Friday, June 19, 2026

चौल रेवदंडा माहिती ( अंतिम )

           सह्याद्रीमुळे समुदसपाटीची पश्चिम किनारपट्टी आणि उंचीवरचे पठार विभक्त झाले. पश्चिम किनारपट्टी कोकण म्हणून ओळखली जाउ लागली. तळकोकण, उत्तर कोकण असाही भेद दाखवला जाउ लागला. किनारपट्टीचे कोकण आणि दख्खनचे पठार म्हणजे देश यात मुलभुत फरक आहे. कोकणचा इतिहास बराचसा एकसंध तर देशावरच्या भुभागाचा इतिहास मात्र बराच विवीध परंपरा सांगणारा, त्यामुळे कोकणात शिरण्यापुर्वी या चिंचोळ्या भुभागाची एतिहासिक पार्श्वभुमी समजून घेणे अगत्याचे आहे. 
    कोकणाला प्रदीर्घ  इतिहास आहे. अस कोकणाभिमानी म्हणतात, पण सुरवातीच्या इतिहासात आख्यायिका आणि लोककथा यांचे भारुड अधिक, त्यासुध्दा पोथीबध्द ! पोथ्यांंमध्येही पाठभेदच अधिक. एकीचा दुसरीशी ताळमेळ नाही. त्या पोथ्याही किती शिल्लक राहील्या आहेत ? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्यासुध्द नाहीत. कोकणातील गावा-गावला वास्तविक मोठा इतिहास आहे, पण ऐतिहासिक साधनांची अशी हि दैना.  त्यामुळे आख्यायिका गोळा करतानाही दमछाक व्हावी. अर्थात कोकणचा जुना इतिहास गोळा करताना दमछाक कमी होण्यासाठी अगदी काही मोजक्या अभ्यासकांचे श्रम सार्थकी लागते आहेत. ऑर्थर क्रॉफर्ड या ब्रिटीश सनदी अधिकार्याने 'लिजेन्ड ऑफ कोकण लिहून  (प्रथम प्रकाशन १९०९ कोकणवासीयांवर खुप उपकार करुन ठेवले आहेत.त्याच प्रकारचे लक्षणीय कार्य रेव्हरण्ड अलेक्झांडर किड नैर्न ( 'हिस्टरी ऑफ कोकण', १८९४) आणि कर्सन  डाकून्हा  ( नोट्स ऑन द हिस्टरी अ‍ॅण्ड अ‍ॅन्टिक्विटीज ऑफ चौल अँड बसिन १७७६ ) यांनी केले.आहे. अगदी वेगळ्या म्हणजे भाषेच्या अंगाने जाणारे कार्य रेव्ह ए. मॅनवेअरींग  (मराठी प्रॉव्हर्बज १८९९) यानं आहे.
         कोकण ही परशुरामाची भूमी मानली जाते. परशुरामाबरतच्या आख्यायिका दंतकथा म्हणा हवं तर तरी एकत्र कुठं आहेत?  ऑर्थर क्रॉफर्डने चिपळुणच्या एका नामवंत ब्राह्मणाच्या मदतीने या काही एकत्र तरी केल्या.  हिंदुल्हनात सरकारी नोकरीसाठी आलेल्या ऑर्थर क्रॉफर्डचा चिपळुणशी अनेक वर्ष संबंध आला. संस्कृत शिकग्याच्या प्रयत्नात असताना त्याचा राघोबा महादेवराव या चित्पावन ब्राह्मणाशी  सलोखा झाला  वयाची साठी उलटलेला राघोबा प्रकांडपडित तर होताच पण पिढीजात वारशाने आलेल्या अनेक पोथ्या त्याच्याकडे होत्या,.आपल्या संग्रहातली एकही पदेवी तो द्यायता वा विकायला तयार नव्हता. वास्तविक क्रॉफर्डला तो संग्रह विकत घेऊन एशियाटिक लायब्ररीसारख्या सार्वजनिक ग्रंथालयाला घायचा होता  त्यासाठी मोठी किंमत मोजायला तो तयार होता, पण वाडवडिलार्जित ठेवा कोणाकडे सुपुर्द  करायला राघोबा तयार नव्हता. क्रॉफर्डचं सारं लक्ष त्या संग्रहातल्या एका पोथीकडे होते. त्या पोथीत चित्पावनाची खरी आख्यायिका नमुद केली होती म्हणे. १८१२ मध्ये पुण्याला एका देशस्थ ब्राह्मणानं ती प्रसिद्ध केली होती, अस क्रॉफर्ड  लिहितेो. परशुरामानं समुद्रकिनारी निश्चेष्ट पडलेल्या अरबांच्या प्रेतांमध्ये जीव टाकून चित्पावनांची निर्मिती केली, अशो काहीशी ती दंतकथा आहे. 

  
   बाजीराव पेशव्यांनी त्या पोथीच्या सर्व प्रति जाळून टाकण्याचा हुकुम सोडला होता. अश्या  प्रक्षिप्त वागमयातील पोथी राघोबा भट हा क्रॉफर्डच्या हाती थोडीच लागु देणार    होता. कारण हि पोथी जवळ बाळगणान्यास देहातांची सजा होती. इ.स.  १८८७  मध्ये राघोबा भटाने संन्यास घेतला, परंतु दोनच वर्षातच त्याचे निधन झाले. चिपळूण जवळ परशुराम पर्वतावरच त्याचे दहन झाले, अस क्रॉफर्डने लिहीले आहे. त्याच्याजवळ असलेल्या वाडवडीलोपार्जित ठेव्याचे पुढे काय झाले कळायला मार्ग तरी काय ?   संन्यासी होण्यापुर्वी आपल्या जवळच्या पोथ्या क्रॉफर्डला राघोबा भटाने मोठ्याने एकेक करुन वाचून दाखवल्या. क्रॉफर्डने राघोबा भट वाचत असताना टिपण काढली. अन त्या टिपणाच्या सह्याने 'लिजेण्डस ऑफ कोकण' हे पुस्तक जुळवल. त्यातील एकेक दंतकथा वाचताना आज गंमत वाटते. पोथीत टाकलेली कथा सांगण्याची हतोटी विलक्षण होती. आणि क्रॉफर्डने ज्या आंग्ल भाषेत राघोबा भटाबरोबरचा संवाद लिहून काढला. ती पध्दतही विलक्षण. ज्या तात्कालिन ब्रिटीशा वाचकांनी क्रॉफर्डचे पुस्तक वाचल त्यांना या अदभुत कहाण्या कितपत रुचल्या हे कळायला मार्ग नाही. पण ज्या आंग्ल भाषाप्रवीण एतद्देशीयांनी कहाण्या इंग्रजीतून वाचल्या असतील त्यांना परकीय भाषेत आपले वागमय कस न्यावे याचे दाखले मिळाले असणार हे निश्चित. क्रॉफर्डने गोळ्या केलेल्या आख्यायिकांपैकी कोकणनिर्मितीची कथा अशी. 

        प्रभु श्रीराम -लक्ष्मण या बंधूना उत्तरेकडच्या बर्फाच्छादीत पर्वतराजीवर राहून कंटाळा आल्याने त्यांनी समुद्राच्या राज्यात - कोकण किनारपट्टीकडे प्रस्थान केले.  एका दमात प्रथम नासिक अन् नंतर सह्यपर्वतराजीपर्यंत त्यांनी मजल मारली. वाईजवळ नीरा अन् कृष्णा या दोन नद्यांमधलं पाणी प्यायला ते थांबले असतील तेवढंच. सारा दैवी मामला। अस आपल्याला वाटेल. पण या दंतकथेत तसे नसते.  राघोबा भटानं सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचे मनुष्यावतारात रुपांतर झाले कि दैवी व्यक्तींनाही मानवी सुख- दुख सोसावी लागतात. .when the gods assume human form they are subject to human ills

      सह्याद्री कसा व कुठून उतरायचा याचा विचार राम-लक्ष्मण करत राहिले. पूर्वी दोनदा त्यांनी कुम्भालों घाट उतरला होता. पण दोन्ही वेळी त्यांना त्रास झाला होता नवीनच एखादा मार्ग शोधून काढू या, लक्ष्मणार्थ म्हणणं !  राम-लक्ष्मणाची चर्चा त्यांच्या भोवतालच्या वृक्षराजीवर बसलेल्या वासरांनी ऐकली त्याला सर्वात वृद्ध कनर झाडावरून खाली उतरला. दोन बंधूच्या समोर उभा राहून म्हणाला  ' आम्ही परशुरामाचे पूजक आहोत आम्ही तुम्हाला मार्ग दाखवत चिपळुणपर्यंत नेउन पोहचवू. पण दिवसाढवळ्या रात्री राक्षसांची भिती भिती वाटते. ' राम-लक्ष्मणांनी विचारलं, तुम्ही राक्षसांना भिता ? ते काही चालायचं नाही. आपण लढू ना त्यांच्याशी ! लक्ष्मणा माझ्या धनुष्याला नवा प्रत्यंचा लावून घे. उद्या पहाटेच आपण घाट उतरायला लागू'
      राघोबा भटानं क्रॉफर्डला थाप ठोकली की 'तुम्हाला माहीतीच आहे घाट एक हजार फूट तरी उताराचा आहे', क्रॉफर्डने राघोबा भटाची रेवडी उडवली, 'थापा मारु नका राघोबा भट, घाट फक्त चारशे फुटांचा आहे.' राघोबा भटाने लगेच माघार घेतली. भलंभलं असो ! पण उंचावरून स्वच्छ आकाश असेल तेव्हा चाळीस मैलांचा टापु नजरेत येतो. उत्तरेकडच्या दाभोळ, महिपतगड इथल्या समुद्रातली शिडं छोट्या-छोट्या माशांइतकी दिसतात, तर दक्षिणेकडे मुल्ला घाटातनं बाहेर आल्यासारखा भैरुगड दिसतो. पण ते जाऊ दे, मी पोथीच वाचून दाखवतो कमा' असा दोघांचा संवाद कहाणी-कथनात खुमारी आणतो.
      राम-लक्ष्मण 'देशावरच होते. मग त्यांना समुद्र दिसणार तरी कसा? ते  सह्यकड्यापासून पंधरा कोस दूर असल्याने कराडलाच निद्राधीन झाले. सूर्य समुद्रात डुबला मारं जग झोपलं. निसर्ग झोपला. पशु झोपले, चंद्र मात्र उगवला सारं जग झोपले तरी तीन पुबह जागीच होती चंद्राने आपल्या प्रवासात राम -लक्ष्मणाची जोडी निद्रिस्त अवस्थेत पाहिली. काही काळ गेला अन् घुबडांना कशाची तरी चाहुल लागाती त्यांनी ओरडायला मुरुवात केली. त्वरित जाग आलेल्या रामानं लगेच हातात धनुष्यबाण घेतला लक्ष्मणाला हाक मारली, 

    राक्षस आले रे आले ! ढाला, भाला आण लवकर ! लक्ष्मणाला काय झाले ते कळेना. कोणीही दिसत तर नव्हतच. पण स्वच्छ, निरभ्र आकाशात अचानक ढग जमा झालेले त्याला दिसले. पश्चिमेकडून ते येत होते. त्यांच्या पाठोपाठ एक वादळ आलं. त्याच्या मागोमाग चिडलेला समुद्रदेव उभा। भत्या मोठ्या लाटा उठत्या, दोन्ही बंधूंना त्या लाटांनी अक्षरशः भिकबून टाकलं समुद्रदेव हातात भला मोठा शंख घेऊन उभा होता त्याच्याभोवती मोठाले माने आणि अक्राळविकात जलवर, लाटा उठत, फुटत, त्यानुसार जलवर वर-खाली होत होते.'इथे  काय करत आहात ? माझ्या भूमीवर  तुमचं आक्रमण ? राम-लक्ष्मण ना तुम्ही ? एवढेसे तर आहात. निधून जा इथून, नाहीतर पाण्याच्या तळाशी पोहोचवीन तुम्हाला'. समुद्रदेवानं दटावून साँगितले. राम काहीच बोलला नाही त्यानं एक मोठा खडक उबलता अन् अचूक त्याच्या दिशेनं फेकला समुद्रदेवाच्या तोंडाशी असलेल्या शंखाचा त्या खडकाचा चक्काचुर केला. समुद्रदेवाचा पारा चढला ''लढाई करायची। दुःखीचा शेवट करायचाय ठिक आहे. उद्याची सकाळ ठरवीत या जलजगताचा नियंता कोण? राम महागाला,' एकदम मान्य'.  प्रभु श्रीरामाने धनुष्याला स्पर्श करताच समुद्रदेवाने आपल्या दोन्ही हातातील समुद्रातील सागरवेल सर्व दिशेन फेकली. अहो आश्चर्य ! वीज कडाडल्याचा आवाज झाला.  पर्वताच्या शिखराचे तुकडे झाले पृथ्वीच्या उदरातून जणू पाण्याची कारंजी उडाली. त्यात समुद्रदेव लुप्त झाला. उद्या, उद्या असा ध्वनी मात्र काही काळ येत राहिला श्रीराम मात्र निश्चल अढळ आत्मविश्वासात उभे होते. अजिक्य अशा धनुष्यबाणाचे बळ ते जाणून होते.

         लक्ष्मण घाबरून मूच्छित पडला होता. त्याला जागे करून दोघेही कराडला परतले - विश्रांतीसाठी ! दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी रामाने धनुष्याला नवी प्रत्यंचा लावून तयारी करून ठेवली वानरांकडून बागही तयार करविते. पुन्हा सूर्य अस्ताला गेला. जग निद्रिस्त झालं. पशुपक्षी विश्रांती घेऊ लागले, भुंगे अन् घुबड तेवढे जागृत अवस्थेत होते. 
       समुद्रदेवाला आपण कोणाला आव्हान दिले आहे याची कल्पना होती. त्यानं भरपुर तयारी केली. पाठीवर पडून संथ पाण्यावर तरंगत तो काय काय करावं ? या विचारात पहुडला असताना त्याला भुंग्याचे गुणगुनणे एकु आले. संधी प्रकाशात भुंगे पाण्याशी जवळीक साधतात अन् मग टयून बसलेले जलचर त्यांना खाऊन टाकतात. अशा एका भुंग्याला मासा टपकन खायच्या बेतात असताना ममुद्रदेवानं त्याला सावध करुन वाचवले आणि हाताच्या तळव्यावर त्याचे पंख सुकविण्यासाठी त्याला ठेवले. प्राण वाचवल्याच्या आनंदात तो नाचू-बागडू लागला कपटकारस्थानात प्रवीण असलेल्या समुद्रदेवाच्या मनात मात्र भलत्याच विचारांचे थैमान बालू होतं. 'तुझे प्राण वाचवल्याबद्दल तू माझा ऋणी आहेस म्हणतोस नाः मग तुझे शब्द खरे करून दाखव ! प्रभु रामाच्या कळपात जा. जवळच आहे. माझे मार्गदर्शक तुला ती जागा दाखवतील. त्याचे धनुष्य कोठे ठेवले आहे हे ही दाखवती. इतरही कीटक तिथे उडत असतीलच. तुला फक्त एवढे करायचे आहे कि धनुष्याच्या आतल्या बाजुला जाउन बसायचे आणि त्या लाकडी धनुष्याला पोखरत सुटायचं अगदी सकाळपर्यंत पोखरायचं. कळलं ना। बपू या तरी तू ऋण कस फेडतोस ते? हे तू केलं नाहीस तर मात्र तुझा अंत ठरलेलाच आहे असे समज ! भुंग्यानं आपलं काम नाइलाजानं पण चोख केले. कोणालाही काही कळले नाही. घुबडांना काहीतरी आवाज येत होता, पण नक्की कशाचा ? ते समजले नाही. 

     सकाळी राम-लक्ष्मण अन् समुद्रदेव समोरासमोर उभे ठाकले. राम-लक्ष्मण उंचावरच्या कड्याच्या टोकाला तर समुद्रदेव एकदम तळाला धुंग्यानं आपले काम एकदम चोख केल्याचे समुद्रदेवाला कळाले होतेच. प्रभु रामाला मात्र ते माहिती नव्हते. त्याने हाती  धनुष्य घेतलं अन् प्रत्यंचा लावली.' कशाला आलात पुन्हा ? माझ्या हातून पराभव स्विकारायला ? हरलात तर माझ्या लाटा तुम्हाला जलसमाधी देणार हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रच काय, पण श्रीलंकेपर्यंत सारा प्रदेश मी गिळून टाकणार '- इति समुद्रदेव.
' माहिती आहे . जिंकलास तर ना ?'श्रीराम
     प्रभुरामानं प्रत्यंचा ओढली त्याक्षणी धनुष्यातून कडकड आवाज झाला. धनुष्याचे दोन तुकडे झाले पण ते इतके सामर्थ्यशाली होते कि त्यातून निघालेला बाण समुद्राच्या छातीत घुसला. नंतर राम  लक्ष्मण जिथे उभे होते तिथून अठरा कोस म्हणजे छत्तीस मैल जाउन पडला. जखमी समुद्रदेव हटला. जमिनीवर प्रचंड उलथापालथ झाली., ज्वालामुखी फुटले. लाव्हारस पसरला आणि राखरांगोळी झाली. आणि कोकणाची निमिती झाली. 
     कोकणच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास आपल्याला रंजक माहिती मिळते अगदी पुराणकाळी गोकर्ण ते कन्याकुमारीपर्यतचा पश्चिम किनाऱ्याचा भाग परशुरामाने आपला परशु समुदात फेकून निर्माण केला., अशी अख्यायिका आहे. त्यावरून कोकणची व्याप्ती कन्याकुमारीपर्यंत होती असे म्हणतात. सह्यादी खंड आणि मंगेश माहात्म्य था ग्रंथात देखील सर्वत्र कोकणचे वर्णन आढळते.
     कोकणच्या बहुतेक भागाला लागून समुद्र किनारा आहे. कोकणातील बहुतेक नद्या पश्चिमेकडे वाहत समुद्राला मिळतात. त्यामुळे या भागातील हवा वर्षभर सौम्य असते. हवेत पाण्याची वाफ जास्त असते म्हणून हवा दमट असते, दुपारी अंगाला घाम फुटती पर्यायाने काम करायला तरतरी वाटत नाही. इथूनच कोकणची भूरचना त्याच्या एका बाजूस पर्वतराजी त्यातील दऱ्या खोऱ्या त्यांची समशितोष्ण हवा या सर्व गोष्टींचा परिणाम कोकणी माणसाच्या जीवनशैलीवर होतो. सावित्री नदीला बिलगणाऱ्या चार उपनद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. ह्या नद्या लहान व बेडवावाकडया वाहणाऱ्या आहेत. समुद्रात मिळण्या अगोदरच या नद्यांची बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ३६० मैलाच्या कोकण पट्ट्याला निसगनि भरभरून दिले आहे.
     अरबी समुद्र व सह्याद्री या दरम्यान असलेला उत्तरेकडील दमणपासून दक्षिणेकडील गोव्यापर्यंतचा किनारपट्टीचा, अंदाजे ८५ ते ९० किलोमीटर रुंद व ५०० किलोमीटर लांब, उतरणीचा प्रदेश प्राचीन काळापासून कोकण या नावाने ओळखला जातो. कालांतराने त्याचे उत्तर व दक्षिण कोकण असे भाग पडले. सुरत जिल्ह्याच्या दक्षिणेपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेपर्यतचा प्रदेश उत्तर कोकणात मोडतो. रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग व कारवार जिल्ह्याचा दक्षिण भाग यामधील प्रदेशास दक्षिण कोकण असे संबोधिले जाते. म्हणजे रायगड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास हा उत्तर कोकणचा इतिहास होय. उत्तर कोकणास अपरान्त (पश्चिमेकडील शेवटचे टोक) असे ऐतिहासिक नाव आहे. महा महोपाध्याय मिराशींच्या मते सम्राट अशोकाच्या आज्ञापत्रांत (Edict) अपरान्तचा ऐतिहासिक उल्लेख सर्वप्रथम आला.
ख्रिस्त पूर्व कालापासून कोकणचा इजिप्त, अरबस्थान, पार्शिया, ग्रीक आदी देशांशी व्यापार चालत असे. इ. स. दक्षिण कोकण (आरिका) असे दोन भाग केल्याचा उल्लेख आढळतो. एका पंथात दक्षिण कोकणात अरबांच्या चाचेगिरीच्या फारच त्रास होतो असे नमूद करण्यात आले आहे.


      ठाणे व रायगड हे उत्तर कोकणात मोडणारे जिल्हे तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणात मोडणारे जिल्हे आहे. कोकणच्या भूप्रदेशाचा एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वताची उंच उंचच शिखरे त्यामध्ये कोकण प्रदेश बसला आहे. उंच डोंगरात व समुद्र किनारी अति आर्द्रता व अति प्रर्जन्यसृष्टी यांचा मिलाप आढळतो बाणकोटच्या खाडीने कोकणचा दक्षिण भाग कोकणापासून विभाग‌ला गेला आहे.
         पात्रे सुकी पडतात. पावसाळ्यात या नद्यांना पुर येतो. उन्हाळयात या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. कोकणातील उंच उंच पर्वतावर अनेक दुर्गम किल्ले आहेत. चहुकडे घनदाट अरण्ये आहेत. सपाट जागी उस, नारळी, पोफळी पाने फळे इत्यादी गजबजलेला सुदर प्रदेश आहे. असे इ. स. १४७० च्या सुमारास कोकणच्या स्वारीवर गेलेल्या बहामणींचा शुर सरदार महमद गावाण याने लिहून ठेवले आहे.
सह्याद्री पर्वतांच्या भितांडात दमणपासून गोव्यापर्यंत अनेक खिंडी आहे. त्यातून जाणाऱ्या वाटांना घाट म्हणतात. पार घाट, माळसेज, दिवे, रामघाट, कुंभारघाट, नाणेघाट, थळघाट, भोरघाट, बालाघाट, झालेला आहे.
   ठाणे व रायगड हे उत्तर कोकणात मोडणारे जिल्हे तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दक्षिण कोकणात मोडणारे जिल्हे आहे. कोकणच्या भूप्रदेशाचा एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वताची उंच उंचच शिखरे त्यामध्ये कोकण प्रदेश बसला आहे. उंच डोंगरात व समुद्र किनारी अति आर्द्रता व अति प्रर्जन्यसृष्टी यांचा मिलाप आढळतो बाणकोटच्या खाडीने कोकणचा दक्षिण भाग कोकणापासून विभाग‌ला गेला आहे.
पात्रे सुकी पडतात. पावसाळ्यात या नद्यांना पुर येतो. उन्हाळयात या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. कोकणातील उंच उंच पर्वतावर अनेक दुर्गम किल्ले आहेत. चहुकडे घनदाट अरण्ये आहेत. सपाट जागी उस, नारळी, पोफळी पाने फळे इत्यादी गजबजलेला सुदर प्रदेश आहे. असे इ. स. १४७० च्या सुमारास कोकणच्या स्वारीवर गेलेल्या बहामणींचा शुर सरदार महमद गावाण याने लिहून ठेवले आहे.
      सह्याद्री पर्वतांच्या भितांडात दमणपासून गोव्यापर्यंत अनेक खिंडी आहे. त्यातून जाणाऱ्या वाटांना घाट म्हणतात. पार घाट, माळसेज, दिवे, रामघाट, कुंभारघाट, नाणेघाट, थळघाट, भोरघाट, बालाघाट, झालेला आहे.इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते तल, रसातल, महितल, पाताल इत्यादी सप्तपाताले म्हणजेच समुद्रकाठचा कोकण. म्हणजे प्राचीन काळी एक सलग कोकण नव्हताच. तेथे पूर्वी अनेक राज्ये होती व नंतरही ती अनेक वर्षे राहिली. तथापि कोकण या प्रदेशास अतिप्राचीन काळी अपरान्त म्हणून संबोधिले जात असे ही गोष्ट राजवाड्यांच्या लक्षात आली नसावी. कोकण हा किनाऱ्याचा प्रान्त असल्यामुळे सप्तपाताले ही बहुधा सप्तबंदरे असावीत. कालिदासाच्या रघुवंशा तील अपरान्ताचा उल्लेख करताना टीकाकार वल्लभत्यास "कोकण" असे दुसरे नाव देतो. आरंभी येथे नाग लोकांची वस्ती होती, आणि कुंकण नावाच्या एका नागकुलाने आपले अधिराज्य प्रस्थापिल्यामुळे या प्रदेशाला सप्तपातालऐवजी सप्तकुंकण म्हणजे कोकण हे नाव प्राप्त झाले. गुजरातमधील नागर ब्राह्मण स्वतःला आजही कुंकण ब्राह्मण म्हणवितात. प्राचीन ग्रंथात इ. स. पू. चौथ्या शतकापासून कोकणचा उल्लेख आढळतो. महाभारत, हरिवंश, विष्णुपुराण, बृहत्संहिता, राजतरंगिणी, पेरिप्लस इ. ग्रंथ, चालुक्यांचे शिलालेख, प्लिनी, टॉलेमी, स्ट्रेंबो, हचुएन त्सँग, इब्न बतूता, अल्-बीरुनी यांचे वृत्तांतांत कोकणचा उल्लेख आहे. टॉलेमीने गुजरात व उत्तर कोकण यांस  "लारिका" व दक्षिण कोकणास "आरिका" म्हटले आहे. इ. स. पू. पाचव्या शतकापासून बॅबिलोन, रोम इत्यादींशी भडोच, चौल, वनवासी, नवसारी, सोपारा, बालेयपट्टण, चंद्रपूर, कल्याण या व्यापारी केंद्रांचा संबंध होता. कोकण हे नाव कसे पडले याविषयी अनेक मते आहेत. परशुरामाची माता कुंकणा यावरून कोकण नाव पडले असावे असेही एक मत आहे.
      आर्यपूर्व अनार्य नागकुलांचे कुंकण नाव गुजरातमधील नागर ब्राह्मणांनी स्वीकारण्याचे कारण म्हणजे या प्रदेशात झालेला आर्य संस्कृतीचा प्रसार हेच असावे. गुजरातमधील 'भृगुकच्छ' या भडोच बंदराच्या प्राचीन नावावरून देखील समुद्र किनाऱ्यावरील आद्यबसाहती भार्गवांनी केल्या, व भुगुकुळातील परशुरामाने समुद्र हटवून कोकण निर्माण केला ही दन्तकथा आर्य संस्कृतीच्या विस्तारामुळेच प्रचलित झाली असावी. याचा परिणाम पुढे "कोकणचा इतिहास म्हणजे आर्य लोक व आर्यभाषा यांच्या त्या प्रदेशातील प्रवेशापासूनचा इतिहास" आणि "कोकणचा राजा झिम्मा खेळतो" या लोकगीतातील ओळीचे स्पष्टीकरण "सामान्यपणे आर्यभाषेतील साहित्यातूनच हा इतिहास हुडकून काढून निश्चित केला पाहिजे,"" अशा विधानांत आढळतो. याचा अर्थ आर्य लोक कोकणात येण्यापूर्वी तो प्रदेश निर्मनुष्य होता असा भास होतो. परंतु तेथील आदिवासी नागलोकांच्या भाषा, त्यांची लोकगीते, नृत्य, रीतीरिवाज वगैरे साधनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास झाल्याशिवाय कोकणचा प्राचीन इतिहास अपूर्णच राहील.
      अश्मयुगीन कोकण : भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास सध्याच्या कोकण समुद्र किनाऱ्या-पासून अंदाजे अर्धा ते दोन किलोमीटर आत, तसेच समुद्रात दोन ते चार किलोमीटर आत असलेले "करळ" म्हणजे खडकासारखे घट्ट झालेले वाळूचे अवशेष यावरून कोकण किनाऱ्याची अवस्था गेल्या चार हजार वर्षांत किती बदलली असेल हे दिसते.'
       लोखंडी छिन्यांसारख्या उपकरणांच्या सहाय्याने सह्याद्रीच्या कुशीत कोरलेली भव्य बौद्ध लेणी आजही तत्कालीन पाथरवट कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात. कान्हेरी, कुडा, महाड, चौल, कोल, पाले, ठाणाळे येथील बौद्ध लेणी लोहयुगीन कारागिरीचीच साक्ष देतात. उत्तर कोकणातील ही बौद्ध लेणी इतर लेण्यांपेक्षा उशिरा (इ. स. पहिल्या ते तिसन्या शतकापर्यंत) कोरली आहेत. " या काळापर्यंत त्या कारागिरांची भटकीवृत्ती नाहीशी होऊन ते वसाहती करून राहू लागले. जेथे जेथे लेणी कोरण्याचे काम करावे लागे तेथे तेथे अनेक वर्षे हे कारागीर वसाहती करून राहू लागले. कारण एका बौद्ध लेण्याचे संपूर्ण खोदकाम व कोरीव काम करण्यास अंदाजे ६० वर्षे लागत असावीत. अनेक बौद्ध भिक्षुकडून या पाथरवट कारागिरांना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. पुढे त्यांच्याच पैकी काहींनी संपूर्ण लेण्याचे दान दिल्याचे उल्लेख अनेक शिलालेखांत आढळतात. कुड्याच्या एका संपूर्ण लेण्याचे दान कराडच्या एका लोहवाणियाने दिले, व कान्हेरीचे एक संपूर्ण वौद्ध लेणे एका लोहाराने (कम्मार) दान दिल्याचे उल्लेख शिलालेखांत आढळतात.
       लोहयुगीन संस्कृतीबरोबर जसा लोखंडी हत्यार, बौद्ध लेणी व कला यांचा प्रसार झाला तसाच भाजलेल्या विटांची घरे, खिळे ठोकून बसविलेली त्यावरील कौले, तटबंदीची शहरे, दर्यावर्दी व्यापार व बंदरे, नाण्यांचा वापर, लेखन कला, पाटा-वरवंटा, दळणाचे जाते ब कारागिरांचे संघही उदयास आले.
        मौर्य, सातवाहन व क्षत्रप उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास म्हणजे प्रामुख्याने तेथील बंदरे, खाड्या व देशी आणि विदेशी लोकांबरोबर होत असलेल्या व्यापारी व सांस्कृतिक संबंधांचा इतिहास होय. ठाणे व सोपारा या प्राचीन बंदरांचा व्यापार इजिप्त, बॅबिलोन व फिनिशिया या देशांशी इ. स. पूर्व २५०० ते ५०० या काळात जलभागनि होत होता. इ. स. पूर्व १५०० ते १००० या काळात इजिप्तच्या राजधानीतील डेअिरेल-बहरी नावाच्या मंदिरातील शिल्पकलेवरून इजिप्तने आपल्या गलबतांतून आणलेल्या लुटीत हस्तिदंत, सोने, मौल्यवान रत्ने, चंदन व माकड अशा अनेक भारतीय वस्तूंचा मोठ्या प्रमाणात समावेश होता." ओल्ड टेस्टमेंट या पाश्चिमात्य प्राचीन धर्मग्रंथात सोलोमन राजाची गलबते ओफीर (उत्तर कोकणातील सोपारा बंदर) येथे येऊन भारतीय साग, सोने, चांदी, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मोर व माकड यांची आयात करीत, असा उल्लेख सापडतो. बुद्धकालीन सोपारा (सुप्पारक, सोफिर) बंदराचे व्यापारी संबंध पश्चिम आशियाशी असल्याचे उल्लेख पाली भाषेतील ग्रंथांमध्ये सापडतात. "वावेरु" जातकात भडोच व सोपारा येथील व्यापारी बॅबिलोनशी समुद्रमागनि व्यापार करीत होते असा उल्लेख आढळतो. काही कालावधीनंतर इ. स. पूर्व ५०० ते इ. स. २५०, पर्यंत कल्याण, संजान, चौल, महाड, पुरी, बालेयपट्टणसारख्या बंदरांतूनही पशिया, ग्रीस, अरेबिया, पेमेन व इजिप्त या देशांबरोबर आयात-निर्यात होऊ लागली.
    सम्राट अशोकाच्या आज्ञापत्नात अपरान्तचा ऐतिहासिक उल्लेख प्रथम आला. अपरान्त म्हणजे कोकण असे आता इतिहासकारांनी मान्य केले आहे. अपरान्त भागात उत्खननांचा अथवा संशोधनाचा अभाव असला तरी एक महत्त्वाचा पुरावा येथे उपलब्ध झाला आहे. घारापुरी (एलिफन्टा) जवळील बुचर बेटावर हातकुन्हाडी व रापीसारखी अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडल्याने या प्रदेशात किमान एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे. शिवाय पाचाड व हातखंबे येथील गुहांमध्ये मिळालेल्या गारगोटीच्या उपकरणांवरून कोकणातील वीस ते चाळीस हजार वर्षांपूवींच्या मध्य-पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सिध्द होते. या भूप्रदेशावर मौर्य, कोकणचे मौर्य, सातवाहन, क्षत्तप, त्रैकूटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी,, शिलाहार, यादव, बहामनी, गुजरातचे सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्दी,  मराठे, मुघल, आंगरे व ब्रिटिशांनी राज्य केले. रायगड जिल्ह्यातील पुरावशेषांवरून स्पष्ट होते की, येथे बौद्ध संस्कृतीची बीजे खोलवर रुजली होती. येथील बौध्द लेण्यांवरून असेही दिसून येते की, या लेण्या एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर खोदलेल्या आहेत.
       इ. स. पूर्व तिसन्या शतकात अशोक मौर्याच्या कारकिर्दीत सोपारा हे मौर्य साम्राज्यातील एक मोठे बंदर होते. तेथे सापडलेल्या अशोकाच्या शिलालेखात त्याने अपरान्तात (कोकणात) बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता धर्ममहामात्र पाठविले असा उल्लेख आहे. इ. स. चौथ्या व पाचव्या शतकांत लिहिलेल्या दीपवंस व महावंस या पाली ग्रंथांतही अशोकाच्या देखरेखीखाली भरलेल्या पाटणा येथील तिसऱ्या बौद्ध महासंघाच्या सभेत ठरल्याप्रमाणे योण (यवन) धम्मरक्खित नावाच्या बौद्ध भिक्षुला धर्मप्रसाराकरिता अपरान्तात पाठविले असे वर्णन आहे. मौर्याच्या राजकीय धोरणामुळे उत्तर कोकणात केवळ बौद्ध धर्मप्रसारच नव्हे तर व्यापारही मोठ्या प्रमाणात सुधारल्याचे अनेक पुरावे सापडतात. अपरान्त व इतर प्रदेशांमध्ये बौद्ध धर्म प्रचारासाठी निघालेले धर्मप्रसारक भिक्षु हे तत्कालीन व्यापारी मार्गावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यापारी तांड्याबरोबरच जात असावेत. अशोकाच्या शिलालेखात सिरियाचा दूसरा अँटिओक, इजिप्तचा दुसरा टॉलेमी फिलेडेल्फस, मेसो-डोनिआचा अँतिगोन, सिरिनचा मग आणि एपिरसचा (Corinth) सिकंदर यांच्याकडे पाठविलेले बौध्द भिक्षु कोकणातील विविध बंदरांतून जाणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच गेले अमावेत.

सागरामुळे उत्तर कोकणचा केवळ परदेशी व्यापार व तेथील नाविक हालचालीच वाढल्या अमे नाही तर प्राचीन रायगड जिल्ह्याच्या परिसरातील प्रदेश खुष्कीच्या मार्गानेही व्यापाराकरिता जोडले गेले. सोपारा, कल्याण, ठाणे, चौल, महाड, मांदाड, राजपुरी व घोडेगाव (गोरेगाव) ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नासिक, पैठण यांसारख्या व्यापारी केंद्रांशी नाणेघाट, बोरघाट, शेरघाट व थळघाट या मार्गानीच नव्हे तर देवस्थळी, कुंभ व शेवटचा अशा अरुंद व अडचणीच्या घाटमागांनीही जोडली गेली.
      ठाणे, सोपारा, कल्याण, डहाणू, भाईंदर (वसई), चौल, मांदाड, म्हसळा, पाले, अंतोरे, महाड, घोडेगाव (गोरेगाव), राजपुरी इत्यादी प्राचीन बंदरांचे इजिप्त, अरबस्तान, इराण, ग्रीम वगैरे देशांबरोबर व्यापारी मंबंध होते अशी माहिती प्राचीन फारमी व ग्रीक ग्रंथांत मोठ्या प्रमाणात सापडते.
       भारताचे मौर्य व इजिप्तचे टॉलेमी या राजघराण्यांचे एकमेकांशी सलोन्याचे परराष्ट्रीय धोरण व राजदूत पातळीवरील संबंध यामुळेच या दोन्ही देशांमधील व्यापार नियमितपणे वृद्धिगत होत गेला. इ. सनाच्या दुसऱ्या शतकातील अथेनिअस नावाच्या ययन अलंकार मास्त्रज्ञाने टॉलेमी दुसरा फिलेडेल्पस (इ. स. पूर्व २८५-२४७) याच्या मिरवणुकीत भारतीय महिला, मसाले व पशू यांचा समावेश असल्याचे वर्णन केले आहे. यावन्न इ. म. पूर्व तिसऱ्या शतकातील भारताचे इजिप्तशी असलेले व्यापारी संबंध दिसून वेलान. टॉलमीच्या माहितीवरून पश्चिमेकडील यवन लोकांना भारताच्या पश्चिम किनाऱ्याची इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक माहिती होती हे स्पष्ट दिसते. चौल बंदरान येणाव्या यवन व्यापाऱ्यांकडून भरपूर माहिती मिळवून टॉलेमीने भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे 'सुराष्ट्रेने' (सौराष्ट्र म्हणजे कच्छ, काठेवाड व उत्तर गुजरात), 'लारिके' (लाट देण म्हणजे दक्षिण गुजरात), 'आरियेके' (मराठा देश), आणि 'दामुरिके' (दामिल म्हणजे तामिळ देश) असे वर्णन केले आहे. आरियेकेचे त्याने 'आरियेके' (मुंबई-दख्खन), 'मदन आरियेके' (उत्तर कोकण) व 'पिराते आरियेके' (दक्षिण कोकण) असे स्पष्टीकरण केले आहे." यावरून टॉलेमीस 'कोकण' हे नाव अपरिचित असावे. टॉलेमीच्या जिऑग्रॅफी ग्रंथामध्ये नवसारी, गोरे, दुगाड, भाईंदर, चौल, पाले व घोडेगाव या प्राचीन बंदरांतून परदेशी माल आयात होत असे आणि कल्याण, सोपारा व चौल ही व्यापारी शहरे होती असेही वर्णन केले आहे. यावरून भारताचा पश्चिम किनारा परदेशी व्यापाऱ्यांना फार महत्त्वाचा होता हे उघड होते. ग्रीस व अरबस्तानातील काही व्यापाऱ्यांनी आपले कायमचे वास्तव्य सोपारा व ठाणे येथे केल्याचा उल्लेखही सदरहू ग्रंथात आढळतो. कान्हेरी व इतर लेण्यांतील यवनांच्या देणग्यांचे उल्लेख स्थानिक यवनांचे अस्तित्व दर्शवितात." परंतु या सर्व माहितीबरोबर टॉलेमीच्या मते चौल ते मंगलोरपर्यंतचा किनारी प्रदेश हा चाचेगिरीचा फार मोठा धोकादायक प्रदेश होता. इजिप्तकडून येणाऱ्या व्यापारी गलबतांना या उपद्रवाच्या बंदोबस्तासाठी धनुर्धारी सैनिकांची एक तुकडी बरोबर आणावी लागे. टॉलेमीच्या या विधानाला पेरिप्लसने पुष्टी दिली आहे."

          सुरुवातीचा व्यापार आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याहून, तांबडा समुद्र, एडन, अरेबिया, अलेक्झांड्रिया, पशियाचे आखात, ओमान व खंबायतचे आखात या मागनि किनाऱ्या किनाऱ्याने  फार मंदगतीने होत असे. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील दुसऱ्या सोतेर टॉलेमीचा शिक्षक आगाथाकिडेस याच्या सांगण्याप्रमाणे जरी अनेक भारतीय व्यापारी एडनला नियमित भेट देत असत तरी इजिप्तबरोबर होणाऱ्या व्यापारामुळे अरब देशांनाच भरपूर आर्थिक लाभहोत असे. पेरिप्लस अनुसारही भारतीय खलाशी व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी अरेविया व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आढळत असत. तांबड्या समुद्राकडील भारतीयांचे वर्चस्व कमी करण्यासाठी किंवा नाहीसे करण्यासाठी अरब व्यापारी नेहमीच प्रयत्नशील असत." परंतु अशा परिस्थितीतही सोपारा, कल्याण, चौल, मांदाड, पाले, राजपुरी या प्राचीन बंदरांतून तांदूळ, लोणी, तिळाचे तेल, साधे व तलम सुती कापड व साखर या भारतीय वस्तूंची निर्यात इजिप्तकडे केली जात असे. "
       या परिस्थितीत इ. स. पूर्व पहिले ते इ. म. चे पहिले शतक या काळात मोठ्या प्रमाणात बदल झाला असे वर्णन स्ट्रॅवो व प्लिनी यांच्या लेखनात सापडते. इ. स. पूर्व ३१ ते इ. स. १४ मध्ये इजिप्त रोमन साम्राज्यात विलीन झाले. सम्राट ऑगस्टसने चाचेगिरीला आळा घातला व व्यापारी मार्ग सुरक्षित बनविले. हिप्पॅलस या रोमन नाविकाने नैऋत्य मोसमी वाऱ्याचा शोध इ. स. ४७ मध्ये लावला. स्वाभाविकच रोमहून भारताला किनाऱ्या किनाऱ्याने येणाऱ्या जहाजांच्या दीर्घकालीन जलप्रवासाला पूर्णविराम मिळाला, व या दोन देशांचा आपसातील थेट दर्यावर्दी व्यापार सुरू झाला. या व्यापारी हालचालीत अरव देशांना वगळले गेले. प्लिनी आपल्या नॅचरल हिस्टरी मध्ये लिहितो की 'हिप्पॅलस' बारा (नैऋत्य वारे) जर व्यवस्थित असला तर इजिप्त ते भारत या जलप्रवासास अवघे ४० दिवस लागत असत. साहजिकच स्ट्रॅबोने वर्णन केल्याप्रमाणे जेथे पूर्वी सबंध इजिप्तमधून अवधी २० व्यापारी गलबते वर्षाकाठी भारताकडे येत असत, त्याऐवजी आता फक्त मियो होर्मो या एकाच बंदरातून १२० व्यापारी गलबते भारताच्या दिशेने दरवर्षी येताना दिसत असत.

       रोम साम्राज्याकडून भारतीय चैनीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. भारतीय आर्थिक परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला. प्लिनीच्या मते भारतीय खनिज पदार्थ व मौल्यवान रत्ने ही जगात सर्वोत्तम गणली जात होती. सूर्यकांतमणी, शिव-धातू, माणिक, क्षीरस्फटिक, रत्ने, हिरे, याकूत यांची मागणी रोम साम्राज्यात वाढत होती, व राजकुटुंब, राजदरवारातील श्रीमंत व विलासी स्त्रिया यांच्या चैनीच्या गरजाही वाढत होत्या. साग, सुवासिक वनस्पती, सुंठ, मिरी, तिळाचे तेल, साखर, धूप, जिरे, जनावरांची कातडी, सुगंधी मलम व द्रव्ये, रेशीम, हस्तिदंत, वैडूर्यमणी, इंद्रनील, हिरे, मोती आदि वस्तू भारतातून रोमला निर्यात केल्या जात असत आणि मद्य, पोवळे, काच, सोन्या-चांदीच्या वस्तू, तांबे, कथील, शिसे इत्यादी वस्तूंची आयात रोमकडून केली जात असे. सुंठ, मिरी व रेशमी कापड वजनाबर विकून त्यांची किमत सोन्यात घेतली जाई. याचा परिणाम, प्लिनी लिहितो, " शंभर पटीने मालाची किंमत घेऊन भारत आमच्या  साम्राज्यास वर्षाकाठी ऐंशी लाख रुपयांपर्यंत लुबाडित असे." तो पुढे लिहितो, " इतक्या महागाईने आम्ही आमच्या चैनीकरिता व आमच्या विलासी स्त्रियांकरिता मोल देत असू."

        मौर्य साम्राज्यानंतर व्यापाराकरिता लागणारी राजकीय स्थिरता व शांतता सातवाहन काळात असल्याचा पुरावा म्हणजे त्या काळातील (इ. स. पूर्व २२५ ते इ. स. २२५) पश्चिम किनाऱ्याच्या व्यापारी मार्गावरील शेकडो बौद्ध लेणी होत. राज्यातील स्थानिक व परदेशी व्यापारावर आपले राजकीय वर्चस्व व संपन्नता बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे या जाणिवेनेच सातवाहनांनी त्यांच्या पैठण राजधानीपासून जुन्नरपर्यंत व पुढे नाणेघाटातून कल्याण बंदरापर्यंत व्यापारी मार्ग तयार केला. नाणेघाटातील एका गुहेत सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक व त्याचा पुत्र पहिला सातकर्णी यांच्या पूर्ण आकाराच्या कोरीव प्रतिमा व त्यांची नावे दिसतात. यावरून नाणेघाटाचे महत्त्व त्यांना निश्चितच उमगले असावे. याशिवाय त्यांनी बोर बाटातील अरुंद मार्गाने चौल बंदराशी आपले व्यापारी संबंध निर्माण केले. या संदर्भात चौल ही स्थानिक पेठ एकदम व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्धीस आल्याचा उल्लेख टॉलेमीने केला आहे. कल्याण, चौल आणि सोपारा या सातवाहनकालीन बंदरांचे विपुल संदर्भ पेरिप्लस व टॉलेमीने दिले आहेत. कालांतराने क्षत्रप नृपतींनीही बंदरांचे महत्त्व जाणून ती हस्तगत केली. सातवाहन आणि क्षत्रपांचा प्रदीर्घ संघर्ष हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता. व्यापारी मार्ग आणि आंतरराष्ट्रीय बंदरे आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठीच दोघांचेही अखंड प्रयत्न होते. पश्चिम किनाऱ्यावरील अनेक बौद्ध लेण्यांतील क्षत्रप व सातवाहनांचे शिलालेख याची साक्ष देतात.
   ऐतिहासिक दृष्ट्या प्राचीन रायगड जिल्ह्याचे पहिले ज्ञात राज्यकर्ते सातवाहनच होत.  इ. स. च्या सुरूवातीस सात वाहन राजांची सत्ता होती. त्यांची पहिली राजधानी पैठण होती. सात वाहन घराण्यात पहिला राजा शिमुक होऊन गेला. त्याचा काळ ख्रिस्तपूर्व २३२ सुमाराचा असावा. त्याच्या कारकिर्दीत सात वाहन साम्राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकचा काही भाग मोडत होता. त्याचा मुलगा सातकर्णी त्याचे राज्य इ. स. पूर्वी १६८ च्या सुमारास कोकण, नाशिक, खानदेश ते भंडाऱ्यापर्यंत पसरले होते.  इ. स. पूर्व पहिल्या शतकातील कलिंगाच्या खारवेल राजाच्या हाथिगुंफा येथील शिलालेखावरून सातवाहन वंशातील तिसरा राजा पहिला सातकर्णी याचे साम्राज्य उत्तर कोकण व काठेवाडच्या विशाल प्रदेशावर पसरले होते हे सिद्ध होते.
त्याशिवाय याच घराण्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा इ. स. पूर्व १२४ च्या सुमारास होऊन गेला त्याचेही कोकणावर राज्य होते. त्याचे काही नाणी ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडली. त्यावर त्याचे राज्य दक्षिणेत पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत पसरले होते. हे स्पष्ट होते. गौतमीपुत्र सातकर्णी याच्या आईचे नाव राझी गौतमी बलश्री व मुलाचे नाव वशिष्ठी पुत्र श्री पुलुमावी होते. जो इ. स. पूर्व १३१ च्या सुमारास सातवाहन राज्यावर बसला. त्याने सुमारे २४ वर्षे राज्य केले. कार्ले व कान्हेरी येथील लेण्यात त्याचे लेख सापडले. त्यावरून त्याचे राज्य कोकणात होते हे दिसून येते.  परंतु कालांतराने काही काळ सातवाहनांच्या सत्तेला ओहोटी लागली व त्यांना दख्खनचा पश्चिम भाग गमवावा लागला. उत्तर कोकणचा भाग एका सातकर्णी राजाने गमावला होता असा उल्लेख पेरिप्लस मध्ये आहे. तो पहिल्या सातकर्णीबाबतचाच (सातवाहनांचा तिसरा) होय.
       क्षत्रपांच्या क्षहरात व कार्दमक अशा दोन शाखा होत्या. पहिल्या शाखेचे भूमक (इ. स. १०५-११०) व नहपान (इ. स. ११०-१२४) असे दोनच राजे होते व दुसऱ्या शाखेचे २७ राजे होते. क्षत्रपांची सत्ता जरी प्रामुख्याने सौराष्ट्र व माळवा प्रदेशात होती तरी पेरिप्लस अनुसार व नासिक आणि कान्हेरी येथील शिलालेखांवरून त्यांची सत्ता काही काळ तरी सोपारा बंदर व पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागावर होती असे दिसते. त्यांची बहुतेक नाणी गुजरातमध्ये सापडली आहेत. परंतु त्यांचा कुषाण सम्राटाशी कशा प्रकारचा राजकीय संबंध होता याचा बोध होत नाही. नहपान हा कुषाण साम्राज्याच्या नैऋत्य भागाचा राजप्रतिनिधी होता. त्याच्या नाण्यांवरील 'राजन' या उल्लेखावरून तो स्वतंत्वरीत्या सत्ता गाजवीत होता हे सिद्ध होते. जोगलटेंबी येथे सापडलेल्या नहपानाच्या १३,२७० रुपेरी नाण्यांपैकी ९,२७० नाण्यांवर गौतमीपुत्र सातकर्णीचे सांकेतिक चिन्ह असल्यामुळे क्षहरात राजा नहपानाचा पराजय गौतमीपुत्रानेच केला हे स्पष्ट होते. नासिक येथील शिलालेखात त्याची आई गौतमी बलश्री हिने आपल्या पुत्त्राचे प्रशंसापर उल्लेख 'क्षहातबंगनिवेशक", 'शकयवन पल्हव निबूदन' म्हणजे क्षहात कुलाचा विध्वंसक, शक यवन व पल्हव यांचा नाशकर्ता असे केले आहेत. यावरून दक्षिणेकडील कृष्णा नदीपासून उत्तरेकडील मालब व काठेवाडपर्यंत आणि पूर्वेकडील वन्हाडपासून पश्चिमेकडे कोकण-पर्यंतच्या संपूर्ण प्रदेशावर गौतमीपुत्र राज्य करीत होता असे दिसते.
     नासिकच्या नहपानाच्या शिलालेखात भरुकच्छ, दशपुर, गोवर्धन व सोपरिग (सोपारा) येथे विश्रांतिगृहे बांधल्याचा उल्लेख सापडतो. त्याच्या इच्छेनुसार अनेक नद्यांच्या काठी होड्यांची सोय व विश्रांतिगृहांत पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे वर्णन आहे. यावरून सातवाहनांना देखील व्यापारी मार्ग व परदेशी व्यापार यांचे विलक्षण महत्त्व पटले होते, व त्यासाठीच त्यांनी क्षहरातांशी युध्द केले. आपल्या सत्तेखालील साम्राज्य व त्याचा उत्कर्ष या बावतीत त्यांचा परदेशाशी होणारा व्यापारच फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता याची सातवाहनांना निश्चित जाणीव होती. नहपानाचा जावई उपबदात यानेही सोपारा येथे चौकोनी विश्रांतिगृहाचे दान दिले असा नासिकच्या लेण्यात उल्लेख आहे.
      इ. रा. पहिल्या शतकातील सातवाहन राजा हाल (इ. स. २०-२४) याने संकलित केलेला माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील सातशे ओवींचा गाथासप्तशती हा काव्यसंग्रह सातवाहनांकडून माहाराष्ट्री प्राकृत भाषेला मिळालेला एक अमोल ठेवा असून महाराष्ट्राच्या मानवी जीवनाचे यथार्थ व मोहक वर्णन करणारे एक ऐतिहासिक साधन आहे. मराठी भापेची माता असणाऱ्या माहाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेल्या या काव्यसंग्रहात स्वतः हालाने ४४ पद्यांची रचना केली. पद्य ७८० मध्ये जहाजाच्या शिडावरील पक्षी (प्राचीन पाली ग्रंथांतील 'दिशाकाळ') आकाशात उंच उडून कोठेही भूप्रदेश न दिसल्याने परत जहाजाच्या गिडावर येऊन बसतो असे वर्णन केले आहे. हे वर्णन त्या काळातील दूरच्या प्रदेशांशी होत असणारा सागरी व्यापार व इतर नाविक हालचाली यांचा उत्तम पुरावा आहे. पद्य क्रमांक ६७९ मध्ये किनाऱ्यावरील हिवाळी मध्यान्हाबाबत लिहिताना आकाशातील पांढरे ढग जणू काय मिठाचे मोठे ढीग दिसतात असे वर्णन केले आहे. पद्य ३०८ मध्ये बौध्द वसाहतीतील लांब झगे घातलेल्या व गुडघे टेकून बुध्दाच्या पायाशी प्रार्थना करणाऱ्या बौध्द भिक्षुचे चित्त रेखाटले आहे. बौध्द भिक्षु आणि हिंदू पुरोहित यांचा डोंगीपणाही उघडकीस आणला आहे. होळी व गुडीपाडवा हे लोकप्रिय सण वणिले आहेत. बैलजोडीसह शेताकडे जाणाऱ्या नांगरधारी शेतकऱ्याच्या प्रणयकथेची माहिती दिली आहे. यावरून हे काव्य सातवाहनकालीन माहाराष्ट्री प्राकृत भाषा बोलणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील लोकांच्या समाजजीवनाचे वर्णन तर करतेच, शिवाय परंपरागत जनजीवनही दर्शविते.
         गौतमीपुत्र सातकर्णीने इ. स. ८६ ते ११० पर्यंत राज्य केले. अंदाजे इ. स. १०० मध्ये त्याने नहपानाचा पराभव केला. नहपानाने इ. स. ५४ ते इ. स. १०० पर्यंत राज्य केले. मत्स्य व ब्रह्मांड पुराणांत गौतमीपुत्र सातकर्णीनंतर पुलुमावी, शिवश्री सातकर्णी, शिवस्कंद सातकर्णी व यज्ञश्री सातकर्णी हे एकामागून एक राज्यावर आले असे वर्णन आहे. पुलुमावी  हा चष्टनाचा (क्षत्रपांच्या कार्दमक शाखेचा राजा) समकालीन होता असे टॉलेमी लिहितो. त्याने इ. स. ११० ते १३८ पर्यंत राज्य केले. त्यानंतर इ. स. १३८ ते १४५ दरम्यान वासिष्ठीपुत्र सातकर्णी याने राज्यकारभार चालविला. कान्हेरीच्या एका शिलालेखात वासिष्ठीपुत्राच्या राणीने ती कार्दमकबंशीय महाक्षत्रप रुद्रदामनची सुपुत्री होती असे वर्णन केले आहे. म्हणजे बासिष्ठीपुत्र सातकर्णी हा रुद्रदामन्चा जावई होता असे स्पष्ट होते. परंतु कच्छकडून एकडून येणाऱ्या रुद्रदामन्च्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात (इ. स. १५०) त्याने दख्खनचा अधिपती सातकर्णी याचा दोनदा पराभव केला असा उल्लेख सापडतो. तथापि त्याबरोबरच 'संबंधाविदूरतया' म्हणजे फार दूरच्या नसलेल्या नात्यामुळे, त्याचा (सातकर्णीचा) संपूर्ण नाश केला नाही असाही उल्लेख आहे.
      गिरनारच्या शिलालेखात रुद्रदामन् यास 'महाक्षत्त्रप' असे संबोधिले आहे. तो उदार मनाचा होता. न्याय्य जकात व खंडणी बसुलीमुळे द्रव्यसंचय, सोने, चांदी, हिरे, मौल्यवान रत्ने आदि वस्तूंच्या संग्रहाने त्याचा खजिना नेहमीच भरलेला असे अशीही माहिती त्या लेखात मिळते. रुद्रदामन् महाक्षत्रपाच्या कन्येशी सातवाहन राजाचा विवाह होतो याचे थोडे आश्चर्य वाटते, कारण आर्य धर्म, यज्ञ, चातुर्वर्ण्य या बाबतचा अभिमान व ब्रह्मणांना दान यांची सातवाहन नेहमीच फुशारकी मारीत असत.
        प्राचीन रायगडचा शेवटचा प्रभावी सातवाहन राजा म्हणजे यज्ञश्री होय. बायुपुराणातील माहितीप्रमाणे त्याने २९ वर्षे (इ. स. १५२-१८१) राज्य केले. अनेक ठिकाणी सापडलेल्या त्याच्या शिलालेखांवरून व नाण्यांवरून त्याच्या विस्तीर्ण साम्राज्याची कल्पना येते. त्याचे शिलालेख नासिक, कान्हेरी व चिन्न येथे आणि नाणी गुजरात, सौराष्ट्र, उत्तर कोकण, अकोला, चंद्रपूर आणि कृष्णा-गोदावरी प्रदेशात सापडली आहेत. यज्ञश्रीच्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षातील नासिक शिलालेख आणि कान्हेरीच्या दोन लेखांपैकी एक शिलालेख आणि कृष्णा जिल्ह्यातील चिन्न येथील एक शिलालेख त्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षातील आहेत. नासिकच्या शिलालेखावरून अपरान्त प्रदेश यज्ञश्रीच्या ताब्यात होता. त्यापूर्वी तो प्रदेश गिरनारच्या वास्तुलेखात उल्लेखिल्याप्रमाणे रुद्रदामन्च्या ताब्यात होता. साहजिकच यज्ञश्रीचे साम्राज्य अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. यामुळे सागरी व्यापारात मोठी बाढ झाली होती. दोन शिडांचे जहाज असे चिन्ह असणारी यज्ञश्रीची अनेक नाणी देखील याच काळातील असावीत. यावरून व्यापारी जहाजांचा व लढाऊ गलवतांचा उपयोग सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणात केला जात होता हे स्पष्ट होते.
      यज्ञश्रीनंतर सातवाहनांच्या आपसातील मतभेदांमुळे किंवा स्वार्थामुळे छोट्या छोट्या प्रदेशांवर सत्ता गाजविणाऱ्या त्यांच्या अनेक शाखा तयार झाल्या व शेवटी सातबाहनांचे साम्राज्य इ. स. २२५ च्या आसपास संपुष्टात आले. (काही इतिहासकारांच्या मते हा काळ इ. स. २३० होता) पुराण ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञश्रीनंतर विजय सातकर्णी, चंद्रश्री सातकर्णी व पुलुमाबी हे एकामागून एक गोदाबरी प्रदेशात सत्ताधीण झाले. अकोला जिल्ह्यात सापडलेल्या कुंभ सातकर्णी, कृष्ण सातकर्णी व शक सातकर्णी यांच्या नाण्यांवरून हे तेथे राज्य करीत होते हे सिध्द होते. यांचा उल्लेख मात्र पुराण ग्रंथांत सापडत नाही." 
राजपुरी खाडीवरील मांदाड (टॉलेमीचे 'मंदागार' व वेरिप्लसचे 'मंदागोर') बंदराजवळील कुडा लेण्यांतील शिलालेखांत सातवाहनांचे प्रतिनिधी 'सामंत', 'महाभोज' आणि 'महारथी' यांचे उल्लेख आहेत. यावरून सातवाहनांची उत्तर कोकणची सत्ता विलय पावत होती है स्पष्ट होते. मांदाड गाव स्थानिक राजाचे प्रशासकीय केंद्र होते असे दिसते. महाड जवळील पाले लेण्यांत देखील सातवाहनांच्या काणभोज वंशीय मांडलिकाचा उल्लेख सापडतो."
      सातवाहनांचा काल मानवी प्रयत्नाने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या अपूर्व प्रगतीचे उत्तम उदाहरण होय. शेती उत्पादन, बौद्ध लेणी, बिबिध कारागिरांचे, व्यापाऱ्यांचे व धंदेवाईकांचे संघ, शहरांना तटबंदी व परदेशी व्यापार यांची झपाट्याने वाढ झाली. रोमन साम्राज्याशी होणाऱ्या व्यापारामुळे हस्तिदन्त, लाकूड, कातडी, औषधी वनस्पती, सुगंधी द्रव्ये, मलमली कापड व मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होऊ लागली, तर मद्य, चांदी, संगीत वाद्ये, काच आणि राजदरवारी गाणारी मुले-मुली यांची आयात होऊ लागली.  

 चौल :-

         अष्टागार हा असाच संपन्न, सुंदर आणि वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जपून ठेवलेला; पुण्या-मुंबईपासून जवळ असलेला प्रदेश. अष्टागार हा महाराष्ट्रातील कोकणच्या भागात असलेला प्रदेश. या प्रदेशाला मोठा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास लाभल्याने महाराष्ट्र, कोकण आणि अष्टागाराला लाभलेले अनेक संदर्भ तपासून पाहावे लागतील.
       बौधायन स्मृतीत, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातात, महाभारतात, रामायणात, पतंजलीच्या महाभाष्यात आणि असंख्य शिलालेखात महाराष्ट्राचे 'दंडकारण्य' किंवा 'दक्षिणपथ' हे प्राचीन नाव सापडते.
        भरताने आपल्या नाट्यशास्त्रात दक्षिणपथाच्या सीमा सांगितल्या आहेतः
                             महेंद्रो मलयः सह्यो मेकल. पलपिंजरः। एतेषु ये श्रिता देशाः स ज्ञेयो दक्षिणापथः।।
           स्थूलमानाने विंध्यपर्वतापासून किंवा त्यात उगम पावलेल्या नर्मदेपासून तो थेट कन्याकुमारीपर्यंत जो उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम अफाट पसरलेला प्रदेश म्हणजे दक्षिणपथ. चालुक्य राजा पुलकेशीच्या इ.स. ६३४ च्या बदामी येथील ऐहोळे प्रशस्तीत पुलकेशीच्या दिग्विजयाचे वर्णन येते त्यात महाराष्ट्राचा तसेच महाराष्ट्राच्या तीन भागांचा पहिल्यांदा स्पष्ट, उल्लेख येतो तो असाः

विधिवदुपचितामिश्शक्तिभिश्शक्रकल्पः ।
तिसृभिरपिगुणौधेः स्वैश्वमाहाकुलाद्यैः ।।
अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणाम्।
नवनवतिसहस्त्रग्रामभाजां त्रयाणाम्।।

       म्हणजेच, ज्याने तिन्ही शक्ती विधियुक्त रीतीने वाढविल्या आहेत आणि त्यामुळे जो इंद्रतुल्य दिसत आहे, त्याच्या उच्च घराण्यातील जन्मामुळे त्याने नव्याणणव हजार खेडी असलेल्या तिन्ही महाराष्ट्रकांचे अधिपत्य मिळविले. 'महाराष्ट्रक' म्हणजे अनेक राष्ट्र देश किंवा विभाग ज्यात सामावलेत असा भाग. विदर्भ, अपरांत, अश्मक, मूलक, सेऊण व कुंतल इत्यादी. या महाराष्ट्राचा महत्वाचा भाग म्हणजे अपरांत ! 'परा' म्हणजे पूर्व आणि 'अपरा' म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेचा अंत जिथे होतो; तो भाग किंवा प्रदेश अपरांताचा होय. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेशाला प्राचीन काळी 'अपरांत' म्हंटले जाई. महाभारतातील भीष्मपर्वात तसेच कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अपरांताचा उल्लेख आलेला आहे. अपरांतात अपरिमित पाऊस पडतो, असा कौटिल्याने उल्लेख केला आहे.
           बौद्ध ग्रंथात त्याचप्रमाणे असंख्य शिलालेखात अपरांताचे विपुल उल्लेख येतात. अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारतात तसेच भारताबाहेर अनेक धर्मप्रचारक पाठविले. महावंशात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात महाधर्मरक्षित, अपरांताचे योन धर्मरक्षित व वनवासी प्रांतात रक्षित थेर हे धर्मप्रचारक पाठविले. मोगलीपुत तिस्स याने अपरांतात धर्मप्रसाराचे कार्य स्वतंत्रपणे केल्याचे थूपवंशात सांगितले आहे. सामत्तपासादिकेत अपरांतात सदतीस हजार लोकांना बौद्ध धर्माची दिक्षा देण्यात आल्याचे उल्लेख आहेत.
      'कोकण' हे अपरांताचे प्राकृत भाव. सातव्या शतकातील प्रपंचहदय ग्रंथात सात कोकणे सांगितलेली आहेत. कूपक, केरळ, मूषक, आलूक, पशु, कोकण आणि परकोकण अशी ही सात कोकणे. या ग्रंथात सांगितलेले 'परकोकण, पलीकडचे कोकण म्हणजेच अष्टगार, शूर्पारक व लाट हा भाग.
   राष्ट्रकूट, शिलाहारांच्या राजवटीत लाट प्रदेशाला 'वरालाट' आणि अष्टागार व शूर्पारक मिळून होणाऱ्या प्रदेशाला 'कपर्दीद्वीप' ही संज्ञा असून या भागाची राजधानी 'स्थानक' म्हणजेच 'ठाणे' येथे होती. ढोबळमानाने दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशाला शूर्पारक आणि शूर्पारकाच्या दक्षिणेकडील कुंडलिकेपर्यंतच्या प्रदेशाला अष्टागार ही नावे असून शूर्पारक हे प्राचीन तर अष्टागार हे अर्वाचीन नाव आहे. जेथे नारळी-पोफळीची दाट झाडे उगवतात किंवा मीठ पिकते अशा भागाला 'आगार' म्हंटले जाते.
        अष्टागर हा पश्चिम किनारपट्टीवरील लहानसा चिंचोळा भाग. पश्चिमेस समुद्र, पुर्वेस सह्याद्री, दक्षिणेस कुंडलिका खाडी आणि उत्तरेस धरमतरची खाडी या अष्टागाराच्या भौगोलिक सीमा. हा भाग सध्याच्या रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यात मोडतो. जुनी आठ महत्वाची आगारे मिळून सध्याचा 'अलिबाग' तालुका अस्तित्वात आला असे दिसते. आजसुध्दा अलिबागच्या प्रदेशाला अष्टागार असे बोलले जाते. अष्टागार म्हणजे एखादा विशेष भाग अशी कल्पना किमान यादवांच्या कालखंडाच्या आधीपासूनच असावी. प्रामुख्याने ती शिलाहारांच्या काळात उदयाला येऊन यादवांच्या साम्राज्यात प्रशासकीय व महसुलीच्या कामात वापरली जात होती म्हणूनच नागावच्या लेखात या अष्टागारातील अधिकारी असलेल्या कुसनाकाचा उल्लेख 'आठागार आधिकारिआ' असा केला आहे. अष्टागारातील आठ मोठी, महत्वाची आगारे म्हणून पुढील आठ गावे सांगता येतील. चोल, रेवदंडा, नागाव, अक्षी,वरसोली,  थळ, किहीम आणी आवास
      यापैकी चौल हे गाव किंवा आगार सर्वात प्रसिद्ध आहे. चौल हे प्राचीन व्यापारी बंदर होते त्याचा उल्लेख आपल्याला प्राचीन काळातील शिलालेख, ताम्रपट त्याचप्रमाणे परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनात सापडतो. हे पश्चिम किनारपट्टीवरील एक वैभवशाली बंदर असल्याची नोंद सापडते.

  ​महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील कुंडलिका नदीच्या मुखाशी वसलेले 'चौल' (आजचे चेऊल) हे प्राचीन भारतातील एक अत्यंत वैभवशाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्यापारी बंदर व सांस्कृतिक केंद्र होते. इ.स.पूर्व काळात या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व होते.  शूर्पारक हे ज्याप्रमाणे प्राचीन, पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे तसेच चौल हे तितकेच प्राचीन ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. पौराणिक कथा, आख्यायिका, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचबरोबर असंख्य मंदिरं आणि पुष्करणी यांसाठी चौल प्रसिद्ध आहे. जुन्या नोंदीत याचे तपशीलवार वर्णन आपल्याला वाचायला मिळते.
     पुराणांची परंपरा आपल्याला चौलचे पौराणिक महत्त्व सांगतानाच 'चंपावती' नावामागे दडलेल्या काही कथा-आख्यायिका सांगते. पौराणिक काळात 'चंपा' नावाच्या राजाचे वैभवशाली राज्य या प्रदेशात होते; म्हणूनच या भागाला चंपावती नाव पडले. च्यवनऋषींचा आश्रम व तपोभूमी या ठिकाणी होती असे ही मानले जाते. चंपावती देवीच्या मंदिरावरून या भागाचे नाव 'चंपावती' पडले. चाफ्याची झाडे या प्रदेशात भरपूर असून ज्यावेळी इथून मोठा व्यापार परदेशाशी होई त्यावेळी इथल्या चाफ्याच्या फुलांची किंमत एक सुपलीभर पार्डिओस इतके होते. अशी सोन्याचे मोठे उत्पन्न मिळवून देणारी, चाफ्याच्या फुलांची नगरी म्हणून 'चंपावती' यासारख्या अनेक कथा ह्या चंपावती नावामागे दडल्या आहेत.
        चौलच्या जोडीनेच रेवदंड्याचे नाव घ्यावे लागेल; कारण ही दोन गावे इतकी जवळ आहेत की, रेवदंड्याला 'खालचे चौल' असेही म्हणतात. चौलच्या सोळा पाखड्यांपैकी दोड, दाखवाड व मुरड या तीन पाखड्यां मिळून पोर्तुगीज चौल अस्तित्वात आले. परंपरेने रेवदंड्याला 'रेवतीक्षेत्र' असे संबोधले आहे. रेवती हे बलरामच्या पत्नीवरून हे नाव आले आहे. कृष्णाने बलरामाच्या पत्नीला हा भाग आंदण म्हणून दिलेला होता त्यावरून रेवतीक्षेत्र हे नाव पडले असे मानले जाते. ​महाभारत आणि पुराणे: महाभारतात चौलचा उल्लेख 'चंपावती' असा येतो. स्कंद पुराणातील 'कुमारिका खंडात' आणि 'सह्याद्री खंडात' या परिसराचा उल्लेख 'रेवती क्षेत्र' किंवा 'चेमुल्य' असा करण्यात आला आहे. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो.  मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो.
       ​चौलचा उल्लेख प्राचीन भारतीय, ग्रीक, रोमन आणि बौद्ध साहित्यात प्रामुख्याने आढळतो. इ.स.पूर्व काळातील संदर्भ खालील ग्रंथांमध्ये विस्तृतपणे मिळतात:पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी, असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले. इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
      मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे अवशेष आढळतात. मुंबईजवळील कान्हेरी बौद्धलेणीसमूहातील इ. स. १३० या काळातील शिलालेखात ‘चेमुल्ला’ येथील सोनाराने कान्हेरी येथे बौद्धभिक्षूंकरिता विहार व पाणपोईसाठी देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात. इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. प्रवासवर्णन लिहिणाऱ्या टॉलेमीच्या दस्तावेजात या सातवाहनकालीन बंदराचा उल्लेख येतो आणि आज विस्मरणात गेलेले चौल त्या काळी किती महत्वाचे व्यापारी बंदर होते, याची प्रचिती येते.  पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी  या ग्रीक प्रवासवर्णनात प्राचीन कलियानच्या (सध्याचे मुंबईजवळील कल्याण) दक्षिणेस चौल येथे स्थानिक बाजारपेठ असल्याचे नमूद केले आहे. तसेच अरबी व युरोपियन प्रवाशांनीही चौलचा उल्लेख भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दोन मोठ्या बंदरांपैकी एक असा केला आहे.
या परिसरात कापड विणणे, जहाजे बांधणी (Shipbuilding), हस्तिदंतावरील कोरीव काम, आणि मौल्यवान रत्नांना पैलू पाडणे हे येथील प्रमुख स्थानिक उद्योग होते.
   कुंडलिका नदीच्या सुपीक खोऱ्यामुळे भात (धान्य) आणि नारळ, सुपारीच्या बागा (पोफळीच्या बागा) इ.स.पूर्व काळातही मोठ्या प्रमाणावर होत्या. मासेमारी हा किनारपट्टीवरील लोकांचा मुख्य व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन होते.
 ​दोन हजार वर्षांपूर्वीचे चौलचे लोकजीवन अत्यंत समृद्ध, सुसंस्कृत आणि बहुसांस्कृतिक होते.
     उत्खननात सापडलेल्या मृण्मय मूर्ती आणि त्याच काळातील कार्ले-भाजे किंवा कान्हेरी लेण्यांमधील शिल्पांवरून तत्कालीन पेहरावाचा अंदाज येतो. पुरुष सहसा कंबरेला 'धोतर' (अधोवस्त्र) नेसत असत आणि डोक्याला पागोटे बांधीत. स्त्रिया कंबरेभोवती वस्त्र गुंडाळत आणि अंगावर शेला घेत असत. स्त्री आणि पुरुष दोघेही मोठ्या प्रमाणावर दागिने (मणी, बांगड्या, कानातली कुंडले) घालत असत, जे प्रामुख्याने शंख, हस्तिदंत, तांबे आणि सोन्याचे असत.
       ​चौल हे विविध धर्म आणि संस्कृतींचे मीलन केंद्र होते. बंदरामुळे येथे परदेशी नागरिक, बौद्ध भिक्खू, जैन मुनी आणि वैदिक संस्कृतीचे लोक एकत्र राहत. त्यामुळे येथील समाजात प्रचंड सहिष्णुता आणि खुला दृष्टिकोन होता.
​       पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाच्या काळात यादव सैन्याची काही काळ या भागात हालचाल होती, ज्यामुळे याला 'रेवती क्षेत्र' (बलराम यांच्या पत्नी रेवती यांच्यावरून) असेही नाव पडले. दत्तात्रेयांचे वास्तव्य या भूमीत होते, अशी श्रद्धा असल्यामुळे चौल परिसराला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले गेले आहे. (जरी आजचे मंदिर नंतरच्या काळातील असले, तरी या भूमीचा धार्मिक इतिहास प्राचीन आहे).
     इ.स.पूर्व काळात चौल हे बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते. चौलच्या डोंगरात असलेल्या 'हिंगुळजा लेण्या' आणि जवळील 'कुडा लेण्या' (इ.स.पूर्व १ ले ते २ रे शतक) हे दर्शवतात की, येथील व्यापारी बौद्ध धर्माचे मोठे आश्रयदाते होते.
      ​इ.स.पूर्व २००० वर्षांपूर्वी म्हणजेच इ.स.पूर्व काळात आजच्या सारखी भव्य पाषाण मंदिरे (शिखर असलेली) बांधण्याची पद्धत भारतात विकसित झाली नव्हती. त्या काळात धार्मिक वास्तू प्रामुख्याने दोन प्रकारच्या होत्या:
​१. काष्ठ व विटांची रचना: देवळे प्रामुख्याने लाकूड आणि कच्च्या-पक्क्या विटांची असत, ज्यांवर कौलारू किंवा गवताचे छप्पर असे. कालौघात ही लाकडी बांधकामे नष्ट झाली, मात्र उत्खननात सापडलेल्या विटांचे अवशेष या रचनेची साक्ष देतात.
२. शैलशिल्पे (Rock-cut Architecture): पाषाण शिल्पांचा खरा इतिहास डोंगरांमध्ये कोरलेल्या लेण्यांच्या रूपाने पाहायला मिळतो. चौलजवळील डोंगरातील बौद्ध चैत्य आणि विहार हे इ.स.पूर्व काळातील पाषाण कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. या गुंफांमध्ये कोरलेले खांब, साधे स्तूप आणि दगडी बाके (Benches) ही त्या काळातील वास्तुरचनेची वैशिष्ट्ये आहेत. या मूर्तींमध्ये कमालीची साधेपणा आणि प्रमाणबद्धता आढळते, ज्यावर नंतरच्या काळातील गांधार किंवा अमरावती शैलीचा प्रभाव नव्हता.
       ​थोडक्यात सांगायचे तर, इसवी सन पूर्व काळात चौल हे केवळ एक साधे गाव नसून, ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील जागतिक व्यापाराचे एक अथांग दालन होते. येथील भूगर्भातील विटा, रोमन भांडी आणि डोंगरमाथ्यावरील कोरीव लेण्या आजही चौलच्या दोन ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

      रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. 
     डेक्कन कॉलेज, पुणे या अभिमत विद्यापीठातर्फे विश्वास गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौल येथे २००२–२००६ या कालावधीत उत्खनन केले गेले. हे उत्खनन म्हणजे १९९८ पासून सुरू असलेल्या ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन बंदरे व मानवी वस्त्यांचा अभ्यास’ याचा एक भाग होय. येथे प्राचीन वसाहतीचे व प्राचीन बंदराचे अवशेष खाडीलगत, तसेच नदीकाठी असलेल्या दोन किमी.च्या परिसरात आढळले. याच भागात चार विविध ठिकाणी मर्यादित उत्खनन केले गेले. या उत्खननातील पुरावशेषांचे समालोचन पुढीलप्रमाणे केले आहे : उत्खननात एकूण चार सांस्कृतिक क्रम उजेडात आले. यांतील पहिला कालखंड मौर्यकाळातील; दुसरा सातवाहन काळ; तिसरा शिलाहार आणि चौथा इस्लाम काळ असल्याचे दिसून आले. चौल हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वपूर्ण बंदर होते व ते सु. २००० वर्षे, सर्वसाधारणपणे इ. स. पू. ३०० ते इ. स. १७०० या कालावधीत सक्रिय होते, असे अनुमान केले गेले. असे असले तरी सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते, हे या काळातील उपलब्ध वैशिष्ट्यपूर्ण अवशेषांवरून दिसून येते. यांमध्ये घरांचे-जोत्यांचे अवशेष, घरांच्या छप्पर आच्छादनासाठीची कौले, सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता खापरी विहीर, खूर असलेला दगडी पाटा, रोमन मद्यकुंभ, क्षत्रप राजवंशाचे शिशाचे नाणे, काळी आणि तांबडी भांडी इत्यादींचा समावेश होता.





       चौल येथील उत्खननात तसेच पश्चिम भारताच्या संजान, केळशी येथील उत्खननांत प्रामुख्याने आढळलेले वैशिष्ट्यपूर्ण मणी व मृद्भांड्यांचे साधर्म्य पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील – किल्वा, मंडा, शंगा व क्वाना इत्यादी प्राचीन बंदरांत उपलब्ध झालेल्या – अवशेषांशी असल्याचे दिसून आले. यावरून इ. स. ८ वे ते १८ वे शतक या काळात भारताचा पूर्व आफ्रिका, तसेच प्राचीन मेसोपोटेमिया, पर्शिया, आशियातील चीन, जपान, कोरिया या देशांशी समुद्रमार्गे असलेला व्यापार व त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची ये-जा, तसेच सांस्कृतिक संबंध अधोरेखित होतात. याव्यतिरिक्त येथील हमामखान्याजवळ झालेल्या उत्खननात ४.२२ मी. सांस्कृतिक थर असलेल्या उत्खनित खड्ड्यात मध्ययुगातील काचमण्यांचे उत्पादनकेंद्र असल्याचा पुरावा मिळाला व तेथून उत्पादनप्रक्रियेच्या विविध अवस्थांत असलेले ५१७ मणी मिळाले. हे मणी इण्डो-पॅसिफिक या प्रकारात मोडणारे असून यांत विविध रंगच्छटा आढळल्या. चौल येथील समन्वेषणात तसेच उत्खननातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन व्यापारी बंदराला जी गुण-वैशिष्ट्यांची जोड लागते ती सर्व चौल येथील बंदरात होती, असे निश्चितपणे सांगता आले. त्याचप्रमाणे येथील वसाहतीचे अवशेष कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर सुमारे दोन किमी. अंतरापर्यंत विखुरलेले दिसून आले; तथापि वसाहतीचा निश्चित विस्तार विविध कारणांस्तव कळू शकला नाही. या बंदराने सुमारे दोन हजार वर्षे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, असे निष्कर्ष उत्खनकांनी काढले आहेत.
     चौल बंदराचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता बहुप्रमाणित अभ्यासाची गरज उत्खनकांनी अधोरेखित केली आहे. यात पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील सर्व प्राचीन व फारशा परिचित नसलेल्या बौद्धधर्मीय शिलागृहांचे तसेच प्राचीन अभिलेखात उल्लेखिलेल्या स्थळांचे समन्वेषण, प्राचीन बंदरांची उत्खनने, उत्खननांतील पुराव्यांचे विश्लेषण व प्राचीन व्यापारी मार्गांचा अभ्यास या सर्व बाबींचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
     ज्ञात इतिहासावरून इ. स. १३० पासून १७८६ पर्यंत चौल हे सतत ऐतिहासिक घटनांचे केंद्र व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. चौलचे प्राचीनत्व इसवी सनपूर्व १२०० पर्यंत नेता येते. त्याकाळी या स्थानास चंपावती व रेवतीक्षेत म्हणत असावेत. खरे पाहता निसर्गरम्यता व ऐतिहासिक घटना या दोहोंच्या वावतीत जुळ्या भावंडाप्रमाणे चौल व रेवदंडा गावांची जवळीक आहे. प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा प्रभाव एकाच वेळी या दोन्ही ठिकाणांवर होत होता. म्हणूनच या दोन्ही ठिकाणांच्या ऐतिहासिक घटनांची माहिती पुढे एकत्रित दिली असून तेथील सध्याच्या महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची व अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक अवशेषांची माहिती स्वतंत्र दिली आहे. येथील बरेच ऐतिहासिक अवशेष नष्ट होण्याची कारणे नमूद करणे आवश्यक आहे. जुन्या काळच्या इमारती लाकडी असल्याने कालौघात त्यो नष्ट झाल्या. हिंदूंच्या जुन्या दगडी इमारती चौलवरील मुसलमानी अमदानीत व रेवदंड्यातील पोर्तुगीज काळी नष्ट झाल्या. मुसलमान व पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी नंतर बांधलेल्या इमारतींना चुना जास्त लावल्याने जुन्या अवशेषांचे भाग ओळखता येत नाहीत. चौल व्यापारी केंद्र असल्याने त्यास राजधानीऐवजी बाजार व यात्रेप्रमाणेच महत्त्व होते. अनेकदा झालेल्या लढाया, लुटालूट व जाळपोळीमुळेही जुन्या इमारती नष्ट झाल्या. सध्या चौल आणि रेवदंडा येथे नारळ पोफळीच्या बागा झाल्यामुळे  ऐतिहासिक काळातील उरल्यासुरल्या वास्तूंचे अवशेष नष्ट झाले. तसेच पुरावशेषांचे दगड भिती बांधण्यासाठी लोकांनी नेल्याने बहुसंख्य पुरावशेष नष्ट झालेत. काही दगड मूळच्या ठिकाणांपासून इतस्ततः विखुरले आहेत. ऐतिहासिक काळात सध्याच्या चौलचा अप्पर चेऊल, नॉर्थ चेऊल, सिटी ऑफ दि मूर्ख व मुसलमान चेऊल व रेवदंडयाचा लोबर चेऊल, साउथ चेऊल, पोर्तुगीज चेऊल असे उल्लेख आढळतात.

     चंपावती व रेवतीक्षेत्र या नावांनी गुजरातमध्ये श्रीकृष्ण राज्य करीत होता त्या पौराणिक काळाशी स्थानिक लोक चौलचा संबंध जोडतात. चंपावती हे नाव चंपा नावाच्या झाडापासून, मासे पकडण्यासाठी उपयोगात असलेल्या चंपा नावाच्या जाळयापासून किंवा चंपा नावाच्या राजावरून पडले असावे असे द कुन्हा या पोर्तुगीज लेखकाने लिहिले आहे. तेथे चंपावती देवीचे देऊळही दाखवतात. तसेच रेवतीक्षेत्न हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम याच्या रेवती या पत्नीच्या नावावरून पडले असावे असे म्हणतात. पुरातन काळी या शहरात सोळा लक्ष इमारती, ३६० मंदिरे व. ३६० तळी होती व ते १६ पाखाड्यांमध्ये विभागले होते. यापैकी दोड, दखवाड व मुरड या पाखाड्या मिळून पोर्तुगीज चेऊल झाले असे द कुन्हा म्हणतो.

सातवाहनकालीन चौल: प्राचीन महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे प्रवेशद्वार

महाराष्ट्राच्या प्रदीर्घ आणि वैभवशाली इतिहासातील एक अत्यंत सुवर्णपान म्हणजे सातवाहन साम्राज्याचा काळ. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ कालखंडात महाराष्ट्राने केवळ राजकीय आणि सांस्कृतिकच नव्हे, तर आर्थिक क्षेत्रातही मोठी भरारी घेतली होती. या अभूतपूर्व आर्थिक भरभराटीचे एक प्रमुख केंद्र म्हणजे कोकण किनारपट्टीवरील 'चौल' हे प्राचीन बंदर आणि गाव. आजच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर कुंडलिका नदीच्या मुखाशी वसलेले चौल हे आज जरी एक शांत आणि छोटेसे गाव वाटत असले, तरी दोन हजार वर्षांपूर्वी, म्हणजेच सातवाहन काळात ते एक जागतिक दर्जाचे आणि गजबजलेले आंतरराष्ट्रीय बंदर होते. सातवाहन राजांनी दख्खनच्या पठारावर जी स्थिर आणि प्रबळ सत्ता निर्माण केली होती, तिचा थेट फायदा कोकणातील बंदरांच्या विकासाला झाला, ज्यामध्ये चौल हे एक अत्यंत अग्रगणी आणि महत्त्वाचे नाव होते.

चौल या गावाला प्राचीन काळी अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे. 'चेंबूल', 'चेमुल', 'चंपावती', आणि 'चिमुल' अशी याची काही जुनी नावे तत्कालीन साहित्यात आणि ब्राह्मी शिलालेखांमध्ये आढळतात. या बंदराची कीर्ती केवळ भारतभरच नव्हे, तर सातासमुद्रापार युरोप आणि आफ्रिका खंडांपर्यंत पसरलेली होती. ग्रीक आणि रोमन भूगोलातज्ज्ञांच्या आणि प्रवाशांच्या नोंदींमध्ये चौलचा वारंवार अत्यंत सन्मानाने उल्लेख आलेला आहे. 'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी' या पहिल्या शतकातील एका अज्ञात ग्रीक खलाशाने लिहिलेल्या प्राचीन ग्रंथात या बंदराचा उल्लेख 'सिम्युल्ला' (Symulla) असा करण्यात आला आहे. त्या ग्रंथानुसार हे बंदर तत्कालीन जागतिक व्यापारातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. जगप्रसिद्ध ग्रीक खगोलशास्त्रज्ञ आणि भूगोलतज्ज्ञ टॉलेमी याने देखील आपल्या दुसऱ्या शतकातील ग्रंथात चौलचे वर्णन एक अत्यंत मोठे आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून केले आहे. यावरून सातवाहन काळात चौलने जागतिक व्यापार नकाशावर मिळवलेले अढळ स्थान स्पष्ट होते.
सातवाहन काळातील चौल हे केवळ एक गाव नव्हते, तर ते एक अतिशय गजबजलेले आणि श्रीमंत महानगर असावे. येथील बंदरात दररोज अनेक मोठी जहाजे नांगरलेली असायची. रोमन साम्राज्य, इजिप्त, ग्रीस आणि आखाती देशांमधील व्यापारी आपली भव्य जहाजे घेऊन या बंदरात मोठ्या संख्येने येत असत. भारताच्या अंतर्गत भागातून, विशेषतः दख्खनच्या पठारावरून मोठ्या प्रमाणावर माल बैलगाड्यांच्या आणि गाढवांच्या तांड्यांवर लादून सह्याद्रीचे कठीण घाट ओलांडून चौल बंदरात आणला जात असे. येथून प्रामुख्याने उच्च प्रतीचे सुती कापड, मलमल, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची मौल्यवान लाकडे, हस्तिदंताच्या कलाकुसरीच्या वस्तू, आणि नीलमणी व गोमेद यांसारखी मौल्यवान रत्ने परदेशात निर्यात केली जात असत. याच्या मोबदल्यात परदेशी व्यापारी आपल्यासोबत रोमन सोन्या-चांदीची नाणी, उत्तम प्रतीचे मद्य (वाईन), विविध धातू, काचेच्या वस्तू आणि सुगंधी द्रव्ये घेऊन येत. या अफाट व्यापारामुळे चौलचे व्यापारी आणि स्थानिक नागरिक अत्यंत श्रीमंत आणि वैभवसंपन्न झाले होते. सातवाहन राजांच्या तिजोरीत जकात आणि करांच्या माध्यमातून येणारा मोठा महसूल याच बंदरातून येत असे.
चौलच्या या विलक्षण भरभराटीमागे त्याची नैसर्गिक भौगोलिक रचना आणि सातवाहन राजांचे दूरदर्शी धोरण हे प्रमुख कारण होते. कुंडलिका नदीच्या मुखाशी असल्याने येथे जहाजांना नांगरण्यासाठी नैसर्गिक आणि वादळांपासून सुरक्षित अशी खाडी उपलब्ध होती. या बंदराचा थेट संबंध सातवाहनांची राजधानी असलेल्या 'प्रतिष्ठान' (आजचे पैठण), आणि 'जुन्नर', 'तेर', 'नेवासे' यांसारख्या मोठ्या व्यापारी व प्रशासकीय शहरांशी होता. दख्खनच्या पठारावरील हा कच्चा आणि पक्का माल नाणेघाट, बोरघाट, आणि ताम्हिणीसारख्या प्राचीन घाटवाटांमधून खाली कोकणात आणला जायचा आणि तिथून तो खुशकीच्या मार्गाने किंवा खाडीच्या मार्गाने चौलला पोहोचायचा. सातवाहन राजांनी या व्यापारी मार्गांवर प्रवाशांच्या आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भक्कम बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे व्यापार करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर झाले होते. सातवाहनांच्या काही नाण्यांवर दोन शिडांच्या जहाजांचे चित्र आढळते, यावरून चौल सारख्या बंदरांवरून चालणाऱ्या सागरी व्यापाराचे महत्त्व त्यांनी किती जाणले होते हे दिसून येते.




