

हरिहर गड मागच्या बाजूने
पौराणीक साहीत्यानुसार त्रिंबक हे त्रिसंध्या क्षेत्र होते. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी विष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणि अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर विष्णुने अंताचा म्हणजे पायाचा! पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले कि त्याला मस्तक सापडले, त्यावर केतकीचे फुल होते .या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दिला .त्यावर ब्रम्हदेवानेही रागाने ' तु पर्वत होशील असा शाप दिला, तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष शिवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला. ब्रम्हाला दिलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दिला , अशी ही पद्मपुराणातील कथा
हरीहर म्हटले की त्याचा ब्रम्हगीरीशी येणारा संबंध अटळ आहे. या दोन्ही किल्ल्यात अनेक बाबतीत साम्य आहे
. दोन्हीही डोंगर बेलाग आहेत.
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणि देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड किल्ले बांधण्यात आले . दोन्ही किल्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
एकदा हर्षगडाला इंग्रजांच्या सैन्याने वेढा घेतला होता. किल्ल्यावर दारूगोळ्ळा व शिबंदी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना तो किल्ला सर करता येईना. इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्यातील वास्तू कोसळून दगडाविटांच्या मलब्याखाली दबून किल्ल्यावरील बहुतांशी शिबंदी गारद झाली. पण इतकी हानी होऊनही किल्ला इंग्रजांच्या हाती येण्याची चिन्ह दिसेनात. या गोष्टीचे इंग्रजांना आश्चर्य वाटले. इतका दारूगोळा खर्च करून, अनेक वेळा तोफा डागून निष्पन्न काय, तर फक्त धूर आणि आवाज!
इंग्रजांच्या तोफांच्या सरबत्तीला किल्ल्यावरून प्रत्युत्तर मिळत होते, पण तेही अधूनमधून 'परंतु एक गोष्ट मात्र नियमितपणे सुरू होती आणि ती म्हणजे उष्ट्या पत्रावळ्या! दररोज सकाळी व संध्याकाळी बऱ्याचशा उष्ट्या पत्रावळ्या किल्ल्यावरून खाली पडत होत्या. त्या पत्रावळ्यांच्या संख्येवरून इंग्रज चांगलेच चक्रावून गेले होते. किल्ल्यावर अजून किती शिबंदी आहे याचा अंदाज त्यांना काही केल्या लागत नव्हता. किल्ल्यावरून नित्यनियमाने भिरकावल्या जाणाऱ्या पत्रावळ्यांबरोबरच कधी कधी काही पागोटीही तटबुरुजांवरून वर डोकावत आणि अचानक नाहीशी होत! त्यामुळे इंग्रजांना या सर्व गोष्टींचा काहीच उलगडा होईना.
शेवटी इंग्रज सेनापतीने किल्ल्यातील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याकरिता दोन हुशार हेरांना किल्ल्यावर पाठवले. त्यांनी आडवाटेने कड्याकपाऱ्यांवरून किल्ल्यात प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना समजले की, किल्ल्यात शिबंदी नसून आत फक्त म्हातारेकोतारेच आहेत! तरणेबांड असे कोणीच नाही! थोड्याबहुत स्त्रिया आहेत, त्याच किल्ला झुंजवण्याची कामे करतात! आणि किल्ल्यावर मोठी शिबंदी अजूनही शिल्लक आहे हे भासवण्यासाठी त्या पत्रावळ्यांना पिठले-भात चोपडून खाली भिरकावून देतात! इतकेच नाही, तर अधूनमधून त्या डोक्याला पागोटे गुंडाळून तटबुरुजांवरून खाली डोकावत असतात! मग ते हेर किल्ल्यावरून खाली उतरले आणि इंग्रजांच्या छावणीत येऊन पोहोचले. त्यांनी किल्ल्यावरची सर्व बित्तंबातमी इंग्रज सेनापतीला सांगितली.
भग सेनापतीने काही सैनिक किल्ल्यावर पाठवले. त्यांना किल्ल्यावरून फारसा प्रतिकार झाला नाही. ते किल्ल्यात शिरले आणि मुख्य दरवाजा उघडून किल्ल्याची वाट मोकळी केली. तशी इंग्रजांची फौज भराभर डोंगर चढून वर गेली. इंग्रजांनी हर्षगडात प्रवेश करून तो रीतसर काबीज केला आणि आपला युनियन जॅक त्यावर फडकवला. हर्षगड पडला खरा, पण त्या दुर्दैवी स्त्रियांचे नशीब झोपले, ते कायमचे.
वरील दंतकथेला ऐतिहासिक साधनामधून दुजोरा देणारा पुरावा अजूनही समोर आलेला नाही. 'चतुर आजीबाई' या दंतकथेपेक्षा ही थोडी वेगळी आह
त्यावेळची ५८ किल्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो १५६५ च्या तालीकोटच्या लढाईत विजयनगरचे वैभवशाली राज्य लयास गेले आणि दक्षिण भारताला एकप्रकारचा सांस्कृतीक धक्का बसला .मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रिंबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ निवासी हिंदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टिकु शकला नाही.
शहाजींची १६३६ ला सोडचिठ्ठी दक्षिणेत मुघलांचा प्रवेश तब्बल चाळीस वर्षे रोखला गेला तो मलिक अंबरच्या कडव्या प्रतीकारामुळे यात मलिक अंबरला बहुतांशी काळ ‘स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची मोलाची साथ होती . मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षिणेत आली तर हिंदवी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या विरोधात खटाटोप केला. शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची निझामशाही वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला
मलीक अंबरच्या मृत्युपश्चात निजामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली . निजामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा निझामला पेमगीरी किल्ल्यावर नेऊन गादीवर बसविले .त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे निजाामशाही वाचविण्यासाठी याचना केली , पण त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही.
इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता . शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली किल्ल्यावर हलवली . त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच निजामशाहीचे पारीपत्य केले हा संघर्ष शहाजींनी शरणागती पत्कारल्यानंतर संपुष्टात आला . शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले . त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील निजामशाही प्रदेश देऊन टाकला . त्यात त्रिंबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता . इसवीसन १६३६ ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची . त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हिंदुंचा अंमलाखाली राहीला.
त्रिंंबकगड पडल्यानंतर हरीहर , भास्करगड ,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही .एकदा ताब्यात आल्यानंतर त्रिंबकगड किमान दहा वर्षे तरी मराठ्यांकडे राहीला .शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत :दक्षीणेत उतरला . त्याने आदीलशाही व कुतुबशाहीचा घास गिळला . मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला . १६८२ मध्ये अंकाईचा किल्ला मसलत करुन मिळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशिक जवळच्या लहानशा किल्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला . हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही . असे म्हणतात की , हा संघर्ष दीड किंवा तीन वर्षे तरी चालला असावा
रामसेज युद्धाच्या वेळेस त्रिंबकगडालाही मुघलांचा वेढा पडला . पण त्रिंबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही .याच कालावधीत हरीहरचा किल्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा त्रिंबकगडावरुन रामसेजकडे मराठ्यांना पोहोचणारी रसद मुघलांनी रोखुन धरली . युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला . ते सगळे प्रयत्न विफल ठरत होते . १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा (खोपडा )हा मुघलांना जाऊन मिळाला. त्याने त्रिंनकगडाच्या किल्लेदारास वश करुन गड मिळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दिले ,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दिली . त्याने त्रिंबकगडाच्या किल्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दिले . किल्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले . त्यामुळे राघो खोरा पळुन गेला


२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.
३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे. कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास हर्शेवाडी हा योग्य पर्याय आहे. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे. स्वतःचे वाहन असल्यास तेथुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या हर्शेवाडी गावात कच्च्या रस्त्याने जाता येते अन्यथा निरगुडपाडा येथूनच गड चढण्यास सुरवात करावी. नाशिक-हर्शेवाडी हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे.
. हरिहर ची कातळ समशेर
.डोंगरा पलीकडे उभा असलेला हरि
.हरिहर पहाडी कडा....कातळात खोदलेल्या पायऱ्या येथूनही दिसतायेत पहा

..

![]() |
| हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर |

आश्रम

आश्रमाच्या आवारातील मारुतीराया

श्री
।।श्री गणेशाय नमः।।
धात्रवर्णा
मि शुक्रेधवल शरतिथौशंकरात्म:सु
तः श्रीमन्नारायणख्येगजगिरिरसक्यु क्तसत्शालिवाहोशकेदाण्यूपनामा
हरिहरविलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी ण्यातलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय
या शिलालेखाची साधारणपणे शब्द फोड करता येईल ती अशी…
धात्रवर्णामि= धोतऱ्याच्या फुलांच्या रंगासारखा शुभ्र किंवा चमकदार, शुक्रेधवल= शुक्रधवल ( पांढरेशुभ्र ), शरतिथो= शर म्हणजे बाण, तिथो= तिथि म्हणजे पवित्र दिवस ( कदाचित हा शब्द क्षयतिथि असावा= सूर्योदयानंतर प्रारंभ होणारी तिथी ), शंकरात्म:सुत:= शंकराचा पुत्र, श्रीमन्नारायण= श्रीमन् नारायण, गजगिरिरसक्यु= गज=८ गिरि=७ रस=६ क्=१, सत्शालिवाहोशके= सत्= चांगले, शालिवाहन शके (शक संवत्सर- वर्षगणना ), दाण्यूपनामा= दाण्यू या शब्दातून दानी व दाणी असे दोन वेगवेगळे अर्थ प्रेरित होतात. दानी= दानशूर मनुष्य किंवा धान्यावरील कर वा महसूल गोळा करणारा अधिकारी, दाणीपनामा= दाणी हे उपनाव असलेला, हरिहरविलसत्= हरिहर, विलसत्= तळपणे, चमकणे, शोभून दिसणे, देवताकंसुतीर्थंप्रादद्दी= देवतांच्या कृपेने, तीर्थंप्रादद्दीण्यात= पुण्यमय झालेली भूमी व परिसर, लोकश्रमनीरहरुतेश्रेयसे= ( लोक+श्रम+नीर+हरुते ) लोकांचे श्रम पाण्याने, हृ ( हर् ) – हरण करणे, दूर करणे, नष्ट करणे, श्रेयसे= यशासाठी, मंगलाय= कल्याणासाठी
वरील शब्द फोडीच्या क्रमानुसार वाक्यरचना न धरता शिलालेखातून खालील अर्थ निघतो ….
श्री. श्री गणेशाला वंदन असो. धातृ नाम संवत्सरात ज्येष्ठ महिना असताना शुद्ध पक्ष पंचमी तिथीला दाणी उपनावाने विख्यात असलेल्या शंकराचा मुलगा श्रीमन् नारायण, यांनी शालिवाहन शके १६७८ (चवथी ओळ- गज = ८, गिरि = ७, रस = ६, क् = १ याप्रमाणे ८७६१ ही संख्या येते मात्र शक मांडताना वामतो गती पध्दतीनुसार-१६७८) हरिहर पर्वतावर विलास करणाऱ्या देवतांच्या नावाने दीनजनांचा त्रास कमी करण्यास आणि आर्त लोकांचे श्रमहरण करून पुण्यप्राप्तीसाठी या तिर्थाची निर्मिती केली.
शिलालेखाचे वाचन कसे केले ?
हरीहरचा शिलालेख म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातले एक खुले पान ! . उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता,‘माझ्या अंतरंगात या, किल्ला डोळे भरुन पाहा, लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली . त्याने त्याच्या परीने तो काढण्याचा प्रयत्न केला . पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले . वर्षानुवर्ष या शिलालेखाची अक्षरे झीजु लागली . त्यातील काही तर उध्वस्त झाली . हरीहर किल्ल्याच्या उत्तर माचीवर भल्या मोठ्या पुष्कर्णीवरचा हा शिलालेख फार अगोदर पासुन बघण्याचा योग यायचा तो श्रावणातल्या ४० मैल अंतराच्या ब्रम्हगिरी -हरीहर प्रदक्षिणेच्या निमीत्ताने जुने नाशिक भागातली मंडळी ही प्रदक्षिणा नित्यनियमाने करत असतात. .अनेक वर्षे हा खटाटोप चालला. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच सर्वांच्या ठायी त्याचे महत्व होते .
शिलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता. .छायाचित्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता काही अक्षरे अजिबत लागत नव्हती. काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही उध्वस्त झाल्याचे जाणवले. शिलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गिरवली. त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली . मग त्याची छायाचित्रे घेतली . नंतर शिलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या विटेच्या रंगाने अक्षरे गिरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली .अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला . त्याची टीपणे तयार केली घरी परतल्यानंतर छायाचित्रांचे आवलोकन केले तेव्हा शक ,संवत्सर वाचता आले . दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम हे अक्षर पटकन वाचता येते. अभ्यासकांनी ते वाचले आहे .त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती . पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता .हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता
.

![]() |
| शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे |
. सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात ,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते . त्या खालचे अक्षरही लागत नव्हते . शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली . शक संवत्सर कळाले होते , त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण ...नारायण शंकर ...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते त्रिंबकचे महत्व मराठ्यांच्या राजकारणात अनन्यसाधारण होते . म्हणजे त्रिंबकगड मुघलांकडे असला तरी शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत . नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रिंबकराजाच्या भेटीस यायचे . गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत . आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनी बांधुन ठेवलेली मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले . त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला .हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते . हे काम सुरु असतानाच हरीहर किल्याच्या उत्तर माचीवर विस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आली असावी . ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती . पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शिलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते . इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते. .अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शिलालेखाचे वाचन असल्याची माहीती मिळाली , त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते.
जी अक्षरे लागत नव्हती याकरीता काही जुन्या छायाचित्रांचा संदर्भ मिळवील . या कामी नाशिकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचित्राची बरीच मदत झाली . पण ते छायाचित्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दिल्यानंतरचे होते . तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली . शिलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दिसत होते .ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे . आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली . शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले . खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता . हा पनामा काय असावा ?यावर खल सुरु असताना नाशिकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मिळाली . मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला - दाण्युपनामा ही उकल झाली
.शिलालेखावरचे शक व तिथी मिळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते . पंधराच दिवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शिलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली . जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले . अशा प्रकारे हरीहराच्या शिलालेखाचे पुर्ण वाचन झाले . राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दिले.
हा शिलालेख शके १६७८ म्हणजे सन १७५६ काळातील असून तेंव्हा नानासाहेब हे पेशवे पदावर होते. नारायण शंकर दाणी म्हणजेच नारोशंकर हे पेशव्यांचे बिनीचे म्हणजे आघाडीचे किंवा पहिल्या फळीतील सरदार होते.
नारोशंकर हे नांव आलेच आहे तर त्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेवू.
कोण होते नारोशंकर
वेगवेगळ्या कालखंडात नाशिक हे महत्वाच्या राजवटींच्या राजधानीचे केंद्र होते .जसे यादव, अभीर ,राष्ट्रकुट, त्रैकुटक , बागुल इत्यादी .तद्वताच नाशिक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते . सरदार रास्ते , सरदार विंचुरकर , सरदार राजेबहाद्दर , पवार घराणे,अशी काही नावे आजच्या पिढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलेल्या वास्तु ,मंदीरे आदींशी निगडीत नावांमुळे .गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसिद्ध आहे .हे रामेश्वराचे शिवालय १७४७ साली बांधण्यात आले .त्यास १८ लाख रुपये खर्च आला .उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते . या मंदीराची भली मोठी घंटा नाशिकची सांस्कृतीक ओळख बनली आहे . नाशिक महानगरपालीकेच्या मानचिन्हात तीचा वापर करण्यात आला आहे.
सन १७२० पर्यंत ते उदाजी पवारांच्या हाताखाली शिलेदार होते. या काळात सन १७२८ मध्ये मराठ्यांच्या माळव्यात हालचाल सुरू केल्यात यात त्यांचा सहभाग होता. थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी सन १७२९ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम सुरू केली त्यात नारोशंकर सहभागी होते. त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. सन १७३० नंतर त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकर यांच्या पदरी असल्याबद्दलचा सापडतो. त्यांच्या सैन्यात राहून नारोशंकराने काही लहान मोठ्या लढायात भाग घेऊन पराक्रम गाजवला. मल्हाररावांनी नारोशंकराची हुशारी व कर्तबगारी ओळखून त्यांना वरच्या हुद्याच्या जागाही दिल्यात. पुढे मल्हाररावांच्या शिफारशीवरून थोरल्या बाजीरावाने नारोशंकराला इंदूरचा सुभेदार नेमले.
बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने थोरल्या बाजीरावाने मदत केली म्हणून मराठ्यांना बुंदेलखंडाचा एक भाग देऊन टाकला. त्या भागातील नवास या भांडखोर जमातीने बंडाळी माजवून चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देणं बंद केले. त्यांच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी मल्हारराव किसन व ज्योतिबा शिंदे यांना रवाना केले. परंतु या कामी त्यांना अपयश आले. तेंव्हा होळकरांच्या सल्ल्याने पेशव्यांनी ही कामगिरी नारोशंकरावर सोपविली. नारोशंकरांनी आपल्या सैन्याच्या मदतीने नवास जमातीचे बंड मोडून काढले व चौथाई सुरळीत केली. त्यानंतर पेशव्यांनी नारोशंकराला ओरिसा प्रांतातील राजावर स्वारीस पाठविले. नारोशंकरांनी त्या स्वारीत अकरा लाख रुपये महसुलाचा भाग मिळविला. पेशवे खुष झाले. त्यांनी त्यांना झाशीचे सुभेदार नेमले व राजे ही पदवी दिली. .नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता .
सन १७४२ साली पेशव्यांनी नारोशंकराची रवानगी ओर्छा राज्यावर केली. झाशी जवळील ओर्छा हे छोटे राज्य. तेथील मुसलमान राजाने पेशव्यांविरुद्ध पुंडाई केली होती. नारोशंकर ओर्छावर चालून गेले. त्यांनी त्या राजाला कैद करून शृंखला बांधून झाशीच्या किल्ल्यात ठेवले व ओर्छा राज्यावरुन गाढवांचा नांगर फिरविला. सर्व ओर्छा राज्यावर पेशव्यांचा अंमल झाला. नंतर राजाशी नारोशंकरांनी तह केला. झाशीचा किल्ला मराठ्यांना मिळाला. त्या किल्ल्याखाली नारोशंकरांनी गाव वसविले. ते गाव म्हणजेच आजचे झाशी शहर. सन १७४२ ते १७५६ पर्यंत नारोशंकराचा अंमल झाशीवर होता. झाशी शहरात अजूनही नारोशंकर तळ या नावाचा एक भाग आहे. झाशीच्या सुभेदारीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी झाशीचे वैभव वाढविले. नारोशंकर १७४२ ते १७५९ असे पुढची पंधरा वर्षे झांसीचे सुभेदार होते . (मराठी विश्वकोष खंड ६) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली. तिकडे झासी शहर वसत होते,पेठा निर्माण होत होत्या, किल्ला मजबुत केला जात होता . इकडे पेशव्यांना एक छदामही मिळत नव्हता . त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दिले .
त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली. इतकेच नव्हे तर पेशव्यांकडून जी जी कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात येई ती ते चोख रितीने बजावत असत. महसूलाच्या रकमा वसूल करण्यात त्यांची कामगिरी विशेष असे. यामुळे पेशवे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना मोत्याचा चौकडा दिला. हा चौकडा नारोशंकर नेहमी वापरीत. त्यामुळे त्यांना गमतीने मोतीवाले नारोशंकर असे म्हटले जाई.
सन १७४७ मध्ये त्यांनी नाशिक पंचवटी परिसरातील गोदावरी तटावर रामेश्वर मंदिर बांधले.व पोर्तुगीजांकडून एक भली मोठी घंटा घेऊन ती मंदिरावर बांधली आजही तिला नारोशंकरी घंटा असे म्हणतात. अहमदशाह अब्दालीने ११ ऑगस्ट १७५७ ला दिल्लीवर दुसऱ्यांदा व उत्तरेत चौथी स्वारी केली. त्याने दिल्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दिल्लीच्या राजवटीची कमान दिली .मुघल बादशाह आलमगीर ( दुसरा ) हा अब्दालीचा मांडलीक बनवीला गेला. वार्षीक २० लाखाची खंडणी निश्चीत करण्यात आली. अब्दाली माघारी फिरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली . तोवर अब्दाली निघुन गेला होता.मराठी फौजांनी दिल्ली चहुकडुन घेरली. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी निर्णायक विजय मिळवुन लाल किल्ल्यात प्रवेश मिळवला. दिल्लीत सदाशिवराव भाऊंनी दरबार भरवला. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली. त्यांना दिल्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या कामगिरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दिली. पुढे दक्षिणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली . घर बांधले तरी ते दीर्घकळ टिकत नाही,असा विचार करुन त्यांनी दिल्लीहुन कुरैशी या प्रशिक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दिल्लीच्या किल्ल्यासारखा भव्य असा किल्ला बांधला. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले. तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले .किल्ला पुरा झाला तेव्हा नारोशंकर मुघलांना फितुर असल्याची दरबारात कागाळी झाली आणि श्रीमंतांनी जासुद पाठवुन किल्ला खाली करुन देण्याचे फर्मान दिले. तोवर किल्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते . नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतिपादन करुन किल्ला खाली करुन दिला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या निष्ठेची प्रचिती आली.
मालेगावचा किल्ला बांधला त्याच्या आसपासची तारीख हरीहर शिलालेखावर आढळते. इतका सुबक शिलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही .पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे .यावरुन मालेगावचा किल्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो .पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले . झासीवरुन नारोशंकरांस परत बोलावल्यानंतर त्यांची हरीहरवर कुठली कामगीरी झाली असावी का ? ज्यामुळे त्यांनी किल्ल्याच्या उत्तर माचीवर विशाल आकाराची पुष्कर्णी बांधली. हा माचीचा परीसर किल्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा. हरीहर किल्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने किल्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर .तिथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात . हरीहर किल्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
नारोशंकरांची महत्वपुर्ण कामगीरी ही उत्तर भारतात झाल्याने त्याच्या नावानिशी हरीहरावर इतके माठे बांधकाम करण्यास पेशव्यांनी उगाचच परवानगी देण्याची शक्यता कमी दिसते. पेशवाईतली किंवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो मालेगाव येथील वकील एडव्होकेट व डॉक्टर डी.एस. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्दुर हे पुस्तक प्रकाशित केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सन १७५७ नंतर त्यांची रवानगी गुजरात प्रांतात झाली. तेथे त्यांनी गुजरातसह सावनूर लढ्यातही पराक्रम गाजवले. तेथून ते दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीने उत्तरेला गेलेत.
अहमदशा अब्दाली याने इ. स. १७५६ मध्ये भारतावर चौथ्यांदा स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी पेशव्यांनी राघोबादादास पाठविले. मात्र राघोबादादा उत्तरेत पोचण्यापूर्वीच अहमदशहा निघून गेला होता. सन १७६० मध्ये अब्दाली पाचव्यांदा भारतावर स्वारी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊस आज्ञा केली व मुलगा विश्वासराव यास बरोबर दिले. अब्दाली पूर्ण तयारीनिशी आला होता. याही मोहीमेत नारोशंकर सामील होते कारण उत्तरेकडे ते बराच काळ असल्याने त्यांना या प्रदेशाची माहिती होती. चौथ्या स्वारीत अहमदशाने दिल्लीवर कबजा मिळविला होता. अब्दालीच्या देखत दिल्लीला पेशव्यांनी वेढा दिला आणि दिल्ली घेतली. सदाशिवभाऊंना धीर आला आता मराठ्यांची हिंम्मतही वाढली होती. या प्रित्यर्थ दरबार भरविला गेला. या दरबारात पेशव्यांनी नारोशंकरास ‘राजेबहाद्दूर’ ही पदवी दिली. शिवाय पाच हजार सैन्य व पेशव्यांचा ५/६ लाखांचा खजिनाही दिला यासाठी की त्याने दिल्ली शहर सांभाळावे. तसेच शिंद्यांनीही पाच सहा लाख असा एकूण चाळीस लाखांचा खजिना त्यांच्या हवाली केला.
१४ जानेवारी १७६१, सकाळी १० वाजता युध्दाला तोंड फुटले. दुपारी विश्वासरावाला गोळी लागून ते घोड्यावरुन खाली पडले. त्यामुळे सदाशिवरावभाऊ गोंधळून गेले. त्यांचे देहभान सुटले व ते गर्दीत बघताबघता दिसेनासे झालेत. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड यांनी युद्धातून पाय काढला. नारोशंकर वगैरे दिल्लीच्या किल्लयात होते. होळकरांनी नारोशंकरास दिल्लीतून निघून जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील मंडळी गुरुवारपर्यंत धीर धरून होती. संध्याकाळी होळकर यांचे दिवाण गंगोबा तात्या पळत आले व वर्तमान सांगितले व सल्ला दिला की “ज्यास जो मार्ग भगवंत देईल, त्या मार्गे निघोन जावे.” त्यामुळे खजिना काढण्यास अनुकुल सापडले नाही. सैन्य इतके भेदरले की दिल्लीतील सैन्याची पळापळ सुरू झाली. होळकर, नारोशंकर, पवार हे पानिपतहून पळून आले. त्यांचे सरंजाम पेशव्यांनी जप्त केले. पळून जाण्याऐवजी नारोशंकर दिल्लीस दडून बसला असते तर खजिना वाचला असता. पळणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देता आले असते व अब्दालीच्या सैन्याला अटकाव करता आला असता पण नारोशंकराने होळकरांच्या सांगण्यावरून पळ काढला व पेशव्यांची गैरमर्जी ओढवून घेतली.
पानिपतानंतर लवकरच पुत्र व भाऊंच्या वियोगाने नानासाहेबांनी प्राण सोडला व राघोबादादाने सन १७६१ मध्ये पेशवाईचा कारभार आपल्या हाती घेतला. सन १७६२ मध्ये नारोशंकरांना प्रतिनिधीचे काम देण्यात आले. पुढे ते महादजी शिंदे यांच्या पदरी दिवाणगिरी करीत. पण ती रघुनाथरावांच्यामुळे गेल्याने प्रतिनिधी भवानराव यांचेकडे कारभारी म्हणून नोकरीस असताना इ.स.१७७५ च्या २३ जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना रघुनाथराव (मालेगाव शाखा) व त्रिंबकराव (नाशिक शाखा) अशी दोन मुले होती.
श्री चित्रावशास्त्रीलिखित मध्ययुगीन चारित्राकोशात असा उल्लेख आढळतो की दिल्लीस असताना एका शिकारीच्या प्रसंगी त्याने बादशहाचे प्राण वाचवले. यावर बादशहाने संतुष्ट होऊन त्यांना राजेबहादूर हा किताब व मालेगाव हा गाव जहागीर देऊन इतर गावे सरंजामादाखल दिलीत.
भीमसेन कुलकर्णी संपादित पेशव्यांच्या बखरीत असाही उल्लेख मिळतो की सन १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने बऱ्याच जहागिऱ्या वाटल्या. त्या वेळी नारोशंकरांनी मालेगावची जहागिरी मागितली. भाऊंनी ती दिली. या जहागिरीत मालेगावातील एकुण आठ गाव व निंबायती परगणा यांचा समावेश होता. अशा रितीने नारोशंकराचा मालेगांव शहराशी प्रथम संबंध आला.
नारोशंकर हे उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर होते. पानिपत युद्धानंतर त्यांनी मालेगावला किल्ला बांधण्यासाठी घेतला. तत्पुर्वी मालेगाव हे एक खेडे होते. तेथे किल्लाही अस्तित्वात नव्हता. गिरणा व मोसम अथवा मोक्षगंगा या नद्यांच्या संगमापासून उत्तरेला सुमारे एक मैल अंतरावर हा मालेगांवचा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्याला लागूनच मालेगांव शहर वसले आहे. हा किल्ला खानदेशकी किल्ली म्हणूनही प्रसिद्ध होता. किल्ला पुर्ण होण्यास दहा वर्षे लागली. नारोशंकराने मालेगावला येऊन किल्ला बांधला असला तरी स्वत: येथे कधीही वास्तव्यास नव्हते.
शिलालेखानिमीत्ताने इतिहासात डोकावून झाल्यानंतर पुन्हा गड चढाई सुरु ठेवुया.
हे सर्व पाहुन मुळ वाटेवर येऊन काही अंतर गेल्यावर आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. निरगुडपाडा येथुन येणारी वाट या पठारावर आपल्याला येऊन मिळते. या ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत. येथुन समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. येथे येणाऱ्या गर्दीमुळे सध्या गावकऱ्यांनी येथे चहा-पाणी,सरबत, जेवण-नाश्ता याची दहा बारा दुकाने थाटली आहेत. या दुकानामधुन वाट काढत मळलेल्या वाटेने दहा- पंधरा मिनिटे समोरचा चढ चढत पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत गेलो कि आपण हरिहर गडाच्या कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यां असलेल्या लहानशा खिंडीत पोहचतो. या पायऱ्या सुरु होण्यापुर्वी त्याच्या विरुध्द दिशेला खालील बाजुस एक खडकात कोरलेले पाण्याचे लहानसे टाके आहे. किल्ल्यावर जाणारा हा ७० अंशी कोनात कोरलेला सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग व त्यावरील दरवाजा हा पहाताक्षणी त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. १८१८सालच्या मराठा-इंग्रज लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हरिहरगड जिंकला. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा या पाय-या बघून तो आश्चर्यचकित झाला. जिंकलेल्या किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते पण हरिहर किल्ल्याच्या या पाय-यांनी कॅप्टन ब्रिग्ज भारावला. त्याने हरिहरगड जिंकला पण त्याच्या सुंदर पायरीमार्गाला मात्र हात लावला नाही. दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…
“Truly wonderful! ‘Words’ are not be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly
straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”
प्राचिन स्थापत्य शास्त्राचा उत्तुंग आविष्कार असलेल्या या गडोत्तमाच्या मुळाशी सुरूंग लाऊन ठिक-या-ठिक-या उडवण्याच्या कामगिरीवर गोरा कॅप्टन ब्रिग्ज निघाला देखील. अशा अघोरी कामावर नेमणूक झाली असली तरी त्याच्या कलासक्त वृत्तीला खरंतर आपण भटक्यांनी सलामच केला पाहिजे. हे येडपट त्यावेळी या पायऱ्यांच्या नादाने खुळावलं नसतं तर आज हरिहराचा उध्वस्त सांगाडा पाहून आपल्याला वेड लागायची वेळ नक्कीच आली असती.
किल्ले हरिहरानेही त्यावेळी केलेली लबाडी तर पहा. आपल्या अमोघ मोहिनी अस्त्राच्या लपेट्यात टोपीकर कॅप्टन ब्रिग्जला अस्सा काही लपेटला कि हा गड मुळापासून उखडून टाकायला आलोय हे विसरून ते खुळं गडाचं गुणगान करत परत गेलं. एका फाकड्या लष्करी अधिकाऱ्याची हि कथा... तर तुम्ही आम्ही किस झाडकि पत्ती?
| उतरणीच्या वेळेस असलेली हा गर्दी |
![]() |
| एका अवघड वळणा |
आता या पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्न मनात उभा रहातो. पण प्रत्यक्षात मनाचा हिय्या करून एक एका पायरीशी आपण सलगी करतो तेंव्हा त्या पायऱ्यांच्या दोन्ही टोकाशी हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या कोरल्याचे लक्षात येते. आणि जीव भांड्यात पडतो. चढून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची विलक्षण भयावह घालमेल लक्षात घेऊन पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हाताची बोटं मजबूतीनं रुतवण्यासाठी खोबण्यांचे खोल आधार ईथे कोरुन ठेवलेत. काळ्याकुट्ट, दगडातून खोदलेल्या ओबड-धोबड पायऱ्यांनादेखील कमालीचं सौंदर्य असतं हे इथं आल्यावर कळतं. खडक फोडून तराशलेल्या या पायऱ्या... बलाकि खुबसुरत आहेत. यांच्या नजाकतीपुढे तर एखाद्या अय्याश, गुलाबी रंमहालाच्या, बारीक, नक्षीदार कलाकुसरीच्या संगेमरमरी तेजाच्या महालांनीही झक्कत मान खाली घालावी. असा हा गडसोपान गर्दीने ओसंडत असला तरी प्रत्येक पायरी न पायरी बारकाईने न्याहाळायची. जसजशा आपण पायऱ्या वर चढत जातो तसतसा आपला आत्मविश्वासही वाढत जातो. या जिन्यावर हाता-पायांचा भरपूर वापर झाल्याने हा खट्याळ गड आपल्याला पुन्हा एकदा उत्क्रांतीच्याही आधीच्या काळात पाठवून नराचा पुरता वा'नर बनवून सोडतो.
| भीरभीर नजर अनं पायऱ्यातल्याखोबण्या |
| दगडातुन कोरलेला वैशीष्ट्यपुर्णप्रवेश मार्ग |
| बालेकील्ल्यावर कोरलेलीअक्षरे व चीन्हे |
खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसतात. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...अखेर ९०-९५ सोपानाची वाट चढताना स्वर्ग सुखाचा आनंद घेत घेत आपण महाद्वाराजवळ पोहोचतो आणि सुटलो बुवा एकदाचे करीत प्रवेशद्वारातून आत प्रवेशतो. हा दरवाजा छोटेखानी पण देखण्या स्वरूपाचा आहे. इथ वर येई पर्यंत मागे वळून पहाण्याचे घाडस होत नाही. मात्र येथून खाली नजर फेकताच एवढ्या चिंचोळ्या, अरूंद व खड्या जिन्याच्या खोल दरीतून वर आल्याबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची व पुढे निघायचे. छोटेखानीच पण मोठ्या मानाचा मानकरी असलेल्या महाद्वाराच्या दर्शनाने उर भरून येतो. पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतलेल्या फिरंगी कॅप्टन ब्रिग्जला जाता-जाता गडाचं हे एकमेव प्रवेशद्वार सहज उद्ध्वस्त करता येण्यासारखं होतं. पण हा गोरा साहेब जसा या सोपानाच्या प्रेमात पडला होता तस्साच तो या महाद्वारातही गुंतला होता. त्याच्या रसिक मनाने हे पक्कं जाणलं होतं कि या पायऱ्यांशिवाय महाद्वाराला आणि महाद्वाराशिवाय पायऱ्यांना शोभा नाहीच. म्हणूनच तो उदार फिरंगी कॅप्टन, तृप्त होऊन आल्या वाटेने परत गेला.
पायऱ्या संपताच दिसतो तो पहिला दरवाजा
प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्या
गडाचं हे महाद्वार असलं तरी इतरांसारखं हे अवाढव्य अन् प्रशस्त नाही. तर आत झुकूनच प्रवेश करावा लागतो, इतकं हे लहान आहे प्राचीन मांदिरं, लेणी आणि गडांचे दरवाजे कमी उंचीचे ठेवण्याची हि पद्धत कदाचित वाकून गेल्यामुळे त्या महान वास्तूदेवतेला, त्यांच्या रचनाकारांना नकळत नमस्कार तर घडतोच पण आपलीही 'उंची' समजते .
आत प्रवेश करताच उजवीकडे दिसतो तो शेंदूर फासलेला गणपती
मारूतीराया
तत्पूर्वी गडाच्या प्रवेशव्दारा शेजारी उजव्याहाती कातळात स्थानापन्न असलेल्या शेंदूरचर्चित गणेशाचे व मारुतीरायाचे दर्शन घेण्यास विसरायचे नाही. त्या शेजारी अस्पष्ट असे काही कोरून ठेवलेले आहे. दरवाज्याची कमान व तटाबुरुजावरील फांजीचे बांधकाम विटांनी केलेले आहे.
![]() |
| नेढे |

खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.

| उत्तरबाजुच्या कड्यातकोसळणाऱ्या पायऱ्या |
या दरवाजाच्या पुढे डोंगरांची कातळ कपार खोदून आडवी वाट तयार केली आहे. ह्या मार्गाची उंची जास्त नसल्यामुळे थोडे वाकूनच हा टप्पा पार करावा लागतो. उजव्या हाती गडाचा काताळ, डाव्या हाती पाताळ दरी आणि वरच्या बाजूस कपाळमोक्ष करणारा काताळ अश्या अद्भुत मार्गाने आपला पुढचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी या मार्गाचा उल्लेख “रॉक कट् गॅलरी” (Rock Cut Gallery of Harihar Fort) असा केला. या सज्जात आपण डोकं आणि तोल सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं. या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.एखाद्या भ्रमर भुंग्याने मजबूत लाकूड पोखरून आपल्या पिढ्यांची वहिवाट सुकर करावी अगदी तश्शाच पद्धतीने ईथून पुढची गडवाट त्या बेनाम शिल्पकारांनी जीव ओतून कोरलेली दिसते. या वाटचालीत आपण त्यांच्या या अजरामर कलाकृतीची तारीफ करण्यात कंजुषी मात्र करायची नाही. अंग चोरत पुढे गेल्यानंतर काताळात कोरलेले आणखी दोन दरवाजे लागतात. हे पार केल्यावर परत पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. याच्या दोन्ही बाजूस आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत. तो पार केला की आपण अंतिम प्रवेशद्वारापाशी येतो. हा संपूर्ण १३० पायऱ्यांचा अद्भुत प्रवास कधी गुहेतून तर कधी नाळेतून झालेला असल्यामुळे कायम स्मरणात राहतो.
गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?
| घुमटाकृती वीटकाम |
दुसरे प्रवेशद्वार
या मार्गाने पुढे गेल्यावर कातळातच खोदलेले दोन पश्चिमाभिमुखी दरवाजे पार करताना साधारण ३०-४० पाय-या लागतात. या जिन्याच्या दोन्ही बाजूंस आधारासाठी असलेल्या खोबणीची मदत घेत आपण गडाच्या अंतिम दरवाजा असलेल्या भुयारी मार्गात येऊन पोहोचतो. हा जिना सांभाळून चढून जायचं आणि दरवाजातून खालून वर चढत हरिहर किल्ल्याचा चक्क लहानशा विटांनी बांधून काढलेल्या मोडक्या घुमटीचं छत असलेल्या हा शेवटचा छोटा दरवाजा पार केल्यावर गडावर थाटात प्रवेश करायचा.. या दरवाजावर असलेला विटांचा घुमट मोठया प्रमाणात ढासळलेला असुन या विटा दरवाजातच पसरलेल्या आहेत.
या मोडकळीस आलेल्या घुमटीची रचना आपल्याला दाद द्यायलाच लावते. तीच्याकडे निरखुन पहात असतांनाच एक उर्दू शेरवजा कहावत आठवली. अर्ज है... “खंडहर बयाँ कर रहें हैं, के इमारत कभी बुलंद थी”... पुढच्या पावसाळ्यात हि असेल याची का… ही शाश्वती नाही.
एका मोठ्या भुलभुलय्यातून सहीसलामत सुटून जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपण गडमाथ्यावर अवतरतो. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःला एक मस्त शाब्बासकि बिनधास्त देऊन टाकायची. शांतपणे बसून धपापणारा श्वास एकसुरी करून घ्यायचा. थोडं पाणी तोंडावर मारायचं आणि थोडंसं आतही सोडायचं. पूर्व-पश्चिम पसरलेला चिंचोळ्या माथ्याचा गड उभा-आडवा नापायला फार वेळ लागत नाही. दरवाजाच्या पुढील भागात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष असुन ते पार केले कि आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो.
साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन त्याचा विस्तार १६ एकरात सामावलेला आहे. आकाशातून पहिले असता या किल्ल्याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४४५ फुट उंच असून गडाला चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची गरज भासली नाही. गडावर येण्यासाठी आपण आलो ती एकमेव पायऱ्यांची वाट आहे.
दरवाजातून काही अंतर पुढे आल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीत कड्यालगत कोरलेल्या उध्वस्त दरवाज्याचे व प्रवेशमार्गाचे अवशेष दिसतात परंतु या दरवाज्यापर्यंत जाणारी वाट उध्वस्त झाली आहे. हा गडाच्या मूळ बांधकामातील दरवाजा कालांतराने दरड कोसळुन उध्वस्त झाला असावा. या दरवाजाच्या वरील बाजुस एक ५० फुट खोल कोठार आहे पण तिथे उतरण्यासाठी दोर सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा हे कोठार वरूनच पहावे लागते.
कोठाराच्या वरील बाजूस एक खडकात कोरलेले बुजलेले टाके आहे. ते पाहुन पुढे गेल्यावर आपल्याला एका मोठया वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि बहुदा गडाची सदर अथवा वाडा असावा. या वाटेवर डाव्या बाजुला खडकात कोरलेली एक गुहा दिसुन येते.

गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं
![]() |
| धुक्याची चादर |
![]() |
| तलाव आणि मंदिर |

ती पार करून पुढे गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची तीन मोठी टाकी व एक प्रशस्त तलाव दिसतो. या तलावाला पश्चिमेकडे दगडी भिंत बांधून पाणी अडविले असुन तलावाच्या काठावर लोखंडी देव्हाऱ्यात हनुमंताची मुर्ती ठेवलेली आहे.
| हनुमानाचे मंदिर |


![]() |
| हर हर महादेव |
![]() |
| शंभू महादेव |

हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
तलावाच्या काठावर दोन लहान चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी तर दुसऱ्या चौथऱ्यावर मारुतीची भग्न मूर्ती ठेवलेली आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे निघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तूकडे आपला मोर्चा न्यायचा.
तलावाच्या उजव्या बाजुला असलेल्या उंबराच्या झाडाखाली एक खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील व तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तलावाकडून समोरच आपल्याला एक घुमटाकार माथा असलेली दारुगोळा कोठाराची दगडी इमारत दिसते. तलावाकडून या इमारतीकडे जाताना वाटेत डाव्या बाजुला एक साचपाण्याचा खोदीव तलाव दिसुन येतो. या तलावाच्या मध्यभागी खडकात खोदलेले चौकोनी टाके आहे.
![]() |
| गोल घुमटाकार इमारत आणि टाक्या |
![]() |
| गडावर पाण्याच्या ५ टाक्या आहेत |
ते पाहुन पुढे आल्यावर डाव्या बाजुला दुसरे खडकात खोदलेले खांब टाके आहे. सध्या हे टाके मातीने पुर्णपणे भरून गेले आहे. या परिसरात असलेले तुरळक वाड्याचे अवशेष व इतर उध्वस्त बांधकाम पहात आपण ३० x १२ फूट लांबरुंद अशा दगडी कोठाराकडे पोहोचतो. दारूगोळा कोठाराची हि वास्तू गडावरील छत शिल्लक असलेली एकमेव इमारत आहे. या कोठाराचे आत दोन भाग केलेले असुन आत शिरण्यासाठी एक लहान खिडकीवजा दरवाजा आहे. या कोठीत दिवसासुद्धा काळोख असल्याने कोठाराच्या भिंतीत एक मोठी लोखंडी पणती ठोकलेली दिसुन येते. गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा. या कोठारात १० ते १२ जण सहज राहु शकतात.
कोठाराच्या पुढील बाजूस खडकात खोदलेली ५ लहानमोठी टाकी असुन मागील बाजूस एक मोठे टाके व त्यामागे एक लहान तळे खोदलेले आहे. यात एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथे डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. दारुकोठार आणि आजूबाजूचा परिसर भटकून झाल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे टेकडीकडे निघायचे. टेकडीवर जाणारी वाट थोडी निसरडी असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते. दारूगोळा कोठारा समोर असलेली ६०-७० फूट उंचीची टेकडी म्हणजे हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. या टेकडीवर जाताना आपल्याला शेवटचा कातळटप्पा चढून पार करावा लागतो. माथ्यावर ध्वजस्तंभाची जागा असुन येथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा असलेल्या या ठिकाणावरून संपुर्ण हरीहर किल्ला तसेच त्रिबक डोंगररांगेत उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला कावनाई व त्रिंगलवाडी पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यामागे ब्रह्मगिरी किल्ला तर पश्चिमेला फणी डोंगर, बसगड, उतवड, अंजनेरी किल्ला, वैतरणा जलाशय इ. परिसर दिसतो. घड्याळाच्या दिशेने थोड्या उजवीकडे नजर फिरवली तर वैतरणेच्या प्रचंड जलाशयाने समृद्ध झालेलं विस्तीर्ण खोरं दिसतं. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा घेरा निमुळता असला तरी वर असलेल्या अवशेषांमुळे संपूर्ण गडफेरी करण्यास दोन तास लागतात.
| बालेकील्ला |
| अनाम वीराची समाधी |
तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात. गड पाहून परत उतरताना मात्र काळजीपूर्वक उतरावे लागते
![]() |
| फणी |
.पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ जमा होत असल्याने चढताना किंवा उतरताना पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाणे टाळावे.

हरिहरगड आणि सुरक्षा :-
– त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.
– आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.
– आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.
हरिहर शिलालेख
हरिहर शिलालेख
तो भीषण आहे.तो रौद्र आहे.तो सुंदर आहे.तो कधी कुणा समोर व्यक्त होत नाही. प्रयत्न केला तरी तो ताकास तुर लागु देत नाही. यामुळेच त्र्यंबकेश्वर रांगेतला हरीहर कील्ला इतीहासातली एक गुढरम्य कथा बनला आहे. आज मात्र तो थोडा मेहेरबान झाला. त्याच्या जुन्या शीलालेखाचे गुपीत उलगडले आणी हरीहराच्या इतीहासातले एक मानाचे पान नजरेस पडले.
, इतीहासाच्या पुस्तकातले एक खुले पान
. उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता
,‘माझ्या अंतरंगात या
...कील्ला डोळे भरुन पाहा
...लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा
’. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो
.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते
. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली
. त्याने त्याच्या परीने
. तो काढण्याचा प्रयत्न केला
. पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले
.पीढी दर पीढी या शीलालेखाची अक्षरे झीजु लागली
. त्यातील काही तर क्षतीग्रस्त झाली
.
. त्याने हुरुप वाढला होता
.आता हरीहर कील्ल्याच्या शीलालेखाची माहीती मीळवावी असे मनात आले
. त्यावरुन
,या शीलालेखाचे वाचन कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे
,याचा शोध सुरु झाला
. सर्वात प्रथम मुंबईचे प्रसीद्ध ब्लॉगर तथा सतीशीळा
, वीरगळ
, गद्देगळाचे अभ्यासक पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा या ब्लॉगमध्ये
, हरीहर शीलालेख भागश
:वाचायला मीळाला
. पुण्यातील संशोधक महेश तेंडुलकर यांनी
,मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात या ६८८ पानी पुस्तकात या शीलालेखाचे
,त्यांना जेवढे शब्द वाचता आले तीतकेच त्यांनीनमुद केले होते
.
![]() |
| हरीहर पुष्कर्णी |
-हरीहर प्रदक्षीणेच्या नीमीत्ताने
. आमची जुने नासीक भागातली मंडळी ही प्रदक्षीणा नीत्य नीयमाने करत असु
.अनेक वर्षे हा खटाटोप चालला
. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच आमच्या ठायी त्याचे महत्व होते
. सुबक दगडात घडवीलेल्या या पुष्कर्णीवर गणपतीचे एक पुर्वाभीमुख शील्प कारले आहे
.त्यावरुन त्यास गणेश कुंड संबोधले जायचे
. त्रींबकची मंडळी यास हरीहरवरचे कुशावर्त संबोधत. त्र्यंबकेश्वर पासुन पावसात भीजत
,इथवर अनवाणी चालत आल्यानंत या पुष्कर्णीत पोहण्याची फार मजा यायची
. सगळा शीण नीघुन जायचा
. शेंदुर फासल्यामुळे शीलालेखावरची अक्षरे स्पष्टपणे वाचता येत नसायची
. ती काळजीपुर्वक वाचण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता
.
![]() |
| शीलालेखाचे वाचन करतानाराजेश दीक्षीत |
.परंपरा
. आजोबांकडुन शीकलेले ज्योतीष व गणीत
. त्र्यंबकेश्वर परीसराच्या इतीहसाबद्दलची आस्था
. धार्मीक व ऐतीहासीक वीषयांवरील पुस्तके
, लेख
,चर्चासत्र आदींत नीयमीत सहभाग या गोष्टींमुळे मीत्रवर्य राजेश दीक्षीतने हरीहर शीलालेख वाचनाचे शीवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शवीली
.शीलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता
.छायाचीत्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता
. मग प्रत्यक्षात शीलालेख बघण्याची छोटेखानी मोहीम हाती घेतली
.लागोलाग हरीहर कील्ल्याला भेट दीली
. वरच्या भागात इतीहासाचा अभ्यास करण्याजागे काय काय सापडते याचा आढावा घेतला
. परतताना उशीर झाला
. सुर्य मावळतीला गेल्याने पुरेशा उजेडात शीलालेखाचे अवलोकन करण्याची पुरेशीसंधी मीळु शकली नाही
.मग दोन दीवसांनी फक्त शीलालेख बघण्याचा बेत आखला
. काही अक्षरे अजीबत लागत नव्हती
.काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही क्षतीग्रस्त झाल्याचे जाणवले
. शीलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गीरवीली
.त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली
. मग त्याची छायाचीत्रे घेतली
. नंतर शीलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या वीटेच्या रंगाने अक्षरे गीरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली
.अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला
. त्याची टीपणे तयार केली
.
| देखणी अक्षरे व सुंदरनक्षीचा हरीहर शीलालेख |
,संवत्सर वाचता आले
. दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम
:हे अक्षर पटकन वाचता येते
. अभ्यासकांनी ते वाचले आहे
.त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती
. पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता
.हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता
. सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात
,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते
. त्या खालचे अक्षरही लागत नव्हते
. शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली
. शक संवत्सर कळाले होते
, त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण
...नारायण शंकर
...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते
.
. मालेगावचा राजेबहाद्दुरांचा कील्ला प्रसीद्ध आहे
. आता नारोशंकर यांच्या बद्दलची माहीती जाणुन घेण्याची जीज्ञासा नीर्माण झाली
. सुदैवाने राजेशचा स्वत
:चा पुस्तकांचा मोठा संग्रह आहे
.या कामी त्याचा मोठा उपयोग झाला. पेशवाईतला हा अव्वल दर्जाचा सरदार होता
. यांचे उल्लेख ठीकठीकाणी वाचायला मीळाले
.पेशवे घराण्याचा इतीहास
- लेखक प्रमोद ओक
, पेशव्यांची बखर
- संपादक काशीनाथ नारायण साने
, बखर संस्थानची
- सुनीत पोतनीस
, मराठ्यांचा इतीहास
- संपादक अ
. रा
.कुलकर्णी
- ग
. ह
.खरे
, सातारचे श्रीमंत छत्रपती शीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधान यांचा इतीहास
- वीष्णु गोपाळ भीडे
,दक्षीणेतील सरदारांच्या कैफीयती
- पुरुषोत्तम वीश्राम मावजी व डी
.बी
. पारसनीस अशा काही पुस्तकातुन नारोशंकर यांचे अनेक उल्लेख वाचायला मीळाले
. एका सरदार घराण्याकडुन
, राजेबहाद्दर हे मुळचे सासवडचे दाणी असल्याची महत्वपुर्ण माहीती मीळाली
. त्यामुळे पनामा शब्दाला जोडुन असेले अक्षर दाण्युपनामा असल्याचा उलगडा झाला
.
![]() |
| उठावाची अक्षरे |
. हरीहर कील्ल्याची माहीती घेण्यासाठी पुस्तके
,ब्लॉग्ज धुंडाळण्याची लगबग सुरु झाली
. महत्वाच्या ऐतीहासीक ग्रंथात हरीहरवर दहा पाच ओळींचे परीच्छेद शोधणे म्हणजे दुरापास्त गोष्ट
. आज हरीहर कील्ल्याचे राकट रुप बघीते की प्रश्नांचा कोंडावळा उठतो
: हरीहर कील्ला कोणी बांधला
? ‘त्याच्या भीषण कड्याला अमुर्त पायऱ्या बांधल्या जाऊ शकतात
’,असे अचाट स्वप्न कोणी रंगवले आणी मग ते प्रत्यक्षात साकार केले
? ते कोण बेलदार होते जे एखाद्या योद्द्या प्रमाणे कड्याला लटकुन शेकडो टनाचा दगड फोडत राहीले
? एखाद्या डोंगराला इतक्या सुंदर पायऱ्या घडवील्या तरी जाऊ शकतात का
? हा समज सत्यात उतरवीणारी ती राजवट होती कोणाची
?
. दोन्हीही डोंगर बेलाग
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणी देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड कील्ले बांधण्यात आले
. दोन्ही कील्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
.पौराणीक साहीत्यानुसार त्रींबक हे त्रीसंध्या क्षेत्र होते
. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी वीष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणी अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला
. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर वीष्णुने अंताचा म्हणजे पायाचा
.पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही
. आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला
.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले
, त्याला मस्तक सापडले
. त्यावर केतकीचे फुल होते
.या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी
,तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दीला
. ब्रम्हदेवानेही रागाने
,तु पर्वत होशील असा शाप दीला
.तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष शीवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला
. ब्रम्हाला दीलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने
, हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दीला
, अशी ही पद्मपुराणातील कथा
. या कथेनुसार वीष्णु हरीहर रुपात डोंगर बनुन प्रकटले
,तर इंद्र अंजनेरी पर्वताच्या रुपाने
. त्यांच्या जोडीला आसपास वेगवेगळे पर्वत देवी देवताच्या रुपाने प्रकटले
.
| हरीहराचे सोपान - सह्याद्रीचेदीव्य स्वप्न |
.शास्त्रज्ञांनी या डोंगरांगेचा काळ साडे तीन कोटी वर्षांपुर्वीचा नीश्चीत केला आहे
. ७० टक्के पाणी व ३० टक्के भुभाग असे स्वरुप असलेल्या पृथ्वीवर सगळी जमीन ही अस्थीर म्हणजे तरंगती आहे व या जमीनीचा प्रवास अखंडपणे सुरु आहे
. साडे सात कोटी वर्षांपुर्वी ओस्ट्रेलीया खंड हा युरेशीया कडे तरंगत तरंगत एकमेकांच्या जवळ कुर्मगतीने सरकत राहीले गोंडवाना काळात ते एकमेकांना भीडले
. या महाटक्करीतुन पृथ्वीच्या गाभ्यात असलेला तप्त अग्नीरस जमीनीचे बंध झुगारुन उफाळुन आला
. त्यातुन पृथ्वीवरची सगळ्यात जुनी डोंगररांग सह्याद्रीच्या रुपाने नीर्माण झाली
.स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडा नुसार सह्याद्री डोंगररांगेचे उत्पत्ती स्थान ब्रम्हगीरी पर्वत आहे
. पुराणांच्या रचनकारांना याचे ज्ञान कसे झाले असावे हे देखील एक कोडेच आहे
. कदाचीत अग्नीरस त्रीसध्या क्षेत्रातुन म्हणजे त्रींबक परीसरातुन उद्दीप्त झाला असावा
. तीथुन तो दक्षीणोत्तर पसरला
. काळांतराने थंड झाल्यानंतर त्यावर जीवसृष्टी अवतरली ही मांडणी वैज्ञानीकांनी करुन ठेवली आहेच
.
. त्या सोबत वृक्ष
, वेली
,द्रुम नीर्माण झाले
.वीवीध जीव नीर्माण झाले
, ही कथा वीज्ञान व पुराणांनी आपापल्या परीने कथन केली आहे
. आपले भरण पोषण करणाऱ्या सृष्टीची आराधना करण्यासाठी हे डोंगर देवस्वरुप
, म्हणुन पुर्वीच्या लोकांनी त्यांचे पुजन केले
.मानववंश प्रगती पथावर असताना कालांतराने यातील काही डोंगरांचा वापर राजशकट हाकण्यासाठी महसुल जमा करण्याचे केंद्र व संरक्षण केंद्र म्हणुन झाला
.नेमके कोणत्या काळात ही नीर्मीती झाली याचा शोध इतीहासकारांना लावता आलेला नाही
.त्यावरील बांधकामांवरुन त्यांच्या प्राचीनत्वाचे अनुमान काढले गेले
.
. येथुन मोठा महसुल गोळा होत असे
.सर्व जुन्या राजवटीचे येथे अस्तीत्व होते
.याचे दाखले जुन्या साहीत्यातुन तसेच गडांवरच्या बंधकामांच्या अवशेषांवरुन अभ्यासकांनी मांडले आहेत
. त्र्यंबकेश्वर व हरीहर हे दोन्ही कील्ले शब्दश:
बेलाग
. त्यावरील यादव काळाच्या खुणांकडे अभ्यासक नीर्देश करतात
. तर काहींच्या मते त्या अगोदरच्या राजवटींचे त्यावर अस्तीत्व असावे
.
| हरीहर कील्ल्याची थरारकवाट |
. इसवीसन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खीलजीने देवगीरीच्या यादवांचा पाडाव करताच मुसलमानी राजवटींने या परीसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली
.१३४७च्या सुमारास दक्षीणेत बहामनी राज्य नीर्माण झाले
;१४००च्या सुमारास त्याची शकले होऊन दक्षीणेत पाच मुसलमान शाह्या नीर्माण झाल्या
.इसवीसन १५५३ला त्रींबकची लीखीत नोंद आढळते
. नीझामशाहाने ३० डीसेंबर १५५३ मध्ये तो ताब्यात घेतला
. त्यावेळची ५८ कील्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो
.
.मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रींबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ नीवासी हींदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टीकु शकला नाही
.
. यात मलीक अंबरला बहुतांशी काळ
‘स्वराज्य संकल्पक
’शहाजी महाराजांची मोलाची साथ होती
. मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षीणेत आली तर हींद्वी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या वीरोधात खटाटोप केला
.शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची नीझामशाही वाचवीण्याचा अटोकाट प्रयत्न केला
. मलीक अंबरच्या मृत्युपश्चात नीझामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली
. नीझामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा नीझामला पेमगीरी कील्ल्यावर नेऊन गादीवर बसवीले
.त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे नीझामशाही वाचवीण्यासाठी याचना केली
, पण त्यांना हवी तशी साथ मीळाली नाही
. इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता
. शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली कील्ल्यावर हलवली
. त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच नीझामशाहीचे पारीपत्य केले
.
. शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले
. त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील नीझामशाही प्रदेश देऊन टाकला
. त्यात त्रींबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता
. इसवीसन १६३६ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची
. त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हींदुंचा अंमलाखाली राहीला
.
| हरीहर - कर्मकठीण |
. लुट घेऊन परतत असताना १७ ओक्टोबर १६७०ला दींडोरी येथे लढाई झाली
. त्याच सुमारास मोरोपंत पींगळे यांनी त्रींबकगड घेतला
. देवगीरीच्या यादवांनंतर शहाजी आणी त्यानंतर मोरोपंत पींगळें असा हा मोठा कालखंड
. शीवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलुन श्रीगड ठेवले अशी नोंद सभासद बखरीत आढळते
.इतीहासात युद्ध करुन त्रींबकगड घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ
,त्यातलेच हे एक
.त्रींबकगड पडल्यानंतर हरीहर
, भास्करगड
,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही
.
.शीवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत
:दक्षीणेत उतरला
. त्याने आदीलशाही व नीझमशाहीचा घास गीळला
. मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला
. १६८२ मध्ये अंकाईचा कील्ला मसलत करुन मीळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशीक जवळच्या लहानशा कील्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला
. हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही
. असे म्हणतात की
, हा संघर्ष दीड कींवा तीन वर्षे तरी चालला असावा
. रामसेज युद्धाच्या वेळेस त्रींबकगडालाही मुघलांचा वेढा पडला
. पण त्रींबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही
.याच कालावधीत हरीहरचा कील्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा
.
. युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला
. ते सगळे प्रयत्न वीफल ठरत होते
. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा
(खोपडा
)हा मुघलांना जाऊन मीळाला
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास वश करुन गड मीळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दीले
,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दीली
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दीले
. कील्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले
. त्यामुळे राघो खोरा पळुन गेला
. त्याच्या मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी नावाच्या माणसाला मुघलांनी अटक केली
. आपला राघो खोराशी काहीच संबंध नाही हे वारंवार पटवुन दील्यानंतर जमनाजीची सुटका झाली व त्याची मनसब कायम ठेवण्यात आली
.
| हरीहर तीर्थाच्या शेजारीअसलेले छोटे कुंड |
. त्याने नासीक उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार मातबरखान यास त्र्यंबकगड घेण्यास पाठवीले
. त्याने सहा महीने वेढा घातला
.गडावर रसदेचा एक दाणाही जाऊ दीला नाही
. गडाची शीबंदी हवालदीली झाली
. अखेर १६८४ मध्ये कील्लेदार शीवाजी तेलंगराव व शामराज हे गडावरुन उतरुन खाली आले
. त्यांना मुघलाईत मनसबी मीळाल्या
. दहावर्षे शीवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या हातुन पुन्हा गेला
.येणे प्रमाणे हा टकोरबंद गड जाताच परीसरातले इतर गड मुगलांच्या ताब्यात गेले
.
. खुद्द बादशाह दक्षीणेत तळ ठोकुन होता
. कुतुबशाही व आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी मुलुख घेण्याचा नीकराचा प्रयत्न सुरु होते
.एक गड
, एक मुलुख घेत मुघल फौजा पुढे जात व त्या माघारी मराठे पुन्हा तो जींकुन घेत
. १६८९च्या फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली
.त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा संपला असे वाटले
.पण त्याचे स्वप्न शेवट पर्यंत पुर्ण होऊ शकले नाही
.मराठेशाही खीळखीळी झाली तरी राजाराम महाराज आणी त्यांच्या पश्चात ताराबाईंनी पुढे हा लढा चालु ठेवला
.शेवटी १७०७ साली वयाच्या ८९व्या वर्षी तो मरण पावला
.
.संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या कैदेतुन सुटले
. महाराष्ट्रात येताच त्यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली
. अनेक नामांकीत सरदारा मंडळी त्यांनी गोळा केली
. बाळाजी वीश्वानाथ पेशवा आणी मग त्या पाठोपाठ पहीला बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात मराठेशाहीचा वारु चौखुर उधळला
. त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा वीशाल प्रदेश काबीज केला
. दील्लीच्या सुलतानास त्यांनी अंकीत केले
.त्रींबक परीसरातुन चौथाई वसुलीचे अधीकार पेशव्यांकडे होते
. त्रींबकगड मात्र अजुनही मुघलांच्या वतीने हैदराबादच्या नीझामाकडे होता
. त्र्यंबकेश्वर येथील इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील हकीगतीत पेशव्यांनी त्रींबकगड कशा प्रकारे काबीज केला याचे वर्णन आहे
. १७५१च्या सुमारास नीझामाने तहाची बोलणी करण्याची तयारी दर्शवीली
. त्यासाठी त्याने त्रींबकगड आपल्याकडेच ठेवण्याची मागणी केली
. पेशव्यांनी तहाची बोलणी केली
.पण गड नीझामाला काही दीला नाही
.अशा रीतीने तब्बल ६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्रींबकगड मुसलमानी जोखडातुन मुक्त झाला
. त्रींबक पडला की रांगेतले इतर कील्ले सुपुर्द होतात तोच कीत्ता यावेळी कायम राहीला असण्याची शक्यता आहे
. हरीहर कील्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी घेतला या संबंधीचे उल्लेख मीळु शकले नाहीत
, परंतु तो पेशव्यांनी घेतला हे नक्की
.तो त्रींबकगडापुर्वीच पेशव्यांना मीळालाअसावा. हरीहर शीलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.

