Thursday, January 30, 2025

https://westernghatstreks.blogspot.com back up

 https://westernghatstreks.blogspot.com/2024/04/

Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

Korigad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Maharashtra. It comes under Pune District. This fort is situated at Paunmaval plateau which is at 700m above sea level where as The top height of the fort is around 930m above sea level. It lies at the edge of Deccan plateau so one can see the deccan as well as konkan very clearly.
Also this fort is called in various other names such as (Kuvarigad/Koraigad/Koari/Kunwari/Koraigad)

(District Pune, Dist. Maval/Mulshi) Type: Giridurg Altitude: 929 m

Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

History of the Korigad Fort. (Source: Korigad)

1) A.D. On the death of Mahmadshah Bahmani (the head of the Bahmani Empire) in 1482, in his will he made Malik Naib (originally Malik Hasan and his title Naib), the trustee of the Bahmani kingdom, as the chief vizier of his son, Sultan Mahmud. Later, Malik Naib gave his son Ahmad the responsibility of establishing Jahagiri. He was sent from Daulatabad to Jutrar. He etc. S. In the campaign of 1482-83, he conquered the forts of Shivneri, Chavand, Lohgad, Tung, and shifted his march to Koar (Korigarh). A.D. In 1490, Ahmad overthrew the Bahmani Sultanate and established an independent Nizamshahi. Then Korigarh came under Nizamshahi. Later in AD The fort was under Nizamshahi for 146 years till 1636.

2) A.D. In 1636, Shah Jahan of Delhi and Muhammad Adil Shah of Bijapur captured the Nizamshahi and divided the territory of the Nizamshahi when Korigarh came under the control of Adilshahi.

3) During the Nizamshahi, Korigarh's mulkha was called Paud Maval or Korbarse. Dhamale was Deshmukh at that time. After the decline of the Nizamshahi, even if the Adilshahi came to power, the countrymen there as well as Korigarh and

The fort of Ghangad belonged to Damale Deshmukh.

4) AD In 1647, Chhatrapati Shivaraya sent Dadoji Konddev to Maval to bring Korigarh to Swaraj. Dadoji fought with Damale Deshmukh or Musaddegiri and brought the fort into Swarajya.

5) AD In the Treaty of Purandar with Mughal Sardar Mirza Raje Jaising in 1665, twenty-three forts were given to the Mughals and out of the 12 forts that were under Swaraj, Kuwari (Korigarh) was under Swaraj. 

6) AD After the death of Chhatrapati Sambhaji Maharaj in 1689, the Mughals took over most of the Maratha forts, including Korigarh. Where Shakavali mentions "this year Kul Gad Mogle took".

7) Aurangzeb ordered Mansur Khan (Alibeg), the Fort and Faujdar of Junnar, to capture Korigarh. Alibeg gave this responsibility to his son Muhammad Kazim. Kazim, with the help of military officer Rayaji Bahulkar, fitted the fort's keeper Sonaji Farjat and tied the fort with a mala (a rope made by tying a knot in a tree branch at a particular place to climb up) and the Mughal army entered the fort. A fierce battle took place in the fort. Girjoji Nimbalkar and Dinkarrao died a heroic death. Finally, on 12 November 1695, the Mughals attacked the fort.

8) On the orders of Shankaraji Narayan Sachi, Navaji Balakawade brought Korigarh back under the control of the Marathas. (The year must be before 1700 AD as Navaji Balakawade died in 1700.)

9) A.D. In 1713, Korigarh, the western gateway of Chhatrapati Shahu Maharaj, was captured by Sarkhel Kanhoji Angre. On 28th February 1714, Kanhoji Angre became the mandalika of Shahu Maharaj. Korigarh was taken over by Shahu Maharaj as per the agreement reached. 

10) Sardar Awase was in charge of Paud Maval during the rule of Peshwa, he also rebelled against the British, at that time Korigarh was taken over by the British, but Awase negotiated with the Peshwas and returned to Korigarh.

11) In AD 1818 Lt. Col. Prother moved his march towards Korigarh after taking over the forts of Lohgad, Visapur, Rajmachi, Tung and Tikona. Britishers had to make concerted efforts to conquer Korigarh. Finally, on 17 March 1818, the British captured Korigarh.

Trek Route to Korigad

Trek route to Korigad is very easy. It can be graded as very easy trek. It takes around 45 mins to trek which is around 1.5km hike from the deccan base. One can park vehicles at base in Peth Shahapur near highway and start the trek which passes through jungles and meets up with the stairs at the base of Korigad. The route is very easy, wide and marked. No chance of getting lost. 

Other route is from Ambey Valley village where a tar road goes straight at the base of the fort from where stairs start. 

Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

After climbing the stairs one comes across a resting point where there is a Ganesh temple and a small cave.
Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

One can rest here for a brief period of time and then continue to climb the stairs till you reach Mahadarwaja or Ganesh Darwaja of the Fort. On the way one can see small caves and a water tank from where you can even drink water as it is quite clean.

Mahadarwaja Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

Mahadarwaja Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra

After entering the Mahadarwaja, one can enter the vast plateau at the top of Korigad. It is a huge plateau of around 34 acres. The fort is entirely fortified and most of the walls are still intact. One can almost walk the whole perimeter of the fort on walls. The vast plateau is mostly empty with 2 to 3 big lakes and temples. The housing or wadas are in ruins now and the stones are all scattered.
Korigad Fort Walls, Lonavala, Maharashtra
Korigad Fort Perimeter Walls and Bastion.
Korigad Fort Walls, Lonavala, Maharashtra
Korigad Fort Perimeter Walls and Bastion.
Korigad Fort Walls, Lonavala, Maharashtra
Korigad Fort Perimeter Walls and Bastion.
Korigad Fort Walls, Lonavala, Maharashtra

There are small underground caves and bunkers on the west side of the fort that one can easily see.
One can keep walking and reach the west gate, which is also a darwaja from where Sarkhel Kanhoji Angre came up and captured the fort. Going further one can reach the south bastion of the fort.

Korigad Fort West Gate, Lonavala, Maharashtra
West Gate of Korigad Fort
Korigad Fort West Gate, Lonavala, Maharashtra
Thick walls of Korigad fort.
Also there is a Mahadev temple, Korai Devi temple and a Vishnu temple on top of Korigad.

Korai Devi, Korigad Fort, Lonavala, Maharashtra
Korai devi temple
Korai Devi, Korigad Fort, Lonavala, Maharashtra
Old deep mahal and stone idols on top of Korigad.

On the south bastion of Korigad there is a chor darwaja or thief door which it descend to Ambavne village. The chor darwaja has stairs which opens on the base of the fort. Also one of the chor darwaja is blocked by rock debris. This is the third route to gain access to the fort.

Chor Darwaja, Korigad Fort, Lonavala, Maharashtra

Korigad is best visited in monsoon for to see its lakes waterfalls and lush greenery whereas to explore the fort winter season is good as during monsoon it is covered under dense fog. There are total 6 canons on the fort. They are kept in Mahadev temple at entrance where as the big ones are kept facing the west at the west end of the fort. The biggest of the canon is named Lakshmi Tof.

Lakshmi Tof, Korigad Fort, Lonavala, Maharashtra

Other Information regarding Korigad (Source: Internet)
One interesting story associated with Korigadh revolves around its capture by Dadoji Konddev, a trusted lieutenant of Chhatrapati Shivaji Maharaj.

Legend has it that when Dadoji Konddev arrived at Korigadh to bring it under Maratha rule, he found it to be heavily fortified and defended by Damale Deshmukh, the local ruler. Despite facing significant resistance, Dadoji was determined to succeed in his mission.

In a clever and daring move, Dadoji devised a plan to deceive the defenders of Korigadh. He decided to employ a strategy that played on the superstitions and beliefs of the enemy.

Under the cover of darkness, Dadoji and his men stealthily approached the fort. Instead of launching a direct assault, they initiated a series of mysterious and eerie activities around the fort. They set fire to haystacks to create smoke, mimicked ghostly sounds, and even used torches to cast eerie shadows on the walls of the fort.

Terrified by these supernatural phenomena, the defenders of Korigadh began to believe that the fort was haunted by malevolent spirits. Fearful for their safety, they abandoned their posts and fled from the fort, leaving it virtually undefended.

Seizing the opportunity, Dadoji and his troops swiftly entered the fort and claimed it in the name of Chhatrapati Shivaji Maharaj. The clever ruse orchestrated by Dadoji Konddev not only enabled the Marathas to capture Korigadh without a prolonged battle but also became a legendary tale of strategic brilliance and resourcefulness in Maratha history.

Also it is said that the Jewellery after 1818 from the Korai devi temple was given to Mumba Devi (Godess of Mumbai) (Source: Harish Kapadia Book)




KORIGAD TREK SUMMARY


Korigad Fort Trek Route and Map














































Monday, January 27, 2025

ब्रह्म , कार्तिकेय, सूर्य मुर्तीशास्त्र

 कार्तिकेय
        हरिवंशात ब्रह्मदेवांकडून असे भविष्य वदविले गेले आहे की कलियुगात प्रारंभापासून लोक आणि कुमार या देवांचा आश्रय घेतील.' हे विधान उघड उघड स्कंद व शिव यांच्या समकालीन लोकप्रियतेकडे संकेत कुषाणांच्या नाण्यावर असलेला शंकर आपल्या माहितीत आहे, त्याचप्रमाणे विश्काच्या काहण्यावर कर, कुधार आणि विशाख हे दिसतात. कुषाणांच्या नंतरच येणाऱ्या यौधेयांच्या पाण्यावर कोर कार्तिकस्वामीचे दर्शन घडते. (रे. चि. पस्तीस २) गुप्तकाळातही त्याच्या कित्येक सुंदर प्रतिभा घडविल्याच्या कु स्कन्द, देवसेनापति, गाङ्गेय, शिवसुत, षडानन, वगैरे त्याची इतर नावे होत. आता स्वतंत्र धानेक पूजन फारसे होत नाही, पण वाङ्‌मय, अभिलेख, प्रतिभा, नाणी आणि अनुतीयांत या की इसवीसनांच्या सुरुवातीचे अगोदरपासून मुसलमानांच्या देण्यापर्यंत इकडेही स्कंद पूजा चालू होती. आज मात्र सुब्रह्मण्यम् या नांवाने हा देव अजून पुजला जातो.
        कार्तिकेय व अग्ग्री यांचा संबंध लक्षात घेऊन त्याचा दुवा ऋग्वेदाशी जोडण्याचा प्रयत्न काही केला आहे.त्यांचे 'कुमार' हे नांव त्याच काळातील असावे असा कयास आहे. उत्तर वैदिक काळात स्कंद' हे ना पुढे आले कुमाराबरोबर सनत्, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र, वगैरे नांवाची साकार होती कार्तिकेयाचा विशेष उत्सव 'स्कंदमह' या नांवाने ओळखला जात असे.
      स्कंद हा धूर्त आणि चोर यांचाही देव समजला जातो. अधर्ववेदाचे परिशिष्ट म्हणून स्कंदा किंवा धूर्तकल्प याचा उल्लेख आहे. येथे स्कंदाला 'भगवान् देवोधूर्तः' असें म्हटले आहे. याच प्रसंगातील कित्येकाची चित्रसंनाह, सिंहसंनाह, शक्तिसंनाह, लोहितगात्र, अशावशलोचन, वगैरे अभिधाने, भाताबरोबरच संगती, लाल डोळे असलेल्या कोंबड्याचा उल्लेख कौरे, कार्तिकेयाच्या भूर्ति विज्ञापनকসান धूर्तकल्पाचा काळ ठरविणे सोपे नाही. एवढेच सांगता येईल की स्कंदाची उत्पत्ती आणि विकासासंबंधी निरनि मतांचे स्थिरीकरण व सम्मिश्रण झाल्यावर हा कल्प तयार झाला असावा,
        महाभारतात स्कंद जन्माविषयी खालील सहा मतांची नोंद केलेली आवळते.
१) पितामहाचा ज्येष्ठ पुत्र सनत्कुमार हाच स्कंद होता.
२) तो महेश्वराचा मुलगा होता.
३) तो विभावसु अग्नीचा पुत्र होता.

ते ६) त्याची माता होण्याचा मान उमा, गंगा व कृतिका यांना देण्यात येत असे
कार्तिकयाच्या संबंधी वाङ्‌मयातील निरनिराळ्या कथांचे अनुशीलन केल्यास खालील गोही महत्वाच्या वाटतात :
अ) कार्तिकेयाला चोर आणि धूर्ताचा देव मानला जात असे.
आ) तो पार्वतीचा अङ्गज पुत्र नसून त्यांच्या जन्मांच्या मुळांशी सौंदर्यासक्ती, अवैध संबंध, शक्तिप्रयोग आणि बलात्कार, विश्वासघात अशा कित्येक गोष्टींचा संबंध आहे.
इ) जन्मानंतर त्यांचे द्विजांस योग्य असे संस्कार करण्यास कोणीच ब्रह्मजन्मा ब्राह्मण पुढे आला नाही, तेव्हा क्षत्रियापासून ब्राह्मण झालेल्या विश्वामित्रानें या प्रबळ पराक्रमी बालकाला सामाजिक दृष्टीने वर आणण्याचा भार आपल्याला खांद्यावर घेतला.
ई) आपल्या पराक्रमाने स्कंदाने सगळ्या देवांवर प्रभुत्व स्थापन केले तेव्हा देव-सेनापति म्हणून इंद्राने त्याचा अभिषेक केला व आपल्या पक्षाचे बळ वाढविले.
3) तारकासुराचा नाश केल्यानंतर स्कंदाच्या दुष्ट प्रवृत्ती पुनः बळावल्या व त्याने देवांच्या बायकांवर बलात्कार करणे सुरू केले. अर्थात् त्याच्या पराक्रमाने भारावलेले देव दिङ्मूढ झाले. शेवटी पार्वतीनें युक्ती केली. तिच्या मायेमुळे स्कंद ज्या स्त्रीला हात लावण्याचा प्रयत्न करी तीच त्याला आईच्या म्हणजे पार्वतीच्या रूपात दिसू लागे. शेवटी तो कंटाळला व स्त्रीमात्रालाच आई म्हणून पाहण्याची त्याने प्रतिज्ञा करून टाकली.
ऊ) स्कंदाला देवसमाजात वरचे स्थान तर मिळाले पण त्याचे दुष्ट रूप अगदीच मावळले असे मात्र नाही. बाल- ग्रहाच्या रूपांत ते तसेच राहिले. त्याला त्या रूपांत भूतें, पिशाच्चे आणि शिवा व अशिवा मातांचा अधिपती मानले गेले' व त्याचे पूजन घराच्या बाहेर व्हावे (वास्तुबाह्य) असा दंडक पातला गेला.
वरील मुद्दे या गोष्टीचा उघड पाठपुरावा करतात की स्कंदोपासनेत वेळोवेळी निरनिराळ्या धारांचे विलयन होत गेले ज्यात आर्य आमि अनार्य प्रवाह होते. हे वैचित्र्य स्कंदाच्या भारतीय व परदेशी पोषाख घातलेल्या प्रतिमांतही दिसते.
नाण्यांवर स्कंद :
     काही विद्वानांच्या मताप्रमाणें ठोकीव नाणी (Punch marked coins) यावर दंडकमंडलू घेतलेली जी पुरुष प्रतिमा दिसते तीं शक्ती व ढाल घेतलेल्या स्कंदाची आहे." (रे. चि. पस्तीस ३) काही तिला शिव समजतात. अजून हा वाद तुटलेला नहीं. त्याचप्रमाणे उज्जयिनीच्या पूर्वकुषाण कालीन नाण्यांवर आढळणारी दंडकमंडलुधारी त्रिमुख मूर्ती कार्तिकयाचीच आहे हे संदेहातीत नाही. (रे.चि. पस्तीस ४) नक्की असा स्कंद प्रथम योधेय गणांच्या नाण्यांवर आढळतो. तेथे तो सहा तोंडाचा असून शक्ती घेतलेला आहे. या नाण्यांवर एका बाजूला कार्तिकय आणि दुसरीकडे षष्ठी दाखविली आहे (रे.चि. २,३, पान रे३३). षष्ठी आणि कार्तिकेय यांच्या संबंधाची आपण नुकतीच चर्चा केली आहे. याच गणाच्या दुसऱ्या प्रकारच्या गाण्यांवर तो एक तोंडाचा असून त्याच्या पायाजवळ कोंबडा आहे (रे. चि. पस्तीस २). कुषाणांच्या काही नाण्यांवर स्कंद, कुमार व विशाख या रूपात हा देव दिसतो." उत्तर भारतातील काही जनपदीय शासकांच्या नाण्यांवर कुक्कुट स्तंभ आणि सबिड्यासह तालवृक्ष दिसतो. डॉ. बॅनर्जीच्या मते ही स्कंदोपासनेची प्रतीके होत.
गुप्तकाळात सम्राट कुमारगुप्त हा स्कंदाचा उपासक असावा, बिलसाद येथील लेखांप्रमाणे त्याने स्वामी महासेनाचे

३२०
मंदिर बांधले " एवढेच नव्हे तर स्वतःच्या नाण्यावर देखील आपल्या इष्टाला मानाचे स्थान दिले.

मातीच्या ठशांवर स्कंद":
   भीटा (उ.प्र.) आणि बसाढ (बिहार) येथून मिळालेल्या काही गुप्तकालीन ठशांवर पंख पसरलेला मोर दिसतो. भीटा येथील एका ठशावर 'स्कंदशूरस्य' ही अक्षरेही आहेत. वाराणसी येथून हाती आलेल्या ठशांवर 'महाशी (शु) रख्य ही अक्षरे असून तेथे दोन शक्तिधर पुरुष दिसतात.

गांधार कलेत कार्तिकेय प्रतिमा :
पश्चिमोत्तर (वायव्य) भारतांतील शिव आणि दुर्गा यांच्या प्रतिमेसंबंधी मागे जागोजागी चर्चा झाली आहे. कार्तिकय देखील त्या प्रदेशाला अनोळखी नव्हता. त्याच्या खालील मूर्ती आपणास माहीत आहेत :
    १) तक्षशिलेहून मिळालेली शक्ती व कोंबडा घेतलेली प्रतिमा. येथे त्याच्या पायात उंच जोडे दिसतात. पुराणांत वर्णन केलेली स्कंद व सूर्याचा अनुचर दंड यांची समानता यांनी स्कंदाच्या पायातील जोड्यांची सूर्याच्या जोड्याशी संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे." हे संभवते की स्कंदाचे जोडे, फॅरो आणि ऑरडोक्शो किंवा सूर्य याच्या प्रमाणेच त्याच्या मुळांत परदेशी होण्याचे सूचक असतील. "
    २) ब्रिटिश म्युझियम, लंडन येथे शक्ती व कोंबडा घेतलेला देवसेनापती आहे. येथे जोडे नाहीत पण डोक्याच्च्या पाठीमागील प्रभामंडळ व अंगावर चढविलेले चिलखत मात्र स्पष्ट आहे." अधोवस्त्र म्हणून धोतराचाच वापर केला आहे.
     ३) जवळ जवळ अशाच प्रकारची एक मूर्ती रोम येथील संग्रहालयांत आहे, फरक एवढाच की येथें धोतरांचे ऐवजी तंग पायजमा किंवा सुरवार वापरली आहे.
        ४) लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अलबर्ट संग्रहालयांत कोंबडा व शक्ती घेतलेली स्कंदाची लहानशी मूर्ती आहे. हातांवर उपरणें असून नेसूचे तलमसे धोतरही दिसतें. येथील वैशिष्ट्य म्हणजे स्कंदाच्या डोक्यामागून वर येणाऱ्या अग्निज्वाला होत. या ज्वाला एकीकडे स्कंदाला अग्नीशी संबंध सुचवितात तर दुसरीकडे ते पश्चिमोत्तर भारतीय कलेचे एक वैशिष्ट्य ही होते. कित्येक सोन्याच्या नाण्यांवर कुषाण राजाच्या मागेही अशाच ज्वाला दिसतात.
      ५) गांधार कलेतील एक स्कंद प्रतिमा बडोदा संग्ग्रहालयात आहे. येथे कार्तिकयांचे कवच, शक्ती आणि प्रभामंडल आहे पण कोंबडा मात्र नाही.
     ६) याच कलेची एक मयूरारूढ द्विभुज प्रतिमा लखनऊ संग्रहालयात आहे. येथे मूळ रूपात उजव्या हातात शक्ती होती पण ती आता तुटली आहे. डाव्यात कोंबडा आहे येथे कुमाराचा वेष मात्र भारतीय आहे. (चित्र १२९)
         याप्रमाणें उत्तर पश्चिमेत स्कंद माहीत होता हे नक्की. त्याचे आयुध शक्ती आणि खेळणे कोंबडा हेही प्रसिद्ध होते, पण त्याची तेथील सर्व रूपे एकमुखच आहेत, षड्‌मुख नाहीत. दुसरे असे, की मोराचा वाहन म्हणून उपयोग फक्त एकाच ठिकाणी दिसतो.

३२१

स्कंद, सुवर्ण प्रतिमा :
     हुलासरवेडा (लखनऊ), उ.प्र. येथून उत्खननांत मिळालेली छोटीशी सुवर्ण प्रतिमा सुमारे ई.पू. १००ते ई.स. २००च्च्या मधली आहे. हात दोन, उजवा अभयमुद्रेत असून डाव्यात पुष्प असावेः फार स्पष्ट नहीं. उजव्या बाजूला त्याचे आयुध-शक्ती दिसते. या प्रतिमेला स्कंदाचे प्राचीनतम अंकन म्हणता येईल.
    R.K. Tewari, Excavations at Hulaskhera, Kosala. The Journal of Indian research society Avadh Faizabad, IV 1-2, January 1982-83 pl. IV, p. 136

दोन मोर असलेला स्कंद :
    बैजनाथ (अल्मोडा) उत्तराखंड येथून प्राप्त सुमारे ८-९व्या चतुर्भुज स्कंदाच्या आजूबाजूला एक एक मोर असून तो डावीकडच्या मोराला खाऊ घालीत आहे.
R.C.Agrawala, Skanda from National Museum, New Delhi and U.P. Hills, EW., N.S. 18/3-4, 1968, p. 319

नाचणारा स्कंद :
    अशा प्रकारच्या दोन प्रतिमा आपल्या माहितीत आहेत. पटना संग्रहालयात महरवों (नावडा) बिहार येथून आलेल्या सुमारे ६व्या शतकातील एका सोळा आरे असलेल्या चाकाच्या पुढील व पाठीमागील भागावर नाचणारा कार्तिकेय आहे. गळ्यात वाद्यनख दिसते. (रे.चि.श.१)
Naseem Akhtar, Patna Museum Catalogue, Stone sculptures, Patna 2001 Cat. No. 104, pl. XIX, p. 68
     दुसरी प्रतिमा छोटीखाडू (नागौर) राजस्थान येथील एका विहिरीत चिणलेली आहे. सुमारे ८-९व्या शतकातील हा देव असून त्याच्या मुख्य मस्तकावर उरलेली पाच मुखे किंचित वर्तुळाकार दाखवली आहेत. त्याचा मोर दोन्ही पायामध्ये आहे. स्कंद त्याला एक फळ ही खाऊ घालीत आहे. काही हात नृत्य मुद्रेत आहेत. पण इतर आयुधे सोबतच्या चित्रांत स्पष्ट नाहीत.
        R.C.Agrawala, Skanda in early Rajasthan sculptures, research, XII-XIII 1972-73, pl. XIV, p. 18

स्कंद चतुरात्मा :
      मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर, ओडीसा (सुमारे १०वे शतक) येथे आसनस्थ तशाच प्रकारच्या शक्ती घेतलेल्या इतर तीन प्रतिमासह दिसतो. उजवीकडे मोर आणि डावीकडे कोंबडा आहे. या चौघांची अग्रवाल यांनी स्कंद, विशाख, शाख आणि तैगमेय अशी ओळख करून शिल्पाला 'चतुरात्मा स्कंद' असे नांव दिले आहे. (रे.चि.स्क. २).
     D.K. Agrawala, Tetrad of Skanda Deities at Bhubaneswar, EW., N.S. 29, 1-4, December 1979, fig. 1, p. 157

नैगमेष :
   मांढळ (नागपूर) महाराष्ट्र येथून सुमारे ५व्या शतकातील बकऱ्याचे मुख असलेल्या एका शिल्पात उजव्या हातांत
 ३२२

     दंड (वरचा भाग खंडित असलेली शक्ती) घेतलेली प्रतिमा दिसते. देगलूरकरांच्या मते हा नैगमेष असावा, नैगमेष है स्कंदाचे रूप असल्याचे प्रसिद्ध आहे.
     GB. Deglurkar, 'Naigames Emerging as Kartikeya, The Iconographic record, Bulletin of the Deccan College, Pune 47-48, 1988-89, pp. 57-58

वराहसंहार :
     तमिळ 'शरभपुराणां' प्रमाणे विष्णूने वराहरूप घेऊन हिरण्याक्षाला मारले, पण पुढे तो अतिशय चवताळल्यामुळे जगालाच अस्त करू लागला. तेव्हा स्कंदाने आपल्या शक्ती किंवा 'वेल' नांवाच्या आयुधाचा प्रयोग करून त्याला ताळ्यावर आणले. हे ही अंकन वर नमूद केलेल्या सुब्रह्मण्य स्वामीच्या मंदिरात आहे. R.K.K. Rajarajan वरील प्रमाणे, चित्र ९० (हे चित्र संदर्भगत शिल्पाशी नीट जुळत नाही)

स्कंद आणि सर्प :
    स्कन्दाबरोबर सर्पाचेही अंकन करणारी शिल्पें अगदी मोजकी आहेत. दक्षिण भारतात स्कंदाला नागदेवता मानतात. विशेषतः कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागांत स्कंदाला 'शेषावतार' समजातात. भहिप्रोलू (आंध्रप्रदेश) येथील विठ्ठलेश्वराच्या मंदिरात स्कंद म्हणून नागाचीच मूर्ती आहे. किंबहुना मंदिराजवळ असलेल्या वारूळात जिवंत नागाची स्कंदाची पूजा होते.
-रा.चि. ढेरे, श्री विठ्ठल : एक महासमन्वय, पुणे २००५, पृ. ११९.

        रामेश्वर (तामिळनाडू) च्या रामतीर्थ मंदिर परिसरात एका मोठ्या चौथऱ्यावर शेकडो दगडी नाग ठेवलेले दिसतात. त्यांत वरच्या भागवर तीन वेटोळ्या घातलेल्या एका नागावर बारा हातांचा षण्मुखी कार्तिकेय बसलेला दिसतो. डोक्यावर सर्पाच्या पाच फणा आहेत. आयुधे मात्र स्पष्ट नाहीत. दुसरे म्हणजे स्कंदाचे वाहन म्हणून एका मोठ्या मोराबरोबरच दुसरा लहान मोर ही आहे. हे शिल्प सुमारे ११व्या शतकातील असावे.
A.L. Srivastava, Mayurarudha Sadanana, Jnana Pravaha research journal XIII, pl. 10.1,2,3 p. 56 ff.
         स्कंद आणि सर्प यांचे संयोजन उत्तर भारतांत ही आढळते. जयपूर राजस्थान येथील नकटीमातेच्या मंदिराच्या एका कोनाड्यात मोरावर बसलेला चतुर्भुज स्कंद आहे. त्याच्या उजव्या हातांत शक्ती व सर्प असून डाव्यात कमंडलू आहे (सुमारे ९वे शतक).
     त्याचप्रमाणे, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश जवळ राणोद येथून सुमारे १४-१५व्या शतकाचा मोरावर बसलेला सहातोंडाचा द्वादशभुजी कार्तिकेय समोर आला आहे. त्याच्या गळ्यात एक लांब सर्प रूळत आहे. शिवाय दुसरा त्याच्या मोराच्या चोचीत आहे. या शिल्पाचे दुसरे वैशिष्ट्य याची आयुधे आहेत. हात बारा आहेत, पण मुख्य चार हातांत त्याने वैष्णव आयुधे- शंख, चक्र, गदा व पद्म घेतली आहेत. इतर स्पष्ट नाहीत. अग्रवाल यांच्या मते हे 'वैष्णव स्कंदा'चे अंकन असणे शक्य आहे.
- रत्नचंद्र अग्रवाल, 'स्कंद कार्तिकेय की विलक्षण प्रतिमा'
Jnana Pravaha research Journal XIII, pl. 9.1, p. 48
Arch. Sur. India A.R. 1918, pl. XIII, p. 22
 
 
 ३२३

मथुरेतील कुषाणकालीन स्कंद :
    या काळांत स्कंदोपासनेचा निश्चितच भर होता. या देवाच्या सुमारे वीस प्रतिमा आपल्या माहितीत आहेत. त्यांत एक शक वर्ष ११ = सन् ८९ मर्धे कोरलेल्या लेखाने युक्त आहे. या लेखांप्रमाणे विश्वदेव व विश्वसोम या दोन भावांनी ती स्कंद प्रतिमा स्थापली होती (चित्र १३०).
     कुषाण काळांत कार्तिकेयाच्या स्थानक प्रतिमा जास्त आहेत. तो एकटा, मातृकांच्या बरोबर किंवा अग्री बरोबरही असतो (अग्निसह म.सं.सं. ४०.२८८३). माता आणि घट याच्या सह उभा असलेला स्कंद कुषाणकलेत कमीत कमी तीन प्रतिमांत तर आहेच. तो एका ठिकाणी व्याघ्रमुखी मातेसह (ल.सं.सं.ओ. २५०), व दुसऱ्या ठिकाणी मानवमुखी मातेसह आढळतो (म.सं.सं. १५.११७८). कधी या पशुमुखी मातेबरोबरच एक अन्य माताही असते (म.सं.सं.यू. ९) तर कधी यांची संख्या चार किंवा त्यापेक्षाही जास्त असते (म.सं.सं. ३४.२४९१). कोंबडा हे कार्तिकयाचे खेळणे आहे. हा कोंबडा त्याला एका मताप्रमाणे सूर्याचा सारथी अरुण यांच्या कडून व दुसऱ्या प्रमाणे समुद्रांकडून " मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या ध्वजांवरही हा पक्षी असतो. कानपूर जिल्ह्यातून मिळालेल्या 'लाला भगत' खांबावर (चित्र १२९) कुक्कुट ध्वजाचे अंकन मिळते (रे. चि. पस्तीस १). एवढेच नसून या खांबावर मुळात एक भला मोठा कोंबडा होता असे म्हणण्यांस जागा आहे." कुषाणकालीन मधुरेच्या स्कंदांची खालील वैशिष्ट्ये सांगता येतील :
१) या भागांतील स्कंदप्रतिमा एक मुखाच्या व फक्त दोनच हाताच्या आहेत.
२) मस्तकावर कुठे मुगुट असतो, नसल्यास केसाची डोक्यावर गाठ दिसते किंवा ते पाठीकडे वळवलेले असतात. (चित्र १३१)
३) दोन्हीं खांद्यांवर विखुरलेले केस ही कार्तिकेयाची एक विशेषता आहे.
४) स्कंदाचे आयुध शक्ती किंवा भाला हे होय. कधी कधी भाल्याच्या फाळांवर पुष्पहार लोंबविलेले दिसतात (चित्र १३०).
५) बहुतेक कार्तिकेयाच्या गळ्यांत एक घट्टसर दागिना व त्या खाली त्रिकोणाच्या रूपात लोंबणारा अरुंद पट्टीचा ग्रैवेयक हा दागिना दिसतो (चित्र १३०).
६) मधुरेतील प्रतिमांत फक्त अपवाद (म.सं. ३२.२३३२) वगळल्यास कार्तिकेयाबरोबर कोंबडा दिसत नाही.
७) स्कंदाचे मुख मात्र कुमाराला शोभेल असेच असते. तेथें प्रौढत्व दिसत नाही.
८) काही शिल्पात कार्तिकेयाचे गळ्यात जानवे दिसते (ल.सं.सं.जे. ९२१) (चित्र १३१).

गुप्तकालीन स्कंद : (चित्र १३२, १३३)
     स्कंदोपासनेशी संबंधित गुप्तकाळांतील सर्वात महत्त्वाचा लेखी पुरावा म्हणजे एटा (उ.प्रदेश) जिल्ह्यांत बिलसाद नांवाच्या गावातील दोन खांबांवर असलेला कुमारगुप्त कालीन लेख असून यांत ब्रह्मण्यदेव स्वामी महासेनाचे विशाल मंदिर बांधल्याची नोंद आहे." शांतिवर्मा (सुमारे स. ४५५-७०) याच्या ताल्गुंड स्तंभ लेखांत षडानन आणि मातृकांच्या उल्लेख आहे." स्कंदगुप्ताच्या एका अभिलेखांत कार्तिकेयाचा माताच्या बरोबर प्रमुख रूपानें उल्लेख केलेला आहे. (स्कंद
३२४

प्रधानैर्भुविमातृभिश्च) याच प्रमाणे कदंब आणि चालुक्यांच्या लेखांत महासेन (स्कन्द) आणि मातांचे उल्लेख आहेत.
गुप्तकाळातील खालील स्कंद प्रतिमा आपल्या माहितीत आहेत.
क) मोरावर बसलेला कार्तिकेय, मृफलक (म.सं.सं. ३८.२७९४, ३२.२२७०).
ख) इंद्र आणि ब्रह्मदेव यांचे कडून कुमाराचा अभिषेक (म.सं.सं. १४ ४६६)"
ग) वाराणसीहून मिळालेली सुंदर प्रतिमा (भारत कला भवन, वाराणसी).
घ) पवाया (मध्यप्रदेश) येथील षडानन स्कंदराजा बलीचा यज्ञ आणि त्रिविक्रमाचे अंकन करणाऱ्या ग्वाल्हेर संग्रहालयांतील शिलापट्टाच्या मागील बाजूस डावीकडे सहा डोकी आणि बारा हात असणारा कार्तिकेय दिसतो. तेथेच त्यांची पूजा करणारेही कोरलेले आहेत. हा दगड तुटलेला असल्यामुळे फक्त स्कंदाचे एकी कडचे सहा हात आणि समोरची तीन डोकीच पहाता येतात.
ङ) उत्तर गुप्तकाळातील एक कांस्य मूर्ती" चंबा प्रदेशांत मिळाली असून तिला सहा मस्तके आहेत पण हात मात्र चारच आहेत. सहा डोकी एका ओळीत न दाखविता तीनचा गट एकावर एक ठेवला आहे. मांढळच्या द्वादशमुखी शिवाच्या डोक्यांची रचना काही अंशी अशीच आहे. (मागे पहा पा. १५०)
दुसरे वैशिष्ठ्ये म्हणजे स्कंदाचा मोर आणि शक्ति हे मानव रूपात अंकित आहेत. हा प्रकार नवा आहे. गुप्तकाळांतील एकूण स्कंद मूर्तीचे अनुशीलन केल्यास त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणून खालील मुद्दे सांगता येतील :
१) स्कंदाच्या डोक्यावर मुगुट कमी दिसतो. केसांना नीट विंचरून त्यांचे तीन भाग-शिखा किंवा शिखंड पाडतात (चित्र १३२). स्कंदपुराणात कार्तिकयांसाठी 'जटी' व 'शिखंडी' हे शब्द वापरले आहेत. वरील अंकनाशी त्यांचा संबंध असणे संभवते. 'जटी' पद्धतिच्या प्रतिमा कुषाण काळातही आपणांस मिळाल्या आहेत.
२) कुमाराला शोभेल असा एक नवा दागिना आतां दिसू लागतो. जुनें ग्रैवेयक जाऊन त्या ठिकाणीं वाघनख असलेली एक प्रकारची सरी प्रगट होते (चित्र १३२), वाघनख हे बाळपणांचे प्रतीक तर आहेच, पण त्या बरोबरच त्याचा शंकराशीही संबंध आहे. स्वतः शंकराच्या" किंवा त्याचा गणाच्याही गळ्यांत वाघनख दिसते."
३) कुमार व मयूर यांचे सान्निध्य वाढते, कुठे तर तो आपल्या मयूराला खाऊ घालतांना ही दाखवितात (अलाहाबाद सं. ९४६ त्याचप्रमाणे चित्र १३२).
४) आतां सहसा याच्या हातांत कोंबडा दिसत नाही, त्याची जागा बऱ्याचदा फळ घेतें (उदा. भारत कलाभवन प्रतिमा).
५) विष्णू आणि शिवाप्रमाणें कार्तिकेयाची शक्ती ही आतां आयुधस्त्रीच्या रूपांत दिसू लागते. पाटणा संग्रहालयांत असलेल्या उत्तर गुप्तकाळच्या मूर्तीत कार्तिकेयाच्या डाव्या हातांखाली एक स्त्री उभी आहे. तिच्या डोक्यावर असलेला भाल्याचा फाळ ती शक्ती आहे हे सुचवतो (चित्र १३४).
३२५

६) त्याचप्रमाणें, चंबा प्रतिमेसारख्या कांही शिल्पांत नंदी आणि गरुडांप्रमाणें स्कंदाच्या मोरानेही पुरुष रूप घेतलेले दिसतें.
७) काहीं प्रतिमांत एक आणीक नवी वस्तू दिसतें. ती म्हणजे चिमुकली घाट किंवा 'घंटिका', भूमरा प्रतिमेंत (अल्हाबाद सं. १५०) ही घाट मोराच्या गळ्यांत बांधली आहे, तर अहिच्छत्रा येथून मिळालेल्या खंडित प्रतिमेत ती स्कंदाच्या कक्षबंधांतच आहे."