कोणत्याही भागात जेव्हा व्यापारातून मोठी संपत्ती निर्माण होते, तेव्हा त्याचा थेट सकारात्मक प्रभाव तिथल्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनावर पडतो. सातवाहनकालीन चौल याला अपवाद नव्हते. येथील श्रीमंत व्यापाऱ्यांनी, ज्यांना तत्कालीन भाषेत 'सार्थवाह' किंवा 'श्रेष्ठी' म्हटले जायचे, त्यांनी तत्कालीन प्रचलित असलेल्या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठी सढळ हाताने दान दिले. कान्हेरी, कुडा, महाड आणि कर्ले यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये जे प्राचीन ब्राह्मी शिलालेख आढळतात, त्यामध्ये चौल (चेमुल) येथील व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानांचे स्पष्ट उल्लेख आहेत. मुंबईजवळील कान्हेरी लेण्यांमधील एका शिलालेखात 'चेमुल' येथील एका सुवर्णकाराने (सोनाराने) आणि त्याच्या कुटुंबाने लेण्यासाठी मोठे दान दिल्याची नोंद आहे. यावरून तत्कालीन चौल गावातील लोकांची आर्थिक सुबत्ता, तेथील प्रगत कारागिरी आणि त्यांची सामाजिक व धार्मिक बांधिलकी दिसून येते. या व्यापाऱ्यांनी लेण्यांमध्ये पाण्याची टाकी खोदणे, विश्रामगृहे बांधणे आणि प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था करणे यांसारखी अनेक समाजोपयोगी कामे स्वखर्चाने केली होती.
सातवाहन काळातील चौल गावातील सामाजिक जीवनही अत्यंत प्रगत आणि बहुसांस्कृतिक असावे. जगभरातील व्यापारी येथे येत असल्याने वेगवेगळ्या भाषा, संस्कृती आणि चालीरीती यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळत असावा. रोमन आणि ग्रीक व्यापाऱ्यांच्या दीर्घकालीन वास्तव्यामुळे त्यांच्या जीवनशैलीचा आणि कलाकुसरीचा काहीसा प्रभाव स्थानिक समाजावरही पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथले बाजारपेठांचे रस्ते नेहमीच गजबजलेले असायचे, जिथे विविध देशांतील नाण्यांचा आणि वस्तूंचा मुक्त विनिमय चालत असे. जहाज बांधणीचा आणि डागडुजीचा एक मोठा उद्योग चौलमध्ये त्याकाळी विकसित झाला होता, ज्यामध्ये स्थानिक कोळी आणि आगरी समाजातील कसलेल्या दर्यावर्दींची मोठी भूमिका होती.
काळाच्या ओघात सातवाहन साम्राज्याचा अस्त झाला आणि नंतरच्या काळात शिलाहार, यादव, बहमनी आणि शेवटी पोर्तुगीज अशा अनेक राजवटी चौलने पाहिल्या. प्रत्येक राजवटीत चौलचे व्यापारी महत्त्व टिकून राहिले. परंतु चौलच्या या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय ओळखीचा आणि वैभवशाली सागरी व्यापारी परंपरेचा खरा आणि भक्कम पाया सातवाहन काळातच रचला गेला होता. आज चौलमध्ये फेरफटका मारताना जरी आपल्याला त्या प्राचीन बंदराच्या खाणाखुणा थेट नजरेस पडत नसल्या, तरी इतिहासकारांच्या आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या उत्खननात सापडलेली सातवाहनकालीन नाणी, परदेशी खापरी (अॅम्फोरा), आणि विटांचे अवशेष हे सर्व आपल्याला त्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या 'सिम्युल्ला'च्या सुवर्णकाळाची साक्ष देतात. प्राचीन महाराष्ट्राच्या अफाट सागरी सामर्थ्याचे आणि सातवाहनांच्या जागतिक आर्थिक दूरदृष्टीचे चौल हे एक अत्यंत अभिमानास्पद आणि कधीही न विसरता येणारे असे ऐतिहासिक स्मारक आहे.

परकीय प्रवाश्यांच्या लिखाणातील चौलचा उल्लेख :-

      अष्टागारातील चौलचा स्पष्टपणे उल्लेख हा इ.स.च्या पहिल्या शतकापासून परकिय प्रवाशांच्या नोंदीत सापडतो. परकीय प्रवाशांची वर्णने ही ऐतिहासिकदृष्टीने महत्त्वाची मानली जातात; कारण ती कोणताही भेद न ठेवता जशीच्या तशी नोंदवून ठेवलेली असतात. परकीय प्रवाशांना भारतीय धर्म आणि संस्कृतीची फारशी माहिती नसल्याने बऱ्याचदा त्यांना भारतीयांची एखादी घटना किंवा रुढी, पूजापद्धती आणि राहणीमान हे निकृष्ट दर्जाचे वाटण्याचा संभव असतो.
      प्राचीनकाळात भारताचा व्यापार हा मोठ्या प्रमाणात खुष्कीच्या मार्गान मध्य आशियातून युरोपपर्यंत होई. नंतरच्या काळात या मार्गावर मध्य आशियातील हिंस्क्लोळ्यांनी लुटालूट, रक्तपात सुरू केल्याने व्यापारात अनेक अडचणी येऊ लागल्या. हिंदुस्तानात निर्माण होणाऱ्या खाद्य व चैनीच्या वस्तूंना पश्चिमेकडील देशात मोठी मागणी होती. खुष्कीचा मार्ग बंद झाल्याने व्यापारी बाजारपेठा, सोयीस्कर मार्ग आणि राजाश्रय ही व्यापारी व राज्यकर्त्यांची गरज बनलीः या गरजेतूनच पुढे सातवाहनांच्या आश्रयाने पश्चिम किनारपट्टीवर अनेक बंदरे विकसित होऊन भरभराटीस आली. सातवाहनांच्या काळात भौगोलिकदृष्ट्या सोयीची असलेली कल्याण, सोपारा, चील ही बंदरे भरभराटीस आली. ही बंदरे घाटमार्गांनी नाशिक, तगर, जुन्नर, पैठण सारख्या बाजारपेठांना जोडली गेलेली होती.
     सोपार्याच्या उत्तरेस वैतरणा नदी आणि दक्षिणेस उल्हास या नद्यांची मुखे असल्याने, त्याचप्रमाणे चोलच्या उत्तरेस अंबा आणि दक्षिणेस कुंडलिका नद्यांची मुखे असल्याने मोठ्या जहाजांची बंदरात ये-जा करणे शक्य होते. सोमारा आणि कल्याणहून निघालेला माल नाणेघाटाने नाशिक, जुन्नर, पैठण या बाजारपेठेत जाई. चोलमधील माल वाघजाई घाटाने रोहा अष्टमी- जुन्नरपर्यंत पोहोचवला जाई. थळ घाट, बोरघाट, नाणे घाट यांसारखे मोठे घाट आणि बंदरांना जोडणारे अनेक रस्ते त्याकाळी वाहतुकीसाठी होते. रस्त्यांच्या जाळ्यांवर जागोजागी चौक्या, पहारे, पाण्याची टाकी, डोंगरी किल्ले यासारख्या सोयी असल्यामुळे हा व्यापार प्राचीन काळापासून  ते मध्ययुगापर्यंत सुरू होता.


        इ.स. ४७ मध्ये हिप्पोलसने लावलेल्या मोसमी वाऱ्यांच्या शोधामुळे पाश्चिमात्य देशांसोबत व्यापार करणे शक्य झाले. पावसाळ्ळ्यात नैऋत्य वारे सुरू झाले म्हणजे लाल समुद्रातील बंदरातून कोकणकडे जाणे शक्य होई तसेच हिवाळ्यात ईशान्य वारे सुरू झाले म्हणजे व्यापाऱ्यांना परत फिरता येत असे. नाणेघाट, जुन्नर, कान्हेरी, नाशिक, कार्ले इ. ठिकाणच्या लेण्यांतील शिलालेखांवरून आपल्याला दिड हजार वर्षांपूर्वीच्या आर्थिक समृद्धीची कल्पना येते. नंतरच्या काळात कोकणात तुर्काण झाले, पोर्तुगीजांनी केलेली लुटालूट, जाळपोळ तसेच दुष्काळ, बंदरांची बदललेली भोगोलिक स्थिती, सोयींचा आभाव यामुळे या जुन्या बंदरांचे महत्त्व कमी होऊन ती नष्ट झाली.
   सातवाहनांच्या काळात अखेरीपर्यंत दक्षिण हिंदुस्थानाचा रोम बरोबर मोठा व्यापार होता. एका नोंदीनुसार रेशमी व तलम कापड, मोती हे सोन्याच्या मोलाने विकले जातं. सातवाहनांच्या या आर्थिक समृद्धीची छाप त्यांनी घेतलेल्या बिरुदांवर आणि नाण्यांवर दिसते. गौतमीपुत्राची 'दक्षिणपथपती' व 'त्रिसमुद्रपीततोयवाहन ह्या पदव्या तसेच 'शिडाच्या जहाजाचे अंकन असलेलं सातवाहनांचं नाणं आपल्याला त्या वैभवाची साक्ष देतं.
          इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धातील व्यापाराची विश्वसनीय माहिती 'पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी' या ग्रंथातून आपल्याला मिळते. या काळातील पश्चिम किनारपट्टीवर असलेली कल्याण, शुर्पारक, चील यासारखी बंदरे आणि बाजारपेठांची माहिती या ग्रंथात आलेली असली तरी ती एका नावाड्याच्या दृष्टीने दिलेली आहे.पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी  या ग्रीक प्रवासवर्णनात प्राचीन कलियानच्या (सध्याचे मुंबईजवळील कल्याण) दक्षिणेस चौल येथे स्थानिक बाजारपेठ असल्याचे नमूद केले आहे.

 अरब प्रवासी मसूदी याने इ.स. ९१५ मध्ये सैमूरला (चौलला) भेट दिलेली त्यावेळी, तेथे शिलाहारराजा झंझ राज्य करीत होता. अरबी, युरोपियन प्रवाश्यांनी 'चौल' या शहराचे वर्णन एक श्रीमंत शहर असे केले आहे. ते या शहराला त्यांच्या बोलीप्रमाणे 'चेमूल्य', 'टीमुल्ल', 'सिमुल्ल', 'सियोर', 'चौल', 'चिमोलो', 'सैमुर', 'जयमूर', 'चेमूली' आणि 'चौल' या नावाने संबोधतात.
    चौल हे टॉलेमीने इ. स. १५० मध्ये वर्णन केलेले वसईची खाडी व पालेपट्टण किंवा महाड यामधील Symulla किवा Timulla हे भूशिर आणि बाजारपेठ असावी. या ठिकाणाहून अ‍ॅलेक्झांड्रियास गेलेल्या लोकांकडूनच पश्चिम भारताची माहिती आपणास मिळाली असे टॉलेमी नमूद करतो.  चौल हे व्यापारी बंदर असून इजिप्त, रोम तसेच अरब देशांबरोबर हा व्यापार चाले. हस्तीदंत, इंद्रनील, पाचू, मोती, तलम कापड, तांदूळ, लोणी, गुळ ह्या वस्तू निर्यात केल्या जात. सोन्याची नाणी हे विनिमयाचे साधन होते.
        याच सुमारास (सन १३०) कान्हेरी लेण्यातील दोन शिलालेखांत Chemula असा उल्लेख असून तेथे राहणाऱ्या दोघा भावांनी विहारास देणग्या दिल्याचा त्यात उल्लेख आहे. इ. स. २४७ मध्ये पेरिप्लस नामक प्रवास वर्णनात Semulla ही कल्याणच्या दक्षिणेस असलेली पहिली स्थानिक बाजारपेठ असा उल्लेख आहे. पाचव्या शतकात पुन्हा कान्हेरी लेण्यातील एका शिलालेखात चेमूल असा उल्लेख आहे. इ. स. ५२५ मध्ये एक ग्रीक व्यापारी व भिक्षुने कल्याण व मलबार या बंदरांदरम्यान व्यापारात अग्रेसर असलेले Sibor असा चौलचा उल्लेख केला आहे. तर इ. स. ६४० मध्ये चिनी प्रवासी हिएन-त्सँग याने याच संदर्भात चौलचा Tchi-Mo-Lo असा उल्लेख केला आहे. अल मसूदी (सन ९१५), मुहलहीबू (९४२), अल इस्तसिल (९५०), इब्त होकल (९७६) अल विरुनी (१०३०) आणि जल इड्रिसी (११५३) हे अरब प्रवासी चौलचा सैमूर किंवा जयमूर असा उल्लेख करतात. अरब प्रवासी मसूदी याने इ. स. ९१५ मध्ये सैमूरला भेट दिली तेव्हा तेथे कोकण शिलाहारांच्या (इ. स. ८२० ते १२६०) उत्तरेकडील शाखेचा पाचवा स्थानिक राजपुत्र झंझ राज्य करीत होता. इ. स. ९७० मध्ये सैमूर हे मोठे व सुरक्षित शहर असून तेथे आंबे, नारळ, कांदे व भाताचे पीक भरपूर होते असे प्रवाशांनी वर्णन केले आहे. तेथे हिंदूंशिवाय मुसलमानही मोठ्या संख्येने राहात होते. त्यापैकी काही स्थानिक, काही सिराफ, ओमान, बसरा व बगदादहून आले होते. बरेच जण धनिक व्यापारी होते. त्यांची भाषा लारी म्हणजे गुजराथी होती. याशिवाय ग्रिश्चन, ज्यू व पारशीही होते.

  इ. स. १०९४ मध्ये चौदावा शिलाहार राजा अनंतदेवाच्या ताम्रपटात चेमुर्लीचा शुरपारक (सोपारा) आणि श्रीस्थानक (ठाणे) या बंदरांसारखे बंदर असल्याचा उल्लेख केला आहे. बाराव्या शतकात चौल हे मेंदी व नारळाची खूप झाडे असलेले व सभोवतालच्या टेकड्यांवर सुवासिक वनस्पती असलेले चांगले बांधलेले शहर होते असा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध इटालियन प्रवासी मार्को पोलो (सन १२९२-९४) जेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून गेला, तेव्हा त्याने या भागातील बंदरांचा उल्लेख केला. त्याने लिहिले आहे की, येथील बंदरातून (चौलचा संदर्भ घेऊन) कापड, मसाले आणि चामड्याच्या वस्तूंची मोठी निर्यात होत असे.
    तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांनी चौल माहिमच्या राजाकडून जिंकून घेतले. इ. स. १३१२ मध्ये यादवांकडे असलेले हे ठिकाण व कोकणातील त्यांची इतर प्रमुख केंद्रे अलाउद्दीन खिलजीचा (१२९७-१३१५) सरदार मलिक काफूर याने शंकरदेव यादव यास ठार मारून आपल्या आधिपत्याखाली आणली. त्यानंतर अल्पावधीसाठी चौल विजयनगर राज्यात समाविष्ट होते. त्यानंतर ते बहमनींकडे गेले. इ. स. १३५७ मध्ये बहमनी राज्यातील चौल एक महत्त्वाचे शहर होते. पहिल्या अलाउद्दीन बहमनीचा (१३४७-१३५८) पुतण्या मुहम्मद या न्यायी व दयाळू राजाने येथे अनाथांकरिता शाळा काढल्या होत्या. तसेच दुष्काळ पडला तेव्हा त्वरित धान्य वाटपासाठी जी केंद्रे स्थापन केली होती त्यापैकी चौल येथे एक केंद्र होते. इ. स. १३८० मध्ये फेरिश्तान' चौलचा बहमनी राज्यातील एक मोठे शहर व मुख्य बंदर असा उल्लेख केला आहे. 
      सन १३९८ मध्येही चौल हे कोकणातील प्रमुख बंदर होते. फिरुन (१३९७-१४२२) या बहमनी राजाने जगातील विविध देशांतून खास माल आणि बुद्धिमान माणसे आणण्यासाठी चौल येथून जहाजे पाठविली होती.


     परदेशी प्रवाश्यांनी चोलच्या स्मृती आपल्या लेखनात, प्रवासवर्णनात जतन केल्या आहेत त्याचप्रमाणे चौलमध्ये ही अशाच एका मुशाफिराची, अफनासी निकीतीची स्मृती जतन करून ठेवली आहे.
     ढेर या रशियातील शहरातून व्होल्गा नदीच्या तीरावरून अनेक संकटे झेलत, मोठा जलप्रवास करत रशियन प्रवासी अफनासी निकीतीन इ.स. १४६६ च्या जुलै महिन्यात चौल येथे उतरला. रशियातून आलेला हा पहिलाच परदेशी प्रवासी होता. इतर प्रवाशी त्यांच्या प्रवासवर्णनात चौलचा व्यापार, किल्ले, आयात-निर्यातीच्या वस्तू यासारखी माहिती देतात.तो चौलचा चिवील असा उल्लेख करतो. मात्न त्याने चौलच्या व्यापाराविषयी तसेच वैभवाविषयी नमूद केले नाही. परंतु निकीतीने चौल, दक्षिण भारताच्या सामाजिकस्थितीचे वर्णन केलेले आहे. निकीतीनला भारतीय समाज आणि संस्कृतीचे आकलन नसल्याने त्याने केलेली वर्णने ही बीभत्स वाटतात. चौल - पाली - जुन्नर असा त्याने कोकणातील प्रवास केला. त्यावेळी चौल आणि कोकणात बहमनी सत्तेचा अंमल होता नंतर काही वर्षाने म्हणजेच इ.स. १४९६ मध्ये चौलचा भाग अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात आला.
     भारतात सर्वप्रथम आलेला रशियन प्रवासी म्हणून निकीतीनची नोंद असल्याने इ.स. १४६६ पासून रशियाच्या नागरिकांचा किंवा व्यापाऱ्यांचा संबंध चौल किंवा भारताशी होता असे म्हणावे लागेल. त्यासंबंधांची स्मृती टिकून राहावी तसेच भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे प्रतिकव ! प्रवासाची फारशी साधने नसताना केलेल्या धाडसी प्रवासाची आठवण म्हणून रशियन कल्चरल सोसायटी व कोकण एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यमाने कोकण एज्युकेशनच्या रेवदंडा हायस्कुलच्या आवारात १७, जानेवारी २००२ रोजी स्मृतीस्तंभउभारला. या प्रसंगी अनेक रशियन पाहुणे उपस्थित होते. 
      निकितीनच्या भेटीनंतर काही वर्षांनी चौल बहमनींकडून अहमदनगरच्या निजामशाहीच्या (१४९६-१६००) आधिपत्याखाली गेले. त्या काळात चौलची प्रमुख बंदर म्हणून चांगली देखभाल ठेवली होती. १५०३ ते १५०८ या काळात आलेल्या बार्थमा याने देखिल चौलचा व्यापार, तटबंदी, लढवय्ये लोक, उत्पादन आणि सुबत्तेचे बद्दल लिहिले आहे.


     सन १५०५ मध्ये पोर्तुगिजांचे चौलमध्ये पदार्पण झाले. इजिप्त व गुजरातचे सुलतान आपल्याला हिंदी महासागरातून हुसकावून लावणार हे समजल्यावरून सर्व मुसलमान आपले शक्तू आहेत असे त्यांना वाटू लागले. त्याप्रमाणे पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा मुलगा डॉम लोरेंको ड अल्मेडा या तरुण नौसेनाधिकाऱ्याने सर्व मुसलमान जहाजांवर हल्ला चढवून त्याचे बरेच नुकसान केले. पोर्तुगिजांची ताकद पाहून अहमदनगरच्या राजाने शरणागती पत्करून बंदराच्या व जहाजांच्या संरक्षणार्थ पोर्तुगिजांना सालिना ६०० पौंड (२,००० सुवर्ण परदाव) देण्याचे मान्य केले. सन १५०८ च्या शेवटी अमीर हुसेनच्या (पसियन) आधिपत्याखाली इजिप्तचे नौदल व दीवचा गुजरात गव्हर्नर मलिक ईआज यांनी एकत्रितपणे पोर्तुगिजांवर हल्ला केला. या युद्धात पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा मुलगा डॉम अल्मेडा मारला गेला. मात्र लगेच दुसऱ्या वर्षी फेब्रुवारी १५०९ मध्ये दीव येथे इजिपंहुच्या नौदलाचा पराभव केल्यामुळे पोर्तुगिजांचा विजय होऊन समुद्रावरील त्यांचे प्रभुत्व सिद्ध झाले. एप्रिल १५०९ मध्ये पोर्तुगीज व्हॉइसरॉयने चौलला भेट दिली व ठरल्याप्रमाणे अहमदनगरच्या बुरहान निजाम शहाने (१५०८-१५५३) सालिना ६०० पौंड देऊन आपल्या व्यापारी जहाजांचे व चौल बंदराचे संरक्षण करण्याच्या अटीवर पोर्तुगिजांशी तह केला. पोर्तुगिजांनी बंदराचे काळजीपूर्वक संरक्षण केले व व्यापारही वाढवला. सन १५१४ मध्ये वारबोसा या प्रवासी इतिहासकाराने चौलला भेट दिली. तेव्हा तेथे अहमदनगरच्या राजाचा मांडलिक सत्ताधारी होता. प्रदेश सुव्यवस्थित ठेवून व खंडणी वसूल करून तो राजास देत असे. त्याच्चे पोर्तुगिजांशी व इतर लोकांशीही चांगले संबंध होते. चौल येथे गोव्याच्या कॅप्टनने नेमलेला अडत्या राहत असे व तो गोव्यात तसेच पोर्तुगीज आरमारास लागणाऱ्या मालाचा पुरवठा करीत असे.


        बारबोसाने वर्णन केल्याप्रमाणे चौल त्या काळी फार मोठे शहर नव्हते. भिती बांधिव परंतु गवताने शाकारलेली घरे होती. पावसाळयात गावात जास्त लोक राहत नसत. पावसाळा संपताच डिसेंबरच्या सुरुवातीस व्यापारी लोक माल घेऊन मोठ्या संख्येने येत. त्या अगोदर ते गावापासून अलीकडे ५ कि. मी. थांबत. डिसेंबर ते मार्च या कालावधीत चौल अतिशय गजबजलेले असे. या कालावधीत व्यापारी लोक बैलांच्या पाठीवर पखालीतून माल आणीत. सुरत व गोव्या दरम्यान चौल हे सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. समुद्रमार्गे पर्शियन आखात आणि अरेबियात नारळ मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात असत व तेथून प्रामुख्याने खजूर व घोडे आयात करीत. दक्षिणेस मलबार, गोवा व उत्तरेस गुजरातबरोबर व्यापार होत असे. बराचसा व्यापार मलबारी जहाजांतून होत असे. मलबारहून नारळ, सुपारी, मसाल्याचे पदार्थ, औषधे, ताडसाखर, कुरुंदाचा चूर आणीत व तो अंतरभागात तसेच गुजरातमध्ये पाठविला जात असे. चौलहून मलवारी बोटीतून गहू, भाजीपाला, कडधान्ये, तांदूळ, तीळ, तिळाचे तेल, तलम रेशमी कापड, सुती कापड नेत. तलम रेशमी तसेच सुती कापड दीवमार्गे अरेबिया व पर्शियालाही जात असे.


       सन १५१६ मध्ये अहमदनगरचा बुरहान निजाम शहा (१५०८-१५५३) याने पोर्तुगिजांना रेवदंडा येथे वखार बांधण्यास परवानगी देऊन चौल बंदरात पूर्वपिक्षा जास्त मोकळीक दिली. सन १५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगिजांचा पराभव झाला तरी बुरहान पोर्तुगिजांशी मिन्नत्वानेच राहिला. इतकेच नव्हे तर त्याने प्रामुख्याने घोड्यांचा पुरवठा सुरक्षितपणे होण्यासाठी तसेच इतर हेतूने लोअर चेऊलला (रेवदंडा) त्यांना किल्ला बांधण्यास परवानगी देऊन उत्तेजन दिले. मात्र चौलचा मुसलमान प्रांताधिकारी शेख मुहमदने विश्वासघात केला व दीवचा गुजरात प्रांताधिकारी मलिक ईआझने नदीच्या पलीकडे तीन महिने मुक्काम ठोकून बांधकामात अडथळे आणले. तरी देखील शेवटी किल्ल्याचे बांधकाम १५२४ मध्ये पूर्ण केले. सन १५२८ मध्ये गुजरात आरमाराने काही जहाजांच्या मदतीने चौलवर हल्ला केला. परंतु तो पोर्तुगीज व अहमदनगरच्या निजामाने एकत्रितपणे परतवून लावला. सन १५२९ मध्ये वैरभाव वाढून पुन्हा गुजरातच्या सैन्याने चौल लुटले. गुजरातचा राजा बहादुरशहाने (१५२६-१५३६) बुरहान निजाम शहाचा पराभव करून त्यास गुजरातचे प्रभुत्व मानावयास भाग पाडले. गुजरात राजाच्या प्रभावामुळे निजामाने पोर्तुगिजांशी भांडण सुरू करून बराच त्रास दिला. बहादूर शहाच्या मृत्यूनंतर बुरहान निजाम शहा व पोर्तुगीज यांची पुन्हा मैत्री सुरू झाली. परिणामी या काळात (१५३८) चौल एक फार मोठे प्रसिद्ध शहर आणि पूर्वेकडील प्रदेशातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. सन १५४५ मध्ये गुजरातच्या सैन्याने दीववर कठीण प्रसंग आणला असता दीवला चौलच्या लोकांनी स्वतःहून मदत केली होती. त्यानंतर १५५७ पर्यंत चौल येथे शांततामय जीवन होते. 

       बुरहान निजाम शहाच्या मृत्यूनंतर हुसेन निजाम शहाने (१५५३-१५६५) राज्यारोहण केले तेव्हा पोर्तुगिजांना रेवदंड्चाजवळच असलेला कोरलईचा भाग सोडून देण्यास सांगितले. परंतु हुसेनने त्यास न जुमानता उलट पोर्तुगिजांनी तो भाग ताब्यात घेऊ नये म्हणून तेथे एक भक्कम किल्ला बांधण्यासाठी त्याने आपले उत्कृष्ट अधिकारी पाठविले. त्यांच्यात युरोपात काम केलेला व विजापूर येथील ब्राँझची भव्य तोफ ज्याने तयार केली होती, त्या आशिया मायनरमधील चुलाबी रुपीखान नावाचा अधिकारी होता. पोर्तुगिजांनीही प्रतिकार करण्याची तयारी केली. परंतु अल्पशा लढाईनंतर दोघांत समझोता होऊन कोरलई येथे किल्ला बांधू नये असे ठरले. सन १५७० मध्ये अहमदनगरचा मूर्तजा निजाम शहा व विजापूरचा सुलतान एक होऊन त्यांनी १६ फेब्रुवारी १५७१ रोजी पोर्तुगीज चौलला वेढा घातला. साडेचार महिने वेढा होता. शेवटी २९ जून १५७१ रोजी मोठा हल्ला होऊन अहमदनगरच्या शहास शांततेचा तह करून माघार घ्यावी लागली. यानंतर १५७७ मध्ये पोर्तुगिजांनी रेवदंडा किल्ल्याच्या संरक्षणार्थ दक्षिण किनाऱ्यावर भक्कम तटबंदी बांधली. या काळात चौलने भरभराटीचा शिरोबिंदू गाठला होता. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांपैकी तांबडा समुद्र, ओर्मुज इत्यादी ठिकाणांची सर्वाधिक गलबते चौलला येत असत.

      सन १५८३ मध्ये एका डच प्रवाशाने चौलचे वर्णन तटबंदी असलेले, चांगले बंदर व व्यापारासाठी प्रसिद्ध शहर असे केले आहे. खंबायत, सिंध, बंगाल, ओर्मुज, मस्कत आणि तांबडा समुद्राकडच्या व्यापाऱ्यांना ते सुपरिचित होते. तेथील व्यापारी श्रीमंत असून त्यांच्या मालकीची जहाजेही होती. तांदूळ, वाटाणे, डाळी, लोणी, तेल व नारळाचे अमाप उत्पश्न होते. खंबायत व गुजरातमधील व्यापारी तेथे स्थायिक झाले होते व ते विशेषतः हिरे-माणिकांचा व्यापार करीत. आसपास राहणारे स्थानिक लोक रेशीम तयार करीत. चीनहून आयात केलेल्या कच्च्या रेशमापासून लांब झगे, महिलांचे व श्रीमंती थाटाचे कपडे तयार करीत.
     याशिवाय विविध शैलीचे बिछाने, खुर्चा, नक्षीदार पेटचा व कपाटेही करीत. येथील हवा चांगली आरोग्यदायी असल्याचेही त्याने वर्णन केले आहे. सन १५८६ मध्ये व्हेनिसहून आलेला प्रवासी सीझर फ्रेडरिक याने बंदराच्या तोंडाशी सर्व बाजूंनी मजबूत भितीने सुरक्षित असलेले पोर्तुगीज शहर (रेवदंडा) आणि नदीच्या मुखापासून सुमारे २.४२ कि. मी. अंतरावर असलेले मूर किंवा मुसलमान शहर (चौल) या दोन शहरांचा उल्लेख केला असून ती दोन्ही मोठी व्यापारी बंदरे होती असे नमूद केले आहे. या बंदरात भारतीय किनाऱ्यावरून नारळ, मसाल्याचे पदार्थ व औषधे तसेच पोर्तुगाल, मक्का व चीनमधून सॅन्डल, रेशीम व रेशमी वस्त्रे, मखमल, शेंदरी रंगाचे कापड, चिनी मातीची भांडी इत्यादी वस्तू आयात केल्या जात होत्या. तसेच येथून लोखंड, बोरॅक्स, हिंग, धान्य, नीळ, अफू, विविध प्रकारचे रेशीम आणि शुभ्र व छापील रंगीत सुती कापड व कपडे भारतातील इतर ठिकाणी आणि मलाका, चीन, ओर्मुज, पूर्व आफ्रिका, पोर्तुगालकडे निर्यात केल्या जात होत्या. चौलच्या आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर रेशमी कापड विणीत. काचेचे मणी तयार करून मोठ्या प्रमाणात आफिकेत पाठवीत.
    इ. स. १५९२ मध्ये (काही पोर्तुगीज अभ्यासकांच्या मते १५९४ मध्ये) अहमदनगरचा बुरहान निजाम दुसरा (१५९०-१५९४) याचे पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी मतभेद झाल्याने त्याने चीलवर सेना पाठवून कोरलई येथे किल्ला बांधण्याचा हुकूम केला. किल्ला बांधून झाल्यावर त्याच्या सैन्याने नदीपलीकडून पोर्तुगिजांना उपद्रव केला तसेच पोर्तुगीज किल्ल्याच्या भितीवर तोफांचा भडीमार केला. पोर्तुगिजांनीही प्रतिकार चालू ठेवला. शेवटी ४ सप्टेंबर १५९४ रोजी अल्वारोद अब्रांचेस या पोर्तुगीज गव्हर्नरने १,५०० पोर्तुगीज सैनिक व विश्वसनीय स्थानिक लोकांसह कोरलईच्या काठावर लहान लहान होड्यांतून पोहोचण्यात यश मिळविले व सुदैवाने हात दिल्याने किल्ल्याच्या दरवाजासमोर एका हत्तीचा मृतदेह ठेवून शेवटी किल्ला जिंकला. यामुळे स्थानिक लोकांचे पोर्तुगिजांकडे वजन वाढले. त्याचा त्यांना फायदाही मिळाला. पोर्तुगिजांनी त्यांना नागरी अधिकार व आपल्या इच्छेनुसार न्यायदानासाठी न्यायाधीश निवडण्याचा हक्क दिला.


 चौलचे मुसलमानी अंमलातले फारसे प्रसिद्ध नसलेले नाव म्हणजे 'मुर्तजाबादः इ.स. १६०० मध्ये अहमदनगरची निजामशाही बुडाल्यावर वरचे चौल' हे अकबराच्या ताब्यात आले त्यावेळी त्यास् 'मुर्तजाबाद' म्हणतं. चौलचे हे नाव बहमनी काळापासूनच असावे कारण जुन्या कागदपत्रांत चौलचा उल्लेख 'मुर्तजाबाद' असा येतो.
      फ्रेंच प्रवासी फॅन्कॉइस पायरार्ड (Francois Pyrard) (१६०१-१६०८) यानेही पोर्तुगीज चौलचा (रेवदंडा) उल्लेख चांगले हवामान, अतिशय सुबत्ता असलेले व्यापारी केंद्र व संरक्षणदृष्टया मजबूत असे शहर असा केला आहे. तर अप्पर चेऊल येथे अतिशय कुशल व मेहनती कारागीर होते. ते चिनी पद्धतीची कपाटे, पलंग व फर्निचर बनवून त्यास लाखेचे बहुरंगी रोंगण करीत. शिवाय तेथे मोठ्या प्रमाणावर विणकाम उद्योग चालत असे. सुंदर सुती कापड तसेच चिनी रेशमी कापडापेक्षाही उत्तम रेशमी कापड तयार करीत असल्याचेही पायरार्डने नमूद केले आहे. त्याने केलेल्या वर्णनानुसार, चौलचा (आत्ताचा रेवदंडा) किल्ला इतर पोर्तुगीज किल्ल्यांपेक्षा कमी मजबूत होता; तरीपण येथे मोठा व्यापार चाले. येथे कापड व रेशीम विणण्याचे पुष्कळ माग होते. चीनमधून गोव्याच्या किंवा इतर व्यापारी शहरात जो रेशीम माल येई त्यापेक्षा चौलचा माल सुबक व तलम असे.

    सन १६०० मध्ये अहमदनगरची निजामशाही बुडाल्यानंतर अप्पर चेऊल अकबर बादशहाच्या ताब्यात गेले. त्यावेळी त्यास मामले मुर्तजाबाद असे म्हणत. सन १६०३ मध्ये मलिक अंबरने अहमदनगरच्या निजामशाहीचा बरा भाग दुसरा मुर्तजा निजामशाह याच्यासाठी जिंकून परत घेतला. परंतु त्याची सत्ता चौलच्या २५.७५ कि. मी. पलीकडे जाऊ शकली नाही. मुघलांकडून परत घेतलेल्या या शहरावर काही काळ एका प्रांताधिकाऱ्याची (मलिक) सत्ता राहिली. पायरार्डच्या निरीक्षणानुसार मलिकची पोर्तुगिजांशी चांगली मैत्री होती. पोर्तुगिजांच्या उतरत्या काळातही चौलची भरभराट असून व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता. सोळाव्या शतकाच्या अखेरीपूर्व तेथे मोठचा इमारती बांधलेल्या होत्या.

  सतराव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगिजांची समुद्रावरील सत्ता उचांकडे गेल्याचे परिणाम दिसू लागले. सन १६०९ मध्ये अप्पर चेऊलच्या गव्हर्नरने पोर्तुगिजांविरुद्ध समुद्रात मोहीम करण्यास सुरुवात केली. सन १६१२ मध्ये मुघलांनी चौलच्या आजूबाजूचा प्रदेश उध्वस्त करून चौलला वेढा दिला. मात्न तो उठविण्यासाठी पोर्तुगिजांना फार मोठी किंमत द्यावी लागली. नंतर आलेल्या हुषार व लोकप्रिय पोर्तुगीज गव्हर्नरने चौलला काही काळ स्थैर्य व सौख्य प्राप्त करून दिले. त्याने मुघल व दुसरा मुर्तजा निजामशाह यांच्याबरोबर तह केला. या काळात मलिक अंबरने अप्पर चेऊल परत घेतले. त्याने १६१५ मध्ये पोर्तुगिजांशी तह करून इंग्रज व डचांना चौल येथे स्थायिक होऊ देऊ नये असे ठरले. सन १६१७ मध्ये नव्याने तह होऊन त्याप्रमाणे दोन्ही शहरांतील बागा पोर्तुगिजांकडे असाव्यात असे ठरले.
  इ.स. नोव्हेंबर-डिसेंबर १६२५ १६२५ च्या सुमारास आलेला इटालियन प्रवासी पैट्रो डेलाव्हॅली याने चौलच्या बंदराचे बारकाईने वर्णन केले आहे. पोर्तुगीज वसाहतीच्या आग्नेयेस असलेले कॅथेड्रल किल्ल्याच्या भितीच्या आत नव्हते असे त्याने म्हटले आहे. त्याने लिहिले आहे, चौल बंदर व शहर यांना जोडणारे दोन मार्ग असून एक खुष्कीचा समुद्रकिनाऱ्याने हरेश्वराकडून, रामेश्वराच्या बाजूने चोलकडे जाई व पुढे मार्केटला मिळे. दुसरया मार्गाने साडीतन भरतीया तेली होडीतून ओहोटी असताना यांच्या पाठीवरून जाता येत असे व पुढे  मार्केटला मिळे. दुसरया मागनि खाडीतून भरतीच्या वेळी होडीतून व ओहोटी असताना माणसांच्या पाठीवरून जाता येत असे व पुढे मार्केटला पोहोचता येई' व त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू मिळत. जवळच हिंदूंची व मुसलमानांचीही बस्ती होती. बाजार व दुकानांच्या पलीकडे उंच नारळ-पोफळीच्या बागांतून विखुरलेली घरे होती. बाजारापासून जवळच पायऱ्या असलेला नवेनगर तलाव होता. बाजार व नदीकाठादरम्यान मुसलमान लोक राहत होते. त्याशिवाय जकातघर, न्यायालय आणि इतर सरकारी इमारती होत्या. बाजारास लागूनच गर्द झाडीत बहुसंख्येने हिंदू लोक राहत होते. तेथे त्यांची बरीच मंदिरे होती. त्यांत जगदंबा, अमृतेश्वर, नारायणाची मंदिरे महत्त्वाची होती. सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले रामेश्वराचे मंदिर बाजारापासून बरेच दूर पोर्तुगीज चौलकडे (रेवदंडा) जाणाऱ्या रस्त्याला लागून दाट लोकवस्तीच्या भागात रहात होते. स,न, १६३४ साली चौलला भेट दिलेल्या अँटॉनिओ बोकारोने चौलच्या किल्ल्याचे, तोफांचे, इमारती, शिबंदीचे खुलासेवार वर्णन केले आहे.
  सन १६३१ मध्ये विजापूरच्या आदिलशाहाने अप्पर चेऊलचा ताबा घेतला. परंतु लगेच त्याने ते मुघलांस दिले. सन १६३६ मध्ये मुघल बादशहाने विजापूरशी तह करून कोकणातील सर्व प्रदेश विजापूरकरास दिला. मात्र अप्पर चेऊल जास्त काळ विजापूरकरांकडे राहिले नाही. सन १६५७-५८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अप्पर चौल जिंकले असावे. काही भाग मात्र पोर्तुगिजांकडे होता. पोर्तुगिजांचा ऱ्हास झाल्याने व १६६५-१६६६ मध्ये इंग्रज मुंबईत स्थायिक झाल्याने पोर्तुगीज चेऊलची (रेवदंडा) भरभराट व व्यापार संपुष्टात आला. सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांकडे रायगडावर निघालेला ब्रिटिश वकील ऑक्झंडन पोर्तुगीज चौल (रेवदंडा) येथे राहिला होता. तो प्रदेश शिवाजी महाराज व मुघलांतील लढायांमुळे उध्वस्त झाल्याचे त्याने नमूद केले आहे. तेथे मराठा सुभेदाराचे ठिकाण असून तो नागोठणे, पेण, थळ व मुंबईसमोरील प्रदेशावर देखरेख करीत असे.

           चौलला १६६८ पर्यंत विणकाम भरभराटीत चालू होते. परंतु त्यानंतर उद्योगास मिळणारे संरक्षण कमी झाले. त्याचा फायदा मुंबईस मिळाला. चौलच्या रेशीम विणकर व कुशल कारागिरांनी मुंबईत स्थायिक व्हावे म्हणून त्यांना इंग्रजांनी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी मुंबईत रस्ता बांधला व इतर सोयी उपलब्ध केल्या. परिणामी चौलचे बरेच सोनार, विणकर, सुतार मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे मुंबईतील वंशज मूळ गावावरून चेऊली या नावाने ओळखले जातात.
    फ्रायरने १६७२ मध्ये या गावास भेट दिली होती. त्याच्या प्रवास वर्णनात तो म्हणतो, "चौलचा वरचा भाग शिवाजीच्या ताब्यात असून पोर्तुगीज शहरापासून तो सुमारे दोन मैल अंतरावर आहे. पुर्वी दख्खनमधील मालाचीही एक मोठी बाजारपेठ होती. पण आता हे ठिकाण भग्नावस्थेत आहे."
          सन १६८१ मध्ये सिदीने अप्पर चेऊल लूटले. पोर्तुगिजांनी त्याला विरोध केला नाही म्हणून संतापलेल्या संभाजी महराजांनी पोर्तुगीज चेऊलला (रेवदंडा) वेढा दिला. परंतु पोर्तुगिजांच्या तोफांचा मारा व संरक्षित भिंतीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही व शेवटी २४ डिसेंबर १६८३ रोजी वेढा उठविणे भाग पडले. मात्र मराठ्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोर्तुगिजांना संरक्षणासाठी भित व दुर्गरक्षक सेना सतत सज्ज ठेवावी लागे. दि. ५ डिसेंबर १७२८ रोजी आंद्रे रिबेरो कुटीन्होने रेवदंड्याची म्हणजेच पोर्तुगीज चौलची पाहणी केली त्याच्या अहवालानुसार, 'किल्ला पंधराबाजू असलेला अकरा बुरुजांचा होता. तीन ते चाळीस पौंडी ५८ तोफा, दगडांचा मारा करणारया तोफा, ६२ व्यक्तींची एक याप्रमाणे तीन कंपन्या येथे होत्या. १६३४ पासून तटबंदीची इतकी दुरुस्ती झालेली की, तटबंदी नवीन बांधल्यासारखी वाटत होती. पश्चिमेच्या बाजूचे लाटांनी झालेले नुकसान वगळता बाकी बांधकाम सुस्थितीत होते.
        सन १७३९ मध्ये वसई मराठघांच्या ताब्यात गेल्यानंतर पोर्तुगिजांना चौल ताब्यात ठेवणे अशक्य झाले. त्यांनी चौल व कोरलई किल्ला इंग्रजांना दिला. वसईच्या लढाईपूर्वी इंग्रजांचे पोर्तुगिजांशी संख्य नसले तरी त्यांनी पोर्तुगिजांना पैशांची मदत केली होती. मराठ्यांच्या विजयाच्या धडकीने इंग्रजांनी बाळाजी बाजीराव पेशव्याबरोबर ७ सप्टेंबर १७४० रोजी तह करून चौल व रेवदंडा ही दोन्ही स्थळे मराठ्यांना दिली. मात्र मराठ्यांच्या असलात चौलला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले नाही. सन १७५० च्या सुमारास ग्रोसच्या मते चौलला डचांची व्यापारी वखार होती. पुढे फ्रेंचांना चौल बंदराचा मुक्तपणे वापर करण्याची परवानगी मिळाली. १९ जानेवारी १७७८ रोजी करार होऊन चौल येथे फ्रेंचांना सैन्य व तोफखाना ठेवण्यास परवानगी दिली व १७८६ मध्ये चौल फ्रेंचांना देण्याच्या दृष्टीने परवान्याचे नूतनीकरण केले.
       सुमारे इ.स. १६६८ नंतर येथील व्यापाराला संरक्षण मिळेनासे झाले. सततची युद्धे, लुटालूट, बदलती भौगोलिक परिस्थिती यामुळे चौलचे महत्व घटू लागले व पर्यायी व्यापारी बंदर म्हणून मुंबईचा उदय होऊ लागला.  याला प्रामुख्याने दोन कारणे कारणीभूत ठरली आहेत. पहिले राजकीय तर दुसरे भौगोलिक. ब्रिटिशांचे सागरी व्यापारावर स्वामित्व होते व त्या अनुषंगाने मुंबई येथेच सागरी व्यापार एकवटला. पर्यायाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील चौलसारख्या बंदरांचे महत्त्व घटले. येथील व्यापारी मुंबईत जाऊन व्यापार वाढवू लागले. चौलच्या कुशल कारागीर, रेशीम विणकर कामगारांनी मुंबईत स्थलांतरीत व्हावे म्हणून इंग्रजांनी अनेक सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या, परिणामी मुंबई बंदराचा व्यापार वाढू लागला आणि मुंबई ची भरभराट होऊ लागली. 
      या राजकीय कारणाशिवाय अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे कुंडलिका नदीच्या उजवीकडील भागात गाळ साचल्याने कालांतराने मोठे जहाज चौल बंदरात येण्यास असमर्थ झाले. याच्या परिणामी नदीचे पात्र बंदरापासून १ किमी. अंतरावर गेले व हे बंदर इतिहासजमा झाले.
 हे व्यापार बुडण्याचे एक कारण ठरले. या सर्व गोष्टींमुळे चौलमधील व्यापाराला उतरती कळा लागली व ब्रिटिश काळात मुंबई हे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले.
       आज चौल हे सध्याच्या अलिबाग तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव आहे. हे ठिकाण मुंबई, पुणे आणि नाशिक यासारख्या शहरांपासून सुमारे चार-पाच तासांच्या अंतरावर आहे. सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे, प्रसन्न हवामान, कॉटेज, रिसॉर्ट, रुचकर शाकाहारी, मांसहारी जेवणाकरिता प्रसिद्ध आहे.  अलिबागच्या दक्षिणेस १८ कि. मी. अंतरावर आहे. तसेच ते रोहा शहराकडून पश्चिमाभिमुख वाहणाऱ्या कुंडलिका नदी तथा रोहा खाडीच्या उजव्या म्हणजे उत्तर किनाऱ्याच्या पश्चिम टोकावर आहे. चौल व रेवदंडा ही लागून असलेली स्वतंत्र दोन गावे आहेत. त्यांचा इतिहास सारखा असल्याने एकत्रित माहिती दिली आहे. आता आगरकोट हे रेवदंड्यांच्या आगरकोट जलदुर्गातील स्वतंत्र गाव आहे. त्याचीही माहिती यात समाविष्ट आहे. मुंबईहून लाँचने रेवस व तेथून बसने अलिबागमार्गे चौल-रेवदंड्यास (४२) जाता येते. याशिवाय मुंबई-पनवेल-पेण-अलिबागमार्गे (१२६) व मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली-पेण-अलिबागमार्गे (७८) तसेच खोपोली-पाली-नागोठणेमार्गे चौलला (१००) जाता येते. कोकण रेल्वेमार्गावरील पेण (४८), नागोठणे (५०) व रोहा (४०) या स्थानकांहून चौल-रेवदंड्यास जाता येते.
  आज चौलमध्ये पाऊल टाकले की, प्रथम या साऱ्या प्राचीन इतिहासापेक्षा कोकणच्या निसर्गसौंदर्याचीच मोहिनी पडते. नारळी-पोफळीची ही एवढी घट्ट वीण की, चौलमध्ये आलो तरी गाव आल्याचे समजत नाही. जणू सारा भवताल आकाशी धावणाऱ्या वृक्षांच्या मांदियाळीत हरवून गेलेला! या हिरवाईतच चौलच्या राजाभाऊ राईलकरांची एक वाडी! पाऊण एकरातली ही वाडी, पण जणू एखादे जिवंत वनस्पतींचे संग्रहालय! शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष यांचा हा संसार! यामध्ये नारळ, पोफळी, आंबा, फणस, रातांबा अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही तर चक्क परदेशी वनस्पती! एकेक झाड पाहू लागलो की, हा खजिना उलगडत जातो. बकुळ, सीतेचा अशोक, सोनटक्का, कवठी चाफा अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. चित्रक, ब्राह्मी, शतावरी, अनंतमूळ, वैजयंती तुळस, महाळुंगसारख्या वनस्पती औषधी वनस्पतींचे दालन उघडतात. जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि साबूदाणा, कॉफी, अननस आणि चॉकलेटमध्ये वापरले जाणारे ते कोको यासारख्या दुर्मिळ वनस्पती, साऱ्याच चार क्षण त्यांच्याकडे निरखून पाहायला लावतात. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘अ‍ॅव्हाकॅडो’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘पॅशन फ्रूट’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. खरेतर हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत! राईलकरांनी तो इथे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला. आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत. त्यांच्या या कार्यास यश लाभो ही सदिच्छा!










चौल मधील जुनी चलनी नाणी...


चौली (ज्याला 'चौगुला' किंवा 'चौल' असेही म्हटले जाई) आणि लारी (Larin) ही दोन्ही ऐतिहासिक काळातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नाणी होती. विशेषतः कोकण किनारपट्टी, मराठा साम्राज्य आणि आदिलशाहीच्या काळात या नाण्यांचा मोठा वावर होता.
​या दोन्ही नाण्यांची रंजक माहिती खालीलप्रमाणे आहे:
​१. लारी (Larin) - आकड्यासारखे नाणे
​'लारी' हे मध्ययुगीन काळातील अत्यंत वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण नाणे होते. हे नाणे इतर सामान्य नाण्यांसारखे गोल नसून, चांदीच्या तारेला दुमडून किंवा आकड्यासारखा (Fish-hook) आकार देऊन बनवले जात असे.
​उगम: याचा उगम मूळचा पर्शियन आखातातील 'लार' (Lar) या प्रांतात झाला, तिथूनच याला 'लारी' हे नाव मिळाले.
​स्वरूप: हे चांदीचे नाणे असायचे. चांदीची एक पट्टी किंवा तार दुमडली जायची आणि त्यावर सुलतानाचे नाव किंवा राजमुद्रा उमटवली (Stamp केली) जायची.
​कोकणात वापर: विजापूरची आदिलशाही आणि पोर्तुगीजांच्या काळात कोकण किनारपट्टीवर परदेशी व्यापारासाठी लारीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही कोकण प्रांतात आणि विशेषतः राजापूर, दाभोळ या बंदरांच्या परिसरात 'लारी' हे चलन चलनात होते.
​२. चौली (Chouli) - लारीचा भाग
​'चौली' हे प्रामुख्याने लारी या मुख्य नाण्याचा एक उपभाग (Fractional Coin) किंवा त्याच्याशी संबंधित लहान मूल्य असलेले चांदीचे नाणे होते.
​मूल्य: साधारणपणे १ लारी म्हणजे काही ठिकाणी ४ चौली असे समीकरण असायचे (भागांनुसार यात थोडे बदल होत). जेव्हा लहान खरेदी-विक्री करायची असे, तेव्हा लारीऐवजी 'चौली'चा वापर केला जाई.
​स्थानिक महत्त्व: कोकणातील स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि दैनंदिन व्यवहारात चौलीचा वापर खूप जास्त होता.
​ऐतिहासिक संदर्भ आणि महत्त्व
​सागरी व्यापार: चौली आणि लारी या नाण्यांचा मुख्य संबंध समुद्री व्यापाराशी होता. अरबी समुद्रातून येणारे व्यापारी, स्थानिक कोळी, आणि कोकणातील व्यापारी यांच्यात होणाऱ्या व्यवहारांचे हे मुख्य साधन होते.
​शिवकाळ आणि पेशवेकाळ: शिवकाळात जरी 'शिवराई' (तांब्याचे नाणे) आणि 'होन' (सोन्याचे नाणे) मुख्य होते, तरीही कोकण पट्ट्यातील महसूल आणि परकीय व्यापाराच्या नोंदींमध्ये 'लारी' आणि 'चौली' या चलनाचा उल्लेख आवर्जून आढळतो.
​थोडक्यात सांगायचे तर, लारी हे चांदीचे मुख्य आणि आकड्याच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण नाणे होते, तर चौली हे त्याच्या सोबतीने चालणारे लहान मूल्याचे चांदीचे नाणे होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या विशेषतः कोकणच्या आर्थिक इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली

चौल-कोरलाईचा विस्मयकारक इतिहास:

पोर्तुगीज आगमनापासून ते ‘क्रिस्ती’ संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणांपर्यंत
​कोकणच्या समृद्ध किनारपट्टीवरील चौल (चंपावती) आणि कोरलाई हा परिसर केवळ निसर्गरम्य नाही, तर तो जागतिक इतिहास आणि भाषाशास्त्राचा एक अद्भुत चमत्कार आहे. या परिसराचा इतिहास समजून घेताना पोर्तुगीजांचे आगमन, त्यांची मूळ भाषा, स्थानिक संस्कृतीशी झालेला मिलाफ आणि त्यातून आकाराला आलेली एक वेगळी लोकसंस्कृती यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजेचे ठरते.
​पोर्तुगीज १५ व्या शतकाच्या शेवटी, म्हणजे १४९८ मध्ये वास्को-द-गामाच्या रूपाने पहिल्यांदा कालिकत येथे आले. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला, १५१० मध्ये अल्बुकर्कने गोवा जिंकला आणि त्यानंतर १५१६ च्या सुमारास चौल-रेवदंडा परिसरावर पोर्तुगीजांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. या काळात त्यांची मूळ भाषा 'गालेगो-पोर्तुगीज' मधून विकसित झालेली 'जुनी पोर्तुगीज' ही होती आणि ते याच भाषेत संवाद साधत असत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कॅथलिक धर्मप्रसारक भारतात आले, ज्यामध्ये मुख्यत्वे 'फ्रान्सिसकन्स' आणि नंतर 'जेसुइट्स' (जसे की सेंट फ्रान्सिस झेवियर) यांचा समावेश होता. हे जेसुइट्स उत्तम भाषातज्ज्ञही होते. त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी येथील कोकणी आणि मराठी (ज्याला ते लिंग्वा कानारिम किंवा लिंग्वा ब्राह्मणा म्हणायचे) या भाषांचा सखोल अभ्यास केला. याच अभ्यासातून थॉमस स्टीफन्स सारख्या पाद्र्यांनी 'क्रिस्तपुराण' सारख्या ग्रंथांची रचना मराठीत केली.
​पोर्तुगीज जेव्हा वसई, गोवा आणि पुढे कोरलाई किल्ल्याच्या परिसरात स्थायिक झाले, तेव्हा त्यांच्या भाषेत कमालीचे बदल झाले. कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या कॅथलिक ख्रिश्चन समाजाची भाषा भाषाशास्त्रात एक चमत्कार मानली जाते, ज्याला 'क्रिस्ती', 'कोरलाई क्रिओल' किंवा 'नो-लिंग' म्हटले जाते. हे लोक आपली मूळ भाषा विसरले नाहीत, तर तिचे 'क्रिओलायझेशन' (मिश्रण) झाले. जेव्हा पोर्तुगीज सैनिक, खलाशी आणि स्थानिक मराठी किंवा कोकणी भाषिक स्त्रियांचे विवाह झाले, तेव्हा दोन्ही भाषांच्या मिलाफातून एक नवीन भाषा जन्माला आली. या भाषेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिने पोर्तुगीज भाषेचे क्लिष्ट व्याकरण पूर्णपणे सोडून दिले आणि मराठी भाषेची 'कर्ता-कर्म-क्रियापद' अशी वाक्यरचना (Subject-Object-Verb) स्वीकारली, मात्र या भाषेत ७० ते ८० टक्के शब्द मूळ पोर्तुगीज राहिले. उदाहरणार्थ, पोर्तुगीज भाषेतील "एउ ते वेजो" (मी तुला पाहतो) हे वाक्य कोरलाईच्या क्रिस्ती भाषेत मराठीच्या रचनेनुसार "यो ति ओला" असे झाले. या भाषेला स्वतःची स्वतंत्र लिपी नाही, ती मुख्यतः मौखिक परंपरेने टिकून आहे; परंतु अभ्यासासाठी ती रोमन आणि स्थानिक व्यवहारासाठी देवनागरी लिपीत लिहिली जाते.
​चौल हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्याने आणि जवळील जंजिरा-दांडा राजपुरीमध्ये सिद्दी (हबशी) सत्ता असल्याने कोरलाईच्या भाषेत बहुसांस्कृतिक शब्द आले. या भाषेवर सर्वाधिक प्रभाव मराठीचा असून दैनंदिन वापरातील नातेसंबंध (बाप, बायको) आणि भाजीपाल्याची नावे मराठी आहेत. चौलमध्ये शेकडो वर्षे बहमनी आणि निजामशाही सारख्या मुस्लिम राजवटी असल्याने 'किल्ला', 'गरीब', 'नशीब', 'दुकान' यांसारखे अरबी आणि फारसी शब्दही या भाषेत रुळले. तसेच चौल आणि रेवदंडा हा 'बेने इस्राईल' ज्यू लोकांचा मुख्य गड असल्याने त्यांच्या संपर्कामुळे काही हिब्रू शब्दांचा प्रभाव धार्मिक पातळीवर पडला. जंजिऱ्याचे सिद्दी आणि चौलचे पोर्तुगीज यांच्यातील युद्धे आणि व्यापारी करारांमुळे काही आफ्रिकन दर्यावर्दी आणि मासेमारीशी संबंधित शब्दही या भाषेत समाविष्ट झाले.
​या वैशिष्ट्यपूर्ण भाषेवर आणि जनजीवनावर जागतिक स्तरावर मोठे संशोधन झाले आहे. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीचे जगप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ प्रा. जे. क्लॅन्सी क्लेमेंट्स यांनी कोरलाई गावात अनेक वर्षे राहून संशोधन केले आणि १९९६ मध्ये "The Genesis of a Language: The Formation and Development of Korlai Portuguese" हा प्रमाण ग्रंथ लिहिला, ज्यातून या भाषेचे अधिकृत व्याकरण जगासमोर आले. भारतातील भाषाशास्त्राचे अग्रगण्य केंद्र असलेल्या डेक्कन कॉलेज (पुणे) च्या संशोधकांनी आणि मुंबई विद्यापीठाच्या भाषाशास्त्र व मराठी विभागाने या परिसरातील समाज-भाषावैज्ञानिक घटकांवर महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या किंवा उत्तर भारतातील काही इतिहासकारांनी भारतातील पोर्तुगीज व्यापारी संबंधांवर आणि सागरी मार्गांवर प्रकाश टाकणारा अभ्यास केला आहे.
​पोर्तुगालच्या नेमक्या कोणत्या भागातून हे लोक आले, याचा शोध घेतला असता असे दिसते की, सुरुवातीचे बहुतांश खलाशी आणि सैनिक पोर्तुगालच्या उत्तरेकडील 'मिन्हो' (Minho) आणि 'गालिसिया' (Galicia) या किनारपट्टीच्या प्रदेशातून आले होते. पोर्तुगालचा हा भाग भौगोलिकदृष्ट्या आणि हवामानाच्या दृष्टीने कोकण किनारपट्टीशी कमालीचे साधर्म्य दाखवतो. दोन्ही भागांमध्ये समुद्राची जवळील उपस्थिती, मासेमारीची संस्कृती आणि डोंगराळ-किनारपट्टीची रचना यात मोठी साम्यता आहे. या पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी भारतात शेती आणि भाजीपाल्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केला. हे लोक मूळचे पोर्तुगीज पुरुष आणि स्थानिक कोळी, आगरी किंवा भंडारी समाजातील स्त्रियांचे वंशज (Luso-Indians) आहेत. पोर्तुगीजांनी भारताला बटाटा, तंबाखू, काजू, अननस, पपई आणि मिरची यांसारख्या अनेक नव्या वनस्पती व बियाणी दिली. कोरलाई आणि चौल परिसरातील वाड्यांमध्ये (Wadi Orchards) पोर्तुगीजांनी गोव्यातून आणि थेट ब्राझील किंवा आफ्रिकेतून आणलेली वैशिष्ट्यपूर्ण बियाणी लावली. आज रेवदंडा आणि अलिबाग परिसरातील पोयनाडची वांगी, चौलची पांढरी पटकी, विशिष्ट माठ आणि मिरची यांचे बियाणे पोर्तुगीज काळातील बागायती तंत्रज्ञानातून विकसित झाले असून ते येथील खारट-गोड्या जमिनीत उत्तम रुजते.
​या लोकांच्या वेशभूषेत काळाच्या ओघात मोठे बदल झाले. सुरुवातीच्या काळात युरोपियन कपडे घालणारे हे लोक स्थानिक संस्कृतीत मिसळल्यानंतर पूर्णपणे कोकणी वेशभूषेकडे वळले. येथील पुरुषांनी स्थानिक आगरी-कोळी समाजाप्रमाणे लुंगी आणि शर्ट किंवा गंजिफ्रॉक परिधान करण्यास सुरुवात केली, तर स्त्रियांनी महाराष्ट्रीयन पद्धतीची नऊवारी काष्टा साडी नेसण्यास सुरुवात केली. आजच्या काळात त्यांची वेशभूषा आधुनिक झाली असली, तरी सण-उत्सवांच्या वेळी ज्येष्ठ महिला पारंपरिक काष्टा साडी आणि पुरुष लुंगी-शर्ट अशाच वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेत दिसतात. त्यांची संस्कृती गोव्याच्या किंवा वसईच्या पोर्तुगीज ख्रिश्चनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. गोव्यात प्रदीर्घ ४५१ वर्षांची पोर्तुगीज राजवट असल्याने तिथे पाश्चात्त्य संस्कृतीचा थेट प्रभाव राहिला, तर वसई १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी जिंकल्याने तिथली संस्कृती पूर्व-भारतीय (East Indian) मराठी धाटणीची झाली. याउलट, कोरलाई गाव भौगोलिकदृष्ट्या प्रदीर्घ काळ एकाकी आणि दुर्गम राहिल्यामुळे येथील लोकसंस्कृती आगरी-कोळी संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झाली. ते ख्रिसमस आणि इस्टर या सणांसोबतच स्थानिक 'मरीआईची जत्रा' (जी ते रेइस मागोस किंवा थ्री किंग्सच्या नावाने साजरी करतात) अत्यंत उत्साहाने साजरी करतात. त्यांच्या आहारात मासे, भात आणि नारळाचा भरपूर वापर असतो, ज्याला पोर्तुगीज मसाल्यांची आणि स्थानिक पाचक पद्धतीची जोड दिलेली असते.
​पोर्तुगालमधील राष्ट्रीय ग्रंथालये (Biblioteca Nacional de Portugal) आणि लिस्बनमधील 'शत्रू पलीकडील दस्तऐवज संग्रह' (Arquivo Histórico Ultramarino) यामध्ये चौल, रेवदंडा आणि कोरलाई या भागांतील पोर्तुगीजांच्या स्थलांतरावर, युद्धांवर आणि त्यांच्या परतीवर अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. जेव्हा १७३९ च्या सुमारास मराठ्यांनी उत्तरेचा प्रांत आणि चौल भागातील पोर्तुगीज सत्ता मोडून काढली, तेव्हा अनेक पोर्तुगीज अधिकारी आणि त्यांचे कुटुंब गोव्यात किंवा परत पोर्तुगालला गेले. या स्थलांतराच्या वेळी, जसे इस्रायलमधील बेने इस्राईल ज्यू लोकांनी भारतातील खाद्यसंस्कृती (उदा. कढी, पोहे), मराठी भाषेतील बारकावे आणि काही चालीरीती आपल्यासोबत इस्रायलला नेल्या आणि तिथे स्वतःची वस्ती जिवंत ठेवली; तशाच प्रकारे पोर्तुगालला परत गेलेल्या काही वंशजांनी भारतातील खाद्यपदार्थ (विशेषतः मसाल्यांचा वापर, आमटीची पद्धत) आणि इकडच्या काही रितीरिवाजांच्या आठवणी आपल्या कौटुंबिक जीवनात जतन केल्याच्या नोंदी पोर्तुगीज इतिहासकारांनी घेतल्या आहेत.
​या संपूर्ण विषयाचा अधिकृत आणि शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी 'कुलाबा जिल्हा गॅझेटियर', डॉ. शं. गो. धपलापूरकर व डॉ. रा. ची. ढेरे यांचे चौल बंदरावरील ऐतिहासिक लेखन, एम. एन. पिअरसन यांचे "The Portuguese in India" आणि अ. का. प्रियोळकर यांचे "वसईचा इतिहास" व "कोकणचा इतिहास" हे ग्रंथ अत्यंत प्रामाणिक संदर्भ मानले जातात. कोरलाईचे हे पोर्तुगीज ख्रिश्चन गोव्यासारखे पूर्ण पाश्चात्त्य राहिले नाहीत आणि वसईसारखे पूर्णपणे बदलले नाहीत, तर त्यांनी स्वतःची एक वेगळी, सुंदर आणि बंदिस्त संस्कृती व 'क्रिस्ती' भाषा टिकवून ठेवली, जी आजही भारताच्या बहुसांस्कृतिकतेचा एक अद्वितीय दस्तऐवज आहे.

चौल-चंपावती (अलिबाग): ६०० वर्षांचा ख्रिस्ती आणि ज्यू धर्माचा इतिहास, संघर्ष आणि संस्कृती

​अलिबाग जवळील चौल (चंपावती) हे केवळ एक ऐतिहासिक बंदर नसून विविध जागतिक संस्कृती, धर्म आणि व्यापाराचे महाद्वार होते. मागील ६०० हून अधिक वर्षांत या भूमीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. ख्रिस्ती, ज्यू (इझ्रायली), मुघल, मराठे आणि स्थानिक हिंदू संस्कृतीच्या मिलाफातून आणि संघर्षातून चौलचा एक अनोखा इतिहास घडला आहे. प्रामुख्याने ख्रिश्चन समाजजीवनाचा वेध घेणारा हा सविस्तर इतिहास खालीलप्रमाणे आहे:
​१. ख्रिस्ती धर्माचे आगमन: आक्रमक, धर्मप्रसारक आणि युरोपीय सत्ता
​चौलमध्ये ख्रिस्ती धर्माचे आगमन प्रामुख्याने १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांच्या रूपाने झाले. पोर्तुगीज हे केवळ व्यापारी म्हणून आले नाहीत, तर एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात क्रूस (Cross) घेऊन आलेले आक्रमक आणि धर्मप्रसारक होते.
​घटनाक्रम आणि साल: १५०५ च्या सुमारास पोर्तुगीज आरमारी अधिकारी दों लोरेन्सो दे अल्मेडा (Dom Lourenço de Almeida) हा चौलच्या बंदरात आला. पुढे १५१६ मध्ये पोर्तुगीजांनी विजापूर आणि अहमदनगरच्या राजवटींशी वाटाघाटी करून येथे वखार स्थापन केली. १५२१ ते १५२४ च्या दरम्यान त्यांनी चौलच्या किनारपट्टीवर (विशेषतः रेवदंडा परिसरात) मजबूत किल्ला बांधून आपले बस्तान बसवले.
​धर्मगुरू आणि धार्मिक संस्था: पोर्तुगीजांसोबत धार्मिक संस्थांचे जाळे आले. सुरुवातीला 'फ्रान्सिसकन' (Franciscan) आणि १५४८ च्या सुमारास 'जेसुइट' (Jesuit/Society of Jesus) पंथाचे धर्मगुरू चौलमध्ये दाखल झाले. १५३४ मध्ये जेव्हा बेसिन (वसई) करारांतर्गत पोर्तुगीजांची सत्ता अधिक दृढ झाली, तेव्हा चौलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराला मोठी गती मिळाली. 'फायदाल्गो' (पोर्तुगीज सरदार) आणि धर्मगुरूंनी मिळून चौलमध्ये भव्य चर्च आणि मठांची स्थापना केली. यात १५६५ ते १५८० च्या दरम्यान बांधलेले रोझरी चर्च (Church of Our Lady of the Rosary) आणि सेंट बार्बरा यांचे अवशेष आजही रेवदंडा किल्ल्यात याचे साक्षीदार आहेत.
​२. धर्माचे स्वागत, विरोध आणि धार्मिक संघर्ष
​स्थानिक हिंदू आणि ख्रिश्चन संघर्ष: पोर्तुगीजांनी सुरुवातीला व्यापाराच्या अटींवर स्थानिक हिंदू आणि निजामशाही अधिकाऱ्यांशी सलोखा ठेवला. परंतु, पोर्तुगीज सत्तेने बस्तान बसवल्यानंतर 'इन्क्विझिशन' (Inquisition) च्या नियमांचा प्रभाव वाढला. १५६० नंतर गोव्याप्रमाणेच चौलमध्येही सक्तीने धर्मपरिवर्तन, स्थानिक मंदिरे पाडणे आणि हिंदूंच्या उघड्यावरील धार्मिक विधींवर बंदी घालण्याचे धोरण अवलंबले गेले. यामुळे स्थानिक हिंदू समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि पोर्तुगीज सत्तेला छुपा व उघड विरोध सुरू झाला.
​ख्रिश्चन आणि मुघल/निजामशाही संघर्ष: चौलच्या भूमीवर मुसलमानी सत्ता (अहमदनगरची निजामशाही) आणि पोर्तुगीज यांच्यात अनेक रक्तरंजित युद्धे झाली. १५७०-१५७१ आणि १५९२-१५९४ दरम्यान निजामशाहीच्या सैन्याने चौलच्या पोर्तुगीज वसाहतीवर (रेवदंडा किल्ला) मोठे हल्ले केले. या युद्धांना राजकीय कारणांसोबतच 'धार्मिक युद्धाचे' (Crusade vs Jihad) स्वरूप आले होते. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार, १५९४ च्या युद्धाच्या वेळी जेसुइट धर्मगुरूंनी स्वतः हातात शस्त्रे घेऊन पोर्तुगीज सैन्याला धार्मिक प्रोत्साहन दिले होते आणि तटबंदीवरून निजामशाही सैन्याविरुद्ध जोरदार प्रतिकार केला होता.
​३. ज्यू (येहुदी/बेने इझ्रायल) समाज आणि त्यांचे स्वागत
​ख्रिश्चनांच्या कितीतरी शतके आधी चौल आणि आसपासच्या (नवागाव, कीहीम) भागात ज्यू (Jew) म्हणजेच बेने इझ्रायल समाज आला होता. ऐतिहासिक दाखल्यांनुसार, इसवी सन पूर्व १७५ च्या सुमारास किंवा इसवी सनाच्या सुरुवातीच्या पहिल्या शतकात जहाजे फुटून काही ज्यू कुटुंबे चेऊल-नवागावच्या किनाऱ्याला लागली.
​पारस्परिक स्वागत: हिंदू समाजाने आणि स्थानिक राजांनी या ज्यू बांधवांचे अत्यंत खुल्या मनाने स्वागत केले. त्यांना शेती, तेल गाळणे (शनिवार तेली) आणि व्यापाराची पूर्ण मुभा दिली. हिंदू आणि ज्यू यांच्यात कधीही धार्मिक संघर्ष झाला नाही; उलट ते स्थानिक संस्कृती आणि मराठी भाषेशी पूर्णपणे एकरूप झाले.
​४. कोर्लईचे ख्रिश्चन: समाजजीवन आणि जिवंत इतिहास
​चौलच्या अगदी समोरील खाडीपलीकडे असलेल्या कोर्लई (Korlai) गावाचा इतिहास आणि तिथल्या ख्रिश्चन समाजजीवनाचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, जे इतर भागांपेक्षा वेगळे ठरते.
​मूळ आणि भाषा (Kristi/Nouvel): कोर्लई येथील ख्रिश्चन हे प्रामुख्याने १६ व्या शतकात पोर्तुगीज सैनिक, खलाशी आणि स्थानिक स्त्रिया (विशेषतः कोळी आणि आगरी समाजातील) यांच्या विवाहातून निर्माण झालेला समाज आहे. त्यांची भाषा 'कोर्लई पोर्तुगीज क्रिओल' (Korlai Portuguese Creole) किंवा स्थानिक भाषेत 'नोवेल' (Nouvel) म्हणून ओळखली जाते. ही जगातील एकमेव अशी भाषा आहे, जी पोर्तुगीज व्याकरण आणि मराठी-कोंकणी शब्दांच्या मिलाफातून तयार झाली आहे. ही भाषा केवळ बोलली जाते, तिला स्वतंत्र लिपी नाही; मात्र धार्मिक ग्रंथांसाठी ती रोमन लिपीत किंवा मराठी संवादात लिहिली जाते.
​वेशभूषा आणि परंपरा: कोर्लईच्या ख्रिश्चन महिला पूर्वी पोर्तुगीज पद्धतीचे जाकीट-स्कर्ट किंवा पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडीही नेसत असत. त्यांच्या समाजजीवनात आणि खाद्यसंस्कृतीत कोंकणी मासे-भात आणि पोर्तुगीज पद्धतीचे स्ट्यू (Stew) यांचे मिश्रण आढळते.
​धार्मिक स्थळ: कोर्लई येथील मुख्य चर्च 'अवर लेडी ऑफ द कार्मो' (Our Lady of Mount Carmel) हे आहे, ज्याची स्थापना मूळतः १५८८ च्या सुमारास कोर्लई किल्ल्याच्या अंतर्गत झाली होती आणि नंतर ती गावात स्थलांतरित करण्यात आली. येथील धार्मिक विधींमध्ये, गाण्यांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये स्थानिक 'नोवेल' भाषेचा आणि चालीरितींचा मोठा प्रभाव आहे.
​५. वसई, गोवा आणि कोर्लई/चौलच्या ख्रिश्चनांमधील सांस्कृतिक भिन्नता
​ख्रिश्चन समाजजीवनाचा विचार करता, गोवा, वसई आणि चौल/कोर्लई येथील समाजात भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठा फरक आहे.
​गोव्यातील ख्रिश्चन समाजात कोंकणी आणि पोर्तुगीज संस्कृतीचा तीव्र व प्रदीर्घ प्रभाव राहिला, कारण तिथे पोर्तुगीज राजवट १९६१ पर्यंत टिकून होती. या उलट, वसईचे ख्रिश्चन (ज्यांना ईस्ट इंडियन म्हटले जाते) हे संपूर्णपणे स्थानिक मराठी संस्कृतीशी जोडलेले आहेत. ते मराठीचीच 'सामवेदी' किंवा 'वाडवळी' बोली बोलतात. १७३९ मध्ये श्रीमंत चिमाजीअप्पांनी वसई जिंकल्यामुळे तिथला पोर्तुगीज राजकीय आणि भाषिक प्रभाव लवकर संपुष्टात आला.
​चौल आणि कोर्लई येथील ख्रिश्चन समाज या दोन्हीपेक्षा वेगळा ठरला. येथील समाज प्रामुख्याने पोर्तुगीज सैनिक आणि स्थानिक कोळी/आगरी संस्कृतीच्या मिश्रणातून तयार झाला. १७४० च्या सुमारास जेव्हा मराठ्यांनी चौल आणि कोर्लईचा ताबा घेतला, तेव्हा अनेक उच्चपदस्थ पोर्तुगीज कुटुंबे गोवा किंवा युरोपमध्ये निघून गेली. मात्र, कोर्लई येथील स्थानिक ख्रिस्ती समाज तिथेच राहिला आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र 'नोवेल' भाषा आणि संस्कृती आजही जिवंत ठेवली.
​६. परदेशी प्रवाशांची वर्णने, ऐतिहासिक दाखले आणि दस्तऐवज
​चौलच्या ख्रिस्ती समाजाचे, तिथल्या वैभवाचे आणि चर्चच्या व्यवस्थेचे वर्णन अनेक परदेशी प्रवाशांनी आपल्या दस्तऐवजात करून ठेवले आहे:
​फादर मन्सरेत (Father Antonio Monserrate - १५७९): या जेसुइट धर्मगुरूने चौल येथील जेसुइट कॉलेज आणि तिथल्या धार्मिक वातावरणाचे विस्तृत वर्णन आपल्या दैनंदिन नोंदींमध्ये केले आहे.
​राल्फ फिच (Ralph Fitch - १५८३): या इंग्रज प्रवाशाने चौलला भेट दिली तेव्हा आपल्या प्रवासवर्णनात लिहिले की, "चौल (Chaul) हे पोर्तुगीजांच्या ताब्यातील एक अत्यंत मोठे आणि समृद्ध शहर असून येथे ख्रिस्ती धर्मगुरूंचे मोठे प्रस्थ आहे आणि बंदरात व्यापारी जहाजांची मोठी ये-जा असते."
​पिएत्रो देल्ला व्हाले (Pietro Della Valle - १६२३): या इटालियन प्रवाशाने चौलच्या चर्चचे सौंदर्य, तेथील धार्मिक उत्सव आणि स्थानिक हिंदू-ख्रिश्चन समाजजीवनातील परस्पर संबंधांवर सविस्तर लिहून ठेवले आहे.
​दस्तऐवज: पोर्तुगीज दस्तऐवज 'क्रोनिका दे दों जुआव दे कास्त्रो' (Crónica de Dom João de Castro) आणि गोव्याच्या दप्तराशयील (Historical Archives of Goa) नोंदींमध्ये चौलच्या चर्चला दिली जाणारी दाने आणि तिथल्या ख्रिस्ती लोकसंख्येचे अधिकृत दाखले मिळतात.
​७. आजची परिस्थिती: प्रार्थना स्थळे आणि समाजजीवन
​१७४० मध्ये मराठा साम्राज्याने पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर चौल-रेवदंडा परिसर पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाला. त्यानंतर शुद्ध पोर्तुगीज घराणी निघून गेल्याने चौल-रेवदंडा शहरात आज थेट पोर्तुगीज वंशाचा समाज उरलेला नाही. रेवदंडा किल्ल्यातील जुनी चर्च आज ऐतिहासिक अवशेष म्हणून पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत.
​मात्र, कोर्लई भागात आजही ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतो आणि सक्रिय आहे. ते येथील 'अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल' चर्चमध्ये एकत्र येतात आणि आपापल्या परंपरा जपतात.
​दुसरीकडे, ज्यू समाजाची 'बेथ एल सिनॅगॉग' (Beth El Synagogue) ही ऐतिहासिक प्रार्थना स्थळे रेवदंडा परिसरात आहेत. १९४८ मध्ये इस्रायल देशाची निर्मिती झाल्यानंतर येथील बहुतांश ज्यू कुटुंबे इस्रायलला स्थायिक झाली, ज्यामुळे आज केवळ काही मोजकीच कुटुंबे येथे शिल्लक आहेत. इतिहास साक्षी आहे की, चौलच्या भूमीत ज्यू आणि ख्रिश्चन समाजाच्या अंतर्गत कधीही मोठे वांशिक किंवा धार्मिक वाद झाले नाहीत; दोन्ही समाज आपापल्या धार्मिक चौकटीत शांततेने नांदत आले.
​निष्कर्ष आणि स्थानिक नाते
​चौल-चंपावतीचा ख्रिस्ती इतिहास हा केवळ आक्रमणाचा किंवा सक्तीचा इतिहास नाही, तर तो प्रदीर्घ काळानंतर निर्माण झालेल्या संस्कृतींच्या देवाणघेवाणीचा इतिहास आहे. सुरुवातीच्या काळातील पोर्तुगीज सत्तेचा धार्मिक आक्रमकपणा मराठ्यांच्या आगमनानंतर शांत झाला. आज येथील ख्रिश्चन समाज हा परका किंवा उपरा राहिलेला नसून, तो स्थानिक आगरी, कोळी आणि इतर हिंदू समाजाशी सामाजिक पातळीवर, सलोख्याने आणि गुण्यागोविंदाने जोडला गेला आहे. कोर्लईच्या ख्रिश्चनांच्या मुखातील पोर्तुगीज-मराठी मिश्र भाषा आणि रेवदंडा किल्ल्यातील चर्चचे ऐतिहासिक अवशेष चौलच्या या ६०० वर्षांच्या समृद्ध सामाजिक प्रवासाची साक्ष देत आजही उभे आहेत.
 
 
कोकणच्या मातीशी एकरूप झालेला अनोखा जनसमूह: बेणे इस्राएल (अलिबाग तालुक्यातील ज्यू समाजाचा ऐतिहासिक व सामाजिक प्रवास)
​..........
​महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर विविध जाती, जमाती आणि धर्म शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. या विविधतेतील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण, शांतताप्रिय आणि निष्ठावंत घटक म्हणजे 'बेणे इस्राएल' (Bene Israel) अर्थात कोकणचे ज्यू (Isreali) लोक. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि पेण या तालुक्यांच्या किनारपट्टीने या समाजाला केवळ आश्रयच दिला नाही, तर त्यांना आपल्या संस्कृतीत असं काही सामावून घेतलं की, हे लोक संपूर्णपणे ‘मराठी’ झाले. जागतिक इतिहास आणि स्थानिक लोकश्रुती यांच्या संगमातून साकारलेला बेणे इस्राएल समाजाचा अलिबाग तालुक्यातील इतिहास अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी आहे.
​१. भारतात आगमन: नवगावची दुर्घटना आणि सुरुवातीचे वास्तव्य
​सुमारे २,२०० ते २,५०० वर्षांपूर्वी (काही इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व १७५ मध्ये, राजा अँटिओकसच्या जुलूमाला कंटाळून) पॅलेस्टाईन/इस्राएलमधून काही ज्यू कुटुंबे जहाजाने निघाली. प्रवासादरम्यान अरबी समुद्रात अलिबाग जवळील नवगाव (Nawgaon) किनाऱ्यापाशी प्रचंड वादळामुळे त्यांची बोट फुटली आणि ती तिथेच बुडाली.
​या भीषण अपघातातून केवळ ७ पुरुष आणि ७ स्त्रिया असे एकूण १४ जण सुदैवाने जिवंत वाचले. ते कसेबसे पोहून नवगावच्या किनाऱ्यावर आले. तिथेच त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका विस्तीर्ण जागेत मृतांवर अंत्यसंस्कार केले. ही जागा आज ‘नवगाव ज्यू स्मशानभूमी’ (Cemetery) म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, जिथे या समाजाच्या मूळ पूर्वजांची स्मारके (Monuments) आहेत. नवगाव येथे या घटनेची साक्ष देणारा एक भव्य स्मारक स्तंभही उभारण्यात आला आहे.
​२. गावाची नावे आडनावे म्हणून स्वीकारणे (उदाहरणे)
​सुरुवातीला या लोकांकडे कोणतीही पारंपरिक आडनावे नव्हती. परंतु, महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर त्यांनी स्थानिक मराठी संस्कृतीनुसार, ज्या गावात ते स्थायिक झाले, त्या गावाच्या नावापुढे 'कर' प्रत्यय लावून आपली आडनावे निश्चित केली. ही बेणे इस्राएल समाजाची जगात सर्वात आगळीवेगळी ओळख ठरली.
​वाकरूळकर: वाकरूळ गावचे रहिवासी
​तळकर / तळेकर: तळ(ता. मुरुड) किंवा तळे गावचे रहिवासी
​सागावकर: सागाव (बोरली जवळ) गावचे रहिवासी
​किहीमकर: किहीम गावचे रहिवासी
​नागावकर: नागावचे रहिवासी
​रोहेकर: रोहा गावचे रहिवासी
​अष्टमकर: अष्टमी (रोहा) गावचे रहिवासी
​चौलकर: चौल गावचे रहिवासी
​३. 'तेली' समाज किंवा 'शनिवार तेली' म्हणून उल्लेख का?
​स्थानिक आगरी, कोळी व अन्य समाजांत मिसळताना या निर्वासित लोकांनी उपजीविकेसाठी 'तेल गाळणे' (घणा चालवणे) हा व्यवसाय स्वीकारला. ते अत्यंत प्रामाणिकपणे शुद्ध तेल काढून विकू लागले.
​ज्यू धर्माच्या नियमानुसार, शुक्रवारी सूर्यास्तापासून ते शनिवारी सूर्यास्तापर्यंतचा काळ हा 'शब्बाथ' (Sabbath) म्हणजेच पवित्र विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी ते कोणतेही व्यावसायिक काम करत नसत, घणा पूर्णपणे बंद ठेवत आणि ईशान्येची प्रार्थना करत. शनिवारी पूर्ण सुट्टी ठेवून तेल गाळणारे तेल व्यावसायिक म्हणून कोकणातील स्थानिक लोकांनी त्यांना 'शनिवार तेली' असे नाव दिले. पुढे कित्येक दशके महसूल नोंदींमध्येही त्यांची हीच ओळख राहिली.
​४. अलिबाग तालुक्यातील प्रमुख घराणी व त्यांचे अस्तित्व
​आजही अलिबाग आणि आसपासच्या परिसरात काही नामांकित घराण्यांचे वंशज आणि त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत:
​अलिबागचे वाकरूळकर घराणे
​वाकरूळकर हे या भागातील अत्यंत प्रतिष्ठित आणि जमीनदार घराणे होते. अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे आईस्क्रीम व थंड पेयाची प्रसिद्ध दुकान होते. तसेच गिरण व्यवसाय होता. या समाजाच्या व्यक्तींनी ब्रिटीश काळात आणि त्यानंतरही न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रशासनात मोठी पदे भूषवली. हे लोक अत्यंत शिस्तप्रिय, सुशिक्षित आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होते.
​रेवदंडा येथील तळकर घराणे
घराणे हे शेती आणि बागाईतदार म्हणून ओळखले जाई. अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि स्थानिक मराठा व आगरी समाजाशी सलोख्याचे संबंध राखणारे म्हणून हे घराणे ओळखले जाते.
​बोरली आणि सागाव परिसरात राहणारे सागावकर घराणे हे धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असे. स्थानिक देवस्थानच्या उत्सवांना सढळ हस्ते मदत करणे आणि शिक्षण प्रसार करणे हे यांचे वैशिष्ट्य होते.
​इतर शिल्लक घराणी (बोरली, रोहा, नागाव, चरी, आवास, नवगाव येथे आहेत.
​आज या गावांमधून अनेक ज्यू कुटुंबे इस्राएलला स्थलांतरित झाली असली, तरी नागावकर, चौलकर, किहीमकर, पेनकर, भोनंगकर आणि अष्टमकर या घराण्यांच्या वास्तू, काही वयोवृद्ध वारसदार किंवा त्यांच्या जमिनी आजही तिथे अस्तित्वात आहेत.
​५. प्रार्थना स्थळे (सिनेगॉग) आणि त्यांची वैशिष्ट्ये
​बेणे इस्राएल समाजाच्या प्रार्थना स्थळाला ‘सिनेगॉग’ (Synagogue) किंवा मराठीत ‘मशीद’ किंवा 'प्रार्थना मंदिर' म्हटले जाते. अलिबाग तालुक्यात ज्यूंची प्राचीन प्रार्थना स्थळे आहेत.
इतिहास अभ्यासकांनी या संदर्भात जी माहिती असेल ती संकलित करण्यासाठी मदत करावी
ॲड. विलास नाईक.
 



 

अलिबाग जवळील ‘जेरुसलेम गेट’

 आपल्या महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणे आहेत जी बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात परंतु अश्या ठिकाणांची माहिती जाणून घेणे ते ठिकाण प्रत्यक्ष जाऊन बघणे आणि माहिती मिळविणे हे देखील आपल्याला फार महत्वाचे ठरते. अश्या ठिकाणांंच्यापैकी एक महत्वाचे ठिकाण अलिबाग येथील ‘नवगाव’ येथे आहे ते म्हणजे भारतामधील ‘ज्यू’ धर्मीय लोकांसाठी अत्यंत महत्वाचे स्थळ म्हणजे ‘जेरुसलेम गेट’. 

