Wednesday, January 31, 2024

खिद्रापुरचा कोपेश्वर

भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध राजसत्तांनी विविध काळामध्ये राज्य केले या काळात महाराष्ट्रात विविध कालखंडामध्ये विविध लेणी, मंदिरे उभारली गेली याच लेणी, मंदिरांनी विविध गावांचा देखील विकास केला आणि या लेणी मंदिरांच्यामुळे गावांना ऐतिहासिक, राजकीय, आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले. असेच एक सुंदर गाव म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेले खिद्रापूर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड-किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र, काही वर्षांपूर्वी केलेल्या डागडुजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. 
    आपण घर बांधायचं ठरवलं की त्याचं स्वप्न बघण्यापासून ते प्रत्यक्षात उतरेपर्यंत पूर्ण घराचा नक्षाच बदलून जातो. आपण काहीतरी मनात चित्र बनवतो. घर असं असेल तसं असेल. मग घरात इथं दरवाजा, तिथं खिडकी हवी असं एक स्वप्न प्रत्येकानं बघितलेलं असतं. पण प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यावर गोष्टी खूप बदलतात.कधी स्थापत्य शास्त्राच्या कक्षेत न बसल्याने, तर कधी प्रत्यक्षात बांधताना आलेल्या बदलांमुळे आपलं घराचं स्वप्नं प्रत्यक्षात काही वेगळ्याच पद्धतीने साकार होतं.हे झालं साधं घराच्या बाबतीत; परन्तु आपल्या संस्कृतीची एक भव्यदिव्य कलाकृती उभी करायची असेल तर किती विचार करावा लागेल?
      कलाकृती उभारताना नुसती उभी न करता पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना ती मार्गदर्शक ठरेल आणि सगळ्या आक्रमणांना मग ती नैसर्गिक असो वा कृत्रिम त्यात टिकून राहील हा सगळा विचार करावा लागतो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचं द्योतक असलेली मंदिरं उभारताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे. कोणतंही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिलं गेलं आहे. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफलं गेलं आहे. हि मंदिरं उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन मग तो तांत्रिक बाबतीत असो वा गणिती बाबतीत, वापरला गेला आहे.
   म्हणूनच आज १००० वर्षानंतर आजही ही मंदिरं अनेक आक्रमणांना पुरून उरत आहेत. असंच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे.कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे. उन्हाळ्यात देखील सुखावणारी हिरवळ. हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले खिद्रापूर गाव. खिद्रापुर हे अवघ्या ३००० वस्तीचे गाव ३०६ हेक्टर जागेवर वसलेले कर्नाटकच्या सीमेवर वसलेले एक लहान खेडेगाव आहे. खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. हे गाव मंदिरांच्या सेवकांना इनाम दिले आहे. यात वाजंत्री गुरव यांचा पण समावेश आहे.
   महाराष्ट्रातील मंदिर पाहिल्यास असे लक्षात येते की विदर्भातील चंद्रपूर जवळील मार्कंडदेव मंदिर हे त्रिजंगायुक्त असे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. ज्यावर सुमारे चारशेच्या वर शिल्पे आहेत, पण त्याचा बराचसा भाग पडलेला होता. तर अंबरनाथ येथील मंदिर तुलनेने आकाराने लहान तर आहेच शिवाय त्यावरील शिल्पांची बरीच झीज झालेली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील महासरस्वतीच्या गाभाऱ्याला चोलांच्या हल्ल्यात हानी पोहोचलेली होती आणि महालक्ष्मीच्या बाहेरच्या भिंतीवरील शिल्पे मोठ्या प्रमाणात दुरुस्त करावी लागली आहेत. औंढ्या नागनाथ येथील मंदिर भव्य आहे आणि त्याच्या बाहेरच्या भिंती द्विजंगायुक्त म्हणजे त्यावर शिल्पांच्या दोन रांगा किंवा पट्ट आहेत, जरी त्यावरील देवदेवतांची शिल्पे अभ्यासनीय आहेत पण शिल्पकलेच्या दृष्टीने ती उणी वाटतात, डावी वाटतात. त्यामुळे असे वाटते की त्यामानाने कोपेश्वर मंदिर अनेक दृष्टीने उजवे ठरावे असे आहे. असे असले तरी या मंदिराकडे अनेक शतके दुर्लक्ष झालेले होते असे दिसते. वस्तुत: कुरुंदवाड, सांगली, मिरज, कोल्हापूर या संस्थानाच्या घेऱ्यात हे मंदिर आहे. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष झालेले पाहून आपल्या समाजातील अनास्थेचा प्रत्यय येतो. हे एवढे देखणे मंदिर १९२७ पर्यंत अज्ञातच होते. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर के. एन. सिताराम यांनी त्यावर्षी लिहिलेल्या मंदिरावरील लेखामुळे यावर प्रसिद्धीचा होत पडला.
 
 
खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीराची विवीध रुपे
        कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते. अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो. म्हणूनच हजार वर्षांनंतरही मंदिरे अनेक आक्रमणांना पुरून उरलेली आपल्याला दिसतात. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील सर्व मंदिरापेक्षा सुंदर आणि त्यातल्या त्यात जास्त  सुस्थितीत असे हे मंदिर आहे. एका विस्तीर्ण परिसरात हे उभे असून याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील मोठी आहे. तसेच या सुंदर मंदिराचे स्थापत्य हे वेगळे आहे, याच्या अंगाखांद्यावरील शिल्पे बोलकी आहेत तसेच येथील देवदेवतांच्या प्रतिमा देखील लक्षवेधक आहेत. रामायण- महाभारत आणि पुराण यांतील प्रसंग भावणारे आहेत. ही सर्व शिल्पे न्याहाळताना आपण भारावून तर जातोच, पण वेगळ्या अशा विश्वात वावरतो आहोत असे आपल्याला वाटते. असे हे खिद्रापूरचे कलाविश्व नक्कीच पाहण्यासारखे आहे.
        कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
  कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.

इतिहास :-   

अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदीराचा इतिहास सर्वप्रथम जाणून घेउया.
     कल्याणी चालुक्यशैलीचा अप्रतिम नमुना कोल्हापूरच्या आग्नेयस शिरोळ तालुक्यामध्ये स्थित आहे. मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी आहे.करवीर महात्म्यांमध्ये खिद्रापूच्या कोपेश्वर या देवतेचा करवीर क्षेत्रातील अष्टमहालिंगापैकी एक असा गौरव केलेला आहे. कोपेश्वरचे खिद्रापुरात असणाऱ्या अस्तित्वा मागे सुप्रसिद्ध सतीच्या आत्मदहनाची कथा करवीरमहात्म्यात दिलेली आहे, ती अशी.
     दक्ष राजाला सोळा मुली होत्या,त्यात सर्वात लहान मुलगी म्हणजे सती.दक्ष प्रजापती हे सतीचे म्हणजेच शंकराच्या पत्नीचे वडील,शंकराचे सासरे.दक्ष राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. त्यावेळेस शंकर आणि दाक्षायणी ( सती ) ला  आमंत्रित करीत नाही.मात्र माहेरी जाण्याच्या हट्टापायी सती नंदीला घेऊन तिच्या वडिलांकडे यज्ञासाठी जाते.शंकर मानी असल्याने आमंत्रणा शिवाय तिथे जात नाही.सती तिथे गेल्यावर दक्ष राजा सर्वांसमोर तिचा अपमान करतो आणि तिला हाकलून लावतो.मात्र हा अपमान सहन न झाल्यामुळे ती तिथल्याच अग्निकुंडात उडी घेते.हि माहिती समजल्यावर शंकराचा राग (कोप) अनावर होतो.त्यानंतर शंकर वीरभद्राला पुत्रकामेष्टी यज्ञाचा विध्वंस करण्याचे आवाहन करतो.हा राग शांत करण्यासाठी साक्षात विष्णू शिवाला घेऊन खिद्रापूरला येतात.शंकरानी क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला आणि म्हणूनच या मंदिराचे नाव कोपेश्वर (चिडलेला देव) असे आहे.तसेच येथे विष्णूची पिंड देखील आहे.म्हणूनच कोपेश्वर आणि धोपेश्वर ( विष्णू ) आणि सती वडिलांकडे जाताना सोबत नंदीला घेऊन जाते त्यामुळे कोपेश्वर मंदिरात नंदी देखील नाहीये.
कोपीत शिवाच्या स्मरणार्थ कोपेश्वर स्थापन करण्यात आला असे मानले जात असले तरी या देवतेचे मूळ नाव पाहता हे कोपेश्वर नसून कोप्पेश्वर आहे. यावरुन त्याची उत्पत्ती कोप्पन्ना, कोपनाथ अशा व्यक्तींनामापासून झाली असावी असे सुचित करते. तसेच आगमिक शैवांच्या मध्ये,' जो आपल्या नावे शिवलिंग स्थापित करतो तो शाश्वत सुख ( शिवलोक ) प्राप्त करतो' असे प्रमाण वाक्य असल्याने कोण्या कोप्पनाथ वा तत्सम नामधारी व्यक्तीने हे कोपेश्वरचे लिंग स्थापन केले असावे. शिवाय मंदिर प्राकारात अश्या काही सुचक गोष्टी निदर्शनात येतात. त्यातून हे मंदिर व त्या अनुषंगाने यातील देवता आगमिक शैवांच्या कापालिक अथवा काळामुख पण बहुतेक करून काळामुख ताब्यात होती असे स्पष्ट जाणवते. परंतु काही अभिलेखित पुरावानुसार असे समजते की खिद्रापूरचे मूळ नाव कोप्पम होते आणि त्यामुळे वरील तर्कविलासापेक्षा कोप्पम गावचा तो कोप्पेश्वर अशी नाम उत्पत्ती झाला असावी हा तर्क अधिक संयुक्तिक आहे.
 खिद्रापूर या गावाचे प्राचीन काळातील नाव कोप्पम असे होते.यास पुरावा म्हणून सुप्रसिद्ध अश्या कोपेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला लागूनच असलेल्या भिंतीवरील शिलालेखात हे नाव आढळते. हा शिलालेख इ.स १२१३ मधील असून यादव राजा सिंघणदेव द्वितीय याचा आहे.तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हा मध्ये येऊर येथील एका शिलालेखात सुद्धा कोप्पम हे नाव येते. हा शिलालेख इ.स १०७७ चा असल्याने खिद्रापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी ११ व्या शतकापर्यंत मागे जाते.इ.स. १०७७ मध्ये कोपेश्वर मंदिर छोटेखानी का होईना अस्तित्वात असावे याचे कारण येऊरच्या शिलालेखात शंकर आर्य नावाच्या व्यक्तीने पुत्रप्राप्ती साठी कोप्पम मधील कोप्प देवाची ( कोपेश्वर) ची अनेक व्रत करून पूजा केली. 

 कोपेश्वर मंदिराचा जुना फोटो
 
         कृष्णा आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेले कोप्पम हे गाव प्राचीन काळात अत्यंत महत्वाचे असावे असे दिसते. आज जरी हे गाव लहान दिसत असले तरी या  गावाने काही महत्वाचे ऐतिहासिक क्षण देखील पाहिले आहेत. नद्यांच्या संगमामुळे या गावाला अत्यंत  पावित्र्य लाभले असून आणि त्याला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देखील मिळाली.
    साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. हे मंदिर उभारण्याचे काम सुरु असताना विविध देशातील राजांनी बलाढ्य पुलकेशी राजाला नजराणा पाठवून मैत्रीचे नाते घट्ट केले होते. पुलकेशी राजाबद्दल सामर्थ्य आणि सद्गुणाचे गौरवोद्गार त्याकाळी आलेला चिनी प्रवासी युवन श्वांगने काढले, जे त्यावेळी लिहून ठेवले आहेत. इराणचा राजा खुश्रो दुसरा याने सुद्धा पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. नेमके त्याचवेळी कोपेश्वर मंदिर बांधणारा स्थापत्य विशारद तेव्हा दरबारात हजर होता आणि म्हणूनच या प्रसंगाची आठवण म्हणून इराण आणि आखातातील व्यक्तीशिल्प तिथे कोरलेली आढळतात.
कृष्णा आणि कुवेणी यांच्या संगमाच्या काठावरच्या भागाने विविध राजसत्ता अनुभवल्या आहेत तसेच येथे झालेल्या तुंबळ लढाया यामुळे याला रणक्षेत्राचे रूपही देखील आलेले आपल्याला दिसते. इतिहासातील काही पुराव्यांच्या साक्षीने येथे एक महत्वाची लढाई झाली ती इ.स. १०५८ मध्ये. ही लढाई अहवमल्ल चालुक्य आणि राजेंद्र चोल यांच्यातली ही महत्वाची लढाई अत्यंत महत्वाचा दुवा आहे असे म्हणावी लागेलं याचे मुख्य कारण म्हणजे या लढाईमध्ये पराक्रमी चोलांचा राजा येथे धारातीर्थी पडल्यावर तेथेच दुसऱ्या राजाचा रणांगणावरच राज्याभिषेक झाल्याचे येथील शिलालेखात नमूद केलेले आहे.
 इ.स ११ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेतून उत्तरेकडे आक्रमणे वाढली होती. परमप्रतापी चोल राजवंश त्यांच्या राज्याच्या सीमा रुंदावत महाराष्ट्रापर्यंत आला होता.त्यावेळी आपला महाराष्ट्र उत्तरं कालीन चालुक्य राजवंशाच्या हाताखाली होता. चौल सम्राट राजाधिराज १ ला याने महाराष्ट्र राज्यावर आक्रमण केले होते. त्याची अजस्त्र सेना अवाढव्य हत्तिदळ, अश्वदळ सह कृष्णा नदीच्या तीरावर येऊन स्थिरावले होते. मंदाध हत्ती व तेवढेच तगडे सैन्य असल्याने खिद्रापूर ला रणभूमीचे स्वरूप आले होते.त्यांना प्रतिकार कार्यासाठी सज्ज होता चालुक्य राजा पहिला सोमेश्वर अर्थात अहमल्लदेव.
ही घटना आहे सन १०५८ ची जेव्हा चालुक्यांनी पराक्रमाची नुसती शर्थच केली नाही तर राजाधिराज चोल चा पराभव करीत त्याच्या सैन्याचा धुव्वा उडविला या लढाईत राजाधिराज चोल मारण पावला. महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा हा पराक्रमाचा वारसा आहे.जो आज ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही . प्राचीन चोळ साम्राज्य आणि महाराष्ट्राचा संबंध आहे खिद्रापूर मुळे. खिद्रापूर कोपेश्वर मंदिर तर सातव्या शतyकापासून बांधले जात होते पण पूर्ण झाले ११ व्यां शतकात. सातव्या शतकापासून याचे कळस निर्मिती ३०० वर्ष थांबलेली पूर्ण केली यादव साम्राज्यात.
इ.स. ११ वे शतक. महाराष्ट्रावर बहुतांशी चालुक्य व शिलाहारांचे राज्य होते.राज्यविस्तारासाठीच्या संघर्षात चोळ आणि चालुक्यांमध्येअनेक लढाया झाल्या. या अनेक दशके चाललेल्या संघर्षात कैक लढाया या आजच्या सांगली बेळगाव कोल्हापूर जिल्ह्यात झाल्या. "कोप्पतीर्थम" ( खिद्रापूर) येथील युद्धात चोळ साम्राज्याचा शक्तिशाली राजा "राजराजा चोळ" याचा नातू राजाधिराज चोळ याने कोल्हापूरवर आक्रमण करताना तेथील श्रीमहालक्ष्मी मंदिरही जाळण्याचा प्रयत्न केला होता. याच विरोध करताना तेथील मुथ्थय्या नामक फूलविक्रेत्याने आपले प्राण गमावले, असे सांगणारा वीरगळ न्यू पॅलेसमध्ये आहे.सदर वीरगळाची भाषा व लिपी कन्नड आहे.

खिद्रापूर त्याकाळात कोप्पाल म्हणून प्रसिद्ध होते.या लढाईचा खूप इतिहास चेन्नईच्या एका उपनगरानजीक मणिमंगलम या गावात राजगोपाल-पेरुमाळ या नावाचे एक मंदिर मधील शिलालेखांत आहे.त्यानुसार, कोल्हापूरचा उल्लेख "कोल्लिपक्कै" असा येतो आणि तेथील लढाईत चोळांच्या हाती बरेच सोने, हत्ती, घोडे लागले.ह्या लढाईत चोल जिंकले तरी त्यांचा राजा राजाधिराज चोल लढाईत मरण पावला. पुढें १०० वर्षांनी इथेच आणि एक मोठे युद्ध झाले ते म्हणजे यादव साम्राज्याचा सिंघम आणि शिलाहार राजा भोज द्वितीय. खिद्रापूरचे मंदिर सातव्या शतकापासून बांधत असले तरी ते कैक शतके अपूर्णच होतें. शिखर शिवाय आणि वरील नृत्यमंडपाच्या वरील छत कोसळले आहे, त्यामुळं आकाश दिसते, पौर्णिमेला वगैरे चंद्र पाहणे वगैरे.
       खिद्रापूर भागात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, चोल, यादव, बहामनी, मराठे आणि शेवटी इंग्रज अशी सत्तांतरे होत राहिली. चालुक्य राजांच्या काळात दुसऱ्या पुलकेशीच्या कालखंडात राज्य वैभवाच्या शिखरावर होते. या काळातच येथील मंदिराची मुहूर्तमेढ झाली; पण पुलकेशीच्या मृत्यूनंतर हे काम बंद पडले. हे मंदिर चालुक्यांनी बांधले की शिलाहारांनी बांधले, यावर तज्ज्ञांमध्ये व इतिहासकारांमध्ये नेहमीप्रमाणे एकमत नाही; पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की बदामी, वेरूळ, भुलेश्वर, हळेबिडू, बेलूर येथील शिल्पे वेगळी आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे; पण खिद्रापूरच्या शिल्पात जो नाजूकपणा आहे, तो दुसरीकडे कोठेही नाही. बेलूर, हळेबिडू येथील मंदिरे मृदू खडकातील आहेत, तर येथील मंदिरे सह्याद्रीच्या कातळातील आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील स्तंभ व खिद्रापूरमधील स्तंभ थोडे सारखे वाटले, तरी शिल्पे मात्र खूप वेगळी आहेत. एक इंच उंचीपासून आठ फूट उंचीपर्यंतची शिल्पे येथे आहेत. 
शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात बरेच किल्ले बांधले. त्यातील काही समुद्री किल्लेही होते म्हणजेच समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. का महत्वाचे होते याचे कारण समजण्यासारखे आहे. त्यांचा व्यापार त्या मार्गाने चालत असणार व त्याबाजुनेही त्याआधी जमिनीवर आक्रमण झाले असणार. माझे हे मत अर्थातच तपासून बघावे लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बांधलेली देवळे. या राजांचा ओढा जैन धर्माकडे होता पण त्यांनी हिंदूधर्माची कास सोडली नव्हती. त्यांनी अनेक जैन देवळे बांधली त्याचप्रमाणे शंकराच्या देवळांचीही काळजी अत्यंत उत्तम प्रकारे वाहिली. महाराष्ट्रात त्या काळात जैन धर्म व हिंदू धर्म हे एकाच घरातील दोन भावंडे म्हणून नांदावीत तशी नांदत होते
    हे देऊळ शिलाहार राजांनी बांधले याचा भक्कम पुरावा असल्यामुळे त्यात संशय घेण्यास काही जागा उरत नाही. यांना काही ठिकाणी सिलार, शियलार व सेळार या नावानेही ओळखले जाते. (मराठी शेलार हे आडनाव व यांचा काय संबंध आहे हे एकदा अभ्यासले पाहिजे) या घराण्याच्या तीन शाखा होत्या व यांचा मूळपुरुष होता जीमूतवाहन. या घराण्याची वंशावळ एका ताम्रपटावर सापडली त्यात एका शूर योद्ध्याने परशूरामाच्या बाणांपासून पश्चिम समुद्राचे रक्षण केले तो शिलाहारांचा मूळपुरुष असा स्पष्ट उल्लेख सापडतो. महाराष्ट्रात शिलाहारांची राज्ये ठाणे, कुलाबा येथे एक शाखा, गोवा, रत्नागिरी इ. येथे दुसरी शाखा व तिसरी सांगली कोल्हापूर, सातारा, बेळगाव...इ. येथे राज्य करत होती. शिलाहारांची मुख्य राजधानी होती मराठवाड्यातील तगर (तेर) येथे. हे सर्व राजे मुख्यत: कन्नड भाषिक होते असे मानले जाते आणि ते बरोबरही असावे कारण त्यांचे बरेच शिलालेख या भाषेत आहेत व त्यांनी बांधलेल्या देवळांची छाप हंपीवरही आहे.
     कोल्हापूरच्या शिलाहार राजांचा मूळपुरुष पहिला जतिग हा गोमंथ किल्ल्याचा किल्लेदार ग्ंगनृपती पेर्मानडी याचा मामा होता. हा किल्ला शिमोगा जिल्ह्यात आहे यावरुन असे म्हणता येईल की हे राजे काही काळ कर्नाटकातही राज्य करत होते. शिलाहारांनी दक्षिण महाराष्ट्रावर जवळ जवळ २०० वर्षे राज्य केले. जतिग, नायिवर्मा व चंद्र हे पहिले तीन राजे शूर होते परंतू बहुदा राष्ट्रकुटांचे मांडलिक असावेत. यानंतरच्या मारसिंह राजाचा १०५८ साली मिरज येथे दिलेला एक ताम्रपट सापडतो. हे अर्थातच दानपत्र आहे. याची राजधानी किल्ले पन्हाळा येथे होती. मारसिंहानंतर आला गुवल व त्यानंतर आला बल्लाळ. बल्लाळनंतर आलेल्या राजामधे आपल्याला जास्त रस आहे कारण हा बऱ्यापैकी सार्वभौम होता व त्याचे नाव होते गंडरादित्य. या राजाचे १११० पासून ११३५ पर्यंत खोदलेले अनेक शिलालेख सापडले आहेत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गंडरादित्य राजाचा ताम्रपटावरील शिक्का.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची पायाभरणी यानेच केली. एका शिलालेखात त्याने स्वत:चा उल्लेख मिरिज देश, सात खोल्ल ( कदाचित घरातील ‘खोली’ हा शब्द यातूनच निर्माण झाला असावा) व कोंकण देशाचे आधिपती आहोत असे जाहीर केले आहे. त्याच्या राणीचे नाव होते कर्णावती. या राजाराणीचा ओढा जैन धर्माकडे होता परंतु तो महालक्ष्मीला शिलाहारांची कुलदेवता मानत असे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
शिलाहारांची कुलदेवता:महालक्ष्मी