मध्यकालांतील स्कंद प्रतिमा :
     गुप्तोत्तर कालांत स्कंदाची उपासना चांगलींच तग धरून होती. दशकुमारचरित्रात 'कार्तिकेयगृहा'चा उल्लेख आहे. सुमारे चौदाव्या-पंधराव्या शतकांत तिला उतरती कळा लागली व झपाट्यानें तिचें उच्चाटन झाल्यासारखें दिसते, कारण तेराव्या शतकांनंतर स्कंद प्रतिमांची संख्या रोडावू लागते व एकोणीसाव्या शतकांपर्यंत तर उत्तरभारतांत स्कंदाची पूजा होती किंवा नव्हती हे ओळखणें बरेच कठिण झालेले दिसतें.
     मध्यकाळांत मात्र ओडिसा, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्यभारत वगैरे सर्व भागांतून स्कंदाच्या मूर्ती आढळतात. इतकेच नव्हे तर उत्तरप्रदेशाच्या सुदूर पर्वतीय भागांतही कत्त्युरी कलेतही काही सुंदर मूर्ती दिसतात (चित्र १३६). या सर्व प्रतिमांचा सरासरी आढावा घेतला तर खालील वैशिष्ठ्ये सांगता येतील-
     १) प्रथम ओडिसातील मूर्ती घेऊ. यांना दोन वर्गात वाटता येईल" कोंबडा नसलेल्या व कोंबडा घेतलेल्या. प्रथम प्रकारांत देव द्विभुज असून त्याच्या हातांत बहुतेक शक्ती आणि फळ (बीज पूरक) दिसते. तो उभा, सिंहासनावर बसलेला किंवा मोरावर आरूढ दिसतो. अशाच प्रकारच्या एका प्रतिमेत स्कंदाच्या अभिषेकाचे दृश्य चित्रित केले आहे." दुसऱ्या प्रकारांत तो चतुर्भुज असून त्याच्या जवळ त्रिशूळ, डमरू आणि कोंबडा मुख्यत्वेकरून दिसतात. या शिवाय खड्ग आणि वरद मुद्रा ही काही शिल्पांत आढळते.
     २) उत्तर प्रदेशांतील पर्वतीय कर्लेत त्याची रूपें आढळतात (चित्र १३६). सुरुवातीच्या काळांतील एका सहामुखी धातुप्रतिमेचा मागे उल्लेख झाला आहे." इकडील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे स्कंदाची शक्ती व मोर यांना क्रमाने स्त्री व पुरुषरूपाने दाखविणे हे होय. एका प्रतिमेत एक ऐवजी दोन मोर आढळतात " तर दुसरीत कमळ हे ही त्याचे एक आयुध असल्याचे दिसते. कोंबडा मात्र आता कचित आढळतो (चित्र १३७).
     ३) उत्तरभारताच्या मैदानी इलाख्यांत कांही शिल्पांत कार्तिकेयाच्या हातांत अर्थात् त्याच्या चतुर्भुज रूपांत एक नवी वस्तू, पोथी आढळते." गुप्तकालीन काही प्रतिमांप्रमाणें हा आपल्या मोरांस खाऊ घालताना ही दिसतो. कार्तिकेयाची पोथी त्याला बौद्ध परिसरांत नेऊन बसविते. मंजुश्रीमूलकल्पांप्रमाणें कार्तिकय मंजुश्रीच्या हातांत पोथी असून तो मोरावर बसतो. पण यावरून पोथी घेतलेल्या सर्व कार्तिकेयांना बौद्ध म्हणण्यांचे कारण नाही.
    ४) सहा तोंडाचा आणि बारा हातांचा स्कंद इकडे फारसा दिसत नाही."
     ५) कार्तिकेयाचा व मुगुटाचा फार जवळचा संबंध नाही. किंबहुना बव्हंशी कार्तिकेय प्रतिमांचे केस एका विशिष्ट (र.चि. पस्तीस ५-७) पद्धतिनें रचलेले असतात. हे त्रिशिखंड होय. याची सुरुवात गुप्त काळांतच झाली व वाड्‌मयांत त्याचे उल्लेख आढळतात. कार्तिकेयाचे हे वैशिष्ट्य कौमारीच्या प्रतिमेंत ही दिसणें स्वाभाविक आहे.
३२६

६) कार्तिकय आणि अग्नी. मध्यकालीन मूर्तीत काही ठिकाणी यांचा संबंध दिसतो. देहरादून (उत्तर प्रदेश) येथून मिळालेल्या एका प्रतिमेत पुरुषरूपानें स्कंदाजवळ एक बकरा उभा आहे. अम्मीनेंच आपल्या मुलांस खेळविण्यासाठी बकऱ्याचे रूप घेतले होते हे आपण मार्गे पाहिले आहे. सारनाथ (वाराणसी) संग्रहालयांत अग्नीची अशी एक प्रतिमा आहे जिच्यांत त्याच्या डाव्या पायांजवळ मोरासह उभा कार्तिकेय आणि उजव्या बाजूला एक कोंबडा आहे."

दक्षिण भारतांतील सुब्रह्मण्य :
    उत्तरेपेक्षा दक्षिणेंत आजही कार्तिकेयाची लोकप्रियता कितीतरी पटीने जास्त आहे. तिकडे तो सुब्रह्मण्य या नांवाने प्रसिद्ध आहे. (रे.चि. पस्तीस ८) जसा आपल्याकडे मारुती हा लहान मोठ्या प्रत्येक गावांत असतोच तसा दक्षिणेत सुब्रह्मण्य असतो. त्याची मंदिरें शहरे, गाव, बगीचे, डोंगर, वगैरे ठिकाणी सर्वत्र दिसतात. कामिकागमांत एका ठिकाणी नगरांचे तेरा प्रकार सांगितले आहेत व हे ही निर्धारित केले आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या रूपाचा सुब्रह्मण्य स्थापित करावा." कुमारतंत्र, आगमग्रंथ, श्रीतत्त्वनिधि, वगैरे ग्रंथांवर नजर फिरविल्यास सुब्रह्मण्याची सुमारे चाळीस ध्याने आपणांस आढळतात. या शिवाय त्याचा इतर पसारा खालीलप्रमाणे दिसतो.

शरीरपालक किंवा अंगरक्षक
(षण्मुख, शक्तीपती, वगैरे) ८
परिवार देवता
(सूर्य, शास्ता, ब्रह्मा, यम, सातमाता, वगैरे -
८, १२, १६ किंवा ३२
द्वारपाल (सुदेह आणि सुमुख) २
बायका (महावल्ली आणि देवसेना)
मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने अर्थातच इतका अफाट विचार आपणास येथे करता येणार नाही. तेव्हां सुब्रह्मण्याची काहीं वैशिष्ट्ये व महत्त्वाची ध्याने येथपर्यंतच आपली सीमा बांधून घ्यावी लागेल.

वर्गीकरण :
   सुब्रह्मण्य प्रतिमांचे एक ठोकळ वर्गीकरण असें ही देण्यांत येते कीं तो आसनांवर बसलेला असला तर त्याला फक्त दोनच हात असावेत. ही त्याची सात्त्विक मूर्ती होय. राजस स्वरूपात जर तो उभा असला तर त्याला चार हात असावेत, या उलट तो मोरावर बसलेला असला तर त्या तामस रूपांत चार, आठ, किंवा बारा ही हात असू शकतात.

आयुर्धे :
        शक्ती हे सुब्रह्मण्याचे मुख्य आयुध होय. हिच्या उत्पत्तीबद्दल मार्कण्डेय पुराणांत असा उल्लेख मिळतो की एकदा सूर्याचे तेज इतके वाढले की त्यामुळे जग होरपळू लागले. तेव्हा विश्वकम्यनि त्याच्या तेजाचा थोडासा भाग काढून त्याला सहनीय केले व त्या काढलेल्या तेजापासून सुब्रह्मण्यांसाठी शक्ती हे आयुध बनविले. या प्रसंगात हे लक्षांत ठेवावे कीं शिव व अग्निप्रमाणें सूर्याशीही स्कंदाचा संबंध लावला जातो.

३२७

    उत्तरेपेक्षा दक्षिणेच्या स्कंदात सर्वात मोठा फरक हा आहे की इकडचा स्कंद ब्रह्मचारी नाही व त्याला बायकांचे कवडेही नाही. उत्तरेंत बायका स्कंदाच्या दर्शनासही जात नाहीत. पार्वतीच्या युक्तीमुळे स्कंदाने सर्व स्त्रियांना मातृवत् कसे मानले ही कथा मागे आली आहेच, पण दक्षिणेत मात्र त्याला एक सोडून दोन बायका कल्पिल्या आहेत - एक वल्ली किंवा महाबली आणि दुसरी देवसेना. तो देवसेनेचा अधिपती असल्यामुळे त्याची पत्नी म्हणून देवसेनेची कल्पना युक्तिसंगत ठरते. स्कंदाला बायको आहे ही कल्पना कर्मकांडात ही रूढ आहे. देवदेवक बसवतांना ज्यावेळी मातृकांचे आवाहन केले जाते त्यावेळी सपत्नीक स्कंदाचेही आवाहन करीत असतात.
    दुसरें असे कीं, दक्षिणेंत साधारणपणें जरी स्कंदाला कुमारच समजत असले तरी वयपरत्वें तेथे एकाधिक रूपाची कल्पना केलेली आहे, जसें मुंज न झालेला, मुंज झालेला, किंवा पूर्ण विकसित तरुण, सुब्रह्मण्य. एवढेच नव्हे तर बाळसुब्रह्मण्य रूपांत त्याला नृत्य करतानाही दाखवतांत.
     तिसरे असे की, दक्षिणेत स्कंदाजवळ ध्यानभिन्नत्वाने शक्तीशिवाय कोंबडा, त्रिशूल, वगैरे दाखवतात पण पुस्तक असल्याचे मात्र अजून पाहण्यांत नाही. तसेच स्त्रीरुपिणी शक्ती किंवा पुरुष रूपांत मोर ही दिसत नाही.
     वेरूळच्या मूर्तीत स्कंदाचा परिवार देव म्हणून बकऱ्यांचे मस्तक असलेला पुरुष दिसतो." तसा आपण उत्तर भारतांत ही पाहिला होता, किंबहुना कुषाण काळांत एका शिल्पांत (ल.सं.सं.ओ. २५०) घागरीवर ठेवलेले नुसते मेषाचे डोकेंच दिसले होते. श्री. राव यांच्या मतांप्रमाणें वेरूळचा बकऱ्यांचे मुख असलेला पुरुष दक्ष प्रजापती आहे, त्याची गणना स्कंदाच्या परिवार देवतांत केलेली आहे."

काही उल्लेखनीय स्कंद शिल्पें :
    दक्षिणेतील स्कंद प्रतिमांचा साधारण आढावा आपण घेतला. एकमुख असलेल्या द्विभुज किंवा चतुर्भुज प्रतिमा सामान्य आहेत. सहा तोंडे व बारा हात असलेल्या मूर्ती ही मिळतात. आता त्या व्यतिरिक्त विशेष म्हणजे खालील शिल्पे होत :
        १) तारकारि सुब्रह्मण्य ऐहोळेच्या या शिल्पांत मोरावर बसलेला स्कंद हातांत खड्ग व शक्ती घेऊन तारकासुरांवर प्रहार करीत आहे. देवगणांकडून स्तवन ही चालू आहे.
        २) देवसेना कल्याणसुंदरमूर्ती शिवाची कल्याणसुंदरमूर्ती चांगलीच प्रसिद्ध आहे. विष्णु कल्याणसुंदराची काही शिल्पें आपण उत्तरभारतांत पाहिली आहेत. त्याच धर्तीवर स्कंदभक्तांनी देवसेनेचे पाणिग्रहण करणारा सुब्रह्मण्य घडविलेला दिसतो. हा चतुर्भुज असून त्याचेजवळ शक्ती व कमळ दिसत आहे. उजवा हात कन्यादान घेण्यांस पुढे केला आहे. देवराज इंद्र लाजाळू देवसेनेचे कन्यादान ओतण्यांस तिच्च्या मागे उभा आहे. पायशिळेवर होम करण्यांत ब्रह्मदेव गुंतला आहे. ही मूर्ती मदुरेजवळच्या एका शिव मंदिरांत आहे.
      ३) महावल्ली व देवसेनेसह सुब्रह्मण्य अशा प्रकारच्या शिल्पांत स्कंद उभा असून आजूबाजूला त्याच्या बायका असतात. कुमारतंत्रांप्रमाणें महावल्लीच्या डाव्या हातांत कमळ असून उजवा हात बाजूला लोंबत असावा. या उलट देवसेनेच्या हातांत नीलोत्पल असावे. प्रथम देवी श्याम व दुसरी तांबड्या रंगाची सांगितली आहे.
     ४) सशक्तिक कार्तिकेय काहीं शिल्पांत स्कंद हा मोरावर बसलेला असून त्याच्या मांडीवर त्याची पत्नी उमामहेश्वर मूर्तीप्रमाणें आलिंगन मुद्रेत बसलेली दिसते. कुमारतंत्रांप्रमाणे या प्रकाराला सेनापती असे म्हणतात. "
 ३२८

५) बालस्वामी किंवा बालसुब्रह्मण्य – श्री शिवराममूर्ति याच्या मतांप्रमाणें मद्रास संग्रहालयांतील नृत्य करणान्या बालकाची धातुमूर्ती बालसुब्रह्मण्याची आहे." कुमार तंत्रांप्रमाणे याच्या हातांत कमळ असावयास पाहिजे.
६) ब्रह्मशास्ता - तंजावर जिल्ह्यांतील प्रारंभिक चोल काळांतील एका धातुमूर्तीला श्री शिवराममूर्ती यांनी ब्रह्मशाला म्हणून ओळखले आहे." कुमारतंत्रांकडे नजर टाकल्यास ब्रह्मशास्त्याच्या हातांत कमंडलू व अक्षमाला असावयास पाहिजे." उल्लेखित धातुमूर्तीत अक्षमाळा तेवढी आढळते.
      तमिळभाषेतील 'कंदपुराणम्' व 'शरभ पुराणम्' या ग्रंथातील 'स्कंदलीला' या प्रकरणाप्रमाणे स्कंदाने ब्रह्मदेवाला प्रणवमंत्राचा अर्थ विचारला. ब्रह्मदेव ते सांगू शकला नाही, म्हणून स्कंदाने त्याला दंडित केले. अलगमलाद, कोयंबतूर येथील सुब्रह्मण्यस्वामीच्या मंदिरा (सुमारे १४वे शतक) च्या रथावर अंकित एका दृष्यांत शक्ती, वज्र आणि फळ घेतलेल्या स्कंदाने ब्रह्मदेवाला दंडित करून कैदेत टाकलेले दिसते. तेथेच क्षमा मागणारा ब्रह्मदेव ही आढळतो. असेच अंकन पैलाम्, तामिळनाडू येथे ही आहे.
    R.K.K. Rajarajan, 'Rare Images of Brahmasasta and varaha sanihara' Kala 1, 1994- 95, p. 129 ff. Francoise Harnault 'L' Iconographic De Sulerahmanya Poondichery 1978, pl. 83, p. 118.

***
















 

कार्तिकेय


चित्र क्र. ११० : कार्तिकेय, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली

    कार्तिकेयाच्या प्रतिमा कुषाण, गुप्त आणि यौधेयांच्या नाण्यांवर आढळतात. वेद काळात त्याचे कुमार हे नाव असावे आणि पुढे स्कंद या नावाने तो प्रचलित झाला. सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र, स्कंदामह अशी त्याची नावे होती. तर त्यांच्या प्रतिमांची नावे देवसेनापती, गांगेय, शिवसुत, षडानन इ. होती. प्राचीन काळापासून स्कंद पूजा सुरू होती. दक्षिण भारतात षण्मुगम किंवा सुब्रह्मण्यम् या नावाने याची पूजा होते. प्राचीन वाङ्‌मयामध्ये सनत्कुमार हाच स्कंद होता. तो महेश्वराचा मुलगा होता, तो विभावसू अग्नीचा पुत्र होता असे उल्लेख येतात. तर पुराण काळात तो शिव पार्वतीचा पुत्र होता. शिव पुराणाच्या अठराव्या अध्यायात त्याच्या जन्माची कथा येते. तारक नावाच्या असुराने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मांडात उच्छाद मांडायला सुरुवात केली. देवांची सेना त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडू लागली. त्यांना एका सक्षम सेनापतीची गरज होती ब्रह्मदेवाने देवांना सांगितले की शिव पार्वतीचाच पुत्र सेनापती झाल्यास तो तारकासुराचा वध करेत. भगवान शंकर महायोगी आणि ब्रह्मचर्येचे व्रत घेतलेले, त्यामुळे त्यांची आधी मनधरणी करून त्यांना लग्नाला तयार केले. इकडे पार्वतीने पंचाग्नी तप आरंभले होते ते त्यासाठीच. अखेर त्या दोघांचा विवाह झाला परंतु पंधरा वर्षे ते कामक्रीडेतच मप्न राहिले. पृथ्वीला हा भार असह्य झाल्यामुळे सर्व देवांसा इंद्राने कैलासावर जाऊन त्यांची याचना केली. या दरम्यान वार्यावर उडून त्याचे काही वीर्याचे गंगेत पडले. तेथे सहा कृत्तिका स्नान करत होत्या आणि त्या सहा कृत्तिकांच्या गर्भातून याचा जन्म झाला. म्हणून त्याचे नाव 'कार्तिकेय' असे झाले. हे सहा डोकी असणारे मूल जन्माला आले म्हणून त्याला षडानन किवा षण्मुगम असे म्हणतात. पुढे हा पराक्रमी मुलगा देवसेनेचा सेनापती झाला आणि त्याने भीषण झालेल्या रणकंदनामध्ये तारकासुराचा वध केला. गुप्तकालापासून दिसणाऱ्या शिल्पांमध्ये कार्तिकेयाचे वाहन मोर असून त्याच्या हातात त्रिशूळ, पाश, सर्प, आदी आयुधे दिसतात. (जोशी : १९७९).     
        कार्तिकेयाच्या काही शिल्पांमध्ये त्याच्या हातात कोंबडा धरलेला असतो. याचे कारण असे की कोंबडा हे कामवासनेचे प्रतिक मानले जाते. ब्रह्मपुराणामध्ये या युद्धानंतर विजयी झाल्यावर कार्तिकेयाने देवाच्या बायकांवरही अत्याचार करावयास सुरुवात केली. शेवटी पार्वतीने एक युक्ती केली, कार्तिकेयाने कुठल्याही स्त्रीला धरण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे पार्वतीचेच रूप दिसेल. त्यानंतर कार्तिकेयाने सर्व स्त्रियांना, माता समजून पाहण्याची प्रतिज्ञाच करून टाकली. कार्तिकेयाच्या अशा चारित्र्यामुळे महाराष्ट्रात आजही कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो.
   वेरुळमध्ये रामेश्वर लेणे क्र. २१ मध्ये कार्तिकेयाचे मोठे शिल्प आहे. त्याच्या शेजारी मेषाची तोंडे असणारे दोन सेवक असून त्यांची नावे नैगमेष आणि छग्वत्र अशी असतात. कार्तिकेयाच्या पायाजवळ एक मोठा मोर काढलेला असून त्याच्या डाव्या हातात त्याने कोंबडा धरलेला आहे. कोंबड्याचे आणि मोराचे मुख तुटलेले आहे.

चित्र क्र. १११ : कार्तिकेय, रामेश्वर लेणे, वेरूळ

     दक्षिण भारतातील काही शिल्पांमध्ये मोरावर पत्नीसह बसलेला कार्तिकेय दिसतो. त्याला 'सेनापती' असे म्हणतात. याचे कारण देवसेना ही त्याची शक्ती होती जिला स्त्री रुपात दाखवले जाते.
 कर्नाटकात ऐहोळे येथील शिल्पात (इ.स. ८ कार्तिकेय हातात तलवार आणि शक्ती घेऊन तारकासुराशी युद्ध करीत असल्याचे शिल्प आहे. वारंगळ ( आंध प्रदेश) येथील रामप्पा मंदिरात (इ.स.१३ वे शतक) सहा डोक्याचा कार्तिकेय तारकासुराशी युध्द करताना दाखवला आहे. दक्षिण भारतात या देवाची लोकप्रियता गणपती इतकी किंवा त्याहून अधिकच असावी असे वाटते. 
 
 
!












कार्तिक स्वामी मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूरच्या बिलानपुऱ्यात श्री कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. त्या मंदिराची रचना ही जरी अर्वाचीन काळातील असली तरी तेथील मूर्ती मात्र यादवकालीन आहे. कार्तिकेयाची ती मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत असा नमुना आहे. शिव-पार्वती पुत्र कार्तिकेयाचा जन्म स्कंदपुराणानुसार तारकासुराचा वध करण्यासाठी झाला. तो देवांचा सेनापती अनेक शस्त्रांनी सिद्ध असतो. मूर्तिशास्त्रानुसार कार्तिकेय मूर्ती सहा मुखे (म्हणून त्यास षडानन असेही म्हणतात) व बारा हात अशा स्वरूपात असते. कार्तिकेयाचे वाहन मयूर आहे. अचलपूरची कार्तिकेयाची मूर्तीदेखील सहा मुखांची असून, तिची दर्शनी तीनच मुखे व सहा भुजा दिसतात. कार्तिकेय मयूर वाहनावर आरूढ आहे. यानक अवस्थेतील ती मूर्ती चार ते साडेचार फूट आहे. प्रदक्षिणा क्रमाने उजवीकडील हातांमध्ये अक्षमाला, गदा, अंकुश तर डावीकडे पाश, कमंडलू, धनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत. मूर्ती सालंकृत असून तिन्ही शीर्षांवर मुकुट आहेत. कानांत कुंडले, गळ्यात हार, दंडात केयूर, अंगद, कटी सूत्रे, स्कंधमाला, कटकवलय, पादवलय अशा सर्व अलंकारांनी अलंकृत आहे. मूर्तीच्या महिरपीवरसुद्धा कोरीव काम केलेले आहे. महिरपी वर वरील भागात शिवमूर्ती कोरलेली आहे. शिवमूर्तीच्या हातामध्ये बीजपूरक, त्रिशूळ असून ते वरदहस्त असे शिल्प आहे. कार्तिकेयाचे वाहन मोर हा सुद्धा शिल्पीने कोरीव कामाने देखणा केलेला आहे. अचलपूर नगरीत अशा बऱ्याच मूर्ती आहेत. काही भग्न स्वरूपात तर काही चांगल्या स्थितीत.
(माहिती - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)
(Photo - Pravin Tayde, Pramod Jawale, Mandir Kosh)

 
 
tv9marathi.com

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

मुंबई : देवी पार्वतीच्या डोहाळेजेवणाचा सोहळा पूर्ण झाल्यावर इंद्रदेवाने स्वर्गात वरुण देव (Lord Kartikeya), यक्ष आणि गंधर्वांकडे प्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले देवी डोहाळेजेवणाचा उत्सव खूप भव्य झाला आहे. परंतु त्याचवेळी इंद्रदेवाने चिंता व्यक्त केली की तारकासुराने अनेकदा माता पार्वतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता असे प्रयत्न सातत्याने सुरु राहतील कारण देवी पार्वतीच्या गर्भातून त्याचा मृत्यू करणारा जन्माला येणार आहे (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).

इंद्रदेव म्हणाले की पाच देवता गुप्तपणे कैलास येथे जातील आणि ताडकासूर माता पार्वतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत याची काळजी घेतील. तेव्हा पाच देवतांनी कबुतराचे रुप धारण केले आणि ते कैलासवर राहू लागले. जेव्हा महादेव आणि माता पार्वती यांनी हे कबुतरे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की अचानक कैलासवर कबूतर कसे आले. पंचांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीला आपले खरे रुप दाखवून नमन केले आणि तेथे हजर राहण्याचे कारण सागंतिले. पण, यादरम्यान ताडकासूराने कैलास गाठले आणि त्याने संपूर्ण संभाषण गुप्तपणे ऐकले. अशा प्रकारे त्याला कळले की कैलासवर नजर ठेवण्यासाठी पाच देवता उपस्थित आहेत. यानंतर तारकासूराने कट रचला.

चला जाणून घेऊ हा कट काय होता?

महादेव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांचा जन्म होणार होता. महाराज हिमालय आणि त्यांची पत्नी कैलास जाण्याची तयारी करत होते. त्यांनी निर्मला नावाच्या आयालाही सोबत घेण्याचे ठरवले. त्यांना निर्मला आया म्हणून ओळखले जात असे. हीच निर्मला आया देवी पार्वतीच्या जन्माच्या वेळीही उपस्थित होती. महाराजांनी निर्मला आयाला बोलवायला महामंत्रीला पाठवले. दरम्यान, ताडकासूराला समजले की पार्वतीचे आई-वडील निर्मला आयाला घेऊन कैलास येथे जात आहेत.

महामंत्री येण्यापूर्वी तारकासूराने निर्मलाची झोपडी गाठली आणि तिची हत्या करुन तिचा रुप धारण केलं. अशा प्रकारे निर्मला आयाच्या रुपात तारकासूर कैलास येथे पोहोचला आणि बाळाचा जन्म होताच त्याने बाळाला घेतले आणि देवी पार्वतीला आराम करण्यास सांगितले. देवी पार्वती निद्रा स्थितीत आल्या तेव्हा निर्मलाचे रुप धारण केलेला तारकासूर बाळासह अदृष्य झाला.

काही वेळानंतर जेव्हा देवी पार्वतीला जाग आली तेव्हा बाळाला तिथे न पाहून त्यांना काळजी वाटली. देवी पार्वती समजून गेली की त्यांच्या पुत्राला तारकासूराला घेऊन गेला आहे. त्यांनी घोषणा केली की जर माझा पुत्र सापडला नाही तर मी माझ्या क्रोधाग्नीमध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करेन. देवी पार्वतीला इतकी विचलित झालेलं पाहून भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू कैलासवर आले. भगवान विष्णू पार्वतीला म्हणाले, काळजी करु नका, ब्रह्माजींनी ही भविष्यवाणी केली आहे की तुमचा पुत्र सात वर्षांच्या वयात ताडकासूराचा वध करेल (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).

दुसरीकडे, ताडकासूराने बाळाला हिमालयच्या शिखरावरुन खाली फेकले. हे मूल कैलासचे रक्षण करणाऱ्या पाच देवतांपैकी एक असलेल्या अग्निदेवच्या कुशीत जाऊन पडले. हे बाळ खूप रडत होते. या रडणार्‍या बाळाचा आवाज ऐकून देवी गंगा तेथे पोहोचली आणि बाळाला आपल्याबरोबर घेऊन गेली. बाळाला भूक लागली होती हे देवी गंगाला समजले. म्हणून त्यांनी कृतिकांचं स्मरण केलं. तेव्हा या कृतिकांनी बाळाला स्तनपान देऊन शांत केले. बाळाने प्रथमच कृतिकांचं स्तनपान केल्याने देवी गंगाने त्याचं नाव कार्तिकेय ठेवले.

तारकासूरला खात्री होती की त्या बाळाचा मृत्यू झालाय. म्हणून त्याने त्याच्या महालात उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. कारण, त्याला आता मारणारा संपूर्ण विश्वात कोणी नव्हता. दुसरीकडे, जेव्हा अग्निदेव आणि इंद्रदेव यांची भेट झाली, तेव्हा देवराजने अग्निदेवला या अपघाताची माहिती दिली. तेव्हा अग्निदेवाने सांगितले की एक बाळ त्यांच्या कुशीत येऊन पडलं होतं.

दुसरीकडे बाळाचा शोध घेणारा वीरभद्रला देवी गंगाची भेट घेतली आणि वीरभद्र यांनी देवी गंगाला संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्याच क्षणी इंद्रदेव आणि अग्निदेव देखील तेथे पोहोचले आणि त्या बाळाचे सत्य सांगितले की हे बाळ देवी गंगाची बहिणी पार्वतीचं आहे. गंगाला हे ऐकून अत्यंत आनंद झाला आणि ते सर्व कैलासच्या दिशेने गेले.

दुसरीकडे, देवी पार्वती पुत्र वियोगामध्ये अग्नीत भस्म होणार होती, तेव्हाच त्यांच्या मोठ्या बहिणीने जल प्रवाहित केले आणि आग विझविली. देवी पार्वतीला त्यांचं बाळ सोपवलं. अशा प्रकारे कैलासवर अत्यंत आश्चर्यकारक देखावा पाहायला मिळाला.

 https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/lord-kartikeya-get-kidnapped-after-his-birth-know-this-interesting-story-438457.html

 

en-m-wikipedia-org.translate.goog

Kartikeya

Contributors to Wikimedia projects

"मुरुगा" येथे पुनर्निर्देशित करतो. 2007 च्या चित्रपटासाठी, मुरुगा (चित्रपट) पहा .

"मुरुगन" येथे पुनर्निर्देशित करतो. नाव असलेल्या लोकांसाठी, मुरुगन (आडनाव) पहा .

कार्तिकेय ( IAST : Kārtikeya ), ज्याला स्कंद , सुब्रह्मण्य , षण्मुख आणि मुरुगन या नावानेही ओळखले जाते , हे युद्धाचे हिंदू देव आहे . त्याचे वर्णन सामान्यतः शिव आणि पार्वती या देवतांचा पुत्र आणि गणेशाचा भाऊ असे केले जाते .

कार्तिकेय

विजयाचा देव आणि
देवांचा युद्ध सेनापती [ १ ]

बटू लेणी , मलेशिया येथे कार्तिकेयची मूर्ती

इतर नावेमुरुगन, सुब्रह्मण्य, कुमार, स्कंद, सरवण, अरुमुख, देवसेनापती, षण्मुख, कथिरवेला, गुहा, स्वामीनाथ, वेलायुदा, वेल [ २ ] [ ३ ]
संलग्नतादेवा , सिद्धर
निवासस्थानअरुपादाई वेडू (मुरुगनचे सहा निवासस्थान)
पलानी हिल्स
कैलाश
ग्रहमंगला ( मंगळ )
मंत्रओम सर्वाना भव
वेट्रिवेल मुरुगानुक्कु आरोग्या
शस्त्रवेल
प्रतीककोंबडा
दिवसमंगळवार
माउंटमोर
लिंगपुरुष
सण
वंशावळी
पालक
भावंडगणेश (भाऊ)
सोबती

कार्तिकेय हे प्राचीन काळापासून भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे देवता आहे . संगम युगानंतर मुरुगनची तामिळ देवता स्कंदच्या वैदिक देवतेशी समक्रमित झाली होती असे मानले जाते . त्याला " तमिळ लोकांचा देव" म्हणून ओळखले जाते आणि पलानी टेकड्यांचा स्वामी म्हणून त्याचा गौरव केला जातो , कुरिंजी प्रदेशातील ट्यूलरी देवता ज्यांच्या पंथाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तमिळ साहित्यकृती जसे की नक्किरनेर लिखित तिरुमुरुकानटुप्पटाई आणि अरुणागिरीनाथर यांचे तिरुप्पुकल मुरुगन यांना समर्पित आहेत. पहिल्या शतकातील आणि त्यापूर्वीचे पुरातत्वीय पुरावे अग्नी या हिंदू देवता अग्नीशी त्याच्या प्रतिमाशास्त्राचा संबंध दर्शवतात , जे सूचित करतात की कार्तिकेय हे हिंदू धर्माच्या सुरुवातीच्या काळात एक महत्त्वपूर्ण देवता होते.

कार्तिकेयाची प्रतिमाशास्त्र लक्षणीयरीत्या बदलते. तो सामान्यत : सदैव तरूण माणूस, स्वार किंवा भारतीय मोराच्या जवळ (परवाणी नावाचा) आणि कधीकधी त्याच्या बॅनरवर कोंबड्याचे प्रतीक म्हणून दर्शविला जातो. तो वेल नावाचा भाला चालवतो , असे मानले जाते की त्याला त्याची आई पार्वतीने दिले होते. बहुतेक चिन्हे केवळ एक डोके असलेले त्याचे प्रतिनिधित्व करतात, तर काहींना सहा डोके असतात, जे त्याच्या जन्माभोवती असलेल्या दंतकथांचे प्रतिबिंब आहे ज्यामध्ये तो सहा मुलांपासून जोडला गेला होता किंवा सहा संकल्पना जन्माला आल्या होत्या. त्याचे वर्णन लहानपणापासूनच लवकर झाले, एक योद्धा झाला, देवांच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि तारकासुर आणि सुरपद्मांसह राक्षसांचा नाश करण्याचे श्रेय दिले . त्यांना एक तत्वज्ञानी मानले जाते ज्याने नैतिक जीवनाचा पाठपुरावा आणि शैव सिद्धांताचे धर्मशास्त्र शिकवले .

कौमराम हा हिंदू संप्रदाय आहे जो प्रामुख्याने कार्तिकेयची पूजा करतो. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण कौमराम पूजा आणि मंदिरांव्यतिरिक्त , उत्तर आणि पूर्व भारतात त्यांची महासेन आणि कुमार म्हणून पूजा केली जाते . श्रीलंका , आग्नेय आशिया (विशेषत: मलेशिया , सिंगापूर , थायलंड आणि इंडोनेशियामध्ये ), तमिळ वंशाच्या लक्षणीय लोकसंख्या असलेले इतर देश ( फिजी , मॉरिशस , दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यासह ), कॅरिबियन देश ( त्रिनिदाद आणि टोबॅगोसह ,) मध्ये त्यांची पूजा केली जाते. गयाना आणि सुरीनाम ), आणि लक्षणीय भारतीय स्थलांतरित लोकसंख्या असलेले देश ( युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया ).

