Tuesday, June 27, 2023

अंदमान

अंदमान द्विपसमूह भारताचे अविभाज्य अंग आहे. ही आपल्याकरता खरेच आनंदाची गोष्ट आहे. हिंदी महासागरास मिळालेले, हिंदी हे नामाभिधानही कदाचित, ह्याच आपल्या अस्तित्वाचे द्योतक असावे. मात्र, महासागरातील त्याच्या स्थानामुळे, अंदमान आणि निकोबार राज्यात, वर्षाचे बहुतांशी दिवस हवामान ढगाळ, वादळी आणि पावसाळी राहते. धूसर राहते. तापमान जरी मुंबईसारखेच असले तरी, हवामानातील महासमुद्री बेभरवसा, तिथे पुरेपूर भरून राहिलेला आहे. वर्षातले काही दिवसच तिथे वातावरण समेवर येते. निरभ्र वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्थिरपद, स्वस्थ समुद्र; स्वर्गसदृश हवामान प्रदान करतो. हेच दिवस तिथे पर्यटनास अत्यंत योग्य असतात. अशा दिवसात ज्यांनी तिथे पर्यटन केले, ते त्याची अविस्मरणीय गोडी, विसरूच शकत नाहीत. म्हणूनच अंदमानात पर्यटनास जातांना हवामान पक्षकर असायला हवे ह्यात तिळमात्र संशय नाही. एरव्ही, पर्यटनाचे अनेक दिवस खराब हवामानामुळे गमवावे लागलेले पर्यटक तिथे काही कमी नाहीत! संदर्भः http://www.andaman.climatemps.com/ वरील तक्ता स्वतःहूनच सारी हवामान परिस्थिती स्पष्ट करतो.

ओले दिवस पर्यटनास योग्य समजायचे नसतील, तर फेब्रुवारी अखेर व मार्च महिन्याची सुरूवात हाच मुहूर्त सर्वोत्तम समजायला हवा. ह्याच दिवसात नितळ, ऊबदार, सूर्यप्रकाश आणि कमालीची दृश्यमानताही साथ देत असते. आम्हालाही ह्याच सुवर्णदिवसांत अंदमानात जाण्याची संधी मिळाली हे आमचे सुदैव!

बोरिवलीच्या प्रथमेश टूर्सतर्फेच्या ६ रात्री आणि ७ दिवसांच्या; २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत सुरू होऊन, ३ मार्च २०१५ रोजी मुंबईतच संपणार्‍या सहलीकरता, आम्ही नावे नोंदवली. सकाळी पावणे सहाच्या विमानाने निघून, चेन्नईमार्गे सकाळी साडेदहा वाजता आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. एन.के.इंटरनॅशनल ह्या फिनिक्स धक्क्यानजीकच्या हॉटेलात उतरलो. फिनिक्स धक्क्यावरूनच हॅवलॉक बेटाकरता बोटी सुटतात. नॉर्थ बे आणि रॉस बेटांकरता मात्र अबर्दिन धक्क्यावरून बोटी सुटतात. सुग्रास जेवण झाल्यानंतर दुपारी कॉर्बिन कोव्ह बीचला गेलो. तर संध्याकाळी सेल्युलर जेलमधल्या लाईट अँड साऊंड च्या १८०० च्या शोला. हा शो हिंदीत असतो. ह्यानंतरचा १९३० वाजताचा शो इंग्रजीत असतो. ह्याचे दर माणशी तिकीट ५० रुपये आहे.

कॉर्बिन कोव्ह बीच, बेटाच्या महासागराकडील दिशेला आहे. तिथे आम्ही शहाळ्याचे पाणी प्यायले. शंखशिंपली गोळा केली. फोटो काढले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणशी ३०० रुपये दराने चौघे जण स्पीडबोटीतून चक्कर मारून आलो. कॉर्बिन कोव्ह बीच वरून, खुल्या महासागरातील भूशिरावरच्या बेटाकडे आम्ही स्पीडबोटीने निघालो खरे, मात्र नावाड्याने आमची वेव्ह रायडर नावाची बोट, समुद्री लाटांवर अशी काही चढवली की, आपटाआपटीने आमची हाडे खिळखिळी झाली. कधी टोपी उडून गेली, तर कधी कॅमेरा हातातून निसटला! असे वाटत होते की बोट खालच्या दगडांवर आदळते आहे. फुटते की काय, असेही वाटून गेले. थोडे हळू चालव सांगायला तोल सावरायच्या आत, आम्ही बेटानजीक पोहोचलोही होतो. खुल्या सागरात असल्याने, बेटावर उतरायला मात्र मनाई आहे!

संध्याकाळ फारच लवकर होते. पाच वाजताच उजेड कमी होऊ लागलेला होता. साडेपाचच्या सुमारास आम्ही सेल्युलर जेलसमोर जाऊन पोहोचलो. काही फोटो काढले आणि लाईट अँड साऊंड शोला जाऊन बसलो. सात पंखी सेल्युलर जेलच्या मध्य मनोर्‍यानजीक असलेल्या वृक्षराजाच्या साक्षीने कथा गुंफली जाते. अवघड ठरणार्‍या राजकीय कैद्यांना विजनवासात ठेवण्यासाठी, अशा प्रकारच्या तुरूंगाची योजना करणार्‍या ब्रिटिशांच्या बुद्धिने मन स्तिमित होते. जगावर हुकूमत गाजवत असतांना देखील लोकशाहीने, कायद्याच्या राज्याने, प्रशासन चालवितो आहोत असे दाखविण्याच्या त्यांच्या अट्टाहासाखेरीज; ह्या सव्यापसव्याचे काय समर्थन असू शकते. एरव्ही जगातील जेत्यांनी जीतांना नाहीसे करणे; ह्या ’बळी तो कानपिळी’ थाटाच्या पाशवी प्रथेपासून, काळ्यापाण्याची शिक्षा तयार करण्याच्या, मानवी क्रूर प्रथेपर्यंत ते येते ना. शो लक्षात राहील असा, किंवा खूप प्रेरणादायी असा वाटला नाही. मात्र, त्या ठिकाणाच्या प्रखर क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीने, देशाकरता जगण्याची दुर्दम्य जिज्ञासा मनात पुन्हा उजागर केली.

 दुसरा दिवस पोर्ट ब्लेअर शहरदर्शनाचा होता. सकाळच्या सत्रात आम्ही सेल्युलर जेल सविस्तर पाहिला. नंतर चॅथम आरायंत्रही विस्ताराने बघितले. दुपारच्या सत्रात १. पुरातत्त्व संग्रहालय (आंथ्रापॉलॉजिकल म्युझियम), २. मात्स्यिकी संग्रहालय (फिशरीज म्युझियम), ३. नौदलाचे समुद्री संग्रहालय -समुद्रिका- (नेव्हल मरीन म्युझियम), आणि ४. कुटिरोद्योग निर्मित वस्तूंचा विक्रयहाट -सागरिका- (कॉटेज इंडस्ट्रीज एंपोरियम); ह्या चार गोष्टी बघितल्या.

२६-०२-१९६६ रोजी मुंबई येथे वीर सावरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर बरोब्बर ४९ वर्षांनी आम्ही पोर्ट ब्लेअर मधील त्यांच्या कोठडीत पोहोचलो होतो. ज्वलंत राष्ट्राभिमानाखातर काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या दिवंगत नेत्यास आम्ही सुमनांजली वाहिली. त्यांच्या "माझे मृत्यूपत्र" ह्या कवितेचे अखेरचे कडवे सामुदायिकरीत्या म्हटले.

की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे ।
बुद्ध्याच वाण धरले करी हे सतीचे ॥ - स्वातंत्र्यवीर सावरकर

शहिदांनी ज्याकरता प्राणार्पण केले, सावरकरांसारख्या राष्ट्रवीरांनी ज्याकरता अपार कष्ट सोसले, त्या राष्ट्राकरता, अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आमचे दायित्व पुन्हा एकदा उजागर झाले! त्या कर्तव्यास आम्ही सदैव लक्षात ठेवू.

केवळ अंदमानातच आढळून येणारा पडौक वृक्ष, हा ह्या राज्याचा राज्यवृक्ष आहे. तो सुमारे १२० फूट उंच वाढतो. पानगळीचा पर्णसंभार बाळगतो. अशा वृक्षांचे उंचच-उंच जंगल तर नजरेचे पारणेच फेडते. तो अत्यंत भारदस्त दिसतो आणि उत्तम लाकडी वस्तुंकरताचे दर्जेदार लाकूड पुरवतो. पडौक लाकूड हे सागवानी लाकडापेक्षा जास्त सुदृढ असते. ह्या पडौकवनांतील वृक्षांचा वापर, बांधकामांकरता आणि बैठकीच्या सामानांकरता लागणार्‍या लाकडाच्या गरजा भागवण्याकरता, करता यावा, म्हणून १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारने इथे एका आरा यंत्राची स्थापना केली होती . दुर्दैवाने दुसर्‍या महायुद्धात थेट ह्या ठिकाणी स्फोटके पडल्यामुळे यंत्राचे अपरिमित नुकसान झाले. मात्र पूर्व पाकिस्तान, लंका आणि बर्मामधून ब्रिटिशांनी इथे पुनरुत्थानाकरता आणलेल्या लोकांच्या लाकडाबाबतच्या अतिरिक्त गरजा भागविण्याकरता ह्या यंत्राची पुनर्स्थापना करण्यात आली. बिनीच्या अंदमानी पडौक वृक्षाची कटाई केवळ ह्या सरकारी आरा यंत्रावरच केली जाते. हे आरायंत्र चॅथम बेटावर आहे. हे बेट पोर्ट ब्लेअर शहराच्या उत्तरेला आहे. पोर्ट ब्लेअरशी ते केवळ चॅथम पुलानेच जोडलेले आहे. दुपारच्या जेवणापूर्वी आम्ही ह्या आरायंत्राला भेट दिली.

पहिल्या चित्रात प्रवेशद्वार आणि वन-उप-संरक्षकांचे कार्यालय दिसत आहे. खालच्या ओळीत आरायंत्रावर, तसेच मानवी कौशल्याने साधलेल्या लाकडी वस्तू दिसत आहेत.

पहिल्या चित्रात उभ्या दिसणार्‍या दोन बांबूंपैकी एकाचा काप मधल्या चित्रात दिसत आहे. मग दिसते आहे ती लाकडातून साकारलेली विश्वकर्म्याची मूर्ती.

त्यानंतरच्या चित्रात दिसते आहे आरायंत्राचे प्रारूप.

खालील पहिल्या चित्रात आरा यंत्राकरता, दातेरी आरीचा पट्टा उचलून नेला जात असलेला दिसत आहे. दुसर्‍या चित्रात कापले जाणारे पडौक वृक्षाचे लांबलचक खोड दिसते आहे.

त्या कामगाराच्या डाव्या हाताकडील खोडाच्या टोकास आरीचे पाते खोडात उभे घुसलेले स्पष्ट दिसत आहे. उजव्या बाजूस रुळांवरून सरकत पुढे जाणार्‍या खोडातून कापली गेलेली फळीही, त्या कामगाराच्या उजव्या बाजूस सुटी झालेली दिसते आहे.

तिसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरपासून फिनिक्स धक्क्यावरून, कोस्टल क्रूझ बोटीने हॅवलॉक बेटावर गेलो. देशात सर्वोत्तम म्हणून, पर्यटन खात्याने गौरवलेल्या राधानगरी बीचवर गेलो. पुन्हा समुद्रस्नान केले आणि हॅवलॉक बेटावरच हॉटेल हॉलिडे इन्नमध्ये राहिलो. राधानगरी बीचवर, पैसे देऊन का होईना पण, कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची चांगली सोय आहे. हॅवलॉक बेटावरले आमचे वास्तव्य सगळ्यात आनंददायक होते. हॉटेलच्या परंपरागत कल्पनेलाच छेद देणारी सगळी व्यवस्था होती तिथे. खूप मज्जा आली. सर्व अत्याधुनिक सोयीसवलतींसह सुसज्ज पण झावळ्यांच्या झोपड्या वाटाव्यात अशा खोल्या.

हॉटेल हॉलिडे इन्न, हॅवलॉक

वेताच्या काड्यांना वाकवत वाकवत तयार केलेली मंचके, खुर्च्या, स्तंभ, छत्र्या इत्यादींमुळे जास्तच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत होते. अंदमानातील वृक्षराजींत वेळूची बेटे आणि वेताच्या झुडुपांचा समावेश नक्कीच असणार! जागोजाग फळलेल्या नारळी सर्वदिस नारळांचा वर्षाव करत होत्या. सर्वत्र, इथे तिथे सुके नारळ आणि शहाळी पडलेली दिसत होती.

वेताच्या वस्तूंची रेलचेल

चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजताच हॉटेल सोडून द्यायचे होते. म्हणून सगळे सामान गोळा करून स्वागतकक्षात रचून ठेवले. नास्ता केला आणि मग आम्ही निघालो एलिफंट बीच बघायला. इथे पहिल्यांदा आमच्यापैकी एका मुलीने (मुलगी कसली, लग्न झाले आहे आता तिचे!) सी-वॉक केले. आणि आम्ही सगळ्यांनी स्नॉर्केलिंगचा भरकस प्रयत्न केला. दोन जणांना स्नॉर्केलिंग करण्यात यश आले. इतरांनी त्याचा आनंद लुटला.

अंदमानी मासा!

अंदमानी समुद्रातून मासा वेचून आणतांना मी.

गळ्यापर्यंतच्या पाण्यात, नाकावर मुखवटा लावून नाकात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. डोळ्यांवर समुद्री गॉगल लावून, डोळ्यात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. तोंडात एका नळीचे कवळीच्या आकाराचे एक टोक धरून, दुसरे टोक पाण्याबाहेर तरंगवायचे. ह्या नळीतूनच तोंडाने श्वासोच्छवास करायचा. पाण्याच्या पृष्ठभागावर तरते राहून, आणि पाण्यात डोके खुपसून तळ न्याहाळायचा. अशी ही स्नॉर्केलिंगची संकल्पना असल्याचे मला कळले. मात्र ’मुख से साँस’ घेण्याचे मात्र, मला किंवा इतर बहुसंख्यांकांना जमू शकले नाही. पोहोणे येत असलेल्या एक दोघांनाच काय ते साधले. तळ अगदी स्वच्छपणे दिसू शकत असलेल्या -नितळ- पाण्यात डुंबण्याचे सुख मात्र सगळ्यांनाच खूप साधले. प्रसन्न वाटले. सुनामीमुळे पडलेल्या झाडांचे भग्नावशेष ह्या किनार्‍यावर विखुरलेले आहेत. त्यांच्या सोबतीने अनेकांची प्रकाशचित्र सत्रे झाली. इथे मात्र कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची कुठलीच सोय त्या दिवशी उपलब्ध झाली नाही. कारण असे सांगितले गेले की त्या व्यवस्थेची किल्ली जवळ बाळगणारी व्यक्तीच आज कामावर हजर नव्हती. असो.

पाचव्या दिवशी वंडूरमार्गे जॉली बॉय बेटावर जायचे होते. वंडूर बंदरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय समुद्री उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. ह्या बेटावर प्लास्टिकमुक्त वातावरण सांभाळले जाते. म्हणून बाटलीबंद पाणी नेण्यासही मनाई आहे. दर दोन माणसांगणिक, २०० रुपये अनामत भरून दोन लिटरची एक ओतीव प्लास्टिकची वॉटर बॅग दिली जाते. आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात. बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात. इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की, सगळ्यांनाच आपापल्या सामांनांतून असंख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्याने टाकून द्याव्या लागल्या. अंदमानात विशेषतः पाण्यात डुंबायचे असल्याने प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेण्याच्या मोहापायी अक्षरशः हैराण व्हावे लागले. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून द्याव्या लागल्या. आतील सामान उघडे पडले. स्त्रियांना तर हा फटका फारच अनावर झाला. अशा रीतीने आमचा प्लॅस्टिकविरहित प्रवास प्रत्येकी आठ-दहा माणसे नेणार्‍या छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे सुरू झाला. बेट सुरेखच होते. दृष्ट लागण्यासारखे. अंदमानात आल्यानंतर इथे आम्ही प्रथमच, काचेच्या तळाच्या नावांतून समुद्रतळ बघितला. त्याकरता प्रत्येकी ३०० रुपये घेऊन, एका बोटीतून आठ आठ जणांना नेऊन, तीन निरनिराळ्या ठिकाणी सागरतळ दाखवण्यात आला. कॅमेर्‍यांत बंदिस्त केला.

अंदमानी सागरतळातील जीवसृष्टी आणि ज्या काचेच्या तळाच्या होडीतून ती दिसली, ती होडी.

जॉली बॉय बेटावर आम्ही पॅक लंच नेलेले होते. किनार्‍यावरील तिवरांच्या जंगलात, तिवरांच्या झाडांच्या जमिनीनसमांतर फांद्यांवर, तर कुठे विशेष तयार केलेल्या बाकड्यांवर आणि कुटिरांत आम्ही स्वेच्छा-सहभोजनाचा लाभ घेतला. सहाव्या दिवशी नॉर्थ बे बेटावर समुद्रसंचार (सी-वॉक), मग ब्रिटिश प्रशासनाचे अंदमानातील मुख्यालय राहिलेल्या रॉस बेटावर विहारफेरी आणि पोर्ट ब्लेअरला परत, असे नियोजन होते. हा सगळा प्रवास आम्ही अबर्दीन धक्यावरून एम.व्ही.जया नावाच्या पन्नास आसनी बोटीतून केला. नॉर्थ बे आयलँडच्या किनार्‍याजवळच सी-लिंक कंपनीचे सी-वॉकर हे जहाज उभे आहे. पोर्ट ब्लेअर वरून समुद्र-संचार करू इच्छिणार्‍या पर्यटकांना ह्या जहाजावर आणतात. ह्याकरता समुद्र संचाराकरताचे रु.३,२००/- चे तिकीट वेगळ्याने घ्यावे लागते. स्कूबा डायव्हिंगकरता रु.३,५००/- चे तिकीट पडते. मात्र, ह्यात प्रत्येक स्कूबा डायव्हरसोबत एक स्वतंत्र पाणबुडा सोबत दिला जात असतो. स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावे लागते. पोर्ट ब्लेअर वरून येतांना, एका छोट्या स्वयंचलित होडीतून, जहाजालगत उभ्या असलेल्या दुसर्‍या होडीत आणि तिथून ह्या जहाजात आपण प्रवेश करतो.

इथेच कपडे बदलवण्याकरता चेंजिंग रूम, आपले व्यक्तिगत सामान ठेवण्याकरता लॉकर इत्यादी पुरवले जाईल असेही तिकीट देतांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इथे चेंजिंग रूमच्या नावाखाली एक झापड असलेला आडोसा, आणि लॉकरच्या नावाखाली झाकणे असलेले अपुरे कप्पे एका रॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याला कडीकुलूप करावे अशी कोणतीही सोय नाही. समुद्र संचाराच्या कल्पनेने भारावलेले पर्यटक ह्याच तुटपुंज्या सेवांचा आनंद सुखाने घेत असतात. प्रशासकीय अधिकारी सुखासिन ठेवले जात असणार, त्यामुळे त्यांचीही फारशी अडचण होत नाही. तरीही, समुद्र-संचार कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार प्रामाणिक, सचोटीचा आणि विश्वास निर्माण करणारा आहे, ह्यात मुळीच संशय नाही.

जहाजाच्या मागच्या बाजूला, साधारण जहाजाच्याच आकाराच्या गोलाकार समुद्राला, तरत्या गोलकांच्या आधारे, तळापर्यंत लोंबणारे जाळे लावून बंदिस्त केलेले आहे. जहाजावरून एक लोखंडी शिडी तळापर्यंत उतरवलेली आहे. तिच्यावरून समुद्राकडे पाठ करून, नेसत्या कपड्यांनिशी आपण दोन चार पायर्‍या उतरून तळाकडे निघालो, म्हणजे गळ्यापर्यंत पाण्यात शिरल्यावर, ३२ किलो वजनाचे हवेशीर, म्हणजे पाठीमागच्या बाजूने दाबित हवेची नळी जोडलेली असते असे, शिरस्त्राण आपल्या डोक्यावर चढवले जाते. जहाजावर एक मोठ्ठा हवादाबक (काँप्रेसर) असून त्यातून दाबित हवा आणणार्‍या सुमारे एक सेंटिमीटर व्यासाच्या लांबलचक (पन्नास, शंभर मीटर लांबीच्या असाव्यात) नळ्या शिरस्त्राणास जोडलेल्या असतात. अगदी चष्मा घालूनही हे शिरस्त्राण चढवले जाते. कारण शिरस्त्राणाच्या आतील भाग कोरडाच राहत असतो, शिवाय चष्मा घातल्याने आपण नेहमीसारखेच स्वच्छ पाहूही शकत असतो. शिरस्त्राणाचे आकारमान असे असते की, त्याचे पाण्यातील वजन केवळ ७ किलोच भरते. मात्र, ह्या ७ किलोच्या अतिरिक्त वजनामुळेही आपण सागरतळाकडे लोटले जाऊ लागतो. अशावेळी, सोबत करत असलेला पाणबुडा आपल्याला शिडी सोडायची खूण करतो आणि ती सोडताच आपण त्याचा हात धरून झपाट्याने सागरतळाशी पोहोचतो. इथे सागरतळ साधारणपणे ५ मीटर म्हणजे सुमारे १५ फूट खोल असतो. अर्थात हवेची नळी कायमच हवादाबकाला जोडलेली राहून आपल्याला दाबित हवेचा पुरवठा करत राहते. शिरस्त्राणाच्या आतील हवेच्या दाबाने बाहेरचे पाणी शिरस्त्राणामध्ये शिरू शकत नाही. आपण बाहेरच्यासारखाच सुखाने श्वासोच्छवास करत राहतो.

समुद्रसंचार करणार्‍या आठदहा संचारकर्त्यांमागे तीन पाणबुडे सोबत असतात. आमचा गट आठ जणांचा होता. आमच्याच सोबत पर्यटन करणारे पाच जण आणि नवरा, बायको व त्यांचा सुमारे दहा वर्षांचा एक मुलगा असे इतर तिघे बंगाली भाषक, ह्यांचा हा गट होता. तळाशी पोहोचल्यावर संचार कर्त्यांची हातात हात देऊन एक माळ तयार केली जाते. त्या माळेच्या एका टोकास एक, तर दुसर्‍या टोकास दुसरा पाणबुडा हाती धरून मार्गदर्शन करत असतो. काय करायचे आहे ते खुणेनी समजावून सांगण्याचे त्यांचे कसब मला फारच अपूर्व भासले. आवडले. तिसरा पाणबुडा जलगच्च प्रकाशचित्रकाने (वॉटरटाईट कॅमेर्यापने) संचारकर्त्यांचे फोटो काढत असतो. आपण बाहेर येऊन कपडे बदलेपर्यंत, अशा प्रत्येकी १२ फोटोंची एक सी.डी.ही तयार करून आपल्या हाती देत असतात.

आत शिरण्यापूर्वी आम्हाला आठ जणांना एकत्र करून जहाजावरील एका ज्येष्ठ खलाशाने एक पाच मिनिटांचे व्याख्यान दिले. पाण्यात न विरघळणार्‍या शाईचा वापर करून, आठही जणांच्या उजव्या हाताच्या तळव्यामागे ए-८ असे इंग्रजीत लिहूनही ठेवण्यात आले. पाणबुड्यांना आमची ओळख पटावी म्हणून. आपण सुंदर आहे असे दाखविण्यासाठी करतो ती हस्तमुद्रा; ’मला जमते आहे. मी स्वस्थ आहे. आता समुद्रसंचार करू या’ असे सोबतच्या पाणबुड्यांना सांगण्याकरता वापरावी असे सांगण्यात आले. तसेच उजव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेने दाखवल्यास; ’मला ताबडतोब बाहेर काढा. अस्वस्थ वाटते आहे.’ असा अर्थ सोबतच्या पाणबुड्यांना कळेल आणि ते तुम्हाला बाहेर तत्काळ काढतील. असेही सांगण्यात आले. मात्र ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही हावभावांना आणि खुणांना समुद्रसंचारासंदर्भात काहीही अर्थ नाही, असे बजावून सांगण्यात आले.

खरे तर मी तासाभरापासून नंबर लागण्याची वाट पाहत होतो. लघवीची भावनाही होत होती. मात्र जहाजावर स्वच्छतागृहच नसल्याने, तशी सोय नव्हती. समुद्रात उतरल्यावर सहज विसर्जनाचा विचारही उद्भवला होताच. मात्र प्रत्यक्षात पाण्यात, समुद्रतळाशी पोहोचल्यावर आजूबाजूच्या वाढत्या दाबाच्या प्रभावाने ती भावनाही क्षीण होऊन, नामशेष झाली.

आता आमच्यासोबतच्या एका महिलेस, “फ्लोट होत आहेत” ह्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले. त्यांचे म्हणणे असे होते की, ’मला चांगले जमते आहे’ ह्या अर्थाने त्यांनी उजव्या हाताचा अंगठा वर करून दाखवला. मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे ही खूण चुकीची ठरल्याने त्यांना बाहेर काढले गेले. तरीही त्यांचे पूर्ण पैसे, सी-लिंकने संध्याकाळपर्यंत परत केलेले होते. इथे हे नमूद करावे लागेल की, सागरतळाशी अशा शिरस्त्राणासह वावरत असतांना, आपले पाण्यातले वजन कमी भरत असल्याने, चालण्याकरता हलकेच पाऊल उचलले तरी, उडी मारल्यासारखे शरीर वर उसळत असते. अशा परिस्थितीत जमिनीवर पावले रोवून ठेवणे, आणि ताठ, सरळ उभे राहणे अत्यंत जरूर ठरते. कारण ह्या उसळीचा आपल्याला अंदाज यायला जरासा वेळच लागतो. शिवाय आपण खाली वाकलो तर शिरस्त्राणात पाणी शिरून आपल्याला बुडण्याचा धोका संभवतो. एका पाणबुड्यास तीन-चार संचारकर्त्यांवर लक्ष ठेवायचे असल्याने आणि त्याचेवर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने, अशा प्रकारे अस्थिर होणार्‍या व्यक्तीस बाहेर काढणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत असणार.

पहिल्या संचारकर्त्यास हाताने धरून तळाशी गेलेला पाणबुडा खालीच थांबला. दुसर्‍या पाणबुड्याने मग एक एक करून इतर संचारकर्त्यांना खाली आणले. त्यांच्या हातात आधीच खाली उतरलेल्या संचारकर्त्याचा हात सुपूर्त करून तो इतरांना आणायला वर जात असे. तोपर्यंत तळाशी आलेले संचारकर्ते परस्परांचे हात हातात घेऊन समोरच्या दिशेने वाट चालण्याकरता सज्ज होऊन राहत. त्यांच्या माळेच्या एका टोकास पहिल्या पाणबुड्याने घट्ट धरून ठेवलेले होतेच. आता, डोक्यावर शिरस्त्राण, त्यास पाठीमागे जोडलेली हवेची नळी अशा एक एक करून आठही संचारकर्त्यांना दोन पाणबुड्यांच्या संचाने तळापर्यंत आणून सोडले होते. सगळ्यांची तोंडे समोरच्या बाजूला आणि पाठी जहाजाकडे होत्या. त्याच दिशेने सगळ्यांच्या हवेच्या नळ्याही जहाजावरील हवादाबकापर्यंत गेलेल्या होत्या. माळेच्या दोन्हीही टोकांना पाणबुडे होते. अशी मालिका मग एका विहीरसदृश खळग्याच्या कडेवरील पांढर्‍याशुभ्र बारीक वाळूच्या पाऊलवाटेवरून मार्ग चालू लागली.

खळग्यात एके ठिकाणी एक मोठासा खडक उभा होता. त्यावर गुलाबी रंगांची सजीव पोवळी लगडलेली होती. झुडूपांप्रमाणे डोलत होती. मग एका पाणबुड्याने आम्हा एकेकाला सुटे करून आमचा हात त्या पोवळ्यास लावून दिला. सगळ्यात अखेरच्या चित्रात तळाशी मध्यभागी असलेले तपकिरी पोवळे, आम्ही हात लावताच गर्द निळे, जांभळे दिसू लागले. लाजाळूसारखे मिटलेही. हाच प्रयोग मग आम्ही सुट्यासुट्याने आणि एकत्रितपणेही केला. दरम्यान तिसरा पाणबुडा खडकाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन, जलगच्च प्रकाशचित्रकाने आमचे फोटो काढत होता. आजूबाजूला रंगीबेरंगी मासे स्वैर संचार करत होते. त्यांना हात लाऊन पाहण्याचे आमचे प्रयत्न मात्र असफल होत असत. एक म्हणजे ते अत्यंत चपळ असत. दुसरे म्हणजे पाण्यात खोल असल्याने आमच्या हालचाली अतिशय मंद होत. आणि तिसरे म्हणजे शिरस्त्राणाच्या काचेतून खोलीचा अदमास योग्यप्रकारे येतच नव्हता.

आता आम्हाला हा समुद्र संचार आवडू लागला होता. पण हे सगळे होतपर्यंत आम्हाला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. सुमारे अर्धा तास तरी गेला असावा. मग जसे खाली आणले होते, तसेच एकेकाला वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक पाणबुडा मालिकेचे एक टोक धरून तळाशी थांबला. दुसरा एकेकास शिडीपर्यंत नेऊन, शिडीवरून वरपर्यंत नेई. शिरस्त्राण पृष्ठभागाशी पोहोचताच जहाजावरील कर्मचारी ते काढून बाजूला करी, त्याची नळी काढून टाकी आणि ते बाजूला ठेवून देई. अवजड सामान गाडीत चढवून घ्यावे तसे ते दृश्य दिसे. बाहेर येणारा विजयी वीराच्या आविर्भावात असे. अद्भूत दर्शनाचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असे. तर आत उतरण्यास तयार असलेले लोक, आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत असतांना दिसत असत. अशा प्रकारे आमचा हा अद्भुतातला प्रवास सुखरूप पार पडला!

नॉर्थ बे बेटावरून पोर्ट ब्लेअरला परततांना रॉस बेटावर जेवण करायचे होते. जया बोटीतून आम्ही मार्ग आक्रमू लागलो. रॉस बेट, पोर्ट ब्लेअर शहरातून सारखेच दिसत राहते. सुरेख दिसते.

तिथे पोहोचल्यावर वरील पाटी वाचून मात्र धसकाच बसतो. अर्थात तिथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत, हे दंड वसूल करण्याकरता नेमलेले लोक, दहा टाक्केही नसल्याने किंवा पर्यटकांना उगाच त्रस्त करायचे नाही ह्या धोरणामुळे असेल, पण वरीलप्रमाणे दंडवसूली अजिबातच होत नसावी असे दिसले. बेट मात्र स्वच्छ सांभाळलेले दिसून येते. महासागरी नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण तर त्याला लाभलेलेच आहे. त्यामुळे ते आवडतेही.

बेटावर अरुंधती राव नावाची एक खासगी मार्गदर्शक आहे. ती माफक दरात, शुल्क घेऊन, पर्यटकांचे प्रबोधन करत असते. मात्र तिची खासियत ही आहे की ती, खार, हरणे, ससे, मोर इत्यादिकांना त्यांच्या नावाने हाका मारते. ते लोक येतात. ती मग सोबत आणलेले ब्रेड त्यांना खायला देते. हे हरीण बदमाश आहे. लहान मुलांना मारेल. सांभाळा. ते हरीण आंधळे आहे. काही करणार नाही. अशा माहित्याही देत असते. प्रवासी तिच्या व्याख्यानांवर खूश असतात. त्या प्राण्यांसोबत आपापली प्रकाशचित्रे काढून घेत असतात. तेही सुखाने प्रकाशचित्रे काढू देत असतात.

अशा रीतीने रॉस बेटाची संस्मरणीय सफर, तासाभरात सुखाने संपन्न होते.

अरुंधती रावने ओढणीत बांधून घेतलेला जखमी ससा आणि तिने बोलावल्यावर धाऊन आलेली हरणे.

एम.व्ही.जया ह्या बोटीतून मग आमचा अंदमानातील अखेरचा समुद्रप्रवास, पोर्ट ब्लेअरच्या दिशेने सुरू झाला. संपूच नये असे वाटत असतांनाच संपलाही.

परतीचा प्रवास दुसरे दिवशी विमानाने चेन्नईकडे उड्डाण भरून सुरू झाला. प्रवासाला निघाल्यावर विमानातून भारतभूमीची प्रकाशचित्रे काढावी अशी इच्छा झाली खरी. पण कॅमेरा बंदिस्त करून चेक-इन लगेजमध्ये ठेवलेला होता आणि मोबाईल बंद केलेला होता. परतीच्या प्रवासात मात्र आठवणीने मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून, विमानातून असंख्य प्रकाशचित्रे काढली. खाली दिसणार्‍या दृशांचा, ज्ञात भौगोलिक ठिकाणांशी संबंध जोडायचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नव्हते. घरी आल्यावर जेव्हा असे प्रयत्न वेगळ्याने केले तेव्हा, कृष्णानदीवरले येरलवाडी आणि शिरसवाडी धरण मात्र विमानातून काढलेल्या फोटोत, त्यांच्या आकारांवरून आणि परस्पर तुलनेतील त्यांच्या स्थानांवरून स्पष्ट ओळखू येत आहे.

Yeralwadi Dam on Krishna River on Google Map. And WP_20150303_138.jpg, 03 March 2015, 14:41:02, From GoAir’s G8-304 Chennai-Mumbai Flight-30F.

त्यानंतर संपूच नये असा वाटणारा अंदमानाचा प्रवास लवकरच पूर्णत्वास आला. मुंबई विमानतळावर त्याची सांगता झाली.

https://nvgole.blogspot.com/search/label/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2



 https://bravoplanner.ru/mr/blog/gde-nahodyatsya-andamanskie-ostrova-chto-predstavlyayut-soboi/

अंदमान बेटे कोठे आहेत. अंदमान बेटे कोणती आहेत? इतिहासात एक संक्षिप्त सहल


भारत, अंदमान बेटे, भारत

नकाशावर दाखवण्यासाठी

अंदमान बेटे हिंद महासागरातील समुद्र - अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्यामध्ये पसरलेली आहेत. अंदमान द्वीपसमूहात 550 बेटांचा समावेश आहे, त्यापैकी फक्त 26 लोकवस्ती आहेत, फक्त 9 बेटे पर्यटकांसाठी खुली आहेत.

अंदमान बेटांवर कसे जायचे

द्वीपसमूह भारताच्या पूर्व किनार्‍यापासून 1000 किलोमीटर अंतरावर आहे आणि दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित आहे. कोलकात्याहून विमानाने तुम्ही अंदमान बेटांवर जाऊ शकता. दिल्लीपासून बेटांपर्यंत तुम्ही फक्त कोलकातामार्गेच जाऊ शकता. विमाने अंदमानची राजधानी - पोर्ट ब्लेअर येथे नेली जातात. कलकत्ता, चेन्नई आणि विशाखापट्टणम ते पोर्ट ब्लेअर पर्यंत, तुम्ही बोटीने जाऊ शकता (सुमारे 60 तास, ज्याला 4 दिवस लागतील).

द्वीपसमूहाचा प्रदेश संरक्षित क्षेत्र असल्याने, त्यास भेट देण्यासाठी परमिट आवश्यक आहे. जे लोक विमानाने बेटांवर येतात त्यांना पोर्ट ब्लेअर विमानतळावर अशी परवानगी मिळू शकेल. तुम्ही जहाजाने बेटांवर जाण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला दूतावास (व्हिसा मिळाल्यावर) किंवा निर्गमन बिंदूच्या बंदरात परमिटची काळजी घ्यावी लागेल. परमिट 30 दिवसांच्या कालावधीसाठी जारी केले जाते. सर्व बेटांना भेट देताना, हॉटेलमध्ये चेक इन करताना तुमची परवानगी तपासली जाईल - एखादे महत्त्वाचे दस्तऐवज काळजीपूर्वक हाताळा.

अंदमान बेटे खुणा

अंदमान बेटे - दैवी निसर्ग, विदेशी वनस्पती आणि प्राणी, कोरल रीफ, जंगले, ज्याच्या झाडीमध्ये स्थानिक बेटवासी लपलेले आहेत - असे लोक ज्यांना सभ्यतेने स्पर्श केला नाही.

1789 मध्ये, ब्रिटिश वसाहतवादी प्राचीन लोकांची वस्ती असलेल्या भारतीय बेटांवर उतरले. त्यांनी या जमिनीवर एक तुरुंग बांधला, जो 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत कार्यरत होता. कारागृहाच्या इमारती आणि परिसर आज ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हे राजधानी पोर्ट ब्लेअर मध्ये स्थित आहे.

बेटे आलिशान वालुकामय किनारे आणि डायव्हिंग स्पॉट्सने भरलेली आहेत. द्वीपसमूहातील लोकप्रिय ठिकाणे कॉर्बिन बे, बेटे आहेत: चिर्या-तापू, वाइपर आयलंड, हॅवलॉक, कर्माटांग, दिगलीपूर, रामनगर बीच, कॉर्बिन बीच, महामता गांधी समुद्र किनारा.

अंदमान बेटांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मे आहे आणि गोताखोरांसाठी सर्वोत्तम वेळ जानेवारीच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत आहे. अशा सहलीसाठी सर्वात वाईट वेळ - जोरदार वारा, पाऊस आणि खराब दृश्यमानता - मेच्या शेवटी ते जूनच्या अखेरीस.

अंदमान बेटे - द्वीपसमूहाचा एक भाग, ज्यामध्ये बंगालच्या उपसागरात स्थित निकोबार बेटे देखील समाविष्ट आहेत. ते मुख्य भूमीपासून 1400 किमी अंतराने वेगळे झाले आहेत. बेटांची राजधानी सुमारे 100 हजार लोकसंख्येसह पोर्ट ब्लेअर आहे आणि सामान्यतः पर्यटकांचा मार्ग त्यातूनच जातो.

एकूण, सुमारे 570 बेटे आहेत, त्यापैकी 40 लोकवस्ती आहेत आणि 10 पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, शिवाय, हे डझन अंदमान बेटांचा संदर्भ देते, तर निकोबार बेटे सामान्यतः लोकांसाठी बंद असतात. एकूण लोकसंख्या सुमारे 350 हजार लोक आहे, त्यापैकी फक्त 500 आदिवासी आहेत (तसे, स्थानिक लोकसंख्या कोणत्या गटाशी संबंधित आहे हे शोधून काढण्यासाठी कोणताही मानववंशशास्त्रज्ञ अद्याप सक्षम नाही). आदिवासी लोक पाहू शकणार नाहीत, कारण भारत सरकारला या आदिम जमातींना त्यांच्या मूळ स्वरुपात जतन करण्याची काळजी आहे आणि पर्यटकांशी संवाद, जसे की तुम्हाला माहिती आहे, यात फारसे काही होत नाही.

काही रशियन पर्यटक अंदमान बेटांवर त्यांच्या सुट्टीचा अभिमान बाळगू शकतात, कारण, प्रथम, बेटे एक बंद क्षेत्र आहे, ज्याला भेट देण्यासाठी तुम्हाला परमिट घेणे आवश्यक आहे आणि दुसरे म्हणजे, त्यांच्याकडे जाणे खूप महाग आणि महाग आहे.

हे तोटे संबंधित आहे. पण फायदे, पुरेसे जास्त.

  • +23 डिग्री सेल्सिअस ते +31 डिग्री सेल्सिअस तापमानासह अद्भुत उष्णकटिबंधीय हवामान. येण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मे आहे. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात अनेकदा तीव्र वादळे येतात.
  • आश्चर्यकारक आणि समृद्ध वनस्पती आणि प्राणी. पर्यटकांसाठी ब्रोशरमध्ये, बेटांना अनेकदा (आणि योग्यरित्या) "पन्ना उष्णकटिबंधीय नंदनवन" म्हटले जाते. रहस्यमय जंगल, विदेशी पक्ष्यांचे गाणे, कमी विदेशी फुले, पाम वृक्षांनी वेढलेले पांढरे किनारे, विविध रंगांचे मासे, कधी कधी देशी ड्रम्सची थाप ऐकू येते - कोणतीही कल्पनारम्य अधिक रोमँटिक सुट्टी तयार करू शकत नाही.
  • सर्वात स्वच्छ पर्यावरणशास्त्र, आणि हे नैसर्गिक आहे. शेकडो किलोमीटर बेटांना मुख्य भूमीपासून वेगळे करते, तेथे व्यावहारिकदृष्ट्या कोणताही उद्योग नाही आणि कदाचित नसेल, कारण येथे राष्ट्रीय साठे आहेत. हे कदाचित अंटार्क्टिकामध्ये फक्त स्वच्छ आहे, परंतु तेथे सूर्यस्नान करणे समस्याप्रधान आहे.
  • उत्तम हॉटेल्स

भेट देण्याची परवानगीअंदमान बेटे

हवाई मार्गाने येणाऱ्या पर्यटकांना पोर्ट ब्लेअर बेटांच्या राजधानीतील इमिग्रेशन कार्यालयात परमिट, तथाकथित परमिटसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. कार्यालय हड्डो जेट्टी येथे आहे. समुद्रमार्गे बेटांवर जाणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ परमिट घेणे आवश्यक आहे: परदेशी नोंदणी कार्यालयात किंवा चेन्नई (फोन ०४४-२८२७८२१०), किंवा कोलकाता (फोन ०३३-२२४७३३००), किंवा मानक व्हिसासाठी अर्ज करताना. सहसा कोणालाही परवानगी नाकारली जात नाही.

रिटर्न तिकीट उपलब्ध असल्यास सहसा 30 दिवसांसाठी परवानगी दिली जाते. नसेल तर फक्त 15 दिवसांसाठी. इच्छित असल्यास, पोर्ट ब्लेअरमध्येच केवळ 15 दिवसांसाठी परमिटचे नूतनीकरण केले जाते.

हे लक्षात घेतले पाहिजे की ही परवानगी हॉटेलमध्ये, फेरीवर, बेटांच्या अधिकार्यांना आवश्यक असू शकते, म्हणून ते गमावणे भरलेले आहे.

अंदमान बेटांवर कसे जायचे

पर्यटनाची ही दिशा फार मोठी नसल्यामुळे, पर्यटकाने अंदमानच्या सहलीसाठी ट्रॅव्हल एजन्सीकडे जाऊ नये, किंमती अन्यायकारकपणे वाकल्या जातील. खरं तर, या बेटांवर जाणे कोह सामुई म्हणा, यापेक्षा कठीण नाही आणि पैशाच्या बाबतीत ते स्वस्त असेल.

विमान

आतापर्यंत, पोर्ट ब्लेअर, बेटांचे एकमेव प्रवेशद्वार, फक्त भारतातूनच, येथून उड्डाणांसह पोहोचता येते.

जेटलाइट विमाने दिल्लीहून अंदमानला उड्डाण करतात (सुमारे 4 तास), चेन्नईहून - इंडियन एअरलाइन्स आणि किंगफिशर रेड (2 तास 5 मिनिटे), आणि कोलकाता - इंडियन एअरलाइन्स - 2 तास.

गोव्यात सुट्टी घालवणाऱ्या पर्यटकांसाठी, अंदमान बेटांवर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मुंबई. राखीव आसन (स्लीपर क्लास) मध्ये मुंबईला जाण्यासाठी रेल्वे तिकीटाची किंमत 400 रुपये असेल आणि आधीच मुंबई आणि पोर्ट ब्लेअर नियमित फ्लाइटने जोडलेले आहेत.

फ्लाइटच्या आधी तिकिटे खरेदी करणे सहसा अवघड असते, म्हणून ते आगाऊ बुक करण्याची शिफारस केली जाते. याचा वापर करून अंदमान बेटावरील फ्लाइट तिकिटे काढता येतात शोधा... आत चालवा दिल्ली, नंतर पोर्ट ब्लेअर, निर्गमन शहर, आणि इच्छित तारखांसाठी इच्छित फ्लाइट पहा.

जहाज .

कोलकाता, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथून अंदमान बेटांवर नियमित फेरी आहेत. याशिवाय, एमव्ही अकबर जहाज कोलकाताहून महिन्यातून 4-6 वेळा धावते (प्रवास 56 तास चालतो), चेन्नईहून आठवड्यातून एकदा एमव्ही नॅनकोरी आणि एमव्ही स्वराजद्वीप ही जहाजे (60 तास वाटेत).

तुम्ही बेटांदरम्यान हेलिकॉप्टरने किंवा फेरीने प्रवास करू शकता. फेरी पर्यटक आहेत - शंभर लोकांसाठी, कमी-जास्त आरामदायी आणि नियोजित - 400 लोकांसाठी. पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक दरम्यानच्या फेरीच्या तिकिटाची किंमत दोनशे रुपयांपर्यंत आहे, परंतु तिकीट खरेदी करणे खूप कठीण आहे, बॉक्स ऑफिसवर लोकांची संख्या जास्त आहे. विचित्रपणे, येथे महिलांसाठी एक रांग आहे, अधिक शांत, तथापि, रांगेत पुरुष देखील आहेत.

अंदमान बेटांचे समुद्रकिनारे आणि हॉटेल्स

बेटांच्या राजधानीपासून दूर न जाताही तुम्ही सुंदर किनारे पाहू शकता. पोर्ट ब्लेअरपासून फार दूर कॉर्बिना बे येथे एक बाउन्टी-शैलीतील बीच आहे. येथे तुम्ही पीअरलेस रिसॉर्ट किंवा गेस्टहाऊसमध्ये राहू शकता आणि एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करू शकता.

पोर्ट ब्लेअरच्या बंदरात वाइपर बेटाचा एक छोटासा बेट आहे, ज्याचा किनारा एक सतत सुंदर समुद्रकिनारा आहे.

हॅवलॉक बेट सर्वोत्तम समुद्रकिनारे (जरी जास्त चांगले असले तरी) तसेच पाण्याखालील सर्वात श्रीमंत जगासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांनी प्रामुख्याने 2 किनारे निवडले आहेत: विजयनगर, ज्यामध्ये डायव्हिंग सेंटर आहे आणि राधानगर. पाण्याची पारदर्शकता 10 ते 30 मीटर, खूप समृद्ध कोरल रीफ, पांढरी वाळू आणि तळवे, तळवे, तळवे ...

रॉबिन्सन क्रूसोच्या भूमिकेत अनेक पर्यटक स्वत:ला आजमावण्यासाठी येतात. सहसा त्यांना एका निर्जन बेटावर आणले जाते ज्यामध्ये अन्न आणि अनेक दिवसांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा केला जातो आणि ते कराराने येतात. अंदमान बेटांमध्ये तुम्ही चांगले हॉटेल निवडू शकता. ताऱ्यांची संख्या, किंमत, तारखा निवडा आणि तुम्हाला काय आवडते ते निवडा.

डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग.

अंदमान आणि निकोबार बेटांचे पाण्याखालील जग वेगळ्या चर्चेला पात्र आहे, कारण ते पृथ्वीवरील सर्वोत्तमांपैकी एक आहे. स्थानिक कोरल आणि पाण्याखालील निर्मिती मानवांवर व्यावहारिकरित्या अप्रभावित आहेत. कोरल भिंती, टेकड्या आणि बुरुज उष्णकटिबंधीय वन्यजीवांसाठी आदर्श परिस्थिती प्रदान करतात.

केवळ एका रीफवर कधीकधी विविध मासे, स्कारिड्स, ट्रिगर फिश, मांटस, शार्कच्या असंख्य प्रजाती, कासवांच्या सुमारे 750 प्रजाती आढळतात, ज्यात अद्वितीय प्रजातींचा समावेश आहे, केवळ या प्रदेशात अंतर्भूत आहेत.

बेटांच्या दुर्गमतेमुळे, येथे वर्षाला पन्नासपेक्षा जास्त गोताखोर नसायचे. आता बेटांची लोकप्रियता वाढत आहे, परंतु, देवाचे आभार, ते अद्याप एक वस्तुमान गंतव्य बनलेले नाहीत.

अंदमान बेटांवर सध्या तीन डायव्हिंग सेंटर्स आहेत. पहिला खूप महाग आणि व्यवस्थित आहे - समुद्र, दुसरा थोडा स्वस्त आहे - पोर्ट ब्लेअर अंडरवॉटर, आणि तिसरा सामान्य पर्यटकांसाठी अधिक परवडणारा आहे - अंदमान अॅडव्हेंचर स्पोर्ट्स. नॅशनल पार्कमधील हॅवलॉकपासून फार दूर नसलेले साउथ सिंक बेट हे सर्वात मनोरंजक डायव्हिंग आहे. गांधी.

सर्वात मनोरंजक स्नॉर्कलिंग त्याच हॅवलॉकवर आहे, उत्तर उपसागरात.

पर्यटकांसाठी निर्बंध.

बेटे, जरी नंदनवन नसली तरी, येथे काही निर्बंध आणले गेले आहेत, तथापि, अगदी वाजवी.

हे प्रतिबंधित आहे:

  • कचरा, जमिनीवर आणि समुद्रावर
  • जमिनीवर कोरल आणि कवच गोळा करा आणि त्याहूनही अधिक समुद्रात
  • कोणतीही औषधे घ्या
  • नग्नवादात सामील व्हा, म्हणजे समुद्रकिनार्यावर आराम करा, ज्यामध्ये आईने जन्म दिला
  • स्वतःहून बेटावर जाणे अजिबात सुरक्षित नाही
  • नारळ गोळा करा (येथे खाजगी मालमत्ता)
  • शिकार करा, हलकी आग लावा, समुद्रकिनार्यावर किंवा जंगलात रात्र घालवा

YouTube, भारत, अंदमान बेटे

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सुंदर गडद पन्ना पाण्याचा परिसर मूळ जंगल आणि खारफुटीच्या जंगलाने वेढलेला आहे; किरमिजी रंगाच्या सूर्यास्ताच्या किरणांखाली पांढरे किनारे वितळतात; मैत्रीपूर्ण लोक - दक्षिण आणि आग्नेय आशियातील स्थलांतरित आणि निग्रो वांशिक गट, ज्यांचे बेटांवर दिसणे अद्याप एक मानववंशशास्त्रीय रहस्य आहे. अंदमानचे भौगोलिक स्थान, त्याऐवजी, आग्नेय आशिया आहे: इंडोनेशियापासून 150 किमी आणि म्यानमारपासून 190 किमी अंतरावर आहे, जे अधिक मनोरंजक आहे.