‘अलिबाग’ येथील समुद्रकिनारा सर्वदूर प्रसिद्ध आहे परंतु ‘अलिबाग’ पासून अगदी १० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘नवगाव’ येथे ‘ज्यू’ धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक ‘जेरुसलेम गेट’ आहे. तसे इतिहासामध्ये बघायला गेले तर ‘ज्यू’ लोकांचा भारताशी प्राचीन काळापासून व्यापाराचा संबंध होता. फिनिशियन लोकांच्या सोबत ‘ज्यू’ लोकं हे देखील व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये येत असे. हे ‘ज्यू’ लोकं व्यापाराच्या निमित्ताने प्राचीन सोपारा म्हणजेच आजचे नालासोपारा, चौल, आणि मलबार येथील बाजारपेठांना भेटी देत असत तसेच त्यांनी आणलेला माल देखील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकत असत. ‘बायबल’ किंवा जुन्या करारामध्ये ‘राजा हिराम’ याने ‘जेरुसलेम’ येथील साॅलोमनच्या मंदिरासाठी सागाचे लाकूड हे ‘शूर्पारक’ म्हणजेच नालासोपारा किंवा ‘ओफिर’ येथून मागवले होते याचा संदर्भ मिळतो. 

‘ज्यू’ धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक ‘जेरुसलेम गेट’

इ. स. १ ल्या शतकापासून इ. स. ६ व्या शतकापर्यंत ‘ज्यू’ लोकांचे भारतामध्ये येणे जाणे होते. या काळामध्ये व्यापाराच्या निमित्ताने काही ‘ज्यू’ लोकं हे भारतामध्ये केरळ किनारपट्टीवर कोचीन आणि जवळपासच्या भागामध्ये उतरले. त्यांच्या हुशार आणी तीव्र बुद्धीमुळे त्यांना केरळच्या तत्कालीन राजाने आपल्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाची शासकीय पदे देखील दिली. ‘ज्यू’ लोकांचे व्यापारामध्ये खूप चांगले लक्ष असल्याने मसाल्यांचा सर्व व्यापार हा ‘ज्यू’ लोकांच्या हातामध्ये होता. याच कालावधी मध्ये इ. स. ६ व्या शतकामध्ये जेव्हा धार्मिक जाचाला कंटाळून काही ‘ज्यू’ लोकं दोन जहाजांच्या मधून कोकणाकडे आली आणि दुर्दैवाने अलिबागजवळ ‘नवगाव’ येथे त्यांची जहाजे खडकावर आपटली यामध्ये बरेच ‘ज्यू’ लोकं मृत्युमुखी पडले.

या जहाजाच्या झालेल्या घटनेमध्ये सात पुरुष आणि सात स्त्रीया सुदैवाने वाचल्या आणि त्यांनी ‘नवगाव’ किनारपट्टीचा आसरा घेऊन ही कुटुंब त्याठिकाणी स्थायिक झाली. जहाजामधील ज्या स्त्री आणि पुरुषांना जलसमाधी मिळाली होती त्यांंचे मृतदेह या वाचलेल्या कुटुंबांनी एकत्र केले. या पाण्यात बुडून मेलेल्या ‘ज्यू’ लोकांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘नवगाव’ येथील स्थानिक लोकांनी लाकडे आणि अग्नीची व्यवस्था केल्यावर मात्र त्या १४ लोकांनी खाणाखुणा करत थांबायला सांगितलं आणि मृतदेह पुरण्याची परवानगी मागितली आणि ‘नवगाव’ येथे ‘ज्यू’ कबरी बांधल्या. याच कबरी आपल्याला ‘जेरुसलेम गेट’ येथे बघायला मिळतात. 

‘जेरूसलेम गेट’ येथे असलेला स्तंभ आणि त्याच्यावर असलेले मराठी, इंग्रजी आणि हिब्रू भाषेमधील माहिती.  

तसेच या ‘ज्यू’ लोकांनी तत्कालीन राजसत्ता यांनी देखील ‘नवगाव’ येथे राहण्याची परवानगी या ‘ज्यू’ लोकांना दिली. हळूहळू हा ज्यू समाज अलिबाग येथील किनारपट्टी ठाणे आणी मुंबई येथे स्थायिक झाला. महाराष्ट्रातील लोकांच्या सहकार्याच्या भावनेमुळे आणि सहिष्णू वृत्तीमुळे ‘ज्यू’ लोकं येथील संस्कृतिशी समरस झाले. या सर्व ज्यू लोकांनी नवगाव, अलिबाग, नागाव, किहीम, चौल, कोर्लई, आवास, रोहे, पेण या ठिकाणी वसाहती केल्या. तसेच या गावांच्या नावाप्रमाणे त्यांनी स्वतःची आडनावे घेतेली पेणकर, किहीमकर, चौलकर, कोर्लेकर, रोहेकर, आवासकर, भौगावकर अशी नावे त्यांनी स्वीकारली. तसेच या ‘ज्यू’ लोकांनी कोकणात आल्यावर आपला तेल गाळण्याचा  पूर्वापार व्यवसाय तसाच चालू ठेवला. ‘ज्यू’लोकं हे इतर लोकं शनिवारी आपल्या तेल विक्री व्यवसायाला सुट्टी देत असत म्हणून यांना ‘शनिवार तेली’ असे संबोधण्यात येत असे. हे ‘ज्यू’ लोकं उत्तम मराठी भाषा बोलतात. 

अश्या या ‘ज्यू’ लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थान असलेले ‘जेरुसलेम गेट’ आहे. ‘नवगांव’ किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या ‘बेने-इस्राएल’ म्हणजेच ‘ज्यू’ लोकांच्या पूर्वजांची ही दफनभूमी आहे. ‘अलिबाग’ जवळील ‘नवगाव’ येथून ‘बेने-इस्राएल’ लोकं संपूर्ण भारतभर पसरली आहेत. ‘जेरुसलेम गेट’ येथील दफनभूमी मध्ये  आपल्याला एक  स्तंभ  देखील बघायला मिळतो त्याच्यावर मजकूर पुढीलप्रमाणे:-

हिब्रू भाषेमध्ये असलेला स्तंभावरील लेख हा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही मध्ये आपल्याला पहायला मिळतो.

Here are buried the ancestors of the Bene-Israel community of India who were shipwrecked on the shores of Nawgaon nearly 2000 years ago. From Nawgaon the Bene-Israel community spread all over India. In the beginning they were engaged in oil pressing and agriculture. Later they took to small scale industry, the armed forces, and government services and attained the highest positions. They have been true citizens of India and have participated in the freedom movement of the country. With the establishment of the state of Israel in 1948 they have emigrated in large numbers to the state of Israel where they are happily settled.

तसेच मराठी मजकूर हा या इंग्रजी शिलेवरून ट्रान्सलेशन केलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-

दोन हजार वर्षांपूर्वी नवगाव किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या बेने-इस्राएल ज्ञातीतील पूर्वजांची ही दफनभूमी आहे. नवगावहून बेने-इस्राएल जात संपूर्ण भारतभर पसरली. प्रारंभी हे लोक तेल गाळणे व शेती हे व्यवसाय करीत. कालांतराने त्यांनी छोटे उद्योगधंदे, सेनादल, सरकारी नोकरी करून मोठे हुद्दे मिळवले. ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचे नागरिक असून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला होता. १९४८ च्या इस्राएल च्या निर्मितीनंतर त्यातील बहुसंख्य लोक इस्राएलला जावून आनंदाने राहत आहेत.

‘नवगाव’ येथे असलेल्या ‘ज्यू’ कबरी.

तसेच आपल्याला हिब्रू भाषेमध्ये देखील हा मजकूर बघायला मिळतो. असा हे ‘ज्यू’ लोकांचा महत्वाचा वारसा असणारे ‘जेरुसलेम गेट’ अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. ‘नवगाव’ येथील ‘जेरुसलेम गेट’ हे लवकरच जागतिक पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित केले जाणार आहे. ‘महाराष्ट्र’ आणि ‘इस्त्राईल’ यांच्या संस्कृतिचे प्रतिक हे ‘जेरुसलेम गेट’ आहे. दोन संस्कृती एकमेकांना किती चांगल्या प्रकारे मदत करतात याचे उत्तम उदाहरण असलेले ‘जेरुसलेम गेट’ हा महाराष्ट्राचा खूप महत्वाचा वारसा आहे. ‘नवगाव’ येथील ‘जेरुसलेम गेट’ याला भेट देऊन दोन संस्कृतीच्या संगमाचे हे प्रतिक असलेले ‘जेरुसलेम गेट’ नक्कीच भारताचा एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा आहे. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१. Gazeteer of Bombay Presidencey Bombay:-  Government Central Press, 1883.

२. Gazeteer of Bombay Presidencey Kolaba:- The Executive Editor And Secretary, Gazetteers Department, Government Of Maharashtra, Mumbai, 1883.

कसे जाल:-

पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – नवगाव. 


महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू


अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२ जून २०१६ रोजी दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षें वाट पाहत होता. स्वाभाविकच, तो समाज आनंदित झाला आहे. ते लोक महाराष्ट्रात खरोखरी अल्पसंख्य म्हणजे बारा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोन-चार हजारांच्या दरम्यान आहेत. पश्चिम बंगालने तेथील ज्यू लोकांना अल्पसंख्याक ही मान्यता दहा वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्यावेळी तेथे फक्त सत्तेचाळीस ज्यू नागरिक होते! महाराष्ट्र हे ज्यू धर्मियांना मान्यता देणारे भारतातील दुसरे राज्य आहे.

अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच, त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल.

महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी म्हणतात, की ज्यू धर्मीयांना तशी मान्यता या आधीच द्यायला हवी होती, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.

मात्र राज्य सरकारकडे त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही! जनगणनेच्या अर्जामध्ये त्यांच्यासाठी वेगळा रकाना (कॉलम) सुद्धा नसे, अधिकारी त्यांना सांगत, की ख्रिश्चन किंवा मुसलमान असे लिहा, त्यामुळे ज्यू धर्मीयांची खरी जनगणना होत नसे. महाराष्ट्रात१९६१ साली पंधरा हजार आठशेएक्कावन्न ज्यू नागरिक होते, तत्पूर्वी ती संख्या तीस हजारापर्यंत असावी. आता मात्र पश्चिम किनारपट्टीवर (मुख्यत: महाराष्ट्रात व केरळमध्ये) चार-साडेचार हजार ज्यू नागरिक असावेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यूंचे योगदान भरीव आहे. ज्यूंचे हे ‘अल्पसंख्याक’ होणे त्याला स्थलांतर हे कारण आहे; पक्षी एकामागोमाग एक उडून जावेत तसे येथील ज्यू नागरिक त्यांच्या धर्मदेशी, इस्रायलला निघून गेले आहेत. ज्यू लोक साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी - इसवी सनपूर्व ७३० मध्ये - पॅलेस्टाईनमधून स्वसंरक्षणाकरता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले. कथा अशी, की त्यांची जहाजे अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ या बंदरकिनारी बुडाली व त्यातून जे वाचले त्या सात-आठ जोडप्यांचे जे वंशज ते बेने-इस्रायली! त्यांचे वंशज महाराष्ट्रात दोन-अडीच हजार वर्षें नांदले. दुसरे जहाज दक्षिण किनाऱ्याला लागले. ते कोचीनला उतरले, ते कोचिनी ज्यू! बगदादहून स्थलांतरित झाले ते बगदादी ज्यू – ते कोलकात्यामध्ये स्थिरावले होते. ‘बेने इस्त्रायल’ या हिब्रू शब्दाचा अर्थ इस्त्रायलची लेकरे!

अपघाताने अलिबाग तालुक्यात आलेल्या निराधार लोकांना स्थानिकांनी आश्रय दिला. त्यांना तेल गाळण्याची कला अवगत होती. म्हणून त्यांनी गलबतांना लागणाऱ्या उंडीच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी विश्रांती घेत. म्हणून त्यांना ‘शनिवार तेली’ असे म्हटले जाई. त्यांनी मराठी भाषा स्वीकारली, ज्या गावात ते राहिले, त्या गावांची नावे त्यांनी स्वीकारली. म्हणून अष्टमीचे अष्टमकर, झिराडचे झिराडकर, चरीकर, मळेकर, रोहेकर, आवासकर अशी आडनावे त्यांच्यात आहेत. त्यांची प्रगती कान्होजी आंग्रे यांच्या काळात चांगली झाली. रायगड जिल्ह्यातील बेने-इस्रायली १७४६ मध्ये मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संख्या मुंबई-ठाण्यात वाढली. त्यांनी रायगड जिल्ह्याप्रमाणेच (कुलाबा जिल्हा) मुंबईतही त्यांची प्रार्थनामंदिरे बांधली. ते सुतारकामासाठी प्रसिद्ध झाले. स्त्रियांनी शाळेत शिक्षिका म्हणून नोकऱ्या पत्करल्या. मुंबईमध्ये भायखळ्याला ‘सर एली कदूरी’ ही शाळा ज्युईश मुलांसाठी सुरू झाली. त्यांचे स्वतंत्र कॅलेंडर प्रसिद्ध होऊ लागले. सण व इतर धार्मिक संस्कार मंदिरात (सिनेगॉग्ज) होऊ लागले, त्या लोकांनी मराठी साहित्यात, संगीत नाटक, किर्तने ह्यामध्ये योगदान दिले. मराठीमध्ये महाराष्ट्रात त्यावेळी बेने इस्रायली समाजाने बावीस लहानमोठी नियतकालिके चालवली. एडवीन रोहेकर, रेचल गडकर (अनुबंध- ग्रंथाली प्रकाशन), नाथान सातामकर, भाई बंदरकर यांनी नाटके, कादंबऱ्या लिहिल्या. बिनयामीन अष्टमकर हे हरिदासबुवा किर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. हिंदी, गुजराथी व ऊर्दू भाषेतही ज्यू समाजाचे योगदान आहे. बनी रुबेन, सिनेनट डेव्हिड, रिबेका रूबेन, डॉ. जेरूषा झिराड, निस्सीम इझीकेल, विजू पेणकर (भारतश्री), डॉ. ई. मोझेस ही आणखी काही प्रसिद्ध नावे! इझिकेल रोहेकर यांनी ज्ञानेश्वरीवर सलग आठ दिवस प्रवचने सोलापूर, अमरावती येथे दिली होती.

इस्रायलचे राष्ट्र १९४८ साली निर्माण झाल्यानंतर, जगातील अनेक देशांतील ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले. भारतात ज्यू समाजाला कोणता त्रास झाला नव्हता. ते सुखी व समाधानी होते. त्यामुळे त्या समाजातील फारच थोडे लोक १९४८ ते १९६० पर्यंत इस्रायलला गेले. इतकेच नव्हे तर तेथे गेलेल्या काही लोकांना परत भारतात यायचे होते म्हणून पंडित नेहरूंनी त्यांच्याकरता विमानही पाठवले होते. सुरुवातीला, जे १९४८ च्या आसपास गेले त्यांना राष्ट्रउभारणीसाठी फार कष्ट करावे लागले. बेने इस्रायलींचे स्थलांतर १९६४ नंतर मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात झाले. ते स्थलांतर मुख्यत्वे धर्मासाठी, मुले-नातेवाईक तिकडे गेले म्हणून किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घडून आले. मराठी भाषिक ज्यू मुख्यत्वे रामले, बेरशेवा, किर्यातगात, दिमोना या शहरांतून राहतात. इस्रायल सरकारने त्यांना घर, नोकरी अशा अनेक सुविधा पुरवल्या. अनेकांनी सैन्यातील सक्तीच्या शिक्षणामुळे इस्त्रायलसाठी लढाईत - अरब-ज्यू संघर्ष - भाग घेतला. इस्रायलच्या प्रगतीमुळे त्यांचीही आर्थिक भरभराट, कष्टाची कास धरल्यामुळे झाली. त्यांना हिब्रू भाषा शिकावी लागली. त्याबरोबरच वेश आणि खाणे-पिणे ह्यात बदल करावा लागला. आता ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते मराठी सर्व जगभर फिरतात; अनेक वेळा भारताला भेटी देतात.

ती मंडळी इस्रायलमधील सिनेगॉग्जमध्ये भेटू लागली. तेथे स्त्रीमंडळे निघाली, त्यातून तेथे महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना झाली. ते ‘१ मे’ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात; सर्वजण एकत्र जमून मराठी पेहराव, मराठी भाषा, मराठी जेवण आवर्जून करतात. मुंबईमधून गेलेला एखादा सांस्कृतिक कलाकार कार्यक्रम सादर करतो. तसेच, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे भारताचे राष्ट्रीय सणही साजरे करतात. फ्लोरा सॅम्युअल या उच्चशिक्षित स्त्रीने सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे ‘मायबोली’ मासिक चालवले, ते अजूनही चालू आहे. त्यांना मराठी भाषा, आपला गाव, आपले शेजारी ह्यांचा विसर पडलेला नाही. येलू पेणकर नावाचे नाटकवेडे मराठी वाचनालयही लूद या शहरी चालवत असत.

मराठी ज्यू-ज्येष्ठ नागरिक मुंबईत विमानतळावर उतरला, की त्याच्या मातापित्यांच्या गावाकडील कबरीवर मेणबत्ती लावण्यासाठी सर्वप्रथम तिकडे जातो. तो कबरस्थान सुव्यवस्थित राहण्यासाठी आर्थिक निधी देतो आणि मगच पुढे भारतभेटीला निघतो. मानवी आयुष्याच्या प्रेम, कष्ट, भावनांचा ओलावा, कर्तव्यनिष्ठा या साऱ्या गुणांचे तेथे दर्शन होते.

काही लोकांच्या वाडवडिलार्जित जमिनी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. जमिनीच्या किंमती अतोनात वाढल्यामुळे, दलाल ज्यांच्या नावावर सात-बाराचा उतारा आहे अशा इस्रायलमधील व्यक्तींचा शोध घेतात, त्यांच्या जमिनींची विक्री करून देतात. काही लोक ते पैसे इस्त्रायलमध्ये घेऊन जातात, तर काही उदार लोक तो पैसा महाराष्ट्रातील स्थानिक शाळांना, दवाखान्यांना दान करतात.

मूळ मराठी लोकांच्या इस्रायलमध्ये जन्मलेल्या पिढीचे लोकही भारतभेटीला येतात. त्यांना मराठी येत नाही तरी थोडेफार शब्द बोलतात, वडापाव-भेळ आवडीने खातात, बॉलिवूडच्या आकर्षणाने मुंबईत फिरतात, ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमामुळे शनिवार वाडा पाहण्यास मुद्दाम पुण्यास जातात.

माधव गडकरी ह्यांच्या प्रयत्नाने इस्रायलमध्ये ‘जागतिक मराठी अकादमी’चे अधिवेशन जेरुसलेम येथे १९९६ साली झाले. त्यावेळी ‘इस्रायल - माणूस आणि देश’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच सुमारास फ्लोरा सॅम्युअल ह्यांचे ‘संस्कृती संगम’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रेचल गडकर ह्यांचे ‘आम्ही भारतवासी बेने इस्त्रायली’ हे पुस्तक व ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञ’ प्रकल्पातून मी लिहिलेले ‘इस्त्रायलची मराठी लेकरे’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली. इस्रायलच्या मराठी स्थलांतरांची कहाणी, त्यांच्या व्यथा, त्यांची कर्तबगारी आणि त्यांचा आनंद सांगणारी ही तीन पुस्तके आहेत. त्यापूर्वी ‘छळाकडून बळाकडे’ हे इस्रायलची माहिती देणारे पुस्तक नाना पालकर ह्यांनी लिहिले होते. त्यानंतर इस्रायलवर काही पुस्तके प्रकाशित झाली, एक्झोडस (अनुवादित) – नीळकंठ देशमुख; २. शालोम इस्त्रायल – अभिजित वैद्य; 3. एक होती बाय (अनुवादित) – आपटे - राजहंस प्रकाशन, ३. जेरुसलेम ओ जेरुसलेम – निळू दामले; ४. छेडिता हृदय हे (अनुवादित) – उषा तांबे - राजहंस प्रकाशन, ५. विशेष पर्व (अनुवादित) – स्नेहा महाजन, ६. जेरुसलेम एक चरित्रकथा(अनुवादित) – सविता दामले - डायमंड पब्लिकेशन ही काही महत्त्वाची पुस्तके मराठीत आहेत.

लिऑन उरीसच्या कादंबऱ्यांचे अनुवादही मराठीत झाले आहेत. ‘शायली’ नावाचे मासिक ठाण्याहून ‘इव्हज् असोसिएशन’ तर्फे प्रसिद्ध केले जाते, ‘मक्काबी’ नावाचे मासिक भाई बंदरकर व त्यांचा मुलगा रेमंड बंदरकर ह्यांनी मिळून, सदुसष्ट वर्षें चालवले. ‘मक्काबी’ नुकतेच बंद झाले आहे.

महाराष्ट्रातील ज्यूंचे वर्णन ‘सूक्ष्मदर्शी अल्पसंख्यांक’ असे करता येईल. त्यांना नुकतीच मिळालेली तशी मान्यता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. ज्यू धर्मीय म्हणजे नेमके कोण ते महाराष्ट्रात माहीत नसते. कोणी त्यांना ख्रिश्चन समजतात. ज्यू समाजाचे मुंबईतील कुलाबा येथील ‘छाबाड हाऊस’ही २००८ साली झालेल्या २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात सापडले होते. त्यामुळे भारतात ज्यू आहेत असे अनेकांना कळले. भारतात त्यांची सिनेगॉग्ज आहेत, त्यांपैकी दहा मुंबईत आहेत, ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग येथे प्रार्थना मंदिरांच्या इमारती आहेत, पण तेथे स्थानिक ज्यू नसल्यामुळे प्रार्थनेसाठी दहा माणसे जमणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यांच्या ए.जे.डी.सी. आणि ओ.आर.टी. ह्या संस्था आहेत. ज्युईश मध्यवर्ती संस्था सुद्धा आहे. इस्त्रायलमधील सधन नागरिक येथील प्रार्थना मंदिरे सुस्थितीत राहवी म्हणून देणग्या देतात. कबरस्थानातून जागा अपुरी आहे. किप्पूर, रोश-हा-शाना आणि हान्नुका(या सणांच्या) सुट्ट्या मिळाव्यात अशी ज्यू समाजाची अपेक्षा आहे. अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ येथे स्मृतिस्तंभ आहे. खंडाळा या खेड्यामध्ये ‘येलिहाउहन्नाबी’च्या रथाच्या टापांचा खडक आहे. त्या स्थानांची निगा राखली जाईल असे स्थानिकांना वाटते. ‘सर एली कदूरी’ या एकेकाळी ज्युईश विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेत ना एकही शिक्षक ज्यू आहे ना विद्यार्थी ज्यू आहेत. मुंबईतील उरलीसुरली तरुण मुले इस्त्रायल भेटीसाठी जातात, तेथील जीवनशैली आणि झगमगाट, आर्थिक सुस्थिती पाहून इस्रायलला स्थलांतरित होतात. अल्पसंख्याक मान्यतेमुळे कदाचित महाराष्ट्रातील उरलेल्यांना अधिक सुरक्षितता, अधिक फायदे मिळतील व स्थलांतराचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वाटते.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांनी तेल अवीव येथे मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेथील युवकही महाराष्ट्राकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. ४ जुलै २०१६ रोजी, ‘तेल अवीव विद्यापीठा’त मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने त्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून सरकारने विजय तापस, कादंबरी भंडारी आणि सोनल गुजर ह्या तीन प्राध्यापकांना तीन महिन्यांसाठी इस्रायलला पाठवले आहे. ‘तेल अवीव विद्यापीठा’तील सव्वीस विद्यार्थी तेथे ‘ग म भ न’चे धडे घेत आहेत. पुढील पिढीमध्ये मराठी आणि महाराष्ट्र या त्यांच्या पूर्व भूमीतील भाषेविषयी, प्रदेशाविषयी औत्सुक्य व आत्मीयता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
  
ज्यू प्रार्थनेत, ‘आम्ही जेरुसलेमला विसरलो तर उजवा हाता कापा’ असे म्हणतो. मराठी ज्यू ‘आम्ही भारताला विसरलो तर दोन्ही हात कापून टाका’ असे सांगतो तेव्हा ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या ओळी आठवतात.






 कोकणची भूमी अन् ज्यू संस्कृतीचा अनोखा संगम: 'बेने इस्रायल' समुदायाचा रंजक इतिहास! 
ॲड. विलास नाईक...

​महाराष्ट्राची संस्कृती ही विविधतेने नटलेली आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. या मातीने जगभरातून आलेल्या अनेक संस्कृतींना आणि समुदायांना आपल्या कडेवर खेळवले आणि त्यांना आपलेसे केले. यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण, शांतताप्रिय आणि ऐतिहासिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण समुदाय म्हणजे 'बेने इस्रायल' (Bene Israel) अर्थात मराठी भाषिक ज्यू (Jewish) समाज!
​गेल्या दोन हजार वर्षांहून अधिक काळ हा समुदाय महाराष्ट्राच्या, विशेषतः कोकणच्या आणि अलिबागच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात इतका एकरूप झाला आहे की, त्यांच्या इतिहासाची पाने उलटताना या मातीची थोरवी अधिकच गडद होते.
🚢 कासाच्या खडकावरील तो अपघात अन् नवगावचा किनारा
​बेने इस्रायल समुदायाच्या मौखिक इतिहासानुसार आणि संशोधकांच्या मते, साधारणतः २००० वर्षांपूर्वी तत्कालीन रोमन शास्त्यांच्या छळाला कंटाळून हा ज्यू समुदाय इस्रायलमधून जहाजाने निघाला होता. भारताच्या पश्चिमेकडील प्रवास करत असताना अलिबाग आणि उरणच्या दरम्यान असलेल्या 'कासा'च्या खडकावर त्यांचे जहाज आदळले आणि फुटले.
​या भीषण अपघातातून केवळ सात पुरुष आणि सात महिला असे एकूण १४ जण जिवंत वाचले. ते अलिबाग जवळील 'नवगाव' च्या किनाऱ्यावर पोहोचले. नवगाव येथे या वाचलेल्या पूर्वजांचे दफनस्थान (Cemetery) आजची या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभे आहे. येथूनच बेने इस्रायल समुदायाचा भारतातील प्रवास सुरू झाला.
🚜 'शनिवार तेली' ते मराठी संस्कृतीशी नाळ
​कोकणात स्थायिक झाल्यावर या समाजाने स्थानिक कोळी आणि इतर बांधवांच्या सहवासात आपला उदरनिर्वाह सुरू केला. त्यांनी तेलबियांपासून तेल काढण्याचा पारंपारिक व्यवसाय स्वीकारला.
​ज्यू धर्मातील 'शब्बाथ' (Sabbath) या पवित्र नियमानुसार ते शनिवारी देवाच्या प्रार्थनेसाठी पूर्ण विश्रांती घेत आणि तेलाचा घाणा बंद ठेवत. यामुळे स्थानिक मराठी लोकांनी त्यांना 'शनिवार तेली' हे नाव दिले. ते मराठी भाषेतच बोलू लागले आणि त्यांची मराठी भाषा पुढे 'जुदाव मराठी' म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांनी त्यांच्या नावांमध्ये कोकणातील गावांवरून 'अष्टमकर', 'दिवेकर', 'तळेगावकर', 'माझगावकर' अशी मराठी आडनावे स्वीकारली, जी आजही कायम आहेत.
🎵 ज्यू अस्मिता आणि मराठी कीर्तन परंपरा!
​बेने इस्रायल समुदायाने मराठी संस्कृती स्वीकारताना आपली धार्मिक मूळे कधीच सोडली नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक 'कीर्तन' कलेचा वापर करून ज्यू धर्मग्रंथातील योसेफ, मोशे, डेव्हिड आणि राणी एस्तेर यांच्या कथा सांगायला सुरुवात केली. हारमोनियम आणि बुलबुल तरंगच्या तालावर ज्यू कीर्तनकार स्थानिक मराठी भाषेत पण हिब्रू शब्दांचा गोडवा आणून कीर्तने गातात. हा सांस्कृतिक सुवर्णमध्य खरोखरच थक्क करणारा आहे.
🏛️ अलिबाग-मुंबईतील सिनेगॉग्स आणि आधुनिक झेप
​१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा समुदाय अलिबाग आणि कोकणातील गावांमधून मुंबई आणि पुण्याच्या दिशेने स्थलांतरित झाला. ब्रिटिश लष्करातील सुभेदार सॅम्युअल हसाजी दिवेकर यांनी १७९६ मध्ये मुंबईत पहिले बेने इस्रायल सिनेगॉग (प्रार्थनास्थळ) 'गेट ऑफ मर्सिडीज' बांधले. अलिबाग, पेण, पनवेल, कोर्लई, मुरुड आणि पुण्यातही या समुदायाची सुंदर सिनेगॉग्स आजही त्यांच्या समृद्ध इतिहासाची ग्वाही देतात.
🌐 इस्रायलची निर्मिती आणि सद्यस्थिती
​१९४८ साली जेव्हा 'इस्रायल' हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले, तेव्हा भारतातील बहुसंख्य बेने इस्रायली समाज आपल्या मूळ मातृभूमीत स्थायिक होण्यासाठी तिकडे निघून गेला. आज इस्रायलमध्ये हजारो मराठी भाषिक ज्यू राहतात, जे तिथेही मराठी भाषा, पुरणपोळीचा बेत आणि महाराष्ट्राच्या आठवणी जपून आहेत. भारतात आजही मुंबई आणि अलिबाग परिसरामध्ये हा सलोख्याचा ज्यू समुदाय अत्यंत आदराने आणि मानाने वास्तव्यास आहे.
​कोकणच्या मातीने ज्यू संस्कृतीला दिलेला हा आडोसा आणि बेने इस्रायली बांधवांनी या मातीशी राखलेले इमान, हे जागतिक पातळीवर भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि विशाल हृदयाचे सर्वात मोठे उदाहरण आहे!







चौल आणि रेवदंडा (ज्याला आपण जुन्या काळात 'चौल चंपावती' म्हणायचो) या परिसराचा इतिहास खूप मोठा आणि रंजक आहे. हा इतिहास फक्त राजा-महाराजांच्या युद्धापुरता मर्यादित नसून, तो समुद्रावरून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी आणि इथल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. इथल्या मुस्लिम समाजाची जडणघडण कशी झाली, याबद्दलही बोलले पाहिजे.

​१. मूळ सुरुवात: दिल्लीवरून नाही, तर समुद्रावरून!
​एक मोठी गैरसमजूत अशी आहे की, इथला मुस्लिम समाज उत्तर भारतातून किंवा मुघलांच्या काळात आला. पण ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे खरे नाही.
​अरब व्यापारी: इसवी सनाच्या ७ व्या आणि ८ व्या शतकापासूनच पर्शियन आखात, येमेन आणि ओमानमधून अनेक अरबी आणि इराणी व्यापारी जहाजं घेऊन चौल बंदरात आले.
​स्थानिक राजांचा आश्रय: त्या काळी महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या राष्ट्रकूट आणि शिलाहार राजांनी या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी पूर्ण स्वातंत्र्य आणि आश्रय दिला.
​नवाइत किंवा कोकणी मुस्लिम: या अरबी व्यापाऱ्यांनी पुढे स्थानिक महिलांशी विवाह केले आणि इथेच संसार थाटले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना कागदपत्रांमध्ये 'नवाइत' किंवा 'कोकणी मुस्लिम' असं म्हटलं गेलं. म्हणजेच, यांचे पूर्वज प्रामुख्याने मध्य पूर्वेतील दर्यावर्दी आणि व्यापारी होते.
​२. राजकीय सत्ता आणि उलथापालथ
​काळाच्या ओघात चौल-रेवदंडा परिसरावर अनेक राजवटी आल्या आणि गेल्या:
​सुलतानी कालखंड: १३ व्या आणि १४ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुघलक यांच्या सैन्याचा इथे तात्पुरता प्रभाव होता. त्यानंतर बहमनी साम्राज्य आणि अहमदनगरची निजामशाही यांच्या काळात चौल हे पश्चिमेकडचं सर्वात श्रीमंत आंतरराष्ट्रीय बंदर बनलं.
​पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्य: याच काळात पोर्तुगीजांनी रेवदंडा (लोअर चौल) भागात आपला किल्ला आणि वसाहत बांधली, तर वरचा भाग (अप्पर चौल) निजामशाहीकडे होता. पुढे १६३६ मध्ये हा भाग आदिलशाहीत आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला. १७३९ मध्ये थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून रेवदंडा पूर्णपणे मराठा साम्राज्यात जोडला.
​३. व्यवसायावरून पडलेली अनोखी आडनावे
​इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्राशी जोडलेला असल्यामुळे त्यांची आडनावंही तशीच पडली. बॉम्बे गॅझेटियर आणि जुन्या दप्तरांमध्ये याचे स्पष्ट उल्लेख आहेत:
​तांडेल (तांडीत): जहाजाचे कप्तान किंवा प्रमुखांना 'तांडेल' म्हटले जाई, ज्याचा स्थानिक उच्चार 'तांडीत' असा झाला.
​तोंडेकर हाजी: जहाजावरून माल उतरवणारे किंवा व्यापारी जहाजांचे व्यवस्थापन पाहणारे लोक पुढे 'तोंडेकर' किंवा 'तोंडेकर हाजी' म्हणून ओळखले जाऊ लागले.
​गावांवरून पडलेली नावे: चौल आणि गुंडे या गावांवरून चौलकर आणि गुंडेकर अशी आडनावे पडली, जी आजही जमिनीच्या कागदपत्रांवर पाहायला मिळतात. याशिवाय काझी, जलाल, खोत, सय्यद आणि मुजावर ही घराणीही पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत.
​४. धार्मिक सलोख्याचे ऐतिहासिक पुरावे
​इथल्या राजांमधे आणि समाजात धार्मिक सलोखा कसा होता, याचे भक्कम पुरावे पेशवे दप्तरात मिळतात:
​मंदिरांना देणग्या: अहमदनगरच्या निजामशहाने चौलच्या प्रसिद्ध रामेश्वर मंदिराच्या पूजेसाठी आणि देखभालीसाठी जमिनीची सनद (इनाम) दिली होती. तसेच बहमनी काळात कनकेश्वर मंदिराच्या उत्सवासाठी महसुलातून 'होन' (सोन्याची नाणी) देण्याचे आदेश होते.
​दर्ग्यांना मदत: छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशवे शासकांनी चौलमधील प्रसिद्ध सुफी संत मलिक इब्न दीनार आणि पीर शहा हुसेन यांच्या दर्ग्यांसाठी आणि मशिदींसाठी दरवर्षी २५ ते ५० रुपयांची दिवाबत्तीची नेमणूक करून दिली होती.
​५. भाषिक आणि खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण
​शतकानुशतके एकत्र राहिल्यामुळे भाषा आणि खाण्यापिण्यात कमालीची देवाणघेवाण झाली:
​बोलीभाषा: आज चौलमधील मुस्लिम समाजाची बोलीभाषा पूर्णपणे मराठी व्याकरणावर आधारित आहे, फक्त त्यात कारखान (कारखाना), दफ्तर, नक्त (रोख), केंची (कात्री) आणि रुमाल यांसारखे अरबी-फारसी शब्द मिसळले आहेत.
​कोकणी खाद्यसंस्कृती: हा समाज उत्तर भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळा असून पूर्णपणे कोकणी मातीशी जोडलेला आहे. तांदळाच्या पिठाचा आणि नारळाच्या दुधाचा 'सांदण' हा त्यांचा पारंपरिक गोड पदार्थ आहे. तसेच चौलचा प्रसिद्ध 'खाजा' सणासुदीला बनवला जातो. माशांचे कालवण (तिखटले) आणि तांदळाची भाकरी हे त्यांचे मुख्य अन्न आहे, जे स्थानिक कोळी बांधवांसारखेच आहे.
​६. परदेशी प्रवाशांच्या नजरेतून चौल
​चौल किती समृद्ध होते, याचे वर्णन अनेक परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवले आहे:
​इब्न बतुता (१४ वे शतक): या अरब प्रवाशाने चौलचा उल्लेख 'सैमूर' असा केला असून, येथील मशिदी आणि मुस्लिमांच्या वैभवाचे कौतुक केले आहे.
​अफानासी निकितिन (१४७०): या रशियन प्रवाशाने लिहिले की, चौल बंदरात मध्य पूर्वेतून सैन्यासाठी शेकडो उत्तम जातीचे अरबी घोडे उतरवले जायचे.
​दुआर्ते बार्बोसा: या पोर्तुगीज प्रवाशाने चौलच्या जगप्रसिद्ध मलमल आणि सुती कापडाच्या व्यापाराचे सविस्तर वर्णन केले आहे.
​भौतिक पुरावे: आजच्या काळातही अप्पर चौलमधील निजामशाही काळातील शाही मशीद (जी हमीद खानने बांधली होती) इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून उभी आहे. उत्खननात सापडलेली बहमनी काळातील तांब्या-चांदीची नाणी (ज्याला स्थानिक भाषेत 'कास' म्हणायचे) आणि शिलालेखांवरील 'बंदर-ए-चौल' हा उल्लेख या इतिहासाची साक्ष देतो.

भारतात येणारा पहिला युरोपियन अफसानी निकितन :-

           भारत आणि रशियामधल्या नात्याची सुरूवात महाराष्ट्रातून झाली, असं सांगितलं, तर  विश्वास बसणार नाही. पण भारतात आलेला पहिला रशियन प्रवासी हा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर, रायगडच्या चौलमध्ये उतरला होता. त्याचं नाव अफनासी निकितिन.!  केपटाउनला वळॅसा घालून भारतामध्ये आलेला वास्को-द-गामा हा पहिला युरोपियन प्रवासी मानला जातो. त्याच्याही आधी २५ वर्ष अफनासी निकिता हा पहिला युरोपियन भारतात आला होता. निकितान उच्चविद्याविभूषित नसला तरीही त्याच्या आत्मचरित्रातून भारताच्या इतिहासातील कित्येक घटनांचे बंद दरवाजे उघडले  बहामनी सुलतान आणि विजयनगर साम्राज्यांच्या लढायांचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. मात्र याचे स्मारक आपल्या महाराष्ट्रातील अलिबाग जवळ रेवदंडा येथे उभारले आहे. अफनासीने आपले पहिले पाऊल अलिबाग जवळील चौल येथे टाकले त्यामुळे कोकणात त्याचे स्मारक उभारले आहे.  अफनासी निकितांची ओळख मात्र कोणालाच नाही   
         प्राचीन काळी व्यापार, अभ्यास, धर्मप्रसार या निमित्ताने अनेक जण आपले नशीब आजमावून पाण्याच्या दृष्टीने म्हणा इतर देशाचा सफारी करत असत. अर्थात वाहतुकीच्या मर्यादित सोयी साधनांमुळे  घोड्यावरून जाणे किंवा चालत जाणे याशिवाय विशेष पर्याय नव्हते. चोर दरोडेखोरांच्या त्रासाप्रमाणे आजारपण, खाणे यांची पंचायत होत असे. त्यातही काही उत्साही आणि धाडसी मंडळी व्यापार किंवा धर्मप्रसारार्थ बाहेर पडत आणि आल्यावर प्रवास करणे लिहून ठेवत असत. काळाच्या ओघात ही प्रवासवर्णने अजरामर झाली. युवान श्वांग मनूची यांच्या प्रवास वळणामुळे इतिहासातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टींचा उघडा झाला आहे. अफनासी निकीतान हा मध्ययुगीन रशियन त्यापैकीच एक.
अफनासी निकितिन        
अफनासी निकितिन हा एक रशियन व्यापारी होता. त्याचा जन्म १४३३  साली रशियाच्या त्वेर शहरात झाल्याचं बहुतांश रशियन सरकारी माध्यमांतील रिपोर्ट्स सांगतात. भारतात येण्याआधीच्या अफनासीच्या आयुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यानं इथे यायचा निर्णय का घेतला असावा, याविषयी अंदाज बांधता येतो. त्याकाळी टव्हेर ही रशियातली एक मोठी व्यापारी पेठ होती आणि तिथले व्यापारी युरोपात, मध्य आशियात दूरवर प्रवास करण्याचं धाडस करायचे. अफनासीही तसाच व्होल्गा नदीतून प्रवासाला निघाला. इ.स १४६६ ला जेव्हा मास्को जवळील २०० किलोमीटर अंतरावरील झ्वार प्रांत सोडून तो प्रवासाला निघाला त्यावेळी आपण अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होणार आहोत याची त्याला कल्पनाही नव्हती. खरंतर तो प्रवासाला निघण्यापूर्वी एक अतिसामान्य व्यापारी होता
नकाशाअफनासी निकितिनच्या प्रवासाचा मार्ग

     टव्हेर जवळच्या रीडमर येथील एका चर्च पासून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याचा प्रवास सुरू झाला. पण तार्तार टोळ्यांच्या लुटारूनी मध्येच तुफानी हल्ला चढला आणि त्याला पूर्णपणे धुतले. त्यात अफनासी निकितानचे  कपडेही लुटले गेले त्यातूनही कसेबसे पुढे गेल्यावर या कफल्लक लोकांचे दुर्दैव पुन्हा पुढे आले. कॅस्पियन समुद्रातील मोठ्या वादळाला तोंड द्यावे लागले. निसर्गाच्या रौद्र रूपाला तोंड न देऊ शकल्यामुळे त्यांचे गलबत फुटले. कसेबसे प्रयत्न करून ही मंडळी व्यापाराच्या दिशा शोधण्याऐवजी जीवाचा न करता शिपोनला अझरबैझानला पोहचले. अझर बैझान हा कॉकेशियन पर्वतरांगातील एक भाग.
 अफनासी हाताश झाला नाही. गलबत फुटले होते, संपत्ती तुटली गेली होती, कपडे फाटले होते. ध्येय पार करण्यासाठी हातात ना वस्तू होती ना पैसा. अफसानी निराश झाला नाही सोबतच्या काही बदमाश व्यापाऱ्यांनी त्याला फसवले.मात्र सोबतची मंडळी कंटाळली. त्यांनी आणखी फिरायला विरोध केला. तरीही अफनासीने कोण सोबत येत आहे याची वाट न पाहता इराणची वाट धरली. जाताना बाकु, तरूम या वाटेने तो हॉरमुझ बंदरात गेला. हॉर्मुझ येथील कडक उन्हाळा तो कंटाळला. आपल्या प्रवास वर्णनात तो लिहितो की येथे माणूस भाजून जाईल. त्या ठिकाणी तो महिनाभर राहिला. नंतर तो मस्कतला गेला तिथे त्याला कळले की भारतात अरबी घोड्यांना मागणी आहे  भारतात चांगल्या जातीचे घोडे मिळत नाहीत.त्याच्यातील व्यापारी जागा झाला. एका अरबी धाब्यावरुन उत्तम अरबी घोडे घेऊन तो भारतात नशीब अजमण्यासाठी निघाला. हिंदी समुद्र पार करून भारतात येण्यासाठी एका गलबतात विक्रीसाठी घेतलेले घोडे भरून त्याने प्रवास सुरू केला. सहा आठवड्याने जेव्हा त्याचे गलबत चौल येथे लागले. अतिशय कष्टप्रद वातावरणात  प्रवास करत तो तीन वर्षांनी भारतात पोहोचला. व्यापार उदीमाच्या उत्तम संधी शोधण्याच्या महत्त्वाकांक्षेने तो प्रवास करत होता.  या प्रवासातले अनुभव निकितिननं नोंदवून ठेवले आहेत. त्यातूनच त्या काळातील प्रवासाचे मार्गही कळतात. अफनासीनं लिहिल्यानुसार त्यानं आधी रशियाच्या व्होल्गा नदीतून कॅस्पियन समुद्रापर्यंत प्रवास केला. या वाटेत दोनदा निकितिनला लुटारूंनीही हिसका दिला. त्याच्यासोबतचे काहीजण मागे फिरले. पण निकितिन पुढे सरकत राहिला. कॅस्पियन समुद्रातून त्यानं इराण म्हणजे तेव्हाच्या पर्शियात पाऊल ठेवलं आणि पुढे होर्मुझवाटे अरबी समुद्रातून प्रवास करत तो भारतात दाखल झाला.
अफनासीची बोट आधी दीवजवळ आणि मग गुजरातमध्ये खंबाटच्या आखातात पोहोचली. तिथे त्यानं नीळ खरेदी केली, जिला रशियात मोठी मागणी होती. तिथून अफनासी मग बोटीनं चौल बंदरात आला.  कुंडलिका नदीच्या खाडीकाठी चौलमध्येच त्यानं भारतीय भूमीवर पहिल्यांदा पाऊ ठेवल्याचं काहीजण मानतात. फक्त एक घोडा, एक डायरी आणि भारतात जाण्याची तीव्र इच्छा घेऊन हा माणूस इथे आला होता. ते वर्ष होतं १४६९ म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या मृत्यूनंतर साधारण १७२ वर्ष आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या साधारण १६२ वर्ष आधी.
अफनासी निकितिन      त्या काळातला महाराष्ट्र म्हणजे दख्खनचा प्रांत कसा होता? तिथले लोक, विशेषतः स्त्रिया कशा होत्या याचं दर्शन अफनासी निकितिनच्या लिखाणातून घडतं. अफनासी फक्त चौलमध्येच थांबला नाही, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतही फिरला. चौलला आला तेव्हा तो कफल्लक झाला होता. भारतात आल्यानंतरही त्याची वाटचाल मनोरंजक झाली. 
चौल येथील भारतीय संस्कृती वातावरण पाहून ही चक्रावून गेला, आत्तापर्यंत त्याने भारताबद्दल ऐकले होते. त्यापेक्षा हे कितीतरी अराकलीय आणि अद्‌भूत बाटत होते.चौलला पोहोचल्यावर त्याला भारतीय लोकांमधील फरक लगेच दिसून आला. आपल्या डायरीत तो लिहितो :
"इथे लोक उघडेच राहतात. त्यांचं डोकं झाकलेलं नसतं, छाती उघडी असते, केसांची एक वेणी बांधतात. इथे सगळेजण अनवाणी असतात.
"इथे श्रीमंत व्यक्ती डोक्याला कापड बांधतात, खांद्यावरून एक कापड घेतात आणि दुसरे कापड कमरेभोवती गुंडाळतात; येथील स्त्रिया फक्त कमरेला कापड गुंडाळतात.बायकांनी फेस नीट विधरून बांधलेले आहेत. बहुतेक विवाहित बायका लहान मुलांना कडेवर घेऊन फिरत असतात. 
"इथले स्त्री पुरुष काळ्या रंगाचे आहेत. मी कुठेही गेलो, की गोरा रंग पाहून त्यांना अप्रूप वाटतं."
रशियातून आलेल्या व्यक्तीसाठीही हे सगळंच नवं होतं, याची जाणीव अफनासीचं लिखाण वाचताना होते. चौलहून अफनासी पुढे आपला घोडा घेऊन पाली मार्गे जुन्नरला गेला. या प्रवासासाठी त्याला जवळपास पंचवीस दिवस लागले. जुन्नरविषयी तो लिहितो,
"इथे चार महिने दिवसरात्र पाऊस आणि चिखल असतो. हे शहर खडकाळ भागावर वसलेलं असून, त्याला कुठली संरक्षक भिंत नाही." 
रेवदंडारेवदंडा-चौलचा किनारा
 
      चौलला उतरल्यावर पुढची काही वर्षे त्याने पश्चिम आणि मध्य भारत संपूर्ण पायी फिरून बघत घालवला. तीन वर्षाच्या काळात तो अलिबाग होऊन जुन्नर, दक्षीण महाराष्ट्र ,गुलबर्गा ,विजयनगर इत्यादी विभाग फिरला आणि त्यानंतर त्याने रशियाला परतण्याचे ठरवले. जवळजवळ तीन वर्षे तो भारतात होता त्यावेळी पाहिलेल्या अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी त्याने टिपून ठेवल्या आहेत. भारतीय प्रवासाच्या अनुभवाचा व्यापारी फायदा उठवायला त्याला संधी मिळाली नाही भारतातील वैशिष्ट्यपूर्ण खाणे त्याला खूपच आवडले. संपत्ती वैभव पाहून त्याचे डोळे दिपून गेले तर गरिबी व जातीयता पाहून त्याला धक्काच बसला.
           जुन्नर मध्ये नांगरण्यासाठी येणाऱ्या पद्धतीचे त्याने सविस्तर माहिती दिली आहे बिदर मधील जरी काम पाहून तो अचंबित झाला आपल्या प्रवासवर्णनात त्याने उच्चकुलीन राजघराण्याची  गरीब पीडितांचे शोषण करण्याच्या वृत्तीवरती ताशेरे ओढले आहेत. तो म्हणतो ही भूमी दाट लोकसतीची आहे गावकरी सर्वत्र गरीब आहेत. पण जहागीरदार सावकार मंडळी मजेत वावरत असतात. कधी महत्त्वाच्या कार्यक्रमाला हे लोक चांदीच्या पालखीतून निघाले की पुढे सोनेरी  लगाम आणि भरजरी पेहराव असलेले १५ ते २० घोडे त्यापाठी ३०० घोडेस्वार, पाचशे लोकांचे पायदळ, दहा तुतारीवाले, १९ ताशे वाजवणारे तर दहा समईवाले असत. अफसानी  निकितान बारीक-सारीक गोष्टी लिहून ठेवत असे.घु घु आवाज करणाऱ्या पक्षापासून ते पवित्र कामे करणाऱ्या उजव्या हातानेच करायच्या भारतीय पद्धतीपर्यंतच्या सर्व गोष्टी त्याने नमूद करून ठेवल्या आहेत. कधी रशियन भूमीची आठवण झाल्यावर त्यांनी लिहून ठेवले आहे की राहण्यासाठी सुरक्षित आणि सुबत्तॅसाठी हिंदुस्थान सारखी दुसरी भूमी नाही.
      जुन्नरचा एक किस्सा त्यानं लिहून ठेवला आहे. त्यानुसार तिथला सरदार असद खाननं निकितिनला एक अट घातली. 'इस्लामचा स्वीकार कर, तरच तुझा घोडा परत देईन. नाहीतर तुला दंड बसेल.'
     अफनासी संकटात सापडला. पण मग एका तुर्की मुस्लीम मंत्री मोहम्मद खोरासननं असद खानला दम भरला, की आपला धर्म असा दुसऱ्यांवर लादू नये. मोहम्मदनं अफनासीची सुटका केली आणि पुढे दोघांमध्ये त्यानंतर मैत्रीचं नातं निर्माण झालं.  या घटनेने तो इतका घाबरला की त्याने पुढील प्रवासवणात लिहून ठेवले की भारतात येऊन राहायचे असेल तर आपली श्रद्धा, भक्ती रशियालाच ठेऊन यावी. प्राणाहून जपत मोठ्या मुश्किलीने आणलेल्या घोड्यांना त्याला पाहिजे तसा काही भाव मिळाला नाही. उलट घोड्याच्या देखभालीचा जादा खर्च होऊ लागला. इथल्या महागाईला तो कंटाळला. घरच्या आठवणीने तो खचून गेला. ईस्टर आणि ख्रिसमस सारखे सण त्याला चार वर्षात साजरे न करता आल्यामुळे वाईट वाटू लागले शेवटी तो कंटाळून पुन्हा गजबजाटाने भरलेल्या दाभोळ बंदरात आला आणि होर्मोझ बंदरात जाण्यासाठी दोन मोहरांचा सौदा ठरवला.  तो हा त्याचा सौदा दुर्दैवी ठरला. भारतात तीन ते चार वर्ष उष्ण हवामानाचे सवय झाल्यानंतर रशियन थंड वारे आणि  हवामान त्याला मानवले नाही. तो आजारी पडला आणि त्यातून तो बाहेर पडू शकला नाही
  प्रवासात तो आजारपणाने हैराण झाला अखेर काळी समुद्रधुनी पार करून टव्हेर गाठण्यापूर्वीच २०० किलोमीटर अलीकडे त्याचे निधन झाले. माय भूमीवर पोहोचण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले नाही. आपले प्रवास वर्णन लोकापर्यंत पोहोचण्याचे भाग्य काही त्याला मिळाले नाही परंतु तो ज्याठिकाणी मृत्यूमुखी पडला तेथील अशिक्षित रशियन हुशार होते त्यांनी ते प्रवास वर्णन जवळच्या एका धर्मस्थळात ठेवले.
   त्यानंतरचा चारशे वर्षाचा काळ उलटला सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ करमझीनला मास्को जवळील एका जुन्या पुराण्या मठाच्या ग्रंथालयात निकितांनचे दुर्लक्षित, काळाच्या पडद्याआड गेलेले हस्तलिखित मिळाले  आणि इतिहासातील काही दुर्मिळ घटनांना उजाळा मिळाला. करंमझीनने या हस्तलिखिताचा पूर्ण अभ्यास केला. रशीयन भाषेत टिपणे काढली. १८२१ मध्ये त्याने या संकलनाचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. एवढ्या जुन्या लायब्ररीत हा महत्त्वाचा दस्तावेज इतकी वर्ष टिकला कसा हेही नसे थोडके.
      निकितान काही उच्च विद्या विभूषित नव्हता त्याचे प्रवास वर्णन त्याच्या कुवतीच्या मनाने ठीक आहे. पण तरीदेखील भारतीय इतिहासातील कित्येक न उघडलेल्या गोष्टींचा शोध लागला आहे. कित्येक तर्क खरे ठरले आहेत. कित्येक घटनाचा कालक्रम ठरवणे शक्य झाले आहे. त्याने बहामनी सुलतान आणि विजयनगर साम्राज्य यातील लढाईची संपूर्ण माहिती सविस्तर लिहून ठेवली आहे.
आज वास्को दि गामाला समुद्र मार्गे भारतात पोचलेला पहिला युरोपियन म्हणून ओळखले जात असले तरीही वास्को दि गामापूर्वी सुमारे २६ वर्ष  आधी समुद्रमार्गे जहाजातून भारतात पोहोचलेल्या या पहिल्या युरोपियन प्रवाशाकडे काळाच्या ओघात दुर्लक्ष झाले आहे हे खरेच .
निकितन अफनासी निकितिनचं रशियाच्या त्वेर शहरातील स्मारक

 अफसाने निकितांचे स्मृती जपण्याकरता मास्को ते ते पीटसबर्ग ट्रेनला त्याचे नाव देण्यात आले आहे तर टव्हेर गावी त्याचे एक सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे. त्याने लिहिलेले हे 'व्हॉयेज बिहांइड थ्री सीज'  हे प्रवास वर्णन रशियात एक संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासले जात आहेत
       अफनासीच्या मृत्यूनंतर गेल्या साडेपाचशे वर्षांत भारतात आणि रशियातही अनेक साम्राज्यांचा उदयास्त झाला. मग भारताच्या स्वातंत्र्यानंतर सोव्हिएत काळात निकितिनकडे भारत-रशिया मैत्रीचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. त्यातूनच १९५७ साली निकितिनची कहाणी सांगणारा चित्रपट, 'परदेसी' प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे भारतीय आणि सोव्हिएत रशियन कलाकारांचं 'जॉइंट व्हेंचर' होता.
दोन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नर्गिस, पृथ्वीराज कपूर, बलराज साहानी यांच्यासह अफनासीच्या भूमिकेत रशियन अभिनेता ओलेग स्ट्रिझनोव्ह झळकले होते. लता मंगेशकर, मन्ना डे, मीना कपूर यांनी त्यातली गाणी गायली होती.
    2002 साली रशियन दूतावासाच्या साथीनं चौलजवळ रेवदंडा इथे अफनासी निकितिनचं स्मारक म्हणून एक स्तंभ उभारण्यात आला. (रेवदंडा गाव मध्ययुगात चौलचाच भाग होतं.)
 चौल स्मारकरेवदंड्याच्या एसआरटी विद्यालयातील अफनासी निकितीनचं स्मारक

  रेवदंड्याच्या सरदार रावबहाद्दूर तेंडुलकर शाळेच्या प्रांगणात हा स्तंभ उभा आहे. दूतावासाशी संबंधित अनेक रशियन्स आणि इतिहास अभ्यासकांनी या भागाला भेट दिल्याचं शाळेतील शिक्षक सांगतात. रशियन कॉन्सर्टला भारतात आपले कार्यालय सुरू करून शंभर वर्षे होउन गेली. याचे औचित्य साधून रशियन कंसलेट तर्फे अफसाने निकितांचे योग्य स्मारक अलिबाग येथे उभारण्यात आले आहे. अलिबाग जवळील चौल येथे आपसाने निकितांचे पहिल्यांदा भारत भूमीवर पाऊल ठेवले त्यामुळे हे स्मारक उभारण्यास अलिबाग शिवाय उचित स्थळ कोणते असणार ?
 चौल स्मारकत्वेरमध्ये अफनासी निकितिनचं स्मारक व्होल्गा नदीकाठी आहे

निकितनअफनासी निकितिनचं क्रायमियामधील स्मारक


    अफनासीच्या मायभूमीत, रशियाच्या त्वेर शहरात आणि क्रायमियाच्या फेडोशियामध्येही त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत. भारतात आलेला पहिला रशियन प्रवासी आफानी निकलीन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेवदंडा येथे स.रा. तेंडुलकर विद्यालय प्रांगणात रशियन सांस्कृतिक केंद्र व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेला स्मृतिस्तंभ
आयुष्याच्या अखेरपर्यंत निकितिन लिहित राहिला. त्याची ती डायरी काही वर्षांनी रशियातल्या एका मठात सापडली, तेव्हा निकितिनची कहाणी जगासमोर आली. एखाद्या रशियन व्यक्तीनं केलेलं भारताचं प्रवासवर्णन म्हणून रशियात या डायरीकडे पाहिलं जातं. खोझेनिया झा त्री मोऱ्या म्हणजे जर्नी बियाँड थ्री सीज किंवा तीन समुद्रांपलीकडचा प्रवास या नावानं ही डायरी ओळखली जाते, कारण निकितिननं कॅस्पियन समुद्र, अरबी समुद्र आणि काळा समुद्र अशा तीन समुद्रांमधून प्रवास केला होता.
      पंधराव्या शतकात असा प्रवास करून भारतात येणारा निकितिन एकटाच व्यापारी किंवा प्रवासी नव्हता. निकितिननंतर तीस वर्षांनी वास्को द गामानं कालिकतमध्ये पाऊल ठेवलं. पण निकितिनचं वेगळेपण त्यानं लिहिलेल्या विस्तृत प्रवासवर्णनातून दिसून येतं,  इतकी संकटं झेलून एक माणूस इतक्या दूर येतो, हे सगळं अनुभवतो आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागात जाऊन तो राहिला आहे, फिरला आहे. त्यामुळेच त्याचा प्रवास वेगळा होता. तो इथे राहिला, भारतातल्या सर्वसामान्यांमध्ये मिसळला. त्यानं ग्रामीण संस्कृती नोंदवून ठेवली. "त्यानं लिहिलं आहे, तुलना केली आहे ती रशियन दृष्टिकोनातून आहे. स्त्रियांविषयी लिहिताना तो लिहितो की त्या डोकं उघडं ठेवतात. कारण रशियात केस झाकण्याची पद्धत होती."
     त्या काळातल्या इतर युरोपियन व्यापाऱ्यांसारखं अफनासीला कुठल्या राजा महाराजांचं समर्थन किंवा शाही आधार नव्हता, तरीही तो इथे आला. यातूनच त्याला भारताविषयी असलेलं आकर्षण यातून दिसून येते. निकितिनची डायरी त्यावेळच्या भारताचं विशेषतः दख्खनचं चित्र मांडते. निकितिननं भारतात अनेक मुस्लीम आणि हिंदूंसोबत मैत्री केली, पहिल्यांदाच ताडीचा आस्वाद घेतला, फणसाची आणि साजूक तुपाची चव चाखली. भारतात घोड्यांऐवजी लोक गाई-बैलाला महत्त्व देतात, इथे हत्तीचे व माकडाचे तोंड असलेल्या देवता (गणपती आणि हनुमान) आहेत असं तो लिहितो. महत्त्वाचं म्हणजे त्या काळातल्या श्रीमंत आणि सामान्य लोकांमध्ये आढळणारी तफावत आणि समाजातील जाती-जातींमधला फरकही तो नमूद करतो. एका समाजाचे लोक दुसऱ्यासोबत खात-पीत नाहीत किंवा लग्न करत नाहीत असं निरिक्षण त्यानं नोंदवलं आहे.
"मुस्लिम राजवट असतानाही त्यांच्याकडे काही चांगुलपणा होता, हे सगळं आपल्याला तिथे जाणवतं. त्या काळातल्या सामूहिक जीवनातलं वेगवेगळ्या पंथांमध्ये सहअस्तित्वाचं चित्र तो मांडतो. हे आजच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे." अफनासी स्वतः एक श्रद्धाळू ख्रिश्चन होता आणि धर्म बदलण्याची सक्ती करण्यात आली, तेव्हा अस्वस्थ झाला. त्यावेळी त्यानं लिहिलंय, की इकडे यायचं असेल तर आपली श्रद्धा, धर्म तिथेच ठेवून यावी. पण एक बाजू हीदेखील आहे, की तो आपली श्रद्धा इथे टिकवूनही ठेवू शकला.    













चौल आणि रेवदंडा: परकीय आक्रमणे, सांस्कृतिक संकर आणि लोकजीवनावरील प्रभाव..

  ​महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील चौल (चेंबूल) आणि रेवदंडा ही केवळ गावे नसून, जागतिक इतिहासाचे आणि व्यापाराचे महाद्वार राहिलेली अत्यंत समृद्ध ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गेल्या दोन ते अडीच हजार वर्षांच्या इतिहासात या भूमीने अनेक आर्थिक, राजकीय आणि लष्करी आक्रमणे झेलली. सातवाहन, शिलाहार आणि यादव काळापासून ते अगदी पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी आणि डच लोकांपर्यंत अनेक परकीय शक्ती येथे व्यापार आणि सत्तेच्या निमित्ताने आल्या. या विविध आक्रमणांमुळे आणि प्रदीर्घ संपर्कामुळे चौलच्या मूळ संस्कृतीवर, भाषेवर, शेतीवर, वास्तुकलेवर आणि जनमानसाच्या मानसिकतेवर काय परिणाम झाले, याचा साद्यंत आणि अभ्यासपूर्ण आढावा खालीलप्रमाणे आहे.
​आर्थिक आक्रमणे, कालखंड आणि आक्रमक
​चौल हे एक नैसर्गिक बंदर असल्यामुळे जगातील प्रमुख व्यापारी शक्तींचे लक्ष नेहमीच या भागाकडे राहिले. येथील प्रमुख आर्थिक व राजकीय आक्रमणे खालील कालखंडांत झाली:
१. अल्पबल्द आणि अरब व्यापारी (८ वी ते १२ वी शतक): शिलाहार राजांच्या काळात चौलमध्ये मोठ्या प्रमाणावर अरब व्यापाऱ्यांचे आगमन झाले. हे प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचे आक्रमण होते, ज्याने स्थानिक व्यापारावर नियंत्रण मिळवले.
२. बहमनी आणि सुलतानी राजवट (१४ वी ते १५ वी शतक): मुघल पूर्व काळात आणि सुलतानी राजवटीत चौलवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून येथील महसूल आणि सागरी व्यापारावर आर्थिक कर लादण्यात आले.
३. पोर्तुगीज राजवट (१५०५ ते १७३९): चौल आणि रेवदंडाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आणि प्रभावी आक्रमण होते. पोर्तुगीजांनी १५०५ मध्ये येथे वखार स्थापन केली आणि १५२० च्या सुमारास रेवदंडा किल्ला (फोर्ट सेंट जेम्स) बांधून चौलच्या आर्थिक नाड्या पूर्णपणे आपल्या हातात घेतल्या. त्यांनी स्थानिक हिंदू जनतेवर धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आक्रमणे केली.
४. सिद्दी आणि डच लोकांचे प्रासंगिक हल्ले: जंजिऱ्याच्या सिद्दीने आणि डच व्यापाऱ्यांनीही या भागातील संपत्ती लुटण्यासाठी वेळोवेळी आर्थिक व लष्करी आक्रमणे केली.
५. ब्रिटिश राजवट (१८ वी ते २० वी शतक): मराठ्यांनी (विशेषतः कान्होजी आंग्रे आणि पेशव्यांनी) पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर काही काळ हा भाग मराठ्यांच्या ताब्यात होता, परंतु १८१८ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या भागावर आर्थिक नियंत्रण मिळवले.
​भाषा, संस्कृती आणि मानवी जीवनावरील परिणाम
​या परकीय आक्रमणांचा आणि प्रदीर्घ सहवासाचा स्थानिक हिंदू नागरिकांच्या जीवनपद्धतीवर आणि संस्कृतीवर गहिरा परिणाम झाला. पोर्तुगीज आणि सुलतानी राजवटीत जबरदस्तीने किंवा आर्थिक प्रलोभने दाखवून झालेल्या धर्मांतरामुळे स्थानिक लोकसंख्येत मोठे सामाजिक बदल झाले. यामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्कृतीचे घटक स्थानिक हिंदू चालीरीतींमध्ये मिसळले गेले.
​भाषेचा विचार केला तर, आजच्या चौल आणि रेवदंडा भागातील बोलीभाषेत पोर्तुगीज आणि अरबी-फारसी शब्दांची मोठी गुंफण पाहायला मिळते.
​पोर्तुगीज शब्दांचा प्रभाव: आपल्या रोजच्या वापरातील पाऊ (पाव), बट्टाटा (बटाटा), पगार (पोर्तुगीज: Pagamento), चावी (Chave), तिजोरी, कपाट, मेज (Mesa), तंबाखू, नाताळ हे शब्द पोर्तुगीज संस्कृतीतून स्थानिक मराठी भाषेत कायमचे रूजले.
​फारसी व अरबी शब्द: जमीन, महसूल, कागद, कचेरी, वकील यांसारखे न्यायालयीन आणि प्रशासकीय शब्द सुलतानी आणि मुघल काळातील आक्रमणांमुळे येथील भाषेत आले.
​वेशभूषा, पेहराव आणि खानपान पद्धतींमधील बदल
​परकीय आक्रमकांचा स्थानिक लोकांच्या कपड्यांवर आणि खाण्यापिण्याच्या पद्धतींवर लक्षणीय परिणाम झाला. मूळची चौलची संस्कृती ही सुती धोतर, उपरणे आणि चोळी-कासोटा नेसणारी होती. परंतु पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या संपर्कामुळे पेहरावात आमूलाग्र बदल झाले. पुरुषांच्या पेहरावात शर्ट, विजार (पॅंट) आणि कोट यांचा अंतर्भाव झाला, तर महिलांच्या वस्त्रप्रावरणांवर पाश्चात्त्य विणकाम आणि डिझाइन्सचा (उदा. लेस आणि नक्षीकाम) प्रभाव पडला.
​खानपानाचा विचार केला तर, आज आपण ज्याला कोकणी किंवा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानतो, त्यातील अनेक गोष्टी परदेशातून आलेल्या आहेत. पोर्तुगीजांनी भारतात आणलेला 'पाव' हा चौल-रेवदंडा भागातही लोकप्रिय झाला. याशिवाय, मासे आणि मांसाहार शिजवण्याच्या काही पाश्चात्त्य व गोवन पद्धती (उदा. व्हिंदालूचा सौम्य प्रकार किंवा व्हिनेगरचा वापर) ख्रिश्चन धर्मीयांच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीत आल्या.
​शेती, अवजारे आणि जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (राहाट पद्धती)
​कोकणातील वाडी आणि बागायती शेतीला परकीय तंत्रज्ञानाने समृद्ध केले. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी वापरली जाणारी 'लोखंडी किंवा लाकडी रहाट गाडगी' (Persian Wheel) हे तंत्रज्ञान मूळचे पर्शियन (इराण) आणि अरब जगतातून भारतात आले. सुलतानी कालखंडात आणि त्यानंतर पोर्तुगीज काळात या तंत्रज्ञानाचा वापर चौलच्या नारळी-सुपारीच्या वाड्यांमध्ये (बागांमध्ये) मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. यामुळे कमी श्रमात जास्त पाणी उपसणे शक्य झाले आणि बागायती शेतीचा विकास झाला. शेती कापण्यासाठी लागणारी काही विशिष्ट प्रकारची विळे, कोयते आणि जमिनीची मशागत करण्याची पद्धत यातही युरोपीय आणि अरब तंत्रज्ञानाचा मिलाफ पाहायला मिळतो.
​परदेशातून आलेली फळझाडे, शोभेची व फुलझाडे आणि त्यांचे शास्त्रीय विश्लेषण
​आज चौलची ओळख ज्या वनस्पतींमुळे आहे, त्यातील बहुतांश वनस्पती परकीय व्यापाऱ्यांनी आणि आक्रमकांनी इथे आणल्या आणि त्या येथील जमिनीत अशा रूजल्या की त्या मूळच्या परदेशी आहेत यावर विश्वास बसत नाही.
​१. हापूस आणि पायरी आंबा (Mangifera indica - संकरित प्रकार): आंबा जरी भारतीय असला, तरी आंब्यावर 'कलम करण्याची पद्धत' (Grafting Technology) पोर्तुगीजांनी जेशुइट पाद्र्यांच्या माध्यमातून चौल आणि गोव्यात आणली. पोर्तुगीज गव्हर्नर 'अफॉन्सो डी अल्बुकर्क' याच्या नावावरून 'अफॉन्सो' म्हणजेच आजचा 'हापूस' हा शब्द रूढ झाला. चौलच्या तांबड्या-काळ्या आणि दमट हवामानाच्या मातीत या कलमांनी उत्कृष्ट दर्जाचे फळ दिले.
२. काजू (Anacardium occidentale): हे झाड मूळचे ब्राझीलमधील (दक्षिण अमेरिका) असून पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि फळासाठी कोकणच्या किनारपट्टीवर आणले. चौलच्या मातीने या वनस्पतीला इतके आपलेसे केले की, आज काजू हे येथील प्रमुख नगदी पीक बनले आहे.
३. पेरू (Psidium guajava): हे फळही मूळचे उष्णकटिबंधीय अमेरिकेतून (सेंट्रल अमेरिका) पोर्तुगीजांमार्फत येथे आले. शास्त्रीय अभ्यासानुसार, कोकणातील दमट हवामान आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती पेरूच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल ठरली.
४. पपई (Carica papaya) आणि अननस (Ananas comosus): ही दोन्ही फळे मूळची दक्षिण अमेरिकेतील असून पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ती चौलच्या बंदरात आणली.
५. शोभेची व फुलझाडे: बोगनवेली (Bougainvillea) हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील फुलझाड, तसेच गुलमोहर (Delonix regia) हे मादागास्करमधून आलेले झाड आज चौलच्या घराघरांच्या अंगणात आणि रस्त्यांच्या कडेला पाहायला मिळते. या वनस्पतींनी येथील किनारपट्टीच्या हवामानाशी संपूर्ण अनुकूलन (Adaptation) साधले आहे.
​वास्तुकला, घरे, दारे-खिडक्या आणि वजन-मापे
​चौल आणि रेवदंडा येथील वास्तुकलेवर पोर्तुगीज आणि युरोपीय शैलीचा प्रचंड मोठा संस्कार झालेला आहे, ज्याला 'इंडो-पोर्तुगीज वास्तुकला' म्हटले जाते.
​घरांची रचना आणि खिडक्या: येथील जुन्या घरांना असणाऱ्या मोठ्या, कमानीदार खिडकीच्या चौकटी, लाकडी ल्युव्हर्स (झडपा असणाऱ्या खिडक्या) आणि काचेऐवजी वापरल्या जाणाऱ्या शिंपल्यांच्या चकत्या (Mother of Pearl shells - ज्या प्रकाश आत आणतात पण उष्णता रोखतात) या पोर्तुगीज पद्धतीच्या आहेत.
​प्लास्टर आणि रंगसंगती: घरांना दिल्या जाणाऱ्या भडक रंगसंगती (उदा. निळा, पिवळा, गडद लाल) आणि चुन्याचे गिलावे (Lime Plastering) करण्याची पद्धत युरोपीय वास्तुकलेतून आली आहे. डच आणि पोर्तुगीज वास्तूंचे अवशेष आजही रेवदंडा किल्ल्यात आणि स्थानिक ख्रिश्चन व हिंदूंच्या जुन्या वाड्यांमध्ये दिसतात.
​मंदिरे: चौलच्या प्रसिद्ध मंदिरांची (उदा. रामेश्वर मंदिर, शीतलादेवी मंदिर) पुनर्रचना करताना किंवा त्यांच्या दीपमाळा बांधताना स्थानिक मराठा आणि युरोपीय/सुलतानी कमानींच्या पद्धतींचा संकर झालेला दिसतो.
​वजन आणि मापे: व्यापारी आक्रमणांमुळे चौलमध्ये 'शेर', 'मण' या अरबी-फारसी वजन पद्धती आणि नंतर ब्रिटिश काळातील 'पाउंड' व 'आउंस' या पद्धती रूढ झाल्या. जुन्या व्यापारी घराण्यांमध्ये आजही या परदेशी मापांचे अवशेष आढळतात.
​मानशास्त्रीय आणि शारीरिक बदल व इतिहासतज्ज्ञांचे संशोधन
​प्रदीर्घ काळ आक्रमणांच्या सावटाखाली राहिल्यामुळे आणि विविध संस्कृतींशी संपर्क आल्यामुळे स्थानिक जनतेच्या मानसिकतेत एक प्रकारची 'सांस्कृतिक लवचिकता' (Cultural Resilience) आणि 'स्वीकारार्हता' निर्माण झाली. वेगवेगळ्या संस्कृतींना सामावून घेण्याची वृत्ती हा येथील मानसिकतेचा मुख्य भाग बनला. जबरदस्तीच्या धर्मांतरामुळे निर्माण झालेला मानसिक आघात (Historical Trauma) आणि त्यानंतर स्वतःच्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष, याने येथील लोकजीवनाला एक वेगळी धीरोदात्तता दिली.
​या संदर्भातील ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय अभ्यास अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी केला आहे:
१. मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) आणि डेक्कन कॉलेज (Deccan College, Pune): या दोन्ही नामांकित संस्थांच्या पुरातत्त्व विभागाने चौल येथे अनेक उत्खनने केली आहेत. डॉ. एच. डी. सांकलिया, डॉ. एम. के. ढवळीकर आणि डॉ. शं. बा. देव या इतिहासतज्ज्ञांनी चौलच्या रोमन, अरब आणि पोर्तुगीज संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
२. पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ): येथील इतिहास विभागाने कोकणच्या किनारपट्टीवरील परकीय प्रभावांचा आणि व्यापाराचा सखोल अभ्यास केला आहे.
३. अधिकृत पुस्तके आणि नोंदी:
​'Kolaba District Gazetteer' (कुलाबा जिल्हा गॅझेटियर) मध्ये चौल आणि रेवदंडाच्या आक्रमणांची आणि सांस्कृतिक बदलांची इत्थंभूत नोंद आहे.
​'Chaul: An Ancient Port on the West Coast of India' - डॉ. वि. ग. खोबरेकर आणि अन्य संशोधकांचे लेख.
​पोर्तुगीज दफ्तरखान्यातील (Goa Archives) नोंदींमध्ये चौलच्या आर्थिक आणि धार्मिक आक्रमणांचे अधिकृत पुरावे मिळतात.
​थोडक्यात सांगायचे तर, आजचे चौल आणि रेवदंडा हे परकीय आक्रमकांच्या खुणा स्वतःमध्ये बाळगूनही आपली भारतीय आणि कोकणी अस्मिता टिकवून ठेवलेले एक जिवंत ऐतिहासिक संग्रहालय आहे. येथील मातीने, भाषेने आणि माणसांनी परक्यांचे जे चांगले होते ते स्वीकारले, जे वाईट होते त्याला तोंड दिले आणि आज एक समृद्ध संमिश्र संस्कृती समोर आणली आहे.

  चौल-नागावचा ज्ञानसाठा: विद्वान ब्राह्मण घराण्यांचा ऐतिहासिक वारसा

​कोकण किनारपट्टीवरील चौल आणि नागाव ही गावे प्राचीन काळापासून 'विद्येची माहेरघरे' मानली गेली आहेत. येथील ब्राह्मण घराण्यांनी केवळ कोकणातच नव्हे, तर वाराणसी (काशी) आणि पुणे (पेशवे दरबार) येथेही आपली विद्वत्ता सिद्ध केली होती.
​१. कुलाबा गॅझेटिअर (१८८३) आणि दस्तऐवजांतील उल्लेख
​'गॅझेटिअर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी' (Vol. XI) मध्ये चौलच्या ब्राह्मणांचा उल्लेख 'अत्यंत कर्मठ आणि विद्वान पंडित' असा करण्यात आला आहे.
​दप्तरखान्यातील नोंदी: चौलच्या दस्तऐवजात प्रामुख्याने चित्पावन आणि कर्हाडे ब्राह्मण घराण्यांचा उल्लेख 'ग्रामोपाध्ये' किंवा 'धर्माधिकारी' म्हणून येतो.
​महत्त्वाची आडनावे: गॅझेटिअर आणि स्थानिक सनदांनुसार वैद्य, पुराणिक, जोशी, महाजन, साठे, निसळ, लिमये, दांडेकर आणि कानिटकर ही घराणे चौल-नागावच्या सामाजिक संरचनेत अग्रस्थानी होती.
​२. वेद अभ्यास आणि काशीशी असलेले नाते
​नागाव आणि चौलच्या ब्राह्मण तरुणांची परंपरा होती की त्यांनी 'वेदान्त' आणि 'व्याकरण' शिकण्यासाठी काशीला जावे.
​प्रमाणपत्र आणि पदव्या: काशीतून विद्या संपादन करून परतलेल्या विद्वानांना 'अग्निहोत्री' किंवा 'दीक्षित' या पदव्या मिळायच्या. नागावच्या वैद्य आणि पुराणिक घराण्यातील अनेक पूर्वजांनी काशीत जाऊन 'वेदरत्न' पदव्या मिळवल्याचे उल्लेख जुन्या हस्तलिखितात आढळतात.
​व्याकरण आणि न्याय: चौलचे 'वैद्य' घराणे व्याकरणाच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होते. आजही त्यांच्या वंशजांकडे काशीतून मिळालेली जुनी सनद आणि प्रमाणपत्रे पाहायला मिळतात.
​३. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आणि नागावचे ब्राह्मण
​शिवराज्याभिषेकाच्या (१६७४) वेळी गागाभट्टांनी देशभरातील विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित केले होते.
​नागावचे योगदान: ऐतिहासिक संदर्भांनुसार, राज्याभिषेकाच्या विधीसाठी नागावच्या विद्वान वेदमूर्तींना विशेष बोलावणे धाडले होते. यामध्ये नागावचे वैद्य घराणे आणि दांडेकर घराण्यातील विद्वानांचा समावेश होता असे मानले जाते.नागावातील बाळकृष्णभट्ट क्रमवंत हे काशी क्षेत्री असताना गागाभट्ट यांनी त्यांची मुंज केली होती. जेव्हा गागाभट्ट शिवराज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्यावर येणार असे त्यांना समजले तेव्हा हे बाळकृष्णभट्ट राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आवर्जून उपस्थित राहिले होते.
संदर्भ: रायगडची जीवनकथा, लेखक: शा. वि. आवळसकर.
​राजकीय सल्लागार: स्वराज्याच्या कारभारात चौलच्या 'चिटणीस' आणि 'जोशी' घराण्यांनी लेखनिकाचे आणि पंचांग शुद्धीचे काम पाहिले होते.
​४. देवळांचे पुजारी आणि धार्मिक व्यवस्थापन
​चौलमधील मंदिरांचे व्यवस्थापन पिढ्यानपिढ्या ठराविक घराण्यांकडे आहे:
​श्री रामेश्वर मंदिर: येथील पूजेचा मान प्रामुख्याने पुराणिक आणि जोशी घराण्यांकडे राहिला आहे.
​शीतलादेवी आणि सोमेश्वर: या मंदिरांच्या पुजारी घराण्यांचा इतिहास किमान ४०० ते ५०० वर्षे जुना आहे. पोर्तुगीज आक्रमणावेळी या घराण्यांनीच मंदिरातील मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवून धर्माचे रक्षण केले होते.
​५. शिलालेख आणि ऐतिहासिक पुरावे
​चौल आणि नागावमध्ये अनेक शिलालेख आढळतात जे ब्राह्मण घराण्यांच्या अस्तित्वाचा पुरावा देतात:
​नागाव शिलालेख (१३६५): यामध्ये स्थानिक ब्राह्मणांना दिलेल्या जमिनीच्या दानाबद्दल उल्लेख आहे.
​चौल हमामखाना जवळील अवशेष: येथे असलेल्या काही जुन्या समाधी आणि वृंदावनांवर ब्राह्मणी लिपीत कोरलेली नावे त्या काळातील विद्वत्तेची साक्ष देतात.
​६. संदर्भ ग्रंथ आणि स्रोत
​या इतिहासाची पुष्टी खालील ग्रंथांमधून होते:
​महिकावतीची बखर: उत्तर कोकणातील ब्राह्मणांच्या वसाहतींची सविस्तर माहिती यात आहे.
​विश्वेश्वर बेंद्रे लिखित 'कोकणचा इतिहास': यात चौलच्या विद्वत परंपरेचे विशेष प्रकरण आहे.
​शांडिल्य गोत्राचा इतिहास: नागावमधील काही घराण्यांच्या वंशावळी यात आढळतात.
​ऋग्वेदी ब्राह्मणांचा इतिहास: चौलच्या वेदरत्नांची माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ.
​७. सध्याची स्थिती
​आजही चौल आणि नागावमध्ये अनेक जुने 'वाडे' अस्तित्वात आहेत, जे या विद्वानांच्या अभ्यासाच्या जागा होत्या. विशेषतः नागावमधील 'वैद्य वाडा' आणि चौलमधील 'जोशी वाडा' हे आजही त्यांच्या पूर्वजांच्या वेदविद्येचा वारसा जपत आहेत.
चौल आणि नागावच्या ब्राह्मण घराण्यांनी केवळ धार्मिक विधी न करता, भाषेचा, व्याकरणाचा आणि इतिहासाचा अधिकृत पुरावा जतन केला आहे. 'काशी ते चौल' हा प्रवास या विद्वानांच्या ज्ञानाची व्याप्ती दर्शवतो.

 

चौलचे वैभव आणि बारा बलुतेदार:

ऐतिहासिक संपन्नता ते मुंबई-सुरत कडील स्थलांतराचा इतिहास
​महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील अलिबाग जवळील 'चौल' (चेऊल) हे केवळ एक ऐतिहासिक गाव नसून ते प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रगत संस्कृती आणि अद्वितीय हस्तकलेचे एक वैभवशाली केंद्र होते. आज चौलच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा आणि सामाजिक संरचनेचा सखोल अभ्यास इतिहास संशोधकांकडून सुरू आहे. उत्खननात सापडणारे अवशेष, जुने शिलालेख आणि ऐतिहासिक दाखले यावरून चौलच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे मिळतात. आजच्या तरुण पिढीला, पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना चौलचा हा अचूक इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा वारसा दस्तऐवज (रेकॉर्ड) स्वरूपात जतन केला नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा पाया आपण विसरून जाऊ. चौलचा इतिहास समजून घेणे म्हणजेच मुंबई बंदराच्या उदयाचा पूर्वइतिहास समजून घेणे होय.
​चौलच्या आर्थिक आणि सामाजिक समृद्धीचा मुख्य कणा म्हणजे तेथील 'बारा बलुतेदार' पद्धत आणि अठरापगड जातींचे कुशल कारागीर. चौलमध्ये आजही अस्तित्वात असलेल्या विविध 'आळ्या' (वस्त्या) जसे की सुतारवाडी, कुंभारआळी, शिंपीआळी, सोनारआळी हे या व्यवस्थेचे जिवंत साक्षीदार आहेत. त्या काळी या आळ्या केवळ जातींचे प्रतिनिधित्व करत नव्हत्या, तर ती विशिष्ट कौशल्यांची आणि उत्पादनांची स्वायत्त केंद्रे होती. प्रत्येक समाज आपापल्या पारंपारिक व्यवसायात अत्यंत निपुण व पारंगत होता. यामध्ये कुंभारआळीचे योगदान अद्वितीय होते. तेथील कुंभार मातीची अत्यंत सुबक आणि मजबूत भांडी बनवण्यात कुशल होते. मातीची भांडी बनवण्याची कला ही मुळातच प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, ज्याचे मूळ सिंधू संस्कृतीपर्यंत जाते. चौल हे जागतिक बंदर असल्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणावर चालायचा. आजही चौल परिसरातील काही जुन्या घरांमध्ये चिनी मातीची भांडी किंवा विशिष्ट रांजण (ज्याला स्थानिक भाषेत 'रांगण' म्हटले जाते) पाहायला मिळतात. या रांगणांवर चिनी किंवा तत्कालीन विदेशी लिपीत काही अक्षरे कोरलेली दिसतात. हे रांगण आणि भांडी मुळात परदेशातून जलमार्गाने चौल बंदरात आयात केली गेली होती आणि ती चौलच्या जागतिक व्यापाराची आणि संपन्नतेची प्रतीके आहेत.
​इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना या बलुतेदार व्यवस्थेचे मूळ स्वरूप आणि त्यातील विविध जाती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मध्ययुगीन महाराष्ट्रात, विशेषतः शिवकाळात आणि पेशवेकाळात, गावगाडा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी ही पद्धत उदयास आली. बलुतेदार म्हणजे गावाच्या शेतीशी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित सेवा पुरवणारे १२ व्यावसायिक समाज. या बलुतेदारांचे त्यांच्या कामाच्या महत्त्वावरून तीन प्रमुख वर्ग (कस किंवा ओळी) पडत असत:
​पहिली ओळ (थोरले कस): यामध्ये सुतार (लाकडी अवजारे आणि कोरीव काम करणारे), लोहार (लोखंडी हत्यारे आणि नांगर बनवणारे), चांभार (कातड्याच्या वस्तू व पादत्राणे बनवणारे) आणि महार (गावची सुरक्षा, वेशीचे रक्षण आणि न्यायनिवाड्यात महसूल व्यवस्था सांभाळणारे) यांचा समावेश होता. हे समाज शेती आणि गावच्या संरक्षणाचा मुख्य पाया होते.
​दुसरी ओळ (मधले कस): यामध्ये कुंभार (मातीची भांडी आणि रांजण घडवणारे), परीट किंवा धोबी (वस्त्रे स्वच्छ करणारे), न्हावी (हजामत आणि पारंपारिक वैद्यकीय/शस्त्रक्रियेचे प्राथमिक काम करणारे) आणि शेटे किंवा महाजन (बाजारपेठेची व्यवस्था पाहणारे व्यापारी) येत असत.
​तिसरी ओळ (धाकटे कस): यामध्ये जोशी (पंचांग पाहणारे व धार्मिक विधी सांगणारे), गुरव (मंदिराची पूजा आणि वाद्ये वाजवणारे), कोळी (पाणी भरणारे आणि जलवाहतूक सांभाळणारे) आणि माळी किंवा मांग (बागायतदार आणि दोरखंड विणणारे कारागीर) यांचा समावेश होता. (काही प्रांतात स्थानिक गरजेनुसार शिंपी किंवा सोनार यांचाही समावेश बलुतेदारांच्या भूमिकेत केला जाई).
​या व्यवसायांचे वंशपरंपरागत जातींमध्ये रूपांतर मध्ययुगीन काळात स्थिर झाले, कारण कामाचे कौशल्य पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबात जपले जात असे. चौलसारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारी नगरीत हे भेद केवळ धार्मिक नव्हते, तर ते श्रमविभागावर (Division of Labour) आधारित आर्थिक संरचनेचे भाग होते. प्रत्येक जातीचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आणि अधिकार होते, ज्यामुळे गावाला कधीही बाहेरील घटकांवर अवलंबून राहावे लागत नसे.
​काळाच्या ओघात ही वैभवशाली बलुतेदार व्यवस्था आणि कुशल कारागीर नामशेष झाले किंवा त्यांना स्थलांतर करावे लागले. चौलमध्ये एकेकाळी लाकडावर आणि पाषाणावर अत्यंत कोरीव व नाजूक काम करणारे कुशल सुतार व कारागीर होते. तसेच, या परिसरात रेशीम उद्योगाला (Silk Industry) सुवर्णकाळ लाभला होता. स्थानिक पातळीवर रेशमाच्या किड्यांचे संगोपन केले जायचे आणि त्यापासून उत्तम दर्जाचा रेशमी धागा तयार केला जात असे. येथील विणकर आणि कोष्टी समाज या धाग्यापासून अत्यंत तलम, मौल्यवान आणि जरतारी रेशमी वस्त्रे विणत असत, ज्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी होती. तसेच येथील सोनार समाज त्यांच्या कलाकुसरीच्या आणि शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध होता. परंतु, सतराव्या आणि अठराव्या शतकात पोर्तुगीज, सिद्दी आणि ब्रिटिश यांच्यातील संघर्षामुळे चौल बंदराची शांतता भंग पावली. पुढे ब्रिटिशांनी मुंबई बंदराचा पद्धतशीरपणे विकास करायला सुरुवात केली आणि व्यापार मुंबईकडे वळवला. ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई शहर वसवण्यासाठी आणि जहाजांच्या बांधणीसाठी कुशल कारागिरांची अत्यंत गरज होती. त्यामुळे इंग्रजांनी चौल, नागाव आणि अक्षी भागातील कुशल सोनार, विणकर, सुतार, लोहार आणि व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षा, सवलती आणि आर्थिक प्रलोभने देऊन मुंबई आणि सुरतच्या देशाने स्थलांतरित होण्यास भाग पाडले. यामुळे चौलमधील कारागीर वर्ग हळूहळू निघून गेला आणि तिथल्या समृद्ध आळ्या ओस पडल्या.
​चौलमधून स्थलांतरित झालेल्या या बलुतेदारांनी आणि विविध समाजाने मुंबईच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जुन्या मुंबईचा, विशेषतः गिरगाव, माहीम आणि काळबादेवी या भागांचा इतिहास तपासल्यास तेथे चौल परिसरातील अनेक कुटुंबांनी वस्त्या वसवल्याचे दिसून येते. या स्थलांतरामध्ये पाचकळशी समाज (ज्यांनी मुंबईतील नौकाबांधणी आणि वास्तू उभारणीत मोठे योगदान दिले), भानुशाली समाज (ज्यांनी व्यापारात आघाडी घेतली), क्षत्रिय कासार आणि खात्री समाज (जे कापड आणि धातूच्या भांड्यांच्या व्यापारात पारंगत होते) मोठ्या संख्येने मुंबईत स्थलांतरित झाले. या कुशल मंडळींनी गिरगाव आणि दक्षिण मुंबईच्या इतर भागांमध्ये स्वतःच्या वाड्या आणि मालमत्ता खरेदी केल्या, ज्यांच्या नोंदी आजही मुंबईच्या जुन्या भूमी अभिलेख (Land Records) दप्तरात उपलब्ध आहेत. या कारागीर आणि व्यापारी वर्गासोबतच चौलमधील अनेक उच्चविद्याविभूषित ब्राह्मण कुटुंबेही मुंबई व पुण्यात स्थलांतरित झाली. ही मंडळी केवळ कलेतच नव्हे, तर पूर्वीच्या काळी स्थानिक सत्तांच्या आणि मराठ्यांच्या सैन्यातही महत्त्वाची भूमिका बजावून गेलेली होती, ज्याचे थेट दाखले ऐतिहासिक पत्रांमध्ये मिळतात.
​चौल आणि नागाव परिसरातील जी घराणी मुंबई-पुण्यात स्थलांतरित झाली, त्यांनी पुढे जाऊन विविध क्षेत्रांत मोठी कीर्ती मिळवली. मुंबईत स्थलांतरित झालेल्या काही प्रमुख घराण्यांनी उद्योग, समाजकारण आणि बौद्धिक क्षेत्रात आपले नाव कमावले. या ऐतिहासिक स्थलांतराची आणि चौलच्या बलुतेदार व्यवस्थेची वस्तुस्थिती पूर्णपणे पुराव्यांवर आधारित आहे. ब्रिटिश सरकारने संकलित केलेल्या 'बॉम्बे गॅझेटियर' (कुलाबा जिल्हा, खंड ११ - १८८३) मध्ये चौल बंदराचा इतिहास, तेथील रेशीम उद्योग, विणकर समाज आणि त्यांचे मुंबईत झालेले स्थलांतर यावर सविस्तर आणि कायदेशीर नोंद आहे. याव्यतिरिक्त, 'पेशवे दप्तर' मधील महसुली दस्तऐवज आणि राजारामशास्त्री भागवत यांच्यासारख्या इतिहासकारांच्या टिपणांमध्ये चौलच्या बलुतेदारांच्या कौशल्याचा आणि लष्करी महत्त्वाचा स्पष्ट संदर्भ मिळतो. चौलच्या बारा बलुतेदारांचा हा इतिहास आणि त्यांचे मुंबई-सुरत कडील स्थलांतर हा केवळ एका विशिष्ट भूभागाचा इतिहास नसून, तो महाराष्ट्राच्या आर्थिक संक्रमणाचा आणि आपल्या पूर्वजांच्या अलौकिक कौशल्याचा जिवंत दस्तऐवज आहे.


