प्राचीन काळात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या त्रैकुटकां बद्दल कमीच बोलल्या जातं . आता काही दिवसां पहिले जागतीक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोरबंदर भागात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या नव्या उत्खननात दोन दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. यातील एक ताम्रपट त्रैकूटक घराण्यातील राजाचा असून, या शोधामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे. या ताम्रपटावर त्रैकूटक वंशाचा राजा 'महाराज इंद्रसेन' याचे नाव कोरलेले आहे. या राजवंशाचा यापूर्वी फक्त एकच ताम्रपट १८६४ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांना कन्हेरी गुफेत सापडला होता. त्यानंतर सापडलेला हा दुसराच अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्रैकुटकांचा इतिहास अगदी त्रोटक संदर्भा वरुन उभा करता येतो. त्रैकुटकांनी सुमारे १५० वर्षे आधुनिक गुजरात मधील सुरतपासून ते महाराष्ट्रातील थेट कोकण किनारपट्टीपर्यंत राज्य केले. त्यांच्यातील राज्य करणारे ५ प्रमुख राजे (इंद्रदत्त, दहरसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन) मानले जातात किंबहुना या राजांचीच नावे आपल्याला उपलब्ध पुराव्यांवरुन प्राप्त झाली आहेत. त्यांचे मूळ स्थान नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसर असावे असे काहींचे मत आहे. त्रैकुटकांनी त्यांच्या लेखांमध्ये कोणत्याही विशिष्ट 'शकाचा' किंवा संवत्सराचा उघड उल्लेख केला नव्हता. काही संशोधकांच्या मते त्रैकुटकांनी त्यांच्या पूर्वी राज्य करणाऱ्या कार्दमक शकाचाच उपयोग केला असावा. कन्हेरी गुंफेतील बौद्ध स्तूप आणि ताम्रपटांवर असलेल्या ब्राह्मी लिपीच्या अभ्यासावरून हा राजवंश साधारणपणे ५ व्या शतकातील होता हे स्पष्ट होते. अशा या त्रैकुटकांचा इतिहास त्यांच्या समकालीन असलेल्या सर्वात शक्तिशाली वाकाटक साम्राज्याशी कमालीचा जोडलेला आहे. त्रैकुटक घराण्यातील प्रसिद्ध राजा दहरसेन याने स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी 'अश्वमेध यज्ञ' केला होता. त्याच्या 'पार्डी ताम्रपटावरून' (४५६-५७ ई.स.) त्रैकुटक साम्राज्य किती समृद्ध होते हे समजते. मात्र, त्यांची ही वाढती ताकद पराक्रमी वाकाटक सम्राट हरिषेण याला सहन झाली नसावी. वाकाटकांच्या धाकट्या पातीतिल हरिषेन हा वाकाटक घराण्याच्या उत्तर काळातील अत्यंत पराक्रमी राजा झाला. याचा लेख अजिंठा लेणीत कोरलेला आढळतो. अजिंठा गुंफा क्र. १६ मधील वाकाटकांच्या शिलालेखात सम्राट हरिषेण 'अपरांत' (कोकण) जिंकल्याचा आणि "त्रिकुट" (त्रैकुटक) साम्राज्याचा पराभव केल्याचा स्पष्ट उल्लेख करतो. इतिहासकारांच्या मते, राजा दहरसेन आणि त्याचा उत्तराधिकारी व्याघ्रसेन यांच्या नोंदींमध्ये तब्बल ३० वर्षांचे अंतर आहे. हा काळ म्हणजे वाकाटकांनी त्रैकुटकांना पराभूत करून त्यांचे राज्य आपल्या साम्राज्यात जोडल्याचा काळ होता. या काळात त्रैकुटकांची शक्ति बरीच कमकुवत झाली असावी. परंतु वाकाटकांचे हे वर्चस्व फार काळ टिकले नाही. सम्राट हरिषेणाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्य अंतर्गत कलहामुळे पत्त्यासारखे कोसळले, ज्याचे वर्णन 'दशकुमारचरित' या ग्रंथातही आढळते. या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन त्रैकुटक राजा व्याघ्रसेन याने आपले साम्राज्य पुन्हा उभे केले! त्याच्या 'सुरत ताम्रपटात' (४९०-९१ ई.स.) तो स्वतःचा उल्लेख अत्यंत अभिमानाने "अपरांताचा स्वामी" असा करतो आणि त्याचे पाय अनेक राजांच्या मुकुटांनी पूजले जातात असे सांगतो. वाकाटकांच्या पतनानंतर त्रैकुटक हे पश्चिम भारतातील सर्वोच्च सत्ता बनून पुनः नावारूपास आले असे दिसते. घारापुरीमध्ये झालेल्या उत्त्खननामुळे त्रैकुटकांचा बराच नवा इतिहास पुढे आलेला आहे. उत्त्खननामुळे अशा प्रकारे प्राचीन इतिहासातील बरीच भरीव माहिती पुढे येऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या या दुर्लक्षित घराण्याकडे या ताम्रपटाने लक्ष वेधून घेतले आहे.
आ पण गुप्तकला किंवा सातवाहनकला यांचा विचार करतो, तेव्हा फक्त त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या स्थापत्य, शिल्प व चित्रकलेचाच विचार करीत नाही, त्यात त्यांचे सरदार-दरकदार यांच्या आश्रयाने निर्माण झालेल्या कलावस्तूंचा, त्यांच्या कारकीर्दीत व त्यांचा अंमल असलेल्या प्रदेशात निर्माण झालेल्या सर्व दृश्यकलांचाही विचार करतो. गुप्त साम्राज्य किंवा सातवाहन साम्राज्य यांचा विस्तारही अवाच्या संवा होता, त्यात प्रादेशिक केंद्रे उदयास येणे अपरिहार्य होते, तसेच सम्राटाच्या वर्चस्वाखालील जनपदांतसुद्धा राजधानीतील कलाप्रवाहांचा, चोखंदळपणाचा परिणाम होणे अपरिहार्थ होते. त्यामुळे मथुरा, कौशांबी व सारनाथ ही कलाकेंद्रे गुप्तशैलीत स्वतःचे बारकावे जपत असली तरी त्यांतील एकजिनसीपणा जाणवतोच. गुप्तराजांचा गंगा-यमुनाखोथातील, साम्राज्याचा गाभ्याचा भाग वगळला तर भोवतालच्या सामंतांच्या प्रदेशांतील जनपदांत, ठळक प्रादेशिक वैशिष्ट्ये आढळली तरी, गुप्तकलेचा प्रभाव दिसतोच. त्रैकूटकांचे राजघराणे आजपासून दीडेकशे वर्षांपासून संशोधकांना माहीत असले तरी काही राजांचे योगायोगाने उघडकीस आलेले नाण्यांचे निधी (treasuretroves) आणि पाच ताम्रपट वगळता राजकीयदृष्ट्या महत्वाची इतर माहिती न मिळाल्याने भारताच्या राजकीय इतिहासांतसुद्धा त्या देशाची फारशी दखल घेण्यात आली नाही.
कान्हेरीच्या गुंफाचे महत्व लक्षात आले परंतु प्रसिद्ध प्राच्यविद्याविशारद डॉ. बर्ड यांनाही आपल्या प्रयत्नामुळे या राजवंशाच्या इतिहासास वेगळेच वळण लागणार याची त्या वेळेस कल्पना आली नाही. बर्ड यांना होते आणि त्यामुळे लेख अथवा नाण्यांच्या स्वरूपात एखादा ठोस पुरावा मिळाल्यास त्याच्या ते शोधात होते. त्यांना तसा तो मिळाला, एका ताम्रपटाच्या रूपाने, त्यांनी उत्सुकतेपोटी खणलेल्या (इ.स. १८३९) दगड व विठतांत बांधलेल्या एका स्तूपात. या स्तूपात अपेक्षिल्याप्रमाणे एका दगडी करड्यात हिरेमाणकांसकट रक्षा व अवशेष आणि अनपेक्षितपणे एका तांब्याच्या करंड्यांत दोन पत्रे असलेला एक ताम्रपट व दुसऱ्यात एका पायावर जुन्या अक्षरात लिहिलेली धर्मलिपी मिळाली या धर्मलिपीवरून स्पष्ट झाले की तो स्तूप विधिवत प्रतिष्ठित झालेला असून, तो आता धर्मकाय म्हणून समजला जाईल. सापडलेला स्तूप, त्यातील ताम्रपट व ताम्रपत्र, त्यावरील अभिलेख या सर्वांवर बर्ड यांनी आपला लेख एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या जर्नल (१८४१, पृ. ९४-९६) मध्ये छापला. हा ताम्रपट एखाद्या राजाने दिला नसून, सिधू विषयातील कानकग्रामाच्या बुद्धरुची नावाच्या उपासकाने सर्वश्रेष्ठ श्रावक आर्य शाद्धतीपुत्राच्या स्मरणार्थ हा दैत्य पाषाण व विटांनी बांधला. हा स्तूप सागर मेरुपर्वत, सूर्य-चचंद्र आहेत तोपर्यंत शाबूत राहो. आणि देव, यक्ष, सिद्ध व विद्याधरगण, माणिभद्र, पूर्णभद्र व पाचिक हे यक्ष, आणि आर्य वज्रपाणि, वाङ्कणक आदी हा दैत्य सुखरूप राहील हे पाहोत, व प्राप्त झालेली कीर्ती मुलगा पुष्य यास मिळो, अशी इच्छाही प्रकट केली. हे कार्य त्याने त्रैकूठकांच्या भरभराटीच्या राज्यात २४५ व्या वर्षी पूर्ण केले.
डॉ. भाऊ दाजी लाड, म. म. मिराशी, दिनेशचन्द्र सरकार, डॉ. शोभना गोखले यांपासून ते अमितेश्वर झा व दिलीप राजगोर या अलीकडल्या विद्वानांपर्यंत सर्वांनी त्रैकूटकांचा २४५ हा संवत् शालिवाहन शके की कलचुरि-चेदि संवतात आहे, याचा खल केला आहे, व त्यांचे दोन गट पडले आहेत. शकसंवत् धरला तर या राजवंशाची कारकीर्द इ.स. २८५-३६४ या काळात झाली असे मानावयास लागेल, तर कलचुरी संवत् धरल्यास इ. स. ४५७-५३३ असे मानावे लागेल, म्हणजे जवळजवळ १७० वर्षांचा फरक पडतो, पण ज्या स्तूपात तो ताम्रपट सापडला त्याच्या रचनाशैलीवरून तो इ. स. ३२३ मध्ये की इ.स. ४९४ बांधला याविषयीही खातरजमा होऊ शकते हे लक्षात घेणे आवश्यक होते. तो विचार डॉ. मेरिलीन लीज या मिशिगन विद्यापीठातील संशोधिकेने केला. पण त्याचा ऊहापोह करण्याअगोदर कलेतिहासज्ञांनी महाराष्ट्रातील बौद्ध गुफा, त्यातील स्थापत्य व शिल्प, आणि मूर्तिविज्ञान यांच्या इतिहासाची गुंफण कशी केली हे जाणून घेणे आवश्यक आहे. फर्ग्यूसन व बर्गिस हे गुफाविषयक अभ्यासाचे आद्य प्रवर्तक, त्यांनी अभ्यासाच्या, कालक्रमाच्या सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील बौद्ध गुफांचे, अगोदरच्या हीनयान व नंतरच्या महायान असे वर्गीकरण केले आणि त्यांना अवगत झालेल्या बौद्ध धर्माच्या ज्ञानाच्या आधारे, गाभाऱ्यात स्तूप असेल तर ती गुफा हीनयानपंथीय व बुद्धमूर्ती असेल तर महायानापंथीय असा ठोकताळा मांडला. (वास्तविक सांप्रतच्या काळात संशोधनात वा सामान्य लेखनाही हीनयान हा शब्द वापरत नाहीत, कारण तो श्रावकयानीय थेरवादींना उद्देशून तुच्छतेने महायानी वापरत असत.) फर्ग्यूसन यांच्या आकलनाप्रमाणे, अजिता येथील गुफा क्र. ९, १०, ११, १२, १३ व ५ अ वगळता, सर्व गुफा या महायानपंथीय आणि सर्वात जुन्या. ते कुठल्याही महाराष्ट्रातील गुंफेचा वज्रयानी म्हणून उल्लेख करीत नाही. सर्वप्रथम प्रा. गुप्ते यांनी ते विशेषण वेरूळ येथील बौद्ध गुफांबाबत वापरले, त्यानंतर म. न. देशपांडे यांनी पन्हाळे-काजी येथील गुफांना उद्देशून सार्थ रीतीने वापरले. नंतरच्या पिढीतील, म्हणजे विद्या दहेजिया व नागराजू यांनी श्रावकथानीय गुफांचा खोलात जाऊन अभ्यास केला. जितका लाकडी घटकोचा वापर जास्त तितकी गुफा जुनी या ठोकताळ्यापलीकडे जाऊन, नवे निकष उपयोगात आणले. त्यांनी स्थापत्याचे घटक असलेल्या, विशेषतः स्तूप, स्तंभ यांच्या ठेवणीबरोबरच, शिल्पशैली व अक्षरांच्या वळणात होत जाणाऱ्या बदलांचाही मागोवा घेऊन गुंफांचा कालक्रम अधिक पक्का केला. त्यावरून असे लक्षात आले की, पूर्वी समजले जात होते त्याप्रमाणे सातवाहन काळानंतर गुंफा कोरण्याच्या कामात मोता खंड पडला नव्हता, कामात थोडे मोटा आले होते. हीनयान गुफांमधील या शेवटच्या गुंफा महायान गुंफांचा दुवा ठरू शकतील हे ढवळीकरांच्या 'लेट हीनयान केव्हज्' या प्रबंधामुळे, तसेच सुरेश जाधव यांच्या जुन्नर येथील गुंफांच्या अभ्यासामुळेही लक्षात आलेच होते. या सर्व प्रपंचाला प्रा. शिलगलॉफ यांच्या अजिता येथील कथनात्मक चित्रांच्या विश्लेषणामुळे आणखी एक कलाटणी मिळाली. या अगोदर, बैद्ध धर्मातील जातककथीचा उलगडा करावयाचा झाल्यास पाली आगमातील जातके स्रोत म्हणून वापरण्यात विद्वानांना संकोच वाटत नसे. एकीकडे त्या गुंफा महायान पंथाच्या म्हणून वर्गीकरण करावयाचे व त्यातील चित्रणांचे पाली ग्रंथांतून स्पष्टीकरण द्यावयाचे यांत काही 'वदतोव्याध्यात' आहे, हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. खरे तर तारा देवतेचे एक-दौन ठिकाणीच चित्रण, अवलोकितेश्वराचे, विशेषतः त्याच्या अष्टमहाभयत्राण रूपाचे विशेष चित्रण, काही चित्रणांसोबत स्गात लिहिलेले आर्य शूस्सेनाच्या जातकमालेतील श्लोक यांवरून या गुफा परिपक्व महाश्थान पंथाच्या नाहीत हे स्पष्ट होते. मुनीशचंद्र जोशींनी या गुफा सर्वास्तिवादी (हीनथानातीलच एक उपपंथ) निकायाध्या असल्याविषयी निर्वाळा दिलेलाच होता, शिलगलॉफ यांच्या अनेक वर्षांच्या साधनेमुळे जातकमालेव्यतिरिक्त सद्धर्भपुण्डरिक, दिव्यावदान इत्यादी मिश्र-संस्कृतभाषेत - म्हणजे खरे तर गांधारीत लिहिलेल्या अनेक सर्वास्तिवादी आगमधथांच्या साहाय्यानेच अजिता येथे चितारलेले प्रसंग समजू शकले. व दख्खनमधील चौथ्या ते सहाव्या शङकांतील बैद्ध धर्मविषयक संशोधनाला नवी दिशा मिळाली. १९७३ साली वॉल्टर स्पिक थांना वीसेक वर्षांच्या संशोधनानंतर हे लक्षात आले की मिराशींनी हरिषेणास बहाल केलेला कार्यकाळ बराच ऐसपैस आहे, तसेच अजिंठ्यासारख्या उच्च कोटीच्या कलेचा आजूबाजूच्या मुलखातील झालेल्या परिणामाचे योग्य मूल्यमापनही करणे आवश्यक होते. त्यांनी, ऋषिकराज उपेन्द्रगुप्त, सम्राटाचा मंत्री वराहदेव, श्रेष्ठी माथुरक व विशेष म्हणजे मांडलिक अश्मकराज या हरिषेणाच्या सरदार- दरकदारांचे परस्परसंबंध, काही अपूर्ण राहिलेल्या गुफा, त्या पूर्ण झाल्या तरी यजमानाची प्रशस्ति नसलेले लेख, घाईघाईने मधेच कोबलेल्या, मिथूनी कौरविलेल्या मूर्ती या बाबी लक्षात घेऊन असा निष्कर्ष काढला की इ.स. ४७८ मध्ये हरिषेणाचा मृत्यू झाला असावा व आज दिसते तेवढे कोरीव काम पूर्ण झाले असावे. त्याचा मुलगा, सर्वसेन तिसरा यानेही आठेक वर्षे कसबसे राज्य केल्यानंतर इ.स. ४८४ पर्यंत वाकाटक साम्राज्य अचानक कोसळले असावे. त्यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हरिषेणाचे सामंत म्हणून उल्लेखिलेल्या राजांनी आपला वेगळा कारभार मांडण्यास वाकाटक साम्राज्याच्या अश अचानक विलयाच्या वेळेसच सुरुवात केली, हे स्पष्टपणे दिसते. उदा. कोसल, मेकल, मालव, आंध या प्रदेशात एकतर गुप्तांनी आपले बस्तान परत मांडले किवा नवीन राजवंश उदयाला आला. तीच गोष्ट त्रैकूटकांच्या बाबतीत घडली. दहसेनाचा मुलगा व्याधसेन याने आपले स्वातंत्र्य घोषित केले.
हरिषेणाच्या साम्राज्याचे विस्तारवर्णन करताना त्याचा अमात्य वराहदेव कुंतल, अवंती, कलिंग, कोसल त्रिकूट, लाट आणि आंध येथील राजे त्याचे सामंत होते असे म्हणतो. त्यापैकी त्रिकूट येथील राजे त्रैकूटक हे हरिषेणाचे सामंत होते. त्यापैकी आदिपुरुष इन्द्रदत्ताचा मुलगा दहसेन याचा राज्यकाळ इ. स. ४३८ ते ४८०, व्याघ्रसेनाचा ४८० ते ४९४, असा असावा. याचा अर्थ ज्या वेळी सुबन्धुने महिष्मती येथे कलचुरी राज्याची स्थापना केली, याच सुमारास व्याधसेनाने स्वातंत्र्य पुकारले असावे. डॉ. शोभना गोखले त्यांना कोकणात माटवण येथे सापडलेल्या व्याघ्रसेनाच्या वारसीच्या ताम्रपटावरून मध्यमसेन हा सहाव्या शतकाच्या पहिल्या दशकात राज्य करीत होता. तर त्यापुढील विक्रमसेन याची कारकीर्द चौथ्या दशकात आणि नेमकेपणाने सांगावयाचे झाल्यास ५३३ पर्यंत चालू होती असे दिसते. याचा अर्थ इंद्रदत्ताची कारकीर्द लक्षात घेतल्यास ५३३ पर्यंत त्रैकूटक राजे अपरान्तावर निर्वेधपणे राज्य करीत होते, याला अपवाद फक्त हरिषेणाने दहसेनाला ४७० च्या सुमारास आपले मांडलिकत्व घेणे भाग पाडले. तेव्हापासून ते व्याघ्रसेनाने आपले स्वातंत्र्य पुकारले तेपर्यंतचा दहाएक वर्षांचा हा काळ, वराहदेवाच्या गुफा क्र. १६ मधील शिलालेखाव्यतिरिक्त याला काही दुसरा पुरावा आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यास, 'आहे' असे म्हणता येईल, कान्हेरी येथील दुसऱ्या कालखंडातील (इ. स. पाचवे सहावे शतक) गुंफांच्या स्थापत्यावर आणि शिल्पावर अजिंठा येथील कलेची दाट सावली पडल्याचे दिसते. दाराच्या चौकटी, त्यावर मध्यभागी असलेले अर्धस्तंभ (पिलास्टर) गुंफा क्र. ८९, ९० मधील वहांड्यातील आणि सभागृहातील शिल्पांची धारणी आणि त्यामागील हावभाव वाकाटकांच्या सांस्कृतिक प्रभावाचा दुसरा पुरावा शोभना गोखाले यांनी मोठ्या हिरिरीने मांडला. कान्हेरी येथील गुंफा क्र. ८७येथील स्तूपरूपी बौद्ध समाधींचा त्यांनी खोलात जाऊन अभ्यास केला. कान्हेरी येथील केअरटेकर के. एम. वाणी यांच्या साहाय्याने त्यांनी तीसापेक्षा जास्त शिलालेख हुडकून काढले व संपादित केले. गोखलेबाईंनी विशेष करून लक्षात आणून दिलेली गोष्ट म्हणजे, त्यातील बरेच लेख पेटिकाशीर्ष (बॉक्स हेडेड) वळणाच्या ब्राह्मी लिपीत लिहिले आहे. वाकाटकांचे जवळजवळ सर्व शिलालेख या लिपीतच कोरलेले आहेत. त्रैकूटकांवर हरिषेणाचे वर्चस्व होते, हे अधोरेखित करण्यासाठी आणखी एक मुद्दा विशद केला "सकुन्तलावन्ति कलिङ्ग कोसल त्रिकूटलारान्ध... जानिमान/ अशा श्लोकांमध्ये अस्पष्ट झालेली तीन अक्षरे 'परान्त' म्हणजे 'अपरान्त' अशी असावीत, असे सुचविले आहे. त्रैकूटक राजे हे अपरान्ताचे म्हणजे पूर्व दक्षिण- उत्तर कोकणाचे स्वामी असल्याचा त्यांच्या अभिलेखातून उल्लेख येतो. त्रिकूटाबरोबर अपरान्ताचा उल्लेख केल्यामुळे कोकण व सख्याद्री रांगेला लागून असलेला नाशिक अथवा कोल्हापूरसारखा पठाराचा भागही त्यांना अभिप्रेत असावा असे दिसते. या सर्व पार्श्वभूमीवर वॉल्टर स्पिंक यांच्या शिष्या डॉ. भेरिलिन लीज यांनी कान्हेरी येथील पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफांचा विशेष अभ्यास करून प्रबंध सादर केला. "एन्सायक्लोपिडिया ऑफ इंडियन आर्किटेक्चर" या ग्रंथमालिकाचे एक सन्मान्य सहसंपादक डॉ. मधुसूदन ढाकी यांनीही आपल्या लेखनात त्रैकूटक कलेचा परामर्श घेताना या बाबींचा विचार केला आणि डॉ. सूरज पंडित हे कान्हेरी येथील गुंफांवर प्रबंध लिहीत आहेत, हे कळल्यावरून तेथील त्रैकूटक स्थापत्य व शिल्पकलेचा विशेष अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.
डॉ. पंडित यांनी कान्हेरी येथीलच पाचव्या-सहाव्या शतकातील गुंफीचा विचार केला नाही, तर त्यांच्या प्रबंधात अपेक्षित असल्याप्रमाणे साष्टी बेट आणि भोवतालच्या गुफांमध्ये पाचव्या सहाव्या शतकातील बौद्ध वास्तूंचा आणि शिल्पकलेचासुद्धा विचार केला, त्यात लोणाड, महाकाली आणि भारठाणे येथील अवशेष महत्त्वाचे आहेत. याही पलीकडे जाऊन त्रैकूटक हे अपरान्ताचे स्वामी असल्यामुळे कुलाबा म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ल्यातील बौद्ध गुंफांचा विशेष करून महाडजवळील गांधारपाले आणि कुडा येथील गुंफांचा, त्यातल्या त्यात शिल्पांचा परामर्श घेतला. कोकणबरोबरच सह्याद्रीला लागून असलेल्या नाशिकसारख्या पठारावरील ठिकाणांचा त्यांना विचार करावा लागला कारण त्रिकूट हा पर्वत किंवा त्यावरील अनिरुद्धपुरी ही त्यांची राजधानी नेमकी कुठे होती, याविषयी अभ्यासकांत मतभेद असले तरी राजधानी कदाचित धारापुरी येथेच असल्याची शक्यता असल्याने त्रिकूट पर्वत हा नाशिकच्या आसपास कुठे तरी असावा अशी शक्यता असल्यामुळे त्यांनी कोकण साष्टीबेटे व धारापुरी, नाशिक आणि बोरघाटातील गुंफांवर आपले लक्ष केंद्रित केले. वास्तूच्या दृष्टीने कान्हेरी, महाकाली, लोणाड, महाड, नाशिक व कार्ले या स्थळांचा आणि शिल्पमूर्तीविशेषांच्या दृष्टीने मागठाणे आणि कुडा यांचा विचार केला. त्यांच्या मते कान्हेरी येथील शंभरापैकी पंचवीस गुफा त्रैकूटक कालखंडातील असून त्यातील वीस गुंफांचेच त्यांनी आपल्या ग्रंथात वर्णन केले आहे. त्रैकूटक काळातील कान्हेरी येथील गुफांची स्थापत्यवैशिष्ट्ये त्यांच्या निरीक्षणात आली, ती येणेप्रमाणे -
१) गुफेसमोर प्रशस्त अंगण व त्यावर लाकडी मंडप २) अंगणात मितीलगत एक बाक ३) भितीलगत परंतु किंचित आत वर छप्पर ४) गुफेत बाहेर व्हरांडा व आतमध्ये सभागृह आणि गाभारा. ५) गुंफेच्या व्हरांड्याकडे चढून जाण्यासाठी पायऱ्या व याआधी चंद्राशिळा.
वरील उल्लेखिलेल्या २५ गुफांमधील चारांच्या नोंदी (क. ९०, ८९, ३१,४१) त्याकाळचे शिल्पस्थापत्य जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यातील पाहिल्या तीन व्याघ्रसेन, दहसेन यांच्या काळातल्या (म्हणजे इ. स. ४७५ ते ५००) असून ४१ क्र. ची गुंफा इ. स. ६१० पर्यंत पूर्ण झाली असावी. गुफा क. ९० ही एक स्थापत्य तसंच मूर्तिपूजेच्या उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाची गुफा आहे. स्थापत्यदृष्ट्या ही एक पूर्वीच्या काळातल्यासारखी विहारगुंफा आहे. सभागृहाच्या पुढे मूर्तीसाठीचा गाभारा नाही. पाठीमागच्या भिंतीलगतच जवळजवळ पाच फूट उंच असलेली बैठी, बहुतकरून लाकडाची चलमूर्ती बसविण्यासाठी खोबण करण्यात आली आहे. या संदर्भात येथीलच श्रावकयानीय गुंफा क्र. ३ मधील एका वैशिष्ट्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. कार्ले येथील चैत्यगृहाखमाणे प्रशस्त आणि सुंदर अशा या चैत्यगृहात पारंपरिक पद्धतीने स्तूपाची पूजा करण्यात येत असे. परंतु संशोधकांनी नोंद केल्याप्रमाणे पूजा पद्धतीत तिथे काही फरक घडून येत होते व त्याची सुरुवात येथील ध्वजस्तंभावर ठळकपणे कोरलेल्या बैठ्या व उभ्या अशा दोन बुद्धमूर्तीवरून येते, स्तूपाऐवजी बुद्धमूर्तीच्या पूजेची ही नांदी म्हणावयास हरकत नाही. हा बदल ठळकपणे बाध (जिल्हा धार, मध्य प्रदेश) आणि अजिंठा या ठिकाणी झाल्याचा उल्लेख यापूर्वी केलेलाच आहे. अजिंठा येथील गुंफा क्र.