व्युत्पत्ती आणि नामकरण

कार्तिकेय हे विशेषण देवतेच्या जन्माच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडलेले आहे. [ 6 ] स्कंद पुराणानुसार , शिवापासून सहा दैवी ठिणग्या निघाल्या आणि सहा स्वतंत्र बालके बनली. या मुलांचे संगोपन कृत्तिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दासींनी केले होते . नंतर पार्वतीने त्यांना एकत्र करून सहा डोक्यांचा कार्तिकेय निर्माण केला. [ ७ ] संस्कृतमध्ये कार्तिकेयचा अर्थ "कृतिकांचा" असा होतो . [ 6 [ 8 ] हिंदू साहित्यानुसार, त्याला 108 वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, जरी इतर नावे देखील सामान्य वापरात आहेत. [ ९ ] यापैकी सर्वात सामान्य म्हणजे स्कंद ( स्कंदमधून- , 'उडी मारणे किंवा हल्ला करणे'), मुरुगन ('सुंदर'), कुमार ('तरुण'), सुब्रह्मण्य ('पारदर्शक'), सेंथिल ('विजयी') , Vēlaṇ (' वेलचा राजा '), स्वामीनाथ ('देवांचा अधिपती'), सर्ववणभव ('जन्मलेल्यांमध्ये रीड्स'), अरुमुख किंवा षण्मुख ('सहा तोंडी'), धनदापानी ('गदा चालवणारा') आणि कंधा ('मेघ'). [ 10 [ 11 [ 12 ]

त्याच्या प्रतिमा असलेल्या प्राचीन नाण्यांवर त्याचे नाव कुमार, ब्राह्मण्य किंवा ब्राह्मण्यदेव असे कोरलेले दिसते. [ १३ ] काही प्राचीन इंडो-सिथियन नाण्यांवर त्याचे नाव ग्रीक लिपीमध्ये स्कंद, कुमार आणि विशाक असे आढळते. [ १४ ] [ १५ ]

जन्म

विविध भारतीय साहित्यकृती कार्तिकेयच्या जन्माभोवती वेगवेगळ्या कथा सांगतात. वाल्मीकीच्या रामायणात (ई.पू. सातव्या ते चौथ्या शतकात), त्याचे वर्णन रुद्र आणि पार्वती या देवतांचे मूल म्हणून केले गेले आहे , ज्याचा जन्म अग्नी आणि गंगा यांनी केला होता . [ १६ ] बीसीई तिसऱ्या शतकातील हिंदू महाकाव्य महाभारतातील शल्य पर्व आणि अनुशासन पर्व स्कंदच्या आख्यायिकेचे वर्णन करतात, त्याला महेश्वर (शिव) आणि पार्वतीचा पुत्र म्हणून सादर करतात: शिव आणि पार्वती संभोगाच्या वेळी व्यथित झाले होते, ज्यामुळे शिव अनवधानाने होते. त्याचे वीर्य सांडणे . त्यानंतर ते वीर्य गंगेत उष्मापित करण्यात आले , अग्नी देवाच्या उष्णतेने संरक्षित केले गेले आणि अखेरीस कार्तिकेय म्हणून जन्माला आले. [ ६ [ १७ ]

शिवपुराणानुसार , असुर तारकासुराने निर्माता देव ब्रह्मदेवाची प्रार्थना करण्यासाठी तप केले . ब्रह्मदेवाने त्याला दोन वरदान दिले: एक, तिन्ही लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचे कोणीही होणार नाही , आणि दुसरे म्हणजे फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकेल. [ 18 [ 19 ] शिव एक योगी होता आणि त्यामुळे त्याला मुले होण्याची शक्यता नव्हती, तारकासुर जवळ अमरत्वाने सज्ज होता . तिन्ही जगावर राज्य करण्याच्या त्याच्या शोधात, त्याने देवांना स्वर्गातून बाहेर काढले . देवांचा राजा इंद्र याने शिवाच्या ध्यानात व्यत्यय आणण्यासाठी आणि त्याला प्रेमाच्या विचारांनी फसविण्याची योजना आखली, जेणेकरून त्याला संतती प्राप्त होईल आणि अशा प्रकारे तारकासुराचे अमरत्व संपेल. शिव ध्यानात गुंतले होते , आणि हिमवनाची कन्या पार्वती हिच्या प्रेमळपणाकडे क्वचितच लक्ष दिले होते , ज्याने त्याला आपली पत्नी म्हणून शोधले होते. इंद्राने प्रेमदेवता कामदेव आणि त्याची पत्नी रती यांना शिवाला त्रास देण्याचे काम सोपवले. या कृत्याने शिव रागावले आणि त्यांनी कामदेवाला जाळून राख केले. पण नंतर शिवाचे लक्ष पार्वतीवर गेले, जिने आपला स्नेह जिंकण्यासाठी तप केले होते आणि तिच्याशी लग्न केले आणि नंतर कार्तिकेयाला गर्भधारणा केली. [ १९ ]

सहा डोक्यांचा कार्तिकेय मोरावर बसलेला, बाराव्या शतकात

सतराव्या शतकातील कांड पुराणम ( जुन्या स्कंद पुराणाचे तमिळ अनुवाद ) या ग्रंथानुसार , असुर बंधू सुरपद्म, सिंहमुख आणि तारकासुर यांनी शिवाला तप केले, ज्याने त्यांना विविध शस्त्रे आणि इच्छा दिली ज्यामध्ये त्यांना फक्त मारले जाऊ शकते. शिवाचा पुत्र, ज्याने त्यांना अमरत्व देऊ केले. त्यांनी नंतर देवांसह इतर आकाशीय प्राण्यांवर अत्याचार केले आणि तिन्ही लोकांमध्ये अत्याचाराचे राज्य सुरू केले . [ ७ ] [ २० ] जेव्हा देवांनी शिवाला मदतीची याचना केली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरावर पाच अतिरिक्त मुंडके प्रगट केली आणि त्या प्रत्येकातून एक दिव्य ठिणगी निघाली. सुरुवातीला, वायू देवता वायूने​​ठिणग्या वाहून नेल्या, नंतर असह्य उष्णतेमुळे त्या अग्निदेवतेच्या स्वाधीन केल्या. अग्नीने ठिणग्या गंगा नदीत जमा केल्या. ठिणग्यांच्या तीव्र उष्णतेमुळे गंगेतील पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले. गंगा त्यांना सरवण सरोवरात घेऊन गेली, जिथे ठिणग्यांचा विकास होऊन सहा पोरं झाली. [ 7 ] त्यानंतर सहा मुलांचे संगोपन कृतिकाने केले आणि नंतर पार्वतीने त्यांचे एकत्रीकरण केले. अशा प्रकारे, सहा डोक्यांचा कार्तिकेय जन्माला आला, देवांच्या मदतीसाठी केलेल्या विनंतीला उत्तर देण्यासाठी आणि त्यांना असुरांपासून मुक्त करण्यासाठी गर्भधारणा झाला. [ २१ ]

इ.स.च्या पाचव्या शतकातील कुमारसंभव ( अर्थात ' कुमाराचा जन्म ' ) त्याच्या जन्माविषयी अशीच एक कथा सांगतात ज्यामध्ये अग्नी शिवाचे वीर्य घेऊन भागीरथी नदीत (गंगेच्या प्रवाहात) जमा करतो. जेव्हा कृतिका नदीत स्नान करतात तेव्हा ते गर्भधारणा करतात आणि कार्तिकेयाला जन्म देतात. [ २२ ]

कार्तिकेयच्या पितृत्वाचा पर्यायी वृत्तांत महाभारताच्या वनपर्वामध्ये सांगितला गेला आहे , जिथे त्याचे वर्णन अग्नि आणि स्वाहा यांचा पुत्र म्हणून केले जाते . अग्नी सप्तर्षींच्या (सात महान ऋषींच्या) पत्नींना भेटायला जातो आणि अग्नीच्या प्रेमाच्या भावनांपैकी एकही पत्नी अग्नीच्या प्रेमाची प्रतिपूर्ती करत नसताना, स्वाहा उपस्थित असतो आणि अग्नीकडे आकर्षित होतो. स्वाहा एक एक करून सहा पत्नींचे रूप धारण करते आणि सहा वेळा अग्निशी संभोग करते. अरुंधतीच्या विलक्षण सद्गुणशक्तीमुळे ती वसिष्ठाची पत्नी अरुंधतीचे रूप धारण करू शकत नाही . स्वाहाने अग्नीचे वीर्य गंगा नदीच्या कातळात जमा केले, जिथे ते विकसित होते आणि सहा मुखी स्कंद म्हणून जन्माला येतो. [ २३ ]

 

कार्तिकेयाची कथा...

5 वर्षांपूर्वी



     सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाची मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्यावेळी दुर्गेजवळ ठेवलेली आढळते. मात्र, दक्षिण भारतात नेमके याउलट घडते. कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो.

    कौरवांना युद्धात मारल्यानंतर पश्चात्तापाने पछाडलेल्या युधिष्ठिरने कुरुक्षेत्राजवळ भगवान शंकराचा मुलगा म्हणजे कार्तिकेयाचे मंदिर बांधले, असे म्हणतात. आजही हे मंदिर हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्रानजीकच्या पिहोवा शहरात आहे. उत्तर भारतातील कदाचित एकमेव असलेल्या या मंदिरात कार्तिकेयाची ब्रह्मचाऱ्याच्या रूपात पूजा केली जाते. असे असले तरी सध्या उत्तर भारतात कार्तिकेयाची पूजा करण्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. कार्तिकेयाच्या अधिक मूर्ती शंकराच्या मंदिरात किंवा बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी दुर्गेजवळ ठेवलेल्या आढळतात. मात्र याउलट कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो. तामीळनाडूच्या पलनी शहरात उंच डोंगरावर कार्तिकेयचे भव्य मंदीर अतिशय प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे इथे ब्रह्मचारी रुपात कार्तिकेय नसून दोन पत्नींसह त्याची मूर्ती दिसते. इंद्राची कन्या सेना ही पहिली पत्नी तर पृथ्वीची कन्या वल्ली ही दुसरी पत्नी होय... कार्तिकेयला दक्षिणेकडे मुरुगन म्हणूनही संबोधतात. अति प्राचीन तमिळ संगम साहित्यात असे उल्लेख आढळतात... उंच डोंगरावर, हातात भाला पकडणारा लाल रंगाचा एक देखणा पुरूष जो स्वर्ग आणि पृथ्वी या दोहोंचाही समन्वय साधून आहे... अशारितीने उत्तर भारताचा ब्रह्मचारी कार्तिकेय आणि दक्षिण भारताचा विवाहित मुरुगन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.


    भारतीय आख्यायिकांनुसार पिढ्यानपिढ्यांपासून आपल्या पुराण कथेंमध्ये बदल होत गेला आहे. हा बदल जसा कथेंमध्ये झाला तसाच स्थळ आणि काळामध्येही होत गेला. वेदांपासून पुरणांपर्यंत प्रत्येक प्रथेमध्ये बदलाव झाला. म्हणूनच वेदांमध्ये कार्तिकेयचा फारसा उल्लेख नाही तर पुराणांत मात्र त्याला शंकराच्या कुटुंबाचा सदस्य मानला गेला आहे. 


    २३०० वर्षांपूर्वी मौर्य कालखंडात आणि कुषाण काळात कार्तिकेयला मोठे महत्व देण्यात आले होते. मोरावर स्वार असलेल्या कार्तिकेयचा मंगळ ग्रहाशी संबंध जोडण्यात आला होता. युद्ध देवता आणि या देवतांचे सेनापती असलेले कार्तिकेय यांच्या अनेक मुर्त्या स्थापन केल्या जायच्या. परंतु हळूहळू राजेमहाराजांसोबत कार्तिकेयची जागा दुर्गाने घ्यायला सुरूवात केली आणि कार्तिकेयचे महत्त्व कमी झाले. 


    कालिदास लिखित "कुमारसंभव'नुसार तारकासुरला माारण्यासाठी देवांना एक महान योद्ध्याची गरज होती. ब्रह्मदेवाने सांगितले की असा वीर सुपुत्र फक्त शंकर देऊ शकतो. मात्र तोपर्यंत शंकर ब्रह्मचारी होते आणि त्यांनी कामदेवाला भस्मही करून टाकले होते. त्यामुळे देवीने पार्वतीचे रुप घेऊन शंकराशी विवाह करणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल. अशापद्धतीने शंकराचा गृहस्थाश्रमात 
    प्रवेश करण्यासाठी कार्तिकेय हा निमित्त ठरला आहे.


    पुराणात मात्र वेगळीच कथा आहे. त्यानुसार शंकर-पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे बीज अग्नीत पडले. परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू शकले नाहीत आणि त्यांनी ते बीज "वायू'कडे सोपवले. वायूलाही ते सांभाळता आले नाही आणि त्याने ते बीज गंगा नदीत सोडले. गंगेचे शीतल पाणीही या प्रखरतेला थंड करू शकले नाही उलट गंगेचे पाणीच या बिजामुळे उकळू लागले आणि आजूबाजूचे जंगल वणव्यासारखे पेटू लागले. हे अग्नीतांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी कमळाच्या फुलामध्ये सहा अपत्ये दिसू लागली. कृतिका नक्षत्रांमधून सहा कृतिका खाली अवतरल्या आणि त्यांनी या सहा अपत्यांना स्वीकारले. शेवटी पार्वतीने या सहाजणांना एकत्र जोडले. या मुलाला सहा तोंडे होती आणि त्याच्यात सहाजणांची शक्ती होती. त्या शक्तीवान बालकाने तारकासुराचा वध केला. दक्षिण भारतात त्याने सुरपद्मला मारले असा उल्लेख आहे. एक महान योद्धा म्हणून त्याला दक्षिण भारतात पुजले जाते. परंतु कथेत असे म्हटले गेले आहे की, शंकर आणि कार्तिकेयमध्ये मतभेद होते, ज्यामुळे कैलाश पर्वत सोडून अगस्ती ऋषीसोबत कार्तिकेय दक्षिण भारतात निघून गेला आणि म्हणूनच कार्तिकेयची पुजा आता उत्तर भारताऐवजी दक्षिणेकडे अधिक होते. 

     https://divyamarathi.bhaskar.com/news/devdatt-patnayak-writes-about-kartikeya-story-1560596053.html

     

    marathi.indiatimes.com

    गणेशबंधू कार्तिकेय

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शिवपार्वतीचा ज्येष्ठ पुत्र आणि गणपतीचा ज्येष्ठ बंधू कार्तिकस्वामी म्हणजेच कार्तिकेय. आपल्या आधी गणपतीचं लग्न झालं असं कळल्यावर कार्तिकेय रागावला आणि दक्षिणेत येऊन म्हैसूर (कर्नाटक) राज्यातल्या लोहाचल पर्वतावर राहिला, अशी कथा आहे. जन्मानंतर कृत्तिकांनी त्याचं पालनपोषण केलं. त्या कृत्तिका त्याच्या माता ठरल्या. म्हणून त्याचं नाव कार्तिकेय. कार्तिकेयाचा जन्म शरवनात झाला. म्हणून त्याला ‘सरवणभव’ असंही दुसरं नाव आहे. याशिवाय त्याला ‘सेनानी’, ‘षडानन’, ‘कुमार’, ‘स्कंद’ अशीही अन्य नावं आहेत.

    कार्तिकेय हा गंगा आणि अग्नि यांचा पुत्र, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. याविषयीची कथा अशी- एकदा सप्तऋषींचा यज्ञ चालू असताना यज्ञीय अग्नी त्या ऋषींच्या पत्नींवर मोहित झाला. परंतु त्या प्राप्त होणं अशक्य होतं म्हणून तो निराश होऊन मृत होण्यास सिद्ध झाला. ही गोष्ट अग्निची नावडती पत्नी स्वाहा हिला समजली. तेव्हा एकामागून एक अशी सहा ऋषीपत्नींची रूपं घेऊन ती अग्नीपुढे आली. अग्नीने सहा वेळा तिच्याशी समागम केला. प्रत्येकवेळी स्खलित झालेलं त्याचं वीर्य तिने एका कुंडात साठवून ठेवलं. त्या वीर्यापासून यथावकाश सहा मस्तकं असलेला एक पुत्र जन्मला. तोच हा षडानन (सहा आननं म्हणजे मुखं असलेला) म्हणजेच कार्तिकेय.

    दुसरी कथा अशी आहे की, शंकर आणि पार्वती एकांतात असताना सर्व देवांना सोबत घेऊन भगवान विष्णू शंकराकडे गेले. त्यावेळी शिवपार्वतीच्या एकांताचा भंग होऊन शंकराचं वीर्य स्खलित झालं. शंकराने ते वीर्य अग्निला धारण करण्यासाठी दिलं. त्या वीर्याचा दाह अग्निला सहन होईना. अशा अवस्थेत त्याला नारदमुनी भेटले. त्यांनी अग्निला म्हटलं, ‘प्रयागक्षेत्रामध्ये माघ महिन्यातल्या पहाटे ऋषीपत्नी स्नानासाठी येतील, त्यांना हे शिववीर्य दे.’ अग्निने तसं केल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला सहा मुखं असलेल्या एका मुलाचा जन्म झाला. नंतरच्या काळात शंकराने त्याला बोलावून घेतलं.

    तो आल्यावर सर्व देव त्याचं दर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी शंकराला सांगितलं, ‘हे महादेवा तारकासुराचा वध करण्यासाठी या तुझ्या मुलाला सेनापती म्हणून पाठव.’ शंकराने तसं केलं. जन्मल्यापासून सातव्या दिवशी कार्तिकेयाने तारकासूराला मारलं आणि हे करण्याआधी त्याने क्रौंच पर्वताला बाणाने आरपार भोक पाडलं. कार्तिकेयाचे उपनयन(मुंज) आणि अन्य संस्कार विश्वामित्रांनी केले. भगवान विष्णूने कार्तिकेयाला गरूड, मयूर(मोर) आणि कुक्कुट (कोंबडा) ही वाहनं दिली. वायूने पताका, सरस्वतीने वीणा, ब्रह्मदेवाने बोकड आणि शिवाने मेंढा दिला. (मुंजीच्या वेळच्या या भेटवस्तू असाव्यात.) सर्व देवांनी मिळून देवसेना या मुलीशी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचं लग्न लावलं. शाख, निशाख आणि नैगमेय असे तीन मुलगे त्याला झाले.
    देवसेना या नावाचा विचार केला, तर देवांची सेना म्हणजे देवसेना आणि तिचा पती कार्तिकेय असा देवसेना या नावाचा अन्वयार्थ घेतल्यास देवसेना ही कोणी स्त्री नसून ती देवांची सेना आणि कार्तिकेयाचे तीन पुत्र शाख, विशाख आणि नैगमेय हे देवांच्या सैन्यातले तुकड्यांचे अधिकारी असावेत. महाभारतात कार्तिकेयाने महिषासूराचा वध केल्याचा उल्लेख आढळतो.

    कार्तिकेयाने तारकासूराला मारल्यानंतर त्याला कीर्ती प्राप्त झाली आणि आई पार्वती त्याचे लाड करू लागली. त्यामुळे शेफारून जाऊन तो देवांच्या िस्त्रयांवर हात टाकू लागला. तेव्हा देवांनी पार्वतीकडे तक्रार केली. आपल्या या मुलाचा खोडकरपणा नाहीसा व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी पार्वती त्याला आपलं (पार्वतीमातेचं) रूप दाखवू लागली. या प्रकारामुळे कार्तिकेयाला पश्चाताप झाला आणि त्याने, ‘आजपासून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानेन’, अशी शपथ घेतली.

    मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला आणि त्याच दिवशी शारीरिणीश्री त्याच्या आश्रयाला आली. श्री-कार्तिकेय मीलन ज्या तिथीला झालं ती महातिथी श्रीपंचमी म्हणून प्रसिद्धीस आली.

    काही कथांमध्ये कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याचं म्हटलं आहे. तर काहींमध्ये त्याची एक पत्नी देवसेना आणि दुसरी श्री असं सांगितलं आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाच्या पत्नीचं नाव वळ्ळी असं आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाला सुब्रह्मण्य किंवा मुरुग असं म्हणतात. तो दोन िस्त्रयांचा पती आहे, असं मानलं जातं. महाराष्ट्रीय संकेताप्रमाणे कार्तिकेय ब्रह्मचारी असून स्त्रीने कार्तिकेयाचं दर्शन घेतलं तर ती विधवा होते, अशी समजूत आहे. ‘आपल्या दर्शनास येणाऱ्या िस्त्रयांना सात जन्म वैधव्य येईल,’ असा कार्तिकेयाने स्त्रीजातीला शाप दिला, अशी कथा मराठी ‘शिवलीलामृतात’ आहे. परंतु या गोष्टीला पुराणांमध्ये कुठेही आधार नाही. उलटपक्षी बंगालमध्ये कार्तिकेयाची क्षणिका (मातीची मूर्ती) करून पुत्रलाभासाठी त्याची पूजा करतात.

    - लक्ष्मण रा. दिवेकर
    mtartnedit@indiatimes.com

     https://marathi.indiatimes.com/ganesh-festival/ganapati-stories/kartikey/articleshow/16434042.cms

     

    esakal.com

    Tripurari Pornima 2023 : कार्तिक स्वामींनी महिलांना विधवा होण्याचा शाप का दिला होता?

    Pooja Karande-Kadam

    Tripurari Pornima 2023

    Tripurari Pornima 2023esakal

    Updated on: 

    Tripurari Pornima 2023 :

    आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक महिन्यात शिवपुत्र कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता. त्यामुळे या पौर्णिमेला धार्मिकदुष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक स्वामींचा जन्माची गाथा काही वेगळीच आहे. तर, त्यांनी महिलांना एक शाप दिला होता. तो आजही पाळला जातो.

    शिवलीलांमधला सगळ्यात रम्य भाग म्हणजे कुमार कार्तिकेयाचा जन्म माता सतीने देहत्याग केला. भगवान शंकर आपल्या सृष्टी कर्मातून बाजूला होऊन आत्म समाधीमध्ये लीन झाले. त्यांना पुन्हा सृष्टीकार्यात आणण्यासाठी शक्तीच्या पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली.

    म्हणून एक अनोखा प्रसंग घडला ब्रह्मदेवांनी तारकासुर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले. की, तुझा वध शिवपुत्राच्या हातून होईल या वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासुर उन्मत्त झाला.

    कारण भगवान शिव आत्मानंदामध्ये लीन होते. तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता. मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला. तपाचरण करून कठोर परिक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी, पण दोघेही सदासर्वकाळ एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेले. त्यामुळे शिवपुत्राचा जन्म दृष्टिक्षेपात येईना. म्हणून मग एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकरांच्या दारात आर्त हाक घालू लागले.

    असंही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकरांच्या द्वारी उभा राहिला. माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले. त्यांनी स्वतःच सगळं तेज अग्नीच्या ओंजळीत टाकले. शिवाचं तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नीने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले.

    गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले म्हणून तो गांगेय. नंतर कोणे एकेकाळी सहा कृतिका गंगेत स्नान करण्यास आल्या. गंगेने त्या तेजाचे सहा भाग करून सहा जणींच्या उदरात ठेवले. कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या सहा पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला.

    त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन त्यांने 6 मुखे बारा हाताचे रूप घेऊन एकाकार झाला कृतिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय अशा कार्तिकेयाला कृत्तिकांना शरकांडामध्ये म्हणजे दर्भाच्या वनात सोडून दिले. आकाशभ्रमण करणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून त्याला उचलून घेतले.

    त्याला पोटाशी धरताच स्वतःचे स्तन्य पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले. शरकांडामध्ये सापडला म्हणून त्याला शर्वणभव असे सुद्धा म्हणतात. कार्तिकेय आपलाच पुत्र आहे हे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामीच्या हातातला भाला म्हणून ओळखली जाते.

    यथा काळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई झाली. सूनमुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली. पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर मातेने माझ्या सारखी असे म्हणताच समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत.

    भगवंतांनी दिला संबंध महिलावर्गाला शाप

    म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय भगवान कार्तिकेय यांनी केला. तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमारस्वामी असे नाव मिळाले. ही घटना कोल्हापुरातील कपिलतीर्था शेजारी घडली इथे कार्तिकेयाचे कुमार स्वामी नावाचे मंदिर होते. माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल, अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले.

    त्यांच्या मोराच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली तोच दुधाळी नाला हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूर स्वामी नावाचे मंदिर होते. यानंतर कार्तिकेय प्रयागामध्ये जाऊन दार म्हणजे कपाट लावून बसले म्हणून त्यांना कपाट स्वामी असे नाव मिळाले.

    आजही प्रयागात कार्तिकेयाचे सहा मुख आणि बारा हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे. इथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेले. तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्याने विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या देवसेना आणि वनकन्या वल्ली यांच्याशी विवाह केला.

    कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तेथे दर्शन करत नाहीत. याउलट शिवपंचायतन म्हणजे गौरी गणपती शंकर आणि नंदी यांच्या बरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते. कारण इथे कुमार प्रधान देव नाही.

    कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना झाला. म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो स्त्री असो वा पुरुष सात जन्म धनधान्य विद्या यांनी संपन्न होईल. असा वर दिला म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात स्त्रियादेखील कार्तिकेयाचे दर्शन करतात.

    काही लोक कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांची सांगड घालतात वास्तविक श्लोकाप्रमाणे पौर्णिमेचा उल्लेख नसून फक्त कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिना यांचा उल्लेख आहे. त्यामुळे कृतिका नक्षत्र पौर्णिमा सोडून जरी आले तरी कार्तिक महिना असल्याने तो दर्शनाचा योग समजावा.

    कुमार स्वामिनी स्त्रियांना शाप देण्यामागे त्याचा स्त्रीद्वेष हे कारण नसून आपला कधी विवाह होऊ नये ही भावना होती त्यामुळे निष्काम भावनेने पार्वतीपुत्र म्हणून स्नेहाने त्याचे दर्शन घेणाऱ्या स्त्रीला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही.  

    (संबंधित कथा इतिहासतज्ज्ञ ऍड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेण्यात आली आहे)

     

     कार्तिक पोर्णिमा हा दिवस कार्तिक स्वामींचा जन्म दिवस. यादिवशी कृत्तिका नक्षत्रावर भगवान कार्तिकेयाचा जन्म झाला. कृत्तिका हे अग्नी चे, तेजाचे नक्षत्र. कार्तिक स्वामी हे देवांचे सेनापती व बाबाजींचे इष्ट दैवत आणि अशाच एका कार्तिक पौर्णिमेला बाबाजींचा जन्म झाला. विक्रम संवंत २६०,शक १२५ला बाबाजींचा जन्म झाला, त्यात कार्तिक पोर्णिमा ज्याला दक्षिणेत कार्तिक दीपं हा सण साजरा करतात. भगवान कार्तिकेयाचा हा दिवस, या दिवशी कार्तिक दर्शन अत्यंत महत्वाच मानतात. याच दिवशी भगवान शिव शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला व स्वत: आत्मरूप, प्रकाश स्वरूप झाले म्हणून या दिवशी स्कंद पुराणानुसार कार्तिक स्वामिनी दिलेल्या वरदानानुसार या दिवशी त्यांचे दर्शन लाभप्रद असते व ते प्रसन्न होतात. हा दिवस जीवात्म्याचा शिवात्म स्वरूप होण्याचा असतो. आजच्या दिवशी पुण्याच्या पर्वतीला जे कार्तिक स्वामींचे देउळ आहे तेथे प्रचंड गर्दी असते. खर तर महाराष्ट्रात कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया सहसा घेत नाहीत पण या दिवशी येथे प्रचंड गर्दी होते कारण या दिवशीच कार्तिक स्वामींचे दर्शन महाराष्ट्रात बायकापण,त्यांनी दिलेल्या वरदानानुसार, घेतात. महाराष्ट्रा पेक्षा दक्षिणेतील परिस्थिती एकदम उलट आहे. कार्तिकस्वामी हे तेथे अत्यंत महत्वाचे व लोकप्रिय दैवत आहे जसे आपल्याकडे गणपती बाप्पा वा बालकृष्ण कारण तमिळ संस्कृती, भाषा, समाज यांच्या जडण घडणीत कार्तिक स्वामी यांचा फार महत्वाचा व मोलाचा वाटा आहे त्यामुळे घरोघरी पूज्य मानले जातात. जसे अष्ट विनायक स्थाने आपल्याकडे अत्यंत लोकप्रिय आहेत तशीच दक्षिणेला, तामिळनाडू येथे कार्तिकेयाची सहा स्थाने अत्यंत पवित्र, लोकप्रिय, व शक्तीस्वरूप मानली जात्तात व प्रत्येक माणसाचे हि स्थाने जाऊन दर्शन घ्यावी असे तमिळी माणसाचे स्वप्न असते. कार्तिकेयन स्वामी व बाबाजींच्या कृपेने प्रस्तुत पामरांस कमीतकमी चारपांच वेळा त्यांच्या दर्शन सेवेचा (सहा कार्तिकेय स्थानांचा) लाभ झाला आहे. अशा या कार्तिक स्वामी यांच्या पवित्र दिवशी, जीवात्म्याचा शिवस्वरूप होण्याच्या दिवशी, बाबाजींचा जन्म परंगे पेटई येथे झाला. आणि आणखी एक योगायोग म्हणजे त्यांचे वडील हे कार्तिक स्वामींच्या मंदिरातील प्रमुख पुजारी होते. ते नंबुद्री ब्राम्हण होते. अशा नम्बुद्री ब्राह्मणाच्या कुटुंबात बाबाजींचा जन्म झाला. नम्बुद्री हि तेथील सर्वात श्रेष्ठ व महत्वाची जमात मानली जाते. येथे एक शंकराचे मंदीर होते कालौघात ते स्कन्द भगवंत /कार्तिकेय मंदिरात रुपांतरीत केले गेले. आजही ते तेथे आहे. बाबाजींचे वडील या मंदिराचे प्रमुख पुजारी होते. आज तेथे ‘शर्वण’ नावाचा एक छोटा पुजारी आहे. सर्वण हे हि एक कार्तिकेयाचे लोकप्रिय नाव. हा हायर सेकण्डरी ला शिकत आहे. तो व त्याचे वडील, जे विश्वविद्यालयात कामाला आहेत, मिळून या देवळात पुजासेवा देतात. प्रस्तुत लेखकाने येथेहि चारपांच वेळ दर्शन सेवेचा लाभ घेतला आहे. तर अशा या कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या पूजा-याच्या घरी बाबाजींचा जन्म झाला. त्याचं गोत्र वाठूर हे आहे. त्यांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाचे जन्मनक्षत्र पण हेंच श्रावणातल. कार्तिक महिना हा श्रावण महिन्यासारखाच पवित्र मानला जातो. दक्षिणेस कार्तिक पोर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी दारोदारी दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला. याच दिवशी शिवशंकरांनी स्वत:ला अमर्याद प्रकाश रुपात परावर्तीत केले. शंकर आणी षण्मुख कार्तीकेयचा हा दिवस. बाबाजींच नाव नागराज असे ठेवले गेले. नागराज हा मानवी अध्यात्मिक जीवनाची गुरुकिल्ली जी मानवी शरीरात मूलाधारात सर्प /नाग रुपात स्थित असते तीचं प्रतिक नागराज. दक्षिणेला घरोघरी वडाच्या झाडाची व त्याखाली स्थित असलेल्या नागराजाची पूजाकरण्याचा प्रघात आहे. त्या जगन्माता कुंडलिनी स्वरूप नागराजाचे नाव त्यांना दिले गेले हापण एक अजब संकेतच या महिन्यातच दक्षिणेला कार्तिकेयाच्या तारका सुरावरील विजया निमित्त साजरा होतो व याच दिवसांत रामाचा लंका विजयोत्सव साजरा होतो. म्हणून कि काय नागराज मध्ये राम व कार्तिकेयाचे गुण अधिक दिसतात. नागराज दिसायला अत्यंत गोरे, गोंडस, लोभस व सुंदर होते. त्यांच्या जीवन शैलीचा व जवळच असलेल्या चिदंबरमच्या आकाश लिंग नटराज शिवमंदिराचा त्यांच्यावर धार्मिक संस्कार घडविण्यात मोठा सहभाग आहे. असो बाबाजींचे जन्मगाव व जन्म् तिथीची स्थिती बरंच काही सांगून जाते शिकवून जाते. तर जन्म २६० विक्रम संवंत, शक १२५, कार्तिक पोर्णिमा, शिव योग, बव करणावर त्यांचा जन्म झाला. संवंत शक १२५ हे इ.स.२०३ साली होते.
    त्यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेला २०३ साली झाला. योगी रामैय्या व निल कांतन यांच्यानुसार ती ३० नोवेंबर, बुधवार होता,पण आकाशस्थ ग्रह स्थितींचा आभ्यास करता लक्षात आले कि ३० नोवेंबर ला तर मार्गशीर्ष महिना आहे व नक्षत्र पण रेवती, व रास मीन होती. त्यामुळे हि तारीख बरोबर नाहीये, रामैया व निल कांतन दोघेही आज ह्यात नाहीत.

    गोविंदन पत्रव्यवहारास रेस्पोन्स देत ना हित. मग लक्षात आले कि मला कुणीतरी पुण्याच्या एका मोठ्या व्यक्तीने (नाव आठवत नाही) सांगितले होते कि एक धरायची म्हणून ३० नोवेंबर तारीख ठरवली गेली. म्हणून पुण्यात 30 नोव्ह ला बाबाजींचा 'प्रेमोत्सव साजरा केला जातो .तेथे मी 2011 साली प्रमुख वक्ता ग म्हणून निमंत्रित होतो .
    मग संवत २६० शके १२५ ची कार्तिक पोर्णिमा व नक्षत्र गणित करून पाहिलं, तर सर्व जुळते व तारीख ६ नोवेंबर इ.स. २०३ रविवार येतो. त्या दिवसाची चंद्र कुंडली मांडली. तीच माझ्या बाबाजी वरच्या नवीन पुस्तकांत ,मृत्युंजय महावतार बाबाजी या योग्य प्रकाशकाची वाट पहात असलेल्या पुस्तकांत दिली आहे. अभ्यासकांना त्याचा नक्की उपयोग होईल. कुन्डलीत वैराग्य योग, ज्ञान, उच्चकोटीचे गूढ ज्ञान, समाज हीतार्थ मात्यापित्या पासून दुरावा इ सर्व बाबी दिसून येतात.
    तर अशी हि बाबाजींच्या हि व जन्म ठिकाणाची कथा. योगी रामैय्यांना स्वप्नात दृष्टांत होऊन बाबाजींची जन्माची योग्य जागा पण सापडली. ती कस्टमच्या ताब्यात हो ती. मग त्यावेळचे युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर करणसिंग, जे जम्मूच्या राजघराण्याशी संबंधित आहेत व आता श्रीनगर येथे वास्तव्य करून आहेत त्यांच्या मदतीने ती जागा १९७३ साली मिळवली गेली, तेथे वडाचे झाड हि आहे ते शाबूत ठेवून तेथे त्यांचे जन्म स्थळ स्मृती मंदीर बांधले गेले. १९७५ व १९ आगष्ट १९७७ ला त्याचे उदघाटन झाले व सर्वांसाठी खुले केले गेले. येथे त्यांचे जन्मस्थानी कार्तिकेय यंत्र स्थापित केले आहे व त्यांचे मूर्ती व मंदीर,नाग प्रतिमा व गणेश मूर्ती स्थापित आहे. मागे ध्यान करण्यासाठी खोली आहे. प्रसन्न, शांत, सुस्थित अशी सज्ज खोली आहे. समोर मोकळी जागा आहे कोप-यात मोठे वडाचे झाड आहे तेथेही ध्यान करता येते. कार्तिकेयन नावाचे ग्रहस्थ येथे व्यवस्था पाहतात. येथे राहण्याची व्यवस्था मात्र नाही. मला स्वत:ला दोनदा २०१२ आगष्ट,१५. व जून २०१३ ला. येथेच जवळंच कार्तिक स्वामीचे मंदिर जेथे त्यांचे वडील पुजारी होते ते आहे. २०१२ ला ते जुनं होतं आता त्याला सुंदर रंग रंगोटी करण्यात आली आहे. अस आहे तर बाबाजींचे जन्मस्थान त्यांच्या जीवनपटा बाबत अनेक अध्यात्मिक संकेत देणारे पोर्तो नोवा म्हणजेच परंग पेट्टाई =परदेशीयांची पेठ.