कोकणचा सामाजिक मानबिंदू: चौकळशी व पाचकळशी समाजाचा सर्वांगीण इतिहास
​१. उगम, ऐतिहासिक संदर्भ आणि कोकण आगमन
​या समाजाचा इतिहास हा पराक्रम आणि कौशल्याचा संगम आहे. या समाजाचे मूळ उत्तर भारतात (प्रामुख्याने राजस्थान किंवा गुजरातचा काही भाग) असल्याचे मानले जाते. या समाजाचा कोकणातील प्रवेश हा प्रामुख्याने राजा बिंबदेव (बिंबशाह) यांच्याशी जोडलेला आहे.
​ऐतिहासिक कालखंड: इ.स. १२९४ च्या सुमारास जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने यादव साम्राज्यावर आक्रमण केले, तेव्हा राजा बिंबदेव आपल्या ६६ कुळांसह आणि राजपरिवारासह पैठणहून निघून उत्तर कोकणात आले. त्यांनी आपली राजधानी 'माहीम' (मुंबई) येथे स्थापन केली.
​महिकावतीची बखर: या ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आहे की, राजासोबत आलेल्या ६६ कुळांमध्ये क्षत्रिय योद्धा, वास्तुकला निपुण (पाचकळशी) आणि कृषी निपुण (चौकळशी) अशा विविध वर्गांचा समावेश होता. हे लोक सुरुवातीला सैन्यदलात होते, मात्र नंतर त्यांनी कोकणच्या सुपीक किनारपट्टीवर बागायती आणि गृहनिर्माणाचे कार्य स्वीकारले.
​२. समाजाची वैशिष्ट्ये आणि 'कळशी' संज्ञेचा अर्थ
​या समाजाला 'कळशी' हे नाव पडण्यामागे त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथांचा मोठा वाटा आहे.
​पाचकळशी समाज: यांना 'सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी' म्हटले जाते. त्यांच्या विवाह विधींमध्ये किंवा धार्मिक संस्कारांत 'पाच कलशांचे' पूजन अनिवार्य असते. हे लोक वास्तुकला, जहाज बांधणी आणि सुतारकामात अत्यंत निपुण होते.
​चौकळशी समाज: यांना 'वाढवळ' किंवा 'माळी' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या विधींमध्ये 'चार कलशांचा' मान असतो. अलिबागच्या परिसरात 'वाडी' (नारळ-सुपारीच्या बागा) विकसित करण्यात यांचा सर्वात मोठा वाटा आहे.
​३. भौगोलिक विस्तार आणि स्थानिक अस्तित्व
​कुलाबा (अलिबाग): अलिबाग तालुक्यातील चौल (चवल), नागाव, आक्षी, रेवदंडा, किहीम, आवास, थळ, मांडवा आणि वरसोली ही या समाजाची प्रमुख ठाणी आहेत.
​अन्य भाग: मुंबई (माहीम, दादर, प्रभादेवी), ठाणे, वसई आणि पालघर (केळवे-माहीम). पालघर परिसरात हा समाज 'वाडवळ' नावाने प्रसिद्ध असून तेथील केळीच्या बागांसाठी ओळखला जातो.
​४. ऐतिहासिक कालखंडातील योगदान
​मराठा व आंग्रे काळ: कानजी आंग्रे यांच्या आरमारात या समाजाचे मोठे योगदान होते. जलदुर्गांची दुरुस्ती आणि जहाजांच्या बांधणीत पाचकळशी समाजाच्या कारागिरांनी तंत्रज्ञान पुरवले, तर लष्करी रसद आणि किनारपट्टीच्या रक्षणात चौकळशी माळी समाजाने सक्रिय सहभाग नोंदवला.
​पोर्तुगीज काळ: रेवदंडा आणि चौल येथील पोर्तुगीज सत्ताकाळातही या समाजाने आपली धार्मिक ओळख टिकवून ठेवत कृषी क्षेत्रातील आपले वर्चस्व कायम राखले.
​५. चालीरीती, खाद्यसंस्कृती आणि पेहराव
​धार्मिक उत्सव: 'कान्होबा' (श्रीकृष्ण) हा या समाजाचा प्रमुख सण आहे. तसेच शिमगा (होळी), गणेशोत्सव आणि कार्तिकी एकादशी हे सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.
​खाद्यसंस्कृती: कोकणच्या भौगोलिक उपलब्धतेनुसार नारळ आणि मासे हे त्यांच्या अन्नाचे मुख्य घटक आहेत. नारळाच्या दुधातील रस्सा (पांढरा रस्सा), तांदळाची भाकरी आणि 'अळूची भाजी' ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
​पेहराव: पूर्वी पुरुष डोक्याला 'मुंडासे' किंवा 'पागोटे', अंगात बंडी आणि धोतर नेसत. स्त्रिया 'नऊवारी काष्टा' नेसत, जो वाडीतील कामासाठी अत्यंत सोयीचा असे. अंगावर 'बोरमाळ', 'नथ' आणि 'पाटल्या' हे पारंपरिक दागिने असत.
​६. समाजातील नामवंत व्यक्ती आणि कार्य
​या समाजाने साहित्य, समाजकारण आणि प्रशासनात अनेक रत्ने दिली आहेत:
​प्रशासकीय व कायदेतज्ज्ञ: या समाजातील अनेक व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयात आणि प्रशासकीय सेवांमध्ये उच्च पदे भूषवली आहेत.
​साहित्यिक: महिकावतीच्या बखरीचे अभ्यासक आणि अनेक स्थानिक इतिहासकारांनी या समाजाचा वारसा जगासमोर आणला आहे.
​स्वातंत्र्यसैनिक: अलिबागच्या स्वातंत्र्यलढ्यात या समाजातील अनेक युवकांनी सहभाग घेतला होता.
​७. घटनात्मक स्थिती (OBC दर्जा)
​महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, 'माळी' आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 'चौकळशी' व इतर पोटजातींना इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गात स्थान मिळाले आहे. केंद्रीय आणि राज्य सूचीमध्ये यांचा समावेश अनुक्रमांक १८२ वर आहे. यामुळे ग्रामीण भागातील या समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीची नवी दारे उघडली आहेत.
​८. सध्याची स्थिती आणि आधुनिक बदल
​आज हा समाज केवळ शेती किंवा बागायतीपुरता मर्यादित नसून, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर चमकत आहे. एकेकाळी 'रोटी-बेटी' व्यवहार वर्ज्य असलेल्या पोटजातींमध्ये आता मुक्तपणे विवाह संबंध होत आहेत, जे सामाजिक सुधारणेचे निदर्शक आहे. अलिबागमध्ये आजही त्यांची 'वाडी संस्कृती' आणि जुने 'वाडे' या समाजाच्या समृद्धीची साक्ष देतात.
राजा बिंबदेवाच्या सैन्यासोबत आलेला हा 'क्षत्रिय' योद्धा समाज कालांतराने भूमीचा रक्षक आणि बागायतदार बनला. अलिबागच्या आणि पर्यायाने कोकणच्या जडणघडणीत या समाजाचा घाम आणि बुद्धिमत्ता दोन्ही सामावलेली आहे. इतिहासाचे दाखले आणि आधुनिक प्रगती यांचा सुवर्णमध्य साधून हा समाज आजही आपले वेगळेपण टिकवून आहे.
राजा बिंब आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशी हा 1140 च्या सुमारास पैठण येथे आला, बाळकृष्ण सोमवंशी आणि यशवंतराव शीलाहार यांच्यात कलवा येथे युद्ध झाले
माहिम ही केळवे माहिम , महिकावतीच्या बखरी नुसार माहिम हे पालघर जिल्ह्य़ातील गाव आहे.
या बखरीत इतिहासाचार्य विका राजवाडे यांची प्रदीर्घ संशोधनात्मक प्रस्तावना माहितीपुर्ण आहे.
त्याकाळात महाराष्ट्र धर्म लयास गेला होता,लोक आपला कुळाचार विसरले होते.
ही ए आय मार्फत मिळवलेली संकलित माहिती आहे. यात ए आय चूक करू शकते, म्हणून आपण अशा संकलित माहितीचे एकत्रीकरण करून त्यातील तथ्य तपासून पाहत आहोत.. आपण यासाठी संशोधनात्मक सहकार्य करावे ही विनंती...




वाडवली समाजाच्या भाषेविषयी जरूर वाचावा असा मजकूर...




कोकणच्या मातीशी एकरूप झालेला अनोखा जनसमूह: बेणे इस्राएल (अलिबाग तालुक्यातील ज्यू समाजाचा ऐतिहासिक व सामाजिक प्रवास)
​..........
​महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर विविध जाती, जमाती आणि धर्म शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. या विविधतेतील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण, शांतताप्रिय आणि निष्ठावंत घटक म्हणजे 'बेणे इस्राएल' (Bene Israel) अर्थात कोकणचे ज्यू (Isreali) लोक. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा आणि पेण या तालुक्यांच्या किनारपट्टीने या समाजाला केवळ आश्रयच दिला नाही, तर त्यांना आपल्या संस्कृतीत असं काही सामावून घेतलं की, हे लोक संपूर्णपणे ‘मराठी’ झाले. जागतिक इतिहास आणि स्थानिक लोकश्रुती यांच्या संगमातून साकारलेला बेणे इस्राएल समाजाचा अलिबाग तालुक्यातील इतिहास अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी आहे.
​१. भारतात आगमन: नवगावची दुर्घटना आणि सुरुवातीचे वास्तव्य
​सुमारे २,२०० ते २,५०० वर्षांपूर्वी (काही इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व १७५ मध्ये, राजा अँटिओकसच्या जुलूमाला कंटाळून) पॅलेस्टाईन/इस्राएलमधून काही ज्यू कुटुंबे जहाजाने निघाली. प्रवासादरम्यान अरबी समुद्रात अलिबाग जवळील नवगाव (Nawgaon) किनाऱ्यापाशी प्रचंड वादळामुळे त्यांची बोट फुटली आणि ती तिथेच बुडाली.
​या भीषण अपघातातून केवळ ७ पुरुष आणि ७ स्त्रिया असे एकूण १४ जण सुदैवाने जिवंत वाचले. ते कसेबसे पोहून नवगावच्या किनाऱ्यावर आले. तिथेच त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका विस्तीर्ण जागेत मृतांवर अंत्यसंस्कार केले. ही जागा आज ‘नवगाव ज्यू स्मशानभूमी’ (Cemetery) म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, जिथे या समाजाच्या मूळ पूर्वजांची स्मारके (Monuments) आहेत. नवगाव येथे या घटनेची साक्ष देणारा एक भव्य स्मारक स्तंभही उभारण्यात आला आहे.
​२. गावाची नावे आडनावे म्हणून स्वीकारणे (उदाहरणे)
​सुरुवातीला या लोकांकडे कोणतीही पारंपरिक आडनावे नव्हती. परंतु, महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर त्यांनी स्थानिक मराठी संस्कृतीनुसार, ज्या गावात ते स्थायिक झाले, त्या गावाच्या नावापुढे 'कर' प्रत्यय लावून आपली आडनावे निश्चित केली. ही बेणे इस्राएल समाजाची जगात सर्वात आगळीवेगळी ओळख ठरली.
​वाकरूळकर: वाकरूळ गावचे रहिवासी
​तळकर / तळेकर: तळ(ता. मुरुड) किंवा तळे गावचे रहिवासी
​सागावकर: सागाव (बोरली जवळ) गावचे रहिवासी
​किहीमकर: किहीम गावचे रहिवासी
​नागावकर: नागावचे रहिवासी
​रोहेकर: रोहा गावचे रहिवासी
​अष्टमकर: अष्टमी (रोहा) गावचे रहिवासी
​चौलकर: चौल गावचे रहिवासी
​३. 'तेली' समाज किंवा 'शनिवार तेली' म्हणून उल्लेख का?
​स्थानिक आगरी, कोळी व अन्य समाजांत मिसळताना या निर्वासित लोकांनी उपजीविकेसाठी 'तेल गाळणे' (घणा चालवणे) हा व्यवसाय स्वीकारला. ते अत्यंत प्रामाणिकपणे शुद्ध तेल काढून विकू लागले.
​ज्यू धर्माच्या नियमानुसार, शुक्रवारी सूर्यास्तापासून ते शनिवारी सूर्यास्तापर्यंतचा काळ हा 'शब्बाथ' (Sabbath) म्हणजेच पवित्र विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी ते कोणतेही व्यावसायिक काम करत नसत, घणा पूर्णपणे बंद ठेवत आणि ईशान्येची प्रार्थना करत. शनिवारी पूर्ण सुट्टी ठेवून तेल गाळणारे तेल व्यावसायिक म्हणून कोकणातील स्थानिक लोकांनी त्यांना 'शनिवार तेली' असे नाव दिले. पुढे कित्येक दशके महसूल नोंदींमध्येही त्यांची हीच ओळख राहिली.
​४. अलिबाग तालुक्यातील प्रमुख घराणी व त्यांचे अस्तित्व
​आजही अलिबाग आणि आसपासच्या परिसरात काही नामांकित घराण्यांचे वंशज आणि त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत:
​अलिबागचे वाकरूळकर घराणे
​वाकरूळकर हे या भागातील अत्यंत प्रतिष्ठित आणि जमीनदार घराणे होते. अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे आईस्क्रीम व थंड पेयाची प्रसिद्ध दुकान होते. तसेच गिरण व्यवसाय होता. या समाजाच्या व्यक्तींनी ब्रिटीश काळात आणि त्यानंतरही न्यायव्यवस्था, लष्कर आणि प्रशासनात मोठी पदे भूषवली. हे लोक अत्यंत शिस्तप्रिय, सुशिक्षित आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होते.
​रेवदंडा येथील तळकर घराणे
घराणे हे शेती आणि बागाईतदार म्हणून ओळखले जाई. अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि स्थानिक मराठा व आगरी समाजाशी सलोख्याचे संबंध राखणारे म्हणून हे घराणे ओळखले जाते.
​बोरली आणि सागाव परिसरात राहणारे सागावकर घराणे हे धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असे. स्थानिक देवस्थानच्या उत्सवांना सढळ हस्ते मदत करणे आणि शिक्षण प्रसार करणे हे यांचे वैशिष्ट्य होते.
​इतर शिल्लक घराणी (बोरली, रोहा, नागाव, चरी, आवास, नवगाव येथे आहेत.
​आज या गावांमधून अनेक ज्यू कुटुंबे इस्राएलला स्थलांतरित झाली असली, तरी नागावकर, चौलकर, किहीमकर, पेनकर, भोनंगकर आणि अष्टमकर या घराण्यांच्या वास्तू, काही वयोवृद्ध वारसदार किंवा त्यांच्या जमिनी आजही तिथे अस्तित्वात आहेत.
​५. प्रार्थना स्थळे (सिनेगॉग) आणि त्यांची वैशिष्ट्ये
​बेणे इस्राएल समाजाच्या प्रार्थना स्थळाला ‘सिनेगॉग’ (Synagogue) किंवा मराठीत ‘मशीद’ किंवा 'प्रार्थना मंदिर' म्हटले जाते. अलिबाग तालुक्यात ज्यूंची प्राचीन प्रार्थना स्थळे आहेत.
इतिहास अभ्यासकांनी या संदर्भात जी माहिती असेल ती संकलित करण्यासाठी मदत करावी
ॲड. विलास नाईक.
 

 चौल: भारताचे विस्मृतीत गेलेले 'व्यापारी सुवर्णद्वार'

          ​महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेले चौल हे केवळ एक गाव नसून, ते प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील आशियातील सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रांपैकी एक होते. मुंबईचा उदय होण्यापूर्वी पश्चिम किनारपट्टीवर जे स्थान चौलचे होते, ते आज कल्पनेच्या पलीकडे आहे.​चौलच्या लोकसंख्येबद्दल आणि इमारतींबद्दल अनेक दंतकथा गॅझेटिअर आणि प्रवाशांच्या वर्णनानुसार:आहेत.  स्थानिक परंपरेनुसार चौलमध्ये ३६० मंदिरे, ३६० तलाव आणि अडीच लाख इमारती (घरे) असल्याचा उल्लेख येतो. अर्थात: इतिहासकार राजवाडे आणि गॅझेटिअरनुसार, 'अडीच लाख' हा आकडा अतिशयोक्ती असू शकतो, परंतु चौलचा विस्तार रेवदंडा ते आगरकोट आणि पुढे रोह्यापर्यंत पसरलेला होता हे निश्चित. त्या काळी चौलची लोकसंख्या कोणत्याही युरोपीय शहरापेक्षा जास्त होती. चौलचा पसारा इतका मोठा होता की, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी घोडेस्वाराला मोठा वेळ लागत असे.
       ​चौलवर अनेक आक्रमणे झाली. प्रामुख्याने १५७०-७१ मध्ये निजामशाहीच्या सैन्याने पोर्तुगीजांविरुद्धच्या युद्धात शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला होता. तसेच गुजरातच्या सुलतानांनीही या बंदरावर हल्ले केले होते. वारंवार होणाऱ्या युद्धांमुळे आणि पोर्तुगीज-मुस्लिम संघर्षात हे शहर अनेकदा आगीच्या भक्षस्थानी पडले. ​चौल (वरचे चौल): हे हिंदू संस्कृतीचे आणि व्यापाराचे केंद्र होते. येथे आजही हमामखाना, रामेश्वर मंदिर आणि ऐतिहासिक वाडे पाहायला मिळतात. ​आगरकोट (रेवदंडा): हा पोर्तुगीजांनी बांधलेला तटबंदीचा भाग होता. याची रचना युरोपीय पद्धतीची होती, ज्यात चर्च, सात मजली बुरूज आणि लष्करी छावण्या होत्या.
      चौलमधील 'अडीच लाख' इमारती ही केवळ अतिशयोक्ती नसून, त्या काळातील अफाट समृद्धीचे ते एक रूपक आहे. जरी आज तिथे केवळ अवशेष उरले असले, तरी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या विटा आणि पाण्याचे हौद आजही त्या महान महानगराची साक्ष देतात.

चौल – एक हरवलेली मंदिरनगरी

         आज चौल म्हटले की लोकांना रेवदंडा किल्ला, पोर्तुगीज चर्च किंवा समुद्रकिनारा आठवतो; पण या नगरीच्या मातीखाली एक विशाल हिंदू सांस्कृतिक वारसा दडलेला आहे. १२ शिवमंदिरे, ९ विष्णुमंदिरे, ८ गणपती स्थाने आणि असंख्य ग्रामदैवतांची परंपरा पाहता चौल हे कोकणातील एक महत्त्वाचे धार्मिक विद्यापीठ आणि तीर्थक्षेत्र असावे, असे इतिहास संशोधक मानतात. ही मंदिरे केवळ दगडातील वास्तू नव्हती; ती चौलच्या सामाजिक, व्यापारी आणि आध्यात्मिक जीवनाचे केंद्र होती. रायगड जिल्ह्यातील चौल हे फक्त पोर्तुगीज इतिहासासाठी प्रसिद्ध नाही… तर ते एकेकाळी ४० पेक्षा अधिक देवालयांनी नटलेले प्राचीन हिंदू नगर होते!  १८७६ साली डॉ. जे. गर्सन दा कुन्हा यांनी लिहिलेल्या ग्रंथात चौलमध्ये: सोमेश्वर, नागेश्वर, सिद्धेश्वर, अमृतेश्वर, केशव नारायण, सिद्धिविनायक, कालभैरव, हिंगुळजा… अशी अनेक देवस्थाने चौलच्या वैभवाची साक्ष देतात. आज यांपैकी अनेक मंदिरे हरवली आहेत… काहींचे फक्त दगडी अवशेष उरले आहेत… तर काहींची नावेच इतिहासात शिल्लक राहिली आहेत. पण या नोंदी सांगतात — चौल हे केवळ व्यापार बंदर नव्हते; ते कोकणातील एक मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते.
      इ.स. १८७६ मध्ये इतिहासकार "डॉ. जे. गर्सन दा कुन्हा","इतिहासकार" यांनी लिहिलेल्या Notes on the History and Antiquities of Chaul and Bassein या ग्रंथात चौलमधील प्राचीन हिंदू देवालयांची एक महत्त्वपूर्ण यादी दिलेली आहे. त्या यादीत चौलमध्ये एकूण ४१ पेक्षा अधिक देवालये, गणपती मंदिरे, भैरव स्थाने आणि ऋषींची आश्रमस्थाने असल्याचा उल्लेख आहे.
      त्या दस्तऐवजात विशेष उल्लेख आलेल्या मंदिरांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : यावरून चौल ही केवळ व्यापारी नगरी नव्हती, तर ती एक मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी होती, हे स्पष्ट होते.
चौलच्या मंदिरांची ही यादी पुढील ग्रंथात उपलब्ध आहे:
       Notes on the History and Antiquities of Chaul and Bassein लेखक – J. Gerson Da Cunha प्रकाशन वर्ष – १८७६ या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक ९९ च्या आसपास चौलमधील मंदिरांची यादी दिलेली आहे.
चौलमधील १२ शिवमंदिरे – मराठी भाषांतर

दस्तऐवजात दिलेली इंग्रजी/संस्कृत नावे आणि त्यांचे मराठी रूप पुढीलप्रमाणे:
Saciramesvara / Sacciramesvara सच्चिरामेश्वर
Somesvara सोमेश्वर
Hemesvara हेमेश्वर
Amritesvara अमृतेश्वर
Vaijayantha वैजयंतेश्वर
Cintalesvara चिंतलेश्वर / चिंतामणेश्वर
Nagesvara नागेश्वर
Muradesvara मुरडेश्वर
Haresvara हरेश्वर
Siddhesvara सिद्धेश्वर
Malesvara माळेश्वर
Kalesvara / Kalisvara काळेश्वर
ही सर्व नावे शिवाच्या विविध रूपांशी संबंधित आहेत. ‘ईश्वर’ किंवा ‘श्वर’ हा प्रत्यय शिवलिंगाला उद्देशून वापरला जातो.

विष्णूची मंदिरे – मराठी रूप

Kesava Narayana केशव नारायण
Lakshmi Narayana लक्ष्मी नारायण
Madhava Narayana माधव नारायण
Sundara Narayana सुंदर नारायण
Narasimha Narayana नरसिंह नारायण
Trivikrama Narayana त्रिविक्रम नारायण
Udana Narayana उड्डाण/उदान नारायण
Surya Narayana सूर्य नारायण
Aditya Narayana आदित्य नारायण
Champavati चंपावती देवी
Sitladevi शितळादेवी
Bhadrakali Yekavira भद्रकाली एकवीरा
Padmavati पद्मावती
Kalikadevi कालिकादेवी
Hingulaja हिंगुळजा देवी
Chaturasati चतुःषष्ठी / चौरसष्ट योगिनी परंपरा
Siddhivinayaka सिद्धिविनायक
Dhundivinayaka धुंडीविनायक
Mukhyavinayaka मुख्य विनायक
Ballalvinayaka बल्लाळ विनायक
Tri Ganesha त्रिगणेश
Chintamanivinayaka चिंतामणी विनायक
Hari Ganesha हरि गणेश
Samyukta Vinayaka संयुक्त विनायक
Kalabhairava कालभैरव
Adyabhairava आद्यभैरव
Samayasiddhabhairava समयसिद्ध भैरव
Batukabhairava बटुक भैरव
Hatabhairava हटभैरव
Sivabhairava शिवभैरव
Dinasabhairava दिनेश भैरव
Kolabhairava कोळभैरव
Kapilamuni कपिलमुनी आश्रम
Sakuni शकुनी ऋषी स्थान
Dattatreyamuni दत्तात्रेय मुनी आश्रम
Yajnavalkya muni याज्ञवल्क्य मुनी आश्रम
       इतिहासकारांच्या मते, चौल परिसरातील अनेक मंदिरे इ.स. ९व्या ते १३व्या शतकादरम्यान बांधली गेली असावीत. काही मंदिरे शिलाहार आणि यादव काळातील असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोर्तुगीज आक्रमणानंतर अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली किंवा काळाच्या ओघात नष्ट झाली. काही मंदिरांचे अवशेष आजही चौल, रेवदंडा आणि आसपासच्या भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळतात.
      चौल परिसरातील उपलब्ध शिल्प आणि मंदिर अवशेषांवरून पुढील शैलींचा प्रभाव दिसून येतो:
शिलाहारकालीन कोकणी मंदिरशैली
यादवकालीन हेमाडपंती प्रभाव
काळ्या बेसॉल्ट दगडातील कोरीवकाम
काही ठिकाणी लाल जांभ्या दगडाचा वापर
साधे पण प्रभावी शिवलिंग स्थापत्य
गणेश आणि भैरव मूर्तींमध्ये ग्रामदैवत परंपरेचा प्रभाव
विशेषतः कोकणातील मंदिरांमध्ये स्थानिक हवामानानुसार उताराची छपरे, दगडी चौथरे आणि लहान गाभारे दिसून येतात.
         उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्यशैली पाहता: काही मूर्ती अंदाजे ८०० ते १२०० वर्षे जुन्या असण्याची शक्यता आहे. शिवलिंगे अधिक प्राचीन असू शकतात. काही गणपती आणि ग्रामदेवता मूर्ती मध्ययुगीन काळातील असाव्यात. पोर्तुगीज काळात अनेक मूर्ती स्थलांतरित करण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाकडून सर्व मंदिरांचे अधिकृत उत्खनन आणि शास्त्रीय दिनांकन झालेले नाही.

रामेश्वर :

      कोकणात अनेक सुंदर शिव मंदिरे आहेत. त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले एक मंदिर म्हणजे चौल गावचा रामेश्वर. दगडी पुष्करणीसमोर हे कोकणी पद्धतीचे मंदिर एखादे चित्र असावे तसे भासते. इसवीसन १६२५ मध्ये इटालियन प्रवासी डेला वेल ने लिहिलेल्या वृत्तांताप्रमाणे पोर्तुगीज चौल आणि मुस्लिम चौलच्या मध्ये (आजच्या दृष्टीने चौल-रेवदंडा सीमेवर) एक भव्य शिवमंदिर आहे.
       पौराणिक संदर्भांनुसार, जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते. असे म्हटले जाते की, हे भव्य मंदिर पांडवांनी केवळ एका रात्रीत बांधले होते. ​चौलच्या या मंदिराचा आणि गाव्याचा उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांमध्ये आणि प्रवासवर्णनांमध्ये आढळतो. प्रामुख्याने:​शके ६३४ च्या ताम्रपटात चौलचा उल्लेख 'चंपवती' असा आढळतो, जिथे रामेश्वर मंदिराचा संदर्भ येतो. ​विठ्ठल सखाराम पाध्ये यांचे ग्रंथ: ऐतिहासिक संदर्भांसाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक मराठी पुस्तकांमध्ये कोकणातील मंदिरांच्या वर्णनात रामेश्वर मंदिराचा गौरव केला गेला आहे.




  

     ते केव्हा व कोणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही, पण  या मंदिराचा जीर्णोद्धार ८ ऑक्टोबर १७४१ रोजी श्रीनिवास बाबा दीक्षित यांनीविजयादशमीच्या मुहूर्तावर करवून घेतला. यासतीच मानाजी आंगरे आणि नानासाहेब पेशव्याचे आर्थिक अनुदान मिळाले.  मात्र त्यांचे हातून काम पुरे झाले नव्हते. पुढे उरलेली रंगरंगोटी आणि दीपमाळा, तुळशी वृंदावन वगैरे काम विसाजीपंत सरसुभेदार यांनी १७६९-७० मध्ये पूर्ण करून घेतले. मंदिरासमोरच्या पुष्करणीची दुरुस्ती मार्च १८३८ मध्ये झाली. त्यावेळी उत्तर व दक्षिण बाजूच्या दुरुस्तीस ५०० रुपये खर्च झाले. रामेश्वर मंदिराजवळ आणखी दोन लहान मंदिरे आहेत. पेशव्यांचा सेनापती हरिपंत फडके याचा मुलगा माधवराम हरि १७९४ मध्ये अनेक दिवस रेवदंड्यात होता. रामेश्वर मंदिराच्या पूर्वेस शेणवी लोकांनी बांधलेल्या नारायण मंदिराचा त्याने जीर्णोद्धार केला. या मंदिराला अर्धा खंडी भात नेमला गेला होता. धार्मिक प्रवृत्तीच्या राघोजी आंगरेंनी यात अजून अर्ध्या खंडी भाताची भर घातली.
  या मंदिराचे वर्णन करताना हा इटालियन प्रवासी सांगतो … इथं तलावाकडे पाठ करून आणि गर्भगृहाकडे नजर वळवलेल्या स्थितीत दक्षिणी पद्धतीचा नंदी आहे. भाविक इथं आल्यावर प्रथम हातपाय धुतात आणि नंतर नंदीला डोके आणि हात टेकून नमस्कार करतात. त्यानंतर काही मंदिरात जातात तर काही प्रथम प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जातात. इथल्या देवांना, नंदीला आणि तुळशीला ते फळे आणि भात अर्पण करतात. रामायणातील महत्त्वाचे पात्र हनुमान इथं देवता स्वरूपात आहे.
मंदिरासमोरील दगडी पुष्करिणीबद्दलही बरीच माहिती उपलब्ध आहे. इसवीसन १८३८ मध्ये या पुष्करिणीच्या दुरुस्तीसाठी ७५० रुपये खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. नंदीजवळ असलेली दीपमाळ लाडो भावजी प्रभू पाताणे यांनी १७८४ मध्ये बांधली तर पुष्करिणीजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली. मंदिरात अतिशय सुबक आणि रेखीव गणेशमूर्तीही पाहता येते.
महाशिवरात्रीला रामेश्वरला पाच दिवस यात्ना भरत असे. मंदिरात देणग्या देण्याची पूर्वापार पद्धती आढळते. त्यांचे काही नमुने असे:- ७४, ६५ किलोग्रॅमची पंचरसी शाळुंका व ४.६७ कि. ग्रॅ. चा नागफणा अर्पण केला, ८.९१ कि. ग्रॅ. रुप्याचा पंचमुखी मुखवटा व दुसऱ्या बाजीराव पेशव्याने ऑगस्ट १८१७ पूर्वी रामेश्वरास अर्पण केलेला नंदादीप.



 पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२४४.४२ मीटर असून मध्यभागी १.५० मीटर लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्न्याने मढवलेली  असून मध्यभागी १.५० मीटर लांब रुंद व जमिनीपासून थोडी उच पितळी पत्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्डयात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून सुमारे ७.६२ मीटर उंच असलेल्या शिखरांचे व संपूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम दगडी आहे. गाभाऱ्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या इमारतीपुढील भाग मोठा असून त्यास सभामंडप म्हणतात. याच मंडपात वर वर्णन केलेली तीन कुंडे आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपातं उभे राहिले असता उजव्या म्हणजे उत्तर बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूच्या कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्निकुंड आहे. गाभाऱ्याबाहेरील जागेत तसेच सभामंडपात शहाबादी फरशी आहे. उपरोक्त तीनही कुंडे सध्या या फरशीखाली आहेत. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दर्शनी भितीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमाडपंती पद्धतीसारखे वाटते. बांधकाम करताना लोखंडी चापात दगड बसविले आहेत. रामेश्वर मंदिराच्या उत्तरेस एक कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख असलेल्या मुखरीच्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.
6

. १८७६ साली जेव्हा पर्जन्य कुंड उघडले तेव्हा आत काही नाणी सापडली ती पूजेसाठी ठेवण्यात आली. हे कुंड १६५३ साली उघडले गेले. त्यानंतर १७३१ साली सेखोजी आंगरेनी उघडले. नंतर १७९०, १८५७, १८७६ च्या दुष्काळात, १८९९ साली आणि सर्वात शेवटी १९४१ साली उघडले गेल्याची नोंद सापडते. अशी समजूत होती की कुंड उघडणाऱ्या यजमानांचा सहा महिन्यात मृत्यू होतो. सुरुवातीच्या काळात काही योगायोगाने हे घडले असावे असे दिसते कारण नंतर अनेकदा कुंड उघडून काही वर्षे उलटली तरीही यजमानांना कोणताही त्रास झाला नाही असं शां वि आवळस्कर यांनी नमूद केलं आहे. मंदिराबाहेर एका मंचावर नवग्रहांची मांडणी केलेली दिसते त्यांचीही नित्य पूजा केली जाते.
 
 अनेक पेशवेकालीन मंदिरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या संगमरवरी मूर्ती. रामेश्वर मंदिरात श्री विष्णूची अतिशय सुबक संगमरवरी मूर्ती पाहायला मिळते.
​हे मंदिर आणि त्याचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक असल्याने अनेक चित्रपट दिग्दर्शकांना या ठिकाणाने भुरळ घातली आहे. अलिबाग आणि रेवदंडा परिसरात होणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये या मंदिराचे दर्शन घडते. प्रामुख्याने 'किल्ला' (Killa) सारख्या पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित अनेक मालिकांचे चित्रीकरण या मंदिर परिसरात आणि येथील विशाल कुंडांजवळ झाले आहे.

  महाशिवरात्रीला रामेश्वरला पाच दिवस यात्ना भरत असे. मंदिरात देणग्या देण्याची पूर्वापार पद्धती आढळते. त्यांचे काही नमुने असे:- ७४, ६५ किलोग्रॅमची पंचरसी शाळुंका व ४.६७ कि. ग्रॅ. चा नागफणा अर्पण केला, ८.९१ कि. ग्रॅ. रुप्याचा पंचमुखी मुखवटा व दुसऱ्या बाजीराव पेशव्याने ऑगस्ट १८१७ पूर्वी रामेश्वरास अर्पण केलेला नंदादीप. मंदिराच्या सभागृहात अग्निकुंड व पर्जन्यकुंड आहेत. रामेश्वराच्या मूर्तीसमोर सभागृहात अग्निकुंड, उत्तरेस नारायणाच्या मूर्तीसमोर कमानीखाली पर्जन्यकुंड आणि दक्षिणेसः गणपतीच्या मूर्तीसमोर वायुकुंड आहे. ज्यावेळी हवेतील उष्मा नाहीसा होतो त्यावेळेस अग्निकुंड उघडतात, बारा पडतो तेव्हा वायुकुंड उघडतात आणि पाऊस पडत नाही तेव्हा पर्जन्यकुंड उघडतात. प्रत्येक कुंड साधारण १.२२ मीटर चौरसाकृती आहे. कुंडाच्या वेदिका पूर्वी बऱ्याच खाली होत्या. सन १७४१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा जमीन चढविली व वेदिकेची वर बांधणी करून कुंडांची मूळची उंची वाढविली. पर्जन्यकुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले मिळतात. जून १७३१ मध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून सेखोजी आंगरेने पर्जन्यकुंड उघडल्याचा दाखला मिळतो व कुंड उघडल्यावर पर्जन्यवृष्टी झाल्याचे म्हणतात. सन १८७६ व १९४१ मधील अवर्षणाचे वेळीही पर्जन्यकुंड उघडल्याचे म्हणतात.

  महाशिवरात्रीला रामेश्वरला पाच दिवस यात्ना भरत असे. मंदिरात देणग्या देण्याची पूर्वापार पद्धती आढळते. त्यांचे काही नमुने असे:- ७४, ६५ किलोग्रॅमची पंचरसी शाळुंका व ४.६७ कि. ग्रॅ. चा नागफणा अर्पण केला, ८.९१ कि. ग्रॅ. रुप्याचा पंचमुखी मुखवटा व दुसऱ्या बाजीराव पेशव्याने ऑगस्ट १८१७ पूर्वी रामेश्वरास अर्पण केलेला नंदादीप. मंदिराच्या सभागृहात अग्निकुंड व पर्जन्यकुंड आहेत. रामेश्वराच्या मूर्तीसमोर सभागृहात अग्निकुंड, उत्तरेस नारायणाच्या मूर्तीसमोर कमानीखाली पर्जन्यकुंड आणि दक्षिणेसः गणपतीच्या मूर्तीसमोर वायुकुंड आहे. ज्यावेळी हवेतील उष्मा नाहीसा होतो त्यावेळेस अग्निकुंड उघडतात, बारा पडतो तेव्हा वायुकुंड उघडतात आणि पाऊस पडत नाही तेव्हा पर्जन्यकुंड उघडतात. प्रत्येक कुंड साधारण १.२२ मीटर चौरसाकृती आहे. कुंडाच्या वेदिका पूर्वी बऱ्याच खाली होत्या. सन १७४१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा जमीन चढविली व वेदिकेची वर बांधणी करून कुंडांची मूळची उंची वाढविली. पर्जन्यकुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले मिळतात. जून १७३१ मध्ये पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून सेखोजी आंगरेने पर्जन्यकुंड उघडल्याचा दाखला मिळतो व कुंड उघडल्यावर पर्जन्यवृष्टी झाल्याचे म्हणतात. सन १८७६ व १९४१ मधील अवर्षणाचे वेळीही पर्जन्यकुंड उघडल्याचे म्हणतात.




 

 

 

 

 

 

   पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२४४.४२ मीटर असून मध्यभागी १.५० मीटर लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्न्याने मढवलेली  असून मध्यभागी १.५० मीटर लांब रुंद व जमिनीपासून थोडी उच पितळी पत्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्डयात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून सुमारे ७.६२ मीटर उंच असलेल्या शिखरांचे व संपूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम दगडी आहे. गाभाऱ्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या इमारतीपुढील भाग मोठा असून त्यास सभामंडप म्हणतात. याच मंडपात वर वर्णन केलेली तीन कुंडे आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपातं उभे राहिले असता उजव्या म्हणजे उत्तर बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूच्या कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्निकुंड आहे. गाभाऱ्याबाहेरील जागेत तसेच सभामंडपात शहाबादी फरशी आहे. उपरोक्त तीनही कुंडे सध्या या फरशीखाली आहेत. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी दर्शनी भितीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमाडपंती पद्धतीसारखे वाटते. बांधकाम करताना लोखंडी चापात दगड बसविले आहेत. रामेश्वर मंदिराच्या उत्तरेस एक कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख असलेल्या मुखरीच्या गणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे.

5

    ​हे मंदिर आणि त्याचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक असल्याने अनेक चित्रपट दिग्दर्शकांना या ठिकाणाने भुरळ घातली आहे. अलिबाग आणि रेवदंडा परिसरात होणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये या मंदिराचे दर्शन घडते. प्रामुख्याने 'किल्ला' (Killa) सारख्या पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटातील काही महत्त्वाचे प्रसंग आणि कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित अनेक मालिकांचे चित्रीकरण या मंदिर परिसरात आणि येथील विशाल कुंडांजवळ झाले आहे.

 २ ) एकविरा भगवती देवी :
    हे चौलचे दुसरे प्रसिद्ध मंदिर असून आंगरेंच्या उत्तर कालात या मंदिराचा अनेकदा किल्ल्यासारखा उपयोग केल्याचे दिसून येते. चौल रेवदंडा परिसरात पर्यटनाला येणाऱ्या मंडळींचे लक्ष जास्त करून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने असलेल्या भागांमध्ये असते पण चौल वावे बायपास रस्त्याने निघाले की आपण आग्राव आणि भोवाळे परिसरातील अनेक ठिकाणे पाहू शकतो. हिंगुळजा माता, दत्त मंदिर, सराई गावातील कलावंतिणीचा वाडा अशा अनेक जागा आहेत. अष्टागाराचा इतिहास आणि सरखेल कान्होजी आंग्रेंच्या घराण्याचा इतिहास एकमेकांशी गेली ३०० वर्षे तरी जोडला गेलेला आहे. या भागातील एकविरा भगवतीचे मंदिर ही अशीच एक महत्वाची जागा ! या मंदिराचा अनेकदा किल्ल्यासारखा उपयोग केल्याचे दिसून येते. एकविरा भगवतीने आंगऱ्यांच्या दुसऱ्या यादवीत बराच रक्तपात पाहिला.

पूर्वाभिमुख असलेल्या एकविरा भगवती आईचे हे देऊळ लाकडी बांधकाम आणि कौलारू छप्पराने साकारलेले आहे. ५ लाकडी खांबांच्या रांगांवर उभा असलेला सभामंडप आणि नगारखान्याला लाभलेले किल्ल्यासारखे रुपडे हे याचे वैशिष्ट्य. आंगरे घराण्याच्या उत्तर काळात ज्या यादवी आणि रक्तपात झाला तेव्हा या देवळाचा वापर किल्ल्यासारखा केला गेला असे दिसते. जयसिंगराव आंगरे आणि मानाजी आंगरे यांच्यात १७९६  साली झालेल्या लढाया या परिसरात झाल्या व त्यात जयसिंगरावांचा विजय झालेला दिसतो.

मंदिराचे यजमानपद पूर्वी नित्सुरे व मोदगी कुटुंबांकडे होते तर पुराणिक पद जोशी मंडळींना लाभले अशी नोंद आवळस्करांच्या आंग्रेकालीन अष्टागर ग्रंथात दिसते. १७५२ साली या शिवकालीन देवळाचा जीर्णोद्धार झाला आणि त्यांनंतर आज दिसणारे बांधकाम १८५२ साली रामजी वल्लद मल्हार प्रभू कुलकर्णी यांनी केल्याचे दिसते. देवीच्या शांत-प्रसन्न मुद्रेला उत्सव काळात सुंदर मुखवट्याने सजवले जाते. गुगल मॅप्स वर श्री भार्गव पाटील यांनी अपलोड केलेला एक सुंदर फोटो मला सापडला.

लाकडी खांबांचे बांधकाम व आजच्या काळातील उत्सवात त्याला लाभलेली पताकांची जोड हे दृश्य कोकणात अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळते. देवळासमोर असलेली दीपमाळ, पुष्करिणी आणीन सभोवताली असलेल्या नारळ सुपारीच्या बागा असा इथला कोकणी आसमंत. एरवी रिकामा आणि शांत परंतु उत्सव असला की चैतन्याने आणि उत्साहाने भारून टाकणारा .. हिंदू धर्मात शैव, वैष्णव, शाक्त असे विविध पंथ आहेत खरे.. पण कोकणात मात्र मुख्य देवतेच्या जोडीला इतर देवता पंचायतन स्वरूपात तरी असतात किंवा गर्भगृहाजवळ त्यांना पूजास्थान लाभलेले असते. इथंही श्री विष्णू आणि गणेश आहेतच.भगवती देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून मंदिर संपूर्णपणे लाकडी व कौलारू आहे. मंडपात पाच लाकडी खांबांच्या दोन रांगा असून पश्चिमेकडील शेवटच्या दोन खांबांच्या मध्ये लहान शिखर असलेली गाभाऱ्याची स्वतंत्र इमारत आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७३, फाल्गुन शु. ७ (इ. स. १७५२) रोजी सुरू केले असे गाभाऱ्याच्या दरवाजाच्या  बरील बाजूच्या तुळईवर पाच संस्कृत वाक्यांत कोरले आहे. देवीचा उत्सव नवरात्रात होतो. पूर्वी फार मोठी यात्रा भरत असे.

देवीची आरती अशी आहे

भगवती एकविरा, देवी देई मजवरा,
शरणे मी तुजला गे देई दर्शन पामरा
चौलग्रामी वास तुझा, भक्त दर्याकिनारी
कूर्म दृष्टीने पाहून, सांभाळीसी लवलाही

अश्विन शुद्धपक्षी, नवरात्री उत्सव होई
भक्तगण मेळताती, पालखी ती मिरविती
दर्यावरचे शूरवीर, तुझ्या पायीचे चाकर
तवकृपा त्यांसि तारी, त्यांना एकचि आधार
हस्त नक्षत्राचा वारा, उठे जीवा नाही थारा
क्षण तुज आठविता त्यांसी तारिसी तू माता
तव पूजनी जे रमती, मनोभावे स्मरुनी जाती
तया संकटाचे वेळी, कडाडून प्रकट होसी
शांत तृप्त होई, सेवा मान्य करी आई
अभयाचा देई वरा, ठेवितो चरणीं मी शिरा

३ ) शीतलादेवीचे मंदिर ::-
       चौल नाक्यापासून दोन किलोमीटर असलेले शीतलादेवीचे मंदिर पुरातन असून अजूनही फार प्रसिद्ध आहे. देवीचे स्थान जागृत समजले जाते. पूर्वीची स्थिती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ बांधले होते परंतु आता जवळपासची खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार १७५९ मध्ये केला. आंगरे घराण्याची या देवतेवर दृढ भक्ती होती.


    पूर्वीचे आंगरेकालीन लाकडी व कौलारू मंदिर पाडले असून त्याच जागेवर २७ मार्च १९९० रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन सिमेंट काँक्रीटचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर १९९० मधील सर्वेक्षणापर्यंत बरेच काम झालेले आढळले.  पूर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वाराशिवाय उत्तर व दक्षिण बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार व सभामंडपावर एक एक कळस असून सभामंडपावरील कळस जास्त उंच असेल. गाभाऱ्यात देवीची मूर्ती मूळच्या ठिकाणीच स्थानापन्न आहे. सातारा, पुणे व रत्नागिरीकडूनही बरेच भाविक दर्शनासाठी येतात.

४ )  महाकाली मंदिर :-
    शीतलादेवीचे दर्शन घेऊन एकविरा भगवती मंदिराकडे जाताना मध्येच त्वष्ठा कासार ज्ञाती संस्थान, रेवदंडा, यांचे महाकाली मंदिर लागते. या मंदिराचेही जीर्णोद्धाराचे काम चालू असून शीतलादेवी मंदिराशी तुलना करता ही इमारत बरीच मोठी आहे. मे महिन्यात देवीची यात्रा भरते.


५ ) श्री महालक्ष्मी मंदिर , चौल.
      येथील महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आणि काळ्या कातळातील आहे. मूर्तीचे मुखकमल अत्यंत सौम्य आणि प्रसन्न आहे. चौल बंदर असताना परदेशी व्यापाऱ्यांनीही या देवीचे दर्शन घेतल्याच्या नोंदी जुन्या पुस्तकात आढळतात.


६ )  श्री हिंगुळजा (हिंगलाज) देवी मंदिर, ​पत्ता/स्थान: हिंगुळजा आळी (चौल टेकडीच्या पायथ्याशी).

   चौल येथे दत्तात्त्रयाप्रमाणेच पर्वतनिवासीनी देवीचेही मंदिर आहे. एका सलग खडकात कोरलेल्या दगडी मंदिरात पार्वतीचे रूप असलेली हिंगुलजा किंवा हिंगळादेवी आहे. आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील अर्ध-वाळवंटी प्रदेश मकरान येथे स्थित हे एक महत्वाचे शक्तिपीठ.. हिंगलाज किंवा हिंगुळजा मातेचे स्थान. आज तिथं जाणे कठीण असले तरीही कोकणातील रायगड जिल्ह्यातील चौलच्या डोंगरावर तिथल्या प्राचीन लेण्यांमध्येही हिंगुळजा मातेचे वास्तव्य आहे
       सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास।  प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥
 दरवर्षी पौष पौणिमेला यात्रा भरते. या देवीचे प्रामुख्याने भक्त असलेले भनसाळी लोक मुंबईहून येतात.  भन्साळी मंडळींसाठी हे एक प्रमुख आराध्यदैवत असल्याने इथे विश्रामधामही बांधण्यात आला आहे. या डोंगरावरच पण उत्तर दिशेला चौल-भोवाळे येथील महत्वाचे दत्त मंदिर आहे. सातआठशे पायऱ्या चढून ते ठिकाण पाहिले की डोंगराच्या कडेने चौल लेण्यांच्या मागे थेट येणे शक्य आहे.

 
 
या परिसरात काही बौद्ध लेणी आहेत. डोंगरकड्यात आग्नेयेस पायथ्यापासून सुमारे ३०.४८ मीटर उंचीवर ०.९७ × १.६८ मीटरचा दरवाजा असलेले ३.३५ x १.७८ × १.६८ मीटर लांबी, रुंदी व उंचीचे लहान लेणे आहे. बाहेर ३.३५ x १.५२ मीटरचा सज्जा असून शेड उभारण्यासाठी भोके आहेत. या लेण्यात कसलेही कोरीवकाम किंवा लेख नाहीत. या गुहेत लागूनच पश्चिमेस २.३१ x १०३२ ४ २.४४ मीटरचे दुसरे लेणे आहे. समोरची बाजू तुटलेली असून व्हरांडा अरुंद आहे. दगड चांगला नसल्याने या लेण्याचे काम अपुरे ठेवले असावे. या दोन लेण्यांप्रमाणे पश्चिम बाजूस तितक्याच उंचीवर पश्चिमाभिमुख असलेल्या हिंगुलजा देवीच्या मंदिराकडे रस्ता जातो.
 
नैऋत्येकडून असलेल्या सुमारे १५८ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिरात जाता येते. वरील पायरीच्या उजव्या बाजूस दगडात कोरलेले ५.२६ ४ ४.६५ x २.०३ मीटर आकाराचे एक लेणे आहे. त्याच्या बायव्येकडील खोदलेल्या कोपऱ्यात आशापुरी देवी आहे. दक्षिणेकडील भितीत १.३७ × १.०२ मीटर व १.२२ मीटर चौरसाकृती आकाराच्या दोन खोल्या आहेत. पश्चिमेकडील समोरच्या भिंतीत खिडकी आहे. लेण्याच्या बाहेर उजव्या बाजूच्या ३० पायऱ्या  चढून गेल्यावर दगडात खोदलेली पाण्याची दोन टाकी आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीजवळ थोडे उत्तरेस दरवाजाच्या आत हिंगुलजा देवीचे मंदिर असून त्याच्या सभोवार अरुंद मार्ग आहे. समोरच्या मोकळया जागेवर अलीकडेच सिमेंट काँक्रीटचा सभामंडप बांधला आहे. त्याच्या समोर (परंतु खालच्या पातळीवर) खुल्या जागेवर तुळसीवृंदावन व दीपमाळ आहे. तेथून लांबवरचा सुंदर देखावा दिसतो. इथून चौल रेवदंड्याचा बराच परिसर आपल्याला दिसू शकतो. मंदिरापलीकडे जवळच ओळीने पाच लहान बौद्ध लेणी असून एका लेण्यात अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. सात क्रमांकाच्या लेण्याबाहेर स्तूपाचे उठावशिल्प कोरलेले आहे. त्याच्या घडणीवरून स्तूप सन १५० मधील असावा. या लेण्याच्या पलीकडील दरवाजातून पाऊल वाटेने टेकडीवरील दत्त मंदिरात जाता येते.

हिंगुळजा मातेची मंदिरे गुजरात आणि राजस्थान येथेही आहेत. शक्तीपीठ असलेली ही देवी हिंगळजा, हिंगळाज, हिंगुलता अशा अनेक नावांनी ओळखली जाते. वीरभद्र म्हणजेच शिव हा भैरव रूपात सर्व शक्तिपीठांमध्ये निवास करतो अशी श्रद्धा आहे. कुलर्णव तंत्रातील १८ शक्तिपीठांमध्ये हिंगुळजा माता तिसऱ्या ठिकाणी आहे, कोट्टारी, कोटावी, कोट्टारिशा अशी नावेही या देवतेला दिलेली दिसतात.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
चरण किंवा गढवी समाज हिंगुळजा देवीला आपली कुलदेवी मानतो. यामागील आख्यायिका अशी आहे की पृथ्वी निःक्षत्रिय करायला निघालेल्या परशुरामाच्या आक्रमणातून १२ क्षत्रियांना काही ब्राह्मणांनी ब्राह्मण वेष देऊन वाचवले आणि हिंगुळजा मातेच्या मंत्राने त्यांचे संरक्षण झाले.
इथे पुढं एका गुहेत नवचंडी देवीची मूर्ती आहे. दुर्गेच्या या रूपाची पूजा दुर्गा सप्तशती पाठ म्हणून नवचंडी विधीने केली जाते. इथल्या एका गुहेत चौलच्या बौद्ध लेण्याचे अवशेष स्पष्टपणे दिसतात.


भक्तांची इच्छा, आशा पूर्ण करणाऱ्या आशापुरा मातेचे देऊळही या ठिकाणीं एका गुहेत आहे. कच्छ आणि राजस्थानमध्ये मुख्यतः या देवीला आराध्य मानले जाते. चौहान आणि पुरबिया राजपूत, काही ब्राह्मण कुटुंबे, वैश्य लोकांमधील विजयवर्गीय समाज, तसेच गुजरात मधील लोहाणा, जाडेजा राजपूत, भन्साळी आणि पिपळाव चे पटेल यांचीही ही कुलदेवी आहे. तिच्या डाव्या उजव्या बाजूस आशापुरी व नवचंडी नावाच्या आणखी दोन देवी आहेत.  पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मूळ शक्तीपीठाचे हे प्रतिरूप. प्राचीन काळी सिंध प्रांताशी असणाऱ्या सागरी व्यापाराची ही जिवंत साक्ष आहे. येथील शेंदूरचर्चित मुखवटा अत्यंत पुरातन आहे.
या ठिकाणचे प्राचीन नाव रेवतीतीर्थ असे होते. बलरामाची पत्नी रेवती हिचे हे स्थान. ह्युएन त्सांग, मसूदी, टॉलेमी अशा विविध विदेशी पर्यटकांनी चौलच्या प्राचीन बंदराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. अबू रिहान अल बिरूम असं सांगतो की ठाण्याच्या दक्षिण दिशेला चौल जैमूर नावाचे उत्कृष्ट बंदर आहे. इद्रीसीच्या ११५३ सालच्या नोंदीत इथं नारळाची अनेक झाडे असलेलं नियोजित शहर आहे असा उल्लेख आढळतो. पुढे १६३५ मध्ये सादिक इफ्शाहानी च्या लेखनातही चौलचा उल्लेख सापडतो. इथं चाफ्याची झाडे होती म्हणून किंवा बौद्ध राजा चंपा याने वसवलेले शहर म्हणून या जागेला चंपावती या नावानेही ओळखले जात असे. कान्हेरी येथील शिलालेख, पेरिप्लस मध्ये सेमुल्ला म्हणून इसवीसन २४७ मध्ये केला गेलेला उल्लेख या ठिकाणचे प्राचीनत्व सिद्ध करतात. उत्तर शिलाहारांतील राजपुत्र झंझ इथं शासन करत असल्याचा आणि इथं अतिशय समृद्ध बाजारपेठ असल्याचा उल्लेख मसूदीने केलेला आहे.


७). चंपावती मंदिरम मध्यभागी, चौल.
चौलचे प्राचीन नाव 'चंपावती नगरी' होते, त्यावरून या ग्रामदेवतेचे नाव पडले. हे स्थान गावाचा आद्य उगम दर्शवते.


८ ) . श्री कालिका माता मंदिर , बेलाई रस्ता, चौल
       ​मूर्ती वैशिष्ट्य: अष्टभुज महिषासूरमर्दिनी स्वरूपातील ही मूर्ती असून, हातातील शस्त्रे आणि पायाखालील महिषासुराचे कोरीव काम अत्यंत प्रभावी व तांत्रिक/शाक्त पद्धतीचे आहे.


९ ) ​ श्री भगवती मंदिर, श्री पद्मावती मंदिर व कुंडेश्वर मंदिर
​ चौलमधील सर्वात मोठे शिवलिंग पाषाणात कोरलेले आहे परिसरात अनेक पुराण वस्तू व मुर्त्या सापडलेल्या आहेत बाकी साफसफाई करताना देखील पुराण वस्तू सापडलेल्या आहेत,पद्मावती मंदिर हे हिंदू-जैन संस्कृतीच्या प्राचीन समन्वयाचे प्रतीक मानले जाते.

 १० )  श्री विमलादित्य सूर्य मंदिर (केळकर आळी जवळ), चौल. :-
      ​इतिहास: शिलाहार वंशाचा राजा 'विमलादित्य' याच्या १० व्या शतकातील (इ.स. १०८८ च्या सुमारास) ताम्रपटात व शिलालेखात या मंदिराचा अधिकृत उल्लेख आहे. हे भारतातील दुर्मिळ पश्चिमाभिमुख सूर्य मंदिर होते.
  ​ गर्भगृहातील मुख्य सूर्यमूर्ती काळ्या तलम पाषाणात (Schist) कोरलेली असून अत्यंत देखणी होती. भगवान सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर आरूढ असून, त्यांच्या दोन्ही हातांत उमललेली कमळ होती. मूर्तीच्या पायात उंच बूट (उदीच्यवेष - जो पर्शियन किंवा कुशाण शैलीचा प्रभाव दर्शवतो) होते. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना त्यांची पत्ती 'राज्ञी' व 'निक्षुभा' आणि अनुचर 'दंडी' व 'पिंगल' यांच्या अत्यंत सुबक आणि सूक्ष्म कोरीव मूर्ती होती. दुर्दैवाने परकीय आक्रमणामध्ये कालावघात ही मूर्ती व मंदिर पूर्णपणे नष्ट झाले त्याचे काही अवशेष फक्त मिळाले आहेत त्यामुळे हा अमूल्य ठेवा आता नष्ट झाला आहे...


११ ) श्री सुंदर नारायण मंदिर (विष्णू मंदिर) चौलनाका नारायण आळी, चौल.:-
    चौलमधील सर्वात अप्रतिम वैष्णव स्थान. येथील 'सुंदर नारायण' मूर्ती त्रिभंग मुद्रेत उभी असलेली चतुर्भुज विष्णू मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अतिशय रेखीवपणे कोरलेले आहे. मूर्तीच्या सभोवताली दशावतारांचे अत्यंत सूक्ष्म कोरीव काम (Prabhavali) पाहायला मिळते. या पाषाणावरील तलम पॉलिश आजही चमकावे असे आहे.
१२ ). मोडकळी येथील विष्णू मंदिर ​ (मोडक आळी / मोडक गल्ली), चौल.
       हे एका खाजगी जागेत असलेले अतिशय प्राचीन व जुने कौलारू मंदिर आहे, जे इतिहास अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. ​मूर्तीचे कोरीव काम: येथील विष्णूमूर्ती 'स्थानक' (उभ्या) स्थितीतील आहे. स्थानिक ऐतिहासिक संदर्भांनुसार ही मूर्ती शिलाहार ते यादव काळातील मानली जाते. मूर्तीचे अलंकार, मुकुट (किरीट मुकुट) आणि धोतराच्या घड्या (Drapery) अत्यंत जिवंतपणे कोरलेल्या आहेत. काळाच्या ओघात मंदिराची रचना बदलली असली तरी मूर्तीचे मूळ प्राचीन वैभव टिकून आहे.
१३ ) श्री पांचाळेश्वर मंदिर ( पांचाळ आळी (तांबट-सुतार आळी परिसर), चौल.
     पांचाळ (विश्वकर्मा) समाज, जो मूर्तीकाम आणि धातूकामात पारंगत होता, त्यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील पंचमुखी किंवा वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आणि मंदिराच्या परिसरातील प्राचीन अवशेष. गर्भगृहाची रचना शांत असून, दगडी पाषाणावर स्थानिक कारागिरीचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात.
१४ ). मुकरीचा गणपती (भव्य सिद्धिविनायक)​ (रेवदंडा-चौल मुख्य रस्ता).
        सुमारे ६ ते ७ फूट उंच असणारी ही मूर्ती एकाच विशाल पाषाणात कोरलेली आहे. ही उजव्या सोंडेची 'सिद्धिविनायक' मूर्ती असून, तिची बैठक डाव्या पायावर उजवा पाय अशी राजेशाही थाटातली आहे. पेशवेकालीन सनदांमध्ये या गणपतीचा अधिकृत उल्लेख येतो.






१५ ) दत्त मंदिर, भोवाळे :

 चौल नाक्याहून दोन अडीच किमी अंतरावर भोवाळे तलावापाशी डोंगर आहे. फूट उंचीच्या या डोंगरावर उत्तर बाजूला दत्ताचे मंदिर आहे तर दक्षिणेच्या खांद्यावर हिंगुलजा मातेचे देऊळ आहे. सुमारे साडेसातशे पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो किंवा गाडी रस्ता आपल्याला स्वामी समर्थांच्या मठापाशी नेतो. तिथून सुमारे २०० पायऱ्यांची चढण आहे. ती चढायला सुरुवात केली की अतिशय सुबक असे तुळशी वृंदावन आपले लक्ष वेधून घेते.
मार्च-एप्रिल १८१० मध्ये या डोंगरावर एक दत्तभक्त गोसावी राहत होता. एके दिवशी त्याने दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून आपल्या मठीत आणून ठेवल्या. मार्च-एप्रिल १८३१ मध्ये दगडी दीपमाळ बांधण्यात आली. डिसेंबर १८३४ मध्ये रेवदंड्याच्या गोविंद वाडकर नावाच्या कोळी गृहस्थाने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणा मार्ग बांधून वर कळस बांधला. पुढे १८४३, १८४७ व १८५२ मध्ये अनुक्रमे मंडप, घरे व पायऱ्या बांधण्यात आल्या. दिनांक २८ नोव्हेंबर १८५७ रोजी पाषाणाची निमुखी दत्तमूर्ती पादुकांच्या शेजारी बसविण्यात आली. १८४३ ते १८५२ या काळात इथं गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी मंडप आणि घर बांधून घेतले तर इथं चढून येणे कठीण असल्याने नारायण रामचंद्र खात्री यांनी १८५७ साली ७५०-८०० पायऱ्यांचा मार्ग बांधून घेतला. 

     अदमासे साडेसातशे पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. त्याचा १९८८ मध्ये जीर्णोद्धार झाला. त्यानंतर क्रमाने सभागृह, समाधी सत्चित् आनंद साधना कुटी, पाठारे क्षत्रिय पाचकळशी लोकांचे हरेराम विश्रामधाम, धुनीमंदिर व जवळच दत्तगुरुच्या संगमरवरी पादुका असलेला औदुंबर मठ आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील माई जानकीबाई व हनुमानदासबाबा मठात बऱ्याच मूर्ती पाहावयास मिळतात. या ठिकाणावरून नारळीपोफळीच्या बागांतून दडलेले चौल-रेवदंडधाचे दृश्य व भोवाळे गाव व भोवाळघाचे तळे स्पष्ट दिसते. सांप्रतचे आधुनिक पद्धतीचे सिमेंट काँक्रीटचे दत्त मंदिर १९५६-५७ साली अस्तित्वात आले. देवालयाच्या आकर्षक कमानीपासून गाभाऱ्यापर्यंत आकर्षक जिना आहे. वर गाभाऱ्यासमोर मोकळी जागा असून समोरच्या खांबाला आडव्या बांधलेल्या नवसाच्या घंटा तसेच भितीवर देणगीदाराचे संगमरवरी नामफलक आहेत. मंदिरातील पाषाणाची दत्तमूर्ती त्रिमुखी व सहा हातांची आहे. मूर्तीच्या मागे चांदीचे कोंदण आहे. .राम, लक्ष्मण आणि सीतेच्या सुबक मूर्ती, सोबतीला महादेवाची पिंडी आणि गणपती बाप्पा आणि रामासमोर लीन झालेला हनुमान असे इथले दृश्य आहे. .
 मूर्तीच्या डाव्या वाजूच्या कोपऱ्यात दर्शनी भागावर लेख कोरलेल्या चौकोनी काळया दगडावर सुबक पादुका कोरलेल्या आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष पौणिमेपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत दत्तजयंतीचा उत्सव साजरा होतो. तेव्हा फार मोठी यात्त्रा भरते. दत्तजयंतीच्या दिवशी थेरोंडा येथून श्री. दत्तगुरुंचा चांदीचा मुखवटा पालखीतून बाजतगाजत दत्त मंदिरात आणून देवालयातील मूर्तीवर बसवितात. पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजाच्या या पालखी प्रथेला सुमारे नव्वद वर्षे झाली. दत्त मंदिराच्या डोंगरमाथ्यावर जिल्हा परिषदेने सुमारे तीन लाख रुपये खर्च करून नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली आहे. सन १९६५ पासून वीज उपलब्ध झाली.
 
      पाठारे क्षत्रिय पांचकळशी समाजासाठी हे महत्वाचे ठिकाण असून इथं दत्त जयंतीचा उत्सवही मोठ्या जोमाने साजरा होतो, यात्राही निघते. थेरोंदा येथे असलेला चांदीचा मुखवटा आणून यावेळी दत्त प्रतिमा सजवली जाते. या डोंगराच्या दक्षिण खांद्यावर उतरले की आपण चौल लेणी आणि हिंगुलजा माता मंदिर परिसरात येतो. इथं जवळपास एकविरा भगवती मंदिर, शितळादेवी, सोमेश्वर, कलावंतिणीचा वाडा, राजकोटाचे अवशेष अशी अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.. मात्र यासाठी कुतूहल आणि वेळ हवा. इस्लामी बांधकामांमध्ये इथं आग्राव च्या दिशेने हमामखाना व आसा मशीद पाहता येते.

 
 
 
 
 
 
 
 
 
    
भारत सरकारच्या 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) आणि राज्य पुरातत्व विभागाने चौलच्या या मूर्तीवैभवाची अधिकृत नोंद घेतली आहे. ​रामेश्वर मंदिर परिसर, विमलादित्य सूर्य मंदिर आणि राजबागच्या बौद्ध लेणी यांना ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय महत्त्वामुळे 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक' (Protected Monument) म्हणून घोषित केले आहे. इतिहासात असलेली ३६० देवळे आज अस्तित्वात नाही अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काही पुरातन मंदिरे आहे परंतु त्यांचाही जीव बऱ्याच ठिकाणी जीर्णोद्धार झाला आहे.. निदान आज चौलमध्ये असलेल्या पुराण वस्तू पुराण मूर्ती पुरातन मूर्ती काही शिलाले खोदकामात मिळालेले कामाचे दगड जुन्या देवळातील लाकडावरील कोरीव काम असलेल्या पाषाणमूर्ती या सर्वांचे जतन होणे व त्यांचे संग्रहालय होणे ही अत्यंत महत्त्वाची काळाची गरज आहे शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे पुढील पिढीसाठी हा ठेवा जतन होणे महत्त्वाचे असले तरी त्याबद्दल अनेक इतिहास अभ्यासक काळजी व्यक्त करीत आहेत. जीर्णोद्धाराच्या नावाखाली अनेक पुरातन पुरावे नष्ट झाले आहेत. लाकडी कोरीव काम नष्ट झाले आहे.
    चौलची प्रत्येक आळी, तिथली मंदिरे आणि विष्णू-सूर्याच्या प्राचीन मूर्ती म्हणजे भारताच्या प्राचीन मूर्तीकलेचा सर्वोच्च अविष्कार आहेत. इतिहास अभ्यासकांनी आणि पर्यटकांनी केवळ फिरणे म्हणून नाही, तर या शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी चौलला नक्की भेट दिली पाहिजे.
 

 राजकोट :-

        चौल रेवदंडा परिसरात भ्रमंती म्हणजे ऐतिहासिक वास्तू अभ्यासणाऱ्या लोकांसाठी पर्वणीच. रेवदंड्याचा पोर्तुगीज कोट आणि त्यातील अवशेष, कोर्लई चा डोंगरी दुर्ग, बेने इस्राएल समाजाची सिनेगॉग आणि दफनस्थळे, कलावंतिणीचा महाल, अनेक मंदिरे अशा कितीतरी वास्तू पाहण्याची संधी इथं मिळते. काळाच्या पडद्याआड गेलेली आणि नारळ सुपारीच्या वनात गायब झालेली अशीच एक वास्तू म्हणजे चौलचा राजकोट किल्ला. पर्यटनाच्या नकाशावर सहजपणे न सापडणाऱ्या या दुर्गाची आज आपण माहिती घेणार आहोत.

       बोकारो नावाच्या इतिहासकाराच्या नोंदीनुसार हा किल्ला १६३६-४६ या विजापूर सत्तेच्या काळात इथं बांधला गेला. ६० पावलं लांबीची तटबंदी असलेल्या या दुर्गाला चार बाजूला १४ फूट उंचीचे बुरुज होते. दोन मजली वाड्याचे अवशेष आणि आठ बाजू असलेले खांब इथं होते.
       हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधल्याचाही उल्लेख मिळतो. आंगरेंची राजवट सुरू होण्यापूर्वी चौलच्या सुभेदाराच्या ताब्यात एक लहानसा किल्ला होता. त्याचे नाव राजकोट. तो सन १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी बांधला.  शंभु छत्रपतीनी बांधलेन्या राजकोटाशिवाय  आठरा पाखाड्यांच्या चौल मधील तीन पाखाड्यातील वस्ती उठवून ,मुदडे पााडून तिथे पोर्तुगीजांनी आगरकोट उभारला तिथे माद्रि -द-देऊसचे - बोलीभाषेतील  मांजर देवाचे मंदिर आहे. ही आहे  देवांची माता.सन १६८१ मध्ये सिद्दीने अप्पर चेऊलची लूटमार केली तेव्हा पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला नाही म्हणून संभाजी महाराजांनी रागाने पोर्तुगीज चेऊलला म्हणजेच रेवदंड्यास वेढा दिला. मात्र पोर्तुगिजांच्या रेवदंडा किल्ल्याच्या मजवुत संरक्षक भिती व बंदुकीच्या माऱ्यापुढे मराठ्यांचा नाईलाज झाला. परंतु अपयशाने खचून न जाता चौलच्या रक्षणार्थ तेथे किल्ला बांधला व आरमाराची जमवाजमव केली. तोच राजकोट किल्ला होय. एवढे करूनही पोर्तुगीज जादा सैन्य व जहाजांची कुमक आणण्यात यशस्वी झाले. शेवटी संभाजी महाराजांना २४ डिसेंबर १६८३ रोजी वेढा उठविणे भाग पडले. सन १६९१ आणि १७३१ मध्ये मराठ्यांबरोबर झालेल्या युद्धांत या किल्ल्याचा उल्लेख येतो. 
    चौल भुईकोटासंदर्भात एक दंतकथा अशी. १२१२ नंतर इथली यादव सत्ता संपली. मग माहीम (सध्याच मुंबईच उपनगर) उर्फ महिकावती इथल्या राजधानीचे महत्व उणावले, मग केळवे, ड‌हाणू, तारापूर, चिंचणी, आवास, सासवने, मरोळ अशी स्वतंत्र राज्य या भागात निर्माण झाली. मरोळचे प्रमुख ठाकूर म्हणून होते. गुजरातचा सुलतान बहादूर शहा याला लढाईत मदत करण्यासाठी मरोळच्या ठाकुरांचे कर्ते सवरते पुरुष गेले. पण एकामागोमाग एक असे ते सारे धारातीर्थी पडले .युद्ध बहादुर शहाने जिंकले. मरोळच्या ठाकुरांचा शौर्याचा गौरव कसा करावा असा पेच पडला, तेव्हा त्या सातही पुरुषांच्या प्रेतानां स्नान घालून उत्त्तम सरटारी पोषाख चढवून, डोईवर मंदिल बांधले. सजवलेल्या एका गलबतात ते सातही मृतदेह ठेवले व वाऱ्याच्या हवाल्यावर सोडून विजे. हे गलबत ज्या गावाच्या किनाऱ्याला लागेल, त्याचे अधिकार मरोळच्या ठाकूर घराण्यातीळ वेशजाना पालखी - अबदागीर - छत्रीचा मान देऊन तेथे त्यांना सुप्रतिष्ठीत केल-दरसाल दोनशे लारी सरकारातून मिळण्याची व्यवस्था केळी. आपण त्यांच्यावर काही जबाबदार्या टाकल्या. इथली मंदिर त्यांनी राखावीत, न्यायनिवाडे करावेत आणि राजकीय सामाजिक- आर्थिक - भौतिक घटनांची तिथीवार नोंद करावी. हे अधिकार मिळावे म्हणून त्यांना अधिकारी म्हष्णू लागले.
     या दुर्गाशी निगडित एक ठळक युद्धप्रसंग म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेनी सन १७१० मध्ये पोर्तुगीजांना शिकवलेला धडा. त्यांनी ब्राम्हणगाव नावाचे ठिकाण वसवले (बहुतेक सागरगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे) त्यावर पोर्तुगीजांनी आणि काही मांडलिक भंडारी सैनिकांनी रात्री अकस्मात हल्ला केला. कान्होजी आंग्रेंना या हल्ल्याची बातमी हेरांनी आधीच दिली होती. त्यांच्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीजांचा दारुण पराभव झाला आणि आंग्रेनी आक्रमकांचा वेगाने पाठलाग करत कत्तल सुरु केली. हा हल्ला इतका तिखट होता की पोर्तुगीजांना आपला रेवदंडा कोटही गाठता येईना. तेव्हा चौलच्या हकीम मोतमखानाने त्यांना राजकोटात आश्रय दिला.  सन १७२१ मध्ये कान्होजीच्या मदतीस आलेल्या बाजीराव महाडिकची राजकोटकडे दृष्टी गेली.
१७३३-३४ च्या आसपास छत्रपती शाहू महाराज आणि मुघलांच्या दरम्यान झालेल्या. कराराप्रमाणे राजकोट मुघलांना दिला गेला आणि त्यांच्या वतीने संभाजी आंगरे कारभार पाहू लागले.  आंगरे घराण्यातील संभाजी व थोरला मानाजी यांच्यातील पहिल्या यादवीच्या वेळी नोव्हेंबर १७३४ मध्ये मानाजीने राजकोटचा आसरा घेतला होता. याच वर्षी डिसेंबरमध्ये पोर्तुगीज संभाजी आंगरेस सामील होऊन त्यांनी मानाजीवर चढाईसाठी राजकोटात मोर्चे लावले. पोर्तुगीज व मानाजीची राजकोटला लढाई झाली. याच महिन्यात संभाजी आंगरेने राजकोट घेऊन तेथील हवालदार मानाजीस सामील असल्याचे ओळखून त्याच्या ठिकाणी आपले लोक ठेवले. एप्रिल १७३६ मध्ये कामारले येथे विजयी झालेल्या चिमाजी अप्पाची मुघलांच्या नामधारी अमलाखाली असलेला राजकोट मराठ्यांच्या ताब्यात आणण्याची इच्छा होती. सन १७३९ मध्ये मराठ्यांनी राजकोटकडे पुन्हा हालचाली केल्या. दरम्यान  येसाजी आंगरेनेही राजकोट जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. राजकोट किल्ला पाडण्याचे अनेक वर्षे घाटत असावे. पुढे या कोटाच्या आडून शत्रूचा उपद्रव होऊ नये म्हणून जानेवारी १७४८ पध्ये पेशव्यांचा सरदार व आरमाराचा सुभेदार बाजीराव बेलोसे याने राजकोटास मोर्चे बांधून आणि सुरुंग लावून हा किल्ला कायमचा जमीनदोस्त केला.
12
तटबंदी तोडून तयार केलेला हा रस्ता

 

   हा आगरकोट मुळचा भुईकोट, पण पश्चिमेला समुद्र दक्षिणेता कुंडलिकेची खाडी आहे. उरलेल्या दोन दिशांना खंदक खोदून त्या कोटाचा त्यांनी पाणकोट करून टाकला. आगरकोटाच महाद्वार होते वायव्येला. खंदकातून शिरलेली गलबते थेट महाद्वाराचमा पायरीला लागत. आता मात्र हा खंदक पूर्ण भरून गेला आहे. मात्र थोडीफार तटबंदी शाबूत आहे- चौलचा किल्ला काळाच्या ओघात नामशेष झाला आहे.. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके अवशेष आजमितीला शिल्लक आहेत..चौल गावात पोहोचताच, इथे किल्ला कुठाय? अशी विचारणा करताच., किल्ला कुठे आहे असं विचारलं तर कुणी सांगत नाही. स्थानिकांना विचारत विचारत विविध खुणा तपासत या किल्ल्याच्या काही भिंतींचे अवशेष पाहता येतात. या गडाचे सध्याचे  जीपीएस लोकेशन 18.552973, 72.943235 आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही राजकोटाचे अवशेष पाहू शकता. पण या भिंती खासगी वाडीत आहेत त्यामुळे स्थानिकांची आदरपूर्वक परवानगी घेऊनच पुढे जा.

   हमामखाना :-

हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह! कमानींची रचना, भिंतीतच काढलेल्या खोल्या आणि या साऱ्यांवर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने या वास्तूला कलात्मक चेहरा आला आहे. या साऱ्यातून फिरणारे पाण्याचे पाट, कारंजी, हौद तर ती शाही श्रीमंतीच पुढे आणतात. आज या साऱ्यांचे पाण्याशी असलेले नाते तुटले असले तरी त्या सौंदर्यशाली रचना पाहूनच भिजायला होते.  हमामखाना हे केवळ अंघोळीचे ठिकाण नव्हते, तर तो त्या काळातील एक 'सोशल क्लब' किंवा विरंगुळ्याचे केंद्र होते. शीतलादेवी मंदिराकडून गोळवा देवीच्या गल्लीकडे जाताना ही वास्तू आजही आपले लक्ष वेधून घेते.
​कालखंड: साधारण १५ व्या ते १६ व्या शतकातील अहमदनगरच्या निजामशाही काळात याची निर्मिती झाली.
​शैली: ही वास्तू इंडो-पर्शियन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. मध्य आशियातील गरम पाण्याच्या कारंज्यांची (Turkish Baths) संस्कृती कोकणात उतरवण्याचा हा प्रयत्न होता.  ​हमामखान्याची रचना पाहताना आजही इंजिनिअर्स थक्क होतात: ​घुमटांची किमया: छतावर तीन मोठे घुमट आहेत. त्यावर असलेल्या गोलाकार छिद्रांमुळे नैसर्गिक प्रकाश आत येतो आणि वाफेचे योग्य नियोजन (Ventilation) होते. ​पाण्याचे जलद नियोजन (Hydraulics): भिंतींच्या आतून टेराकोटाच्या (मातीच्या) नळ्यांचे जाळे पसरलेले होते. गरम आणि गार पाणी एकाच वेळी खेळवण्याची ही पद्धत आजही विस्मित करते.: काळ्या पाषाणाचे चिरे, चुना आणि शिसे यांचा वापर करून हे बांधकाम इतके भक्कम केले आहे की, कोकणच्या पावसाचा आणि खाडीच्या हवेचा यावर फारसा परिणाम झाला नाही.
 चौल स्मारक
 








 
10


एकविरा भगवती मंदिराच्या सुमारे एक कि. मी. दक्षिणेला एक लहानसा उंचवटा व पोखरण आहे. तेथून जवळच आग्नेयेला मुसलमानकालीन हमामखाना किंवा स्नानगृह आहे. हमामखान्याच्या उत्तरेकडील भितीत प्रत्येकी २.८९४ २.२९४ ३.६६ मीटर आकाराच्या कमानीयुक्त सहा ओवऱ्या असून पूर्वेकडील बाजूच्या २.७४ मीटर रुंदीच्या दरवाजाने दोन कमानीतत ६ ११ मोटर चौकोनी प्रमख दालनात जाता येते हे सर्व अवशेष पडझड झाली असली तरी अजून उभे आहेत. मात्न प्रमुख दालनावरील सुमारे ९.१४ मीटर उंचीवरील घुमट पडलेला आहे. दालनाच्या मध्यभागी पूर्वी अष्टकोनी कारंजे असावे. दालनाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूंच्या भिंतीत कमानीयुक्त बैठकीची सोय आहे. दालनाच्या वायव्य कोपऱ्यातील वळणाच्या अरुंद वाटेने आत गेल्यावर उत्तर बाजूस ४.८८४४.११ मीटर व दक्षिणेस ७.९२० ३.९६ मीटर आकाराची दोन स्नानगृहे आहेत. स्नानगृहांच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर जुन्या आसा मशिदीचे काही अवशेष आढळतात.
कलावंतिणीच्या महालामागे ५० फूट अंतरावर तीन कमानी असलेली मशीद आहे. हे बांधकामही दगड आणि चुना वापरून केलेलं आहे. यात पश्चिम दिशेला प्रार्थनेसाठी मिहराब आहे. छतावरील दगड कोसळून मोकळी जागा निर्माण झाली आहे त्यातून सूर्यप्रकाश पाहणे हा एक स्मरणीय अनुभव असतो.
कलावंतिणीचा महाल पाहून चौलकडे परतत असताना उजवीकडे एक रम्य तळ्याचा परिसर नजरेला पडतो. तिथं काठावर बसून दिसणाऱ्या मोहक लँड्स्केपचा आनंद जरूर घ्यायला हवा. चौलच्या दत्ताचा डोंगर आणि हिरवळीने भरलेल्या काठाचं प्रतिबिंब असलेलं नितळ पाणी. या तळ्याच्या पश्चिम दिशेला एक टेकाड आहे, त्यावर मशीद आहे असं स्थानिक सांगतात. गुगल मॅपवर इथं भोवाळे देवीचे स्थान आहे असं दर्शवलेला टॅग आहे. परंतु गॅझेटमधील माहितीनुसार हा एक इस्लामी धाटणीचा मकबरा आहे. बांधकामाची दख्खनी शैली पाहता निजामशाही किंवा बहामनी काळात किंवा आदिलशाहीच्या दहा वर्षांत हा मकबरा बांधला गेला असावा असं वाटतं.     साधारणपणे ३७ मीटर स्क्वेयर आकाराचा या मकबऱ्याचा पाया असावा. घुमट अंदाजे १० फुटी आहे. दगडी भिंती साध्याच असून जाळीच्या खिडक्या आणि कमानीचा दरवाजा आहे. १५१४ साली बार्बोसाने लिहिलेल्या नोंदीनुसार सराई गावाच्या आसपासच्या भागात मोठी जत्रा भरत होती असे दिसते. इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून मध्ययुगीन काळापर्यंत विविध प्रवाशांनी आणि नंतर गॅझेटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराबद्दल बरीच कल्पना येते.चौल नाक्यावरून शीतलादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने काही अंतर गेल्यावर हमामखान्याकडे जाण्यासाठी वळण्यापूर्वी रस्त्यालगत डाव्या बाजूस मुसलमानकालीन हजामखान्याची कशीबशी उभी असलेली अर्धवट भित दिसते. कबरस्तान, आसा मशीद, हमामखाना, हजामखाना इत्यादी अवशेषांवरून या परिसरात मुसलमानी राजवटीत प्रांताधिकाऱ्याचे मुख्यालय असावे.

कलावंतिणीचा वाडा :-
      चौल रेवदंडा परिसर पोर्तुगीज किल्ल्यासाठी ओळखला जातो पण पंचक्रोशीत हिंदू देवळे आणि इस्लामी इमारतीही अनेक आहेत. चौलचे दत्त स्थान प्रसिद्ध आहे. तिथं जाणाऱ्या रस्त्यातून चौल नाक्याहून सराई गावात पोहोचलं की निजामशाही किंवा बहामनी शैलीचा एक वाडा रस्त्यालगत दिसतो. त्याला कलावंतिणीचा वाडा किंवा कलावंतिणीचा महाल या नावाने ओळखले जाते. ही इस्लामी पद्धतीची दगड आणि चुना वापरून बांधण्यात आलेली इमारत आहे. तीन घुमट आणि तीन कमानी असलेले हे बांधकाम घडीव दगडांच्या प्रमाणबद्ध रचनेतून साधण्यात आले आहे. त्याचं एक राकट सौंदर्य आहे.
सभागृहाला तीन घुमट व दोन्ही बाजूस दोन मोठ्या देवळया होत्या. त्याच्या पश्चिमेला ५० पावले रुंद व ७० पावले लांब अशी चहूबाजूंनी भिती बांधलेली जागा होती. त्यापुढे १३.९५ मी. x ४.०५ मी. आकाराची मशीद होती. मशिदीमागे एक मोठे तळे होते.

9










      पुरातत्व खात्याकड़े असलेली हि वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे. एके काळी हा वाडा चौलची ओळख होती, असे इतिहासात वाचायला मिळते. हि वास्तू निजामशाही व आदिलशाहीत कितीतरी करमणुकीच्या क्षणांची साक्षीदार असेल. मोठमोठे अधिकारी या वाड्यात येत असतील. कितीतरी लोकांना या वाड्याची मोहिनी असेल.चौलच्या सराई भागात आज उद्ध्वस्त अवस्थेत उभ्या असलेल्या या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत या साऱ्यांतून फिरू लागलो की, काही क्षण वर्तमानाचे भान हरपते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगी!
 उदयाकडून अस्ताकडे चाललेल्या या वाड्याची आजची स्तिथी खूपच वाईट आहे. या वाड्याची तटबंदी पूर्णतः भग्न झाली आहे. फक्त प्रवेशद्वार आणि त्या समोरील वास्तू आज ठीकठाक अवस्थेत आहेत. या वास्तूच्या मागच्या बाजूला मोकळी जागा आहे. तिथं डाव्या बाजूला पायऱ्या आहेत. त्यांनी चढून आपण घुमटांच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. मागच्या माळरानाचे दृश्य इथून छान दिसतं. आज या वाड्याच्या आत पूर्णतः शेती केली जात आहे.  घुंगरांचा आवाज ऐकलेला आणि नाचगाणे पाहणाऱ्या ह्या वास्तूच्या मागे प्रचंड मोठे तळे आहे. बहुतेक ह्याच वास्तूतील कलाकारांसाठी हि पाण्याची व्यवस्था असू शकेल. ऐतिहासिक नजरेतून त्या वास्तूत जेव्हा आपण शांत उभे राहतो. तेव्हाचा थिरकणाऱ्या घुंगरांचा आवाज आणि नाद कानावर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी हि मुकं वास्तू एकदातरी पाहणे गरजेचे आहे

रेवदंडा

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्रकिनाऱ्यालगत निसर्गसौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. या अष्टागरात दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. रेवदंडा म्हणजे प्राचीन चौलचाच एक भाग. मूळ चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आल्याने आजही या परिसराचा उल्लेख चौल-रेवदंडा असा केला जातो. चौल हे प्राचीन बंदर असल्याने या भूमीचा इतिहास चौलशीच जोडला जातो पण रेवदंडा भाग चर्चेत आला तो पोर्तुगीज राजवटीत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी येथे पाय रोवले व जवळपास २१० वर्षे या भागावर वर्चस्व राखले. वसईच्या बरोबरीनेच पोर्तुगीजानी रेवदंडय़ात सत्ता राखली व या काळात त्यांनी रेवदंडय़ाचा किल्ला बांधला.