अकराच्या गाभाऱ्यात प्रदक्षिणा घालता येतील असा स्तूप कोरण्यात आला होता, परंतु नंतर बुद्धमूर्ती कोरण्यात आली तरी पाठच्या भागात स्तूपाचा गोलाकार कायम राहिलेला होता. चैत्यगृह क्र. १९ मध्ये तसेच २६ मध्येही स्तूपाच्या समोर स्थानक बुद्ध मूर्ती स्वतंत्रपणे कोरण्यात आली आहे. कान्हेरी येथे अशा बदलांची चाहूल इ. स. च्या दुसन्या शक्कात लागली असली, तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र पाचवे शतक उजाडावे लागले. वर वर्णिल्याप्रमाणे सभागृहाच्या पाठीच्या भिंतीवरच खोबण तयार करून लाकडी मूर्ती बसविण्यात आली असावी. दुसरा महत्वाचा विशेष म्हणजे अश प्रकारच्या पूजागारांत आगमग्रंथांचे पठण सद्धर्मपुण्डरिक हा सर्वास्तिवादी (म्हणजे पंथदृष्ट्या हीनयानी) पण महायान परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेला ग्रंथ चाळल्यास मूर्तिपूजा आणि धर्मग्रंथपठण यांना आचारविधीमध्ये महत्त्वाचे स्थान होते असे दिसते. कान्हेरी येथील त्रैकूटक गुफातील दर्शनी व्हरांड्याला लागून एक कक्ष (सेल) कोरलेला असे त्यातील कोनाड्यात ग्रंथ ठेवण्याची सोय असावी, असा सूरज पंडितांनी केलेला कयास बरोबरच आहे. कारण याच काळातील एक महत्वाची दुसरी गुफा म्हणजे दरबार लेणे (क.११) जेथे सांधिकरीत्या पठण करण्यासाठी दोन लांबलचक ओटे बांधले होते, असे दिसते व ही परंपरा वेरुळ येथील गुफा क्र. ५ मधील, तशाच प्रकारच्या वास्तुरचनेवरू नही मूलकजन्मदातसुद्धा प्रचलित होती, हे स्पष्ट दिसते. क. ९० मधील गुफेतील बुद्धमूर्ती काष्ठाची आणि चल (सुटी) होती, हा योगायोग नाही. कारण सद्धर्मपुण्डरिकाचाच आधार देऊन सूरज पंडित असा तर्क करतात, की विशेष उत्सवप्रसंगी या मूर्तीची मिरवणूकही काढण्यात येत असे. इ. स. सातव्या शतकातले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे राजा श्रीहर्ष अशा उत्सवप्रसंगी भगवान बुद्धाच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक काढीत असे, आणि बोधिसत्त्वाच्या जागी चवरी ढाळण्यासाठी स्वतः उभा राहत असे. भारतीय परंपरेतील रथयात्रेच्या प्रघाताच्या मुळाशी अशीच कल्पना आहे. आजही महालक्ष्मी आणि जे जुरीच्या संस्थानात विशेषप्रसंगी देवळाच्या आवारातच चलमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. या चलमूर्ती व्यतिरिक्त सभागृहाच्या तीनही भितीवर अवलोकितेश्वर, श्रावस्ती येथील महाप्रतिहार्य (श्रावस्ती मिरॅकल) भगवान बुद्ध व दोन बाजूस परिचारक असलेले बेोधिसत्त्व अशा त्रिकूटाची प्रतिमा आणि जॉन हेटिंग्टन यांनी ज्याचे वर्णन 'पञ्चजिनमण्डल' असे केले आहे, असे शिल्पपट भरगच्चपणे कोरलेले आहेत. नंतरच्या म्हणजे वजयान काळातही हे बुद्ध मंदिर तितकेच महत्त्वाचे राहिले असावे. कारण या गुंफेच्या माथ्यावर एक चौकोनी खोबण असून त्यामध्ये काम्यस्तूप (वोटिव्ह स्तूप) उभारण्याची पद्धत होती. असे काम्यस्तूप महाकाली आणि पन्हाळेकाजी येथे उभारल्याचा पुरावा आहे. यानंतरच्या महत्वाच्या गुंफत्र क. ८९ आणि ८१ यांचा तलविन्यास सारखाच आहे. परंतु व्हरांड्यात उजव्या बाजूला असलेला कक्ष लेणी क. ८९ मध्ये मात्र नाही, मात्र भिंतीवर श्रवस्तिमहाप्रातियाथांचे विपुल प्रमाणात चित्रण असून गुंफा क. ३१ मध्ये मूर्तीऐवजी पूजेसाठी स्तूप आहे. या सर्व गुफा पीडित यांच्या मते पाच्या शतकाच्या उत्तरार्धात दह सेना व व्याधसेन यांच्या काळात कोरल्या असाव्यात. इ. स. च्या सहाब्या शतकाच्या पहिल्या दशकात कोरलेली एक महत्वाची गुफा क्र. ४१ ही होय. गुंफेचा तलविन्यास या आधी वर्णन केलेल्या गुंफांच्या सारखाच म्हणजे मोकळे अंगण, मुखभडप, आतमध्ये सभागृह आणि गाभारा असा आहे. परंतु सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे उजव्या हाताला अंगणाच्या सुरुवातीसच एक कक्ष असून त्यात बोधिसत्त्वासहित असलेली बुद्धाची त्रिमूर्ती आहे. सर्वात लक्षणीय म्हणजे एकादशमुख अवलोकितेश्वराचीही प्रतिमा आहे. अवलोकितेश्वर म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर करुणेने नजर ठेवणारा बोधिसत्त्व होय, आपण अशीही कल्पना करू शकतो की त्याची ही दृष्टी दशदिशांत व्यापून राहिलेली आहे आणि त्यासाठीच दहा शिरांची कल्पना करण्यात आली आहे. एकादशमुख अवलोकितेश्वराचा एक स्वतंत्र संप्रदायच मध्य आशिया आणि चीनमध्ये लोकप्रिय झाला होता. अशा अवलोकितेश्वराकडून अभय प्राप्त करून घेण्यासाठी 'एकादशमुख अवलोकितेश्वर दय' अशा नावाचा धारणीमंत्रही ग्रंथीतरी आढळतो. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अवलोकितेश्वराची जगातील ही प्राचीन प्रतिमा आहे. या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होईल की, आज कान्हेरी म्हणून ओळखला जाणारा तत्कालीन कृष्णागिरी महाविहार हा त्या काळी बौद्ध धर्मात होणाऱ्या संक्रमणाचा व त्यातून उद्भवलेल्या नवीन आचारविधी आणि प्रतिभालक्षणे यांचा मूलखोत होता.
कान्हेरीपासून थोडे दूर पण कल्याणच्या मार्गावरील लोणाड या गावाच्या शिवारात लहानशा टेकडीवर एक गुफा आहे. समोरील अंगण ओलांडून गेल्यानंतर दोन खांब आणि अर्धस्तंभाकृती तौललेला हरांडा या मागे तीन द्वारातून प्रवेश करता येईल, असा बंदिस्त मंडप (Closed hall) आणि पलीकडे गाभाथाची योजना असावी. परंतु टेकडीच्या शिळीमध्ये असलेल्या भेगांमुळे मंडप कोरला गेला नाही. ही गुफा महत्त्वाची यासाठी की अंगणात एका बाजूला पाण्याचे टाके आणि दुसऱ्या बाजूला छज्ज्याखाली एक मोठे सुंदर शिल्प आहे. शिल्याचा विषय चटकन लक्षात येत नाही. परंतु व्हरांड्याच्या खांबावरील असलेल्या शिल्पषट्टिकेवर विश्वंतर जातकाच्या कथेतील प्रसंग लक्षात घेतले म्हणजे विश्वंतराला वनवासाला पाठविण्याचा राजाने घेतलेला निर्णय, हा या शिल्पाचा विषय असावा हे स्पष्ट होते. विश्वंतर जातकातील या प्रसंगाबरोबरच त्याकाळच्या संकेतानुसार हरिती आणि पाञ्यिक या मूर्ती येथे कोरलेल्या दिसतात. मंडपात जाण्याच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या तळाशी डोक्धावर कुंभ धारण करणारे गण दाखविलेले आहेत. कुंभ धारण करणारे गण, हरिती व पाञ्यिक आणि विश्वंतर जातकाचे चित्र, त्याचप्रमाणे शिल्पशैली ही हुबेहूब अजिंठ्याप्रमाणे आहे. त्यामुळे ही गुफा पाचव्या शतकाच्या शेवटी शेवटी कोरण्यात आली असावी. महाकाली येथील पहिल्या तीन गुंफाही त्रैकूटक काळातच कोरण्यात आल्या असाव्यात व पलीकडच्या चैत्यगृहातील भितीवरील बोधिसत्त्व शिल्पेही त्याच काळातील असावीत. या संदर्भात साष्टिबाहेरील त्रैकूटक स्थळे म्हणजे कुडा येथील चैत्यगृहात कोरलेल्या श्रवस्ती प्रतिहार्याच्या प्रतिमा आणि महाडजवळील गांधारपाले येथील पहिली गुंफाष्टी विहाराच्या स्वरूपात असून मध्यभागी स्तुपासाठी असलेल्या चौकोनी शिलाखंडाच्या समोरच्या पार्श्वभूमीवर बुद्ध प्रतिमा कोरण्यात आली आहे. बाजूच्या दोन भितींवर चवन्ऱ्या ढाळणारे बोधिसत्त्व कोरण्याचा प्रयत्न केला आहे. ही दोन्ही स्थळे त्रैकूटक काळात श्रवकयानातून बौद्ध धर्माचे बोधिसत्त्व यानात होणारे संक्रमण दाखवितात. स्वतः त्रैकूटक राजे हे बौद्धममनुयायी नव्हते. परंतु याआधी उल्लेख केल्याप्रमाणे सातवाहन/अभिरानंतरच्या आर्थिक पडत्या काळात सागराची किनारपट्टी त्यात अध्याह्नत बंदरे आणि दुर्ग यावर बळकट शिबंदीची व्यवस्था करून त्यांनी व्यापार उदिमाला अभय दिले होते. सारिपुत्ताच्या स्तूपात सापडलेल्या ताम्रपटात उल्लेखिल्याप्रमाणे सिंध प्रांतातील भक्तगण तसेच सार्थवाह साष्टी बेटामध्ये येऊन स्तूप आणि इतर धार्मिक स्थापत्य घडवीत होते. त्यामुळे बौद्ध धर्माला त्यांनी प्रत्यक्ष आश्रय दिला, असा एकही अभिलेख नसला तरी वाकाटक राजा हरिषेण याच्याप्रमाणेच त्यांचे प्रोत्साहन होते असे स्पष्ट दिसते. ते स्वतः परम वैष्णव होते आणि दहसेनाने अश्वमेध याग केल्याचाही उल्लेख येतो. सर्व त्रकूटक राजाच्या शिलालेखातून ब्राह्मणांना चरुबली, वैश्वदेव यासाठी सूरतेच्या आसपासच्या भागात व कोकणात भूमिदान केल्याचे उल्लेख येतात. आज रत्नागिरीच्या संग्रहात प्रदर्शित केलेली, पनवेलजवळ सापडलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती या संदर्भात महत्वाची आहे. चक्र, गदा आणि शंख धारण करणारी ही लाञ्छनांच्या आणि मूर्ती घडविण्याच्या शैलीच्या दृष्टीने पश्चिमेकडील मिनमान (राजस्थान) व इतरत्र आढळणाऱ्या प्राचीन स्थानकमूर्तीशरी साम्य दाखविते. ही पाचया शतकातील म्हणजे त्रैकूटक काळातील हे निश्चित, याहूनही अधिक स्तिमित करणारी मूर्तिशिल्पे रत्नागिरीजवळ लॉजा येथे टेकाडात कोरलेली आढळतात. त्यामध्ये स्थानक चतुर्भुज विष्णु, नदीवर आरूढ झालेले उभा व शंकर आणि चक्रपाणी आणि विशेष म्हणजे द्विभुज चक्रपाणी केवलनरसिंहाची प्रतिमाही आहे. याआधी आपण पाहिल्याप्रमाणे रामटेक (जि. नागपूर), भादक व भटाळा (जिल्हा चंद्रपूर) आणि पवनार (जिल्हा वर्धा) या विदर्भातील स्थळाव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेर चौथ्या पाचव्या शतकात अशा केवलनरसिंहाच्या प्रतिमा उत्तर कर्नाटकात (हल्लीचे धारवाड व मंगलौर हे जिल्हे) म्हणजे प्राचीन कुंतलाधिपती यांच्या राज्यातच सापडल्याची माहिती होती. हे राजेही स्वतःस परमभागवत आणि वैष्णव म्हणावत असत. वाकाटक राजाप्रमाणेच ते सात्वत धर्मानुयायी होते, याचा यापूर्वीच्या लेखात उल्लेख आला आहेच, परंतु लांजा येथील त्रैकूटककालीन केवल नरसिंहाच्या शोधामुळे हरिषेणाच्या काळात सात्त्वतधर्म हा कोकणातही पोहोचला होता हे सिद्ध होते. पळसांबे (जिल्हा-कोल्हापूर) येथील एका नाल्यात मोठमोठ्या शिलाखंडामध्ये एकार मक पद्धतीने कोरलेल्या तीन मंदिरांचा आणि काही शिवलिंगांचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्ण होणार नाही, असे आम्हांस वाटते. एकूण स्थापत्य पद्धतीवरून आणि विशेषतः खांबांच्या रचनेवरून आम्ही या निष्कर्षाप्रत आलो आहोत की या गुफा त्रैकूटकालीनच असाव्यात, याविषयी पूर्वी लेख लिहिला, त्या वेळी पळसांबे येथील गुंफा चालुक्यापूर्वकालीन आहेत, असा निर्णय घेऊन कालविषयक चर्चा तेवढ्यात आटोपती घेतली, परंतु त्रैकूटककालीन कलेचा सूरज पंडित यांनी केलेला ऊहापोह लक्षात घेता आम्ही आता बरील निष्कर्ष काढला आहे.
वेंगीचे विष्णुकुंडी
आणखी एक राजघराणे म्हणजे वाकाटकांशी घनिष्ठ संबंध असणारे वेगीचे विष्णुकुंडी होत. काही विद्वानांच्या मते अगदी प्रवरसेन प्रथम (इ.स. २७०-३३०) याच्या काळापासून अंध राजांचा आणि वाकाटकांचा संबंध आला असावा. वाशीमच्या वाकाटकांनी द्वितीय विन्ध्यशक्तीच्या काळात (इ.स. ३५५ - ४००) आंध्रातील आपले वर्चस्व कायम ठेवले असावे. पण त्यांच्या संबंधाचा अगदी स्पष्टपणाने पुरावा विष्णुकुंडी विक्रमेद्रवर्मन् द्वितीय याच्या चिक्कुल्ल ताम्रपटामधील 'माधववर्मणः प्रियप्रणप्ता विष्णुकुंडिवाकाटकवंशद्व-यालङ्कृतजन्मनः' या उल्लेखावरून मिळतो. विक्रमेद्रवर्मन् याने कंदुलपले येथून चौदाव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात, श्रीमाधववर्मा याचा तो आवडता मुलगा असून विष्णुकुंडी आणि वाकाटक वंश यांना आपल्या जन्माने त्याने अलंकृत केल्याचा उल्लेख येतो. विक्रमेद्रवर्मा यानेच आपल्या तुंबलगुडे येथून अकराव्या वर्षी दिलेल्या ताम्रपटात महाराज श्रीविक्रमेंद्र हा श्रीमाधववर्त्याचा प्रिय पुत्र असून त्याची आई वाकाटक कुळातील होती असा स्पष्ट उल्लेख येतो. यांनी विक्रमेद्रवर्मन् हा माधववर्मा याचा मुलगा ही गोष्ट लक्षात घेऊन तो माधववर्मा प्रथम याचा मुलगा असावा असे मत मांडले होते. परंतु चिक्कुल्ल ताम्रपटातील स्पष्ट उल्लेखामुळे तो माधववर्याचा पणतू होता हेही लक्षात आले. डॉ. एस नारायण यांनी आपल्या १९७७ साली लिहिलेल्या 'विष्णुकुंडी व त्यांचा काळ' या ग्रंथात विष्णुकुंडी घराण्याच्या सर्व ताम्रपटांचा सखोल मानत होते अभ्यास करून असे दाखवून दिले की म. म. मिराशी त्याप्रमाणे विष्णुकुंडीवंशामध्ये माधववर्मा या नावाचे दोनच राजे नसून चार राजे झाले असावेत. तसेच विक्रमेद्रवर्मा या नावाचेसुद्धा दोन राजे होऊन गेले असावेत.
▲ शिऊर येथील गुंफांमध्ये कोरलेले पूतनावधाचे शिल्प
त्यातील माधववर्मा द्वितीय याने ३७ वर्षापेक्षा जास्त राज्य केले असावे (इ.स. सुमारे ४६३-५०२). विक्रमेंद्रवर्मन् प्रथम (इ.स. सुमारे ५०२-५२७) हा मुलगा त्याला वाकाटक राजकन्येपासून झाला असावा. आणि त्यामुळेच एके ठिकाणी तो माधववर्त्याचा मुलगा आणि दुसऱ्या ठिकाणी तो माधववर्त्याचा पणतू अशा प्रकारचे उल्लेख येतात. स्वतः विक्रमेंद्रवर्मन् प्रथम याने दिलेले ताम्रपट अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. वाकाटकमहादेवीचा किंवा विष्णुकुंडी आणि वाकाटक या वंशद्वयाचा उल्लेख असलेले सर्व ताम्रपट हे विक्रमेंद्र द्वितीय याने दिलेले आहेत हे स्पष्ट आहे. त्याच्या राज्य शासनाच्या दहाव्या वर्षी चिक्कुल्ल येथून दिलेल्या ताम्रपटातून तो ताम्रपट शक ४८८ मध्ये दिलेला असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे त्याचा काल इ.स. सुमारे ५५५ ते ५७२ असावा असे ठरवताना फारसे प्रयास झाले नाहीत. म. म. मिराशी यांनी माधववर्त्यांचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध असावा हे मांडले, त्यालाही एक वेगळी पार्श्वभूमी होती. सातारा जिल्ह्यातील खानापूर या तालुक्याच्या ठिकाणी माधववर्मा या राजाने दिलेल्या ताम्रपटसंचातील दोन पत्रे मिळाले. त्यावर त्यांनी व य. रा. गुप्ते यांनी मिळून (एपिग्राफिया इंडिका खंड २७पृष्ठे ३१६-३१७) एक लेख प्रसिद्ध केला. या ताम्रपटसंचात मूळ तीन पत्रे असावेत. त्यातील पहिला पत्रा सुरुवातीपासूनच गहाळ असल्याने व दुसऱ्या पत्र्याचा वरचा आणि खालचा भाग तुटलेला असल्याने त्यातील दोन्ही बाजूंवरील सुरुवातीचा आणि शेवटचा मजकूर खंडित झाला होता. त्यामुळे दान देणारा महाराज श्रीमाधववर्मा हा कुठल्या घराण्यातील राजा असाही सुरुवातीस प्रश्न पडला होता. परंतु दुसऱ्या पत्र्यावरील दुसऱ्या ओळीत पुंडरीक बहुसुवर्ण आणि अकरा यज्ञ केल्याचा, तसेच तो सार्वभौम होता, सूर्याप्रमाणे तेजस्वी, ऐश्वर्याने इंद्रासारखा व चातुर्वर्ण्य आणि चतुराश्रम धर्माचा तो रक्षणकर्ता होता असेही त्याचे वर्णन आले आहे. त्यातील 'पुंडरीक बहुसुवर्ण' या वेगळ्या प्रकारच्या यज्ञ प्रकारामुळे तसेच त्याने अकरा म्हणजे अकरा अश्वमेध याग केले होते, हे लक्षात आल्यामुळे तो विष्णुकुंडी वंशातील माधववर्मा असावा असा कयास म. म. मिराशी यांनी प्रदर्शित केला व त्यावेळी विष्णुकुंडीच्या इतिहासासाठी उपलब्ध असलेल्या लेखसामग्रीवरून त्यांनी विष्णुकुंडी वंशातील राजांची वंशावळसुद्धा तयार केली व त्यात वंशातील आद्य माधववर्मा याने खानापूरचा ताम्रपट दिला असावा असे मत प्रकट केले. मिराशी यांना उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे विष्णुकुडी वंशात दोनच माधववर्मा नावाचे राजे झाले असावेत असे त्यांना वाटले. माधववर्मा प्रथम हा आंध्र प्रदेश येथील वेगी अथवा इंद्रपूर येथून राज्य करीत असताना दान दिलेल्या गावाच्या चारही बाजूस असलेल्या आजच्या सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक (रेडूरकग्राम) व मलखेड (मलखेटक) यांचा उल्लेख करताना तो वाकाटकांच्या
▲ शिऊर येथील गुंफांमधील त्रिविक्रमाची मूर्ती
वाशीम शाखेतील हरिषेणाचा समकालीन असावा (त्यांच्या मते इस ४७५ ते ५००) आणि हरिषेणाच्या मृत्यूनंतर माधववर्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार साताऱ्यापर्यंत केला असावा असा कयास बांधला. आपल्या वरील मताला पुष्टी देण्यासाठी त्रिकुटमलय पर्वतावर माधववर्त्याची सत्ता होती असाही विष्णुकुंडी ताम्रपटांत उल्लेख असल्यामुळे तो त्रिकूटपर्वत म्हणजे अंजनेरी ताम्रपटांत उल्लेख केलेला
▲ शिऊर येथील या गुंफा विष्णुकुंडी यांच्या काळात कोरल्या गेल्या असाव्यात
▲ शिऊर येथील गुंफांमधील वराहाची मूर्ती
सह्यह्याद्री पर्वताचा भाग असलेला नाशिकजवळील त्रिकूटपर्वत असावा असेही अनुमान त्यांनी केले. आणि त्यामुळे पश्चिमेत नाशिकपासून साताऱ्यापर्यंत इतक्या दूरवर त्याचे साम्राज्य पसरले असावे, अशी अटकळ त्यांनी बांधली. तसेच अंध, कलिंग, त्रिकूट, लाट, कोसल, मालव, कुंतल, एवढ्या प्रदेशावर सार्वभौमत्व गाजवणाऱ्या हरिषेणाचा माधववर्मा प्रथम हा मांडलिक असावा, एवढेच नसून आपली मुलगी देऊन माधववर्याशी हरिषेणाने आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले असावेत असेही मत मांडले. वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी व त्यांचे मांडलिक यांच्या अठरा ताम्रपट व शिलालेखांचा चिकित्सक अभ्यास करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या म्हैसूर येथील प्रमुख पुराभिलेखज्ञ या कार्यालयात पुराभिलेखज्ञ या हुद्यावर काम करणाऱ्या अलमेलू श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी विष्णुकुंडी आणि त्यांचा काळ हा प्रबंध १९७७ साली प्रकाशित केला. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे विष्णुकुंडी राजवंशात इ. स. ३७५ ते इ. स. ६१२ या जवळ जवळ २५० वर्षाच्या कालखंडात आठ राजांनी राज्य केल्याचे प्रतिपादिले आहे. त्यात दोन विक्रमेद्रवर्मा, दोन गोविंदवर्मा, दोन इंद्र, व चार माधववर्मा नावाचे राजे होऊन गेल्याचे ते प्रतिपादितात. विष्णुकुंडी यांचे राज्य हे उत्तरेत नर्मदा, पश्चिमेस सातारा आणि दक्षिणेत पल्लवांच्या राज्यापर्यंत भिडलेले असल्यामुळे व तुलनेने या काळातील इतिहास हा बराचसा अज्ञात आणि गुंतागुंतीचा असल्याने इतिहासाची जुळवाजुळव करताना त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत असे सहज लक्षात येते. पण त्यामुळे वाकाटकवंश आणि विष्णुकुंडी यांच्या परस्पर संबंधांवर त्यांनी नव्याने प्रकाश टाकला आहे. उदा. नंदिवर्धन शाखेतील नरेन्द्रसेन व पृथ्वीषेण द्वितीय यांच्याशी, यापूर्वी उल्लेख केलेल्या मानपूर येथील राष्ट्रकूट राजांशी, वनवासी येथील कदंबांशी व वाशीम शाखेतील विन्ध्यशक्ती व्दितीय, देवसेन व त्याचा पुत्र सम्राट् हरिषेण यांच्याशी कशा प्रकारचे संबंध होते याचाही त्यांनी चिकित्सकपणे खोलवर विचार केला आहे. श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी नव्याने मांडलेल्या विष्णुकुंडी यांच्या राजवंशावळीत माधववर्मा द्वितीय (इ.स. सुमारे ४२२-४६६) हा वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील प्रवरसेन द्वितीय (नंदिवर्धन शाखा इ.स. ४१०-४४०) व हरिषेण (इ. स. सुमारे ४६२ - ४७८ डॉ. स्पिक यांनी मांडलेल्या नवीन कालक्रमाप्रमाणेही) या दोघानाही समकालीन होता. तो कदाचित नरेद्रसेन (इ.स. सुमारे ४४० ४५५) आणि पृथ्वीषेण द्वितीय (इ. स. सुमारे ४५५ - ४७०) यांनाही समकालीन असावा. प्रो. स्पिक यांनी अजिंठा येथील व बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संबंधात वाकाटकांच्या भोवतालच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या अथवा त्यांच्या संबंधात असलेल्या राजांच्या कारकिर्दीचा विचार करून हरिषेणाचा कार्यकाल एरवी समजले जाते, त्यापेक्षा कमी कालावधीचा असावा असे मत मांडले. प्रो. स्पिक यांच्या असे लक्षात आले की हरिषेणाचे साम्राज्य कदाचित आकस्मिक रीतीने संपुष्टात आले असावे. त्याच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशाचा आणि त्यावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचा कार्यकाळ लक्षात घेतला, तसेच जुन्या राज्यावर नव्याने प्रस्थापित झालेले राजवंश लक्षात घेतले तर असाच अंदाज करावा लागतो. उदा. नर्मदेच्या पलीकडील माळव्यावर राज्य करणारे राजे त्याला अनुकूल होते. बाघ (मध्यप्रदेश) येथील गुंफांच्या संगोपनासाठी सुबंधु नावाच्या माळव्यात नव्याने उदयाला आलेल्या राजाने ताम्रपट दिल्याचे लक्षात आले. सुबंधु याचा बरवानी येथील ताम्रपट त्याने १६७ व्या संवत्सरात (+ गुप्त शकाची ३२० वर्षे = इ. स. ४८७) दिला. या ताम्रपटातील गुप्त शकातील वर्षानुसार हरिषेणाचा काल इ.स. सुमारे ४८५ च्या आसपास संपला होता असे मानावे लागते. त्रैकूटक हा दुसरा राजवंश, त्यांनीसुद्धा वाकाटकांचे वर्चस्व झुगारून त्याच सुमारासच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. (४९० मधील सूरत ताम्रपट) तसेच बाघ येथील गुंफा, म. म. मिराशी मानतात त्याप्रमाणे पाचव्या शतकातील सुरुवातीच्या काळातील नसून, अजिंठ्याच्या समकालातच निर्माण केल्या असाव्यात, हे तेथील स्थापत्य व शिल्पकलेची धाटणी लक्षात घेतल्यावर दिसून येते, हे वाल्टर स्पिक यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. तिसरा मुद्दा असा की, नंदिवर्धन शाखेचा लय हा कदाचित हरिषेणाच्या आक्रमक धोरणामुळे झाला असावा. पुणे येथील प्रभावतीगुप्ता हिच्या ताम्रपटाचा हरिहर ठोसर यांनी नव्याने विचार करून हे दाखवून दिले आहे की त्यातील सुप्रतिष्ठानविषय व दानपत्रात वर्णन केलेली गावे ही पैठणच्या आसपासच सापडतात. त्याचा सहज व सरळ अर्थ असा होतो की प्रवरसेनाने वन्हाडात राज्य करणाऱ्या वाशीम शाखेतील प्रदेशापलीकडे सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे प्रवरसेन द्वितीय याच्या काळामध्ये वत्सगुल्मशाखेतील एक अगदी कोवळ्या वयातील राजा अथवा त्यापाठोपाठ राज्यावर आलेला देवसेन हा दुर्बळ राजा असावा असे दिसते.