निकोबार बेटे पर्यटकांसाठी बंद आहेत, परंतु अजूनही शेकडो बेटे एक्सप्लोर करण्यासाठी बाकी आहेत.

कथा

अंदमान आणि निकोबारवर प्रथम वसाहत कधी दिसली हे माहीत नाही. मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, दगडी अवजारे येथे 2,000 वर्षांपासून आहेत. आणि लोकांच्या स्थलांतरावरील तज्ञांचा असा विश्वास आहे की स्थानिक जमाती आग्नेय आशियातील स्थलांतरित आहेत, निग्रो आणि मलय वांशिक गटांमधून. दुसऱ्या शब्दांत, बेटे परदेशी लोकांसाठी पौराणिक कथांचे अक्षय स्रोत बनले आहेत.

अंदमान हा शब्द माकड देव हनुमानापासून आला आहे असे मानले जाते, ज्यांना हिंदूंनी बेटांचा वापर भारत आणि श्रीलंका दरम्यान पूल म्हणून केला आहे असे मानले जाते. मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, दगडांची साधने येथे 2000 वर्षांपासून अस्तित्वात आहेत, परंतु येथे प्रथम स्थायिक कधी दिसले हे निश्चितपणे माहित नाही.

10व्या शतकातील पर्शियन प्रवासी बुझर्ग इब्न शहरयार याने नरभक्षक वस्ती असलेल्या बेटांच्या साखळीबद्दल लिहिले; नंतर मार्को पोलोने जोडले की आदिवासींना कुत्र्यांची डोकी असतात आणि ती तंजावरमध्ये आढळतात (पूर्वी तंजोर)की त्मिलनाडू राज्यात द्वीपसमूहाला तिमैतिवू - "घाणेरडे बेटे" असे म्हणतात.

ही माहिती, अर्थातच, पर्यटक माहितीपत्रकासाठी नाही, परंतु तरीही, प्रवासी येणे सुरूच राहिले: 17 व्या शतकाच्या शेवटी - मराठी आणि 200 वर्षांनंतर - ब्रिटिश, ज्यांनी अंदमान बेटांचा राजकीय वसाहत म्हणून वापर केला. गुन्हेगार दुसऱ्या महायुद्धादरम्यान, काही बेटवासीयांनी जपानी सैन्याच्या आक्रमणाचे स्वागत केले, त्यांना मुक्तिदाता म्हणून पाहिले. निर्मिती असूनही (कठपुतळी)भारतीय राजकारण्यांचे सरकार, जपानी लोक क्रूर विजेते असल्याचे सिद्ध झाले.

1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर, अंदमान आणि निकोबार बेटे भारतीय संघाचा भाग बनले. मुख्य भूमीवरून स्थलांतर केल्यानंतर (विभागणीनंतरच्या अराजकतेतून पळून जाणाऱ्या बंगाली निर्वासितांसह)बेटांची लोकसंख्या काही हजारांवरून 350,000 पर्यंत वाढली. या पुनर्वसनाच्या काळात आदिवासींचे हक्क, तसेच पर्यावरण संरक्षणाकडे अनेकदा दुर्लक्ष झाले. आणि सध्या काही सुधारणा होत असल्या तरी, आदिवासी जमातींच्या परिस्थितीत अजूनही बरेच काही हवे आहे.

2004 मध्ये, हिंद महासागरातील भूकंप, किनारी आफ्टरशॉक्स आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे ही बेटे नष्ट झाली. निकोबार बेटांना विशेषत: मोठा फटका बसला: काही अंदाजानुसार, येथील लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक मरण पावले, कोणीतरी पोर्ट ब्लेअरला गेले आणि त्यापैकी बरेच लोक परत आले नाहीत. आता जनजीवन पूर्वपदावर आले असूनही आणि पर्यटक त्यासोबत परतले असूनही, लहान अंदमानसारखी ठिकाणे आहेत, जिथे पाहुण्यांना भेट देण्याची घाई नाही. (तसे, भेट द्या).

हवामान

समुद्राच्या वाऱ्यामुळे, अंदमान आणि निकोबार बेटांवरील तापमान 23-31 डिग्री सेल्सियसच्या श्रेणीत राहते आणि वर्षभर आर्द्रता 80% असते. नैऋत्येकडून वारे वाहत असताना येथे खूप दमट असते (ओले)मान्सून - कुठेतरी मेच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीस आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, ईशान्य (कोरडे)पावसाळा

भूगोल आणि निसर्ग

अंदमान आणि निकोबार बेटे अरकान पर्वत तयार करतात, पूर्व म्यानमारपासून सुरू होणारी एक कड (ब्रह्मदेश)आणि महासागर ओलांडून इंडोनेशियातील सुमात्रा पर्यंत पसरलेला आहे.

बेटांच्या अलगावमुळे अनेक वनस्पती आणि प्राण्यांची उत्क्रांती झाली, जे केवळ या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. येथे आढळणाऱ्या ६२ सस्तन प्राण्यांपैकी ३२ फक्त याच बेटांवर राहतात, त्यापैकी अंदमानचे जंगली डुक्कर, सायनोमोल्गस माकड, हिमालयीन सिव्हेट, तुपाया आणि वटवाघुळांच्या अनेक प्रजाती. येथे राहणाऱ्या 250 पक्ष्यांच्या प्रजातींपैकी जवळपास 50% पक्षी केवळ अंदमान आणि निकोबारमध्ये आढळतात, ज्यात निकोबार बिगफूट्स, स्विफ्टलेट आणि पन्ना निकोबार कबूतर यांचा समावेश आहे. निर्जन किनार्‍यावर, कासवे त्यांची अंडी घालतात; नद्यांमध्ये, कडवट मगरी त्यांच्या शिकाराची वाट पाहत असतात. आपण येथे अनेकदा डॉल्फिन पाहू शकता, परंतु या भागात पूर्वी मुबलक असलेले डुगॉन्ग्स आता जवळजवळ कधीही दिसत नाहीत.

खारफुटी समुद्र आणि जमीन यांच्यामध्ये संरक्षणात्मक अडथळा निर्माण करतात. जंगलात मौल्यवान वृक्ष प्रजातींचे घर आहे, जसे की प्रसिद्ध पादुक, हलके आणि गडद पोत असलेले हार्डवुड.

करण्याच्या गोष्टी

अंदमान बेटे त्यांच्या विशिष्ट एकांत, स्वच्छ स्वच्छ पाणी, भव्य कोरल आणि विविध पाण्याखालील जगामुळे जगातील सर्वोत्तम डायव्हिंग गंतव्यांपैकी एक मानले जाते.

गोताखोरांचा मुख्य हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत असतो, परंतु ते पावसाळ्यात उन्हाळ्यात देखील येथे येतात. (जून ऑगस्ट)तथापि, किनाऱ्याच्या जवळ जा. मूलभूतपणे, डायव्हिंगसाठी सर्वात अनुकूल परिस्थिती सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तयार होते. फक्त पावसाचा हिशेब ठेवायचा आहे.

स्थानिक डायव्हिंग केंद्रे स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम देतात (4000 रुपयांपासून), ओपन वॉटर कोर्स PADI (रु. 18,000)आणि प्रगत अभ्यासक्रम (१३,५०० रुपये)तसेच डायव्हमास्टर प्रशिक्षण. स्थान, सहभागींची संख्या आणि अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार किंमती बदलतात. सर्वसाधारणपणे, अंदमान बेटांवर बोटीतून डायव्हिंग करणे 2000/3500 रुपयांमध्ये एक/दोन डाइव्हसाठी शक्य आहे. राष्ट्रीय उद्यानांमध्ये प्रति व्यक्ती प्रतिदिन ५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

हॅवलॉक बेट हे मुख्य डायव्हिंग केंद्रांपासून दूर स्थित आहे, जरी उपकरणे आणि उपकरणे नील आणि दक्षिण अंदमान या दोन्ही ठिकाणी आढळू शकतात. अधिक तपशीलांसाठी संबंधित विभाग पहा.

स्नॉर्केलिंग वर्ग आयोजित करणे खूप सोपे आणि स्वस्त आहे. हॅवलॉक आयलंड हे सर्वोत्कृष्ट स्नॉर्कलिंग स्पॉट्सपैकी एक आहे ज्यात रीफ आणि बेटांवर बोट ट्रिप आहे जे जवळजवळ सर्व पर्यटन स्थळांमध्ये प्रवेशयोग्य नाहीत. नील बेट आणि कालीपुरा येथे उत्कृष्ट स्नॉर्कलिंग देखील आहे.

अलीकडील कोरल ब्लीचिंगमुळे, काही खडकांचे नुकसान झाले आहे, परंतु असे असूनही, येथे डेव्हिंग जागतिक स्तरावर कायम आहे आणि नवीन ठिकाणे उघडत आहेत.

माहिती

अंदमान बेटे मुख्य भूमीपासून हजार किलोमीटर अंतरावर असूनही ते भारतीय वेळेनुसार येथे राहतात. म्हणून, संध्याकाळी 5 वाजता येथे आधीच अंधार असतो, आणि पहाटे 4 वाजता आधीच प्रकाश असतो, त्यामुळे येथील लोक सहसा लवकर उठतात. सर्व दूरध्वनी क्रमांक प्रादेशिक कोड - 03192 सह डायल करणे आवश्यक आहे, अगदी स्थानिक कॉलसह. अंदमान आणि निकोबार पर्यटन (IP 232747; www.tourism.andaman.nic.in; कामरे रोड (कामराज आरडी), पोर्ट ब्लेअर; ८:३०-१३:०० आणि १४:००-१७:०० सोम-शुक्र, ८:३०-१२:०० शनि)उपयुक्त एमराल्ड आयलंड ट्रॅव्हल ब्रोशर मिळवा (100 रुपये)येथे किंवा विमानतळावर.

निवासस्थान

या प्रकरणातील किमती मध्य हंगामासाठी आहेत. (1 ऑक्टोबर ते 30 एप्रिल पर्यंत, उच्च हंगाम वगळून)... पीक सीझनमध्ये किमती गगनाला भिडतात (15 डिसेंबर ते 15 जानेवारी)... मे ते सप्टेंबर हा कमी हंगाम असतो. सार्वजनिक भागात आणि बेटांच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये सध्या कॅम्पिंग करण्यास मनाई आहे.

परवानगी

मुख्य भूभागातील बहुतेक सरकारी अधिकारी पोर्ट ब्लेअरमध्ये दोन वर्षे सेवा करतात. या उलाढालीसह, परवानगी देणाऱ्या नियम आणि नियमांमध्ये अनपेक्षित बदलांसाठी तयार रहा.

सर्व परदेशी लोकांना अंदमान बेटांना भेट देण्यासाठी परमिट घेणे आवश्यक आहे, जे आगमनानंतर विनामूल्य जारी केले जाते. 30 दिवसांच्या परमिटमुळे पर्यटकांना पोर्ट ब्लेअर, दक्षिण आणि मध्य अंदमानमध्ये राहण्याची परवानगी मिळते , उत्तर अंदमान मध्ये (दिगलीपूर), लाँग आयलंडवर, उत्तर पॅसेज, लहान अंदमान (मूळ रहिवाशांचे प्रदेश वगळून), हॅवलॉक आणि नील बेटांवर. तुम्ही पोर्ट ब्लेअरमधील इमिग्रेशन ऑफिसमध्ये 15 दिवसांसाठी परमिट वाढवू शकता (03192-239247; 8: 30-13: 00 आणि 14: 00-17: 30 सोमवार ते शुक्रवार, शनिवारी 13:00 पर्यंत)आणि हॅवलॉक पोलिस स्टेशनमध्ये.

ही परवानगी जॉली बॉय बेटांना दिवसा भेटी देण्यास देखील परवानगी देते. (लॉली बॉय), दक्षिण सिंक (दक्षिण सिंक), लाल त्वचा (लाल त्वचा), रॉस, नारकोंडम (नार्कॉन-डॅम), मुलाखत (मुलाखत)आणि रुटलँड तसेच ब्रदर्स (बंधू)आणि बहिणी (बहिणी).

परमिट मिळविण्यासाठी, विमानाने येणार्‍या पर्यटकांनी त्यांचा पासपोर्ट सादर करणे आवश्यक आहे आणि पोर्ट ब्लेअर विमानतळावर आल्यावर एक फॉर्म भरणे आवश्यक आहे. परवानग्या सहसा जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी वैध असतात (नक्की तपासा).

बोटीने येणारे पर्यटक सहसा इमिग्रेशन अधिकाऱ्याद्वारे बंदरावर भेटतात. अन्यथा, तुम्ही पोहोचल्यावर ताबडतोब हड्डो पिअर येथील इमिग्रेशन कार्यालयात जावे. (हड्डो जेट्टी)... संपूर्ण ट्रिपसाठी तुमचा परमिट ठेवा - त्याशिवाय तुम्ही बेटांवर नेव्हिगेट करू शकणार नाही. पोलिस अधिकारी सहसा परमिट मागतात, विशेषत: त्यांच्या बेटावर किनाऱ्यावर जाताना, आणि हॉटेलमध्ये चेक-इनच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्याही सेवेवर सध्याचे समुद्र प्रवास नियम तपासा: अंदमान आणि निकोबार पर्यटन (03192-238473)

चेन्नई परदेशी नागरिक नोंदणी सेवा (044-23454970, 044-28278210) ; कोलकाता (033-22470549, 033-22473300)

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI; www.shipindia.com)चेन्नई (०४४-५२३१४०१; जवाहर बिल्डिंग, ६ राजाजी सलाई); कोलकाता (०३३-२४८२३५४; पहिला मजला, १३ स्ट्रँड आरडी)

राष्ट्रीय उद्याने आणि राखीव

काही राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांसाठी अतिरिक्त परवानग्या आवश्यक आहेत. पोर्ट ब्लेअर पर्यटन प्राधिकरणाकडे वनीकरण विभाग आहे (9: 00-15: 00 सोमवार-शुक्रवार, 13:00 शनिवार पर्यंत), तुम्हाला एखाद्या विशिष्ट बेटाला भेट देण्यासाठी परमिटची गरज आहे का, तुम्ही ते कसे मिळवू शकता, सेवेची किंमत किती आहे आणि ते मिळवणे अजिबात शक्य आहे का हे तुम्ही शोधू शकता.

जर तुम्ही काही कठीण नियोजन करत असाल तर तुम्हाला मुख्य वन्यजीव वॉर्डनकडे पाठवले जाईल (CWW; 233321; हड्डो रोड, पोर्ट ब्लेअर; 8: 30-12: 00 आणि 13: 00-16: 00 सोमवार ते शुक्रवार), तुमचा अर्ज कोठे आहे, त्यात एक पत्र आहे, जे तुमच्या केसचे सार, जहाजाचे नाव आणि भेटीची तारीख दर्शवते. जर तुम्ही आवश्यकतेनुसार सर्वकाही केले तर, एका तासापेक्षा कमी वेळात तुम्हाला परवानगी दिली जाईल.

बहुतेक दिवसाच्या परवानग्यांसह, समस्या इतकी लाल फितीची किंमत नाही. मरीन नॅशनल पार्क सारख्या भागात भेट देण्याची परवानगी. महात्मा गांधी (महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान), दिग्लीपूर जवळील रॉस आणि स्मिथ बेटे, भारतीय नागरिकांसाठी/परदेशींसाठी 50/500 रु. सॅडल पीक नॅशनल पार्कला भेट देण्याच्या परमिटची किंमत 25/250 रुपये आहे.

वैध विद्यार्थी आयडी असलेल्या विद्यार्थ्यांकडून किमान शुल्क आकारले जाते, त्यामुळे तुमचा विद्यार्थी आयडी विसरू नका.

निकोबार बेटे संशोधन, सरकारी काम आणि व्यापारात गुंतलेले भारतीय वगळता सर्वांसाठी बंद आहेत.

अंदमान बेटांचा रस्ता आणि परत

विमान

दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला दैनंदिन उड्डाणे आहेत, जरी दिल्ली आणि कोलकाता येथून उड्डाणे अनेकदा चेन्नईमधून जातात, बुकिंगच्या वेळेनुसार, राऊंड ट्रिपचे भाडे US $ 250 ते US $ 500 पर्यंत असते. काही एअरलाईन्स US $80 इतक्या कमी किमतीत एकेरी उड्डाणे ऑफर करतात, परंतु तिकिटे अनेक महिने अगोदर बुक करणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या वेळी, किंगफिशर एअरलाइन्सकडे बेटांसाठी सर्वात स्वस्त "शेवटच्या मिनिटाची" तिकिटे होती. (1800 2093030; www.flykingfisher.com)... तुम्ही एअर इंडिया सेवा देखील वापरू शकता (चेन्नई 0044-28554747; कोलकाता 033-22117879; पोर्ट ब्लेअर 03192-233108; www.airindia.com)आणि जेटलाइट (चेन्नई 080-39893333; कोलकाता 033-25110901; पोर्ट ब्लेअर 003192-242707; www.jetlite.com).

पोर्ट ब्लेअरहून आग्नेय आशियासाठी कोणतीही थेट उड्डाणे नाहीत, जरी अभ्यासाच्या वेळी, वेळापत्रकानुसार क्वालालंपूरहून चार्टर फ्लाइट होती. पण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका.

मोटार जहाज

कोणीतरी असा विचार करतो की पोर्ट ब्लेअरमधील कुप्रसिद्ध जहाजे "अंदमान बेटांवर जाण्याचा एकमेव मार्ग आहे," तर इतरांना वाटते की या केवळ अनावश्यक अडचणी आहेत. सत्य मधेच कुठेतरी आहे. पोर्ट ब्लेअर आणि मुख्य भूभाग दरम्यान महिन्याला साधारणतः 4-6 उड्डाणे असतात: कोलकाता येथून दर दोन आठवड्यांनी एकदा (प्रवासाची वेळ ५६ तास), आठवड्यातून एकदा (उच्च हंगामात)चेन्नई पासून (६० तास), Vizag वरून महिन्यातून एकदा (५६ तास)... चेन्नईमध्ये, वाहतूक उपप्रमुखांमार्फत तिकीट बुक केले जाऊ शकते (०४४-२५२२६८/३; राजाजी सलाई, चेन्नई बंदर)... शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI; www.shipindia.com; कोलकाता येथे ०३३-२२४८२३५४, विझागमध्ये ०८९१-२५६५५९७)कोलकाता आणि विझाग येथून उड्डाणे पाठवते. फ्लाइटचे वेळापत्रक तरंगत आहे, म्हणून आगाऊ कॉल करा. हड्डो पिअर येथील मुख्य भूभागावरील सर्व फेरी.

(फिनिक्स बे)

तुम्ही सूचित प्रवासाचा वेळ पूर्णपणे विश्वासावर घेऊ नये: पर्यटकांनी वर्णन केले की त्यांनी कोलकाता बंदरात जहाजावर सुमारे 12 तास कसे घालवले, तर पोर्ट ब्लेअरजवळील इतरांनी लँडिंगपूर्वी अनेक तास प्रतीक्षा केली. विलंब आणि विविध समुद्र आणि हवामानामुळे, प्रवासाला 3-4 दिवस लागू शकतात. फिनिक्स बे फेरी तिकीट कार्यालयात राउंड ट्रिप तिकीट खरेदी केले जाऊ शकते (फिनिक्स बे)... तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो आणि तुमच्या परवानगीची छायाप्रत आवश्यक असेल. किंमती आणि दरांबाबत अद्ययावत माहितीसाठी कृपया www.and.nic.in/spsch/sailing.htm ला भेट द्या.

वेगवेगळ्या जहाजांवरील जागांचे वर्गीकरण थोडे वेगळे असते. बंक बर्थवरील सर्वात स्वस्त जागा 1700 - 1960 रुपये, नंतर 2 वर्ग बी केबिन - 3890 रुपये, 2 वर्ग अ केबिन - 5030 रुपये, नंतर 1 वर्ग केबिन - 6320 रुपये, लक्झरी केबिन - 7640 रुपये. अकबराकडे वातानुकूलित वसतिगृहे आहेत, जिथे जागेची किंमत 3290 रुपये आहे. अधिक महागड्या जागांच्या तिकिटांची किंमत विमानाच्या तिकिटांसारखीच आहे, जर जास्त नसेल. जर तुम्ही सामायिक केबिन निवडले असेल, तर "soooooooooooooooooooooooooooooooooooooooking" च्या सुरात जागे होण्यासाठी तयार रहा आणि लोक sniffling, वैयक्तिक जागेचा जवळजवळ पूर्ण अभाव आणि शौचालय, ज्यामध्ये तीन दिवसांच्या प्रवासानंतर प्रवेश करणे अप्रिय आहे. दुसरीकडे, स्थानिकांना भेटण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

पोषण (नाश्त्यासाठी स्थानिक स्नॅक्स, दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी थाली)दररोज सुमारे 150 रुपये खर्च येतो आणि जवळजवळ नेहमीच तांदूळ असतो. रस्त्यावर काहीतरी घेऊन जा (विशेषतः फळे)कसा तरी आपल्या आहारात विविधता आणण्यासाठी. काही बेडिंग दिले जाते, तथापि तुम्ही शेअर केबिनमध्ये प्रवास करत असाल तर कृपया तुमची स्वतःची चादर आणा. बरेच प्रवासी त्यांच्यासोबत हॅमॉक्स घेतात आणि डेकवर ताणतात.

अधिकृतपणे, पोर्ट ब्लेअर आणि थायलंड दरम्यान कोणतीही फेरी नाही, परंतु या मार्गावर नौका भाड्याने घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अंदमान बेटांवरून म्यानमारमध्ये कायदेशीररित्या जाऊ शकत नाही (ब्रह्मदेश)समुद्रमार्गे, जरी ते म्हणतात की कोणीतरी ते त्यांच्या स्वत: च्या बोटीवर केले. पण सावध राहा, जर तुम्ही भारतीय किंवा बर्मी नौदलाच्या अशा प्रयत्नात पकडले गेले तर तुम्हाला तुरुंगात जाण्याचा किंवा त्याहूनही वाईट धोका आहे.

खराब हवामान आपल्या योजनांना गंभीरपणे गोंधळात टाकू शकते: जर समुद्र खूप खडबडीत असेल तर फेरी उड्डाणे रद्द केली जातात. बेटावर उशीर झाल्यामुळे तुमची फ्लाइट चुकली नाही तर काही दिवस राखीव ठेवा (जरी ते नेहमीच वाईट असू शकत नाही ...).

बेटांभोवती फिरणे

विमान

बेटांदरम्यान एक हेलिकॉप्टर धावते. पोर्ट ब्लेअरहून तो लहान अंदमानला जातो (रु. 1488, 35 मिनिटे, मंगळ, शुक्र आणि शनि), हॅवलॉक बेट (रु. 850, 20 मिनिटे)आणि मायाबंदर मार्गे दिगलीपूर (2125 किंवा 1915 रुपये मायाबंदर, एक तास)... येथे, नागरी सेवक आणि 5 किलोपेक्षा कमी सामान असलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाते, जे बहुतेक पर्यटकांना ही सेवा वापरण्यापासून प्रतिबंधित करते. तुम्ही सचिवालयात अर्ज करून तुमचे नशीब आजमावू शकता (230093) पोर्ट ब्लेअरमध्ये आणि संध्याकाळी 4:00 वाजता तुम्ही भाग्यवान आहात की नाही हे पाहण्यासाठी परत येत आहे.

फेरी

बहुतेक अंदमान आणि निकोबार बेटांवर फक्त पाण्यानेच पोहोचता येते. हे नक्कीच रोमँटिक वाटते, परंतु फेरी तिकीट कार्यालये वास्तविक नरक आहेत: उष्णता, संथ सेवा, रांगेतून जाण्याचा प्रयत्न आणि बॉक्स ऑफिस खिडकीवर मारामारीसाठी तयार रहा. रांगेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यात पुढे जाण्यासाठी, आपण एकतर थोडे आक्रमकपणे वागले पाहिजे (परंतु धक्काबुक्की करू नका), किंवा स्त्री व्हा (महिलांच्या रांगा हे एक मोठे यश आहे, तथापि, ते फक्त पोर्ट ब्लेअरमध्येच घडतात)... तुमच्‍या सहलीच्‍या दिवशी तुमच्‍या सहलीच्‍या एक तास अगोदर मरीना येथे पोहोचून तुम्‍ही तिकिटे खरेदी करू शकता, परंतु अतिउत्साही हंगामात हे धोकादायक असते आणि वर्षभर Havelock वर कोणतीही हमी नसते. रंगतसारख्या शहरांमध्ये, फेरी तिकीट कार्यालयांचे कामकाजाचे तास बदलणारे आणि अविश्वसनीय आहेत. अभ्यासाच्या वेळी, अधिकृततेची एक प्रत प्रदान करण्याची आवश्यकता होती. आगमनापूर्वी याची व्यवस्था करा.

हॅवलॉक आणि नील बेटांवर तसेच रंगत, मैयाबंदर, दिगलीपूर आणि लिटल अंदमान येथे नियमित सागरी प्रवास आहेत. जर सर्व काही अयशस्वी झाले, तरीही असे मच्छिमार आहेत जे तुम्हाला घेऊन जाण्यास इच्छुक आहेत, उदाहरणार्थ, पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक पर्यंत, रु. 2,000 मध्ये. बेटांदरम्यान चालणार्‍या बोटींचे वेळापत्रक www.and.nic.in/spsch/iisailing.htm वर आढळू शकते.

बस

सर्व रस्ते (आणि फेरी)पोर्ट ब्लेअरला जा, आणि भविष्यातील सहलीचे बुकिंग करून तुम्ही येथे एक किंवा दोन दिवस नक्कीच घालवाल. बेटांचा मुख्य समूह - दक्षिण, मध्य आणि उत्तर अंदमान - रस्ता, फेरी क्रॉसिंग आणि पुलांनी जोडलेले आहेत. स्वस्त सार्वजनिक आणि खाजगी बसेस पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेपासून बांदूरपर्यंत अधिक महाग आहेत (वंदूर)आणि उत्तरेकडे भरतंग (भरतंग), रंगत, मायाबंदर आणि शेवटी दिगलीपूर, राजधानीच्या उत्तरेस ३२५ किमी. दुपारी 3:00 च्या सुमारास, जारावा नेचर रिझर्व्हचा बहुतेक भाग प्रवासासाठी बंद असतो, त्यामुळे त्यामधून जाणार्‍या बस 4:00 ते 11:00 पर्यंत सुटतात.

वैयक्तिक जीप आणि मिनीव्हॅन

गाड्या गावोगावी धावतात आणि तुम्ही त्या संपूर्ण मार्गावर जाऊ शकता. तुम्ही संपूर्ण कार जास्त किमतीत भाड्याने देखील घेऊ शकता.

आगगाडी

तुम्ही रेल्वे तिकीट कार्यालयात मुख्य भूभागासाठी रेल्वे तिकीट मिळवू शकता (२३३०४२; ८:००-१२:३० आणि १३:००-१४:००)एबरडीन बाजारच्या दक्षिणेस सचिवालय कार्यालयात आहे (एबरडीन बाजार)पोर्ट ब्लेअर मध्ये. हॉटेल मालक त्यांच्या पाहुण्यांना या समस्येवर सर्व आवश्यक माहिती देऊ शकतात.

बेटवासी

अंदमान आणि निकोबार बेटावरील स्थानिक लोक लोकसंख्येच्या फक्त 12% आहेत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ही टक्केवारी कमी होत आहे. ओंगे, सेंटिनेलीज, अंदमान आणि जरावा या नेग्रिटोस वांशिक गटातील जमाती आहेत, जे आफ्रिकन लोकांसारखेच आहेत. दुर्दैवाने, गेल्या शतकात अनेक जमाती नामशेष झाल्या आहेत. फेब्रुवारी 2010 मध्ये, बो जमातीचा शेवटचा सदस्य मरण पावला, त्याच्याबरोबर भाषा घेऊन आणि लोकांचा इतिहास संपवला, जो 65,000 वर्षे टिकला.

ओंगे

लिटल अंदमानमधील ओंगे बेटाचा दोन तृतीयांश भाग वनीकरण विभागाच्या अखत्यारीत आणण्यात आला आणि 1977 मध्ये वस्ती करण्यात आली. सुमारे 100 उर्वरित ओंगे 25 चौरस किलोमीटरच्या दोन आरक्षणांपुरते मर्यादित आहेत: डुगॉन्ग क्रीक (डुगॉन्ग क्रीक)आणि दक्षिण खाडी (दक्षिण उपसागर)... मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, ओंगेच्या संख्येत घट हे प्रदेशांच्या नुकसानीशी संबंधित प्रतिनिधींचे मनोबल कमी झाल्यामुळे होते.

सेंटिनेलीज

या सांगाड्यावर राहणाऱ्या इतर जमातींप्रमाणे, सेंटिनेलीज बाहेरील जगाशी संपर्कास विरोध करतात. वर्षानुवर्षे, शिष्टमंडळे उत्तर सेंटिनेल बेटाच्या किनाऱ्यावर, सेंटिनेलियन लोकांचा शेवटचा गड, नारळ, केळी, डुक्कर आणि लाल प्लास्टिकच्या बादल्या भेट म्हणून बाण मारण्यासाठी घेऊन जात. जरी काही मूळ रहिवासी इतके विरोधी नव्हते. सध्या सुमारे 150 सेंटिनेलीज शिल्लक आहेत.

अंदमान

आता अंदमानची लोकसंख्या जेमतेम 50 लोकांची आहे आणि ही जमात नामशेष होण्यापासून वाचू शकणार नाही असे दिसते. 19व्या शतकाच्या मध्यभागी, सुमारे 7,000 अंदमान होते, परंतु वसाहतवाद्यांशी असलेल्या मैत्रीमुळे या जमातीचा मृत्यू झाला: 1971 पर्यंत गोवर, सिफिलीस आणि फ्लूच्या साथीमुळे तिची लोकसंख्या 19 लोकांवर गेली. अंदमानला सरळ बेटावर हलवण्यात आले.

जरावा

सध्या, 350 उर्वरित जारवा 639 चौरस मीटरवर राहतात. किमी दक्षिण आणि मध्य अंदमान बेटांवर. 1953 मध्ये, मुख्य आयुक्तांनी जरावा वस्त्यांवर बॉम्बफेक करण्याचा प्रस्ताव दिला, आणि अंदमान महामार्ग, जंगलतोड आणि आक्रमणकर्ते आणि पर्यटकांच्या आक्रमणामुळे त्यांचे प्रदेश नष्ट झाले. बहुतेक जारवा विरोधी असतात.

चोम्पेन

बोलशोई निकोबारवरील जंगलात एकूण 250 चोम्पेन राहिले. ही अर्ध-भटकी शिकारी जमात नदीकाठी राहते. त्यांनी एकीकरणाला विरोध केला आणि आता ते भारतीय स्थलांतरितांनी व्यापलेले प्रदेश टाळत आहेत.

निकोबेरियन्स

निकोबेरियन ही एकमेव जमात आहे ज्यांची लोकसंख्या कमी होत नाही आणि 30,000 लोकसंख्या आहे. त्यापैकी बहुतेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आधुनिक भारतीय समाजात जवळजवळ आत्मसात केले. ते गावांमध्ये राहतात जिथे ते डुक्कर पाळतात आणि नारळ, रताळे आणि केळी पिकवतात. बहुधा मलेशिया आणि म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांमधून आलेले निकोबेरियन लोक कर निकोबारच्या केंद्रस्थानी असलेल्या निकोबार समूहाच्या अनेक बेटांवर राहतात. (कार निकोबार), 2004 त्सुनामीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेला प्रदेश.

कोरल सह सावध रहा!

सर्वसाधारणपणे, अंदमान बेटांमध्ये स्नॉर्कलिंग फक्त भरतीच्या वेळीच केले पाहिजे. कमी भरतीच्या वेळी, आपण चुकून कोरलवर पाऊल ठेवू शकता, जे या नाजूक जीवाला अपरिवर्तनीयपणे नष्ट करू शकते. पंखाने स्पर्श केला तरी दुखापत होऊ शकते. शिवाय, जेव्हा तुम्ही तळाशी पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला समुद्री अर्चिन काट्यापासून वेदनादायक टोचण्याचा धोका असतो. गोताखोरांनी खडकांच्या जवळ डायव्हिंग करताना अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. पूर्ण गीअरमध्ये कोरलशी गंभीर टक्कर पर्यावरणास हानी पोहोचवू शकते.

पोर्ट ब्लेअर

हिरवे, शांत, कधीकधी पोर्ट ब्लेअरला आमंत्रित करते - अंदमान बेटांची राजधानी - बंगाली, तमिळ, निकोबारी, बर्मी आणि तेलगू यांसारख्या लोकांच्या संस्कृतींचे दोलायमान मिश्रण आहे. बहुतेक पर्यटक येथे जास्त काळ थांबत नाहीत. (पुढील ट्रिप बुक करण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी सहसा एक किंवा दोन दिवस), आणि पूर्ण वेगाने थेट बेटांवर जा. पोर्ट ब्लेअर हे हॅवलॉकच्या समुद्रकिनाऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाही, परंतु शहराच्या आकर्षक इतिहासाने उत्कृष्ट महत्त्वाच्या खुणा निर्माण केल्या आहेत.

पोर्ट ब्लेअरची बहुतेक हॉटेल्स एबरडीन बाजार परिसरात आहेत. विमानतळ शहराच्या दक्षिणेस 4 किमी अंतरावर आहे. सामान्यतः, मध्यमवर्गीय घरे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीसाठी पूर्णपणे खरेदी केली जातात आणि भारताच्या टूर पॅकेजमध्ये समाविष्ट केली जातात.

पोर्ट ब्लेअरच्या खुणा

नॅशनल सेल्युलर जेल मेमोरियल (जीबी पेन्ट रोड (जीबी पंत आरडी); प्रवेशद्वार 10 रुपये फोटो / व्हिडिओ चित्रीकरण 25/100 रुपये; 8:45-12:30 आणि 13:30-17:00 मंगळ-रवि)हे पूर्वीचे ब्रिटीश तुरुंग आहे आणि आता येथे एकेकाळी वेळ घालवलेल्या सर्व राजकीय कैद्यांना समर्पित असलेले संग्रहालय आहे. अंदमान बेटांचे भारतीय इतिहासात किती महत्त्व आहे हे समजून घेण्यासाठी सेल्युलर प्रिझनला भेट देण्यासारखे आहे. कारागृहाचे बांधकाम 1896 मध्ये सुरू झाले आणि 1906 मध्ये संपले. सुरुवातीला सात इमारतींमध्ये (त्यापैकी काही जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात नष्ट केले होते)तेथे 698 चेंबर्स होते, जे मध्य टॉवरमधून किरणांसारखे पसरत होते. अनेक राजकीय तुरुंगांप्रमाणेच, "हनीकॉम्ब प्रिझन" हे स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक प्रकारचे विद्यापीठ बनले होते ज्यांना त्यांची पुस्तके, कल्पना आणि विवादांसाठी टॉर्चर चेंबर्स आणि वॉर्डर्सची प्रतीक्षा होती.

येथे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी 18:45 वाजता संगीत आणि प्रकाश प्रदर्शन आयोजित केले जातात (प्रौढ/मुलांसाठी २०/१० रुपये प्रवेश)इंग्रजी मध्ये.

मानववंशशास्त्रीय संग्रहालय (०३१९२-२३२२९१; एमजे रोड (MG Rd); प्रवेश 10 रुपये; ९:००-१३:०० आणि १३:३०-१६:३० शुक्र-बुध)हे पोर्ट ब्लेअरचे सर्वोत्कृष्ट संग्रहालय आहे आणि बेटांवर राहणाऱ्या जमातींबद्दल खूप तपशीलवार माहिती आहे. काचेचे केस कालबाह्य असू शकतात, परंतु ते साध्या भौमितिक नमुन्यांसह सुशोभित केलेल्या जारवच्या स्तनपट किंवा सेंटिनेल्टियन छताखाली सोडलेली कवटी किंवा निकोबार शमॅनिक शिल्पांद्वारे दर्शविलेल्या टोटेमिक आत्म्यांइतके प्राचीन नसतात. गिफ्ट शॉप एक माहितीपत्रक विकते (२० रुपये)स्थानिक मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या आदिवासी संस्कृतीबद्दल.

सामुद्रिक सागरी संग्रहालय (हळदो रोड (हड्डो आरडी); प्रौढ/मुलांसाठी प्रवेशद्वार 20/10 रुपये, फोटो/व्हिडिओ चित्रीकरण 20/50 रुपये; ९:००-१३:०० आणि १४:००-१७:०० मंगळ-रवि)भारतीय नौदलाने या संग्रहालयाची स्थापना केली होती. बेटांची परिसंस्था, त्यांची स्थानिक लोकसंख्या, वनस्पती, प्राणी, सागरी जीवन याबद्दल सांगणारी विविध प्रदर्शने आहेत. संग्रहालयात एक लहान मत्स्यालय आहे. बाहेर कामोर्ताच्या निकोबार बेटावर किनाऱ्यावर धुतलेल्या निळ्या व्हेलचा सांगाडा आहे (कामोर्टा बेट).

चॅथम सॉमिल (प्रवेश 10 रुपये; 8:30-14:30 सोम-शनि)चथम बेटावर असलेला हा कारखाना, पोर्ट ब्लेअरला रस्त्याच्या पुलाने जोडलेला आहे, ब्रिटिशांनी १८३६ मध्ये बांधला होता. हा आशियातील सर्वात मोठ्या लाकूड प्रक्रिया उद्योगांपैकी एक होता. वनस्पती अद्याप कार्यरत आहे, आणि जरी हे प्रत्येकाच्या आवडीचे नाही (विशेषतः पर्यावरणवाद्यांसाठी), येथे भेट बेटाच्या इतिहास आणि अर्थव्यवस्थेची एक मनोरंजक माहिती आहे. दुसर्‍या महायुद्धात जपानी लोकांनी टाकलेल्या बॉम्बमधून एक मोठा खड्डा उरला आहे आणि एक निस्तेज वनसंग्रहालय आहे.

समुद्रकिनाऱ्यासाठी कोणीही पोर्ट ब्लेअरला जात नाही, परंतु तरीही तुम्हाला वाळूवर झोपायचे असल्यास, शहराच्या दक्षिणेस 7 किमी अंतरावर असलेल्या कॉर्बिन कोव्ह हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाम वृक्षांच्या मागे लपलेला हा छोटासा किनारा, स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, पोहण्यासाठी आणि सूर्य स्नान करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. शहरातून ऑटो-रिक्षाने प्रवासाचा खर्च 200 रुपये आहे. दुसरीकडे, कोस्टल रोडवर नेव्हिगेट करण्याचा एक उत्तम मार्ग असण्यासोबतच, तुम्ही दुसऱ्या महायुद्धापासून उरलेले अनेक जपानी बंकर पाहू शकता.

बर्मी बौद्ध मिशन - लहान घंटा-आकाराचा स्तूप (कबर)हे फारसे प्रभावी नसेल, परंतु हे बर्मीज बौद्ध वास्तुकलेचे उदाहरण आहे, भारतातील असामान्य आहे आणि हे स्मरण करून देणारे आहे की तुम्ही भौगोलिकदृष्ट्या हिंदुस्थानपेक्षा दक्षिणपूर्व आशियाच्या जवळ आहात.

माहिती

अंदमानमधील पोर्ट ब्लेअर हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्ही चलन किंवा प्रवासी चेक बदलू शकता. संपूर्ण शहरात एटीएम स्थापित आहेत आणि वेस्टर्न युनियन कार्यालय पोस्ट ऑफिसमध्ये आहे. एबरडीन बाजारात अनेक इंटरनेट ऍक्सेस पॉइंट आहेत.

एबरडीन पोलीस स्टेशन (०३१९२-२३२४००; एमजी रोड (एमजी आरडी))

अंदमान आणि निकोबार पर्यटन (1P 232694; www.tourism.andaman.nic.in; कामराज रोड कामराज रोड); ८:३०-१३:०० आणि १४:००-१७:०० सोम-शुक्र, ८:३०-१२:०० शनि)मुख्य बेट टूर ऑपरेटर. येथे तुम्ही सार्वजनिक गृहनिर्माण बुक करू शकता आणि वाळवंटात जाण्यासाठी परवानग्या मिळवू शकता. कर्मचारी सहाय्यक आणि अविचारी आहेत.

ई-कॅफे (30 तास इंटरनेट; 8:00-00:00)ऍबरडीन बाजार मध्ये, अगदी क्लॉक टॉवर समोर.

जीबी पंत हॉस्पिटल (०३१९२-२३३४७३, २३२१०२; जीबी पंत आरडी)

मुख्य पोस्ट ऑफिस (एमजी रोड (MG Rd); ९:००-१९:०० सोम-शनि)

स्टेट बँक ऑफ इंडिया (एमए रोड एमए आरडी); 9: 00-12: 00 आणि 13: 00-15: 00 सोम-शुक्र, 10: 00-12: 00 शनि) येथे तुम्ही प्रवासी चेक आणि चलन बदलू शकता.

पोर्ट ब्लेअर आणि दक्षिण अंदमानचे शेजारी

रॉस बेट

रॉस बेटाला भेट द्या (उत्तर अंदमानमधील त्याच नावाच्या बेटाच्या गोंधळात पडू नये)- हे जंगलात लपलेले अंगकोर वाट सारखे हरवलेले शहर शोधण्यासारखे आहे; तथापि, येथील अवशेष ख्मेरपेक्षा अधिक व्हिक्टोरियन आहेत. अंदमान - रॉस बेटांवर ब्रिटिश सरकारच्या पूर्वीच्या मुख्यालयापूर्वी (रिझोल्यूशन 20 रुपये)- पोर्ट ब्लेअरहून अर्धा दिवस ड्राइव्ह. एकेकाळी, लहान रॉसला प्रेमाने "पूर्वेचे पॅरिस" म्हटले जात असे. (पाँडिचेरी, सायगॉन इ. सोबत)... परंतु गोंडस नाव, सामाजिक जीवन आणि उष्णकटिबंधीय बाग हे सर्व 1941 मध्ये दुहेरी धक्क्याने नष्ट झाले: भूकंप आणि जपानी आक्रमण. (ज्याने अनेक मशिन गनची घरटी सोडली जी स्थानिक लँडमार्क बनली आहे).

जलद वाढणाऱ्या जंगलाच्या हिरव्या लाटेने त्या जवळजवळ पूर्णपणे गिळंकृत केल्या असूनही आज जुन्या इंग्रजी इमारती सापडतात. एक छोटासा कप्पा आहे, जिथे रॉस आयलंडच्या आनंदाच्या दिवसातील प्रदर्शन आणि छायाचित्रे आहेत आणि एक छोटेसे उद्यान आहे, जिथे झुडुपातून हरणाची पाने गळतात.

रॉस बेटावर फेरी (75 रुपये, 20 मिनिटे वाटेत)पोर्ट ब्लेअर एक्वैरियम पिअर येथून बुधवार वगळता दररोज 8:30, 10:30, 12:30 आणि 14:00 वाजता निघते. कृपया तुमचे तिकीट खरेदी करताना वेळापत्रक तपासा कारण ओहोटी आणि प्रवाह निर्गमन वेळा प्रभावित करू शकतात.

तुम्ही सकाळी 9:30 वाजता व्हायपर बेटावर फेरी देखील घेऊ शकता (रु. ७५)जिथे तुम्हाला 1867 मध्ये ब्रिटीशांनी बांधलेल्या फाशीचे अवशेष दिसतील. पण खरे सांगायचे तर, ही सर्वात संस्मरणीय सहल नाही.

वंडूर आणि महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान

बंदूर हे पोर्ट ब्लेअरच्या आग्नेयेस २९ किमी अंतरावर एक छोटेसे गाव आहे. येथे एक सुंदर समुद्रकिनारा आहे, जरी अभ्यासाच्या वेळी पोहण्यास मनाई होती कारण परिसरात मगरी दिसल्या होत्या. पण अधिक बंदूर हे मरीन नॅशनल पार्कच्या सहलीसाठी सुरुवातीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महात्मे (भारतीय / परदेशी 50/500 रुपये)... 280 चौरस मीटर क्षेत्रफळावर स्थित आहे. किमी, खारफुटी, उष्णकटिबंधीय जंगले आणि खडक असलेली 15 बेटे व्यापलेली आहेत, जिथे 50 प्रवाळ प्रजाती राहतात. उद्यानात दोन स्पोर्टिंग स्पॉट्स आहेत: जॉली बॉय (1 नोव्हेंबर - 15 मे)आणि लाल त्वचा (16 मे - 30 ऑक्टोबर)... तुम्ही बांडुराच्या घाटावरून लोकप्रिय दिवसाच्या फ्लाइटने तेथे पोहोचू शकता (रु. 450; मंगळ-रवि)... तरीही, जर तुमच्या अंदमान प्रवासात हॅवलॉक किंवा नील बेटांचा समावेश असेल, तर तेथे स्नॉर्कलिंगला जाणे सोपे आणि स्वस्त असू शकते - जर तुम्ही नक्कीच मोठे पैसे मोजणार नसाल. हे इतकेच आहे की जहाजे येथे जास्त काळ थांबत नाहीत आणि तुमच्याकडे पोहायला पुरेसा वेळ नसतो. जर तुम्हाला या प्रदेशाचे सखोल अन्वेषण करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला Lacadives शी संपर्क साधण्याचा सल्ला देतो (९६७९५३२१०४; www.lacadives.com)... वंदूरमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. बांडुरा पिअर किंवा पोर्ट ब्लेअर ट्रॅव्हल ऑफिसमध्ये परमिट मिळू शकतात.

पोर्ट ब्लेअर ते बांदूरपर्यंत बसेस धावतात (12 रुपये, 1.5 तास).

चिरीयतपू

चिरिया टापू हे पोर्ट ब्लेअरपासून ३० किमी अंतरावर आहे. समुद्रकिनारे आणि मानफ झाडे असलेले हे एक छोटेसे गाव आहे. 2 किमी दक्षिणेस तुम्हाला हॅवलॉक आणि नीलच्या बाहेर सर्वोत्तम स्नॉर्कलिंग स्पॉट मिळेल. सूर्यास्त पाहण्यासाठी हा एक उत्तम कोपरा आहे. पोर्ट ब्लेअरहून दररोज 7 बसेस आहेत (^ 10, 1.5 तास)... तुम्ही सिंक बेटावरून जहाजानेही येथे पोहोचू शकता. नवीन जैविक उद्यान (भारतीय / परदेशी 20/50 रुपये; 9:00-16:00 मंगळ-रवि)अद्याप पूर्ण झाले नाही (हे 2015 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे), परंतु येथे जंगलात आधीच अनेक प्रशस्त नैसर्गिकरित्या कुंपण घातलेले क्षेत्र आहेत जेथे मगरी, हरिण आणि वार्थॉग राहतात.

सिंक बेट

उत्तर आणि दक्षिण सिंकची निर्जन बेटे, वाळूच्या किनाऱ्याने जोडलेली, बांदूरच्या दक्षिणेकडील वन्यजीव अभयारण्याचा भाग आहेत. ही बेटे कोरल रीफने वेढलेली आहेत आणि अंदमानातील सर्वात सुंदर मानली जातात.

येथे दिवसाच्या भेटींना परवानगी आहे. परंतु, जर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सींकडून येत नसाल जे अधूनमधून येथे ग्रुप टूर आयोजित करतात, तर तुम्हाला मुख्य वन्यजीव वॉर्डनला भेट देण्याची परवानगी अगोदर घ्यावी. चिरिया टापू येथून बोटीने या बेटांवर पोहोचता येते (2 तास)किंवा बांडुरा येथून (3.5 तास)... येथे, मरीन नॅशनल पार्कला भेट देण्याची परवानगी वैध मानली जाते. महात्मा गंडे (भारतीय / परदेशी 50/500 रुपये).

हॅवलॉक बेट

पांढरा वालुकामय किनारा, नीलमणी उथळ, गडद जंगल, शॅक-लाइन असलेला समुद्रकिनारा, जगभरातील अनेक पर्यटक - हा हॅवलॉक आहे, बजेट पर्यटनाचा उष्णकटिबंधीय मोती. काही वर्षांत, त्याची स्थिती थाई कोह फांगनशी संबंधित असेल. (को फा-नगान), नाइटलाइफ मोजत नाही. येथे, किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये, एक व्यस्त जीवन जोमात आहे, परंतु चंद्रप्रकाशाखाली वेड्या पार्ट्यांमध्ये ते कधीही येत नाही. आळशीपणा बाजूला ठेवून, हॅवलॉक डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग क्रियाकलाप देते आणि बरेच पर्यटक त्यांचा बहुतेक वेळ अंदमान बेटांवर घालवतात.

काय पहावे आणि करावे

अंदमानातील स्कुबा डायव्हिंगसाठी हॅवलॉक हे मुख्य बेट आहे. मुख्य पर्यटन रस्त्यालगत डायव्हिंग ऑपरेटर्सची कमतरता नाही. तुम्हाला फक्त काहींशी चॅट करावे लागेल आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडेल अशी निवड करावी लागेल.

