सांस्कृतिक भारत: गुजरात (पूर्वार्ध)
इ.स. पूर्व २००० वर्षांचा गुजरातचा इतिहास आहे. भगवान श्रीकृष्णाने मथुरेचे राज्य सोडून सौराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर व्दारका हे नवे राज्य स्थापले. नंतर अनेक राजघराणी-मौर्य, गुप्त, प्रतिहार इ. चालुक्य (सोलंकी) राजाच्या कार्यकाळात भरभराट व उन्नती झाली. महमूद गझनीच्या स्वाऱ्या सुरू असतानाही गुजरातचे वैभव कायम होते. स्वातंत्र्यापूर्वी गुजरात दोन भागात विभाजित होता. १) ब्रिटीशांच्या ताब्यातील, २) राजांच्या अधिपत्याखालील गुजरात. भाषावार प्रांतरचनेनुसार सौराष्ट्र व केंद्रशासित कच्छ व जुन्या इंग्रज सरकारच्या अखत्यारितील गुजरात यांच्यासह मुंबई असा मोठा व्दिभाषिक प्रांत होता. १ मे १९६० ला नवे गुजरात राज्य अस्तित्वात आले. भारताच्या पश्चिम किनार्यावर पश्चिमेला अरवी समुद्र, पाकिस्तान व राजस्थान. ईशान्येला मध्यप्रदेश, दक्षिणेला महाराष्ट्र आहे.
राज्यातील मुख्य पिके तंबाखू, कापूस व शेंगदाणे ही आहेत. गुजरात हा कापड व्यवसाय तसेच तेल व साबण यांचे उत्पादक राज्य समजले जाते. इसबगोल, तांदूळ, गहू व बाजरी ही पिकेही इथे पिकतात. सागवान, खैर, बांबू यांचे विपुल प्रमाणात जंगल उत्पादन होते. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातही गुजरातची प्रगती होत आहे. गुजरात राज्यात गुजराती ही अधिकृत भाषा असली तरी राज्यात काही आदिवासी वास्तव्य करतात. त्यांच्या स्वत:च्या काही घटकबोली आहेत. राज्यातील आदिवासी व ते जी भाषा बोलतात त्यांची नावे खालीलप्रमाणे सांगता येतील.
भाषा | कोण बोलतात |
भिली | भील, डुंगरी गरासिया, वसावे भील, मावची |
धानकी | धानका |
गामेती | डामोर |
गामित | गामित |
कच्छी | पारधी/ नाहर पारधी |
कोकणी | कोंकणा |
कोतवालिया | कोतवाल/ कोतवालिया |
नायकाडी | नाईकडा |
सरहोदी | वागरी /वाघरी |
वारली | वारली |
या व्यतिरिक्त राज्यात अजून काही आदिवासी वास्तव्य करतात. बारदा, बावचा, भामचा, भरवाड, डुंगरी भील, मेवासी, रावल, तावडी, भगालिया, भिलाला, पावरा, वसावा, चौधरी, धोडीया, दुबळा, पडवी, गोंड, काथोडी, कातकरी, कोळी, नाइकडा, कापडिया, पधार, पतेलिया, पोमला, राबरी, राठवा, वाघरी आदी आदिवासी गुजरात राज्यात आहेत. तर्नेतर येथे तर्नेतरची यात्रा शिव या दैवतासाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी, पंचमी व षष्ठीला भरते. पोरबंदरजवळ माधवपूर येथे कृष्णाने रूक्मिणीला पळवून आणून केलेल्या लग्नाच्या तिथीला म्हणजे चैत्र शुक्ल नवमीला ही यात्रा भरते. बनसकंथा जिल्ह्यातील अंबाजी येथे देवीची यात्रा (अंबादेवी) चैत्र महिन्यात असते. ही सर्वात मोठी वार्षिक यात्रा असते. कृष्ण जन्माष्टमीला व्दारका व डाकोर येथे ही यात्रा भरते. मकर संक्रांत, नवरात्री, डांगी दरबार, शामलजी यात्रा, भवनाथ यात्रा आदीसोबतच भवाई, रास गरबा, पतंग उत्सव, नवरात्री, दिवाळी, होळी, ताजिया हे सणही इथे साजरे होतात.
लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे,
गुजरात — १ : भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य. २०० ६’ उ. ते २४० ४२’ उ. ६८० ४’ पू. ते ७४० २४’ पू. क्षेत्रफळ १,९५,९८४ चौ.किमी. लोकसंख्या २,६६,९७,४७५ (१९७१). याच्या उत्तरेस पाकिस्तान व राजस्थान पूर्वेस राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र दक्षिणेस महाराष्ट्र व अरबी समुद्र आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या ६·१% क्षेत्रफळ आणि ४·८ %लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे.
भूरचना : गुजरात राज्यात १,१२० मी.पेक्षा उंच प्रदेश कोठेही नाही. तथापि या राज्याचे (अ) उत्तरेकडील व पूर्वेकडील आणि कच्छ-काठेवाडमधील डोंगराळ प्रदेश, (आ) सौराष्ट्राचे म्हणजे काठेवाडचे पठार, (इ) मैदानी प्रदेश व (ई) किनारी सखल प्रदेश व कच्छचे रण असे चार स्वाभाविक विभाग पडतात. (अ) उत्तरेकडे साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अरवलीचे फाटे आलेले आहेत. त्यांच्या पश्चिम भागातून बनास व पूर्व भागातून साबरमती नद्या वाहतात. पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांत विंध्याचे व सातपुड्याचे फाटे आलेले असून उत्तर भागात रतनमाळ व पावागढ (८२९ मी.) डोंगर असून त्यांच्या उत्तरेस मही व पानम नद्या आहेत व दक्षिणेस नर्मदा व तिच्या ओरसंग व कर्जन या उपनद्या आहेत. मध्य भागात छोटा उदेपूर व राजपीपला डोंगर असून त्यात नर्मदा व तापी यांच्या दरम्यानचा डोंगराळ प्रदेश येतो. यात मठसर हे ८०० मी. उंचीचे शिखर आहे. तापीच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा किनाऱ्याला समांतर गेलेल्या आहेत. त्यांत डांग व धरमपूरचे डोंगर अधिक उंच आहेत. सह्याद्रीवरून पूर्णा, अंबिका, औरंगा, पार व दमणगंगा या नद्या पश्चिमेकडे खंबायतच्या आखातास मिळतात. कच्छमध्ये पश्चिमपूर्व गेलेल्या तुटक डोंगरटेकड्यांच्या तीन रांगा आहेत. उत्तरेकडील रांग कच्छच्या रणातील बेटांच्या रूपाने दिसते. त्यातील पछम बेटावरील डोंगर कच्छमध्ये सर्वांत उंच (४६५ मी.) आहे. काठेवाडमधील उत्तरेकडील मंडा डोंगराळ प्रदेश राजकोटच्या पूर्वेस असून त्याचे चोटिल शिखर ३४० मी. उंच आहे. हा भाग पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय या नद्यांदरम्यानच्या एका अरुंद डोंगराळपट्टीने दक्षिणेकडील गीर रांगेशी जोडलेला आहे. गीर हा अनेक टेकड्यांचा समुदाय असून त्यात सारकाला (६४३ मी.) सर्वांत उंच व आग्नेयीकडील नंदीवेला (५२९ मी.) त्याखालोखाल आहे. गिरनारचा पर्वत मैदानात अलग उभा असून त्याचे गोरखनाथ हे १,११७ मी. उंचीचे शिखर गुजरातमध्ये सर्वांत उंच आहे. या सर्व डोंगराळ प्रदेशांच्या पायथ्याचा ७५ मी. ते १५० मी. उंचीचा उताराचा प्रदेश १० ते २५ किमी. रुंदीचा असून त्यावर काही भागात गवत व काही भागात अरण्ये आहेत. (आ) सौराष्ट्र पठार ७५ ते ३०० मी. उंचीचे असून ते लाव्हाचे बनलेले आहे. ते मध्यवर्ती डोंगराळ भागाकडे उंचावत गेले असून त्यावरून उत्तरेकडील मच्छू व अजी, पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय व भगवा या नद्या वाहतात. या पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ६० मी.पर्यंत रुंदीच्या व ६० किमी.पर्यंत व त्यापेक्षाही जास्त लांबीच्या अनेक भित्ती हे होय. (इ) पश्चिमेस किनारी सखल प्रदेश व पूर्वेस डोंगर पायथ्याचा प्रदेश यांदरम्यान गुजरातच्या मुख्य भूमीचे अत्यंत सपाट गाळमैदान आहे. ते सु. ९६ किमी. रुंद व दक्षिणोत्तर ४०० किमी. लांबीचे आहे. याच्या उत्तरभागात वालुकामय आणि खेडा जिल्ह्याच्या काही भागात वातोढ मृदा असून दक्षिणभागात नर्मदातापीच्या खोऱ्यात काळी रेगुड मृदा आहे. या मैदानातून साबरमती, मही, नर्मदा व तापी या प्रमुख नद्या वाहतात. (ई) दक्षिण काठेवाडाखेरीज गुजरातचा किनारा भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या पंकपाटांनी व खारजमिनींनी भरलेला आहे. कच्छच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवर अशा १०—१२ किमी. रुंदीच्या दलदली आहेत. भरतीचे पाणी ओहोटीच्या वेळी त्यावरील पंकिल प्रवाहमार्गांनी परत जाते. या पंकपाटांच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या टेकड्या आहेत. कच्छच्या आखाताच्या दोन्ही बाजूंचा किनारी प्रदेश असाच आहे. काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावर पंकपाट आढळत नाहीत परंतु दलदली मात्र आहेत. पोरबंदर व भादर नदीचे मुख यांदरम्यानची दलदल विस्तीर्ण आहे. खंबायतच्या आखाताचा किनारा खाड्यांनी युक्त आहे. येथेही दलदली असून त्यांत मधूनमधून बेटे आहेत. खंबायतच्या आखाताचा सर्व भाग उत्थान पावलेला आहे. एके काळी खंबायतचे आणि कच्छचे आखात निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे. १८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी कायमचे जोडले गेले. १९५६ मध्ये कच्छमधील अंजार येथे मोठा भूकंप झाला व २३ मार्च १९७० च्या भूकंपाने दक्षिण गुजरातचे बरेच नुकसान झाले होते. खंबायतपासून बलसाडपर्यंतचा सर्व किनारा मही, नर्मदा, किम व तापी आणि इतर नद्यांच्या खाड्यांनी भरलेला आहे. त्यावरही पंकपाट आढळतात. गुजरातला इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त लांबीचा २,५६० किमी. किनारा लाभलेला असून त्यावर कांडला, बेडी, ओखा, पोरबंदर, वेरावळ, भावनगर, खंबायत, भडोच, सुरत ही प्रमुख बंदरे आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दीव हे गोवा, दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशाचे बेट आहे. कच्छचे रण : कच्छच्या उत्तरेस मोठे रण व पूर्वेस छोटे रण या विस्तीर्ण खाऱ्या दलदली सु. २१,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापतात. मोठे रण २५६ किमी. पूर्वपश्चिम व १२८ किमी. दक्षिणोत्तर विस्ताराचे आहे. दोन्ही रणे पावसाळ्यात पाण्याखाली जातात. एरवी ती कोरडी असतात व त्यांतून पायवाटाही जातात. छोट्या रणातील पाणी नल सरोवरामार्गे खंबायतच्या आखातात येते. दोन्ही रणे म्हणजे समुद्रबूड जमिनीचा उचलला गेलेला भाग आहे. बनास, सरस्वती व लुनी या कच्छच्या रणास येऊन मिळतात. सौराष्ट्रातील नल व कच्छमधील नारायण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांखेरीज काही किरकोळ तळी गुजरातेत आहेत परंतु मोठे तलाव नाहीत.
जीर्ण स्फटिकजन्य खडकापासून बनलेल्या मृदा निकृष्ट आहेत. तथापि बांधकामास उपयोगी असे पोरबंदर दगडासारखे व सिमेंटला उपयुक्त असे चुना खडकासारखे मूल्यवान खनिजप्रकार जमिनीतून मिळतात. सौराष्ट्रातील नद्या पावसाळ्यात वाहून एरवी कोरड्या असतात. बाकी गुजरातच्या मृदा किनाऱ्याला दलदलीचा रेतीमिश्रित गाळ, सपाटीवर जलोढ नदीगाळ, भडोच व सुरत जिल्ह्यांत काही रेगुड माती, कच्छमध्ये आणि उत्तर गुजरातेत रेताड व वातोढ माती, अशा प्रकारच्या आहेत.
राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खनिज गेल्या दशकात सापडलेले खनिज तेल व वायू होत. अंकलेश्वर, कलोल व खंबायतखेरीज अहमदाबादजवळही त्याचा प्रचंड भूमिगत साठा असण्याची शक्यता दिसली आहे. कच्छ व सौराष्ट्रात सु. १·७५ कोटी टन बॉक्साइट, शेकडो कोटी टन चुनाखडक, चिनी माती व इतर जातींची चिकण माती आहे. छोटा उदेपूर भागात आशियातील अत्यंत मोठा, १ कोटी मे. टनाहून जास्त फ्ल्यूओराइटचा संचय, कच्छमधील लखपतजवळील व भडोच जिल्ह्यात मिळू सु. २४ लाख टन लिग्नाइट, शिवाय क्वॉर्ट्झ, डोलोमाइट, फ्रोट, कॅल्साइट, जिप्सम व मँगॅनीज ही खनिजे गुजरातेत उपलब्ध आहेत.
उत्तर भाग कर्कवृत्तावर असणाऱ्या गुजरातचा प्रदेश बव्हंशी उष्ण कटिबंधातच येतो. कच्छ सौराष्ट्रासारखे तुटक भूभाग, सागरसानिध्य आणि वेगवेगळ्या भागांतील उंचसखलपणा या कारणांनी या राज्यातल्या तपमानात व पर्जन्यात विविध प्रकार आहेत. दक्षिण गुजरातेत ७५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो आणि किमान व कमाल तपमानात आत्यंतिक फरक नसतो, डांगमध्ये २०० सेंमी. पाऊस पडतो. उत्तर गुजरातेत पाऊस ५० ते १०० सेंमी. असतो व थंडीत तपमान बरेच खाली जाते. उत्तर व पश्चिम सौराष्ट्रात पाऊस ६७ सेंमी.पेक्षा कमी, हवा शुष्क व थंडी कडक, तर दक्षिण व पूर्व सौराष्ट्रात पाऊस थोडा अधिक व हवामानही तुलनेने समशीतोष्ण असते. कच्छच्या वैराण प्रदेशात पाऊस फारच कमी असतो, किमान तपमान १५·६० से. ते २१·१० से. तर बाकीच्या गुजरात राज्यात ते २१·१० से. ते २३·९० से.इतके असते. कमाल तपमान पूर्व सौराष्ट्र, कच्छ व उत्तर गुजरातेत २९·४० से. ते ३२·२० से. आणि कच्छ व सौराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांना व मध्य गुजरातेत २६·७० से. ते २९·४० से. असे राहते. अहमदाबादचे किमान तपमान १४० से. ते २७० से., कमाल तपमान २९० से. ते ४२० से. व सरासरी ३४·७० से. याप्रमाणे असते. राज्यात वनप्रदेश थोडा आहे. सौराष्ट्रातील गीरच्या जंगलाखेरीज भडोच व सुरत जिल्ह्यांचे पूर्वभाग आणि डांग जिल्हा एवढ्याच भागात जंगले आहेत. उल्लेखनीय प्राणी म्हणजे आशिया खंडात फक्त गीरच्या जंगलात आढळणारे अवशिष्ट सिंह व नल सरोवरावर दरवर्षी उतरणारे हंसक (फ्लॅमिंगो) हे स्थलांतरी पक्षी आहेत.
इतिहास : प्रागितिहास काळापासून मानववस्ती असल्याचे पुरावे गुजरातेत ठिकठिकाणी सापडले आहेत. अतिप्राचीन मानवांच्या वसाहतींच्या अवशेषांनंतर सिंधू खोरे संस्कृतीशी संबंध सिद्ध करणारे सु. ३,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष अहमदाबाद जिल्ह्यात धंधुकाजवळ लोथल व सौराष्ट्रातील रोझ्डी येथील उत्खननांत मिळाले आहेत. मोहें-जो-दडो आणि हडप्पाच्या समकालीन मातृदेवता पूजक संस्कृतीचे पुरावे आहेत, असे तज्ञांचे मत आहे. फार पूर्वीपासून गुजरातचा सागरी व्यापार दूरदूरच्या देशांशी चालत होता, याची साक्ष राज्याच्या विविध भागांत सापडलेली ग्रीक व रोमन नाणी देतात. गुजरात हे नाव गुज्जरठ्ठ या प्राकृत अथवा गुर्जर राष्ट्र या संस्कृत नावापासून आले. मध्य आशियातून हूणांबरोबर भारतात आलेले मुळचे गुर्जर प्रथम पंजाबात स्थायिक होऊन हळूहळू दक्षिणेकडे सरकत, अबू पर्वताभोवती राहू लागले असा समज आहे. त्यांच्या प्रदेशाला गुजरात हे नाव दहाव्या शतकापासून रूढ झाले तथापि तो प्रदेश अधिक प्रमाणात पश्चिम राजस्थानच्या मिनमाळच्या आसपास होता. ज्ञात इतिहासारंभी चंद्रगुप्त मौर्याच्या सेनेने गुजरातची लहानलहान राज्ये साम्राज्याला जोडून घेतली. मौर्य सम्राटाने नेमलेला पुष्यगुप्त वैश्य हा गिरिनगर अथवा गिरनार-जुनागढ येथे ख्रि. पू. तिसऱ्या शतकात राज्यपाल होता. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक याने गिरनारच्या विख्यात शिलालेखाने या भागात आपली स्मृती कायम ठेवली आहे. मौर्यामागून काही वर्षांनी डीमीट्रिअसच्या नेतृत्वाखाली घुसलेल्या ग्रीकांची सत्ता येथे होती. ख्रिस्तोत्तर पहिल्या चार शतकांपर्यंत गुजरातवर क्षत्रपांचे राज्य होते. त्यांच्यापैकी इ.स. १५० मधल्या रुद्रदामनने अशोकाच्या शिलालेखाखाली आपला लेख कोरवून ठेवला आहे. त्याच शिळेवरचा तिसरा लेख क्षत्रपानंतर गुजरातचे स्वामी झालेल्या गुप्त सम्राटांपैकी स्कंद गुप्ताचा इ.स. ४५२ मधला आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाअखेर गुप्तसत्ता दुबळी झाली, तेव्हा त्यांचाच एक सेनापती मैत्रक याने सौराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापून, वल्लभीपूर ही आपली राजधानी केली. मैत्रकाच्या प्रबळ राज्यात गुजरातचा व माळव्याचाही बराच प्रदेश होता आणि वैभवाबरोबर विद्येचाही उत्कर्ष झाला होता. वल्लभीपूर येथे नालंदाच्या तोडीचे विद्यापीठ असल्याची नोंद आहे. वल्लभीच्या ऱ्हासानंतर त्या राज्याचे उत्तर गुजरातमधील मांडलिक चावडा राजपूत वनराजाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झाले व इतिहासप्रसिद्ध अनहिलपूरपाटण किंवा अनहिलवाडा ही त्यांची राजधानी झाली. शेवटचा चावडावंशीय सामंतसिंह याने ज्या सोळंकीवंशीय मूळराजाला दत्तक घेतले, तो शूर असून विद्येचा पुरस्कर्ता होता. त्याने उत्तरेतून व देशाच्या अन्य भागांतून अनेक विद्वान ब्राह्मण आणवून गुजरातेत स्थायिक करवले. त्याने जुनागढच्या गृहरिपूंचा आणि कच्छच्या लाखो फलाणींचा पराभव करून त्यांची राज्ये घेतली. सोळंकी वंशाच्या दहा राजांपैकी बाराव्या शतकातले सिद्धराज जयसिंह व कुमारपाल हे विख्यात झाले. प्रभासतीर्थाचा सोमनाथ हे सोळंकीचे आद्य दैवत. ते जरी दोनदा भ्रष्ट होऊन लुटले गेले, तरी कुमारपालाने ते पुन्हा बांधले होते. सोळंकीचा अस्त होताच त्यांचे मांडलिक वाघेला उदयास आले व त्यांनी तेरावे शतकभर गुजरातवर राज्य केले. त्याच्या आठ राजांपैकी वीरधवल व विशालदेव हे प्रसिद्ध आहेत. वीरधवलाच्या कारकीर्दीतच त्याचे अमात्य वस्तुपाल व तेजपाल यांनी अबू, गिरनार, शत्रुंजय व कुंभारिया येथील सुंदर देवळे बांधली. विशालदेवाने उत्तर गुजरातमधील विशालनगर स्थापन केले आणि डभई येथील वैद्यनाथ मंदिर व भारतातील शुद्ध हिंदू स्थापत्य शैलीचा एकमेव म्हणून प्रसिद्ध असलेला भूमिदुर्ग बांधला. करण वाघेला या शेवटच्या रजपूत राजाचा पाडाव करून, गुजरातवरील हिंदू राजवट अलाउद्दीन खल्जीने संपुष्टात आणली. मग इ.स. सु. १३०० पासून ४०० वर्षेपर्यंत गुजरातवर मुसलमानी अंमल होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात हिंदूंच्या जुन्या राजधान्यांचा आणि पवित्र स्थानांचा सर्रास विध्वंस झाला. पहिली अदमासे १०० वर्षे गुजरातवर दिल्लीच्या खल्जी व तुघलक सुलतानांची सत्ता होती. १४०९ मध्ये पहिल्या अहमदशाहने गुजरातचे स्वतंत्र राज्य स्थापन करून, अहमदाबाद शहर वसवले. तो आणि पहिला महमूद (महमूदशाह बेगडा) हे गुजरातच्या १६६ वर्षांतील १५ सुलतानांपैकी सर्वांत नामवंत होऊन गेले. दोघांच्याही राजवटी दीर्घकालीन, यशस्वी व भरभराटीच्या झाल्या आणि पूर्वी लुटींनी व जाळपोळीने झालेले गुजरातचे नुकसान त्यांच्या वैभवसंपन्न कालखंडात भरून निघाले. १५७३ मध्ये अकबराने गुजरात जिंकून, तो मोगल राज्याचा एक सुभा बनवला. तेव्हापासून १८५ वर्षांपर्यंत बहुधा राजघराण्यातील सुभेदार आणि ठाणेदार यांच्यामार्फत गुजरातवर मोगलांचे राज्य होते. औरंगजेबाच्या मरणानंतर थोड्याच दशकांत मोगलांना हुसकावून मराठे गुजरातेत सत्तेवर आले. गायकवाडांनी गुजरातच्या बऱ्याच भागांत आणि सौराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. यूरोपीय लोकांपैकी गुजरातशी पहिला संपर्क पोर्तुगीजांचा आला. १५३७ मध्ये त्यांनी सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील दीव बेटावर पाय रोवले व नंतर कित्येक वर्षे अरबी समुद्रकिनाऱ्यावर आरमारी सत्ता गाजवली. तथापि त्यांच्यामागून लवकरच दाखल होऊन, सुरतेस वखार घालणाऱ्या इंग्रजांनी देशभर हळूहळू आपला जम बसवीत पोर्तुगीजांना निष्प्रभ केले, सागरी व्यापाराचा कबजा मिळवला आणि भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली. ती सत्ता १९४७ पर्यंत टिकली. त्या आधी अर्धशतकापासून भारतीयांची स्वराज्यासाठी चळवळ चालू झाली होती. १९२० मध्ये गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या अभिनव तंत्राने अहिंसात्मक आंदोलनाचा पहिला प्रयत्न करून देशभर जागृती केली. थोड्याच वर्षांनंतर बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. ते गांधीजींचा उजवा हात बनले. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहासाठी अहमदाबादजवळील साबरमती आश्रमातील १२ वर्षांचे वास्तव्य सोडून, महात्माजींनी दांडीमोर्चाने स्वातंत्र्य-आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले. त्यांच्या प्रत्येक हाकेला गुजरातच्या जनतेने हार्दिक प्रतिसाद दिला. गांधीजींची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून गुजरातला असाधारण महत्त्व आले. १९४२ च्या अंतिम स्वातंत्र्य संग्रामात गुजरात एकजुटीने महात्माजींच्या मागे होता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यातून गुर्जर नरेश गायकवाडांच्या बडोदे राज्याप्रमाणे इतरही अनेक लहानमोठ्या संस्थानांची प्रजा वगळल्यासारखी झाली होती. त्या प्रजेच्या आंदोलनाने उग्र स्वरूप घेण्याआधीच नवानगरच्या जामसाहेबांसारख्या सूज्ञ व दूरदृष्टी संस्थानिकांच्या नेतृत्वाने गुजरात व सौराष्ट्रातली, पूर्वी ब्रिटिशांशी स्वतंत्र तहनामे असलेली संस्थाने, भारतीय संघराज्यात विलीन झाली. अपवाद म्हणून पाकिस्तानला मिळू पाहणाऱ्या जुनागढच्या नबाबाला त्याच्या प्रजेने हाकलून देऊन संस्थान भारतात आणले. १९४८ मध्ये सौराष्ट्राचा एक संयुक्त संस्थान संघ होता व गुजरातची इतर संस्थाने तत्कालीन मुंबई राज्याला जोडलेली होती. १९५६ च्या राज्यपुनर्घटनेत कच्छ-सौराष्ट्रासकट गुजरात द्विभाषिक मुंबई राज्यात आले आणि १९६० साली गुजरात वेगळे होऊन पंधरावे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात दाखल झाले. अहमदाबाद, बडोदे, बनासकांठा, भडोच, मेहसाणा, खेडा, पंचमहाल, डांग, सुरत, साबरकांठा, जामनगर, अमरेली, जुनागढ, कच्छ, राजकोट, सु रेंद्रनगर, भावनगर, बलसाड आणि गांधीनगर या राज्याच्या १९ जिल्ह्यांत, १८६ तालुके व अहमदाबाद महानगरपालिकेसह ५९ नगरपालिका आहेत. शिवाय ४९ नगरपंचायती व ११,५६२ ग्रामपंचायती स्थानिक कारभार पाहतात. भारतीय संविधानानुसार राज्यशासनाने सांभाळण्याचा खात्यांचा कारभार पाहणारी गुजरातची अंतर्गत शासनव्यवस्था सामान्यतः देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे. राजधानी तूर्त अहमदाबाद असून, तिच्यापासून थोड्या अंतरावर गांधीनगर ही नवी राजधानी बांधण्यात येत आहे. राज्याला विधान परिषद नाही. विधानसभेच्या १६८ सदस्यांपैकी बहुसंख्य, ९३ काँग्रेस पक्षाचे असून तो पक्ष अधिकारारूढ आहे. त्या खालोखाल संख्याबल स्वतंत्रपक्षाचे, ६६ आहे. लोकसभेवर २४ व राज्यसभेवर ११ सदस्य गुजरात राज्यातून निवडून दिले जातात.
आर्थिक स्थिती : या राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी निम्म्याहून थोडी अधिक भूमी शेतीखाली आहे. कच्छचा विस्तीर्ण वैराण प्रदेश या राज्याच्या हद्दीत असल्यामुळे उजाड व नापीक जमिनीचे प्रमाण चतुर्थांशाहून जास्त आहेत. गवताळ मैदाने व कायम चराऊ कुरणे मात्र राज्यात पुष्कळ आहेत. तांदूळ, ज्वारी, बाजरी व गहू ही मुख्य अन्नधान्ये त्यांपैकी तांदूळ दक्षिण गुजरातच्या खेडा, पंचमहाल, बडोदे व सुरत जिल्ह्यांत, ज्वारी व बाजरी उत्तर गुजरातेत व सौराष्ट्रात आणि गहू मुख्यतः उत्तर गुजरातेत व काही प्रमाणात सौराष्ट्रात पिकवण्यात येतो. पंचमहाल जिल्ह्यात मकाही काढण्यात येतो. नगदी पिकांत कापूस, भुईमूग व तंबाखू ही महत्त्वाची आहेत. बटाटे, मिरची, सुंठ यांचेही उत्पन्न येते. देशातील पंचमांश कापूसक्षेत्र या राज्यात आहे. गुजरात प्रदेश सुपीक असूनही राज्याला अन्नधान्याची तूट आहे. चालू पाटबंधारे योजना उकाई, कडाणा, नर्मदा, काक्रापारा, मही उजवा काठ, दंतीवाडा, हठमती, सरस्वती, शत्रुंजयी-पालिताणा, भादर, शत्रुंजयी-खोडिआर, मच्छू व साबरमती-धोरोई अशा एकंदर १४ असून त्या सर्वांनी मिळून सु. ११·४७ लाख हे. जमिनीला पाणी मिळेल. १९६१ च्या शिरगणतीच्या वेळी राज्यात पशुधन ६५·५ लाख गुरे (गाई-बैल), ३० लाख म्हशी, १५ लाख मेंढरे, २२ लाख बकरी, १ लाख घोडी व तट्टे, १ लाख इतर जनावरे असे होते. १९६५-६६ च्या अधिकृत अंदाजानुसार एकूण गुरेढोरे १·४३ कोटी व कोंबडी २३ लाख होती. अहमदाबाद, आणंद, बडोदे, भावनगर, जामनगर, जुनागढ, राजकोट, सुरेंद्रनगर, मेहसाणा व सुरत येथे दुग्धालय कारखाने चालू असून, आणंद व मेहसाणा येथील दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन लक्षणीय आहे. सौराष्ट्राच्या गीर गाई, उ. गुजरातची काँकरेज गुरे, जाफराबादी व मेहसाणा म्हशी ही राज्यातली नामांकित जनावरे आहेत. गुजरातला कच्छच्या लखपत बंदरापासून दक्षिणेकडच्या उंबरगावपर्यंत सु, १,६०० किमी. समुद्रकिनारा आणि कच्छ खंबायतच्या आखातासह एकूण ६७,६०० चौ.किमी. मच्छीमारीस उपयोगी समुद्र लाभला असून ५१ मच्छीमार बंदरे, १२५ मच्छीमार वस्त्या व छोटी नांगरठाणी आहेत. २·५ लाख मच्छीमारांपैकी प्रत्यक्ष व्यवसायात ३०,००० असून १ ते १५ टनांच्या नौकांतून १९६५-६६ मध्ये त्यांनी ३ कोटी रु. किंमतीचे सु. १ कोटी टनाहून अधिक मासे पकडले. बोंबिल, सॅमन, सरंगे, कोळंबी, झिंग्या पर्च, हिल्सा व इतर अनेक जातींच्या माशांचा स्थानिक खप होऊन बाकीचे मुंबईच्या बाजारात विक्रीस जातात. माशांखेरीज शंख, शिंपले व मोती सागरातून काढण्यात येतात. त्याशिवाय माशांपासून मिळणारे आयसिंग्लास (चिनी गवत), मच्छीखत, शार्क लिव्हर ऑइल असे अनेक अर्थोत्पादक पोटधंदे मच्छीमारीतून विकसित करण्यात आले आहेत. अंतर्देशीय गोड्या पाण्याच्या मच्छीमारीत २,००० कोळी ९ जिल्ह्यांत उपजीविका करतात. तळ्यांमधील मासे पुरवठ्यासाठी २ मत्स्यजलाशय व २ अंडीकेंद्रे चालवण्यात येतात. मासे टिकवून ठेवण्यासाठी ८३ बर्फाचे कारखाने व ११ शीतगृहे आहेत. अहमदाबादेस मच्छीमार प्रशिक्षण संस्था असून, अन्यत्र ४ मच्छीमार शाळा, ३ मदतकेंद्रे आणि वेरावळ येथे एक संशोधन केंद्र आहे. शासकीय प्रोत्साहनाने मच्छीमारांच्या ८४ सहकारी संस्था चालू आहेत. १९६४-६५ मध्ये राज्याचे ९ टक्के क्षेत्र सु. १८·६ लाख हे. वनाच्छादित होते. त्यापैकी ११ लाख हे. डांग, जुनागढ, पंचमहाल, बडोदे, भडोच, सुरत, बनासकांठा आणि अंशतः जामनगर व कच्छ या जिल्ह्यांत होते. जंगल उत्पादन साग, वेळू, पिवळे, लाल व काळे लाकूड, चंदन, खैर, मिमल, धुमडा, धुडिजा अशा जातींच्या झाडांचे लाकूड असून, दुय्यम उत्पादन गवत, मध, लाख, रंगांसाठी लाकूड व साली या मालाचे होते. डांगमधले सागाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय होते. उद्योगधंद्यांत गुजरात राज्य व्यापाराप्रमाणेच झपाट्याने प्रगती करीत आहे. स्वतः शासनाने बडोद्याला एक खत कारखाना काढला असून, भावनगर सार्वजनिक दुग्धालयासारख्या विविध उद्योगात शासन पुढाकार घेत आहे. खाजगी क्षेत्रात मुख्य कारखानदारी धंदे, सूत व कापडगिरण्या, सिमेंट, रासायनिक द्रव्ये, यांत्रिकी व विजेची उपकरणे, खाद्य तेलावर प्रक्रिया असे आहेत. सूत व कापडगिरण्या अहमदाबादेत केंद्रित असल्या तरी भडोच, नवसारी, नडियाद अशा अन्य ठिकाणीही चालू आहेत. कापूस पिंजून गठ्ठे दाबण्याच्या जिन्स अनेक जिल्ह्यांत असून, सु. ३५ लाख सूत चात्या व ६३,००० यंत्रमाग अहमदाबादच्या ६९ व बाकी गुजरातच्या ४३ मिळून एकूण ११२ गिरण्यांत आहेत. त्यांतून सर्व पाळ्यांचे मिळून १·७५ लाखांवर कामगार १६,७२८ टन किंवा जवळजवळ १ लाख गासड्या कापसाचे कापड विणून तयार करतात. कापडधंद्याला पूरक अशा इतर उद्योगांचे कारखाने अहमदाबादप्रमाणेच इतर गिरणगावांभोवती निघाले आहेत. सिमेंट कारखाने सौराष्ट्रात पोरबंदर, द्वारका व सिक्का येथे आणि रासायनिक मालाचे कारखाने बडोद्याच्या परिसरात आहेत. सुती, कृत्रिम धाग्याचे व रेशमी विणकाम आणि जरीकाम सुरतेत केंद्रित आहे. दोन लोकरगिरण्या सौराष्ट्रात जामनगरला असून, तीत सु. १२,००० चात्या व १६७ यंत्रमाग आहेत. राज्यात ६ औद्योगिक वसाहती असून त्यांची संख्या आणखी वाढून वेगवेगळे कारखानदारी धंदे अधिक विकसित होत आहेत. खेडा जिल्ह्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोद्योगाचे उत्पादन देशभर नाव मिळवीत आहे. गुजरातेत खनिज तेल आणि ज्वलनवायू सापडल्यामुळे बडोद्याजवळ कोयाली येथील खनिज तेलशुद्धीकरणाचा कारखाना केंद्राने चालू केल्यामुळे गुजरातच्या उद्योगधंद्यांना औष्णिक शक्तीसाठी इंधनाची मोठीच सोय झाली आहे. ज्वलनवायू खंबायत, धुवरण, अंकलेश्वर-उत्रण व बडोदे, अशुद्ध तेल अंकलेश्वर ते कोयाली आणि खनिज तेल उत्पादने कोयाली ते अहमदाबाद याप्रमाणे नळांनी पोहोचविण्यात येत आहेत. १९६६ मध्ये औष्णिक व २ डीझेल केंद्रांतून २·५ लाख किवॉ. विद्युत्शक्ती निर्माण झाली. तिसऱ्या योजनेअखेर ५३ टक्के किंवा गावे व खेडी मिळून १,८४० ठिकाणांना वीज पोहोचू लागली व विद्युत् उत्पादनक्षमता ६०८ मेगॅवॉटपर्यंत वाढली. अहमदाबाद, बडोदे, सुरत, भावनगर, जामनगर व राजकोट या ठळक बाजारपेठांपैकी व्यापार केंद्र म्हणून अहमदाबादचे स्थान पश्चिम भारतात मुंबई खालोखाल आहे.
१९७०-७१ मध्ये राज्यातील एकूण ५,६५६ किमी. लोहमार्गांपैकी १,१३४ किमी. रुंदमापी ३,३८१ किमी. मीटरमापी व १,१४१ किमी.अरुंदमापी होते. लोहमार्गांचे जाळे सौराष्ट्र व बडोदे भागात अधिक दाट आहे. कच्चे व पक्के रस्ते मिळून एकंदर ३२,७९७ किमी. असून चांगले रस्ते डांग, अमरेली, जुनागढ, राजकोट व भावनगर जिल्ह्यांत तर निकृष्ट रस्ते मेहसाणा, साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अशी स्थिती होती. सर्व प्रकारची मोटार वाहने सु. ९९,६२१ असून त्यांपैकी राज्य वाहतुकीच्या ३,१४६ गाड्या रोज अंदाजे १·३७ लाख किमी. मार्गक्रमण करून सरासरी ८·४५ लाख उतारू वाहून नेतात व ४·८८ लाख रु. मिळवतात. राज्याचे सर्वात मोठे कांडला बंदर वर्षाला १५·७५ लाख टन मालाची चढउतार करते. बाकीच्या ८ मध्यम व ४२ सामान्य बंदरांपैकी ओखा, बेडी, वेरावळ, सिक्का व पोरबंदर या बंदरांतून कमाल ६ पासून किमान २ लाख टनांपर्यंत मालाची चढउतार होते. अहमदाबाद, राजकोट आणि भूज येथे नभोवाणी केंद्रे आहेत. १९६७ अखेर राज्यात सु. ६ लाख रेडिओ संच होते. गुजराती भाषेची एकूण १३ ते १५ लाख खप असणारी ४९५ नियतकालिके असून त्यांपैकी ३५ दैनिके, १२८ साप्ताहिके व २२८ मासिके आहेत.
लोक व समाजजीवन : गुजरातचे बहुसंख्य म्हणजे ८०% च्यावर लोक जरी हिंदू असले, तरी त्यांच्यात अनुसूचित जाती (६·७%) व अनुसूचित जमाती (११·६%) बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग, दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या सु. ६२% हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी, वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव, पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील १७·५ लाख मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत. पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे. हिंदूंची दैवते द्वारकेचा कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात केंद्रित झाले आहेत. गुजरातमधील बहुसंख्य मुसलमानही गुजरातीच आपली भाषा मानतात व काही पंथांचे धर्मग्रंथदेखील गुजराती लिपीत आहेत. गुजरातची जनता परधर्म सहिष्णू असली, तरी जातिभेदाच्या बंधनातून मुक्त नाही व अस्पृश्यता निर्मूलनाची प्रगतीही खुद्द महात्माजींच्या गुजरातेत अजून म्हणण्यासारखी दिसत नाही. अनुसूचित जाती व ‘साळीपरज’ जमाती वगळता बाकीचा गुजराती समाज एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतो. व्यापारी वर्ग अन्य कोणत्याही राज्यापेक्षा येथे जास्त असल्याने ‘महाजन’ वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असते. या वैश्यप्रधान संस्कृतीत अनुत्पादक विद्येला व व्यापारेतर पराक्रमाला महत्त्व नसल्याने, ब्राह्मणक्षत्रियांचे स्थान दुय्यम आहे. ज्ञातीचे नियंत्रण मानण्याची रूढी सामाजिक जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. तथापि परंपरागत आचारविचारांच्या पद्धतीत व्यावहारिक दृष्ट्या लवचिकपणाही आला आहे व उच्चनीचतेच्या कल्पना जन्मापेक्षा आर्थिक स्थितीवरूनही ठरू शकतात. १९७१ च्या शिरगणतीतील २·६ कोटीहून अधिक लोकसंख्येपैकी १·९ कोटीहून अधिक लोक, अठरा हजारांवर खेड्यांत आहेत. १ लाखावर वस्तीची अहमदाबाद, बडोदे, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर व नडियाद ही सात शहरे असून आणखी १७ शहरांची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. शिवाय पुरे किंवा छोटी छोटी शहरे गुजरातेत आणखी १९३ आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक छोट्या संस्थानांच्या राजधान्या व व्यापार उद्योगाची विविध लहानलहान केंद्रे मिळून इतर राज्यांच्या तुलनेत नगरांची संख्या गुजरातेत अधिक प्रमाणात आहे. साक्षरतेचे प्रमाण ३५·७२% आहे. २०,७३,०५३ कामगारांपैकी ५·५७% शेतकरी, ४·६२% शेतमजूर, ८९·८१% इतर कामगार आहेत. व्यापारात अन्यत्र कमाई करून आपल्या गावी चांगली घरे बांधण्याची प्रवृत्ती गुजरातेत असल्याने इतर राज्यातील खेड्यांपेक्षा इकडची खेडी अधिक संपन्न वाटतात. खेड्यातील सामान्य घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपराची आणि बऱ्यापैकी घरे विटांनी बांधलेली व कौलारू असतात. लहानमोठ्या शहरांमधून मात्र सिमेंट काँक्रीटचा वापर सर्रास आढळतो. अनेक गावांचे जुन्या तटबंदीचे भाग अजून शिल्लक आहेत. गुजराती लोक अधिकांश शाकाहारी असून खेड्यात बाजरी वा ज्वारीची भाकरी, डाळी, तेल व भाज्या त्यांच्या भोजनात असतात. नागरी वस्तीत गहू, तांदूळ, दूधदुभते व साखर यांचा समावेश रोजच्या आहारात नित्य असतो. खेड्यातून पुरुषाचा वेश धोतर, कोपरी, सदरा आणि प्रसंगी अंगरखा, साफा किंवा पागोटे व बायकांचा चोळी, घागरा, उजव्या खांद्यावर पदराची साडी किंवा ओढणी असा असतो. तसेच पायात मोठाले पोकळ वाळे, हस्तिदंती बांगड्या, गळ्यात वजनदार अलंकार आणि दंडांवर व नाकाकानांत ठळक दागिने घालण्याची आवड ग्रामीण स्त्रियांत आढळते. शहरी वस्तीत पुरुष धोतर, शर्ट, डगला व टोपी घालतात आणि स्त्रिया उजव्या खांद्यावर पदर असलेली सहावारी साडी नेसतात. उत्तर गुजरातेत व कच्छ-सौराष्ट्रात लोकांच्या पेहरावावर राजस्थानची छाप दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांची राहणी मध्य व दक्षिण गुजरातपेक्षा वेगळी असते. उत्तर गुजरात व कच्छ-सौराष्ट्राचे लोक जास्त काटक, कष्टाळू व कडवे , तर मध्य व दक्षिण गुजरातचे सौम्य, हौशी व सुखवादी वाटतात.
गुजराती भाषा नवव्या ते दहाव्या शतकांत शौरसेनीपासून विकसित झाली, असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत-प्राकृतशी संबंध असल्यामुळे तत्सम व तद्भव शब्दांचा भरणा तिच्यात आहे. त्याशिवाय फार पूर्वीपासून व्यापाराच्या निमित्ताने इराण-अरबस्तानशी संबंध आल्यामुळे त्या देशांच्या भाषांतले, पोर्तुगीजांशी संपर्क आल्यामुळे त्यांचे आणि मराठी-कन्नडच्या शेजारामुळे त्या भाषांचे, असे अनेकविध शब्द गुजरातीत आले आहेत. देवनागरीतील काही अक्षरांचा आकार बदलून व शिरोरेखा वगळून गुजराती लिपी बनली आहे. जुने कवी या भाषेला प्राकृत किंवा अपभ्रंश म्हणत. महाकवी प्रेमानंदाने हिला प्रथम गुजराती हे नाव दिले. तिचा विकास दहाव्या शतकापासून होऊ लागला. तेव्हापासून गुजराती साहित्याची निर्मिती होऊ लागली. प्राचीन गुजराती साहित्य ‘गौर्जरी अपभ्रंश’ भाषेतील आहे. दहाव्या शतकात रासो हा व्रज-मारवाडी भाषांतील राजस्तुतिपर काव्यप्रकार सुरू झाला. त्याचा उपयोग जैन कवींनी धर्मप्रचारासाठी केला. अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत धार्मिक व नैतिक स्वरूपाच्या तरंगलोलासारख्या रचना निर्माण झाल्या. भरतेश्वर बाहुबलिरास हा जैनरास सर्वांत प्राचीन आहे. त्याशिवाय सिरिस्थूलिभद्रफागूसारखी फागुकाव्ये किंवा ऋतूपरत्वे गाणी व बारमासी हा ऋतुगीतांचाच एक प्रकार जैन कवींनी व नंतर उत्तरकालीन कवींनीही हाताळला. त्या उत्तर कालातल्या ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक आख्यानकाव्यांना प्रबंध म्हणत. इ. स. १४५६ मधील झालोरच्या पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध विख्यात आहे. दुसरा कालखंड गुर्जर भाषेच्या भक्तियुगाचा. त्यात नरसी मेहता, मीरा, आखो, भगत, प्रेमानंद, पुरोगामी विचारसरणीचा शामळ, दयाराम, भालण, भीम अशा अनेकांनी काव्ये रचली. त्यात नरसी-प्रेमानंद-दयाराम या त्रिमूर्तींनी गुजरात काव्यात श्रेष्ठ स्थान मिळविले. अर्वाचीन कालखंड १८५० मध्ये सुरू झाला. त्यांत नवप्रेरणेचा उद्गाता नर्मद, वेन चरित्रकार दलपतराम, विद्वान साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया, प्रेमकवी कलापी, कान्त, सरस्वतीचंद्र ह्या युगप्रवर्तक कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी, भावकवी नानालाल, कांदबरीकार कन्हैयालाल मुनशी यांची नावे उल्लेखनीय आहेत. महात्मा गांधींच्या लेखनाने तर गुजराती भाषेत नवे गांधीयुग अवतरले. मोटेचा नाडा धरणाऱ्या माणसालाही समजेल, अशी सुबोध गुजराती भाषा लिहिण्यास कृतसंकल्प होऊन त्यांनी ती समाज प्रबोधनासाठी राबवली. त्यांचे समकालीन व अनुयायी काका कालेलकर, किशोरलाल मशरूवाला, महादेवभाई देसाई, रामनारायण पाठक व धूमकेतू अशांच्या लेखनाने दुसऱ्या महायुद्धकालापर्यंत गुजराती भाषा संपन्न झाली. १९४० नंतरच्या काळात कादंबरीकार रमणलाल देसाई, चुनीलाल मडिया, आचार्य गुणवंतराय, पन्नालाल पटेल कथालेखक गुलाबदास ब्रोकर, ईश्वर पेटलीकर नाटककार चंद्रवदन मेहता विनोदलेखक ज्योतिंद्र दवे टीकाकार विजयराय वैद्य, विष्णुप्रसाद त्रिवेदी सौराष्ट्राचे सव्यसाची साहित्यकार झवेरचंद मेघाणी त्याचप्रमाणे उमाशंकर जोशी, राजेंद्र शाह, निरंजन भगत अशा वाङ्मयसेवकांनी गुजराती भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे.
शिक्षण : १९६७ च्या शासकीय अंदाजानुसार १४% प्रजा शिक्षणाचा लाभ घेत होती. तिसऱ्या योजनेत ६ ते ११ वयाच्या मुलांपैकी ९२% मुले विनाशुल्क अनिवार्य प्राथमिक शिक्षण घेत होती. १९७४-७५ मध्ये २१,९०० प्राथमिक शाळांत ३५,००,००० विद्यार्थी असून माध्यमिक शाळांची संख्या २,१५० होती. त्यांत ७,७५,००० विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या २७० शाळांत १,३७,००० मुले व ३,३०० इतर शाळांतून १,५०,००० मुले होती. तिसऱ्या योजनेअखेर ५ अभियांत्रिकी महाविद्यालये, १२ विविध हुन्नर संस्था व ४२ तंत्रशाळा चालू होत्या. १८ कामगार प्रशिक्षण केंद्रांत ४,२०० विद्यार्थी होते. शिक्षणावर सु. २० कोटी रु. पर्यंत खर्च झाला. १९७४-७५ मध्ये राज्यात एकूण आठ विद्यापीठे असून त्यांपैकी एक निवासी, एक शुद्ध आयुर्वेदीय व एक कृषी विद्यापीठ आहे. महाविद्यालयांपैकी ७६ कला व विज्ञान, १३ व्यापार, १ शारीरिक प्रशिक्षण व १३ अध्यापन प्रशिक्षण या विषयांची होती. विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९४,००० होती.
कला व क्रीडा : गुजरातमधील हस्तकलांत मातीची भांडी, सुरती जरीकाम, कच्छी जडावकाम, पाटण येथील गोमेद (अकीक) अलंकार, अखेडा लाखकाम, पालनपूरचा सुंगधी माल आणि अहमदाबाद व इतर ठिकाणचे कोरीव लाकूडकाम उल्लेखनीय आहेत. गुजरातच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य बाराव्या ते पंधराव्या शतकांतील जैन ग्रंथांत व नंतर पंधराव्या शतकातील हिंदू पोथ्यांत मिळालेल्या चित्रांतून आढळते. राजपूत शैली आधीची ही ‘दक्षिणी राजस्थान’ शैली खास गुजरातची मानण्यात येते. ‘शिलावत’ शैलीतील कच्छ व सौराष्ट्रातील भित्तिचित्रेही गुजरातच्या प्रादेशिक चित्रकलेची स्वतंत्र शैली दाखवितात. आधुनिक काळात गुजराती चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन लाठीनरेश मंगलसिंगजी, ब्रिजलाल भगत, खोडीदार परमार, आचार्य रविशंकर रावळ, श्यावक्ष चावडा, कनू देसाई आदी चित्रकार ख्याती पावले आहेत. गुजरातच्या रंगभूमीची परंपरा अंबाजी-बहुचराजी या देवींच्या उत्सवातून होणाऱ्या ‘भवाई’ नामक प्रहसनात्मक नाट्यप्रकाराइतकी जुनी आहे. आधुनिक रंगभूमीची सुरुवात गुजरातेत १८५०च्या सुमारास झाली. त्या कामात पारशी मंडळींनी पुढाकार घेतला. हौशी नाट्यप्रयोगापासून सुरुवात होऊन, नंतर हळूहळू धंदेवाईक नाटक मंडळ्या नाटके करू लागल्या. प्रथम रूपांतरित नाटके होत पण लौकरच स्वतंत्र कृती होऊ लागल्या. १८६८ पासून नर्मद, मणिलाल त्रिभुवनदास, प्रभुलाल द्विवेदी, कन्हैयालाल मुनशी, चंद्रवदन मेहता यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी गाजविली. गुजरातच्या परंपरागत सामूहिक क्रीडा, रास व गरबा ही नृत्ये आणि मार्गी व देसी हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. खेळ व करमणूक भक्तीवर आधारल्यामुळे लोकनृत्ये व समूहगायने यांत स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजाला निःसंकोचपणे भाग घेता येतो. व्यापारी साहस, सुखोपभोग, दानशूरता, कला, पुरस्कार, व्यवहारचातुर्य व श्रद्धाळूपणा ही गुजरातची विशेष लक्षणे मानता येतील.
संदर्भ : 1. Dixit, K. R. Geography of Gujarat, New Delhi, 1970.
2. Munshi, K. K. Glory that was Gurjara Desa, Bombay, 1955.
ओक, शा. नि.
सांस्कृतिक भारत : गुजरात (उत्तरार्ध)
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार गुजरातची लोकसंख्या ६,०३,८३,६२८ इतकी आहे. राज्याची साक्षरता ७९.३१टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा गुजराती असून हिंदी आणि इंग्रजी भाषेतही व्यवहार केले जातात. राज्यात ३३ जिल्हे समाविष्ट आहेत. गुजरात राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. गुजरात हे भारताच्या पश्चिम प्रदेशातील राज्य आहे. महात्मा गांधी हे १९१७ ते १९३० पर्यंत याच राज्यातील साबरमती आश्रमात रहात असत.
गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, पालिटना, पावागड, अंबाजी, भद्रेश्वर, श्यामलजी, तरंग, गिरनार ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व आहे. पाटणपुरा, सिद्धपूर, घुमली, दाभोई, वाडनगर, मोधेरा, लोथल व अहमदाबाद ही शहरेही ऐतिहासिक. अहमदपूर-मांडवी, चोरवाड व तिथल हे गुजरातची सुंदर समुद्रकिनारे. सतपुरा, सिंहाचे अभयारण्य, गिरचे अभयारण्य जंगल व रानटी गाढवांचे अभयारण्य (कच्छ) आदी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत.
अलंग हे निकामी जहाजांची विल्हेवाट लावण्याचे गुजरातमधील भारतातील एकमेव बंदर आहे. अहमदपूर मांडवी हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण आहे. अहमदाबादचे प्राचीन नाव कर्णावती असून वस्त्रोद्योगात भारतात अग्रेसर आहे. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम. आणंद हे दुग्ध विकासात भारतात अग्रेसर. कांडला हे कच्छच्या आखातातील आंतरराष्ट्रीय बंदर. गांधीनगर ही गुजरात राज्याची नवनिर्मित सुनियोजित वसवलेली राजधानी. स्वामी नारायण पंथाचे अक्षरधाम हे अतिविशाल व कलात्मक मंदिर. जामनगर हे ऐतिहासिक ठिकाण. प्राचीन राजधानी. जुनागड हे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी वसलेले प्राचीन नगर. संत नरसी मेहतांचे जन्मस्थान. डभोई येथील तेराव्या शतकातील किल्ला. तिथल हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य पर्यटन स्थान असून दांडी हे ऐतिहासिक स्थान आहे. इ.स. 1930 ची महात्मा गांधींची दांडीयात्रा व मिठाचा सत्याग्रह.
द्वारका ही श्रीकृष्णाने आपली राजधानी मथुरेहून इथे आणली. नलसरोवर पक्षी अभयारण्य. नवसारी पारश्यांची ज्योत. पाटण ही प्राचीन राजधानी. लोथल येथील हडप्पा संस्कृतीचे अवशेष. वडोदरा ही गायकवाड संस्थानची राजधानी असून राजवाडे. सोमनाथ मंदिरे येथे आहेत. सुरत हे तापीवरील प्राचीन ऐतिहासिक शहर येथे आहे.गुजराती लोकसंगीत हे सुगम संगीत नावाने ओळखले जाते. तुरी, बंगाल आणि पावा, रावण हातो, एकतारो, जंतर, मंजिरा, झांज आणि पोटझोडे ही गुजरातची लोकवाद्य आहेत.
गरबा, दांडिया, तिफणी आदी लोकनृत्य गुजरात मध्ये लोकप्रिय आहेत. गरबा हे विशेषत: महिलांचे नृत्य असून विशिष्ट ठेक्यावर टाळ्या वाजत वा हातातल्या टिपऱ्या खेळत फेर धरून हे नृत्य केले जाते. हे नृत्य नवरात्रीत देवीच्या उत्सवात केले जाते. दांडिया नृत्यात काठी नृत्य आणि तलवार नृत्यही अंतर्भूत असते. दुर्गा आणि महिषासुर यांच्यात झालेले युद्ध म्हणजे दांडिया नृत्य. तिफनी नृत्य हे सौराष्ट्रातील नृत्य आहे. कामगार स्त्रिया हे नृत्य करतात. हातात मोगरी सारखा लाकडी दंडुका घेऊन जमिनीवर आदळले जातात.
हेमचंद्र आचार्य, नरसी मेहता, मिराबाई, प्रेमानंद भट्ट, श्यामल भट्ट, दयाराम, दलपतराम, गोवर्धनराम त्रिपाठी, महात्मा गांधी, के.एम.मुन्शी, उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, पन्नालाल पटेल, राजेंद्र शहा हे गुजरातीतील महत्त्वाचे लेखक आहेत. कवी कांत, झवेरचंद मेघानी, कल्पी आदी गुजराती कवी आहेत.
गुजराती लोकनाट्य भवाई या नावाने प्रसिद्ध आहे. लोकसंगीत आणि लोककला यांच्या सरमिसळीत ही भवाई कला सादर केली जाते.अहमदाबाद, वडोदरा, भावनगर, भूज, सुरत, जामनगर, कांडला, केशोद, पोरबंदर, राजकोट येथे विमानतळ आहेत. लुनी, मही, साबरमती, बनास, नर्मदा, तापी, दमणगंगा, अजी, अंबिका, अरूणावती, औरंगा, बलराम, भादर, भु्खी, भुरूड, चिराज, चौक, फुलकी, गजांनसर, घेला, हिरन, काली, कंकावती, करेश्वर, कायला, केरी, खारी, खोकरा, कीम, कोलाक, मालन, मिंढोला, नागमोती, नारा, नायरा, रंगमती, रावळ, रूखमावती, रूपेन, साई, सरस्वती, शाही, सुवी, उतावली, वेगडी, विश्वमित्री या नद्या गुजरातमधून वाहतात.
लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे

गुजरात का नक्शा
गुजरात का नक्शा (मानचित्र)

गुजरात के महत्वपूर्ण तथ्य | |
|---|---|
| राज्यपाल | ओम प्रकाश कोहली |
| मुख्यमंत्री | विजय रूपानी |
| आधिकारिक वेबसाइट | www.gujaratindia.com |
| स्थापना का दिन | 1 मई, 1960 |
| क्षेत्रफल | 1,96,024 वर्ग किमी |
| घनत्व | 308 प्रति वर्ग किमी |
| जनसंख्या (2011) | 60,439,692 |
| पुरुषों की जनसंख्या (2011) | 31,491,260 |
| महिलाओं की जनसंख्या (2011) | 28,948,432 |
| जिले | 33 |
| राजधानी | |
| नदियाँ | साबरमती, माही, नर्मदा, ताप्ती, दमनगंगा, सरस्वती |
| वन एवं राष्ट्रीय उद्यान | गिर राष्ट्रीय उद्यान, वाइल्ड एस अभयारण्य कच्छ, नल सरोवर पक्षी अभयारण्य, कृष्णमृग राष्ट्रीय उद्यान, वेलावदार राष्ट्रीय उद्यान, बंसदा राष्ट्रीय उद्यान |
| भाषाएँ | अंग्रेजी, गुजराती, सिंधी, मारवाड़ी, कच्छी, उर्दू, हिन्दी, सौराष्ट्र, वासवी |
| पड़ोसी राज्य | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, दमन और दीव, दादरा और नागर हवेली |
| राजकीय पशु | एशियाई शेर |
| राजकीय पक्षी | ग्रेटर फ्लेमिंगो |
| राजकीय वृक्ष | आम |
| राजकीय फूल | मैरीगोल्ड |
| नेट राज्य घरेलू उत्पाद (2011) | 75115 |
| साक्षरता दर (2011) | 76.64% |
| 1000 पुरुषों पर महिलायें | 918 |
| विधानसभा निर्वाचन क्षेत्र | 182 |
| संसदीय निर्वाचन क्षेत्र | 26 |
गुजरात के बारे में
गुजरात या कहा जाए “महापुरूषों की धरती“ देश के पश्चिमी भाग का सबसे महत्वपूर्ण राज्य है। विशाल अरब सागर इसकी भूगोलीय सीमा है और पश्चिम में पाकिस्तान का सिंध प्रांत स्थित है, उत्तर में राजस्थान, दक्षिण में महाराष्ट्र राज्य, दमन, दीव और दादरा जैसे केन्दª शासित प्रदेश और पूर्व में मध्य प्रदेश है और गुजरात इन सबके बीच अपने अद्भुत लैंडस्केप के कारण अनूठा लगता है। गुजरात की राजधानी गांधीनगर है और अहमदाबाद यहां का सबसे मुख्य शहर है।
गुजरात का क्षेत्रफल लगभग 196,024 वर्ग किलोमीटर है और 2011 की जनगणना के अनुसार राज्य की कुल जनसंख्या 60,383,628 है। महात्मा गांधी और वल्लभभाई पटेल जैसे भारत के कई प्रसिद्ध व्यक्तियों की जन्मभूमि होने के कारण इस जगह की सांस्कृतिक और पारंपरिक विरासत बहुत समृद्ध है और ये राज्य का गौरव बढ़ाती है। यहां की गर्मियाँ बहुत गर्म और कठोर और सर्दियाँ हल्की और सुहानी होती हैं। मानसून अक्सर राज्य के दक्षिणी भाग में बरसता है और उत्तर पश्चिमी हिस्सा सालभर सूखा ही रहता है। गुजरात शिक्षा संबंधी पर्यटन के लिए अनुकूल है क्योंकि यहां भारतीय संस्कृति की विभिन्न विशेषताओं के बारे में बहुत कुछ सीखा जा सकता है। गुजरात की सरकार बहुत सक्रिय है और यहां 182 विधानसभा क्षेत्र हैं। पहले गुजरात बम्बई राज्य (जो आज महाराष्ट्र और गुजरात है) के तहत आता था और 1960 में यह अलग राज्य बना।
गुजरात का इतिहास
गुजरात के इतिहास को प्राचीन, मध्यकालीन और आधुनिक उपवर्गों में बाँटा जा सकता है। प्राचीन इतिहास को सिंधु घाटी सभ्यता से जोड़ा जा सकता है। गुजरात में सबसे पहले गुज्जर आकर बसे, जो कि पाकिस्तान और अफगानिस्तान से थे। इसके बाद मौर्य वंश आया जिसके राजा चन्द्रगुप्त मौर्य और उनके पौत्र राजा अशोक ने इस क्षेत्र में अपना वर्चस्व स्थापित किया। उनकी मौत के बाद कई राजवंश आए जैसे साका, शुंगा, मैत्रका, चैरा, सौलंकी और बघिलाह आदि जिन्होंने गुजरात पर राज किया और फिर मुसलमानों ने यहां हमला कर लगभग 400 सालों तक राज किया। महमूद गजनी से लेकर अलाउद्दीन खिलजी और राजा अकबर तक सभी ने अपने पराक्रम से गुजरात को जीता लेकिन फिर इन मुस्लिम राजाओं को मराठा राजा शिवाजी ने सत्ता से बाहर कर दिया। सत्रहवीं सदी में अंग्रेजों के आने से मराठा शक्ति थोड़ा दबाव में आई और राज्य कई रियासतों में बँट गया जैसे अहमदाबाद, भरूच, पंचमहल, कैरा और सूरत जिस पर अंग्रेजों ने राज किया। आजादी की लड़ाई के दौरान गुजरात उन स्वतंत्रता सैनानियों का केन्द्र बन गया जो वहां जन्में थे। आजादी के बाद गुजरात बम्बई राज्य का हिस्सा बन गया जिस पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने शासन किया। 1960 में बम्बई राज्य को महाराष्ट्र और गुजरात में बाँटा गया और उन्हें अलग राज्यों का दर्जा मिला।
भूगोल और जलवायु
भारतीय प्रायदीप के पश्चिमी तट पर स्थित होने के कारण इस राज्य में देश का तीसरा सबसे लंबा समुद्री किनारा है जो कि 1300 किमी लंबा है। भौगोलिक तौर पर राज्य के तीन मुख्य उपविभाजन हैः उत्तर पूर्व में बंजर और पथरीला कच्छ, जिसमें कच्छ का प्रसिद्ध रण या रेगिस्तान शामिल है और छोटे-छोटे पहाड़ों से बना पहाड़ी क्षेत्र सौराष्ट्र या काठियावाड़। मुख्य भूमि कच्छ से शुरू होकर दमनगंगा नदी तक है जो कि कछारी मिट्टी से भरी है। गुजरात से साबरमती, नर्मदा, तापी और दमनगंगा नदियाँ गुजरती हैं। राज्य के उत्तरी और पूर्वी भाग की सीमा अरावली, सतपुड़ा, विंध्य और सहयाद्री पर्वतों से घिरी है। राज्य का एक बड़ा हिस्सा गिर, डांग और पंचमहल जैसे जंगलों से ढंका है। इन जंगलों में नम और सूखे दोनों तरह के वनस्पति मिलते हैं। उनमें से खासकर कच्छ के पास के इलाकों में कांटेदार हैं। गुजरात के दक्षिणी भाग की आबोहवा नम और उत्तरी हिस्से कि शुष्क है। राज्य में बारिश का सालाना औसत 33 से 152 सेमी है जबकि डांग में लगभग 190 सेमी बारिश दर्ज होती है। गुजरात के कर्क रेखा पर स्थित होने के कारण उत्पन्न कठिन जलवायु को खंभात की खाड़ी और अरब सागर सहज कर देते हैं।
पर्यटन
गुजरात को “पश्चिम का जेवर“ भी कहते हैं और यहां कई प्रकार के संग्रहालय, किले, अभयारण्य, मंदिर और कई रूचिकर जगहें हैं जो पर्यटकों के लिए दावत से कम नहीं हैं। इस जगह का गहरा ऐतिहासिक पहलू है इस कारण यहां कई खास जगहें है जो देखने लायक हैं, जैसे हृदय कुंज, महात्मा गांधी का निवास स्थान, लोथल या सिंधु घाटी सभ्यता के अवशेष, कीर्ति मंदिर या महात्मा गांधी का जन्मस्थान, बड़नगर का प्रसिद्ध हटकेश्वर मंदिर और धौलावरिया आदि। पर्यटकों को कई धार्मिक स्थान भी अच्छे लगते हैं, जैसे द्वारका, पावागढ़, शामलजी, पालिताना पवर्त और गिरनार पर्वत स्थित जैन मंदिर। वास्तुकला और पुरातत्व स्मारकों में रूचि रखने वाले लोग अहमदाबाद, डबलोई, पाटन, मोधेरा आदि के अद्भुत स्मारक भी देखने जाते हैं। पर्यटक सतपुड़ा की पहाड़ी के साथ-साथ कोरवार्ड, तीथल और मांडवी के समुद्री किनारों पर भी जाना पसंद करते हैं। इसके अलावा गिर शेर अभयारण्य और कच्छ अभयारण्य प्रकृति प्रेमियों की पसंदीदा जगह है। इनके अलावा कई किले जैसे उपरकोट किला, नज़र बाग महल, धबोई किला आदि और संग्रहालय, जैसे गांधी स्मारक संग्रहालय, गांधी संग्रहालय, बड़ौदा संग्रहालय और पिक्चर गैलेरी भी हर साल हजारों पर्यटक देखते हैं।
गुजरात की सरकार और राजनीति
गुजरात राज्य में 26 जिले हैं और गांधीनगर राजनीतिक गतिविधियों का केन्द्र है। गुजरात की विधानसभा मे 182 सदस्य हैं, और जिनमें से 39 सीटें अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिए आरक्षित हैं। अन्य भारतीय राज्यों की तरह गुजरात में भी मुख्यमंत्री ही सरकार और विधानसभा का नेता होता है और उसके पास विशेष कार्यकारी शक्तियाँ होती हैं। राज्यपाल राज्य का प्रधान होता है और उसकी नियुक्ति राष्ट्रपति करते हैं और विधानसभा के सदस्य स्पीकर का चुनाव करते हैं, जो विधानसभा की बैठकों की अध्यक्षता करता है। आजादी के बाद से गुजरात जब तक बम्बई राज्य का हिस्सा था तब तक राज्य में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सत्ता में रही। नब्बे के दशक में कांग्रेस को हराकर भाजपा सत्ता में आई और अब तक सत्ता में है।
गुजरात में शिक्षा
गुजरात देश के कुछ प्रसिद्ध और प्रतिष्ठित शैक्षिक संस्थानों का केन्द्र है। सरकार ने राज्य में बुनियादी शिक्षा को बढ़ावा देने के लिए कई प्राथमिक स्कूल खोलने के साथ राज्य में बच्चों के लिए निःशुल्क शिक्षा के कई कार्यक्रम शुरू किये हैं। राज्य में कई सरकारी और निजी स्कूल सीबीएसई बोर्ड और सीआईएसई बोर्ड से संबद्ध हैं। यहां महिला शिक्षा पर विशेष ध्यान दिया गया है। उच्च शिक्षा के लिए कई संस्थान हैं, जैसे गुजरात यूनिवर्सिटी, सौराष्ट्र यूनिवर्सिटी, हेमचन्द्राचार्य उत्तर गुजरात यूनिवर्सिटी आदि गुजरात के कुछ खास संस्थान हैं। आईआईएम अहमदाबाद, बड़ौदा की महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल प्रौद्योगिकी संस्थान, सूरत और अहमदाबाद का राष्ट्रीय डिजाइन संस्थान देश के नामी संस्थान हैं। गुजरात में कई इंजीनीयरिंग काॅलेज हैं, जैसे सरदार वल्लभभाई पटेल तकनीकी संस्थान, धीरुभाई अंबानी सूचना और संचार प्रौद्योगिकी संस्थान जो कि भारत के अव्वल दर्जे के संस्थान माने जाते हैं। कुछ अन्य संस्थानों में केंद्रीय नमक और समुद्री रसायन अनुसंधान संस्थान गुजरात का एक सम्माननीय संस्थान है जो समुद्री नमक, देशी झील नमक और अवभूमि लवण-जल पर होने वाले अनुसंधानों को बढ़ावा देता है।
गुजरात की अर्थव्यवस्था
गुजरात भारत का सबसे बड़ा औद्योगिक राज्य है जिसका राष्ट्र के कुछ महत्वपूर्ण कारोबारों पर कब्जा है। कपड़ा, रसायन, बिजली, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, वनस्पति तेल, सोडा एश और उर्वरकों का निर्माण राज्य में होता है। खनिज समृद्ध राज्य होने के नाते गुजरात भारत के 66 प्रतिषत नमक की जरुरत पूरी करता है और 35 प्रतिशत रासायनिक आवश्यकता भी यहीं से पूरी होती है। अंकलेश्वर और खंभात को प्राकृतिक गैस और तेल के उत्पादन के लिए जाना जाता है। राजकोट आॅटो इंजन, आॅटो अवयवों, सीएनजी मशीनों, फोर्जिंग और कास्टिंग के हिस्सों के निर्माण के उद्योगों का केन्द्र है। गुजरात अपने उत्पादन और रत्नों और ज़ेवरातों के कारोबार के लिए भी जाना जाता है। सूरत हीरा व्यापार के लिए मशहूर है। गुजरात कपास, तंबाकू, चावल, मूंगफली, गेहूँ, बाजरा, ज्वार, मक्का का मुख्य उत्पादक है और राज्य की अर्थव्यवस्था कृषि आधारित है। डेयरी और पषुपालन भी गांवों की अर्थव्यवस्था का मुख्य स्रोत है। अमूल सहकारी दूध संघ के माध्यम से गुजरात भारत ही नहीं बल्कि एशिया का सबसे बड़ा दूध उत्पादक है। तेल, साबुन और पेट्रोल के अलावा गुजरात पशुधन, अण्डे और ऊन का बहुत बड़ा उत्पादक है। पर्यटन भी राज्य की अर्थव्यवस्था का अच्छा स्रोत है। जहाज तोड़ने का विष्व का सबसे बड़ा यार्ड भावनगर में है और रिलायंस पेट्रोलियम जो कि दुनिया की सबसे बड़ी जमीनी रिफायनरी है, जामनगर में है।
जनसांख्यिकी
2011 की जनगणना के अनुसार गुजरात की जनसंख्या 60, 683, 628 है और जनसंख्या का घनत्व लगभग 308 प्रति वर्ग किमी है जो कि दूसरे राज्यों के मुकाबले कम है। राज्य में पुरुषों और महिलाओं का अनुपात 1000 पुरुषों के अनुपात में महिलाओं की संख्या 918 है जो कि अन्य राज्यों के मुकाबले कम है। 89 प्रतिशत हिंदू आबादी के साथ हिंदू धर्म राज्य का प्रमुख धर्म है। श्रीनाथजी के रुप में भगवान कृष्ण राज्य में बहुत पूजे जाते हैं। 9 ़1 प्रतिशत आबादी के साथ मुस्लिम समुदाय राज्य की दूसरी मुख्य आबादी है, बाकी जनसंख्या में जैन, ईसाई और सिख हैं। हिंदू आबादी में गुजरातियों की बहुतायत है जो कि बहुत जीवंत और मिलनसार हैं। राज्य में बिहारी और मारवाड़ी समुदाय भी अच्छी संख्या में है। पुर्तगाली लोगों का एक छोटा सा हिस्सा अहमदाबाद में रहता है। दूसरे लोगों के साथ ही गुजरात में भारतीय समुदाय के तमिल, मलयाली, पंजाबी, सिंधी, तिब्बती, नेपाली, असमिया, बंगााली, तेलगु, उडि़या और कोंकणी के साथ-साथ विदेशी समुदाय के पारसी, यहूदी, दक्षिण कोरियाई, एंग्लो इंडियन और यूनानी भी रहते हैं।
गुजरात की संस्कृति
विविध संस्कृतियों के कारण गुजरात की सांस्कृतिक और पारंपरिक विरासत समृद्ध और जीवंत है। इस राज्य को मेलों और त्यौहारों की धरती के तौर पर जाना जाता है। पारंपरिक त्यौहारों जैसे होली, दीपावली और दशहरा के अलावा यहां अन्य हिंदू त्यौहार जैसे मकर संक्रंाति या पतंगबाजी का त्यौहार, कच्छ महोत्सव, मोधेरा और भद्र पूर्णिमा भी यहां मनाए जाते हैं। ईद, क्रिसमस और महावीर जयंती भी यहां बराबर उत्साह से मनाए जाते हैं। नृत्य और संगीत यहां के त्यौहारों और विशेष अवसरों का खास हिस्सा है। यहां के नृत्यों के रुप जैसे डांडिया, गरबा, गरबी और पधार दुनियाभर में प्रसिद्ध हैं। यहां के लोक गीत और संगीत का स्थानीय ही नहीं कई दिग्गज कलाकार भी नियमित अभ्यास करते हैं। कई राग जैसे खंबावती, टोडी, लाटी और सौराठी गुजरात से ही उत्पन्न हुए हैं।
राज्य के हस्तशिल्प में आधुनिक और प्राचीन प्रभाव का मेल दिखता है जो कलात्मक और सुंदर है। यहां की कढ़ाई, लकड़ी की नक्काशी, जेवर और पत्थर का काम दुनियाभर में प्रसिद्ध है। गुजरात की कढ़ाई के कुछ खास प्रकार हैं, सलामा, चालक, टीकी और कंगीरी। आभला राज्य का प्रसिद्ध बुनाई का काम है जिसमें आरसी को कपड़ों पर बुना जाता है।
गुजरात की भाषा
गुजरात में रहने वाले लोग विभिन्न जाति और धर्मों के हैं, इसलिए यहां राजभाषा गुजराती के अलावा कई भाषाएँ बोली जाती हैं। गुजराती भाषा एंग्लो इंडियन परिवार से ली गई है और इसकी जड़ें संस्कृत में हैं। गुजराती 11 प्रकार से बोली जाती है और राज्य में अलग-अलग प्रांतों से आकर बसे लोग बोलते हैं। इनमें से कुछ मानक गुजराती, काठीयावाड़ी, खरवा, खाकरी, गमठी और पारसी बोलियाँ हैं। पारसी गुजराती सुनने में बहुत मीठी है और मूल पारसी इसे बोलते हैं। यह मूल गुजराती से थोड़ी अलग है इसमें फारसी का भी मेल है और यह बोलने और लिखने में इस्तेमाल होती है। राज्य की सीमा राजस्थान, महाराष्ट्र और मध्य प्रदेश से लगे होने के कारण सीमा के पास रहने वाले लोग वहां की भाषाएँ भी बोलते हैं। मराठी, हिंदी और मारवाड़ी भी स्वाभाविक कारणों से राज्य में बहुत बोली जाती है। कुछ आबादी सिंधी और उर्दू भी बोलती है। कच्छ जो कि राज्य का महत्वपूर्ण हिस्सा है वहां की मातृभाषा कच्छी है और उस क्षेत्र में बहुत प्रसिद्ध है। कच्छी को सिंधी और गुजराती का मिश्रण माना जाता है।
परिवहन
गुजरात भारत के अन्य राज्यों से अच्छी तरह जुड़ा है और दुनिया के किसी भी हिस्से से यहां आसानी से पहुंचा जा सकता है। गुजरात में कई घरेलू और अंतर्राष्ट्रीय हवाईअडड्े हैं, जिनसे अमेरिका, यूरोप और मध्य पूर्व के लिए नियमित उड़ानें हैं, खासकर अहमदाबाद से। कई निजी और सरकारी एयरलाईन जैसे जेट एयरवेज़, इंडिगो, एयर सहारा और इंडियन एयरलाइंस की राज्य में सेवाएँ हैं। रेलवे का अच्छा नेटवर्क होने के कारण भारत के किसी भी हिस्से से गुजरात पहुंचा जा सकता है। अहमदाबाद, सूरत और वडौदरा जैसे बड़े नगर भारत के हर महानगर से जुड़े हैं। यहां से पाकिस्तान के कराची और पेशावर के लिए भी रेल सेवा उपलब्ध है। गुजरात राज्य की सड़कों को सबसे उम्दा किस्म की सड़कंे माना जाता है। गुजरात से सभी पड़ोसी राज्यों के लिए लक्ज़री बसें मिलती हैं और अच्छी सड़कों कि वजह से इनकी यात्रा बहुत आरामदायक होती है। सरकार ने राज्य में स्थानीय बस सेवा भी चला रखी है जिनसे स्थानीय परिवहन भी बहुत आरामदायक है। यहां टैक्सी, आॅटो रिक्शा, सायकिल रिक्शा बहुत कम हैं, लेकिन निजी कारों की संख्या अच्छी है। घोड़ागाड़ी परिवहन का आम साधन है जिसे हज़ारों लोग नियमित तौर पर इस्तेमाल करते हैं।
गुजरात के जिले
| क्र.सं. | जिला का नाम | जिला मुख्यालय | जनसंख्या (2011) | विकास दर | लिंग अनुपात | साक्षरता | क्षेत्र (वर्ग किमी) | घनत्व (/ वर्ग किमी) |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | अहमदाबाद | अहमदाबाद | 7214225 | 24.03% | 904 | 85.31 | * | * |
| 2 | अमरेली | अमरेली | 1514190 | 8.63% | 964 | 74.25 | * | * |
| 3 | आनंद | आनंद | 2092745 | 12.70% | 925 | 84.37 | * | * |
| 4 | अरावली | मोडासा | * | * | * | * | * | * |
| 5 | बनासकांठा | पालनपुर | 3120506 | 24.61% | 938 | 65.32 | * | * |
| 6 | भरूच | भरूच | 1551019 | 13.16% | 925 | 81.51 | * | * |
| 7 | भावनगर | भावनगर | 2880365 | 16.63% | 933 | 75.52 | * | * |
| 8 | बोटाद | बोटाद | * | * | * | * | * | * |
| 9 | छोटा उदयपुर | छोटा उदयपुर | * | * | * | * | * | * |
| 10 | देवभूमी द्वारका | खम्भलिए | * | * | * | * | * | * |
| 11 | दोहद | दोहद | 2127086 | 29.98% | 990 | 58.82 | * | * |
| 12 | गांधीनगर | गांधीनगर | 1391753 | 4.29% | 923 | 84.16 | * | * |
| 13 | गिर सोमनाथ | वेरावल | * | * | * | * | * | * |
| 14 | जामनगर | जामनगर | 2160119 | 13.44% | 939 | 73.65 | * | * |
| 15 | जूनागढ़ | जूनागढ़ | 2743082 | 12.05% | 953 | 75.8 | * | * |
| 16 | कच्छ | भुज | 2092371 | 32.16% | 908 | 70.59 | * | * |
| 17 | खेड़ा | नाडियाड | 2299885 | 13.62% | 940 | 82.65 | * | * |
| 18 | महीसागर | लूनावड़ा | * | * | * | * | * | * |
| 19 | मेहसाणा | मेहसाणा | 2035064 | 10.73% | 926 | 83.61 | * | * |
| 20 | मोरबी | मोरबी | * | * | * | * | * | * |
| 21 | नर्मदा | राजपीपला | 590297 | 14.75% | 961 | 72.31 | * | * |
| 22 | नवसारी | नवसारी | 1329672 | 8.15% | 961 | 83.88 | * | * |
| 23 | पंचमहल | गोधरा | 2390776 | 18.05% | 949 | 70.99 | * | * |
| 24 | पाटन | पाटन | 1343734 | 13.61% | 935 | 72.3 | * | * |
| 25 | पोरबंदर | पोरबंदर | 585449 | 9.06% | 950 | 75.78 | * | * |
| 26 | राजकोट | राजकोट | 3804558 | 20.02% | 927 | 80.96 | * | * |
| 27 | साबरकांठा | हिम्मतनगर | 2428589 | 16.62% | 952 | 75.79 | * | * |
| 28 | सूरत | सूरत | 6081322 | 42.24% | 787 | 85.53 | * | * |
| 29 | सुरेंद्रनगर | सुरेंद्रनगर | 1756268 | 15.91% | 930 | 72.13 | * | * |
| 30 | तापी | व्यारा | 807022 | 12.14% | 1007 | 68.26 | * | * |
| 31 | डांग | आहवा | 228291 | 22.26% | 1006 | 75.16 | * | * |
| 32 | वडोदरा | वडोदरा | 4165626 | 14.38% | 934 | 78.92 | * | * |
| 33 | वलसाड | वलसाड | 1705678 | 20.92% | 922 | 78.55 | * | * |
गुजरात : इतिहास और संस्कृति की समृद्ध परंपरा
महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल और अब नरेन्द्र मोदी जैसे नेता देश को देने वाले गुजरात की इतिहास और संस्कृति की समृद्ध परंपरा रही है। गुजरात का इतिहास साढ़े तीन हजार ईसा पूर्व का माना जाता है, लेकिन वर्तमान गुजरात महाराष्ट्र से अलग होकर 1 मई 1960 को अस्तित्व में आया।
गुजरात में विधानसभा की 182 सीटें हैं और 2012 के चुनाव में भाजपा को 115, कांग्रेस को 61 और अन्य के खाते में 6 सीटें आई थीं। राज्य में लोकसभा की 26 सीटें हैं। करीब 14 साल राज्य के मुख्यमंत्री रहे नरेन्द्र मोदी आज देश के प्रधानंमत्री हैं। राज्य में पिछले 22 सालों से भाजपा की सरकार है। इससे पहले ज्यादातर समय कांग्रेस की ही सरकार रही।
क्षेत्रफल एवं जनसंख्या : गुजरात भारत के पश्चिमी तट पर स्थित है। इसके पश्चिम में अरब सागर, उत्तर में पाकिस्तान तथा उत्तर-पूर्व में राजस्थान, दक्षिण-पूर्व में मध्य प्रदेश और दक्षिण में महाराष्ट्र है। राज्य का क्षेत्रफल 1 लाख 96 हजार 24 वर्ग किलोमीटर है तथा जनसंख्या 6 करोड़ से ज्यादा है। राज्य की राजधानी गांधीनगर है और राज्य की मुख्य भाषा गुजराती है। हालांकि राज्य में अन्य भाषाएं भी बोली जाती हैं।
इतिहास : कहा जाता है कि ईस्वी पूर्व लगभग 2,000 साल पहले जब भगवान कृष्ण मथुरा छोड़कर सौराष्ट्र के पश्चिमी तट पर जा बसे, तब इसे द्वारका यानी प्रवेशद्वार कहा गया था। बाद के वर्षों में मौर्य, गुप्त, प्रतिहार तथा अन्य अनेक राजवंशों ने इस प्रदेश पर राज किया। चालुक्य (सोलंकी) राजाओं का शासनकाल गुजरात में प्रगति और समृद्धि का युग माना जाता है। महमूद गजनवी की लूटपाट के बावजूद चालुक्य राजाओं ने यहां के लोगों की समृद्धि और भलाई का पूरा ध्यान रखा। आजादी से पहले गुजरात का वर्तमान क्षेत्र मुख्य रूप से दो भागों में बंटा था- एक ब्रिटिश क्षेत्र और दूसरा देसी रियासतें।
संस्कृति : गुजरात की संस्कृति भी देश के अन्य हिस्सों की तरह विविधता लिए हुए है। यहां हिंदू, इस्लाम, जैन, बौद्ध, पारसी आदि धर्मावलंबी रहते हैं। राज्य में पतंगबाजी और नवरात्रि के दौरान डांडिया उत्सव देश-विदेश में काफी लोकप्रिय हैं। यहां
तरह के त्योहार मनाए जाते हैं जिनमें भाद्रपद्र (अगस्त-सितंबर) मास के शुक्ल पक्ष में चतुर्थी, पंचमी और षष्ठी के दिन तरणेतरी गांव में भगवान शिव की स्तुति में तरणेतर मेला लगता है। भगवान कृष्ण और रुक्मणी विवाह के उपलक्ष्य में चैत्र (मार्च-अप्रैल) के शुक्ल पक्ष की नवमी को पोरबंदर के पास माधवपुर में माधवराय मेला लगता है।
उत्तरी गुजरात के बानसकांठा जिले में मां अंबा को समर्पित अंबाजी मेला आयोजित किया जाता है। राज्य का सबसे बड़ा वार्षिक मेला द्वारका और डाकोर में भगवान कृष्ण के जन्मदिवस जन्माष्टमी के अवसर पर आयोजित होता है। इसके अलावा गुजरात में मकर सक्रंति, नवरत्रि, डांगी दरबार, शामलाजी मेले तथा भावनाथ मेले का भी आयोजन किया जाता है।
कृषि और उद्योग : गुजरात कपास, तंबाकू और मूंगफली का उत्पादन करने वाला देश का प्रमुख राज्य है तथा यह कपड़ा, तेल और साबुन जैसे महत्वपूर्ण उद्योगों के लिए कच्चा माल उपलब्ध कराता है। यहां की अन्य महत्वपूर्ण नकदी फसलें हैं- ईसबगोल, धान, गेहूं और बाजरा। गुजरात में वनों में उपलब्ध वृक्षों की जातियां हैं- सागौन, खैर, हलदरियो, सादाद और बांस।
यहां रसायन, पेट्रो-रसायन, उर्वरक, इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आदि उद्योगों का विकास हो रहा है। इसके साथ ही, अनिवासी भारतीयों की मदद से नए-नए उद्योगों का काम तेजी से चल रहा है। राज्य में भूतलीय जल तथा भूमिगत जल द्वारा कुल सिंचाई क्षमता 64.88 लाख हेक्टेयर आंकी गई है जिसमें सरदार सरोवर (नर्मदा) परियोजना की 17.92 लाख हेक्टेयर क्षमता है।
परिवहन : राज्य सड़क परिवहन की दृष्टि से कापी विकसित है और राज्य में 2007-08 के अंत तक सड़कों की कुल लंबाई (गैर योजना, सामुदायिक, शहरी और परियोजना सड़कों के अलावा) लगभग 74 हजार 112 किलोमीटर थी। राज्य के अहमदाबाद स्थित मुख्य हवाई अड्डे से मुंबई, दिल्ली और अन्य शहरों के लिए दैनिक विमान सेवा उपलब्ध है। अहमदाबाद हवाई अड्डे को अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे का दर्जा मिला है। अन्य घरेलू हवाई अड्डे वड़ोदरा, भावनगर, भुज, सूरत, जामनगर और राजकोट में हैं। रेल का भी यहां अच्छा-खासा नेटवर्क है।
समुद्री सीमा से लगे गुजरात में कुल 41 बंदरगाह हैं। कांडला राज्य का प्रमुख बंदरगाह है। वर्ष 2009-10 के दौरान गुजरात के मंझोले और छोटे बंदरगाहों से कुल 2055.40 लाख टन माल ढोया गया, जबकि कांडला बंदरगाह से 795 लाख टन माल ढ़ोया गया। वर्तमान यह आंकड़ा और अधिक है।
पर्यटन स्थल : राज्य में द्वारका, सोमनाथ, पालीताना, पावागढ़, अंबाजी, भद्रेश्वर, शामलाजी, तरंगा, गिरनार जैसे धार्मिक स्थलों के अलावा महात्मा गांधी की जन्मभूमि पोरबंदर तथा पुरातत्व और वास्तुकला की दृष्टि से उल्लेखनीय पाटन, सिद्धपुर, घुरनली, दभाई, वड़नगर, मोधेरा, लोथल और अहमदाबाद जैसे स्थान भी है। अहमदपुर मांडवी, चोरवाड़, और तीथल के सुंदर तट, सतपुड़ा पर्वतीय स्थल, गिर वनों में शेरों का अभयारण्य और कच्छ में जंगली गधों का अभयारण्य भी पर्यटकों के आकर्षण का केंद्र है।
https://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8
भारतीय उपमहाद्वीप के पश्चिमी तट पर स्थित गुजरात को “पश्चिम का जेवर“ भी कहते हैं। यह भारत का सबसे अधिक औद्योगिक और समृद्ध राज्य है। यहां आपको आधुनिक परिवेश और सदियों पुरानी परंपराओं का सुखद मेल देखने को मिल जाएगा।
इस राज्य को अपना नाम ‘गुज्जरत्ता’ शब्द से मिला है, जिसका मतलब होता है गुज्जरों की भूमि। गुज्जर एक जनजाति है जो कि 5वीं शताब्दी में भारत आई थी। इस इलाके की पुरातात्विक खोजें - जैसे लोथल, धोलावीरा, रंगपुर सिंधु घाटी सभ्यता काल की हैं। तब से ही इस राज्य में ब्रिटिशों के आने तक कई शक्तिशाली साम्राज्यों जैसे मौर्य, खिलजी और अन्य मुस्लिम शासकों और मराठों ने राज किया।
गुजरात के लोग राज्य की जीवंत संस्कृति को दर्शाते हैं। यहां के लोग रंग बिरंगे कपड़े पहनते हैं और औरतें कई गहने पहनना पसंद करती हैं। ज्यादातर लोग यहां गुजराती बोलते हैं। गुजरात में हिंदी, उर्दू, सिंधी और अंग्रेजी भी बोली जाती है।
गुजरात में साल भर मौसम सामान्य रहता है। हालांकि राज्य में कच्छ जैसे कुछ भाग ऐसे हैं जो बहुत सूखे और कठोर जलवायु वाले हैं। इस राज्य में घूमने आने का सबसे अच्छा समय अक्टूबर से मार्च का है।
| जनसांख्यिकीय | |
|---|---|
| स्थानः | भारत का पश्चिमी तट, पाकिस्तान और राजस्थान उत्तर और पूर्वोत्तर में, अरब सागर पश्चिम में, दक्षिण-पूर्व में मध्य प्रदेश और दक्षिण में महाराष्ट्र। |
| अक्षांशः | 20 डिग्री 6 और 24 डिग्री 42 उत्तर में |
| देशांतरः | 68 डिग्री 10 और 74 डिग्री 28 पूर्व में |
| क्षेत्रफलः | 196,024 वर्ग किलोमीटर |
| मौसमः | गर्मियां - गर्म, सर्दियां - सुहावनी ठंडी |
| अधिकतम तापमानः | 42 डिग्री |
| न्यूनतम तापमानः | 14 डिग्री |
| औसत सालाना बरसातः | 200 सेंटीमीटर |
| राजधानीः | गांधीनगर |
| आबादीः | 50.6 मिलियन |
| भाषाएंः | गुजराती, हिंदी, अंग्रेजी |
| धर्मः | हिंदू, मुस्लिम, जैन, पारसी और अन्य |
| यात्रा का सबसे अच्छा समयः | अक्टूबर से मार्च |
| पहनावाः गर्मियां - | सूती, सर्दियां - हल्के उनी |
- अहमदाबाद
- गांधीनगर
- जामनगर
- वडोदरा
- पावागढ़
- चंपानेर
- पोरबंदर
- आणंद
- भावनगर
- मांडवी
- पाटन
- राजकोट
- सासन गिर
- सूरत
गुजरात कैसे पहुंचें
हवाई जहाज से
अहमदाबाद में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के अलावा गुजरात में 10 घरेलू हवाई अड्डे हैं। ज्यादातर घरेलू एयरलाईन इस राज्य को भारत के अन्य हिस्सों से जोड़ती हैं।
रेल से
गुजरात का रेलवे नेटवर्क बहुत अच्छा है। रेल से यह सिर्फ राज्य में ही नहीं राज्य के बाहर भारत के बाकी हिस्सों भी अच्छी तरह जुड़ा है।
सड़क से
गुजरात का सड़क नेटवर्क भारत के अन्य राज्यों के मुकाबले बहुत अच्छा है। राज्य में सड़कों की कुल लंबाई 68,900 किलोमीटर है जिसमंे से 1572 किलोमीटर राष्ट्रीय राजमार्ग है। इससे गुजरात पहुंचना बहुत सुलभ है। ज्यादातर बड़े शहरों से राज्य के प्रमुख पर्यटन स्थलों तक गुजरात राज्य परिवहन निगम की और निजी बसें नियमित तौर पर चलती हैं।
गुजरात में शाॅपिंग
आपकी गुजरात यात्रा अधूरी है अगर आप गुजरात आकर खरीददारी ना करें। गुजरात आने वाले सैलानी दरअसल यहां खरीददारी करने के लिए उत्सुक रहते हैं।
इस राज्य में हस्तशिल्प की समृद्ध परंपरा है जो कि दुनिया भर में मशहूर है। गुजरात के सबसे मशहूर हस्तशिल्प टेक्सटाइल से संबंधित हैं। यहां कढ़ाई का सदियों पुराना इतिहास है और आज भी यहां विस्तृत रेंज में डिजाइन, रंग और सिलाई के सामान हैं।
गुजरात में साडि़यों में ज़री, बीड़ के काम, दर्पण लगी, सिक्वेंस और शैल वाली और बंधेज और ब्लाॅक प्रिंट की कई वैरायटी हैं।
गुजरात में शाॅपिंग करते समय आप देख सकते हैंः
- पटोला सिल्क साड़ी
- बांधनी और पांरपरिक घाघरा चोली
- विवाह के कपड़े
- वाॅल हैंगिंग
- कशीदाकारी, रजाई
- क्रेडल क्लाॅथ
- कपड़े के खिलौने
- कढ़ाई के जूते
- लौह फर्नीचर
- सजावटी सामान
राज्य में हर जगह सरकारी एंपोरियम और निजी दुकानें हैं जहां आप गुजरात में शाॅपिंग का मज़ा ले सकते हैं। अहमदाबाद में कई प्रमुख दुकानें इन इलाकों में हैंः सी जी रोड, आश्रम रोड, लाॅ गार्डन और रिलीफ रोड। पूरे राज्य में प्लास्टिक और पेपर करंसी स्वीकार होती है।
गुजरात में देखने लायक जगहें
गुजरात नाम का लुभावना राज्य भारत के पश्चिमी तट पर स्थित है और यह देश के सबसे लोकप्रिय पर्यटन स्थलों में से एक है। यह राज्य अपनी समृद्ध सांस्कृतिक विरासत, ऐतिहासिक महत्व, हस्तशिल्प और असंख्य पर्यटन आकर्षणों के लिए जाना जाता है। भारत का सबसे अधिक औद्योगिक क्षेत्र होने के अलावा यह देश का बड़ा टूरिस्ट हब भी है। रोमांच, करिश्मे, रहस्य, जीवंत रंगों और अनंत सुंदरता से भरा गुजरात यहां आने वालों को लुभाने में कभी असफल नहीं रहता।
नीचे गुजरात के महत्वपूर्ण पर्यटन स्थलों की सूची है
गुजरात में समुद्र तट
गुजरात में देश की सबसे लंबी तट रेखा है। मन को लुभाते बीच रिसाॅर्ट, किनारे बने मंदिर और ब्लू लगून के साथ गुजरात में देश के कुछ सबसे उम्दा बीच हैं। प्रकृति, इतिहास और धार्मिक स्मारकों के अनूठे संगम के साथ गुजरात भारतीय उपमहाद्वीप में सबसे महत्वपूर्ण पर्यटन स्थल है।
गुजरात में धार्मिक स्थल
गुजरात में कई धार्मिक स्थान हैं जो कि हिंदू और इस्लाम धर्म से संबंधित हैं। कुछ धार्मिक स्थल हैंः
- द्वारकानाथ मंदिर
- सोमनाथ मंदिर
- तख्तेश्वर मंदिर
- अक्षरधाम मंदिर
- पालिताना मंदिर
- कालिका मंदिर
- जामा मस्जिद
- राज बाबरी मस्जिद
- रानी रुपमति मस्जिद
- नारायण मंदिर
- सिदी सैयद मस्जिद
गुजरात में
- गुजरात में राष्ट्रीय पार्क और वन्यजीव अभयारण्य
- गिर फाॅरेस्ट नेशनल पार्क
- ब्लेककब नेशनल पार्क
- मरीन नेशनल पार्क
- वंसदा नेशनल पार्क
- कच्छ डेजर्ट वन्यजीव अभयारण्य
- जंगली गधा अभयारण्य
- नील सरोवर पक्षी अभयारण्य
- कच्छ बस्टर्ड सेंचुरी
- शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य
अहमदाबाद
महात्मा गांधी से अपने जुड़ाव के कारण अहमदाबाद का बहुत ऐतिहासिक महत्व है और यह गुजराज के सबसे महत्वपूर्ण शहरों में से एक है। यहां देश भर से सैलानी बड़ी संख्या में आते हैं और गुजरात देश का सबसे लोकप्रिय पर्यटन स्थल इसलिए भी है क्योंकि यहां की वास्तुकला में इस्लामी और हिंदू शैली का अनूठा मेल है।
अहमदाबाद के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- साबरमति आश्रम/महात्मा गांधी का घर
- टेक्सटाइल का केलिको संग्रहालय
- अदलज बावड़ी
- हाथी सिंह जैन मंदिर
- कांकरिया झील, भद्र किला
- हिलती मीनारें
गांधीनगर
अहमदाबाद से उत्तर में 25 किलोमीटर की दूरी पर गांधीनगर स्थित है जो कि गुजरात की राजधानी है और यहां कई पर्यटन स्थल हैं, जैसे अक्षरधाम और शामलजी।
गांधीनगर के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- बच्चों का पार्क
- सरिता उद्यान
- हिरण पार्क
- अक्षरधाम मंदिर
- बाॅटनिकल गार्डन और खरीददारी के बाजार
जामनगर
अहमदाबाद से 302 किलोमीटर की दूरी पर स्थित जामनगर अपने आप में गुजरात के ताज का एक रत्न है। यहां आपको वास्तुकला के कुछ उत्कृष्ट नमूने किलों, महलों और धार्मिक स्मारकों के रुप में मिलेंगे जो यहां आने वाले को अपने आकर्षण में बांध लेते हैं।
जामनगर के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- कोठा गढ़
- विलिंगटन क्रीसेंट
- लखोटा किला
- धूपघड़ी
- जामसाहब महल
- बोहरा हजीरा
- लखोटा संग्रहालय
- रनमल झील
- आदिनाथ मंदिर
- बाल हनुमान मंदिर
- भीड़ भंजन मंदिर
- शांतिनाथ मंदिर
- बेट द्वारका बीच रोजी
वडोदरा
वडोदरा को गुजरात की सांस्कृतिक राजधानी के तौर पर जाना जाता है और यह गुजरात की संस्कृति और परंपरा के बारे में काफी कुछ बताता है। अपने शानदार बागीचों, अद्भुत ललित कला और लोक नृत्यों के कारण वडोदरा गुजरात के पर्यटक आकर्षणों में टाॅप पर है।
वडोदरा के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- लक्ष्मी विलास पैलेस
- स्वामीनारायण मंदिर
- ईएमई मंदिर वडोदरा
- वडोदरा संग्रहालय और आर्ट गैलरी
- सयाजी बाग वडोदरा
- खजुराहो बाजार
- महाराजा फतेह सिंह संग्रहालय
पावागढ़
पावागढ़ एक छोटा हिल स्टेशन है जिसे शानदार लैंडस्केप और शांति के लिए जाना जाता है। पावागढ़ को विश्व विरासत स्थल का सम्मान मिला है और इसे गुजरात के सबसे ज्यादा देखे जाने वाले पर्यटन स्थलों में जाना जाता है।
पावागढ़ के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- चंपानेर पावागढ़ पुरातत्व पार्क
- पावागढ़ हिल
- कालिका माता मंदिर
- पावागढ़ मंदिर
- माची हवेली
- सदनशाह पीर दरगाह
चंपानेर
गुजरात में पावागढ़ पहाड़ी की तलहटी में बसा चंपानेर भारत का सबसे प्राचीन राॅक फाॅरमेशन है। यहां कई ऐतिहासिक मंदिर हैं जो कि सच्ची नागर शैली में बने हैं। चंपानेर पुरातत्वविदों के लिए सबसे रुचिपूर्ण जगह है। इस शहर में एक और सबसे ज्यादा देखे जाने वाली जगह जामा मस्जिद है जो कि वास्तुकला की इंडो इस्लामिक शैली में बनी है।
पोरबंदर
पोरबंदर में साल भर तीर्थयात्रियों का आना जाना लगा रहता है। यहां प्राचीन भारत के कुछ सबसे बेहतरीन पवित्र मंदिर हैं। गुजरात की आधुनिकता के साथ साथ पोरबंदर के ग्रामीण स्वरुप का अनूठा मेल इसे सबसे अच्छा पर्यटन स्थल बनाता है।
पोरबंदर के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- कीर्ति मंदिर
- आर्य कन्या
- गुरुकला
- सुदामा मंदिर
- भरत मंदिर और तारामंडल
आणंद
गुजरात का आणंद शहर ‘भारत के मिल्क कैपिटल’ के तौर पर जाना जाता है। आणंद शहर ‘अमूल डेयरी’ और ‘दूध क्रांति’ के लिए जाना जाता है। गुजरात के आणंद में राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड और आणंद कृषि विश्वविद्यालय हैं।
आणंद के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- स्वामीनारायण मंदिर
- रणछोड़ डाकोर मंदिर
- अमूल डेयरी संग्रहालय
- फ्लो आर्ट गैलरी
- सरदार वल्लभभाई पटेल और वीर विट्ठल पटेल मेमोरियल
भावनगर
भावनगर गुजरात में पैदा होने वाली कपास सामग्री के लिए मुख्य व्यापारिक बंदरगाह है। इस पोर्ट को 1743 में बनाया गया था। भावनगर लाॅक गेट लो टाइड में भी जहाजों को बंदरगाह में बचाए रखता है। इस जगह को पर्यटक आकर्षण नहीं माना जा सकता।
भावनगर के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- तख्तेश्वर मंदिर
- गांधी स्मृति संग्रहालय या गांधी मेमोरियल
- गंगाजलिया
- टाउन हाॅल
- गौरीशंकर झील
- सामलदास काॅलेज
- बार्टन लाइब्रेरी
- वाॅटर लाॅक गेट
जूनागढ़
जूनागढ़ गुजरात में खूबसूरत गिरनार हिल के आधार पर स्थित है। यह सैलानियों के गिरनार हिल जाने का पाॅइंट है। गिरनार हिल में बड़ी संख्या में मंदिर हैं। जूनागढ़ एक आकर्षक शहर है जिसमें कई पुराने भवन हैं। हालांकि बहुत कम सैलानी यहां आते हैं। इसके पीछे एक प्रमुख कारण प्रचार की कमी है। लोग शायद जूनागढ़ की शांति और सुंदरता से वाकिफ नहीं हैं।
जूनागढ़ के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- अक्षर मंदिर
- भावनाथ मंदिर
- दातार हिल
- दरबार हाॅल संग्रहालय
- सम्राट अशोक के चट्टान शिलालेख
- गिरनार पर्वत जूनागढ़
- हड़प्पा युग के अवशेष
- सक्का बाग चिडि़याघर
मांडवी
गुजरात में भारत का सबसे शानदार समुद्र तट है जिसे अहमदपुर-मांडवी बीच के नाम से जाना जाता है। इस तट पर रोमांचक वाॅटर स्पोर्टस मौजूद हैं जिन्हें आप कभी नहीं भूल पाएंगे। यह अहमदाबाद से 298 किलोमीटर की दूरी पर स्थित है। समुद्र का साफ पानी इसे तैराकी के लिए सबसे सही जगह बनाता है।
मांडवी के कुछ पर्यटन स्थल हैंः
- विजय विलास पैलेस
- श्यामजी कृष्णा वर्मा स्मारक
- रुकमावती ब्रिज
- काशी विश्वनाथ बीच
- मांडवी बीच
- तोपनसर झील
पाटन
पाटन का इतिहास सोलंकी शासन में अपने चरम पर था। यह दौर गुजरात का स्वर्ण युग था। उस समय यह शहर व्यापार और शिक्षा के लिए एक महान जगह माना जाता था। जैन लेखों के अनुसार गुजरात में ‘कुमारपाला रस’ पाटन एक समृद्ध शहर था।
पाटन के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- कालका के पास पुराना किला
- रानी-की-वाव और त्रिकम बरोट नी वाव
- सहस्त्रलिंग सरोवर
- आनंद सरोवर
- कालका मंदिर
- महालक्ष्मी मंदिर
- हिंगराज मंदिर
राजकोट
गुजरात में राजकोट को एक समय में सौराष्ट्र की राजधानी होने का गौरव प्राप्त था। यह पहले ब्रिटिश सरकार का मुख्यालय भी था। गुजरात में राजकोट ही वो जगह है जहां महात्मा गांधी ने अपने जीवन के शुरुआती साल बिताए। यहां आप गांधी परिवार के घर, काबा गांधी नो डेलो को भी देख सकते हैं। अब इस घर में गांधी जी के सामानों की स्थायी प्रदर्शनी लगी रहती है।
राजकोट के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- वाटसन संग्रहालय
- काबा गांधी नो डेलो
- राजकुमार काॅलेज
- मोहनदास गांधी विद्यालय
- राष्ट्रीय शाला
- आजी बांध
सासन गिरी
सासन गिरी पश्चिमी राज्य गुजरात में सौराष्ट्र प्रायद्वीप में स्थित विश्व प्रसिद्ध शेर अभयारण्य है। यह गिर पहाडि़यों के उत्तर और पश्चिम में है। यह जंगल शुष्क पर्णपाती प्रकार का है जिसमें सागौन प्रमुख प्रजाति है। सासन गिरी शेर अभयारण्य परियोजना 1972 में शुरु हुई थी। आजादी के पहले गिर में मलधारी और शेरों की कमी की वजह से स्थिति तेजी से बिगड़ी। तब सरकार ने इस मामले पर विचार करना शुरु किया।
सूरत
सूरत गुजरात में ताप्ती नदी के किनारे बसा है। पहले यह पश्चिमी भारत के प्रमुख बंदरगाहों में से एक था। इस बात के भी प्रमाण हैं कि यह बंदरगाह उस समय के गुजरात राज्य के गेटवे के तौर पर काम करता था। 12वीं सदी में पारसी गुजरात में आए और सूरत में बस गए। 1573 में सूरत सम्राट अकबर के शासन में आया। उन्होंने इस क्षेत्र में इस बंदरगाह की अपार संभावनाओं की पहचान की। उस समय यह शहर एक प्रमुख मुगल व्यापारिक बंदरगाह बन गया।
सूरत के कुछ लोकप्रिय पर्यटन स्थल हैंः
- चिंतामणि जैन मंदिर
- डच गार्डन
- सरदार पटेल संग्रहालय
- जवाहर लाल नेहरु गार्डन
गुजरात के दर्शनीय स्थल – 13 Tourist Places In Gujarat In hindi
Tourist Places In Gujarat In hindi– गुजरात भारत के पश्चिम में स्थित एक बहुत महत्वपूर्ण राज्य है जिसे ‘महापुरुषों की धरती’ के नाम से भी जाना जाता है क्योंकि ये राज्य इतिहास के महान पुरुष सरदार बल्ब भाई पटेल जी का घर है आज से महज 30 वर्ष पहले तक गुजरात भारत के टॉप 10 राज्य में भी नही आता था परन्तु आज यह देश का तीसरा सबसे शक्तिशाली राज्य है जिसका मुख्य कारण यह है की गुजरात देश की इकॉनमी में दुसरे राज्य से अधिक योगदान दे रहा है जैसे की पूरी दुनिया में आज 10 में से 8 हिरे गुजरात में ही पॉलिश हो रहे है इसके अलावा देश का एक चौथाई दूध भी गुजरात में ही उत्पन्न हो रहा है गुजरात अपने प्रसिद्ध ऐतिहासिक स्थलों पवित्र हिन्दू मंदिरों, पहाड़ और वन्यजीव अभयारण्य के लिए भी जाना जाता है यहाँ आने वाले पर्यटकों के लिए गुजरात में घूमने एंव देखने को बहुत कुछ है यही नही गुजरात प्योर एशियाई शेरों का एक मात्र घर भी है जिन्हें आप गुजरात की यात्रा में देख सकते है
तो अगर आप गुजरात घूमने के लिए जा रहें है या फिर वहां जाने की सोच रहे है तो हमारे इस आर्टिकल को आप अंत तक जरुर पढ़े क्योंकि हम ने इस आर्टिकल में गुजरात के सभी प्रमुख पर्यटन स्थलों के बारे में बिस्तार पूर्वक जानकारी दी है
Table of Contents
1. गुजरात घूमने के प्रसिद्ध पर्यटन स्थल – FAMOUS TOURIST PLACES IN GUJARAT IN HINDI
1.1 गुजरात के पर्यटन स्थल गांधीनगर – Guajrat Me Ghumne Ki Jagah Gandhinagar In Hindi

गांधीनगर गुजरात की राजधानी होने के साथ एक खुबसूरत पर्यटन स्थल भी है जो कई हिन्दू मंदिरों और ऐतिहासिक इमारतों को अपने अंदर समेटे हुए है इन्ही में से एक अक्षरधाम मंदिर भी है जिसकी गिनती देश के खुबसूरत मंदिरों में होती है इस शांत शहर में आप अक्षरधाम मंदिर के अलावा चिल्ड्रेन पार्क और उदालज बावली जैसे सुंदर आकर्षणों को भी देख सकते है इस शहर का महात्मा गाँधी के नाम पर रखा गया है
1.2 गुजरात के दर्शनीय स्थल द्वारका – Guajrat Ke Prasidh Darshaniya Sthal Dwarka In Hindi
गुजरात राज्य में स्थित द्वारका शहर हिन्दुओं के चारधामो में से एक है यहाँ पर भगवान श्री कृष्ण को समर्पित एक भव्य मंदिर भी है जिसे द्वारकाधिश मंदिर के नाम से जाना जाता है यह गुजरात का एक प्रसिद्ध मंदिर है हर साल जन्मास्टमी के अवसर पर भक्तो की यहाँ अपार भीड़ देखने को मिलती है|पौराणिक मान्यताओ के अनुसार भगवान श्री कृष्ण ने मथुरा को छोड़ने बाद इस नगर को बसाया था जो द्वारका नाम से जाना जाता है
1.3 गुजरात में देखने लायक जगह वडोदरा – Gujarat Me Dekhne Layak Jagah Vadodra In Hindi

वडोदरा शहर अपने कई ऐतिहासिक एंव धार्मिक आकर्षणों से भरा हुआ शहर है इन्ही में से एक लक्ष्मी विलास पैलेस यहाँ का सबसे देखे जाने वाला पर्यटन स्थल है इसकी अदभुत वास्तुकला को देख कर आपके होश उड़ जाएंगे| यह वडोदरा के महाराजा और उनके परिवार के सदस्यों का निवास स्थान है यहाँ सयाजी राव गायकवाड जी का स्मारक है जिनका वडोदरा के इतिहास में एक अमूल्य योगदान रहा है
. दिल्ली में घुमने लायक सबसे अच्छी जगहें
1.4 गुजरात का प्रसिद्ध पर्यटन स्थल सपुतारा – Saputara Gujarat Tourist Places In Hindi

सपुतारा गुजरात राज्य का एक छोटा सा मनमोहक हिल स्टेशन है जो समुद्र ताल से करीब 875 मीटर की ऊंचाई पर स्थित है यहाँ पर आप हरे भरे वन, शीतल झरने और सुकून दायक ठंडा वातावरण को देख पाएंगे यह हिल स्टेशन ट्रेकिंग के सौकीन लोगो में काफी प्रसिद्ध है सपुतारा एक आदिवासी छेत्र है जहाँ लोग सापों की पूजा करते है
1.5 गुजरात में घूमने की जगह पोरबंदर – Gujarat Me Ghumne Ki Jagah Porbandar In Hindi

गुजरात में समुद्र तट के किनारे बसे पोरबंदर शहर को महात्मा गाँधी के जन्म स्थान के रूप में भी जाना जाता है पोरबंदर में घुमने और देखने के लिए काफी सुंदर आकर्षण मौजूद है यहाँ पर आप सुदामा मंदिर और मंदिर जैसे दर्शनीय स्थलों के साथ साथ पोरबंदर बिच को भी घूम सकते है जो यहाँ आने वाले पर्यटकों का प्रमुख आकर्षण रहता है
1.6 गुजरात का प्रमुख आकर्षण स्थल रन ऑफ़ कच्छ – Gujarat Ka Pramukh Aakarshan Sthal Run Of Kutuch In Hindi

गुजरात के कच्छ शहर में स्थित ‘रन ऑफ़ कच्छ’ भारत की एक अनोखी शहर है यहाँ का जादातर छेत्र नमक और रेत से बना हुआ है तथा दुनिया का सबसे बड़ा नमक का रेगिस्तान है पूर्णिमा की रात को यह चांदनी में जगमग हो उठता है हम तो आपसे यही कहेंगे की जब भी आप गुजरात में घुमने के लिए आये तो कच्छ शहर में स्थित रन ऑफ कच्छ को देखना बिलकुल भी न भूलें क्योंकि ऐसी जगह शायद ही आपने जिंदगी में कभी देखि हो
1.7 गुजरात में घुमने लायक जगह गिर राष्ट्रीय उद्दान – Gujarat Me Ghumne Layak Jagah Gir National Park In Hindi

गुजरात के गिर राष्ट्रीय उद्दान को शासन गिर राष्ट्रीय उद्दान के नाम से भी जाना जाता है जो तक़रीबन 400 बब्बर शेरों का घर है इस उद्दान की स्थापना का मुख्य कारण भी इन शेरों की सुरक्षा करना था अगर आपको जंगल सफारी करने का मन है तो आप यहाँ का रुख कर सकते हैं शेरों के साथ साथ आपको कई आकर्षित जिव जन्तु भी देखने को मिलेंगे
1.8 गुजरात के पर्यटन स्थल स्टेचू ऑफ़ यूनिटी – Best Places To Visit In Gujarat In Hindi

स्टेचू ऑफ़ यूनिटी गुजरात के अहमदाबाद में सरदार सरोवर बांद के पास बना दुनिय्या का सबसे ऊँचा स्टेचू है जिसकी कुल ऊंचाई 182 मीटर है जो अमेरिका के स्टेचू ऑफ़ लिबर्टी से दोगुना है इसे भारत के लॉ पुरुष कहे जाने वाले सरदार बल्ब भाई पटेल जी के सम्मान में बनवाया गया है आज यह देश ही नही बल्कि विदेशों से आने वाले पर्यटकों का भी एक मुख्य आकर्षण का केंद्र बना गया है
इस प्रतिमा के ऊपर जाने के लिए तीव्र गति से चलने वाली लिफ्ट लगी है जिससे एक ही समय में करीब 40 लोग गैलरी जा सकते है इसके लिए आपको 300 रूपये चार्ज देना होगा
.जयपुर के प्रसिद्ध पर्यटन स्थल
1.9 गुजरात के प्रसिद्ध तीर्थ स्थल सोमनाथ मंदिर – Gujarat Ke Prasidh Tirth Sthal Somnath Temple In Hindi

सोमनाथ मंदिर गुजरात के स्वराष्ट्र में प्रभाषपाटन में स्थित एक प्राचीन तीर्थस्थल है और भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंगो में सबसे पहला ज्योतिर्लिंग है हिन्दू धर्म में इस मंदिर को बहुत पवित्र माना जाता है कहा जाता है की सोमनाथ तीर्थ के दर्शन मात्र से ही मनुष्य पापो से मुक्त हो जाता है और मृत्यु के बाद सीधे स्वर्ग को पधारता है| अब तक इसे 17 बार नष्ट किया जा चूका है और हर बार इसका पुनह निर्माण हुआ है
1.10 गुजरात में घूमने की जगह अहमदाबाद – Gujarat Me Ghumne Ki Jagah Ahamdabad In Hindi

अहमदाबाद गुजरात का सबसे बड़ा शहर है अहमदाबाद में स्थित साबरमती आश्रम गाँधी आश्रम के नाम से भी जाना जाता है यह आश्रम अहमदाबाद का सबसे बड़ा पर्यटन स्थल है इसलिए जब आप अहमदाबाद आये तो साबरमती आश्रम को देखना बिलकुल न भूलें| गाँधी जी ने स्वतंत्रता संग्राम की अंतिम योजना इसी आश्रम से बनाई थी और यहीं से उन्होंने प्रसिद्ध ‘डंडी मार्च’ की शुरुआत की थी यहाँ पर अभी भी महात्मा गाँधी के चश्मे, जूते, और किताब देखने को मिलेगी
. कोलकाता के 15 प्रसिद्ध पर्यटन स्थल
2. गुजरात के प्रसिद्ध खान पान – LOCAL FOODS OF GUJARAT IN HINDI

गुजरात अपने पर्यटन स्थलों के अलावा स्थानीय व्यंजनों के लिए भी जाना जाता है जो आपको गुजरात के अलग अलग स्थानों पर अलग अलग स्वाद और प्रकार में देखने को मिल जाएंगे बात करें यहाँ के कुछ प्रसिद्ध व्यंजनों की तो ढोकला, फफाडा और थेपला को गुजराती काफी पसंद करते है इसके अलावा मीठे यहाँ घेवर, पूरण पोली और मालपुआ काफी प्रसिद्ध है आप जब भी गुजरात आये तो इन व्यंजनों को ट्राई जरुर करें
3. गुजरात जाने का सबसे अच्छा समय – BEST TIME TO VISIT GUJARAT IN HINDI

गुजरात जाने का सबसे अच्छा समय अक्टूबर से फरवरी महीने के बीच का रहता है यानि ठण्ड का समय क्योंकि गर्मियों में एक सुखा छेत्र होने के कारण यहाँ अतिरिक्त गर्मी पड़ती है जिसके कारण पर्यटकों द्वारा यहाँ के स्थानों का भ्रमण करना आसान नही होता सर्दियों के अलावा मानसून ऋतू भी गुजरात घुमने का एक अच्छा मौसम है| तो आप जादातर कोशिश करें इन्ही महीनो में आने के लिए
4. गुजरात कैसे पहुंचे – HOW TO REACH GUJARAT IN HINDI
अगर आप गुजरात की यात्रा पर जा रहे है तो आप हवाई मार्ग, रेल मार्ग, सड़क मार्ग और समुद्र मार्ग इन्मे से किसी भी माध्यम से गुजरात आसानी से पहुंचा जा सकता है चलिए हम आपको बिस्तार पूर्वक बताते है की कैसे आप इन चार माध्यमों के द्वारा यहाँ पहुँच सकते है
4.1 हवाई मार्ग से गुजरात कैसे पहुंचे – How To Reach Gujarat By Flight In Hindi