▲ शिऊर येथील गुंफांमधील मागील हातात शंख आणि चक्र घेतलेली विष्णूची मूर्ती
श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन वाकाटक वंशाच्या दोन शाखांतील परस्परसंबंध कसे होते याविषयी काही नव्याने विचार मांडले आहेत. त्यांच्या मते विक्रमेद्रवर्मन् (प्रथम) याची आई, म्हणजे द्वितीय माधववर्याची पत्नी, जिचा लेखात वाकाटक महादेवी म्हणून उल्लेख केला आहे, ती नंदिवर्धन शाखेच्या प्रवरसेन द्वितीय याची मुलगी असावी. श्रीनिवास शंकरनारायणन् यांच्या मते हरिषेण याचा पिता देवसेन हा अत्यंत दुबळा राजा असून नामधारी राजा असावा. आणि त्यामुळेच नंदिवर्धन शाखेचा प्रवरसेनच विदर्भाचा खरा राजा असावा. त्याने पराक्रमी माधववर्याला आपली मुलगी देऊन संबंध बळकट केले असावेत. प्रवरसेन द्वितीय याची सून कुंतल राजकन्या अज्झितभट्टारिका ही मानपूरच्या राष्ट्रकूट वंशातील किंवा कदंब वंशातील असली, तरी ही राज्ये वाशीम शाखेच्या राज्याच्या सीमारेषेवर असल्यामुळे नंदिवर्धन शाखेचीही प्रतिस्पर्धी अथवा शत्रू होती. कुंतलांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून प्रवरसेनाने आपली आग्नेयेकडील बाजूदेखील पक्की केली होती. प्रवरसेनाचा मुलगा नरेंद्रसेन आणि नातू पृथ्वीषेण द्वितीय यांच्याविषयी ताम्रपटांतून आलेली बिरुदे दोन शाखांतील नाजूक संबंधांच्या दृष्टीने अतिशय सूचक आहेत असे दिसते. नरेंद्रसेनाचे वर्णन, त्याच्या राजप्रतिष्ठेचा कोसल (हल्लीचा छत्तीसगढचा भाग) मेकला (म्हणजे नर्मदा नदीच्या उगमाजवळील अमरकंटकचा प्रदेश व मालव (म्हणजे माळवा) यावर राज्य करणारे राजे आदर करीत असत, (मेकला-कोसला-मालवाभ्यर्चितशासनः) असे आले आहे. परंतु त्याचबरोबर त्याच्या राज्यलक्ष्मीचा एका बलाढ्य नातेवाईकाने अपहार केला (गुणवद्दायादापहृतवंशश्रियः) होता असा उल्लेख त्याचा वारस पृथ्वीषेण द्वितीय याच्या ताम्रपटातून येतो. आपण घराण्याच्या सत्तेवर आलेली संकटे दोनदा बाजूला सारली (द्विमग्नवंशस्योद्धर्तुः). नरेंद्रसेनाने स्वतः दिलेले ताम्रपट अथवा शिलालेख अजून तरी मिळालेला नाही. या दोन्ही राजांच्या वर्णनावरून असे दिसते की, नंदिवर्धन शाखेच्या राज्यावर परचक्र किंवा बंडाळी यांसारखी संकटे दोनदा आली होती. त्यातील एक संकट तर जवळच्या नातेवाईकामुळे ओढवले होते. ते हरिषेणामुळे आलेले असावे. आपण वर पाहिले त्याप्रमाणे देवसेन आणि त्याचा पिता यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन सर्व विदर्भावर द्वितीय प्रवरसेनाने आपला अधिकार प्रस्थापित केला असावा. त्यामुळे इ. स. ४६२च्या सुमारास राज्यावर आल्यानंतर हरिषेणाने खानदेशासारखा भाग आपल्या ताब्यात घेऊन (हरिषेणाचा थाळणेर ताम्रपट पहा) आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या परिस्थितीत कुंतालाधिपतीनी आणि त्यांच्याशी सख्य असलेल्या विष्णुकुंडी माधववर्त्याने आपल्या मेव्हण्याला मदत केली असावी. त्याच्या मदतीने राजपुत्र पृथ्वीषेणाने हरिषेणाचे संकट टाळले असावे. नरेंद्रसेनाने माळव्यावर आपल्या सत्तेचा दरारा बसवला होता त्यावेळेच्या संघर्षातसुद्धा माधववर्त्याने त्याला व पृथ्वीषेणाला मदत केली असावी. आपल्या ताम्रपटातून माधववर्मा आपल्या राज्याची सीमा उत्तरेत नर्मदेपर्यंत पसरली आहे असे मोठ्या अभिमानाने सांगतो. असे असूनसुद्धा नरेंद्रसेनाच्या मृत्यूनंतर पृथ्वीषेण फार काळ टिकाव धरू शकला नसेल असे ताम्रपटात उल्लेखलेल्या त्रिकूट, लाट, कुंतल, कोसल, कलिंग आणि अवंति या प्रदेशांवरील सार्वभौमत्वावरून लक्षात येते. वाकाटक घराण्यातील माधववर्त्यांची पत्नी ही प्रवरसेन द्वितीयाची मुलगी असावी याला श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी उधृत केलेल्या श्रीशैल स्थलमाहात्म्यातील एका कथेवरून लक्षात येते. त्या माहात्म्यात असे म्हटले आहे की चंद्रगुप्त राजाची कन्या चंद्रावती ही दररोज एक मोगऱ्याचा हार श्रीशैलस्वामीला वाहून आपली भक्ती प्रकट करत असे. राजकन्यांचा उल्लेख त्यांच्या राजघराण्यावरून करण्याचा प्रघात भारतात आहेच, यासंदर्भात विच्या पित्यावरून तिचे नाव चंद्रावती ठेवले असावे. महात्म्यकाराला येथे चंद्रगुप्त द्वितीयाची मुलगी आणि रुद्रसेन द्वितीयाची महाराणी प्रभावतीगुप्ताच अपेक्षित असावी. नंदिवर्धन आणि वाशीम शाखांमधील विसंवाद आणि त्यातून उत्त्पन्न झालेली स्पर्धा हीसुद्धा एका अर्थाने वाकाटक वंशाच्या लयाला कारणीभूत होती, असे वरील पुराव्यावरून लक्षात येते. श्रीनिवास शंकरनारायणन् यांनी केलेली ही उकल लक्षात घेतली म्हणजे हरिषेणाच्या मृत्यूनंतर मिळालेली संधी घेऊन माधववर्त्याने आपले राज्य काही काळपर्यंत तरी साताऱ्यापर्यंत वाढवले असावे, हे खानापूरच्या ताम्रपटाच्या पुराव्यावरून पटते. आणि त्या घटनेचासुद्धा समाधानकारकपणे खुलासा करता येतो.
▲ शिऊर येथील गुंफांमधील महिषासुरमर्दिनीची मूर्ती
विष्णुकुंडी आणि वाकाटक वंशातील गुंतागुंतीच्या संबंधावर औरंगाबाद जिल्ह्यह्यातील भोकरदन येथील वैष्णव गुंफा आणि आंध्रप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या नांदेड जिल्ह्यातील शिऊर येथील वैष्णव गुंफांतील पुराव्यामुळे कसा प्रकाश पडतो, हे लक्षात येते. भोकरदन येथील सहाव्या/सातव्या शतकातील वैष्णव गुंफा ही एका लहानशा टेकाडाच्या एका बाजूस कोरलेली असून पुढे अंगण, दर्शनी भागात सहा स्तंभ, उत्तर व दक्षिण बाजूस एकेक अर्धस्तंभ, या स्तंभावलीच्या पश्चिमेस तशीच सहा स्तंभांची रांग आणि दोन अर्धस्तंभ, त्याच्या पाठीमागील बाजूस सात कक्ष असा या गुंफेचा विन्यास आहे. मधोमध असलेल्या कक्षाचा वापर गर्भगृह म्हणून होत होता, हे दरवाज्याच्या चौकटीच्या तळाशी असलेल्या द्वारापालांवरून आणि आतल्या भिंतीला लागून असलेल्या मूर्तिपीठावरून सहज लक्षात येते. गुंफा कोरण्यासाठी वापरण्यात आलेला दगड हा काही उत्तम प्रतीचा नाही; त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेकडील भिंतीवर कोरलेली शिल्पे फारशा चांगल्या अवस्थेत नाहीत. पण त्यावर कोरलेल्या ब्रह्मा आणि दुर्गा महिषमर्दिनी यांच्या बरोबरच शेषशायीविष्णु, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिमा सहज ओळखता येतात. त्यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती ही विष्णूची असावी याविषयी तिळमात्र शंका राहत नाही. खांबांची ठेवण त्यावरील नक्षी तसेच शिल्पाची धाटणी लक्षात घेता ही गुंफा कोरणाऱ्या स्थपतीची शैली ही आंध्रप्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या स्थापत्यशिल्पाशी मिळतीजुळती आहे, असे निरीक्षण के. व्ही. सौदरराजन यांनी आपल्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ द डेक्कन' या प्रबंधात मांडले आहे. या गुहेमध्ये एके ठिकाणी 'उत्पातिपिडुगु' अशी अक्षरे असलेला एक लेख कोरलेला आढळतो. असा आशय असलेले लेख आंध्र प्रदेशातील पूर्वी चालुक्यांच्या सतनीकोटा, मोगलराजपुरम, अक्कण्णा-मदण्णा येथील गुंफांतून सापडले असून या लेखांतील वळणही कन्नड-तेलुगु धाटणीचे आहे.
▲ पवनार येथे सापडलेली विष्णुकुंडी राजघराण्याचे तांब्याचे नाणे
विद्वानांच्या मते हे एका शैव महंताचे बिरुद असून, अशा प्रकारे प्रवासी महंत आपली नावे यात्रेच्या दरम्यान कोरून ठेवत असत. अशाच एका शैव महान्ताने आपले बिरुद भोकरदनच्या गुहेत कोरून ठेवले असावेत. या संदर्भात शिऊर (जिल्हा नांदेड) येथील गुंफांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. शिऊर येथे चार गुंफा असून, त्या अपूर्ण अवस्थेत आहेत. या शिल्पांची शैली पूर्णपणे संस्कारित नाही, तर ओबडधोबड आहे. स्थपतीने गुहा कोरताना शिल्पे भिंतीऐवजी खांबांवर कोरली आहेत. शिल्पे वैष्णव असून शिल्पांची मांडणी एक विशिष्ट क्रम मनात ठेवून केलेली नाही. आत एके ठिकाणी एक शिवलिंग आणून बसवले असले तरी ते गुंफांच्या इतके जुने नक्कीच नाही. कोण्या शिवभक्ताने काही वर्षांपूर्वी ते बसवले असावे हे शिल्पांचे विषय पाहिला म्हणजे लक्षात येते. ठळकपणे नजरेत भरणारी शिल्पे आहेत ती अशी; महिषासुरमर्दिनी, लिंगोन्द्भवमूर्ती, विदरणनरसिंह, वराह व पूतनावध. विष्णूच्या तीन-चार स्थानक मूर्ती असून त्यातील हातात घेतलेल्या लक्षणांच्या क्रमावरून त्या सातव्या परिसंवादात या गुंफांचा काळ आणि त्या कुठल्या संप्रदायाशी संबंधित आहेत, याविषयी चर्चा करताना डॉ. वैशाली वेलणकर यांनी असे मत व्यक्त केले की विष्णुकुंडीचा अंमल असताना त्या कोरल्या गेल्या असाव्यात. विष्णुकुंडी हे श्रीशैलस्वामीचे परमउपासक होते हेही आपण या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील काही गुंफावर विष्णुकुंडींच्या स्थापत्य व शिल्पशैलीचा काही प्रभाव असावा या मताला पोषक असा आणखी एक पुरावा म्हणजे सिंहमुद्रांकित तांब्याची नाणी. प्राध्यापक शां. बा. देव व प्राध्यापक म. के. ढवळीकर यांनी पवनार येथे १९६५-६६ साली उत्खनन करून तेथील वाकाटककालीन वस्तीचा आणि अवशेषांचा विशेषकरून अभ्यास केला. नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे उपकुलगुरू डॉ. वि. भि. कोलते, म. म. वा. वि. मिराशी यांनी केलेल्या तर्काला देव आणि ढवळीकर यांनी उत्खननानंतर दुजोरा दिला. त्यांच्या मते नन्दिवर्धन शाखेच्या वाकाटकांची प्रवरपूर ही सुप्रसिद्ध राजधानी पवनार येथेच असावी. पवनार येथे एका धातुपात्रात ठेवलेला तांब्याच्या नाण्यांचा निधीही आढळला. प्रा. अजय मित्र शास्त्री यांनी या नाणेनिधीचा अभ्यास केला आणि त्यांच्या मते ती विष्णुकुंडी यांची नाणी होती. माधववर्याचा खानापूर येथील ताम्रपट, भोकरदन येथील वैष्णव गुंफा व तेथील कानडी तेलुगु लिपीतील महंताच्या बिरुदाचे नामांकन, शिऊर येथील गुंफा यांचासुद्धा वाकाटक-विष्णुकुंडी यांचे संबंध व सहाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास यांचा अभ्यास करताना विचार केला पाहिजे हे वरील आढावा घेतल्यानंतर सहज लक्षात येते. शतकाच्या अगोदरच्या आहेत हे लक्षात येते. वरच्या किंवा पाठीमागील हातात चक्र आणि गदा असून पुढील डाव्या हातात शंख आहे. असा क्रम इ. स. पाचव्या शतकातील मूर्तीत आढळतो. गुंफांच्या एकूणच ठेवणीवरून तसेच प्रतिमालक्षणावरून त्या वाकाटककालीन असाव्यात, असे नांदेडचे सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ प्रभाकर देव यांचे मत झाले आहे. या सर्व गुंफा त्यातील दगडाच्या घडणीमुळे काही चांगल्या अवस्थेत नाहीत. बऱ्याच मूर्तीमधून एक आडवा किंवा तिरपा ठिसूळ थर असा आहे की त्यामुळे मूर्तीना छेद गेलेला आहे. कदाचित या कारणामुळेच काम अर्धवट राहिले असावे. एके ठिकाणी लिंगोद्भवमूर्ती असल्यामुळे चारपैकी एक गुंफा शैवसुद्धा असण्याची शक्यता आहे. विष्णूच्या प्रतिमांमधील लक्षणांच्या क्रमामुळे त्या सहाव्या शतकातील आहेत, असे मानावयास काही हरकत नाही. डेक्कन कॉलेजमधील उत्खनन चमूने एका वर्षी या ठिकाणी चाचणीचे उत्खननही केले. कारण गुंफेसमोरील शेतात त्यांना समकालीन खापरे आणि इतर पुरावशेषसुद्धा सापडले होते. एका
आजपासून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध गिरिस्थान माथेरानच्या कथा जाणुन घेणार आहोत. मुंबई-पुणे लोहमार्गावरील नेरळ या प्रस्थानकापासून अरुंदमार्गी म्हणजे नॅरो गेज लोहमार्गाने माथेरानला जाता येते. नेरळ-माथेरान हे लोहमार्ग अंतर २१ किमी. आहे नेरळहून माथेरानपर्यंत मोटारीकरिता रस्ता असला, तरी मोटारींना माथेरान गावात प्रवेशबंदी आहे. मुंबई–पुणे राष्ट्रीय हमरस्त्यावरील चौक येथून पाऊलवाटेनेही माथेरानला जाता येते तसेच विवीध वाटांनी ट्रेकर्स इथे येतात. हौशी प्रवासी व गिर्यारोहक नेरळहून जवळच्या मार्गाने (११ किमी.) माथेरानला पायी जातात.
या प्रदेशाच्या माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले असे म्हणतात. धनगरांचे आद्य मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) हे नाव रूढ झाले, अशी येथील धनगर समाजाची समजूत आहे. १८५० पूर्वी कोणासही ज्ञात नव्हते. मात्त्र काही आख्यायिकांवरून शिवाजी महाराज व नेताजी पालकरचा येथील साधूपुरुष पिसारनाथशी संबंध जोडला आहे. येथील वरोसा घळीतील चढणमार्गास शिवाजी चढण ( शिवाजी लॅडर ) असे नाव आहे. माथेरानचे नाव डोंगर माथ्यावरील रान या अयनि रूढ झाले आहे.
१८३० च्या सुमारास मुंबई शासन फौजेसाठी उन्हाळी आरोग्यधामाच्या शोधात होते. मे १८५० मध्ये ठाण्याचा जिल्हाधिकारी एच. पी. मॅलेट ( Hugh P Malet ) पुण्यातून ठाण्याला परत निघाला असताना चौक येथील बंगल्यात मुक्कामाला असताना एक कुतुहल म्हणून माथेरानवर प्रथमच गेला. ईथल्या निसर्ग सौंदर्यांने तो भारावून घेला. मॅलेटचा चौकला तळ असताना एके दिवशी संध्याकाळी तो मोठा चौक व वन ट्री हिलमधील वरोसा घळीतील झऱ्याच्या पात्त्रातील अरुंद चढावमार्गाने (आताची शिवाजी लॅडर) अर्धी टेकडी चढून गेला. दुसऱ्या दिवशीही सुंदेवाड्याच्या पाटलासोबत डोंगराचे समन्वेषणासाठी त्याने पुन्हा कूच केले. या मार्गाने तो थेट वन ट्री हिलवरून पिसारनाथ जंगलात आला. तेथे त्याला लहानसे नैसर्गिक तळे (सध्याचे शारलोट तलाव) आढळले. या तळयास खळखळ वाहत येणारे पाण्याचे अनेक प्रवाह येऊन मिळाले होते. येथील पाणी व दगड-मातीचे नमुने घेऊन तो रामबागेतून अलेक्झांडर पॉईंट व धाकटा चौक पॉईंटमधील बाटेने उतरून चौक तळावर आला. इंग्रजांना भारतात हिल स्टेशन उभारण्याची निकड होती, कारण भारतातील उष्ण हवामान आणि रोगराई मुळे अनेक ब्रिटीश अधिकारी इंग्लंडला परत जाण्यास उत्स्तुक होते. त्यातच १९ व्या शतकात भारतात ब्रिटीश सत्तेचा विस्तार होत होता. त्यामुळे थंड हवामान असलेल्या ठिकाणांचा शोध अपरिहार्य होता. यातूनच सिमला, डलहौसी, उटी, मसुरी यासारखी थंड हवेची ठिकाणे विकसीत करंण्यात आली. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये महाबळेश्वर हे पहिले थंड हवेचे ठिकाण विकसीत करण्यात आले. इ.स. १८२९ मध्ये महाबळेश्वर हि अशिकृत उन्हाळी राजधानी घोषीत करण्यात आली. मात्र इंग्रजांना काही विशेष गोष्टी अपेक्षित होत्या, जश्या सहजगत्या पोहचण्याजोगे ठिकाण, उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील हवामान, कॉलर्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची उपलब्धता, माती, सैनिक तळ उभारण्यासाठी अनुकुलता, वनस्पती, शिकारीसाठी वन्यजीवन आणि बांधकाम करण्यासाठी उपलब्ध साहित्य. हे सर्व निकष पुर्ण करणारे ठिकाण शेवटी मिळाले ते म्हणजे माथेरान !
सदाहरीत जंगलाचे अस्तर असलेल्या पठार म्हणजे माथेरान हि उन्हाळी राजधानी बनवण्यासाठी आदर्श जागा होती. यासाठी पुन्हा नोव्हेंबर १८५० मध्ये मॅलेटने येथे महिनाभर मुक्काम होता. त्याच्या मुक्कामासाठी चौक गावाचे पाटीलांचा मुलगा माधव राव याच्या देखरेखीखाली एक तात्पुरती कुटी उभारण्यात आली. हि कुटी उभारण्यासाठी जे लाकुड वापरले गेले ते मॅलेटने लिलावात खरेदी केलेल्या एका जुन्या बोटीच्या सुकाणूचे होते. हे लाकुड मॅलेटने मुंबईवरुन माथेरानला पाठवले होते.
माथेरानच्या डोंगराळ भागाचे वित्र ( मेल्व्हिले क्लार्क १८५४, ब्रिटीश लायब्ररी
मॅलेटच्या मे १८५० च्या आरोहणानंतर मुंबई लष्कराचा कॅप्टन हेन्री बार हा सुद्धा माथेरान डोंगर दोन वेळा चढून गेला. मॅलेटच्या नोव्हेंबर १८५० च्या मुक्कामाच्या वेळी कॅप्टन वार त्याच्यासोबत होता. मॅलेटने या मुक्कामात येथील निरनिराळ्या पॉईंटवर जाण्याच्या वाटा मोकळया केल्या. या काळात मॅलेटचा बंगला सोडला तर परिसरात बारा धनगर वाडे आणि ठाकुर, कारकरॉ यांच्या वाड्या होत्या. तो फेब्रुवारी १८५१ मध्ये पुन्हा तिसर्यांदा माथेरानला आला. या मुक्कामात त्याने बाईक ( सध्याचे Byke Hotel)) नावाने प्रसिद्ध असलेला दगडी बंगला बांधला. सन १८५२ मध्ये मॅलेटने त्याच्या पत्नीस पालखीतून वर नेता येण्यासाठी शासनाकडून ५०० रुपयांची मंजुरी मिळवून रामबागमार्गे चौक ते माथेरान रस्ता पायी चढण्यायोग्य केला. माथेरानच्या निसर्गसौंदर्यानं भाळलेल्या ह्यू मॅलेटनं तिथं आपली पर्णकुटी बांधावी, हे स्वाभाविकच होतं. पण त्याच्यापाठोपाठ माथेरानमध्ये ब्रिटिशांनी आपापली विश्रामगृहं बांधली. ब्रिटिशांचा मागोवा सदोदित घेणाऱ्या सधन पारशांचीही तिथं निवासस्थानं यथावकाश झाली. ब्रिटिशांनी माथेरानमध्ये बांधलेल्या पहिल्या पाच बंगल्यांची नावं एलीननं खास नमूद केली आहेत. ती अशी. ह्यू मॅलेटनं आपल्या बंगलीचं नाव ठेवलं होतं 'द बाईक' नंतर बांश्चली गेली कॅप्टन हेन्री बार याची बंगली 'बार कॉटेज' कैप्टन सी. बॉकरची 'वॉकर कॉटेज', तर इ. जी. फॉसेटची 'द हर्मिटेज', ह्यू मॅलेटनं आपल्या भावासाठी म्हणजे आर्थर मंलेटसाठी बांधलेली 'स्टोनहेज' (जी पूढे रेहीमनी या सधन पारशानं घेतल्यामुळे तिचं पुनर्नामकरण 'रेडीमनी हांऊस' असं झालं!)... या त्या मावेरानमधल्या पहिल्या पाच बंगल्या.
वन ट्री हिल ( The famous one-tree hill of Matheran | Raja Deel Dayal, c. 1881 )
सन १८५२ मध्ये मुंबई शासनाने लष्कराच्या क्वार्टर-मास्टर जनरलला लष्करी आरोग्य-धामासाठी या डोंगराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यामुळे त्याच वर्षी कॅप्टन डे याने सर्वेक्षण केले व कॅप्टन पॉनसॉनबीने माथेरानचा नकाशा तयार केला. परंतु वैद्यकीय प्राधिकाऱ्यांनी माथेरानपेक्षा खंडाळ्यास प्राधान्य दिल्यामुळे माथेरान लौरी आरोग्यधामाचा विचार शासनाने सोडून दिला. सन १८५३ मध्ये कॅप्टन पीकॉक याने नवीन सर्वेक्षण करून काही नवीन मार्ग शोधून खाजगी घरांच्या जागा आखल्या.माथेरानच्या जवळ असलेल्या नेरळमधून माथेरानकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला. यानंतर माथेरानवर चर्च, हॉस्पिटल, दोनशे सैनिकांसाठी बराक,तुरुंग आणि इतर सरकारी इमारतीसाठी जागा आखण्यात आल्या. मात्र खंडाळा हे ठिकाण अधिक योग्य वाटल्याने त्याला प्राधान्य देण्यात आले.
भग्नावस्थेतील चर्च
सन १८५५ ते १८५८ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरान विकासासाठी खूप प्रयत्न केले. त्यानुसार माथेरानला चौककडून वरोसा घळीतील शिवाजी चढावमार्गाऐवजी नेरळ शृंगाकडील कमी उताराचा रस्ता १०,००० रुपये खर्चुन तयार केला. आताच्या सिमसन तलावाखालील मालढुंगे झऱ्याला बांध घातला. परंतु तो पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यानंतर पिसारनाथ झऱ्याचे पाणी अडवण्यासाठी दुहेरी भित घातली.