येथील स्नॉर्कलिंग अप्रतिम आहे. स्नॉर्कलिंग जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हॉटेलमधून डुंगी ऑर्डर करणे (लाकडी मोटर बोट)... सहलीची किंमत सहभागींची संख्या, अंतर इत्यादीनुसार 1000 ते 2000 रुपये आहे. - ग्रुपमध्ये बरेच लोक असल्यास, तुमच्याकडून फक्त 250 रुपये आकारले जाऊ शकतात. स्नॉर्कलिंग उपकरणे हॅवलॉकमध्ये - हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये - सहज मिळू शकतात परंतु ते सामान्यतः कमी दर्जाचे असतात.

मासेमारी हा येथील आणखी एक लोकप्रिय उपक्रम आहे. हॉटेलद्वारे व्यवस्था करणे देखील चांगले आहे. शहरात अनेक स्पोर्ट फिशिंग ऑपरेटर आहेत.

काही सराय हायकिंग आणि पक्षी निरीक्षणासाठी जंगल फिरण्याचे आयोजन करतात. सावधगिरी बाळगा, पाऊस पडल्यानंतर जंगलातील मातीची खूप झीज होते. आतून, रेनफॉरेस्ट एक रमणीय पन्ना गुहा आणि पक्षीनिरीक्षण आहे (विशेषतः काठावर)- एक फायदेशीर व्यवसाय. निळसर-काळा रॅकेट-शेपटी असलेला ड्रोंगो त्याच्या अद्भुत शेपटीसह आणि याउलट, चमकदार रंगाचा ओरिओल लक्षात घ्या.

गाव क्रमांक 5 पासून सुमारे 5 किमी अंतरावर कालापथर आहे, जिथे हत्ती प्रशिक्षण शिबिर आहे. अभ्यासाच्या वेळी, कामाच्या ठिकाणी हत्तींचे शो आयोजित करण्याची योजना होती. कालापठारच्या पलीकडे, रस्ता आणखी एक प्राचीन समुद्रकिनारा जातो आणि नंतर हळूहळू जंगलात हरवून जातो.

सर्वात सुंदर आणि लोकप्रिय वालुकामय समुद्रकिनारा - राधा नगर, ज्याला बीच क्रमांक 7 देखील म्हटले जाते, भरपूर प्रशंसा मिळविली. पांढरी वाळू, समुद्राच्या लाटेची परिपूर्ण सर्पिल, जंगल, चित्रातल्याप्रमाणे - हे राधा नगर आहे. आणि सूर्यास्त? ते फक्त भव्य आहेत! घाटापासून 12 किमी अंतरावर बेटाच्या वायव्येस असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा रस्ता हॅवलॉकच्या आतील भागातून जातो - एक हिरवे स्वप्न (ऑटो-रिक्षा तुम्हाला सुमारे 150 रुपये घेईल)... किंवा, तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही गाव क्रमांक 1 येथून बसने येथे येऊ शकता. समुद्रकिनाऱ्याच्या वायव्येस 10 मिनिटांवर तुम्हाला नील बे खाडीचा सुंदर तलाव दिसेल, मूळ वाळू आणि स्वच्छ पाण्याने नंदनवनाचा आणखी एक तुकडा. 2010 मध्ये येथे मगरीचा हल्ला झाला होता, त्यामुळे येथे पोहणे किती सुरक्षित आहे हे स्पष्ट करणे योग्य ठरेल. उच्च हंगामात, तुम्ही हत्ती (प्रौढ / मुले 25/15 रुपये; 11: 00-14: 00 सोम-शनि) समुद्रकिनार्यावर स्वार होऊ शकता, फोटोसाठी पोज देत आणि हसत आहात.

हत्ती समुद्रकिनारा (एलिफंट बीच)एलिफंट बीच, स्नॉर्कलिंगचे एक उत्तम ठिकाण, आणखी उत्तरेला आहे. हत्तींनी घातलेल्या वाटेने सुमारे चाळीस मिनिटे त्याच्याकडे जा. रस्त्यावर चिन्हे आहेत, परंतु पावसानंतर चालणे कठीण आहे. 2004 मध्ये आलेल्या सुनामीनंतर समुद्रकिनारा अक्षरशः गायब झाला होता आणि आता भरतीच्या वेळी पोहोचणे अशक्य आहे. बचावकर्ते किनार्‍यावर ड्युटीवर आहेत, जे कचरा टाकणार्‍या प्रत्येकाला टिप्पणी करतात (देव त्यांना मदत करा!).

कुठे राहायचे आणि कुठे खायचे

बहुतेक हॅवलॉक हॉटेल्स बीच हाऊस आहेत. ते सर्व "इको-हाउस" असल्याचा दावा करतात. ("इको" चा अर्थ स्पष्टपणे "स्वस्त बांधकाम साहित्य" असा होतो)परंतु पैशासाठी हे उत्कृष्ट मूल्य आहे, विशेषतः कमी हंगामात.

सर्व सूचीबद्ध निवासस्थानांमध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय पाककृतींचा पर्यटकाभिमुख मेनू उपलब्ध आहे. तुम्हाला काही पारंपरिक भारतीय हवे असल्यास शहरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जा. (गाव क्रमांक १)किंवा मुख्य बाजाराकडे (गाव क्रमांक ३)... गाव क्रमांक १ मध्ये वाईन शॉप आहे.

जवळपास सर्व घरे पूर्व किनार्‍यावर गाव # 2 आणि # 5 मधील आहेत.

मगरी

एप्रिल 2010 मध्ये हॅवलॉकमधील एका अमेरिकन पर्यटकाचा दुःखद मृत्यू, ज्यावर स्नॉर्कलिंग करत असताना खाऱ्या पाण्याच्या मगरीने हल्ला केला होता, त्यामुळे संपूर्ण जनतेला धक्का बसला. अंदमान बेटांच्या अनेक भागात मगरी दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत, परंतु ही घटना घडलेल्या राधा नगरजवळील नीला खाडीमध्ये याआधी मगरी दिसल्या नाहीत. शिवाय, हा हल्ला खुल्या समुद्रात प्रवाळ खडकांवर झाला, जो अत्यंत असामान्य मानला जातो. मगरीचा अंत तिथे कसा झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बहुधा, प्रदेशाच्या लढाईत पराभूत झाल्यानंतर त्याला बेटाच्या पश्चिमेकडील खारफुटीमधील त्याच्या वस्तीतून हद्दपार करण्यात आले. त्यामुळे मगरीला पकडण्यात आले (ते आता पोर्ट ब्लेअर प्राणीसंग्रहालयात आहे)... तेव्हापासून, हे सरपटणारे प्राणी येथे दिसले नाहीत, परंतु तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगली जाते. सर्व खात्यांनुसार, ही एक वेगळी घटना होती आणि लोकांना येथे पोहण्यास घाबरू नये. तथापि, आपण माहिती ठेवणे महत्वाचे आहे. सरकारी इशाऱ्यांकडे लक्ष द्या, बेटाच्या पश्चिमेकडील भागात एकटे पोहू नका आणि संध्याकाळी आणि रात्री पाण्यापासून दूर राहा.

ही चेतावणी कॉर्बिना खाडी, वंडूर बीच, बाराटांग आणि संपूर्ण लहान अंदमान सारख्या ठिकाणी लागू होते.

माहिती

गाव 3 मध्ये शेजारी दोन एटीएम आहेत. येथे तुम्ही अत्यंत स्लो इंटरनेट देखील वापरू शकता. (80 प्रति तास).

पुढे मागे मार्ग

फेरी सुटण्याच्या वेळा विसंगत आहेत, परंतु पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक आणि त्याउलट, दिवसातून किमान एकदा, परंतु सहसा दोन किंवा अधिक वेळा थेट उड्डाणे असतात. (परदेशी साठी तिकीट 195 रुपये, 2.5 तास)... सहलीच्या किमान एक दिवस आधी तिकीट बुक करणे चांगले. तिकीट कार्यालय 9.00 ते 11.00 पर्यंत खुले असते. तुम्ही अधिक आरामदायी मकरुझ फेरी देखील वापरू शकता (650 रुपये, दोन तास).

हॅवलॉक आणि नील दरम्यान दर आठवड्याला अनेक सरकारी फेरी चालतात (१९५ रुपये)... लाँग आयलंडला जाण्याचा हा सर्वात सोयीचा मार्ग आहे (१९५ रुपये), शिवाय, रंगात येथे थांबते, तेथून तुम्ही उत्तर अंदमानला बसने पुढे जाऊ शकता.

बेटावर फिरणे

लोकल बस (७ रुपये)मरीना आणि गावांदरम्यान तासातून एकदा चालते, परंतु येथे आपली स्वतःची वाहतूक करणे उपयुक्त आहे. तुम्ही मोपेड किंवा मोटारसायकल भाड्याने घेऊ शकता (प्रतिदिन 250 रुपये पासून)आणि सायकली (40 ते 50 रुपये प्रतिदिन)तुमच्या हॉटेलमध्ये किंवा गाव क्रमांक 3 मध्ये.

नील बेट

सोयीस्करपणे त्याच्या अधिक प्रसिद्ध शेजाऱ्याच्या सावलीत वसलेल्या, नीलकडे आराम करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही आहे आणि बरेच काही. त्याचे समुद्रकिनारे हॅवलॉकसारखे विलासी नसतील, परंतु ते प्रशस्त आहे आणि उत्कृष्ट सायकलिंग मार्ग आहेत. जीवनाची लय येथे अविचल आहे. नयनरम्य गावांमधून सायकल चालवत असताना, स्थानिक लोक आणि प्रौढ सारखेच तुमचे स्वागत मैत्रीपूर्ण पद्धतीने करतील. नील बेटापासून पोर्ट ब्लेअरपर्यंत सुमारे 40 किमी, हॅवलॉक आणि घरापर्यंत अनेक ब्रह्मांडांची एक छोटी फेरी.

अभ्यासाच्या वेळी, इंटरनेट नव्हते आणि चलन बदलण्याची जागा नव्हती. बाजाराच्या प्रदेशावर पोस्ट ऑफिस आहे.

काय पहावे आणि करावे

नील बेटावर पाच समुद्रकिनारे आहेत (1 ते 5 पर्यंत क्रमांकित), ज्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे अद्वितीय आकर्षण आहे.

बीच क्रमांक 1 सर्वात सुंदर आणि सर्वात प्रवेशयोग्य आहे. मरिना आणि गावाच्या पश्चिमेला 40 मिनिटे चालत आहे. भरतीच्या वेळी, तुम्ही दूरवर असलेल्या कोरल रीफजवळील बेटावर सर्वोत्तम स्नॉर्कलिंग करू शकता (पश्चिमी)बीचचा शेवट. पर्ल पार्क रिसॉर्ट हे सूर्यास्त पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पहाटे संध्याकाळपासून येथे पर्यटक आणि स्थानिक जमतात.

बीच क्रमांक 2 बेटाच्या उत्तरेकडील भागात आहे. येथे खडक एक नैसर्गिक पूल बनवतात, ज्यावर खडकाळ खाडीभोवती फिरून कमी भरतीच्या वेळी पोहोचता येते. येथे बाईकने जाण्यासाठी, बाजारातून बाजूचा रस्ता घ्या आणि नंतर फाट्यावर डावीकडे वळा. समुद्रकिनार्यावर पोहणे सर्वोत्तम आहे! जरी त्याचे घाट जवळ असणे किंचित त्रासदायक आहे.

समुद्रकिनारा क्रमांक 3 वालुकामय किनार्यांसह एक निर्जन खाडी आहे. ब्लू सी रेस्टॉरंटमधून सर्वात सोयीस्कर निर्गमन आहे. पुढे एक जंगली बीच आहे (गावापासून ५ किमी)... बेटाच्या पूर्वेकडील भागाकडे जाणाऱ्या गावाच्या रस्त्याने तुम्ही येथे पोहोचू शकता. किनाऱ्यावर चालण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कमी भरतीच्या वेळी, तुम्ही चुनखडीच्या छोट्या गुहांना भेट देऊ शकता.

इंडिया एक्सप्लोरर्ससह डायव्हिंगला जा (९४७४२३८६४६; www.indiascubaexplorers.com)किंवा स्नॉर्कलिंग उपकरणे भाड्याने द्या (150 रुपये प्रतिदिन)तुमच्या हॉटेल किंवा शहरात. समुद्रकिनारा # 1 वर एक डगॉन्ग उंच भरतीच्या वेळी उथळ पाण्यात अन्न शोधत असल्याचे पाहणे तुम्हाला भाग्यवान ठरेल. 1000 - 2000 रुपयांमध्ये, तुम्ही मासेमारी बोट भाड्याने घेऊ शकता आणि त्यावर स्नॉर्कलिंग किंवा मासेमारी करू शकता. खर्च सहलीचे अंतर, डाइव्हचा कालावधी इत्यादींवर अवलंबून असते; सहसा अनेक लोकांना बोर्डवर घेतले जाते.

मुख्य बाजारामध्ये आनंददायी वातावरण आहे आणि संध्याकाळी बरेच लोक येथे जमतात. ज्ञान गार्डन रेस्टॉरंटमध्ये पाककला वर्ग उपलब्ध आहेत (200 रुपयांपासून)... रेस्टॉरंटच्या मागे एक मार्ग आहे जो तुम्हाला टेकडीवरून निरीक्षण डेकवर घेऊन जाईल, तेथून तुम्ही संपूर्ण बेट समुद्रापर्यंत पाहू शकता.

कुठे राहायचे आणि कुठे खायचे

कमी हंगामात, बीचवर साधे बंगले भाड्याने खूप फायदेशीर आहेत. सर्वात लोकप्रिय ठिकाणे नँगो बीच रिसॉर्ट आहेत: (03192-282583; बंगले रु. 50-350, कॉटेज रु. 600-1000)आणि पर्ल पार्क रिसॉर्ट (03192-282510; बंगले 100-250 रुपये, कॉटेज आणि खोल्या रुपये 400-1600), दोन्ही बीच क्रमांक 1 वर. ते एकमेकांचे प्रतिबिंब आहेत असे दिसते - ही छाप त्यांच्या जवळच्या आणि बाह्य समानतेमुळे तयार केली गेली आहे. दोन्ही गोंडस खाचेचे बंगले किंवा कमी मनोरंजक परंतु अधिक आरामदायक काँक्रीट खोल्या देतात. मुख्य फरक असा आहे की टँगो समुद्राच्या झुळूक आणि समुद्राची दृश्ये देते, तर पर्ल पार्क सूर्यास्त आणि हिरवीगार बाग ऑफर करते.

ए-डी बीच रिसॉर्ट (214722; बंगला रु 300-700)- बीच क्रमांक 4 वर आणखी एक उत्तम पर्याय.

नील बेटावरील अन्न आश्चर्यकारकपणे चांगले आहे. तुम्हाला बाजारात स्वस्त आणि स्वादिष्ट बंगाली खाद्यपदार्थ मिळतील.

चांदणे (मुख्य अभ्यासक्रम 40-150 रुपये)बीच क्रमांक 1 च्या मार्गावर - हे पर्यटकांचे आवडते रेस्टॉरंट आहे. येथे ते उत्कृष्ट घरगुती पास्ता आणि त्यातून पदार्थ बनवतात (कोळंबी पास्ता आश्चर्यकारक आहे)आणि थंड बिअर सर्व्ह करा. चांद रेस्टॉरंट मार्केट येथे स्थित आहे देखील लोकप्रिय. येथे तुम्हाला मजबूत कॉफी आणि स्वादिष्ट ग्रील्ड फिश दिले जाईल. ज्ञान गार्डन रेस्टॉरंट (मुख्य अभ्यासक्रम 50-200 रुपये)सीफूड पदार्थांची उत्तम निवड देते.

कसे जायचे आणि आजूबाजूला कसे जायचे

पोर्ट ब्लेअरमधील फिनिक्स बे पिअर येथून नीलकडे जाणारी फेरी दररोज सकाळी निघते (१९५ रुपये, दोन तास)... हॅवलॉकसाठी रोजची फेरी देखील आहे जी सकाळी निघते.

दुचाकी भाड्याने (दररोज 50 रुपये पासून)- बेटावर जाण्याचा एक चांगला मार्ग: रस्ते सपाट आहेत आणि अंतर कमी आहेत. ऑटोशॉ तुम्हाला 50 रुपयांमध्ये घाटापासून बीच क्रमांक 1 वर घेऊन जाईल.

मध्य आणि उत्तर अंदमान

अंदमान बेटे हे सर्व सूर्य आणि वाळूचे नाहीत. हे जंगल देखील आहे, अॅमेझॉनच्या जंगलासारखे घनदाट आणि ज्युरासिक उद्यानासारखे प्राचीन, जणू काही मातृ निसर्गाने लहरीपणाने तयार केले आहे. अंदमान हायवेवर बसच्या लांब हादरत असताना बेटांची ही घनदाट जंगली, जंगली बाजू दिसते. (ATR)... दिगलीपूरला जमिनीवरून प्रवास करताना, तुम्हाला पुरातन वृक्षांनी नटलेल्या खडबडीत रस्त्यांवर आणि लाल-टॅनिन-समृद्ध नद्यांच्या पाण्यावर नांगरणाऱ्या फेरीची दृश्ये दिसतील, ज्यात मगरींचे घर आहे.

परंतु एटीआर ट्रिपची एक नकारात्मक बाजू देखील आहे: रस्ता जरावा वस्त्यांमधून जातो, म्हणूनच जमातीला सतत बाह्य जगाशी संपर्क साधावा लागतो. आधुनिक भारत आणि आदिवासी जीवन एकत्र राहण्यास सक्षम असल्याचे दिसत नाही - प्रत्येक वेळी जरावा आणि नवागत यांच्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे संवाद साधला जातो तेव्हा गैरसमज निर्माण होतात, ज्यामुळे मतभेद आणि अशांतता निर्माण होते किंवा सर्वात वाईट परिस्थितीत हिंसा आणि मृत्यूची कृती होते. भारतीय मानववंशशास्त्रज्ञ आणि स्थानिक मानवाधिकार गट जसे की सर्व्हायव्हल इंटरनॅशनल एटीआर बंद करण्याची मागणी करत आहेत. अभ्यासावेळी महामार्गाच्या स्थितीबाबत चर्चा सुरू होती. सध्या, वाहनांना केवळ एस्कॉर्टसह आणि निर्दिष्ट वेळी परवानगी आहे. 6:00 ते 15:00 पर्यंत. छायाचित्रे घेणे सक्तीने निषिद्ध आहे, जसे की जरावा थांबणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे, जे पर्यटकांना जाण्यापासून हँडआउट्सवर अधिकाधिक अवलंबून होत आहेत.

पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेकडील सर्वात मनोरंजक ठिकाण म्हणजे चुनखडीच्या गुहा (सोमवारी बंद)बारातंगा मध्ये. त्यांच्यापर्यंत बोटीने पोहोचता येते (200 रुपये)घाटापासून, ज्यास ४५ मिनिटे लागतील. वाट एका नयनरम्य खारफुटीच्या जंगलातून जाते. परमिट आवश्यक आहे, जे मरीनामध्ये मिळू शकते.

रंगत हे दुसरे मुख्य शहर आहे, वाहतूक केंद्र आहे, दुसरे काही उल्लेखनीय नाही. तुम्ही इथे अडकल्यास, आम्ही PLS भवर हॉटेलची शिफारस करतो. (1-सीटर / 2-सीटर 150/250 रुपयांपासून), बर्‍याच वाईट हॉटेल्सपैकी सर्वोत्तम. जवळच एटीएम आहे. पोर्ट ब्लेअर आणि हॅवलॉक बेटासाठी फेरी निघतात (50/195 रुपये, 9 तास)तसेच लाँग आयलंड (७ रुपये), येरतगा घाटापासून, जे रंगतपासून 8 किमी आहे. पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी रोजची शटल बस आहे (९५ रुपये, ९ तास).

डिसेंबर ते मार्च बिसा (mshe कासव)रंगतपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर कथबर्ट खाडीच्या किनाऱ्यावर घरटे. उत्तरेकडे जाणारी बस तुम्हाला इथे घेऊन जाईल. हॉक्सबिल घरटे (03192-279022; 4-बेड बेडरूम रु. 600, दुहेरी रु. 400, वातानुकूलित रु. 800)राहण्यासाठी एकमेव ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअरमधील A&N टुरिझम कार्यालयात खोली बुक करणे आवश्यक आहे. परवानगी (250 रुपये)बेतापूर येथील वनपाल कार्यालयात नोंदणी करता येईल.

लांब बेट

लाँग आयलंडचे मैत्रीपूर्ण रहिवासी आणि जीवनाचा अविचारी वेग यामुळे ते शांतता आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श गंतव्यस्थान बनते. या बेटावर कोणतीही मोटार चालणारी वाहने नाहीत आणि काही वेळा असे दिसते की येथे फक्त तुम्हीच पर्यटक आहात.

दीड तास जंगल वॉक (पावसानंतर शिफारस केलेली नाही)पांढरा वालुकामय समुद्रकिनारा आणि आंघोळीसाठी आरामदायक जागा असलेल्या लालाजींच्या निर्जन खाडीकडे नेईल. डुंगी भाड्याने करून (1500 रुपये जमा करा), तुम्ही खाडीवर सहज पोहोचू शकता, खासकरून जर तुम्हाला लीचेस आवडत नसतील. चमकदार पांढर्‍या वालुकामय समुद्रकिनारा आणि स्वच्छ पाण्यासह आश्चर्यकारक मर्क बे मधील नॉर्थ पॅसेज बेटावर तुम्ही शेण आणि स्नॉर्केल देखील भाड्याने घेऊ शकता. तसेच येथून तुम्ही साऊथ बॅटगोनला जाऊ शकता (दक्षिण बटण).

निळा ग्रह (9474212180; www.blueplanetanandamans.com; 300/700 रुपयांपासून आंघोळीसह/विना खोली)हे केवळ एक उत्कृष्ट हॉटेल नाही तर धुतलेल्या किनाऱ्यावरील बाटल्या वापरून वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. साध्या खोल्यांच्या आजूबाजूला एक पाडुक आहे, ज्यावर हॅमॉक्स ताणलेले आहेत. ते खूप मंद इंटरनेट पुरवतात आणि पुरवतात. घाटातून येथे येण्यासाठी निळ्या बाणांचे अनुसरण करा. स्वतंत्र कॉटेज आहेत (2000 ते 3000 रुपयांपर्यंत)जवळपास लाँग आयलंड अल्कोहोल विकत नाही, म्हणून तुम्हाला आगाऊ खरेदी करावी लागेल.

हॅवलॉक आणि पोर्ट ब्लेअरला आठवड्यातून तीन वेळा फेरी जाते. (१९५ रुपये)आणि आठवड्यातून एकदा रंगतला (8 रुपये).

मायाबंदर आणि त्याचा परिसर

"वरच्या" मध्य अंदमानवर, ब्रिटनच्या वसाहती काळात येथे पुनर्स्थापित झालेल्या केरन या बर्मीज टेकडी जमातीने वस्ती केलेली अनेक गावे आहेत. मायाबुंदेरे मध्ये, समुद्र "n" वाळू येथे थांबा (03192-273454; thanzin_the_great@yahoo.co.in; 200 रुपयांपासून क्रमांक), हे एक साधे घर, रेस्टॉरंट आणि बार आहे ज्यातून समुद्र दिसतो. शहराच्या केंद्रापासून 1 किमी अंतरावर आहे. करेनाचे हॉटेल टायटस आणि एलिझाबेथ त्यांच्या मोठ्या कुटुंबासह चालवतात. ज्यांना गर्दीपासून दूर राहायचे आहे त्यांच्यासाठी ही सुज्ञ जागा योग्य आहे. येथे दिवसभराच्या बोटीच्या प्रवासाची ऑफर दिली जाते (500-2500 रुपये प्रति सहल)ज्यामध्ये, हंगामानुसार, एकेचाळीस गुहेच्या सहलींचा समावेश असू शकतो, जिथे स्विफ्टलेट्स त्यांचे मौल्यवान खाद्य घरटे बांधतात, एव्हिस बेटाच्या किनाऱ्यावर स्नॉर्कलिंग, विचित्र बेटाची जंगल सहल मुलाखत, जंगली हत्तींच्या लहान लोकसंख्येचे घर लाकूड खरेदी एंटरप्राइझ 1950 -x वर्षांमध्ये बंद झाल्यानंतर मुक्त केले. तुम्हाला खूप असामान्य वाटेल. परवानगी आवश्यक (५०० रुपये)... जे समुद्र "n" वाळू द्वारे सर्वोत्तम प्राप्त केले जाते.

मायाबंदर रंगतपासून ७१ किमी अंतरावर आहे. पोर्ट ब्लेअरहून रोजची बस आहे (l30 रुपये, 10 तास)आणि आठवड्यातून तीन वेळा - फेरी (मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी)... येथे एक अविश्वसनीय एटीएम आहे.

दिगलीपूर आणि त्याचा परिसर

जे लोक या सुदूर उत्तरेकडील प्रदेशात पोहोचतील त्यांना आकर्षक दृष्ये दिली जातील. अंदमान द्वीपसमूहातील सर्वात उत्तरेकडील प्रमुख शहर, एटीएम आणि संथ इंटरनेट असलेले विस्तीर्ण वालुकामय बाजार शहर असलेल्या दिगलीपूरकडून तुम्ही फारशी अपेक्षा करू नये. (40 रुपये प्रति तास)... तुम्ही थेट कॅलिपूरला जावे जेथे तुम्हाला समुद्र आणि दूरवरच्या बेटांचे निवास आणि दृश्ये मिळतील.

फेरी एरियल बे मरिना येथे पोहोचते, जे दिग्लीपूरच्या नैऋत्येस 11 किलोमीटरवर आहे, बस स्थानक आणि प्रशासन इमारत आहे, जिथे फेरी तिकीट बुक केले जाऊ शकते. कालीपूर हे समुद्रकिनाऱ्याच्या 8 किमी आग्नेयेला आहे.

काय पहावे आणि करावे

इबिस, लेदरबॅक, ऑलिव्ह आणि हिरवी कासवे डिसेंबर ते एप्रिल या काळात दिगलीपूरच्या किनाऱ्यावर घरटी करतात. पर्यटक उष्मायनासाठी अंडी गोळा करण्यास मदत करू शकतात; अधिक माहितीसाठी प्रिस्टाइन बीच रिसॉर्टशी संपर्क साधा. या परिसरात अनेक गुहा देखील आहेत.

वालुकामय पट्टीने जोडलेली जुळी बेटे सुंदर उष्णकटिबंधीय तराजूसारखी आहेत. हा भाग सागरी अभयारण्य मानला जात असल्याने, येथे जाण्यासाठी तुम्हाला वनीकरण विभागाची परवानगी घ्यावी लागेल. (भारतीय / परदेशी रु. 50/500; 6:00-14:00 सोम-शनि), जे एरियल बे मरिनाच्या समोर स्थित आहे. ही बेटे अंदमानातील काही सर्वोत्तम आहेत; आणि येथे उत्तम स्नॉर्कलिंग आहे. 1,000 रुपये दिवसाला गावाबाहेर जाण्यासाठी तुम्ही बोट भाड्याने घेऊ शकता.

Craggie हे कालीपूर जवळ एक छोटेसे बेट आहे, जिथे स्नॉर्कलिंग करायला जाणे देखील आनंददायी आहे. मजबूत जलतरणपटू तेथे स्वतः पोहोचू शकतात किंवा तुम्ही डुंगा भाड्याने घेऊ शकता (200 रुपये राउंड ट्रिप).

माउंट सॅडल पीक - अंदमान बेटांचा सर्वोच्च बिंदू (समुद्र सपाटीपासून ७३२ मी.)... उपोष्णकटिबंधीय जंगलातून कालीपूर ते शिखर आणि परत जाण्यासाठी 6 तास लागतील; शीर्षस्थानी द्वीपसमूहाचे भव्य दृश्य दिसते. यासाठी वन विभागाची परवानगीही लागते. (भारतीय 25 रुपये, परदेशी 250 रुपये)आणि स्थानिक मार्गदर्शक तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करेल - अधिक माहितीसाठी प्रिस्टाइन बीच रिसॉर्ट पहा. अन्यथा, झाडांवर पेंट केलेल्या लाल बाणांचे अनुसरण करा.

कसे जायचे आणि आजूबाजूला कसे जायचे

मायाबंदरच्या उत्तरेस 80 किमी अंतरावर असलेल्या दिगलीपूरमध्ये पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी रोजची बस आहे (१७० रुपये, १२ तास)आणि परत, तसेच मायाबंदरला (50 रुपये, 2.5 तास)आणि रंगत (70 रुपये, 4.5 तास)... पोर्ट ब्लेअरहून दिगलीपूरला जाणारी फेरीही आहे जी रात्री दिगलीपूरहून परत येते (आसन/बंक रु 100/295, 10 तास).

दिगलीपूर ते कालीपूर दर अर्ध्या तासाला बस धावतात; एका ऑटो-रिक्षाची किंमत सुमारे 100 रुपये आहे.

लहान अंदमान

गौबोलंबे हे द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लहान अंदमानचे नाव आहे, येथील रहिवासी ओंगे जमातीचे आहेत. येथे तुम्ही स्वतःला जगाच्या शेवटी सापडत आहात (उष्णकटिबंधीय स्वर्गात): येथे जवळजवळ कोणतेही पर्यटक नाहीत, स्थानिक लोक इतके मैत्रीपूर्ण आहेत की आपण त्यांना एक कुटुंब समजता आणि हे बेट स्वतःच एक हिरवेगार खारफुटी आणि जंगल आहे जे जगाच्या निर्मितीपासून येथे अस्तित्वात आहे.

26 डिसेंबर 2004 रोजी आलेल्या त्सुनामीमध्ये छोट्या अंदमानचे खूप नुकसान झाले होते आणि आता ते हळूहळू सावरत आहे. परंतु, येथे अद्याप पर्यटन पायाभूत सुविधा विकसित झाल्या नसतानाही, नवीन हॉटेल्स आधीच सुरू होऊ लागली आहेत. येथील मुख्य वस्ती हॅट बे आहे, हे पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेस १२० किमी अंतरावर असलेले एक छोटेसे शहर आहे, जिथे मुख्यतः हसतमुख बंगाली आणि तमिळ लोक राहतात. उत्तरेला तुम्हाला स्वच्छ आणि ताजे समुद्रकिनारे आढळतील.

काय पहावे आणि करावे

नेताजी नगर, हॅट बेच्या 11 किमी उत्तरेस आणि बटलर बे, आणखी 3 किमी उत्तरेस, सुंदर वाळवंट आहेत (जोपर्यंत गाय योगायोगाने भेटत नाही तोपर्यंत)समुद्रकिनारे आणि सर्फर्ससाठी उत्तम लाटा.

किनाऱ्यापासून थोडे पुढे जंगलात व्हाईट सर्फ आणि व्हिस्पर वेव्ह धबधबे आहेत (नंतरच्या मध्ये 4 किमीचा प्रवास समाविष्ट आहे, ज्यासाठी आम्ही मार्गदर्शकाची शिफारस करतो)... तुम्हाला भव्य धबधबे दिसतील आणि तुम्हाला त्यांच्या तलावांमध्ये पोहण्याची इच्छा असेल, परंतु मगरींपासून सावध रहा.

हॅट बे पासून 14 किमी अंतरावर असलेले छोटे अंदमान दीपगृह हे आणखी एक फायदेशीर पर्यटन आहे. 41 मीटर वर, अगदी 200 पायर्‍या - आणि किनार्याचे आणि जंगलाचे जादुई दृश्य तुमच्या समोर उघडते. येथे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग मोटारसायकलने आहे, परंतु तुम्ही घाम गाळून बाइकने येथे पोहोचू शकता. तुम्ही ऑटो-रिक्षा देखील भाड्याने घेऊ शकता आणि नंतर, जेव्हा रस्ता दुर्गम होईल तेव्हा, निर्मनुष्य, निर्जन समुद्रकिनार्यावर चालत जा. चालायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.

हरबिंदर खाडी आणि डुगॉन्ग खाडी हे अनुक्रमे निकोबार आणि ओंगेचे आदिवासी प्रदेश आहेत; त्यांना भेट देण्यास मनाई आहे.

धाडसी पर्यटक सर्फर्समध्ये, लिटल अंदमानच्या अफवा काही वर्षांपूर्वी परदेशी लोकांसाठी उघडल्यापासून पसरत आहेत. खडकांमधील मध्यांतरांमध्ये, फक्त अनुभवी सर्फर्सना सवारी करण्याची शिफारस केली जाते आणि शार्क आणि मगरी येथे असामान्य नाहीत. सर्फिंग फ्रीक मुथशी कनेक्ट व्हा (9775276182) हॅवलॉक कडून, तो तुम्हाला लहान अंदमान आणि आजूबाजूच्या परिसराविषयी आवश्यक माहिती देईल. अनेक राहण्यायोग्य सर्फर नौका येथे जातात, ज्यांना तुम्ही अधिक दुर्गम, दुर्गम कोपऱ्यांवर नेऊ शकता. सर्फ अंदमानशी संपर्क साधा (www.surfandamans.com).

कसे जायचे आणि आजूबाजूला कसे जायचे

फेरी पूर्व किनाऱ्यावर हॅट बे येथे येतात; समुद्रकिनारे इथल्या उत्तरेस आहेत. बस (१० रुपये)त्यांना पाहिजे तेव्हा बटलर बे येथे जा. स्थानिक जीप भाड्याने मिळू शकते (100 रुपये).

पोर्ट ब्लेअरहून लहान अंदमानला दररोज जलवाहतूक चालते. तुम्ही स्लो जहाजावरील 8-तासांची नाईट क्रूझ किंवा 6 तासांची दिवसाची बोट ट्रिप निवडू शकता (बसण्याची जागा / बेड 25/70 रुपये).

जर तुम्ही हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अशा प्रकारे, आपण केवळ 7.5-तासांची बोट ट्रिप टाळू शकत नाही, तर वरून अविश्वसनीय दृश्यांचा आनंद देखील घेऊ शकता - जरी सामानाचे वजन 5 किलोपर्यंत मर्यादित ठेवल्याने गोष्टी काहीशी गुंतागुंतीच्या होतात.

तिथे कसे पोहचायचे? ते कोणत्या देशाचे आहेत? नारळ चॉकलेटच्या प्रसिद्ध जाहिरातीतून परिपूर्ण स्वर्ग येतो तेव्हा या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे आहे का? होय, स्वर्ग. ... ... ज्यामध्ये करण्यासारखे काहीच नाही. ... ... :)

अजून दूर... आता आम्ही तुम्हाला अंदमान बेटांना भेट देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहोत असे समजू नका. अगदी उलट.
जमीन, पाणी आणि हवाई मार्गाने जाण्यासाठी, भारतीय व्हिसा मिळविण्यासाठी आणि नंतर एक विशेष परवाना मिळविण्यासाठी बरेच दिवस लागतात, पहिल्या दिवशी प्रखर वैश्विक सूर्यप्रकाशात जळू नये म्हणून व्यवस्थापित करा ... सनब्लॉकने मळलेले, बांबूमधून बाहेर पडणे. सकाळी आणि संध्याकाळी दोन तास झोपडी .. ...
आणि, सर्वात निंदनीय, विसरून जा. साधारणपणे. अगदी हळूवार.

केवळ या प्रकरणात अंतर्दृष्टी येते - या आश्चर्यकारक क्षणाच्या फायद्यासाठी आपण केलेल्या सर्व अडचणी, काहीही न करण्याचा क्षण. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पिठाने वेढलेला, पायाखालचा शांतपणे कुरकुरीत, पारदर्शकतेमुळे पोहताना प्रत्यक्ष दिसणारा समुद्राचा निळसर पृष्ठभाग, रोज हात पुढे करत राहणारा मधुर नारळ आणि उन्मत्त लयीत अत्यंत आवश्यक असलेली शांतता. आपल्या दैनंदिन जीवनातील.

अंदमान बेटांवर - दूरच्या प्रदेशात आपले स्वागत आहे. तसे, तुम्ही बरोबर ऐकले आहे, अंदमान द्वीपसमूह भारताचा आहे.
त्याला म्यानमारमधून फक्त "तुम्ही पाहू शकता". त्यांच्यामध्ये सुमारे 150 किलोमीटर अंतर आहे. बेटे जवळजवळ दीड हजारांनी "मूळ" देशातून काढून टाकली आहेत. सीस्केप, अंतहीन विस्तार आणि जहाज रोलिंगबद्दल उदासीन नसलेल्यांसाठी हे अंतर अगदी क्षुल्लक आहे.
आठवड्यातून एकदा, कोलकाता बंदरातून एक जहाज अनेक दिवस लक्ष्यापर्यंत जात असते. आणि ज्यांना विमानाने प्रवास करायला आवडते त्यांच्यासाठी अर्थातच, विमान फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे.

तुम्ही कोणताही पर्याय निवडा, परमिट मिळवण्यासाठीची रांग टाळता येणार नाही. तथापि, काळजी करू नका - हे जवळजवळ प्रत्येकाला दिले जाते. आणि पासपोर्टवर फुशारकी मारलेल्या शिक्क्यानंतर, सर्व रस्ते उघडतात. द्वीपसमूहातील कोणत्याही बेटांना. जरी नाही, अजिबात नाही. मी अतिशयोक्ती करत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 500 पेक्षा जास्त, 50 पेक्षा कमी लोक राहतात ...
आणि बाकीचे अस्पर्शित कोपरे आहेत, जिथे फक्त ताजे पाणी नाही आणि जिथे, बहुधा, एखाद्या व्यक्तीचा पाय कधीही ठेवला नाही. बहुतेक तथाकथित "जंगली" बेटांवर अजूनही लोक राहतात जे सभ्यतेशी परिचित नाहीत. ते म्हणतात की त्यांच्यामध्ये आदिम लोकांचे थेट वंशज आहेत. हे तपासण्याचा कोणताही मार्ग नसला तरी - आदिवासी वसाहतींना आरक्षण घोषित केले जाते, ज्यांचे अधिकार्यांद्वारे कडक रक्षण केले जाते आणि त्यांना भेट देण्यास मनाई आहे.

विशेष म्हणजे, द्वीपसमूहाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये, अनेक ट्रॅव्हल एजन्सी "जंगली" बेटांवर सहलीची ऑफर देतात. मला म्हणायचे आहे की अनेक राष्ट्रीयत्वांसह जमिनीचे डझन तुकडे (ओंगे, जरावा, सेंटिनेलियन, इ.), ज्यांची संख्या दोनशे लोकांपेक्षा जास्त नाही. हे आदिवासी पिग्मी आहेत, जे अलीकडेच सुसंस्कृत जगाशी परिचित झाले आहेत आणि कपडे म्हणून फक्त कंगोरे आणि चमकदार मणी वापरतात.

बेटांवर येणाऱ्या पर्यटकांना बोटीतून फक्त शंभर मीटर अंतरावर जाण्याची परवानगी आहे. अर्थात, कुंपण नाहीत. नियुक्त क्षेत्राच्या बाहेर, सहलींचे आयोजक आश्वासन देत असल्याने, अडचणीत येण्याचा धोका आहे. प्रवेश क्षेत्रामध्ये अर्थातच, वर वर्णन केलेले "जंगली" एक दुर्मिळ अपवाद आहेत. आणि जर तुम्ही हेतुपुरस्सर परवानगी असलेल्या श्रेणीतून बेटांवर गेलात तर तुम्ही त्यांना घाबरू नये.

तर, पोर्ट ब्लेअरपासून 20 फेरी मिनिटे, कदाचित त्यापैकी सर्वात सहली - रॉस बेट... किंवा "पूर्वेचा पॅरिस", जसे की प्रथम फ्रेंच आणि नंतर ब्रिटीश वसाहती अधिकार्यांच्या निवासस्थानाच्या वेळी दयनीयपणे म्हटले जात असे. येथेच दोषींसाठी पहिली सुधारात्मक वस्ती बांधली गेली. आजपर्यंत, केवळ काही भिंती, कलात्मकरीत्या वेलींनी वाढलेल्या, टेकडीच्या माथ्यावर एक चर्च आणि त्याला लागून असलेली जुनी स्मशानभूमी, विटांच्या तुरुंगातून उरल्या आहेत. बेटाच्या पाहुण्यांचे प्रदेशाच्या मालकांनी स्वागत केले - अक्सिस सिका हिरण, जे स्वत: ला मारण्याची परवानगी देतात.

रॉस विपरीत, शेजारी वाइपर बेटखूपच लहान आणि पूर्णपणे हिरव्यागार झाकलेले. 1789 मध्ये येथे उद्ध्वस्त झालेल्या त्याच नावाच्या जहाजाच्या सन्मानार्थ त्याचे नाव मिळाले. त्यावरच इंग्रज लेफ्टनंट आर्चीबाल्ड ब्लेअर प्रथम तुरुंग बांधण्याच्या उद्देशाने अंदमानात आले (एक रॉस बेटावर, तर दुसरा द्वीपसमूहाच्या राजधानीत). व्हिपिंग पोस्ट्स वाइपरचे अवशेष म्हणून जतन केले गेले आहेत, जो दुःखद वसाहतवादी भूतकाळाचा पुरावा आहे. त्यांच्यामुळे या ठिकाणाला "फाशीचे बेट" असेही म्हणतात. आणि घाटातून त्यांच्याकडे जाणारा मार्ग वळणदार विटांच्या मार्गाने जातो.

बेटांपैकी सर्वात शांत - नाईल... पोर्ट ब्लेअर फेरी आठवड्यातून फक्त तीन वेळा त्याच्या किनाऱ्यावर जाते. त्याचा प्रदेश श्रीमंत इकोटूरिस्ट आणि स्नॉर्कलिंग चाहत्यांसाठी खास मनोरंजनाचे केंद्र मानले जाते. कोरल रीफ येथे मूळ स्वरूपात जतन केले गेले आहे आणि बेट स्वतःच अनेक खाडी आणि मोहक किनारे असलेल्या त्रिकोणासारखे दिसते. तुम्ही त्यांना दुचाकीवरून काही तासांत पाहू शकता.
आणि जागा अनुभवण्यासाठी, एक आठवडा राहणे चांगले. या वेळी, आपण आराम आणि डुबकी घेऊ शकता. आणि विदेशी फळे देखील खा. नाईल, तसे, द्वीपसमूहातील रहिवासी "अन्न वाडगा" म्हणतात. शेवटी, येथूनच सर्व "अंदमान" फळे आणि भाज्यांची सर्वाधिक निर्यात होते.

आणि जर हे छोटे उष्णकटिबंधीय नंदनवन कंटाळले असेल तर आपले स्वागत आहे हॅवलॉक- सर्व बेटांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि पर्यटक. तुम्ही नाईल नदीच्या त्याच फेरीवर पोहोचू शकता, फक्त टर्मिनलवर उतरा. आणि घाटातून, कोणीही काही मिनिटांत इच्छित ठिकाणी गाडी चालवेल. बेटाचे मुख्य आकर्षण बीच 7 आहे, जे कदाचित "बाउंटी स्केल" वर सर्वोच्च रेटिंगचे पात्र आहे.
पांढऱ्या वाळूचे विस्तीर्ण सरोवर, हिरवाईने नटलेला, खऱ्या पर्जन्यवनातून जाणारा रस्ता, एक भव्य आणि शांत महासागर आणि शेवटी, एक स्फटिक निळे आकाश ...

हॅवलॉकवर मुक्कामाचे पहिले दिवस, आजूबाजूचे लँडस्केप काय घडत आहे याचे संपूर्ण "फोटोशॉपिंग" करण्याची कल्पना सोडू देत नाही. फक्त चाळीस मिनिटांनंतर, आणि आम्ही हत्ती समुद्रकिनार्यावर आहोत, जिथे, अर्थातच, फीसाठी, तुम्ही एका मोठ्या प्राण्यासोबत पोहू शकता. दक्षिणेला आणखी काही किलोमीटर, आणि आम्ही नेहमी डॉल्फिन आणि कासवांसह भेटू. आणि रात्रभर - पोर्चवर आरामदायक हॅमॉक्ससह बांबूच्या झोपडीत. त्यांच्या छतावर, ताडाच्या फांद्या, पिकलेले आंबे पहाटेच्या आधी झाडांवरून पडतात, ज्याने दिवसा त्यांची तहान भागवणे आनंददायी असते.
प्रत्येक नवीन दिवशी तुम्ही नवीन समुद्रकिनारा, डुबकी किंवा स्नॉर्केलला भेट देऊ शकता, जंगलात प्रवास करू शकता. किंवा फक्त वाळूवर बसून बोटी पहा ज्या तरंगत नाहीत, परंतु स्वच्छ पाण्यावर तरंगत आहेत.

शांतीचा पाठलाग
अनेक वाचकांना असे वाटू शकते की अंदमान एक परिपूर्ण स्वर्ग आहे, जिथे तुम्ही अविरतपणे भटकू शकता. वाळवंट, खारफुटी, महासागर, महासागर, महासागर ...
परंतु या सर्व सौंदर्याला यूएई, मालदीव आणि इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या शैलीत पर्यटन स्थळ म्हणता येणार नाही. अंदमानात फॅशनेबल हॉटेल्स, दिखाऊ रेस्टॉरंट्स, नाईटक्लब आणि कोणतीही महत्त्वाची वास्तुशिल्प स्थळे नाहीत.
अंदमान द्वीपसमूहावर लोक आळशीपणे "जंगली" समुद्रकिनारा आणि वार्‍याने कंप पावणार्‍या झोपडी दरम्यान धावतात. तथापि, या प्रकरणात, "आळस" या शब्दाचा नकारात्मक अर्थ नाही. उलट, याचा अर्थ "शांती" ची सुप्रसिद्ध स्थिती, आंतरिक आणि बाह्य जगाची सुसंवाद. आणि जर ते तुम्हाला छान वाटत असेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात जिथे ते फक्त चांगले आहे, कोणत्याही अधिवेशनाशिवाय.

चॉकलेट बार व्यतिरिक्त बाउंटी म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? पण हे मूलतः एका युद्धनौकेचे नाव होते, जी न्यूझीलंडच्या आग्नेयेकडील लहान बेटांच्या किनाऱ्यावर कोसळली. तेच जे नंतर "बाउंटी", "स्वर्गीय सुख" चे प्रतीक बनले ...
आणि जर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरील मित्रांच्या कविता हळू आणि आळशीपणे पकडण्यासाठी, स्वातंत्र्याच्या वातावरणात श्वास घेण्यासाठी आणि काहीही न करण्यासाठी अंदमान बेटांच्या लांब आणि कठीण सहलीसाठी तयार असाल, तर तुम्ही ते नंतरसाठी पुढे ढकलू नये. या वस्तुस्थितीमुळे, बहुधा, अशी सहल प्रवासाच्या यादीतील सर्वात मनोरंजक साहसांपैकी एक ठरेल. आणि जवळजवळ स्वर्गीय सेटिंगमध्ये गोंधळ घालणे किती आश्चर्यकारक आहे याचा पुरावा.

हा नकाशा पाहण्यासाठी Javascript आवश्यक आहे.

अंदमान बेटेपाण्यात स्थित आहेत हिंदी महासागर, मध्ये आणि. हे फॅशनेबल रिसॉर्ट एक नयनरम्य द्वीपसमूह आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त चार हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

वैशिष्ठ्य

द्वीपसमूहाचे प्रशासकीय केंद्र पोर्ट ब्लेअर शहर आहे, जे फक्त 100 हजार लोकांचे घर आहे. त्याच्या सोयीस्कर भौगोलिक स्थानामुळे आणि सौम्य हवामानामुळे, अंदमान बेटे अल्पावधीतच प्रांतीय ब्रिटिश वसाहतीतून भारतातील सर्वात समृद्ध रिसॉर्ट्सपैकी एक बनले आहेत. पांढरी वाळू, चमकदार हिरवे तळवे आणि लहान विचित्र कवच हे या विदेशी स्वर्गाचे वैशिष्ट्य आहे. मुख्यत्वे रिसॉर्ट सर्वोत्तम युरोपियन उदाहरणांच्या शक्य तितक्या जवळ आहे या वस्तुस्थितीमुळे, त्याची राष्ट्रीय भारतीय चव गमावली आहे, जी केवळ द्वीपसमूहात विखुरलेल्या काही मंदिरांच्या वास्तूमध्येच दिसून येते. सर्वसाधारणपणे, अंदमान बेटे हे भारतातील एक उत्तम सुट्टीचे ठिकाण आहे, जे दरवर्षी अंदमान समुद्राच्या किनाऱ्यावर जाणाऱ्या अनेक पर्यटकांमध्ये भारतीय रिसॉर्टची लोकप्रियता दर्शवते.

सामान्य माहिती

अंदमान बेटे, ज्याचा क्रमांक 204 आहे, 6408 चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापलेले आहे. किमी लोकसंख्या 343,125 लोक आहे, त्यापैकी फक्त 500 लोक स्थानिक राहतात.

इतिहासात एक संक्षिप्त सहल

बर्याच काळापासून, या जमिनींवर स्थानिक आदिवासी जमातींचे वास्तव्य होते, ज्यांना जगाला ग्रेट अंदमानचे रहिवासी म्हणून ओळखले जाते. हे उत्सुक आहे की आज सुमारे पाचशे स्थानिक लोक बेटांवर राहतात. ते किनार्‍यापासून लांब, नेहमी हिरव्यागार जंगलात राहतात आणि द्वीपसमूहाचा सनी किनारा निवडलेल्या असंख्य पर्यटकांना टाळतात. आदिवासी शिकार करतात, शेती आणि मासेमारी करतात. इच्छित असल्यास, जिज्ञासू पर्यटक स्थानिक लोकसंख्येचे जीवन आणि दैनंदिन जीवन पाहण्यास व्यवस्थापित करतात, परंतु हे अत्यंत क्वचितच घडते, कारण स्थानिक लोक डोळ्यांपासून लपण्यात चांगले असतात.