हरीहर पुष्कर्णीचे गुढ उकलले
. म्हणजे त्रींबकगड मुघलांकडे असला तरी शीवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत
. नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रींबकराजाच्या भेटीस यायचे
. गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सींहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत
. आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनीबांधुन ठेवलेली मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले
. त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला
.हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते
. हे काम सुरु असतानाच हरीहर कील्याच्या उत्तर माचीवर वीस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आलीअसावी
. ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती
. पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शीलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते
. इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी हा शीलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते
.अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शीलालेखाचे वाचन असल्याची माहीती मीळाली
, त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते
.
. या कामी नाशीकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचीत्राची बरीच मदत झाली
. पण ते छायाचीत्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दील्यानंतरचे होते
. तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली
. शीलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दीसत होते
.ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे
. आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली
. शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले
. खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता
. हा पनामा काय असावा
?यावर खल सुरु असताना नाशीकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन
, राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मीळाली
. मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला
- दाण्युपनामा ही उकल झाली
.शीलालेखावरचे शक व तीथी मीळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते
. पंधराच दीवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शीलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली
. जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले
. अशा प्रकारे हरीहराच्या शीलालेखाचे पुर्ण वाचन झाले
. राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दीले
.

![]() |
| शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे |
.
, तीथी आदी अंकात न देता शब्दात दीले आहेत
.
: ।। धात्रवर्ना
:श्रीमन्नारायणा्ख्येगजगीरीरसक्
यु
शालीवाहोशकेदाण्युपनामा
ण्यार्तलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय ।।१।।
लेखाचे वाचन व स्वैर अनुवाद: राजेश दीक्षीत, त्र्यंबकेश्वर
) श्री
(श्री या अक्षराने शीलालेखाची सुरुवात आहे
)
) ।।श्रीगणेायनम
:।। धात्रव र्ना
(मी
) (गणेशाचे स्तवन हा दंडक आहे
. धात्रवर्
= धात्रृ नावाचे संवत्सर
)
) मी शुक्रेधवलशरतीथौ शंकरा त्म
: सु
(शुक्रे
= ज्येष्ठ महीना
, धवल
= शुद्धपक्ष
, शर
= पंचमीतीथी शंकरात्म सुत
: = शंकराचा मुलगा
)
) त
: श्रीमन्नारायणाख्ये गज गीरी रस क्
यु
(शंकर पुत्र नारायण नामे वीख्यात
, गज
= ८
,गीरी
= ७
, रस
= ६
, क्
=१
,युक्त
)
) क्त सत शालीवाहो शके दाण्युपनामा
( १६७८ या शालीवाहन शकात
- इसवीसन १७५६ साली
,दाणी उपनावाचे
)
) हरीहर वीलसद्देवताकं सुतीर्थं प्रादद्दी
(हरीहर पर्वतावरील वीलास करणाऱ्या देवतांच्या नावे उत्तम तीर्थ दीन जनांचा त्रास कमी करण्यास
)
) ण्यार्त लोकश्रम नीरहरुते श्रेयसे
(आर्त लोकांच्या श्रम हरण करुन पुण्यप्राप्तीसाठी
)
) मंगलाय
(मंगल श्रेयासाठी नीर्माण केले
)
![]() |
| हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर |
.जसे यादव
, अभीर
,राष्ट्रकुट
, त्रैकुटक
, बागुल इत्यादी
.तद्वताच नासीक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते
. सरदार रास्ते
, सरदार वींचुरकर
, सरदार राजेबहाद्दर
, पवार घराणे
,अशी काही नावे आजच्या पीढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलल्या वास्तु
,मंदीरे आदींशी नीगडीत नावांमुळे
.गोदावरी नदीच्या कीनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसीद्ध आहे
.हे रामेश्वराचा शीवालय
.१७४७ साली हे मंदीर बांधण्यात आले
.त्यास १८ लाख रुपये खर्च आला
.उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते
.मंदीराची ओळख मात्र मदीर अशीच आहे
. या मंदीराची भली मोठी घंटा नाशीकची सांस्कृतीक ओळख बनली आहे
. नाशीक महानगरपालीकेच्या मानचीन्हात तीचा वापर करण्यात आला आहे
.ही बहुधा वसईच्या युद्धात जींकुन आणली असावी
.चीमाजी अप्पाने वसईत पोर्तुगीजांच्या वीरुद्ध नीकराची झुंज दीली
.त्याच्या सोबत त्यांचे वीश्वासु सहकारी नारोशंकर राजोबहाद्दर हे होते
. अशा आठ पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठीकाणी बसल्याचे उल्लेख सापडतात
.
नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगीरीवर नजर
टाकली तर ते
पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार
कशामुळे गणले जात
याची प्रचीती येते.घोड्याच्या पागेची नीगा राखणाऱ्या साधारण शीपायापासुन त्यानी इतकी मोठी मजल मारली
.नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता
. त्यांनी बंडखोरी करणारे ओर्च्छाचे राज्य खालसा केले
. झांसी शहर त्यांनी वसवीले
.दील्लीच्या सुलत्तानाचे रक्षक म्हणुन त्यांची पेशव्यांनी नीयुक्ती केली
.पेशव्यांच्या वतीने ते उत्तरेत वसुलीचे काम करत
.त्यांनी दक्षीण भारतातही काही मोहीमा केल्या
. दील्लीत त्यांच्याकडे पेशवे व शींद्यांचा खजीना सांभाळण्याची जबाबदारी होती
. पानीपतच्या युद्धात ते अवघी दौलत टाकुन पळुन आले असे बालंट त्यांच्यावर लागले
. परंतु त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले त्या प्रत्येक वेळेस पेशव्यांना योग्य तो खुलासा देऊन त्यांनी त्यांजी नाराजी दुर केली
.
. (मराठी वीश्वकोष खंड ६
) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली
. तीकडे झासी शहर वसत होते
.पेठा नीर्माण होत होत्या
. कील्ला मजबुत केला जात होता
. इकडे पेशव्यांना एक छदामही मीळत नव्हता
. त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली
. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दीले
. त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली
.
![]() |
| माचीवर जोत्यांचे अवशेष |
. त्याने दील्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दील्लीच्या राजवटीची कमान दीली
.मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा अब्दलीचा मांडलीक बनवीला गेला
. वार्षीक २० लाखाची खंडणी नीश्चीत करण्यात आली
. आब्दाली माघारी फीरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली
. तोवर अब्दाली नीघुन गेला होता
.मराठी फौजांनी दील्ली चहुकडुन घेरली
. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले
. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी नीर्णायक वीजय मीळवुन लाल कील्ल्यात प्रवेश मीळवला
. दील्लीत सदाशीवराव भाऊंनी दरबार भरवला
. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली
. त्यांना दील्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली
. त्याच्याकामगीरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दीली
. पुढे दक्षीणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली
. घर बांधले तरी ते दीर्घकळ टीकत नाही
,असा वीचार करुन त्यांनी दील्लीहुन कुरैशी या प्रशीक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दील्लीच्या कील्ल्यासारखा भव्य असा कील्ला बांधला
. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले
. तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले
.कील्ला पुरा झाला तेव्हा
, नारोशंकर मुघलांना फीतुर असल्याची दरबारात कागळी झाली आणी श्रीमंतांनी जासुद पाठवुन कील्ला खाली करुन देण्याचे फर्मान दीले
. तोवर कील्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते
. नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतीपादन करुन कील्ला खाली करुन दीला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या नीष्ठेची प्रचीती आली
.
. इतका सुबक शीलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही
.पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे
.यावरुन मालेगावचा कील्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो
.पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले
.
?ज्यामुळे त्यांनी कील्ल्याच्या उत्तर माचीवर वीशाल आकाराची पुष्कर्णी बांधली
. हा माचीचा परीसर कील्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा
. हरीहर कील्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने कील्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात
. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर
.तीथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात
. हरीहर कील्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
.
. पेशवाईतली कींवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो
.
.एस
. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्
दुर हे पुस्तक प्रकशीत केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे
.अजुनही पुण्यातले पेशवा दफ्तर खंगाळले
, अथवा अन्य संदर्भाची
, खास करुन त्रींबकगड व हरीहर कील्ला या संबंधीची माहीती तपासली तर या वीषयावर महत्वाचा प्रकाश पडु शकतो
.
वीशेष आभार:
भगवान बाबा, कळमुस्ते
गीरीश टकले
इलीयास सीद्दीकी
ओम दीक्षीत
बाळा उजे
मनोज खैरनार
सुयोग देवकुटे
अंबरीश मोरे
अनील दुधाणे
रवी पवार
संदर्भ:
-महाराष्ट्र देशा, पंकज समेळ
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात,महेश तेंडुलक
-मराठ्यांचा इतीहास,संपादक अ.रा. कुलकर्णी, ग.हे.खरे
-बखर संस्थानची, सुनीतपोतनीस
-पेशवे घराण्याचा इतीहास,प्रमोद ओक
-त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज,महेश तेंडुलकर
-पेशव्यांची बखर, काशीनाथनारायण साने
-सातारचे श्रीमंत छत्रपतीशीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधानयांचा इतीहास, वीष्णु
गोपाळ भीडे
Please make your own arrangements as food is available only at base village. You can contact Sanjay Nirgude 9421035554 / 7776893098 for food and restroom at the base village
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील प्रत्येक गडाला स्वतःचे असे वेगळेपण आहे. काही किल्ले
त्यावर घडलेल्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्यांच्या
दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द आहेत. उभ्या कड्यात ७० अंशाच्या कोनात असलेल्या
खोदीव पायऱ्या या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द असलेला असाच एक गड म्हणजे
हरिहरगड. संपुर्ण महाराष्ट्रातील गड-किल्यांत अतिशय दुर्मिळ असा
प्रवेशमार्ग या गडावर आजही शिल्लक आहे पण आज त्याचे हे सौंदर्य त्याच्या
मुळावर उठले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या शहराशी असलेली या गडाची जवळीक यामुळे
या गडावर आयोजकांकडून भटकंतीचा बाजार भरत आहे. शनिवार-रविवार या दिवशी
गडावर होणाऱ्या भयानक गर्दीमुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अशा
गोष्टीना वेळीच आवर घालायला हवा. नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी,
अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व
इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड,
त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन
येतात.
हरिहर हा या त्र्यंबक रांगेतील त्र्यंबकगडा पाठोपाठ महत्त्वाचा दुसरा
किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. डहाणु
बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक-
नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या
दुर्गशृंखलेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड या किल्ल्याची
निर्मिती करण्यात आली. निरगुडपाडा व हर्शेवाडी हि गडाच्या पायथ्याचे गावे
असुन निरगुडपाडा येथुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर हर्शेवाडी येथुन एक
तास लागतो. या दोन्ही वाटांनी आपण एकाच ठिकाणी गडाच्या पायथ्याला पोहोचतो.
कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास हर्शेवाडी हा योग्य
पर्याय आहे. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर
साधारण १७० कि.मी.आहे. स्वतःचे वाहन असल्यास तेथुन ५ कि.मी. अंतरावर
असलेल्या हर्शेवाडी गावात कच्च्या रस्त्याने जाता येते अन्यथा निरगुडपाडा
येथूनच गड चढण्यास सुरवात करावी. नाशिक-हर्शेवाडी हे अंतर त्रिंबकमार्गे ४१
कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. हर्शेवाडी
गावामधून समोरच हरिहर ऊर्फ हर्षगडचा डोंगर दिसतो. येथून एका बंधा-याच्या
काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर
किल्ल्याखालील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या वाटेवर डाव्या बाजुला एक
समाधीचा दगड असुन त्यापुढे काही अंतरावर एक ढासळलेले कोरडे बांधीव टाके
आहे. टा टाक्याच्या पुढे एक आश्रम व त्याशेजारी दगडी बांधणीची पुष्करणी
आहे. पुष्करणीच्या काठावर गणेश व शिवमंदीर असुन आश्रमाच्या मागे असलेल्या
झाडीत काही अंतरावर हनुमान मंदीर आहे. या पुष्करणीच्या भिंतीवर एका
कोपऱ्यात दगडावर कोरलेला देवनागरी लिपीतील आठ ओळींचा शिलालेख आहे. या
शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असुन बाजुला दोन नक्षीदार खांब व वरील बाजुस
कमळाची नक्षी व खालील बाजूस दोन पक्षी कोरलेले आहेत. हा शिलालेख
पुढीलप्रमाणे आहे. श्री || श्री गणेशाय नम: त्रि व मा मि श्रुके धवल श शा
ने यो श क त्र त: श्री मंत्रश गि र र स सु क्त सत शालिवाहने शके हरिहर
विलसदे लोक श्रमनिरहसते श्रेय मंगलाय || या शिलालेखात हरिहर किल्ल्याच्या
उल्लेख आहे. याशिवाय शालिवाहन शके गणेशाय नमः अशी काही अक्षरे सहजपणे
वाचता येतात. हा शिलालेख तैलरंगात रंगवलेला असल्यामुळे काही अक्षरे वाचता
येत नाहीत. सध्या येथे एका साधुचा मुक्काम असतो. गडावर मुक्काम करावयाचा
झाल्यास हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे सर्व पाहुन मुळ वाटेवर येऊन काही
अंतर गेल्यावर आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. निरगुडपाडा येथुन
येणारी वाट या पठारावर आपल्याला येऊन मिळते. या ठिकाणी काही शेंदूर फासलेले
दगड ठेवलेले आहेत. येथुन समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई
करायची. येथे येणाऱ्या गर्दीमुळे सध्या गावकऱ्यांनी येथे चहा-पाणी,सरबत,
जेवण-नाश्ता याची दहा बारा दुकाने थाटली आहेत. या दुकानामधुन वाट काढत
मळलेल्या वाटेने दहा- पंधरा मिनिटे समोरचा चढ चढत पुन्हा एका उंचवट्याला
उजवीकडे ठेवत गेलो कि आपण हरिहर गडाच्या कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यां
असलेल्या लहानशा खिंडीत पोहचतो. या पायऱ्या सुरु होण्यापुर्वी त्याच्या
विरुध्द दिशेला खालील बाजुस एक खडकात कोरलेले पाण्याचे लहानसे टाके आहे.
किल्ल्यावर जाणारा हा ७०अंशी कोनात कोरलेला सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग व
त्यावरील दरवाजा हा पहाताक्षणी त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. १८१८सालच्या
मराठा-इंग्रज लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हरिहरगड जिंकला.
सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या
जिन्यासारखा या पाय-या बघून तो आश्चर्यचकित झाला. जिंकलेल्या किल्ल्यांच्या
वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते पण
हरिहर किल्ल्याच्या या पाय-यांनी कॅप्टन ब्रिग्ज भारावला. त्याने हरिहरगड
जिंकला पण त्याच्या सुंदर पायरीमार्गाला मात्र हात लावला नाही. हरिहर
किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान
बुरूज कातळात खोदून काढलेल्या या मार्गाची शोभा वाढवितात. या पाय-यांनी
एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाऊ शकतो. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी
आधारासाठी खोबण्या असुन काही पायऱ्या ढासळलेल्या असल्याने थोडे जपूनच
चढावे लागते. साधारण नव्वद पायऱ्यां चढल्यावर गडाचा पहीला पश्चिमाभिमुखी
लहानसा दरवाजा लागतो. या दरवाजातून आत आल्यावर समोरच उजवीकडे कातळात
गणपतीची अनगड मूर्ती कोरलेली असुन त्यावर शेंदुर फासलेला आहे. दरवाज्याची
कमान व तटाबुरुजावरील फांजीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. या दरवाजाच्या
पुढे डोंगरांची कातळ कपार खोदून आडवी वाट तयार केली आहे. ह्या मार्गाची
उंची जास्त नसल्यामुळे थोडे वाकूनच हा टप्पा पार करावा लागतो. या मार्गाने
पुढे गेल्यावर कातळातच खोदलेले दोन पश्चिमाभिमुखी दरवाजे पार करताना साधारण
३०-४० पाय-या लागतात. या जिन्याच्या दोन्ही बाजूंस आधारासाठी असलेल्या
खोबणीची मदत घेत आपण गडाच्या अंतिम दरवाजा असलेल्या भुयारी मार्गात येऊन
पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार केल्यावर आपला गडात
प्रवेश होतो. या दरवाजावर असलेला विटांचा घुमट मोठया प्रमाणात ढासळलेला
असुन या विटा दरवाजातच पसरलेल्या आहेत. दरवाजाच्या पुढील भागात काही
उध्वस्त वास्तुंचे अवशेष असुन ते पार केले कि आपण किल्ल्याच्या पठारावर
पोहोचतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन
त्याचा विस्तार १६ एकरात सामावलेला आहे. आकाशातून पहिले असता या किल्ल्याचा
आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४४५
फुट उंच असून गडाला चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची गरज भासली
नाही. गडावर येण्यासाठी आपण आलो ती एकमेव पायऱ्यांची वाट आहे. दरवाजातून
काही अंतर पुढे आल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीत कड्यालगत
कोरलेल्या उध्वस्त दरवाज्याचे व प्रवेशमार्गाचे अवशेष दिसतात परंतु या
दरवाज्यापर्यंत जाणारी वाट उध्वस्त झाली आहे. हा गडाच्या मूळ बांधकामातील
दरवाजा कालांतराने दरड कोसळुन उध्वस्त झाला असावा. या दरवाजाच्या वरील
बाजुस एक ५० फुट खोल कोठार आहे पण तिथे उतरण्यासाठी दोर सोबत असणे गरजेचे
आहे अन्यथा हे कोठार वरूनच पहावे लागते. कोठाराच्या वरील बाजूस एक खडकात
कोरलेले बुजलेले टाके आहे. ते पाहुन पुढे गेल्यावर आपल्याला एका मोठया
वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि बहुदा गडाची सदर अथवा वाडा असावा. या
वाटेवर डाव्या बाजुला खडकात कोरलेली एक गुहा दिसुन येते. ती पार करून पुढे
गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची तीन मोठी टाकी व एक प्रशस्त तलाव दिसतो.
या तलावाला पश्चिमेकडे दगडी भिंत बांधून पाणी अडविले असुन तलावाच्या काठावर
लोखंडी देव्हाऱ्यात हनुमंताची मुर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या काठावर दोन
लहान चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी तर दुसऱ्या चौथऱ्यावर
मारुतीची भग्न मूर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या उजव्या बाजुला असलेल्या
उंबराच्या झाडाखाली एक खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील व तलावातील
पाणी पिण्यायोग्य आहे. या तलावाकडून समोरच आपल्याला एक घुमटाकार माथा
असलेली दारुगोळा कोठाराची दगडी इमारत दिसते. तलावाकडून या इमारतीकडे जाताना
वाटेत डाव्या बाजुला एक साचपाण्याचा खोदीव तलाव दिसुन येतो. या तलावाच्या
मध्यभागी खडकात खोदलेले चौकोनी टाके आहे. ते पाहुन पुढे आल्यावर डाव्या
बाजुला दुसरे खडकात खोदलेले खांब टाके आहे. सध्या हे टाके मातीने पुर्णपणे
भरून गेले आहे. या परिसरात असलेले तुरळक वाड्याचे अवशेष व इतर उध्वस्त
बांधकाम पहात आपण ३० x १२ फूट लांबरुंद अशा दगडी कोठाराकडे पोहोचतो.
दारूगोळा कोठाराची हि वास्तू गडावरील छत शिल्लक असलेली एकमेव इमारत आहे. या
कोठाराचे आत दोन भाग केलेले असुन आत शिरण्यासाठी एक लहान खिडकीवजा दरवाजा
आहे. या कोठीत दिवसासुद्धा काळोख असल्याने कोठाराच्या भिंतीत एक मोठी
लोखंडी पणती ठोकलेली दिसुन येते. या कोठारात १० ते १२ जण सहज राहु शकतात.
कोठाराच्या पुढील बाजूस खडकात खोदलेली ५ लहानमोठी टाकी असुन मागील बाजूस एक
मोठे टाके व त्यामागे एक लहान तळे खोदलेले आहे. यात एका टाक्यातील पाणी
पिण्यासाठी योग्य आहे. येथे डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते.
दारुकोठार आणि आजूबाजूचा परिसर भटकून झाल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च
ठिकाणी म्हणजे टेकडीकडे निघायचे. टेकडीवर जाणारी वाट थोडी निसरडी
असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते. दारूगोळा कोठारा समोर असलेली
६०-७० फूट उंचीची टेकडी म्हणजे हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. या
टेकडीवर जाताना आपल्याला शेवटचा कातळटप्पा चढून पार करावा लागतो. माथ्यावर
ध्वजस्तंभाची जागा असुन येथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. किल्ल्यावरील
सर्वांत उंच जागा असलेल्या या ठिकाणावरून संपुर्ण हरीहर किल्ला तसेच
त्रिबक डोंगररांगेत उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला कावनाई व त्रिंगलवाडी
पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यामागे ब्रह्मगिरी किल्ला तर पश्चिमेला फणी
डोंगर, बसगड, उतवड, अंजनेरी किल्ला, वैतरणा जलाशय इ. परिसर दिसतो. येथे
आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा घेरा निमुळता असला तरी वर असलेल्या
अवशेषांमुळे संपूर्ण गडफेरी करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना
मात्र काळजीपूर्वक उतरावे लागते. हरिहर उर्फ हर्षगड हा किल्ला कोणत्या
राजवटीत बांधला गेला ह्याबद्दल निश्चित असा पुरावा नाही पण गडाचे एकंदरीत
खोदकाम पहाता हा किल्ला सातवाहन काळात त्रिंबकगडाच्या बरोबरीने बांधला गेला
आहे. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा
त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकून घेतला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे
गेला. पुढे १६७०-७१ याकाळात मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक परिसरातील किल्ले
जिंकून घेतले त्यावेळी हा किल्ला जिंकून घेतला. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल
सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. इ.स.१८१८ मध्ये ब्रिटीशांनी
त्र्यंबकगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला.
पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ जमा होत असल्याने चढताना किंवा उतरताना पाय
घसरण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाणे टाळावे.
© Suresh Nimbalkar
मागे जा
छायाचित्रे
Discover more
Travel Guides & Travelogues
Tourist Destinations
Hiking & Camping
Historical Sites & Buildings
Adventure Travel
प्रस्तावना
नाशिक
जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग
या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख
किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक
घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून
जाणार्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी
करण्यात आली होती.
नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस
त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात
बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर
दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील
प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.
महत्त्वाची ठिकाणे
कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण
किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्या खोदलेल्या आहेत
आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्या चढून
गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत
थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्या लागतात. या पायर्या चढून
गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत
शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच
आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.
पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर
डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग
सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे
छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास
योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन
खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका
बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य
आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.
कसे पोहोचावे
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा"
हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी
वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.
१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
तसेच
इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते.
हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.
३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा
किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी
बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे.
गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ
पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा
गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या
बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर
हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास
लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ हर्षेवाडी मार्गे १ तास तर निरगुडपाडा मार्गे २ तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाणी उपलब्धता
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.Harihar Fort Trek
https://punetrekss.blogspot.com/2019/06/harihar-fort-trek.html
Shri. Nirgude - 960442 9739, 08766 514423, 77768 93098
There are not much left on the fort. God Maruti temple, water tanks, Dhanyakothar (grains storage) etc. are there on the vast plateau of the fort. The top most point has watching tower with Saffron flag.
रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड
https://charudattasawant.com/2021/11/08/harihar-fort/