अगर आप हवाई मार्ग के जरिये गुजरात आना चाहते है तो बता दें की गुजरात में कुल 17 हवाई अड्डे मौजूद है जो देश के सभी प्रमुख शहरों जैसे कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बनारस, मथुरा, जयपुर और उदयपुर से अच्छी तरह जुड़े हुए है| सूरत हवाई अड्डा, पोरबंदर हवाई अड्डा, वडोदरा हवाई अड्डा, डीसा हवाई अड्डा और कांडला हवाई अड्डा यहाँ के कुछ प्रमुख हवाई अड्डे है इन्मे से अपने सुविधा अनुसार आप किसी भी हवाई अड्डे पर उतरकर अपने मन चाहे शहर का भ्रमण कर सकते है
4.2 रेल मार्ग से गुजरात कैसे पहुंचे – How To Reach Gujarat By Train In Hindi

रेल मार्ग द्वारा गुजरात देश के सभी छोटे बड़े शहरों से बहुत अच्छी तरह जुड़ा हुआ है वैसी तो गुजरात में कई परन्तु वडोदरा रेलवे स्टेशन यहाँ का सबसे वयस्त रेलवे स्टेशन है| राज्य के अन्य प्रमुख रेलवे स्टेशन सूरत, अहमदाबाद, गांधीनगर और राजकोट हैं आप जिस शहर को सबसे पहले घूमना चाहते हों वहां के लिए देश के किसी भी हिस्से से ट्रेन ले सकते है
4.3 सड़क मार्ग से गुजरात कैसे पहुंचे – How To Reach Gujarat By Road In Hindi

अगर आप सड़क मार्ग द्वारा गुजरात जाने का मन बना रहे है तो बता दें की गुजरात राज्य रोडवेज के मामले में काफी बढ़िया है गुजरात के लिए देश के अन्य शहरों से बसों की सुविधा काफी अच्छी है अगर आप चाहे तो बस के माध्यम से भी राज्य के किसी भी शहर में पहुँच सकते है इसके अलवा आप अपने निजी वहां की मदद से भी यहाँ आ सकते है
4.4 समुद्र मार्ग से गुजरात कैसे पहुंचे – How To Reach Gujarat By Water In Hindi

गुजरात आने का एक और खास मार्ग है जो की समुद्र मार्ग के द्वारा है यह खास इसलिए है क्योंकि आप भारत के हर राज्य में इस मार्ग से नही जा सकते है केवल कुछ राज्य ही है जिनमे से गुजरात भी एक है यहाँ स्थित कांडला बंदरगाह गुजरात का सबसे प्रसिद्ध बंदरगाह है जो भारत के कई हिस्सों से जुड़ा हुआ है
5. गुजरात की कुछ तस्वीरें – SOME LOCAL PHOTOS OF GUJARAT IN HINDI



अगर आपको हमारा यह आर्टिकल (गुजरात के दर्शनीय स्थल – 13 Tourist Places In Gujarat In hindi) पढ़ कर अच्छा लगा तो कृप्या इसे उन दोस्तों और रिश्तेदारों के साथ भी अवश्य शेयर करें जो गुजरात घूमने के बारे मे सोच रहें हों और वहां के प्रमुख दर्शनीय स्थलों के बारे मे जानने को उत्सुक हैं|
गुजरात में घूमने लायक वो जगहें जहाँ एक बार जरूर जाएँ आप!
Tourist Places in Gujarat
टेलेविज़न पर अमिताभ बच्चन को कई बार अपने कहते सुना होगा की “कुछ दिन तो गुजारिये गुजरात में”। ये बात सच है की गुजरात जैसे खूबसूरत राज्य में कुछ दिन तो जरूर गुजारने चहिये। भारत के पश्चिमी क्षेत्र में स्थित राज्य ‘गुजरात’ यहाँ के प्रमुख तीर्थस्थलों एवं व्यापारिक पृष्ठभूमि के लिए प्रसिद्ध है। यह राज्य विभिन्न सांस्कृतिक परम्पराओं का अद्भुत मिश्रण है।
पर्यटन के उद्देश्य से यह देश का दसवा सबसे प्रसिद्ध राज्य है, जहाँ तक़रीबन 18.9 मिलियन लोग आते है। यहाँ पर घूमने के लिए बहुत सारी जगहें हैं जो आपको अलौकिक सुख देती हैं।
यह राज्य उत्तर में राजस्थान, दक्षिण में महाराष्ट्र, एवं पूर्व में मध्यप्रदेश से घिरा हुआ है। इसके अलावा इसके उत्तर-पश्चिम में पाकिस्तान एवं दक्षिण-पश्चिम में अरब सागर स्थित है। गुजरात भारत का 7वां सबसे बड़ा राज्य है। यहाँ की राजधानी गांधीनगर है।
गुजरात को राष्ट्रपिता महात्मा गांधी की जन्मभूमि के रूप में भी जाना जाता है, इनका जन्म पोरबंदर में हुआ था। इसके अलावा गांधी जी का साबरमती आश्रम पर्यटकों के बीच काफी लोकप्रिय है।
गुजरात मे ऐसी कई चीजें हैं जो देश-विदेश के पर्यटकों को गुजरात की तरफ जाने को मजबूर करती है, और पर्यटकों की भ्रमण सूची में गुजरात का नाम सर्वोपर करती हैं, फिर वो चाहे दुनिया का सबसे बड़ा सफेद रेगिस्तान हो, या फिर भारत का सबसे लंबा समुद्रतट हो, या फिर समुद्र के किनारे बने हुए मंदिर। ये सभी चीजें दर्शको के आकर्षण का केंद्र बन जाते है, और पर्यटक स्वतः ही गुजरात खिंचे चले आते हैं।
आइये जानते हैं किन जगहों में आप जा सकते हैं घूमने-

गुजरात के दर्शनीय स्थल – TOURIST PLACES IN GUJARAT
गुजरात को भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक एवं व्यापारिक मापदंडों के आधार पर कई भागों में विभाजित किया गया है। एक तरफ जहाँ इसकी प्राकृतिक सुन्दरता लोगो के मन को लुभाती है, तो वही दूसरी तरफ यहाँ का इतिहास हमारे पूर्वजो के संघर्ष एवं संस्कृति की कहानी को बयां करता है। इसके अतिरिक्त यहाँ की व्यापारिक पृष्ठभूमि हमारे देश के आर्थिक शक्ति को प्रदर्शित करते हैं।
अगर बात की जाए कपड़े के उत्पादन के क्षेत्र में तो गुजरात इस क्षेत्र में भारत का एक जाना-माना राज्य है। वहीं साड़ियों के कारोबार में गुजरात भारत का सबसे बड़ा राज्य है। शायद यही वजह है कि देश के किसी भी कोने से आये पर्यटक खुद को यहाँ आने के बाद खरीददारी करने से नही रोक पाते हैं।
गुजरात राज्य अपने रंग-बिरंगे पहनावे एवं विशिष्ट खान-पान के लिए भी प्रसिद्ध है। यहाँ के लोगो की रंग-बिरंगी एवं पारम्परिक पोशाकें पर्यटकों को लुभाने में महत्वपूर्ण हैं। जहाँ एक तरफ रंग-बिरंगी एवं सुंदर कढ़ाई से परिपूर्ण घाघरा-चोली महिलाओं के श्रृंगार को पूर्ण करती हैं, तो वही दूसरी तरफ पगड़ी, प्लेटेड जैकेट, एवं लम्बी आस्तीन के कुर्ते के साथ चूड़ीदार पुरुषों के पोशाक को लुभावना बनाता है। अगर आप गुजरात भ्रमण के लिए जाते हैं तो खरीददारी के तौर पर वहाँ की पारम्परिक पोशाक लेना न भूले, यह आपके यात्रा को यादगार बना देगा।
यदि खान-पान की बात की जाए तो इस मामले में यहाँ पर काफी विविधता देखने को मिल जाती है। गुजरात के मुख्य व्यंजनो में शामिल हैं- ढोकला, खांडवी, बासुंदी, सुरती लोचो, थेपला, खाखरा एवं फाफड़ा है। इसके अलावा भी कई ऐसे व्यंजन हैं जो गुजराती खान-पान की शोभा को बढ़ाते हैं। आप गुजरात मे आने के बाद खुद को यहाँ के खान-पान का मुरीद बनने से नही रोक पाएंगे।
गुजरात कैसे पहुँचे – How to reach Gujarat
गुजरात पहुँचने के लिए आप फ्लाइट अथवा ट्रेन का सहारा ले सकते हैं।
- गुजरात के अहमदाबाद शहर में अंतराष्ट्रीय हवाई अड्डा स्थित है जहाँ से देश-विदेश के फ्लाइट्स का आवागमन होता है।
- इंटरनेशनल एयरपोर्ट्स के अलावा गुजरात मे 10 नेशनल एयरपोर्ट्स भी हैं।
- गुजरात राज्य में रेलवे का भी नेटवर्क बहुत अच्छा है। जहाँ से भारत के लगभग हर हिस्से को जोड़े हुए रेलवे सुविधा उपलब्ध है।
- इन सबके अलावा गुजरात मे सड़क मार्ग की भी अच्छी सुविधा उपलब्ध है। गुजरात में राज्य परिवहन निगम का अच्छा साधन उपलब्ध है।
गुजरात मे घूमने की दृष्टि से प्रमुख पर्यटन स्थल- Places to visit in Gujarat
गुजरात पर्यटन के उद्देश्य से काफी खास स्थान हैं। यहाँ पर कई ऐसे मंदिर बने हुए हैं जो कि बहुत खास एवं भव्य हैं। मंदिरों के अलावा भी गुजरात मे कई ऐसी चीजें हैं जो घूमने के लिहाज से काफी महत्वपूर्ण हैं।
आईये हम उन स्थानों के बारे में आपको विस्तार से बताते हैं जो गुजरात के महत्वपूर्ण पर्यटन स्थलों में शामिल हैं-
- सासर गिर – Sasan Gir
इसे गिर का जंगल भी कहा जाता है। इसके अलावा इसे “दा होम ऑफ़ एशियाटिक लायंस” या “गिर नेशनल पार्क” के नाम से भी जाना जाता है। गुजरात जाकर एक बार इस जगह सफारी का मजा जरूर लेना चहिये। दुनियाभर में मशहूर इस फारेस्ट में आपको नीलगाय, चीतल हिरन, शेर, बारासिंघा जैसे जानवर देखने को मिलते हैं। इस जगह जाकर आपको बहुत मजा आएगा। यह जगह जूनागढ़ से साठ किलोमीटर दूर स्थित है।
- सूर्य मंदिर मोढेरा – Modhera Sun Temple
इस मंदिर का निर्माण 1026 ई० में सोलंकी वंश के राजा भीमदेव प्रथम ने कराया था। यह मंदिर पुष्पावती नदी के तट पर स्थित है। इस मंदिर के आराध्य देव सूर्य देव हैं।
यह मंदिर ईरानी शैली में बना हुआ है, जो कि दो भागों में विभाजित है। इसका पहला भाग गर्भगृह है जबकि दूसरा भाग सभामंडप का है। मंदिर का गर्भगृह 51 फिट 9 इंच लंबा एवं 25 फिट 8 इंच चौड़ा है। वही अगर बात की जाए मंदिर के सभामंडप की तो इनमे कुल 52 स्तंभ बने हुए हैं। इन स्तंभों पर विभिन्न देवी-देवताओं के चित्र एवं रामायण तथा महाभारत के प्रसंगों को चित्रित किया गया है।
यह मंदिर भारत के मुख्य सूर्य मंदिरों में से एक है। रामायण काल से संबंधित कई घटनाएं इस मंदिर से जुड़ी हुई हैं, जिनका उल्लेख पुराणों में किया गया है।
सूर्य मंदिर से सम्बंधित महत्वपूर्ण जानकारियां:
- यह मंदिर अहमदाबाद रेलवे स्टेशन से 102 किमी की दूरी पर स्थित है। तथा इस मंदिर का निकटतम एयरपोर्ट भी अहमदाबाद एयरपोर्ट है।
- अहमदाबाद से इस मंदिर तक पहुंचने के लिए बस एवं टैक्सी की सुविधा उपलब्ध है।
- समय-सारणी- 8:00AM से 7:00PM तक रोजाना।
- प्रवेश शुल्क- निःशुल्क।
- नागेश्वर मंदिर – Nageshvara Jyotirlinga
नागेश्वर मंदिर भगवान शिव के प्रसिद्ध मंदिरों में से एक है। यह मंदिर भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंगों में से एक है।
इस मंदिर का मुख्य उत्सव महाशिवरात्रि का पर्व है। महाशिवरात्रि के दिन इस मंदिर की सजावट एवं यहाँ का आयोजन देखने लायक होता है।
नागेश्वर मंदिर से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह मंदिर गुजरात के द्वारका जिले में स्थित है।
- द्वारका रेलवे स्टेशन से इस मंदिर की दूरी 15.5 किमी है।
- समय-सारणी- 6:00AM से 12:30PM एवं 5:00PM से 9:30PM तक रोजाना।
- प्रवेश शुल्क- निःशुल्क।
- गिरनार – Girnar
गुजरात राज्य के जूनागढ़ जिले में पायी जाने वाली पर्वत शृंखला ‘गिरनार’ जैन धर्म का सिद्ध स्थान है। गिरनार पर्वत की ऊंचाई 1031 मीटर है। इस पर्वत शृंखला के पास नेमिनाथ मंदिर स्थित है। इसके अलावा पहाड़ की चोटी पर कई जैन मंदिर बने हुए हैं। साथ ही यह दत्तात्रेय का मंदिर एवं गोमुखी गंगा भी हैं, जो की हिंदुओ के पवित्र तीर्थस्थलों में से एक हैं।
अगर आप प्राकृतिक सुंदरता एवं भक्तिपूर्ण वातावरण का दर्शन करना चाहते हैं तो गिरनार उसके लिए एक बढ़िया विकल्प साबित हो सकता है। प्राचीन काल से ही इन पर्वतों की शोभा का अदभुत वर्णन है।
गिरनार से संबंधित महत्वपूर्ण जानकारियां:
- गिरनार का नजदीकी रेलवे स्टेशन जूनागढ़ रेलवे स्टेशन है जो कि गिरनार से 5 किलोमीटर की दूरी पर है।
- पहाड़ी क्षेत्र होने की वजह से ज्यादातर पर्यटक गिरनार जाने के लिए टैक्सी लेना पसंद करते हैं।
- लक्ष्मी विलास पैलेस, बड़ोदरा – Laxmi Vilas Palace
अगर गुजरात जाने की बात आती है तो इस जगह जाने का विचार जरूर बनाना चाहिए। सफ़ेद संगमरमर के पत्थरों से निर्मित यह महल अपने आप में बहुत खूबसूरत है। इसका निर्माण महाराजा सयाजीराव गायकवाड ने करवाया था। इस महल में ऐसी ऐसी शिल्प कलाएं हैं जिन्हें देखकर आप हैरान रह जातें है। यह बहुत अद्भुत हैं। एक बार आपको इस जगह जाना चाहिए।
- अडालज वाव – Adalaj Stepwell
इसकी स्थापना 1499 में हुई थी। यह बावड़ी गुजरात के अडालज नामक गाँव मे स्थित है। सीढ़ी के आकार में बने इस भवन की संरचना काफी सुंदर है। इस भवन की सुंदरता को देखने के लिए दूर-दूर से दर्शक आते हैं।
अडालज वाव से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह बावड़ी गुजरात राज्य के गांधीनगर जिले से 5 किलोमीटर की दूरी पर स्थित है।
- समय-सारणी- 8:00AM से 6:00PM रोजाना।
- प्रवेश-शुल्क- निःशुल्क।
- मांडवी – Mandvi
यह एक समुद्र तट है जो की पूरे भारत में सबसे खूबसूरत समुन्द्र तटों में से एक कहा जाता है। यह अह्मदुपुर-मांडवी बीच के नाम से जाना जाता है। समुन्द्र के साफ़ पानी का नजारा और बीच में चलने वाली ठंडी हवाएं आपको आकर्षित करती हैं। इस जगह आप तैराकी का मजा ले सकते हैं।
- साबरमती आश्रम अहमदाबाद – Sabarmati Ashram
गुजरात को महात्मा गांधी का स्टेट भी कहा जाता है। भारत की आजादी के प्रणेता राष्ट्रपिता महात्मा गाँधी जहाँ रहते थे उस जगह को साबरमती आश्रम के नाम से जाना जाता है। यहं पर गाँधी जी की सभी यादें हैं। उनका बिस्तर, उनके द्वारा इस्तेमाल किया गया टेलीफोन, जहाँ वो बैठते थे, सोते थे, टहलने जाया करते थे।
इसके अलावा गाँधी के सत्याग्रह से जुड़ी कई सारी छोटी बड़ी यादें हैं। यहाँ जाकर आप भारत के आजाद होने की कहानी को विस्तार से समझ सकते हैं।
- रानी की वाव – Rani ki Vav
यह एक बावड़ी है जिसे यूनेस्को ने विश्व की धरोहर में शामिल कर रखा है। रानी की वाव को देखकर लगता है की इसका निर्माण कैसे किया गया होगा। इसका निर्माण 11वीं शताब्दी में करवाया गया था। इसके अंदर एक मंदिर और सीढ़ियों की सात कतारें हैं। इन्हें देखकर आप अचंभित रह जाते हैं। इस जगह आपको जरूर जाना चहिये। यह गुजरात के पाटन गाँव में मौजूद है।
- कांकरिया झील – Kankaria Lake
कांकरिया झील का निर्माण 1451 ई० में सुल्तान अहमद खां के द्वारा करवाया गया था। यह झील गुजरात राज्य की सबसे बड़ी झील है जो कि लगभग 2.25 किलोमीटर परिधि की है।
इस झील के बीचोबीच द्वीप महल बना हुआ है जो इसकी खूबसूरती को चार गुना बढ़ देता है, साथ ही झील के चारो तरफ लगे हुए सुंदर बगीचे प्राकृतिक सुंदरता का एक अनुपम उदाहरण पेश करते हैं।
इस जगह की एक विशेषता यह भी है कि झील के समीप ही बाल वाटिका एवं चिड़ियाघर भी स्थित है। साथ ही इस झील के अंदर बोटिंग की भी सुविधा उपलब्ध है जो कि यहाँ आने वाले पर्यटकों की पहली पसंद है।
छुट्टियों का आंनद लेने के लिए यदि आप गुजरात आते हैं, तो आपको इस जगह पर घूमने का आनंद जरूर लेना चाहिए।
कांकरिया झील से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- कांकरिया झील अहमदाबाद रेलवे स्टेशन से 2.8 किलोमीटर की दूरी पर है। यहाँ पहुचने के लिए टैक्सी एवं ऑटो की सुविधा उपलब्ध है।
- समय-सारणी- 4:00AM से 11:00PM तक (8:00AM से 11:00AM प्रवेश निषेध) सोमवार बन्द।
- प्रवेश-शुल्क- 10रु. /व्यक्ति (वयस्क), 5रु. /व्यक्ति (बच्चे), वरिष्ठ नागरिकों का प्रवेश निःशुल्क।
- अक्षरधाम मंदिर – Akshardham Temple
इस मंदिर की स्थापना नवंबर 1992 में हुई थी। इस मंदिर के प्रमुख देवता स्वामीनारायण जी हैं। यह मंदिर भारत के प्रमुख मंदिरों में से एक है।
अक्षरधाम मंदिर से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह मंदिर गांधीनगर रेलवे स्टेशन से 6.8किलोमीटर की दूरी पर स्थित है।
- समय-सारणी- 9:30AM से 7:30PM (सोमवार बन्द)।
- प्रदर्शनी समय- 10:00AM से 7:30PM तक
- प्रवेश-शुल्क 1.वाटर शो- 90रु./व्यक्ति (वयस्को के लिए), 60रु./व्यक्ति (बच्चों के लिए)
- प्रदर्शनी- 60रु./व्यक्ति (वयस्कों के लिए), 40रु./व्यक्ति (बच्चों के लिए)
- लक्ष्मी विलास पैलेस – Laxmi Vilas Palace
इसको गायकवाड़ द्वारा 1890 में बनवाया गया था। इसको बनवाने में कुल 14 वर्ष का समय लग गया था। यह उस समय मे पायी जाने वाली सभी सुविधाओं से परिपूर्ण महल था।
इस महल को यूरोपीय इंटीरियर के आधार पर बनाया गया है। यह महल 500 एकड़ से भी अधिक क्षेत्र में फैला हुआ है। साथ ही इसमे एक संग्रहालय भी बनाया गया है। इस महल में अन्य घूमने लायक जगह- सयाजी बाग एवं सूरसागर झील है। सयाजी बाग भारत के बेहतरीन बागों में से एक है। वही अगर बात की जाए सूरसागर झील की तो इस झील के बीचोबीच भगवान शिव की 120 फिट लम्बी प्रतिमा स्थापित की गई है, जिसकी वजह से इस झील का महत्व और भी बढ़ गया है।
लक्ष्मी विलास पैलेस से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह महल वडोदरा रेलवे स्टेशन से 3.6किलोमीटर की दूरी पर बना हुआ है।
- समय-सारणी- 9:30AM से 5:00PM (सोमवार बन्द)
- प्रवेश-शुल्क- 1.पैलेस- 225रु./व्यक्ति (भारतीय पर्यटक), 400रु./व्यक्ति (विदेशी पर्यटक)
- संग्रहालय- 60रु./व्यक्ति (भारतीय पर्यटक), 150रु./व्यक्ति (विदेशी पर्यटक)
आईना महल – Aina Mahal
इस महल की स्थापना 18वीं शताब्दी में हुई थी जिसकी संरचना भारतीय एवं यूरोपीय शैली के मिश्रित रूप पर आधारित थी।
2001 में आये भूकंप के दौरान इस महल का ज्यादातर हिस्सा क्षतिग्रस्त हो गया था हालांकि महल का कुछ हिस्सा ऐसा रह गया था जो कि ज्यादा क्षतिग्रस्त नही हुआ था। महल के इन्ही हिस्सो की मरम्मत कर के इसे एक संग्रहालय बना दिया गया है।
आईना महल से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह महल भुज रेलवे स्टेशन से 2.1 किलोमीटर की दूरी पर स्थित है।
- समय-सारणी- 9:00AM से 11:45AM तक एवं 3:00PM से 5:45PM तक रोजाना।
- प्रवेश-शुल्क- 10रु./व्यक्ति
- चंपानेर-पावागढ़ पुरातत्व उद्यान – Champaner-Pavagadh Archaeological Park
इस उद्यान की स्थापना चावड़ा वंश के राजा वनराज ने की थी। इस वन को 2004 में यूनिस्को द्वारा वैश्विक धरोहर में शामिल कर लिया गया है। इस वन की पहाड़ियां लाल एवं पीले चट्टानों से बनी हुई है।
उस पुरातत्व उद्यान में 11 प्रकार की विभिन्न इमारते बनी हुई है जिनमे मंदिर, मस्जिद, सहित कई इमारतें शामिल हैं। इस उद्यान में निर्मित सभी इमारते नागर शैली में निर्मित किये गए हैं। जिस पहाड़ी पर इस उद्यान को स्थापित किया गया है वह पहाड़ी समुद्रतल से 800 मीटर की ऊंचाई पर स्थित है।
चंपानेर-पावागढ़ पुरातत्व उद्यान से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियां:
- यह पुरातत्व उद्यान गुजरात राज्य के चंपानेर में स्थित है।
- चंपानेर रेलवे स्टेशन से यह 21.4 किलीमीटर की दूरी पर है।
- समय-सारणी- 8:30AM से 5:00PM तक रोजाना।
- प्रवेश-शुल्क- 10रु./व्यक्ति
- द्वारकाधीश मंदिर – Dwarkadhish temple
गुजरात के द्वारका शहर में स्थित वह जगह जिसे भगवान् श्रीकृष्ण की नगरी कहा जाता है। मथुरा छोड़ने के बाद भगवान् श्रीकृष्ण ने इस जगह को बसाया था। कहते हैं ऐसा अद्भुत आर्किटेक्चर आज तक किसी ने नहीं किया। यह चार धामों में से एक है। आपको एक बार इस जगह जाना चहिये।
- कच्छ का रण – Great Rann of Kutch
इसे “ग्रेट रण ऑफ़ कच्छ” या फिर सफ़ेद रेगिस्तान (Safed Ran) भी कहा जाता है। यहं पर दिसम्बर के महीने में कच्छ कार्निवल मनाया जाता है जिसमे दुनियाभर से लोग आते हैं। सफ़ेद रेगिस्तान में चांदनी के तले ऊँट की सवारी करनी है तो एक बार इस उत्सव में जरूर जाएँ। यह बहुत मशहूर है।
यहाँ पर आपको गुजरात की संकृति से लेकर मॉडर्न चीजे और थिएटर तक की सुविधाएँ मिलेगी। यह 38 दिन तक चलने वाला खास कार्यक्रम है।
सोमनाथ मंदिर – Somnath temple
भगवान् के 12वें ज्योतिलिंग में रूप में मशहूर सोमनाथ का मंदिर बहुत ख़ास है। यहाँ पर आपको कुछ ऐसी चीजे देखने को मिलेगी जिन्हें आज तक विज्ञान भी नहीं समझ पाया है। यहाँ आप त्रिवेणी घाट, जूनागढ़ गेट आदि का भी लुफ्त ले सकते हैं।
तो ये हैं गुजरात के वो स्थान जहाँ घूमने के लिए एक बार आपको जरूर जाना चहिये। इन जगहों में जाकर आपको भारत के गौरवशाली इतिहास के दर्शन होंगे तो साथ ही आपको सुकून भी मिलेगा।
गुजरात के विशाल रण कच्छ में हमें सतपुड़ा पहाडियों की दर्शनीय सुंदरता भी देखने मिलती है। गुजरात एशियाई शेरो का एकमात्र घर है और साथ ही इसे एशिया की सबसे महत्वपूर्ण सुरक्षित जगहों में से भी एक माना जाता है कच्छ जिले की प्राचीन आर्कियोलॉजिकल साईट धोलावीरा और अहमदाबाद जिले की प्राचीन आर्कियोलॉजिकल साईट लोथल में हमें प्राचीन सिंधु घाटी सभ्यता के और धोलावीरा में हड़प्पा संस्कृति के खंडहर भी देखने मिलते है।
पलिताना मंदिर परिसर में 863 से भी ज्यादा छोटे-छोटे मंदिरों का समावेश है, जो गुजरात की शत्रुंजय पहाडियों पर बना हुआ है। संगमरमर के पत्थरो से इस मंदिर को बनाया गया है।
सल्तनत शासनकाल में हिन्दू शिल्पकारो ने इस्लामिक आर्किटेक्चरो को मिलाकर इंडो-सिरासिक स्टाइल की खोज की। राज्य की बहुत सी एतिहासिक धरोहरों का निर्माण भी इसी स्टाइल में किया गया है। साथ ही यह भारतीय स्वतंत्रता अभियान के महान नेता महात्मा गांधी और सरदार वल्लभभाई पटेल की जन्मभूमि भी है।
गुजरात में कई तरह के पर्यटन जैसे व्यापार पर्यटन, आर्कियोलॉजिकल और हेरिटेज पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, वन्यजीव पर्यटन, मेडिकल पर्यटन और इत्यादि देखने मिलते है। भारतीय अभिनेता अमिताभ बच्चन फ़िलहाल गुजरात पर्यटन के ब्रांड एम्बेसडर है। गुजरात में कही भी जाने के लिए अहमदाबाद को ही एक आइडियल हब माना जाता है।
गुजरातमधील 13 आकर्षणे आणि ठिकाणे

गुजरातमध्ये काही थोडेसे ज्ञात रत्न आहेत!
महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यातील भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित, गुजरातमध्ये पर्यटकांच्या नकाशावर अलिकडच्या वर्षापूर्वी उल्लेख नाही. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनसोबत जाहिरात मोहिमेची एक अत्यंत यशस्वी मालिका मात्र बदलली आहे, आणि राज्यातील पर्यटकांचे व्याज वाढत आहे. गुजरातमध्ये भेट देण्यासाठी काही आश्चर्यकारक ठिकाणे आहेत जसे हस्तकला,आर्किटेक्चर, मंदिरे आणि वन्यजीवन यासारख्या विविध आकर्षणेसह. हे मोठय़ा शहरांमधून, आणि अन्वेषण करण्यापासून आणि बाहेर जाणे फायदेशीर आहे.
01 ते 13
अहमदाबाद जुने शहर

ग्रॅहम क्रॉच \ गेटी इमेज अहमदाबाद, गुजरातची राजधानी अनेक शतकांपासून, 2017 साली भारताचे पहिले युनेस्को जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले, दिल्ली आणि मुंबई या दोघांनाही पराभव त्याची भिंत जुनी शहर सुलतान अहमद शाह यांनी 15 व्या शतकात स्थापन केली आणि विविध हिंदू, इस्लामी आणि जैन समुदायांचे घर आहे. जुन्या शहराला बर्याच ध्रुवांमध्ये विभाजित केले आहे (वळणावळणाची लेन्स आणि कोरलेली लाकडी घरे असलेली ऐतिहासिक निवासी शहरे). तसेच, भारतातील भारतीय-इस्लामिक वास्तुकलाची आणि हिंदू मुस्लिम आर्टची काही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या आकर्षक अहमदाबाद वारसा चाक वर क्षेत्र एक्सप्लोर करा
02 ते 13
मोधारे हे शांततेत गाव भारतातील सर्वात महत्वाचे सूर्य मंदिरे आहेत. सोलंकी वंशवंश शासकांनी 11 व्या शतकात बांधले, ते सूर्य सूर्य देव यांना समर्पित आहे. मंदिर एक खरा रचना आहे, ज्यामध्ये एक कोरलेली पायरी असलेला टंक, विधानसभा कक्ष आणि मुख्य मंदिर आहे. हे जटील दगड शिल्पे समाविष्ट आहे पवित्र स्थान हा एक मार्ग आहे ज्यास तो रात्र व शुक्रवारच्या सूर्यकिरणांच्या पहिल्या किरण प्राप्त करतो.
- कोठे: उत्तर गुजरात, पुष्पावती नदीच्या दिशेने शहराचे 2 किलोमीटरचे अंतर, मेहसाणापासून 25 किमी आणि अहमदाबादपासून 100 किमी.
03 चा 13
राणी की वाव (द क्वीन स्टेपवेल), पाटन

प्रियाश बालकृष्णन / गेटी इमेज एक युनेस्को जागतिक वारसा स्थान, राणी की वाव 11 व्या शतकात परत एक प्राचीन बेबंद stepwell आहे . सोलंकी राजवटीत, त्याची पत्नी विनम्र पत्नी भीमदेव मी यांच्या स्मरणार्थ हे विवाह झाले होते. पायर्याजवळ पायर्या सात स्तरांवरून खाली जात आहेत आणि 500 पेक्षा अधिक मूर्तिं आणि 1,000 पेक्षा जास्त बालकांच्या पॅनल्स आहेत. जवळजवळ सरस्वती नदीच्या पात्राद्वारे फक्त पाण्याची सोय होती व 1 9 80 च्या दशकाच्या मधोमध उथळ पाण्याने भरलेला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने उत्खनन केल्यावर, तिच्या कोरविंग्स मुळ स्थितीत सापडले.
- कोठे: उत्तर गुजरात. पाटण अहमदाबाद पासून सुमारे 130 किमी आणि मोडेरा पासून 35 किलोमीटर आहे.
04 चा 13
कच्छ क्षेत्र

ऍनी ओवेन / गेटी प्रतिमा गुजरातच्या कच्छ प्रदेशाला कधीकधी भारताचे "वायहीन पश्चिम" असे संबोधले जाते. बऱ्याच मोठ्या व निर्जन वाळवंटी भूभागाचा हा प्रचंड ताण 40,000 चौ. कि.मी. पेक्षा अधिक आहे आणि हे देशाच्या सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. कच्छ (किंवा कच्छ) या शब्दाचा अर्थ, ते ओले ( पावसाळी हंगामात बुडणे) आणि कोरडी दरम्यान alternates कच्छमधील बहुतेक ऋषी मच्छिमार ज्या कच्छचे प्रसिद्ध रान (त्याच्या नमक वाळवंटासाठी प्रसिध्द) आणि कच्छचे छोटे छोटे राण ( जंगली गांड अभयारण्य साठी प्रसिद्ध) म्हणून ओळखले जातात. कच्छच्या इतर आकर्षणेमध्ये ऐतिहासिक भुज, गावे आणि पारंपारिक हस्तकला, बंदरगाडीतील मांडवी शहरातील जहाज बांधणी आणि प्राचीन सिंधु संस्कृतीचा वास / धरण धरणाची धुळिवीर अवशेष समाविष्ट आहेत. या कच्छ प्रवासाच्या मार्गदर्शक मध्ये अधिक शोधा .
- कोठे: वायव्य गुजरात भुज अहमदाबादच्या पश्चिमेला 340 किलोमीटर अंतरावर आहे.
05 चा 13
द्वारका

एक्झीटिका.आयम / गेट्टी प्रतिमा भारतातील चार सर्वात पवित्र चार धाम हिंदू तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आणि भारतातील सात सर्वात प्राचीन सप्तपुरी धार्मिक शहरांपैकी एक, द्वारका हे भगवान कृष्णचे प्राचीन राज्य आणि गुजरातची पहिली राजधानी मानली जाते. कृष्णा जन्माष्टमी उत्सव ही एक प्रमुख स्पर्धा आहे. द्वारकाध्याय मंदिराचे विशेष महत्व आहे, 200 च्या आसपास बांधले, आणि जगत मंदिर उंट, चहाच्या स्टॉल आणि शेशल ज्वेलरी विक्रेत्यांच्या चष्म्यासाठी पवित्र पाण्याच्या काठावर गोमती घाटवर खाली सरकवा.
- कोठे: पश्चिमी गुजरात, अरबी समुद्रावर गोमती नदीच्या मुखाजवळ, जामनगरपासून 130 किमी लांब आणि अहमदाबादच्या 300 किलोमीटर पश्चिमेला.
06 चा 13
द्वारका मार्गावरुन वेगळ्या आणि बंदिस्त झालेला मार्टिन नॅशनल पार्क किनारपट्टीवर आहे. हे 1 9 82 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित झाले आणि भारतातील अशा प्रकारचे पहिले उद्यान आहे. तरीही, बर्याच लोकांना याबद्दल माहित नाही. राष्ट्रीय उद्यानात 42 द्वीपांचा समावेश आहे, ज्यापैकी 33 प्रवाळ रीफद्वारे वेढलेले आहेत, आणि विविध समुद्री आणि पक्षीजीवनाचे घर आहे. पर्यटकांना केवळ काही बेटांवर भेट देण्याची परवानगी आहे. मुख्य नारा नारा आईलँड गाडीद्वारे उपलब्ध आहे आणि कमी समुद्राची भरभराट करतांना पाय-या दरम्यान लांब पळून आहे. हिवाळ्यादरम्यान भेट द्या आणि समुद्राच्या पाण्यावर घोट्याच्या खोल पाण्याने जाण्यासाठी तयार रहा. स्थानिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. चार्टर बोटाने पायरोटिन बेटे मिळू शकतात परंतु हे कठीण आहे आणि बर्याच सरकारी विभागांकडून आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे.
- कोठे: कच्छ आखात जामनगर जवळ, पश्चिम गुजरात.
13 पैकी 07
एक महत्वपूर्ण तीर्थस्थान, सोमनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे (भगवान शिवचे मंदिर, जिथे त्याला प्रकाशाच्या झुंडी म्हणून त्याची पूजा केली जाते). त्याची समुद्रसपाटीची जागा शक्तिशाली आहे, त्याच्या वाळूचा खडक वास्तुकला वर क्लिष्ट कोरीव काम भव्य आहेत, आणि त्याच्या इतिहास मोहक आहे. इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले आणि भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अंतिम पुनर्बांधणी करून अनेक वेळा पुन्हा बांधले. महाशिवरात्री हा मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक पौर्णिमा (पूर्ण चंद्र रात्री, सामान्यत: नोव्हेंबरमध्ये) येथे एक रंगीत धार्मिक उत्सव साजरा केला जातो. लहान मुलांनी भगवान शिव म्हणून परिधान केले होते आणि भरपूर भाग बनले होते .
- कोठे: नैऋत्य गुजरात, अहमदाबाद पासून सुमारे 400 किलोमीटर आणि वेरवाल पासून 10 किलोमीटर.
- सोमनाथ येथे सात्त्विक संध्याकाळी ध्वनी आणि प्रकाश शो बघू नका .
13 पैकी 08
गिर नॅशनल पार्क

अजय के शाह / गेटी इमेज भारतातील वन्यजीव पाहण्याचे एक मुख्य उद्यान असलेल्या गिरी नॅशनल पार्क हे जगातील एकमेव ठिकाण आहे जेथे एशियाटिक सिंह आता आढळू शकतात. संवर्धन प्रयत्नांमुळे धन्यवाद, त्यांची संख्या वाढत आहे. पश्चिम भारतातील गिरी हे सर्वांत मोठे कोरडी पानगोवेतन मानले जाते. तेथे सुमारे इतर वन्यजीवांमध्ये सुमारे 300 प्रकारचे पक्षी आढळतात. मार्चपर्यंत आपण मार्चमध्ये जाल तेव्हा सिंहाचा शोध घेण्याची उत्तम संधी असेल, परंतु उद्या डिसेंबर पर्यंत मार्च पर्यंत जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर वेळ असला तरीही. सफारी रोज धावतात.
- कोठे: नैऋत्य गुजरात, अहमदाबाद पासून 360 किमी, जुनागढ़ पासून 65 किलोमीटर, आणि वेराळ पासून 40 किलोमीटर. हे दीव च्या किनारे पासून अंतर्देशीय आहे
13 पैकी 09
जूनागढ़

हॉब्रोर / गेट्टी प्रतिमा द्वारे फोटोग्राफर जर तुम्हाला भारतीय-इस्लामी स्थापत्यशास्त्रात रस असेल तर आपण 1 9 शतकांच्या शतकातील जुनागड येथील स्थानिक शासक महाबत मकबरा समाधी संकुलातील गुंतागुंतीच्या डिझाईनवरून आश्चर्यचकित व्हाल. या ऐतिहासिक शहरात, ज्याचे नाव आहे प्राचीन काळी पवित्र आणि मंदिर-संरक्षित गिरनार टेकड्यांच्या तळाशी स्थित आहे. आपण उपरकट किल्ल्याची अवशेषही पाहू शकता, ज्यामध्ये काही मनोरंजक रचना आहेत जसे की stepwells आणि बौद्ध रॉक-कट लेणी
- कोठे: दक्षिण पश्चिम गुजरात, अहमदाबाद पासून 315 किलोमीटर, सोमनाथच्या 90 किलोमीटर उत्तर, आणि गिर नॅशनल पार्क उत्तर पश्चिम 50 किलोमीटर.
13 पैकी 10
वेलवदार ब्लॅकबॅक नॅशनल पार्क

सिल्वेन कॉर्डीएअर \ गेटी इमेजेस ब्लॅकबॅकची सर्वात मोठी लोकसंख्या, असामान्य सर्पिल-शिंगे असलेला भारतीय काळवीट, Velavadar येथे राहतात. भारतातील एकमेव उष्णकटिबंधीय चराऊ कुंपणे ही राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आली आहे. हे गवताळ पक्षी पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे घर आहे. ब्लॅकबॅक लॉज भारताच्या जंगल लॉजपैकी एक आहे, तेथे राहण्यासाठी उत्कृष्ट स्थान आहे.
- जिथे: अहमदाबादपासून दक्षिण-पश्चिम 140 किमी, केंबेच्या खाडीच्या पश्चिम किनाऱ्याजवळ.
13 पैकी 11
चंपानेर-पावागढ़ पुराणवस्तुसंशोधन उद्यान

तिलक हरिया / गेट्टी प्रतिमा एक अल्पज्ञात युनेस्को जागतिक वारसा स्थान, चंपाणर आणि पावागढ हे मुस्लिम आणि हिंदू परंपरेतील ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय व पुरातन वास्तुशास्त्रीय धनदानीसह 8 व्या आणि 14 व्या शताब्दींच्या कालखंडात आहेत. यामध्ये डोंगरी गढी, राजवाडे, उपासनेची जागा (जाम मशिद गुजरातमध्ये सर्वात आकर्षक मशिदी आहे), निवासी क्षेत्रे, जलाशयांचे व पायरी विहिरी आहेत.
- कोठे: अहमदाबाद पासून दक्षिण पूर्व 145 आणि वडोदरा 50 किलोमीटर पूर्वोत्तर.
13 पैकी 12
जलिमाचे मुख्य देवस्थान असलेल्या पलतिना यांनी 9 00 मंदिरांचे बांधकाम केले आहे. टेकडीच्या शिखरावर 3,000 पायर्यांपेक्षा जास्तीत जास्त चढणं आणि तुम्हाला आश्चर्यकारक जैन मंदिर परिसर मिळेल ज्यामध्ये सनसनाटी दृश्ये असतील. टेकडी पवित्र मानली जाते हे लक्षात घ्या. आपण कोणत्याही लेदरच्या वस्तू वापरू शकत नाही किंवा वाहून नेऊ शकत नाही.
- कोठे: दक्षिणी गुजरात, भावनगरपासून 55 कि.मी. व अहमदाबादपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंभातच्या खाडीजवळ.
13 पैकी 13
सप्तमारा, याचा अर्थ "सर्पचे निवास" हे सह्याद्रीच्या सीमेवरील घनदाट जंगलातील पठारावर वसलेले आहे. या हिल स्टेशनला मोठ्या सरोवर, बोट क्लब, आदिवासी संग्रहालय, केबल कार, कलाकार गाव आणि इतर आकर्षणे जवळील पर्यटकांसह एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले गेले आहे. हे एक लोकप्रिय शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस आहे, विशेषत: पावसाळी हंगामात जेव्हा ते अस्पष्ट आहे
- कोठे: दक्षिणी गुजरात, अहमदाबाद पासून 400 किलोमीटर दक्षिणेस महाराष्ट्र सीमा जवळ.
गुजरात के दर्शनीय व पर्यटन स्थल | Gujarat Tourism in Hindi
Gujarat Tourism / गुजरात भारतीय उपमहाद्वीप के पश्चिमी तट पर स्थित एक राज्य हैं। यह स्थलाकृतिक और सांस्कृतिक विविधता के लिए जाना जाता है। इसे “पश्चिम का जेवर“ भी कहते हैं। यह भारत का सबसे अधिक औद्योगिक और समृद्ध राज्य है। यहां आपको आधुनिक परिवेश और सदियों पुरानी परंपराओं का सुखद मेल देखने को मिल जाएगा। गुजरात हमेशा भारत के इतिहास में सांस्कृतिक और व्यापार का केंद्र माना जाता रहा है।

गुजरात पर्यटन – Information About Gujarat Tourism in Hindi
Contents [show]
गुजरात जैसे की यह राज्य सिंधु घाटी सभ्यता का उद्गमस्थल भी है। इसकी उत्तरी-पश्चिमी सीमा जो अन्तर्राष्ट्रीय सीमा भी है, पाकिस्तान से लगी है। राजस्थान और मध्य प्रदेश इसके क्रमशः उत्तर एवँ उत्तर-पूर्व में स्थित राज्य हैं। इसकी राजधानी गांधीनगर है। गांधीनगर, राज्य के प्रमुख व्यवसायिक केन्द्र अहमदाबाद के समीप स्थित है। गुजरात का क्षेत्रफल 1,96,077 किलोमीटर है।
गुजरात, भारत का अत्यंत महत्वपूर्ण राज्य है। इस राज्य को अपना नाम ‘गुज्जरत्ता’ शब्द से मिला है, जिसका मतलब होता है गुज्जरों की भूमि। गुज्जर एक जनजाति है जो कि 5वीं शताब्दी में भारत आई थी। इस इलाके की पुरातात्विक खोजें – जैसे लोथल, धोलावीरा, रंगपुर सिंधु घाटी सभ्यता काल की हैं। तब से ही इस राज्य में ब्रिटिशों के आने तक कई शक्तिशाली साम्राज्यों जैसे मौर्य, खिलजी और अन्य मुस्लिम शासकों और मराठों ने राज किया।
विशाल सागर तट वाले इस राज्य में इतिहास युग के आरम्भ होने से पूर्व ही अनेक विदेशी जातियाँ थल और समुद्र मार्ग से आकर स्थायी रूप से बसी हुई हैं। इसके उपरांत गुजरात में अट्ठाइस आदिवासी जातियां हैं। जन-समाज के ऐसे वैविध्य के कारण इस प्रदेश को भाँति-भाँति की लोक संस्कृतियों का लाभ मिला है। ये राज्य हमारे राष्ट्रपिता, महात्मा गांधी का भी जन्म स्थल है।
गुजरात के लोग राज्य की जीवंत संस्कृति को दर्शाते हैं। यहां के लोग रंग बिरंगे कपड़े पहनते हैं और औरतें कई गहने पहनना पसंद करती हैं। ज्यादातर लोग यहां गुजराती बोलते हैं। गुजरात में हिंदी, उर्दू, सिंधी और अंग्रेजी भी बोली जाती है। अगर इस राज्य की भौगोलिक विविधता के बारे में बात करें तो कच्छ में नमक का दलदल , समुद्र तट और सापूतारा और गिरनार की पहाड़ियां सबसे पहले जुबां पर आते है। इतनी विशेषता से भरा यह राज्य यहाँ आने वाले पर्यटकों को पर्यटन का पूरा पैकेज उपलब्ध कराता है। गुजरात को दो क्षेत्रों में बटा गया है, राज्य के उत्तर में बसा है कच्छ और दक्षिण पश्चिम में है काठियावाड़।
गुजरात में साल भर मौसम सामान्य रहता है। हालांकि राज्य में कच्छ जैसे कुछ भाग ऐसे हैं जो बहुत सूखे और कठोर जलवायु वाले हैं। इस राज्य में घूमने आने का सबसे अच्छा समय अक्टूबर से मार्च का है।
गुजरात में कुल 26 जिलों है, जो किसी बाकी राज्य की तरह इष्टतम विविधता प्रस्तुत करते हैं। अरब सागर और सहयाद्रि रेंज की पहाड़ियां और स्वच्छ और प्राचीन समुद्र तट, अरावली रेंज, सतपुड़ा रेंज और सह्याद्री रंजे कच्छ के रण का अनूठा स्थलाकृतिक है, यहाँ आये पर्यटकों को शायद ही किसी अन्य जगह ऐसा नज़ारा देखने को मिलेगा।
गुजरात के पर्यटन स्थल – Gujarat Tourist Places in Hindi
गुजरात देश के सबसे लोकप्रिय पर्यटन स्थलों में से एक है। यह राज्य अपनी समृद्ध सांस्कृतिक विरासत, ऐतिहासिक महत्व, हस्तशिल्प और असंख्य पर्यटन आकर्षणों के लिए जाना जाता है। भारत का सबसे अधिक औद्योगिक क्षेत्र होने के अलावा यह देश का बड़ा टूरिस्ट हब भी है। रोमांच, करिश्मे, रहस्य, जीवंत रंगों और अनंत सुंदरता से भरा गुजरात यहां आने वालों को लुभाने में कभी असफल नहीं रहता।
तीथल काले रेत का समुद्र तट, मांडवी बीच, चोरवाड़ समुद्र तट, अहमदपुर-मांडवी बीच, सोमनाथ बीच, पोरबंदर तट, द्वारका बीच, गुजरात के समुद्र तटों की फेहरिस्त बड़ी लम्बी है और वैसे ही तीर्थस्थलों की भी। द्वारका और सोमनाथ जैसी जगह हमारे भारतीय पौराणिक कथाओं और धर्म का अभिन्न हिस्सा हैं, कुछ वैसे ही है अंबाजी मंदिर और गिरनार की पहाड़ियों पर बने हिंदू और जैन मंदिर।
गुजरात के राष्ट्रीय उद्यानों और वन्य जीव अभयारण्यों में 40 से अधिक जानवरों की प्रजातियों को संरक्षण देते है जैसे की दुर्लभ एशियाई शेर, जंगली गधा और कृष्णमृग। गिर राष्ट्रीय उद्यान, वंस्दा नेशनल पार्क, वेरावादर कृष्णमृग राष्ट्रीय उद्यान, नारायण सरोवर वन्य जीव अभयारण्य, थोल झील पक्षी अभ्यारण्य, कच्छ ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य राज्य के वन्य जीवों की रक्षा के लिए सबसे महत्वपूर्ण स्थानों में से कुछ हैं।
गुजरात के मुख्य पर्यटन स्थल –
1). द्वारिकाधीश मंदिर
गुजरात का द्वारका शहर वह स्थान है जहाँ 5000 वर्ष पूर्व भगवान कृष्ण ने मथुरा छोड़ने के बाद द्वारका नगरी बसाई थी। जिस स्थान पर उनका निजी महल ‘हरि गृह’ था वहाँ आज प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर है। इसलिए कृष्ण भक्तों की दृष्टि में यह एक महान तीर्थ है। वैसे भी द्वारका नगरी आदि शंकराचार्य द्वारा स्थापित देश के चार धामों में से एक है। यही नहीं द्वारका नगरी पवित्र सप्तपुरियों में से एक है।
2). सोमनाथ मंदिर
श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात (सौराष्ट्र) के काठियावाड़ क्षेत्र के अन्तर्गत प्रभास में विराजमान हैं। इसी क्षेत्र में लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचन्द्र ने यदु वंश का संहार कराने के बाद अपनी नर लीला समाप्त कर ली थीं। ‘जरा’ नामक व्याध (शिकारी) ने अपने बाणों से उनके चरणों (पैर) को बींध डाला था।
3). अक्षरधाम गांधीनगर
अक्षर मंदिर स्वामिनारायन सप्र दाय मंदिर है। गुजरात राज्य के गांधीनगर जिल्ला में अक्षरधाम मंदिर देखने लायक उतम स्थल है। और वो मंदिर ने स्वामिनारायन भगवान् की प्रसीद्ध और पूरा नि मुर्तिया है। जब उसके बगीचे भी देखने लायक है गांधीनगर में ये स्थल देखने लायक प्रचीन मंदिर है। नीलकंठ और सहजानंद हॉल, मिस्टिक इंडिया प्रदर्शनी ( 45 मिनट), परमानंद हॉल ( 45 मिनट) यह सब भी देखने लायक है।
4). नागेश्वर ज्योतिर्लिंग
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात प्रान्त के द्वारका पुरी से लगभग 25 किलोमीटर की दूरी पर अवस्थित है। यह स्थान गोमती द्वारका से बेट द्वारका जाते समय रास्ते में ही पड़ता है। द्वारका से नागेश्वर-मन्दिर के लिए बस, टैक्सी आदि सड़क मार्ग के अच्छे साधन उपलब्ध होते हैं। रेलमार्ग में राजकोट से जामनगर और जामनगर रेलवे से द्वारका पहुँचा जाता है।
5). कीर्ति मंदिर
कीर्ति मंदिर पोरबंदर का प्रमुख आकर्षण केन्द्र है। कीर्ति मंदिर महात्मा गाँधी और उनकी पत्नी कस्तूरबा गाँधी का घर था। कीर्ति मंदिर उस जगह के पास स्थित है जहाँ महात्मा गाँधी का जन्म हुआ था। कीर्ति मंदिर में एक गाँधीवादी पुस्तकालय और प्रार्थना कक्ष है।
6). लक्ष्मी विलास पैलेस वडोदरा
लक्ष्मी विलास पैलेस यमल प्राचीन भारतीय शिल्प कला की अनोखी मिसाल है। सफेद संगमरमर शीशे लकड़ी पत्थरों से निर्मित है। यह पैलेस पर्यटकों को बहुत पसंद आता है। यहां की खूबसूरती को महाराजा सयाजीराव गायकवाड ने बनवाया था पहले यह महाराज का महल था। इस्माल की दीवालों पर काफी शिल्प कला है जिसे देखने के लिए दूर से लोग आते हैं।
7). गिर वन राष्ट्रीय उद्यान
गिर वन राष्ट्रीय उद्यान और अभयारण्य, गुजरात राज्य, पश्चिम- मध्य भारत में स्थित है। जूनागढ़ नगर से 60 किलोमीटर दक्षिण-पश्चिम में शुष्क झाड़ीदार पर्वतीय क्षेत्र में स्थित इस उद्यान का क्षेत्रफल लगभग 1,295 वर्ग किलोमीटर है। यहाँ की वनस्पति में सागौन, साल और ढाक (ब्यूटिया फ्रोंडोसा) जैसे पर्णपाती वृक्षों सहित कांटेदार जंगल शामिल हैं।
8). सासन गिरी
सासन गिरी पश्चिमी राज्य गुजरात में सौराष्ट्र प्रायद्वीप में स्थित विश्व प्रसिद्ध शेर अभयारण्य है। यह गिर पहाडि़यों के उत्तर और पश्चिम में है। यह जंगल शुष्क पर्णपाती प्रकार का है जिसमें सागौन प्रमुख प्रजाति है। सासन गिरी शेर अभयारण्य परियोजना 1972 में शुरु हुई थी। आजादी के पहले गिर में मलधारी और शेरों की कमी की वजह से स्थिति तेजी से बिगड़ी। तब सरकार ने इस मामले पर विचार करना शुरु किया।
9). मांडवी
गुजरात में भारत का सबसे शानदार समुद्र तट है जिसे अहमदपुर-मांडवी बीच के नाम से जाना जाता है। इस तट पर रोमांचक वाॅटर स्पोर्टस मौजूद हैं जिन्हें आप कभी नहीं भूल पाएंगे। यह अहमदाबाद से 298 किलोमीटर की दूरी पर स्थित है। समुद्र का साफ पानी इसे तैराकी के लिए सबसे सही जगह बनाता है।
10). साबरमती आश्रम अहमदाबाद
साबरमती आश्रम अहमदाबाद में साबरमती नदी किनारे है। इसका नाम भी साबरमती नदी के नाम से पडा है। महात्मा गांधीजी ने यहाँ से सत्याग्रह की सुरुआत गांधीजी ने यहाँ से की थी। आज भी गांधीजी की यादे इस आश्रम में है। यह भी जगह देखने लायक है।
11). रानि की वाव पाटन
रानी की वाव एक जटिलतापूर्वक बनायी गयी बावड़ी है, जो भारत में गुजरात के पाटन गाँव में स्थित है। यह बावड़ी सरस्वती नदी के किनारे पर स्थित है। रानी की वाव का निर्माण 11 वी शताब्दी में ए.डी. किंग की याद में बनायी गयी थी। 22 जून 2014 को इसे यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट में भी शामिल किया गया था। यह बावड़ी भूमिगत पानी स्त्रोतों से थोड़ी अलग है और प्राचीन समय में काफी समय पहले ही इसका निर्माण किया गया था। रानी की वाव मारू-गुर्जरा आर्किटेक्चर स्टाइल में एक कॉम्प्लेक्स में बनाया था। इसके भीतर एक मंदिर और सीढियों की सात कतारे भी है जिसमे 500 से भी ज्यादा मुर्तिकलाओ का प्रदर्शन किया गया गया है।
12). पालीताणा टेंपल
पालीताना शत्रुंजय नदी के तट पर शत्रुंजय पर्वत की तलहटी में स्थित है। यहाँ 900 से भी अधिक जैन मन्दिर हैं। पालिताना मंदिर जैन धर्म के लोगो के लिए सबसे पवित्र तीर्थ स्थान के रूप में माना जाता है। पालीताना से पहाड़ की तलहटी तक के लिए सवारियाँ मिलती हैं। पर्वत की सम्पूर्ण चढ़ाई लगभग ४ किमी. है। यह भी एक देखने लायक स्थल है।
13). जामा मस्जिद अहमदाबाद
गुजरात राज्य के अहमदशाह शहर में प्रचीन देखने लायक पर्यटन स्थल है। इसे अहमदशाह ने बनवाया था शहर के मध्य में स्थित मस्जिद में 206 और 15 गुबंद है। देश की सबसे सुंदर मस्जिदों में इसकी गिनती की जाती है। मस्जिद की दीवारों पर हिंदू स्थापत्य कला के सुंदर नमूने देखने को मिलते हैं। यह मस्जिद पीले बलुआ पत्थरों से निर्मित है।
14). मोढेरा सूर्य मंदिर
मोढेरा का सूर्य मन्दिर गुजरात राज्य के मोढेरा में स्थित है। यह मन्दिर अहमदाबाद से लगभग सौ किलोमीटर की दूरी पर पुष्पावती नदी के तट पर स्थित है। इस सूर्य मन्दिर का निर्माण सूर्यवंशी सोलंकी राजा भीमदेव प्रथम ने 1026 ई. में करवाया था। मोढेरा का सूर्य मन्दिर अब पुरातत्व विभाग की देख-रेख में आता है और हाल ही में यहाँ पर्यटन स्थलों के रख-रखाव में काफ़ी सुधार हुआ है। इस प्रसिद्ध मन्दिर के आस-पास बगीचा बना हुआ है और साफ-सफाई का भी पूरा ध्यान रखा गया है। चूंकि यहाँ पूजा-अर्चना आदि नहीं होती, इसीलिए श्रद्धालुओं की भीड़ बहुत कम होती है।
जयंत कुलकर्णी.
सहलीचा मार्ग असा ठरवला होता...
पुणे-बडोदा-जामनगर-भूज-जामनगर-द्वारका-पोरबंदर-सोमनाथ-जूनागढ-राजकोट-जामनगर- अहमदाबाद-पाटण-मोधेरा-अहमदाबाद-बडोदा-पुणे..... अंदाजे ३५०० किमी प्रवास होईल असा अंदाज होता तो बऱ्यापैकी बरोबर आला. सहलीचे मुख्य उद्दीष्ट ठेवले होते –
१ प्राचीन देवळे
२ गुजरातची प्रगती खरी की खोटी ते जेवढे शक्य होईल तेवढे बघणे.
३ पक्षी निरिक्षण व छायाचित्रण
४ गुजराती जेवणांचा व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे शिवाय मजा करणे हाही मुख्य हेतू मनात होताच.
छायाचित्रणासाठी मी एक चेकलिस्टच तयार केली आहे ती खालीलप्रमाणे –
कॅमेरा, दोन बॅटऱ्या, दोन कार्ड, ट्रायपॉड, दोन लेन्सेस, छोटा ट्रायपॉड (सहा इंची) मॅक्रोच्या रिंग्ज, व्हाईट बॅलन्सचा क्युब, लेन्स साफ करायचे किट, निरनिराळे फिल्टर्स, लॅपटॉप, एक एक्स्टर्नल हार्डडिस्क, सगळ्या केबल्स (यादी) कॅमेऱ्याची छोटी बॅग, एक चष्मा ( कॅमेऱ्याच्या बागेत) एक छत्री - वेळ पडल्यास कॅमेऱ्यावर धरण्यास. या सगळ्यावर टिकमार्क करुन ती यादी कॅमेऱ्याच्या बॅगेत ठेवली व लवकर उठायचे म्हणून लवकर झोपी गेलो. लवकर झोपे लवकर उठे .....इ.इ.इ.
पहाटे ५-४५ला बहीण व मेहुण्याला त्यांच्या घरी सुस रोडला घेण्यास पोहोचलो. रिट्झ गाडी चांगली आहे पण मोठ्या सहलीला चौघांसाठी जागा फारच कमी आहे. ड्रायव्हर सीटवर एवढी काही अडचण येत नाही पण बाकींच्यांचा पायात सामान, मधे सामान त्यामुळे हलण्यास बिलकूल जागा नाही. मागे बायकोच्या व बहिणीच्या मधल्या जागेत इतके सामान कोंबले होते की दोघींना एकमेकींकडे बघण्यासाठी माना वर कराव्या लागत होत्या. बूटकडे तर बघावेसे वाटत नव्हते. पुढच्या सहलीआधी टपावर एक चांगल्या प्रतीचे कॅरियर लावण्याचे निश्चित केले आहे. अर्थात बायकोने खायचे सामान कमी झाल्यावर बरीच जागा कमी होईल अशी समजूत काढली परंतू त्याचबरोबर नवीन सामान येणार नाही हे आश्र्वासन देण्यास बहुदा ती सोयिस्कररित्या विसरली असावी कारण येताना सामान कमी झाल्याचे मला तरी काही जाणवले नाही. खाण्याचे सामान इतके घेतले की हॉटेल काढू शकू या प्रकारची स्टँडर्ड चेष्टा करुन झाली पण एक कबूल करायलाच लागेल की खाण्याच्या पदार्थांचा शेवटचा कणही आम्हाला खावा लागला. व शेवटी आम्ही बायकांची माफी मागितली. त्यांनीही गत्यंतर नसल्यामुळे आम्हाला उदार अंत:करणाने माफ केले असावे.
बोईसर टोल नाक्याआधी एक सूर्यनदीची पाटी वाचल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे नद्यांची कमी असलेले ज्ञान. आपण कुठला रस्ता कुठे जातो, त्याला कुठला रस्ता येऊन मिळतो, पर्वत रांगांची नावे, हे सर्व सांगू शकतो पण हाच प्रश्न नद्यांच्या बाबतीत स्वत:ला विचारुन बघा... अंऽऽऽहंऽऽऽऽ याचा जरा अभ्यास वाढवायलाच पाहिजे मी मनात म्हटले. हे वाक्य मनात येताच मिपा आठवले व हसू आले....
नंतर लागलेल्या पार्डी टोलवर चिक्कू घेतले व त्यावरुन अजून एक धडा शिकलो. पिकणारी फळे गाडीत ठेऊ नयेत हा. त्या पिकलेल्या चिक्कोच्या वासाने आमचे डोके भणाणून गेले. मधे रस्त्यात एके ठिकाणी आपल्या ज्वारीच्या हुरड्यासारख्या धान्याचा हुरडा विकायला बसले होते. ताजा हुरडा खायला मिळणार म्हटल्यावर गाडी थांबवून नीट पाहिले तर ती ज्वारी नव्हती. दाणे मोठे होते व त्याला ते क्वोंड असे काहीतरी म्हणत होते. ते भाजून हुरड्यासारखे मळून देत होते पण त्यावर तिखट शेव टाकून खायला देत होते. ३० रुपये पाव किलो. मला तरी तो प्रकार आवडला. रस्त्यात ठिकठिकाणी निर्जन जागी थांबू नये अशा पाट्या ठिकठिकाणी लावलेल्या आढळल्या त्यावरुन दिवसा ढवळ्याही वाटमारी होते की काय अशी शंका आली. शेवटी ५५४ किमी प्रवास करुन बडोद्याला संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. दुसऱ्या दिवशी दभोईला जायचे होते. ड्रायव्हिंग करणारा मी एकटाच होतो. आराम करण्याची आवश्यकता असल्यामुळे सकाळी निवांत ८ वाजता निघायचे असे ठरल्यावर सकाळी ८ वाजता निघालो.
डभोईचे प्रचिन नाव आहे दर्भावती. डभोई बडोद्यापासून ३२ एक किमि आहे. गावापर्यंतचा रस्ता मस्त, आजुबाजूला कोथींबिरेची शेती. कोथिंबीर फुलाला आली असल्यामुळे खाली हिरवी रोपे व वर पांढऱ्या फुलांचे तुरे असा मोठा बहारदार देखावा दिसत होता. मधेच वाऱ्याची झुळूक आली की रोपांची ती पागोटी मस्तपैकी डुलत होती.
डभोईमधे शिरताना मात्र हे सगळे दृष्य बदलू लागले व इतिहासात वाखाणलेल्या सिद्धराजा जयसिंगाने बांधलेले हेच का ते डभोई ही शंका येऊ लागली. खरोखरच उकिरडा बरा अशी पहिली वेस लागली.
सिद्धराजा जयसिंग हा एक कलासक्त राजा होता व त्याने जी बांधकामे केली आहेत त्यावरुन दिसून येते. त्याने डभोईचा किल्ला बांधला व त्याने बांधलेल्या अजून दोन वास्तूंनी याची प्रचिती येते. पहिली वास्तू आहे रुद्रमहालय व दिसरी सहस्रार्जून तलाव. प्रबंधचिंतामणीमधे या राजाबद्दल एक श्र्लोक आहे तो असा :
महालयो महायात्रा महास्थानं महासर: |
यत्कृतं सिद्धराजेन कियते तन्न कियेचित. ||
याचा अर्थ साधारणत: असा होतो...भव्य महाल,(रुद्रमहालय), धार्मिक यात्रा (सोमनाथ), स्थान (दरबार) व सागराप्रमाणे भव्य तलाव (सहस्रलिंग तलाव) यात सिद्धराजाचा हात धरणारा या भूतलावर कोणी नाही.....
डभोईला चार वेशी आहेत व त्या उत्कृष्ट कलाकृतींनी नटलेल्या आहेत. पण मला हे उमजले नाही की या वेशींचा गावाच्या संरक्षणासाठी काय उपयोग होता. कदाचित त्यावेळी हा राजा एवढा बलाढ्य होता की त्याला त्याची गरज भासली नसावी. माझ्या मते हा दुरदृष्टीचा पूर्णपणे अभाव असल्याचे द्योतक आहे. मी तरी असली नाजूक वेस व तटबंदी संरक्षणासाठी बांधली नसती. परकीय आक्रमकांना दोष देण्यात काय हशील आहे ? एक वेस आहे पूर्वेला तिचे नाव आहे हिराभागोल, हे नाव ज्याने ती बांधली त्या हिराधर नावाच्या वास्तूविशारदाच्या नावावरुन ठेवले आहे. पश्चिमेला आहे वडोदरा वेस, उत्तरेला चंपानेर वेस व दक्षिणेला आहे माहुडी किंवा नांदेड वेस. यातील पहिल्या व शेवटची वेस अप्रतीम शिल्पांनी सजलेली आहे. अर्थात उकिरडा तुडविल्यानंतर ही रत्ने आपल्या दृष्टीस पडतात....
राजा होता हिंदू, पण जैनधर्माला त्याने उदार राजाश्रय दिला असल्यामुळे दभोईमधे अनेक जैन देवळेही दिसतात. मराठ्यांसाठी डभोईचे अजून एक महत्व आहे. डभोईला एक महत्वाची लढाई झाली ज्याने शाहूमहाराजांचा दरारा महाराष्ट्रात सिद्ध झाला. ही लढाई झाली बाजीराव पेशवे पहिले व सरसेनापती त्रंबकराव दाभाडे यांच्यात. राजाराममहाराजांनी खंडेराव घाटग्यांची योग्यता पाहून त्यांना भली मोठी जहागिरी दिली व त्यांनीही त्याचे चिज केले. १७१७ साली जानेवारीत शाहूमहाराजांनी दाभाड्यांस गुजरातला पाठवून तिथे वसूली करण्याचा अधिकार दिल्यावर खंडेराव व बाळाजी विश्र्वनाथ यांच्यात चांगली मैत्री हो़ऊन त्यांनी बरीच फायदेशीर कामे पूर्णत्वास नेली. परंतू त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा त्रंबकराव व त्याचा सरदार पिलाजी गायकवाड हे मोहिमांच्या खर्चाचा हिशेब देईनासे झाल्यावर शाहूमहाराजांनी बाजीरावास या दोघांची समजूत काढण्यास गुजरातेत पाठविले. बाजीराव शेवटपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला अपयश आले. याच्यातच निजामाने दाभाडे व पिलाजीचे कान भरले व गुजरातमधे त्यांचे आता काम राहणार नाही असे पटविले. अर्थात बाकी अनेक कारणेही होती त्यात आता आपण जायला नको. त्यावर एक भला मोठ्ठा लेख होईल. बाजीराव डभोईस मुक्कामास असता १ एप्रिल १७३१ रोजी दाभाड्यांनी त्यांच्या तळावर अचानक हल्ला चड्गविला. बाजीरावाची फौज होती अंदाजे २५००० व दाभाडे व गायकवाडांची मिळून होती ५०,०००. त्रंबकराव स्वत: हत्तीवर बसून लढाईत सहभागी झाले होते. तेही शूर होतेच. असे म्हणतात त्या हत्तीचा माहूत जखमी झाल्यावर ते पायाने हत्तीला पराणे टोचत लढाई करत होते तेवढ्यात कपाळात गोळी लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पुढे शाहू महाराजांनी पेशवे व दाभाड्यांमधे दिलजमाई करुन दिली पण दाभाड्यांना मोहिमांचा हिशेब द्यायला लावलाच. शाहू महाराजांनी स्वत:च्या सरसेनापतीस वठणीवर आणले हे बघून इतर सरदारांचीही टाळकी ठिकाणावर आली असे म्हणतात. मी या लढाईबद्दल डभोई येथे चौकशी केली पण कोणालाच काही माहिती नव्हते.
माहुडीची वेस:
या वेशीशेजारीच अलिकडेच बांधलेले एक कालिमातेचे छोटे मंदीर आहे. वेशीच्या भिंतीवर नाथ पंथीय साधूंची शिल्पे आहेत. (असे काही जणांचे म्हणणे आहे) त्याबद्दल प्रत्येक छायाचित्रांखाली जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेशीला आतून अशा पाच कमानी आहेत. व प्रत्येक कमानीच्या मधे जी जागा आहे त्यात शिल्पे कोरलेली दिसतात....कमानी वर पूर्वी बांधकाम होते असे म्हणतात पण आता तसे काही दिसत नाही. दिसते ते तारांचे जंजाळ ज्याचे छायाचित्र घेववत नाही.
या कमानींवर गजव्यालावर बसलेल्या स्त्रिचे शिल्प प्रत्येक ठिकाणी आढळते. बहुदा ते सजावटीसाठी असावे.
कमानीवर थोडे वर पाहिल्यास दोन योगाचार्यांच्या प्रतिमा दिसतात. त्यातील डाव्याबाजूच्या योग्याने गुडघ्याभोवती योगपट्टा लावलेला दिसतो. असे म्हणतात हा एकदा चढविला की त्याच स्थितीत साधक १०-१२ तास सहज बसू शकतो.
हे पाहिल्यावर मला एलोरामधे एका भिंतीवर असलेल्या एका योग्याच्या चित्राची आठवण झाली. सध्या हा योगपट्टा साधक वापरतात का ते माहीत नाही.....बघायला पाहिजे एकदा.........
अजून शिल्पे पुढच्या भागात बघू....व त्यानंतर हिराभागोलला जाऊ.
क्रमशः
२ दभोई
हे शिल्प बहुदा चांमुंडाचे किंवा कालिचे असावे. सातव्या शतकात योगिनींच्या पूजेस प्रारंभ झाल्यावर भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे तयार झाली ( वर्तुळाकार असतात) त्यातील काही देवतांच्या मूर्ती स्वतंत्रपणेही आढळतात. मला शंका आहे कदाचित या मूर्ती तत्सम असाव्यात.
या देवतेखाली जे वाहन दाखविले आहे ते नीट दिसत नाही कारण छायाचित्र खालून काढले आहे. पण ही बहुदा सरस्वती किंवा ब्राह्मणी असावी.
एका देवतेचे वाहन उंदरासारखे दिसते तर दुसरीचे मनूष्य. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे तर मनूष्य हे कुबेराचे. पण यात मला सुसंगती लागली नाही. अर्थात गणेशीचे शिल्प आपल्या येथे आहे पण कुबेरावरुन एखादी देवता असेल असे मला वाटत नाही. वल्लीने किंवा अजून कोणाला माहिती असल्यास यावर प्रकाश टाकावा.
शेजारच्याच देवळाच्या भिंतीत चिणलेला एक दगड. खाली अजून दोन दगडांची छायाचित्रे दिली आहेत.
ही बहुद उमा योगिनीचे शिल्प असावे. सप्त मातृकांनंतर स्त्रिशक्तीच्या विविध रुपांचे प्रतिनिधित्व मूर्तींमधे दिसू लागले त्याचेच हे उदाहरण.
आतल्या खांबांवर प्रकाश इतका मस्त पडला होता की फोटो काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
हिंदू देवळात हमखास आढळणारे शिल्प या माणसाचे असते. भारवाहक. अशी कल्पना आहे की हा आपल्या हाताने मंदीराचा भार उचलतो. काही भारवाहकांच्या शिल्पात त्याला तो भार वाहताना होणारे कष्ट स्पष्ट दिसतात. यात एक वेगळी गोष्ट मला आढळली ती म्हणजे त्याचे पाय. ज्या प्रकाराने ते गुडघ्यात वाकविलेले आहेत तसे अंतराळात/अवकाशात उडणार्या यक्षाचे दाखविले जातात. शिवाय याला चार हात आहेत. हा भारवाहक आहे का यक्ष ? का एखाद्या यक्षाला भारवाहकाचे काम दिले आहे ? (शिक्षा म्हणून ?)
थोडे उजवीकडे बघितल्यास एक छोटी कमान दिसते त्यावर ही मुद्रा आढळली. बहुतेक ही नजर लागू नये म्हणून जे कोहळे तामिळनाडूमधे घरावर टांगतात त्याप्रकारचे काहीतरी असावे पण खात्री नाही.
आपल्याकडे जसे गधेगाळ सापडतात त्याप्रमाणे येथे गधेगाळ नव्हता पण भिंतीवर तत्सम शापवाणी कोरली होती. व गधेगाळावर जशी मूर्ती असते तशी अस्पष्ट असे चित्रही कोरले होते. एक माणूस उत्साहाने आम्हाला ते दाखविण्यास घेऊन गेला व त्याने जे सांगितले ते ऐकून मी पडायचाच बाकी होतो. " पूर्वी राजाची राणी गाढवाबरोबर झोपायची त्याचे ते चित्र आहे'' त्याचे ताबडतोब शंका निरसन करण्यात आले व पुढे खरे काय तेच सांगावे असे त्याला बजाविले.
शेजारी जे मंदीर आहे त्याच्या कुंपणामधे जे दगड चिणले आहेत त्यावरील काही कोरीवकाम.
ही कमान बघून आम्ही हिराभागोलची चौकशी केली. त्यावरील नक्षिकाम अप्रतीम आहे त्याचा एक नमूना.....व बाकीची छायाचित्रे पुढच्या भागात.
याच ठिकाणी आम्हाला वढवाणा तलावाबद्दल माहिती कळाली आणि आम्हाला पक्षांचा खजिनाच सापडला तेही पुढच्या भागात.....
क्रमशः
३ डभोई हिरागेट
आत्तापर्यंत गुजरातमधे प्रवेश केल्यावर जेवढा प्रवास केला त्यात लक्षात राहणार्या बाबी म्हणजे रस्त्यांचा दर्जा. जगभरातील रस्त्यांना टक्कर देतील अशा दर्जाच्या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नव्हते. सगळे रस्ते डांबरी, त्यामुळे आवाजही कमी येत होता व मधे खटखट येणारे आवाजही नव्हते. बरेचसे रस्ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केले होते. रस्ते म्हणजे नुसते डांबर टाकून त्यावरुन रोड रोलर फिरवणे असे नसते तर त्यामागी काहीतरी तंत्रज्ञान असते ही महाराष्ट्रातील राजकारण्यांना केव्हा उमगणार देव जाणे. टोल नाक्यावर एकदाही दोन मिनिटापेक्षा जास्त थांबावे लागले नाही. टोलही जाचक वाटला नाही. काका पुतण्या भाच्यांना काँट्रॅक्टर बनवून त्यांच्याकडून रस्ते बनवून घेतल्यावर काय होते हे आपण इथे बघतोच आहे. एका ठिकाणी चहा पिताना एका कर्नाटकमधून आलेल्या एका पर्यटकाशी बोलताना मला माझीच लाज वाटली. तो म्हणाला, "गुजरात, मध्यप्रदेश मधे सगळे प्रमुख रस्ते चांगले आहेत. गोव्यातही चांगले आहेत एक येही महाराष्ट्रमे प्रॉब्लेम !'' नुकताच कोकणात जाऊन आल्यावर सातार्याच्या पुढच्या रस्त्यावरुन प्रवास केला असल्यामुळे त्याच्याशी सहमत होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मला आता वाटू लागले आहे की आपण निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी नालायक असतील व जर स्वतःच्या तुंबड्या भरत असतील तर राज्य सरकारने व केंद्रसरकारने एक टेंडर काढावे ज्यात दर ठरवून, त्या दराने कुठेही काम करण्यास परवानगी द्यावी. त्यात काही % बदलाची परवानगी द्यावी. कारण लोकहो ही मामा, काका, भाच्चे, पुतणे कंपनीने केलेली कामे शेवटी अपल्याच खिशातून पैसे घेऊन जातात. मला आठवते, भारतातील सगळ्या राज्य परिवाहन मंडळाने अशी योजना राबविली होती ज्यात ते गाड्यांना लागणार्या सुट्ट्या भागांची एकदम खरेदी ओईकडून करायचे. ती अजून चालू आहे का ते माहीत नाही. मागच्या महिन्यात जेथे लहानपणी रहात होतो त्या वाड्यात गेलो होतो. लहानपणी वाड्यात जाण्यास दीडफुटी पायरी चढावी लागे. आता उंबरा रस्त्याच्या पातळीवर आलेला दिसला. गेल्या १० वर्षात पालिकेने एवढे डांबर त्या रस्त्यावर ओतले आहे. पण रस्ता चांगला झाला का ? या प्रश्नाचे उत्तर "नाही !'' असेच आहे. असो........आणि एक राहिलेच. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते तेथील डायव्हर्जनचे रस्ते आपल्या हमरस्त्याहूनही चांगले होते. मी गुजरातमधे बर्याच खेड्यात फिरलो पण रस्त्याचा अनुभव हा चांगला होता असेच म्हणावे लागेल. हे अर्थात माझे निरिक्षण आहे....
आता काही हिराभागोलची छायाचित्रे बघू....
घराच्या सज्जात उभी राहिलेली माणसे यात दाखविली आहेत. पण या पेक्षही जास्त चांगली सज्जा व त्यात उभी राहिलेली स्त्री बेलूर येथे दाखिविले आहे व ते सुद्धा अत्यंत लहान आकारात.
बेलूरची गॅलरी. या देखाव्यातील स्त्रिच्या मुर्तीची उंची फक्त सहा/सात इंच आहे.
या जागेत एक समरप्रसंग अत्यंत बारकाईने कोरला आहे. हा प्रसंग त्रिमीतीत असल्यामुळे जास्त परिणामकारक आहे. मधे असलेला हत्ती, त्याभोवती असलेले सैनिक, वाजणारी वाद्ये....फारच मस्त..हत्तीवरची अंबारी......
समुद्रमंथन....यात दोरी म्हणून नागाचा उपयोग केलेला स्पष्ट दिसतो पण हे मंथन एका पात्रात का दाखविले आहे हे समजत नाही. कदाचित ते प्रतिकात्मक असावे.
या देवतेच्या हातात दिसतो तो बहुदा शुळ आहे.
दोन झुंजणार्या हत्तींचे एक अप्रतीम शिल्प. एवढ्या उंचावर ते कसे चढविले असेल आणि बरोबर कसे बसविले असेल....अर्थात ते एवढे काही अवघड नसावे... :-)
नरसिंम्हाची पुजा आपल्याकडे बर्याच प्रांतात प्रचलीत होती. हंपीमधे तर आपण त्याच्या अनेक भाव असलेल्या मुर्ती पाहिल्या असतील. अर्थात महत्वाचे देव आले की त्यांचे स्त्रिस्वरुप आलेच. डाविकडे दिअसते आहे ती नरसिंहाचे स्त्रिरुप. उजवीकडे बहुदा मदन व रती असावेत. खात्री नाही.
गेटला एक मोठा वीस एक फुटाचा लाकडी दरवाजा आहे. हा अजूनही रात्री बंद करतात. डभोईच्या या भागातून त्या भागात जाण्यासाठी हा वापरात आहे. या दरवाजातून आपण गेटच्या मागील भागात येतो. त्याचे एक छायाचित्र.
वरील चित्रात जो डावीकडील भाग दिसत नाही त्या भिंतीवर असलेला हा एक सज्जा.
खालील २ छायाचित्रे ही खाली जमिनीवर धुळ खात पडलेल्या दगडावरच्या कलाकुसरीची आहेत. ३ इंच आकाराच्या या शिल्पातही कारागिराने काय कमाल दाखविली आहे बघा....
हिरागेटच्या मागील भागाचे बाजूने घेतलेले छायाचित्र..... नशीबाने ही कमान त्या काळात पूर्णपणे ढासळलेली असल्यामुळे बहुदा मुर्तीभंजकांपासून वाचली असवी. ही कमान एएस्आयने मोठ्या कष्टाने उभी केली. यावर कित्येक दगडांवर क्रमांक टाकलेले स्पष्ट दिसतात. मनोमन त्या कारागिरांना व ज्यांनी ही कमान परत उभी केली त्यांना सलाम करुन आम्ही बाहेर पडलो.
छायाचित्रांची संख्या प्रचंड असलयामुळे काहीच टाकली आहेत.
बाहेर आल्यावर आम्ही एका माणसाला अजून काही बघण्यासारखे येथे काय आहे ते विचारल्यावर त्याने सांगितले, "तुम्ही जामनगरला पक्षी बघण्यास जाणार असालच ना ? मग येथून फक्त पाच मैलावर असलेले वढवाणा चुकवूच नका.'' आणि तेथे डोळ्याचे पारणे फिटले हे सांगणे न लगे. तेथील एक फोटो खाली दिला आहे व इतर पुढच्या भागात बघू !
.४ डभोई/वढवाणा
हिरव्यागार शेतांमधे हा भला मोठा तलाव पक्षांचे नंदनवनच आहे. याचा व्यास अंदाजे असेल २ किमी. डभोईपासून तो साधारणतः ८ किमी अंतरावर आहे. रस्ता मस्त. रस्त्यावरच आसपासच्या शेतात अनेक स्थानिक पक्षी नजरेस पडत होते. हा तलाव बांधला गायकवाड महाराजांनी १९०९-१० या काळात. याचे क्षेत्रफळ आहे ८६० चौ. किमी. ओर्संगनदीवर बांध घालून हे पाणी अडवले आहे. या पाण्यातून आसपासच्या २५/३० खेड्यांची पिण्याच्या पाण्याची व शेताला लागणार्या पाण्याची गरज भागवली जाते.
रस्ता संपला तेव्हा आम्ही जंगल खात्याच्या ऑफिससमोर होतो. एक माणूस टेबल टाकून बसला होता व त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. त्याच्या मागे भले मोठे डांबरी व्यवस्थित आखलेले पार्कींग. नशीबाने त्यात एकही गाडी नव्हती. म्हणजे गर्दी नसणार व पक्षिनिरिक्षण आरामात करता येणार अशी खुणगाठ मनी बांधली. समोरच एक मोठा बांध दिसत होता व त्यापलिकडे पाण्याचा एवढा मोठा साठा असेल असे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. त्या माणसाने पावती फाडली व कुठून आलात इ चौकशी केली. त्यानंतर त्याने आम्हाला त्या बांधावरुन गाडी नेण्याची परवानगी दिली. मी नको म्हणत होतो पण त्याचे ऐकले ते बरे झाले. कारण त्या बांधावरुनच आम्ही नंतर मुख्य रस्त्याला दुसर्या बाजूने लागलो. गाडी बांधावर चढवून उजव्या बाजूला वळलो आणि गाडी आपोआप थांबली. समोर अथांग निळ्याभोर पाण्यावर असंख्य म्हणजे मोजता येणार नाहीत इतकी बदके व इतर पक्षी तरंगत होते. त्याचमागोमाग त्यांचा कलकलाट कानावर येऊन आदळला. बापरे ! एवढ्या प्रकारचे आवाज एकाच वेळी मी ऐकलेले मला स्मरत नाही (पुण्याचा रस्ता सोडून). बांधावर एकदोन पक्षिप्रेमी कॅमेरे घेऊन बसले होते. एका ठिकाणी बाजूला सावलीत गाडी उभी केली व ते अदभूत दृष्य नजरेत साठवू लागलो.....
पक्षिजगताचा काळा पांढरा करडा झेंडा असल्यासारखे वाटत होते.....बदके व कूट.... (बदके कुठली आहेत हे तज्ञांनी लिहावे)
येथे प्रमुखतः बदके जास्त प्रमाणात आढळतात. अर्थात विवीध मोसमात दिसणार्या पक्षांची यादी फारच मोठी आहे.
हे एवढे सगळे होईपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता पण बदकांना त्याचे काहीहे पडले नव्हते ती क्वॅक क्वॅक करत मस्तपैकी पोहत बसली होती. हे दृष्य पाहिल्यावर मला देर्सू आठवला. खरेच हे पक्षांचे विश्व अदभुत....रम्य !
आता आम्हाला बांधावरुन तसेच पुढे जायचे होते. रस्ता मातीचा असल्यामुळे भरपूर धूळ उडत होती. व रस्ताही कच्चा होता. अंधार पडण्याआधी आम्हाला डांबरी रस्ता गाठायचा असल्यामुळे व किती वेळ लागेल याचा अंदाज नसल्यामुळे आम्ही परत परत त्या तलावावर नजर टाकून निघालो. त्या सगळ्या दृष्याचा आमच्यामनावर इतका परिणाम झाला होता की सगळेजण चुपचाप बसले होते, ते एका कॅनॉलवर असलेल्या रस्त्यापर्यंत येइतोपर्यंत....तेथे आम्हाला आद्य मासेमारी पाहण्यास मिळाली व आम्ही परत एकदा छायाचित्रणामागे लागलो......
एक छोटा कॅनॉल, त्यात वाहते पाणी, पाण्यात मासे व पाण्यावर तारा. खंड्याला याहून मासेमारीला योग्य जागा कुठून सापडणार. एक जोडी त्या तारेवर एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसली होती. ते चलाख पणे एकमेकांकडे पाठ करुन बसले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. तेवढ्या एका खंड्याला खाली पाण्यात चाहूल लागली व त्याने पाण्यात सूर मारला. बहुदा एवढा मोठा मासा त्याच्या तावडीत सापडेल असे त्याला वाटले नसेल. तो तारेवर बसणार तेवढ्यात त्याच्या चोचीतून तो पक्षी निसटला. मी श्वास रोखला.....मला वाटले गेली शिकार हातातून. पण तेवढ्यात त्याच्या जोडीदाराने त्या सावजावर सरळ रेषेत खाली झेप घेतली व तो मासा हवेतच चोचीत पकडून tतो/ती परत वर तारेवर आला/आली. काहीच मिनिटात त्याचा चट्टामट्टा झाल्यावर त्यांनी परत आपापल्या जागा घेतल्या. गंमत म्हणजे या सगळ्या शिकारीत मी पाहिले, खंड्याला स्वतःच्या पाठीमागे असलेल्या पाण्यातीला माशांची चाहूल लागू शकते. येथे जेवढी काढायला जमली ती छायाचित्रे टाकली आहेत. त्यांचा वेग व अंतर जास्त असल्यामुळे मला हे छायाचित्रण काही झेपले नाही. छायाचित्रे कमी प्रतीची आहेत....चालवून घ्या.
बंड्या, कवड्या, लेसर पाईड किंगफिशर.....
त्यांची मासेमारी कितीवेळ चालणार होती देवाला ठाऊक....आम्हाला मात्र बडोद्याला पोहोचायचे असल्यामुळे आम्ही त्या जोडीचा निरोप घेतला.....देवा रे ! मला मासे पकडण्यासाठी तरी उडण्याचा वर दे.....पाहिजे तर मी फक्त समुद्रावर पापलेट मारेन.....मी मनोमन प्रार्थना केली...........
क्रमशः
बडोदा-लोथल-जामनगर
बडोद्याला परत आल्यावर प्रथम शोध घेतला मला आवडणार्या एका पदार्थाचा. "उंधियो' याचा उच्चार हाच असवा असे वाटते. परंतू बडोद्यातील उंधियो हा पुण्यातील बाकरवडी असावी. बर्याच ठिकाणी उंधियो संपला अशा पाट्या लागल्या होत्या. शेवटी अलकापुरीत एका दुकानात आम्हाला तो गवसला. दुकानदाराने तो संपत आल्यामुळे जे काही राहिले होते ते प्रथम दाखविले व मग घेण्याचा विचार करावा असे सुचविले. गुजरातमधे एकंदरीत मला प्रामाणिकपणा आढळला. म्हणजे सुटे पैसे प्रत्येक ठिकाणी परत मिळत होते. सिगरेट योग्य भावात सगळीकडे मिळत होती.
बडोद्याला दोन वस्तूसंग्रहालये आहेत त्यातील एक राजघराण्यातीला कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे बंद होते. दुसरे पाहिले ज्याचे नाव होते बडोदा म्युझियम. त्यातील काही गोष्टी सोडल्यास मला काही ते एवढे खास वाटले नाही. मुख्य म्हणजे प्रकाश योजनेची वाट लावलेली असल्यामुळे वस्तू पाहताना त्रासच होत होता. अजून एक गंमत म्हणजे अलकापूरीत आम्हाला संध्याकाळी चहा मिळाला नाही. आम्हाला कदाचित माहीत नसल्यामुळे असेल कदाचिते. दुसर्या दिवशी सकाळी जामनगरला निघायचे असल्यामुळे शहरातील फेरफटका आवरता घेतला.
सकाळी ८ वाजता गाडीला स्टार्टर मारला. आम्हाला महीसागर नदी पार करुन मधे लोथलला जायचे होते. लोथल हरप्पाच्या संस्कृतीचे एक महत्वाचे छोटे शहर होते. या शहरात त्याकाळातील वास्तूशास्त्राचे व आभियांत्रीकीचे विश्वास बसणार नाहीत अशी उदहरणे पहावयास मिळतात. असे म्हणतात ही संस्कृती वसली ७००० बी.सी या काळात, पण याचा सर्वोच्च काळ होता अंदाजे २५०० बी.सी या काळात. तरी २५००+२००० म्हणजे जवळजवळ ४५०० वर्षापूर्वी. त्या काळातील विटांचा एक सारखा आकार पाहून मला वाटले की या विटा हल्लीच्याच आहेत. या वीटा उन्हात वाळवून तयार केल्या गेल्या आहेत. लोथलला मणी तयार करण्याचा कुटीर उद्योग होता. हे मणी जगात दुरदुरवर सापडले आहेत. खड्याएवढ्या मण्यांना ज्या प्रकारे भोके पाडलेली दिसली त्याने खरोखरेच अचंबित झालो. बरेचसे मणी हे अगेटचे आहेत. खंबातमधे अजूनही या प्रकारे मणी तयार करण्याची कला काही जमातीत अस्तित्वात आहे. काही काळापूर्वी सिद्दी जमातीची माणसे अगेट गोळा करण्याचे काम करीत. आता माहीत नाही. फक्त तेथे सापडणार्याच खनिजांपासून मणी तयार करण्यात येत असे नव्हते. लोथलचे व्यापारी सार्या भारतात हिंडून वेगवेगळे खडे व दगड गोळा करीत. लोथलमधे बंद गटारे, विहिरींचे जाळे ठिकठिकाणी दिसतात. लोथलवरुन आफ्रिकेशी व ग्रीसशे व्यापार चालत असे.
एक विहीर.....
लोथलवासियांना समुद्राच्या भरती ओहोटीचे संपूर्ण ज्ञान होते असे म्हणावे लागेल तसेच साबरमतीच्या सतत बदलणार्या पात्राचा अभ्यास करुन त्यांनी ही वसाहत उभी केली असणार......
अगेट तापविण्याची, शिक्के भाजण्याची भट्टी
छोटी गोदी जी खालील कल्पनाचित्रातही दिसत आहे....
खंबातच्या आखातात समुद्रात असणार्या मोठ्या जहाजातून माल गुजरातमधे आणण्यासाठी व जहाजावर माल चढविण्यासाठी त्यांनी मोठी नामी कल्पना लढविली होती जी आपल्याला खालील चित्रावरुन दिसते.

काही तज्ञांच्या मते हे असे काही नसून तो आपला एक पाणी साठविण्याचा तलाव आहे....
ज्यांना भुतकाळात रमायला आवडते व ज्यांची कल्पना शक्ती तीव्र आहे अशांना ही जागा आवडेल. म्हणजे आपल्याला मनाने त्या काळात जावे लागते. हे शक्य नसेल तर मात्र ही जागा अत्यंत कंटाळवाणी होऊ शकते.... अर्थात तेथील वस्तूसंग्रहालयही उत्तम आहे. उत्तम माहीती पुरवते. दुर्दैवाने आसपास बराच कचरा आहे बहुतेक महिन्यातून एकदाच साफ करत असावेत. असो लोथलची पूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्यामुळे जास्त लिहित नाही.
तीन वाजून पन्नास मिनिटांनी राजकोटमधून चाललो असताना डॅशबोर्डकडे लक्ष गेले. बरोबर १००० किमीचा आकडा दिसत होता. उरलेल्या तिघांनी टाळ्यावाजवून त्या आकड्याचे स्वागत केले. बरोबर ६.२० ला जामनगरला राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो. त्या दिवशी मात्र संध्याकाळी माफक मद्यपान करुन आराम केला. दुसर्या दिवशी लखोटा तलाव व त्यातील वस्तूसंग्रहालय पाहिले. ठीक होते. पण तलावात असंख्य सीगल उडत होते व येणारे जाणारे त्यांना खाद्य पुरवीत होते. ते दृष्य मात्र मला बिलकूल आवडले नाही. मी पक्षांना अशा प्रकारे खायला घालण्याच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे असेल कदाचित.
दुसर्या दिवशी खिजाडीया बर्ड सँक्चुअरीला जायचे होते. तेथे मात्र आमची घोर निराशा झाली. एक तर तेथे फारच थोडे पक्षी होते कारण कमी पाऊस झाला होता व जे थोडे फार होते ते इतके दूर होते की आम्हाला दुर्बीणीतून पहावे लागत होते. तेथे एक पक्षांची माहिती देणारे म्युझियम आहे ते मात्र चांगले आहे. आता तेथे काहीच बघण्यासारखे नसल्यामुळे परत मुक्कामास परत आलो. दुसर्या दिवशी नॅशनल मरीन पार्कला भेट द्यायचा विचार होता. ते मात्र फारच भारी होते.
हे भारताचे पहिले मरीन पार्क आहे व आवर्जून पहावे असे आहे. आम्ही पिरोटानचा भाग पाहिला.
याला भेट देताना प्रथम ओहोटी भरतीच्या वेळा माहिती करुन घ्याव्या लागतात. ओहोटीच्या वेळी या पार्कमधे घोट्याएवढेच पाणी असते तर भरती मधे ते छातीपर्यंत येते. वनखात्याचा गाईड घेऊन जाणे अनिवार्य आहे. या पार्कमधे चालण्यासाठी आपण नेहमी जे स्पोर्ट शू वापरतो ते घालावेत कारण खालची जमीन ओबढधोबढ आहे. अर्थात याने फक्त पायाचे संरक्षण होते. तेथे मात्र जर धारधार रुतलेल्या शिंपल्यावर पाय पडला तार बुट चिरलाच समजा. यासाठी तेथे उपलब्द्ध असलेले गमबुट घालण्यासाठी भाड्याने घ्या असे तुम्हाला सांगण्यात येइल पण अशी चूक चुकुनही करु नका कारण ते गमबूट आपल्या मापाचे नसतात व त्याची वरची कड आपल्या पोटर्यांना घासून हमखास जखम होते. हे आपल्या मापाचे आहेत की नाही हे ४/५ मैल चालल्याशिवाय कळत नाही आणि तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आपले बूट समजा चिरले तर फेकून द्यायचे व बडोद्याला नवीन घ्यायचे. अशी सोय तळपायासाठी नसल्यामुळे आपले नेहमीचे बुट घालवेत हे बरे... बूट ओले होतात तेव्हा दिसरा जोड बरोबर अवश्य घेऊन जावा. डोक्यावर टोपी आवश्यक व पिण्याचे पाणी....ते बहुदा कोणी विसरत नाही म्हणा..... कॅमेरा जर बरोबर नेलात तर लेन्स पुसायचे कापड हाताशी ठेवा....
या पार्कमधे समुद्रजिवनाचा एक नमुनाच नजरेस पडतो. गाईड अत्यंत अनुभवी असल्यामुळे त्याला साधारणतः कुठल्या दगडाखाली काय सापडेल याचा अंदाज असतो. आपल्या नशिबात असेल तर आपल्याल बरेच समुद्री जीव दिसतात. आम्हाला दिसलेले काही.....
सी-अॅनिमल. हा स्पर्ष झाल्यावर खाली जमिनीत एका सेंकदात नाहीसा होतो व वरती फक्त एक छोटेसे टोक राहते. वर जी भोके दिसतात त्यातून हा आपले खाद्य गिळतो...
आम्हाला नशिबाने दिसलेला ऑक्टोपस.....
अजून एका प्रकारचा क्रॅब...याचे नाव विसरलो....
हे सगळे सागरी प्राणी हाताळायला मिळत होते. ते अदभूत सागरी विश्र्व बघून, खोल समुद्रात काय भयंकर मायावी दुनिया असेल याचा विचार करुन आम्ही गप्प झालो. प्राणी बघून झाल्यावर आमचा गाईड ज्या ममतेने एखाद्या बाळाला पाण्यात सोडावे तसे त्या प्राण्यांना परत पाण्यात सोडत होता ते पाहून या असल्या माणसांच्या ताब्यात ते मरीन पार्क सुरक्षित आहे याची खात्री वाटली.......
हा अनुभव एकंदरीत लक्षात राहण्यासारखा व एकदा तरी घेतलाच पाहिजे......असा विचार करत आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो....उद्या द्वारकेला जायला निघायचे होते....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
स्केचेस व विहिरीचे चित्र जालावरुन साभार....
द्वारका-कुसडी-पोरबंदर
नॅशनल मरीन पार्कला अदल्या दिवशी भेट देऊन आल्यावर दुसर्या दिवशी आम्ही सकाळची न्याहरी करून द्वारकेला जाण्यासाठी जामनगर सोडले. खंबालिया-भाटिया-कुरुंगा-द्वारका असा मार्ग होता. द्वारकेला पोहोचल्या पोहोचल्या रसभंग झाला. तेथे इतका कचरा होता की माझा फोटो काढायचा मुडच खलास झाला. जसे जसे आत जाऊ तसा कचरा वाढतच होता. मुख्य म्हणजे दुपारी देव झोपल्यामुळे मुख्य देऊळ बंद होते....असो. त्या कचर्याचा मोबाईलने फोटो काढले व पंतप्रधानांच्या वेबसाईटवर पाठवून दिले. एकंदरीत द्वारका बघून भ्रमनिरास झाला. म्हणजे देऊळ चांगले आहे पण सभोवतालचा परिसर एकदम भिकार होता. आता माहीत नाही. पण एक फायदा येथे झाला तो म्हणजे एका माणसाने नुकतेच समुद्रातून दोन शंख काढले होते त्याचा सौदा केला. अगोदर १८०० म्हणत होता...पण शेवटी ५०० ला दोन शंख घेतले. घेण्याआधी त्याच्याकडून वाजवून घेतले व सांभाळून पुण्याला आणले. पुण्याला आल्यावर ते स्वच्छ धुतले व वाजवायचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. शेवटी मुलाने संध्याकाळी घरी आल्यावर वाजवून दाखविला. मग मात्र थोडा सराव केल्यावर वाजवता येऊ लागला पण फार मोठा आवाज काढता आला नाही.....
मधे एकदा घरी टेबलटॉपचे प्रयोग केले त्यात त्याचाही एक फोटो काढला....
द्वारकेहून अत्यंत निराश होउन आम्ही पोरबंदरला निघालो. पोरबंदरच्या आधी सूर्य मावळतीला चालला होता हवा मस्त सुटली होती. आरामात बेगम अख्तरच्या गझला ऐकत चाललो होतो तेवढ्यात बहीण मागच्या खिडकीतून ओरडली. "काय मस्त कमळे फुलली आहेत बघ !'' थांबूया जरा. मलाही गुलाबी रंग लांबून दिसला होता पण थांबायचा काही माझा विचार नव्ह्ता. गाडी बाजूला घेऊन उतरलो तर त्या पाण्यात असंख्य लेसर फ्लेमिंगो अगदी स्तब्ध उभे होते. त्यांनी तिरक्या तिरक्या रांगा लावल्या होत्या. आमची चाहूल लागताच त्यांनी आत पाण्यात सरकण्यास सुरवात केली...तेवढ्यात एक छायाचित्र टिपले...
इथे इतके पक्षी होते की आमची द्वरकेची व खिजाडियाची निराशा कुठल्याकुठे पळून गेली... दुसर्यादिवशी पोरबंदर सोडून उलट्या दिशेला यायला लागले तरी चालेल पण येथे येऊन फोटो काढायचे हे निश्चित केले. आदल्या दिवशी संध्याकाळी व दुसर्यादिवशी दुपारपर्यंत काढलेले फोटो.... या जागेचे नाव आहे कुसडी...
अबोला......शेकाट्या किंवा ब्लॅक विंग्ड स्टिल्ट...
उचाट्या किंवा पाईड अॅव्होसेट.....
मासा मिळाल्यामुळे खुष झालेला बगळा....
पेलिकन...एक रुबाबदार व्यक्तिमत्व....
हजारोंच्या संख्येने असलेले करडे करकोचे.....
फ्लेमिंगोची नाचणारी पोरे.....अगदी धीटपणे आमच्या जवळ घिरट्या घालत होती...
आता कॅमेर्याच्या समोर सूर्य आल्यामुळे मला माझे आवडते शॉटस् मिळाले....
फ्लेमिंगोची रांग....
गुजरातमधे मला सगळ्यात आवडलेले शहर म्हणजे उत्तम समुद्र किनारा लाभलेले पोरबंदर.... समुद्राच्या काठाने एक मस्त रस्ता बांधलेला आहे...ज्यावर एकही अतिक्रमण नाही...कचरा नाही...मस्तच ! हवा मस्त, खाणेपिणे (सगळ्यात चांगला उंधियो पोरबंदरला खाल्ला) मस्त, शहराचा वेग माणसाला सहन होणारा....
उद्या सोमनाथला जायचे आहे....सोमनाथचा इतिहास आठवून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.....
.७ - मोढेरा...सूर्यमंदीर...
गुजरातमधील मोढेरा या गावात एक अप्रतिम सूर्यमंदिर आहे. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुंदर मंदिराचा पावसाळ्यातला व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. त्यात मंदिरापुढच्या कुंडात पावसाच्या धारा पडतानाचं अप्रतिम दृश्य होतं. मी मोढेराला पोहोचले होते ते अशाच एका पावसाळी सकाळी. सोनेरी वालुकाष्मात कोरलेलं मोढेराचं अत्यंत देखणं सूर्यमंदिर पावसाच्या संततधारा अंगावर घेत बघणं हा एक भारावून टाकणारा अनुभव होता.
गुजरातमधलं प्रमुख शहर अहमदाबाद इथल्या ‘वल्लभभाई पटेल विमानतळा’पासून सुमारे शंभर किलोमीटरवर वसलेलं मोढेरा हे गाव पुष्पावती नदीच्या तीरावरच्या सूर्यमंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे. मेहसाणा शहरापासून हे गाव सुमारे ४० किलोमीटरवर आहे. इथलं सूर्यमंदिर गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रचलित असलेल्या नागर स्थापत्यशैलीच्या ‘मरू-गुर्जर’नामक उपप्रकाराचं उत्कृष्ट उदाहरण आहे. दगडावर दगड रचून बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामात कुठंही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही.
गुजरातमधील पाटण इथून राज्य करणाऱ्या सोलंकी राजवंशातील पराक्रमी राजा भीमदेव पहिला यानं सन १०२६ मध्ये हे मंदिर उभारलं असे इथल्या शिलालेखात उल्लेख आहेत. म्हणजे, तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये जेव्हा राजराजा चोळ/चोल शिवांना समर्पित भव्य बृहदीश्वर मंदिर उभारत होता त्याच काळात गुजरातमध्ये राणा भीमदेव सोलंकी पहिला सूर्याला समर्पित हे सूर्यमंदिर उभारत होता.
गुजरातचे सोलंकीराजे म्हणजे सूर्यवंशी चालुक्य. ते सूर्यदेवाला स्वतःची कुलदेवता म्हणून भजत असत. त्यांच्या आराध्यदेवाच्या म्हणजे सूर्यदेवाच्या पूजेसाठी त्यांनी हे भव्य सूर्यमंदिर निर्माण केलं; पण या जागेचं महत्त्व फार पुरातन आहे असं मानलं जातं. स्कंदपुराणानुसार, आजच्या मोढेरा गावाभोवती एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यात ऋषी-मुनींचे खूप आश्रम होते म्हणून त्याला ‘धर्मारण्य’ असं संबोधलं जायचं. रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या श्रीरामांनी रावणहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी सीतेसह या धर्मारण्यात जाऊन यज्ञ केला अशी कथा आहे. आम्हाला मंदिर दाखवणाऱ्या ‘गाईड’च्या मते, प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि या ठिकाणी ‘मोढेरक’ या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढं ‘मोढेरा’ असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथं आले होते असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मोढेराच्या सूर्यमंदिरासमोरील कुंडाला ‘रामकुंड’ असंही म्हटलं जातं.
सन १०२४-२५ च्या सुमारास सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करून पुढं सरकणारा गझनीचा क्रूरकर्मा महमूद याचं आक्रमण चालुक्य राजा भीमदेव पहिला यानं मोढेरा इथं युद्ध करून रोखलं होतं. इतिहासतज्ज्ञांचं असं मत आहे, की या देदीप्यमान विजयाचं प्रतीक म्हणून मोढेरा इथं हे भव्य सूर्यमंदिर उभारण्यात आलं.
या मंदिराच्या प्राकारात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डोळ्यात भरतं ते इथलं विशाल कुंड. याच कुंडाला ‘सूर्यकुंड’ किंवा ‘रामकुंड’ या दोन्ही नावांनी संबोधलं जातं. या रामकुंडाची रचना गुजरात-राजस्थानमध्ये प्रचलित असलेल्या ‘वाव’ किंवा खाली उतरता उतरता निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्या पायऱ्या असलेल्या विहिरीप्रमाणे म्हणजेच स्टेपवेलप्रमाणे केलेली आहे. थोड्या थोड्या अंतरावर पायऱ्यांवर छोटी छोटी मंदिरं कोरलेली आहेत. एकेकाळी रामकुंडाच्या पायऱ्यांवर विविध देवतांना समर्पित केलेली १०८ छोटी मंदिरं होती. सध्या त्यातली फार थोडी चांगल्या स्थितीत आहेत. त्यातलं देवी घालवणाऱ्या शीतलामातेचं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गुजरातसारख्या परिसरात अशा वावी उन्हाळ्यात पूर्ण गावाचा पाण्याचा स्रोत असत.
रामकुंड पाहून आपण मंदिराकडे वळलो की आपल्याला प्रथम दिसतो तो अत्यंत नाजूक कोरीव कामानं नटलेल्या खांबांवर तोललेला भव्य सभामंडप. रामकुंडाच्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करताना आधी दिसतं ते दोन प्रचंड कोरीव स्तंभांवर उभं असलेलं कीर्तितोरण. पुढं मुसलमानी आक्रमणात या मंदिरानं खूप घाव सोसले, त्यात या तोरणाचा वरचा भाग नष्ट झाला, तरी त्याचे दोन खांब अजूनही गतवैभवाची साक्ष देतात. सभामंडप ‘सर्वतोभद्र’ म्हणजे चारही बाजूंनी प्रवेशद्वारं असलेला आहे. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेले छोटे खांब आणि मुख्य मंडपात जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब, ज्यांच्यावर रामायण-महाभारतातले व इतर पौराणिक कथांमधले प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरात सौरवर्षातील ५२ आठवड्यांचं प्रतिनिधित्व करणारे ५२ स्तंभ आहेत.
सभामंडप बघून आपण जातो ते मुख्य मंदिराच्या वास्तूकडे, ज्याला ‘गूढमंडप’ असं नाव आहे. गूढमंडपाच्या बाहेरील भिंतीवर सूर्यदेवाच्या १२ प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रतिमांचं वैशिष्ट्य म्हणजे, यातल्या काही प्रतिमांमध्ये सूर्याच्या पायात गुढघ्यापर्यंतचे बूट दाखवलेले आहेत. या मूर्तींवर पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव आहे, असं काही पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं मत आहे. गूढमंडपाच्या बाहेरील देवकोष्ठांमधून सूर्याबरोबरच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती आणि अष्टदिक्पाल यांच्याही मूर्ती दिसतात.
गूढमंडपाला तीन बाजूंनी तीन खिडक्या आहेत. वर्षातून काही विशिष्ट दिवसांमध्ये या खिडक्यांमधून सूर्यकिरण प्रवेश करत आणि गर्भगृहात असलेल्या सूर्यमूर्तीवर पडत असे उल्लेख तत्कालीन लेखांमध्ये सापडतात. गूढमंडपाच्या दर्शनी भिंतीवर काही मिथुनशिल्पंही आढळतात. गूढमंडपावर दुर्दैवानं आज शिखर अस्तित्वात नाही. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी या धर्मांध सुलतानानं पाटणच्या सोलंकी राजांचा पराभव करून इथल्या हिंदुमंदिरांचा भरपूर विध्वंस केला. त्यातच त्यानं मोढेराचं हे सूर्यमंदिरही लुटलं आणि इथल्या मूर्ती घणाचे घाव घालून तोडल्या.
आज मोढेराच्या सूर्यमंदिरातलं गर्भगृह रिकामे आहे आणि आपण आत डोकावलं तर गर्भगृहात चांगला आठ-दहा फूट खोल असा एक खड्डा दिसतो. इथले गाईड आवर्जून सांगतात, की हा गर्भगृहातील दहा फूट खोल खड्डा एकेकाळी सोन्यानं भरलेला होता आणि त्यावर सूर्यदेवाची पूर्ण सोन्याची सात घोड्यांच्या रथावर विराजमान असलेली मूळ मूर्ती ठेवलेली होती. मूर्तीच्या भालप्रदेशात एक तेजस्वी हिरा जडवलेला होता. मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण त्यातून परावर्तित होत असत आणि मंदिराची सर्व वास्तू दिव्य प्रकाशानं उजळून निघे.
दुर्दैवानं आज त्यापैकी काहीही अस्तित्वात नाही. खिलजीनं या मंदिराचा पुरता विध्वंस केलेला आहे; पण तरीही जे शिल्लक आहे तेच इतकं डोळे दिपवणारे आहे, की मूळ मंदिर किती वैभवशाली असेल हा विचार राहून राहून अस्वस्थ करतो.
मी आधीच कबूल केले आहे की प्रवासवर्णन (वाचकांना आवडू शकेल असे) लिहिणे फार अवघड आहे. पण परत परत मी तो प्रयत्न का करतो याला कारण आहेत उत्कृष्ट प्रवासवर्णने लिहिणारे मिपाकर. त्यांची प्रवासवर्णने वाचून मी परत परत चांगली प्रवासवर्णने लिहिण्याचा प्रयत्न करतो व परत परत तोंडघशी पडतो. तेव्हा दोष द्यायचा झालास तर खालील मिकाकरांना द्यावा लागेल. श्रीमती मधुरा देशपांडे, श्री श्रीरंग जोशी, प्रचेतस नावाचा वल्ली, डॉ. म्हात्रे, श्री. विशाल कुलकर्णी, श्री. देर्देकर, श्रीमती अजया, श्री मार्गी आणि असे अनेक, ज्यांची नावे राहिली आहेत त्यांनी उदार अंत:करणाने क्षमा करावी किंवा त्यांचे नाव येथे घेतले आहे हे गृहीत धरावे.
प्रवासवर्णन लिहिल्यावर परत वाचले असता मला सतत यात आपण काय विशेष लिहिले असे वाटत रहाते कारण त्यात खरोखरच विशेष काही नसते. बहुतेक वेळा मी तर फोटो टाकण्यासाठी प्रवासवर्णनाचा आसरा घेत असतो. तेही बरोबर नाही कारण प्रवासवर्णन हा साहित्यातील अत्यंत महत्वाचा, उपयोगी, करमणूकप्रधान, व उत्कंठा वाढविणारा एक साहित्यप्रकार आहे. प्रत्येक पानाच्या शेवटी किंवा प्रकरणाच्या शेवटी आता पुढे काय वाचण्यास मिळणार किंवा आता बहुदा असे असे असेल असा विचार करावयास लावणारे प्रवासवर्णन हे खरे प्रवासवर्णन. इब्नबतूताच्या प्रवासवर्णात मला हा अनुभव आला होता. इब्नबतुतावरील लेखात मी सुरवातीलाच म्हटले होते की रस्ता हे एक प्रचंड विद्यापीठ आहे. या विद्यापीठात नम्रतेनेच चालावे लागते. तसे नाही चालल्यास फटके अटळ आहेत. असो! जसे जसे फटके पडत जातात माणूस चुकांतून शिकत जातो; या नियमाला अनुसुरुन परत एकदा मोढेराच्या सूर्यमंदीराच्या भेटीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. :-)
हिंदुस्थानातील सूर्यपूजा : वेदकालापासून इराण व हिंदुस्थानात सूर्यपुजा चालू आहे. अजुनही भारतात सूर्यपुजेला मान आहे. इराणमधून मात्र तिचे उच्चाटन झाले. पण मधे केव्हातेरी कुठेतरी काही पंथ अजूनही तेथे गुप्तपणे ही पूजा करतात असे वाचले होते. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे हे माणसाला प्रथमपासून माहीत असल्यामुळे वेदात त्याची प्रार्थना केली आहे. आजही परमेश्वराचे (सूर्याचे) आभार मानण्यासाठी आपण ही प्रार्थना करीत असतो. खरे तर या एकाच देवाची प्रार्थना केल्यास इतर कुठल्याही शक्तीची उपासना करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, परंतु माणसाचे मन कशात आसरा शोधेल सांगता येत नाही. म्हणूनच त्याच्या असंख्य रुपांची तो प्रार्थना करीत असतो.
ॐ भूर्भुवः॒ स्वः ।
तत्स॑वितुर्वरे॑ण्यं
भ॒र्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।
धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥
सूर्याची मुर्ती.
सूर्याची मुर्ती कशी करावी याचे काही नियम आपल्या शिल्पशास्त्रात लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्याच्या दोन्ही हातात कमळे हवीत. ती त्या मुर्तीच्या खांद्यापर्यंत जायला हवीत. त्याच्या पायात बुट दाखविले पाहिजेत...त्याचे सात घोडे दाखविले पाहिजेत इ.इ. असे अनेक नियम शिल्पशास्त्रात लिहून ठेवले आहेत व त्याच प्रमाणे मूर्ती घडवाव्या लागत.
भारतातही सूर्याची मंदीरे पार अफगाणिस्थान, पाकिस्तान पासून दक्षिणेपर्यंत सापडतात. त्यातील गुजरातमधील मोढेरा येथील सूर्यमंदीर मी नुकतेच पाहिले. आपल्या येथे प्रत्येक मंदिरामागे एखादी दंतकथा असते तशी याच्यामागेही आहे. रामाने एका ब्राह्मणाला म्हणजे रावणाला मारले म्हणून प्रायश्र्चित्त म्हणून एक यज्ञ करायचा होता. त्यासाठी त्याने एक मोढेरक नावाची नगरी वसविली. त्याचे पुढे झाले मोढेरा.
पुढे मोढेराला १०२६ साली सोलंकी घराण्याचा राजा भिमदेव याने हे सूर्यमंदीर बांधले. सोलंकी हे सूर्यवंशाचे असल्यामुळे हे स्वाभाविकच होते. मंदीराचे बांधकाम किती काळ चालले होते याची कल्पना नाही परंतू राजाने व त्याच्या कलाकारांनी हे मंदीर किती जीव ओतून बांधले आहे याची कल्पना त्यावरील कलाकुसरीवरुन येऊ शकते. बऱ्याच मंदीराप्रमाणे येथेही मावळत्या सूर्याची किरणे गाभाऱ्यात पडतात. भारतातील बरीचशी देवळे तीन भागात बांधली जातात.
गर्भगृह, गुढमंडप आणि असलाच तर स्वर्गमंडप.
या मंदिराची काही आपली स्वत:ची वैशिष्ठ्ये आहेत. एकतर पुष्करणीत (सूर्यमंदीरात याला सूर्यकुंड म्हणतात) पाय धुतल्याशिवाय या मंदीरात प्रवेश करता येत नसे, म्हणजे प्रवेश करण्याचा मार्गच असा आखला होता.
सूर्यकुंड अप्रतीम बघत रहावे असे आहे. सूर्यकुंडाच्या भोवती पायऱ्या व इतर देवतांची मंदीरे आहेत त्याची माहिती त्या त्या फोटोंच्या खाली दिलेली आहेत. सूर्यकुंड आयातकृती असून १७६ फूट लांब व १२० फूट रुंद आहे. यात स्नान केल्यावर किंवा सूर्याला अर्ध्य दिल्यावर साधकाला एकूण दोन मंडपातून जावे लागे जे गरुडस्तंभासारख्या खांबांवर उभे केले होते.
पहिल्या मंडपाचे उरलेले दोन खांब
काठावरची देवळे
शितळादेवी; हिच्या डोक्यावर सूप आहे. देवीच्या साथीत मुलांना देवी येऊ नयेत म्हणून भाविक हिची पुजा करीत व अजूनही करतात.
सूर्यकुंडाभोवती १०८ मुर्ती आहेत व चार कोपऱ्यात गणपती, नटराज, शितळामाता, व विष्णू यांची देवळे आहेत.
नटराजाची अत्यंत सुबक मूर्ती. त्याच्या नृत्यातील डौल बघण्यासारखा आहे.
या देवतांची देवळे एकसारख्या अशा देवळात आहेत.
सभामंडपाला एकूण ५२ खांब आहेत. खांबावरील नक्षिकाम अप्रतीमच्याही पलिकडील आहे. एक फोटो मला नीट घेता आला नाही. त्याच्या इतके कोरीव काम मी कुठेच पाहिले नाही.
सभामंडपाची काही छायाचित्रे:-
सभामंडपात चारही बाजूंनी जाता येते. आतमधे खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. छपराची उंची साधारणत: २३ फूट आहे. गुढमंढपातही अनेक शिल्पे कोरलेली आहेत काही कामसूत्रातीलही आहेत. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३०० वर्ग फूट आहे. आतील भागात पूर्वी सूर्याची मुर्ती असावी. त्याच्याभोवती प्रदिक्षणेचा मार्ग ही आखलेला आहे. दर २१ मार्चला सूर्याची किरणे त्या मुर्तीवर पडतात. गुढमंडपात एक भुयार होते असे आमच्या गाईडने सांगितले जे सध्या बुजलेले आहे असेही सांगितले. खरे खोटे देव जाणे.
मंदीराच्या बाहेरील भिंतीवरील काही शिल्पे
बर्याच नमंदीरात मंदीराचा भार उचलण्यासाठी गजथर दाखविलेला असतो. येथे मात्र कमळाचा थर दाखविलेला आहे....
आम्ही गेलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मोढेराचा नृत्यमहोत्सव सुरु होणार होता. तेथे थांबता येणार नसल्यामुळे उदास होत आम्ही सूर्यमंदिराचा निरोप घेतला.
यानंतर आम्हाला पाटणला जगप्रसिद्ध असलेली रानीकी बाव पहायला जायचे होते; त्याबद्दल पुढच्या भागात.
पण तेथील एक अप्रतीम शिल्प येथे ट्रेलर म्हणून टाकायला हरकत नाही. हा फोटो मला दोन भागात काढावा लागला कारण मधे खांब येत होते. त्यानंतर लेन्स करेक्शन करुन एकत्र केला आहे.
मोढेरा बाकी डोळे खिळून राहाण्याइतके सुंदर आहे.
बाह्यभागातल्या एका शिल्पपट्टिकेवर एक छोटेसे प्रसूतिचित्र आहे. त्यात 'स्क्वॉटिंग' स्थितीतली प्रसूती दाखवली आहे. तिथले गाईड हे अगदी छोटे शिल्प आवर्जून दाखवतात आणि आजकाल पश्चिमेकडे लोकप्रिय होऊ घातलेली ही प्रसूती मुळातली आपल्याकडचीच आहे असे अभिमानाने सांगतात. (सांगत असत, आता माहीत नाही.)
भाग ८ (रानीकी बाव)...
=================================================================

एकूण प्रवास ३५०० कि. मी.
गाडी: मारुती रिट्झ
तक्रार : शून्य.
गुजरातच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी आम्ही रानीकी बाव या प्रसिद्ध विहीरीला भेट दिली. त्याचे एक छायाचित्र मी मागील लेखाच्या शेवटी टाकले होते तेच आता येथे परत टाकतो.
.......यानंतर आम्हाला पाटणला जगप्रसिद्ध असलेली रानी की बाव पहायला जायचे होते; त्याबद्दल पुढच्या भागात.
पण तेथील एक अप्रतीम शिल्प येथे ट्रेलर म्हणून टाकायला हरकत नाही. हा फोटो मला दोन भागात काढावा लागला कारण मधे खांब येत होते. त्यानंतर लेन्स करेक्शन करुन एकत्र केला आहे.....
ही विहीर सोळंकी घराण्याच्या भीमदेव नावाच्या राजाच्या राणीने बांधली अशी नोंद आहे. हा राजा मुलराजाचा मुलगा. याचा काळ होता १०२२ ते साधारणत: १०६३. म्हणजे ज्या काळात जेरुसलेममधे मुसलमान व ख्रिश्चन क्रुसेडमधे एकामेकांचे गळे घोटत होते तो हा काळ. हे घराणे अनहिलवाड पट्टन या गाचाचे म्हणून ओळखले जायचे. या घराण्याचे राजे बरेच ताकदवान असावेत कारण ज्या प्रकारची शांतता असे बांधकाम करण्यास लागते ती त्यांनी थेथे राबविली होती हे उघड आहे.
सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्यांना थोडीफार माहीत होती.
पाटण शहराची स्थापना झाली ७४६ साली राजपूत राजी वनराजा चावडा याच्या काळात. ही गुजरातची राजधानीही काही काळ होती. काही काळ म्हणजे अंदाजे ६०० वर्षं.
चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२
सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४
वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४
या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.
आत शिरल्याशिरल्या दिसणार्या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
११८० साली महंमद घोरीने पाटणवर आक्रमण केले पण सोळंकींनी ते परतवले पण दुर्दैवाने पुढे त्याच्याच एका सरदाराने म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने १२०० च्या आसपास पाटणचा विध्वंस केला. पुढे दिल्लीच्या सुलतानाचा र्हास झाल्यावर गुजरातचा सुलतान स्वतंत्र झाला व त्याने त्याची राजधानी अहमदाबादला हलविली. साहजिकच त्यामुळे पाटणचे महत्व कमी कमी होत गेले.
काळाच्या ओघात या विहिरीला पाण्याचा पुरवठा करणार्या जमिनीखालील झर्यांनी जमिनीतील हालचालींमुळे त्यांचे पात्र बदलले आणि नंतर ही विहीर संपूर्णपणे गाळाने भरली. त्यामुळेच त्यातील अप्रतीम शिल्पे मुसलमानांच्या आक्रमणापासून वाचली नाहीतर याचेही तुकडे पडले असतेच. जी शिल्पे गाळात गाडली गेल्यामुळे वाचली तीच आता वातावरणाशी संबंध येताच झिजत जाणार हा काळाचा व निसर्गाचा खेळ आहे असेच म्हणावे लागेल. ही विहीर तेथे आहे हे गावकर्यांना माहीत होते कारण वृद्ध माणसे सांगतात की त्यांनी त्या विहीरीतून पाणी काढले होते पण वटवाघळांमुळे त्यांची कधी आत जायची हिंम्मत झाली नसावी. पण त्यांना फक्त त्या विहीरीबद्दल माहिती होती. त्या विहिरीच्या पाण्याकडे उतरण्यासाठी ज्या पायर्या होत्या त्यावर जमलेल्या मातीवर ही मंडळी शेती नांगरत असत.
विहिरीची मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.
श्रीविष्णू वराह अवतार...
भूदेवीला एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
यातील मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५० वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण २९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा. विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत पायर्यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या, त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत असे.
ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
आळस देणार्या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
बहुतेक मदन...हातात उस व दुसर्या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
पायर्यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
कृष्णधवलची मजा काही औरच असते...
आम्ही गेलो तेव्हा विहीर कुठे दिसेना म्हणून आम्ही एका माणसाला विचारले देखील. मी फार पूर्वी येथे आलो होते हे खरे पण आता सर्वच बदललेले दिसले. त्याने बोट दाखविलेल्या दिशेला आम्ही चालू लागलो आणि अचानक थोडी दूर दगडांची एक जमिनीवर आलेली एकफुट उंचीची पायरी दिसली. थोडे पुढे गेल्यावर त्या पायरी पलिकडील दृष्य बघून ताजमहाल जसा एकदम समोर येतो त्याची आठवण झाली. २३ मिटरची खाली उतरण्यास आपल्याला चार मजले सात जिन्यांच्या सहाय्याने उतरावे लागतात. आता फक्त एकाच मजल्यापर्यंत जाता येते. पण पूर्वी तिसर्या मजल्यापर्यंत उतरण्याची परवानगी होती. एका नतद्रष्ट माणसाने एका मुर्तीचा हात तोडल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली. मुर्तींचा दगड तसा ठिसूळ आहे त्यामुळेही असेल कदाचित.
या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
खालच्या मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्या उतरुन जातो त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते. सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे. ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
माझी ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी ही कथा ज्या फोटोवरुन सुचली ते छायाचित्र..
एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची अगणित शिल्पे आहेतच.
किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्यांचे छायाचित्र...
सगळ्यात शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.
दगड निर्जीव असतात असे म्हणणार्यांनी रानी-की-बावच्या पायर्या एकदा उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागतील.
गुजरातची सहल समाप्त.... :-)
जयंत कुलकर्णी.
रानी की वाव
दुपारीच मेहेसाणामार्गे पाटणला येऊन पोहोचलो. पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. इथल्याच पाटण पाटोला साड्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या किमती विचारल्यावर तेवढ्या खर्चात आपण युरोपला जाउन येऊ अशी समजूत घालून पुढे निघालो. कुठेही आपण एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी जातो आहोत असे वाटत नव्हते. शेवटी एकदा गावाच्या अगदी शेवटाला गाडीने एक वळण घेतले आणि भारतातल्या सुप्रसिद्ध विहीरींची महाराणी म्हणावी अशा राणीं की वाव द्रुष्टीपथास पडली.
बाहेर पार्किंगपासुनच आतल्या गर्दीचा अंदाज आला. दिवाळीतल्या लाभ पंचम ची तमाम गुजराती उद्योजकानी सुट्टी घेऊन ,इथे येऊन कारणी लावली होती बहुतेक! सर्वत्र हिरवळीवर खावानु,पिवानु,मज्जा करानु आलेल्या गुर्जर बांधवांची गर्दीच गर्दी होती! आता आम्हाला वाव बघण्याचे वेध लागले होते. अक्षरश: धावत आम्ही विहिरीच्या पायरी पाशी पोहोचलो. आणि समोरचे अचाट शिल्प वैभव पाहून कुठून सुरू करावे पाहायला तेच कळेनासे झाले! तेव्हढ्यात एका बांधवाशी माझी जुंपली! त्यांचा काहीच दोष नव्हता ते बिचारे एका विष्णू मूर्तीला आय लायनर लावण्यासाठी तिच्या डोळ्याच्या कडेवरुन बॉलपेन फिरवत होते!असो!राणी की वाव साधारण इ.स.1022 ते 1063च्या दरम्यान सोळंकीराजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. एक जलमंदिरच असावे त्या काळातले. इथे विष्णू दशावतारची शिल्पे,सुरकन्या,विषकन्या,महिषासुरमर्दिनी ही शिल्पे प्रामुख्याने दिसतात.ती इतकी अप्रतिम कोरलेली आहेत की त्यांचा डौल,सौंदर्य,रेखीवपणा,त्यातले शास्त्र,त्यांचे अलंकार्,आयुधं,चेहेर्यावरील भाव, काय बघू काय नको असे होऊन जाते. केवळ नजरबंदी करणारी कारागिरी! याच विहिरीचा वरुन देखील देखावा बघता येतो. तोही एक विलक्षण अनुभव आहें. मजल्या,मजल्यांच्या रचनेत जवळ्जवळ आठशे शिल्पे सामावली आहेत.तीही एक से बढकर एक. सर्वात तळाशी शेषशायी विष्णूचे शिल्प आहे..
ही विहीर काळाच्या ओघात गाळात लपुन गेली होती.पुरातत्व खात्याने 1980नंतर अत्यंत काळजीपूर्वक उत्खनन केल्याने आता आपल्याला आहे या दिमाखदार स्वरुपात दिसते आहे.
संध्याकाळ होऊन कमी दिसायला लागेपर्यंत भान हरपून शिल्प बघत होतो! खरोखरच अशी ठिकाणं पाहिली की आपण भारतात राहत असल्याचा इतका अभिमान आणि आनंद वाटतो. त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली असणार यात शंकाच नाही. त्या अनाम कलाकारांच्या अतुलनिय कामगिरीपुढे नतमस्तक!
अडालज विहीर
जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती.