गंडरादितत्याचा मुलगा विजयादित्य हा ११४० साली गादीवर आला व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा भोज हा गादीवर आला. हा इतिहासात बराच प्रसिद्ध झाला व तो सार्वभौम राजा होता हे त्याच्या काही शिलालेखातून समजते. १२१२ मधे यादवांनी शिलाहारांवर स्वारी करुन शिलाहार भोजाचा पराभव केला व त्याला त्याच्या राजधानीतच म्हणजे पन्हाळ्यावर कैदेत टाकले. या राजाच्या मृत्युनंतर शिलाहार घराण्याचे राज्य खालसा झाले असे म्हणायला हरकत नाही. यादवांनी मात्र ज्या मंदीरांची बांधकामं शिलाहारांनी चालू केली होती ती बंद पडू न देता त्यांची चांगली व्यवस्था लावून दिली.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
राजा भोज दुसरा याची राजधानी पन्हाळा:

  गंडरादितत्याने अनेक शिवमंदिरे बांधली व जैन मंदिरेही बांधली. त्याने मिरजच्या आसपास एक तलावही बांधला व त्याला गंडसमुद्र असे नाव दिले होते. शिलाहारांच्या लेखात शिव, ब्रह्मा, महालक्ष्मी, जोगेश्वरी, भगवती अशा अनेक देवदेवतांचा उल्लेख होतो. ब्रह्माचे एक देऊळ कोल्हापूरात आहे तर दुसरे गोव्यात करमळी येथे आहे. शिलाहारांनी आदित्याची मंदिरेही बांधली. त्याने बांधलेली काही जैन देवळे म्हणजे आजुरिका यथे बांधलेले जिनालय त्रिभुवनतिलक, कोल्हापूरातील रुपनारायण व खिद्रापूरातही एक मंदीर आजही दिसते. नांदगिरी किल्ल्यावरही एक जैन स्थान आहे तेही याच काळातील असावे.
  खिद्रापूरचे मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून तर प्रसिद्ध आहेच परंतु येथे मोठ्या आणि महत्वाच्या लढाया देखील झालेल्या दिसतात त्यापैकी  पहिली लढाई पाहिली आता दुसरी लढाई कोणामध्ये झाली हे देखील जाणून घेऊ.
         खिद्रापूर येथे दुसरी लढाई मोठी झाली ती म्हणजे शिलाहारांचा राजा द्वितीय भोज आणि देवगिरीच्या यादवांचा राजा सिंघण यांच्या बलाढ्य सैन्यात. या तुंबळ लढाईत शिलाहारांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो. खिद्रापूरचंग कोप्पेश्वर मंदिरातील एका लेखानुसार 'बन्नेस' हा या लढाईमध्ये मारला गेला. हा बहुतेक शिलाहारांचा सेनापती असावा असे वाटते. तसेच शिलाहार राजा भोज हा यादवांच्या सैन्याच्या तावडीत सापडला. या भोज राजाला राजकैदी म्हणून पन्हाळगडावर बंदोबस्तात ठेवले गेले होते. ही सर्व घटना कोप्पेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळील सिंघणाच्या इ.स. १२१३ च्या शिलालेखात नमूद केलेली असून या घटनेनंतर शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा अस्त झाला असे आपल्याला दिसते. 
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
 खिद्रापूर गुगलवर
 
     खिद्रापूर हे गाव कृष्णेच्या किनारी वसलेले आहे. हे ठिकाण त्याकाळी अत्यंत निसर्गरम्य असणार.या ठिकाणी कृष्णानदी आपली वाहण्याची दिशा बदलते. पूर्वेकडे वाहणारी कृष्णा येथे पश्चिम दिशेला वाहू लागते.कृष्णेच्या काठावरील हा भाग गाळाने भरलेला आहे. आपण शाळेत भूगोलात शिकल्याप्रमाणे येथे मैदानी प्रदेशात नदी नागमोडी वळणे घेते, त्याचे येथे प्रत्यंतर येते. नरसोबाच्या वाडीवरून दक्षिणेकडे अलसा गावापासून पुन्हा पूर्वेकडे, देवळाला वळसा घालून पुन्हा पश्चिमेकडे असा तिचा प्रवास चालू असतो. येथे तिन्ही बाजूंना कृष्णा नदी आहे. पावसाळ्यात सैनिक टाकळीच्या अलीकडे एक ओता (प्रवाह) आहे. नदीला पूर आल्यावर त्यातून आलसा गावापासून कृष्णेच्या दक्षिणेला रामतीर्थापर्यंत पाणी वाहू लागते. त्यामुळे पावसाळ्यात खिद्रापूर एक बेट असल्यासारखे होते; मात्र आता त्यावर पूल झाला आहे. या ओतामुळे खिद्रापूरच्या भागाचे पुरापासून संरक्षण झाले आहे. अन्यथा नदी अशा ठिकाणी आपला प्रवाह बदलत असते.

लॉकिंग सिस्टीम

आता एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे, हे मंदिर बांधले कसे? येथे मंदिरात वापरलेला दगड आसपासचा नाही. तो खिद्रापूरच्या पश्चिमेला कोल्हापूरच्याही पुढे असलेल्या सह्याद्री पर्वतातून तराफ्यांच्या साह्याने पंचगंगेतून येथे आणला गेला. नदीवरून हत्तींच्या साहाय्याने तो ओढत आणला गेला. त्यावर वेगवेगळ्या आकाराच्या शिळा घडवून ‘लॉकिंग सिस्टीम’मध्ये (खालच्या शिळेमध्ये वरच्या बाजूला खोबणी करून त्यामध्ये वरील शिळेच्या खालच्या बाजूला खालच्या खोबणीत बसेल अशी जीभ कोरून अडकवायचे, अशा प्रकारचे हे बांधकाम असते). जमिनीत सुरुवातीला मोठा खड्डा करून त्यात ‘डबर सोलिंग’ करून वर मंदिर उभारले गेले. 
 गंडरादित्याने चालू केलेले हे मंदीर उभारणीचे काम त्याच्या काळात पूर्ण होणे शक्यच नव्हते. ते पूर्ण झाले त्याचा नातू दुसरा भोज याच्या काळात. अर्थात हे मंदीर त्याला फारसे लाभलेले दिसत नाही. सिंघण यादवाने त्याला कैदेत टाकले तरीही त्याने सुरु केलेल्या सर्व बांधकामांची चांगली व्यवस्था लावून दिली हे आपण बघितलेच आहे. त्या काळात हे राजे एकाच धर्माचे असल्यामुळे ते एकमेकांची राज्ये जिंकत, शत्रूची संपत्ती बळकावत पण परमेश्वराच्या निवासस्थानास ते बोट लावत नसत. बहुतेक वेळा एखादे राज्य जिंकल्यावर त्या राज्यातील देवळांना या नवीन राजांकडून चांगल्या देणग्याही मिळत. या प्रकाराने ही देवळे चांगली श्रीमंत असत व स्वत:चा कारभार हाकण्यास समर्थ असत. आजही या कोपेश्वर देवस्थानाची २००/३०० एकर जमीन आहे असे म्हणतात. अर्थात हे सगळे बदलले मुसलमानांची आक्रमणे झाल्यावर. या देवळाचीही मुसलमानांनी अशीच वाट लावली. आता जी काही कल्पना करायची ती त्या भग्न अवशेषांवरुनच.
असे म्हणतात कि, औरंगजेबाच्या कन्येने कोप्पेश्वराचे मंदिर पाहिले आणि ती येथील शिल्पांच्या प्रेमात पडली. ती येथेच राहिली. अनेक प्रकारे तिच्या मिनतवाऱ्या करण्यात आल्या, पण ती खिद्रापूर सोडेना. अखेर, या मंदिराला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचणार नाही, असे औरंगजेबाने वचन दिल्यावर ती माघारी परतली. या मंदिराच्या रक्षणासाठी खैदरखान याची नेमणूक करण्यात आली. खैदरखानलाही हे मंदिर, हा परिसर खूप आवडला. त्याने आपल्या नावावरून कोप्पमचे खिद्रापूर केले. खैदरखानने या मंदिराच्या बाह्यभागावरच्या शिल्पांची नासधूस केली. त्याचे वंशज आजही येथे आहेत. अनेक कहाण्या या मंदिराच्या प्राकारात विखरून पडल्या आहेत ध्वस्त शिल्पासारख्याच. या मंदिराच्या उभारणीनंतर एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे.
    असे हे महत्वाचे खिद्रापूरचे मंदिर किती महत्वाचे क्षेत्र त्याकाळात असावे असे यावरून लक्षात येते. तसेच हा परिसर देखील तत्कालीन राजसत्तांच्या दृष्टीने महत्वाचा भूभाग होता हे समजण्यास आपल्याला मदत होते.

 
 _MG_5147

_MG_5149

कोपेश्वर मंदिर का प्रवेश द्वार

कोपेश्वर महादेव मंदिर का प्रवेश द्वार


 
  Nagarkhana, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
  बस स्थानकावर उतरल्यावर पूर्वेस भव्य कृष्णेचे पात्र आणि पश्चिमेस एक अद्वितीय मंदिर दिसल्यावर नजरेचं पारणं फिटतं. मंदिराचं आवार सुरू झाल्यावर एक फलक आहे. त्यात आपल्याला वाचायला मिळते की हे प्राचीन मंदिर केंद्र शासनाच्या पुरातन संरक्षक विभागाकडे ‘संरक्षित’ घोषित करण्यात आले आहे.मंदिराभोवती सीमा भिंत अथवा प्रकार असून त्यातून मंदिराकडे जाण्याचा दरवाजा मध्यम आकाराचा आहे. तो अगदी अलीकडच्या काळातील आहे
   मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश-भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करत आहेत असं वाटतं. एका वेळी एकच व्यक्ति प्रवेश द्वारातून जाऊ शकेल इतकं ते अरूंद आहे. एके काळी ह्या देवळाचा आसमंत सनईच्या मधुर स्वरांनी जिवंत होत असे. नगा-याच्या नादाने दुमदुमत असे.
नगारखान्यातून दिसणारा स्वर्गमंडप
 
 
 
मंदीराच्या दरवाज्यातून आत जाताना होणारे कोपेश्वर मंदीराचे प्रथम दर्शन

मंदिराचे दार इतके साधे आहे, की येथे आत काही बघण्यासारखे आहे असे वाटतच नाही. आत आलो, की नगारखाना लागतो. तो ओलांडून पुढे गेल्यावर मंदिराचा भव्य परिसर दिसू लागतो. नगारखान्याच्या दरवाज्यातून मंदीराच्या प्राकारातून प्रवेश करताच आपण आश्चर्याने थक्क आणि स्तब्ध होतो. पाषाणात घडवलेले शिल्पांच्या कलाकुसरीने भरुन टाकलेले हे मंदीर म्हणजे जणु जमीनीतून प्रकट झालेले भुईकमळ वाटते. इतक्या आडबाजुला स्थापत्यशास्त्राचा अदभुत अविष्कार पहायला मिळेल याची आपण जराही कल्पना केलेली नसते. दिगमुड अवस्थेतून भानावर आल्यावरच आपण मंदीराच्या मुख्य आकर्षणाकडे म्हणजे स्वर्गमंडपाकडे धाव घेतो. पण त्यापुर्वी मंदीराच्या आवारात ठेवलेल्या शिल्पाकृतीकडे एक नजर टाकायला हवी. प्राकार भिंत आणि परिसर मात्र आधुनिक काळात बांधलेला आणि दुरुस्ती केलेला आहे जाणवतो.महादेवाचे मंदिर असल्याने प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, म्हणून इकडे-तिकडे पाहावे तो समजते की या मंदिरात नंदी नाही व भारतातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जिथे नंदीशिवाय महादेव आहे.
_MG_5159

 
 Simple, Free Image and File Hosting at MediaFire
 देवळाच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर पुर्व बाजुच्या भिंतीजवळ बरेच शिल्पाचे भग्नावशेष ठेवलेले दिसतात.त्यात एक वीरगळ पडला आहे तो शिलाहार दुसरा भोजाचा सेनापती बाणेशा याच्या स्मृतीप्रित्यर्थ उभा केलेला असावा. हा सेनापती सिंघण यादवाविरुद्ध लढताना धारातिर्थी पडला असा उल्लेख एका शिलालेखात आहे. या वीरगळावर सगळ्यात खाली लढाई नंतर मधे बाणेशाला अप्सरा स्वर्गात घेऊन चालल्या आहेत व शेवटी शंकराची पूजा दाखविली आहे, म्हणजेच तो कैलासवासी झाला असे दाखवले आहे.
बहुतेक सर्व एतिहासिक महत्व असलेल्या शहरात किंवा गावात आपल्याला असे वीरगळ नेहमी आढळतील. हे त्या गावाच्या रक्षणासाठी हौताम्य पत्करलेल्या वीरांचे स्मृतीस्तंभच आहेत म्हणाना. शक्य झाल्यास मातीतून/कचऱ्यातून काढून त्याची पुनर्स्थापना करावी. काही वीरगळांवर लेखही लिहिलेले असतात. ( काही गळ शाप देण्यासाठीही असतात. त्यांना गध्धेगाळ म्हणतात. त्याच्या आणि याच्यात फरक आहे हे लक्षात ठेवायला लागेल) हे वीरगळ विवीध काळातील असतात.

निसर्गाने सुद्धा इथे भरभरून दिले आहे. विस्तीर्ण अशी बरीच वडाची झाडे या मंदिराभोवती असून त्यावर येणाऱ्या फळांचा क्रम सुद्धा ठरलेला आहे. जेव्हा एका झाडाला फळे येतात तेव्हा बाकी झाडे रिकामी असतात. एकाचा बहर ओसरला कि, दुसऱ्याचा चालू होतो. त्यामुळे इथे बारा महिने वडाला फळ येत असतात म्हणूनच वटवाघळे आणि पक्ष्यांना हे हक्काचे ठिकाण आहे. पालवीचे सुद्धा तसेच आहे. क्रमाक्रमाने येथील वडाच्या झाडांना पालवी येत असते, आहे कि नाही निसर्गाचा आविष्कार !
 Simple, Free Image and File Hosting at MediaFire
 
 
 
 
 

 मंदीर पूर्वाभिमुख असून लांबीला अंदाजे १०३ फूट, रुंदीला ६५ फूट व उंचीला ५२ फूट आहे.मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. मंदिराचे विभाग असे १) मुखमंडप ( यालाच स्वर्गमंडप असे नाव आहे ) २) सभामंडप अथवा गुढमंडळ ३) अंतराळ ४) गर्भगृह.  मंदिराचे अवयव कसे असावेत, हे अग्निपुराणात सांगितले आहे. मनुष्यदेहाशी मंदिराचे साम्य दाखवण्यात आले आहे. म्हणजे की, ग्रीवा म्हणजे मान, डोके म्हणजे आमलक, कळस म्हणजे केस. गर्भाशय आणि गर्भगृह यात साम्य मानले आहे. मंदिराच्या प्रत्येक भागामागे एक उद्देश असतो. त्यानुसारच मुखमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना असते. खिद्रापूरच्या मंदिराला मुखमंडप नाही. त्याऐवजी मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला स्वर्गमंडप आहे. त्यानंतर सभामंडप, अंतराळकक्ष आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे.
हे मंदिर खालील वैशिष्ट्यामुळे शिलाहार कलेचा सुंदर नमुना झाले आहे.
 १) मुखमंडपा ऐवजी किंचित विलग असा स्वर्गमंडप.
 २) गर्भगृह आणि मंडपाच्या पिठावर नेहमीपेक्षा खूप उंच अशा गजथराची योजना
३) गर्भगृहालागतच गर्भगृहातून प्रवेश असलेल्या तीन उपदेवळांची दालने
 ४) स्वर्ग मंडपात दीक्पाल असूनही गर्भगृहाच्या बाह्यांगावर उदगम पातळीवर शक्तीसही दाखवण्यात आलेले दिक्पाल आणि
५)  सोळंकी शैलीतील करोटक छताचे साम्य असणारे स्वर्ग मंडपाच्या घुमटाचा छतावरील ( याचा फक्त खालचा भागच बांधला गेला आहे ) अलंकरण.
         ह्या मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले १०८ खांब आहेत. ह्या खाबांनी मंदिराचं पूर्ण छत तोललेलं आहे. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. १०८ खांब मंदिराच्या निर्मितीमध्ये निवडण्यामागेही गणित आहे. असं म्हटलं जातं की ह्या आकड्याला हिंदू धर्मात मोठं स्थान आहे. ह्यामागे एक कारण सांगितल जातं ते म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतकं आहे. चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.
   (याचे गणित करून बघितलं तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणल तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे. ३ लाख ८४ हजार किलोमीटर.)
     ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुरण आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहिता येतात, दोन्ही मिळून संख्या होते १०८. ह्या शिवाय इतर अनेक गोष्टी १०८ ह्या संख्येचं हिंदू धर्मातील महत्त्व अधोरेखित करतात. आपल्या संस्कृतीत महत्वाच्या असणाऱ्या संख्येला मानून त्यावरून एखाद्या मंदिराची पूर्ण रचना करणे हे विज्ञान, तंत्रज्ञान ह्या शिवाय शक्यच नाही. आपल्या संस्कृतीच्या कलेच्या आविष्कारात गणिताला स्थान देणे हे त्या प्रगत संस्कृतीचा एक दाखला नक्कीच आहे!