     

    vicharyadnya.com

    स्त्रियांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे की नाही?: समज - अपसमज

    Mohini Puranik

    स्त्रियांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यावे की नाही?: समज - अपसमज

    आज कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक स्वामी दर्शनाबद्दल एक मुख्य समज लहानपणापासून ऐकत आलेय – महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेतले तर ‘काहीतरी’ विपरीत होणार कारण कार्तिक स्वामिंचाच तसा शाप आहे असे मानले जाते. विपरीत म्हणजे काय ते आता माझ्या लक्षात नाही. बरेचसे लोक हा समज खरा मानतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

    मी अलीकडेच अय्यप्पा मंदिरात गेले होते, तेथे कार्तिक स्वामी मंदिर पण आहे. मंदिर मुख्यत: मल्याळी बांधवांनी बांधलेले आहे. मंदिर केवळ शनिवारीच सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ दर्शनासाठी उघडे असते. शनिवारची संध्याकाळ होती, सगळे भक्त जमले होते. सर्व भक्तांनी दर्शन घेतले, कार्तिक स्वामींचे पण दर्शन झाले. महिला भाविकांनी सुंदर मंत्रमुग्ध करणारी मल्याळी भजने म्हटली. महिलांनी दर्शन घ्यावे की नाही हे कुणाच्या गावीही नाही. मग कळले, हा समज आणि ही कथा महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित असावी.

    व्रतांच्या कथा, पूजा व विधी हे पुराणांत सापडतात. पुराणे आता अगदी मूळ स्वरूपात आहेत की नाही याबद्दल ठामपणे सांगणे कठीण आहे. पण ज्ञान आणि भक्ती यांनी ओतप्रोत भरलेल्या कथांमध्ये मध्येच कुठे भेसळ असली तर सहसा लक्षात येतेच. आपण ऐकत आलेल्या कथेचा आधार शोधण्यासाठी मी रुद्रसंहिता बघितली. वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांत सुद्धा पाठभेद असतात. त्यातून उत्तर भारतीय प्रकाशने, दक्षिण भारतीय प्रकाशने, महाराष्ट्रातील प्रकाशने यांच्या ग्रंथांत भेद असतो.  मी गीताप्रेसच्या पुस्तकाचा आणि भाषांतराचा संदर्भ येथे देत आहे.

    मला तरी कार्तिक स्वामींनी स्त्रियांना दिलेल्या शापाची कुठलीही गोष्ट सापडली नाही. विवाहाच्या विषयावर कार्तिक स्वामीना राग आला आणि ते क्रौंच पर्वतावर तपस्येला निघून गेले अशी कथा सापडते. पण आपला राग त्यांनी कुणालाही शाप देऊन व्यक्त केला नाही. पौर्णिमेला माता पार्वती त्यांना भेटायला जाते. अशी कथा रुद्रसंहितेच्या कुमारखंडात वाचायला मिळते.

    आपण ऐकत आलेली कथा श्रीधर कवी विरचित शिवलीलामृतात आहे. श्रीधर कवींचा हा ग्रंथ अनुपम आहे, दिव्य आहे. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो. विविध भाषांमधल्या काव्यांवर कुठेतरी ज्या काळात ते रचले गेले आहे त्याचा प्रभाव जाणवतो. श्रीधर कवींचे काव्य पुराणांतील कथांवर आधारित दिसते. पुराणकथा श्रीधर कवींनी आपल्या काव्याने फुलवल्या, विस्तारीत केल्या, शब्दसौंदर्याच्या अलंकारांनी – दागिन्यांनी सजवल्या आहेत. पण कार्तिक स्वामींच्या शापाबद्दलची कथा सत्य मानून आपण भयभीत व्हावे का असा मला प्रश्न पडतो.   

    दुसऱ्या एका दृष्टीकोनातून विचार करायचा तर मुळात भक्ती ही साधना आहे. परमेश्वराच्या ज्या रूपात त्याची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे आवडते त्यात आपण ती करावी असे स्वातंत्र्य भक्तीयोगात आहे. परमेश्वर आपल्या भक्ताचे अनिष्ट करूच शकत नाही. साधना पथावर वाटचाल करताना आपले मन भीतीयुक्त असेल तर भक्तीमध्ये कुठेतरी अविश्वास पण असेलच. परंपरा म्हणून आपण जे विश्वास अगदी कवटाळून बसतो त्याचा भौतिक सुखाच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने काही सकारात्मक उपयोग होतो आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे. शास्त्र शास्त्र म्हणून खूप निर्णय ऐकायला मिळतात पण शास्त्र म्हणजे नक्की काय, त्याला आधार काय असा उल्लेख बरेच लोक करीत नाहीत. धावपळीच्या जीवनात काय खरे काय अपसमज यांवर विचार करायला वेळ मिळत नाही. मग आपण सहसा ज्या व्यक्तीला तज्ञ मानतो त्यांचे मत ग्राह्य धरून आपली अनंत धावपळ सुरु ठेवतो.

     https://www.vicharyadnya.com/2014/11/kartik-swami-darshan-mahila-apasamaj.html

     

     

     

    कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा

    गाभा: 

    कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप.

    आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो -

    इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या-
    ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् |
    समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं
    हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८||

    जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.
    ______________________
    अर्थात कुमार रुप म्हणजे पौगंडावस्थॆच्या आधीची काही वर्षे. ज्या वयात बहुसंख्य मुलांना मुलींबरोबर खेळणे आवडत नाही / त्यांचा राग येतो/ अथवा आतापर्यंत एकत्र असलेले मुला-मुलींचे गट वेगवेगळे होऊ लागतात ते वय.
    ______________________
    मला शंका ही आहे की कार्तिकस्वामी कुमार रूपातच भजला जातो त्यामुळे त्याचे त्या वयातील गुण/आवडी/निवडी अधोरेखित होता असतील काय? उदाहरणार्थ त्याचा स्त्रीद्वेष्टेपणा. त्याने पार्वतीवर रुसून मी तुझे तोंडही पाहणार नाही म्हटले होते आदि. शिवाय कार्तिकस्वामीच्या देवळात स्त्रियांना जाण्याची बंदी वगैरे.
    ______________________
    केवळ एक शंका!!!

     

    स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये, असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील स्त्रिया केवळ कार्तिक पौर्णिमेलाच स्वामींचे दर्शन घेतात. दक्षिणेतील स्त्रीया या गोष्टी मानत नाही त्या वर्षभर दर्शन घेतात. महिला कार्तिक स्वामींचे दर्शन वर्षातून फक्त कृतिका नक्षत्रावरच घेऊ शकतात कारण त्या दिवशी स्वामी बाल अवस्थेत असतात, अशीही आख्यायिका आहे.

    स्वरूपवान कुमार कार्तिकेय स्वामी

     

    पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती अशी काहीशी होती.

    सर्व स्त्रिया मातेप्रमाणे आहेत. म्हणूनच त्यांना अविवाहीत रहायचे होते. यामधे स्त्रिद्वेश न्हवता. पण पार्वतीवर चिडून त्यांनी यापुढे एकाही स्त्रीचे तोंड न पाहण्याची शपथ घेतली होती ही कथेची अर्धी बाजु आहेच (पुर्ण बाजु आपले विस्मरण कमी होता होता प्रकाशात येइलच) पण स्त्रिद्वेश म्हणून न्हवेच तर आधीची प्रतिज्ञा मोडायला लागु नये इतकाच त्यामागे हेतु होता. नशीब एखाद्या देवीने एखाद्या राक्षसाचा वध गेला म्हणून तिला पुरुषद्वेष्टे ठरवण्याइतपत अजुन पातळी कोणी बेगड्या व्यक्तीने गाठली नाहीये ते.

     

    स्कंद व स्त्रीद्वेष्टेपणा कैच्याकै हरदासी कथा आहे.
    पुराणाप्रमाणे स्कंद हा अग्नी व स्वाहा यांचा पुत्र. रूद्ररूपी अग्नीपासून सहा स्त्रियांचे रूप धारण केलेल्या स्वाहेपासून स्कंदाचा जन्म झाल्याने स्कंदाला रूद्रपुत्र म्हणूनच समजले जाते.

    स्कंदाचे पालन सहा मातृकांनी अर्थात सहा कृतिकांनी केले म्हणून तो षडानन आणि कार्तिकेय झाला. तर देवसेना म्हणजे कोणी स्त्रीपार्टी नाही. देवसेना म्हणजेच देवांची अथवा इन्द्राची सेना. राक्षसांकडून देवसेनेचा पराभव होत असल्याचे पाहून इंद्राने स्कंदाला देवसेनेचा सेनापती व्हायचे आवाहन केले. देवसेनेचे पालन केले म्हणूनच त्यास देवसेनेचा पती म्हणून मानले जाते. अग्नीने स्कंदास कुकुट ध्वज दिला म्हणूनच स्कंद मूर्तीच्या हाती कोंबडा दिसतो.
    ह्यात स्कंदाचा स्त्रीद्वेष्टेपणा कुठेही नाही.

    हा धागा म्हणजे उगाचच तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार वाटतो. (तसा तुमचा उद्देश नसेलही)

    ही वेरूळ येथील अप्रतिम स्कंदप्रतिमा
    a

     

     

    lokmat.news18.com

    Kartik Purnima : फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडतं हे मंदिर; पुन्हा वर्षभर मिळत नाही दर्शन कारण...

    Pooja Jagtap

    मराठी बातम्या / अध्यात्म / Kartik Purnima : फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडतं हे मंदिर; पुन्हा वर्षभर मिळत नाही दर्शन कारण...

    मुंबई, 8 नोव्हेंबर : आज मंगळवार 08 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मनाली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान, पूजा आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदी किंवा पवित्र नदीत स्नान केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मात्र कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचा नेमका संबंध काय हे तुम्हाला माहित आहे का? कार्तिक स्वामी म्हणजेच महादेव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिक आहेत. कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एका दिवस उघडले जातात. याचदिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल असे का? आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कथा जाणून घ्यावी लागेल.

    Kartik Purnima 2022: आज कार्तिक पौर्णिमेला महाविष्णूच्या नारायण स्तोत्राचे करा पठण

    हे आहे स्वामींचे मंदिर बंद असण्याचे कारण कार्तिकेय हे भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आहेत. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांनी त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की, जगाची परिक्रमा केल्यानंतर जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल, त्याची पूजा प्रथम मानली जाईल. त्याला जगातील पहिल्या पूज्य देवतेचा दर्जा मिळेल. यानंतर कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन तिन्ही लोकाची परिक्रमा करण्यासाठी निघाले.

    पण शिव पार्वतीचे कनिष्ट पुत्र श्रीगणेशांनी आई-वडिलांची प्रदक्षिणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले. माता पार्वती यांनी विचारले, ते कसे? तर श्रीगणेशांनी आईला उत्तर दिले की, आई-वडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. गणेशाच्या बुद्धीमत्तेने प्रसन्न होऊन भगवान महादेवांनी श्रीगणेशाला आशीर्वाद दिला की, सर्व देवतांच्या आधी त्यांची पूजा केली जाईल. तेव्हापासून गणपतीला आद्य पूज्य देवता मानले जाते. कार्तिकेयाचा शाप कार्तिकेयाने जेव्हा जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते परत आले, तेव्हा त्याने पहिले पूजनीय देवता म्हणून गणेशाची प्रशंसा सुरु होती. सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते. यामुळे कार्तिकेय माता पार्वतीवर रागावले आणि त्यांनी स्वतःला गुहेत कोंडून घेतले आणि कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली. त्यांनी शाप दिला की, त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. यावर भगवान शिव आणि माता पार्वतीने स्वामी कार्तिकेयांना समजावले.

    Tripurari Purnima 2022 Wishes : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खास मेसेज; नातेवाईक, मित्रमैत्रिणींना द्या मंगलमय शुभेच्छा

    कार्तिकेयाचा राग शांत झाल्यावर त्यांनाही याचा पश्चाताप झाला. माता पार्वतीने त्यांना वर्षातून एक दिवस दर्शन देण्यास पटवून दिले. तेव्हा कार्तिकेयांनी सांगितले की, ‘आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन.’ यानंतर महादेवाने कार्तिक स्वामींच्या जन्मदिनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिकीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वरदान दिले. त्यामुळे धार्मिकी मान्यतेनुसार, त्यामुळे स्वामींचे मंदिर वर्षातून एक दिवस उघडले जाते.

     
    news18marathi.com

    कार्तिक स्वामी पंचगंगा काठावर गेले अन्..., कोल्हापुरातील दंतकथा माहितीये का?

    News18 Marathi

    मराठी बातम्या / अध्यात्म / कार्तिक स्वामी पंचगंगा काठावर गेले अन्..., कोल्हापुरातील दंतकथा माहितीये का?

    कोल्हापूर, 27 नोव्हेंबर : दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असते. कोल्हापुरात तर या पौर्णिमेनिमित्त सर्वत्र दीपोत्सवाचे वातावरण पाहायला मिळत असते. या त्रिपुरारी पौर्णिमेलाच भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याला एक वेगळे महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, याच दिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. या दर्शनासाठी कोल्हापुरात पूर्वी 3 मंदिरे होती. आणि त्याबाबतीत एक कथा देखील प्रचलित आहे. याच सर्वांबाबत मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी माहिती दिली आहे.

    खरंतर त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुराचा अरी असलेल्या शंकराची पौर्णिमा होय. पण हीच कार्तिक पौर्णिमा ही भगवान कार्तिकेय यांचा जन्मदिवस असतो. याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. याबाबतीत एक कथा प्रचलित आहे. कार्तिकेय हे भगवान शंकराचे ज्येष्ठ पुत्र आहेत. श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्यात प्रथम पूज्य देवता होण्यासाठी तिन्ही लोकांची प्रदक्षिणा करण्याचे ठरले. मात्र बुद्धीचातुर्य वापरून श्री गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून आद्य पूज्य देवतेचा मान मिळवला होता.

    मनी स्टोन वापरा अन् पैशात खेळा, या रत्नाचे फायदे ऐकून बसेल धक्का

    त्यावेळी कार्तिकेय यांनी रागावून स्वतःला गुहेत कोंडून घेतले. त्यांनी असा शाप दिला की, त्यांचे दर्शन घेणारी स्त्री विधवा होईल आणि पुरुष 7 जन्म नरकात जातील. पण नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या समजवण्यानंतर कार्तिकेयांनी ‘आपल्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी भक्तांना दर्शन देईन.’ त्यामुळेच धार्मिकी मान्यतेनुसार स्वामींचे मंदिर हे वर्षातून एक दिवसच उघडले जाते, अशी माहिती उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.

    कार्तिक स्वामींची करवीर नगरीतील कथा

    तर कार्तिक स्वामी जेव्हा कुमार वयात होते, तेव्हा माता पार्वतीने त्यांच्याकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. पण त्या आग्रहाला नकार देऊन तिथून कार्तिक स्वामी आपल्या मोर या वाहनावरून पंचगंगा नदीच्या काठावर गेले. तिथे थांबून पुढे काठावरूनच विहार करत ते पंचगंगा नदीच्या उगमस्थानी पोहोचले. आणि तिथे एका कपाटात जाऊन लपून बसले., अशी मानवी स्वभावाचे भावबंध दाखवणारी एक सुंदर कथा करवीर महात्म्य या ग्रंथात सांगण्यात आली आहे.

    श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट, तब्बल 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य, Video

    कोल्हापुरातील कार्तिक स्वामींची मंदिरे

    कार्तिक स्वामींच्या लग्नाच्या दंत कथेचा आधार घेतल्यास कोल्हापुरात कार्तिक स्वामींची 3 मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी पार्वती मातेने कार्तिक स्वामींना लग्नाचा आग्रह केला, त्या ठिकाणच्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला कुमारस्वामी असे नाव पडले. हे मंदिर कपिलतीर्थ बाजारपेठेतील कपिलेश्वर मंदिराशेजारी होते. पण सध्या त्या ठिकाणची मूर्ती टाऊन हॉल वस्तू संग्रहालयात पाहायला मिळते.

    माता पार्वतीपासून दूर जाऊन कार्तिक स्वामी पंचगंगा नदीच्या तीरावर आपल्या मयुर या वाहनावर बसून आले. त्यामुळेच पंचगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला मयुरस्वामी मंदिर असे म्हटले जाते. तर या घाटाला मयुरेश्वर घाट म्हणून ओळखले जाते. सध्या हे मंदिर देखील मोडकळीस आले आहे. तर तिसरे कार्तिक स्वामींचे मंदिर सध्याच्या प्रयाग चिखली येथे आहे. त्या ठिकाणच्या कार्तिक स्वामींच्या मंदिराला कपाटस्वामी असे नाव देखील पडले आहे. आज देखील हे मंदिर एखाद्या कपाटात ठेवल्यासारखे असून तेथे कार्तिक स्वामींची सहा मुखी मूर्ती पाहायला मिळते, अशी माहिती देखील उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.

     https://news18marathi.com/religion/karthik-purnima-2023-karthik-swamy-temple-and-legends-in-kolhapur-watch-video-mspk-1086181.html
     
     
     महाराष्ट्रामध्ये अशी धारणा आहे की कार्तिक स्वामींचे दर्शन महिलांना वर्षातून फक्त एकदा घेता येते तर दक्षिणात्य राज्यांमध्ये हे दर्शन नेहमी घेतात याबद्दल मला तरी फारशी माहिती नाही.

    तरी आता नमनाला घडाभर तेल न ओतता मुख्य प्रश्नाकडे वळूया.
    स्वामींची मंदिरे महाराष्ट्र मध्ये खालील ठिकाणी आहेत.
    १. पुण्यामध्ये पर्वती वर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे व ती सारस बागेची जी संस्था आहे त्यांच्या अखत्यारीत हे मंदिर आहे.
    २. पुण्यात अपोलो टॉकीज जवळ श्री अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर आहे.
    ३. अमराई विसावा जकात नाक्या मागे पिरवाडी सातारा येथे एक मंदिर आहे.
    ४. अंभेरी घाट तालुका खटाव जिल्हा सातारा रहिमतपूर पासून पाच किलोमीटर या ठिकाणी एक मंदिर आहे
    ५. सोलापूर अक्कलकोट आळंद कडगंची पासून दहा किलोमीटरवर श्री क्षेत्रपाल नरोणा येथे एक मंदिर आहे.
    ६. जळगाव येथे निवृत्ती नगर मध्ये कार्तिक स्वामींचे मंदिर तर पत्र्या हनुमान मंदिराजवळ एक मंदिर तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एक मंदिर तर पिंपाळ्यात एक मंदिर आहे.
    ७. मुंबईमध्ये ठाणे येथे एक मंदिर आहे असे मी ऐकले होते याबद्दल माहिती मला तरी नाही.
    ८. कोल्हापूर येथे ज्योतिबा रोडवर कार्तिक स्वामींचे मंदिर आहे.
    ९. समता नगर आनंद नगर जवळ अहमदनगर या ठिकाणी एक मंदिर असू शकते
    १०. राजगुरुनगर बाजारपेठ येथे.
    ११. मुलुंड येथे मुरुगण स्वामी या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू रोड मुलुंड वेस्ट या ठिकाणी आहे
    १२. पुण्यात हडपसर गाव येथे सुद्धा एक छोटे कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे.
    १३. पुण्यात देहूरोड येथे शितला नगर मुरुगन हिल देहूरोड कॅन्टोन्मेंट सेंट्रल रेस्टॉरंटच्या जवळ येथे सुद्धा मंदिर आहे.
    १४. उल्हासनगर येथे लक्ष्मीनिवास ओम नगर नेताजी टेकडी च्या जवळ भजन तबेला जवळ सह्याद्री नगर जवळ या ठिकाणी एक मंदिर आहे.
    ठाणे वर्तकनगर येथे मंदिर आहे.

    कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने…

    ३०.११.२०२० या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे. कृत्तिका नक्षत्राचा कार्तिक मासाशी असलेला संबंध आणि कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

    १. कार्तिक मासाचा कृत्तिका नक्षत्राशी असलेला संबंध

    ​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो. कृत्तिका नक्षत्राचा संबंध असल्यामुळे या मासाला ‘कार्तिक’ हे नाव दिले गेले.

    श्री. राज कर्वे

    २. कृत्तिका नक्षत्राचा भगवान कार्तिकेयाच्या जन्माशी असलेला संबंध

    ​ब्रह्मपुराणानुसार एका प्रसंगी अग्निदेवाने शिवाचे तेज ग्रहण केले. शिवतेजाने युक्त अग्नीला पाहून सहा कृत्तिका अग्नीकडे आकर्षित झाल्या. शिवतेजाच्या योगाने सहा कृत्तिकांपासून सहा मुखे असणारा परमतेजस्वी बालक ‘स्कंद’ जन्माला आला. कृत्तिकांपासून जन्म झाल्याने तो ‘कार्तिकेय’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने बलाढ्य दैत्य तारकासुराचा वध केला.

    २ अ. विविध नावे : कार्तिकेय हा देवांचा सेनापती असून त्याची सुब्रह्मण्य, कुमार, मुरुगन, षडानन आदी नावेही प्रचलित आहे.

    कृत्तिका नक्षत्राची आकृती (आकृतीतील ठिपके हे तार्‍यांचे दर्शक आहेत.)

    ३. कृत्तिका नक्षत्राशी संबंधित वैशिष्ट्ये

    ​कृत्तिका नक्षत्रात ६ मुख्य तारे आहेत. नक्षत्राची आकृती धारदार वस्तर्‍यासारखी आहे. आकाशात या नक्षत्राकडे पाहिल्यावर ‘त्यातून वाफा बाहेर पडत आहेत’, असे वाटते. कार्तिक मासात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. कृत्तिका नक्षत्राची देवता अग्नि आहे. यज्ञाचा हविर्भाग देवतांपर्यंत पोचवणार्‍या अग्नीला देवतांचे मुख मानले जाते. प्राचीन काळी कृत्तिका हे आद्यनक्षत्र होते; म्हणजे कृत्तिका नक्षत्राला नक्षत्रचक्राचा आरंभ मानले जायचे. कृत्तिका नक्षत्राला कालपुरुषाचे शिर मानले जाते.

    ४. कृत्तिका नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असणारी वैशिष्ट्ये

    ​कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवि ग्रह आहे. कृत्तिका हे पित्तप्रकृतीचे नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सशक्त आणि पीळदार शरिराच्या, उत्तम पचनशक्ती अन् रोगप्रतिकारशक्ती असलेल्या असतात. त्यांची शारीरिक क्षमता पुष्कळ असते, दृष्टी भेदक असते आणि त्वचा लालसर असते. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्‍वास उत्तम असल्याने त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ असते. त्यांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी, धैर्यवान, आव्हान स्वीकारणारा आणि प्रयत्नवादी असतो. इच्छित कार्याला मूर्त आणि भव्य रूप देण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते. युद्ध, सैन्य, राजकारण, जागतिक घडामोडी, उद्योग, भौतिक विज्ञान, खेळ हे त्यांचे आवडीचे विषय असतात. तेजतत्त्वाने युक्त असलेले हे नक्षत्र पराक्रमी आणि नेतृत्वगुणाने युक्त आहे. राजे, सत्ताधीश, पुढारी, सेनापती, वैद्य, उद्योजक, तंत्रज्ञ, उपासक यांसाठी नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र उच्चपदावर पोचवणारे आणि नावलौकिक देणारे आहे.

    ५. सामाजिक दृष्टीकोनातून कृत्तिका नक्षत्राची वैशिष्ट्ये

    ​कृत्तिका समष्टी प्रकृतीचे नक्षत्र आहे. सध्याच्या काळानुसार आवश्यक असलेल्या धर्मरक्षणाच्या कार्यासाठी कृत्तिका नक्षत्र पूरक आहे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्‍वास, प्रभावी वक्तृत्व, नेतृत्व, संघटनकौशल्य, जिद्द आदी गुण असल्याने त्या धर्मद्रोह्यांचा वैचारिक प्रतिवाद करणे, जाहीर सभांमध्ये श्रोत्यांना संबोधित करणे, देवतांचे होणारे विडंबन रोखणे, धर्मप्रेमींचे संघटन करणे, नेतृत्व करणे आदी कार्य उत्तमरित्या करू शकतात.

    – श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.११.२०२०)

    कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्राच्या रूपात होणारे भगवान कार्तिकेयाचे दर्शन !

    ​कार्तिक पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर भगवान कार्तिकेयाचेे दर्शन घेण्यास विशेष महत्त्व आहे. या एकाच दिवशी स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. ‘या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेतल्याने वैवाहिक जीवन सुखी होते’, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी भाविक मोठ्या संख्येने कार्तिकेयाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. पृथ्वीतलावर हा दर्शनसोहळा चालू असतांनाच आकाशातही भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला रात्रभर दर्शन देतात. ‘कृत्तिका नक्षत्राजवळ असलेला पौर्णिमेचा चंद्र’, हे दृश्य दिव्यतेची प्रचीती देते. युगायुगांपासून भगवान कार्तिकेय कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आपल्याला तेज, सामर्थ्य आणि धैर्य प्रदान करत आहेत.

    १. वर्ष २०२० मधील भगवान कार्तिकेयाच्या दर्शनाचा काल : २९.११.२०२० या दिवशी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे दुपारी १२.४८ पासून ३०.११.२०२० या दिवशी पहाटे ६.०३ पर्यन्त पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असल्याने या कालावधीत भगवान कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे.

     
     












    सूर्य

    बित्र क्र. ११६ : सूर्य, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली




    वेद काळामध्ये ज्या निसर्ग देवतांची पूजा होत असे त्यातील सूर्य ही एक प्रमुख देवता. पृथ्वीवरच्या आपल्या अस्तित्वाला कारणीभूत असणारी प्रभावी आणि जीवनदायी शक्ती हीच असल्याचे त्या काळातच उमगले होते. त्यामुळे सूर्याची अत्यंत कृतज्ञतापूर्वक पूजा केली जात असे. आजही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक अशी आपली जगभर ओळख आहे. दूर डोंगरात खेड्यापाड्यात राहणाऱ्यांपासून शहरात राहणाऱ्यांपर्यंत सगळेच सकाळी सकाळी सूर्यनारायणाला हात जोडताना दिसतात. असे असले तरी मूर्तिरूपामध्ये सूर्याची उपासना आपल्याकडे रूढ नव्हती. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये सूर्याला देव म्हणून ते पूजत असत. त्यांच्या देवळांमध्ये त्या काळी वहाणे काढून जायची पद्धत नव्हती. (आजही चर्चमध्ये जाताना पादत्राणे काढत नाहीत) त्यामुळे त्यांच्या देवांच्या मूर्तीही विविध शस्त्रधारी आणि पादत्राणांसहित असत. इराणमध्ये अग्नीची उपासना करणारा एक पंथ प्रबळ होता. ज्याचे वंशज म्हणजे आजचा पारशी समाज, परंतु अग्नीचे उपासक आणि सूर्याचे उपासक यांच्यात तंटा झाल्यामुळे सूर्योपासकांना (ज्यांना 'मग' म्हणत) भारताचा आश्रय घ्यावा लागला. या मगानी आपले देवही आपल्याबरोबर आणले. आपल्या समाजात त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांना मागी ब्राह्मण म्हणून स्थान तर दिलेच परंतु त्यांच्या देवता आणि त्यांच्या मूर्तींनाही स्वीकार करण्यात आला. त्यामुळे सूर्याची मूर्तिरूपातील पूजा भारतात सुरू झाली. त्यांच्या पद्धतीनुसार पायात जोडे घातलेली सूर्याची मूर्ती ते पूजत असत. तिचा तसाच स्वीकार करंण्यात आला. याचबरोबर  सूर्यमूर्तीवरील काही पाश्चात्त्य प्रभावही तसेच स्वीकारले गेले. यामुळे सूर्याच्या मूर्तीमध्ये गुडघ्यापर्वन उंच असे गमबुटासारखे जोडे घातलेले दिसतात. हिंदू देवतांमध्ये पादत्राणे घातले असलेली ही एकमेव मूर्ती आहे. सूर्याची ही मूर्ती मंदिरांमध्ये बाह्य भिंतींवर तसेच सूर्यमंदिरातील गर्भगृहातही दिसते. सूर्याच्या उपासकांना सौरपंथी असे म्हणत.
        पादत्राणांसहित मूर्तीला सामावून घेण्यासाठी पुराणात काही कथाही आलेल्या दिसतात, श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला कुष्ट झाले ते बरे होईना म्हणून त्याने सूर्याची उपासना केली. त्यामुळे से विकारमुक्त झाला, परंतु गुडघ्याखालील भाग मात्र रोग मुक्त झाला नाही म्हणून त्याला तो भाग झाकावा लागला. मार्कंडेय पुराणातील दुसऱ्या एका कथेनुसार त्वष्ट्याची मुलगी संज्ञा ही सूर्याला दिली होती. त्याचे बेडौल रूप सुंदर करण्यासाठी मुलीच्या आग्रहाखातर त्याने सूर्यास तासण्यास सुरुवात केली. गुडघ्यापर्यंत आल्यावर मात्र सूर्याला ते असह्य झाले आणि तेथेच त्याने ते तासणे थांबविले, त्यामुळे गुडघ्याखालचे त्याचे पाय तसेच राहून गेले पण गुडघ्याखालचा भाग मात्र झाकून टाकला. तिसऱ्या कथेमध्ये त्वष्ट्याची मुलगी संध्या ही सूर्याची बायको. परंतु तिला त्याचे तेज असह्य झाल्यामुळे ती आपले प्रतिरूप छाया हिला घरी ठेवून थंड प्रदेशात जाऊन घोडीच्या रूपात राहू लागली. तिचा शोध घेत सूर्य त्वष्ट्याकडे गेला असता तुझे तेज कमी केल्याशिवाय ती तुझ्या बरोबर राहणार नाही असे त्याने सांगितले. तेव्हा त्याचे ते तेज कमी करण्यासाठी त्वष्ट्याने सूर्याला तासले. तो सुंदर आणि सहनीय झाल्यानंतर घोड्याच्या रूपात संध्येकडे गेला. त्यांच्या त्या रूपातील संयोगातून अश्विनीकुमार आणि रेवंत नावाची संततीही त्यांना झाली. (जोशी: १९७९, पृ.३५२)
        मूळ सूर्याच्या उपासकांची संख्या कमी असल्यामुळे सूर्य मंदिरांचीही संख्या फारच कमी आहे. काश्मिरमधील मार्तंड मंदिर, खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिर, गुजरातमधील मोढेरा गावातील मंदिर, ओडिशा मध्ये कोणार्क या स्थानी सूर्यमंदिरे आहेत.

    चित्र क्र. ११७: सूर्य मंदिर, मोडेरा, गुजरात

        अन्य ठिकाणी अशीच मंदिरे असतीलही परंतु बीजामंडल (विदिशा, म.प्र.) यासारखी त्यांची गत असणार. येथे एक प्रचंड सूर्यमंदिर होते, परंतु औरंगजेबाने ते उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. १९७४ साली पुरातत्व खात्याच्या सांगण्यावरून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ती वास्तू खात्याच्या ताब्यात दिली. तेथील मशीद पाडून तेथे पुन्हा मंदिर पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे,त्या ठिकाणच्या भग्न करण्यात आलेल्या मंदिराचे अवशेष गोळा करून ठेवले होते त्यांची जोडणी सुरू आहे. सूर्य मंदिराबाबत अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे. ती म्हणजे खग्रास ग्रहणाच्या सावलीचा काळा पट्टा देशातील ज्या भागांवरून जातो त्या भागातच सूर्य मंदिरे उभारलेली दिसतात. काही वर्षांपूर्वी अशा खग्रास ग्रहणाच्या सावलीचा पट्टा कोणार्क आणि मोढेराच्या मंदिरावरून गेला. 
        मूर्तिकलेमध्ये मात्र ग्रीकांच्या हेलीऑस नावाच्या सौंदर्यदेवतेच्या रथारूढ शिल्पांकनाचा प्रभाव दिसतो. सुरुवातीला त्याच्या रथाला चार घोडे, कधी चाके दाखविलेली, कधी एकच चाक असे कुषाण काळाचे शिल्पांकन दिसते. गुप्त काळामध्ये स्यांबरोबरच त्याच्या राशींचेही शिल्पांकन दिसते आणि त्या प्रत्येक राशीत एक सूर्वप्रतिमा दिसते. हेच ते बारा आदित्य होय. आठव्या शतकानंतर मात्र सूर्यप्रतिमांचे सपरिवार असे शिल्पांकन दिसते. तसेच दहाव्या शतकापासून सूर्याची स्वतंत्र मंदिरेही दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराणाप्रमाणे सूर्याचा परिवार बराच मोठा आहे. स्वतः सूर्य, त्याच्या सोबत हातात दंड घेतलेला दंड नावाचा त्याचा एक सेवक व लेखणी आणि दौत घेतलेला पिंगल हा दुसरा सेवक, सिंहध्वज, यम, रेवंत दोन मनू असे चार मुलगे, राज्ञी, रीक्षुभा,छाया व सुवर्चासा अशा बायका, अरुण हा सारथी, गायत्री, उष्णीक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप आणि जगती हे सप्तछंदात्मक सात घोडे, भोवती फिरणारे इतर ग्रह, शरसंधान अणाऱ्या उषा आणि प्रत्युषा दोन देवी,इत्यादिकांचा मेळावा सूर्याचा परिवार म्हणून गाजतो. याबरोबरच स्तवन म्हणणारे ऋषी, रथिकाबिंबातील देव वगैरे असतात ते वेगळेच. 

    चित्र क्र. ११८ : सूर्य, सूर्य मंदिर, कोणार्क

    चित्र क्र. ११९ : सूर्य, सूर्य मंदिर, कोणार्क

    कोणार्क येथील सूर्य मंदिरात मास, दिवस आणि सवत्स यांच्याही मूर्ती कालवाचक देवता म्हणूनच दिसतात. तेथील मुख्य मंदिरातील गर्भगृहात असलेली सूर्याची मूर्ती दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात हलवली असून गर्भगृहाबाहेरील देवकोष्ठांमध्ये तीन वेगळ्या सूर्याच्या मूर्ती आहेत. त्यांची नावे पूषण, मित्र, भास्कर (हरिदश्व) ही आहेत. भास्कराची मूर्ती उत्तरेकडील देवकोष्ठामध्ये असून तो अश्वारूढ आहे. पूषण आणि मित्र यांच्या मूर्ती मात्र रथारूढ असून अलंकृत आहेत. पुषणाच्या डोक्यावर उंच किरीट मुकुट असून मित्राची केशभूषा ही गोलाकार टोपाच्या आकारात आहे. यातील तिन्ही मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव वेगळे आहेत. उगवणारा सूर्य हा प्रसत्र दिसतो, माध्यांनीचा भास्कर हा तेजःपुंज असून मावळतीचा सूर्य काहीसा गंभीर दिसतो. (जोशी: १९७९) खजुराहो येथील संग्रहालयातील सूर्यमूर्तींमध्येही असेच भाव आढळून येतात.

     

     सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)


    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. या नविन वर्षात तूमच्या परिसरातील प्राचीन मंदिरं आणि मूर्तींचे संवर्धन होवो.
    ही मूर्ती आहे सूर्य नारायणाची. होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील ही मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
    या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
    मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
    विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते.
    सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
    होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.
     
     

    सूर्य

    लेख ४ 

    मित्र, रवी, भानू, हिरण्यगर्भ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा सूर्य हा या सृष्टीच्या जीवनाचा गाभा आहे. प्रकाश देणारा, बळ देणारा आणि या अवकाशात अखंड भ्रमण करणाऱ्या या सूर्याची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये जे प्रमुख पाच पंथ आहेत त्यापैकी सौर्य म्हणजेच सूर्याची उपासना करणारे हा देखील आहे. इतर चार म्हणजे - वैष्णव, शैव, शाक्त आणि गाणपत्य. या सूर्याचे जे रूप आज आपल्याला शिल्पांमध्ये दिसते त्यावर भारतातल्या आणि भारताबाहेरील अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. सूर्याचे महत्त्व एवढे जास्त आहे की अगदी सुरवातीच्या जनपदांपासून ते नंतरच्या काळातील राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला चिन्हांकित सूर्य प्रतिमा बघायला मिळतात. सूर्याची शिव, वराह (विष्णू अवतार) आणि ब्रह्मदेव यांच्या बरोबर एकत्रित अंकन केलेली शिल्पं काश्मीर, वाराणसी आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी बघायला मिळतात. 