(संग्रहित छायाचित्र)
रजनी देवधर
पाणी हे जीवन. प्रत्येक जीवमात्राला जीव जगविण्याची आस. त्यासाठी पाण्याच्या स्रोताकडे वळतात त्याची पावले. झरे, नद्या, सरोवरे, भूगर्भातील गोडय़ा पाण्याचे झरे.. अथक शोध, उन्हातली तृषार्त वणवण पाण्यासाठी आदिम काळापासूनची. मिळालेले पाणी जतन करताना पावसाचे पाणी साठविणे, वाहते पाणी अडविणे, बांध, बंधारे, धरणे बांधणे, कालवे काढणे; गोडे पाणी शोधत जमिनीत खोल विहिरी खणणे अशा विविध उपायांद्वारे पुरातन कालापासून आजमितीपर्यंत अथक केली जाणारी आणि यापुढेही करायला लागणारी ही यातायात निव्वळ जगण्यासाठी.. उष्ण कटिबंधातील प्रदेशात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई डोळ्यातून पाणी काढणारी. या खडतर समस्येला सामोरे जायचे, त्यावर मार्ग काढायचे प्रयत्न आपापल्या परीने सर्वाचे.
प्राचीन भारतात त्यावेळच्या राजे, महाराजे, संस्थानिकांनी आपापल्या राज्यात नद्यांना कालवे काढून, विहिरी बांधून तहानलेल्या रयतेला पाणी पुरविले. जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती. या प्राचीन पद्धतीची मुळे हजार वर्षांअगोदरपासून आढळतात. संस्कृती विकसित होताना अन्न, पाणी, निवासाच्या मूलभूत गरजा भागविण्याबरोबर कलेचा उदय होत त्याचा आविष्कारही दैनंदिन जीवनात उमटतो. पाणथळ जागा विपुल असलेल्या गुजरात राज्यामध्ये गोडय़ा पाण्याची वानवा शतकांपासूनची. उष्ण हवा पाण्याची गरज अजूनच वाढविणारी. पायऱ्या असलेल्या मोठय़ा विहिरी खोदणे ही पद्धत तेथे हजार वर्षांपासून अवलंबिली जाणारी. अहमदाबादजवळ सुमारे २० कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीनगर जिल्ह्यतल्या अडालज नावाच्या छोटय़ा खेडेगावात पायऱ्या असलेली ही विहीर हा तत्कालीन प्रगत स्थापत्यशास्त्र, कला यांचा विलोभनीय अलौकिक आविष्कार. रखरखत्या उन्हातून वाटचाल करणाऱ्या तहानलेल्या पांथस्थांना विहीर फक्त पाणी घेण्यासाठी नव्हे तर शीतल सावलीत विसावण्यासाठी आणि विसावताना मन रिझवीत आल्हाददायी प्रसन्न करणारी देखील. पायऱ्यांवरून खाली उतरत गेल्यावर दिसून येतो या विहिरीवर बांधलेला पाच मजले असलेला वालुकामय दगडात खोदलेला कोरीव महाल. कडक उन्हात विहिरीवर कडेनी छत धरत पाण्याचे बाष्पीभवन कमी करत पाणी आटू न देणारा, जमिनीच्या पोटात खोदलेला असूनही कुंद काळोखी नव्हे तर अगदी हवेशीर, उजेड आणि सावली असलेला, आत शीतल होत जाणारा, बाहेरच्या उन्हाच्या झळांपासून सुटका देणारा, नेत्रदीपक कोरीवकाम असलेला.. आताच्या अहमदाबामध्ये पंधराव्या शतकात तिथे होते दांडई राज्य; राजपूत वाघेला राज घराण्याचे. राणा वीर सिंग राजा होता तेव्हा त्या राज्याचा. पाणी कमी असलेले त्याचे लहान राज्य. तहानलेल्या रयतेला पाण्यासाठी दूर पायपीट करायला लागायची तेव्हा. पाऊस पडला नाही तर दुष्काळामध्ये प्रजाजन त्रस्त व्हायचे. राजा वीर सिंगने अडालज येथे रयतेला पाण्यासाठी आणि वाटसरू, प्रवासी पांथस्थांना विसावण्यासाठी आगळी वेगळी विहीर बांधण्याचे ठरविले आणि कुशल कारागिरांच्या स्थापत्य कौशल्याला सुरुवात झाली. जमिनीत खोदलेली विहीर आणि त्यावरचा पाच मजली महाल उभारण्यास सुरुवात झाली. राजा हिंदू, साहजिकच बांधकामावर हिंदू शैलीचा ठसा. कोरीवकामात नवग्रहांच्या प्रतिमा, तत्कालीन संस्कृतीमधील लोकजीवन त्याच्या प्रतिमा, हत्ती, घोडे, कमळ, पक्षी साकारले गेले. विहिरीवरचा महाल अष्टकोनी- अनेक खांबांवर उभारलेला. खांबांवर कोरीव नक्षीकाम त्या वेळच्या संस्कृतीचे प्रतिबिंब उमटविणारे, आतमध्ये प्रशस्त मंडपासारखी जागा. महालाच्या या अष्टकोनात भूमितीय संरचना दिसून येतात. याचे बांधकाम सुरू असताना एक आक्रित घडले. त्या वेळचा गुजरातचा सुलतान महमूद बेगदा ऊर्फ महमूद शहाचे या छोटेखानी राजपूत राज्यावर आक्रमण झाले आणि लढाईत राजा वीर सिंग शत्रू कडून मारला गेला. त्याची सौंदर्यवान राणी रुपबा ऊर्फ रुडाबाईने सती जाण्याची तयारी केली. मात्र जेत्या महमूद सुलतानने तिच्या सौंदर्याची मोहिनी पडून त्यापासून तिला रोखले आणि तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. राणी तयार झाली ती एका अटीवर, तिच्या पतीच्या स्मरणार्थ तो विहिरीवरचा भव्य महाल बांधून झाल्यावर ती विवाहबद्ध होणार असल्याची अट तिने घातली. राणीच्या सौंदर्यावर फिदा होत तिच्या प्रेमात पडलेला महमूद तयार झाला आणि या महालाचे अर्धवट राहिलेले काम त्याने झपाटय़ाने पूर्ण करून घेतले. हिंदू मंदिरे, लेणी मोगल राजवटीकडून उद्ध्वस्त होत असल्याच्या त्या काळात महमूदने हे काम आधीच्या कलाकृतीला धक्का न लावता त्यावर इस्लामिक शैलीचा बाज चढवत पूर्ण केले. विहिरीवरचा हा अद्वितीय, आगळा महाल बांधून पूर्ण होताच त्याने राणीला विवाहाबद्दल विचारले. राणी विहिरीवरच्या त्या सुंदर महालात गेली. मनात मूर्ती पतीची. त्याचे अखंड स्मरण. प्रार्थना आणि पूजापाठ करण्याच्या निमित्ते गेलेली राणी पुन्हा परतली नाही. पतीच्या चित्तेच्या ज्वाळा नाही तर त्या विहिरीचे जल जल करत पतीनंतर तिने आपली जीवनयात्रा संपवली. पतीकडून अधुरे राहिलेले कार्य पूर्ण करून तिने जीवन समर्पित केले. राजे, बादशहा आपल्या पत्नींच्या स्मरणार्थ महाल, स्मारके बांधण्याच्या त्या काळात ही धर्यवान स्त्री मोठय़ा चातुर्याने आपल्या पतीचे अर्धवट राहिलेले कार्य शत्रूकडून पूर्ण करून घेत आपल्या पतीस भेटण्यास कायमची निघून गेली.
महमूद शहा चिडला मात्र त्याने महालाची तोडफोड केली नाही. क्रूर होत बांधकाम करणाऱ्या त्या पाच कलाकारांची हत्या केली. त्यांच्याकडून अशी देखणी कलाकृती होऊ नये याची दक्षता म्हणून. अशी दु:खद किनार असलेली ही बाजू या महालाविषयी पाच शतकांपूर्वीची आख्यायिकेमध्ये सांगितली जाते. अडालज इथला हा विहिरीवरचा महाल १४९८ साली बांधून पूर्ण झाला. त्याला पाच लाख टांक इतका खर्च आला. महालाच्या संगमरवरी शिळेवर हे तपशील- झालेला खर्च, बांधकाम पूर्ण झाल्याची तिथी, प्रहर आदी संस्कृतमध्ये लिहिले आहेत. पाच मजली महालाच्या पहिल्या मजल्यावर मंडपासारखी प्रशस्त जागा आहे. पायऱ्या असलेले तीन बाजूंनी तीन जिने असलेली ही एकमेव विहीर आहे. पहिल्या मजल्यावरच्या मंडपात तेथून जाता येते. खांब, सज्जा, छत, गवाक्ष येथली कोरीव नक्षीकाम लेण्यांसारखी नेत्रदीपक कलाकृती, मजल्यांना जोडणारे आतमधले चक्राकार दगडी जिने सारेच विस्मयकारी. पाच शतकांपूर्वीच्या त्या कसबी कारागिरांचे कौशल्य फक्त कोरलेल्या नक्षीकामात नव्हे तर भूमितीय प्रमाणबद्ध रचना, आत उत्तम वायुविजन, थंडावा, सावली आणि उजेड दोन्ही राहील अशी रचना यात दिसून येते. स्थापत्यशास्त्राचा या आगळ्या बांधकामशैलीचा नमुना असलेली ही विहीर आणि वालुकामय दगडात खोदलेला भव्य महाल दोन भिन्न शैलींची नजाकत असलेला कलेचा विलोभनीय आविष्कार होय.
गीर; आशियातील सिंहगर्जना!
भारताच्या पश्चिम भागात गेल्यावर निसर्गाचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. त्यातही गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत गेल्यावर तर अधिकच वेगळं. पश्चिम भागात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. इथला जंगलांचा प्रकार वेगळा, पक्षी वेगळे, प्राणी वेगळे, झाडं वेगळी. आणि तरीही या सगळ्याचं मनोहारी रूप लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचं इथलं वेगळेपण इथं फिरताना सारखं जाणवत राहतं व ते क्षणाक्षणाला आनंद देऊन जातं.
आपल्या वेगळेपणानं स्वतःची छाप निसर्गप्रेमींच्या मनावर पाडणाऱ्या अशाच एका जंगलाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हे जंगल म्हणजे एका रुबाबदार प्राण्याचं आशियातील एकमेव नैसर्गिक आश्रयस्थान आहे. या जंगलाचं नाव आहे ‘गीर राष्ट्रीय उद्यान’. आशियाई सिंहांसाठीचं गुजरात राज्यातील जंगल. सिंह या प्राण्यानं आपल्या सर्वांच्या मनावर लहानपणापासूनच जादू केली आहे. अगदी ‘पंचतंत्र’, ‘इसापनीती’च्या गोष्टींपासून ते बालमनाला वेड लावणाऱ्या ‘सिम्बा’ या सिनेमापर्यंत, प्रत्येक रूपातून सिंह आपल्या मनाचा वेध घेत राहिला आहे. त्याच्या रुबाबदार रूपामुळे आपल्याला लहानपणापासूनच त्याचं आकर्षण वाटत आलेलं आहे. असं असताना गीरचं जंगल आपल्याला विशेष आनंद देऊन जातं. फक्त सिंहच नव्हे तर इथं दिसणारे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आपल्याला या जंगलाचं वेड लावतात.
या जंगलाला इतिहासही लाभला आहे. मुळात आशियाई सिंहांच्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला गीरच्या जंगलाचं महत्त्व लगेच पटेल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील अनेक भागांत सिंह अस्तित्वात होते. भारतातील सिंध प्रांत, पंजाब, गुजरात, राजस्थान, हरियाना, बिहार ते अगदी पूर्वेच्या पलामाऊपर्यंत, तर मध्य भारतात रेवा प्रांतातही सिंह अस्तित्वात होते. त्याअगोदरच्या काळात अगदी बंगालमध्येही सिंहांच्या अस्तित्वाची नोंद आढळते. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि कमी झालेला अधिवास यामुळे सिंह भारताच्या बहुतांश भागांतून नाहीसे झाले. पलामाऊ भागातील सिंह सन १८१४ पर्यंत, बडोदा, हरियाना आणि अहमदाबादमधील सिंह १८३० पर्यंत, मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील सिंह १८४० पर्यंत नष्ट झाले. याचं मुख्य कारण अनियंत्रित शिकार हेच होतं. सन १८५७ मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं जवळपास ३०० सिंहांची शिकार केल्याची नोंद आहे. ग्वाल्हेर आणि रेवा प्रांतातील सिंह १८६० पर्यंत, अलाहाबाद प्रांतातील १८६६ पर्यंत, राजस्थान भागातील १८८० पर्यंत नष्ट झाले. गुना, पालनपूर जिल्ह्यांतही सिंहांचं नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही. केवळ जुनागढ जिल्ह्यात अवघे १२ सिंह अस्तित्वात राहिले होते.
आणि यातूनच सुरू झाला गीरच्या अभयारण्याचा प्रवास. पूर्वी हा भाग जुनागढच्या नबाबाचा प्राण्यांची शिकार करण्यासाठी राखून ठेवलेला खासगी भाग होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात फक्त याच भागात आणि तेही केवळ १२ सिंह शिल्लक राहिल्यावर ब्रिटिश व्हाईसरॉयनं ही बाब नबाबाच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर नबाबानं या भागाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या भागाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. स्वातंत्र्योत्तर काळातही वनविभाग, सरकार आणि काही वन्यजीवप्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे गीर आपलं गतवैभव पुन्हा प्राप्त करू शकलं आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक वर्षं भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह होता हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पुढं १९७२ मध्ये वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्याचं घोषित करण्यात आलं. आज संपूर्ण आशिया खंडाचा विचार केला तर, सिंह आता गीरच्या जंगलापुरतेच मर्यादित राहिले आहेत. आज सुमारे १४१२ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रात हे जंगल पसरलेलं आहे. यापैकी सुमारे २५८ चौरस किलोमीटर भाग हा राष्ट्रीय उद्यान म्हणून, तर सुमारे ११५३ चौरस किलोमीटरचा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सन २०१५ मध्ये आशियाई सिंहांची चौदावी गणना घेण्यात आली. त्यात या सिंहांची संख्या सुमारे ५२३ पर्यंत पोहोचली. २०१० मध्ये ही संख्या ४११ होती, तर २००५ मध्ये ३५९. सन २०१५ च्या गणनेनुसार जुनागढ जिल्ह्यात २६८ सिंह होते, सोमनाथ जिल्ह्यात ४४, अमरेली जिल्ह्यात १७४, तर भावनगर जिल्ह्यात ३७ सिंह होते. हा सर्व भाग गीर जंगल आणि त्याच्या आसपासचा आहे. केवळ १२ ते सुमारे ५२३ हा प्रवास अनेक लोकांच्या अथक् प्रयत्नांमुळे आणि सिंहांना मिळालेल्या संरक्षणामुळे शक्य झाला.
गीरच्या जंगलातून सात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्या वाहतात. हिरन, शेत्रुंजी, माचुंद्री, दातर्डी, शिंगोडा, गोदावरी, रावल या नद्यांमुळे गीरच्या जंगलातील अनेक पशू-पक्ष्यांची तहान भागते. याशिवाय सुमारे ३०० ठिकाणी वनविभागानं कृत्रिम रीतीनं पाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात इतर ठिकाणचं नैसर्गिक पाणी कमी झालं की बरेचसे प्राणी-पक्षी या पाण्यावर अवलंबून असतात. गीरच्या जंगलाचा भाग हा काटेरी झुडपं आणि शुष्क झाडांनी व्यापलेला आहे. हे जंगल ‘शुष्क पानगळी’ आणि ‘शुष्क पानगळी झुडपी’ प्रकारात मोडणारं आहे. पश्चिम भारतातील हे सर्वात शुष्क पानगळी जंगल म्हणून ओळखलं जातं. सिंहांचा विचार केला तर त्यांना अशाच प्रकारच्या अधिवासाची गरज असते. त्यामुळे सिंह या भागात मोठ्या संख्येनं टिकून राहिले आहेत.
गीरच्या जंगलात सिंहांव्यतिरिक्त अनेक प्रकारचे प्राणी-पक्षीही पाहायला मिळतात. जंगलाचा भाग कोरडा, रखरखीत वाटला तरीही या वातावरणात टिकून राहणारे अनेक प्राणी-पक्षी आहेत. गीरच्या जंगलात फिरताना, सिंहांच्या पाऊलखुणा पाहत त्यांचा मग काढताना, इतर प्राणी-पक्षी बघताना ऊर अभिमानानं भरून येतो, वेगळाच आनंद मिळतो. विनाशाच्या मार्गावर असलेल्या एका अप्रतिम प्रजातीला, अर्थात वनराज सिंहाला वाचवल्याचा हा अभिमान पुढील जबाबदारीची जाणीवही करून देतो...जबाबदारी ही सिंहगर्जना अशीच टिकवून ठेवण्याची!
कसे जाल? :
पुणे/मुंबई-जुनागढ-गीर
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते एप्रिल
काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी : आशियाई सिंह, बिबट्या, रानमांजर, तरस, कोल्हा, खोकड, मुंगूस, चांदी अस्वल, रानमांजर, रस्टी स्पॉटेड कॅट, चितळ, नीलगाय, सांबर, चौशिंगा, चिंकारा, रानडुक्कर इत्यादी.
पक्षी : सर्पगरूड , तुरेवाला सर्पगरूड , बोनेलीज् इगल, मत्स्यगरूड , इंडियन ईगल आऊल, रॉक बुश क्वेल, मोर, तिसा, ब्राऊन कॅप्ड् पिग्मी वूडपेकर, बुरखा हळद्या, क्रेस्टेड ट्री स्विफ्ट, स्वर्गीय नर्तक, कापशी, सोनपाठी सुतार इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
अहमदाबाद-गांधीनगर
अहमदाबादमधील रस्ते अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहेत. पण रस्त्याची रुंदी जास्त असल्याने कुठे सिग्नल नाही त्यामुळे सगळे कशी तळीरामांसारखे गाडी चालवितात. रस्त्यावर डिजिटल फलक मात्र अतिशय दुर्मिळ(सगळीकडे मोदी असतील असे वाटले होते पण पूर्णपणे अपेक्षाभंग).
प्रवासाची रूपरेषा :
१. अक्षरधाम मंदिर, गांधीनगर : अहमदाबादपासून ४० किमी अंतरावर आहे. (मंदिर पाहण्यास लागणारा कालावधी: ३ तास )
२. अडालज वाव : अक्षराधामपासून १८ किमी. अंतरावर आहे. बसने किंवा वडापने अगदी आरामात पोहचू शकता. (कालावधी : ४०-४५ मि.)
३. हाथीसिंग जैन मंदिर : अडालजपासून १० किमी अंतरावर आहे. दिल्ली दरवाजाला जाणारी कोणतीही बस पकडा. (कालावधी : २५-३० मि.)
४. साबरमती रिव्हरफ्रंट : हाथीसिंग जैन मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे.(कालावधी : १-१.३० तास)
अक्षरधाम: स्वामीनारायण या मनुष्यरूपी देवाचे हे सुंदर मंदिर. जवळपास ६००० गुलाबी दगडांचा वापर करून १००० कारागिरांनी आपली कला समर्पित करून हि अदभुत वास्तू उभारली आहे. आत प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला एक सुंदर बगीचा व हत्तीचा आकार दिलेली झाडे बघायला मिळतात. मंदिराच्या सभोवताली स्वामीनारायण यांचे विचार कोरले आहेत. स्वामीनारायण यांनी वयाच्या ११व्या वर्षी गृहत्याग करून ७ वर्षात १२०० किमी.ची भारत भ्रमंती करून हिंदू धर्माच्या विचारांचा प्रसार केला होता.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ५० रुपयांचे तिकीट काढून एक प्रदर्शन होते. त्याच्या पहिल्याच टप्यात एक सुंदर दृश्य होते. एका बाजूला असंख्य दगडे पडली होती तर दुसर्या बाजूला एक मूर्ती होती जिच्या हातामध्ये हातोडा व छिन्नी होती. हातोडा हे ताकतीचे तर छिन्नी हे बुद्धीचे प्रतिक होते. ताकद व बुद्धीच्या योग्य मिलाफातूनच मनुष्य श्रेष्टत्वाला पोहचतो नाहीतर त्याचा दगडच बनतो हाच संदेश हि मूर्ती देत होती. त्यानंतर एका अरुंद वाटेने जंगलात आलो जिथे सिंह डरकाळ्या फोडत होता, गोरिला विखारी नजरेने बघत होता, अजगर एका झाडावर लटकत होते आणि थंड हवा मनाला शांत करीत होती. काही काळासाठी खरोखरच जंगलात आल्याचा भास होत होता. त्यानंतर स्वामीनारायण यांच्या जीवनावरचा दृक-श्राव्य कार्यक्रम दाखविण्यात आला जो अतिशय भंपक होता. व नंतर महाभारतातील प्रसंगावर आधारित विविध देखावे दाखविण्यात आले. पुढे स्वामीनारायण यांचा जीवनप्रवास उलगडणारा व त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर आधारित एक छोटेसे संग्रहालय आहे.
२००२च्या अतिरेकी हल्ल्यानंतर मंदिराची सुरक्षाव्यवस्था अतिशय कडक केली आहे. आपले सगळे सामान आपल्याला बाहेरच जमा करावे लागते. इतकेच काय कमरेचा पट्टा, पाकीटसुद्धा काढून तपासणी केली जाते. आतमध्येच १०० रुपये घेऊन २ तासात फोटो काढून देण्याची व्यवस्था केली आहे.
अडालज वाव : वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. हि विहीर १४००व्या शतकाच्या अखेरीस राजपूत राणी रुदाबाई यांच्या स्मरणार्थ बांधली होती. प्रवासी तसेच गावकर्यांना विश्रांतीचे एक ठिकाण म्हणून सुरुवातीस याचा वापर होत असे. अशा प्रकारच्या अनेक विहिरी गुजरातच्या विविध भागात आहेत. नंतर याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी होऊ लागला.
हि विहीर अक्षरधाम मंदिरापासून साधारणता १८ किमी.च्या अंतरावर अहमदाबाद-गांधीनगर महामार्गावर आहे. जवळपास ७५ मी. लांब असलेली हि विहीर १६ खांबावर जवळपास ६०० वर्षानंतर भक्कम स्थितीत उभी आहे. विहिरीची रचनाच अशी केली आहे कि सूर्यकिरणे व्कचितच पाण्याला स्पर्श करतात त्यामुळे असे म्हणाले जाते कि बाहेरच्यापेक्षा पाण्याचे तापमान ५-६ अंशाने कमी असते.
हाथी सिंग जैन मंदिर: जैन तीर्थकार धर्मनाथ यांना समर्पित केलेले हे मंदिर. हाथीसिंग या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. पण हे मंदिर पूर्ण होण्याआधी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या पत्नीच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे मंदिर हाथीसिंग याच नावाने प्रसिद्ध झाले.
अतिशय शांत व प्रेक्षणीय स्थळ. स्थापत्यकलेचा एक अदभुत अविष्कार. अतिशय देखणे कोरीव काम.
संध्याकाळी ७च्या आसपास जैन मंदिर बघून झाल्यानंतर जवळच असणाऱ्या साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देण्याचा विचार होता. पण एकतर खूप कंटाळलो होतो व ज्या मित्राकडे राहायला जाणार होतो तो दुसऱ्या टोकाला राहत होता (जवळपास २ तासांचा प्रवास) त्यामुळे साबरमतीचे दुरूनच दर्शन घेतले व गुजराती थाळीवर ताव मारून दिवसाची दिवसाचा अध्याय संपवला.
दिवस दुसरा: प्रवासाची रूपरेषा
१. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.)
२. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. )
३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.)
४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास )
५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास )
१. कांकरिया लेक : संध्याकाळी सहाची बस पकडायची असल्याने दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कांकरिया लेकवरच बघण्याचे नियोजन होते. पण नेहमीच उठण्याच रडगाण पाठ सोडायला नको. कसेतरी करून शेवटी ७.४५ च्या दरम्यान लेकवर पोहचलो.
हा लेक वर्तुळाकार असून १४५१ च्या दरम्यान बांधल्याचा अंदाज आहे. हा लेक बघताना हैद्राबादच्या हुसेन सागर तलावाची आठवण होत होती.
संध्याकाळी इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, प्राणी संग्रहालय, बोटिंग, उद्यान आणि आपल्यासाठी चरण्याचा अड्डा पण आहे.
२. सिद्दी सय्यद मस्जिद: १५७३ साली बांधलेली हि मस्जिद दगडावर अतिशय नाजूक कोरलेल्या अर्धवर्तुळाकार जाळीदार नक्षीसाठी प्रसिद्ध.
जाळीदार खिडकीचे समोरील बाजूने टिपलेले सोंदर्य....
जाळीदार खिडकीचे बाहेरील बाजुने टिपलेले सोंदर्य...
चारही खडक्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम आहे.
३.जुम्मा मस्जिद : १४२३ साली सुलतान अहमद शाह यांनी बांधलेली भव्य व तितकीच सुंदर अशी वास्तू...
४.साबरमती आश्रम: प्रवासाला सुरुवात झाल्यापासून मी पाहण्यास सर्वाधिक उत्सुक असलेली हि जागा म्हणजे माझ्या देवाचे मंदिर (कृपया इथे बाकी कोणताही वाद सुरु करू हि विनंती)
तीन माकडे ....
गांधीजींचा जीवनप्रवास उलगडणारे संग्रहालय...
गांधीजीनी जगाला दिलेला हाच तो संदेश..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन धृवतारे...
दोन राष्ट्रांचे पितामह...
अहिंसेची हिंसा...अखेरचा हा तुला दंडवत...
सुती धाग्यापासून बनविलेला हो फोटो...
तपस्वी, ध्यानमग्न, तेजस्वी महात्मा...
तेजाचे वलय प्राप्त झालेली वास्तू...गांधीजींचे निवासस्थान...
महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या वस्तू...
एक स्वर्गीय अनुभूती...
रघुपति राघव राजाराम....गांधीजींचे प्रार्थनास्थळ...
५.सायन्स सिटी : आकाराने प्रचंड पण अजूनही विकसनशील अवस्थेत असलेली जागा. त्यामुळे इतक्या दूरवर जाऊन हाती धुपाटणे लागण्याचा प्रकार. इथे मंगळयान, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यांचा अनुभव घेण्यासाठी राईडस आहेत पण त्यासाठी किमान १५ जणांचा कंपू लागतो.
या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत सर्व टप्प्यांचे अगदी सविस्तर विवेचन केले आहे.
हे सगळ बघून होईपर्यंत ५.३० वाजले होते. शेवटी जमेल तेवढा खाकरा विकत घेतला आणि बसमध्ये जाऊन झोपी गेलो.
अध्याय समाप्त.
गुजरात दौरा भाग-१ अदालज नि वाव (ADALAJ STEPWELL)
सगळ्यात आधी व्यवस्थित नियोजन केलं. कोणती गाडी पकडायची, आधी काय करायचं? कुठे रहायचं? हे सगळं गुगल मॅपवर नोट करून ठेवलं. बरं आता सोबत कोण येणार ह्याची काही खात्री नव्हती कारण गुढीपाडवा म्हणजे हिंदू वर्षातला पहिला दिवस आणि सणावाराला कोण घराबाहेर पडणार? म्हणून वेळ आली तर एकट जावं लागेल ह्याची ही तयारी केली आणि झालंही तसंच कोणीच यायला तयार नव्हतं त्यामुळं पुन्हा एकदा ही माझी "SOLO TRIP" झाली. सगळ्यात महत्त्वाचं होतं काय तर गुजरात मध्ये जाऊन बघायचं काय?? गुजरात हा राजे राजवाड्यांच्या काळी पाहायला गेलं तर पाण्याच्या दृष्टीने दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून गुजरातकडे पाहिलं जायचं मग गुजरातमध्ये प्रसिद्ध काय असेल तर राज्यांच्या काळातल्या विहिरी. मग पूर्ण अभ्यास करून सर्वात पहिले भेट देण्याचं ठिकाण ठरवलं ते म्हणजे गुजरातपासून जवळ असणारी "अदालज नी वाव"
अदालज हे अहमदाबाद पासून सुमारे १८ किमी दूर असलेलं एक गाव. अदालज ला जायचं झाल्यास अहमदाबाद वरून सिटीबस मिळतात पण मी लवकर पोहोचल्यामुळे थेट रिक्षा केली व सात वाजण्याच्या सुमारास अदालज जवळ पोहोचलो.
अदालज विहीर पहायची झाल्यास त्याची वेळ सकाळी ८ ते ६ आहे. त्यामुळे मी थोडावेळ तिथेच थांबायचं ठरवलं त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की विहिरीत सगळ्यात पाहिले प्रवेश करायचा मान मला मिळाला व जशी हवी तशी फोटोग्राफी करू शकलो.
खरंतर अदालजच्या विहिरीसाठी कितीही वेळ असला तरी तो कमीच वाटेल पण एकदा गर्दी वाढली की मग थांबण्यात मजा नाही हे समजून पावणे दहाच्या सुमारास अदालजच्या विहिरीपासून काढता पाय घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
लवकरच भेट होईल गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या भागात.
गुजरात दौरा भाग - २ मोढेरा सुर्यमंदिर (Modhera Suntemple)
सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते "रामकुंड", हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर "सभामंडप "आणि शेवटी "गूढमंडप अथवा गर्भगृह.
२) सभामंडप
सभामंडपात प्रवेश करताना आधी "किर्ती तोरण" लागते. काळाच्या ओघात तोरण नष्ट झाले असले तरी त्याचे दोन खांब अजूनही वैभवाची साक्ष देतात. सभामंडपाला चारही बाजूनी प्रवेशद्वारे आहेत. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. बाहेरील बाजूस असणारे छोटे खांब आणि जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब.
सूर्यमंदिरात प्रवेश केल्यावर बाहेर निघायचा विचारसुद्धा मनात येत नाही तुम्हीच पाहिलं असेल कि वरील ब्लॉगमध्ये माहिती मोजकी असली तरी फोटो काही संपत नाही कारण मंदिरच तेवढं देखणं आहे खरंतर अजून बरेच फोटो आहेत पण सगळे प्रदर्शित करणं शक्य नाही तरी जितके जमतील तितके प्रदर्शित केले आहेत बाकी Social Media वर पाहायला मिळतीलच.
सूर्यमंदिराचा संपूर्ण परिसर न्याहाळून आता पुढच्या प्रवासाला निघायचा विचार केला. एव्हाना २ वाजले होते म्हणजे सुर्यमंदिर बघायला पण मी बरोबर २ तास घेतले. २ वाजता मी पुन्हा बस स्टँडच्या दिशेने निघालो. बस स्टँडवर पोहोचतो न पोहोचतो तोच समोर पाटणला जाणारी बस लागलेली होती. त्यात बसलो आणि पाटणच्या दिशेने रवाना झालो.
गुजरात दौरा भाग - ३ रानी की वाव (RANI KI VAV)
विहिरीचा इतिहास :-
अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी "अन्हीलवाड" या नांवाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोलंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली.
वास्तू विशेष

गुजरात दौरा भाग - ४ दादा हरी नि वाव (DADA HARI NI VAV)
गुजरात दौऱ्याच्या मागील तिन्ही भागात आपण अनुक्रमे पाहिलं अदालज नि वाव, मोढेरा चे सूर्यमंदिर आणि पाटण ची सुप्रसिद्ध रानी कि वाव. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पहिल्या दिवशी सगळं झाल्यामुळे आता बाकी राहिलेलं ते म्हणजे फक्त "दादा हरी नि वाव" त्यामुळे माझ्याकडे बराच वेळ शिल्लक होता. शनिवारी दिवसभर धावपळीत गेल्याने रात्री निवांत झोपून सकाळी आरामात उठायचा विचार केला पण रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी ६.३० लाच जाग आली मग उठलो आवराआवर केली आणि ऊन वाढायच्या आत निघायचं ठरवलं. ७.३० ला हॉटेलमधून बाहेर पडून बस स्टॅन्डकडे वाटचाल चालू केली. हॉटेल पासून बस स्टॅन्ड जवळच असल्याने तिथेही वेळ लागला नाही बस स्टॅन्डवर पोहोचताच समोर अहमदाबादला जाणारी बस दिसली आणि "दादा हरि नी वाव"च्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.अशा तऱ्हेने एकट्याने केलेला गुजरात दौरा यशस्वी झाला.
शेवटी एकच म्हणेन अमिताभ बच्चन बरोबर म्हणत होते कुछ दिन तो गुजारो गुजरात में...
असो अखेर ...બાય બાય ગુજરત
३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला. २५ ला सकाळी ५:४५ निघून २७ ला रात्री घरी एक मस्त रोड ट्रिप मारून आलो
सरदार वल्लभाई पुतळा :- १८२ मीटर्सचा जगातील सर्वात उंच पुतळा नुसताच उंच नाही तर बर्यापॆकी रुंद पण आहे , लार्सन आणि टुब्रो (आम्ही गमतीने ल आणि ट म्हणतो ) ह्यांनी अवघ्या ४ वर्षात उभा केला आहे , तुमच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या दुपटीहून अधिक आहे , श्री राम सुतार हे ह्या पुतळयाचे शिल्पकार आहेत , पुतळ्या खालीच म्युसिम आहे तेथे सर्व माहिती सविस्तरपणे मिळते
जवळच रेल्वे स्थानक / एअर पोर्ट :- बडोदा (गुगलला वडोदरा कळत म्हणे ) इथून नर्मदा सरोवर किंवा पुतळा साधारण पण ९० km / २ तासावर आहे.
बडोदा शहरापासून सरदार सरोवर साठी बसेस सुटतात त्या बसने ये-जा करू शकतो किंवा बडोद्याहून एखादी प्रायव्हेट गाडी बुक करून तुम्ही येऊ शकता
जर ठाणे / मुंबई हुन ड्राईव्ह करून जाणार असाल तर साधारण अंतर ४२० किमी आहे पण जायला सहजच ७/८ तास लागतात. सरदार वल्लभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा केवडिया कॉलनी राजपिपला गुजरात येथे आहे मुंबईहून जाणार असल्यास सकाळी पाच वाजता निघावे जेणेकरून दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचता येईल
राहायची सोय :- एकतर बडोद्याला राहावं आरामात किंवा मग सर्वोत्तम पण बऱ्यापैकी महाग पर्याय म्हणजे नर्मदा टेन्ट सिटी , टेंथ सिटी मध्ये राहणार थोडसं महाग असलं तरी तिथल्या सोयीसुविधा अत्यंत चांगल्या आहेत जर दिवसाचं तपमान जास्त असेल तर एअर कंडीशन चा पर्याय निवडावा अन्यथा एअर कंडिशन शिवाय चालू शकेल. टेन्ट सिटीचे वेगवेगळे पॅकेज येतात २ दिवस १ रात्र किंवा ३ दिवस आणि २ दोन रात्र , आम्ही दुसरा पर्याय निवडला एकदा टेंट सिटी रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सर्व खाणं-पिणं ब्रेकफास्ट चहा जेवण आणि साईट सीन याचा समावेश आहे , जेवणाची Quality अर्थातच उत्तम (सगळे गुजराती पदार्थ हादडुन झाले ) खूप छान आहे त्यामुळे आम्ही हाच पर्याय निवडला. टेंट सिटीमध्ये राहणार असाल तर बारा वाजता चेकिंग आहे चेक इन करून जेवण करून इतर स्पॉट बघता येतात पुतळ्याला जाण्यासाठी आणि गॅलरीचे तिकीट याची सर्व व्यवस्था टेंट सिटी व्यवस्थित पणे करते. रिसॉर्ट मधून पुतळ्यासाठी सरदार सरोवर धरणासाठी आणि आजूबाजूचे इतर छोटे-मोठे स्पॉट बघण्यासाठी बसेस आहेत या बसेस एअरकंडीशन आहेत तसेच रिसॉर्टचा एक गाईड तुमच्याबरोबर येतो आणि सर्व माहिती देतो पुतळ्यासाठी जर viewing गॅलरी जायचं असेल तर त्याची तिकीट बुक करता येतात.
viewing गॅलरीतुन जे काही दृश्य आहे चित्तथरारक आहे , पुढे सरदार सरोवर धारण आणि भोवताल नर्मदा खोर डोळ्याचं पारणे फेडतात आणि तळ मजल्यावरून viewing गॅलरीला जाणारी लिफ्ट ३६ सेकंदात वर पोहोचवते
सरदार सरोवर आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ पास इतरही काही छोटी-मोठी सुंदर स्थळे आहेत ती पाहता येतात व्हॅली ऑफ फ्लॉवर हे एक नवीन उद्यान जे फक्त फुलांसाठी आहे ते हल्लीच उघडला आहे तसेच जवळपासच्या परिसरात एक राजवाडा आणि एक मंदिर आहे तेही छान आहे.
(Statue of Unity Visit , Sardar Sarovar Dam , Visit Rajvant Palace, Rajpipla , Shoorpaneshwar Temple , valley of flower )
https://live.ipms247.com/booking/book-rooms-narmadatentcity
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि त्याचा परिसर अत्यंत मोहक आहे पुतळ्याच्या छातीमध्ये viewing गॅलरी आहे त्या गॅलरीचे तिकीट वेगळा आहे माणशी साडेतीनशे रुपये तिकीट आहे. तसेच पुतळ्या पुतळ्यावर संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी जवळजवळ अर्धा तासाचा एक लेझर शो आयोजित केला जातो तोही अत्यंत सुंदर आहे शक्य असल्यास हा शो नक्की पाहावा. हेलिकॉप्टर चे १५ मिनिटाच्या राईडचे माणशी तीन हजार रुपये आहेत
आता रिवाजानुसार सर्व फोटो , काहीही माहिती लागल्यास व्य नि करावा
पुतळ्याचे आणि भोवतालचे काही फोटो
पुतळ्याची भव्य सावली
आम्ही इवलुसे
लेझर शो क्षणचित्रे
टेन्ट सिटी
शनिवार / रविवार लिफ्ट साठी खुप लांब रांग असते असे ऐकून आहे. (मी शुक्रवारी गेलो होतो ) दोन तास लागु शकतात. रांगेत बसण्याची काही सोय नाही.
तसेच पुतळ्याच्या आवारात शिरण्यापूर्वी दोनदा सुरक्षातपासणी होते. (पुन्हा रांग).
कोणतेही खाण्याचे पदार्थ आत नेउ देत नाहीत. सुरक्षातपासणीत फेकून द्यावे लागते.
फूडकोर्ट आहे.
ऑनलाईन तिकिट काढावे.( एक रांग कमी !)
एक्सप्रेस तिकिट काढल्यास कोणतीही रांग नाही. १००० रु -मोठे, मुले समान दर.
शनिवार , रविवार शक्यतो टाळावेत , सोमवारी बंद असतो आणि मंगळवारी सोमवारी बंद असल्याने थोडी गर्दी जास्त असतात
पुतळा शक्यतो सकाळी दहा पर्यंत बघून घ्यावा जेणेकरून नंतर ऊन आणि वाढलेली गर्दी ह्याचा फटका बसणार नाही
तुम्हाला एकुण खर्च किति आला?
कार ने जाऊन येऊन , टेन्ट सिटी साठी चौघांचे मिळून २५ हजार रुपये , बडोद्याहून जाऊन एक दिवसात पाहिलं तर अर्ध्याहून कमी होतील
धन्यवाद माझीही शॅम्पेन. आपला लेख वाचून खूपच चांगली माहिती मिळाली आणि लगेच जाऊनही आले.
मुंबई सेन्ट्रलहून रात्री साडे अकराच्या गाडीने निघालो. बडोद्याला सकाळी साडे सहाला पोहचलो. स्टेशन बाहेरच चहा घेतला व टेन्ट सिटीसाठी सात आसनी गाडी केली. (२३००+५०० कुबेर मंदिरासाठी. यात परतीचा प्रवास नाही). कुबेर मंदिराला भेट देऊन अकरा वाजता टेन्ट सिटीला पोहचलो. एक रात्र व दोन दिवसाच्या सहलीचे बुकिंग अगोदरच केलेले होते. लगेच रूमचा ताबा घेतला.
काही गोष्टी सोडल्या तर माझीही शॅम्पेन यांनी वर्णन केल्याप्रमाणेच सर्व सहल झाली. आम्ही दोन तंबू बुक केलेले होते. दोघांचाही अनुभव वेगवेगळा. एका तंबूत राहिलेल्या लोकांना तेथे राहणे खूपच आवडले. सगळ्या अडचणी मात्र माझ्याच तंबूत होत्या. ए सी बंद पडल्याने दुपारच्या ३८ डिग्री तापमानात तंबूत भाजून निघत होतो शॉवरला पाणी येत नव्हते. संडासचा फ्लश काम करत नव्हता.
तक्रार केल्यावर एकेक तंत्रज्ञ तंबूत येऊन खूप काम केल्यासारखे दाखवत होता आणि आम्ही मात्र तंबूच्या बाहेर झाडाखाली सावलीला. तीन वाजता बाहेर फिरायला जायची वेळ झाली तरी ए सी चे काम झालेच नाही. संध्याकाळी परत येऊ तोपर्यंत सर्व ठीकठाक झालेले असेल अशी मॅनेजरने खात्री दिली. फिरून आलो. रिसेप्शनलाच मॅनेजरने सर्व हसून स्वागत केले व सर्व काही व्यवस्थित झाल्याचे सांगितले. रूमवर जाऊन बघितले तर ए सी चालू आहे पण फक्त हवेचा झोत येतो आहे पण थंड होतच नाही. परत आरडा ओरड , परत तीच दुरुस्ती करणाऱ्यांची धावपळ. काम झालेच नाही. संध्याकाळी सात वाजता आम्हाला दुसरा तंबू दिला गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता तंबू सोडायचा असला तरी उद्या संध्याकाळपर्यंत येथेच रहा, दुपारच्या जेवणाचे कूपनही फुकट देतो असे सांगून मॅनेजरने स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला बडोद्याहून दुपारी साडे चारची गाडी पकडायची होती त्यामुळे आम्ही सकाळीच तंबू सोडला.
थोडक्यात :
१. टेन्ट सिटी छानच आहे पण अतिशय महाग आहे.
२. देखभाल-दुरुस्ती व्यवस्था अतिशय खराब.
३. पुतळा बघण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी शनिवार, रविवार टाळावा (आम्ही बुधवार निवडला
होता. रांग नव्हतीच)
४. या भागात उन्हाचा तडाखा खूपच जाणवतो त्यामुळे उन्हाळ्यात पुतळा व टेंट सिटी सहल शक्यतो टाळावी.
टेन्ट सिटीत तंबूचे तीन प्रकार आहेत
१. स्टॅंडर्ड २. डिलक्स ३. प्रिमिअम व तीनही प्रकारात ए सी व नॉन ए सी.
याबद्दलही एक मुद्दा सांगावासा वाटतो.
तंबू कुठलाही घेतला तरी सर्व सुविधा जसे जेवण, बघण्याची ठिकाणे, रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम, बस सेवा वगैरे संगळ्यांसाठी एकच आहे. बदलते ते फक्त तंबूचे क्षेत्रफळ. त्यामुळे प्रिमिअम तंबू घेऊन आपण जास्त काही वेगळे अनुभवत नाही (स्वानुभव). उगाच प्रिमिअमच्या मागे लागून खर्च वाढवण्यात काही अर्थ नाही.
आम्ही सहा चुलत भावंडं बायकांसहित असे १२ जण एक हेक्झा आणि एक सफारी अशा दोन गाड्यांनि २२ फेब्रुवारीला बडोद्याला गेलो. मुंबईतून हे अंतर ४०० किमीच्या आसपास आहे. रस्ता अप्रतिम आहे परंतु ट्रकची वर्दळ प्रचंड प्रमाणात आहे. ट्रक ड्रॉयव्हरना अजिबात शिस्त नसल्याने सारखे त्यानच्या पुढे जाण्यासाठी या लेनमधून त्या लेनमध्ये सारखे नागमोडी जावे लागते. त्यामुळे प्रवासाला ८ तास लागतात (त्यात मधला नाष्टा जेवणाचा वेळ गृहीत नाही).
२२ फेब्रुवारीला बडोद्याला हॉटेलात मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी तेथून एकात्मतेच्या पुतळ्याला गेलो हे ९० किमी सुद्धा रस्ता उत्कृष्टच आहे. तेथे आपली गाडी पार्क करून त्यांच्या बसनेच सर्वत्र फिरलो. सर्वांचे १००० रूपयांचें तिकीट अगोदरच काढलेले होते त्यामुळे कुठेही रांगेत उभे राहावे लागले नाही. आपण तेथे रांगेत उभे राहून ३५० रुपयांचे तिकीट काढू शकता. दोन्हीच्या सुविधांत रांगेत उभे राहावे लागते एवढे सोडले तर काहीच फरक नाही.
प्रत्यक्ष पुतळा लाम्बपासूनच दिसू लागतो परंतु प्रत्यक्ष जवळ गेल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना येते. हा पुतळा फोटोत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
हा पुतळा त्यांच्या उत्तुंग प्रतिमेला साजेसा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव फोटोत अजिबात पकडता येत नाहीत.
अशी भावना मला प्रथम फक्त ताज महाल पाहताना झाली होती. फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही.
स्वच्छता कमालीची आहे. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी अतिशय स्वच्छ अशी स्वच्छतागृहे जागोजागी निःशुल्क आहेत. त्यामुळे विशेषतः स्त्रियांची अजिबात कुचंबणा होत नाही.
आपण भरतो त्याचे पैशात तेथे असलेल्या फुलांची बाग आणि धरणाची सहल अंतर्भूत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या पातळीचे हे स्थळ आहे असे असूनही तेथे असलेल्या फूड मॉल मध्ये सर्व तर्हेचे उत्तम पदार्थ सर्वाधिक किरकोळ किमतीलाच मिळतात (MRP). म्हणजे थंड पाण्याची बाटली सुद्धा १५ रुपयालाच मिळते किंवा समोसा ४० रुपये लाच मिळतो. एवढे मोठे पर्यटन स्थळ असूनही मॉल सारखे २०० रुपये पॉप कॉर्न आणि ९० रुपयाला पेप्सी असा चावटपणा नाही. याशिवाय तेथे स्थानिक मिळणारी फळे, बोरे, चिंचा, मेवे, खारे दाणे हे सुद्धा मुबलक मिळते.
कुठेही आपल्याला लुटण्यात आले आहे अशी भावना अजिबात येत नाही.
एकंदर -- आंतर राष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून ताजमहालसारखे केवळ एकात्मतेचा पुतळा हे पर्यटन स्थळ भेट देण्याच्या नक्कीच लायकीचे आहे.
परंतु एका दिशेने ४०० किमी चा प्रवास थोडा जास्त होतो आणि जाऊन येउन तुमचे दोन दिवस त्यात जातात. या पेक्षा उत्तम म्हणजे शताब्दी एक्स्प्रेसने सकाळी ६ २५ ला मुंबई सेंट्रल ला बसलात ( किंवा बोरिवली ला ०७.००) तर भरूच ला १०.२५ ला पोटातले पाणी न हलता नाष्ट्यासकट पोचता.माणशी तिकीट ७२५ रुपये. भरूच पासून हे अंतर ९० किमी च आहे तेथून तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा सरकारी बसने जाऊ शकता. परत येताना दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी निवांतपणे येऊ शकता.
मी सुद्धा तुमचा लेख वाचून जाऊन आले ,तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला . शनिवारी औगस्ट क्रांति ने रात्री बड़ोदयाला पोचलो , बडोदयाला रहिलो , ,7 आसनी गाडीने पुतळा पहायला गेलो , दुपारी 1ला पोचलो ,रस्ते अगदी गुळगुळित , पूर्वी लालू म्हणाले होते -हेमामलिनीचे गाल, ते उगिचच आठवले , आम्ही आधी तिकीट काढले ,गर्दी चिक्कार रविवार असल्यामुळे तरीही अर्ध्या तासात तिकीट मिळालि ,मग आम्ही टेंबे स्वामी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , जवळच आहे , नंतर 3 वाजता परत आलो ,इथुन त्यांच्या ए सी बस मधुन प्रवास ,आम्हाला लेझर शो पहायचा होता म्हणून आम्ही आधी सरदार सरोवर ,नंतर valley of flower आणि मग 4 वाजे पर्यंत statue of Unity असा उलटा प्रवास केला .त्यामुळे प्रवेश रांग बरीचशी ओसरली होती , पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे एक्सप्रेस तिकीट साठी direct entry नव्हती, आम्ही साधे तिकीट काढले होते पण एक्सप्रेस तिकीट वाले वाद घालत होते ,एक्सप्रेस तिकीट चा फायदा फक्त viewing gallery ला होतो ,तिथे त्याना वेगळी रांग होती .
-------------प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
अगदी सहमत ,
मस्जिद और मिनारोंका शहर : चंपानेर
सुमारे २ महिने पहिलेपासून आरक्षण केल्यामुळे जागेचा काही प्रश्न नव्हता. आमचा प्रवास सुरु झाला तो रविवारी मध्यरात्री १२.४० च्या डेहराडून एक्सप्रेसने. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. आम्ही सगळे आधी बोरिवलीस्टेशन वर भेटलो. मी, अजय, वीणा, श्रेया , प्राजक्ता आणि अमित. सगळ्यांची तोंडओळख झाली. चांगली मैत्री व्हायला ती सुद्धा पुरेशी होती कारण पुढचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच काढायचा होता.
झालं तर मग सुमारे साडेबाराच्या सुमारास गाडीत बसून मस्त झोप काढून सकाळी ८ वाजता चंपानेर स्टेशनवर उतरलो. चंपानेर हे स्टेशन निर्जन लोकवस्तीतील रेल्वे स्टेशन. मोजून १० माणसंसुद्धा नसतील स्टेशनवर. वेळ कमी असल्यामुळे उतरल्यावर रिक्षावाल्याची वाट बघेपर्यंत चहा नाश्ता करून घेतला तोपर्यंत रिक्षापण आली दोन रिक्षा सांगून पण रिक्षावाल्याने एकच रिक्षा आणली. मग काय ऍडजस्ट करून आम्ही ६ जण एकाच रिक्षेत बसलो आणि मग त्या रिक्षेची बैलगाडी कधी झाली हे कळलं सुद्धा नाही. फक्त गुजरातचे रस्ते चांगले असल्याकारणाने कोणाला त्रास जाणवला नाही.
रिक्षात बसून अजयने गुगल मॅप चालू करून आम्हाला आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंची ओळख करून दिली. बरीचशी ठिकाणे आम्ही रिक्षातूनच पहिली. ९.२० च्या सुमारास आम्ही आमच्या पहिल्या ठिकणी पोहोचलो ते म्हणजे "शहर की मस्जिद".

आतमध्ये हवा व उत्तम प्रकाश येण्यासाठी दोन्ही बाजूला दोन झरोके आहेत. मशिदीच्या आतमध्ये एकसारख्या असणाऱ्या खूप साऱ्या कमानी व मध्यभागी उत्तम नक्षीकाम असणारे घुमट आहे.

सुमारे २५ मिनिटांचा वेळ घेऊन आम्ही ९.४५ ला तिथून काढता पाय घेतला व आमचं मुख्य लक्ष्य असणाऱ्या जामा मस्जिदकडे वाटचाल सुरू केली. पाच मिनिटाच्या अंतरावर असलेली ही मस्जिद मुस्लिम स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

मशिदीच्या आतमध्ये प्रशस्त वावर असून दोन्ही बाजूला खिडक्या आहेत मशिदीच्या वरील बाजूस उत्तम कलाकुसर असलेले नक्षीकाम असून बाहेरील बाजूस राजस्थानी राजवाड्यासारख्या खिडक्या आहेत.









रण आॅफ कच्छ ( प्रवास दैनंदिनी)
२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.
अचानक ध्यानीमनी नसताना ठरलेली ही ट्रीप!
त्याचं असं झालं पिंपळदला असल्याने माझ्याशी संपर्क न झाल्यामुळे शोभा/वंदना (बहीण) व तिच्या यजमानांनी एका प्रवासी कंपनी बरोबर जायचं ठरवलं 'रण आॅफ कच्छ' ! हो, तेच ते ! ज्याची जाहिरात अमिताभ बच्चन करतो ना तेच. माझी जी मोठ्ठी बकेट लिस्ट आहे ना त्यात हिमालया नंतर दुसर्या क्रमांकावर असलेलं हे स्थान! हं तर त्या प्रवासी कंपनीवाल्याकडे दोन जागा शिल्लक असल्याचा निरोप आला तिला. मी ही नागपूरला परतले होते. तिने आम्हाला विचारलं पण इतक्या वेळेवर रेल्वेचं आरक्षण मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती म्हणून आधी फ्लाईटची तिकीट बघितली पण ती काहीच्या काही महाग! टूर तीस तारखेला अहमदाबादहून सुरू होणारे पण एकोणतीसच्या कुठल्याही गाडीचं आरक्षण शिल्लक नव्हतं. फक्त सत्तावीसच्या संत्रागाच्छी राजकोट स्पेशल ट्रेनमध्ये मात्र अडीचशे तिकीटं शिल्लक होती. पण परतीची स्लीपर क्लासची मिळत होती . ती आधी तर काढलीच व त्याचसोबत एसीची पण काढून ठेवली. अश्याप्रकारे रेल्वेला आम्ही नियमीत देणगी देत असतो smile दोन दिवस नंतर न राहता आधी राहू निताकडे (चुलत बहीण)असा विचार करून सत्तावीसची तिकीटं नंतर काढली अन् दोन दिवसांनी गाडीत बसलोही smile
नीताचं घर मणीनगर स्टेशनपासून जवळ, पण तिथे गाडी थांबत नाही पण काही कारणाने. म्हणजे सिग्नल वैगेरे नाही मिळाला आणि थांबली तर आम्ही उतरण्याच्या तयारीने दाराशी आलो. गाडी हळू झाली पण थांबली नाही. थोडं पुढे जाऊन थांबली अन् पब्लिक उतरू लागलेलं पाहून आम्ही पण उतरलो... थ्रील ! एडवेंचर ! रिक्शा करुन घरी पोचलो.
काकूने गरमागरम मेथीचे गोटे म्हणजेच भजी नाश्त्याला केली ती इतकी तोंपासू होती की फोटो काढायला विसरले. रात्र थोडी सोंग फार व पोट लहान! मनसोक्त गप्पा मारून आधीच ठरवलेल्या प्रोग्रामप्रमाणे इथलं स्पेशल काठियावाडी जेवायला गेलो. पंजाबी मेन्युला काट मारून स्थानिक जेवण मागवलं. उंधियो, भरीत, तुरिया पात्रानु शाक, खिचडी -कढी ! एकूण गुजराती गोडबोले, दिलदार व आतथ्यशील. ताकाचा मसाला आवडल्याचे सांगतात शंभरग्रॅम मसाल्याची पुडी हातात दिली. काॅलेज बाॅय माधव आम्हा बायकांमध्ये मस्त एन्जाॅय करत होता, कौतुक वाटलं.



घरी आल्यावर आराम व गप्पांत रात्र केव्हा झाली कळलेच नाही. जेवायचा प्रश्नच नव्हता . एकादशी दुप्पट खाशी! दुसर्या दिवशी एकादशी तर करत नाही पण दुप्पट खादाडी (रात्रीची व सकाळची)मात्र केली आदल्या दिवशी!
नीता सख्खी चुलत बहीण! बर्याच वर्षांनी नीताला प्रत्यक्षात भेटत होते. किती बोलू न बोलू झालं. ती एकेक तिची फाईट सांगत होती अन् मी तिच्याकडे थक्क होऊन पहात राहिले. कॅन्सर सर्व्हायवर नीता म्हणजे मूर्तिमंत सकारात्मकता! पंधरा वर्षांपूर्वी केमो, रेडीएशन करून दहा वर्षे व्यवस्थित गेली. नुसती व्यवस्थितच नाही तर एक उद्योगिनी उदयाला येत होती. सोयाबीनचे प्रोटीन रिच विविध टीकाऊ पदार्थ, सोया पफ्स, प्रोटीन पावडर, चटपटीत पूड चटणी असे करून विकायची. कामाला पाचसहा जण होते. भारतभर खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात तिचा स्टाॅल असायचा.
त्यानंतर रिलॅप्स झाले. परत पाच केमो नीट पार पडले नंतर सहन झाले नाही त्यामुळे रेडीएशन घेतलेच नाही. दुर्दैव हात धुवून पाठीमागे लागले... पंधरा वर्षापासून चालू असलेला उद्योग तेव्हाच घाट्यात आला अन् व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसायात सुभाषची साथ होती व सासुबाईंचा पाठिंबा. सुभाषकडच्या सात पिढ्या गुजरातच्या मातीत व पाण्यावर वाढलेल्या ! हार मानली नाही. विम्याचं काम सुरू केलं. घसरलेली गाडी जरा रूळावर आली. अॅलोपथीच्या औषधांचा परिणाम ह्रदयावर झाला. एका नामांकित आयुर्वेदिक डाॅक्टरकडे खोपोलीत ट्रीटमेंट घेतली त्याने बराच आराम पडला. घरबसल्या म्युच्युअल फंडाचे काम करते. दोन तरूण काॅलेजमध्ये शिकणारी मुले. सुभाष अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी गेलेत. दोन म्हातार्या सासू व आई, दोन तरुण मुले असे आज आनंदाने एकमेकांना सांभाळत राहताहेत.
hareThis
२९/१/२०१८
एक उनाड सकाळ
जेशी क्रुष्ण ! जय श्री क्रुष्ण अभिवादनाने प्रसन्न सकाळ झाली. आज्यांचे प्रात:स्मरण सुरू झाले होते व एकीकडे चहाची लगबग सुरू होती. कांकरिया तलावावर माॅर्निंग वाॅकला जायचं व नाश्ता करूनच परतायचा प्लॅन माधवने ठरवला होता. गाईड, घरचा कर्ता पुरुष व आईची जबाबदारी स्वत:कडे घेत तिन्ही भूमिका समजूतदारपणे, उत्साहाने पार पाडत होता. मावशीचे अर्धो कल्लाकाने जाऊ, मी आज दौडणार नाही गुजराथी अनुवादित मराठी ऐकायला मजा येत होती. त्याला काही सुचवायला म्हटलं की त्याचं उत्तर असायचं 'वांधो नथी' ही टॅग लाईन मला फारच आवडली. मनातल्या मनात म्हणायला सुरूवात केली तर लक्षात आलं आपण उगीचच्या उगीच वांधे करत बसतो. वांधो नथी 
काॅलेजमध्ये असताना आम्ही दोघी बहिणी एकदा उन्हाळ्याच्या सुटीत अहमदाबादला आलो होतो, तेव्हा काका काकुंनी कांकरियाला नव्यानेच सुरू झालेले म्युझिकल फाऊंटन बघायला आणले होते. तेव्हा पहिल्यांदा इथली प्रसिध्द पावभाजी खाल्ली होती. पण आता पावभाजी बरोबरच प्रांतोप्रांतीच्या पंगतीला देशीविदेशी आलेले पदार्थ दिमाखाने बसले आहेत. आपणही त्यांना सामावून घेतलंय. संध्याकाळी चालू होणारे म्युझिकल फव्वारे अजूनही चालू स्थितीत आहेत. ही सगळी मजा पाहायला संध्याकाळी यायला हवं. पण गर्दीची आम्हाला सवय नसल्यामुळे सकाळी जायचा प्लॅनवर शिक्कामोर्ब केलं.
तलाव खूप स्वच्छ आहे. आरोग्य सजगता देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढल्याने सकाळीही तितकीच गर्दी होती चिल्लेपाल्ले वगळता.

कांकरिया तलाव फिरून बाहेर पडलो घटवलेल्या क्यॅलरी भरून काढायला. सुरुवात हेल्दी मिक्स वेज सूपने केली. स्ट्रीट फूड म्हणजे ट्रीट! विविध पदार्थांची रेलचेल. लिज्जत रेस्टाॅरेंटचा लाईव ढोकळा प्रसिध्द आहे पण ते नऊ वाजता उघडत त्यामुळे ढोकळा ठेल्यावरच खाल्ला. ठेल्यांची रांगच रांग आणि प्रत्येकाकडे गर्दी. आधी एक चक्कर मारून सर्वे केला अन 'खिचू' पासून आरंभ केला. बरेच पदार्थ चाखायचे म्हणून वन बाय थ्री करत बन मस्का, खिचू (तांदळाच्या उकडीवर कच्चं तेल, तिखट व मसाला भुरभुरवलेला) लाईव ढोकळा.<

IMG-20180202-WA0014.jpg
पोहे काय आपण नेहमीच खातो न, मग नको मागवायला. पण शेजारच्या ठेल्यावरचे सजवलेली पोह्याची प्लेट पाहून हो, पोहेच जरी असले तरी प्रत्येक घरची, प्रत्येक ठेल्यावरची चव वेगळी ना, आणि हो, नंतर उगीच रुखरुख नको म्हणत मागवलेच. अशी ही खादाड उनाड सकाळ!
आमच्या टूरमध्ये अहमदाबाद दर्शन होणारच होतं. त्यामुळे बाहेर गेलोच नाही. कित्येक वर्षांनी सगळ्यांना प्रत्यक्ष भेटत होतो . घरीच गप्पा मारण्यात एकमेकांच्या सहवासात घालवला. गोपी, नीताची लाॅ शिकणारी मुलगी संध्याकाळी एका ट्रीपहून परत आली तिही आमच्या गप्पात सामील झाली. तोंडी लावायला मज्जा नु लाईफचा वडापाव ! खादाडी, खादाडी अन् खादाडी continued... शेजारीच एक बेन कुर्ती विकते तिच्याकडे थोडी खरेदी केली. मनाजोगता, समाधानकारक दिवस!
३०/१/२०१८
आजपासून टूर सुरू होणार. प्रवासी कंपनी बरोबरचा हा पहिलाच अनुभव. गोपीची काॅलेजला जायची व आमची निघायची एकच वेळ अन तिच्या वाटेवरच आमचं हाॅटेल असा योग! ती सोडणार असल्याने निश्चींत झोप लागली. सकाळी 'आव जो' 'आव जो' करत सगळ्यांचा जड अंत:करणाने निरोप घेतला. साडेआठ वाजता मुंबई, पुणे बसने, ट्रेनने येणार्यांना हाॅटेल मेट्रोपोलमध्ये एकत्र यायला सांगितलं होतं.
आमच्यासाठी वंदना व जिजू सोडून बाकी अनोळखी होते. टूर कंपनीने पुण्यात सहप्रवाश्यांच गटग ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आपआपसात ओळख झालेली होती. वयोगट चाळीस ते सत्तरी अपवाद होत्या मुली सोबत आलेल्या ऐंशी वर्षाच्या आजी . दोन पुण्याची पारशी जोडपी मराठी बोलणारी, गुज्जु, मल्याळी असा मिक्स ग्रुप होता. तारांकित हाॅटेलमधला ब्रेकफास्ट करून निघालो. बसमध्ये चढायला -उतरायला एक लोखंडी स्टूल जेव्हा जेव्हा ठेवला जायचा तेव्हा तेव्हा पूर्वांचल आठवायचे. तिथल्या बसच्या पायर्या खूप उंच असतात पण त्यांना स्टूलची गरज कधी वाटतंच नाही. चटकन कोणीही हात देतं.
अहमदाबाद ते भूज नऊ दहा तासांचा प्रवास. हाॅनेस्ट रेस्टाॅरेंटची चेन हायवेवर थोड्या थोड्या अंतरावर दिसत होती. दुपारचं जेवण काठियावाडी/गुजराथी घेतलं. रस्ते चांगले पण लांबच लांब! रस्त्याच्या दोन्ही बाजूला एरंडेल, कापूस व मिठाची शेती. भूजच्या जवळ जसं जसं जात होतो तसं तसं दोन्ही बाजूला सपाट ओसाड जमीन! गांवही दूर दूर. मनुष्य वस्ती तुरळक! मध्ये मध्ये उंटांचे कळप चरत होते. टूर मालक जयेश दिल्लीहून आला होता. तिथून त्याने तोंडात टाकायला बरेच प्रकार आणले होते त्यापैकी गुडगट्टे, गुळाच्या कांड्या मस्त होत्या.
संध्याकाळी हाॅटेल हिल व्ह्यु मध्ये पोचलो. छोटीशी ओळख परेड झाली. आम्ही नागपूरकर अल्पसंख्यक पण बर्याच जणांच नागपूरशी काही ना काही कनेक्शन निघालं. भूजमध्ये शिरतांना वाटेत भुकंपाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या अर्थात सतरा वर्ष उलटली होती म्हणा!भूजमधल्या प्रसिध्द हाॅटेल 'प्रिन्स' मध्ये जेवायला गेलो. थाळीचा आकार बघूनच जीव दडपला. सगळंच जेवण छान होतं पण जिलबी और हलवे का जवाब नही. पोट भरलं पण मन नाही.
रण आॅफ कच्छ (प्रवास दैनंदिनी): ३
भूज म्हटलं की मनात येतात त्या भुकंपच्या आठवणी! इतक्या दूर राहणार्या व इतक्या वर्षांनंतरही आपल्या सारख्या लोकांना त्या आठवणी नको वाटतात. इथल्या लोकांची अवस्था त्यावेळेला काय झाली असेल विचार करून मन उदास होतं. 'रण आॅफ कच्छ' सुरू करण्यामागे तोच उद्देश होता. सर्वच गमावून बसल्यामुळे निराश, उदास झालेल्या मनाला उभारी देण्यासाठी काय करता येईल ह्या मंथनातून हा उत्सव सुरू झाला. त्यासाठी लागणारा मूळ घटक आतिथ्यशीलता त्यांच्या रक्तातच असल्याने तो उधार उसनवारीने आणायचा नव्हता व बाकीचे घटक कलासंपन्नता, सृजनशीलता, उत्सवप्रियताही असल्याने त्याला चार चाॅंद लागले. कच्छींनी ही कल्पना उचलून धरली. लोकं उत्साहाने, नव्या उमेदीने कामाला लागले. नव चैतन्य सळालंल आणि आज त्याचं मूर्त रूप आपल्याला पहायला मिळतंय. तुमचा माल उत्तम असला तरी तो लोकांपर्यंत पोचायलाही हवा न. अमिताभ बच्चन! नाम ही काफी है!
कच्छ नही देखा तो कुछ नही देखा
एखादं ठिकाण आपण बघायला जातो, फोटो काढतो, सेल्फी तर काढतोच व आपला प्रवासी धर्म निभावतो, धन्यता मानतो पण त्यापलिकडे आपण कधी डोकवत नाही. रणोत्सवाची कहाणी ऐकल्यावर प्रवासी म्हणून एक नवी दृष्टी मिळाली. कन्याकुमारीच शिला स्मारक पाहिलं ते केंद्राच काम सुरू केल्यानंतरच. त्यामुळे ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्याने त्याचा दर्जा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून न राहता तो उंचावलाय, ते बनलंय 'तीर्थस्थळ'! एका दुसर्या अर्थाने प्रसिध्द होण्यासाठी कारण ठरलं 'लगान' त्याचा उल्लेख पुढे येईलच.
तर मग आता गुज्जु स्टाईलचा व सर्वसमावेशक नाश्ता करून निघूयात भूज सफरीला. स्वामी नारायण मंदिर, प्राग व आईना महल. त्या महालांच चित्र दर्शन घ्याच पण बस मधून उतरल्या उतरल्या गायींच्या शिंगांनी लक्ष वेधून घेतलं. घेऊयात 'गीर' गाईंचं दर्शन. बाकी गाईडने सांगितलेली रोचक माहिती घरी गेल्यावर लिहीन शेपटीत. लिहीन ना! वांधो नथी! आॅल इज वेल!
स्वामी नारायण मंदिर
भुकंपाने खंडीत झालेला महालः
महालाचा दर्शनी भागः
कच्छमध्ये जाऊन दाबेली खायची नाही ?

क्रमश:
कच्छचे रण
डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुजरात राज्यातील कच्छचे रण हा क्षार प्रदेश निसर्गाचा एक असामान्य आणि देखणा आविष्कार आहे. अनेक बाबतीत वेगळा असलेला हा प्रदेश आपले अगदी स्वतंत्र भूशास्त्रीय रूप अजूनही टिकवून आहे आणि म्हणूनच भारतातील एक महत्त्वाचे भूवारसा स्थळ आहे. फार मोठ्या भूशास्त्रीय उलथापालथीतून गेल्यावरच या प्रदेशाला त्याची आजची सगळी वैशिष्ट्ये प्राप्त झाली आहेत.
कच्छच्या विस्तृत भागात कच्छचे मोठे रण (Great Rann of Kachchh) पसरले आहे. त्याच्या आग्नेयेला कच्छचे छोटे रणही (Little Rann) आहे. कच्छचे मोठे रण त्याच्या विस्तारासाठी, भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्मांसाठी एकमेव (Unique) म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किमीपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या प्रदेशात २० कोटी वर्षे जुन्या ज्युरासिक कालखंडातील अवसादी (Sedimentary) खडकांपासून तीन कोटी वर्षे जुन्या इओसीन कालखंडातील स्तरित अवसादी खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात अगणित जीवाश्मांचा अक्षरशः खच पडल्याचे आढळून येते. या प्रदेशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची पाच मीटरपेक्षाही कमी आहे. दर वर्षी इथे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडतो. याच्या उत्तरेला थरच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांचा परिसर असून दक्षिणेला बानीचा गवताळ प्रदेश आहे. बानीचा प्रदेश मूलतः उत्थापित (Uplifted) चिखल सपाटीचा (Mud flat) असून दहा हजार वर्षांपूर्वी तो पाण्याखाली होता. बानी प्रदेशाचे आजचे स्वरूप गेल्या आठ हजार वर्षांत तयार झाले आहे.
मोठ्या रणातील पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर २५ ते ०.५ कोटी वर्षांपूर्वीचे समुद्रात तयार झालेले स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचे रूप प्राप्त झाले होते. एक लाख वीस हजार पासून बारा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आंतर हिमानी (Inter glacial) काळात हे रण नळ सरोवरातून गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडले गेले होते.
आजपर्यंत अनेक वेळा कच्छ आणि गुजरातच्या इतर भागांत समुद्र पातळी कमी अधिक प्रमाणात वर खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातील गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येने आढळून येतात. या जीवाश्मांतील विविधता खरोखरच आश्चर्यकारक असून जगात आज जीवाश्मांचा खजिना असलेले ठिकाण म्हणून कच्छ आणि कच्छचे रण ओळखले जाते!
कच्छचे रण हा प्रदेश जसा हंगामी (Seasonal) क्षारयुक्त म्हणून ओळखला जातो, तसा तो वाळवंटी पाणथळ (Desert Werland) म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात पाण्याखाली बुडालेला प्रदेश कोरड्या ऋतूत पाणी कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनामुळे क्षारांनी भरून जातो आणि सगळा प्रदेश पांढऱ्या शुभ्र रंगाने आच्छादून जातो. राजस्थानातील लुनी नदीतून या रणाला अधून मधून पाण्याचा पुरवठा होत असतो. आपल्या प्रचंड मोठ्या भूशास्त्रीय प्रवासातील विविध घटनांचे अनेक पुरावे जीवाश्म, खडक आणि भूरूपांच्या स्वरूपात या क्षार प्रदेशाने जपून ठेवले आहेत.
भूशास्त्रीय काळात हा अरबी समुद्राचाच एक भाग होता. त्यानंतर या भागाचे जे उत्थापन (Uplifting) झाले, त्यामुळे तो समुद्रापासून तुटला आणि त्याचे रूपांतर एका मोठ्या पाणथळीत झाले. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत खोल पाण्यामुळे तिथे नौकानयनही (Navigation) करता येत असे. नंतरच्या काळात मात्र पाणथळीत झालेल्या गाळाच्या प्रचंड संचयनामुळे इथे चिखलाचे विस्तीर्ण सपाट भाग (Mud flat) तयार झाले. आज केवळ पावसाळ्यात हे रण पाण्याने भरून जाते आणि वर्षाच्या उर्वरित काळात क्षारांचे एक विशाल वाळवंट होते!
या प्रदेशाच्या उत्क्रांतीत वारंवार होणाऱ्या भूकंपांचे मोठे योगदान आहे. १८१९ मध्ये इथे झालेल्या विनाशकारी भूकंपात अनेक गावे नष्ट झाली होती आणि ‘अल्लाह बंड’ (Allah bund) या ९० किमी लांब आणि ४ ते ५ मीटर उंच नैसर्गिक बंधाऱ्याची निर्मितीही झाली. या बंधाऱ्यामुळे सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि कच्छच्या रणाला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही संपुष्टात आला. या भूकंपाच्या साधारणपणे ८०० वर्षे आधीही असाच मोठा भूकंप झाल्याची नोंद आहेच. त्या भूकंपानेही या प्रदेशाच्या भूरूपिकीत (Geomorphology) मोठे बदल घडवून आणले होते.
या पाणथळीच्या प्रदेशात आज लोकसंख्या खूपच कमी असली तरी मानवी वस्त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात याला खूप मोठे महत्व आहे. ६० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे जे प्राचीन मानवाचे स्थलांतर (Migration) झाले, त्या स्थलांतराच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुख्यतः कच्छच्या रणाकडेच झाले, असे मानववंशशास्त्रज्ञ स्पेन्सर वेल्स यांचे मत आहे. ख्रिस्तपूर्व २६५० ते १४५० वर्षांपूर्वी हा प्रदेश सिंधू संस्कृतीचा किंवा हराप्पा संस्कृतीचा भाग होता. मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर ढोलावीरा नावाचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान उत्खननात मिळाले आहे. धोलावीराच्या जवळच ११ किमी अंतरावर १७ ते १८ कोटी वर्षे जुन्या झाडांचे अवशेष सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्म स्वरूपात दिसतात. इथली नऊ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडे वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्मिभूत (Petrify) झालेली आहेत! या भागाला त्यामुळेच जीवाश्म उद्यानाचा (Fossil Park)चा दर्जा देण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशाचे संधारण आणि तिथल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीने, इराणमधल्या रामसर शहरात १९७१ मध्ये रामसर आंतरराष्ट्रीय कराराला (Treaty) मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार कच्छच्या रणाला २००२ मध्ये रामसर पाणथळीचा (Ramsar Wetland) दर्जा देण्यात आलाय.
आज या क्षारयुक्त पाणथळ प्रदेशात अठरा जमातींचे वास्तव्य आढळते. मात्र इथली पारिस्थितिकी आज मोठ्या वाहनांची वर्दळ, वृक्षतोड, क्षार उत्पाटन (Extraction) यासारख्या घटनांनी बाधित होऊ लागली आहे. या विस्तीर्ण पाणथळीतच अनेक छोट्या पाणथळीही दिसून येतात. वाळवंटी पाणथळ, क्षार पाणथळ, लगून पाणथळ, दलदल पाणथळ यांनी आणि त्यातील जैवविविधतेने कच्छचे रण अगदी समृद्ध झाले आहे. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना, फ्लेमिंगोंना आणि अनेक प्राण्यांच्या जमातींना या प्रदेशाने मोठाच आधार दिला आहे.
आज भारतातल्या या अशा संवेदनशील भूवारसा ठिकाणच्या जीववैविध्याला कुठलेही संरक्षण नाही आणि म्हणावी तशी ओळखही दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रदेश हे जलीय जैवविविधतेचे (Aquatic biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असे त्यांचे महत्त्वही खूप मोठे आहे. हे भूवारसा स्थान आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलले भूमी उपयोजन (Land use) यांचा खूप मोठा ताण तणाव सहन करीत आहे. परिणामी या स्थळाचा भौगोलिक विस्तार अक्रसतो आहे आणि त्याची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. या क्षारयुक्त जागेत जलजीवांची पैदास होत असते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. कच्छमधल्या या भूवारसा पर्यटन स्थळाचा अभ्यास असे दाखवतो की आपल्याकडे ह्या क्षेत्राच्या संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि सुनिश्चित यंत्रणा आजही नाही. त्यामुळे २० कोटी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आणि भूवारसा असलेल्या या स्थळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे हे नक्की.
कच्छचे रण
- स्थान संदर्भ : २३.९० उत्तर अक्षांश/६९.७४० पूर्व रेखांश
- समुद्रसपाटीपासून उंची : पाच मीटरपेक्षा कमी
- भूशास्त्रीय वय : २० कोटी वर्षे
- जवळची मोठी ठिकाणे : भूज (९० किमी), खबडा (१५ किमी), लोद्राणी (९ किमी).
कच्छचं रण म्हणजेच वाळवंट. तिथे असून असून काय वन्यजीवन असणार असं कुणालाही वाटू शकतं. पण तिथे मुक्काम ठोकल्याशिवाय तिथल्या वन्य जीवनातला जिवंतपणा अनुभवता येत नाही.
कच्छचं रण हे चकवा लावणारं. मी पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिथे गेले आणि त्या वाळवंटी प्रदेशाने असा काही चकवा लावला की मी अजूनही त्याच्या मोहातून बाहेर पडू शकले नाही. आता तुम्ही म्हणाल वाळवंटाचा आणि जंगलाचा काय संबंध? जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सहसा उभं राहतं ते दाट झाडीने भरलेलं, गूढ वातावरण असणारं, वाहते झरे असणारं असं रान. पण तुम्हाला माहिती आहे का, की ‘जंगल’ या शब्दाचा मूळ वापर संस्कृत भाषेत अशा जागांच्या वर्णनासाठी केला जायचा जिथे शुष्क, उंचसखल अशी जमीन असेल, विशेषत: गावाबाहेरील झाडीचा किंवा माळरानाचा, उपयोगाखाली नसलेला असा भाग. हा शब्द आजकाल इंग्रजीतही वापरला जातो. उदाहरणार्थ, ‘इट्स ए जंगल आऊट देअर’ म्हणजे धोकादायक, तोंड देण्यास कठीण अशी अवस्था किंवा जिथे नियमांचा आदर केला जात नाही अशी परिस्थिती. त्याचबरोबर तुम्हाला ‘जंगली’ या शब्दाचा अवमानकारक असा वापर माहिती असेलच. या शब्दाचे विश्लेषण करण्याचे कारण असे की आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या प्रकारच्या जंगलाची ओळख करून देणार आहे आणि हे जंगल त्याच्या मूळ अर्थाच्या जास्त जवळ जाणारं आहे.
काटेरी झुडपं आणि गवताने व्यापलेली शुष्क प्रदेशातील जंगलं ही माझी सर्वात आवडत्या प्रकारची जंगलं आहेत. अशी जंगलं जिथे असतात ती जमीन बऱ्याचदा टाकाऊ समजली जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे इथे शेतीही करता येत नाही आणि झाडं कमी असल्याने वन्यजीव संशोधक किंवा पर्यटकांनाही ती विशेष आकर्षति करून घेत नाहीत. पण या जंगलांचं एक वेगळंच महत्त्व असतं. माझं सध्याचं काम कच्छच्या रणात असल्यामुळे मी तिकडचंच उदाहरण घेऊन या शुष्क जंगलांची गोष्ट सांगते.
मला कच्छच्या रणात नेले ते लांडग्याने. लांडग्यांबद्दल आपण लहानपणीपासून बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात. पण खरं म्हणजे भारतीय लांडग्यांची अवस्था फारच दयनीय आहे, गोष्टीतले क्रूर लांडगे आता अस्तित्वात नाहीत. त्यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने मी दाट जंगलं सोडून या शुष्क, काटेरी आणि गवताळ भागात आले. या भागांमध्ये फिरल्यानंतर हे लक्षात आलं की खरी समस्या आपण ज्या प्रकारे माळरानांचा वापर बदलला आहे तिथे आहे. पडीक जागा वेगाने औद्योगिकीकरणासाठी, शेतीसाठी आणि शहरांच्या वाढीसाठी वापरली जातेय. त्यामुळे मेंढपाळही कमी झाले, काटेरी झुडपंही आणि त्यांच्या आधाराने राहणारे जंगली प्राणीही. त्यामुळे भारतातील सर्वात चांगल्या समजल्या जाणाऱ्या गवताळ प्रदेशातील परिस्थिती कशी आहे हे बघण्यासाठी मी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यत बन्नी नावाच्या, भारतीय सीमारेषेजवळच्या एका भागात आले. या भागाच्या उत्तरेला आणि पूर्वेला कच्छचं रण, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला कांडला, मुंद्रा, मांडवी अशी कच्छच्या आखातातील बंदरं आहेत. तिथे लांडगे फारसे सापडले नाहीतच पण या प्रदेशात जे बदल होत होते ते पाहून मी तिथेच राहून काम करायचं ठरवलं.
कच्छच्या रणात तुम्हाला पहिल्यांदा दिसते ते लख्ख असे क्षितिज. हा प्रदेश अगदी समुद्रसपाटीलगत आहे. जमिनीची सरासरी उंची फक्त दोन मीटर! उंच झाडं नाहीत, डोंगर कमी, इमारती तर नाहीतच. मग काय, कुठेही उभं राहिलं की क्षितिजापर्यंत अगदी गालिच्यासारखा पसरलेली काटेरी जमीन. इथे पाऊस अत्यंत कमी होतो, बऱ्याचदा दुष्काळाची परिस्थिती असते, त्यामुळे कमी पाण्यातही उगवणारे गवताचे विविध प्रकार आणि बाभळीसारखी काटेरी झाडं इथे चांगली वाढतात. सपाट आणि गवताने व्यापलेली अशी जमीन गाईगुरं पाळण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाते. गवतावर अवलंबून असणारे प्राणी आणि गवताळ जमीन यांचा खूप घनिष्ट संबंध असतो. असे म्हणतात की त्यांची उत्क्रांती एकत्रच झाली. बन्नीत म्हशी आणि गाई पाळतात. अनेक वर्षांची निपज या गुरांच्या जातीमागे आहे. विशेषत: इकडची कांकरेज जातीची गाय अतिशय कमी पाणी उपलब्ध असताना इथे राहू शकते. तसेच तिचा चालण्याचा वेग आणि काटकपणा प्रसिद्ध आहे. दुष्काळात जेव्हा बन्नीतील लोक गुरं घेऊन स्थलांतर करतात किंवा जेव्हा बलांना विकण्यासाठी गुजरातेतील शेतजमिनीच्या भागात नेले जाते तेव्हा या प्राण्यांना अगदी शेकडो किलोमीटर अंतर चालत चालत जावे लागते. याशिवाय दर संध्याकाळी इकडच्या गाई-म्हशी स्वत:हून चरायला बाहेर निघतात आणि पहाटे परत येतात. कारण रणाच्या रणरणत्या उन्हात रात्री चरणे जास्त उपयुक्त असते. त्यामुळे कच्छमधल्या संध्याकाळी खूप सुमधुर होतात. सूर्य लालबुंद क्षितिजावर बुडायला निघाला की हवेत लगेच गारवा येतो, सोबतीला गुरांच्या गळ्यातील घंटीचा किणकिणाट, अगदी पहाटेपेक्षाही प्रसन्न वाटावं असं वातावरण असतं.

संध्याकाळच्या वेळी इकडचे वन्यप्राणीही हालचाल करायला सुरुवात करतात. अंधार पडायला लागताच कोल्हेकुई सुरू होते. इथे खोकडाचेही दोन प्रकार पाहायला मिळतात. त्यातले एक खोकड हे फक्त वाळवंटात किंवा शुष्क गवताळ प्रदेशात सापडतं. बन्नीतले लोक या खोकडाच्या हुशारीच्या अनेक गोष्टी सांगतात. उदाहरणार्थ, खोकडाला पकडणं खूप कठीण असतं. त्याच्या मागे कोणी लागले तर खोकड आपली झुपकेदार शेपूट एका दिशेला वळवतं आणि पळून जातं दुसऱ्याच दिशेला! अगदीच पकडलं गेलं, तर खोकड पटकन त्याच्या घरात घुसतं आणि त्या घराची भुयारं एवढी लांब पसरलेली असतात की खोकड काही हातात येत नाही. या गोष्टी बऱ्यापकी प्रमाणात खऱ्या आहेत. शुष्क, झाडं नसलेल्या जंगलात बहुतेक प्राणी जमिनीखाली घरं करून राहतात. त्यात खोकडाच्या घराला सर्वात जास्त भुयारं असतात आणि ती पाच-दहा ठिकाणी वेगवेगळ्या दिशांना उघडतात! संध्याकाळ झाली की आम्ही काही लोक अशा प्राण्यांना बघायला आमची जीप अथवा दुचाकी घेऊन बाहेर पडायचो. तिकडचे रस्ते म्हणजे बऱ्याचदा फक्त मातीचे. एक डांबरी रस्ता आहे, अगदी त्यावरही गेले तरी साळींदर, साप, रानमांजर असं काहीतरी दिसायचंच.
कच्छमध्ये काही अतिशय दुर्मीळ असे पक्षी आणि सरपटणारे प्राणीही आढळतात. रण असले तरीही एकदा का पाऊस पडला की काही भागांत साठलेलं पाणी उन्हाळा येईपर्यंत वाहून जात नाही. अशा पाण्याच्या साठय़ांमध्ये हिवाळ्यात अनेक पक्षी जगातील इतर भागांमधून स्थलांतर करून इथे येतात. लांब माना असलेले, अंगावर छान गुलाबी रंगाच्या छटा असणारे अग्निपंख किंवा रोहित पक्षी तर इथे अंडी घालण्यासाठी येतात. याशिवाय फक्त गवताळ प्रदेशात किंवा वाळवंटात सापडणारे काही प्राणी, उदाहरणार्थ टिटवीचा एक अतिशय दुर्मीळ असा प्रकार आणि सरडय़ाच्या काही जाती इथे आढळतात. इथे एक शाकाहारी सरडा राहतो. अंगावर अनेक काटय़ासारखे खवले असणारा सरडा दिसायला दंतकथांमधील ड्रॅगनचीच एक इवलुशी नक्कल असावी की काय असा असतो. पण हा सरडा जवळपास पूर्णपणे गवताच्या आहारावर जगतो. एक पक्षी, ग्रे हायपोकॉलीयस, हा संपूर्ण भारतात फक्त कच्छमध्येच सापडतो. आशिया आणि आफ्रिका खंडात इतर ठिकाणी हा सापडत असला तरी त्या जातीचा पक्षी सगळ्या दुनियेत फक्त एकच आहे, त्यामुळे अनेक पक्षी निरीक्षकांची त्याला एकदा तरी बघण्याची इच्छा असते. हे सर्व प्राणीपक्षी आणि वनस्पतींचे प्रकार घनदाट जंगलात राहू शकत नाहीत, त्यांना असं खुलं रणच लागतं.

रण म्हणजे तरी काय? कच्छचा भाग हा पाकिस्तान आणि भारतामधील जमिनीचा अत्यंत समतल असा, समुद्राजवळचा प्रदेश आहे. उन्हाळ्यात अतिशय गरम, ५० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाणारं तापमान, तर उन्हाळ्यात चार डिग्रीच्या खाली जाणारा गारठा! इथल्या जमिनीत वनस्पती वाढत असल्या तरी काही भाग असा आहे जिथे मातीत मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जवळपास काहीच उगवत नाही. पाऊस पडला की नद्यांचं, पावसाचं आणि समुद्राचं पाणी मिसळून हा भाग काही महिने पाण्याखाली जातो. एकदा ते पाणी सुकलं की मागे राहते ते भेगा पडलेली, मिठाने भरलेली जमीन. अशा जमिनीला ‘रण’ म्हटलं जातं. रणांत काही बेटंही असतात. हे छोटे टेकडीसारखे भाग पाण्याखाली जात नाहीत आणि त्यामुळे या बेटांवर वनस्पती, प्राणी आणि पक्षी जास्त प्रमाणात सापडतात. भारत-पाकिस्तान सीमारेषा बनण्यापूर्वी कच्छमधील लोक या बेटांवर गुरं चारायलाही घेऊन जायचे. एवढंच नव्हे, तर हे रण पार करूनच लोक भारत-पाकिस्तान असा प्रवास करत असत. त्यात अनेक वेळा कठीण प्रसंगही येत. पाणी नीट सुकलेलं नसेल तर त्या चिखलात अडकून पडण्याच्या घटना आधी बऱ्याच झाल्या आहेत. मिठाच्या थरामुळे जमीन दिसायला कडक दिसते पण पाऊल टाकताच मिठाचा पातळ थर अगदी बर्फाच्या थरासारखा फुटतो आणि पाय किंवा गाडीची चाकं अगदी खोलवर रुतून बसतात. अजून एक म्हणजे रणात जागांची ओळख पटायला काहीच दिसत नसल्यामुळे माणसाची दिशाभूल होते. त्यात पाण्याच्या कमतरतेमुळे आधीच डोकं गरगरत असेल तर वेगवेगळे भास होतात. जिन आणि भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर त्या रणामध्येच.
मलाही काही खास अनुभव आले याचे. मी मोटरसायकल चालवायला शिकले ते इथेच. माझे पीएचडीचे गाइड, डॉ. नितीन राय हे माझ्या रणातील पहिल्या फेरीला सोबत होते. त्यांनी सांगितलं, ‘‘इथे काम करायचं असेल तर तुला माती-खड्डय़ांमधून गाडी आणि बाईक चालवणं शिकावं लागेल, नाहीतर काही खरं नाही.’’ त्या दिवशी संध्याकाळीच ते मला मोटरसायकलवर बसवून रणात घेऊन गेले. सगळीकडे धुळीचे लोट! दोन-तीन वेळा पडणारच होतो. पण त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी लवकरच शिकले आणि मग ते गेल्यावर मी स्वतंत्रपणे फिरायला लागले. बाकी वाहने फारशी मिळायची नाहीत, सार्वजनिक वाहने तर सोडाच. अशीच एकदा रात्री उशिरा मी एका गावातून काम आटोपून परत आमच्या रिसर्च सेंटरला येत होते. त्या प्रदेशात विकासाच्या कामांमुळे माणूस आणि निसर्ग यांच्यात काय बदल झाले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी मी तिथल्या स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्यायला जायचे. त्याशिवाय गवताच्या जातींची आणि उत्पादनशक्तीची नोंद करण्याचंही काम होतं. प्रवास फक्त अकरा किलोमीटरचा. पण वारा एवढा प्रचंड होता की माझी हलकी स्प्लेंडर थरथरायला लागली. मी चालवत राहिले, पण कमीतकमी पाच वेळा तरी वाटलं की मागे फिरावं. आणि मग अचानक बाजूला एक प्रकाश दिसला. मला माहीत होतं की त्या बाजूला गाव किंवा वस्ती नाही, त्यामुळे मला तो प्रकाश कुठून येतोय कळेना. त्यात आजूबाजूला माणूसही नाही. तो निळसर-पांढरा प्रकाश मात्र हवेवर वाहत चालल्यासारखा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात होता. मी शेवटी थांबण्याचे विचार बाजूला सारून सेंटरला पोहोचले.

गेल्यावर हा अनुभव आमच्याबरोबर काम करणाऱ्या बन्नीच्याच एका माणसाला सांगितला. तो कच्छी भाषेत म्हणाला, ‘‘होतं असं. कधी कधी तर अनेक दिवे दिसतात. त्यांना त्रास नाही द्यायचा. ‘चेरबत्ती’ आहे ती.’’ मग समजलं की त्या भागात असा समज आहे की या बत्तीच्या रूपाने फिरणारे आत्मे लोकांची दिशाभूल करतात. पुढे अजून एकदा मला हा प्रकाश दिसला, पण बरोबरचे स्थानिक लोक एवढे घाबरलेले होते की मलाही या प्रकाशाजवळ जाऊ नाही दिलं. मग या विषयावर वाचन केल्यावर असं लक्षात आलं की युरोपच्या काही भागातही असा प्रकाश दिसतो. वैज्ञानिकांच्या मते, ज्या जागी पाणी जास्त वेळ साठून राहतं, तिथे मातीतील काही घटक कुजल्यामुळे फॉस्फाइन, मिथेन अशा प्रकारचे वायू तयार होतात. हे वायू हवेच्या संपर्कात आल्यास प्रतिक्रिया होऊन प्रकाश तयार होऊ शकतो. काही वैज्ञानिकांनी हा प्रकाश प्रयोगशाळेतही तयार करायचा प्रयत्न केला आहे.
अशा गोष्टींमुळे माझं रणातील वास्तव्य रोमांचक झालं. पण माझ्यासाठी सगळ्यात जास्त चित्तवेधक ठरलं ते म्हणजे तिकडचं काम आणि त्यातून बाहेर आलेली माहिती. गेल्या फक्त वीस वर्षांत या भागात अनेक बदल झाले आहेत. शुष्क गवताळ प्रदेश अजूनही सरकारला पडीक वाटत असल्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात झाडं लावण्यात आली. भराभर वाढवीत म्हणून दक्षिण अमेरिकेत वाढणारी, प्रोसोपीस जुलीफ्लोरा नावाची एका काटेरी झाडाची जात निवडण्यात आली, अगदी विमानाने बी पसरवण्यात आले. हे झाड एवढं भराभर पसरलं की काही वर्षांतच गवताची ५० टक्क्य़ांहून जास्त कुरणं संपुष्टात आली. दिसायला प्रदेश आता जास्त हिरवागार दिसत असला तरी वन्यप्राणी, माणूस आणि त्यांची गुरं यांना मात्र त्याची अडचण हाऊ लागली. कांकरेज गाई तर या झाडाचा पाला खाऊन आजारी पडू लागल्या. आधीच संपुष्टात येऊ लागलेल्या कुरणांना वनखात्याने कुंपण घातलं. गवत पुरेसं नसल्यामुळे आणि दुधाची मागणी वाढल्यामुळे नसíगक चारा कमी पडू लागला. मग बाजारातून चारा विकत घेण्याची सुरुवात झाली. सामाईक जमिनी जाऊन जमिनीचे खासगी तुकडे पडू लागले. कुंपणं वाढली. आजूबाजूच्या सर्व नद्यांवर धरणं बांधण्यात आली. एकही ओहोळ मुक्त राहिला नाही. त्यामुळे, रणात येणाऱ्या गोडय़ा पाण्यावर मर्यादा आली. जमिनीतील आणि पाण्यातील मिठाचं प्रमाण वाढलं. वन्यप्राणीच नव्हे तर तिथे राहणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम होऊ लागला. पाण्यासाठी टँकर आणि नळावर अवलंबून राहायला लागले. खाऱ्या जमिनीत मिळणाऱ्या रासायनिक पदार्थाच्या अवाढव्य खाणी उभ्या राहिल्या. याशिवाय इतर अनेक बदल झाले, विशेषत तिकडच्या व्यवस्थापनात आणि पर्यावरणात. या सगळ्याचा परिणाम असा झाला की माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं तुटलं. जमिनीचा टिकाऊपणा कमी झाला आणि लोक जास्त जोखमीचं असं, पशावर अवलंबून असणारं आयुष्य जगू लागले.
भारतातील अनेक शुष्क भागातील जंगलांची परिस्थिती अशीच आहे. गवताळ प्रदेश, माळरानं वेगाने संपुष्टात येऊ लागली आहेत. आणि त्याबरोबर तिकडचा निसर्ग आणि माणूसही. तरीही आपण या अनुभवातून फारसे शिकलेलो नाही. परिस्थितीत बदल करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. तुम्ही आफ्रिकेची दृश्य पाहिली आहेत का? तिकडचे ‘सव्हाना’ प्रकारचे गवताळ भाग जिथं जिराफ, सिंह इत्यादी प्राणी राहतात हे भारतातील भागांपेक्षा फार वेगळे नाहीत. इथेही गुरं पाळणाऱ्या अनेक जमाती आहेत आणि तिथेही अशा प्रकारचे बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिकडचं व्यवस्थापन बदलायला सुरुवात केली आहे. पण भारतात अजूनही या जमिनीकडे लक्षं दिलं जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. हे मान्य की हे बदल प्रचंड वेगाने होत आहेत. त्यांचा काय परिणाम होतोय हे लक्षात यायच्या आधीच अजून एक मोठा बदल झालेला असतो. पण म्हणून त्याच चुका पुन्हा करत राहणं (की कशाला उगीच काळजी करायची या गोष्टींची असं वाटत असतं आपल्याला?) आणि त्या जमिनीवर अवलंबून असणाऱ्या लोकांनाच गुन्हेगार ठरवणं, यापलीकडे का जात नाही आपण? याउलट असाही एक प्रयत्न होतो की जुनं होतं तेच उत्तम, त्यामुळे लोकांनी (फक्त तिथे स्थानिक असणाऱ्या) आधीच्या पद्धतीने, परंपरेने चालत असलेल्या नियमानुसारच राहावं. पण सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूचा निसर्ग आणि आपली अर्थव्यवस्थाच बदलली असताना हे तरी कितपत शक्य आहे? निसर्ग आणि माणसाचं नातं जपण्याची जबाबदारी सरकारची, उद्योगपतींची आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांचीही नाही काय?
ओवी थोरात
कच्छच्या रणातील दुर्मिळ वन्यजीव
| Maharashtra Times | Updated: Dec 8, 2019, 4:00 AM
| Maharashtra Times | Updated: Dec 8, 2019, 4:00 AM
कच्छचे रण म्हणजे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सुमारे १०००० चौरस मैलाचा प्रदेश व्यापणारे लहान रण आणि मोठे रण...