 स्वर्गमंड्प :-

 
 कोपेश्वर मंदिर - खिद्रापुर
 

 मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती ४ विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप !  हा मंडप वरील बाजूस मोकळा राहिला. त्यातून आकाश दर्शन होत असल्याने सध्या त्याला 'स्वर्गमंडप' असे नाव देण्यात आलेले आहे. स्वर्ग मंडप ४८ खाबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्य अविष्कारच म्हणावा लागेल. या मंडपाच्या मध्यावर उठावातील वर्तुळाकृती शिळा असून ती स्तंभ आणि परिवेशिष्ट आहे. या वर्तुळाभोवतीचे स्तंभ आणि मुखमंडपाच्या भोवतीने असणारे स्तंभ यांच्यातील विशिष्ठ रचनेमुळे या दोघांच्या मध्ये एक वर्तुळाकार पथ निर्माण झालेला आहे, ज्याचे प्रयोजन येणार्या जाणार्यासाठी केले आहे. या मंडपाला कठडा आहे व तो गुढमंडपाप्रमाणे खांबांवर उभा आहेत मात्र याच्या ओळी चौकोनात नसून वर्तूळाकारात आहेत. अशी दोन वर्तूळे आहेत. बाहेरच्या वर्तूळात ३६ खांब आहेत तर आतल्या वर्तूळात १२ खांब आहेत. एखाद्या कर्कटकाने रेखावा असे वर्तूळ त्यामुळे रिकामे पडले आहे ज्यातून आकाशाचा गोल तुकडा आपल्या नजरेस पडतो. खरोखरच असे वाटते, स्वर्गारोहणासाठी तर हे वर्तूळ मोकळे सोडले नसेल ना ? पण त्याखाली सगळे नक्षिकाम नजरेस पडल्यावर हाच स्वर्ग आहे याची खात्री पटते. स्वर्ग खाली आणि आकाश वर असा प्रसंग बहुदा येथेच नजरेस पडावा.
   प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.ह्या सगळ्या खांबांची रचना आणि त्यावर शिल्पकलेची मांडणी करताना हे आकार कुठेच विसंगत वाटत नाहीत.इथल्या शिल्पकलेवर एक वेगळा ग्रंथ होईल इतकी ती सुंदर आहे. नजाकत असणाऱ्या अनेक मूर्ती डोळ्याचं पारणं फेडतात.
   या मंदिराच्या फक्त गर्भगृहावरील मुळ शिखर पडून गेलेले नसून अंतराळ, मंडप आणि त्यापासून किंचित विलग असलेल्या आणि स्वर्ग मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडपाचेही मूळ छप्पर आज अस्तित्वात नाही असे काही अभ्यासकांचे मत आहे.  स्वर्ग मंडपाच्या छताचा मध्यभाग उघडा असल्यामुळे काही अभ्यासकांचे म्हणणे असे आहे की मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले असावे. पण निरीक्षणाअंती असे लक्षात येते की यामध्ये तथ्य नसावे याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मंदिर बांधून पूर्ण झाल्याशिवाय गर्भगृहातील देवताच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठाता होत नसते. ती तशी झाली असणार, कारण मंदिराच्या दक्षिण द्वाराशी असलेल्या सिन्हा यादवाच्या शिरा रेखा शिरा रेखात कोपेश्वरच्या पूजा-अर्चे साठी दोन गावाचे उत्पन्न दिल्याचा उल्लेख आहे.
 दुसरे असे की मंडपाच्या मूळ प्रवेशद्वारापासून सुमारे वीतभर दूर स्वर्ग मंडप बांधलेला आहे. मंदिराच्या मंडपाला लागूनच तो आहे याचाच अर्थ तो नंतर बांधण्यात आला असावा किंवा नंतर केव्हातरी त्याच्या छताची पडझड झाली असावी.
तर स्वर्ग मंडपावर छत कधीच नव्हते, यामुळे काही विद्वानांचे मत असे आहे कि 'केवळ स्वर्ग मंडपच आकाशाला खुला होता ( छप्पर रहित होता ) एवढेच नव्हे तर सर्व मंदिराचेच बांधकाम अपूर्ण होते आणि याचे कारण यादव राजा सिंघनाच्या ( इस १२१० ते १२४७ ) हातून झालेला शिलाहारांचा शेवट हे असावे', असे टोकाचे  बनले. तथापि मंदिरात देवाची प्रतिष्ठापना झाली होती. मंदिराच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन पूजे अर्चेसाठी देणग्याही देण्यात आल्या होत्या. इंग्रजी दिनदर्शिका नुसार इ.स. १२१४ मधील एप्रिल महिन्यात शके ११३६ झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी त्यात आणखी देणग्यांची भर पडली. यादव राजा सिंघनाने या अपूर्ण मंदिराला असलेली आधीची अनुदाने तर कायम केलीच, पण आणखीही अनुदाने दिलेली आहेत हि बाब जरा विसंगत वाटते. मंदीरात नियमित पुजा,अर्चा होते आहे, शिवाय राजाकडून त्यासाठी देणग्या मिळत आहेत, याचा अर्थ स्वर्गमंडप हा जाणून्,बुजून उघडा ठेवला असणार हेच योग्य वाटते. शिवाय महाराष्ट्रातील इतर काही मंदीरात जसे अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर, सोलापुर जिल्ह्यातील कुडलसंगम तसेच  नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर इथे अशीच रचना पहायला मिळते.

 
 
 
_MG_5244
 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 

स्वर्गमंडपाचे काही खांब व त्यावरील नक्षीकाम -

       स्वर्गमंडपात वरच्या बाजूला १३ फूट गोलाकार छत नसून त्यातून आकाशाकडे बघताना स्वर्ग बघितल्याचा भास होतो. ही रचना १२ नक्षीदार खांबांनी तोललेली आहे. स्वर्ग मंडपाच्या मुख्य खांबांच्या ३ वेगवेगळ्या रचना असून हा पूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र अश्या सगळ्या गोष्टींचा अविष्कार आहे. ह्या सगळ्या शाखा एकमेकात इतक्या सुंदरतेने मिसळलेल्या आहेत की आपण एकातून दुसरी बाजूला काढू शकत नाही.या मंडपातील दगडाची चकाकी, गुळगुळीतपण लगेच लक्षात येते. येथील प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहात राहावे असे आहे. स्वर्ग मंडपाचा नुसता फोटो बघितला तरी विचार मनात येतो? हे खांब कसे बनवले असतील. कारण त्यावर असलेल्या कलाकुसरीवरून ते छिन्नी आणि हातोड्याने बनवणं अशक्य आहे असं वाटतं. त्यावरील रचना एकमेकांशी मिळतीजुळती आहे. म्हणजेच ह्याचं निर्माण हे एका मास प्रोडक्शन सिस्टीमचा भाग असलं पाहिजे. त्याशिवाय अशी निर्मिती अशक्य आहे. गणितात बघितले जाणारे सगळे आकार एकसंध दगडाच्या शिळेवर असे निर्माण करणे म्हणजे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा एक वेगळा अविष्कार आहे कारण प्रत्येक खांबाच्या शिळेचं वजन कित्येक टना मध्ये आहे.इतक्या वजनाच्या खांबाना गोलाकार फिरवून त्यातून टर्निंग पद्धतीने आकार देणं ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा नक्कीच वापरली गेली आहे.
या मंदिराच्या मुखमंडपाचे छत हे कोल्हापूर शहरातील शेषशायी व ओंकारेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या छतासारखे क्षिप्तोक्षिप्त पद्धतीचे असावे असे अंदाज आहे.
कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple)


 

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

स्वर्ग मंडपाचे खांब:
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 Simple, Free Image and File Hosting at MediaFire
  

 
 
 
 
 स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे हे काही अभ्यासकांचे मत आहे. या मंडपाला यज्ञमंडप असेही म्हणले जाते. होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी छत गोलाकार मोकळे सोडले असावे, असे सांगितले जाते. पण यज्ञयागाच्या अन्य कोणत्याही खुणा येथे दिसत नाहीत. या मंडपात रंगशिळा आहे, म्हणून एक वेगळा विचार मनात येतो. पूर्वी गाभाऱ्यातील देवाला सन्मुख असा रंगभोग चाले. रंगभोग म्हणजे प्रवचन, कीर्तन, नर्तन, गायन अशा प्रकारची सेवा. या रंगभोगासाठीच हा मंडप खुल्या आकाशासह तयार केला गेला असावा. आपण या मोकळ्या छतातून दिसणाऱ्या आकाशाची गंमत लुटायला, येथील स्थापत्य पाहायला जायला हवे. आणि हो, स्वर्गमंडपाच्या या छिद्रामुळेच या गावाचे नाव छिद्रापूर पडले आणि त्याचा अपभ्रंश खिद्रापूर झाला, असाही समज आहे.
या मंडपाच्या वरील टोकास अष्टकोनी रचनेत तुळ्यांवर अष्ट दिकपालाची रचना केलेली आहे. हे दिकपाल ज्या त्या दिशेस तोंड करून स्थापन केले आहेत. दोन दिकपालांच्या मध्ये काही प्रमुख देवता सशक्ती स्थापित आहेत.या मूर्ती वरुन खाली चाललेले कार्यक्रम बघत आहेत अशी कल्पना असावी. दिकपालांची कल्पना थोडक्यात समजून घेऊया.....
_MG_5176
 आठ दिशांचे स्वामी म्हणून इंद, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, कुबेर आणि इशान यांना ओलखले जाते. काही उपदिशांची नावे यांच्यावरुनच पडली आहेत उदा. आग्नेय, वायव्य, इशान्य इ.इ...सुर्य पूर्वेस उगवतो व सुर्यामुळेच हे प्राणिमात्र जिवंत आहे म्हणून पूर्व दिशा ही देवांची म्हणून ओळखली जाते. व इंद्राला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेली आहे.म्हणून पुर्वेच्या खांबावर एरावतावर बसलेले इंद्र च इंद्राणी आहेत. आग्नेयेचा स्वामी अग्निदेव दोन शिरे, सात हात आणि डोक्यावर एक शिंग धारण करुन स्वाहा व स्वधा या आपल्या दोन्ही पत्नीसह मेंढ्यावर आरुढ झाला आहे. याच्या विरुद्ध असलेली दक्षिण ही त्यामुळे मृत्युची, अंताची दिशा म्हणून यमाला त्याची देवता/पालक म्हणून मान्यता मिळालेलेली आहे.यमधर्म व त्याची पत्नी रेड्यावर आरुढ झालेली दाखव्ली आहे. नैऋत्येस राक्षसावर विराजमान झालेला निऋतीदेव सपत्नीक दाखवला आहे. यम आणि निऋती यांच्यामध्ये हंसारुढ कार्तिकस्वामी दिसतात.  भारतवर्षाची पश्र्चिम सीमा समुद्राने अधोरेखित केली आहे असे मानल्यामुळे पाण्याच्या देवतेला म्हणजे वरुणाला त्या दिशेचे पालकत्व मिळाले आहे. इथल्या स्तंभावर मकरावर बसलेला वरुण सप्त्नीक आहे. त्याच्या हातात वरुण पाश दिसतो. वायव्य दिशेचा स्वामी वायु शक्तीसह दिसतो. तो चंद्रावर आरुढ झाला आहे.
यक्ष इ. मंडळी उत्तरेला राहतात म्हणून कुबेर उत्तरेचा पालक झाला. कुबेर आपल्या पत्नीसह नरवाहनावर आरुढ झालेला दाखवला आहे. इशान्य हि इशाची म्हणजे परमेश्वराची दिशा, इथे शिव-पार्वती गंगेसह नंदीवर आरुढ झालेले दाखवले आहेत. तर या सर्व दिशांच्या पालकांनी ब्रह्मा, विष्णू इत्यादि देवांबरोबर स्वर्गमंडपातील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे व स्वर्गातून ते खाली बघत आहे अशी कल्पना असावी. त्यातील इंद्राचे छायाचित्र खाली देत आहे.
 तुलापट्टावर गौणदेवतांच्या लघु मंदिराचा पट्ट आहे. यावर गजतालु प्रयोजनांनी युक्त अशी उत्तरोत्तर लहान होत जाणारे वर्तुळाकार कडी आहेत. बारा स्तंभाच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत. कमी रुंदीचे किंवा सडपातळ स्तंभ नंतरच्या काळातील कर्नाट शैलीच्या मंदिरात आढळणाऱ्या स्तंभाशी साधर्म्य दाखवतात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
स्वर्गातून खाली बघणारी इंद्रदेवता.-
_MG_5179

Surya (Sun)
सात घोड्यावर आरुढ झालेला सुर्य

स्वर्गमंडपातील दिशारक्षक पत्नीसह..
Vishnu On Garuda Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
गरुडारुढ विष्णु
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

Chandra (Moon) Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
चंद्र

Skanda @ Khidrapur, Maharashtra
हंसारुढ कार्तिकस्वामी
वाहनावर बसलेले दाम्पत्य
एक स्तम्भ के शिखर पर विष्णु और लक्ष्मी
एक स्तम्भ के शिखर पर विष्णु और लक्ष्मी


\ला आता…मी तिथेच. किती वेळ!

स्वर्गमंडपातून बाहेर येण्यासाठी तीन बाजुला तीन दरवाजे असून त्याला पायऱ्या आहेत या पायऱ्यांनाही हत्तींनी आधार दिला आहे असे दाखिवले आहे व त्यावर नक्षीकामही केलेले आहेत. अर्थात यातील बराचसा भाग आता गाडला गेल्या असल्यामुळे जे उरले आहे त्याचे छायाचित्र देण्यावाचून गंत्यंतर नाही.
_MG_5163

_MG_5171

_MG_5263

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
पायऱ्या-

सभामंडप :-

आपण स्वर्गमंडपाच्या आकाशगवाक्षाने भारलेले असतो. पण आतील सभामंडपही खूप सुंदर आहे. मंदिराचा दुसरा भाग म्हणजे सभामंडप. मुखमंडपातून ( स्वर्गमंडपातून ) सभामंडपात प्रवेश करताना अतिशय सुबकतेने घडवलेले तोरण व प्रवेशद्वार निदर्शनास येते. 
 
या प्रवेशद्वाराच्या तोरणाच्या मध्यनासीवर अथवा ललाटबिंबावर भूवनेशीची ( सरस्वती ) आकृती कोरली आहे. शिवालयाच्या प्रवेशद्वारावर ललाट्बिंबावर स्त्रीदेवतेचे अस्तित्व लक्षणीय आहे. 
१२ स्तंभों पर विराजमान १२ देवतागण
 
Entrance from Swarga Mandapa, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 सभामंडपाचे स्वर्गमंडपाकडील दरवाजा
South Entrance to Mandapa, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 
 सभामंडपाचा दक्षिणेकडचा दरवाजा
 
 

 another temple entrance
 सभामंडपाचा उत्तरेकडचा दरवाजा
 
     सभामंडप प्रशस्त असून त्याला समोरून एक व दोन्ही बाजूस दोन अशी द्वार आहेत.समोरच्या किंवा पुढच्या दारातून स्वर्ग मंडपात जाता येते. मुख्यदरवाजावर गणपतीचे शिल्प असून स्वर्ग मंडपाच्या दारात सरस्वतीचे शिल्प आहे.आतमध्ये गजलक्षमीचे कोरीव शिल्प दारावर रेखाटलेले आहे.सभामंडपात मधोमध असणार्‍या चार खांबांमध्ये जमिनीवर रंगशिला आहे. येथेही रंगभोग म्हणजे देवाची कलेच्या माध्यमातून सेवाउपासना केली जाते. येथे भक्तगण उपासनेला, कीर्तन-प्रवचन ऐकायला बसलेले असतात. त्यांना सहज आतबाहेर करता यावे यासाठी या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. 
 
 Mandapa Ceiling, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 
गोलाकार रंगशिळेवर उभे राहून वर पाहिले की, कमळाच्या आकाराचे सुंदर नक्षीकाम पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडते. येथील सभा मंडपाचे छत हे महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपाच्या छताप्रमाणे कमळाच्या आकृतीने सुशोभित आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. एक व्यालशिल्प आवारात पडलेले दिसले. पण यापेक्षा मंदिरातील शिल्प अधिक सुबक आहे. सर्वच व्याल मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे व्याल कोरलेला असतो. हा काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला होता, असे लक्षात येते. सभामंडपाच्या मधे बारा स्तंभ आहेत. त्यांच्याभोवती वीस स्तंभ आहेत. या स्तंभांच्यापलीकडे मंडपाची भिंत आहे. मंडपाला प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. तसेच हवा खेळती राहावी यासाठी जालवातायनेही आहेत.
 
 
गुढमंडपातून बाहेर येताना राजाराणीच्या शिल्पाशेजारी जी गवाक्षे आहेत ती पहायला विसरु नका. त्याचे सौंदर्य भन्नाट आहे. त्यातील प्रत्येक नक्षीकाम वेगळे आहे. ही हवा जाण्यासाठी केलेली असवीत कारण उजेडासाठी याचा विशेष उपयोग असावा असे वाटत नाही.
 
 
 
 
  

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गवाक्ष ( जालवातायन ) मधल्या ओळीततील कमळात शिल्पकाराने केलेली चूक बघितली का ? पण अर्थातच ती डिझाईनवाल्याची चूक आहे व ती शिळेची चुकीची मोजमापे घेतल्यामुळे झाली असवी.

 
 
 
 
 
 
 
Pillars of Kopeshwar
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Temple)
 
 
 स्वर्ग मंडपापेक्षा सभा मंडपाची मांडणी वेगळी आहे. येथे ६० खांबांच्या साह्याने सभामंडपाच्या छताला आधार दिला आहे. येथील खांबही नक्षीकामाने ओतप्रोत भरले आहेत. कीर्तिमुख असलेले चार खांब सभामंडपाच्या चौकोनी उंचवट्यावर आहेत.वरच्या बाजूला खोबणी कांगारीच्या साह्याने संधी साधलेले कलात्मक छत आहे.सभामंडप हा आयताकृती आहे.हीच भूमिती अबाधित ठेवण्यासाठी इथे असलेले सगळे साठ खांब हे त्याच आयतामध्ये व्यवस्थित ओळीत उभारलेले आहेत.पहिल्या ओळीत बारा,दुसऱ्या ओळीत वीस आणि उरलेले खांब हे भिंतींशी संलग्न उभारलेले आहेत.या मंडपातील सगळे खांब आयाताकृतीच आहेत. सभा मंडपाच्या मधल्या १२ स्तंभाभोवती २० चौकोनाकृती स्तंभ आहेत. वीस स्तंभांच्या रांगापलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. एवढा विस्तृत मंडप असलेली मंदिरे महाराष्ट्रात अगदीच अत्यल्प आहेत.
_MG_5154
प्रत्येक खांबावर विलक्षण कोरीव कामाचे नमुने आहेत.कुठल्याही खांबावर एकच चित्र किव्वा नक्षी परत कोरलेली नाही.दक्षिणेचे अधिपती असलेले विष्णू,हरणावर स्वर झालेला वायू,बोकडावर बसलेला अग्नी,हत्तीवर बसलेले इंद्र,रेड्यावर बसलेला यम आणि मोरावर बसलेले कार्तिकेय यांची त्या खांबांवर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात.मंदिराचे पूर्ण बांधकाम हे बेसॉल्ट खडकापासून झालेले आहे.मंदिर उभारायची पद्धत भिन्न स्वरूपाची होती.खांब एकमेकांना दुव्यांनी जोडले गेले त्यामध्ये नंतर माती भरली गेली आणि मग उभारणी पूर्ण झाल्यावर त्यातील माती काढून टाकण्यात आली.अशा पद्धतीने संपूर्ण मंदिर उभारले गेले आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना असलेल्या खिडक्यांवर जरबेराची फुले कोरलेली आहेत.खांबांवर असलेले चालुक्य राजांचे चिन्ह म्हणजे उलटा नाग आणि यादव साम्राज्याचे चिन्ह म्हणजे व्याल या गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीने कोलेल्या आहेत. ‘Cloning animal' या शास्त्राच्या आधारावर तोंड बैलाचे आणि देह वेगळ्याच जनावराचा किंवा तोंड रेड्याचे आणि देह वेगळ्याच प्राण्याचा असे संकरित प्राण्याची कोरीव शिल्प येथील खांबांवर बघायला मिळतात.
सभा मंडप के स्तम्भ पर उत्कृष्ट कीर्तिमुख
 
 
 
 Kirtimukha Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
Laksmi Narayan, and Garuda Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 लक्ष्मीनारायण आणि गरुड
 
 
कोप्पेश्वर मंदिराच्या प्राकारात सोळा प्रकारची कीर्तीमुखे पाहायला मिळतात. शिवालयांच्या प्रवेशद्वारापाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प कोरलेले दिसते, तेच कीर्तीमुख. येथील या शिल्पांतील कलाकुसरीला तोड नाही. प्रत्येक कीर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम वेगळे. शिल्पकाराने शिव-पार्वतीलाही कीर्तीमुखात बद्ध केलेले दिसते. कीर्तीमुखाची एक कहाणी आहे. कीर्तीमुख नावाचा असूर शिवभक्त होता. त्याने तहान-भूक विसरून घोर तपश्चर्या केली. महादेव त्याला प्रसन्न झाले. वर माग म्हणाले. तेंव्हा प्रचंड भुकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांकडे अन्नाची मागणी केली. महादेव म्हणाले, स्वत:चेच शरीर पायापासून खा. त्या असुराने तसे केले. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून महादेव म्हणाले, आजपासून तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पापे खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हापासून कीर्तीमुखाचे शिल्प शिवालयाच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली.






गौतम बुद्धांचे पद्मासनातील शिल्प एका खांबावर आहे.









Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 पाषाण में गढ़ी जातक कथाएं - कोपेश्वर मंदिर कोल्हापुर
 
 मकर, मयूर एवं पूर्ण कुम्भ - कोपेश्वर मंदिर में मंगल चिन्हमकर, मयूर एवं पूर्ण कुम्भ – कोपेश्वर मंदिर में मंगल चिन्ह
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 Panchatantra Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
Ram Lakshman and Maruti Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 


 सभामंडपातील सर्व स्तंभ उत्तम कलाकृतीने सुशोभित आहे. काही स्तंभांवर पौराणिक कथा, प्रसंग, विविध प्रधान तसेच गौणदेवता इत्यादी कोरलेले आहेत. सभामंडपातली या कोरीव स्तंभावरील उल्लेखनीय कोरीव शिल्पे पुढीलप्रमाणे - आगामिक काळामुख शैवाचार्य, चामुंडी, मिथुन शिल्प, विष्णूलक्ष्मी यांचा वसंतोत्सव,राम हनुमानाची भेट, पंचतंत्रातील कासव आणि हंसाची कथा, वांनराची आणि मगरीची कथा.  खांबांवर कलात्मक कोरलेले यक्ष आणि किन्नर यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात.मानवी कवटीपासून बनविलेले ( मानवी कवटीसारखे दिसणारे ) मुकुट परिधान केलेल्या द्वारपालांचे कोरलेले शिल्प अचंबित करायला लावते.शंकराच्या द्वारपालांच्या मुकुटावर मानवी कवटीचे चित्र का या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शंकर स्मशानात असतो म्हणून द्वारपालाला कवटीचे मुकुट.हातामध्ये पळी घेऊन उभी राहिलेली अन्नपूर्णा,रुद्राक्ष घातलेले नाथ,सर्प नियंत्रण करणारा गारुडी आणि विविध मैथुन शिल्प यांनी रंगशिलेतील सर्व खांब सजलेले आहेत.एका खांबावर बासरी वाजविणारा बाळकृष्ण,बलराम आणि पेंद्या या तिघांचा रेखीव मिलाप पहायला मिळतो.तसेच गरुडावर आरूढ झालेला सपत्नीक विष्णू कमालीचा भासतो.मार्गक्रमण करणाऱ्या हंस पक्षांची शिल्पे मन मोहित करतात.हरेराम हरेकृष्णच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या लोकांची मुद्रा शिल्पाद्वारे खांबांवर रेखाटलेली आहे.रंगाशीलेच्या नर्तकीची मुद्रा देखील पाहावयास मिळते.
    खांबांवर आणि भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा कोरलेल्या आहेत.राम-रावणाच्या युद्धात बाण लागून जखमी झालेल्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन हनुमानाला संजीवनी बुटी आणायला पाठविण्याचा प्रसंग मोठ्या कल्पकतेने कोरलेला पहावयास मिळतो.बुद्धावतारातील मूर्ती,बालाजीची मूर्ती तसेच वाल्मिकी आणि कोदंडधारी रामाची सर्वांगसुंदर शिल्प येथे कोरलेली आढळतात. जैन श्रावक व भगवान महावीर यांची शिल्पे येथे आहेत.कोपेश्वर मंदिरात सभा मंडपात उत्तरेकडील खांबावर लहान आकारात मिथुन शिल्प आहे. स्त्रिया न्हायल्यानंतर आपले ओले केस एका  बाजूला घेऊन चालतात त्या रूपातील स्त्रीचे शिल्प रेखाटलेले आहे.शंकर,पार्वती,ब्रह्मदेव आणि गंगा यांच्या कथांचे शिल्प देखील पहायला मिळते. याच बरोबर दुर्गा,कालीमाता,महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवींची शिल्पे कोरलेली आढळतात.रंगशिलेमध्ये गणपतीला कोनशीला बसवून पूजा केली गेली आणि तिथूनच मंदिराचे बांधकाम सुरु केले गेले अशी माहिती सांगण्यात येते.रंगशाळेतील एका खांबाच्या पायाला गणपती बसविला आहे.
 अर्थात या देवळाच्या बाहेर जेवढी उठावदार शिल्पकला आहे तेवढी आत नाही. सभामंडपात एका कोपऱ्यात सप्तमातृकांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतील पण त्या अत्यंत वाईट अवस्थेत आहेत व अंधारात असल्यामुळे व्यवस्थित छायाचित्र काढता येत नाही. अनेक देवळात आपल्याला सप्तमातृकांच्या मूर्ती दिसतात. कोण असतात त्या ? या सप्तमातृका म्हणजे स्त्रीशक्तीची रुपे आहेत. यातील सर्व मातांच्या जन्माच्या कथा आहेत व बहुतेक मातांचा जन्म हा राक्षसांचा वध करण्यासाठी झालेला दिसतो. उदा. अन्धकासुर कथेत त्याच्या जमिनीवर पडणाऱ्या रक्तापासून नवीन राक्षस तयार हो़ऊ नयेत म्हणून या देवांनी उत्पन्न केल्या अशी कथा आहे तर एका कथेत नैर्ऋतीचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यांना उत्पन्न केले असे म्हटले आहे. त्या काळी या मातृकांना बरेच महत्व असले तरीही यांचे वेगळे मंदीर पाहण्यात नाही. यांना अनेक देवळात जागा मात्र दिलेली असते. बदामीचे राजे त्यांचे राज्य हे सप्तमातृकांच्या कृपेने मिळाले असे म्हणतात. यांना नावेही आहेत, ती अशी – ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा.कोप्पेश्वराच्या सभामंडपात उजव्या व डाव्या अशा दोन्ही कोपर्‍यांत सप्तमातृकांचे दोन शिल्पपट आहेत. दोन्ही अगदी सारखेच आहेत.
 
 a
 
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

डाव्या बाजूला वीरभद्र शिव, मध्यभागी सप्तमातृका आणि उजवीकडे गणेश. ह्या सर्व मूर्तींखाली त्यांची वाहनेसुद्धा कोरलेली आहेत.
     जेथे गुढमंडपातून आपण बाहेर येतो तेथे दरवाजावर खालच्या बाजूला काही शिल्पे आहेत मला वाटते ही शिलाहारांच्या राजा-राणीची असवीत.....त्याचे छायाचित्र खाली देत आहे.
 Kopeshwar Dwarpalas Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

अंतराळ आणि गर्भगृह :-  

      सभागृह आणि गाभारा याच्या मधील भागाला अंतराळ म्हणतात.मंदिराचा अंतराळामध्ये तसा बऱ्यापैकी काळोख आहे.छोटासा चौकोनी आवारासारखी हि जागा असून याच्या संपूर्ण भिंतीवर विविध शिल्प साकारलेली आहेत. सभा मंडपातून पुढे अंतराळात आल्यावर उत्तरेकडील भिंतीवर काही शिलालेख आढळतात. याचे वाचन झालेले आहे. नेहमी अंतराळात आढळतात तसे देवकोष्ठे येथे नाहीत. मात्र स्त्री पुरुषांच्या मिळून येथे सहा प्रतिमा भिंतीजवळ आहेत.


 गाभार्याची चौकट, बाजुला असलेल्या द्वारशाखा आणि वरच्या बाजुला कपोतालीवर असलेल्या शिखरांच्या प्रतिकृती
 
अंतराळात प्रवेश केल्यावर समोर गाभाऱ्याच्या चौकटीवर असलेली गजलक्ष्मी लक्ष वेधून घेते. गर्भगृहाच्या चौकटीवर उत्तम कोरीव काम आढळते. चौकटीच्या दोन्ही बाजूस कुट स्तंभावर पूर्ण घटांची आकृती शिल्पे आढळतात. भुदेवी अथवा गजलक्ष्मी स्थानापन्न असल्याचे दिसून येते. द्वारशाखांच्या तळाशी नेहमीच्या देवता मूर्ती ( प्रतिहारी) आहेत. द्वार पंचशाखाप्रकाराचे असून मधल्या स्तंभ शाखेवर उत्तरांग आहे. उत्तरांगावर पाच लघुमंदिरे आहेत.
सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे.पडून गेलेले मुख्य शिखर बांधताना ते या प्रतिकृतीनुसार बांधता आले असते, परंतु जीर्णोद्धाराचे काम करणाऱ्या स्थपतीने तसे केलेले नाही. यावरून त्याला शिल्प ग्रंथाचे ज्ञान नव्हते हे उघड आहे. कपोतालीवर असलेल्या मुख्य शिखरांच्या प्रतिकृती, भद्रावर असलेल्या देवकोष्टांवरील शिखरे यावरून मुळात हे मंदिर शिलाहार शैलीचे सप्तरथ भूमीज प्रसाद असावे  हे उघड आहे.या मंदिराच्या फक्त गर्भगृहावरील मुळ शिखर पडून गेलेले नसून अंतराळ, मंडप आणि त्यापासून किंचित विलग असलेल्या आणि स्वर्ग मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडपाचेही मूळ छप्पर आज अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूंना कामासाठी वापरलेली छिन्नी अडकवलेली आहे.




तसेच चौकटीखाली  गर्भगृहाच्या उंबर्याशी सुंदर अशा कोरीवकामाने युक्त चंद्रशिळा पहावयास मिळते. स्थापत्याच्या उत्तरकाळात अशी मोहक चंद्रशिळा जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये पाहावयास मिळते. चंद्रशिळेचे वैशिष्ट्य म्हणजे हिची झीज फारच कमी असते.
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra


 जयची मुर्ती
 
अंतराळात प्रवेश करताना आठ फूट उंचीच्या द्वारपाळाच्या प्रमाणबद्ध मूर्ती दिसतात. 
 Brocken Dwarpala Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 कोपेश्वर मंदिर के सभा मंडप का प्रवेश द्वार
त्यातील एक मंदिराच्या दक्षिणद्वाराबाहेर भग्नवस्थेत पडला आहे.
 _MG_5207
 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आतील नाहिसा झालेला विजय:
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ही खालचा व वरचा भाग तोडलेली मूर्ती एकसंध असताना खरोखरच सुंदर असणार हे त्याच्या दागिन्याच्या नक्षिकामामुळे कळून येते. त्याचे एका जवळून काढलेले छायाचित्र:

 द्वारपाल प्रतिमा - कोपेश्वर मंदिर खिद्रापुर
  हे द्वारपाळ गदाधारी असून, आभूषणयुक्त आहेत. शरीरयष्टी व आभूषणे प्रमाणबद्ध आणि बघतच राहावीत अशी आहेत. दागिन्यांची आवड फक्त महिलांनाच असते असे नाही. हे पुरुषाचे शिल्पही नखशिखान्त नाजूक दागिन्यांनी नटलेले आहे. कोणत्याही शिल्पामधील प्रमाणबद्धता त्याचे सौंदर्य वाढविते, हे येथे अनुभवायला मिळते. 
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
कोप्पेश्वरचे गर्भगृहः
 
 मंदिराचा शेवटचा आणि मुख्य भाग म्हणजे गाभारा किंवा गर्भगृह.  मिणमिणता तेलाचा दिवा सोडल्यास प्रकाशाचा स्रोत येथे नाही.घुमणारा आवाज आणि गाभाऱ्यात येणार ठराविक वास गंभीर वातावरणाची जाण करून देतो.गाभार्याच्या भोवताली भिंतीलगतच्या खांबांना खेटून अठरा तरुणी पूजा साहित्य घेऊन उभ्या आहेत.कोपेश्वराचे गर्भगृह हे महालक्ष्मी मंदीराच्या गर्भगृहासारखे तीन दालनांनी युक्त आहे. परंतु ब्रह्मस्थानी कोपेश्वराचे लिंग सोडल्यास तिन्ही दालने रिकामीच आहेत. त्यातील उत्तरेकडील दालनात देवतेचे पादपिठही दिसते. यासंदर्भात अंतराळातील दानलेखाचा अभ्यास करताना हे जाणवले की त्यात उल्लेख आलेले कुसुवेश्वर ( शिल्पी लोकांचा देव ) कामेश्वर आणि कुर्कुटेश्वर ही जरी कोपेश्वरची नावे सांगितली असली तरीही ते स्वतंत्र देव असावेत आणि त्यांची जागा गर्भगृहातील दालनात असावी.परंतु गर्भगृहातून प्रवेश असणाऱ्या तीन उपदालनांमध्ये कोणत्या देवमूर्ती होत्या, याबाबत निश्चितपणे काही सांगितले जात नाही. याचा फक्त अंदाज बांधावा लागतो.सभा मंडपातून पुढे अंतराळात आल्यावर उत्तरेकडील भिंतीवर काही शिलालेख आढळतात. याचे वाचन झालेले आहे.
 
  गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. ज्यादा शिवलिंगाचे स्पष्टीकरण देणाऱ्या स्थानिक अख्यायिकाही आहे. इथे विष्णूची पिंडरुप आणि शेजारी शिवलिंग पहायला मिळते.याची कथा अशी, येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. त्याची कथा अशी आहे -
शंकर हा वर देण्याच्या बाबतीत तसा भोळा आणि उदार देव होता. त्याच्यावर प्रेम करणाऱयांना, खर तरं त्याची भक्ती करणाऱयांना तो चांगले वर देत असे. त्याच्या उदार वराचे दुष्परिणाम वाढले की, मग विष्णूला ते सर्व निस्तरावं लागे. शिवभक्त रावणाने शंकराकडून वर घेतला आणि मग विष्णूला राम होऊन रामायण घडवावं लागलं. इथे त्या मानाने विष्णूचं काम सोपं होतं. शंकराने आपल्या भक्तांना जाहीर केलं की, शंखनाथ (संकेश्वर), बकनाथ (रायबाग) आणि कोपनाथ (खिद्रापूर) या तीन ठिकाणाच्या शिवलिंगांचं दर्शन जो भक्त एका दिवसात करील त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. अर्थात ज्या काळात प्रवास जिकरीचा होता, पण स्वर्ग मिळणार यासाठी अनेकांनी हा अट्टहास केला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वर्गाची लोकसंख्या वाढायला लागली. त्यामुळे स्वर्गातले जे मूळचे रहिवासी देव, ते वैतागले. त्यामुळे सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूने काय केले असेल? तो कोपनाथात आला आणि राहिला. त्याने कोपेश्वराच्या मंदिरात आपलं अस्तित्व शिवलिंगापेक्षा अंमळ जास्त असेल असं पाहिलं. त्यामुळे देवळात शिरल्यावर पहिली नजर विष्णूकडे जाते आणि मग शंकराकडे. त्यामुळे वर भंग होतो. स्वर्गात येणारे ‘उपरे’ थांबले. आजही मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. अर्थात धोपेश्वराची पिंड हि विष्णुरुप मानली तरी बहुधा हि सुध्दा एक शाळूंका असावी.पिंडीवरील अभिषेकाचे पाणी उत्तर बाजूला जाण्याची व्यवस्था आहे. 
  खरंतर या संबंधातील अनुमान असे की सध्याचे मुख्य शिवलिंग मूळचे नसावे. जीर्णोध्दाराच्या वेळी जे मूळचे शिवलिंग होते ते सध्याच्या शिवलिंगाच्या पुढे ठेवले असावे. श्रीशैल मल्लिकार्जुन नामक प्राचीन शिवलिंगाचे जागी नव्याची प्रतिष्ठापना झाल्यावर मूळचे शिवलिंग एका देवळीत प्रतिष्ठापीले होते. त्याला वृद्ध मल्लिकार्जुन म्हणतात. तसेच काहीसे येथे झाले असावे.
     गर्भगृहाच्या आत देखील सुरसुंदरीची शिल्पे आढळतात. ही शिल्पे आठ दिशांमध्ये बसवलेली असून ती भग्नावस्थेत आहेत. या सुरसुंदरीची रचना पाहता असे अनुमान निघते की सुस्थित असताना यांच्या हातामध्ये घट,कलश व पात्र यांची योजना केली असावी. शिवाय गाभाऱ्यात तीन दिशेस एकेक देवळी आहे तिच्या दोन्ही बाजूस एकेक द्वारपालीका आहे या सालंकृत आणि प्रमाणबद्ध आहेत.  त्यांच्या चेहरे पहात तुटलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही. गाभाऱ्याच्या भिंतीत अर्धस्तंभ असून त्याच्या तळभागी एकेक स्त्री प्रतिमा आहे. गाभाऱ्यात अशा शिल्पाकृती असलेल्या अन्य तर कोठेही नाही म्हणूनच या गाभाऱ्याला अनोख्या रचनेचा गाभारा असे म्हणता येईल.

 नंदीचे मंदिर कर्नाटकात :
 दुसरे एक वैशिष्ट्य असे की कोणत्याही शंकरांच्या मंदिरात आपल्याला आधी नंदी दिसतो. मगच शंकरांची पिंड दिसते. पण, या मंदिरात असे नाही. येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे, असे माहितीगार सांगतात. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर (चिकोडी, जि. बेळगाव) या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे.  लोक असेही म्हणतात की ते केवळ नंदिचे मंदिर असावे. पण, तसे नाही. खिद्रापूर मंदिराच्या बाजूलाच मुख असलेला नंदी इथे आहे. तो कर्नाटकात आहे. श्री वीरभद्र व भद्रकाली याची स्वतंत्र मंदिरे आपल्याला आज पाहायला मिळतात. श्री वीरभद्रेश्वराचे लिंग व श्री भद्रकाली दिवीेेची मुर्ती आहे.तसेच विरभद्र मंदिरापासून काही अंतरावर देवी सती बरोबर आलेला नंदीचे स्थान आहे.मंदिराच्या गर्भगृहामध्ये पाषाणातील भव्य नंदी आपल्याला दिसुन येतो.खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
येडूर गावातील नंदी

     येडुर गावातील वीरभद्र मंदीर

  खिद्रापूर मंदिर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आख्यायिकांनी भरलेले आहे. अशीच एक कथा भगवान शिव आणि देवी पार्वतीची कथा सांगते, जे अनुक्रमे मल्लिकार्जुन आणि भ्ररामंबा म्हणून प्रकट झाले, जगाला त्यांच्या दैवी उपस्थितीने आशीर्वाद देण्यासाठी.
  लोककथेनुसार, भगवान शिव एका मधमाशीमध्ये (भ्रमारा) रूपांतरित झाले आणि देवी पार्वती फासेच्या खेळात मग्न असताना त्यांनी खेळकरपणे डंक मारला. प्रत्युत्तर म्हणून, देवीने खेळकरपणे मधमाशीला मारले, ज्यामुळे रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला. हे पवित्र स्थान असे मानले जाते की जेथे खिद्रापूर मंदिर आता उभे आहे, या दैवी घटनेमुळे कायमचे पवित्र झाले आहे.
खिद्रापुर मंदीरातील उत्सव :-




खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात किरणोत्सव ; महाराष्ट्रातील खूजराहो म्हणून ओळख
खिद्रापूर, (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरात किरणोत्सव

दरवर्षी ५ ते १० मे च्या दरम्यान, वैशाख शुक्ल १४ चैत्र नक्षत्रला हा योग येतो. भारतात अशी बोटावर मोजण्यात इतपत मंदिरं आहेत जिथे शिवपिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. त्यापैकी खिद्रापूरचे एक मंदिर आहे. मंदीर पुर्वाभिमुख असल्यामुळे सकाळी सुर्योदयाला मुख्य प्रवेशद्वारातून सुर्यकिरण प्रवेश करतात. काही काळ हा किरणोत्सव आपल्याला अनुभवता येतो.


झिरो शॅडो डे अर्थार्थ शून्य सावली दिवस
       असं म्हटलं जात की आपली सावली कधीच आपली साथ सोडतनाही परुंतु मे महिन्यात काही विशिष्ट दिवशी आपली सावली अदृश्य होते .खगोल शास्त्रामध्ये ह्या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असं म्हणतात. कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा आनंद घेता येतो. हा दिवस अनुभवण्यासाठी खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीरातील स्वर्गमंडप हे अतिशय नेमके ठिकाण आहे.