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort
मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.
काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कराव्या लागणाऱ्या चढाईनं, या पायऱ्या नुसत्या डोळ्यांच पारणं फेडीत नाही तर अक्षरश: मोहून टाकतात. या सोपानांची किंवा पायऱ्यांची महती एवढी थोर की इस.१८१८ सालात मराठाशाही बुडविण्यासाठी आलेल्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी याच्या नुसत्या पायऱ्या बघूनच आश्चर्यचकीत झाला व उद्गारका ” या किल्ल्याच्या पायऱ्यांच वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे २०० फुट सरळ व तिव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात.” गड किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफांनी उद्ध्वस्त करुन क्रांतिकारकांचे मनोध्येर्य खच्ची करणाऱ्या इंग्रजाने हरिहर किल्ल्याचे यथार्थ केलेले वर्णन किल्ल्याच्या महतीत अधिक भर घालते. अर्थात कॅप्टन ब्रिग्ज याने या सुंदर पायऱ्यांच्या मार्गला मात्र हात लावला नाही हे वेगळ सांगायला नको.
हर्षवाडी व निरगुडपाडा ही हरिहर किंवा हर्षगडाखाली परस्पर विरुद्ध दिशेला वसलेली पायथ्याकडील गावे. नाशिक-त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरुन कचोर्ले येथून हर्षवाडी गाठता येते. हर्षवाडीतून तास- दीड तासात आश्रमाजवळ व तेथून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ मळलेल्या वाटेने पोहोचता येते. निरगुडपाडा येथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पैकी कसारा-खोडाळे-निरगुडपाडा, दुसरा इगतपुरी-घोटी-निरगुडपाडा व तिसरा नाशिक-त्र्यंबकेश्वर-निरगुडपाडा. निरगुडपाड्यातून साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. नंतरचा चढ चांगलाच दमछाक करणारा आहे. तो चढून एका तासात आपण पठारावर येतो. इथून पठारावरून किल्ल्यावर जाणारी व किल्ला उजवीकडे ठेवून अर्ध्या तासात आश्रमाजवळ जाणारी अशा दोन वाटा लागतात. आश्रमाजवळून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोहोचता येते. आपल्याला जो सोयीचा मार्ग वाटेल तो मार्ग निवडावा.
निरगुडपाड्यावरून किंवा हर्षवाडीकडून जाताना आश्रम लागतो. वाटेत दगडी घडीव वस्तू लागते ती काय आहे त्याचा बोध होत नाही. त्याच्या मागे असलेल्या डोंगर उतारावरील पायथ्याकडील जागी एका उंचीवर आश्रम उभारलेला आहे. आश्रमाच्या ओट्यावर शिवलिंग असून त्यामागे भगवान शिव गणरायाला मांडीवर घेऊन बसलेली नजीकच्या काळातील पीओपी ची मूर्ती आहे. त्या पुढे त्रिशूळ रोवून ठेवलेला आहे. त्याखाली चौकोनाकृती पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या घाटावरील दगडी भिंतीवर डावीकडील बाजूस गणेश प्रतिमा तर उजव्या बाजूस दगडी मकारात पुष्पाकार शिक्का सदृश्य उठावदार शिलालेख आहे. त्या खाली समोरा समोर तोंड करून चोचीत वेल धरलेले दोन मोर कोरलेले आहेत. आठ ओळीतील शिलालेख देवनागरी संस्कृत लिपीतील असून तो असा…
श्री
।।श्री गणेशाय नमः।।
धात्रवर्णा
मि शुक्रेधवल शरतिथौशंकरात्म:सु
तः श्रीमन्नारायणख्येगजगिरिरसक्यु क्तसत्शालिवाहोशकेदाण्यूपनामा
हरिहरविलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी ण्यातलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय
या शिलालेखाची साधारणपणे शब्द फोड करता येईल ती अशी…
धात्रवर्णामि= धोतऱ्याच्या फुलांच्या रंगासारखा शुभ्र किंवा चमकदार, शुक्रेधवल= शुक्रधवल ( पांढरेशुभ्र ), शरतिथो= शर म्हणजे बाण, तिथो= तिथि म्हणजे पवित्र दिवस ( कदाचित हा शब्द क्षयतिथि असावा= सूर्योदयानंतर प्रारंभ होणारी तिथी ), शंकरात्म:सुत:= शंकराचा पुत्र, श्रीमन्नारायण= श्रीमन् नारायण, गजगिरिरसक्यु= गज=८ गिरि=७ रस=६ क्=१, सत्शालिवाहोशके= सत्= चांगले, शालिवाहन शके (शक संवत्सर- वर्षगणना ), दाण्यूपनामा= दाण्यू या शब्दातून दानी व दाणी असे दोन वेगवेगळे अर्थ प्रेरित होतात. दानी= दानशूर मनुष्य किंवा धान्यावरील कर वा महसूल गोळा करणारा अधिकारी, दाणीपनामा= दाणी हे उपनाव असलेला, हरिहरविलसत्= हरिहर, विलसत्= तळपणे, चमकणे, शोभून दिसणे, देवताकंसुतीर्थंप्रादद्दी= देवतांच्या कृपेने, तीर्थंप्रादद्दीण्यात= पुण्यमय झालेली भूमी व परिसर, लोकश्रमनीरहरुतेश्रेयसे= ( लोक+श्रम+नीर+हरुते ) लोकांचे श्रम पाण्याने, हृ ( हर् ) – हरण करणे, दूर करणे, नष्ट करणे, श्रेयसे= यशासाठी, मंगलाय= कल्याणासाठी
वरील शब्द फोडीच्या क्रमानुसार वाक्यरचना न धरता शिलालेखातून खालील अर्थ निघतो ….
श्री. श्री गणेशाला वंदन असो. धातृ नाम संवत्सरात ज्येष्ठ महिना असताना शुद्ध पक्ष पंचमी तिथीला दाणी उपनावाने विख्यात असलेल्या शंकराचा मुलगा श्रीमन् नारायण, यांनी शालिवाहन शके १६७८ (चवथी ओळ- गज = ८, गिरि = ७, रस = ६, क् = १ याप्रमाणे ८७६१ ही संख्या येते मात्र शक मांडताना वामतो गती पध्दतीनुसार-१६७८) हरिहर पर्वतावर विलास करणाऱ्या देवतांच्या नावाने दीनजनांचा त्रास कमी करण्यास आणि आर्त लोकांचे श्रमहरण करून पुण्यप्राप्तीसाठी या तिर्थाची निर्मिती केली.
हा शिलालेख शके १६७८ म्हणजे सन १७५६ काळातील असून तेंव्हा नानासाहेब हे पेशवे पदावर होते. नारायण शंकर दाणी म्हणजेच नारोशंकर हे पेशव्यांचे बिनीचे म्हणजे आघाडीचे किंवा पहिल्या फळीतील सरदार होते.
नारोशंकर हे नांव आलेच आहे तर त्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेवू.
नारोशंकर यांचे वडिल शंकरपंत विजापूर दरबारी दिवाण होते. वडिलांच्या मृत्यु पश्चात त्यांची तीनही मुले आबाजी, लक्ष्मण व नारायण सासवडला परत आलेत. कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली म्हणून पत्नीला सासुरवाडीला ठेवून नशीब आजमाविण्यासाठी नारोशंकर स्वतः मात्र वानला येथे नोकरीला गेलेत. तेथे एका मोठया सावकाराचा उमदा घोडा खूप आजारी पडला. नारोशंकर विजापूरला असताना काही वैद्यकीय ज्ञान मिळविले होते. त्या अनुभवावर सावकाराच्या घोड्यावर उपचार करताच तो बरा झाला. सावकाराचा शब्द होता की जो कोणी घोड्याला आजारातून बरा करील त्याला दोन हजार रुपये इनाम देईन. त्याप्रमाणे नारोशंकराला ते इनाम तर मिळालेच पण त्या सावकाराने नारोशंकराला दरमहा दीडशे रुपयाची नोकरीही दिली. काही वर्षानंतर त्यांनी सावकाराची नोकरी सोडली व ते सासवडला परत आलेत.
सन १७२० पर्यंत ते उदाजी पवारांच्या हाताखाली शिलेदार होते. या काळात सन १७२८ मध्ये मराठ्यांच्या माळव्यात हालचाल सुरू केल्यात यात त्यांचा सहभाग होता. थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी सन १७२९ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम सुरू केली त्यात नारोशंकर सहभागी होते. त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. सन १७३० नंतर त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकर यांच्या पदरी असल्याबद्दलचा सापडतो. त्यांच्या सैन्यात राहून नारोशंकराने काही लहान मोठ्या लढायात भाग घेऊन पराक्रम गाजवला. मल्हाररावांनी नारोशंकराची हुशारी व कर्तबगारी ओळखून त्यांना वरच्या हुद्याच्या जागाही दिल्यात. पुढे मल्हाररावांच्या शिफारशीवरून थोरल्या बाजीरावाने नारोशंकराला इंदूरचा सुभेदार नेमले.
बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने थोरल्या बाजीरावाने मदत केली म्हणून मराठ्यांना बुंदेलखंडाचा एक भाग देऊन टाकला. त्या भागातील नवास या भांडखोर जमातीने बंडाळी माजवून चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देणं बंद केले. त्यांच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी मल्हारराव किसन व ज्योतिबा शिंदे यांना रवाना केले. परंतु या कामी त्यांना अपयश आले. तेंव्हा होळकरांच्या सल्ल्याने पेशव्यांनी ही कामगिरी नारोशंकरावर सोपविली. नारोशंकरांनी आपल्या सैन्याच्या मदतीने नवास जमातीचे बंड मोडून काढले व चौथाई सुरळीत केली. त्यानंतर पेशव्यांनी नारोशंकराला ओरिसा प्रांतातील राजावर स्वारीस पाठविले. नारोशंकरांनी त्या स्वारीत अकरा लाख रुपये महसुलाचा भाग मिळविला.
पेशवे खुष झाले. त्यांनी त्यांना झाशीचे सुभेदार नेमले व राजे ही पदवी दिली.
सन १७४२ साली पेशव्यांनी नारोशंकराची रवानगी ओर्छा राज्यावर केली. झाशी जवळील ओर्छा हे छोटे राज्य. तेथील मुसलमान राजाने पेशव्यांविरुद्ध पुंडाई केली होती.
नारोशंकर ओर्छावर चालून गेले. त्यांनी त्या राजाला कैद करून शृंखला बांधून झाशीच्या किल्ल्यात ठेवले व ओर्छा राज्यावरुन गाढवांचा नांगर फिरविला. सर्व ओर्छा राज्यावर पेशव्यांचा अंमल झाला. नंतर राजाशी नारोशंकरांनी तह केला. झाशीचा किल्ला मराठ्यांना मिळाला. त्या किल्ल्याखाली नारोशंकरांनी गाव वसविले. ते गाव म्हणजेच आजचे झाशी शहर. सन १७४२ ते १७५६ पर्यंत नारोशंकराचा अंमल झाशीवर होता. झाशी शहरात अजूनही नारोशंकर तळ या नावाचा एक भाग आहे. झाशीच्या सुभेदारीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी झाशीचे वैभव वाढविले. इतकेच नव्हे तर पेशव्यांकडून जी जी कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात येई ती ते चोख रितीने बजावत असत. महसूलाच्या रकमा वसूल करण्यात त्यांची कामगिरी विशेष असे. यामुळे पेशवे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना मोत्याचा चौकडा दिला. हा चौकडा नारोशंकर नेहमी वापरीत. त्यामुळे त्यांना गमतीने मोतीवाले नारोशंकर असे म्हटले जाई.
सन १७४७ मध्ये त्यांनी नाशिक पंचवटी परिसरातील गोदावरी तटावर रामेश्वर मंदिर बांधले.व पोर्तुगीजांकडून एक भली मोठी घंटा घेऊन ती मंदिरावर बांधली आजही तिला नारोशंकरी घंटा असे म्हणतात. सन १७५७ नंतर त्यांची रवानगी गुजरात प्रांतात झाली. तेथे त्यांनी गुजरातसह सावनूर लढ्यातही पराक्रम गाजवले. तेथून ते दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीने उत्तरेला गेलेत.
अहमदशा अब्दाली याने इ. स. १७५६ मध्ये भारतावर चौथ्यांदा स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी पेशव्यांनी राघोबादादास पाठविले. मात्र राघोबादादा उत्तरेत पोचण्यापूर्वीच अहमदशा निघून गेला होता. सन १७६० मध्ये अब्दाली पाचव्यांदा भारतावर स्वारी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊस आज्ञा केली व मुलगा विश्वासराव यास बरोबर दिले. अब्दाली पूर्ण तयारीनिशी आला होता. याही मोहीमेत नारोशंकर सामील होते कारण उत्तरेकडे ते बराच काळ असल्याने त्यांना या प्रदेशाची माहिती होती. चौथ्या स्वारीत अहमदशाने दिल्लीवर कबजा मिळविला होता. अब्दालीच्या देखत दिल्लीला पेशव्यांनी वेढा दिला आणि दिल्ली घेतली. सदाशिवभाऊंना धीर आला आता मराठ्यांची हिंम्मतही वाढली होती. या प्रित्यर्थ दरबार भरविला गेला. या दरबारात पेशव्यांनी नारोशंकरास ‘राजेबहाद्दूर’ ही पदवी दिली. शिवाय पाच हजार सैन्य व पेशव्यांचा ५/६ लाखांचा खजिनाही दिला यासाठी की त्याने दिल्ली शहर सांभाळावे. तसेच शिंद्यांनीही पाच सहा लाख असा एकूण चाळीस लाखांचा खजिना त्यांच्या हवाली केला.
१४ जानेवारी १७६१, सकाळी १० वाजता युध्दाला तोंड फुटले. दुपारी विश्वासरावाला गोळी लागून ते घोड्यावरुन खाली पडले. त्यामुळे सदाशिवरावभाऊ गोंधळून गेले. त्यांचे देहभान सुटले व ते गर्दीत बघताबघता दिसेनासे झालेत. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड यांनी युद्धातून पाय काढला. नारोशंकर वगैरे दिल्लीच्या किल्लयात होते. होळकरांनी नारोशंकरास दिल्लीतून निघून जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील मंडळी गुरुवारपर्यंत धीर धरून होती. संध्याकाळी होळकर यांचे दिवाण गंगोबा तात्या पळत आले व वर्तमान सांगितले व सल्ला दिला की “ज्यास जो मार्ग भगवंत देईल, त्या मार्गे निघोन जावे.” त्यामुळे खजिना काढण्यास अनुकुल सापडले नाही. सैन्य इतके भेदरले की दिल्लीतील सैन्याची पळापळ सुरू झाली.
होळकर, नारोशंकर, पवार हे पानिपतहून पळून आले. त्यांचे सरंजाम पेशव्यांनी जप्त केले. पळून जाण्याऐवजी नारोशंकर दिल्लीस दडून बसला असते तर खजिना वाचला असता. पळणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देता आले असते व अब्दालीच्या सैन्याला अटकाव करता आला असता पण नारोशंकराने होळकरांच्या सांगण्यावरून पळ काढला व पेशव्यांची गैरमर्जी ओढवून घेतली.
पानिपतानंतर लवकरच पुत्र व भाऊंच्या वियोगाने नानासाहेबांनी प्राण सोडला व राघोबादादाने सन१७६१ मध्ये पेशवाईचा कारभार आपल्या हाती घेतला. सन १७६२ मध्ये नारोशंकरांना प्रतिनिधीचे काम देण्यात आले. पुढे ते महादजी शिंदे यांच्या पदरी दिवाणगिरी करीत. पण ती रघुनाथरावांच्यामुळे गेल्याने प्रतिनिधी भवानराव यांचेकडे कारभारी म्हणून नोकरीस असताना इ.स.१७७५ च्या २३ जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना रघुनाथराव (मालेगाव शाखा) व त्रिंबकराव (नाशिक शाखा) अशी दोन मुले होती.
श्री चित्रावशास्त्रीलिखित मध्ययुगीन चारित्राकोशात असा उल्लेख आढळतो की दिल्लीस असताना एका शिकारीच्या प्रसंगी त्याने बादशहाचे प्राण वाचवले. यावर बादशहाने संतुष्ट होऊन त्यांना राजेबहादूर हा किताब व मालेगाव हा गाव जहागीर देऊन इतर गावे सरंजामादाखल दिलीत.
भीमसेन कुलकर्णी संपादित पेशव्यांच्या बखरीत असाही उल्लेख मिळतो की सन १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने बऱ्याच जहागिऱ्या वाटल्या. त्या वेळी नारोशंकरांनी मालेगावची जहागिरी मागितली. भाऊंनी ती दिली. या जहागिरीत मालेगावातील एकुण आठ गाव व निंबायती परगणा यांचा समावेश होता. अशा रितीने नारोशंकराचा मालेगांव शहराशी प्रथम संबंध आला.
नारोशंकर हे उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर होते. पानिपत युद्धानंतर त्यांनी मालेगावला किल्ला बांधण्यासाठी घेतला. तत्पुर्वी मालेगाव हे एक खेडे होते. तेथे किल्लाही अस्तित्वात नव्हता. गिरणा व मोसम अथवा मोक्षगंगा या नद्यांच्या संगमापासून उत्तरेला सुमारे एक मैल अंतरावर हा मालेगांवचा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्याला लागूनच मालेगांव शहर वसले आहे. हा किल्ला खानदेशकी किल्ली म्हणूनही प्रसिद्ध होता. किल्ला पुर्ण होण्यास दहा वर्षे लागली. नारोशंकराने मालेगावला येऊन किल्ला बांधला असला तरी स्वत: येथे कधीही वास्तव्यास नव्हते.
थोडेसे म्हणता म्हणता बरेचसे झाले.आता वळूयात हरिहर किल्ल्याच्या माहितीकडे (Harihar Fort) ……
आश्रम पाहून पुन्हा हर्षगडाचा डोंगर चढून गेल्यावर काही वेळात आपण किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडा समोर येतो. इथून किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ होतो. अंदाजे ६०-७० अंशाच्या कोनात गगनाला भिडणाऱ्या पायऱ्या पाहून छाती दडपतेच. आता या पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्न मनात उभा रहातो. पण प्रत्यक्षात मनाचा हिय्या करून एक एका पायरीशी आपण सलगी करतो तेंव्हा त्या पायऱ्यांच्या दोन्ही टोकाशी हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या कोरल्याचे लक्षात येते. आणि जीव भांड्यात पडतो. जसजशा आपण पायऱ्या वर चढत जातो तसतसा आपला आत्मविश्वासही वाढत जातो.
अखेर ९०-९५ सोपानाची वाट चढताना स्वर्ग सुखाचा आनंद घेत घेत आपण महाद्वाराजवळ पोहोचतो आणि सुटलो बुवा एकदाचे करीत प्रवेशद्वारातून आत प्रवेशतो. हा दरवाजा छोटेखानी पण देखण्या स्वरूपाचा आहे. इथ वर येई पर्यंत मागे वळून पहाण्याचे घाडस होत नाही. मात्र येथून खाली नजर फेकताच एवढ्या चिंचोळ्या, अरूंद व खड्या जिन्याच्या खोल दरीतून वर आल्याबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची व पुढे निघायचे तत्पूर्वी गडाच्या प्रवेशव्दारा शेजारी उजव्याहाती कातळात स्थानापन्न असलेल्या शेंदूरचर्चित गणेशाचे व मारुतीरायाचे दर्शन घेण्यास विसरायचे नाही. त्या शेजारी अस्पष्ट असे काही कोरून ठेवलेले आहे.
उजव्या हाती गडाचा काताळ, डाव्या हाती पाताळ दरी आणि वरच्या बाजूस कपाळमोक्ष करणारा काताळ अश्या अद्भुत मार्गाने आपला पुढचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी या मार्गाचा उल्लेख “रॉक कट् गॅलरी” (Rock Cut Gallery of Harihar Fort) असा केला याची आदराने जाणीव ठेवून अंग चोरत पुढे गेल्यानंतर काताळात कोरलेले आणखी दोन दरवाजे लागतात. हे पार केल्यावर परत पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. याच्या दोन्ही बाजूस आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत. तो पार केला की आपण अंतिम प्रवेशद्वारापाशी येतो. हा संपूर्ण १३० पायऱ्यांचा अद्भुत प्रवास कधी गुहेतून तर कधी नाळेतून झालेला असल्यामुळे कायम स्मरणात राहतो.
गडाचा शेवटचा दरवाजा लहान असून तो पार केला की आपण गडमाथ्यावर येतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या अंगास एक गुहा आहे. घसरण असल्यामुळे तिथ पर्यंत उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे आहे. ही गुहा पाहून वर यायचे व पुढे निघायचे. वाटेत काही घराची जोती व गडाच्या सदरेचे अवशेष दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याच्या टाक्या व पश्चिमेस भिंत बांधून पाणी अडविलेला एक प्रशस्त तलाव लागतो. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेले हनुमानाचे देऊळ व बाजूच्या उघड्या खडकावर एक शिवलिंग व नंदी आहे. उजव्या हाताला साधारण ५० फुट उंचीची एक टेकडी दिसते. शेवटचा काताळ टप्पा चढून ही टेकडी सर केली की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर अनेक देव-देवतांनी दाटी करून आपली जागा पटकावली आहे. कुणा एका दुर्गवी राने इथं एक भगवा ध्वज ही लावलेला आहे. आसमंताच्या निळाईवर माथ्यावरून उत्तरेला वाघेरा, दक्षिणेला वैतरणा तलाव व त्या मागे कवनाई, त्रिंगलवाडी तर पूर्वेला कापड्या, ब्रम्हा त्यामागे त्र्यंबकगड इत्यादी किल्ले पहाता येतात.
इथवरचा भाग बघून झाला की टेकडी उतरुन आल्यावाटेने परत फिरून गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे चालू लागायचे. वाटेत एका सरळ ओळीत कातळात कोरलेल्या पाच पाण्याच्या टाक्या लागतात. टाक्यापाहून पुढं गेलं की घुमटाकार माथा वर कळस असलेली व अंदाजे तीस बाय बारा फूट अशी आयताकार दगडी कोठी लागते. संपुर्ण गडावर ही एकच वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे. उंचीला चार बाय अडीज असे खिडकी सारखे दिसणारे कोठीचे प्रवेशव्दार उंचावर आहे त्यामुळे आत उडी मारूनच प्रवेश करावा लागतो. या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या डावीकडे खालच्या भागावर काहीतरी कोरलेले आहे. कोठीला दोन खण असून आत सदैव काळोखच असतो. त्यामुळे कोठीच्या एका भागात दिवा लावण्यासाठी धातूच्या पत्र्याची पणती रुतवून बसविली आहे. गडावर मुक्काम करायचा झाल्यास या एकमेव कोठीचाच आश्रय घ्यावा लागतो. गडावरील इतर वास्तूंपेक्षा दूर असल्यामुळे ही कोठी म्हणजे नक्कीच दारूकोठार असणार.
कोठी पाहून गडाच्या पूर्वेकडील टोकावर जात असताना वाटेत दोन पाण्याच्या टाक्या लागतात. त्या पुढे खळगा असून तो फक्त पावसाळ्यातच भरलेला असतो. पूर्वेकडील भागाला किंवा संपूर्ण हर्षगडाला सातशे आठशे फुटाच्या काताळाची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे गडावर जवळ-जवळ तटबंदी अशी नाहीच किंवा बांधली गेल्याच्या खुणा दिसत नाहीत. इथवर तीन-साडेतीन तासाच्या भटकंतीने आपले गडदर्शन पूर्ण होते. गड पाहून परत उतरताना मात्र विशेष काळजी घेऊन काळजीपूर्वक उतरावे लागते.
आता पाहूया या गडाचा इतिहास…… (Harihar Fort)
या गडाला हर्षगड असे नाव का पडले याची मनोरंनात्मक दंतकथा सागितली जाते ती अशी. मुगल सैन्याचा गडाला वेढा पडला. गडावर कमी शिबंदी असून सुध्दा ती गडावरुन दगडधोंडे फेकून मोगलांना वर चढू देत नव्हती. दोन महिने गड झुंजला. गडावरची धान्यसामुग्री संपत चालली होती. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न किल्लेदाराला पडला. तेव्हा त्याच्या म्हाताऱ्या आईला एक कल्पना सुचली. तिने आपल्या मुलाला म्हणजे किल्लेदाराला हजार दीड हजार पत्रावळ्या आणि मोठा टोप भर भात व वरण करायला सांगितले. दोन अडीज महिन्याचा वेढा बाहेरून कुमक, रसद मिळण्याची शक्यता मावळलेली. त्यातून गडावरील शिधा संपत आलेला. अश्यावेळी या म्हातारीला काय खा खा सुटलीय. परंतु मातृ हट्टपायी किल्लेदाराला आईचे बोलणे मान्य करावे लागले. गडावर पत्रावळ्या बनविल्या गेल्यात. भात डाळ शिजविले गेले. नंतर किल्लेदाराच्या आईने गडकऱ्यांच्या मदतीने तो भात वरणात कालवून पत्रावळीला फासला आणि वाजंत्री लावून नाचत गाणी गात आरडाओरडा करत त्या खरकट्या पत्रावळ्या गडावरुन खाली भिरकावल्या. गडावर वाजणारी वाध्ये, चाललेला जल्लोष व आतषबाजी पाहून अगोदरच दोन अडीज महिन्याच्या वेढ्याने कातावलेल्या मुगल सैन्याच्या सरदाराला आश्चर्य वाटले. वर लेकाचे खुशाल गाणी काय गाताहेत, नाच काय करताहेत, जेवणावळी काय उठताहेत, आनंदोत्सव काय साजरा करताहेत. या अर्थी गडावर शिधा साहित्य भरपूर आहे आणि इथे आपण अन्न-पाण्याशिवाय गडाखाली तळ ठोकून वेढा घालून बसलोय. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर आपण मात्र नक्कीच उपासमारीने मारून जावू. असा विचार करून मुगलांनी वेढा उठविला आणि चालते झाले. हे पाहून किल्लेदाराला प्रचंड हर्ष झाला. तेव्हा पासून या गडाचे नाव पडले हर्षगड.
हरिहर (Harihar Fort) उर्फ हर्षगड हा कुणी बांधला हे नक्की सांगता येण कठीण पण त्याची बांधणी पहाता तो प्राचिन काळात बांधला गेला असावा. याबाबत दुमत नाही. सुरवातीच्या काळात हा गड अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात असल्याचे पुरावे सापरतात. पुढे शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी इ.स.१६३६ साली त्र्यंबकगड घेताना हा ही किल्ला जिंकून घेतला. पुढे त्याचा ताबा मुघलांकडे गेला. इस. १६७० मध्ये स्वराज्याचे पंतप्रधान मारोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. शिवरायांच्या मृत्यू नंतर संभाजी राजांच्या धामधुमीच्या काळात हा किल्ला दि. ८ जाने. १६८९ रोजी मुघल सरदार महाबतखान याने हा किल्ला जिंकला. त्यावर मात म्हणून ताराराणीच्या काळात मराठ्यांनी हा गड पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला. शेवटी सन १८१८ मधे इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा ही गड मराठ्यांकडून जिंकून घेतला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांकडून भारताने स्वतंत्र मिळविले आणि सर्वच किल्ल्यांसह हरिहर उर्फ हर्षगडही (Harihar Fort) स्वतंत्र झाला.
लेखन, संकलन: संजय तळेकर (संजया उवाच्), मुंबई. भ्रमणध्वनी क्र. : 98202 38177
सूचना: ह्या लेखाचे संपूर्ण अधिकार लेखक संजय तळेकर, मुंबई यांच्याकडे असून त्याची नोंदणी केलेली आहे, ह्या लेखातील कुठलाही मजकुर अथवा छायाचित्रे यांचा वापर लेखकाच्या समंती शिवाय करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.
आधार व आभार…..
- दुर्गांच्या देशा: भगवान चिल्ले
- वारसा अतिताचा: पंकज समेळ
- सरदार नारोशंकर राजेबहाद्दर: डी. एस्कु. लकर्णी
- डॉ. रूपा गणेश मेस्त्री (Ph. D. संस्कृत)
First Published on facebook on 04/04/2020 at : https://www.facebook.com/sanjay.talekar.92
हरिहर गडाची छायाचित्रे
हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT (२८ जुन २०१५ )
हरिहर किल्ल्याला भेट देऊन ३ वर्ष झाली .हरिहरला " हर्षगड" असे ही म्हणतात. समुद्रसपाटी पासून ३६७६ फूट उंच असा हा किल्ला सह्याद्रीच्या त्र्यंबक भागातील महत्वाचा किल्ला आहे ! मागील आठवड्यात फेसबुक वर हरिहर किल्ल्याचे फोटो पहिले आणि तेव्हा जाणवले की हरिहर किल्ल्याच्या पायऱ्यांची छाप मनावर कायमची उमटलेली आहे. मराठ्यांचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचे किल्ले ! मराठ्यांची शक्तिस्थाने कमकुवत करण्यासाठी इंग्रज गडावर जाणऱ्या पायऱ्या आणि वाटा तोफगोळ्यांनी उडवित असत ! इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स हा हरिहर गडाच्या कोरलेल्या पायऱ्या पाहून त्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने त्या तोफगोळ्यांनी न उडविण्याचा निर्णय घेतला. इंग्रज तसेच निर्दयी माणसे त्यात त्यांनी ह्या वास्तूचा एक भाग जपला म्हणजे ती नक्कीच सुंदर असणार असे कुतूहल मनात होते. प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या कश्या बांधल्या गेल्या असतील हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडेल आणि तो ही हरिहरच्या प्रेमात पडेल हे नक्की ! एका दुर्गम सुळक्यावर मधोमध आणि घुमावदार पायऱ्या कोरणे ही साधी बाब नव्हे !
![]() |
| हरिहर गडाच्या पायऱ्या |
![]() |
| टाके हर्ष गावातून दिसणारा धुक्यात लपलेला हरिहर गड |
आम्ही कसे गेलो ?
ट्रेकला सुरुवात !
![]() |
| अभिनव |
परतीचा प्रवास :
हरिहर
http://www.misalpav.com/node/34558
रात्री ३ वाजता एका आश्रमात पोचलो, तिथे थोडा वेळ आराम करून सकाळी हरिहर गडासाठी निघणार होतो.