कच्छचे रण म्हणजे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सुमारे १०००० चौरस मैलाचा प्रदेश व्यापणारे लहान रण आणि मोठे रण. दोन भागात विभागलेला, जैवविविधतेने समृद्ध प्रदेश आणि पर्यावरणप्रेमींसाठी महत्त्वाचे क्षेत्र. हे दूरदूर पसरलेले रण माहेरघरच आहे विविध दुर्मिळ, अतिदुर्मिळ स्थानिक आणि स्थलांतरित वन्यजीवांचे. जगातील सर्वात मोठे वन्य गाढवांचे एकमेव आश्रयस्थान आणि संवर्धन क्षेत्र म्हणूनही हे लिटिल रण प्रसिद्ध आहे. या भागात एका बाजूला वाळवंट व दुसरीकडे समुद्र. यामुळे या भागात आपल्याला विविध प्राणी आणि वनसंपत्तींचा समावेश आढळतो. जैवविविधतेने समृद्ध अशा प्रदेशात आपल्याला फ्लेमिंगो, विविध क्रेन, बदके, शिकारी पक्षी, दुर्मिळ स्थलांतरित पक्षी, त्याचप्रमाणे दुर्मिळ लांडगा, वन्य गाढवे, वाळवंटी कोल्हे, नीलगायी असे कितीतरी प्राणी दिसतात.
रणात अतिदुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी सोशेबल लॅपविंग मराठीत तिला संघचारी टिटवी, असे म्हणतात. तिला पाहण्याचा योग आला. कझाकिस्तान आणि रशियाच्या विस्तीर्ण माळरानात या पक्ष्याचे निवास्थान आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हा पक्षी भारत, आफ्रिका, पाकिस्तान आदी देशात स्थलांतर करतो. कझाकिस्तान आणि रशियामध्ये सैगा हरणांच्या आजूबाजूला असणाऱ्या अधिवासात या पक्ष्याचे निवास्थान आहे. पूर्वी मोठ्या मोठ्या थव्याने दिसणारा हा पक्षी १९६०नंतर याची संख्या ६०० ते १००० असावी अशी नोंद झाली आणि या संघचारी टिटवीचा समावेश अतिदुर्मिळ आणि संकटग्रस्त जीवांमध्ये झाला. अगदी कमी प्रमाणात दिसणारा हा आपला हिवाळी पाहुणा कच्छच्या रणात आला आहे, ही बातमी मिळाली आणि आम्हाला भल्या सकाळी पाहण्यात आला. खूप दूरवर गावातील किडे खाताना ४ पक्षी दिसले. बरच लांबून फोटोग्राफी केली. डोळे आणि डोक्यात पांढरा पट्टा डोके काळे, अंग करडे पांढरे, काटकुळे लांब काळे पाय आणि काळी चोच असा हा पक्षी याचे फोटो मिळाले. पुढील पाच दिवस मात्र रोज शोधूनही दिसला नाही.
भारतीय वन्य गाढव हा रणातील दुसरा संकटग्रस्त प्राणी. २०१४ पासून यांची संख्या थोडीफार वाढली आहे. परंतु तरीही साधारण ४८०० वन्यगाढवे असावीत, असा अंदाज आहे. पांढरा रंग आणि त्यावर सँडी पॅचेस असलेले हे प्राणी रणात कधी एकट्या दुकट्याने कधी छोट्या मोठ्या समूहात दिसतो. गवत, पाने आणि रणातील सलाइन व्हेजिटेशन आदी हे प्राणी खातात. रणामध्ये दूरपर्यंत दिसतात. चाहूल लागली की चौखूर उधळतात. परंतु, सूर्योदय किंवा सूर्यास्ताला दूरवर पसरलेल्या रणात सुंदर फोटो देतात. दूरदूर क्षितिजापर्यंत पसरलेले रण आणि अध्येमध्ये असणारी खुरटी झुडपे, त्या झुडुपात दिवसा सहसा विश्रांती घेणारे शॉर्ट ईअर्ड आऊलल अर्थात छोट्या कानाचे घुबड बरेचदा दर्शन देते. तसे हा पक्षी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस अॅक्टिव्ह असतो. परंतु शिकारही रात्रीच करतो. रणातील छोटे मोठे उंदीर घुशी हे यांचे आवडते खाणे.
हा युरोपातून येणार हिवाळी पाहुणा आहे. छोटे कान असल्यासारखा दोन टर्फ असतात. हे घुबड जेव्हा सावध होते, तेव्हा हे टर्फ दिसतात. गोलाकार चेहऱ्यावर मोठे मोठे पिवळे डोळे आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळे खास लक्ष्य वेधतात. सर्व शिकारी पक्ष्याप्रमाणे याची मादीही आकाराने नरापेक्षा मोठी असते. एकाच जोडीदाराबरोबर राहण्याकडे कल असतो. रणात येणारा महत्त्वाचा हिवाळी पाहुणा म्हणून यांची नोंद घेतली जाते.
![]()
कच्छचे रण म्हणजे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सुमारे १०००० चौरस मैलाचा प्रदेश व्यापणारे लहान रण आणि मोठे रण. दोन भागात विभागलेला, जैवविविधतेने समृद्ध प्रदेश आणि पर्यावरणप्रेमींसाठी महत्त्वाचे क्षेत्र. हे दूरदूर पसरलेले रण माहेरघरच आहे विविध दुर्मिळ, अतिदुर्मिळ स्थानिक आणि स्थलांतरित वन्यजीवांचे. जगातील सर्वात मोठे वन्य गाढवांचे एकमेव आश्रयस्थान आणि संवर्धन क्षेत्र म्हणूनही हे लिटिल रण प्रसिद्ध आहे. या भागात एका बाजूला वाळवंट व दुसरीकडे समुद्र. यामुळे या भागात आपल्याला विविध प्राणी आणि वनसंपत्तींचा समावेश आढळतो. जैवविविधतेने समृद्ध अशा प्रदेशात आपल्याला फ्लेमिंगो, विविध क्रेन, बदके, शिकारी पक्षी, दुर्मिळ स्थलांतरित पक्षी, त्याचप्रमाणे दुर्मिळ लांडगा, वन्य गाढवे, वाळवंटी कोल्हे, नीलगायी असे कितीतरी प्राणी दिसतात.
रणात अतिदुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी सोशेबल लॅपविंग मराठीत तिला संघचारी टिटवी, असे म्हणतात. तिला पाहण्याचा योग आला. कझाकिस्तान आणि रशियाच्या विस्तीर्ण माळरानात या पक्ष्याचे निवास्थान आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हा पक्षी भारत, आफ्रिका, पाकिस्तान आदी देशात स्थलांतर करतो. कझाकिस्तान आणि रशियामध्ये सैगा हरणांच्या आजूबाजूला असणाऱ्या अधिवासात या पक्ष्याचे निवास्थान आहे. पूर्वी मोठ्या मोठ्या थव्याने दिसणारा हा पक्षी १९६०नंतर याची संख्या ६०० ते १००० असावी अशी नोंद झाली आणि या संघचारी टिटवीचा समावेश अतिदुर्मिळ आणि संकटग्रस्त जीवांमध्ये झाला. अगदी कमी प्रमाणात दिसणारा हा आपला हिवाळी पाहुणा कच्छच्या रणात आला आहे, ही बातमी मिळाली आणि आम्हाला भल्या सकाळी पाहण्यात आला. खूप दूरवर गावातील किडे खाताना ४ पक्षी दिसले. बरच लांबून फोटोग्राफी केली. डोळे आणि डोक्यात पांढरा पट्टा डोके काळे, अंग करडे पांढरे, काटकुळे लांब काळे पाय आणि काळी चोच असा हा पक्षी याचे फोटो मिळाले. पुढील पाच दिवस मात्र रोज शोधूनही दिसला नाही.
भारतीय वन्य गाढव हा रणातील दुसरा संकटग्रस्त प्राणी. २०१४ पासून यांची संख्या थोडीफार वाढली आहे. परंतु तरीही साधारण ४८०० वन्यगाढवे असावीत, असा अंदाज आहे. पांढरा रंग आणि त्यावर सँडी पॅचेस असलेले हे प्राणी रणात कधी एकट्या दुकट्याने कधी छोट्या मोठ्या समूहात दिसतो. गवत, पाने आणि रणातील सलाइन व्हेजिटेशन आदी हे प्राणी खातात. रणामध्ये दूरपर्यंत दिसतात. चाहूल लागली की चौखूर उधळतात. परंतु, सूर्योदय किंवा सूर्यास्ताला दूरवर पसरलेल्या रणात सुंदर फोटो देतात. दूरदूर क्षितिजापर्यंत पसरलेले रण आणि अध्येमध्ये असणारी खुरटी झुडपे, त्या झुडुपात दिवसा सहसा विश्रांती घेणारे शॉर्ट ईअर्ड आऊलल अर्थात छोट्या कानाचे घुबड बरेचदा दर्शन देते. तसे हा पक्षी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस अॅक्टिव्ह असतो. परंतु शिकारही रात्रीच करतो. रणातील छोटे मोठे उंदीर घुशी हे यांचे आवडते खाणे.
हा युरोपातून येणार हिवाळी पाहुणा आहे. छोटे कान असल्यासारखा दोन टर्फ असतात. हे घुबड जेव्हा सावध होते, तेव्हा हे टर्फ दिसतात. गोलाकार चेहऱ्यावर मोठे मोठे पिवळे डोळे आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळे खास लक्ष्य वेधतात. सर्व शिकारी पक्ष्याप्रमाणे याची मादीही आकाराने नरापेक्षा मोठी असते. एकाच जोडीदाराबरोबर राहण्याकडे कल असतो. रणात येणारा महत्त्वाचा हिवाळी पाहुणा म्हणून यांची नोंद घेतली जाते.
नभ-धरणीचे झाले मीलन
By अनुज सुरेश खरे
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा स्वर्ग अशी अनेक वैशिष्ट्य सामावलेला भारतातील भूभाग म्हणजे कच्छचे रण. नभ धरणीचे मीलन व्हावे अशा क्षितीजाचे जिथे तिथे दर्शन घडणाऱ्या ओसाड रणात पर्यटन ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटते. पण अनेक पक्ष्यांचं नंदनवन आणि रान गाढव अर्थातच घुडखर चे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या या रणाने गुजरातच्या पर्यटनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात राज्यात स्थित या रणाचे कच्छचे छोटे रण आणि मोठे रण असे दोन भाग पडतात.
यापैकी छोट्या रणात भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. १९७२ साली निर्मिती झालेल्या हे वन्यजीव अभयारण्य सुमारे ५००० चौ. किमी. क्षेत्रफळात पसरले आहे. घुडखर च्या संरक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यात अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. घुडखरचे एकमेव आश्रयस्थान असणारे हे अभयारण्य अनेक स्थलांतरीत पक्ष्यांसाठी जणू स्वर्गच.
इथे आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये घुडखर शिवाय चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, तरस, खोकड, वाळवंटातील खोकड, कोल्हा, इ. प्राणी आढळतात. घुडखर हा इथे आढळणारा चित्तवेधक प्राणी. ‘गुजरातचे जंगली गाढव’ किंवा ‘बलुची जंगली गाढव’ म्हणूनही घुडखरला ओळखले जाते. हा प्राणी अंगापिंडाने अत्यंत मजबूत अतिशय वेगाने धावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कमी होत असलेली संख्या पाहून गुजरात सरकारने त्यांना विशेष संरक्षण दिले. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्युल १ मध्ये या प्राण्याचा समावेश करण्यात आला. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या अतिशय कमी असून हा प्राणी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे इथल्या वनविभागातर्फे या प्राण्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्राण्याला पळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन लागते. त्यांचा वेगही तशी ७० ते ८० किमी इतका जास्त असतो. ही जमीन कमी होणे हा त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इथल्या भागात मिठागरांची संख्या वाढत चालली आहे. लोकांकडून अभयारण्याच्या क्षेत्रात होत असलेले अतिक्रमण या प्राण्याच्या संख्येला मारक ठरत आहे. त्यामुळे ही मिठागरं अभयारण्याच्या बाहेर कशी जातील या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
पक्षी निरीक्षकांसाठी छोटे रण हे नंदनवनच आहे. शेकडो प्रजातींचे दुर्मिळ पक्षी एका भागात पाहायला मिळणं ही पक्षीप्रेमींसाठी मेजवानीच आहे. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ नावाचा पक्षी. माळढोक पक्ष्याच्या जातीचा हा पक्षी. हा पक्षी हिवाळ्याच्या मोसमात भारतात स्थलांतर करतो. मुख्यत्वे पाकिस्तानात याची वीण होते आणि मग हा पक्षी त्यानंतर रणात दाखल होतो. नेहमीच्या माळढोक पक्ष्यापेक्षा छोटा असणारा हा पक्षी निसर्गप्रेमींना छोट्या रणाकडे अक्षरशः खेचून आणतो. भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात जसे वाघ बघायला निसर्गप्रेमी जातात त्याचं ओढीने ते छोट्या रणात ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ हा पक्षी पाहायला जातात. याशिवाय अनेक पक्षी या भागाला हिवाळ्यात भेट देतात. इथे त्यांची वीणही होते. या भागात अनेक पक्ष्यांची असंख्य घरटी आहेत. इथे नया तालाब नावाचा तलाव आहे. या तलावावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अगदी रेलचेल असते.
Lesser Whistling Duck, Bar Headed Goose, Common Shelduck, Ruddy Shelduck, Red-Crested Pochard, Common Pochard, Garganey, Gadwall, Eurasian Wigeon, Great Crested Grebe, Lesser Flamingo, Greater Flamingo, Eurasian Thick-knee, Greater Thick-knee, Great White Pelican, Sarus Crane, Demoiselle Crane, Common Crane सारखे असंख्य पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतील. Lesser Flamingo आणि Greater Flamingo यांची लक्षणीय संख्या हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. यातल्या काही जोड्या इथे रणातच वास्तव्याला आहेत. तर काही आफ्रिकेतून येतात. या पक्ष्यांची वीण मात्र इथेच होते. याशिवाय शिकारी पक्ष्यांची संख्या हेही रणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Black-wing Kite, Short-toed Eagle, Griffon Vulture, Cinereous Vulture, Indian Spotted Eagle, Greater Spotted Eagle, Imperial Eagle, Steppe Eagle, Tawny Eagle, Golden Eagle, Bonelli’s Eagle, Booted Eagle, Western Marsh Harrier, Hen Harrier, Pallid Harrier, Montagu’s harrier, Osprey, Shikra, Eurasian Sparrow hawk, Black Kite, White-eye Buzzard, Eurasian Buzzard, Long-legged Buzzard, Common Kestrel, Red-necked Falcon, Laggar Falcon, Saker Falcon, Merlin, Eurasian Hobby, Peregrine Falcon असे अनेक शिकारी पक्षी इथल्या परिसंस्थेत समतोल राखून ठेवतात. बजाना खाडी नावाचे रणातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी हे शिकारी पक्षी लक्षणीय संख्येने आहेत. या भागात असलेल्या मोकळ्या मैदानावर हे शिकारी पक्षी मोठ्या संख्येने बसलेले आढळतात. यातले काही शिकारी पक्षी खासकरून काही गरुड जातीचे पक्षी हे स्थलांतरित आणि अतिशय दुर्मिळ आहेत.
याशिवाय रात्रीचे पहारेकरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घुबडांची आणि रातव्यांची संख्याही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. Grey Nightjar, European Nightjar, Syke’s Nightjar, Indian Nightjar, Savana Nightjar या रातव्यांच्या प्रजाती तर Barn Owl, Spotted Owlet, Eurasian Eagle Owl, Rock Eagle Owl तसेच Short-eared Owl, Pallied Scops Owl सारख्या दुर्मिळ घुबडांच्या प्रजातीही आढळतात. याशिवाय Pied Avocet, Northern Wryneck, Black-rumped Woodpecker, Yellow-crowned Woodpecker, Coppersmith Barbet, Green Bee-eater, Blue-tailed Bee-eater, Blue-cheeked Bee-eater, Common Kingfisher, Pied Kingfisher, Black-capped Kingfisher, Common Woodshrike, Black Drongo सारखे अनेक प्रजातींचे पक्षी रणाचं सौदर्य वाढवतात.
मी गेल्या दहा-बारा वर्षात इथे अनेक पक्षी निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यातले दोन प्रसंग मला आवर्जून नमूद करावेसे वाटतात. बरेचसे शिकारी पक्षी रणात मोकळ्या सपाट भागात तर काही रणातील खडकाळ भागात दिसतात. एकदा आम्ही शिकारी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी खडकाळ भागाजवळ बसलो होतो. समोरचा काही भाग मोकळा सपाट होतं. इथे काही गायबगळे होते. एक गायबगळा मला निपचित पडल्यासारखा वाटला. म्हणून मी डोळ्याला दुर्बीण लावली. माझ्या लक्षात आलं की हा बहुदा जखमी झाला आहे. तेवढ्यात त्याच्या पलीकडे काहीतरी हललं. नीट निरखून पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की पलीकडे एक Peregrine Falcon बसला आहे. आणि मग सगळा प्रकार आमच्या लक्षात आला. या गायबगळ्याला Peregrine Falcon ने जखमी केलं होतं. आणि झालेल्या झटापटीनंतर थोडा दम खायला तो बाजूलाच बसला होता. त्याने आपली शिकार अचूक साधली होती. गायबगळा कोणत्याही क्षणी मरेल अशी स्थिती होती. त्याची अक्षरशः तडफड सुरु होती. त्याने एकदा उडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पहिला. पण Peregrine Falcon ने त्याला जागचं हलू दिलं नाही. तेवढ्यात आमच्या उजव्या बाजूला मला हालचाल दिसली. जवळच्या मिठागरात काम करणारी चार पाच माणसं त्याच दिशेने येत होती. समोरचा प्रसंगच असा होतं की माझं त्यावरून लक्ष विचलित झालं नव्हतं. त्यामुळे ही माणसं मला जरा उशीरानेच दिसली. त्यामुळे मला त्यांना अगोदर काहीच सांगता आलं नाही. आणि ज्या वेळी मी त्यांना पाहिलं त्यावेळी बराच उशीर झाला होता. ही माणसं गायबगळ्याच्या खूपच जवळ पोचली होती. हा समोरचा प्रसंग त्यांच्या ध्यानीमनीही नव्हता. समोरचे गायबगळे नेहमीचेच याच थाटात त्यांची चाल पुढे पडत होती. माणसं जवळ आल्यावर Peregrine Falcon एकदम दचकला आणि गायबगळ्याला सोडून तो जरासा मागे सरला. याच संधीचा फायदा त्या गायबगळ्याने उचलला आणि होता नव्हता जोर लावून जीवाच्या आकांताने त्याने हवेत झेप घेतली. Peregrine Falcon च्या हातून शिकार निसटली. तिथून निघून जाण्याशिवाय त्या बिचाऱ्याच्या हातात काही नव्हतं.
या एका छोट्या प्रसंगाने मला विचारात पाडलं. मानवी हस्तक्षेप हा रणाला असलेला खूप मोठा धोका आहे. पुरेसे खाद्य, पुरेसे पाणी आणि सुरक्षित जागा याच गोष्टी वन्यजीवांना हव्या असतात. त्याही आपण त्यांच्यापासून हिरावून घेत चाललो आहोत. या गोष्टी नसतील तर स्थलांतरित पक्षीही रणात येणार नाहीत. यावर आपल्यालाच वेळीच उपाययोजना करायला हव्यात.
दुसरा प्रसंग नुसता आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभं राहतो. इथे मेढक नावाची एक जागा आहे. अतिशय दुर्मिळ पक्षी आपल्याला या जागी हमखास बघायला मिळतो. माझ्या अगदी अलीकडच्या रणाच्या भेटीत मी या मेढकला पहिल्यांदा गेलो. हा अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणजे Greater hoopoe-lark. उडताना Common Hoopoe ची आठवण करून देणारा पक्षी म्हणून या पक्ष्याला hoopoe-larkअसं नाव पडलं. आमच्या गाईडनी मला या भेटीत हा पक्षी एकदा बघाच अशी गळ घातली. झैनाबाद या आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून मेढक खूप अंतरावर आहे. तरीही हा स्थलांतरित दुर्मिळ पक्षी पाहण्याच्या मोहिमेवर आम्ही निघालो. बरोबर मुसा आणि इक्बाल नावाचे दोन अतिशय निष्णात गाईड होते. सुरवातीला रणातून जाताना माणसं दिसत होती, मिठागरं दिसत होती. अनेक गावं आम्ही मागे टाकली. आणि त्यानंतर मात्र सर्व दिशांना रण दिसायला लागलं. माणसं नावालासुद्धा दिसत नव्हती. वस्तीची आणि रहदारीची बातच नको. आपण कोणत्या दिशेने आलो याचाही मला विसर पडायला लागला. भीतीची लहर शरीरातून एकदा वाहून गेली. दोन्ही गाईडकडे पाहून मी मनाशीच म्हटलं, “नशीब हे दोघं आपल्याबरोबर आहेत.” त्या दोघांचं आपापसात काहीतरी चालू होतं. दोघेही खुसपुसत होते. असंच थोडं पुढे गेल्यावर अचानक मुसाने गाडी थांबवली आणि माझ्याकडे मोर्चा वळवून तो म्हणाला, “साहब हम रास्ता भटक गये हैं | आगे का रास्ता हम दोनोंको याद नही आ रहा |” ते ऐकल्यावर क्षणभर मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. आळीपाळीने मी दोघांकडेही पाहिलं. माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. भीतीने शरीरातून वाहणाऱ्या रक्ताची जाणीव करून दिली. मला एकदम सरफरोश चित्रपटातला सुलतानाचा प्रसंग आठवला. चहूकडे वाळवंट आणि उंटावरच्या सुलतानचं मुंडकं उडवणारा जावेद अब्बास माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागले. मी माझ्या थरथरत्या वाणीवर ताबा ठेऊन फक्त एकच शब्द उच्चारला, “अब?” माझी एकंदर स्थिती बघता इक्बालला फार वेळ राहवलं नाही. एकदम हसून तो म्हणाला, “साहब, आप चिंता मत करो, हम मजाक कर रहे थे | हमे रास्ता मालूम हैं |” दोघांनाही खाऊ का गिळू असं मला झालं होतं. ड्रायव्हरला पुढे चलण्याची खुण इक्बालने केली आणि आम्ही पुढे निघालो. पुढच्या प्रवासात मी अनेकदा त्या दोघांकडे संशयाने पाहत होतो. या दोघांना नक्की रस्ता माहित आहे ना या संशयाने. अनेक वर्षांची ओळख आणि स्नेह असल्यामुळे हे दोघेही स्वभावाने अत्यंत गरीब आणि अतिशय विश्वासू आहेत हे मला माहित होतं.
माझ्या मनात चालू असलेली खळबळ मुसाने ओळखली. आणि तो म्हणाला, “साहब आप बिलकुल बेफिकर रहिये | हम सच में मजाक कर रहे थे |” त्याचे हे शब्द ऐकल्यावर माझ्या मनावरचा ताण कमी झाला आणि माझ्या जीवात जीव आला. आणखी थोडं पुढे गेल्यावर आम्हाला वेणूदादाचं मंदिर लागलं. हे कृष्णाचं मंदिर आहे. एवढ्या लांबवर मंदिर कुणी बांधलं आहे आणि इथे कोण येतं हेच मला समजेना. तिथे अनेक बैल मात्र दिसत होते. मुसाने मला मंदिराची माहिती दिली. हे बैल देवाला सोडलेले होते आणि इथे त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून आणखी पुढे गेल्यावर आम्हाला मेढकची टेकडी लागली. आम्ही सरळ त्या टेकडीवर गाडी घातली. इथे आम्हाला दोन hoopoe-lark बघायला मिळाले. अतिशय देखण्या, ऐटबाज पक्ष्याने आमचे सहा तासांचे प्रवासाचे श्रम आणि थरकाप उडवणारा प्रसंग आम्हाला विसरायला लावला. आमच्या परतीच्या प्रवासात मुसा आणि इक्बाल या दोघांनीही पुन्हा झाल्या प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी तो प्रसंग विसरूनही गेलो होतो. पण आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर रोम अन् रोम उभे राहतात.
गेली अनेक वर्ष मी रणात पक्षीनिरीक्षणासाठी जात आहे. मला नेहमीच भुरळ घालणाऱ्या जागांपैकी ही एक जागा. अहमदाबाद पासून सुमारे १०४ किमी अंतरावर असणाऱ्या झैनाबाद या गावात धनराज मलिक नावाच्या माणसाचे ‘डेझर्ट कोर्सर’ नावाचे हॉटेल आहे. इथे पर्यटन चालू करणाऱ्यात धनराज च्या वडिलांचा म्हणजेच शब्बीर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत उबदार झोपड्यांच्या स्वरूपातील इथल्या खोल्या आहेत. या हॉटेलच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते आणि संपूर्ण हॉटेल पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी खोल्यांची डागडुजी करावी लागते. कधी कधी तर काही खोल्या पूर्णपणे बांधाव्या लागतात. खोल्यांच्या भिंती माती आणि शेण यांनी तयार केल्या जातात. या भागातली बहुतेकशी घरं अशीच शेण आणि माती यांनी बनवली जातात. या घरांना ‘बुंगा’ म्हणतात. आमीर खानच्या लगान चित्रपटाचं चित्रीकरण रणाच्या भागातलं आहे. या चित्रपटात दाखवलेली घरं याच पद्धतीने बनवली होती. बाकी दुर्लक्षित राहिलेल्या रणाचं सौंदर्य चंदेरी दुनियेने मात्र अचूक टिपलं. रेफ्युजी, लगान, मगधीरा अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण रणात केलेलं आहे.
कासवासारख्या आकारामुळे नावं मिळालेल्या या कच्छच्या रणाचं सौंदर्य अफलातून आहे. अनेक प्रजातीचे पक्षी; सपाट मोकळी जमीन; घुडखर सारखा प्राणी; आपलं अस्तित्व दाखवून देणारे तरस, कोल्हा, खोकड यांसारखे इतर सस्तन प्राणी; hoopoe-lark सारखा दुर्मिळ पक्षी; मॅक्विन्स बस्टर्ड सारखा स्थलांतरीत माळढोक; लक्षणीय संख्येने असलेले शिकारी पक्षी आणि धनराज सारख्या पक्षीवेड्या माणसाचं आदरातिथ्य या सर्वांनी रणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या सगळ्याची सुरक्षा आपल्यावर अवलंबून आहे. या सर्वावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ ओसाड जमीन शिल्लक राहील. पौर्णिमेच्या रात्रीत तर रणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. चंद्रप्रकाशात चमकणारी पांढरी शुभ्र जमीन पहिली की असं वाटतं की चंद्रच जमिनीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी कच्छला भेट द्यायलाच हवी. अमिताभ बच्चन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “आपने कच्छ नही देखा तो कुछ नही देखा! कुछ दिन तो गुजारो गुजरात में !!
कच्छ : स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थान व पाकिस्तानला लागून असलेला गुजरात राज्यातील एक जिल्हा. भूज हे कच्छचे मुख्य ठाणे आहे. क्षेत्रफळ ४५,६१२ चौ. किमी. व लोकसंख्या ८,४९,७६९ (१९७१). पूर्व-पश्चिम सु. २५६ किमी. व उत्तर-दक्षिण ५६ ते ११२ किमी. विस्ताराच्या, या द्वीपकल्पाच्या उत्तरेस व वायव्येस कच्छच्या मोठ्या रणापलीकडे पाकिस्तानचा सिंध प्रांत, पूर्वेस मोठ्या व छोट्या रणापलीकडे गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा व सुरेंद्रनगर जिल्ह्यांचे प्रदेश, आग्नेय भागात कच्छचे छोटे रण, दक्षिणेस कच्छचे आखात व त्यापलीकडे आणि छोट्या रणापलीकडे सुरेंद्रनगर, राजकोट व जामनगर जिल्ह्यांचे प्रदेश आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. कच्छ हे नाव या द्वीपकल्पाचा कासवासारखा आकार तसेच खाऱ्या पाण्याचा प्रदेश किंवा कक्ष (संस्कृतमध्ये दलदल) याचा अपभ्रंश यांवरून पडले असावे. खाऱ्या पाण्याने बव्हंशी वेढलेल्या व मुख्य भूमीपासून जवळजवळ अलग पडलेल्या या प्रदेशाची भूमी उजाड व खडकाळ असून तिच्यावर मधूनमधून टेकड्याच्या रांगा, लहान लहान नद्यांची खोल गेलेली पात्रे, थोडी सुपीक खोरी व संपन्न गवताळ मैदाने आहेत. दक्षिण भागात वाळूच्या उंच तटामागे ३२ ते ४८ किमी. लांबीचा सुपीक जमिनीचा पट्टा आहे. टेकड्याच्या तीन रांगांत झुरा व वरार ही २८० मी. उंचीची शिखरे व धिनोधार हे ३१० मी. उंचीचे प्राचीन ज्वालामुखीचे अवशिष्ट शिखर आहे. उत्तरेकडच्या रणात पछम, चोरड, खादीर, बेला इ. बेटे आहेत. पछमच्या नैर्ऋत्येस किनाऱ्याला समांतर असा ११४ किमी. लांबीचा बन्नी नामक पट्टा कधीकधी भरतीच्या पाण्याखाली जातो. त्यावर गुरचराई करणारे गुराखी गवती झोपड्यातून वस्ती करतात. कच्छच्या नद्या पावसाळ्यात रणाला व आखाताला मिळतात. एरवी त्यांच्या पात्रांतून डबकी असतात. कच्छमधले एकमेव सरोवर पूर्व भागातल्या एका गोलाकार खोऱ्याला बांध घालून केलेले आहे. कच्छला भूकंपाचे धक्के वरचेवर बसतात. १८२९, १८४४, १८४५, १८६४ व १९५६ मध्ये भूकंप झाले. लिंब, बाभूळ, पिंपळ यांखेरीज येथे फारशी झाडे नाहीत. वन्य पशू, चित्ते, रानडुक्कर, वाळवंटी गाढव व ससा तसेच उंट, घोडे, बैल, गाई, म्हशी असून हिवाळ्यात हंसक व सारस पक्षी बाहेरून येथे येतात. तपमान किमान ७.८० से. व कमाल ४२.८० से. असून सरासरी वार्षिक पर्जन्य ३१.५ सेंमी. पडतो. किनाऱ्यावर वर्षभर व अंत:प्रदेशात उन्हाळ्याखेरीज हवा सुसह्य असते. एप्रिल, मे व ऑक्टोबर महिन्यांत धुळीची वादळे उठतात.
सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ — ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ — १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ —१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.
संदर्भ : Williams, L. F. Rushbrook, The Black Hills, London, 1958.
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा स्वर्ग अशी अनेक वैशिष्ट्य सामावलेला भारतातील भूभाग म्हणजे कच्छचे रण. नभ धरणीचे मीलन व्हावे अशा क्षितीजाचे जिथे तिथे दर्शन घडणाऱ्या ओसाड रणात पर्यटन ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटते. पण अनेक पक्ष्यांचं नंदनवन आणि रान गाढव अर्थातच घुडखर चे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या या रणाने गुजरातच्या पर्यटनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात राज्यात स्थित या रणाचे कच्छचे छोटे रण आणि मोठे रण असे दोन भाग पडतात.
यापैकी छोट्या रणात भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. १९७२ साली निर्मिती झालेल्या हे वन्यजीव अभयारण्य सुमारे ५००० चौ. किमी. क्षेत्रफळात पसरले आहे. घुडखर च्या संरक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यात अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. घुडखरचे एकमेव आश्रयस्थान असणारे हे अभयारण्य अनेक स्थलांतरीत पक्ष्यांसाठी जणू स्वर्गच.
इथे आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये घुडखर शिवाय चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, तरस, खोकड, वाळवंटातील खोकड, कोल्हा, इ. प्राणी आढळतात. घुडखर हा इथे आढळणारा चित्तवेधक प्राणी. ‘गुजरातचे जंगली गाढव’ किंवा ‘बलुची जंगली गाढव’ म्हणूनही घुडखरला ओळखले जाते. हा प्राणी अंगापिंडाने अत्यंत मजबूत अतिशय वेगाने धावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कमी होत असलेली संख्या पाहून गुजरात सरकारने त्यांना विशेष संरक्षण दिले. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्युल १ मध्ये या प्राण्याचा समावेश करण्यात आला. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या अतिशय कमी असून हा प्राणी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे इथल्या वनविभागातर्फे या प्राण्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्राण्याला पळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन लागते. त्यांचा वेगही तशी ७० ते ८० किमी इतका जास्त असतो. ही जमीन कमी होणे हा त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इथल्या भागात मिठागरांची संख्या वाढत चालली आहे. लोकांकडून अभयारण्याच्या क्षेत्रात होत असलेले अतिक्रमण या प्राण्याच्या संख्येला मारक ठरत आहे. त्यामुळे ही मिठागरं अभयारण्याच्या बाहेर कशी जातील या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
पक्षी निरीक्षकांसाठी छोटे रण हे नंदनवनच आहे. शेकडो प्रजातींचे दुर्मिळ पक्षी एका भागात पाहायला मिळणं ही पक्षीप्रेमींसाठी मेजवानीच आहे. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ नावाचा पक्षी. माळढोक पक्ष्याच्या जातीचा हा पक्षी. हा पक्षी हिवाळ्याच्या मोसमात भारतात स्थलांतर करतो. मुख्यत्वे पाकिस्तानात याची वीण होते आणि मग हा पक्षी त्यानंतर रणात दाखल होतो. नेहमीच्या माळढोक पक्ष्यापेक्षा छोटा असणारा हा पक्षी निसर्गप्रेमींना छोट्या रणाकडे अक्षरशः खेचून आणतो. भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात जसे वाघ बघायला निसर्गप्रेमी जातात त्याचं ओढीने ते छोट्या रणात ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ हा पक्षी पाहायला जातात. याशिवाय अनेक पक्षी या भागाला हिवाळ्यात भेट देतात. इथे त्यांची वीणही होते. या भागात अनेक पक्ष्यांची असंख्य घरटी आहेत. इथे नया तालाब नावाचा तलाव आहे. या तलावावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अगदी रेलचेल असते.
Lesser Whistling Duck, Bar Headed Goose, Common Shelduck, Ruddy Shelduck, Red-Crested Pochard, Common Pochard, Garganey, Gadwall, Eurasian Wigeon, Great Crested Grebe, Lesser Flamingo, Greater Flamingo, Eurasian Thick-knee, Greater Thick-knee, Great White Pelican, Sarus Crane, Demoiselle Crane, Common Crane सारखे असंख्य पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतील. Lesser Flamingo आणि Greater Flamingo यांची लक्षणीय संख्या हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. यातल्या काही जोड्या इथे रणातच वास्तव्याला आहेत. तर काही आफ्रिकेतून येतात. या पक्ष्यांची वीण मात्र इथेच होते. याशिवाय शिकारी पक्ष्यांची संख्या हेही रणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Black-wing Kite, Short-toed Eagle, Griffon Vulture, Cinereous Vulture, Indian Spotted Eagle, Greater Spotted Eagle, Imperial Eagle, Steppe Eagle, Tawny Eagle, Golden Eagle, Bonelli’s Eagle, Booted Eagle, Western Marsh Harrier, Hen Harrier, Pallid Harrier, Montagu’s harrier, Osprey, Shikra, Eurasian Sparrow hawk, Black Kite, White-eye Buzzard, Eurasian Buzzard, Long-legged Buzzard, Common Kestrel, Red-necked Falcon, Laggar Falcon, Saker Falcon, Merlin, Eurasian Hobby, Peregrine Falcon असे अनेक शिकारी पक्षी इथल्या परिसंस्थेत समतोल राखून ठेवतात. बजाना खाडी नावाचे रणातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी हे शिकारी पक्षी लक्षणीय संख्येने आहेत. या भागात असलेल्या मोकळ्या मैदानावर हे शिकारी पक्षी मोठ्या संख्येने बसलेले आढळतात. यातले काही शिकारी पक्षी खासकरून काही गरुड जातीचे पक्षी हे स्थलांतरित आणि अतिशय दुर्मिळ आहेत.
याशिवाय रात्रीचे पहारेकरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घुबडांची आणि रातव्यांची संख्याही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. Grey Nightjar, European Nightjar, Syke’s Nightjar, Indian Nightjar, Savana Nightjar या रातव्यांच्या प्रजाती तर Barn Owl, Spotted Owlet, Eurasian Eagle Owl, Rock Eagle Owl तसेच Short-eared Owl, Pallied Scops Owl सारख्या दुर्मिळ घुबडांच्या प्रजातीही आढळतात. याशिवाय Pied Avocet, Northern Wryneck, Black-rumped Woodpecker, Yellow-crowned Woodpecker, Coppersmith Barbet, Green Bee-eater, Blue-tailed Bee-eater, Blue-cheeked Bee-eater, Common Kingfisher, Pied Kingfisher, Black-capped Kingfisher, Common Woodshrike, Black Drongo सारखे अनेक प्रजातींचे पक्षी रणाचं सौदर्य वाढवतात.
मी गेल्या दहा-बारा वर्षात इथे अनेक पक्षी निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यातले दोन प्रसंग मला आवर्जून नमूद करावेसे वाटतात. बरेचसे शिकारी पक्षी रणात मोकळ्या सपाट भागात तर काही रणातील खडकाळ भागात दिसतात. एकदा आम्ही शिकारी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी खडकाळ भागाजवळ बसलो होतो. समोरचा काही भाग मोकळा सपाट होतं. इथे काही गायबगळे होते. एक गायबगळा मला निपचित पडल्यासारखा वाटला. म्हणून मी डोळ्याला दुर्बीण लावली. माझ्या लक्षात आलं की हा बहुदा जखमी झाला आहे. तेवढ्यात त्याच्या पलीकडे काहीतरी हललं. नीट निरखून पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की पलीकडे एक Peregrine Falcon बसला आहे. आणि मग सगळा प्रकार आमच्या लक्षात आला. या गायबगळ्याला Peregrine Falcon ने जखमी केलं होतं. आणि झालेल्या झटापटीनंतर थोडा दम खायला तो बाजूलाच बसला होता. त्याने आपली शिकार अचूक साधली होती. गायबगळा कोणत्याही क्षणी मरेल अशी स्थिती होती. त्याची अक्षरशः तडफड सुरु होती. त्याने एकदा उडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पहिला. पण Peregrine Falcon ने त्याला जागचं हलू दिलं नाही. तेवढ्यात आमच्या उजव्या बाजूला मला हालचाल दिसली. जवळच्या मिठागरात काम करणारी चार पाच माणसं त्याच दिशेने येत होती. समोरचा प्रसंगच असा होतं की माझं त्यावरून लक्ष विचलित झालं नव्हतं. त्यामुळे ही माणसं मला जरा उशीरानेच दिसली. त्यामुळे मला त्यांना अगोदर काहीच सांगता आलं नाही. आणि ज्या वेळी मी त्यांना पाहिलं त्यावेळी बराच उशीर झाला होता. ही माणसं गायबगळ्याच्या खूपच जवळ पोचली होती. हा समोरचा प्रसंग त्यांच्या ध्यानीमनीही नव्हता. समोरचे गायबगळे नेहमीचेच याच थाटात त्यांची चाल पुढे पडत होती. माणसं जवळ आल्यावर Peregrine Falcon एकदम दचकला आणि गायबगळ्याला सोडून तो जरासा मागे सरला. याच संधीचा फायदा त्या गायबगळ्याने उचलला आणि होता नव्हता जोर लावून जीवाच्या आकांताने त्याने हवेत झेप घेतली. Peregrine Falcon च्या हातून शिकार निसटली. तिथून निघून जाण्याशिवाय त्या बिचाऱ्याच्या हातात काही नव्हतं.
या एका छोट्या प्रसंगाने मला विचारात पाडलं. मानवी हस्तक्षेप हा रणाला असलेला खूप मोठा धोका आहे. पुरेसे खाद्य, पुरेसे पाणी आणि सुरक्षित जागा याच गोष्टी वन्यजीवांना हव्या असतात. त्याही आपण त्यांच्यापासून हिरावून घेत चाललो आहोत. या गोष्टी नसतील तर स्थलांतरित पक्षीही रणात येणार नाहीत. यावर आपल्यालाच वेळीच उपाययोजना करायला हव्यात.
दुसरा प्रसंग नुसता आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभं राहतो. इथे मेढक नावाची एक जागा आहे. अतिशय दुर्मिळ पक्षी आपल्याला या जागी हमखास बघायला मिळतो. माझ्या अगदी अलीकडच्या रणाच्या भेटीत मी या मेढकला पहिल्यांदा गेलो. हा अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणजे Greater hoopoe-lark. उडताना Common Hoopoe ची आठवण करून देणारा पक्षी म्हणून या पक्ष्याला hoopoe-larkअसं नाव पडलं. आमच्या गाईडनी मला या भेटीत हा पक्षी एकदा बघाच अशी गळ घातली. झैनाबाद या आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून मेढक खूप अंतरावर आहे. तरीही हा स्थलांतरित दुर्मिळ पक्षी पाहण्याच्या मोहिमेवर आम्ही निघालो. बरोबर मुसा आणि इक्बाल नावाचे दोन अतिशय निष्णात गाईड होते. सुरवातीला रणातून जाताना माणसं दिसत होती, मिठागरं दिसत होती. अनेक गावं आम्ही मागे टाकली. आणि त्यानंतर मात्र सर्व दिशांना रण दिसायला लागलं. माणसं नावालासुद्धा दिसत नव्हती. वस्तीची आणि रहदारीची बातच नको. आपण कोणत्या दिशेने आलो याचाही मला विसर पडायला लागला. भीतीची लहर शरीरातून एकदा वाहून गेली. दोन्ही गाईडकडे पाहून मी मनाशीच म्हटलं, “नशीब हे दोघं आपल्याबरोबर आहेत.” त्या दोघांचं आपापसात काहीतरी चालू होतं. दोघेही खुसपुसत होते. असंच थोडं पुढे गेल्यावर अचानक मुसाने गाडी थांबवली आणि माझ्याकडे मोर्चा वळवून तो म्हणाला, “साहब हम रास्ता भटक गये हैं | आगे का रास्ता हम दोनोंको याद नही आ रहा |” ते ऐकल्यावर क्षणभर मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. आळीपाळीने मी दोघांकडेही पाहिलं. माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. भीतीने शरीरातून वाहणाऱ्या रक्ताची जाणीव करून दिली. मला एकदम सरफरोश चित्रपटातला सुलतानाचा प्रसंग आठवला. चहूकडे वाळवंट आणि उंटावरच्या सुलतानचं मुंडकं उडवणारा जावेद अब्बास माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागले. मी माझ्या थरथरत्या वाणीवर ताबा ठेऊन फक्त एकच शब्द उच्चारला, “अब?” माझी एकंदर स्थिती बघता इक्बालला फार वेळ राहवलं नाही. एकदम हसून तो म्हणाला, “साहब, आप चिंता मत करो, हम मजाक कर रहे थे | हमे रास्ता मालूम हैं |” दोघांनाही खाऊ का गिळू असं मला झालं होतं. ड्रायव्हरला पुढे चलण्याची खुण इक्बालने केली आणि आम्ही पुढे निघालो. पुढच्या प्रवासात मी अनेकदा त्या दोघांकडे संशयाने पाहत होतो. या दोघांना नक्की रस्ता माहित आहे ना या संशयाने. अनेक वर्षांची ओळख आणि स्नेह असल्यामुळे हे दोघेही स्वभावाने अत्यंत गरीब आणि अतिशय विश्वासू आहेत हे मला माहित होतं.
माझ्या मनात चालू असलेली खळबळ मुसाने ओळखली. आणि तो म्हणाला, “साहब आप बिलकुल बेफिकर रहिये | हम सच में मजाक कर रहे थे |” त्याचे हे शब्द ऐकल्यावर माझ्या मनावरचा ताण कमी झाला आणि माझ्या जीवात जीव आला. आणखी थोडं पुढे गेल्यावर आम्हाला वेणूदादाचं मंदिर लागलं. हे कृष्णाचं मंदिर आहे. एवढ्या लांबवर मंदिर कुणी बांधलं आहे आणि इथे कोण येतं हेच मला समजेना. तिथे अनेक बैल मात्र दिसत होते. मुसाने मला मंदिराची माहिती दिली. हे बैल देवाला सोडलेले होते आणि इथे त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची चोख व्यवस्था ठेवलेली आहे. तिथून आणखी पुढे गेल्यावर आम्हाला मेढकची टेकडी लागली. आम्ही सरळ त्या टेकडीवर गाडी घातली. इथे आम्हाला दोन hoopoe-lark बघायला मिळाले. अतिशय देखण्या, ऐटबाज पक्ष्याने आमचे सहा तासांचे प्रवासाचे श्रम आणि थरकाप उडवणारा प्रसंग आम्हाला विसरायला लावला. आमच्या परतीच्या प्रवासात मुसा आणि इक्बाल या दोघांनीही पुन्हा झाल्या प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी तो प्रसंग विसरूनही गेलो होतो. पण आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर रोम अन् रोम उभे राहतात.
गेली अनेक वर्ष मी रणात पक्षीनिरीक्षणासाठी जात आहे. मला नेहमीच भुरळ घालणाऱ्या जागांपैकी ही एक जागा. अहमदाबाद पासून सुमारे १०४ किमी अंतरावर असणाऱ्या झैनाबाद या गावात धनराज मलिक नावाच्या माणसाचे ‘डेझर्ट कोर्सर’ नावाचे हॉटेल आहे. इथे पर्यटन चालू करणाऱ्यात धनराज च्या वडिलांचा म्हणजेच शब्बीर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत उबदार झोपड्यांच्या स्वरूपातील इथल्या खोल्या आहेत. या हॉटेलच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते आणि संपूर्ण हॉटेल पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी खोल्यांची डागडुजी करावी लागते. कधी कधी तर काही खोल्या पूर्णपणे बांधाव्या लागतात. खोल्यांच्या भिंती माती आणि शेण यांनी तयार केल्या जातात. या भागातली बहुतेकशी घरं अशीच शेण आणि माती यांनी बनवली जातात. या घरांना ‘बुंगा’ म्हणतात. आमीर खानच्या लगान चित्रपटाचं चित्रीकरण रणाच्या भागातलं आहे. या चित्रपटात दाखवलेली घरं याच पद्धतीने बनवली होती. बाकी दुर्लक्षित राहिलेल्या रणाचं सौंदर्य चंदेरी दुनियेने मात्र अचूक टिपलं. रेफ्युजी, लगान, मगधीरा अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण रणात केलेलं आहे.
कासवासारख्या आकारामुळे नावं मिळालेल्या या कच्छच्या रणाचं सौंदर्य अफलातून आहे. अनेक प्रजातीचे पक्षी; सपाट मोकळी जमीन; घुडखर सारखा प्राणी; आपलं अस्तित्व दाखवून देणारे तरस, कोल्हा, खोकड यांसारखे इतर सस्तन प्राणी; hoopoe-lark सारखा दुर्मिळ पक्षी; मॅक्विन्स बस्टर्ड सारखा स्थलांतरीत माळढोक; लक्षणीय संख्येने असलेले शिकारी पक्षी आणि धनराज सारख्या पक्षीवेड्या माणसाचं आदरातिथ्य या सर्वांनी रणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या सगळ्याची सुरक्षा आपल्यावर अवलंबून आहे. या सर्वावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ ओसाड जमीन शिल्लक राहील. पौर्णिमेच्या रात्रीत तर रणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. चंद्रप्रकाशात चमकणारी पांढरी शुभ्र जमीन पहिली की असं वाटतं की चंद्रच जमिनीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी कच्छला भेट द्यायलाच हवी. अमिताभ बच्चन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “आपने कच्छ नही देखा तो कुछ नही देखा! कुछ दिन तो गुजारो गुजरात में !!
कच्छ : स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थान व पाकिस्तानला लागून असलेला गुजरात राज्यातील एक जिल्हा. भूज हे कच्छचे मुख्य ठाणे आहे. क्षेत्रफळ ४५,६१२ चौ. किमी. व लोकसंख्या ८,४९,७६९ (१९७१). पूर्व-पश्चिम सु. २५६ किमी. व उत्तर-दक्षिण ५६ ते ११२ किमी. विस्ताराच्या, या द्वीपकल्पाच्या उत्तरेस व वायव्येस कच्छच्या मोठ्या रणापलीकडे पाकिस्तानचा सिंध प्रांत, पूर्वेस मोठ्या व छोट्या रणापलीकडे गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा व सुरेंद्रनगर जिल्ह्यांचे प्रदेश, आग्नेय भागात कच्छचे छोटे रण, दक्षिणेस कच्छचे आखात व त्यापलीकडे आणि छोट्या रणापलीकडे सुरेंद्रनगर, राजकोट व जामनगर जिल्ह्यांचे प्रदेश आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. कच्छ हे नाव या द्वीपकल्पाचा कासवासारखा आकार तसेच खाऱ्या पाण्याचा प्रदेश किंवा कक्ष (संस्कृतमध्ये दलदल) याचा अपभ्रंश यांवरून पडले असावे. खाऱ्या पाण्याने बव्हंशी वेढलेल्या व मुख्य भूमीपासून जवळजवळ अलग पडलेल्या या प्रदेशाची भूमी उजाड व खडकाळ असून तिच्यावर मधूनमधून टेकड्याच्या रांगा, लहान लहान नद्यांची खोल गेलेली पात्रे, थोडी सुपीक खोरी व संपन्न गवताळ मैदाने आहेत. दक्षिण भागात वाळूच्या उंच तटामागे ३२ ते ४८ किमी. लांबीचा सुपीक जमिनीचा पट्टा आहे. टेकड्याच्या तीन रांगांत झुरा व वरार ही २८० मी. उंचीची शिखरे व धिनोधार हे ३१० मी. उंचीचे प्राचीन ज्वालामुखीचे अवशिष्ट शिखर आहे. उत्तरेकडच्या रणात पछम, चोरड, खादीर, बेला इ. बेटे आहेत. पछमच्या नैर्ऋत्येस किनाऱ्याला समांतर असा ११४ किमी. लांबीचा बन्नी नामक पट्टा कधीकधी भरतीच्या पाण्याखाली जातो. त्यावर गुरचराई करणारे गुराखी गवती झोपड्यातून वस्ती करतात. कच्छच्या नद्या पावसाळ्यात रणाला व आखाताला मिळतात. एरवी त्यांच्या पात्रांतून डबकी असतात. कच्छमधले एकमेव सरोवर पूर्व भागातल्या एका गोलाकार खोऱ्याला बांध घालून केलेले आहे. कच्छला भूकंपाचे धक्के वरचेवर बसतात. १८२९, १८४४, १८४५, १८६४ व १९५६ मध्ये भूकंप झाले. लिंब, बाभूळ, पिंपळ यांखेरीज येथे फारशी झाडे नाहीत. वन्य पशू, चित्ते, रानडुक्कर, वाळवंटी गाढव व ससा तसेच उंट, घोडे, बैल, गाई, म्हशी असून हिवाळ्यात हंसक व सारस पक्षी बाहेरून येथे येतात. तपमान किमान ७.८० से. व कमाल ४२.८० से. असून सरासरी वार्षिक पर्जन्य ३१.५ सेंमी. पडतो. किनाऱ्यावर वर्षभर व अंत:प्रदेशात उन्हाळ्याखेरीज हवा सुसह्य असते. एप्रिल, मे व ऑक्टोबर महिन्यांत धुळीची वादळे उठतात.
सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ — ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ — १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ —१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.
संदर्भ : Williams, L. F. Rushbrook, The Black Hills, London, 1958.
कच्छच्या रणात नौकानयन / Navigation in the Rann of Kachchh
कच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा - ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो - दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. मागे १४४० तर मुंबईत ४८ हजार आहे यावरुन कच्छमध्ये किती किरकोळ आहे याची कल्पना यावी. 'कच्छचं रण' या नावानं ओळखल्या जाणार्या या जिल्ह्यातला भाग म्हणजे एक मोठं कोडंच आहे म्हणाना! 'कच्छ' ह्या शब्दाचा अर्थ आलटून-पालटून दलदलीचा आणि कोरडा होणारा भूभाग असं विकिपिडीयात म्हणलंय (http://en.wikipedia.org/wiki/Kutch_District). तर 'रण' या शब्दाचा उगम संस्कृत शब्द 'ईरिण' यातून झाला असावा ज्याचा अर्थ ओसाड प्रदेश, नापीक जमीन असा होतो. ३०० कि.मी. पूर्व-पश्चिम आणि काही ठिकाणी १५० कि.मी. दक्षिणोत्तर पसरलेला हा भूभाग समुद्रसपाटीपासून म्हणण्यापुरत्याच उंचीवर आहे. यातल्या मधल्या उंच भूभागामुळे याचे दोन भाग झाले आहेतः उत्तरेचं 'थोरलं रण' (Great Rann) - सुमारे १८००० चौ.कि.मी. आणि आग्नेय (दपू) दिशेला 'धाकटं रण' (Little Rann) - सुमारे ५००० चौ.कि.मी. कच्छ जिल्ह्याचा बराचसा भाग हे रण व्यापतात. थोरलं रण अरबी समुद्राला कोरी खाडीनं जोडलं आहे तर धाकटं रण कच्छच्या आखाताला. पावसाळ्यात रणाचा बराचसा भाग पाण्याखाली रहातो तर इतर ऋतुत (नोव्हेंबर ते मे) मात्र ते बहुधा कोरडेच असते.
पर्यटनानिमित्त या प्रदेशाला भेट देणारे बरेच असले तरी तेथे मुक्काम ठोकून रोजीरोटीची सोय करण्यासारखे या भागात विशेष काही नाहीये असं तेथील लोकसंख्येवरून वाटावं. तरी, २०११ च्या जनगणनेत या भागाची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. सोयी होत आहेत, मीठाची निर्मिती, रासायनिक उद्योग, सिमेंट, जहाज बांधणी, विद्युत निर्मिती, कांडला आणि मुंद्र्यासारखी दोन मोठी बंदरं असे उद्योग वाढताहेत तशी लोकसंख्येत भर पडतेय. पण सिंधू संस्कृतीच्या वेळी इथं काय असावं? हडप्पन वसाहत येथे बहरली होती असं त्या भागात झालेल्या उत्खननावरून समजतं. त्यावेळच्या एकूण ६१ वसाहतींचा शोध या भागात लागला आहे. यातील बर्याच वसाहती सुरुवातीच्या काळातल्या तर काही नंतरच्या काळातल्या आहेत. हडप्पन लोक प्रथम पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात वसले. नंतर ते कच्छ आणि सौराष्ट्रात पसरले. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय समजला जात असे. सिंध प्रांतातले हडप्पन लोकही शेतीच करून उदरनिर्वाह करीत असे दृष्टोत्पत्तीस आलं आहे. पण मग त्यांना इथे दलदलीच्या, नापीक जमिनीवर वस्ती का कराविशी वाटली? इथे त्यांचा उदरनिर्वाह कसा होत होता? नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात (करंट सायन्स, खंड १०५(११); २०१३; १४८५) यावर बर्याच वर्षांपासून वेगवेगळी मतं-मतांतरं नोंदली जात असल्याचं नमूद केलं आहे. हे लोक समुद्र मार्गे सौराष्ट्रातून इथं येऊन पोहोचले तर काहींच्या मते ते खुष्कीच्या मार्गानेच (म्हणजे जमिनीवरून) इथं आले अशा नोंदी असल्याचं दिसतं. अर्थात खुष्कीच्या मार्गाने ते इथं पोहोचल्याचं सांगणार्यात तेथील परिसर त्यावेळी आजच्या सारखाच होता अशा अनुमानावर असावा. परंतु यानंतर इथल्या पुराणकाळातल्या पराग कणांवरच्या संशोधनाच्या आधारानं या ठिकाणी त्यावेळी आतापेक्षा वेगळंच म्हणजे खार्या पाण्याचं पर्यावरण अस्तित्वात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधू खोर्यातले लोक कच्छ येथे जलमार्गानेच येऊन पोहोचले असण्याची शक्यता असल्याचं मत पुढे रुजलं. कच्छमध्ये त्या काळी अतिशय पुढारलेली संस्कृती बहरली होती असं पुरातत्वशास्त्रीय संशोधन नमूद करतं. जरी हडप्पा येथील संस्कृती शेती उद्योगावर अवलंबून होती असं दिसत असलं तरी कच्छमधील हडप्पन मात्र उत्तम शेत जमिनी अभावी शेतीवर अवलंबून नसणार. एका दस्तऐवजानुसार यांना हुल्लर येथून, गुजरातच्या इतर भागातून, मलबार आणि सिंधमधूनही धान्यपुरवठा होत होता. या आधारानुसार हे लोक मग इथं शेती करण्यासाठी येऊन वसले नसून नौकानयनात प्राविण्य मिळवलेले आणि व्यापारी वृत्तीचे असावेत असं अनुमान काढलं गेलं. व्यापारउदीम हाच त्यांचा व्यवसाय असावा असा अंदाज बांधला गेला. गुजरात आणि विशेषतः कच्छ हा भाग चुनखडी, अगेट, शिसं या दगड आणि धातूंच्या खाणींसाठी तेव्हापासूनच प्रसिध्द होता. सिंधमधील हडप्पाच्या वसाहतींमधल्या आणि इतरत्र सापडलेल्या चुनखडीच्या कमानी येथूनच पाठवल्या गेल्या असाव्यात असा निष्कर्ष निघतो. या कमानीचं वजन प्रत्येकी शंभर किलोच्या आसपास भरतं. अशा वजनदार वस्तू इथून जलमार्गेच वाहून नेणं त्यांना सोयीचं होत असणार असा निष्कर्ष निघतो आणि त्यांचा उदरनिर्वाह असल्या व्यापारावर होत असणार असं अनुमान काढता येतं.

आकृती १: (a) कच्छच्या रणाची सद्यस्थिती
(b) ५००० वर्षांपूर्वीच्या स्थितीची स्थलाकृती
धाकट्या रणातल्या एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी तेथील मातीचं अवसादन (sedimentation) होत होतं. त्याचं प्रमाण दर वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी १.५ ते ३ मिलीमीटर असे. तसंच या भागात, या दरम्यान कसलीही भूविवर्तनी क्रिया (tectonic activity) झालेली नाही. हे गृहीत धरलं तर असं लक्षात येतं की अगदी २००० वर्षांपूर्वीही या धाकट्या रणाची खोली समुद्रसपाटीपासून ४ मीटर तरी असायला हवी आणि हे समुद्राला जोडलं गेलेलं असल्यामुळे हा भाग वर्षभर पाण्याखाली असायला हवा. असाच अभ्यास थोरल्या रणात खदिर बेटाजवळ केला गेला आणि तेथील वार्षिक अवसादनाचं प्रमाण २५०० वर्षापूर्वीपर्यंत १.२२ मिलिमिटर असल्याचं आढळलं. याचाच अर्थ इथेही हा भाग समुद्रसपाटीपेक्षा खोलच होता आणि साहजिकच त्यातही समुद्राचं पाणी असणार असाच निघतो. कच्छचं रण त्यावेळी नौकानयनास योग्य असा भाग होता या तर्कशुध्द विचाराला पुष्टी देणार्या साधनाच्या शोधात वैज्ञानिक होते. त्यांनी मग याकरता संगणकावर कच्छच्या भागाची आज अस्तित्वात असलेल्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार एक स्थलाकृती (digital elevation model) तयार केली आणि आज्ञावली वापरुन जर हा भाग ५ मीटर कमी उंचीचा असेल तर तेथील नकाशा कसा दिसेल याची प्रतिकृती तयार केली. या स्थलाकृतींनुसार (आकृती १ (अ) आणि (ब)) असं लक्षात येतं की कच्छच्या रणात ५००० वर्षाँपूर्वी, हडप्पन वसाहत होती तेव्हा, तो अरबी समुद्राचाच एक भाग होता आणि त्यात बारमाही पाणी होतं. तसंच ऐतिहासिक तथ्य विचारात घेतलं तर असंही म्हणता येईल की हे कच्छचं रण अगदी इसवी सनाच्या सुरुवातीलाही (सुमारे २००० वर्षांपूर्वीही) समुद्राला जोडलेला पाण्याचा उथळ भाग होता आणि अगदी मध्ययुगातही (१९व्या शतकापर्यंत) त्यात बारमाही पाणी असायचं.