    या फोटो मधील शिल्पाच्या आधाराने आपण आता सूर्याची प्रतिमा समजून घेऊयात. सर्वात खाली सूर्य सतत फिरत असतो ही संकल्पना अधोरेखित करून त्याचा रथ आणि घोडे दिसतात, यांची नावं देखील गायत्री, अनुष्टुप,पंक्ती, इत्यादी सात छंदांवर आधारलेली आहेत. सूर्याचा सारथी अरुण हातामध्ये लगाम घेऊन बसला आहे. सूर्याच्या पायात असणारे बूट हे त्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. प्रदक्षिणा मार्गाने निरीक्षण केल्यास आधी पिंगल (सूर्याचा सेवक - याने हातामध्ये दौत आणि लेखणी धरलेली असते), वरच्या हातात कमळ, माळा घेतलेले गंधर्व, डोक्यामध्ये प्रभावळ, परत हातामध्ये कमळ, आणि शेवटी शिल्पाच्या डावीकडे खाली दंड नावाचा अजून एक सेवक आपल्याला दिसतो. हातामध्ये असणारी कमळ ही सूर्य मूर्ती ओळखण्यासाठी खूप मदत करतात. सूर्याच्या पत्नी आणि मुलं यांची माहिती विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये वाचायला मिळते. याच बरोबर कूर्म आणि अग्नी या पुराणांमध्ये देखील सूर्य वर्णने लिहिलेली आहेत. 

    सर्वांना प्रकाश देणाऱ्या सूर्याला थोडा उजेड आमच्याकडे देखील पाड आणि या उन्हाळ्यात दाहकता कमी कर एवढीच आम्हा सर्वांची त्या आदित्यचरणी प्रार्थना! 

    शिल्प - भुबनेश्वर राज्य संग्रहालय, ओडिसा

    इंद्रनील सदानंद बंकापुरे
    कोल्हापूर
    9960936474
     

    रथ सहस्ररश्मीचा

    चोवीस महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अशा कौशल्यानं, वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली भलीमोठी मेखही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले सात विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण, गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ती, संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या सात घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो अरुण आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी म्हणजे साक्षात सूर्यदेव! सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात अश्वांच्या रथात बसून दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत ह्या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप म्हणजे ओडिशा मधले कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर.

    हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी कितीतरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कितीही फोटो बघितलेले असले तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरुपी सभामंडप पाहता तेव्हा कितीही अरसिक असलात तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर म्हणजे दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा आहे. कोणार्कच्या या सूर्यमंदिराच्या स्थळ महात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली.

    सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले अशी इथल्या भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून तीन किलोमीटर मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे ती वास्तू तेराव्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी ह्यांनी हे सूर्यमंदिर उभारले. पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले व आपला आपला कीर्तिस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. कोणार्कच्या ह्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२ हजार स्थपती आणि शिल्पी बारा वर्षे खपत होते आणि या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेवाने आपले बारा वर्षांचे उत्पन्न खर्च केले असे अकबर कालीन इतिहास ग्रंथ ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये नमूद केलेले आहे.

    कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी वालुकाश्म व क्लोराइट शिस्ट अश्या दोन प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशा मधल्या एका शिल्पकाराने त्या दगडांची फूल खाडिया आणि मुग्नी अशी स्थानिक नावे सांगितली होती. वालुकाश्म हा दगड खडबडीत पण टणक असतो तर क्लोराइट शिस्ट खाणीतून काढल्यावर मऊ असतो पण पुढे ऊन वारा पाऊस पिऊन टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थपती आणि शिल्पकारांना अतिशय बारीक, नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघताना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते ते या दगडामुळे.

    कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तुकला व शिल्पकला ह्यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणाऱ्याला जास्त भुरळ घालते की मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही. सध्या अस्तित्वात असलेला सूर्यरथाच्या स्वरूपातला सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ‘जगमोहन’ हे नाव आहे, त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेल्या गर्भगृह आणि मुख्य शिखर ह्यांनी मिळून बनलेल्या रेखादेवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुप्पट असली पाहिजे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची नजर आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही ऊर्ध्वगामी दृष्टिरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे.

    कलिंग स्थापत्यशैली हा नागर शैलीचाच एक उपप्रकार मानला जातो. कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे तीन भाग असतात, गर्भगृह म्हणजे रेखा देऊळ, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते व वर गोलाकारआमलक असतो. रेखा देवळाच्या पुढे असतो तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या पिरॅमिड सारख्या शिखरामुळे पिढा देऊळ असे नाव आहे. यालाच भद्र देऊळ किंवा जगमोहन असेही म्हणतात. रेखादेऊळ उंच आणि निमुळते असते तर पिढा देऊळबुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार ह्यामध्ये एक सुंदर समन्वय असतो ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते. जगमोहनाच्याही पुढे नटमंडप किंवा नृत्यमंडप असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो. या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्कमध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की आजच्या भग्नावस्थेत देखील मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो, आणि मनात विचार येतोच की पूर्णावस्थेतले रेखा देऊळ, त्यातली सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातले भव्य भद्रदेऊळ व त्यापुढील नृत्यमंडप यासर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असताना किती देखण्या दिसत असतील!

    कोणार्कच्या या सूर्यमंदिराची खासियत म्हणजे इथले भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांचे फोटो आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण एकेकट्या रथचक्राचे फोटो बघणे आणि प्रत्यक्ष अतिभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असे म्हणतात खरे पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे ही कल्पनाच किती उदात्त आहे!

    एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारी भिंतींवर मिळून बाराचक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत ज्या वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला आठ बारीक व आठ जाड आऱ्या कोरलेल्या आहेत. या आठ आठ आरी म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे सप्ताहाच्या सात दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थपतीचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आऱ्याच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसारत्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ते दाखवले आहे. म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे, आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित गाईड घेणे फार आवश्यक आहे, कारण या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की गाईड नसला तर नव्वद टक्के बारकावे आपल्याला उमजणारच नाहीत.

    असे म्हणतात की राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढून टाकला गेला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पुढे सोळाव्या शतकात काला पहाड नावाच्या इस्लामी सरदाराने ओडिशास्वारीत या मंदिराचा केलेला विध्वंस यामुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले व कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेती अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर १८९३ मध्ये ब्रिटिशपुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम १९०१ पासून हाती घेतले.

    आज जे मंदिर आपल्याला दिसते ते भग्नावस्थेत आहे. मंदिराचा गाभारा उध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती वस्तुसंग्रहालयात गेलेल्या आहेत तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यातली सूर्यमूर्ती कोठे आहे ते कोणालाच माहिती नाही. जगमोहनाची नाजूक परिस्थिती पाहता ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे सील केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो, पण करणार काय? शिल्पकला आणि स्थापत्य या दोन्ही गोष्टींनी नटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर एकाच वेळी अभिमान आणि विषाद अशा परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतीयाने पाहिलेच पाहिजे असे हे मंदिर आहे.

    (सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत)

     


    सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)

    दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. या नविन वर्षात तूमच्या परिसरातील प्राचीन मंदिरं आणि मूर्तींचे संवर्धन होवो.
    ही मूर्ती आहे सूर्य नारायणाची. होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील ही मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
    या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
    मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
    विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते.
    सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
    होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.
    https://shriumrikar.blogspot.com/2020/11/blog-post_11.html

    कनकादित्य सूर्यमूर्ती: गुजरातची आख्यायिका की, कोकणच्या कारागिरांची कला?

    लोकसत्ता ऑनलाइन

    डॉ. अंजय धनावडे
    Konkan Kanakadity Sun Temple:
    रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आडिवरे– कशेळी परिसरातील कनकादित्याचे मंदिर ही अशीच एक जागा आहे, जिथे सातव्या– आठव्या शतकांपासून सूर्योपासनेची अखंड परंपरा जपली गेली आहे. कोकणात सूर्योपासना ही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. आजही दक्षिण कोकणात आढळणारी सूर्य मंदिरे, सुट्या सूर्यमूर्ती आणि रथसप्तमीसारखे उत्सव ही त्या परंपरेची उदाहरणे आहेत. कोकणचा इतिहास हा केवळ राजकीय घडामोडींपुरता मर्यादित नसून, तो धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि निसर्गाशी जोडलेल्या उपासनेचा इतिहासही आहे.

    पुरातत्त्वीय आणि अभिलेखीय पुरावे

    रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आडिवरे– कशेळी परिसर हा सातव्या– आठव्या शतकांपासून सूर्योपासनेचे एक प्रमुख केंद्र असल्याचे विविध पुरातत्त्वीय आणि अभिलेखीय पुराव्यांतून स्पष्ट होते. कशेळी हे एक छोटेसे गाव आहे. येथे कनकादित्य सूर्यदेवाचे मंदिर आहे. स्थानिक कथेनुसार, गुजरातमधील प्रभासपाटण (वेरावळ) परिसरातील सूर्य मंदिरांवर संकट आले तेव्हा काही सूर्यमूर्ती समुद्रमार्गे दक्षिणेकडे हलविण्यात आल्या. सूर्योपासक असलेल्या आणि व्यवसायाने गणिका असलेल्या कनकाने यातील एका मूर्तीची स्थापना केली. नंतर सूर्यदेवाची ही मूर्ती कनकेचा आदित्य म्हणजे कनकादित्य म्हणून ओळखला जाऊ लागला.

    गणिकेची आख्यायिका

    या मूर्तीची कनकादित्य ही ओळख आजही कायम आहे. समुद्राकाठी असलेल्या कड्यातील ज्या गुहेत मूर्ती तात्पुरती ठेवली होती ती गुहा म्हणजे ‘देवाची खोली’ हे स्थान आजही समुद्रकिनारी अस्तित्वात आहे. एका सामान्य गणिकेने सूर्यमूर्ती स्थापन केल्याची आख्यायिका इथे ऐकायला मिळते. प्राचीन भारतात रुपजीविका पद्धतीने जगणारा गणिकांचा वर्ग वा समुदाय अस्तित्वात होता. त्या शास्त्र, कला, संगीत आणि चौसष्ठ विद्येत निपुण असत. हे वात्सायानाचे कामसूत्र, चातुर्भाणी अथवा वसंतसेना सारख्या साहित्यावरून लक्षात येते. तत्कालीन समाजात गणिकांना मान होता त्यांना सन्मानाने वागविले जात होते.

    आदित्यवाडचा इतिहास

    कशेळी हे आडिवरे पंचक्रोशीतील गाव आहे. आजच्या आडिवरे गावाचे प्राचीन नाव ‘आदित्यवाड’ असल्याचे प्रस्तुत लेखकाने त्याच्या संशोधनात दाखवून दिले आहे. ‘आदित्य’ म्हणजे सूर्य आणि ‘वाड’ म्हणजे वस्ती म्हणजेच सूर्यदेवाचे निवासस्थान. हे नाव केवळ दंतकथांवर आधारित नसून, थेट चालुक्यकालीन ताम्रपटांच्या पुराव्यावर आधारलेले आहे. काळ्या पाषाणातील सुमारे सव्वा मीटर उंच सूर्यमूर्तीवर चकाकी आहे. समभंग आणि स्थानक अवस्थेतील सूर्य दोन हातांचा असून त्याच्या डोक्यामागे लंबवर्तुळाकार प्रभावलय कोरले आहे. हातात आखूड सनाल पद्म पुष्पे धारण केली आहेत. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि करंडक मुकुट घातलेल्या सूर्याच्या हातात कंकणे, बाजूबंद, गळ्यात कंठहार, यज्ञोपवीत, कमरेत मेखला, उदरबंध इत्यादी अलंकार परिधान केले आहे. त्याचे लांब कान खांद्यापर्यंत आले असून त्यात कर्णकुंडले आहेत. त्याने अधोवस्त्र म्हणून वैशिष्ट्यपूर्ण आखूड ‘जंघिका’ किंवा ‘अर्धोरूक’ म्हणजे गुढग्याच्या वर परिधान केलेले एक प्रकारचे वस्त्र दिसते. त्याच्या पायाशी चामारधारिणी उभ्या असून त्या छाया आणि संध्या अथवा उषा आणि प्रत्युषा या सूर्य पत्नी असाव्यात. पीठावर सात घोड्यांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात.

    Kankaditya-Temple-Konkan
    कनकादित्य, कशेळी

    कोकणातील कारागिरी?

    या सर्व वैशिष्ट्यांवरून ही मूर्ती इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या मध्यकाळातील असून, कर्नाटकातील ऐहोळे व पत्तडकल येथील चालुक्यकालीन सूर्यमूर्तींशी साधर्म्य दर्शवते. त्यामुळे गुजरातहून मूर्ती आणली गेली अशी आख्यायिका असली, तरी तिची कलात्मक घडण मात्र कोकणातीलच कारागिरांनी, चालुक्य प्रभावाखाली केली असावी, असे दिसते.

    व्यापारी संबंध

    प्राचीनकाळी कोकणात अनेक बंदरे वसली होती. ती व्यापारी मार्गानी भरूकच्छ (भडोच), उज्जैन, तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण) इत्यादी व्यापारी केंद्रांना जोडली गेली होती. आडिवरे हे असेच मुचकुंदी नदीच्या काठावरील व्यापारी मार्गावरचे एक सक्रिय बंदर असावे. या बंदरामुळे व्यापारी, प्रवासी आणि सार्थवाह यांची येथे सतत ये-जा चालू असे आणि त्यामुळे धार्मिक केंद्र म्हणूनही या गावाचा विकास झाला असावा. व्यापाराच्या निमित्ताने देशविदेशातून अनेक प्रवासी, सार्थवाह, व्यापारी यांची बंदर किनारी वसलेल्या नगरातून सतत ये-जा सुरु असे. त्यामुळे येणाऱ्या धनाढ्य व्यापारी, राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी वर्गास काव्य, गायन, नृत्यादी मनोरंजनासारखी सेवा पुरविणारा गणिकांचा वर्ग अस्तित्वात असावा.

    ताम्रपटाचा संदर्भ

    चालुक्य काळात आडिवरे हे ‘आदित्यवाड’ या नावाने ओळखले जात होते असे ठामपणे म्हणता येते कारण बदामी चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा याने शके ६६४ (इ.स. ७४१–७४२) मध्ये दिलेल्या नरवण ताम्रपटामध्ये आलेली गावे कोकणातील चिपळूण,गुहागर परिसरातील आहेत. ताम्रपटामध्ये तो आदित्यवाड या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दान देत असल्याचा उल्लेख आहे. स्वत चालुक्य सम्राटाने दान दिलेले असल्याने आडिवरे हे केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र होते, असे म्हणता येते.

    डिसेंबरमधील मकर संक्रांत

    या ताम्रपटातील आणखी एक अधोरेखित करण्यासारखी आणि महत्त्वाची बाब म्हणजे दान दिल्याची तिथी सूर्याशी संबधित म्हणजे मकर संक्रांत होती. आज संक्रांत १४ जानेवारीला साजरी होते; मात्र ताम्रपटातील तारीख २१ डिसेंबर ७४१/४२ अशी होती. यातील खगोलशास्त्रीय संदर्भांनुसार त्या काळात मकर संक्रांत डिसेंबर महिन्यात येत असे, हे देखील लक्षात येते. यावरून सूर्यगती आणि उत्तरायणाला त्या काळी किती महत्त्व दिले जात होते, हे लक्षात येते. पुढील काळात म्हणजे शिलाहार राजवटीतही हा परिसर धार्मिकदृष्ट्या सक्रिय राहिला. शिलाहार काळातील उल्लेखांवरून कनकादित्य मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे संभवते. त्यामुळेच सूर्योपासनेची परंपरा अखंड सुरू राहिल्याचे दिसते.

    कोकणातील सूर्यपूजेची पार्श्वभूमी

    कोकणात शिलाहारांच्या पूर्वी कदाचित बदामी चालुक्य काळात (सन ५४३-७५७) सूर्यपूजा जास्त लोकप्रिय झाली असण्याची शक्यता आहे. बदामी चालुक्यांनी त्यांच्या राज्यात आदित्य म्हणजे सूर्याला समर्पित अनेक मंदिरे बांधली. त्यांनी आदित्य हे नाव आपल्या राजपुत्रांच्या नावांसाठी उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणूनही वापरले. उदाहरणार्थ आदित्यवर्मन, चंद्रादित्य आणि विक्रमादित्य. सन ६९१-६९२ च्या मनोर ताम्रपटानुसार उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यातील मानपूर म्हणजे आजच्या मनोर येथे सूर्याचे मंदिर होते. या ताम्रपटानुसार गुजरात शाखेचा चालुक्य सम्राट विनयादित्य- मंगलरसने ‘दीधितीमालीन’ नावाच्या सूर्यदेवाच्या मंदिराला रोजच्या पूजोपचारासाठी अत्तर, फुले, धूप, दिवे, संगीत अर्पण करण्यासाठी आणि मंदिराच्या दुरुस्तीसाठी काही गावे आणि स्थळांचे अनुदान दिले.

    कांदळगाव ताम्रपटात रथसप्तमीचा उल्लेख

    चालुक्य पुलकेशी दुसरा याच्या कांदळगाव (सिंधुदुर्ग) ताम्रपटात रथसप्तमीचा आलेला उल्लेख महत्वाचा आहे. स्पष्ट अशा अभिलेखीय पुराव्यामुळे कोकणच्या किनारी भागात सूर्य पूजा अगदी मंदिरात विधिवत मूर्ती स्थापना करून होत होती, असे दिसते. त्यामुळेच चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा याने स्वतः कोकणातील ‘आदित्यावाड’ येथून कोकणातील गावे दान दिल्याचे दिसते. आजही कशेळी येथे साजरी होणारी रथसप्तमी ही या प्राचीन परंपरेची साक्ष आहे. या उत्सवात आडिवरेच्या स्थानिक ग्रामदेवता महाकाली, जाखादेवी आणि भगवती विधिवत सहभागी होतात. सूर्यदेव आणि ग्रामदैवतांचा हा सहवास कोकणच्या धार्मिक संस्कृतीतील सुंदर समन्वय दर्शवतो.

    एकूणच, आदित्यवाड ते आडिवरे, चालुक्य सम्राटाची प्रत्यक्ष उपस्थिती, कनकादित्याची सातव्या शतकातील सूर्यमूर्ती, कनका या गणिकेची भक्ती आणि आजही साजरी केली जाणारी रथसप्तमीची परंपरा या सगळ्यांमुळे कशेळी- आडिवरे परिसर कोकणातील सूर्योपासनेचा एक तेजस्वी आणि अभिमानास्पद अध्याय ठरतो.


























































    Why is Surya the only god in the Brahmanic pantheon to wear high boots?

    Kamayani Sharma

    It was the boots that intrigued me.

    Meandering through the Government Museum in Mathura in sandals befitting the hot summer afternoon, I was almost irrationally bothered by the sight of so much close-toed footwear on the sculptures of the Hindu sun god Surya.

    In one bronze rendering, a nimbate Surya sits between two hierarchically-scaled little horses, a dagger between his booted feet, in another sandstone composition, he stands holding a lotus in each hand, flanked by his attendants, and in yet another stone tableau, he appears to rest on his haunches as he is chauffeured in a seven-steed chariot. Notwithstanding the range of his poses, whether in the early centuries of the Common Era or the tenth, Surya was always shod.

    In the Brahmanic pantheon of the first millennium CE, Surya is the only deity who wears shoes. As art historian Pratapaditya Pal writes in the first volume of his Indian Sculpture: Circa 500 B.C.-A.D. 700 (1986), Surya is “...a regal figure like Vishnu but usually with two arms. The lotus is his distinctive emblem, which he holds with both hands. He is further distinguished only in northern India by his jacket or coat of mail, trousers and boots, generally the attire of the inhabitants of northwestern India and central Asia.”

    Why would a subtropical solar deity be fitted with high boots suited for cold steppes rather than hot plains? And what meaning does the incongruous ensemble impart to the depiction of this specific god?

    Getting a makeover

    There was a time when Surya dressed for the weather.

    Originating as a divine character in one of the earliest hymns of the Rg Veda, he seems to have made his full-fledged visual debut almost a thousand years later. In the essay Greek Helios or Indian Surya: The Spread of the Sun-God Imagery from India to Gandhara, historian and numismatist Osmund Bopearachchi points to Surya’s appearance on the railing of the Mahabodhi temple in Gaya in the 2nd century BCE and at the Bhaja Vihara caves in the 1st century BCE as being “among the earliest representation of Surya found in South Asia”. In these Sunga period incarnations, Surya rides a chariot flanked by his two wives, Usa and Pratyusa, vanquishing darkness in the former case with the support of his consorts’ archery and, in the latter, by trampling it (manifested as demons) underhoof. The human feet are not visible, shielded by the frontality of the composition and thus the chariot’s bow. But the accessories clue us into their likely status, as historian Marion Frenger decodes in her essay The Sun in Stone–Early Anthropomorphic Imagery of Surya in North India (2020).

    A sculpture of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [CC BY 3.0].

    Referring to the Bodh Gaya image as well as contemporaneous ones at Khandagiri (Odisha) and Lala Bhagat (Uttar Pradesh), Frenger observes that “all the insignia of an ancient Indian ruler including a large parasol above his head, an opulent turban, heavy ear-plugs and necklace…His upper body is bare, which is in keeping with the dress traditions of the subcontinent”. From this description, we can reasonably surmise that the sun god’s obscured choice of footwear was probably in keeping with the fashion trends of the 100s BCE (possibly similar to padukas or perhaps even barefoot).

    So how or why did Surya undergo a makeover over the next few centuries?

    One broad context for bundling up Surya involved the syncretism of his mythography. Commenting on the lack of inscriptions on representations before 500 CE, Frenger points out that “it is not even known if they were seen as images of Surya, as the Iranian sun god named Mithra/ Miiro, as the Greek Helios or – maybe the most probable supposition – as all three depending on the cultural background and contextual understanding of the individual viewer”.

    Exemplifying this point is the fact that even in the earliest known iconography, it is not the Vedic rath of seven horses riding which the sun dawns, but the Hellenistic four-horsed quadriga. Frenger attributes this hybridity to the Buddhist nature of sites such as Bodh Gaya, since the Vedic articulation of the deity would have been far less important than accentuating his Buddha-like regality, an approach allowing inspiration from iconographic schemes of other solar gods, both proximate and distant.

    A bronze statue of Surya from the Kushan period at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].

    It was the induction of Surya into the Buddhist religio-cultural sphere during this time that eventually led to his transformed aspect. In the book Images of Mithra, its five authors (Philippa Adrych, Robert Bracey, Dominic Daglish, Stefanie Lenk and Rachel Wood) note, “In the early first millennium, there were strong affinities between Miiro and Surya. Some texts include ‘Mitra’ as one of the names of Surya, and describe him as driving a seven-horse chariot. One text, the Bṛhatsamita Surya, prescribes that Surya should appear without multiplication of limbs and dressed in ‘northern’ garb…a decorated tunic and calf-high boots.”

    Eclecticism of faith

    The footwear that caught my eye in Mathura has finally surfaced in my research. By the 2nd century CE, Surya was taking his style cues from a certain northerly people – widely known as the Kushans.

    Descendents of Yuezhi nomads from what is now the China-Mongolia border area of the Eurasian Steppe, the Kushan emperors ruled over one of the largest, wealthiest and most religiously diverse territories in the ancient world. Over a 500-year period straddling the turn of the 1st millennium CE, they governed from the present-day eastern borderlands of Iran to Patna. The most famous member of the dynasty, Kanishka I – whose statue was the purpose of my Mathura visit – is perhaps known best for his patronage of Buddhism. At the same time, he protected the practice of other belief systems in his realm, including the Vedic, Greek and Zoroastrian ones, during his 23-year reign sometime between 78 and 144 CE. This eclecticism of faith prevailing in the Kushan Empire became apparent too in the sacred art which flourished in it.

    A headless statue of Emperor Kanishka at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [Creative Commons Attribution 3.0 Unported License].

    In a 1999 paper titled Solar Iconography of Mathura, scholar Suresh Pandey inventoried the Surya figures held in that city’s Government Museum. Noting that ancient Mathura was the capital of the Kushan Empire, Pandey asserts that “the Iranian form of Sun-cult was given official recognition and the Sun-image with Iranian features like Udichya-vesha, Abhanga upanat-pinaddha, etc…The iconography of the Sun at Mathura during this period is of obvious Scythian influence and monastic boots as well as tailored coat with sleeves…”. While an indigenous version of the sun god continued to be privately worshipped, the Iranianised solar deity was the object of public worship supported by the Kushan state, an incarnation of the Central Asian culture itself.

    By donning their attire, the summer Surya radiating unto the Doab had transformed into a representative of the Bactrian winter. But what was the reason for the sun god specifically to have become the locus of transfer of symbolic power?

    The concept of solar kingship was old and ubiquitous in the realms of Asia and Europe, with monarchs up to the early modern period drawing on the metaphorical plenitude of the sun to emphasise their sovereignty. In his analysis of solar mythology from the Indo-Iranian world to the Greco-Roman one through the figure of Mithras, historian David H Sick interprets the sun god genre along the Silk Road as “the enforcer of contracts and the guardian of herds”. Surya’s own name, according to Sick, is etymologically linked to the Proto-Indo-European term for sun, allowing these layers of Eurasian meanings to settle upon him, like the mantle on Emperor Kanishka’s headless statue inaugurating Mathura museum’s main gallery. On closer inspection, the striations on his boots, suggestive of cold-proof padding, resemble the ones worn by a number of resident Suryas. Gesturing towards the similarities in costume and a deep squatting figuration denoting both king and god (different from Kanishka’s lifesize statue type), art historian John M Rosenfeld, in his definitive The Dynastic Art of the Kushans (1967), writes of the Kushans’ solar symbolism: “Some early images of Surya are so similar to Kushan royal portraits that it is possible to confuse one with the other.”

    A statue of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].

    Visual update

    Whilst acknowledging the link between Surya and the Kushan royals, Rosenfeld did not think there was enough information to establish a direct investiture of political power from the former to the latter. Conversely, aligned with scholars like Sick, Frenger presents the homonymy of the Sanskrit word raj as both ‘to rule’ and ‘to shine’ as another possible explanation for why the sun god was an ideal surrogate for the king. Tracking the iconographic correspondences between the ruler and the light-giver from the Sunga period to the Kushan era, she sees the wardrobe change from bare torso to embroidered tunic as “reflect[ing]the contemporary apparel of the ruler”.

    According to Frenger, this link is further corroborated by the detailed updating of visual elements into the representation of a pre-existing deity: “[T]his remarkable exactitude with which Surya images incorporated changes in the appearance of contemporary rulers was continued for several centuries. It shows that the relation between the sun god and the ruler was not the repetition of a once established iconographical convention but a ‘living’ feature. Artists and viewers alike obviously understood the reference to the ruler as an essential part of the sun image.” A later example supporting this correspondence is how in the era following the Kushans’ Hindu successors, the Guptas, Surya starts riding the seven-horsed Vedic rath.

    As I make my way out of the Mathura museum, I stand before Emperor Kanishka’s massive statue, admiring his boots one last time. Through his glass case, I glimpse the smaller figures whose feet I have spent a whole afternoon scrutinising. On an absurd, anachronistic tangent, I am reminded of the famous Shawshank Redemption scene: “I mean, seriously, how often do you look at a man’s shoes?”

    Clearly, as it turns out, far less often than a god’s.






    सूर्य पूजा !! कुषाण कालीन "बूट" संस्कृति !!
    सूर्य की उपासना भारत में वैदिक काल से ही महवपूर्ण रही है . कुषाण काल - शक क्षत्रप / गुप्तकाल के आसपास तो सूर्य मंदिर भी बनने लगे . ज़ाहिर है अब सूर्य की गणना प्रमुख देवताओं में होने लगी थी . शास्त्रीय पुस्तकों में ‘सूर्य’ के लक्षण बताये जाने लगे जिनके अनुसार ‘सूर्य प्रतिमा का निर्माण किया गया . सामान्यत: सूर्य प्रतिमा के निम्न अभिलाक्ष्ण होते हैं .
    १. कंधे की ऊंचाई पर पर दोनों और खिले हुए कमल , एवं चेहरे के चारों ओर ‘कीर्ति मंडल’
    २. अंधकार को दूर रखने के लिए धनुष बाण लिए बायीं ओर देवी प्रत्युषा ओर तथा दायीं ओर देवी उषा
    ३. बायीं ओर अश्वनी कुमार , दंड हाथ में लिए द्वारपाल ‘दंडी’ और देवी ‘निक्षुभा’
    ४. दायीं ओर अश्वनी कुमार , कलम और दवात हाथ में लिए द्वारपाल ‘पिंगल’ और देवी ‘रजनी’
    ५. पैरों में ‘बूट’ पहने हुए , संभवतः भारतीय देवताओं में ‘सूर्य’ को ही ‘बूट पहने’ दिखाया गया है.
    ६. सबसे नीचे ‘अधिष्ठान’ पर सात घोड़े , एक पहये का रथ , सारथि ‘आरुणी’ ...अथवा ‘महाश्वेता देवी’
    ७. कई बार अन्य देवताओं को भी साथ में दिखा दिया जाता है .
    समय के साथ धीरे धीरे ‘सूर्य’ का महत्व कम होने लगा और ईसा की तेरहवीं सदी के आते आते ‘सूर्य’ का स्थान मात्र नवग्रहों में ही सुरक्षित रह सका ....
    Courtesy : Sanjeev Singh
    सूर्यपूजा गुजरात मे होती थीं । यहाँ काफी सूर्य मंदिर थे । जिसमें से आज भी बहोत सारे बचे हुए है । आश्चर्य की बात यह है कि कुछ में सूर्य भगवान की मूर्ति कि पूजा कुछ अलग देव के रूप में आज होती है । कंठकोट के सूर्य मंडूर की विशाल मूर्ति मंदिर के भूकंप में गिरने के बाद पुरातत्व विभाग या और कोई सरकारि लोग ले गए है, जबकि शामलाजी के सूर्य मंदिर की मूर्ति चोरी हो गयी है । रोड़ा और ओखा मंडल के मंदिर की सूर्य मूर्ति वडोदरा म्यूज़ियम में है । भवनाथ भीलोड़ा के सूर्य मंदिर के सूर्य की जगह विष्णु मूर्ति रखी है । महिसागर के डॉलरिया गांव में छोटा सा सूर्य मंदिर भग्न हालात में खड़ा है । प्रत्यक्ष देव होने के बावजूद सूर्य पूजा आजकल नही होती है ।
    आभार :तरुण शुक्ल
    शैयर जरूर करें वीरों !!
    वीर गुर्जर इतिहास व संस्कृति :--
    Veer Gurjar History N Culture
     
     

    भारत में सूर्य प्रतिमाओं का प्रचलन, मिथक और इतिहास 

    ----------------------------------------------------------------
    सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय 

    सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय (कुषाण काल)

    रथ पर सवार सूर्य की प्रतिमा, मथुरा संग्रहालय

    रथ पर सवार सूर्य परिवार, मथुरा संग्रहालय


    प्रकाश आैर शक्ति का प्रतीक सूर्य विश्व की अनेक संस्कृतियों में आराध्य के रूप में पूजित होते रहे हैं। अपने देश या भारतीय उपमहाद्वीप की बात करें तो सूर्योपासना के मूल यूं तो वैदिक काल से ही मिलने लगते हैं, पर कुषाणों के समय से उसमें कई परिवर्तन हुए आैर गुप्तकाल से यह पद्धति ‘सौर संप्रदाय’ के नाम से जाने जानी लगी। इसे पंचदेवताओं में से एक माना जाने लगा। इन्हीं पंचदेवताओं के आधार पर पंचायतनों की कल्पना भी की गई, जिसमें मुख्य देवता बीच में स्थित होता है तथा अन्य चारों उसके चारों तरफ या आगे पीछे रहते हैं। ये पंचदेवता हैं शिव, शक्ति, विष्णु, गणपति आैर सूर्य। जहां तक सूर्य प्रतिमा या प्रतीक की बात आती है तो सर्वप्रथम इसे गोल चमकदार रूप में प्रतिकृत किया गया। देखा जाए तो यह प्राचीन प्रतीकों में से एक है या सर्वाधिक प्राचीनतम प्रतीक। शतपथ ब्रााह्मण के अनुसार सूर्य का प्रतिनिधित्व करने के लिए सुवर्ण का गोल टुकड़ा रखा जाना चाहिए। साम्ब उपपुराण में इसका वर्णन कुछ इस प्रकार है- पहले सूर्य की प्रतिमा नहीं थी, अपितु मण्डल में ही उसका पूजन होता था। जिस प्रकार आकाश में सूर्य-मण्डल विद्यमान रहता है, उसी प्रकार पहले भक्त लोग मण्डल का निर्माण कर लिया करते थे। इसके बाद जबसे विश्वकर्मा ने पुरूषाकृति सूर्य का निर्माण किया, तबसे घरों आैर मंदिरों में प्रतिमाओं की स्थापना होने लगी। भविष्य पुराण के अनुसार श्रीकृष्ण के पुत्र साम्ब के कुष्ठग्रस्त होने पर शाकद्वीप से अग्नि पूजकों के विरोध के कारण आये हुए मग ब्रााह्मणों ने सूर्य पूजा का विधान बताया था, जिसका अनुसरण करने पर साम्ब को कुष्ठ रोग से मुक्ति हुई थी। माना जाता है कि विश्वकर्मा जिनका दूसरा नाम त्वष्टा भी था ने अपनी पुत्री संज्ञा का ब्याह सूर्य से किया था। फिर संज्ञा के ही अनुरोध पर बेडौल आैर अत्यन्त प्रखर सूर्य को सुन्दर आैर सुडौल बनाया था। सूर्य उस पूरी प्रक्रिया में होने वाले कष्ट को सह ना सके, आैर सूर्य के अनुरोध पर विश्वकर्मा ने उनके घुटने से नीचे के भाग को अपूज्य घोषित करके छोड़ दिया। इस तरह कहा जाए तो भारतीय परंपरा में सूर्य पूजा की जो परंपरा प्रतीकों से शुरू होती है वह बाद के वर्षों में मानवीय स्वरूप ग्रहण कर लेती है। महाभारत में सूर्य पुत्र कर्ण की कथा से हर भारतीय किसी ना किसी रूप में परिचित ही है।


    भारतीय कला में सूर्य की प्रतिमा शुंगकाल से मिलने लगती है। बौद्ध शिल्प में भी सूर्य का अंकन मिलता है। बोधगया के एक वेदिका स्तम्भ में चार घोड़ों द्वारा खींचे जा रहे रथ पर सवार सूर्य को दिखाया गया है। इस रथ पर कोई सारथी तो नहीं है लेकिन साथ में धनुष पर बाण चढाये ऊषा व प्रत्यूषा अवश्य हैं। दूसरा रथारूढ सूर्य उड़ीसा के अनन्त गुफा के द्वार पर मिलता है। लगभग इसी काल के भारतीय यूनानी राजाओं में प्लेटो आैर फिलोक्सीनास की मुद्राओं पर हेलिऑस या सूर्य अंकित दिखते हैं। यहां भी सूर्य चार घोड़ों के रथ पर सवार हैं। एक आैर समानता यह भी है कि इनमें से किसी में भी रथ के पहिए नहीं दिखाये गये हैं। दक्षिण भारत में भी इस काल में कुछ इसी तरह के सूर्य प्रतिमाओं का अंकन मिलता है। भाजा की गुफा में एक विशालकाय राक्षस को रौंदकर चलने वाले सूर्य रथ का अंकन किया गया है। इन सभी अंकनों में एक आैर साम्यता है कि सभी में सूर्य के पैरों का बड़ी ही कुशलता से छिपा दिया गया है। इतिहाकारों का मानना है कि कदाचित यूनानी हेलियस की देखादेखी भारतीय कलाकारों ने भी अपनी रुचि के अनुसार चार घोड़ों के रथवाले सूर्य को शुंगकाल में बनाना प्रारंभ कर दिया था। माना जाता है कि कुषाण काल आते आतेसूर्यप्रतिमाओं की संख्या बढ़ने लगी। मथुरा संग्रहालय में कुषाणकालीन आैर कुषाणोत्तर कालीन सूर्य प्रतिमाओं का एक बड़ा संग्रह है। कुषाणकाल की प्रारंभिक सूर्य मूर्तियों में सूर्य के दाहिने हाथ में कमल की कली है तथा बांयें हाथ में छुरी। इसी काल की दूसरी प्रकार की मूर्तियों में दोनों हाथों में कमल की अद्र्धविकसित कलियां हैै। गुप्तकाल में पहुंचते पहुंचते ये कमल पूर्ण विकसित हो जाते है आै बाद में सदैव के लिए सूर्य के स्थायी चिन्ह बन जाते हैं। तथा कुषाणकाल की छुरी तलवार में बदल जाती है आैर अब यह कमर में लटकने लगती है। इसे अग्निपुराण में खड़ग आैर कमलधारी सूर्य के रूप में बतलाया गया है।  

    सूर्य प्रतिमाओं के संबंध में एक आैर विचारणीय तथ्य है सूर्य के पैर में जूतों का होना। उत्तर भारत की सूर्य प्रतिमाएं ईरानी वेष में मिलती हैं जिनके पैरों में ऊंचे जूते भी रहते हैं। जबकि पूजा में जूतों का उपयोग मान्य नहीं है बल्कि इसका पूर्णत: निषेध रहता है। किन्तु इसके विपरीत ईरानी वेशभूषा में जूतों का सम्माननीय स्थान था। बृह्तसंहिता के अनुसार सूर्य मूर्ति पैर से जंघा तक गुप्त रहनी चाहिए। विष्णुधर्मोत्तरपुराण के अनुसार सूर्य को रथ में बैठा दिखलाना चाहिए। वहीं मत्स्यपुराण का कथन है कि सूर्य के चरण तेज या प्रकाश से आवृत होने चाहिए। वहीं महाभारत की एक कथा के अनुसार संसार में जूतों का प्रचलन सूर्य देवता के द्वारा ही हुआ। उन्होंने ही सर्वप्रथम ऋषि जमदग्नि के श्राप से बचने के लिए उनकी पत्नी रेणुका को जूते आैर छतरी दी, जिनकी सहायता से ऋषि पत्नी प्रखर धूप से अपने को बचा सकी।

                                                                                               ---------सुमन कुमार सिंह ​


    सन्दर्भ : विकिपीडिया 
      प्राचीन भारतीय मूर्तिविज्ञान : लेखक - नील पुरुषोत्तम जोशी 
    https://singhh63.blogspot.com/2018/03/blog-post.html













    INFORMATION ABOUT KETU GRAHA



    TEMPLE INFORMATION:
    TEMPLE NAME: KEERPERUDPALLAM KETU TEMPLE [KEEDIL (LOWER)]
    VILLAGE LOCATION: KEERPERUDPALLAM, TAMIL NADU 609105, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: NAGANATHAR SWAMY TEMPLE
    DEITIES: LORD SHIVA IS KNOWN AS SRI NAGANATHAR AND PARVATIJI IS KNOWN AS NAGAVALLI. 