कार्तिकी पौर्णिमेला का होते गर्दी?
कार्तिकी पौर्णिमेबाबतची  पोस्ट गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे त्याला ‘चंद्रशिला’ असे म्हटले जाते.स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडतो. या चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या चंद्रशिलेच्या दगडाशी जुळून येतो.स्वर्गमंडपामध्ये असलेल्या गवाक्षातून कार्तिक पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्याला पाहता येतो. वर्षातील १२ पौर्णिमांपैकी ही एकच पौर्णिमा अशी आहे, की या स्वर्गमंडपाच्या गवाक्षातून चंद्रप्रकाश खाली येतो आणि खाली असलेल्या १३ फूट व्यासाच्या अखंड रंगशीलेवर प्रकाश टाकतो. स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगाने संपुर्ण मंदिर चंद्रप्रकाशाने उजळून निघते. 
 यासंदर्भात एका संशोधकाचा नक्कीच उल्लेख केला पाहिजे. श्री. अरविंद परांजपेंनी (संचालक, नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू सेंटर) स्वतः सर्व गणिती आकडेमोड करून त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र त्या गवाक्षाखालच्या शिळेवर विसावतो याचा कयास बांधला आणि आपला कयास किती बरोबर आहे हे त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं. त्यांच्या गणिती आज्ञेचा मान ठेवून चंद्र त्या शिळेवर क्षणभर विसावला. ज्यावेळी हे मंदिर बांधलं त्यावेळी कुणी हा गणिती उपद्व्याप केला होता का? की हे वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण होतं? की केवळं हे अपघाताने घडलं याचं अचूक उत्तर देणं कठीण असेल, पण कितीतरी अशा विस्मयचकीत करणाऱया गोष्टी आपल्याला प्राचीन हिंदुस्थानात सापडतात. मग हे शास्त्र, ही कला गेली कुठे? ती व्यक्तिगत किंवा सामूहिक प्रॉपर्टी राहिली काय?
खिद्रापूर दीपोत्सव
खिद्रापूर दीपोत्सव

 मंदिरात आकर्षक रांगोळी रेखाटून त्याभोवती दिवे लावण्यात येतात. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.  कोपेश्वराच्या पूजा मानाच्या दंपतीकडून यथायोग्य विधीवत केली जाते. सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरती करण्यात येते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी तसेच भजन किर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.
 मध्यभागी चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग हा सोहळा  अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्त मोठी गर्दी करतात.
बुत्ती पुजा :-
 उन्हाळ्यातील शिवरात्रीपासून पावसाळ्याच्या आरंभीचे मृगनक्षत्र लागेपर्यंत सोमवारी व गुरुवारी कोपेश्वराच्या पिंडीला दही-भाताची पुजा बांधली जाते. स्वच्छ धुतलेल्या तांदळाचा फार मउ वा फार मोकळा नसलेला, खाली न लागलेला भात व उत्तम निर्भेळ दुधाचे दही, फडक्यावर घालून हाताने मळून घेतात. आवश्यकेतानुसार निरसे दुध घालतात.मग या भाताने कोपेश्वराच्या पिंडीला भाताने मढवतात. त्यातच शिव-पार्वती, गणपती, नंदी यांचे आकार करुन केस्,डोळे इत्यादी रंगवतात. तीन तासाच्या बुत्तीपुजेनंतर हि पिंडी संगमरवरी असावी अशी भासते. संध्याकाळी गुरव हि पुजा उतरवतात. खिद्रापुरमधील श्री. अप्पाशास्त्री जोशी व त्यांचा मुलगा रघुनाथराव जोशी यांनाच हि पुजा बांधता येते. सहा किलो तांदुळ, चार लिटर दुधाचे दही, अर्धालिटर निरसे दुध व किरकोळ साहित्य दिले तर अशी पुजा बांधता येते.
    याशिवाय विशालतीर्थ यात्रा भरते यावेळी हजारो भाविक कृष्णा नदीच्या पात्रात स्नान करून दर्शन घेऊन जातात. गावातील सर्व पंथाचे लोक ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवितात व आपली मनोकामना पूर्ण करण्याची विनवणी करतात.

कोपेश्वर मंदीरातील शिलालेख :-

खिद्रापूर शिलालेख एक
राजघराणे व राजा :- देवगिरीचा यादवराजा सिंदण
 भाषा व लिपी:- संस्कृत, देवनागरी
 वर्ष व तिथी :- शके ११३६ श्रीमुख संवत्सर, चैत्र, सूर्यपर्व, सोमवार इ.स.- १२१४-१५
 सारांश :- या लेखाचा मुख्य उद्देश यादव बृपती सिंघण देव याने मिरींज जिल्ह्यातील कुडल, कृष्ण वेणी व भेणसी या नद्यांच्या संगमावर वसलेले कुडलादामवाड हे गाव तेथील वृक्ष व या गावाच्या कक्षेत येणारी कृष्णवेणी व कुवेणी ह्या नद्यांच्या संगमापर्यंत पसरलेली जमीन व इतर संपत्ती कोपेश्वर देव मंदिराला अंगभोग, रंगभोग व इतर धार्मिक कृत्यासाठी दान दिली. हे नमूद करण्याचा होता. याशिवाय सिंघण देवाने जुगूल व सिरीगुप्प ही दोन गावे या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख केलेला आहे.
 व्यक्तीनामें :- सिंघण देव यादव नृपती
 ग्रामनामे :- १) द्वारावतीपूर ( मैसूर संस्थांतील हल्लीचे हळेबीड ) २)  सिरीगुप्प ( ओळख पटत नाही ) ३) जुगूल (ओळख पटत नाही )
 ४ ) कुडलदामवाड ( ओळख पटत नाही ) ५) मिरींज ( मिरज )
 

Inscription, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

 जसे हे मंदिर असंख्य शिल्पाने सुशोभित आहेत तसेच या मंदिराच्या आत व बाहेर शिलाहारांचे व यादवांचे शिलालेख हे विपुल प्रमाणात आढळतात. मंदिराच्या सभा मंडपाच्या दक्षिण द्वारा बाहेर यादवांचा भव्य असा शिलालेख आढळतो. शिलालेखात यादव राजा सिंघणने शिलाहारांवर मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ कोपेश्वरला दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. ( मिराशी वा.वी. १९७४ शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख पृष्ठ ३४९ ३५२). 

याच सिंघण यादवाच्या शिलालेखाची शिळा गुढमंडपाच्या दक्षिण द्वाराबाहेर लावलेली आहे. या शिलालेखाचे भाषांतर श्री. मिराशी यांनी केलेले आहे ते ही पटकन बघून टाकू –
श्री—नमस्तुगशिरश्चुबिचंद्रचमरचारवे—त्रैलोक्य-
नगरारभमूलस्तभाय शभवे ।..धर्म सुस्थिरतामु-
पैतु जगतामानददायी सदा वृद्धि चाभिनवातरेण
भजता कोप्पेश्वरस्याभित । स्थानस्वोचितमूर्जित च
वहुना कालेन लब्ध्वाधुना श्रीमद्धीमदुदारसारचतुरायुष्मन्म -
हापूरुषान् ।। भूदेवाशीरमृतात्मवृष्टयाप्यायितोयमनवरत (तम्)।
अकुरतात्पल्लवतात्कुसुमतु फलतात्सुधर्मकल्पतरु ३।।
स्वस्ति—श्रीशकवर्षे ११३६ श्रीमुखसवत्सरे सूर्यपर्वणि सोमदिने
श्रीमद्देवगिरावधिष्ठित समस्तभुवनाश्रय श्रीपृथ्वीवल्लभ महाराजाधिराज
परमेश्वर द्वारवतीपुरवराधिश्वर विष्णुवशोद्भव
यादवकुलकलिकाविकासभास्कर समस्तअ रि-
रायतगजप इत्येवमादिसमस्तराजावलीसमलकृत श्रीम-
त्प्रतापचक्रवर्तिश्रीमहाराजश्रीसिघणदेव शासनपत्र प्रयच्छति ।
यथा । कूडलकृष्णवेणीभेणसी नद्यो सगमे मिरिजिदेशमध्ये
च तिष्ठमान कूडलदामवाडग्राम सवृक्षमालाकुल क्षेत्रस्थ
लवाटसहित नवनिधानसयुक्त चतुराघाटोपेत स्वसीमापर्यंत
श्रीमत्कृष्णवेणीकुवेणीनदीसगमात् श्रीमदाद्दस्वयभुवे
श्रीकोप्पेश्वरदेवाय मकलागभोगरगभोगपरिमलरिपु-
रणार्थ अष्टविधार्चननिमित्त शासनोदकेन प्रदत्तवान् ।। अस्य
ग्रामस्योत्पन द्रवेण सकलागस्थानपतिभि श्रीमद्देवकायं
सर्वमपि अगभोगपूजादिप्रभृतिक करणीयम् ।
अन्यच्च जुगुलसिरिगुप्पग्रामेद्धये यत्पूर्वेण विद्दते तदेव जीर्णो-
द्वारीकृत्य श्री सिंघणदेव श्रीकोप्पेश्वरदेवाय प्रदत्तवान् ।।
आनंदामृतसागरस्य भरणेय पूर्णचंद्रायते य कार्पण्यमस्ततेश्च
हरणे मार्तंडता ढौकते । यश्चाय ह्रदये निवेशितहरि
क्षीराब्धिना स्पर्धते तस्य श्रीभुजवल्लरी विजयते सिंहा-
ह्रपृथीपते ४।। रिपुभूमिपालभालस्थलनिहित क्षालयन्रेणेषु चकास्ति ।
गल्लगलितमदाबुप्रवाहतोसौ जगयी सिंहनृप ।। मंगलम ।।

यातील काही (४ ते ५) शब्द श्री मिराशींनी दुरुस्त केले आहेत. ते केल्यावर या शिलालेखाचा अर्थ खालीलप्रमाणे. भाषांतर अर्थातच श्री मिराशींनी केलेले आहे इंग्रजीमधे. ते मी मराठीत केले आहे. मी एकंदरीत अर्थावर जास्त भर दिला आहे.
‘‘हे त्रैलोक्य ज्याने निर्माण केले व जो त्याचा पाया आहे अशा शंकराला वंदन असो. ज्याच्या मस्तकावर खुद्द चंद्र चौऱ्या ढाळतो आहे व ज्यामुळे ज्याचा शिरोभाग चमकत आहे अशा शंकराला नमन असो.
नवीन राजाधिप्त्याखाली श्री कोप्पेश्वराच्या प्रदेशात धर्माचे अधिष्ठान असो, ज्याने त्रैलोक्याला सदासर्वदा आनंद मिळो कारण आता कोप्पेश्वराला यादवांसारख्या शूर, बुद्धिमान, वैभवशाली, शक्तिशाली व दिर्घायुष्य लाभलेल्या राजाचे राज्य वसतिस्थान म्हणून मिळाले आहे.
ज्याला ब्राह्मणांचा आशिर्वाद लाभलेला आहे असा हा धर्माचा कल्पतरु असाच फोफावणार आहे व त्याला इच्छापूर्तीची फळेही लागोत.
नमन असो ! शके ११३६ श्रीमुख वर्षाच्या चैत्रात सूर्यग्रहणाच्या पवित्र मुहुर्तावर सोमवारी प्रतापचक्रवर्ति, महाराज सिंघणदेव ज्याला महाराजाधिराज, परमेश्वर असे ओळखले जाते, जो द्वारावती सारख्या सुंदर शहराचा मालक आहे, जो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, ज्याच्या कुळाची काळजी खुद्द सूर्य वाहतो, जो त्याच्या शत्रूवर नेहमी विजय मिळवतो व जो देवगिरीला वसतो, आज खालील दान करत आहे –
त्याने उदक सोडून मिरिंजिदेशातील कुडलदामवाड जे कुडलकृष्णावेणी व भेणसी याच्या संगमावर वसले आहे ही गावे त्यांच्या हद्दीतील झाडांसकट, शेतीसकट, सर्व ठिकाणे, बागा व नऊ खजिनने व चतु:सिमांसह श्री कोप्पेश्वर देवस्थानाला, जे कृष्णावेणी व कुवेणी नद्द्यांच्या संगमावर वसलेले आहे त्या देवस्थानाला दान दिले आहे. हे दान देवाची अष्टपूजा बांधण्यासाथी करण्यात आलेले आहे. या दान दिलेल्या गावाच्या उत्पन्नातून गावाच्या अधिकाऱ्यांने प्रसाद, करमणूक व सुगंधी उटण्याचा खर्च भागवावा.
याच बरोबर सिंघणदेवाने जी जुगुल व सिरिगुप्प नावाची गावे कोप्पेश्वराला दान मिळालेली होती तीही मंदीराच्या दुरुस्तीसाठी पुनर्दान केली आहेत.
या पृथ्वीचा स्वामी सिंघण, ज्याच्या कर्तृत्वाने आनंदसमुद्रालाही पोर्णिमेच्या चंद्रामुळे येते तशी भरती येते, ज्याच्या तेजाने सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंध:कार नष्ट होतो, त्याचा विजय असो !
युद्धात ज्या सिंघणाच्या हत्तीच्या मस्तकातून वाहणाऱ्या मदामधे भल्या भल्या राजांच्या ललाटी लिहिले गेलेले भविष्य पुसले जाते त्या सिंघणाचा विजय असो !
या पृथ्वीवर सगळीकडे आनंद नांदो...........’’

दुसरा शिलालेख अंतराळगृहाच्या उत्तर भिंतीवर कोरलेला आहे. मंदिराचे साफसफाई करताना काही वर्षांपूर्वी सदर लेख आढळून आला. या लेखाचे वाचन कोल्हापूरचे श्री अनंत बळवंत करवीरकर व धारवाडचे डॉक्टर रिती यांनी केले.या लेखात कोपेश्वराची स्तुती असून कोपेश्वरला कुसुमेश्वर, कुटकेश्वर या नावाने ओळखतात असे लिहिले आहे. यावर कालतिथी नाही व राजवटीचाही उल्लेख नाही.
    तिसरा शिलालेख नगारखान्यातील दक्षिणेच्या भिंतीत बसवलेल्या वीरगळेच्या पट्टीवर जुन्या कानडीत असून सेनापती बम्मेश याचा मृत्यू संगम खिंडीतील लढाईत झाल्याचे दर्शवितो. यावरही काल किंवा तिथी दिलेली नाही.
  बाकीचे नउ शिलालेख मंदिराच्या बाहेरच्या बाजूने नरपट्टाच्या मूर्ती खाली कोरलेले आहेत. त्यांचे वाचन व संकलन श्री कुंदनगर यांनी केले आहे.शिलाहार राजा विजयादित्य याचा दंडनायक बोप्पण्णा हा होता. त्याने आपल्या राजाची व स्वतःची स्तुती व पराक्रमाचे वर्णन शिलालेखात केलेले असून त्यावर ही काल निर्देश नाही.


    आणखी एका तांम्रपटात कोपेश्वर देवालयाचा उल्लेख आहे. ताम्रपटाचे वाचन श्री श.गो. तुळ्पुळे यांनी केले असून त्याचा सारांश असा, चालुक्य नृपती सत्याश्रयदेव यांचा लष्करी तळ कोपेश्वर देवळाच्या परिसरात भाव संवत्सर, ज्येष्ठ कृष्ण पक्ष सोमवार सप्तमी शकत १०७६ मध्ये होता. मिरज प्रांतातील सलगरे हे गाव करमुक्त करून दान दिल्याचा उल्लेख सदर ताम्रपटात असून सध्या हातावर पट लंडन येथील म्युझियम मध्ये आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 असाच एक एका मूर्तीखाली कोरलेला शिलालेख:
२)  हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात वीरगळावर कोरलेला आहे
 भाषा - कन्नड, लिपी - कन्नड,
 राजवंश राजा :- महामंडलेश्वर भोज देव ( बहुदा हा शिलाहार राजा असावा )
 वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
 सारांश :- या लेखांमध्ये महामंडलेश्वर भोज देव याचा उल्लेख असून संगम खिंडीमध्ये झालेल्या युद्धात निधन पावलेल्या बम्मेश याचाही उल्लेख आहे.
 व्यक्तीनामे :- १) भोजदेव - महामंडलेश्वर २) बम्मेश ( युद्धात मृत्यू पावलेला वीर )
३)  प्राप्ती स्थळ :- हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या बाहेर भिंतीवर हस्त मूर्तीच्या खाली कोरला आहे.
 भाषा व लिपी :- कन्नड
 राजवंश व  राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
 या लेखात विजादित्याचा सेवक बप्पण दंडनायक यांच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे.
 व्यक्तीनामे :- १) विजयादित्य २) बप्पण-  विजयादित्याचा सेवक दंडनायक
४)  हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या मूर्तीच्या खाली भिंतीवर आहे
 भाषा व लिपी :- कन्नड
 राजघराणे, राजा :-उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
 सारांश :- या लेखांमध्ये बप्पण दंडनायक याची स्तुती केलेली आहे
 व्यक्तीनामे :- १) बप्पण दंडनायक
५)   हा लेख खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी  :-कन्नड
 राजघराणे,राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- उल्लेख नाही
सांराश :- या लेखात सेनापती शिरिग याचे सदगुण वर्णन करणे सहस्त्रशीर्ष व दोन सहस्त्र जिव्हा असणाऱ्या शेषासही अशक्य आहे असे नमूद केलेले आहे
 व्यक्तीनामे :- शिरीग सेनापती
६)  हा शिलालेख खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिरातील मूर्तीच्या खाली
 भाषा व लिपी :- कन्नड
  राजघराणे,राजा :- उल्लेख नाही
 वर्षा व तिथी :- उल्लेख नाही
 सारांश :- या लेखात बोप्पणा नामक सरसेनापतीची, त्यांने आपल्या राजाच्या एक छत्राखाली सर्व प्रदेश आणून लोकांना सुखी केल्याबद्दल प्रशंसा केलेली आहे
 व्यक्तिनामे :- बोप्पण्णा ( सरसेनापती )
७) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी :- कन्नड
 राजवंश राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- दिलेली नाही
 सारांश :- या लेखात बोप्पणा दंडनायक याच्या ठिकाणी पाच पांडवांचे गुण एकवटले आहेत असे लिहिले आहे
  व्यक्तीनामे :- बोप्पणा ( दंडनायक )
८) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी कन्नड
 राजवंश राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- दिलेली नाही
 सारांश:- या लेखात उत्पन्नाच्या शौर्याची प्रशंसा केलेली आहे
 व्यक्तीनामे :- बोप्पणा ( दंडनायक )
९) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी :- कन्नड
  राजवंश राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- दिलेली नाही
 सारांश :- हा लेख तोटक आहे सुसंगत अर्थ लागत नाही
१०) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी :- कन्नड
  राजवंश राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- दिलेली नाही
 सारांश:-  या लेखात ज्या व्यक्तीच्या शौर्याची स्तुती केली आहे त्या व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
११) हा लेख खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात हस्ताकार मूर्तीच्या खाली आहे
 भाषा व लिपी :- कन्नड
  राजवंश राजा :- उल्लेख नाही
 वर्ष व तिथी :- दिलेली नाही
सारांश :- या लेखात सिरीयण याची स्तुती केली आहे
व्यक्तीनामे :- सिरीयण

_MG_5217

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 

 


खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीरावरील शिखर मुळ स्वरुपात अस्तित्वात असताना कसे दिसत असेल याचा काल्पनिक फोटो

 सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. मुळ शिखर कसे होते याची साधारण कल्पना येण्यासाठीच म्हणून कि काय, शिखराचा थोडासा भाग आजही अस्तित्वात आहे. त्यावरुन आपण मुळ शिखर कसे होते ? याची फक्त कल्पनाच करु शकतो.मंदिराच्या वरील बाजूस भूमीज नागर शैलीच्या लहान शिखरांची आडवी मालिका आहे. यालाच 'मेखला' अशी संज्ञा आहे.