हवामान

सर्वोत्तम हवामान परिस्थिती जानेवारी ते मध्य मे पर्यंत सेट केली जाते. डायव्हिंगसाठी देखील ही सर्वोत्तम वेळ आहे. वर्षाच्या या वेळी सूर्यप्रकाश असतो आणि समुद्र शांत असतो. मान्सून सामान्यतः मे महिन्याच्या अखेरीपासून सुरू होतो आणि जुलैच्या शेवटपर्यंत टिकतो - हा सर्वात वाईट काळ असतो जेव्हा वारा असतो, समुद्रात उंच लाटा उठतात आणि पाण्याखाली दृश्यमानता कमी होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु या काळात डुबकी मारणे चांगले आहे.

तिथे कसे पोहचायचे

मॉस्को आणि रशियाच्या इतर प्रदेशातून, दिल्ली, बँकॉक आणि इतर मोठ्या शहरांमधून अंदमान बेटांवर पोहोचता येते. कोलकाता, चेन्नई, मद्रास येथून स्थानिक पोर्ट ब्लेअर विमानतळावर कमी किमतीची उड्डाणे आहेत.

वाहतूक

बेटांदरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवासी फेरी हा एकमेव तुलनेने स्वस्त मार्ग आहे. आगाऊ ठिकाणे बुक करणे चांगले. शटल-हेलिकॉप्टर किंवा सीप्लेन भाड्याने घेणे खूप महाग आहे, परंतु अशी सेवा देखील शक्य आहे. बेटांवर, ऑटो रिक्षा सहसा फिरण्यासाठी उपलब्ध असतात, टॅक्सी फक्त पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहेत.

रिसॉर्ट्स

अंदमान बेटांमधील सर्वात लोकप्रिय रिसॉर्ट्स म्हणजे व्हायपर आयलंड, पोर्ट ब्लेअर, बर्ड आयलंड, कारमाटॉन्ग आणि डिगलीपूर आणि हॅवलॉक बेटांचा समुद्रकिनारा. रिसॉर्ट्समध्ये हिरवीगार, हिरव्यागार झाडे आहेत आणि किनारपट्टी विलक्षण स्वच्छ पाण्याने विस्तीर्ण वालुकामय समुद्रकिनाऱ्यांनी भरलेली आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा प्रदेश आणि भरपूर मनोरंजन असलेली लक्झरी हॉटेल्स आहेत. भारतातील या फॅशनेबल रिसॉर्टच्या पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये वैविध्यपूर्ण सुट्टीसाठी उत्कृष्ट परिस्थिती आहे, परिणामी तेथे कोणतेही वाईट नाही आणि म्हणूनच, द्वीपसमूहातील स्वस्त हॉटेल्स.

राहण्याची सोय

अंदमान आणि निकोबार टुरिझमद्वारे व्यवस्थापित केलेल्या विविध श्रेणीतील हॉटेल्स या बेटांवर आहेत.

स्वयंपाकघर

अंदमान बेटांवर भरपूर मासे उत्पादने आहेत; तुम्ही पोर्ट ब्लेअरच्या रेस्टॉरंट्स किंवा स्थानिक कॅफेमध्ये पदार्थ चाखू शकता. रेस्टॉरंट्समध्ये, स्थानिक कॅफेपेक्षा किमती जास्त आहेत, परंतु अन्न ते योग्य आहे.

खरेदी

अंदमान बेटे त्यांच्या समुद्रकिनारे आणि डायव्हिंग मोहिमांसाठी प्रसिद्ध आहेत, परंतु येथे खरेदी करणे देखील आनंददायक आहे. पोर्ट ब्लेअरमधील मॉल आणि इतर ठिकाणी विविध प्रकारचे कवच, मदर-ऑफ-मोत्याचे दागिने आणि कोरल स्मृतिचिन्हे मिळू शकतात. तुम्ही स्ट्रॉ हॅट्स, विविध हस्तकला, ​​मण्यांचे दागिने, बांबू हस्तकला खरेदी करू शकता. खरेदी केलेल्या वस्तूंसह समस्या टाळण्यासाठी आपण विक्रेत्याला पावतीसाठी निश्चितपणे विचारले पाहिजे.

सावधगिरीची पावले

अंदमान बेटे एक सुरक्षित ठिकाण आहे, परंतु तुम्ही फोटो काढू नये आणि स्थानिक स्थानिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. नॉर्थ सेंटिनेल बेट हे स्थानिक आदिवासींचे घर आहे जे इतर लोकांशी संपर्क नाकारतात.

 
 
 
 
 
 https://www.marathisrushti.com/articles/andaman-nicobar-islands-have-crucial-role-in-relations-with-south-east-asian-relations/

दक्षिण-पूर्व आशियाई देशांशी संबंधांसाठी अंदमान व निकोबार द्विपसमुहाचे महत्वाचे स्थान – Marathisrushti Articles

About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात १० दक्षिण-पूर्व आशियाई  देशांच्या प्रमुखांची मांदियाळी 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन १० दक्षिण-पूर्व आशियाई  देशांचे प्रमुख उपस्थित रहाणार आहे.हे देशाच्या इतिहासात प्रथमच होते आहे. येत्या काळात भारत-चीन स्पर्धा अधिक तीव्र होणार. कारण चीनच्या महत्त्वाकांक्षांच्या आड येणारा आशियाई खंडात भारत हा एकमेव देश आहे. म्हणून चीन भारतविरोधी धोरण अवलंबणारच.

दक्षिण चीन उपसागर हा जगातील वादग्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. चीनच्या वाढत्या सार्मथ्यामुळे, उपसागराच्या भोवतालच्या देशांना आपल्या देशहितांचे संरक्षण करणे कठीण होत चालले आहे. म्हणून ते इतर देशांच्या पाठींब्याच्या आणि मदतीच्या शोधात आहेत. व्हिएतनामाने भारताची मदत घेणे हे यातले एक उदाहरण.  चीन ज्या देशांना आपले प्रभावक्षेत्र मानतो अशा दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील राष्ट्रांशी पारंपरिक मैत्री संबंध मजबूत करून भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे. दक्षिण-पूर्व आशियाई  देश चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांमुळे चिंतित आहेत.दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील देशांशी आपल्याला आर्थिक व व्यूहात्मक संबंध वाढवावे लागतील. चीनला उत्तर देण्यासाठी भारताला आपल्या मित्रांची फळी उभी करावी लागेल.

द्वीपप्रदेशांपुढील  आव्हाने

भारतात पूर्वेकडील समुद्रात अंदमान व निकोबार बेटे आहेत. अतिव्यग्र जलमार्गिकांवर निगराणी करण्याचे प्रचंड सामर्थ्य; आपल्याला त्यांच्या भौगोलिक स्थितींमुळे प्राप्त झाले आहे. अंदमान व निकोबार बेटे संख्येत ५७२ आहेत. त्यातील ३६ बेटांवर वसाहत आहे. महत्त्वाच्या समुद्री दळणवळणाच्या जलमार्गिकांनजीक (सी-लेन्स ऑफ कॉम्युनिकेशन नजीक) असलेली, तसेच आग्नेय आशिया देशांचे संदर्भातील त्याच्या स्थानामुळे व्यूहरचनात्मक  स्थिती त्यांचे महत्त्व वाढविते.

इंधन, खनिजे आणि मत्स्यधन यांसारख्या संसाधनांच्या बाबतीत बंगालचा उपसागर अतिशय समृद्ध आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ द सी-३ किनार्यापासून २०० नॉटिकल मैलांचे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आर्थीक क्षेत्र संमत करून दिलेले आहे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनपुढे किनार्यापासून ३५० नॉटिकल मैलापर्यंत भारत संसाधनांचे उत्खनन करू शकेल.

अंदमान व निकोबार बेटांचे व्यूहरचनात्मक स्थान

अंदमान व निकोबार भूसंरचना त्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त करून देते. हा द्वीपसमूह भारताची आग्नेयेकडील आघाडी ठरत असतो. आग्नेय आशियास, भारताच्या (सुमारे १,२०० कि.मी. दूर असलेल्या) मूख्यभूमीच्या मानाने तो अधिक जवळ आहे. ७८० कि.मी. लांब, सरळ रेषेत विखुरलेला त्यांचा विस्तार, बंगालच्या उपसागरात त्यांना उत्तर-दक्षिण पसरलेली विस्तृत उपस्थिती देत असतो. पारंपारिक आणि अपारंपारिक धोक्यांचा विरोध करण्याकरता ही बेटे आदर्श आहे.

आग्नेय आशियाई देशांशी असलेले त्यांचे सान्निध्य, भारतास त्या देशांसोबत संयुक्त कार्यवाही वाढवून, मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यास समर्थ करते.विस्तारित शेजारातील राजकीय व लष्करी घडामोडीबाबत अवगत राहण्यासही भारतास त्यांचाच उपयोग होत असतो.

अंदमान व निकोबार द्वीपसमूह म्हणजे, भारताची पहिली संरक्षण फळी आणि न बुडणारी विमानवाहक नौकाच आहे. ही द्वीपसाखळी स्वसंरक्षणाव्यतिरिक्त, भारताची पूर्वेतील राष्ट्रीय हित साध्य करण्यात अतिशय मोठी भूमिका बजावू शकतात.

बेटांची भूसंरचना

बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटांच्या साखळी भौगोलिकदृष्ट्या उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. तिच्या सर्वात उत्तरेकडील टोकाचे भारताच्या मुख्य भूमीपासूनचे अंतर १,२०० कि.मी. आहे. त्यांतील लँडफॉल बेट त्याच्या आणखी उत्तरेकडील म्यानमारच्या कोको बेटापासून केवळ १८ कि.मी. आहे. साखळीचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे ’इंदिरा पॉईंट’. ते इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या सर्वात उत्तरेकडील टोकापासून सुमारे १६० कि.मी. दूर आहे. अंदमान व निकोबार बेटांलगतचे भारताचे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आर्थीक क्षेत्र, भारताच्या एकूण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन क्षेत्राच्या ३०% आहे. सिंगापूर, पोर्ट ब्लेअरपासून केवळ ९२० नॉटिकल मैलच दूर आहे.

द ग्रेट निकोबार बेटांची साखळी अतिशय महत्त्वाची आहे. कारण ती इंडोनेशियन द्वीपसमूहातील सर्वात उत्तरेकडील बेटांपासून केवळ ९० नॉटिकल मैलांवरच स्थित आहे. इंडोनेशिया भारताच्या ’पूर्वेकडे बघा’ धोरणातील महत्त्वाचा भागीदार देश आहे.

बेटांची ही साखळी, लाकडाची अफाट मोठी वखार आहे. एकदा या बेटांत, हवाई व सागरी,अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित झाल्या की मग, ती बेटे आकर्षक व्यापारी गुंतवणुकीची आणि पर्यटनाची स्वर्गीय ठिकाणे होऊ शकतील.

पोर्ट ब्लेअरला आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्याची योजनाही आहे. तिथे एक तेल प्रस्थानक आणि ग्रेटर निकोबारातील कँपबेल बे बेटावर मालांतरण स्थानक(ट्रान्स शिपमेंट हब), उभारण्याचीही योजना आहे. मालांतरण स्थानक (ट्रान्स शिपमेंट हब), इंधनभरणसुविधा, किंवा करमुक्त व्यापारी पेठ म्हणूनही त्यांचा वापर करण्याची संधीही देते. जेणे करून या  प्रदेशातील महासागरी व्यापारास चालना मिळेल.

मल्लाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये चीनची कोंडी

उत्तरेस कोको वाहिनी, अंदमान व निकोबार द्वीपसमुहांमधील १० अंश वाहिनी(Ten-degree channel ), आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ६ अंश वाहिनी(six-degree channel). जे जलमार्ग, व्यापारी नौकानयनाकरता वापरले जातात.

वर्तमान अनुमानानुसार दरसाल एकूण ६०,००० हून अधिक नौका मल्लाक्काची सामुद्रधुनी ये-जा करण्यासाठी वापरत असतात. ऊर्जा उत्पादनांची, तसेच व्यापारी आणि वाणिज्यिक उपयोगाच्या इतर वस्तूंची ने-आण त्या करत असतात. त्यामुळेच अंदमान व निकोबार बेटसमूह, मल्लाक्काच्या सामुद्रधुनीनजीकचा तळ म्हणून, एक  लाभ पुरवतो. आग्नेय आशियातील इतर सामुद्रधुनींच्याही तो सान्निध्यात असल्यानेही, वर्दळीच्या ठिकाणांबाबतची तसेच विरुद्ध वाहतुकीची पूर्वसूचना व माहिती तो आपल्याला पुरवू शकतो. मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतून चिनी वस्तूंची प्रचंड वाहतूक सुरू असते. तिला धक्का पोहोचणे चीनला सोसण्यासारखे नाही. भारत मल्लाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये चीनची कोंडी करू शकतो.

आज आपण व्हिएतनामी लष्करी सैनिकांना प्रशिक्षण देत आहोत. आपण पाणबुडीतील संचालन पथकासही (क्रू लाही) प्रशिक्षण देत आहोत. व्हिएतनामच्या मदतीने, दक्षिण चिनी समुद्रात गुप्तवार्तांकन मोहीमही सुरू करता येईल.

मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतील भारताची भूमिका

मल्लाक्काची सामुद्रधुनी, आणि अंदमान व निकोबार बेटे महासागर मालेच्या व्यूहरचनात्मक स्थानांवर स्थित असून प्रवेशद्वाराप्रमाणे काम करतात. मल्लाक्काची सामुद्रधुनी भारताच्या पूर्वलक्ष्यी धोरणाकरताचे, तसेच ’आसिआन’ प्रादेशिक सहकार्याकरताचे महाद्वारच झालेली आहे. प्रदेशातील आर्थीक स्थिरता आणि संरक्षण छ्त्राच्या दृष्टीने अंदमान व निकोबारचे महत्त्व आहे. भारताची तंत्रशास्त्रीय ताकद, निरनिराळ्या कार्यवाहींकरता तांत्रिक आणि उपग्रहीय माहिती पुरवून या प्रदेशास समर्थ करते. मल्लाक्काच्या सामुद्रधुनीची निगराणी आणि देखरेख करण्याचे भारताचे सामर्थ्य, अंदमान व निकोबार साखळी मधील पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे वाढवण्यात आलेले आहे. मल्लाक्काच्या सामुद्रधुनीत सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावण्याचा आग्रह न धरता, सामुद्रधुनीच्या किनार्‍यावरील देशांना औपचारिक-अनौपचारिक चर्चांतून पुढील मुद्दे पटवून देण्याची आवश्यकता आहे.

मल्लाक्काच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी भारताची कार्यकारी गुंतवणूक, सामुद्रधुनीच्या किनार्‍यावरील देशांनी विनंती केल्यास संभव आहे.सार्वभौमत्त्वाच्या मुद्द्यावरील त्यांची संवेदनाशीलता सांभाळली जाईल. त्या दिशेने असलेले सर्व पर्याय तपासले जातील. त्यांपैकी एक पर्याय असेल भारतीय नौदल वा भारतीय तटरक्षक दलाच्या नौकांनी सामुद्रधुनीत गस्त घालणे  होय.किनार्‍यावरील देशांचे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी त्या नौकांवर घेतलेले असतील.

अवैध मासेमारी आणि स्थलांतरणे रोखण्यासाठी समन्वयित गस्ती घालण्याकरता म्यानमार (आणि बांगलादेश) सोबत, इंडोनेशिया आणि थायलंड यांच्या धर्तीवर, करार करण्याचा विचार करता येईल. मासेमारी उद्योगाचा विकास करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे ’मानवी गुप्तवार्ता’ म्हणून उपयुक्त ठरेल आणि वरील कार्यवाहीस पुष्टी देईल.

अंदमान व निकोबार तळावर संभाव्य भूमिकेकरता तयार रहा

द्वीपसमूह साखळीवरील रडार जाळे, वास्तवकाळात, पोर्ट ब्लेअरमधील संयुक्त कार्यवाही केंद्रास जोडलेले असणार आहे. त्यास जलदगतीने पूर्ण केले पाहिजे. इंटिग्रेटेड हवाई क्षमतांसहितच्या मोठ्या गस्ती नौका अंदमान व निकोबार तळावर मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतील संभाव्य भावी कार्यकारी भूमिकेकरता तयार ठेवल्या पाहिजेत.या नौकांची वाढीव गती आणि आग ओकण्याची क्षमता आवश्यक ठरणार आहे.

याकरता त्यादृष्टीने, तांत्रिक आणि पुरवठा साहाय्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. अंदमान व निकोबारमधील इतर भागांत, कायमस्वरूपी ताकद  स्थापन करण्यासाठी, बंदरे आणि धावपट्ट्या विकसित करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीकरताचा प्रतिसाद सुधारण्याकरता, समुद्रीउचल आणि हवाईउचल क्षमता वाढवायला हव्या आहेत.

नव्यानेच तैनात केल्या जात असलेल्या, नवीन मोठ्या ’रणगाडा अवतरण नौका’, अंदमान व निकोबार बेटांवर ठेवल्या गेल्या पाहिजेत. अंदमान व निकोबार बेटांकरता तटरक्षकदलाने, विशेष २,००० टन प्रदूषण-नियंत्रण-नौका निश्चित केलेल्या आहेत.

कठीण प्रसंगी पोर्ट ब्लेअर तळावरील भारतीय नौदलाकरवी, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि इतर आशियाई देशांच्या नौदलांच्या सहकार्याने; मल्लाक्का, लोंबॉक वा सुंदाच्या सामुद्रधुनींच्या सुरक्षिततेकरता संयुक्त कार्यवाही करणे शक्य आहे.

अंदमान व निकोबार, तसेच लक्षद्वीप बेटांचा विमानवाहू नौका म्हणून वापर करणे, या  हवाई तळांचे, भारतीय मुख्यभूमीपासून ९०० कि.मी. अंतरावर असलेले स्थान, आपल्या विमानांना विस्तारित लढाऊ त्रिज्या (एक्सटेंडेड कोंबॅट रेडियस) देईल.भविष्यकाळात आवश्यकता पडल्यास, या  बेटांवर प्रक्षेपणास्त्रे तैनात करून त्या अस्त्रांचा लक्ष्यविस्तार वाढवला जाऊ शकतो.या  बेटांवर सर्वव्यापी संरक्षण छत्र पुरवण्याकरता, स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली ’आकाश’ आणि इतर हवाई संरक्षण संपदा या  बेटांवर तैनात केली जाऊ शकते.

भारतीय आण्विक त्रिविध शस्त्रसंभार, अंदमान व निकोबार बेटांवर कार्यान्वित करण्यासाठी, अंदमान व निकोबारमध्ये पाणबुडीकेंद्र स्थापन करण्याचा विचार भारताने करावा.इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया इत्यादी देशांच्या नौदलांच्या सहकार्याने, सामुद्रधुनींची संयुक्त गस्त घातली जाऊ शकते.

पूर्वेकडील वाढते हितसंबंध:

अलीकडील काही वर्षांत, चीन व्यापार वीसपट वाढलेला आहे, तसेच भारत-आसिआन (असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट आशियन नेशन्स)आणि भारत दक्षिण कोरिया व्यापार ४.३ पट वाढला आहे. भारत-जपान मधील २०१६ द्वाराचे  व्यूहरचनात्मक सहकार्यामुळे जपानसोबतचा व्यापारही वाढणार आहे. पूर्वी समुद्रमार्गांतील भारताचे स्वारस्य लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः वाटाघाटींच्या निरनिराळ्या अवस्थांत असलेली आणि अंमलबजावणीच्या निरनिराळ्या टप्प्यांवर असलेली प्रादेशिक मुक्त व्यापार क्षेत्रे (फ्री ट्रेड एरिआज) प्रस्थापित झाल्याने, हे घडून आलेले आहे.

दीर्घकालीन ऊर्जा-सुरक्षेच्या स्त्रोतांत वैविध्य निर्माण करण्याच्या वाढत्या प्रयासांमुळे काही प्रमाणात कच्चे तेल आणि वायू पूर्वेकडून, उदाहरणार्थ रशियातील साखलीनमधून, व्हिएतनाममधून आणि इंडोनेशियातून प्राप्त केला जाईल. त्यापैकी बहुतेक माल पूर्वी समुद्रमार्गांतूनच भारतात येईल. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, पूर्वी समुद्रमार्गांचे महत्त्व आणि आग्नेय आशियाई सामुद्रधुनींचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढेल.

पारदर्शिता आणि विश्वासनिर्मितीकरता ’मिलन’

१९८५ च्या सुमारास भारताने नौदलाची ताकद वाढवली होती. त्यामुळे आग्नेय आशियाई शेजार्‍यांत एक प्रकारचे भय निर्माण झाले होते. १९९५ मध्ये पोर्ट ब्लेअर येथे, भारत-आसिआन प्रादेशिक नौदलांचे षण्मासिक एकत्रिकरण सुरू झाले. त्याचे नाव ’मिलन’. पारदर्शिता आणि विश्वासनिर्मिती करण्यासाठीचा तो एक उपाय होता.

मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतून पार होणारे संपूर्ण जागतिक नौकानयन, ६ अंश वाहिनीतून पार होतच असते. द्वीपसमूहाचे दक्षिण टोक म्हणूनच भौगोलिकदृष्ट्या, मल्लाक्काच्या सामुद्रधुनीत सुरक्षा पुरवण्याची भूमिका निभावण्याकरताही, ते उत्तम स्थित आहे. याची वैधता २००२ मध्येच पाहिली गेली होती. त्यावेळी पोर्ट ब्लेअर/ कँपबेल-बे पासून कार्यरत होणार्‍या नौदलाच्या सागरी  गस्ती नौकेने, अमेरिकेच्या नौकांना या  सामुद्रधुनीतून पार होण्यास यशस्वीरीत्या सोबत केलेली होती.

हिंदी महासागरातील २६ डिसेंबर २००४ रोजीच्या त्सुनामी आपत्तीस, भारताने चांगला प्रतिसाद दिला. या  प्रकारच्या संकटात, जेव्हा वेळेचे खूपच महत्त्व असते. हिंदी महासागर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता संरक्षित आणि सुरक्षित करण्याचा उद्देश कँपबेल-बे येथील तळ (फॉर्वर्ड ऑपरेटिंग बेस), नौदल वा तटरक्षकदलाकडून, जलमार्गांतील कार्यवाहींकरता उपयोगात आणला जाऊ शकतो.

भारत पोर्ट ब्लेअर स्थित डॉर्निअर विमाने, आसिआन देशांना वापरू देण्याचा विचार करू शकेल. संबंध सौदार्हपूर्ण ठेवण्यास आणि विश्वासवर्धनार्थ याचा उपयोग होऊ शकेल. अंदमान व निकोबारातील निगराणी आणि गुप्तवार्तांकनाच्या पायाभूत सुविधा इत्यादींचा उपयोग; आग्नेय आशियातील घुसखोरी, दहशतवाद, चाचेगिरीबाबतच्या नव्या घडामोडींशी अवगत राहण्याकरता केला जाऊ शकतो.अंदमान व निकोबार बेटांतील निगराणी व गुप्तवार्तांकनाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग; घुसखोरी, दहशतवाद आणि अरबी समुद्रातील, बंगालच्या उपसागरातील व हिंदी महासागरातील चाचेगिरी रोखण्यासाठी विकसित केला पाहिजे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

 
 
 अंदमान-निकोबार बद्दलच्या या गोष्टी प्रत्येक भारतीयाला ठाऊक असायलाच हव्यात!

अंदमान निकोबार बेटे ही भारताचाच एक भाग आहेत. येथे प्रत्येक वर्षी लाखो प्रवासी सुट्टी घालवायला येतात. परंतु या बेटांबद्दल अशी अनेक सत्ये आहेत, ज्यांच्या विषयी तुम्ही कधी एकले नसेल. आज आम्ही तुम्हाला अंदमान निकोबारबद्दल अशीच काही सत्ये सांगणार आहोत.
१. या बेटांच्या निर्मितीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. असे मानले जाते की अंदमान शब्द हनुमानाचे एक रूप आहे. जो संस्कृतशी साधर्म्य दाखवणाऱ्या मलय भाषेमधून आला आहे. मलय भाषेत रामायणातील हनुमानाच्या पात्राला हंडुमान म्हटले जाते आणि निकोबारचा अर्थ आहे नेक्ड (नग्न) लोकांचे बेट.
२. येथे राहणारी जमात बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये मिसळत नाही. येथील निवासी मुख्यतः ‘जार्वा’ जमातीचे आहेत. त्यांची लोकसंख्या ५०० पेक्षाही कमी आहे.
३. संपूर्ण जगात आजही हे बेट खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे आजही या बेटावर कितीतरी अशा जागा आहेत जिथे मनुष्य पोहचू शकलेला नाही.
    येथील ५७२ बेटांपैकी केवळ  ३६ बेटे अशी आहेत जिथे माणूस जाऊ शकतो आणि राहू शकतो. निकोबारवर जाण्यासाठी फक्त रिसर्च आणि सर्वेसाठी निवडलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी आहे. सर्वच पर्यटकांना येथे जाण्याची अनुमती दिली जात नाही.
४. येथे सर्वात जास्त समुद्र कासव सापडतात. जगातील सर्वात मोठे कासव येथेच सापडला आहे. या कासवाचे नाव Dermocheleys Coriacea आहे. ही समुद्री कासवे आकाराने खूप मोठी असतात आणि प्रत्येक वर्षी अंदमानात पोहोचतात. जगातील सर्वात छोटे कासव ओलिव राइडली सुद्धा अंदमानात आपले घर बनवते.

    स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर अंदमान -निकोबार मध्ये भारतीय रेल्वेची एन्ट्री!
 
५. आपल्या रुपयांच्या नोटीवर जो जंगलाचा भाग दिसतो, तो अंदमान बेटाचाच आहे.
६. अंदमानमध्ये व्यवसायासाठी मच्छीमारी करण्यास सक्त मनाई आहे. हे जगातील त्या निवडलेल्या प्रदेशांपेकी एक आहे जिथे समुद्री प्राण्यांना त्याचे जीवन स्वच्छंदीरित्या जगायला मिळते.
७.   शंभर वर्षांपूर्वी सूर्याची पहिली किरणे अंदमानच्या बेटांवर पडली होती. म्हणजे त्या दिवशी सूर्य या भागातून उगवला होता. असे सौभाग्य ‘कैचल’ बेटाला ही मिळाले होते.
८. अंदमानमध्ये फुलपाखरे खूप दिसतात. अंदमान फुलपाखरांसाठी ‘हॅप्पी आइलंड’ आहे. जवळपासच्या उष्णकटिबंध बेटांवरून इथे हजारो फुलपाखरे येथे येतात.
९. अंदमानमध्ये कोकोनट क्रॅब खूप जास्त दिसतात. हे जमिनीवर मिळणारे सर्वात मोठे खेकडे आहेत. त्यांची लांबी १ मीटर पर्यंत असते. ह्यांचा नारळ हा आवडता आहार असतो. हे आपल्या तोंडाने नारळासारख्या मजबूत कवच असणाऱ्या फळालाही तोडू शकतात.
१०.      येथे सर्वात जास्त बंगाली भाषा बोलली जाते. त्याशिवाय हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम भाषा बोलणारे लोकही इथे आहेत.
११.      अंदमानचा राज्यप्राणी डुगोंग आहे. हा एक समुद्री जीव आहे आणि तो आपल्या जोडीदाराबरोबर खूप लाजाळू राहतो. यांचे ५ ब्रीडिंग सेंटर आहेत. त्यातील एक अंदमानात आहे.
१२. भारतात एकच सक्रीय ज्वालामुखी आहे, तो अंदमानात आहे. हा ज्वालामुखी आइलँड पोर्ट ब्लेअर पासून १३५ किलोमीटर लांब स्थित आहे. अनेक पर्यटक खास हा ज्वालामुखी पाहण्यासाठी येथे येतात.
१३. पहिला युरोपीय व्यक्ती ज्याने अंदमानात आपली कॉलनी बनवली तो डॅनिश (डेन्मार्क चा निवासी) होता. हा १७५५ मध्ये अंदमानला पोहोचला होता. इंग्रज पहिल्यांदा १७८९ मध्ये अंदमानला चंथम बेटावर आले होते. इंग्रजांनी इथे आपली कॉलनी आणि नेवल मिलेट्री बेस बनवला.
१४. डेनिश वसाहत कायदा १८६८ रोजी संपुष्टात आणला गेला. कारण इंग्रजांनी ती जागा विकत घेतली होती. त्यानंतर संपूर्ण बेटावर इंग्रजांचे राज्य अस्तित्वात आले होते.
१५. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या ‘आझाद हिंद सेनेला’ जपानच्या मदतीने अजून मजबूत केले. हा दुसऱ्या महायुद्धाचाच काळ होता. बोसांनी अंदमान-निकोबारच्या उत्तर आणि दक्षिणी बेटांना शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नाव दिले.
१६. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अंदमान आणि निकोबार भारताचे एकमात्र असे भूमीक्षेत्र होते जे जपानने काबीज केले होते. जपानने भारताच्या उत्तर पूर्वचे काही भागही काबीज केले होते. सहा महिने जपानची या भागांवर सत्ता होती. मात्र अंदमान आणि निकोबार ह्या बेटावर ३ वर्षापर्यंत जपानने राज्य केले होते.
१७. अंदमानच्या दोन बेटांची नावे ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. ह्या बेटांची नावे हेवलॉक बेट आणि नील बेट अशी आहेत.
१८. इंग्रजी शासनामध्ये अंदमानचे नाव ‘काळ्या पाण्याच्या’ शिक्षेसाठी खूप चर्चित होते. येथील सेल्युलर जेल आजही स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीवीरांची गोष्ट सांगतात. आता या जेलला राष्ट्रीय स्मारक बनवले आहे.
१९. भारतापेक्षा अंदमान हे इंडोनेशिया आणि म्यानमार देशांच्या जवळ आहे. अंदमान इंडोनेशिया पासून १५० किलोमीटर लांब आहे. तर भारतापासून मात्र अंदमान ८०० किलोमीटर लांब आहे.
२०. अंदमान बेटावरील ९० टक्के भाग जंगली आहे. हा भाग भारतातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे.

 https://inmarathi.com/14499/amazing-and-interesting-facts-about-andaman-nicobar/

 

अंदमान आणि निकोबार बेटे हे 572 बेटांचे द्वीपसमूह आहे जे त्याला एक आयडियल गेटवे डेस्टिनेशन बनवते. अंदमान आणि निकोबार बेटांवर करण्यासारखे आणि भेट देण्यासारखे बरेच आहे. उत्तम प्रेक्षणीय स्थळे आणि जलक्रीडा उपक्रम तुम्हाला नक्की आवडतील.

अंदमान आणि निकोबार बेटांवर जाण्याचे नियोजन करताय? जाणून घ्या सर्व माहिती फक्त एका क्लिकवर

अंदमान आणि निकोबार बेटांवर जाण्याचे नियोजन करताय? जाणून घ्या सर्व माहिती फक्त एका क्लिकवर

नवी दिल्ली : प्राचीन पांढऱ्या वाळूचे किनारे, क्रिस्टल स्पष्ट निळे पाणी आणि स्टनिंग सूर्यास्ताची कल्पना करा. हे सर्व तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांवर अनुभवू शकता. अंदमान आणि निकोबार बेटे हे 572 बेटांचे द्वीपसमूह आहे जे त्याला एक आयडियल गेटवे डेस्टिनेशन बनवते. आपण अनेक साहसी उपक्रम आणि लक्झरी स्टेकेशन अनुभवू शकता. (Planning to visit Andaman and Nicobar Islands, know all the information with just one click)

अंदमान आणि निकोबार बेटांवर करण्यासारखे आणि भेट देण्यासारखे बरेच आहे. उत्तम प्रेक्षणीय स्थळे आणि जलक्रीडा उपक्रम तुम्हाला नक्की आवडतील. तर, अंदमान आणि निकोबार बेटांवर भेट देण्याच्या ठिकाणांची यादी येथे आहे जेणेकरून तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब किंवा तुमच्या जीवन साथीदारासह कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

भेट देण्यासारखी ठिकाणे

राधानगर बीच, हॅवलॉक बेट

या समुद्रकिनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. नीलमणी पाणी आणि पांढरी वाळू असलेला हा एक प्राचीन समुद्रकिनारा आहे जिथे आपण आपली बोटे बुडवू शकता आणि आश्चर्यकारक दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर

हे काळा पाणी म्हणूनही ओळखले जाते, हे पोर्ट ब्लेअरमध्ये स्थित एक जुने वसाहती कारागृह आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. हे कारागृह ब्रिटिशांच्या माध्यमातून वसाहती राजवटीत बांधण्यात आले.

रॉस बेट, पोर्ट ब्लेअर

रॉस बेट हे एकेकाळी ब्रिटिशांचे प्रशासकीय मुख्यालय होते. सध्या हे बेट निर्जन आहे. इतिहास आणि पुरातत्त्व ठिकाणे आवडणाऱ्या कोणालाही भेट देण्यासाठी हे एबनडंड बेट उत्तम आहे.

कालापत्थर बीच

पांढरी वाळू, निळे पाणी आणि काळे दगड असलेला हा मंत्रमुग्ध करणारा समुद्रकिनारा आहे. आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा समुद्रकिनाऱ्याच्या स्टनिंग बॅकड्रॉपवर फोटो क्लिक करण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

वायपर बेट

वायपर बेट त्याच्या शांतता आणि जुन्या कारागृहासाठी प्रसिद्ध आहे. आपण त्या कारागृहाला भेट देऊ शकता जे पूर्वीच्या काळातील घटनांचे वर्णन करते. एक ब्रेथटेकिंग सनसेट पकडा आणि समुद्रकिनाऱ्याच्या आश्चर्यकारक सौंदर्याचा आनंद घ्या.

लक्ष्मण बीच

हा एक शांत आणि निर्जन समुद्रकिनारा आहे जो त्याच्या मनमोहक सौंदर्य आणि दृश्यांसाठी ओळखला जातो. जर तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांवर असाल तर हे एक स्वर्गीय ठिकाण आहे.

करण्यासारख्या गोष्टी

स्नॉर्कलिंग

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे स्नॉर्कलिंगचा आनंद घेणे. समुद्री जीवन आणि जलचर प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पहा जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर पोहता.

स्कूबा डायव्हिंग

स्कूबा डायव्हिंगद्वारे पाण्याखालील जग शोधा. हा अनुभव तुमचे डोळे आणि आत्मा पाण्याखाली असलेल्या जादुई जगासाठी उघडेल. पाण्याखाली पूर्णपणे बुडलेले सागरी जीवन एक्सप्लोर करा आणि प्रवाळ, समुद्री जीवन आणि बरेच काही पहा.

पाण्याखाली समुद्र फिरणे

या बेटाचा आणखी एक अनोखा अनुभव आहे तो म्हणजे पाण्याखालील समुद्र फिरणे. या पाण्याखालील समुद्रात फिरण्याच्या अनुभवाचा आनंद घ्या, जिथे तुम्ही पाण्यात पूर्णपणे बुडलेल्या समुद्री प्राण्यांमधून फिराल.

काचेच्या खाली बोटीची सवारी

जर पाण्याखाली राहणे हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पाण्याखालील जग एक्सप्लोर करण्याचा आणखी एक मार्ग आहे. फक्त ओपन ग्लास बोट राइड घ्या आणि समुद्री जीव आणि समुद्री प्राण्यांचे जादुई जग एक्सप्लोर करा.

खारफुटी कयाकिंग

हा क्रियाकल्प एक अनोखा कयाकिंग अनुभव आहे जो आपल्याला लहरी मॅंग्रोव्ह बेटांद्वारे कयाकवर घेऊन जाईल. शांत पाण्यात कयाक करताना तुम्हाला समृद्ध वनस्पती आणि खारफुटींची विविधता एक्सप्लोर करायला मिळेल.

समुद्री विमान प्रवास

सी प्लेनमध्ये प्रवास करा आणि सी प्लेन राइडद्वारे बेटाच्या आश्चर्यकारक सौंदर्याचे साक्षीदार व्हा. तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांचे उत्तम दृश्य पाहू शकता आणि पाण्यावरून प्रवास करण्याचा अनुभव घेऊ शकता.

गुहेच्या आत फिरणे

या खास चुनखडीच्या गुहेत चाला आणि चुनखडीला एक्सप्लोर करा. मॅसिव्ह सेडिमेंट रॉकद्वारे तयार केलेले, गाळाच्या खडकांपासून बनवलेल्या भव्य चुनखडीच्या निर्मितीमुळे तुम्ही आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध व्हाल.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ : बेटांना भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मे दरम्यान आहे.

 https://www.tv9marathi.com/lifestyle/planning-to-visit-andaman-and-nicobar-islands-know-all-the-information-with-just-one-click-540243.html

अंदमान व निकोबार : बंगालच्या उपसागरात उ. अक्षांश ६ ४५’ ते १३ ४५’ व पू. रेखांश ९२१५’ ते ९४ १३’ यांच्या दरम्यान वसलेला भारताचा केंद्रशासित प्रदेश. अंदमान (६,३४०) व निकोबार (१,९५३) मिळून एकूण क्षेत्रफळ ८,२९३ चौ.किमी. व  लोकसंख्या ११५,०९० (१९७१). याच्या पूर्वेकडील समुद्रास ‘अंदमान समुद्र’ म्हणतात. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, बाराटांग व रटलंड या पाच बेटांनी मिळून झालेले मोठे अंदमान, त्याच्या दक्षिणेचे छोटे अंदमान, पूर्वेकडील रिची द्वीपसमूह व इतर लहानमोठी धरून एकूण २५७ बेटे मिळून अंदमान बेटे होतात. १० उत्तर अक्षवृत्ताच्या दक्षिणेस, छोट्या अंदमानपासून ९६ किमी. वरील कारनिकोबार, तेरेसा, कामोर्ता, त्रिंकत, नानकवरी, काचाल, छोटेनिकोबार, मोठे निकोबार इ. एकूण ६२ बेटे मिळून निकोबार बेटे होतात. अंदमान बेटांची एकूण लांबी ३५२ व निकोबारांची २३२ किमी. आहे. सरासरी रुंदी सु. २५ किमी. आहे. हुगळीच्या मुखापासून आग्नेयीस ही बेटे ९५० कि.मी. ब्रह्मदेशातील नेग्राईस भूशिराच्या दक्षिणेस १९३ किमी. व सुमात्रा बेटाच्या ॲचिनहेड टोकाच्या पश्चिमेस १४६ किमी. अंतरावर आहेत. त्यांचे हे स्थान भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याचे आहे. पोर्ट ब्लेअर हे राजधानीचे शहर कलकत्ता व मद्रासपासून अनुक्रमे १,२५५ व १,१९१ किमी. दूर आहे. अंदमानला शहीद द्वीप व निकोबारला स्वराज्य द्वीप अशी नवी नावे सुचविली आहेत.

भूवर्णन : ही बेटे म्हणजे समुद्रतळावरील सुं. ७,००० मी. उंचीच्या पर्वतश्रेणींचा माथ्याचा भाग असून त्यांची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची सु. ३३५ मी. आहे. कारनिकोबार व छोटे अंदमान ही बहुतेक सपाट आहेत. बाकी सर्व डोंगराळ आहेत. उत्तर अंदमानामधील सॅडल शिखर ७३१⋅५ मी. व ग्रेट निकोबारमधील मौंट थुलियर ६४२ मी. उंच आहे. टेकड्याटेकड्यांमधील सखल भागांत काही ठिकाणी समुद्राचे फाटे आलेले आहेत, तर काही ठिकाणी सपाट मैदानी प्रदेश आहेत. किनारा अतिशय दंतुर असून त्यावर अनेक खाड्या व सुरक्षित बंदरे आहेत. बेटांचा कोणताही भाग समुद्रापासून १६ किमी. पेक्षा अधिक दूर नाही. अंदमानच्या उत्तरेकडील प्रिपॅरिस खाडी (सु.१,००० मी. खोल), अंदमान व निकोबार यांमधील १० अक्षांश (टेन डिग्री) खाडी (सु. ८०० मी. खोल) व ग्रेरेट निकोबार आणि सुमात्रा यांमधील ग्रेट खाडी (सु. १,५०० मी. खोल ) यांखेरीज बेटांजवळचा समुद्र उथळ (सु. २०० मी. खोल) आहे. पश्चिमेस सु. ५० किमी. पलीकडे बंगालचा उपसागर व पूर्वेस सु. १५० किमी. पलीकडे अंदमान समुद्र हे सु. ४,००० मी. खोल आहेत. मुख्य बेटांपासून सु. १००-१२५ किमी. दूर असलेली बेटे म्हणजे पश्चिमेस सेंटिनल बेटे व पूर्वेस बॅरन आणि नारकोंडम ही बेटे होत. बॅरन बेट हा एक सुप्त ज्वालामुखी १५३ मी. उंच आहे. १९ व्या शतकाच्या सुरवातीस त्याचा स्फोट झाला होता. नारकोंढम हा ७१० मी. उंचीचा एक मृत ज्वालामुखी असून त्याच्या मुखाचा भिंतीसारखा भाग पार नाहीसा झाला आहे.

अंदमान व निकोबार बेटांतील भूस्तरांचे अनुक्रमे आराकान योमाशी व सुमात्रामधील भूस्तरांशी बरेच साम्य दिसते. इओसीन कालातील वालुकाश्म, त्यांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घुसलेले डाइक, झिजेमुळे धारदार व टोकदार स्वरूप आलेले चुनखडक काही ठिकाणी सर्पेटाइन खडक, निळसर झाक असलेले पंकाश्म, पिंडाश्म, प्रवाली खडक व उत्थानाने तयार झालेल्या पुळणी, असे येथील भूरचनेचे निरनिराळ्या भागांतील सामान्य स्वरुप आहे. समुद्रातही प्रवाली खडकांच्या ओळी आढळतात. या बेटांतील डोंगरकणे क्रेटेशियस कालखंडात तयार झाले असावेत. निकोबार बेटे व बॅरन आणि नारकोंडम बेटे यांना जोडणाऱ्या रेषेवर पृथ्वीचा पृष्ठभाग काहीसा अधू आहे त्यामुळे निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के वारंवार बसतात. 

अंदमानातील जलप्रवाह लहान, उन्हाळयात आटणारे, परंतु वेगवान आहेत. त्यातल्या त्यात दक्षिण अंदमानमधील प्रवाह थोडेसे लांब व बारमाही आढळतात. ग्रेट निकोबारमध्ये काही नद्या आहेत. 

एकंदर हवामान नेहमी दमट व उष्ण असते, परंतु खाऱ्या वाऱ्यांमुळे ते थोडेसे आल्हाददायक होते. जवळजवळ सर्व ठिकाणी कमाल तपमान २९ ते ३१ से. असून किमान तपमान २४ ते २५से. असते. नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे या बेटांत पाऊस पडतो. दक्षिण अंदमानमध्ये व निकोबार बेटांत तो जवळजवळ वर्षभर असतो. पर्जन्यमान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. या बेटांवरील सरासरी पर्जन्यमान ३१२ सेंमी. आहे. वर्षभर येथे सोसाट्याचे वारे असतात व वर्षातून साधारणपणे ४५ दिवस झंझावातांचा त्रास होतो. 

एकूण जमिनीच्या ७७ टक्के भाग जंगलव्याप्त असल्याने सर्वत्र घनदाट वनस्पतीचे आच्छादन दिसते. अंदमानमधील वनस्पतींचे तीन भाग पडतात: सदाहरित, पानझडी  व किनारपट्टीवरील वृक्षराजी. अंदमानमधील जंगलसंपत्ती भारतीय अर्थकारणाच्या-परकीय चलन मिळविण्याच्या-दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. फणस, बांबू, पळस, नारळ, सुपारी, सागाच्या काही जाती, शिसवी, गरजन, सॅटीनवुड, कोको, पडाउक, मार्बलवुड, चुई, पपीता वगैरे झाडे आहेत. बांधकाम व रेल्वे स्लीपर्सकरिता यांपैकी काही झाडे उपयोगी आहेत. बऱ्याच ठिकाणी एकाच जातीची झाडे जवळजवळ आढळतात, हे व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरते. कठिण व मऊ दोन्ही प्रकारचे लाकूड मिळते आणि प्लायवुड (गरजन) व आगकाड्या (पपीता) यांना उपयुक्त लाकूडही पुष्कळ मिळते. निकोबारमध्ये नारळ प्रमुख असून सुपारी, अनेक प्रकारचे सुंदर ताडवृक्ष  व काही इमारती लाकूड देणारे वृक्ष येथे आढळतात.


पावसाच्या परिणामामुळे ६०० ते ९०० मी. उंचीच्या प्रदेशात जांभ्या दगडापासून तयार झालेली जमीन आढळून येते. नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या जमिनी आढळतात, तर किनारपट्टयांवरील जमिनीत रेतीचे प्रमाण जास्त असते. दमट व उष्ण प्रदेशात तयार होणाऱ्या जांभ्या दगडाच्या जमिनीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी आढळून येते व पावसामुळे त्यांची धूपही जास्त होते. गाळाच्या जमिनीत मात्र चिकण मातीचे प्रमाण ५०% असून ती सिलिका द्रव्याने युक्त असते. किनाऱ्यावरील जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त आहे.  

अंदमान व निकोबार
अंदमान व निकोबार

अंदमान बेटांतील खनिजसंपत्तीची अजून योग्य प्रकारे भूवैज्ञानिक दृष्टया पाहणी झालेली नसून ज्ञात असलेली खनिजे आर्थिक दृष्ट्या  किफायतशीर नाहीत. रेतीच्या खडकांत व चुनखडकांत निकृष्ट प्रकारचा दगडीकोळसा आढळत असून पोर्ट ब्लेअरच्या आसपास क्रोमियम, तांबे, लोखंड व गंधकाचे थोडेसे साठे आहेत. थोडे अभ्रक व संगमरवरही आहे. निकोबारमध्ये थोडे तांबे सापडते. बाराटांग व हॅवलॉक बेटांत तेल व गॅस मिळण्यासारखा आहे. माकडे व सरपटणारे प्राणी विपुल असून सर्पांच्या वेगवेगळ्या जाती येथे आढळतात. रानडुक्करे, हत्ती, पाणघोडे, मगरी, सुसरी, कासवे, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, जळवा व पक्षी येथे विपुल आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : भारत, ब्रह्मदेश आणि अतिपूर्व यांमधील दळणवळणाच्या वाटेवर असल्यामुळे या बेटांची काही माहिती प्रवासी, व्यापारी व चाचेलोकांकडून मिळत असे. तथापि बराच काळापर्यंत ती दुर्लक्षितच राहिली. नेग्रिटो वंशाच्या लोकांना ही बेटे प्रथम ज्ञात झाली असावीत. प्राचीन अरब व भारतीय व्यापाऱ्यांच्या लिखाणांत यांचा निर्देश आढळतो. दुसऱ्या शतकात टॉलेमीने या बेटांचा उल्लेख ‘विविध प्रकारचे शंखशिंपले मिळणारे बेट’ म्हणून केलेला आढळतो. सातव्या शतकातील इत्सिंग, तेराव्या शतकातील मार्कोपोलो, १४ व्या शतकातील फ्रायर ओडोरिक व १५ व्या शतकातील निकोलो काँटी इत्यादिच्या प्रवासवृत्तांतून बेटांचा उल्लेख सापडतो. ‘अंदमान’ हे नाव हनुमान यावरून व निकोबार हे १०५० मधील तंजावर शिलालेखात उल्लेखिलेल्या नेक्कावरम् (विवस्त्र लोकांची भूमी) यावरून आले असावे असे मानतात. १७ व्या शतकात त्यांकडे यूरोपीय लोकांचे लक्ष वेधलेले दिसते. त्यांनी तेथे वसाहती करून तेथील मूळच्या लोकांचे धर्मांतर करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पोर्तुगीज व फ्रेंच धर्मप्रचारकांनंतर १७५६ मध्ये डेन लोकांनी या बेटाचा ताबा घेतला. मोराव्हियन मिशनची मदत घेऊनही यश न आल्यामुळे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ मध्ये येथून काढता पाय घेतला. अंदमान बेटांच्या इतिहासाचे चार कालखंड पडतात : १७८८ पर्यंतचा चाच्यांच्या उपद्रवाचा काल १७८८-१९४१ ब्रिटिश राजवटीचा काल १९४१-४५ जपानी अंमलाचा काल व १९४७ नंतरचा भारतीय काल. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातल्या कैद्यांपासून सावरकरांपर्यंत अनेक देशभक्तांना येथील कुप्रसिद्ध बंदिशाळेत ठेवण्यात आल्यामुळे ब्रिटिशकालात ही बेटे म्हणजे काळ्या पाण्याची सजा भोगण्याचे ठिकाण मानण्यात येऊ लागले. जपान्यांनी १९४२ मध्ये या बेटांचा कब्जा घेतला व या द्वीपांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. १९४७ नंतर ही बेटे स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली.

भारतीय संविधानाप्रमाणे या बेटांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा आहे. पोर्ट ब्लेअर हे कारभाराचे मुख्य ठाणे आहे. एक प्रशासक काही अधिकाऱ्यांच्या साहाय्याने या बेटांचा कारभार पाहतो. निकोबार बेटांसाठी एक साहाय्यक प्रशासक असतो. त्याचे कार्यालय कारनिकोबार येथे असते. १९६७ पासून ह्या बेटांचा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी लोकसभेत असतो. प्रशासकाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडतात. अंदमानमध्ये २६ ग्रामपंचायती व ३१ न्यायपंचायती आहेत. निकोबारमध्ये परंपरागत पंचायतपद्धती आहे. येथील न्यायालये कलकत्ता हायकोर्टाच्या अधिकारकक्षेत आहेत.