    IN THIS PARTICULAR TEMPLE, ABHISHEK IS PERFORMED DAILY DURING RAHU KAAL.

    HOW TO REACH THE TEMPLE:
    IT IS SITUATED ON MAYILADUTHURAI – POOMPUHAR HIGHWAY.

    HISTORY OF KETU GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, THIS PLACE HAS GREAT IMPORTANCE. DURING SAMUDRA MANTHAN, THE GREAT CHURNING OF THE OCEAN, VASUKI NAG BECAME UNCONSCIOUS AND THE ASURAS CUT HIM INTO PIECES AND THREW HIM INTO THIS PLACE WHICH WAS A BAMBOO FOREST. DUE TO GRACE OF LORD SHIVA, HE BECAME ALIVE AGAIN. HE DID PENANCE AT THIS PLACE AND REQUESTED LORD SHIVA TO COME STAY AT THIS PLACE AND GRACE ANYONE WHO WORSHIPS HERE. THE SACRED TREE IS BAMBOO.

    KETU PURAN: WHEN RAHU AND KETU CAME TO LIFE (REFER PREVIOUS STORY ON RAHU), NOBODY WAS READY TO ACCEPT THEM. KETU WAS BROUGHT UP BY A BRAHMIN SO HE ACQUIRED GYAN (KNOWLEDGE/HIGHER LEARNING/WISDOM) FROM HIS FOSTER FATHER (BRAHMIN). HE DID PENANCE AT THIS PLACE AND ACQUIRED THE STATUS OF A GRAHAM (CELESTIAL BODY). KETU’S WIFE IS CHITRALEKHA. HIS SON IS AVAMRUT. THERE IS ONE MORE PLACE WHERE THERE IS KETU TEMPLE.

    TEERTH/ SACRED POND: THERE IS ONE TEERTH CALLED NAGA TEERTH. IT IS PRESUMED THAT IT WAS CREATED BY VASUKI. ON THE WESTERN SIDE OF THE TEERTH, THERE ARE A PIPAL AND A NEEM TREE CONJOINED TOGETHER. NAGA PUJA IS DONE AT THIS PLACE.

    IMPORTANCE OF KETU GRAHA - ASTROLOGICAL PERSPECTIVE:
    ACCORDING TO ASTROLOGY, KETU IS MOKSHAKARAK (HARBINGER[KARAK] OF LIBERATION[MOKSHA]).

    HE IS VERY POWERFUL (UCHCHA) IN VRISHCHIK RASHI/ ZODIAC (BY MOON BASED ASTROLOGY) AND POWERLESS (NEECH) IN RISHABH RASHI. MESH, KARKA, SIMHA, AND KUMBHA ARE HOUSE OF ENEMY. HE GIVES HIS BENEFITS IN THE HOUSE IN WHICH HE STAYS (AS HE HAS NO HOUSE OF HIS OWN). KETU IS FRIENDLY WITH SHUKRA. SURYA, CHANDRA AND MANGALA ARE HIS ENEMIES. KETU MAHADASHA IS FOR 7 YEARS.

    HIS ADHIDEVATA (PRESIDING LORD) IS CHITRAGUPTA AND PRATYADHIDEVATA IS GANAPATI. HIS VAHAN/MOUNT IS VULTURE/ FROG.

    HE IS RESPONSIBLE FOR SUDDEN WEALTH, HIDDEN WEALTH, ASSOCIATED WITH CRIMINAL INVOLVEMENT.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM KETU DOSHA:
    ON EVERY CHATURTHI, WORSHIP LORD GANESHA BY PERFORMING ABHISHEK WITH DURVA (SACRED GRASS). KETU’S CEREAL IS URAD DAL AND FAVORED CLOTH IS PRINTED CLOTH. GIVING ALMS OF COCONUT, COOKED RICE AND FRUITS TO SAINTS (NOT BEGGARS) ALSO LEADS TO KETU DOSHA NIVRITTI (ABSOLUTION).


    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – KETU:
    #
    NAVAGRAHA ASPECT
    KETU
    1
    CONSORT
    CHITRALEKHA
    2
    CLOTH COLOR
    MULTI- COLORED FLOWER DESIGN
    3
    GENDER
    MALE
    4
    ELEMENT
    EARTH
    5
    GOD
    GANESH
    6
    MOUNTS
    VULTURE/ FROG
    7
    PRESIDING DEITY
    CHITRAGUPTA
    8
    METAL
    MERCURY
    9
    GEMSTONE
    CAT'S EYE
    10
    BODY PART
    SKIN
    11
    TASTE
    SOUR
    12
    GRAIN
    HORSE GRAM
    13
    SEASON
    AUTUMN
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    CENTER EAST
    15
    FLOWER
    RED LILY
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    BAMBOO
    17
    WEEK DAY
    TUESDAY AND SUNDAY
    18
    SOUND
    -


    RANGOLI FOR KETU GRAHA:
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING KETU GOD



    MANTRA FOR KETU GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR KETU GOD. 


     Navagraha temples - Rahu

    INFORMATION ABOUT RAHU GRAHA




    TEMPLE INFORMATION:
    TEMPLE NAME: THIRUNAGESHWARAM TEMPLE
    VILLAGE LOCATION: THIRUNAGESHWARAM, TAMIL NADU 614014, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: SRI SHENBAGA* ARANYESHWARA TEMPLE
    DEITIES: LORD SHIVA IS KNOWN AS SHENBAGA ARANYESHWARA AND HIS CONSORT PARVATI AS SRI GIRI GUJAMBIKA.
    * SHENBAGA = HIBISCUS. 
    NOTE: A NAG BEARS SIGN AND CAN FORM A HOOD BUT A SARP NEITHER HAS A SIGN NOR CAN FORM A HOOD. THE MILK OFFERED TO THE DEITY (POURED OVER) TURNS BLUISH AFTER FLOWING OVER THE DEITY.

    HOW TO REACH THE TEMPLE:
    THE TEMPLE IS ABOUT 6 KMS TO THE EAST FROM KUMBHAKONAM.

    HISTORY OF RAHU GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, THE SERPENT KING (NAGRAJ) FROM PATAL (PATAL LOK), ON ONE SHIVARATRI DAY, SELECTED FOUR FORESTS IN KUMBHAKONAM TO PERFORM PUJA IN FOUR PRAHARS (SEGMENTS) OF THE NIGHT (RATRI): 1. BILWA FOREST 2. HIBISCUS FOREST 3. VANNI FOREST 4. NAGAPATANAM. NAGRAJ CONSTRUCTED TEMPLES IN EACH OF THESE FOUR PLACES AND WORSHIPED LORD SHIVA THERE. ACCORDING TO MYTHOLOGY, GANAPATI, NANDI, BRAHMA, SUN-GOD, VASHISHTHA MUNI AND INDRA ALSO WORSHIPED LORD SHIVA HERE. IT IS ALSO SAID THAT GAUTAM MUNI GOT HIS WIFE BACK AFTER PERFORMING WORSHIP HERE. PANDAVAS ALSO VISITED THIS PLACE DURING ADNYATWAS (PERIOD IN WHICH THEY WERE TO BE INCOGNITO).

    HISTORY OF RAHU GRAHA:
    BECAUSE RAHU WORSHIPED HERE, AND AS THIS PLACE WAS CREATED BY SERPENT KING, THIS PLACE IS CONSIDERED TO BE THE PLACE WHERE RAHU DOSH CAN BE GOT RID OFF. NAGARAJ AND RAHU NOT ONLY GOT THE BENEFIT BY PRAYER/ WORSHIP OVER HERE, THEY ALSO GOT A BOON FROM THE LORD (SHIVA) THAT THOSE WHO WORSHIP THEM IN THIS PLACE WILL GET RID OF ALL DOSHAS (ALL MALEFIC EFFECTS OF ALL GRAHAMS).

    IT IS BELIEVED THAT ON SUNDAY, DURING RAHUKAL, I.E. BETWEEN 4:30 PM TO 6:00 PM, IF ONE DOES ABHISHEK WITH MILK, ONE CAN GET COMPLETE RELIEF FROM THE MALEFIC EFFECTS OF RAHU, KETU AND SARPDOSH.

    KASHYAP MUNI HAD A DAUGHTER FROM HIS SECOND WIFE. THE DAUGHTER SIMHIKA WAS A DEVIL. FROM HIS FIFTH WIFE, KASHYAP MUNI HAD A SON VIPRAJEET WHO WAS A DEMON. SIMHIKA AND VIPRAJEET MARRIED AND HAD A SON CALLED SWARABHANU.

    DURING THE TIME OF SAMUDRA MANTHAN, THE GREAT CHURNING OF THE OCEAN, VASUKI NAG WAS USED AS ROPE FOR CHURNING AND THE MOUNTAIN MANDAR WAS USED AS THE CHURNER. TO PACIFY THE DEVAS/ SUR AND DANAVAS/ ASUR WHEN THEY STARTED FIGHTING OVER THE YIELD OF AMRUTAM, LORD VISHNU TOOK THE FORM OF MOHINI, TOOK THE POT OF AMRUTAM AND MADE THEM SIT IN TWO SEPARATE ROWS. THEN SHE (MOHINI) COMMENCED THE DISTRIBUTION OF AMRUTAM STARTING WITH THE DEVAS. SWARABHANU SNEAKED IN WITH THE DEVAS AND HAD A HELPING OF AMRUTAM. WHEN SURYA CAME TO KNOW ABOUT THIS, HE COMPLAINED TO MOHINI (LORD VISHNU). MOHINI (LORD VISHNU) SEVERED THE HEAD OF SWARABHANU WITH THE LADLE. BECAUSE SWARABHANU HAD ALREADY PARTAKEN THE AMRUTAM, HE DID NOT DIE. HIS FACE REMAINED ALIVE AND THE BOTTOM GREW LIKE SERPENT BODY, BLACK IN COLOR – RAHU.  THE BODY OF SWARABHANU (DECAPITATED BODY) DEVELOPED A FIVE HEADED SERPENT (NAG) HEAD – KETU.

    RAHU AND KETU ASKED FOR FORGIVENESS FROM BRAHMA AND VISHNU. THEY DID PENANCE, OBTAINED GYAN (KNOWLEDGE) SO THAT THEY COULD GIVE MOKSHA (LIBERATION) TO OTHERS.

    RAHU HAS TWO WIVES – NAGAVALLI AND NAGAKANNI. HE HAS A SON.

    IMPORTANCE OF RAHU GRAHA:
    RAHU AND KETU DO NOT HAVE ANY HOUSE OF THEIR OWN IN THE HOROSCOPE. RAHU IS THE OWNER IN ARIES AND SCORPIO, EXALTED IN TAURUS AND DEBILITATED IN SAGITTARIUS. HE GIVES PROSPERITY, WEALTH, POSITIONS. ADVERSE EFFECTS – GIVES ARROGANCE AND JEALOUSY. RESPONSIBLE FOR FEVER, LEPROSY AND RESTLESSNESS.

    RAHU MAHADASHA IS FOR 19 YEARS. ACCORDING TO SOME THEORY IT IS ON AN AVERAGE OF 18 YEARS.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM RAHU DOSHA:
    THE ONLY PLACE WHERE RAHU HAS A TEMPLE ALONG WITH HIS WIFE IS AT THIRUNAGESHWARAM (THIS PLACE). HENCE, ACCORDING TO SPIRITUAL BELIEF: 1. HE HAS THE POWER OF CURING/REMOVING RAHUDOSH IF ONE DOES ABHISHEK WITH MILK AND PUJA AND ARCHANA IN THIS PLACE. 2. ONE MORE BELIEF IS, IF A PERSON LIGHTS A LAMP WITH GHEE IN A LEMON SHELL AND WORSHIPS GODDESS DURGA (RAHU’S PRESIDING DEITY) FOR ELEVEN WEEKS, IT WILL ELIMINATE RAHUDOSH. 3. PLACE BLACK COLOR CLOTH AND URAD DAL IN FRONT OF RAHU IDOL. ONE CAN USE A BLUE COLOR CLOTH ALSO.

    NOTE: IT IS A BELIEF THAT DURING RAHUKAL, GIVEN BELOW, NO AUSPICIOUS ACT SHOULD BE DONE. 

    SUNDAY 4:30 PM TO 6:00 PM, MONDAY 7:30 AM TO 9:00 AM, TUESDAY 3:00 PM TO 4:30 PM, WEDNESDAY 12:00 NOON TO 1:30 PM, THURSDAY 1:30 PM TO 3:00 PM, FRIDAY 10:30 AM TO 12:00 NOON, SATURDAY 9:00 AM TO 10:30 AM.



    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – RAHU:

    #
    NAVAGRAHA ASPECT
    RAHU
    1
    CONSORT
    NAGAVALLI AND NAGAKANNI
    2
    CLOTH COLOR
    BLACK/ BLUE
    3
    GENDER

    4
    ELEMENT
    AIR
    5
    GOD
    NIRRATI
    6
    MOUNTS
    BLUE/ BLACK LION
    7
    PRESIDING DEITY
    DURGA
    8
    METAL
    BLUE METAL (BASALT, BROKEN PIECES OF BLACK ROCK)
    9
    GEMSTONE
    GOMEDHA (GOMED)/ HONEY- COLORED HESSONIT E
    10
    BODY PART
    HEAD
    11
    TASTE
    -
    12
    GRAIN
    BLACK GRAM
    13
    SEASON
    -
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    SOUTH
    15
    FLOWER
    WHITE MANDARA-RUI
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    1. BEL/ BILWA/ AEGLE MARMELOS/ WOOD APPLE 2. CHAMPAK 3. SHAMI (VANNI) 4. PUNNAI TEMPLE TREE (ALEXANDRIAN LAUREL TREE)
    17
    WEEK DAY
    -
    18
    SOUND
    -


    RANGOLI FOR RAHU GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING RAHU GOD



    MANTRA FOR RAHU GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR RAHU GOD. 


     Navagraha temples - Shani

    INFORMATION ABOUT SHANI (SATURN) GRAHA





    TEMPLE INFORMATION:
    TEMPLE NAME: THIRUNALLAR SHANI TEMPLE
    VILLAGE LOCATION: THIRUNALLAR, TAMIL NADU 609607, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: DARBHARANYESHWARA (DARBHA + ARANYA + ISHWARA)
    DEITIES: SANESHWARAN AND SRI BHOGA MARTA POON MULAIYAL


    HOW TO REACH THE TEMPLE:
    IT IS ON THE HIGHWAY BETWEEN KUMBHAKONAM AND KARAIKAL. THE TEMPLE IS 25 KMS FROM NAGAPATTINAM BY ROAD.


    HISTORY OF SHANI GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, BRAHMA, AFTER HAVING CREATED THE WORLD, WENT AROUND TO TOUR IT. WHEN HE CAME TO THIS FOREST (ARANYA) FULL OF DURBHA, HE WAS ENCHANTED BY ITS BEAUTY AND PERFORMED A PENANCE AND WORSHIPED A SWAYAMBHU*1 SHIVA LINGAM*2.

    THE LORD APPEARED AND EXPLAINED TO BRAHMA THE INNER MEANING OF VEDAS AND TAUGHT HIM OTHER SHASTRAS. BRAHMA STAYED IN THIS PLACE FOR A LONG TIME WORSHIPING SHIVA-PARVATI AND BUILT TEMPLES FOR THEM. BRAHMA CREATED BRAHMA TEERTH AND SARASWATI CREATED VANI TEERTH. INDRA, ASHTADIKPAL (EIGHT DIRECTIONS) AND THE SACRED SWAN (HANSA) ESTABLISHED THEIR OWN SHIVA LINGAM AND WORSHIPPED.

    NOMENCLATURE: BECAUSE BRAHMA WORSHIPPED AT THIS PLACE LONG AGO, THE PLACE IS KNOWN AS AADIPURI (AADI = BEGINNING, PURI = CITY). AS, THE SACRED GRASS DURBHA (NOT DURVA USED IN GANESH PUJA) WAS ABUNDANT, THIS PLACE WAS CALLED DURBHAARANYAM. BECAUSE NALA HAD ALSO WORSHIPPED HERE, THE PLACE USED TO BE CALLED NALLAR AND SHIVA HERE CALLED NALLESHWARA.

    *1 SWAYAMBHU: NOT CREATED BY HUMAN HAND OR TOUCHED BY CHISEL; SWAYAM = SELF AND BHU = BE, SWAYAMBHU = BE BY SELF.

    *2 SHIVA LINGAM WORSHIP
    SHIVA = COSMIC REALITY (FORM) CREATED BY AADIPARASHAKTI (AADI = BEGINNING, PARA = BEYOND AND SHAKTI = ENERGY) IE PARAVATI. AADIPARASHAKTI = ENERGY BEYOND BEGINNING (OF MATTER), THE ESSENCE/ TRUTH (STATE OF NO MATTER, ONLY ENERGY). ENERGY, IN AND OF ITSELF CANNOT BE PERCEIVED WITHOUT A FORM. THEREFORE AADIPARASHAKTI CREATED COSMIC REALITY TO MANIFEST ITSELF. 
    LINGAM = LEEN (BECOME ONE WITH) + GAMYA (NAVIGABLE), LINGAM = TO NAVIGATE AND BECOME ONE WITH. THUS SHIVA/ SHIVA LINGAM WORSHIP IS A WAY OF BECOMING ONE WITH THE COSMIC REALITY/ AADIPARASHAKTI (TRUTH). SHIVA, BY HIMSELF CANNOT DO ANYTHING WITHOUT AADIPARASHAKTI. SAME IS TRUE FOR AADIPARASHAKTI. THEREFORE, THE ARDHANARIISHWARA MANIFESTATION (ADVAITA IN THE DWAITA) IS THE (FUNDAMENTAL/ ETERNAL) TRUTH.

    HISTORY OF SHANI GRAHA:

    SUN HAD ONE WIFE CALLED SANCHIKA (USHA DEVI). HE HAD TWO SONS FROM HER, NAMELY VAIVASTAMADHU AND YAMA AND A DAUGHTER NAMED YAMUNA. BECAUSE SANCHIKA COULD NOT BEAR THE HEAT OF THE SUN, SHE MADE CHHAYA DEVI FROM HER SHADOW AND ASKED HER TO STAY WITH SUN-GOD AND SHE WENT TO HER FATHER’S PLACE. THE FATHER REPRIMANDED HER AND ASKED HER TO GO BACK TO HER HUSBAND. BECAUSE OF FEAR OF HER HUSBAND, SHE WENT TO NORTH POLE AND STARTED DOING PENANCE IN THE FORM OF A HORSE (MARE). CHHAYA DEVI BORE TWO SONS, NAMELY SAVARNI (MANU) AND SHANI AND A DAUGHTER, NAMELY BHADRA.

    CHHAYA DEVI USED TO TROUBLE YAMA, SON OF THE FIRST WIFE SANCHIKA. YAMA KICKED CHHAYA DEVI AND SHE CURSED HIM TO BECOME LAME. WHEN SUN-GOD CAME TO KNOW OF THIS, HE CURED YAMA’S LAMENESS; HE CAME TO KNOW ABOUT THE STORY ABOUT CHHAYA AND SANCHIKA; HE WENT TO NORTH POLE TO BRING BACK SANCHIKA (THEREFORE SURYA DEVA IS UTTARAYANA HERE) AND UPON RETURN LIVED WITH TWO WIVES.

    BECAUSE OF THE ANGER OF YAMA (STEMMING FROM THE TREATMENT FROM CHHAYA DEVI), YAMA KICKED HER SON SHANI AND THEREBY SHANI BECAME LAME. SUN-GOD GRANTED A BOON TO SHANI TO BECOME A GRAHAM. SHANI WENT TO KASHI AND PERFORMED PENANCE TO ATTAIN STRENGTH.


    IMPORTANCE OF SHANI GRAHA:
    HE IS THE LORD OF MAKAR (CAPRICORN) AND KUMBH (AQUARIES) RASHI/ ZODIAC, BY MOON (SUN) BASED ASTROLOGY. HE IS EXALTED  IN TULA (LIBRA)  AND NEECH IN MESH (ARIES).

    HE DECIDES LIFE SPAN. HE IS RESPONSIBLE FOR AN INDIVIDUAL’S SERVICE, FEAR FROM DISGRACE AND DISRESPECT, COVETING SLEEP AND KILLING OF LIVING BEINGS. HE CONTROLS NERVES, SKIN, HAIR, NAILS INTESTINE, TEETH AND JOINTS.

    HE OVERSEES 3RD, 7TH, AND 10TH HOUSES. WHEN HE IS IN 12TH, 1ST, AND 2ND OF CHANDRA RASHI (I.E. WHERE MOON IS PLACED), THE PERIOD IS KNOWN AS SAADESAATI. IT LASTS FOR 7.5 YEARS. HE STAYS IN EACH RASHI FOR 2.5 YEARS.

    SHANI MAHADASHA IS FOR 19 YEARS.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM SHANI DOSHA:

    IT IS THROUGH SHANI UPASANA WHICH ONE CAN DO BY ONE AND/OR ALL OF THE FOLLOWING WAYS:
    1) WORSHIP HANUMAN
    2) RECITE HANUMAN STOTRA
    3) RECITE SHANI STOTRA
    4) READ SHANI MAHATMYA ON SATURDAYS
    5) FAST ON SATURDAYS (AVOID TAKING SALT ON SATURDAY)
    6) PERFORM SHANI MANTRA JAAP
    7) DONATE BLACK TIL (SESAME SEED), BLACK CLOTH, A PIECE OF NAIL (IRON), A BLUE FLOWER (BLUE GOKARNA FLOWER) AND LIGHT A LAMP WITH A PIECE OF BLACK CLOTH AS WICK AND USING TIL OR SESAME OIL IN A TEMPLE.

    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – SHANI (SATURN):



    #
    NAVAGRAHA ASPECT
    SATURN
    1
    CONSORT
    NEELA DEVI
    2
    CLOTH COLOR
    BLACK/ BLUE
    3
    GENDER
    NEUTRAL
    4
    ELEMENT
    AIR
    5
    GOD
    BRAHMA
    6
    MOUNTS
    CROW (RAVEN)
    7
    PRESIDING DEITY
    YAMA
    8
    METAL
    IRON
    9
    GEMSTONE
    BLUE SAPPHIRE
    10
    BODY PART
    MUSCLES
    11
    TASTE
    ASTRINGENT
    12
    GRAIN
    BLACK SEASAME
    13
    SEASON
    ALL SEASONS
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    WEST
    15
    FLOWER
    BLUE GOKARNA
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    DURBHA/ KUSHA GRASS
    17
    WEEK DAY
    SATURDAY
    18
    SOUND
    PA



    RANGOLI FOR SHANI GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING SATURN GOD



    MANTRA FOR SHANI GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR SATURN GOD. 


     Pradakshina

    CIRCUMAMBULATION OF A TEMPLE OR IDOL OR MOUNTAIN IS CALLED AS PRADAKSHINA. WHEN IT IS DONE AROUND A TEMPLE, SITUATED ON A MOUNTAIN, IT IS KNOWN AS GIRI-PRADAKSHINA OR GIRI-VALAM. PERFORMING PRADAKSHINA IS CONSIDERED TO BE BENEFICIAL AND CULMINATION OF A WORSHIP OR A RITUAL. IN PURAN WE COME ACROSS, THE GREATNESS OF PRADAKSHINA WHEN LORD GANESHA WENT AROUND THE PARENTS I.E. PERFORMED A PRADAKSHINA AND GOT HIGHEST BENEFIT. THIS CAN ALSO BE CONSIDERED AS A GIRI-VALAM AS THE PARENTS WERE SEATED IN MOUNT KAILASH.

    TYPICALLY THE PRADAKSHINA IS DONE BEAR FEET. GENERALLY THE GIRI-VALAM IS DONE WITH HILL ON THE RIGHT SIDE. I.E. CLOCKWISE. SHRI RAMAN MAHARSHI EXPLAINED THE MEANING OF PRADAKSHINA IN FOLLOWING MANNER. "PRA" - STANDS FOR REMOVAL OF ALL KINDS OF SINS,  "DA" – STANDS FOR FULFILLING THE DESIRES OF A PERSON, "KSI" – STANDS FOR FREEDOM FROM FUTURE BIRTHS, "NA" – STANDS FOR GIVING DELIVERANCE THROUGH GYANA.

    THE FOLLOWING BENEFITS WERE ENUMERATED BY SHRI RAMAN MAHARSHI.

    BY WALKING ONE STEP IN PRADAKSHINA, ONE GETS HAPPINESS IN THE WORLD. BY WALKING TWO STEPS, GIVES HAPPINESS IN HEAVEN. WALKING THREE STEPS GIVES, BLISS OF SATYALOKA WHICH CAN BE ATTAINED.

    IT IS STATED IN PURANS THAT DOING PRADAKSHINA IN CERTAIN SHIVA TEMPLES IN SOUTH INDIA GIVES BENEFITS MORE THAN THAT OF PERFORMING ASHWAMEDHA YADNYAS.

    ONE SHOULD GO AROUND IN SILENCE (MAUNA) OR MEDITATION (DHYAN) OR JAPA (NAAMSMARAN) OR DOING BHAJAN. THIS MAKES US THINK OF THE LORD ALL TIMES. IT IS STATED ONCE SHOULD WALK SLOWLY LIKE A WOMAN IN NINTH MONTH OF PREGNANCY.

    PEOPLE PERFORM GIRI-VALAM AT GIRNAAR IN GUJRAAT, ARUNACHALA MOUNTAIN AT TIRUVANNAMALAI AND AT A NUMBER OF OTHER PLACES LIKE HARHARISHWAR AND GANAPATIPULE IN MAHARASHTRA, SHRISAILAM IN ANDHRA PRADESH AND PAKSHITIRTHA (TIRUPARMKUNDRAM) IN TAMIL NADU.


    INFORMATION ABOUT SHUKRA (VENUS) GRAHA




    TEMPLE INFORMATION:
    TEMPLE NAME: KANJANUR SHUKRA TEMPLE
    VILLAGE LOCATION: KANJANUR, TAMIL NADU 609804, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: SHREEAGNIPURISHWARA TEMPLE
    DEITIES: LORD SHIVA IS KNOWN AS SHREEAGNIPURISHWARA (SHREE + AGNI + PURI + ISHAWARA) AND CONSORT PARVATI AS SHREEKARPAGAMAMBAL (SHREE + KARPAGAM + AMBAL)


    HOW TO REACH THE TEMPLE:
    IT IS ON THE HIGHWAY BETWEEN KUMBHAKONAM AND MAYILADUTHURAI. THE TEMPLE IS 17 KMS FROM KUMBHAKONAM AND ABOUT 3 KMS FROM SURYANAR KOVIL BY ROAD.


    HISTORY OF SHUKRA GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, SHUKRA (SHUKRACHARYA) WAS GURU OF DEMONS AND HAD SANJEEVANI MANTRA BY WHICH HE WOULD BRING TO LIFE DEMON WHO HAD DIED IN FIGHT.

    ONCE, BRAHMA PERFORMED PENANCE AT THIS PLACE TO SEE SHIVAPARVATI IN THEIR WEDDING ATTIRE AND FOR OTHERS TO WITNESS THE GLORIOUS VISION TOO. BECAUSE OF THIS, THE SHIVA TEMPLE IS TO THE RIGHT AND PARVATI TEMPLE IS TO THE LEFT.

    LOCAL FOLKLORE HAS IT THAT SUGARCANE AND HONEY WERE PLENTIFUL HERE – RIVER OF HONEY – THEREFORE THE NAME KANJANUR. IT IS FURTHER BELIEVED THAT AADIPARASHAKTI (PARVATI) CREATED THE TRIMURTIS (BRAHMA, VISHNU AND MAHESH) AT THIS PLACE.

    ACCORDING TO HISTORY, CHANDRA (MOON), PARASHAR MUNI, KANSA (LORD KRISHNA’S MATERNAL UNCLE) HAD WORSHIPPED LORD SHIVA HERE. HENCE, THERE ARE THREE SEPARATE SHIVA-LINGAMS PRESENT HERE.

    THERE ARE THREE PUNYA-TEERTH OR SACRED PONDS HERE – 1.BRAHMA TEERTH CREATED BY BRAHMA, 2. AGNI TEERTH CREATED BY AGNI AND 3. PARASH TEERTH CREATED BY PARASHAR MUNI. RIVER CAUVERY RUNS NEARBY AND IT IS ALSO CONSIDERED A TEERTH.

    HISTORY OF SHUKRA GRAHA:
    ACCORDING TO SCRIPTURES, SHUKRA IS SON OF BHRIGU RISHI AND HIS WIFE PULOMISHA. WHEN SHUKRACHARYA WAS PERFORMING PENANCE TO GET SANJEEVANI MATRA, INDRA’S DAUGHTER JAYANTI PERFORMED SEVA (SERVICE) TO SHUKRACHARYA. AFTER THE BIRTH OF THEIR DAUGHTER DEVAYANI, JAYANTI WENT BACK TO DEVALOK.

    SHUKRA GOT HIS NAME BECAUSE OF HIS (SILVER) LIGHT COMPLEXION. SHUKRACHARYA HAD OBTAINED THE SANJEEVANI MANTRA FROM LORD SHIVA BY WHICH HE COULD BRING TO LIFE THE DEAD DEMONS. BRIHASPATI (GURU OF DEVAS) SENT HIS SON KACHA TO LEARN THE SANJEEVANI MANTRA FROM SHUKRACHARYA. KACHA SERVED SHUKRACHARYA WITH ALL HIS MIGHT AND WON OVER THE HEARTS OF SHUKRACHARYA AND HIS DAUGHTER DEVAYANI. BECAUSE OF THIS, THE DEMONS KILLED KACHA AND MIXED HIS ASHES IN WATER AND GAVE IT TO SHUKRACHARYA TO DRINK. BECAUSE OF DEVAYANI’S INSISTENCE, SHUKRACHARYA GOT KACHA OUT OF HIS STOMACH. IN THE PROCESS, THE SANJEEVANI MANTRA LOST ITS POWER.

    SHUKRACHARYA HAD THREE WIVES, ONE SON AND TWO DAUGHTERS. HE WROTE A BOOK (IN SANSKRIT/ NORTH-INDIAN LANGUAGE) ON LAW KNOWN AS SHUKRA NEETI.

    SHUKRACHARYA WENT TO KASHI, PERFORMED PENANCE AND GOT A BOON TO BECOME A GRAHAM (CELESTIAL BODY).

    IMPORTANCE OF SHUKRA GRAHA:
    SHUKRA IS A SHUBHA GRAHAM. HE IS THE LORD OF RISHABH AND TULA RASHI/ ZODIAC (BY MOON BASED ASTROLOGY). HE IS VERY POWERFUL IN MEEN AND KANYA RASHI/ ZODIAC. IN RIGVEDA, HE IS KNOWN AS GOD VENA. GENERALLY SHUKRA MAHADASHA COMES ONLY ONCE IN LIFE AND IS FOR 20 YEARS. SHUKRA IS RESPONSIBLE FOR MARRIAGE. SHUKRA’S GRACE CAN REMOVE INFERTILITY. HIS BENEFITS CAN BE FELT IN THE MONTHS OF NOVEMBER, DECEMBER, MARCH AND APRIL AND ALSO WHEN HE IS IN RISHABH, TULA AND MEEN RASHI.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM SHUKRA DOSHA:
    DEVIUPASANA IS ADVISED (PRAYER/WORSHIP OF GAJALAKSHMI AND/OR RAJRAJESHWARI). ALSO PARAYANA (REGULAR READING) OF DEVIMAHATAMYA. FASTING ON FRIDAY AND WEARING OF WHITE CLOTHES, USE OF WHITE COLOR LOTUS FLOWER AND WHITE CLOTH IN PUJA IS ALSO ADVISED.

    THE SACRED TREE IS PIPUL/ PIMPLA.

    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – SHUKRA (VENUS):


    #
    NAVAGRAHA ASPECT
    VENUS
    1
    CONSORT
    SUKIRTI AND URJASWATI
    2
    CLOTH COLOR
    WHITE
    3
    GENDER
    FEMALE
    4
    ELEMENT
    WATER
    5
    GOD
    INDRANI
    6
    MOUNTS
    HORSE/ CAMEL/ CROCODILE
    7
    PRESIDING DEITY
    MAHALAKS HMI
    8
    METAL
    SILVER
    9
    GEMSTONE
    DIAMOND
    10
    BODY PART
    SEMEN
    11
    TASTE
    SOUR
    12
    GRAIN
    FLAT WHITE BEANS/ LIMA BEANS
    13
    SEASON
    SPRING
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    EAST
    15
    FLOWER
    WHITE LOTUS
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    PIPUL
    17
    WEEK DAY
    FRIDAY
    18
    SOUND
    NI



    RANGOLI FOR SHUKRA GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING VENUS GOD



    MANTRA FOR SHUKRA GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR VENUS GOD. 