 मंदीराची बाह्यभिंत अथवा मंडोवर :-

या देवळाचा तलविन्यास (नकाशा ) बघितलात तर आपल्या असे लक्षात ये़ईल की गर्भगृह, अंतराळ व गुढमंडप या तिन्ही मंडपाचा आकार बाहेरुन एखाद्या चांदणी सारखा आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीवकामाने परिपूर्ण आहे. मंदिराच्या बाह्यांगावर स्थापत्य रचनेचे वेगळेपण पाहिले म्हणजे डोळ्यात भरणारी, क्वचित स्तिमित करणारी, एकमेवाद्वितीय म्हणावी अशी रचना आहे. या मंदिराची बाह्य बाजू देखणी शिल्पसमृद्ध आहे. यावरील मानवी शिल्पे आणि देवता देवदेवतांच्या मूर्ती 'देखता डोळा| बैसाव्या मनी' अशा आहेत.
 या मंदिराच्या बाह्यांगाचे तीन भाग होतात. अधिष्ठान (ओटा व चौथरा) मंडोवर ( बाह्य भिंत ) आणि शिखर. कोपेश्वर मंदिराच्या अंतर्भागाचे वेगळेपण पाहिलेच आहे तसेच वेगळेपण बाह्यभागाचेही आहेत. ही सर्व वैशिष्ट्य आहेत या मंदिराची !
 अधिष्ठान हे मंदिर ज्या ओट्यावर उभारलेले आहे तो भाग म्हणजे अधिष्ठान. सन १९२७ पर्यंत हा भाग जमिनीमध्ये गाडला गेला होता.  आता याचा जो भाग उघडकीस आला आहे त्यात खुर, द्विस्तर पद्म, अंतरपट्टी, रत्नरूपकयुक्तपट्ट, पूर्वपट्ट आणि गजखर या घटकांची योजना केलेली आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. या देवळाच्या बाह्य भिंती नखशिखांत मूर्तींनी मढविलेल्या आहेत. बाह्य बाजू मुख्यत्वेकरून खूरशिळा, गजपट्ट, नरपट्ट व त्यावर असलेले नक्षीकाम, त्यावर छत अशी विभागली गेलेली दिसते. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूच्या भिंतीमध्ये उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूला देवकोष्ठ व त्यावर छोटे शिखर दाखविले आहेत.  मंडोवराच्या मागे व पुढे अशी प्रक्षेपणामुळे छाया प्रकाशाच्या माध्यमातून त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.मंदिर जंगा ( भिंती ) या तीन आडव्या विभागात विभाजित केल्याचे जाणवते. मंदिराच्या बाहेरूल बाजूस डोळे दिपविणारी कलाकृती आहेत .कोपेश्वर मंदिराच्या बाहेरील बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर असलेल्या वेगवेगळ्या शिल्पांवर जैन शिल्पकलेचा प्रभाव आहेच. मंदिराच्या शिल्पपट्टीत महावीरांचे एक शिल्पही आढळते. मंदिराच्या प्राकारात एक दिगंबर तीर्थंकरांचे ध्वस्त शिल्प आहे. साहजिकच या मंदिरात गौतम बौद्ध व महावीर यांची शिल्पे आढळतात. संपूर्ण मंदिर हे ९२ हत्तीवर उभे आहे.या गजपट्टीवर नरपट्ट आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही नरपट्टवर उभं राहू शकता.
    अशा या मंदिराच्या बाह्य भिंतीवर अगदी अधिष्ठानापासूनच मूर्तीशिल्पांची रेलचेल दिसते. या नरपट्टात शिवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत तर विष्णूचे दशावतार केशव, नारायण मूर्ती तसेच शेषशायी इत्यादी प्रकारच्या प्रतिमा आहेत. त्यात अर्थातच शिवमुर्ती अधिक आहेत. शिवाच्या व्यक्तिमत्वात बराच विरोधाभास आहे. मंगल आणि अमंगल तसेच सौम्य आणि रौद्र सहांरक (महाकाल )आणि सुखनिधान (सदाशिव ) भयंकर आणि आशुतोष ( तात्काळ प्रसन्न होणारा )असा तो आहे. येथे त्याच्या 'एवमपूर्णविशिष्ट' कारी मूर्ती आहेत. भैरव, नटराज, लकुलीश, उमामहेश्वर अर्धनारीश्वर, भिक्षाटनशिव या मूर्ती देखण्या आहेत. या सर्व मूर्ती शिवाय विष्णूचाही अनेक प्रकारच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात.
   तसेच अष्ट दिकपालाच्या पत्नीचे म्हणजे दिक देवींचे स्वतंत्रपणे केलेले शिल्पांकन, स्वतंत्रपणे दाखवलेले नवग्रह, दशाश्वरथी ( दहा घोड्यांच्या रथावरचा ) चंद्र, दुर्मिळ धन्वंतरी आणि विविध विभ्रमांनी सुशोभित अशा सुरसुंदरी यांच्या अप्रतिम प्रतिमा आढळतात.याशिवाय पार्वती, लक्ष्मी, गजलक्ष्मी, सावित्री यांच्या मूर्ती येथे आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर अशा मूर्ती आढळतात, मात्र या मंदिरांच्या वैशिष्ट्य असेल की येथे अष्टदिक्पालांच्या सपत्नी प्रतिमा तर आहेतच पण दिग्देवींच्या स्वतंत्र प्रतिमाही आहेत, असे इतरत्र आढळत नाही. धन्वंतरीची प्रतिमा आहे केवळ याच मंदिरावर आढळते. आता बोलूया काही प्रसंग शिल्पाकृतीकडे ! येथे महाभारतातील एक प्रसंग प्रत्यकारीपणे दाखवलेला आहे. द्रोपदी आपल्या मोकळ्या केशव संंभाराकडे निर्देश करून प्रतिज्ञेची आठवण करून देते आणि गदादारी भीम मिशीवर बोट ठेवून स्वतःच्या पराक्रमाची ग्वाही देतो. दुसऱ्या प्रसंगशिल्पात हनुमान अशोकवनातल्या सितेला राममुद्रात देतो आहे. आणखी एका प्रसंगात रति आपले दोन्ही हात पसरून समोर उभ्या असलेल्या मदनाला जणू सांगते 'तुझ्या वाऱ्यालाही उभे राहणार नाही, हे मंदिर आहे ना !'

 
 
 



a

 Agni on ram Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
मेंढ्यावर आरुढ झालेला अग्नी 
 
 

मंदीराची शिल्पकामाने नटवलेली बाह्यभिंत किंवा मंडोवर
 _MG_5219
 मंदीर जंघावर ठराविक ठिकाणी नागर शैलीतील शिखरे कोरण्यात आलेली आहेत.
 
 
 
 
 
  
Mandovar Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 मंदिराच्या सर्वात वरच्या विभागात असणाऱ्या शिल्पांच्या वर शंकूच्या आकाराची, एकावर एक कडी ठेवून रचना केलेली शिखरवजा छत्रांची योजना आढळते. अशीच योजना जिनालयात जिनांच्या मस्तकावर आढळते. वरील तिसऱ्या विभागात देवादीकांच्या लहानग्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. हा वरील विभाग जणू खालील दोन विभागांवर किरीट चढवल्याप्रमाणे दिसतो. याच वरील विभागातील शिल्पे लहान असली तरी त्यांचे सौष्ठव वाखाण्याजोगे आहे.
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

 
 खिद्रापूरचा कोपेश्वर
 
 
 

मंदीराच्या बाह्यभिंतीवर असलेले देवकोष्ट


_MG_5229
_MG_5261
Kpoeshwar Khidrapur, Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

Makara Pranal (Water outlet) Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

 कोपेश्वराच्या शिवपिंडीवर अभिषेक केलेले पाणी बाहेर जाण्यासाठी जी व्यवस्था असते, त्याला निरनिराळ्या प्रकारची मुख असतात. इथे आपल्याला मकरमुख दिसते. याला मकरप्रणाल म्हणतात. मकर म्हणजे मगरमुख वापरण्याचे कारण म्हणजे मगर हे वरुणाचे वाहन आहे. काही अभ्यासकांच्या मते मगर हे गंगेचे वाहन असल्यामुळे मकरमुखातून आलेले पाणी हे गंगाजल स्वरुपात बाहेर येते. हे पाणी चांदणीच्या आकाराच्य कुंडात साठवले जाते.आज मगरीचे मुख भग्न झाले आहे. तारकाकुंड मात्र तुम्ही  फोटोत पाहू शकता.
_MG_5249
 ब्रम्हदेवाची मुर्ती
विष्णु मुर्ती
_MG_5213
 
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 

 
2017-05-29_12.08.22
 
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
इराणचा राजा खुश्रो दुसरा याने पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. त्या प्रसंगाची आठवण म्हणून व्यक्तीशिल्प तिथे कोरलेले आहे.  फोटोत ते पाहू शकता.
डोक्यावर माळ बांधलेली व गळ्यात उपरण्यासारखे वस्त्र असलेला माणूस पर्थियन असावा. कारण त्यावेळे त्यांची बरीच येजा होत होती.हे अरबी / इराणी म्हणजेच पार्थियन व्यापारी लोक असावेत.

शिलाहारांनी त्यांना मशिदी बांधण्यासाठी अनुमती देऊन त्यासाठी दाने सुद्धा दिली होती. तर दक्षिण कोकणच्या अवसर (तिसरा) याने दोन व्यापार्‍यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती असा उल्लेख त्याच्या एका ताम्रपटात आहे.

याच परदेशी माणसाच्या शेजारीच एका मंगोलियन माणसाचे शिल्प कोरलेले आहे.


अफगाण राजाने पाठवलेल्या नजराण्याची आठवण म्हणून हे अफगाण राजाचे शिल्प फोटोत दिसते आहे.
 
दक्षिण, पश्चिम, उत्तर बाजूवर तीन ठिकाणी नंदीची शिल्पे आहेत नंदीवर शंकर व पार्वती विराजमान आहेत नंदीच्या दोन्ही बाजू द्वारपाल आहेत. शंकर पार्वतीच्या उजव्या बाजूला ब्रह्मा व डाव्या बाजूला विष्णू गजारुढ आहेत.मंदिराच्या दक्षिण-उत्तर अंगाला ऋषभ जोडलेले रथ आहेत. रथात दंपती. शिव-पार्वती वाटत नाहीत, पण तीच अपेक्षित असतील का? विवाहानंतरची नवथरता चेहऱ्यावर दिसते. दक्षाघरी यज्ञाला जाण्याआधीची शिव-पार्वती असतील का ही? मंदिराच्या मागे भिंतीवर नंदीवर आरुढ शिव-पार्वती शिल्पित आहेत.  तिन्ही ठिकाणी शंकर पार्वतीचे शिल्पे नंदीचे शिल्प त्यांच्या अलंकार सर्व आभूषणे इत्यादीचे रचना समान नसून विविधतेने नटलेली आहे. उत्तर बाजूच्या शिल्पात शंकराच्या गळ्यात वळवळणारे सर्प आहेत. पश्चिमेच्या शिल्पात गतिशील नाग आहे दक्षिणेच्या शिल्पात नंदीचे अलंकार अत्यंत आकर्षक आहेत.
   मंदिराच्या समोर नंदी नसला तरी, भद्रावरील देवकोष्ठात नंदीचे दर्शन होते, तेही शिव-शक्तीसह. नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा. त्यांना शेत नांगरताना मिळालेला. नंदीने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांने त्याला आपले वाहन केले आणि आपल्या गणांचे नायकही बनवले. शंकराचा निस्सीम भक्त, देवाची सर्व कामे करणारा निष्ठावंत सेवक. शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचेच एक नाव सांगितले आहे. नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशा नामांनी त्याची ओळख आहे.
 ही रचना गजपट्टावर आहे. वर नरपट्टात मंदिराच्या स्थापत्य शास्त्राला शोभा देणारी देवडी ( चौकटीचा आतील भाग ) म्हणजेच देवकोष्ट कोरलेला आहे. 
 Ganapati On Outer Walls of Kopeshwar
  दक्षिण दिशेला दक्षिणाभिमुख अशी श्री गणेशाची मोठी मूर्ती आहे. पश्चिमेला पश्चिमाभिमुख असणारी दुर्गेशनंदनी भवानीची मूर्ती आहे. या राजस्थानी शैलीच्या शैलीच्या शिल्पामुळे हा कारागीर राजस्थानी कलेची जाण असणारा असावा असं वाटतं.इथे असणाऱ्या असंख्य मूर्ती चकचकीत झीलई दिलेल्या आढळतात. पश्चिम दिशेला असणाऱ्या एका मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा झोक मागील बाजूला गेलेला असल्याने तिचे गळ्यातील दागिने मात्र पुढे सरकलेले आहेत. कित्येक मूर्तीवरील वस्त्र पारदर्शक असल्याचा भास कोरीव कामातून साध्य केलेले आहे. मंदिराच्या उत्तर भागात श्री सरस्वतीची एक मोठी मूर्ती आहे. ही चतुर्भुजा मूर्ती पद्मासनावर बसलेली असून डोक्यावर करंड मुकुट धारण केलेला आहे. अंकुश, पाश, रुद्राक्षमाळा व पोथी अशी तिची आयुधे आहेत. कानातील कुंडले, पायातील पैंजण, हातातील कंकणे, गळ्यातील रत्नहार या गोष्टी अतिशय बारकाव्यासह नीट कोरल्या आहेत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
     नरथरावरती काही मूर्ती वाद्य वादन करत आहेत. काही मूर्ती वेगवेगळ्या हावभावाच्या आणि नृत्य करण्यात मग्न असणाऱ्या आहेत. काही नग्न आहेत, काही शृंगारमग्न आहेत. याच थराच्या खाली व वर काही मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवलीलामृतामधील काही प्रसंग, तांडव नृत्य करणारा शिव,अंधकासुरवध, गंगा पार्वती सह शंकर अशा मूर्ती शिवाय विष्णु संदर्भातील काही शिल्पे इथे आहेत.
   प्राचीन काळापासून लोकश्रद्धेत स्थान मिळवून बसलेल्या यक्ष-यक्षींची योजना भारतीय शिल्पकारांनी वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते. मंदिरशिल्पात यक्ष-यक्षीला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पौराणिक कथांमधून यक्ष-यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी दिलेली दिसते. यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. या मंदिरावरही ती दिसेल. एका यक्षाला भक्तांकडून हळद-कुंकू वाहिलेलेही दिसते. 
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra


Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

बासरीवादक
 

Simple, Free Image and File Hosting at MediaFire




 
 
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
      स्त्री-पुरुषांच्या शरीरसौष्ठवाची किंवा त्यातल्या आदर्शाची कल्पना इथली शिल्पकला बघीतली कि येते. ते फारसे बदललेले नाहीत.या शिल्पातल्या ललनांमध्ये पूजेसाठी जाणाऱया ललना आहेत, नर्तकी आहेत. मुख्य म्हणजे नर्तकींच्या वेगवेगळय़ा मुद्रा आहेत. हे मंदिर पाहताना आणखी एक त्या काळातली सामाजिक जाणीव होते ती म्हणजे स्त्री ही फक्त घरात कोंडलेली पुरुषाची छाया नव्हती. ती पुढे मध्ययुगात झाली. ती या मंदिरात द्वारपालाच्या भूमिकेतही दिसते.
  स्त्रियांशिवाय तेथे ध्यानस्थ मुनी दिसतो. अरब देशांतून आले असावेत असे ढगळ कपडय़ांतले पुरुष दिसतात,येथे दाखवण्यात आलेली स्त्री-पुरुषांची वेशभूषा व त्यांनी धारण केलेले अलंकार हा अभ्यास करण्याचा विषय आहे. केशरचनेचे अनेक अलंकार व प्रकार येथे दिसतात. त्याकाळचे पुरुष केस राखीत असत, बांधत असत, शृंगारित असत, हातात कडी तोडे घालीत असत. अनेक प्रकारचे जानवी त्याकाळी वापरात असत. साध्या धाग्याच्या जानव्यापासून ते जाड साखळीच्या जानव्यापर्यंत अनेक प्रकार येथील स्त्री पुरुषांच्या अंगावर दिसतात. स्त्रियांच्या अलंकारांचे अनेक प्रकार येथे आहेत बोटातल्या अंगठ्या आहेत, हातातली कंकणे आहेत, कडी व तोड्याचे अनेक नमुने आहेत. पायातील पैंजणाचे, तोड्याचे, पायाच्या बोटातील जोडव्याचे अनेक प्रकार व दागिन्यांच्या मालिकाच येथे पाहिल्यास मिळतात. ललनांच्या गळ्यात रुळणारे अनेक मौल्यवान हार येथे आहेत. गळपट्टी सारखे लहान हार ते बेंबीपर्यंत रुळणारे मोठे हार व त्यांचे अनेक प्रकार येथे आहेत. धातूंचे हार तसेच पुष्पहारही दिसतात. दंडात बाहुभूषणे आहेत. त्यांचेही अनेक प्रकार बारकावे आहेत.
    त्याकाळी वापरत असलेले एक बहुउपयोगी प्रवासातील साधन येथील शिल्पात स्त्री-पुरुषांकडे पाहायला मिळते. खांद्यावरील जाड काठीला एका बाजूला त्रिशुळासारखे शस्त्र व दुसऱ्या बाजूला लटकवलेली सामानाची झोळी असे या साधनाचे स्वरूप आहे. प्रवासातील साहित्य नेण्यासाठी व प्रसंगी शस्त्रासारखा याचा उपयोग होत असे. रामायणातील प्रसंग येथे आहे. हनुमान भेटीचा पहिला प्रसंग, हनुमान सीता भेट, पंचतंत्र व महाभारतातले प्रसंग येथे दाखवले आहेत.
       कडेवर बालक घेतलेली माता येथे आहे. मातेचा हात हाती घेऊन चालणारे बालक आहे. युद्धावर निघालेला वीर इथे आहे. हस्तरेषा वरून भविष्य जाणून घेत इच्छिणारा माणूस व भविष्य सांगणारा पंडित येथे शिल्पात आहे. विष्णूचे दहा अवतार आहे.हातात धनुष्य आणि भात्यात असलेले पाच बाण यावरून कामदेव आणि रती ओळखता येतात
 त्याकाळी चालत असलेल्या तांत्रिक पंथातील उपासकांची दैवत व दैवतांची शिल्प येथे आहेत. डोक्यावर सर्प हातात सर्प दंडावर व अंगावर माळा अशा स्वरूपातील उपासक येथे आहेत. नरमुंडमाळा गळ्यात घालणारा काळभैरवाची तसेच गणपती, सरस्वती, महिषासुरमर्दिनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांची दर्शनीय शिल्प येथे आहेत.काही शिल्प हि इतक्या आतील बाजूस कोरलेली आहेत कि त्यांची मूळ लकाकी अजून बऱ्यापैकी अबाधित आहे.ती बघून आपण पूर्वीच्या सौन्दर्याचा अंदाज नक्की लावू शकतो.खऱ्या अर्थाने काळा बेसॉल्ट आपल्याला पहायला मिळतो.
शस्त्रांचे अनेक प्रकार, खडगाचे अनेक प्रकार, तलवारीचे व ढालीचे प्रकार व आकार इथे अभ्यासण्यासारखे आहेत.
  त्याकाळी वापरात असलेली वाद्य व त्यांचे आकार येथे पहावयास मिळतात. डमरुवादक आहे. वीणावादक आहेत. बासरी वादक आहेत. ढोल वादक आहेत. सनई व भोंगळा वादक आहेत. टाळ वादक आहेत, झांजवादीका आहे. एका हातात झेंगटी व दुसऱ्या हातात खुंटी अशा वादिका आहेत. तेथे ते वाद्य वाजवताना होणाऱ्या शारीरिक हालचालीच्या बारकावे बघायला मिळतात. भोंगळा वादकाचे गाल फुगलेले आहेत. तिरंदाजी दाखवणार्या शिल्पाचा डोळा मिटलेला आहे. जेव्हा आपण बासरी वाजवणारे ओठ पाहतो. ती टोकदार ठेवण हुबेहूब दगडात चितारलीय. . 
    हे मंदिर उभारण्याचे काम सुरु असताना विविध देशातील राजांनी बलाढ्य पुलकेशी राजाला नजराणा पाठवून मैत्रीचे नाते घट्ट केले होते. पुलकेशी राजाबद्दल सामर्थ्य आणि सद्गुणाचे गौरवोद्गार त्याकाळी आलेला चिनी प्रवासी युवन श्वांगने काढले, जे त्यावेळी लिहून ठेवले आहेत. इराणचा राजा खुश्रो दुसरा याने सुद्धा पुलकेशी राजाला नजराणे पाठवले होते. नेमके त्याचवेळी कोपेश्वर मंदिर बांधणारा स्थापत्य विशारद तेव्हा दरबारात हजर होता आणि म्हणूनच या प्रसंगाची आठवण म्हणून इराण आणि आखातातील व्यक्तीशिल्प तिथे कोरलेली आढळतात. मनापासून केलेली मेहनतीत सौंदर्य खुलते, त्याचा साक्षात्कार इथे होतो. जीव ओतून तयार केलेली हि शिल्प जिवंत असल्याचा भास होतो. इराणी,चायनीज,अरेबिक लोकांची शिल्प लक्ष वेधून घेतात.त्यांच्या लांब दाढ्या आणि पिळदार मिश्या अतिशय हुशारीने रेखाटल्या आहेत. याचबरोबर मंदिराच्या बाह्यांगावर पठाणी व्यक्ती,कुबेराची शिल्पे,अगस्ती मुनी आणि आदिमानव इत्यादी प्रतिमा कोरलेल्या आहेत.हातात चिपळ्या धरलेले किन्नर,विष्णू,गायत्री,तसेच वीरभद्राचे शिल्प असे नानाविध सुंदर शिल्प येथे कोरलेली आढळतात.दक्षाच्या यज्ञाचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या वीरभद्राने छाटलेले दक्षाचे मुंडके घेऊन उभे राहिलेले शिल्प अत्यंत कोरीव आणि देखणे आहे.सहाव्या शतकात देखील पेशवेकालीन पगडीतील कोरलेल्या व्यक्ती अचंबित करतात. 
      महाकालीचे शिल्प,अश्वारूढ असलेले कल्की,दर्पसुंदरी आणि पृथ्वी वराह यासारखी शिल्पे अविश्वसनीय आहेत.रामाने रावणाला शेवटचा बाण मारला  त्यावेळची रामाची मुद्रा खुबीने कोरलेली पाहण्यास मिळते.रामाने दिलेली अंगठी घेताना आणि ती सीतेपर्यंत पोहोचवितानाचा प्रसंग आपल्याला थेट रामायणात घेऊन जातो.गजांतलक्ष्मी बरोबरच,हत्तीच्या पायी देण्याच्या शिक्षेची पद्धत मंदिराच्या उजव्या बाजूला कोरलेली आढळून येते.भिकबाळी घालतानाच्या मुद्रेतील स्त्रीशिल्प तेव्हाच्या रसिकतेची छाप सोडून जाते.शिव तांडवाचे शिल्प तसेच अर्धा देह शंकर आणि अर्धा विष्णू यांचे शिल्प अवाक करून सोडणारे आहे.उजव्या बाजूने पुन्हा स्वर्गमंडपाकडे येतेना भिंतीवर बौद्ध भिक्षुक कोरलेला आढळतो.त्या काळातही 'हाय हिल परिधान केलेल्या स्त्रियांचे शिल्प, तल्लीन होऊन गाणारी स्त्री गायिका यांची शिल्पे आश्चर्यकारक आहेत. दुःशासन आणि द्रौपदीचा भर दरबारातील प्रसंग मोठ्या शिताफीने कोरलेला आहे.राम लक्ष्मण आणि सीता यांचे वनवासातील दृश्य,आळसावलेली स्त्री,गजारूढ इंद्र,एडक्यावर स्वार झालेला अग्नी हि शिल्पे भारतीय पौराणिक संस्कृतीचे दर्शन घडवतात.धन्वंतरी,पुत्र वल्लरी आणि पुत्रवल्लव तसेच सुरसुंदरी यांची शिल्पे मंदिराच्या बाह्य भिंतींवर रेखाटलेली आहेत.राजस्थानी बंजारन,नदीवरून निघालेली वरात,कीर्तिमुख आणि रेड्यावरचा यम यासारखं  कोरीव शिल्प मन मोहून टाकतात.