आश्रम

आश्रमाच्या आवारातील मारुतीराया

सकाळी ६ वाजता ट्रेक लिडरच्या शिटीने जाग आली तर सर्वात शेवटी उठणारा मीच असल्यामुळे थोडस शरमल्यासारख झाल. मग पटापट आन्हिक उरकून ब्याग भरून ठेवली, आणि ग्रुप च्या सदस्यांनी केलेला फक्कड चहा घेतला. ट्रेक लीडरने सर्वाना सूचना दिल्या, नवीन ओळखी झाल्या.


हरिहर गड मागच्या बाजूने
हरिहर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ते नेढ, वरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत फिरत होतो. ग्रुपचा नाशिक मधील एक सदस्य क्रिकेट मैच सोडून सर्वांसाठी गरम गरम पुलाव घेऊन आला होता. दोघांच्या खांद्यावर ५० लोकांच जेवण होत आणि इतका गड चढून आले होते. त्यांना कोपरापासून हात जोडले, कारण इतक गरम जेवण ब्यागेत भरून चालण म्हणजे तव पाठीवर घेऊन चालण्यासारख होत. सर्व गड फिरून झाल्यावर उतरताना रोप लावून उतरलो. चढताना पायाऱ्याकडे तोंड करून चढल्यामुळे त्या सरळसोट पायऱ्या धोकादायक वाटल्या नव्हत्या, पण आता उतरताना ती उंची बघून ……… कपाळात आल्या होत्या.

कातळ पायऱ्या ज्याकरता हा ट्रेक करावा
गड उतरताना एक ग्रुप फोटो काढण्याच्या नादात रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने गावात उतरला. ट्रेक लीडरने तिथल्या तिथे त्यांची कान उघडणी केली, आणि पुढच्या ट्रेक साठी सूचना दिल्या. बसमध्ये बसून आता कळसुबाई साठी चाललो होतो, एका गावातल्या बोर्ड वर लिहील होत "कळसुबाई माता मंदिर" तर चुकून आम्ही त्या गावात शिरलो. विचारल्यावर कळलं कि आम्हाला पुढच्या बारी गावात जायचं होत. मग परत बस फिरवून एकदाच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जेवून लवकर झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठून ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती.
थोड्या चालीतच आम्ही बऱ्यापैकी उंचीवर पोचलो होतो. चढत असताना एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पियालो. लिंबू सरबताने अशी काही एनर्जी आली की डायरेक्ट शिडीजवळ येउन थांबलो. आता पायऱ्या आणि शिड्यांची वाट होती. बऱ्यापैकी थंडावा आणि धुकं होत. शेवटच्या टप्प्यावर येताना एका टपरीवजा दुकानात ग्रुपचे काही मेंबर कांदा भजीवर ताव मारताना दिसले मग काय आक्रमण, मनसोक्त हादडून झाल्यावर समोरच असलेल्या विहिरीतून थंड बर्फासारख पाणी पियालो. त्या पाण्याची चव खूपच छान होती. वरती जाऊन कळसुबाईच दर्शन घेतलं, तिची खणा-नारळाने ओटी भरली.

कळसुबाई माता प्रसन्न

ग्रुप मध्ये (नवीन) लग्न झालेले आमचे जोडपे असल्यामुळे आमच्याकडून मातेची ग्रुपकडून ओटी भरली. नंतर माझ्या बायकोला उखाण्यासाठी सगळ्यांनी पिडलं, म्हटलं माझ्यावर पण हे सरकणार म्हणून थोडस मागे मागे जात होतो. बायकोचा उखाणा संपताच ज्याची भीती होती तेच झाल मला उखाणा घ्यायला सांगितलं मग काय रहाणेचा उखाणा घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. नशीब ग्रुप मधले कोणी होम मिनिस्टर बघणारे नव्हते नाहीतर काय खर नव्हत. प्रत्येक ट्रेकला अशा काही न काही गोष्टी घडतात की तो ट्रेक चांगलाच आठवणीत राहील.
ओटी भरून झाल्यावर देवीची आरती केली, ग्रुप मधील शार्दुलने प्रतिज्ञा म्हटली. ग्रुप मधील एका मुलाचा त्याच दिवशी वाढदिवस होता, हरिहर गडावर पाय लचकल्यामुळे तो खरतर कळसुबाई ट्रेक करणार नव्हता पण फोनवरून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सावकाश चालत त्याने ट्रेक पूर्ण केला. प्रतिज्ञा झाल्यावर त्याने महाराजांवर एक छानसा पोवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस इतक्या चांगल्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे तो खूप खुश होता.
उतरताना ग्रुप मधील सौरभच आणि माझ लदाख प्रेम सारखच असल्यामुळे त्याच्याशी चांगली गट्टी जमली. येताना लदाखचा प्लान केला, कस जायचं कुठे थांबायचं अस बोलण चालू होत. नंतर निवांत भेटून प्लानिंग करू अस ठरवून ट्रेक ची सांगता केली.
यावेळेला फोटो खूपच कमी काढले त्याबद्दल माफी असावी.
हरिहरगड उर्फ हर्षगड HARIHAR HARSHGAD
हरिहर (हर्षगड, हरिशगड) Fort Harihar
संवर्धन आणि विकासकामांसंबंधी-
गेल्या काही वर्षात हरिहर किल्ल्यावर गिर्यारोहकांबरोबरच हौशी पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. विशेषतः आठवड्यांच्या शेवटी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हरिहर प्रकाश झोतात आला आहे. यावरूनच सुरक्षिततेचे काही प्रश्न उभे राहतात.
नाशिकच्या प्रशासनालाही यामुळे हरिहरवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भात पावले उचलावीशी वाटतात. कारण जर कुणाचा अपघात झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू ओढावला तर मात्र प्रशासकिय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं जातं. हरिहर किल्ला हा वनविभाग, नाशिक पश्चिम यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सर्व विकासकामे आणि सुरक्षेची कामे वनविभागामार्फतच केली जाणार आहेत. या सर्व सुरक्षेच्या आणि विकासकामांना जिल्हाधिकारी, नाशिक यांचेतर्फे फंडींग होत असते. सुरक्षेच्या कारणात्सव ही विकासकामे व्हावीत याबद्दल आक्षेप अथवा शंका नाही परंतु त्याआधी हरिहर किल्ल्याविषयी जाणून घेऊन गिर्यारोहणातील तज्ञांकरवी ह्याची आखणी व्हावी ही आपेक्षा. त्यासाठी हा लेखप्रपंच…
सर्वप्रथम आपण हरिहरच्या रचनेबद्दल जाणून घ्यायला हवं-
हरिहर समुद्रसपाटीपासून 3674 फूट उंच असून हा किल्ला नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत येतो. पायथ्याच्या निरगुडपाडा गावापासून काही अंतर चालून गेल्यावर पहिला डोंगरउतार असलेला माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळ टेकडी भागावर जाता येते. वेताळटेकडी असलेल्या पठारावर वेताळादेवा पासून साधारण हरिहरच्या पूर्वे दिशेला जाणारी पायवाट आश्रम आणि शिलालेख असलेल्या प्राचीन पुष्करिणी (कुंड) कडे जातो.
पठाराच्या वर उभा कातळकडा दिसतो. हा कातळभाग प्रिझम (Prism) आकाराचा असून त्याच्या तीन बाजू आणि दोन कडा संपूर्णतः नव्व्द अंश कोनात उभे आहेत. वेताळटेकडीपासून वरच्या बाजूस उठावलेला जो कातळकडा दिसतो. तो मात्र सुमारे 70 ते 75 अंश कोनात असून त्यावरून नाळ कोरून त्यात अवघड असा पायऱ्यांचा मार्ग बनविलेला आहे. हरिहर किल्ल्याच्या प्राचीन पायरी मार्गावरून गडमाथ्यावर जाण्यासाठी एकावेळेस एकच माणूस वर चढू शकतो किंवा खाली उतरू शकतो. हा मार्ग थोडा अवघड असला तरी अशक्यप्राय नाही. सुमारे 150 ते 200 फूट उंचीचा हा सरळ मार्ग आहे. या प्रत्येक पायरीची लांबी ही सरासरी दोन ते अडीच फूट असून दोन्ही बाजुंना हाताने घट्ट धरण्यासाठी खोबणी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पाय व दोन्ही हात असे चार पकडींनी (holds) घेऊन कुणीही वर जाऊ शकतो. सह्याद्रीत अशा प्रकारच्या उभ्या कड्यावर किंवा कातळभिंतीवर कोरलेले जीन्याचे मार्ग अनेक किल्ल्यांवर आहेत. हे सर्व मार्ग काही ठिकाणी दोन्ही बाजुंनी बंदीस्त आहेत तर काही मार्ग एका बाजूने मोकळा/उघड (exposed) आहेत. परंतु हरिहर हा फक्त सह्याद्रीत नव्हे तर संपूर्ण भारतात दोन्ही बाजुंनी आणि पाठमोरा मोकळा (exposure) असलेला अनोखा दुर्गाविष्कार आहे. उभी नाळ असलेला पायरी मार्ग पहिल्या प्रवेशद्वारात जातो.
या प्रवेशद्वाराच्या पुढेही थेट माथ्यावर जाण्यासाठी कोरीव मार्ग आणि कोरीव पायऱ्या आहेत परंतु ही कोरीव ठिकाणं एका बाजूने बंदीस्त आहेत. गडमाथा हा सुमारे 20 ते 24 एकर क्षेत्रफळाचा असून फार विस्तिर्ण नाही. माथ्यावर काही गडावशेष आहेत. साधारण मध्यभागी टोकदार उठावलेला सर्वोच्च बिंदू आहे.
हरिहरचे सौंदर्य ब्रिटिशांच्या अंगाने-
सन 1818 मध्ये त्र्यंबकगड उर्फ ब्रम्हगिरीला ब्रिटिशांनी वेढा दिला. तिव्र संघर्षाला सामोरे जावूनही ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला. त्र्यंबकगडाच्या अखत्यारित असणारे 17 किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले. हरिहर देखील त्यांपैकी एक. आजच्या बरोबर दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…
“Truly wonderful! ‘Words’ are not be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”
महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरून पुन्हा संघर्ष होऊ शकतो हे जाणून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर जाणारे मार्ग आणि पायऱ्या दारूगोळ्यांनी उडवले आणि त्यांना न वापरते केले. परंतु हरिहरच्या या अनोख्या रचनेच्या ते मात्र प्रेमात पडले आणि त्याला आहे तसा ठेवला.

आता आपण येणाऱ्या भाविक, हौशी लोक आणि पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा विचार केला पाहिजे.
पर्यटनाच्या अंगाने कुठल्या भागात एकावेळी किती पर्यटकांनी जावं याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु शासन-प्रशासनाच्या वतीने गर्दीचं नियंत्रण आणि नियमन करण्याच्या उपाययोजना अनेक स्थळांवर केलेल्या आढळतात. हरिहर हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे वनविभागाची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिंहगडावर सोडली जाणारं प्रत्येक वाहन नोंद करून तसंच तपासणी करून वरच्या बाजूस सोडलं जातं. मद्यपान आणि मांसाहारास पूर्णतः बंदी आहे. संपूर्ण घाट मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने धुम्रपान करण्यास मनाई आहे जेणे करून वणवा पेटणार नाही. गडमाथ्यावरील खाद्यगृहांतही धुम्रपान केल्यास जागेवर दंडाची व्यवस्था दिसून येते. ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसविलेले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी प्रसाधनगृहांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.
दुसरं उदाहरण आपण वासोटा किल्ल्याचे बघू. बामणोली येथे पर्यटकांना वनविभागाच्या कार्यालयात परवानगी घ्यावी लागते. परवानगी असलेल्या पर्यटकांनाच बोटीत बसून वासोट्याच्या पायथ्याशी सोडले जाते. पायथ्याशी असलेल्या चौकीत वनकर्मचारी परवानगी तपासून वर जाण्यासाठी सोडतात. संध्याकाळच्या आंत पर्यटक, गिर्यारोहक आदिंनी परत यायचे असते. रात्री वासोटा किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे.
1. वरील दोन उदाहरणांच्या धर्तीवर हरिहर परिसरात वनविभागाने पर्यटकांसाठी छोटे कक्ष किंवा चौकी निर्माण करावे. हरिहरला येणारे लोक प्रामुख्याने हर्षेवाडीच्या घाटमार्गातून किंवा पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून हरिहरच्या दिशेने पायी ट्रेक करण्यास सुरुवात करत असतात. या दोन ठिकाणांवर म्हणजेच हर्षवाडी आणि निरगुडपाडा येथे या चौकी असाव्यात. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत येथे स्थानिक लोकांना रोजगार देऊन नेमणूक करावी. या दोन चौकींपैकी कुठल्याही एकातून हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची शासकीय ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी. या चौकी केंद्रांचे कामकाज चालण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेशशुल्क तसेच वाहन पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. त्याची रीतसर पावती पर्यटकाना देण्यात यावी.
2. पहिला टप्पा म्हणजेच डोंगरउताराचा माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळटेकडी पठारी भागावर एक वनचौकी असावी. ही वनचौकी अवघड पायरी मार्गाच्या दिशेने असावी. खालील केंद्रात नोंदणी केलेली पावती वरच्या चौकीत दाखविणे पर्यटकांना बंधनकारक असावे. ज्यांच्याकडे नोंदणी नाही ते पर्यटक पायरीमार्ग चढून गडमाथ्यावर जाऊ शकत नाहीत. परंतु असे पर्यटक पहिल्या टप्प्यातील पठार, वेताळटेकडी परिसर, आश्रम, पुष्करिणी या भागात फिरण्यास हरकत नसावी.
3. गर्दीच्या वेळी एकावेळेस किती जणांना पायऱ्यांवरून सोडावे तसेच उतरवावे याचा निर्णय चौकीतील वनकर्मचारी घेतील. ते पर्यटकांना बंधनकारक असेल. अन्यथा केलेल्या नोंदीवरून नियम न पाळणाऱ्या पर्यटकाना दंडात्मक कारवाई करावी.
4. एका दिवसात किती पर्यटक गडमाथ्यावर सोडावे याचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञांकडून अभ्यास करून संख्या ठरवावी. त्यानुसार खालील केंद्रातून तेवढ्याच पर्यटकांना वर जाण्यास परवानगी द्यावी.
5. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच कास पठारासारखी संरक्षित ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी ज्याप्रमाणे वेबसाईहून नोंदणी करण्याची सोय आहे तशी हरिहरच्या बाबतीत लवकरच तयार करावी. वेबसाईटहून होणाऱ्या नोंदीसाठी भेट देण्याच्या निदान 15 दिवस आधी होणे आवश्यक असल्याची अट असावी.
6. 20/30 च्या वरील संख्येने मोठा ग्रुप येत असल्यास त्यांनी अधिकृत/नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेमार्फतच बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण, अशा ग्रुपला सांभाळणे, काळजी घेणे आणि शिस्तशीर ट्रेक करणे संस्थेमार्फतच सोयीचे होत असते.
7. अतिवृष्टी असलेल्या दिवसात हरिहर गडमाथ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नोंदणी देऊ नये. हा निर्णय सर्वतः पायथ्याच्या चौकी/केंद्रातील वनकर्मचारी घेतील. या दिवसात पायऱ्या मार्ग शेवाळलेला असतो. पायरी मार्गा वर पाणी वाहत असते. तसेच हरिहरचा माथ्याकडून खालील ३०० मीटरचा भाग हा दाट धुक्याखाली असल्याने दृष्यमानता (visibility) फार कमी असते. त्यात वरील वाटा चुकण्याची शक्यता अधिक असते.
8. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असणाऱ्या ब्रह्मगिरी-हरिहर प्रदक्षिणा दिवसात ज्या भाविकांना वेताळटेकडीकडून गडमाथ्यावर जायचे आहे त्यांना वर जाण्यास मनाई नसावी.
9. खालील वनकेंद्र/चौकी पासून ते थेट गडमाथ्यापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सूचना फलक असावेत. त्यावरील सूचना गिर्यारोहणातील तज्ञाकरवी मागवून तयार कराव्यात.
10. हरिहर गडमाथ्यावर रात्री मुक्कामास पूर्णतः बंदी असावी. वेताळटेकडी पठारावरील आश्रम बाजूस मुक्काम करण्यास हरकत नसावी.
11. निरगुडपाडा, हर्षवाडी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांच्या घराघरातून मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी (Home stay) प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
12. साम्रद-सांधण दरी तसेच कळसूबाई परिसरात जसे झाले आहे तसे हरिहर परिसरातील स्थानिक तरुणांना गिर्यारोहणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाकरवी अशा प्रशिक्षितांची नोंद करून त्यांना गिर्यारोहणाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा प्रशिक्षित तरूणांनी अनुभव नसलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करून गाईडचे काम करावे. त्यातून त्यांना मिळकतीची सोय होऊ शकते. जेणे करून नवख्या पर्यटकांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.
13. उभ्या पायरी मार्गावर शिडी/जीना/रेलिंग्ज लावणे हा पर्याय नाही. यामागे खालील कारणं आहेत
– या नाळेच्या पायरीमार्गाचा विचार केला तर त्याचे सौंदर्य नष्ट न होता लोखंडी मार्ग बनविणे शक्य नाही.
– त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.
– आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.
– आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.
14. उभा पायरी मार्गावर गर्दी होत असल्याने धोकेदायक स्थिती वाटते. या खड्या मार्गावर एकावेळी वरून खाली किंवा खालून वर असा फक्त एकेरी वापर होत असतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या कातळभिंतीवरून शिडी/जीना/ट्रॉलीमार्ग किंवा रोप वे यांचा पर्याय करण्यास वाव आहे. त्यामुळे प्राचीन मार्गावरून माथ्यावर जाणे आणि आधुनिक मार्गाने खाली परतणे अशी यंत्रणा सोयीची होऊ शकते.
15. गडमाथ्यावर अति धोकेदायक ठिकाणी रेलिंग्ज लावावेत. परंतु संपूर्ण परिघाला रेलिंग्ज लावण्याची आवश्यकता नाही. कारण त्या रेलिंग्जचे निर्माण करताना खालील पायऱ्यांच्या रचनेला हादरे बसू शकतात. तडे आदी पडून ह्या अनोख्या रचनेचे कायम स्वरूपी नुकसान होऊ शकते.
16. हरिश्चंद्रगड येथील कोकणकडा, धोडपमाची आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेलिंग्ज आज कोसळलेले आहेत. त्यातून नैसर्गिक खडक रचनेचे अतोनात नुकसान होते. हरिहर गडमाथ्यावर रेलिंग्ज करू नयेत. यातून काही वर्षात रेलिंग्ज सकट कातळाचा काही टप्पा कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता अधिक आहे.
17. अनेक गडकोटांवर पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या पोटापर्यंत जाण्यासाठी डांबरी गाडी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. काही किल्ल्यांच्या थेट माथ्यावर वाहने जातात. हरिहर किल्ल्याच्या पठारापर्यंत गाडी रस्ता करण्याची माहिती गावकरी आणि वनविभागाशी संबंधित कर्मचारी कडून मिळाली. डांबरी गाडी रस्ता करण्याचे धोके खालीलप्रमाणे
– डोंगर उतारावरील वनं आणि वृक्ष मोठ्या प्रमाणावर कापावे लागतील.
– रस्त्यासाठी सुरुंग लावून स्फोट करावे लागणार. त्यामुळे हादऱ्यांनी वरच्या उभे कडे असलेल्या भागावरून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.
– हादऱ्यांमुळे पायरी मार्गावरील प्रवेशद्वार कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ह्या प्रवेशद्वाराचे दगडी चीरे कुठलाही चुना आदी पदार्थ न भरता रचीव पद्धतीने द्वार तयार केलेले आहे.
– हातगड आदी किल्ल्यावर वनविभागाने जो गाडी रस्ता केला आहे त्यावर सतत दरड कोसळत असते आणि पर्यटकांना गाडी खाली लावून पायी जावं लागतं. यातून रस्ता बनविण्याचा मुळ उद्देश साधत नाही.
– ज्या अनोख्या पायरी मार्गाला जपण्यासाठी ही नियमावली आहे त्यात रस्ता बनविण्याची कार्यप्रणाली बाधक ठरेल.
– जर गाडी रस्ता झाला तर हरिहरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी गर्दीला रोखणे नियंत्रणाबाहेर होईल. हरिहरवरील गर्दी रोखणे हा सध्यस्थितित तरी शासनाचा प्रमुख हेतू आहे.
– वाहनांचे प्रदूषण, कचऱ्याचे प्रदूषण या प्रश्नांना मोठ्याप्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे.
– परिसरातील वन्यजीवन आणि जैवविविधता धोक्यात येईल.
18. शासनाने विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणावर लोकजागृती आणि लोकशिक्षण मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यात गिर्यारोहण, आनंददायी पर्यटन, स्वयंशिस्त, सुरक्षित पर्यटन आदी बाबींचा सामावेश असेल. रेडियो, टी.व्ही., वर्तमानपत्र, फलक, पत्रके, विविध कार्यशाळा वगैरे अनेक माध्यमांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