आकृती २: कच्छच्या किनार्यावरील हडप्पन वसाहतीं
कच्छ रणाच्या आसपास केलेल्या उत्खननातल्या हडप्पन वसाहती या रणाच्या भागात पूर्वी पाणी असताना त्याच्या दोन्ही किनार्यांवर असल्याचं आढळतं (आकृती २). पूर्वीच्या एका अभ्यासानुसार कच्छचं रण खंबाटाच्या आखाताला धाकट्या रणाच्या बाजूनी जोडलं गेलं होतं आणि त्यामुळे कच्छचं आखात, दोन्ही रणं आणि खंबाटाचं आखात यातून सोयीच्या बाजूने हडप्पन जलवाहतूक करायचे. काळाच्या ओघात तळातल्या सिंध मध्ये बरेच प्राकृतीक बदल घडत गेले. सिंधू नदीचं पात्र अनेक किलो मीटर पश्चिमेकडे सरकत गेलं आणि कालांतरानं कच्छच्या रणावर त्याचा परिणाम दिसून यायला लागला. सौराष्ट्राच्या किनार्यावर वसलेल्या हडप्पन वसाहतींचा पुरातत्व अभ्यास खंबाटाच्या आखाताच्या किनार्यावरील बदलांची नोंद करतो. या बदलांची दोन कारणं आहेतः तेथे होत असलेली भूविवर्तनी क्रिया आणि समुद्र-पातळीत होणारे बदल.
कच्छचा भूभाग भूकंपांसाठी प्रसिध्द आहे. मोठे प्राकृतीक बदल इथं घडवून आणणार्या अशा कित्येक भूकंपांची नोंद झालेली आहे. पुरातत्वशास्त्रानुसार हडप्पन काळात किमान तीन मोठे प्रलयकारी भूकंप तरी इथं झाले आहेत. इ.स.पू. २१०० वर्षांपूर्वी झालेला शेवटचा भूकंप पूर्वीच्या हडप्पन वसाहतींच्या विनाशास कारणीभूत ठरला. त्यानंतर काही दशकांनंतर हडप्पनांनी इथं पुन्हा नव्यानं वसाहती केल्या. पण या पूर्वीच्या वसाहतींच्या तुलनेत मोजक्याच होत्या आणि त्यातल्या काहीच जुन्या वसाहतींच्या जागी होत्या असं दिसतं. कारण त्यांच्यातील बर्याच जणांनी सौराष्ट्रात - त्यातल्या त्यात भूकंपांपासून कमी नुकसान करणारी जवळची जागा म्हणून - स्थलांतर केलं असावं असं तिथल्या नव्या वसाहतींवरुन अनुमान काढता येतं.
समुद्र पातळीत होणारे बदल हे दुसरे कारण. १३००० वर्षांपूर्वी जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत होती आणि ही वाढ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी स्थिरावल्याचं दिसतं. कच्छच्या रणातले पुरातत्वशास्त्रीय अभ्यास इथे बंदरांचं अस्तित्व असल्याचं सिध्द करतात. आता त्याठिकाणी केवळ ओसाड जमीन उरली आहे. त्यावेळच्या रणाच्या मध्यभागी असलेल्या बेटांच्या उत्तरेकडच्या किनार्यांची धूप झाल्याचे पुरावे आजही मिरवत आहेत. यानंतर मात्र येथील जमिनीची उंची वाढत जाऊन या भागातलं पाणी मागे हटलं.
बदल ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सतत घडत असते. काळाच्या उदरात यामुळे अनेक संस्कृती लयाला गेल्या, वसाहती नष्ट झाल्या तसंच निसर्ग नव्या रुपात नवचैतन्य घेऊन आला. कच्छचे रण याचं एक उत्तम, बोलकं उदाहरण ठरतं. बदलाचे स्वागत करण्यापलिकडे आपल्या हातात असतं तरी काय?
http://muraritapaswi.blogspot.com/2014/01/navigation-in-rann-of-kachchh.html
पर्यटनानिमित्त या प्रदेशाला भेट देणारे बरेच असले तरी तेथे मुक्काम ठोकून रोजीरोटीची सोय करण्यासारखे या भागात विशेष काही नाहीये असं तेथील लोकसंख्येवरून वाटावं. तरी, २०११ च्या जनगणनेत या भागाची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. सोयी होत आहेत, मीठाची निर्मिती, रासायनिक उद्योग, सिमेंट, जहाज बांधणी, विद्युत निर्मिती, कांडला आणि मुंद्र्यासारखी दोन मोठी बंदरं असे उद्योग वाढताहेत तशी लोकसंख्येत भर पडतेय. पण सिंधू संस्कृतीच्या वेळी इथं काय असावं? हडप्पन वसाहत येथे बहरली होती असं त्या भागात झालेल्या उत्खननावरून समजतं. त्यावेळच्या एकूण ६१ वसाहतींचा शोध या भागात लागला आहे. यातील बर्याच वसाहती सुरुवातीच्या काळातल्या तर काही नंतरच्या काळातल्या आहेत. हडप्पन लोक प्रथम पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात वसले. नंतर ते कच्छ आणि सौराष्ट्रात पसरले. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय समजला जात असे. सिंध प्रांतातले हडप्पन लोकही शेतीच करून उदरनिर्वाह करीत असे दृष्टोत्पत्तीस आलं आहे. पण मग त्यांना इथे दलदलीच्या, नापीक जमिनीवर वस्ती का कराविशी वाटली? इथे त्यांचा उदरनिर्वाह कसा होत होता? नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात (करंट सायन्स, खंड १०५(११); २०१३; १४८५) यावर बर्याच वर्षांपासून वेगवेगळी मतं-मतांतरं नोंदली जात असल्याचं नमूद केलं आहे. हे लोक समुद्र मार्गे सौराष्ट्रातून इथं येऊन पोहोचले तर काहींच्या मते ते खुष्कीच्या मार्गानेच (म्हणजे जमिनीवरून) इथं आले अशा नोंदी असल्याचं दिसतं. अर्थात खुष्कीच्या मार्गाने ते इथं पोहोचल्याचं सांगणार्यात तेथील परिसर त्यावेळी आजच्या सारखाच होता अशा अनुमानावर असावा. परंतु यानंतर इथल्या पुराणकाळातल्या पराग कणांवरच्या संशोधनाच्या आधारानं या ठिकाणी त्यावेळी आतापेक्षा वेगळंच म्हणजे खार्या पाण्याचं पर्यावरण अस्तित्वात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधू खोर्यातले लोक कच्छ येथे जलमार्गानेच येऊन पोहोचले असण्याची शक्यता असल्याचं मत पुढे रुजलं. कच्छमध्ये त्या काळी अतिशय पुढारलेली संस्कृती बहरली होती असं पुरातत्वशास्त्रीय संशोधन नमूद करतं. जरी हडप्पा येथील संस्कृती शेती उद्योगावर अवलंबून होती असं दिसत असलं तरी कच्छमधील हडप्पन मात्र उत्तम शेत जमिनी अभावी शेतीवर अवलंबून नसणार. एका दस्तऐवजानुसार यांना हुल्लर येथून, गुजरातच्या इतर भागातून, मलबार आणि सिंधमधूनही धान्यपुरवठा होत होता. या आधारानुसार हे लोक मग इथं शेती करण्यासाठी येऊन वसले नसून नौकानयनात प्राविण्य मिळवलेले आणि व्यापारी वृत्तीचे असावेत असं अनुमान काढलं गेलं. व्यापारउदीम हाच त्यांचा व्यवसाय असावा असा अंदाज बांधला गेला. गुजरात आणि विशेषतः कच्छ हा भाग चुनखडी, अगेट, शिसं या दगड आणि धातूंच्या खाणींसाठी तेव्हापासूनच प्रसिध्द होता. सिंधमधील हडप्पाच्या वसाहतींमधल्या आणि इतरत्र सापडलेल्या चुनखडीच्या कमानी येथूनच पाठवल्या गेल्या असाव्यात असा निष्कर्ष निघतो. या कमानीचं वजन प्रत्येकी शंभर किलोच्या आसपास भरतं. अशा वजनदार वस्तू इथून जलमार्गेच वाहून नेणं त्यांना सोयीचं होत असणार असा निष्कर्ष निघतो आणि त्यांचा उदरनिर्वाह असल्या व्यापारावर होत असणार असं अनुमान काढता येतं.
![]() |
| आकृती १: (a) कच्छच्या रणाची सद्यस्थिती (b) ५००० वर्षांपूर्वीच्या स्थितीची स्थलाकृती |
![]() |
| आकृती २: कच्छच्या किनार्यावरील हडप्पन वसाहतीं |
कच्छचा भूभाग भूकंपांसाठी प्रसिध्द आहे. मोठे प्राकृतीक बदल इथं घडवून आणणार्या अशा कित्येक भूकंपांची नोंद झालेली आहे. पुरातत्वशास्त्रानुसार हडप्पन काळात किमान तीन मोठे प्रलयकारी भूकंप तरी इथं झाले आहेत. इ.स.पू. २१०० वर्षांपूर्वी झालेला शेवटचा भूकंप पूर्वीच्या हडप्पन वसाहतींच्या विनाशास कारणीभूत ठरला. त्यानंतर काही दशकांनंतर हडप्पनांनी इथं पुन्हा नव्यानं वसाहती केल्या. पण या पूर्वीच्या वसाहतींच्या तुलनेत मोजक्याच होत्या आणि त्यातल्या काहीच जुन्या वसाहतींच्या जागी होत्या असं दिसतं. कारण त्यांच्यातील बर्याच जणांनी सौराष्ट्रात - त्यातल्या त्यात भूकंपांपासून कमी नुकसान करणारी जवळची जागा म्हणून - स्थलांतर केलं असावं असं तिथल्या नव्या वसाहतींवरुन अनुमान काढता येतं.
समुद्र पातळीत होणारे बदल हे दुसरे कारण. १३००० वर्षांपूर्वी जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत होती आणि ही वाढ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी स्थिरावल्याचं दिसतं. कच्छच्या रणातले पुरातत्वशास्त्रीय अभ्यास इथे बंदरांचं अस्तित्व असल्याचं सिध्द करतात. आता त्याठिकाणी केवळ ओसाड जमीन उरली आहे. त्यावेळच्या रणाच्या मध्यभागी असलेल्या बेटांच्या उत्तरेकडच्या किनार्यांची धूप झाल्याचे पुरावे आजही मिरवत आहेत. यानंतर मात्र येथील जमिनीची उंची वाढत जाऊन या भागातलं पाणी मागे हटलं.
बदल ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सतत घडत असते. काळाच्या उदरात यामुळे अनेक संस्कृती लयाला गेल्या, वसाहती नष्ट झाल्या तसंच निसर्ग नव्या रुपात नवचैतन्य घेऊन आला. कच्छचे रण याचं एक उत्तम, बोलकं उदाहरण ठरतं. बदलाचे स्वागत करण्यापलिकडे आपल्या हातात असतं तरी काय?
कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा
लाही लाही करणाऱ्या उन्हाचा सामना करत तुडूंब पावसात अदृश्य झालेलं कच्छचं वाळवंट हिवाळ्यात मिठानं उजळून निघतं. 200 वर्षांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपानं कच्छचा उत्तर पूर्वेचा भाग समुद्रसपाटीपासून वर गेला. आणि तयार झालं मिठाचं वाळवंट.
गारठा वाढल्यावर परदेशी पक्षांनी तलाव नदी नाले समुद्रावर गर्दी करावी तसंच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या विस्तीर्ण खारट वाळवंटाला अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोकांची रीघ लागते. गुजरात टुरिझमकडून इथे रण उत्सव रंगतो आणि कच्छी हस्तकला, हस्तशिल्पाला जागतिक व्यासपीठ खुलं होतं.
पण सुरूवातीलाच तुम्हाला थोडं निराश करतो, इथे यायचं असेल तर खिसा थोडासा गरम ठेवा. कारण भूजपासून 80 किमीपर्यंत धोरडो गावाजवळच्या रण उत्सवला येण्यासाठी गुजरात सरकारची एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रायव्हेट गाडीवाले तुमच्याकडे अगदी 2 हजाराची मागणी करू शकतात. बार्गेनिंग करत करत तुम्ही त्यांना फार तर हजार बाराशेपर्यंत आणू शकता. पण फक्त तिथे जाण्यासाठी 1200 रुपये देणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. शिवाय ओला उबेर किंवा तत्सम वाहतुकीचं कुठलंही अॅप इथे निकामी आहे. मोदींनी करोडो रुपये नुसता अमिताभ बच्चनला घेऊन रणच्या जाहिरातीवर खर्च केलाय. दोन बस सोडायला काही अवघड नव्हतं. एकही बस न सोडण्यामागे मोदींचा गुजराती दिमाग असू शकतो. पण सर्वसामान्य लोकांना रणला जाणं तसं अवघडंच आहे.
असो, तरीही तुम्ही हजार बाराशेची गाडी करून गेलात. किंवा रेन्टवर मिळणाऱ्या बाईक घेऊन गेलात तर भूज ते कच्छचं रण हा रस्ता तुम्ही दीड दोन तासात सहज पूर्ण करता. 100 रुपयांचा गेटपास घेऊन आत प्रवेश मिळतो. गेटपाससाठी तुम्हाला कुठलाही फोटो आयडी सोबत ठेवावा लागतो. हा सगळा परिसर सैन्यदलाच्या अखत्यारित येतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर अथांग शुभ्रदलदलीचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो. हेच कच्छचं रण. एका टोकावर हा पांढरा शुभ्र वाळवंट आणि आकाशातली ढग शेजारी बसून गप्पा मारतात की काय असा भास होतो.
कच्छचं हे रण फक्त पर्यटकांचंच आकर्षण आहे असं नाही. गेल्या 200 वर्षात मिठाची शेती हा एक मोठा उद्योग इथे उभा राहिलाय. नोव्हेंबरपासून इथल्या आदिवासींकडून मिठाची शेती पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहते. इथूनच भारताला एकूण मिठाच्या 75 टक्के मिठ मिळतं. देशाविदेशातून येणाऱ्या विविध प्राण्यांसाठी कच्छचं रण हे आपलं माहेरासारखं आहे. विविध पक्षांचे थवे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान कच्छच्या किनाऱ्यावर आपली घरं बनवतात.
रणच्या वाळवंटात संध्याकाळ आणखीच शूभ्रधवल होते. सोनेरी किरणांनी निरोप घेणारा सूर्य इथल्या मिठाची गळाभेट घेत असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात कच्छी संस्कृतीचे स्वर कानी पडत असतात. तर दुसरीकडे रास गरबा खेळणारी मंडळी. जगात आनंद खूप स्वस्त आहे. तो फक्त घेता आला पाहिजे. हा अनुभव कितीही पैसे देऊन जगात कुठेच विकत घेतला जाऊ शकत नाही. तो गोड अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या खारट वाळवंटावरच यावं लागतं.
अंधार पडल्यावर घोडागाडी, उंटगाड्यांची लगबग वाढते. उदास खिन्न मन तिथून बाहेर पडायला तयार नसतं. पण जड पावलांनी आपल्याला तिथून बाहेर पडावंच लागतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा मंद शीतल प्रकाशामुळे इथले मिठाचे कण लखलखतात. पण दुर्दैवानं तो अनुभव घेता आला नाही. तसंही अपूर्णता हवीच, पुन्हा येण्यासाठीचं ते निमंत्रण असतं.
काला डुंगर. आपण त्याला डोंगर म्हणूयात. पण हा डोंगर रहस्यमयी आहे. एकतर इथून तुम्हाला समुद्र दिसतो, मिठाचं वाळवंट दिसतं, घनदाट वनराईचं जंगल दिसतं आणि त्यावर सुवर्णलेप म्हणजे तुम्ही कच्छच्या सर्वात उंच डोंगरावर उभे असता. हाच काला डुंगर. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर इथून फक्त 70 किमी आहे. दुर्बिणीतून तुम्ही थेट बॉर्डरची सैर करून येता. इथूनच तुम्हाला जगातला शेवटचा पूलही दिसतो. असं म्हणतात की दत्तात्रेयांचं काही काळ इथे वास्तव्य होतं. इथल्या मंदिरात दोन वेळा लांडग्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. मघाशी मी रहस्यमयी हा शब्द का वापरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारणही ऐका. हा डोंगर सर करताना एका ठिकाणी मॅग्नेटिक पॉईन्ट लागतो. या पॉईन्टवर गाडी आली की ती बंद करायची तरीही तुमची गाडी किमान 20 च्या स्पीडनं उंच डोंगर चढू लागते. आहे की नाही कमाल!
भूज शहर हे ऐतिहासिक आणि सुखी संपन्न आणि समाधानी लोकांचं शहर आहे. इथे कुणालाही घाई नाही. खासकरून मुंबईसारख्या शहरातून आलेल्या लोकांना इथलं आयुष्य संथ वाटू शकतं. पण तसंही धावपळ करून आपण तरी काय मिळवलं? असा प्रश्न आपसूक पडतो. हा शांतपणा सुखावणारा आहे. भूजमधला आईना महल आणि प्राग महल इथल्या राजेशाहीचा इतिहास जिवंत ठेऊन आहेत. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली पण आजही इथल्या लोकांच्या मनात राजाविषयीचा आदर कायम आहे. इथलं स्वामीनारायण मंदिर सुंदरतेचा, कलेचा आणि भावभक्तीचा अनोखा मिलाफ आहे. भूजमधलं म्युझियम तर देखणं आहे. भूकंपाचे असंख्य हादरे सोसणारं भूज कसं बदलत गेलं ते म्युझियममध्ये बघायला मिळतं. भूज शहरावर भूकंपाच्या त्या जखमा आजही दिसतात.
भूजपासून 10 किमीवरच्या भुजोडी गावात हॅन्डलूमच्या वस्तू बनतात. अख्खं गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे इथल्या चादरी, बॅग्ज आणि खासकरून बांधणी वस्त्राची वीण अधिक घट्ट आहे. थोड पुढे गेलात तर अजरखपूर लागतं. इथल्या नैसर्गिक रंगांच्या साड्या, दुपट्टे जगात प्रसिद्ध आहे. इथल्या आदरातिथ्य आणि प्रेमाचा स्वाद कच्छच्या खाण्यात उतरलाय. भरपूर तेल्यातल्या मसालेदार भाज्या, जाडजूड तळलेल्या मिरच्या, मुगाची सात्विक खिचडी कढी आणि ताक. मन तृप्त होतं! मी पुन्हा भूजला जाईन तर ते खाण्यासाठीच.
या संपूर्ण प्रवासात मला अनेक नवीन मित्र भेटले. खरंतर मी बाहेर पडतो तेच मुळात नवीन लोकांचा शोध घेण्यासाठी. हे अनपेक्षित भेटलेले मित्र परत कदाचित आपल्याला कधीच भेटत नसतात पण त्यांच्या आठवणी छान असतात. देशी परदेशी लोकांसोबत बोलून आपल्याला आपला आवाका कळतो. लिफ्ट मागून मागून प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे. ती अशा प्रवासांमधून मिळत जाते. कच्छनंही मला दोन दिवसात बरंच काही दिलं.
गारठा वाढल्यावर परदेशी पक्षांनी तलाव नदी नाले समुद्रावर गर्दी करावी तसंच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या विस्तीर्ण खारट वाळवंटाला अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोकांची रीघ लागते. गुजरात टुरिझमकडून इथे रण उत्सव रंगतो आणि कच्छी हस्तकला, हस्तशिल्पाला जागतिक व्यासपीठ खुलं होतं.
पण सुरूवातीलाच तुम्हाला थोडं निराश करतो, इथे यायचं असेल तर खिसा थोडासा गरम ठेवा. कारण भूजपासून 80 किमीपर्यंत धोरडो गावाजवळच्या रण उत्सवला येण्यासाठी गुजरात सरकारची एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रायव्हेट गाडीवाले तुमच्याकडे अगदी 2 हजाराची मागणी करू शकतात. बार्गेनिंग करत करत तुम्ही त्यांना फार तर हजार बाराशेपर्यंत आणू शकता. पण फक्त तिथे जाण्यासाठी 1200 रुपये देणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. शिवाय ओला उबेर किंवा तत्सम वाहतुकीचं कुठलंही अॅप इथे निकामी आहे. मोदींनी करोडो रुपये नुसता अमिताभ बच्चनला घेऊन रणच्या जाहिरातीवर खर्च केलाय. दोन बस सोडायला काही अवघड नव्हतं. एकही बस न सोडण्यामागे मोदींचा गुजराती दिमाग असू शकतो. पण सर्वसामान्य लोकांना रणला जाणं तसं अवघडंच आहे.
असो, तरीही तुम्ही हजार बाराशेची गाडी करून गेलात. किंवा रेन्टवर मिळणाऱ्या बाईक घेऊन गेलात तर भूज ते कच्छचं रण हा रस्ता तुम्ही दीड दोन तासात सहज पूर्ण करता. 100 रुपयांचा गेटपास घेऊन आत प्रवेश मिळतो. गेटपाससाठी तुम्हाला कुठलाही फोटो आयडी सोबत ठेवावा लागतो. हा सगळा परिसर सैन्यदलाच्या अखत्यारित येतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर अथांग शुभ्रदलदलीचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो. हेच कच्छचं रण. एका टोकावर हा पांढरा शुभ्र वाळवंट आणि आकाशातली ढग शेजारी बसून गप्पा मारतात की काय असा भास होतो.
कच्छचं हे रण फक्त पर्यटकांचंच आकर्षण आहे असं नाही. गेल्या 200 वर्षात मिठाची शेती हा एक मोठा उद्योग इथे उभा राहिलाय. नोव्हेंबरपासून इथल्या आदिवासींकडून मिठाची शेती पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहते. इथूनच भारताला एकूण मिठाच्या 75 टक्के मिठ मिळतं. देशाविदेशातून येणाऱ्या विविध प्राण्यांसाठी कच्छचं रण हे आपलं माहेरासारखं आहे. विविध पक्षांचे थवे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान कच्छच्या किनाऱ्यावर आपली घरं बनवतात.
रणच्या वाळवंटात संध्याकाळ आणखीच शूभ्रधवल होते. सोनेरी किरणांनी निरोप घेणारा सूर्य इथल्या मिठाची गळाभेट घेत असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात कच्छी संस्कृतीचे स्वर कानी पडत असतात. तर दुसरीकडे रास गरबा खेळणारी मंडळी. जगात आनंद खूप स्वस्त आहे. तो फक्त घेता आला पाहिजे. हा अनुभव कितीही पैसे देऊन जगात कुठेच विकत घेतला जाऊ शकत नाही. तो गोड अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या खारट वाळवंटावरच यावं लागतं.
अंधार पडल्यावर घोडागाडी, उंटगाड्यांची लगबग वाढते. उदास खिन्न मन तिथून बाहेर पडायला तयार नसतं. पण जड पावलांनी आपल्याला तिथून बाहेर पडावंच लागतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा मंद शीतल प्रकाशामुळे इथले मिठाचे कण लखलखतात. पण दुर्दैवानं तो अनुभव घेता आला नाही. तसंही अपूर्णता हवीच, पुन्हा येण्यासाठीचं ते निमंत्रण असतं.
काला डुंगर. आपण त्याला डोंगर म्हणूयात. पण हा डोंगर रहस्यमयी आहे. एकतर इथून तुम्हाला समुद्र दिसतो, मिठाचं वाळवंट दिसतं, घनदाट वनराईचं जंगल दिसतं आणि त्यावर सुवर्णलेप म्हणजे तुम्ही कच्छच्या सर्वात उंच डोंगरावर उभे असता. हाच काला डुंगर. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर इथून फक्त 70 किमी आहे. दुर्बिणीतून तुम्ही थेट बॉर्डरची सैर करून येता. इथूनच तुम्हाला जगातला शेवटचा पूलही दिसतो. असं म्हणतात की दत्तात्रेयांचं काही काळ इथे वास्तव्य होतं. इथल्या मंदिरात दोन वेळा लांडग्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. मघाशी मी रहस्यमयी हा शब्द का वापरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारणही ऐका. हा डोंगर सर करताना एका ठिकाणी मॅग्नेटिक पॉईन्ट लागतो. या पॉईन्टवर गाडी आली की ती बंद करायची तरीही तुमची गाडी किमान 20 च्या स्पीडनं उंच डोंगर चढू लागते. आहे की नाही कमाल!
भूज शहर हे ऐतिहासिक आणि सुखी संपन्न आणि समाधानी लोकांचं शहर आहे. इथे कुणालाही घाई नाही. खासकरून मुंबईसारख्या शहरातून आलेल्या लोकांना इथलं आयुष्य संथ वाटू शकतं. पण तसंही धावपळ करून आपण तरी काय मिळवलं? असा प्रश्न आपसूक पडतो. हा शांतपणा सुखावणारा आहे. भूजमधला आईना महल आणि प्राग महल इथल्या राजेशाहीचा इतिहास जिवंत ठेऊन आहेत. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली पण आजही इथल्या लोकांच्या मनात राजाविषयीचा आदर कायम आहे. इथलं स्वामीनारायण मंदिर सुंदरतेचा, कलेचा आणि भावभक्तीचा अनोखा मिलाफ आहे. भूजमधलं म्युझियम तर देखणं आहे. भूकंपाचे असंख्य हादरे सोसणारं भूज कसं बदलत गेलं ते म्युझियममध्ये बघायला मिळतं. भूज शहरावर भूकंपाच्या त्या जखमा आजही दिसतात.
भूजपासून 10 किमीवरच्या भुजोडी गावात हॅन्डलूमच्या वस्तू बनतात. अख्खं गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे इथल्या चादरी, बॅग्ज आणि खासकरून बांधणी वस्त्राची वीण अधिक घट्ट आहे. थोड पुढे गेलात तर अजरखपूर लागतं. इथल्या नैसर्गिक रंगांच्या साड्या, दुपट्टे जगात प्रसिद्ध आहे. इथल्या आदरातिथ्य आणि प्रेमाचा स्वाद कच्छच्या खाण्यात उतरलाय. भरपूर तेल्यातल्या मसालेदार भाज्या, जाडजूड तळलेल्या मिरच्या, मुगाची सात्विक खिचडी कढी आणि ताक. मन तृप्त होतं! मी पुन्हा भूजला जाईन तर ते खाण्यासाठीच.
या संपूर्ण प्रवासात मला अनेक नवीन मित्र भेटले. खरंतर मी बाहेर पडतो तेच मुळात नवीन लोकांचा शोध घेण्यासाठी. हे अनपेक्षित भेटलेले मित्र परत कदाचित आपल्याला कधीच भेटत नसतात पण त्यांच्या आठवणी छान असतात. देशी परदेशी लोकांसोबत बोलून आपल्याला आपला आवाका कळतो. लिफ्ट मागून मागून प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे. ती अशा प्रवासांमधून मिळत जाते. कच्छनंही मला दोन दिवसात बरंच काही दिलं.
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 1
मंगळवार
मुंबईहून भुजला जाणारे माझे विमान, निदान अर्धा तास तरी उशीरा सुटणार आहे. म्हणजेच मुंबईच्या आंतर्देशीय विमानतळावरचा माझा मुक्काम आता निदान 4 तासाचा तरी नक्कीच होणार आहे. आज सकाळी मी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी म्हणून एस.टीच्या शिवनेरी सेवेने 8.30 वाजताच पुणे सोडले होते. ही शिवनेरी बस सेवा मात्र आहे अगदी वक्तशीर आणि अतिशय आरामदायी. मी या सेवेची तरफदारी मनापासून करायला तयार आहे. बसने मला विमानतळाच्या शेजारून जाणार्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाच्या अगदी समोरच सोडले होते व तेथून विमानतळावरील निर्गमन कक्षात मी अगदी सहज पोचू शकलो होतो. 1बी टर्मिनल मधील हा निर्गमन कक्ष आहे मात्र अगदी ऐसपैस! याच्या एका बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी म्हणून बरीच दुकाने व एक कॅफेटेरिया दिसत आहेत. शो केसमध्ये मांडलेल्या वस्तू, पुस्तके यांचे विंडो शॉपिंग करत मी माझा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेरीस आमच्या उड्डाणाची घोषणा होते. नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लगबग, व गोंधळ थोड्याफार प्रमाणात अनुभवल्यानंतर मी विमानापर्यंत पोचण्यात यशस्वी होतो. विमान पूर्ण भरलेलेच दिसते आहे आणि स्वस्त विमानसेवा या वर्गाखाली हे उड्डाण मोडत असल्याने पिण्याच्या पाण्याखेरीज दुसरी कोणतीच सुविधा विमानात उपलब्ध नाहीये.
कच्छ आणि काठेवाडचा प्रवास हा इतिहासाची सोबत घेतल्याशिवाय करताच येत नाही असे मला वाटते. पावला पावलावर पर्यटकाला येथे, पार इ.स.पूर्व 2500 ते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, यांमधील इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत राहतात आणि या शिवाय गेल्या 50 वर्षात, औद्योगिक क्रांतीमुळे या भागात जो आमुलाग्र बदल होतो आहे तोही क्षणाक्षणाला सतत जाणवत राहतो. निसर्गाने येथे दिसणार्या अथांग आणि असीम अशा आसमंतात, इतक्या अद्भुत आणि रौद्र सौंदर्याची लयलूट केली आहे की आपले मन आश्चर्याने आणि कौतुकाने पुरेपूर भरून जाते.
आमचे विमान भुज विमानतळावर उतरते आहे तेंव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले आहेत. समोर दिसणारा विमानतळ खूपच मोठा वाटतो आहे परंतु समोर टरमॅक वर उभे असलेले विमानदलाचे एक MI17 हेलिकॉप्टर सोडले तर बाकी काहीच विमाने दिसत नाहीत. भुज विमानतळावर दिवसाला फक्त 2 किंवा 3 उड्डाणे उतरतात ही गोष्ट लक्षात घेतली तर इथला आगमन कक्ष त्या मानाने खूपच प्रशस्त वाटतो आहे. मी मुंबईला चेक–इन खूपच लवकर केले होते त्यामुळे अपेक्षेनुसार माझे सामान सर्वात उशीरा बेल्ट्वर येते. मी टर्मिनलच्या बाहेर येतो तोपर्यंत बहुतेक मंडळी निघून गेलेली आहेत. आहेत.अगदी थोडी वाहने वाहनतळावर उभी आहेत. मात्र नशिबाने मला एक टॅक्सी मिळते. पण ती ज्या पद्धतीने मला लगेच मिळते ते काही चांगले चिन्ह नाही आणि आपल्या खिशाला जबरदस्त चाट बसणार आहे हे ही माझ्या लक्षात येते. पण तरी सुद्धा मी ती टॅक्सी घेतो कारण या निर्जन विमातळावर टॅक्सीची वाट एकाकीपणे बघत बसण्याची माझ्या मनाची काही तयारी नाही. हा विमानतळ शहरापासून फक्त 3 किमी लांब आहे आणि शहराच्या भरवस्तीमध्ये असलेल्या हॉटेलवर पोचल्यावर जेंव्हा टॅक्सी चालक माझ्याकडे 500 रुपयांची मागणी करतो तेंव्हा माझा होरा बरोबर असल्याची मला खात्रीच पटते. नाईलाजाने मी पैसे काढून देतो आणि हॉटेलमधल्या माझ्या रूमकडे वळतो. संध्याकाळी नंतर मी जरा पावले मोकळी करायला म्हणून बाहेर पडायचे ठरवतो व शहराच्या बाजारपेठेतून सरळ ‘हमिसर‘ तलावाकडे जाणारा रस्ता पकडतो. हा तलाव म्हणजे भुज शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे आणि माझ्या हॉटेलपासून या तलावापर्यंतचे अंतर जेमतेम 15 मिनिटात चालत जाता येते आहे. मी तलावापाशी पोचतो तेंव्हा सूर्यास्त होतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर तलावात पाणीच नाहीये. या वर्षी म्हणे पाऊस फारच तुरळक पडला आणि तलावाला पाणी आलेच नाही. बाजारपेठेतील रस्ता गर्दीने नुसता फुलला आहे. वेडीवाकडी कशीही उभी केलेली वाहने, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, मोकाट सोडलेल्या गाई यामधून चालणे मुश्किल वाटते आहे. रस्त्याला पदपथ वगैरे नाहीतच आणि सगळीकडे कचर्याचे ढीग साठलेले दिसत आहेत. भुजचे प्रथम दर्शन तरी माझ्या मनाला फारसे पटलेले किंवा आवडलेले नाहीये. मी जरा कंटाळूनच हॉटेलवर परततो.
बुधवार
पुढचे 2 दिवस माझा मुक्काम कच्छच्या रणाजवळ असलेल्या ज्या कॅम्पमधे होणार आहे, त्या कॅम्पच्या व्यवस्थापनाने मला भुज रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या स्वागत कक्षात सकाळी बोलवले आहे. तेथे लवकर पोचता यावे म्हणून हॉटेलमधून 7.30 पर्यंत चेक आऊट करायचे असा माझा बेत होता. पण या हॉटेलची सेवा जरा मंद गतीनेच दिली जाते आहे असे दिसते. सकाळी 6 वाजता जो चहा येणार होता तो मिळालाच नाही व हॉटेलमधील रेस्टॉरन्ट मधे जाऊन प्यावा म्हणावे तर ते 7.30 शिवाय उघडत नाही. शेवटी सकाळी 8 च्या सुमारास चेक आऊट करण्यात मी यशस्वी होतो होतो आणि भुज स्टेशन जवळच्या स्वागत कक्षात पोचायला मला 8.15 होतात. मी गरम कपड्यात मला गुंडाळून घेतले आहे कारण येथे थंडी जबरदस्त आहे आणि झोंबणारे गार वारेही आहेत.
स्टेशन जवळच्या या स्वागत कक्षासमोर दिसणारे एकूण चित्र मला जरा निरुत्साही करणारेच वाटते आहे. समोर बर्याच बसेस कशाही वेड्यावाकड्या पार्क केलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे सामानाचे ढीग आणि या कॅम्पमधे भाग घेण्यासाठी आलेले लोक घोळक्या घोळक्यांनी उभे आहेत. मी स्वागत कक्ष अशी पाटी लावलेल्या शामियान्यात शिरतो आणि एका काऊंटरपाशी जातो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी आहे. आतले काम भलतेच शिस्तशीर आणि पद्धतशीर रितीने होताना दिसते आहे. समोरचा स्टाफ अतिशय अदबीने वागतो आहे आणि प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यास तत्पर दिसतो आहे. माझी कागदपत्रे बघितल्याबरोबर मला एक तंबू अलॉट केला जातो व बरोबर आणलेल्या सर्व सामानावर त्या तंबूचा नंबर लिहिलेले टॅग्ज दिले जातात. ते मी सामानाला लावायचे आणि कोणत्याही बसमधे चढायचे एवढे सोपे काम आहे. फक्त माझे सामान मी प्रवास करतो आहे त्याच बसमध्ये ठेवले जाईल हे माझे मलाच बघायचे आहे. मी बाहेर येतो व समोरच असलेल्या एका बसच्या सेवकाकडे माझे सामान देतो. ते त्याने बसमध्ये ठेवले आहे याची खात्री झाल्यावर बसमध्ये चढतो.
पुढच्या 10 मिनिटात, भुजच्या वायव्येला 80 किमी अंतरावर असलेल्या धोर्डो या गावाकडे जाण्यासाठी बस निघते. भुजच्या उत्तरेकडे असलेला हायवे 45 वरून आम्ही निघालो आहोत. परत एकदा भुज विमानतळाचे दर्शन होते. विमानतळाच्या कडांना असलेल्या हॅन्गर्समध्ये ताडपत्र्यांचे आच्छादन घातलेली बरीच लढाऊ विमाने दिसत आहेत. आजूबाजूचे दृष्य काही आगळेच, सहसा बाकी कोठे न दिसणारे असे आहे. मधे मधे हिरवट काळसर रंगाची उभी पिके असलेली शेते व त्याच्या मधे मधे ओसाड जमीनीचे मोठाले पॅचेस दिसत आहेत. मधून मधून साठलेल्या पाण्याची डबकी पण दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी भुजमधे जोरदार वर्षा वृष्टी झाली होती त्यामुळे बहुदा हे पाणी साठलेले असावे. शेतात जी पिके उभी आहेत ती बहुतांशी एरंडीची आहेत. एरंडी (Ricinus communis, or Euphorbiaceae) हे पीक त्याच्या बियांपासून मिळणार्या एरंडेल तेलासाठी घेतले जाते. शेतकर्यांना नगदी रक्कम मिळवून देणारे हे पीक येथे खूपच घेतले जाते कारण येथली अतिशय खराब जमीन आणि वाळवंटी हवामान! हे तेल म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगातील अनेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा उत्पादन घटक आहे. या उत्पादनांत, सौंदर्य प्रसाधने आणि मोटरगाड्यांच्या आणि इतर डिझेल, पेट्रोल इंजिनांसाठी जे वंगण लागते ते तेल, अशी दोन महत्त्वाची उत्पादने मोडत असल्याने एरंडी तेलाला खूपच मागणी असते.
आता शेतांच्या मधे मधे लागणार्या ओसाड पॅचेस मधली जमीन पांढरट दिसायला लागली आहे. हा पांढरा रंग, जमिनीत क्षारांचे प्रमाणे अवाजवी असल्याने दिसतो आहे. या ओसाड खारवट जमिनीत, फक्त बाभळीची झुडुपे उगवतात व टिकू शकतात. आम्ही जसजसे उत्तरेकडे जातो आहोत तसतसे या ओसाड जमिनींचे प्रमाण वाढते आहे व शेती अगदी थोड्या प्रमाणात, फक्त खेडेगावांजवळ, दिसते आहे. खेडेगावांतली घरे गोल आकाराची बांधलेली आहेत आणि त्यावरची छते शंकाकृती आकाराची दिसत आहेत. येथील पूर्वापार चालत आलेल्या घरांमध्ये, पूर्वी या शंकूच्या आकाराच्या छतावर गवत पसरण्याची पद्धत होती व त्यांना भुंगा असे नाव होते. आता सर्रास पणे मंगलोरी कौले छतावर घातलेली दिसत आहेत. मात्र छताचा आकार तसाच शंकू सारखाच आहे. घरांचा हा आकार असा बनवला जातो कारण, अशी घरे भूकंप झाला किंवा वादळ आले तरी त्यांना चांगले तोंड देतात व सहसा पडत नाहीत.
1 तासभर प्रवास केल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी रहाते. आजूबाजूला दिसणारे दृष्य अगदी कॉमन आहे. दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुकाने, चहाच्या टपर्या आणि भाज्या वगैरे विकणारे स्टॉल्स. या गावाचे नाव आहे भिरंडीयारनी आणि हे गाव तसे प्रसिद्ध आहे. या गावात चप्पल, सॅन्डल या सारख्या चामड्याच्या वस्तू आणि खवा, किंवा त्यापेक्षा हुबळी, बेळगाव कडे जसा कुंदा मिळतो तसाच दिसणारा आणि चवीला लागणारा, मावा मिळतो. या गावाबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे उत्तरेला जायचे असले तर इनर लाइन परमिट घ्यावे लागते असे म्हणतात. खरे खोटे मला माहीत नाही.
हे गाव सोडून आमची बस आता डावीकडे असलेल्या एका छोट्या फाट्याला वळली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे. येथून पुढे कच्छ्ची प्रसिद्ध चराऊ राने ज्यांना येथे ‘बन्नी‘ असे नाव आहे ती सुरू होतात. मात्र मला दिसत आहेत ती बाभळीची झुडपे व त्या खाली वाळलेले गवत. कच्छ मध्ये गाई आणि म्हशी यांच्या दुधाचे प्रचंड उत्पादन होते याला प्रामुख्याने ही बन्नी चराऊ राने कारण आहेत. इथल्या गवतावर पोसलेल्या बलदंड दुभत्या जनावरांचे कळप किंवा ताफे मला दोन्ही बाजूंना बाभळीच्या झुडपांमागे दिसत आहेत. आणखी अर्धा तास प्रवास केल्यानंतर बस एकदम थांबते. आम्ही रणाजवळच्या कॅम्पपाशी पोचलो आहोत.
शेकडो तंबू ठोकून उभा केलेला हा कॅम्प म्हणजे एक प्रचंड वसाहतच आहे. प्रत्येक तंबूमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जवळच वातानुकूलित भोजनगृह, खरेदीसाठी अनेक स्टॉल्स असलेली एक बाजारपेठ व एक सभागृह आहे. तंबूमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. प्रथम मी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करतो व त्या नंतर मला एक कॅम्पचे ओळखपत्र आणि भोजनासाठीची कुपॉन्स देण्यात येतात. ती सगळी घेऊन मी आरामात माझ्या तंबूकडे जातो. आशचर्याची गोष्ट म्हणजे माझे सामान, तंबू समोर आणून ठेवलेलेच आहे. तेथील सेवक वर्ग मला प्रथम न्याहरी घ्यावी अशी अशी सूचना करतो कारण न्याहरीची वेळ थोड्याच वेळात संपणार असते. मोठ्या थोरल्या भोजन गृहात अगदी गरम गरम जेवण तुम्हाला सर्व्ह केले जाते. संपूर्ण गुजराथी पद्धतीची पोहे, जिलबी आणि गाठिया यांची न्याहरी व त्यानंतर मसाला चहा याची लज्जत येथे काही औरच येते आहे.
आता दुपारच्या भोजनापर्यंत तसा मला मोकळा वेळ आहे. त्या नंतर आम्हाला जवळपास असलेल्या कच्छी खेड्यांच्यात तेथील कारागिरांनी केलेले भरतकाम आणि इतर कलाकुसर बघण्यासाठी नेण्यात येणार आहे. मी जवळच असलेल्या बाजारपेठेतील स्टॉल्समध्ये भटकण्यात वेळ घालवून आणि थोडीफार खरेदी करून माझ्या तंबूमध्ये परतण्याचे ठरवतो.
प्रत्यक्षात मात्र मी शेवटी अंदाजे 2 तास तरी तिथल्या दुकानांच्यात घालवतो. भरतकाम किंवा बांधणी प्रकारची वस्त्रे, त्यांचे रंग हे सगळे मनाला फारच लुभावणारे वाटते आहे. कलाकुसरीच्या इतर वस्तूंची कारागिरी सुद्धा फारच अप्रतिम वाटते आहे.
12.30च्या सुमारास मी माझ्या तंबूकडे परत येतो. प्रत्येक तंबूमध्ये, 2 शयनमंच, 2 टेबले, खुर्च्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक रूम हीटर, पाणी गरम करण्यासाठी एक इलेक्ट्रिक किटली आणि चहाचे किट टेबलावर ठेवलेले आहे. तंबूच्या मागच्या बाजूस आधुनिक सुविधा असलेले स्वच्छता गृह आहे.
मी जरावेळ आराम करतो व परत एकदा भोजन गृहात जाऊन संपूर्ण गुजराथी भोजनाचा आस्वाद घेतो व नंतर या कॅम्पच्या स्वागत कक्षाजवळ असलेल्या वाहनतळाकडे वळतो.
मंगळवार
मुंबईहून भुजला जाणारे माझे विमान, निदान अर्धा तास तरी उशीरा सुटणार आहे. म्हणजेच मुंबईच्या आंतर्देशीय विमानतळावरचा माझा मुक्काम आता निदान 4 तासाचा तरी नक्कीच होणार आहे. आज सकाळी मी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी म्हणून एस.टीच्या शिवनेरी सेवेने 8.30 वाजताच पुणे सोडले होते. ही शिवनेरी बस सेवा मात्र आहे अगदी वक्तशीर आणि अतिशय आरामदायी. मी या सेवेची तरफदारी मनापासून करायला तयार आहे. बसने मला विमानतळाच्या शेजारून जाणार्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाच्या अगदी समोरच सोडले होते व तेथून विमानतळावरील निर्गमन कक्षात मी अगदी सहज पोचू शकलो होतो. 1बी टर्मिनल मधील हा निर्गमन कक्ष आहे मात्र अगदी ऐसपैस! याच्या एका बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी म्हणून बरीच दुकाने व एक कॅफेटेरिया दिसत आहेत. शो केसमध्ये मांडलेल्या वस्तू, पुस्तके यांचे विंडो शॉपिंग करत मी माझा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेरीस आमच्या उड्डाणाची घोषणा होते. नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लगबग, व गोंधळ थोड्याफार प्रमाणात अनुभवल्यानंतर मी विमानापर्यंत पोचण्यात यशस्वी होतो. विमान पूर्ण भरलेलेच दिसते आहे आणि स्वस्त विमानसेवा या वर्गाखाली हे उड्डाण मोडत असल्याने पिण्याच्या पाण्याखेरीज दुसरी कोणतीच सुविधा विमानात उपलब्ध नाहीये.
कच्छ आणि काठेवाडचा प्रवास हा इतिहासाची सोबत घेतल्याशिवाय करताच येत नाही असे मला वाटते. पावला पावलावर पर्यटकाला येथे, पार इ.स.पूर्व 2500 ते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, यांमधील इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत राहतात आणि या शिवाय गेल्या 50 वर्षात, औद्योगिक क्रांतीमुळे या भागात जो आमुलाग्र बदल होतो आहे तोही क्षणाक्षणाला सतत जाणवत राहतो. निसर्गाने येथे दिसणार्या अथांग आणि असीम अशा आसमंतात, इतक्या अद्भुत आणि रौद्र सौंदर्याची लयलूट केली आहे की आपले मन आश्चर्याने आणि कौतुकाने पुरेपूर भरून जाते.
आमचे विमान भुज विमानतळावर उतरते आहे तेंव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले आहेत. समोर दिसणारा विमानतळ खूपच मोठा वाटतो आहे परंतु समोर टरमॅक वर उभे असलेले विमानदलाचे एक MI17 हेलिकॉप्टर सोडले तर बाकी काहीच विमाने दिसत नाहीत. भुज विमानतळावर दिवसाला फक्त 2 किंवा 3 उड्डाणे उतरतात ही गोष्ट लक्षात घेतली तर इथला आगमन कक्ष त्या मानाने खूपच प्रशस्त वाटतो आहे. मी मुंबईला चेक–इन खूपच लवकर केले होते त्यामुळे अपेक्षेनुसार माझे सामान सर्वात उशीरा बेल्ट्वर येते. मी टर्मिनलच्या बाहेर येतो तोपर्यंत बहुतेक मंडळी निघून गेलेली आहेत. आहेत.अगदी थोडी वाहने वाहनतळावर उभी आहेत. मात्र नशिबाने मला एक टॅक्सी मिळते. पण ती ज्या पद्धतीने मला लगेच मिळते ते काही चांगले चिन्ह नाही आणि आपल्या खिशाला जबरदस्त चाट बसणार आहे हे ही माझ्या लक्षात येते. पण तरी सुद्धा मी ती टॅक्सी घेतो कारण या निर्जन विमातळावर टॅक्सीची वाट एकाकीपणे बघत बसण्याची माझ्या मनाची काही तयारी नाही. हा विमानतळ शहरापासून फक्त 3 किमी लांब आहे आणि शहराच्या भरवस्तीमध्ये असलेल्या हॉटेलवर पोचल्यावर जेंव्हा टॅक्सी चालक माझ्याकडे 500 रुपयांची मागणी करतो तेंव्हा माझा होरा बरोबर असल्याची मला खात्रीच पटते. नाईलाजाने मी पैसे काढून देतो आणि हॉटेलमधल्या माझ्या रूमकडे वळतो. संध्याकाळी नंतर मी जरा पावले मोकळी करायला म्हणून बाहेर पडायचे ठरवतो व शहराच्या बाजारपेठेतून सरळ ‘हमिसर‘ तलावाकडे जाणारा रस्ता पकडतो. हा तलाव म्हणजे भुज शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे आणि माझ्या हॉटेलपासून या तलावापर्यंतचे अंतर जेमतेम 15 मिनिटात चालत जाता येते आहे. मी तलावापाशी पोचतो तेंव्हा सूर्यास्त होतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर तलावात पाणीच नाहीये. या वर्षी म्हणे पाऊस फारच तुरळक पडला आणि तलावाला पाणी आलेच नाही. बाजारपेठेतील रस्ता गर्दीने नुसता फुलला आहे. वेडीवाकडी कशीही उभी केलेली वाहने, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, मोकाट सोडलेल्या गाई यामधून चालणे मुश्किल वाटते आहे. रस्त्याला पदपथ वगैरे नाहीतच आणि सगळीकडे कचर्याचे ढीग साठलेले दिसत आहेत. भुजचे प्रथम दर्शन तरी माझ्या मनाला फारसे पटलेले किंवा आवडलेले नाहीये. मी जरा कंटाळूनच हॉटेलवर परततो.
बुधवार
पुढचे 2 दिवस माझा मुक्काम कच्छच्या रणाजवळ असलेल्या ज्या कॅम्पमधे होणार आहे, त्या कॅम्पच्या व्यवस्थापनाने मला भुज रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या स्वागत कक्षात सकाळी बोलवले आहे. तेथे लवकर पोचता यावे म्हणून हॉटेलमधून 7.30 पर्यंत चेक आऊट करायचे असा माझा बेत होता. पण या हॉटेलची सेवा जरा मंद गतीनेच दिली जाते आहे असे दिसते. सकाळी 6 वाजता जो चहा येणार होता तो मिळालाच नाही व हॉटेलमधील रेस्टॉरन्ट मधे जाऊन प्यावा म्हणावे तर ते 7.30 शिवाय उघडत नाही. शेवटी सकाळी 8 च्या सुमारास चेक आऊट करण्यात मी यशस्वी होतो होतो आणि भुज स्टेशन जवळच्या स्वागत कक्षात पोचायला मला 8.15 होतात. मी गरम कपड्यात मला गुंडाळून घेतले आहे कारण येथे थंडी जबरदस्त आहे आणि झोंबणारे गार वारेही आहेत.
स्टेशन जवळच्या या स्वागत कक्षासमोर दिसणारे एकूण चित्र मला जरा निरुत्साही करणारेच वाटते आहे. समोर बर्याच बसेस कशाही वेड्यावाकड्या पार्क केलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे सामानाचे ढीग आणि या कॅम्पमधे भाग घेण्यासाठी आलेले लोक घोळक्या घोळक्यांनी उभे आहेत. मी स्वागत कक्ष अशी पाटी लावलेल्या शामियान्यात शिरतो आणि एका काऊंटरपाशी जातो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी आहे. आतले काम भलतेच शिस्तशीर आणि पद्धतशीर रितीने होताना दिसते आहे. समोरचा स्टाफ अतिशय अदबीने वागतो आहे आणि प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यास तत्पर दिसतो आहे. माझी कागदपत्रे बघितल्याबरोबर मला एक तंबू अलॉट केला जातो व बरोबर आणलेल्या सर्व सामानावर त्या तंबूचा नंबर लिहिलेले टॅग्ज दिले जातात. ते मी सामानाला लावायचे आणि कोणत्याही बसमधे चढायचे एवढे सोपे काम आहे. फक्त माझे सामान मी प्रवास करतो आहे त्याच बसमध्ये ठेवले जाईल हे माझे मलाच बघायचे आहे. मी बाहेर येतो व समोरच असलेल्या एका बसच्या सेवकाकडे माझे सामान देतो. ते त्याने बसमध्ये ठेवले आहे याची खात्री झाल्यावर बसमध्ये चढतो.
पुढच्या 10 मिनिटात, भुजच्या वायव्येला 80 किमी अंतरावर असलेल्या धोर्डो या गावाकडे जाण्यासाठी बस निघते. भुजच्या उत्तरेकडे असलेला हायवे 45 वरून आम्ही निघालो आहोत. परत एकदा भुज विमानतळाचे दर्शन होते. विमानतळाच्या कडांना असलेल्या हॅन्गर्समध्ये ताडपत्र्यांचे आच्छादन घातलेली बरीच लढाऊ विमाने दिसत आहेत. आजूबाजूचे दृष्य काही आगळेच, सहसा बाकी कोठे न दिसणारे असे आहे. मधे मधे हिरवट काळसर रंगाची उभी पिके असलेली शेते व त्याच्या मधे मधे ओसाड जमीनीचे मोठाले पॅचेस दिसत आहेत. मधून मधून साठलेल्या पाण्याची डबकी पण दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी भुजमधे जोरदार वर्षा वृष्टी झाली होती त्यामुळे बहुदा हे पाणी साठलेले असावे. शेतात जी पिके उभी आहेत ती बहुतांशी एरंडीची आहेत. एरंडी (Ricinus communis, or Euphorbiaceae) हे पीक त्याच्या बियांपासून मिळणार्या एरंडेल तेलासाठी घेतले जाते. शेतकर्यांना नगदी रक्कम मिळवून देणारे हे पीक येथे खूपच घेतले जाते कारण येथली अतिशय खराब जमीन आणि वाळवंटी हवामान! हे तेल म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगातील अनेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा उत्पादन घटक आहे. या उत्पादनांत, सौंदर्य प्रसाधने आणि मोटरगाड्यांच्या आणि इतर डिझेल, पेट्रोल इंजिनांसाठी जे वंगण लागते ते तेल, अशी दोन महत्त्वाची उत्पादने मोडत असल्याने एरंडी तेलाला खूपच मागणी असते.
आता शेतांच्या मधे मधे लागणार्या ओसाड पॅचेस मधली जमीन पांढरट दिसायला लागली आहे. हा पांढरा रंग, जमिनीत क्षारांचे प्रमाणे अवाजवी असल्याने दिसतो आहे. या ओसाड खारवट जमिनीत, फक्त बाभळीची झुडुपे उगवतात व टिकू शकतात. आम्ही जसजसे उत्तरेकडे जातो आहोत तसतसे या ओसाड जमिनींचे प्रमाण वाढते आहे व शेती अगदी थोड्या प्रमाणात, फक्त खेडेगावांजवळ, दिसते आहे. खेडेगावांतली घरे गोल आकाराची बांधलेली आहेत आणि त्यावरची छते शंकाकृती आकाराची दिसत आहेत. येथील पूर्वापार चालत आलेल्या घरांमध्ये, पूर्वी या शंकूच्या आकाराच्या छतावर गवत पसरण्याची पद्धत होती व त्यांना भुंगा असे नाव होते. आता सर्रास पणे मंगलोरी कौले छतावर घातलेली दिसत आहेत. मात्र छताचा आकार तसाच शंकू सारखाच आहे. घरांचा हा आकार असा बनवला जातो कारण, अशी घरे भूकंप झाला किंवा वादळ आले तरी त्यांना चांगले तोंड देतात व सहसा पडत नाहीत.
1 तासभर प्रवास केल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी रहाते. आजूबाजूला दिसणारे दृष्य अगदी कॉमन आहे. दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुकाने, चहाच्या टपर्या आणि भाज्या वगैरे विकणारे स्टॉल्स. या गावाचे नाव आहे भिरंडीयारनी आणि हे गाव तसे प्रसिद्ध आहे. या गावात चप्पल, सॅन्डल या सारख्या चामड्याच्या वस्तू आणि खवा, किंवा त्यापेक्षा हुबळी, बेळगाव कडे जसा कुंदा मिळतो तसाच दिसणारा आणि चवीला लागणारा, मावा मिळतो. या गावाबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे उत्तरेला जायचे असले तर इनर लाइन परमिट घ्यावे लागते असे म्हणतात. खरे खोटे मला माहीत नाही.
हे गाव सोडून आमची बस आता डावीकडे असलेल्या एका छोट्या फाट्याला वळली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे. येथून पुढे कच्छ्ची प्रसिद्ध चराऊ राने ज्यांना येथे ‘बन्नी‘ असे नाव आहे ती सुरू होतात. मात्र मला दिसत आहेत ती बाभळीची झुडपे व त्या खाली वाळलेले गवत. कच्छ मध्ये गाई आणि म्हशी यांच्या दुधाचे प्रचंड उत्पादन होते याला प्रामुख्याने ही बन्नी चराऊ राने कारण आहेत. इथल्या गवतावर पोसलेल्या बलदंड दुभत्या जनावरांचे कळप किंवा ताफे मला दोन्ही बाजूंना बाभळीच्या झुडपांमागे दिसत आहेत. आणखी अर्धा तास प्रवास केल्यानंतर बस एकदम थांबते. आम्ही रणाजवळच्या कॅम्पपाशी पोचलो आहोत.
शेकडो तंबू ठोकून उभा केलेला हा कॅम्प म्हणजे एक प्रचंड वसाहतच आहे. प्रत्येक तंबूमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जवळच वातानुकूलित भोजनगृह, खरेदीसाठी अनेक स्टॉल्स असलेली एक बाजारपेठ व एक सभागृह आहे. तंबूमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. प्रथम मी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करतो व त्या नंतर मला एक कॅम्पचे ओळखपत्र आणि भोजनासाठीची कुपॉन्स देण्यात येतात. ती सगळी घेऊन मी आरामात माझ्या तंबूकडे जातो. आशचर्याची गोष्ट म्हणजे माझे सामान, तंबू समोर आणून ठेवलेलेच आहे. तेथील सेवक वर्ग मला प्रथम न्याहरी घ्यावी अशी अशी सूचना करतो कारण न्याहरीची वेळ थोड्याच वेळात संपणार असते. मोठ्या थोरल्या भोजन गृहात अगदी गरम गरम जेवण तुम्हाला सर्व्ह केले जाते. संपूर्ण गुजराथी पद्धतीची पोहे, जिलबी आणि गाठिया यांची न्याहरी व त्यानंतर मसाला चहा याची लज्जत येथे काही औरच येते आहे.
आता दुपारच्या भोजनापर्यंत तसा मला मोकळा वेळ आहे. त्या नंतर आम्हाला जवळपास असलेल्या कच्छी खेड्यांच्यात तेथील कारागिरांनी केलेले भरतकाम आणि इतर कलाकुसर बघण्यासाठी नेण्यात येणार आहे. मी जवळच असलेल्या बाजारपेठेतील स्टॉल्समध्ये भटकण्यात वेळ घालवून आणि थोडीफार खरेदी करून माझ्या तंबूमध्ये परतण्याचे ठरवतो.
प्रत्यक्षात मात्र मी शेवटी अंदाजे 2 तास तरी तिथल्या दुकानांच्यात घालवतो. भरतकाम किंवा बांधणी प्रकारची वस्त्रे, त्यांचे रंग हे सगळे मनाला फारच लुभावणारे वाटते आहे. कलाकुसरीच्या इतर वस्तूंची कारागिरी सुद्धा फारच अप्रतिम वाटते आहे.
12.30च्या सुमारास मी माझ्या तंबूकडे परत येतो. प्रत्येक तंबूमध्ये, 2 शयनमंच, 2 टेबले, खुर्च्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक रूम हीटर, पाणी गरम करण्यासाठी एक इलेक्ट्रिक किटली आणि चहाचे किट टेबलावर ठेवलेले आहे. तंबूच्या मागच्या बाजूस आधुनिक सुविधा असलेले स्वच्छता गृह आहे.
मी जरावेळ आराम करतो व परत एकदा भोजन गृहात जाऊन संपूर्ण गुजराथी भोजनाचा आस्वाद घेतो व नंतर या कॅम्पच्या स्वागत कक्षाजवळ असलेल्या वाहनतळाकडे वळतो.
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 2
वातानुकूलित बसेसचा एक ताफाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला या कॅम्पच्या व्यवस्थापनाने कॅम्प रहिवाशांच्या सोईसाठी म्हणून नेहमी तयार ठेवलेला असतो. त्यापैकी पुढे असलेल्या एका बसमध्ये मी चढतो आणि पुढच्या काही मिनिटातच बस संपूर्ण भरल्यामुळे निघते सुद्धा! आम्ही परत एकदा भिरंडीयारनी गावाकडे जाणार्या चिंचोळ्या रस्त्याने निघालो आहोत. या गावाजवळ आमची बस आता हायवे 45 वर डावीकडे म्हणजे सकाळी आलो त्याच्या विरूद्ध दिशेला वळते आहे.
दुपारचे ऊन आता चांगलेच रणरणते आहे. वर सूर्य सुद्धा तळपतो आहे आणि अंग भाजून काढतो आहे. काही क्षणातच आम्ही गोल आकाराच्या 3 किंवा 4 भुंगा झोपड्यांच्या मधे असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो.
खाली उतरल्यावर एका दृष्टीक्षेपातच माझ्या लक्षात येते की हे काही खरे भिरंडीयारनी गाव नाही. ते बहुदा या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेल्यावर असावे. या भुंगा झोपड्या, कच्छ्च्या हस्तकला आणि भरतकाम केलेले कपडे, यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेले एक विक्री केंद्र आहे. पण समोर जे काही विक्रीसाठी दिसते आहे ते इतके सुंदर आणि अप्रतिम आहे की आम्ही खर्या गावात न आल्याबद्दल मला तक्रार करण्यासारखे काहीच नाहीये. कपडे, चादरी या सारख्या वस्त्रांवर या इथल्या कारागीरांनी रंगांची जी बहारदार उधळण केलेली दिसते आहे त्याला खरोखरच तोड नसेल. या रंगांबरोबरच या वस्त्रांवर भरतकाम करून ज्या आकृत्या विणलेल्या आहेत त्या ही अजोड आहेत. अनेक प्राणी, पक्षी, भूमितीय आकृत्या, या वस्त्रांवर, कच्छी टाका म्हणून परिचित असलेल्या एका टाक्याने, विणलेल्या दिसत आहेत. सभोवती टाके विणून छोटे छोटे आरसे या आकृत्यांत बसवलेले आहेत त्यामुळे आसमंतावर तळपणार्या सूर्याचे किरण त्यावरून परावर्तीत होऊन ही वस्त्रे चमचम करत झगमगत आहेत. विक्री करणार्या स्त्री पुरुष खेडूतांनी याच प्रकारची वस्त्रे अंगावर व डोक्यावर घेतलेली आहेत. खरे तर हे रंग अतिशय गडद आणि उठावदार आहेत तरीही ते वापरून बनवलेली वस्त्रे भगभगीत किंवा बेगडी असल्यासारखी वाटत नाहीत. परंपरागत चालत आलेल्या या हस्तकलांचे हेच वैशिष्ट्य असते. ही वस्त्रे म्हणजे माझ्या डोळ्यांना एक मेजवानी असल्यासारखीच मला वाटते आहे. भिरंडीयारनी गावातील हे भुंगा विक्री केंद्र, जरी खरा भुंगा नसले तरीही डोळ्यांना अतिशय आल्हाद्कारक मात्र नक्कीच वाटते आहे.
एका भुंग्यामध्ये मला भिंतीपाशी एक विचित्र दिसणारे एक उपकरण ठेवलेले दिसते आहे. मुळात हे एक लाकडी कपाट आहे. त्यावर शाडूच्या मातीचा लेप देऊन त्यावर पांढरा रंग दिलेला आहे. कपाटाच्या समोरील बाजूस एक छोटा दरवाजा दिसतो आहे. या कपाटाच्या वरच्या बाजूवर 3 मडक्यांच्या प्रत्येकी केलेल्या 2 उतरंडी ठेवलेल्या आहेत. त्यांनाही पांढरा रंग दिलेला आहे. या सर्वच उपकरणाच्या बाह्य पृष्ठभागावर छोटे आरसे शाडूच्या मातीत रोवून पक्के बसवून टाकलेले आहेत. हे येथील खेडूतांचे विद्युत किंवा दुसरी कोणतीही शक्ती आवश्यक नसलेले असे शीतकपाट आहे. कपाटावर असलेली मडकी पाण्याने भरून ठेवली की अन्नपदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ कपाटातील छोट्या कप्प्यामध्ये खराब न होता व्यवस्थित राहू शकतात. कच्छ मध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो व तपमान 50 अंश सेल्सस पर्यंत सहजपणे जाते. अशा परिस्थितीत हे ग्रामीण शीतकपाट खेडूतांना एक वरदानच ठरते.
आता आम्ही ‘होडको‘ नावाच्या दुसर्या एका खेड्यापाशी पोचलो आहोत. या खेड्याच्या थोड्या बाजूला, एक आदर्श खेडेगाव सरकारने उभारले आहे. या आदर्श गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या अखेरीचा 100 मीटर लांबीचा भाग हा दाट भरलेल्या बाभळींच्या वनामधून जातो आहे. मात्र ही बाभूळ आपल्याकडे दिसते तशी काटेरी बाभूळ (Gum Arabic) नसून आपण ज्याला विलायती बाभूळ (Prosopis juliflora) म्हणतो त्या प्रकारची चांगली उंच वाढलेली झाडे असल्याने त्यांच्या खालून सहजपणे जाता येते आहे. समोर दिसणार्या रंगवलेल्या भुंगा झोपड्या, स्वच्छ सारवलेली अंगणे, सगळीकडे आणि मुख्यत्वे भिंतींवर केलेले कलात्मक नक्षीकाम आणि चित्रे, पॉलिश केलेली घरांची दारे, यामुळे हे आदर्श गाव एखादा बॉलीवूड चित्रपटाचा सेट लावावा त्याप्रमाणे दिसते आहे.
असे असूनही हा चित्रपटाचा सेट मात्र नाही. या भुंगा झोपड्यांमध्ये लोक प्रत्यक्षात रहात आहेत. मला काही अतिशय गोंडस दिसणारी मुले या भुंगा झोपड्यांभोवती खेळताना दिसत आहेत. मी एका झोपडीत डोकावून बघतो. आतले घर अगदी स्वच्छ आणि टापटिपीने आवरलेले आहे. भिंतीवर लाकडी शेल्फ अडकवलेली आहेत व त्यांच्यावर घरातली भांडी–कुंडी व इतर सामान नीट लावून ठेवलेले दिसते आहे. समोरच्या भिंतीवर एका सपाट पाटीवर, शाडूच्या मातीचा थर देऊन त्यात बारके आरसे खोचून तयार केलेल्या डिझाइनचे एक पॅनेल लावलेले आहे. त्यातली कारागिरी दाद देण्यासारखीच आहे. या प्रकारच्या पॅनेल्सवरची डिझाइन्स, बहुधा भूमितीय आहेत व ती भिंतीवर बसवलेली आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या अनेक कलावस्तू आणि इतर गोष्टी आम्हाला बघता याव्यात म्हणून नीट मांडून ठेवलेल्या आहेत. कला गुण बहुदा या कच्छी खेडूतांच्या जनुकांमधेच असले पाहिजेत. नाहीतर त्यांनी बनवलेली अगदी साधी साधी डिझाइन्स सुद्धा दाद द्यावी अशीच आहेत. या लोकांच्या अंगात असलेल्या सृजनशीलतेचे किती कौतुक करावे तरी ते कमीच पडेल असाच कलाविष्कार येथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेला आहे.
या कच्छी खेडेगावांची ही कलासफर करताना संध्याकाळ कधी झाली ते मला कळतही नाही. आम्ही परत बसमध्ये चढतो पण कॅम्पकडे परत न जाता साधारण ईशान्य दिशेला असलेल्या एक गेस्ट हाऊसकडे आमची बस वळते. तेथे संध्याकाळचा चहा व बिस्किटे यांचा मी समाचार घेतो आणि जरा फ्रेश होऊन आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अतिशय भव्यदिव्य मानल्या जाणार्या अशा एका निसर्ग करामतीचे दर्शन घेण्यासाठी तयार होतो. या निसर्ग करामतीला, धवल मरुभूमी (the white desert) या नावाने ओळखले जाते.
मी वर ज्या बन्नी या नावाने ओळखल्या जाणार्या चराऊ रानांचा उल्लेख केला आहे ती राने कच्छ्च्या सर्वात उत्तरेला असलेला व ज्यात मानवी वस्ती आहे अशा एका प्रदेशाभोवती पसरलेली आहेत. या प्रदेशाच्या उत्तरेला, एक अफाट मोठी अशी एक मरूभूमी सुरू होते. या मरूभूमीमध्ये कोणतीही खेडी किंवा वस्त्या नाहीत व येथे कोणी रहात सुद्धा नाही. ही मरूभूमी उत्तर–दक्षिण दिशेला 50 ते 125 किमी एवढी पसरलेली आहे तर भारताच्या पश्चिम किनार्यापासून ते पूर्वेला जवळजवळ 300 किमी पर्यंत या मरूभूमीचा आवाका आहे. मात्र ही मरूभूमी म्हणजे नुसत्या रेतीच्या टेकड्यांनी भरलेले एक वाळवंट नाही. मॉन्सूनचे वारे सुटले की ‘रण‘ या नावाने ओळखल्या जाणार्या या मरूभूमीमध्ये, अरबी समुद्राचे पाणी घुसते व या मरूभूमीच्या आसमंतात असलेल्या पर्जन्यपोषित नद्या सुद्धा तुडुंब वहात येऊन या पाण्यात भर टाकतात. या कारणांमुळे ही सर्व मरूभूमी दर वर्षी, या सर्व मॉन्सून कालात, काही फूट खोल पाण्याखाली असते. मात्र मॉन्सूनचे वारे ओसरले की हे सर्व पाणी परत समुद्राकडे धाव घेते आणि पाणी गळून गेल्यावरचे हे रण, प्रथम दलदलीच्या स्वरूपात बदलते व शेवटी त्याला एका कोरड्या वाळवंटाचे स्वरूप येते. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये येथील जमीन कोरडी व पापुद्रे सुटलेली अशी दिसते. मात्र या मरूभूमीच्या काही भागावर मात्र गळून जाणारे समुद्राचे पाणी, मिठाचा (Sodium Chloride) एक थर सोडून जाते. जमिनीवर पसरलेला हा पांढर्या शुभ्र मिठाचा थर आसमंतात एक जादूमय वातावरण निर्माण करतो. रणाच्या या भागांना धवल मरूभूमी म्हणून यासाठीच ओळखले जाते व निसर्गाची अतिशय दुर्मीळ व अद्भुत अशी ही करामत डोळे भरून बघण्यासाठी मी आता निघालो आहे.
बस थांबते आणि मी खाली उतरतो. समोर काही अंतरावर एक बांबूचे कुंपण किंवा बॅरिकेड उभारलेले दिसते आहे. या कुंपणाच्या पलीकडच्या बाजूस कोणत्याही वाहनांनी जाऊ नये यासाठी ही तजवीज आहे. या कुंपणापलीकडे फक्त उंटाने ओढलेल्या गाड्या जाऊ शकतात. मात्र पलीकडे मला एक मोठा जनसमुदाय जमलेला दिसतो आहे. हिवाळ्याच्या दिवसातील संध्याकाळी, येथे पर्यटक शेकड्यांनी जमा होतात व पांढर्या शुभ्र क्षितिजामागे होणारा सूर्यास्ताचा भव्य खेळ, डोळे भरभरून बघत राहतात. या बॅरिकेडच्या मागे बर्याच अंतरावर, अगदी क्षितिजाजवळ मला एक पांढरा स्वच्छ पट्टा दिसतो आहे. तो शुभ्र पट्टा अर्थातच या धवल मरूभूमीचा आहे आणि तेथेच मी आता जाणार आहे.
मी बॅरिकेडमधून पुढे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, डबे तुम्हाला याच्या पुढे नेता येत नाहीत. मी खाली बघतो. पायाखालची जमीन जरा भुरकट–मातकट रंगाची वाटते आहे. मधून मधून पाणी साचलेली छोटी छोटी डबकी पण दिसत आहेत.
जमीन संपून ही धवल मरूभूमी जेथे सुरू होते आहे तेथे स्थानिक कलाकारांनी एक छोटेसे स्टेज उभारले आहे. त्यावर 5 किंवा 6 कलाकारांचा एक संच वाद्यांच्या साथीवर लोकगीते प्रस्तुत करतो आहे. साधारण लोकसंगीताच्या चाली असतात तसेच हे संगीत कानाला थोडे गूढ वाटत असले तरी कर्णमधुर आहे. अर्थात शब्द कच्छी भाषेतील असल्याने समजणे शक्यच नाही. मात्र या लोकसंगीताने या धवल मरूभूमीवर जो एक माहौल उभा केला आहे तसा परत आयुष्यात अनुभवणे कठीण आहे. मी माझे 1/2 फोटो या संगीत संचाबरोबर काढून घेतो आणि पुढे निघतो.
आता पायाखालची जमीन हळूहळू मळकट पांढरी होत जाते आहे आणि थोड्या अंतरावर अचानकपणेच ती शुभ्र धवल बनली आहे. वेड लागल्यासारखा मी तरातरा चालतच राहतो. पुढे आणखी एखादा किलोमीटर अंतर गेल्यावर मी स्तब्ध उभा राहतो. आता माझ्या चहूदिशांना फक्त एकच रंग उरला आहे. पार क्षितिजापर्यंत जाणवते आहे ती फक्त अपार आणि अफाट अशी धवलता. गेल्या काही मिनिटात येथे जादूने जोरदार हिमवर्षाव तर झाला नाहीये ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून जावी इतका आसमंत आता पांढरा शुभ्र झाला आहे. बरोबरचे कोणीतरी मला विचारते की आपण असेच चालत राहिलो तर कोठे पोचू? मला खरे तर क्षितिजावर! असे उत्तर द्यावे असे मनापासून वाटते आहे पण मी ते उत्तर न देता रूक्षपणे सिंधमध्ये पोचू असे सांगून टाकतो.
मगाशी डोक्यावर तळपणारा सूर्य, आता पश्चिम क्षितिजावर 10 ते 15 अंशावर आला आहे. आणि माझ्या पश्चिमेला, जमिनीवर पाणी साचून तयार झालेल्या शेकडो खळग्यांच्या पुंजक्यांनी अचानकपणे सुवर्णकांती प्राप्त केली आहे. सूर्यकिरणांमुळे हे साचलेले पाणी, मोजता येणार नाही अशा अनंत ठिकाणीं, नुसते झळाळून उठले आहे व सह्स्त्रावधी सुवर्णतारका एकदम चमकाव्यात तसे चमचमते आहे. समोरचे हे अवर्णनीय दृष्य मला या अवनीतलावरचे वाटतच नाहीये. या प्रकारचे स्वर्गीय दृष्य माझ्या उर्वरित आयुष्यात परत बघता येईल असे काही मला वाटत नाही.
वेळ तर पुढे सरकतोच आहे. मी आसमंताची अक्षरश: शेकडोंनी छायाचित्रे घेतो आहे. पश्चिम क्षितिजावर पोचलेल्या सूर्याने आता थोडी नारिंगी छटा असलेला सुवर्णमय अवतार धारण केला आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे नाव पूर्वी ऋषींनी देण्यामागचे कारणच मला समोर दिसते आहे. सूर्याचा इतका शुद्ध आणि स्वर्गीय अवतार मी या पूर्वी कधीच बघितलेला नाही. मी सहाज पूर्वेकडे वळून बघतो. क्षितिजापासून साधारण 40 अंशावर दुधाच्या रंगाचा सफेद चंद्र आकाशात मला सहजपणे दिसतो आहे.
आणखी काही क्षण जातात. सूर्याची एक कड आता क्षितिजाला टेकते आहे. क्षणार्धात पश्चिमेला असलेले पाण्याचे सर्व सुवर्णमय पुंजके एकमेकाचा हात हातात घेतात व मला समोर दिसू लागतो नारिंगी सुवर्ण रंगाचा परंतु सबंध क्षितिजाच्या लांबीचा एक चिंचोळा पट्टा!हा पट्टा तर आता सूर्याचा एक भागच असल्यासारखा झळाळतो आहे. आणखी काही क्षण जातात.सूर्याची वरची कडही क्षितिजाआड लपते. त्याचबरोबर मगाशी झळाळणारे पाण्याचे ते पुंजकेही हरपतात.
मी एक उसासा टाकतो व परत फिरण्यासाठी मागे वळतो. चालत असतानाच माझ्या अचानक लक्षात येते की आजूबाजूच्या जमिनीने आता अचानक रुपेरी रंग प्राप्त केला आहे. सूर्य क्षितिजाआड गेल्याने आणि नारिंगी रंगाचा मागमूस न राहिल्याने चंद्राने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. मगाशी सुवर्णकांती धारण केलेली ही शुभ्र धवल मरूभूमी आता रुपेरी बनली आहे. अगदी रूक्षपणे सांगायचे म्हटले तरी ही सभोवार दिसणारी अवनी आता अचानक जादूमय बनली आहे.
अगदी नाईलाजाने पाय निघत नसतानाही मी परत बसकडे वळतो व आमच्या कॅम्पकडे येण्यास निघतो. रात्री गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पाय जवळच असलेल्या अॅम्फीथिएटर कडे वळतात. आजा अहमदाबाद येथील एका नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींचा ‘कुचिपुडी‘ पद्धतीच्या नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आता परत चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. मी अंगावर भरपूर कपडे चढवतो व डोळ्यावर पेंग येत असूनही हा प्रेक्षणीय कार्यक्रम पूर्ण बघतो.
नंतर झोपेची आराधना करत असताना माझे विचार उद्याच्या विशेष कार्यक्रमाच्या भोवतालीच केंद्रित झाले आहेत. उद्या सकाळी, जवळचे हे विराण आणि विशाल रण ओलांडून आम्ही, जेथे परत एकदा मानवी वस्ती शक्य आहे अशा पलीकडच्या म्हणजेच उत्तरेच्या बाजूच्या काठावर जाणार आहोत. परंतु या काठाच्या पलीकडे असलेला भूभाग मात्र आता भारताच्या स्वामित्वाखालील नाही.
(क्रमश)
https://chandrashekhara.wordpress.com
वातानुकूलित बसेसचा एक ताफाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला या कॅम्पच्या व्यवस्थापनाने कॅम्प रहिवाशांच्या सोईसाठी म्हणून नेहमी तयार ठेवलेला असतो. त्यापैकी पुढे असलेल्या एका बसमध्ये मी चढतो आणि पुढच्या काही मिनिटातच बस संपूर्ण भरल्यामुळे निघते सुद्धा! आम्ही परत एकदा भिरंडीयारनी गावाकडे जाणार्या चिंचोळ्या रस्त्याने निघालो आहोत. या गावाजवळ आमची बस आता हायवे 45 वर डावीकडे म्हणजे सकाळी आलो त्याच्या विरूद्ध दिशेला वळते आहे.
दुपारचे ऊन आता चांगलेच रणरणते आहे. वर सूर्य सुद्धा तळपतो आहे आणि अंग भाजून काढतो आहे. काही क्षणातच आम्ही गोल आकाराच्या 3 किंवा 4 भुंगा झोपड्यांच्या मधे असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो.
खाली उतरल्यावर एका दृष्टीक्षेपातच माझ्या लक्षात येते की हे काही खरे भिरंडीयारनी गाव नाही. ते बहुदा या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेल्यावर असावे. या भुंगा झोपड्या, कच्छ्च्या हस्तकला आणि भरतकाम केलेले कपडे, यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेले एक विक्री केंद्र आहे. पण समोर जे काही विक्रीसाठी दिसते आहे ते इतके सुंदर आणि अप्रतिम आहे की आम्ही खर्या गावात न आल्याबद्दल मला तक्रार करण्यासारखे काहीच नाहीये. कपडे, चादरी या सारख्या वस्त्रांवर या इथल्या कारागीरांनी रंगांची जी बहारदार उधळण केलेली दिसते आहे त्याला खरोखरच तोड नसेल. या रंगांबरोबरच या वस्त्रांवर भरतकाम करून ज्या आकृत्या विणलेल्या आहेत त्या ही अजोड आहेत. अनेक प्राणी, पक्षी, भूमितीय आकृत्या, या वस्त्रांवर, कच्छी टाका म्हणून परिचित असलेल्या एका टाक्याने, विणलेल्या दिसत आहेत. सभोवती टाके विणून छोटे छोटे आरसे या आकृत्यांत बसवलेले आहेत त्यामुळे आसमंतावर तळपणार्या सूर्याचे किरण त्यावरून परावर्तीत होऊन ही वस्त्रे चमचम करत झगमगत आहेत. विक्री करणार्या स्त्री पुरुष खेडूतांनी याच प्रकारची वस्त्रे अंगावर व डोक्यावर घेतलेली आहेत. खरे तर हे रंग अतिशय गडद आणि उठावदार आहेत तरीही ते वापरून बनवलेली वस्त्रे भगभगीत किंवा बेगडी असल्यासारखी वाटत नाहीत. परंपरागत चालत आलेल्या या हस्तकलांचे हेच वैशिष्ट्य असते. ही वस्त्रे म्हणजे माझ्या डोळ्यांना एक मेजवानी असल्यासारखीच मला वाटते आहे. भिरंडीयारनी गावातील हे भुंगा विक्री केंद्र, जरी खरा भुंगा नसले तरीही डोळ्यांना अतिशय आल्हाद्कारक मात्र नक्कीच वाटते आहे.
एका भुंग्यामध्ये मला भिंतीपाशी एक विचित्र दिसणारे एक उपकरण ठेवलेले दिसते आहे. मुळात हे एक लाकडी कपाट आहे. त्यावर शाडूच्या मातीचा लेप देऊन त्यावर पांढरा रंग दिलेला आहे. कपाटाच्या समोरील बाजूस एक छोटा दरवाजा दिसतो आहे. या कपाटाच्या वरच्या बाजूवर 3 मडक्यांच्या प्रत्येकी केलेल्या 2 उतरंडी ठेवलेल्या आहेत. त्यांनाही पांढरा रंग दिलेला आहे. या सर्वच उपकरणाच्या बाह्य पृष्ठभागावर छोटे आरसे शाडूच्या मातीत रोवून पक्के बसवून टाकलेले आहेत. हे येथील खेडूतांचे विद्युत किंवा दुसरी कोणतीही शक्ती आवश्यक नसलेले असे शीतकपाट आहे. कपाटावर असलेली मडकी पाण्याने भरून ठेवली की अन्नपदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ कपाटातील छोट्या कप्प्यामध्ये खराब न होता व्यवस्थित राहू शकतात. कच्छ मध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो व तपमान 50 अंश सेल्सस पर्यंत सहजपणे जाते. अशा परिस्थितीत हे ग्रामीण शीतकपाट खेडूतांना एक वरदानच ठरते.
आता आम्ही ‘होडको‘ नावाच्या दुसर्या एका खेड्यापाशी पोचलो आहोत. या खेड्याच्या थोड्या बाजूला, एक आदर्श खेडेगाव सरकारने उभारले आहे. या आदर्श गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या अखेरीचा 100 मीटर लांबीचा भाग हा दाट भरलेल्या बाभळींच्या वनामधून जातो आहे. मात्र ही बाभूळ आपल्याकडे दिसते तशी काटेरी बाभूळ (Gum Arabic) नसून आपण ज्याला विलायती बाभूळ (Prosopis juliflora) म्हणतो त्या प्रकारची चांगली उंच वाढलेली झाडे असल्याने त्यांच्या खालून सहजपणे जाता येते आहे. समोर दिसणार्या रंगवलेल्या भुंगा झोपड्या, स्वच्छ सारवलेली अंगणे, सगळीकडे आणि मुख्यत्वे भिंतींवर केलेले कलात्मक नक्षीकाम आणि चित्रे, पॉलिश केलेली घरांची दारे, यामुळे हे आदर्श गाव एखादा बॉलीवूड चित्रपटाचा सेट लावावा त्याप्रमाणे दिसते आहे.
असे असूनही हा चित्रपटाचा सेट मात्र नाही. या भुंगा झोपड्यांमध्ये लोक प्रत्यक्षात रहात आहेत. मला काही अतिशय गोंडस दिसणारी मुले या भुंगा झोपड्यांभोवती खेळताना दिसत आहेत. मी एका झोपडीत डोकावून बघतो. आतले घर अगदी स्वच्छ आणि टापटिपीने आवरलेले आहे. भिंतीवर लाकडी शेल्फ अडकवलेली आहेत व त्यांच्यावर घरातली भांडी–कुंडी व इतर सामान नीट लावून ठेवलेले दिसते आहे. समोरच्या भिंतीवर एका सपाट पाटीवर, शाडूच्या मातीचा थर देऊन त्यात बारके आरसे खोचून तयार केलेल्या डिझाइनचे एक पॅनेल लावलेले आहे. त्यातली कारागिरी दाद देण्यासारखीच आहे. या प्रकारच्या पॅनेल्सवरची डिझाइन्स, बहुधा भूमितीय आहेत व ती भिंतीवर बसवलेली आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या अनेक कलावस्तू आणि इतर गोष्टी आम्हाला बघता याव्यात म्हणून नीट मांडून ठेवलेल्या आहेत. कला गुण बहुदा या कच्छी खेडूतांच्या जनुकांमधेच असले पाहिजेत. नाहीतर त्यांनी बनवलेली अगदी साधी साधी डिझाइन्स सुद्धा दाद द्यावी अशीच आहेत. या लोकांच्या अंगात असलेल्या सृजनशीलतेचे किती कौतुक करावे तरी ते कमीच पडेल असाच कलाविष्कार येथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेला आहे.
या कच्छी खेडेगावांची ही कलासफर करताना संध्याकाळ कधी झाली ते मला कळतही नाही. आम्ही परत बसमध्ये चढतो पण कॅम्पकडे परत न जाता साधारण ईशान्य दिशेला असलेल्या एक गेस्ट हाऊसकडे आमची बस वळते. तेथे संध्याकाळचा चहा व बिस्किटे यांचा मी समाचार घेतो आणि जरा फ्रेश होऊन आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अतिशय भव्यदिव्य मानल्या जाणार्या अशा एका निसर्ग करामतीचे दर्शन घेण्यासाठी तयार होतो. या निसर्ग करामतीला, धवल मरुभूमी (the white desert) या नावाने ओळखले जाते.
मी वर ज्या बन्नी या नावाने ओळखल्या जाणार्या चराऊ रानांचा उल्लेख केला आहे ती राने कच्छ्च्या सर्वात उत्तरेला असलेला व ज्यात मानवी वस्ती आहे अशा एका प्रदेशाभोवती पसरलेली आहेत. या प्रदेशाच्या उत्तरेला, एक अफाट मोठी अशी एक मरूभूमी सुरू होते. या मरूभूमीमध्ये कोणतीही खेडी किंवा वस्त्या नाहीत व येथे कोणी रहात सुद्धा नाही. ही मरूभूमी उत्तर–दक्षिण दिशेला 50 ते 125 किमी एवढी पसरलेली आहे तर भारताच्या पश्चिम किनार्यापासून ते पूर्वेला जवळजवळ 300 किमी पर्यंत या मरूभूमीचा आवाका आहे. मात्र ही मरूभूमी म्हणजे नुसत्या रेतीच्या टेकड्यांनी भरलेले एक वाळवंट नाही. मॉन्सूनचे वारे सुटले की ‘रण‘ या नावाने ओळखल्या जाणार्या या मरूभूमीमध्ये, अरबी समुद्राचे पाणी घुसते व या मरूभूमीच्या आसमंतात असलेल्या पर्जन्यपोषित नद्या सुद्धा तुडुंब वहात येऊन या पाण्यात भर टाकतात. या कारणांमुळे ही सर्व मरूभूमी दर वर्षी, या सर्व मॉन्सून कालात, काही फूट खोल पाण्याखाली असते. मात्र मॉन्सूनचे वारे ओसरले की हे सर्व पाणी परत समुद्राकडे धाव घेते आणि पाणी गळून गेल्यावरचे हे रण, प्रथम दलदलीच्या स्वरूपात बदलते व शेवटी त्याला एका कोरड्या वाळवंटाचे स्वरूप येते. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये येथील जमीन कोरडी व पापुद्रे सुटलेली अशी दिसते. मात्र या मरूभूमीच्या काही भागावर मात्र गळून जाणारे समुद्राचे पाणी, मिठाचा (Sodium Chloride) एक थर सोडून जाते. जमिनीवर पसरलेला हा पांढर्या शुभ्र मिठाचा थर आसमंतात एक जादूमय वातावरण निर्माण करतो. रणाच्या या भागांना धवल मरूभूमी म्हणून यासाठीच ओळखले जाते व निसर्गाची अतिशय दुर्मीळ व अद्भुत अशी ही करामत डोळे भरून बघण्यासाठी मी आता निघालो आहे.
बस थांबते आणि मी खाली उतरतो. समोर काही अंतरावर एक बांबूचे कुंपण किंवा बॅरिकेड उभारलेले दिसते आहे. या कुंपणाच्या पलीकडच्या बाजूस कोणत्याही वाहनांनी जाऊ नये यासाठी ही तजवीज आहे. या कुंपणापलीकडे फक्त उंटाने ओढलेल्या गाड्या जाऊ शकतात. मात्र पलीकडे मला एक मोठा जनसमुदाय जमलेला दिसतो आहे. हिवाळ्याच्या दिवसातील संध्याकाळी, येथे पर्यटक शेकड्यांनी जमा होतात व पांढर्या शुभ्र क्षितिजामागे होणारा सूर्यास्ताचा भव्य खेळ, डोळे भरभरून बघत राहतात. या बॅरिकेडच्या मागे बर्याच अंतरावर, अगदी क्षितिजाजवळ मला एक पांढरा स्वच्छ पट्टा दिसतो आहे. तो शुभ्र पट्टा अर्थातच या धवल मरूभूमीचा आहे आणि तेथेच मी आता जाणार आहे.
मी बॅरिकेडमधून पुढे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, डबे तुम्हाला याच्या पुढे नेता येत नाहीत. मी खाली बघतो. पायाखालची जमीन जरा भुरकट–मातकट रंगाची वाटते आहे. मधून मधून पाणी साचलेली छोटी छोटी डबकी पण दिसत आहेत.
जमीन संपून ही धवल मरूभूमी जेथे सुरू होते आहे तेथे स्थानिक कलाकारांनी एक छोटेसे स्टेज उभारले आहे. त्यावर 5 किंवा 6 कलाकारांचा एक संच वाद्यांच्या साथीवर लोकगीते प्रस्तुत करतो आहे. साधारण लोकसंगीताच्या चाली असतात तसेच हे संगीत कानाला थोडे गूढ वाटत असले तरी कर्णमधुर आहे. अर्थात शब्द कच्छी भाषेतील असल्याने समजणे शक्यच नाही. मात्र या लोकसंगीताने या धवल मरूभूमीवर जो एक माहौल उभा केला आहे तसा परत आयुष्यात अनुभवणे कठीण आहे. मी माझे 1/2 फोटो या संगीत संचाबरोबर काढून घेतो आणि पुढे निघतो.
आता पायाखालची जमीन हळूहळू मळकट पांढरी होत जाते आहे आणि थोड्या अंतरावर अचानकपणेच ती शुभ्र धवल बनली आहे. वेड लागल्यासारखा मी तरातरा चालतच राहतो. पुढे आणखी एखादा किलोमीटर अंतर गेल्यावर मी स्तब्ध उभा राहतो. आता माझ्या चहूदिशांना फक्त एकच रंग उरला आहे. पार क्षितिजापर्यंत जाणवते आहे ती फक्त अपार आणि अफाट अशी धवलता. गेल्या काही मिनिटात येथे जादूने जोरदार हिमवर्षाव तर झाला नाहीये ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून जावी इतका आसमंत आता पांढरा शुभ्र झाला आहे. बरोबरचे कोणीतरी मला विचारते की आपण असेच चालत राहिलो तर कोठे पोचू? मला खरे तर क्षितिजावर! असे उत्तर द्यावे असे मनापासून वाटते आहे पण मी ते उत्तर न देता रूक्षपणे सिंधमध्ये पोचू असे सांगून टाकतो.
मगाशी डोक्यावर तळपणारा सूर्य, आता पश्चिम क्षितिजावर 10 ते 15 अंशावर आला आहे. आणि माझ्या पश्चिमेला, जमिनीवर पाणी साचून तयार झालेल्या शेकडो खळग्यांच्या पुंजक्यांनी अचानकपणे सुवर्णकांती प्राप्त केली आहे. सूर्यकिरणांमुळे हे साचलेले पाणी, मोजता येणार नाही अशा अनंत ठिकाणीं, नुसते झळाळून उठले आहे व सह्स्त्रावधी सुवर्णतारका एकदम चमकाव्यात तसे चमचमते आहे. समोरचे हे अवर्णनीय दृष्य मला या अवनीतलावरचे वाटतच नाहीये. या प्रकारचे स्वर्गीय दृष्य माझ्या उर्वरित आयुष्यात परत बघता येईल असे काही मला वाटत नाही.
वेळ तर पुढे सरकतोच आहे. मी आसमंताची अक्षरश: शेकडोंनी छायाचित्रे घेतो आहे. पश्चिम क्षितिजावर पोचलेल्या सूर्याने आता थोडी नारिंगी छटा असलेला सुवर्णमय अवतार धारण केला आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे नाव पूर्वी ऋषींनी देण्यामागचे कारणच मला समोर दिसते आहे. सूर्याचा इतका शुद्ध आणि स्वर्गीय अवतार मी या पूर्वी कधीच बघितलेला नाही. मी सहाज पूर्वेकडे वळून बघतो. क्षितिजापासून साधारण 40 अंशावर दुधाच्या रंगाचा सफेद चंद्र आकाशात मला सहजपणे दिसतो आहे.
आणखी काही क्षण जातात. सूर्याची एक कड आता क्षितिजाला टेकते आहे. क्षणार्धात पश्चिमेला असलेले पाण्याचे सर्व सुवर्णमय पुंजके एकमेकाचा हात हातात घेतात व मला समोर दिसू लागतो नारिंगी सुवर्ण रंगाचा परंतु सबंध क्षितिजाच्या लांबीचा एक चिंचोळा पट्टा!हा पट्टा तर आता सूर्याचा एक भागच असल्यासारखा झळाळतो आहे. आणखी काही क्षण जातात.सूर्याची वरची कडही क्षितिजाआड लपते. त्याचबरोबर मगाशी झळाळणारे पाण्याचे ते पुंजकेही हरपतात.
मी एक उसासा टाकतो व परत फिरण्यासाठी मागे वळतो. चालत असतानाच माझ्या अचानक लक्षात येते की आजूबाजूच्या जमिनीने आता अचानक रुपेरी रंग प्राप्त केला आहे. सूर्य क्षितिजाआड गेल्याने आणि नारिंगी रंगाचा मागमूस न राहिल्याने चंद्राने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. मगाशी सुवर्णकांती धारण केलेली ही शुभ्र धवल मरूभूमी आता रुपेरी बनली आहे. अगदी रूक्षपणे सांगायचे म्हटले तरी ही सभोवार दिसणारी अवनी आता अचानक जादूमय बनली आहे.
अगदी नाईलाजाने पाय निघत नसतानाही मी परत बसकडे वळतो व आमच्या कॅम्पकडे येण्यास निघतो. रात्री गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पाय जवळच असलेल्या अॅम्फीथिएटर कडे वळतात. आजा अहमदाबाद येथील एका नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींचा ‘कुचिपुडी‘ पद्धतीच्या नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आता परत चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. मी अंगावर भरपूर कपडे चढवतो व डोळ्यावर पेंग येत असूनही हा प्रेक्षणीय कार्यक्रम पूर्ण बघतो.
नंतर झोपेची आराधना करत असताना माझे विचार उद्याच्या विशेष कार्यक्रमाच्या भोवतालीच केंद्रित झाले आहेत. उद्या सकाळी, जवळचे हे विराण आणि विशाल रण ओलांडून आम्ही, जेथे परत एकदा मानवी वस्ती शक्य आहे अशा पलीकडच्या म्हणजेच उत्तरेच्या बाजूच्या काठावर जाणार आहोत. परंतु या काठाच्या पलीकडे असलेला भूभाग मात्र आता भारताच्या स्वामित्वाखालील नाही.
(क्रमश)
https://chandrashekhara.wordpress.com
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 3
गुरूवार
आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या ‘खावडा‘ गावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाईडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.
खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.
आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.
मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.
एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील ‘रहिम की बझार‘ हे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.
आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने ‘चिडियामोर‘ असे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.
चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.
बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिग–झॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.
विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.
विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्यावरून मला स्पष्ट दिसते आहे.
या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.
आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.
दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्या टेकड्या व दर्या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्याखोर्यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गारठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.
या निरीक्षण चौथर्यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्यावरील कडा खर्या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.
नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.
उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.
(क्रमश)
गुरूवार
आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या ‘खावडा‘ गावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाईडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.
खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.
आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.
मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.
एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील ‘रहिम की बझार‘ हे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.
आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने ‘चिडियामोर‘ असे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.
चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.
बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिग–झॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.
विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.
विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्यावरून मला स्पष्ट दिसते आहे.
या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.
आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.
दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्या टेकड्या व दर्या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्याखोर्यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गारठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.
या निरीक्षण चौथर्यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्यावरील कडा खर्या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.
नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.
उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 4
शुक्रवार
मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक प्लॅनिंग आणि त्याच बरोबर कमालीची कार्यक्षमता यामुळे कॅम्प व्यवस्थापनाला मला मनापासून दाद द्याविशी वाटते आहे. आमची बस कॅम्प सोडते व काही वेळातच परत एकदा भिरंडीयारनी गावात थांबते. या गावातला थांबा हा पूर्वीच्या मुंबई–पुणे रस्त्याला जसा खोपोलीचा थांबा अनिवार्य असे तसाच बहुधा इथल्या वाहन चालकांना वाटत असावा. परंतु या खेपेस मात्र मी बसमधून खाली उतरतो व दुधापासून बनवलेला इथला प्रसिद्ध मावा खरेदी करतो. भूजमध्ये मी पोचतो तेंव्हा सकाळचे 11 वाजले आहेत आणि हॉटेलमध्ये चेक इन करायला मला काहीच अडचण नाही. आजचा दिवस मी या पुरातन शहरामध्ये साइट सीइंग करण्यात घालवायचा असे ठरवले आहे. या शहराचे भूज हे नाव येथे जवळच असलेल्या 160 मीटर उंचीच्या भुजियो डुंगर किंवा Serpant Hill या नावाने ओळखल्या जाणार्या पर्वतामुळे पडले आहे. सर्पांचा राजा भुजंग याचे हे वसतीस्थान होते अशी एक आख्यायिका आहे व त्यामुळे या पर्वतावर भुजंगाचे एक मंदीर सुद्धा आहे.
8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत कच्छ्वर सिंध मधील सामा या राजपूत घराण्याची सत्ता होती. हा काळ सिंधच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्याबद्दल लिहून ठेवावे असा सुवर्णकाल होता असा समज आहे. या नंतर या राजांची सत्ता कमजोर पडत गेली. राजघराण्याच्या अंतर्गत अनेक कट कारस्थाने व हत्या घडवल्या गेल्या आणि अखेरीस या सामा राजपुतांचे वंशज असलेलेच लाखो जडेजा घराणे सत्तेवर आले. तेंव्हापासून हे घराणे जडेजा राजपूत या नावाने ओळखले जाते. या राजांनी सिंधमधून कच्छ्चा राज्यकारभार न चालवता तो कच्छ मधील अंजर गावातून चालवण्यास सुरुवात केली. कच्छच्या भौगोलिक मध्यावर भूज गाव येत असल्याने त्याचे महत्त्व ओळखून इ.स.1549 मध्ये खेंगराज 1 या राजाने आपली राजधानी भूजला हलवली आणि कच्छची भूज ही राजधानी अस्तित्वात आली.
प्रथम मोगल काळात व नंतर ब्रिटिश राजवटीत, जडेजा राजे बर्याच प्रमाणात आपले स्वतंत्र सार्वभौमत्त्व राखण्यात यशस्वी ठरल्याने भूज शहराला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व राखून ठेवता आले आहे. 18 व्या शतकात गादीवर आलेल्या लखपतजी 1 यांच्यापासून पुढे गादीवर आलेल्या सर्व जडेजा राजांनी भूजमध्ये नवे नवे महाल बांधले आणि शहर शोभिवंत करण्याकडे लक्ष बरेच केंद्रित केले. परंतु दर काही दशकांनंतर होत गेलेल्या महाभयंकर भूकंपांमुळे कच्छ्मध्ये बांधल्या गेलेल्या जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त होत राहिल्या व जडेजा राजांनी बांधलेले महाल सुद्धा याला अपवाद ठरू शकले नाहीत. या भूकंप मालिकेपैकी सर्वात भयावह भूकंप 16 जून 1819 या दिवशी झाला. यानंतर 1844-45, 1864 आणि शेवटी 2001 मध्ये असेच जबरदस्त भूकंपाचे झटके भूजला बसले. या भूकंपांमध्ये कच्छ मधील जवळपास सर्वच जुन्या इमारती जमीन सपाट झालेल्या आहेत.
ऐना महल
भूजच्या साधारण मध्यभागात असलेल्या हमिसर तलावाच्या चहूबाजूंना भूजमधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बांधलेली/ बनवली गेलेली असल्याने भूज मधील पर्यटन हे फारशा प्रयासांविना पर्यटकांना करता येते. मागच्या वर्षी हा तलाव तुडूंब भरून वहात होता म्हणे! परंतु या वर्षी पाऊसच न पडल्याने तलावात पाणीच नाहीये. तलावाभोवतीची प्रेक्षणीय स्थळे बघण्याआधी मी प्रथम पेटपूजा करण्याचे ठरवतो व बस स्टॅन्ड जवळील एका बर्या दिसणार्या हॉटेलात जाऊन कच्छी पावभाजीची ऑर्डर देतो. चमचमीत पावभाजीच्या भोजनानंतर भूजमधील साइट सीइंग, हमिसर तलावाच्या काठावर असलेल्या ऐना महालापासून सुरू करावे असे ठरवून एक रिक्षा ठरवतो. भूजमधील रिक्षा मात्र अत्यंत त्रासदायक वाटतात. एकतर बसण्यासाठी असलेल्या सीट्स आरामदायक अजिबातच नाहीत व पळताना त्या आवाजही प्रचंड प्रमाणात करत राहतात. ऐना महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचल्यानंतर मात्र माझी मोठी निराशा होते. ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने ऐना महालाचे दरवाजे बंद असल्याचे मला दिसते आहे.
1750 मध्ये राव लखपतजी यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या साठी त्यांनी आधीच्या वर्षांत रामसिंघ मालम या कारागिराला आरसे बनवणे आणि धातू काम यांचे विशेष शिक्षण घेण्यासाठी युरोपला पाठवले होते. होते. तो परत आल्यावर त्याने या महालाचे काम व्हेनिसहून काचा मागवून पूर्ण केले होते. या दुमजली इमारतीत दरबार हॉल, आरसे महाल आणि राजपरिवारासाठी कक्ष बनवण्यात आले होते. संगमरवरी फरशांनी आच्छादलेल्या भिंती व त्यावर सोन्याचे पाणी चढवलेल्या पत्र्याच्या कोंदणांत बसवलेले आरसे हे या महालाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचप्रमाणे तळाच्या थोड्या वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर बसवलेली कारंजी हे ही या महालाची एक खासियत आहे. हा महाल रामसिंघ मालम याच्या कारागिरीची कमाल मानली जाते. 18व्या शतकाच्या मध्यावर बांधलेला व युरोपियन छाप असलेल्या भारतीय स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाचे नेहमीच नाव घेतले जाते.
ऐना महालाच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम
प्रागजी महाल
ऐना महालाच्या अगदी बाजूलाच हा महाल आहे. 1838-76 या कालात कच्छच्या गादीवर असलेले राव प्रागमलजी दुसरे यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या महालाचे डिझाइन एक सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल हेनरी सेंट विल्किन्स यांनी केलेले होते. याच काळात बांधल्या गेलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि ओहेल डेव्हिड सिनेगॉग (लाल देऊळ) या सारख्या इमारतींचे आराखडे याच वास्तुविशारदांनी केलेले असल्याने हा महाल मला अगदी सुपरिचित असल्या सारखाच भासतो आहे. हा महाल बांधण्यासाठी 10 वर्षे लागली व अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च आला होता. मला मात्र हा महाल, मुंबईच्या फोर्ट विभागात असलेला राजाभाई टॉवर व त्या शेजारील मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत, या दोन्ही सारखाच हुबेहुब वाटतो आहे व त्यामुळे त्याची खास अशी छाप माझ्यावर पडू शकत नाहीये. या महालाच्या व्हरांड्यातील आधार स्तंभ आणि त्यावरील कॉर्निस हे भाग सुद्धा मला ओळखीचेच भासत आहेत. हा महाल सुदैवाने प्रवेश करण्यास आज खुला आहे. मी प्रवेश पत्रिका विकत घेतो व आत पाऊल टाकतो.
ब्रिटिश काळात भारतात असलेल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानिकांचे जसे महाल होते साधारण त्याच धर्तीवर असलेल्या या महालामधे आता एक संग्रहालय बनवण्यात आलेले आहे. त्या कालातील फर्निचर, राजपरिवारातील व्यक्तींच्या वापरातील वस्तू, तैलचित्रे, भांडीकुंडी, शिकारीत मारलेल्या प्राण्यांची पेंढा भरलेली डोकी, बंदुका आणि राजपुत्र व राजकन्या यांची खेळणी या सारख्या गोष्टी येथे मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. राव प्रागमलजी यांच्या दरबार हॉलचे नूतनीकरण चालू असल्यामुळे तो हॉल बंदच आहे. या संग्रहालयातील वस्तूंपैकी मला सर्वात काय आवडले असेल तर राजा रविवर्मा यांनी चित्रित केलेल्या चित्रांच्या छापील प्रतींची एक फ्रेम करून ठेवलेली मालिका. या फ्रेम्समध्ये या चित्रांमधील व्यक्तींच्या, विशेषेकरून स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर किंवा काठ यावर बारीक चमचम करणारे खडे चिकटवले आहेत व त्यामुळे या चित्रांचे मूळ सौंदर्य मोठे खुलून दिसते आहे.
या प्रासादाच्या गच्चीवरून मला जवळचा असलेला पण संपूर्णपणे आटलेला हमिसर तलाव दिसतो आहे. त्याच प्रमाणे पलीकडेच असलेला रामकुंड हा पाणी तलाव ही कोरडा ठणठणीत दिसतो आहे. महालाच्या पुढच्या पोर्चपाशी एक चाकांवर बसवलेली तोफ ठेवलेली आहे. तिचा वापर कधी झाला असेल असे वाटत नाही. ही तोफ़ बहुधा एक शो पीस म्हणूनच ठेवलेली असावी. या महालाच्या समोर असलेल्या राणी महालाची 2001 मधील भूकंपात अपरिमित हानी झालेली असल्याने प्रागजी महालाचा संपूर्ण परिसर हा पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो आहे. समोर दिसणारी तोफ या पडझडीची एकुलती एक मूक साक्षीदार असावी असे माझ्या मनाला वाटत राहिले आहे.
रामकुंड
या राणी महालाची एवढी हानी भूकंपामध्ये झालेली आहे की यात प्रवेश करणेही धोकादायक समजले जाते आहे. या राणी महालाचे स्थापत्य मात्र अप्रतिम आहे यात शंकाच नाही. गवाक्षे आणि द्वारे यांच्या बाहेर असलेल्या षटकोनी आकाराच्या बाल्कनी व त्यावर बसवलेल्या आणि कोरीव काम करून तयार केलेल्या जाळ्या, दरवाज्यांबाहेरील चौकटी या अतिशय सुंदर रितीने बनवल्या गेलेल्या आहेत. राणी महालाच्या स्थापत्याचे बाहेरून कौतुक करण्याशिवाय बाकी काहीच करणे शक्य नसल्याने मी तेथे काही मिनिटे घालवतो व कच्छ संग्रहालयाकडे जाण्यास निघतो.
महाराव खेंगरजी तिसरे यांनी सन 1877 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली होती. जुन्या काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखवणारे नमुने, कच्छमधील हस्तकलांचे नमुने याचा मोठा संग्रह येथे आहे. परंतु ईदची सुट्टी असल्याने हे संग्रहालयही बंदच आहे. मला संग्रहालयाची बंद दारे बघूनच समाधान मानणे आवश्यक आहे.
राणी महाल
हातात भरपूर वेळ असल्याने जवळच असलेल्या स्वामी नारायण मंदीराला भेट देण्याचे मी ठरवतो. हे देऊळ म्हणजे झगमग करणार्या भव्य आधुनिक स्थापत्याचा एक नमुना आहे. या भव्य देवळाच्या वास्तूमधील स्तंभ आणि भिंती यावर संपूर्णपणे संगमरवर पाषाणाच्या फरशा बसवलेल्या असल्याने देऊळ संगमरवरातून बनवले असल्याचा भास होतो आहे. स्तंभ आणि बाहेरील भिंती यावर फुल रिलिफ प्रकारच्या अक्षरशः हजारोंच्या संख्येने मूर्ती–शिल्पे बसवलेली आहेत. ही शिल्पे मला छापलेल्या चित्रांप्रमाणे असावी अशी किंवा अगदी एकसारखी दिसणारी, वाटतात. शिल्पातील मूर्तींचे ओठ व कपाळावरील टिळा हा लाल रंगात रंगवलेला पाहून मात्र मला गंमत वाटते आहे. या देवळात भाविकांची नुसती झुंबड उडालेली आहे.
स्वामीनारायण मंदीराला भेट देऊन मी जवळच असलेल्या छटर्डी या ठिकाणाजवळ रिक्षा उभी करण्यास सांगतो. छटर्डी म्हणजे छत्र्या. पुण्याला शिंद्याची छत्री या नावाने प्रसिद्ध असलेली महादजी शिंद्यांची समाधी आहे. त्याच धर्तीवर कच्छ्च्या राजांच्या येथे छत्र्या किंवा समाध्या आहेत. यापैकी बहुतेक छत्र्या 2001 च्या भूकंपात पूर्णपणे कोसळल्या व आता त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. या छत्र्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून आत जाण्यास बहुधा मज्जाव केलेला आहे. मी दुरूनच या छत्र्या बघतो व काही छायाचित्रे काढतो. या छत्र्यांवर मूळ स्वरूपात अतिशय उत्तम शिल्पे कोरलेली होती याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
छटर्डी
हॉटेलवर परतण्याच्या आधी भूजमधील मुख्य बाजारपेठेमध्ये मी थोडा वेळ घालवतो व काही खरेदी करतो. नंतर हॉटेलवर व्यवस्थित भोजन घेऊन मी निद्रेची आराधना जरा लवकरच करण्याचे ठरवतो. भूजपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या एका स्थानी मला उद्या जायचे आहे. हे ठिकाण, सुमारे 4000 वर्षांपूर्वी 20000 रहिवासी रहात असलेले व अत्यंत भरभराटीस आलेले व श्रीमंत असे बंदर व शहर होते. अर्थात आता तेथे फक्त भग्नावशेष उरलेले आहेत.
(क्रमश)
शुक्रवार
मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक प्लॅनिंग आणि त्याच बरोबर कमालीची कार्यक्षमता यामुळे कॅम्प व्यवस्थापनाला मला मनापासून दाद द्याविशी वाटते आहे. आमची बस कॅम्प सोडते व काही वेळातच परत एकदा भिरंडीयारनी गावात थांबते. या गावातला थांबा हा पूर्वीच्या मुंबई–पुणे रस्त्याला जसा खोपोलीचा थांबा अनिवार्य असे तसाच बहुधा इथल्या वाहन चालकांना वाटत असावा. परंतु या खेपेस मात्र मी बसमधून खाली उतरतो व दुधापासून बनवलेला इथला प्रसिद्ध मावा खरेदी करतो. भूजमध्ये मी पोचतो तेंव्हा सकाळचे 11 वाजले आहेत आणि हॉटेलमध्ये चेक इन करायला मला काहीच अडचण नाही. आजचा दिवस मी या पुरातन शहरामध्ये साइट सीइंग करण्यात घालवायचा असे ठरवले आहे. या शहराचे भूज हे नाव येथे जवळच असलेल्या 160 मीटर उंचीच्या भुजियो डुंगर किंवा Serpant Hill या नावाने ओळखल्या जाणार्या पर्वतामुळे पडले आहे. सर्पांचा राजा भुजंग याचे हे वसतीस्थान होते अशी एक आख्यायिका आहे व त्यामुळे या पर्वतावर भुजंगाचे एक मंदीर सुद्धा आहे.
8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत कच्छ्वर सिंध मधील सामा या राजपूत घराण्याची सत्ता होती. हा काळ सिंधच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्याबद्दल लिहून ठेवावे असा सुवर्णकाल होता असा समज आहे. या नंतर या राजांची सत्ता कमजोर पडत गेली. राजघराण्याच्या अंतर्गत अनेक कट कारस्थाने व हत्या घडवल्या गेल्या आणि अखेरीस या सामा राजपुतांचे वंशज असलेलेच लाखो जडेजा घराणे सत्तेवर आले. तेंव्हापासून हे घराणे जडेजा राजपूत या नावाने ओळखले जाते. या राजांनी सिंधमधून कच्छ्चा राज्यकारभार न चालवता तो कच्छ मधील अंजर गावातून चालवण्यास सुरुवात केली. कच्छच्या भौगोलिक मध्यावर भूज गाव येत असल्याने त्याचे महत्त्व ओळखून इ.स.1549 मध्ये खेंगराज 1 या राजाने आपली राजधानी भूजला हलवली आणि कच्छची भूज ही राजधानी अस्तित्वात आली.
प्रथम मोगल काळात व नंतर ब्रिटिश राजवटीत, जडेजा राजे बर्याच प्रमाणात आपले स्वतंत्र सार्वभौमत्त्व राखण्यात यशस्वी ठरल्याने भूज शहराला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व राखून ठेवता आले आहे. 18 व्या शतकात गादीवर आलेल्या लखपतजी 1 यांच्यापासून पुढे गादीवर आलेल्या सर्व जडेजा राजांनी भूजमध्ये नवे नवे महाल बांधले आणि शहर शोभिवंत करण्याकडे लक्ष बरेच केंद्रित केले. परंतु दर काही दशकांनंतर होत गेलेल्या महाभयंकर भूकंपांमुळे कच्छ्मध्ये बांधल्या गेलेल्या जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त होत राहिल्या व जडेजा राजांनी बांधलेले महाल सुद्धा याला अपवाद ठरू शकले नाहीत. या भूकंप मालिकेपैकी सर्वात भयावह भूकंप 16 जून 1819 या दिवशी झाला. यानंतर 1844-45, 1864 आणि शेवटी 2001 मध्ये असेच जबरदस्त भूकंपाचे झटके भूजला बसले. या भूकंपांमध्ये कच्छ मधील जवळपास सर्वच जुन्या इमारती जमीन सपाट झालेल्या आहेत.
ऐना महल
भूजच्या साधारण मध्यभागात असलेल्या हमिसर तलावाच्या चहूबाजूंना भूजमधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बांधलेली/ बनवली गेलेली असल्याने भूज मधील पर्यटन हे फारशा प्रयासांविना पर्यटकांना करता येते. मागच्या वर्षी हा तलाव तुडूंब भरून वहात होता म्हणे! परंतु या वर्षी पाऊसच न पडल्याने तलावात पाणीच नाहीये. तलावाभोवतीची प्रेक्षणीय स्थळे बघण्याआधी मी प्रथम पेटपूजा करण्याचे ठरवतो व बस स्टॅन्ड जवळील एका बर्या दिसणार्या हॉटेलात जाऊन कच्छी पावभाजीची ऑर्डर देतो. चमचमीत पावभाजीच्या भोजनानंतर भूजमधील साइट सीइंग, हमिसर तलावाच्या काठावर असलेल्या ऐना महालापासून सुरू करावे असे ठरवून एक रिक्षा ठरवतो. भूजमधील रिक्षा मात्र अत्यंत त्रासदायक वाटतात. एकतर बसण्यासाठी असलेल्या सीट्स आरामदायक अजिबातच नाहीत व पळताना त्या आवाजही प्रचंड प्रमाणात करत राहतात. ऐना महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचल्यानंतर मात्र माझी मोठी निराशा होते. ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने ऐना महालाचे दरवाजे बंद असल्याचे मला दिसते आहे.
1750 मध्ये राव लखपतजी यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या साठी त्यांनी आधीच्या वर्षांत रामसिंघ मालम या कारागिराला आरसे बनवणे आणि धातू काम यांचे विशेष शिक्षण घेण्यासाठी युरोपला पाठवले होते. होते. तो परत आल्यावर त्याने या महालाचे काम व्हेनिसहून काचा मागवून पूर्ण केले होते. या दुमजली इमारतीत दरबार हॉल, आरसे महाल आणि राजपरिवारासाठी कक्ष बनवण्यात आले होते. संगमरवरी फरशांनी आच्छादलेल्या भिंती व त्यावर सोन्याचे पाणी चढवलेल्या पत्र्याच्या कोंदणांत बसवलेले आरसे हे या महालाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचप्रमाणे तळाच्या थोड्या वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर बसवलेली कारंजी हे ही या महालाची एक खासियत आहे. हा महाल रामसिंघ मालम याच्या कारागिरीची कमाल मानली जाते. 18व्या शतकाच्या मध्यावर बांधलेला व युरोपियन छाप असलेल्या भारतीय स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाचे नेहमीच नाव घेतले जाते.
ऐना महालाच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम
प्रागजी महाल
ऐना महालाच्या अगदी बाजूलाच हा महाल आहे. 1838-76 या कालात कच्छच्या गादीवर असलेले राव प्रागमलजी दुसरे यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या महालाचे डिझाइन एक सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल हेनरी सेंट विल्किन्स यांनी केलेले होते. याच काळात बांधल्या गेलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि ओहेल डेव्हिड सिनेगॉग (लाल देऊळ) या सारख्या इमारतींचे आराखडे याच वास्तुविशारदांनी केलेले असल्याने हा महाल मला अगदी सुपरिचित असल्या सारखाच भासतो आहे. हा महाल बांधण्यासाठी 10 वर्षे लागली व अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च आला होता. मला मात्र हा महाल, मुंबईच्या फोर्ट विभागात असलेला राजाभाई टॉवर व त्या शेजारील मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत, या दोन्ही सारखाच हुबेहुब वाटतो आहे व त्यामुळे त्याची खास अशी छाप माझ्यावर पडू शकत नाहीये. या महालाच्या व्हरांड्यातील आधार स्तंभ आणि त्यावरील कॉर्निस हे भाग सुद्धा मला ओळखीचेच भासत आहेत. हा महाल सुदैवाने प्रवेश करण्यास आज खुला आहे. मी प्रवेश पत्रिका विकत घेतो व आत पाऊल टाकतो.
ब्रिटिश काळात भारतात असलेल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानिकांचे जसे महाल होते साधारण त्याच धर्तीवर असलेल्या या महालामधे आता एक संग्रहालय बनवण्यात आलेले आहे. त्या कालातील फर्निचर, राजपरिवारातील व्यक्तींच्या वापरातील वस्तू, तैलचित्रे, भांडीकुंडी, शिकारीत मारलेल्या प्राण्यांची पेंढा भरलेली डोकी, बंदुका आणि राजपुत्र व राजकन्या यांची खेळणी या सारख्या गोष्टी येथे मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. राव प्रागमलजी यांच्या दरबार हॉलचे नूतनीकरण चालू असल्यामुळे तो हॉल बंदच आहे. या संग्रहालयातील वस्तूंपैकी मला सर्वात काय आवडले असेल तर राजा रविवर्मा यांनी चित्रित केलेल्या चित्रांच्या छापील प्रतींची एक फ्रेम करून ठेवलेली मालिका. या फ्रेम्समध्ये या चित्रांमधील व्यक्तींच्या, विशेषेकरून स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर किंवा काठ यावर बारीक चमचम करणारे खडे चिकटवले आहेत व त्यामुळे या चित्रांचे मूळ सौंदर्य मोठे खुलून दिसते आहे.
या प्रासादाच्या गच्चीवरून मला जवळचा असलेला पण संपूर्णपणे आटलेला हमिसर तलाव दिसतो आहे. त्याच प्रमाणे पलीकडेच असलेला रामकुंड हा पाणी तलाव ही कोरडा ठणठणीत दिसतो आहे. महालाच्या पुढच्या पोर्चपाशी एक चाकांवर बसवलेली तोफ ठेवलेली आहे. तिचा वापर कधी झाला असेल असे वाटत नाही. ही तोफ़ बहुधा एक शो पीस म्हणूनच ठेवलेली असावी. या महालाच्या समोर असलेल्या राणी महालाची 2001 मधील भूकंपात अपरिमित हानी झालेली असल्याने प्रागजी महालाचा संपूर्ण परिसर हा पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो आहे. समोर दिसणारी तोफ या पडझडीची एकुलती एक मूक साक्षीदार असावी असे माझ्या मनाला वाटत राहिले आहे.
रामकुंड
या राणी महालाची एवढी हानी भूकंपामध्ये झालेली आहे की यात प्रवेश करणेही धोकादायक समजले जाते आहे. या राणी महालाचे स्थापत्य मात्र अप्रतिम आहे यात शंकाच नाही. गवाक्षे आणि द्वारे यांच्या बाहेर असलेल्या षटकोनी आकाराच्या बाल्कनी व त्यावर बसवलेल्या आणि कोरीव काम करून तयार केलेल्या जाळ्या, दरवाज्यांबाहेरील चौकटी या अतिशय सुंदर रितीने बनवल्या गेलेल्या आहेत. राणी महालाच्या स्थापत्याचे बाहेरून कौतुक करण्याशिवाय बाकी काहीच करणे शक्य नसल्याने मी तेथे काही मिनिटे घालवतो व कच्छ संग्रहालयाकडे जाण्यास निघतो.
महाराव खेंगरजी तिसरे यांनी सन 1877 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली होती. जुन्या काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखवणारे नमुने, कच्छमधील हस्तकलांचे नमुने याचा मोठा संग्रह येथे आहे. परंतु ईदची सुट्टी असल्याने हे संग्रहालयही बंदच आहे. मला संग्रहालयाची बंद दारे बघूनच समाधान मानणे आवश्यक आहे.
राणी महाल
हातात भरपूर वेळ असल्याने जवळच असलेल्या स्वामी नारायण मंदीराला भेट देण्याचे मी ठरवतो. हे देऊळ म्हणजे झगमग करणार्या भव्य आधुनिक स्थापत्याचा एक नमुना आहे. या भव्य देवळाच्या वास्तूमधील स्तंभ आणि भिंती यावर संपूर्णपणे संगमरवर पाषाणाच्या फरशा बसवलेल्या असल्याने देऊळ संगमरवरातून बनवले असल्याचा भास होतो आहे. स्तंभ आणि बाहेरील भिंती यावर फुल रिलिफ प्रकारच्या अक्षरशः हजारोंच्या संख्येने मूर्ती–शिल्पे बसवलेली आहेत. ही शिल्पे मला छापलेल्या चित्रांप्रमाणे असावी अशी किंवा अगदी एकसारखी दिसणारी, वाटतात. शिल्पातील मूर्तींचे ओठ व कपाळावरील टिळा हा लाल रंगात रंगवलेला पाहून मात्र मला गंमत वाटते आहे. या देवळात भाविकांची नुसती झुंबड उडालेली आहे.
स्वामीनारायण मंदीराला भेट देऊन मी जवळच असलेल्या छटर्डी या ठिकाणाजवळ रिक्षा उभी करण्यास सांगतो. छटर्डी म्हणजे छत्र्या. पुण्याला शिंद्याची छत्री या नावाने प्रसिद्ध असलेली महादजी शिंद्यांची समाधी आहे. त्याच धर्तीवर कच्छ्च्या राजांच्या येथे छत्र्या किंवा समाध्या आहेत. यापैकी बहुतेक छत्र्या 2001 च्या भूकंपात पूर्णपणे कोसळल्या व आता त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. या छत्र्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून आत जाण्यास बहुधा मज्जाव केलेला आहे. मी दुरूनच या छत्र्या बघतो व काही छायाचित्रे काढतो. या छत्र्यांवर मूळ स्वरूपात अतिशय उत्तम शिल्पे कोरलेली होती याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
छटर्डी
हॉटेलवर परतण्याच्या आधी भूजमधील मुख्य बाजारपेठेमध्ये मी थोडा वेळ घालवतो व काही खरेदी करतो. नंतर हॉटेलवर व्यवस्थित भोजन घेऊन मी निद्रेची आराधना जरा लवकरच करण्याचे ठरवतो. भूजपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या एका स्थानी मला उद्या जायचे आहे. हे ठिकाण, सुमारे 4000 वर्षांपूर्वी 20000 रहिवासी रहात असलेले व अत्यंत भरभराटीस आलेले व श्रीमंत असे बंदर व शहर होते. अर्थात आता तेथे फक्त भग्नावशेष उरलेले आहेत.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 5
शनिवार
कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट यामधील सरळ रेषेचे अंतर 25 किमी पेक्षा कमीच भरेल. परंतु या दोन्हींना जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही. गुजरात सरकारने काही काळापूर्वी या दोन्हींना जोडणारा रस्ता व पूल बांधण्याची तयारी केली होती. परंतु मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या एका तज्ञांच्या समितीने असा रस्ता व पूल बांधण्याची कल्पना रणाच्या पर्यावरणास अत्यंत घातक ठरेल असे मत व्यक्त केल्याने हा प्रकल्प गुजरात सरकारला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले.
मी आज भेट देऊ इच्छित असलेले स्थान, धोलाविरा, हे या खादिर बेटाच्या पश्चिम टोकावर असलेली एक छोटी वस्ती आहे. परंतु सरळ रस्ता नसल्याने मला रणाच्या काठाने जाऊन या बेटाच्या पूर्व टोकाकडून या बेटावर प्रवेश घेणे गरजेचे आहे. या बाजूने खादिर बेटावर येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याने भूज आणि धोलाविरा यामधे पडणारे 250 किमी अंतर लक्षात घेऊन सकाळी शक्य तितक्या लवकर भूजहून प्रयाण करण्याचा माझा बेत फारसा यशस्वी होत नाही व मी हायवे 42 वर प्रवेश करतो तेंव्हा घड्याळात सकाळचे पावणेआठ वाजून गेल्याचे माझ्या लक्षात येते आहे. आहे. भूजच्या सीमेच्या बाहेर पडल्याबरोबर उजव्या हाताला मला भुजंगिया डुंगर किंवा Hill of the serpent व त्यावर असलेल्या भारदस्त किल्याची मजबूत तटबंदी दिसते आहे. हायवे 42 मात्र मोठ्या सुस्थितीत राखलेला दिसतो आहे. मात्र इतक्या ठिकाणी या रस्त्यावर पुराचे पाणी येऊ नये म्हणून सांडवे बांधण्याचे काम चालू आहे की त्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डायव्हर्शन्स वरून गाडी न्यावी लागत असल्याने दर काही मिनिटांनी गाडीची गती अगदी हळू होते आहे. या हायवेच्या भूज ते भचाउ या संपूर्ण टप्यावर रस्त्याच्या उजव्या हाताला मोठमोठे उद्योग धंदे उभे राहताना दिसत आहेत. गाडीच्या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व विकास गेल्या 10 वर्षात झालेला आहे व त्याच्या आधी ही सर्व जमीन वैराण व ओसाड स्वरूपात होती. सकाळचे सव्वादहा वाजलेले असताना आम्ही सामखियाली गावाजवळ पोचतो आहोत व नंतर चित्रोड या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता 15 वर वळतो आहोत. चित्रोड जवळ हा रस्ता सोडून आम्ही रापर गावावरून पुढे जाणार्या हायवे 51 वर वळतो. .वन प्रदेशातून जाणारा हा संपूर्ण रस्ता सुद्धा अतिशय सुस्थितीत आहे. हा वन विभाग सुद्धा कच्छ्मध्ये इतरत्र ठिकाणी दिसणार्या वनांसारखाच आहे. कोरडी जमीन, त्यावर वाळलेले गवत आणि बाभूळ व विलायती बाभूळ यांची झाडे झुडपे हेच दृष्य सगळीकडे दिसते आहे. मात्र सर्वत्र दुभत्या जनावरांचे मोठे कळप चरताना दिसत आहेत. रापर नंतर देसालपार, बालासार आणि लोडराणी या खेड्यांमधून हा रस्ता जातो व अखेरीस पश्चिमेकडे वळतो. लोडराणी खेड्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर मला नाकासमोर जाणारा एक लांब पूल समोर दिसतो आहे. व हा पूल परत जमीन लागेपर्यंत धवल मरुभूमीमधून जाणार आहे हेही लक्षात येते आहे.
आमची गाडी पुलावरून जाऊ लागल्यानंतर दोन्ही बाजूकडील परिसराचे गाडीच्या काचेतून मला दिसणारे दृष्य, थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वप्नातील दृष्याप्रमाणे अवर्णनीय आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसते आहे ती पार क्षितिजाला जाऊन पोचणारी धवलता. माझे दिशा ज्ञान आता हरवल्यासारखेच झाले आहे कारण डोळ्यासमोर दिसणारा डांबरी रस्ता सोडला तर सर्व दिशांना शुभ्र धवलतेशिवाय दुसरे काही दिसतच नाहीये. या धवलतेच्या वर आहे निळे स्वच्छ आकाश आणि तळपणारा सूर्य. अशा भ्रामक वातावरणात आम्ही बरीच मिनिटे घालवतो व अखेरीस पूल संपतो व आमची गाडी खादिर बेटावर पोचते आहे. रणातील इतर बेटांप्रमाणे हे बेट निर्मनुष्य नसून येथे छोटी छोटी बरीच खेडेगावे आहेत. रस्त्याने जाता जाता अमरपूर, गणेशपूर, बांबिनिका व अखेरीस जनान या गावांच्या पाट्या मला दिसतात. जनान मध्ये सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. येथून आम्ही पुढे जातो आणि मला समोर एक प्रशस्त असा वाहनतळ आणि ‘धोलाविरा पुरातत्त्व संग्रहालय असा मोठा नामफलक दिसू लागतो. मी घड्याळाकडे बघतो. दुपारचे सव्वाबारा झाले आहेत आणि आम्ही गुजरात शासनाने बनवलेल्या प्रशस्त व आरामदायी रस्त्याच्या कृपेने धोलाविराला अगदी वेळेत पोहोचतो आहोत.
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे की भारताच्या पश्चिम सीमेजवळच्या एका कोपर्यातल्या स्थानावर असलेल्या व कोणत्याही मोठ्या शहर किंवा गावापासून दूरवर असलेल्या या खादिर बेटावर येण्यासाठी एवढी धडपड करून येण्याचा मी का प्रयत्न करतो आहे? अर्थातच यामागे एक कारण आहे. पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री जगत पती जोशी यांनी 1967-68 मध्ये शोधून काढलेल्या व 1990 ते 2005 एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये दरवर्षी या जागी श्री आर. एस. बिश्त यांच्या नेतृत्त्वाखाली केले गेलेल्या उत्खननामुळे, भारताच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्या व परकीयांच्या मनात असलेले अनेक गैरसमज आणि भ्रम, निखालस खोटे असल्याचे आढळून आले आहे आणि त्या कालखंडामधील भारतीय द्वीपकल्पामधे सत्य परिस्थिती काय होती याची बर्यापैकी कल्पना या उत्खननामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकली आहे. त्यामुळे या जागेला मला भेट द्यायचीच आहे.
धोलाविरा संग्रहालयाजवळ मी थोडी चौकशी करतो व पुढच्या 2 तासासाठी श्री रावजीभाई यांना या पुरातन महानगरामध्ये फेरफटका करताना गाईड म्हणून घेण्याचे ठरवतो व त्यांच्या बरोबर, समोर दिसणार्या एका टेकडीवजा उंचवट्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात करतो.
या टेकाडाचा बराचसा भाग उत्खनन करून फोडलेला दिसतो आहे. प्रथम समोर दिसते आहे सध्या पूर्ण कोरडी ठणठणीत असलेली आणि ‘मनहर‘ हे नाव असलेली एक पावसाळी नदी. या नदीवर कधी काळी बांधलेल्या एका पुरातन बंधार्याचे दगड पात्रात पडलेले दिसत आहेत. रावजी भाई सांगतात की या टेकाडाच्या वायव्य कोपर्यालगत सुद्धा ‘मनसर‘ या नावाची आणखी एक अशीच पावसाळी नदी आहे. या दोन नद्यांतून, पावसाळ्यात वाहणार्या पाण्याचा पूर्णत: वापर करता येईल अशी व्यवस्था या नगरीमधील नियोजनकारांनी केली होती. या पुरातन नगरीत एके काळी 15000 ते 20000 नागरिक रहात असत त्यांना पिण्यासाठी व इतर उपयोगासाठी पुरेसे पाणी केवळ या दोन पावसाळी नद्यांमधून उपलब्ध होत होते. परंतु 1 किंवा 2 महिनेच उपलब्ध होत असलेले हे पाणी वर्षभराच्या उपयोगासाठी म्हणून साठवून ठेवण्याची अतिशय विस्मयकारक व्यवस्था धोलाविरामधील नियोजनकारांनी केली होती.
टेकडाच्या पुढे उजव्या हाताला प्रथम मला दिसतो आहे एक मोठा पाणी साठवण्याचा तलाव. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीच्या कडेने पायर्या खोदलेल्या दिसत आहेत. ‘मनहर‘ नदीचे पाणी प्रथम या तलावात वहात येत असे. या तलावालगत 11 ते 13 मीटर रुंदीची एक भिंत मला दिसते आहे. मातीच्या विटा व मातीचेच प्लॅस्टर वापरून बांधलेल्या या भिंतीला दोन्ही बाजूंनी दगड किंवा चिरे पृष्ठभागांवर बसवून त्यांना मजबूती आणलेली आहे. इजिप्त मधल्या पिरॅमिडच्या भिंतींना जसा ढाळ दिलेला दिसतो तसाच काहीसा ढाळ या भिंतीला आहे. या नगरीतील किल्ल्याला चहूबाजूंना असलेल्या चार भिंतींची मजबूत तटबंदी केलेली होती. रावजीभाई मला सांगतात की हे शहर अस्तित्वात होते त्या 1200 वर्षांच्या कालखंडात ( इ.स.पूर्व 2600 ते इ.स.पूर्व 1400) या तटांची उंची 3 किंवा 4 वेळा वाढवली गेलेली होती. किल्यामध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र हौद व एक विहीर होती. या विहीरीचे पाणी बैलाच्या सहाय्याने मोटेद्वारा उपसले जात असे. पाणी साठवण्याच्या किल्यामधील हौदांच्या तळाला मध्यभागी गाळ साठून रहावा व वरील पाणी स्वच्छ रहावे म्हणून चौरस आकाराची कुंडे तळाशी खोदलेली होती. होती.या कुंडात पाण्यातील गाळ व इतर जड कचरा साठून रहात असे व ठरावीक कालानंतर या कुंडांमधील गाळ साफ केला जात असे.
पूर्वेकडचे महाद्वार
धोलाविरा मधे पर्जन्य वृष्टीचे प्रमाण अतिशय स्वल्प असले तरी पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल अशी परिपूर्ण व्यवस्था केलेली होती. या साठी तटाच्या भिंतींना उभे चर ठेवलेले होते व यातून खाली येणारे पाणी भाजलेल्या मातीच्या बनवलेल्या नळांतून आणून एका हौदामध्ये साठवले जात होते.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला चर
उत्तर महाद्वार
गुळगुळीत पॉलिश केलेला स्तंभाचा तळातील दगड
स्टेडियमच्या बाजूस प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायर्या
किल्यामधील विहीर
किल्यावरून पश्चिमेच्या बाजूस दिसणारी धवल मरूभूमी
धोलाविरा किल्यामध्ये पाणी पुरवठा वर्षभर सुरळीतपणे व्हावा या साठी केलेल्या योजनेच्या कांकणभर सरस अशी योजना, किल्यातील सांडपाणी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धोलाविराच्या नियोजनकारांनी केली होती. किल्यामध्ये असलेल्या महालांमधील खोल्यांच्या कोपर्यांतून, भाजलेल्या मातीतून बनवलेले सांडपाण्याचे नळ भिंतींच्या तळाना बसवलेले होते. या नळांतून वाहत जाणारे पाणी मुख्य सांडपाण्याच्या वाहिनीला जोडलेले होते. जमिनीखालून जाणार्या या सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये हवा अडकून पाण्याचा प्रवाह बंद होऊ नये यासाठी जमिनीवर उच्छ्वास बांधलेले होते. सांडपाणी नंतर पश्चिमेला, शहरापासून जवळच असलेल्या समुद्रात ( सध्या तेथे धवल मरूभूमी आहे) सोडले जात असे. प्रत्येक खोलीच्या कोपर्यात वापरलेले पाणी फेकून न देता साठवण्यासाठी ते मातीच्या मोठ्या कुंभांत साठवून ठेवण्याची प्रथा होती असे दिसते.
किल्याच्या पश्चिम तटबंदीच्या बाहेर सेवकवर्गाची निवासस्थाने आणि धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे हौद बांधलेले होते. त्याच्या पलीकडे आणखी अनेक पाणी साठवण्याचे तलाव बांधलेले होते. किल्याच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम तटबंदीमध्ये प्रवेशद्वारे बांधलेली होती. या द्वारांजवळ 1 किंवा 2 देवड्या बर्याच उंचीवर बांधलेल्या आढळून आलेल्या आहेत. कदाचित उंटांवर बसण्यासाठी चढ उतार या देवड्यांमधून केली जात असावी. देवडीला 3 बाजूंना भिंती बांधलेल्या होत्या व आता येण्याच्या मार्गाजवळच्या बाजूला दगडी गोलाकार स्तंभ उभारून छताला आधार दिलेला होती. हे गोलाकार स्तंभ एकमेकात अड्कवले जातील अशा छोटे गोलाकार आकाराचे चिरे एकावर एक ठेवून बनवलेले होते व हे गोलाकार तुकडे आजही इतस्ततः पडलेले दिसू शकतात. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मार्गाचे, पॉलिश केलेल्या सॅन्डस्टोनचे व 4 फूट उंचीचे असे स्तंभ जमिनीवर उभे करून 3 भागात वर्गीकरण केलेले होते. उत्तर द्वाराजवळच्या एका देवडीत, पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना, सिंधू संस्कृतीतील चिन्ह लिपी मध्ये लिहिलेला आणि 15 इंच उंच असलेली चिन्हे असलेला एक मोठा नामफलक सापडला होती. 3 मीटर लांबीचा हा फलक लाकडी होता व त्यावर जिप्सम या खनिजातून कोरलेली 10 चिन्हे बसवून हा नामफलक बहुधा द्वारावर उभा केलेला असावा. हे शहर नष्ट झाल्यावर हा फलक बहुधा तसाच देवडीमध्ये पडून राहिल्यामुळे त्याचे लाकूड कुजून नष्ट झाले व फक्त जिप्समची चिन्हे खालच्या पाषाणावर चिकटून राहिल्याने टिकली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मताने या नामफलकावर या शहराचे नाव बाहेरगावांहून येणार्या प्रवाशांना वाचता यावे म्हणून मोठ्या आकारात लिहिलेले होते.
उत्तर द्वाराबाहेर 10000 प्रेक्षक बसू शकतील असे एक मोठे स्टेडियम बांधलेले होते. हे स्टेडियम सांस्कृतिक किंवा औपचारिक समारंभ आणि आठवड्याचा बाजार या सारख्या प्रसंगी बहुधा वापरले जात असावे, धोलाविरा हे बंदर असल्याने तेथे कोणते जहाज माल घेऊन आले की त्यावरील मालाची खरेदी विक्री सुद्धा या स्टेडियम मध्ये केली जात असल्याची शक्यता वाटते. रावजीभाई मला सांगतात की किल्यातील जिन्यांना 7, 15 आणि 30 पायर्या आहेत व त्यावर काही सांकेतीक वस्तू ठेवून ती बहुधा रोजा सकाळी हलवली जात असे. या सोप्या पद्धतीने आठवडा, पंधरवडा व महिना यांची कालगणना केली जात असे. येथे पूर्वी समुद्र होता याच्या स्पष्ट खुणा किल्याच्या भिंती बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत त्यावर असलेल्या जीवाश्म खुणांवरून कळते. रावजीभाई मला शिंपल्यांच्या खुणा असलेला एक दगड दाखवतात.
पॉलिश केलेला दगडी स्तंभ
दगडी खांबाच्या तळातील खाचा घेतलेला दगड
किल्याची भेट आटोपून मी आता जवळच असलेल्या संग्रहालयाला भेट देतो आहे. येथे सापडलेली भाजलेल्या मातीची पात्रे, हत्यारे, मातीतून बनवलेल्या बाहुल्यांसारख्या वस्तू आणि उत्खननात सापडलेल्या असंख्य वस्तूंची छायाचित्रे येथे मांडलेली आहेत. या वस्तू व चित्रे बघून हे पुरातन शहर आणि येथे वास्तव्य करणारे लोक यांच्या जीवनशैलीबद्दल खूपच माहिती मला मिळते आहे.
भाजलेल्या मातीतून बनवलेली खेळणी
मनाला समाधान देणार्या या भेटीनंतर आम्ही बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो. रापर आणि चित्रोड गावांच्या मध्ये आम्हाला रस्त्यावर एक नीलगाय (Boselaphus tragocamelus the largest Asian antelope, family Bovidae) आडवी येते व आपण खरोखरच वन विभागात अजून आहोत याची खात्री पटते. आम्ही सामखियाली गावाजवळ एका धाब्यावर चहा पितो व उजवीकडे भचाउ मार्गाने परत भूजकडे जाण्याऐवजी हायवे 27 वरून काठेवाड कडे जाण्यास निघतो. आजचा आमचा मुक्काम मोरवी किंवा मोरबी या शहरात आहे. हे शहर छोटया रणापासून फक्त 40 किमी अंतरावर असल्याने मला उद्या छोट्या रणाला धावती भेट देता येईल अशी आशा वाटते आहे. मोरवीला पोचायला आम्हाला तिन्हीसांजा होतात. मोरवी गावात शिरताना प्रथम काय जाणवते आहे ती आसमंतात आणि हवेत सर्वत्र असलेली धूळ. मोरवीमध्ये सिरॅमिक टाईल्स बनवणारे अनेक कारखाने असल्याने ही धूळ बहुधा अनुभवण्यास येते.
(क्रमश)
शनिवार
कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट यामधील सरळ रेषेचे अंतर 25 किमी पेक्षा कमीच भरेल. परंतु या दोन्हींना जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही. गुजरात सरकारने काही काळापूर्वी या दोन्हींना जोडणारा रस्ता व पूल बांधण्याची तयारी केली होती. परंतु मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या एका तज्ञांच्या समितीने असा रस्ता व पूल बांधण्याची कल्पना रणाच्या पर्यावरणास अत्यंत घातक ठरेल असे मत व्यक्त केल्याने हा प्रकल्प गुजरात सरकारला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले.
मी आज भेट देऊ इच्छित असलेले स्थान, धोलाविरा, हे या खादिर बेटाच्या पश्चिम टोकावर असलेली एक छोटी वस्ती आहे. परंतु सरळ रस्ता नसल्याने मला रणाच्या काठाने जाऊन या बेटाच्या पूर्व टोकाकडून या बेटावर प्रवेश घेणे गरजेचे आहे. या बाजूने खादिर बेटावर येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याने भूज आणि धोलाविरा यामधे पडणारे 250 किमी अंतर लक्षात घेऊन सकाळी शक्य तितक्या लवकर भूजहून प्रयाण करण्याचा माझा बेत फारसा यशस्वी होत नाही व मी हायवे 42 वर प्रवेश करतो तेंव्हा घड्याळात सकाळचे पावणेआठ वाजून गेल्याचे माझ्या लक्षात येते आहे. आहे. भूजच्या सीमेच्या बाहेर पडल्याबरोबर उजव्या हाताला मला भुजंगिया डुंगर किंवा Hill of the serpent व त्यावर असलेल्या भारदस्त किल्याची मजबूत तटबंदी दिसते आहे. हायवे 42 मात्र मोठ्या सुस्थितीत राखलेला दिसतो आहे. मात्र इतक्या ठिकाणी या रस्त्यावर पुराचे पाणी येऊ नये म्हणून सांडवे बांधण्याचे काम चालू आहे की त्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डायव्हर्शन्स वरून गाडी न्यावी लागत असल्याने दर काही मिनिटांनी गाडीची गती अगदी हळू होते आहे. या हायवेच्या भूज ते भचाउ या संपूर्ण टप्यावर रस्त्याच्या उजव्या हाताला मोठमोठे उद्योग धंदे उभे राहताना दिसत आहेत. गाडीच्या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व विकास गेल्या 10 वर्षात झालेला आहे व त्याच्या आधी ही सर्व जमीन वैराण व ओसाड स्वरूपात होती. सकाळचे सव्वादहा वाजलेले असताना आम्ही सामखियाली गावाजवळ पोचतो आहोत व नंतर चित्रोड या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता 15 वर वळतो आहोत. चित्रोड जवळ हा रस्ता सोडून आम्ही रापर गावावरून पुढे जाणार्या हायवे 51 वर वळतो. .वन प्रदेशातून जाणारा हा संपूर्ण रस्ता सुद्धा अतिशय सुस्थितीत आहे. हा वन विभाग सुद्धा कच्छ्मध्ये इतरत्र ठिकाणी दिसणार्या वनांसारखाच आहे. कोरडी जमीन, त्यावर वाळलेले गवत आणि बाभूळ व विलायती बाभूळ यांची झाडे झुडपे हेच दृष्य सगळीकडे दिसते आहे. मात्र सर्वत्र दुभत्या जनावरांचे मोठे कळप चरताना दिसत आहेत. रापर नंतर देसालपार, बालासार आणि लोडराणी या खेड्यांमधून हा रस्ता जातो व अखेरीस पश्चिमेकडे वळतो. लोडराणी खेड्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर मला नाकासमोर जाणारा एक लांब पूल समोर दिसतो आहे. व हा पूल परत जमीन लागेपर्यंत धवल मरुभूमीमधून जाणार आहे हेही लक्षात येते आहे.
आमची गाडी पुलावरून जाऊ लागल्यानंतर दोन्ही बाजूकडील परिसराचे गाडीच्या काचेतून मला दिसणारे दृष्य, थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वप्नातील दृष्याप्रमाणे अवर्णनीय आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसते आहे ती पार क्षितिजाला जाऊन पोचणारी धवलता. माझे दिशा ज्ञान आता हरवल्यासारखेच झाले आहे कारण डोळ्यासमोर दिसणारा डांबरी रस्ता सोडला तर सर्व दिशांना शुभ्र धवलतेशिवाय दुसरे काही दिसतच नाहीये. या धवलतेच्या वर आहे निळे स्वच्छ आकाश आणि तळपणारा सूर्य. अशा भ्रामक वातावरणात आम्ही बरीच मिनिटे घालवतो व अखेरीस पूल संपतो व आमची गाडी खादिर बेटावर पोचते आहे. रणातील इतर बेटांप्रमाणे हे बेट निर्मनुष्य नसून येथे छोटी छोटी बरीच खेडेगावे आहेत. रस्त्याने जाता जाता अमरपूर, गणेशपूर, बांबिनिका व अखेरीस जनान या गावांच्या पाट्या मला दिसतात. जनान मध्ये सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. येथून आम्ही पुढे जातो आणि मला समोर एक प्रशस्त असा वाहनतळ आणि ‘धोलाविरा पुरातत्त्व संग्रहालय असा मोठा नामफलक दिसू लागतो. मी घड्याळाकडे बघतो. दुपारचे सव्वाबारा झाले आहेत आणि आम्ही गुजरात शासनाने बनवलेल्या प्रशस्त व आरामदायी रस्त्याच्या कृपेने धोलाविराला अगदी वेळेत पोहोचतो आहोत.
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे की भारताच्या पश्चिम सीमेजवळच्या एका कोपर्यातल्या स्थानावर असलेल्या व कोणत्याही मोठ्या शहर किंवा गावापासून दूरवर असलेल्या या खादिर बेटावर येण्यासाठी एवढी धडपड करून येण्याचा मी का प्रयत्न करतो आहे? अर्थातच यामागे एक कारण आहे. पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री जगत पती जोशी यांनी 1967-68 मध्ये शोधून काढलेल्या व 1990 ते 2005 एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये दरवर्षी या जागी श्री आर. एस. बिश्त यांच्या नेतृत्त्वाखाली केले गेलेल्या उत्खननामुळे, भारताच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्या व परकीयांच्या मनात असलेले अनेक गैरसमज आणि भ्रम, निखालस खोटे असल्याचे आढळून आले आहे आणि त्या कालखंडामधील भारतीय द्वीपकल्पामधे सत्य परिस्थिती काय होती याची बर्यापैकी कल्पना या उत्खननामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकली आहे. त्यामुळे या जागेला मला भेट द्यायचीच आहे.
धोलाविरा संग्रहालयाजवळ मी थोडी चौकशी करतो व पुढच्या 2 तासासाठी श्री रावजीभाई यांना या पुरातन महानगरामध्ये फेरफटका करताना गाईड म्हणून घेण्याचे ठरवतो व त्यांच्या बरोबर, समोर दिसणार्या एका टेकडीवजा उंचवट्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात करतो.
या टेकाडाचा बराचसा भाग उत्खनन करून फोडलेला दिसतो आहे. प्रथम समोर दिसते आहे सध्या पूर्ण कोरडी ठणठणीत असलेली आणि ‘मनहर‘ हे नाव असलेली एक पावसाळी नदी. या नदीवर कधी काळी बांधलेल्या एका पुरातन बंधार्याचे दगड पात्रात पडलेले दिसत आहेत. रावजी भाई सांगतात की या टेकाडाच्या वायव्य कोपर्यालगत सुद्धा ‘मनसर‘ या नावाची आणखी एक अशीच पावसाळी नदी आहे. या दोन नद्यांतून, पावसाळ्यात वाहणार्या पाण्याचा पूर्णत: वापर करता येईल अशी व्यवस्था या नगरीमधील नियोजनकारांनी केली होती. या पुरातन नगरीत एके काळी 15000 ते 20000 नागरिक रहात असत त्यांना पिण्यासाठी व इतर उपयोगासाठी पुरेसे पाणी केवळ या दोन पावसाळी नद्यांमधून उपलब्ध होत होते. परंतु 1 किंवा 2 महिनेच उपलब्ध होत असलेले हे पाणी वर्षभराच्या उपयोगासाठी म्हणून साठवून ठेवण्याची अतिशय विस्मयकारक व्यवस्था धोलाविरामधील नियोजनकारांनी केली होती.
टेकडाच्या पुढे उजव्या हाताला प्रथम मला दिसतो आहे एक मोठा पाणी साठवण्याचा तलाव. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीच्या कडेने पायर्या खोदलेल्या दिसत आहेत. ‘मनहर‘ नदीचे पाणी प्रथम या तलावात वहात येत असे. या तलावालगत 11 ते 13 मीटर रुंदीची एक भिंत मला दिसते आहे. मातीच्या विटा व मातीचेच प्लॅस्टर वापरून बांधलेल्या या भिंतीला दोन्ही बाजूंनी दगड किंवा चिरे पृष्ठभागांवर बसवून त्यांना मजबूती आणलेली आहे. इजिप्त मधल्या पिरॅमिडच्या भिंतींना जसा ढाळ दिलेला दिसतो तसाच काहीसा ढाळ या भिंतीला आहे. या नगरीतील किल्ल्याला चहूबाजूंना असलेल्या चार भिंतींची मजबूत तटबंदी केलेली होती. रावजीभाई मला सांगतात की हे शहर अस्तित्वात होते त्या 1200 वर्षांच्या कालखंडात ( इ.स.पूर्व 2600 ते इ.स.पूर्व 1400) या तटांची उंची 3 किंवा 4 वेळा वाढवली गेलेली होती. किल्यामध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र हौद व एक विहीर होती. या विहीरीचे पाणी बैलाच्या सहाय्याने मोटेद्वारा उपसले जात असे. पाणी साठवण्याच्या किल्यामधील हौदांच्या तळाला मध्यभागी गाळ साठून रहावा व वरील पाणी स्वच्छ रहावे म्हणून चौरस आकाराची कुंडे तळाशी खोदलेली होती. होती.या कुंडात पाण्यातील गाळ व इतर जड कचरा साठून रहात असे व ठरावीक कालानंतर या कुंडांमधील गाळ साफ केला जात असे.
पूर्वेकडचे महाद्वार
धोलाविरा मधे पर्जन्य वृष्टीचे प्रमाण अतिशय स्वल्प असले तरी पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल अशी परिपूर्ण व्यवस्था केलेली होती. या साठी तटाच्या भिंतींना उभे चर ठेवलेले होते व यातून खाली येणारे पाणी भाजलेल्या मातीच्या बनवलेल्या नळांतून आणून एका हौदामध्ये साठवले जात होते.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला चर
उत्तर महाद्वार
गुळगुळीत पॉलिश केलेला स्तंभाचा तळातील दगड
स्टेडियमच्या बाजूस प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायर्या
किल्यामधील विहीर
किल्यावरून पश्चिमेच्या बाजूस दिसणारी धवल मरूभूमी
धोलाविरा किल्यामध्ये पाणी पुरवठा वर्षभर सुरळीतपणे व्हावा या साठी केलेल्या योजनेच्या कांकणभर सरस अशी योजना, किल्यातील सांडपाणी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धोलाविराच्या नियोजनकारांनी केली होती. किल्यामध्ये असलेल्या महालांमधील खोल्यांच्या कोपर्यांतून, भाजलेल्या मातीतून बनवलेले सांडपाण्याचे नळ भिंतींच्या तळाना बसवलेले होते. या नळांतून वाहत जाणारे पाणी मुख्य सांडपाण्याच्या वाहिनीला जोडलेले होते. जमिनीखालून जाणार्या या सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये हवा अडकून पाण्याचा प्रवाह बंद होऊ नये यासाठी जमिनीवर उच्छ्वास बांधलेले होते. सांडपाणी नंतर पश्चिमेला, शहरापासून जवळच असलेल्या समुद्रात ( सध्या तेथे धवल मरूभूमी आहे) सोडले जात असे. प्रत्येक खोलीच्या कोपर्यात वापरलेले पाणी फेकून न देता साठवण्यासाठी ते मातीच्या मोठ्या कुंभांत साठवून ठेवण्याची प्रथा होती असे दिसते.
किल्याच्या पश्चिम तटबंदीच्या बाहेर सेवकवर्गाची निवासस्थाने आणि धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे हौद बांधलेले होते. त्याच्या पलीकडे आणखी अनेक पाणी साठवण्याचे तलाव बांधलेले होते. किल्याच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम तटबंदीमध्ये प्रवेशद्वारे बांधलेली होती. या द्वारांजवळ 1 किंवा 2 देवड्या बर्याच उंचीवर बांधलेल्या आढळून आलेल्या आहेत. कदाचित उंटांवर बसण्यासाठी चढ उतार या देवड्यांमधून केली जात असावी. देवडीला 3 बाजूंना भिंती बांधलेल्या होत्या व आता येण्याच्या मार्गाजवळच्या बाजूला दगडी गोलाकार स्तंभ उभारून छताला आधार दिलेला होती. हे गोलाकार स्तंभ एकमेकात अड्कवले जातील अशा छोटे गोलाकार आकाराचे चिरे एकावर एक ठेवून बनवलेले होते व हे गोलाकार तुकडे आजही इतस्ततः पडलेले दिसू शकतात. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मार्गाचे, पॉलिश केलेल्या सॅन्डस्टोनचे व 4 फूट उंचीचे असे स्तंभ जमिनीवर उभे करून 3 भागात वर्गीकरण केलेले होते. उत्तर द्वाराजवळच्या एका देवडीत, पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना, सिंधू संस्कृतीतील चिन्ह लिपी मध्ये लिहिलेला आणि 15 इंच उंच असलेली चिन्हे असलेला एक मोठा नामफलक सापडला होती. 3 मीटर लांबीचा हा फलक लाकडी होता व त्यावर जिप्सम या खनिजातून कोरलेली 10 चिन्हे बसवून हा नामफलक बहुधा द्वारावर उभा केलेला असावा. हे शहर नष्ट झाल्यावर हा फलक बहुधा तसाच देवडीमध्ये पडून राहिल्यामुळे त्याचे लाकूड कुजून नष्ट झाले व फक्त जिप्समची चिन्हे खालच्या पाषाणावर चिकटून राहिल्याने टिकली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मताने या नामफलकावर या शहराचे नाव बाहेरगावांहून येणार्या प्रवाशांना वाचता यावे म्हणून मोठ्या आकारात लिहिलेले होते.
उत्तर द्वाराबाहेर 10000 प्रेक्षक बसू शकतील असे एक मोठे स्टेडियम बांधलेले होते. हे स्टेडियम सांस्कृतिक किंवा औपचारिक समारंभ आणि आठवड्याचा बाजार या सारख्या प्रसंगी बहुधा वापरले जात असावे, धोलाविरा हे बंदर असल्याने तेथे कोणते जहाज माल घेऊन आले की त्यावरील मालाची खरेदी विक्री सुद्धा या स्टेडियम मध्ये केली जात असल्याची शक्यता वाटते. रावजीभाई मला सांगतात की किल्यातील जिन्यांना 7, 15 आणि 30 पायर्या आहेत व त्यावर काही सांकेतीक वस्तू ठेवून ती बहुधा रोजा सकाळी हलवली जात असे. या सोप्या पद्धतीने आठवडा, पंधरवडा व महिना यांची कालगणना केली जात असे. येथे पूर्वी समुद्र होता याच्या स्पष्ट खुणा किल्याच्या भिंती बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत त्यावर असलेल्या जीवाश्म खुणांवरून कळते. रावजीभाई मला शिंपल्यांच्या खुणा असलेला एक दगड दाखवतात.
पॉलिश केलेला दगडी स्तंभ
दगडी खांबाच्या तळातील खाचा घेतलेला दगड
किल्याची भेट आटोपून मी आता जवळच असलेल्या संग्रहालयाला भेट देतो आहे. येथे सापडलेली भाजलेल्या मातीची पात्रे, हत्यारे, मातीतून बनवलेल्या बाहुल्यांसारख्या वस्तू आणि उत्खननात सापडलेल्या असंख्य वस्तूंची छायाचित्रे येथे मांडलेली आहेत. या वस्तू व चित्रे बघून हे पुरातन शहर आणि येथे वास्तव्य करणारे लोक यांच्या जीवनशैलीबद्दल खूपच माहिती मला मिळते आहे.
भाजलेल्या मातीतून बनवलेली खेळणी
मनाला समाधान देणार्या या भेटीनंतर आम्ही बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो. रापर आणि चित्रोड गावांच्या मध्ये आम्हाला रस्त्यावर एक नीलगाय (Boselaphus tragocamelus the largest Asian antelope, family Bovidae) आडवी येते व आपण खरोखरच वन विभागात अजून आहोत याची खात्री पटते. आम्ही सामखियाली गावाजवळ एका धाब्यावर चहा पितो व उजवीकडे भचाउ मार्गाने परत भूजकडे जाण्याऐवजी हायवे 27 वरून काठेवाड कडे जाण्यास निघतो. आजचा आमचा मुक्काम मोरवी किंवा मोरबी या शहरात आहे. हे शहर छोटया रणापासून फक्त 40 किमी अंतरावर असल्याने मला उद्या छोट्या रणाला धावती भेट देता येईल अशी आशा वाटते आहे. मोरवीला पोचायला आम्हाला तिन्हीसांजा होतात. मोरवी गावात शिरताना प्रथम काय जाणवते आहे ती आसमंतात आणि हवेत सर्वत्र असलेली धूळ. मोरवीमध्ये सिरॅमिक टाईल्स बनवणारे अनेक कारखाने असल्याने ही धूळ बहुधा अनुभवण्यास येते.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 6
रविवार
मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान होते. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने वाघजी ठाकोर यांना या संस्थानाच्या राज्यपदावर आरूढ होण्यास मान्यता दिली व त्यांच्या कारकिर्दीत संस्थानाचे चित्र पालटले. राज्यपदावर आरूढ झाल्याबरोबर वाघजींनी मोरवी संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. सन 1886 मध्ये त्यांनी मोरवी शहरापासून रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केले. त्या काळात मोरवीच्या परिसरात मिठाचे उत्पादन हा एकच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने कच्छ्च्या खाडीच्या पूर्वेकडील टोकांवर असलेल्या नवलाखी बंदरातून मिठाची वाहतुक करणे सोपे जाईल या कल्पनेने या बंदराचा विकास करणे त्यांनी सुरू केले. वाहतुकीच्या प्रकल्पांशिवाय त्यांनी मोरवी मध्ये नवीन शाळा, कॉलेजे व हॉस्पिटल्स यांची स्थापना केली. वाघजी यांच्या नंतर संस्थानाच्या राज्यपदी लखदीरजी ठाकोर यांना ब्रिटिश सरकारने बसवले. लखदीरजी यांनी सुद्धा मोरवी संस्थानासाठी बरेच कार्य केले. वीज निर्मितीसाठी पॉवर हाऊस, टेलेफोन एक्सचेन्ज, नवी मंदीरे, टेक्निकल हाया स्कूल आणि इंजिनीयरिंग कॉलेज या सारख्या असंख्य नवीन गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात सुरु झाल्या.
मोरवीचे राजे आपल्या संस्थानात नवनवीन उद्योग चालू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असत. चिनी मातीचे उद्योग, त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची उपलब्धता संस्थानात विपुल असल्याने, सुरू व्हावेत यासाठी अनेक सवलती व सुविधा या उद्योगाला मोरवी संस्थानाने देऊ केल्या. परशुराम पॉटरीज हा 40/50 वर्षांपूर्वी मोठे नाव कमावलेला पॉटरी उद्योग मोरवी संस्थानातच कार्यरत होता. आज मोरवी मध्ये 350 च्या वर सिरॅमिक टाइल्स बनवणारे कारखाने आहेत. याशिवाय भिंतीवर लावण्याची घड्याळे बनवणारे सर्व सुप्रसिद्ध कारखाने मोरवीतच आहेत.
लखधीरजी ठाकोर यांनी 1940च्या दशकात राज परिवारासाठी एक नवा पॅलेस बांधला होता. या पॅलेसला भेट देणे हा माझ्या आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग आहे. मोरवीमध्ये जी रेल्वे लाईन बांधली गेली होती, त्या लाईनवर असलेल्या नझरबाग स्थानकाच्या बाजूला हा पॅलेस बांधलेला आहे. पॅलेसचा परिसर आणि त्या बाजूने बांधलेले कंपाऊंड हे दोन्ही अतिशय भारदस्त आणि मनावर छाप पाडणारे आहेत. बाहेरच्या कंपाऊंडला असलेल्या अनेक प्रवेशद्वारापैकी एकातून आम्ही आत शिरतो आणि एक वळण घेऊन आतील कंपाउंडच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. आम्ही प्रवास करत असलेली एस.यू.व्ही गाडी आतील कंपाऊंडरला असलेल्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी (आणि बंद) असलेल्या सर्वात मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जी दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एकातून सहजपणे आत जाऊ शकते आहे यावरून रॉट आयर्नमधून बनवलेल्या या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या आकाराची कल्पना करणे सहज शक्य आहे. या प्रवेशद्वारापासून एक रस्ता सरळ पॅलेसच्या भव्य दर्शनी भागाच्या मध्यावर असलेल्या द्वाराकडे जातो. परंतु आम्ही डावीकडे वळतो आणि या बाजूला असलेल्या पोर्चखालील एका द्वाराजवळ गाडी थांबवतो.
पॅलेसची वास्तू दुमजली आहे व 1940च्या दशकात आधुनिक वास्तुकला म्हणून मानल्या जाणार्या आराखड्यानुसार ही वास्तू बांधलेली आहे. ही वास्तू बघताना मला मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशन जवळच्या भागातील याच कालात बांधल्या गेलेल्या इमारतींची असलेले या वास्तूचे साधर्म्य लक्षात येते आहे. वास्तूच्या दोन्ही कोपर्यात असलेल्या कक्षांना अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर ऑफसेट दिलेले पट्टे आहेत आणि सर्व खिडक्या अशाच एका पट्ट्यात सरळ रेषेत बसवलेल्या आहेत. खिडक्यांच्या लिंटेल्सच्या जरा वर लिंटेल्सच्या स्लॅब्ज मधूनच छज्जे बाहेर काढलेले असल्याने बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशाला आत येण्यास मज्जाव केला जातो आहे.
आम्हाला तळमजल्याला भेट देण्याची फक्त परवानगी मिळालेली असल्याने हा मजला आम्हाला दाखवण्यात येतो आहे. या मजल्यावर उत्तर–दक्षिण असे बांधलेले 3 स्वीट्स (Suits) आहेत. प्रत्येक स्वीट्मध्ये एक हॉल, डायनिंग रूम आणि शयनगृह हे एकापाठोपाठ एक किंवा रेल्वेच्या डब्यांप्रमाणे बांधलेले आहेत. या 3 स्वीट्सच्या मध्ये 2 खुली प्रशस्त अंगणे आहेत. या स्वीट्सच्या दोन्ही टोकांना पूर्व–पश्चिम अशी विस्तारलेली अनेक दालने आहेत. यापैकी उत्तर टोकाला असलेल्या दालनांत एक मोठा दरबार हॉल, भेटीसाठी आलेल्या इच्छूकांना बसण्यासाठी असलेला बैठकीचा हॉल व एक शयन गृह आहे. दक्षिण टोकाच्या दालनांमध्ये एक पोहण्याचा तलाव, जिम्नॅशियम आणि बिलियर्ड्स कक्ष आहे. येथील बिलियर्डस टेबल नेहमीच्या टेबलांच्या दीड ते 2 पट मोठ्या आकाराचे आहे. तसेच जिम्नॅशियममधे असलेली व 1940च्या दशकात बनवलेली निरनिराळी व्यायाम करण्याची उपकरणे बघायला मला मोठी रोचक वाटत आहेत. पॅलेसमधील प्रत्येक कक्ष हा निराळ्या पद्धतीने बांधला गेलेला आणि सजवला गेलेला आहे. आतील सजावट पहाताना तिचा खानदानी व श्रीमंती रुबाब मनाला मोठी भुरळ् घालतो आहे. प्रत्येक कक्षाच्या तळाला असलेल्या इटालियन संगमरवराच्या टाइल्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या संगमरवरातून घडवलेल्या आहेत. हा पॅलेस बघताना त्या काळातील संस्थानिकांची जीवनशैली आणि श्रीमंती यांची चांगलीच कल्पना येते आहे. अर्थात ही सर्व संस्थानिक मंडळी शेवटी इंग्रज सरकारच्या इशार्यानुसार चालत होती हे सत्य या देखाव्यामागे अबाधित आहेच. लायब्ररी कक्षात असलेला एक 1940 मधील नकाशा मला अतिशय रोचक वाटतो आहे. हा नकाशा निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या लाकडांचे तुकडे एका पॅनेलवर ‘इनले‘ करून बनवलेला आहे. प्रत्येक मोठ्या संस्थानासाठी निराळ्या झाडाचे लाकूड वापरलेले आहे. दरबार हॉलमधील ब्रिटिश कलाकारांनी काढलेली तैलचित्रे आणि छायाचित्रे मला खूपच भावतात.
मोरवी रेल्वेची इंजिन शेड
जुन्या पॅलेसचा दर्शनी भाग
मच्छू नदीवरचा झुलता पूल
मणी मंदीर
मोरवीची मच्छू नदी
पॅलेसची भेट आटोपून आम्ही बाहेर पडतो. बाजूलाच मोरवी मधील जुन्या रेल्वे इंजिनांसाठी बांधलेली शेड आहे. ती बघून आम्ही मच्छू नदीवरील झुलता पूल, जुना किंवा दरबार गढ पॅलेस आणि मणी मंदीर यांना एक धावती भेट देतो. परतत असताना हिरव्या रंगाच्या व ग्रीन टॉवर असे नाव असलेल्या एक लोखंडी स्ट्रक्चरकडे माझे सहज लक्ष जाते.
भोजन झाल्यावर दुपारी, मोरवीचे प्रमुख आकर्षण ( निदान माझ्या मताने) असलेल्या छोट्या रणाकडे जाण्यास आम्ही निघालो आहोत. हे छोटे रण मोरवीपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. मोरवी शहर जरी गुजराथच्या काठेवाड भागामध्ये मोडत असले तरी छोटे रण हे नेहमीच कच्छचा एक भाग म्हणून मानले गेले असल्याने मी परत एकदा कच्छ्कडे चाललो आहे असे म्हणता येईल. मोरवी– जेतपूर यांना जोडणारा हायवे 321 आम्ही जेतपूरजवळ सोडतो व गुजराथ सरकारने नवीनच बांधलेल्या हायवे 7 वर वळतो. गुजराथची राजधानी अहमदाबाद व उत्तरेकडील शहरे या नवीन रस्त्याने आता सरळ जोडली गेलेली आहेत. खाखरेची गावाकडे जाणारा दुसरा एक छोटा रस्ता आम्हाला घ्यायचा असल्याने आम्ही हायवे 7 लगेचच सोडतो व या रस्त्यावर वळतो. नर्मदा नदीचे पाणी आता इतपर्यंत कॅनॉलने आणले गेले आहे. या पाण्यावर वाढणारी एरंडी व जिरे यांची जोमदार पिके रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. नर्मदा कॅनॉलचे पाणी पोचल्याने हा भाग आता संपन्न झालेला दिसतो आहे.
जंगली गाढवाची कवटी
थोड्याच वेळात आम्ही वेणसर गावाजवळ पोचतो. येथून छोटे रण सुरु होते व उत्तरेला त्याचा विस्तार होत जातो. रणात जाणारा एक कच्चा रस्ता आम्ही पकडतो. आजूबाजूचा आसमंत परत एकदा गेले काही दिवस सतत बघितल्यामुळे ओळखीच्या झालेल्या मोठ्या रणातील आसमंतासारखा दिसू लागला आहे. लालसर ब्राऊन जमीन, त्यावर मधून मधून असलेली बेटे किंवा उंचवटे, गवताळ जमीन व सर्वत्र पसरलेली बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झुडपे हेच दृष्य चारी बाजूंना दिसते आहे. थोड्याच वेळात रस्ता संपतो आणि आम्ही सुकलेल्या रणातील सपाट जमिनीवर पोचतो आहोत. येथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये गाडी चालवता येते मात्र दुसर्या कोणाच्या गाडीच्या टायरच्या खुणांवरून मार्गक्रमण करणे हे नेहमीच बिनधोक असते. काही अंतरावर मला एक फुटलेला बंधारा दिसतो. या बंधार्याला सागर बंधारा असे नाव दिलेले होते परंतु मागच्या वर्षीच्या पुरामध्ये तो वाहून गेलेला आहे. थोड्या उंचीवर असलेल्या एका जागी आम्ही गाडी थांबवतो आणि रानटी गाढवे दिसतात का हे बघण्यासाठी खाली उतरतो. छोटे रण हे रानटी गाढवांसाठी अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे व ही रानटी गाढवे पहाण्यासाठीच खरे म्हणजे आम्ही येथे आलो आहोत. खाली मला एका जागी गाढवाची काही हाडे व कवटी पडलेली दिसते. हे गाढव बहुधा काही वर्षांपूर्वी मृत झालेले असावे परंतु गिधाडे आणि नंतर मुंग्या यांनी आपले काम उत्कृष्ट रित्या करून नंतर ही हाडे इतकी चाटून पुसून स्वच्छ केलेली आहेत की ही आता ती धुतल्यासारखी स्वच्छ दिसत आहेत. लांब अंतरावर एक नर गाढव एकटेच फिरताना आम्हाला दिसते ( रानटी नर गाढवे नेहमीच एकटी फिरत असतात.) पण ते बर्याच अंतरावर असल्याने त्याचे छायाचित्र काढणे मला शक्य होत नाही.
आम्ही पुढे निघतो. पुढे काही अंतरावर एक तळे दिसते आहे. याला स्थानिक लोक कॅनॉल तळे या नावानेच ओळखतात कारण नर्मदा कॅनॉल मधून गळती झालेल्या पाण्यामुळे हे तळे तयार झालेले आहे. मला तळ्याच्या निळ्याभोर पाण्याच्या पृष्ठभागावर काही पांढरे ठिपके तरंगताना दिसतात. आम्ही थोडे पुढे जातो व पक्षी विचलित होणार नाहीत एवढ्या अंतरावर गाडी थांबवतो. बायनॉक्यूलर्स मधून बघताना लक्षात येते की तेथे 4 पेलिकन आणि त्यांच्या मागे 6 फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगो कुटुंबात 4 मोठे पक्षी व 2 पिल्ले आहेत. जरा काळजीपूर्वक5 बघितल्यावर5मी त्यांना नीट बघू शकतो आहे. खरे तर कच्छचे रण् हे फ्लेमिंगो पक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे पण आतापर्यंतच्या या सहलीत, मला फ्लेमिंगो पक्षी कोठेच दिसू शकले नव्हते. फ्लेमिंगो बघता येतील ही माझी अपेक्षा येथे छोट्या रणात थोड्या प्रमाणात का होईना! शेवटी पूर्ण होते आहे. पाण्यामध्ये हे फ्लेमिंगो आपली मान मुरडुन घेऊन खाली पाण्यातील मासे शोधत अगदी स्तब्धपणे उभे आहेत. निळ्याशार पाण्यामध्ये त्यांचे केशरी रंगाचे पाय उठून दिसत आहेत.
आम्ही परत वळतो व जरा उंचावर असलेल्या हांडी बेटाकडे गाडी वळवतो. काही काळापूर्वी या ठिकाणाचा फायरिंग रेंज म्हणून पोलिस वापर करत असत. परंतु पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली फायरिंग रेंज येथून आता हलवली आहे व रानटी गाढवांना हे रान परत मोकळे झाल्याने ती परतली आहेत.
हांडी बेटावर गाडी थांबवून आम्ही खाली उतरतो व इकडे तिकडे जरा बघितल्यावर 3 धष्टपुष्ट जनावरे शोधायला आम्हाला फारसा वेळ् लागत नाही. मध्यम आकाराच्या आणि घोड्याच्या उंचीएवढ्या असलेल्या या सर्व माद्या आहेत. त्यांच्या अंगावर ब्राऊन आणि पांढर्या रंगाचे पॅचेस दिसत आहेत.
हांडी बेटावर आणखी पुढे गेल्यावर आम्हाला धवल मरुभूमीचा एक पट्टा दिसतो. छोट्या रणाच्या काही भागात ही धवल मरुभूमी मोठ्या रणाप्रमाणेच दिसते. मात्र येथे असलेल्या मिठाचे व्यापारी स्वरूपात उत्पादन केले जाते आहे असे समोर उभे असलेली मिठागरे व ट्रक यावरून कळून येते आहे.
छोट्या रणातून परतताना खाखरेची गावाजवळ मला दोन किंवा तीन् मोर व सात किंवा आठ लांडोर यांचा एक थवा दिसतो. मोरांची निळसर–हिरवी पिसे पूर्णपणे झडून गेलेली दिसत आहेत. फक्त त्यांच्या माना व डोक्याजवळचा भाग तेवढा निळसर हिरवा दिसतो आहे. दोन मोरांनी आपला पिसारा खरे तर पूर्णपणे पसरलेला आहे. परंतु निळसर पिसे झडून गेल्याने हा पिसारा सध्या पिवळट ब्राउनिश दिसतो आहे. हा असा पिसारा बघितल्यावर कोणतीही लांडोर साहजिकपणे त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीये.
उद्या सकाळी आम्ही काठेवाडच्या समुद्र किनार्यावर असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदीराकडे जायला निघणार!
रविवार
मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान होते. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने वाघजी ठाकोर यांना या संस्थानाच्या राज्यपदावर आरूढ होण्यास मान्यता दिली व त्यांच्या कारकिर्दीत संस्थानाचे चित्र पालटले. राज्यपदावर आरूढ झाल्याबरोबर वाघजींनी मोरवी संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. सन 1886 मध्ये त्यांनी मोरवी शहरापासून रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केले. त्या काळात मोरवीच्या परिसरात मिठाचे उत्पादन हा एकच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने कच्छ्च्या खाडीच्या पूर्वेकडील टोकांवर असलेल्या नवलाखी बंदरातून मिठाची वाहतुक करणे सोपे जाईल या कल्पनेने या बंदराचा विकास करणे त्यांनी सुरू केले. वाहतुकीच्या प्रकल्पांशिवाय त्यांनी मोरवी मध्ये नवीन शाळा, कॉलेजे व हॉस्पिटल्स यांची स्थापना केली. वाघजी यांच्या नंतर संस्थानाच्या राज्यपदी लखदीरजी ठाकोर यांना ब्रिटिश सरकारने बसवले. लखदीरजी यांनी सुद्धा मोरवी संस्थानासाठी बरेच कार्य केले. वीज निर्मितीसाठी पॉवर हाऊस, टेलेफोन एक्सचेन्ज, नवी मंदीरे, टेक्निकल हाया स्कूल आणि इंजिनीयरिंग कॉलेज या सारख्या असंख्य नवीन गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात सुरु झाल्या.
मोरवीचे राजे आपल्या संस्थानात नवनवीन उद्योग चालू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असत. चिनी मातीचे उद्योग, त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची उपलब्धता संस्थानात विपुल असल्याने, सुरू व्हावेत यासाठी अनेक सवलती व सुविधा या उद्योगाला मोरवी संस्थानाने देऊ केल्या. परशुराम पॉटरीज हा 40/50 वर्षांपूर्वी मोठे नाव कमावलेला पॉटरी उद्योग मोरवी संस्थानातच कार्यरत होता. आज मोरवी मध्ये 350 च्या वर सिरॅमिक टाइल्स बनवणारे कारखाने आहेत. याशिवाय भिंतीवर लावण्याची घड्याळे बनवणारे सर्व सुप्रसिद्ध कारखाने मोरवीतच आहेत.
लखधीरजी ठाकोर यांनी 1940च्या दशकात राज परिवारासाठी एक नवा पॅलेस बांधला होता. या पॅलेसला भेट देणे हा माझ्या आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग आहे. मोरवीमध्ये जी रेल्वे लाईन बांधली गेली होती, त्या लाईनवर असलेल्या नझरबाग स्थानकाच्या बाजूला हा पॅलेस बांधलेला आहे. पॅलेसचा परिसर आणि त्या बाजूने बांधलेले कंपाऊंड हे दोन्ही अतिशय भारदस्त आणि मनावर छाप पाडणारे आहेत. बाहेरच्या कंपाऊंडला असलेल्या अनेक प्रवेशद्वारापैकी एकातून आम्ही आत शिरतो आणि एक वळण घेऊन आतील कंपाउंडच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. आम्ही प्रवास करत असलेली एस.यू.व्ही गाडी आतील कंपाऊंडरला असलेल्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी (आणि बंद) असलेल्या सर्वात मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जी दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एकातून सहजपणे आत जाऊ शकते आहे यावरून रॉट आयर्नमधून बनवलेल्या या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या आकाराची कल्पना करणे सहज शक्य आहे. या प्रवेशद्वारापासून एक रस्ता सरळ पॅलेसच्या भव्य दर्शनी भागाच्या मध्यावर असलेल्या द्वाराकडे जातो. परंतु आम्ही डावीकडे वळतो आणि या बाजूला असलेल्या पोर्चखालील एका द्वाराजवळ गाडी थांबवतो.
पॅलेसची वास्तू दुमजली आहे व 1940च्या दशकात आधुनिक वास्तुकला म्हणून मानल्या जाणार्या आराखड्यानुसार ही वास्तू बांधलेली आहे. ही वास्तू बघताना मला मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशन जवळच्या भागातील याच कालात बांधल्या गेलेल्या इमारतींची असलेले या वास्तूचे साधर्म्य लक्षात येते आहे. वास्तूच्या दोन्ही कोपर्यात असलेल्या कक्षांना अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर ऑफसेट दिलेले पट्टे आहेत आणि सर्व खिडक्या अशाच एका पट्ट्यात सरळ रेषेत बसवलेल्या आहेत. खिडक्यांच्या लिंटेल्सच्या जरा वर लिंटेल्सच्या स्लॅब्ज मधूनच छज्जे बाहेर काढलेले असल्याने बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशाला आत येण्यास मज्जाव केला जातो आहे.
आम्हाला तळमजल्याला भेट देण्याची फक्त परवानगी मिळालेली असल्याने हा मजला आम्हाला दाखवण्यात येतो आहे. या मजल्यावर उत्तर–दक्षिण असे बांधलेले 3 स्वीट्स (Suits) आहेत. प्रत्येक स्वीट्मध्ये एक हॉल, डायनिंग रूम आणि शयनगृह हे एकापाठोपाठ एक किंवा रेल्वेच्या डब्यांप्रमाणे बांधलेले आहेत. या 3 स्वीट्सच्या मध्ये 2 खुली प्रशस्त अंगणे आहेत. या स्वीट्सच्या दोन्ही टोकांना पूर्व–पश्चिम अशी विस्तारलेली अनेक दालने आहेत. यापैकी उत्तर टोकाला असलेल्या दालनांत एक मोठा दरबार हॉल, भेटीसाठी आलेल्या इच्छूकांना बसण्यासाठी असलेला बैठकीचा हॉल व एक शयन गृह आहे. दक्षिण टोकाच्या दालनांमध्ये एक पोहण्याचा तलाव, जिम्नॅशियम आणि बिलियर्ड्स कक्ष आहे. येथील बिलियर्डस टेबल नेहमीच्या टेबलांच्या दीड ते 2 पट मोठ्या आकाराचे आहे. तसेच जिम्नॅशियममधे असलेली व 1940च्या दशकात बनवलेली निरनिराळी व्यायाम करण्याची उपकरणे बघायला मला मोठी रोचक वाटत आहेत. पॅलेसमधील प्रत्येक कक्ष हा निराळ्या पद्धतीने बांधला गेलेला आणि सजवला गेलेला आहे. आतील सजावट पहाताना तिचा खानदानी व श्रीमंती रुबाब मनाला मोठी भुरळ् घालतो आहे. प्रत्येक कक्षाच्या तळाला असलेल्या इटालियन संगमरवराच्या टाइल्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या संगमरवरातून घडवलेल्या आहेत. हा पॅलेस बघताना त्या काळातील संस्थानिकांची जीवनशैली आणि श्रीमंती यांची चांगलीच कल्पना येते आहे. अर्थात ही सर्व संस्थानिक मंडळी शेवटी इंग्रज सरकारच्या इशार्यानुसार चालत होती हे सत्य या देखाव्यामागे अबाधित आहेच. लायब्ररी कक्षात असलेला एक 1940 मधील नकाशा मला अतिशय रोचक वाटतो आहे. हा नकाशा निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या लाकडांचे तुकडे एका पॅनेलवर ‘इनले‘ करून बनवलेला आहे. प्रत्येक मोठ्या संस्थानासाठी निराळ्या झाडाचे लाकूड वापरलेले आहे. दरबार हॉलमधील ब्रिटिश कलाकारांनी काढलेली तैलचित्रे आणि छायाचित्रे मला खूपच भावतात.
मोरवी रेल्वेची इंजिन शेड
जुन्या पॅलेसचा दर्शनी भाग
मच्छू नदीवरचा झुलता पूल
मणी मंदीर
मोरवीची मच्छू नदी
पॅलेसची भेट आटोपून आम्ही बाहेर पडतो. बाजूलाच मोरवी मधील जुन्या रेल्वे इंजिनांसाठी बांधलेली शेड आहे. ती बघून आम्ही मच्छू नदीवरील झुलता पूल, जुना किंवा दरबार गढ पॅलेस आणि मणी मंदीर यांना एक धावती भेट देतो. परतत असताना हिरव्या रंगाच्या व ग्रीन टॉवर असे नाव असलेल्या एक लोखंडी स्ट्रक्चरकडे माझे सहज लक्ष जाते.
भोजन झाल्यावर दुपारी, मोरवीचे प्रमुख आकर्षण ( निदान माझ्या मताने) असलेल्या छोट्या रणाकडे जाण्यास आम्ही निघालो आहोत. हे छोटे रण मोरवीपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. मोरवी शहर जरी गुजराथच्या काठेवाड भागामध्ये मोडत असले तरी छोटे रण हे नेहमीच कच्छचा एक भाग म्हणून मानले गेले असल्याने मी परत एकदा कच्छ्कडे चाललो आहे असे म्हणता येईल. मोरवी– जेतपूर यांना जोडणारा हायवे 321 आम्ही जेतपूरजवळ सोडतो व गुजराथ सरकारने नवीनच बांधलेल्या हायवे 7 वर वळतो. गुजराथची राजधानी अहमदाबाद व उत्तरेकडील शहरे या नवीन रस्त्याने आता सरळ जोडली गेलेली आहेत. खाखरेची गावाकडे जाणारा दुसरा एक छोटा रस्ता आम्हाला घ्यायचा असल्याने आम्ही हायवे 7 लगेचच सोडतो व या रस्त्यावर वळतो. नर्मदा नदीचे पाणी आता इतपर्यंत कॅनॉलने आणले गेले आहे. या पाण्यावर वाढणारी एरंडी व जिरे यांची जोमदार पिके रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. नर्मदा कॅनॉलचे पाणी पोचल्याने हा भाग आता संपन्न झालेला दिसतो आहे.
जंगली गाढवाची कवटी
थोड्याच वेळात आम्ही वेणसर गावाजवळ पोचतो. येथून छोटे रण सुरु होते व उत्तरेला त्याचा विस्तार होत जातो. रणात जाणारा एक कच्चा रस्ता आम्ही पकडतो. आजूबाजूचा आसमंत परत एकदा गेले काही दिवस सतत बघितल्यामुळे ओळखीच्या झालेल्या मोठ्या रणातील आसमंतासारखा दिसू लागला आहे. लालसर ब्राऊन जमीन, त्यावर मधून मधून असलेली बेटे किंवा उंचवटे, गवताळ जमीन व सर्वत्र पसरलेली बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झुडपे हेच दृष्य चारी बाजूंना दिसते आहे. थोड्याच वेळात रस्ता संपतो आणि आम्ही सुकलेल्या रणातील सपाट जमिनीवर पोचतो आहोत. येथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये गाडी चालवता येते मात्र दुसर्या कोणाच्या गाडीच्या टायरच्या खुणांवरून मार्गक्रमण करणे हे नेहमीच बिनधोक असते. काही अंतरावर मला एक फुटलेला बंधारा दिसतो. या बंधार्याला सागर बंधारा असे नाव दिलेले होते परंतु मागच्या वर्षीच्या पुरामध्ये तो वाहून गेलेला आहे. थोड्या उंचीवर असलेल्या एका जागी आम्ही गाडी थांबवतो आणि रानटी गाढवे दिसतात का हे बघण्यासाठी खाली उतरतो. छोटे रण हे रानटी गाढवांसाठी अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे व ही रानटी गाढवे पहाण्यासाठीच खरे म्हणजे आम्ही येथे आलो आहोत. खाली मला एका जागी गाढवाची काही हाडे व कवटी पडलेली दिसते. हे गाढव बहुधा काही वर्षांपूर्वी मृत झालेले असावे परंतु गिधाडे आणि नंतर मुंग्या यांनी आपले काम उत्कृष्ट रित्या करून नंतर ही हाडे इतकी चाटून पुसून स्वच्छ केलेली आहेत की ही आता ती धुतल्यासारखी स्वच्छ दिसत आहेत. लांब अंतरावर एक नर गाढव एकटेच फिरताना आम्हाला दिसते ( रानटी नर गाढवे नेहमीच एकटी फिरत असतात.) पण ते बर्याच अंतरावर असल्याने त्याचे छायाचित्र काढणे मला शक्य होत नाही.
आम्ही पुढे निघतो. पुढे काही अंतरावर एक तळे दिसते आहे. याला स्थानिक लोक कॅनॉल तळे या नावानेच ओळखतात कारण नर्मदा कॅनॉल मधून गळती झालेल्या पाण्यामुळे हे तळे तयार झालेले आहे. मला तळ्याच्या निळ्याभोर पाण्याच्या पृष्ठभागावर काही पांढरे ठिपके तरंगताना दिसतात. आम्ही थोडे पुढे जातो व पक्षी विचलित होणार नाहीत एवढ्या अंतरावर गाडी थांबवतो. बायनॉक्यूलर्स मधून बघताना लक्षात येते की तेथे 4 पेलिकन आणि त्यांच्या मागे 6 फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगो कुटुंबात 4 मोठे पक्षी व 2 पिल्ले आहेत. जरा काळजीपूर्वक5 बघितल्यावर5मी त्यांना नीट बघू शकतो आहे. खरे तर कच्छचे रण् हे फ्लेमिंगो पक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे पण आतापर्यंतच्या या सहलीत, मला फ्लेमिंगो पक्षी कोठेच दिसू शकले नव्हते. फ्लेमिंगो बघता येतील ही माझी अपेक्षा येथे छोट्या रणात थोड्या प्रमाणात का होईना! शेवटी पूर्ण होते आहे. पाण्यामध्ये हे फ्लेमिंगो आपली मान मुरडुन घेऊन खाली पाण्यातील मासे शोधत अगदी स्तब्धपणे उभे आहेत. निळ्याशार पाण्यामध्ये त्यांचे केशरी रंगाचे पाय उठून दिसत आहेत.
आम्ही परत वळतो व जरा उंचावर असलेल्या हांडी बेटाकडे गाडी वळवतो. काही काळापूर्वी या ठिकाणाचा फायरिंग रेंज म्हणून पोलिस वापर करत असत. परंतु पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली फायरिंग रेंज येथून आता हलवली आहे व रानटी गाढवांना हे रान परत मोकळे झाल्याने ती परतली आहेत.
हांडी बेटावर गाडी थांबवून आम्ही खाली उतरतो व इकडे तिकडे जरा बघितल्यावर 3 धष्टपुष्ट जनावरे शोधायला आम्हाला फारसा वेळ् लागत नाही. मध्यम आकाराच्या आणि घोड्याच्या उंचीएवढ्या असलेल्या या सर्व माद्या आहेत. त्यांच्या अंगावर ब्राऊन आणि पांढर्या रंगाचे पॅचेस दिसत आहेत.
हांडी बेटावर आणखी पुढे गेल्यावर आम्हाला धवल मरुभूमीचा एक पट्टा दिसतो. छोट्या रणाच्या काही भागात ही धवल मरुभूमी मोठ्या रणाप्रमाणेच दिसते. मात्र येथे असलेल्या मिठाचे व्यापारी स्वरूपात उत्पादन केले जाते आहे असे समोर उभे असलेली मिठागरे व ट्रक यावरून कळून येते आहे.
छोट्या रणातून परतताना खाखरेची गावाजवळ मला दोन किंवा तीन् मोर व सात किंवा आठ लांडोर यांचा एक थवा दिसतो. मोरांची निळसर–हिरवी पिसे पूर्णपणे झडून गेलेली दिसत आहेत. फक्त त्यांच्या माना व डोक्याजवळचा भाग तेवढा निळसर हिरवा दिसतो आहे. दोन मोरांनी आपला पिसारा खरे तर पूर्णपणे पसरलेला आहे. परंतु निळसर पिसे झडून गेल्याने हा पिसारा सध्या पिवळट ब्राउनिश दिसतो आहे. हा असा पिसारा बघितल्यावर कोणतीही लांडोर साहजिकपणे त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीये.
उद्या सकाळी आम्ही काठेवाडच्या समुद्र किनार्यावर असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदीराकडे जायला निघणार!
सिर खाडीचे महत्त्व
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 3000 किमी लांबीची आणि बहुतांशी जमिनीवरून जाणारी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा काश्मिरात काही भाग व ही सीमा अरबी समुद्राला जेथे मिळते तेथील थोडा भाग वगळला तर इतर सर्व ठिकाणी विवाद विरहित रितीने रेखलेली आहे. या रेषेचा अरबी समुद्राजवळचा 96 किमी लांबीचा भाग मात्र प्रथमपासूनच विवादास्पद आहे. मात्र या 96 किमी लांबीच्या विवादास्पद रेषेचे हे वैशिष्ट्य मानले पाहिजे की ही रेखा सध्या जशी दाखवली जाते ती कोणत्याही आंतर्राष्ट्रीय लवादाने किंवा स्वातंत्र्यपूर्व कालातील ब्रिटिश सरकारने मनास येईल त्याप्रमाणे आखलेली नसून ती एका भौगोलिक वैशिष्ट्याच्या (feature) सलग आखलेली आहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्राला जोडलेली लहान अशी व सिर खाडी या नावाने ओळखली जाणारी एक खाडी आहे. या खाडीने गुजरात राज्यातील कच्छ हा विभाग आणि पाकिस्तानातील सिंध प्रांत हे विभागले जातात. या खाडीचे अक्षांश–रेखांश साधारणपणे 23°58′N 68°48′E. हे येतात. विकिपिडीया मधील वर्णनाप्रमाणे या खाडीला बाणगंगा असे नाव आहे. परंतु मला तरी इतर कोठे हे नाव आढळले नाही.
सन 1924 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने राव महाराज यांच्या अधिपत्याखाली असलेले भूज संस्थान आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील सिंध विभाग यांच्यामधील सीमेची आखणी करण्यासाठी या सिर क्रीकच्या प्रवाहाच्या साधारण मध्यावर खाडीमध्ये सीमा रेखा आरेखन करणारे स्तंभ उभारले होते. पाकिस्तानने प्रथमपासूनच या स्तंभांचे अस्तित्व व त्यावरून रेखीत केली जाणारी रेषा ही आंतर्राष्ट्रीय सीमा आहे हे अमान्य केलेले आहे. पाकिस्तानच्या मताने ही सीमा रेखा भारताच्या बाजूस पडणार्या या खाडीच्या पूर्व किंवा पश्चिम किनार्यालगत असणे आवश्यक आहे. (म्हणजेच या खाडीतील जलप्रवाह हा संपूर्णपणे पाकिस्तानच्या सीमा अंतर्गत असला पाहिजे.) भारताची भूमिका ही सीमा रेखा मूळ 1924 मध्ये उभारलेल्या स्तंभांच्या सलग असली पाहिजे अशी आहे.
बर्याच लोकांचे असे म्हणणे आहे की या एका छोट्याशा जलमार्गाला एवढे महत्त्व विनाकारण दिले गेले आहे आणि पाकिस्तान व भारत आपल्या भूमिकेवरून मागे हटण्यास तयार नसल्याबद्दल आश्चर्यही अनेकांना वाटते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडे मागे गेले पाहिजे व मुळात सिर क्रीक मधील ही सीमा रेखा रेखीत करण्याचीच गरज का निर्माण झाली होती याची कारणे शोधली पाहिजेत. यासाठी कच्छ आणि सिंध यांच्या मधील सीमारेषेच्या पूर्वेकडील भागाकडे आपण प्रथम वळूया. प्राकृतिक नकाशा बघितल्यास लगेच लक्षात येऊ शकेल की पूर्वेकडील ही सीमारेखा, रण या नावाने ओळखल्या जाणार्या व खारवट पाण्याने आणि दलदलीने भरलेल्या अशा एका विस्तृत जलाशयाच्या उत्तर किनार्याच्या बाजू–बाजूने पश्चिमेकडे जाते. 1878 साली काढल्या गेलेल्या एका नकाशात सुद्धा ही सीमारेखा अगदी स्पष्टपणे आणि विवाद विरहित रित्या दर्शवलेली आहे.
या रेषेच्या पश्चिम भागाच्या थोड्या दक्षिणेला म्हणजेच कच्छ मध्ये, ‘लखपत‘ हे गाव वसलेले आहे. या गावाच्या उत्तरेला ‘कोरी‘ या नावाने ओळखली जाणारी एक नदी 1875 या वर्षापर्यंत वहात असे. मात्र मानव निर्मित व निसर्ग निर्मित अशा दोन्ही कारणांमुळे या नदीतून वाहणारे पाणी कमी–जास्त अशा चक्रामधून या वर्षाच्या आधीच्या 100 वर्षांच्या कालखंडात जात राहिल्याने ही नदी कधी भरपूर पाण्याने भरलेली तर कधी एक दलदलीने भरलेला एक पाणथळ प्रदेश अशी स्वरूपे घेत राहिली. ‘लखपत‘च्या‘ ईशान्येकडे असलेले व सध्या पाकिस्तान मध्ये असलेले ‘अली बंदर‘ हे गाव या ‘कोरी‘ नदीच्या किनार्यावर वसलेले होते व तेथूनच ही नदी ‘लखपतकडे‘ वहात येत असे. पाकिस्तानमध्ये या नदीला ‘पूरन‘ असे नाव आहे.
या ‘कोरी‘ नदीला ऐतिहासिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलेक्झांडर (इ.पूर्व 325) ते टॉलेमी (इ.स.150) यांच्या कालात ही नदी ‘लोनीबेरे‘ या नावाने परिचित होती आणि ही नदी सिंधू नदीचे पूर्वेकडील एक महत्त्वाचे मुख असल्याचे मानले जात असे. या नदीचे पाणी वळवण्यासाठी अली बंदर जवळ रहात असलेल्या सिंधी लोकांचे उद्योग 1764 पासूनच सुरू होते. या वर्षी या नदीवर एक मोठा बंधारा बांधण्यात सिंधी लोकांना यश आले. यामुळे ‘लखपत‘ जवळची शेती संपूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला व कच्छी आणि सिंधी सेनांमध्ये युद्ध झाले या युद्धात कच्छी सेनेचा दारूण पराभव झाला झाला आणि ‘लखपत‘ जवळील सुपीक जमीन पाण्याअभावी नापीक बनली. परंतु पुढील काही वर्षातच ‘कोरी‘ नदीला महाभयंकर पूर आला व अली बंदर जवळील बंधारा नष्ट होऊन परत एकदा कोरी नदीला भरपूर पाणी येऊ लागले. 1802 मध्ये अली बंदर जवळ नवा बंधारा बांधला गेला व ‘कोरी‘ नदीचे पाणी परत गायब झाले. परिणामी ‘लखपत‘ जवळील शेती नष्ट होऊन त्या जमिनीचा फक्त चराऊ जमीन म्हणून उपयोग होऊ लागला.
1819 साली झालेल्या एका भयानक भूकंपामध्ये कोरी नदीच्या पात्रात मोठे उंचवटे निर्माण झाले आणि सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख मानल्या जाणार्या ‘कोरी‘ नदीच्या पात्राचे पाणथळ व दलदलीच्या प्रदेशात कायमस्वरूपी रूपांतर झाले. या भूकंपाच्या पाठोपाठ एका महाभयानक सुनामी लाटेने या कोरी नदीच्या पात्रावर आक्रमण केले आणि हा सर्व भाग जलमय झाला.
1846 मध्ये जिऑऑजिकल सोसायटी च्या त्रिमासिक मुखपत्रात (Quarterly journal of Geological society 2, 103, (1846) मिसेस डेरिन्झी या एका ब्रिटिश महिलेने कोणा एका कॅप्टन नेल्सनला लिहिलेले एक पत्र उदृत केले गेले होते. या पत्रात या महिलेले या सुनामी लाटेने हा सर्व भाग जलमय होऊन कसा हाहाकार उडाला होता याचे वर्णन केलेले आहे. थोडे विषयांतर होण्याचा धोका पत्करूनही हे वर्णन मूळातून वाचण्यासारखे असल्याने मी खाली देत आहे.
” कॅप्टन मॅकमर्डो यांचा एक गाइड त्यांना भेटण्यासाठी भूजकडे निघाला होता. तो ज्या दिवशी लखपतला पोचला त्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले. या धक्यांनी राजमहालाच्या भिंती हादरून त्यांचा थोडा भाग कोसळला व काही जिवीतहानी झाली. याचा परिणाम म्हणून सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख असलेल्या कोरी नदीत समुद्राकडून मोठी लाट आली. या लाटेने पश्चिमेकडे सुमारे 20 मैलावर असलेल्या गुंगरा नदीपर्यंत, उत्तरेकडे कोरी नदीच्या मुखापासून 40 मैल अंतरावर असलेल्या ‘वेयरी‘ गावाच्या थोड्या उत्तरेपर्यंत तर पूर्वेला ‘सिंदडी‘ जलाशयापर्यंतचा सर्व प्रदेश जलमय झाला. हा गाइड ‘लखपत‘ मध्ये 6 दिवस( 19 ते 25 जून) अडकून पडला होता. या कालात भूकंपाचे एकूण 66 धक्के त्याने अनुभवले. त्या नंतर तो कोटडी गावापर्यंत पोचू शकला. या गावात उंच जमीनीवर बांधलेली काही लहान घरे फक्त अस्तित्वात राहिली होती. या जिल्ह्यातील रहिवाशांपैकी बहुतेकांचा ते समुद्रात वाहून गेल्याने या महाभयंकर लाटेने घास घेटला होता. सिंध मधील अगदी उत्तम मानली जाणारी बहुतेक घरे ही सूर्यप्रकाशात वाळवलेल्या मातीच्या विटांनी बांधलेली असतात तर बहुतेक खेडेगांवातील झोपड्या या वेड्यावाकड्या लाकडी खांबांच्या आधारावर वेळूच्या विणलेल्या चटयांचे आच्छादन टाकून बनवलेल्या असतात. कॅप्टन मॅकमर्डो यांच्या गाइडने यानंतरचे अंदाजे 20 मैल अंतर उंटावर बसून पार केले. या वेळी पाणी उंटाच्या शरीरापर्यंत पोचत होते. लखपत गाव तर संपूर्ण पाण्याखालीच होते. एका फकिराच्या मशिदीजवळचा एक खांब फक्त पाण्याच्यावर दिसत होता. ‘वेयरी‘ गाव (या गावाचा आता ठावठिकाणा लागत नाही.) व इतर खेडेगावे यामधील काही घरांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. असे म्हटले जाते की लखपत गावात दरवर्षी किमान 2 तरी भूकंप होतातहोतात. सिंदडी जलाशयाचे आता खारवट पाण्याने भरलेल्या एका दलदल प्रदेशात रूपांतर झाले आहे.”
याच भूकंपामुळे कच्छच्या रणाच्या उत्तर किनार्यासलग असलेल्या सिंधच्या भूभागाची एक पट्टीच्या पट्टी, एखादा बंधारा बांधावा तशी वर उचलली गेली. या निसर्गनिर्मित बंधार्याला ‘अल्लाह बंधारा‘ (God’s Bund) असे लोक म्हणू लागले. या बंधार्यामुळे सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख मानले जाणार्या कोरी नदीच्या जलप्रवाहाने आपली दिशा कायम स्वरूपी बदलली.
यापुढील कालात, कोरी नदीच्या खोर्यात जर सिंधू नदीला भयानक पूर आला तर गोडे पाणी व इतर वेळी समुद्राचे पाणी किंवा ते नसेल तर दलदल किंवा खारवट जमीन असे कच्छच्या रणाच्या इतर भागासारखेच स्वरूप प्राप्त झाले व त्यामुळे हा सर्व भाग अनिश्चित स्वरूप असलेला व कोणत्याही पद्धतीने मोजमाप करणे शक्य नसलेला असा बनला.
कोरी नदीचा 1819 मधील भूकंपानंतरच्या कालातील इतिहासही तितकाच रोचक आहे. इंपिरियल गॅझेटियर मधे हा इतिहास असा वर्णिलेला आहे.
” 1819 सालानंतर लखपत गावाजवळील, आधी सहज रित्या जहाजे जाऊ शकणारे कोरी नदीचे पात्र 18 फूट एवढेच खोल राहिले. येथून 16 मैल पुढे, 2 ते 6 मैल लांबीचे नदीपात्र जमीन पातळीच्या वर उचलले गेले तर त्यापुढील भागात नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना असणार्या रणाचा भाग खाली गेल्याने 12 फूट खोलीचे एक नदी खोरे निर्माण झाले. याच्या पुढचा नदीचा भाग अल्लाह बंधारा निर्माण झाल्याने 25 ते 40 फूट वर उचलला गेला. त्याचवेळी सुनामीमुळे एक भयंकर लाट नदी पात्रात समुद्राकडून आली आणि सर्व नदी खोरे खार्या पाण्याने भरून गेले. यानंतरच्या 8 वर्षांत नदीला पूर आलेला असतानाच्या वेळा सोडल्या तर नदी पात्र संपूर्णपणे कोरडे राहिले होते. होते.1826 मध्ये अप्पर सिंधू नदीने काठांवर आक्रमण केले आजूबाजूचा सर्व वाळवंटी भाग पाण्याने भरून टाकला. या नंतर जवळ जवळ सर्व बंधार्यांना नदीच्या पाण्याने फोडून टाकले आणि अली बंदर जवळून वाहत येत हे पाणी शकूर लेक मध्ये घुसले. या वाहणार्या पाण्याने कोरी नदीच्या पात्रातील साठलेला सर्व गाळ एवढ्या प्रमाणात वाहून नेला की लखपत गावापर्यंत 100 टन माल वाहतुक करणारी जहाजे पोचू लागली. पुढची 3 वर्षे कोरी नदीला एवढे पाणी होते की अमिरकोट गावापर्यंत माल वाहतुक नदी मार्गाने शक्य होती.
मध्यंतरीच्या काळात सिंध मधील रहिवाशांनी नदीवरील सर्व बंधारे परत बांधले व 1834 मध्ये कोरी नदी परत कोरडी पडले. 1838 मध्ये पावसाळा सोडला तर इतर वेळी नदी कोरडीच होती. पुढची 36 वर्षे ( 1839-1874) अली बंदर पासून पुढचा नदीचा भाग गाळाने भरून गेला होता. होता.1856 मध्ये परत एकदा कोरी नदीला एवढे पाणी आले की नदीच्या मुखापासून शकूर जलाशयापर्यंत बोटी जाऊ शकत होत्या. 1868 नंतर लखपतच्या पुढे बोटी जाण्याचे बंद झाले. 1874 मध्ये परत एकदा मोठा पूर नदीला आला व नदीचे पाणी परत एकदा शकूर जलाशयात भरले.”
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडणे साहजिक आहे की लेखाचा विषय सिर क्रीक असताना मी कोरी नदी बद्दलचे हे लांबलचक चर्हाट का सुरू ठेवले आहे? याच्या कारणांसाठी आपण 1908 मध्ये इंपिरियल गॅझेटियर मध्ये प्रसिद्ध झालेला एक नकाशा बघूया. या नकाशात कच्छ संस्थान व सिंध प्रांत यांच्यामधील सीमा स्पष्टपणे रेखीत केलेल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना ही सीमारेखा पारंपारिक सीमारेषेनुसार रणाच्या किनार्याने जाते. मात्र पश्चिम भागात 1819 च्या भूकंपामुळे निर्माण झालेली भौगोलिक परिस्थिती या नकाशात विचारात घेतलेली नसल्याने ही सीमारेखा कोरी नदीच्या पश्चिम किनार्यासलग जाताना दर्शवलेली आहे. 1819 मध्ये ही भौगोलिक परिस्थिती संपूर्ण बदलली व कोरी नदीच्या पश्चिमेकडच्या भागाचे रूपांतर मानवी वस्ती किंवा कोणतेही भौगोलिक वैशिष्ट्य नसलेल्या एका खारवट पाणथळ दलदलीच्या प्रदेशात झाले. मॉन्सूनच्या काळात हा भाग पाण्याने भरून जाई तर इतर वेळी वैराण खारवट जमीन व दलदलीने हा भाग भरलेला दिसून येई. या प्रकारच्या भू प्रदेशात सीमा रेखन करणे अशक्यप्राय असल्याने प्रथा 1914 मध्ये व नंतर 1924-25 मध्ये कच्छ संस्थान व सिंध सरकार यांच्यात नवीन सीमा ठरवण्यासंबंधी वाटाघाटी झाल्या व नवीन सीमा रेखित केली गेली.
वाचकांच्या हे सहज लक्षात येईल की 1819 च्या भूकंपानंतर सतत बदलत राहणारी जी भौगोलिक किंवा प्राकृतिक परिस्थिती कोरी नदीच्या खोर्याच्या पश्चिम भागात निर्माण झाली होती ती बघता कच्छ संस्थान व सिंध यांच्या मधील या भागातून जाणार्या सीमेचे रेखन करणे अशक्यच होते. त्यामुळे कोरी नदी खोर्याच्या पश्चिमेला व तेथून सर्वात जवळ असलेल्या कोणत्यातरी भौगोलिक वैशिष्ट्याजवळ ही सीमारेखा आखणे गरजेचे बनले होते. सर्वात जवळचे व ज्याच्यालगत सीमेचे आरेखन स्पष्टपणे करता येईल असे भौगोलिक वैशिष्ट्य, सिर खाडी किंवा क्रीक हेच होते.
भरतीच्या वेळेस या खाडीत जहाजे येऊ शकत होती त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या बोटी येथून खुल्या समुद्रात जाऊ शकत होत्या. त्यामुळे समुद्री सीमांचे आरेखन करण्याच्या कनव्हेन्शन प्रमाणे, या खाडीच्या मध्यावर कच्छ संस्थान आणि ब्रिटिश ताब्यात असलेला सिंध प्रांत या मधील सीमा रेषेचे आरेखन करणारे स्तंभ ब्रिटिश सरकारने 1924 मध्ये उभारले. हे स्तंभ उभारण्याचा निर्णय विचार करून घेतलेला आणि आंतर्राष्ट्रीय कनव्हेन्शन प्रमाणे होता याबद्दल मला तरी काही शंका दिसत नाही.
पाकिस्तानचा या सीमारेषेला विरोध असण्याची कारणे स्पष्ट होत नाहीत. कदाचित या सीमेमुळे पुढे अरबी समुद्रात 200 मैलापर्यंत त्यांना प्राप्त होणार्या व्यापारी पट्ट्यात तेल विहिरी सापडण्याची शक्यता असल्याने या पट्ट्यातील काही भाग भारतात गेला तर या भागाचा व्यापारी उपयोग करून घेता येणार नाही अशी भीति पाकिस्तानला वाटत असावी. एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. स्थिर आणि कोणताही विवाद ज्यामुळे निर्माण होणार नाही असे या भागात असलेले एकुलते एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे सिर खाडी हेच आहे आणि या प्रवाहाच्या मध्यभागी उभारलेल्या सीमारेखा स्तंभांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना या खाडीच्या प्रवाहाचा समप्रमाणात फायदा होत असल्याने ब्रिटिश सरकारने आखलेली ही सीमारेखा कायम करण्यातच दोन्ही देशांचे हित आहे.
11 मार्च 2013
पक्षी निरिक्षकांचे नंदनवन
शीर्षक वाचून कदाचित त्यात थोडासा विरोधाभास दिसेल. कारण रण म्हटले म्हणजे आपल्या डोळ्या समोर येते मैलोंन मैल पसरलेली रखरखीत रुक्ष जमीन, विखरलेली काटेरी झुडपं. अशा जागी पक्षी आणि ते सुद्धा फ्लेमिंगोज, पेलिकन्स सारखे पक्षी दिसणं कसे शक्य आहे?
पण हे सत्य आहे. पावसाळ्यामध्ये जो काही थोडा बहुत पाऊस पडतो ते पाणी नंतर हळूहळू सुकू लागते आणि हिवाळ्यापर्यंत जमीन पाणथळ (काही अंशी दलदलीची) बनते जी पक्ष्यांसाठी आदर्श असते.
कच्छचे रण सगळ्यांना माहीत आहे. आपल्या भारत देशाची पश्चिम सीमा. "रिफ्यूजी" चित्रपटामध्ये खुपसं चित्रीकरण या रणातील आहे. पण ते GRK - Greater Rann of Kutch. ते देखील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण मी सांगतोय ते LRK अर्थात Little Rann of Kutch बद्दल. LRK हे भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे अभयारण्य आहे .
अहमदाबाद पासून साधारण १००-११० कि.मी. अंतरावर सुरेंद्रनगर
जिल्ह्यामध्ये ध्रांगध्रा नावाचे एक छोटे गाव आहे. तेथून बजाना नावाच्या
एका एकदम छोट्या गावामधून entry आहे LRK मध्ये. तसा अजून एक entry point
आहे झिंझुवाडा या गावाजवळून. पण जर तुम्हाला पक्षी निरिक्षणामध्ये रस असेल
तर बजानाच ऊत्तम कारण येथून water bodies जवळ आहेत.
येथे जवळच एखाद दोन रिसॉर्ट्स पण आहेत जी सफारी आयोजित करतात. पण त्या
थोड्या महागड्या आहेत साधारण रु. २२००-२५०० एका गाडी साठी . त्या जिप्सी
मध्ये ६ व्यक्ती असतात. या रिसॉर्ट्स मध्ये साधारणतः नाश्ता, दुपारचे आणि
रात्रीचे जेवण आणि निवास असे पॅकेज असते. आम्हाला मात्र सकाळी जाऊन दुपार
पर्यंत अहमदाबाद ला परत येणे शक्य असल्यामुळे आम्ही ठरवले की रविवारी सकाळी
लवकर निघायचे.
रविवार १२ फेब्रुवारी २०१२. सकाळी पावणे सहा वाजता आम्ही (मी, माझा
मित्र प्रदीप आणि आमच्या दोघांच्या फॅमिलीज) अहमदाबादहून निघालो. साधारण
पावणे दोन तासात आम्ही बजानाला पोहोचलो. गुजरात वन विभागाच्या कार्यालयातून
परवाना घेतला. गाडी आमचीच होती. फक्त गाईड घ्यावा लागला. पाच वयस्क आणि
दोन मुले यांची entry fee रु. ३००/- व दोन cameras चे रु १००/- भरून आणि
गाईड ला गाडीत घेऊन आम्ही निचालो. गावापासून एखाद कि.मी. पुढे आल्यावर
ऊजवीकडे वळलो आणि प्रवेश केला रणामध्ये आणि झाले रणाचे पहिलं दर्शन.
थोडे पुढे गेलो आणि दिसली "घुडखुर" म्हणजेच "Wild Ass". जगातील एकमेव नैसर्गिक आवास - Wild Ass चे.
तो कळप बघून लगेच आम्ही निघालो कारण आमचे मुख्य आकर्षण आणि लक्क्ष्य होते पक्षी. गाडी सावकाश चालवत आजूबाजूला बघत आम्ही पुढे जात होतो आणि पहिल्यांदा दिसले "Common Crane".
त्यानंतर दिसला "ग्रे हेरॉन".
आणि मग दिसले सुप्रसिद्ध फ्लेमिंगो पक्षी - कमीत कमी दोन अडीचशे. एका फ्रेम मध्ये पकडणे अशक्य होते.
तिथेच दिसला "Western reef egret" - काळा बगळा.
मनसोक्त फोटो काढले. आता जवळपास दहा वाजले होते. सडकून भूक लागली होती. मग तेथेच त्या पाणवठ्याच्या बाजूला थोडीशी सावली बघून आम्ही नाश्ता केला. थंडी अजून ही टिकलेली होती. मोकळ्यावरची जागा होती. सोबतीला फ्लेमिंगोज होते. अजून काय हवे? नाश्ता ऊरकला. आपल्यामुळे पर्यावरण प्रदुषित होऊ नये म्हणून disposable plates, glasses वगैरे कचरा गोळा करून एका पिशवीत भरला आणि ती पिशवी गाडीत ठेवली घरी परत गेल्यावर कचर्यात टाकण्या साठी.
तिथून निघालो आणि थोड्याच वेळात एक मोठी water body दिसली
आणि त्यात दर्शन झाले पेलिकन्सचे.
इतर ही अनेक पक्षी दिसले - ऊदा. Northern Shoveller, Common Snipes, Black tailed godwits, Sea gulls.
आता जवळपास सव्वाबारा वाजले होते. गरमी वाढायला लागली होती. आम्ही पक्षी निरिक्षणाचा अगदी मनसोक्त आनंद लुटला होता. परतीच्या वाटेला लागलो आणि दिसले दोन शिकारी पक्षी - देव ससाणा म्हणजेच "Common Kestrel" व "शिकरा".
आजची आपली ट्रीप खुपच यशस्वी झाली या आनंदात परत निघालो. त्या यक्षभूमी कडे जिने एवढे सगळे पक्षी आम्हाला दाखवले तिच्याकडे वळून नजर टाकली आणि हे द्रुश्य दिसले.
निसर्गाच्या अगाध लीलेचे आणि विविधतेचे कौतुक करत आम्ही अहमदाबादच्या दिशेने परत निघालो. आता दरवर्षीच्या पक्षी निरिक्षण स्थळांच्या यादीमध्ये एका हमखास जागेचा समावेश झालेला होता.
वैशिष्टय़पूर्ण स्थळे रण ऑफ कच्छ
गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले.