आर्थिक स्थिती : घनदाट झाडी व जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनी असल्याने येथे फारच थोडी जमीन शेतीकरिता उपलब्ध आहे. डास व जळवा या दोन्हींचा उपद्रव येथे होतो. उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी फारच थोडी जमीन विरळ लोकवस्तीमुळे कसली जाते. एकूण ७,४४१ हेक्टर जमीन भाताच्या लागवडीखाली असून भात व नारळ ही दोन मुख्य पिके आहेत. केळी, चिकू, अननस ही फळे होतात. निकोबार बेटांत पोपया, मोसंबी, संत्री, लिंबे ही फळे होतात. येथे स्पंजही सापडतो. कॉफी,कोको,रबर,लाख व मसाल्याचे पदार्थ यांचे उत्पन्न काढण्याचे  भारत सरकारचे प्रयत्न आहेत. लाकूड हेच महत्वाचे उत्पन्न आहे. दरसाल ६०,००० मेट्रिक टन लाकडाचे उत्पादन होऊ लागले आहे. किनारपट्टीवर मच्छीमारी चालते. परंतु मच्छीमारीची पद्धत मात्र जुनीच आहे. शंख-शिंपले गोळा करणे, कासवे पकडणे हे इतर उद्योग आहेत. अंतर्गत भागातील जंगलात शिकार करून रानटी टोळ्या पोट भरतात.

पोर्ट ब्लेअर, रंगत, मायाबंदर, दिगलीपूर, नानकवरी वगैरे ठिकाणी मिळून १,५०० किवॅ. वीज-उत्पादन-सामग्री १९५०-६८ या काळात बसविलेली आहे.

येथील प्रमुख उद्योग जंगलावर अवलंबून आहेत. लाकूडउद्योगाशिवाय व्यवस्थापन, संरक्षण इ. व्यवसायांत साडेचार हजार लोक आहेत. सामान्य अभियांत्रिकी, आगपेट्या, वीजनिर्मिती इ. औद्योगिक क्षेत्रात सु. १,६०० लोक आहेत (१९५९). पोर्ट ब्लेअरला  लाकूड कापण्याची गिरणी व आगपेट्या आणि प्लायवुड यांचे कारखाने व एक छापखाना आहे. कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, नावा बांधणे, मासेमारी या उद्योगांची वाढ करण्यात येत आहे. सहकारी संस्थांची वाढ करण्यात येत असून १९६८ पर्यंत १८२ सहकारी संस्था, २ शेतीसहकारी संस्था आणि २२ मळे-सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या. शेतकरी व कामगार कुटुंबास परतफेडीचे कर्ज व आर्थिक साहाय्य दिले जाते.


भारत सरकारच्या पुनर्वसन-मंत्रालयातर्फे येथे वसाहती वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. १९६८ पर्यंत बांगला देशीय २,६१४, केरळी १४३, मद्रासी ४७, बिहारी १८४, ब्रह्मी ५ अशा एकूण २,९९३ कुटुंबांत १०,१७४ माणसे होती. १९६१-१९६८ पर्यंत ५४५ सरकारी नोकर व त्यांची कुटुंबे मिळून २,९११ माणसे व राष्ट्रीय विकास दलाचे अधिकारी येथे आले. येथील मुळचे लोक, गुन्हेगार वसाहतीनंतर येथे स्थायिक झालेले लोक व पुनर्वसनासाठी आलेले लोक या सर्वांस सर्व प्रकारची मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे.

येथील मुख्य व्यापार लाकूड व नारळ यांचा आहे. निकोबारमधून काही प्रकारचे मासे, सुपारी, काही पक्ष्यांची खाण्यास योग्य अशी घरटी पूर्वीपासून मुख्यतः चीनकडे जातात. तांदूळ, तंबाखू, कापड, हत्यारे इ. वस्तू आयात होतात.विकासासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू, हत्यारे, यंत्रे, खाद्यपदार्थ वगैरे भारतातून आणाव्या लागतात.

पोर्ट ब्लेअर येथे स्टेट बँकेची शाखा आहे. ती सरकारी तिजोरीचाही कारभार पहाते. १९६६ पासून राज्य सहकारी बँकाही कार्य करीत आहेत. १९६८-६९ च्या अर्थसंकल्याप्रमाणे या बेटांचा मुलकी खर्च ७,१६,२५,००० रु., भांडवली खर्च ३,२८,९७,००० रु. व मुलकी जमा २,४७,२५,००० रु. होती.

या बेटांवर एकूण ३३८ किमी. लांबीचे चांगले रस्ते आहेत. १९६० मध्ये मोटारी, ट्रक, बस वगैरे मिळून २८५ वाहने होती. १९६८ मध्ये पोर्ट ब्लेअरमध्ये २० प्रवासी बसगाड्या होत्या त्या शहरात व ग्रामीण भागातही वाहतूक करतात. बेटाबेटांतील दळणवळणासाठी बोटींचे धक्के बांधले जात आहेत. भारताच्या मुख्य भूमीशी दळणवळण ठेवणाऱ्या तीन आगबोटी आहेत. अंदमानमध्ये पोर्ट कॉर्नवालिस, मायाबंदर ही चांगली बंदरे आहेत. निकोबारमध्ये कामोर्ता, त्रिंकत व  नानकवरी या बेटांनी वेढलेले नानकवरी हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहेत. ते पूर्वेकडील एक उत्तम बंदर समजले जाते. कलकत्ता ते रंगूनमार्गे पोर्ट ब्लेअर अशी आठवड्यातून दोनदा विमानवाहतूक सुरू आहे. डाक घरे, दूरध्वनी या सोयीही उपलब्ध आहेत. आकाशवाणी-केद्र १९६१ मध्ये सुरू झाले.

लोक व समाजजीवन : अंदमानमधील मूळ लोक नेग्रिटो वंशाचे आहेत. मलायामधील सेमंग, फिलिपीन्समधील आएटा व सीलोनमधील वेद्द लोकांशी त्यांचे साधर्म्य आढळते. जारवा, ओंगी, सेंटिनेली व शॉमपेन ह्या त्यांच्यापैकी प्रमुख पोटजाती असून त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. टोळीच्या प्रमुखाकडे न्यायनिवाडा, नेमणुका वगैरे गोष्टी असतात. घुमटासारखी घरे, धनुष्यबाण, भाषा, स्त्रियांचे पोषाख व दागिने या बाबतींत जरी साम्य असले तरी प्रत्येक जातीची खास अशी वैशिष्ट्ये आढळतात. उष्ण हवामानामुळे लोक लज्जारक्षणापुरती झाडाची पाने वापरतात. ते अत्यंत सोशिक असून त्यांचा रंग काळा व कातडी तुकतुकीत असते. त्यांच्या बुद्धीची वाढ विशेष झालेली आढळून येत नाही. रानमांजर, कासव, मासे, किडे, कंदमुळे, नारळ, मध हे त्यांचे खाणे आहे. स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा कमी समजला जातो. घटस्फोटाची चाल त्यांच्यात कमी आढळते. एकपत्नीकत्व, एकपतित्व व पुनर्विवाह या चालीही त्यांच्यात आढळून येतात. पुलुगा या दैवताने सारे जग व्यापलेले आहे असे ते मानतात. वन, सागर व पूर्वजांच्या भुतांची त्यांना भीती वाटते. अंदमानमधील या आदिवासी लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काही जमाती तर नामशेष होत आहेत किंवा झाल्या आहेत.

निकोबारी लोक अंदमानी लोकांपेक्षा सर्वच बाबतीत भिन्न आहेत. निकोबारी आदिवासी लोक पॉलिनेशियन गटाचे आहेत. ते बसक्या नाकाचे, पिवळसर काळ्या रंगाचे आहेत. निकोबारी लोकांत जातीजमाती अशा नाहीत. निरनिराळ्या बेटांवर राहणारे म्हणून त्यांच्यात फरक असतो, परंतु त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतो. नारळ हे प्रमुख उत्पन्न असून देण्याघेण्याचे व्यवहार नारळांच्या संख्येत होतात. त्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या रूढ समजुतीप्रमाणे होतात. काही बंधने कडकपणे पाळतात. उदा., उत्तरेकडील बेटांवरील लोकांनी नावा बांधावयाच्या नाहीत चौरा व तेरेसा बेटांवर चुना तयार करावयाचा नाही, फक्त चौरा बेटावरच मातीची भांडी तयार करावयाची इत्यादि. केवडीची फळे, नारळ, मासे, पादानाऊची फळे, आयात केलेला तांदूळ हे त्यांचे मुख्य अन्न असते. डुकरे, कोंबड्या व बदके वगैरे खास मेजवानीसाठी असतात. या लोकांना पानतंबाखूचा मोठा शोक आहे. तंबाखू ओढतातही. ताडी व दारू पिणे भरपूर प्रचलित आहे. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. जमिनीत रोवलेल्या खांबांच्या आधारावर उभारलेल्या फळ्यांच्या व पानाफांद्याच्या घुमटाकार झोपड्यात पुष्कळ लोक राहतात. संगीत व नुत्य यांची त्यांस आवड आहे. अलीकडे कारनिकोबारमध्ये फूटबॉल हा खेळ लोकप्रिय होऊ लागला आहे. भांडी बनविणे, टोपल्या विणणे, लोखंडाची हत्यारे बनविणे, चटया बनविणे इ. व्यवसाय येथे चालतात.

अंदमान व निकोबार बेटांतील या मूळ रहिवाशांखेरीज तेथील गुन्हेगार वसाहती बंद झाल्यानंतर त्यांपैकी राहिलेले लोक, भारताच्या इतर भागांतून वसाहतीसाठी आलेले निर्वासित, कारभारासाठी आलेले लोक यांची तेथे वस्ती आहे. त्यांचीच संख्या आता मोठी आहे. सु. ६३,००० लोकांपैकी १५,००० लोक आदिवासी असून त्यांतील १४,००० निकोबारमध्ये आहेत. जारवा व सेंटिनेली मिळून ५००, ओंगी आणि शॉमपेन प्रत्येकी शंभराहून थोडे अधिक व अंदमान २३ आहेत (१९६१). नेग्रिटो लोकांची मूळ भाषा अंदमानमधील लोकांच्या भाषेची जननी असून तिचे न्यूगिनीमधील पापुअन व फिलिपीन्समधील आएटा भाषांशी साम्य आढळते. इतर लोकांत हिंदी भाषा प्रमुख आहे. निकोबारी लोकांना एकमेकांच्या भाषा समजत नसल्या म्हणजे ते हिंदी, ब्रह्मी, इंग्रजी इ. भाषा वापरतात.

१९६० मध्ये ७९ शाळांत मिळून ३,६४४ मुले व १,५३५ मुली होत्या. १२२ शिक्षक व ४३ शिक्षिका होत्या. माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत आहे. १९६९ मध्ये ११५ प्राथमिक शाळा, १ शिक्षण-प्रशिक्षण शाळा, १ पूर्व प्राथमिक शाळा, १ सेंट्रल शाळा, १ सरकारी महाविद्यालय होते. विद्यार्थ्यांना भारतात जाऊन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्या दिल्या जातात.  

मलेरिया-निर्मूलनासाठी गावाजवळच्या दलदली नष्ट करण्यात येत आहेत. लोकांना औषधपाणी व शस्त्रक्रियासुद्धा मोफत मिळते. १९६० मध्ये रुग्णालयांत ४१८ खाटा होत्या व २९ दवाखाने होते. तेथे २० डॉक्टर, ६५ परिचारिका, १६ दाया व २१ कंपाउंडर होते. १९६८ मध्ये खाटा ४६१ व दवाखाने ४२ झाले. जनावरांसाठी एक रुग्णालय व चार दवाखाने आहेत. पोर्ट ब्लेअर येथे एक नवीन रुगणालय व ५० खाटांचे क्षयरोगरुग्णालय झाले आहे. त्याशिवाय कारनिकोबार, नानकवरी, बांबूफ्लॅट, मायाबंदर, लाँग आयलंड, रंगत आणि दिगलीपूर येथे रुग्णालये आहेत.


  एक प्राथमिक आरोग्यकेंद्रही चालू आहे. निकोबारच्या मध्य द्वीपसमूहात राष्ट्रीय आरोग्ययोजनेखाली एक मलेरिया व फिलेरिया पाहणी व नियंत्रण-केंद्र आणि एक गुप्तरोग-केंद्र चालू आहे.

पोर्ट ब्लेअर व कारनिकोबार येथे माहितीकेंद्र व ग्रंथालये आहेत. विमान-वाहतुकीमुळे कलकत्याहून ताजी वर्तमानपत्रे मिळू शकतात. पोर्ट ब्लेअरला सरकारी विवरणपत्रिका निघते.

पर्यटनाच्या दृष्टीने ही बेटे आकर्षक आहेत. पोर्ट ब्लेअर व कार्बिन्स कोव्ह येथे पर्यटकगृहे स्थापन झालेली आहेत. पोर्ट ब्लेअर शहर व तेथील कुप्रसिद्ध वर्तुळाकार तुरुंग, बेटावरील रम्य वनश्री, धबधबे, नौकाविहार, जलक्रीडा, बॅरन व नारकोंडम ही ज्वालामुखी बेटे, कारनिकोबार बेट व नानकवरी बंदर, आकर्षक पुळणी, प्रवाळ अशा कितीतरी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतील अशा आहेत.

भागवत, अ. वि.

कला व क्रिडा : या प्रदेशातील रहिवाशांच्या दैनंदिन गरजा व उपलब्ध सामग्री यांमुळे येथील कला व हस्तव्यवसाय वैशिष्टयपूर्ण ठरले आहेत. येथे गरजनसारख्या लाकडाचे वैपुल्य असल्याने त्याचा वापर घरे, नौका वगैरेंच्या बांधणीत होतो. यातूनच लोकांचे सुतारकामातील नैपुण्यही दिसून येते. जोडनौका व जमिनीपासून उंचावर बांधलेली गोलाकार घरे ही खास वैशिष्ट्ये. नित्योपयोगी लहान कुऱ्हाडी (डाह) तयार करण्यात लोहारकामातील कौशल्य दिसते. येथे स्वतंत्र शिंपी-व्यवसाय नसल्याने स्त्रिया शिवण करतात व कशिदाकामात पारंगत असतात. लोक वेतापासून सफाईदार व मजबूत टोपल्या बनवितात. नारळाच्या शाखा व पाने यांच्या बारीक

पट्टयांनी चट्या विणतात व करवंटीपासून भांडी करतात. केवड्याच्या पानांच्या रंगीबेरंगी चटया अधिक दिखाऊ असतात. कुंभारी चाकाचा वापर न करता बनविलेली घाटदार, सुडौल व रंगविलेली मातीची भांडी हे एक वैशिष्टय. भुताखेतांपासून रक्षण व्हावे म्हणून स्त्रीपुरुषांच्या तसेच पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या लाकडी आकृत्या तयार करुन व रंगवून त्या घरात ठेवतात. यांपैकी काही मूर्तीची मुखे चित्रविचित्र मुखवट्यांसारखी असतात काही अर्धमानवी व अर्धपाशवी असतात. मूर्तीऐवजी कित्येकदा सपाट लाकडी फळ्यांवर चित्रे रंगवून ते फळे घरात ठेवतात. या प्रदेशातील लोकांचा कल भडक रंग वापरण्याकडे असला, तरी रंगसंगतीची जाण त्यांना चांगली असते. डोळ्यांना सुखवणारी व कलात्मक सुसंवादित्व असलेली रंगरचना त्यांच्या नित्योपयोगी व कारागिरीच्या वस्तूंमधून दिसते. केवडा, नारळ, केळी, बांबू इत्यादींच्या पानांचे व फुलांचे हार, चांदण्या, क्रॉस, यांसारखे निरनिराळे आकृतिबंध व अनेकविध वस्तू कारागीर तयार करतात. तिरंदाजीसाठी वा शिकारीसाठी आडव्या दांड्यावर बांधलेली चापाची धनुष्ये बनवितात. संगीत व नृत्य पारंपरिक असते व बहुधा प्रत्येक उत्सवा-समारंभासाठी ठराविक असते. प्रादेशिक संगीत एकसुरी व कंटाळवाणे असते व नृत्य अगदी सामान्य असते. या प्रदेशातील पुरुषांचा प्राचीन पोषाख म्हणजे सिंहाच्या कातड्याचे, कंबरेला बांधावयाचे ‘किसान’ वस्त्र होय. स्त्रिया प्राचीनकाळी गवती झगे वापरीत. हल्ली हे पोषाख फारसे वापरात नाहीत. मात्र गवत व रंगीत कापड यांपासून बनविलेल्या टोप्या अजूनही वापरतात. पादत्राणे फक्त विशेष प्रसंगी वा प्रवासामध्येच वापरली जातात. हे लोक दु:ख, आजार, आनंद, कौमार्य वगैरे अवस्था दर्शविण्यासाठी अंगाला विशिष्ट तऱ्हेने गेरू, रंगीत माती व तेल फासतात. तारेमध्ये नाणी ओवून बनविलेले चांदीरुप्याचे अलंकार विशेषत्वाने वापरात आहेत. फुले व केळीनारळाच्या पानांचेही अंलकार बनवितात. रुपेरी जडावकाम केलेल्या कूर्मपृष्ठाच्या अंगठ्या वगैरे करतात. ओंगी जमातीत मेलेल्या व्यक्तीच्या हाडांपासून दागिने करून ते मृताच्या आठवणीदाखल वापरण्याची प्रथा आहे. सामूहिक नौकाशर्यती, डुकराशी झोंबी वगैरे खास प्रादेशिक खेळ विशिष्ट प्रसंगी खेळले जातात. लाठीमार, कोंबड्यांच्या झुंजी हे देखील आवडते खेळ आहेत. यांखेरीज फुटबॉल, व्हॉलीबॉल यांसारखे परकीय खेळही अलीकडे लोकप्रिय होत आहेत.

महाम्बरे, गंगाधर

 

संदर्भ: 1. Mathur, K. K. Nicobar Islands, Delhi, 1967.

           २. राजवाडे, माधव, अंदमान ते आनंदमान, मुंबई १९६७.

 https://vishwakosh.marathi.gov.in/26197/

 

अंदमान-निकोबारवरील नील बेट अतिशय सुंदर..जाणून घ्या माहिती

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतातील (India) सर्वातील सुंदर समुद्र किनारे (beach) आणि सुंदर बेट (Island) म्हणून अंदमान आणि निकोबाराची (Andaman and Nicobara)ओळख आहे. येथील समुद्रकिनार्‍यावर शांतता आणि समुद्र किनाऱ्यांवरील निर्सग सौंर्दय सर्वांना भुरळ पाडते. असेच या बेटावरील स्थित नील बेट आहे. जे लहान, परंतु अतिशय सुंदर बेट आहे. हे अंदमानच्या दक्षिणेस आहे. कोरल रीफ आणि उत्कृष्ट जैवविविधतेमुळे हे अंदमानमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी आहे. चला जाणून घेवू या सुंदर बेटाबद्दल...

(interesting information about nile island on andaman nicobar)

शदीद बेट म्हणून ओळख..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानच्या तीन बेटांचे नाव बदलण्याची घोषणा 2018 मध्ये केली. यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहितांना त्यांनी रॉस आयलँड, हेव्हलोक आयलँड आणि नील आयलॅडचे नामकर केले होते. यात निल बेटांचे आता शहीद बेट म्हणून ओळखले जाते. तर रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट आणि हव्हेलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप असे नाव देण्यात आले.

भाजी वाडगा

फुड प्रेमींसाठी नील बेट किंवा शहीद द्विप हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. यांना अंदमानची भाजी वाटी म्हणतात. जसा हावेलाॅक आयलँड सीफूडसाठी लोकप्रिय आहे. तसेच नील आयलँड वर शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. सर्व ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी नील केंद्राचा स्थानिक बाजार हा उत्तम स्थान आहे. शाकाहारी आणि शाकाहारी व्यतिरिक्त आपल्याला चिनी, इस्त्रायली, कॉन्टिनेंटल, नेपाळी आणि इटालियन खाद्यपदार्थांचा पर्याय आहे.

हावडा ब्रिज

आपल्याला कोलकाताचा हावडा ब्रिज माहिती असेलच पण नील बेटावरही हावडा ब्रिज आहे. मोठ्या दगडांनी बनलेला हा नैसर्गिक पूल नील बेटातील आकर्षणांपैकी एक ठिकाण आहे. नील बेटावर स्थायिक झालेल्या बंगाली लोकांनी प्रथम त्याचे नाव रवींद्रनाथ सेतू ठेवले आणि त्यानंतर हावडा ब्रिज असे नाव पडले.

सुभाष मेळा

नील द्विपच्या प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे सुभाष मेळा असून हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित केला जातो. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेष परिधान करून स्थानिक लोक पारंपारिक अन्न शिजवतात आणि पर्यटकांसमवेत असते.

समुद्रकिनारांचे नावे

नील बेटाचे लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांचे नावे लक्ष्मणपूर, भरतपूर, सीतापूर बीच आहेत ती रामायणातील पौराणिक पात्रांनी प्रेरित आहेत. सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यापैंकी एक आहे आणि सर्व समुद्रकिनाऱ्यांवर उत्तम रिसॉर्ट्स येथे आहेत. स्नोर्कलिंग, जेट स्कीइंग आणि स्कूबा डायव्हिंग इत्यादी अशा किनाऱ्यांवर आपण करू शकता.

 https://www.esakal.com/tourism/marathi-news-tourisam-interesting-information-about-nile-island-on-andaman-nicobar-bms86

 

'अंदमान-निकोबारमधील बेटांची नावं बदलली तर पर्यटनावर परिणाम'

  • ओंकार करंबेळकर आणि रोहन नामजोशी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

अंदमान बेटे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेट

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील तीन बेटांची नावं 30 डिसेंबरला होणाऱ्या एका कार्यक्रमात बदलली जाणार आहेत.

रॉस, नील आणि हॅवलॉक या बेटांची नावं अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप, अशी केली जाणार आहेत. यापैकी एका बेटाला सुभाषचंद्र बोसांचं नाव देण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.

या बेटांची नावं बदलण्याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही, अशी माहिती या बेटांवरील 'लोकल बॉर्न असोसिएशन'चे अध्यक्ष प्रेम किशन यांनी व्यक्त केली आहे. "आम्हाला ही सगळी माहिती वर्तमानपत्रातून समजत आहे, मात्र कोणतंही नोटिफिकेशन मिळालेलं नाही," असं प्रेम किशन म्हणतात.

लोकल बॉर्न असोसिएशनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात लिहिलं आहे. रॉस, वायपर आणि चॅथॅम या तीन बेटांवर 1858 साली स्वातंत्र्यसैनिकांचा पहिला गट आला. त्यामुळे या बेटांशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेटावरील गुन्हेगारांची वसाहत

"सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहेच. मात्र पर्यटनासंबंधी बेटांचं नाव बदलण्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा," असं सांगण्यास प्रेम किशन विसरत नाहीत.

पर्यटन उद्योगावर परिणाम?

प्रेम किशन पुढे म्हणतात, "अंदमान-निकोबार बेटांची नावं सुभाषचंद्र बोस यांनीही बदलली होती. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही, हा इतिहास उपलब्ध आहे. त्यामुळे आताही नावं बदलण्यात अर्थ नाही. या बेटांचं नावं बदलल्याने हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनासंबंधित व्यवसायांशी संबंधित लोकांवरही परिणाम होईल.

नील, रॉस, हॅवलॉक या तिन्ही बेटांचे ब्रँड तयार झाले आहेत. आता नव्याने त्यांचे ब्रँड तयार होणं कठीण होईल, असं इथल्या हॉटेल उद्योजकांना वाटत असल्याचं किशन सांगतात.

'अंदमान अँड निकोबार हॉटेलियर्स असोसिएशन'चे अध्यक्ष जी. भास्कर यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. ते पत्रात लिहितात, "हॅवलॉक, नील, रॉस, वायपर, जॉली बॉय, नॉर्थ बे, रेडस्कीन ही सगळी पर्यटन केंद्रं झाली आहेत. त्यांची नावं बदलल्याने पर्यटनाच्या ब्रँडवर परिणाम होईल. आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो, मात्र त्यांनी या बेटांची नावं बदलण्याऐवजी नव्याने शोधण्यात आलेल्या बेटांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं द्यावी, अशी आम्ही विनंती करतो."

सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो - विश्वास पाटील

स्थानिक रहिनाशांनी या तीन बेटांची नावं बदलण्याच्या निर्णयाला विरोध केला असला तरी प्रसिद्ध लेखक आणि इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

त्यांच्या मतानुसार, "आजच्या अंदमानच्या पिढ्यांना खरा इतिहास माहिती नाही. तिथे सगळा ब्रिटिशप्रणित शिक्षणाचा प्रभाव आहे. त्या व्यवस्थेमध्ये भारतीय क्रांतिकारकांना शत्रू मानलं गेलं आहे. नेताजींनी अंदमानला जी भेट दिली आहे, त्याची चित्रफित उपलब्ध आहे. ब्रिटिश सत्तेचे शत्रू ते आपले शत्रू, अशी शिकवण तिथल्या व्यवस्थेत दिली गेल्यामुळे अंदमान-निकोबारचे लोक विरोध करत आहेत. परंतु त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही. त्यांचा विरोध अनाठायी आहे. बेटांची नावं बदलण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मला तर वाटतं हा निर्णय घेण्यास उशीरच झाला आहे."

'प्रतीकात्मक राजकारणाचा भाग'

तीन बेटांची नावं बदलण्याचा निर्णय शुद्ध लोकप्रिय राजकारणाचा भाग आहे, असं मत दिल्ली विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केलं. याबाबत बीबीसीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "जपानच्या ताब्यात ही बेटं असताना स्थानिक लोकांवर अत्याचार झाले होते. जपानी वसाहतवादी सर्वच वसाहतींमध्ये लोकांचा छळ करायचे.

"जपानी लोकांनी या बेटांचा ताबा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिला. पण तरीही मला बेटांची नावं बदलणं हा प्रतीकात्मक आणि लोकप्रिय राजकारणाचा भाग वाटतो. नाव बदलल्याने काहीच होणार नाही. लोकांच्या मनात जुनीच नावं शिल्लक राहतात, असा इतिहास आहे.

"तसंच या बेटांची जुनी नावं काहीतरी होती आणि त्यांची नावं इंग्रजांनी बदलली होती, असं झालेलं नाही. कारण मुळात त्यांना नावंच इंग्रजांनी दिली होती. त्यामुळे असलेली नावं बदलण्यात काहीच अर्थ नाही."

रॉस, नील, हॅवलॉक बेटांच्या नावांची कथा

रॉस या प्रसिद्ध बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बाँबेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. 29 ऑक्टोबर 1849 रोजी त्यांचं निधन झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेट

नील आणि हॅवलॉक या बेटांची नावे जेम्स नील आणि सर हेन्री हॅवलॉक या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांवरून ठेवण्यात आली. हॅवलॉक यांनी अवध आणि कानपूरमध्ये तर जेम्स नील यांनी 1857 मध्ये लष्करी उठाव निपटण्यासाठी कंपनी सरकारतर्फे प्रयत्न केले होते.

24 नोव्हेंबर 1857 रोजी अतिसाराने हॅवलॉक यांचं निधन झालं तर जेम्स नील यांचा 25 सप्टेंबर 1857 रोजी गोळी लागून मृत्यू झाला.

जपानी लोकांकडून झाला अनन्वित छळ

सप्टेंबर 1939 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा निकोबारचे तत्कालीन प्रशासनप्रमुख जॉन रिचर्डसन आणि त्यांच्या परिसरातील स्थानिक लोकांना पुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नव्हती. अजय सैनी यांनी 'इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकली'साठी लिहिलेल्या एका संशोधन निबंधात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

"1939 मध्ये जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर रिचर्डसन आणि तेथील लोकांना पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. पहिल्या महायुद्धात या परिसरात शांतता होती. दुसऱ्या महायुद्धात मात्र ही परिस्थिती बदलली. जपानने मलाया, सिंगापूर आणि हाँगकाँग इथे हल्ला केल्यानंतर ब्रिटिशांनी 1941 मध्ये जपानविरुद्ध युद्ध पुकारलं.

"तेव्हा हे युद्ध अगदी आपल्या दाराशीच होतंय, अशी भावना तेथील आदिवासींच्या मनात निर्माण झाली. जपानी लोकांनी सिंगापूर, म्यानमार येथे केलेल्या अत्याराबाबत माहिती मिळाली. 1942 मध्ये जपानने कामोर्टा आणि पोर्ट ब्लेअरवर बाँब हल्ला केला आणि ही भीती आणखीच बळावली.

फोटो स्रोत, TEJALI SHAHASANE

फोटो कॅप्शन,

हॅवलॉक

"जपानने या बेटांचा ताबा घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांना जपानी लोकांच्या छळवणुकीचा पहिल्यांदाच अनुभव आला. 24 डिसेंबर 1942ला निकोबारमधील 500 लोकांना बांधकामासाठी मजूर नेमण्यात आलं. निकोबारपेक्षा अंदमानचं महत्त्व जपानी लोकांच्या दृष्टीने जास्त होतं. त्यामुळे जपानी नौदलाचा अंदमानवर ताबा होता.

"हे नौदल सिंगापूरमधील मुख्यालयाला उत्तरदायी होते. त्यांचा प्रभाव इतका जास्त होता की तेव्हाच्या हंगामी भारतीय सरकारलासुद्धा तिथे कोणताही हस्तक्षेप करता येत नव्हता.

"निकोबारच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे एक प्रशासकसुद्धा नेमण्यात आला होता. स्थानिकांना जपानी भाषा शिकवली गेली. जपानचा राजा म्हणजे देवाचाच एक अवतार आहे, हे सांगण्यासाठी व्याख्यानं आयोजित केली गेली," असं सैनी लिहितात.

जपानची शरणागती

Skip पॉडकास्ट and continue reading

पॉडकास्ट

तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

जपानी सैनिकांनी तिथल्या स्थानिकांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचंही सैनी यांनी या शोधनिबंधात पुढे म्हटलं आहे. याबद्दल अनेकदा तक्रार केली तरी त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिकांना रोज कामावर येण्याचे आदेश देण्यात आले होते.

कुणी आजारी पडलं तरी त्याला अगदी घरातून उचलून आणलं जायचं. जुलै 1945 मध्ये निकोबार भागात अनेक सागरी आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर निकोबारमध्ये राहणाऱ्या आणि तिथे न राहणाऱ्या लोकांचीही हत्या करण्यात आली. जपानने 300 लोकांना अटक करून त्यांची रवानगी छळछावण्यांमध्ये करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात जपानने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर जपानच्या मेजर जनरलने रिचर्डसन यांना पाचारण केलं. "आमचा राजा शांतताप्रिय आहे. लोकांना ज्या वेदना होत आहेत, त्या त्याला बघवल्या जात नाहीत. आमच्याकडे शस्त्र आहेत, ज्यांनी आम्ही अजून 100 वर्षं युद्ध करू शकतो. मात्र आता आम्हाला शांतता हवी आहे," अशा आशयाचा मजकूर त्यांना वाचून दाखवण्यात आला.

या संदेशाबरोबर रिचर्डसन यांना एक जुनं ब्लँकेट, 40 पाऊंड तांदूळ आणि दोन यार्ड इतकं कापड देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

 https://www.bbc.com/marathi/india-46698778

 

अंदमान-निकोबार बेटांचे लष्करी महत्व काय आहे?

लोकसत्ता ऑनलाइन

पंतप्रधानांनी परमवीर चक्र सन्मानीत यांची नावे ही अंदमान-निकोबार बेटांच्या समुहात असलेल्या २१ प्रमुख बेटांना दिल्याने अंदमान-निकोबार ही बेटं चर्चेत आहेत

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जयंती दिवस ‘पराक्रम दिवस’म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांच्या ५७१ पैकी २१ सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्र सन्मानितांची नावे देण्यात आली. एक प्रकारे सशस्त्र दलाच्या शौर्याचा सन्मान करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र यानिमित्ताने देशाच्या अग्नेय दिशेला एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या अंदमान निकोबार बेटांची चर्चा सुरु झाली आहे.लष्करी दृष्ट्या या बेटांचे अनन्य साधारण असं महत्व आहे.

अंदमान निकोबर बेटं नक्की कशी आहेत?

पश्चिम बंगालच्या उपसागरात अग्नेय दिशेला असलेली अंदमान-निकोबार ही बेटांची एक समूह साखळी आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तरकेडली बेटांना अंदमान तर दक्षिणेकडील बेटांना निकोबार बेटं या नावाने ओळखले जाते. दोन्ही मिळून विविध आकाराची एकुण ५७२ बेटं असून यापैकी फक्त ३७ बेटांवर मानवी वस्ती आहे, उर्वरित बेटं ही निर्मनुष्य आहेत. हा सर्व भाग केंद्रशासित प्रदेश असून याची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे. काही बेटांदरम्यान बोट सेवा आहे, काही बेटांवर विमानानेच पोहचणे जास्त सोईचे आहे.

बेटांचे भौगोलिक स्थान

ही बेटं भारताच्या मुख्य भूमीपासून जरी दुर असली तरी इंडोनिशायपासून ही अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर आहेत. तर सुमारे ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर थायलंड आणि म्यानमार हे देश आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंडोनेशियाच्या मलाक्का आखात्याच्या जवळच निकोबार बेटाचे टोक किंवा भारतातील सर्वांत दुरचे टोक इंदिरा पॉईंट हे आहे.

अंदमान निकोबार बेटं का महत्त्वाची?

भारताच्या भूभागापासून सर्वात दूर असलेली बेटाचं लष्करी दृष्ट्या अनन्य साधारण असं महत्व आहे. जगात जलमार्गे जी मालवाहतूक केली जाते त्यापैकी २५ टक्के मालवाहतूक ही मलाक्का आखातामधून होते. आपला मुख्य शत्रू असलेल्या चीनची बहुतांश मालवाहतूक ही याच आखातामधून होते. त्यामुळे या भागावर नजर ठेवणे, जरब ठेवणे आणि गरज पडल्यास नियंत्रण ठेवणे हे अंदमान निकोबार बेटांमुळे शक्य होणार आहे. फक्त चीन नाही तर भारतासह जपान, सिंगापूर, व्हिएतनाम, तैवान, दक्षिण कोरिया, थायलंड, मलेशिया आणि अर्थात इंडोनेशिया हे देशही मालवाहतूकीसाठी याच आखातामधील जलमार्गाचा वापर करतात. एका अंदाजानुसार दरवर्षी एक लाखाहून अधिक विविध मालवाहू जहाजे या भागातून प्रवास करतात. मालवाहतुकीमध्ये तेलाची वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होते.

थोडक्यात या भागातील जलवाहतूक नियंत्रित केली तर चीनसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो.

सैन्य दलाचे संयुक्त केंद्र – Andaman and Nicobar Command

ही बेटं भौगोलिक दृष्ट्या दूर असल्याने इथे विमानानेच वेगाने पोहचणे शक्य आहे, तसंच या बेटांच्या परिसरात दीर्घकाळ गस्त घालायची असेल तर ती नौदल किंवा तटरक्षक दलांच्या बोटींनेच शक्य आहे. तसंच वेळप्रसंगी या बेटांच्या पलिकडे असलेल्या भूभागांवर किंवा जहाजांवर लष्करी कारवाईची वेळ आली तर लष्कराची सज्ज तुकडी असणे आवश्यक आहे. म्हणूनच या बेटांसाठी २००१ ला संरक्षणालाच्या संयुक्त केंद्राची ( Andaman and Nicobar Command ) निर्मिती करण्यात आली. तेव्हा भारतापासून दूर असलेली ही बेटं, त्याचे सागरी क्षेत्र ( Exclusive economic zone ) आणि या बेटांचा परिसर यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही Andaman and Nicobar Command वर देण्यात आली आहे.

या माध्यमातून जलवाहतूकीवर लक्ष ठेवणे, चीनच्या समुद्रातील हालचालींवर नजर ठेवणे, विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आणि अवकाश प्रक्षेपण यासाठी मदत करण्याचे काम या बेटांवरील सामरीक पायाभूत सुविधांमार्फत केलं जातं.तसंच या बेटांवर आणि समुद्रात असलेली नैसर्गिक संपत्तीमुळे, जैविक विविधता यामुळेही या बेटांचे महत्व अनन्यसधारण आहे.

 https://www.loksatta.com/explained/what-is-military-significance-of-andaman-nicobar-island-asj-82-3420602/

 

अंदमान निकोबारची आगळीवेगळी ओळख - Majha Paper


andaman
पर्यटकांची खूप पसंती असलेली अंदमान निकोबार ही बेटे जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र पर्यटकनाशिवायही या बेटांची आणखीही आगळीवेगळी ओळख आहे.. ही बेटे अनेक मनोरंजक बाबींशी निगडीत आहेत. काय आहेत ही वैशिष्टे?

असे मानले जाते की अंदमानच्या नावाचे मूळ संस्कृत आहे. म्हणजे हनुमान या शब्दाचा हा मल्याळीतला उच्चार आहे. मल्याळीत हनुमानाला हण्डुमन म्हणतात व त्यावरून अंदमान हा शब्द आला आहे. निकोबारचा अर्थ आहे नेकेड लोकांची जमीन. या बेटांवर असलेल्या मूळ आदिवासी जाती बाहेरच्या लोकांबरोबर अजिबात मिसळत नाहीत. अशा ५०० जातींचे लोक येथील विविध बेटांवर राहतात.

samudri
अंदमान हा एकूण ५७२ बेटांचा समूह आहे मात्र त्यातील फक्त ३६ बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात तर निकोबार बेटावर पर्यटक जाऊ शकत नाहीत. तेथे फक्त रिसर्चसाठी निवडक लोकांनाच जाता येते. या बेटांवर कासवे खूप प्रमाणात आढळतात त्यात सर्वात मोठे डर्मोचेलेम कोरिअसी या नावाचे कासव जसे सामील आहे तसेच सर्वात छोटे ऑलिव्ह राईडली हे कासवही सामील आहे. भारतीय चलनाच्या २० रूपयांच्या नोटेवर जे जंगल आहे ते अंदमानातले जंगल आहे.

या बेटांवर व्यावसायिक मासेमारीला बंदी आहे. त्यामुळे येथे मासे त्यांचे पूर्ण आयुष्य जगू शकतात. फुलपाखरांसाठी हे हॅपी आयलंड मानले जाते कारण येथे विविध प्रकारची व खूप मोठ्या संख्येने फुलपाखरे आढळतात. हे बेट कोकोनट क्रॅबसाठीही प्रसिद्ध आहे. हे खेकडे जमिनीवरील सर्वात मोठे खेकडे समजले जातात. त्याची लांबी १ मीटरपर्यंतही असते. हे खेकडे नारळाच्या करवंट्या दातांनी फोडतात. येथील राज्य प्राणी आहे डुगोंग. हा समुद्री जीव अतिशय लाजाळू असतो. या प्राण्याची देशात पाच ब्रिडींग सेंटर आहेत त्यातील एक अंदमानात आहे.

volcamo
अंदमानमधील एका बेटावर भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी आहे व पर्यटक या बेटावर जाऊन तो पाहू शकतात. दुसर्‍या जागतिक युद्धात जपानने तब्बल तीन वर्षे अंदमानवर कब्जा केला होता. ब्रिटीश काळात अंदमानची ओळख काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी झाली. येथील तत्कालीन सेल्युलर जेल आजही जतन केला असून तो राष्ट्रीय स्मारक बनला आहे. अंदमानचा ९० टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे.

विशेष म्हणजे अंदमान निकोबार भारतात असली तरी ती भारतापेक्षा इंडोनेशियाला अधिक जवळ आहेत. इंडोनेशियापासून या बेटांचे अंतर १५० किमी आहे तर भारतापासून ते ८०० किमी आहे.

 

अंदमान निकोबार बेटे आज भारतात आहेत याचं श्रेय जातं मराठा आरमाराच्या पराक्रमाला !

बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेटे. भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस.  नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण.

काही दिवसापूर्वी सेंटनली आदिवासींच्या प्रश्नावरून अंदमान निकोबार बेटे परत चर्चेत आली. इथे राहणारी आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे राहात आहेत. आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती त्यांच्या पर्यंत पोहचलेली नाही. गेली हजारो वर्षे त्यांच्या जीवनपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा अनेक आदिवासी प्रजाती अंदमान निकोबारवर आढळतात.

अशावेळी प्रश्न पडतो की अंदमान निकोबार बेटाचा इतिहास काय? ही बेटे आपल्या भारतात कधीपासून आली?

अंदमान या शब्दाचा पहिला उल्लेख चिनी साहित्यात आढळतो. कुठल्यातरी चीनी व्यापाऱ्याचे भारताच्या मुख्य भूमीकडे येणारे जहाज वादळामुळे भरकटले आणि ते या बेटांवर जाऊन पोचले. या बेटाचा उल्लेख त्यांनी येनटोमेन असा केला आहे. पुढे काही वर्षांनी म्हणजेच पंधराव्या शतकात आणखी एका चीनी प्रवाशाने आपल्या डायरीत आंदेमन पर्वत अशी नोंद केली आहे. हेच ते अंदमान.

याचाच अर्थ या बेटावर चीनवरून भारताकडे येणारी जहाजे विश्रांतीसाठी थांबत असण्याची शक्यता आहे.

भारतात दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र याने सुमात्रा बेटांवर हल्ला करण्यासाठी या बेटांचा वापर केला होता अस सांगितलं जात. हे सोडलं तर अंदमानचा इतिहास तसा अप्रकाशित आहे. ज्याची कोणालाही जास्ती माहिती नाही.

मध्ययुगात भारतात अनेक राज्य होती, अनेक राजे होते. मात्र या राजांकडे आपले शक्तीशाली आरमार नव्हते. भारत देश हा सुपीक देश आहे. शिवाय सोन्याच्या हिऱ्याच्या प्रचंड खाणी येथे आढळतात. भारतीय राजे संपन्न होते. त्या काळातल्या कर्मठ समजुतीप्रमाणे हिंदू धर्मात समुद्रगमन करण्यास परवानगी नव्हती.

अशा अनेक कारणांमुळे भारतात कोणाकडेच मोठे नौदल नव्हते किंवा कोणी समुद्रपार करून पलीकडे असलेली बेटे ताब्यात घेतली नाहीत. फक्त एक राजा सोडून.

“छत्रपती शिवाजी महाराज”

महाराजांकडे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्याचं रक्षण फक्त दिल्लीच्या मुघलसत्तेपासूनच नाही तर सातसमुद्रापार हून आलेल्या गोऱ्या लोकांपासून केले पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं. यासाठीच मराठ्यांचं पहिलं आरमार त्यांनी उभा केलं. समुद्री किल्ले मजबूत केले. महाराजांच्या काळात अरबी समुद्रातून स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची टाप कोणाकडे नव्हती.

पुढे मराठी आरमाराची जबाबदारी कान्होजी आंग्रेच्या कडे आली. शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्य मोडकळीस येईल असा जो अनेकांचा अंदाज होता तो संताजी, धनाजी, कान्होजींच्या सारख्या लढवय्या सरदारांच्या मुळे खोटा ठरला. मराठी राज्याचा तारू या वादळात टिकला आणि जोमाने मार्गक्रमण करू लागला.

छत्रपती ताराराणीबाईसाहेबांच्या काळात कान्होजी आन्ग्रेनी प्रचंड पराक्रम  गाजवला.

मुंबई ते वेंगुर्ला या किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व होते. अरबी समुद्रातच नाही तर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागातही मराठ्यांच्या लढाऊ नौका फिरत होत्या. दर्यासारंग कान्होजी आंग्रेंची दहशत लंडनपर्यंत पोहचली होती. त्यांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न इंग्रज सत्तेला पडला होता.

बंगालच्या उपसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या इंग्रज डच आणि पोर्तुगीज जहाजांशी लढा देण्यासाठी कान्होजी आन्ग्रेनी अंदमान बेटावर आपला नाविक तळ उभा केला.

अंदमान बेटावरचा हा पहिला नाविक तळ होता. 

कान्होजी आंग्रे यांचा हा व्युव्हात्मक निर्णय होता. कलकत्ता, मद्रास, पोंडेचरी येथून जाणारी इंग्लिश, डच जहाजे मराठ्यांच्या टप्प्यामध्ये आली. जंग जंग पछाडूनही इंग्रजांना सरखेल कान्होजी आंग्रेंचा पराभव करणे शक्य होत नव्हते. दुर्गम अशा अंदमान निकोबार बेटांमध्ये वेगाने जाऊन लपणार्या मराठी जहाजांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या इंग्लिश नौका तिथेच जलसमाधी घेत होत्या.

त्यांच्या भीतीने इंग्रजांनी कान्होजींच्या मराठा आरमाराला समुद्री चाचे म्हणून घोषित केले होते.

कोकणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींच्या बंदोबस्तासाठी आलेले अनेक इंग्लिश दर्यावर्दी मारले गेले. एकदा तर मराठ्यांनी मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरला ताब्यात घेतले होते. मेधाजी भटकर आणि मायनाक भंडारी यांच्या मदतीने कान्होजीनी संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर राज्य केलं.

कान्होजींच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचे आपल्या आरमाराकडे दुर्लक्ष झाले.

काही वर्षांनी आपल्या सत्तासंघर्षाच्या नादात पेशव्यांनी इंग्रजांना मराठा आरमार बुडवण्यात मदत केली. १७५६ साली पेशव्यांनी कान्होजींच्या मुलाला म्हणजे तुळाजी आंग्रेला इंग्रजांना पकडवून दिले आणि समुद्रावरील आपले राज्य देखील संपुष्टात आले.

कान्होजींच्या नंतर इंग्रजांना अंदमान, निकोबार या बेटांचे महत्व लक्षात आले आणि त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी तिथला वापर सुरु केला.

भारतात गुन्हे केलेल्या अनेक कैद्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात येऊ लागले. तिथे अत्याधुनिक नाविक तळ उभारण्यात आला. अंदमानमध्ये झालेल्या शिक्षेची भीती एवढी होती की लोक तीला काळ्यापाण्याची शिक्षा म्हणून ओळखत होते.

पुढे दुसऱ्या महायुद्धावेळी जपानी सैन्याने अंदमान निकोबारवर विजय मिळवला आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या ताब्यात ही बेटे दिली. पण दुर्दैवाने इंग्रजांचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला आणि ही बेटे परत ब्रिटीश साम्राज्याच्या ताब्यात आली.

पुढे १९४७ साली भारत सोडून जाताना इंग्रजांनी भारताच्या मुख्यभूमीबरोबरच अंदमान निकोबार ही बेटे सुद्धा स्वतंत्र केली आणि ती भारताचा अविभाज्य भाग आहेत असे घोषित केले.

आजही भारतासाठी सामरिकदृष्ट्या अंदमान व निकोबार बेटे अतिशय महत्वाची आहेत. बांगलादेशला स्वतत्र करण्याच्या युद्धात आपल्या नौदलाने अंदमानवरून केलेल्या मोहिमेचा आपल्याला खूप मोठा फायदा झाला. आजही अंदमानमुळे बंगालचा उपसागर, हिंदी महासागरावर आपले वर्चस्व टिकून आहे.

याचे श्रेय जाते कान्होजी आंग्रेंच्या दूरदृष्टीला. त्यांनी तिथे नाविक तळ उभारला म्हणून अंदमान आज भारताचा एक शक्तिशाली घटक बनला आहे. नाही तर काय माहिती या बेटांचा ताबा म्यानमार मलेशिया इंडोनेशिया तिथून तुलनेने जवळ असणाऱ्या कुठल्या तरी देशाकडे असता.

संदर्भ- Indian defence review by Lef. gen. J.S.Bajwa

 https://bolbhidu.com/andaman-nicobar-kanhoji-angre-maratha/

 

अंदमान-निकोबार बेटाच्या जंगलात राहते ही जगावेगळी आदिवासी जारवा जमात

Maharashtra News

parwa tribe

अंदमान-निकोबार बेट हे पर्यटकांच्या दृष्टीने नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. देश विदेशातून लाखो पर्यटक या बेटावर निसर्ग सोंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. निसर्गाचा अनमोल खजिना जरी या बेटावर असला तरी तितक्याच काही रहस्यमय गोष्टींसाठी हा बेट ओळखला जातो.

ही बातमी पण वाचा : भारतातील रहस्यमय बेटावर अमेरिकन पर्यटकाच हत्या, 7 अटकेत

त्या मधली सर्वात मोठी बाब जर कुठली असेल तर ती आहे तिथल्या जंगलात राहणारे प्राचीन आदिवासी प्रजाती. ही प्रजाती विकासाच्या प्रवाहा पासून कोसो दूर आहे. इतकी दूर की ज्या बद्दल आपण कल्पना हि नाही करू शकणार. आज २१ व्या शतकात जग कुठच्या कुठे जाऊन पोहोचले आहे परंतु हे आदिवासी समूह अजूनही आजच्या जगाच्या तब्बल ६० हजार वर्ष मागे आहे. असे असले तरी याचा अर्थ हा अजिबातच नाही की हे कमकुवत आहेत. जारवा नावाने ओळखली जाणारी आदिवासी जमात अत्यंत धोकादायक आहे.

ही बातमी पण वाचा : भारतात या ठिकाणी सुनेला वेश्याव्यवसाय करणे आहे बंधनकारक !

पारवा जमात

त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र जरी नसले तरी त्यांचा बाण आणि भाल्याचा निशाणा कुणालाही मृत्यूच्या दाढेत ढकलू शकतो. अत्यंत दुर्मिळ अशी असे हे जारवा आदिवासी त्यांच्या समुहा शिवाय दुसऱ्या कोणालाही त्यांच्या जंगलात प्रवेश करू देत नाही. तसेच ते ही कधी बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत नाही. अगदी काही दिवसांआधी एक अमेरिकी पर्यटकाने काही मासे माऱ्याच्या साहाय्याने या जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु या आदिवासींनी बाण मारून त्याची हत्या केली. अश्या अनेक घटना या आधीही घडल्या आहेत. त्यामुळे सरकार ने हे क्षेत्र प्रतिबंधित केले असून तिथे जायची कुणालाही परवानगी नाही.