हरिहर किल्ल्याची रचना अवघड आणि अजस्त्र भासत असली तरी आजपर्यंत हरिहर पायरी मार्ग तसेच गडमाथ्याहून पडल्याने अपघात झाला किंवा मृत्यू झाला अशी नोंद ऐकवत नाही. तरी सोशल मिडियामधून पायरी मार्गावर होणारी गर्दीची भीषण वास्तवता समोर येत आहे. त्यामुळे जलदीने उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, वनाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, दुर्ग अभ्यासक, तज्ञमंडळी, गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू करणारी टीम, काही तज्ञ गिर्यारोहक यांनी संयुक्त हरिहर किल्ल्याला भेट द्यावी. यातून स्थानिक लोकांच्याही सूचना महत्त्वाच्या असतील. शासकिय कार्यालयात होणाऱ्या किल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बैठकीत ‘महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या गड-किल्ले संवर्धन समिती‘ तील सदस्यांना पाचारण करण्यात यावे.
धन्यवाद.
हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य
![]() |
| किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक |
![]() |
| कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या |
![]() |
| सरळ पायऱ्या |
वरून आपणाला उत्तरेला दिसते ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे हरिहरचा ट्रेकचा थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353, 9156571313 ⚔🚩
किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत... - भाग १
प्रास्ताविक ....
तर, अशा तळेकर कुलोत्पन्न राजे संजयजींनी ऐनवेळी हुकुम सोडला ... हर्षगडला जायचं... बस्स्स... वनीं आनंद, भुवनी आनंद अशीच साऱ्यांची अवस्था होऊन गेली. झाडून सारे (कामा) धंद्याला लागले. आमच्या पक्षिमित्र मनिष नाखवा साहेबांनी थेट एक खाजगी बसच आरक्षित केली. वर्षाच्या सुरुवातीलाच अशी रांगड्या गडोत्तमाची भेट नाकारण्याचं महापाप कोण करेल?
मोहिमेचा शुभारंभ… क्षेत्र नाशिक येथे आगमन आणि देवदर्शन...
झिम्माड थंडीचा कडाका अस्सा आशिकाना होता कि मी मंदिरात, शिवाय "तसा एकटाच" आहे हे विसरून जनाब गालिब साहेबांच्या बेभान, प्रणयरंगी शायरीच्या, भावभोर दुनियेत काही क्षण मुशाफिरी करून आलो. "इश्कने (भटकंतीच्या) हमको निकम्मा कर दिया, वरना आदमी हम भी थे कामके".
हिमालयाच्या ओढीने आतुरले होऊन त्याच्या भेटीला नेहमीच जातो. पण यंदा, हिमालयच अपल्या भेटीला येतोय कि काय अस्संच गोठवणारं वातावरण होतं. भव्यदिव्य मंदिराच्या प्रांगणातील फरसबंदीवरील उघड्या पायांमुळे थंडी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती. माझ्या 'सायंटिफिक वांड' लेकाने तर हिमालयाशी नेहमीच पंगा घेणा-या बापालाही 'फ्राॅस्टबाईटची' भिती घालून टाकली.
महाखट पुजारीवर्गाच्या 'कृपे'मुळे झटापटीचं दर्शन उरकून बाहेर फेकला गेलो. तसा मंदिरासमोरच्या टपरीवरून मिसळीच्या ठसक्याचा गंध सुरसुरत्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोहोचून डोक्याचं भजं घालू लागला. मग आव देखा ना ताव ... त्या टपरीवर जोरदार हल्लाबोल केला. सक्काळी सक्काळी ६-७च्या गारेगार गारठ्यात कानातून धुर निघेल अश्शा... आगजाळ, 'तर्री मारके' गर्मा-गर्म मिसळीबरोबर काहि लाद्या पाव चेपून व डब्बल अद्रक मारके कोरा करकरीत टमरेलभर चहा नरड्यात ओतून पुढच्या अतिमहत्वाच्या कामगिरीला सज्ज झालो.
किल्ले हरिहराच्या रोखाने...
अरुण गवेकर हे आणखी एक मस्तमौला व्यक्तीमत्व आमच्यात होते. नाही.... असं म्हणणं योग्य होणार नाही, तर आम्ही त्यांच्यासोबत गड भटकंती करीत होतो हे जास्त सयुक्तिक होईल. कमालीची व्यस्त आणि तणावपूर्ण अशी उच्चपदस्थ शासकिय नोकरी आणि पंचावन्नाच्या पुढे-मागे वय असलं तरी हा माणूस, वेळ उपलब्ध होतोय असं दिसलं कि त्याच्या सदुपयोगाकरीता एखाद्या गडकिल्ल्यावरच आढळून येईल... मजबूत शरीरयष्टी राखून असलेले अरुणजी सह्यांगणातील रानवा-यासारखे भिरभरत असतात. लेखनाचं उत्तम अंग असलेले हे साहेब लिहायला मात्र जाम कंटाळा करतात ही एक यांच्याविरूद्ध माझी कायमची तक्रार. अशा चांगलं लिहिणाऱ्यांनी लेखण्या म्यान केल्यामुळे माझ्यासारख्यांना हे असं काहीतरी खरडावं लागतं.
अस्सल कोल्हापूरकर असलेल्या गवेकरांचं नरकेसरी सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या घराण्यात चांगलीच जानपछान. जंजी-याच्या नबाबाकडे यांचा वशिला. आता बोला... या अडनिड्या वयातही ते नुकतेच कुलंग-मदन-अलंग या सर्वांत अवघड दुर्गत्रयींच्या भेटीला जाऊन आले. त्यांच्या सोबत, गडफेरीदरम्यान इतिहासाची पानं उलटणे हि एक वेगळीच अनुभूती असते. आणि का असू नये? अहो, श्रीमान योगी, स्वामी अशा दिग्गज ग्रंथांची श्रीमान रणजित देसाई यांनी ज्या वाड्यात रचना केली, तिथंच आमच्या अरुणजींचं बालपण गेलंय. आता बोला?
या ट्रेकला, वाटलं होतं कि एका नव्या टिमबरोबर जातोय, त्यातून गड असा हा कस लावणारा. त्यामुळे मी चांगल्या तयारीनेच आलो होतो. प्रस्तरारोहणाचं ब-यापैकि साहित्य मी सोबत नेलं होतं. गेल्या दोन-अडीच दशकात विपुल प्रमाणात केलेल्या भटकंती आणि आरोहणादरम्यान असं एक एक पाहिलंय, अनुभवलंय कि अगदी डोंगरातल्या १००% सुरक्षित ठिकाणी जातांनाही माझ्याकडे थोडीफार सुरक्षासाधनं मी ठेवतोच. (इतकंच काय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीने करावयाच्या भटकंतीच्यावेळी सोबत घेतलेल्या या साधनांमुळे मी सालाबादप्रमाणे बोलणी खातो… कुणाची हे सांगायलाच हवं का? )
करारी कारवीची करुण कहाणी...
दिलोदिमागकि बत्तीयाँ गुल हो जाती हैं... तिथल्या कातळी भानामतीचं भल्या-भल्यांना लागिरं होऊन जातं. त्या नशेमन नजाऱ्याच्या खुबसुरत गारूडातून बाहेर पडणं मात्र सोपं नाही.
सावधपणे पुढे सरकत असतांना अचानक गर्दितला एक आवाज अोळखीचा वाटला. अरुण सावंत... हा आणखी एक अवलिया तेथे हजर होता नजरा-नजर होताच अरुण दादाने नेहमीप्रमाणे एक घट्ट मिठी मारली. त्याच्या भेटीची हि नेहमीची पद्धत मला खुप आवडते.
एकंदर झालं काय? तर २-२ सिनियर अरूण आणि नभांगणातील सर्वांनाच सिनियर अरुणरावांमुळे आमच्या या मोहिमेत खणखणीत अरुणोदय होऊन सबंध गड अपुर्व प्रकाशाने न्हाऊन निघाला. दिलखुश हवामानाच्या साथीनं हरिहराचं असं अपरंपार तेजाने निथळण्याचा सोहळा पाहून तबियत खुष होऊन गेली.
गडकोटांवर यायचं ते इथल्या खडका-मातीत झिरपलेला अभिमानास्पद इतिहास टिपायला, टिपकागदासारखं स्वच्छ, हळुवार मन घेऊन. यांना चांगल न् वाइट यातला फरक कधी समजणार आहे कोण जाणे? खऱ्या थ्रिलभऱ्या अॅडव्हेंचरची न् यांची कधी गाठच पडली नाही. इन्स्टंट फुडवर पोसलेली ही पिढी. एक गावरान झटका द्यायचा विचार होता पण थोडक्यात आवरतं घेतलं.
आमच्यासारखी खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसले. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...
बिकट ही वाट... गडाची...
महाद्वारातून
अंतर्भागात प्रवेश करताच समोरच्या खडकातील लोभस गणेशमुर्तिचं दर्शन घडतं.
गणपती बाप्पा मोरया म्हणून लगेच वाटेला लागायचं. पुढची वाट इथं डावीकडे
वळते आणि एका अद्भुत सज्जात आणून सोडते. या सज्जात अापण डोकं आणि तोल
सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं.
या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?


गडावर प्रवेश केलेल्या उगवतीच्या दिशेने तसंच सरळ रेषेत पुढे गेलं कि सुबकरीत्या बांधून काढलेल्या एका पुष्करणीच्या काठचा शेंदूरचर्चीत हनुमान आपली वाट अडवतो.
त्याशेजारीच एका चौथऱ्यावर शिवलिंग स्थापलेले आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे नीघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू अर्थात् धान्याच्या कोठीकडे आपला मोर्चा न्यायचा.
गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा.
याच दिशेने पुढ्यात दिसणाऱ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत सहज जाता येतं. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. हरिहरापासून एका खिंडीमुळे वेगळा झालेल्या, अगदी शेजारच्याच डोंगरातील एका निरूंद, खड्या घळीतून काही गावकरी चढून जातांना दिसले. अधिक चौकशी करता तेथे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांचं दुर्गम देवस्थान असल्याचं समजलं. त्या 'देवाच्या डोंगरामागे' भंडारदुर्ग लपल्यासारखा दिसत होता. तर थोडं उजवीकडे खेटून उभा असलेला आणि स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दर्शवणारा ब्रम्हगिरी अर्थात त्रिंबकगड मोठ्या दिमाखात भाव खात होता.
तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात.
काही वर्षांपूर्वी थोर दुर्गसाहित्यकार सर्वश्री आनंद पाळंदे आणि समकालीन जेंव्हा भ्रमंतीच्या गडघाटवाटा धुंडाळू लागले होते तेंव्हा पुण्यातील विख्यात गिर्यारोहक डाॅ. जी. आर. पटवर्धन अर्थात् बापूकाकांनी अशी प्रथा सुरू केली होती. अशा माहितीपूर्ण हस्तलिखितांची त्यावेळी अत्यंत मौलिक मदत व्हायची. बापूकाकांचं ते कार्य आणि साहित्य इतकं परिणामकारक होतं कि त्यावर पिढ्या पोसल्या गेल्या. आमच्या संजयचं हे कामदेखील असंच निखालस, निगर्वी अन् मार्गदर्शनपर आहे.
मोहिमेत
छायाचित्रकार हा घटक खुप महत्वाचा असतो. पण आपल्याकडे अजून त्यांना हवं
तितकं महत्व दिसून येत नाही ही एक मोठी खंत आहे. आमच्या पथकातला देहेरकर
असं वजनदार आडनांव असलेला अवधूत एक गुणी भटक्या. आणि होऊ घातलेला एक उत्तम
छायाचित्रकार. मोहिमेत जिथं आपला जीवही आपल्याला जड झालेला असतो तिथं हा
पठ्ठ्या सर्वांना आग्रहाने थांबवून त्यांचे फोटो घेत होता. आमच्यातल्या
निखील हळबे या गोंडस बाळाने आणि नारायण बेबले या गुंतवणूक तज्ञाने त्याच्या
कॅमे-यात स्वतःच्या छबींची भली भक्कम गुंतवणूक केली. आणि महिला आघाडीने तर
याचा मामा बनवून भरपूर फोटो काढून घेतले. छायाचित्रणावरचंं त्याचं निरतिशय
प्रेम त्याला आयुष्यात खुप काही मिळवून देईल यात मात्र शंका नाही.धार्मिक बाबतीत जगभरात आपलं वर्चस्व राखणारी नाशिकनगरी, नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्टयाही परमवैभवसंपन्न आहे. एकट्या नाशिक परिसरात सह्याद्रीच्या पहाडी बाण्याचे ५०हुन अधिक आणि एकापेक्षा एक रौद्र-बळवंत अशा दुर्गम गडकोटांचं वास्तव्य आहे. त्यामुळे नाशिकला मी तर कौतुकाने “किल्ल्यांचा जिल्हा” असंच म्हणतो.
सुखद हवामान आणि महामुर पावसामुळे बारमाही ताजातवाना निसर्ग, पूजनीय नद्या, प्राचीन मंदिरे, सरोवरे अन् प्रचूर मात्रेतील पाषाणसौंदर्य अशा विविधतेने नटलेला हा प्रदेश भटक्यांसाठी स्वर्गासमान आहे. याच स्वर्गातल्या किल्ले हरिहराच्या भेटीमुळेे खूप काही मिळवल्याचं एक वेगळंच चमकदार समाधान गडावरील प्रत्येक चेह-यावर दिसत होतं.
सन 1818 मध्ये त्र्यंबकगड उर्फ ब्रम्हगिरीला ब्रिटिशांनी वेढा दिला. तिव्र संघर्षाला सामोरे जावूनही ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला. त्र्यंबकगडाच्या अखत्यारित असणारे 17 किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले. हरिहर देखील त्यांपैकी एक. आजच्या बरोबर दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…
“Truly wonderful! ‘Words’ are not be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”
महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरून पुन्हा संघर्ष होऊ शकतो हे जाणून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर जाणारे मार्ग आणि पायऱ्या दारूगोळ्यांनी उडवले आणि त्यांना न वापरते केले. परंतु हरिहरच्या या अनोख्या रचनेच्या ते मात्र प्रेमात पडले आणि त्याला आहे तसा ठेवला.

आता आपण येणाऱ्या भाविक, हौशी लोक आणि पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा विचार केला पाहिजे.
पर्यटनाच्या अंगाने कुठल्या भागात एकावेळी किती पर्यटकांनी जावं याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु शासन-प्रशासनाच्या वतीने गर्दीचं नियंत्रण आणि नियमन करण्याच्या उपाययोजना अनेक स्थळांवर केलेल्या आढळतात. हरिहर हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे वनविभागाची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिंहगडावर सोडली जाणारं प्रत्येक वाहन नोंद करून तसंच तपासणी करून वरच्या बाजूस सोडलं जातं. मद्यपान आणि मांसाहारास पूर्णतः बंदी आहे. संपूर्ण घाट मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने धुम्रपान करण्यास मनाई आहे जेणे करून वणवा पेटणार नाही. गडमाथ्यावरील खाद्यगृहांतही धुम्रपान केल्यास जागेवर दंडाची व्यवस्था दिसून येते. ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसविलेले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी प्रसाधनगृहांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.
दुसरं उदाहरण आपण वासोटा किल्ल्याचे बघू. बामणोली येथे पर्यटकांना वनविभागाच्या कार्यालयात परवानगी घ्यावी लागते. परवानगी असलेल्या पर्यटकांनाच बोटीत बसून वासोट्याच्या पायथ्याशी सोडले जाते. पायथ्याशी असलेल्या चौकीत वनकर्मचारी परवानगी तपासून वर जाण्यासाठी सोडतात. संध्याकाळच्या आंत पर्यटक, गिर्यारोहक आदिंनी परत यायचे असते. रात्री वासोटा किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे.
1. वरील दोन उदाहरणांच्या धर्तीवर हरिहर परिसरात वनविभागाने पर्यटकांसाठी छोटे कक्ष किंवा चौकी निर्माण करावे. हरिहरला येणारे लोक प्रामुख्याने हर्षेवाडीच्या घाटमार्गातून किंवा पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून हरिहरच्या दिशेने पायी ट्रेक करण्यास सुरुवात करत असतात. या दोन ठिकाणांवर म्हणजेच हर्षवाडी आणि निरगुडपाडा येथे या चौकी असाव्यात. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत येथे स्थानिक लोकांना रोजगार देऊन नेमणूक करावी. या दोन चौकींपैकी कुठल्याही एकातून हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची शासकीय ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी. या चौकी केंद्रांचे कामकाज चालण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेशशुल्क तसेच वाहन पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. त्याची रीतसर पावती पर्यटकाना देण्यात यावी.
2. पहिला टप्पा म्हणजेच डोंगरउताराचा माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळटेकडी पठारी भागावर एक वनचौकी असावी. ही वनचौकी अवघड पायरी मार्गाच्या दिशेने असावी. खालील केंद्रात नोंदणी केलेली पावती वरच्या चौकीत दाखविणे पर्यटकांना बंधनकारक असावे. ज्यांच्याकडे नोंदणी नाही ते पर्यटक पायरीमार्ग चढून गडमाथ्यावर जाऊ शकत नाहीत. परंतु असे पर्यटक पहिल्या टप्प्यातील पठार, वेताळटेकडी परिसर, आश्रम, पुष्करिणी या भागात फिरण्यास हरकत नसावी.
3. गर्दीच्या वेळी एकावेळेस किती जणांना पायऱ्यांवरून सोडावे तसेच उतरवावे याचा निर्णय चौकीतील वनकर्मचारी घेतील. ते पर्यटकांना बंधनकारक असेल. अन्यथा केलेल्या नोंदीवरून नियम न पाळणाऱ्या पर्यटकाना दंडात्मक कारवाई करावी.
4. एका दिवसात किती पर्यटक गडमाथ्यावर सोडावे याचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञांकडून अभ्यास करून संख्या ठरवावी. त्यानुसार खालील केंद्रातून तेवढ्याच पर्यटकांना वर जाण्यास परवानगी द्यावी.
5. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच कास पठारासारखी संरक्षित ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी ज्याप्रमाणे वेबसाईहून नोंदणी करण्याची सोय आहे तशी हरिहरच्या बाबतीत लवकरच तयार करावी. वेबसाईटहून होणाऱ्या नोंदीसाठी भेट देण्याच्या निदान 15 दिवस आधी होणे आवश्यक असल्याची अट असावी.
6. 20/30 च्या वरील संख्येने मोठा ग्रुप येत असल्यास त्यांनी अधिकृत/नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेमार्फतच बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण, अशा ग्रुपला सांभाळणे, काळजी घेणे आणि शिस्तशीर ट्रेक करणे संस्थेमार्फतच सोयीचे होत असते.
7. अतिवृष्टी असलेल्या दिवसात हरिहर गडमाथ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नोंदणी देऊ नये. हा निर्णय सर्वतः पायथ्याच्या चौकी/केंद्रातील वनकर्मचारी घेतील. या दिवसात पायऱ्या मार्ग शेवाळलेला असतो. पायरी मार्गा वर पाणी वाहत असते. तसेच हरिहरचा माथ्याकडून खालील ३०० मीटरचा भाग हा दाट धुक्याखाली असल्याने दृष्यमानता (visibility) फार कमी असते. त्यात वरील वाटा चुकण्याची शक्यता अधिक असते.
8. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असणाऱ्या ब्रह्मगिरी-हरिहर प्रदक्षिणा दिवसात ज्या भाविकांना वेताळटेकडीकडून गडमाथ्यावर जायचे आहे त्यांना वर जाण्यास मनाई नसावी.
9. खालील वनकेंद्र/चौकी पासून ते थेट गडमाथ्यापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सूचना फलक असावेत. त्यावरील सूचना गिर्यारोहणातील तज्ञाकरवी मागवून तयार कराव्यात.
10. हरिहर गडमाथ्यावर रात्री मुक्कामास पूर्णतः बंदी असावी. वेताळटेकडी पठारावरील आश्रम बाजूस मुक्काम करण्यास हरकत नसावी.
11. निरगुडपाडा, हर्षवाडी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांच्या घराघरातून मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी (Home stay) प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
12. साम्रद-सांधण दरी तसेच कळसूबाई परिसरात जसे झाले आहे तसे हरिहर परिसरातील स्थानिक तरुणांना गिर्यारोहणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाकरवी अशा प्रशिक्षितांची नोंद करून त्यांना गिर्यारोहणाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा प्रशिक्षित तरूणांनी अनुभव नसलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करून गाईडचे काम करावे. त्यातून त्यांना मिळकतीची सोय होऊ शकते. जेणे करून नवख्या पर्यटकांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.
13. उभ्या पायरी मार्गावर शिडी/जीना/रेलिंग्ज लावणे हा पर्याय नाही. यामागे खालील कारणं आहेत
– या नाळेच्या पायरीमार्गाचा विचार केला तर त्याचे सौंदर्य नष्ट न होता लोखंडी मार्ग बनविणे शक्य नाही.
– त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.
– आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.
– आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.
14. उभा पायरी मार्गावर गर्दी होत असल्याने धोकेदायक स्थिती वाटते. या खड्या मार्गावर एकावेळी वरून खाली किंवा खालून वर असा फक्त एकेरी वापर होत असतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या कातळभिंतीवरून शिडी/जीना/ट्रॉलीमार्ग किंवा रोप वे यांचा पर्याय करण्यास वाव आहे. त्यामुळे प्राचीन मार्गावरून माथ्यावर जाणे आणि आधुनिक मार्गाने खाली परतणे अशी यंत्रणा सोयीची होऊ शकते.
15. गडमाथ्यावर अति धोकेदायक ठिकाणी रेलिंग्ज लावावेत. परंतु संपूर्ण परिघाला रेलिंग्ज लावण्याची आवश्यकता नाही. कारण त्या रेलिंग्जचे निर्माण करताना खालील पायऱ्यांच्या रचनेला हादरे बसू शकतात. तडे आदी पडून ह्या अनोख्या रचनेचे कायम स्वरूपी नुकसान होऊ शकते.
16. हरिश्चंद्रगड येथील कोकणकडा, धोडपमाची आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेलिंग्ज आज कोसळलेले आहेत. त्यातून नैसर्गिक खडक रचनेचे अतोनात नुकसान होते. हरिहर गडमाथ्यावर रेलिंग्ज करू नयेत. यातून काही वर्षात रेलिंग्ज सकट कातळाचा काही टप्पा कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता अधिक आहे.
17. अनेक गडकोटांवर पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या पोटापर्यंत जाण्यासाठी डांबरी गाडी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. काही किल्ल्यांच्या थेट माथ्यावर वाहने जातात. हरिहर किल्ल्याच्या पठारापर्यंत गाडी रस्ता करण्याची माहिती गावकरी आणि वनविभागाशी संबंधित कर्मचारी कडून मिळाली. डांबरी गाडी रस्ता करण्याचे धोके खालीलप्रमाणे
– डोंगर उतारावरील वनं आणि वृक्ष मोठ्या प्रमाणावर कापावे लागतील.
– रस्त्यासाठी सुरुंग लावून स्फोट करावे लागणार. त्यामुळे हादऱ्यांनी वरच्या उभे कडे असलेल्या भागावरून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.
– हादऱ्यांमुळे पायरी मार्गावरील प्रवेशद्वार कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ह्या प्रवेशद्वाराचे दगडी चीरे कुठलाही चुना आदी पदार्थ न भरता रचीव पद्धतीने द्वार तयार केलेले आहे.
– हातगड आदी किल्ल्यावर वनविभागाने जो गाडी रस्ता केला आहे त्यावर सतत दरड कोसळत असते आणि पर्यटकांना गाडी खाली लावून पायी जावं लागतं. यातून रस्ता बनविण्याचा मुळ उद्देश साधत नाही.
– ज्या अनोख्या पायरी मार्गाला जपण्यासाठी ही नियमावली आहे त्यात रस्ता बनविण्याची कार्यप्रणाली बाधक ठरेल.
– जर गाडी रस्ता झाला तर हरिहरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी गर्दीला रोखणे नियंत्रणाबाहेर होईल. हरिहरवरील गर्दी रोखणे हा सध्यस्थितित तरी शासनाचा प्रमुख हेतू आहे.
– वाहनांचे प्रदूषण, कचऱ्याचे प्रदूषण या प्रश्नांना मोठ्याप्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे.
– परिसरातील वन्यजीवन आणि जैवविविधता धोक्यात येईल.
18. शासनाने विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणावर लोकजागृती आणि लोकशिक्षण मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यात गिर्यारोहण, आनंददायी पर्यटन, स्वयंशिस्त, सुरक्षित पर्यटन आदी बाबींचा सामावेश असेल. रेडियो, टी.व्ही., वर्तमानपत्र, फलक, पत्रके, विविध कार्यशाळा वगैरे अनेक माध्यमांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