शासनाने त्याबाबतचा नकाशा मुद्रित केला. त्यानुसार काही जागा शासनासाठी राखून बाकी जागा लोकांना वितरित करण्याचे अधिकार मॅलेटला दिले. ठाण्याला कलेक्टर असताना ह्यू मॅलेटनं 'माथेरान' 'शोधून' नव्या वस्तीच्या पाऊलखुणा दाखविल्या. एववंच नव्हे, तर माथेरानला जमिनी भाडेतत्वावर दिल्या जातील, अशी जाहिरात करून व्यवस्थाही केली. जागांसाठी अर्ज करताना अर्जदारांना पसंत पडेल ती जागा निवडण्याचा अधिकारही दिला. पण त्यानं एक मात्र आवर्जून केलं. माथेरानमध्ये जागा भाड्याने देताना मॅलेटनं जी नियमावली केली, त्यात पैशाच्या विचारापेक्षा माथेरानच्या सौदर्याला बाधा येऊ नये, अशा प्रकारची कलमं ठेवल्याचं दिसतं. कोणासही पाच एकरांपेक्षा अधिक जागा घेण्याचा अधिकार नव्हता. माथेरानची देखभाल करण्यासाठी सुपरिन्टेण्डेन्ट' नावाचं जे पद निर्माण केलं गेलं, त्या पदावर एकामागोमाग एक असे कार्यक्षम अधिकारी मिळाल्यानं माथेरानचं माथेरानपण बरीच वर्ष टिकलं. अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत म्हणा ना। शिवाय तिथं कायमच्या वास्तव्यास आलेल्या निवृत्तांनी,
सन १८५६ मध्ये लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरानच्या व्यवस्थापनासाठी मेजर पार्कीन्सनची पहिला अधीक्षक म्हणून नेमणूक केली. युरोपिअनांच्या सोयीसाठी जॉन मॅन्युअल डिसोझाने १८५४ मध्ये माथेरानला पहिले हॉटेल काढले. सन १८५५ मध्ये लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरानला पहिला दवाखाना बांधला. निरनिराळ्या पॉईंटना जाणारे बहुतांश रस्ते एल्फिन्स्टनच्याच मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. त्याने स्वतःच्या निवासासाठी सध्याच्या एल्फिन्स्टन लॉजची ३० एकराची जागा निवडली. प्रथम तेथे कुटी बांधून सध्याच्या इमारतीचा पाया घातला. त्याच्या कर्मचाऱ्यांनीही त्याचे अनुकरण केले, बंगले व घरे उभी राहिली आणि माथेरानचे रूप बदलले. इमारतीच्या जागांना मागणी वाढली. माथेरानच्या शोधाचे श्रेय मॅलेटकडे जात असले तरी विकासाचे श्रेय मात्र एल्फिन्स्टनकडे जाते. एल्फिन्स्टन लॉजचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याने आपला मुक्काम महाबळेश्वरहून माथेरानला हलविला. बरेच शासकीय निर्णय माथेरानहून घेतले जात व या ठिकाणाला छोट्या राजधानीचे स्वरूप आले.लॉर्ड एलफिस्टनका माथेरानचे इतके आकर्षण होते कि सकाळी माथेरानवरुन तो मुंबईला कामासाठी जाई आणि दुपारी जेवणासाठी माथेरानला परत येई. एलफिस्टननेच १८६१ मध्ये सेंट पॉल चर्च उभारले, टेनीस कोर्ट असलेला युरोपियन जिमखाना १८६२ मध्ये उभारला.
बार्स हाउस ( Barr’s House )
बाईक बंगला ( The Byke )
अधूनमधून विश्रांतीसाठी येणाऱ्या सधन, सुसंस्कृत घराण्यांच्या पिढ्यानी नियमबाड़ा काही केलं नाही, माथेरानच्या सौदर्याला बाधा आणणारं काही करण्याचं कटाक्षाने टाळलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र सता, पैसा, मोह या त्रिगुणांकित पक्षांनी नियमबाह्यतेचं कुपथ्य मानलं नाही. अर्थात् हे फक्त माथेरानमध्येच झालं असं नाही. पण ते माथेरानमध्येही झालं, हे विशेष ! ज्या निसर्गवेडया ब्रिटिशांनी माथेरानला 'आपलं' मानलं, त्यांची यादीच बेलासिस नावाच्या अधिकाऱ्यानं पुरवली आहे. या बेलासिक मायेरानच्या विकासाबद्दल एक टिषण निहितं होतं, बेलासिसच्या नोंदीनुसार सुरुवातीला एकरी पाच रुपये या दरानं दिलेल्या जागांची घरपट्टी १८०८ मध्ये वाढवून सात रुपये करण्यात आली. तर १९०२ मध्ये ती पुन्हा वाढवून एकरी दहा रुपये करण्यात आली. मैलेटचं आवाहन प्रसिद्ध झाल्यानंतर १८५३ मध्ये ७३ जणांनी जागा मिळण्यासाठी अर्ज केले. अर्जदारांची बेलासिसनं पुरवलेली यादी चाळली तर त्यात, सर जमशेटजी जीजीभॉय यांच्यासह एकंदर ११ पारसी धनिकांची नावं आढळतात, तर विनायक गंगाधर हे एकमेव हिंदू नाव त्या यादीत आवळतं बाकीचे सारे ब्रिटिश मावेगनला नवी वसती होऊ लागलो छोटी मोठी दुकानंही उघडली गेली वर्षाकाठी नवनवे बंगलेही उठत गेले. एवढंच काय, १८९१ साली 'माथेरान जॉटिंग्ज' नावाचं माथेरानविषयी सबकुछ माहिती देणारं वृतपत्र ही प्रसिद्ध होऊ लागलं अन् त्यापाठोपाठ माथेरानच्या एकेका 'पॉईंटला नाव मिळू लागलं. बघता बघता 'माथेरान' असं ' पॉईंटमय झालं उतर भागात पॅनोरमा, हार्ट, पर्क्युपाईन, तर दक्षिण भागात चौक, लुईसा, पश्चिम भागात कगिनेशन पॉइन्ट ही पर्यटकांची विशेष आकर्षण केंद्र बनली. याशिवाय इतर कितीतरी पाँईंट जसे मंकी पॉइन्ट, मल्ढुंगा, मौनी, मेरी, पेब, हेजर पॉइन्ट, सिलिया..अक्षरशः कितीतरी। एकाचं नावच मुळी 'अवर पॉइन्ट', दुसऱ्या एकाचं 'लॅण्डस्केप पॉइन्ट', आणखी एक 'आर्टिस्ट पॉइन्ट', अशा एखाद्या 'पॉइन्ट 'वर पोहोचून तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळणं, हा माथेरानला काही दिवस का होईना, पण जाणाऱ्यांचा आवडता उद्योग. तो फुकाचा असंही म्हणता येणार नाही, कारण अशा एखाद्या 'पॉइन्ट'वरून निसर्गसौदर्य न्याहाळणं हा निसर्गप्रेमाचा परमोच्च क्षण मानला गेला. सांस्कृतिक श्रीमंतीचा तो एक अविभाज्य घटक मानला गेला.
तट्टावरून हिंडणं किंवा भोयांच्या पालखीत बसून उंचावर चढून जाणं, हा माथेरान-भेटीला गेलेल्यांचा आवडता छंद. अशिक्षित भोयांना या वेगवेगळ्या 'पॉइन्टस्' चे उच्चार करणं अवघडच गेलं. त्यांनी आपल्या सोयीची नावं माथेरानमधल्या बंगल्यांना अन् 'पॉइन्टस्'ना दिली. भोयांची मदत घ्यायची तर त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगता आलं पाहिजे. वेगवेगळ्या बंगल्यांच्या अन् 'पॉइन्टस्'च्या नावांची यादीच भोयांच्या सुलभीकृत नावांसह 'माथेरान जॉटिंग्ज' मध्ये प्रसिद्ध केली होती. ती अख्खी यादों एलीननं आपल्या ग्रंथात दिली आहे. 'आर्टिस्ट पॉइन्ट' हे भोयांच्या तोंडी होतं 'हतिस पाइन्ट', 'लुईसा पॉइन्ट'चं त्यांनी केलं 'लुचा पाइन्ट', 'पॅनोरमा'चं केलं 'पांडुरंग'. 'पॉक्युपाईन'चं केलं 'पालखी', हे तर काहीच नाही. 'हॅरिसन स्प्रिंग्ज'चं सुलभीकरण न होता पुनर्नामकरण करून भोई मोकळे झाले. 'हॅरिसन स्प्रिंग्ज' हे त्यांच्या लेखी 'गळतीचं पाणी' ! 'मैलेट स्प्रिंग'चं केलं गेलं 'टिपाचं पाणी' 'वॉकर्स टॅक'चं केलं गेलं 'बाल्डीचं पाणी', 'पॉन्स वी स्थिग्ज'चं केलं गेलें 'गटाराचं पाणी'! एखाद्या बंगलीचं नाव उच्चारायला अवघड झालं तर हे भोई तिच्या मालकाचं नाव घेणं पसंत करीत. काही बाबतीत तर बिनदिक्कत बंगलीत काम करणाऱ्या माळयाचं वा धोब्याचं नावच त्या बंगलीला मिळे ! त्यामुळे 'अरनॉल्ड लॉज हा हिरु गवळ्याचा बंगला म्हणून ओळखला जाउ लागला. बर्न साईड' हा त्यांच्या लेखी होत 'नारायण धोव्याचा बंगला'! 'रोझ कॉटेज'ला ते ओळखत 'म्हाताऱ्या मडमेचा बंगला' या नावानं । 'क्लरेंडन हॉटेल'ला तर हे भोई चक्क म्हणत 'काकाचे हाटेल'। याच माथेरानची श्रीमंत जगद्राय शंकरशेट यांच्याशी माथेरानचा सूर्यास्ताशी निगडित असलेला एक अनुभव नमूद आहे.. सर जॉर्ज बर्डवुड हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या मुंबईतलं बडे प्रस्थ, सर जॉर्ज बर्डवुड यांचा प्रेमचंद रायचंद, जगन्नाथ शंकरशेट अशा समाजधुरिणांचा आणि विद्वतेच्या अनेक अवघड पायऱ्या ओलांडून पार पलीकडे गेलेले असामींचा कौटुंबिक स्नेह लाभलेला होता.बर्डवुड जरी ब्रिटिश असले तरी ते पौर्वात्यांच्या भावभावना जपणारे, जाणणारे तसेच त्या भावना प्रयत्नपूर्वक जाणून-उमवून घेऊन पौर्वात्याबद्दल्ची माहितीची पाश्चिमात्यांच्या ज्ञानात भर घालत होते. माथेरानच्या सर जॉर्ज यांनी केलेल्या वर्णनाला पार्श्वभूमी आहे ती शंकरशेटांच्या नातवाचं मुख पाहण्याच्या आर्त ओढीची ! नातू लाभावा माणून शंकरशेट किती आतूर झाले होते अन् त्यासाठी परमेश्वराची त्यांनी किती करुणा भाकली याचे अत्यंत इदयस्पर्शी वर्णन सर जॉर्ज यांनी केलं आहे. विनायकराव या आपल्या मुलाला एकदाचा मुलगा झाला की आपल्या जीवनाची इतिकर्यव्यता झाली असं मानणारे जगन्नाथ शंकरशेट विनायकरावांना एकामागून एक मुलीच होऊ लागल्यामुळे किती हळवे झाले होते, याचं वर्णन त्यांच्या अत्यंत जवळच्या स्नेहानं करावं इतक्या हळुवारपणे सर जॉर्ज बर्डवुड यांनी केलं आहे.
जयन्नाथ शंकरशेट यांनी नातवाचं मुख पाहण्याच्या आपल्या तीव्र इच्छेचा पुनरुच्चार आपल्याशी बोलताना अनेकदा केला होता, असं सर जॉर्ज यांनी लिहून ठेवलं आहे. देवानं कृपा केली तरच आपल्याला नातू होणार, ही जगत्राव शंकरशेट यांची खात्री होती. भाविकाचीच श्रध्दा ! श्रध्दावानाची व्रतवैकल्य सदैव चालूच असतात. जगन्नाथ शंकरशेटही छोट्या-मोठ्या तीर्थस्थानी जाऊन आले. त्यांच्या या श्ररद्धेचा वैद्यकविद्यानिपुण सर जॉर्ज यांनी कधी उपहास केला नाही. थोडं अंतर ते चालून जातात, न जातात, तोच त्यांना पाठीमागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अन् त्यापाठोपाठ त्यांच्या नावाचा पुकाराही त्यांना ऐकू आला. क्षणभरात दस्तुरखुद्द जगन्नाथ शंकरशेट यांनी विषय काढण्यापूर्वीच सर जॉर्ज, म्हणाले, 'तुम्हाला नातवाचं मुख नक्कीच पाहायला मिळणार.' जगनाथ शंकरशेट उत्तरले, 'हो ना। बर्डवुड, हेच मी तुम्हाला सांगणार होतो. 'एवढं खात्रीपूर्वक कसं सांगता?' यां सर जॉर्ज यांच्या प्रश्नावर जगन्नाथ शंकरशेट उत्तरले 'खात्री आहे, कारण परमेश्वरानं प्रत्यक्ष सांगितलं ना मला!' सर जॉर्ज यांना या उत्तराचं प्रचंड आश्चर्य वाटलं. काही क्षणांपूर्वी जगन्नाथ शंकरशेट यांच्या चेहऱ्यावर पाहिलेली उदासी अनु आताचा हसरा प्रफुल्लित भाव यातल्या महदंतरानं सर जॉर्जना थक्क केलं. दोघंही फिरत फिरत चांगलं मैलभर चालले. 'डेंजर पॉइंट'पासून 'अलेक्झांड़ा पॉईंट पर्यंत आले. जगनाथ शंकरशेट लहान मुलासारखं भडाभड बोलत होते, सर जॉर्ज ऐकत होते. दिवस-रात्रीच्या संधिकालात वनराजीला वेगळीच झळाळी आली होती. वातावरणात एक प्रकारची गूढता होती. समोर दिसणारं दृश्य पाहून जगनाथ शंकरशेट बोलायचं अचानकपणे थांबले. शांतपणे ते दृश्य पाहत राहिले. घरी परतणारे गावकरी डुंबणाऱ्या सूर्यकिरणांकडे नतमस्तक होऊन पाहत होते. या सर्व वातावरणाचा अन् दृश्याचा जगनाथ शंकरशेटांवर एवढा परिणाम झाला की ते दैवी शांततेचा अनुभव घेत आहेत. असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला, त्यांच्या तोडून सहजोद्गार आला- 'आपल्या हाताची पाचही बोटं शेवटी एका हातात विलीन होतात, त्याचप्रमाणे सर्वधर्म शेवटी एकाच परमेश्वराकडे जातात.' सर जॉर्ज बर्डवुड लिहितात, 'अशा रीतीनं जगन्नाथ शंकरशेट यांच्या संगतीत मी घालवलेला एक अविस्मरणीय दिवस संपला.' जगवाथ शंकरशेटांची प्रार्थना ऐकली गेली होती. त्यांना यथासमय नातवाचं मुख पाहावयास मिळालं. त्यानंतर त्यांचं जीवनच बदललं. ऐहिक आनंदाचा त्याग करण्याकडे त्यांची प्रवृत्ती बनली. मृत्यूचे जणू त्यांना वेध लागले होते. काही दिवसांनी त्यांचं निधन झालं, पण निधनापूर्वीच्या भेटीत 'मृत्यूची अशी आळवणी करावयाची असते का', असं विचारणाऱ्या सर जॉर्जना त्यांनी सांगितलं होतं, 'मुळीच अवघड नाही हे, सोपं आहे. याचं कारण हा रस्ता अगदी सरळ आहे. वेडावाकडा नाही की वरखाली होणारा नाही. हा रस्ता आहे फक्त उतरणीचा, भीती न वाटणारी कोणीही व्यक्ती डोळे मिटून या रस्त्यावरून प्रवास करू शकेल.
माथेरानविषयी मिळविता येईल तितकी माहिती मिळवून तिथं संगतवार संकलन करणाऱ्या मिसेस ए. के. ऊर्फ एलीन ऑलिव्हर हिचा द हिल स्टेशन ऑफ माथेरान' हा, विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत माथेरानसंबंधी सर्वांग परिपूर्ण असा ग्रंथ आहे, हे निर्विवाद, किती प्रकारची माहिती तिनं गोळा केली असावी? माथेरान परिसरात आढळणाऱ्या वनस्पती, फुलझाडं, पशुपक्षी यांच्याचद्दल माहिती देताना तिनं पूर्वसूरीचे ऋण आवर्जुन मान्य केलं आहे, अगदी त्या सर्वाच्या नामनिर्देशासह तिच्या ग्रंथातले 'सॉग्ज ऑफ माथेरान' नावाचं जे गमतीचं प्रकरण आहे, ते तिच्या ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरावं. माथेरानच्या मूळ रहिवाशांत प्रचलित असलेली लोकगीतं, त्यांच्या इंवजी भावानुवादासह तसंच लेखिकेच्या टिप्पण्यांसह या प्रकरणात आढळतात. लोकगीतांच्या अभ्यासकांचं एलीननं जमविलेल्या या गीतांकडे म्हणावं तितकं लक्ष गेलेलं दिसत नाही एलीन ऑलिव्हरने ऐकलेल्या एका गीतात आपल्या लेकासाठी 'मुंबईकरीण' नवरी शोधणाऱ्या मातेचा तिच्या लेकाशी झालेला संवाद आहे. तो असा आई : लेका, बम्बैची नवरी करून देईन तुला। घोड्याच्या गाडीमधी नेईन तुला। लेक : बम्बैची बर्फी पाहिजे तिला । अमदाबादी लुगडे ती भागिल मला। जरीची चोळी आता कोवुन आणू तिला ? बाम्बैची बायको नको गे मला। चार दोड्याची पान-सुपारी मागते खायाला। आई : लेका, खाशिल का? नाही तो मारीन तुला। सरकारी कोठडीमधे घालीन तुला ।
लेक : आई, जिनगी बायको करून दे गे मला ।
न करशिल तर, आई, पळून जाईन देशाला।
बाम्बैची बायको नको गे मला।
चार दोड्याची प्रान-सुपारी मागते खायाला।
आई : लेका चार पैसे देईन तुला खर्चाला, पान-सुपारीला। तळ्याच्या माळावर नेईन तुला । जांभुळ पेरू चारीन तुला। खुर्ची टेबलावर बसविन तुला। लेक : बम्बैची बायको नको गे मला चार दोड्याची पान-सुपारी मागते खायाला। एलीन ऑलिव्हरनं ऐकलेल्या अन् टिपून केहलेल्या गीतातलं एक गीत असेही आहे ' या उपवनाची सुरभ्व छाया, योग्य असे ती अम दूर कराया, कोकिला, शुक, खग सुस्वर गाती, शांतविती किती त्रस्त अना या, कारंजाचे तुषार आवडुनी, मिळती पुष्ये गंधित पाकृनिया ।'
माथेरान म्हटलं की तिथली लाईट रेल्वे आठवते. लाईट म्हणजे बसणार नाहीत खरं तर तिला नॅरोगेच म्हणणं अधिक योग्य राहील. नेरळ माथेरान रेल्वे १५ एप्रिल १६०७ रोजी सुरू झाली ती सुरू करायला वर्षभराचा कालावधी लागला. तोपर्यंत मुंबई माथेरानचा प्रवास असा केला जाई. मुंबईवरून लाँचने पनवेल तालुक्यातील उलवा बंदरापर्यंत जायचे. नंतर टांग्याने किंवा बैलगाडीने चौक गावापर्यंत प्रवास करायचा. चौक गावापासून घोड्यावर स्वार होऊन किंवा भोयांच्या मदतीने पालखीत किंवा खुर्चीत बसून अख्खा चढ चढून माथेरानला पोहोचायचे. १८५४ पासून मुंबई पुणे रेल्वे गाडी धावू लागली. मुंबईपासून ५४ मैलावर आणि पुण्यापासून ६६ मैलावर असलेल्या नेरळला माथेरानकडे जाणारे प्रवासी उतरू लागले. तिथून पुन्हा घोड्यावर बसून किंवा पालखीत बसून माथेरान पर्यंत प्रवास सुरू झाला.. हा प्रवास पहिल्यापेक्षा बराच सोयीचा तरी जिकिरीचा म्हणून त्रासदायक. मुंबई नेरळ प्रवास हा रेल्वे गाडीने जितका सुखाचा केला तितका हा कष्टाचा. माथेरानला पोहोचायला काही शॉर्टकट होते नाही असं नाही पण ते तिथल्या मूळ रहिवाशांना धनगर माळी आणि ठाकूर यांनाच पायवळणीचे. खोलवरच्या दर्या, प्रचंड उतरंड यामुळे हा प्रदेश अनोळखी असलेल्या प्रवाशांना पश्चाताप करायची पाळी यावी अश्या या पायवाटा. त्याची प्रवासाचे दोन टप्पे होतेच. एकाला धनगर टप्पा म्हंटला जाईल तर दुसऱ्याला सोनारनीचा वळसा असे म्हटले जाईल.
नेरळ माथेरान रेल्वे धावू लागली आणि माथेरानला पोहोचण्याच्या अडचणी दूर झाल्या. या रेल्वेचा इतिहास हि गमतीदार आहे. नेरळ माथेरन रेल्वे करायची कल्पना मुळची ब्रिटिशांची नव्हती. तर ती होती एका धनिक एत्तदेशियची.,अब्दुल हुसेन यांची ती कल्पना. ती अमलात आणली तीही त्यांनीच. सर आदमजी पीरभॉय या तात्कालीन यशस्वी उद्योजकाचे अब्दुल हुसेन हे चिरंजीव. माथेरानला जाण्यासाठी एकदा ते नेरळला आले पण कुठलंही वाहन उपलब्ध झालं नाही म्हणून ते माघारी मुंबईला परतले. मुंबईला परतले ते माथेरानला जाईन ते स्वतःच्या गाडीनेच ,असा निश्चय करूनच! आपल्या वडिलांच्या सर आदमजी पीरभाय यांच्या मागे लागून त्यानी दहा लाख रुपयांचे भांडवल या कामासाठी मिळवलं. मुलाच्या इच्छेपुढे सर आदमजी नमले.आणि पर्यटकांच्या पुढच्या सर्व पिढ्यांना लाभ झाला.
केवळ निश्चय करून भागणार नव्हते कारण कडयाची उंची खूप होती. नागमोडी वळणे उंच कडे थोड्या अंतरात चढायचे, त्यामुळे पूल बांधण्यात ही खूप काम निघालं. एकदा तर असं वाटलं हे की हा प्रयत्न सोडून द्यावा पण अब्दुल हुसेन सहजासहजी हार मानायला तयार नव्हते. त्यानी कालका - सिमला रेल्वे तयार करणाऱ्या रायसाहेब हरिचंद्रना आमंत्रित केलं दोन हजार कामगार कामाला लावले. सरकारला ते जमलं नाही ते रायबहादुराने करून दाखवलं मात्र रेल्वेची सोय पर्यटकांसाठी करून देणाऱ्या अब्दुल हुसेन आणि त्यांचे पिता सर आदमजी पीरभॉय यांच्या ह्या प्रयत्नाविषयी त्यांच्या पणतुने एक पुस्तिका प्रसिद्ध केली तिचं नाव. ब्रीफ हिस्ट्री ऑफ माथेरान रेल्वे अँड इट्स पायोनियर. दहा लाख रुपये नेरळ माथेरान रेल्वे प्रकल्पासाठी द्यायला सहज आदमजी सुरुवातीला तयार नव्हते पण आपल्या चिरंजीवांनी घेतलेल्या ध्यासा पुढे ते नमले अब्दुल हुसेन यांनी वडिलांना राजे करून त्यांच्या मदतीने दहा लाख रुपयांचा भांडवल उभं केलं.
१९०० पासून ते थेट नेरळच जाऊन राहिले रात्रंदिवस पावसाची आणि वन्यपसूंची पर्वा न करता त्यांनी आपली स्वप्नपूर्ती केली रेल्वे लाईन करण्यासाठी अनेकदा सर्पाची वारूळ फुटली जात, सापांची पिल्लावळ मोकळी सुटे पण कामगार अंधश्रद्धेमुळे सर्पना मारायला तयार नसत अब्दुल हुसेन यांनी एक युक्ती लढवली. एक साप मारायला एक रुपया बक्षीस देऊ केला ज्या जमान्यात सोने २० रुपयात तोळाभर मिळायचे एक रुपया ही रक्कम भारी होती मग कामगार अंधश्रद्धा बाजूला ठेवून पातक करायला तयार झाले. पुढे पुढे तर ही रेल्वे टाकण्याचं काम इतकं दुष्कर व्हायला लागलं की सैन्याच्या मरीन बटालियन मुंबई आणि पायोनियर रेजिमेंट पुणे यांची मदत घ्यावी लागली. स्पेन्सर्स मायनर्स रेजिमेंटही मदतीला आली.अब्दुल हुसेन यांनी जर्मनीला जाऊन ऑरेनस्टिन अँड कॉपेल कंपनीशी करारनामा लिहून दिला. साडे सतरा जणांची लहान इंजिन आणली गाडीचे डबे इथेच तयार झाले. तरीही नेरळ माथेरान यांच्या खड्या चढणाऱ्या गाडीची भीती वाटून गाडीत बसायला फारसे लोक तयार होईनात. स्वतः अब्दुल हुसेन इंजिन ड्रायव्हर आणि त्यांचे दोन मदतनीस यांच्याबरोबर इंजिनात बसले गाडीचा पहिलावहीला प्रवास त्यांनी करून दाखवला काही गडबड होऊ नये म्हणून रेल्वेच्या दोन्ही बाजूला कामगारांनी खडा पहारा दिला होता इंजिन ड्रायव्हर आणि त्यांचे मदतनीस यांचे आयुष्यही माझ्या माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे असं म्हणत इतर लोक नको नको म्हणत असतानाही अब्दुल असेल गाडीत चढले आणि प्रवास सुरळीत पार पडला. माथेरानला गाडी पोहोचण्याच्या आनंदात अब्दुल हुसेन उतरताना त्यांचा कोट फाटला पण ते इतके आनंदी झाले होते की आपल्या खिशात असलेली सारी रक्कम त्यांनी तिथल्या तिथं कामगारांना वाटून टाकली. आपल्या चिरंजीवांनी भगीरथ प्रयत्नांनी साकार केलेलं दिव्य सर आदमजीना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. उत्तरायुष्यात तर सर आदमजी 'शैलेट' या आपल्या मावेरानच्या बंगल्यात राहत होते. गाडी जेव्हा त्यांच्या बंगल्याजवळून जाई तेव्हा तिर्थ क्षणभर ती यांबे, शिट्टी वाजवून सर आदमजींना वंदन करी अन् मगच पुढे जाई.