 

नील बेट हे ठिकाण जिथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता

नील बेट हे अंदमान द्वीपसमूहातील अनेक सुंदर बेटांपैकी एक आहे. याला शहीद बेट म्हणून देखील ओळखले जाते. हे बेट पोर्ट ब्लेअरपासून समुद्रमार्गे सुमारे 37 किमी अंतरावर आहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. नील बेट त्याच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी आणि घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांच्या विस्तारासाठी आणि पांढर्‍या वाळूचे किनारे आणि समृद्ध हिरवाईसाठी ओळखले जाते. त्याचा बराचसा भाग जंगलाने व्यापलेला आहे.
 
जर आपण अंदमान बेटांवर सहलीची योजना आखत असाल तर नील बेटाला भेट द्यावी आणि या बेटाचे अप्रतिम सौंदर्य पाहावे. या बेटावरील लोक खूप मैत्रीपूर्ण आणि स्वागतासाठी आतुर असणारे आहेत, आपण या अद्भुत बेटावर नक्कीच आनंद घ्याल. संपूर्ण अंदमान बेटांमध्ये या बेटावर काही सर्वात आकर्षक किनारे आहेत; स्वराजद्वीप (हॅवलॉक बेट) च्या सावलीमुळे बहुतेक पर्यटक हे बेट पाहण्यास मुकतात. शहीद दीप आकर्षक आहे आणि येथील निसर्ग सौंदर्याच्या शिखरावर आहे. अंदमान द्वीपसमूहातील इतर ठिकाणांप्रमाणे शहीद दीपचे जाळे फारसे चांगले नाही. जर आपण शांत प्रवासाची योजना आखत असाल तर हे ठिकाण आपल्यासाठी योग्य आहे.
 
नील बेट हे भाजीपाला पिकांच्या विविधतेमुळे अंदमानचे व्हेजिटेबल बाऊल म्हणून प्रसिद्ध आहे. नील आयलंड हे लोकांसाठी विविध ठिकाणे पाहण्यासाठी एक चांगले पर्यटन स्थळ आहे. नील बेटाची माती भारत सरकारने सेंद्रिय म्हणून प्रमाणित केली आहे. शेती हा गावकऱ्यांचा प्राथमिक व्यवसाय असून येथे मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. नील बेट संपूर्ण अंदमानला मुबलक उत्पादनासाठी भाजीपालाचा पुरवठा करतात. भाजीपाला उत्पादन करण्यासाठी शेतकरी सेंद्रिय शेतीचा सराव करतात, ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक-आधारित खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकांची वाढ आणि संगोपन समाविष्ट असते. येथील माती नैसर्गिकरित्या सेंद्रिय आहे जी भाज्यांची गुणवत्ता टिकवून ठेवते आणि त्यांना रसायनमुक्त, ताजी आणि निरोगी ठेवते.
 
नील बेटाची प्रमुख आकर्षणे
 
नील बेट हे कमी लोकवस्ती असणारे गाव आहे आणि येथे राहणारे लोक अतिशय साधे जीवन जगतात. नील येथे उपलब्ध सुविधा हॅवलॉक किंवा पोर्ट ब्लेअरच्या तुलनेत कमी आहेत.
नील बेटावर लक्ष्मणपूर बीच, भरतपूर बीच आणि नैसर्गिक रॉक फॉर्मेशन ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. जल क्रीडा क्रियाकलापांमध्ये स्वारस्य असलेले लोक नील बेटावर स्कूबा डायव्हिंगसाठी जाऊ शकतात. इतर जलक्रीडा क्रियाकलापांमध्ये बनाना बोट राइड, जेट स्की राइड आणि ग्लास बॉटम बोट राईड यांचा समावेश आहे जे नील बेटावरील भरतपूर बीचवर करता येते. नील बेटाच्या भरतपूर बीचवर पाण्याशी संबंधित सर्व कामे करता येतात.
 
येथील प्रमुख निसर्गरम्य किनारे आहेत:
 
- भरतपूर बीच
- लक्ष्मणपूर बीच
- नैसर्गिक पूल (नैसर्गिक खडक निर्मिती)
- सीतापूर बीच
- रामनगर बीच (सनसेट बीच)
जरी येथे निवासाच्या सर्व श्रेणी उपलब्ध आहेत, हे ठिकाण विकसित होत आहे आणि जवळजवळ सर्व उत्पादने पोर्ट ब्लेअरमधून मागवले जातात.
 
वाहतूक, रेस्टॉरंट आणि निवास या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. इतर बेटांच्या तुलनेत येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब आहे; इथे बेटावर पोहोचल्यावर इंटरनेट कनेक्शन आपोआप बंद होईल.
 
नील बेटावर कसे जायचे?
 
शहीद द्वीप म्हणजेच नील बेट पर्यंत फक्त समुद्रमार्गेच पोहोचता येते. पोर्ट ब्लेअर किंवा हॅवलॉक बेटावरून फेरीने तुम्ही नील बेटावर पोहोचू शकता. बेटांना जोडणाऱ्या दैनंदिन शिफ्ट चालवणाऱ्या सरकारी फेरी आणि खाजगी फेरी/क्रूझ दोन्ही आहेत. बेटावर पोहोचण्यासाठी फेरीला साधारणतः 60 ते 90 मिनिटे लागतात. हे बेट हेलिकॉप्टरद्वारे इतर बेटांशी देखील जोडलेले आहे ज्यामुळे प्रवास जलद होतो.
आपण शहीद दीपमध्ये असता आणि बेटाच्या आत प्रवास करू इच्छित असाल तेव्हा  कॅब सेवा किंवा दुचाकी भाड्याने घेऊ शकता. ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत. सायकलिंग हा दुसरा पर्याय आहे ज्यासाठी आपण  जाऊ शकता. सायकल भाड्याने घ्या आणि या बेटाचे सौंदर्य शोधा.
 
बेटाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
बेटावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आहे. हीच वेळ आहे जेव्हा अंदमानमध्ये हवामान सर्वोत्तम असते.

 https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/nile-island-is-a-place-where-you-can-enjoy-the-beauty-of-nature-tourism-marathi-bharat-darshan-marathi-122011000059_1.html

 https://zeenews.india.com/marathi/photos/irctc-is-offering-five-day-trip-to-andaman-nicobar-island-just-in-21-thousand-travel-offer/440279/irctc-is-offering-five-day-trip-to-andaman-nicobar-440281

 

अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा!

ऑनलाइन लोकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 11:30 AM2018-11-24T11:30:10+5:302018-11-24T11:34:55+5:30

irctc to start rail route to andaman nicobar islands to boost tourism | अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा!

अंदमान निकोबारचा प्रवास आणखी सोपा; भारतीय रेल्वेकडून खास रेल्वे सेवा!

जर तुम्हाला निळाशार समुद्र आणि त्यावर तंरगणारं खुलं आभाळ नेहमीच भुरळ घालत असेल तर तुम्ही एकदा तरी अंदमान निकोबारला नक्की भेट द्या. हे एक असं ट्रव्हल डेस्टिनेशन आहे जे फार महाग नाही पण एकदम पैसा वसूल आहे. परंतु येथे जाण्यासाठी आधी विमानाने आणि त्यानंतर बोटीने किंवा बसने प्रवास करावा लागत असे. हा प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. अनेक पर्यटक या प्रवासामुळे अंदमान निकोबारकडे पाठ फिरवतात आणि दुसऱ्या ठिकाणांना पसंती देतात. तुम्हीही अशा पर्यटकांपैकी एक असाल तर आता टेन्शन सोडा. कारण आता अंदमान निकोबारला जाण्याचं टेन्शन नाही. भारतीय रेल्वेमुळे येथे पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. भारतीय रेल्वेकडून येथे पोहोचण्यासाठी एक खास रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे.  

अंदमान निकोबारला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास 

दरम्यान  IRCTC एक खास ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना थेट अंदमान निकोबारपर्यंतचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना 240 किमीपर्यंतचा प्रवास ट्रेनने करावा लागणार आहे. या ट्रेनने अंदमान निकोबारला पोहचण्यासाठी प्रवाशांना 10 तासांचा वेळ लागणार आहे. ही ट्रेनसेवा पोर्ट ब्लेयर आणि अंदमान निकोबारमधील दिगलीपूरपासून ही सेवा असून अंदमान निकोबरपर्यंत पोहोचण्यासाठी 10 तासांचा प्रवास करावा लागणार आहे. 

सध्या या दोन्ही बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जलमार्गाचा किंवा बसचा प्रवास करावा लागतो. बसने या बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 14 तासांचा प्रवास करावा लागतो तर जलमार्गाने 24 तासांचा प्रवास करून येथे पोहोचता येते. परंतु रेल्वे मार्गाने फक्त 10 तासांतच येथे पोहोचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ट्रनच्या प्रवासात येथील निसर्गसौंदर्यही न्याहाळता येणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या कामाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. अंदमान निकोबारकडे पर्यंटकांचा वाढता कल लक्षात घेऊन आता पुन्हा हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करण्यात येत असून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. 

या प्रोजेक्टमुळे अंदामान निकोबारमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या या ठिकाणी जाणाऱ्या पर्यंटकांमध्ये भारतीय पर्यंटकांची संख्या फार मोठी आहे. सध्या हा रेल्वेमार्ग तयार होण्यासाठी फार वेळ लागणार आहे. यासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीटाची घोषणा अद्याप IRCTC मार्फत करण्यात आली नाही. 

...म्हणून अंदमन निकोबारला अवश्य भेट द्या

जर तुम्हाला निळ्याशार सुमुद्र किनाऱ्यावर फिरण्याची मजा अनुभवायची असेल तर तुम्ही अंदमान निकोबारला अवश्य भेट देऊ शकता. स्कूबा डायविंगचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये आकर्षणाचं केंद्र आहे. येथे समद्रामधील जीवन अनुभवणं हा एक वेगळा अनुभव असतो. 

हिल स्टेशन्स आणि पर्वतरांगाबरोबरच तुम्ही थंडीतही अंदमान आणि निकोबार बेटांनाही भेट देऊ शकता. इथलं मुंजोह ओशिएन रिसॉर्ट अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टससाठी नावाजलेलं आहे. अंदमान निकोबारच्या बीच नंबर 5 हॅवलॉकवर हे रिसॉर्ट आहे. स्कूबा डायिव्हंग, स्नोर्कलिंह, डीप सी डायव्हिंगसारखे वेगवेगळे खेळ तुमच्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करतात. इथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतही जाऊ शकता.  

अंदमान निकोबारमध्ये जाण्यासाठी ही योग्य वेळ 

अंदमान निकोबारमध्ये ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता. या दरम्यान येथील तापमान 23 डिग्रीपासून ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येथे तौर्सिम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यादरम्यान येथे पर्यटकांची गर्दी असून देश-विदेशातून अनेक पर्यटक येथे येतात.

 

भारतीय बेटे – मुख्य भूमीपासून अलग असलेली बेटे ही देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहेत. अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरातील बेटे, अंदमान मधिल बेटांचे नामकरण, व भारतातील अन्य बेटे सर्वांची सविस्तर माहिती.

Indian Island Information in Marathi
Indian Island Information in Marathi

अरबी समुद्रातील बेटे (लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनीदिवी बेटे)

  • लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनदीवी बेटें ही प्रवाळांच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत.
  • लक्षद्वीप, मालदीव व छागोस द्वीपसमूह ही अरबी समुद्रातील बेटे म्हणजेच जलमग्न पर्वतीय रांगेचे अतिउत्तरेकडील भाग आहेत.
  • लक्षद्वीप यांचा शब्दश: अर्थ ‘एक लाख बेटे’ असा असला तरी प्रत्यक्षात अरबी समुद्रातील द्वीप समूहात केवळ 36 बेटांचा किंवा शैला भित्तीचा समूह आढळतो.
  • अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वतांच्या शिखरावरांभोवती किटकांच्या संचयलाणामुळे निर्मिती झालेल्या लक्षद्वीप बेटांना प्रवाळांची कंकण द्वीपे म्हणतात.
  • लक्षद्वीप बेट समूहात मिनीकाॅय ,कावरती, लखदीव, अमिनी, किलतान, कादमत इत्यादी बेटांचा समावेश होतो.
  • लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौकिमी असून तो भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
  • लक्षदीप मधील एकमेव विमानतळ ‘अगाती विमानतळ’ हा मुख्य भूमीवर केरळमधील कोची या शहरास जोडला गेला आहे.
  • लक्षद्विप परिसरात स्कूबा डायव्हिंग, विंडसर्फिंग, वॉटरस्किइंग इत्यादी जलक्रीडा यांच्या माध्यमातून हा परिसर पर्यटकांचे आकर्षण स्थान बनवण्यात आले आहे.
  • Indian Island Information in Marathi कॅनेनोर बेटे व अमिनदीवि बेटे हे लक्षद्वीप बेटांचे भाग आहेत.

बंगालच्या उपसागरातील बेटे (अंदमान- निकोबार बेटे)

  • बंगालच्या उपसागरातील बेटे ही समुद्रात बुडालेल्या ‘आव्हाकानयोमा’ या पर्वताची शिखरे आहेत.
  • अंदमान निकोबार बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखी निर्मित असून या भागातील एकूण 552 बेटांपैकी 34 बेटांवर मानवी वस्ती आहे.
  • अंदमान बेट समूहात लहान-मोठी सुमारे 304 बेटे आहेत तर निकोबार बेट संवाद सुमारे 22 बेटे आढळतात.
  • अंदमान बेटे निकोबार बेटें पासून 10 अंश चॅनेल द्वारा विभागली गेली आहे.
  • अंदमान बेटाचे मोठे अंदमान व लहान अंदमान असे दोन भाग आहेत.
  • मोठी अंदमान चे उत्तर ,मध्य व दक्षिण अंदमान असे भाग आहेत.
  • दहा अंश खाडीच्या दक्षिणेकडील निकोबार हा 22 बेटांचा समूह असून त्यातील 10 बेटांवर मानवी वस्ती आहे.
  • अंदमान निकोबार ची राजधानी असलेले पोर्टब्लेअर मुख्य भूमीशी चेन्नई, विशाखापटनम व कोलकाता या शहरांना जोडलेले आहेत.
  • अंदमान निकोबार मधील लक्षद्वीप च्या तुलनेत पर्यटन क्षेत्र पोर्टब्लेअर व त्याच्या जवळच्या काही बेटांपुरतेच मर्यादित आहे. कारण या भेट समूहातील कमी होत चाललेल्या आदिवासी जमातींना संरक्षण देणे हे सरकारने मुख्य ध्येय मानले आहे.
  • अंदमान बेट समूहात प्रवाळ बेटे आढळत नाहीत.

अंदमान मधील तीन बेटांचे नामकरण :-

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेस 2018 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018 रोजी अंदमान मधील तीन बेटांचे नामकरण केले.

1) राज आयलँड:-नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप

2) निल बेटे:-शहीद द्वीप

3) हॅवलाॅक बेटे:-स्वराज द्वीप

भारतातील अन्य बेटे :-

  • भारतात समुद्रातील सुमारे 1,382 बेटे आहेत.
  • बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर ‘अवसादी बेटे’ आहेत.
  • कच्छच्या आखातात झालेल सदृश्य प्रवाळांच्या शैल भिंतीच्या स्वरूपातील बेटे आहेत.
  • कोकण व मलबार किनार्‍यालगत छोटी बेटे आढळतात.
  • Bhartiya Betanbaddal mahiti Marathi information
  • न्यू -मरे हे बंगालच्या उपसागरातील बेट (हरिभंगा नदीलगत) भारताच्या मालकीचे आहे. या बेटावरून भारत व बांगलादेश या राष्ट्रांमध्ये वाद सुरू आहे.
  • ‘बॅरियर आयलंड’ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाळूच्या संचलनाने श्रीहरीकोटा येथे तयार झालेला आहे.

 

अंदमान निकोबार येथील जीवनशैली कशा प्रकारची आहे?


आपण विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर "होय" आहे.

मी आपणास अगोदर मला आलेल्या अनुभव व स्वतः नयनसाक्ष बघितलेल्या गोष्टीचे विश्लेषण करतो व नंतर ह्या बेटाचे, प्रशासनिक, भौगोलिक व राजकीय मुद्दे कागदोपत्री असलेल्या माहितीच्या आधारावर सांगु शकेल.

आता प्रथम हे सांगतो की, अंदमान व कारनिकोबार ही दोन वेगळी बेट आहेत. प्रशासकीय कारणासाठी, कार निकोबार हे बेट अंदमानचे उप विभाग म्हणून जाणले जाते. अंदमान व निकोबारची राजधानी ही पोर्टब्लेअर आहे. अंदमान व निकोबार मधील सागरी अंतर 75 ते 100 किमी. च्या आसपास आहे. अंदमानला विमानतळ असुन हे दोन टेकड्यांच्या मधोमध आहे. सदर विमानतळ हे नेव्हल बेस म्हणून ओळखले जाते व ते भारतीय नौसेनेच्या अधिपत्या खाली येते.

मला फेब्रुवारी 1985 मध्ये, वायुसेनेत असतांना वैमानिक तंत्रज्ञ म्हणून, मिग 21, कॅनबेरा व एच एस 748 या विमानवर वैमानिक तंत्रज्ञ म्हणून काम करत असताना जाण्याचा योग आला होता. त्या वेळेस अंदमानला पण सहसा कोणी जात नसे.

आमच्या भारतीय वायुसेनेच्या एच एस 748 विमानाने सकाळी 8:30 मिनीटांनी , पश्चिम बंगाल मधील, कलायकुंडा ह्या वायुसेनेच्या तळावरून निकोबारला जाण्यासाठी उंच आकाशात झेप घेतली. Squadron Leader Rodrigues व Flight Lieutenant Dudeja हे वैमानिक आमच्या विमानाचे सारथ्य करीत होते. तत्पुर्वी आमचे प्रशिक्षण झालेले असल्याने सर्वांनी लाईफ जॅकेट अंगात घातले. अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवास नंतर, आमचे विमान निळ्याभोर बंगालच्या उप सागरावरून निकोबारच्या दिशेने आग्नेय कडे हवाई मार्ग क्रमन करू लागले. जशी जशी सूर्याची किरण प्रखर व्हायला लागली, तसे तसे समुद्राचे पाणी आपले निळे, काळभोर, हिरवट असे वेगवेगळे रंग दाखवु लागले. ह्या विविध रंगाचे कारणे, म्हणजे ठीक ठिकाणी बदलत असलेली समुद्राची खोली. अंदाजे 4:30 तास प्रवासानंतर , दुपारचे 1:00 वाजण्यास सुमारास आमचे विमान कारनिकोबरच्या धावपट्टीशी दिशा मिळविण्यासाठी, आकाशातील उंची कमी करू लागले. त्यावेळेस जो समुद्र किनारा होता, त्यावर सूर्याची प्रखर किरणे व किनाऱ्या लगतची लाल माती, हे मिश्रण आकाशातून, सोनेरी नेकलेस प्रमाणे दिसत होते. जेव्हा विमानाची ऊंची धावपट्टीच्या दिशेने कमी होत चालली, ह्या वेळेस मात्र, उंचावरून मन मोहक दिसणारे समुद्राचे रूप, अथांग व भयावह दिसु लागले. कारण विमान आता पाण्यावर उतरणार की काय, असे वाटत असतानाच, धड- धड असा जोराचा आवाज झाला व तो सराईत आवाज असल्याने, कारनिकोबारला प्रथम लँडिंग केल्याचा आनंद झाला.

अशा प्रकारे प्रवास पुर्ण करून, आमचे जे मुख्य काम होते, त्या कामासाठी आलो व त्याची सुरुवात झाली. बाजूला लाटांच्या घोंगवण्याचा आवाज चालूच होता.

तेथे दोन महिन्यासाठी तंबूतच मुक्काम होता. आम्हाला हवाई कसरती व इतर दिलेली कामे पार पाडत होतो. आमचे काम आटोपले की जवळच " मल्लाक्क।" जेट्टी नावाची वस्ती व छोटेसे गाव आहे. तेथे स्थानिक नागारीकांच्या राहणीमान व इतर गोष्टीची विचारपूस केली. तेलगू लोकांनी पण थोडा शिरकावं केलेला लक्षात आला. अंदमानच्या आजूबाजूला टेकड्या टेकड्या आहेत, कारनिकोबार मात्र सर्व नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेले सखल बेट आहे. आम्ही गेलो तेव्हा तेथे पर्यटन अजिबात नव्हते. मोठया भरतीने केव्हाही समुद्राचे पाणी वस्तीत शिरते, त्यामुळे सर्व घर ही 5 ते 6 फुट बांबूची मचाण व त्यावर बांबूचे घर असते. 1985 मध्ये पण स्थानिक लोकांना पैसे बद्दल जास्त असक्त। नव्हती. मेसर्स एलेंन हिनेगो ह्या व्यापाऱ्याने सर्व बेटावरील नारळ, सुपाऱ्याचा लिलाव घेतल्याने, तो बार्टर पद्धतीने, अन्न, धान्य व कपडे पुरवत होता. शिक्षणासाठी सेन्ट्रल स्कुल आहे. हिंदी भाषा बोलतात व समजतात पण जमात व स्थानिक भाषा ऊलचु आहे. दुसऱ्या महायुद्धात तेथे जपानी सैन्य होते, असे ऐकण्यात आले. कारण स्थानिक लोक हे मिक्स ब्रीडचे असुन ते नेपाळी किंवा जपानी सारखे दिसतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांची नावे पण सुरेश जॅक्सन, रमेश युरियल अशा प्रकारची आहेत.

1985 ला तेथे ज्ञानी झेलसिंग राष्ट्रपती असतांना त्यांनी, तेथे टीव्ही केंद्राचे उदघाटन केले. त्या वेळेस सर्व रस्ते नारळ व सुपारीच्या झावळ्यांची कमान करून सजविले होते. टीव्ही केंद्रामुळे रवी शास्त्रीने ऑडी जिंकली, ते पहाण्याचा योग कार निकोबारलाच आला. हवामानाची काहीच खात्री नाही. अति दमट असल्याने कधी पण ढग जमून पाऊस पडतो. रात्री समुद्रांच्या लाटांचा आवाज भयावह वाटतो. दुसरा समुद्री किनारी "ककाना" बीच आहे. तेथे जाण्यास मनाई आहे. पण आम्ही गेलो होतो. दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे समुद्री टोक आहे.

आता थोडक्यात इतर माहिती;

समुद्र : बंगालचा उपसागर

भौगोलिक स्थान : 9:17 उत्तर अक्षवृत व 92:78 पुर्व रेखावृत्त

बेटांची संख्या: 1

क्षेत्रफळ : 126.9 चौरस किमी.

लांबी : 15 किमी.

रुंदी : 12 किमी.

समुद्रकिनारा : 51 किमी.

समुद्र सपाटी पासुन जास्तीत जास्त उंची : 10 मीटर.

प्रशासन : भारत सरकार

जिल्ह्य : निकोबार

मोठी वस्ती : मल्लाक्का जेट्टी

एकूण लोकसंख्या : 17841(2014).

धन्यवाद.

तळटिप : भौगोलीक माहिती विकिपीडिया वर आधारीत आहे.

 

जेव्हा जेव्हा अंदमान निकोबार बेटांचे नाव डोळ्यासमोर येतं, तेव्हा तेव्हा चित्तथरारक समुद्र आणि नेत्रदीपक किनारे असलेलं एक नयनरम्य स्थळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. जरी पर्यटन हे येथील उत्पन्नाचा मुख्य आधार बनले आहे, तरी हे देखील खरे आहे की आपल्यापैकी बरेचजण येथील मूळ वंश आणि त्यांच्या जीवनशैलीविषयी अज्ञानी आणि अनभिज्ञ आहेत.

द्वीपातील प्राचीन जमातीची जीवनशैली :

या उष्णकटिबंधीय नंदनवनावर सर्वप्रथम कब्जा केला तो अंदमानी, जारवा, सेंटिनेली आणि ओंगेज या आदिवासींनी आणि निकोबार येथे निकोबारी आणि शॉम्पेन यांनी. त्यांनी या परीसरातील जवळजवळ 572 बेटे व्यापली आहेत, ज्यांचे क्षेत्र 8,249 कि.मी.पर्यंत पसरले आहे. ते शेकडो वर्षांपासून बेटांच्या घनदाट जंगलांमध्ये रहात आहेत. कित्येक वर्षे त्यांनी स्वतःला जगापासून अलिप्त ठेवले होते. ब्रिटीशांनी या बेटावर कब्जा केल्यापासून आदिवासी थोडेफार लोकांसमोर आले आहेत.

चला, त्यांची जीवनशैली, त्यांचा व्यवसाय, कपडे, खाण्यापिण्याच्या सवयी, संस्कृती आणि सण यांची थोडी माहीती करून घेऊया:

व्यवसाय :

मूळ रहिवासी शेती, वनीकरण आणि मासेमारीमध्ये गुंतले होते. अंदमान बेटांमधील बहुतांश रहिवाश्यांचा शेती हा व्यवसाय आहे. मुख्य पिकांमध्ये तांदूळ, नारळ, सुपारी, फळे आणि मसाले असतात. रबर, पामतेल आणि काजू यांचे देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

कपडे :

पुरुष आदिवासी झाडाची साल आणि नारळाच्या झावळ्यांनी आपले अंग झाकतात. सर्वसाधारणतः, कमरेखालील भागावर ही वस्त्रे नेसली जातात. स्त्रिया मुख्यतः असे कपडे परिधान करतात ज्यामुळे त्यांची वक्षस्थळे व कमरेखालील भाग झाकला जाईल. याखेरीज, मण्यांनी बनवलेले हार, कानातले बांगड्यासदृश दागिनेही त्या वापरतात.

अन्न :

मासेमारी आणि शिकार, हे आदिवासींचे अन्न मिळवण्याचे मुख्य मार्ग आहेत. त्यांना उपयुक्त वनस्पतींची देखील चांगली माहीती असते. तथापि, सुरवातीस त्यांना अगदी आग कशी करावी आणि अन्न कसे शिजवावे, हे देखील माहीत नव्हते. वन्य डुकरे, गोगलगायी, डुगॉन्ग्स, कासव आणि घोरपडी हे त्यांच्या अन्नाचा प्रमुख घटक. समुद्रातील मासेमारीवर त्यांची जास्त भिस्त असते. स्त्रिया बादलीसारख्या भांड्यांच्या साह्याने मासे पकडतात. मुळात ते भटक्या जमातीतील लोक होते आणि इतरांपासून ते नेहमीच वेगळे रहात आले. एकंदरीत त्यांची खाण्याची सवय सोपी आणि साधी!

संस्कृती :

सर्व स्थानिक जमाती या बेटाच्या समृद्धी, वांशिकता आणि रीतीरिवाजांचे जतन करण्यासाठी आग्रही होते. मूळ लोकांची दोन भिन्न गटांमध्ये विभागणी केली गेली होती जी त्यांची भिन्न संस्कृती होती. एक म्हणजे ओंगे, जारवा, अंदमानी, सेंटिनेलि आणि ऑटोथॉन्स सारख्या निग्रिटो, जो शोम्पन्स, निकोबारी आणि मोनोलोइड होते.

बेटाच्या आधुनिक रहिवाशांची जीवनशैली :

नागरीकरणाच्या वाढत्या प्रसारासह, या बेटांच्या रहिवाशांनी आधुनिकता आणि वैश्विक संस्कृती स्वीकारली आहे. देशाच्या विविध भागांतून वेगवेगळ्या कारणांसाठी पंजाबी, बंगाली, दक्षिण भारतीय आदी लोक इथे स्थायिक झाले आहेत. ते सुशिक्षित आणि साक्षर आहेत. देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असूनही, उंची हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सच्या आगमनाने आधुनिक शहरी जीवन सुधारले आहे. एकेकाळी निर्जन असलेल्या या बेटांवर आता बार आणि पब देखील आढळतात.

सण :

भारतीयांच्या अंगात भिनलेला सणांचा उत्साह येथेही आहे. नेहमीचे दुर्गापूजा, लक्ष्मीपूजा, जन्माष्टमी, द्वीप पर्यटन महोत्सव आणि सुभाष मेळा भव्य प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात.

जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अत्यंत मनोभावे साजरा केला जातो. घरे रंगवून सजविली जातात. रात्रीचे मुख्य आकर्षण रासलीला असते ज्यात स्थानिक लोक नाटिकांद्वारे श्रीकृष्णाच्या जीवनलीलांचे वर्णन करतात. मध्यरात्र होईपर्यंत सर्व भक्तगण उपवास धरतात आणि मध्यरात्रीनंतर श्रीकृष्णाला नेवैद्य दाखविल्यानंतच तो प्रसाद ग्रहण करतात.

पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय! या पर्यटनाला चालना देण्यासाठी 'आयलंड टूरिझम फेस्टिव्हल'हा दहा दिवस चालणारा महोत्सव साजरा केला जातो. संगीत, नृत्य आणि कलाविषयक गोष्टींची रेलचेल असते, जोडीला येथील पारंपारिक खाद्यपदार्थ! आकर्षक कला प्रदर्शन, एक्वा स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग देखील आयोजित केले जातात. हा महोत्सव मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो.

सुभाष मेळा हा या बेटाचा आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे ज्यात देशी व परदेशी कलाकारांच्या हस्तकलेचे प्रदर्शन केले जाते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या उत्सवात देखील मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.

येथील जीवन खूप सोपे आणि साधे आहे. लोकही खूप मैत्रीपूर्ण आहेत. भारतातील सर्व राज्यांतील लोक येथे येऊन स्थायिक झाले असल्याने इथली बोली हिंदी आणि अन्य बोलीभाषा यांचे संमिश्र रूप आहे.

आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू कोलकाता, चेन्नई, दिल्लीहून येतात, म्हणून त्या थोड्या महाग असतात. येथे पावसाचा निश्चित असा हंगाम नाही. तो कधीही, कुठेही, केव्हाही पडतो!

इथली शिक्षण व्यवस्था चांगली आहे. येथील शासकीय व अशासकीय अशा दोन्ही शाळांच्या शिक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे. इथली वैद्यकीय महाविद्यालये, पॉलिटेक्निक, आयटी आणि टीटीआय संस्थासुद्धा चांगले योगदान देत आहेत.

अंदमान बीच हा जगातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे. येथील समुद्र जैविक संपत्तीने समृद्ध आहेत. अंदमान निकोबार बेटे खूप स्वच्छ आहेत. इथली झाडे प्रत्येक हंगामात फुलांनी भरलेली असतात.

जर कोणाला जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी अंदमानला भेट दिलीच पाहिजे.

नमोस्तुते !

चित्रे : http://terramaterstudios.com

, HugeDomains.com, Home | International | Business Traveller वरून साभार

 

अंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित

14866
4

समृद्धी धायगुडे

प्रत्येकाच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये एक ट्रिप असते तशी माझ्याही बकेट लिस्ट मध्ये एक होती, ती म्हणजे अंदमान. आतापर्यंत कोणत्याही पर्यटनस्थळांची मी एवढी माहिती शोधली नाही जेवढी या पर्यटन स्थळाची शोधली. साधरणपणे एक वर्ष यात गेले. यात पहिलाच प्रश्न पडेल की, कोणत्या टूर कंपनी बरोबर गेलात. पण वर्षभराच्या संशोधनात बरेच जणांचे अनुभव, आमच्या प्रायरोटीज यांची सांगड घालून कोल्हापूरमधील एका विद्यमान डॉक्टर अश्विनी राजगोळकर यांच्या बरोबर जाण्याचे निश्चित केले. यांच्या बरोबर जाण्याची प्रमुख कारणे एक म्हणजे त्या डॉक्टर आहेत, दुसरे म्हणजे त्यांच्या बरोबर जाऊन आलेल्यांचा अनुभव अतिशय चांगला होता. तिसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे तुलनेने पॉकेट फ्रेंडली. मोठ्या ट्रीपला जाताना शक्यतो बजेट ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते.
अखेर चार फेब्रुवारीला अंदमानसाठी आम्ही उड्डाण घेतले.

कसे जाल : अंदमानला जाण्यासाठी तसा कम्फर्टझोन असलेला मार्ग म्हणजे विमान प्रवास. एक म्हणजे इतर साधनांपेक्षा वेळ कमी जातो. फिरायला जास्त वेळ मिळतो. तेथे गेल्यावर बऱ्यापैकी बोट प्रवास.

नियोजन कसे कराल : कोणत्याही टूर कंपनीबरोबर गेलात तरी स्वतःचे नियोजन देखील महत्वाचे ठरते. पॅकिंग पासून वेळेचे, वैद्यकीय अडचणी असतील तर त्याचे असे करावे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने अंदमानसारख्या ठिकाणी जाताना भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आणि मानसिक तयारी करून जावे. विशेषतः सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आपल्या डेली रुटीनवर प्रभाव पडतो. अंदमानमध्ये सकाळी ५-५.१५ ला सूर्योदय होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत सूर्यास्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या बोटीपासून क्रूझ पर्यंत सगळ्या प्रकारचे जलप्रवासाची हौस फिटते. त्यामुळे पाण्याचे वावडे असलेल्यांनी एक मानसिक तयारी करावी.

पॅकिंग : आता पहिला टप्पा जाताना विशेषतः महिला मंडळाने आवश्यक तेवढेच आणि जमल्यास गुडघ्या पर्यंतचे कपडे घेतल्यास सोयीचे जाते. संपूर्ण किनारी आणि बेट असा भौगोलिक भाग असल्याने उकडण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे. मुंबईकरांना किंवा समुद्र किनारी राहणाऱ्याना तसे हे नवीन नाही, पण इतरांना असू शकते. इथे उकाड्यासोबत वारा आणि समुद्राच्या खारटपाण्याचाही सामना करावा लागतो.

एखाद्या स्त्रीच्या अलंकारात कर्णफुले जशी सौंदर्य खुलवातात तशी भारतातच्या एका बाजूला लक्षद्वीप आणि एका बाजूला अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेट आहेत. भारतापासून जरी लांब असली तरी ती आपल्या कर्णफुलांसारखी आहेत. ती जपणे प्रत्येक स्थानिकांबरोबर भारताच्या प्रमुख भूभागावर राहणाऱ्यांचे कर्तव्य आहे असे मला वाटते आणि म्हणूनच भारताने जपलेले सुंदर गुपित म्हणायला हरकत नाही.

बंगालच्या उपसागरात निळ्याशार पाण्याने वेढलेला हा द्वीपसमूह ! एकीकडे निळ्याशार पाण्याने वेढलेली पाचूची बेट आणि कुठे शहरातील त्रासलेल्या, प्रदूषित जीवनशैलीतून तेथे गेलेलो आपण. निसर्ग सौंदर्यामुळे देश-विदेशातून पर्यटक येथे निसर्ग सौंदर्य आणि निरव शांतता अनुभवायला येतात. नकाशावर इवलीशी दिसणाऱ्या या बेटांची संख्या एकूण ५७२ असून त्यापैकी ३६ बेटांवर वस्ती आहे. त्यापैकी महत्वाची हॅवलॉक, व्हायपर, रॉस, जॉली बॉय, बारतांग अशी आहेत. त्यामुळे ५७२ पैकी जेमतेम पाच ते सहा बेटांवर पर्यटनाला परवानगी आहे.

अंदमानातील प्रमुख म्हणजे राजधानीचे शहर म्हणजे पोर्ट ब्लेअर. इथल्या विमानतळावर उतरल्यानंतर आपल्याला या छोट्या भूभागाची कल्पना येतेच. पण या छोट्याशा विमानतळाला जेव्हा सावरकरांचे नाव दिसते ते बघून आणखी भरून येते. खरंतर स्वातंत्र्यलढ्यातील बरेच सेनानी जास्ती करून पंजाबी आणि बंगाली प्रांतातील असूनही नाव एका मराठी माणसाचे हे बघितल्यावर प्रत्येकाचे उर भरून येणारच. या पोर्ट ब्लेअरविषयी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण काही प्रमुख सांगायच्या झाल्या तर इथली शिस्त, स्वच्छता, पाहुणचाराची पद्धत, संस्कृती, सुरक्षेच्या बाबतीत ‘नो खाबू गिरी’ सर्व स्थानिक ‘स्वान्त सुखाय’ आयुष्य जगणारे लोकं. त्यांचे आयुष्य बघून मला फारच हेवा वाटतो. अवास्तव जीवनशैली नाही. याचे प्रमुख करण म्हणजे सूर्योदय आणि दुसरे म्हणजे केंद्रशासित असल्याने दोन्ही वन विभाग व तटरक्षक दलाची शिस्त अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. वनविभाग आणि तटरक्षक दलाचे महत्व इथे जास्त जाणवते आणि प्रभाव देखील तुलनेने जास्त आहे. अर्थात ही चांगली गोष्ट आहेच पण पर्यटक म्हणून जाताना आपणही यांत अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे ट्रिपचा पुरेपूर आनंद लुटता येतो.

चार तारखेला रात्रीच्या विमानाने हैदराबाद आणि त्यानंतर पोर्टब्लेअरला ५ फेब्रुवारीला सकाळी ८ पर्यंत पोहोचलो. त्यानंतर साधारण साडेआठ पर्यंत हॉटेलमध्ये चेक इन केले.

जल प्रवासास सुरू : अंदमानच्या आमच्या ट्रिपची सुरवात एका सबमरीन संग्रहालयापासून झाली, त्यानंतर समस्त महाराष्ट्र ज्या भावनिक धाग्याने जोडला गेलाय त्या स्थळी जाण्याचा योग आला. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली ते सेल्युलर जेल. खरंतर अंदमानचे त्या दिवसाचे ओझरते सौंदर्य बघून कशी काय त्या ब्रिटिशांना इथे तुरुंग बांधण्याची दुर्बुद्धी झाली असा विचार मनात येतो. पण आता ते वाटूनही उपयोग नाही. महाराष्ट्रासह बऱ्याच बंगाली आणि पंजाबी स्वातंत्र्यसेनानींना इथे मरण यातना भोगाव्या लागल्याची प्रचिती तेथे गेल्यावर येते. सेल्युलर जेलचे बांधकाम आणि ब्रिटिशांच्या अघोरी अत्याचारांची कल्पना येऊन नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. स्थानिक प्रशासनाच्या कृपेने येथे ‘लाईट अँड साउंड शो’ असतो. यातून एक जुने झाड त्याच्या तोंडून अंदमानातील तो काळा इतिहास कथन करतो. पहिल्याच दिवशी हे ठिकाण बघून निश्चित भावूक होयला होते.

पहिला दिवशी सुरू झालेला हा निळाशार प्रवास साधारण सलग सहा दिवस कायम होता. या दरम्यान अस्सल कोल्हापुरी वल्लींशी ओळख झाली. सगळे अर्थातच माझ्यापेक्षा अनुभवी होते. समवयस्क नसतानाही ग्रुप ट्रीपला खूप मजा आली. पहिल्याच दिवशी ‘समुद्रिका व एन्थ्रोपोलॉजी’ संग्रहालय पाहून अंदमानमधील संस्कृती आणि समुद्री जीवांची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक भोजनाचा आनंद लुटता आला. यानंतर लाकडाची ब्रिटिश कालीन वखार पहिली. या वखारी जवळ एका मार्गदर्शकाने पूर्ण इतिहास आणि आतापर्यंतचे तेथील कामाची उत्तम माहिती पुरवली. येथे अंदमानमधील अत्यंत टिकाऊ पेडॉक नावाच्या वृक्षाची माहिती दिली. या वखारीत एक संग्रहालय आहे ज्यात त्या वृक्षापासून केलेल्या विविध वस्तू अगदी अंदमानचा नकाशा सुद्धा केलेला दिसतो.

यानंतर बऱ्याच दिवसांपासून मी ज्या वास्तूच्या प्रतीक्षेत होते ते पाहण्याचा क्षण आला. पोर्टब्लेअरमध्ये उतरल्यावर सेल्युलर कारागृहच आपले स्वागत करते. प्रवेशद्वाराजवळच नेताजी आर्ट गॅलरी, संग्रहालय आहे. कारागृहातील सर्व क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ दोन स्वातंत्र्य ज्योती अखंड तेवत असतात. तेथे बंदी म्हणून ठेवलेल्या प्रत्येकाचा इतिहास महत्वाच्या घडामोडींची सचित्र माहिती मिळते. याच संग्रहालयात ठेवलेली सेल्युलर कारागृहाची छोटी प्रतिकृती नजरेस पडते. अर्थातच त्याचे छायाचित्र काढल्याशिवाय राहवत नाही. स्वातंत्र्य संग्रामात उतरलेले बटुकेश्वर दत्त, बिभूतिभूषण सरकार, बरिंदर कुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, ऋषिकेश कांजीलाल, सुदीन कुमार सरकार, वामनराव जोशी, सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश सावरकर देखील येथे बंदिस्त होते.

सेल्युलर जेल ११ फेब्रुवारी १९७९ रोजी भारताचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले. या तुरुंगाच्या काही भागात सध्या सरकारी रुग्णालय सुरू आहे. एक भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. या कारागृहाची रचना बघून ब्रिटिशांच्या बुद्धीचे कौतुक वाटते. पण ती बुद्धी आपल्या विरोधात कृत्य करण्यासाठी वापरल्याने जरा चीड ही येतेच. यातील एक गोष्ट म्हणजे तुरुंगातील कोठडीच्या कड्या. जवळपास हात भर लांब असलेल्या कड्या कैद्यांनी सहजा सहजी उघडू नये यासाठी तीन अडथळे यात केले होते. या अनन्वित अत्याचारातही तेथील राजकीय कैद्यांनी बरेच ऐतिहासिक संप केले. याची माहिती लाईट ऍण्ड साउंड शो मधून मिळतेच. सेल्युलर जेलमध्ये फाशीची जागा त्यानंतर जेथे कोलूचे काम होत असे ती जागा ‘शहीद ज्योत’ या गोष्टी दिसतात. यासाठी तेथे गाईड देखील उपलब्ध आहेत.

जॉली बॉय बेट : दुसऱ्या दिवशी जोली बॉय आयलंड आणि समुद्री अभयारण्यात मनसोक्त फिरता आले. मनसोक्त म्हणजे अक्षरशः एखादे बेट किती सुंदर असावे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे त्याची प्रचिती हे बेट पाहून येते. अंदमानातील प्रत्येक बेटाची मजा साधारणपणे दीड ते दोन फारतर तीन वाजे पर्यंत घेता येते. यात एका बेटावर एका दिवशी किती पर्यटक सोडायचे हे देखील निश्चित केलेले असते. हे नियोजन अर्थातच तेथील वनविभाग आणि तट रक्षक दल करते. यात आपला नंबर आधी लागावा यासाठी थोडे कष्ट आपल्यालाही घ्यावे लागतात. या बेटावर जाताना आपल्याला कोणत्याही स्वरूपातील प्लास्टिक सोबत नेता येत नाही, तुमच्याकडे जर का वेफर्स किंवा बिस्किट्स असतील तर ती देखील तुमच्या डब्यात वगैरे काढून घेऊन जायला लागते. पण एकदा या बेटावर आल्यानंतर ग्लासबोटीतून संपूर्ण समुद्री जीवन जवळून पाहता येते. हा अनुभव अतिशय अविस्मरणीय आणि सुरेख होता. आपल्या कामाविषयी जसा एखाद्याला आत्मविश्वास असतो तसे येथील गाईड पर्यटकाला आव्हान देतात, या ग्लासबोट राईडचे तिकीटामध्ये कोणीही खरंतर बार्गेन करू नये असे हे देखणे विश्व आपल्याला खचितच अनुभवता येते यात कॉम्प्रोमाइज करू नये. समुद्राखालील जीव आणि विश्व तेथील स्थानिक आपल्या जिवाप्रमाणे जपताना दिसतात. हे बेट वर्षातून ६ महिने खुले असते व उरलेले ६ महिने रेड स्किन हे बेट खुले असते. या मागे कारण म्हणजे एका बेटाचे सौंदर्य थोडे का होईना मानवी स्पर्शाने खराब होते, त्यामुळे तेथील जीव पुन्हा वृद्धिंगत व्हावेत यासाठी केलेला प्रयत्न. आमच्या नशिबाने यावेळी जॉली बॉय हे बेट खुले होते. पहिल्या दिवशी संग्रहालयात पाहिलेल्या प्रवाळाचे प्रत्येक प्रकार, सी कुकुम्बर, कासव, ऑक्टोपस, स्टार फिश, कलरफुल सतार फिश, गोल्ड फिश, सी हॉर्स, असे विविध जीव जे केवळ आपण ट्रॅव्हल एक्सपी सारख्या वाहिनीवर बघतो ते आज जवळून अनुभवत होते. ग्लास बोटीचा अनुभव प्रत्येक वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते.

तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आठच्या मॅक्रुझ नावाच्या क्रूझने ‘स्वराज द्विप’ म्हणजे हॅवलॉक येथे आलो. अंदमान बेट समूहातील सर्वांत मोठे बेट म्हणजे हॅवलॉक. पोर्ट ब्लेअर पासून जलमार्ग ५० किमी अंतरावर असलेल्या या बेटावर राधानगरी, काला पत्थर आणि एलिफंट बीच हे सुंदर किनारे आहेत. राधानगर हा आशियातील सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे.

आपल्याकडे म्हण आहे खूप उन्हा तान्हाची खरेदी करून आले की, ‘जीवाची मुंबई केली का?’ असे वाक्य कानी पडते, तसेच आम्ही पोर्टब्लेअरला उतरल्यापासून जीवाचे पाणी, सर्व प्रकारचा बोट प्रवास करत होतो. तिथे पोहीचल्यावर इतर टूर कंपन्यांपेक्षा आम्ही भाग्यवान आहोत असे समजले कारण हॅवलॉकला राहणे प्रेस्टीजस समजले जाते. माझ्यासाठी अर्थातच हे महत्वाचे नव्हते, कारण फिरणे हेच प्राधान्य होते. माझ्या आनंदात भर पडलीच ज्या ‘एल डोरा डू’ नावाच्या हॉटेल मध्ये राहिलो त्यांचा खासगी बीच होता. मग काय क्रूझ प्रवासाचा थकवा एका क्षणात गेला. दुपारी तेथील लोकप्रिय राधानगर बीचवर जाण्याचा प्लॅन होता, तो थोडा स्कीप करून आम्ही काला पत्थर नावाच्या बीचवर जाण्याचे निश्चित केले. हा बदललेल्या प्लॅनचा सर्वांना सुखद धक्का होता. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक बेट म्हणल्यावर बीच आलाच त्यात काय सारखे कौतुक, पण जेव्हा तुम्ही हा विचार बाजूला ठेवून बीच पाहता तेव्हा त्याचे सौंदर्य आणि वेगळेपण लक्षात येते. काला पत्थर सारखा बीच भारतात शोधून सापडणार नाही. प्रत्येक पर्यटकाला इकडे किती फोटो काढू आणि किती नको असे होतेच. तीन शेड्स मधला समुद्र नजर टाकावी तितका लांब. त्सुनामीमध्ये वाहून आलेली काही प्रचंड खोड असलेली झाडे मराठी चित्रपट सैराटमधील त्या झाडाची आठवण करून देतात.

एकाच दिवशी दोन सरप्राइज मिळाल्यावर कसा आनंद होतो तसा मला त्या दिवशी दुसरा सुंदर बीच राधानागर पाहिल्यावर झाला होता. एक म्हणजे या किनाऱ्यावर सर्वांना सुरक्षितपणे मनसोक्त पाण्यात खेळता येणार होते, दोन दिवस डोळ्यांचे पारणे फेडणारे समुद्राच्या पाण्याचे रंग आज आणखी जवळून अनुभवण्याची संधी होती. येथे नाममात्र पैसे देऊन कपडे बदलण्याची सोय होते, त्यामुळे बहुतेक पर्यटकांची इकडे झुंबड उडालेली असते. या बीचचे खरे सौंदर्य पाच ते साडेपाच दरम्यान सुरू होते. कारण सुर्यास्ताला सुरवात होते. अतिशय सुरेख सनसेट डोळ्यात आणि कॅमेरात साठवून परतताना एक दिवसाने येथील मुक्काम वाढवण्याचा आगंतुक विचार येतोच.

या बीचवर आणखी एक अनुभव आला म्हणजे तटरक्षक दलाचा सराव. चार-पाच नौसेनेची लढाऊ जहाजे किनारीवर सराव करत होती. यात सतत डोक्यावर घिरट्या घालणारे नौसेनेचे हेलिकॉप्टर बघून आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव झाली. संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत साधारण हे तीन ते चार तास सुरू होते. हवाई दलाच्या कसरती तुलनेने बऱ्याचदा बघतो, पण तटरक्षक दलाशी एवढ्या जवळून पाहण्याचा योग आला.

स्वराज दीप म्हणजेच हॅवलॉकला स्कुबा डायव्हिंग करता येते, पण जॉली बॉय बेटावरच्या ग्लासबोट राईडची सर त्याला येत नाही. ज्यांना फक्त अडव्हेंचर म्हणून जायचे ते खुशाल जाऊ शकतात पण तेवढेच सौंदर्य स्कुबा करताना दिसेल याची शाश्वती नाही.