       सह्याद्रीत उगम पावणारी कुंडलिका नदी चौल-रेवदंडाजवळ अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर प्राचीन काळापासून चौल हे सुरक्षित व प्रसिद्ध बंदर होते. इ.स.१३० पासून ते १७६८ पर्यंत ह्या बंदरातून जगाच्या कानाकोपऱ्यात जहाजे जात येत होती. परंतु कालांतराने या बंदरात गाळ साचल्याने ह्या बंदराचा उपयोग कमी होत गेला. प्राचीन काळी रेवदंडा हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. श्रीकृष्णाचा धोरला भाऊ असणात्या बल रामाची पली रेवती हिला हे गाव श्री कृष्णाने आंदण दिले होते. धर्मराजाने सोडलेल्या अश्वमेध यज्ञाच्या याज्ञाश्वाळा इथल्या हंसध्वज राजाने पकडले तेव्हा अर्जुनाने त्याच्याशी युद्ध केले ते येथेच. 

शिलाहार राजवंशाने या भागावर दीर्घकाळ राज्य केले.दहाव्या शतकात अल मसुदी हा अरबी व्यापारी येथे आला असता झंझ शिलाहार राजा येथे राज्य करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. भारताला भेट देणारा अफनासी निकीतीन हा पहिला रशियन प्रवासी इ.स.१४६६ ते ७२ या काळात भारतात आला होता. त्याने त्याच्या या प्रवासाची सुरुवात चौलच्या बंदरातुनच केली होती. पुढे त्याने पाली, मुंब्रा, जुन्नर असा मोठा प्रवास करून या प्रदेशाचे वर्णन करून ठेवले आहे. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण गावाभोवती तटबंदी बांधून त्यांनी गावालाच रेवदंडा किल्ल्याच्या कवेत घेतल. पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली पण त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी निजामाकडून परवानगी घेऊन कारखान्यासाठी सध्या चौकोनी बुरुज म्हणुन ओळखली जाणारी इमारत बांधली. इ.स.१५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगीजांचा पराभव केला त्यामुळे १५२१ ते १५२४ दरम्यान पोर्तुगीजांनी या वखारीभोवती तटबंदी बांधली. सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत या किल्ल्यात पोर्तुगिजांनी अनेक इमारती बांधल्या. १६२५ ते १६३४ या काळात किल्ल्याचा विस्तार करण्यात आला. १६३५ ला उत्तरेचा तर १६३८ ला दक्षिणेचा दरवाजा दुरुस्त करण्यात आला. १६५६ पर्यंत हे नवे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसते. 
इ.स.१६३४ मध्ये इथे आलेला अँटॉनिओ बोकारोने हा पोर्तुगीज लिहितो,  त्यावेळी पोर्तुगीज किल्ल्यात घडीव दगडांच्या भिती असलेल्या आवाराच्या आत त्यांचा सेनाधिकारी राहत होता. तेथे एक तुरुंगही होता. किल्ल्यात २०० पोर्तुगीज व पन्नास स्थानिक विश्चनांची मजला असलेली दगडी घरे होती. प्रत्येक घरात एक गुलाम असे. पूर्वी गुलाम जास्त होते. परंतु ते नंतर चौलला गेले. आवाराच्या बाहेर काही ख्रिश्चन व इतर कुशल कारागीर होते. तेथे दोन शस्त्रागार होते. सभोवतालच्या भितींच्या आतील परिसरात भव्य  कॅथेड्रल, रुग्णालय, सेंट पॉल जेझुइट चर्च, जेझुइट मोनॅस्टरी, डोमिनिकन फ्रेंन्सिस्कन चर्च व ऑगस्टिनियन चर्च व मोनॅस्टरी अशा सात धार्मिक इमारती होत्या. भिंतीच्या बाहेर सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च व सदर ऑफ गॉडचे कॅपूचिन चर्च अशा तीन इमारती होत्या. या दहा इमारतींकरिता प्रतिवर्षी सरकारातून एकूण रु. २,४४८ खर्च होत असत. पोर्तुगीजकाळी या भागाचे वैभव खूप मोठे असावे. काळाच्या ओघात या वास्तू नष्ट झाल्या. या दुर्गाचे नामकरण पोर्तुगीजांनी साओ पेद्रो ए साओ पाऊलो दे चौल असे केले होते. उत्तरेचा दरवाजा जमिनीकडील म्हणून त्याचे नाव पोर्टा डे टेरा असे करण्यात आले आणि त्याला संरक्षण देण्यासाठी खंदक खणण्यात आला. दक्षिणेकडील दरवाजा हा बंदराच्या दिशेने उघडत असे म्हणून त्याचे पोर्ट डॉ मार असे बारसे करण्यात आले. इथं एक शिलालेख आहे ज्यात १५७७ मध्ये हे बांधकाम अलिक्सान्द्रे डिसोझा फ्रेयर च्या काळात झाले अशी नोंद वाचता येते.
    बोकारोने आणखीही काही वास्तू व बुरुजांची नोंद करून ठेवली आहे. त्यात नऊ बुरुजांचा तो उल्लेख करतो. नदीच्या बाजूकडे असलेल्या पहिल्या बुरुजावर १८ पौंड वजनाचे दगडी गोळे मारू शकणारी कॅमेल नावाची एक मोठी तोफ होती. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बुरुजावर फक्त वाळू भरून ठेवली होती. चौथ्या बुरुजावर १८ पौंडी दगडी गोळा फेकणारी आणखी एक कॅमेल तोफ व ६५ पौंडी लोखंडी गोळा फेकणारी एक तोफ अशा दोन तोफा व लहानसे किल्ल्यासारखे वांधकाम होते. सॅम पावलोच्या समोरच्या बुरुजावरही अशीच दोन बांधकामे होती व आतून लोखंडी आवरण असलेली पितळी सर्पाकृती तोफ होती. तिच्यातून १६ पौंडी गोळे उडवीत. सॅम डिनिस या सहाव्या बुरुजावरून लोखंडी तोफेतून १४ पौंडी दगडी गोळे उडवीत. येथे समुद्राकडे तोंड करून लहानशा किल्ल्यासारखे बांधकाम होते. सातव्या बुरुजावर ४० पौंड वजनाचे गोळे फेकणारी गरूड तोफ व प्रत्येकी ५० पौंडी वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या. आठव्या बुरुजावर तोफा नव्हत्या. शेवटच्या नवव्या बुरुजावर २४ पौंड वजनाचे लोखंडी गोळे फेकणारी एक तोफ होती. सन १६२५ मध्ये आग्नेय कोपरा बांधला तेव्हा कॅथेड्रल भितीच्या बाहेर होते. मात्र १६३४ मध्ये ते भितीच्या आत आले. सत १६३४ नंतर तटबंदीची बरीच दुरुस्ती केली. सन १६३५ मध्ये उत्तर दरवाजा तर १६३८ मध्ये दक्षिण दरवाजा दुरुस्त केला. सन १६५६ मध्ये दक्षिण दरवाजासमोरचे बांधकाम केले व १६८८ मध्ये वायव्येचा टॉवर बांधला.
     सरासरी ६.०९ मीटर उंच व ३.६६ मी. रुंद असलेल्या गोलाकार भितीची लांबी अंदाजे २.४२ कि. मी. होती. या भितीवर बंदुकीने मारा करण्यासाठी लहान झरोके (जंगी) असलेली १.८३ मी. उंचीची दुसरी भित होती व वर वर्णन केल्याप्रमाणे अर्ध-वर्तुळाकार नऊ मनोरे होते. किल्ल्याचे आवार दक्षिणोत्तर व पूर्व-पश्चिम अनुक्रमे २०१.१६८ मी. व ३०१.७५२ मी. होते. पश्चिम व दक्षिणेकडून हल्ला होण्याची भीती नव्हती. तसेच पूर्वेकडील दलदलीच्या प्रदेशामुळे तिकडूनही कमी भीती होती. म्हणून या तिन्ही बाजूंनी फार भव्य मजबूतीची आवश्यकता नव्हती. भीती होती ती उत्तरेकडून. म्हणूनच त्या बाजूस २.१३ मी. खोल व १७ पावले रुंद असा खंदक समुद्रापासून चौल खाडीच्या वायव्य टोका-पर्यंत खणला होता.


दिनांक ५ डिसेंबर १७२८ रोजी आंद्रे रिबेरो कुटिन्होने पोर्तुगीज चौलची म्हणजेच रेवदंड्याची कार्यालयीन तपासणी केल्यावर लिहिलेल्या अहवालानुसार किल्ला आकाराने पंधरा वाजू असलेला व अकरा बुरुजांचा होता. तीन ते चाळीस पौंडी ५८ तोफा, दगडांचा मारा करण्याच्या तोफा, ६२ व्यक्तींची एक याप्रमाणे तीन कंपन्या होत्या. याशिवाय स्थानिक मच्छीमार बोटीवाले व नारळाच्या झाडावर चढणारे होते. शहराच्या भितीच्या बाहेर उत्तरेकडील श्रीमंत लोकवस्ती असलेल्या बाजूस संरक्षणासाठी सुरक्षित जागा बांधून तेथे १९ तोफा, सैन्याच्या दोन कंपन्या आणि २३४ भंडारी होते. सभोवतालचा खंदक काही
तय १९ ताफा, सन्याच्या दान कपन्या आणि २३४ भडारा हात. सभोवतालचा खंदक काही ठिकाणी वाळूने भरला होता. कुटिन्हो याने असेही नमूद केले आहे की, १६३४ पासून तटबंदीची इतकी दुरुस्ती झाली की, ती जणू नव्यानेच बांधल्यासारखी आहे. पश्चिमेच्या बाजूने समुद्राच्या लाटांमुळे झालेले नुकसान सोडता बाकी सर्व बांधकाम सुस्थितीत आहे.
      आजही किल्ल्याच्या तटाबुरुजावर अनेक तोफा दिसतात. निजामशाहीत रेवदंडा गाव चौलचाच एक भाग समजला जात होता. वस्तुतः त्याकाळी चौल व रेवदंडा ही गावे एकमेकावर अवलंबून व एकमेकास पूरक होती. इ.स.१६३६ मध्ये निजामशाही वाचवताना शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे मदत मागितली असता त्यांनी नकार दिला. इ.स.१६५७-५८च्या सुमारास शिवरायांनी चौल जिंकले पण रेवदंडा मात्र पोर्तुगीजांकडे राहिला. इ.स.१६७४ मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर असलेला इंग्रज वकील हेन्री ओकझेंडन एक दिवस रेवदंडा किल्ल्यात राहिला होता. २२ जुलै १६८३ च्या रात्री संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंडा किल्यावर हल्ला केला पण पोर्तुगिजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातल्यावर तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. इ.स. १७२८ मधील आंद्रे रिबेरो कुरिन्हाने या पोर्तुगीजाच्या अहवालात या किल्ल्याचा तपशील येतो. तो म्हणतो या किल्ल्यास अकरा बुरूज असुन किल्ल्यात तीन ते चाळीस पौंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या ५८ तोफा आहेत. ६२ सैनिकांची एक याप्रमाणे तीन कंपन्या इथे तैनात आहेत.
पुढे चिमाजी आपांच्या वसई मोहिमेच्यावेळी बारीक सारीक ठाणी ताब्यात घेण्याचे ठरवले तेव्हा मानाजी आंग्रयाने २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदंड्‌यावर हल्ला केला. दुसन्या दिवशी मोर्चे लावले. पोर्तुगीजांनी कणखरपणे प्रतिकार केला. नानासाहेब चिमाजी अप्पांनी रेवदंडेकर व पोर्तुगीजांना त्राही भगवान केले.. ८ डिसेंब १७४० रोजी रेवदंडयाचा किल्ला खंडोजी माणकरांनी हस्तगत केला. इ.स.१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखुन २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात आगरकोट व कोरलई हैं दोन्ही किल्ले इंग्रजांना दिले. पुढे अँग्लो-पोर्तुगिजांच। प्रतिनिधी कॅप्टन इंचबर्ड याच्या मध्यस्थीने १७४० मध्ये तह होऊन चौलचा प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले. १८०६ च्या नोव्हेंबर मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. अन् किल्ला दुरु अंदाज घेतला. १८१७ मधे रेवदंडा परत आंग्र्याकडे आला तेव्हा गेज्याठ नारायन शेणवी यांना सुभेदार नेमले.. १८१८ मध्ये काही काळ परत इंग्रजानी तो ताबात घेतला. पण लगेचच पेण-पनवेल कडील माणिकगड तालुका घेऊन रेवदंडा परत आंग्रे यांच्या कडे दिला गेला.
रेवदंडा परिसरात पोर्तुगीजकालातील फॅक्टरी किंवा चौकोनी बुरुजातील कॅप्टनचे निवासस्थान व तुरुंगाभोवतीच्या लहानशा किल्ल्याचे अवशेष तसेच जेझुइट मोनॅस्टरी, सातखणी बुरूज, डोमिनिकन चर्च व मठी, सेंट झेवियर चॅपेल आणि या सर्वाभोवती संरक्षणासाठी बांधलेली भित यांचे अवशेष पाहण्यास मिळतात. रेवदंडा पेशव्यांनी घेतल्यावर (१७४०) नानासाहेब पेशव्याने हरेश्वराचे व हनुमंताचे मंदिर बांधले. श्रीसिध्देश्वराचे मंदिर १७४० मध्ये बाबूभट नेने पंडित याने ग्रामस्थांकडून वर्गणी मिळवून बांधले. श्रीमाधवनारायणाचे मंदिर महादजी बल्लाळ दांडेकर याने स्वतःच्या पैशांनी बांधले. इतर मंदिरे यानंतरची आहेत.


 रेवदंडा किल्ला पहाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अलीबाग येथे यावे लागते. मुंबई-अलिबाग हे अंतर १०० कि.मी.असुन पुणे अलिबाग हे अंतर साधारण १४० कि.मी. आहे. अलिबागपासून रेवदंडा किल्ला २० कि.मी.अंतरावर असुन तेथे जाण्यासाठी बस-रिक्षाची सोय आहे. रेवदंडा गाव किल्याच्या तटबंदीच्या आत वसलेले असुन गावात शिरणारा रस्ता तटबंदी फोडून काढला असल्याने गावात शिरतानाच तटबंदी दिसुन येते. संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास रेवदंडा बसस्थानकावर उतरुन गडफेरीला सुरुवात करावी. साधारण लंबगोलाकार आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ ७० एकरपेक्षा जास्त आहे. संपुर्ण रेवदंडा गावाभोवती हि तटबंदी असुन या तटबंदीची लांबी २ कि.मी. पेक्षा जास्त आहे. किल्ल्याची बहुतेक तटबंदी आजही शिल्लक आहे. तटबंदीच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि उत्तरेला कुंडलिका खाडी असुन पुर्व बाजुला दलदल व तर दक्षिण बाजूच्या तटाबाहेर खंदक खोदलेला होता. हा खंदक आता पुर्णपणे बुजला आहे. किल्ल्याला उत्तर व दक्षिण दिशेला दोन मुख्य दरवाजे असुन तटबंदीत अजुन दोन लहान दरवाजे पहायला मिळतात. किल्ल्याला अजुनही लहान दरवाजे असावेत पण खाजगी मालकी हक्कामुळे किल्ल्याच्या बऱ्याच भागात फिरता येत नाही. आगरकोटमधील रस्ते युरोपियन 'ग्रिड' (Grid) पद्धतीने होते. पोर्तुगीज धाटणीची मोठी प्रवेशद्वारे (Portals) आणि चर्चच्या बाजूने जाणारे प्रशस्त मार्ग ही याची वैशिष्ट्ये होती.


बस स्थानकाकडून किल्ला फिरायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण कुंडलिका खाडीच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे येतो. 

येथे दुहेरी तटबंदीत एकामागोमाग एक असे दोन दक्षिणाभिमुख दरवाजे असुन या दोन्ही दरवाजांमधील भागात रणमंडळाची रचना आहे.



 यातील एका दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगीज सत्तेचे राजचिन्ह कोरलेले आहे. दोन दरवाजांच्या मध्ये असलेल्या रणमंडळाच्या भिंतीत पोर्तुगीज भाषेत दरवाजा बांधल्याचा काळ सांगणारा एक शिलालेख आहे.आणि त्या काळातील त्यांची महत्वाची शिल्पकला उठून दिसते. यामध्ये जागतिक स्वामित्व (आर्मीलरी स्पियर), कोट ऑफ आर्मस आणि तीन भाले एकाच गाठीत बांधून तीस वर्ष सत्ता उपभोगल्याचे शिल्प दर्शनी भागांत लावून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. असे हे शिल्प आपल्याला त्या काळात घेऊन जातात. रेवदंडा व चौल किल्ल्यांच्या परिसरात एकूण १८ शिलालेख आहेत. त्यांपैकी ११ पोर्तुगीज, ४ मराठी, २ उर्दु आणि यादवांचा इ.स. १२९८ मधील संस्कृत व मराठी मधील शिलालेख आहेत. यातील काही आजही इथे असुन काही मुंबई एशियाटिक सोसायटीत ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत शिरताच समोरच तीन मोठे दगडी गोळे दिसतात. दरवाजाच्या बाजूलाच तटबंदी व शेजारील बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्याशेजारील भिंतीत एक तोफगोळा असुन बुरुजावर दोन मोठया तोफा दिसुन येतात. तटावरून खाली उतरून थोडे पुढे आल्यावर अजुन एक दरवाजा पहायला मिळतो. शिल्पकृतींनी सजलेल्या या दरवाजावर दोन धर्मगुरु कोरलेले असुन त्याखाली त्यांची नावे व वरील बाजुस क्रॉस तसेच राजचिन्ह कोरलेले आहे.  त्याकाळी मागे फिरून लवून मुजरा करण्याचे ठिकाण असलेला हा महत्वाचा दरवाजा होता. कितीतरी अधिकाऱ्यांचा मुजरा या मुकुटासमोर झडला असेल पण दुर्दैवाने आज मात्र हे शिल्प वेलींच्या विळख्यात अडकलेले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने हादरून गेलेली पोर्तुगीज सत्तेची शिल्प आज निसर्ग उखडून फेकण्याच्या तयारीत आहे. हे शिल्प पूर्णतः दगडी असून हे पाहणे म्हणजे पर्वणी आहे. असे शिल्प पोर्तुगीजांच्या किल्ल्यांवर खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.या दरवाजाच्या आतील बाजुस पोर्तुगीजांनी रेवदंडा येथे किल्ल्याआधी १५१६साली बांधलेली वखार असुन या वखारीभोवती हा दरवाजा व तटबंदी १५२१ ते १५२४ या काळात बांधली गेली. हा भाग खाजगी मालमत्ता असुन वखारीच्या दरवाजालाच फाटक लावून बंद केल्याने आत जाता येत नाही. येथुन डांबरी वाटेने किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला जाताना वाटेत डाव्या बाजुला जेझुईट मोनेस्ट्रीचे अवशेष दिसतात. जेझुइट या अतिशय कडव्या पंथाच्या साधकांची इमारतही किल्ल्यात आहे. इसवीसन १५७० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या सैन्याने इथं वेढा दिला आणि त्या हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचा विध्वंस झाला आणि काहींचे बांधकाम पुन्हा केले गेले. काही इमारतींचे अस्तित्व मात्र अवशेषरूपातच पाहता येते.
या मोनेस्ट्रीसमोरच किल्ल्याच्या तटबंदीतील एक लहान दरवाजा तोडून रस्ता बाहेर गेलेला आहे. या रस्त्याने बाहेर जाऊन किल्ल्याची तटबंदी पहाता येते. येथे असलेल्या बुरुजाच्या वरील भागात एका तोफेचे तोंड दिसुन येते पण हा भाग देखील खाजगी मालमत्ता असल्याने तेथवर जाता येत नाही. येथुन परत आत येऊन उजव्या बाजुला तटबंदीला समांतर गेल्यावर काही अंतरावर तटबंदीत एक दरवाजा आहे. हा भाग खाजगी मालमत्ता असला तरी येथील मालकाने आत जाण्यास परवानगी दिली. या दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी खोल्या असुन तटाच्या आत जमिनीखाली दारूगोळ्याचे कोठार आहे तसेच प्रसंग पडल्यास तटाबाहेर खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. येथुन तटबंदीला समांतर तसेच पुढे गेल्यावर काही अंतरावर तटाला लागुनच तटबंदीवर तोफा चढवण्यासाठी बांधलेला उतार दिसतो. तेथुन पुढे आल्यावर किल्ल्याच्या उत्तर तटबंदीत असलेला किल्ल्याचा दुसरा मुख्य दरवाजा दिसतो. येथे देखील दोन दरवाजे असुन या दरवाजांची रचना पहिल्या दरवाजाप्रमाणेच आहे. 
चौकोनी बुरूज : 
      दक्षिण दरवाजाच्या दोन कमानीतून आत गेल्यावर थोडेसे पूर्वेस है ठिकाण असून येथेच पोर्तुगिजांनी १५१६ मध्ये वखार बांधली व सभोवती सुरक्षिततेसाठी १५२१-१५२४ या कालावधीत मजबूत भिती बांधल्या. पोर्तुगिजांची गोव्याबाहेरील ही सर्वात जुनी इमारत आहे.

11



 वखारीच्या दर्शनी भागी दगडी दरवाजाची एक सुंदर कमान असून ती शाबूत आहे. तिच्या वरच्या बाजूस मध्यभागी पोर्तुगीज बोधचिन्ह असून त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या मानवाकृती आहेत. वरच्या बाजूस क्रॉस व थोडे कोरीव कामही आहे. दरवाजाच्या आत पूर्व-पश्चिम सुमारे ४० पावले व दक्षिणोत्तर सुमारे ५६ पावले जागेभोवती पूर्वी ७.६२ मीटर उंचीची भित होती व नैऋत्येस १५.२४ मीटर उंचीचा भक्कम बुरूज होता. सध्या भिती पडलेल्या असून बुरूज मात्र आपले अस्तित्व दाखवितो. या जागेत कप्तानाचे निवासस्थान व तुरुंग होता. येथे आता नारळीपोफळीची बाग आहे. उत्तरेच्या मुख्य दरवाजापासून ५४.८६ मीटर दक्षिणेस व अलिबाग रस्त्याच्या पश्चिमेस जेझुइट मोनॅस्टरीच्या भितीचे काही अवशेष आहेत.

8


येथे बाहेरील दरवाजाच्या वरील बाजुस पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेले असुन त्यावरील बाजूस मोठा राजमुकुट कोरलेला आहे.  खाली सेंट पीटर आणि सेंट पॉल या दोन संतांच्या प्रतिमाही आहेत. ज्यांच्यावरून या किल्ल्याला नाव दिले गेले. चौकोनी बुरुजाजवळ १५१६ साली एक छोटी वखार बांधली गेली व पुढे १५२१ ते १५२४ हे बांधकाम पूर्ण झाले.
 बाहेरील दरवाजासमोर एक लहानसे मंदिर असुन तटामध्ये लहान लहान देवड्या आहेत. किल्ल्याच्या या दरवाजांवर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. दरवाजा पाहुन परत आल्यावर तटबंदीला समांतर न जाता डावीकडे वळावे. या वाटेवर समोरच पांढऱ्या रंगाने रंगवलेली सिद्धेश्वर मंदिराची दीपमाळ दिसते. मंदिराला लागुनच अलीकडे तटबंदीयुक्त तीन मजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन दरवाजात १६३० मधील दोन शिलालेख आहेत. हा भाग देखील खाजगी मालमत्तेत असल्याने वाडयाच्या दरवाजालाच फाटक लावुन आत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाडयाच्या अवशेषात नारळाची बाग लावलेली आहे. सिद्धेश्वर मंदीर १७४० मध्ये बाबुभट नेने यांनी लोकवर्गणीतुन बांधलेले असुन मंदिराच्या आवारात पायऱ्या व दरवाजा असलेली विहीर आहे. हि विहीर वरील बाजूस चौकोनी असुन आतील बाजूस गोलाकार आहे. मंदिरात शिवलिंग व नंदी असुन एका कोनाड्यात गणेशमुर्ती आहे. या मंदिरात शिकारीचा प्रसंग कोरलेली सुंदर लाकडी तुळई पहायला मिळते. मंदिरासमोर पोर्तुगीज शैलीतील एका वास्तुचे अवशेष असुन या वास्तुचा पडझड झालेला दरवाजा पहायला मिळतो.

3





 मंदिराकडून सरळ पुढे जाऊन उजव्या हाताला वळल्यावर एक मनोरा आपले लक्ष वेधुन घेतो. ६ मजले असलेली हि इमारत सातखणी मनोरा व पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार म्हणुन ओळखली जाते कारण या मनोऱ्यावरुन संपुर्ण किल्ल्याचा अंतर्भाग तसेच तटाबाहेरील समुद्राचा खुप लांबवरचा प्रदेश दिसत असे. वायव्येकडील बुरुजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेयेस ४५.७२ मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भितीत पडलेल्या भगदाडासमोर १५३४ च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमारतीच्या मध्यभागी असलेल्या ६.०९ मीटर चौकोनी आकाराच्या सातखणी बुरुजाच्या भितींचा सांगाडा अजून उभा आहे. पूर्वी त्यांची उंची २९.२६ मीटर इतकी नमूद केलेली असली तरी वरच्या बाजूने भिंती पडल्यामुळे उंची कमी झालेली आहे. या मनोऱ्याच्या आजूबाजूला लांब पल्ल्याच्या तोफा पडलेल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या या तोफा आज मात्र त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या तटबंदीवरुन अफाट आणि अथांग समुद्र दिसतो, इथूनच पोर्तुगीजांनी टेहळणीसाठी खास बांधलेला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या टेकडीवर कोर्लई किल्ला दर्शन देतो. आज तिथे दिपस्तंभसुद्धा आहे.


याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असावा. या मनोऱ्याच्या आवारात २ फोर्ज वेल्डेड तोफा व ५ ओतीव तोफा दिसतात. मनोऱ्याच्या आसपास असलेले उध्वस्त अवशेष पहाता येथे एखादे चर्च असल्याचे जाणवते. याशिवाय या आवारात असलेल्या दफनभूमीत दोन शिलालेख पहायला मिळतात. 
बुरुजाच्या लगत भोवतालीच्या सर्व इमारती पूर्णपणे पडलेल्या असून कोठे तरी अर्धवट भितीचे अवशेष दिसतात. या सर्व इमारती फान्सिस्कन चर्च व मटीच्या संरक्षणार्थ वांधलेल्या होत्या. इ. स. १५७७ च्या वेढ्यात त्यांनी फार मोठी कामगिरी बजावली होती. फ्रान्सिस्कन चर्च सेंट बारबाराच्या नावे १५३४ मध्ये सुरू केले होते. सन १८४७ पर्यंत हे चर्च सुस्थितीत होते. इ. स. १८५४ मध्ये त्याची बरीच पडझड झाली. इ. स. १५४९ मध्ये बांधलेले डोमिनिकन चर्च व मठीचे काही अवशेष आहेत. 

सध्या त्याची एक दगडी भव्य कमान, पाठभित व बाजूच्या भिती आहेत. खिडक्यांच्या वर पुढे आलेल्या भागावर नक्षीकाम आहे. दक्षिणेकडील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मुख्य मोठ्या कमानीच्या दोन्ही बाजूस उंच खिडक्या असलेल्या भितीचे अवशेष आहेत. समोर डाव्या बाजूस घोड्यांच्या पागेची जागा आहे. समोर भव्य इमारतीचे अवशेष विखुरलेले आहेत. हे चर्च १६३४ मध्ये सर्वात वैभवसंपन्न होते.


समुद्राकडील दरवाजावर अशी पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेली दिसतात. ती पाहून आत असलेलं मॅट्रीज चर्च अवशेषरूपात पाहायचं. मॅट्रिझ चर्चचे बांधकाम १५३४ मध्ये सुरु केले गेले तिथं नोसा सेन्योरा डो मार म्हणजेच अवर लेडी ऑफ द सी या रूपात इथं मेरीची अर्चना केली जाते. पोर्तुगीज रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आणि अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने इथं अनेक चर्च आणि मठांचे बांधकाम दिसते. आता बरीच पडझड होऊन नुकसान झालेले असले तरीही मूळ आकाराची भव्यता इथं सहज लक्षात येते. डॉमिनिकन चर्च आणि मठाचे बांधकाम या कोटात १५४९ च्या आसपास झाले.
डोमिनिकन चर्च व मठीच्या पूर्वेस सुमारे ४५.७२ मीटरवर लहान इमारतींचे काही अवशेष दिसतात. येथून पुढे काही अंतर गेल्यावर उजव्या बाजूस सेंट झेवियर चॅपलचे अवशेष दिसतात. त्याच्या दरवाजावरील एक चौकोनी दगड खाली पडला असून त्यावर लेख आहे. या चर्चच्या दोन्ही बाजूच्या भिती शिल्लक आहेत. डोमिनिकन चर्च व सेंट झेवियर चॅपलवरील संगमरवरी शिलालेखांवरून मध्यवर्ती पुरातत्त्व खात्याकडून त्यांचे स्थान दर्शविणारे फलक चुकीचे लागले असल्याचे जाणवते.



 आगरकोटच्या बाहेर उत्तर दरवाजाच्या पूर्वेस मुसलमान मोहोल्ल्यात एक मशीद असून तिचे आधुनिक पद्धतीचे मजबूत व सर्व सोयींनी युक्त बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. या मशिदीकडे जाताना मुसलमान मोहोल्ल्याच्या अलीकडे मेरी चर्चची नवीन इमारत आहे.
इथं पूर्वी एक रुग्णालय आणि सेवाभावी संस्था होती, पोर्तुगीजांनी त्याला मिसरीकॉर्डिया असे नाव दिले होते. असे बांधकाम वसईच्या किल्ल्यातही आहे. नकाशावरून त्याच्या अवशेषांच्या स्थानाचा अंदाज येतो.
मनोऱ्याच्या मागील बाजुला असलेल्या तटात उजवीकडे समुद्राकडे बाहेर पडणारा एक लहान दरवाजा असुन भरतीच्या वेळेस या दरवाजाच्या पायरीच्या पातळीपर्यंत पाणी चढते व आत किल्ल्यात येते. हे पाणी परत बाहेर जाण्यासाठी तटात एक लहान नाली ठेवलेली आहे. या दरवाजाने बाहेर समुद्रावर आल्यावर तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते. येथुन समोरच खाडी पलीकडे बेटावर असलेला कोरलई किल्ला नजरेस पडतो. येथुन किल्ल्यात परत आल्यावर दरवाजा शेजारील तटबंदी वरून उजवीकडे गेले असता एक बुरुज लागतो. या बुरुजावर एक तोफ पडलेली असुन या बुरुजावरून किल्ल्याबाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. येथुन पुढे गेल्यावर एक बुरुज सोडुन दुसऱ्या बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. किल्ल्याच्या या भागात तटावरून फिरता येते पण मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. रेवदंडा किल्ल्याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. किल्ल्याभोवती असलेल्या खंदकातून या तटबंदीमध्ये शिरण्यासाठी ६ भुयारी मार्ग आहेत. वरून जरी हे सहा मार्ग असले तरी अंतर्गत ते एकमेकांना जोडले गेले आहेत. किल्ला बांधण्यापुर्वीच हि भुयारे बांधली गेली असावीत. जुलै १९८२ मध्ये केव्ह एक्स्प्लोरर्स या संस्थेने या भुयारांचा शोध घेतला. भुयारांच्या आतील बांधकाम दगडविटांनी केलेले असुन ८-९ फूट उंच आणि चांगलाच रुंद असलेला हा भुयारी मार्ग तत्कालीन स्थापत्याची साक्ष देतो. माती-गाळाने भरलेले हे मार्ग या संस्थेने काही प्रमाणात खुले केले होते पण त्याची योग्य निगा न राखल्याने हे मार्ग पुन्हा गाळ आणि घाणीने बुजले आहेत. याच्या तोंडावर वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्याच्या नैऋत्य कोपऱ्यात डोमिनिक चर्च हे रेवदंडय़ातील भव्य चर्च आहे. इ.स. १५४९ मध्ये बांधलेल्या या चर्चचे छत जरी कोसळलेले असले तरी त्याचा सभामंडप, भिंती व त्यावरील नक्षीकाम यातून त्याची भव्यता लक्षात येते. याशिवाय पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वास्तूंपैकी सेंट झेवियर चर्चही रेवदंड्यात आहे. या चर्चच्या सभामंडपात त्याच्या बांधकामा बाबत शिलालेख पडलेला आहे. या शिवाय किल्ल्यात फिरताना पोर्तुगीज शैलीतील बुरूज व अनेक बांधकामे पडीकावस्थेत दिसतात. किल्ल्याचा बराच भाग खाजगी मालमत्ता असल्याने काही मालक आत जाऊन पहायला परवानगी देतात तर काही उगीचच शिष्टपणा दाखवतात. संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण दोन तास लागतात.








Church@ Agar kot


lying unattended..sad condition



nothing left in church




view from Revdanda beach





(PC Nitin Nimbalkar) 

(PC Nitin Nimbalkar) 


(PC Nitin Nimbalkar) 

Deserted Revdanda Beach


Missing crowd of Revdanda beach found at last


Broken walls of the Fort





Dense Vegetation inside the Fort 


Seeing the dense bushes we started to walk carefully and moved towards the tower like structure which we could see at far thru the trees.


Tower like structure within the Fort


 

Franciscan Church Tower inside the fort
(PC Nitin Nimbalkar) 



Scattered Cannons

We explored little bit and moved to Jesuit Monastery

(PC Nitin Nimbalkar) 


Ruins of Jesuit Monastery. (PC Nitin Nimbalkar) 







ओहोटीच्या वेळेला किल्ल्याची समुद्राकडील भिंत पाहायला रेवदंड्याच्या किनाऱ्यावर जायचे. लांबलचक दगडी तटबंदी आणि त्यातून डोकावणारे माड अशा दृश्याचा अनुभव घ्यायचा. ओहोटीची वेळ संध्याकाळची असेल तर पश्चिमेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ही भिंत उजळून निघते.  रेवदंड्याच्या दक्षिण टोकाला कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. तिथून समोरच चौलच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला कोर्लई किल्ला दिसतो.आणि कुंडलिका नदीवरील पूल ओलांडून पलीकडे गेलं की आगरकोटाची भिंत आणि त्यामागचा गर्द हिरवा आसमंत निरखत बसायला मजा येते. मागे चौलची टेकडीही दिसते.








बॉम्बे स्टीम नॅव्हीगेशन कंपनीने आपल्या एका जहाजाचे नाव चंपावती ठेवले होते.

शिलालेख

१) चौलच्या उत्तरेस असलेल्या मोडकवाडी भागात देवगिरीनृपती यादव रामचंद्रदेव कालीन (शके १२२०, विलंबी संवत्सर, चैत्र शुद्ध ११, सोमवार, २४ मार्च, इ. स. १२९८) संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील शिलालेख मिळाला. या लेखाचा अर्थ सुसंगतपणे  लावता येत नाही कारण या लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या ओळीत शापात्मक वचन आहे. 
२) किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या कोपऱ्यावर खालच्या भितीवर १. २७ मी. x ०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश, कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले आहे. चेहरा तुटला आहे. या प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा अर्थ किंग Dom Joao चौथा असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता येईल. 
३) समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर ०.६७ मी, ४ ०.६७ मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन ताऱ्यांची प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या, ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका देणारा पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE || SOVSA FREIRE, DESTA FORTALEZA I SEFESTO || DAESTA FORTIFICASAO ADDAADDAPRAIAHDLOMAR"
(४) किल्ल्याच्या उत्तर भितीतील दरवाजाच्या डाव्या बाजूस ०.४५ मी. x ०.४५ मी. अशा चौरसाकृती लादीवर तुटलेला शिलालेख आहे. या लेखाचा आशय अवर लेडी ऑफ सॉरो हिच्या संरक्षणाखाली हा दरवाजा आहे असा आहे. पोर्तुगीज भाषेत तो "ESTA PORTA || COAROANS || DOROVE HF || SVA" असा आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूसही एक लादी होती. ती भग्न पावली आहे. तिच्यावर इ. स. १६३८ चा पुढील पोर्तुगीज लेख होता :- "NAER A DE || 1638 SERE || DEFICOV || ESTA PORTA. २१६
५) अलिवाग रस्त्यावरील लँड गेटच्या बाहेरच्या बाजूने द्वारमाथ्यावर ०.७५ मी. x ०.६५ मी. लादीवर मुकुट व इतर काही चिन्हे कोरली होती. या लादीवर शिलालेख होता तो बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे" चेऊल किल्ल्याचा Joao de Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम (किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व १६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले. सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता (Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून नेमण्यात आले." पोर्तुगीज भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO 635 EPRI || NCIPODE 636 SENDO CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO DE THOBAR DE VE I लसूचॉइसतो
नागानाममा जाहपऊल फिल्ल्याचा Joao de Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम (किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व १६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले. सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता (Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून नेमण्यात आले." पोर्तुगीज भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO 635 EPRINCIPODE 636 SENDO CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO DE THOBAR DE VE || LASCOESETO MOVRORPAD ROEIRODESTACIDE OGLO || RIOZOPE SFRANCISCOXA || VIER, DACOMPA DEIESVS, " असा आहे.
लावता येत नाही कारण या लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या ओळीत शापात्मक वचन आहे. २१
२) किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या कोपऱ्यावर खालच्या भिंतीवर १.२७ मी. ४ ०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश, कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले आहे. चेहरा तुटला आहे. या प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा अर्थ किंग Dom Joao चौथा असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता येईल. 
३) समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर ०.६७ मी. x ०.६७ मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन ताऱ्यांची प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका देणारा पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE SOVSA FREIRE, DESTA FORTALEZA 1 SEFESTO || DAESTA FORTIFICASAO ADDAADDAPRAIAHDLOMAR" P
६) किल्ल्याच्या वायव्य बाजूकडील एका घराच्या ओसरीत २.०२५ मी. x ०.९ मी. आकाराच्या लादीवर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे:- " (SEPOLTURA) DELVIS ALVARESCA MEIO E DE SEVS ERDEIRO (S)" त्याचा सारांश-"Luis Alvares Camillo आणि त्याच्या वारसांची समाधी" असा आहे. १९८
७) किल्ल्याला पश्चिमेकडे लहान दरवाजा आहे. त्याच्या वायव्य वाजूस असलेल्या पडक्या मनोऱ्यावर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे. "SENDO VR. DA INDIA FRCO. DE TAVOR, CONDE DE AIVOR MDO. IOM DE LEMO DE BRITO FZEO ESTA ATALAIA ASVACVSTA SENDO CAPAM, MOR DESTA CANPO NAER AD. 1688" या शिलालेखाचे डॉ. द कुन्हा याने पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांटर केले आहे:-"When Francisco de Tavora was Viceroy of India, Conde d'Alvor Joao deMelo de Brito commanded this tower to be built at his expense while Chief Captain of this Camp in the year 1688.
८) किल्ल्याच्या वायव्येकडील भितीत ०.६२५ मी. ४०.४५ मी. लादीवर वरील याजूस जिझसचा क्रॉस असलेला शिलालेख पूर्वी N. S. da Conceicao चा संबोधला जाणारा दुर्बोध पोर्तुगीज शिलालेख आहे.- "NO ANO DE 1721, SENDO CAPITAO, E GOVOR. DEIA FORTZA DE CHAVL ANTONIO DE S. DE LEMOS, FIDALGO DA CAZA DE SA. MSE. QUE, DS. SP POR ORDEM QUE IEVE DO XMO. SOR. FRANSO. JOZEPE DE SAMPO E CATRO, VREI E CAPITAO-GFRA DA INDIA PA, LEVANTAR ESA FORTFICACAO CHAMADA N. S. DA CONCEICAO AOS 25 DE MARCO DA DIA HE. RA. A. IMA." डॉ. द कुन्हा याने याचे इंग्रजी भाषांतर पुढीलप्रमाणे केले:- "In 1721 when Antonio de Souza de Lemos, a nobleman of the household of His Majesty, whom may God always guard, was Captain and Governor of the Fortress of Chaul, under orders sent by His Excellency Senhor Francisco JOSE de Sampaioe Castro Viceroy and Captain General of Portuguese India, commanded that this fortification named N. S. da Conceicao should be built on the 25th March of the abovementioned year." २२०

९) आगरकोट मधील फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य कमानीच्या दरवाजावर एक कोनाडा होता. त्यात १.७७ मी. x ०.६५ मी. आकाराचा तीन तुकडे झालेला पोर्तुगीज शिलालेख बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आला आहे. पोर्तुगीज भाषेतील त्याचा मजकूर असा होता:- "CONSACRA DA ENTERNIDA DE IOAM IV, REI, DE PORTUGAL, EMAS CORTES Q CELEBROV NO ANNO DE 1646
FES TRIBUTARIO ASI E A SEVS REINOS O OANNVA PENCAM A IMMACVLA DA CONCEIOAM DA VIRGEM SENHORA E COM PVBLICO IVRAMENTO PROMETEO DEFENDER QA MESMA SENHORA ELEITA PADROEIRA DE SEV IMPEHO FOI PRESERVADA DE TODA A MACVLA DE PECCADO ORIGINAL. EPERA QA PIEDADE PORTVGEZA VIVESSE MANDOV ABRIR NESTA PEDRA ESTA PERPETVA LEM BRANCA NO 15 ANNO D SEV IMPERIO E NO DE CHRISTO 1655. FESE ESTA OBRA NAEB DE 1656. " सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर पुढीलप्रमाणे दिले आहे:-"Consecrated to Eternity. Dom Joao IV. King of Portugal in the Cortes which he assembled in 1646 made himself and his Kingdom tributary for a yearly pension to the Immaculate Conception of the Virgin Lady. Under a public oath he promised to maintain that the same Lady, the elect Patroness of his empire, was free from the stain of original sin. To preserve Portuguese piety he ordered that this lasting memorial should be carved in the 15th year of his reign and in the year of Christ 1655. This was done in the year 1656,
१०) किल्ल्याच्या आग्नेय कोपऱ्यात डोमिनिकन चर्च होते. मुख्य चर्चच्या दक्षिणेस एक चॅपल होते. या पडक्या चॅपलवर एका गोलाकार भग्न दगडावर पुढील पोर्तुगीज पुसट शिलालेख आहे :- "SEPVLTVRA D (E) (A) NTONIO ATAIDE (?) MENESES (?) E DE SEV (S) ERDEIROS, QUE FALECEO A DEM (1) DC (?) I." त्याचा आशय :- "Antonio Alaide Menezes" (मृत्यू १६०११) व त्याचे वारस यांची समाधी असा आहे. १२
११) डोमिनिकन चर्चच्या पूर्वेस असलेल्या छपराच्या इमारतीस १.८ मी. x ०.७५ मी. शस्त्रांच्या प्रतिमा असलेल्या लादीवर एका देवदूताची प्रतिमा आणि गरुडाच्या प्रतिमेवर पोर्तुगीज भाषेत I. H. S., Jesus Hominum Salvator. (इंग्रजीत 'Jesus the Saviour of Men.') अशी अक्षरे आहेत. गरुडाच्या भोवताली पोर्तुगीजांचे "Dominvm (est) spes mea" (इंग्रजीत 'The Lord is my Hope') ही अक्षरे आहेत. शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील पुढील शिलालेख आहे :- " ESTA SEPVLTVRA HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE (I) 636 ANOS. डॉ. द कुन्हा याने या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले :-
आहेत. शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील पुढील शिलालेख आहे:- "ESTA SEPVLTVRA HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE (I) 636 ANOS, डॉ. द कुन्हा याने या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले :-"This is the tomb of Manoel Saldanha and of his heirs, who died on the 20th of December of the year 1636. "
१२) उपरोक्त शिलालेखाजवळ आणखी एक तुटलेला शिलालेख आहे. त्याचा इंग्रजीतून आशय "(Tomb) of Diogo Goes, and of (his heirs) died on 2nd of October of...." असा आहे. बाकी भाग नष्ट झाला आहे. डोमिनिकन चर्चच्या सुमारे ४० मी. पूर्वेस काही लहान लहान इमारतींचे अवशेष होते आणि त्याच्याही पुढे सुमारे ५५-६० मी. वर आणखी काही अवशेष होते. त्यांच्या उजव्या बाजूस सुमारे ५५-६० मी. अंतरावर सेंट झेविअर चॅपल होते. त्याच्या अवशेषांत पूर्वेस एक कमानदार दरवाजा आहे. या दरवाजावर १.२ मी. x ०.८२ मी. आकाराच्या संगमरवरी दगडावर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे :-"POR HAVER MORADO NESTE LVGAR SAO FRANCISCO XAVIER OCO PASSov AO NORTE LHE FES ESTA ERMIDA, DO GILIANES DENRA. SENDO CAPITAO DESTO FORTALEZA, PA MEMORIA E LOVVOR DO SANCTO O ANO DE 1640". सन १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले आहे :-"St. Francis Xavier having lived in this place on his way to the north, this chapel was built by Dom Gilianes Noronha Captain of this Fort to the memory and praise of the saint in the year 1640. २२४
१३) सराई (आताचे सुरई हे ओसाड गाव) खेडयाच्या ०.४ कि. मी. वर पायऱ्यांची लहान विहीर आहे. तिच्यावर इ. स. १७८२ चा पुढील शिलालेख आहे:- "श्री शक १७०४ शुभकृत नाम संवत्सरे, श्री विठ्ठल चरणी शामजी विबक प्रभू सोपारकर, वैशाख शुद्ध १५.१२५
१४) दत्तात्रेय मंदिरात उजव्या बाजूकडील बांधलेल्या ओट्यावर संगमरवरी दगडात पादुकांच्या जोडासह, दंड, शंख, मृदंग, चंद्र व कमळाची प्रतिमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके १७८७ (इ. स. १८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे. 
१५) दत्तात्नेय मंदिराच्या पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे एका साधूचे घर आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall) पुढील मराठी शिलालेख आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७० (इ. स. १८४८), किलक नाम संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून खाली उतरताना सुमारें १०० व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख आहे:-
     "श्री. श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा लक्ष्मणजी शेठ सोनार यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद नाम संवत्सरे माहे चैव शद्ध भूषण, पद्रव कमळाचा प्रातमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके १७८७ (इ. स. १८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे. 
१५) दत्तात्रेय मंदिराच्या पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे एका साधूचे घर आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall) पुहील मराठी शिलालेख आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७० (इ. स. १८४८), किलक नाम संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून खाली उतरताना सुमारे १०० व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख आहे:-"श्री. श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा लक्ष्मणजी शेठ सोनार यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद नाम संवत्सरे माहे चैत्र शुद्ध तृतिया वार सोम (सोमवार) श्री संवत १९१०.
१६) दत्त मंदिराच्या वरून २४८ व्या पायरीवरही पुढील राराठी शिलालेख आहे:-"श्री गुरु दत्तात्रेय चरणी कृष्णा नारायण शास्त्री, मुकादम, पायऱ्या पंच, शक १७९० (इ. स. १८६८), विभू (विभव) नाम संवत्सर माहे पौष. २२८ भवाळे येथील भगवती मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर पुढील पाच ओळींचा नागरी संस्कृत शिलालेख आहे- "श्री गणेशाय नमः। शके १६७३ प्रजापती नाम संवत्सरे। फाल्गुन शुद्ध सप्तम्याम् । देव्यालयस्य जीर्णोद्वारस्य । प्रारंभ कृतः समाप्तीस्तू अंगिरा ।।" सारांश- इ. स. १७५१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. 
१७) हमामखान्याच्या ०.४ कि. मी. पश्चिमेस नदीकाठी उभारलेल्या जागेवर सोळा घुमटांची एक मशीद आहे. तिचे ११ घुमट ढासळले आहेत. तिला ईशान्येस लागून दोन मुस्लिम कबरी आहेत. त्यांच्यावर दोन उर्दू शिलालेख आहेत त्यातील एका कबरीवरील हिजरी ९१५ (इ. स. १५०७) चा व दुसऱ्या कबरीवरील हिजरी १०३४ (इ. स. १६२३) चा उल्लेख आहे. दुसऱ्या कबरीवरील शिलालेख पूर्ण तुटला आहे. पहिल्या कबरीवरील शिलालेखाचा सन १८८३ पूर्वी प्रा. रेस्टेक (Rehsteck) यांनी पुढीलप्रमाणे ओळीनुसार इंग्रजी अनुवाद केला आहे:- " (1) Our Lord Commands the arrangement, (2) Diligently of the Sunni Mosque, (3) With a priest and pond.. (4) Whom we may love according to the ordinance of Muhammad the Apostle; and in (5) Khaul we command you to prohibit intoxication
(and) (6) Infidelity like companions (of you) (7)
our प्रो्फेट
or prepav
(8) Muhammad had striven..
(11) Mosque
(9) and (10) (15) .(date) with propriety, (12) (13) (14) .year 915 (?). "
(16)
रेस्टेक यांनी दुसऱ्या शिलालेखाचा ओळींनुसार इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे केला आहे:-
"(1) As was the edifice of the house of God. (2) Date of mosque (3) Handallanu (or bu or yu) (4) year 103(?)". गुलाम महंमद मुन्शी यांनी लेखातील चौथ्या ओळीतील हिजरी वर्ष १०३४ असे लावले आहे.

 


रेवदंडा

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्रकिनाऱ्यालगत निसर्गसौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. या अष्टागरात दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. रेवदंडा म्हणजे प्राचीन चौलचाच एक भाग. मूळ चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आल्याने आजही या परिसराचा उल्लेख चौल-रेवदंडा असा केला जातो. चौल हे प्राचीन बंदर असल्याने या भूमीचा इतिहास चौलशीच जोडला जातो पण रेवदंडा भाग चर्चेत आला तो पोर्तुगीज राजवटीत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी येथे पाय रोवले व जवळपास २१० वर्षे या भागावर वर्चस्व राखले. वसईच्या बरोबरीनेच पोर्तुगीजानी रेवदंडय़ात सत्ता राखली व या काळात त्यांनी रेवदंडय़ाचा किल्ला बांधला.

       सह्याद्रीत उगम पावणारी कुंडलिका नदी चौल-रेवदंडाजवळ अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर प्राचीन काळापासून चौल हे सुरक्षित व प्रसिद्ध बंदर होते. इ.स.१३० पासून ते १७६८ पर्यंत ह्या बंदरातून जगाच्या कानाकोपऱ्यात जहाजे जात येत होती. परंतु कालांतराने या बंदरात गाळ साचल्याने ह्या बंदराचा उपयोग कमी होत गेला. प्राचीन काळी रेवदंडा हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. श्रीकृष्णाचा धोरला भाऊ असणात्या बल रामाची पली रेवती हिला हे गाव श्री कृष्णाने आंदण दिले होते. धर्मराजाने सोडलेल्या अश्वमेध यज्ञाच्या याज्ञाश्वाळा इथल्या हंसध्वज राजाने पकडले तेव्हा अर्जुनाने त्याच्याशी युद्ध केले ते येथेच. 

शिलाहार राजवंशाने या भागावर दीर्घकाळ राज्य केले.दहाव्या शतकात अल मसुदी हा अरबी व्यापारी येथे आला असता झंझ शिलाहार राजा येथे राज्य करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. भारताला भेट देणारा अफनासी निकीतीन हा पहिला रशियन प्रवासी इ.स.१४६६ ते ७२ या काळात भारतात आला होता. त्याने त्याच्या या प्रवासाची सुरुवात चौलच्या बंदरातुनच केली होती. पुढे त्याने पाली, मुंब्रा, जुन्नर असा मोठा प्रवास करून या प्रदेशाचे वर्णन करून ठेवले आहे. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण गावाभोवती तटबंदी बांधून त्यांनी गावालाच रेवदंडा किल्ल्याच्या कवेत घेतल. पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली पण त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी निजामाकडून परवानगी घेऊन कारखान्यासाठी सध्या चौकोनी बुरुज म्हणुन ओळखली जाणारी इमारत बांधली. इ.स.१५२१ मध्ये विजापूरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगीजांचा पराभव केला त्यामुळे १५२१ ते १५२४ दरम्यान पोर्तुगीजांनी या वखारीभोवती तटबंदी बांधली. सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत या किल्ल्यात पोर्तुगिजांनी अनेक इमारती बांधल्या. १६२५ ते १६३४ या काळात किल्ल्याचा विस्तार करण्यात आला. १६३५ ला उत्तरेचा तर १६३८ ला दक्षिणेचा दरवाजा दुरुस्त करण्यात आला. १६५६ पर्यंत हे नवे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसते. 
इ.स.१६३४ मध्ये इथे आलेला अँटॉनिओ बोकारोने हा पोर्तुगीज लिहितो,  त्यावेळी पोर्तुगीज किल्ल्यात घडीव दगडांच्या भिती असलेल्या आवाराच्या आत त्यांचा सेनाधिकारी राहत होता. तेथे एक तुरुंगही होता. किल्ल्यात २०० पोर्तुगीज व पन्नास स्थानिक विश्चनांची मजला असलेली दगडी घरे होती. प्रत्येक घरात एक गुलाम असे. पूर्वी गुलाम जास्त होते. परंतु ते नंतर चौलला गेले. आवाराच्या बाहेर काही ख्रिश्चन व इतर कुशल कारागीर होते. तेथे दोन शस्त्रागार होते. सभोवतालच्या भितींच्या आतील परिसरात भव्य  कॅथेड्रल, रुग्णालय, सेंट पॉल जेझुइट चर्च, जेझुइट मोनॅस्टरी, डोमिनिकन फ्रेंन्सिस्कन चर्च व ऑगस्टिनियन चर्च व मोनॅस्टरी अशा सात धार्मिक इमारती होत्या. भिंतीच्या बाहेर सेंट सेबॅस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च व सदर ऑफ गॉडचे कॅपूचिन चर्च अशा तीन इमारती होत्या. या दहा इमारतींकरिता प्रतिवर्षी सरकारातून एकूण रु. २,४४८ खर्च होत असत. पोर्तुगीजकाळी या भागाचे वैभव खूप मोठे असावे. काळाच्या ओघात या वास्तू नष्ट झाल्या. या दुर्गाचे नामकरण पोर्तुगीजांनी साओ पेद्रो ए साओ पाऊलो दे चौल असे केले होते. उत्तरेचा दरवाजा जमिनीकडील म्हणून त्याचे नाव पोर्टा डे टेरा असे करण्यात आले आणि त्याला संरक्षण देण्यासाठी खंदक खणण्यात आला. दक्षिणेकडील दरवाजा हा बंदराच्या दिशेने उघडत असे म्हणून त्याचे पोर्ट डॉ मार असे बारसे करण्यात आले. इथं एक शिलालेख आहे ज्यात १५७७ मध्ये हे बांधकाम अलिक्सान्द्रे डिसोझा फ्रेयर च्या काळात झाले अशी नोंद वाचता येते.
    बोकारोने आणखीही काही वास्तू व बुरुजांची नोंद करून ठेवली आहे. त्यात नऊ बुरुजांचा तो उल्लेख करतो. नदीच्या बाजूकडे असलेल्या पहिल्या बुरुजावर १८ पौंड वजनाचे दगडी गोळे मारू शकणारी कॅमेल नावाची एक मोठी तोफ होती. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या बुरुजावर फक्त वाळू भरून ठेवली होती. चौथ्या बुरुजावर १८ पौंडी दगडी गोळा फेकणारी आणखी एक कॅमेल तोफ व ६५ पौंडी लोखंडी गोळा फेकणारी एक तोफ अशा दोन तोफा व लहानसे किल्ल्यासारखे वांधकाम होते. सॅम पावलोच्या समोरच्या बुरुजावरही अशीच दोन बांधकामे होती व आतून लोखंडी आवरण असलेली पितळी सर्पाकृती तोफ होती. तिच्यातून १६ पौंडी गोळे उडवीत. सॅम डिनिस या सहाव्या बुरुजावरून लोखंडी तोफेतून १४ पौंडी दगडी गोळे उडवीत. येथे समुद्राकडे तोंड करून लहानशा किल्ल्यासारखे बांधकाम होते. सातव्या बुरुजावर ४० पौंड वजनाचे गोळे फेकणारी गरूड तोफ व प्रत्येकी ५० पौंडी वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या. आठव्या बुरुजावर तोफा नव्हत्या. शेवटच्या नवव्या बुरुजावर २४ पौंड वजनाचे लोखंडी गोळे फेकणारी एक तोफ होती. सन १६२५ मध्ये आग्नेय कोपरा बांधला तेव्हा कॅथेड्रल भितीच्या बाहेर होते. मात्र १६३४ मध्ये ते भितीच्या आत आले. सत १६३४ नंतर तटबंदीची बरीच दुरुस्ती केली. सन १६३५ मध्ये उत्तर दरवाजा तर १६३८ मध्ये दक्षिण दरवाजा दुरुस्त केला. सन १६५६ मध्ये दक्षिण दरवाजासमोरचे बांधकाम केले व १६८८ मध्ये वायव्येचा टॉवर बांधला.
     सरासरी ६.०९ मीटर उंच व ३.६६ मी. रुंद असलेल्या गोलाकार भितीची लांबी अंदाजे २.४२ कि. मी. होती. या भितीवर बंदुकीने मारा करण्यासाठी लहान झरोके (जंगी) असलेली १.८३ मी. उंचीची दुसरी भित होती व वर वर्णन केल्याप्रमाणे अर्ध-वर्तुळाकार नऊ मनोरे होते. किल्ल्याचे आवार दक्षिणोत्तर व पूर्व-पश्चिम अनुक्रमे २०१.१६८ मी. व ३०१.७५२ मी. होते. पश्चिम व दक्षिणेकडून हल्ला होण्याची भीती नव्हती. तसेच पूर्वेकडील दलदलीच्या प्रदेशामुळे तिकडूनही कमी भीती होती. म्हणून या तिन्ही बाजूंनी फार भव्य मजबूतीची आवश्यकता नव्हती. भीती होती ती उत्तरेकडून. म्हणूनच त्या बाजूस २.१३ मी. खोल व १७ पावले रुंद असा खंदक समुद्रापासून चौल खाडीच्या वायव्य टोका-पर्यंत खणला होता.


दिनांक ५ डिसेंबर १७२८ रोजी आंद्रे रिबेरो कुटिन्होने पोर्तुगीज चौलची म्हणजेच रेवदंड्याची कार्यालयीन तपासणी केल्यावर लिहिलेल्या अहवालानुसार किल्ला आकाराने पंधरा वाजू असलेला व अकरा बुरुजांचा होता. तीन ते चाळीस पौंडी ५८ तोफा, दगडांचा मारा करण्याच्या तोफा, ६२ व्यक्तींची एक याप्रमाणे तीन कंपन्या होत्या. याशिवाय स्थानिक मच्छीमार बोटीवाले व नारळाच्या झाडावर चढणारे होते. शहराच्या भितीच्या बाहेर उत्तरेकडील श्रीमंत लोकवस्ती असलेल्या बाजूस संरक्षणासाठी सुरक्षित जागा बांधून तेथे १९ तोफा, सैन्याच्या दोन कंपन्या आणि २३४ भंडारी होते. सभोवतालचा खंदक काही
तय १९ ताफा, सन्याच्या दान कपन्या आणि २३४ भडारा हात. सभोवतालचा खंदक काही ठिकाणी वाळूने भरला होता. कुटिन्हो याने असेही नमूद केले आहे की, १६३४ पासून तटबंदीची इतकी दुरुस्ती झाली की, ती जणू नव्यानेच बांधल्यासारखी आहे. पश्चिमेच्या बाजूने समुद्राच्या लाटांमुळे झालेले नुकसान सोडता बाकी सर्व बांधकाम सुस्थितीत आहे.
      आजही किल्ल्याच्या तटाबुरुजावर अनेक तोफा दिसतात. निजामशाहीत रेवदंडा गाव चौलचाच एक भाग समजला जात होता. वस्तुतः त्याकाळी चौल व रेवदंडा ही गावे एकमेकावर अवलंबून व एकमेकास पूरक होती. इ.स.१६३६ मध्ये निजामशाही वाचवताना शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनकडे मदत मागितली असता त्यांनी नकार दिला. इ.स.१६५७-५८च्या सुमारास शिवरायांनी चौल जिंकले पण रेवदंडा मात्र पोर्तुगीजांकडे राहिला. इ.स.१६७४ मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर असलेला इंग्रज वकील हेन्री ओकझेंडन एक दिवस रेवदंडा किल्ल्यात राहिला होता. २२ जुलै १६८३ च्या रात्री संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंडा किल्यावर हल्ला केला पण पोर्तुगिजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातल्यावर तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. इ.स. १७२८ मधील आंद्रे रिबेरो कुरिन्हाने या पोर्तुगीजाच्या अहवालात या किल्ल्याचा तपशील येतो. तो म्हणतो या किल्ल्यास अकरा बुरूज असुन किल्ल्यात तीन ते चाळीस पौंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या ५८ तोफा आहेत. ६२ सैनिकांची एक याप्रमाणे तीन कंपन्या इथे तैनात आहेत.
पुढे चिमाजी आपांच्या वसई मोहिमेच्यावेळी बारीक सारीक ठाणी ताब्यात घेण्याचे ठरवले तेव्हा मानाजी आंग्रयाने २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदंड्‌यावर हल्ला केला. दुसन्या दिवशी मोर्चे लावले. पोर्तुगीजांनी कणखरपणे प्रतिकार केला. नानासाहेब चिमाजी अप्पांनी रेवदंडेकर व पोर्तुगीजांना त्राही भगवान केले.. ८ डिसेंब १७४० रोजी रेवदंडयाचा किल्ला खंडोजी माणकरांनी हस्तगत केला. इ.स.१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखुन २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात आगरकोट व कोरलई हैं दोन्ही किल्ले इंग्रजांना दिले. पुढे अँग्लो-पोर्तुगिजांच। प्रतिनिधी कॅप्टन इंचबर्ड याच्या मध्यस्थीने १७४० मध्ये तह होऊन चौलचा प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले. १८०६ च्या नोव्हेंबर मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. अन् किल्ला दुरु अंदाज घेतला. १८१७ मधे रेवदंडा परत आंग्र्याकडे आला तेव्हा गेज्याठ नारायन शेणवी यांना सुभेदार नेमले.. १८१८ मध्ये काही काळ परत इंग्रजानी तो ताबात घेतला. पण लगेचच पेण-पनवेल कडील माणिकगड तालुका घेऊन रेवदंडा परत आंग्रे यांच्या कडे दिला गेला.
रेवदंडा परिसरात पोर्तुगीजकालातील फॅक्टरी किंवा चौकोनी बुरुजातील कॅप्टनचे निवासस्थान व तुरुंगाभोवतीच्या लहानशा किल्ल्याचे अवशेष तसेच जेझुइट मोनॅस्टरी, सातखणी बुरूज, डोमिनिकन चर्च व मठी, सेंट झेवियर चॅपेल आणि या सर्वाभोवती संरक्षणासाठी बांधलेली भित यांचे अवशेष पाहण्यास मिळतात. रेवदंडा पेशव्यांनी घेतल्यावर (१७४०) नानासाहेब पेशव्याने हरेश्वराचे व हनुमंताचे मंदिर बांधले. श्रीसिध्देश्वराचे मंदिर १७४० मध्ये बाबूभट नेने पंडित याने ग्रामस्थांकडून वर्गणी मिळवून बांधले. श्रीमाधवनारायणाचे मंदिर महादजी बल्लाळ दांडेकर याने स्वतःच्या पैशांनी बांधले. इतर मंदिरे यानंतरची आहेत.


 रेवदंडा किल्ला पहाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अलीबाग येथे यावे लागते. मुंबई-अलिबाग हे अंतर १०० कि.मी.असुन पुणे अलिबाग हे अंतर साधारण १४० कि.मी. आहे. अलिबागपासून रेवदंडा किल्ला २० कि.मी.अंतरावर असुन तेथे जाण्यासाठी बस-रिक्षाची सोय आहे. रेवदंडा गाव किल्याच्या तटबंदीच्या आत वसलेले असुन गावात शिरणारा रस्ता तटबंदी फोडून काढला असल्याने गावात शिरतानाच तटबंदी दिसुन येते. संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास रेवदंडा बसस्थानकावर उतरुन गडफेरीला सुरुवात करावी. साधारण लंबगोलाकार आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ ७० एकरपेक्षा जास्त आहे. संपुर्ण रेवदंडा गावाभोवती हि तटबंदी असुन या तटबंदीची लांबी २ कि.मी. पेक्षा जास्त आहे. किल्ल्याची बहुतेक तटबंदी आजही शिल्लक आहे. तटबंदीच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि उत्तरेला कुंडलिका खाडी असुन पुर्व बाजुला दलदल व तर दक्षिण बाजूच्या तटाबाहेर खंदक खोदलेला होता. हा खंदक आता पुर्णपणे बुजला आहे. किल्ल्याला उत्तर व दक्षिण दिशेला दोन मुख्य दरवाजे असुन तटबंदीत अजुन दोन लहान दरवाजे पहायला मिळतात. किल्ल्याला अजुनही लहान दरवाजे असावेत पण खाजगी मालकी हक्कामुळे किल्ल्याच्या बऱ्याच भागात फिरता येत नाही. आगरकोटमधील रस्ते युरोपियन 'ग्रिड' (Grid) पद्धतीने होते. पोर्तुगीज धाटणीची मोठी प्रवेशद्वारे (Portals) आणि चर्चच्या बाजूने जाणारे प्रशस्त मार्ग ही याची वैशिष्ट्ये होती.


बस स्थानकाकडून किल्ला फिरायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण कुंडलिका खाडीच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे येतो. येथे दुहेरी तटबंदीत एकामागोमाग एक असे दोन दक्षिणाभिमुख दरवाजे असुन या दोन्ही दरवाजांमधील भागात रणमंडळाची रचना आहे.

(PC Nitin Nimbalkar) 
(PC Nitin Nimbalkar) 

 यातील एका दरवाजाच्या कमानीवर पोर्तुगीज सत्तेचे राजचिन्ह कोरलेले आहे. दोन दरवाजांच्या मध्ये असलेल्या रणमंडळाच्या भिंतीत पोर्तुगीज भाषेत दरवाजा बांधल्याचा काळ सांगणारा एक शिलालेख आहे.आणि त्या काळातील त्यांची महत्वाची शिल्पकला उठून दिसते. यामध्ये जागतिक स्वामित्व (आर्मीलरी स्पियर), कोट ऑफ आर्मस आणि तीन भाले एकाच गाठीत बांधून तीस वर्ष सत्ता उपभोगल्याचे शिल्प दर्शनी भागांत लावून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. असे हे शिल्प आपल्याला त्या काळात घेऊन जातात. रेवदंडा व चौल किल्ल्यांच्या परिसरात एकूण १८ शिलालेख आहेत. त्यांपैकी ११ पोर्तुगीज, ४ मराठी, २ उर्दु आणि यादवांचा इ.स. १२९८ मधील संस्कृत व मराठी मधील शिलालेख आहेत. यातील काही आजही इथे असुन काही मुंबई एशियाटिक सोसायटीत ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत शिरताच समोरच तीन मोठे दगडी गोळे दिसतात. दरवाजाच्या बाजूलाच तटबंदी व शेजारील बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्याशेजारील भिंतीत एक तोफगोळा असुन बुरुजावर दोन मोठया तोफा दिसुन येतात. तटावरून खाली उतरून थोडे पुढे आल्यावर अजुन एक दरवाजा पहायला मिळतो. शिल्पकृतींनी सजलेल्या या दरवाजावर दोन धर्मगुरु कोरलेले असुन त्याखाली त्यांची नावे व वरील बाजुस क्रॉस तसेच राजचिन्ह कोरलेले आहे.  त्याकाळी मागे फिरून लवून मुजरा करण्याचे ठिकाण असलेला हा महत्वाचा दरवाजा होता. कितीतरी अधिकाऱ्यांचा मुजरा या मुकुटासमोर झडला असेल पण दुर्दैवाने आज मात्र हे शिल्प वेलींच्या विळख्यात अडकलेले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने हादरून गेलेली पोर्तुगीज सत्तेची शिल्प आज निसर्ग उखडून फेकण्याच्या तयारीत आहे. हे शिल्प पूर्णतः दगडी असून हे पाहणे म्हणजे पर्वणी आहे. असे शिल्प पोर्तुगीजांच्या किल्ल्यांवर खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.या दरवाजाच्या आतील बाजुस पोर्तुगीजांनी रेवदंडा येथे किल्ल्याआधी १५१६साली बांधलेली वखार असुन या वखारीभोवती हा दरवाजा व तटबंदी १५२१ ते १५२४ या काळात बांधली गेली. हा भाग खाजगी मालमत्ता असुन वखारीच्या दरवाजालाच फाटक लावून बंद केल्याने आत जाता येत नाही. येथुन डांबरी वाटेने किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला जाताना वाटेत डाव्या बाजुला जेझुईट मोनेस्ट्रीचे अवशेष दिसतात. जेझुइट या अतिशय कडव्या पंथाच्या साधकांची इमारतही किल्ल्यात आहे. इसवीसन १५७० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीच्या सैन्याने इथं वेढा दिला आणि त्या हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचा विध्वंस झाला आणि काहींचे बांधकाम पुन्हा केले गेले. काही इमारतींचे अस्तित्व मात्र अवशेषरूपातच पाहता येते.
या मोनेस्ट्रीसमोरच किल्ल्याच्या तटबंदीतील एक लहान दरवाजा तोडून रस्ता बाहेर गेलेला आहे. या रस्त्याने बाहेर जाऊन किल्ल्याची तटबंदी पहाता येते. येथे असलेल्या बुरुजाच्या वरील भागात एका तोफेचे तोंड दिसुन येते पण हा भाग देखील खाजगी मालमत्ता असल्याने तेथवर जाता येत नाही. येथुन परत आत येऊन उजव्या बाजुला तटबंदीला समांतर गेल्यावर काही अंतरावर तटबंदीत एक दरवाजा आहे. हा भाग खाजगी मालमत्ता असला तरी येथील मालकाने आत जाण्यास परवानगी दिली. या दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी खोल्या असुन तटाच्या आत जमिनीखाली दारूगोळ्याचे कोठार आहे तसेच प्रसंग पडल्यास तटाबाहेर खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. येथुन तटबंदीला समांतर तसेच पुढे गेल्यावर काही अंतरावर तटाला लागुनच तटबंदीवर तोफा चढवण्यासाठी बांधलेला उतार दिसतो. तेथुन पुढे आल्यावर किल्ल्याच्या उत्तर तटबंदीत असलेला किल्ल्याचा दुसरा मुख्य दरवाजा दिसतो. येथे देखील दोन दरवाजे असुन या दरवाजांची रचना पहिल्या दरवाजाप्रमाणेच आहे. 
चौकोनी बुरूज : 
      दक्षिण दरवाजाच्या दोन कमानीतून आत गेल्यावर थोडेसे पूर्वेस है ठिकाण असून येथेच पोर्तुगिजांनी १५१६ मध्ये वखार बांधली व सभोवती सुरक्षिततेसाठी १५२१-१५२४ या कालावधीत मजबूत भिती बांधल्या. पोर्तुगिजांची गोव्याबाहेरील ही सर्वात जुनी इमारत आहे.

11

(PC Nitin Nimbalkar) 

 वखारीच्या दर्शनी भागी दगडी दरवाजाची एक सुंदर कमान असून ती शाबूत आहे. तिच्या वरच्या बाजूस मध्यभागी पोर्तुगीज बोधचिन्ह असून त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या मानवाकृती आहेत. वरच्या बाजूस क्रॉस व थोडे कोरीव कामही आहे. दरवाजाच्या आत पूर्व-पश्चिम सुमारे ४० पावले व दक्षिणोत्तर सुमारे ५६ पावले जागेभोवती पूर्वी ७.६२ मीटर उंचीची भित होती व नैऋत्येस १५.२४ मीटर उंचीचा भक्कम बुरूज होता. सध्या भिती पडलेल्या असून बुरूज मात्र आपले अस्तित्व दाखवितो. या जागेत कप्तानाचे निवासस्थान व तुरुंग होता. येथे आता नारळीपोफळीची बाग आहे. उत्तरेच्या मुख्य दरवाजापासून ५४.८६ मीटर दक्षिणेस व अलिबाग रस्त्याच्या पश्चिमेस जेझुइट मोनॅस्टरीच्या भितीचे काही अवशेष आहेत.

8


येथे बाहेरील दरवाजाच्या वरील बाजुस पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेले असुन त्यावरील बाजूस मोठा राजमुकुट कोरलेला आहे.  खाली सेंट पीटर आणि सेंट पॉल या दोन संतांच्या प्रतिमाही आहेत. ज्यांच्यावरून या किल्ल्याला नाव दिले गेले. चौकोनी बुरुजाजवळ १५१६ साली एक छोटी वखार बांधली गेली व पुढे १५२१ ते १५२४ हे बांधकाम पूर्ण झाले.
 बाहेरील दरवाजासमोर एक लहानसे मंदिर असुन तटामध्ये लहान लहान देवड्या आहेत. किल्ल्याच्या या दरवाजांवर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. दरवाजा पाहुन परत आल्यावर तटबंदीला समांतर न जाता डावीकडे वळावे. या वाटेवर समोरच पांढऱ्या रंगाने रंगवलेली सिद्धेश्वर मंदिराची दीपमाळ दिसते. मंदिराला लागुनच अलीकडे तटबंदीयुक्त तीन मजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन दरवाजात १६३० मधील दोन शिलालेख आहेत. हा भाग देखील खाजगी मालमत्तेत असल्याने वाडयाच्या दरवाजालाच फाटक लावुन आत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाडयाच्या अवशेषात नारळाची बाग लावलेली आहे. सिद्धेश्वर मंदीर १७४० मध्ये बाबुभट नेने यांनी लोकवर्गणीतुन बांधलेले असुन मंदिराच्या आवारात पायऱ्या व दरवाजा असलेली विहीर आहे. हि विहीर वरील बाजूस चौकोनी असुन आतील बाजूस गोलाकार आहे. मंदिरात शिवलिंग व नंदी असुन एका कोनाड्यात गणेशमुर्ती आहे. या मंदिरात शिकारीचा प्रसंग कोरलेली सुंदर लाकडी तुळई पहायला मिळते. मंदिरासमोर पोर्तुगीज शैलीतील एका वास्तुचे अवशेष असुन या वास्तुचा पडझड झालेला दरवाजा पहायला मिळतो.

3

Church@ Agar kot
nothing left in church
Tower like structure within the Fort
Franciscan Church Tower inside the fort
(PC Nitin Nimbalkar) 

 

मंदिराकडून सरळ पुढे जाऊन उजव्या हाताला वळल्यावर एक मनोरा आपले लक्ष वेधुन घेतो. ६ मजले असलेली हि इमारत सातखणी मनोरा व पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार म्हणुन ओळखली जाते कारण या मनोऱ्यावरुन संपुर्ण किल्ल्याचा अंतर्भाग तसेच तटाबाहेरील समुद्राचा खुप लांबवरचा प्रदेश दिसत असे. वायव्येकडील बुरुजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेयेस ४५.७२ मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भितीत पडलेल्या भगदाडासमोर १५३४ च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमारतीच्या मध्यभागी असलेल्या ६.०९ मीटर चौकोनी आकाराच्या सातखणी बुरुजाच्या भितींचा सांगाडा अजून उभा आहे. पूर्वी त्यांची उंची २९.२६ मीटर इतकी नमूद केलेली असली तरी वरच्या बाजूने भिंती पडल्यामुळे उंची कमी झालेली आहे. या मनोऱ्याच्या आजूबाजूला लांब पल्ल्याच्या तोफा पडलेल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या या तोफा आज मात्र त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या तटबंदीवरुन अफाट आणि अथांग समुद्र दिसतो, इथूनच पोर्तुगीजांनी टेहळणीसाठी खास बांधलेला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या टेकडीवर कोर्लई किल्ला दर्शन देतो. आज तिथे दिपस्तंभसुद्धा आहे.

lying unattended..sad condition
Scattered Cannons

याचा उपयोग वॉचटॉवर म्हणून होत असावा. या मनोऱ्याच्या आवारात २ फोर्ज वेल्डेड तोफा व ५ ओतीव तोफा दिसतात. मनोऱ्याच्या आसपास असलेले उध्वस्त अवशेष पहाता येथे एखादे चर्च असल्याचे जाणवते. याशिवाय या आवारात असलेल्या दफनभूमीत दोन शिलालेख पहायला मिळतात. 

Ruins of Jesuit Monastery. (PC Nitin Nimbalkar) 

(PC Nitin Nimbalkar) 

बुरुजाच्या लगत भोवतालीच्या सर्व इमारती पूर्णपणे पडलेल्या असून कोठे तरी अर्धवट भितीचे अवशेष दिसतात. या सर्व इमारती फान्सिस्कन चर्च व मटीच्या संरक्षणार्थ वांधलेल्या होत्या. इ. स. १५७७ च्या वेढ्यात त्यांनी फार मोठी कामगिरी बजावली होती. फ्रान्सिस्कन चर्च सेंट बारबाराच्या नावे १५३४ मध्ये सुरू केले होते. सन १८४७ पर्यंत हे चर्च सुस्थितीत होते. इ. स. १८५४ मध्ये त्याची बरीच पडझड झाली. इ. स. १५४९ मध्ये बांधलेले डोमिनिकन चर्च व मठीचे काही अवशेष आहेत. 

सध्या त्याची एक दगडी भव्य कमान, पाठभित व बाजूच्या भिती आहेत. खिडक्यांच्या वर पुढे आलेल्या भागावर नक्षीकाम आहे. दक्षिणेकडील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मुख्य मोठ्या कमानीच्या दोन्ही बाजूस उंच खिडक्या असलेल्या भितीचे अवशेष आहेत. समोर डाव्या बाजूस घोड्यांच्या पागेची जागा आहे. समोर भव्य इमारतीचे अवशेष विखुरलेले आहेत. हे चर्च १६३४ मध्ये सर्वात वैभवसंपन्न होते.


समुद्राकडील दरवाजावर अशी पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेली दिसतात. ती पाहून आत असलेलं मॅट्रीज चर्च अवशेषरूपात पाहायचं. मॅट्रिझ चर्चचे बांधकाम १५३४ मध्ये सुरु केले गेले तिथं नोसा सेन्योरा डो मार म्हणजेच अवर लेडी ऑफ द सी या रूपात इथं मेरीची अर्चना केली जाते. पोर्तुगीज रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी आणि अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने इथं अनेक चर्च आणि मठांचे बांधकाम दिसते. आता बरीच पडझड होऊन नुकसान झालेले असले तरीही मूळ आकाराची भव्यता इथं सहज लक्षात येते. डॉमिनिकन चर्च आणि मठाचे बांधकाम या कोटात १५४९ च्या आसपास झाले.

डोमिनिकन चर्च व मठीच्या पूर्वेस सुमारे ४५.७२ मीटरवर लहान इमारतींचे काही अवशेष दिसतात. येथून पुढे काही अंतर गेल्यावर उजव्या बाजूस सेंट झेवियर चॅपलचे अवशेष दिसतात. त्याच्या दरवाजावरील एक चौकोनी दगड खाली पडला असून त्यावर लेख आहे. या चर्चच्या दोन्ही बाजूच्या भिती शिल्लक आहेत. डोमिनिकन चर्च व सेंट झेवियर चॅपलवरील संगमरवरी शिलालेखांवरून मध्यवर्ती पुरातत्त्व खात्याकडून त्यांचे स्थान दर्शविणारे फलक चुकीचे लागले असल्याचे जाणवते.

view from Revdanda beach

 आगरकोटच्या बाहेर उत्तर दरवाजाच्या पूर्वेस मुसलमान मोहोल्ल्यात एक मशीद असून तिचे आधुनिक पद्धतीचे मजबूत व सर्व सोयींनी युक्त बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. या मशिदीकडे जाताना मुसलमान मोहोल्ल्याच्या अलीकडे मेरी चर्चची नवीन इमारत आहे.
इथं पूर्वी एक रुग्णालय आणि सेवाभावी संस्था होती, पोर्तुगीजांनी त्याला मिसरीकॉर्डिया असे नाव दिले होते. असे बांधकाम वसईच्या किल्ल्यातही आहे. नकाशावरून त्याच्या अवशेषांच्या स्थानाचा अंदाज येतो.
मनोऱ्याच्या मागील बाजुला असलेल्या तटात उजवीकडे समुद्राकडे बाहेर पडणारा एक लहान दरवाजा असुन भरतीच्या वेळेस या दरवाजाच्या पायरीच्या पातळीपर्यंत पाणी चढते व आत किल्ल्यात येते. हे पाणी परत बाहेर जाण्यासाठी तटात एक लहान नाली ठेवलेली आहे. या दरवाजाने बाहेर समुद्रावर आल्यावर तटाच्या प्रचंड बांधकामाची कल्पना येते. येथुन समोरच खाडी पलीकडे बेटावर असलेला कोरलई किल्ला नजरेस पडतो. येथुन किल्ल्यात परत आल्यावर दरवाजा शेजारील तटबंदी वरून उजवीकडे गेले असता एक बुरुज लागतो. या बुरुजावर एक तोफ पडलेली असुन या बुरुजावरून किल्ल्याबाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. येथुन पुढे गेल्यावर एक बुरुज सोडुन दुसऱ्या बुरुजावर एक भलीमोठी तोफ आहे. किल्ल्याच्या या भागात तटावरून फिरता येते पण मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. रेवदंडा किल्ल्याचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. किल्ल्याभोवती असलेल्या खंदकातून या तटबंदीमध्ये शिरण्यासाठी ६ भुयारी मार्ग आहेत. वरून जरी हे सहा मार्ग असले तरी अंतर्गत ते एकमेकांना जोडले गेले आहेत. किल्ला बांधण्यापुर्वीच हि भुयारे बांधली गेली असावीत. जुलै १९८२ मध्ये केव्ह एक्स्प्लोरर्स या संस्थेने या भुयारांचा शोध घेतला. भुयारांच्या आतील बांधकाम दगडविटांनी केलेले असुन ८-९ फूट उंच आणि चांगलाच रुंद असलेला हा भुयारी मार्ग तत्कालीन स्थापत्याची साक्ष देतो. माती-गाळाने भरलेले हे मार्ग या संस्थेने काही प्रमाणात खुले केले होते पण त्याची योग्य निगा न राखल्याने हे मार्ग पुन्हा गाळ आणि घाणीने बुजले आहेत. याच्या तोंडावर वाढलेल्या झुडपांमुळे आत जाता येत नाही. किल्ल्याच्या नैऋत्य कोपऱ्यात डोमिनिक चर्च हे रेवदंडय़ातील भव्य चर्च आहे. इ.स. १५४९ मध्ये बांधलेल्या या चर्चचे छत जरी कोसळलेले असले तरी त्याचा सभामंडप, भिंती व त्यावरील नक्षीकाम यातून त्याची भव्यता लक्षात येते. याशिवाय पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वास्तूंपैकी सेंट झेवियर चर्चही रेवदंड्यात आहे. या चर्चच्या सभामंडपात त्याच्या बांधकामा बाबत शिलालेख पडलेला आहे. या शिवाय किल्ल्यात फिरताना पोर्तुगीज शैलीतील बुरूज व अनेक बांधकामे पडीकावस्थेत दिसतात. किल्ल्याचा बराच भाग खाजगी मालमत्ता असल्याने काही मालक आत जाऊन पहायला परवानगी देतात तर काही उगीचच शिष्टपणा दाखवतात. संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण दोन तास लागतात.

Deserted Revdanda Beach
Missing crowd of Revdanda beach found at last
Broken walls of the Fort
Dense Vegetation inside the Fort 

ओहोटीच्या वेळेला किल्ल्याची समुद्राकडील भिंत पाहायला रेवदंड्याच्या किनाऱ्यावर जायचे. लांबलचक दगडी तटबंदी आणि त्यातून डोकावणारे माड अशा दृश्याचा अनुभव घ्यायचा. ओहोटीची वेळ संध्याकाळची असेल तर पश्चिमेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ही भिंत उजळून निघते.  रेवदंड्याच्या दक्षिण टोकाला कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. तिथून समोरच चौलच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला कोर्लई किल्ला दिसतो.आणि कुंडलिका नदीवरील पूल ओलांडून पलीकडे गेलं की आगरकोटाची भिंत आणि त्यामागचा गर्द हिरवा आसमंत निरखत बसायला मजा येते. मागे चौलची टेकडीही दिसते.








बॉम्बे स्टीम नॅव्हीगेशन कंपनीने आपल्या एका जहाजाचे नाव चंपावती ठेवले होते.