सर आदमजीचं १२ ऑगस्ट १९१३ ला निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी. त्यांच्या दानशूरपणाची अनेक उदाहरणं इतिहासात नमूद आहेत. चिरंजीव अब्दुल हुसेन १८ डिसेंबर १९१८ रोजी निवर्तले. वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीतून तितकेच कष्ट करून एखाद्या ध्यासाची यशस्वी सांगता करणारे चिरंजीव किती असतांत! पैसा सर आदमजीचा, कष्ट अब्दुल हुसेन यांचे, लाभ मात्र माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचा, असंच नेरळ-माथेरान रेल्वेचं वर्णन करावं लागेल.
सुमारे मैलभर नेरळ-मावेरान ही गाडी मुंबई पुणे रेल्वेच्या समांतर मार्गानं जाते अन् नंतर मात्र पश्चिम दिशेनं घाट चढू लागते. सपाट रस्त्यावर ताशी १२ मैल गतीनं तर चढावर फक्त पाच मैल गतीनं चढणारी ही गाडी दुरून खेळण्यातली गाडी वाटते. दोन रुळांमधलं अंतर फक्त दोन फुटांचं! पण तास-सव्वा तासात १३ मैलांचं नागमोडी अंतर कापत ती समुद्रसपाटीपासून २४५५ पूढ वर येते, हे महत्वानं पूर्वी आम प्रवाशांसाठी असणाऱ्या या गाडीबरोबर धनिक कुटुंबांसाठी, महत्त्वाच्या व्यक्तीसाठी रेल मोटर-कोचही होते. आज विमानं 'चार्टर' होतात, तसे हे मोटर-कोच 'चार्टर' होत. दार्जिलिंग रेल्वे ही माथेरान-रेल्वेची एका अर्थानं स्पर्धक खरी, पण 'रेल्वे मोटर-कोच'ची श्रीमंती तियं कधीच दिसली नाही. हेही श्रेय अब्दुल हुसेन आदमजो पीरभॉय यांच्या कल्पकतेला दिलं पाहिजे.
माथेरान संदर्भात अलीकडेच एक गोष्ट घडली ती म्हणजे रेल्वे गणपती. माथेरानच्या सगळ्यात सुंदर असलेल्या पॅनोरमा पॉईंटकडे जाताना किंवा माथेरानवरुन पेब गडाकडे जाताना रेल्वे रुळावरुन जाताना आपल्याला डाव्या हाताला एक पायवाट रेल्वे गणेश उर्फ निसर्ग राजाकडे घेउन जाते.
नेरळ माथेरान रेल्वेमार्गावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक अवाढव्य गणपती दिसतो तो म्हणजे कड्यावरचा गणपती.आधी हा गणपती तिथे नव्हता, तर माथेरानची मिनी ट्रेन चालवणाऱ्या मध्य रेल्वेच्या राजाराम खडे या लोको पायलटने तो स्वतः घडवला. रोज रेल्वे चालकाचे काम करत असतानाच पॅनोरमा पॉईंट जवळ एका खडकात त्यांना गणपती साकारला जाऊ शकतो असे वाटले.त्यानंतर तब्बल १४ वर्षे त्यांनी कोणत्याही अत्याधुनिक साधनांची मदत न घेता, आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने हा गणपती साकारला.त्याला खडे काकांनी निसर्ग राजा असे नाव दिले.हा गणपती तब्बल ५२ फूट उंच असून, माथेरानच्या निसर्गाच्या कुशीत उभा आहे
संदर्भ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर २) स्थलकाल- अरुण टिकेकर] ३) https://www.livehistoryindia.com/story/snapshort-histories/matheran ४) https://arvindr.substack.com/p/the-timeless-charm-of-hills
'क्लॅरंडन हॉटेल झालं 'काकाचं हाटेल'!
स्थल-काल
अरुण टिकेकर
माथेरानविषयी मिळविता येईल तितकी माहिती मिळवून तिथं संगतवार संकलन करणाऱ्या मिसेस ए. के. ऊर्फ एलीन ऑलिव्हर हिचा द हिल स्टेशन ऑफ माथेरान' हा, विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत माथेरानसंबंधी सर्वांग परिपूर्ण असा ग्रंथ आहे, हे निर्विवाद, किती प्रकारची माहिती तिनं गोळा केली असावी? माथेरान परिसरात आढळणाऱ्या वनस्पती, फुलझाडं, पशुपक्षी यांच्याचद्दल माहिती देताना तिनं पूर्वसूरीचे ऋण आवर्जुन मान्य केलं आहे, अगदी त्या सर्वाच्या नामनिर्देशासह तिच्या ग्रंथातले 'सॉग्ज ऑफ माथेरान' नावाचं जे गमतीचं प्रकरण आहे, ते तिच्या ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरावं. माथेरानच्या मूळ रहिवाशांत प्रचलित असलेली लोकगीतं, त्यांच्या इंवजी भावानुवादासह तसंच लेखिकेच्या टिप्पण्यांसह या प्रकरणात आढळतात. लोकगीतांच्या अभ्यासकांचं एलीननं जमविलेल्या या गीतांकडे म्हणावं तितकं लक्ष गेलेलं दिसत नाही एलीन ऑलिव्हरने ऐकलेल्या एका गीतात आपल्या लेकासाठी 'मुंबईकरीण' नवरी शोधणाऱ्या मातेचा तिच्या लेकाशी झालेला संवाद आहे. तो असा आई : लेका, बम्बैची नवरी करून देईन तुला। घोड्याच्या गाडीमधी नेईन तुला। लेक : बम्बैची बर्फी पाहिजे तिला । अमदाबादी लुगडे ती भागिल मला। जरीची चोळी आता कोवुन आणू तिला ? बाम्बैची बायको नको गे मला। चार दोड्याची पान-सुपारी मागते खायाला। आई : लेका, खाशिल का? नाही तो मारीन तुला। सरकारी कोठडीमधे घालीन तुला ।
लेक : आई, जिनगी बायको करून दे गे मला ।
न करशिल तर, आई, पळून जाईन देशाला।
बाम्बैची बायको नको गे मला।
चार दोड्याची प्रान-सुपारी मागते खायाला।
आई : लेका चार पैसे देईन तुला खर्चाला, पान-सुपारीला। तळ्याच्या माळावर नेईन तुला । जांभुळ पेरू चारीन तुला। खुर्ची टेबलावर बसविन तुला। लेक : बम्बैची बायको नको गे मला चार दोड्याची पान-सुपारी मागते खायाला। एलीन ऑलिव्हरनं ऐकलेल्या अन् टिपून केहलेल्या गीतातलं एक गीत असेही आहे ' या उपवनाची सुरभ्व छाया, योग्य असे ती अम दूर कराया, कोकिला, शुक, खग सुस्वर गाती, शांतविती किती त्रस्त अना या, कारंजाचे तुषार आवडुनी, मिळती पुष्ये गंधित पाकृनिया ।' अमेलिया फॉकलंडसारखी कविमनाची चित्रकर्ती महाबळेश्वरचं वर्णन गद्यात करूनही पध्धात्यक लिहू शकते. माथेरानवरचं हे 'काव्य' तिथ' गेलेल्या कुणा सुसंस्कृत पर्यटकाचं असणार यात काय शंका? हा सुसंस्कृत कवी पद्यात लिहिणारा असला, तरी शब्दप्रभू नसावा. त्यानं ओधडधोबड काव्य लिहिलं, प्रयासानं, कसंही असलं तरी दोघांची अनुभूती एकाच जातीची आहे. आविष्कारात जातकुळीचा फरक असला तरी. होय ना। माथेरानच्या निसर्गसौंदर्यानं भाळलेल्या ह्यू मॅलेटनं तिथं आपली पर्णकुटी बांधावी, हे स्वाभाविकच होतं. पण त्याच्यापाठोपाठ माथेरानमध्ये ब्रिटिशांनी आपापली विश्रामगृहं बांधली. ब्रिटिशांचा मागोवा सदोदित घेणाऱ्या सधन पारशांचीही तिथं निवासस्थानं यथावकाश झाली. ब्रिटिशांनी माथेरानमध्ये बांधलेल्या पहिल्या पाच बंगल्यांची नावं एलीननं खास नमूद केली आहेत. ती अशी. ह्यू मॅलेटनं आपल्या बंगलीचं नाव ठेवलं होतं 'द बाईक' नंतर बांश्चली गेली कॅप्टन बार याची बंगली 'बार कॉटेज' कैप्टन बॉकरची 'वॉकर कॉटेज', तर फॉसेटची 'द हर्मिटेज', ह्यू मॅलेटनं आपल्या भावासाठी म्हणजे आर्थर मंलेटसाठी बांधलेली 'स्टोन हेज' (जी पूढे रेहीमनी या सधन पारशानं घेतल्यामुळे तिचं पुनर्नामकरण 'रेडीमनी हांऊस' असं झालं!)... या त्या मावेरानमधल्या पहिल्या पाच बंगल्या. ठाण्याला कलेक्टर असताना ह्यू मॅलेटनं 'माथेरान' 'शोधून' नव्या वस्तीच्या पाऊलखुणा दाखविल्या. एववंच नव्हे, तर माथेरानला जमिनी भाडेतत्वावर दिल्या जातील, अशी जाहिरात करून व्यवस्थाही केली. जागांसाठी अर्ज करताना अर्जदारांना पसंत पडेल ती जागा निवडण्याचा अधिकारही दिला. पण त्यानं एक मात्र आवर्जून केलं. माथेरानमध्ये जागा भाडावानं देताना मॅलेटनं जी नियमावली केली, त्यात पैशाच्या विचारापेक्षा माथेरानच्या सौदर्याला बाधा येऊ नये, अशा प्रकारची कलमं ठेवल्याचं दिसतं. माथेरानची देखभाल करण्यासाठी सुपरिन्टेण्डेन्ट' नावाचं जे पद निर्माण केलं गेलं, त्या पदावर एकामागोमाग एक असे कार्यक्षम अधिकारी मिळाल्यानं माथेरानचं माथेरानपण बरीच वर्ष टिकलं. अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत म्हणा ना। शिवाय तिथं कायमच्या वास्तव्यास आलेल्या निवृत्तांनी,
'पॅनोरमा पॉईंट'वरुन दिसणारं दृश्य चित्रसंदर्भ: मिसेस एलीन ऑलिव्हरचं 'द हिल स्टेशन ऑफ माथेरान' (१९०५)
अधूनमधून विश्रांतीसाठी येणाऱ्या सधन, सुसंस्कृत घराण्यांच्या पिढ्यानी नियमबाड़ा काही केलं नाही, माथेरानच्या सौदर्याला बाधा आणणारं काही करण्याचं कटाक्षाने टाळलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र सता, पैसा, मोह या त्रिगुणांकित पक्षांनी नियमबाह्यतेचं कुपथ्य मानलं नाही. अर्थात् हे फक्त माथेरानमध्येच झालं असं नाही. पण ते माथेरानमध्येही झालं, हे विशेष ! ज्या निसर्गवेडया ब्रिटिशांनी माथेरानला 'आपलं' मानलं, त्यांची यादीच बेलासिस नावाच्या अधिकाऱ्यानं पुरवली आहे. या बेलासिक मायेरानच्या विकासाबद्दल एक टिषण निहितं होतं, बेलासिसच्या नोंदीनुसार सुरुवातीला एकरी पाच रुपये या दरानं दिलेल्या जागांची घरपट्टी १८०८ मध्ये वाढवून सात रुपये करण्यात आली. तर १९०२ मध्ये ती पुन्हा वाढवून एकरी दहा रुपये करण्यात आली. मैलेटचं आवाहन प्रसिद्ध झाल्यानंतर १८५३ मध्ये ७३ जणांनी जागा मिळण्यासाठी अर्ज केले. अर्जदारांची बेलासिसनं पुरवलेली यादी चाळता तीत, सर जमशेटजी जीजीभॉय यांच्यासह एकंदर ११ पारसी धनिकांची नावं आढळतात, तर विनायक गंगाधर हे एकमेव हिंदू नाव त्या यादीत आवळतं बाकीचे सारे ब्रिटिश मावेगनला नवी वसती होऊ लागलो छोटी मोठी दुकानंही उघडली गेली वर्षाकाठी नवनवे बंगलेही उठत गेले. एवढंच काय, १८९१ साली 'माथेरान जॉटिंग्ज' नावाचं माथेरानविषयी सबकुछ माहिती देणारं वृतपत्र ही प्रसिद्ध होऊ लागलं अन् त्यापाठोपाठ माथेरानच्या एकेका 'पॉईंटला नाव मिळू लागलं. बघता बघता 'माथेरान' असं ' पॉईंटमय झालं उतर भागात पैनोरमा, हार्ट, पंक्र्युिपाईन, तर दक्षिण भागात चौक, लुईसा, पश्चिम भागात कगिनेशन पॉइन्ट ही पर्यटकांची विशेष आकर्षण केंद्र बनी याशिवाय इतर कितीतरी पोईंट जसे मंकी पॉइन्ट, मल्ढुंगा, मौनी, मेरी, पेब, हेजर पॉइन्ट, सिलिया..अक्षरशः कितीतरी। एकाचं नावच मुळी 'अवर पॉइन्ट', दुसऱ्या एकाचं 'लॅण्डस्केप पॉइन्ट', आणखी एक 'आर्टिस्ट पॉइन्ट', अशा एखाद्या 'पॉइन्ट 'वर पोहोचून तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळणं, हा माथेरानला काही दिवस का होईना, पण जाणाऱ्यांचा आवडता उद्योग. तो फुकाचा असंही म्हणता येणार नाही, कारण अशा एखाद्या 'पॉइन्ट'वरून निसर्गसौदर्य न्याहाळणं हा निसर्गप्रेमाचा परमोच्च क्षण मानला गेला. सांस्कृतिक श्रीमंतीचा तो एक अविभाज्य घटक मानला गेला. तट्टावरून हिंडणं किंवा भोयांच्या पालखीत बसून उंचावर चढून जाणं, हा माथेरान-भेटीला गेलेल्यांचा आवडता छंद. अशिक्षित भोयांना या वेगवेगळ्या 'पॉइन्टस्' चे उच्चार करणं अवघडच गेलं. त्यांनी आपल्या सोयीची नावं माथेरानमधल्या बंगल्यांना अन् 'पॉइन्टस्'ना दिली. भोयांची मदत घ्यायची तर त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगता आलं पाहिजे. वेगवेगळ्या बंगल्यांच्या अन् 'पॉइन्टस्'च्या नावांची यादीच भोयांच्या सुलभीकृत नावांसह 'माथेरान जॉटिंग्ज' मध्ये प्रसिद्ध केली होती. ती अख्खी यादों एलीननं आपल्या ग्रंथात दिली आहे. 'आर्टिस्ट पॉइन्ट' हे भोयांच्या तोंडी होतं 'हतिस पाइन्ट', 'लुईसा पॉइन्ट'चं त्यांनी केलं 'लुचा पाइन्ट', 'पॅनोरमा'चं केलं 'पांडुरंग'. 'पॉक्युपाईन'चं केलं 'पालखी', हे तर काहीच नाही. 'हॅरिसन स्प्रिंग्ज'चं सुलभीकरण न होता पुनर्नामकरण करून भोई मोकळे झाले. 'हॅरिसन स्प्रिंग्ज' हे त्यांच्या लेखी 'गळतीचं पाणी' ! 'मैलेट स्प्रिंग'चं केलं गेलं 'टिपाचं पाणी' 'वॉकर्स टॅक'चं केलं गेलं 'बाल्डीचं पाणी', 'पॉन्स वी स्थिग्ज'चं केलं गेलें 'गटाराचं पाणी'! एखाद्या बंगलीचं नाव उच्चारायला अवघड झालं तर हे भोई तिच्या मालकाचं नाव घेणं पसंत करीत. काही बाबतीत तर बिनदिक्कत बंगलीत काम करणाऱ्या माळयाचं वा धोब्याचं नावच त्या बंगलीला मिळे ! त्यामुळे 'अरनॉल्ड लॉज हा हिरु गवळ्याचा बंगला म्हणून ओळखला जाउ लागला. बर्न साईड' हा त्यांच्या लेखी होत 'नारायण धोव्याचा बंगला'! 'रोझ कॉटेज'ला ते ओळखत 'म्हाताऱ्या मडमेचा बंगला' या नावानं । 'क्लरेंडन हॉटेल'ला तर हे भोई चक्क म्हणत 'काकाचे हाटेल'।
'हा रस्ता अगदी सरळ आहे.,...फक्त उतरणीचा आहे'
स्थल-काल
अरुण टिकेकर
माथेरानचा सूर्यास्त डोळे भरून पाहणं, हा नैमितिक रोजनिशी लिहिणाऱ्याला नोंद घेण्यासारखाच अनुभव वाटावा. माथेरानचा 'शोध' लागल्यापासून तिथे निसर्गसानिध्यासाठी गेलेल्या प्रत्येक शहरी व्यक्तीला मग ती ब्रिटिश असो वा भारतीय, भारून टाकणारंच हे दृश्य, थकल्या भागल्या सूर्याचं रक्तचंदनी दर्शन हा खरं तर दिवसभर तियं केलेल्या भटकंतीनंतरचा 'क्लायमॅक्स'चा क्षण.! कवी नसलेल्याचं मनही काव्यपंक्ती प्रसवू लागावं, असाच हा देखावा. सूर्याच्या अंतिम किरणांच्या सोनेरी दर्शनामुळे मनात उठलेल्या तरंगांना शब्दांत पकडण्याचा अपुराच वाटणारा प्रयत्न करत अनेकांनी तो दिवस संपविला असेल, तर काहीनी आपला प्रयत्न केविलवाणा असल्याचं भान येऊन तोही प्रकार करण्याचा प्रयत्न सोडून दिला असणार, यात शंका नाही
पण ते सूर्यास्ताचे क्षण शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करण्याचं धारीष्ट्य ज्यांनी दाखवलं, त्यांच्यापैकी अनेकांच्या रोजनिशा काळाच्या उदरात गडप झाल्या असतील. खिशात मावतील एवढ्या छोट्या ज्यांच्या रोजनिशा होत्या, त्या कुठं अडगळीत पडल्या असतील, याची त्यांच्या वंशजांनाही कल्पना आली नसेल. ज्यांनी वर्षानुवर्ष त्या जपून ठेवल्या अन् कित्येक वर्षानंतर त्या पुन्हा चाळायला हाती घेतल्या, तेव्हा कदाचित आपण होऊन माथेरानच्या सूर्यास्ताच्या वर्णनाची पाने फाडून टाकली असणार, त्या निसटत्या सौदर्यक्षणांना शब्दांत पकडताना आपलं शब्दसामर्थ्य लुळं पडलं, याची जाणीव होऊन ! रंगीत छायाचित्रणाची सोय झाल्यानंतर माथेरानचा सूर्यास्त शब्दांत पकडण्याची गरज उरली नाही, महणून ते क्षण शब्दांत पकडण्याचे प्रयत्नही थांबले असतील. छायाचित्रणकलेमुळे नेत्रद्रयाचं अन् कवी मनाचे काम यंत्र करू लागले. तो नेमका क्षण टिपल्यानंतर त्या दर्शनाची लघुत्व पावलेली प्रतिकृती इतरत्रही दाखवता येऊ लागली. अद्ययावत छायाचित्रण यंत्राचा यथायोग्य वापर करणाऱ्यांनी माथेरानच्या सूर्यास्ताचे रंगीत छायाचित्रण करून अनेक पारितोषिकही पटकावली असणार. पण रंगीत छायाचित्रण कला अस्तित्वात नव्हती, तेव्हाचा माथेरानचा सूर्यास्त पाहून रोमांचित झालेल्या दोन मित्रांचं एक विलक्षण हृदयस्पर्शी उदाहरण इतिहासात नमूद आहे. ऐऱ्यागैन्याच्या सोक्षीनं नव्हे, तर श्रीमंत जगद्राय शंकरशेट यांच्याशी माथेरानचा सूर्यास्त निगडित असलेला अनुभव नमूद आहे. सर जॉर्ज बर्डवुड हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कष्टातल्या मुंबईतलं बर्ड प्रस्थ विद्वतेच्या अनेक अवघड पायऱ्या ओलांडून पार पलीकडे गेलेली ही असामी प्रेमचंद रायचंद, जगन्नाथ शंकरशेट अशा समाजधुरिणांचा कौटुंबिक स्नेह लाभलेलो. तत्कालीन एतद्देशियांच्या मुखद् खात सहजपणे सहभागी झालेली. ब्रिटिश असूनही पौर्वात्यांच्या भावभावना जपणारी, जाणणारी अन् त्या प्रयत्नपूर्वक जाणून-उमवून घेऊन पाश्चिमात्यांच्या पौर्वात्य-ज्ञानात भर घालणारी, माथेरानच्या सूर्यास्ताचा एक आलेख सर जॉर्डन काढला, त्या आलेखाची बरोबरी करण्यात इतरांच असे आलेख असमर्थच ठरले. त्यामुळेच असेल, सर जॉर्ज यांचा भायेरानच्या सूर्यास्ताबद्दलचा हा आलेख करा-मरणातून मुक्त झाल्यासारखा वाटतो. सर जॉर्ज बर्डवुड यांचं लेखन विपुल म्हणता येणार नाही, पण कमीही म्हणता येणार नाही, असं अन् एवई, 'साध्याही विषयात आशय की मोठा किती आवळे', अशीच त्यांचं लेखन वाचणाऱ्याची प्रतिक्रिया व्हावी. अशीच या लेखनाची विशेषता, त्यांच्या 'स्व' (स्वस्तिकातला 'स्व'।) या जाडजूड ग्रंथात 'द सनसेट ऑफ मावेरान' हा अवधा सव्वासहा पानांचा भावगर्भ निबंध आहे.
माथेरानच्या सर जॉर्ज यांनी केलेल्या वर्णनाला पार्श्वभूमी आहे ती शंकरशेटांच्या नातवाचं मुख पाहण्याच्या आर्त ओढीची ! नातू लाभावा माणून शंकरशेट किती आतूर झाले होते अन् त्यासाठी परमेश्वराची त्यांनी किती करुणा भाकली याचे अत्यंत इदयस्पर्शी वर्णन सर जॉर्ज यांनी केलं आहे. विनायकराव या आपल्या मुलाला एकदाचा मुलगा झाला की आपल्या जीवनाची इतिकर्यव्यता झाली असं मानणारे जगन्नाथ शंकरशेट विनायकरावांना एकामागून एक मुलीच होऊ लागल्यामुळे किती हळवे झाले होते, याचं वर्णन त्यांच्या अत्यंत जवळच्या स्नेहानं करावं इतक्या हळुवारपणे सर जॉर्ज बर्डवुड यांनी केलं आहे. जयन्नाथ शंकरशेट यांनी नातवाचं मुख पाहण्याच्या आपल्या तीव्र इच्छेचा पुनरुच्चार आपल्याशी बोलताना अनेकदा केला होता, असं सर जॉर्ज यांनी लिहून ठेवलं आहे. देवानं कृपा केली तरच आपल्याला नातू होणार, ही जगत्राव शंकरशेट यांची खात्री होती. भाविकाचीच श्रध्दा ! श्रध्दावानाची व्रतवैकल्य सदैव चालूच असतात. जगन्नाथ शंकरशेटही छोट्या-मोठ्या तीर्थस्थानी जाऊन आले. त्यांच्या या श्ररद्धेचा वैद्यकविद्यानिपुण सर जॉर्ज यांनी कधी उपहास केला नाही.
श्रीमंत जगनाथ उर्फ नाना शंकरशेट
थोडं अंतर ते चालून जातात, न जातात, तोच त्यांना पाठीमागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अन् त्यापाठोपाठ त्यांच्या नावाचा पुकाराही त्यांना ऐकू आला. क्षणभरात दस्तुरखुद्द जगन्नाथ शंकरशेट यांनी विषय काढण्यापूर्वीच सर जॉर्ज, म्हणाले, 'तुम्हाला नातवाचं मुख नक्कीच पाहायला मिळणार.' जगनाथ शंकरशेट उत्तरले, 'हो ना। बर्डवुड, हेच मी तुम्हाला सांगणार होतो. 'एवढं खात्रीपूर्वक कसं सांगता?' यां सर जॉर्ज यांच्या प्रश्नावर जगन्नाथ शंकरशेट उत्तरले 'खात्री आहे, कारण परमेश्वरानं प्रत्यक्ष सांगितलं ना मला!' सर जॉर्ज यांना या उत्तराचं प्रचंड आश्चर्य वाटलं. काही क्षणांपूर्वी जगन्नाथ शंकरशेट यांच्या चेहऱ्यावर पाहिलेली उदासी अनु आताचा हसरा प्रफुल्लित भाव यातल्या महदंतरानं सर जॉर्जना थक्क केलं. दोघंही फिरत फिरत चांगलं मैलभर चालले. 'डेंजर पॉइंट'पासून 'अलेक्झांड़ा पॉईंट पर्यंत आले. जगनाथ शंकरशेट लहान मुलासारखं भडाभड बोलत होते, सर जॉर्ज ऐकत होते. दिवस-रात्रीच्या संधिकालात वनराजीला वेगळीच झळाळी आली होती. वातावरणात एक प्रकारची गूढता होती. समोर दिसणारं दृश्य पाहून जगनाथ शंकरशेट बोलायचं अचानकपणे थांबले. शांतपणे ते दृश्य पाहत राहिले. घरी परतणारे गावकरी डुंबणाऱ्या सूर्यकिरणांकडे नतमस्तक होऊन पाहत होते. या सर्व वातावरणाचा अन् दृश्याचा जगनाथ शंकरशेटांवर एवढा परिणाम झाला की ते दैवी शांततेचा अनुभव घेत आहेत. असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला, त्यांच्या तोडून सहजोद्गार आला- 'आपल्या हाताची पाचही बोटं शेवटी एका हातात विलीन होतात, त्याचप्रमाणे सर्वधर्म शेवटी एकाच परमेश्वराकडे जातात.' सर जॉर्ज बर्डवुड लिहितात, 'अशा रीतीनं जगन्नाथ शंकरशेट यांच्या संगतीत मी घालवलेला एक अविस्मरणीय दिवस संपला.' जगवाथ शंकरशेटांची प्रार्थना ऐकली गेली होती. त्यांना यथासमय नातवाचं मुख पाहावयास मिळालं. त्यानंतर त्यांचं जीवनच बदललं. ऐहिक आनंदाचा त्याग करण्याकडे त्यांची प्रवृत्ती बनली. मृत्यूचे जणू त्यांना वेध लागले होते. काही दिवसांनी त्यांचं निधन झालं, पण निधनापूर्वीच्या भेटीत 'मृत्यूची अशी आळवणी करावयाची असते का', असं विचारणाऱ्या सर जॉर्जना त्यांनी सांगितलं होतं, 'मुळोच अवघड नाही हे, बर्डवुड सोपं आहे. बाचं कारण हा रस्ता अगदी सरळ आहे. वेडावाकडा नाही की वरखाली होणारा नाही हा रस्ता आहे फक्त उतरणीचा, भीती न वाटणारी कोणीही व्यक्ती डोळे मिटून या रस्त्यावरून प्रवास करू शकेल.'