गर्भगृह व गुढमंडप चांदणीच्या आकाराच्या पायावर उभे असल्यामुळे जेव्हा आपण बाहेरुन या भिंती बघतो तेव्हा आपल्याला एक मूर्ती समोरुन दिसते तर एक मूर्ती बाजूने दिसते. (प्रकाश चित्रे बघताना हे अधिक स्पष्ट व्हावे) त्यांच्या सावल्यांचा खेळ फारच मजेदार दिसतो.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे देऊळ प्रकाशाच्या वेगवेगळ्या योजनांमधे बघायलाच पाहिजे. म्हणजे सकाळी, दुपारी व संध्याकाळी सूर्य मावळताना.
भिंतींवर अनेक सुरसुंदरींची शिल्पे मोठ्या डौलाने उभी आहेत. त्यांच्याकडे बघताना काही तर स्वर्गातील अप्सरा तर येथे अवतरल्या नाहीत ना असा भास होणे असंभव नाही. यातील काही वाद्ये वाजवत आहेत तर काही नृत्य करत आहेत. त्यातील काही शिल्पांचे रसग्रहण आपण पुढे करणारच आहोत. दक्षिण भिंतीवर गणपती आहे तर उत्तरेच्या भिंतीवर सरस्वती. याच भिंतींवर महिषासुरमर्दिनी, भैरव, विष्णू, ब्रह्मा इ. देवतांच्या मूर्ती आहेतच.

 Simple, Free Image and File Hosting at MediaFire

सरस्वती:

ही मूर्ती जराशी उंचावर असल्यामुळे मूर्तीभंजकांच्या तावडीतून सुटली असावी. भारतीय मूर्तीशस्त्रात सरस्वतीची एकंदरीत बारा रुपे पहायला मिळतात. त्याप्रकारात तिच्या हातात असलेली आयुधांवरुन तिची नावे पडलेली आहेत. उदा. महाविद्या सरस्वती : हिच्या हातात अक्षमाला, पद्म, वीणा व पुस्तक असते. पण सर्व प्रकारात मला वाटते पुस्तक असतेच. ही मूर्ती पद्मासनात बसलेली असून तिच्या मस्तकावर तिने मुकुट धारण केलेला दिसतो. एका हातात अक्षमाला असून दुसऱ्या हातात एक पोथी दिसते. (इथे दिसत नाहे) एका हातात पाश आहे तर दुसऱ्या हातात अंकुश आहे. गळ्यात सुंदर दागिने घातलेले असून पायातही दागिने घातलेले दिसतात. महाराष्ट्र व कर्नाटकात वीणाधारी सरस्वतीचे शिल्प फार दुर्मिळ असते.
एका राजपुत्राचे शिल्पही उल्लेख करण्याजोगे आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
राजपुत्र ‘

या मूर्तीचा मुकुट बघण्यासारखा आहे. शिलाहार शिल्पकलेचा हा एक चांगला नमुना म्हणावा लागेल. काही हलकीफुलकी शिल्पही दिसतात.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उदा येथे एक नाचणाऱ्या स्त्री-पुरुषाचे शिल्प कोरलेले आहे.

हे शिल्प एका कोपऱ्यावर कोरलेले असल्यामुळे एका भिंतीवर एक व दुसऱ्यावर एक अशी रचना असली तरीही ते एकच वाटते. शंकराचे देऊळ असले तेरीही शिल्पकाराला इतर देवतांचे विशेषत: विष्ष्णूचे वावडे दिसत नाही. ब्रह्मा, विष्णू, महावीरांच्याही मूर्ती देवळाच्या भिंतींवर विराजमान आहेत. गुढमंडपाच्या दक्षिण द्वारावर एक महावराहावताराची मूर्ती आहे. 

  दक्षिण भारतात नाग अनंताची पूजा मंदिराच्या प्राकारात केलेली आढळते. या मंदिराच्या प्राकारातही बाहेर एका वृक्षातळी भंगलेले शिल्प आढळते. नाग हे काळाचे प्रतीक आहे. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो, वेगाने पुढे सरकणाऱ्या काळासारखा. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाला अंत नाही म्हणून तो अनंत. म्हणूनच नागालाही अनंत म्हणतात. हा नागपुरूष सर्वांवर कृपाक्ष ठेवून असतो. तोच विष्णूसाठी शय्या होतो आणि शिवाच्या गळ्यात डोलतो.
  या देवालयाच्या परिसरात येथे उपयोगात आणलेल्या दगडासारखा प्रस्तर दिसत नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या शिळ्या येथे वाहून आणून मग त्यातून शिल्पे घडवली व हे प्रचंड मोठे मंदिर बनले. कोल्हापूर जवळील ज्योतिबाच्या डोंगरातून या शिरा येथे वर राहून आणल्या असाव्यात असा जाणकारांचा कयास आहे. अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले. त्याकाळी वास्तुविशारदांनी देऊळ उभारले आणि मग ते नशिबावर हवाला ठेऊन बघत बसले असे नव्हते. त्यांचे नशीब ते देऊळ टिकले असे नसून त्यांनी प्रत्येक गोष्टींचा पूर्ण विचार केला असणार हे निश्चित. या देवळाचे आरेखन करताना एक एक तुकड्याचा विचार करताना या वास्तूविशारदांनी त्यांचा व्यापक दृष्टीकोन सोडला नव्हता हे लक्षात येते. सगळे बांधकाम वजनदार दगडाचे आहे हे लक्षात घेता सगळ्या वास्तूचा समतोल राखण्यासाठी त्यांना काय काय करावे लागले असेल याची आपण कल्पना करु शकतो. हे काम किती अवघड असेल हे कळण्यासाठी फक्त तुम्हाला हे देऊळ बांधायचे आहे तर सुरवात कुठून कराल असा विचार करायला घेतलात की बस्स !

गजपट्ट :-
   गजपट्टामध्ये ९२ हत्ती असून, प्रत्येक हत्तीचे शिल्प बारकाईने पाहिले असता वेगवेगळे असल्याचे दिसून येते. हत्तींनी हे देवळाचे वजन पेलल्याचा आपल्याला भास होतो. तसेच हत्तीच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवता दर्शविल्या आहेत. गजवैभव व मंदिरशिल्प ही भारतभऱ जाणवणारी जोडी आहे.या देखण्या अधिष्ठानावरील हत्तींची रांग प्रेक्षणीय आहे संपूर्ण मंदिराला विळखा घालणारे हे हत्ती अर्धा मीटर उंचीचे असून प्रत्येक हत्तीच्या हालचालीत वेगळेपण आहे.
 येथील गजथरातील ब्यान्नव मोठ्या हत्तींवर वेगवेगळ्या देवदेवता आरुढ आहेत. हा गजपट्ट बरोबर आपल्या नजरेच्या पातळीवर येतो. त्यामुळे त्याचं सौंदर्य जवळून न्याहाळता येतं. ती शिल्पं तयार करणं कारागिरांना शारीरिकदृष्टय़ा इतर शिल्पांपेक्षा सोपं झालं असावं म्हणून कदाचित त्या शिल्पांत बारकावे जास्त पाहायला मिळतात.हत्तीच्या दागिन्यांची नक्षी वेगळी आहे. दुर्दैवाने या हत्तीचे बरेचसे नुकसान झालेले आढळते. हत्तीवर बसलेल्या देवतांचे अलंकार, त्यांचे पोषाख, त्यांच्या हातातली शस्त्र अगदी ठळकपणे दिसतात. काळय़ा कातळात ती कोरताना किती कष्ट पडले असतील आणि किती काळजी घ्यावी लागली असेल! कारण तिथे चुकीला दुरुस्ती नाही. एक गोष्ट जाणवते की, हत्तींनासुद्धा योद्धय़ाप्रमाणे नटवलं जाई. त्यामुळे हत्तीच्या गळय़ात अलंकार दिसतात. हत्तीच्या गंडस्थळासाठी आणि सोंडेसाठीही अलंकार होते हे जाणवतात. हत्तीवरच्या बैठकासुद्धा कलाकुसरीने समृद्ध असत. त्या काळातल्या श्रीमंतीचं दर्शन जेवढं या शिल्पांतून होतं, तेवढंच दागिने तयार करण्याच्या कलेचं आणि रसिकतेचंही होतं. दीड हजार वर्षांपूर्वीचं हे समाजजीवन आहे. हिंदुस्थानातून सोन्याचा धूर वगैरे निघायचा म्हणतात तो हाच असावा. येतील हत्तीची आभूषण आहे नंदी व अश्वाला त्याकाळी घालण्यात येणारा साज आजही आपल्याला आकर्षण घेतो. हत्तीचे नैसर्गिक विभ्रम येथे जितके पाहायला मिळतात तितके अन्य तर कुठेही नाहीत.
 _MG_5222
 _MG_5226
 _MG_5210
तळटीप : वॉट
दक्षिण बाजूकडील गजपट्ट
गजपट्टावरील हत्ती    नंदी पे सवार शिव-पार्वती
नंदी पे सवार शिव-पार्वती



Elephants of Khidrapur Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra


Harihar Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
हरिहर
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
सुर्य
Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 Gaja-Thar and Nara-Thar on Outer Walls
 
 Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
 
 सुरसुंदरीं :-
   कोपेश्वर मंदिराच्या आणखी एक वैशिष्ट्य आहे ज्यामुळे हे अत्यंत देखणी ठरते. शास्त्र सांगते मंदिरात जाण्याआधी बहिर्देव पूजा केली पाहिजे. म्हणजे मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवप्रतिमांचे दर्शन घेतले पाहिजे. हे करतानाच येथील सुरसुंदरी काय सांगतात हे लक्षात ठेवले पाहिजे तरच गावातील देवाचे दर्शन सफल संपूर्ण व्हायचे असते. सुरसुंदरी म्हणजे आपसात असतात शिल्प शास्त्राप्रमाणे या एकूण ३२ आहेत. पैकी येथे २३-२४ आढळतात.अशा युवती अर्थातच कमनीय आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरींची शिल्पे देखणी आहेत. येथे जी स्त्रियांची शिल्पे आहेत त्यांना सुरसुंदरी अशी उपाधी आहे. या स्त्रिया वाद्ये वाजवताना दिसतात, नटताना दिसतात, नृत्य करताना दिसतात तर काही पत्र लिहितानाही दिसतात. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. सुरसुंदरी म्हणजे अप्सरा अथवा पर्‍या असाही समज आहे. समुद्रमंथनातून त्या बाहेर आल्या असेही अनेकजण मानतात. या सुरसुंदरी मंदिराच्या भिंतीवर आवर्जून कोरण्यात येतात. आपल्याला शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध या विषयांनी ग्रासलेले असते. या विषयांत मन न गुंतवता, मंदिरात जातांना सावध चित्त असावे, असे  या सुरसुंदरी सुचवतात. तसेच, यातील काही जणी देवदर्शनाला जातांना देवाला काय अर्पण करावे, देवदर्शनाला कसे जायचे असते याचेही मार्गदर्शन करतात. रिक्त हस्ते देवाला जाऊ नये. पाने, फळे, फुले असे काहीच जवळ नसेल तर मनोभावे केवळ जलही अर्पण केले तरी चालते.
• मृदंगवादिनी – मृदंग वाजवणारी मदनिका, जीला मर्दला सुध्दा म्हणतात
• विषकन्या – हाता,पायावर विषारी सर्प गुंडाळलेली आणि नग्न असणारी मदनिका
• शुक सारिका – हातात पोपट घेतलेली मदनिका
• पत्रलेखा – पत्र लिखाण करत असलेली मदनिका. या मंदीरावर तीन प्रकारच्या पत्रलेखीका आहेत, त्यात एक मदनिका पत्राची सुरवार करणारी, एक पत्र अजून लिहीत असणारी आणि एक पत्राचा शेवट करणारी.
• मरीचिका – हातात धनुष्य घेउन बाण मारणारी मदनिका।
• मर्कटसुंदरी -  एक वानर हिचे वस्त्र ओढत आहे
• चामरवाहिनी – हातात चामर धारण केलेली मदनिका
• नर्तकी – विभिन्न नृत्य मुद्रा दाखवणारी मदनिका
• वीणावाहिनी – वीणा वाजवणारी मदनिका
• शालभंजिका – वृक्षाची फांदी पकडलेली मदनिका
• भुजंग त्रासिता – सर्पामुळे भयभीत झालेली मदनिका।
• कंदुक क्रीड़ा मग्न – चेंडुशी खेळण्यात मग्न असलेली मदनिका
• पिचकारी घेउन रंग खेळणारी मदनिका
   दर्पणा, पुत्रवल्लभा, पत्रलेखिका, कर्पूर मंजिरी, मर्दला इत्यादी महत्त्वाच्या आहेत मंदिरावर असणारे त्यांचे काही प्रयोजन आहे. त्याचप्रमाणे डालमालिका, जया, पद्मगंधा या आपणास मंदिरात जावे कसे हे सांगत असतात. देव, गुरु आणि मान्यवर यांच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असं संकेत आहे. पत्र पुष्प फलतोय घेऊन जावे असे भगवद्गीता सांगते. येथे डालमालिकेच्या हाती झाडाचे पान, जयाचे हाती पाण्याचा कुंभ आणि पद्मगंधाचे हाती फुल दिसते आणि आपणास त्यांचे असणे कळते. वर उल्लेख केलेल्या काही सुरसुंदरींचे प्रयोजन काय ते पाहिले पाहिजे उदाहरणार्थ दर्पणा ही आरशात पाहते आहे असे दिसते काही शिल्पसमीक्षक ते सौंदर्यप्रसादनात मग्न असल्याचे सांगतात. पण मंदिरावर अशा प्रकारे तिला दाखवण्याचे कारण काय हे ते सांगत नाहीत. वस्तुतः समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपण आपणास पहावे हे तिचे प्रयोजन असते. मंदिरात कोण कोणत्या कारणाने जातो इतरांना कळत नाही अशावेळी जाणाऱ्याने आपणासही पहायचे असते. भक्तिभावाने तो जातोय की अन्य हेतु मनात ठेवून, हे त्याचे त्यालाच कळायचे असते, दुसऱ्यांना नाही.
 दुसरी आहे पुत्रवल्लभा आणि तिच्या कडेवर मूल असते. ती संत नामदेवांच्या एका अभंगात देव आणि भक्त यांचे नाते आई आणि मूल यांच्याप्रमाणे असते. 'तू माझी माऊली मी तुझा लेकरू| नको दुरी धरु विठाबाई' असे ते म्हणतात. आणखी एका सुरसुंदरी पत्र लिहिण्यात मग्न असल्याचे दिसते. विरहव्याकुळ भक्ताचे ते चित्रण आहे.
 चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी | सरेना कि ग बाई रजनी काळी काळी ||
       संत ज्ञानदेवांची विरहीणी लक्षात आणून देणारे हे शिल्प आहे.
 येथील आणखी एका लक्षवेधी शिल्पाकडे पाहिले पाहिजे. या शिल्पातून तळणीच्या अंगावरील वस्त्रे ढळली आहे लज्जेन डोळे मिटले आहेत हाताने नैसर्गिक प्रमाण नैसर्गिकपणे लज्जा रक्षण करीत आहेत. त्यांच्या पायाशी असलेली माकड त्यांचे राहिलेले वस्त्र ओढीत आहे. मानवाच्या मार्केट वृत्तीचे दर्शन या शिल्पातून होते. त्या स्त्रीला ती चेष्टा आवडतेय असे भाव तिच्या चेहऱयावर आहेत.माकड जसे चंचल असते तसे मन चंचल असते. 'मन एवं मनुष्यांना कारणम बंध मोक्षयोहो' तेव्हा मंदिरात जाताना मनावर ताबा ठेवायला पाहिजे, हे त्या शिल्पातील सुंदरीचे असे म्हणणे आहे हे लक्षात ठेवूया.
  काही युवतींच्या मांडीला वेटोळे घातलेल्या भुजंगाची शिल्पे आहेत. त्यांच्या हातात कालसर्प आहेत. काहींच्या खांद्यावर जहरी नाग आहेत. त्या युवती ‘विषया’चा (म्हणजेच कामवासनेचा) अतिरेक नको असं दर्शवतात. कामवासनेत लडबडलेला पुरुष सापांच्या म्हणजे मृत्यूच्या जबडय़ात असतो असं त्यांना सुचवायचे आहे.
 मंदिराच्या उजव्या बाहेरील बाजूस पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे शिल्प,तसेच पत्राचे लिखाण मध्यंतरावर आलेले शिल्प आणि त्याच पत्राखाली स्वाक्षरी करणारे शिल्प मोठ्या कलात्मक पद्धतीने कोरलेले आहे.
सुरसुंदरीचे शिल्पे पाहताना मधुरता आणि शृंगारे सुरेखता असल्याचे भासते डोळ्यांना निवणारे, मनाला भिजवणारे, मतीला चालना देणारे आणि भक्तीचे समाधान करणारे हे शिल्प वैभव न्याहाळताना 'सौभाग्य पोखले सुखाचे येत' अशी जाणीव होते हे मात्र खरे.








दर्पण सुंदरी
आलसा
a



       देशभरातल्या अनेक देवळांत जिथे अशी शिल्पं आहेत, तिथे काही प्रमाणात स्त्री-पुरुषांच्या शृंगारमग्न जोडय़ांची शिल्पं दिसतातच. त्यात लाजण्यासारखं किंवा कमीपणाचं वाटण्यासारखं काहीच नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे.
 या सुरसुंदरी देखण्या तर असाव्या लागतात, परंतु त्यांच्यात मानवी भावभावना आणि कार्यमग्नताही असावी लागते. भक्तजनांमध्ये नीतीमूल्ये निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. नृत्यांगना, वादनमग्न सुरसुंदरी देवतांचे मनोरंजन करणार. अप्सरा भक्तांना मंदिराकडे आकर्षित करणार. आपल्या लक्षणांनी गुणांनी सुरसुंदरी भक्तांना इच्छा, वासना, मोह, विकार यापासून परावृत्त करणार आणि त्यानेच भक्तांचा उद्धार होईल, या भावनेने मंदिरासारख्या सांस्कृतिक केंद्रात सुरसुंदरींची योजना मध्ययुगात करण्यात आली होती. या सुरसुंदरींविषयी डॉ. गो. ब. देगलूरकर (सुरसुंदरी, भारतीय विद्याभवन, पुणे केंद्र) यांनी विस्ताराने लिहिले आहे.

पत्र लेखिका.
पत्र लेखिकांची एकूण पाच शिल्पे आहेत. कदाचित पत्र लिहायला सुरवात आणि त्याचा शेवट असा क्रम असावा. त्यातील काही शिल्पांची छायाचित्रे खाली देतो.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Patra Lekhika Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

या स्त्रिया कागदाच्या भेंडोळ्यांवर लिहित असताना दाखविलेल्या आहेत. म्हणजे आपण जुन्या सिनेमात जे खलिते पहातो त्या प्रकारच्या कागदावर. मला वाटते त्या काळात कागदाचे ताव भेंडोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध होत असावेत. त्यांनी अत्यंत नाजुकपणे हातात लेखणी धरलेली आहे. पहिल्या दोन बोटात लेखणी धरल्यावर उरलेली बोटे अत्यंत मोहकरित्या विलग झालेली दाखविलेली आहेत. मानवी आकृत्या काढताना किंवा घडवितांना गुडघ्याची ठेवण (वरून दिसणारी) किंवा कोपराचा बाक व ठेवण काढणे किंवा कोरणे अत्यंत अवघड. विशेषत: कोपराचे टोक ज्याप्रमाणे दिसते तसे आले नाही तर साऱ्या प्रतिमेची रयाच जाते. चित्र किंवा शिल्प मग बेढब दिसू लागते. किंवा ‘फ्लॅट’ होते. असे येथे ही अनेक शिल्पाच्या बाबतीत झाले आहे पण शिल्पकारांनी सुरसुंदरींच्या बाबतीत असे होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. हे आपल्याला वरील छायाचित्रात दिसुन येते. तिन्ही शिल्पात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे परिधान केलेली दिसतात. फॅशन डिझायनरला हे देऊळ म्हणजे कल्पनांचा एक उत्तम स्त्रोत आहे. शेवटच्या शिल्पातील शॉर्ट स्कर्टसारखे दिसणारे वस्त्र आजही लोकप्रिय हो़ऊ शकते ( तो शॉर्टस्कर्ट नाही हे मला माहीत आहे). किंवा ती वस्त्रे व त्याला शोभतील असे दागिने असा एक उत्तम पोषाख हो़ऊ शकतो. असो.

वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिपुरुषांची शिल्पे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
वरील स्त्रीने तिचे केस अंबाडा घालून खाली सोडले आहेत. तसेच तिने केसातही दागिने घातलेले दिसतात. तिच्या हातात एक छोटे मृदूंग दिसत आहे. कोपराजवळ एक दागिना आहे किंवा ती वाकी असावी पण ती दंडावर न घालता बरीच खाली घातलेली दिसते. व खांद्यावरही एक दागिना आहे. असे दागिने मी तरी बघितले नाहीत. शेजारील शिल्पात एक पुरुष मृदूंग वाजवताना दिसत आहे तर त्याच्या शेजारील माणसाची टोपी वेगळीच दिसते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खालील शिल्पात ही स्त्री जे वाजवते आहे ते साधे मृदूंग नाही. याच्या वर चामड्याला ताण देण्याच्या दोऱ्यांखाली सरकत्या खुट्या असतात. एका हाताने हे वाद्य वाजवायचे व त्याचवेळेस त्या खुट्ट्या सरकवून वेगळा ध्वनी निर्माण करायचा असा हा अवघड प्रकार असतो. या प्रकारचे वाद्य दक्षिणेत वाजवत असत पण बहुदा आता कोणी वाजवत नाहीत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खालील चित्रात एक स्त्री विणेसारखे एक वाद्य वाजवताना दाखविले आहे. ती वीणा निश्चितच नाही पण दोन भोपळ्याच्या वाद्यासारखे काहीतरी दिसत आहे. शेजारीच काटकोनातील भिंतीवर एक सुंदर स्त्री नृत्य करताना दिसते. मी मागे म्हटले ते येथे स्पष्ट व्हावे.समजा ती नृत्य स्त्री समोरुन बघितली तर वाद्य वाजविणारी स्त्री बाजूने दिसते. जर ती समोरुन बघितली तर नृत्य करणारी बाजूने दिसते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खालील शिल्पात शेवटी एक नागकन्या दाखविलेली आहे. ती संपूर्ण नग्न असून तिच्या मांडीला सर्पांनी विळखा घातलेला दिसतो व तिने तिचे हातही नागाच्या फण्यासारखे वर पसरलेले दिसत आहेत.


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे शिल्प चक्क एका धनुर्धारी स्त्रीचे आहे. एका हाताने तिने तिचे धनुष्य तोलले आहे तर दुसरा हात भात्याकडे वळलेला दिसतोय. या मूर्तीचे परस्पेक्टीव्ह जरा चुकलेले दिसते....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माझी अत्यंत आवडती दोन शिल्पे.. या दोन शिल्पांवर पडणारा प्रकाश हा केवळ अद्वितीय आहे. याचीही मोडतोड झाली आहे नाहीतर या सुंदरींच्या लावण्याची किर्ती दुरवर पसरली असती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वरील अर्धे छायाचित्र हे पहिल्या शिल्पाचेच आहे. आता ही दोन शिल्पे बघण्याची मजा समोरुन नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. समोरुन ही शिल्पे साधी मान वळवलेल्या स्त्रियांची वाटतात पण मी हे छायचित्र ज्या कोनातून काढले आहे त्या कोनातून बघा मग तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य समजून ये़ईल. दुसऱ्या चित्रात ती स्त्री अचानक मागे वळून बघते आहे व तेही इतक्या मोहकपणे, तिच्या चेहऱ्यावरचे भावही बघण्यासारखे आहेत.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही अजून एक सुंदर स्त्री. यात तिचा कमनीय बांधा आपल्याला मोहवून टाकतो. दुसरे शिल्प एका नग्न स्त्रीचे दिसते.

अजून काही छायाचित्रे.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire



Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra

Kopeshwar Temple, Khidrapur, Maharashtra
देवकोष्ठ















































 जैन मंदिर :-
 हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूर कोपेश्वर मंदीरापेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे तशी आज जतन होत नाही, याचेच फार दु:ख वाटते.
 कोपेश्वर मंदिर व जैन मंदिर हे समकालीन मंदिरे असून शिल्पशात्रातील अनेक दुवे येथे समान आहेत. कोपेश्वर मंदिरावरील शिल्पकलेच्या दर्जाच्या मनाने जैन मंदिरावरील शिल्प दुय्यम दर्जाची आहे. जैन मंदिराच्या उत्तर बाजूवर नरपट्टात दर्शनीय मिथुन शिल्प आहे. इतरत्र कोठेही आढळणारे एक दुर्मिळ शिल्प जैन मंदिराच्या उत्तर बाजूवर आहे. एका तरुणीच्या हातात फणा उभारलेला नाग आहे व डोक्यावर घेतलेल्या उजव्या हातात सर्पाकडे उसळी मरणारे मुंगूस आहे. मुंगसाच्या गळ्यातील दोरी बोटाने ओढून धरलेली आहे.

समारोप

कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य हे प्रत्यक्षात अनुभवण्याची गोष्ट आहे. नुसते वाचून कल्पना करणे कठीण आहे. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून हे खाते मंदिराची देखभाल करते.कोपेश्वर मंदिराची सुलतानी आक्रमणात मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. तरीही त्याचे सौंदर्य कमी झालेले नाही, मग नासधूस झालेली नसताना मंदिर कितीसुंदर असेल, याचा विचार पाहताना मनात येतो. 
कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
 पुरातत्त्व विभागानेही थोडीफार दखल घेतली आहे. एक मात्र नक्की, कोणी कितीही वर्णन केले, तरी तेथील गाइडशिवाय मंदिर बघू नये. कारण त्यातील बारकावे नुसते बघून लक्षात येत नाहीत. येथे रात्री विद्युत दिव्यांचे झोत टाकण्याची व्यवस्था केली, तर हे मंदिर आणखी खुलून दिसेल.
  अर्थात भविष्यकाळात हे मंदीर आणि परिसर यांचा विकास होण्यासाठी काही गोष्टी आवश्य्क आहेत.
१. जागतिक संदर्भात, खिद्रापूर हे आकर्षक स्थळ असूनही ‘पर्यटन स्थळ’ म्हणून त्याचा विकास नाही.
२. कागदोपत्री हजारो रुपयांचा परिसर विकास खर्च तेवढा दाखविला आहे.
३. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची कोल्हापूर दर्शन बस इकडे फिरकत नाही.
४. राजकीय वर्चस्व असलेला तालुका, पण परिसर विकास करण्यात मात्र कुचकामी ठरलेला.

कोपेश्वर मंदिराजवळील पर्यटन स्थळे

कोल्हापूर हे जसे ऐतिहासिक शहर आहे तसेच निसर्ग सौंदर्य याचा अमोल ठेवा असलेले शहर आहे. विविधतेने नटलेले इथले पर्यटन वैभव देशभरातील पर्यटकांना खुणावत असते. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आणि प्रत्येक शहरातून कोल्हापूरला हायवे जोडला गेला असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर हे शहर पर्यटनासाठी सोयीस्कर वाटते.

कोपेश्वर मंदिराखेरीज कोल्हापूर मधील आणखीन काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे

  • कणेरी मठ
  • दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर
  • रंकाळा तलाव
  • भवानी मंडप
  • न्यू पॅलेस
  • पंचगंगा नदी घाट
  • विशाळगड
  • पन्हाळगड
  • दाजीपूर अभयारण्य
  • राधानगरी धरण
  • श्री क्षेत्र नृसिंहवाडी

ही कोल्हापुरातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर तिथून तुम्हाला जावेसे वाटणार नाही याची खात्री आहे.

कोपेश्वर मंदिराजवळील हॉटेल्स

कोपेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण असूनही या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झालेली नाही. त्यामुळे येथील गाव आणि आजूबाजूचा परिसर शांत दिसून येते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशी हॉटेल सोडली, तर बाकी पर्यटकांसाठी कोणतीच व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे कोपेश्वर मंदिर अजूनही तसे फार प्रसिद्धीला आलेले नाही.

  • हॉटेल माऊली
  • हॉटेल गुरुप्रसाद
  • हॉटेल कन्हैया

कोपेश्वर मंदिराजवळील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो तांबडा पांढरा रस्सा नंतर आठवते ते झणझणीत कोल्हापुरी मिसळ. हे दोन पदार्थ फारच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर कोल्हापुरी चटणी, दावणगिरी लोणी डोसा याची सुद्धा खासियत आहे. सुके मटण, सुके चिकन, खिमा हे प्रकार संपूर्ण कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्या म्हणजे चपात्यांची खासियत आहे ती तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली गरम चपाती अप्रतिम लागते. या ठिकाणची पोकळा नावाची पालेभाजी सुद्धा अप्रतिम लागते. येथे मिळणारी भाकरी आणि खर्डा सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे.

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिरात जाण्यासाठी वेळ आणि प्रवेश शुल्क

खिद्रापूर मधील कोपेश्वर हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने वाढीस आले नसल्यामुळे या ठिकाणी जाताना तुम्ही कोणत्याही वेळी जाऊ शकता. हे मंदिर 24 तास उघडे असते. तसेच या मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे जून पासून ते अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा योग्य कालावधी असतो.


खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर कोठे आहे आणि कसे जायचे

 कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव ‘खिद्रापूर’ होय.शिरोळ हा तसा वैशिष्टयपूर्ण तालुका. जीवनाला सर्व दिशांनी स्पर्श करणारा असा हा प्रदेश. त्यात नरसोबावाडीचे दत्त मंदिर, शाहु महाराजांनी वसविलेले व्यापारी केंद्र जयसिंगपूर, ‘कुरुदंवाडकर’ सरकारचे राजवाडे, शिरोळचा साखर कारखाना, घरातील एक तरी व्यक्ती भारतीय सेनेत असलेली… ‘सैनिक टाकळी’ हे खिद्रापूरचं वैशिष्टयं. आवर्जून उल्लेख करण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे, खिद्रापूरचे ‘कोपेश्वर मंदिर’ आणि ‘जैन मंदिर’ होय. या मंदिरांच्या सौदंर्यानं व शिल्पकलेनं भल्याभल्या वास्तुविशारदांना तोंडात बोटं घालायला लावली आहेत.३०६ हेक्टर जमीन असलेले, खिद्रापूर हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा घालून परत पश्चिमेकडे फिरते. खिद्रापूर म्हणजे आहे, महाराष्ट्र-कर्नाटक प्रदेशांची सीमारेषा. खिद्रापूर गावात हे कोपेश्वराचे मंदिर आहे. स्थापत्य कलेचा मूर्तिमंत उदाहरण असूनही या मंदिराची पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झालेली दिसून येत नाही. सांगली किंवा कोल्हापूर या दोन्हीकडून नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे जायचे. तेथून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर. नरसोबाच्या वाडीपासून २५ किलोमीटरवर.कुरुंदवाड मार्गे खिद्रापुराला जाता येतं. दुतर्फा हिरवीगार ऊस शेती, केळीच्या बागा, मध्येच लागणारी नारळाची झाडे, आणि पुष्कळ झुळझुळ पाणी. संपूर्ण प्रवासभर आनंदच आनंद जाणवत राहतो.
पुण्याहून सातारा-इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूर-कुरुंदवाडमार्गे खिद्रापूरला जाता येते. तसेच सातारा-पेठवडगाव-हातकणंगले-इचलकरंजी-अकिवाट-खिद्रापूर असेही जाता येते. बेळगावहून कागलमार्गेही जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर - ३२ किलोमीटर. जवळचा विमानतळ - कोल्हापूर ६० किलोमीटर. जयसिंगपूर, नरसोबाची वाडी, सांगली येथे राहण्याची, भोजनाची उत्तम सोय होऊ शकते. साधारण पावसाळा सोडून येथे कधीही जाता येते. कोल्हापूर, नरसोबाची वाडी, सांगली ट्रिपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा.

विमान – कोल्हापूर विमानतळापासून खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ५५ किलोमीटर म्हणजेच साधारणपणे सव्वा तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाणी विमानतळावरून येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकतो.

ट्रेन – कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे साधारणपणे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे. रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत येताना ऑटो किंवा केबने येऊ शकता.

बस – कोल्हापूर बस स्थानक ते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर यामधील अंतर हे ६० किलोमीटर असून जवळपास दीड तासाचे अंतर आहे या ठिकाणी येताना ऑटो किंवा कॅबने येऊ शकता.

खाजगी वाहने – कोल्हापूर हायवे हा आजूबाजूच्या शहरांनाही जोडला गेल्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी स्वतःच्या खाजगी गाडीने येणे सोयीस्कर होते.

मुंबई ते कोल्हापूर – मुंबई ते कोल्हापूर पुणे मार्गे साधारणता सात तासाचे म्हणजे जवळपास ३८० किलोमीटरचे अंतर आहे

पुणे ते कोल्हापूर – पुणे ते कोल्हापूर साधारण साडेचार तासाचे म्हणजे जवळपास २०० किलोमीटरचे अंतर आहे.

संदर्भ :-
१) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थलकाल - अरुण टिकेकर
३ ) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख – वा.वि.मिराशी
४ ) भारतीय संस्कृती कोष खंड ७
५) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
६) सुरसुंदरी -डॉ.गो.बं.देगलूरकर
७) कोप्पेश्वर ( खिद्रापुर) - डॉ.गो.बं.देगलूरकर
८) खिद्रापूरची मंदिरं - डॉ. रामचंद्र गोविंद चोथे
९) दै. लोकसत्ता, सकाळ, पुढारी यातील लिखाण
१०) श्री. जयंत कुलकर्णी, श्री. सागर बोरकर यांचे लिखाण
११)  कोल्हापुरातील मंदिर वैभव – योगेश प्रभुदेसाई
१३ ) शिलाहारांचे कोल्हापूरः एक शोध – डॉ.अरुणचंन्द्र पाठक
१४) https://shriyogweb.wordpress.com/2019/12/21/kolhapur-vagare-2/
१५) https://marathi.indiatimes.com
१६) http://hrishikeshpandkar.blogspot.com/2017/01/blog-post.html
१७) https://www.inditales.com/hindi/kopeshwar-mandir-khidrapur-kolhapur/
१८) https://drifteradwait.com/kopeshwar-temple-khidrapur/
१९) https://kolhapurexplorer.com/khidrapur-yadur-mahatmya/
२० ) https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
२१ ) https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/
२२ ) https://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=41708&tblId=41708
२३) https://marathizatka.com/khidrapur-kopeshwar-temple-information-in-marathi-language/

छायाचित्र पट

1
Figure 1 हत्तींच्या विविध आभूषण विलसित 92 मूर्तींचा दगडी चौथरा
2
Figure 2 मंदिर कळसावर फारच कमी कलाकुसर दिसते
3
Figure 3 मंदिर परिसर
4
Figure 4 पंचतंत्रातील कथा -गतीमंद कासवाला भुलवून सिहाला खाऊ घालणारे धूर्त बगळे
3
Figure 5 चलाख मर्कट- दुष्ट सुसर संवाद कथा
6
Figure 6 हत्तीवर आरूढ ध्यानस्थ बुद्ध
6
Figure 7 चुकून काढला गेलेला स्वर्गमंटपाकाशाचा फोटो
7
Figure 8 जो असा काढला पाहिजे होता !
1
Figure 9मूर्ती भंजकांच्या तावडीतून सुटलेला पूर्णसोंडेचा हत्ती
पोकळ खोबणीतील सुबकता
Figure 10 पोकळ करून केलेल्या खोबणीतील सुबकता
दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
Figure 11 दातेरी यंत्राकार मांडणीचे कातळ
मैथुन आकृती
Figure 12 मैथुन आकृती
12
Figure 13 दक्षिण मुखीशिवांचे आडवे व विष्णूंचे उभे गंध अर्चित दोन लिंग समान आकृतीबंध
12
Figure 14 जोडवी अन पैंजण पावलाचे सांगाती
15
Figure 15 अंब्याच्या डहाळ्या व कैऱ्या चैत्र महिना दर्शवतात
16
Figure 16 संदर्भ न आठवणारे शिल्प कदाचित चोरून भेटणारे तरुण जोडपे?
17
Figure 17 गाल फुगवलेला वादक शिवगण
18
Figure 18 अष्ट कोनी कुंड त्याला जोडून असलेले सांड पाण्यासाठीचे मकरमुख
19
Figure 19 अस्थिपंजर कलिका
20
Figure 20 डाव्या बाजूचा अरबी व उजव्या बाजूचा बसक्या नाकाच्या वंशाचा

शिवाय अनेक फोटो आहेत पण त्याचे संदर्भ आठवत नाहीत...




 

Few meters away from Kopeshwar, in the heart of the village is a Jain temple, which is much smaller in size. The outer wall of the shrine being in the star-shaped Hemadpanti plan.

The building is of black stone. The carvings on outer wall are less in number but the beautiful women in various poses are strikingly similar to kopeshwar.

Most of statues have very calm, peaceful glowing look.

It is said that Adinath Bhagwan idol looks of different colour in Morning, afternoon & evening.

The pillars of the hall are richly carved.

There are some very fine carvings on left hand wall at the entrance.












डॉ. रामचंद्र चोथे यांचा या संदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध झाल्याचे कळले. ‘खिद्रापूरची मंदिरे : भारतीयांची प्राचीन ठेव’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांनी १९९०पासून मंदिराचा अभ्यास सुरू केला आणि अगदी बारकाईने अभ्यास करून प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य शोधून काढले. त्यांनी खिद्रापूरच्या आसपासचे अनेक शिलालेख, ताम्रपट यांचा अभ्यास करून माहिती काढली आहे. पेशाने पशुवैद्य असलेल्या डॉ. चोथे यांनी खिद्रापूरच्या मंदिराची शिल्पगाथा पुस्तकातून सुंदरपणाने पर्यटकांसमोर आणली आहे. सुदैवाने डॉ. चोथे यांचे चिरंजीव शशांक यांच्याशी संपर्क झाला. त्यांनीही त्यांच्या वडिलांना या कामी मदत केली असल्याने त्यांची भेट खूपच उपयुक्त ठरली.







 


सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकोनी शंकाकृती शिखर निश्चितपणे मराठा काळातही नंतर बांधण्यात आले आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे.पडून गेलेले मुख्य शिखर बांधताना ते या प्रतिकृतीनुसार बांधता आले असते, परंतु जीर्णोद्धाराचे काम करणाऱ्या स्थपतीने तसे केलेले नाही. यावरून त्याला शिल्प ग्रंथाचे ज्ञान नव्हते हे उघड आहे. कपोतालीवर असलेल्या मुख्य शिखरांच्या प्रतिकृती, भद्रावर असलेल्या देवकोष्टांवरील शिखरे यावरून मुळात हे मंदिर शिलाहार शैलीचे सप्तरथ भूमीज प्रसाद असावे  हे उघड आहे.













Kopeshwar Temple



















कसे जायचे खिद्रापूरला?
पुण्याहून सातारा-इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूर-कुरुंदवाडमार्गे खिद्रापूरला जाता येते. तसेच सातारा-पेठवडगाव-हातकणंगले-इचलकरंजी-अकिवाट-खिद्रापूर असेही जाता येते. बेळगावहून कागलमार्गेही जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर - ३२ किलोमीटर. जवळचा विमानतळ - कोल्हापूर ६० किलोमीटर. जयसिंगपूर, नरसोबाची वाडी, सांगली येथे राहण्याची, भोजनाची उत्तम सोय होऊ शकते. साधारण पावसाळा सोडून येथे कधीही जाता येते. कोल्हापूर, नरसोबाची वाडी, सांगली ट्रिपमध्ये या ठिकाणाचा समावेश करावा.


https://drifteradwait.com/kopeshwar-temple-khidrapur/

https://kolhapurexplorer.com/khidrapur-yadur-mahatmya/

https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/

https://iplmemes.com/khidrapur-temple-history-in-marathi/

https://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=41708&tblId=41708

https://marathizatka.com/khidrapur-kopeshwar-temple-information-in-marathi-language/




मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...