हरिहर किल्ल्याची रचना अवघड आणि अजस्त्र भासत असली तरी आजपर्यंत हरिहर पायरी मार्ग तसेच गडमाथ्याहून पडल्याने अपघात झाला किंवा मृत्यू झाला अशी नोंद ऐकवत नाही. तरी सोशल मिडियामधून पायरी मार्गावर होणारी गर्दीची भीषण वास्तवता समोर येत आहे. त्यामुळे जलदीने उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, वनाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, दुर्ग अभ्यासक, तज्ञमंडळी, गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू करणारी टीम, काही तज्ञ गिर्यारोहक यांनी संयुक्त हरिहर किल्ल्याला भेट द्यावी. यातून स्थानिक लोकांच्याही सूचना महत्त्वाच्या असतील. शासकिय कार्यालयात होणाऱ्या किल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बैठकीत ‘महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या गड-किल्ले संवर्धन समिती‘ तील सदस्यांना पाचारण करण्यात यावे.
धन्यवाद.
हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य
![]() |
| किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक |
![]() |
| कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या |
![]() |
| सरळ पायऱ्या |
वरून आपणाला उत्तरेला दिसते ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे हरिहरचा ट्रेकचा थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353, 9156571313 ⚔🚩
हरिहर शिलालेख
हरिहर शिलालेख
तो भीषण आहे.तो रौद्र आहे.तो सुंदर आहे.तो कधी कुणा समोर व्यक्त होत नाही. प्रयत्न केला तरी तो ताकास तुर लागु देत नाही. यामुळेच त्र्यंबकेश्वर रांगेतला हरीहर कील्ला इतीहासातली एक गुढरम्य कथा बनला आहे. आज मात्र तो थोडा मेहेरबान झाला. त्याच्या जुन्या शीलालेखाचे गुपीत उलगडले आणी हरीहराच्या इतीहासातले एक मानाचे पान नजरेस पडले.
, इतीहासाच्या पुस्तकातले एक खुले पान
. उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता
,‘माझ्या अंतरंगात या
...कील्ला डोळे भरुन पाहा
...लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा
’. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो
.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते
. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली
. त्याने त्याच्या परीने
. तो काढण्याचा प्रयत्न केला
. पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले
.पीढी दर पीढी या शीलालेखाची अक्षरे झीजु लागली
. त्यातील काही तर क्षतीग्रस्त झाली
.
. त्याने हुरुप वाढला होता
.आता हरीहर कील्ल्याच्या शीलालेखाची माहीती मीळवावी असे मनात आले
. त्यावरुन
,या शीलालेखाचे वाचन कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे
,याचा शोध सुरु झाला
. सर्वात प्रथम मुंबईचे प्रसीद्ध ब्लॉगर तथा सतीशीळा
, वीरगळ
, गद्देगळाचे अभ्यासक पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा या ब्लॉगमध्ये
, हरीहर शीलालेख भागश
:वाचायला मीळाला
. पुण्यातील संशोधक महेश तेंडुलकर यांनी
,मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात या ६८८ पानी पुस्तकात या शीलालेखाचे
,त्यांना जेवढे शब्द वाचता आले तीतकेच त्यांनीनमुद केले होते
.
![]() |
| हरीहर पुष्कर्णी |
-हरीहर प्रदक्षीणेच्या नीमीत्ताने
. आमची जुने नासीक भागातली मंडळी ही प्रदक्षीणा नीत्य नीयमाने करत असु
.अनेक वर्षे हा खटाटोप चालला
. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच आमच्या ठायी त्याचे महत्व होते
. सुबक दगडात घडवीलेल्या या पुष्कर्णीवर गणपतीचे एक पुर्वाभीमुख शील्प कारले आहे
.त्यावरुन त्यास गणेश कुंड संबोधले जायचे
. त्रींबकची मंडळी यास हरीहरवरचे कुशावर्त संबोधत. त्र्यंबकेश्वर पासुन पावसात भीजत
,इथवर अनवाणी चालत आल्यानंत या पुष्कर्णीत पोहण्याची फार मजा यायची
. सगळा शीण नीघुन जायचा
. शेंदुर फासल्यामुळे शीलालेखावरची अक्षरे स्पष्टपणे वाचता येत नसायची
. ती काळजीपुर्वक वाचण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता
.
![]() |
| शीलालेखाचे वाचन करतानाराजेश दीक्षीत |
.परंपरा
. आजोबांकडुन शीकलेले ज्योतीष व गणीत
. त्र्यंबकेश्वर परीसराच्या इतीहसाबद्दलची आस्था
. धार्मीक व ऐतीहासीक वीषयांवरील पुस्तके
, लेख
,चर्चासत्र आदींत नीयमीत सहभाग या गोष्टींमुळे मीत्रवर्य राजेश दीक्षीतने हरीहर शीलालेख वाचनाचे शीवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शवीली
.शीलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता
.छायाचीत्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता
. मग प्रत्यक्षात शीलालेख बघण्याची छोटेखानी मोहीम हाती घेतली
.लागोलाग हरीहर कील्ल्याला भेट दीली
. वरच्या भागात इतीहासाचा अभ्यास करण्याजागे काय काय सापडते याचा आढावा घेतला
. परतताना उशीर झाला
. सुर्य मावळतीला गेल्याने पुरेशा उजेडात शीलालेखाचे अवलोकन करण्याची पुरेशीसंधी मीळु शकली नाही
.मग दोन दीवसांनी फक्त शीलालेख बघण्याचा बेत आखला
. काही अक्षरे अजीबत लागत नव्हती
.काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही क्षतीग्रस्त झाल्याचे जाणवले
. शीलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गीरवीली
.त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली
. मग त्याची छायाचीत्रे घेतली
. नंतर शीलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या वीटेच्या रंगाने अक्षरे गीरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली
.अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला
. त्याची टीपणे तयार केली
.
| देखणी अक्षरे व सुंदरनक्षीचा हरीहर शीलालेख |
,संवत्सर वाचता आले
. दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम
:हे अक्षर पटकन वाचता येते
. अभ्यासकांनी ते वाचले आहे
.त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती
. पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता
.हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता
. सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात
,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते
. त्या खालचे अक्षरही लागत नव्हते
. शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली
. शक संवत्सर कळाले होते
, त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण
...नारायण शंकर
...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते
.
. मालेगावचा राजेबहाद्दुरांचा कील्ला प्रसीद्ध आहे
. आता नारोशंकर यांच्या बद्दलची माहीती जाणुन घेण्याची जीज्ञासा नीर्माण झाली
. सुदैवाने राजेशचा स्वत
:चा पुस्तकांचा मोठा संग्रह आहे
.या कामी त्याचा मोठा उपयोग झाला. पेशवाईतला हा अव्वल दर्जाचा सरदार होता
. यांचे उल्लेख ठीकठीकाणी वाचायला मीळाले
.पेशवे घराण्याचा इतीहास
- लेखक प्रमोद ओक
, पेशव्यांची बखर
- संपादक काशीनाथ नारायण साने
, बखर संस्थानची
- सुनीत पोतनीस
, मराठ्यांचा इतीहास
- संपादक अ
. रा
.कुलकर्णी
- ग
. ह
.खरे
, सातारचे श्रीमंत छत्रपती शीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधान यांचा इतीहास
- वीष्णु गोपाळ भीडे
,दक्षीणेतील सरदारांच्या कैफीयती
- पुरुषोत्तम वीश्राम मावजी व डी
.बी
. पारसनीस अशा काही पुस्तकातुन नारोशंकर यांचे अनेक उल्लेख वाचायला मीळाले
. एका सरदार घराण्याकडुन
, राजेबहाद्दर हे मुळचे सासवडचे दाणी असल्याची महत्वपुर्ण माहीती मीळाली
. त्यामुळे पनामा शब्दाला जोडुन असेले अक्षर दाण्युपनामा असल्याचा उलगडा झाला
.
![]() |
| उठावाची अक्षरे |
. हरीहर कील्ल्याची माहीती घेण्यासाठी पुस्तके
,ब्लॉग्ज धुंडाळण्याची लगबग सुरु झाली
. महत्वाच्या ऐतीहासीक ग्रंथात हरीहरवर दहा पाच ओळींचे परीच्छेद शोधणे म्हणजे दुरापास्त गोष्ट
. आज हरीहर कील्ल्याचे राकट रुप बघीते की प्रश्नांचा कोंडावळा उठतो
: हरीहर कील्ला कोणी बांधला
? ‘त्याच्या भीषण कड्याला अमुर्त पायऱ्या बांधल्या जाऊ शकतात
’,असे अचाट स्वप्न कोणी रंगवले आणी मग ते प्रत्यक्षात साकार केले
? ते कोण बेलदार होते जे एखाद्या योद्द्या प्रमाणे कड्याला लटकुन शेकडो टनाचा दगड फोडत राहीले
? एखाद्या डोंगराला इतक्या सुंदर पायऱ्या घडवील्या तरी जाऊ शकतात का
? हा समज सत्यात उतरवीणारी ती राजवट होती कोणाची
?
. दोन्हीही डोंगर बेलाग
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणी देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड कील्ले बांधण्यात आले
. दोन्ही कील्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
.पौराणीक साहीत्यानुसार त्रींबक हे त्रीसंध्या क्षेत्र होते
. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी वीष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणी अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला
. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर वीष्णुने अंताचा म्हणजे पायाचा
.पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही
. आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला
.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले
, त्याला मस्तक सापडले
. त्यावर केतकीचे फुल होते
.या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी
,तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दीला
. ब्रम्हदेवानेही रागाने
,तु पर्वत होशील असा शाप दीला
.तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष शीवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला
. ब्रम्हाला दीलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने
, हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दीला
, अशी ही पद्मपुराणातील कथा
. या कथेनुसार वीष्णु हरीहर रुपात डोंगर बनुन प्रकटले
,तर इंद्र अंजनेरी पर्वताच्या रुपाने
. त्यांच्या जोडीला आसपास वेगवेगळे पर्वत देवी देवताच्या रुपाने प्रकटले
.
| हरीहराचे सोपान - सह्याद्रीचेदीव्य स्वप्न |
.शास्त्रज्ञांनी या डोंगरांगेचा काळ साडे तीन कोटी वर्षांपुर्वीचा नीश्चीत केला आहे
. ७० टक्के पाणी व ३० टक्के भुभाग असे स्वरुप असलेल्या पृथ्वीवर सगळी जमीन ही अस्थीर म्हणजे तरंगती आहे व या जमीनीचा प्रवास अखंडपणे सुरु आहे
. साडे सात कोटी वर्षांपुर्वी ओस्ट्रेलीया खंड हा युरेशीया कडे तरंगत तरंगत एकमेकांच्या जवळ कुर्मगतीने सरकत राहीले गोंडवाना काळात ते एकमेकांना भीडले
. या महाटक्करीतुन पृथ्वीच्या गाभ्यात असलेला तप्त अग्नीरस जमीनीचे बंध झुगारुन उफाळुन आला
. त्यातुन पृथ्वीवरची सगळ्यात जुनी डोंगररांग सह्याद्रीच्या रुपाने नीर्माण झाली
.स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडा नुसार सह्याद्री डोंगररांगेचे उत्पत्ती स्थान ब्रम्हगीरी पर्वत आहे
. पुराणांच्या रचनकारांना याचे ज्ञान कसे झाले असावे हे देखील एक कोडेच आहे
. कदाचीत अग्नीरस त्रीसध्या क्षेत्रातुन म्हणजे त्रींबक परीसरातुन उद्दीप्त झाला असावा
. तीथुन तो दक्षीणोत्तर पसरला
. काळांतराने थंड झाल्यानंतर त्यावर जीवसृष्टी अवतरली ही मांडणी वैज्ञानीकांनी करुन ठेवली आहेच
.
. त्या सोबत वृक्ष
, वेली
,द्रुम नीर्माण झाले
.वीवीध जीव नीर्माण झाले
, ही कथा वीज्ञान व पुराणांनी आपापल्या परीने कथन केली आहे
. आपले भरण पोषण करणाऱ्या सृष्टीची आराधना करण्यासाठी हे डोंगर देवस्वरुप
, म्हणुन पुर्वीच्या लोकांनी त्यांचे पुजन केले
.मानववंश प्रगती पथावर असताना कालांतराने यातील काही डोंगरांचा वापर राजशकट हाकण्यासाठी महसुल जमा करण्याचे केंद्र व संरक्षण केंद्र म्हणुन झाला
.नेमके कोणत्या काळात ही नीर्मीती झाली याचा शोध इतीहासकारांना लावता आलेला नाही
.त्यावरील बांधकामांवरुन त्यांच्या प्राचीनत्वाचे अनुमान काढले गेले
.
. येथुन मोठा महसुल गोळा होत असे
.सर्व जुन्या राजवटीचे येथे अस्तीत्व होते
.याचे दाखले जुन्या साहीत्यातुन तसेच गडांवरच्या बंधकामांच्या अवशेषांवरुन अभ्यासकांनी मांडले आहेत
. त्र्यंबकेश्वर व हरीहर हे दोन्ही कील्ले शब्दश:
बेलाग
. त्यावरील यादव काळाच्या खुणांकडे अभ्यासक नीर्देश करतात
. तर काहींच्या मते त्या अगोदरच्या राजवटींचे त्यावर अस्तीत्व असावे
.
| हरीहर कील्ल्याची थरारकवाट |
. इसवीसन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खीलजीने देवगीरीच्या यादवांचा पाडाव करताच मुसलमानी राजवटींने या परीसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली
.१३४७च्या सुमारास दक्षीणेत बहामनी राज्य नीर्माण झाले
;१४००च्या सुमारास त्याची शकले होऊन दक्षीणेत पाच मुसलमान शाह्या नीर्माण झाल्या
.इसवीसन १५५३ला त्रींबकची लीखीत नोंद आढळते
. नीझामशाहाने ३० डीसेंबर १५५३ मध्ये तो ताब्यात घेतला
. त्यावेळची ५८ कील्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो
.
.मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रींबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ नीवासी हींदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टीकु शकला नाही
.
. यात मलीक अंबरला बहुतांशी काळ
‘स्वराज्य संकल्पक
’शहाजी महाराजांची मोलाची साथ होती
. मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षीणेत आली तर हींद्वी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या वीरोधात खटाटोप केला
.शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची नीझामशाही वाचवीण्याचा अटोकाट प्रयत्न केला
. मलीक अंबरच्या मृत्युपश्चात नीझामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली
. नीझामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा नीझामला पेमगीरी कील्ल्यावर नेऊन गादीवर बसवीले
.त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे नीझामशाही वाचवीण्यासाठी याचना केली
, पण त्यांना हवी तशी साथ मीळाली नाही
. इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता
. शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली कील्ल्यावर हलवली
. त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच नीझामशाहीचे पारीपत्य केले
.
. शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले
. त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील नीझामशाही प्रदेश देऊन टाकला
. त्यात त्रींबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता
. इसवीसन १६३६ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची
. त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हींदुंचा अंमलाखाली राहीला
.
| हरीहर - कर्मकठीण |
. लुट घेऊन परतत असताना १७ ओक्टोबर १६७०ला दींडोरी येथे लढाई झाली
. त्याच सुमारास मोरोपंत पींगळे यांनी त्रींबकगड घेतला
. देवगीरीच्या यादवांनंतर शहाजी आणी त्यानंतर मोरोपंत पींगळें असा हा मोठा कालखंड
. शीवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलुन श्रीगड ठेवले अशी नोंद सभासद बखरीत आढळते
.इतीहासात युद्ध करुन त्रींबकगड घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ
,त्यातलेच हे एक
.त्रींबकगड पडल्यानंतर हरीहर
, भास्करगड
,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही
.
.शीवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत
:दक्षीणेत उतरला
. त्याने आदीलशाही व नीझमशाहीचा घास गीळला
. मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला
. १६८२ मध्ये अंकाईचा कील्ला मसलत करुन मीळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशीक जवळच्या लहानशा कील्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला
. हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही
. असे म्हणतात की
, हा संघर्ष दीड कींवा तीन वर्षे तरी चालला असावा
. रामसेज युद्धाच्या वेळेस त्रींबकगडालाही मुघलांचा वेढा पडला
. पण त्रींबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही
.याच कालावधीत हरीहरचा कील्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा
.
. युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला
. ते सगळे प्रयत्न वीफल ठरत होते
. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा
(खोपडा
)हा मुघलांना जाऊन मीळाला
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास वश करुन गड मीळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दीले
,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दीली
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दीले
. कील्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले
. त्यामुळे राघो खोरा पळुन गेला
. त्याच्या मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी नावाच्या माणसाला मुघलांनी अटक केली
. आपला राघो खोराशी काहीच संबंध नाही हे वारंवार पटवुन दील्यानंतर जमनाजीची सुटका झाली व त्याची मनसब कायम ठेवण्यात आली
.
| हरीहर तीर्थाच्या शेजारीअसलेले छोटे कुंड |
. त्याने नासीक उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार मातबरखान यास त्र्यंबकगड घेण्यास पाठवीले
. त्याने सहा महीने वेढा घातला
.गडावर रसदेचा एक दाणाही जाऊ दीला नाही
. गडाची शीबंदी हवालदीली झाली
. अखेर १६८४ मध्ये कील्लेदार शीवाजी तेलंगराव व शामराज हे गडावरुन उतरुन खाली आले
. त्यांना मुघलाईत मनसबी मीळाल्या
. दहावर्षे शीवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या हातुन पुन्हा गेला
.येणे प्रमाणे हा टकोरबंद गड जाताच परीसरातले इतर गड मुगलांच्या ताब्यात गेले
.
. खुद्द बादशाह दक्षीणेत तळ ठोकुन होता
. कुतुबशाही व आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी मुलुख घेण्याचा नीकराचा प्रयत्न सुरु होते
.एक गड
, एक मुलुख घेत मुघल फौजा पुढे जात व त्या माघारी मराठे पुन्हा तो जींकुन घेत
. १६८९च्या फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली
.त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा संपला असे वाटले
.पण त्याचे स्वप्न शेवट पर्यंत पुर्ण होऊ शकले नाही
.मराठेशाही खीळखीळी झाली तरी राजाराम महाराज आणी त्यांच्या पश्चात ताराबाईंनी पुढे हा लढा चालु ठेवला
.शेवटी १७०७ साली वयाच्या ८९व्या वर्षी तो मरण पावला
.
.संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या कैदेतुन सुटले
. महाराष्ट्रात येताच त्यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली
. अनेक नामांकीत सरदारा मंडळी त्यांनी गोळा केली
. बाळाजी वीश्वानाथ पेशवा आणी मग त्या पाठोपाठ पहीला बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात मराठेशाहीचा वारु चौखुर उधळला
. त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा वीशाल प्रदेश काबीज केला
. दील्लीच्या सुलतानास त्यांनी अंकीत केले
.त्रींबक परीसरातुन चौथाई वसुलीचे अधीकार पेशव्यांकडे होते
. त्रींबकगड मात्र अजुनही मुघलांच्या वतीने हैदराबादच्या नीझामाकडे होता
. त्र्यंबकेश्वर येथील इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील हकीगतीत पेशव्यांनी त्रींबकगड कशा प्रकारे काबीज केला याचे वर्णन आहे
. १७५१च्या सुमारास नीझामाने तहाची बोलणी करण्याची तयारी दर्शवीली
. त्यासाठी त्याने त्रींबकगड आपल्याकडेच ठेवण्याची मागणी केली
. पेशव्यांनी तहाची बोलणी केली
.पण गड नीझामाला काही दीला नाही
.अशा रीतीने तब्बल ६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्रींबकगड मुसलमानी जोखडातुन मुक्त झाला
. त्रींबक पडला की रांगेतले इतर कील्ले सुपुर्द होतात तोच कीत्ता यावेळी कायम राहीला असण्याची शक्यता आहे
. हरीहर कील्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी घेतला या संबंधीचे उल्लेख मीळु शकले नाहीत
, परंतु तो पेशव्यांनी घेतला हे नक्की
.तो त्रींबकगडापुर्वीच पेशव्यांना मीळालाअसावा. हरीहर शीलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.

हरीहर पुष्कर्णीचे गुढ उकलले
. म्हणजे त्रींबकगड मुघलांकडे असला तरी शीवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत
. नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रींबकराजाच्या भेटीस यायचे
. गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सींहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत
. आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनीबांधुन ठेवलेली मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले
. त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला
.हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते
. हे काम सुरु असतानाच हरीहर कील्याच्या उत्तर माचीवर वीस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आलीअसावी
. ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती
. पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शीलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते
. इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी हा शीलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते
.अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शीलालेखाचे वाचन असल्याची माहीती मीळाली
, त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते
.
. या कामी नाशीकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचीत्राची बरीच मदत झाली
. पण ते छायाचीत्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दील्यानंतरचे होते
. तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली
. शीलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दीसत होते
.ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे
. आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली
. शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले
. खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता
. हा पनामा काय असावा
?यावर खल सुरु असताना नाशीकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन
, राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मीळाली
. मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला
- दाण्युपनामा ही उकल झाली
.शीलालेखावरचे शक व तीथी मीळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते
. पंधराच दीवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शीलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली
. जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले
. अशा प्रकारे हरीहराच्या शीलालेखाचे पुर्ण वाचन झाले
. राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दीले
.