(चित्रसंदर्भ एक जुनं पिकवर पोस्ट-कार्ड)
माथेरान म्हटलं की तिथली लाईट रेल्वे आठवते. लाईट म्हणजे बसणार नाहीत खरं तर तिला नॅरोगेच म्हणणं अधिक योग्य राहील. डॉक्टर स्मिथच्या पुस्तकात या रेल्वेचा उल्लेख नसणं अधिक स्वाभाविक आहे. मिसेस हॉलीवरच्या पुस्तकातील तो का नाही बरं? कसा असणार? मिसेस ऑलिव्हरचा पुस्तक 1905 साली प्रकाशित झालं. नेरळ माथेरान रेल्वे 15 एप्रिल 1607 रोजी सुरू झाली ती सुरू करायला वर्षभराचा कालावधी लागला. तोपर्यंत मुंबई माथेरानचा प्रवास असा केला जाई. मुंबईवरून लाँचने पनवेल तालुक्यातील उलवा बंदरापर्यंत जायचे. नंतर टांग्याने किंवा बैलगाडीने चौक गावापर्यंत प्रवास करायचा. चौक गावापासून घोड्यावर स्वार होऊन किंवा भुयांच्या मदतीने पालखीत किंवा खुर्चीत बसून अख्खा चढचडून माथेरानला पोहोचायचे. 1854 पासून मुंबई पुणे रेल्वे गाडी धावू लागली. मुंबईपासून 54 महिलावर आणि पुण्यापासून 66 महिलावर असलेल्या नेरळला माथेरान कडे जाणारे प्रवासी उतरू लागले. तिथून पुन्हा घोड्यावर बसून किंवा पालखीत बसून माथेरान पर्यंत प्रवास सुरू. हा प्रवास पहिल्यापेक्षाबराच सोयीचा तरी जिकिरीचा म्हणून त्रासदायक. मुंबई नेरळ प्रवास हा रेल्वे गाडीने जितका सुखाचा केला तितका हा कष्टाचा. माथेरानला पोहोचायला काही शॉर्टकट होते नाही असं नाही पण ते तिथल्या मूळ रहिवाशांना धनगर माळी आणि ठाकूर यांनाच पायवळणीचे. खोलवरच्या दर्या, प्रचंड उतरंड यामुळे हा प्रदेश अनोळखी असलेल्या प्रवाशांना पश्चाताप करायची पाळी यावी अश्या या पायवाटा. त्याची प्रवासाचे दोन टप्पे होतेच. एकाला धनगर टप्पा म्हंटला जाईल तर दुसऱ्याला सोनार नीचा वळसा असे म्हटले जाईल. नेरळ माथेरान रेल्वे धावू लागली आणि माथेरानला पोहोचण्याच्या अडचणी दूर झाल्या. रेल्वेचा इतिहास हे गमतीदार आहे. नेरळ मात्र रेल्वे करायची कल्पना मुळशी ब्रिटिशांची नव्हती. तर ती होती एका धनिक एत्तदेशियची. अब्दुल हुसेन यांचे ती कल्पना. ते अमलात आणले तेही त्यांनीच. सर आदमजी पीरभॊय या तात्कालीन यशस्वी उद्योजकाचे अब्दुल हुसेन हे चिरंजीव. माथेरान ला जाण्यासाठी एकदा ते नेरळला आले पण कुठलंही वाहन उपलब्ध झालं नाही म्हणून ते माघारी मुंबईला परतले. मुंबईला परतले ते माथेरानला जाईन ते स्वतःच्या गाडीनेच असा निश्चय करूनच! आपल्या वडिलांच्या सर आदमजी पीरभाय यांच्या मागे लागून त्याने दहा लाख रुपयांचा भांडवल या कामासाठी मिळवलं. मुलाच्या अति इच्छेपुढे सर आदमजी नमले. आणि पर्यटकांच्या पुढच्या सर्व पिढ्यांना लाभ झाला. केवळ निश्चय करून भागणार नव्हते कारण कडयाची उंची खूप होती. नागमोडी वळणे उंचकडे थोड्या अंतरात चढायचे त्यामुळे पूल बांधण्यात ही खूप काम निघालं. एकदा तर असं वाटलं हे की हा प्रयत्न सोडून द्यावा पण अब्दुल हुसेन सहजासहजी हार मानायला तयार नव्हते. त्यानी कालका सिमला रेल्वे तयार करणाऱ्या रायसाहेब हरिचंद्रना आमंत्रित केलं 2000 कामगार कामाला लावले सरकारला ते जमलं नाही ते रायबाजुराने करून दाखवलं मात्र रेल्वेची सोय पर्यटकांसाठी करून देणाऱ्या अब्दुल हुसेन आणि त्यांचे पिता सर आदमजी पीरभॉय यांच्या ह्या प्रयत्नाविषयी त्यांच्या पण तुने एक पुस्तिका प्रसिद्ध केली तिचं नाव. ब्रीफ हिस्ट्री ऑफ माथेरान रेल्वे अँड इट्स पायोनियर. दहा लाख रुपये नेरळ माथेरान रेल्वे प्रकल्पासाठी द्यायला सहज आदमजी सुरुवातीला तयार नव्हते पण आपल्या चिरंजीवांनी घेतलेल्या धासापुर ते नमले अब्दुल हुसेन यांनी वडिलांना राजे करून त्यांच्या मदतीने दहा लाख रुपयांचा भांडवल उभं केलं. 1900 पासून ते थेट नेरळच जाऊन राहिले रात्रंदिवस पुन्हा पावसाची आन वन्यपसूंची परवा न करता त्यांनी आपली स्वप्नपूर्ती केली रेल्वे लाईन करण्यासाठी अनेकदा सरपंची वारूळ फुटली जात सापांची पिल्लावळ सुरसळ सुटे पण कामगार अंधश्रद्धेमुळे सर्पना मारायला तयार नसत अब्दुल हुसेन यांनी एक युक्ती लढवली. एक साप मारायला एक रुपया बक्षीस देऊ केला ज्या जमान्यात सोनू 20 रुपयात तोळाभर मिळायचे एक रुपया ही रक्कम भारी होती पण कामगार अंधश्रद्धा बाजूला ठेवून पाठक करायला तयार झाले. पुढे पुढे तर ही रेल्वे टाकण्याचं काम इतकं दुष्कर व्हायला लागलं की सैन्याच्या मरीन बटालियन मुंबई आणि पायोनियर रेजिमेंट पुणे यांची मदत घ्यावी लागली. स्पेन्सर्स मायनर्स रेजिमेंटही मदतीला आली. अब्दुल हुसेन यांनी जर्मनीला जाऊन ऑरेनस्टिन अँड कॉपेल कंपनीशी करारनामा लिहून दिला. साडे सतरा जणांची लहान इंजिन आणली गाडीचे डबे इथेच तयार झाले. तरीही नेरळ माथेरान यांच्या खड्या खड्यावर चढणाऱ्या गाडीची भीती वाटून गाडीत बसायला फारसे लोक तयार होईनात. स्वतः अब्दुल हुसेन इंजिन ड्रायव्हर आणि त्यांचे दोन मदतनीस यांच्याबरोबर इंजिनात बसले गाडीचा पहिला महिना प्रवास त्यांनी करून दाखवला काही गडबड होऊ नये म्हणून रेल्वेच्या दोन्ही बाजूला कामगारांनी खडा पहारा दिला होता इंजिन ड्रायव्हर आणि त्यांचे मदतनीस यांचे आयुष्यही माझ्या माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे असं म्हणत इतर लोक नको नको म्हणत असतानाही अब्दुल असेल गाडीत चढले आणि प्रवास सुरळीत पार पडला. माथेरानला गाडी पोहोचण्याच्या आनंदात अब्दुल हुसेन उतरताना त्यांचा कोट फाटला पण ते इतके आनंदी झाले होते की आपल्या खिशात असलेली सारी रक्कम त्यांनी तिथल्या तिथं कामगारांना वाटून टाकली. आपल्या चिरंजीवांनी भगीरथ प्रयत्नांनी साकार केलेलं दिव्य सर आदमजीना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. उत्तरायुष्यात तर सर आदमजी 'शैलेट' या आपल्या मावेरानच्या बंगल्यात राहत होते. गाडी जेव्हा त्यांच्या बंगल्याजवळून जाई तेव्हा तिर्थ क्षणभर ती यांबे, शिट्टी वाजवून सर आदमजींना वंदन करी अन् मगच पुढे जाई. सर आदमजीचं १२ ऑगस्ट १९१३ ला निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी. त्यांच्या दानशूरपणाची अनेक उदाहरणं इतिहासात नमूद आहेत. चिरंजीव अब्दुल हुसेन १८ डिसेंबर १९१८ रोजी निवर्तले. वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीतून तितकेच कष्ट करून एखाद्या ध्यासाची यशस्वी सांगता करणारे चिरंजीव किती असतांत! पैसा सर आदमजीचा, कष्ट अब्दुल हुसेन यांचे, लाभ मात्र माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचा, असंच नेरळ-माथेरान रेल्वेचं वर्णन करावं लागेल. सुमारे मैलभर नेरळ-मावेरान ही गाडी मुंबई पुणे रेल्वेच्या समांतर मार्गानं जाते अन् नंतर मात्र पश्चिम दिशेनं घाट चढू लागते. सपाट रस्त्यावर ताशी १२ मैल गतीनं तर चढावर फक्त पाच मैल गतीनं चढणारी ही गाडी दुरून खेळण्यातली गाडी वाटते. दोन रुळांमधलं अंतर फक्त दोन फुटांचं! पण तास-सव्वा तासात १३ मैलांचं नागमोडी अंतर कापत ती समुद्रसपाटीपासून २४५५ पूढ वर येते, हे महत्वानं पूर्वी आम प्रवाशांसाठी असणाऱ्या या गाडीबरोबर धनिक कुटुंबांसाठी, महत्त्वाच्या व्यक्तीसाठी रेल मोटर-कोचही होते. आज विमानं 'चार्टर' होतात, तसे हे मोटर-कोच 'चार्टर' होत. दार्जिलिंग रेल्वे ही माथेरान-रेल्वेची एका अर्थानं स्पर्धक खरी, पण 'रेल्वे मोटर-कोच'ची श्रीमंती तियं कधीच दिसली नाही. हेही श्रेय अब्दुल हुसेन आदमजो पीरभॉय यांच्या कल्पकतेला दिलं पाहिजे. ** एलीन ऑलिव्हरनं लिहिलेलं 'माथेरान' हे या दोन्ही दृष्टिकोणातून परीक्षेत उत्तरतं. माथेरानबद्दलवा अतीव जिव्हाळा अन् विविध प्रकारची माहिती प्रथम संकलित करून, नंतर ती संग्रहित करून माथेरानला भविष्यात भेटी देणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं हा तिचा प्रयत्न आजही इतका जिवंत वाटतो की, तिच्या अंगाची तुलना ना. गो. चापेकर यांनी 'बदलापूर' गावाचा जो सर्वांगीण अभ्यास पुढच्या पिक्यांसाठी केला, त्यां प्रयलाशीच होऊ शकेल, 'मायेरान'ची मांडणी स्वच्छ, शुद्ध अन् परिपूर्ण आहे. मायेरानविषयी अन्य 'वाटाडे' बरेच निघाले- तिथल्या म्युनिसिपल स्कूलचे हेडमास्टर विष्णू भिकाजी दाबके यांच्या 'अ हँडबुक ऑफ माथेरान' (१९२४) पासून हंसराज परमानंदांच्या 'की (key) टू माथेरान' (१९३५) या इंग्रजी-गुजराथी पुस्तकापर्यंत 'वाटाडे' वेळोवेळी उपलब्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळातलं 'अ पिक्टोरिअल गाईड टू माथेरान द ब्यूटिफुल' (१९५६) या एम्. डी. जाफेथ यांच्या पुस्तिकेतही वाड्मयीन शैलीच्या झलकी दिसतात. या सर्व 'वाटाड्यां'नी मिसेस ऑलिव्हरच्या आधारभूत ग्रंथाचं ऋण मान्य केलं आहे, ज्याप्रमाणं मिसेस ऑलिव्हरनं डॉ. जे. वाय. स्मिथच्या पुस्तकाचं ऋण मनापासून मानलं आहे. मिसेस ऑलिव्हर (१९०५) काय किंवा डॉ. स्मिथ (१८७१) काय, हेडमास्टर दाबके काय (१९२४) किंवा एम. डी. जाफेय (१९५६) काय, त्रिंबक श्रीपाद फडके (द पिक्चरेस्क हिल ऑफ माथेरान, १९२९) काय किंवा गुलबाई फ्रामजी पाटक (माथेरान (गुजराथी), १८९१) काय, माथेरानविषयीचा या मंडळीचा जिव्हाळा त्यांच्या पुस्तकांचा विशेष ठरतो. म्हणूनच ही पुस्तकं चाळताना कवी वर्डस्वर्थच्या 'इमोशन रिकलेक्टेड इन ट्रॅक्विलिटी'चा अनुभव येऊन स्मृतिकातर होत काव्य सुचू लागतं. माथेरानचा परिसर, त्या परिसरातील ठाकूर, कातकरी अन् साधीभोळी माणसं आदिवासी खरी, त्यांची अन्यत्र झालेल्या प्रगतीशी जानपहचानसुद्धा झालेली नसली तरी, ती निरक्षरतेच्या शापानं दग्ध झालेली असली तरी, माथेरानमध्ये भटकंती करताना ती मंडळीही जातिवंत ग्रंथ होतात, त्याचंही स्मृतिकातर होऊन अप्रूप वाटायला लागतं. डॉ. स्मिथच्याच शब्दात सांगायचं तर "ही मंडळी बुद्धिमापनाचे नेहमीचे निकष लावले तर ती कमी बुद्धीचीच ठरतील. आपापली वयंही त्यांना नीट सांगता येणार नाहीत. कोठल्याही प्रकारचा मानसिक गोधळ न करता त्यांना वीस आकड्यापुढे मोजताही येणार नाही. कदाचित आठवड्याचे दिवस त्यांना कळू शकतील, पण महिन्याचे दिवस अजिबात कळणार नाहीत. अशा बाबतीत त्यांची मती फारशी काम करत नाही, हे खरे. पण (माथेरानच्या) परिसरातल्या वृक्षवेलीबद्दल त्यांना विचारा. प्रत्येकाचं नाव त्यांना माहीत आहे. ती फुलतात कधी, फळतात कधी, हे पक्कं माहीत आहे. तिथल्या जंगलातले पश, असंख्य पक्षी, कृमिकीटक त्यांना तोहपाठ आहेत. यांच्याबद्दलच्या साऱ्या प्रश्नांन ते अचूक उत्तरं देऊ शकतात." समाजशास्त्र नावाची विद्याशाखा सुरू व्हायच्या पूर्वी, तसंच स्थानीय इतिहास ही इतिहास लेखनाची नवसंकल्पना जन्म घेण्यापूर्वी हा विरोधाभास टिपणाऱ्यांना ही साधीभोळी माणसं अडाणी तरी कशी वाटणार?
फमावेरान रेल्वे अॅण्ड इट्स् पायोनिअर्स)
माथेरान
माथेरान : (कर्जत ता. १८० ५५' उ., ७३० १५' पू., न. पा. १९०५, उंची ७९१.५ मी.) मुंबईजवळील हे थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण १८५० पूर्वी कोणासही ज्ञात नव्हते. मात्त्र काही आख्यायिकांवरून शिवाजी महाराज व नेताजी पालकरचा येथील साधूपुरुष पिसारनाथशी संबंध जोडला आहे. येथील बरोसा घळीतील चढणमार्गास शिवाजी चढण असे नाव आहे. माथेरानचे नाव डोंगर माथ्यावरील रान या अयनि रूढ झाले आहे. इतिहास : मे १८५० मध्ये ठाण्याचा जिल्हाधिकारी एच. पी. मॅलेट माथेरानवर प्रथमच गेला. याआधी १८३० च्या सुमारास मुंबई शासन फौजेसाठी उन्हाळी आरोग्यधामाच्या शोधात होते. तेव्हा मुंबईचा गव्हर्नर सर जॉन माल्कम याचा त्यासाठी प्रबळ व माथेरान डोंगरांचे समन्वेषण करण्याचा विचार होता. सन १८५० मध्ये मॅलेटला जॉन माल्कमच्या विचारांचे स्मरण झाले. मॅलेटचा चौकला तळ असताना एके दिवशी संध्याकाळी तो मोठा चौक व वन ट्री हिलमधील वरोसा घळीतील झऱ्याच्या पात्त्रातील अरुंद चढाबमार्गाने (आताची शिवाजी लॅडर) अर्धी टेकडी चढून गेला. दुसऱ्या दिवशीही सुंदेवाड्याच्या पाटलासोबत डोंगराचे समन्वेषणासाठी त्याने पुन्हा कूच केले. या मार्गाने तो थेट वन ट्री हिलवरून पिसारनाथ जंगलात आला. तेथे त्याला लहानसे नैसर्गिक तळे (सुधारित शारलोट तलाव) आढळले. या तळयास खळखळ वाहत येणारे पाण्याचे अनेक प्रवाह येऊन मिळाले होते. येथील पाणी व दगड-मातीचे नमुने घेऊन तो रामबागेतून अलेक्झांडर पॉईंट व धाकटा चौक पॉईंटमधील बाटेने उतरून चौक तळावर आला. पुन्हा नोव्हेंबर १८५० मध्ये मॅलेटचा येथे महिनाभर मुक्काम होता. मॅलेटच्या मे १८५० च्या आरोहणानंतर मुंबई लष्कराचा कॅप्टन हेन्री बार हा सुद्धा माथेरान डोंगर दोन वेळा चढून गेला. मॅलेटच्या नोव्हेंबर १८५० च्या मुक्कामाच्या वेळी कॅप्टन वार त्याच्यासोबत होता. मॅलेटने या मुक्कामात येथील निरनिराळ्या पॉईंटवर जाण्याच्या वाटा मोकळया केल्या. तो फेब्रुवारी १८५१ मध्ये पुन्हा माथेरानला आला. या मुक्कामात त्याने बाईक नावाने प्रसिद्ध असलेला दगडी बंगला बांधला. सन १८५२ मध्ये मॅलेटने त्याच्या पत्नीस पालखीतून वर नेता येण्यासाठी शासनाकडून ५०० रुपयांची मंजुरी मिळवून रामबागमार्गे चौक ते माथेरान रस्ता पायी चढण्यायोग्य केला. सन १८५२ मध्ये मुंबई शासनाने लष्कराच्या क्वार्टर-मास्टर जनरलला लष्करी आरोग्य-धामासाठी या डोंगराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यामुळे त्याच वर्षी कॅप्टन डे याने सर्वेक्षण केले व कॅप्टन पॉनसॉनबीने माथेरानचा नकाशा तयार केला. परंतु वैद्यकीय प्राधिकाऱ्यांनी माथेरानपेक्षा खंडाळ्यास प्राधान्य दिल्यामुळे माथेरान लौरी आरोग्यधामाचा विचार शासनाने सोडून दिला. सन १८५३ मध्ये कॅप्टन पीकॉक याने नवीन सर्वेक्षण करून काही नवीन मार्ग शोधून खाजगी घरांच्या जागा आखल्या. शासनाने त्याबाबतचा नकाशा मुद्रित केला. त्यानुसार काही जागा शासनासाठी राखून बाकी जागा लोकांना वितरित करण्याचे अधिकार मॅलेटला दिले. सन १८५३ अखेर ७० जागांसाठी अर्ज आले होते. प्रारंभी वसाहतींसाठी भाडेपट्टचाने द्यावयाच्या जागेचा दर एकरी फक्त पाच रुपये होता. व कोणासही पाच एकरांपेक्षा अधिक जागा घेण्याचा अधिकार नव्हता. माथेरानच्या पहिल्या पाच निवासांमध्ये एच. पी. मॅलेटचा बाईक, इ. जी. फॉसेटचा हमिटेज, कॅप्टन हेन्री बारचा बार हाऊस, कॅप्टन सी. बॉकरचा बॉकर्स कॉटेज आणि आर्थर मॅलेट याचा स्टोनहेंज यांचा क्रमांक लागतो. सन १८५५ ते १८५८ च्या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरान विकासासाठी खूप प्रयत्न केले. त्यानुसार माथेरानला चौककडून वरोसा घळीतील शिवाजी चढावमार्गाऐवजी नेरळ शृंगाकडील कमी उताराचा रस्ता १०,००० रुपये खर्चुन तयार केला. आताच्या सिमसन तलावाखालील मालढुंगे झऱ्याला बांध घातला. परंतु तो पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यानंतर पिसारनाथ झऱ्याचे पाणी अडवण्यासाठी दुहेरी भित घातली. सन १८५६ मध्ये लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरानच्या व्यवस्थापनासाठी मेजर पार्कीन्सनची पहिला अधीक्षक म्हणून नेमणूक केली. युरोपिअनांच्या सोयीसाठी जॉन मॅन्युअल डिसोझाने १८५४ मध्ये माथेरानला पहिले हॉटेल काढले. सन १८५५ मध्ये लॉर्ड एल्फिन्स्टनने माथेरानला पहिला दवाखाना बांधला. निरनिराळ्या पॉईंटना जाणारे बहुतांश रस्ते एल्फिन्स्टनच्याच मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. त्याने स्वतःच्या निवासासाठी सध्याच्या एल्फिन्स्टन लॉजची ३० एकराची जागा निवडली. प्रथम तेथे कुटी बांधून सध्याच्या इमारतीचा पाया घातला. त्याच्या कर्मचाऱ्यांनीही त्याचे अनुकरण केले, बंगले व घरे उभी राहिली आणि माथेरानचे रूप बदलले. इमारतीच्या जागांना मागणी वाढली. माथेरानच्या शोधाचे श्रेय मॅलेटकडे जात असले तरी विकासाचे श्रेय मात्र एल्फिन्स्टनकडे जाते. एल्फिन्स्टन लॉजचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याने आपला मुक्काम महाबळेश्वरहून माथेरानला हलविला. बरेच शासकीय निर्णय माथेरानहून घेतले जात व या ठिकाणाला छोट्या राजधानीचे स्वरूप आले. प्रारंभी अधीक्षकाचे माथेरानच्या व्यवस्थापनावर पूर्ण नियंत्रण होते. त्यानंतर १८७० मध्ये स्थापन झालेल्या हिल स्टेशन कमिटीकडे स्थानिक व्यवस्थापनाचे काम हस्तांतरित झाले. सन १९०५ मध्ये माथेरान नगरपालिकेची स्थापना झाली तरी नगरपरिषदेवरील नियुक्त सभासद मंडळावर पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने अधीक्षकाचेच नियंत्रण असे. पहिल्या महायुद्धापर्यंत इंडियन मेडीकल सव्हिसमधील वैद्यकीय अधिकारी व प्रथम वर्ग मॅजिस्ट्रेटचीच अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात येत असे. त्यानंतर मात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही नियुक्ती होत असे. सन १९३३ अखेर जुन्या कायद्यानुसार निर्माण केलेले अधीक्षकाचे पद रद्द करण्यात आले व नगरपरिषदेवर निवडून आलेले सभासद मंडळ व अध्यक्ष नागरी व्यवस्थापन पाहू लागले. माथेरानला डाक व तार कार्यालय १८६८ ला स्थापन झाले. दूरध्वनी विनिमय केंद्र १९३३ मध्ये स्थापन झाले. सन १९२७ मध्ये पाण्याचे नळ टाकण्यात आले. त्याआधी पखालीने पाणी आणत. सन १८९२ मध्ये फ्रामजी मेहता यांनी येथून माथेरान जॉटींग्ज नामक अर्धसाप्ताहिक सुरू केले. ते ७ जून १९१६ ला बंद पडले. छोडो भारत आंदोलनातही माथेरान अग्रेसर होते. येथील विठ्ठल लक्ष्मण कोतवाल ऊर्फ भाई कोतवाल १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात पोलिसांद्वारा २ जानेवारी १९४३ ला सिद्धगडावर बेसावध असता मारले जाऊन हुतात्मा झाले. सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचे हुतात्मा स्मारक आहे. नवरोजी लॉर्ड गार्डनमध्येही त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. रस्ते : नेरळ-माथेरान रस्ता होण्यापूर्वी माथेरानला चौकहून जावे लागे. हा ३५ किलोमीटरचा अवघड मार्ग तीन टप्प्यांचा होता. मुंबईहून नावेने उलवा बंदरापर्यंत पहिला टप्पा, उलबा ते पनवेल टांग्याने व पुढे चौकपर्यंत बैलगाडीने दुसरा टप्पा व चौकच्या पुढील चढाव तिसरा टप्पा. चौकहून शिवाजी चढावमार्गे पायी किंवा पालखीतून जाता येई. मुंबई-पुणे रेल्वेमार्गाचा कल्याण-पळसदरी भाग १२ मे १८५६ ला सुरू झाल्यानंतर मुंबई व पुण्याच्या प्रवाशांना नेरळमार्गे माथेरानला प्रवास सोयीचा होऊन चौकहून रहदारी कमी झाली. त्यानंतर कॅप्टन पीकॉकच्या सर्वेक्षणानुसार रेखांकित केलेला नेरळ-माथेरान मार्ग लॉर्ड एल्फिन्स्टनने १०,००० रुपये खर्चुन नीट बांधला. त्यानंतर दोन्ही मार्गानी प्रवासी येत असत. सशक्त प्रवासी पायी किंवा घोड्यावर येत, तर महिला, म्हातारे व धनिक पालख्यांमधून येत. सन १८८८ पूर्वी पालख्यांना टोनजोन (Tonjon) म्हणत. या पालख्या म्हणजे लोखंडी खुर्चीस दोन्ही बाजूंनी बांबू किंवा लाकडी दांडे बांधत व त्या पुढे चार व मागे चार भोयांनी बाहून नेत. पुढे एका लोखंडी खुर्चीची जागा दोन लाकडी खुच्र्यांनी घेतली. पुढे टोनजोनची जागा बॅलेस चेअरने घेतली. ही पालखी टोनजोनसारखीच होती. फक्त त्यावर कॅन्व्हास चढविलेला असे. बॅलेस चेअरनंतर मॅनचिल (Manchil) पालखी अस्तित्वात आली. यातून प्रवासी झोपून प्रवास करू शकत असे. सन १८९९ मध्ये मुंबईला प्लेगची साथ आल्यामुळे अनेक शहरवासी माथेरानला गेले. त्यांना या मॅनचिलचा चांगला उपयोग झाला. आता नेरळ-माथेरान डांबरी रस्ता जकात नाक्या (दस्तूरी नाका) जवळ संपतो. खाजगी वाहनांना फक्त येथपर्यंतच परवानगी आहे. माथेरानमध्ये स्वयंचलित वाहनांना परवानगी नाही. शासनाच्या विश्रामगृहाव्यतिरिक्त पर्यटन विकास महामंडळाचे हॉलिडे होम्स, खाजगी हॉटेल्स, केंद्र सरकारची व खाजगी कंपन्यांची विश्रामगृहे आहेत. शासनाचा माऊंट बंगला माथेरानचा सर्वोच्च बिंदू आहे (७९१.५ मी.). रेल्वे : नेरळ-माथेरान रेल्वे १५ एप्रिल १९०७ ला सुरू झाली. या रेल्वेचे श्रेय मुंबईचे प्रसिद्ध बोहरा व्यापारी सर आदमजी पीरभाय यांच्याकडे जाते. रेल्वे उभारणी-मागील घटना अशी की, १९०० च्या सुमारास आदमजी पीरभाय माथेरानला जाण्यासाठी मुंबईहून नेरळला आले. तेव्हा नेरळचे सर्व भाडोत्री घोडे, रिक्षा व पालख्या आधीच निघून गेल्यामुळे पायी चढण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. निराश झालेले आदमजी न चढताच मुंबईला वापस गेले ते माथेरानला रेल्वे नेण्याची प्रतिज्ञा करूनच. या रेल्वेमार्गाचा चढाव कठीण असून पुढे तो पश्चिमेकडे वळतो व वळणावळणाने जातो. जुम्मा पट्टी स्थानकाआधी मार्ग घोड्याच्या नालेसारखा भासतो. जुम्मा पट्टीजवळ नेरळ-माथेरान रस्ता लागतो. नेरळपासून सुमारे १२ कि. मी. वर लहानसा बोगदा लागतो. त्यास "बन किस टनेल" म्हणतात. त्यानंतर वाटर पाईप स्थानक लागते. पुढे गाडी पॅनोरमा पॉइंटखालील कडेने वर जाते.