भूकंपाने तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी दहा ठिकाणे
गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले. मात्र याच कच्छच्या रणात त्याही आधीपासून एका निसर्गवेडय़ाने अनेकांना भटकवायला सुरुवात केली होती. जुगल तिवारी त्याचं नाव. मूळचा राजस्थानचा. बीएनएचएसने नॅचरलिस्ट म्हणून त्याला येथे नेमलं. आठएक वर्षे येथे काम केल्यावर त्याच्या लक्षात आलं, येथे खूप काही करण्यासारखे आहे. मग तो मोटी विराणीला स्थायिक झाला. गावासाठी काहीतरी करायचं त्याच्या डोक्यात होतं. परिसरातील वन्यजीवनचा अभ्यास केला. या भागात येणाऱ्या वन्यजीव प्रेमींना त्याने भटकवायची सुरुवात केली. चारी धांड, लायलरी रिव्हर बेड अशा आडवाटेवरच्या ठिकाणांना तो घेऊन जाऊ लागला.
चारी धांड (धांड म्हणजे पाणी) तलावाच्या आसपास हजारोंच्या संख्येने येणारे कॉमन क्रेन्स हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होऊ लागले. ४० ते ६० हजारांच्या घरात येणारे हे अडीच तीन फूट उंचीचे पक्षी दिवसभर जमिनीवर चोचीने टकटक करत असतात. पाऊस आल्यावर उगवणारे हिरवे कोंब. चोच खुपसून या कोंबातून बी बाहेर काढायचं आणि ते फोडून त्यातील दाणा खायचं काम ते करतात. दिवसाला २५० ग्रॅम दाणे त्यांना लागतात. उरलेला कचरा तेथे येणारे लार्क पक्षी फस्त करतात. त्यांच्यामुळे जमीन चारपाच इंच खोल खणली जाते, नैसर्गिरीत्या नांगरली जाते. सुपीक होते. पुढच्या वर्षी पुन्हा कोंब येतात. येथे एक अनोखी जीवनसाखळीच तयार झाली आहे. गोडय़ा पाण्यावरील अनेक प्रकारचे वेडर्स आणि शिकारी पक्षी येतात. हे सारं चारी धांडवर पाहता येतं.
चारी धांड जवळच्याच फुले या गावी ग्रे हायपोकेलिस पक्ष्यांची भारतातील एकमेव जोडी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येते. येथून जवळच आठ किलोमीटर्सवर लायलरी रिव्हर बेड आहे. हा डेड रिव्हर बेड आहे. त्यातील व्होल्कॅनिक फॉर्मेशन पाहण्यासारखे आहे. विविधरंगी आणि आकाराचे नमुने पाहता येतात. अगदी दिवसभर आरामात येथे भटकता येते.
सरकारी रणोत्सवात हे काहीच नसते. प्रसिद्ध वाईल्डलाइफ डेस्टिनेशनवर खंडीभर पर्यटक येत असतात. येथे मात्र फक्त आपणच असतो. तेदेखील जुगलमुळे.
याच भटकंतीत कच्छचे प्रसिद्ध ‘व्हाईट रण’ पाहता येते. कोणे एकेकाळी येथे समुद्र होता, तो भूगर्भात खेचला गेला. दरवर्षी पाऊस पडून गेल्यावर सुकल्यानंतर हजारो किलोमीटरचा केवळ मिठाचा पांढरा पट्टा येथे दिसतो. हे सारं आवर्जून पाहावं अस आहे, आणि गेल्या काही वर्षांत हे पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असते. परतीच्या प्रवासात मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे भुजपासून ३०० किलोमीटरवर असणारे धोलावीरा पाहता येते.
केव्हा जाल : नोव्हेंबर ते मार्च. हे सर्व पाहण्यासाठी साधारण चार दिवस पुरतात. प्रवासाचा कालावधी वेगळा.
कसे जाल : रेल्वेने किंवा विमानाने भुजपर्यंत. मोटी विराणी भुजपासून ४५ किलोमीटर्सवर आहे.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या 30:05:2020 रोजी झालेल्या 26व्या वेबिनार मालिकेद्वारे "जगण्याची जिद्द- कच्छची प्रेरणादायी कथा दाखवली गेली. भारतीय संस्कृतीच्या प्रेरकशक्तिचे दर्शन घडविणार्या, भारतातल्या गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या कच्छ या जिल्ह्याचा इतिहास,संस्कृती ,हस्तकला वस्त्रोद्योग याचा संपन्न वारसा तसेच तेथील लोकांची नैसर्गिक आपत्ती विरुध्द लढण्याची चिकाटीचे दर्शन झाले•या वेबिनारमधून "कच्छ नही देखा तो कुछ नही देखा " हा संदेश देण्यात आला. एक भारत श्रेष्ठ भारत या शृंखलेअंतर्गत भारताच्या संपन्नतेचे दर्शन घडविणारी देखोअपना देश ही मालिका आहे.
या वेबिनारचे प्रस्तुतिकरण पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालिका श्री रुपिंदर ब्रार यांनी केले तर संचालिका डाँ नविना जाफा यांनी ती सादर केली. श्रीमती जाफा यांनी भारतातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आणि लोकांमधील अनुवंशिक ताकद याचे त्यांच्या प्रभावी कथनाद्वारे वर्णन केले.
कच्छचा भूप्रदेश हा खारट वाळवंट,हिरवी कुरणे आणि पाणथळ प्रदेश आहे. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव अशा पध्दतीचा भूप्रदेश आहे. भारतातील मीठाची तीन चतुर्थांश मागणी कच्छचे रण पूर्ण करते. येथील खराई जातीचे उंट हे कोरड्या हवामानात वा खाऱ्या पाण्यात सुध्दा तग धरु शकतात. ते समुद्रात पोहू शकतात आणि खारट पाणी आणि वनस्पती खाऊन राहू शकतात. ते वाळवंटातीलतीव्र हवामान आणि अतीखारट पाण्याशी जुळवून घेऊ शकतात.
सादरीकरणातील सर्वात उत्तम भाग म्हणजे परंपरागत अज्रक ब्लाँक प्रिंटचे दर्शन •अज्रक प्रिंट हा गुजरात आणि राजस्थानातील सर्वात जुना ब्लाँकप्रिंटचा पारंपारिक प्रकार आहे• या पध्दतीने नैसर्गिक रंगांचा वापर करून कापडाच्या दोन्ही बाजूला हाताने प्रिंटचे हे कष्टकारक आणि लांबलचक रंग आत शिरू न देता काम कले जाते•( काही ठिकाणी रंग पसरणार नाही याची काळजी घेतली जाते)
त्यानंतर बँनीथ वाळवंट यावर एक परिसंवाद झाला , यात कुंभारकाम ,भरतकाम आणि चर्मकाम करणार्या तीन मोठ्या समाजातील कलाकारांचे काम दाखवण्यात आले•श्री जफाल्सो यांनी कर्ण कापलेल्या संन्यासी समाजाची ( सिध्दि सिध्दांत पंथ) आणि त्यांनी चालविलेल्या धर्मादाय अन्नदानाची ( community kitchen) माहिती दिली•
सादरीकरणात अरबी समुद्रात बोटी बनविणार्या सुफी पंथाच्या मार्गदर्शकाचे मांडवीच्या किनार्यावरचे सादरीकरणही झाले•
कच्छ मधील काही विशेष आकर्षणे
- ढोलावीरा _ युनेस्को जागतीक वारसा स्थळ आणि दुसरे सर्वात मोठे हडप्पा स्थान, शहररचना आणि वास्तुस्थापत्य याचे उत्तम उदाहरण
- फाँसिल पार्क
- कच्छचे रण अरबी समुद्रातील खारेवाळवंट
- काला डुंगर
- नारायण सरोवर मंदीर
- लाखपोर्ट किल्ला आणि बंदर
- सुरहान्डो_ मोराच्या आकाराचे वाद्य
- थाळीनृत्य _ लग्न वा बारशाच्या वेळचे नृत्य
- तुफान_ समुंदरकी मस्ती नावाचे मदहोश नृत्य
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यात धोर्डो नावाचे गाव आहे•पर्यटनाच्या दृष्टिने ह्या गावचे वातावरण तितकेसे चांगले नाही. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरातेत रण उत्सव साजरा केला जातो•धोर्डो आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमधे धोर्डो शुभ्र रण उत्सवामुळे अनेक कायमची आणि तातपुरती निवासी स्थाने उभारली आहेत. प्रचंड इच्छाशक्ती ,कल्पना आणि उपक्रमशीलता याने या कोरड्या आणि वेगळ्या भूप्रदेशात सामाजीक आर्थिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण निर्माण होऊन येथील लोक आत्मनिर्भर झाले आहेत. यात गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने होणार्या रण उत्सव टेन्ट सिटी चे मोठेस्थान आहे.
दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात रण उत्लव साजरा केला जातो•मूलभूत सोयी उपलब्ध करून भुज शहराचे तंबू शहरात रुपांतर होते• बीएसएफ वाद्यवृंद,गरम फुगे उडविणे ,यासह पारंपारीक संगीत, नृत्य, खरेदी यांची आणि पारंपारीक भोजनाचा आस्वाद ही या उत्सवाची ठळक वैशिष्टे आहेत.
3_4 दिवस प्रवास आणि 7_8 दिवस कच्छची मजा लुटायला पुरेसे (आवश्यक ) आहेत • कच्छच्या या प्रवास मार्गदर्शिकेत पर्यटकांना तिकडची ठिकाणे,परंपरा,संस्कृती ,वस्त्रे ,वाद्ये ,बाजारपेठा,गावातील सहल ,नृत्ये यांची थोडक्यात माहिती उपलब्ध आहे.
भूज हे गुजरातच्या आजूबाजूच्या राज्यांशी रस्त्याने, रेल्वेने मुंबई आणि दिल्ली तसेच देशातील इतर भागांशी जोडलेले असून तेथे रुद्र माता विमानतळ ही आहे.
हे सादरीकरण https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल हँन्डल माध्यमांवर प्रदर्शित केले आहे.
यापुढील मालिका दि•2जून 2020 रोजी सकाळी 11वाजता प्रदर्शित होणार असून ती हरियाणा : संस्कृती, भोजन आणि पर्यटन या विषयावर असून त्यासाठी नोंदणी करावी https://bit/ly/3dmTbmz
कच्छ का रण | भारतकोश
कच्छ का रण गुजरात राज्य में कच्छ ज़िले के उत्तर तथा पूर्व में फैला हुआ एक नमकीन दलदल का वीरान स्थल है।
- कच्छ का रण लवणीय दलदली भूमि है जो पश्चिमी-मध्य भारत और दक्षिणी पाकिस्तान में स्थित है।
- कच्छ का रण लगभग 23,300 वर्ग किमी क्षेत्रफल में फैला हुआ है और पाकिस्तान सीमा से लगे भारतीय राज्य गुजरात में लगभग पूरा का पूरा अवस्थित है।
- कच्छ का छोटा रण, कच्छ की खाड़ी के पूर्वोत्तर में है और यह गुजरात के लगभग 5,100 वर्ग किमी क्षेत्र में फैला हुआ है।
- मूलतः अरब सागर का विस्तार रहा कच्छ का रण सदियों से एकत्रित होने वाले अवसाद के कारण एक बंद क्षेत्र बन गया है।
- कच्छ का रण समुद्र का ही एक सँकरा अंग है जो भूकंप के कारण संभवत: अपने मौलिक तल को ऊपर उभर आया है और परिणामस्वरूप समुद्र से पृथक् हो गया है।
- सिकंदर महान् के समय यह नौकायन योग्य झील थी। लेकिन अब यह एक विस्तृत दलदली क्षेत्र है, जो मॉनसून के दौरान जलमग्न रहता है।
- उत्तरी रण, जो लगभग 257 किमी में फैला हुआ है। पूर्वी रण अपेक्षाकृत छोटा है। इसका क्षेत्रफल लगभग 5,178 वर्ग किमी है।
- मार्च से अक्टूबर मास तक यह क्षेत्र अगम्य हो जाता है।
- यहाँ के लोगों का निवास निम्न, विलग पहाड़ियों तक सीमित है।
इतिहास
सन 1819 ई. के भूकंप में उत्तरी रण का मध्य भाग किनारों की अपेक्षा अधिक ऊपर उभर गया। इसके परिणामस्वरूप मध्य भाग सूखा तथा किनारे पानी, कीचड़ तथा दलदल से भरे हैं। ग्रीष्म काल में दलदल सूखने पर लवण के श्वेत कण सूर्य के प्रकाश में चमकने लगते हैं।
बड़े रण के पश्चिमी छोर पर भारत-पाकिस्तान सीमा को लेकर 1965 में विवाद उठ खड़ा हुआ था। अप्रैल में लड़ाई छिड़ गई और ब्रिटेन की मध्यस्थता के बाद ही युद्ध विराम हुआ। संयुक्त राष्ट्र के महासचिव द्वारा सुरक्षा परिषद को भेजी गई रिपोर्ट के आधार पर इस मामले को अंतर्राष्ट्रीय न्यायाधिकरण (ट्राइब्यूनल) को भेजा गया। जिसने 1968 में निर्णय लिया कि इसका लगभग 10 प्रतिशत हिस्सा पाकिस्तान को और लगभग 90 प्रतिशत भारत को सौंप दिया जाए और 1969 में विभाजन हुआ।
नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य :-
नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य को 'नारायण सरोवर अभयारण्य' या 'नारायण सरोवर चिंकारा अभयारण्य' के नाम से भी जाना जाता है। यह अभयारण्य गुजरात राज्य के कच्छ ज़िले में लखपत तालुका में अवस्थित है। इस अभयारण्य की मुख्य प्रजाति चिंकारा और भारतीय चिंकारा है। इस अभयारण्य का अधिकांश हिस्सा काँटेदार रेगिस्तान तथा झाड़-झंकाड़ वाला है। नारायण सरोवर अभयारण्य में 184 से भी अधिक पक्षियों की प्रजतियाँ पाई जाती हैं।
जैव विविधता
जंगली गधा अभयारण्य' के समान ही नारायण सरोवर भी कई जंगली जीवों का घर है, जिसमें स्तनधारी, सरीसृप और पक्षियों की अनेक प्रजातियों का समावेश होता है, जिसमें से 15 प्रजातियाँ अभी संकटग्रस्त हैं। यहाँ की मुख्य प्रजाति चिंकारा और भारतीय चिंकारा है। इस अभयारण्य के कठोर परिदृश्य में केवल वही प्राणी अच्छी तरह से रह सकते हैं, जो अत्यधिक गर्मी, तेज हवाएँ और लगातार तुफ़ानो के बीच रेगिस्तान की जलवायु में अनुकुलन साध सकें। इसी कारणवश अन्यत्र नहीं दिखाई देने वाली प्रजातियाँ भी यहाँ दिखाई देती हैं।[1]
खतरे में पड़े चिंकारा विश्व के एकमात्र ऐसे हिरन हैं, जिनके नर और मादा दोनों के सींग होते हैं। एक अध्ययन के अनुसार विश्व में क़रीब 7000 चिंकारा अस्तित्व में हैं। उसमें से 80 प्रतिशत गुजरात के कच्छ में रहते हैं और उनकी प्राथमिक ज़रूरत झाड़-झंकाड़ और झाड़ी वाला जंगल है, जो यहाँ सामान्य है। नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य उनके लिए अत्यंत महत्वपूर्ण जगह है। अभयारण्य में जंगली बिल्ली से लेकर स्याहगोश (केरेकल ) रण कि लोमी और खतरे मे पड़े भारतीय भेड़िया, टपकी वाले हिरनों से लेकर जंगली सूअर तक के अनेक स्तनपाई जीव रहते हैं। रेटल, अपनी सांप को मारने की क्षमता एवं तेंदुए, शेर, जहरीले सांप और मधुमक्खी के डंक से आक्रमक सुरक्षा के कारण इसने 'गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड' में सबसे निर्भय प्राणी का खिताब पाया है।
वनस्पति
नारायण सरोवर अभयारण्य का अधिकांश हिस्सा कांटेदार रेगिस्तान और झाड़-झंकाड़ वाला है। इसके साथ ही कुछ मौसमी आर्द्र भूमियाँ और सवाना प्रकार के वनस्पति के सूखे जंगल भी हैं। गोराड और बबूल यहाँ कि प्रमुख वनस्पतियां हैं, पूर्व में गोराड और पश्चिम में बबूल काफ़ी उगता है। इसके अलावा निकट के इलाके में हरमो, बेर, पीलु, थोर, गुगल, आक्रमक 'पागल बबुल' जैसी क़रीबन 252 प्रकार की वनस्पतियाँ पाई जाती हैं।[1]
पक्षी
अभयारण्य में 184 से भी अधिक पक्षियों की प्रजातियाँ पाई जाती हैं। बस्टार्ड की तीनों प्रजातियाँ- ग्रेट इन्डियन बस्टार्ड, हौबारा बस्टार्ड और लेसर फ्लोरिकन यहाँ पाई जाती है। साथ ही साथ ब्लेक पेट्रीज, 19 तरह के शिकारी पक्षी और वौडरफोल की अनेक प्रजातियाँ भी मिलती हैं। कोई भी पक्षी प्रेमी यहाँ से नाराज होकर नहीं जा सकता।
काला डूंगर या ब्लैक हिल
गुजरात के कच्छ ज़िले का एक पर्यटन स्थल है। काला डूंगर से कच्छ का रण का दृश्य देखते ही बनता है तथा पहाड़ी स्थित ‘दत्तात्रेय मंदिर’ से सायंकाल की आरती पूजन के बाद पुजारी की आवाज़ पर सैकड़ों की संख्या में सियारों का दौड़ कर आना पर्यटकों को अचंभित करता है।
कांडला बंदरगाह
कांडला बंदरगाह (अंग्रेज़ी: Kandla Port) भारत में गुजरात प्रान्त में कच्छ ज़िले में स्थित देश का सबसे बड़ा बंदरगाह है। यह बंदरगाह भारत का सबसे पहला मुक्त व्यापार क्षेत्र है। कांडला बंदरगाह भारत के सबसे बड़े 12 मुख्य बंदरगाहो में से कार्गो हेन्डलींग में सबसे बड़ा है। यह कांडला नदी पर बना हुआ है। अधिकारियों की अनुमति लेकर यहां घूमा भी जा सकता है। यह बंदरगाह आयात-निर्यात से पूरे विश्व के साथ जुड़ा हुआ है। कांडला बंदरगाह खास आर्थिक क्षेत्र, जो स्पेश्यल ईकोनोमिक जोन से जाना जाता है। ये बंदरगाह पूरे भारत एवं एशिया का सबसे पहला खास आर्थिक क्षेत्र है, जिसकी स्थापना ई.स. 1965 में हुई थी।[1]
1 इतिहास
2 भौगोलिक स्थिति
3 सुविधाएं
4 पृष्ठदेश
5 आयात एवं निर्यात
6 अन्य जानकारी
7 टीका टिप्पणी और संदर्भ
8 संबंधित लेख
इतिहास
कांडला बंदरगाह एक ज्वारीय पतन है एवं इसका पोताश्रय प्राकृतिक है। इस बंदरगाह का निर्माण 1930 में कच्छ राज्य के लिए किया गया था। तब यहां एक जेट्टी थी, जिसमें साधारण आकार का केवल एक जहाज़ ठहर सकता था। किंतु विभाजन के फलस्वरूप जब कराची का बंदरगाह पाकिस्तान के अधिकार में चला गया, इसकी कमी पूरी करने हेतु ई.स. 1950 में पश्चिम भारत में अरबी समुद्र के कच्छ के अखात के तट पर कांडला बंदरगाह की स्थापना की गई थी, ताकि गुजरात के उत्तरी भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली और जम्मू-कश्मीर राज्यों की व्यापार की आवश्यकता पूरी की जा सके। साथ ही मुम्बई के व्यापार भार को घटाया जा सके। अत: 1994 में कांडला बंदरगाह की योजना कार्यांवित की गयी। कांडला बंदरगाह का प्रशासन स्थानिक तौर पर कांडला पॉर्ट ट्रस्ट के हस्तक है, जिसका पूरा नियंत्रण भारत सरकार के शिपिंग मंत्रालय के अंतर्गत आता है।
टीका टिप्पणी और संदर्भ
↑ भारत का भूगोल |लेखक: डॉ. चतुर्भुज मामोरिया |प्रकाशक: साहित्य भवन पब्लिकेशन्स, आगरा |पृष्ठ संख्या: 367 |
↑ (Free Trade Zone)

ब्रिटिश आमदानीत अभ्यासकांनी रामायण व महाभारत तसेच इतर पौराणिक साहित्य या भाकडकथा आहेत म्हणून घोषित केल्या, ते साहजिकच होते. तत्कालीन विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीतील समाजरचनेनुसार किंवा त्यांच्या प्रादेशिक ऐतिहासिक मापदंडानुसार भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या देशावर नेहमी परकीयांनी राज्ये केली, नेहमी परकीय आक्रमणे होत राहिली त्या भूमीत रामायण, महाभारत या केवळ कथाच असू शकतात असे प्रतिपादले जाऊ लागले, त्यामागची सत्यता पडताळून पाहण्यात आली नाही. यामधूनच मग आर्य भारताबाहेरून आले (आर्यन थिअरी) यासारखी गृहितके मांडली गेली त्यातून अनेक यक्षप्रश्न निर्माण झाले. भारताचा इतिहास हा अॅलेक्झांडरपासून सुरू होतो असे मानले जाऊ लागले, परंतु या पार्श्वभूमीवर एक आश्चर्याची घटना घडली, ही घटना जगाचा इतिहास बदलणारी ठरली. असंस्कृत भारतीय इतिहासाला ‘सुसंस्कृत’ बनवणारी हडप्पा संस्कृती जगासमोर आली. जगात चार प्राचीन मानल्या जाणाऱ्या संस्कृतींत ही हडप्पा संस्कृती गणली जाऊ लागली. या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आली; यामध्येच गेल्या काही दशकांत एक महत्त्वपूर्ण स्थळ आपला संबंध या संस्कृतीशी दर्शवत होते; हे म्हणजे द्वारका. द्वारकेचा कृष्णाशी असलेला संबंध आणि त्याच वेळी हडप्पा संस्कृतीशी असलेला संबंध हा भारतीय पौराणिक संस्कृती व भारतीय इतिहास या दोन्ही गोष्टींना आत्मचिंतन करायला लावणारा होता. आज आपण श्रीकृष्णाच्या ज्या शहराला द्वारका म्हणून ओळखतो, त्या शहराचे जुने नाव द्वारिका. भारतीयांच्या जीवनात द्वारकेचे वेगळेच महत्त्व आहे. आपल्या संस्कारातून, मनातून कृष्ण जसा आपण वेगळा काढू शकत नाही तसेच द्वारकेचे अस्तित्व भारतीयांच्या संस्कारातून पर्यायाने इतिहासातून वगळता येत नाही. पौराणिक कथा म्हटल्या, कीत्यात तथ्य किती, हा प्रश्न नेहमीच उभा राहतो आणि भारतात तर हा प्रश्नच जटिल केला गेला आहे. एक तर या कथा भाकड ठरविल्या जातात किंवा त्यांचे सादरीकरण अद्भुत दैवीकरणाच्या आच्छादनात केले जाते. त्यामुळे या कथांच्या गíभताकडे साहजिकच दुर्लक्ष होते. ऐतिहासिक तथ्य हाताळत असताना कुठल्याही पुराव्याला कमी लेखून चालत नसते; म्हणूनच साहित्यिक पुरावा हादेखील इतिहासात तितकाच महत्त्वपूर्ण असतो. एखादे साहित्य मग ते धार्मिक असो किंवा अधार्मिक, ते तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यातील अद्भुततेचा किंवा लालित्याचा भाग वगळून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असते. तसेच महाभारत- द्वारका यांच्या संदर्भात झालेले आढळते. भारतीय धार्मिक संकल्पनेत महाभारत, कृष्ण, द्वारका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक साहित्यातून श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारकेविषयी भरभरून लिहिलेले आहे. आता ही द्वारका अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होतो? गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून द्वारकेचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे; परंतु याबरोबरच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
पौराणिक पार्श्वभूमी
द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर असून पश्चिम किनारपट्टीवर पाण्याने वेढलेल्या ओखामंडल या भागात गोमती नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेले आहे. द्वारका हे हिंदू तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ, पुरी, रामेश्वर, द्वारका या चार धामांतील एक, तर मथुरा, अयोध्या, काशी, कांचीपुरम, उज्जैन, पुरी, द्वारका या सप्तपुरीतील एक महत्त्वपूर्ण स्थळ मानले जाते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे. बेट द्वारका ही गोमती द्वारकेपासून २५ किलोमीटर अंतरावर असून बेट द्वारकेला जाण्यासाठी नावेने समुद्र ओलांडावा लागतो. खरं तर हा समुद्र नसून कच्छची खाडी आहे. द्वारकेत श्रीकृष्णाचं मंदिर हे गोमती नदीच्या काठी आहे. ती नदी सागरात एकरूप होण्यासाठी तिथे येते. १७० फूट उंचीचे असे हे मंदिर असून त्याचे शिखर पाच मजली आहे. त्या मंदिराचा सभा मंडप साठ खांबांवर उभा असून गर्भगृहात श्रीकृष्णाची चतुर्भुज अशी चार फुटांची मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांची स्थापना जवळच्याच एका वाडय़ात केलेली आहे.
द्वारिका हा मूळ संस्कृत शब्द असून याचा अर्थ अनेक द्वार असलेलं नगर असा होतो. महाभारतात या स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे. हे नगर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेलं असून कालांतरांने सिंधु सागरात विलीन झाले अशी आख्यायिका आहे. असे असले तरी महाभारतातील व इतर पौराणिक साहित्यानुसार द्वारका ही कृष्णाने वसविण्यापूर्वी कुशस्थली या नावाने अस्तित्वात होती. देवी भागवत व श्रीमद भागवतानुसार जुनी द्वारका म्हणजेच कुशस्थली हे शहर ‘शर्यत’ राजवंशाचा राजा रेवत याने उभारलेले होते. राजा रेवत हा आनर्ताचा मुलगा असून वैवस्वत मनू याचा नातू होता. तर बलरामाची पत्नी रेवती ही रेवत राजाची कन्या होती. वायू-पुराणानुसार यादवांपूर्वी हे स्थळ आनर्ताच्या राजधानीचे ठिकाण होते. या राजवंशातील ककुद्मी या राजाच्या कारकीर्दीत पुण्यजन नावाच्या राक्षसाने हा प्रदेश बळकावला व कालांतराने जुनी द्वारका पाण्याखाली गेली. या घटनेनंतर बऱ्याच काळाने श्रीकृष्णाने द्वारका या नावाने येथे नवीन शहर वसवले. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे श्रीकृष्ण व बलरामाने यादवांसह राजस्थानमाग्रे रैवतक पर्वताचा पायथा गाठला आणि तिथे सागरतीरावर त्याने नवी द्वारकानगरी उभारली, म्हणूनच श्रीकृष्ण रणछोडदास या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीकृष्णाने नव्या नगरीसाठी भगवान विश्वकर्मा यांचे आवाहन केले. विश्वकर्मा प्रगट झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाच्या विनंतीवरून समुद्रावर तरंगत्या अशा अद्भुत द्वारकेची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या द्वारकेच्या प्रवेशद्वाराची रचना होती, असे वर्णन पुराणात सापडते. परंतु दुर्दैवाने त्या शहराचा अंतही पाण्यात विलीन होऊनच झाला. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारकेला सागराने गिळून टाकले, प्राचीन द्वारका ही बेटावर वसलेली होती व बंदर स्थान होती. बंदर अर्थव्यवस्थेमुळे आíथकदृष्टय़ा पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचा नाश झाला, यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारकेला समुद्राने आपल्या अंतरात सामावून घेतले अशी आख्यायिका आहे. ती द्वारका समुद्रात बुडाल्यावर कृष्णाच्या नातवाने वज्रनाथने ती पुन्हा उभारली. परंतु कालांतराने तिचा अंतही तसाच झाला.
श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली.
द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.
एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला दिलेला शाप.
अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप
महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की, ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.

ऋषींनी दिला होता सांबाला शाप
महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले. त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की, ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ? सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप दिला की,श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील. श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार.

ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली. नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले. श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.

हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले.

प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला. सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तीत झाले.
त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली. श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की, तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.
दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वसुदेवांना सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वसुदेवलाही झाले.

ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले. ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला. बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप झाला.तेव्हा –
“हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच संपणार होता…”


हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वर्गात निघून गेले.
इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप दु:ख झाले. वसुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा देखील अंत होणार होता. अर्जुनाने वसुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार केले. वसुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा वसुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा अंतिम संस्कार केले. सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला. सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली.

तर अशी ही आख्यायिका! म्हटलं तर आख्यायिका…म्हटलं तर कथा…म्हटलं तर इतिहास…!
सध्या द्वारका व बेट द्वारका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी पुराणकाळातील द्वारका होती का? यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. ‘पेरीप्लस ऑफ एरिथ्रीअन सी’ या ग्रीक-रोमन ग्रंथात द्वारिकेला ‘बराका’ असे म्हटले गेले आहे, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, तर टॉलेमी म्हणतो की, बराका हे एक द्वीप असून चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. महाभारतकालीन द्वारका नेमकी कुठे स्थित आहे, यावर पुष्कळ मतभेद आहेत. पहिला लेखी पुरावा आपल्याला पालीटाना येथील ताम्रपटामध्ये सापडतो. या ताम्रपटाचा कालावधी इ.स. सहाव्या शतकात जातो. भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. हसमुखलाल सांकालिया यांच्या मते सध्याची द्वारका हीच महाभारतकालीन द्वारावती आहे. पौराणिक साहित्यात दोन द्वारकांचा उल्लेख प्रकर्षांने येतो, एक म्हणजे रेवत राजाची द्वारका व दुसरा उल्लेख म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका. महाभारतातील सभापर्व व आदिपर्वानुसार तसेच विष्णू व वायू पुराणात उल्लेखलेली द्वारका ही गुजरातमधील रैवत पर्वताच्या परिसरातील आहे, तर महाभारतातील मौसल पर्व हरिवंश, भागवत पुराणानुसार द्वारका ही समुद्रकिनारी वसलेली आहे. हरिवंशाच्या विष्णुपर्वात द्वारकेचा उल्लेख वारीदुर्ग म्हणजेच जलदुर्ग म्हणून केलेला आहे. हा दुर्ग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आहे असे वर्णन केलेले आहे. पुरातत्वज्ज्ञ डॉ. सांकलिया यांच्या मतानुसार या दोन्ही द्वारका वेगवेगळ्या काळांतील असून आदी पर्व, सभा पर्व, विष्णू पुराण व वायू पुराण यात नमूद केलेली द्वारका ही इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहे, तर मौसल पर्वातील द्वारका ही त्यानंतरच्या कालखंडातील आहे. बौद्ध साहित्यातही आपल्याला द्वारकेचा उल्लेख सापडतो. घट जातकात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील द्वारकेचा उल्लेख केलेला आहे. या उल्लेखानुसार द्वारकेच्या एका बाजूस समुद्र, तर दुसऱ्या बाजूस डोंगर आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या वेळेस यादव मथुरेहून द्वारकेस स्थलांतरित झाले त्या वेळेस त्यांनी एक द्वारका वसवलेली नसून तब्बल पाच द्वारका वसवल्या असाव्यात. केवळ साहित्यातच नव्हे तर गुजरातमध्ये अनेक लोककथांमध्ये वेगवेगळ्या स्थळांचा द्वारका म्हणून उल्लेख केला जातो. त्यात मूळ द्वारका, सध्याची द्वारका, माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळांचा समावेश होतो.
मार्कंडेय पुराणाचे भाषांतर करताना ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक एफ. ई. पार्जिटर यांनी द्वारका नगरी रैवतक पर्वताजवळ असल्याचे म्हटले होते. भारतविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक ए. डी. पुसाळकर यांनी सध्याची द्वारका हीच प्राचीन द्वारका असल्याचे मत मांडले होते. १९६३ मध्ये डेक्कन कॉलेजच्या झैनुद्दीन अन्सारी व म. श्री. माटे यांनी द्वारकेत उत्खनन केले. तेथे त्यांना प्रारंभिक ऐतिहासिक काळातील (इ.स. पहिले शतक) व मध्ययुगीन वसाहतीचे पुरावे मिळाले; तथापि द्वारकेसंबंधी पुराणांमधील माहिती व मौखिक परंपरेतील उल्लेख अधिक महत्त्वाचे आहेत, असे मानणाऱ्यांनी द्वारका फक्त दोन हजार वर्षे जुनी असल्याचे मान्य केले नाही.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी १९७९-८० मध्ये द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात केलेल्या उत्खननात इ.स. नवव्या शतकातील विष्णू मंदिराचे अवशेष मिळाले. त्यानंतर राव यांनी १९८१ पासून केलेल्या संशोधनात द्वारकेच्या समुद्रात आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) अवशेष मिळाल्याचे व श्रीकृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या द्वारकेचा शोध लागल्याचे जाहीर केले; तथापि ही कालनिश्चिती वैज्ञानिक पद्धतीने केलेली नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्यात मिळालेली दगडी बांधकामे आणि अन्सारी व माटे यांना मिळालेल्या प्रारंभिक ऐतिहासिक काळातील दगडी भिंती यांच्यात साम्य आहे. डॉ. एस. आर. राव यांनी कुशस्थली हीच द्वारका आहे असा निष्कर्ष मांडला. त्यांच्या मतानुसार गोमती द्वारका व बेट द्वारका याच प्राचीन द्वारका आहेत; परंतु पुरातत्वज्ज्ञ डॉ. अलोक त्रिपाठी यांनी त्यांच्या मताचे खंडन करत, गुजरातमधील माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळे यांचा संबंध प्राचीन द्वारकेशी असावा, असे मत मांडले. त्रिपाठींनी जुनागढ हे स्थळ प्राचीन द्वारका असावे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्या संशोधनात केला आहे. यासाठी त्यांनी सॅटेलाइट रिमोट सेिन्सग फोटोग्राफीद्वारे घेतलेल्या चित्रणाचा वापर केला. या छायाचित्रात त्यांना जुनागढ परिसरात आटलेल्या नदीचे पुरावे सापडले. त्या आधारे त्यांनी प्राचीन काळात जुनागढ येथे पूर्वी पाण्याचा स्रोत होता व तो कालांतराने आटला, अशी मांडणी त्यांच्या संशोधनात केली. प्राचीन साहित्यात पाण्याच्या स्रोतास सागर असे म्हणत, त्याचा आधारही त्यांनी घेतला. तसेच येथे डोंगररांग असून पुराणात द्वारकेचे वर्णन केल्याप्रमाणे सागर व पर्वत असे दोन्हीही येथे आहेत. म्हणूनच त्रिपाठी यांनी जुनागढला प्राचीन द्वारकेचा दर्जा दिला. याशिवाय सम्राट अशोक व शक राजा रुद्रदामन पहिला यांचे शिलालेखही जुनागढला सापडले आहेत, हे विशेष.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने सन १९९०-९१ आणि पुन्हा १९९७ ते २००२ या काळात पाण्याखालील पुरातत्त्वीय संशोधन मोहिमा पूर्ण केल्या. साधारण एक चौ. किमी. परिसरात २५ मीटर खोलीपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. मिळालेल्या अवशेषांमध्ये घडीव दगडांच्या अर्धवर्तुळाकार भिंती व इतर दगडी रचना यांचा समावेश होता. त्यातल्या एका दगडावर गुजराती भाषेतील काही अक्षरे कोरलेली होती. द्वारकेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी एक दगडी धक्का बांधवून घेतला असल्याची माहिती पाहता पाण्याखालील दगडी बांधकामे विसाव्या शतकातील असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. सर्वेक्षणात गोमती नदीच्या मुखापाशी समुद्रात एक किमी. अंतरापर्यंत ८ ते १० मी. खोलीवर अनेक दगडी नांगर पडलेले आढळले. परंतु द्वारकेला आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) वसाहत असल्याचा व ती समुद्राच्या पाण्यात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
एकंदर सागरी पुरातत्त्वीय संशोधनातून असे दिसते की, द्वारका प्रारंभिक ऐतिहासिक काळात अस्तित्वात असली व किमान इ.स. नवव्या शतकापासून द्वारका हे वैष्णव पंथाचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असले, तरी पाण्याखालील उत्खननात एखादी नगरी समुद्रात बुडल्याचा कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही. फक्त एस. आर. राव यांचे संदर्भ देऊन व नंतरच्या संशोधनाकडे काणाडोळा करून श्रीकृष्णाची ३५५० वर्षे जुनी द्वारका सापडली असल्याचा दावा करणारे बरेच लेखन वर्तमानपत्रांमध्ये व पुरातत्त्वीय क्षेत्राबाहेर इतरत्र प्रसिद्ध झाले आहे; तथापि कोणताही ठोस पुरावा नसताना असा दावा करणे हे छद्मपुरातत्त्वाचे उदाहरण ठरते.
सर्वात आधी १९६३ मध्ये गुजरात पुरातत्त्व विभागाने व पुण्याच्या डेक्कन अभिमत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिराच्या बाजूलाच उत्खनन करण्यात आले. या उत्खननातून इसवी सन पूर्व कालखंडात तिथे वस्ती होती याचे पुरावे सापडले. या संशोधनातून द्वारका दोनदा बुडाली असाही निष्कर्ष निघाला. या पुरातत्त्वीय उत्खननात पाच वेगवेगळ्या कालखंडाचे थर अभ्यासकांनी उघडकीस आणले. या थरांतून रेड पॉलिश वेअर, मातीचे चेंडू, रोमन अॅम्फोरा, शंखांपासून तयार केलेल्या बांगडय़ा, मंदिराचे भग्न अवशेष, मध्ययुगीन कालखंडातील गुजरातच्या सुलतानाची नाणी, मध्ययुगीन काचेच्या बांगडय़ा, मध्ययुगीन चमकदार मृदभांडी असे काही महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले. तर डेक्कन महाविद्यालयानंतर डॉ. एस. आर. राव आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने १९७९-८० च्या काळात या भागात पुन्हा पुरातत्त्वीय उत्खनन केले. या उत्खननातून आठ कालखंडांचे थर उघडकीस आले. या शिवाय या भूभागावर इसवी सन पूर्व १५०० या कालखंडात एक प्रगत हडप्पाकालीन संस्कृती नांदत होती आणि ती समुद्रामुळे नष्ट झाली असा निष्कर्ष अभ्यासा अंती मांडण्यात आला. द्वारका हे भारतातील पहिले सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून समुद्राच्या तळाशी झालेले उत्खनन आणि सर्वेक्षण गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मार्फत करण्यात आले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मदतीने १९८२-८३ साली बेट द्वारकेला सर्वात प्रथम ऑन शोअर म्हणजे किनाऱ्यावर आणि ऑफ शोअर म्हणजे थेट समुद्रात पाण्याखाली असे सर्वेक्षण सुरू झाले. १९८२ पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने २००१ पर्यंत चालले. किनाऱ्यालगत आणि समुद्राअंतर्गत चाललेल्या या सर्वेक्षणात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. २००५ आणि २००७ मध्ये भारतीय नौदल व भारतीय पुरातत्त्व खात्याने एकत्रितपणे सर्वेक्षण केले. १९९७ आणि २००१ या कालावधीत समुद्री उत्खननात बरेच महत्त्वाचे पुरावे आढळले. त्यासाठी अभ्यासकांनी द्वारकेच्या किनाऱ्यापासून इंटर-टाईडल झोन ते २५ किमी खोल पाण्यात गवेषण केले. या संशोधनात एक चौरस किमी एवढा समुद्री सपाटीचा भाग अभ्यासण्यात आला. हा परिसर दोन भागात विभागलेला होता. पहिल्या भागात म्हणजेच लोकेशन-ए मध्ये स्थापत्य अवशेष आढळून आले. या स्थापत्य अवशेषात बरेच अर्धवर्तुळाकार खडक सापडले. त्यांचा आकार ९० अंश म्हणजेच इंग्रजी ‘छ’ आकाराचा आहे. या स्थापत्य रचना ६०-८० सेमी. एवढय़ा उंचीच्या असून, याचबरोबर काही आयताकृती दगडी ठोकळेसुद्धा सापडले. वेगवेगळ्या प्रकाराचे जहाजांचे दगडी नांगरसुद्धा या उत्खननात सापडले, त्यावरून असे सिद्ध होते कीद्वारका ही कधी काळी महत्त्वाचे बंदर असण्याची शक्यता आहे. तसेच या शिवाय बेट द्वारका इसवी सन पूर्व १५०० मध्ये मुख्य भूमीला जोडलेली होती हेही या अभ्यासात सिद्ध झाले. एकूणच संपूर्ण सर्वेक्षणात दगडी वास्तूंचे अवशेष, उत्तर हडप्पाकालीन मृद भांडय़ांचे अवशेष, पाटे, भग्न विष्णू मूर्ती, मंदिराचे अवशेष, किल्ल्याच्या िभतींचे अवशेष, नांगर, पितळेच्या वस्तू, लोखंडाच्या गंजलेल्या वस्तूंचे भाग, जीर्ण लाकडी वस्तूंचे भाग, मणी, कुशाण कालीन नाणी असे अनेक पुरावे हाती लागले. थोडक्यात डॉ. एस. आर. राव यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर द्वारका हे भारतीय इतिहासातील पहिले सागरी बंदर हडप्पा संस्कृतीबरोबरच भारतातील नागरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचेही प्रतिनिधित्व करते. हा दुसरा टप्पा इसवीसनपूर्व सहाव्या शतकातील आहे. श्रीमद्भागवतामध्ये द्वारकेचे वर्णन करताना नारदमुनी म्हणतात, ‘हे शहर उद्यान, पक्षी, पाखरं यांनी समृद्ध असून, इकडची जल-तलाव विविध पुष्पानी बहरलेली होती. त्यात इंदिवरा, अंभोजा, कहलारा, कुमुद, उत्पला कमळ आणि हंसाचे मधुर स्वर तरंगत असत. सोन्या-चांदी-पाचूनी बांधलेले नऊ लक्ष राजमहाल, या महालांमध्ये सोन्या- माणकांनी सजवलेल्या वस्तूंची आरास होती. शहर-रचना अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना होती. रस्ते, बाजारहाट, अनेक सभागृहे आणि देवतांची देवालये शहराची शोभा वाढवत असत. मार्ग, राजमार्ग, वस्तील मार्ग, या सर्वावर उष्णता कमी करण्यासाठी पाणी िशपडले जात असे. भगवान विश्वकर्मानी आपली विशेष कला भगवान श्रीकृष्णासाठी या नगर रचनेतून दाखवली. विश्वकमार्ंनी १६ सहस्र महाल उभारले. या सर्व महालात श्रीकृष्णांच्या १६ सहस्र राण्या राहत होत्या. या शहराला महाभारतात द्वारावती म्हणून ओळख होती. हे वर्णन जरी लालित्यपूर्ण असले तरी सापडलेल्या पुराव्यांवरून श्रीमद् भागवतामध्ये द्वारकेची वर्णन केलेली नगररचना अगदीच नाकारता येत नाही, असे संशोधकांना पुराव्यांवरून लक्षात आले.
द्वारकेचा शेवट
द्वारका हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. द्वारकेचे धार्मिक महत्त्व हे तिच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीपेक्षा नेहमीच वरचढ ठरते. हे धार्मिक महत्त्व केवळ अस्तिकांसाठी नाही तर नास्तिकांसाठीही तेवढेच महत्त्वाचे असते. आस्तिक आपल्या श्रद्धेच्या चष्म्यातून द्वारकेकडे पाहतात तर नास्तिक अस्तिकांना विरोध करण्याच्या भूमिकेतून द्वारकेकडे पाहतात. या वादाच्या द्वंद्वाचे चटके भारतीय इतिहासाला उजाळा देणाऱ्या स्थळाला सोसावे लागतात. मग घडते ते राजकारण, म्हणूनच सगळ्या प्रकारचे पडदे, चष्मे डोळ्यांवरून बाजूला सारून एक ऐतिहासिक स्थळ म्हणून द्वारकेकडे पाहिल्यास आपल्यालाच पूर्वजांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा समजण्यास मदत होईल.
द्वारकेच्या संशोधनात बेट द्वारका हे तत्कालीन प्रसिद्ध बंदर आहे हे सिद्ध झाले आहे. तरीही उपलब्ध पुराव्यांवरून द्वारकेच्या काळासंबंधी अनेक वाद आहेत. नवीन संशोधनात जहाजांचे नांगर मोठय़ा प्रमाणात सापडले, या नांगरावरून ते कुठल्या भागातील असावेत, कुठल्या प्रकारच्या नौकांसाठी वापरले जात असावेत, असे अनेक अंदाज बांधता येतात. त्याचबरोबर अभ्यासकांनी द्वारकेच्या आजूबाजूच्या परिसरातही सर्वेक्षण आणि उत्खनन केले, या सर्वेक्षणात त्यांना गुजराती लिपी असलेला एक दगडी ठोकळा मिळाला. या दगडी ठोकळ्याची धाटणी, जहाजांच्या नागरांप्रमाणे असल्याने अभ्यासकांनी गुजराती लिपीच्या आधारे या नांगराचा काळ मध्ययुगीन असून अशा प्रकारचे नांगर इंडो-अरब व्यापाराचे निदर्शक होते, असा निष्कर्ष मांडला. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्यात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषांना जगासमोर आणण्यात आले आहे, असे असले तरी या पुराव्यांची कालनिश्चितीही तशीच वैज्ञानिक पद्धतीने होण्याची गरज आहे. जहाजांच्या नांगरांचा काळ हा गृहीतकांऐवजी रेडिओमेट्रिक डेटिंगसारख्या वैज्ञानिक पद्धतीने शोधला असता तर सत्याकडे अधिक अचूक वाटचाल करता आली असती. नांगर मध्ययुगीन तर पूर्वीच्या उत्खननात मिळालेली मृदभांडी हडप्पाकालीन असल्याने अनेकविध कालखंडांमध्ये हा भूभाग वापरात होता, हेच लक्षात येते. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात नेहमीच लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ते स्थळ केवळ एकाच काळाचे निदर्शक असू शकत नाही. कालपरत्वे एक संस्कृती वसते, फुलते व कालांतराने नष्ट होते व त्याच ठिकाणी नव्याने दुसरी संस्कृती रुजू होते. असे असले तरी द्वारकेला सापडलेल्या पुराव्यांवरून हे मात्र नक्की सिद्ध होते की, द्वारका हे नागरीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरक्षित कार्यरत बंदर होते व इंडो-अरब व्यापाराच्या काळात ते प्रगतीच्या सर्वोच्च िबदूवर होते. म्हणूनच द्वाराकेच्या संदर्भात अजून सखोल व शास्त्रीय संशोधनाची गरज आहे.
द्वारकाधीश मंदिर :-
गोमती नदीच्या काठावरील द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात पवित्र व प्राचीन मंदिर मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात.
द्वारकाधीश मंदिर सुमारे 2 हजार दोनशे वर्ष जुने असल्याचे मानले जात आहे. असे म्हणतात की हे मंदिर कृष्णा काळात व्रजभान यांनी बांधले होते. व्रजभान हे भगवान श्रीकृष्णाचे नातू समजले जातात. पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की हे स्थान 'हरि गृह' अर्थात भगवान श्रीकृष्ण जी यांचे निवासस्थान होते, जे नंतर मंदिर म्हणून बांधले गेले.

द्वारकाधीश मंदिर अनेक नावांनी देखील प्रसिद्ध आहे. यात 'कृष्णा मंदिर', 'द्वारका मंदिर' आणि 'हरि मंदिर' असे म्हटले जाते, परंतु द्वारकाधीश मंदिराच्या नंतर हे मंदिर 'जगत मंदिर' म्हणून सर्वाधिक ओळखले जाते. हे शहर भगवान श्रीकृष्णाने समुद्रातून ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बनवले होते, तेथे आप मंदिर आहे.

द्वारकाधिश मंदिर भव्य असून चुनखडी आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे. जे भारतातील सर्वात प्राचीन शैली प्रतिबिंबित करते. तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर बांधले गेले आहे असे देखिल म्हतले जात असून हे पाच मजली मंदिरआहे.
या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात. या ध्वजाची उंची सुमारे 75 फूट असल्याचे सांगितले जाते. असेही म्हटले जाते की मंदिराचा ध्वज दिवसातून किमान पाच वेळा बदलला जातो, जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साही असतात. या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजेही खूप महत्वाचे मानले जातात. उत्तरेकडे एक दरवाजा आहे, ज्याला 'मोक्ष द्वार' म्हणून ओळखले जाते. दुसरा द्वार दक्षिणेकडे दिशेला आहे ज्याला 'स्वर्ग द्वार' असेही म्हणतात. दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता.

द्वारकेचा राजा कृष्ण म्हणून कृ ष्णाला येथे द्वारकाधीश म्हटले जाते. द्वारका कृष्णासाठीच विश्वकर्म्याने वसविली असा समज आहे. या शहराचे उल्लेख महाभारत, हरिवंश, भागवत पुराण, स्कंद पुराण, विष्णुपुराणातही आहेत. संपन्न अश्या सौराष्ट्रातील हे शहर गोमती नदीकाठी असून त्याला द्वारमती, द्वारवती, कुशस्थली अशीही नावे आहेत.
गावात पाहायचे ते पहिले द्वारकाधीशाचे मंदिर. सहाव्या सातव्या शतकातले हे मंदिर असून मूळ मंदिर कृष्णाचा पणतू राजा वज्राने बांधले होते असा इतिहास आहे. पाच मजल्यांचे हे मंदिर चुनखडी आणि दगडात बांधले असून मंदिरावर असलेला ध्वज दिवसातून पाचवेळा बदलला जातो. येथेच स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार आहे. गोमती जेथे सागराला मिळते तेथेच हे मंदिर असून द्वारकाधीशाची अप्रतिम सुंदर आणि दागदागिन्यांनी मढलेली मूर्ती भाविकांच्या नजरेचे पारणे फेडते. याच परिसरात कृष्णाचा पिता वसुदेव, देवकी, बलराम, रेवती, सुभद्रा, रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांचीही मंदिरे आहेत.
द्वारकेतील सुंदर रस्ते, महाल , सुदामा सभा या आणखी काही पाहण्यालायक वास्तू. येथे कृष्णाच्या राण्यांचे सात हजार महाल होते असेही सांगितले जाते. त्यातील कांही आजही पाहायला मिळतात. सुंदर बगिच्यांनी या शहराला अधिक देखणे बनविले आहे.
द्वारकेत निवासासाठी अनेक चांगली ठिकाणे असून खाण्यापिण्यासाठीच्या सोयीही चांगल्या आहेत. खास गुजराथी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. जाण्यायेण्यासाठी रस्ते वाहतूक अतिशय सोयीची आहे. रेल्वेची थेट सेवा आहे.
नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर :-
या क्षेत्रासंबधीत कथा अशी, दारुका या राक्षसीने माता पार्वतीकडून वर मिळवला आणि ती उन्मत्त झाली.तीचा पती राक्षस दारुक हा देखील बलवान राक्षस होता.त्याने राक्षसांच्या टोळीच्या सहाय्याने सगळीकडे हाहाकार माजवला होता.तो यज्ञ सुरु असताना तिथे जाउन ते नष्ट करायचा,तसेच ऋषी,मुनींची हत्या करायचा.हा दारुक भारताच्या पश्चीम किनार्यावर सोळा योजना विस्तार असलेल्या एका वनात रहायचा.
एकदा त्या समुद्रातून सुप्रिय नावाच्या वैश्य व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काही यात्रेकरु निघाले होते.सुप्रिय हा सदाचारी होता.तो कपाळावर नेहमी भस्म लावत असे तसेच गळ्यात रुद्राक्षाक्षी माळा धारण करीत असे,भगवान शंकराची पुजा केल्याशिवाय सुप्रिय कधीही भोजन करीत नसे.त्याच्याबरोबर असलेले यात्रेकरुसुध्दा शिवभक्त होते.ते सतत नमः शिवायचा जप करीत असत.सुप्रिय शंकराचा परमभक्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष शंकरानी दर्शन दिले होते.अश्या या सज्जन यात्रेकरुना दारुकाच्या राक्षसांनी पकडले आणि साखळदंड घालून कारागृहात बंद केले.दारुकाला जेव्हा या बंदीवान यात्रेकरुंविषयी समजले तेव्हा तो कारागृहात आला.
सुप्रिय व इतरांना दारुक धमकावू लागला.घाबरलेल्या सुप्रियने भगवान शंकराची प्रार्थना सुरु केली.त्याचा हा धावा एकून शिवशंकर एका विवरातून प्रगट झाले.त्याचबरोबर त्या ठिकाणी एक चार दरवाजे असणारे मंदिर निर्माण झाले.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात एक दिव्य ज्योर्तिलींग प्रकाशमान झाले होते.भगवान शंकर आणि पुर्ण परिवार त्या ज्योतीच्या रुपात तिथे होते.सुप्रिय व इतरांनी शिवलिंगाची पुजा केली.सुप्रियच्या पुजेने प्रसन्न होउन भ्गवान शंकरांनी पाशुपत अस्त्राच्या सहाय्याने राक्षसांचा वध केला व ते वन सर्वांना निवास करण्यासाठी मुक्त केले.रक्षसांवर आलेले हे संकट पाहून दारुकाने माता पार्वतीची प्रार्थना केली व आपल्या कुळाच्या रक्षणाची विनंती केली.पार्वतीने दारुकाच्या विनंतीचा स्विकार केला व भगवान शंकराना माता पार्वती म्हणाल्या कि मी दारुकाला अभय दिले आहे.तेव्हा हे वन राक्षसांना रहाण्यासाठी असावे.यावर शंकर उत्तरले कि मी माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कटीबध्द आहे.जी व्यक्ती धर्माचे पालन करुन श्रध्द्दापुर्वक माझे दर्शन करेल ती व्यक्ती चक्रवर्ती राजा होईल.कलीयुगाच्या शेवटी व सत्ययुगाच्या प्रारंभी महासेनाचा पुत्र वीरसेन राजा हा महाराज होइळ.तो माझा परमभक्त व पराक्रमी असेल.या वनात येउन त्याने माझे दर्शन घेतले कि तो चक्रवर्ती सम्राट होइल.
अशाप्रकारे शिव्शंकर व माता पार्वती शिवलिंगाच्या रुपात तेथेच कायमचे राहीले.इथे शंकराना नागेश्वर व पार्वतीमातेला नागेश्वरी असे संबोधले जाते.जी व्यक्ती श्रध्दापुर्वक या शिवलिंगाचे दर्शन करते त्याची सर्व पापे नष्ट होतात.
बेट द्वारका महाभारत की स्वर्णिम नगरी के दर्शनीय स्थल

कुछ दिनों पूर्व मुझे गुजरात के द्वारका की यात्रा का अनमोल अवसर प्राप्त हुआ था। मैंने इस अवसर का पूर्ण लाभ उठाने का निश्चय किया तथा बेट द्वारका को अपनी यात्रा कार्यक्रम में प्रथम स्थान पर रखा। प्रातः अपने होटल से हम बेट द्वारका पहुँचने के लिए निकले। हमारे होटल से बेट द्वारका लगभग ३५ की.मी. दूर था जिसका ३० की.मी. भाग सड़क मार्ग से तथा ५ की.मी. भाग समुद्र मार्ग से पूर्ण करना था। इसके पश्चात ही हमें बेट द्वारका में चरण रखने का सुख प्राप्त होने वाला था। बेट द्वारका एक द्वीप है जिसे शंखोधर भी कहा जाता है।
द्वारका से बेट द्वारका की ओर

जब हम सड़क मार्ग द्वारा द्वारका नगरी पार कर रहे थे, हमने बाईं ओर गोमती द्वारका देखी तथा दायीं ओर रुक्मिणी मंदिर। कुछ क्षण पश्चात हम एक वीरान शुष्क मैदानी क्षेत्र पार कर रहे थे। शनैः शनैः हमारे समक्ष हल्के भूरे रंग के उतार चड़ाव लिए छोटे बड़े कई टीले आये। वे सर्व असंसाधित या कच्चे नमक के टीले थे। टाटा नमक आप सब ने खाया होगा। इसी टाटा नमक के निर्माता टाटा केमिकल्स का निर्माण कारखाना यहीं गोमती द्वारका तथा बेट द्वारका के मध्य स्थित मीठापुर में है। मीठापुर अर्थात नमक नगरी, क्योंकि गुजराती भाषा में नमक को मीठ कहा जाता है। मेरे गुजराती मित्र मीठापुर के विषय में अवश्य जानते होंगे। जैसे जैसे हम आगे बढे, हमारे बाईं ओर भारतीय नौसेना के कार्यालय आये तथा दायीं ओर धीरे धीरे रंगबिरंगी नौकाओं से भरी जेट्टी प्रकट होने लगी थी।
बेट द्वारका की ओर नौका सवारी

नौका द्वारा बेट द्वारका की बची दूरी पूर्ण करने के लिए हम एक पगडंडी से जेट्टी की ओर बड़े। दोनों ओर दुकानों की कतारें थीं जो मूंगा, सीपियाँ, कौंच, समुद्री पौधे, लकड़ी के खिलौने, पूजा सामग्री आदि बेच रहे थे।
जेट्टी पहुँचने पर नौकाओं की कतार दिखी किन्तु उनमें से एक नौका ही यात्रियों को उस पार पहुंचा रही थी। हम भी पहले से ही भरी उस नौका में चढ़ गए। अनोखा तथ्य तो कुछ क्षण पश्चात सामने आया। हम नौका को भरी समझ रहे थे किन्तु नौका चालक हमसे सहमत नहीं था। उसे तो अपनी नौका कगार तक भरनी थी ताकि अधिक से अधिक यात्रियों को बिठा सके तथा उतनी अधिक कमाई हो सके। मुझे शहरों में दौड़ते परिवहन साधनों की स्मृति ताजा हो आयी। उनके चालकों के सामान यहाँ भी एक नौजवान चालक घूम घूम कर यात्रियों के मध्य स्थान बनाने का प्रयत्न कर रहा था ताकि वो और अधिक यात्रियों को बिठा सके। उस पर रुष्ट होकर भी क्या होगा? अंततः यह एक जनसामान्य की नौका थी तथा प्रत्येक यात्री के लिए शुल्क मात्र २० रुपये ही था।
यदि आप बेट द्वारका तक की स्वच्छंद शांतिपूर्ण यात्रा चाहते हों तो अपने लिए पूर्णतः निजी नौका सेवा भी प्राप्त कर सकते हैं। यद्यपि इस सुविधा के लिए जेब कुछ अधिक हलकी करनी पड़ेगी क्योंकि ऐसी सुविधाओं का शुल्क लगभग २०००रुपये तक है।

बेट द्वारका के लिए नौका सवारी लगभग १० से १५ मिनटों की है। यद्यपि समय अधिक नहीं है, फिर भी समुद्री पक्षियों की जल अठखेलियाँ देखते यह समय भी कब बीत जाता है पता ही नहीं चलता। नौका चढ़ने से पूर्व ही आप चिड़ियों तथा मत्स्यों के लिए दाना अवश्य खरीद लें। इसी दाने को जल में बिखेरकर आप इन समुद्री पक्षियों को और पास बुला सकते हैं। अपने चारों ओर अठखेलियाँ करते इन श्वेत जल पक्षियों को देखने का आनंद प्रत्यक्ष अनुभव करने पर ही समझा जा सकता है। आप उन्हें खिलाते रहिये, वे आपका भरपूर मनोरंजन करते रहेंगे।
बेट द्वारका शब्द की व्युत्पत्ति

बेट द्वारका को भेंट द्वारका भी कहा जाता है। दोनों नामों के सम्बन्ध में कथाएं प्रसिद्ध हैं।
जल से घिरी भूमि जिसे हम द्वीप कहते हैं, इसे गुजराती में बेट कहा जाता है। अतः द्वारका का वह भाग जो मुख्य भूमि से पृथक होकर द्वीप में परिवर्तित हो गया, उसे बेट द्वारका कहा जाने लगा।
भेंट द्वारका यह शब्द सुनते ही आपको अवश्य कृष्ण तथा सुदामा का प्रसिद्ध भेंट स्मरण हो आया होगा। जी हाँ! बेट द्वारका से सम्बंधित एक अन्य किवदंती के अनुसार यह वही स्थल है जहां कृष्ण के प्रिय किन्तु दरिद्र मित्र सुदामा ने उनसे भेंट की थी। बेट द्वारका के मंदिर में कथावाचक रस लेकर इसका बखान करते नहीं थकते। उसी अजर अमर भेंट के कारण ही इस स्थल को भेंट द्वारका भी कहा जाता है।
बेट द्वारका को बेट शंखोधार भी कहा जाता है। आप जानना नहीं चाहेंगे कि बेट द्वारका का यह अनोखा नाम कहाँ से उत्पन्न हुआ है?

कुछ लोगों का मानना है कि यह द्वीप शंख के आकार का था, इस लिए इसे शंखोधार कहा जाता है। मेरे अनुमान से इन सैकड़ों वर्षों पश्चात इस द्वीप के आकार में अनेक परिवर्तन आये होंगे। फिर भी यदि गूगल मानचित्र में बेट द्वारका देखा जाय तो यह एक लंबा शंख प्रतीत होता है।
बेट द्वारका के कुछ अन्य नाम हैं – रमणद्वीप अर्थात रमणीय द्वीप, कृष्ण विलास नगरी अर्थात कृष्ण की आमोद नगरी, कलारकोट इत्यादि।
बेट द्वारका का इतिहास तथा सम्बंधित कथाएं

द्वारका के विषय में हम सब जानते हैं कि यह कृष्ण की बसाई तथा राज की गयी स्वर्णिम नगरी थी। इसी कारण कृष्ण को द्वारकाधीश कहा जाता है। कृष्ण को रणछोड़ राय भी कहा जाता है। रणछोड़ अर्थात वह जो रणभूमि छोड़कर भाग गया। कृष्ण ने कंस के अत्याचारों से अपनी प्रजा की रक्षा करने के लिए मथुरा छोड़ दी थी। अपनी प्रजा के लिए उन्होंने द्वारका में नवीन नगरी की स्थापना की थी। आज भी द्वारका के लोग एक दूसरे को जय द्वारकाधीश कहकर अभिवादन करते है।
सोलह हजार एक सौ आठ रानियों के महल
कृष्ण की सोलह हजार रानियों के विषय में तो आप जानते ही हैं। किन्तु कई लोग इस विषय में मिथ्याबोध से ग्रसित हैं। यद्यपि कृष्ण की ८ प्रमुख रानियाँ थीं। कृष्ण ने नरकासुर द्वारा अपहृत लगभग १६००० राजकुमारियों को उससे मुक्ति दिलायी थी। समाज में बहिष्कृत होने के भय से उन्होंने कृष्ण से विनती की कि वे पाणिग्रहण कर उनका उद्धार करें। अतः कृष्ण ने उनसे विवाह कर उन सब के लिए यहीं बेट द्वारका में अलग अलग महल बनवाये थे। जबकि कृष्ण का राजपाट गोमती द्वारका में था। वर्तमान में आपको केवल उस विशाल स्वर्णिम द्वारका का एक छोटा सा भाग ही दृष्टिगोचर होता है। एक बड़ा भाग समुद्र के नीचे है।
बेट द्वारका में श्री कृष्ण-सुदामा भेंट

सुदामा-कृष्ण की मित्रता की कहानियां हम सबने बालपन में सुनी तथा पढी हैं। ऐसी कहानियाँ अब भी हमारे लिए प्रेरणा का स्त्रोत हैं। आईये एक बार फिर उस कहानी को दुहराते हैं। निर्धन ब्राम्हण-पुत्र सुदामा, अवंतिका या उजैन स्थित संदीपनी आश्रम में बालकृष्ण के सहपाठी थे। कालान्तर में कृष्ण राजा बन गए किन्तु सुदामा निर्धन ही रहे।
पत्नी के आग्रह पर वे एक बार कृष्ण से भेंट करने पोरबंदर से द्वारका आये। निर्धनता के कारण वे भेंट स्वरूप केवल मुठ्ठी भर कच्चे चावल ही साथ लाये थे। सुदामा के हाथों से छीनकर बड़े ही चाव से चावल खाते कृष्ण सुदामा की परिस्थिति बिना कहे ही जान गए थे। वस्तुस्थिति से अनभिज्ञ सुदामा को घर पहुँचने के पश्चात ही कृष्ण की उदारता का अनुभव हुआ जब उन्होंने धन-धान्य से परिपूर्ण हर्षोल्लसित पत्नी तथा पुत्रों को देखा। ऐसी थी कृष्ण सुदामा की मित्रता।
इसी अनमोल मित्रता की महानता समझाने के लिए बहुधा बालक बालिकाओं को यह कथा अवश्य सुनायी जाती थी। द्वारकाधीश मंदिर के भीतर यह कथा आप एक बार फिर सुनेंगे। आपसे आग्रह किया जाएगा कि आप भी मंदिर का संरक्षण करने वाले ब्राम्हणों को चावल दान करें। ऐसी मान्यता है कि भगवान् कृष्ण सुदामा की तरह आपका घर भी धन धान्य से भर देंगे।
शंखासुर तथा शंखोधार तीर्थ
आपने कदाचित कृष्ण द्वारा शंखासुर नामक असुर के वध की कथा सुनी होगी। अपने गुरु संदीपनी के पुत्र को बचाने के लिए कृष्ण ने पांचजन्य नामक शंख के भीतर निवास करते शंखासुर का वध किया था। किवदंतियों के अनुसार प्रभास क्षेत्र जहां शंखासुर निवास करता था, वही वर्तमान में बेट द्वारका है। बेट घाट तथा द्वारकाधीश मंदिर से १ की.मी. दूर शंख सरोवर नामक एक पवित्र जलाशय है। ऐसा मानना है कि कृष्ण ने शंखासुर का वध वहीं किया था। शंख सरोवर आप आज भी यहाँ देख सकते हैं। इसके आसपास अनेक पक्षियों को देख आपका मन भी मेरी तरह प्रसन्न हो उठेगा। शंख सरोवर के किनारे एक छोटा प्राचीन शिव मंदिर भी है।
और पढ़ें – दिनकर जोशी की द्वारका का सूर्यास्त
मीराबाई के जीवन के अंतिम क्षण

यह तो सब जानते हैं कि मेवाड़ के चित्तौड़गढ़ की रानी मीराबाई बालपन से भगवान् कृष्ण की परम भक्त थी। किन्तु, क्या आप जानते हैं कि मीराबाई ने अपने जीवन के अंतिम क्षण बेट द्वारका में व्यतीत किये थे? कथाओं के अनुसार विवाह के पश्चात भी मीराबाई कृष्ण भक्ति में लीन रहती थी। राजमहल की अपेक्षाओं तथा षड्यंत्रों से त्रस्त होकर अंततः उन्होंने राजमहल का त्याग किया तथा बालकृष्ण की नगरी वृन्दावन चली गयी। उन्होंने अपना सर्व जीवन कृष्ण भजन रचने तथा उनकी स्तुति गाने में लगा दिया। गाँव गाँव भ्रमण कर कृष्ण भजन गाने वाली मीराबाई की ख्याति चारों ओर पसरने लगी।
जीवन के अंतिम क्षणों में बेट द्वारका पहुंचकर उन्होंने मंदिर में भोग लगाने की इच्छा व्यक्त की। उनकी ख्याति से अवगत पंडितों ने उन्हें इसकी स्वीकृति दे दी। मंदिर के भीतर वे अपनी भक्ति द्वारा भगवान् कृष्ण में विलीन हो गयी। उनके पवित्र वस्त्र कृष्ण की प्रतिमा को अर्पित किये गए। इस कथा पर विश्वास करना आपकी श्रद्धा पर निर्भर है। यह कथा इस ओर अवश्य इंगित करती है कि मीराबाई ने अपने अंतिम क्षण बेट द्वारका में व्यतीत किये थे। इसी कारण मैंने इस कथा का यहाँ उल्लेख किया।
बेट द्वारका के मंदिर
कृष्ण की नगरी बेट द्वारका में अनेक मंदिर होंगे, ऐसा आपका अनुमान होगा। किन्तु बेट द्वारका की जीवनरेखा द्वारकाधीश मंदिर के चारों ओर ही घूमती है। अधिकतर यात्री इसी मंदिर के दर्शन करने आते हैं। भाग्यवश मैंने द्वारकाधीश मंदिर के साथ साथ कुछ अन्य मंदिरों के भी दर्शन किये। इन सभी मंदिरों में मेरा अनुभव आपके साथ बांटना चाहती हूँ।
बेट द्वारका का द्वारकाधीश मंदिर

द्वारकाधीश मंदिर बेट द्वारका का अति विशेष मंदिर है। इसी कारण लाखों की संख्या में भक्त इसके दर्शनार्थ ओखा से यहाँ तक की नौका सवारी करते हैं। यद्यपि बेट द्वारका में कई अनेक महत्वपूर्ण मंदिर भी हैं।
जहां तक द्वारकाधीश मंदिर का प्रश्न है, ऐसा कहा जाता है कि यहाँ स्थापित श्री कृष्ण की प्रतिमा रुक्मिणी देवी ने स्वयं स्थापित की थी। उन्होंने यह प्रतिमा श्री कृष्ण द्वारा देह त्यागने के समय अर्थात आज से लगभग ५२४४ वर्षों पहले स्थापित की थी। जैसा की हम जानते हैं कि रुक्मिणी कृष्ण की पटरानी थी, और उनकी ८ मुख्य रानियों में से एक है। विडम्बना यह है कि बेट द्वारका के इस मंदिर परिसर में रुक्मिणी देवी का एक भी मंदिर नहीं है।
द्वारकाधीश मंदिर में कई दैनिक अनुष्ठान किया जाते हैं जिसमें मुख्यतः १३ बार भोग, ९ बार आरती तथा २२ देव दर्शन सम्मिलित हैं।
नाथद्वारा मंदिर की तरह बेट द्वारका के इस श्री कृष्ण मंदिर में भी शिखर नहीं है। अन्य घरों की तरह इसकी छत भी सामान्य रूप से सपाट है। इसके पीछे का कारण नहीं जानना चाहेंगे? यह इसलिए क्योंकि द्वारकाधीश मंदिर परिभाषिक रूप से मंदिर है किन्तु वास्तव में यह कृष्ण का निवासस्थान था जहां वे अपने परिवार संग निवास करते थे।
द्वारकाधीश मंदिर परिसर में स्थित अन्य मंदिर

बेट द्वारका के द्वारकाधीश मंदिर परिसर के भीतर कृष्ण के साथ साथ उनके परिवार के सदस्यों के भी मंदिर हैं। वे इस प्रकार हैं-
राधिका रानी मंदिर– राधा को द्वारका में गोलोक की महारानी के नाम से जानते हैं। इसके तथ्य में ना जाते हुए आईये मैं आपको वह बताती हूँ जो मैंने इस मंदिर मैं देखा । राधा को समर्पित इस मंदिर के लकड़ी के द्वार तथा नक्काशीदार कोष्ठक इस मंदिर की सुन्दरता में चार चाँद लगा रहे थे। जहां कृष्ण होंगे वहां राधा अवश्य होगी। किन्तु राधाजी कृष्ण की प्रिय सखी होते हुए भी यहाँ उनका मंदिर मुख्य मंदिर परिसर के बाहर स्थित है। परिसर के भीतर केवल श्री कृष्ण, उनके भ्राताओं, उनके पुत्रों तथा उनकी पत्नियों के मंदिर हैं।
इस मंदिर में राधाजी की उत्सव मूर्ति है अर्थात् मूर्ति अचल नहीं है। इसका अर्थ यह है कि उनकी मूर्ति सतत यहाँ स्थापित नहीं रहती बल्कि उन्हें विशेष रूप से यहाँ लाया व ले जाया जाता है। राधाजी की मूर्ति को आप देखना चाहें तो आपको यहाँ श्रावण मास में आना होगा। श्रावण मास में ही उनकी मूर्ति को एक मास के लिए बाहर निकाला जाता है। उनकी मूर्ति को शरद पूर्णिमा के दिन भी बाहर लाया जाता है।
द्वारकाधीश मंदिर– द्वारकाधीश मंदिर का मुख्य आकर्षण है श्री कृष्णजी की मूर्ति जिसे रुक्मिणी ने स्वयं बनायी है। उनकी मूर्ति को देख आपका मन प्रसन्न हो जाएगा। सम्पूर्ण दिवस उन्हें भिन्न भिन्न श्रृंगार में सज्जित किया जाता है। यदि आप यहाँ जन्माष्टमी के दिन आयें तो आप इस श्रृंगार की चरम सीमा के दर्शन कर सकते हैं। कृष्ण मंदिर के रजत द्वार पर आप सूर्य, चन्द्रमा, शंख, चक्र, गदा तथा पद्म देख सकते हैं। द्वार के निचले भाग में श्री कृष्ण ग्वाले के रूप में उत्कीर्णित (तराशे) हैं जो गौमाता के साथ खड़े अपनी बांसुरी बजा रहे हैं।
बलराम – श्री कृष्ण के ज्येष्ठ भ्राता बलराम को यहाँ त्रिविक्रम रूप में दर्शाया गया है। चार भुजाधारी त्रिविक्रम की काले पत्थर की मूर्ति प्राचीन प्रतीत हो रही थी।
कृष्ण-रुक्मिणी के पुत्र प्रद्युमन यहाँ कल्याण राय के रूप में उपस्थित हैं।
पुरुषोत्तम राय – इन्हें अधिक मास के देवता कहा जाता है। अधिक मास अर्थात् हिन्दू पंचांग के अनुसार प्रत्येक ३-४ वर्षों पश्चात आने वाला एक अधिक मास। भूरे बलुआ पत्थर में बनी पुरुषोत्तम राय की मूर्ति के बाजू उनकी चारपाई रखी हुई है।
देवकी मंदिर– देवकी को समर्पित मंदिर आपने कहीं नहीं देखा होगा। कृष्ण की मूर्ति जिस आँगन में है वहीं भूरे बलुआ पत्थर में बनी देवकी की भी प्रतिमा स्थापित है। आप यहाँ एक आश्चर्यजनक दृश्य देखेंगे। द्वारका में माता यशोदा का कहीं भी उल्लेख नहीं है। कृष्ण को समर्पित मंदिर के भीतर उनकी माता के रूप में देवकी ही विराजमान रहती हैं।
जब आप मुख्य प्रांगण की परिक्रमा करेंगे आप अन्य कई मंदिर देखेंगे। ये मंदिर क्रमवार कुछ इस प्रकार हैं-
महालक्ष्मी मंदिर – आप आश्चर्यचकित होंगे कि कृष्ण मंदिर के भीतर महालक्ष्मी का मंदिर! यहाँ रुक्मिणी को महालक्ष्मी का अवतार माना जाता है। अतः महालक्ष्मी को कृष्ण की पटरानी के रूप में स्थापित किया गया है। यहाँ उनका अपना मंदिर है जहां काले पत्थर में उनकी प्रतिमा स्थापित की गयी है।
माधव राय जी – माधव राय जी के विषय में जानकारी नहीं होने के कारण मैंने कुछ पूछताछ की। मुझे बताया गया कि माधव राय कृष्ण के काका थे। आपको बता दूं कि प्रयाग में आयोजित होने वाले कुम्भ मेले के वे पीठासीन देव हैं।
कृष्ण की कुल देवी अम्बाजी थीं। तो उनका मंदिर तो यहाँ होना ही चाहिए। मुझे इस मंदिर के दर्शन का भी सौभाग्य प्राप्त हुआ।
प्रांगण के एक ओर मैंने देखा कि एक पंडित चारों ओर से भक्तों से घिरे बैठे थे तथा उन्हें कुछ जानकारी दे रहे थे। समीप जाकर जाना कि वे भक्तों को बेट द्वारका की कथा सुना रहे थे। उन्होंने कृष्ण सुदामा की मित्रता तथा शंखासुर की कथा सुनाई। भक्तों को द्वारका दर्शन की महत्ता समझाते हुए उन्हें मंदिर में चावल के दान का सुझाव भी दे दिया। यह सब उन्होंने मात्र ३ मिनट में संपन्न किया।
वहां से आगे जाकर मैंने गोवर्धन मंदिर देखा। आगे शेषावतार मंदिर में शेषावतार की प्रतिमा थी जिस के ऊपर शेषनाग की छत्री थी।
परिसर में मुझे कलियुग के देव सत्यनारायण भगवान् का भी मंदिर दिखा। मंदिर के भीतर जाकर संगमरमर में बनी उनकी सुन्दर मूर्ति देख गद्गद हो गयी।
साक्षी गोपाल, यह एक उत्सव मूर्ति है जो बेट द्वारका के द्वारकाधीशजी की अचल मूर्ति की एवज में यात्रा करती है। इन्हें द्वारका धाम की तीर्थ यात्रा का देव माना जाता है। अतः जब भी आप द्वारका धाम की तीर्थ यात्रा पर यहाँ आयें, साक्षी गोपाल आपकी यात्रा के दर्शन करेंगे तथा आपका संरक्षण भी करेंगे। यह मेरा प्रथम अनुभव था जब मैंने देखा कि देव स्वयं भक्तों द्वारा किये द्वारका तीर्थ का समक्ष खड़े होकर दर्शन करते हैं।
लक्ष्मी नारायण, अर्थात् शक्ति समेत विष्णु। बेट द्वारका के द्वारकाधीश मंदिर में लक्ष्मीनारायण की जोड़ी की मूर्ति है जो काले पत्थर से निर्मित है।
क्या आपने कहीं कृष्ण के पुत्र तथा पौत्र के मंदिर देखे हैं? यदि नहीं, तो यहाँ आप ऐसे मंदिर अवश्य देखेंगे। मैंने यहाँ कृष्ण पुत्र प्रद्युमन तथा पौत्र अनिरुद्ध के मंदिर भी देखे। कृष्ण के कुलगुरु अर्थात् ऋषि दुर्वासा को समर्पित भी यहाँ एक मंदिर स्थापित है।
जामवंती – ये कृष्ण की द्वितीय पत्नी तथा रीछ राजा जाम्बवंत की पुत्री थी।
सत्यभामा – ये कृष्ण की तृतीय पत्नी तथा द्वारका के खजांची सत्रजित की पुत्री थी।
गरुड़ – गरुड़ के विषय में आपने पौराणिक कथाओं में पढ़ा ही होगा। किन्तु क्या आप जानते हैं कि गरुड़ का भी द्वारकाधीश मंदिर के भीतर यथोचित स्थान है। मुझे ऐसा बताया गया कि विष्णु अर्थात कृष्ण का वाहन गरुड़, भगवान् कृष्ण को प्रत्येक दिवस प्रातः अपनी पीठ पर बिठाकर उनकी राजधानी गोमती द्वारका ले जाते थे तथा सांझ होते ही उन्हें बेट द्वारका में उनके महल में ले आते थे।
गणेश मंदिर – मंदिर परिसर के भीतर प्रवेश करते से ही जो प्रथम देव के आप दर्शन करेंगे वे हैं गणेशजी। इस गणेश मंदिर में गणेशजी की खड़ी प्रतिमा स्थापित है।
द्वारका के कृष्ण मंदिर की एक अनोखी बात मेरे ध्यान में आयी। यहाँ सर्व पंडित प्रत्येक देव अथवा देवी के विषय में जानकारी देते समय कृष्ण का सन्दर्भ अवश्य देते हैं। देव-देवी की महत्ता का गुणगान करते समय उनका कृष्ण से नाता तथा घटनाओं में उनके योगदान की जानकारी चर्चा में लाते नहीं थकते। इन देवी-देवताओं के अन्य दैवी अस्तित्वों से सम्बन्ध की भी वे जानकारी देते हैं।
इन सर्व मंदिरों के दर्शनोपरांत मैंने कुछ क्षण बेट द्वारका के श्री कृष्ण मंदिर की वास्तु को निहारने में व्यतीत किये। मंदिर की भित्त मुझे अपेक्षाकृत नवीन प्रतीत हुई। भित्तियों पर कृष्णलीला के दृश्य उत्कीर्णित थे। हांडी से माखन चुराते बालकृष्ण, कदम्ब वन में बांसुरी बजाते कृष्ण, गोवर्धन पर्वत को अपनी कनिष्ठा में उठाये गोवर्धनधारी, गज को पूंछ से उठाये कृष्ण इत्यादि उनमें से मुख्य हैं। मेरे विचार से अन्य कई प्रमुख दृश्य भी चित्रित किये जा सकते थे। भित्तियों के अन्य रिक्त स्थान ज्यामितीय तथा पुष्पों के आकारों से उत्कीर्णित हैं।
रानियों के मंदिरों की बाहरी भित्तियों पर मुझे लाल रंग में हथेलियों के चिन्ह दिखे। उत्सुकता वश मैंने पंडितजी से इस विषय में जानना चाहा। उन्होंने मुझे बताया कि दीपावली तथा होली जैसे त्योहारों के समय हथेलियों द्वारा भित्तियों को इसी प्रकार चिन्हित किया जाता है।
डांडी हनुमान मंदिर

डांडी हनुमान मंदिर द्वारकाधीश मंदिर से लगभग ५ की.मी. की दूरी पर था। अतः वहां पहुँचने हेतु हमें कृष्ण मंदिर के सामने से ऑटो की सहायता लेनी पड़ी। किन्तु वहां पहुंचते पहुंचते हमें हमारी नानी याद आ गयी। सड़क के नाम पर ऊबड़ खाबड़ मार्ग तथा बेट द्वारका द्वीप की संकरी सी भूमि दोनों और से समुद्र से घिरी। समुद्र किनारे से होते हुए हमारा ऑटो एक छोटे अवर्णित से मंदिर के समक्ष पहुंचा। मंदिर के बाहर कुछ छोटी दुकानें भी दिखाई दीं।
जैसे ही मैं मंदिर के समीप पहुँची, मेरे कर्ण हनुमान चालीसा के मधुर स्वरों से सराबोर हो गए। मैंने भी अपने स्वर जप के स्वरों से एकाकार कर लिए। जप सम्पूर्ण होने पर उतावली होकर मंदिर के पट खुलने की बाट जोहने लगी। इस मंदिर को कोई भी राजकीय संरक्षण प्राप्त नहीं है। बल्कि यह सदैव पूर्ण रूप से जनता का मंदिर रहा है। मंदिर के चारों ओर एक धर्मशाला अवश्य बाँध दी गयी है।
मंदिर का भीतरी भाग अत्यंत छोटा है। ऐसा प्रतीत हो रहा था मानो यह कोई छोटा सा गुफा मंदिर हो। भीतर दो मूर्तियाँ दिखीं। एक मूर्ति हनुमानजी की थी जो धरती में समाती हुई प्रतीत होती है। दूसरी मूर्ति हनुमाजी के पुत्र मकरध्वज की है। अतः इसे पिता पुत्र का मंदिर कहा जाता है।

आप सबने रावण भ्राता अहिरावण तथा पाताल राजा महिरावण द्वारा श्री राम तथा लक्षमण के अपहरण की कथा अवश्य सुनी या पढी होगी। ऐसी माना जाता है कि पुत्र इन्द्रजीत की मृत्यु के पश्चात रावण के अनुरोध पर अहिरावण तथा महिरावण ने दोनों दिव्य पुरुषों का अपहरण इसी स्थान पर किया था। इसका अर्थ आप आसानी से लगा सकते हैं कि बेट द्वारका द्वीप का इतिहास कृष्ण युग से भी अधिक प्राचीन है।
यहाँ के निवासियों की मान्यता है कि यदि आप इस मंदिर में वास करते हनुमानजी को सुपारी अर्पण करें तो वे आपकी सर्व इच्छा पूर्ण करेंगे।
मीरा बाई का मंदिर
बेट द्वारका की एक गली में मुझे मीरा बाई को समर्पित एक छोटा सा मंदिर भी दिखाई दिया।
बेट द्वारका के सरोवर (तलाव)

बेट द्वारका में मुझे दो मुख्य सरोवर दिखे। दोनों सरोवरों की अवस्था अत्यंत उपेक्षित थी। मेरे अनुमान से इसका मुख्य कारण है समुद्र तले स्थित जल नलिकाएं जिनके द्वारा बेट द्वारका को जल आपूर्ति की जाती है। आप चौंक गए होंगे। बेट द्वारका की जनता को अब आसानी से जल प्राप्ति हो रही है। इसलिए अब वे इन सरोवरों की उपयोगिता तथा अब तक दी गयी इनकी सेवाओं को भूलने लगे हैं। इन सरोवरों से जुड़ी किवदंतियां भी लोगों को इनकी देखभाल हेतु प्रोत्साहित नहीं कर सकीं। इन सरोवरों की यह अवस्था देख मैंने अनुमान लगाया कि यहाँ कई अन्य सरोवर भी रहे होंगे जो अब लुप्त गए हैं।
शंख सरोवर

बेट द्वारका द्वीप की लम्बाई-चौड़ाई देखें तो शंख सरोवर तदनुसार विशाल प्रतीत होता है। इसके चारों ओर घाट तथा पौड़ियाँ बाँधी हुई हैं। मैंने द्वारका यात्रा अप्रैल मास में की थी। अप्रैल मास की उष्णता के कारण सरोवर में जल नाममात्र ही शेष था। यही जल वहां उड़ते पक्षियों की प्यास बुझा रहा था। सरोवर के प्रवेश द्वार के समीप ही नीलकंठ का छोटा सा मंदिर था। इसका एक भाग प्राचीन तथा दूसरा भाग अपेक्षाकृत नवीन व जागृत था।
यह वही स्थान है जहां द्वारकाधीश मंदिर से साक्षी गोपाल की मूर्ति परिक्रमा हेतु आती है।
इसके अलावा राम नवमी के दो दिवस पश्चात आयोजित कृष्ण-रुक्मिणी के विवाह की बरात भी यहीं आती है।
रणछोड़ तलाव
नकाशीदार प्रवेश पथ युक्त यह सरोवर भी छोटा नहीं था। इसकी निर्मिती, इस क्षेत्र के शासक अर्थात् बरोदा के गायकवाड वंश ने की थी।
बेट द्वारका के लोग
मेरी द्वारका यात्रा के समय मेरे परिदर्शक तथा वाहनचालक जयेश बेट द्वारका के ही निवासी हैं। जब मैं उससे द्वारका के विषय में कुछ अधिक ही प्रश्न पूछने लगी तब उसे मेरी सच्ची उत्सुकता का अनुमान लगा। वह सीधे मुझे अपने दादाजी के पास ले गए। इसका कारण मुझे दादाजी से परिचय के पश्चात ही ज्ञात हुआ। जयेश के ९२ वर्षीय दादाजी श्री वरसिंह माला राबरी, बेट द्वारका के एक पुस्तकालय में कार्यरत थे। दुर्भाग्यवश उस पुस्तकालय को २००७ में आये भूकंप ने पूर्णतः नष्ट कर दिया था। परन्तु ऐसा कहा जाता है कि ज्ञान कभी नष्ट नहीं होता। उसका जीता जागता उदाहरण थे स्वयं श्री वरसिंहजी। यह मेरा सौभाग्य था कि मेरी भेंट श्री वरसिंहजी से हुई तथा उनसे द्वारका व बेट द्वारका की कथाएं सुनाने मिलीं।

वरसिंहजी ने मुझे भाई मोहकम सिंह के विषय में भी जानकारी दी। भाई मोहकमजी गुरु गोबिन्दजी के पांच प्यारों में से एक थे तथा बेट द्वारका के निवासी भी थे। उनकी स्मृति में शंख सरोवर के समीप एक गुरुद्वारा भी निर्मित है। सिख धर्म की शपथ लिए ५ प्रथम सिखों को पांच प्यारे कहा जाता है। अतः बेट द्वारका सिख धर्म का पालन करने वाले भक्तों हेतु भी अति महत्वपूर्ण तीर्थस्थल है, यह कहना अतिशयोक्ति नहीं होगी। ।
बेट द्वारका की जनसंख्या लगभग १०००० है जिसमें ८००० मुसलमान तथा २००० हिन्दू धर्म का पालन करने वाले हैं। जहां मुसलमान समुदाय के अधिकतर लोग मछली पकड़ने का व्यवसाय करते हैं वहीं हिन्दुओं की गुजर-बसर द्वारकाधीश मंदिर की अर्थव्यवस्था पर निर्भर है। अतः आप कह सकते हैं कि कृष्ण अब भी उनका लालन पालन कर रहे हैं।
राबरी – यह गड़रियों का समुदाय कहीं न कहीं बेट द्वारका की ऐतिहासिक धरोहर है।
बेट द्वारका की यात्रा – कुछ सुझाव

- बेट द्वारका पहुँचने के लिए ओखा से नौका सवारी ही एकमात्र साधन है। द्वारका के मुख्य भूभाग से बेट द्वारका द्वीप के मध्य सेतु की योजना बन गयी है किन्तु इसके निर्माण में कुछ वर्ष लग सकते हैं।
- नौका सवारी प्रातः ६ बजे से सायं ७ बजे तक उपलब्ध रहती है। बेट द्वारका के अधिकतर मंदिर दोपहर में बंद रहते हैं तथा सायं ५ बजे के आसपास खुलते हैं। अतः प्रथम प्रहर, जब अधिक श्रद्धालू आते हैं तथा संध्या, मंदिर के पट खुलने के पश्चात नौका सेवायें अधिक हैं।
- मंदिर के भीतर चित्र खींचना मना है।
- बेट द्वारका में खाने-पीने की अधिक सुविधाएं उपलब्ध नहीं हैं। अतः मेरा सुझाव है कि आप प्रातः भरपेट नाश्ता कर यहाँ आयें तथा दोपहर भोजन के समय तक वापिस मुख्य द्वारका पहुँच जाएँ।
- बोतल-बंद जल उपलब्ध हैं किन्तु आप अपनी पानी की बोतल भर कर साथ ले जाएँ। यह अधिक उचित होगा।
- यूँ तो बेट द्वारका के द्वीप में आप ऑटो रिक्शा द्वारा भ्रमण कर सकते हैं। अपितु यदि आपके पास पर्याप्त समय हो तथा धूप कम हो तो आप आसानी से पदयात्रा भी कर सकते हैं।
- बेट द्वारका में रहने के लिए अच्छे होटल नहीं हैं। अधिकतर पर्यटक द्वारका के होटलों में ही रहते हैं।
- द्वारका से बेट द्वारका के लिए कई नियोजित यात्राएं हैं। आप उनका लाभ उठा सकते हैं।
अनुवाद: मधुमिता ताम्हणे
रुक्मिणी मंदिर – द्वारका की रानी से एक साक्षात्कार
बालपन से ही हमने पढ़ा व सुना था कि श्री कृष्ण की पहली रानी रुक्मिणी थी। कहने का अर्थ है कि उन्होंने सर्वप्रथम रुक्मिणी से विवाह किया था। तत्पश्चात आयीं सत्यभामा, जाम्बवती तथा अन्य। यह और बात है कि कृष्ण के लोकप्रिय चित्रों व प्रतिमाओं में आप उन्हें अधिकतर राधा के साथ ही देखेंगे। यद्यपि कुछ रूपों में कृष्ण रुक्मिणी के संग भी दर्शाये जाते हैं। जैसे कृष्ण के विट्ठल रूप के संग उनकी शक्ति रुक्मिणी उनके साथ रहती है। अतः कृष्ण के साथ राधा तथा रुक्मिणी दोनों के नामों को श्रद्धा के साथ लिया जाता है। एक ओर बृज भूमि में राधा का बोलबाला है। इसे राधाक्षेत्र भी कहा जाता है। वहीं दूसरी ओर द्वारका में कृष्ण के संग केवल रुक्मिणी को पूजा जाता है। राधा की भी कुछ प्रतिमाएं द्वारका में हैं किन्तु अधिकतर श्रद्धालू रुक्मिणी की ही आराधना करते हैं।

यह पहला अवसर था जब मैंने रुक्मिणी को दी जाने वाली प्राधान्यता का अनुभव किया। द्वारका में उनकी अनेक कथाएं प्रचलित हैं। द्वारकावासी उन्हें प्रेम से रुक्ष्मणि पुकारते हैं। मैंने द्वारका नगरी के सीमापार स्थित उनका मंदिर भी देखा। वहां एक फलक पर रुक्ष्मणि के विवाह संबंधी सूचना लिखी हुई थी। यह सब देख कर मेरा कौतुहल चरम सीमा तक पहुँच गया था। द्वारका से लौट कर प्रथम कार्य जो मैंने किया वह था रुक्मिणी के विषय में और पढ़ना तथा जानना। विदर्भ की राजकुमारी, महालक्ष्मी का अवतार तथा श्री कृष्ण की पटरानी इन नामों के सज्जित रुक्मिणी के विषय में कितना कुछ था जो मुझे ज्ञात नहीं था।
तो आईए रुक्मिणी देवी के सुन्दर मंदिर के दर्शन करने चलते हैं।
द्वारका का रुक्मिणी मंदिर

द्वारका के द्वारकाधीश मंदिर से २ की.मी. की दूरी पर रुक्मिणी का यह मंदिर स्थित है। आपको जानकर आश्चर्य होगा कि यह मंदिर द्वारका की सीमा में ना होते हुए नगर के बिलकुल बाहर बना हुआ है। हो सकता है कि प्राचीनकाल में यहाँ जंगल रहा हो। द्वारकाधीश के मुख्य मंदिर का समकालीन यह मंदिर अनुमानतः १२ वीं. शताब्दी में बनवाया गया है। वर्तमान में यहाँ केवल यह एक मंदिर है व समीप ही एक छोटा जल स्त्रोत है। मैंने इस जल स्त्रोत में कई पक्षी देखे जो इस मंदिर का साथ निभाते प्रतीत हो रहे थे।
रुक्मिणी मंदिर के शीर्ष पर एक ऊंचा शिखर है जिस पर प्राचीन नक्काशियां अब भी स्पष्ट देखी जा सकती हैं। शिखर के सम्पूर्ण सतह पर कई मदनिकाएं अर्थात् रूपवती स्त्रियों की नक्काशी है। वहीं मंदिर का आधार उल्टे कमल पुष्प के आकार का है। इस पुष्प के ऊपर हाथियों की कतार है जिन के ऊपर बने आलों के भीतर विष्णु की प्रतिमाएं बनी हुई हैं। आप समझ गए होंगे कि मैं अपने सम्मुख नागर पद्धति के वास्तुशिल्प का अभूतपूर्व चित्रण देख रही थी। शिखर के ऊपर फहराता चटक केसरिया ध्वज इस मंदिर की सुन्दरता को और बढ़ा रहा था।

समुद्र जल से होने वाले क्षरण के चिन्ह मंदिर के पत्थरों पर स्पष्ट दिखाई दे रहे थे।
मंदिर के शिखर से विपरीत मंडप का शीर्ष गुम्बदाकार है। मेरे अनुमान से इसका कारण हो सकता है, मध्यकालीन अनुवृद्धी अथवा मुख्य मंदिर का प्रतिस्थापन। मेरे कहने का अर्थ है कि या तो यह मंडप मध्य काल में जोड़ा गया होगा अथवा मुख्य मंदिर के स्थान पर नवीन संरचना की गयी होगी।
रुक्मिणी की गाथा

रुक्मिणी मंदिर में प्रवेश करते से ही वहां के पंडित आप को रोक कर सर्वप्रथम रुक्मिणी की कथा सुनायेंगे। तत्पश्चात छोटे छोटे जत्थों में आपको मुख्य मंदिर के भीतर प्रवेश की अनुमति देंगे। मंदिर के भीतर प्रवेश करते ही रुक्मिणीजी की मनमोहक छवि आपका मन मोह लेगी। मंदिर की भीतरी भित्तियों पर भी उनसे जुड़े अनेक प्रसंगों को सुन्दरता से चित्रित किया गया है। इनसे आप अनुमान लगा सकते हैं कि जनमानस में उनकी कितनी महत्ता है।
रुक्मिणी देवी मंदिर परिसर में मैंने एक और मंदिर भी देखा जो अम्बा देवी को समर्पित था। विशेष उल्लेख करना चाहूंगी, अम्बा देवी श्रीकृष्ण जी की कुलदेवी थी।

रुक्मिणी मंदिर के बाहर एक इकलौता मंडप था जिसका उद्देश्य मैं समझ नहीं पायी। मंदिर के बाहर साधुओं का एक झुण्ड बैठा हुआ था जिनके पास रुक्मिणी का चित्र भी था।

रुक्मिणी का मंदिर, द्वारका के मुख्य मंदिरों से भले ही छोटा हो किन्तु रुक्मिणी देवी के समान उनका मंदिर भी अपने आप में अनोखा है। अप्रतिम मंदिरों से भरी द्वारका नगरी के बाहर स्थित इस मंदिर की अपनी ही एक विशिष्टता है।
आखिर रुक्मिणी मंदिर द्वारका नगरी के बाहर क्यों बनाया गया?