शिलालेख

१) चौलच्या उत्तरेस असलेल्या मोडकवाडी भागात देवगिरीनृपती यादव रामचंद्रदेव कालीन (शके १२२०, विलंबी संवत्सर, चैत्र शुद्ध ११, सोमवार, २४ मार्च, इ. स. १२९८) संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील शिलालेख मिळाला. या लेखाचा अर्थ सुसंगतपणे  लावता येत नाही कारण या लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या ओळीत शापात्मक वचन आहे. 
२) किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या कोपऱ्यावर खालच्या भितीवर १. २७ मी. x ०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश, कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले आहे. चेहरा तुटला आहे. या प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा अर्थ किंग Dom Joao चौथा असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता येईल. 
३) समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर ०.६७ मी, ४ ०.६७ मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन ताऱ्यांची प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या, ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका देणारा पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE || SOVSA FREIRE, DESTA FORTALEZA I SEFESTO || DAESTA FORTIFICASAO ADDAADDAPRAIAHDLOMAR"
(४) किल्ल्याच्या उत्तर भितीतील दरवाजाच्या डाव्या बाजूस ०.४५ मी. x ०.४५ मी. अशा चौरसाकृती लादीवर तुटलेला शिलालेख आहे. या लेखाचा आशय अवर लेडी ऑफ सॉरो हिच्या संरक्षणाखाली हा दरवाजा आहे असा आहे. पोर्तुगीज भाषेत तो "ESTA PORTA || COAROANS || DOROVE HF || SVA" असा आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूसही एक लादी होती. ती भग्न पावली आहे. तिच्यावर इ. स. १६३८ चा पुढील पोर्तुगीज लेख होता :- "NAER A DE || 1638 SERE || DEFICOV || ESTA PORTA. २१६
५) अलिवाग रस्त्यावरील लँड गेटच्या बाहेरच्या बाजूने द्वारमाथ्यावर ०.७५ मी. x ०.६५ मी. लादीवर मुकुट व इतर काही चिन्हे कोरली होती. या लादीवर शिलालेख होता तो बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे" चेऊल किल्ल्याचा Joao de Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम (किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व १६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले. सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता (Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून नेमण्यात आले." पोर्तुगीज भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO 635 EPRI || NCIPODE 636 SENDO CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO DE THOBAR DE VE I लसूचॉइसतो
नागानाममा जाहपऊल फिल्ल्याचा Joao de Thobar de Velasco हा कॅप्टन असताना हे काम (किल्ल्याचे) १६३५ च्या अखेरीस व १६३६ च्या सुरुवातीस पूर्ण करण्यात आले. सोसायटी ऑफ जिझसचे परम पिता (Father) यांना चौल शहराचे आश्रयदाते म्हणून नेमण्यात आले." पोर्तुगीज भाषेत तो " ESTAOBRA SEFES NOREMA || TE DOANNO 635 EPRINCIPODE 636 SENDO CAPITA || ODESTA FORTALEZA DCH || AVL IOAO DE THOBAR DE VE || LASCOESETO MOVRORPAD ROEIRODESTACIDE OGLO || RIOZOPE SFRANCISCOXA || VIER, DACOMPA DEIESVS, " असा आहे.
लावता येत नाही कारण या लेखात फक्त सुरुवातीच्या दोन व शेवटच्या दोन ओळी वाचता येतात. शेवटच्या ओळीत शापात्मक वचन आहे. २१
२) किल्ल्याच्या आग्नेय बाजूस असलेल्या कोपऱ्यावर खालच्या भिंतीवर १.२७ मी. ४ ०.६७ मी. एका लादीवर सैनिकाची प्रतिमा कोरलेली आहे. त्याने खिस्ती योद्धघासारखा अधिकारदर्शक गणवेश, कोटावर तलवारीचा पट्टा व डोक्यावर टोपीसारखे उघडे शिरस्त्राण परिधान केले आहे. चेहरा तुटला आहे. या प्रतिमेखाली "EL REI DOJOAO || COARTO" व त्याचा अर्थ किंग Dom Joao चौथा असा होतो. त्याचा काळ इ. स. १६५६ असा निश्चित करता येईल. 
३) समुद्राच्या (जुन्या बंदराच्या) बाजूने असलेल्या दरवाजावर ०.६७ मी. x ०.६७ मी. अशी चौरसाकृती लादी आहे. तिच्यावर एक दंड (छडी) व तीन ताऱ्यांची प्रतिमा असून त्यामध्ये मेरीच्या ईश्वरी अनुग्रहाची आख्यायिका देणारा पोर्तुगीज लेख आहे:-NAER AD 1577 I SEDO || CAPITAO. ALIXADREDE SOVSA FREIRE, DESTA FORTALEZA 1 SEFESTO || DAESTA FORTIFICASAO ADDAADDAPRAIAHDLOMAR" P
६) किल्ल्याच्या वायव्य बाजूकडील एका घराच्या ओसरीत २.०२५ मी. x ०.९ मी. आकाराच्या लादीवर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे:- " (SEPOLTURA) DELVIS ALVARESCA MEIO E DE SEVS ERDEIRO (S)" त्याचा सारांश-"Luis Alvares Camillo आणि त्याच्या वारसांची समाधी" असा आहे. १९८
७) किल्ल्याला पश्चिमेकडे लहान दरवाजा आहे. त्याच्या वायव्य वाजूस असलेल्या पडक्या मनोऱ्यावर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे. "SENDO VR. DA INDIA FRCO. DE TAVOR, CONDE DE AIVOR MDO. IOM DE LEMO DE BRITO FZEO ESTA ATALAIA ASVACVSTA SENDO CAPAM, MOR DESTA CANPO NAER AD. 1688" या शिलालेखाचे डॉ. द कुन्हा याने पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांटर केले आहे:-"When Francisco de Tavora was Viceroy of India, Conde d'Alvor Joao deMelo de Brito commanded this tower to be built at his expense while Chief Captain of this Camp in the year 1688.
८) किल्ल्याच्या वायव्येकडील भितीत ०.६२५ मी. ४०.४५ मी. लादीवर वरील याजूस जिझसचा क्रॉस असलेला शिलालेख पूर्वी N. S. da Conceicao चा संबोधला जाणारा दुर्बोध पोर्तुगीज शिलालेख आहे.- "NO ANO DE 1721, SENDO CAPITAO, E GOVOR. DEIA FORTZA DE CHAVL ANTONIO DE S. DE LEMOS, FIDALGO DA CAZA DE SA. MSE. QUE, DS. SP POR ORDEM QUE IEVE DO XMO. SOR. FRANSO. JOZEPE DE SAMPO E CATRO, VREI E CAPITAO-GFRA DA INDIA PA, LEVANTAR ESA FORTFICACAO CHAMADA N. S. DA CONCEICAO AOS 25 DE MARCO DA DIA HE. RA. A. IMA." डॉ. द कुन्हा याने याचे इंग्रजी भाषांतर पुढीलप्रमाणे केले:- "In 1721 when Antonio de Souza de Lemos, a nobleman of the household of His Majesty, whom may God always guard, was Captain and Governor of the Fortress of Chaul, under orders sent by His Excellency Senhor Francisco JOSE de Sampaioe Castro Viceroy and Captain General of Portuguese India, commanded that this fortification named N. S. da Conceicao should be built on the 25th March of the abovementioned year." २२०

९) आगरकोट मधील फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य कमानीच्या दरवाजावर एक कोनाडा होता. त्यात १.७७ मी. x ०.६५ मी. आकाराचा तीन तुकडे झालेला पोर्तुगीज शिलालेख बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आला आहे. पोर्तुगीज भाषेतील त्याचा मजकूर असा होता:- "CONSACRA DA ENTERNIDA DE IOAM IV, REI, DE PORTUGAL, EMAS CORTES Q CELEBROV NO ANNO DE 1646
FES TRIBUTARIO ASI E A SEVS REINOS O OANNVA PENCAM A IMMACVLA DA CONCEIOAM DA VIRGEM SENHORA E COM PVBLICO IVRAMENTO PROMETEO DEFENDER QA MESMA SENHORA ELEITA PADROEIRA DE SEV IMPEHO FOI PRESERVADA DE TODA A MACVLA DE PECCADO ORIGINAL. EPERA QA PIEDADE PORTVGEZA VIVESSE MANDOV ABRIR NESTA PEDRA ESTA PERPETVA LEM BRANCA NO 15 ANNO D SEV IMPERIO E NO DE CHRISTO 1655. FESE ESTA OBRA NAEB DE 1656. " सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर पुढीलप्रमाणे दिले आहे:-"Consecrated to Eternity. Dom Joao IV. King of Portugal in the Cortes which he assembled in 1646 made himself and his Kingdom tributary for a yearly pension to the Immaculate Conception of the Virgin Lady. Under a public oath he promised to maintain that the same Lady, the elect Patroness of his empire, was free from the stain of original sin. To preserve Portuguese piety he ordered that this lasting memorial should be carved in the 15th year of his reign and in the year of Christ 1655. This was done in the year 1656,
१०) किल्ल्याच्या आग्नेय कोपऱ्यात डोमिनिकन चर्च होते. मुख्य चर्चच्या दक्षिणेस एक चॅपल होते. या पडक्या चॅपलवर एका गोलाकार भग्न दगडावर पुढील पोर्तुगीज पुसट शिलालेख आहे :- "SEPVLTVRA D (E) (A) NTONIO ATAIDE (?) MENESES (?) E DE SEV (S) ERDEIROS, QUE FALECEO A DEM (1) DC (?) I." त्याचा आशय :- "Antonio Alaide Menezes" (मृत्यू १६०११) व त्याचे वारस यांची समाधी असा आहे. १२
११) डोमिनिकन चर्चच्या पूर्वेस असलेल्या छपराच्या इमारतीस १.८ मी. x ०.७५ मी. शस्त्रांच्या प्रतिमा असलेल्या लादीवर एका देवदूताची प्रतिमा आणि गरुडाच्या प्रतिमेवर पोर्तुगीज भाषेत I. H. S., Jesus Hominum Salvator. (इंग्रजीत 'Jesus the Saviour of Men.') अशी अक्षरे आहेत. गरुडाच्या भोवताली पोर्तुगीजांचे "Dominvm (est) spes mea" (इंग्रजीत 'The Lord is my Hope') ही अक्षरे आहेत. शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील पुढील शिलालेख आहे :- " ESTA SEPVLTVRA HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE (I) 636 ANOS. डॉ. द कुन्हा याने या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले :-
आहेत. शस्त्रांच्या खाली पोर्तुगीज भाषेतील पुढील शिलालेख आहे:- "ESTA SEPVLTVRA HEDE MANOEL SALDAMHA, E DE SEVS ERDEIROS QUE MORREO: A-20 DE DEZEMBRO DE (I) 636 ANOS, डॉ. द कुन्हा याने या शिलालेखाचे पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले :-"This is the tomb of Manoel Saldanha and of his heirs, who died on the 20th of December of the year 1636. "
१२) उपरोक्त शिलालेखाजवळ आणखी एक तुटलेला शिलालेख आहे. त्याचा इंग्रजीतून आशय "(Tomb) of Diogo Goes, and of (his heirs) died on 2nd of October of...." असा आहे. बाकी भाग नष्ट झाला आहे. डोमिनिकन चर्चच्या सुमारे ४० मी. पूर्वेस काही लहान लहान इमारतींचे अवशेष होते आणि त्याच्याही पुढे सुमारे ५५-६० मी. वर आणखी काही अवशेष होते. त्यांच्या उजव्या बाजूस सुमारे ५५-६० मी. अंतरावर सेंट झेविअर चॅपल होते. त्याच्या अवशेषांत पूर्वेस एक कमानदार दरवाजा आहे. या दरवाजावर १.२ मी. x ०.८२ मी. आकाराच्या संगमरवरी दगडावर पुढील पोर्तुगीज शिलालेख आहे :-"POR HAVER MORADO NESTE LVGAR SAO FRANCISCO XAVIER OCO PASSov AO NORTE LHE FES ESTA ERMIDA, DO GILIANES DENRA. SENDO CAPITAO DESTO FORTALEZA, PA MEMORIA E LOVVOR DO SANCTO O ANO DE 1640". सन १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये पुढीलप्रमाणे इंग्रजी भाषांतर केले आहे :-"St. Francis Xavier having lived in this place on his way to the north, this chapel was built by Dom Gilianes Noronha Captain of this Fort to the memory and praise of the saint in the year 1640. २२४
१३) सराई (आताचे सुरई हे ओसाड गाव) खेडयाच्या ०.४ कि. मी. वर पायऱ्यांची लहान विहीर आहे. तिच्यावर इ. स. १७८२ चा पुढील शिलालेख आहे:- "श्री शक १७०४ शुभकृत नाम संवत्सरे, श्री विठ्ठल चरणी शामजी विबक प्रभू सोपारकर, वैशाख शुद्ध १५.१२५
१४) दत्तात्रेय मंदिरात उजव्या बाजूकडील बांधलेल्या ओट्यावर संगमरवरी दगडात पादुकांच्या जोडासह, दंड, शंख, मृदंग, चंद्र व कमळाची प्रतिमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके १७८७ (इ. स. १८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे. 
१५) दत्तात्नेय मंदिराच्या पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे एका साधूचे घर आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall) पुढील मराठी शिलालेख आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७० (इ. स. १८४८), किलक नाम संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून खाली उतरताना सुमारें १०० व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख आहे:-
     "श्री. श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा लक्ष्मणजी शेठ सोनार यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद नाम संवत्सरे माहे चैव शद्ध भूषण, पद्रव कमळाचा प्रातमा कोरली असून त्यावर या वस्तू देवास शके १७८७ (इ. स. १८६५) मध्ये अर्पण केल्या असा शिलालेख आहे. 
१५) दत्तात्रेय मंदिराच्या पायऱ्या संपतात तेथे उंबराच्या झाडाचे खोड आहे. तेथे एका साधूचे घर आहे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूच्या भितीवर (parapet wall) पुहील मराठी शिलालेख आहे "सौ. सावित्रीबाई शास्त्री, संवत १९०५, शक १७७० (इ. स. १८४८), किलक नाम संवत्सर, कार्तिक वद्य प्रतिपद (प्रतिपदा) वरून खाली उतरताना सुमारे १०० व्या पायरीजवळच्या भितीवर पुढील मराठी शिलालेख आहे:-"श्री. श्रीदत्तात्रेय स्वामींच्या पादुका दासानुदास महादोबा लक्ष्मणजी शेठ सोनार यांनी बांधले. पायऱ्या ५०, शक १७७६ (इ. स. १८५४) आनंद नाम संवत्सरे माहे चैत्र शुद्ध तृतिया वार सोम (सोमवार) श्री संवत १९१०.
१६) दत्त मंदिराच्या वरून २४८ व्या पायरीवरही पुढील राराठी शिलालेख आहे:-"श्री गुरु दत्तात्रेय चरणी कृष्णा नारायण शास्त्री, मुकादम, पायऱ्या पंच, शक १७९० (इ. स. १८६८), विभू (विभव) नाम संवत्सर माहे पौष. २२८ भवाळे येथील भगवती मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर पुढील पाच ओळींचा नागरी संस्कृत शिलालेख आहे- "श्री गणेशाय नमः। शके १६७३ प्रजापती नाम संवत्सरे। फाल्गुन शुद्ध सप्तम्याम् । देव्यालयस्य जीर्णोद्वारस्य । प्रारंभ कृतः समाप्तीस्तू अंगिरा ।।" सारांश- इ. स. १७५१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. 
१७) हमामखान्याच्या ०.४ कि. मी. पश्चिमेस नदीकाठी उभारलेल्या जागेवर सोळा घुमटांची एक मशीद आहे. तिचे ११ घुमट ढासळले आहेत. तिला ईशान्येस लागून दोन मुस्लिम कबरी आहेत. त्यांच्यावर दोन उर्दू शिलालेख आहेत त्यातील एका कबरीवरील हिजरी ९१५ (इ. स. १५०७) चा व दुसऱ्या कबरीवरील हिजरी १०३४ (इ. स. १६२३) चा उल्लेख आहे. दुसऱ्या कबरीवरील शिलालेख पूर्ण तुटला आहे. पहिल्या कबरीवरील शिलालेखाचा सन १८८३ पूर्वी प्रा. रेस्टेक (Rehsteck) यांनी पुढीलप्रमाणे ओळीनुसार इंग्रजी अनुवाद केला आहे:- " (1) Our Lord Commands the arrangement, (2) Diligently of the Sunni Mosque, (3) With a priest and pond.. (4) Whom we may love according to the ordinance of Muhammad the Apostle; and in (5) Khaul we command you to prohibit intoxication
(and) (6) Infidelity like companions (of you) (7)
our प्रो्फेट
or prepav
(8) Muhammad had striven..
(11) Mosque
(9) and (10) (15) .(date) with propriety, (12) (13) (14) .year 915 (?). "
(16)
रेस्टेक यांनी दुसऱ्या शिलालेखाचा ओळींनुसार इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे केला आहे:-
"(1) As was the edifice of the house of God. (2) Date of mosque (3) Handallanu (or bu or yu) (4) year 103(?)". गुलाम महंमद मुन्शी यांनी लेखातील चौथ्या ओळीतील हिजरी वर्ष १०३४ असे लावले आहे.

अक्षी

अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या एका अर्वाचिन स्तंभावरुन हे गावं आल्याची चाहूल लागते. आक्षी व नागावं ही जुळी भावंड, निसर्गरम्यताव व ऐतिहासिकता यांच्या बाबतीत या दोन्ही गावांत विलक्षण साम्य दिसून येते. अक्षी, नागाव आणि रेवदंडा हा बागांचा व नारळी-पोफळीच्या वनाचा पट्टा समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे १३ कि. मी. पसरलेला आहे. गावातील घरे नारळी-पोफळीच्या दाट छायेत वसलेली असून येथील समुद्र किनाऱ्यावर कोळघांची मोठी वसाहत आहे.
         अक्षी गावाचे नाव कसे पडले असावे हा अभ्यासाचा विषय आहे. अक्षी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ नेत्र किंवा अक्ष असा होतो. प्रत्येक गावाच्या नावामागे एक अर्थ दडलेला असतो ज्यावरुन गावाच्या आद्य इतिहासाचा थोडाफार निष्कर्ष लावता येतो. अक्षी हे गाव साखरखाडीच्या जवळच असल्याने व येथून उत्तर व दक्षीणेकडिल खुप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने टेहळणीसाठी या प्रदेशाचा वापर पुर्वी मोठ्या प्रमाणात होत असावा आणि भौगोलिक दृष्ट्या अक्षी हे गाव अष्टागरांच्या मधोमध येत असल्याने अष्टागराची नेत्रे या अर्थी या गावास हे नाव मिळाले असल्याचा अंदाज लावू शकतो. अर्थात अक्षी हे गाव प्राचिन अष्टागरांपैकी एक असल्याने तसेच या गावातल्या दोन प्राचिन शिलालेखांमुळे हे गाव फार पुर्वीपासून राजकिय व सांस्कृतिकदृष्ट्या वैभवसंपन्न होते याची खात्री पटते. उत्तर आंग्रे काळात म्हणजे १७ फेब्रुवारी १७९७ मध्ये आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे व रघुजी आंग्रे यांचे पुत्र जयसिंगराव आंग्रे यांच्यात अक्षी या गावात तुंबळ युद्ध झाले होते ज्यामध्ये बाबुरावांचा पराभव झाला मात्र कालांतराने बाबुरावांनी जयसिंगरावांचा पराभव करुन दुसर्‍या बाजिरावाकडून सरखेलपदाची वस्त्रे घेतली.
        गेल्या काही वर्षांपुर्वी अक्षी हे गाव आपल्या निसर्गरम्यतेसाठी व स्वच्छ पांढर्‍या वाळूच्या समुद्रकिनार्‍यासाठी प्रसिद्ध होतं, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अक्षीची ओळख मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं म्हणुन समोर आली आहे.
 या गावात साखरखाडीच्या दक्षिणेला सुमारे १.२१४ हेक्टर क्षेत्रफळ असलेला एक जुना तलाव (खोली ४.२६७ मीटर) आहे. हल्ली तलावात गाळ साचल्यामुळे तलाव आटतो. गावात कालिकादेवी व सोमेश्वर महादेवाची जुनी देवळे आहेत. या परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशीदेवरायची आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेवचा असे दोन शिलालेख सापडले आहेत.
  अक्षी गावात शिरणार्‍या मुख्य रस्त्यास लागलं की काही अंतरावर सोमेश्वराचे प्राचिन शिवमंदीर आहे, याच परिसरात मराठीतला प्राचिन व पहीला शिलालेख पहावयास मिळतो. एका गधेगळीवर कोरलेला हा केशीदेवरायचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून तो शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे-शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ या तिथीचा आहे." या शिलालेखात केशीदेवराय-कोकण शिलाहार नृपती, भइर्जु सेणुई महाप्रधान व लुनया-लेख कोरणारा या व्यक्तिनामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश-कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दान दिले हे नमूद करण्याचा आहे. 

राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२

गीं सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु: ९३४ प्रधा-
वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ-
लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज-

जगी सुख नांदो.पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली.

या लेखाचा शेवट शापात्मक वचनांनी झाला आहे. मराठी भाषेतील उपलब्ध लेखांतील हा पहिला शिलालेख होय असे पुरातत्त्वज्ञ शं. गो. तुळपुळे यांचे मत आहे. संशोधनाअंती या शिलालेखाचा काळ १६ मे १०१२ असा ठरला याचा अर्थ २०१२ साली या शिलालेखास हजार वर्षे पुर्ण झाली. त्याकाळी संपुर्ण कोकण प्रांतावर शिलाहार नावाचे राजघराणे राज्य करीत होते, हे शिलाहार राष्ट्रकुट नामक साम्राज्याचे मांडलिक असून यांच्या तीन शाखा अस्तित्वात होत्या त्यांना उत्तर कोकण शाखा, दक्षीण कोकण शाखा व कोल्हापुर शाखा असे म्हटले जाते. अक्षीचा शिलालेख हा उत्तर कोकणच्या शिलाहार शाखेचा राजा केशिदेवराय याच्या काळातला हा शिलालेख असून केशिदेवाचा महाप्रधान भइर्जु सेणूई याने अक्षी गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दिले असल्याचे या शिलालेखात नमुद करण्यात आले आहे.

 

मराठी भाषेच्या उगम इतिहासातील सज्जड पुरावे म्हणजे कोरीव ताम्रपट आणि शिलालेख होत. त्या सर्वांवर काळाची नोंद नसली त्यांच्या अक्षरांच्या वळणावरुन त्या काळाची नोंद होऊ शकते. मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा जैन दिगंबर पंथीय श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शालिवाहन शके १०३८-३९ म्हणजेच इ.स. १११६-१७ सालातील
श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले
अशा नोंदीचा मानला जात होता परंतु शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे अक्षीचा शिलालेख हा पहिला शिलालेख ठरतो

पूर्वी हा ‘दगड’ रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. आज तो अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभा आहे. 

 सोमेश्वराचे मंदीर जवळ रस्त्याच्या डावीकडे हा गद्धेगळ उभा करून ठेवला आहे. Gazetteer of Bombay Presidency- Kolaba and Janjira, 1883', मध्ये याचा उल्लेख आपणास आढळतो तो असा, “About ten feet to the left of the Someshvar temple is an inscribed stone, 5' 5." long by l' 3" broad. Above are the sun and moon followed by fifteen lines of writing in the Devanagari character and below the writing is the ass-curse”. याच बरोबर, 'Revised list of Antiquarian Remains in the Bomaby Presidency ' या पुस्तकात याचा उल्लेख झालेला दिसून येतो (page. 206).

     साधारण ३ फूट असणाऱ्या या शिळेचे ३ भाग पडतात. वरील भागात चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. मधल्या भागात साधारण १५ ओळींचा लेख असून यातील केवळ ८-१० ओळींचेच वाचन झालेले आहे व खालच्या भागात गद्धेगळीची आकृती कोरलेली आहे. या शिळेवरील आकृत्यांचे खोदकाम जरी चांगले झालेले असले तरी त्यावरचा लेख मात्र सद्यस्थितीला वाचता येत नाही. उन,पाउस,वारा आणि कोणतेही संरक्षण न मिळाल्यामुळे, लेख जवळपास नाहीसा झाला आहे.
लेखात आपल्या नशिबाने सन कोरलेले असल्यामुळे हा गद्धेगळ कोणत्या काळात खोदला गेला याची माहिती आपल्याला मिळून जाते. हा लेख शके १२१३ (गत बर्ष), खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ या तिथीचा आहे. लेखात रामचंद्रदेव यादव नृपती, जाईदेव-यादव नृपतीचा मांडलिक, आणि इश्वरदेव क्षत्निय-जाईदेवाचा दान देणारा पुत्र या व्यक्ति-नामांचा समावेश आहे. 
   शके १२१३ म्हणजेच इ.स. १२९१ मध्ये रामचंद्र यादवच्या राजवटीत खोदला गेला. त्या काळात उत्तर कोकणावर या यादवची सत्ता होती हे यावरून कळून येते.
गद्धेगळ). शिळेच्या वरच्या भागात सूर्य आणि चंद्र यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. याचा अर्थ, जर कुणी दानाचा गैरवापर केला तर मिळणारा शाप हा जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत टिकेल. सद्यस्थितीला सुद्धा या आकृती स्पष्टपणे दिसून येतात. डाव्या भागात सूर्याची गोलाकार आकृती आणि उजवीकडे चंद्रकोर असे याचे स्वरूप आहे.
     मधल्या भागात लेख कोरलेला आपल्याला दिसून येतो. १५ ओळींच्या या लेखात प्रत्येक ओळीत साधारणपणे १२-१४ अक्षरे कोरलेली आढळून येतात. बऱ्याच वर्षांच्या कालावधीमुळे संपूर्ण लेख आता अस्पष्ट झालेला आहे पण मूळ लेख हा चांगला ठळक असणार हे सध्याच्या उरलेल्या अक्षरांवरून कळून येते. हा लेख देवनागरी लिपीत कोरलेला आहे परंतु लेखाची भाषा ही मराठी-संस्कुत आहे. लेखाचे प्रास्ताविक संस्कुत मध्ये असून दानाचा उल्लेख हा मराठी मधून आहे.. या लेखाचे प्रथम वाचन तुळपुळे यांनी केले. तसेच आपल्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या पुस्तकात त्याचे सविस्तर विश्लेषण देखील दिले आहे.

लेखाचे वाचन-
१. स्त्री सकु १२१३ खर संवछारे चैत्र सुध
२. ८ सुक्रे अद्येह स्त्रीमत्पौधीप्रतापचक –
३. वर्त्ती स्त्रीरामचंद्रदेव विजयोदयी तत्पा
४. दपद्मोपजीवी स्त्रीजाइदेव --- तेहाचे स्त्री—इ
५. स्वरदेव क्षत्रीय -------------------------
६. त्रींबकानी स्त्री अक्षी का (लि) कादेवी
७. ब्राह्मणासी प्रदेसु ----------- पुत्रे दत्त मा
८. गे तेआ ग? ------------------------
९. -----------------------------------------
१०. पूर्वे पस्मे ---------------------
११. -------------------------------------------
१२. ------------------------------------------
१३. ---------------------------------- हे जो
१४. लोपी तेहाचीये माएसी गाढौ घोडू झविजे
१५. ------------------------- शुभं भवतु

( संदर्भ- प्राचीन मराठी कोरीव लेख- श्री. तुळपुळे)

वरील लेखात ज्या ठिकाणी मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत, त्याठीकाणच्या लेखाचे वाचन करणे जमले नाही.

अर्थ-
    लेखाच्या ज्या भागाचा ठसा घेऊन तो लेख वाचता आला त्याचा अर्थ हा तुळपुळे यांच्या पुस्तकातून जसाच्या तसा इथे देत आहे, “श्रीशक १२१३, खर संवत्सर, चैत्र शुद्ध शुक्रवार, या दिवशी स्त्रीमत्पौधीप्रतापचकवर्ती श्रीरामचंद्रदेव (यादव) याची राजवट असताना त्याचा पादपद्मोपजीवी श्रीजाइदेव याचा पुत्र श्रीईश्वरदेव क्षत्रिय याने अक्षी (गावातील) श्रीकालिकादेवी (हिच्या) ब्राह्मणास १ गद्याण.. दिला. [यापुढील लेख वाचता न आल्यामुळे अर्थ लागत नाही परंतु पूर्वे व पस्मे या शब्दांवरून कदाचित जमिनीच्या दानाचा उल्लेख असावा असे वाटते] शेवटी गद्धेगळ असून त्याचा अर्थ, “हे (दान) कुणी नष्ट करील त्याच्या आईस गाढव व घोडा ही लागतील. शुभं भवतु.
       आता या लेखातून अनेक प्रकारची माहिती कळून येते ती म्हणजे, या लेखाचा काळ, शके १२१३ (इ.स. १२९१) असा उल्लेख लेखातच आल्यामुळे लेखाच्या कालानिश्चीतीबद्दल वाद उद्भवत नाहीत. पुढे आलेल्या नावांवरून असे कळून येते की, या काळात उत्तर कोकणावर रामचंद्र यादव याची सत्ता होती कारण तो स्वताचा उल्लेख हा प्रौढप्रतापचक्रवर्ती असा करतो. जाइदेव हा निरोपी अधिकारी असल्याचे कळून येते, तर हे दानपत्र ईश्वरदेव या जाइदेवाच्या मुलाचे असल्याचे कळून येते. या ईश्वरदेवाने अक्षी या गावातील कालिकादेवीच्या उपासक ब्राह्मणास दान म्हणून १ गद्याण दिले अशा आशयाचा हा लेख आहे. सध्या अक्षी मध्ये कालकाबोरवा हे देवीचे प्रसिद्ध मंदीर आहे, कदाचित कालिकादेवी आणि सध्याचे कालकाबोरवा हे स्थान एकच असू शकते.
        याच्या तिसऱ्या भागात एक स्त्री आणि गाढव/घोडा यांचा प्रणय होतानाची आकृती रेखाटण्यात आलेली आहे. अर्थात ही आकृती रेखाटण्यामागे इतकेच प्रयोजन असावे की ज्या लोकांना तो लेख वाचता नसेल येत त्यांना हा दगड कशासाठी कोरला आहे हे कळेल आणि याची अवहेलना केली तर काय शासन होईल ते कळेल. गम्मत म्हणजे अशा प्रकारचे दगड महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत, पण त्यांची आज देव म्हणून शेंदूर फासून पूजा केली जाते.
रामचंद्रदेव याच्या लेखाचे महत्व इतक्यासाठीच की, या लेखात उल्लेख आलेले अक्षी हे गाव आणि सध्याचे अक्षी हे गाव यांच्या नावात काडीमात्र सुद्धा फरक पडलेला नाही, ७३५ वर्षानंतर सुद्धा.
   या शिलालेखाबरोबरच या परिसरात आणखी एक यादवकालीन शिलालेख दिसून येतो   

अक्षी गावातील कालंबिका माता मंदीर व सोमेश्वर महादेव हे शिवमंदीर समस्त अक्षीकरांची आराध्य दैवते आहेत. कालंबिका मंदीराचा जिर्णोद्धार झाला असून देवीचे सर्व उत्सव ग्रामस्थ भाविक अतिशय उत्साहाने साजरे करत असतात. कालंबिका मंदीराच्याच आवारात काही काळांपुर्वी प्राचिन गजांतलक्ष्मीची मुर्ती आढळली, आता तिची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी कालंबिका मंदीराशेजारीच एक छोटेखानी मंदीर बांधून केली आहे. या शिवाय सोमेश्वर महादेव शिवमंदीरही अतिशय प्रेक्षणीय आहे या मंदीरातला प्रवेश धीरगंभीर व मंत्रमुग्ध वातावरणाचा अनुभव देतो. या मंदीरातील नंदीची मुर्ती भलीमोठी असून एवढी मोठी मुर्ती आजुबाजुच्या परिसरामध्ये क्वचितच पहावयास मिळते.
  सोमेश्वराच्या देवळाजवळ चितशोमणेश्वराचेही जुने देऊळ आहे. गावात सिद्धिविनायकाचे एक देऊळ असून ते बापूजी सिध्दिविनायक मंदिर या नावाने ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यास लागून पीराचा दर्गा असून त्याचा नुकताच जीर्णोध्दार केला आहे. तेथे पौष पौर्णिमेला उरूस भरतो.


अक्षी गावात फेरफटका मारावा तो चालतच, नारळी पोफळीच्या बागांमधून गेलेल्या रस्त्यांवरुन चालत असताना फळा-फुलांच्या बागांतून आलेला सुगंध वेगळ्या विश्वात घेऊन जातो, येथील समुद्रकिनार्‍यावरील पांढरी वाळू व समोर विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचा निनाद वातावरणात गुढ ध्वनीलहरी निर्माण करीत असतात. अक्षी गावाची एक दिवसाची सफर सुद्धा वर्षभर पुरेल इतका उत्साह देऊन जाते. अलिबाग  चौल रस्त्यावर अलिबागपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या अक्षी गावास भेट देण्याकरीता आपले खाजगी वाहन, बस किंवा रिक्षांचा वापर करता येऊ शकतो, येथील स्तंभापासून साधारणतः १.५ कि.मी. अंतरावर अक्षीचा समुद्रकिनारा आहे जेथे थेट वाहने जाऊ शकतात. अक्षीच्या किनार्‍यावरुन आपल्याला अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते याशिवाय अक्षी गावात राहण्याच्या व खाण्याच्या विपुल सोयी असल्याने हा बीच पर्यटकांसाठी अतिशय सोयीचा आहे. एका वेगळ्या विश्वाचा आनंद घ्यावयाचा
असल्यास अक्षी या गावास एकदातरी भेट द्यायलाच हवी.

References-

1. Pracheen Koreev lekh By S.G. Tulpule
2. Gazetteer of Bombay Presidency, kolaba and Janjira
3. List of Antiquarian Remains in the Bombay Presidency 


अक्षी गावातील श्री कळंबादेवी मंदिर

अलिबागकडून नागावकडे जाताना अक्षी हे लहानसे गाव लागते. स्वछ समुद्रकिनारा, सुंदर वाड्या आणि तेराव्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख ही या गावाची काही वैशिष्ट्ये! या गावात दोन फार जुनी आणि महत्वाची मंदिरेही आहेत. त्यातील एक।म्हणजे श्री सोमेश्वर महादेव मंदिर व दुसरे श्री कालिका देवीचे मंदिर!
अक्षी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ कालिका देवीचे सुंदर मंदिर आहे. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता ज्यामुळे या मंदिराचे रूप पूर्णपणे पालटून गेले आहे. मंदिराच्या आत प्रशस्त सभामंडप आहे व समोरच देवीच्या दोन मूर्ती आहेत. मंदिरासमोर दोन आधुनिक बनावटीच्या दीपमाळा आहेत ज्यांना लाल व पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे. हे मंदिर दिसत जरी नवीन बनावटीचे असले तरी या मंदिराचा इतिहास कमीत कमी ९०० वर्षे पूर्वीचा आहे.






अक्षी गावात शिलाहार कालीन एक व यादव कालीन एक असे दोन दगडी शिलालेख आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराजवळचा शिलालेख (गद्धेगळ) शके १२१३ म्हणजे सन १२९१ मधील आहे. यादव राजा रामचंद्रदेव याचा अधिकारी श्रीजाईदेव याचा मुलगा ईश्वरदेव क्षत्रिय याने या कालिका देवीच्या मंदिरातील ब्राह्मणास दान दिल्याचा मजकूर कोरून ठेवलेला आहे. या मंदिराच्या अलीकडे ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर शिलाहार राजा दुसरा केशीदेव याचा शके ११३१ म्हणजे सन १२०९ मधला दुसरा एक शिलालेख आहे. या शिलालेखातही या मंदिराबाबत नोंद आहे. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी १९६३ मध्ये पुणे विद्यापीठात प्रकाशित केलेल्या "प्राचीन कोरीव लेख" या पुस्तकात या शिलालेखाचे वाचन पुढील प्रमाणे केले आहे. केशीदेव याचा महाप्रधान भइर्जु आणि प्रधान अधीर यांनी शक संवत ९३४ परिधावी संवत्सर, अधिक मास, द्वितीय पक्ष, शुक्रवारी या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कवली धान्य नेमून दिले. मो. ग. दीक्षित यांनी या शिलेखाचे वाचन करताना "नऊ कवली" असे वाचन न करता "भइर्जुतलातव्हानं उकरली" असे वाचतात. त्यामुळे या लेखाचा अर्थ बदलतो. या वचनाप्रमाणे देवीच्या सन्मानार्थ ---- उकरले (खोदले). दानविषयक भाग नष्ट झाल्याने नक्की काय खोदले याचा उलगडा होत नाही. पण त्यांनी धार्मिक कार्यासाठी पुष्करणी अथवा विहीर खोदली असावी. या मंदिराच्या बाजूला एक विहिरही आहे व सोमेश्वर मंदिरासमोर एक लहानशी पुष्करणी ही आहे. त्यामुळे या वाचनाला पुरावा मिळतो. शिवाय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांनीही "शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख" या पुस्तकात दीक्षितांचे वाचन अधिक योग्य वाटते असे नमूद केले आहे. अर्थ कोणताही खरा असला तरी देवीचा उल्लेख दोन्ही वाचनांमध्ये आहे त्यामुळे या देवीची स्थापना १२ किंवा १३ व्या शतकात नक्कीच झाली असावी.
या मंदिराशेजारी असलेल्या छोट्या मंदिरात काही वर्षांपूर्वी खोदकाम करत असताना सापडलेल्या गजांतलक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. हे अतिशय दुर्मिळ शिल्प क्वचितच पहायला मिळते. अलिबागमध्ये वरसोलीतील बेलेश्वर व आवासमधील वक्रतुंड मंदिरासमोर हे गजांतलक्ष्मीचे शिल्प पाहता येते.

संदर्भ:
१.प्राचीन कोरीव लेख - शं. गो. तुळपुळे (१९६३)
२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३)
३. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी (१९७४)
४. वारसा अतिताचा - पंकज समेळ (२०२१)

श्री सोमेश्वर मंदिर - आक्षी 

अलिबागजवळील आक्षी हे आंग्रेकालीन अष्टागरांतील महत्वाचे ठिकाण. याच आक्षी मध्ये मराठीमधील आद्य शिलालेख आहे. आणि जवळच पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर आहे. आक्षी गावामध्ये गेल्यावर ज्या ठिकाणी शिलालेख सापडले त्याच ठिकाणच्या चौकाजवळ हे मंदिर आहे. अलीकडच्या काळामध्ये ह्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर अतिशय सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी खांबांवर उभा असलेला सभामंडप नजरेस पडतो. या लाकडी खांबांवरचे नक्षीकाम पाहताना नजर हटत नाही. काही खांबांवर देवदेवतांची चित्रे कोरली आहेत. सभामंडपाचे छत पूर्वी कौलारू होते, पण आता त्याचे नूतनीकरण केले आहे. सभामंडपानंतर श्री सोमेश्वराच्या गाभारा दिसतो, गाभाऱ्यावर नक्षीदार घुमट आहे.







मंदिरासमोरच एक मोठ्या आकाराचा दीपस्तंभ उभा आहे. मंदिराभोवताली अलीकडेच सुशोभीकरण केले आहे.

ऐतिहासिक ठेवा –
हे मंदिर जसे पुरातन इतिहासाचा वारसा सांगते, तसेच मंदिराजवळच कोकण शिलाहारवंशीय नृपती केशिदेवरायाचा आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव यांचा असे दोन शिलालेख सापडले आहेत. ते आता जवळच समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक स्थापन केले आहेत. मंदिराजवळ अजून एक पुरातन चिंताहरेश्वराचे शिवमंदिर आहे, त्यासमोर एक जुनी बारव (पायऱ्यांची विहीर) सुद्धा आहे.

नागांव  : -

   रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचीन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, 
अलिबागच्या ईशान्येस ७ कि. मी हे गाव. आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या रमणीय बागा, लहान मोठ्या पोखरणींनी आणि मंदिरांनी नटलेले व शांत वातावरणाचे गाव असून येथील वस्ती सुशिक्षित आहे. कोकण किनाऱ्यावरील नारळ सुपारीच्या बागायतीची विशेषता येथे दिसते. सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन म्हणुन प्रसिद्ध असले तरी या गावास अतिशय प्राचिन असा ऐतिहासिक वारसा आहे.
    नागावचे मूळनाव नामग्राम असावे.  महाभारतातल्या नागसत्र यज्ञानंतर जी नागकुळे दक्षीणेत स्थित्यंतरीत झाली व जी गावे वसवली त्यापैकी नागाव हे एक गाव. नागाव मध्ये आजही नागवंशाच्या प्राचीन खुणा अस्तित्वात आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची खुण म्हणजे दश नागांचे मंदीर, या मंदीरात नागाव गावाच्या मुळ दैवत असलेल्या दश नागांच्या मुर्त्या पहावयास मिळतात ज्या अत्यंत प्राचिन आहेत. तथापि त्याचा ग्रामनामाशी निश्चित संबंध काय आहे हे सांगता येत नाही. शिवकाळात नागावला बरीच वस्ती असावी हे १६७४-७५ मधील स्थानिक लोकांची आडनावे व आताच्या लोकांच्या आडनावांतील साधर्म्यावरून वाटते.  १६३७ मध्ये मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यावर ते दिल्लीच्या शहाजहान बादशहाच्या ताब्यात गेले. १६१२ च्या अस्सल कागदपत्रावरून हरी वर्तक हा वतनदार उल्लेखित आहे. बागायती गावात वर्तक असायचा, ग्रामपंचायतीचे काम अमलात आणावयाचे काम वर्तक करीत असे. १६६२ मध्ये अष्टागराचा बराचसा भाग श्री शिवाजी महाराज यांनी ताब्यात घेतला. अण्णाजी दत्तो सुभेदार झाला. भारतात जमीन महसुलाची पद्धत निर्माण करणारी तीन माणसे म्हणून राजा तोडरमल्ल , मलिकवर व अण्णाजी दत्तो यांचा उल्लेख करावा लागतो .अण्णाजी दत्तोने चौल सुभ्यातील जमिनी मोजून त्यांचा महसूल ठरवून दिला. त्यावेळी नागांवचे , नख्त महसुलाचे उत्पन्न ७४३१ लारी ठरले.( साडेतीन लारी = १ रु.) प्राचिन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नागावंने शिवकाळात सुद्धा राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानाची भुमिका बजावली होती. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नागावचा समावेश होत असे व शेजारच्या चौल वर पोर्तुगिजांची सत्ता होती तसेच पलिकडे मुरुड येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू जंजिर्‍याचा सिद्दी याची सत्ता असल्याने शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या ताब्यातल्या अनुक्रमे जंजिरा व उंदेरी या ठिकाणांवर काढलेल्या मोहिमांचे आरंभस्थान नागाव हेच होते. १६७० च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी नागाव येथे १६० लहान जहाजे, १०००० घोडदळ व २०००० पायदळाचे सैनिक तयार ठेवून जंजिर्‍याला वेढा घालण्याच्या तयारीने जमावले होते. या सैनिकांसोबत इतर शस्त्रास्त्रांसोबत कुदळी, फावळी, पहारी इत्यादी बांधकामाची आयुधे सुद्धा होती. २४ नोव्हेंबरला या तुकडीने नागाव सोडले मात्र २६ तारखेला महाराज अचानक माघारी वळले व आरमारास परत बोलावून काही काळातच त्यांनी खानदेश व वर्‍हाडवर स्वारी केली व प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. अर्थात नागाव मधून निघालेली ही मोहिम ही महाराजांच्या राजकिय डावपेचांचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यास गनिमीकावा असे प्रसिद्ध नाव आहे.   आंग१६९३ मध्ये रघुजी कुलकर्णी नागांवचा कुलकर्णी म्हणून काम पाहत असत.१६९७ मध्ये कान्होजी आंग्रे यांचा उदय झाला. १७१० मध्ये त्यांनी बामणगाव येथे पोर्तुगीझांचा पराभव केला व ते अष्टागराचे धनी झाले. रे काळात नागाव महालातील वस्ती नागावला एकवटलेली होती. येथे नागेश्वर, भीमेश्वर, बंकनाथ, नारायण, महालक्ष्मी, कोलाई तथा ग्रामदेवता, गणपती व योगेश्वरी मंदिरे आहेत.


      प्राचिन काळी नागांव, चौल, रेवदंडा सारखी बंदरे युरोप, अरब तथा आफ्रिकन राष्ट्रांशी व्यापार करण्यामध्ये अग्रेसर होती मात्र मध्ययुगातली अस्थिरता या बंदरांच्या नाशासाठी कारणीभुत ठरली. इतक्या राजकिय स्थित्यंतरातही नागाव, चौल, रेवदंडासारखी गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत ही खरे तर दैवी कृपाच म्हणायला हवी. अष्टागरांचे वैभव असलेले नागाव म्हणजे जणू ऐतिहासिक, सांस्कृतीक, भाषिक, वांशिक व राजकिय ठेव्यांचे एक संग्रहालयच आहे. गेली हजारो वर्षे नागावने आपली प्राचिन संस्कृती जपून ठेवल्याने आजही नागाव मध्ये येणार्‍या पर्यटकांना खर्‍या अर्थाने कोकणातल्या एका टुमदार गावात आल्याचा भास होतो. नागावचा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पोहोण्याच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षित असल्याने जलक्रिडेसाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात मात्र समुद्र पर्यटनाबरोबरच नागाव मधील ऐतिहासिक वारश्याचे दर्शन जर या पर्यटकांना देता आले तर खर्‍या अर्थाने नागावचे सांस्कृतीक व ऐतिहासिक वैभव जगासमोर येईल . सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

      नागावचा समुद्रकिनारा सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर व डोळ्यांचे पारणं फेडणारा असून सभोवताली दाट सुरुबनाने वेढल्याने किनार्‍याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुरेशी काळजी घेतल्यास या सुरक्षित अशा समुद्रकिनार्‍यावर जलक्रिडेचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

भीमेश्वरः  मंदिर :-
 

        नागाव  येथील सुंदर शिवमंदिरे आणि एक शिलालेख यांमुळे ते गाव अभ्यासकांचे आकर्षण आहे. नागावात भीमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. लोक त्याचा उल्लेख भीमनाथाचे मंदिर असाही करतात. या मंदिराविषयी आख्यायिका अशी की हे मंदिर जेथे आहे ती जागा पूर्वी शेतजमीन होती. एकदा नांगरणी करताना शेतकऱ्याला नांगराचा फाळ रक्ताने भरलेला दिसला. त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडले व त्यात ‘मी या नगराचा रक्षक आहे, मला तात्पुरत्या स्वरूपात सावली तयार कर’, असा आदेश मिळाला. त्यानुसार शेतकऱ्याने येथे आसरा केला. शिवपिंडीवर अद्याप नांगर लागल्याची खूण दाखविली जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे सरदार बिवलकर यांची या देवावर खूप श्रद्धा होती. त्यांची कन्या भीमाताई हिने अपत्यप्राप्तीसाठी येथील महादेवाला नवस केला. काही दिवसांमध्ये तिला पुत्ररत्न झाले. त्यानंतर या स्थानाचे नाव भीमेश्वर ठेवण्यात आले.







      ते मंदिर त्याच्या सुंदर पुष्करणीने येणा-यांचे स्वागत करते! मंदिराच्या कमानीतून आत शिरल्यानंतर उजव्या हाताला पाण्याचे टाके दिसते. मंदिराची बांधणी जुनी असावी. रस्त्यावरील एका कमानीतून आत आल्यावर समोरच दगडी बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण पुष्करणी आहे. त्याच्या बाजूला एक दीपस्तंभ व चार तुळशी वृंदावन आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एका झाडाखाली दोन पुरातन मूर्ती आहेत. त्या येथील पुष्करणीत सापडल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी एक देवीची, तर दुसरी भैरवाची आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडे व उत्तरेकडे दरवाजे आहेत. कौलारू मंदिरातील लाकडी दरवाजांची रचना प्राचीन असल्याचे जाणवते. मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. हे मंदिर जमिनीपासून उंच अधिष्ठानावर असल्याने मंडपातून सहा पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मोठी मूर्ती आहे. या नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडी पाहण्याची पद्धत आहे. सभामंडपाच्या छताकडील बाजुला जुन्या काळातील काचेचे कंदील आहेत. दुमजली सभामंडपात बांधकामासाठी लाकडाचा जास्त वापर केलेला आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील नक्षीदार देवकोष्टकांत उजवीकडे गणपती व डावीकडे काळभैरव यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार नक्षीदार द्वारशांखांनी सजलेले आहे. प्रवेशद्वाराच्या मंडोवरावर दोन किर्तीमुख, ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व उत्तरांगावर नक्षीकाम आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी भिमेश्वर महादेवाची पिंडी आहे. या पिंडीभोवती धातूचा नाग व शेजारी त्रिशुळ आहे. पिंडीच्या मागील भिंतीवरील देवकोष्टकात पार्वती मातेची संगमरवरी मूर्ती आहे.
मंदिराशेजारी सापडलेला शिलालेख किंवा अक्षीचे प्रसिद्ध गद्धेगळ किंवा मंदिराच्या बांधकामाची पद्धत पाहता मूळ मंदिर हे शिलाहारकालीन असावे. मात्र तसा शास्त्रीय पुरावा किंवा संदर्भ सापडत नाही.या मंदीराचा १७५८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी पेशव्याचा भाऊ सदाशिवरावभाऊ याची भार्या पार्वतीबाईकडून पैसे मिळविण्यात आले होते. पार्वतीबाई नागावच्या कोल्हटकराची कन्या होती. विठोबा लोंढे याने मंदिरासमोर जीर्णोद्धारानंतर दीपमाळ बांधली. मंदिरासमोरील पुष्करणी १७६४ मध्ये नारंभट रिसबूडने बांधली.  तेथून जवळ असलेले वंखनाथाचे मंदिर शिलाहार स्थापत्यशैलीमधे बांधलेले आहे. त्या‍मुळे भीमनाथाचे मंदिरदेखील त्या काळातील असावे असा तर्क केला जातो.
 मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन पुरातन मूर्ती ठेवल्या आहेत. तेथील पुजा-यांच्या मते, जेव्हा तेथील तळे साफ केले तेव्हा त्या मूर्ती मिळाल्या. त्या मूर्ती प्राचीन भासतात. त्यांपैकी मोठी मूर्ती विष्णूची आहे आणि दुसरी मूर्ती बहुधा भैरवाची असावी. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यांपैकी उजव्या हाताच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस शिलालेख आढळतो. तो दोन-अडीच फूट लांब आणि दीड फूट रुंद आकाराचा आहे. तो शिलालेख पूर्वी गावात होता, मात्र पेशव्यांकडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी तो शिलालेख मंदिराच्या पायरीवर आणून बसवला गेला असा ऐकीव इतिहास आहे.
तो शिलालेख देवनागरीमध्ये आहे. त्यामुळे तो वाचण्यास मजा येते. संदर्भ पुस्तके घेऊन प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लेख वाचण्यात जी मजा आहे ती दुसरीकडे कोठेच नाही. त्या शिलालेखाचा पहिला उल्लेख कुलाबा गॅझेटियरमध्ये आढळतो. पण तेथे तो शिलालेख संस्कृत भाषेतील असल्याचे नमूद केले गेले आहे. शिलालेख चांगल्या रीतीने कोरला गेलेला आहे. त्यावरील सर्व अक्षरे स्पष्ट वाचता येतात. त्यात फारसी शब्द व नावे कोरलेली आढळतात. तसेच, कालगणना हिजरी पद्धतीने केलेली आहे.

शिलालेख अठ्ठावीस ओळींचा आहे. तुळपुळे यांच्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ या पुस्तकातून त्याल शिलालेखावरील मजकूर जसाच्या तसा उद्धृत करत आहे-
छस्वस्तिश्री हिजरत ७६९सकु संवतू १२८९पळवंग संवसरे आद्येय
श्रीमत्यप्रौढीप्रतापचक्रवर्ती माहाराजाधिराज श्रीहंबिरुराओ
ठाणे कोकण राज्यं कोति सत्येतस्मिनकाळेप्रवर्तमाने धरमादि---
पत्र ळीखीते यथासर्व्यव्यापारी सिहीप्रोतंनिरोपित आठगरआधि
करिआकुसनाकू हासणानाकाचा सैणवे देऊप्रोपहोऱ्ह वेळितसं
मंधचिचावळीत्रामपैकी तेथिळ मिजिगिति सिहीप्रोकेळी तेथेमरंगी
द्याळावेआळागी आठगरसमंध मुख्य नागवे आगरुपैकीकातळवाडी
नारदेकवळीआपैकी भाधाळी १उभै वाडीआ २ससिम फळभोगास
हिते श्रीराजायाप्राधानु सिहीप्रो विकती सडाउनी चिचावळीयेचीये मिजिगि
तिवर मिधातळीया कातिळवाडी विकिती द्रमा १६०नारदेकवळीआ जि
येभाटालैये विकिता द्रम४० उभै वाडिआ २ विकिता द्रामा सते २००
हे दाम वरतकू कोश कवळीआ मुष्य करुनी समथीआगरीयासमागीत
डीळी धाकुटाबाळगोपाळी वाटुनी घेतले आठीआघाटातु वाहनाहीवाडी
आ दातारेहीन करुनीजाळीआ म्हणौनीसमथी आगरीचासहानीव्री
किळी ते गुती कैवाहसोडवूनि सिहीप्रोलागौनी वाडीआ विकिळीआ हे
वाडीआ कोण्ही दातारूठमटेळीत गुंतीकरि तरसमंथी आगरीचाई नि—
रवेहा धरमू सिहीप्रोचानितीचरूसमंथी आगरीचाई समाग्रीप्रतिपाळावे
डिआची जमेति सवारा जेतुकेआगर सोई झाडातेपावेतेतुकेआगाराचेआ प्र
झाडाचेचि रोपवुआ वाडी सिहीप्रोसासनविषयेभोगवावी हा धरमू समथी प्र
तिपाळावा आघाटाणे पूर्व दिसे नाउ म्हातारेआचि वाडीउतरदिसे चोरलेवाडीपष
सिम दिसेपठीआरवाडी दसिण दिसेकोणिष्ठीआचि वाडी ऐसि आघाटणे चि
आरिनिवारती आदिपाळक वरतकू कोशकवळीआ पोगुनाकुरामदेओ
वेदम्हतारेआचाधरमूदेओ विभूम्हतारेआचा वाउरे पैकीकावंदेओ कपाटे
आअधोयारी सोम्हाळ म्हाताराराउतनागदेओ भाई दार्षु जसदे सेठी
साकु म्हातारा वाईदेओ कावंदे म्हातारासवद म्हातारागोरु म्हातारा सा
जकारसोमदेओ जोनदेओ वारैकरू वरतकू भूपळ पातैळूनाभळा पातैळू
वैजकरूहे जन मुष्यकरूनिसमथी प्रतिपाळावे अप्राशेसासिना
गावूजमतेपैकी म्हैरुमाहामदु दाउवार आया हाजि दाउवार आया
     प्रस्तुत लेख हा शके 1289 मधील (सन 1367) आहे. त्याकाळी ठाणे प्रांतात ‘श्रीमत्यप्रौढीप्रतापचक्रवर्ती महाराज’ हंबीरराव राज्य करत होते. त्यांच्या काळात ते धर्मपत्र लिहिण्यात आले. शिलालेखातील मजकुरात अनेकदा सिहीप्रो या नावाचा उल्लेख येतो. तो सिहीप्रो हा हंबीररावाचा मुख्य प्रधान. तर मूळ लेखात असा उल्लेख आला आहे, की सिहीप्रो याने अष्टागर प्रांतामधील (म्हणजे अलिबाग ते रेवदंडा या भागातील गावे) नागाव आगारातील चिचावळी या गावात एक मशीद उभारून तेथे रत्नदीप लावण्यासाठी काही दान दिले आहे. तसेच, इतर लेखांतसुद्धा त्याने आगरी लोकांना दान दिल्याचे उल्लेख आढळून येतात आणि काही कलह होऊ नये म्हणून त्यासाठी काय करावे याचे वर्णन केलेले दिसते. त्या शिलालेखाचा आशय तुळपुळे यांच्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिलेला आहे.


     महाराष्ट्रातील संस्कृतीवर दुसऱ्या साम्राज्यातील संस्कृतींचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्या शिलालेखाचे उदाहरण घेतले, तर हंबीरराव हा देवगिरीच्या यादव साम्राज्याशी निगडित असला तरी नागाव येथील शिलालेखावर बहामनी साम्राज्याचा प्रभाव दिसून येतो. लेखात अनेक फारसी शब्द आहेत. त्यामध्ये हंबीरराव याने मशीद बांधण्यासाठी दान दिल्याचे सुद्धा कळून येते. तेथपासून परकीय राजवटीचा प्रभाव महाराष्ट्राच्या पुरातन संस्कृतीवर पडण्यास सुरुवात झाली असावी. त्यामुळे त्यानंतरच्या मधल्या धामधुमीच्या काळात कलेपेक्षा संरक्षणाला महत्त्व दिले गेले. महाराष्ट्रात किल्लेबांधणी झाली. त्यानंतर पेशवे काळात पुन्हा एकदा मंदिर बांधणी किंवा जुन्या मंदिरांचे जीर्णोद्धार करणे सुरू झाले.
    भीमेश्वर मंदिरात दोन गाभारे आहेत. एका गाभाऱ्यात शिवशंकर आहेत तर दुसऱ्या गाभाऱ्यात आणखी एका देवाची मूर्ती आहे. ती कोणती ते ओळखता येत नाही. पेशव्यांनी जीर्णोद्धार करताना मंदिराच्या आत केलेली लाकडी कलाकुसर मनात भरते. भीमेश्वर मंदिराचे गुरव येणा-यांचे स्वागत आपुलकीने करतात. एकंदरच नागाव, भीमेश्वर मंदिर, जवळचे नागेश्वर आणि वंखनाथाचे मंदीर आणि नागावचा किनारा असा सर्व परिसर फिरणे एक दिवसात शक्य आहे.  याशिवाय याच मंदीरापरिसरात शिल्पशास्त्राचा अजब नमुना असलेल्या काही मुर्त्या सुद्धा पहावयास मिळतात.
   इ.स. १९६१ मध्ये संघ व गावकरी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिरासमोर तळे आहे. १९७४ मध्ये त्याचा दक्षिणेकडील भिंत नव्याने बांधण्यात आली. भिमेश्वराजवळ श्री नारायणाचे मंदिर आहे. सन १८४० मध्ये ते बाळाजी गणेश सहस्त्रबुद्धे यांच्याकडे वहिवाटीस होते.                
  येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. व पालखी निघते. नोकरी व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले येथील गावकरी आवर्जून या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. या दिवशीचा पालखी सोहळाही नयनरम्य असतो. पूर्ण रात्रभर वाजत गाजत नागावमध्ये फिरून पहाटेच्या सुमारास पालखी भीमेश्वर मंदिरात येते. साधारणतः मंदिर भाविकांसाठी दिवसभर खुले असते.

येथील सिद्धीविनायकाचे देवस्थान तसे मुख्य मार्गावर असूनही अपरिचितच आहे. या मंदीराचे लाकडी सभागृह आता पुरते मोडकळीस आले असून फक्त गाभाराच सुस्थितीत आहे. या मंदीराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख कोरला असून भग्नावस्थेत असल्याने पुर्णपणे वाचता येत नाह मात्र यावर सुस्थितीत असलेली 'प्लवंग संवस्तरात कुणा बाळभट्टाच्या नावे असलेले हे दानपत्र असल्याचे लिहीले असल्याने' ह्या शिलालेखावरील बाळभट्ट म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पुरोहीत चौलचे वेदसंपन्न पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे चिरंजीव बाळभट्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाळभट्ट सुद्धा वेद्संपन्न असून शिवराज्याभिषेकात अनेक कार्ये त्यांनी गागाभट्टांसोबत पार पाडली होती. सन १७८८ च्या सुमारास मराठी शाळेजवळ खोलगट जमीन होती व तेथे पाणी साचत असे. ती भरून काशून श्री गणपतीचे नवीन मंदिर बांधणेत आले. जवळच श्री मुरलीधराची हि प्रतिष्ठापना करण्यात आली.

 नऊनाग देवस्थान :- 

         नागाव हे पूर्वी ‘नागग्राम’ किंवा ‘नागुम’ म्हणून प्रसिद्ध होते. कोकणात प्राचीन काळी नागवंशीय लोक मोठ्या प्रमाणावर राहात असत. कोंकण हे नावही येथील नागांच्या एका पराक्रमी कुळाच्या नावावरून पडलेले आहे. त्याची स्मृती म्हणून अनेक ठिकाणी नागांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा केली जाते. नागाव हे त्यापैकीच एक गाव. येथे नागांचे मंदिर आहे व त्यात नागांच्या दगडी प्रतिमा आहेत. या नऊनाग मंदिरामुळे या गावाची ओळख नागाव अशी झाल्याचे सांगितले जाते.
     पुरातनकाळी पातालात किंवा रसातलात नागलोक राहात, अशी समजूत होती. महीतल हा याचाच एक भाग. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘कोंकण व नागलोक’ या संकीर्ण निबंधात (राजवाडे लेखसंग्रह, भाग २, पा. २२९–२३५) असे म्हटले आहे की महीतलाच्या प्रदेशाला किंवा प्रदेशाच्या काही भागाला पुढे अपरान्तक असे नाव पडले. नागांची नाना कुळे होती. वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालीय, कुकुण ही त्यातीलच काही. कुळांच्या या संस्कृत नावावरून पुढे मराठीत आडनावे आली. वासुकीवरून वासे, भासे, तक्षकवरून तखे, तिखे, कर्कोटकवरून कोकटे, गोकटे, कालीयवरून काळियै, काळ्ये, काळे, तसेच कुकुणवरून कोंकणे अशी नावे पडली. यातीलच कुकुण या नागकुलातील एका पराक्रमी व्यक्तीवरून कोंकण हे नाव पडले. 
    नागकुळांचा मूळ राहण्याचा प्रदेश नागलोक ऊर्फ महीतल ऊर्फ अपरान्त ऊर्फ कोंकण होते व तेथून ते चोहींकडे पसरले. काही काळ अन्य लोकांशी नागलोकांचा मोठा संघर्ष झाला. मात्र महाभारतात अर्जुनाचा विवाह ऊलूपी या नागकन्येशी झाला होता. त्यावरून नागवंशीय लोकांशी अन्य लोकांचे चांगले संबंध होते असे दिसते. नागाव, पाल, नागोठणे, तळे वगैरे प्रदेशात गोवर्धंब्राह्मण अद्यापही आढळतात. ते नागांच्या पातालात राहात असलेल्या गोव्रत नामक ब्रह्मर्षीचे वंशज असावेत, असेही इतिहासचार्य राजवाडे यांनी म्हटलेले आहे. या नागावमध्ये नागवंशाच्या प्राचीन खुणा आजही अस्तित्वात आहेत. नऊ नागांचे मंदिर ही त्यातील प्रमुख खूण आहे. ते नागावचे मूळ दैवत असल्याचे सांगण्यात येते. येथे नागेश्वर मंदिरही आहे.
         मुंबईपासून  रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या परिसरास प्राचीन काळी रायगडमधील अष्टागरांचा परिसर म्हणून ओळखले जाई. नागाव हे या अष्टागरांतील एक महत्त्वाचे व इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे गाव आहे. पोर्तुगीज प्रवाशी डिकॅस्ट्रो याच्या १५३८ मधील प्रवासवर्णनात नागावचा उल्लेख येतो. त्यानुसार पूर्वी हा भाग मुख्य भूमीपासून समुद्रात ‘गनशॉटच्या’ अंतरावर म्हणजे तत्कालीन तोफेचा गोळा जाऊन पडेल एवढ्या अंतरावर होता. ते एक लांबच लांब व अरुंद असे बेट होते. या परिसरात पूर्वी अनेक बेटे होती. लोकसंख्येत झालेल्या वाढीमुळे यांमधील असलेल्या खाड्या भराव घालून बुजविण्यात आल्या व हे बेट मूळ जमिनीला जोडले गेले. या गावात फिरताना येथील शिलालेख, मंदिरे व मोठमोठे वृक्ष त्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. आज नागाव हे एक समुद्रकिनाऱ्यावरील नारळी–पोफळीच्या बागांमध्ये वसलेले टुमदार गाव म्हणून पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. 
         इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या परिसरातील काही शिलालेखांचे वाचन केले आहे. इ.स. १६०४ ते १६३० या काळात हा परिसर मलिक अंबरच्या ताब्यात होता. त्यानंतर आदिलशाही, निजामशाही व मोगलांचा या परिसरावर वेळोवेळी अंमल होता. इ.स. १६७७ मध्ये शिवाजी महाराजांचा येथे अंमल होता. त्यापुढे आंग्रे यांच्या काळात पोर्तुगीज राजवटीला जोरदार हादरे बसले व ते येथून निघून गेले. नागाव हे खांदेरी, उंदेरी व प‌द्मदुर्गपासून जवळ असल्याने इंग्रजांनी हा परिसर ताब्यात घ्यायचा अनेकदा प्रयत्न केला. त्यासाठी शिवाजी महाराजांनी येथे तटबंदी उभारून तो सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मराठे सरदार मायनाक भंडारी आणि दर्यासारंग दौलतखान यांनी वेळोवेळी आपल्या पराक्रमाने इंग्रजी आरमाराला उधळून लावले होते.
     नागाव येथील नऊनाग देवस्थान हे पंचक्रोशीतील जागृत स्थान मानले जाते. नारळी–पोफळीच्या बागांमध्ये सर्वसामान्य मंदिराप्रमाणे भासणाऱ्या या स्थानावर कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. येथे आहेत केवळ दगडात कोरलेल्या नऊ नागांच्या प्रतिमा. नऊनाग मंदिर असे नाव असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे नागांच्या दहा प्रतिमा आहेत. यातील एक प्रतिमा रक्षकाची आहे. या प्रतिमा किती प्राचीन आहेत, याबद्दल ठोस माहिती नसली तरी त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. येथील जमिनीच्या खोदकामात या प्रतिमा सापडल्या. अनेक वर्षे त्या तेथेच ठेऊन त्यांची पूजा केली जात होती. २०१० मध्ये या प्रतिमांची स्थापना एका चौथऱ्यावर करण्यात आली आणि या जागेला मंदिराचे स्वरूप आले. आजही या मंदिराला भिंती नाहीत. केवळ भाविकांची सोय व्हावी, यासाठी येथे पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे.


या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी नवनाथ स्वामी प्रवास करता करता या ठिकाणी आले होते. हा परिसर आवडल्यामुळे त्यांनी येथेच राहणे पसंत केले. त्यांनी आपले मूळ रूप त्यागून नागरूप धारण केले व पुढे पाषाण रूपात ते येथे राहिले. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी, तसेच नागपंचमीला भाविकांची या ठिकाणी गर्दी होते. या नऊनाग देवस्थानचे व्रत गुरुवारी किंवा सोमवारी सुरू करून पुढे तीन महिने केल्यास दुःख–दारिद्र्य नाहीसे होते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. 
       हे देवस्थान नवसाला पावणारे आहे, अशी मान्यता आहे. येथे नवसपूर्ती म्हणून घंटा बांधल्या जातात. त्याबाबत अशी कथा सांगितली जाते की या मंदिरात पूर्वी एक घंटा बांधलेली होती. पाच मुली असलेल्या महिलेला मुलगा नसल्यामुळे तिचा सासरी छळ होत होता. म्हणून तिने नवस केला की मुलगा झाला तर येथे घंटाघाट बांधेन. त्याप्रमाणे तिला पुत्रप्राप्ती झाली; परंतु बोललेला नवस ती विसरली. यासाठी नागदेवतेने तिला स्वप्नदृष्टांत देऊन केलेल्या नवसाची आठवण दिली. आपल्याकडून झालेली चूक मान्य करून तिने त्वरित येथे घंटाघाट बांधला. त्यानंतर आता या घंटाघाटावर शेकडो भाविकांनी नवसपूर्तीनंतर घंटा अर्पण केलेल्या आहेत. 

श्री नागेश्वर मंदिर :-

     हे मंदिर शिवकालापुर्वीचे आहे. त्याचा जीर्णोद्धार ६ जानेवारी १७७२ रोजी राघोची आंग्रे सरखेल यांनी वेदोक्त मंत्रांनी केला.राघोजी आंग्रेंचे सुपुत्र मानाजी आंग्रेनी १७७२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं आंगरेकालीन अष्टागर या ग्रंथात शां वि आवळस्कर सांगतात. मंदिराजवळील दीपमाळ सहस्त्रबुद्धे यांनी बांधली आहे. समोर तळे आहे. ते १७७३ रोजी राघोजी आंग्रे यांनी बांधले आहे. सर्व बाजूनी चिरेबंदी तांबडा दगड असून तळ्याचे क्षेत्र खूप मोठे आहे. खोली २१ फुट असून वर्षभर पाणी असते. श्रावणात लक्ष बेलपत्रांनी नागेश्वराची पूजा बांधीत. १८१० चे सुमारास बारमाही पूजा बाळकृष्णभट लेले यांचेकडे होती.

 







या दगडी मंदिरात एक छोटा नंदी आहे जो एका बाजूला ठेवलेला दिसतो. शिवाय गणेश आणि भैरवाची मूर्तीही मंदिरात आहे. मंदिराच्या बाहेर एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या बाहेर असलेली दीपमाळ सहस्रबुद्धे नामक गृहस्थाने बांधली अशी नोंद सापडते.
अवर्षणासारखे संकट कोसळ्यास मंदिरात लघु रुद्र करीत. शिवरात्रीचा उत्सव अद्यापही चालू आहे. १९७९ साली मंदिर जीर्णोद्धार व श्रीहरीनाम सप्ताह शतसांवत्सरीक समितीने स्मरणिका काढून व निधी जमवून जीर्णोद्धार केला आहे. नागेश्वराची यात्रा चैत्र शुद्ध पौणिमेला भरते.

वंखनाथ मंदिर  :- 

अलिबाग-रेवदंडा मार्गावर नागाव हे गाव आहे. शांताराम विष्णू अवळसकर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथात नागावचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. अष्टागर म्हणजे आठ मुख्य ठाणी… ही अष्टागरे नेमकी कोणती याबाबत मतमतांतरे आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचा उल्लेख आहे, तर काही ग्रंथांमध्ये रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचे लिहिले आहे. या दोन्ही याद्यांमध्ये नागावबाबत एकमत असल्याचे लक्षात येते. १६६२च्या सुमारास कोकणातील या अष्टागराचा बराचसा भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याला जोडला. १७१० साली कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगिजांचा पराभव करून हा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.
गावात प्रवेश करताना नागाच्या प्रतिमा कोरलेली नऊ शिल्पे आहेत. त्यावरून गावाचे नाव नागग्राम झाले असावे, असे सांगितले जाते. या नावाचा अपभ्रंश नागाव असा झाला. या गावातील वंखनाथ हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथामध्ये मंदिराच्या बांधकामाचे वर्ष १७६३ दिले आहे. तर ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या ‘कुलाबा गॅझेट’मध्ये बांधकामाचा काळ १७९०च्या आसपास असल्याचा उल्लेख आहे. मात्र दोन्ही संदर्भांनुसार अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या निधीमधून नागावचे रहिवासी केशव महाजन यांनी हे मंदिर बांधले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ अशी सुमारे ३० वर्षे इंदौरच्या गादीवर होत्या. या काळात त्यांनी देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. यामध्ये महाराष्ट्रातील मंदिरांची संख्याही लक्षणीय आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे असलेले वंखनाथ मंदिर हे त्यापैकी एक असून हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानला जातो. या मंदिरातील बांधकामाचे वैशिष्ट्य असे की मंदिरासमोर रस्त्याच्या पलिकडे ७० ते ८० फूटांवर असलेल्या दीपमाळेच्या वरच्या टोकावर जेव्हा दिवा लावला जातो, तेव्हा त्याचा प्रकाश थेट गर्भगृहातील पार्वती मूर्तीच्या मुखावर पडतो. वंखनाथ मंदिर आणि दक्षिण दिशेले डोंगराजवळ असलेली एक मशीद उभारण्यासाठी महाजन यांना साधारण ७५ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.  १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचंही कुलाबा जिल्हा गॅझेट १८८३ आवृतीतून लक्षात येते. 

चौलकडे जाताना मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आटळे येथील खारगल्लीमध्ये हे वंखनाथ मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरातून नंतर रस्ता बांधला गेल्यामुळे मंदिराची दीपमाळ रस्त्याच्या डावीकडे आहे. मंदिरासमोर ५० फूट लांबी व रुंदी असलेली चौरसाकृती प्राचीन दगडी पुष्करणी आहे. मोठमोठ्या काळ्या घडीव दगडांचे बांधकाम केलेल्या या पुष्करणीच्या आतमध्येही पाषाणात कोरलेली शिल्पे आहेत. उन्हाळ्यात पाणी खाली गेल्यानंतर त्यातील काही शिल्पे पाहता येतात. तसेच चारही बाजुंना कोष्टकांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे. पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी रस्त्याच्या व मंदिराकडील बाजूने पायऱ्या आहेत.

प्रथम दर्शनी मंदीर पाहिले तर हे पुरातन मंदिर असेल म्हणून अजिबात वाटत नाही. पण  निरखून पाहिल्यावर लक्षात येते की मंदिराचा सभामंडप जरी नवीन कॉंक्रिटमध्ये बांधलेला असला तरीही मंदिरे जुने आहे.या मंदीरासमोरील पुष्करणी सुद्धा अतिशय प्रेक्षणीय असून या पुष्करणीमधील कासवे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.

 आत गेल्यानंतर लक्ष वेधून घेतलं तिथं असलेल्या कृष्ण चरित्रातील कोरीव देखाव्यांनी. महादेवाच्या देवळात विष्णूचे चरित्रपर कोरीवकाम म्हणजे विशेषच.









मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुळ मंदिरासमोर नंतरच्या काळात येथील मंडप बांधलेला आहे. या मंडपाच्या वरील बाजुस पत्र्याची शेड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे काळ्या घडीव दगडांत केलेले आहे. सभामंडपाचा दरवाजा काळ्या पाषाणात कोरलेला आहे. मंदिरातील नंदी आकाराने मोठा आणि दगडात घडवलेला असून श्रीगणेश आणि भैरवाची शिल्पेही येथे पाहता येतात.






गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर अतिशय सुंदर दगडी कोरीवकाम आहे. त्यामधील शिल्पे आणि विशेषतः दोन्ही बाजूला कोरलेले पिसारा फुलवलेले मोर या मंदिराचं खास सौंदर्यस्थान आहे असं म्हणता येईल. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला स्तंभशाखा व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. येथील स्तंभशाखांवर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अतंराळाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांत गणपती व भैरवाच्या काळ्या दगडात घडविलेल्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या द्वारावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात श्रीकृष्णाच्या चरित्रातील काही देखाव्यांचा समावेश आहे. मुरली वाजविणारा कृष्ण, त्याचे सवंगडी, समोर गोमाता असलेले शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैष्णवांचे दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाला शिवमंदिरात मिळालेले मानाचे स्थान हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर द्वारपाल शिल्पे व नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. येथील गर्भगृह हे काहीसे खोलवर आहे. त्यामुळे प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी वंखनाथ महादेवाची पिंडी आहे. या पिंडीवर धातूच्या पत्र्याचे आवरण व नागाची प्रतिमा आहे.  समोरच्या भिंतीतील देवकोष्टकात काळ्या पाषाणातील पार्वतीची मूर्ती आहे.  या मंदीरातील नंदीची मुर्ती हि अतिशय रेखीव असून अशा प्रकारची दुसरी मुर्ती कुठल्याही शिवमंदीरात दिसत नाही. या गर्भगृहाच्या कळसाचे काम नागर शैलीतील आहे व त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. 

दरवर्षी महाशिवरात्रीला वंखनाथाची पालखी निघते. कोकणातील पारंपरिक वाद्यांचा गजर करत पालखी गावातून फिरविली जाते. त्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. याखेरीज मंदिरामध्ये दैनंदिन पूजा, आरती होते. सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.


      कोलाई तथा ग्रामदेवता : 
    नागावची सर्वात जुनी देवता म्हणून हे मंदिर सर्वात जुने असावे. तथापि शि‌कालीन असल्याबद्दल संशय नाही. कारण १८२९-३० मध्ये मंदिर मोडकळीस आल्यामुळे  आंग्रे यांनी चार घोणवासे दोन मोख आणि एक पाठाळूस अशी लाकडे मोफत देऊन ते नव्याने बांधले. १८४० च्या सुमारास बाबजी किंवा गणू वर्तक या मंदिराचा वहिवाटीदार होता.

श्री दक्षिणमुखी देवी – जगदंबा
   मराठी मुलींच्या शाळेजवळ हे पुरातन मंदिर आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी जत्रा भरते. देवी नवसाला पावते अशी ख्याती असल्यामुळे भाविक लोक दूरदूरवरून नवस फेडण्यासाठी येतात.

श्री तांबडा मारुती हटाळे :-
सदर देवळात मारुतीची शेंदरी मूर्ती आहे. स्थानिक लोकांनी समितीस्थापन करून निधी जमवून मंदिर बांधले आहे.

श्री पांढरा मारुती देवस्थान हटाळे :-
   श्री चिदधनस्वामी सखारासबुवांचे शिष्य व समर्थ सांप्रदायिक थोर सत्पुरुष कै. रामकृष्णबुवा माटे यांनी हे मंदिर उभारून दासनवमी उत्सव सुरु केला. येथेच त्यांनी सन १८७९ मध्ये समाधी घेतली. सदर उत्सव गेली ११६ वर्ष चालू आहे. कै. सीताराम विष्णू आठवले व कुटुंबीय यांचा सदर मंदिराशी व उत्सवाशी विशेष संबंध व त्याग आहे. मंदिराचे उत्पन्न व भिक्षा कमी झाल्यामुळे सन १९६८ मध्ये दासनवमी उत्सव समितीने कायमनिधी सुरु करून वीस हजार जमविले. मारुतीची संगमरवरी शुभ्र मूर्ती हे देवस्थानाचे वैशिष्ट आहे.

बेने इस्रायली मंदिर : -
    नागावात सध्याच्या माध्यमिक शाळेजवळ ईशान्येकडील भागास मशीद भाग म्हणतात. काही शतकापूर्वी तेथे इशायली लोकांचे मंदिर होते. त्याच्या पडक्या भिती अजूनही आढळतात.
     नागावात जुने तळे असून ते पाथरलीचे तळे म्हणून ओळखले जाते. हे तळे कान्होजी आंगरेने बांधून घेतले. नागावच्या सीमेवर कस नदीचा समुद्राशी संगम होतो. ती जागा स्थानिक तीर्थक्षेत्र समजले जाते. तेथे वामन द्वादशीस भाविक तीर्थस्नान करतात. समुद्रकिनाऱ्यास लागून ग्रामपंचायतीने सुरूच्या झाडांची मोठी लागवड केली असून हे ठिकाण पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

बागमळ्याची महालक्ष्मी

         चौलजवळ बागमळा परिसरात एका टेकडीवर महालक्ष्मीचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांच्या यादीत नाही. रायगड जिल्हा गॅझेट आणि आंग्रेकालीन अष्टागर या दोन्ही संदर्भात याची विशेष माहिती मिळत नाही. परंतु दोन घुमट असलेले हे मंदिर अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकातील बांधकाम असावे असा बांधकामाच्या शैलीवरून केलेला अंदाज करू शकतो.


नागाव पेट्रोल पंपाच्या जवळ एक पूर्वेकडे जाणारा रस्ता आहे तिथं हे देऊळ काही अंतरावर आहे. सुमारे पन्नास ते साठ पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या शांत रम्य परिसरात पोहोचतो.


मंदिराजवळ पोहोचले की लक्ष वेधून घेते ती इथली कोकणी पद्धतीची दीपमाळ. यावरील हनुमान प्रतिमा हे दीपमाळेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परिसरात काही तुळशी वृंदावनेही आहेतही सतीची वृंदावने असावीत असा काही अभ्यासकांचा कयास आहे. पण त्याला काही ठोस शिलालेखासारखा आधार इथं सापडत नाही.

या मंदिराचे जुनेपण त्याच्या घुमटाखाली असलेल्या भौमितीय नक्षी मधून दिसते. अशा प्रकारची भौमितीय नक्षी अनेकदा इस्लामी बांधकामांमध्ये दिसते. पण दीडशे दोनशे वर्षे जुन्या मराठा बांधकामातही अनेकदा त्यांचा वापर केलेला आढळतो.

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||
त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||

कृष्णकेशव नामक मराठी साहित्यिकाने रचलेले महालक्ष्मी स्तोत्र म्हणत इथल्या प्रसन्न मूर्तीची आराधना करायची.
एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी | त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||  कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे | डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४|| कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती | पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५|| पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी | सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६|| कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या | गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७|| इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८|| निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी | किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९|| कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी | चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०|| नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते | जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११|| संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||

|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||

नागोठणे : -

    रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल.
    यासाठी आपण नागोठणे या गावाचे उदाहरण घेऊ, भौगोलिक दृष्ट्या नागोठण्याचे स्थान महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यात येते. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मात्र नागोठणे हे उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसले आहे. हे बंदर दाट झाडी असलेल्या डोंगरात अंबा नदीच्या उजव्या किनाऱ्यावर व नागोठणे खाडीच्या मुखापासून ३८.६२ कि. मी. वर आहे. ते पेणच्या दक्षिणेस २४.१४ कि. मी. तर मुंबईच्या आग्नेयेस ६४. ३७ कि. मी. आहे.  नागोठण्याच्या पश्चिमेकडून अंबा नदी वाहते. अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस ४८ कि.मी. वाहत जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहते. नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्‍याचा तळ रुंद होतोत व नदी सपाट माथा असलेल्या डोंगरांगांमधून धरमतर खाडीला मिळते यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे. अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडील भाग. पुर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत ३५ कि.मि. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पुर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस १८ कि.मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुदं होते. धरमतपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो. नागोठण्या पासून अंबा नदीस एकही मोठी नदी येऊन मिळत नाही.
      परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्य पुर्वेस जि डोंगररांग आहे तिला महालमिरा डोंगर रांग या नावाने ओळखले जाते. आणि नागोठण्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगररांगेस सुकेळी डोंगररांग म्हणुन ओळखले जाते. या डोंगरांगेत सुरगड, अवचित गड आणि सागरगड यासारखे तिन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत. याशिवाय नागोठण्याच्या पुर्वेस नागोठणे गावास लागुनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला पुर्व नागोठणे डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तिन बांजूनी डोंगररांगानी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.
  सद्यस्थितीस मुंबई गोवा महामार्गावरिल एक शहरवजा गाव असलेल्या या गावास हजारो वर्षांचा इतिहास आहे हे सांगुन कोणास खरे वाटणार नाही. खर तर नागोठण्याच्या नावातच फार मोठा इतिहास दडला आहे जो महाभारत काळापर्यंत जाऊन पोहोचतो. पुर्व महाभारतातल्या खांडवकांड नामक घटनेनंतर उत्तरेत राहणार्‍या नागलोकांमध्ये आणि पांडवांमध्ये जे वैर झाले त्याची परिणीती उत्तर महाभारत काळातल्या नागसत्र यज्ञामध्ये झाली, या भयानक युद्धात अनेक नागकुळांचा संहार झाला जिवंत राहिलेली नागकुळे दक्षिणेकडे सरकत जाऊन दक्षिणेकडिल अनेक भागांत स्थिरावली. यातील काही कुळे कोकणात सुद्धा दाखल झाली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल (पन्नगपल्ली), नागोठणे (नागस्थान), नागाव (नागग्राम) अशी ठिकाणे वसवून तेथे राहिली. रायगड जिल्ह्यात अनेक गावांत सापडणार्‍या नागमुर्त्या आणि गांवामधले नागदर्शक नाम हे नागवंशियांच्या रायगड जिल्ह्यातल्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बहुदा नागलोकांच्या जेथे जेथे वस्त्या झाल्या ति ठिकाणे समुद्रतिरी, बंदरावर अथवा खाडीच्या मुखाशी दिसून येतात यावरुन नागलोक हे निष्णात दर्यावर्दी होते असाही सिद्धांत लावता येतो कारण अगदी बुद्धकाळातही नागलोकांची कोकणपट्ट्यात आरमारे होती असे उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळुन येतात याचा अर्थ नागलोकांनीच कोकण पट्टीतली पहिली आरमारे स्थापन केली होती असे ठामपणे म्हणता येईल आणि यापैकीच एक आरमार नागोठणे येथेही स्थापन झाले असावे.
      नागोठणे गावास खुप जुना आरमारी इतिहास आहे नागलोकांनी येथे आरमाराचा पाया रचला आणि सातवाहन, मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, गुजरात सुलतान, निजामशहा, आदिलशहा, मराठे, आंग्रे, इंग्रज यांनी या आरमाराच्या इतिहासाच्या इमारतीची पक्की बांधणी करुन उत्कर्षाचे कळस चढवले. मौर्य सातवाहन काळात नागोठण्याचे व्यापारी महत्त्व खुपच वाढले इ.स्.पुर्व २२५ मध्ये चौल्-रेवदंडा, नागोठणे, महाड, मुरुड, गोरेगाव, पेण, पनवेल, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्याद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्‍या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हिणी सारख्या घाटाटून नागोठणे बंदरात आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे आणि देशभरातला माल याच ठिकाणाहून परदेशात निर्यात होत असे. येथुन येणार्‍या व्यापार्‍यांच्या निवासासाठी नागोठणे मार्गे मावळात जाणार्‍या याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खडसांबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरुन काढण्यात आल्या. वरील सर्व लेण्यांवरुन असे दिसून येते कि इ.स्.पुर्व १०० ते इ.स.३०० पर्यंत बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता. नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचीन काळी सह्याद्रीच्या घाटांमधुन चालणार्‍या व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरुन रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्त्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते नागोठणे, नागोठणे ते अष्टम आणि अष्टम ते चौल हा असावा.  इ.स. सनाच्या दुसर्‍या शतकात भारतात आलेल्या भुगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिप्ल्स मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ.स.७० ते ८० च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तिळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी,शिंपल्यांचे दागिने, चांदिचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे. मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही नागोठण्याचे व्यापारी महत्त्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाच्या ताम्रपटात त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्टींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी  यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तीन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. नागोठण्याच्या अंबा नदीवर दिसणारा जो पुल आहे तो याच प्रमुख व्यापारी मार्गावर विजयनगर साम्राज्याच्या राजा अलिया राम राया याच्या काळात बांधण्यात आला होता यावरुन विजय नगर साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती हि महत्त्वाची माहिती कळते. याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे नागोठण्यातून देशावर जाणार्‍या मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतुक सुलभ होण्याकरिता १५८० साली काजी अलाऊद्दीनने अंबा नदीवरिल याच पुलाचा जिर्णोद्धार केला होत पुढे मराठे तसेच इंग्रजांच्या काळातही या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती झाल्याचे उल्लेख मिळतात.
      नागोठण्यास फक्त आरमारी इतिहासच आहे असे नाही तर वांशिक, धार्मिक, औद्योगिक, भौगोलिक, भाषिक, व्यापारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागोठण्यास भुतकाळात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण वांशिक किंवा भाषिक इतिहासाबद्दल पहायचे झाले तर नागोठण्यात पाच हजार वर्षांपुर्वीची प्राचीन अशी नागवंशिय संस्कृती स्थिरावली होती. याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मुळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती हि शैवसंस्कृतीमध्ये विलिन झाली असावी. एका वेगळ्या विचारप्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करतां हे लोक मूळचे डोंगरदर्‍यांतले रहिवाशी असावेत, कारण नाग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो त्यामुळे  नाग लोक मूळचे डोंगराळ मुलखांतील रहिवाशी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावे. जर यांचीं समुद्रांतरीं द्वीपें (उदा नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टण) होतीं, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळीं असला पाहिजे. नागांचा लोक हे पाताळातले रहिवाशी समजण्याचा संस्कृतांत संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवाशी असून, ते पुढें वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाची काहितरी संबध असावा. महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक जमात आहे. हे झाले वांशिक महत्त्व आणि भाषिक महत्त्वाचा विचार करता महाराष्ट्राच्या भाषिक जडणघडणीत नागोठण्याच्या नागवंशी संस्कृतीचा नक्कीच सहभाग होता कारण प्रथम नागवंशिय लोकांनी येथे वस्ती केल्यावर इ.स्.पुर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व महाराष्ट्रिक या तिन संघाचे लोक उदयास आले व या चारही संस्कृतींचा मिलाप होऊन महारट्ट अर्थात मराठी वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रिक त्यांची महाराष्ट्रि भाषा बोलत असत. याच महाराष्ट्रिक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.



     वरील अनेक घटनांवरुन नागोठण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते मात्र इतकेच नव्हे तर नागोठणे हे गाव अनेक वेळा वेगवेगळ्या साम्राज्यांच्या संकर सीमेवरील संवेदनशिल गाव म्हणुन प्रसिद्ध राहिले आहे. सन १५४२ ते १५६५ हा काळ विजय नगर साम्राज्याचे सम्राट अलिया राम राय यांच्या कारकिर्दीचा काळ या काळात विजयनगर या संपन्न हिंदू साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती. आजही तज्ञ हे मानत असले कि विजयनगर साम्राज्य रत्नागिरी पर्यंत मर्यादित होते तरी रायगड जिल्ह्यात असलेल्या तळे गावातल्या एका मंदिरात विजय नगर साम्राज्य काळातला एक तेलुगु भाषेतला शिलालेख आजही पहावयास मिळतो याशिवाय नागोठणे गावातला अंबा नदीवरिल जो मजबुत पुल आहे तो सुद्धा विजय नगर साम्राज्याच्या काळातच तालिकोटच्या लढाईच्या आधी राम रायाच्या काळात बांधण्यात आला होता कारण तसा प्राकृत भाषेतला शिलालेख या परिसरात दुर्लक्षित स्थितीत पडलेला होता मात्र भारतीयांच्या इतिहासाविषयीच्या उदासिनतेमुळे हा शिलालेख यानंतर अंबा नदीस आलेल्या वारंवार पुरामुळे आता दिसूनही येत नाही. याच पुलाचा जीर्णोद्धार पुढे १५८० साली गुजरातच्या सुलतान अथवा निजामशाही काळात झाला यावेळी जीर्णोद्धार करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम नष्ट करुन त्याऐवजी नविन पद्धतीचे बांधकाम करण्यात आले तसेच पुलावर नविन शिलालेख बसवण्यात आला ज्यावर येथिल काजी अल्लाऊद्दीन याचे नाव दिसून येत होते मात्र दुदैवाने हा शिलालेख सुद्धा आता दिसून येत नाही. 