पॅनोरमा पॉइंट (उंची ७५४.८ मी.): माथेरान डोंगराच्या पूर्वेकडील शाखेच्या अगदी
उत्तर टोकाला हा पॉईट आहे. याच्या पूर्व, उत्तर व पश्चिम बाजूस उंच कडा असून येथून सभोवतालच्या प्रदेशाचे पूर्ण दर्शन होत असल्यामुळे यास पॅनोरमा पॉईंट नाव पडले आहे." या पॉईंटच्या अगदी समोर पेब किल्ला असल्याने स्थानिक लोक यास "गडाची सोंड" किंवा "फोर्ट हेड" म्हणतात. माथेरानजवळील लोक यास पांडुरंग पॉईंट म्हणतात. माथेरानचा हा सर्वोत्तम पॉईंट रेल्वेस्थानकापासून उत्तरेस ४.८ कि. मी. वर आहे. यामुळेच डोंगराच्या या शाखेस पॅनोरमा हिल नाव पडले. या पॉइंटकडे जाताना अमन लॉज, सिमसन तलाव, माऊंट बॅरी, गव्हर्नर बंगला (गव्हर्नर हिल) ही स्थाने आहेत. सिमसन तलावाजवळ दाट झाडीतून लाल मातीतील एल्फिन्स्टन बंधाऱ्याचे अवशेष दिसतात. पुढे जवळच खडकांवरून जाणारी अरुंद वाट असून त्यानंतर दाट वनराई असलेली लहानशी मुकुटासारखी टेकडी आहे. त्यापुढे पॅनोरमा पॉईटचा वृक्षरहित सपाट दगडी भाग आहे. येथून पूर्वेकडील सह्याह्नीपर्यंत, उत्तरेकडील ठाणे जिल्ह्यातील महालक्ष्मी टेकडीपर्यंत व पश्चिमेकडील मुंबई-करंजापर्यंतचा विशाल प्रदेश दृष्टिपथात येतो. आग्नेयेस दाट भेरली माडांच्या रानातून गव्हर्नर हिल एखाद्या तुऱ्यासारखी दिसते. पूर्वेकडील काही भूशलाकांहून वातावरण स्वच्छ असल्यास सह्याद्रीतील अनेक शिखरे व किल्ले दिसतात. वायव्येस बाबा मलंग पर्वतरांगेतील पेब किल्ला तटबंदीसह स्पष्ट दिसतो. मागील शतकात माथेरानला बंगले व इमारतींच्या बांधकामासाठी पेब किल्ल्याचे तयार चिराचे दगड माथेरानच्या बाजूला खाली लोटून व तेथून ते वर चढविले. पेबच्या मागे अरुंद असा नाखिंड कडा दिसतो. पलीकडे चंदेरी किल्ल्याच्या टेकडीचा सरळ उभट सुळका दिसतो. पुढे म्हैसमाळ व नवरानवरी टेकड्यांची शिखरे दिसतात. मलंगगड रांगेतील अगदी पश्चिमेकडील टोकाला दोन मोठ्या टेकड्या दिसतात. त्यापैकी उजवीकडील तावली व डावीकडील बाबा मलंग (Cathedral rock) टेकडी आहे. डाव्या बाजूस प्रबळगडाकडे माथेरान डोंगरांच्या घळयांमधील दाट झाडी व हार्ट, मंकी व पॉक्युपाईन पॉईंटचे सुंदर दृश्य दिसते. पश्चिम किंवा अंशतः नैऋत्येकडे प्रबळगडासमोर मोठे व धाकटे करंजा (३०० मी.) दिसते. त्याच्या उत्तरेस मुंबई बंदर व घारापुरी (१७०.५ मी.) दिसते. त्याहीपलीकडे मुंबई शहर दिसते. त्याच्या उत्तरेला तुर्भे टेकडी (३०० मी.) दिसते. येऊर टेकडी व पारसिक भूशिरही दिसते. पारसिक भूशिराजवळ मध्य रेल्वे केसासारखी दिसते. पारसिक हिलपुढे कल्याणची खाडी किंवा उल्हास नदीचे मुख दिसते. खाडीच्या वर उत्तरेला बाबा मलंग व तावली टेकड्यांमधून कमनदुर्ग (६४८ मी.) व तुंगार टेबल लँड (६५८.५ मी.), तावलीच्या समोर उजव्या बाजूस दुगड किल्ला व त्यापलीकडे टकमक टेकडी (७८४.८ मी.) दिसते. टकमकखाली वैतरणा खोऱ्याचे ओझरते दर्शन घडते. टकमकच्या उत्तरेस सूर्य डोंगररांग व त्यातील टेकड्या वातावरण स्वच्छ असल्यास दिसतात. अगदी उत्तरेला अशेरी (५०६.७ मी.) किल्ला असून त्याच्या पूर्वेकडील वाडा टेकडचाही दिसतात. परंतु उत्तर क्षितिजाकडे पेब भूशिरावरून डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी टेकडीचे शिखर दिसू शकते. त्याच्या उत्तरेस थोड्या अंतरावर पश्चिम वाजूने उंच कड्यांचा माहूली (८४४.५ मी.) किल्ला दिसतो. त्याला लागून छोटा माहूली आहे. माहुलीच्या पूर्वेस सह्याद्रीचा दिसू शकणारा भाग म्हणजे वाटवड टेकड्या. वाटवडच्या पूर्वेस मागील बाजूस लिंबक (१,२७६.२ मी.) डोंगर आहे. त्यापुढे जरा दक्षिण बाजूस अंजनेरी (१,३१५.२ मी.) डोंगर आहे. त्याच्या दक्षिणेकडे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांता अलग करणारे अलंग व कुलंग किल्ले दिसतात. या गडांमधून सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कळसूबाई (१,६२८.१ मी.) दिसू शकते. कळसूबाईच्या दक्षिणेकडे घाटघर व सह्याद्रीच्या तुटलेल्या रांगांमधील इतर शिखरे दिसतात. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड (९७०.८ मी.) कोटाच्या शिखरामुळे पलीकडे हरिश्चंद्रगड (१,२६८.६ मी.) लपलेला दिसतो. सिद्धगडच्या उत्तरेस गोरखनाथ व मच्छिद्रगडच्या जुळ्या टेकड्या दिसतात. त्यापुढे आणखी दक्षिणेकडे भिमाशंकर (१,०३०.२ मी.) दिसतो. भिमाशंकरसमोर एकाकी असलेला गुंगी (६१५.३९ मी.) डोंगरी किल्ला आणि त्याहीपुढे पेठचा किल्ला दिसतो. गारबट पॉईंट : माथेरानच्या पूर्व बाजूच्या स्वतंत्र शाखेच्या उत्तर टोकाला पॅनोरमा व दक्षिण टोकाला गारवट पॉईंट आहे. येथे अमन लॉजहून दक्षिणेकडे जावे लागते. गारबटकडे जाताना बॉमबाच विहीर, चॅलेट, डालकीथ, गारबट हिल ही स्थाने लागतात. गारवट हिलच्या पुढे आणखी दीड कि. मी. वर गारबट पॉईंट असून त्यावरून कर्जत अगदी समोर दिसते. येथे चकाकणारे स्फटिकासारखे दगड (गार) बिपुल असल्याने यास हे नाव मिळाले. गारबट हिलचा उजवा किनारा दाट झाडीने व्यापला असन खालच्या बाजस सदाहरित
माथेरान : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध गिरिस्थान. लोकसंख्या ३,९२० (१९८१). मुंबईच्या पूर्वेस सु.५० किमी., समुद्रसपाटीपासून ७५० मी. उंचीवर हे एका रुंद ⇨ मेसावर वसलेले आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरील नेरळ या प्रस्थानकापासून अरुंदमापी लोहमार्गाने माथेरानला जाता येते. नेरळ-माथेरान हे लोहमार्ग अंतर २१ किमी. आहे नेरळहून माथेरानपर्यंत मोटारीकरिता रस्ता असला, तरी मोटारींना माथेरान गावात प्रवेशबंदी आहे. मुंबई–पुणे राष्ट्रीय हमरस्त्यावरील चौक येथून पाऊलवाटेनेही माथेरानला जाता येते. हौशी प्रवासी व गिर्यारोहक नेरळहून जवळच्या मार्गाने (११ किमी.) माथेरानला पायी जातात.
या प्रदेशाच्या माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले असे म्हणतात. धनगरांचे आद्य मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) हे नाव रूढ झाले, अशी येथील धनगर समाजाची समजूत आहे.
मे १८५० मध्ये मुंबई नागरी सेवेतील ह्यू मॅलेट या अधिकाऱ्याने प्रथम या स्थानाला भेट दिली व याचे गिरिस्थान म्हणून महत्त्व ओळखले. लॉर्ड एल्फिन्स्टन याने १८५४ मध्ये तेथे एक बंगलाही बांधला. तेव्हापासून या गिरिस्थानाकडे अधिकाधिक लोक आकृष्ट होऊ लागले. येथील सृष्टिसौंदर्याने मोहित होऊन सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधणीचे श्रेय त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन याच्याकडे जाते. १९०५ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. माथेरानच्या परिसरात धनगर, ठाकूर व कातकरी या लोकांचे वास्तव्य आहे.
माथेरान गिरिस्थानाच्या माथ्याचा विस्तार २०·७ चौ. किमी. असून याच्या दोन अंगांना दोन कटक आहेत. मेसाच्या कडांच्या बाजूला अनेक सौंदर्यस्थळे (पॉइंट्स) असून हार्ट, पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉर्क्युपाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल इ. ठिकाणे प्रसिद्ध आहेत. येथे शार्लट सरोवर तसेच इतर अकरा झरे असून त्यांपैकी हॅरिसन व मॅलेट हे उल्लेखनीय आहेत. येथे मारुती, राम तसेच पिसारनाथ यांची मंदिरे आहेत.
माथेरान वेगवेगळ्या टोकांवरून हिरवीगार वनश्री व परिसर यांचे विहंगम दृश्य दिसते. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, मोहक सृष्टिसौंदर्य व मुंबईचे सान्निध्य यांमुळे या थंड हवेच्या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेले, निवासगृहे, उपहारगृहे व भोजनालये, बाजार, उद्याने इ. सोयी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे येथे एक विश्रामगृह आहे. गावात रुग्णालय, दवाखाने, शाळा यांसारख्या नागरी सुविधाही आहेत. पर्यटकांचा हंगाम जवळजवळ वर्षभर, विशेषतः ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि एप्रिल ते जून, असतो.
चौधरी, वसंत
कुटुंब-कबिल्याला घेऊन माहेरानला जाणारे धनिक रेलवे मोटर-कोच' भाडयानं घेत आता विमानं 'चार्टर' केली जातात, तसाच हा त्यावेळचा प्रकार, (चित्रसंदर्भ द पिक्चरेस्क हिल ऑफ माथेरान, ओवक श्रीपाद फडके, १९२९)
बसायला फारसे लोक तयार होईनात. स्वतः अब्दुल हुसेन इंजिन ड्रायवार अन् त्याचे दोन मदतनीस यांच्याबरोबर इंजिनात बसले. गाडीचा पहिलावहिला प्रवास त्यांनी करून दाखवला. काही गडबड होऊ नये म्हणून रेल्वेच्या दोन्ही बाजूला कामगारांनी खडा पहारा दिला होता, इंजिन ड्रायव्हर अन् त्याचे मदतनीस याचं
ार केलेलं दिव्य
(शिवमंदर्भ अ ब्रीफ हिस्टरी ऑफ मावेरान रेल्ने अंगड इट्स पायोनिअर्स)
आयुष्यही माझ्या आयुष्याइतकंच महत्वाचं आहे, असे म्हणत इतर 'नको नको' म्हणत असताना अब्दुल हुसेन गाडीत चढले अन् प्रवास सुविहितपणे झाला. माथेरानला गाडी पोहोचल्याच्या आनंदात अब्दुल हुसेन उतरताना त्यांचा कोट फाटला, पण ते इतके आनंदित झाले होते की आपल्या खिशात असलेली सारी
रक्कम त्यांनी तिथल्या तिथं कामगारांत बादून टाकली. आपल्या चिरंजीवांनी भगीरय प्रयत्नांनी साकार केलेलं दिव्य सर आदमजीना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद उत्तरायुष्यात तर सर आदमजी 'रॉलेट' या आपल्या माथेरानच्या बंगल्यात राहत होते. गाडी जेव्हा त्यांच्या बंगल्याजवळून जाई तेव्हा तिथं क्षणभर ती बांबे, शिट्टी वाजवूनं सर आदनबौना वंदन करी अन् मगच पुढे जाई.
सर आदमजीचं १२ ऑगस्ट १९१३ ला निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षा त्यांच्या दानशूरपणाची अनेक उदाहरणं इतिहासात नमूद आहेत. चिरंजीव अब्दुल हुसेन १८ डिसेबर १९१८ रोजी निवर्तले. वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीतून तितकेच कष्ट करून एखाद्या ध्यासाची यशस्वी सांगता करणारे चिरंजीव किती असतांत। पैसा सर आदमवीचा, कह अब्दुल हुसेन यांचे, लाभ मात्र माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचा, असंच नेरळ-माथेरान रेल्वेचं वर्णन करावं लागेल.
सुमारे मैलभर नेरळ-माथेरान ही गाडी मुंबई पुणे रेल्वेच्या समांतर मार्गानं जाते अन् नंतर मात्र पश्चिम दिशेनं घाट चढू लागते. सपाट रस्त्यावर ताशी १२ मैल गतीनं तर चढ़ावर फक्त पाच मैल गतीनं चढणारी ही गाडी दुरून खेळण्यातली गाडी वाटते. दोन रुळांमधलं अंतर फक्त दोन फुटांचं। पण तास-सव्वा तासात १३ मैलांचं नागमोडी अंतर कापत ती समुद्रसपाटीपासून २४५५
समाजशास्त्र नावाची विद्याशाखा सुरू व्हायच्या पूर्वी, तसंच स्थानीय इतिहास ही इतिहास लेखनाची नवसंकायनस जन्म घेण्यापूर्वी
एलीन अऑतिकानं लिहिलेलं माथेरान हे या
दोन्नती दृष्टिकोणातून परीक्षेत उतरत माथेरानबरतचा अतीव विज्ञाजा अन् विविध प्रकारची माहिती प्रथम संकलित करून नंतर ती संघहित करून मावेगवला भविष्यात भेटी देणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं हा तिवा प्रयत्न आजही इतका जिवंत वाटतो की, तिच्या पंगाची तुलना ना. गो. चापेकर यांनी 'बदलापूर गावाचा जो सर्वांगीण अभ्यास च्या पिक्यांसाठी केला, त्यां प्रयत्नाशीच होऊ शकेल. 'मावेरान'ची मांडणी स्वच्छ, शुद्ध अन् परिपूर्ण आहे. माथेरानविषयी अन्य वाटाहे बरेच निषाले तिथल्या म्युनिसिपल स्कूलचे हेडमास्टर विष्णू भिकाजी दाबके यांच्या 'अब औष माथेरान' (१९२४) पासून हंसराज प्रमानंदांच्या 'की (key) टू माथेरान' (१९३५) या इं गुजराथी पुस्तकापर्यंत 'बाटाई' वेळोवेळी उपलब्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळातलं 'अ पिक्टोरिअल गाईड टू माथेरान द ब्यूटिफुल' (१९५६) मा ए डी फेय यांच्या पुस्तिकेतही वाङ्मयीन शैलीच्या झलकी दिसतात. या सर्व वाटाड्यां'नी मिसेस ऑलिव्हरच्या आधारभूत ग्रंथाचं ऋण मान्य केलं आहे. ज्याना मिसेस ऑतिकानं डॉ. जे. वाय. स्मिथच्या पुस्तकाचं ऋण मनापासून मानलं आहे
मिसेस ऑलिजर (१९०५) काय किया डॉ. निमय (१८७१) काय, हेडमास्टर दाबके काय (१९२४) किंवा एन. डी. जाफे (१९५६) काय, श्विक श्रीपाद फडके (पिक्योस्क हिल ऑफ माथेरान, १९२९) काय किंवा गुलबाई फ्राम पटक (मायेन (गुजराथी) १८९१) काय, माथेरानविषयीचा या मंडीचा विका त्यांच्या पुस्तकांचा विशेष उरतो. म्हणूनच हो पुस्तकं चाळताना कवीवर्डस्वर्थच्या 'इमोशन रिकलेक्टेड इन दृक्विलिटी'चा अनुभव येऊन स्मृतिकातर होत काव्य सुचू लागतं. माथेरानचा परिसर, त्या परिसरातील ठाकूर, कातकरी अमू साधीभोळी माणसं आदिवासी खरी, त्यांची अन्यत्र झालेल्या प्रगतीशी जानपहचानसुद्धा झालेली नसली तरी, ती निरक्षरतेच्या शापानं दग्ध झालेली असली ती, माथेरानमध्ये भटकंती करताना ती मंडळीही जातिवंत ग्रंथ होतात, त्याचंही स्मृतिकातर होऊन अधूप काढायला लागतं. डॉ. स्मिथच्या शब्दात सांगायचं तर
हेत्यांनी कधपुचे मोजताही येणार नाही "हो मंडळी बुद्धिमापनाचे नेहमीचे निकष लावले तर ती कमी बुद्धीचीच ठरतील, आपापली वयंही त्यांना नीट सांगता येणार नाहीत. कोठल्याही प्रकारचा मानसिक गोधळ न करता कदाचित आउवडधाचे दिवस त्यांना कर शकतील, पण महिन्याचे दिवस अजिबात कळणार नाहीत. अशा बाबतीत त्यांची मती फारशी काम करत नाही, हे खरे. पण (माथेरानच्या) परिसरातल्या वृक्षवेलीबद्दल त्यांना विचारा. प्रत्येकाचं नाव त्यांना माहीत आहे. ती फुलतात कधी, फळतात कधी, हे पक्कं माहीत आहे. तिथल्या जंगलातले पशु असंख्य पक्षी कृमिकीटक त्यांना तोडपाठ आहे यांच्याबद्दलच्या साऱ्या प्रश्नांना अचूक उतर देऊ शकतात."
Matheran Travel Notes: A Car-Free Hill Station Near Mumbai
Arvind Ramadurai
4–5 minutes
My
last weekend was spent in Matheran, a quaint hill station some 90 km
from Mumbai. Having been to Asia’s only automobile-free hill station a
few times, I didn’t indulge in touristy sight-seeing. Strolling down the
main road (or the only road) near the market, I couldn’t help but
notice the timelessness of some of the structures there, probably
existing for as long as over a century. And no wonder why. The little
place was discovered by the then Governor of Thane, Hugh Poyntz Malet in
1850 as a getaway destinations for British officers. One reason why
tourists visit the place is because of the toy train, which in itself is
holds a long history. This is one of the five mountain railways
currently operational in India that was started by Sir Adamjee Peerbhoy
in 1907. Visionary. The following can be seen just at the entrance of
the Matheran Railway Station -
Outside Matheran Railway Station
I love how the message is written. “Rare engineering skill”, “Staggering cost of Rs. 16 lakh” (such was the value of money in the 1900s) and “Matheran Railwaywala”.
Quite a testament to the remarkable craftsmanship and dedication of
the individuals. I also learnt that the initial settlers of this place
were wealthy Parsis and Dawoodi-Bohra muslims, that further explains
their abundance even in areas like Neral.
On the same road near the main market, you’ll find this ancient 100+ year old Khorshed Villa.
A structure that has stood the test of time. Just imagining how this
place must’ve been in 1911 gives me so much happiness. Some person named
Khorshed would’ve been living within these walls (again seems to be a
Parsi), basking in the warm sunshine, breathing fresh cool air from
their balcony and watching the monkeys and British officers and
governors pass by. Kaafi nice.
Khorshed Villa
Once
I reached home, my imagination and thoughts about Khorshed Villa still
kept bugging me. Who is Khorshed? What did he/she do for a living? Of
course had to be someone of a high stature to own a mansion like this
during British Raj. Wait, is Khorshed even a real person? Or is it some
word in native Parsi language?
I tried searching about this property on the internet and the closest resource I could find was this link
that talks about Kekoo and Khorshed Gandhy, two prominent Indian
artists and gallerists of the 20th century, and their family home in
Matheran. I even ChatGPT-ed this and the response was the following -
Khorshed
Villa is a heritage bungalow located in the hill station of Matheran in
Maharashtra, India. It was built in the early 1900s by the Parsi family
of Khorshed and Jal Bhujwala, and is one of the few remaining Parsi
bungalows in Matheran. The bungalow is situated on a hilltop and offers
panoramic views of the surrounding hills and valleys. It has a large
garden with a variety of flowers and fruit trees.
Today,
Khorshed Villa has been converted into a boutique hotel that retains its
old-world charm and colonial architecture. The hotel has eight
well-appointed rooms that are equipped with modern amenities like air
conditioning, television, and attached bathrooms. Guests can relax in
the garden, take a dip in the pool, or explore the nearby hiking trails.
The hotel also has a restaurant that serves a variety of Indian and
international cuisines.
Doesn’t seem to be convincing, does it? In no way, the pictures above show any trace of air conditioners and swimming pools.
I’m
leaving this discussion open ended for now as the true origins and
story of Khorshed Villa remain unknown to me - perhaps someone could let
me know in the comments.
Matheran,
meaning “forest on the forehead” in Marathi, has a rich history that
dates back to prehistoric times. The region was originally inhabited by
the indigenous tribes who lived in harmony with nature, utilizing the
resources of the dense forests and fertile land.
Discovery and Development by the British
Matheran’s
transformation from a secluded forest to a popular hill station began
in the mid-19th century during the British colonial era. It was
discovered in 1850 by Hugh Poyntz Malet, the then Collector of Thane
district. Malet was captivated by the cool climate and the stunning
views that Matheran offered, which starkly contrasted with the hot and
humid conditions of the nearby plains.
Recognizing
its potential as a health resort, the British soon began to develop
Matheran as a retreat for their officers and families. The construction
of bungalows, roads, and other infrastructure commenced, giving the hill
station a distinct colonial charm that it retains to this day.
Establishment as a Hill Station
Lord
Elphinstone, the Governor of Bombay (now Mumbai) from 1853 to 1860,
played a significant role in promoting Matheran. Under his
administration, the hill station saw significant development. The
British introduced several amenities, including schools, churches, and
clubs, to cater to the needs of their community. The famous Matheran
Light Railway, a narrow-gauge railway line from Neral to Matheran, was
constructed in 1907. This railway line remains operational and is one of
the key attractions of the hill station, offering scenic views and a
nostalgic journey.
Matheran’s Unique Car-Free Policy
One
of the most unique aspects of Matheran is its vehicle-free policy. This
regulation was introduced to preserve the ecological balance and
natural beauty of the region. The absence of vehicles not only helps in
maintaining the air quality but also ensures a peaceful environment,
free from the noise and pollution typical of urban areas. This policy
has helped Matheran retain its old-world charm and pristine beauty,
making it a popular destination for those seeking tranquility.
Matheran During the Independence Movement
During
India’s struggle for independence, Matheran served as a meeting place
for several freedom fighters and political leaders. Its relative
seclusion provided a safe haven for discussions and planning. Many
prominent leaders, including Mahatma Gandhi, visited Matheran and stayed
in some of its bungalows, which have now become historical landmarks.
Post-Independence Era
After
India gained independence in 1947, Matheran continued to be a favored
destination for tourists seeking respite from the sweltering heat of the
plains. The hill station witnessed gradual modernization, with improved
connectivity and better facilities for visitors. However, the
authorities have been cautious to balance development with conservation,
ensuring that Matheran’s natural beauty and ecological significance are
not compromised.
Preservation and Conservation Efforts
In
recent decades, significant efforts have been made to preserve
Matheran’s unique environment. The local government, along with various
non-governmental organizations, has undertaken several initiatives to
protect the region’s biodiversity. These efforts include strict
regulations on construction, waste management programs, and campaigns to
promote eco-friendly tourism practices.
Cultural Significance
Matheran
is not just a natural paradise but also a cultural hub. The local
population, comprising mainly the Adivasi (tribal) communities, has a
rich cultural heritage that adds to the hill station’s charm.
Traditional festivals, dances, and customs are an integral part of
Matheran’s cultural landscape, offering visitors a glimpse into the
local way of life.
Conclusion
Matheran’s
history is a tapestry woven with threads of indigenous culture,
colonial heritage, and natural splendor. From its early days as a tribal
land to its development as a British hill station and its current
status as a popular eco-friendly destination, Matheran has been a
fascinating journey. Its commitment to preserving its natural and
cultural heritage makes it a unique and timeless retreat for travelers.