इसके पीछे भी एक मनोरंजक कथा है। कहा जाता है कि यादवों के कुलगुरु, ऋषी दुर्वासा का आश्रम द्वारका से कुछ दूरी पर, पिंडारा नामक स्थान में था। एक बार श्रीकृष्ण व रुक्मिणी के मन में उनका अतिथी सत्कार करने की इच्छा उत्पन्न हुई। वे दोनों अपने रथ में सवार होकर ऋषी को निमंत्रण देने उनके आश्रम पहुंचे। ऋषि दुर्वासा का चिड़चिड़ा स्वभाव तथा त्वरित क्रोध किसी के छुपा नहीं है। दुर्वासा ऋषि ने कृष्ण रुक्मिणी का आमंत्रण स्वीकार तो किया किन्तु एक शर्त भी रख दी। शर्त थी कि उन्हें ले जाने वाले रथ को न तो घोड़े हांकेंगे ना ही कोई अन्य जानवर। बल्कि रथ को केवल कृष्ण व रुक्मिणी हांकेंगे। कृष्ण व रुक्मिणी ने उनकी मांग सहर्ष स्वीकार कर ली।
और पढ़ें – बेट द्वारका महाभारत की स्वर्णिम नगरी के दर्शनीय स्थल
चूंकि रुक्मिणी एक रानी थी, इन्हें रथ हांकने का कोई अनुभव नहीं था। कुछ समय पश्चात वे थक गयीं व प्यास से उनका कंठ सूखने लगा। उन्होंने कातर दृष्टी से कृष्ण की ओर देखा। स्थिति को भांप कर कृष्ण ने शीघ्र अपने दाहिने चरण का अंगूठा धरती पर दबाया। और वहीं गंगा नदी प्रकट हो गयीं। यहाँ रुक्मिणी से एक बड़ी भूल हो गयी। तृष्णा से वशीभूत रुक्मिणी दुर्वासा मुनि से जल ग्रहण का आग्रह करना भूल गयी तथा उनसे पूर्व, स्वयं ही जल ग्रहण कर लिया। यह देख दुर्वासा मुनि कुपित हो गए। उन्होंने तुरंत ही कृष्ण व रुक्मिणी को विछोह का श्राप दे डाला। यही कारण है कि रुक्मिणी का मंदिर कृष्ण मंदिर से दूर बनाया गया है। मानो वे अब भी दुर्वास मुनि के श्राप को जी रहे हों।

लोगों का कहना है कि कृष्ण व रुक्मिणी को श्राप देकर भी दुर्वासा मुनि का क्रोध शांत नहीं हुआ। उन्होंने द्वारका नगरी को भी बंजर हो जाने का श्राप दे दिया। उनके श्राप का प्रभाव आज भी यहाँ देखा जा सकता है। द्वारका के आसपास की धरती सूखी व बंजर है जिस पर कुछ उगता नहीं । यहाँ के लोग नमक बना कर अपना जीवन यापन करते हैं।
यह कथा है रुक्मिणी मंदिर के नगर बाहर स्थापना करने का कारण!
जैसा कि मैंने आपको मेरे बेट द्वारका के संस्मरण में बताया था, द्वारकाधीश मंदिर में भी रुक्मिणी, स्व:रूप में ना होकर, महालक्ष्मी रूप में विराजती हैं।
रुक्मिणी का पृथक् सा एक छोटा मंदिर गोपी तलाव में भी है।
रुक्मिणी देवी से जुड़ी कुछ और कथाएं
रुक्मिणी देवी से जुड़ी कुछ ३-४ कथाएं प्रसिद्ध हैं जो अधिकतर श्रीमद भागवत से आयी हैं।
कृष्ण – रुक्मिणी विवाह

रुक्मिणी विदर्भ की राजकुमारी थी। विदर्भ अर्थात् वर्तमान में नागपुर के आसपास का क्षेत्र। इसी कारण उन्हें वैदर्भी भी पुकारा जाता है। रुक्मिणी विदर्भ-राज भीष्मक की सुपुत्री थी। उनका विवाह चेदि राजा शिशुपाल के संग तय किया गया था। रुक्मिणी को यह विवाह स्वीकार्य नहीं था। उन्होंने नारद मुनि तथा कई अन्य महानुभावों से श्री कृष्ण के इतने गुणगान सुने थे कि उन्होंने कृष्ण संग विवाह का मन बना लिया था। भागवत पुराण के अनुसार, गुणों के आधार पर रुक्मिणी केवल कृष्ण को ही स्वयं हेतु योग्य वर मानती थी।
कहा जाता है कि भारतीय धर्मग्रंथों के अनुसार रुक्मिणी अब तक की सर्वाधिक सुन्दर स्त्री है। क्यों ना हो! वे महालक्ष्मी की अवतार जो हैं। लक्ष्मी के रूप में वे नारायण की शक्ति हैं तथा रुक्मिणी रूप में कृष्ण की।
रुक्मिणी पत्र

श्रीकृष्ण की ख्याति से प्रभावित होकर रुक्मिणी ने उन्हें अपना वर मान लिया था। शिशुपाल संग विवाह निश्चित किये जाने पर उन्होंने कृष्ण को एक प्रेम पत्र लिखा था जो कुल सात श्लोकों में सीमित था। पत्र में उन्होंने कृष्ण के समक्ष स्वयं का अपहरण कर ले जाने का आग्रह किया। विवाह पूर्व मंदिर दर्शन हेतु जाते समय अपहरण करने की भी सलाह दी। यह पत्र उन्होंने एक पत्रवाहक द्वारा भिजवाया था। कुछ का मानना है कि पत्रवाहक एक ब्राम्हण था तो कुछ के अनुसार रुक्मिणी ने यह पत्र हनुमान के हाथों भिजवाया था। कुछ लोग कहते हैं कि पत्रवाहक गरुड़ थे।
इस पत्र की छपी प्रति द्वारका के रुक्मिणी मंदिर में उपलब्ध है। मैंने इस पत्र का हिंदी संस्करण उठाया। श्वेत पन्ने पर लाल अक्षरों में लिखे इस पत्र में मूल ७ श्लोक तथा हिंदी में उनके अर्थ अंकित हैं। वैसे तो प्रकाण्ड पंडित घंटों इसकी व्याख्या कर सकते हैं। फिर भी इस पत्र में विस्तार पूर्वक की गयी अर्थ-विवेचना पर्याप्त है।
और पढ़ें – भारत के ५० नगर देवी के नाम पर आधारित
पत्र का आरम्भ रुक्मिणी ने श्रीकृष्ण गुणगान से किया है। तत्पश्चात प्रेम प्रकट कर उनसे विवाह करने की इच्छा व्यक्त की है। शिशुपाल संग उनके विवाह समारोह के मध्य अपहरण की योजना उन तक पहुंचाई। साथ ही भावी युद्ध तथा रक्तपात की आशंका भी जताई। जन्म जन्मान्तर तक उनकी प्रतीक्षा करते रहने के प्रण की जानकारी देते हुए उलाहना भी दी।
रुक्मिणी पत्र पठन
द्वारकाधीश मंदिर में प्रत्येक रात्री, कृष्ण की निद्रा पूर्व, इस पत्र का पठन किया जाता है। कहा जाता है कि इच्छित प्रेमी के संग विवाह की आस रखती प्रत्येक स्त्री को इसका पठन करना चाहिए।
कृष्ण-रुक्मिणी विवाह की कथा पर लौटते हुए आगे की घटना की चर्चा करते हैं। पूर्वयोजना अनुसार श्री कृष्ण रुक्मिणी के अपहरण में सफल हो गए। तत्पश्चात चैत्र मास की एकादशी को पोरबंदर के निकट स्थित माधवपुर खेड नामक एक गाँव में वे दोनों विवाह बंधन में बंध गए। द्वारका पहुंचकर कृष्ण व रुक्मिणी ने एक बार फिर अपना विवाह रचाया।
आज भी द्वारका में कृष्ण-रुक्मिणी विवाह का उत्सव धूमधाम से मनाया जाता है। प्रत्येक वर्ष इस दिन द्वारकाधीश मंदिर से कृष्ण की बारात निकलती है तथा रुक्मिणी मंदिर पहुंचती है जहां उनका विवाह-संस्कार किया जाता है। द्वारका सहित बेट द्वारका तथा माधवपुर खेड में भी यह प्रथा अनवरत चली आ रही है।
रुक्मिणी को ९ पुत्ररत्नों तथा एक सुपुत्री के मातृत्वसुख की प्राप्ति हुई। कालान्तर में उनका पुत्र प्रद्युमन श्री कृष्ण का उत्तराधिकारी बना।
तुलाभार

इस कथा के अनुसार एक बार नारद मुनि ने श्रीकृष्ण की तृतीय पत्नी सत्यभामा के मन में यह कहकर शंका उत्पन्न की, कि कृष्ण का रुझान रुक्मिणी की ओर अधिक है। कृष्ण के प्रति प्रेम सिद्ध करने हेतु उनके भार के बराबर संपत्ति दान देने के लिए कहा। चुनौती स्वीकार करते हुए सत्यभामा ने तुला के एक पलड़े पर कृष्ण को बैठने का आग्रह किया। किन्तु तुला के दूसरे पलड़े पर अपनी सम्पूर्ण संपत्ति रखने के पश्चात भी कृष्ण के भार को पार नहीं कर पायी। पराजय के भय से सत्यभामा ने कृष्ण की अन्य पत्नियों से मदद माँगी। उनकी सम्पूर्ण संपत्ति भी सत्यभामा की सहायता करने में असफल रही। अंततः हारकर सत्यभामा ने रुक्मिणी से सहायता करने का आग्रह किया।
कृष्ण के प्रति निश्छल प्रेम तथा अगाध भक्ति ह्रदय में लिए रुक्मिणी ने केवल एक तुलसी के पत्ते को तुला के दूसरे पलड़े पर रखा। और तुलाभार दूसरी ओर झुक गया! अतः कृष्ण को केवल भक्ती एवं समर्पण से पाया जा सकता है, ना कि धन संपत्ति द्वारा।
यह विरोधाभास ही है कि तुलाभार की प्रथा आज भी द्वारका में प्रचलित है। गोमती नदी के किनारे रखे एक तुलाभार पर भक्तगण अपने भार के बराबर ७ प्रकार के विभिन्न धान्य दीन-दुखियों को दान करते हैं। द्वारका यात्रा के समय इस प्रकार दान करना कथित रूप से मोक्ष प्राप्ति के लिए अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है।
पंढरपुर में रुक्मिणी

‘Talking Myths’ इस वेब पोर्टल के अनुसार रुक्मिणी को महाराष्ट्र के पंढरपुर तक लाने के पीछे भी एक मनोरंजक कथा है। कृष्ण की मुख्य रानी होने के कारण सर्व गोपियों तथा अन्य रानियों को रुक्मिणी का सम्मानपूर्वक अभिवादन करना आवश्यक था। एक बार जब वह कृष्ण के संग थी, राधा ने उठकर उनका अभिवादन नहीं किया। इससे क्रोधित होकर रुक्मिणी ने द्वारका छोड़ दी तथा रूठकर डिंडीर्वन आ गयी। डिंडीर्वन वर्तमान में पंढरपुर के नाम से जाना जाता है।
कहा जाता है कि कृष्ण, उनकी गउएँ, गंगा तथा गोवर्धन पर्वत भी रूठी रुक्मिणी को मनाने उनके पीछे पीछे चल दिए। अंततः कृष्ण उनको मनाने में सफल हो गए। तब दोनों ने मिलकर दही तथा मक्के से दहीकाला नामक पदार्थ बनाकर सब उपस्थित शुभचिंतकों को प्रीतिभोज कराया। इसी प्रथा को जीवंत रखते हुए आज भी वार्षिक पंढरपुर यात्रा के समय भक्तों को दहीकाला परोसा जाता है।
द्वारका में हुई कृष्ण-सुदामा की विशिष्ठ भेंट की गाथा कहते हुए भी रुक्मिणी का स्मरण किया जाता है। कृष्ण ने उनसे सुदामा को पंखा झलने का आग्रह किया था। उनके आतिथ्य-सत्कार के सर्व प्रबंध का उत्तरदायित्व भी कृष्ण ने रुक्मिणी को दिया था। यह और बात है कि रुक्मिणी द्वारा पंखा झलवाने के लिए आखिर सुदामा ने क्या किया, यह कईयों को असमंजस में डाल देता है।
रुक्मिणी से सम्बंधित और भी कई कथाएं होंगीं जिन्हें आप इस सूची में सम्मिलित करना चाहेंगे। मुझे आपके योगदान की प्रतीक्षा रहेगी।
हाजी किरमानी पीर, बेट द्वारका, द्वारका
40
अवलोकन
फोटो
आकर्षण
होटल
बेट द्वारका के पूर्वी तट पर हाजी पीर किरमानी धार्मिक स्थान है। यह स्थान
ईरान में स्थित किरमान के सूफी संत हाजी किरमानी पीर को समर्पित है।
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dwarka/attractions/haji-kirmani-pir-beyt-dwarka/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dwarka/attractions/haji-kirmani-pir-beyt-dwarka/#overview
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dwarka/attractions/gopi-talav/#photos
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dwarka/attractions/bhalka-tirtha-dehotsarg/#overview
BEYT ISLAND
Located around 30 km from the main town of Dwarka Beyt Dwarka is a small island and was the main port in the region before the development of Okha. While the island is enclosed by a few temples, white sand beach and coral reefs, the beach is also popular among tourists for its marine life, sea excursions, camping and picnics.
You can also enjoy water sports to make your trip a bit adventurous.

GOMTI GHAT, DWARKA
If the holy scriptures are to be believed, the Gomti River is none other than the Ganges, descending directly from heaven. The most sought after spots out of the various shrines and ghats this is the place where the river meets the mighty ocean.
The water is saline yet highly tempting and devotees and tourists alike have no option but to give in to the inviting waters and go for a holy dip.
Read more at: https://hindi.nativeplanet.com/dwarka/attractions/gomati-ghat-temples/

RUKSHMANI TEMPLE
A small structure is an important shrine dedicated to Krishna’s beloved consort, Rukmani Devi. Not as majestically gigantic, this shrine is an architectural masterpiece in itself.
The rich paintings on the walls depicting Rukmini and Krishna as old as the 12th century, the intricate carvings on the walls leave the beholder spell bound.
श्रीकृष्णांच्या विनंतीवरून विश्वकर्मा यांनी द्वारका नगरीचे निर्माण केल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णांच्या अवतारकार्य समाप्तीनंतर तत्कालीन द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली, असे सांगितले जाते. महाभारतकालीन एका कथेनुसार, रुक्मिणी देवीचे मंदिर द्वारका नगरीपासून लांब असल्यामागे एक विशिष्ट कारण असल्याचे सांगितले जाते. विवाहानंतर श्रीकृष्णाकडून एक चूक झाली होती. त्या चुकीमुळे रुक्मिणी आणि श्रीकृष्णांना १२ वर्षांपर्यंत वेगळे राहावे लागले होते. आता ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने कठोर तप केले होते, असेही सांगितले जाते.
यदुवंशी ऋषी दुर्वासा यांना कुलगुरू मानत असत. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरूंचे आशिर्वाद घेण्यासाठी ते दुर्वासा ऋषींच्या आश्रमात येतात. द्वारका नगरीत आदरातिथ्य करण्याची आणि सेवा करण्याचा मानस असल्याचे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना सांगतात. आजही द्वारकेपासून काही अंतरावर दुर्वासा ऋषींचा आश्रम असल्याचे आढळून येते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत. एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे.
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दिलेले निमंत्रण दुर्वासा ऋषी आनंदाने स्वीकारतात. मात्र, श्रीकृष्णासमोर एक अट ठेवतात. आपण दोघे ज्या रथातून या आश्रमात आला आहात, त्या रथातून मी येणार नाही. माझ्यासाठी दुसऱ्या रथाची व्यवस्था करावी, अशी अट दुर्वासा ऋषी श्रीकृष्णाला सांगतात. कोणतेही आढेवेढे न घेता श्रीकृष्ण दुर्वासा ऋषींची अट मान्य करतात. महाभारतात द्वारका नगरी या स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे.
दुर्वासा ऋषींचा आश्रमात येण्यासाठी श्रीकृष्णाने एकच रथ आणला होता. त्यामुळे त्या रथाला असलेले अश्व श्रीकृष्णाने बाजूला केले. त्याऐवजी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतः रथ ओढण्यासाठी सज्ज झाले. दुर्वासा ऋषींना विनंती केल्यानंतर ते रथारुढ झाले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना घेऊन द्वारकेकडे निघाले. द्वारकेच्या मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णाला ही बाब समजताच त्याने पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहार केला. तेथेच पाण्याचा तुषार उत्पन्न झाला. ते पाणी पिऊन रुक्मिणीची तृष्णा शमली. या गडबडीत दुर्वासा ऋषींना पाणी विचारायचे राहून गेले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी आपल्याला पाणी विचारले नाही, याचा दुर्वासा ऋषींना राग आला. आपला अपमान झाल्याच्या भावनेतून त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला शाप दिला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना १२ वर्षांपर्यंत एकमेकांचा विरह सहन करावा लागेल. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एकत्र नांदू शकणार नाही. जिथे गंगा नदीमुळे पाण्याचा तुषार निर्माण झाला आहे. तेथील संपूर्ण जमिनीचे वाळवंट होईल, असा शाप दुर्वासा ऋषींनी दिला. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी १२ वर्षे दूर राहिले. दुसरीकडे, रुक्मिणीने १२ वर्षांपर्यंत श्रीविष्णूंची कठोर तपश्चर्या केली. रुक्मिणीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शापमुक्त केले. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे येथे जलदान करण्याची मोठी परंपरा आहे.

GOPI TALAV
Legend has it that this is the lake where Krishna used to entice his Gopis (young female inhabitants) with his youthful pranks and romantic nature. About 20km, the lake is surrounded by sandal like yellow sand which is used by the devotees to make tilaks on their bodies. It is quite a pretty sight.

Read more at: https://hindi.nativeplanet.com/travel-guide/places-to-visit-in-porbandar-gujarat-hindi/articlecontent-pf22200-003191.html
Read more at: https://hindi.nativeplanet.com/travel-guide/places-to-visit-in-jamnagar-gujarat-hindi/articlecontent-pf23467-003442.html
Read more at: https://hindi.nativeplanet.com/travel-guide/top-5-tourist-places-to-visit-around-rajkot-gujarat/articlecontent-pf24574-003661.html
राजकोट के दर्शनीय स्थल – राजकोट के टॉप 25 पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक स्थल
सौराष्ट्र का एक प्रतिष्ठित क्षेत्र राजकोट भारत के प्रमुख पर्यटन स्थलों में से एक है। गुजरात के दूसरा प्रगतिशील शहरों होने के नाते, राजकोट के दर्शनीय स्थल और राजकोट के पर्यटन स्थलों के भ्रमण के लिए जाना जाता है। यह राज्य की पश्चिमी दिशा में स्थित एक सुंदर शहर है। यह भारत के ऐतिहासिक कस्बों में से एक है जिसमें महात्मा गांधी की गहरी यादें जुडी हैं, जिन्होंने राजकोट में अपनी पढ़ाई के लिए मूल्यवान समय बिताया था। इसलिए यह गुजरात के पर्यटन में एक अनिवार्य जगह के रूप में अपनी स्थिति बरकरार रखता है।
राजकोट गुजरात राज्य में अच्छी तरह से विविध पर्यटन स्थल है जो आतिथ्य के उच्च मानकों से आशीर्वादित है। इसमें धार्मिक स्थान, प्राकृतिक स्थान, उद्यान, पार्क, संग्रहालय, ऐतिहासिक स्मारक, बांध, शॉपिंग मॉल, बाजार और अन्य ऐसे गंतव्य हैं जो राजकोट की यात्रा करने के लिए पवित्र व उप्युक्त हैं। राजकोट भारत के सभी हिस्सों से अच्छी तरह से जुड़ा हुआ है। राजकोट भ्रमण या राजकोट दर्शन की योजना बनाने से पहले सुविधाओं, आकर्षण, होटल, भोजनालयों, और राजकोट के बारे में जानना, यात्रा करने का सर्वोत्तम समय और कैसे पहुंचे? यह सब जानना जरुरी होता इसलिए, इन सभी बिंदुओं को इस लेख के तहत शामिल किया गया है। और राजकोट के टॉप आकर्षक स्थलो की जानकारी दी गई है।

राजकोट के दर्शनीय स्थल
राजकोट के 25 रोचक पर्यटन स्थल
कबा गांधी नो डेला
कबा
गांधी नो डेलो यह गांधीजी के पूर्वजों का घर है (1880) जिसमें अब ‘गांधी
स्मृति’ है- एक स्मारक संग्रहालय जिसमें फोटोग्राफ और व्यक्तिगत प्रभाव
शामिल हैं।
करमचंद गांधी, मोहनदास कर्मचंद गांधी के पिता को राजकोट राज्य के दीवान
नियुक्त किया गया था। यही पर अपने माता पिता के साथ महात्मा गांधी का
शुरुआती बचपन गुजरा है। यह घर महात्मा के जीवन को चित्रकारी द्वारा हिन्दी
और गुजराती द्विभाषी कैप्शन के साथ प्रदान करता है। यहां एक गैर सरकारी
संगठन द्वारा परिसर के भीतर युवा लड़कियों के लिए सिलाई और कढ़ाई में
कक्षाएं चलाता है। यह स्थान राजकोट के दर्शनीय स्थल मे महत्वपूर्ण स्थान
रखता है।
जुबली गार्डन
जुबली गार्डन राजकोट के मध्य में स्थित है और राजकोट पर्यटन स्थलों का भ्रमण और पिकनिक स्थलो मे सबसे लोकप्रिय स्थलों में से एक है। जुबली उद्यान कई दुकानों और आकर्षण संग्रहालय, कनॉट हॉल, अल्फ्रेड हाई स्कूल, और लैंग पुस्तकालय के साथ एक बड़े मनोरंजन पार्क के रूप मे स्थित है। इसके अलावा यहां कई तरह के फूड कोर्ट, स्टाल आदि भी है। जिससे मनोरंजन के साथ साथ स्वाद का भी आनंद लिया जा सकता है। मनोरंजन पार्क बच्चों और वयस्कों दोनों के लिए सवारी की एक विस्तृत विविधता प्रदान करता है। इस उद्यान मे सर्दियों मे पक्षियों की कुछ दुर्लभ प्रजातियों भी देखने को मिलती है। इसके अलावा यह जगह शहर का एक प्रमुख व्यावसायिक केंद्र भी है।
वाटसन संग्रहालय और पुस्तकालय
वाटसन
संग्रहालय और लैंग पुस्कालय जुबली गार्डन मे ही स्थित है। जुबली गार्डन
में बिताए जाने वाले एक सुखद दिन के साथ शरीर और दिमाग को बढ़ाने का आदर्श
तरीका है। प्रकृति के सुंदर वातावरण के भीतर स्थित वाटसन संग्रहालय और लैंग
पुस्तकालय हैं। संग्रहालय का नाम काथीवाड़ में ब्रिसिथ राजनीतिक एजेंट के
सम्मान में रखा गया है, जिसने इस क्षेत्र के शाही परिवारों के उचित संरक्षण
के साथ ऐतिहासिक कलाकृतियों के दस्तावेज की शुरुआत की। संग्रह में विभिन्न
शाही परिवारों द्वारा दान किए गए पेंटिंग्स और कलाकृतियों, औपनिवेशिक शासन
का एक व्यापक यादगार और भारवाड़, अहिर, दरबार और प्रांत के अन्य स्वदेशी
लोगों को चित्रित वस्त्रों और गहने के साथ प्रभाव। सौराष्ट्र क्षेत्र के
आसपास विभिन्न साइटों से प्राप्त सिंधु घाटी सभ्यता कलाकृतियों का एक
दिलचस्प संग्रह भी है।
रानी विक्टोरिया की एक विशाल 19वीं सदी की संगमरमर की मूर्ति आकर्षक है।
सौराष्ट्र के शाही राजकुमारों और यूरोपीय गणमान्य व्यक्तियों, हस्तशिल्प,
मिट्टी के बर्तनों और रियासतों के कई शानदार चित्र और तस्वीरें भी यहां
मुख्य रूप से दर्शनीय हैं।

एजी बांध
एजी बांध राजकोट से 8 किलोमीटर दूरी पर स्थित है और शहर के पानी की आपूर्ति करता है। इसके अलावा यह राजकोट के दर्शनीय स्थल मे पर्यटकों द्वारा काफी पसंद किया जाता है। यहां ऊंचाई से गिरता पानी बहुत सुंदर दिखाई देता है।
सामुदायिक विज्ञान केंद्र और प्लेनेटरीयम
सामुदायिक विज्ञान केंद्र और प्लेनेटरीम एक गैर सरकारी संगठन द्वारा चलाया जाता है। जो सन् 1992 में स्थापित किया गया था। इसको स्थापित करने का उद्देश्य शैक्षिक कार्यक्रमों, कार्यशालाओं और संगोष्ठियों की सहायता से बच्चों को विज्ञान और गणित से संबंधित ज्ञान प्रदान करना है। इस समुदाय केंद्र में भी वैज्ञानिक और गणितीय वस्तुओं के साथ कई विज्ञान कथा कार्यक्रम प्रदर्शित किए जाते हैं। यह ऑडियो और वीडियो शो की मदद से ग्रहों की स्थिति और इसके प्रभावों के बारे में ज्ञान भी प्रदान करता है। इस केंद्र की टीम भी एड्स के महत्वपूर्ण मुद्दों पर बच्चों को शिक्षित कर रही है।
ऐश्वर्या मंदिर
ऐश्वर्या मंदिर राजकोट का एक छोटा मंदिर है, जो भगवान शिव को समर्पित है। यह जामनगर राजमार्ग के माधापार गांव में शहर से 10 किमी दूर स्थित है। इसकी सबसे लोकप्रिय विशेषता शिव लिंगम है, जिसे ‘स्वयंभू’ के रूप में पहचाना जाता है। यह राजकोट का एक प्रमुख पिकनिक स्थान भी है। इसके साथ-साथ, इस मंदिर में आयोजित एक वार्षिक मेला भी काफी लोकप्रिय है।
जगत मंदिर
जगत मंदिर श्री रामकृष्ण परमहंस का सुंदर नक्काशीदार मंदिर है। यह लाल पत्थरों से बना है। जिसकी कलाकृति बेमिसाल है। जगत मंदिर राजकोट के दर्शनीय स्थल मे प्रसिद्ध धार्मिक स्थल है।

नौलखा पैलेस
राजकोट से केवल 35 किमी दूर गोंडल शहर है। जो राजशाही लोगों के परिवार द्वारा शासित था, जिनके शाही जुनून के परिणामस्वरू कारो का एक अच्छा संग्रह हुआ जो अब इस भव्य महल परिसर में एक संग्रहालय का हिस्सा है। ऐसा शाही जुनून था कि गोंडल के पास पूर्वनिर्धारित गुजरात में सबसे अच्छी योजनाबद्ध और अच्छी तरह से डिजाइन की गई सड़क प्रणाली थी। नौलखा महल की शानोशौकत और भव्यता तो अनोखी थी। महल के मैदान एक निजी वन रिजर्व बनाते हैं जिसमें हिरण और पक्षियों की विविधता होती है जो जगह की शांति और सुंदरता में चार चांद लगाते है। नौलखा पैलेस महल नक्काशीदार मेहराबों की श्रृंखला पर बनाया गया है। पैलेस परिसर में पहुचने के लिए पत्थर की शानदार सीढियां बाई गई है। नौलखा महल का इंटीरियर आगंतुकों के लिए खुला है। जो बहुत ही शानदार है और पुराने महाराजा की भव्य जीवन शैली का अनुभव कराता है। नौलखा पैलेस राजकोट के दर्शनीय स्थल काफी देखा जाने वाला स्थल है।
हमारे यह लेख भी जरूर पढ़े:—
हैंगिंग ब्रिज
हैंगिंग
ब्रिज राजकोट के मोरबी में स्थित है। राजकोट से मोरबी की दूरी लगभग 63
किलोमीटर है। यह ब्रिटिश शासन के दौरान तार रस्सियों और लकड़ी से बना था।
पुल 165 फीट लंबा और 4.5 फीट चौड़ा है और माचछु नदी पर इसका निर्माण किया
गया है। पुल को पार करना आगंतुकों के लिए एक सनसनीखेज अनुभव है।
मोरबी में अन्य उल्लेखनीय आकर्षण मनी मंदिर, एक बहु-धार्मिक हिंदू मंदिर
हैं, इसके अलावा मोरबी मे वेलिंगटन सचिवालय अपने राजस्थानी प्रभाव के साथ
स्थित है। आर्ट डेको पैलेस का निर्माण 1931 में एक शानदार विविध इंटीरियर
के साथ किया गया था। मोरबी राजकोट के दर्शनीय स्थल मे एक पसंदीदा जगह है।
हिंन्गोल्गढ़ प्रकृति शिक्षा अभयारण्य
इस
अनूठे इलाके की सैर करने या प्रकृति शिक्षा शिविरों में भाग लेने के लिए
सर्दियों की शुरुआत तक मानसून की शुरुआत एक आदर्श अवधि है। यह अद्वितीय
पारिस्थितिक शिक्षा हेवन भौतिक विशेषताओं जैसे कि बढ़ते पहाड़ी ढलानों,
मिट्टी की विशेषताओं के पैटर्न, जल प्रवाह और वनस्पति (घास, जड़ी बूटियों,
झाड़ियों और स्क्रबबी) सहित खाद्य श्रृंखला पर इन विशेषताओं के प्रभाव को
देखने के लिए मूल्यवान अवसर प्रदान करता है। पेड़ और जानवरों की दुनिया
मुख्य रूप से वनस्पति द्वारा समर्थित है।
जबकि बुलबुल के सुन्दर गायन आपको एक झुंड के पीछे छिपे हुए शर्मीली गायन पर
ध्यान देते हैं, सावधान रहें और सतर्क रहें और सरीसृपों के साथ निकटता के
बारे में जागरूक रहें। प्रकृति का यह अद्वितीय अनियमित उद्यान भी सांप की
19 प्रजातियों का घर है और आपके सतर्क होने से यहां की यात्रा एक सुरक्षित
और यादगार यात्रा बनती है। राजकोट से हिन्गोल्गढ अभ्यारण्य की दूरी लगभग 70
किलोमीटर है।

जेतपुर
राजकोट से जेतपुर की दूरी लगभग 70 किलोमीटर है। जेतपुर राजकोट जिले का एक प्रसिद्ध नगर है। जेतपुर की प्रसिद्धि यहां होने वाले कपडों के रंगाई और छपाई के काम के कारण है। यह कोई पर्यटन स्थल नही है, लेकिन कपडो की रंगाई छपाई को देखने के इच्छुक सैलानी अक्सर जेतपुर की यात्रा करते है।
खंभालिदा गुफाएं
खंभालिदा गुफाएं भारत के गुजरात के राजकोट जिले में गोंडल के पास स्थित तीन बौद्ध गुफाएं हैं।
एक प्रमुख पुरातत्त्ववेत्ता पी पी पांड्या ने 1 9 58 में इन बौद्ध गुफाओं
की खोज की। इन गुफाओं को गुजरात राज्य के पुरातत्व विभाग द्वारा बनाए रखा
जाता है।
गुफाएं वसंत के तट पर छोटे पहाड़ियों के पैर पर स्थित हैं। वे चूना पत्थर
चट्टानों से बना है। तीन गुफाएं हैं, केंद्रीय में स्तूप होता है जिसे
चैत्य गुफा के नाम से जाना जाता है। चैत्य गुफा के द्वार के दोनों किनारों
पर बोधिसत्व की दो मूर्तियां हैं। बाईं तरफ, यह आंकड़ा शायद अशोक-जैसे पेड़
के नीचे एक महिला साथी और पांच परिचरों के साथ पद्मपनी है। एक टोकरी पकड़े
हुए बाईं ओर एक यक्ष-जैसे बौना है। दाईं ओर की आकृति शायद अशोक-जैसे पेड़
के नीचे वज्रपानी है जो समान परिचरों के साथ है। मादागढ़ के उपकोट गुफाओं
में मादा का विस्तृत बेल्ट आंकड़ों के समान है। वे कुशाना-क्षतपा काल की
मूर्तियों के साथ तुलनात्मक रूप से तुलनीय हैं और साथ ही कुछ देर से आंध्र
के व्यवहार की विशेषताएं भी हैं। माना जाता है कि गुफाएं 4 वीं या 5 वीं
शताब्दी ईस्वी में अस्तित्व में आ गई हैं।
लाल परी झील
लाल परी झील राजकोट से 5 किलोमीटर की दूरी पर एक सुरम्य पिकनिक स्पॉट है। तथा राजकोट के दर्शनीय स्थल मे प्रमुख स्थान रखता हैं।
मुक्ति धाम
मुक्ति धाम राजकोट की एक प्रसिद्ध विद्युत श्मशान स्थल है, जो न्यारी नदी के तट पर रामनाथ पैरा क्षेत्र में स्थित है। एक श्मशान स्थल होने के अलावा, इस जगह में एक पुस्तकालय भी शामिल है जिसमें आध्यात्मिक और धार्मिक विषयों से संबंधित किताबें हैं। मुक्ति धाम में तीन छतरी आराम बिंदु हैं जो गर्मी और बारिश के दौरान आश्रय प्रदान करते हैं। इन विश्राम बिंदुओं के खंभे विभिन्न देवताओं की मूर्तियों से सजाए गए हैं। पौराणिक घटनाओं से संबंधित कुछ पेंटिंग्स और मूर्तियां भी इस ‘धाम’ के परिसर में प्रदर्शित होती हैं। फूलों और झाड़ियों से सजाए गए इस साइट के बाहरी इलाकों में एक उद्यान भी है।
नेहरू गेट
नेहरू गेट को नगर दरवाजा भी कहा जाता है। यह घड़ी के साथ एक ऐतिहासिक वास्तुकला द्वार है, जिसमें महिमा और लालित्य दर्शाया गया है। यह गेट मोर्बी के ऐतिहासिक बाजार की ओर जाता है।
रेसकोर्स
रेसकोर्स राजकोट शहर के मध्य में स्थित एक बडे मैदान मे है। यहा बालभवन, बच्चे यातायात पार्क, फन वर्ड, आदि जैसे विभिन्न स्थानों, का घर है। यहा ओलंपिक की मानक इंडोर स्टेडियम, अंतर्राष्ट्रीय गुणवत्ता वाले क्रिकेट ग्राउंड, फुटबॉल मैदान, हॉकी जमीन और वॉलीबॉल जमीन जैसे विभिन्न खेल सुविधाओं, एक के साथ है जिम और स्विमिंग पूल भी है।
रयया नाका और बेदी नाका
रायया
नाका और बेदी नाका गेट राजकोट में स्थित एक पुराना किला है, जिसे 1722
ईसवी में जूनागढ़ के उप फौदर मसूम खान ने बनाया था। यह शहर के रामनाथ पैरा
क्षेत्र में स्थित है।
1892 में, इस किले का पुनर्निर्माण सर रॉबर्ट बेल बूथ ने किया था, जो
ब्रिटिश एजेंसी के मुख्य अभियंता थे। उन्होंने यहां तीन मंजिला घड़ी टावर
भी बनाया।
नवाब शासन के दौरान, 1720 ईस्वी में जुंगाध के डिप्टी फौजदार मसूम खान ने
राजकोट शहर पर विजय प्राप्त की थी। जिसने शहर मसूमाबाद का नाम बदलकर 1722
में एक किले का निर्माण किया था। किले की एक बाहरी दीवार थी जो लगभग 4 से 5
किमी चौड़ी थी और आठ बड़े द्वार थे, प्रत्येक बाहर लोहे की स्पाइक्स से
चिपके हुए थे। इनमें से केवल दो, राय नाका और बेदी नाका आज भी पुराने किले
के खंडहरों के बीच स्थित हैं। जो राजकोट के दर्शनीय स्थल मे महत्वपूर्ण
भूमिका निभाते हैं।
रामकृष्ण मठ
1 9वीं शताब्दी के मध्य में, रामकृष्ण परमहंस ने भारत के लोगों के बीच वैदिक दर्शन और सिद्धांतों को पुनर्जीवित करने के लिए तैयार किया। अपने कदमों के बाद, एक शांत परिसर में स्थित रामकृष्ण मिशन, राजकोट एक मूल्य आधारित शिक्षा प्रदान करता है, इसमें एक सार्वजनिक पुस्तकालय और आयुर्वेदिक केंद्र, के साथ ही गेस्ट हाउस और श्री रामकृष्ण परमहंस के जीवन को प्रदर्शित करने वाली स्थायी प्रदर्शनी है।
रमपारा वन्यजीव अभ्यारण्य
जंगली
घास के साथ शुष्क नदी के सीमावर्ती परिधि के चारों ओर पहाड़ियों के किनारे
के साथ चिह्नित रमपारा वन्यजीव अभयारण्य है। अभयारण्य को वर्ष 1983 में
‘रिजर्व वन’ की स्थिति मिली, इससे पहले यह एक शूटिंग रिजर्व के रूप में
कार्य करता था जो वानकर के पूर्व रियासत राज्य से संबंधित था, जिसे
केंद्रीय सौराष्ट्र भी कहा जाता है।
अभयारण्य का प्राकृतिक प्रसार विशाल एंटीलोप्स के पूरे दल के आवास के लिए
जाना जाता है और प्रसिद्ध है। झुंडों में चारों ओर घूमते हुए या जंगली
परिदृश्य में छिपकर ये जीवंत एंटीलोप्स भव्य जीव हैं जो उनके पतले शरीर और
छोटे फर के मोटी कोट के लिए जाने जाते हैं। अपने रमणीय कूद और छलांग के साथ
इलाके के चारों ओर घूमते हुए, एंटीलोप्स वातावरण में उत्साह और मधुुुर
धुुन जोड़ते हैं।
भेड़िया, जैकल, हिना, आम लोमड़ी, और नीले बैल जैसे अन्य जानवर इस अभयारण्य
के साथी निवासी हैं, साथ ही इस क्षेत्र में पक्षियों की 130 से अधिक
प्रजातियां पायी जाती हैं। पार्ट्रिज, आम पेफौल, अंगूठी कबूतर, बड़े भूरे
रंग के बब्बलर, बैंगनी सनबर्ड, पीले थ्रोटेड स्पैरो इस क्षेत्र में रहने
वाले पक्षियों की स्वदेशी किस्में हैं। राजकोट से रमपारा वन्यजीव अभ्यारण्य
की दूरी लगभग 54 किलोमीटर है। और राजकोट के दर्शनीय स्थल मे यह काफी
प्रसिद्ध है
राष्ट्रीयशाला
गांधीजी 1939 में अपने पूर्व स्कूली शिक्षा के स्थान पर राजकोट वापस लौटे, ताकि राष्ट्रीय संस्थान स्थापित करने में मदद मिल सके, कई संस्थानों में से पहला स्वराज के मूल्यों को उजागर कर रहा है और औपनिवेशिक शासन से आजादी की ओर अग्रसर गर्व की भावना पैदा कर रहा है। शाला (स्कूल) आज शिक्षा और व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करता है और खादी, कपास और मैनुअल तेल बनाने में बुनाई में परियोजनाएं शुरू कर दी है। शाला कि एक पहल ने स्थानीय बुनकरों को एकल इकत बुनाई की कला में भी पेश किया, जिससे इकत साड़ियों की एक विशिष्ट राजकोट शैली की शुरुआत हुई, जिसने बाजार में स्वीकृति प्राप्त की है।
डॉल म्यूजियम
रोटरी गुड़िया संग्रहालय, राजकोट। यह अद्वितीय संग्रहालय गुड़िया के माध्यम से बड़े पैमाने पर दुनिया की संस्कृति और परंपराओं के लिए एक सिंहावलोकन देता है। दुनिया भर में रोटरी क्लब ने इन गुड़िया को राजकोट मिडटाउन के रोटरी क्लब में उदारतापूर्वक दान दिया है। इस दृष्टि की कल्पना 2001 में रोटारियन श्री दीपक अग्रवाल ने की थी। इस रोटरी गुड़िया संग्रहालय पर गर्भधारण से लेकर जन्म तक पथ को विस्तार से देखने के लिए, जबकि दृष्टि एक गुड़िया संग्रहालय बनाने के लिए है जहां बच्चों और वयस्कों दोनों से लाभ प्राप्त होता है, मिशन अभी तक महान और सरल, प्यार, देखभाल और चिंता का विषय रहा है। राजकोट के दर्शनीय स्थल मे यह काफी रोचक स्थल है।
रांचीदादा बापू आश्रम
श्री रांचीदादा बापू आश्रम राजकोट में कुवादाव रोड पर स्थित है। यह आश्रम कई मानवीय और आध्यात्मिक गतिविधियों में शामिल है। यह आंखो के लिए एक धर्मार्थ ट्रस्ट और अस्पताल भी चलाता है। इस आश्रम के सबसे व्यस्त दिन गुरुवार हैं, जब यह बड़ी संख्या में विश्वासियों और आगंतुकों द्वारा भरा होता हैं।
स्वामीनारायण मंदिर
यह मंदिर 1998-99 में स्वामीनारायण संप्रदाय द्वारा बनाया गया था। यह महिला कॉलेज के पास कलावाड़ रोड पर स्थित है। इस मंदिर में राज्य के सबसे बड़े सभागारों में से एक है, जिसमें हजारों की क्षमता है।
वांकानेर
वांकानेर
की पूर्व रियासत राज्य राजकोट से 53 किमी दूर स्थित है। माचु नदी पर एक
मोड़ के चारों ओर घिरा हुआ है, इसलिए इसका नाम ‘वांक’ अर्थ है, झील
राजपूतों के शासनकाल के कारण सौराष्ट्र के कॉलर झलवार में एक क्षेत्र का
हिस्सा बन गया है।
वांकानेर रॉयल परिवार कला के संरक्षण के लिए जाना जाता है इंजीनियरिंग और
वास्तुकला में व्यक्तिगत रुचि थी, 1907 में उनकी राजमार्ग अमरसिंहजी द्वारा
डिजाइन रंजीत विलास पैलेस में उदाहरण दिया गया था। यह महल वांकानेर शहर के
नजदीक एक पहाड़ी की चोटी पर बनाया गया है जो एक उदार है विभिन्न
वास्तुशिल्प शैलियों का मिश्रण। गोथिक मेहराब ओरिएंटल संगमरमर बालकनी का
समर्थन करते हैं, टेरेस वाले पोर्टिकोस खेल डोरिक और आयनिक कॉलम और एक मुगल
गुंबद के साथ एक सात मंजिला घड़ी टावर। फ़्रैंको-इटालियन खिड़की के पैन
बाहरी बाहरी इलाकों को देखकर बाहरी इलाकों को ढंकते हैं जो पूरी तरह से
प्रजनन स्टैलियंस और क्लासिक ऑटोमोबाइल का एक अच्छा संग्रह है। महल वर्तमान
शाही परिवार द्वारा कब्जा कर लिया गया है, हालांकि खंडों को हथियार, भरवां
जानवरों, चित्रों और चित्रों, शाही चांदी के बर्तन और विदेशी फर्नीचर के
भव्य संग्रह का प्रदर्शन करने वाले संग्रहालय में परिवर्तित कर दिया गया
है।
दो महल गेस्ट हाउस, द रॉयल रेजीडेंसी और रॉयल ओएसिस अब हेरिटेज होटल हैं।
रॉयल ओएसिस माचछू झील के किनारे पत्तेदार पेड़ के एक शांत बगीचे, पक्षियों
के झुकाव और ठंडा, ध्यान शांत वातावरण के बीच स्थित है। यह कला डेको शैली
में एक भव्य इनडोर पूल भी है जो कि बीसवीं शताब्दी के शुरुआती चरण के
साथ-साथ महल के मैदानों के पास स्थित है। वांकानेर पुराने कथियावार की
आतिथ्य और भव्यता को दर्शाता है
राजकोट के दर्शनीय स्थल, राजकोट के पर्यटन स्थल, राजकोट टूरिस्ट प्लेस, राजकोट के आकर्षक स्थल, राजकोट में घूमने लायक जगह, राजकोट पर्यटन, राजकोट दर्शन, राजकोट भ्रमण, राजकोट की यात्रा, राजकोट के आसपास के दर्शनीय स्थल आदि शीर्षकों पर आधारित हमारा यह लेख आपको कैसा लगा हमे कमेंट करके जरूर बताएं। यह जानकारी आप अपने दोस्तो के साथ सोशल मीडिया पर भी शेयर कर सकते है।
https://alvitrips.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE/
राजकोट में घूमने के लिए बेस्ट जगहें – Famous Tourist Places in Rajkot in Hindi
Famous Tourist Places in Rajkot in Hindi : गुजरात के सौराष्ट्र क्षेत्र मे स्थित “राजकोट” गुजरात का चौथा सबसे बड़ा शहर है। यह शहर अपने पर्यटन स्थलों के अलावा, अपने उद्योगो, मिठाइयों, पारंपरिक स्नैक्स, नवरात्रि समारोह, हस्तशिल्प (चांदी का वर्क, पटोला बुनाई) के लिए भी काफी फेमस है। राजकोट में घूमने के लिए धार्मिक स्थलों से लेकर ऐतिहासिक स्मारकों तक कई विकल्प मौजूद है जो पर्यटकों को इसके इतिहास से परिचित कराती हैं, और इस क्षेत्र की प्राकृतिक सुन्दरता को महसूस करने का अवसर प्रदान करती है।
राजकोट को उस स्थान के रूप में भी काफी प्रसिद्धी हाशिल है,जहाँ महात्मा गांधी ने अपनी प्रारंभिक शिक्षा प्राप्त की थी। इसके अलावा राजकोट भारत के सबसे साफ़ शहरों में भी शामिल है जो इसे आकर्षण में चार चाँद लगाने का कार्य करता है। यदि आप अपनी फैमली या फ्रेंड्स के साथ घूमने के लिए गुजरात के बेस्ट टूरिस्ट प्लेसेस सर्च कर रहे है, तो आप राजकोट को अपनी ट्रिप के लिए सिलेक्ट कर सकते है।
तो आइये इस आर्टिकल में हम राजकोट के प्रसिद्ध पर्यटक और राजकोट की ट्रिप से रिलेटेड इन्फोर्मेशन को डिटेल में जानते है –
Table of Contents
राजकोट का इतिहास – History of Rajkot in Hindi
राजकोट का इतिहास का लगभग 1600 के आसपास से सुर्ख़ियों में आया है, जब राजकोट का गठन 1612 में जडेजा राजपूत कबीले द्वारा किया गया था, जिसने 1947 में भारत की आजादी तक उस स्थान पर शासन किया था।
जबकि राजकोट ब्रिटिश शासन के दौरान गुजरात, सौराष्ट्र और गुजरात के उत्तरी भागों के लिए भारतीय स्टेट एजेंसी का प्रशासनिक केंद्र भी था।
राजकोट में घूमने के लिए जगहें – Best Places To Visit In Rajkot in Hindi
खंभालिदा गुफाएं राजकोट – Khambhalida Caves Rajkot in Hindi

“खंभालिदा गुफाएं” राजकोट जिले में गोंडल शहर के पास स्थित है, जिन्हें राजकोट गुफाओं के रूप में भी जाना जाता है। ये गुफाएं तीन बौद्ध गुफाओं का एक समूह हैं, जिनमे से केंद्र गुफा का नाम चैत्य है और एक अन्य का नाम घिसा हुआ स्तूप है। यह गुफाएं लगभग 4 वीं या 5 वीं शताब्दी ईस्वी की मानी जाती है, जिन्हें चुना पत्थर की चट्टानों से काट कर बनाया गया था। बता दे खंभालिदा गुफाएं राजकोट के प्रमुख ऐतिहासिक स्थल में से एक है, इसीलिए इन गुफायों का रखरखाव पुरातत्व विभाग द्वारा किया जा रहा है।
जो भी पर्यटक राजकोट में घूमने के लिए सबसे अच्छी जगहें (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) सर्च कर रहे है उन्हें खंभालिदा गुफाएं की यात्रा अवश्य करनी चाहिये जो पर्यटकों और इतिहास प्रेमियों के लिए आकर्षण का केंद्र बनी हुई है।
खंभालिदा गुफाएं की टाइमिंग
- सुबह 8.00 बजे से शाम 6.00 बजे तक
खंभालिदा गुफाएं की एंट्री फीस
- नो एंट्री फीस
काबा गांधी नो डेलो राजकोट – Kaaba Gandhi no dello Rajkot in Hindi

यदि आप महात्मा गाँधी को अपना आइडल मानते है और राजकोट में यात्रा की शुरुआत उनकी स्मृतियों से करना चाहते है, तो आपको काबा गांधी नो डेलो से अपनी यात्रा शुरू करने की आवश्यकता है।
काबा गांधी नो डेलो वह स्थान है जहाँ गाँधी जी ने अपना बचपन बिताया था, जिसे आज गांधी स्मृति में एक संग्रहालय के रूप में बदल दिया गया है, जो तस्वीरों के माध्यम से उनके जीवन को प्रदर्शित करता है। एक संग्रहालय होने के अलावा, इमारत का उपयोग युवा लड़कियों के लिए सिलाई और कढ़ाई की कक्षाओं के लिए भी किया जाता है, जिन्हें आप काबा गांधी नो डेलो की यात्रा में प्रशिक्षण प्राप्त करते हुए देख सकेगें।
काबा गांधी नो डेलो की टाइमिंग
- सुबह 9.00 बजे से शाम 6.00 बजे तक
काबा गांधी नो डेलो की एंट्री फीस
- फ्री
प्रद्युम्न जूलॉजिकल पार्क राजकोट – Pradhyuman Zoological Park Rajkot in Hindi

राजकोट में लालपरी झील के पास स्थित “प्रद्युम्न जूलॉजिकल पार्क” या “राजकोट जूलॉजिकल पार्क” राजकोट के सबसे आकर्षक स्थल में से एक है। यह पार्क लगभग 37 एकड़ में फैला हुआ है, जिसमे विभिन्न प्रकार के वनस्पतियों और प्रवासी पक्षियों की प्रजातियों को देखा जा सकता है। इस पार्क के आसपास लालपारी झील और रविन्द्र झील नामक दो झीलें भी है, जो इसके आकर्षण में चार चाँद लगाने का कार्य करती है।
यह पार्क पर्यटकों के साथ साथ स्थानीय लोगो के सैर सपाटा के लिए और पिकनिक स्पॉट के रूप में काफी फेमस है।
यदि आप भी अपने बच्चो के साथ घूमने के लिए या फिर पिकनिक मनाने के लिए राजकोट की सबसे अच्छी जगहें (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) सर्च कर रहे है, तो प्रद्युम्न जूलॉजिकल पार्क आपके लिए बेस्ट ऑप्शन है। राजकोट जूलॉजिकल पार्क एक ऐसी जगह है, जहाँ आप अपनी फैमली के साथ प्राकृतिक सोंद्रयता के मध्य क्वालिटी टाइम स्पेंड कर सकते है और वर्ड वाचिंग जैसी अट्रैक्टिव एक्टिविटीज को एन्जॉय कर सकेगें।
प्रद्युम्न जूलॉजिकल पार्क की टाइमिंग
- सुबह 9.00 बजे से 6.00 बजे तक
प्रद्युम्न जूलॉजिकल पार्क की एंट्री फीस
- पर्यटकों के लिए : 10 रूपये
- बच्चो के लिए : 5 रूपये
रंजीत विलास पैलेस राजकोट – Ranjit Vilas Palace Rajkot in Hindi

रंजीत विलास पैलेस राजकोट के प्रसिद्ध पर्यटक स्थल (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) में से एक है। यह न केवल इतिहास और संस्कृति के लिहाज से महत्वपूर्ण है बल्कि परिवार या दोस्तों के साथ आउटिंग की योजना बनाने के लिए भी परफेक्ट जगह है।
लगभग 225 एकड़ में फैले हुए रंजीत विलास पैलेस का निर्माण महाराजा अमरसिंह जी द्वारा किया गया था, जिसे मुगल, डच, गोथिक और विक्टोरियन वास्तुकला के संयोजन के साथ बनाया गया था। पर्यटको को इस पैलेस के अन्दर जाने की अनुमति नही है, लेकिन पर्यटक इस पैलेस को बाहर से देख सकते है और इसके परिसर में घूम सकते है।
रंजीत विलास पैलेस की टाइमिंग
- सुबह 9.00 बजे से 6.00 बजे तक
रंजीत विलास पैलेस
- 30 रूपये प्रति व्यक्ति
और पढ़े : सोमनाथ मंदिर का इतिहास और रोचक तथ्य
गोंडल राजकोट – Gondal Rajkot in Hindi

राजकोट के दक्षिण में लगभग 35 किलोमीटर की दूरी पर स्थित “गोंडल शहर” राजकोट के प्रमुख पर्यटक स्थल (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) के रूप में लिस्टेड है, जहाँ हर साल हजारों की संख्या में पर्यटकों की उपस्थिति दर्ज की जाती है। यदि आप अपनी फैमली या दोस्तों के साथ 1 दिन की ट्रिप के लिए राजकोट के बेस्ट टूरिस्ट प्लेसेस सर्च कर रहे है, तो गोंडल आपकी ट्रिप के लिए बेस्ट ऑप्शन है।
गोंडल शहर ऑटोमोबाइल के संग्रह के साथ-साथ अपने कुशल सड़क नेटवर्क, रिवरसाइड पैलेस, दरबारगढ़, जैसे प्रसिद्ध पर्यटक स्थल और अपने हलचल भरे बाजारों के लिए जाना जाता है। जबकि इसकी घुमावदार गलियां शहर की सुन्दरता में चार चाँद लगाने का कार्य करती है। गोंडल शहर राजकोट में घूमने के लिए एक ऐसी जगह है जहाँ पर्यटक 1 दिन में इसके आकर्षक स्थल की यात्रा कर सकते है और गोंडल के फेमस मार्किट में शोपिंग करके अपनी ट्रिप को मेमोरिबल बना सकते है।
जगत मंदिर राजकोट – Jagat Mandir Rajkot in Hindi
रामकृष्ण परमहंस को समर्पित जगत मंदिर राजकोट के प्रमुख मंदिर और धार्मिक स्थल में से एक है, जो स्थानीय लोगो के साथ साथ देश के बिभिन्न कोनो से श्रद्धालुयों को आकर्षित करता है। जगत मंदिर एक सार्वभौमिक मंदिर है, जिसमे रामकृष्ण परमहंस के साथ साथ बिभिन्न देवताओं की मूर्तियां स्थापित है। यह मंदिर हिंदू, ईसाई, द्वीप और बौद्ध धर्मों को ध्यान में रखता है, इसीलिए सभी धर्मो के लोग यहाँ प्रार्थना के लिए आते है।
यह मंदिर अपनी धार्मिक विशिष्टतायों के साथ साथ अपनी वास्तुकला के लिए भी जाना जाता है। लाल पत्थर से बना मंदिर 60 स्तंभों पर खड़ा है जो ग्रेनाइट और बलुआ पत्थर से बने हैं जो अपने आप में अद्वितीय हैं। यही विशिष्टतायें इस मंदिर को पर्यटकों, श्र्धालुयों और कला प्रेमियों सभी के घूमने के लिए राजकोट की सबसे अच्छी जगहें में से एक बनाती है।
ईश्वरीय पार्क राजकोट – Ishwariya Park Rajkot in Hindi

ईश्वरीय पार्क राजकोट में घूमने के लिए एक और आकर्षक जगह है। इस पार्क को पर्यटकों के घूमने के लिए सन 2008 में खोला गया था, जिसका उद्घाटन गुजरात के तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया था। तब से इस सुंदर पार्क ने लाखो पर्यटकों को आकर्षित किया किया है।
77 एकड़ में फैले इस पार्क में शांत वातावरण और हरी भरी हरियाली के साथ साथ एक विशाल झील भी है, जहाँ पर्यटक नौका विहार को एन्जॉय कर सकते है। यह पार्क राजकोट की एक ऐसी जगह है, जहाँ आप अपने बच्चो के साथ पिकनिक के लिए और यंगस्टर्स अपने कपल के साथ रोमांटिक स्पेंड करने के लिए यहाँ आ सकते है। इन्ही अट्रेक्शनो को देखते हुए ईश्वरीय पार्क को फैमली, फ्रेंड्स और कपल्स के घूमने के लिए राजकोट की सबसे अच्छी जगहें (Best Places To Visit In Rajkot in Hindi) में शामिल किया गया है।
ईश्वरीय पार्क की टाइमिंग
- दोपहर 1.00 बजे से 8.00 बजे तक
ईश्वरीय पार्क की एंट्री फीस
- पर्यटकों के लिए : 20 रूपये
- बच्चो के लिए : 10 रूपये
स्वामीनारायण मंदिर राजकोट – Swaminarayan Temple Rajkot in Hindi

राजकोट जंक्शन से 4 किमी की दूरी पर, कालवाड़ रोड पर स्थित “स्वामीनारायण मंदिर” राजकोट का एक प्रसिद्ध हिंदू मंदिर है, जो भगवान स्वामीनारायण को समर्पित है। स्वामीनारायण मंदिर की स्थापना 1998 में बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण (BAPS) संस्था द्वारा की गई थी, इसलिए इसे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण के नाम से भी जाना जाता है।
यह मंदिर शहर का प्रमुख आस्था केंद्र होने के साथ साथ अपनी स्थापत्य प्रतिभा के लिए जाना जाता है, माना जाता है, इस मंदिर का निर्माण हाथ से बनाये हुए पत्थरों से किया गया था। यह मंदिर एक सामाजिक-आध्यात्मिक संगठन भी है, इसीलिए सभी धर्मों के लोग यहाँ आते है।
स्वामीनारायण मंदिर खुलने का समय
- सुबह 7.30 बजे से 10.15 तक
- 15 बजे से शाम 8.00 बजे तक
लालपारी झील राजकोट – Lal Pari Lake Rajkot in Hindi

राजकोट के बाहरी इलाके में स्थित “लालपारी झील” राजकोट का फेमस पिकनिक स्पॉट है, जहाँ पर्यटकों के साथ साथ स्थानीय लोग भी अपने बच्चो और फैमली के साथ पिकिनिक के लिए आते है।
जब भी आप लालपरी झील आयेगें तो यकीन माने इसकी खूबसूरती और मनोरम दृश्यों को देखकर एक पल के लिए आप सब कुछ भूलकर इसमें ही खो जायेगे।
यह झील वर्ड वाचिंग के लिए भी बेस्ट जगह है, क्योंकि यह झील कई प्रवासी पक्षियों को अपनी ओर आकर्षित करती है, जिन्हें आसानी से झीलों के किनारे से देखा जा सकता है।
और पढ़े: अहमदाबाद शहर के आकर्षक स्थलों की जानकारी
वाटसन संग्रहालय राजकोट – Watson Museum Rajkot in Hindi

जुबली गार्डन के पास स्थित “वाटसन संग्रहालय” राजकोट के सबसे दिलचस्प स्थानों में से एक है। यह संग्रहालय गुजरात के सबसे पुराने संग्रहालयों में से एक भी माना जाता है, जो राजकोट रियासत के संस्थापक और जडेजा राजपूत वंश के कई कलाकृतियां और सामान को प्रदर्शित करता है। यदि आप इतिहास में दिलचस्पी रखते है और राजकोट में घूमने के लिए जगहें (Best Places To Visit In Rajkot in Hindi) सर्च कर रहे है तो आपको इस संग्रहालय की यात्रा जरूर करनी चाहिये।
इस संग्रहालय का प्रबंधन राज्य सरकार द्वारा किया जाता है जिसे राज्य की लंबी और समृद्ध सांस्कृतिक विरासत के हिस्से के रूप में संरक्षित किया है। इस संग्रहालय में एक पुस्तकालय भी है, जहाँ से आप संग्रहालय द्वारा प्रकाशित पुस्तको को पढ़ या खरीद सकते है।
वाटसन संग्रहालय की टाइमिंग
- सुबह 9.00 बजे से 12.45 बजे तक और 3.00 बजे से शाम 6.00 बजे तक
- जब यह म्यूजियम प्रत्येक बुधबार और नॅशनल हॉलिडे में बंद रहता है।
वाटसन संग्रहालय की एंट्री फीस
- 10 रूपये प्रति व्यक्ति
न्यारी डेम राजकोट – Nyari Dam Rajkot in Hindi
यदि आप राजकोट के प्रमुख पर्यटक स्थल (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) की यात्रा में किसी ऐसी जगह को सर्च कर रहे हैं, जहाँ आप अपनी फैमली या दोस्तों के साथ आरामदायक समय बिता सके, तो इसके लिए आप अपनी यात्रा में कुछ समय निकालकर न्यारी डेम अवश्य जायें।
राजकोट से 5 किमी की दूरी पर स्थित न्यारी डेम राजकोट की सबसे आकर्षक जगहें में से एक है, जो पर्यटकों और स्थानीय लोगो दोनों के लिए समान रूप से लोकप्रिय बना हुआ है। यह जगह वर्ड वाचर्स ओर कपल्स को भी काफी अट्रेक्ट करती है, क्योंकि यहाँ कपल्स शाम के समय रोमांटिक समय बिताना बेहद पसंद करते है।
रोटरी डॉल म्यूजियम राजकोट – Rotary Dolls Museum Rajkot in Hindi

रोटरी डॉल म्यूजियम राजकोट के प्रसिद्ध पर्यटक स्थल (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) और दिलचस्प स्थानों में से एक है। इस म्यूजियम में बिभिन्न देशो से लायी गयी 1000 से भी अधिक गुड़ियों का संग्रह है, जो पर्यटकों को यहाँ आने के लिए मजबूर कर देती है। बता दे इस संग्रहालय में प्रत्येक गुड़िया अद्वितीय है क्योंकि वे दुनिया भर की विभिन्न परंपराओं और संस्कृतियों की कहानियों को बताते हैं।
इस म्यूजियम में एक सिनेमैथिक भी दिखाया गया है जो डिस्कवरी चैनल, नेशनल जियोग्राफिक चैनल, ब्रिटानिका और कई अन्य द्वारा बनाई गई फिल्मों और वृत्तचित्रों को निभाता है। रोटरी डॉल म्यूजियम राजकोट में घूमने के लिए एक ऐसी जगह है, जिसे आप अपने परिवार, दोस्तों और खासकर अपने बच्चो के साथ घूमने जा सकते है, यकीन माने यह म्यूजियम आपको और आपके बच्चो को बेहद आकर्षित करेगा।
रोटरी डॉल्स म्यूजियम की टाइमिंग
- 30 बजे से 1.00 बजे तक और शाम 4.00 बजे से 7.30 (जबकि प्रत्येक सोमबार बंद रहता है)
रोटरी डॉल्स म्यूजियम की एंट्री फीस
- पर्यटकों के लिए : 25 रूपये प्रति व्यक्ति
- बच्चो के लिए : 15 रूपये
राष्ट्रीय शाला राजकोट – Rashtriya Shala Rajkot in Hindi

राजकोट में डॉ. याज्ञिक रोड पर स्थित राष्ट्रीय शाला निश्चित ही राजकोट के प्रमख पर्यटक स्थल (Famous Tourist Places in Rajkot in Hindi) में से एक है। यह जगह खासकर उन पर्यटकों के लिए महत्वपूर्ण स्थान रखती है, जो राष्ट्रपिता महात्मा गांधी के बिचारो से प्रभावित है और उनके बारे अधिक जानने के लिए दिलचस्पी रखते है। 66 एकड़ भूमि क्षेत्र में फैला हुआ राष्ट्रीय शाला एक ऐसा संस्थान है, जिसके बारे में माना जाता है कि इसकी स्थापना हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ने 1921 में की थी। वर्तमान में राष्ट्रीय शाला राजकोट का प्रसिद्ध पर्यटक स्थल होने के साथ साथ संस्थान छात्रों को व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करने वाला एक शैक्षिक केंद्र भी है।
राष्ट्रीय शाला की टाइमिंग
- सुबह 8.00 बजे से 6.00 बजे तक
राष्ट्रीय शाला की एंट्री फीस
- फ्री
और पढ़े : महाराष्ट्र का “मिनी गोवा” के नाम से फेमस अलीबाग में घूमने की बेस्ट जगहें
फनवर्ल्ड राजकोट – Funworld Rajkot in Hindi

फनवर्ल्ड, राजकोट शहर में स्थित, गुजरात का पहला मनोरंजन पार्क है, जिसे 1986 में सार्वजनिक उपयोग के लिए डिज़ाइन और उपलब्ध कराया गया था। फनवर्ल्ड फैमली या फ्रेंड्स के साथ एक रोमांचक दिन बिताने के लिए परफेक्ट जगह है, जहाँ बच्चो से लेकर बुढो तक सभी वर्ग के लोगो के लिए बहुत कुछ है।
इसीलिए यह जगह स्थानीय लोगो के साथ साथ राजकोट के प्रसिद्ध पर्यटक स्थल की यात्रा पर जाने वाले पर्यटकों के लिए भी आकर्षण का केंद्र बना हुआ है जहाँ हर साल लगभग 1.2 मिलियन पर्यटकों की अटेंडेंस नोट की जाती है।
फनवर्ल्ड की टाइमिंग
- दोपहर 3.00 बजे से रात 11.00 बजे तक
फनवर्ल्ड की एंट्री फ़ीस
- पर्यटकों के लिए : 20 रूपये प्रति व्यक्ति
- बच्चो के लिए : 15 रूपये
लैंग लाइब्रेरी राजकोट – Lang Library Rajkot in Hindi

राजकोट के जवाहर रोड पर स्थित, “लैंग लाइब्रेरी” शहर की सबसे पुरानी लाइब्रेरी है, जो प्राचीन साहित्य के अनमोल संग्रह का दावा करता है। यह लाइब्रेरी उन लोगों के लिए एक बेस्ट जगह है जो खुद को पाठकों या साहित्य के पारखी मानते हैं। लैंग लाइब्रेरी में चर्मपत्रों और स्याही से लिखी गयी देहाती पुस्तको का अद्भुद संग्रह है, जो देश भर के पर्यटकों और कवियों के लिए आकर्षण का केंद्र बना हुआ है।
इस पुस्तकालय की ज्यादातर पुस्तके, काठियावाड़ी और गुजराती साहित्य पर आधारित है ,जो औपनिवेशिक युग के बारे में काल्पनिक और संदर्भ सामग्री का एक व्यापक भंडार है। आपको जानकार हैरानी हो सकती है इस लाइब्रेरी में तीन लाख से भी अधिक पुस्तकें मौजूद है जो अपने आप में एक आकर्षण है।
लैंग लाइब्रेरी की टाइमिंग
- सुबह 9.00 बजे से शाम 7.00 बजे तक
अनलगढ़ हिल राजकोट – Analgarh Hill Rajkot in Hindi

अनलगढ़ हिल राजकोट के पास गोंडल शहर से 17 किमी की दूरी पर स्थित एक छोटा हिल स्टेशन है, जो स्थानीय लोगो के लिए ऑफ बीट डेस्टिनेशन के रूप में कार्य करती है। यह जगह शहर की भीड़ भाड़ से दूर है,जो इसे फैमली के साथ घूमने के लिए राजकोट के सबसे आकर्षक जगहें (Best Places To Visit In Rajkot in Hindi) में से एक बनाती है।
जब भी आप यहाँ आयेंगें तो घाटी से नीचे के सुंदर दृश्यों का आनंद लेते हुए सुरम्य वातावरण में अपने परिवार के साथ क्वालिटी टाइम स्पेंड कर सकते है। इस घाटी में एक प्राचीन हिंदू मंदिर भी है, जहाँ कई भक्तों और तीर्थयात्रियों द्वारा दौरा किया जाता है।
यह जगह तीर्थ यात्रियों और पर्यटकों के साथ साथ कपल्स को भी बड़ी संख्या में अट्रेक्ट करती है, जहाँ अक्सर कपल अपनी गर्लफ्रेंड या बॉयफ्रेंड के साथ रोमांटिक और क्वालिटी टाइम स्पेंड करने के लिए आते है।
राजकोट घूमने जाने के लिए सबसे अच्छा समय – Best time to visit Rajkot in Hindi

यदि आप अपनी फैमली या फ्रेंडस के साथ राजकोट के प्रसिद्ध पर्यटक स्थल घूमने जाने के लिए बेस्ट टाइम सर्च कर रहे है, तो हम आपकी जानकारी के लिए बता दे अक्टूबर से मार्च तक का समय राजकोट घूमने जाने के लिए सबसे अच्छा समय होता है। इस दौरान राजकोट का मौसम काफी सुखद होता है और टेम्प्रेचर भी 10 डिग्री सेल्सियस से 30 डिग्री सेल्सियस के आसपास रहता है जो राजकोट के दर्शनीय स्थल के लिए परफेक्ट होता है।
और पढ़े: वडोदरा के पर्यटन स्थल
राजकोट में रुकने के लिए होटल्स – Hotels in Rajkot in Hindi

राजकोट में रुकने के लिए होटल्स को सर्च करने वाले टूरिस्टों को बता दे, राजकोट में लो बजट से लेकर हाई बजट तक सभी टाइप की होटल्स अवेलेबल है, जिनका आप अपनी चॉइस और बजट के अनुसार से सिलेक्शन कर सकते है।
- होटल सिल्वर पैलेस (Hotel Silver Palace)
- प्राइड रिसॉर्ट एंड कन्वेंशन सेंटर (Pride Resort & Convention Center)
- होटल प्लेटिनम (Hotel Platinum)
- निराली रिसॉर्ट्स (Nirali Resorts)
राजकोट केसे पहुंचें – How to Reach Rajkot in Hindi
यदि आप अपने फ्रेंड्स के साथ राजकोट के बेस्ट टूरिस्ट प्लेसेस घूमने जाने का प्लान बना रहे है,और सर्च कर रहे है की हम राजकोट केसे जायें ? तो हम आपकी इन्फोर्मेशन के लिए बता दे, आप फ्लाइट, ट्रेन या रोडवे में से किसी से भी ट्रेवेल करके राजकोट जा सकते है।
तो आइये नीचे डिटेल में जानते की हम फ्लाइट, ट्रेन या रोडवे से राजकोट केसे पहुंचे-
राजकोट फ्लाइट से केसे जायें – How to Reach Rajkot by Flight in Hindi

यदि आपने राजकोट घूमने जाने के लिए फ्लाइट का सिलेक्शन किया है, तो हम आपको बता दे राजकोट में एक एक घरेलू हवाई अड्डा है जो भारत में कई हवाई अड्डो से जुड़ा है। लेकिन यदि आप किसी इंटरनेशनल एयरपोर्ट से फ्लाइट लेने वाले है तो इसके लिए आपको मुंबई एयरपोर्ट के लिए फ्लाइट लेनी होगी।
ट्रेन से राजकोट केसे जायें – How to Reach Rajkot by Train in Hindi

ट्रेन से ट्रेवल करके राजकोट की यात्रा पर जाने वाले पर्यटकों को बता दे राजकोट में अपना खुद रेलवे जंक्शन मौजूद है जो कई एक्सप्रेस और सुपर फ़ास्ट ट्रेनों से राज्य और देश के प्रमुख शहरों से जुड़ा है इसीलिए ट्रेन से ट्रेवल करके राजकोट जाना बेस्ट ऑप्शन है।
राजकोट सड़क मार्ग से केसे पहुचें – How to Reach Rajkot by Raod in Hindi

राजकोट राज्य के विभिन्न शहरों से सड़क मार्ग से अच्छी तरह से जुड़ा हुआ है, इसलिए देश के किसी भी हिस्से से राजकोट की यात्रा करना काफी आसान है। राजकोट के लिए गुजरात के सभी प्रमुख शहरों से नियमित रूप से बसें भी संचालित की जाती है जिनसे कोई भी यात्रा करके आसानी से राजकोट पहुच सकता है। बस के अलावा पर्यटक अपने कार या एक टेक्सी बुक करके भी राजकोट जा सकते है।
और पढ़े : गुजरात में घूमने की 17 ऐसी जगह, जहां आपको जरुर जाना चाहिए
इस आर्टिकल में आपने राजकोट की यात्रा और राजकोट के आकर्षक स्थल के बारे में जाना है आपको हमारा ये आर्टिकल केसा लगा हमे कमेंट्स में जरूर बतायें।
इसी तरह की अन्य जानकारी हिन्दी में पढ़ने के लिए हमारे एंड्रॉएड ऐप को डाउनलोड करने के लिए आप यहां क्लिक करें। और आप हमें फ़ेसबुक और ट्विटर पर भी फ़ॉलो कर सकते हैं।
https://hindi.holidayrider.com/famous-tourist-places-in-rajkot-in-hindi/
गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान
कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.
गिरनार बद्दल नक्की कधी ऐकले होते लक्षात नाही पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडे श्री. प्रमोदजी केणे यांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक वाचायला मिळाले व गिरनार विषयी उत्सुकता वाढली. तरीही गिरनार इथून किती लांब आहे, शिवाय १०हज्जार पायऱ्या चढायच्या.. छे.. हे काही आपल्याने होणार नाही म्हणून सोडून दिलेले.. प्रमोदजींना आलेले अनेक दिव्य अनुभव वाचून लोक भारावून गिरनारला जातात.. तसे माझे काही झाले नव्हते.. आणि हे त्यांचे अनुभव त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याईच्या शिदोरीमुळे होते.. सगळ्यांना थोडी येतात ते.. माझे व्यावहारीक मत.. शिवाय अश्या अनुभवांमुळे नक्की काय फरक पडतो जीवनात तेही माहीत नाही.
पण मग गिरनार विषयी गुगलवर वाचत गेले, जेंव्हा जेंव्हा जे जे वाचायला मिळेल ते वाचत होते. त्यात असे कळाले की पायऱ्या कठीण असतात वारा जोराचा वहात असतो, शिखर खूप उंच आहे, रस्ता एकदम घनदाट जंगलातून जातो. जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी वन्य श्वापदे मार्गावर दिसतात.. का कुणास ठाऊक पण दाट जंगल म्हटले की मला त्याची ओढ लागते.. भीतीही वाटतेच.. पण जंगलात जायला, रहायला मनापासून आवडते. त्यामुळे अजुनच जावेसे वाटायला लागले. त्यात अचानक ध्यानी मनी नसताना माझ्या सासुबाई आणि माझ्या २ नणंदा गिरनारवर जाऊन आल्या.. त्यांचा उत्साह पाहुन माझी इच्छा आणखीन प्रबळ झाली.. ६० च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासुबाई लीलया गिरनार चढून उतरल्या.. मग आपण का बर कच खावी असं वाटायला लागलं.. (सासुबाईंची क्षमता आणी इच्छाशक्ती अफाट आहे हे अलहिदा.)
मग काय सगळ्यांना सांगून झालं की कुणी जाणारं असेल गिरनारला तर मला सांगा, मलापण यायचं आहे. साधारण ३ एक महिन्यांपुर्वी आमच्या पुर्वी शेजारी रहाणाऱ्या काकुंचा फोन आला.. पुण्याहून एक ग्रुप नोव्हेंबरमधे जातोय तर आपण जायचं का. तेव्हा माझ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं पण नोव्हे. पर्य्ंत ते कमी होणार होतं, तेंव्हा सुट्टी मिळण्याची शक्यता होती.. मी हो म्हणून टाकलं. मनी विचार केला पुढचं पुढे पाहू..
पण लगेचच त्यांचा दुसरा फोन आला की नवरात्रापर्यंत त्यांच नक्की काय ते ठरेल.. काही अडचणींमुळे त्यांचं नक्की होत नव्हत.. झालं मी थोडी थोडी माहीती वाचायला सुरवात केलेली, सकाळी लवकर उठून चालायला जाण्याची मनाची तयारी करत असतानाच (हो, मला आधी लवकर उठण्यासाठी मनाची तयारी करावी लागते, मग शरीराची.. लै अवघड काम असतंय ते) काकूंनी अस सांगितल्यामुळे परत सगळ शांत झाल.. कांकू दिवाळी दरम्यान जाण्यासाठी मोकळ्या झाल्या आणी आता परत आमच जाण्याच ठरू लागलं.. त्या ग्रुपला फोन केला तर जागा नव्हती ती लोकं ८ तारखेलाच निघणार होती.
शेवटी आम्ही आमचं जायचं ठरवलं आणि १२, १३,१४ ची तिकिटे काढली.. जातानाची वेटिंगवर होती तर येतानाची कन्फर्म झालेली. आता ऑफीसमध्ये सांगून सुट्टी टाकून, कामे मॅनेज करून परत चालण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, मनाची, शरिराची थोडी थोडी तयारी सुरु केली. नेटवर वाचताना असे लक्षात आले की कार्तिकी पौर्णिमा दत्तदर्शनासाठी महत्वाची मानली जाते, त्यामुळे तिथे खुप गर्दी असणार.. आम्ही रहाण्याचे तिथे गेल्यावर पाहू असे ठरवले होते कारण अनेक धर्मशाळेत सहज जागा उपलब्ध होते, पण आता तसे चालणार नव्हते.. मग परत शोध सुरु झाला.. ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो, त्यांची काकुंशी अधीची ओळख होती म्हणून त्यांनाही विचाराचे ठरले कारण ते निघणार तेंव्हा आम्ही गिरनारला पोहोचत होतो, त्यांच्यापैकीच एखादी खोली आम्हाला मिळाली असती तर काम सोपे होणार होते. ऑनलाईन धर्मशाळा फुल दिसत होत्या.. काकुंनी त्यांना फोन केला तर त्या म्हणाल्या असे नाही होऊ शकणार पण ऐनवेळी ३ जणांनी रद्द् केल्याने जागा आहे तेंव्हा तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. जातानाची ३ तिकिटे आहेत आमच्याकडे फक्त येतानाची २ च् आहेत एकाच तात्काळमध्ये पहावं लागेल.
हे सगळे ६ तारखेला चालले होते आणि ही लोकं ८ तारखेला निघणार होती. मी तारखा पाहिल्या तर मला जास्तीची सुट्टी टाकावी लागणार नव्हती पण सुट्टी अलिकडे मात्र घ्यावी लागणार होती.. एक कांम नेमके शुक्रवारी किंवा सोमवारी येऊ शकत होते, आता परत डेव्हलमेंट टिम, आमचा ऑनसाईट असलेला माणूस, मॅनेजर या सर्वांशी परत बोलावे लागणार होते.. अधीची मंजूर झालेली रजा परत कॅन्सल करणे, नव्याने रजा टाकणे, कामाची आखणी करणे आले. पण सर्वांनीच सहकार्य दिले आणि ६ तारखेला संध्याकाळी ग्रुप बरोबर ८ तारखेच्या संध्याकाळच्या गाडीने निघण्याचे नक्की झाले.
हे सगळे होईस्तोवर Open SAP teamचा इमेल आला.. मी एका कोर्ससाठी नाव नोंदणी केली होती तो बरोबर ६ तारखेपासून सुरु होणार होता आणि पहिल्या आठवड्याचे साहित्य आणि सराव परिक्षा नेटवर उपलब्ध झाले होते. सराव परीक्षा १४ तारखेच्या आत द्यायची होती.. आम्ही १३ला रात्री येणार म्हणजे जायच्या आधी हे सगळे पुर्ण करायला हवे होते..
७ तारखेचा दिवस यातच गेला आणि ८ला दुपारी आम्ही निघणार होतो.. तयारी तर शुन्य होती.
आधी १२ तारखेच ठरलेलं तेंव्हा शनि, रवि हातात असणार होते.. तेंव्हा मायबोलीवर एकीचा गिरनारचा प्रवास वाचायला सुरू केलेली.. तिने बरीच शारीरीक तयारी, आखीव व्यायामाचे नियोजन वगैरे केलेले.. ते आठवले आणि ताण यायला लागला.. इतका की संध्याकाळी पित्ताने डोके दुखी वाढली.. याला अजुन एक कारण होते.. आम्ही गिरनारचा विचार केलेला तो गुरुशिखर चढून पादुकांचे दर्शन घेण्याचा.. पण ह्या ग्रुपमधे परिक्रमाही होती ज्यासाठी ३८ ते ४० किलोमीटर चालावे लागते.. दोन्ही कसं जमणार, परिक्रमा तर आधी होती आणि मग गुरुशिखर.. म्हणजे परिक्रमेने दमलो तर गुरुशिखरावर पाणी सोडावे लागणार होते आणि ते मन मानायला तयार होत नव्हते.. शेवटी मनाची तयारी केली कि परिक्रमा वर्षातून फक्त ५ दिवस - कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंतच करता येते तेंव्हा तिला प्राधान्य द्यायचे गुरुशिखरावर १२ही महिने जाता येते तेंव्हा तिथे परत जाता येईल.
मनाला आश्वस्त करित ८ तारखेला घरची कामे मार्गी लावीत तयारी पुर्ण केली. ८ तारखेला घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने अनेक गोष्टी कमी वेळात मार्गी लावणे शक्य झाले.
अगदी निघायच्या वेळी बॅग भरत २.३०ला निघणारे आम्ही ३ ला मार्गस्थ झालो.
मला जसे आठवत होते तशी मी सामानाची यादी करत होते अगदी टूथपेस्ट्, कंगवा ई. ई. ज्याचा फायदा निघताना ऐनवेळी बॅग भरताना झाला व काहीही न विसरता ३ वाजता मी बांद्रा स्थानकाकाडे निघाले..
क्रमश:
नीलाक्षी
माझ्याबरोबर शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र प्रवास सुरु झाला..
ओला बुक केली होतीच गाडीत बसल्यावर गेले २/३ दिवसाचा ताण निवळला आणि डोळे पेंगू लागले.. मनोमन कुलदेवतेला, दत्तात्रयांना आणि आई बाबांना नमस्कार केला. त्यांच्या पुण्याईनेच हा दिवस उजाडला होता.. बाबा, माझी आजी, आई आणि आजोळ हे दत्तभक्त. मी त्यांच्यामध्ये नास्तिकच! बाबा आणि आजीला स्वामी समर्थांचे वेड.. त्यांचा स्वामींवर गाढ विश्वास.. बाबांनी अगदी शेवट पर्यंत गुरुवारचे स्वामी दर्शन सोडले नव्हते.. आईने तर सगळे आयुष्यच त्यांच्या भरवश्यावर जगलेले.. माझी धाकटी बहीणही त्यांच्याच पावलावर चालणारी.. मीच कशी काय नास्तिक जन्मले या लोकात देव जाणे.. माझे म्हणणे अगदी स्पष्ट असे की देवाला जर सगळ्यांची काळजी आहे तर त्याला नमस्कार न करता, त्याची पुजा न करता त्याने सर्वांना आनंदी ठेवायला हवे. हा म्हणजे व्यवहारच झाला की तु माझे स्तोत्र म्हण मग मी तुला बळ देतो.. आता जसे वाचन वाढते आहे तसे हळुहळू उमगतंय असं वाटते आहे.. देव म्हणा निसर्ग म्हणा ही एक उर्जा आहे, आणि तिची शक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तिच्याशी संधान हवे. जसे इलेक्ट्रीसिटी घराबाहेर पोलवर वाहते आहे, पण घरात दिवा लावण्यासाठी, पंखा लावण्यासाठी, एसी ला वेगवेगळ्या पॉवरची बटणे, वायर टाकून ती घरात आणावी लागते. तिचे बटण गरज असताना दाबावे लागते तेंव्हा दिवा लागतो.. देवाचंही तसंच काहीसं असावं!
असो..तर आम्ही अगदी वेळेत गाडी सुटायच्या तासभर आधी स्टेशनवर पोचलो. गाडी फलाटावर लागली होती आणि बरीचशी लोकं गाडीत आपापल्या जागेवर गेलेली होती. जी थोडीफार मंडळी फलाटावर होती त्यांना भेटलो आणि आमच्या जागा जाणून घेऊन स्थानापन्न झालो.. गाडी अगदी वेळेवर सुटली आम्ही राजकोटच्या दिशेने निघालो. आजुबाजुला पाहीले तर सगळीच मंडळी गिरनारला निघालेली.. हळुहळू असे जाणवले की सारा डबाच गिरनारयात्रींनी भरलाय.. प्रत्येक ग्रुपच्या सहकाऱ्यांची वेगवेगळ्या डब्यांत वाटणी झालेली त्यामुळे बराच वेळ लोक या डब्यांतुन त्या डब्यात करत होती.
अखेर सगळे स्थिरस्थावर झाले, रात्री आम्हाला पॅक फूड देण्यात आले, मस्त पोळी भाजी, मसाले भात होता.. आम्ही जेवून झोपेची आराधना करू लागलो.. काही लोकांना ५ वाजता अलिकडच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने दिवे बंद करून मंडळी ढाराढूर झोपली.
मला मात्र काही केल्या झोप येईना एक तर सर्वात वरचा बर्थ होता त्यामुळे सतत पडण्याची भीती. शेजारी एक लहान मुलगी होती एकदम चुणचुणीत, ती सर्वांना बालसुलभ विनोद सांगत होती, अखंड बडबड चाललेली. तिच्या निरागस गप्पा ऐकीत झोपेच्या आधीन झाले.. सकाळी ६लाच जाग आली, म्हणजे रात्रभर गाढ झोप नव्हतीच पण आता डुलकीही येईना तेव्हा उठून बसले.. थोड्याच वेळात बाकीची मंडळी उठली. गाडी बरोब्बर वेळेत राजकोटला पोचली. आयोजकांनी बस तयार ठेवली होती, मधे आंघोळीसाठी थांबून सोमनाथकडे प्रयाण केले.
सोमनाथची २ मंदिरे आहेत, एक नवे जिथे पाताळात खाली महादेव स्थापिले आहेत व त्यावरच्या मजल्यावरपण एक पिंड. पुर्वी हिंदूमंदिरे आक्रमणांपासून वाचविण्यासाठी ही व्यवस्था.
बऱ्याच लोकांना जुने मंदिर माहीत नसते ते फक्त नवीन मंदिरच पहातात. दोन्ही मंदिरे एकदम जवळ जवळ आहेत. हे मंदिर अनेकवेळा पाडले गेले व पुन:पुन्हा उभे केले गेले असे म्हणतात. अतिशय सुंदर बांधकाम, शंकराची पिंडही मोठ्ठी आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. मी मंदिरात शिरले तेंव्हा प्रदोषाची सायंकाळची पुजा चालु होती. विविधरंगी, विविधसुगंधी फुले इतक्या आकर्षकपणे मांडली होती की पहात रहावे. मंत्रांचा धीरगंभीर आवाज गाभाऱ्यात घुमत होता.. एक प्रसंन्नता मंदिर वेढून राहीली होती. मनात शंकराचार्यांचे आत्मषटक घोळत होते - चिदानंदरुपम् शिवोहं शिवोहं !
चंद्राने दक्षाच्या शापातून मुक्त झाल्यावर येथे शिवलिंगाची स्थापना केली असे पौराणिक कथा सांगतात तर मंदिराचा उल्लेख अगदि इ.स. पुर्वीपासून इतिहासकारांना मिळतो. सध्याचे मंदिर हे सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधले आहे.
मी दर्शन घेतले आणि मागे गेले, देवळाभोवती बाग थाटली होती, हिरवळ पसरलेली चहूबाजूनी. त्याच्याकडेने सज्जा होता सागर दर्शनासाठी. देवळातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच प्रसिद्ध असलेला बाणस्तंभ पाहीला. म्हटलं व्हॉटस् ॲपचे सगळेच मेसेजेस् फेक नसतात तर 
तर या खांबावर एकबाण दाखवून एक श्लोक कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा की बाणाच्या दिशेने सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रुव यात कुठलाही भुभाग नाही. हा स्तंभ ६व्या शतकातील आहे म्हणतात.
मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पुर्वी आलेली लोकं सांगत होती की भरतीच्या वेळेत पाणी मंदीरात शिरत असे. आता मात्र भर टाकून बहुतेक, समुद्रापासून थोड उंचावर वाटलं देऊळ. मस्त समुद्रजल शांतपणे हेलकावत होतं.. दूरवर काही नावा दिसत होत्या एकूण शांतता वाटत होती मनाला..
सोमनाथाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान ठेवलं. जुनागढ हे गावच एक गड आहे म्हणे. त्यामुळे गावाला अनेक मोठमोठाले दरवाजे दिसतात. तसेच बाजूची तटबंदीही सतत दिसत रहाते. काही ठिकाणी पडझड झालीय. पण बऱ्याच अंशी तटबंदी शाबूत असावी.
रात्री जुनागढ स्टेशनजवळ गीता लॉजमधे जेवलो, जेवण अप्रतीम होतं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी मधुर ताकाचा जगच टेबलवर आणून ठेवला.. मी मस्त २/३ ग्लास ताकच प्यायले.. केरळमध्ये सांबार, रस्सम, नाशिकला मिसळीच्या ठिकाणी रस्सा तस इथे अनलिमिटेड ताक.. भारीच.. जुनागढला जाणाऱ्यांनी एकदातरी इथे जेवाव. जेवणे आटोपून रात्री १०.३०ला आम्ही आमच्या खोल्यात पोचलो.
रहाण्याची सोय तळेठीला नरसी मेहता धर्मशाळेत होती. धर्मशाळा असली तरी सोय उत्तम होती. खोलीत गरमपाणी, एसी, सगळ्या सुविधा होत्या. आता २/३ दिवस आमचा ईथेच मुक्काम असणार होता. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. उद्या सकाळी ४.३०लाच परिक्रमेला निघायचे होते. तेंव्हा खोलीत गेल्यावर ताबडतोब झोपून गेलो.
क्रमश:
सकाळी ४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली. हो आता कुठेही जायचं तर खोलीतून निघायचं व थेट चालू लागायचं 
आता परिक्रमेविषयी थोडेसे:
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला करतात.
ही परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत करतात. पहिला दिवस भवनाथमंदीरापासुन सुरु होतो. दुसरा मुक्काम जीना बाबांची मढी, तिसरा मालवेल आणि शेवटचा बोरदेवी मंदीर. अश्याप्रकारे एकादशीपासून सुरु करुन पौर्णिमेला परीक्रमेची समाप्ती करतात. हल्ली एखादा मुक्काम करुन किंवा एका दिवसात सलग चालून १२/१४ तासात पुर्ण करतात. पण एक तरी मुक्काम असावा असे शास्त्र आहे. (मी भाडीपाची फॅन आहे) यादरम्यान सर्व देव, यक्ष, गंधर्व, यती, ऋषी असे सगळेजण परिक्रमा करत असतात व त्यांचा सहवास व आशीर्वाद मुक्काम केल्याने मिळतो अशी भावना आहे.
तर अश्या या परिक्रमेच्या वाटेवर आमची पाऊले पडू लागली.
एवढ्या पहाटेसुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी आश्रम उघडे दिसत होते. अखेर ती कमान आली.. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार... आता खऱ्या अर्थाने चालणे सुरु होणार होते. अंधार मी म्हणत होता.. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार होता. या रस्तावर चालायला विजेरी अत्यावश्यक आहे. मधे मधे इतरांच्या विजेरीचा उजेड मिळतो पण तुमच्या पायाखाली खड्डा आहे की उंचवटा आहे ते पहाण्यासाठी तुमच्या हातात विजेरी हवीच हवी..
हेच ते प्रवेशद्वार :
मी परिक्रमेला सुरवात झाल्यावरच आमचा ठरलेला ग्रुप सोडून पुढे चालायला सुरवात केली. काल सोमनाथ मंदीरात झालेल्या चुकामुकीमुळे जरा लीडरनी प्रेमळ दटावणी केली. पण त्यांना मी विनंती केली की त्यांच्या इतक्या हळूहळू वेगाने मला चालता नाही येणार. इथून मी जी पुढे गेले ते शेवट पर्यंत पुढेच राहीले. आपण जर आपल्या सहज वेगाने चाललो नाही तर पाय जास्त दुखू लागतात. परिक्रमेचे अंतर पाहता मला ती रिस्क घ्यायची नव्हती.
जंगल सुरु झाल्यावर, म्हणा कमान ओलांडली की जंगलच सुरु होते; तेही घनदाट. तर इथून लगेचच हळूहळू चढालाच सुरुवात होते. या पहील्या चढाला जवानी की घोडी म्हणतात.. जवानीकी घोडी चढुन गेल्यावर जीनाबाबाकी मढीपाशी जरा रेंगाळलो. त्यांची चिलीम आजही तिथे आहे. बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदीर आहे. इथे बरेच नागासाधू बसलेले असतात आणि तुमचा रस्ता अडवून पैसे मागतात. ते जे काही चित्र होते ते फारच भयंकर वाटत होते.. काही साधूंची बडबड चालू होती - "१रुपयात काही येतं का आता १०रुपये तरी द्या." माझ्या मागून आलेल्या काहीजणींनी सांगितले की बायकांवरही शेरेबाजी करत होते म्हणे.. कसले हे साधू! मी फार बघू शकत नव्हते.. आपल्याला अश्या दिंगंबर अवस्थेतील माणसांना पहायची एकतर सवय नसते त्यामुळे आधी अवघडायला होतं.. त्यात इथे अनेकजण असे नुसते भस्म फासून बसलेले.. त्यांचाबद्दल अनेक वदंताही आहेत जसे की ही लोकं फार कोपिष्ट असतात, त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर संमोहीत करतात इत्यादी इत्यादी.. आमच्या लीडरलातर पकडून पैसे द्यायला लावले म्हणे..
मी यु ट्युबवर पाहिलं होतं की ही लोकं पैसे मागतात, तेंव्हा हा मुक्काम जवळ आल्यावर मी काही नाणी हातात ठेवली. आणि कुणाकडेही न बघता भराभर चालायला सुरवात केली.. हात पुढे आला की नाणं ठेवायच आणि चालू लागायचं. त्यात मला एक जाणवलं की नामस्मरण चालू असेल तर ही लोकं बाजूला होऊन तुम्हाला रस्ता मोकळा करुन देतात.. नामस्मरण थांबलं की पैसे मागणार.. जीना बाबाच्या मढीच्या आधीपासून, नंतरही बऱ्याच अंतरापर्यंत ही लोकं रस्त्याच्या दुतर्फा बसलेली असल्याने मला माझा अनुभव टेस्ट करता आला.. पुढे पुढे साधूंबरोबर साध्वीपण होत्या (त्या मात्र दिगंबर नव्हत्या). त्याही पैसे मागत असत पुरुषयात्रेकरूंना ते त्रासदायक होई. यातून सुटकेचा मार्ग एकच, नामस्मरण. असे अनुभव यायला लागले की ही परिक्रमा नुसता जंगल ट्रेक न राहता यात्रा बनून जाते व जाणवते त्यांच्या इच्छेनेच केवळ आपण हे करु शकतो.
इथे येईस्तोवर चालणाऱ्यांचे वेगानुसार गट पडले होते. सर्वात आधी सुपरफास्ट बर्वेदादा, श्री. अभ्यंकर आणि अजून दोघे सासरा जावयाची जोडी होती. सासरेबुवाही ७०च्याजवळपास होते पण चालण्याचा वेग अफाट होता. त्यानंतर आमचा ग्रुप मी, राणे आजी, नगरचे चव्हाणदादा, शुभांगी, पुण्याचे पंकजभाऊ, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मैत्रिण, तेजस आणि शिरवळकडचा रोशन. तेजस आणि रोशन एकदम उमदे गडी होते आणि अगदी टणाटण उड्या मारत परिक्रमा पार करत होते. मी बऱ्याचदा पंकजभाऊंच्या आई आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर चालत होते. मधेमधे एकमेकांसाठी थांबून आमचा हा चमू मार्गक्रमण करत होता. आमच्या मागे माझ्याबरोबर आलेल्या २न्ही काकू आणि अजून २जणी होत्या. सर्वात शेवट सगळे लीडर आणि ज्यांचा वेग कमी आहे अशी माणसे. जंगल घनदाट होते व एकदा आत शिरल्यावर चालूनच बाहेर पडायचे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणून ग्रुप लीडर्स या लोकांना चीअर अप करत, मदत करत मागून येत असावेत.
चालताना दिसलेली पवनचक्की व पाण्याची उन्हाळी सोय

एकूण तीन डोंगर चढायचे आणि उतराचे असतात हे माहित होते. पण चढ एवढा होता की २रा डोंगर संपेपर्यंत थकायला झाले होते. मधे थांबत होतोच आम्ही. जवळपास ७०अंशाचे चढ होते.
परिक्रमा ही वर्षातून काही ठराविक दिवसच करता येत असल्याने गर्दीचा नुसता पुर आलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स लागलेले दिसत होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, मीठ, मिरची, मसाला, भाज्या असे काय काय न् काय काय.. सर्वात कहर म्हणजे पानाचे ठेलेही होते. ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे रस्त्यात लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. हा सेवाभाव पाहून सद्गतीत व्हायला होत होतं..
असाच एक अमूलचा स्टॉलः
मीठ, मिरची, भाजीचे ठेले:

सुरवातीला टेंपो, गाड्या काही अंतरापर्यंत येऊ शकतात म्हणून दुर्लक्ष केलेले पण दुसऱ्या डोंगरावरही पाणी मोफत वाटत होते जे त्यांनी खालून कुठुनतरी लांबून वाहून आणलेले.. बरं ही लोकंही गरीबच दिसत होती.. हे सगळे मोफत वाटणारे अगदी हात जोडुन तुम्हाला आमंत्रण देतात.. तो सेवाभाव बघून शब्द सुचत नाहीत. काही ठिकाणी शहाळेही ५/५ रुपयांना विकत होते.. का? केवळ परिक्रमा वसीयांची सेवा हा भाव.. इकडे शहरातील विक्रेते असते तर अश्या ठिकाणी अजून १०० रुपयांना शहाळे विकले असते.. पहिल्याचढापासुन पुढे तुम्हाला सगळे पाठीवर वाहून न्यावे लागते.. गाडी अगदी ३ऱ्या डोंगराचा उतार संपल्यावरच! मला या माणसांची खूप कमाल वाटली.. मी मनातून या सगळ्यांना नव्हे त्यांच्या सेवाभावाला साष्टांग दंडवत घातला.
वारीत जशी सगळ्या प्रकारची माणसे दिसतात तशी परिक्रमेतही दिसत होतीच. सेवाभावी अनेक गरीब लोक होते तसेच लहान मुलाला घेऊन भीक मागणारे, अपंगलोक, वृद्ध भीकारी अनेक ठिकाणी दिसत होतेच. काही मुलांना शंकर, राम, लक्ष्मी असे साज चढवलेले व पैसे मागायला लावलेले तर काही ठिकाणी साधू जमीनीत पुर्ण डोके गाडून झोपलेले अशी अनेक निरीक्षणे करीत मी चालले होते. दुसऱ्या डोंगरमाथ्याला आम्ही साधारण ११.३०च्या सुमारास होतो. उन आजिबात जाणवत नव्हते. मला जरा जरी उन लागले तरी लगेच पित्ताचा त्रास होतो.. म्हणजे पित्त उसळतेच.. मग विश्रांती घेतल्याशिवाय आराम पडत नाही. पण आज मी अखंड चालत होते, थकवा जाणवल्यावर मधे लिंबू सरबत घेत होते, बरोबर इलेक्ट्रॉलचे पाणी घोट घोट घेत होते. पण पित्ताचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. उन्हाचे अस्तित्वही डोंगरमाथ्याला जाणवत होते थोडेफार नाहीतर नाहीच.
मधे मधे अनेक ओढे दुथडीभरून वहात होते आणि बूट ओले होऊनयेत म्हणून मी कसरत करत होते. मधल्या एका ओढ्याला अशीच कसरत करताना उडी चुकली आणि पाण्यात पडले.बूट वाचवत होते आता बऱ्यापैकी पाय भिजले. झाले, सगळ्यांना करमणुकीला नवीन विषय मिळाला- "मी व ओढा". पुढे जिथे जिथे ओढा येत असे तिथे लोक आधीच हसायला सुरवात करत. या करमणुकीने आमचा थकवा विसरायला मदत होत होती.