     Navagraha temples - Guru

    INFORMATION ABOUT GURU (JUPITER) GRAHA




    TEMPLE INFORMATION:
    TEMPLE NAME: APATSAHAYESVARAR TEMPLE, ALANGUDI
    DEITY AT PLACE: SRI APATSAHAYESWARAR
    GODDESS: ELAVARKUZHALI AMMAI OR UMAYAMMAI
    GANAPATI: KAATHA VINAYAKAR
    VILLAGE LOCATION: ALANGUDI, TAMIL NADU 612801, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: APATSAHAYESVARAR TEMPLE, ALANGUDI
    OTHER DEITIES: 1. RAVI/ SUN, 2. SAPTA LINGA 3. MURUGAN, 4. LAKSHMI, 5. NAVAGRAHA, 6. KAAL BHAIRAVA AND 7. GURU DAKSHINAMOORTHY (MAIN IDOL)


    HOW TO REACH THE TEMPLE:
    IT IS ON THE KUMBHAKONAM – NEEDAMANGALAM HIGHWAY, ABOUT 17 KMS SOUTH OF KUMBHAKONAM.


    HISTORY OF GURU GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES:

    1. ONCE WHEN GODDESS PARVATI WAS PLAYING WITH A BALL MADE OF FLOWERS AND HAD THROWN IT UP, AND HAD RAISED HER HANDS TO CATCH IT, THE SUN-GOD WHO WAS PASSING BY, MISTOOK THE RAISED HANDS AS A SIGNAL TO STOP AND HE STOPPED OUT OF REVERENCE. SUN’S STOPPING, HOWEVER BRIEF, WAS A CAUSE FOR GREAT TURMOIL FOR ALL IN THE UNIVERSE (SUN IS IN CONSTANT RELATIVE MOTION WITH EARTH). WHEN LORD SHIVA CAME TO KNOW OF THIS INADVERTENT FOLLY, HE ASKED PARVATI TO TAKE BIRTH AND SHE FOLLOWED.

    THIS TEMPLE IS WHERE GODDESS PARVATI DID HER PENANCE TO PLEASE LORD SHIVA AND EVENTUALLY REMARRIED WITH HIM. DURING THIS MARRIAGE, ALL GODS WERE PRESENT – GANESH, MURUGAN ETC. THIS
    TEMPLE, CREATED BY PARVATI, WAS KNOWN AS KASHIARANYA AND THE PLACE CONSIDERED EQUIVALENT TO KASHI.

    2. LORD SHIVA DRANK THE POISON THAT (ALAM) CAME OUT DURING THE CHURNING OF THE OCEAN BY THE SURAS (GODS) AND ASURAS (DEMONS). IT IS BELIEVED THAT THIS IS THE PLACE WHERE PARVATI HAD PRESSED HER HAND ON LORD SHIVA’S THROAT TO STOP THE FLOW OF POISON. THAT IS WHY THIS PLACE IS KNOWN AS ALANGUDI (IN TAMIL, ALAM = POISON AND KUDI = DRINK).

    3. A DEMON NAMED GAJAMUKHA WAS TROUBLING PEOPLE AND GODS. LORD SHIVA SENT HIS SON GANAPATI TO PUNISH HIM. THEREFORE, THERE IS A GANAPATI TEMPLE HERE AND GANAPATI IS KNOWN AS KAATHA VINAYAKAR (KAATHA = PROTECTOR, VINAYAK = GANAPATI AND AAKAR = FORM).
    INSIDE THE TEMPLE COMPOUND THERE ARE TEMPLES FOR 1. RAVI/ SUN, 2. SAPTA LINGA 3. MURUGAN, 4. LAKSHMI, 5. NAVAGRAHA, 6. KAAL BHAIRAVA AND 7. GURU DAKSHINAMOORTHY (MAIN IDOL) WHICH IS
    CONSIDERED TO BE THE GURU. THERE IS NO SEPARATE IDOL FOR GURU. HERE THEY LIGHT 28 LAMPS WITH GHEE. THE SACRED TREE HERE IS POOLAI SHRUB.
    PUNYA TEERTH (SACRED PONDS): IT IS SAID THAT THERE WERE 15 SACRED PONDS AROUND THE TEMPLE. CURRENTLY, ONLY A FEW ARE IN EXISTENCE. SOME 9 PONDS ARE IN THE VILLAGES SURROUNDING THE TEMPLE. ALL NAVAGRAHA GOT THEIR PAAPAVIMOCHAN, THEIR ABSOLUTION THROUGH THEIR PENANCE. PILGRIMS STAY AT A PLACE CALLED SWAMI MALAI (SWAMI = GOD AND MALAI = HILL).

    THE TEMPLE IS CONTROLLED BY THE TAMIL NADU ENDOWMENT TRUST. IT IS VERY WELL MAINTAINED.

    IMPORTANCE OF GURU GRAHA:
    HE GIVES PROSPECTS, PEACE, PROGRESS AND HEALTH. HE RULES OVER HIGHER LEARNING, INTELLIGENCE, SPIRITUALITY AND LONG DISTANCE TRAVEL. IT TAKES 12 YEARS FOR HIM TO COMPLETE ONE CYCLE. GURU MAHADASHA IS FOR 16 YEARS. HE IS THE LORD OF DHANU AND MEEN RASHI/ ZODIAC (BY MOON BASED ASTROLOGY). BY SUN BASED ASTROLOGY, ITS SAGITTARIUS AND PISCES ZODIAC. HE IS UCHCHA (EXALTED) IN KARKA (CANCER) AND NEECH (IN RECESSION) IN MAKAR (CAPRICORN).

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM GURU DOSHA:

    THE FOLLOWING REMEDIES ARE RECOMMENDED – FASTING ON THURSDAYS; DONATING TURMERIC, GUR, GRAM DAL, PALE YELLOW CLOTH AND COPPER ON THURSDAYS; CHANTING THE MANTRA OF GURU ON THURSDAYS.

    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – GURU (JUPITER):


    #
    NAVAGRAHA ASPECT
    JUPITER
    1
    CONSORT
    TARA
    2
    CLOTH COLOR
    YELLOW/ GOLD
    3
    GENDER
    MALE
    4
    ELEMENT
    SKY/ ETHER
    5
    GOD
    INDRA/ BRAHMA
    6
    MOUNTS
    ELEPHANT
    7
    PRESIDING DEITY
    DAKSHINAMOORTHY
    8
    METAL
    GOLD
    9
    GEMSTONE
    YELLOW SAPPHIRE
    10
    BODY PART
    BRAIN
    11
    TASTE
    SWEET
    12
    GRAIN
    BENGAL GRAM
    13
    SEASON
    WINTER
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    NORTH
    15
    FLOWER
    JASMINE/ JAI-JUI
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    ALSTONIA SCHOLARIS/ INDIAN PULAI/ DEVIL TREE/ MILKY PINE
    17
    WEEK DAY
    THURSDAY
    18
    SOUND
    DHA



    RANGOLI FOR GURU GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING JUPITER GOD



    MANTRA FOR GURU GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR JUPITER GOD. 



     Navagraha temples - Budha

    INFORMATION ABOUT BUDHA (MERCURY) GRAHA




    TEMPLE INFORMATION:

    TEMPLE NAME: THIRUVENKADU BUDHA TEMPLE
    DEITIES AT PLACE (STHALA DEVATA): LORD SHIVA AS SHWETHARANYESHWARA (SHWETHA + ARANYA + ISHWARA)  AND CONSORT PARVATI AS SHREEBRAHMAVIDHYAMBIKA (SHREE + BRAHMAVIDHYA + AMBIKA)
    GRAHA NAME: BUDHAN
    VILLAGE LOCATION: THIRUVENKADU, TAMIL NADU 609114, INDIA

    HOW TO REACH THE TEMPLE:
    IT IS ABOUT 17 KMS SOUTHEAST OF SIRKAZHI, ABOUT 10 KMS TO THE WEST OF POOMBUKAR BUS STOP (HWY 22) AND ABOUT 11 KMS FROM VAITHEESWARANKOIL.


    HISTORY OF BUDHA GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, A DEMON KNOWN AS MARUTHUVASURAN GOT A NUMBER OF BOONS FROM THE GODS AND THEN WENT ON TO ENGAGE THEM IN WAR. SO LORD SHIVA ADVISED THE GODS TO STAY AT THIRUVENKADU IN DISGUISE. THE DEMON CAME TO KNOW ABOUT THIS AND TROUBLED GODS. LORD SHIVA SENT NANDI TO FIGHT THE DEMON. THE DEMON HAD ACQUIRED A TRISHUL (TRIDENT) FROM LORD SHIVA AS BOON. THE DEMON INFLICTED 9 WOUNDS ON THE NANDI. WHEN LORD SHIVA CAME TO KNOW ABOUT THE PLIGHT OF NANDI AND THE MISUSE OF THE TRISHUL, HIS FACE TOOK A FEROCIOUS COUNTENANCE. IN THIS FEROCIOUS MANIFESTATION, HE FOUGHT WITH DEMON. THE DEMON COULD NOT WITHSTAND LORD SHIVA'S FEROCITY AND EVENTUALLY SURRENDERED TO LORD SHIVA. THE TEMPLE SCULPTURE PORTRAYS THIS - LORD SHIVA IN HIS FEROCIOUS MANIFESTATION WITH THE DEMON AT HIS FEET AND THE NANDI ALONGSIDE WITH 9 WOUNDS.

    ON ALL FOUR SIDES THERE ARE ROADS FOR RATHAYATRA. THE RAJAGOPURAM IS ON BOTH EAST AND WEST SIDE.

    THERE ARE 3 TEERTHAS (POND) HERE. ACCORDING TO FABLE, WHEN LORD SHIVA PERFORMED HIS CELESTIAL RUDRA DANCE, 3 DROPS OF WATER FELL DOWN AND FORMED THESE 3 KUNDA/ TEERTH/ POND, NAMELY AGNI TEERTH, SURYA TEERTH AND CHANDRA TEERTH.

    SACRED TREE: 3 TYPES – 1. BEL/ BILWA/ VILWA (TAMIL) 2. VADAVAL (TAMIL) AND 3. KONNAI (TAMIL).

    IMPORTANCE OF BUDHA GRAHA:
    BUDHA IS JNANI (LEARNED), WELL VERSED IN ALL ARTS. HE IS SON OF CHANDRA AND TARA. CHANDRA HAD TAKEN GURU (BRIHASPATHI) AS HIS GURU. CHANDRA HAD MARRIED 27 DAUGHTERS OF DAKSHA. HE PERFORMED A YAGYA TO PLEASE LORD VISHNU. AT THAT TIME, GURU’S WIFE TARA WAS ENCHANTED BY THE BEAUTY OF CHANDRA AND STAYED WITH HIM. SHE DELIVERED A SON, NAMELY BUDHA. UNDER THE ORDERS OF BRAHMA, LORD SHIVA HANDED OVER TARA BACK TO GURU AND THE BOY BUDHA TO CHANDRA. WHEN BUDHA GREW UP, HE GOT DEJECTED WITH CHANDRA AND WENT TO HIMALAYAS TO PERFORM PENANCE. HE BECAME WELL VERSED IN ALL ARTS AND RECEIVED A BOON FROM LORD SHIVA AND BECAME GRAHAM (CELESTIAL BODY).

    BUDHA IS A SHUBHAGRAHAM RESPONSIBLE FOR KNOWLEDGE, INTELLIGENCE, ASTROLOGICAL WISDOM, DEBATING SKILLS ETC.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM BUDHA DOSHA:

    HE IS THE LORD OF MITHUN AND KANYA RASHI/ ZODIAC (BY CHANDRA/ MOON BASED ASTROLOGY). THE CONTROLLING/ PRESIDING DEITY (AADHIDEVATA) IS MAHAVISHNU.

    BUDHA MAHADASHA IS FOR 17 YEARS.

    WHEN BUDHA IS IN THE SIXTH, EIGHTH OR TWELFTH POSITION, GENERALLY HE GIVES ADVERSE RESULTS. ACCORDING TO ASTROLOGY, BUDHA IS RESPONSIBLE FOR MENTAL DISORDERS, ANEMIA, NERVOUS DISORDERS, LEUCODERMA (WHITE PATCHES), LEPROSY ETC.

    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – BUDHA (MERCURY):


    #
    NAVAGRAHA ASPECT
    MERCURY
    1
    CONSORT
    ILA
    2
    CLOTH COLOR
    GREEN
    3
    GENDER
    NEUTRAL
    4
    ELEMENT
    EARTH
    5
    GOD
    VISHNU
    6
    MOUNTS
    LION
    7
    PRESIDING DEITY
    VISHNU
    8
    METAL
    BRONZE
    9
    GEMSTONE
    EMERALD
    10
    BODY PART
    SKIN
    11
    TASTE
    MIXED
    12
    GRAIN
    GREEN GRAM
    13
    SEASON
    AUTUMN
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    EAST
    15
    FLOWER
    WHITE OLEANDER/ KANTHAL/ KANER
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    BEL/ BILWA/ AEGLE MARMELOS/ WOOD APPLE
    17
    WEEK DAY
    WEDNESDAY
    18
    SOUND
    SA



    RANGOLI FOR BUDHA GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING MERCURY GOD


    MANTRA FOR BUDHA GRAHA:
    BELOW IS MANTRA FOR MERCURY GOD. 


     Navagraha Temples - Chandra

    INFORMATION ABOUT CHANDRA (MOON) GRAHA

     Navagraha Temples - Surya

    INFORMATION ABOUT SURYA (SUN) GRAHA






    TEMPLE INFORMATION:

    TEMPLE NAME: SURYANAR KOVIL
    DEITY AT PLACE (STHALA DEVATA): SURYANADAR
    GODDESS: PRAKASH AMBIKA
    GANAPATI: LOKATIRTHA VINAYAKA (ICCHAPURTI GANAPATI)
    GRAHA NAME: SHIVASURYANARAYANA SWAMI (SUN PERFORMED HERE PENANCE BY WORSHIPING SHIVA, HENCE THE NAME).
    NAMES OF WIVES OF SUN: USHADEVI, PRATIUSHA DEVI
    VILLAGE LOCATION: THIRUMANGALAKUDI, P.O, THANJAVUR D.T, THIRUVIDAIMARUTHUR, TAMIL NADU 612102, INDIA
    HISTORICAL/ SCRIPTURAL NAME: ARGHAVANAM (ARGHA (DURVA -- A SPECIFIC TYPE OF BLADE OF GRASS) + VANAM (JUNGLE/FOREST))
    DEITIES: (TWO) 1. (SHIVAPARVATI) 2. (SUN GOD, GANESHA)



    HOW TO REACH THE TEMPLE:
    ONE CAN TRAVEL BY ROAD TO SURYANAR KOVIL FROM KUMBHAKONAM OR MAYILADUTHURAI. ONE CAN ALSO TAKE A TRAIN TO ADUTHURAI STATION BUT IT IS NOT SO CONVENIENT. THE TEMPLE IS 3 KM NORTH OF ADUTHURAI RAILWAY STATION BY ROAD.


    PRASAD DISTRIBUTION:
    AFTER THE NOON PUJA, PRASAD OF CURD-RICE IS SERVED ON MANDAR LEAF (WHITE COTTON LEAF). THIS IS HELPFUL SPECIALLY TO SICK DEVOTEES WHO HAVE COME TO PRAY FOR THEIR RECOVERY.


    HISTORY OF SURYA GRAHA TEMPLE:
    ACCORDING TO SCRIPTURES, ONCE UPON A TIME, THERE WAS A KAAL RISHI (SAMAYA/ TIME) WHO STUDIED HIS OWN HOROSCOPE. WHILE STUDYING HE FOUND GRAHA DOSHAS. TO REMOVE THESE DOSHAS HE PERFORMED PENANCE AND PLEASED THE NINE CELESTIAL BODIES (NAVAGRAHA) AND GOT THEIR BLESSINGS THAT HIS DESCENDANTS WILL NOT SUFFER FROM THESE GRAHA DOSHAS. THUS, HE AND HIS FAMILY WERE RELIEVED FROM PITRU DOSHA. PITRU DOSHA COMES FROM ANCESTRY.

    AFTER KNOWING ABOUT THIS BOON GIVEN BY NAVAGRAHAS, THE PRESIDING DEITIES OF NAVAGRAHAS, NAMELY SHIVA, PARVATI, KARTIK SWAMI (MURUGAN), THIRUMAL (VISHNU), BRAHMA, VALLI (WIFE OF KARTIK SWAMI) GOT ANGRY. THEY CHIDED THE NAVAGRAHAS THAT THEY (THE NAVAGRAHAS) DO NOT HAVE THE RIGHT TO GRANT BOON TO FORGIVE THE GRAHA DOSHAS. THEREFORE, THEIR PRESIDING DEITIES ORDAINED THAT THE NAVAGRAHAS WILL SUFFER FROM LEPROSY. REALIZING THAT THEY HAD GONE BEYOND THEIR BOUNDS TO GRANT THE BOON, THE NAVAGRAHAS ASKED FOR FORGIVENESS FROM THEIR PRESIDING DEITIES. FINDING THE NAVAGRAHAS TO BE GENUINELY REPENTANT, THEY WERE TOLD TO GO TO ARGHYAVANAM AND TO PERFORM PENANCE THERE. THEY WERE TOLD TO TAKE VOW TO FAST, TO TAKE BATH IN THE TIRTH (POND/ LAKE) THERE FOR 11 (ELEVEN) SUNDAYS AND AFTERWARDS WORSHIP LORD SHIVA AND PARVATI AND ON MONDAY TAKE ONLY CURD RICE ON THE LEAF OF MANDARA. THEN THEY CAN GET RID OF THIS DISEASE. THE NAVAGRAHAS DID THIS PENANCE AND GOT RID OF THEIR LEPROSY. THUS THERE ARE 9 HOLY PLACES, ONE FOR EACH OF THE GRAHAMS, WHERE THEY PERFORMED THEIR PENANCE AND ATTAINED THEIR SALVATION.

    IMPORTANCE OF SURYA GRAHA:
    SURYA (SUN) IS CONSIDERED SHUBHAGRAHA, SATWIK. IN ONE'S HOROSCOPE HE RULES ATMA, FATHER, HEAD, BODY, EMPLOYMENT, RIGHT EYE, BOLDNESS, FAME, HEALTH. AMONG THE HINDI ZODIACS, SUN RULES VERY POWERFULLY IN THE SIMHA RASHI, IN MESHA RASHI IT IS VERY STRONG (UCHCHA) AND IN TULA IT IS WEAK (NEECH). SURYA MAHADASHA IS FOR 6 YEARS.

    NIVRITTI (ABSOLUTION) FROM SURYA DOSHA:
    IF THERE IS PATRIKADOSHA RELATED TO SURYA (SUN) THEN SUN WORSHIP SHOULD BE DONE IN THE FOLLOWING MANNER -- WEAR (ADORN) RED COLOR CLOTH, WEAR RING WITH RED COLOR STONE AND WORSHIP THE SUN GOD - OFFER A RED COLOR DRESS FOR THE IDOL; WORSHIP WITH RED COLOR FLOWER; OFFER PRASAD/ NAIVAIDHYAM -- SWEET MADE OF CRACKED WHEAT/ SEMOLINA, SWEET PORRIDGE, PONGAL; WORSHIP OF SHIVA/ RUDRA/ AGNI ALSO PLEASES SUN-GOD AND ACTS AS REMEDY FOR SURYAGRAHADOSHA. TEMPLES OF OTHER PLANETS (NAVAGRAHAS) ARE ALSO LOCATED ON EITHER SIDE OF THE SUN TEMPLE WHICH IS VERY UNIQUE. IN FRONT OF SUN'S IDOL, GURU'S IDOL IS ALSO KEPT SIGNIFYING THAT THE HEAT OF THE SUN IS NULLIFIED BY GURU (NORMALLY, ONE CANNOT BEAR THE ENERGY EMANATING FROM THE SUN; GURU ACTS IN BETWEEN AS A NECESSARY FILTER ALLOWING ONLY THOSE ENERGIES TO PASS THROUGH DISCIPLE THAT THEY CAN TOLERATE/ WON’T GET BURNT BY). IN THIS TEMPLE, ALL THE DEITIES ARE PRESENT WITHOUT ANY SHASTRAS (THEIR WEAPONS).


    NAVAGRAHA ASPECT/ CHARACTERISTICS SUMMARY – SURYA (SUN):


    #
    NAVAGRAHA ASPECT
    SURYA
    1
    CONSORT
    USHA DEVI & PRATI USHA DEVI
    2
    CLOTH COLOR
    RED
    3
    GENDER
    MALE
    4
    ELEMENT
    FIRE
    5
    GOD
    FIRE
    6
    MOUNTS
    SEVEN HORSE CHARIOT
    7
    PRESIDING DEITY
    SHIVA (RUDRA)
    8
    METAL
    GOLD/BRASS
    9
    GEMSTONE
    RUBY
    10
    BODY PART
    BONE
    11
    TASTE
    PUNGENT
    12
    GRAIN
    WHEAT
    13
    SEASON
    SUMMER
    14
    GRAHA DEITIES FACE THIS DIRECTION
    EAST
    15
    FLOWER
    RED LOTUS
    16
    KSHETRA VRUKSHA (TREE)
    DURVA
    17
    WEEK DAY
    SUNDAY
    18
    SOUND
    GA



    RANGOLI FOR SURYA GRAHA
    TO BE DRAWN WHEN WORSHIPING SUN GOD






    SHLOKA FOR SURYA GRAHA:
    THIS IS MANTRA FOR SUN GOD. IT IS VERY EFFECTIVE MANTRA TO PLEASE SUN GOD.



     Navagraha - an introduction

    WHEN HUMAN BEING IS BORN, SO ALSO IS BORN THE EFFECT OF HIS/HER PAST KARMAS TO BE EXPERIENCED THROUGHOUT THE LIFE. THESE CONSIST OF GOOD AS WELL AS BAD EFFECTS OF KARMAS AND ARE SAID TO BE INFLUENCED BY NINE PLANETS OR RATHER BY THEIR PLANETARY POSITIONS AT THE TIME OF BIRTH OF AN INDIVIDUAL. THESE NINE PLANETS ARE COLLECTIVELY KNOWN AS NAVAGRAHAS, (NAVA = NINE, GRAHAS = PLANETS).

    OF THESE NINE PLANETS SEVEN PLANETS (RAVI - SUN, CHANDRA - MOON, MANGALA - MARS, BUDHA - MERCURY, BRIHASPATI/GURU - JUPITER, SHANI - SATURN) ARE CELESTIAL BODIES WHEREAS THE LAST TWO (RAHU AND KETU) ARE ASCENDING AND DESCENDING NODES OF CHANDRA. THEY ARE IMAGINARY POINTS OF INTERSECTIONS OF PATHS OF RAVI AND CHANDRA IN THE CELESTIAL SPHERE.

    FROM ASTRONOMICAL PERSPECTIVE THESE PLANETS ARE CELESTIAL BODIES BUT FROM HUMAN EXPERIENCE PERSPECTIVE THEY ARE CONSIDERED AS NINE POTENCIES OR NINE IDEAS THAT INFLUENCE THE GOOD AND BAD EXPERIENCES OF HUMAN LIFE. PER INDIAN BELIEF, EACH OF THESE PLANETS (POTENCIES) MANIFESTS AS A DEITY AND IT IS BELIEVED THAT WORSHIPING THESE DEITIES CAN HELP TO PALLIATE ILL EFFECTS OF KARMAS AND REDUCE SUFFERING CAUSED BY IT. THOUGH IT IS NOT POSSIBLE TO COMPLETELY GET RID OF SUFFERING, IT IS BELIEVED THAT INTENSITY OF SUFFERING CAN BE REDUCED TO LARGE EXTENT WITH SINCERE DEVOTION, PARTICULARLY IF THE WORSHIP IS DONE PER SCRIPTURES OR PER INSTRUCTIONS OF ONE'S OWN GURU.

    AS MENTIONED IN NAVAGRAHA STHALAMS IN SOUTH INDIA, IN SOUTH INDIA THERE IS A DEDICATED TEMPLE FOR EACH OF THESE NINE PLANETS (GRAHA). IN UPCOMING ARTICLES WE WILL POST INFORMATION ABOUT EACH PLACE WITH DETAILS SUCH AS - NAME OF PLACE AND TEMPLE, DEITIES WORSHIPED THERE, HOW TO REACH THE PLACE, SHLOKA TO BE CHANTED TO WORSHIP THE GRAHA ETC


    थिरुनागनाथस्वामी मंदिर - केतू ग्रहाचे मंदिर

    हे मंदिर केतू ग्रहाशी निगडित असल्याने ह्या स्थळाला केतूस्थळ म्हणतात. ह्या मंदिरातील मुख्य दैवत भगवान शिव आहेत. 

    मुलवर (मुख्य दैवत): नागनादर (भगवान शिव)

    उत्सव मूर्ती: सोमस्कंदर

    देवी: सौन्दर्यनायकी

    क्षेत्र वृक्ष: बांबू 

    गावाचे नाव: कीळ्पेरुम्पळ्ळम्

    जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू 


    समुद्रमंथन चालू असताना जेव्हा वासुकी नागाने विष ओकलं, तेव्हा सर्व देव देवतांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्यायलं. भगवान शिवांनी विष प्यायलं ह्या गोष्टीचं वासुकीला खूप वाईट वाटलं आणि तिला खूप दुःख झालं. ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी तिने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. वासुकीने भगवान शिवांना विनंती केली कि त्यांनी नागाच्या रूपातच इथे वास्तव्य करावं. तिच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव इथे नागनादर (नागाचे नाथ) ह्या नावाने राहिले.


    केतू मंदिराचा इतिहास: 

    पुराणांनुसार ह्या स्थळाला खूप महत्व आहे. समुद्र मंथन प्रक्रियेमध्ये वासुकी नाग जेव्हा बेशुद्धावस्थेत गेली तेव्हा असुरांनी तिच्या शरीराचे तुकडे करून ह्या प्रदेशातील बांबूच्या वनात टाकले. भगवान शंकरांच्या कृपेने वासुकी नाग परत जिवंत झाली. तिने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना इथे येऊन राहण्याची आणि जे कोणी त्यांची उपासना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवण्याची विनंती केली. 


    येथील क्षेत्रवृक्ष बांबू आहे. 


    केतू पुराण: समुद्र मंथनामध्ये जीव गमावलेले राहू आणि केतु जेव्हा परत जिवंत झाले तेव्हा त्यांना कोणीच आपलंसं करायला तयार नव्हतं. केतुला एका ब्राह्मणाने आश्रय दिला आणि त्याला वाढवलं. केतुने आपल्या मानलेल्या पित्याकडून ज्ञान ग्रहण केलं. त्याने ह्या स्थळी तपश्चर्या केली आणि ग्रह होण्याचं वरदान मिळवलं. केतुच्या पत्नीचं नाव आहे चित्रलेखा. आणि त्यांच्या पुत्राचं नाव अवमृत. केतुचं ह्या शिवाय अजून एका ठिकाणी मंदिर आहे.


    ह्या स्थळातील तीर्थे: इथे नागतीर्थ नावाचं तीर्थ आहे. असा समज आहे कि हे तीर्थ वासुकी नागाने निर्माण केलं. ह्या तीर्थाच्या पश्चिम दिशेला एकमेकात मिसळलेले पिंपळ आणि कडुलिंब वृक्ष आहेत. ह्या ठिकाणी नागपूजा केली जाते.

    साधारण माहिती:

    ह्या मंदिरातील विनायकाला अनुग्रह विनायक ह्या नावाने पुजलं जातं. केतू देवाचं वेगळं देऊळ आहे. येथील केतूच्या मूर्तीला मानवी शरीर आणि सर्पाचं शिर आहे. भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांना तो ज्ञान प्रदान करतो. म्हणूनच केतूला अनुग्रहकेतू आणि ज्ञानकारक ह्या नावांनी पुजलं जातं. केतू हे मंदिराचं मुख्य दैवत असल्याने इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नाही.

    मंदिराचे वैशिष्ठ्य:

    १) राहू काळ आणि यमगंड काळ ह्या काळांत इथे केतूदेवाच्या विशेष पूजा केल्या जातात. 

    २) राहू आणि केतूच्या भ्रमण काळात विशेष होम हवन केलं जातं

    ३) जरी इथे नवग्रहांचं वेगळं मंदिर नसलं तरी इथे भगवान सूर्याच्या दोन मूर्ती आणि भगवान शनीची एक मूर्ती इथे दिसते. 

    मंदिरात साजरे केले जाणारे सण:

    १) शिवरात्रि (फेब्रुवारी-मार्च, तामिळ मध्ये मासी)

    २) अन्नाभिषेक (ऑक्टोबर-नोव्हेंबर, तामिळ मध्ये ऎपसी)

    ३) वासुकी उत्सव (मार्च-एप्रिल, तामिळ मध्ये पंगूनी)  

    दर्भारण्येश्वरर मंदिर थिरुनळ्ळारू, शनि ग्रहाचे मंदिर




    हे मंदिर पॉंडिचेरी मधल्या कारैकाल जिल्ह्यातल्या थिरुनळ्ळारू गावात आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे जरी शिव मंदिर असलं तरी नवग्रहांपैकी शनि स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 


    मुख्य दैवत: दर्भारण्येश्वरर, थिरुनळ्ळार-इश्वरर्

    देवी: प्राणांबिका, भोगमार्ता - पुण्मुलैयाल, प्राणेश्वरी

    क्षेत्र वृक्ष: दर्भ

    पवित्र तीर्थ: नळ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. अन्न तीर्थ आणि गंगा तीर्थ ही तीर्थे नळविनायक मंदिराच्या जवळ असलेल्या एका विहिरी मध्ये आहेत. ह्या शिवाय इथे अष्ट दिक्पालांपैकी  प्रत्येक दिक्पालाचं एक अशी आठ तीर्थे आहेत. 


    वैशिष्ठ्य: पुराणांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे हे स्वयंभू शिवलिंग दर्भ गवतामध्ये सापडलं हे दर्शवणाऱ्या दर्भ गवताच्या खुणा ह्या शिवलिंगावर दिसतात. 


    हे स्थळ सप्त विडंग स्थळांपैकी एक आहे. ५१ शक्तीपीठांपैकी पण हे एक पीठ समजलं जातं.


    आख्यायिका

    पुराणांनुसार, सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली. 


    शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यां लिंगांची तपश्चर्या केली. 


    ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नळ्ळार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नळ्ळेश्वर आहे.  


    अजून एका पुराणांतील आख्यायिकेनुसार पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूंनी इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांची उपासना केली आणि त्यांना मन्मथ हा पुत्र झाला. ह्याची परतफेड म्हणून भगवान विष्णूंनी इथे सोमस्कंद मूर्तीची (भगवान शिव आणि माता पार्वती आणि त्यांच्यामध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय) स्थापना केली. पुढे काही काळानंतर भगवान विष्णूंनी ही मूर्ती इंद्र देवाला दिली. इंद्रदेवाने ह्या मूर्तीची उपासना केल्याने त्याला जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री ह्यांची प्राप्ती झाली. इंद्रदेवाने नंतर ह्या मूर्तीच्या अजून सहा प्रतिकृती केल्या आणि त्या सर्व त्याने मुचगंद राजाला दिल्या. मुचगंद राजाने त्याला मिळालेल्या सात मुर्त्यांची सात ठिकाणी स्थापना केली आणि ह्या सर्व सात स्थळांना सप्तविडंग असं संबोधलं जातं. हे सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाला त्यागराज विडंग असं पण संबोधलं जातं.


    ह्या मंदिरातील इतर देवस्थाने:

    मुख्य देवस्थानाच्या दक्षिण दिशेला मेंढपाळ, त्याची पत्नी आणि लेखापाल (अकाउंटंट) ह्यांच्या मुर्त्या आहेत. आख्यायीका अशी आहे की मंदिराला दूध पुरविण्याच्या हिशोबावरून लेखापालाने मेंढपाळाला फसविले. गावाच्या राजाकडून मेंढपाळाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालाचा आपल्या त्रिशुळाने वध केला. भगवान शिवांनी लेखापालावर फेकलेल्या त्रिशुळाला मार्ग देण्यासाठी नंदी आणि बलीपीठ थोडे बाजूला झाले. म्हणूनच नंदी आणि बलीपीठ हे आजही शिवलिंगाच्या सरळ रेषेमध्ये नाहीये. 


    आख्यायिकेनुसार भगवान विष्णू, ब्रह्म देव, इंद्र देव, सरस्वती देवी, अष्टदिक्पाल, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस आणि अर्जुन ह्यांनी पण इथे शिवाची उपासना केली. 


    आणखी काही वैशिष्ट्ये:

    राजगोपुरम् ला नमस्कार करून मंदिरामध्ये शिरताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या चौकटीला शनिदेव लपलेले आहेत. आख्यायिकेनुसार शनिदेवांनी नळ राजाला त्रास दिल्याने भगवान शिव त्यांच्यावर क्रोधीत झाले आणि ह्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते ह्या प्रवेशद्वारामध्ये येऊन लपले. 


    येथील इतर देवस्थाने:

    स्वर्ण गणपती, मुरुगन, नटराज, सोमस्कंद. आदिशेष, नायन्मार, महालक्ष्मी, सूर्य आणि भैरव ह्यांच्या मुर्त्या पण येथे दिसतात. नळ राजा आणि त्याने पुजलेलं शिव लिंगपण येथे आहे. शिव मंदिरामध्ये सहसा असणाऱ्या कोष्ट मुर्त्या पण इथे दिसतात.  त्यागराज विडंग म्हणजे हिरव्या पाचूच्या विडंगाचे इथे स्वतंत्र देऊळ आहे.


    मंदिरात साजरे होणारे सण:

    १) शनी संक्रमण 

    २) शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा असते 

    ३) पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) ह्या तामिळ महिन्यामध्ये हिरव्या पाचूच्या लिंगाची विशेष पूजा केली जाते 

    ४) वैकासि (मे-जून) ह्या तामिळ महिन्यामध्ये १० दिवस ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. 


    थिरुअग्नीश्वरर - कंजनूर - शुक्र ग्रहाचे मंदिर



    हे मंदिर शुक्र ग्रहाचे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे २००० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातल्या कंजनूर गावामध्ये हे मंदिर आहे. 

    मुख्य दैवत: अग्निश्वरर् 
    देवी (अम्मन): श्री कर्पगम् अम्बाळ 
    क्षेत्र वृक्ष: पळस, फणस 
    पवित्र तीर्थे: अग्नी तीर्थ, पराशर तीर्थ, ब्रह्म तीर्थ (कावेरी), चंद्र तीर्थ, अंजनेय तीर्थ आणि मणिकर्णिका तीर्थ 
    ऐतिहासिक / पौराणिक नांवे: पळस अरण्य, पळसापुरम, ब्रह्मपुरी, अग्निपुरम, कंसपूरम 

    येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 

    ह्या क्षेत्राची वैशिष्ठ्ये

    हे नवग्रहांमधील शुक्रदेवाचं स्थळ आहे आणि शुक्रदेवाने तपश्चर्या केलेल्या स्थळांपैकी एक आहे. इथे शुक्रदेवाचे स्वतंत्र देवस्थान आहे. ह्या मंदिराचं एक वैशिष्ठय म्हणजे इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांचं एकत्र देवस्थान आहे. ब्रह्मदेवाला त्यांनी वधूवरांच्या रूपात ह्या ठिकाणी दर्शन दिलं असा समज आहे. आणि म्हणूनच जसं विवाहाच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूला असते, त्याप्रमाणे पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहेत. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी तांडव नृत्य करत पराशर ऋषींना मुक्ती दिली म्हणून येथील नटराजांच्या मूर्तीला मुक्ती तांडव मूर्ती म्हणतात. भगवान शुक्रांना इथे कंजन असे नाव आहे. आणि म्हणूनच ह्या गावाचे नाव कंजनूर आहे. 

    शुक्रदेवांना अनेक नावे आहेत. इथे त्यांना अजून दोन नावांनी ओळखले जाते - एक म्हणजे कवि आणि दुसरे म्हणजे भार्गव. ऋषी भार्गव आणि देवी पुलोमजा ह्यांचे ते पुत्र म्हणून त्यांना भार्गव असे म्हणले जाते. 

    चंद्रदेवाला ह्या ठिकाणी त्याच्या शापातून मुक्ती मिळाली. ऋषी व्यासांच्या सल्ल्यानुसार अग्निदेवाने ह्या ठिकाणी तपश्चर्या केल्याने त्याचे रोगनिवारण झाले. म्हणूनच इथे भगवान शिवांना अग्नीश्वर असे नाव आहे. 