सहाव्या दिवशी आम्ही अदल्या दिवशी बदललेल्या प्लॅन प्रमाणे सकाळी एलिफंट बीचला जायचे ठरवले. इथे बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत्या. ज्यांना स्कुबा करणे शक्य नाही ते स्नॉर्केलिंग करू शकतात. आम्ही ज्या बोटीचे तिकीट काढले त्यांचे कॉम्प्लिमेंट्री स्नॉर्केलिंग होते. ज्यांना त्याचे व्हिडीओ आणि अर्ध्या पाऊण तासाचे स्नॉर्केलिंग करायचे त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. पण हा अनुभव देखील फार कमाल होता. किनाऱ्याच्या इतक्या जवळ जाऊन पुन्हा ते जीव स्पर्श करण्याइतके जवळ येत होते. आमच्या उत्साही ग्रुपमधील प्रत्येकाने हा अनुभव घेतला काही काळ पाण्यात खेळलो. संध्याकाळी चारच्या मॅक्रुझने परत पोर्ट ब्लेअरला आलो. पण अजूनही ते दृश्य डोळ्यासमोरून जात नाही.

बारतांग बेट : अंदमान आणि निकोबार ‘नेकेड बेट’ म्हणून ओळखले जायचे. अगदी गेल्यावर्षी पर्यंत एका अमेरिकी पर्यटकाला आदिवासींनी ठार मारल्याची घटना घडली. त्यामुळे येथील आदिवासी अजूनही निसर्गाच्या अगदी जवळ आणि आपल्या कलयुगापासून अतिशय दूर असल्याचे जाणवते. अशा काही आदिवासींच्या अधिवासातून पुढे बारतांग बेटावरील चुनखडीच्या गुहा पाहण्यासाठी निघालो. या प्रवासाला रात्री अडीचला सुरवात केल्यानंतर आम्ही चार वाजता त्या जंगलाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबलो, दगडूशेठ गणपतीला किंवा सिद्धिविनायकला एवढी मोठी रांग नसेल जेवढी पहाटे चार पासून पर्यटकांची रांग होती. येथे सहा वाजल्या नंतर सोडण्याचे करण म्हणजे हा संपूर्ण प्रवास पट्टा जारवा नावाच्या आदिवासींचा आहे. त्यांच्या जीवनशैलीला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी आहे. अगदी फोटो काढणे, भूतदया म्हणून पाणी देण्यासही बंदी आहे. हे नियम मोडून भूतदया केलीच तर वनखात्याच्या नियमानुसार पाच वर्षांचा कारावास नक्कीच. पहाटेच्या प्रवासात हे आदिवासी फारसे दिसत नाहीत पण येताना दुपारी तुरळक प्रमाणात दिसतात.

जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी भव्य दिव्य बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. निरव शांतता, किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. याला बारतांगचा ‘लकडी पूल’ म्हणायला हरकत नसावी. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल. मानवी हस्तक्षेप किती वाईट असतो याची देखील जाणीव होते. या गुहेत जाणाऱ्या पर्यटकांच्या स्पर्शाने काही ठिकाणची चमकण्याची प्रक्रिया पूर्ण थांबली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने अजून थोडे लक्ष घालून मर्यादित पर्यटक सोडण्याविषयी काही नियम करावेत असे वाटते. या गुहांच्या आसपास थोडी चारपाच घरे आहेत, त्यामुळे थोडीफार शेती दिसते.

रॉस बेट : सोमवारी आज मात्र ट्रिपमधील शेवटचा दिवस. पण ‘चेरी ऑन द टॉप’ तसा हा दिवस ठरला. इतर दिवसांच्या तुलनेने आज थोडा सकाळी मोकळा वेळ होता. त्यामुळे पोर्टब्लेअरच्या अगदी जवळचे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच ‘रॉस’ बेट आहे. ते पाहण्यासाठी निघालो वाटेत एक समुद्रजीवांचे अवशेष जपलेले एक संग्रहालय पाहिले. प्रत्येक दिवशी नवीन अनुभव तसा आजही आला, सुरवात बोट प्रवासापासूनच. रोज बोटीतून चढताना उतरताना फार काही वारे वाहत नव्हते मात्र आज मौसम का नूर कुछ और था! असे होते. बोटीत बसल्यापासून ऍडव्हेंचरला सुरवात झाली. जीव मुठीत धरून सगळे एकदाचे दहा मिनिटांत बेटावर पोहोचलो. वरवर झाडांनी गच्च भरलेले बेट इतके काय काय दडवून ठेवत असेल असे अजिबात वाटले नव्हते.

हे बेट ब्रिटिशांच्या राजधानीचे शहर होते. सर डॅनियल रॉस नावाच्या एका सागरी सर्वेक्षकावरून बेटाला हे नाव पडले. ब्रटिशांच्या काळात त्यांचे मुख्यालय येथे होते. १९४१ मध्ये आलेल्या भूकंपानंतर ब्रिटिशांनी ही राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हलवली. त्या काळात बांधलेल्या इमारती, बाजरपेठ, बेकारी, चर्च, टेनिस कोर्ट, पाणी शुद्धीकरणासाठीचे यंत्र, विद्युत निर्मिती केंद्र, क्लब हाऊस, जपानी बंकर, छापखाना देखील आज भग्नावस्थेत पाहायला मिळतात.

या बेटावरील वृक्षसंपदा अतिशय समृद्ध आहे. हरणे, मोर, बदके, रंगबिरंगी पक्ष्यांचे कुजन आपल्या मनातील वादळांना सहज शांत करते. हे बेट एकूण ६० एकरांचे आहे. हे सर्व पाहण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास पायी किंवा कात्रज उद्यानासारखी इलेक्ट्रिक व्हेकलने करता येतो. काही स्थानिकांना येथे किरकोळ व्यवसायास परवानगी दिली आहे. त्यामुळे छोटे रेस्टॉरंट, शहाळे विक्रेते दिसतात. या बेटावरील आणखी सुखद अनुभव म्हणजे अनुराधा राय यांची भेट. या बेटावर मनसोक्त बागडणाऱ्या पक्षी, हरणे, मोर, सशांना त्यांनी आपल्या घरातील पेट प्रमाणे नावे दिली आहेत. त्यांच्या प्रेमळ हाकेला धावत येणाऱ्या जीवांचे खूप अप्रूप वाटते. त्यांचा हा संवाद आणि माहिती आम्हाला मिळाली हे खरंच ट्रिप संपताना मिळालेले सरप्राईज गिफ्टच होते.

आज आमचा बोऱ्या बिस्तार आवरण्याचा दिवस सगळेचजण पुन्हा परतण्याच्या मनस्थितीत नव्हते. करण ट्रिपच्या पहिल्या दिवसापासूनच येथील निसर्ग सौंदर्याने, संस्कृतीने भारावून गेलो होतो. आठ दिवस येथील किनाऱ्यावरील शंख शिंपले गोळा करण्यासारख्या अमूल्य अशा आठवणी गोळा करून परतीच्या प्रवासाला लागलो.

अंदमान थोडक्यात

दिवस : अंदमान नीट अनुभवण्यासाठी आठ ते दहा दिवस पूर्ण काढावेत.

निवास : शक्यतो पोर्टब्लेअर आणि एखादा दिवस दुसऱ्या म्हणजे हॅवलॉकसारख्या ठिकाणी करावा.

फूड : निवास निश्चित करताना याची चौकशी आधी करावी कारण स्थानिक अन्न मूळ मासे आणि भात असल्याने उगाचच अवाजवी अपेक्षा करू नये. माझे प्राधान्य लोकल फूड मग ते शाकाहार असो किंवा मासे आहार ते स्थानिकांप्रमाणे असावे. कारण ही चव कितीही पैसे मोजले तरी महाराष्ट्रात मिळणार नाही. दुसरे म्हणजे पाणी. बऱ्याच हॉटेलमध्ये एकवागार्डचे पाणी मिळते.

नियमावली : बेसिक नियमावली एअरपोर्ट पासूनच सुरू होते. ती म्हणजे वजनाची, काहींना हे नवीन असते काहींना नसते. दुसरी म्हणजे बऱ्याच जणांना मोह असतो तेथून प्रवाळ, शिंपले इत्यादी आणण्याचा हा टाळावा. आणखी एक म्हणजे जिथे कॅमेरा बॅन आहे तिथे बॅनच करावा, ग्रुप टूर मध्ये कोणा एकामुळे बाकीच्यांवर संक्रांत नको. सुरक्षेच्या बाबतीत ग्रुप कॅप्टन पासून स्पीड बोट चालक ही आपली काळजी घेतो. त्यामुळे त्याने दिलेल्या सूचना ऐकल्यास त्यांच्याही पोटावर पाय येत नाही. बऱ्याच बेटांवर किती पर्यटक कोणत्या वेळेत सोडायचे हे नियम केले आहेत. त्यामुळे त्या वेळेत गेल्यास हे भान सहज पाळले जाते. शेवटची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विमानतळावर पाय ठेवल्यापासून इतस्ततः थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर टाळावा. वापर केल्यास शक्यतो जिथे कचरापेटी ठेवली असेल तिथे टाकावा. हे जरा अति होतंय असे काहींना वाटेल पण हे गरजेचे आहे.

शॉपिंग : अंदमान हे शॉपिंग डेस्टिनेशन नाही त्यामुळे तेथील लोकल मेड असे घेण्यासारखे असेल तर फक्त शहाळे आणि शंख, शिपल्यांचे शोभेच्या वस्तू, कीचेन्स इत्यादी. अगदीच हौस म्हणून अंदमानचे टिशर्ट आठवण म्हणून घेण्यास हरकत नाही. पण यासाठी पुरेशी कॅश जवळ ठेवावी कारण उठसूट पेटीएम, यूपीआय वापरणारे विक्रेते नाहीत. काही ठिकाणी तर दहा रुपयांची नाणी देखील घेत नाहीत. त्यामुळे ज्या वस्तू खरेदी करायच्या त्यासाठी सुट्टे पैशांसाहित कॅश वापरलेली बरी.

तळ टीप : सध्या अन्न वस्त्र आणि निवारा या बरोबर वायफाय ही निकड झाली आहे. त्यामुळे सतत ऑनलाइन असणाऱ्यांना खरंच निर्जन बेटावर आणल्यासारखे वाटू शकते. पण सबांधित रिसॉर्ट आणि हॉटेल्सनी वायफायची सुविधा पुरवली आहे. यांचा कमाल स्पीड टू जी असल्याने वायफाय तुला मला होते. बीएसएनएल, एअरटेलला रेंज मिळते असे ऐकिवात आले. पण त्या अफवा असल्याचा अनुभव आला. त्यामुळे दोनच पर्याय उरतात एवढ्या लांब प्रवास करून जे निसर्ग सौंदर्य पहायला आलोय त्याचा मनमुरात आनंद डोळ्यात साठवणे आणि दुसरा हॉटेल मध्येच बसून रहाणे.

एकंदरीतच अंदमानची सफर माझी सुखद आणि संस्मरणीय ठरली. यामागे राजगोळकर दाम्पत्य आणि त्यांचे नियोजन याचा सिंहाचा वाटा आहे. कारण कोणत्याही वयाचा ग्रुप मॅनेज करणे सोपे नाही. विशेषतः वेगवेगळ्या शहरातून आलेले, वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे यासाठी संयत, संयमी वृत्ती आवश्यक असते. प्रत्येकाला सांभाळून घेऊन सुखरूप परत आणणे आवश्यक असते. सर्व स्थानिक गाईड, वेटर, ड्रायव्हर यांच्यावर बिनधास्तपणे सामान सोपवून आम्ही निर्धास्तपणे फिरू शकलो. यांत ग्रुप म्हणून दिलेल्या वेळेत आवरणे असो बिनातक्रार दोनदा चहा गरम करून देणे असो सगळे नखरे अविरत झेलणारे आमच्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांचे खास कौतुक आणि हे सर्व सुंदर क्षण आमच्या आयुष्यात आणण्याचे राजगोळकर दाम्पत्याचे पुन्हा आभार, कारण आपले व्यवसाय सांभाळून हे नियोजन करण्यासाठी, आम्हा पुणेकरांनाही अंदमानात अस्सल कोल्हापूर अनुभवता आले.

 http://www.dailykesari.com/2022/11/30/andaman-diaries-tour-review-samruddhi-dhayagude/

 

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा इतिहास बघता असे लक्षात येते कि मराठी नौदलाधिकारी कान्होजी आंग्रे हे ह्या बेटांचा युद्धात वापर करणारे पहिले अधिकारी होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी इथे आपला सैनिक तळ वसविला.

त्या वेळेला अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या बाजूचा जो समुद्र आहे त्याचा वापर पोर्तुगीज, इंग्रज आणि डच नौदल किंवा व्यापारी जहाजे जवळच लागून असलेल्या त्यांच्या वसाहतींना भेट देण्यासाठी किंवा परतीच्या मार्गावर करायची. ह्या जहाजांवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा गरज पडल्यास आक्रमण करण्यासाठी कान्होजी आंग्रे ह्यांनी ह्या बेटाचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. ब्रिटिश आणि पोर्तुगीज नौदलाने वारंवार प्रयत्न करूनही ते पराक्रमी कान्होजी आंग्रे ह्यांना कधीच पराभूत करू शकले नाहीत.

त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजेच १७८९ मध्ये ब्रिटिशांनी इथे त्यांची वसाहत स्थापन केली पण ती फक्त काही काळच टिकली. एका गूढ आजारामुळे तिथे लोकांचा मृत्यू होऊ लागल्यामुळे त्यांना वसाहत खाली करावी लागली. १८५७ च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिशांनी इथे सेल्युलर जेलची स्थापना केली आणि इथे स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा म्हणून पाठविले जायचे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा काही काळ जपानच्या ताब्यात होता. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे जपानशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे जपानने हि बेटे त्यांच्या ताब्यात दिल्याचे आढळून येते. पण तदनंतर एक दोन वर्षात ब्रिटिशांनी ह्या बेटांचा पुन्हा ताबा मिळविला.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर हि बेटे देशामध्ये विलीन करण्यात आली. १ नोव्हेंबर १९५६ मध्ये ह्या बेटांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

११ व्या शतकामध्ये चोल राजघराण्यातील पराक्रमी राजा राजेंद्र चोल ह्यांनी ह्या बेटांचा ताबा घेतल्याचे काही संदर्भ आहेत. त्यांनी ह्या बेटांचा वापर हा सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी सैनिक तळ स्थापन करण्यासाठी केला.

फोटो स्रोत

संदर्भ : विकिपीडिया व अंदमान आणि निकोबार बेटांबद्दल माहिती देणारे पुस्तक

 

अंदमान निकोबाराला जाण्याचा प्रसंग 1985 ला आला होता

अंदमान व कारनिकोबार ही दोन वेगळी बेट आहेत. प्रशासकीय कारणासाठी, कार निकोबार हे बेट अंदमानचे उप विभाग म्हणून जाणले जाते. अंदमान व निकोबारची राजधानी ही पोर्टब्लेअर आहे.

अंदमान व निकोबार मधील सागरी अंतर 75 ते 100 किमी. च्या आसपास आहे. अंदमानला विमानतळ असुन हे दोन टेकड्यांच्या मधोमध आहे. सदर विमानतळ हे नेव्हल बेस म्हणून ओळखले जाते व ते भारतीय नौसेनेच्या अधिपत्या खाली येते.

मला फेब्रुवारी 1985 मध्ये, वायुसेनेत असतांना वैमानिक तंत्रज्ञ म्हणून, मिग 21, कॅनबेरा व एच एस 748 या विमानवर वैमानिक तंत्रज्ञ म्हणून काम करत असताना जाण्याचा योग आला होता. त्या वेळेस अंदमानला पण सहसा कोणी जात नसे.

आमच्या भारतीय वायुसेनेच्या एच एस 748 विमानाने सकाळी 8:30 मिनीटांनी , पश्चिम बंगाल मधील, कलायकुंडा ह्या वायुसेनेच्या तळावरून निकोबारला जाण्यासाठी उंच आकाशात झेप घेतली. Squadron Leader Rodrigues व Flight Lieutenant Dudeja हे वैमानिक आमच्या विमानाचे सारथ्य करीत होते. तत्पुर्वी आमचे प्रशिक्षण झालेले असल्याने सर्वांनी लाईफ जॅकेट अंगात घातले.

अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवास नंतर, आमचे विमान निळ्याभोर बंगालच्या उप सागरावरून निकोबारच्या दिशेने आग्नेय कडे हवाई मार्ग क्रमन करू लागले. जशी जशी सूर्याची किरण प्रखर व्हायला लागली, तसे तसे समुद्राचे पाणी आपले निळे, काळभोर, हिरवट असे वेगवेगळे रंग दाखवु लागले. ह्या विविध रंगाचे कारणे, म्हणजे ठीक ठिकाणी बदलत असलेली समुद्राची खोली. अंदाजे 4:30 तास प्रवासानंतर , दुपारचे 1:00 वाजण्यास सुमारास आमचे विमान कारनिकोबरच्या धावपट्टीशी दिशा मिळविण्यासाठी, आकाशातील उंची कमी करू लागले. त्यावेळेस जो समुद्र किनारा होता, त्यावर सूर्याची प्रखर किरणे व किनाऱ्या लगतची लाल माती, हे मिश्रण आकाशातून, सोनेरी नेकलेस प्रमाणे दिसत होते. जेव्हा विमानाची ऊंची धावपट्टीच्या दिशेने कमी होत चालली, ह्या वेळेस मात्र, उंचावरून मन मोहक दिसणारे समुद्राचे रूप, अथांग व भयावह दिसु लागले. कारण विमान आता पाण्यावर उतरणार की काय, असे वाटत असतानाच, धड- धड असा जोराचा आवाज झाला व तो सराईत आवाज असल्याने, कारनिकोबारला प्रथम लँडिंग केल्याचा आनंद झाला.अशा प्रकारे प्रवास पुर्ण करून, आमचे जे मुख्य काम होते, त्या कामासाठी आलो व त्याची सुरुवात झाली. बाजूला लाटांच्या घोंगवण्याचा आवाज चालूच होता.तेथे दोन महिन्यासाठी तंबूतच मुक्काम होता. आम्हाला हवाई कसरती व इतर दिलेली कामे पार पाडत होतो.

(हे निकोबार समुद्र किनाऱ्याचे मनमोहक छायाचित्र आहे- गुगल)

आमचे काम आटोपले की जवळच " मल्लाक्का" जेट्टी नावाची वस्ती व छोटेसे गाव आहे. तेथे स्थानिक नागारीकांच्या राहणीमान व इतर गोष्टीची विचारपूस केली. तेथे सेंथली जमातीचे लोक रहातात. तेलगू लोकांनी पण थोडा शिरकावं केलेला लक्षात आला. अंदमानच्या आजूबाजूला टेकड्या टेकड्या आहेत, तर कारनिकोबार मात्र सर्व नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेले सखल बेट आहे. आम्ही गेलो तेव्हा तेथे पर्यटन अजिबात नव्हते. आता अंदमान साठी विशेष सोयी भारत सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत.

मोठया भरतीने केव्हाही समुद्राचे पाणी वस्तीत शिरते, त्यामुळे सर्व घर ही 5 ते 6 फुट बांबूची मचाण व त्यावर बांबूचे घर असते. 1985 मध्ये पण स्थानिक लोकांना पैसे बद्दल जास्त आसक्ती नव्हती. शिक्षणाची सोय म्हणून केंद्रीय शाळा उघडण्यात आल्या आहेत. तेथील नागरिकांना मुख्य भुमी (Main Land) म्हणजेच भारताबद्दल खुप आकर्षक आहे .

कोठडी बंद कारागृह पोर्टब्लेअर छाया चित्र - स्रोत गुगल

मेसर्स एलेंन हिनेगो ह्या व्यापाऱ्याने सर्व बेटावरील नारळ, सुपाऱ्याचा लिलाव घेतल्याने, तो बार्टर पद्धतीने, अन्न, धान्य व कपडे पुरवत होता. शिक्षणासाठी सेन्ट्रल स्कुल आहे. हिंदी भाषा बोलतात व समजतात पण सेंथली जमात यांची स्थानिक भाषा ऊलचु आहे. दुसऱ्या महायुद्धात तेथे जपानी सैन्य होते, असे ऐकण्यात आले. कारण स्थानिक लोक हे मिक्स ब्रीडचे असुन ते नेपाळी किंवा जपानी सारखे दिसतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांची नावे पण सुरेश जॅक्सन, रमेश युरियल अशा प्रकारची आहेत.

1985 ला तेथे ज्ञानी झेलसिंग राष्ट्रपती असतांना त्यांनी, तेथे टीव्ही केंद्राचे उदघाटन केले. त्या वेळेस सर्व रस्ते नारळ व सुपारीच्या झावळ्यांची कमान करून सजविले होते. टीव्ही केंद्रामुळे रवी शास्त्रीने ऑडी जिंकली, ते पहाण्याचा योग कार निकोबारलाच आला. हवामानाची काहीच खात्री नाही. अति दमट असल्याने कधी पण ढग जमून पाऊस पडतो. रात्री समुद्रांच्या लाटांचा आवाज भयावह वाटतो. दुसरा समुद्री किनारी "ककाना" बीच आहे. तेथे जाण्यास मनाई आहे. पण आम्ही गेलो होतो. दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट हे भारताचे शेवटचे समुद्री टोक आहे.

26 डिसेंबर 2004 ला जवळ जवळ 4000 लोकांना त्सुनामी चा फटका बसला.

 

खाली दिलेले चित्र नीट बघा.

खरे तर आजच्या आण्विक आणि शस्त्रस्पर्धेच्या युगात ५०० वर्षाचा कालावधी कोणताही अंदाज बांधायला फार फार मोठा कालावधी आहे … कारण दरम्यानच्या काळात काय घडेल हे कल्पनेच्या बाहेरचे काम आहे. किम-जोंग-ऊन सारखा एखादा मुर्ख माणूस एका क्षणात होत्याचे नव्हते करू शकतो … आणि चवताळलेला चीनही अविचार करू शकतो. पण साधारणतः आजची geo-political परिस्थिती लक्षात घेऊन विचार करू.

CPEC तर बोंबललेच आहे म्हणजेच गवादर बंदर चीनच्या उपयोगी पडण्याची शक्यता जवळपास संपली आहे … म्हणजे दक्षिण आशियाई समुद्रात थेट प्रवेश करण्यासाठी चीनला आता इराणची (आणि त्यामुळे अफगाणिस्तानची) मदत घेणे आवश्यक झाले आहे … कारण कासीम बंदर हे फार पूर्वीच कालबाह्य झाल्यासारखेच आहे. आणि यामुळेच इंडो-पॅसिफिक हा भाग सध्या फार फार महत्वाचा झाला आहे कारण जगातील जवळपास ६०%+ व्यापार याच समुद्रातून होत असतो … आणि सध्या चीनने दक्षिण चीन समुद्रात जो आतंक निर्माण केला आहे तो बघता जपानसह सर्व देश चीनला वचकून आहेत.

दक्षिण आशियातील सर्वात मोठा आणि बलवान देश आहे भारत आणि याच कारणाने QUAD ची स्थापना करण्यात आली आहे … आता तर युरोपीय देश सुद्धा इंडो-पॅसिफिकमध्ये विशेष रस घेत आहेत … म्हणजेच भारतालाही या भागाला महत्व देऊन हा भाग नागरीदृष्ट्या नव्हे तर सामरिकदृष्ट्या महत्व देणे प्राप्त आहे.

आता मलेशिया या देशाच्या दक्षिणेस जी सागरी पट्टी दिसते तिला मलाक्का स्ट्रेट म्हणतात … आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या दृष्टीने हा भूभाग सर्वात महत्वाचा आहे कारण सर्व वाहतूक ही याच मार्गातून होत असते. आता जर दक्षिण आशियाई समुद्रात चीनला यायचे असेल तर याच मार्गाचा वापर करावा लागतो आणि म्हणून जेमतेम ७ किलोमीटर लांबी आणि ७ किलोमीटर रुंदी असलेल्या या नॉर्थ सेंटीनेलचे फार महत्व आहे. अर्थातच येथे सामान्य नागरी वस्ती करणे हे हिताचे नाही तर ट्रान्सशिपमेंट करण्याच्या दृष्टीने व्यापारी आणि समुद्रावर नजर (नियंत्रण) ठेवण्याच्या दृष्टीने सामरिक विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. आता तिथे सध्या जे लोक राहतात ते कोणत्याही बदलला विरोध करणार हे ओघाने आलेच कारण भारताचा हिस्सा असला तरीही या लोकांचा भारताच्या संस्कृतीची संबंध नाही … पण जर चीनला नियंत्रणात ठेवायचे असेल तर हे आवश्यकच आहे.

आता वर लिहिल्याप्रमाणे ५०० वर्षाचा कालावधी हा विचार करण्यासाठी फारच मोठा कालावधी आहे कारण दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थिती काय राहील … जगातील महासत्तांचे बलाबल कसे बदलेल … जगाची रचना कशी बदलेल … सत्ताकेंद्र कशी बदलतील … कोणते देश लयास जातील आणि कोणते उदयास येतील … मुळात समुद्राची पातळी वाढत असल्यामुळे जगाची भौगोलिक स्थिती कशी बदलेल … वगैरे अनेक गोष्टी अतर्क्य आहेत. मुळात भारतातील राजकीय परिस्थिती काय असेल हेसुद्धा फार महत्वाचे आहे … चीनने आक्रमण करू नये म्हणून कायम नमते धोरण स्वीकारणारे नेभळट सरकार सत्तेत असेल का डोळ्यात डोळे घालून आव्हान देणारे सरकार सत्तेत असेल हे सुद्धा महत्वाचे आहे.

पण भारताला अंदमान निकोबार सारखी बेटं सामरिकदृष्ट्या सबळ करावीच लागतील अन्यथा भारताला धोका निर्माण होऊ शकतो. अर्थातच येतील लोकांनाही बदलावे लागेल आणि त्यांना शक्यतो प्रेमाने समजावून अन्यथा सक्तीने civilize करावे लागेल.

 A.M. (2019–सध्या)3 वर्षे

अंदमान म्हणले की प्रथम आठवण होते ती महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीची, असीम त्यागाची आणि त्यांनी भोगलेल्या यातनांची.

ही जेल इंग्रजांनी बांधली तेव्हा त्याची रचना “ऑक्टोपस” या समुद्र प्राण्यासारखा होती. “Central watch towar” आणि त्याला जोडल्या गेलेल्या सात तीन मजली इमारती ज्यामध्ये कैद्यांना एकांतवास देण्यासाठी बांधलेल्या कोठड्या. भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्रजांनी चार इमारती नष्ट केल्याने आता तीनच इमारती अस्तिवात आहेत. “Central towar” वरून तीनही इमारतीवर लक्ष ठेवता येइल तसेच वेळप्रसंगी तीनही बिल्डींग “Central towar” पासून अलग करता येतील अशा पद्धतीने “Central towar’ चे बांधकाम आहे. त्यामुळे कमी रक्षकांनी ज्यास्तीत ज्यास्त कैद्यांवर लक्ष ठेवता येत असे. इंग्रजांनी या जेलवर Devid Bary या क्रूर कर्म्याला जेलर म्हणून नियुक्त केले होते, संपूर्ण जेलवर त्याची अनिर्बंध सत्ता होती. या जेल मध्ये एकंदर ६९४ कोठड्या आहेत. या कोठ्ड्यांची रचना कैद्याला निराश करणारी आहे. कोठडीची उंची १३.५० फुट तर एकंदर वावरायला जागा ७० चौरस फुटाची. कोठडीच्या मागच्या भिंतीला उंचावर छोटा झरोका आहे. पुढच्या बाजूला लोखंडी मजबूत दरवाजा.कडी कुलूपाची सोय बाजूच्या भिंतीतील खास खोलगट भागात त्यामुळे कोणालाही आतून दरवाजा उघडता येणे शक्यच होणार नाही अशी रचना. सर्व कोठडीत जाण्यासाठी मार्ग “Central towar” मधून होता. या जेलमधून सुटका करून घेणे अशक्य होते. एकदा कोठडीचे दार रात्री बंद झाले की सकाळपर्यंत उघडत नसे.कैद्यांना रात्री नैसर्गिक विधीसाठी पण बाहेर जाता येत नसे.कैद्यांना एकमेकांशी बोलायची मुभा नव्हती.आपल्या शेजारच्या कोठडीत कोणता कैदी आहे हे पण समजणे मुश्कील असे. याच कोठड्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या कोठडीत सावरकर कोठडी आहे. या कोठडीत सावरकरांना १० वर्षे ठेवले होते. सावकरांच्या कोठडीच्या बरोबर समोर जेलच्या आवारात एक छोटी खोली दिसते तिथे कैद्यांना फाशी देण्याची व्यवस्था होती. या ठिकाणी अनेकांना फाशी दिले गेले ते सर्व सावरकराना बघावे लागले. इंग्रजांना वाटत होते की या कारणाने सावरकर खचून जातील व शरण येतील पण हा पोलादी पुरुष शेवटपर्यंत इंग्रजांना शरण गेला नाही. जेलच्या आवारात मोकळ्या जागेत एक “वर्क स्टेशन” आणि संग्रहालय आहे या मध्ये त्याकाळातील कैद्यांना कष्टाची कामे दिली जायची, शिक्षा दिल्या जात त्या संबधातील विविध वस्तू ठेवल्या गेल्या आहेत. तेव्हा कैद्यांना देण्यात येणारे कोलूचे काम व इतर कष्टाची कामे तसेच शिक्षेचे प्रकार याची माहिती या ठिकाणी मिळते.हे सर्व पाहून त्याकाळी शिक्षा भोगायला आलेल्या कैद्याची मनस्थिती कशी असू शकेल याची कल्पना येते. रात्री जेलच्या आवारात दाखवला जाणारा “Light and sound” शो बघितल्यावर अधिक माहिती समजली. स्वातंत्र्यवीर सावरकरां व्यतिरिक्त फजल-ए-हकखैराबादी, दीवान सिंह कालेपानी, योगेन्द्र शुक्ला, मौलाना अहमदुल्लाह, मोलवी अब्दुल रहीम सादिकपूरी, बटुकेश्वर दत्त, मौलवी लियाकत अली, बाबाराव सावरकर, भाई परमानंद, षडान चन्द्र चटर्जी, सोहन सिंह, वामन राव जोशी आणि नंद गोपाल आणि इतर अनेक जणानी या जेल मध्ये शिक्षा भोगली आहे. या भीतीदायक जेल मध्ये कैद्यांना अमानुष अत्याचारांना, शिक्षाना सामोरे जावे लागे. ते ऐकून अंगावर काटा येतो.१९३३ साली या जेल मध्ये होत असणऱ्या अमानुष अत्याचारां विरुद्ध कैद्यांनी “भूक हरताळ” केला होता.या मधे महावीर सिंह या कैद्याचा मृत्यू जबरदस्तीने अन्न भरवल्यामुळे झाला होता.

मला असे वाटते की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर अनेक वीरांनी जे कष्ट भोगले, त्याग केला ते जाणण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी या सेल्युलर जेलला अवश्य भेट द्यावी…….

 

अंदमान बोलावतेय

      सेल्युलर जेल मधील 121 क्रमांकाची हीच ती पावन, पवित्र कोठडी जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दहा वर्षे निवास होता. याच भिंतीवर त्यांनी बाभळीच्या काट्यांनी “कमला” महाकाव्य लिहिले. याच कोठडीच्या गवाक्षातून अनेक साथीदार फासावर लटकताना पाहिले.
आमचा 41 जणांचा,”टिळक ग्रुप” सेल्युलर जेल समोर. श्री शरद पोंक्षे व पार्थ बावस्कर समवेत.

       ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी”, आणि जिभेवर पंक्ति  येत असतील तर त्या

  ” जयोस्तुते श्री  महन् मंगले, शिवास्पदे शुभदे….”

   आज सारे जग महामारीच्या संकटात असल्यामुळे पर्यटनक्षेत्र ठप्प आहे. मनावर भीती निराशा दाटून येत आहेत. हीच वेळ आहे सावरकरांना आठवण्याची, त्यांच्या चरित्रातून ,कर्तृत्वातून प्रेरणा घेण्याची, जिद्द बळकट करण्याची, हे समजूनच आम्ही ‘शब्दामृत’ या संस्थेने जेव्हा अंदमानला सहल काढण्याची कल्पना आणली, म्हटले ,”आपणही  हिम्मत करूया”. तीस वर्षांपूर्वी अंदमान बेटे व सेल्युलर जेलला  गेलो होतो तरी पुन्हा जायचे ठरविले.  ‘सावरकर’ या नावाची जादूच अशी आहे की तेथे व वय, शक्ती ,पैसे, साथसोबत याचा कोणताच विचार होत नाही. उर्मी फक्त एकच… चला तात्यारावांना व आमच्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना वंदन करून येऊ!

          तीस वर्षांपूर्वी आम्ही अंदमानची सफर केली होती. त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. अगदी प्रसन्न व मुक्त मनाने अंदमानच काय, जगात कोठेही मुक्त फिरता येत होते. आमची मुले लहान होती. माझी आईदेखील  सुदृढ व सशक्त होती. बंधू प्रदीपची साथसंगत  होती, त्यामुळे आमचा तो प्रवास अगदी संस्मरणीय न घडता तरच आश्चर्य!

    निसर्गसौंदर्याने नटलेली, बंगालच्या उपसागरातील ही बेटे प्रेक्षणीय असली, जगातील सर्वासाठी नयनरम्य पर्यटन स्थळे असली, तरी भारतीयांसाठी,  प्रत्येक मराठी माणसासाठी हर भारतप्रेमीसाठी ते एक पावन तीर्थक्षेत्र आहे !!

       तीर्थक्षेत्र म्हणजे तरी काय? ज्या ठिकाणी आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, जगण्याचे साधन आणि साध्य यांचा अविष्कार जेथे होतो ! ‘भारतीयधर्म’, मानणाऱ्या प्रत्येकासाठी, पोर्ट ब्लेअर मधील सेल्युलर जेलला दिलेली भेट ही तीर्थयात्रा ठरते. मराठी माणसासाठी, सावरकर म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत! त्यांचे जीवनचरित्र असो किंवा काव्य असो, सामान्य माणसांच्या अनेक समस्यांची उत्तरे देण्याची ताकद त्यात निश्चित दडली आहे.

    की घेतले न व्रत हे अंधतेने, लब्धप्रकाश, इतिहास निसर्ग माने. 

     जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे, बुध्दाची वाण धरिले करी हे सतीचे!

     कोणतेही ध्येय उराशी बाळगले तर त्याचा पाया कसा असावा, त्यामागे भूमिका कोणती असावी याचे उत्तम वर्णन सावरकरांच्या या ओळीत आहे. पन्नास वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा ऐकूनच एखादा कोलमडून पडला असता. मात्र, हे ‘सतीचे व्रत’, आपण जाणून-बुजून घेतले आहे, ही जाणीव असलेल्या स्वातंत्र्यवीरांना, ते ऐकून काहीही फरक पडला नाही!

   सावरकरांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटले तर एक कवी, निबंधकार ,जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक ,ग्रंथकार , इतिहासकार ,भाषाशास्त्रज्ञ , कुशल संघटक ,धाडसी आणि कणखर व्यक्तिमत्व..सोबतीला देशप्रेमाची धगधगती ज्वाला हृदयात बाळगून, ‘वन्हीतो चेतवावा रे’,या न्यायाने केलेले समाजप्रबोधन, अशी सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. अठराशे सत्तावनचा उठाव हे बंड नसून इंग्रजांविरुद्धचे ते  पहिले स्वातंत्र्य समर आहे, हा विचार रुजविणारे सावरकर, ‘अभिनव भारत’,ची स्थापना करणारे सावरकर ,सागरा प्राण तळमळला ,जयोस्तुते श्री महन्मंगले, हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, यासारखी काव्य रचना करणारे सावरकर, आपल्या धर्माचे व गाईंचे वेगळ्या अर्थाने महत्त्व सांगणारे सावरकर, पतीत पावन मंदिर आणि अशी 500 मंदिरे भारतभर, सर्वासाठी खुली करून सहभोजन घालणारे, जात्युच्छेदन करणारे सावरकर ,भाषेचा अभ्यास आणि अभिमान बाळगून मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्दांची लेणी चढविणारे ,भाषाशुद्धी करणारे सावरकर ,अशी त्यांची किती रूपे सांगावीत?

           मलेशियन भाषेत या बेटांना, ‘हंदुमान’ म्हणतात. त्याचा संबंध हनुमानाशी आहे. त्यामुळे संजीवनी च्या शोधात असलेला हनुमान या बेटावर प्रथम आला होता असे म्हटले जाते . ही एकूण 572 बेटे आहेत त्यातील काही थोड्या बेटावर आज  मनुष्यवस्ती आहे. काही  बेटावर विविध प्रकारच्या आदिम जाती वास्तव्य करून आहेत. तेथे कोणाला जाता येत नाही. येथे सकाळी पाच वाजता उजाडते व संध्याकाळी पाच वाजता दिवस मावळतो. सर्व बेटे बंगालच्या उपसागरात विखुरलेली आहेत. एका बेटाचा दुसऱ्या बेटाशी संपर्क म्हणजे  केवळ समुद्रप्रवास आहे. त्यासाठी बोटी, क्रूज, स्पिडबोट, पडाव यांचा वापर केला जातो. आम्ही  बोटीने  चार बेटांचा प्रवास, त्या वेळी केला होता, असे स्मरते.     

  ” ग्रीन ओशन” बोटीने,यावेळी, आम्ही सफर केली.

         त्या पहिल्या प्रवासाची जी काही संस्मरणे आहेत त्यातील मद्रास ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास ज्या पद्धतीने आम्ही करु शकलो ते एक दिव्य होते. मुंबई ,चेन्नई विमान प्रवास करून आम्ही चेन्नईतील आमच्या एच् पी सी  कंपनीच्या गेस्टहाउस मध्ये मुक्काम केला होता.  दुसऱ्या दिवशी पहाटे चेन्नई पोर्टब्लेअर असा विमान प्रवास होता. सर्व काही ठीक होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ऑटोरिक्षाने विमानतळावर जाण्याचे नक्की केले होते .मात्र आदल्या दिवशीच रात्री भरपूर पाऊस पडला. सर्व रस्ते रात्रीत जलमय झाले. व मेट्रो रेल्वे  सर्वच वाहतूक बंद झाले. आमचे  सहकारी मित्र श्री. गावकर व श्री. पांडे यांनी अक्षरशः, कमाल करीत, सायकलवरून आमच्या सामानाची वाहतूक विमानतळापर्यंत केली. आईला सायकलवर बसवून विमानतळावर पोहोचते केले. कसेबसे विमान सुद्धा यावयाचे होते. आम्ही चेक-इन करू शकलो. हे झाले नसते तर आम्हाला विमान पकडणे केवळ अशक्य होते. या दोन मित्रांची आठवण तेव्हापासून मला कायमची आहे.

     त्यानंतर पोर्ट ब्लेअरमध्ये महाराष्ट्र मंडळात निवास. आणि तेथूनच काही बेटांची सफर. त्यामुळे ती एक छान कौटुंबिक सहल झाली. महाराष्ट्रसदन मधील निवास जरी साधा होता. तरी स्वच्छ व नीटनेटके वातावरण असल्याने काही त्रास झाला नाही. यावेळी तेथे निवासाची व्यवस्था पाहणारे एक मराठी दाम्पत्य भोजनाचीही सोय करीत होते. त्यामुळे साधे पण घरगुती जेवणही मिळाले.  जेटीवरून कोणत्या तरी बेटाची सफर करीत असू. संध्याकाळी त्याच बोटीने परत येत असू. मुक्काम पोर्टब्लेअर शिवाय आणि कुठे केला नाही.  संध्याकाळी श्री. हर्षे  या गृहस्थांनी अंदमानच्या सेल्युलर जेल कारागृहाची माहिती आम्हाला दिली . स्वातंत्रोत्तर काळात ते या तुरुंगाचे जेलर होते व निवृत्तीनंतर अंदमान मध्येच स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अंदमानच्या तुरुंगातील कैद्यांच्या जुन्या व नव्या कथा ऐकणे वेगळा अनुभव  होता. त्यावेळी आम्ही रॉस आयलँड, जाॅली बाय आयलंड, हॅवलाॅक आयलँड अशा काही बेटांचा प्रवास केल्याचे आठवते. निश्चितच त्या काळचे अंदमान व आत्ता परवा पाहिलेले अंदमान खूपच फरक झाला आहे. निसर्गाचा ऱ्हास व वाढत्या नागरी संस्कृतीचा प्रादुर्भाव  ही त्याची कारणे.

     आजही अंदमान म्हणजे केवळ निसर्गाच्या सौंदर्याची उधळण आहे. निसर्ग म्हणजे काय, तो किती पहावा, किती मनात साठवावा याला पारावार नाही. समुद्राची निळाई म्हणजे कशी असावी व त्या नील समुद्राचे दर्शन डोळ्यात किती साठवावे याला सीमा नाही. पृथ्वी निर्मितीच्या वेळी, मानवाचा पृथ्वीवर प्रवेश होण्याआधी, निसर्ग कसा होता याची थोडीशी जरी कल्पना घ्यावयाची असेल, तर त्याला अंदमानलाच  यावे लागेल. अजूनही काही बेटावर अजिबात वस्ती नाही. अशा बेटावर  जाऊन भ्रमंती करणे व तो निसर्ग पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद आहे. प्रवासाचे सात दिवस कसे निघून जातात ते कळलेही नाही.अंदमान निकोबार येथील सर्व बेटांची मिळून लोकसंख्या सुमारे चार लाखांच्या  दरम्यान आहे. येथील बोली भाषा हिंदी आहे. मात्र तमिळ, मल्याळी,बंगाली, इंग्रजी या भाषाही वापरात आहेत. येथील हवामान उष्ण व दमट आहे. पाऊस जवळजवळ सहा ते सात महिने बरसत असतो. येथील वनसंपदा 85 टक्के व फक्त पंधरा टक्के भूमीवर मनुष्यवस्ती आहे. जगातील सर्व प्रकारची वनसंपदा येथे पहावयास मिळते.

       या बेटांवर पूर्वीपासून रानटी व नरभक्षक आदिम जातींचे वास्तव्य होते असा उल्लेख रोमन भूगोलतज्ञ टॉलमी यांनी नोंदविला आहे या बेटांचे  सर्वेक्षण  1790 मध्ये लेफ्टनंट ब्लेअरने स्वतः केले व तो येथे राहिला त्यानेच इंग्रज सरकारला शिफारस केली या बेटावर कैद्यांसाठी वसाहत करता येईल.  या  बेटांच्या जडणघडणीत त्यांचा  मोठा सहभाग होता व त्यामुळेच येथील प्रमुख बंदर पोर्टब्लेअर हे त्याच्या नावावरून निर्माण झाले.  हे शहर या  बेटांची  राजधानी आहे. तेव्हापासून या बेटावर मोठ्या शिक्षेचे कैदी, जन्मठेपेचे कैदी, राजकीय कैदी यांना बंदीवासात येथे डांबले जाई. त्यांचा अतोनात छळ केला जाई. या कैद्यांच्या श्रमातूनच पोर्टब्लेयर शहर, बंदरे ,येथील सेल्युलर जेल या सर्वाची निर्मिती झालेली आहे. कैद्यांनी केलेल्या अफाट मेहनतीतून इंग्रजांनी सर्व  निर्माण केले. जंगलाचा परिसर साफ करून घेतला.  येथे एकदा आलेल्या कैद्याला पुन्हा परतीचा रस्ता नव्हता. मायभूमीकडे येण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे ही बेटे व  समुद्र या सर्वांना मिळून, ” काळेपाणी “,असेच संबोधले गेले.

         “शब्दामृत प्रकाशन”,ने आयोजित केलेल्या सहलीत  सामील होण्यासाठी ऑक्टोबर   2021,मध्ये जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा थोडा उशीर झाला होता. सहल आयोजकांनी आम्हाला,  विमानाचे तिकीट स्वतःकाढण्याची विनंती केली .सहलीत सहभागी करण्याचे आश्वासन दिले. त्या प्रमाणे आमची विमान तिकीटे आम्ही काढली .   शब्दामृतला तसे कळवून सहलीत सहभागी झालो. शब्दामृत ही संस्था औरंगाबाद येथे स्थापित असून श्री. शरद पोंक्षे व श्री. पार्थ बावस्कर हे संचालक आहेत. पैकी श्री. शरद पोंक्षे हे मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम रंगकर्मी असून त्यांच्या, “मी नथुराम बोलतो..” या नाटकाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली होती. हे दोघेही या एक आठवड्याच्या सहलीत सहभागी होणार होते. आमचा गट एकूण 41 लोकांचा होता. शब्दामृतचे अजून  दोन, तीन गट त्याच वेळी अंदमानात विविध ठिकाणी फिरत होते. दररोज संध्याकाळी श्री. पार्थ बावस्कर अथवा शरद पोंक्षे ,  स्वा.सावरकरांच्या विस्मृतीत जाण-या  विचारांचे, त्यांच्या त्या  काळातील दूरदृष्टीविषयी व्याख्यान  देत. आजच्या एकंदरीत परिस्थितीचा  विचार  करता त्यांच्या या प्रबोधनाची नितांत गरज आहे!

         दिनांक 3 जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता मुंबई विमानतळावरून निघून प्रथम चेन्नई , तेथे चार तासाच्या विश्रांतीनंतर चेन्नई ते पोर्ट ब्लेअर असा दुसरा विमान प्रवास. विमानाच्या वेळा थोड्याशा अडचणीच्या होत्या परंतु या सगळ्यातून मार्ग काढत आम्ही दोघांनी सोमवारी पहाटे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठला. आणि नियोजित विमानाची प्रतीक्षा करीत बसलो. सुदैवाने त्याच वेळी तेथे आमच्या अंदमान प्रवासातील कोल्हापूर गारगोटी येथून आलेली मंडळी प्रथम भेटली. आणि तेव्हापासूनच आमचा  सहप्रवास सुरू झाला. सौ रेणू ताई, बहीण अनुराधा, मातोश्री आणि त्यांच्या स्नेही सौ ज्योती ताई कुलकर्णी ,या मंडळींचा आम्हाला परतेपर्यंत छान सहवास लाभला. पुढे चेन्नईला नूतन ताई, विजय गोखले, यांचा सुमारे 12 जणांचा ग्रुप  आला.  खर्‍या अर्थाने तेथूनच आमची अंदमान ट्रिप सुरू झाली असे म्हणता येईल . एकाकीपणाची भावना निघून गेली.  मोठ्या ऊमेदीने आम्ही सुरवात केली. चेन्नई येथे जरी चार तास बसावे लागले तरी सहप्रवासी असल्याने गप्पांमध्ये वेळ गेला. व चेन्नई -पोर्ट ब्लेअर प्रवासही आरामात, गप्पांमध्ये पार पडला. हा प्रवास आम्ही पूर्वी  केला असल्यामुळे त्याचे काही विशेष नाविन्य नव्हते. मात्र विमानाने व तोही समुद्रावरून, प्रथम प्रवास करणाऱ्या आमच्या काही सहप्रवाशांना ही मोठी नवलाई होती. मंडळी विमानातूनच, बाहेर दिसणाऱ्या ढगांच्या मनोरम देखाव्याचे व खालील अथांग सागराचे फोटो घेण्यात दंगल झाली होती.

     पोर्टब्लेअर विमानतळावर शब्दामृत संस्थेचे श्री सोहम व यांचे दोघे सहकारी, आम्हास भेटले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. शब्दामृतची रंगीत कॅप, हॉटेल निवास, पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी जुजबी माहिती देऊन, आमच्या निवासस्थानापर्यंत ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली. त्यामुळे थोड्याच वेळात विमानतळावरून,”ब्लू मरलीन”, या आमच्या हॉटेलात आम्ही पोहोचलो. विश्रांती घेतली जेवण घेतले व आता पुढील कार्यक्रमास सज्ज झालो. हॉटेल तसे काही खास नव्हते मात्र टापटीप स्वच्छता व मूलभूत सोयींनी युक्त असे होते.

    हा आहे अंदमानचा समुद्र, निळे आकाश, निळे पाणी आणि भोवताली हिरवाईचा गालीचा,. त्यात अशा सुंदर होडीतून सफर करायला मिळाली तर आनंदाला काय सीमा?? ! 

   मागे म्हटल्याप्रमाणे आमच्या टिळक ग्रुप मध्ये एकूण 41 प्रवासी होतो व त्यांची विभागणी तीन हॉटेलमध्ये केली होती. “प्रवासात व राहताना अशा छोट्या ग्रुपमध्ये मुद्दामच विभागणी केली होती”,असे आयोजकांनी सांगितले. कारण करोनाच्या प्रादुर्भावामुळे, जर कदाचित कोणाला काही संसर्ग झाला, तर त्यामुळे सहलीच्या संपूर्ण सभासदांना त्रास होऊ नये, विलगीकरणासाठी तेवढाच, एखादा ग्रुप वेगळा होऊ शकतो, अशी या मागची भावना होती. मात्र सुदैवाने संपूर्ण सहलीत असे काही झाले नाही, फक्त शेवटच्या दिवशी थोडी गडबड झाली ,ती हकीकत पुढे येईल.सर्वांचा सहा दिवसाचा हा प्रवास व्यवस्थित झाला. आनंदात ,उत्साहात मंडळी नव्या ऊमेदीने, आपापल्या घरी गेली.

       आमच्या  ‘टिळक ग्रुप’मध्ये अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी आली होती. रत्नागिरी, रायगड, ठाणे मुंबई ,सोलापूर कोल्हापूर, औरंगाबाद,नाशिक  अशा विविध भागातून मंडळी सहभागी झाली होती.  वयोगटांची विभागणी तरी कशी? 86 वर्षांच्या भावे काका, बोडके आजोबा यापासून अगदी 10 ,12   वर्षाच्या अवनी, वेदांत या शाळकरी मुलांचाही सहभाग होता. आमच्यात उद्योजक, ऊच्च पदस्थ सरकारी अधिकारी, सेना दलातील निवृत्त मंडळी, प्राध्यापक, वकील, नोकरीत असलेले,  गृहिणी, व उद्योजक महिलाही सामील झाल्या होत्या. त्यामुळे हा संच अगदी आगळावेगळा व सर्व अनुभवांनी परिपूर्ण होता. सर्वांमध्ये एक गोष्ट अगदी हटके होती आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेप्रती जाज्वल्य निष्ठा व प्रेम ! त्यामुळे येथे काय ‘उणे’आहे यापेक्षा काय ‘अधिक’ आहे, याचा आनंद सर्वांना मोठा होता.  म्हणूनच आमची ही एक आठवड्याची सहल खूप आनंददायी ,यशस्वी  रंजक झाली.