        गुजरातच्या महमूद बेगडाने १४९५ चे सुमारास नागोठण्याला लष्करी तळ उभारून चौलवर सैन्य पाठविले. सन १४९८ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडे महाराष्ट्रातिल साष्टी, मुंबई,ठाणे वसई पासून नागोठण्याचा प्रदेश होता व उर्वरित महाराष्ट्रात बहामनी राज्य होते. सन १५३० मध्ये नागोठण्यावर गुजरातची सत्ता होती. सुलतानाचा पराभव करून हे ठिकाण पोर्तुगिजांनी हस्तगत केले. परंतु त्यांनी त्याचा ताबा निजामशहाकडे दिला. नागोठण्यास त्या काळात गुजरातच्या दक्षिण टोकाकडिल शहर म्हणुन सुद्धा ओळखण्यात येत होते. याच काळी चौलमध्ये पोर्तुगिजांनी शिरकाव केला होता या दोन्ही सत्तांच्या संकरस्थळी नागोठणे असल्याने येथे अनेकदा पोर्तुगिज विरुद्ध सुलतान यांची युद्धे झाली होती. गुजरातचा सुलतान मेहमुद बेगडा याने नागोठण्यात तळ ठोकून चौलवर बरेच हल्ले केले होते. १५२९ साली हेक्टर दे सिल्व्हेरिया ने नागोठण्यावर हल्ला करुन जाळपोळ केली त्याला नागोठण्यातिल सेनापतीने प्रत्युत्तर दिले होते.
मक्का येथून येणार्‍या काही भाविकांच्या जहाजाला लुटल्याने पोर्तुगिजांविरुद्ध गुजरात सुलतान, निजामशाह आणि आदिलशहा अशा तिन सत्ता एकत्र येऊन युद्ध पुकारले होते या काळी नागोठण्यामार्गे सुकेळी खिंडीतून रेवदंडा खाडीत मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ तसेच तोफखाने इत्यादींची वाहतुक झाली होती आणि हि वाहतुक सुकर व्हावी यासाठी नागोठण्याच्या विजयनगर कालिन पुलाचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. नागोठणे १६३६ पर्यंत निजामशाहीकडे होते. 
         सन १६३६ साली मुघलांनी निजामशाही नष्ट करुन नागोठ्णे आदिलशहाच्या ताब्यात दिले याच काळी पुण्यात शिवाजी महाराजांचा उदय झाला होता. सन १६४३ च्या सुमारास आदिलशाही सत्ता कोकणातली सर्वश्रेष्ट सत्ता होती त्याकाळी नागोठणे विभाग हा सुभे कल्याणच्या अख्यतारित येत असे. सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत् मुल्ला अहमदकडे तर दुसरा सुभा नागोठण्यापासून महाडपर्यंत जंजिर्‍याच्या सिद्दीकडे होता. सन १६५७ साली शिवाजी महाराजांनी कल्याण सुभ्यावर हल्ला करुन हा सुभा स्वराज्यात आणला अशा तर्‍हेने नागोठणे शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. इथे शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरोधात मोहिम उघडली असताना मुघल सुद्धा मराठ्यांवर हल्ले करण्याच्या तयारित होते आणि या कामासाठी औरंगजेब याने त्याचा मामा शाईस्ताखान यास दख्खनवर पाठवले आणि त्याने पुण्यात तळ मांडला. त्याने पुण्यातून कल्याण सुभ्यावर हल्ला करुन कल्याण स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र नागोठणे त्याच्या ताब्यात येऊ शकले नाही. नागोठण्यावरिल मोहिम फत्ते करण्यासाठी त्याने कारतलब खान उझबेक याची निवड केली. त्याच्या दिमतीला बलाढ्य सैन्य व अनेक सरदार तसेच देशमुख देऊन नागोठण्यावर कुच करण्यास सांगितले. या खानाने लोणावळ्यावरुन अंबा नदीचा जो उगम आहे ति वाट कोकणात उतरण्यासाठी पकडली मात्र शिवाजी महाराजांना या कटाची अगोदरच माहिती लागून ते स्वतः सैन्यासह या परिसरात दाखल झाले होते. दाट रानात जागोजागी  मराठा सैन्य लपुन खानाच्या सैन्याची वाट पहात होते. मेंढराचा कळप जसा वाघाच्या तावडित येतो तसा कारतालब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीत येऊन पोहोचला होता. महाराजांना दया येऊन त्यांनी आपला वकिल खानाकडे पाठवला मात्र खानाने उद्धट वर्तन करुन नागोठणे आपण ताब्यात घेणारच अशि दर्पोक्ती केल्याने महाराजांनि सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले. मराठे सैन्य मुघलांवर तुटून पडले सैन्याची धुळधाण उडवली व खानास अक्षरशः जबरी खंडणी देऊन माफी मागुन पुण्यास पळ काढावा लागला. या लढाईस उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई म्हणुन ओळखण्यात येते.
       महाराजांना या काळात जंजिर्‍याच्या सिद्दीचा सुद्धा सामना करावा लागत होता. पुर्वी आदिलशहा व नंतर मुघलांचा मांडलिक झालेल्या या सिद्दीचे राज्य मर्यादित असले तरी नागोठण्याच्या हद्दीस लागून होते. नागोठण्यास शिवाजी महाराजांचा जहाज बांधणीचा कारखाना असून ते मराठा राज्यातले सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असल्याने सिद्दी बर्‍याच वेळा आपले सैन्य पाठवून नागोठण्यात जाळपोळ करत असे आणि अनावश्यक रक्तपात करुन माणसे, मुले व स्त्रिया गुलाम बनवून मुंबईस नेत असे. सिद्दी संबळने १६७३ मध्ये सुद्धा असे कृत्य केले तेव्हा महाराजांनी रायगड वरुन १०० सैनिक धाडून सिद्दीच्या सैन्याला चकित करुन कापुन काढले. १६७७ मध्ये सिद्दी कासिम परत एकदा नागोठण्यास आला आणि छापे टाकून येथिल रहिवाशांना भंगिकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले तेव्हा महाराजांनि या घटनेचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह सिद्दीवर कुच करायला सांगितले. पुढे नागोठण्याचे सिद्दी व इंग्रजांपासून रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व दौलत खान यांना खाडीसमोरील खांदेरी किल्यावर बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे करताना मराठ्यांना इंग्रजांच्या विरोधाचा सामना करायला लागला. इंग्रजांनी कॅप्टन गेप व केगविन यांना मराठ्यांवर हल्ला करण्यास जहाजे व कुमक सोबत देऊन खांदेरीवर धाडले मात्र मराठ्यांच्या हल्ल्यात गेप ठार झाला व त्याचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. केगविनने मराठा आरमारावर हल्ला चढवला आणि रिव्हेंज हे जहाज घेऊन मराठा गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला. दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठण्यातून परत इंग्रजांवर हल्ला केला व इंग्रजांचे नुकसान केले. पुढे इंग्रजांना नाईलाजाने मराठ्यांशी तह करावा लागला ज्यामधील कलमे स्वतः शिवाजी महाराजांनी तयार केली होती यामध्ये एका कलमात नागोठणे व पेण परिसरात मराठ्यांच्या शत्रूला प्रवेश देऊ नये आणि सिद्दीने नागोठणे येथून ज्या नागरिकांना, स्त्रियांना व मुलांना धरुन नेले आहे त्यांची ताबडतोब सुटक करण्यात यावी अशी कलमे होती.
       ऑगिल्बी या लेखकाने १६७० मध्ये नागोठण्याचा उल्लेख गुजरातच्या दक्षिण टोकाकडील शहर व उतारपेठ असा केला असून १६७५ मध्ये फायरने त्यास मागठन (Magatan) असे म्हटले आहे. इंग्रज व पेशव्यांमधील १७३९ च्या तहात नेगोठन (Negotan) असा उल्लेख आढळतो. 
         संभाजी महाराजांच्या काळातही नागोठण्याचे राजकिय महत्त्व कायम होते. या काळातही सिद्दीचे नागोठण्यावरिल हल्ले थांबले नव्हते. सिद्दीने लहान लहान नौका नागोठण्यास पाठवून कैद्यांना गुलाम बनवून मुंबईस नेल्याचे कृत्य संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनि दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवले होते. १६८१ मध्ये परत एकदा सिद्दीने नागोठण्यात शिरुन जाळपोळ केल्यावर संभाजी महाराजांनी जंजिराच हस्तगत करुन सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले व यानंतर संभाजी महाराजांच्या सर्व जंजिरा मोहिमा सिद्दीने नागोठण्यावर जे अत्याचार केले त्याचा बदला म्हणुनच काढल्या असल्याचे लक्षात घ्यावयास हवे. जंजिरा मोहिमेच्या काळात मुघलांनी हसन अलिखानास मोठे सैन्य देऊन कोकणात मराठ्यांविरुद्ध पाठवुन दिले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून कल्याण कडे जावे लागले मात्र जाताना त्यांनी नागोठण्याच्या रक्षणासाठी १५००० सैन्याची कुमक तैनात करुन ठेवली होती.
शाहू महाराजांच्या काळात भोसले घराण्यात यादवी सुरु झाली या यादवी मध्ये ताराराणींच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी आवाहन करण्यास शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कोकणात धाडले होते. बाळाजी विश्वनाथ हे अवचितगडावरुन नागोठणे प्रांतात येऊन त्यांनि कान्होजी आंग्रे यांची भेट घेतली व आपल्या पक्षात घेतले तसेच  शाहू महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब देऊन संपुर्ण कोकणपट्टीची जबाबदारी सोपवली.
     पेशवे काळात नागोठण्यामध्ये नाण्यांची टांकसाळ तसेच तोफ गोळे बनवण्याच्या कारखान्यांची निर्मिती झाली होती. याशिवाय नारायणराव पेशवा खुनाच्या कटात सामिल असलेले रघुनाथराव पेशवे गटातले एक सदस्य सरदार आबाजी महादेव हे नागोठण्याचे नागरिक होते. या गुन्ह्याबद्दल त्यांना नागोठण्यातून अटक करुन कुटूंबियांसह सुरगड किल्यावर अटकेत ठेवण्यात आले होते.
सन १७९६ नंतर आंग्रे घराण्यात जि यादवी सुरु झाली त्यामध्ये सुद्धा नागोठण्याचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता रघोजी आंग्रे मरण पावल्यावर त्यांचे पुत्र मानाजी, कान्होजी व सावत्र पुत्र  जयसिंग यांच्या गृहकलह निर्माण झाल्यावर जयसिंगास अटक करुन त्याच्या परिवारास नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र जयसिंग आंग्रेची पत्नी सकवारबाई हिने नजरकैदेतून सुटका करुन नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेऊन तेथून तिने बंडाचा झेंडा फडकविला आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली कालांतराने जयसिंगाने आपली सुटका करुन घेऊन तो सुद्धा पुण्यास पेशव्यांकडे गेला.
पुढे आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे यांनी जयसिंगाच्या मदतीसाठी अलिबाग येथे कुच केले ग्व्हाल्हेरच्या दौलत राव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावाच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबाग ला आल्यावर सैन्याने हिराकोटला वेढा दिला पण जयसिंग गुपचुप निसटून रात्री नदी पोहत कुलाब्यास आला. बाबुराव यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने नवर्‍याच्या मदतिस जाऊन खांदेरी किल्ला काबिज केला. इ.स.१७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली परत एकदा बाबुरावाच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजीच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन कैदी बनवण्यात आले. यानंतर बाजिराव दुसरा याने बाबुराव यांना सरखेलपद दिले.
जानेवारी १८१८ मध्ये कर्नल प्रोथर ने ३८० इंग्लिश आणि ८०० स्थानिक सैनिकांच्या सहाय्याने अवचितगड, नागोठणे, सोनगड, पाली हि ठिकाणे ताब्यात घेतली. सन १८१८ मध्ये नागोठणे पेणपेक्षा कमी भरभराटीचे गाव होते.सन १८१८ ते १८४० च्या दरम्यान ब्रिटीश सत्ता आणि आंग्रे, पंतसचिव यांच्यात गावे ताब्यात घेण्यावरुन देवाणघेवाण झाली. यानंतर सांक्षी, राजपुरी व रायगड उपविभाग ब्रिटीश सत्तेखालील रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यात आले. सन १८३० साली ठाण्याला जिल्हा केल्यामुळे हे सर्व उपविभाग ठाण्यास जोडण्यात आले. ब्रिटीशांच्या आधि हा परिसर आंग्रे आणि पंतसचिव यांच्यामध्ये विभागला होता. नागोठणे विभागातली खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या ताब्यात होती. सन १८३० मध्ये नागोठण्यातला अर्धा भाग ब्रिटीशांना देऊन त्याबदली भोरकरांनी अवचितगडचा निम्मा भाग स्वतःकडे घेतला. पुढे १८३३ मध्ये ब्रिटीशांनी आंग्रेंकडून नागोठणे भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा अर्धा भाग आंग्य्रांना दिला. रघोजी आंग्रे यांचा मुलगा दुसरा कान्होजी याच्या मृत्यूनंतर आंग्र्यांच्या गादीस वारस नसल्याने इंग्रजांनी १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा करुन ब्रिटीश राज्यात विलीन केले आणि ब्रिटीश कायदे लागू झाले. १८४० साली रामोशी स्वातंत्र्य सैनिकांचा एक संघ भोर संस्थानाहून घाटावरुन खालि उतरली आणि त्यांनी  ब्रिटीशांच्या ताब्यातल्या पाली आणि आणि नागोठणे गावावर हल्ला चढवला आणि ति गावे जाळून टाकली. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीशांनि नेटीव्ह लोकांच्या १५ व्या रेजिमेंटला पाचारण केले यामध्ये अनेक रामोशी पकडले गेले किंवा मारले गेले. ऑक्टोबर १८४४ साली तुंगारतन, कर्नाळा, वाक्रुळ, हवेली, अंतोरा हि ठिकाणे ठाणे जिल्ह्यात घेऊन नागोठण्याचा दर्जा कमी केला गेला आणि नागोठण्याचा साक्षी प्रांतात समावेश केला. १८५२ साली इंग्रजांनी कुलाबा रिजन्सी रद्द केली आणि या रिजन्सी मधली खांदेरी, रेवदंडा, सांक्षी, राजपुरी, रायगड उपविभाग आणि नागोठणे, तळा, निजामपुर, गोरेगाव, बिरवाडी आणि पोलादपुर हे लहान विभाग एकत्र करुन कुलाबा उपजिल्हा तयार केला. पुणे सार्वजनिक सभेने सुरु केलेल्या १८५७-१८७६ च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहिम काढली. १८५६ साली भोर संस्थानाने नागोठण्यात पहिली देशी शाळ उघडण्यात आली. हि रायगड जिल्ह्यातली महाड नंतर उघडलेली दुसरी देशी शाळा होती. डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीने पनवेल, पेण, नागोठणे, गोरेगाव व रेवदंडा येथे शेतकर्‍यांच्या सभा आयोजित करुन दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. सन १८८२ साली तत्कालिन जिल्ह्यातली अलिबाग, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि महाड उपविभागत १०६४ गावांचा समावेश होता. सन १९२१-१९३१ च्या दरम्याने नागोठणे महाल खालसा करण्यात आले. 
        ब्रिटीशकाळातसुद्धा नागोठणे गावाचे पेठ व महालाचे स्वरुप कायम होते आणि अनेक सरकारी कार्यालये आणि कचेर्‍या तिथे स्थापन झाल्या ज्या आजही येथे पहावयास मिळतात . एक जुन ते ३१ ऑगस्ट हे पावसाचे तीन महिने सोडले तर नागोठणे बंदर त्याकाळी चोविस तास गजबजलेले असे. गोरेगाव, इंदापुर, कोलाड, खांब, पाली सुधागड ते अगदी महाबळेश्वरपर्यंतचे मुंबईत जाणारे प्रवासी नागोठणे बंदरात येत. या प्रवाशांचा नागोठणे बंदराकडे होणारा प्रवास बैलगाडीतून असे आणि जिकडून तिकडून चाळिस पन्नाच कि.मी. बैलगाडीतून येऊनही बोट चुकली म्हणजे दुसर्‍या दिवशी भरती ओहोटीची वेळ पाहून नागोठ्णे बंदरावर बांधलेल्या धर्मशाळ्त प्रवाशांना मुक्काम करावा लागत असे.त्यामुळे परिसरात जिकडे तिकडे बैलगाड्या सोडलेल्या असत व सोडलेले बौल गळ्यातल्या घुंगरांना मंजुळ झटका देऊन रवंथ करताना दिसत. सायंकाळी प्रवाशांच्य पेटलेल्या चुलीमुळे बंदरावर ठिक ठिकाणी चुलींचा उजेड दिसत असे आणि चुलीवर भाजल्या जाणार्‍या भाकर्‍या किंवा घमघमणार्‍या सुक्या मासळीच्या कालवणारे हा परिसर धुंद होत असे. १९१८ च्या दशकाच्या अखेरपर्यंत नागोठणे-धरमतर्-मुंबई या जलवाहतुकीच्या मार्गावरुन तांदुळ,मीठ, मासे, जंगली लाकुड, तांब्या पितळेची भांडी या मालाची निर्यात होत असे. १९१४ ते १५ या दरम्याने धरमतर ते नागोठणे स्टीम बोट सेवा चालत असे मात्र पुढे बंदर गाळात सापडल्याने हि वाहतुक बंद पडली. तरी मुंबईहून महाबळेश्वरपर्यंत प्रवासी नागोठणे बंदरात उतरुन प्रवास करत असत. आजुबाजुच्या डोंगर माथ्यावरिल बेछुट आणि अविरत जंगलतोड यामुळे कोकणातील एकेकाळी हिरवेगार असणारे डोंगर आज उघडे बोडके दिसतात. हि परिस्थिती सुधागड तालुक्यातल्या अंबा नदीच्या उगमापासून नागोठण्यापर्यंत कायम आहे. जंगलतोडीमुळे डोंगरावरिल माती व जमिन जोरदार पावसामुळे सुटून नदीत आली आणि खाडीपर्यंत सरकली त्यामुळे गाळ साचून बोट सेवा बंद पडली. त्यामुळे गेली ५००० वर्षे उत्कर्षाच्या शिखरावर असलेले हे ऐतिहासिक नागोठणे बंदर काळाच्या ओघात नाहिसे झाले आणि नागोठण्याचे व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्वही त्याबरोबर संपुष्टात आले.
नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाकडे पाहिले तर अभिमानाने उर दाटून येतो मात्र इतिहासाचे जतन करण्यामध्ये जि उदासिनता आपण दाखवतो ति नक्कीच दुर्दैवी आहे. नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन होण्यासाठी लोकजागृती होण्याची नितांत गरज आहे यासाठी शहराच्या इतिहासाचे संकलन करुन नागोठण्याच पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, गावातल्या सोळाव्या शतकातल्या ऐतिहासिक पुलाचे तसेच इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे रक्षण करणे, गावात पुरातत्विय दृष्ट्या उत्खनन करुन नाहिशे झालेले शिलालेख अथवा इतर ऐतिहासिक पुरावे शोधून काढणे, गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे आहे अन्यथा नागोठण्याचा वैभवशाली इतिहास इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. कोकणपट्ट्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या अजगराने ठाणे (स्थानक), मुंबई (पुरी), साष्टी, वसई (विषय), नालासोपारा (शुर्पारक), पनवेल (पन्नगपल्ली) अशी अनेक ऐतिहासिक शहरे एकामागुन एक अशाप्रकारे गिळंकृत केली आहेत कि आज तिथे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे कठिण झाले आहे. उद्या नागोठण्याची स्थिती सुद्धा अशीच होण्याआधी या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे अन्यथा शहरीकरणाचा अजगर या ऐतिहासिक शहरास
अशा रितीने गिळंकृत करेल कि या ठिकाणी नागोठणे नावाचे एक गाव अस्तित्वात होते हे देखिल पुढील पिढीच्या लक्षात राहणार नाही.

म्हसळा - निसर्गाच्या सानिध्यातले गाव

रायगड जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेले म्हसळा हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण आपल्या निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात अशा राजपुरी खाडीच्या दक्षिण मुखास असलेले म्हसळा हे एकेकाळी नावाजलेले बंदर व व्यापारी केंद्र होते. म्हसळ्याहून पश्चिमेकडे २५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्र असून श्रीवर्धन व दिवेआगर ही इतिहासप्रसिद्ध गावे याच ठिकाणी आहेत. किंबहुना मुंबई व पुण्याहून श्रीवर्धन-दिवेआगर अथवा हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी म्हसळामार्गेच जावे लागते. या लेखात आपण म्हसळा गावाची माहितीइतिहासनिसर्गरम्यता, आणि पर्यटनस्थळे यांचा सखोल आढावा घेऊ.

म्हसळा गावाचे नाव आणि प्राचीन इतिहास

या गावास म्हसळा हे नाव कसे पडले याबाबत अनेक प्रवाद आहेत, मात्र सर्वात प्रमुख प्रवादानुसार या गावाचे प्राचीन नाव महेश्वर असून येथे पूर्वी असलेल्या महेश्वर नामक शिवमंदिरावरून हे नाव या गावास मिळाल्याचे सांगितले जाते. अर्थात, हे महेश्वराचे मंदिर आता काळाच्या उदरात गुप्त झाले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, म्हणजे सातवाहन काळात, युरोपातील ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी याने आपल्या भारतभेटीच्या वेळी म्हसळ्याची ‘मुसोपल्ली’ अशी नोंद केली होती. या वरून सातवाहन काळात गावास ‘महेशपल्ली’ असेही नाव प्रचलित असावे, अशी शक्यता वाटते.

म्हसळा या गावाचे अनेक संदर्भ निजामशाही काळापासून मिळतात. निजामशाहीआदिलशाहीमराठे, आणि सिद्दी यांच्या काळात म्हसळ्याचा उल्लेख म्हशेळेम्हैसळे अशा पद्धतीने केलेला आढळतो. कालांतराने या शब्दांचे अपभ्रंश होऊन म्हसळे हा शब्द निर्माण झाला असावा. या गावातील काही नागरिकांची आडनावे म्हासलाईम्हशिलकर अशीही आहेत, त्यावरूनही गावाच्या प्राचीन नावाची ओळख पटू शकते.

म्हसळ्याचा ऐतिहासिक वारसा

सातवाहन काळ

सातवाहन काळ (इ.स.पू. २३० ते इ.स. २२०) मध्ये म्हसळा हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. टॉलेमीच्या नोंदीनुसार, मुसोपल्ली (म्हसळा) हे समुद्रमार्गे युरोप आणि आशियाई देशांशी व्यापार करणारे केंद्र होते. राजपुरी खाडी येथील सामरिक स्थानामुळे सातवाहन राजवंशाने येथे व्यापारी आणि लष्करी चौक्या स्थापन केल्या होत्या. या काळात म्हसळा हे कोकणातील एक प्रमुख आर्थिक केंद्र होते.

निजामशाही आणि सिद्दी काळ

म्हसळा हे शहर अतिशय टुमदार असून येथे हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांचे लोक बहुसंख्य आहेत. पूर्वी हा प्रांत सिद्दी या घराण्याच्या अखत्यारीत होता व सिद्दीच्या राज्यातल्या बारा महालांपैकी एक होता. भारतास स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा परिसर सिद्दी नवाबांच्या ताब्यात होता व या सर्व परिसरास हबसाण असे म्हटले जात असे. अतिशय दुर्गम अशा या प्रदेशावर शिवाजी महाराजांनी सन १६४८ साली चाल करून येथील काही किल्ले व गावे ताब्यात घेतली होती. मात्र, संधी मिळाली की सिद्दी परत दंडाराजपुरी खाडीतून हल्ला करून हा मुलुख मराठ्यांच्या हातून काबीज करत असे, त्यामुळे बराच काळ येथे सिद्दींची सत्ता अबाधित होती. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावरही हा भाग जंजिरेकर नवाबांच्या ताब्यात होता, कारण त्यांना स्वतंत्र राहायचे होते. मात्र, स्थानिक जनता, विशेषतः म्हसळेकरांनीक्रांतिसूर्य नाना पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली जंजिरा मुक्ती संग्रामात भाग घेऊन म्हसळा प्रांत प्रजापरिषदेच्या ताब्यात घेतला. कालांतराने जनरेट्याला मान देऊन जंजिरेकर नवाबांनी ३१ जानेवारी १९४८ रोजी जंजिरा संस्थान भारतात विलीन केले.

मराठा काळ

मराठा साम्राज्याच्या काळात म्हसळा हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये येथील काही किल्ले ताब्यात घेतले, ज्यामुळे मराठा नौदलाला राजपुरी खाडीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. सिद्दींशी सततच्या संघर्षांमुळे म्हसळा हा मराठा-सिद्दी युद्धांचा केंद्रबिंदू बनला. आंग्रे काळातकान्होजी आंग्रे यांनी म्हसळा आणि परिसरातील खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गावाचा वापर केला. मराठा साम्राज्याच्या पतनानंतर, ब्रिटिशांनी या भागावर नियंत्रण मिळवले, आणि म्हसळा हा कुलाबा जिल्ह्याचा भाग बनला.

म्हसळ्याचे भौगोलिक स्थान आणि निसर्गरम्यता

म्हसळ्याची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात व विविध आळ्यांमध्ये या जाती विभागल्या गेल्या आहेत. म्हसळ्याचा बराचसा भाग हा डोंगराळ असून तीन बाजूंनी डोंगर व एका बाजूने खाडीने वेढला गेला असल्याने गावात बाराही महिने अतिशय आल्हाददायक वातावरण असते व येथील तीनही ऋतू खऱ्या अर्थाने मन उल्हासित करणारे असतात. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात थंड हवामान आणि सकाळी धुके पाहायला मिळते, तर उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

राजपुरी खाडी आणि अरबी समुद्राच्या जवळ असल्याने म्हसळा हे निसर्गप्रेमींसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. श्रीवर्धनदिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांमुळे म्हसळा हा पर्यटकांचा प्रवास मार्ग बनला आहे.

धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा

गावात ग्रामदैवत धाविरगणपतीनिगडेश्वर महादेव आदी प्रमुख मंदिरे व एक मशिद असून ग्रामदैवत धाविर देवाची दर चैत्र पौर्णिमेस खूप मोठी जत्रा भरते. यावेळेस नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व म्हसळेकर एकत्र येऊन जत्रेचा आनंद लुटतात. येथील लखमेश्वर महादेव मंदिर अतिशय रम्य असून येथे स्वामी समर्थ व काळभैरव यांची मंदिरे सुद्धा आहेत. (रायगड जिल्हा गॅझेटिअर मध्ये मंदिराचा उल्लेख निगडेश्वर असा आला आहे.) लखमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी येथील व परिसरातील जुन्या मूर्त्या मंदिराचे प्राचीनत्व दर्शवितात. विशेषतः येथील नंदीची रचना विलक्षण असून एवढा धष्टपुष्ट नंदी क्वचित दुसरीकडे पाहायला मिळतो.

चिरेगणी: निसर्गरम्य शक्तीस्थळ

म्हसळ्याच्या आसमंतात अतिशय निसर्गरम्य पर्यटनस्थळे असून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत, यातील एक म्हणजे म्हसळ्याच्या दक्षिणेस डोंगरात असलेले चिरेगणी हे शक्तीस्थळचिरेगणी ही देवता म्हसळेकरांचे श्रद्धास्थान असून अतिशय जागृत असल्याचे बोलले जाते. चिरेगणी देवीबद्दल जी अख्यायिका सांगितली जाते, त्यानुसार ही देवी ग्रामदैवत धाविर देव यांची पत्नी असून अतिशय शांतताप्रिय होती. मात्र, एकेकाळी मंदिर परिसरातल्या गजबजाटास त्रासून ही देवी म्हसळ्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरातल्या एका झऱ्याजवळ कायमस्वरूपी स्थायिक झाली व झऱ्याचे स्थळ म्हणून या परिसरास चिरेगणी हे नाव मिळाले व देवीसुद्धा याच नावाने प्रसिद्ध झाली. नावाप्रमाणे हा परिसर अतिशय गूढ व निसर्गरम्य असून डोंगरकपारीत बाराही महिने जिवंत झरा वाहत असतो. या झऱ्याचे अमृततुल्य पाणी टाक्या बांधून आडवले असून जलवाहिनीद्वारे हे पाणी अगदी उन्हाळ्यातही म्हसळेकरांची तहान भागवत असते. या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य असून पूर्वी येथे ढाण्या वाघाचा वावर असे, मात्र आता हा वाघ रायगड जिल्ह्यात दुर्मिळ झाला असला तरी अजूनही बिबटे व रानडुक्कर यांसारखे अनेक प्राणी येथे पाणी पिण्यास येत असतात. म्हसळेकरांसाठी चिरेगणी हे स्थळ कौटुंबिक सहलीचे व सहभोजनाचे सुद्धा स्थळ असून भक्तांनी येथे भक्तनिवासाची व भोजनगृहाची सोय सुद्धा केली आहे. मात्र, येथे आपण स्वतःच सर्व सामान आणून चुलीवर जेवण शिजवावे लागते.

अमृतेश्वर शिवमंदिर

म्हसळ्याच्या पूर्वेस असलेल्या देवघर येथे असलेले अमृतेश्वर शिवमंदिर सुद्धा भक्तांचे श्रद्धास्थान आहे. चालुक्यकालीन या शिवमंदिराचा येथून जवळच असलेल्या व नुकत्याच उत्खननाने प्रकाशझोतात आलेल्या चांदोरे येथील मंदिरांबरोबर गहरा संबंध आहे, हे येथील मूर्त्याविरगळी, व सतीशिळा पाहिल्यावर लक्षात येते. अमृतेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे, आणि येथील कोरीव काम आणि प्राचीन मूर्त्या यांचा अभ्यास इतिहासप्रेमींसाठी आकर्षक आहे.

म्हसळ्याला पोहोचण्याचे मार्ग

म्हसळ्यास येण्यासाठी अनेक मार्ग असले तरी माणगाव-साईमार्गे म्हसळा हा प्रमुख रस्ता आहे. मोर्बा सोडले की हा रस्ता दऱ्या डोंगरातून जातो व अगदी म्हसळा येईपर्यंत ही डोंगरातली आडवळणी वाट आपली साथ सोडत नाही. याच रस्त्यावर म्हसळ्याकडे उतरणारा जो घाट आहे, त्या घाटाच्या पायथ्याला घोणसे नावाचे गाव आहे, आणि या गावावरून या घाटासही घोणसे घाटच म्हणतात. एकेकाळी हा घाट अतिशय भयंकर असून येथील उग्र वळणांचा अंदाज न येऊन शेकडो वाहनांचे अपघात होऊन अनेकांचे बळी गेले होते, त्यामुळे हा घाट एक भयकथाच बनली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी याच घाटात पर्यायी रस्ता तयार करण्यात आल्याने आता अपघातांची संख्या खूपच कमी झाली आहे.

पर्यटन आणि निसर्गरम्य स्थळे

म्हसळा हे निसर्गप्रेमीइतिहासप्रेमी, आणि धार्मिक पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. राजपुरी खाडीचिरेगणी, आणि अमृतेश्वर मंदिर यांसारखी स्थळे म्हसळ्याच्या सौंदर्यात भर घालतात. याशिवाय, श्रीवर्धनदिवेआगर, आणि हरिहरेश्वर यांसारख्या जवळच्या पर्यटनस्थळांमुळे म्हसळा हे पर्यटकांचे हब बनले आहे. घोणसे घाट आणि त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.

 

अंतोरे
    अंतोरे : (पेण ता., १८० ४५' उ., ७३० ०५' पू.) गाव पेणपासून २.४ कि. मी. वरील भोगावती खाडीवरील जुने बंदर आहे. चालुक्य राजा अनंतदेव याने बसविलेले आहे. भरतीच्या वेळी सात टनी तर मोठ्या भरतीच्या वेळी ४० टनी बोटी खाडीतून अंतोऱ्यापर्यंत येऊ शकतात. अंतोऱ्याच्या पलीकडे मात्र फक्त लहान होड्या जातात. प्राचीन काळी अंतोऱ्यासे बंदर म्हणून फार महत्त्व होते. परंतु धरमतर बंदराच्या विकासामुळे अंतोऱ्याचे महत्त्व कमी झाले आहे.

मो. ग. दीक्षित यांच्या मते शके ११३२, प्रभव संवत्सरचा आहे. शां. भा. देव, महाराष्ट्र व गोवे शिलालेख ताम्रपटांची संदर्भ सूची, पृ. ३४-३५.

गोरेगाव

    गोरेगाव : (माणगाव ता., १८० ०५' उ., ७३० १५' पू.) घोडेगाव म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध असलेले हे बंदर दासगांवच्या वायव्येस ९.६५ कि. मी. वर व घोड (गोद) आणि काळ नद्यांच्या संगमाच्या दक्षिणेस ३.२१ कि. मी. वर आहे. प्राचीन काळी हे व्यापारी बंदर होते. परंतु कालांतराने येथील सागरी वाहतूक अत्यंत कमी झाली. टॉलेमीने (इ. स. १५०) गोरेगावचा उल्लेख हिप्पोकुरा (घोडेकुला) असा केला असून बालीपाटणा व हिप्पोकुरा हे सैमुल्ला म्हणजे चौलच्या दक्षिणेस असल्याचे नमूद केले आहे. बालीपाटणा हे पालेपट्टण (पाले नगर) म्हणजेच महाडच्या ३ कि. मी. वर बौद्ध लेणी असलेले पाले असावे, तर हिप्पोकुरा हे साष्टी म्हणजे सालसेटीमधील घोडबंदर असावे. परंतु घोडेगावला असलेल्या नौकानयनाच्या सोयीवरून तेच आताचे गोरेगाव असावे. इ. स. १७१८ पर्यंत घोडेगाव स्थानिक उप विभागाचे मुख्यालय होते. त्यानंतर होजींनी ते पेशव्यांच्या स्वाधीन केले. सन १८२६ मध्ये घोडेगाव हे पुण्याहून देव व कुंभा घाटांमार्गे जाणाऱ्या मार्गावरील प्रमुख ठिकाण होते.
गोरेगावच्या उत्तरेकडील एका टेकडीवर अदमासे ८२५ वर्षापूर्वी बांधलेले मल्लिकार्जुन अथवा सिद्धेश्वराचे मंदिर असून त्यातील लिग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. इ. स. १९०४ मध्ये (शके १८२६) गोविंदशास्त्री रानडे यांनी पंचमुखी गायत्री मंदिर बांधले. हे शाक्त संप्रदायाचे देऊळ जागृत स्थान असल्याचे मानतात. गायत्री देवीची मूर्ती संगमरवरी असून ती जयपूर येथून आणली. देवीच्या पंचमुखातील मधली आदिमाया,

उजव्या बाजूस गणपती, ब्रह्मदेव व डाव्या बाजूस शंकर व विष्णुचे मुख आहे. देवीच्या गाभाऱ्यात बाराहातांचा विद्याधरगणेश आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची, मांडी घातलेली, पंचधातूची, अर्धनरनारीश्वर स्वरूपाची आहे. भारतात अशी ही एकमेव मूर्ती आहे असे म्हणतात. या देवळात वेदान्तावरील अंदाजे १,००० ग्रंथ असलेली वेद पाठशाळा होती. येथे वैशाख शुद्ध सप्तमीला व नवरात्रात यात्रा भरते. देवळासमोर दीपमाळ असून जवळच छोट्याशा गाभाऱ्यात प्रवळाचा गणपती आहे. त्याची जयंती वैशाख शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात. येथे अदमासे २२५ वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर असून ते शिल्पकलेचा चांगला नमुना आहे. त्यातील खांबावरील कोरीव काम उत्कृष्ट आहे. गावाच्या उत्तरेस प्रसिद्ध मुसलमान पीर दाऊद मलिकचा दर्गा आहे. येथे गाव तलाव, विष्णु तलाव व राम तलाब है पुरातन काळातील तलाव आहेत. त्यातील पाण्याच्या सोयीमुळे गोरेगाव व जवळच्या वाकी आणि हुर्डी गावांमध्ये मराठा फौजा मुक्काम करीत असत. त्यामुळे गावात देसाई, पोतदार वगैरे अधिकाऱ्यांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. प्रसिद्ध मराठी साहित्यिक वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालय बांधलेले आहे.

पनवेल

     पनवेल : (तालुका मुख्यालय, १८० ५८' उ., ७३० १२' पू.) पनवेल शहर मुंबईहून ठाणे मार्गे ६८ कि. मी. व खाडी पूल मार्गे ४७ कि. मी. अंतरावर मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर आहे. शहास ऐतिहासिक महत्त्व असून पूर्वी बऱ्यापैकी बंदर होते. तथापि आता फक्त भरतीच्या वेळी शिडाच्या लहान होड्या पनवेलपर्यंत जातात. सन १९६५ मध्ये पनवेल लोहमागनि दिवा मार्गे प्रथम मुंबईला जोडले गेले व १९८९ मध्ये लोहमार्ग रोह्यापर्यंत वाढविण्यात आला. रस्ते व रेल्वे वाहतुकीमुळे बंदराचे महत्त्व कमी होऊन येथील मोठे तलाव, बंदरावरील धक्का, बैल-गाडधांची जाके बनविण्याचा उद्योग हेच बंदराच्या प्राचीन व्यापाराचे अवशेष उरले आहेत.
         सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व यादव वंशातील राजांच्या राजवटी उत्तर कोकणावर होऊन गेल्या. पनवेल चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी गुजरातच्या सुलतानाच्या अमलाखाली होते. मिरत-इ-अहमबी अनुसार गुजरातच्या सुलतानास पनवेल बंदरापासून महसूल प्राप्त होत असे. इ. स. १५७० मध्ये युरोपियनांचे व्यापारी बंदर असा पनवेलचा उल्लेख आढळतो. सन १६३७ मध्ये पनवेलचा भाग आदिलखानाच्या कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी कल्याण प्रांत जिंकून पनवेल घेतले असे दिसते. सन १६७३ नंतर सीदीचा पाडाव करण्यास शिवाजीने आपल्या आरमाराचे सरदार दर्यासारंग व दौलतखान यांना पनवेलला पाठविले होते. येथे शिवाजीचे लहानसे आरमारी ठाणे होते असे ज्ञानकोशकार केतकरांनी नमूद केलेले आहे. काही काळ पनवेलचा राज्यकारभार कर्नाळा किल्ल्यावरून चालत असावा. वाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण नियतकालिकातील एका लेखावरून दिसते की, इंग्रजी अमलाचे प्रारंभी मुंबई शहराचे दक्षिणेशी दळणवळण पनवेलमार्गेच चालत असे. पेशवाईच्या अखेरीस इंग्रज व मराठे यांच्या राज्याच्या सीमेवर हे गाव असल्याने त्यांच्यात येथे वारंवार झटापटी होत असत. सन १७७९ मध्ये राघोबा दादाला पाठिंबा देण्यासाठी कर्नल इगरटनच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजेची एक तुकडी मुंबईहून पनवेलला गेली. पुढे या तुकडीचा कार्ले येथे मराठधांबरोबर झालेल्या चकमकीत पराभव होऊन कॅप्टन स्टुअर्ट ठार झाला. दोन वर्षांनी १७८१ मध्ये जनरल गोडार्डने पनवेलहून रसद आणण्यासाठी कर्नल ब्राऊनला पाठविले. परंतु त्याचा परशुरामभाऊ पटवर्धनाने 
         पनवेलला पराभव करून जनरल गोडार्डचा पुढील डाव उधळून लावला. सन १८०४ मध्ये लॉर्ड व्हॅलेंटियाने पनवेलचे वर्णन अतिशय गजबजलेले शहर असे केले आहे. सन १८१७ मध्ये येथे ७०० पेंढाऱ्यांशी इंग्रजांची लढाई झाली. सन १८१८ मध्ये कर्नाळा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा पनवेलमध्ये थोडेफार इंग्रज सैन्य ठेवण्यात आले होते. नाना फडणिसाच्या एका पत्नीचे वास्तव्य इंग्रजांच्या आश्रयाने काही दिवस पनवेलला होते.
      वसईचा वेढा उठवून चिमाजी अप्पा परतत असता त्याचा तळ पनवेलला होता. सन १८१० मध्ये सर जेम्स मॅकिन्टोशने पनवेलचा उल्लेख खाडीच्या काठावर वसलेले अरण्यमय खेडे असा केलेला आहे. सन १८१८ मध्ये येथे ज्या भागात इंग्रजी फौजेची तुकडी ठेवण्यात आली होती त्या भागास आजही कॅम्प असे संबोधण्यात येते. सन १९३२० मध्ये पनवेल एक व्यापारी ठिकाण असल्याचा उल्लेख आढळतो. सन १८२५ मध्ये विशप हेबर याने पनवेलला मंदिर, दर्गा, प्रवाशांसाठी विश्रामगृह, एक पोर्तुगीज व एक पारशी पांयशाळा असून ते निसर्गरम्य ठिकाण असल्याचे नमूद केले आहे. सन १८६२ मध्ये ते गजबजलेले शहर होते.







  दिनांक १ सप्टेंवर १८५२ रोजी नगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल हे नाव केव्हा पडले याबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरी पुरातनकाळी नाग लोकांचे राज्य असताना या शहराचे नाव पवनपल्ली होते. यादवांनी हा भाग जिंकला तेव्हा पष्यवेला म्हणजे समुद्रकाठचे व्यापारी गाव असे नाव दिले असावे व त्याचा अपभ्रंश पनवेल झाला असावा, असा अंदाज एका अभ्यासकाने केला आहे. सन १६३७ मध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात पनवेलचा भाग होता तेव्हा या बंदरास बाबल अथवा पावळ म्हणत. 

पनवेलमध्ये अनेक मंदिरे, दर्गे, मशीदी व एक बेने इश्यायली सायनॅगॉग आहे. विरूपाक्ष महादेव, बल्लाळेश्वर महादेव व राम मंदिर (दास मारुती मंदिर) ही देवळे जुनी असून ती वाळाजी कृष्ण वापट यांनी बांधलेली आहेत. विरूपाक्ष मंदिर १८७५ च्या सुमारास बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धार १८८४ मध्ये विठोवा खंडाप्पा गुळवे यांनी केला. येथे श्रावणात उत्सव होतो व भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस देवाची पालखी निघते. राम मंदिरातील रामाच्या समोरील दास मारुतीच्या मूर्तीची स्थापना दत्तात्रय गणेश भिडे यांनी केली. बल्लाळेश्वर व राम मंदिरात दरवर्षी महाशिवरात्न, रामनवमी व हनुमान जयंती उत्सव साजरे केले जातात. शहराच्या वायव्येस देवाळे तळयाजवळील हजरत पीर करमअलीशाह च्युस्टी वानवाचा जुना दर्गा त्याचा मुलगा खाजा मोअज्जमशाह याने १७४७ मध्ये (११६६ हिजरी) बांधला. दर्याच्या उत्तरे-कडील भितीचे आतील बाजूस युसुफ नावाच्या कवीने पक्षियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाचा अर्थ "स्वर्गसुख देणारा हा दर्गा ईश्वरभक्त पैगंबरवासी करमअलीशाह याच्याकरिता मुअज्जिज शाह याने बांधला" असा आहे. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने दर्गा नमुनेदार आहे. पूर्वी दर्त्याच्या चारही बाजूला तीन तीन कमानी होत्या. त्या १९०७ मध्ये पाहून १९११ मध्ये पाच पाच बांधल्या. दर्यामध्ये एकूण आठ थडगी आहेत. येथे दरवर्षी माघ महिन्यात मोठा उरूस भरतो. येथील खाडीत १६८२ मध्ये छत्रपती संभाजीने सीदीच्या स्वाऱ्यांपासून बचावासाठी बांधलेल्या लहान किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
गावातील वडाळे तळे बाळाजीपंत बापट, इस्रायल (विश्राळे) तळे मुंबईचा व्यापारी करमसी हंसराज, कृष्णाळे तलाव कृष्णावाई वापट, देवाळे तळे नाखोदे रोगे व बाळाजी वापट यांनी वांधलेले आहेत. शिवाय लेंडाळे व दुदोळे तलाव होते. पनवेलमधील चार धर्मशाळांपैकी रामजीची धर्मशाळा सकलतसिंग खोडेसिंग जमादार यांनी, वडाळा तलावावरील धर्मशाळा बाळाजीपंत बापट यांनी, वाझे मोहल्ल्यातील धर्मशाळा बळवंत गणेश ओझे यांनी, तर इद्यायल (विश्वाळे) तलावाजवळील धर्मशाळा करमसी हंसराज यांनी बांधली आहे. सन १८७२ मध्ये स्थापन झालेला धूतपापेश्वर आयुर्वेदीय औषधी कारखाना सर्वात जुना आहे. १२८

मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी

रायगड जिल्हा हा विवीधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचीत व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विवीधता पाहता येथे डोंगर, दर्‍या व अरण्यांनी व्यापलेला असा खुप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्यपुर्ण स्थळे अजुन प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील.


जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्‍या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्‍यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.

रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्‍या तथा तिसर्‍यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्‍या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही  या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.

अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच  ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत.

Chandore excavation

Chandore veergals










रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे.
मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा संपुर्ण फेरफटका मारणे अगत्याचे ठरते. चांदोरे गावात पुर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तिवात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी गेलेले. मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असल्याने चांदोरेकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागास इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला एवढेच नव्हे तर येथील नागरिकही या उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले, मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक के चांदोरे गावाचा अविभाज्य घटकच झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही अर्थात याबद्दल चांदोरे गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले पाहीजे.
चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे म्हणजे पुर्वेकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे उत्खनन चालू असून अनेक नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. डावीकडल्या रस्त्यावरुन चालायल लागल्यावर प्रथम दिसतो तो विस्तिर्ण असा जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभुमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याचे पारणे फेडतो. जलाशये, विहीरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत, चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवितो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खुप वैभवसंपन्न व भरभराटीत असावे, चांदोरे गावाच्या ज्ञात इतिहासाबाबत अजुन बरीच माहिती प्रकाशझोतात यायची आहे मात्र या गावाचे पुर्वीचे नाव चंद्रपुर असावे असा कयास बांधता येवू शकतो, शिलाहारांच्या ताम्रपटांत व शिलालेखांत अनेकवेळा चंद्रपुर असे उल्लेख येतात अर्थात चांदोर या नावाची अनेक गावे अस्तित्वात आहेत मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातल्या चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या जलाशयाच्या कडेने चालत गेल्यावर प्रथम दिसते ते एक शिवमंदीर, कौलारु छप्पर असलेले हे शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. याच शिवमंदीरात चांदोरे परिसरात उत्खनन चालू असताना सापडलेल्या काही प्राचिन सतीशिळा, विरगळी व मुर्त्या पहायला मिळतात. येथे पहावयास मिळणारी शेषशायी विष्णूमुर्तीरायगड जिल्ह्यात क्वचितच सापडेल. ही मुर्ती पाहता या परिसरात प्राचिन काळी वैष्णवपंथिय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते अर्थात या मुर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्यशैलींशी जुळणारी असल्याने इसवी सनाच्या ७व्या शतकापासून ८व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेचा या गावातील स्थापत्यशैलींशी संबध असण्याची शक्यता बळावते. सन ७५३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजघराण्याची इतिश्री केली. चालुक्य राजघराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्यशैलीमध्ये विष्णूची रुपे पहावयास मिळतात. राष्ट्रकुटांनी चालुक्यांविरुद्ध मदत केल्याबद्दल शिलाहार राजघराण्यास पुर्ण कोकणाची सत्ता दिली त्यामुळे कालांतराने या परिसरावर शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले जे ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले. येथे पहायला मिळणारी मिळणार्‍या सतीशिळा व विरगळी ही याच गावात झालेल्या एका महासंग्रामाच्या प्रतिक आहेत ज्यामध्ये चांदोरे गावाचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्याचे निरिक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आढळून येतो, पुर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारार्तिथी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजाचे स्मारकाप्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालिन युद्धाचे जीवंत प्रसंग कोरले जात. चांदोरेच्या विरगळीमध्ये दाखालेल्या प्रसंगात दोन अश्वारुढ व्यक्ती हातात भाले अथवा तरवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती तर स्त्रीसदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळी सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्यत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वर कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देव्-दानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता आहे.
    याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी कारण या शिळेवर कोरलेला प्रसंग हा कुणा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे कारण यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरुढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे तसेच खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी व एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामत धारातिर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय येथे गणपती तसेच इतर देवतांच्या भग्नावस्थेतल्या मुर्त्या सुद्धा आढळून येतात.

या मुर्त्या पाहून आपण मंदीराबाहेर येऊन त्याच रस्त्यास लागलो की काही अंतरावर डाव्या बाजुला पुरातन अवशेष असल्याचा भास होतो अर्थात हेच ते ठिकाण जेथे सध्या उत्खनन चालू आहे. रस्ता सोडून आपण खाली उतरलो कि भरलेल्या गवतातून जाणार्‍या रस्त्याचा आजुबाजुला काही जुन्या घरांची जोती दिसून येतात तसेच उजव्या बाजुस एक भग्नावस्थेतला नंदी दिसून येतो, हे शिवमंदीराचे अवशेष असावेत हे लक्षात येण्यास वेळ लागत नाहीत. याच शिवमंदीरासमोर एक भलीमोठी जांभ्या दगडात खोदून काढलेली पायर्‍यांची विहीर अर्थात पुष्करणी आहे, या विहीरीत जाण्यास रस्ता आहे व याच रस्त्यात काही कोनाडे कोरले आहेत ज्यातल्या एका कोनाड्यात उमा माहेश्वराची मुर्ती दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेले उत्खनन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ते पुरातत्ववेत्ते व त्यांच्या सहकार्‍यांनी या संपुर्ण पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचिन अवशेष अवगत केले आहेत ज्यांच्यावर सध्या अभ्यास सुरु आहे.
  चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत स्थित आहे त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर नावाचे एक गाव लागते तिथे अमृतेश्वर हे प्राचिन व सुरेख असे शिवमंदीर आहे, या शिवमंदीराचा व चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता आह. कारण ज्या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदीराबाहेर सुद्धा आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचिन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडावयाचा आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढला आहे, लांबुन लांबुन अगदी परदेशातून पर्यटक हे प्राचिन वैभव पाहण्यासाठी गावास भेट देत आहेत व चांदोरे गावातले नागरिक त्यांना आस्थेवाईपणे मार्गदर्शन करत आहेत. चांदोरे गावच्या उत्खननासोबत रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधून काढण्याच्या पर्वास सुरुवात झाली आहे व भविष्यात याचा फायदा रायगड जिल्ह्याच्या स्थानिक पर्यटन विकासाला व रोजगारास होईल अशी आशा करुयात.


चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

mb_130920

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत. या ठिकाणांपैकी एक म्हणजे माणगाव तालुक्यात वसलेले चांदोरे गाव. हे लहानसे गाव आपल्या प्राचीन वैभवाने आणि इतिहासाने पर्यटकांचे आणि संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या उत्खननामुळे चांदोरे गावाचा आणि पर्यायाने रायगड जिल्ह्याचा पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास जगासमोर येत आहे. या लेखात आपण चांदोरे गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा, उत्खनन कार्याचा आणि पर्यटन विकासाच्या संभाव्य संधींचा सखोल आढावा घेणार आहोत.

चांदोरे गाव: एक प्राचीन वारसा

मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर, हरिहरेश्वर, म्हसळा किंवा श्रीवर्धनकडे जाताना वाटेत चांदोरे गावाचा थांबा लागतो. वाहनातून जाताना या गावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येणे कठीण आहे, परंतु गावाला भेट देऊन संपूर्ण फेरफटका मारल्यास येथील प्राचीन अवशेष आणि इतिहासाची थक्क करणारी झलक अनुभवता येते. चांदोरे गावात पूर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तित्वात असल्याचा स्थानिकांचा विश्वास होता, परंतु सखोल संशोधनाशिवाय याची पुष्टी करणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या कमी असली, तरी येथील नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल उत्सुकता आणि जागरूकता आहे. याच उत्साहामुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाला आणि इंडियन स्टडी सेंटरला (इंस्टुसेन) येथे उत्खनन कार्याला प्रारंभ करता आला. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकही या उत्खनन कार्यात सहभागी झाले आहेत. मुंबई आणि इतर ठिकाणांहून येणारे संशोधक चांदोरे गावाचा अविभाज्य भाग बनले आहेत, आणि यासाठी गावकऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

उत्खनन कार्य: एक नवीन अध्याय

चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे, म्हणजेच पूर्वेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्खनन कार्य सुरू आहे. या ठिकाणी अनेक नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टींचा शोध लागत आहे. रस्त्यावरून चालताना सर्वप्रथम दिसतो तो एक विस्तीर्ण जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या रंगाने नटलेला हा जलाशय डोळ्यांचे पारणे फेडतो. जलाशये आणि विहिरी हे गावाच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. चांदोरेसारख्या छोट्या गावात इतका मोठा जलाशय असणे हेच सूचित करते की, हे गाव एकेकाळी वैभवसंपन्न आणि समृद्ध असावे. या जलाशयाच्या उपस्थितीमुळे गावाचा प्राचीन इतिहास अधिक गूढ आणि आकर्षक बनतो. गावाच्या इतिहासाबाबत अजून बरीच माहिती उजेडात येणे बाकी आहे, परंतु काही तज्ञांचा असा कयास आहे की, चांदोरे गावाचे पूर्वीचे नाव ‘चंद्रपुर’ असावे. शिलाहारांच्या ताम्रपटांत आणि शिलालेखांत ‘चंद्रपुर’ या नावाचा उल्लेख वारंवार आढळतो. देशभरात अनेक गावे ‘चांदोरे’ या नावाने ओळखली जात असली, तरी यातील काही उल्लेख माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवमंदिर आणि प्राचीन अवशेष

जलाशयाच्या काठाने चालत गेल्यावर सर्वप्रथम दिसते ते एक सुंदर शिवमंदिर. कौलारू छप्पर असलेले हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिरात चांदोरे परिसरात उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन सतीशिळा, विरगळी आणि मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. येथे पाहायला मिळणारी शेषशायी विष्णूमूर्ती रायगड जिल्ह्यात दुर्मीळ आहे. ही मूर्ती पाहता, या परिसरात प्राचीन काळी वैष्णव पंथीय साम्राज्याचा प्रभाव असावा, असे अनुमान काढता येते. मूर्तीची रचना चालुक्यांच्या स्थापत्यशैलीशी जुळते, ज्यामुळे इ.स. ७व्या ते ८व्या शतकादरम्यान रायगड जिल्ह्यावर राज्य करणाऱ्या चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेशी या गावाचा संबंध असण्याची शक्यता बळावते. इ.स. ७५३ मध्ये राष्ट्रकूट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजवंशाचा अंत केला. चालुक्य हे वैष्णव पंथीय होते, त्यामुळे त्यांच्या स्थापत्यशैलीत विष्णूच्या रूपांचा समावेश आढळतो. राष्ट्रकूटांनी चालुक्यांविरुद्ध लढण्यास मदत केल्याबद्दल शिलाहार राजवंशाला संपूर्ण कोकण प्रांताची सत्ता दिली, ज्यामुळे कालांतराने या परिसरात शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि ते ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले.

सतीशिळा आणि विरगळी: युद्धाचे साक्षीदार

चांदोरे येथे सापडलेल्या सतीशिळा आणि विरगळी या गावात घडलेल्या एका महासंग्रामाचे प्रतीक आहेत. युद्धात पराक्रम दाखवून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे किंवा राजांचे स्मारक म्हणून प्राचीन काळी विरगळी उभारल्या जात. चांदोरे येथील विरगळीवरील दृश्यांचे निरीक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला दिसतो. यात दोन अश्वारूढ व्यक्ती, हातात भाले किंवा तलवारी घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढताना दिसतात. विशेष म्हणजे, यातील एक व्यक्ती स्त्रीसदृश आहे, ज्यामुळे प्राचीन काळीही स्त्रिया पुरुषांबरोबरीने युद्धात भाग घेत असल्याचे दिसून येते. या प्रसंगाच्या वर कोरलेले दृश्य समुद्रमंथनाशी संबंधित असावे, कारण या युद्धाची तुलना देव-दानव संघर्षाशी केली गेली असण्याची शक्यता आहे.

येथील सतीशिळा ही सामान्य सतीशिळा नसून महासतीशिळा आहे. यावर कोरलेला प्रसंग एखाद्या मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे. यात घोड्यावर आरूढ झालेली स्त्री सती जाताना दिसते, तर खालील दृश्यात ती आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली आहे. वरच्या दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे दिसते. याचा अर्थ, या सतीशिळा आणि विरगळी त्या महासंग्रामाशी संबंधित असून, युद्धात धारातिर्थी पडलेल्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय, येथे गणपती आणि इतर देवतांच्या भग्नावस्थेतील मूर्तीही आढळतात.

उत्खनन स्थळ: प्राचीन अवशेषांचा खजिना

शिवमंदिरातून बाहेर पडून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला प्राचीन अवशेषांचा भास होतो. येथेच सध्या उत्खनन कार्य सुरू आहे. रस्ता सोडून खाली उतरल्यावर गवतातून जाणाऱ्या पायवाटेच्या आजूबाजूला जुन्या घरांचे जोते दिसतात. उजव्या बाजूस भग्नावस्थेतील नंदी दिसतो, जो शिवमंदिराचा अवशेष असण्याची शक्यता आहे. याच मंदिरासमोर जांभ्या दगडात खोदलेली एक भलीमोठी पुष्करणी (विहीर) आहे. या विहिरीत जाण्यासाठी रस्ता आहे, आणि या रस्त्यावर कोरलेल्या कोनाड्यांपैकी एका कोनाड्यात उमा-महेश्वराची मूर्ती दिसते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभाग आणि इंडियन स्टडी सेंटरच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उत्खननात या पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचीन अवशेष उजेडात आले आहेत, ज्यांचा सध्या अभ्यास सुरू आहे.

चांदोरे आणि अमृतेश्वर मंदिर: ऐतिहासिक संबंध

चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत आहे, त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर येथे अमृतेश्वर नावाचे प्राचीन आणि सुंदर शिवमंदिर आहे. या मंदिराचा आणि चांदोरे येथील पुरातत्त्वीय अवशेषांचा काळ एकच असण्याची शक्यता आहे, कारण चांदोरे येथील नंदी आणि अमृतेश्वर मंदिराबाहेरील नंदी यांच्यात साम्य आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचा प्राचीन आणि वैभवशाली इतिहास उजेडात येणे बाकी आहे.

पर्यटन विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्था

चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढत आहे. देश-विदेशातून पर्यटक या प्राचीन वैभवाला भेट देण्यासाठी येत आहेत. स्थानिक नागरिक त्यांना आस्थेने मार्गदर्शन करत आहेत, ज्यामुळे गावाचा पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. चांदोरे येथील उत्खननामुळे रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधण्याच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. भविष्यात याचा फायदा स्थानिक पर्यटनाला आणि रोजगार निर्मितीला होईल, अशी आशा आहे. रायगड जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक स्थळांप्रमाणे, चांदोरे गावही पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवू शकते.

रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक संदर्भ

रायगड जिल्हा हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी निगडित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवले होते. याशिवाय, मुरुड-जंजिरा, कुलाबा आणि सुधागड यांसारखे किल्ले या जिल्ह्याच्या लष्करी आणि राजकीय इतिहासाची साक्ष देतात. चांदोरे येथील उत्खननामुळे या जिल्ह्याचा प्राचीन इतिहासही उजेडात येत आहे, ज्यामुळे रायगडच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला नवीन आयाम मिळत आहे.

चांदोरे गाव हे रायगड जिल्ह्याचा एक लपलेला खजिना आहे, ज्याचा प्राचीन इतिहास उत्खननाद्वारे हळूहळू उजेडात येत आहे. मुंबई विद्यापीठ आणि इंडियन स्टडी सेंटरच्या प्रयत्नांमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे या गावाचा वैभवशाली वारसा जगासमोर येत आहे. येथील जलाशय, शिवमंदिर, सतीशिळा, विरगळी आणि प्राचीन मूर्ती हे चांदोरे गावाच्या समृद्ध इतिहासाचे द्योतक आहेत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने चांदोरे गावाला प्रचंड संभावना आहे, आणि येत्या काळात हे गाव रायगड जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळवेल, अशी आशा आहे. इतिहासप्रेमी, संशोधक आणि पर्यटकांसाठी चांदोरे गाव एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, जे रायगडच्या प्राचीन वारशाला नवीन उजाळा देईल.

विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर

प्राजक्ता म्हात्रे

निसर्गाच्या सान्निध्यात असणारं असं आमचं छोटंसं उरण हे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’प्रमाणेच माझ्या हृदयात घर करून आहे. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या होडय़ांचे विहंगम दृश्य या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. उरणमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणादेखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरुपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. या भागाला देवळांवरून देऊळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठा विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले रिद्धी-सिद्धी विनायकाचे देवस्थान आहे.
हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. रिद्धी-सिद्धी विनायका वरून सदर गाव हे विनायक या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्ष्यांचे गुंजन, तोऱ्यात चालणाऱ्या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री रिद्धी-सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.
रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेख केला आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.


मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून, अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून, पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून, रिद्धी-सिद्धी दोन फूट उंचीच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे, तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी सदर मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदींच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते हेदेखील या देवळाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.
मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतला शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, या गूढ शिलालेखाचा उलगडा सन ९१४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबईच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.
सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढय़ांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडुरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजाआर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. सन १९९३ पासून या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त- फजनदार हे सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.
सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंडय़ा अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जिने असून, लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशंना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे- जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंडय़ांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.
गावकरी कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टाकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान केली आहे.


 

themetrognome.in

Chandore lights up Konkan’s hoary past – The Metrognome

The Metrognome

Season one of excavation at Chandore, which is in Konkan, revealed some intriguing artefacts, ceramics and sculptural elements early this month.
by Shubha Khandekar

As the second (annual) season of

 archaeological excavations at Chandore, near Mangaon in the Raigad district of coastal Maharashtra draws to a close, this tiny, idyllic village has increasingly begun to look like a key hub where international trade flourished under the Shilahara kings about a 1,000 years ago, and continued up to the Maratha period in the early 19th century, through the pre-Shivaji Bahamani regime and the rule of the once pan-India Peshwas, before they suffered a decisive defeat at the hands of the British in 1818.

Time & Calendars

Facets of the history of the Shilahara dynasty that ruled the entire seacoast from Sopara in the North to Savantwadi in the South, through the 11th to the 14th century, are unfolding slowly but surely with the excavation, undertaken jointly by the Centre for Extra Mural Studies (CEMS), University of Mumbai and the India Study Centre (INSTUCEN), under Dr Kurush F Dalal, the Field Director, who teaches

 Archaeology at the CEMS.

This makes Chandore a crucial site, demanding extensive and long term historical, ethnographic and archaeological investigation to ascertain the antiquity, the cultural sequence and nature of the settlement at Chandore and its environs, that would shed light on hitherto unknown aspects of the history of the region for the past 1000 years and more.

This was acknowledged, endorsed and emphasised by the presence of all the bigwigs present on site on a Sunday drenched in welcome rain early June: Dr Rajan Velukar, Vice Chancellor, Dr Naresh Chandra, Pro-Vice Chancellor, and Mugdha Karnik, Director, Centre for Extra Mural Studies, Mumbai University, Dr A P Jamkhedkar, former Director, Department of Archaeology and Museums, Government of Maharashtra, Dhananjay Karnik, Drs Samuel Nazareth and Suraj Pandit, all Directors, India Study Centre (INSTUCEN), Dr Kurush F Dalal, Field Director of excavations at Chandore and Suresh Bhosale, President, Mahad Manufacturers’ Association, which came forward to finance the initial phases of this year’s excavation. In addition, Pallavee Gokhale from Pune, NR Swamy from Bangalore (Genesys International) and Vaidyanathan from Mumbai joined hands to do a GIS based study of the vast expanse over which the ruins are strewn.

Archaeology

While Dr Velukar committed the University’s support to the excavation, Dr Jamkhedkar interacted with the villagers of Chandore at a public meeting and explained to them the historical importance of the site, the need for conservation of the remains of the past, if possible through the establishment of a small local museum and the prevention of their pilferage, and the critical role that the villagers must play in the process.

Where is it?
Chandore is located on a ridge running north-south along the Arabian Sea coast, about 30 km to its west, a location that had carved out a unique role for the village in the political, economic and religious life of the Konkan region.

Chandore excavationThe first season of excavation revealed a rock-cut stepped reservoir, with images of Hara-Gauri (a form of Shiva and Parvati), embedded in a niche in one of its walls. Stylistically the image has been dated to the Shilahara period by Drs Arvind Jamkhedkar and Suraj A Pandit. This reservoir was adjacent to a Shiva temple, whose only extant remains consist of a sunken sanctum and a Nandi placed in the temple’s courtyard, a hopelessly crumbling image of the divine bull that one is afraid to touch for fear that it will completely disintegrate.

Urban Transit

Excavations at the site have so far revealed plans of at least three temples, built as per the local traditions during the Bahamani period, which preceded Shivaji by about two centuries.

This kingdom had later split into five, including the Adilshahi out of which Shivaji carved out his swaraj.

Other finds from the excavation consist of a silver gadhiya coin from the 11th century, glass beads and bangles, and monochrome glazed ware potsherds typical of the 14th century.

Historically important
Chandore was incredibly active between the 8th century and 1818 when the Marathas lost the final battle against the British (Third Anglo-Maratha War). The local towns of Mangaon and Goregaon have historically been very important places on the internal highway and have both been feeders to the port of Mhasala, especially during the Maratha, Bahamani and Adilshahi phases. Both the traditional routes passed Chandore and it is only now that the route from Goregaon has bypassed Chandore, the Mangaon-Mhasala route still goes past Chandore.

City & Local Guides

The Chandore-Mhasala stretch is also a part of the Mangaon-Goregaon-Mhasala-Borli-Diveagar-Shrivardhan route. Thus Chandore lies on a critical route between the hinterland and the ports of Mhasala and Diveagar.

The surroundings of Chandore too are replete with hero stones, locally called veergals (see pic on right) , and sati stones, which together Chandore veergalsnarrate a story of valour and sacrifice, and reveal aspects of ancestor worship and the custom of Sati. Indravan, Nivachivadi, Govele, Kakal, Nalephodi, Mhasala, Borli Panchatan, Diveagar and Deokhol in the proximity of Chandore constitute a sprawling complex with thriving international trade and vibrant religious activity on a large scale.

Geographic Reference

There is, however, no inscription in this entire repertoire to give us any definitive names or dates for any of these locations, with the exception of Diveagar.

The earliest occupation of Chandore, surprisingly, seems be of the Stone Age when small, microlithic tools were made in a pre-metal era. This could push the antiquity of the site back by several millennia, and Stone Age experts who have visited the site have recommended a detailed study of the raw materials used for the tools, the structural and functional aspects of the tools and the geological context of the habitation.

The bulk of the original research published on the Shilahara dynasty consists of a volume of the inscriptions of the Shilaharas by VV Mirashi (Corpus Inscriptionum Indicarum, Vol IV brought out by the ASI in 1977). Scholars have subsequently found sporadic copper plate and stone inscriptions of the Shilahara dynasty in the Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts of Maharashtra as well as the coastal area of Goa and Karnataka, and have attempted a reconstruction of the history of the region.

South Asians & Diaspora

A particular location at Chandore is referred to as ‘kalavantiniche gharate’– the dwelling of the nautch girl(s) – in local tradition, which comprised an essential service at a trade route hub, for merchants and traders on long journeys away from home. This yet again confirms the status of Chandore as a thriving semi-urban centre.

Also, an annual religious festival is part of a tradition from the hoary past and draws in large numbers of people surrounding areas. This calls for ethnographic enquiry and its integration with historical evidence in a holistic approach to unfold the secrets buried and forgotten since yore.

This seasons excavations have just drawn to a close and the excavation team is busy cataloguing and analysing the artefacts, ceramics and sculptural elements revealed in the course of this season’s work.

Colleges & Universities

(Pictures courtesy Dr Suraj Pandit, Pallavee Gokhale and Rhea Mitra-Dalal)

https://www.themetrognome.in/places/chandore-lights-up-konkans-hoary-past


 Excavations at Chandore 2012





 Introduction
The Ancient Temple complex at Chandore (18 09’ 52” N; 73 11’ 02” S) is situated near the hamlet of Chambharpada at Chandhore Village, Tal Mangaon, Dist Raigad, Maharashtra. The site was discovered in 2011 by a joint team of members from the Centre for Extra-Mural Studies (CEMS), University of Mumbai and the India Study Centre (INSTUCEN), Mumbai. These explorations were carried out in March 2011 (Dalal 2012). (See earlier post fromMay 2011)

After explorations it was decided to apply for permission to the Archaeological Survey of India to conduct archaeological investigations (both excavations and clearance) at the site in the 2011-2012 Season. The CEMS applied in conjunction with the India Study Centre Trust (INSTUCEN), Mumbai.  Permission was granted and the excavations carried out under the direction of the author along with the past and present students of the CEMS.





The Site

The ancient site of Chandore is located less than half a kilometer to the east of the modern village of Chandhore opposite (and to the west of) the hamlet of Chambharpada. This site is essentially a cluster of Temples/Temple Plinths and lies close to the medieval coastal port site of Mhasla and the other medieval port sites on the Rajapur Creek.


It is also located along the very road that leads from the interiors of Maharashtra to the Rajapur creek and eventually the coast. It is equidistant from Goregaon and Mangaon and would have been the convergence centre for the routes from the north (via Mangaon) and south (via Goregaon) flow of traffic of goods from the interior to the ports of the Konkan. It thus lies on a critical node of one the most viable trade routes in this region.


The ancient site itself is made up of a complex of temples/temple plinths and assorted structural and sculptural members. The plinths in turn can be divided into 2 sub complexes – divided by the Chandore-Govele road - the first opposite the Chambharpada and the second about 100m to the west of the Chambharpada. The first group/complex of temples includes a single large disturbed plinth with an adjacent tank/step well with a smaller temple and nandimandapa. The second group/complex (north of the first group and west of Chambharpada) consists of at least two more temple plinths (one intact and exposed and the other buried and only partially exposed) and a host of smaller structure bases and scattered sculptural members.








The Excavations
The excavations per se were carried out on the eastern side of Complex1 - Plinth 1. Two quadrants each measuring 2.5 x 2.5m were taken up for excavations. The reason for the location of the trench was the slope and the possible accumulation of debris due to the obstruction of the natural flow of rain borne soil and artefacts by Plinth 1. 






The excavations revealed a very small deposit between 30 and 70cm. the soil excavated was uniform and no real layers with the exception of humus discolouration were visible. The bedrock (laterite) locally known as kaatal was exposed in both quadrants. A large number of potsherds of coarse Red and Grey wares, bangle fragments of glass, a broken wound (black) glass bead, a fragment of Monochrome Glazed Ware – a West Asian import (a second example was found whilst clearing the debris on the steps of the tank), a silver Gadhaiya coin (Maheshwari 2010: 83, Cat No. 204-244) and a large number of retouched stone tools (microliths) and tool making debris were recovered from the trench.





The bangles are mainly opaque black with a few green and fewer blue/bichrome blue examples. Amongst the large number of bangle fragments are few with coloured appliqué glass dots reminiscent of similar bangles found at Sanjan (Gupta et. al. 2003; 2004) and dated between the 9th and 12th c AD.

The microliths are a separate and unique ‘problem’. To the best of the authors knowledge these are the first microliths excavated in a stratified context in the Konkan. They require a serious and dedicated study and will be dealt with separately and in detail at a later stage.

Suffice to say that the microliths take back the antiquity of human occupation at Chandhore to at least the 2nd millennium BC.

Conclusion
In conclusion, the sculptural material, the hero/sati stones, the pillars and the Gadhaiya coin all point out to a 10th to 13th c AD period for the site. The Monochrome Glazed Ware and a few very specific types of decorated glass bangles point to a slightly later terminal date of approximately the 15th c AD.

All these conclusions are preliminary and much more work is needed to ascertain the facts.


Acknowledgements
The excavation at Chandhore was carried out by the Centre for Extra Mural Studies, University of Mumbai in partnership with the India Study Centre Trust (INSTUCEN), Mumbai.

I am very grateful to the Archaeological Survey of India; the Vice-Chancellor, University of Mumbai; the Director of the Centre for Extra Mural Studies, University of Mumbai; Mr. Samuel Nazareth, Dr Aravind Jamkhedkar, Dr Suraj Pandit and Dr Abhijit Dandekar.

Special mention must also be made of Dr B. Vaidyanathan who almost single-handedly created the detailed site plan for the first season of excavations.

I am also indebted to the staff at the department, all of my students past and present who participated in the excavations and the labourers and villagers of Chandhore for all their help and patience.














संदर्भ –

१) कुलाबा जिल्हा गॅझेट
२) Portuguese Sea Forts Goa with Chaul, Korlai and Vasai – Amita Kanekar – published by Jaico, funded by the Deccan Heritage Foundation
3) Notes on history and antiquities of Chaul & Bassein – Jose Gerson Da Cunha – Notes by Ms Deepti Bapat


 

नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे.

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचिन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन म्हणुन प्रसिद्ध असले तरी या गावास अतिशय प्राचिन असा ऐतिहासिक वारसा आहे. नागावचे प्राचिन संस्कृत नाव नागग्राम, महाभारतातल्या नागसत्र यज्ञानंतर जी नागकुळे दक्षीणेत स्थित्यंतरीत झाली व जी गावे वसवली त्यापैकी नागाव हे एक गाव. नागाव मध्ये आजही नागवंशाच्या प्राचीन खुणा अस्तित्वात आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची खुण म्हणजे दश नागांचे मंदीर, या मंदीरात नागाव गावाच्या मुळ दैवत असलेल्या दश नागांच्या मुर्त्या पहावयास मिळतात ज्या अत्यंत प्राचिन आहेत.

अनेक प्राचिन साधनांमध्ये नागावचा उल्लेख नागुम असा सुद्धा करण्यात आला आहे. नागाव मध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात, यापैकी महत्त्वाच्या खुणा म्हणजे नागावच्या वैभवशाली इतिहासाची साक्षी असलेली पुरातन मंदीरे भिमेश्वर मंदीर, सिद्धीविनायक मंदीर, वंखनाथ मंदीर, नागेश्वर मंदीर, दक्षीणमुखी देवस्थान अशी यादी संपता संपणार नाही. ही सर्व मंदीरे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम अशीच आहेत. यापैकी भिमेश्वर हे मंदीर या मंदिरात असलेल्या १२ व्या शतकातल्या शिलालेखामुळे इतिहासप्रेमींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. हा शिलालेख भिमेश्वर मंदीराच्या उत्तरेकडील दरवाज्याच्या पायरीवर कोरला असून आजही सुस्थितीत आहे, यावरिल मजकुर पाहता हा ठाणे-कोकण या भागावर राज्य करणार्‍या कुणा हंबीरराव नामक राजाच्या नावे असून शिलालेखावरील प्रौढी प्रताप चक्रवर्ती ही अक्षरे हा शिलालेख यादवकालीन असल्याची साक्ष देतात. याशिवाय याच मंदीरापरिसरात शिल्पशास्त्राचा अजब नमुना असलेल्या काही मुर्त्या सुद्धा पहावयास मिळतात. येथील सिद्धीविनायकाचे देवस्थान तसे मुख्य मार्गावर असूनही अपरिचितच आहे. या मंदीराचे लाकडी सभागृह आता पुरते मोडकळीस आले असून फक्त गाभाराच सुस्थितीत आहे. या मंदीराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख कोरला असून भग्नावस्थेत असल्याने पुर्णपणे वाचता येत नाह मात्र यावर सुस्थितीत असलेली 'प्लवंग संवस्तरात कुणा बाळभट्टाच्या नावे असलेले हे दानपत्र असल्याचे लिहीले असल्याने' ह्या शिलालेखावरील बाळभट्ट म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पुरोहीत चौलचे वेदसंपन्न पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे चिरंजीव बाळभट्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाळभट्ट सुद्धा वेद्संपन्न असून शिवराज्याभिषेकात अनेक कार्ये त्यांनी गागाभट्टांसोबत पार पाडली होती. नागाव मधील एक अतिशय देखणे मंदीर म्हणुन वंखनाथाच्या मंदीराचे नाव घेता येईल. हे शिवमंदीर पुरातन असले तरी आहिल्याबाई होळकरांच्या काळात म्हणजे सन १७९० मध्ये या मंदीराचा जिर्णोद्धार झाल्याचे दाखले आढळतात. या मंदीरासमोरील पुष्करणी सुद्धा अतिशय प्रेक्षणीय असून या पुष्करणीमधील कासवे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. या मंदीरातील नंदीची मुर्ती हि अतिशय रेखीव असून अशा प्रकारची दुसरी मुर्ती कुठल्याही शिवमंदीरात सापडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. येथील नागेश्वर हे शिवमंदीर सुद्धा बरेच जुने असून जानकोजी आंग्रे यांनी या मंदीराचा जिर्णोद्धार केल्याची माहिती सापडते.

प्राचिन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नागावं ने शिवकाळात सुद्धा राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानाची भुमिका बजावली होती. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नागावचा समावेश होत असे व शेजारच्या चौल वर पोर्तुगिजांची सत्ता होती तसेच पलिकडे मुरुड येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू जंजिर्‍याचा सिद्दी याची सत्ता असल्याने शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या ताब्यातल्या अनुक्रमे जंजिरा व उंदेरी या ठिकाणांवर काढलेल्या मोहिमांचे आरंभस्थान नागाव हेच होते. १६७० च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी नागाव येथे १६० लहान जहाजे, १०००० घोडदळ व २०००० पायदळाचे सैनिक तयार ठेवून जंजिर्‍याला वेढा घालण्याच्या तयारीने जमावले होते. या सैनिकांसोबत इतर शस्त्रास्त्रांसोबत कुदळी, फावळी, पहारी इत्यादी बांधकामाची आयुधे सुद्धा होती. २४ नोव्हेंबरला या तुकडीने नागाव सोडले मात्र २६ तारखेला महाराज अचानक माघारी वळले व आरमारास परत बोलावून काही काळातच त्यांनी खानदेश व वर्‍हाडवर स्वारी केली व प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. अर्थात नागाव मधून निघालेली ही मोहिम ही महाराजांच्या राजकिय डावपेचांचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यास गनिमीकावा असे प्रसिद्ध नाव आहे.

नागावचा समुद्रकिनारा सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर व डोळ्यांचे पारणं फेडणारा असून सभोवताली दाट सुरुबनाने वेढल्याने किनार्‍याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुरेशी काळजी घेतल्यास या सुरक्षित अशा समुद्रकिनार्‍यावर जलक्रिडेचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

गेली हजारो वर्षे नागावने आपली प्राचिन संस्कृती जपून ठेवल्याने आजही नागाव मध्ये येणार्‍या पर्यटकांना खर्‍या अर्थाने कोकणातल्या एका टुमदार गावात आल्याचा भास होतो. नागावचा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पोहोण्याच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षित असल्याने जलक्रिडेसाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात मात्र समुद्र पर्यटनाबरोबरच नागाव मधील ऐतिहासिक वारश्याचे दर्शन जर या पर्यटकांना देता आले तर खर्‍या अर्थाने नागावचे सांस्कृतीक व ऐतिहासिक वैभव जगासमोर येईल . सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'
प्राचिन काळी नागांव, चौल, रेवदंडा सारखी बंदरे युरोप, अरब तथा आफ्रिकन राष्ट्रांशी व्यापार करण्यामध्ये अग्रेसर होती मात्र मध्ययुगातली अस्थिरता या बंदरांच्या नाशासाठी कारणीभुत ठरली. इतक्या राजकिय स्थित्यंतरातही नागाव, चौल, रेवदंडासारखी गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत ही खरे तर दैवी कृपाच म्हणायला हवी. अष्टागरांचे वैभव असलेले नागाव म्हणजे जणू ऐतिहासिक, सांस्कृतीक, भाषिक, वांशिक व राजकिय ठेव्यांचे एक संग्रहालयच आहे.



नागाव

        नागाव : (अलिबाग ता. १८० ३५' उ., ७२°५०′ पू.) भरभराटीला आलेले हे गाव अलिबागच्या ईशान्येस ७ कि. मी. आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या रमणीय बागा, लहान मोठ्या पोखरणींनी आणि मंदिरांनी नटलेले व शांत वातावरणाचे गाव असून येथील वस्ती सुशिक्षित आहे. कोकण किनाऱ्यावरील नारळ सुपारीच्या बागायतीची विशेषता येथे दिसते. नागावचे मूळनाव नामग्राम असावे. गावातील एका वाडीत नागांच्या आकृती खोदलेले अनेक दगड आहेत. तथापि त्याचा ग्रामनामाशी निश्चित संबंध काय आहे हे सांगता येत नाही. शिवकाळात नागावला बरीच वस्ती असावी हे १६७४-७५ मधील स्थानिक लोकांची आडनावे व आताच्या लोकांच्या आडनावांतील साधर्म्यावरून वाटते. आंगरे काळात नागाव महालातील वस्ती नागावला एकवटलेली होती. येथे नागेश्वर, भीमेश्वर, बंकनाथ, नारायण, महालक्ष्मी, कोलाई तथा ग्रामदेवता, गणपती व योगेश्वरी मंदिरे आहेत.
         नागेश्वर मंदिर: हे मंदिर शिवकाळातील असावे. कारण त्याचा जीर्णोद्धार ६ जानेवारी १७७२ रोजी राघोजी आंगरे सरखेल याने केला. मंदिराजवळ १७७३ मध्ये राघोजी आंगरेने एक तळे बांधले आहे. त्याच्या सर्व बाजू चिरेबंदी व तांबडघा दगडाच्या आहेत. नागेश्वराची यात्रा चैत्र शुद्ध पौणिमेला भरते.
       भीमेश्वरः हे शिवकालीन मंदिर असून त्याचा १७५८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी पेशव्याचा भाऊ सदाशिवरावभाऊ याची भार्या पार्वतीबाईकडून पैसे मिळविण्यात आले होते. पार्वतीबाई नागावच्या कोल्हटकराची कन्या होती. विठोबा लोंढे याने मंदिरासमोर जीर्णोद्धारानंतर दीपमाळ बांधली. मंदिरासमोरील पुष्करणी १७६४ मध्ये नारंभट रिसबूडने बांधली. येथे दोन फूट चार इंच लांब व दीड फूट रुंद दगडावर शके १२८८ तील २८ ओळींचा संस्कृत शिलालेख आहे. मंदिरात रामनवमीचा उत्सव होतो.
        वंकनाथ : हे मंदिर केशव महाजन याने १७६०-६१ मध्ये बांधले. अहिल्याबाई होळकरने १७९० मध्ये मंदिराची दुरुस्ती केली. जेथे मंदिर आहे तेथे जुनी मशीद होती असे म्हणतात परंतु ती कोसळली होती. त्यामुळे मंदिराच्या दक्षिणेस तळघाच्या काठावर महाजनने मशीदही बांधली.
       कोलाई तथा ग्रामदेवता : नागावची सर्वात जुनी देवता म्हणून हे मंदिर सर्वात जुने असावे. तथापि शि‌कालीन असल्याबद्दल संशय नाही. कारण १८२९-३० मध्ये मंदिर मोडकळीस आल्यामुळे नवीन मंदिर बांधण्यात आले.
बेने इस्रायली मंदिर : नागावात सध्याच्या माध्यमिक शाळेजवळ ईशान्येकडील भागास मशीद भाग म्हणतात. काही शतकापूर्वी तेथे इशायली लोकांचे मंदिर होते. त्याच्या पडक्या भिती अजूनही आढळतात.

नागावात जुने तळे असून ते पाथरलीचे तळे म्हणून ओळखले जाते. हे तळे कान्होजी आंगरेने बांधून घेतले. नागावच्या सीमेवर कस नदीचा समुद्राशी संगम होतो. ती जागा स्थानिक तीर्थक्षेत्र समजले जाते. तेथे वामन द्वादशीस भाविक तीर्थस्नान करतात. समुद्रकिनाऱ्यास लागून ग्रामपंचायतीने सुरूच्या झाडांची मोठी लागवड केली असून हे ठिकाण पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

नागोठणे

              नागोठणे : (रोहा ता., १८० ३०' उ., ७३० ०५' पू.) हे बंदर दाट झाडी असलेल्या डोंगरात अंबा नदीच्या उजव्या किनाऱ्यावर व नागोठणे खाडीच्या मुखापासून ३८.६२ कि. मी. वर आहे. ते पेणच्या दक्षिणेस २४.१४ कि. मी. तर मुंबईच्या आग्नेयेस ६४. ३७कि. मी. आहे. मागील शतकाच्या अखेरपर्यंत धरमतर नागोठणे जलवाहतुकीच्या मार्गावरून तांदूळ, मीठ व मासे यांची वाहतूक चाले. इ. स. १९५८ मध्ये धरमतर खाडीवर पूल (लांबी ३९७ मी., रुंदी ६.७१ मी., उंची १७ मी.) झाल्याने हा मार्ग बंद पडला. इ. स. १९१४-१५ पर्यंत धरमतर ते नागोठणे स्टीम बोटींद्वारेही वाहतूक चाले. पुढे डिझेलवर चालणाऱ्या बोटींच्या प्रसारामुळे ही सेवा बंद पडली. विशेष प्रसंगी मुंबई ते महाबळेश्वर प्रवासी येथून जात असत. बंदरात गाळ साचल्याने आता जलवाहतूक कमी होते. प्रवासी येथून जात असत. बंदरात गाळ साचल्याने आता जलवाहतूक कमी होते.
           गुजरातच्या महमूद बेगडाने १४९५ चे सुमारास नागोठण्याला लष्करी तळ उभारून चौलवर सैन्य पाठविले. सन १५३० मध्ये नागोठण्यावर गुजरातची सत्ता होती. सुलतानाचा पराभव करून हे ठिकाण पोर्तुगिजांनी हस्तगत केले. परंतु त्यांनी त्याचा ताबा निजामशहाकडे दिला. नागोठणे १६३६ पर्यंत निजामशाहीकडे होते. तदनंतर मुघलांनी अहमदनगरच्या ताब्यातील कोकणचा भाग हस्तगत करून विजापूरच्या स्वाधीन केला. पुढे दहा वर्षानंतर तो भाग शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. ऑगिल्बी या लेखकाने १६७० मध्ये नागोठण्याचा उल्लेख गुजरातच्या दक्षिण टोकाकडील शहर व उतारपेठ असा केला असून १६७५ मध्ये फायरने त्यास मागठन (Magatan) असे म्हटले आहे. इंग्रज व पेशव्यांमधील १७३९ च्या तहात नेगोठन (Negotan) असा उल्लेख आढळतो. सन १८१८ मध्ये नागोठणे पेणपेक्षा कमी भरभराटीचे गाव होते.
नागोठण्याच्या नैऋत्येस अदमासे एक कि. मी. वरील मुसलमानकालीन पूल हे येथील आकर्षण असून तो १४६.३० मीटर लांब, ५.७९ मीटर उंच व २.९२ मीटर रुंद आहे. पुलाचा अरुंदपणा ही एक विशेषता होय. पुलाची मुख्य कमान २.२३ मीटर आहे. तो १५८० मध्ये चौलच्या काझी बलाउद्दीनने तीन लाख रुपये खर्चुन बांधला असे म्हणतात. कोंसारी खिडीतून निजामशाही सैन्याची आगेकूच सुलभ होण्यासाठी हा पूल बांधला असावा. २२ नागोठण्यात इंडियन पेट्रोकेमिकल्स या उपक्रमाद्वारे वायू विभाजन (गॅस क्रॅकर) प्रकल्प १४ जून १९९० पासून कार्यान्वित झालेला असल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे

१२१ कुलाबा गॅझेटिअर, १९६४, पृ. ९०३-०४.