![]() |
| शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे |
.
, तीथी आदी अंकात न देता शब्दात दीले आहेत
.
: ।। धात्रवर्ना
:श्रीमन्नारायणा्ख्येगजगीरीरसक्
यु
शालीवाहोशकेदाण्युपनामा
ण्यार्तलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय ।।१।।
लेखाचे वाचन व स्वैर अनुवाद: राजेश दीक्षीत, त्र्यंबकेश्वर
) श्री
(श्री या अक्षराने शीलालेखाची सुरुवात आहे
)
) ।।श्रीगणेायनम
:।। धात्रव र्ना
(मी
) (गणेशाचे स्तवन हा दंडक आहे
. धात्रवर्
= धात्रृ नावाचे संवत्सर
)
) मी शुक्रेधवलशरतीथौ शंकरा त्म
: सु
(शुक्रे
= ज्येष्ठ महीना
, धवल
= शुद्धपक्ष
, शर
= पंचमीतीथी शंकरात्म सुत
: = शंकराचा मुलगा
)
) त
: श्रीमन्नारायणाख्ये गज गीरी रस क्
यु
(शंकर पुत्र नारायण नामे वीख्यात
, गज
= ८
,गीरी
= ७
, रस
= ६
, क्
=१
,युक्त
)
) क्त सत शालीवाहो शके दाण्युपनामा
( १६७८ या शालीवाहन शकात
- इसवीसन १७५६ साली
,दाणी उपनावाचे
)
) हरीहर वीलसद्देवताकं सुतीर्थं प्रादद्दी
(हरीहर पर्वतावरील वीलास करणाऱ्या देवतांच्या नावे उत्तम तीर्थ दीन जनांचा त्रास कमी करण्यास
)
) ण्यार्त लोकश्रम नीरहरुते श्रेयसे
(आर्त लोकांच्या श्रम हरण करुन पुण्यप्राप्तीसाठी
)
) मंगलाय
(मंगल श्रेयासाठी नीर्माण केले
)
![]() |
| हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर |
.जसे यादव
, अभीर
,राष्ट्रकुट
, त्रैकुटक
, बागुल इत्यादी
.तद्वताच नासीक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते
. सरदार रास्ते
, सरदार वींचुरकर
, सरदार राजेबहाद्दर
, पवार घराणे
,अशी काही नावे आजच्या पीढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलल्या वास्तु
,मंदीरे आदींशी नीगडीत नावांमुळे
.गोदावरी नदीच्या कीनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसीद्ध आहे
.हे रामेश्वराचा शीवालय
.१७४७ साली हे मंदीर बांधण्यात आले
.त्यास १८ लाख रुपये खर्च आला
.उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते
.मंदीराची ओळख मात्र मदीर अशीच आहे
. या मंदीराची भली मोठी घंटा नाशीकची सांस्कृतीक ओळख बनली आहे
. नाशीक महानगरपालीकेच्या मानचीन्हात तीचा वापर करण्यात आला आहे
.ही बहुधा वसईच्या युद्धात जींकुन आणली असावी
.चीमाजी अप्पाने वसईत पोर्तुगीजांच्या वीरुद्ध नीकराची झुंज दीली
.त्याच्या सोबत त्यांचे वीश्वासु सहकारी नारोशंकर राजोबहाद्दर हे होते
. अशा आठ पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठीकाणी बसल्याचे उल्लेख सापडतात
.
नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगीरीवर नजर टाकली तर ते पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार कशामुळे गणले जात याची प्रचीती येते.घोड्याच्या पागेची नीगा राखणाऱ्या साधारण शीपायापासुन त्यानी इतकी मोठी मजल मारली
.नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता
. त्यांनी बंडखोरी करणारे ओर्च्छाचे राज्य खालसा केले
. झांसी शहर त्यांनी वसवीले
.दील्लीच्या सुलत्तानाचे रक्षक म्हणुन त्यांची पेशव्यांनी नीयुक्ती केली
.पेशव्यांच्या वतीने ते उत्तरेत वसुलीचे काम करत
.त्यांनी दक्षीण भारतातही काही मोहीमा केल्या
. दील्लीत त्यांच्याकडे पेशवे व शींद्यांचा खजीना सांभाळण्याची जबाबदारी होती
. पानीपतच्या युद्धात ते अवघी दौलत टाकुन पळुन आले असे बालंट त्यांच्यावर लागले
. परंतु त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले त्या प्रत्येक वेळेस पेशव्यांना योग्य तो खुलासा देऊन त्यांनी त्यांजी नाराजी दुर केली
.
. (मराठी वीश्वकोष खंड ६
) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली
. तीकडे झासी शहर वसत होते
.पेठा नीर्माण होत होत्या
. कील्ला मजबुत केला जात होता
. इकडे पेशव्यांना एक छदामही मीळत नव्हता
. त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली
. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दीले
. त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली
.
![]() |
| माचीवर जोत्यांचे अवशेष |
. त्याने दील्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दील्लीच्या राजवटीची कमान दीली
.मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा अब्दलीचा मांडलीक बनवीला गेला
. वार्षीक २० लाखाची खंडणी नीश्चीत करण्यात आली
. आब्दाली माघारी फीरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली
. तोवर अब्दाली नीघुन गेला होता
.मराठी फौजांनी दील्ली चहुकडुन घेरली
. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले
. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी नीर्णायक वीजय मीळवुन लाल कील्ल्यात प्रवेश मीळवला
. दील्लीत सदाशीवराव भाऊंनी दरबार भरवला
. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली
. त्यांना दील्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली
. त्याच्याकामगीरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दीली
. पुढे दक्षीणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली
. घर बांधले तरी ते दीर्घकळ टीकत नाही
,असा वीचार करुन त्यांनी दील्लीहुन कुरैशी या प्रशीक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दील्लीच्या कील्ल्यासारखा भव्य असा कील्ला बांधला
. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले
. तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले
.कील्ला पुरा झाला तेव्हा
, नारोशंकर मुघलांना फीतुर असल्याची दरबारात कागळी झाली आणी श्रीमंतांनी जासुद पाठवुन कील्ला खाली करुन देण्याचे फर्मान दीले
. तोवर कील्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते
. नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतीपादन करुन कील्ला खाली करुन दीला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या नीष्ठेची प्रचीती आली
.
. इतका सुबक शीलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही
.पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे
.यावरुन मालेगावचा कील्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो
.पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले
.
?ज्यामुळे त्यांनी कील्ल्याच्या उत्तर माचीवर वीशाल आकाराची पुष्कर्णी बांधली
. हा माचीचा परीसर कील्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा
. हरीहर कील्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने कील्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात
. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर
.तीथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात
. हरीहर कील्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
.
. पेशवाईतली कींवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो
.
.एस
. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्
दुर हे पुस्तक प्रकशीत केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे
.अजुनही पुण्यातले पेशवा दफ्तर खंगाळले
, अथवा अन्य संदर्भाची
, खास करुन त्रींबकगड व हरीहर कील्ला या संबंधीची माहीती तपासली तर या वीषयावर महत्वाचा प्रकाश पडु शकतो
.
वीशेष आभार:
भगवान बाबा, कळमुस्ते
गीरीश टकले
इलीयास सीद्दीकी
ओम दीक्षीत
बाळा उजे
मनोज खैरनार
सुयोग देवकुटे
अंबरीश मोरे
अनील दुधाणे
रवी पवार
संदर्भ:
-महाराष्ट्र देशा, पंकज समेळ
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात,महेश तेंडुलक
-मराठ्यांचा इतीहास,संपादक अ.रा. कुलकर्णी, ग.हे.खरे
-बखर संस्थानची, सुनीतपोतनीस
-पेशवे घराण्याचा इतीहास,प्रमोद ओक
-त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज,महेश तेंडुलकर
-पेशव्यांची बखर, काशीनाथनारायण साने
-सातारचे श्रीमंत छत्रपतीशीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधानयांचा इतीहास, वीष्णु
गोपाळ भीडे
Please make your own arrangements as food is available only at base village. You can contact Sanjay Nirgude 9421035554 / 7776893098 for food and restroom at the base village
![]() |
| हरीहर तीर्थ |
| वेताळ |
| भीरभीर नजर अनं पायऱ्यातल्याखोबण्या |
| दगडातुन कोरलेला वैशीष्ट्यपुर्णप्रवेश मार्ग |
| बालेकील्ल्यावर कोरलेलीअक्षरे व चीन्हे |
| अनाम वीराची समाधी |
| बालेकील्ला |
| घुमटाकृती वीटकाम |
| शेवटचे प्रवेशद्वार |
| उत्तरबाजुच्या कड्यातकोसळणाऱ्या पायऱ्या |
| हरीहर महादरवाजा |
| धन्यवाद हरीहरगडाचा फोटो मी खुप वर्षापुर्वी फेसबुकला पाहीला होता. तो फोटो बघुनच भीतीने मनात धडकी भरली होती. तेव्हा ट्रेकचे भूत लागलं नव्हतं. कोणी लाख रूपये दिले तरी इथे जाणार नाही आणि आता जेव्हा पासुन ट्रेकींगचे वेड लागलयं तेव्हा पासून या गडावर जायचे वेध लागले होते. चार पाच वेळा प्लान्स बनून पण फिसकटले होते. हरीहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर! गेल्याच महीन्यात गोरखगड केला तेव्हा काहीजण बोलले होते गोरखगडच्या तुलनेत हरीहर गड ट्रेकींगसाठी सोपा आहे. गोरखगडने आपली अवघडता कायम ठेवलीय पण लोक हरीहरच्या प्रेमात जास्त आहेत. त्यातलाच मी. आमच्या रेग्यूलर ग्रुपचे कलावंतीन स्टे पाठोपाठ इरशाळगडचा प्लान देखील फसला. त्यात सलग तीन सुट्टया काही प्लान नाही बनवले तर महाराज मात्र रागवतील. म्हणुन मी आणि माझा एक मित्र अमित जो पहील्यांदाच ट्रेक ला तयार झाला होता, माहुलीगडाचे प्लान करत होतो. त्याची माहीती घेण्यासाठी मी माझ्या एक फ्रेंडला कॉल केला. पण ते सर्व जण नाशिकला जाणार होते आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये हरीहर गड पहीला होता. हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. डोक्यातून माहूलीगड तात्पुरता बाजूला झाला आणि त्याची जागा हरीहरने घेतली. मी संध्याकाळी रेल्वेच्या तिकीट्स बुक केल्या. रात्रीच्या ट्रेनने आम्ही मुंबईहून सहा जण नाशिकला निघालो तेव्हा थोडीफार थंडी होती. पण जेव्हा पहाटे ४ वाजता नाशिकला उतरलो तेव्हा थंडीचा कहर अनुभवयास मिळाला. त्यावेळी माझ्या मनात आले आपले एवरेस्ट बेस कँप ट्रेकचे स्वप्न कसे पुरे होणार? आम्हाला नाशिक स्टेशनला न्यायला आमचे मित्र बाईक घेऊन आले होते. मी पहील्यांदाच भल्या पहाटे दातओठ खाणाऱ्या थंडीत बाईक राईड अनुभवली. हॉटेलला पोहोचेपर्यंत ५ वाजले होते. तिथे फ्रेश होऊन मित्रांनीच बनवलेला वर्डक्लास चहा आणि पोह्यावर यथेच्च ताव मारत आम्ही सकाळी ७ ला त्रिंबक हर्शवाडी च्या दिशेने रवाना झालो. सुर्य उगवला तरी थंडी कमी झाली नव्हती. मुंबई आग्रारोडने जात असताना काही अंतरावर अंजनेरी पर्वत लागला. पुढे रस्त्याच्या बाजुला सर्व पर्वतच उभे ठाकले होते. आम्ही हर्षवाडी गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. उन्ह वर येऊन पण हवेत कमालीचा गारवा होता. हरीहरच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला. पायथ्या पासून तिथपर्यंत जायला दोन खड्या चढणी पार कराव्या लागतात. वाट मळलेली आहे पण बऱ्याच ठीकाणी निसरडी आहे. चढताना खुप जपून चढावे लागते. आम्ही हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांपर्यंत तासाभरात पोचलो. समोर पाहीले तर तेथील दगडी जिना मनातील धाकधुक वाढवत होता. ही दगडी वाट वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते. ती वाट चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्वद पायऱ्यांचा सोपान चढल्यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण. आम्ही एका मागोमाग एक असे फक्त आणि फक्त पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत वर चढत होतो. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. आ वासलेली भयानक काताळी दरी पाठीशी होतीच. एका छोट्याश्या चुकीचे थेट मृत्युत रूपांतर. मला फक्त प्रत्येक पायरीच्या खोबण्या दिसत होत्या. तसेच वरून खाली येणाऱ्या एखाद्या ट्रेकरला जागा करून देताना मात्र आमची पंचायत होत होती. पण आम्ही तो अवघड जिना चढलो. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आमच्या मध्ये पहील्यांदाच ट्रेक करणारे दोघेजण होते. त्यांचा आनंदाला तर सीमाच उरली नव्हती. या पायऱ्या चढून आल्यावर शेंदुरी रंगाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्या जिन्यासही दोन्ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो. त्या पायऱ्या चढताना विशेष काही वाटले नाही. एक बाजू एक्सपोज होती पण दोन्ही बाजूला आधार होता. हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्यात आले आहे. तलावाच्या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. लहान मोठ्या टाक्यांची रचना मन मोहवून जाते किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा चढायला पण थोडी कसरत करावी लागली. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्या दिशेला वाघेरा किल्ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात. हरीहरच्या सर्वात उंचीच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य विहंगम होतेच पण पहील्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही तिरंगा फडकविला होता. खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्याचे सर्व श्रेय अजिंक्यला जाते, त्याची ती आयडीया. सर्वात उंच माथ्यावर राष्ट्रगीत म्हणताना आमची छाती मात्र अभिमानाने फुलली होती. एक वेगळाच रोमांच अंगावर आला होता. तिथून खाली उतरल्यानंतर आम्ही उतराच्या वाटेवर एका झाडाखाली नाशिकमधल्या रवी या मित्राने घरून आणलेल्या जेवनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. थोडं खाली उतरल्यावर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्हा त्या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्या फारच धडकी भरवणाऱ्या होत्या. त्यामुळे उतरताना विशेष काळजी घ्यावी लागत होती. प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडायला हवं होतं. काही ठिकाणी पायऱ्या एवढ्या बाहेर आल्यात की थोडं जरी पाऊल पुढे पडले तरी थेट दरीत रवानगी होणार होती. त्यामुळे दरीकडे पाठ करूनच उतरावे लागत होते. याच कारणास्तव उतरायला वेळ लागत होता. तेही पार करत आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो पण खालून वर येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खुप होती. त्यामुळे आम्हाला उतरायला जागा मिळत नव्हती . पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर उयरायला जागा मिळाली. तेव्हा मला कळसुबाई ट्रेकची आठवण झाली. तिथे पण लोखंडी शिडीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी झाली होती आणि एका एका शिडीवर ६० ते ७० लोक जाण्या येण्याचा प्रयत्न करत होते. इथे पण ट्रेकला जत्रेचे रूप आले होते. यात रात्री स्टे करणारे उशीरा चढत होते. प्रवेशद्वारापासूनच्या पायऱ्या उतरताना पण खुप काळजी पूर्वक उतरावे लागत होते. इथे पण आम्ही दरी कडे पाठ करत एक एक पायरी खाली उतरलो. खऱ्या अर्थाने इथेच ट्रेक संपते असं काहीना वाटते पण त्या नंतर चढताना लागली खडी चढण उतरताना मात्र अवघड होऊन बसते. काही ठीकाणी बसून उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा रितीने एक रोमांचकारी ट्रेक पुर्ण करून नाशिकहून मी आणि अमित मुंबईकडे परत निघालो. हरीहरचा इतिहास (माहीती whatsapp वरून प्राप्त) गडावरील कातळात पायऱ्या कोरण्याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या. हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्याचे स्थान ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्याशेजारच्या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे. हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे कोठालीगड (पेठ) प्रमाणे उभ्या कोरलेल्या पायऱ्या आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो किल्ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्यांच्या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो. मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली. प्लॅन केल्यानंतर नक्की येण्यासाठी तयार झालेले आठजण शेवटी कमी होत होत, १२ जुलैला सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात इगतपुरीकडे जाणार्या तपोवनमध्ये आम्ही फक्त चौघेजणच चढलो. :) हरिहरची भेट पहिल्यांदाच! त्यामुळे जाण्याआधी कुठून कसे जायचं, कुठे उतरायचं याची पुरेशी माहीती आंतरजालावर वाचली, त्याचबरोबर ओळखीच्या काही जणांकडून मार्गदर्शनही घेतलं. यासगळ्या शिदोरीच्या जोरावर आणि वेळेच्या गणितानुसार आपला ट्रेक व्यवस्थितरित्या पार पडेल असा फुकाचा आत्मविश्वास मी माझ्या मनाचा करून घेतला. पण प्रत्येक वेळेला तुम्ही ठरवल्याप्रमाणे होईलच याची खात्री नसते. कधी कधी अगदी तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जातात अन् मनातल्या मनातच आपण आपली पाठ थोपटून घेत असतो. पण कधी कधी याच्या नेमकं विरूध्द घडत जातं, वेळेचं गणित चुकत जातं, काही गोष्टीत आपला अंदाज चुकतो आणि याची परिणती ट्रेकच्या आरंभी असलेला आपला जबर आत्मविश्वास मोक्याच्या क्षणी उणा पडायला लागतो. हरिहरच्या भेटीदरम्यान या सगळ्या गोष्टींचा मी पुरेपूर अनुभव घेतला. या ट्रेकने मला बर्याच सकारात्मक गोष्टी शिकवल्या. हरिहरला जाण्यासाठी इगतपुरी गाठायचं अन् तिथे मागुन ठाण्याहून येणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडून वाटेत गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाड्याला उतरायचं आणि ट्रेक सुरू करायचा असा सर्वसाधारण प्लॅन आम्ही बनवला. त्याप्रमाणे सकाळी पावणेसातला निघालेल्या तपोवनने आम्हाला नऊच्या दरम्यान इगतपुरी स्थानकात सोडलं आणि ती तशीच पुढे नांदेडला गेली. आता पोचलोच आहोत इगतपुरीला तर थोडासा नाश्ता करून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडू आणि तासाभरात गडाच्या पायथ्याशी पोहचू असा छानसा विचार मी मनाशीच केला. बाकीचे तिघे माझ्यावर सगळं सोपवून निर्धास्त होते. पण तिथून पुढे ते तसं मुळी घडायचंच नव्हतं असंच त्या दिवसाने ठरवलं होतं. तिथे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनबद्दल दोन-तीन वेगवेगळ्या सुचना मिळाल्या त्यामुळे आमचा थोडा गोंधळ उडाला. हरिहरला मुंबईहून दोन-तीन मार्गांनी जाता येतं. मुंबईहून लोकलने कसारा गाठावं, तिथून खोडाळा या गावी पोचावं. कसार्याहून खोडाळ्याला जाण्यासाठी शटल लागलेल्या असतात. त्याचबरोबर काही खासगी वाहनेही कसारा-खोडाळा अशा फेर्या करतात. खोडाळ्याहून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडायची आणि वाटेतच असणार्या निरगुडपाडा या गडाच्या पायथ्याशी असणार्या गावात उतरावं. खोडाळा ते त्र्यंबकेश्वर अशी एसटी महामंडळाची बससेवाही आहे. कसारा ते खोडाळा हे अंतर साधारण ३७ किमी आणि खोडाळा ते निरगुडपाडा हे अंतर साधारण २५ किमी, कसार्याहून असा साठ किमीचा प्रवास केल्यानंतर तुम्ही गडाच्या पायथ्याला पोहचू शकता. दुसर्या मार्गाने मुंबई-भिवंडी-वाडा-खोडाळा-निरगुडपाडा असं करतही तुम्हाला पोचता येतं. किंवा मग डायरेक्ट नाशिकला पोचून तिथून खोडाळ्याची गाडी पकडावी. पण त्यातल्या त्यात जरा सोप्पी पद्धत म्हणजे मुंबई सेंट्रलहून सकाळी सहाला सुटणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडावी आणि त्र्यंबकेश्वरच्या सात किमी अलीकडे असणार्या पहिने फाट्यावर उतरावं. तिथून खासगी वाहनाने तुम्हाला निरगुडपाड्याला जाता येतं. आंतरजालावर बर्याच ठिकाणी मुंबई किंवा इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरला जाणारी एसटी ही निरगुडपाड्यामार्गे त्र्यंबकेश्वरला जाते असं सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात ही माहीती चुकीची वाटते. कारण तो मार्ग पुर्णतः वेगळा आहे हे त्या दिवसाच्या प्रवासावरून मला कळालं. मुंबई-इगतपुरी-घोटी मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणारी गाडी एसटी महामंडळाच्या रूटमध्ये घोटीनंतर नाशिकच दाखवते. निरगुडला जाण्यासाठी मध्येच उतरून तुम्हाला दुसरी गाडी पकडावी लागते. अर्थात हा सगळा खटाटोप तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असाल तरच करावा लागतो. खाजगी वाहनाने जात असाल तर निवांतपणे मुंबई-नाशिक हायवेमार्गे तुम्ही सरळ निरगुडपाड्याला पोहचू शकता. इगतपुरीला पोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरची गाडी आम्ही जायच्या आधीच आठ वाजता निघून गेलेली होती. त्यानंतरची गाडी दुपारी एक वाजता येणार होती. एसटी स्थानकापाशी बहुतेक लोकांना निरगुडपाडा नावाचं गावच ठाऊक नव्हतं. मुख्य रेल्वे स्थानकात खासगी गाड्या डायरेक्ट निरगुडपाड्याला जाण्यासाठी हजार ते बाराशेपर्यंत भाव सांगतात असं ऐकून होतो ते त्यादिवशी प्रत्यक्ष पाह्यलं. त्यामुळे त्या फंदात न पडता शेवटी जिथे मिसळ खाल्ली त्या हॉटेलवाल्याला विचारून त्याच्या सांगण्यानुसार आम्ही एका शेअर रिक्षाने घोटीला पोचलो. कदाचित त्र्यंबकची गाडी तिथून पटकन मिळेल या आशेने घोटीला पोचलो खरे पण तिथेही आमच्या प्लॅनचे "बारा" वाजण्याची चिन्हे दिसत होती. घोटीहून त्र्यंबक फाटा पुन्हा तिथून मागे घोटी स्थानक अशा फेर्या मारत आम्ही घोटी स्थानकातून त्र्यंबकसाठी जाणारं 'जीपडं' पकडलं तेव्हा दुपारचे साडेबारा वाजत आले होते. त्यातून जीपवाल्याने त्र्यंबकला जाणारी गाडी निरगुडपाड्यामार्गे जात नाही, तुम्हाला पहिने फाट्याला उतरायला लागेल असं सांगितल्याबरोबर हरिहर आमच्यापासून अजूनही 'कोसो' दूर आहे याची आम्हाला खात्रीच पटली. "तुमी चलाओ भो! फाट्यावरनं कि नय तुमाला दोन दोन मिनिटाला गाड्या मिळतील." "तुमी चला. मी बरोबर सोडतो तुमाला.!" ड्रायव्हर प्रचंड आत्मविश्वासात आमच्याशी बोलत होता. त्याच्या भुलथापांना बळी पडून तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पहिने फाट्याला पोचलो. तिथून त्र्यंबकेश्वर सरळ सात किमी होतं आणि डावीकडे खोडाळा ३८ किमी दाखवत होतं. पहिने फाटा त्र्यंबक सरळ सात किमी खोडाळा (घोटीहून येताना) डावीकडे ३८ किमी पहिने फाट्याला जवळ जवळ अर्धा तास थांबून सुध्दा एकाही गाडीचा यायचा पत्ता दिसत नव्हता. शेवटी अर्ध्या तासाने एक 'छोटा हाथी' वाला आम्हाला निरगुडपाड्याला जाण्यासाठी थांबला. तो थांबला खरा पण त्याच्या गाडीत सुतभरही जागा दिसेना. कसही करून जायचंच या जिद्दीने आम्ही त्याला गाडीच्या टपावरून न्यायला विनंती केली. एक प्रवास...टपावरून! ;) सुमारे अर्ध्या-पाऊण तासानंतर पंधरा-वीस घरांची वस्ती असणार्या कोटमवाडीत पोचलो, जी हरिहर गडाच्या अगदी पायथ्याला आहे. तिथे उतरल्यानंतर समोर सगळीकडे प्रचंड धुकं पसरलेलं दिसत होतं, जिथे झाडाची साधी फांदीसुद्धा दिसत नव्हती तिथे गडाचा तो प्रचंड कातळ कुठून दिसायचा.?! उशीरा का होईना पण पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तिथला स्थानिक बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त दिसत होता. एकीकडे वाडीतली बरीचशी मोठी मंडळी शेतात राबताना दिसत होती तर दुसरीकडे त्यांच्या रिकाम्या घरातून त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली बाहेर डोकावताना दिसत होती. कधी त्या लहानग्यांना तर कधी नांगरणीसाठी निघालेल्या एखाद्या शेतकर्याला विचारत शेवटी गडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत घड्याळातले काटे अडीच वाजल्याचं दाखवत होते. कोटमवाडीतली प्राथमिक शाळा अन् त्यामागे डावीकडे फणीचा डोंगर
पाहिलीये का कधी अशी रंगसंगती :) भाताची खाचरं 'बरोबर पोहचू कि नाही?', 'नेमकी हीच वाट आहे का?', 'इथे तर काहीच दिसत नाही', 'आत्ता अडीचला चढतोय तर मग वर पोचणार कधी आणि खाली उतरणार कधी?' मनातल्या या सगळ्या प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन मुकाट गड चढायला सुरूवात केली. जसजसं वर चढत होतो तसं वाट योग्यच असल्याची खात्री पटत गेली आणि आणखी उत्साहाने वर चढायला सुरूवात केली. सोबतीला धुकं कधी धुसर होत होतं तर कधी पुन्हा दाटून येतं होतं. सुमारे दिड तासाच्या भराभर चढाईनंतर आम्ही एका पठारावर पोचलो जिथे त्या पठाराच्या मधोमध एक त्रिशूळ उभा केला होता आणि त्यासभोवतीने शेंदूर फासलेले अनवट देव आम्हाला पाहायला मिळाले. एवढा चढून आलो होतो पण ती प्रसिद्ध कातळभिंत आणि त्या पायर्या काही दिसण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्या अनवट देवांभोवती पाच मिनिटं विसावा घेतल्यानंतर डाव्या बाजूची वाट पकडून आम्ही पुन्हा निघालो.
अवघ्या पाचच मिनिटात एक छोटासा रॉकपॅच चढून आम्ही त्या कातळपायर्यांच्या पायथ्याला पोचलो. मागाहून मला कळालं, पठारावर ज्याठिकाणी शेंदूर फासलेले देव होते तिथून तो प्रचंड मोठा कातळ आणि त्या पायर्या समोरच दिसतात. पायर्यांपाशी पोचलो तेव्हा चार वाजले होते. वेळ फक्त घड्याळातच पुढे सरकत होती पण आमच्या आजुबाजूचा निसर्ग मात्र एखाद्या चित्रासारखा स्तब्ध झाला होता. सरळ उभ्या चढत जाणार्या त्या पायर्या पाहून आमच्यातल्या नेहमी आघाडीवर असणार्या 'सुपरमॅन'ला वर चढावं कि नाही असा प्रश्न क्षणभर पडला. त्याला कारणही तसंच होतं. सरळ आभाळात घुसलेल्या फक्त दिड-दिड फुटाच्या पायर्या, दोन्ही बाजूने धुक्याने वेढलेली खोल दरी, वरून रिपरिप पडणारा पाऊस. हे सगळं पाहून आम्ही जागेवरच थबकलो. बाकीचे दोघेही पार गपगार झाले. मनाशी विचार केला 'या पायर्यांना बघण्यासाठी इतक्या दूरवर आलोय आणि त्या पाह्यंल्याच आहेत तर आता पुन्हा माघारी फिरावं.' हरिहरला यायचं ते फक्त अखंड कातळात खोदलेल्या या दगडी पायर्यांठीच! त्याची भव्यता कळावी म्हणून आंजावरून हा फोटो साभार. आणखी एक आंजा साभार. आमच्यामागून आलेल्या नाशिकच्या काही लोकांनी दोन घटका तिथे विसावा घेत लगेचच भराभर त्या पायर्या चढायला सुरूवात केली. त्याचं पाहून आम्हालाही थोडासा हुरूप आला आणि त्यांच्यामागे आम्हीही हळूहळू वर चढायला सुरूवात केली. खालून प्रचंड अवघड वाटणार्या पायर्या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती.
सरळसोट उभ्या!!
साधारण सत्तर एक पायर्या चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. आत शिरल्यानंतर लगेचच उजवीकडे खडकात कोरलेली, शेंदूर फासलेली गणरायाची मुर्ती पाहायला मिळते. त्याच्या थोडेच पुढे मारूतीरायाही असाच पाहायला मिळतो. उजवीकडे कातळ आणि डावीकडे सरळ खाली जाणारी दरी यामधून निमुळत्या होत गेलेल्या वाटेने आपण पायर्यांच्या दुसर्या टप्प्यापाशी येतो. या वाटेने जाताना मध्येच एका ठिकाणी दरीकडच्या बाजूल वरच्या बाजूस एक छोटंस नेढ पाहायला मिळतं. प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्या गणपती बाप्पा मारूतीराया नेढं तिथून थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच कपार फोडून काढलेल्या पायर्या लागतात, तिथून सावकाशीने वर चढत अवघ्या दहा मिनिटात दुसर्या प्रवेशद्वाराने आपण गडाच्या पठारावर पोचतो. तिथे चढताना फार सांभाळून चढायला लागतं, घाई गडबड करून चालत नाही. खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.
दुसरे प्रवेशद्वार समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५०० फुट इतकी आहे खरी, पण त्यामानाने गडाचा घेरा फारच छोटा आहे. गडाचा इतिहास बहुत प्राचिन असावा असं वाटतं. अगदी सातवाहन काळापासूनचा. गडाचा घेरा फार छोटा असल्यामुळे वर गड वसवला गेला नसावा, परंतू तळकोकणातून वर नाशिकला आलेल्या व्यापारी वाटा आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी लष्करी तळ म्हणून याची निर्मिती झाली असावी असं म्हणता येईल. गडावर असलेली एकमेव इमारत म्हणजेच दारूगोळ्याचे कोठार पाहिले की याची खात्री पटते. कालौघात याची मालकी शहाजी राजांकडे, कधी अहमदनगरच्या निजामशाहीकडे, तर कधी मुघलाकडे जात राहीली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी पेशवे असलेल्या मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड १६७० साली स्वराज्यात सामील केला. सरतेशेवटी इंग्रजांच्या १८१८ सालच्या 'गड उडवा, मराठे बुडवा' या मोहिमेत याचा ताबा इंग्रजांकडे गेला. त्र्यंबकच्या रांगेत हरिहरसोबत असणार्या बसगड, भास्करगड, फणीचा डोंगर, त्र्यंबकगड या रांगेमुळे गडाचे लष्करीदृष्ट्या महत्व अधोरेखित होते. दुसर्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर एक छोटीशी टेकडी चढायला लागते. ती चढून गेल्यावर डावीकडच्या वाटेने जाताना मध्येच पाण्याची काही टाकी आणि काही उरलेले अवशेष पाहायला मिळतात. त्याच वाटेने थोडंस पुढे चालत राहिल्यानंतर एका ठिकाणी पठारावर मारूतीचे आणि शिवाचे छोटेसे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हनुमंताच्या छोटेखानी मंदिरामागे पाणी अडवून केलेला एक छोटासा तलाव आपल्याला पाहायला मिळतो, त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याची टाकी
हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं त्याचमार्गाने थोडं पुढे गेल्यावर दगडात बांधलेली एक आयताकृती इमारत म्हणजे अर्थातच दारूगोळ्याचं कोठार पाहायला मिळते. आत प्रवेश करण्यासाठीचं त्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिड फुट बाय दोन फुटाची दगडी चौकट आहे. त्या इमारतीत दोन खोल्या समोरासमोर आहेत. १०-१२ लोकांच्या राहाण्याची व्यवस्था तिथे आरामात होऊ शकते. आम्ही गेलो तेव्हा तिथे शिवमगिरी नावाचे नाथपंथी योगी राहात होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड मौन पाळलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्यानंतर ते आपलं मौन सोडणार आहेत अशी माहीती मिळाली. पोटात भुकेचे कावळे ओरडल्याची जाणिव झाली आणि त्या इमारतीत बॅगा टाकत आम्ही व्यवस्थित पोटपुजा उरकली. गडावरच्या इमारतीत राहणारे नाथपंथी योगी शिवमगिरी महाराज. तिथे दहा-पंधरा मिनिटे विश्राम केल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. खाली उतरायली सुरूवात केली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. खालच्या वाडीतून शेवटची गाडी कुठे जाणारी आहे आणि किती वाजता आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती म्हणून उतरताना अगदी भराभर उतरायला सुरूवात केली. अगदी तासाभरातच म्हणजे सातला खाली उतरलो. तोवर आजुबाजूच्या भागातलं सगळं धुकं निवळून सगळा प्रदेश अगदी स्वच्छ धुतल्यासारखा दिसायला लागला होता. हरिहर, त्यासमोरचा फणीचा डोंगर, त्यापुढचा भास्करगड सगळं लख्ख दिसू लागलं होतं. धुक्यात हरवलेला फणीचा डोंगर भास्करगड हरिहर पायथ्याची कोटमवाडी खाली पोचल्यावर जाता जाता वाटेतच एका काकांनी शेवटची खोडाळ्याला जाणारी गाडी आता अगदी पाच मिनिटातच येईल हे ऐकल्यानंतर पळतच मुख्य रस्ता गाठला. खोडाळ्याहून कुठच्याही गाडीने नाशिक किंवा घोटी गाठता येईल या आशेने आम्ही आठ वाजता खोडाळ्याला पोचलो, पण तिथेही आम्हाला धक्का बसायचा बाकी होता. शेवटची शटल खोडाळ्याला मुक्कामी येऊन थांबली होती आणि तिथून पुढच्या आमच्या प्रवासाला फुलस्टॉप पडतोय की काय असं वाटून दोघांनी मुक्कामाची सोय पाहायला सुरूवात केली नि दोघांनी एखाद्या खाजगी गाडीची व्यवस्था पाहायला सुरूवात केली. शेवटी स्थानिक मुलांच्या मदतीने बर्याच घासाघिसीनंतर खोडाळा ते कसारा या ३७ किमीच्या अंतरासाठी अन् पाऊणतासाच्या प्रवासासाठी हजार रूपये देऊन खाजगी गाडीवाला एकजण यायला तयार केला. त्यावेळी पैशांपेक्षा आम्हाला वेळ खुप महत्वाची वाटली. त्या गाडीने कसारा स्थानकात सोडल्यानंतर तिथून मुंबईकडे येणार्या ९.२१ च्या लोकलमधल्या बाकड्यावर जेव्हा आम्ही चौघांनी देह पसरून दिला तेव्हा आम्हा चौघांच्याही चेहर्यावर एक वेगळं समाधान झळकत होतं. त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल किंवा करवीरच्या अंबाबाईचा पौषातला किरणोत्सव पाहताना तिच्या लेकरांच्या चेहर्यावर जे समाधान उमटतं त्याच्याशी करता येईल!! सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!! - इति लेखनसीमा हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर. स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते. बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे. दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे. पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो. आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं. व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो. |
सोनगिरी - खैराई - वाघेरा - बसगड - हरिहर
नोट : ७ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख सापडला, बात पुरानि - हर्षल कि जुबानी!!!
![]() |
| सोनगिरी किल्ला |
![]() |
| खैराई किल्ला |
![]() |
| खैराई किल्ल्यावरील बुरुजाचे अवशेष |
आता साहजिकपणे फार कंटाळा आला होता. पण अजून एक किल्ला करायचा बाकी होता तो म्हणजे वाघेरा. आम्ही वाघेरा हा किल्ला छोटासा आहे ह्या समजुतीत होतो..आणि दुपारी ४ वाजता आम्ही वाघेरागावात पोहोचलो. किल्ला पाहिल्यवर तोंडचे पाणीच पळाले..अबब केवढा हा किल्ला, केवढा हा त्याचा पसारा..६.१५ पर्यंत आपण कसा काय किल्ला पाहणार. कधी खालती येणार असे असंख्य प्रश्न मनात येउन घर करत होते.
![]() |
| वाघेरा किल्ला |
![]() |
| डावीकडुन - काळवी , तळइ, गणबारी, संडे १, संडे २ |
![]() |
| बसगड / भास्करगड |
![]() |
| फणी |
![]() |
| हर्षगडाच्या सुरेख कातळ कोरीव पायऱ्या |
हरिहर / हर्षगड + त्र्यंबकेश्वर
आपल्याच ह्या दुर्गम दुर्ग वाटेने ...कडे कपार्यातून...नवी जिद्द ,नवा उत्साह घेऊन ...नव्या पायवाटा धुंडाळत ...
कधी कधी हि ' वेळ' आपल्यातला ' संयमीपणा ' अगदी तोलून तपासून पाहते .
पण तो हि एक आयुष्याच्या शिकवणीचा भाग असतो . तो शिकून पुन्हा आपली पायवाट शोधत पुढे निघायचं बस्स...
स्वर्ग , स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही .
वाटतं इथेच घर करून राहावं कायम .........पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.
प्रेमाची गरज आहे , मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.
______________________________________________________________________________________
फोटो सूची :-
प्रचि २
हरिहर ची सुंदर पहाट ..
प्र
चि ३ एका टप्प्यावर
प्रचि ४ ..... डावीकडे दिसतोय तो फ़निचा डोंगर
प्र
प्रचि ५५













ह्या वेळेस भौगोलिक अभ्यावर जरा जास्त भरणा होता . म्हणून इतकी खटपट केली . आणि त्याचा फायदा हि झाला
झालेला प्रवास :-
शनिवारी रात्री प्रस्थान ...कसारा लोकल ने :-
ठाणे ठीक ११:३० कसारा १:१८
कसारा - हरिहर (निरगुड पाडा / टाकेहर्ष )- त्रंबकेश्वर मंदिर - कसारा (काळी निळी जीप ने प्रवास, ठरवून ठेवलेली )
कसारा - हरिहर - २ ते ३:४०
ट्रेक ला सुरवात - पहाटे ५:१५ , गडाचा माथा :- ८:००
९:१५ ला उतरण्यास सुरवात - पायथा निरगुडपाडा/टाकेहर्ष - १०:५०
निरगुडपाडा/टाकेहर्ष -त्रंबकेश्वर मंदिर - ११:०० - १२:००
२ तास, देवदर्शन / जेवण
त्रंबकेश्वर मंदिर - कसारा - दुपारी २:३० ते ४:००























































































































































No comments:
Post a Comment