३रा डोंगर अगदी लहान आहे असे ऐकले होते. लोकही असेच सांगत होते आता फार चढण नाही. त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण ३रा चढ सुरु झाला आणि संपायचे नाव घेईना. शेवटी १.३० की २च्या सुमारास आम्ही कालीका देवळापाशी आलो. हे ठिकाण मालवेल व परिक्रमेचा मध्य आहे असे नंतर कळले. तेंव्हा मात्र चला आता हा डोंगर उतरला की परिक्रमा संपणार असे वाटत होते. उतारावर एक शॉर्टकट मिळाला, अजून अंतर कमी झाले. ३ऱ्या डोंगराच्या पायथ्यापाशी आलो तेंव्हा २.३० वाजलेले. आता भूक लागली होती. पायथ्याशी असलेल्या एका लंगर मध्ये पुरी, भाजी, गाठीया, शिरा, खिचडी असे पुर्ण गरमागरम जेवण जेवलो. आता मालिशवाले दिसायला लागले होते, निरनिराळ्या माळा, तेले अश्या वस्तूंची विक्री चालू झालेली. हे पाहून मला अजूनच वाटायला लागले की परिक्रमा संपत आली. काही लोक मालीश करून घ्यायला, झोप काढायला थांबले. मी मात्र चालणे सुरूच ठेवले होते. आता थांबायचे ते रूमवर जाऊनच.
चढत जाणारी नागमोडी वाटः
तासाभरात शेवटची कमान आली परिक्रमा संपल्याची, समोर बोरदेवी मंदिराची पाटी दिसली. मनातल्या मनात मी आनंदाने एक उडी मारली. (शारिरीक शक्यच नव्हते.) देवाचे आभार मानले. बोरदेवीचे दर्शन घेऊन पुढे जाण्याची प्रथा आहे परंतू पाटीवाचली तर एक कि.मी. अंतर होते म्हणजे येऊन जाऊन २ कि.मी. बापरे.. आता २किमी सुद्धा जास्त वाटायला लागले होते. मी तिथेच स्टॉल्सवाल्यांजवळ चौकशी केली तर म्हणाले इथे परिक्रमा संपली बोरदेवीचे दर्शन घेतले पाहिजेच असे नाही. ऐकून किती बरं वाटलं सांगू. थोडं चालल्यावर म्हटले किती अंतर बाकी ते तरी विचारू.. तर कळाले की इथून भवनाथ मंदीर अजून १२किमी. आहे. हे ऐकून फक्त पडायचीच बाकी होते. मनाला आवरलं, इतके अंतर चालून आलो आता हेही संपेल. तशी धुगधुगी होती अजून शरीरात आणि मन थकायला तयार नव्हतं.
हाही रस्ता जंगलातूनच आहे पुर्ण. मधे मधे गिरनार दर्शन देत होता. आजूबाजूला दाट झाडी छोटेसे ओहोळ.. रस्ता खरोखर सुंदर होता. मन प्रसंन्न् करत होता. हळूहळू चालत होते, आता टेकायचे झाल्यास अगदी खाली बसावे लागत होते, त्यामुळे शक्यतो ते टाळून उभ्या उभ्या विश्रांती घेऊन चालणे सुरु ठेवले होते. (एकदा खाली बसल्यावर उठताना काय परिस्थीती होत होती ते केवळ माझे मीच जाणे) तिसऱ्या डोंगराच्या उताराच्यावेळी पंकजभाऊंनी काठी दिलेली; तिचा खूपच उपयोग होत होता. त्याचे झाले असे की knee capsमी पहिल्यांदाच वापरत होते आणि त्याने उजव्या पायाची नस कुठेतरी दुखावली होती. मधे रस्त्यात थांबून मी त्या कॅपस् काढल्या तरी पाय उचलायला खूपच त्रास व्हायला लागला होता. मग काठीच कामी आली. मध्ये मध्ये शॉर्ट्कटस् होते पण पाउल नीट पडेल का याची शाश्वती न वाटल्याने सरळ मार्गावरुनच चालत राहिले.
बोलणे कधीच बंद झाले होते. थकव्याने डोळे मिटायला लागले होते. जेंव्हा जेंव्हा विचारू तेंव्हा सगळेजण ५किमी. राहिले सांगत होते पण हे शेवटचे ५ किमी काही संपायला तयार नव्हते. एकदातर मी केवळ खुणेनेच पोलीसांना विचारले किती अंतर आहे.. त्यांनाही माझी परिस्थिती पाहुन हसू आले. अर्थात उत्तर तेच होते -५ किमी. संपूर्ण परिक्रमेत मधे मधे पोलीसांचा तंबू होता, किंवा पोलीस येताजाताना दिसत होते. मदतीलाही तत्पर असावेत कारण एका कुटुंबातील मुलगा हरवला होता तो त्यांनी विक्रमी वेळात शोधून दिला होता.
मी मजल दर मजल करीत चालत होते. खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागते. तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन नसेल घेतले त्यांनी इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू भक्त्तांसाठी माता रस्त्यावर येऊन उभी होती. परिक्रमा सोपी करत होती. स्वत:ला मोटीवेटकरत होते. निघाल्यापासून अनेक वृद्ध माणसे दिसत होती, गुजराथी बायका केवढाली वजने डोक्यावर वहात वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून अचंबीत होत होते. शेवटी ती वेळ आलीच. एका पाणीवाटपाच्या ठिकाणी बसायला जागा होती, समोर गिरनार दिसत होता.. आता मैलाचे दगड सुरुझाल्याने खरे अंतर कळत होते व खरोखर शेवटचे ५किमी. राहिले होते. शरीर प्रचंड थकले होते, वाटले बस्स आता कोणी काही म्हणो, मी काही इथून ऊठणार नाही.. मागून येणाऱ्यांना विचारू की एखाद्या गाडीवानाला विनंती करायची का ते. आता इथे अगदी दुचाकीपण दिसत होत्या पण रिकामी गाडी एकपण नाही. तेवढ्यात भलमोठं बोचकं घेऊन एक बाई आली आणि माझ्या शेजारी जरा टेकली. तिला विचारलंच न राहवून की बाई गं, एवढ सगळ ओझे कसे वाहतेस. तर ती हसून म्हणाली आम्हाला याची सवय आहे. ओझे नसेल तर भरभर चालता नाही येणार. तिचं कुटुंब आता लवकरच परिक्रमा पुर्ण करणार होतं आणि मग डोक्यावरच्या साहित्यातून तिला स्वयंपाक करायचा होता. बापरे.. इथे चालायची शक्ती नाही आणि ही बाई त्यानंतर स्वयंपाकपण करणारे.. मी स्वत:वरच रागवले.. ते काही नाही हे अंतर पुर्ण करायचेच.. चला यात्रावीरहो.. चालायला लागा.. तु हे करु शकतेस. आता फक्ता ५ किमी म्हणजे १च तास.. "common, you can do it!". परत चालणे सुरु झाले, दत्तात्रयांचे नाम मुखी सुरु केले. मागे नामस्मरणात चालताना असे जाणवले होते की आपले पाय जमिनीला लागतच नाहीयेत.. तो अनुभव आठवला आणि स्वत:ला सांगितले की तेच करून घेत आहेत तेंव्हा परिक्रमा पुर्ण होणारच ! जय गिरिनारी!
आतातर अगदी हळूहळू चालत होते, चालणे कसले म्हणा खुरडतच होते. काठी टेकवायची मग तिच्यावर जोर टाकून पाय ओढायचे. मधे क्षणभरच उभे रहायचे की उर्जा मिळायची, तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जेवढा वेग साधता येईल तो साधायचा की परत थोड्यावेळाने पाय ओढणे सुरु, परत विश्रांती असे चक्र चालू होते. एकीकडे पुणेरी मन म्हणत होते, यांना कुणीतरी सांगायला पाहिजे, जिथे परिक्रमा संपल्याची कमान आहे तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट ठेवा. किती लोक घेतील तो. दुसरीकडे स्वत:ला सांगत होते, तुला कैलास-मानसरोवर चालत जायचे आहे ना, त्याची रिहर्सल समज. हे अंतर पुर्ण केलेस तर तुझी थोडी तरी तयारी होऊ शकते तिकडे जायची. तुला हे अंतर पुर्ण करायलाच हवे. मधेच रुम मधील बेड आणि आरामदायी वातावरण डोळ्यासमोर येत होते, हे अंतर कापले की आपल्याला आराम मिळणार आहे. तेंव्हा एकला चलो रे..
अश्या प्रकारे अनेक विचारांना फाटे देत, नामस्मरणकरत पावणे सहाला मी धर्मशाळेत प्रवेश केला. सकाळी ४.३०ला निघालेली मी ५.४५ म्हणजे जवळ जवळ १४ तासांनी परतले होते.
न आलेल्या व आधी पोचलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तेंव्हा खुप मस्त वाटले. बाहेरच बाकावर बसून घेतले, रुमची चावी काकूंकडे होती. त्या मागे होत्या पण परिक्रमा चालत पुर्ण केल्याचे समाधान एवढे होते की लगेच आडवे व्हायला नाही मिळाले त्याचे आजिबात दु:ख झाले नाही. मी एक उद्देश्य पुर्ण केले होते. लगेच उद्या गडावर येणार का लोकांची चर्चा सुरु झाली. सगळेच इतके दमले होते की उद्याची कल्पना करवत नव्हती. मी म्हटले उद्याचे उद्या पाहू. खोलीवर गेल्यावर गरम पाण्यानी अंग शेकले, लवकर जेवून आडवे झालो तेंव्हा काय वाटत होते ते शब्दात मांडणे कठिण आहे.
क्रमश:
काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला.
१०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप होउ दे!
जाता जाता भवनाथ मंदिरा विषयी थोडेसे :
हे महादेवाचे जागृत मंदीर आहे असे म्हणतात. बाजूलाच मृगीकुंड आहे. त्याची काहीतरी गोष्ट ऐकलेली, पण लक्षात नाही आता. येथे शिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते व मुहुर्तस्नाना साठी साधू थेट कुंडात उड्या टाकतात. हे मी कुंभमेळ्याबाबतपण ऐकले आहे. असे म्हणतात भगवान शिव स्वत: इथे त्यादिवशी स्नानाला येतात. कुंडाला प्रदक्षिणा करुन आल्यावर बाहेरच्या बाजूला एक दगड पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यावर तरंगणारा दगड. असे म्हणतात की रामसेतूतील हा दगड इथे आणला गेला आहे म्हणूनच पाण्यावरही तरंगतो. रात्रीच्या अंधारात खरच तरंगत होता की नाही हे कळाले नाही. दिवसा पहायला हवे.
रात्रीचे भवनाथ मंदिर :
म्रुगी कुंडः
असे महादेवाचे दर्शन झाले की थेट पहिल्या पायरीशी चढावा हनुमान आहे, त्याला नमस्कार; त्यालाही प्रार्थना की शक्ती दे. त्यानंतर पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो. त्या पायरीवर डोके ठेवायचे, दत्तात्रयांना सांगायचे, तुम्हीच घेऊन जा आणि सुखरुप खाली आणा. मग सुरुवात. आम्ही भवनाथानंतर जवळच असलेल्या जुन्या आखाड्याच्या आश्रमातील दत्तालापण नमस्कार केला. उत्सुकतेने सभोवार नजर फिरवीली. चारी बाजूंनी बांधकाम करुन साधू आणि साध्वींसाठी रहाण्याची सोय केलेली अनेक मजली इमारत होती ती. अनेकसाधू, साध्वी दिसत होत्या. या प्रवासात साध्वींना तेही अनेक संख्येने मी पहिल्यांदा पाहिले.
दर्शन घेऊन गिरीशिखराकडे वाटचाल चालू ठेवली.
गिरनार हे भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे. त्याची रेवताचल, कुमुद, उज्जयंत, श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आढळतात. श्रीराम व पांडवांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्णाद्वारे रुक्मिणी हरणही इथेच झाले अशीही मान्यता आहे. गिरनारचे उल्लेख सम्राट अशोकापुर्वीच्या इतिहासातही आहेत असं वीकीपीडिया सांगतो. असा हा गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना. अनेक साधू, बैरागी यांची तपोभूमी. स्वत: दत्तात्रयांनी इथे १२हजार वर्षे तपश्चर्या केली होती ब आजही त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच स्थानावर आज दत्तपादुका उमटलेल्या आहेत. हां आता कुणी म्हणू शकतं की हातानी छिन्नी हातोड्याने त्या कोरू शकतं! तसे असेलही.. पण या स्थानावर अनेकांना अनेक अनुभव येतात जे पादुका उमटल्या ह्यावर श्रद्धा ठेवायला लावतात. गिरनारला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच तो अनेक वन्यप्राणी, वनस्पती यांचे वसती स्थान आहे. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती इथे मिळतात.
आम्ही सुरवात केली, चढाई रात्रीची असल्याने किती चढलो ते काही कळत नाही. हवा छान थंड असते त्यामुळे लवकर थकवा येत नाही. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला चढत होतो. परिक्रमेचा काळ, त्यातून पौर्णिमा त्यामुळे वाटेवरची सगळी दुकाने चालू होती. त्यांचा प्रकाश मिळत होता. पायऱ्यांवर दिवेही लावले आहेत. अगदीच अंधार वाटेल तर तिथे पौर्णिमेचा चंद्र नैसर्गिक प्रकाश पुरवत होता. सुचना पुर्वीच दिल्या गेल्या होत्या की चढताना आजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश एकेक पायरी चढायची. प्रत्येकजण त्याची अंमलबजावणी करत होता. तसंपण ही स्पर्धा थोडीच होती..
इथेही खूप गर्दी होती. अगदी सतत एकाबाजूने चढणारे चालत होते तर दुसऱ्या बाजूने उतरणारे. जसजस वर जाऊ तसतशी गर्दी कमी न होता वाढतच होती. कुणी मोबाईलवर दत्तनामाचा जप लावून चालले होते तर कुणी स्वामी समर्थांचा. काही तरुण मंडळी एवढ्या गर्दीतही धसमुसळेपणा करत सिनेमाच्या गाण्यांवर उड्या मारत चालत होती व यात्रेकरुंच्या रोषास पात्र होत होती. मी सावकाश चालत होते तरी पहिल्या सुपरफास्ट बॅचचे लोक माझ्या आजुबाजूला होते. आश्चर्यच वाटलं माझ्या वेगाचं.
मन स्थिरही होते, शांत होते पण भावूकही झालेले. माझे बाबा अनेकवेळा गुरुचरित्राचे पारायण करीत. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी आठवत होत्या. दत्तगुरु व गणपती हे देव न वाटता लहानपणी आम्हाला आमचे कुटुंबीयच वाटत असत त्यामुळे आजपर्यंत गुरु किंवा देव या नजरेने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही; मला कुणा नातेवाईकालाच फार वर्षाने भेटायला जातोय असंच वाटत होतं.
पायरी चढताना आम्हाला सांगण्यात आलेले की विश्रांती उभ्यानेच घ्या, सारखे खाली बसलात तर अजून त्रास होईल. पायऱ्यांना एका बाजूला कठडे आहेत बहुतांशी. सुरवातीच्याच काही पायऱ्यांना आजिबात कठडे नाहीत. सतत चालत असल्याने हवा थंड असूनही थंडी आजिबात वाटत नव्हती. १५०० पायऱ्यांजवळ एक तरुण मुलगा खाली जाताना पाहिला. २५०० पायऱ्यांपासून परत आला होता तो. मला त्याचं आश्चर्य आणि स्वत:ची काळजी वाटली. हा मुलगा परत आला, आपण जाऊ ना ! पण मला थकवा आजिबात जाणवत नव्हता अगदी आरामात चढत होते. २०००पायरीच्या दरम्यान बेलनाथबाबा समाधी आहे. ते एक मोठे सिद्ध होते. २२५० पायरीवर डावीकडे राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. ३/४ पायऱ्या चढून आतमध्ये जाऊन दर्शनास दोन सुंदर मूर्ती आहेत. तिथून एका कपारीतून अजून वर गुहेत जाता येते. अगदी घसपटत जावे लागते. वर ३शिळांमुळे एक छोटीशी खोली तयार झाली आहे. मस्त वाटलं वर गेल्यावर. इथे भर्तुहरी नाथांनी राजा गोपीचंदाला उपदेश करून तपाला बसवले होते. वरच्या गुहेत ५/६ माणसे बसू शकतात, मस्त उबदार वातावरण होते आत.
रात्रीचे खाली दिसणारे गाव :
यादर्शना दरम्यान सुपरफास्ट बॅच पुढे गेली, ती शेवट पर्यंत भेटली नाही. मी काहीकाळ एकटीच चालत होते, मग परत मंडळी भेटली. २,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे अजून वर गेल्यावर ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर भाविक येथे त्या संतानाला घेऊन येतात. आम्ही राणकमातेपाशी दिवा लावला. सगळेजण त्रिपुरवाती घेऊन आलेले व जिथे शक्य आहे तिथे वात लावत होते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. चढता चढता आम्ही पहिल्या मुक्कामी पोहोचलो- जैन मंदिर - साधारण ४हजार पायऱ्या इथे पुर्ण होतात. इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी बसायला जागा आहे. कुणी आडवे झालेले, कुणी बसल्या बसल्याच झोपलेले. आम्ही इथे पावणे ३ वाजता पोहोचलो.
कुड्कुडणारे आम्ही:
आता असं ठरलं की इथून पुढे सगळ्यांनी एकत्रच जायचं. जैन मंदिराच्या मागच्या बाजूस वळणावर बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते. आम्ही तिथे थांबलो. मागची लोकं बऱीच मागे होती. झोपाळू मंडळींनी ताबडतोब खाली अंथरले व आडवे झाले. मी पण पाठ टेकून झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न केला. आता चांगलच गार वाटू लागलं. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून थंडी जाणवत नव्हती. अजून थांबलो तर थंडीने हुडहुडी भरेल अस वाटायला लागलं. इथे पोचल्यावर लगेचच कमरेला बांधलेले स्वेटर्स अंगावर चढले होते, कानटोप्या घातल्या गेल्या.
खरंतर चालून आता उत्साह आला होता. मोठ्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती. चव्हाणदादा तर उभं राहुन अस्वस्थपणे येरझारा घालायला लागले होते. त्यांना आजिब्बात नुसत थांबून रहायचं नव्हतं. तसाच साधारण तासभर काढला असेल. मागून आमची मंडळी एकेक करून यायला लागली. आता अजून थांबणे फारच जीवावर आलेले, मागून आलेल्या लोकांनापण झोपायचे नव्हते. मग थोड्याच वेळात सगळेच निघालो. आता इथून नुसती चढाई जवळ जवळ संपली. म्हणजे चढाई होती पण मधे मधे पायऱ्या उतरायच्याही होत्या.
इथून डावीकडे जुना रस्ता खाली जाताना दिसतो. या जुन्या मार्गाने स्वामी समर्थ गिरनार चढुन आले होते असे म्हणतात. अजूनही बरेच सिद्ध योगी याच मार्गानी येतात अशी वदंता आहे. डोलीवाले मात्र या मार्गावर नसतात व आता सामान्यही सगळे नवाच रस्ता वापरतात. परंतु गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना इकडे वळवत असल्याचे कळले. त्यामुळे आम्हालाही या मार्गाने यावे लागले असते कदाचित जो आत्तापेक्षाही अवघड आहे असे म्हणत होते. परंतू तसे झाले नाही.
आपल्याला उजवीकडून अंबाजीमाता शिखराकडे जायचे असते. तशी पाटीही इथे लावली आहे. गोमुखी मंदिराकडे, अंबामाता मंदिर, सहसावन मंदिर यासाठी बाणांनी दिशा दाखविली आहे.
हाच तो चौकः
रात्र असल्याने गोमुखी मंदिरावरून सरळ अंबामातेच्या मंदिरापाशी आलो. एरवी रात्री सारी मंदिरे बंद असतात पण आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने सगळी मंदिरे उघडी होती व सगळीकडे भाविकांची गर्दी होती. इथे जवळपास ५हजार पायऱ्या संपतात. म्हणजे खरतर अर्धाच रस्ता झालेला असतो.पण पुढच्या रस्त्यात पायऱ्या उतरणेही असल्याने कदाचित, जास्त वेळ लागत नाही. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की पुढचा मार्ग अंबामाताच सुकर करते.
मी मातेला बाहेरूनच नमस्कार केला व पुढे गोरक्ष शिखराकडे चालत राहिले. हा मार्ग थोडा अवघड वाटला बाजूच्या कठड्यांची उंची जेमतेम घोट्या पर्यंतच वाटत होती. एका बाजूला दरी, रस्ता लहान वाटत होता व तीव्र वळणेही होती. जर वळणांवर जोरात वारा आला किंवा गर्दीत चालताना थोडा जरी धक्का लागला तर एका बाजूला कडप्प्याचा सपोर्ट नव्हता आणि खाली पडायला झाले असते. रात्र असल्याने नेमकी दरी किती खोल ते कळत नव्हते तरी विचाराने भीती वाटली.
आता समोरचा डोंगर चढून गेला की गोरक्षशिखर. इथून एक मधुर सुगंध दरवळायला लागला. खुप प्रसंन्न आणि उल्हसित वाटत होतं. तसं गिरनारवर काय परिक्रमेतही नैसर्गिक विधींसाठी काहीही सोय नाही. सरकारी शौचालये तोडक्या मोडक्या अवस्थेत, आतून झाडोरा वाढलेली होती नाहीतर बंदच. त्यांचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी जिथे सपाट भाग आहे तिथे लोक आडोसा बघत आणि विधी उरकत होते. मधे मधे तो वास तुमची सोबत करतो. हा सुगंध वेगळा होता. जसजसे शिखर जवळ येत होते तसा वाढत होता. मला वाटले की रस्त्यात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळे आहेत. आपल्याकडे काय दगडाला शेंदूर फासला कि झाला देव. तिथे धूप, उदबत्ती लावलेली होती त्याचा वास असेल. नंतर लक्षात आलं की ते तर सगळीकडेच होतं मग हा सुवास फक्त गोरक्षशिखराजवळच का येत होता?
तर सुगंध उत्साह वाढवत होता आणि फार म्हणजे फारच छान वाटत होते. गोरक्ष गुहेपाशी डावीकडे गोरक्ष मंदीर आहे आणि उजवीकडे गुहेत तुम्हाला धुनी भस्म मिळते. तिथेच अगत्याने तुम्हाला चहा पाजला जातो. त्या प्रसादाला नाही म्हणायचे नसते हे आधी वाचलेले आणि अगत्य पाहून चहा घेतलाच. आतापर्यंत एखाद् दोन घोटच पाणी प्यायले होते, तहान अशी लागली नव्हतीच. चहा घेताना लक्षात आले की बराच वेळ आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.
इथेच उभ्या उभ्या विसावा घेतला. तिथे एक साधू बसलेले होते व अनेकजण सेवेकरी होते. गरम गरम ताजा चहा करून सगळ्यांना देत होते. त्या बाबाजींना मी थोडी माहिती विचारली की गिरनार यात्रा का व कशी करतात. गर्दीमुळे असावं पण त्यांनी थोडक्यात जुजबी माहिती दिली.
गिरनार दर्शन हे आता फक्त पादुका दर्शन घेऊन पुर्ण करतात. पण खरतर इथे अनुसूया माता, महाकाली शिखर आहे. कमंडलू तीर्थाबरोबर यांचेही दर्शन घेतल्यावर गिरनार यात्रा पुर्ण होते. पण हल्ली लोकांना शक्य नसते त्यामुळे फक्त दत्त शिखर करतात. त्याचीही पद्धत त्यांनी सांगितली - खाली दामोदर तीर्थावर आंघोळ करायची मग भवनाथ, चढावा हनुमान अशी दर्शने करत कमंडलूतीर्थाला जायचे. तिथे परत आंघोळ करायची मग दत्तात्रय पादुका दर्शनाला जायचे. ते सांगत होते आताही जाणते लोक, साधू आधी कमंडलू तीर्थाला जातात, आंघोळ शक्य नसली तरी डोक्यावर तीर्थाचे प्रोक्षण करतात मग वर जातात. त्याबरोबर गोरक्ष धुनीपाशी असलेली घंटा आणि मोक्षाची गुहेविषयीपण त्यांनी माहिती दिली.
मी त्यांना नमस्कार केला पुढे डावीकडे धुनीचे दर्शन घेतले. इथली घंटा ३ वेळा वाजवायची व वाजवताना आपल्या पितरांची नावे घ्यायची म्हणजे सर्व पितरांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ती मोक्ष गुहा काही मला दिसली नाही.
पुढे गेल्यावर पायऱ्या उतरतानाही सुगंध बरोबर होता. खाली जैन मंदिराच्या अलिकडे असतानाच लोक म्हणत होते वर खूप गर्दी आहे तुम्ही थांबून जा. दर्शनाची रांग कमंडलू तीर्थापर्यंत पोचली आहे. आम्ही गोरक्ष शिखराचा एक जीना उतरला असेल् नसेल, रांगच सुरु झाली. आता जसजशी रांग पुढे सरकेल तसतस पुढे जायचे. हा रस्ता खरोखर लहान वाटतो त्यात डोलीवाले विश्रांतीला थांबले तर मग आपण त्या पायरीवर थांबूच शकत नाही.
डोलीवाल्यांची मात्र दया आली. एक डोलीवाला वयस्कर होता, ओझे उचलून त्याच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते. हे ५ दिवस त्यांचा सिझन होता. वर्षभरातील सर्वात जास्त गर्दी या दिवसांत होते इथे. त्यामुळे याच दिवसांत कमावण्याची संधी. बरं एक डोली झाली की दुसरी डोली मिळेपर्यंत काम नाही. त्यासाठी त्यांना वरखाली फिरावं लागतं गिऱ्हाईक शोधत; म्हणजे परत पायऱ्या चढणे उतरणे आलेच. खुप कष्टामय जीवन आहे हे. तुम्हाला डोली आधीच धर्मशाळेत विचारुन ठरवता येते किंवा रस्त्यात वाटले तरी मागवता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात विचारले तर त्यांच्याकडे डोलीवाल्याचे नंबर असतात ते मागवून देतात. फक्त मग डोलीवाला जिथे असेल तिथून येईपर्यंत वाट पहावी लागते. तुमच्या वजनानुसार ११ ते १४ हजारापर्यंत डोलीचे दर ठरतात. आमच्यापैकी काहीजणांनी डोली आधीच ठरविली होती तर एकीने येताना केली.
या डोलीवाल्यांचा आमच्या बरोबरच एक किस्सा झाला. गर्दी खूपच होती. रांगेतही माणसे अगदी गर्दी करुन उभी होती. डोलीवाले भरभर चालत व मध्ये जागा मिळताच विश्रांती घेत. ते मोठमोठ्याने सुचना देतच चालत जेणेकरुन त्यांना मार्ग मोकळा मिळेल व डोलीतील माणसाला आणि चालणाऱ्यांना एकमेकांचा धक्का लागणार नाही. ते विश्रांतीसाठी थांबताना देखील लोक पुढेमागे सरकून जागा करुन देत. गोरक्षशिखरापासून पुढे बऱ्याच वेळा एका बाजूला दरी असते. दुसऱ्या बाजूला डोंगर जरी असला तरी पायऱ्यांची कड आणि डोंगर यामधे अंतर असते व खड्डास्वरुप झालेले असते. म्हणजे जिन्याच्या पहिल्या दुसऱ्या पायरीवरुन पाहिले तर चांगला दिड दोन पुरुष उंचीचा खड्डा. तर झालं असं की डोली वाल्याला जागा देताना पुढेमागे लोक पटकन् सरकतात त्याच वेळी आमच्यातील एक अगदी कॉर्नरला गेली व पडणार इतक्यात तिच्या सॅकला पकडून एकाने खेचले तिला. इथे डोंगरबाजूला सगळे पाषाण आहेत त्यामुळे काय झालं असतं हा विचारही न केलेलाच बरा.
इथे दुसरे एक महत्वाचे म्हणजे गोरक्षशिखरापासून पुढे एकही दुकान नाही. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असल्या अंबामातेपाशी घेऊन ठेवावे किंवा नंतर शिखरापर्यंत काही तुरळक दुकाने आहेत तिथे. गोरक्षशिखरापासून पुढे पाणी जरी लागले तरी ते कमंडलू तीर्थापाशीच मिळणार. म्हणजे जवळपास तीनेकहजार पायऱ्या गेल्यानंतर. तेंव्हा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी.
गोरक्षशिखरानंतर जी रांग लागली ती थेट पादुका दर्शन, कमंडलूतीर्थाचे दर्शन झाल्यावरच संपली. अनेकजण सांगतात या पायऱ्या खूप कठिण आहेत, जोराचा वारा असतो, रस्ताही तसा अवघड आणि चढही खडा आहे. वारा वगैरे इथे उंचावर आला तर काही खरे नाही. पण आम्ही रांगेत असल्याने आम्हाला चढाचा त्रास झाला नाही. वाराही शांत होता. एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकत रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. ५.३०/६ च्या सुमारास आम्हाला आमच्या डोल्या दिसायला लागल्या. त्यांचे एकदम छान ४.३०/५ला वरती दर्शन झाले होते. खूप खुष होते ते सगळे. आमच्या एकूण ६ डोल्या होत्या, त्यांची वाट पहाण्यात, त्यांना भेटण्यात थोडा वेळ गेला. मध्ये एक दोन छोटी मंदिरे लागली. त्यांचे नाव विसरले, पण प्रसिद्ध असावीत. सगळेजण न चुकता नमस्कार करत होते. रांगेतून चालतानाच ती लागतात त्यामुळे दर्शने घेणे सहज होत होते. त्यातले पुजारी साधू काही लोकांना भस्म लावत होते व काही लोकांना रुद्राक्ष देत होते. माझ्या असं लक्षात आलं; रुद्राक्ष फार कमी लोकांना मिळत होता. मला दोन्ही मिळालं. भस्म व रुद्राक्ष.काहींना हाताला त्यांनी काहीतरी लावले. त्याला एक अप्रतीम सुगंध होता. आमच्यापैकी चव्हाण दादांच्या हाताला त्यांनी ते लावले त्यामुळे आम्हाला सुगंध कळाला. नंतर घरी आल्यावर पाहिले तर रुद्राक्षालाही तोच अवर्णनीय सुगंध येत होता. नंतर कळाले की तिथे गिरनारी बापूंची गुहा आहे, ते मंदिर भैरवाचे होते. तसेच तिथे ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार रुद्राक्ष दिला जातो.
आता आम्ही कमंडलू तीर्थापाशी असलेल्या कमानी पर्यंत पोहोचलो होतो. उजवी कडच्या कमानीतून ३५० पायऱ्या खाली उतरून तीर्थाकडे जायचे तर डावी कडच्या कमानीतून पादुकांकडे. गर्दी इतकी होती की आम्हाला काही पर्यायच नव्हता; आम्ही दत्तशिखराकडे जात होतो. गर्दीचा उत्साह ओसंडून वहात होता. जय गिरिनारीच्या घोषणा दुमदुमत होत्या. येणारी लोकं घोषणा देत त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच मोठयाने रांगेतील लोक घोषणा देत. अशी घोषणाई सगळा आसमंत व्यापून राहिलेली. त्यामुळे कंटाळा, थकवा जाणवत नव्हता.
मागे गोरक्षशिखरापर्यंत गेलेली रांग
बाजूने अनेक साधूवर जाताना दिसत होते. त्यांचे निरिक्षण करण्यातही वेळ चांगला जात होता. कुणी भगवी वस्त्र नेसलेले, जटाधारी, हाती दंड व कमंडलूवाले, कुणी मोठ्ठा जटाभारवाले नुसतेच लंगोटीवाले, कुणी शुभ्र वस्त्रातील, या सर्वांचे डोळे खतरनाक वाटत होते, काही सामन्यांसारखे पण भगवी पचंगी नेसलेले किंवा भगवी वस्त्र घातलेले. सर्वजण आपल्या तंद्रीत भराभर वर जात होते. कधीकधी त्यांचा वेग पाहून तोंडात बोटे जात होती. घरी आल्यावर मामानी विचारलं त्यातले किती साधू खाली येताना तु पाहिलेस लक्षात आहे का? आणि डोक्यात प्रकाश पडला खरंच की वर जाणारे तर अनेक होते, खाली येणारा एखाद् दुसराच. खाली यायला मार्ग तर एकच आहे, निदान जैन मंदिरापर्यंत तरी. मग ही लोकं गेली कुठे?
आम्ही कमंडलू तीर्थाच्या अलिकडे असतानाच समोर अरुणोदय झाला. समोर क्षितिजावर तांबडे फुटले होते. अगदी एखादा रंगाचा फुगा फुटावा किंवा डब्यातून रंग सांडावेत तसे रंग क्षितिजावर पसरले होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की सूर्य कुठून डोंगराच्या मागून वगैरे न येता सरळ क्षितीजरेषेवरुन वर आला. अरुणोदयापासून सुर्योदयापर्यंतचे आकाश पहाणे केवळ अप्रतीम, अलौकिक अनुभव होता.
सूर्योदयाचे काही क्षण


समोरच्या दातार पर्वतावर मच्छिंद्रधुनी अंधारात पेटती दिसत होती, तिच्यावरचा झेंडाही आता नीट दिसत होता. इथे शंकराने दत्तात्रयांना, तर दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले असे म्हणतात. इतक्यात काही टारगट पोरे रांग तोडून जेष्ठांना न जुमानता पुढे आली. आमच्यातील तरुणांनी मग त्यांना अडवले व मागे जाण्यास भाग पाडले. त्यांची देहबोलीसुद्धा कीती बेफिकीरीची होती..
आता गुरुपादुका मंदिर दिसत होते. एक धीरगंभीर वातावरणात आपण प्रवेश करत आहोत असे वाटत होते. डोळे मिटले की ओम् च्या उच्चारवाने जसे तरंग तयार होतात तसे काहिसे वाटत होते. इथे येताना दत्तसंप्रदाय, दत्तमहाराज यांच्या लहानपणापासून कानावर पडलेल्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. हळूहळू पायऱ्या कमी होत होत्या. आम्ही एकाठिकाणी बूट काढले. थोड्याच वेळात आता दर्शन होणार होते.
डोंगरा आडून दिसणारे मंदिर
क्रमश:
आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे. ज्याची बोटे इतकी रेखीव ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसायला कशी असेल. पादुकांभोवती कुंपणाप्रमाणे स्टीलच्या सळया उभ्या लावल्या आहेत. आपण लांबूनच दर्शन घ्यायचे. मागे गर्दी खुप होती, म्हणून प्रदक्षिणा करतच आम्ही बाहेर पडलो. याचसाठी केला होता सारा अट्टाहास.. मी इतके चढून वर पोहोचले होते, कोणत्याही थकव्याशिवाय.. मन तृप्त झाले होते. धीरगंभीरता मनात खोलवर उतरली होती. गोरक्षशिखरापासून दत्तशिखरापर्यंत आम्हाला जवळ जवळ ३/३.३० तास लागले होते. पण इतकावेळ कसा गेला आजिबात कळले नाही.
रांगेत उभे असताना खडकावर पडणार्या सावल्या:

आता उतरायला सुरवात. मनातून तिथून जाऊच नये असे वाटत होते. पण जाणे भाग होते. आम्ही परत कमंडलू तीर्थाच्या रांगेत उभे राहिलो. इथे एकदम शिस्तबद्ध कारभार होता. आधी धुनीचे दर्शन घ्यायचे, मग प्रसादासाठी दुसऱ्या मंडपात जायचे. तिथून बाहेर येऊन तीर्थ प्राशन करायचे मग बाहेर. इथेही बरेच लोक सेवेसाठी जाऊन रहातात. अखंड अन्नदान इथे केले जाते व येथील प्रसाद आवर्जून घेतला जातो. येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. त्यात अनेकांना दत्तगुरूंचे दर्शन झालेले आहे. असं म्हणतात की दत्तगुरु जेंव्हा तपस्या करत होते तेंव्हा जुनागडमधे दुष्काळ पडला, म्हणून अनुसया मातेने त्यांच्या तपश्चर्येला थांबवून आजूबाजूची परिस्थिती त्यांना सांगितली. त्या प्रसंगी त्यांनी कमंडलू खाली फेकला, त्याचे कमंडलू तीर्थापाशी २ तुकडे झाले. एकातून अग्नी निर्माण झाला, तर एकातून पाणी. असे हे कमंडलूपासून निर्मिलेले कमंडलू तीर्थ.
इथे आम्हाला गरम गरम खिचडी, भाजी, दलीयाचा गुळाचा शिरा असा प्रसाद मिळाला, तोही सकळी सकाळी ८.३०च्या सुमारास. एकदम चविष्ट. सकाळी सकाळी एवढे अन्न गरमा गरम बनविणाऱ्या व वाढणाऱ्या सेवेकऱ्यांची कमाल वाटली.
आम्हाला असे सांगितले होते की वर बऱ्याचदा तीर्थ बाटलीत भरून देत नाहीत तेंव्हा बाटली नेऊ नका. पण आज बाटलीतही तीर्थ देत होते. त्यांना उन्हाळ्यात अक्षरश: १ गडूमधे आंघोळ, कपडे धुणे करावे लागते तरी अन्नदानात कधी खंड पडत नाही. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. इथे एकूणच वर शिधा आणणेही खूप कष्टाचे आहे. अनेक लोक थोडाफार शिधा, पैसे असे दान देतात. आम्हीपण केले. आम्हाला दत्तगुरूंचा फोटो व प्रसाद भस्मासह मिळाला.
हे सगळ करून येईपर्यंत बरेच वाजले असणार. आता आम्ही आश्रमात पोचल्यावरच वेळ पाहिली. आता १५०० पायऱ्या चढून गोरक्ष शिखर गाठायचे, मग अंबाजी. परत गोरक्षांचे दिवसा उजेडी दर्शन झाले. आता मोक्षाची गुहापण दिसली. त्याला पापपुण्याची गुहापण म्हणतात. गुहाम्हणजे छोटासा बोगदाच आहे. त्यातून सरपटत सरपटत बाहेर पडायचे. मी डोके आधी घालायच्या ऐवेजी पायाकडून शिरले आणि बाहेर पडले. तर लोक म्हणायला लागले हे चुकीचं आहे, परत जा आणि डोक्याच्या बाजूने शिरा. मी म्हटले अहो असतं एखादं बाळ पायाळू..:)
काही रस्त्यातले फोटो :


तिथून अंबाजी माता शिखर गाठले. इथे एका दुकानी, आधी आलेल्यांचे चहापान चालू होते. मी लिंबू सरबत घेतले. रात्रीतून पाणी असे प्यायलेच नव्हते. खाली तीर्थावरही अगदी अर्धा ग्लास प्यायलेला. आता लिंबूसाखरेने अजून ताजंतवान वाटलं. अंबाबाईच्या मंदीरात गेले. आता गर्दी कमी झाली होती. चढणारे तर जवळपास कुणी नव्हतेच. अंबेचे मंदीर अगदी शांतपणे आतून पहायला मिळाले. देवी तर थेट आमची रेणुकामाताच. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे ऐकले होते म्हणून पुजाऱ्यांना विचारले की देवीच्या कुठल्या अवयवामुळे हे स्थान निर्माण झाले. त्यांनी नाभी असे सांगितले. स्थानिक लोक बऱ्याचवेळा इथपर्यंत येऊन मातेचे दर्शन घेतात आणि खाली जातात असेही सांगितले. आता पुढचा टप्पा जैन मंदीरे.
जैन मंदिरांचा समूह इथे वसलेला आहे. ती दिसतातही खूप सुंदर. बरेच कोरीवकाम केलेली अनेक मंदीरे आहेत. त्यातील शिवमंदीर प्राचीन आहे असे म्हणतात. जाताना पटापट अंबामाता शिखराला पोहोचलो होतो. येताना मात्र वेळ लागला. त्यात मधे मी गोमुखी गंगेचे दर्शन घेतले तिथेही वेळ गेला. कितीतरी वेळ मंदिरे नुसती लांबूनच खुणावत होती. पण शेवटी एकदा त्यांच्या जवळ पोचलेच. आता उनही जाणवत होते. उन सावलीचा खेळ चालल्याने उन्हाचा त्रास मात्र झाला नाही.
बरीचशी मंदीरे बंद होती. मी नेमीनाथांचे मात्र पाहिले. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. जैनलोकं इथपर्यंत दर्शनाला येत असतात. जरासा थकवा वाटत होता. मन मात्र एकदम फ्रेश होते. इथे क्षणभर विश्रांती घेऊन उतरू लागलो. आता फक्त पायऱ्या उतराच्या. पण तेच अवघड जाते असे म्हणतात, भराभर पायऱ्या उतरल्या तर नंतर पायात गोळे येतात तेंव्हा सावकाश उतराच्या.
सतत खुणावणारी जैन मंदिरे :


उजवीकडे रस्ता दिसतोय तिथे मंदिराच्या भिंतीमुळे उन्हापासून संरक्षण होते.

आता मी आणि शुभांगी थोडावेळ एकत्र उतरलो, मध्येच आम्ही एक काकडी खाल्ली दोघींनी मिळून आणि मस्त थंडगार वाटले, भूकही भागली, थकवाही गेला. मग मात्र ती पटापट पुढे निघून गेली. उतरताना परत भर्तुहरी-गोपीचंद गुहा, बेलनाथ महाराज करत सावकाश उतरत होते. मधे मधे उन जाणवत होते, मधेच आभाळ, छान वातावरण होते. आजूबाजूला निसर्ग ठासून भरलेला, दाट झाडी, झाडे तरी कीती वेगवेगळी. बेल, तुळस तर अमाप होते. मधे मधे पांढरी आणि पिवळी कोरांट फुललेली. कोरांटीची एवढी मोठी फुले पहिल्यांदाच पहात होते. लहानपणी अंगणात कोरांट होती पण तिची फुले म्हणजे साधारण अबोलीपेक्षा थोडी मोठी. इथे प्रदूषण नसल्याने सगळीच झाडे वेली तरारून वाढलेली.
खाली उतरता उतरता संध्याकाळ व्हायला लागली. वानरे आता खूप दिसायला लागली. त्यांचे मस्त खेळ चालू होते व आश्चर्य म्हणजे एकाही वानराने त्रास दिला नाही की रस्त्यात आले नाही. माकडेच फक्त त्रास देतात की काय कुणास ठाऊक. त्यांचे खेळ बघत किती पायऱ्या उतरतोय हेही कळत नव्हते. मधेच एका ठिकाणी एकदम सारे चिडीचूप झाले, वानरानी झाडावरुनच खॉक् असा इशारा दिला; मी ज्या पायरीवर होते तिथेच जवळच झाडीत खसपस झाली. मला वाटले कुठलेतरी जनावर पायरीच्या दिशेने येत असावे. मी जिथे होते तिथेच थांबले पण तो आवाज लांब जाऊ लागला. थोड्याच वेळात वानरे परत खाली उतरली आणि खेळू लागली म्हणजे जनावर गेले असावे मग मी ही चालू लागले. शेवटच्या पायरीवर आले तेंव्हा - " अरे पायऱ्या संपल्यापण" अशी मनाने प्रतिक्रीया दिली. परत पायरीवर डोके टेकले, दत्तगुरु, चढावा हनुमान यांचे आभार मानून भवनाथाकडे निघाले. मला असे कळले होते की शेवटच्या पायरीशी ॲक्युपंक्चरवाला बसतो आणि त्याचा खूप फायदा होतो. पण मला काही तो दिसला नाही.
मी भवनाथाचे दर्शन घेतले, जुन्या आखाड्यात जाऊन दत्तमुर्तीसमोर डोके टेकले. ही मुर्ती सुद्धा खूप प्रसंन्न आणि हसरी आहे. तिथे डोके टेकल्यावर क्षणात् जाणीव झाली की आपले उद्देश्य आता पुर्ण झाले. माझे डोळे भरुन आले, अश्रूंना बांध घालणे अवघड झाले. झ्टकन् उठून बाहेर पडले. जवळच धर्मशाळा होती. तिथे जवळपास सर्वच आलेले होते आणि आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. सर्वात शेवटी माझ्या २न्ही काकू आणि अजून एक जण होती. तिचे बूट कमंडलू तीर्थापाशी चोरीला गेले त्यामुळे अनवाणी उतरत होती. ते पण मग निवांत उतरले. रात्री १२.३०ला गाडी होती त्यामुळे सगळ्यांनीच आंघोळ विश्रांतीला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी रात्री घरी पोचलो आणि ही गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
दिवसाचे भवनाथ मंदिर :

आम्ही रहात असलेले नरसी मेहता धामः
एक स्वप्नवत असा हा प्रवास झाला. स्टेशनजवळचा स्कायवॉक पार करताना त्या जिन्यांनीही माझी दमछाक होते, मधे थांबावं लागतं आणि हे एवढे परिक्रमेचे अंतर, इतक्या हजारो पायऱ्या कसेकाय पुर्ण केल्या माझाच विश्वास बसत नाही. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मला कळाले की रात्रीचे चढायचे असते तेंव्हा पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा अशीच होती कारण मला झोप आजिबात आवरता येत नाही. (लक्ष्मी रस्त्यावर भर गणपती मिरवणुकीमध्येही मी दुकानाच्या पायरीवर बसून झोप काढलेली आहे ! ). पण गुरुशिखराच्या रस्त्यावर एकही क्षण थकवा किंवा झोप जाणवली नाही. उतरताना पाय लटपटतात, एकेक पायरी नको होते असे ऐकले होते, यातला एकही अनुभव मला आला नाही. उलट घरी आल्यावरही मी ताजीतवानी होते. सहज चालता येत नव्हते किंवा खाली मांडी घालून बसायला १/२दिवस त्रास झाला तेवढेच!
असे अनुभव आले की त्या जगतगुरुंवर आपोआप विश्वास बसतो आणि मस्तक त्यांच्या चरणी लीन होतं मनात शब्द उमटतात "जय गिरीनारी !"
असा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी केलाच पाहिजे! एकदा तरी जंगल जोखले पाहिजे, गुरुशिखरावरील गूढता, रमणीयता अनुभवली पाहिजे. वरजाताना मुळीच फार खाणे पिणे नेऊ नये. रस्त्यात अनेक दुकाने आहेत व तिथे सर्व काही मिळते. पेनकिलर किंवा स्प्रे मात्र जवळ ठेवावा. त्याचा उपयोग होतो. वर जाताना कपडे सैलसर, सर्वांग झाकणारे व सुटसुटीत असावेत. त्याने चढाउतरायला व उन वाऱ्याचा त्रास होत नाही. गिरिनारची विशेषता हीच की इथे तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता, अगदी ट्रॅकपॅण्ट टी शर्ट देखील.
या अश्या प्रकारच्या यात्रा आपणही करु शकतो हे बीज माझ्या सासूबाईंनी रोवले. त्यांच्या ठिकठिकाणच्या वाऱ्या पाहूनच मनातील सुप्त इच्छेला सत्यात आणणे शक्य वाटले. परत इतक्या ऐनवेळी जा तू मी काम संभाळतो म्हणणारा माझा कलीग, माझा बॉस यांचाही यात हातभार आहे. माझ्या नवऱ्यानेही जाण्याविषयी कुठलीच तक्रार केली नाही त्यामुळे मी समाधानाने जाऊ शकले. माझ्या नणंदेने औषधांची यादीच मला पाठवून दिली व ती उपयोगीही पडली. बहिणीनेही वेळोवेळी मॉरलसपोर्ट दिला ज्यामुळे ताण कमी होऊन तयारीवर व धेयावर लक्ष केंद्रीत करता आले. या अश्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादाने ही यात्रा पूर्ण झाली.
सर्वात शेवटी असेच म्हणेन की एकतरी वारी अनुभवावी गुरुशिखराची! जय गिरिनारी!
नीलाक्षी
गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार
पार्श्वभूमी:
आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा ध्यास घेतला असतो. ती गोष्ट पुरी करण्यासाठी आपण जीवाचे रान करुन ते ध्येय गाठतो. पण कधीतरी असेही होते की कसलीही इच्छा, योजना मनात नसतांना एखादी गोष्ट आपसुक आपल्या पुढ्यात येऊन ठाकते आणि आपण अगदी झपाटल्यागत त्या मागे लागतो. ती पुरी करण्याच्या दॄष्टीने योग्य ती कार्यवाही अगदी नकळत घडून येते. घरात एखादं पक्वान्न बनवलं असतं आणि आई ते पक्वान्न आपल्या बाळाने खावं म्हणून आग्रह करत असते, पण अजाणतेपणामुळे बाळ मात्र नको नको म्हणत आढेवेढे घेत असतं. शेवटी आई बाळाचा हात धरुन स्वहस्ते त्याला भरवते आणि ती अवीट गोडी चाखतांच बाळाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दातीत असतं.
ऑगस्ट अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून गिरनार पर्वताची यात्रा घडली. त्याची कहाणीही थोडीफार अशीच आहे. ही यात्रा अगदी पाच सहा दिवसांची असली तरी तो प्रवास माझ्या मनात त्याआधी तीन महिन्यांपासून सुरु झाला होता. या प्रवासात जे जे घडले ते तुमच्याबरोबर शेअर करावे तसेच हा अनुभव कायम स्मरणात रहावा यासाठी हा लेखनप्रपंच.
हे निव्वळ प्रवासवर्णन नाही. तर त्याला माझ्या विचारांची,अनुभवांची जोड आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ प्रवासाच्या ३ महिने अगोदर ज्या आणि जशा घटना घडून आल्या आणि ध्यानी मनी नसलेली ही यात्रा माझ्याकडून घडवली गेली त्याचे मला जसे जाणवले तसे वर्णन यात असेल. या लेखनमालिकेचा 'श्रद्धा' हाच मूळ गाभा आहे, हे लक्षात घेऊनच हे वाचाल तर हे लेखन अधिक भावेल असं वाटतं.
साधारण फेब्रुवारी महिन्यात माझा चुलत भाऊ माझ्या घरी आला होता. त्या वेळी त्याने 'दत्त अनुभुती' नामक एक पुस्तक मला भेट दिले. "वाच तुला नक्की आवडेल", असं म्हणाला. यात काय आहे? असं विचारताच या पुस्तकाच्या लेखकाने गिरनार पर्वताच्या ११ वार्या केल्या आहेत आणि त्या दरम्यानचे अनुभव यात लिहिले आहेत हे सांगितलं त्याने. “मी वाचेन” म्हणून ते पुस्तक असंच टीपॉयमध्ये इतर पेपरांसोबत ठेवून दिले आणि त्याबद्दल विसरून गेले. या घटनेला तीन साडेतीन महिने उलटून गेल्यावर १८ मे या दिवशी घरात एकटी असतांना अचानक मला या पुस्तकाची आठवण झाली. लगेच ते वाचायला घेतले. अक्षरशः ते खाली ठेववेना, इतके थरारक अनुभव त्यात लिहिले होते. तोवर मला गिरनार नामक एक उंच पर्वत असून तिथे दत्तगुरुंचे जागॄत स्थान आहे जिथे गीरच्या जंगलातून जावे लागते,इतपत जुजबी माहिती होती. मात्र हे पुस्तक वाचत असतांना बर्याच गोष्टी कळल्या. काही शंका कुशंका मनात आल्याही ज्यांचे निरसन गूगल भाऊंनी केले. दहा हज्जार पायर्या चढून या दत्तगुरुंच्या स्थानी पोहोचता येते हे वाचताच "माझा आपला इथूनच नमस्कार घे दत्तबाप्पा" हे सहजोद्गार निघाले. याचं कारण मी मुळात श्रद्धावान असले तरी आवाक्याबाहेर असलेली शारिरीक मेहनत घेऊन, खूप उंच चढून किंवा खूप वेळ चालत त्याचप्रमाणे तासंतास रांगा लावून देवदर्शन घेणार्यांतली नाही. देव तर आहेच ना सर्वत्र , मग काय गरज आहे इतका त्रास करुन कुठे जायची हे असं साधं सोपं लॉजिक मी नेहमी लावत आले आहे. त्यामुळे गिरनारबद्दल काही वेगळे घडण्याची सुतराम शक्यता माझ्या बाबतीत नव्हती. पण.....
तसे घडायचे नव्हते………..
हे पुस्तक वाचल्यापासून गिरनार माझ्या डोक्यात घोळू लागाला. दुसर्या दिवशी नेटवर गिरनार बद्दल माहिती वाचून काढली. यू ट्युबवर काही व्हिडीओज पाहिले. पुस्तक वाचून आवडल्याची पोच रविवारी रात्री भावाला व्हॉटसअपवर दिली. त्याच्याशी चॅटींग करत असतांना सहज बोलून गेले की “हे पुस्तक वाचल्यापासून एकदातरी गिरनारला जावंस वाटतंय रे”. त्यानेही थम्ब्स अप ची स्मायली पाठवली आणि मी झोपले. दुसर्या दिवशी स्वप्नात मी स्वतःला गिरनार पर्वत चढत असलेलं पाहिलं. दोन दिवस सतत हेच विचार करतेय त्याचा परिणाम म्हणून असले स्वप्न पडले असणार असा विचार करतच सकाळी उठले. दूध तापत ठेवले असतांना सहज म्हणून फोन हातात घेतला, नेट ऑन केलं. सर्वात पहिले दिसला तो भावाचा मेसेज की श्रावण महिन्यात २४ ते २९ ऑगस्ट गिरनार यात्रा,इतर माहिती आणि लवकर नावे नोंदवण्याची सुचना. माझ्या भावाची मेडीकल कॉलेजातील मैत्रीण, जी स्वतः ज्या ग्रुपसोबत गिरनार यात्रा करुन आली होती तिने याच ग्रुपच्या पुढच्या यात्रेसंबंधित माहिती माझ्यासाठी भावाला पाठवली होती.
आपलं स्वप्न खरं होऊ घातलंय की काय असं मनात येऊन जीवाची उगीचच तगमग होऊ लागली. का कोण जाणे पण आपण गिरनारला जावं असं वाटू लागलं, पण त्याचबरोबर दहा हजार पायर्या समोर दिसू लागल्या. हे काही आपल्याला झेपायचे नाही. लहानपणापासून आजतागायत कधीच कुठला मैदानी खेळ, नियमित व्यायाम काहीही न केलेली मी, आता एकदम दहा हजार पायर्या कशा काय चढणार? याबद्दल साशंक होते, नव्हे माझ्या आवाक्यातलं हे नाहीच अशी खात्री होती.पण आतला आवाज काही वेगळं सांगत होता आणि ते म्हणजे प्रयत्न तर करुया, इतके लोक जाऊन आले आहेत की.कदाचित जमेलही आपल्याला. द्विधा मनःस्थिती झाली. लेकाचे दहावीचे वर्ष, त्याला फक्त आईंसोबत ठेवणे नवर्याला योग्य वाटेना, आईंचे ही वय झाले आहे. मग नवरा म्हणाला की तुझी मनापासून जायची इच्छा दिसतेय तर तू जा, मी आणि आई मिळून घरचं मॅनेज करु. तरीही अशा अनोळखी ग्रुपसोबत एकटं जायला मन धजावत नव्हतं. गिरनार चढाई ग्रुपनेच करतात. तो रात्री चढला जातो त्यामुळे शक्यतो लोक ग्रुपनेच जातात. माझं हो /नाही अजूनही नक्की ठरत नव्हतं. शेवटी भावाशी बोलले. त्याने त्याच्या मैत्रिणीशी बोलायला सांगितलं. तिने अगदी आश्वस्त केलं, की “बिनधास्त नाव दे, तुला घेऊन जाणारा 'तो' आहे इतकं लक्षात ठेव, बाकी कसलीही शंका मनात आणू नकोस”. बस्स ! मनाचा निर्णय झाला होता की आता मागे पहायचं नाही, फक्त कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. ऑफिसमधली माझी एक मैत्रीण गुजराती आहे, देवभोळी आहे. ती येईलसे वाटले. ऑफिसमध्ये पोचताच तिला अमुक अमुक तारखांना गिरनारला येशील का? विचारले. क्षणाचाही विलंब न लावता तिने होकार दिला आणि मी आमच्या दोघींचं नाव रजिस्टर केलं. नाव देऊन पैसे तर भरुन ठेवू, जाणं, न जाणं पुढे बघू असाच विचार करुन.
का माहीत नाही एकदम शांत, निवांत वाटू लागलं. मनाची दोलायमान अवस्था शमली होती.पण खरी कसोटी आता सुरु होणार होती. ती म्हणजे इतक्या पायर्या चढून उतरण्यासाठी शरीराला आणि मनालाही तयार करणे. तीन महिने माझ्या हातात होते. स्वतःच्या शारिरीक क्षमतेबद्दल खात्री होती की हे माझ्याच्यानं होण्यासारखं नाही. त्यात कॉलेस्टेरॉल वरचेवर धोक्याची पातळी गाठत असतं माझं. आपल्यामुळे ग्रुपमधल्या कोणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं.जे आधी जाऊन आले होते ते ट्रेकर्स वगैरे, ज्यांच्या गाठीशी असे डोंगरमाथे पालथे घालण्याचा मुबलक अनुभव आहे. माझ्यासारख्या ‘कच्च्या लिंबू’ कॅटेगरीतलं कोणी चढून गेलंय याबद्दल काही माहिती मिळत नव्हती.शेवटी मनाशी निर्धार केला की गिरनारची वारी ‘दत्तगुरुंच्या’ इच्छेनेच पुरी करता येते ही वदंता आहे, ते निर्विवादपणे खरं, तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवायचे, स्वतःची शारिरीक क्षमता वाढवायची,तितकं आपल्या हातात नक्कीच आहे. मगच देवाला आळवायचं की यापुढंचं सगळं तू बघून घे देवा.
झालं, दुसर्या दिवसापासून चालायला नियमितपणे सुरुवात केली, जी मी माझ्या लहरीनुसार कधी-मधी करत होते. ३-४ दिवस झाले, पण असे वाटू लागले की जिने चढण्यासाठी आवश्यक त्या व्यायामाची आता खरी गरज आहे. माझ्या काही ट्रेकर्स मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले, त्यांचा फायदा चढताना झालाच. माझा भाचा गेली काही वर्षे मॅरेथॉन्स करत आलाय. त्याच्याशी बोलले. त्याच्याकडून जिने चढणे-उतरणे यासाठी शरीराची तयारी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम प्रकार जाणून घेतले. त्याने पाठवलेले व्हिडिओज पाहिले आणि सुरु झाली माझी भौतिक तपश्चर्या. दररोज सकाळी सूर्यनमस्काराने सुरुवात, हॅमस्ट्रींगचे व्यायाम,क्रंचेस, स्क्वॅटस इ. त्याचबरोबर प्रोटीन्सयुक्त आहार. संध्याकाळी ऑफिसातून निघतांना जिने चढून -उतरण्याचा सराव. हे दररोज करत, हळू हळू वाढवत महिन्या दीड महिन्याभरात रोज १४ सू.न., ४५ स्क्वॅटस, 30 क्रंचेस आणि २० ते २२ जिने चढणे -उतरणे इथवर गाडी आली. त्यानुसार आहारात बदल केल्यामुळे असेल कदाचित किंवा व्यायाम हळू हळू वाढवत नेल्यामुळे शरीराला सवय झाली असावी म्हणून असेल, पण थकवा जाणवत नव्हता. याच्या जोडीला ऑफिसला येण्या- जाण्यासाठी ट्रेनचे जिने चढणे-उतरणे हे तर होतच होते.
दिवस पुढे पुढे सरकत होते. अधून मधून भेटणारे बारीक दिसतेयस असे बोलू लागले. माझ्या गिरनार यात्रेबद्दल आणि त्यासाठीच्या तयारीबद्दल फारच कमी जणांना माहीत होते. बापरे दहा हज्जार पायर्या? जमणार आहे का तुला? काही झालं म्हणजे? असं माझ्या काळजीपोटी बोलून माझा आधीच डळमळता निर्धार गळपाटून जाऊ नये म्हणून मीच ठरवलं जेव्हा जायला निघू तेव्हा सांगायचं सर्वांना. वजनावर लक्ष ठेवून होते, ते काही कमी झाले नव्हते, मला थकवा, अशक्तपणा जाणवत नव्हता, So I was on a right track असे स्वतःला समजावत माझी साधना चालू ठेवली.
दिवस सरत होते. बघता बघता ऑगस्ट महिना येऊन ठेपला. घरापासून, घरच्यांपासून दूर रहाणं हे ऑफिसनिमित्तानं अधेमधे होत असलं तरी आता जिथे जाऊन रहाणार होतो ते एक गाव असणार होतं. तळेठी नावाचं गाव जिथून गिरनारचा पायथा सुरु होतो. या गावात काहीच सुविधा नाहीत. अगदी बँकेचं एटीएमही नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्यामुळे तिथे जाऊन दुसरं काही होऊ नये म्हणून स्वतःला मी या काळात विशेष जपलं. केव्हाही डोकं वर काढणारी माझी दाढदुखी., या ऐन मोक्याच्या वेळेस कशी कच खाईल? जुलैमध्ये तिने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. महिन्याभराचा अवधी होता. ताबडतोब डेंटीस्ट गाठून अक्कलदाढ काढण्याची शस्त्रक्रिया उरकून घेतली. इतर फिलिंग्स वगैरे पूर्ण केली.
माझ्या सोबत येणारी माझी मैत्रीण तर दररोज नियमित चालण्याचा व्यायाम कित्येक वर्षे करत आली आहे, तसंच ती पूर्वी गिरनारलासुद्धा जाऊन आली होती, पण ५००० पायर्यांवरील अंबा मातेच्या देवळापर्यंत. त्यामळे तिला बर्याच गोष्टी माहीत होत्या. ती रोज काही ना काही सल्ला देत असे. ती माझ्या सोबत असणार ही गोष्ट मला फारच दिलासादायक होती. पण याच सुमारास काहीतरी विपरीत घडले.
तिची आई आजारी पडली. प्रकॄती खालावत जाऊन ती अत्यवस्थ झाली. हॉस्पिटल, आय सी यू, या चक्रात ती अडकली. आईचे वय ८७. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती. जर ती येऊ शकली नसती तर मी पुन्हा एकटी पडले असते. मी एकटीने गिरनारला जावे याला आमच्या आई तयार नव्हत्या. त्यांनी जरी असे बोलून दाखवले नाही तरी त्यांचा काळजीचा सूर मला जाणवत होता. त्यांच्या मनाविरुद्ध आणि जीवाला घोर लावून माझा पाय घराबाहेर पडला नसता. त्यावेळी मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना केली की “इतकं सारं घडवून आणलंयस तर आता काही मोडता येऊ नये असं वाटतंय, याउप्पर माझ्यासाठी जे उचित असेल तसं घडू दे आणि ते स्वीकारायची ताकद मला दे”.
७ ऑगस्टला माझ्या मैत्रिणीची आई देवाघरी गेली, तिचे दिवसकार्य वगैरे होऊन मैत्रीण २० तारखेला घरी आली. २४ तारखेला निघायचे होते, दत्तगुरुंनी मार्ग दाखवला होता.
ऑगस्ट सुरु झाला तसा आयोजकांनी गिरनारयात्रेत सहभागी होणार्यांचा व्हॉटस अप ग्रुप तयार केला. त्यावर रोज काही ना काही सुचना येत असत. प्रवासात आणायचे सामान, पर्वत चढताना घेऊन जायच्या वस्तू, अगदी चढतांना चप्पल, बूट कसे असावेत इतक्या बारीक-सारीक बाबतीत मार्गदर्शन केले जाऊ लागले.त्यांच्या अनुभवी सल्ल्याबरहुकुमच मी माझी बॅग भरत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयत्या वेळी नवे बूट नकोत, म्हणून आधी बूट घेऊन ते घालून चालण्याचा, चढ-उताराचा सराव करु लागले. नऊ हजार पायर्यांच्या टप्प्याला भणाणता वारा असतो, छत्री कुचकामी ठरते, त्यामुळे रेनकोटच न्यायचे ठरवले. चढतांना आपण थकतो त्या वेळी पटकन एनर्जी मिळेल असे खाऊचे पदार्थ जवळ ठेव असा मोलाचा सल्ला भाच्याने दिला होता. त्याप्रमाणे स्निकर्स एनर्जी बार्स आणि खजूर, इलेक्ट्रलचे सॅशेस सोबत घेतले. बाम, रोल ऑन, सेंसर अशा वेदनाशमक गोष्टींनी औषधांची बॅग पूर्ण भरली.
या सुमारास पर्वतावर प्रचंड धुकं असतं. काही फुटांवरचंही दिसत नाही. त्यामुळे ७ ते ८ फूट लांब प्रकाशझोत पडेल अशी टॉर्च सोबत घ्यायची होती. ती घेतली. संपूर्ण चढाई रात्री करायची असली तरी अध्येमध्ये देवळात न्यायचे सामान विकणार्यांची दुकाने/घरे असतात. त्या लोकांशी संपर्क करुन कोणत्याही क्षणी डोलीची व्यवस्था करता येते ही दिलासाजनक खबर मिळाली. डोलीवाले किती पैसे घेतात तो अंदाज दिला गेला. मी तेव्हढे पैसे जवळ बाळगायचे ठरवले. कोणत्याही वेळी असे वाटले की आपण नाही चढू शकत तर अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, किंवा एकटे वाटेत थांबण्यापेक्षा डोलीचा पर्याय चांगला होता. चढतांना जास्त वजन नको, म्हणून देवासाठीही घरुन काहीही प्रसाद्,वगैरे नेला नव्हता. आयोजक त्याची व्यवस्था करणार होते. अगदी रिक्त हस्ताने जात होते आणि खरंतर त्याला देऊन तरी काय देणार होते मी? तोच तर देत आला होता आजवर.
२४ ऑगस्ट २०१९....... गेले तीन महिने उराशी बाळगलेलं स्वप्न साकार होत होतं. आज दुपारी १२.४५ ची बांद्रा टर्मिनसवरुन ट्रेन होती. सकाळपासून शुभेच्छांचे फोन, मेसेजेस येत होते. समोरच्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. मग मीच त्या प्रत्येकाला धीर दिला की काळजी करु नका, मी सुखरुप जाऊन येईन.
१०:३० वाजता निघाले.सर्वांनी बान्द्रा टर्मिनसलाच भेटायचे होते. तिथेच सारे सदस्य प्रथम भेटले. हा वसईचा ग्रुप.काही जण एकमेकांना ओळखत होते, तर काही अनोळखी. एकूण २४ सदस्य होते. पैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ६९ वर्षांचे आजोबा आणि सर्वांत ज्युनियर त्या आजोबांचा ७ वर्षांचा नातू. बाकी सगळे अधले मधले. बरेचसे एकेकटे होते, आम्हा दोघींसारखे, फक्त एक जोडपं आणि आजोबा-नातवाचं कुटुंब. विशेष म्हणजे २४ पैकी फक्त ३ जण जे आयोजक होते तेच आधी गिरनारला जाऊन आले होते, पैकी एक मी वाचलेल्या 'दत्त अनुभुती' या पुस्तकाचे लेखक बाकी सर्व नवखे, माझ्यासारखेच साशंक, त्यामुळे अगदी हुश्श झालं. जुजबी ओळख वगैरे झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
क्रमशः
तुमच्या गावी आलो आम्ही
प्रवास सुरु झाला. दोन वेगळ्या डब्यांत मिळून आमचे २४ लोक बसले होते. आयोजक थोड्या थोड्या वेळाने चक्कर मारुन कुणाला काही हवं नको ते पहात होते. मिनरल वॉटरचे वाटप करीत होते. जाताना दुपारचे जेवण बोरीवली येथे तर रात्रीचे अहमदाबाद येथे गाडीत चढवले गेले. आयोजकांचे टाय अप्स असलेल्या कॅटररने पॅक्ड फूड गाडीत पोहोचते केले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुनागढ येणं अपेक्षित होतं, जिथे आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे अहमदाबादला जेवण झाल्यावर सगळे गुडुप झोपून गेलो. झोपताना अडीचचा गजर लावला होता. त्याप्रमाणे उठलो. सामान आवरले. गाडी वेळेवर पोहोचत होती. साधारण तीनला दहा मिनिटे असतांना आम्ही उतरलो. रिक्षात बसून लगेच तळेठी गाठले. तिथेच आमची रहयची सोय केली होती आणि तिथूनच सगळीकडे जायचे होते.
पंधरा-वीस मिनिटांत आमचे हॉटेल आले. रूम्स ताब्यात दिल्या गेल्या. रूमवर गेल्यावर काही वेळ आराम केला. सकाळी नऊ-साडेनऊला तयार रहायला सांगितले होते. त्याप्रमाणे आवरत होतो. रुमवरच चहा नाश्ता केला.
आज २५ ऑगस्ट रविवारचा दिवस होता. आज रात्री गिरनार चढण्यास सुरुवात करायची होती. खोलीबाहेर असलेल्या गॅलरीतून आजुबाजूला पर्वत शिखरे दिसत होती. त्यांपैकी अनेकांच्या माथ्यावर ढगांनी दुलई पसरली होती.हिरव्यागार पर्वतशिखरावर अधेमधे पिंजलेल्या कापसासारखे भासणारे ढगांचे पुंजके लक्ष वेधून घेत होते. यातलं नेमकं कुठलं आपल्याला चढायचंय? उत्सुकता शीगेला पोचत होती. डाव्या बाजूला दिसत असणारा पर्वत आम्हाला दाखवला गेला. त्यावर काही बांधकाम केलेलं दिसत होतं. तो जैन मंदीर परिसर, जो ४००० पायर्या चढल्यावर येतो तो. इथवर जाणारे बरेच आहेत. विशेषतः स्थानिक जैन लोक. तेथून अजून वरती अगदी इवलुसं काहीतरी दिसत होतं ते अम्बाजी धाम होतं, ५००० पायर्या चढून येणारं अंबा मातेचं मंदीर. मग दहा हजार पायर्यांवरचं दत्तशिखर कुठे होतं? तर तिथे पोहोचण्यासाठी हा अम्बाजी धामचा पर्वत चढून विरुद्ध बाजूने उतरावा लागणार होता आणि त्या पुढे अजून एक डोंगर चढून उतरल्यावर मग तिसर्या सुळक्यावर दत्तशिखर. अबब.....
त्यामुळे पायथ्यापासून वर नजर टाकली तर दत्तशिखर नजरेत येणे शक्यच नाही. मनात म्हटलं इथे काही मुखदर्शन, लांबून दर्शन, व्हीआयपी दर्शन, नवसाची रांग अशा कॅटेगरीज नाहीत. जे आहे ते दहा हज्जाराचा पल्ला गाठूनच पहायचं.
तळेठी गाव

साधारण दहाच्या सुमारास बाहेर पडलो. सर्वप्रथम तळेठी गावचे ग्रामदैवत 'भवनाथ' मंदीरात निघालो. गिरनार यात्रा ज्या गावातून सुरु होते त्या गावच्या दैवताला सर्वप्रथम आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घातलं जातं. त्यासाठी सर्वात आधी या शिवमंदीरात आलो.पाऊस नव्हता. प्रसन्न हवा होती. सुंदर नक्षीदार बांधकाम असलेले हे शिवमंदीर खूप छान आहे. दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.
भवनाथ मंदीर
आता कुठे? याचं उत्तर आलं "जटाशंकर", बरं म्हणत निघालो. तसं आम्हाला सांगितलं गेलं की जास्त नाही पण पाचएकशे पायर्या चढायच्या आहेत. माझा 'आ' वासला. एकतर गेले काही दिवस कोणत्याही संख्येपुढे ‘पायर्या’ हा शब्द ऐकू येताच माझे कान टवकारले जात होते. माझी चलबिचल सुरु झाली. डोळ्यांसमोर भाच्याचं मॅरेथॉनचं शेड्युल आलं. स्पर्धेसाठी ढोर मेहनत घेतात मात्र स्पर्धा ज्या आठवड्यात आहे तो पूर्ण आठवडा आरामाचा असतो. कसलाही व्यायाम करायचा नसतो शेवटचे काही दिवस. स्पर्धेसाठी एनर्जी साठवून ठेवायची असते. मी सुद्धा असेच केले होते. पण हे काय भलतेच? आज रात्री ‘मिशन गिरनार’ आहे तर त्याआधी कशाला ५०० पायर्या चढून उतरायच्या? ते ही उन्हात? आपण ग्रुपसोबत आहोत त्यामुळे ग्रुप लीडरच्या मतानुसारच वागायला हवे हे कळत होते, तरी देखील मी एक खडा टाकायचा असे ठरवून बोलले की “आता रात्री जाणारच आहोत ना, तेव्हाच ५०० पायर्यांवर जटाशंकराचं दर्शन घेतलं तर नाही का चालणार?”, "नाही हो ताई, जटाशंकर या अंगाला आणि गिरनार त्या तिथे". “अरे देवा”, हे स्वगत होतं. शेवटी ठरवलं की आपण स्पष्ट बोलून तर बघू. म्हटलं, "दादा, आपण आत्ताच ५०० पायर्या चढून उतरलो तर आपली एनर्जी वाया नाही का जायची या उन्हात? रात्रीसाठी ठेवायला हवी ना शिल्लक? उद्या करुयात का जटाशंकर?” तर उत्तर आले की "जटाशंकर म्हणजे प्रिलिम आहे असं समजा आणि रात्री फायनल एक्झाम." “बोंबला… म्हणजे प्रिलिम नंतर लग्गेच त्याच दिवशी फायनल? आपल्या चुका सुधारायला काही वावच नाही की..”. हे ही अर्थात स्वगत होतं. आता ठरवलं की जाऊ दे आता हे लोक जिथे नेतील तिथे गपगुमान जायचं, सांगतील तसं चढायचं , सांगतील तेव्हा उतरायचं. बाकी कोणीच काही बोलत नव्हते तर आपणच का विरोध करावा? त्यात ६९ वर्षांचे आजोबा, दुसरे साठीचे जोडपे उत्साहात चढायला तयार होते त्यांच्यासमोर मी हॉटेलवर जाऊन आराम करते हे बोलायचीही लाज वाटू लागली. मनाशी पक्कं केलं जे व्हायचंय ते सर्वांसोबत माझंही होईल, आता जास्त आढेवेढे घेणं नको. आमच्या म्होरक्याने शेवटी म्हटलं “ताई तुम्ही चला तर खरं, नक्की आवडेल तुम्हाला असं ठिकाण आहे ते.”
त्यांच्या शब्दांची प्रचिती काही वेळातच आली.गल्लीबोळ पार करत एका आडवाटेला लागलो आणि काही क्षणांतच घनदाट जंगलात. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाली झाडं आणि अवतीभवती दगडा-खडकांतून जाणारी वाट, काही ठिकाणी कच्च्या पायर्या. बाजूलाच खळखळत वाहणारा झरा. ज्याचा आवाज मन प्रसन्न करीत होता. झाडे झुडपे इतकी दाट होती की सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतही नव्हती, अंधारुन आलं होतं.जाता जाता पक्ष्यांचे विविध आवाज अगदी मोराचा केकाही ऐकू आला. वाटेत भरपूर माकडे दिसली. पण ती माणसांना त्रास देत नव्हती. एकंदर परीसर आल्हाददायक होता. अजून एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जिथे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती तिथे जिओचे नेटवर्क मात्र व्यवस्थित मिळत होते. ताबडतोब घरी व्हिडिओ कॉल लावला आणि घरच्यांना ही रम्य जागा दाखवली. कधीही कुठेही माझ्यासोबत असणार्या घरच्या तीन मेम्बरांची प्रकर्षाने आठवण येत होती.मध्ये एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जायचे होते, तिथे मात्र जरा भिती वाटली इतकंच. मुंबईकरांसाठी भुशी डॅमचे जे स्थान ते इथल्या स्थानिकांसाठी जटाशंकरचे. जागॄत देवस्थान म्हणून ज्ञात असलं तरी पिक्निक स्पॉट सारखी गर्दी, पाण्याच्या प्रवाहाखाली डुंबणारी जनता. पाचशे पायर्यांची तमा न बाळगता ट्रंका, पेटारे भरभरुन घरून आणलेले खाणे-पिणे उत्साहात वाहून नेणार्या बायका आणि दर पाचेक मिनिटांवर एखाद्या डेरेदार वॄक्षाखाली गोलाकार विसावलेला कुटुंब कबिला, मधोमध वर्तमानपत्राच्या कागदांवर उघडलेले खाण्याचे डबे, अगदी बाटल्या भरभरुन ताकसुद्धा घरुन घेऊन आली होती ही मंडळी. हे दॄश्य पाहून माझी मैत्रीण अगदी सद्गदीत झाली. मला म्हणे गुजराथी माणूस कधीही कुठेही भुकेला रहात नाही, ठाण मांडून खाणं चालू करतो आणि त्यापुढे मी गुजराथी माणूस आणि त्याची खाद्ययात्रा यावर एक चमचमीत व्याख्यान ऐकले.


पुढे जात जात आम्ही मंदीरात पोहोचलो. एका गुहेत , कपारीत ते स्वयंभू शिवलिंग होते आणि त्या भोवती डोंगर कपारीतून वाहत आलेल्या झर्यातील पाणी वाहत होतं. खरंच खूप शांत, रम्य वातावरण होतं तिथलं. मन प्रसन्न करुन गेला तो माहोल. दर्शन झल्यावर आम्ही परतीचा मार्ग घेतला.
जटाशंकर मंदीर
यापुढचं ठिकाण होतं साक्षात गिरनार पर्वताची पहिली पायरी. नाही चढाई रात्रीच करायची होती. पण भवनाथ आणि जटाशंकर दर्शनाननंतर गिरनारच्या प्रथम पायरीवर नतमस्तक होत दत्तगुरुंना आणि स्वतःच्या आराध्य दैवताला प्रार्थना करायची असते की आज रात्री आम्ही तुमच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आम्हाला सुखरुप वरपर्यंत नेऊन आणा. त्यानुसार आमच्यातील प्रत्येकाने पहिल्या पायरीवर डोके टेकून मनोभावे प्रार्थना केली. शेजारीच 'चढवावा हनुमान' नामक हनुमान मंदीर आहे. हनुमानाकडेही पर्वत चढून उतरण्यासाठी शक्ती द्यावी अशी याचना करायची असते. ते ही केले आणि जेवून हॉटेलवर परतलो.
आराम केला. डोंगरावर नेण्याचे जुजबी सामान सॅकमध्ये भरले. आपल्याकडे काही देवळांत विशिष्ट पोशाख घालूनच प्रवेश दिला जातो असे बंधन इथे अजिबात नाही. ज्याला चढतांना जे कंफर्टेबल वाटेल ते घालावे असे सांगण्यात आले होते. जीन्स, शॉर्टस, थ्री फोर्थ काहीही. संध्याकाळी जरा पाय मोकळे करुन आलो आणि जेवलो. रात्रीसाडेअकराला पुन्हा आंघोळ करुन निघायचे होते. डोंगर चढतांना आधारासाठी प्रत्येकाला काठी देण्यात आली होती.
एका हातात टॉर्च आणि दुसर्या हातात काठी या दोन गोष्टी प्रत्येकाकडे असायलाच हव्यात असे सांगितले गेले होते. दुसर्या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करता येणार नाही, तरी काळजी करु नये असे घरच्या सदस्यांना सांगून ठेवायची सुचना आधीच केली गेली होती. निघतांना घरी फोन केला, सर्वांशी बोलले. मन भरुन आले होते. नवर्याला म्हटलं की जोवर नेटवर्क मिळतंय तोवर मी तुला एसेमेस पाठवत राहीन, किती पायर्या चढले , कशी आहे वगैरे. तू सकाळी उठशील तेव्हा मी नेटवर्कमध्ये नसेन पण तुला निदान समजेल तरी माझा प्रवास.
गेले तीन महिने सतत ज्याचा विचार मनात घोळत होता, अगदी ध्यास लागला होता, ते आता काही तासांनंतर दॄष्टीपथात येणार होते. खरंच डोळ्यांनी दिसणार होते की अर्धवट परतावे लागणार होते? माहीत नाही. पण आता त्याची पर्वा नव्हती. ज्याने इथवर आणलं तोच ठरवेल पुढचं. पण जर त्रास झाला, विशेषतः श्वास लागला, धाप लागली तर न लाजता डोली करायची हे मी मनाशी ठरवले होते. तरीही ती वेळ येऊ नये, आपण पायी चढून जावे ही इच्छाही होतीच.
आता ज्यासाठी इतका अट्टाहास केला त्या गिरनारस्थित दत्तगुरुंबद्दल थोडेसे:-
(ही माहिती 'दत्त अनुभुती' हे पुस्तक तसेच आंतरजालावर गिरनार बद्द्ल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार इथे देत आहे).
गुजरात राज्यातील जुनागढ शहरात गिरनारच्या पर्वतरांगा आहेत. समुद्रसपाटीपासून ३६६५ फूट उंचीवर या पर्वतरांगांवरील सर्वांत उंच शिखर - गोरक्षशिखर आहे. तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे असे मानतात. 'गुरुशिखर' या ठिकाणी दत्तगुरुंच्या पादुका - खडकावर अर्धा ते एक इंच आत रुतलेल्या पावलांच्या ठशांच्या रुपात आहेत. पादुकांच्या मागे त्रिमुर्ती स्थापन केली आहे. पूर्वी गुरुजींव्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती जाऊन दर्शन घेऊ शकेल इतपतच जागा होती, मात्र आता बांधकाम करुन साधारण १५ ते २० माणसे आत मावू शकतील इतकी जागा केली आहे. या स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी, ज्या वेळी अत्री ऋषी - आणि अनसुयामातेचे पुत्र म्हणून पृथ्वीवर लौकिक अवतार धारण केला होता तेव्हा, या गुरुशिखरावर तब्बल १२००० वर्षे तपश्चर्या केली होती असे म्हणतात. तपश्चर्या सुरु असताना जुनागढ येथे दुष़्काळ पडला. पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पिक-पाणी होत नव्हते, गुरे, वासरे, माणसे मरु लागली. त्यावेळी अनसुया मातेने आपल्या लेकाला तपश्चर्येतून जागे केले. जागे होताच त्यांनी आपल्या हातातील कमंडलू खाली फेकला, तो दुभंगून दोन ठिकाणी पडला, एका ठिकाणी पाणी उत्पन्न झाले तर दुसर्या ठिकाणी अग्नी. अशा प्रकारे दत्तात्रेयांनी अग्नी व पाण्याची सोय करुन जुनागढ मधील दुष्काळ दूर केला होता. या स्थानावर आजही अन्नपूर्णेचा वास आहे असे म्हणतात व येथे येणार्या प्रत्येकाला अन्नपूर्णेचा प्रसाद दिला जातो. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. त्यामुळे गिरनार चढत असतांना उपवास करु नये, इथला अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण केल्यावरच ही यात्रा संपन्न होते असे म्हणतात. त्या ठिकाणी आजही पाण्याचे कुंड आहे. या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ असे संबोधले जाते. जिथे अग्नी प्रकटला तिथे आजही दर सोमवारी पिंपळाच्या पानांची मोळी ठेवून विशिष्ट मंत्रोच्चरण करतांच स्वयंभू अग्नी प्रकट होतो. हीच धुनी. दत्तगुरु तेथे धुनीच्या रुपात प्रकटतात व अनेकांना त्या धुनीत त्यांचे आजही दर्शन होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथे गोरक्षनाथांचे स्थान आहे. त्यांनी आपले सद्गुरु श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली होती की जिथे मी आहे तिथे तुम्ही, माझे गुरु असायलाच हवेत. म्हणूनच गोरक्षनाथांनी अधिक उंचावर जाऊन तापश्चर्या केली जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर दत्तपादुका राहातील. हे गोरक्षशिखर म्हणूनच सर्वात जास्त उंचीवर (३६६५ फूट) आहे. पायथ्यापासून ४००० पायर्यांवर जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे स्थान व जैन मंदीरे आहेत. तर ५००० पायर्या चढल्यावर अंबा मातेचे देऊळ आहे. अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. साधारण अडीच ते तीन हजार पायर्यापर्यंतची वाट ही गीरच्या जंगलातील आहे. त्यामुळे वन्य श्वापदे दिसू शकतात. यासाठी काठी आणि टॉर्च सोबत घ्यायला सांगितले जाते.
स्वतःभोवती अनेक गूढ वलये ल्यालेला, अद्भुत अशा आख्यायिका ज्याबद्दल सांगितल्या जातात असा हा गिरनार पर्वत. गिरनार चढण्यास जायचे असल्यास व्यवस्थित रस्ता माहीत असलेली व्यक्ती सोबत असावी, त्याचप्रमाणे जो वहिवाटीचा रस्ता आहे, त्या वाटेनेच चढावे आणि उतरावे असे सांगितले जाते. गिरनार ही पर्वत शॄंखला आहे. वहिवाटेनुसार जैन मंदीर, अंबाजी, गोरक्षशिखर,गुरुशिखर या मार्गाने न जाता, वेगळ्याच पर्वतावरुन, वेगळ्या मार्गानेही जाता येत असावे, मात्र अशा कोणत्याही वेगळ्या मार्गावर पायर्या, लाईटस नाहीत. पायरी मार्गावर लाईटस आहेत पण फार अंधुक प्रकाश, त्यामुळे पावसाळी वातावरणात टोर्च शिवाय पर्याय नाही. इतर मार्गाने जाता -येतांना वाट चुकण्याची, वन्य श्वापदांची भिती असते. या पर्वतांवर बर्याच गुहा आहेत. तिथे आजही अनेक जण तपसाधना करीत असतात. अशा आडमार्गावर अनेक तांत्रिक त्यांची साधना करीत असतात, त्यांच्या मार्गातून आपण जाऊ नये आणि म्हणून वहिवाटेनेच पायर्या चढत जावं असं सांगितलं जातं.
शिर्डी, अक्कलकोट आणि इतरही काही देवस्थानांबद्दल जी वदंता आहे तीच या तीर्थक्षेत्राबद्दलही आहे की इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येऊ शकत नाही. 'दत्तगुरुंची इच्छा' असावीच लागते. अशा अनेक आख्यायिका, पुरातन कहाण्या मनात साठवत आम्ही २४ जण सांगितल्या गेलेल्या सुचनांचा आदर करुन, शंका कुशंकांना स्थान न देता, असं खरंच असेल का? असे उलट प्रश्न न करता अर्थात पूर्ण श्रद्धेने चढू लागलो. जास्त लोक ३० ते ५० या वयोगटातील होते. कौतुक करावे तर आमच्या चमूतल्या बाल शिलेदाराचे, रजत त्याचं नाव. खूप उंचावर असलेल्या दत्तबाप्पाच्या दर्शनाला आजी आजोबा आणि आजीची बहीण जात आहेत हे कळताच त्याने येण्याचा हट्टच धरला. इतका की शेवटी आयत्या वेळेस त्याला आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईलाही आमच्या सोबत घेतले. कराटे शिकत असलेल्या या चिमुरड्याचा स्टॅमिना जबरदस्त, सात वर्षांचा हा पोरगा, न थकता उत्साहात चढला तसेच सकाळी उतरलाही, कुठेही झोप येतेय, दमलो अशी तक्रार, कुरकुर नाही की आईला त्याला कडेवर घ्यावे लागले नाही. हॅटस ऑफ टू रजत.
साडेअकराच्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देत बाहेर पडलो. पुन्हा एकदा बंद असलेल्या भवनाथ मंदीराला बाहेरुन नमस्कार करुन गार्हाणे घातले आणि मार्गस्थ झालो. पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. 'चढवावा हनुमंतालाही प्रार्थना केली. बूट घातले आणि चढण्यास सुरुवात केली.
क्रमशः
चालविसी हाती धरुनिया
आम्ही निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता. काही पायर्या चढून होताच घाम येऊ लागला. पहिल्या पाचशे पायर्या खूप थकवणार्या असतात. त्यापुढे शरीराला सवय होते. आम्हाला दिलेल्या सुचनांनुसार आम्ही सावकाश चढत होतो. तसेच चढत असतांना जास्त बोलत राहिले की दम लागतो हे ही लक्षात घ्यायला सांगितले होते. पाणी अगदी गरज वाटली तरच, घोटभर पित चढण्यास सांगण्यात आले होते. काही अंतर चढून गेल्यावर आमच्या मागे-पुढे मराठी भाषिक लोक दिसू लागले. चौकशी करतां तो ५० जणांचा ग्रुप नाशिक, मनमाड येथून आला होता असे कळले. आपल्या सोबतच आपली भाषा बोलणारी मंडळी आहेत हे पाहून जरा बरं वाटलं. आमच्या ग्रुप मध्ये सर्वांत पुढे आयोजकांतील एक व शेवटी सर्वांत सावकाश चढणार्या सदस्याच्या मागे एक आयोजक अशी ग्रुपची रचना सुरुवातीपासून होती. त्यामुळे कोणीही रस्ता चुकण्याची, भरकटण्याची भिती नव्हती. तसंच चढत असतांना सर्वांत पुढे गेलेला ग्रुप जिथे थांबून विश्रांती घेई, तिथे मागून चालणारी मंडळी पोचली की आधी पोचलेली मंडळी मार्गस्थ होत असत आणि हेच मग त्या नंतरच्या मंडळींनी पुढच्या टप्प्यातील मंड्ळींसाठी केले, त्यामुळे चढतांना संपूर्ण ग्रुपमध्ये एक समन्वय होता . कुणीतरी फारच पुढे निघून गेलंय आणि कुणीतरी मागे एकटं पडलंय अशी मिसिंग लिंक कोणाच्याच बाबतीत चढतांना घडली नाही.
पहिल्या पाचशे पायर्या चढून होण्याआधीच आमच्या ग्रुपमधील एक काका थकले. त्यांनी मी चढू शकत नाही. डोलीनेच जाईन हा निर्णय घेऊन टाकला. ते खरच घामाने निथळत होते, प्रचंड धापही लागली होती. त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला होता.ते जरा स्थिरस्थावर झाल्यावर आयोजकाने डोलीची व्यवस्था केली. डोलीवाल्याचे पैसे ठरवले. काकांना त्या डोलीवाल्याच्या ताब्यात देऊनच मग आयोजक पुढे चालू लागले.
मजल दरमजल करीत आमचे चढणे सुरु होते. आजूबाजूला बरीचशी टपरीवजा बंद दुकाने दिसत होती. साधारण अडीच हजार पायर्यांपर्यंत जंगलातील रस्ता असल्यामुळे वन्य श्वापदे आढळू शकतात. मध्यभागी दगडी पायर्या, एका बाजूला दरी तर दुसर्या बाजूला जंगल अशी रचना. ज्या बाजूला दरी होती,त्या बाजूला कठडा होताच असे नाही. त्या जंगलात कीर्र अंधारात पाहिले तर धुक्यामुळे काही अंतरावर पुढचे अजिबात दिसत नव्हते. भयपटात दाखवतात तसे झाडाचे बुंधे आणि धुक्यात अस्पष्ट होत गेलेली वाट...यामुळे वातावरणातील गुढ अजून वाढत होते. एका बाजूची अंधारात हरवलेली खोल दरी आणि दुसर्या बाजूचे धुक्यात अस्पष्ट दिसणारे जंगल. या दोन्ही गोष्टीची नाही म्हटलं तरी भिती वाटत होती. एकदा कधीतरी मी एकटीच राहिले. पुढची मंडळी किती पुढे गेलीत आणि मागून कोण येतंय हे धुक्यामुळे समजत नव्हते. कुणाचा बोलण्याचा आवाजही येत नव्हता. त्या क्षणी मी प्रचंड घाबरले आणि मनापासून सद्गुरुंना आळवले, मला भिती वाटतेय हे ही बोलले, काही वेळातच मागून आमची मंडळी येतांना दिसली. आता यापुढे चुकुनही डाव्या-उजव्या बाजूला बघायचे नाही, फक्त समोरच्या पायर्यांवर लक्ष केंद्रीत करुन पुढे चालायचे हे ठरवले.
हळूहळू चढतां चढतां ५०० पायर्या, १००० पायर्या, १२०० पायर्या असे टप्पे येत होते. अनेकदा येऊन गेलेल्या आयोजकांना ते टप्पे ओळखता येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. नवर्याला सांगून ठेवलं असल्यामुळे मला जेव्हा कळत होतं की ५०० पायर्या झाल्या, १००० झाल्या मी त्याला मेसेज करत होते. मी बरी आहे, फ्रेश आहे, हेही सांगत होते. माझा मेसेज गेल्यावर लगेच त्याचे उत्तर येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याला सांगितलं की आता कधीही नेटवर्क जाईल आणि मग तू काळजी करशील, त्यापेक्षा झोप आता.तसेच झाले. चार हजार पायर्यानंतर मेसेजेस जात नव्हते.
आता बरेच उंचावर आलो होतो. धुकं वाढत असल्यामुळे सुरुवातीला जसा दरदरून घाम येत होता तो येणं थांबलं. धुक्यातूनच आमचे मार्गक्रमण चालू होते. साधारण दोन फुटांवरचंही दिसत नहतं. आजूबाजूचेही थांबत चढत होते. माझ्यासाठी आश्चर्याची वाटणारी गोष्ट घडत होती ती म्हणजे मला अजूनतरी धाप लागली नव्हती, थकवा जाणवत नव्हता. एरव्ही थोडेसे चालून दमणारी मी, चालण्याचा आळस करणारी मी चढत असूनही ताजीतवानी होते. मी माझ्या आयुष्यात स्वतःला इतके फिट फक्त या चढाई दरम्यान अनुभवले. तरीही अति आत्मविश्वास दूर सारून मी अधे मधे थांबत होते. घोटभर पाणी, खजूर, स्निकर्स हे अधे मधे खात होते.
माझी मैत्रीण हळू हळू चढत होती. तिचा आणि एका काकींचा चालण्याचा वेग समान होता. त्यामुळे त्या दोघी एकत्र चालत होत्या. मी त्यांच्या जरा पुढे चालणार्या मंडळींसमवेत होते. चारहजार पायर्या झाल्यावर पहिला टप्पा - नेमिनाथ स्थान म्हणजे जैन मंदिरे आली. खूप भारी वाटत होते. इथवर तर सुखरुप पोचलो हा अनांद सोबत होता. जैन मंदीरांना वळसा घालून आम्ही पुढचा रस्ता धरला.
काही अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते आढळले. एक डाव्या बाजूला जिथे आता जशा पायर्या चढत आलो त्याच धाटणीच्या पायर्या होत्या तर उजवीकडे पायर्या नसून साधी वळणावळणांची वाट दिसत होती. प्रथम येणार्याला अर्थातच जिथे पायर्या दिसत आहेत तिथून जायचे असे वाटले असते. त्यानुसार मी डावीकडे वळणार तोच आमचे नेहमी सर्वांत शेवटी रहाणारे आयोजक आता 'वाटाड्याची' भुमिका चोख बजावत होते. त्यांनी उजवीकडे जिथे पायर्या नव्हत्या तो आपला रस्ता असे सांगितले. मी प्रश्न केला की मग ही पायर्यांची वाट कुठे जातेय? त्यावर तिथे थोडे अंतर चढून गेल्यावर रस्ताच नाही असे समजले. त्या प्रसंगी गिरनारसारख्या ठिकाणी रात्री चढत असताना अनुभवी ग्रुप सोबत असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.
आता पुढचा टप्पा अंबाजी धाम - ५००० पायर्या हे आमचं लक्ष्य होतं.आमच्यासोबतच ज्या दुसर्या ग्रुपने चढण्यास सुरुवात केली होती त्या ग्रुपमध्ये एक गॄहस्थ झांजांच्या तालावर "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामघोष करत चढत होते. त्या नीरव गूढ शांततेत त्यांचा धीरगंभीर आणि खणखणीत आवाज आश्वस्त करीत होता.बाळ जसं आईला "आई, आई" हाकारत तिच्या दिशेने पुढे चालत रहाते तसं वाटत होतं. ग्रुपमधील अनेकांनी गिरनार उतरुन परतल्यावर हाच अनुभव सांगितला की ते "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरण ऐकले की एक प्रकारची उर्जा मिळत होती चढण्यासाठी आणि चालण्याचे श्रम जाणवत नव्हते.
आता चढतांना ढग आम्ही ज्या उंचीवर होतो त्यापेक्षा खाली दरीत विहरतांना दिसू लागले. हळू हळू जमिनीपासूनचे अंतर वाढत आहे हे दरीत नजर टाकतांच लक्षात येत होते. दिवसाउजेडी हा परिसर किती विहंगम दिसत असेल याची कल्पना मनात करत चालत होते. अजूनतरी पाऊस आला नव्हता. अगदी एखादी चुकार सरही नाही. मात्र वातावरण तसेच धुक्याचे. चढत असतांना हा एकच फोटो वरुन दिसणार्या वाटेचा काढला. बाकी सारे फोटो दुसर्या दिवशी उजेडात काढलेले आहेत.

कालपर्यंत एकमेकांना अनोळखी असलेल्या ग्रुपमध्ये आता चढतांना मात्र मस्त 'बाँडींग' झालं होतं. कुणाला कसलीही मदत लागली तरी अनेक हात पुढे सरसावत होते. सोबत आणलेला खाऊ, चॉकलेटस यांची देवाणघेवाण होत होती. जे आयोजक नव्हते त्या पुरुषांनीही स्वतःहून एकेका स्त्रियांच्या ग्रुपसोबत राहून, त्यांच्या वेगाने चढत कोणीही एकटे मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली.
आम्हां सर्वांची चढत असतांना करमणूक करण्याची, श्रमपरिहार करण्याची जबाबदारी जणू आमच्यातील छोट्या सदस्याची होती. तो पठ्ठ्या भारी उत्साही. पटापट पायर्या चढून तो पुढे जाई आणि आपल्या घरची माणसे कुठवर पोचली हे तपासायला वरुन टॉर्च मारुन शोधत बसे. नेमका तो प्रकाशझोत मागून चढणार्यांच्या डोळ्यांवर पडून डोळे दिपत असत. बर्याचदा तर वीसेक पायर्या चढून गेलेला रजत परत तितक्याच तत्परतेने आई कुठवर आली हे बघायला खाली उतरत असे.या हिशोबाने मला तर वाटते त्याने गिरनार पर्वत सलग दोन वेळा चढून उतरला असावा.
हळूहळू वातावरणातील बदल जाणवत होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. आमचीसुद्धा ही एक प्रकारची उपासनाच चालू होती की आणि ती देखील या सिद्ध भुमीत जिथे साक्षात दत्तगुरुंनी स्वतः तपाचरण केले आणि त्यांना सद्गुरुस्थानी मानणार्या त्यांच्या कैक शिष्य, साधकांनी देखील. अशा कित्येकांच्या तपसाधनेची पवित्र स्पंदने या पवित्र भुमीत, इथल्या आसमंतात भरुन राहिली असतील जी आम्ही त्या ब्राह्म मुहुर्तावर ग्रहण करु शकत होतो. आधी जाणवली तशी भिती आता अजिबात वाटत नव्हती.खूप प्रसन्न असे वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.
धिम्या गतीने चढत-चढत आता अंबाजी धाम दॄष्टीपथात येऊ लागले. बघता-बघता ५००० म्हणजे निम्म्या पायर्या होत आल्या की. मी ज्यावेळी अंबाजी मंदीराजवळ पोचले तेव्हा ३.५८ वाजले होते. ११.३५ वाजता पहिल्या पायरीपासून सुरुवात करुन, मध्ये अनेकदा विश्रांतीसाठी थांबूनही साडे चार तासांत आम्ही ५००० चा टप्पा गाठू शकलो होतो. मंदीर तर अजून बंदच होते. माझ्या आधी पोचलेली मंडळी हसतमुखाने स्वागत करत समोर आली. त्यांनी सांगितल्यानुसार मंदीराच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला. ‘इथवर सुखरुप आणलंस आई, आता पुढेही असंच सुखरुप ने अशी प्रार्थना केली ‘आणि जिथे सगळे बसले होते त्या टपरीवजा हॉटेलात आले. आधी पोचून ताज्यातवान्या झालेल्या मंडळींनी नुकत्याच पोचलेल्यांना जागा करुन दिली. आयोजकांनी या हॉटेलच्या मालकांना झोपेतून उठवून आमची मंडळी आता हळूहळू पोचतायत तर चहा तयार ठेवा असे सांगितले. गरम गरम चहा आणि पार्ले़ जी बिस्कीटस खाऊन तरतरी आली.
हळूहळू एकेक करत सर्व पोचले. सारे वेळेत पोहोचलो होतो. आता पावणेपाचपर्यंत इथेच थांबायचे होते.कारण यापुढचे अंतर एक ते दीड तासात पूर्ण होणार होते. गुरुशिखर -मंदीर पहाटे साडे पाच वाजता दर्शनासाठी उघडते. त्या आधी तिथे पोचल्यास कुठेही थांबायची सोय नव्हती. पायर्यांवर बसावे लागले असते. त्यामुळे इथेच थांबलो. खरं तर अजून निम्म्या पायर्या बाकी होत्या. मग दीड तासांत कसे काय पोचलो असतो आम्ही? असं म्हणतात की ५००० पायर्या चढून अंबा मातेचा आशिर्वाद घेतला की यापुढचं अंतर ती अंबा माता लीलया पुरे करुन घेते, तिच्या कूपाशिर्वादाने पुढचा टप्पा झरझर पार केला जातो. ती आईच दत्तगुरुंच्या पुढ्यात आपल्याला नेऊन ठेवते, हे ऐकतांच अगदी भारावून गेले.
आमचे पाचही आयोजक मदतीस तत्पर होते. गिरनार पर्वत यात्रेचा आनंद जो आपल्याला मिळाला तो इतरांनाही मिळावा या नि:स्वार्थी भावनेने या यात्रेचे आयोजन केले जाते आणि ही नि:स्वार्थी वॄत्ती प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होती, हे विशेष. कुठेही चिडचिड नाही, हातचे राखून माहिती देणे नाही. आताही जिथे थांबलो होतो तिथे थोडं स्ट्रेचिंग करा म्हणजे पाय मोकळे होतील अशी हळुवार सुचना त्यांनी दिली. त्यानुसार स्ट्रेचिंग करुन आम्ही पावणे पाचच्या सुमारास पुन्हा निघालो.
आता गोरक्षनाथ शिखराकडे जाऊ लागलो. याच रस्त्यावर प्रचंड वारा असतो. इथे एकमेकांचे हात पकडून कडं करुनच पुढे जाता येते असे ऐकले होते. आम्ही जेव्हा इथे पोचलो त्या वेळी वारा तर होताच पण असा वादळी वारा नव्हता. व्यवस्थित एकेकटे चालता येत होते. आता हा पर्वत उतरुन दुसरा चढायचा होता. त्यामुळे १०००-१५०० पायर्या उतरायच्या होत्या. काठीच्या आधारे त्या नीट उतरुन पुन्हा पुढील पायर्या चढू लागलो.
याच वाटेवरुन जात असतंना जर कदाचित मुसळधार पाऊस आला असतां तर?..... पाऊस पडत असतांना आजूबाजूच्या कडेकपार्यांतूनही पाण्याचे ओहोळ वहात पायर्यावर येतात, वार्याचा वेग अशा वेळी प्रचंड वाढतो, चढणे मुश्कील होते असे ऐकले होते. अंगावर सरसरून काटा आला. आम्ही दुसर्या दिवशी दुपारी खाली उतरेपर्यंत पाऊस मात्र अज्जिबात आला नाही. जुनागढ हा भाग कमी पावसाचा, त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस संपला असावा असे म्हणावे तर आम्ही मुंबईत परतल्यावर नंतरच्याच आठवड्यात तिथे मुसळधार पाऊस पडला होता, रस्त्यांवर पावसाचे पाणी वेगाने वहात असल्याचे व्हिडीओज आमच्या गिरनार यात्रेच्या ग्रुपवर पाहिले आणि मनोमन देवाचे आभार मानले.
या घटनेचा नंतर विचार करीत असतंना जाणवलं की अरे आपल्याला तर गिरनारच्या वाटेवर व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळत होती जणू काही, तेही कसलेही व्ही आय पी स्टेटस नसतांना. पण व्ही आय पी स्टेटस नाही कसे म्हणावे बरं? आपण सारी तर ‘दत्तगुरुंची बाळं’... हा एकच निकष पुरेसा आहे की व्ही आय पी पास मिळवण्यासाठी. जणू काही दत्तगुरुंनी स्वतः आमच्यासाठी रदबदली केली होती. पंचमहाभुतांना जणू आदेश दिले होते की "माझी बाळं डोंगर चढतायत मला भेटायला येण्यासाठी. तुम्ही तुमचं रौद्र रुप दाखवलंत तर भांबावतील बिचारी, हाल होतील त्यांचे. खरी 'राज की बात' तर ही आहे की ती सारी चढत नाहीचेत मुळी, मीच त्यांना कडेवरुन घेऊन येतोय. तेव्हा हे पंचमहाभुतांनो, माझ्या कार्यात मला मदत करा." आणि या आदेशाचे पालन प्रत्येक ठिकाणी केले जात होते. आम्हाला मोकळा मार्ग मिळत होता. अगदी जिथे कुठे पायर्या पाण्यामुळे ओल्या आढळल्या, तिथे त्यांच्यावर शेवाळ मात्र नव्हते. त्यामुळे कुठेच घसरायलाही झाले नाही.
आजूबाजूला आता स्थानिक काठियावाडी स्त्री-पुरुष दिसू लागले. आसमंत हळूहळू उजळू लागला होता. काळ्याकुट्ट अंधाराचे रुपांतर निळ्या सावळ्या रंगात होत होते. पुढे जात असतांना हळूहळू गुरुशिखराचा सुळका दिसू लागला. सरळसोट सुळका.... बघूनच धडकी भरावी असा. पण पायर्या मात्र वळणा-वळणाने सावकाश वर जाणार्या होत्या. घाटातल्या रस्त्यासारख्या. या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आणि मन भरुन आले.
पहाट होत असतांना
आजूबाजूचं वातावरण भारलेलं जाणवत होतं. कोणत्याही मंदीरात, मंदीर परिसरात आपण पावित्र्य अनुभवतो. मात्र त्यात त्या स्थानमहात्म्याइतकेच योगदान इतर गोष्टींचेही असते, जसं फुलांचा मंद सुवास, धूप, उदबत्तीचा दरवळ, त्यांची हवेत विरत जाणारी वलये, शांतपणे तेवणारी समई, निरांजन, सोबत त्या मंदीरातील आराध्य दैवताची ऐकू येणारी आरती, स्तोत्र, धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चरण या सार्या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. म्हणून गर्दीत,कोलाहलातही आपण ती शांती, पावित्र्य अनुभवू शकतो. इथे मात्र त्यांपैकी काहीच नव्हते. जे होते ते अजून नजरेस पडलेही नव्हते, तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. अरुणोदयाची मंगल वेळ आणि गुरुशिखराचे सान्निध्य.....
गुरुशिखराबाहेर चपला, बूट काढायला जागा नाही, त्यामुळे आधी पन्नास एक पायर्या शिल्लक असतांना चौथरा असेल तिथेच काढून वर जा असे सांगितले होते आम्हांला.त्यानुसार ज्या टप्प्यावरुन मंदीराचे प्रवेशद्वार दिसत होते तिथे बूट काढले आणि सुरु झाला अखेरचा पन्नास पायर्यांचा प्रवास.....भावभावनांचे कल्लोळ मनांत उठवणारा.. तरीही मनाला तॄप्तीची अनुभुती देणारा......
क्रमशः
पायर्यांची झलक
गुरुशिखर - गिरनार (या सुळक्यावर वरती जे निळ्या पांढर्या रंगात दिसतंय ते गुरुशिखर)
आजि म्या ब्रह्म पाहिले
तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो.
फक्त पन्नास पायर्या बाकी राहिल्यात या जाणीवेनेच आतून भरुन येत होते. जसजशी जवळ येत चालले होते, शरीरात सूक्ष्म कंप जाणवू लागला होता. धडधड वाढली होती. मी इथवर आले होते? नाहीच मुळी "तो" घेऊन आला होता.... माझं इथवर येणं घडून येण्यासाठी माध्यम ठरलेले अनेक जण आता नजरेसमोर येऊ लागले. पुस्तक देणारा भाऊ, या यात्रेविषयी माहिती देणारी त्याची डॉ. सहध्यायी, परीक्षा चालू असतांनाही “आई तू जा बिनधास्त म्हणणारा मुलगा”, वयाच्या ८२ व्या वर्षी घरची, लेकाची जबाबदारी सांभाळेन म्हणणार्या आई, आईला आणि लेकाला सोबत म्हणून , मनात असूनही माझ्याबरोबर न येता “तू निर्धास्तपणे जा”, म्हणणारा नवरा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफिसातून सुट्टी मिळू शकेल की नाही अशी शंका येत असंताना बाणेदारपणे बॉसना Sir, let her take leave I will take care of her work in her absence असे म्हणून आश्वस्त करणारा ऑफिसातील सहकारी, मला व्यायाम आणि आहारासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा माझा भाचा, या यात्रेचे पाचही आयोजक आणि इतर ग्रुप मेंबर्स…. सर्वांची मी ॠणी आहे, तुम्ही सर्व नसता तर हे भाग्य माझ्या वाट्याला आले नसते.
गिरनारची वारी करतांना वाटेत 'दत्तगुरु' कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे ऐकले होते. पण मला असे कोणीही दिसले/भासले नव्हते. कसलीही अनुभुती, चमत्कारीक अनुभव का ही ही नाही. हा विचार मनात येताच सद्गुरुंचे शब्द आठवले. "बाळांनो, चमत्कार पाहून नमस्कार करु नका.समोर दिसणार्या चमत्काराने तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरा चमत्कार सद्गुरु घडवून आणतात तो भक्ताच्या मनात आणि मनात बदल घडला की प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही”. अचानकच आठवले ज्या वेळी 'दत्त अनुभुती' पुस्तकात दहा हजार पायर्यांच्या प्रवासाबद्दल वाचले, त्या वेळीच मुखपॄष्ठावर असलेल्या गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या फोटोकडे पाहून म्हटले होते की "माझा नमस्कार इथूनच घे दत्तबाप्पा" असं बोलणारी मी आणि गिरनार दर्शनाची आस मनात घेऊन इथवर पोचलेली मी.... हा माझ्या मनातील बदल होता. हा माझा प्रवास होता नकारात्मक भावनेतून, सकारात्मकतेकडे नेणारा, न्युनगंडाकडून आत्मविश्वासाकडे नेणारा..... सद्गुरुंनी सांगितलं होतं की “जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो, तेव्हा जाणावे की कुठेतरी, कुठल्यातरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठलातरी भाग स्वयंभगवानाने माझे रुप घेऊन घडवून आणलेला आहे”. याहून जास्त अनुभुती कसली हवी होती मला? सद्गुरु म्हणतात की “परमेश्वराकडे प्रत्येकाची रांग ही वेगळीच असते, माझ्या रांगेत माझ्या पुढे कोणी नाही आणि मागेही नाही, मी एकटीच चालत असते माझ्या रांगेत, त्यामुळे अमक्याला हे मिळालं/दिसलं तर मला का नाही? हे विचार सोडा. 'ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे , कारण 'तो' तर भरभरुन द्यायलाच बसला असतो आपल्या लेकरांना, आपलीच झोळी फाटकी असते”..... हे सारं आठवून डोळे पाझरतील की काय अशी अवस्था झाली. कसेबसे स्वतःला सावरत चढू लागले.
श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, एकादशीच्या दिवशी, सोमवारी हे दुर्लभ दर्शन घ्यायला मिळणार होते. माझ्यासाठी आजच्या दिवसाला आणखी खास महत्व होते. कारण आज २६ ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिन. ती असती तर आज तिचा ७५ वा वाढदिवस असता.नेमक्या याच दिवशी मला सद्गुरुपादुकांचे दर्शन होणे हा निव्वळ योगायोग खचितच नव्हता. आई-वडीलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असं म्हणतात, तेच घडत असावं माझ्या बाबतीत.
पावणेसहा ते सहाचा सुमार. शेवटची पायरी चढले. समोर, लोखंडी सरकते दार, त्या दाराजवळ बसलेला गणवेषधारी पहारेकरी. आतमध्ये दॄष्टीक्षेप टाकत मी आत पाऊल टाकले, जिथे साक्षात दत्तगुरु पादुकांच्या रुपात स्थिरावले होते, त्या गुरुशिखरावरील मंदीरात मी आता या क्षणी उभी होते. चालत थोडी पुढे गेले, पादुकांसमोर , सभोवती गोलाकार बॅरीकेडस होते, तरीही पादुका व्यवस्थित दिसत होत्या. राखाडी रंगाच्या पाषाणावर, साधारण सहा ते साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीच्या पायांचा आकार जितका असेल त्या आकाराची दोन पावले, त्या पाषाणात रुतलेली, त्यामुळे जरा खोलगट, पायाच्या बोटांपासून मध्यभागापर्यंत पादुका तशाच अनावॄत्त होत्या. मागच्या भागांवर फुले वाहिली होती, जरी अर्धा भागच दिसत असला तरी अंदाज येत होता पावलांच्या लांबीचा. पादुकांच्या मागेच त्रिमुर्ती, ती मात्र पादुकांच्या आकाराच्या तुलनेत, छोटीशी, साजरी. पादुकांकडे एकटक बघत असतांना नकळत हात जोडले गेले आणि इथवर आवरुन ठेवलेले अश्रू घळघळा डोळ्यांतून वाहू लागले. आता ते आवरणं शक्य नव्हतं. त्याच स्थितीत डोकं टेकलं. आपल्या खूप जवळच्या कुणालातरी आपण बर्याच काळानंतर भेटतोय असं वाटत होतं. असा काही वेळ गेला. सावरलं स्वतःला. समोरच पुजारी बसले होते, ते पहात होते.पण त्यांना हे सवयीचं असावं बहुदा, कारण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होत होती. मंदीरात अर्पण करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेलं खडीसाखरेचं पाकीट आणि पादुकांसठी हिना अत्तराची छोटी बाटली, बाहेर काढली.गुरुजींना दिली. खडीसाखर लगेच प्रसाद म्हणून परत केली गेली. उभी राहिले, प्रदक्षिणा घालण्यासाठी. हात जोडून प्रदक्षिणा घालत परत समोर येत असतांना गुरुजी माझ्याकडे पहात माझ्या दिशेने येत असलेले दिसले, म्हणून तिथेच थांबले. त्यांनी एक लहानशी पोथी माझ्या हातात दिली आणि म्हणाले की "बेटी इसे रोज पढना, तुम्हारी हर इच्छा महाराज पुरी करेंगे!' त्या क्षणी पुन्हा एकदा कंठ दाटून आला. गुरुजी परत फिरुन पादुकांशेजारी जाऊन बसले. मला पुन्हा एकदा नमस्कार करायची अनिवार इच्छा झाली. पुन्हा एकदा पादुकांसमोर नतमस्तक झाले. मनोभावे नमस्कार केला. हुंदका दाटून आला. आवंढा गिळत उठले. अजून मागे बरीच माणसं खोळंबली आहेत. त्यांना माझ्यामुळे ताटकळत रहावं लागू नये असं वाटलं, कारण थोड्या थोड्या लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. पादुकांकडे पहात- पहातच परत फिरले.
त्याच पायर्यांवर चढणारी माणसे होती. मी उतरु लागले. अगदी थोड्याच पायर्या उतरल्यावर माझी मैत्रीण दिसली. तिला म्हटले, “तू दर्शन घेऊन ये, मी थांबते इथे." अजूनही सूर्योदय झाला नव्हता. तांबडं फुटू लागलं होतं. ढगांआडून एखाद-दुसरी सोनेरी रेघ आकाशात पसरत चालली होती. एरव्ही हिल स्टेशन्सना, समुद्रकिनारी जाऊन सुर्यास्त कैक वेळा पाहिला आहे पण सूर्योदय पहाण्याची ही पहिलीच वेळ.तो सुद्धा गुरुशिखरावरुन दिसणारा सूर्योदय. पण तितका वेळ हाताशी नव्हता. आता धुनीचे दर्शन घ्यायचे होते. जी फक्त दर सोमवारीच प्रज्वलित होत असते.सहा वाजून गेले होते. आम्ही दोघी झटपट उतरु लागलो. अंधारात जे जाणवलं नव्हतं ते आता उजेडात दिसून आलं की बर्याच पायर्यांना कठडाच नाहीये. उतरतांना त्यामुळे जरा भिती वाटत होती. एकमेकींचा हात धरुन आम्ही खाली आलो. आता बर्याच पायर्या चढायच्या होत्या. त्या चढून झाल्या एकदाच्या. धुनीपाशी आणि त्याबाहेर गर्दी जमली होती. आम्ही पोहोचेपर्यंत आत धुनी प्रज्वलित झाली होती. आमच्यापैकी केवळ दोघे त्या वेळी तिथे होते, ज्यांना तो क्षण पाहण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले. पुन्हा एकदा मनाला बजावले "ज्याला ज्याची गरज आहे, ते त्याला मिळणारच." शांतपणे रांगेत आत जात धुनीपाशी आलो. शिर्डीतल्या साईनाथांच्या द्वारकामाईतील धुनीची आठवण आली. लहानपणापासून देव म्हणजे साईबाबा हे समीकरण मनात फिट्ट झालेले. त्यांचंच बोट धरीत इथवर पोचले होते. मनोभावे धुनीला नमस्कार केला.
आता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करायची वेळ. इतक्या लवकर पोचलो असूनही आत आमच्या आधीच पहिली पंगत बसली होती. त्यामुळे बाहेर थांबलो.पहिल्या पंगतीतील भाविकांचे प्रसादग्रहण झाल्यानंतर आम्हाला आत घेण्यात आले.एका वेळी साधारण तीस - चाळीस माणसे बसू शकतील इतकी जागा होती. सेवेकरीही तत्पर होते.भराभर पाने वाढण्यात आली. सकाळी साडे सहाच्या सुमारास डाळ, भात, शिरा-पुरीचा आस्वाद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.
तिथून गोरक्ष गुफेकडे जायचे होते. पण स्त्रियांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेरच बाकीच्यांची वाट बघत थांबलो. तोवर सकाळचे साडे सात वाजले होते.गिरनार जागा झाला होता. वर्दळ वाढली होती. आम्ही आता अंबाजी मंदीराकडे चालू लागलो. ते दर्शन अजून बाकी होते. अंबाजी मंदीरापाशी आता पुजेच्या, ओटीच्या सामानाची दुकाने उघडली होती. ते घेऊन आत दर्शनासाठी गेलो. रेणुका मातेसारखं दिसणारं अंबामातेचं रुप मनात भरलं. बाहेर येऊन परत एकदा पहाटे जिथे चहा घेतला होता, त्या हॉटेलात विसावलो. गिरनार वारीतील सर्व स्थळांचे दर्शन घेऊन झाले होते. आता परतीची वाट धरायची होती. कोल्ड्रींक घेऊन थोडा आराम केला. साधारण सव्वा आठ-साडे आठच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली.
आता खरी कसोटी होती. उतरतांना अधिक त्रास होतो, पाय लटपटतात, पायांत गोळे येतात असे ऐकून होते. उतरायला सुरुवात केली आणि अगदी ८-१० पायर्या उतरताच उजव्या पायांत क्रँप आल्यासारखे वाटले. धस्स झालं. चढतांना अगदी पिसासारखी चढले होते. आता काय ? पायाची बोटे जरा हलवली. काही क्षण थांबले. बरं वाटू लागल्यावर पुन्हा उतरायला सुरुवात केली. पायांत गोळे ,पाय लटपटणे यांपैकी काहीच होत नव्हते. त्यामुळे हायसं वाटलं. आता फक्त एकच चिंता होती , ती उन्हाची. उन्हं प्रखर झाली की त्याची झळ लागणार. मला तर उन्हात गेलयावर त्रास होतोच होतो. त्यामुळे शक्यतो उन्हं चढायच्या आत खाली उतरण्याचा प्रयत्न करायचा असे ठरवले. माझी मैत्रीण अगदी सावकाश उतरत होती. तिच्याशी बोलले. तिच्या सोबत ग्रुपमधल्या काही जणी होत्या. त्यामुळे ती म्हणाली की तू पुढे झालीस तरी चालेल आणि मी पुढे निघाले. मध्ये-मध्ये वाटेत आमच्या ग्रुपमधले कु़णीतरी भेटत होते. उतरतांनाही थांबत, विश्रांती घेतच उतरलो.
एका ठिकाणी एक भली थोरली शिळा तिरप्या अवस्थेत - (४५ डीग्री च्या कोनात कललेली) आढळली. ती शिळा देवीमातेने आपल्या दोन्ही हातांनी धरुन ठेवली आहे असे मानले जाते. त्या स्थानावर देवीला हळदी-कुंकू, बांगड्या वाहिलेल्या दिसत होत्या.
आजूबाजूचे सॄष्टीसौंदर्य आता नजरेत भरत होते. उतरत असतांनाच काही फोटो काढले. सकाळच्या लख्ख प्रकाशात गिरनार डोळ्यांत साठवून घेत उतरत होतो.





या अशा डोंगरातील गुहा अधेमधे दिसत होत्या.
आता विरुद्ध दिशेने चढून येणारी माणसे वाटेत दिसत होती. वर्दळ वाढत होती. ते लोक "दत्तात्रेय" पर्यंत चढून परत येताय का? कधी चढायला सुरुवात केलीत वगैरे चौकशी करत होते.
एका ठिकाणी जे पाहिलं ते बघून थबकलेच. एक कॄश अंगकाठीचा युवक एल पी जी सिलिंडर खांद्यावर घेऊन अनवाणी चढत होता, घामाने निथळत. त्यानंतर लगेच काही बायका सुद्धा मोठाल्या फरशा डोक्यावर घेऊन चढतांना दिसल्या. स्वतःची लाज वाटू लागली.
इथे यायचं म्हणून किती ते जीवाला जपलं होतं मी... ब्रॅण्डेड, अॅण्टीस्किड, कंफर्टेबल शूज निवडून घेतले होते, अशाच इतरही अनेक गोष्टी कंफर्ट देणार्या. स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर यायचीच तयारी नसते नं आपली... इथे हे बिचारे कष्टकरी.... त्यांच्या पायांत साध्या चपलाही नव्हत्या नि शिरावर एव्हढं ओझं. मनात आलं आपल्याला मिळालेलं ‘व्ही आय पी स्टेटस’ हे या यात्रेपुरतं नसून त्या ‘दयाघनाने’ जन्मापासून आपल्याला बहाल केलं आहे. आपल्याला फक्त किंमत नाहीये त्याची. म्हणून तर साध्याशा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचा आपण इतका बाऊ करत असतो. या कष्टकर्यांच्या रुपात खरोखर ‘देव दर्शन’ झाले आम्हा सर्वांनाच. इतर तीर्थस्थळांवर गर्दी करणार्या भिकार्यांपेक्षा हे लोक स्वाभिमानाने जीवतोड मेहनत करुन कष्टाची भाकरी मिळवत होते. मनोमन कडक सॅल्युट ठोकला त्यांना.
गिरनार यात्रेदरम्यान जाणवलेली एक खंत म्हणजे इतकं जागॄत देवस्थान असूनही हे फार दुर्लक्षित आहे. दुसर्याच दिवशी पाहिलेल्या सोमनाथ, प्रभास क्षेत्र येथील देवस्थानांचे वैभव बघता इथे तर किमान सुविधाही नाहीत. प्रसाधनगॄहही ९००० पायर्या चढून गेल्यावरच. सरकार इथे का लक्ष देत नाही? माहीत नाही. यात्रेकरुंसाठी नाही पण निदान इथल्या मजूरांचे असे अवजड सामान वाहून नेण्याचे कष्ट तरी दूर व्हावेत अशी मनोमन इच्छा आहे.
जैन मंदिरे दिसू लागली. त्या मंदीरांचे बाधकाम खूप सुंदर होते. गिरनारच्या पार्श्वभुमीवर ही जैन मंदीरे सकाळच्या उन्हात खूप लोभसवाणी दिसत होती.
जैन मंदिरे
हळूहळू उन्हे चढू लागली. नेमक्या किती पायर्या उतरुन झाल्या, किती राहिल्या, कळत नव्हते. थोड्याच पायर्या आता शिल्लक राहिल्या असाव्यात असं स्वतःला समजावत मी उतरु लागले. अता कधी एकदा खाली पोचतोय असे होऊ लागले होते. साडेदहाच्या सुमारास उन्हाची झळ जाणवू लागली. मी थांबले एके ठिकाणी. सॅकमधून टोपी, गॉगल काढला. इलेक्ट्रलची पावडर पाण्यात घालून प्यायले. जरा बरं वाटू लागलं. पुन्हा उतरायला सुरुवात. आमच्या ग्रुपमधील एकाने गुढगे दुखू लागल्यामुळे उतरतांना डोली केली असे समजले. वाटेत प्रत्येक दुकानदार डोली हवी का? असे विचारत होता. “नाही, नाही” म्हणत मी आपली शक्य तितक्या लवकर उतरण्याचा प्रयत्न करीत होते. दहा- पंधरा पायर्या मग सपाट चौथरा, त्यापुढे वळण पुन्हा पायर्या, चौथरा, वळण ही रचना आता इतकी सवयीची झाली की डोळे मिटूनही तेच दिसू लागले.
वाटेत एका दुकानात मालिशचे तेल विकण्यास ठेवले होते. सांधेदुखीवर रामबाण औषध म्हणून. मागे माऊंट अबूवरील गुरुशिखरावर जातांनाही असेच मालिशचे तेल विकत घेतले होते, त्याचा आईंना बराच फायदा झाला होता. त्यामुळे इथेही २ बाटल्या घेतल्या. गिरनारवर शॉपिंग ही करुन झाले.
आता जमिनीपासूनचे अंतर कमी कमी होत चाललेले दिसले आणि आपण आता अगदी अंतिम टप्प्यात पोचलोय हे जाणवले. माझ्या ग्रुपमधील दोघे वाटेत भेटले. आम्ही तिघेही आता एकत्रच उतरत होतो.साडेअकरा वाजता पहिल्या पायरीवर पोचलो. रात्री साडेअकराला इथूनच सुरुवात केली होती. बारा तास पूर्ण झाले होते. परततांना पहिल्या पायरीवर डोकं टेकून आणि शेजारील हनुमानाला नमस्कार करुन सुखरुप नेऊन आणल्याबद्द्ल आभार मानायचे असतात. तसंच ग्रामदैवत भवनाथांचे दर्शन घेऊन त्यांचेही आभार मानायचे असतात. मगच यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. त्यामुळे बूट काढले. पायरीवर डोके टेकायला म्हणून खाली वाकले, डोके टेकले, कंबर प्रचंड दुखत होती हे तेव्हा जाणवलं. कसंबसं उठून चढवावा हनुमानालाही नमस्कार केला आणि भवनाथ मंदीराकडे निघालो.
रस्त्यावर रहदारी वाढली होती. आमच्या हातातील काठी आणि एकूणच अवतार बघून लोक गिरनार चढके आये क्या? दत्तात्रेय तक गये थे क्या? अशी चौकशी करु लागले. हो हो म्हणत आम्ही कसे तरी स्वत:ला रेटत भवनाथ मंदीरात आलो. दर्शन घेतले. कितीही थकला असलात तरीही न जेवता झोपायचे नाही अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली होती. जेवण्याचे हॉटेल आणि कुपनही आदल्या दिवशी निघतांनाच दिले होते. त्यामुळे आम्ही तिघे त्या हॉटेलात गेलो. कसेबसे दोन घास खाल्ले आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथे परत २ मजले चढायचे म्हणजे दिव्य.... ते पार पाडलं. खोलीत आल्यावर फ्रेश झाले, एक क्रोसिन घेतली आणि पायांना रोल ऑन फासून झोपून गेले.
एकेक करत सारे परतू लागले. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रुपमधील सर्व खाली आले. आयोजकांनी एक मसाज करणारा माणूस बोलवून घेतला. तो प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पायांना मसाज करुन देत होता. त्यामुळे खूप बरं वाटू लागलं.
सर्वांची गिरनार यात्रा पूर्ण झाली होती. यात्रा जरी पूर्ण झाली असली तरी या यात्रेआधी आणि त्या दरम्यान 'दत्तगुरुंशी' जुळलेली नाळ तशीच रहावी…..अगदी जन्मजन्मांतरीसाठी हीच इच्छा.
ही लेखमाला म्हणजे गिरनार वारीचे वर्णन आहे. पण ज्याप्रमाणे गिरनार वारी ‘दत्तगुरुंच्या इच्छेनेच’ घडते तसेच हे लेखनही. कारण बुद्धिदाताही 'तोच'. त्यामुळे हे लिहिणारी मी केवळ एक निमित्तमात्र, त्यानेच त्याला हवं तसं लिहून घेतलंय माझ्या हातून. असं असलं तरी या लेखनात अनवधानाने काही त्रुटी आढळल्या तर ते न्यून माझे समजून क्षमा कारावी.
शेवटी एकच सांगणे….
इदं न मम | इदं सद्गुरो:||
लेखनसीमा.
आयोजक - श्री. मंदार पाध्ये नंबर 99230 13375
गीर - सिंहांच्या देशात
अखेरीस ठरल्याप्रमाणे १६ जानेवारीला सकाळी आम्ही ११ जण टेम्पो ट्रॅव्हलर करून अहमदाबादहून सकाळी ६:१५ ला निघालो आणि दुपारी १:३० वाजताच्या सुमारास आमच्या हॉटेल वर पोचलो.
गीर - आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक वसतीस्थान. अहमदाबाद पासून साधारण ४००-४५० कि.मी. दूर - जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे गीर अभयारण्य. १४३६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात आजमितीला साधारण ४११ सिंह आहेत. आमच्या सफारी दुसर्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होत्या - मुद्दामहून आम्ही त्या तश्या बुक केल्या होत्या कारण सकाळी लवकर आणि संध्याकाळी जंगली जनावरे दिसण्याची शक्यता जास्तं असते.
म्हणून पोचल्या दिवशी दुपारी आम्ही जवळ्च्या सासण गावात फेरफटका मारायला निघालो.
तिथे नदीकाठाजवळ काही पक्षी बघायला मिळाले.
एका छोट्या खारुताईचा झकास फोटो मिळाला.
दुसरा दिवस. सोमवार सकाळ - ६:१५ वाजता बर्फाळ गार वारं अंगावर घेत ओपन जिप्सी जीप्समधून आम्ही निघालो - सिंहांच्या देशात.
सुरवातीला spot झालं चितळ. ४११ सिंहाना पुरेसे भक्ष्य मिळावे म्हणून या जंगलात अंदाजे ४०००० चितळ, २०००-२५०० सांबरे आहेत.
आजूबाजूला दिसणारे विविध पक्षी बघत जंगल शोभेचा आनंद लुटत आम्ही चाललो होतो.
आणि मग तेवढ्यात आमच्या गाइडने दाखवले - pug marks - जंगलच्या राजाच्या पावलाचे ठसे.
आणि थोडे पुढे गेल्यावर दर्शन झाले जंगल च्या राजाचे. जेमतेम दहा ते पंधरा फुटांवरून जंगलामध्ये मुक्त असलेला सिंह बघणे हा एक अत्यंत रोमांचक आणि थरारक अनुभव आहे.
थोडे पुढे गेल्यावर दिसल्या महाराणी.
सिंह दिसल्याच्या आनंदात , तो थरार मनात ताजा ठेवत आम्ही होटेल वर परत आलो - सन्ध्याकाळच्या सफारी ला जाण्याच्या तयारीने.
दुपारी पुन्हा एकदा पहिल्यांदा दिसले सांबर.
आणि आमचं नशीब जोरावर असल्याचे परत एकदा सिद्ध झाले. आम्हाला परत "Lion Sighting" झाले - या वेळी दिसली एक सिंहीण तिच्या छाव्यासहीत.
तिथून थोडे पुढे गेलो आणि परत एक पूर्ण वाढलेली सिंहीण दिसली - अत्यंत जवळून.
गीर ला जाण्याचा मुख्य ऊद्देश आमच्या अपेक्षेबाहेर सफल झाला होता. आम्ही खरोखर नशीबवान होतो. आम्हाला दिसले त्याच्या आधी ४ दिवस कोणालाही सिंहांचं दर्शन झालं नव्हतं - इति आमचा गाईड.
ते खरं की खोटं ते माहीत नाही पण आम्हाला मात्र जंगलच्या राजाचं, राणीचं आअणि राजकुमाराचं एकदम जवळून झकास रोमांचक आणि थरारक दर्शन झालं.
अमिताभ बच्चन जाहीरातीमध्ये म्हणतो - "गीर की जंगलोंमें अपनेसे पंधरा फुट की दूरी पर जब शेर को देखा तो पैर जमींपर आ गये और अभिमान घुटनोपर". या वाक्याची सत्यता पूर्णपणे अनुभवायला मिळाली.
जमेल तेव्हा परत गीर ला यायचं असं मनाशी नक्की करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

















































































































































































































































































































































दुसरी देवता कदाचित ब्राह्मणीच असावी. सरस्वतीची शक्यता कमी वाटतेय. कारण वाहन मोर असते तेव्हा त्याचा पिसारा लांबलचक दाखवलेला असतो. तसे येथे दिसत नाही.
तिसरी प्रतिमा गुंतागुंतीची आहे खरी. मूषकवाहिनी खरे तर गणेशिनी किंवा विनायकी असते मात्र तीचे मुख गणपतीसारखेच असते. शेजारची प्रतिमा बहुधा प्रेतवाहिनी चामुंडा असावी.
किंबहुना ह्या दोन्ही प्रतिमा गणेशिनी आणि चामुंडेपैकी नसून त्या योगिनींच्या असाव्यात.
पोपटाचे मुख असलेली योगिनी उमा का योगिनी शुकी?