अक्षी

अक्षी : (अलिबाग ता., १८० ३५' उ., ७२० ५०′ पू.) हे अलिबागच्या दक्षिणेला सुमारे पाच कि. मी. वर वसलेले सदाहरित खेडे आहे. अक्षी, नागाव आणि रेवदंडा हा बागांचा व नारळी-पोफळीच्या वनाचा पट्टा समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे १३ कि. मी. पसरलेला आहे. गावातील घरे नारळी-पोफळीच्या दाट छायेत वसलेली असून येथील समुद्र किनाऱ्यावर कोळघांची मोठी वसाहत आहे. या गावात साखरखाडीच्या दक्षिणेला सुमारे १.२१४ हेक्टर क्षेत्रफळ असलेला एक जुना तलाव (खोली ४.२६७ मीटर) आहे. हल्ली तलावात गाळ साचल्यामुळे तलाव आटतो. गावात कालिकादेवी व सोमेश्वर महादेवाची जुनी देवळे आहेत. या परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशीदेवरायची आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेवचा असे दोन शिलालेख सापडले आहेत.
     केशीदेवरायचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून तो शके ९३४, प्रधावी संवत्सर, अधिक मास (ज्येष्ठ), सुक्रे-शुक्रवार, १६ मे इसवी सन १०१२ या तिथीचा आहे." या शिलालेखात केशीदेवराय-कोकण शिलाहार नृपती, भइर्जु सेणुई महाप्रधान व लुनया-लेख कोरणारा या व्यक्तिनामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश-कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दान दिले हे नमूद करण्याचा आहे. या लेखाचा शेवट शापात्मक वचनांनी झाला आहे. मराठी भाषेतील उपलब्ध लेखांतील हा पहिला शिलालेख होय असे पुरातत्त्वज्ञ शं. गो. तुळपुळे यांचे मत आहे.
    यादव नृपती रामचंद्रदेव याचा शिलालेख संस्कृत व मराठी मिश्र भाषेतील असून देवनागरी लिपीतील आहे. तो शके १२१३ (गत बर्ष), खर संवत्सर, चैत्र शुद्ध ८, शुक्रवार, ९ मार्च इसवी सन १२९१ या तिथीचा आहे. लेखात रामचंद्रदेव यादव नृपती, जाईदेव-यादव नृपतीचा मांडलिक, आणि इश्वरदेव क्षत्निय-जाईदेवाचा दान देणारा पुत्र या व्यक्ति-नामांचा समावेश आहे. लेखाचा सारांश यादव नृपती रामचंद्रदेव याचा मांडलिक जाईदेव याचा पुन इश्वरदेव क्षत्रिय याने उपरोक्त तिथिला देवीला एक गद्याण दान दिले हे नमूद करणे आहे." या दोन्ही शिलालेखांवर चंद्र व सूर्याच्या प्रतिमा आहेत.
    सोमेश्वराच्या देवळाजवळ चितशोमणेश्वराचेही जुने देऊळ आहे. गावात सिद्धिविनायकाचे एक देऊळ असून ते बापूजी सिध्दिविनायक मंदिर या नावाने ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यास लागून पीराचा दर्गा असून त्याचा नुकताच जीर्णोध्दार केला आहे. तेथे पौष पौर्णिमेला उरूस भरतो.

अंतोरे
    अंतोरे : (पेण ता., १८० ४५' उ., ७३० ०५' पू.) गाव पेणपासून २.४ कि. मी. वरील भोगावती खाडीवरील जुने बंदर आहे. चालुक्य राजा अनंतदेव याने बसविलेले आहे. भरतीच्या वेळी सात टनी तर मोठ्या भरतीच्या वेळी ४० टनी बोटी खाडीतून अंतोऱ्यापर्यंत येऊ शकतात. अंतोऱ्याच्या पलीकडे मात्र फक्त लहान होड्या जातात. प्राचीन काळी अंतोऱ्यासे बंदर म्हणून फार महत्त्व होते. परंतु धरमतर बंदराच्या विकासामुळे अंतोऱ्याचे महत्त्व कमी झाले आहे.

मो. ग. दीक्षित यांच्या मते शके ११३२, प्रभव संवत्सरचा आहे. शां. भा. देव, महाराष्ट्र व गोवे शिलालेख ताम्रपटांची संदर्भ सूची, पृ. ३४-३५.

गोरेगाव

    गोरेगाव : (माणगाव ता., १८० ०५' उ., ७३० १५' पू.) घोडेगाव म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध असलेले हे बंदर दासगांवच्या वायव्येस ९.६५ कि. मी. वर व घोड (गोद) आणि काळ नद्यांच्या संगमाच्या दक्षिणेस ३.२१ कि. मी. वर आहे. प्राचीन काळी हे व्यापारी बंदर होते. परंतु कालांतराने येथील सागरी वाहतूक अत्यंत कमी झाली. टॉलेमीने (इ. स. १५०) गोरेगावचा उल्लेख हिप्पोकुरा (घोडेकुला) असा केला असून बालीपाटणा व हिप्पोकुरा हे सैमुल्ला म्हणजे चौलच्या दक्षिणेस असल्याचे नमूद केले आहे. बालीपाटणा हे पालेपट्टण (पाले नगर) म्हणजेच महाडच्या ३ कि. मी. वर बौद्ध लेणी असलेले पाले असावे, तर हिप्पोकुरा हे साष्टी म्हणजे सालसेटीमधील घोडबंदर असावे. परंतु घोडेगावला असलेल्या नौकानयनाच्या सोयीवरून तेच आताचे गोरेगाव असावे. इ. स. १७१८ पर्यंत घोडेगाव स्थानिक उप विभागाचे मुख्यालय होते. त्यानंतर होजींनी ते पेशव्यांच्या स्वाधीन केले. सन १८२६ मध्ये घोडेगाव हे पुण्याहून देव व कुंभा घाटांमार्गे जाणाऱ्या मार्गावरील प्रमुख ठिकाण होते.
गोरेगावच्या उत्तरेकडील एका टेकडीवर अदमासे ८२५ वर्षापूर्वी बांधलेले मल्लिकार्जुन अथवा सिद्धेश्वराचे मंदिर असून त्यातील लिग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. इ. स. १९०४ मध्ये (शके १८२६) गोविंदशास्त्री रानडे यांनी पंचमुखी गायत्री मंदिर बांधले. हे शाक्त संप्रदायाचे देऊळ जागृत स्थान असल्याचे मानतात. गायत्री देवीची मूर्ती संगमरवरी असून ती जयपूर येथून आणली. देवीच्या पंचमुखातील मधली आदिमाया,

उजव्या बाजूस गणपती, ब्रह्मदेव व डाव्या बाजूस शंकर व विष्णुचे मुख आहे. देवीच्या गाभाऱ्यात बाराहातांचा विद्याधरगणेश आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची, मांडी घातलेली, पंचधातूची, अर्धनरनारीश्वर स्वरूपाची आहे. भारतात अशी ही एकमेव मूर्ती आहे असे म्हणतात. या देवळात वेदान्तावरील अंदाजे १,००० ग्रंथ असलेली वेद पाठशाळा होती. येथे वैशाख शुद्ध सप्तमीला व नवरात्रात यात्रा भरते. देवळासमोर दीपमाळ असून जवळच छोट्याशा गाभाऱ्यात प्रवळाचा गणपती आहे. त्याची जयंती वैशाख शुद्ध पौर्णिमेला साजरी करतात. येथे अदमासे २२५ वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर असून ते शिल्पकलेचा चांगला नमुना आहे. त्यातील खांबावरील कोरीव काम उत्कृष्ट आहे. गावाच्या उत्तरेस प्रसिद्ध मुसलमान पीर दाऊद मलिकचा दर्गा आहे. येथे गाव तलाव, विष्णु तलाव व राम तलाब है पुरातन काळातील तलाव आहेत. त्यातील पाण्याच्या सोयीमुळे गोरेगाव व जवळच्या वाकी आणि हुर्डी गावांमध्ये मराठा फौजा मुक्काम करीत असत. त्यामुळे गावात देसाई, पोतदार वगैरे अधिकाऱ्यांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. प्रसिद्ध मराठी साहित्यिक वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालय बांधलेले आहे.


पनवेल

     पनवेल : (तालुका मुख्यालय, १८० ५८' उ., ७३० १२' पू.) पनवेल शहर मुंबईहून ठाणे मार्गे ६८ कि. मी. व खाडी पूल मार्गे ४७ कि. मी. अंतरावर मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर आहे. शहास ऐतिहासिक महत्त्व असून पूर्वी बऱ्यापैकी बंदर होते. तथापि आता फक्त भरतीच्या वेळी शिडाच्या लहान होड्या पनवेलपर्यंत जातात. सन १९६५ मध्ये पनवेल लोहमागनि दिवा मार्गे प्रथम मुंबईला जोडले गेले व १९८९ मध्ये लोहमार्ग रोह्यापर्यंत वाढविण्यात आला. रस्ते व रेल्वे वाहतुकीमुळे बंदराचे महत्त्व कमी होऊन येथील मोठे तलाव, बंदरावरील धक्का, बैल-गाडधांची जाके बनविण्याचा उद्योग हेच बंदराच्या प्राचीन व्यापाराचे अवशेष उरले आहेत.
         सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व यादव वंशातील राजांच्या राजवटी उत्तर कोकणावर होऊन गेल्या. पनवेल चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी गुजरातच्या सुलतानाच्या अमलाखाली होते. मिरत-इ-अहमबी अनुसार गुजरातच्या सुलतानास पनवेल बंदरापासून महसूल प्राप्त होत असे. इ. स. १५७० मध्ये युरोपियनांचे व्यापारी बंदर असा पनवेलचा उल्लेख आढळतो. सन १६३७ मध्ये पनवेलचा भाग आदिलखानाच्या कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी कल्याण प्रांत जिंकून पनवेल घेतले असे दिसते. सन १६७३ नंतर सीदीचा पाडाव करण्यास शिवाजीने आपल्या आरमाराचे सरदार दर्यासारंग व दौलतखान यांना पनवेलला पाठविले होते. येथे शिवाजीचे लहानसे आरमारी ठाणे होते असे ज्ञानकोशकार केतकरांनी नमूद केलेले आहे. काही काळ पनवेलचा राज्यकारभार कर्नाळा किल्ल्यावरून चालत असावा. वाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण नियतकालिकातील एका लेखावरून दिसते की, इंग्रजी अमलाचे प्रारंभी मुंबई शहराचे दक्षिणेशी दळणवळण पनवेलमार्गेच चालत असे. पेशवाईच्या अखेरीस इंग्रज व मराठे यांच्या राज्याच्या सीमेवर हे गाव असल्याने त्यांच्यात येथे वारंवार झटापटी होत असत. सन १७७९ मध्ये राघोबा दादाला पाठिंबा देण्यासाठी कर्नल इगरटनच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजेची एक तुकडी मुंबईहून पनवेलला गेली. पुढे या तुकडीचा कार्ले येथे मराठधांबरोबर झालेल्या चकमकीत पराभव होऊन कॅप्टन स्टुअर्ट ठार झाला. दोन वर्षांनी १७८१ मध्ये जनरल गोडार्डने पनवेलहून रसद आणण्यासाठी कर्नल ब्राऊनला पाठविले. परंतु त्याचा परशुरामभाऊ पटवर्धनाने पनवेलला
          पनवेलला पराभव करून जनरल गोडार्डचा पुढील डाव उधळून लावला. सन १८०४ मध्ये लॉर्ड व्हॅलेंटियाने पनवेलचे वर्णन अतिशय गजबजलेले शहर असे केले आहे. सन १८१७ मध्ये येथे ७०० पेंढाऱ्यांशी इंग्रजांची लढाई झाली. सन १८१८ मध्ये कर्नाळा इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा पनवेलमध्ये थोडेफार इंग्रज सैन्य ठेवण्यात आले होते. नाना फडणिसाच्या एका पत्नीचे वास्तव्य इंग्रजांच्या आश्रयाने काही दिवस पनवेलला होते.
      वसईचा वेढा उठवून चिमाजी अप्पा परतत असता त्याचा तळ पनवेलला होता. सन १८१० मध्ये सर जेम्स मॅकिन्टोशने पनवेलचा उल्लेख खाडीच्या काठावर वसलेले अरण्यमय खेडे असा केलेला आहे. सन १८१८ मध्ये येथे ज्या भागात इंग्रजी फौजेची तुकडी ठेवण्यात आली होती त्या भागास आजही कॅम्प असे संबोधण्यात येते. सन १९३२० मध्ये पनवेल एक व्यापारी ठिकाण असल्याचा उल्लेख आढळतो. सन १८२५ मध्ये विशप हेबर याने पनवेलला मंदिर, दर्गा, प्रवाशांसाठी विश्रामगृह, एक पोर्तुगीज व एक पारशी पांयशाळा असून ते निसर्गरम्य ठिकाण असल्याचे नमूद केले आहे. सन १८६२ मध्ये ते गजबजलेले शहर होते.
  दिनांक १ सप्टेंवर १८५२ रोजी नगरपालिकेची स्थापना झाली. पनवेल हे नाव केव्हा पडले याबाबत निश्चित माहिती मिळत नसली तरी पुरातनकाळी नाग लोकांचे राज्य असताना

*** महाराष्ट्र स्टेट गॅझेटिअर हिस्टरी मेडिव्हल पिरियड, १९७२, पृ. १५१.

या शहराचे नाव पवनपल्ली होते. यादवांनी हा भाग जिंकला तेव्हा पष्यवेला म्हणजे समुद्रकाठचे व्यापारी गाव असे नाव दिले असावे व त्याचा अपभ्रंश पनवेल झाला असावा, असा अंदाज एका अभ्यासकाने केला आहे. सन १६३७ मध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या ताब्यात पनवेलचा भाग होता तेव्हा या बंदरास बाबल अथवा पावळ म्हणत. 
पनवेलमध्ये अनेक मंदिरे, दर्गे, मशीदी व एक बेने इश्यायली सायनॅगॉग आहे. विरूपाक्ष महादेव, बल्लाळेश्वर महादेव व राम मंदिर (दास मारुती मंदिर) ही देवळे जुनी असून ती वाळाजी कृष्ण वापट यांनी बांधलेली आहेत. विरूपाक्ष मंदिर १८७५ च्या सुमारास बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धार १८८४ मध्ये विठोवा खंडाप्पा गुळवे यांनी केला. येथे श्रावणात उत्सव होतो व भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस देवाची पालखी निघते. राम मंदिरातील रामाच्या समोरील दास मारुतीच्या मूर्तीची स्थापना दत्तात्रय गणेश भिडे यांनी केली. बल्लाळेश्वर व राम मंदिरात दरवर्षी महाशिवरात्न, रामनवमी व हनुमान जयंती उत्सव साजरे केले जातात. शहराच्या वायव्येस देवाळे तळयाजवळील हजरत पीर करमअलीशाह च्युस्टी वानवाचा जुना दर्गा त्याचा मुलगा खाजा मोअज्जमशाह याने १७४७ मध्ये (११६६ हिजरी) बांधला. दर्याच्या उत्तरे-कडील भितीचे आतील बाजूस युसुफ नावाच्या कवीने पक्षियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाचा अर्थ "स्वर्गसुख देणारा हा दर्गा ईश्वरभक्त पैगंबरवासी करमअलीशाह याच्याकरिता मुअज्जिज शाह याने बांधला" असा आहे. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने दर्गा नमुनेदार आहे. पूर्वी दर्त्याच्या चारही बाजूला तीन तीन कमानी होत्या. त्या १९०७ मध्ये पाहून १९११ मध्ये पाच पाच बांधल्या. दर्यामध्ये एकूण आठ थडगी आहेत. येथे दरवर्षी माघ महिन्यात मोठा उरूस भरतो. येथील खाडीत १६८२ मध्ये छत्रपती संभाजीने सीदीच्या स्वाऱ्यांपासून बचावासाठी बांधलेल्या लहान किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
किल्ल्याचे अवशेष दिसतात. जुम्मा मशीद अदमासे ३६० वर्षांपूर्वी बांधलेली असून तिचे नाव पूर्वी सर्फइतमाँम मसजिदूल मावा होते.
गावातील वडाळे तळे बाळाजीपंत बापट, इस्रायल (विश्राळे) तळे मुंबईचा व्यापारी करमसी हंसराज, कृष्णाळे तलाव कृष्णावाई वापट, देवाळे तळे नाखोदे रोगे व बाळाजी वापट यांनी वांधलेले आहेत. शिवाय लेंडाळे व दुदोळे तलाव होते. पनवेलमधील चार धर्मशाळांपैकी रामजीची धर्मशाळा सकलतसिंग खोडेसिंग जमादार यांनी, वडाळा तलावावरील धर्मशाळा बाळाजीपंत बापट यांनी, वाझे मोहल्ल्यातील धर्मशाळा बळवंत गणेश ओझे यांनी, तर इद्यायल (विश्वाळे) तलावाजवळील धर्मशाळा करमसी हंसराज यांनी बांधली आहे. सन १८७२ मध्ये स्थापन झालेला धूतपापेश्वर आयुर्वेदीय औषधी कारखाना सर्वात जुना आहे. १२८



पूर्वी हा ‘दगड’ रस्त्याच्या चिरणीत (गटारात) पडलेला होता. आज तो अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभा आहे. []

  1.  सखाराम, शंकर. एक हजार वर्षांचा झाला मराठीतील आद्य शिलालेख.
  2.  तुळपुळे, शं.गो. प्राचीन मराठी कोरीव लेख. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
  3.  तुळपुळे, शं.गो. मराठी वाड्मयाचा इतिहास. १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
  4.  "उत्सव मायबोलीचा - दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे". ३ जुलै इ.स. २०१२ रोजी पाहिले.
अभिजीत बेल्हेकर. "अक्षी".





 
 अक्षीचा शिलालेख – रायगड जिह्यातील अलिबागमध्ये अक्षी हे गाव असून या गावात मराठीतील पहिला शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखावर शके 934 म्हणजेच इसवी सन 1012 असा उल्लेख करण्यात आला आहे. शिलाहार वंशीय राजा पहिला केसी देवराय याचा प्रधान भइर्जु सेणुई याच्या काळात हा शिलालेख कोरण्यात आला असून देवीकरिता नऊ कुवली धान्य अर्पण केल्याचा उल्लेख आढळून येतो. ही शिळा अक्षी ग्रामपंचायतीशेजारी उभी करून ठेवेली आहे.
 
 
 
 
 



नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल.

यासाठी आपण नागोठणे या गावाचे उदाहरण घेऊ, भौगोलिक दृष्ट्या नागोठण्याचे स्थान महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यात येते. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मात्र नागोठणे हे उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसले आहे. नागोठण्याच्या पश्चिमेकडून अंबा नदी वाहते. अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस ४८ कि.मी. वाहत जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहते. नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्‍याचा तळ रुंद होतोत व नदी सपाट माथा असलेल्या डोंगरांगांमधून धरमतर खाडीला मिळते यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे. अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडिल भाग. पुर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत ३५ कि.मि. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पुर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस १८ कि.मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुदं होते. धरमतपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो. नागोठण्या पासून अंबा नदीस एकही मोठी नदी येऊन मिळत नाही.

परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्य पुर्वेस जि डोंगररांग आहे तिला महालमिरा डोंगर रांग या नावाने ओळखले जाते. आणि नागोठण्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगररांगेस सुकेळी डोंगररांग म्हणुन ओळखले जाते. या डोंगरांगेत सुरगड, अवचित गड आणि सागरगड यासारखे तिन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत. याशिवाय नागोठण्याच्या पुर्वेस नागोठणे गावास लागुनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला पुर्व नागोठणे डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तिन बांजूनी डोंगररांगानी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.

सद्यस्थितीस मुंबई गोवा महामार्गावरिल एक शहरवजा गाव असलेल्या या गावास हजारो वर्षांचा इतिहास आहे हे सांगुन कोणास खरे वाटणार नाही. खर तर नागोठण्याच्या नावातच फार मोठा इतिहास दडला आहे जो महाभारत काळापर्यंत जाऊन पोहोचतो. पुर्व महाभारतातल्या खांडवकांड नामक घटनेनंतर उत्तरेत राहणार्‍या नागलोकांमध्ये आणि पांडवांमध्ये जे वैर झाले त्याची परिणीती उत्तर महाभारत काळातल्या नागसत्र यज्ञामध्ये झाली, या भयानक युद्धात अनेक नागकुळांचा संहार झाला जिवंत राहिलेली नागकुळे दक्षिणेकडे सरकत जाऊन दक्षिणेकडिल अनेक भागांत स्थिरावली. यातिल काही कुळे कोकणात सुद्धा दाखल झाली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल (पन्नगपल्ली), नागोठणे (नागस्थान), नागाव (नागग्राम) अशी ठिकाणे वसवून तेथे राहिली. रायगड जिल्ह्यात अनेक गावांत सापडणार्‍या नागमुर्त्या आणि गांवामधले नागदर्शक नाम हे नागवंशियांच्या रायगड जिल्ह्यातल्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बहुदा नागलोकांच्या जेथे जेथे वस्त्या झाल्या ति ठिकाणे समुद्रतिरी, बंदरावर अथवा खाडीच्या मुखाशी दिसून येतात यावरुन नागलोक हे निष्णात दर्यावर्दी होते असाही सिद्धांत लावता येतो कारण अगदी बुद्धकाळातही नागलोकांची कोकणपट्ट्यात आरमारे होती असे उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळुन येतात याचा अर्थ नागलोकांनीच कोकण पट्टीतली पहिली आरमारे स्थापन केली होती असे ठामपणे म्हणता येईल आणि यापैकीच एक आरमार नागोठणे येथेही स्थापन झाले असावे.

नागोठणे गावास खुप जुना आरमारी इतिहास आहे नागलोकांनी येथे आरमाराचा पाया रचला आणि सातवाहन, मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, गुजरात सुलतान, निजामशहा, आदिलशहा, मराठे, आंग्रे, इंग्रज यांनी या आरमाराच्या इतिहासाच्या इमारतीची पक्की बांधणी करुन उत्कर्षाचे कळस चढवले. मौर्य सातवाहन काळात नागोठण्याचे व्यापारी महत्त्व खुपच वाढले इ.स्.पुर्व २२५ मध्ये चौल्-रेवदंडा, नागोठणे, महाड, मुरुड, गोरेगाव, पेण, पनवेल, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्याद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्‍या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हिणी सारख्या घाटाटून नागोठणे बंदरात आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे आणि देशभरातला माल याच ठिकाणाहून परदेशात निर्यात होत असे. येथुन येणार्‍या व्यापार्‍यांच्या निवासासाठी नागोठणे मार्गे मावळात जाणार्‍या याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खडसांबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरुन काढण्यात आल्या. वरिल सर्व लेण्यांवरुन असे दिसून येते कि इ.स्.पुर्व १०० ते इ.स.३०० पर्यं बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता. नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचिन काळी सह्याद्रीच्या घाटांमधुन चालणार्‍या व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरुन रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्त्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते नागोठणे, नागोठणे ते अष्टम आणि अष्टम ते चौल हा असावा.  इ.स. सनाच्या दुसर्‍या शतकात भारतात आलेल्या भुगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिप्ल्स मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ.स.७० ते ८० च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तिळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी,शिंपल्यांचे दागिने, चांदिचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे. मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही नागोठण्याचे व्यापारी महत्त्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाच्या ताम्रपटात त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्टींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी  यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तिन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. नागोठण्याच्या अंबा नदीवर दिसणारा जो पुल आहे तो याच प्रमुख व्यापारी मार्गावर विजयनगर साम्राज्याच्या राजा अलिया राम राया याच्या काळात बांधण्यात आला होता यावरुन विजय नगर साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती हि महत्त्वाची माहिती कळते. याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे नागोठण्यातून देशावर जाणार्‍या मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतुक सुलभ होण्याकरिता १५८० साली काजि अलाऊद्दीनने अंबा नदीवरिल याच पुलाचा जिर्णोद्धार केला होत पुढे मराठे तसेच इंग्रजांच्या काळातही या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती झाल्याचे उल्लेख मिळतात.

नागोठण्यास फक्त आरमारी इतिहासच आहे असे नाही तर वांशिक, धार्मिक, औद्योगिक, भौगोलिक, भाषिक, व्यापारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागोठण्यास भुतकाळात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण वांशिक किंवा भाषिक इतिहासाबद्दल पहायचे झाले तर नागोठण्यात पाच हजार वर्षांपुर्वीची प्राचिन अशी नागवंशिय संस्कृती स्थिरावली होती. याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मुळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती हि शैवसंस्कृतीमध्ये विलिन झाली असावी. एका वेगळ्या विचारप्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करतां हे लोक मूळचे डोंगरदर्‍यांतले रहिवाशी असावेत, कारण नग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो त्यामुळे  नाग लोक मूळचे डोंगराळ मुलखांतील रहिवाशी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावे. जर यांचीं समुद्रांतरीं द्वीपें (उदा नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टण) होतीं, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळीं असला पाहिजे. नागांचा लोक हे पाताळातले रहिआशी समजण्याचा संस्कृतांत संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवाशी असून, ते पुढें वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाची काहितरी संबध असावा. महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक जमात आहे. हे झाले वांशिक महत्त्व आणि भाषिक महत्त्वाचा विचार करता महाराष्ट्राच्या भाषिक जडणघडणीत नागोठण्याच्या नागवंशी संस्कृतीचा नक्कीच सहभाग होता कारण प्रथम नागवंशिय लोकांनी येथे वस्ती केल्यावर इ.स्.पुर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व महाराष्ट्रिक या तिन संघाचे लोक उदयास आले व या चारही संस्कृतींचा मिलाप होऊन महारट्ट अर्थात मराठी वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रिक त्यांची महाराष्ट्रि भाषा बोलत असत. याच महाराष्ट्रिक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.

वरिल अनेक घटनांवरुन नागोठण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते मात्र इतकेच नव्हे तर नागोठणे हे गाव अनेक वेळा वेगवेगळ्या साम्राज्यांच्या संकरसिमेवरिल संवेदनशिल गाव म्हणुन प्रसिद्ध राहिले आहे. सन १५४२ ते १५६५ हा काळ विजय नगर साम्राज्याचे सम्राट अलिया राम राय यांच्या कारकिर्दीचा काळ या काळात विजयनगर या संपन्न हिंदू साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती. आजही तज्ञ हे मानत असले कि विजयनगर साम्राज्य रत्नागिरी पर्यंत मर्यादित होते तरी रायगड जिल्ह्यात असलेल्या तळे गावातल्या एका मंदिरात विजय नगर साम्राज्य काळातला एक तेलुगु भाषेतला शिलालेख आजही पहावयास मिळतो याशिवाय नागोठणे गावातला अंबा नदीवरिल जो मजबुत पुल आहे तो सुद्धा विजय नगर साम्राज्याच्या काळातच तालिकोटच्या लढाईच्या आधी राम रायाच्या काळात बांधण्यात आला होता कारण तसा प्राकृत भाषेतला शिलालेख या परिसरात दुर्लक्षित स्थितीत पडलेला होता मात्र भारतीयांच्या इतिहासाविषयीच्या उदासिनतेमुळे हा शिलालेख यानंतर अंबा नदीस आलेल्या वारंवार पुरामुळे आता दिसूनही येत नाही. याच पुलाचा जिर्णोद्धार पुढे १५८० साली गुजरातच्या सुलतान अथवा निजामशाही काळात झाला यावेळी जिर्णोद्धार करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम नष्ट करुन त्याऐवजी नविन पद्धतीचे बांधकाम करण्यात आले तसेच पुलावर नविन शिलालेख बसवण्यात आला ज्यावर येथिल काजी अल्लाऊद्दीन याचे नाव दिसून येत होते मात्र दुदैवाने हा शिलालेख सुद्धा आता दिसून येत नाही. सन १४९८ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडे महाराष्ट्रातिल साष्टी, मुंबई,ठाणे वसई पासून नागोठण्याचा प्रदेश होता व उर्वरित महाराष्ट्रात बहामनी राज्य होते. नागोठण्यास त्या काळात गुजरातच्या दक्षिण टोकाकडिल शहर म्हणुन सुद्धा ओळखण्यात येत होते. याच काळी चौलमध्ये पोर्तुगिजांनी शिरकाव केला होता या दोन्ही सत्तांच्या संकरस्थळी नागोठणे असल्याने येथे अनेकदा पोर्तुगिज विरुद्ध सुलतान यांची युद्धे झाली होती. गुजरातचा सुलतान मेहमुद बेगडा याने नागोठण्यात तळ ठोकून चौलवर बरेच हल्ले केले होते. १५२९ साली हेक्टर दे सिल्व्हेरिया ने नागोठण्यावर हल्ला करुन जाळपोळ केली त्याला नागोठण्यातिल सेनापतीने प्रत्युत्तर दिले होते.

मक्का येथून येणार्‍या काही भाविकांच्या जहाजाला लुटल्याने पोर्तुगिजांविरुद्ध गुजरात सुलतान, निजामशाह आणि आदिलशहा अशा तिन सत्ता एकत्र येऊन युद्ध पुकारले होते या काळी नागोठण्यामार्गे सुकेळी खिंडीतून रेवदंडा खाडीत मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ तसेच तोफखाने इत्यादींची वाहतुक झाली होती आणि हि वाहतुक सुकर व्हावी यासाठी नागोठण्याच्या विजयनगर कालिन पुलाचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.

सन १६३६ साली मुघलांनी निजामशाही नष्ट करुन नागोठ्णे आदिलशहाच्या ताब्यात दिले याच काळी पुण्यात शिवाजी महाराजांचा उदय झाला होता. सन १६४३ च्या सुमारास आदिलशाही सत्ता कोकणातली सर्वश्रेष्ट सत्ता होती त्याकाळि नागोठणे विभाग हा सुभे कल्याणच्या अख्यतारित येत असे. सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत् मुल्ला अहमदकडे तर दुसरा सुभा नागोठण्यापासून महाडपर्यंत जंजिर्‍याच्या सिद्दीकडे होता. सन १६५७ साली शिवाजी महाराजांनि कल्याण सुभ्यावर हल्ला करुन हा सुभा स्वराज्यात आणला अशा तर्‍हेने नागोठणे शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. इथे शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरोधात मोहिम उघडली असताना मुघल सुद्धा मराठ्यांवर हल्ले करण्याच्या तयारित होते आणि या कामासाठी औरंगजेब याने त्याचा मामा शाईस्ताखान यास दख्खनवर पाठवले आणि त्याने पुण्यात तळ मांडला. त्याने पुण्यातून कल्याण सुभ्यावर हल्ला करुन कल्याण स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र नागोठणे त्याच्या ताब्यात येऊ शकले नाही. नागोठण्यावरिल मोहिम फत्ते करण्यासाठी त्याने करतलब खान उझबेक याची निवड केली. त्याच्या दिमतीला बलाढ्य सैन्य व अनेक सरदार तसेच देशमुख देऊन नागोठण्यावर कुच करण्यास सांगितले. या खानाने लोणावळ्यावरुन अंबा नदीचा जो उगम आहे ति वाट कोकणात उतरण्यासाठी पकडली मात्र शिवाजी महाराजांना या कटाची अगोदरच माहिती लागून ते स्वतः सैन्यासह या परिसरात दाखल झाले होते. दाट रानात जागोजागी  मराठा सैन्य लपुन खानाच्या सैन्याची वाट पहात होते. मेंढराचा कळप जसा वाघाच्या तावडित येतो तसा कारतालब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीत येऊन पोहोचला होता. महाराजांना दया येऊन त्यांनी आपला वकिल खानाकडे पाठवला मात्र खानाने उद्धट वर्तन करुन नागोठणे आपण ताब्यात घेणारच अशि दर्पोक्ती केल्याने महाराजांनि सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले. मराठे सैन्य मुघलांवर तुटून पडले सैन्याची धुळधाण उडवली व खानास अक्षरशः जबरी खंडणी देऊन माफी मागुन पुण्यास पळ काढावा लागला. या लढाईस उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई म्हणुन ओळखण्यात येते.

महाराजांना या काळात जंजिर्‍याच्या सिद्दीचा सुद्धा सामना करावा लागत होता. पुर्वी आदिलशहा व नंतर मुघलांचा मांडलिक झालेल्या या सिद्दीचे राज्य मर्यादित असले तरी नागोठण्याच्या हद्दीस लागून होते. नागोठण्यास शिवाजी महाराजांचा जहाज बांधणीचा कारखाना असून ते मराठा राज्यातले सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असल्याने सिद्दी बर्‍याच वेळा आपले सैन्य पाठवून नागोठण्यात जाळपोळ करत असे आणि अनावश्यक रक्तपात करुन माणसे, मुले व स्त्रिया गुलाम बनवून मुंबईस नेत असे. सिद्दी संबळने १६७३ मध्ये सुद्धा असे कृत्य केले तेव्हा महाराजांनी रायगड वरुन १०० सैनिक धाडून सिद्दीच्या सैन्याला चकित करुन कापुन काढले. १६७७ मध्ये सिद्दी कासिम परत एकदा नागोठण्यास आला आणि छापे टाकून येथिल रहिवाशांना भंगिकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले तेव्हा महाराजांनि या घटनेचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह सिद्दीवर कुच करायला सांगितले. पुढे नागोठण्याचे सिद्दी व इंग्रजांपासून रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व दौलत खान यांना खाडीसमोरील खांदेरी किल्यावर बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे करताना मराठ्यांना इंग्रजांच्या विरोधाचा सामना करायला लागला. इंग्रजांनी कॅप्टन गेप व केगविन यांना मराठ्यांवर हल्ला करण्यास जहाजे व कुमक सोबत देऊन खांदेरीवर धाडले मात्र मराठ्यांच्या हल्ल्यात गेप ठार झाला व त्याचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. केगविनने मराठा आरमारावर हल्ला चढवला आणि रिव्हेंज हे जहाज घेऊन मराठा गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला. दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठण्यातून परत इंग्रजांवर हल्ला केला व इंग्रजांचे नुकसान केले. पुढे इंग्रजांना नाईलाजाने मराठ्यांशी तह करावा लागला ज्यामधिल कलमे स्वतः शिवाजी महाराजांनी तयार केली होती यामध्ये एका कलमात नागोठणे व पेण परिसरात मराठ्यांच्या शत्रूला प्रवेश देऊ नये आणि सिद्दीने नागोठणे येथून ज्या नागरिकांना, स्त्रियांना व मुलांना धरुन नेले आहे त्यांची ताबडतोब सुटक करण्यात यावी अशी कलमे होती.

संभाजी महाराजांच्या काळातही नागोठण्याचे राजकिय महत्त्व कायम होते. या काळातही सिद्दीचे नागोठण्यावरिल हल्ले थांबले नव्हते. सिद्दीने लहान लहान नौका नागोठण्यास पाठवून कैद्यांना गुलाम बनवून मुंबईस नेल्याचे कृत्य संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनि दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवले होते. १६८१ मध्ये परत एकदा सिद्दीने नागोठण्यात शिरुन जाळपोळ केल्यावर संभाजी महाराजांनी जंजिराच हस्तगत करुन सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले व यानंतर संभाजी महाराजांच्या सर्व जंजिरा मोहिमा सिद्दीने नागोठण्यावर जे अत्याचार केले त्याचा बदला म्हणुनच काढल्या असल्याचे लक्षात घ्यावयास हवे. जंजिरा मोहिमेच्या काळात मुघलांनि हसन अलिखानास मोठे सैन्य देऊन कोकणात मराठ्यांविरुद्ध पाठवुन दिले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून कल्याण कडे जावे लागले मात्र जाताना त्यांनी नागोठण्याच्या रक्षणासाठी १५००० सैन्याची कुमक तैनात करुन ठेवली होती.

शाहू महाराजांच्या काळात भोसले घराण्यात यादवी सुरु झाली या यादवी मध्ये ताराराणींच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी आवाहन करण्यास शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कोकणात धाडले होते. बाळाजी विश्वनाथ हे अवचितगडावरुन नागोठणे प्रांतात येऊन त्यांनि कान्होजी आंग्रे यांची भेट घेतली व आपल्या पक्षात घेतले तसेच  शाहू महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब देऊन संपुर्ण कोकणपट्टीची जबाबदारी सोपवली.

पेशवे काळात नागोठण्यामध्ये नाण्यांची टांकसाळ तसेच तोफ गोळे बनवण्याच्या कारखान्यांची निर्मिती झाली होती. याशिवाज नारायणराव पेशवा खुनाच्या कटात सामिल असलेले रघुनाथराव पेशवे गटातले एक सदस्य सरदार आबाजी महादेव हे नागोठण्याचे नागरिक होते. या गुन्ह्याबद्दल त्यांना नागोठण्यातून अटक करुन कुटूंबियांसह सुरगड किल्यावर अटकेत ठेवण्यात आले होते.

सन १७९६ नंतर आंग्रे घराण्यात जि यादवी सुरु झाली त्यामध्ये सुद्धा नागोठण्याचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता रघोजी आंग्रे मरण पावल्यावर त्यांचे पुत्र मानाजी, कान्होजी व सावत्र पुत्र  जयसिंग यांच्या गृहकलह निर्माण झाल्यावर जयसिंगास अटक करुन त्याच्या परिवारास नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र जयसिंग आंग्रेची पत्नी सकवारबाई हिने नजरकैदेतून सुटका करुन नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेऊन तेथून तिने बंडाचा झेंडा फडकविला आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली कालांतराने जयसिंगाने आपली सुटका करुन घेऊन तो सुद्धा पुण्यास पेशव्यांकडे गेला.

पुढे आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे यांनी जयसिंगाच्या मदतीसाठी अलिबाग येथे कुच केले ग्व्हाल्हेरच्या दौलत राव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावाच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबाग ला आल्यावर सैन्याने हिराकोटला वेढा दिला पण जयसिंग गुपचुप निसटून रात्री नदी पोहत कुलाब्यास आला. बाबुराव यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने नवर्‍याच्या मदतिस जाऊन खांदेरी किल्ला काबिज केला. इ.स.१७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली परत एकदा बाबुरावाच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजीच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन कैदी बनवण्यात आले. यानंतर बाजिराव दुसरा याने बाबुराव यांना सरखेलपद दिले.
नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर
जानेवारी १८१८ मध्ये कर्नल प्रोथर ने ३८० इंग्लिश आणि ८०० स्थानिक सैनिकांच्या सहाय्याने अवचितगड, नागोठणे, सोनगड, पाली हि ठिकाणे ताब्यात घेतली. सन १८१८ ते १८४० च्या दरम्यान ब्रिटीश सत्ता आणि आंग्रे, पंतसचिव यांच्यात गावे ताब्यात घेण्यावरुन देवाणघेवाण झाली. यानंतर सांक्षी, राजपुरी व रायगड उपविभाग ब्रिटीश सत्तेखालील रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यात आले. सन १८३० साली ठाण्याला जिल्हा केल्यामुळे हे सर्व उपविभाग ठाण्यास जोडण्यात आले. ब्रिटीशांच्या आधि हा परिसर आंग्रे आणि पंतसचिव यांच्यामध्ये विभागला होता. नागोठणे विभागातली खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या ताब्यात होती. सन १८३० मध्ये नागोठण्यातला अर्धा भाग ब्रिटीशांना देऊन त्याबदली भोरकरांनी अवचितगडचा निम्मा भाग स्वतःकडे घेतला. पुढे १८३३ मध्ये ब्रिटीशांनी आंग्रेंकडून नागोठणे भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा अर्धा भाग आंग्य्रांना दिला. रघोजी आंग्रे यांचा मुलगा दुसरा कान्होजी याच्या मृत्यूनंतर आंग्र्यांच्या गादीस वारस नसल्याने इंग्रजांनी १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा करुन ब्रिटीश राज्यात विलीन केले आणि ब्रिटीश कायदे लागू झाले. १८४० साली रामोशी स्वातंत्र्य सैनिकांचा एक संघ भोर संस्थानाहून घाटावरुन खालि उतरली आणि त्यांनी  ब्रिटीशांच्या ताब्यातल्या पाली आणि आणि नागोठणे गावावर हल्ला चढवला आणि ति गावे जाळून टाकली. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीशांनि नेटीव्ह लोकांच्या १५ व्या रेजिमेंटला पाचारण केले यामध्ये अनेक रामोशी पकडले गेले किंवा मारले गेले. ऑक्टोबर १८४४ साली तुंगारतन, कर्नाळा, वाक्रुळ, हवेली, अंतोरा हि ठिकाणे ठाणे जिल्ह्यात घेऊन नागोठण्याचा दर्जा कमी केला गेला आणि नागोठण्याचा साक्षी प्रांतात समावेश केला. १८५२ साली इंग्रजांनी कुलाबा एजन्सी रद्द केली आणि या एजन्सी मधली खांदेरी, रेवदंडा, सांक्षी, राजपुरी, रायगड उपविभाग आणि नागोठणे, तळा, निजामपुर, गोरेगाव, बिरवाडी आणि पोलादपुर हे लहान विभाग एकत्र करुन कुलाबा उपजिल्हा तयार केला. पुणे सार्वजनिक सभेने सुरु केलेल्या १८५७-१८७६ च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहिम काढली. १८५६ साली भोर संस्थानाने नागोठण्यात पहिली देशी शाळ उघडण्यात आली. हि रायगड जिल्ह्यातली महाड नंतर उघडलेली दुसरी देशी शाळा होती. डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीने पनवेल, पेण, नागोठणे, गोरेगाव व रेवदंडा येथे शेतकर्‍यांच्या सभा आयोजित करुन दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. सन १८८२ साली तत्कालिन जिल्ह्यातली अलिबाग, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि महाड उपविभागत १०६४ गावांचा समावेश होता. सन १९२१-१९३१ च्या दरम्याने नागोठणे महाल खालसा करण्यात आले.

ब्रिटीशकाळातसुद्धा नागोठणे गावाचे पेठ व महालाचे स्वरुप कायम होते आणि अनेक सरकारी कार्यालये आणि कचेर्‍या तिथे स्थापन झाल्या ज्या आजही येथे पहावयास मिळतात . एक जुन ते ३१ ऑगस्ट हे पावसाचे तिन महिने सोडले तर नागोठणे बंदर त्याकाळि चोविस तास गजबजलेले असे. गोरेगाव, इंदापुर, कोलाड, खांब, पाली सुधागड ते अगदी महाबळेश्वरपर्यंतचे मुंबईत जाणारे प्रवासी नागोठणे बंदरात येत. या प्रवाशांचा नागोठणे बंदराकडे होणारा प्रवास बैलगाडीतून असे आणि जिकडून तिकडून चाळिस पन्नाच कि.मी. बैलगाडीतून येऊनही बोट चुकली म्हणजे दुसर्‍या दिवशी भरती ओहोटीची वेळ पाहून नागोठ्णे बंदरावर बांधलेल्या धर्मशाळ्त प्रवाशांना मुक्काम करावा लागत असे.त्यामुळे परिसरात जिकडे तिकडे बैलगाड्या सोडलेल्या असत व सोडलेले बौल गळ्यातल्या घुंगरांना मंजुळ झटका देऊन रवंथ करताना दिसत. सायंकाळी प्रवाशांच्य पेटलेल्या चुलीमुळे बंदरावर ठिक ठिकाणी चुलींचा उजेड दिसत असे आणि चुलीवर भाजल्या जाणार्‍या भाकर्‍या किंवा घमघमणार्‍या सुक्या मासळीच्या कालवणारे हा परिसर धुंद होत असे. १९१८ च्या दशकाच्या अखेरपर्यंत नागोठणे-धरमतर्-मुंबई या जलवाहतुकिच्या मार्गावरुन तांदुळ, मिठ, मासे, जंगली लाकुड, तांब्या पितळेची भांडी या मालाची निर्यात होत असे. १९१४ ते १५ या दरम्याने धरमतर ते नागोठणे स्टीम बोट सेवा चालत असे मात्र पुढे बंदर गाळात सापडल्याने हि वाहतुक बंद पडली. तरी मुंबईहून महाबळेश्वरपर्यंत प्रवासी नागोठणे बंदरात उतरुन प्रवास करत असत. आजुबाजुच्या डोंगर माथ्यावरिल बेछुट आणि अविरत जंगलतोड यामुळे कोकणातील एकेकाळी हिरवेगार असणारे डोंगर आज उघडे बोडके दिसतात. हि परिस्थिती सुधागड तालुक्यातल्या अंबा नदीच्या उगमापासून नागोठण्यापर्यंत कायम आहे. जंगलतोडीमुळे डोंगरावरिल माती व जमिन जोरदार पावसामुळे सुटून नदीत आली आणि खाडीपर्यंत सरकली त्यामुळे गाळ साचून बोट सेवा बंद पडली. त्यामुळे गेली ५००० वर्षे उत्कर्षाच्या शिखरावर असलेले हे ऐतिहासिक नागोठणे बंदर काळाच्या ओघात नाहिसे झाले आणि नागोठण्याचे व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्वही त्याबरोबर संपुष्टात आले.

नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाकडे पाहिले तर अभिमानाने उर दाटून येतो मात्र इतिहासाचे जतन करण्यामध्ये जि उदासिनता आपण दाखवतो ति नक्कीच दुर्दैवी आहे. नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन होण्यासाठी लोकजागृती होण्याची नितांत गरज आहे यासाठी शहराच्या इतिहासाचे संकलन करुन नागोठण्याच पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, गावातल्या सोळाव्या शतकातल्या ऐतिहासिक पुलाचे तसेच इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे रक्षण करणे, गावात पुरातत्विय दृष्ट्या उत्खनन करुन नाहिशे झालेले शिलालेख अथवा इतर ऐतिहासिक पुरावे शोधून काढणे, गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे आहे अन्यथा नागोठण्याचा वैभवशाली इतिहास इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. कोकणपट्ट्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या अजगराने ठाणे (स्थानक), मुंबई (पुरी), साष्टी, वसई (विषय), नालासोपारा (शुर्पारक), पनवेल (पन्नगपल्ली) अशी अनेक ऐतिहासिक शहरे एकामागुन एक अशाप्रकारे गिळंकृत केली आहेत कि आज तिथे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे कठिण झाले आहे. उद्या नागोठण्याची स्थिती सुद्धा अशीच होण्याआधी या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे अन्यथा शहरीकरणाचा अजगर या ऐतिहासिक शहरास

अशा रितीने गिळंकृत करेल कि या ठिकाणी नागोठणे नावाचे एक गाव अस्तित्वात होते हे देखिल पुढील पिढीच्या लक्षात राहणार नाही.

मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी

रायगड जिल्हा हा विवीधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचीत व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विवीधता पाहता येथे डोंगर, दर्‍या व अरण्यांनी व्यापलेला असा खुप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्यपुर्ण स्थळे अजुन प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील.
मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्‍या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्‍यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.

रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्‍या तथा तिसर्‍यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्‍या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही  या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.

अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच  ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत.
चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास
जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे.

मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा संपुर्ण फेरफटका मारणे अगत्याचे ठरते. चांदोरे गावात पुर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तिवात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी गेलेले. मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असल्याने चांदोरेकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागास इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला एवढेच नव्हे तर येथील नागरिकही या उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले, मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक के चांदोरे गावाचा अविभाज्य घटकच झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही अर्थात याबद्दल चांदोरे गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले पाहीजे.

चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे म्हणजे पुर्वेकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे उत्खनन चालू असून अनेक नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. डावीकडल्या रस्त्यावरुन चालायल लागल्यावर प्रथम दिसतो तो विस्तिर्ण असा जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभुमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याचे पारणे फेडतो. जलाशये, विहीरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत, चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवितो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खुप वैभवसंपन्न व भरभराटीत असावे, चांदोरे गावाच्या ज्ञात इतिहासाबाबत अजुन बरीच माहिती प्रकाशझोतात यायची आहे मात्र या गावाचे पुर्वीचे नाव चंद्रपुर असावे असा कयास बांधता येवू शकतो, शिलाहारांच्या ताम्रपटांत व शिलालेखांत अनेकवेळा चंद्रपुर असे उल्लेख येतात अर्थात चांदोर या नावाची अनेक गावे अस्तित्वात आहेत मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातल्या चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या जलाशयाच्या कडेने चालत गेल्यावर प्रथम दिसते ते एक शिवमंदीर, कौलारु छप्पर असलेले हे शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. याच शिवमंदीरात चांदोरे परिसरात उत्खनन चालू असताना सापडलेल्या काही प्राचिन सतीशिळा, विरगळी व मुर्त्या पहायला मिळतात. येथे पहावयास मिळणारी शेषशायी विष्णूमुर्तीरायगड जिल्ह्यात क्वचितच सापडेल. ही मुर्ती पाहता या परिसरात प्राचिन काळी वैष्णवपंथिय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते अर्थात या मुर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्यशैलींशी जुळणारी असल्याने इसवी सनाच्या ७व्या शतकापासून ८व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेचा या गावातील स्थापत्यशैलींशी संबध असण्याची शक्यता बळावते. सन ७५३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजघराण्याची इतिश्री केली. चालुक्य राजघराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्यशैलीमध्ये विष्णूची रुपे पहावयास मिळतात. राष्ट्रकुटांनी चालुक्यांविरुद्ध मदत केल्याबद्दल शिलाहार राजघराण्यास पुर्ण कोकणाची सत्ता दिली त्यामुळे कालांतराने या परिसरावर शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले जे ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले. येथे पहायला मिळणारी मिळणार्‍या सतीशिळा व विरगळी ही याच गावात झालेल्या एका महासंग्रामाच्या प्रतिक आहेत ज्यामध्ये चांदोरे गावाचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्याचे निरिक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आढळून येतो, पुर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारार्तिथी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजाचे स्मारकाप्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालिन युद्धाचे जीवंत प्रसंग कोरले जात. चांदोरेच्या विरगळीमध्ये दाखालेल्या प्रसंगात दोन अश्वारुढ व्यक्ती हातात भाले अथवा तरवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती तर स्त्रीसदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळी सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्यत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वर कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देव्-दानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता आहे.

याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी कारण या शिळेवर कोरलेला प्रसंग हा कुणा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे कारण यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरुढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे तसेच खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी व एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामत धारातिर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय येथे गणपती तसेच इतर देवतांच्या भग्नावस्थेतल्या मुर्त्या सुद्धा आढळून येतात.

या मुर्त्या पाहून आपण मंदीराबाहेर येऊन त्याच रस्त्यास लागलो की काही अंतरावर डाव्या बाजुला पुरातन अवशेष असल्याचा भास होतो अर्थात हेच ते ठिकाण जेथे सध्या उत्खनन चालू आहे. रस्ता सोडून आपण खाली उतरलो कि भरलेल्या गवतातून जाणार्‍या रस्त्याचा आजुबाजुला काही जुन्या घरांची जोती दिसून येतात तसेच उजव्या बाजुस एक भग्नावस्थेतला नंदी दिसून येतो, हे शिवमंदीराचे अवशेष असावेत हे लक्षात येण्यास वेळ लागत नाहीत. याच शिवमंदीरासमोर एक भलीमोठी जांभ्या दगडात खोदून काढलेली पायर्‍यांची विहीर अर्थात पुष्करणी आहे, या विहीरीत जाण्यास रस्ता आहे व याच रस्त्यात काही कोनाडे कोरले आहेत ज्यातल्या एका कोनाड्यात उमा माहेश्वराची मुर्ती दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेले उत्खनन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ते पुरातत्ववेत्ते व त्यांच्या सहकार्‍यांनी या संपुर्ण पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचिन अवशेष अवगत केले आहेत ज्यांच्यावर सध्या अभ्यास सुरु आहे.

चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत स्थित आहे त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर नावाचे एक गाव लागते तिथे अमृतेश्वर हे प्राचिन व सुरेख असे शिवमंदीर आहे, या शिवमंदीराचा व चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता आह. कारण ज्या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदीराबाहेर सुद्धा आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचिन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडावयाचा आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढला आहे, लांबुन लांबुन अगदी परदेशातून पर्यटक हे प्राचिन वैभव पाहण्यासाठी गावास भेट देत आहेत व चांदोरे गावातले नागरिक त्यांना आस्थेवाईपणे मार्गदर्शन करत आहेत. चांदोरे गावच्या उत्खननासोबत रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधून काढण्याच्या पर्वास सुरुवात झाली आहे व भविष्यात याचा फायदा रायगड जिल्ह्याच्या स्थानिक पर्यटन विकासाला व रोजगारास होईल अशी आशा करुयात.


विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर

लोकसत्ता टीम

प्राजक्ता म्हात्रे

निसर्गाच्या सान्निध्यात असणारं असं आमचं छोटंसं उरण हे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’प्रमाणेच माझ्या हृदयात घर करून आहे. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या होडय़ांचे विहंगम दृश्य या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. उरणमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणादेखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरुपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. या भागाला देवळांवरून देऊळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठा विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले रिद्धी-सिद्धी विनायकाचे देवस्थान आहे.

हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. रिद्धी-सिद्धी विनायका वरून सदर गाव हे विनायक या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्ष्यांचे गुंजन, तोऱ्यात चालणाऱ्या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री रिद्धी-सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेख केला आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.

मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून, अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून, पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून, रिद्धी-सिद्धी दोन फूट उंचीच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे, तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी सदर मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदींच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते हेदेखील या देवळाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.

मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतला शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, या गूढ शिलालेखाचा उलगडा सन ९१४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबईच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.

सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढय़ांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडुरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजाआर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. सन १९९३ पासून या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त- फजनदार हे सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंडय़ा अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जिने असून, लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशंना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे- जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंडय़ांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.

गावकरी कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टाकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान केली आहे.

prajaktaparag.uran@gmail.com







कंपनी पुराभिलेखातील चंपावती पेज मी जोडत आहे.

कोकणच्या कुठल्याही जिल्ह्य़ात इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट कल्चर अॅन्ड हॅरीटेज या राष्ट्रीय संस्थेचा अध्याय(चॅप्टर) नाही,
पालघर जिल्ह्य़ात डहाणू येथे आहे पण तो फक्त एन्व्हॉरनमेंटल हॅरीटेज वर कार्य करत आहे.
intach[dot]org संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला काय काय करता येऊ शकते ते बघा.
ह्या संस्थेचा अध्याय सुरु झाला तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधिक्षक किंवा मुकाआ जिप संरक्षक सदस्य असणे सक्तीचे असल्याने एक समन्वय साधला जाऊ शकतो.
हे मी श्री संजय यादवराव यांना कोविड च्या आधी सुचवले होते, कोएसो अध्यक्षांना पण सुचवले होते जो पर्यंत तुम्ही काही % जागतीक होत नाही तो पर्यंत स्थानिक तुमची ओळख दाबून ठेवतील.
जिल्हा माहिती कार्यालयायाने कोवीड आधी उत्कृष्ट कॉफी टेबल बुक प्रकाशित केले होते ते आता उपलब्ध जरी नसले तरी रायगड किल्ल्याचा उत्कृष्ट दस्तऐवज तयार आहे तो archives[dot]org ह्या नॅशनल डिजिटल लायब्ररी शी संबंधित संकेतस्थळावर अपलोड झाला तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटनाच्या माहितीचे कॉफी टेबल बुक जे जिल्हा संकेतस्थळावर आहे ते सुद्धा अर्काइव्हज डॉट ओआरजी वर अपलोड झाले तर तुम्ही जगापर्यंत पोचता.















 

चौलचा इतिहास

chinmayebhave

कोकण किनारपट्टीवर अनेक ऐतिहासिक बंदरे आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात व्यापार आणि उद्योजकतेचे आणि त्याबरोबर येणाऱ्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार असलेले किल्ले, लेणी, बंदरे आपण आजही कोकणात पाहू शकतो. नेहमीच्या पर्यटनापलीकडे जाऊन डोळसपणे पाहण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे चौल-रेवदंडाचा सागरतीर आणि दक्षिण दिशेला कुंडलिका नदीचे मुख आणि त्याच्या पलीकडे असलेला डोंगरावरील पोर्तुगीज कोर्लई किल्ला. सागरी महामार्गाने अलिबागहून सुमारे १८-२० किलोमीटर दक्षिणेला गेलं की आपण चौलला पोहोचतो. चौलच्या नारळ सुपारीच्या बागा या परिसरावर मायेची सावली धरून आहेत. या माडांच्या बनात लपलेला आहे पोर्तुगीजांचे बलाढ्य ठाणे असलेला किल्ला. किल्ल्याच्या उत्तर तटाला लागून जिथं डांबरी रस्ता किल्ल्यात शिरतो तिथंच जवळ किल्ल्याचे दार आहे.

किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला रेवदंड्याचा समुद्रकिनारा आहे… पूर्वेला खाजण आहे आणि उत्तरेला चौल गाव आहे. या ठिकाणचे प्राचीन नाव रेवतीतीर्थ असे होते. बलरामाची पत्नी रेवती हिचे हे स्थान. ह्युएन त्सांग, मसूदी, टॉलेमी अशा विविध विदेशी पर्यटकांनी चौलच्या प्राचीन बंदराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. अबू रिहान अल बिरूम असं सांगतो की ठाण्याच्या दक्षिण दिशेला चौल जैमूर नावाचे उत्कृष्ट बंदर आहे. इद्रीसीच्या ११५३ सालच्या नोंदीत इथं नारळाची अनेक झाडे असलेलं नियोजित शहर आहे असा उल्लेख आढळतो. पुढे १६३५ मध्ये सादिक इफ्शाहानी च्या लेखनातही चौलचा उल्लेख सापडतो. इथं चाफ्याची झाडे होती म्हणून किंवा बौद्ध राजा चंपा याने वसवलेले शहर म्हणून या जागेला चंपावती या नावानेही ओळखले जात असे. कान्हेरी येथील शिलालेख, पेरिप्लस मध्ये सेमुल्ला म्हणून इसवीसन २४७ मध्ये केला गेलेला उल्लेख या ठिकाणचे प्राचीनत्व सिद्ध करतात. उत्तर शिलाहारांतील राजपुत्र झंझ इथं शासन करत असल्याचा आणि इथं अतिशय समृद्ध बाजारपेठ असल्याचा उल्लेख मसूदीने केलेला आहे. उत्तर शिलाहारांच्या नंतर देवगिरीचे यादव, मग खिलजी सत्ता, काही काळासाठी विजयनगर आणि मग शेवटी १३५७ मध्ये बहामनी साम्राज्य अशा विविध सत्तांचे चौलवर नियंत्रण होते. १३८० च्या सुमारास फेरिश्ता या प्रवाशाने चौल बहमनी राज्यातील महत्त्वाचे बंदर असल्याचे वर्णन केले आहे. अफनासी निकितीन या रशियन प्रवाशानेही चौलचा उल्लेख केला आहे (या प्रवाशाच्या भारतभेटीचे स्मारक म्हणून रेवदंड्यात एक स्तंभही उभारला गेला आहे) १५०५ मध्ये इथं पोर्तुगीजांचे आगमन झाले. इथल्या मुस्लिम आणि अरब मुस्लिम सत्ता एकत्र आल्या आणि पोर्तुगीजांना विरोध करू लागल्या. १५०८ च्या अखेरीस अमीर हुसेन या फारसी दर्यासारंगाच्या अधिपत्याखाली इजिप्तचे नौदल आणि गुजरातचा सरदार मलिक इयाझ च्या नौदलाने पोर्तुगिजांचा चौलला दारुण पराभव केला त्यात पोर्तुगीज व्हाइसरॉयचा मुलगा डॉम अल्मिडा ठार झाला. त्यानंतर १५०९ मध्ये मात्र पोर्तुगीजांनी या मुस्लिम युतीची दीवजवळ दाणादाण उडवली आणि त्यांचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जम बसू लागला. चौल हे सुरत आणि गोवा यांच्यामध्ये असलेले एक महत्त्वाचे बंदर होते. कोची बंदर, होर्मूझ, खंबायत, मस्कत, चीन अशा विविध ठिकाणांशी चौलचे व्यापारी संबंध होते. निजामशाहीने पोर्तुगीजांना इथं बरीच मोकळीक दिली. खजूर आणि घोड्यांचा व्यापार वाढला. वास्को दि गामा त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भारत भेटीत चौलला आल्याचे उल्लेख आहेत. १६५७-५८ च्या सुमारास वरचे चौल म्हणजे चौलचा उत्तर भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि रेदवंड्याचा कोट तेवढा पोर्तुगीजांकडे उरला.

छत्रपती संभाजी महाराजांनी चौल जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु पोर्तुगीजांनी चिवट प्रतिकार केला आणि तोफांची सरबत्ती सुरु ठेवली. इथं कुमक जमा करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी राजकोट नावाचा किल्ला बांधला असे इतिहासकार मानतात. पुढे वसईच्या पराभवानंतर पोर्तुगीजांना चौल मराठ्यांच्या ताब्यात द्यावे लागले. इथला कापड उद्योग पुढं तितकासा चालला नाही आणि अनेक कारागीर मुंबईला गेले. मुंबई बंदर आता वेगाने प्रगती करू लागले होते. चौलवाडी नावाच्या ठिकाणी मुंबईत ही मंडळी स्थायिक झाली आणि चौल हळूहळू इतिहासाच्या पडद्यामागे गेले. आज कोकणातील एक रम्य गाव म्हणून चौल सर्वांना परिचित आहे. इथं पोर्तुगीजांचा आगरकोट, मराठ्यांचा राजकोट, रामेश्वर मंदिर, चौलची लेणी, दत्त मंदिर, हिंगुलजा मातेचे मंदिर, कलावंतिणीचा महाल, आसा मशीद, हमामखाना अशी अनेक ठिकाणे आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात आपण ती नक्कीच पाहणार आहोत.

संदर्भ –

१) कुलाबा जिल्हा गॅझेट
२) Portuguese Sea Forts Goa with Chaul, Korlai and Vasai – Amita Kanekar – published by Jaico, funded by the Deccan Heritage Foundation
3) Notes on history and antiquities of Chaul & Bassein – Jose Gerson Da Cunha



 
 
 

 
 





 
 
संदर्भ
1. J. Gerson Da Cunha – Notes on the History and Antiquities of Chaul and Bassein (1876)
2. Bombay Gazetteer – Kolaba District
3. Archaeological Survey references on Konkan temple remains
4. Portuguese records relating to Chaul and Revdanda


About the Temple

Rameshwar Mandir is located in Chaul region of Raigad district of Maharashtra. The presiding deity of this ancient temple is Lord Shiva. The Chaul region is famous for its temples. There are around 365 temples in Chaul which are equal to the number of days in a year. The prime attraction of Rameshwar Mandir is three tanks or Kunds which are known Parjanya Kund, Agni Kund, and Vayu Kund, which represents three elements of nature viz rain, fire, and air. These Kunds are located just outside the temple. Rameshwar Temple is located in Chaul region near Revdanda village which is about 20 km from Kashid. The temple is built in the Hemadpant style of architecture which consists of a sabha mandap, sanctum sanctorum, and Gopuram.


Temple View

Temple History and Temple Architecture

The temple has existed for several centuries but the exact time of the construction is unknown. Research shows that the temple has been renovated many times in history. Rameshwar Mandir features a Hemadpanthi style of architecture which was introduced by Hemadpant. He was the prime minister of the court of Seuna Yadavas of Devagiri. This style of architecture incorporates the use of locally procured black stone and lime. The temple is a calm and serene place to meditate. The temple complex is spread over a large acre of land. The temple dome stands 7.62 m tall. A huge pond is seen in front of the temple which is known as Pokhran. Rameshwar temple is a spectacular living example of rich cultural and architectural history.

According to folklore, Rameshwar Temple was built in a day by the Pandavas, but they couldn’t complete it. Later, Kanhoji Angre, A Maratha Navy Admiral completed the remaining work. It is a must to visit an elaborate entombment behind the temple. It is said that the memorial belongs to one of the Angres.

Temple Full View

Festivals and Celebrations

Pola festival is celebrated by farmers and it is related to bull-worshiping. Pola falls on Pithori Amavasya day of Shravan month. This festival is mainly observed in Vidharbha region. On this occasion, farmers first give a bath to their bullocks, decorate them and worship them. It is known as Pola because the demon Polasur was killed by Baby Krishna. A small procession appears with paraded cattle near the outskirts of Alibag with bugles and drums. Puran Poli, a traditional dish is prepared on this day. The festival of Nag Panchami is celebrated on the fifth day of the moonlit-fortnight in the month of Shravan. Devotees bathe the snakes with milk. Nag Panchami is celebrated to commemorate the victory of Lord Krishna over the Kaliya snake. Devotees offer milk and honey to the Snake God and seek the blessings of the Snake God. The festival of Ganesh Chaturthi is celebrated with devotion in the month of August or September for ten days which envelops the entire place in a festive vigor.

Temple Celebrations

How To Reach

By Air: The closest airport to Rameshwar Mandir is Chhatrapati Shivaji Airport, Mumbai which is about 60 km away. Lohegaon Airport is about 104 km away.

By Train: The nearest railway station to Rameshwar Mandir is Mumbai Central.

By Road: The best way to reach Revdanda is by road. Alternatively, tourists can also take a ferry and get off at Mandwa Jetty. From Mandwa Jetty take a bus or an auto-rickshaw to Revdanda.



 







 
 
 
 
 
 
 
 
 









फोटो स्रोत,PHAS/GETTY

फोटो कॅप्शन,

अफनासी निकितिनचं क्रायमियामधील स्मारक

निकितिनची डायरी त्यावेळच्या भारताचं विशेषतः दख्खनचं चित्र मांडते. निकितिननं भारतात अनेक मुस्लीम आणि हिंदूंसोबत मैत्री केली, पहिल्यांदाच ताडीचा आस्वाद घेतला, फणसाची आणि साजूक तुपाची चव चाखली.

भारतात घोड्यांऐवजी लोक गाई-बैलाला महत्त्व देतात, इथे हत्तीचे व माकडाचे तोंड असलेल्या देवता (गणपती आणि हनुमान) आहेत असं तो लिहितो.

महत्त्वाचं म्हणजे त्या काळातल्या श्रीमंत आणि सामान्य लोकांमध्ये आढळणारी तफावत आणि समाजातील जाती-जातींमधला फरकही तो नमूद करतो. एका समाजाचे लोक दुसऱ्यासोबत खात-पीत नाहीत किंवा लग्न करत नाहीत असं निरिक्षण त्यानं नोंदवलं आहे.

डॉ. मेघा पानसरे सांगतात, "आपल्याकडे इतिहास समजून घेण्याचे स्रोत मर्यादित आहेत आणि अशा नोट्स हा खऱ्याखुऱ्या स्रोतांपैकी एक आहेत. इतिहासाचे वेगवेगळे अर्थ लावले जातात, हे सतत आपण पाहतो आहोत. मला वाटतं आपला एक सशक्त, सांस्कृतिक वैविध्याचा वारसा अफनासी निकितिनच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसतो.


"मुस्लिम राजवट असतानाही त्यांच्याकडे काही चांगुलपणा होता, हे सगळं आपल्याला तिथे जाणवतं. त्या काळातल्या सामूहिक जीवनातलं वेगवेगळ्या पंथांमध्ये सहअस्तित्वाचं चित्र तो मांडतो. हे आजच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे."

त्या पुढे सांगतात, "अफनासी स्वतः एक श्रद्धाळू ख्रिश्चन होता आणि धर्म बदलण्याची सक्ती करण्यात आली, तेव्हा अस्वस्थ झाला. त्यावेळी त्यानं लिहिलंय, की इकडे यायचं असेल तर आपली श्रद्धा, धर्म तिथेच ठेवून यावी. पण एक बाजू हीदेखील आहे, की तो आपली श्रद्धा इथे टिकवूनही ठेवू शकला."

भारत आणि रशियामधलं नातं समजून घेण्यासाठीही अफनासी निकितिनला समजून घेणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं.

"आज आपण रशिया-भारत मैत्रीविषयी बोलतो आणि त्यातून भारताला भूमिका घेणं किती अवघड बनलं आहे याची चर्चा करतो. पण दोन्ही देशांतले संबंध, मैत्री समजून घ्यायची असेल तर मला वाटतं अफनासी निकितिनला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण काळाच्या ओघात मागे गेलो, तरच हे नातं किती खोलवर रुजलं आहे याची जाणीव होते."

https://www.bbc.com/marathi/india-60805700?xtor=CS3-33-[wsmarathi~C~A41B37C45D37E38F39G38ad2chaulnikitan~Marathi_chaulnikitan_Facebook_Traffic_India_C]-[Facebook]-[%7B%7Bcampaign.id%7D%7D]-[%7B%7Bad.id%7D%7D]&fbclid=IwAR0qxdxVUi9_ODzWeMMlkTrelomqdLLej0RIfisJRkCPPypqNZ7nQp9ICdM









 
 
 
 
 
 
​संदर्भ ग्रंथ व स्रोत:
१. कुलाबा जिल्हा गॅझेटियर (१८८३)
२. रायगड जिल्हा गॅझेटियर (सुधारित आवृत्ती)
३. डॉ. एम. एस. माटे यांचे शोधनिबंध (डेक्कन कॉलेज, पुणे)
४. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी (प्राचीन ग्रीक प्रवास वर्णन)
ही ए आय मार्फत मिळवलेली संकलित माहिती आहे. यात ए आय चूक करू शकते, म्हणून आपण अशा संकलित माहितीचे एकत्रीकरण करून त्यातील तथ्य तपासून पाहत आहोत.. आपण यासाठी संशोधनात्मक सहकार्य करावे ही विनंती...
,,,,
संकलन... ॲड.विलास नाईक.
अलिबाग, चौल





रमणीय रेवदंडा

सकाळ वृत्तसेवा

अंजली कलमदानी

अनेक राज्यकर्त्यांनी निरनिराळ्या कालखंडात ही ठिकाणं काबीज करण्यासाठी लढाया केल्या आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या शैलीचा वास्तुरूपी ठसा स्वतःच्या कारकीर्दीत उमटवला.

राज्यकर्ते बदलले तरी वास्तू टिकतात, त्यामुळे रेवदंड्याच्या किनाऱ्यावरील सद्यस्थितीत आढळणाऱ्या वास्तू पोर्तुगीजकाळातील व त्या शैलीचा प्रभाव असणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या रमणीय पश्चिम किनाऱ्यावर आहे रेवदंडा.

अलिबागच्या दक्षिणेला १७ किलोमीटरवर रेवदंडा भरगच्च वनराजीत विसावला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित केला जातो. ही दोन्ही स्वतंत्र गावं असली तरी ऐतिहासिक घटनांच्या बाबतीतही त्यांचा उल्लेख एकत्रितरीत्या आढळतो.

रायगड जिल्ह्याच्या गॅझेटिअरमधील नोंदीवरून सन १३० पासून ते १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचं व व्यापाराचं प्रसिद्ध बंदर होतं. प्राचीन काळी या भागाला चंपावती व रेवतीक्षेत्र असं म्हणत असावेत.

चंपावती व रेवती या नावानं गुजरातमध्ये श्रीकृष्णाचं राज्य होतं. त्या पौराणिक काळाशी स्थानिक लोक चौलचा संबंध जोडतात. पश्चिम किनाऱ्यावरील अशा सौंदर्यपूर्ण व समृद्ध जागांवर परकीय राज्यकर्त्यांची नजर पडली नसती तरच नवल.

‘कोकणात शिलाहारांचा राजपुत्र झुंज हा राज्य करत आहे,’ असं अरब प्रवासी मसूदी यानं सन ९१५ मध्ये नमूद केलं आहे. सन ९७० मध्ये तिथं हिंदूंशिवाय मुसलमानही मोठ्या संख्येनं होते, तसंच नारळ, कांदे, तांदूळ इत्यादींचं अमाप उत्पन्न होत असे असा उल्लेख काही प्रवाशांनी केला आहे.

सन १५०५ मध्ये पोर्तुगीज हे चौल इथं आले व त्यांनी मुसलमानांचा पाडाव करून हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या काळात काही राजवटींनी पोर्तुगीजांशी जुळवून घेतलं, तर काहींनी विरोध केला. मात्र, १५०९ नंतर पोर्तुगीजांनी आपला प्रभाव पूर्णतः सिद्ध केला.

सन १७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर, पुढं आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून पोर्तुगीजांनी आगरकोट ब्रिटिशांना दिला. सन १७४० मध्ये तह होऊन चौल प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले.

पोर्तुगीज, निजामशहा, आदिलशहा, सिद्दी, फ्रेंच, ब्रिटिश यांनी आलटून-पालटून लढाया करत चौल-रेवदंड्यावर आपापलं वर्चस्व गाजवलं. कारण, चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी, नैसर्गिक सौंदर्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समुद्रकिनारा. रेवदंड्याचा उल्लेख इतिहासात ‘लोअर चेऊल’, ‘नॉर्थ चेऊल’ किंवा ‘पोर्तुगीज चेऊल’ (चौल) असा आढळतो.

त्या काळी सुरत व गोव्यादरम्यान चौल हे मोठं व्यापारीकेंद्र होतं. तत्कालीन पर्शिया, अरेबिया इथं समुद्रमार्गे नारळ, सुती कापड, रेशीम जात असे व तिथून खजूर, घोडे आयात होत असत. एका डच प्रवाशानं चौलचा उल्लेख ‘तटबंदी असलेलं व्यापारासाठीचं प्रसिद्ध शहर’ असा केला आहे. खंबायत, सिंध, बंगाल मस्कत इथल्या व्यापारांना हे शहर परिचित असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

तिथले श्रीमंत व्यापारी हिरे-माणकांचा व्यापार करत व चीनहून रेशीम आयात करून त्याचे झगे, नक्षीदार बिछाने तयार करत. सन १५८६ मध्ये व्हेनिसहून आलेला प्रवासी सिडर फ्रेडरिक यानं रेवदंड्याला ‘सर्व बाजूंनी भक्कम सुरक्षित भिंत असलेलं पोर्तुगीज शहर’ असं म्हटलेलं आहे. या वर्णनावरून लक्षात येतं की एकेकाळी इथं व्यापाराची गजबज होती.

एकेकाळी समृद्धीनं गजबजलेला रेवदंड्याचा किनारा सध्या मात्र भग्नावशेष सांभाळत शांत झाला आहे. पोर्तुगीज आगरकोट तटबंदीमध्ये वसलेलं गाव अजूनही अस्तित्वात आहे. इथल्या भग्न इमारतीच्या आवारात सहज फेरफटका मारला तर चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे आजही सहज सापडतात. भक्कम तटबंदीच्या आगरकोटात अनेक इमारती पोर्तुगीजांच्या काळी होत्या.

घडीव दगडांच्या इमारतींमध्ये सेनाधिकारी राहत. इथं दोन शस्त्रागारं होती. किल्ल्याला पंधरा बाजू व ११ बुरुज असल्याची नोंद आहे. असंख्य तोफा व श्रीमंत वस्तीसाठी विशेष सुरक्षित तट व तोफांची सोय होती. पोर्तुगीजकाळातील फॅक्टरी किंवा उंच चौकोनी बुरुज अजूनही अस्तित्वात आहेत. त्या काळी उंच इमारती बांधल्या जात याचा पुरावा अजूनही शिल्लक आहे.

भक्कम व सुरेख घडीव चिऱ्यांनी योग्य प्रमाणबद्धता राखून बांधलेल्या इमारतीचे अवशेष पाहताना प्रगत बांधकामतंत्राची जाणीव होते. सेंट झेविअर चॅपेलचा भव्यपणा व रेखीवपणा अवशेषांमधून प्रतीत होतो. दगडांमधील भव्य कमानी, त्यांवरील कलाकुसर वास्तुकलेतील समृद्धता दर्शवते.

तटबंदीच्या कमानी अजूनही सुस्थितीत असून त्यावर पोर्तुगीज-बोधचिन्हं आहेत. व्यापारामुळे आलेल्या समृद्धीचा अंदाज त्या काळी उभारलेल्या वास्तूच्या भव्यतेमधून, बांधकामशैलीवरून व तंत्रावरून बांधता येतो. चॅपेलच्या कमानी बांधताना वॉल्ट पद्धतीचा अवलंब करून खांबविरहित भव्य दालनाची रचना केल्याचं दिसून येतं.

आगरकोटात आज अस्तित्वात असलेल्या घराबाहेर लोखंडी गोळे पाहून आश्चर्य वाटतं; परंतु इतिहासाच्या पानांत डोकावल्यावर ‘आगरकोटात चौथ्या गुजरात बुरुजावर १८ दगडी गोळा फेकणारी कॅमल तोफ व ६५ पाऊंड लोखंडी गोळा फेकणारी तोफ होती, सातव्या बुरुजावर ४० पाऊंड वजनाचे गोळे फेकणारी गरुड तोफ व ५० पाऊंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या’ अशी तोफांबद्दलची सविस्तर वर्णनं आढळून येतात.

पोर्तुगीज-इमारतीखेरीज मंदिरं, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत; पण दुर्दैवानं हा परिसर अतिशय दुर्लक्षित, निर्मनुष्य आहे. पुरातत्त्व खात्याच्या पाट्या त्यांची मालकी प्रस्थापित करतात; परंतु एका कालखंडाचा इतिहास सांगणारा, वास्तुकलेतील वैशिष्ट्यपूर्ण विविधता दाखवणारा हा परिसर जतन करावा याची काळजी कुणालाच नाही.

नवनवीन पर्यटनस्थळं विकसित करण्यासाठी सरकारकडून निधी दिला जातो. त्यामध्ये पर्यटकांच्या सुविधांना प्राधान्य दिलं जातं; परंतु पर्यटनाचाच भाग असणारी अशी अनेक ठिकाणं मूलभूत सुरक्षेपासून व संवर्धनापासून वंचित राहतात. हा वारसा दुर्लक्षित राहिल्यामुळे कालांतरानं नाहीसा होईल व एका कालखंडाचा इतिहास फक्त गॅझेटिअरच्या पानांमधून वाचण्यापुरता राहील.

शतकं पुढं सरकतात...राजवटी बदलतात...परंतु राजवटींचा वारसा वास्तुरूपानं शिल्लक राहतो. त्याच्या उर्वरित भागाचं जतन-संवर्धन झालं तर इतिहासाशी संदर्भ जोडणं व त्या काळातील जीवनशैलीचा अंदाज बांधणं शक्य होतं. रेवदंड्याच्या इतिहासाला व वास्तुकलेला काळाचे अनेक पदर आहेत. त्यांचं योग्य विवेचन करणारं केंद्र तिथं असणं आवश्यक आहे.

कोकणाकडे सध्या पर्यटनाचा ओघ वाढतो आहे; पण हे पर्यटन फक्त समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी व नारळी-पोफळीचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी विकसित झालं तर तिथली अलौकिक वास्तुसौंदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचणार नाही व त्याच्या अनुभवाचा आनंदही घेता येणार नाही. रमणीय रेवदंड्याचं वास्तुरूपी सौंदर्य आणि पर्यायानं एकेकाळचे उर्वरित सांस्कृतिक धागेदोरे जपले गेले तर पर्यटनाचा आनंदही द्विगुणित होईल.


> रेवदंडा
महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध बंदर. हे अलिबाग तालुक्यात चौलच्या नैऋत्येस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले असून पूर्वी ‘खालचे चौल’ म्हणून ते ओळखले जात होते. सांप्रत रेवदंडा व चौल ही दोन वेगवेगळी गावे आहेत. पूर्वीच्या अष्टांगरांपैकी हे एक असावे असे मानले जाते. इ. स. सहाव्या शतकाअखेरील बादामीच्या चालुक्यांपैकी मंगलेश राजाने रेवतींद्वीप जिंकल्याचा उल्लेख ऐहोळेच्या शिलालेखात आढळतो. ते द्वीप म्हणजेच रेवदंडाक्षेत्र अथवा चंपावती (चौल) असावे असे म्हणतात. सोळाव्या शतकात पोतुर्गिजांनी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला होता. परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे, तसेच धरमतर खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंडय़ाचे व्यापारी महत्त्व कमी झाले. सांप्रत याला जिल्ह्यातील मोठय़ा गावाचा दर्जा देण्यात आला असून येथून लहान नावा व होडय़ा यांमधून वाहतूक चालते. या बंदरातून मुख्यत: नारळ व मासे यांची निर्यात होते. गावात बँका, सार्वजनिक ग्रंथालय, दवाखाने, चित्रपटगृह व माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असून येथील आगरकोट नावाचा किल्ला प्रसिद्ध आहे.


रेवदंडा

 http://hrishikeshpandkar.blogspot.com/2019/03/blog-post.html

रामेश्वर मंदिर

 कोकण म्हटल्यावर डोळ्यसमोर येते ती पोफळीची रांगेने असणारी आणि आभाळाशी स्पर्धा करणारी उंच झाडे,घरामागची टुमदार वाडी,ती पार करून गेल्यावर अंगावर येणार सिंधुसागर आणि लाल मातीचे रस्ते. पांढरेशुभ्र उकडीचे मोदक आणि खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा खाऱ्या पाण्याचा मासा, दमट हवेत घशाखाली अलगद सरकणारी किंचितशी आंबट सोलकढी आणि आंबा फणसापासून ते काजू कोकम पर्यंत जिभेचे चोचले झेलणारी अनेकविध फळे.


 

वर नमूद केलेला कोकणाचा अनुभव कोणालाच नवीन नसावा.हे आणि यापेक्षा वेगळं कोकण पाहण्याचा प्रयत्न या वेळी केला.नागाव किनाऱ्यापासून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर चौल हे गाव आहे.या गावात असलेले रामेश्वर मंदिर हे कदाचित तितकेसे प्रसिद्ध नाही मात्र ऐतिहासिक महत्व असलेले आहे. चौल गावात एकूण ३६५ मंदिरे बांधली गेली. वर्षाचे ३६५ दिवस म्हणून ३६५ मंदिरे असे काहीसे हे गणित आहे अशी माहिती कानावर येते. त्या ३६५ मधील शिल्लक आणि प्रार्थनीय अवस्थेत असलेले हे शिवालय.

आवार भव्य नसले तर शांत आणि नेटके आहे.नेहमीप्रमाणे मुख्य प्रवेशापाशी नंदी विराजमान आहे.मंदिराला एकूण ३ कुंड आहेत.पर्जन्य कुंड,अग्नी कुंड आणि वायू कुंड.हेमाडपंथी धाटणीची बांधणी येथे पहायला मिळते.

नागाव किव्वा अलिबाग ला कधी गेलात तर हे छोटेसे मंदिर नक्की बघा.खूप भव्य किव्वा प्रसिद्ध यापैकी एकही गोष्ट यात नाही पण एक ऐतिहासिक आणि रमणीय वास्तू म्हणून नक्कीच प्रेक्षणीय आहे.त्यातही जर सूर्यास्तानंतर जाण्याची संधी मिळाली तर अजिबात सोडू नका कारण लोहगोलाच्या अनुपस्थितीत तेलाच्या दिव्यांनी नटलेली दीपमाळ डोळ्याचे पारणे फेडेल एवढे मात्र नक्की.मी गेलो ती वेळ टळटळीत दुपारची होती त्यामुळे दीपमाळेकडे डोळे वर करून बघायची माझी हिम्मत झाली नाही.पण साधारण सकाळी उन्ह चढायच्या आधी किव्वा संध्याकाळच्या सावल्या लांबल्यानंतर मंदिराला भेट द्या नक्कीच आनंददायी अनुभव असेल.बाकी 'येवा कोकण अपलोच असा' हे आहेच.

महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

०४.०३.२०१९

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांच्या अस्तित्वाची स्थापत्यरूपी साक्ष देणारा हा 'रेवदंडा' किल्ला. किल्ला कसला... कालानुरूप दुभंगलेले फक्त अवशेष.अथांग अरबी सागराच्या लाटांना थोपवून धरणारी अभेद्य तटबंदी आणि किल्ला असण्याची खात्री पटविणारा हा चार मजली मनोरा.या खेरीज अस्ताव्यस्त पडलेल्या मोजून तीन तोफा आणि पोफळीच्या झाडांना जणू टेकून उभे राहण्यास शिल्लक राहिलेल्या भग्न भिंती.


 

हमरस्त्यालगतच्या लाल मातीच्या पायवाटेने आत गेल्यावर दिसणारी हि बांधणी.पोर्तुगीज कॅप्टन 'सूज' याने १५२४ मध्ये बांधून पूर्ण केलेला हा 'रेवदंडा' किल्ला.कालांतराने मराठ्यांनी काबीज केला आणि सरतेशेवटी इंग्रजांनी यावर युनियन जॅक फडकावला तो १८१८ साली.रेवदंड्याची अजून एक ओळख म्हणजे पहिला रशियन प्रवासी भारतात याच किनाऱ्यावरून आत आला.

किल्ल्यातून इतिहास उलगडावा वगरे असे इथे काहीच शिल्लक नाही.या उंच मनोऱ्याच्या मध्ये असलेले उघडे झरोके दिवसभर उन्हाच्या तिरप्या किरणांची रांगोळी बनवत असतात.मनोऱ्याच्या मधोमध उभे राहिल्यावर सध्या तिथे वास्तव्यास असलेल्या कबुतरांच्या गळ्यातून निघणारा आवाज घुमत असतो.मधेच एखादे कबुतर उडते त्याची फडफड आणि भरतीच्या वेळी येणार लाटांचा आवाज. हे दोन आवाज सोडले तर बाकी सगळे निपचित.

किल्ल्याचा परिसर मोठा असला तरी आता लोकांच्या पोफळीच्या वाड्या या आवारात बेमालूम मिसळल्या आहेत.किल्ल्याच्या आवारात प्रवेश केल्यावर किनाऱ्याची तटबंदी आणि हा मनोरा याच्या मध्ये एक प्री-वेडिंग फोटो शूट चालू होते.पंधरा मिनिटे तिथे रेंगाळून मी निघालो.'किल्ला' हि संकल्पना मनात ठेवून पहायला जाणार असाल तर इथे निराशा पदरी येण्याची दाट शक्यता आहे.पण तटबंदीवर उभे राहून एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला हे भग्नावशेष पहायला मजा येते.सूर्यास्ताच्या किव्वा सूर्योदयाच्या वेळेला हा मनोरा आणि इतर भग्नावशेष ज्यांना कॅमेऱ्यात टिपायचे असतील त्यांनी मात्र नक्की ती वेळ साधून जा.

एखाद्या मराठी भयपटासाठी हि वास्तू कधीच कशी चित्रित झाली नाही याचे आश्चर्य व्यक्त करत मी किल्ल्याची वेस ओलांडली.कधी नागाव,अलिबाग किव्वा काशीद या ठिकाणी आलात तर अर्धा तास काढून इथे येऊन जा माझं म्हणणं पटेल कदाचित…

हृषिकेश पांडकर


 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 






 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

 

 

 
 
 


 

 

 



 

 
 
 



 

 

 

 

 

 



 

 



 







 















 



 

 


 

 

 

 

  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

mes sure a home pa  [pidgin] एक देण्यात आहे उद होते जाणान्या भाषेत माटो ब शेती करतार की मुल आली. त्या कुटुंबात या भाषेचे उगमस्थान समान एक नहीं भाषा पर गावाकडे तसे दुर्लक्षच झाले याठिकाणी अतिबाणहून यायचे तर होडीशिवाय दुसरा मार्ग नव्हता. विक्रम इस्यात चा कारखाना रोधात झाल्यानंतर सा शेतीचा माल विकण्याठी त्यांना सर्वांत आणि बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याची त्यांची भा हो मराठी रिहाइस्र एक गोष्ट त्यात आहे. सोने देणारा सिंह इस्तर', 'आणि त्यातील काही उदाहरणे
बोलतो, त्या शब्दांत आणि सुरावटीत हे काही हेही शंकर कुणाला आली नसावी
आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारे आणि नव्या पिढीलाही घरात सक्तीने आपलीच भाषा बोलायला लावून लिये जतन करणारे हे कोर्लईकी निश्चित अभिनंदाला पात्र आहेत या गावातल्या शाळेतले शिकविण्याचे माध्यम हे मराठी आहे. गावातल्या चर्चमध्येही प्रार्थना ही मराठीतृस्य होते. तरीही आपल्या परी पतल्यानंतर एकमेकांशी बोलताना हे
अनोख्या भाषेचे कोर्लई
म्हणतात 'कॉनॉम की (तुझं नाव काय) एक वाक्य पोर्तुगीज भाषेत पाण्याला सनिली आहे. हे कसे झाले याचे मूल कदाचित पौल-रेक्दा परिसलात चाला प्यारात आणि तेथील बंदरात
कोई है उसे एका टोकाचे गाव गाय आणि तेथील भाषा ही प्रसिद्धीपासून कोलंईचा किल्ला माहिती आहे. पण नाही. कदाचित ही भाषा शांते असण्याची शक्यता नाकारता येत नाह
गावकरी आपल्याय भाषेत बोलतात. ही भाषा काही वेगळी आहे याची जाणीव काही जणांना आहे. या गावात बोलल्याणाऱ्या भाषेत सांगितलेल्या गोष्टींचे देवनागरी लिपीनले पुस्तक
आहे. हे पुस्तक 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज' आणि 'नेशनल एंडोमेंट फॉर द घुमानिटीज यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आले आहे. दमणचे काही जण ही भाषा कोणती ते शोधण्यासाठी येथे येऊन गेले, ही माहिती गावक-यांकडूनच समजली, काही वर्षापूर्वी बडोदे विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालय विभागाचे प्रमुख बेडेकर यांनी या गावात बोलल्या जाणान्या भाषेचा अभ्यास केला होता, पण त्याबाबत अन्य तपशील समजू शकला नाही. खरंतर या गावात बोलली जाणारी भाषा जतन व्हायला हवी, असे येथे आल्यानंतर मनापासून वाटले. जर अमेरिकन लोक पेथील भाषेचे पुस्तक काढण्यास पुढे येतात, ता आपल्या शासनाने तरी याबाबतीत मागे रहायला नको. कोकणचा बराचसा भाग अद्याप अप्रकाशित आहे. कोलंद गश्य हे त्यातीलय एक. जर या माषेच्या उपमस्थानाया पत्ता लागू शकला तर या राज्याच्या वैभवात वैभवात या वा नव्या इतिहासाची भर पडेल हे नक्की।
 

 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...