As you explore Matheran, you not only witness its scenic beauty but also
become part of its rich historical narrative.
Matheran
is a magnificent hill station close to Mumbai. The Railway track
(narrow gauge) was laid and owned by Adamjee Peerbhoy. The Railway
station has this stone and portrait of his. From Neral to Matheran it
is 21 KM and has stations like Jumapatti, Water Pipe and Aman Lodge. It
is still pristine in the sense that motor vehicles are strictly not
allowed.
https://www.livehistoryindia.com/story/snapshort-histories/matheran Matheran: Bombay’s Paradise Found
AUTHOR Aditi Shah PUBLISHED 21 July 2020
Like so many magical places on this earth, Mumbai’s most-loved hill station became one purely by serendipity. Just 50 km from the heat and chaos of the big city, Matheran has been offering a sweet respite to weekenders and day-trippers, all because a British officer decided to stretch his legs and take an evening stroll 170 years ago.
The officer, Hugh P Malet, Collector of Thane, was on his way back from Pune to Thane on a sultry day in May 1850. He was camping in a bungalow at Chauk, not far from the base of the Matheran hill, in the Sahyadri range in Maharashtra’s Raigad district. Malet decided to take a walk up the hill. Halfway up, he was overcome by the unspoiled beauty of Matheran and the jaw-dropping vistas it offered, and thought it worthy of further exploration.
Malet returned the next day and collected some water from a small stream, filled a basket with earth, and chipped some laterite stone to take away with him for careful examination. The far-sighted officer of the British East India Company realised that this could be a haven for British officers flagging under India’s relentless tropical climate.
In those times, the only relief from soaring temperatures and diseases in the colonies came either from early retirement and a ticket back to England, or extended furloughs in cooler climes. Since increasing military and political expansion in the 19th century made the first option unfeasible, developing hill stations across India was a better idea. Hence the abundance of colonial-style bungalows that still dot places like Shimla, Darjeeling, Ooty, Mussoorie and Matheran, a home away from home for British officers wilting under the blazing Indian sun.
Matheran has a more famous precedent – Shimla, one of the earliest hill stations to be developed in India. In 1827, when Governor-General Lord Amherst travelled all the way from Calcutta to spend part of the summer for preventive and recreational purposes in Shimla, the custom caught on. The other Presidencies followed suit, and officers in government departments, commercial firms and the military made it a practice to head for these mountain retreats. Painting of rocky hills at Matheran by Melville Clarke, c.1854. Painting of rocky hills at Matheran by Melville Clarke, c.1854. | British Library
In the Bombay Presidency, Mahabaleshwar was the first to be identified as a convenient hill station. In 1829, it was officially declared as the Presidency’s summer capital. But wonderful weather and natural beauty were not good enough for a hilly abode to be officially designated as a hill station. A set of stringent criteria had to be taken into account:
-The general features of the plateau/place/hill/slopes/altitude - Approaches and accessibility potential - Supposed cost and condition of the roads - Climate, especially during summer and monsoon - History of diseases such as cholera - Availability of water - Soil conditions - Sites for barracks - Construction material - Flora and fauna
Matheran checked all the boxes. The small plateau covered in dense, evergreen forest on top of the hill was a perfect candidate. And so Malet returned in November to pursue his plans. This time, a temporary hut welcomed him. It had been built under the supervision of Madhav Rao, son of the ‘Patil’, or headman of Chauk village. Interestingly, the timber used to build the hut had been sourced from the broken mast of a ship which Malet had bought in an auction. He got it cut to size and dispatched it to Matheran from Bombay.
Malet stayed for a month, and during this time, he cleared many paths to several viewing points, which opened up into beautiful panoramas. At the time, the only other inhabitants of the region, albeit on the lower levels of the hills, were tribal communities. These were mainly Dhangars, who lived in 12 clusters or wadas, of two or three huts each. The other tribes in the region were the Thakurs and Kathkaris. The Byke The Byke
In February 1851, Malet returned for the third time. By then, he already had three more bungalows constructed, two of them temporary and one made of stone (now known as the Byke Hotel), the first pucca residence in Matheran. In the next 12 months, he obtained a grant of Rs 500 from the government for the improvement of the path leading to Chauk, through the Ram Bagh forest. It was via this path that Mrs Malet was carried up to Matheran, seated in a chair fastened with ropes to bamboo poles.
Malet was soon joined by his friends and family, who too built houses here. E G Fawcett built the second house, the Hermitage; Captain Henry Barr built the third (Barr’s House is a heritage hotel today); Captain C Walker the fourth (Walker’s cottage was taken over by wealthy industrialists from Bombay, the Sassoons and then the Petits); and Arthur Malet the fifth, Stonehenge (today the Readymoney Lodge). Barr’s House Barr’s House
This small group enjoyed their time in the wilderness of the mango, jambul, palm and other fine trees and also got the jungle cleared at certain places which opened out several beautiful viewpoints.
Shortly after this, Matheran had a near-miss of sorts. There were plans to use the hill station as a military sanitarium, and the Quarter Master General of the Army was ordered to conduct a survey. In 1852, a map of the hill was drawn, a road was laid out from the north to Neral (the nearest town from Matheran), and sites were marked for a church, a hospital, barracks for 200 men, a jail, and other public buildings.
But the sanitarium plan was given up in favour of Khandala, another hill station between Mumbai and Pune. The next year, in 1853, Captain Peacock carried out a survey that cleared some fresh paths and marked sites for private houses. A map of the hill was printed and the government, after reserving certain plots, authorised Malet to allot sites to the public. Matheran as we know it today began to take shape. Church ruins in Matheran Church ruins in Matheran | Udaykumar PR
A public notice was issued, inviting applications for allotments of plots, which were to be leased at the rate of Rs 5 per acre per year. Before the monsoon of 1853, about 70 sites were snapped up, and the next two years saw frenetic construction activity in Matheran. Thus, while Mahabaleshwar served as a vacation resort for East India Company officials, Matheran became a getaway for merchants and businessmen.
In the summer of 1854-1855, the hill station took a rather fashionable turn. The Governor of Bombay John Elphinstone visited Matheran with his staff. He was absolutely charmed and even built himself a bungalow there. In the next couple of years, he also got the roads widened and made provisions to store water. It is said that Lord Elphinstone was so fond of Matheran that he would frequently leave it in the morning to attend the Council session in Bombay and ‘run up again for his supper’.
Elphinstone’s fascination with Matheran upped its status and it got a church, St Paul’s Church in 1861, a European gymkhana equipped with tennis courts and racquet courts in 1862, and a racecourse in 1891. It became a playground for Bombay’s swish set and owning a house there became a status symbol. The famous one-tree hill of Matheran The famous one-tree hill of Matheran | Raja Deel Dayal, c. 1881
It became the Britishers’ space away from the tropical climate and its people. However, the very exclusivity which the English sought for themselves was neutralized by their need to provide urban comforts which involved the use of Indian labour. At least ten Indians were necessary to support each European on this hill, and most of the time, the labour was forced. Little attention was paid to their housing needs, it no doubt being assumed that they would fend for themselves, and no sanitary facilities were provided either.
The English further attracted wealthy families of Bombay, especially the Parsi community, who always emulated the British in their lifestyle. In the 1880s, even the Maharaja of Baroda came to Matheran to convalesce during a bout of ill-health.
But these affluent families also nurtured Matheran and donated generously towards its upkeep and civic buildings – Byramjee Jeejeebhoy Hospital, Bai Ratanbai Kapadia Market, Karsandas Moolji Library and so on. Interestingly, the population in Matheran was then large enough to support a local newspaper. Launched by a local citizen named Framji Mehta in 1891, it was called Matheran Jottings and it peddled gossip and wrote about the happenings in the town. And what do you know, the biweekly newspaper ran for 24 years!
Matheran Hill Railway
But if there’s one Indian to thank for really opening up Matheran it is Adamji Peerbhoy. Let’s not forget that even though Matheran was bustling, the only way to reach the hill station was still via palanquins and horses. There was now a need for a less cumbersome means of transportation. Peerbhoy, a business magnate and a philanthropist, devised a plan for a mountain rail between Neral and Matheran and the government sanctioned it in 1903.
Peerbhoy’s son, Abdul Hussein, supervised the construction of the Neral-Matheran Light Railway, financed by his father. He engaged the special services of a well-known engineer, Raisaheb Hirachand, who planned it on exactly the same lines as the Shimla-Kalka Hill Railway. The work involved cutting more than 2,000 feet of rock and precipices, and the expenses amounted to Rs 16 lakh! The 20-km railway route was thrown open to the public in 1907.
Today, the line is noted for its unbelievable curves, the first sharp one being marked by a large sign that reads, ‘Oops! What a curve: 45 feet radius!’ The track zigzags up the hill, offering superb panoramic views of Matheran hill.
The beautiful hill station has retained its charm in large part also because vehicles are banned entry. Matheran is, in fact, Asia’s only hill station that has barred motor vehicles, except for an ambulance.
Long after the British left India, Matheran continues to be a hugely popular weekend hangout, especially for people from Mumbai and Pune. But the ravages of time and neglect have taken a toll on this once pristine mountain retreat. In the early 2000s, this encouraged the Indian National Trust for Art and Cultural Heritage (INTACH) to take up the cause of conserving Matheran at the urging of the Matheran Bachao Samiti, a local non-profit. This has given this extraordinary hill station a second lease of life.
https://reflections.live/articles/25/91-kcgcvjbw-the-untold-story-of-matheran---.html The untold story of ‘Matheran’ … … ! Nikhil Padave 10 July 2020
enter image description here
Dreamy, scenic, and mesmerising are the precise words to describe the beautiful hill stations of Maharashtra. People prefer to drive to these hill stations to avoid the disturbance of cities as the way leading here is absolutely delighting and peaceful. And one of the closest hill stations from Mumbai is ‘Matheran’. Matheran literally translates to “Forest on the forehead (of the mountains)” in local Marathi language.
Source: TOI
To visit Matheran, one has to reach Neral Station near Mumbai which is the base of the hills from where transportation like private cars, taxis, bus services are available till Dasturi Naka, about nine kilometres from Matheran. Beyond this point, no vehicles are permitted, and this makes Matheran a unique place because it is Asia’s only non-motorable hill station. It has been declared as an eco-sensitive region by the Ministry of Environment, Forest and Climate Change, owing to the region’s biodiversity and natural heritage.
The place has a slight population of 4,393 of which 2,248 are males while 2,145 are females as per report released by Census India 2011. This bio-diversified place has laterite soil (the red soil) predominates in the hills and almost cover the hilltops, therefore, in the hill region, the hard-exposed surfaces of the laterite show red rough turf. The soil has a vermicular or pisolitic structure and contains much water.
Another unique and most inviting fact about Matheran is its ‘Toy Train’. It was built in 1907 AD by Sir Adamjee Peerbhoy, at a cost of Rupees 16,00,000. Adamjee Peerbhoy visited Matheran often and wanted to build a railway to make it easier to get there. Hussain's plans for the Matheran Hill Railway were formulated in 1900, and construction began in 1904. The line was open to traffic by 1907. It covers a distance of 20 km over large highlands of forest territory from Neral to Matheran. It is also known as Matheran Light Railway, this is the only toy train in Maharashtra and among the five historic mountain railways currently operating in India.
enter image description here
It sneaks across the lush green hills, this narrow toy train has been proposed as a UNESCO World Heritage Site but is yet to be listed. It was temporarily suspended in May 2016 due to technical problems in flood damage but started running again on a limited basis from January 2018. Travelling on this toy train can be the most memorable experience in Matheran. Matheran and the journey from toy train get incredibly beautiful in monsoon when the waterfalls nearby are at their screeching best and the deep forests are green and dense.
With so much to offer, there are many other fun and exciting things to do in Matheran, especially if you are a nature and adventure lover. This tiny hill station has 38 viewpoints, Be it the Western Ghats, Charlotte Lake, Panorama Point or the Panthers’ Caves. If you are an explorer then the beautiful Chanderi Caves, Kalavantin Pinnacle, Irshalgad Fort are made for you. And you can also visit Porcupine point, Louisa and Rambagh point to take some glimpse of beautiful sunset sites. Not only this but the forest of Matheran can give you a thrilling experience of life because the biodiversity in the hills is incredibly rich. Inside the forests, animals like the leopard, panther, fox, wild boar, mongoose, barking deer, Malabar giant squirrel, and porcupine are commonly found.
At the hill-top, monkeys are a common sight as Matheran has a significant population of Hanuman langurs and bonnet macaques. Birds are similarly found including the blue breasted barbet, crested lark, Indian small skylark, common green pigeon and many more. This territory is well diversified, as the rainfall makes this place captivating for nature. During monsoon, this smallest hill station also presents panoramic sceneries and exceptional photography options. Besides this, Matheran has a tropical climate. Most months of the year are marked by significant rainfall. The average annual temperature in Matheran is 23.2 °C. The annual rainfall at this place is 4073 mm. average in May, at around 26.8 °C | 80.2 °F. The lowest average temperatures in the year occur in January when it is around 20.0 °C and this makes the winters of Matheran more graceful, which automatically entertains more tourists during the seasons.
enter image description here
There are also some market areas (bazaar) in this place to sell a large collection of quality goods at reasonable rates which include Chikkis, Leather products, Dried Wildflowers, Cane Items, Kolhapuri Chappals, Local Honey and many more but Matheran as a region holds much more potential than this. As it has Tourism Potentials like Adventure, Sports, Jungle Safari, Bio-diversity & Wellness tourism but all of them are not developed to its best. Though the numbers of tourists are increasing day by day, some of them are not satisfied with many things. They prefer to stay only for a night and two days due to lack of tourism development. The flow of tourists is only for five to six months in a year. This flow may get reduced after a certain period of time.
There is a need to have a proper strategy for the survival of tourism activities in Matheran. The government should insist on strict control on deforestation because If the forest is protected then automatically habitats of the wildlife, birds will also be protected, Construction of Substitute Roads and many more developments are needed in this region. The initiative must be taken by any well-known Institution to establish Hoteliers or local businesses and Officials of the province should help the locals to grow and develop their business for a better status of life. These initiatives can save one of the unique hill stations which the tiniest and prettiest on this land.
Time
Early Beginnings:
Matheran, meaning “forest on the forehead” in Marathi, has a rich history that dates back to prehistoric times. The region was originally inhabited by the indigenous tribes who lived in harmony with nature, utilizing the resources of the dense forests and fertile land.
Discovery and Development by the British
Matheran’s transformation from a secluded forest to a popular hill station began in the mid-19th century during the British colonial era. It was discovered in 1850 by Hugh Poyntz Malet, the then Collector of Thane district. Malet was captivated by the cool climate and the stunning views that Matheran offered, which starkly contrasted with the hot and humid conditions of the nearby plains.
Recognizing its potential as a health resort, the British soon began to develop Matheran as a retreat for their officers and families. The construction of bungalows, roads, and other infrastructure commenced, giving the hill station a distinct colonial charm that it retains to this day.
Establishment as a Hill Station
Lord Elphinstone, the Governor of Bombay (now Mumbai) from 1853 to 1860, played a significant role in promoting Matheran. Under his administration, the hill station saw significant development. The British introduced several amenities, including schools, churches, and clubs, to cater to the needs of their community. The famous Matheran Light Railway, a narrow-gauge railway line from Neral to Matheran, was constructed in 1907. This railway line remains operational and is one of the key attractions of the hill station, offering scenic views and a nostalgic journey.
Matheran’s Unique Car-Free Policy
One of the most unique aspects of Matheran is its vehicle-free policy. This regulation was introduced to preserve the ecological balance and natural beauty of the region. The absence of vehicles not only helps in maintaining the air quality but also ensures a peaceful environment, free from the noise and pollution typical of urban areas. This policy has helped Matheran retain its old-world charm and pristine beauty, making it a popular destination for those seeking tranquility.
Matheran During the Independence Movement
During India’s struggle for independence, Matheran served as a meeting place for several freedom fighters and political leaders. Its relative seclusion provided a safe haven for discussions and planning. Many prominent leaders, including Mahatma Gandhi, visited Matheran and stayed in some of its bungalows, which have now become historical landmarks.
Post-Independence Era
After India gained independence in 1947, Matheran continued to be a favored destination for tourists seeking respite from the sweltering heat of the plains. The hill station witnessed gradual modernization, with improved connectivity and better facilities for visitors. However, the authorities have been cautious to balance development with conservation, ensuring that Matheran’s natural beauty and ecological significance are not compromised.
Preservation and Conservation Efforts
In recent decades, significant efforts have been made to preserve Matheran’s unique environment. The local government, along with various non-governmental organizations, has undertaken several initiatives to protect the region’s biodiversity. These efforts include strict regulations on construction, waste management programs, and campaigns to promote eco-friendly tourism practices.
Cultural Significance
Matheran is not just a natural paradise but also a cultural hub. The local population, comprising mainly the Adivasi (tribal) communities, has a rich cultural heritage that adds to the hill station’s charm. Traditional festivals, dances, and customs are an integral part of Matheran’s cultural landscape, offering visitors a glimpse into the local way of life.
Conclusion
Matheran’s history is a tapestry woven with threads of indigenous culture, colonial heritage, and natural splendor. From its early days as a tribal land to its development as a British hill station and its current status as a popular eco-friendly destination, Matheran has been a fascinating journey. Its commitment to preserving its natural and cultural heritage makes it a unique and timeless retreat for travelers. As you explore Matheran, you not only witness its scenic beauty but also become part of its rich historical narrative.
Matheran is a magnificent hill station close to Mumbai. The Railway track (narrow gauge) was laid and owned by Adamjee Peerbhoy. The Railway station has this stone and portrait of his. From Neral to Matheran it is 21 KM and has stations like Jumapatti, Water Pipe and Aman Lodge. It is still pristine in the sense that motor vehicles are strictly not allowed.
MUMBAI: At the turn of the 20th century, when India was still bereft of electricity and aircraft, a young man of means was privileged to visit the uninhabited hill station of Matheran on horseback in the company of the brown sahibs. He was so enamoured by the beautiful locale that he single-handedly commissioned a railway line to enable the average Indian to travel there.December 18 marks the death centenary of philanthropist Abdul Husein Adamjee Peerbhoy who constructed the Matheran Light Railway (MLR) in 1907. He passed away at Jaiphal Terrace in Forjett Street at the age of 47 in 1918. Peerbhoy His grandson Hussain said, “In a time when gold cost Rs 18 per tola, my grandfather spent Rs 16 lakh to build the MLR." Peerbhoy purchased 280 acres of land after which construction started in 1904. There were no aircraft, so no aerial survey could be conducted. There were no JCBs and only rustic means of communication. Workers broke the hill by hand to carve the gradient. Yet, the rail line was completed in three years. He travelled to Germany to import four engines. These were numbers 738, 739, 740 and 741, of which 738 was the one that pulled the first train to the hill station.
by Taboola Sponsored Links You May Like Help her! Spinal injuries stole her future.Give Hope India During the toy train’s construction, Abdul Husein moved to the remote location which had no facilities, even for his children’s education. Years later, his father Sir Adamjee lived in a chalet there, and each time the train passed by, the driver would blow three whistles in salutation.Once the rail line started, the British government found that footfalls were sparse since there were no facilities for tourists to stay overnight. Peerbhoy then went on to build 105 inns and hotels in order to popularize this exclusive European retreat. In 1912, a Bohra tourist died there, so he built a community cemetery spanning 30,000 square feet. He also founded the civic council of Matheran, a matter of pride since nearby Neral remains a panchayat. Aman Lodge Station is named after his mother Aminabai.The Peerbhoys counted among the wealthiest entrepreneurs in the city who supplied gun carriages, tents and shoes to the British. They owned Asia's largest tannery in Sion as well as Saifee Mahal in Malabar Hill, which is now the official residence of the Syedna.On December 18, the Peerbhoys have invited local schoolchildren for Abdul Husein’s centenary. “We will each light a diya and place one flower. We requested the railways to let us charter a toy train to travel there. Of course, we will pay the fare. But they are still undecided,” said Hussain.The state government is also undecided about naming Matheran railway station after Abdul Husein, despite 20 years of appeal by the family. “Not a tree or a bench is named after him in the town that he built,” his grandson said. Check Rajasthan Board 12th Science Result 2026 Her
indianetzone.com History of Matheran IndiaNetzone 3–4 minutes
History of Matheran reveals the rule of colonial empire in West India and the downfall of Maratha Empire.
History of MatheranHistory of Matheran portrays the discovery of this place during the British regime in India. This place of hilly scenic beauty reveals the discovery of this place as resting area of British people and an esplanade for the elites.
Matheran was discovered by Hugh Poyntz Malet, the then district collector of Thane district in the month of May, in the year 1850.
Lord Elphinstone, the Governor of Bombay Presidency at that time, laid the foundations of the development as a future hill station of West India after Mahabaleshwar.
The British East India Company in West India developed Matheran as a popular resort to beat the summer heat in the region. Matheran is located in an elevated region of Maharashtra. It enjoys a cooler and less humid climate which makes it popular during the summer months. The temperatures range from 32 degree Celsius to 16 degree celsius. Matheran has a huge number of medicinal plants and herbs. The town also has a large monkey population, including Bonnet Macaques and Hanuman Langurs. The nearby Lake Charlotte is the main source of drinking water for the people of Matheran.
The Matheran Hill Railway was built in the year 1907 by Sir Adamjee Peerbhoy and covers a distance of 20 km, over large swathes of forest territory. The Matheran hill railway, also known as Matheran Light Railway (MLR), was inspected by UNESCO world heritage site officials to enlist as a World Heritage Site. India`s other Hill Railways like the Darjeeling Railway, the Kangra Valley Railway, Nilgiri Mountain Railway are already on the list.
Matheran has been declared an eco-sensitive region by the Union Environment Ministry and can be called a Health Sanatorium in itself. The only form of automobile allowed in Matheran is an ambulance operated by the Municipality. No private automobiles are allowed in this place for the case of noise and air pollution. Within Matheran transport facilities available are horses and hand-pulled rickshaws.
The languages spoken in Matheran from the time of Marathas and the British rule include Marathi, Hindi, and English. There are a lot of Parsi bungalows, who bought during the colonial rule of India. The beautiful old British-style architecture is preserved in Matheran. The roads are not metalled and are made of red laterite earth. There are many hilly viewpoints in Matheran discovered by the many British high ranked officials which give a panoramic view of the plains of Matheran below.
MUMBAI: At the turn of the 20th century, when India was still bereft of
electricity and aircraft, a young man of means was privileged to visit
the uninhabited hill station of Matheran on horseback in the company of
the brown sahibs. He was so enamoured by the beautiful locale that he single-handedly commissioned a railway line to enable the average Indian to travel there.December
18 marks the death centenary of philanthropist Abdul Husein Adamjee
Peerbhoy who constructed the Matheran Light Railway (MLR) in 1907. He
passed away at Jaiphal Terrace in Forjett Street at the age of 47 in
1918.
His
grandson Hussain said, “In a time when gold cost Rs 18 per tola, my
grandfather spent Rs 16 lakh to build the MLR." Peerbhoy purchased 280
acres of land after which construction started in 1904. There were no aircraft, so no aerial survey could be conducted. There were no JCBs and only rustic means of communication. Workers
broke the hill by hand to carve the gradient. Yet, the rail line was
completed in three years. He travelled to Germany to import four
engines. These were numbers 738, 739, 740 and 741, of which 738 was the
one that pulled the first train to the hill station.
During
the toy train’s construction, Abdul Husein moved to the remote location
which had no facilities, even for his children’s education. Years
later, his father Sir Adamjee lived in a chalet there, and each time the
train passed by, the driver would blow three whistles in salutation.Once
the rail line started, the British government found that footfalls were
sparse since there were no facilities for tourists to stay overnight.
Peerbhoy then went on to build 105 inns and hotels in order to
popularize this exclusive European retreat. In
1912, a Bohra tourist died there, so he built a community cemetery
spanning 30,000 square feet. He also founded the civic council of
Matheran, a matter of pride since nearby Neral remains a panchayat. Aman
Lodge Station is named after his mother Aminabai.The
Peerbhoys counted among the wealthiest entrepreneurs in the city who
supplied gun carriages, tents and shoes to the British. They owned
Asia's largest tannery in Sion as well as Saifee Mahal in Malabar Hill,
which is now the official residence of the Syedna.On
December 18, the Peerbhoys have invited local schoolchildren for Abdul
Husein’s centenary. “We will each light a diya and place one flower. We
requested the railways to let us charter a toy train to travel there. Of
course, we will pay the fare. But they are still undecided,” said
Hussain.The state
government is also undecided about naming Matheran railway station after
Abdul Husein, despite 20 years of appeal by the family. “Not a tree or a bench is named after him in the town that he built,” his grandson said. Check Rajasthan Board 12th Science Result 2026 Her
History of Matheran reveals the rule of colonial empire in West India and the downfall of Maratha Empire.
History of Matheran
portrays the discovery of this place during the British regime in
India. This place of hilly scenic beauty reveals the discovery of this
place as resting area of British people and an esplanade for the elites.
Matheran was discovered by Hugh Poyntz Malet, the then district
collector of Thane district in the month of May, in the year 1850.
Lord Elphinstone, the Governor of Bombay Presidency at that time, laid the foundations of the development as a future hill station of West India after Mahabaleshwar.
The British East India Company in West India developed Matheran as a
popular resort to beat the summer heat in the region. Matheran is
located in an elevated region of Maharashtra. It enjoys a cooler and
less humid climate which makes it popular during the summer months. The
temperatures range from 32 degree Celsius to 16 degree celsius. Matheran
has a huge number of medicinal plants and herbs. The town also has a
large monkey population, including Bonnet Macaques and Hanuman Langurs.
The nearby Lake Charlotte is the main source of drinking water for the
people of Matheran.
The Matheran Hill Railway was built in the year 1907 by Sir Adamjee
Peerbhoy and covers a distance of 20 km, over large swathes of forest
territory. The Matheran hill railway, also known as Matheran Light
Railway (MLR), was inspected by UNESCO world heritage site officials to
enlist as a World Heritage Site. India`s other Hill Railways like the
Darjeeling Railway, the Kangra Valley Railway, Nilgiri Mountain Railway are already on the list.
Matheran has been declared an eco-sensitive region by the Union
Environment Ministry and can be called a Health Sanatorium in itself.
The only form of automobile allowed in Matheran is an ambulance operated
by the Municipality. No private automobiles are allowed in this place
for the case of noise and air pollution. Within Matheran transport
facilities available are horses and hand-pulled rickshaws.
The languages spoken in Matheran from the time of Marathas and the
British rule include Marathi, Hindi, and English. There are a lot of
Parsi bungalows, who bought during the colonial rule of India. The
beautiful old British-style architecture is preserved in Matheran. The
roads are not metalled and are made of red laterite earth. There are
many hilly viewpoints in Matheran discovered by the many British high
ranked officials which give a panoramic view of the plains of Matheran
below.