    मथुराधिपती कंस राजाने पण ऋषी शुक्राचार्यांच्या सल्ल्याने इथे तपश्चर्या केल्याने त्याचे पण रोगनिवारण झाले. म्हणूनच ह्या स्थळाला कंसपूरम असं पण नाव आहे. 

    हरदत्तशिवाचार्य ह्यांनी “ॐ नमः शिवाय” ह्या पंचाक्षरी मंत्राचं महत्व ह्याच ठिकाणी प्रस्थापित केले. 

    मंदिरातील मुर्त्या

    १) कोष्टम् मध्ये, म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, नर्तन गणपती, दक्षिणामूर्ती, लिंगोद्भवर, दुर्गा आणि चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
    २) देवी पार्वतीच्या देवस्थानाच्या बाजूला आदि कर्पगम्बाळ ह्यांची मूर्ती आहे. 
    ३) परिक्रमेमध्ये विनायक, मयूर सुब्रह्मण्य आणि महालक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
    ४) पळस वृक्षाच्या खाली अग्नीश्वरर लिंग आहे. 
    ५) शिव लिंगा जवळ मनकंचनारर, कुलिकमर, सुरैकाय भक्तर आणि त्याची पत्नी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
    ६) महामंडपामध्ये भैरव, सूर्य, चंद्र, नवग्रह आणि नालवार (श्रेष्ठ शैव संत) ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

    आख्यायिका

    १) पुराणांनुसार शुक्राचार्यांनी त्यांच्या पत्नीची हत्या केल्याबद्दल भगवान विष्णूंना शाप दिला. त्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान विष्णूंनी ह्या ठिकाणी हरदत्तशिवाचार्य नावाच्या शिवभक्ताच्या रूपात भगवान शिवांची उपासना केली. 

    २) कट्टर वैष्णव वासुदेवाचा सुदर्शन नावाचा पुत्र होता. वैष्णव कुटुंबात जन्म घेऊन पण सुदर्शन भगवान शिवांची भक्ती करीत होता. ह्या ठिकाणी तापलेल्या लोखंडी खुर्चीवर बसून भगवान शिवांचं नाव घेत असलेल्या सुदर्शनची मूर्ती आहे. अजून एक मूर्ती आहे जिथे हरदत्तशिवाचार्य दक्षिणामूर्तींच्या रूपात आहेत. 

    ३) एक ब्राह्मण होता ज्याला एका वासरूच्या हत्येसाठी जबाबदार धरलं गेलं होतं. बाकीच्या ब्राह्मणांनी ह्या ब्राह्मणाला गोहत्येचा आरोप लावून जातीबाहेर काढलं होतं. हरदत्तशिवाचार्यांनी आरोप लावलेल्या ब्राह्मणाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्याला परत जातीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साक्ष म्हणून एका नंदीच्या दगडी मूर्तीकडून गवताचं सेवन केलं. 

    ४) ब्रह्मदेवांनी येथे त्यांना शिवपार्वतींच वधुवर रूपामध्ये दर्शन व्हावं आणि ह्या दर्शनाचा लाभ इतरांना पण व्हावा म्हणून तपश्चर्या केली. आणि म्हणूनच इथे भगवान शिवांचं देवस्थान उजव्याबाजूला (दर्शन घेणाऱ्याच्या) तर देवी पार्वतींचं देवस्थान डाव्याबाजूला आहे. 

    ५) पुराणांनुसार शुक्र (शुक्राचार्य) हे दैत्यगुरू होते आणि त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता ज्याच्या सहाय्याने ते युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना परत जिवंत करू शकत होते. 

    ६) असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं. 

    ७) असा समज आहे की चंद्र, पराशर मुनी आणि कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत. 

    ८) ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव अग्निश्वरर् असे आहे), ३. पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ 

    शुक्र ग्रहाचा इतिहास

    पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे. 

    शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली. 

    शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले. 

    शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति. 

    शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं. 

    मंदिरात साजरे होणारे सण

    १) आदि ह्या तामिळ महिन्याच्या पुरम (पुर्वा फाल्गुनी) नक्षत्रावर इथे सण साजरा केला जातो 
    २) मासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (फेब-मार्च) मासी मघा सण साजरा केला जातो. 
    ३) हरदत्तशिवाचार्यांचा सण थाई तामिळ महिन्यामध्ये (जॅन-फेब) साजरा केला जातो 
    ४) पुरत्तासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) नवरात्री सण साजरा केला जातो. 
    ५) ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा आणि अंजनेय पूजा पण इथे केली जाते  

     थिरुआपत्सहायेश्वरर - आलंगुडी - गुरु ग्रहाचे मंदिर



    कुंभकोणम पासून मन्नारगुडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १७ किलोमीटरवर हे मंदिर आहे. नवग्रहस्थळांपैकी गुरुग्रहाचे हे स्थान आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. 

    मुख्य दैवत: आपत्सहायेश्वरर, काशीनारायणेश्वरर 
    उत्सव मूर्ती: भगवान दक्षिणामूर्ती 
    अम्मन: एलवरकुळाली, उमाई अम्मन 
    क्षेत्र वृक्ष: रेशीमसूत (तामिळ मधे पुलै) 
    पवित्र तीर्थ: ब्रह्मतीर्थ, अमृत पुष्करिणी आणि १३ इतर तीर्थे 
    पौराणिक नाव: विरूमपुल्लै 
    स्थळांचं नाव: आलंगुडी 
    जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू) 

    वैशिष्ठ्ये
    हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य देवस्थान (शिवलिंग) हे स्वयंभू आहे. हे स्थळ गुरु स्थळ किंवा दक्षिणामूर्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुदोषांचं परिहारस्थळ म्हणून पण प्रसिद्धआहे. 

    ठळक वैशिष्ठ्ये
    प्रत्येक वर्षी मासी महिना (तामिळ) (फेब-मार्च) मध्ये भगवान दक्षिणामूर्तींच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो. गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस शुभ मानला जातो. पण मासी महिन्यातला हा दिवस त्याहीपेक्षा शुभ मानला जातो. गुरु देवाचं प्रत्यक्ष दर्शन इथे नाही. पण भगवान दक्षिणामूर्तींना इथे गुरु म्हणून मानलं जातं कारण ह्या ठिकाणी त्यांनी सनकादि मुनींना उपदेश दिला. किंबहुना गुरुपरंपरेमध्ये दक्षिणामूर्तींना आदिगुरु मानलं जातं. 

    दोन कारणांमुळे ह्या स्थळाला आलंगुडी म्हणलं जातं. १) काळं रेशीमसूत हे इथलं क्षेत्र वृक्ष आहे २) समुद्रमंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन केल्यावर भगवान शिव इथे येऊन बसले. 

    हे पंचारण्य स्थळांपैकी एक आहे. थिरुवदैमुरुथुर येथील भगवान महालिंगेश्वरांचे हे परिवार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे एका स्वतंत्र देवस्थानामध्ये शेळीचे शिर असलेल्या दक्षाची (पार्वतीचे पिता) मूर्ती आहे. दक्षाने केलेल्या यज्ञावेळी आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने जेव्हा सतीने (दक्षाची पुत्री) यज्ञकुंडात उडी घेऊन आपली आहुती दिली त्यावेळी भगवान शिवांचे सेनापती वीरभद्र ह्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला. देवी पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शेळीचे शिर लावून दक्षाला जीवदान दिले. 

    शुक्रवार अंबिका (म्हणजेच पार्वती) हिचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. शुक्रवारी येथे विशेष पूजा केली जाते. 

    हिंदू धर्मानुसार माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्याची माता, दुसरा गुरु म्हणजे पिता आणि तिसरा गुरु म्हणजे गुरु (जो गुरुकुलात शिकवतो म्हणजेच भगवान दक्षिणामूर्ती). म्हणूनच इथे ह्याच क्रमाने पार्वती (माता), भगवान शिव (पिता) आणि भगवान दक्षिणामूर्ती (गुरु) ह्यांची देवस्थाने आहेत. 

    आख्यायिका

    १) अमूथोहर ह्या मुकुंद चक्रवर्ती राजाच्या मंत्र्याने हे मंदिर बांधलं, पण आपलं पुण्य मात्र त्याने आपल्याकडेच ठेवलं. राजाला हे न रुचल्याने त्याने मंत्र्याचा शिरच्छेद केला. राजसभेमध्ये मंत्र्याच्या नावाचा प्रतिसाद उमटला. राजावर ब्रह्महत्येचा दोष आला. ह्या मंदिरात उपासना करून त्याने ह्या दोषाचे निवारण केले. 

    २) येथील सुंदर मूर्ती नायनार ह्यांच्या मूर्तीवर चेचक रोग (स्मॉल पॉक्स) झाल्याची चिन्हं आहेत. त्याची आख्यायिका अशी आहे. अन्य मूर्तींसमवेत ही मूर्ती पण थिरुवरुर येथील राजाने आलंगुडीवरून थिरुवरुरला नेली आणि तो परत द्यायला तयार नव्हता. आलंगुडी येथील पुजाऱ्याने युक्ती लढवली. त्याने मूर्तीला एका कापडात बांधलं आणि जेव्हा द्वारपालांनी अडवलं त्यावेळी त्याने आपण चेचक रोग झालेल्या लहान मुलाला घेऊन जात आहोत असे सांगितले. आलंगुडी मध्ये आल्यावर जेव्हा त्या पुजाऱ्याने ते कापड उघडलं त्यावेळी त्या मूर्तीवर चेचक रोगाची चिन्हं दिसली. 

    ३) संतान प्राप्ती साठी देवी महालक्ष्मीने येथे भगवान शिवांची उपासना केली. 

    ४) आलंगुडीच्या जवळ थिरूमनमंगला ह्या ठिकाणी भगवान शिवांशी विवाहबद्ध होण्याआधी देवी पार्वतीने येथे (आलांगुडीमध्ये) तपश्चर्या केली. विवाहाच्या वेळी भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, देवी लक्ष्मी, अष्टदिक्पाल आणि वीरभद्र उपस्थित होते. 

    ५) संत सुंदरर ह्यांना येथे भगवान दक्षिणामूर्तींकडून पंचाक्षर मंत्राचा उपदेश मिळाला. 

    ६) आदि शंकराचार्यांना इथे भगवान दक्षिणामूर्तींकडून महावाक्याचा उपदेश मिळाला. 

    ७) वीरभद्र, कश्यप ऋषी, विश्वामित्र ऋषी, मुचगंद राजा ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. 

    ८) एकदा पार्वती देवी फुलांच्या चेंडूबरोबर खेळत असताना तिनें चेंडू उंच उडवला आणि तो झेलण्यासाठी तिने आपले हात वरती केले. सूर्य देवाला वाटले की हा आपल्यासाठी थांबण्याचा संकेत आहे म्हणून तो थांबला. पण ह्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरचं जीवन, जे सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे, ते विस्कळीत झालं. जेव्हां भगवान शंकरांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पार्वतीदेवीला पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितले. असा समज आहे की ह्या ठिकाणी पार्वती देवीने भगवान शंकरांना परत प्रसन्न करून त्यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. आणि तो विवाह येथून जवळ असलेल्या थिरूमनमंगला ह्या ठिकाणी संपन्न झाला. ह्या विवाहाच्या वेळेस सर्व देव उपस्थित होते. हे मंदिर स्वतः पार्वती देवीने निर्माण केले आहे असा समज आहे. ह्या स्थळाला पूर्वी काशीअरण्य असे म्हणत आणि म्हणूनच ह्या स्थळाला काशी इतकेच महत्व आहे. 

    ९) गजमुख नावाचा असुर होता जो देव आणि मानवांना खूप कष्ट देत होता. भगवान शंकरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच गणपतीला गजमुखाला शिक्षा देण्यासाठी पाठवले. म्हणूनंच ह्या स्थळी गणपतीचे मंदिर आहे आणि इथल्या गणपतीला कात्त-विनायगर (कात्त = (रक्षणकर्ता) + विनायक (गणपती) + आकार) असे नांव आहे. 

    इतर देवस्थाने

    विनायक, वळ्ळी आणि दैवानै ह्या दोन पत्नींसमवेत भगवान मुरुगन, नटराज आणि शिवकामी, सोमस्कंद, सूर्य, चंद्र, काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी, सप्तलिंग (सूर्येश्वरर, सोमेश्वरर, घृष्णेश्वरर, सोमनाथ, सप्तऋषीनादर, विश्वनाथ, ब्रह्मेश्वर), वरदराज पेरुमल आणि श्रीदेवी, नळवार, शनि, भैरव, सप्तमाता, ऋषी विश्वामित्र आणि ऋषी अगस्त्य ह्यांच्या मुर्त्या परिक्रमेमध्ये दिसतात. 

    गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, म्हणजेच कोष्टम् मध्ये, कोष्ट मुर्त्या आहेत. भगवान दक्षिणामूर्तींचे स्वतंत्र देवस्थान आहे आणि त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते. 

    मंदिरातील अजून काही वैशिष्ठ्ये

    १) इथे भगवान दक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी केली जाते. अन्य देवांची नाही. 
    २) इथे स्वतंत्र नागसंनिधी आहे. नागदोषाचे निवारण होण्यासाठी इथे पूजा करतात. ह्या गावी कधी नागदंशामुळे मृत्यू होत नाही. 
    ३) इथे सायंकाळी भगवान शिवांची पूजा केली जाते. 
    ४) भगवान मुरुगन ह्यांची पूजा करण्याआधी ऋषी अगस्त्य ह्यांची पूजा केली जाते. 
    ५) श्री महालिंगेश्वर ह्यांच्या परिवार स्थळांमध्ये पुढील देवस्थाने आहेत: १) थिरुवलमचुळी विनायक देवस्थान, २) स्वामी मलय देवस्थान, ३) आलंगुडी भगवान दक्षिणामूर्ती देवस्थान, ४) थिरुवडुदुराई नंदी देवस्थान, ५) सूर्यनार कोविल नवग्रह स्थळ, ६) थिरुवप्पडी चंडिकेश्वर देवस्थान, ७) चिदंबरम नटराज देवस्थान, ८) सिरकाळी भैरव देवस्थान, ९) थिरुवरुर सोमस्कंद देवस्थान 

    हे मंदिर पवित्रतीर्थ, पवित्रस्थळ आणि मूर्ती स्थळ (देव गौरव स्थळ) म्हणून पुजलं जातं. 

    साजरे होणारे सण
    १) गुरु भ्रमण 
    २) चैत्र पौर्णिमा 
    ३) थाई पुसम (जानेवारी-फेब्रुवारी) 
    ४) पंगूणी उत्तरम् रथयात्रा (मार्च-एप्रिल) 
    ५) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा      

     श्वेतारण्येश्वरर मंदिर - थिरुवेंकाडू - बुध ग्रहाचे मंदिर

    हे मंदिर बुध ग्रहाचे मंदिर आहे आणि नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे.  
    मुख्य दैवत: श्वेतारण्येश्वरर
    अम्मन (देवी): ब्रह्माविद्याम्बिका
    क्षेत्र वृक्ष: पीपल (वडवानल), कोंद्रेई (बहावा), बिल्व
    पौराणिक नाव: थिरुवेंकाडू, आदी चिदंबरम, श्वेतारण्य
    पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, अग्नी तीर्थ, चंद्र तीर्थ
    पत्ता: थिरुवेंकाडू, तामिळनाडू ६०९११४, इंडिया

    वैशिष्ठ्ये:

    १) येथील शिवलिंग स्वयंभू आहे 
    २) जशा काशीमध्ये विष्णू पादुका आहेत, त्याचप्रमाणे इथे वडवानल वृक्षाच्या खाली रुद्र पादुका आहेत. म्हणूनच इथे भगवान शंकरांना थिरुवेंकदर किंवा
    थिरुवेंकट्टूदेवर असं संबोधलं जातं. 
    ३) येथील स्फटिक लिंगावर दिवसातून चार वेळा तर नटराजाच्या मूर्तीवर सहा वेळा अभिषेक केला जातो. 
    ४) हे स्थळ म्हणजे शक्ती पीठ पण मानलं जातं. आणि येथील शक्ती पीठाचे प्रणव शक्तीपीठ असे नाव आहे. 
    ५) काशी एवढेच पवित्र मानले जाणाऱ्या सहा क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. बाकीच्या पांच क्षेत्रांची नावे - १. थिरुवयरू, २. मैलादुथुराई, ३. छायावन,
    ४. थिरुवडुमैथुर, ५. थिरुवणचिअम
    ६) वाल्मिकी रामायणामध्ये ह्या स्थळाचा उल्लेख सापडतो
    श्वेतारण्याचा अर्थ: श्वेत म्हणजे पांढरा (तामिळ मध्ये वेनमै). अरण्यम म्हणजे
    जंगल (तामिळ मध्ये काडू). आणि म्हणूनच ह्या स्थळाला श्वेतारण्य किंवा
    वेंगाडू असं म्हणलं जातं. 

    आख्यायिका:

    १) एकदा भगवान मुरूगांनी ब्रह्मदेवाला प्रणव मंत्राचे स्पष्टीकरण देता आलं नाही म्हणून बंदिस्त केलं. पण ह्यामुळे ब्रह्मसृष्टीचं कार्य स्तंभित झालं आणि म्हणून भगवान शिवांनी मध्यस्थी करून ब्रह्मदेवाला मुक्त केलं. काही काळ बंदिस्त राहिल्यामुळे ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञानाचं विस्मरण झालं आणि ब्रह्मदेवांनी इथे येऊन तपश्चर्या केली. त्यांनी जी तपश्चर्या इथे केली त्याला
    समधूनीलै (तामिळ), म्हणजे श्वास राखून धरणे, असं म्हणतात. भगवान
    शिवांनी दक्षिणामूर्तींच्या रूपात येऊन ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञान प्रदान केलं तर
    देवी पार्वतींनी त्यांना ब्रह्मकलेचं ज्ञान दिलं. म्हणून इथे देवी पार्वतींना
    ब्रह्मज्ञानाम्बिका असं संबोधलं जातं. ही घटना दर्शविण्यासाठी इथे स्वतंत्र
    देवस्थान आहे. 
    २) असं समजलं जातं की भगवान शिवांची ६४ रूपे आहेत आणि पांच मुखे
    आहेत. ती पांच मुखे अशी - ऊर्ध्वमुखी ईशान (पवित्रतेचं प्रतीक), उत्तरमुखी
    वामदेव (उदरनिर्वाहाचं प्रतीक), पूर्वमुखी तत्पुरुष (अध्यात्म आणि अहंकार
    निर्मुलनाचं प्रतीक), दक्षिणमुखी अघोर मूर्ती (संहार आणि पुनरुत्थान ह्यांचं
    प्रतीक), पश्चिममुखी सदाशिव (शाश्वत आनंदाचं प्रतीक). 
    ३) एका आख्यायिकेनुसार मरुत नावाच्या दैत्याने (सालीन्द्र चा पुत्र) इथे
    भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान म्हणून त्रिशूल
    प्राप्त केलं. पण ह्या प्राप्त झालेल्या त्रिशुळाने त्याने देवांना त्रास द्यायला चालू
    केलं. भगवान शिवांनी मरुताला शिक्षा देण्यासाठी नंदीदेवाला पाठवलं. पण
    नंदीदेवाबरोबरच्या युद्धात मरुताने नंदीदेवाच्या शरीरावर त्रिशुळाने वार
    केले आणि त्यामुळे नंदीदेवाच्या शरीरावर नऊ ठिकाणी जखमा झाल्या.
    भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी अघोरमूर्ती रूप घेऊन मरुत
    दैत्याला एका वृक्षाखाली मारले. (हे वृक्ष अजूनही ह्या ठिकाणी आहे असा
    समज आहे). येथील नंदीदेवाच्या मूर्तीवर नऊ जखमा दिसून येतात. असा
    उल्लेख आहे कि भगवान शिवांनी मरुत्वाला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असताना
    मारले आणि त्यावेळी रविवार होता. 
    ४) एका आख्यायिकेनुसार यमदेवाला भगवान शिवांनी श्वेतकेतु राजाचा जीव
    हरण केल्याबद्दल शिक्षा केली. आणि ह्या ठिकाणी यमदेवाने भगवान शिवांना
    क्षमायाचना करण्यासाठी तपश्चर्या केली. 
    ५) असा उल्लेख आहे की भगवान शिवांनी येथे नऊ तांडव नृत्ये केली -
    आनंद तांडव, कली तांडव, गौरी तांडव, मुनी तांडव, संध्या तांडव, त्रिपुर
    तांडव, भुजंग तांडव, संहार तांडव आणि भिक्षाटन तांडव. देवीपार्वती साठी
    त्यांनी आनंद तांडव केले आणि ते तांडव करताना त्यांच्या नेत्रातून अश्रुंचे
    तीन थेंब पडले आणि त्यातून तीन तीर्थे निर्माण झाली.
    ६) इंद्र, ऐरावत, महाविष्णू, सूर्य, चन्द्र आणि अग्नी ह्यांनी येथे भगवान शिवांची
    उपासना केली. 
    ७) पत्तीनाथर नावाच्या संतांना येथे शिवदीक्षा प्राप्त झाली. 

    ह्या ठिकाणच्या इतर देवता

    १) भगवान विनायक देवस्थान
    २) भगवान वल्लभ गणपती आणि त्यांची पत्नी श्री वल्लभ देवी ह्यांचे देवस्थान 
    ३) श्वेतवनपेरूमल, पंचलिंग, नागेश्वर आणि वीरभद्र ह्यांची देवस्थाने
    ४) काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी 
    ५) भगवान विष्णूंचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. 

    ह्याशिवाय इतर देवतांच्या त्यांच्या त्यांच्या स्थानी कोष्ट मुर्त्या आहेत. 

    ह्या स्थळाचं एक अद्वितीय वैशिष्ठ्य असं आहे की इथे - तीन देवांच्या मुर्त्या
    आहेत - स्वयंभू लिंग, नटराज आणि अघोर मूर्ती. तीन देवींच्या मुर्त्या आहेत -
    ब्रह्मविद्याम्बिका, काली आणि दुर्गा. तीन तीर्थे आहेत - सूर्य, चंद्र आणि अग्नी,
    आणि तीन क्षेत्र वृक्ष आहेत - बिल्व, कोंद्रेई (बहावा), वडवानल

    इथे साजरे केले जाणारे सण

    १) मासी (फेब - मार्च) महिन्यात साजरा होणारा ब्रह्मोत्सव ज्याला इंद्राचा सण
    असं पण म्हणतात
    २) आडी (जुलै - ऑगस्ट) महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर साजरा होणारा
    दहा दिवसांचा सण 
    ३) आवणी (ऑगस्ट - सप्टेंबर) मध्ये गणेश चतुर्थी 
    ४) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) मध्ये साजरे होणारे स्कंद षष्ठी आणि
    अन्नाभिषेक सण
    ५) मार्गाळी (डिसेंबर - जानेवारी) महिन्यात आर्द्रा नक्षत्रावर साजरा होणारा
    आरुद्र दर्शन सण 
    ६) पंगूनी (मार्च - एप्रिल) महिन्यामध्ये अघोर मूर्तीवर लक्षार्चना 
    ७) कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अघोर पूजा 
    ८) इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीचा वैकासि सण. ह्या ठिकाणी ऐरावताला त्याच्या
    शापातून मुक्ती मिळाली. 
    ९) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा 
    १०) शरद ऋतू मध्ये दहा दिवसाचा नवरात्र सण
    आभार: खाली दिलेल्या वेब साईट्स वरून काही माहिती ह्या पोस्ट मध्ये समाविष्ट केली आहे
    1. https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ 2. https://temple.dinamalar.com/en/
    3. http://www.indiatemples.in/

     थिरुवैद्यनादर कोविल - मंगळ ग्रहाचे मंदिर



    हे मंगळ (अंगारक) ग्रहाचं मंदिर आहे. नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. 

    मंदिराचे नाव: वैथीश्वरन कोविल (वैद्य + ईश्वरन + कोविल)
    स्थळ देवता : श्री वैद्यनाथ 
    अम्मन (देवी): थैयल नायकी 
    गणपती: कर्पग विनायक 
    ग्रहाचे नाव: अंगारकन (तामिळ मध्ये छेवै)
    क्षेत्र वृक्ष: नीम 
    पत्ता: वैथीश्वरन कोविल, नागपट्टीनं जिल्हा, तामिळ नाडू ६०९११७, भारत

    मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

    सिरकाळी - मैलादुथुराई मार्गावर हे मंदिर आहे. 

    येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथील पांच गोपुरे (टॉवर) सरळ रेषे मध्ये (संरेखित) आहेत. इथे शिवलिंगासमोर दोन दीपस्तंभ आहेत. एक सोन्याचा आहे तर दुसरा चांदीचा आहे. सहसा नवग्रह देवस्थान हे मुख्य देवस्थानाच्या समोर असते, पण इथे मात्र ते मुख्य देवस्थानाच्या (गाभाऱ्याच्या) पाठीमागे आहे. मुख्य देवस्थानाच्या पूर्वेला भैरवाचे देवस्थान आहे, पश्चिमेला वीरभद्राचे देवस्थान आहे, दक्षिण दिशेला विनायकाचे तर उत्तरेला काली देवीचे देवस्थान आहे. असा समज आहे की ही चार दिशांना असलेली देवस्थाने रक्षक म्हणून आहेत. इथे एक पाचूचे शिवलिंग आहे.

    मंदिराच्या आख्यायिका:


    १) सिद्ध अमृत तीर्थ: असा उल्लेख आहे की सिद्धांनी इथे अमृताचा अभिषेक करून बरीच वरदानं मिळविली. अभिषेक करताना थोडे अमृत तीर्थामध्ये सांडलं आणि म्हणून ह्या तीर्थाला सिद्ध अमृत तीर्थ असे नाव मिळाले. ऋषी सदानंद ह्यांनी दिलेल्या शापामुळे इथे साप किंवा बेडकं आढळत नाहीत. 

    २) असा समज आहे की वारुळाची वाळू, अभिषेक तीर्थ, नीम पाने, अभिषेक चंदन आणि अभिषेक भस्म मिसळून जो लेप तयार होतो त्यात बरेच रोग निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. आणि असा समज आहे की ह्या ठिकाणी भगवान शंकरांनी स्वतः हा लेप तयार केला. आत्ता चालू काळात सुद्धा हा लेप इथे तयार होतो आणि जवळ जवळ ४०० रोग ह्या लेपाने बरे होतात असा विश्वास आहे. 

    क्षेत्र पुराण:

    जेव्हां अंगारक श्वेतकुष्ठरोगग्रस्त होता तेव्हा त्याला आकाशवाणीने, ह्या स्थळाला येऊन अमृत तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची उपासना करण्याची आज्ञा झाली. अंगारकाने आज्ञेनुसार इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली आणि त्यामुळे शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी (शिवांनी) अंगारकासाठी औषध बनवायला घेतलं आणि त्याच वेळी देवी पार्वती औषधासाठी एक विशेष तेल घेऊन आली. म्हणूनच तिला इथे तैलनायकी असे नाव पडले. 

    मंगळ ग्रह मंदिराचा इतिहास:

    पुराणातील कथांनुसार ह्या गावाचं मूळ नांव पुल्लीरुक्कुवेलूर (पुल्ल - जटायूचं एक नांव, इरुक्कु - ऋग्वेद, वेल - मुरुगन/कार्तिकेय स्वामी, उर - गाव) म्हणजे १) जिथे जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी युद्ध केलं २) जिथे ब्रह्माने ऋग्वेद निर्माण केले आणि ३) जिथे वेलाची (म्हणजे मुरुगन देवाच्या शस्त्राची) पूजा होते. 

    असं मानलं जातं की सगळे वेद हे सुरुवातीला ब्राह्मण रूपात होते. ऋग्वेदाने या जागी तपश्चर्या करून दोषनिवारण केलं. 

    प्रभू श्रीरामांनी या जागी जटायूच्या देहाचं दहन करून त्याला मुक्ती दिली. जटायूने या जागी रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध केलं. या युद्धामध्ये जटायू गंभीररीत्या जखमी झाला. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या जागी आले त्यावेळी जटायूने श्रीरामांना रावणाने सीतेला पळवून नेल्याची बातमी सांगितली आणि मग आपला प्राण सोडला. 

    या जागी मुरुगन स्वामींना (कार्तिकेय स्वामी) त्यांच्या मातेकडून म्हणजेच पार्वती मातेकडून सुरपद्मन राक्षसाचा वध करण्यासाठी वेल (भाला) शस्त्र म्हणून मिळालं. असा समज आहे की मुरुगन स्वामी आणि सुरपद्मन राक्षसाच्या युद्धामध्ये जे देव जखमी झाले त्यांना भगवान शंकरांनी बरं केलं आणि माता पार्वतींनी त्या देवांची सुश्रुषा केली. शंकर-पार्वतींनी इथे वैद्याची भूमिका केली म्हणून या जागेचं नाव वैदीश्वरन (वैतीश्वरन) असं प्रसिद्ध झालं. 

    असा समज आहे की ह्या ठिकाणी १८ कुंडं (पुण्य तीर्थ) होती. ह्यापैकी सध्या माहिती असलेली तीर्थे:

    १) सिद्ध अमृत तीर्थ - कामधेनूने निर्माण केलेलं पहिलं तीर्थ 
    २) कोदंड तीर्थ -  पुराणांनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेच्या वाटेवर असताना ह्या ठिकाणी स्नान घेतलं होतं 
    ३) गौतम तीर्थ - गौतम मुनींनी निर्माण केलेलं तीर्थ 
    ४) बिल्वतीर्थ
    आणि इतर  

    आख्यायिकांनुसार असा समज आहे की इथे उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना वरदानं मिळतात. कुठले ग्रह आणि देव कुठली वरदानं देतात?

    १) कर्पग विनायक सर्व इच्छा पूर्ण करतो 
    २) अंगारक अंगारक दोषांचं (मंगळ दोषांचं निवारण) करतो
    ३) वैद्यनादर स्वामी सर्व रोगांचं निवारण करतात 
    ४) सेल्व मुत्तू कुमारन (भगवान मुरुग) संततीचं वरदान प्रदान करतात 
    ५) तैलनायकी (देवी पार्वती) संततीचं कल्याण करते 
    मंदिरात साजरे होणारे सण:
    १) थाई महिन्याच्या मंगळवारी भगवान सेल्वमुत्तूकुमारन ह्यांचा १० दिवसांचा उत्सव 
    २) पंगूनी (मार्च -एप्रिल) महिन्यात २८ दिवसांचा ब्रह्मोत्सव 
    ३) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) महिन्यात सहा दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव 
    ४) वैकासि (मे-जून) मध्ये कार्तिकेय अभिषेक
    ५) प्रत्येक महिन्याच्या कार्तिक नक्षत्र दिवशी विशेष पूजा 
    ६) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा 

     कैलासनादर थिंगळूर - चंद्रग्रहाचे मंदिर

    हे चंद्रदेवाचे मंदिर आहे. साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे. 
    मुख्य दैवत: कैलासनादर 
    अम्मन (देवी): पेरियनायकी 
    क्षेत्रवृक्ष: बिल्व 
    पवित्र तीर्थ: चंद्र पुष्करिणी 
    पत्ता: थिंगळूर, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

    मंदिरापर्यंत पोचायचा मार्ग:  

    कुंभकोणम वरून थिरुवैयरुकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३३
    किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. थिरुपळनं पासून २ किलोमीटर्सवर आहे.

    ठळक वैशिष्ठ्ये:

    पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या महिन्यांमध्ये
    चंद्राची किरणे मूर्तीवर पडतात. चंद्रदेवाचे इथे स्वतंत्र देवस्थान आहे जिथे
    चंद्राची विशेष पूजा केली जाते.

    चंद्र मंदिराचा इतिहास:

    पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच
    बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर
    मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी
    चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण
    त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले.
    प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून
    प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या
    आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ बनवलं. त्या तीर्थामध्ये
    स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर
    प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला
    वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित
    (कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले. 

    मंदिरात साजरे होणारे सण:

    1. अमावस्या, कृत्तिका नक्षत्र, पौर्णिमा, महाशिवरात्री आणि आर्द्रा दर्शन या दिवशी इथे विशेष अभिषेक केला जातो.
    2. पंगूनी उत्तरम सण 
    3. कार्तिकेय सण 

     सूर्यनार कोविल - सूर्यग्रहाचे मंदिर

    हे सूर्य ग्रहाचे मंदिर आहे. सूर्य ग्रहदोषांचे हे परिहार स्थळ तर आहेच, पण
    त्याशिवाय हे उर्वरित ग्रहदोषांचे पण परिहार स्थळ म्हणून मानले जाते.
    साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. सर्व नवग्रहांपैकी हे एकच
    नवग्रह स्थळ आहे जिथे मुख्य दैवत भगवान शिव नसून भगवान सूर्य
    आहे. 
    मुख्य दैवत: शिवसूर्यन 
    अम्मन (देवी): उषादेवी, प्रत्युषादेवी (छायादेवी)
    क्षेत्र वृक्ष : अर्घ वृक्ष (अर्घवन), (मराठी मध्ये रुई)
    पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ
    पत्ता: सूर्यनार कोविल, तंजावूर जिल्हा

    मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

    मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कुंभकोणम किंवा
    मैलादुथुराई कडून रस्त्याने सूर्यनार कोविल कडे जाऊ शकतो किंवा
    अदुथुराई वरून रेल्वे करून पण जाऊ शकतो. पण रेल्वेचा मार्ग फार
    काही सोयीस्कर नाही. अदुथुराई रेल्वे स्टेशन पासून मंदिर उत्तरेला
    साधारण ३ किलोमीटर्स वर आहे.

    ठळक वैशिष्ठ्ये:

    हे भारतातील तीन प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. येथील गाभाऱ्यात
    सूर्यदेवाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला उषादेवी
    तर उजव्याबाजूला छायादेवी वधूंच्या रूपात आहेत. सूर्यदेवाची मूर्ती उभी
    असून त्यांच्या हातामध्ये लाल कमळ आहे. मूर्तीच्या पुढे सूर्यदेवाचे वाहन
    म्हणजेच अश्वाची मूर्ती आहे. गुरुग्रहदेवाची मूर्ती सुर्याभिमुख आहे जणू
    काही ते सूर्याला शांत करत आहेत. हे एकच मंदिर असं आहे की जिथे
    एकाच ठिकाणी सर्व नवग्रहांची स्वतंत्र देवस्थाने आढळतात. इथले सर्व
    नवग्रह हे अनुग्रह देण्याच्या रूपात आहेत आणि ते त्यांच्या वाहनांशिवाय
    आहेत.

    सूर्य मंदिराचा इतिहास:

    पुराणातील कथांनुसार पूर्वी काल नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या
    कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष
    समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि
    नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या
    ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते
    आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून
    त्यांच्या वंशजांकडे येतो. 

    जेव्हा नवग्रहांनी काल ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या
    (नवग्रहांच्या) अधिदेवतांना -  म्हणजेच शिव, पार्वती, कार्तिक स्वामी
    (मुरुगन), थिरुमल (विष्णू), ब्रह्म, वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) ह्यांना
    कळली, तेव्हा अधिदेवतांना त्यांचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना
    ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना
    कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली
    मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे
    ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील
    प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये
    जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं -
    रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून शिव आणि
    पार्वतीची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन
    करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची
    शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले.
    भगवान शिवांनी नवग्रहांना इथेच राहून भक्तांवर अनुग्रह करून त्यांचे
    ग्रहदोष निवारण करण्याची आज्ञा केली.

    मंदिरातील इतर देवस्थाने: भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश

    मंदिरात साजरे होणारे सण:

    1. फेब्रुवारी महिन्यामध्ये १० दिवसांचा रथसप्तमी सण 
    2. प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे भगवान सूर्यांवर विशेष अभिषेक आणि अर्चना केली जाते. 
    3. सूर्य आणि गुरु ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतांना इथे विशेष पूजा केल्या जातात.










     

    मनसर

     प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...