      पोर्टब्लेयर, अंदमान, येथील आमचे एक निवासस्थान,” हॉटेल ब्लू मरलीन”.

     पहिल्याच दिवशी तीन जानेवारी 2022 रोजी विश्रांती व भोजन झाल्यावर ‘कारबीन्स कोव्ह’, या पोर्टब्लेअर मधील नयनरम्य समुद्र किनाऱ्यावर सर्वांनी, निळाशार समुद्र, हिरव्याकंच नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्ग सौंदर्याचा मनमुराद  आस्वाद घेतला. अजूनही हे समुद्रकिनारे बाजारीकरणापासून मुक्त व स्वच्छ  ठेवले आहेत. मात्र आता हळूहळू येथेही अस्वच्छता वाढू लागली आहे. तास-दीड तास तेथे हुंदडल्यावर, बसने सेल्युलर जेल मध्ये आलो. तेथे सायंकाळी,”लाईट अँड साऊंड”, हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. जसा हा शो सुरू होतो तसा, त्या काळी स्वातंत्र्यवीरांवर होणारे अत्याचार, अन्याय, इंग्रजांच्या क्रूरतेची चीड यावी अशा  विविध शिक्षा, क्रांतिवीरांचे विव्हळणे, ओरडणे, त्यांचे चित्कार, वंदे मातरम आणि भारतमाता की जय या आरोळ्या.. असा चित्रपट डोळ्यासमोर सुरू होतो. हे सर्व आपल्या सहनशक्तीच्या बाहेर आहे, असेही जाणवते… अकरा वर्षे तेथील अन्यायाच्या विरोधात पाय रोवून असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे सर्व बंदिवान सहकारी, यांच्या स्मृतीने, मस्तक नकळतच झुकते. स्वातंत्र्यसेनानींवर झालेले अनन्वित अत्याचार आणि त्याही परिस्थितीत आपल्या मातृभूमीवरील त्यांची निष्ठा व प्रेम , त्यांनी धैर्याने केलेला सर्व संकटांचा व छळाचा सामना.. शेवटी, सर्व अत्याचाराला पुरून उरतं, “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय”, या घोषणांनी…. त्यांना दिलेला, आपला प्रतिसाद … सर्व प्रसंग अंगावर रोमांच आणतात.. डोळ्यात पाणी येते.. खूपच सुंदर  कार्यक्रम पाहिल्याचे समाधान होते…

    पहिल्या दिवशी ,सेल्युलर जेलमध्ये, ‘शब्दामृत’, च्या टिळकगटाचे सहप्रवासी, प्रवेश घेताना..

   सेल्युलर जेल आज. सात शाखा पैकी आज केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. मध्यभागी टोक दिसते ते मनोर्‍याचे.

   जेलर डेव्हिड बेरी आणि त्याचे साथी यांनी स्वातंत्र सेनानींवर अनन्वित अत्याचार केले. काळ्या पाण्यावर आलेल्या बंदीवानात काही खूनी दरोडेखोर होते. मात्र बहुतेक जण तरुण, सुशिक्षित असे देशभक्त होते. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याचे स्वप्न उराशी घेऊन ते येथे आले होते. बाबाराव सावरकर व विनायक सावरकर ही दोनच मंडळी महाराष्ट्रातून त्यावेळी येथे बंदीवान होती. दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे पन्नास वर्षे शिक्षा झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यावेळी बेरी मोठ्या छद्मीपणे विचारतो, “सावरकर तुम्हाला येथे पन्नास वर्षे शिक्षा भोगावयाची आहे हे लक्षात आहे ना?”. तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी दिलेले उत्तर हे त्यांच्या विजिगीषू वृत्तीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यवीर, बेरीला म्हणाले होते, “हो मला ते पूर्ण माहित आहे?” मात्र पुढील पन्नास वर्षे तुझे सरकार आणि तू तरी इथे राहणार आहात का, हे तुला कुठे माहित आहे?”  महापुरुषांची वाणी ही भविष्यवाणी असते. स्वातंत्र्यवीर दहा वर्षांनी तेथून बाहेर आले. मात्र बेरी कधीच इंग्लंडला जाऊ शकला नाही. ब्रिटिश साम्राज्यही  भारतावरून नष्ट झाले.. हे सर्व ऐकत असतांना पहात असताना अभिमानाने ऊर भरून येतो.,.

   रोज सायंकाळी, भोजनापूर्वी आमच्या हॉटेलच्या टेरेसवर बसून, श्रीयुत शरद पोंक्षे किंवा पार्थ बाविस्कर यांचे प्रबोधनाचा आस्वाद..  एक छान अनुभव!

. संध्याकाळी पुन्हा आमच्या हॉटेलवर गेलो तेथे श्री. पार्थ बावस्कर यांचे भाषण झाले. त्यानंतर भोजन करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पहिला दिवस संपला

       दुसऱ्या दिवशी चहापानानंतर आम्ही, राॅस बेटावर जाण्यासाठी हॉटेल सोडले. बसने जेट्टीवर गेलो तेथून,’ ‘सिल्वरओशन’, या बोटीने सुमारे दिड तासाच्या प्रवासानंतर रॉस आयलंड उर्फ नेताजी सुभाष द्विप, येथे आलो.  सध्याच्या सरकारने जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून भारतीय नावे दिलेली आहेत हे पाहून खूप आनंद होतो. या बेटावर सरकारने आता चांगले रस्ते  व पाणी, विजेची सोय केल्यामुळे प्रवास खूप सुखकर होतो.. काही वर्षापूर्वी झालेल्या त्सुनामीमध्ये  येथील ब-याच  महत्त्वाच्या  जुन्या  वास्तू, वाहून गेल्या . सुमारे 200 फूटावर समुद्राचे पाणी उंच गेले होते. म्हणजे एकंदर वाताहातीची कल्पना येईल. मागे आम्ही जेव्हा अंदमानात आलो होतो, तेव्हाही या बेटावर आलो   होतो. त्यावेळी येथील ब्रिटिशकालीन घरे, सैनिकांच्या बराकी, ब्रिटिश गव्हर्नरचा बंगला, क्लब हाऊस, इत्यादी  वास्तू व्यवस्थित पहावयास मिळाल्या होत्या. त्यावेळी ह्या सर्व वास्तू पाहून, तत्कालीन ब्रिटिश वैभव व बंदिवानावर अत्याचार करत असताना, स्वतःसाठी निर्माण केलेली  सुबत्ता, सुखलोलुपता, पाहून ,”नरेची केला हीन किती नर.,” या उक्तीचा प्रत्यय आला होता. आता  कालौघात त्सुनामीत ब्रिटिश राजवटीचा  वैभवशाली इतिहास वाहून गेला. “कालाच्या अती कराल दाढा, सकल वस्तूचा करिती चुराडा..” या भा. रा. तांबे यांच्या काव्यपंक्तीची आठवण झाली..आता उरले आहेत ते केवळ दगडाचे चौथरे.  काल महिमा किती अगाध असतो?…

  काही वर्षांपूर्वी बेटावर झालेल्या त्सुनामीने  जमिनीची एवढी धूप झाली, मग जमिनीवरील इमारती आणि माणसांचे काय झाले असेल?

    येथील दुसरे विशेष आकर्षण म्हणजे अनुराधा राव, या महिलेची भेट! प्राणी-पक्षी यांच्याशी या बाई संवाद करतात. आम्ही त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी एक साद घातली व अनेक मोर, बुलबुल पक्षी, चितल(,हरणे) अगदी लेकुरवाळ्या कोंबड्या देखील  धावत आल्या… अनुराधाबाई याच बेटावर या प्राणी मित्रांच्या सहवासात आयुष्य घालवीत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व नाही.” प्रेम द्या व प्रेम घ्या”, हा नियम अगदी जंगली  श्वापदांनाही लागू पडतो असा त्यांचा जीवन सिद्धांत आहे. 

   बाई सांगत होत्या,”ज्यावेळी त्सुनामी झाली, त्या आधी तीन दिवस ही हरणे काहीच अन्नपाणी घेत नव्हती. लोकांना त्याचा उलगडा झाला नाही. तीन दिवसांनी जेव्हा हाहा:कार माजला , तेव्हांच त्यांच्या अन्नपाणी वर्जचा अर्थ लोकांना कळला. प्राणी, पक्ष्यांना निसर्ग माणसापेक्षा जास्त कळतो .

निसर्ग वाचणार्‍या व प्राणी मित्रांशी संवाद करणाऱ्या, अनुराधा राव यांची भेट अंदमानच्या सहलीत अवश्य घेतली पाहिजे.

     संध्याकाळी पुन्हा त्याच बोटीने आम्ही आमच्या पोर्टब्लेअरमधील हॉटेलात आलो. षण्मुगम हा बोटी मधील गाईड अनेक गमती व आम्हाला माहिती नसलेल्या अनेक  गोष्टी सांगून आमची करमणूक करीत होता, त्यामुळे  हा प्रवास मजेत झाला.  मात्र बोटीमध्ये करोना संसर्गाच्या  दृष्टीने, प्रतिबंधक उपाय तेवढे काटेकोरपणे पाळले जात नाहीत हे पाहून खूप दुःख झाले. लोक मास्क बांधतात मात्र तो नाकावर नाही, तर गळ्यात! सुरक्षित अंतराच्या बाबतीतही तीच वानवा दिसली, त्यामुळे अशा प्रवासातून संसर्गाचा धोका निश्चितच जास्त उद्भवतो. मात्र याकडे संयोजक व बोटीचे व्यवस्थापन यांनी लक्ष दिले पाहिजे. पुढे आमच्या या टिळक गटातील 2 जणांना करोनाचा संसर्ग झाला व त्यांना, विलगीकरणांत राहून त्यांचा अंदमान प्रवास वाढला.अनाठाई खर्च झाला. ही  बेफिकीर वृत्ती कारणीभूत होती. पुढील अनावस्थेची ही नांदीच होती…

    संध्याकाळी  पुन्हा सेल्युलर जेलमध्ये जमलो. ज्या 121 नंबरच्या कोठडीत सावरकरांना बंदिस्त ठेवले होते त्या कोठडीत आम्ही प्रत्येकाने एक छोटी पणती प्रज्वलित केली. तात्यारावांना, विशेष कैदी (Dangerous)) म्हणून जो बिल्ला ब्रिटिश सरकारने गळ्यात बांधला होता,  त्याची प्रतिकृती ,प्रत्येकाने आपले गळ्यांत अडकविली. 100 पणत्यांची आरास त्या संध्याकाळी तात्यारावांच्या कोठडीत करून , त्यांना सर्वांनी आगळीवेगळी मानवंदना दिली.

    हाच तो बिल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  गळ्यात , अदमानातील बंदिवासात अडकविला गेला होता.सुटकेची तारीख बघा, 23 12 1960!,खतरनाक कैदी, (D)

   स्वातंत्र्यवीरांच्या अंदमान कैदेतून  सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने, हा विशेष कार्यक्रम शब्दामृतने आयोजित केला होता. सावरकरांची ही कोठडी, फाशीघराच्या समोरच आहे. ही योजनाही ब्रिटिशानी मुद्दाम केली होती, जेणेकरून सावरकरांना एक दहशत बसावी. मात्र याचा काही एक परिणाम स्वातंत्र्यवीरांच्या  बेडर वृत्तीवर झाला नाही. उलट त्यांना त्याही परिस्थितीत “कमला” हे महाकाव्य लिहावेसे वाटले! याला कारण, तुजसाठी मरण ते जनन. तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण!’  ही अध्यात्मिकता, रोमारोमात भिनलेला, हा आगळा  बंदिवान होता ! 

    एकावेळी तीन बंदिवानांना येथे फासावर चढवले जात असे. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, हा जयघोष या परिसरात कितीदा निनादला असेल याला गणती नाही. शेकडो-हजारो बंदिवान येथे फाशीचा फंदा गळ्याभोवती अडकवून स्वर्गारोहण करते झाले.  त्यांच्या स्मृती ऊरल्या आहेत, त्या आठवून हे लोंबकळणारे फाशीचे दोर आज अगदी केविलवाणे वाटतात!!

   बाजूलाच असलेल्या कार्यशाळेत, बंद्यांना द्यावयाचे शिक्षेचे विविध व्यवसाय व त्यासाठी असलेली उपकरणे यांचे दर्शन घेतले. कोलू ,उर्फ तेलघाणी, काथ्या पिसणे, दिलेला कोटा पूर्ण न  झाल्यास मिळणाऱ्या विविध शिक्षांचे प्रकार,  त्यांचे सर्व प्रकारचे साहित्य  येथे आहे. ते पाहून, सर्व बंदीवानासाठी आपले हृदय हेलावते . त्यांनी एवढे ढोर मेहनतीचे काम कसे केले असेल?  या शिक्षा कशा भोगल्या असतील?  जनावरांनाही कठीण असे काम या तरुण व चांगल्या घरच्या पोरांनी कसे निभावले,  असे विचार मनात येतात. मात्र असेही वाटते की त्यांना  हे सर्व  अपेक्षित होते , त्यांनी स्वतःहून हा मार्ग स्वीकारला होता, त्यामुळे हे सर्व भोगतांना,

  “की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने.. ”  हीच त्यांची मनोवृत्ती असणार ! 

        ध्येयाने भारलेला मनुष्य  जेव्हा आपल्या मातृभूमीसाठी संग्राम करतो, तेव्हा त्याला जगण्याची पर्वा नसते . मृत्यूचे भय ही नसते. अत्यंत बलाढ्य शत्रूदेखील अशा वीरांपुढे हतबल होतो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी हे अशा ध्येयवादाचे प्रतीक आहेत. काही निशस्त्र होते तर काहींनी शस्त्र घेऊन रणांगणात प्रवेश केला होता. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले. काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले. काही फासावर गेले. आणि सर्व जण आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या  इतिहासात अजरामर झाले. त्यातील इंग्रजांच्या हाती जिवंत सापडलेल्या आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेसाठी पाठविले गेलेले अंदमानच्या काळ्यापाण्यावर आले. स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या अशा अनेक क्रांतिकारक सहकाऱ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अंदमानात, या वीरांनी एक नवे पर्व निर्माण केले. त्यांना येथे साखळदंडाने जखडून टाकल्यावर आपण जिंकलो असे इंग्रजांना वाटू लागले. मात्र तेथेच इंग्रजांचा पराभव झाला.  या क्रांतिवीरांनी अंदमानात एक नवा इतिहास घडविला. त्यांना वंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे.

   सेल्युलर जेलमध्ये लावलेल्या,  तत्कालीन बंदिवानांच्या यादीत अग्रभागी असलेल्या तीन नावांपैकी दोन सावरकर बंधू, मात्र तिसरे, श्री दाजी नारायण जोशी यांना आम्ही विसरलो का?

        श्री. दाजी नारायण जोशी यांच्याविषयी मला काहीच माहिती नव्हती. कोणी माहिती दिली नाही. म्हणून मी त्यांच्या चरित्राचा शोध घेतला. आणि मिळालेली माहिती मला सुन्न करून गेली. त्यांच्याविषयी येथे थोडे लिहिणे मला अगत्याचे वाटले… या लेखाची शेवटी छोटी पुरवणी म्हणून ती माहिती मी लिहिली आहे. अंदमान सफारी वर्णन करीत असताना, दाजींना अभिवादन करणे माझे कर्तव्य समजतो. म्हणूनच, लेख विस्ताराचा दोष पत्करूनही त्यांची  ही माहिती मी शेवटी  लिहिली. मला ही खूप समाधान वाटते आहे.

       येथे आलेले बंदीवान, डाकू वा दरोडेखोर नव्हते. तर राजद्रोहाचा आरोप असलेले राजकीय कैदी होते.  इंग्रज सरकारची नीती त्यांना एखाद्या खुनी दरोडेखोराप्रमाणे वागविण्याची होती. त्या वागणुकीला विरोध करण्यासाठी , मृत्यूच्या भयापासून मुक्त असलेल्या अंदमानच्या वीरांनी मे 1933 मध्ये आमरण उपोषणाला प्रारंभ केला. तसेही मरणारच आहोत तर छळाने पिचून मरण्यापेक्षा आमच्या मर्जीने, ताठ मानेने मरू ,हा त्यांचा निर्धार होता. हुतात्मा जतीन दास आणि हुतात्मा महेंद्रनाथ बॅनर्जी यांनी याआधी ते करून दाखविले होते. अंदमानच्या या पर्वात एकाहून एक असे महान क्रांतिकारक उतरले होते. हुतात्मा महावीर सिंह, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, मोहित मित्र, मनकृष्ण नामदास, बटुकेश्वर दत्त, विजय कुमार सिन्हा, शिव वर्मा, गयाप्रसाद, अंबिका चक्रवर्ती, गणेश घोष ,अनंत सिंग, आनंद गुप्त  असे धुरंदर त्यात होते. इंग्रज सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र स्वातंत्र्यवीरांचा जबरदस्त प्रतिकार आणि मनोनिग्रह यामुळे अखेर इंग्रज सरकारला हार स्विकारावी लागली. “की तोडीला तरू फुटे आणखी भराने”, या उक्तीला अनुसरून जुलमी सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. अंदमानचे, नरक अथवा छळछावणी, असे स्वरूप त्यामुळे नष्ट झाले.

     समोरील उद्यानात  स्वातंत्र्यवीर व त्यांच्या काही सहकाऱ्यांचे पुतळे उभे केले आहेत. तेथे देशभक्तीपर गीतांचा सामूहिक गायन कार्यक्रम झाला. जयो स्तुते, ने मजसी ने, वंदे मातरम  ही गीते आम्ही सर्वांनी स्वातंत्र्यवीरांच्या  पुतळ्यासमोर विनम्र होत गायली. तिथून आमच्या हॉटेलवर आलो. रात्री श्री. शरद पोंक्षे यांचे प्रबोधन झाले.

   तिस-या  दिवशी सकाळीच, (5जाने,022), 4.30 वा,आम्ही हॉटेल सोडले व जेटीवर येऊन एका क्रुजने , सुमारे दोन-अडीच तासांचा प्रवास करून, हॅवलाॅक, (स्वराज्य द्विप),या बेटावर आलो. बोटीवर प्रवेश घेण्याआधी विमानतळावर जे सोपस्कार करावे लागतात , तसेच सर्व सोपस्कार, जसे की सामानाची व स्वतःची तपासणी, तिकीट, आयकार्ड लसीकरण सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखविणे, हे सर्व झाल्यावरच बोटीत प्रवेश मिळतो. करोना प्रादुर्भावामुळे, प्रवाशांच्या संख्येवर विशेष परिणाम झालेला दिसत नाही. भरपूर प्रवासी व अतिशय बेफिकीर नियंत्रण . प्रवास दोन-अडीच तासांचा आहे. अंदमानच्या समुद्रातून प्रवास सुखकर वाटतो. प्रत्येक वेळी हॉटेलमधून सामान काढणे ते टेम्पोत भरणे, तिथून बंदरावर आणून बोटीवर चढविणे व बोटीवरून उतरतांना, नव्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत पुन्हा उलटा प्रकार .. ही सगळी यातायात आम्हासारख्या ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रासदायक होते. शिवाय रणरणत्या उन्हात बोटीच्या प्रवेशासाठी रांगेत उभे राहणे त्रासदायक! संयोजकांनी याबाबतीत थोडे लक्ष घातले तर ही यातायात थोडी कमी कष्टदायक होईल असे वाटते.

  राधानगरी,अंदमान, एक निसर्गरम्य समुद्र किनारा.

     हॉटेलमध्ये सामान सोडल्यानंतर तसेच व सरळ राधानगरी या आशिया खंडातील नंबर दोनच्या ,मोठ्या ,सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आलो. तेथे सर्वांनी बरीच भ्रमंती केली. मला तरी येथे काही विशेष असे वाटले नाही. या किनाऱ्यावर काही जुने जपानी बंकर्स अजूनही सुस्थितीत आढळून आले. हे बंकर म्हणजे सैनिकांना सुरक्षितरित्या शत्रूचा मुकाबला करता यावा म्हणून बांधलेली संरक्षक घरे आहेत. जपानी इंजीनियरिंग व स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्तम नमुना आहे. आजही आपण आत शिरून , तळघरात जाऊन,  रचना व आंतील सोई  याचा अंदाज घेऊन , त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो. आमच्या फ्रान्समधील भ्रमंतीच्यावेळी तेथील नॉर्मंडी किनाऱ्यावर असलेले, जर्मन सेनापती रोमेल याने बांधलेले बंकर्स आम्ही पाहिले होते ते अगदीच अजूनही सुस्थितीत आहेत. तोदेखील जर्मन स्थापत्यशास्त्र व संरक्षण सिद्धता यांचा एक उत्कृष्ट नमुना आहे. येथील रचना, सुविधा व तंत्रज्ञान पाहून बुद्धी अचंबित होते. मला तेथे नॉर्मंडीची आठवण झाली .

   राधानगरी समुद्रकिनार्‍यावरील अजूनही सुस्थितीत असलेल्या जपानी बंकर्स पैकी 

       आज 6 जाने 022, नील आयलंड, म्हणजे शहीद द्विपची, भेट. तोच सर्व सोपस्कार. सकाळी उठून सामाना सहित हॉटेल सोडणे ,बंदरावर ऊन्हात रांगा  लावून, सामान चढवणे बोटीत कागदपत्रे दाखवून प्रवेश घेणे आणि दोन तासाचा प्रवास.. हे खरेतर आता थोडे अतीच झाले आहे.’ “हॉटेल आर के इको”,,व्यवस्थित वाटले. आराम करून ब्रेकफास्ट वगैरे केला.सकाळी बस मधून सीतापुर समुद्रकिनारा.येथे काही जलक्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, जसे की बंगी जंपिंग साठी सुमारे साडेचार हजार रुपये, स्नोरकेलींग व कोरल दर्शनासाठी चार हजार रुपये, काचेचा तळ असणार-या  बोटीतून प्रवासासाठी आठशे रुपये इ….. आम्ही काचेचा तळ असणाऱ्या बोटीचा प्रवास पसंत केला. मागील अंदमान प्रवासावेळी आम्ही हे केले होते. त्या वेळेचा अ नुभव व आनंद काही वेगळाच होता. या वेळी शंभर दीडशे फूट आत नेऊन, समुद्रतळाचे छोटे दगड व  चिटुकले मासे दाखविले. पूर्वीच्या ट्रीपमध्ये आम्ही सुमारे दीड किलोमीटर समुद्रात गेलो होतो व समुद्रतळाशी बसलेले मोठी मोठी कासवे व कोरल भोवती फिरणारे रंगीबेरंगी माशांचे विविध, प्रचंड थवे पाहून अचंबित झालो होतो. जाऊ द्या ..तुलना करण्याने आताचा आनंद कशाला घालावा. 

  काचेचा तळ असलेल्या बोटीतून कोरल्स व समुद्रतळ पाहण्यासाठीची सफर.

      तेथून एका खानावळीत शाकाहारी भोजन घेतले. इतर मंडळी पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर भ्रमंतीसाठी गेली .आम्ही मात्र आमचे हॉटेलवर परत आलो.विश्रांतीची गरज होती. थकवा जाणवू लागला होता व काळजी घेणे आवश्यक होते. आम्ही दोघे व सौ. ज्योती ताई, एका दुसऱ्या गटाच्या बस मधून हॉटेलवर जाण्यास निघालो. सोहमने ड्रायव्हरला, आमच्या हॉटेलवर आम्हास सोडण्याची सूचनाही दिली होती. मात्र सोडताना ड्रायव्हरने आम्हाला इंगा दाखवला. आमचे हॉटेलवर सोडण्याऐवजी रस्त्यातच आम्हाला उतरविले व व्यवस्थित मार्गदर्शनही न करता तो बस घेऊन निघून गेला. आम्ही दोघे व सौ.कुलकर्णी.   सुदैवाने आम्हाला दोन वाटसरू  भेटले. वाटसरू कसले ते देवदूतच वाटले. त्यांनी रिक्षा बोलविली, आम्हाला हॉटेलमध्ये  पोहोचविण्याची मेहरबानी केली. ही माणसे भेटली नसती तर थोडा अवघड प्रसंग होता. संध्याकाळची वेळ होती प्रदेश अज्ञात होता व आम्हाला आमचे हॉटेलचा पत्ताही माहीत नव्हता. आमचे मोबाईल फोन ही नेटवर्क नसल्याने चालत नव्हते.  खरोखर अशावेळी देवावरचा विश्वास वाढतो. या जगात जशी स्वार्थी, आपमतलबी माणसे आहेत, तशीच चांगली ,परोपकारी, सज्जन असतात.      

  सीतापुर येथे ज्या शेतकऱ्याने जेवण दिले , त्याने पिकविलेला हा मळा. कोकणची आठवण करून देतो.

  आज सात जानेवारी. आमच्या सहलीचा  पाचवा दिवस. सकाळीच नाष्टा करून हॉटेल सोडले व पुन्हा एकदा तेच सर्व सोपस्कार करून, सामान घेऊन क्रूजसाठी जेटीवर आलो. त्याआधी नॅचरल बीच या जवळच्याच किनार्‍यावर एक नैसर्गिक,  भव्य दगडी कमान पाहून आलो. पाऊस, वारा, व समुद्राच्या पाण्याच्या माऱ्याने, डोंगराचा एक कडा पोखरून  ही कमान तयार झाली आहे. जाण्याचा रस्ता अतिशय कठीण, दगड धोंड्यातून, चिखलातून होता. चालतच जावे लागले. व परत येऊन आमच्या बसमधून जेट्टी पर्यंत प्रवास केला. आता शहीदबेट ते  पोर्ट ब्लेअर हा परतीचा अडीच तासाचा प्रवास सुरू झाला.

   सितापूर समुद्रकिनारा ,अंदमान, येथील नैसर्गिकरित्या तयार झालेली ही दगडाची भव्य कमान.

   बराच वेळ उन्हात उभे राहणे आणि  सतत फिरणे यामुळे त्रास झालाच. दुपारी बाराच्या सुमारास आमच्या  हॉटेल,” ब्लू मरलीन”, वर आम्ही आलो. विश्रांती घेतली. जेवण घेतले. मंदाने हॉटेलवरच विश्रांती घेतली.  मी ग्रुप बरोबर ‘चिडिया टापू’, येथील समुद्रकिनार्‍यावर फिरून आलो. खरंतर नाव चिडिया टापू आहे, एकही चिडिया काही दिसत नाही. पूर्वी कधीतरी असाव्यात. समुद्रकिनारा सुंदर आहे. कडेला छोट्या टेकड्या असून त्यातून फिरण्यासाठी पायवाटा जंगलात जातात. संध्याकाळचे वेळी कोणी सोबत नसताना, असे जंगलात फिरणे मला तरी ठीक वाटले नाही. चिडीया टापू बेटासमोरच समुद्रात दुसरे एक छोटे बेट आहे. समुद्रातील या बेटावरील  डोंगरामागून सूर्यास्त पाहणे एक गंमत असते. निळ्याशार समुद्रात हिरवे बेट, त्या हिरव्या बेटा मागून,हळूहळू खाली सरकणारा सोन्याचा गोळा.. निसर्गाची किमया. ते पाहण्यासाठी लोक येतात. सूर्यास्त पाहून पुन्हा हॉटेलवर आलो . जेवण करून आराम केला.

   आज आठ जानेवारी,  फिरतीचा शेवटचा दिवस.पोर्ट ब्लेअर पासून दोन अडीच तास बस प्रवासाने लोक बारटांग या बेटावर जाणार आहेत. येथे  आदिम जमातीची वस्ती आहे. दीड एक किलोमीटर चालत जावे लागते.  निसर्ग चमत्काराने तयार झालेल्या  लवणगुंफा(salt caves),पहाणार  आहेत. आम्ही अनेक ठिकाणी अशा गुंफे पाहिल्या असल्याने आम्हाला आकर्षण नव्हते.  विश्रांतीची गरज होती. क्षार युक्त पाणी खालील गुंफेच्या पोकळीत सतत झिरपत रहाते. झिरपणाऱ्या पाण्याची हळूहळू वाफ होते. क्षार  घट्ट होत जातात. कालांतराने ते मोठे होतात त्यांना विविध रंगाचे, विविध कृत्रिम आकार येतात. रंगीबेरंगी स्फटीक खूप छान दिसतात. ती निसर्गाची लेणी वाटतात. पाहताना मोठी गंमत वाटते.बारटांगा बेटाची भेट ही एक आगळीवेगळी भेट असते.  त्यासाठी सरकारी खास परवानगी लागते. आदिम, जंगली वस्ती जवळ असल्याने थोडे धोकादायक हि असते.  रात्र होण्याचे आधी येथून परतावे लागते. मंडळींनी सफर खूप एन्जॉय केली असे कळले. 

  बारटांग बेटावरील या लवणगुंफा पाहण्यास आम्ही गेलो नाही. कारण इतरत्र आम्ही त्या पाहिल्या होत्या. व विश्रांतीची  

     बेटावर प्रवेश देतेवेळी, ज्या प्रवाशांकडे संपूर्ण लसीकरणाचे सर्टिफिकेट नव्हते, त्यांची तात्काळ,’करोना टेस्ट’,( Antigen test),घेतली गेली. दुर्दैवाने त्यात  वेदांत  पॉझिटिव्ह मिळाला. आणि त्यामुळे त्यांच्या बरोबरीच्या बसमधील   सहप्रवाशांना  प्रवेश मिळाला नाही .  हॉटेलवर येऊन त्याच्या आईसह विलगीकरणांत  राहावे लागले.त्यांचा मुक्काम आठ दिवस लांबला. शब्दामृतच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे व्यवस्थित आपल्या घरी पोहोचली ,हा त्यातला आनंदाचा भाग.

, संध्याकाळी श्री. पोंक्षे यांचे  सहलीतील  अखेरचे भाषण होते. सर्वांचा निरोप घ्यावयाचा होता . त्यांनी समारोप करताना, “यापुढे तरुण, व विद्यार्थी वर्गासाठी  आम्ही  खास अंदमान सहली काढणार आहोत, त्या करिता आम्हाला सहकार्य करा”, अशी अपेक्षा केली. खरोखरच हा एक चांगला उपक्रम असेल. या देशातील तरुणाईला सावरकर व अंदमान म्हणजे काय, व स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीने केलेल्या अमाप त्यागाची जाणीव होण्यासाठी, हे खूप आवश्यक आहे. आमचा गतकालीन दिव्य वारसा, भावी पिढ्यांना  कळावा ही अपेक्षा असेल तर आजच्या तरुणाईला सावरकर आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक यांच्या महान त्यागाची कल्पना आलीच पाहिजे. 

    आता उद्या विमानतळावरून मुंबईचा प्रवास सुरू होईल. दुपारी हॉटेलवरच असल्याने, उद्याच्या विमान प्रवासासाठी वेब चेकींग , बोर्डिंग पास, इत्यादीही सोपस्कार पूर्ण केले.  सामानाची व्यवस्थित बांधाबांध करून ठेवली होती.

  राधानगरी बीच वर एका निवांत स्थळी , मित्रांनी आग्रह करून, घेतलेला फोटो.

        आज नऊ जानेवारी आमच्या अंदमान सहलीचा शेवटचा दिवस. आता सर्वजण आपापल्या, ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे परतीच्या प्रवासास लागतील. आपल्या मुक्कामी जातील . मागे म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागातून, लांबचे प्रवास करीत, मंडळी अंदमानला आली . त्यामानाने आम्ही भाग्यवान. मुंबई विमानतळ घराजवळ असल्याने जास्त दगदग झाली नाही. मात्र गारगोटी- कोल्हापूर’अथवा देवरूख-चिपळूण, सारख्या ठिकाणाहून आलेल्या मंडळीला, अनेक टप्प्याटप्प्याने प्रवास करत मुंबई विमानतळ गाठावा लागला. पुढे चेन्नई वा बेंगलोर वा कलकत्ता व शेवटी पोर्टब्लेअर. जातांना ही अशाच टप्या टप्प्याने जावे लागणार.

   आम्ही सुमारे नऊ जण सकाळी सव्वा दहा वाजता विमानतळावर येण्यासाठी निघालो. पोर्ट ब्लेअर ते मुंबई असा सर्वांचाच प्रवास, मात्र निरनिराळ्या विमान कंपन्यामार्फत होता. आमच्या, पोर्ट ब्लेअर ,चेन्नई, मुंबई या प्रवासासाठी आम्ही एकूण सहा जण होतो. सर्व सोपस्कार विना विलंब झाले. विमान ही वेळेवर सुटले.”गो एअर”कंपनीचे हे विमान चेन्नईला फक्त अर्ध्या तासासाठी थांबणार होते. तेही खूप बरे झाले. विलंब झाला नाही. चेन्नई मुंबई प्रवास सुखरूप रित्या पार केला. बरोबर साडेतीन वाजता मुंबई हवाई अड्ड्या वर आमचे विमान उतरले. एक ,दगदगीचा व कोरोना काळांतील असल्याने, जोखमीचा हा प्रवास, आम्ही  पूर्ण केला. परमेश्वराची कृपा होती व स्वातंत्र्यवीरांचे आशीर्वाद होते अशीच आमची भावना आहे. या  प्रवासाने, अतीव समाधान व आत्मसन्मानाची भावना मिळाली हे मात्र खरे!

      ज्यावेळी आम्ही हा प्रवास ठरविला त्यावेळी ऑक्टोबर 021,मध्ये करोनाचे संकट कमी होत चालले होते . मात्र जानेवारी 022,उजाडला, आणि या संकटाने पुन्हा रौद्र रूप धारण केले. तरीही आम्ही  हिंमत केली. खूप सुहृदांनी आम्हाला न जाण्याचा सल्ला दिला होता. आम्ही  देवावर भरोसा ठेवला व निघालो. प्रवासादरम्यान थोडे काळजीचे प्रसंग आले, मात्र थोडक्यात निभावले म्हणून बरे झाले.

   या प्रवासातील काही संस्मरणीय गोष्टी शेवटी सांगावयाच्या म्हटल्यास त्यात सेल्युलर जेलचा पावन परिसर, ‘लाईट अन साऊंड’शो तसेच अजूनही निसर्गाचा पुरेपूर वरदहस्त असलेल्या अंदमानची  अविस्मरणीय निसर्ग  यांचा प्रामुख्याने उल्लेख होईल.

    क्रांतिवीरांच्या आयुष्यावर आधारित अविस्मरणीय लाईट अँड साऊंड शो तत्कालीन छळ छावण्या व क्रांतिवीरांचा दुर्दम्य आशावाद तसेच भारतमातेवरील त्यांच्या अविचल निष्ठेचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात!! ब्रिटिश कालीन राजधानी रॉस आयलंड, नॉर्थ बे आयलँड, कोरल्स, स्कुबा डायविंग अशा अनेक गोष्टी इथे अनुभवता येतात स्वच्छ निळेशार पाणी असलेले , आशियातील दोन नंबरचा बीच राधानगरी बीच पाहून मन प्रसन्न होते. पोर्ट ब्लेअर शहर बाराटांग स्पीड बोट सफारी रस्त्यावरील जारवा जातीच्या आदिम लोकांचे दर्शन अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. वेळेअभावी सर्वच ठिकाणांना भेटी देणे शक्य होत नाही पण ज्याला जेवढे पाहता येईल त्यांनी पाहून घ्यावे.

   या अंदमान जेलच्या निर्मितीचा इतिहासही मोठा क्लेशकारक आणि ध्यानात ठेवण्याजोगा..हा जेल सबंध जगात प्रसिद्ध आहे. जेलचा  वेगळा इतिहास आहे. अठराशे 96 ते 1906 या कालखंडामध्ये काळ पाण्याच्या कैदेवर आणलेल्या बंदीवानांनीच तो बांधून पूर्ण केला. एक हिंदी गाणे आहे ना,” जिस का जूता, उसी का सर..” तशीच ही कहाणी. .. आजही ही वास्तू समुद्रकिनारी,एकाद्या पहारेक-याप्रमाणे उभी आहे. सुरुवातीला या जेलचे एकूण सात विंग होते आज फक्त तीन विंग शिल्लक आहेत . जपानी बॉम्ब वर्षावात काही नष्ट झाले.  प्रत्येक विंगवर एकूण तीन मजले आहेत. सर्व सात विंग करिता, मध्यभागी  एकच निरीक्षण टॉवर आहे.एकूण 698 एकांत  कोठड्या आहेत. कोणत्याही एका कैद्याला दुसऱ्या कैद्याची संपर्क साधता येणार नाही अशी त्यांची जडण आहे. म्हणून त्याला,” सेल्युलर जेल”, हे नाव दिले गेले. प्रत्येक कोठडी 13 फूट लांब 7 फूट रुंद आहे.10 फूट उंच आहे. कोठडीचा दरवाजा आतून ऊघडणे किंवा कुलूप तोडणे शक्यच नव्हते. हवेसाठी फक्त एक छोटीशी खिडकी आहे. कोठडी समोर,चार फूट रुंदीचा व्हरांडा आहे. फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला दोन दरवाजे आहेत, तेही मुद्दाम त्यांच्यावर खास पाळत ठेवण्यासाठी… सेल्युलरजेल , परिसर व स्वातंत्र्यवीरांना, नाउमेद, नामशेष करण्यासाठी ब्रिटिशांनी योजलेल्या अनेक क्लृप्त्या, अघोरी शिक्षांचे प्रकार   पाहिल्याशिवाय, त्यांच्या त्यागाचे महत्त्व कळणार नाही!!

     आमच्या सहलीचे आयोजक श्री.शरद पोंक्षे व श्रीयुत पार्थ बाविस्कर यांनी त्यांच्या रोजच्या प्रवचनात, सेल्युलर जेल ,स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकरांच्या रचना, बंदिवान त्यांच्या हालअपेष्टा, विशेषतः सावरकर कुटुंबीयांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान,  या विषयावर खूप उपयुक्त अशी प्रवचने दिली.  बरीच  अज्ञात माहिती कळली. 

  बेटावर मिळणाऱ्या अगणित नारळांचा उपयोग करण्यासाठी, अशा कोलूच्या घाण्यात ,नारळाचे तेल बंदीवाना मार्फत काढले जाई.

  रात्रीच्या वेळी संध्याकाळी पाच ते सकाळी सहा पर्यंत कैद्यांना एक छोटे मातीचे भांडे दिले जाई. ते फक्त एक वेळच्या मलमूत्र विसर्जनासाठी उपयोगात येत असे. त्यामुळे ही काल कोठडी म्हणजे दुर्गंधीचे साम्राज्य होते. रात्री शौचास परवानगी नसे.  प्रमुख जेलर बेरी हा क्रूरकर्मा होता. त्याच्या मनात जे येईल तसे तो करी. प्रत्येक कैद्याला घाण्यावर दिवसभरात पंधरा किलो तेल काढावे लागे. यासाठी कैद्यांना बैलाप्रमाणे घाण्याला जुंपले जाई. तेवढे तेल काढले नाही तर, खांबाला बांधून चाबकाने फोडले जाई. क्रांतिकारकांच्या गळ्यापासून पायापर्यंत साखळदंड बांधले जात. त्यामुळे त्यांना नरकयातना म्हणजे काय, याचा जेलमध्येच अनुभव घ्यावा लागे.

   बंदीवानांनी, रोजचे दिलेले कोलूचे काम थोडे जरी अपूर्ण ठेवले तर, अशाप्रकारे उघड्या अंगावर,आसुडाचे फटके मारून शिक्षा दिल्या जात.

      जेलर बेरी हा अतिशय क्रूर व दयेचा लवलेशही नसलेला अधिकारी होता. तो कैद्यांना म्हणे, “या जगात दोन देव आहेत. एक या पृथ्वीवर व दुसरा नरकात. त्यामुळे मी पृथ्वीवरील देव जे तुम्हाला सांगेन तेच करावे लागेल. तुम्ही करा अथवा मरा!”

     तुरुंगातील जेवण अतिशय घाणेरडे असे. जळक्या रोट्या, आमटीत पाणी, पाण्यावर तरंगणारे किडे , जेवण ही अगदी अल्प दिले जाई. पाणीही बेतानेच देत. नाहीतर कोठडीत संडास व लघवी झाल्याशिवाय राहात नसे. जेवण म्हणजे एक शिक्षाच होती. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना, फाशी देण्याचा कार्यक्रम सर्वांसमक्ष होई. एका वेळी तीन कैद्यांना फाशी दिले जाई. व त्याला वीस फूट खोल खड्ड्यात खाली पाडले जाई. नंतर त्याचा मृतदेह मागे असलेल्या समुद्रात माशांना खाण्यासाठी फेकून दिला जाई. आजही ही इमारत तेथेच आहे.  इंग्रज शासनाविषयी आजही चीड निर्माण होते. असा हा सेल्युलर जेलचा इतिहास पाहिल्यानंतर आपली भारतभूमी आम्हाला का प्रिय असली पाहिजे. याचा मनोमन विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात आल्याशिवाय राहात नाही.

वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद , या घोषणा, एकाच वेळी, तीन कंठा मधून कितीदा  दुमदुमल्या, याचा हिशोब केवळ हे फाशीचे दोर देऊ शकतील..

       स्वातंत्र्यवीरांच्या अनेक स्फूर्तिदायक कथा ऐकल्या त्यांच्या पदस्पर्शाने पावन परिसराला वंदन केले. भेटलेल्या अनेक  सह प्रवाशांच्या आठवणी घेऊन घरी आलो. 

      आजच्या संकटकाळात,  जगण्याच्या जिद्दीची प्रेरणा मिळाली. ही जगण्याची जिद्दच, आपल्या जगण्याचा हेतू सबळ करेल. पुन्हा लवकरच, यातून बाहेर येऊन, उमेदभरल्या मनाने आयुष्याची वाटचाल करू…

     आम्ही मराठी माणसे अंदमानच्या सफरीवर जातो ते केवळ पर्यटन म्हणून जातो का? नाही. भारतीय माणसाच्या, विशेषत: मराठी माणसाच्या अंदमान यात्रेला एक वेगळा असा संदर्भ आहे. राष्ट्रभक्तीचे व्रत घेतलेल्या असंख्य क्रांतिवीरांनी, भारतभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामात, हसत-हसत आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. फाशीचे दोर आनंदाने आपल्या गळ्यात अडकवून घेतले. त्यांचे संसार घरेदारे उद्ध्वस्त झाली. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना छळण्यासाठी येथे छळछावणी उघडली होती. जेथे अनेक क्रांतिवीर, यमयातना भोगीत भारत मातेचे स्वातंत्र्य  गान गात होते. या सर्वांचे महामेरू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीही याच सेल्युलर जेलमध्ये आपल्या आयुष्याची अकरा वर्षे व्यतीत केलेली आहेत. त्यांच्या देशसेवेला सीमा नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत ते केवळ आणि केवळ या राष्ट्रवीरांच्या आत्मसमर्पणामुळेच होय. या वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  भूमीला वंदन करावे व स्वातंत्र्यवीरांनी आमच्यावर केलेल्या उपकाराची , ही कृतज्ञतेची भावना भारतवासी यांच्या मनात येथे येताना असते. त्यामुळेच आम्ही दुसऱ्यांदा हा अंदमान चा प्रवास केला.अंदमान हे आमच्यासाठी एक राष्ट्रीय तीर्थस्थल आहे.

    या शक्तीपीठ अंदमानची अधिष्ठात्री देवता म्हणजे ,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! आमच्या सहप्रवासी सौ ज्योती ताई कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वर केलेली ही छोटी कविता आपणा सर्वांच्याच मनांतील भाव -भावना सांगून जाते. ती येथे उद्धृत केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही, असे वाटते.

     “हजारो तलवारींचे शौर्य

लाखो सुमनांची कोमलता

कोट्यवधी सूर्यांचे तेज

          ……….म्हणजे वीर सावरकर.

मातृभूमीप्रती प्रखर निष्ठा

जाज्वल्य हिंदू राष्ट्रवाद

देशाचा ज्वलंत अभिमान

          ……….म्हणजे वीर सावरकर

एकाच वेळी दोन जन्मठेप

मार्सेलिसची सागरझेप

अंदमानातील काळे पाणी

          ……….म्हणजे वीर सावरकर

कष्टमय सेल्यूलर जेल

कोलूच्या अपार यातना

कोठी नं. 121 च्या भिंती

          ……….म्हणजे वीर सावरकर

कोळसा काट्यांची लेखणी

कमला महाकाव्य लेखन

तोंडपाठ दहा हजार ओळी

         ……….म्हणजे वीर सावरकर

जातीभेद निर्मूलनाचे व्रत

स्त्रियांना समान अधिकार

विज्ञानाचे सच्चा भक्त

          ……….म्हणजे वीर सावरकर

एक कवी, साहित्यिक एक

एक वकील, क्रांतीकारी एक

एक वक्ता, समाजसुधारक एक

          ……….म्हणजे वीर सावरकर.”

ज्योती ताईंना मनःपूर्वक धन्यवाद!

    आमच्या प्रमाणे अशी अनेक मराठी ,भारतीय माणसे या भावनेने तेथे जात असतात. स्वातंत्र्यवीरांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या भूमीला वंदन केल्यावर ,एक आत्मिक समाधान मिळते. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीत, एक पणती प्रज्वलित केली.  बाहेरच्या उद्यानात असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासमोर,”जयोस्तुते..” चा उद्घोष  केला…  या आमच्या नेहमीच्या जगात आल्यानंतर वाटतं ,”स्वतंत्रते भगवती “च ,व्हावं तसं चीज अजूनही झालेलं नाही..,तो इतिहास जगलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्याचे आज  चीज झालेलं दिसत नाही… त्यांच्या  संकीर्तन करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सामान्य भारतीय माणसाची आज हीच भावना असेल….

  भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीरांना पुनः पुनः वंदन करून हे लिखाण संपवतो. जय अंदमान,जय,हिंद.

दाजी उर्फ वामनराव नारायण जोशी, अंदमानातील बंदी काल 1909 ते 1921.

अंदमानातील स्वातंत्र्यवीरांचे नावाची पाटी सहसा कोणी वाचत नाही. वाचली तरी त्यातील पहिले नाव, वामन नारायण जोशी कोणाच्या ध्यानात ही राहत नाही. त्यांचा त्याग  केवळ अद्वितीय आहे. म्हणून दाजीविषयी,लेखाचे शेवटी, एक मानाचे  पान, दाजींसाठी.. .

 बंदिवानाच्या यादीतील पहिली तीन नावे बाबाराव सावरकर तात्याराव सावरकर व वामनराव जोशी उर्फ दाजी, ही तीनही नावे वंदनीय आहेत. वास्तविक दाजी (वामनराव) हे सावरकर बंधूंचे शिष्य; शिष्य कसले ते भक्तच होते. तरीही त्यांना हा मान मिळाला. कारण, त्यांनी केलेले कृत्य हे दशकातील शतकृत्य होते.

   त्यावेळी १९०९ साली विल्यम नावाच्या मग्रूर अधिकार्‍याने, आपल्या घोडागाडीला पुढे जाऊ दिले नाही, या क्षुल्लक कारणासाठी एका गरीब गाडीवानाला लाथाबुक्क्यांनी तुडवून ठार मारले. त्याच्यावर ब्रिटिश सरकारने काहीच कारवाई केली नाही. तो मुजोर तोंड वरकरून शहरात फिरत होता. हे सळसळत्या रक्ताच्या सावरकर भक्तांना कसे सहन होणार?

 . नाशिकमध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला. मग ब्रिटिश सरकारने खटला भरल्याचे नाटक केले. तो आरोपी निर्दोष सुटला आणि नाशिकमध्ये हिंडू लागला.

        वरील सर्व कारणांमुळे सावरकर शिष्यांचा भडका उडाला. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. तोच या सर्व अत्याचाराला जबाबदार होता. अत्याचारांची हद्द झाली होती. म्हणून ब्रिटिश शासकांना हे दाखवून देणे गरजेचे होते की, आम्ही भारतीय बुळचट नाही. देव, देश आणि धर्माचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून जॅक्सनचा वध करण्याचे निश्चित झाले.

    २१ डिसेंबर, १९०९ रोजी विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या कोवळ्या मुलाने (वय १७) जॅक्सनचा वध केला. हा वध म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला मारलेली सणसणीत थप्पड होती.

   अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे यांना जागेवरच अटक झाली. कृष्णाजी कर्वे तेथून निसटले, पण पुढे पकडले गेले.  त्याचदिवशी वामनराव उर्फ दाजी जोशी यांनाही येवले येथून अटक झाली. त्यांना काढण्या घालून उघड्या अंगाने फटके मारत मारत नाशिकला आणण्यात आले. या पुढची कहाणी अत्यंत दारुण आहे.

  या तरुण मुलांनी जे छळ सोसले त्याला तोड नाही. ती वर्णने वाचवत नाहीत. वाचताना भावना वेग असह्य होऊन मी किती तरी वेळा अगदी सुन्न होऊन बसलो. हा खटला वेगाने चालवण्यात आला. आरोप सिद्ध झाले, निकाल लागला. त्यानुसार अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांना फाशी, वामन (दाजी) जोशी यांना काळ्या पाण्याची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

     विनायक देशपांडे व दाजी यांनीच कट रचला, त्याची बारीकसारीक तपशीलासह उत्तम तयारी करून घेतली, हे सिद्ध झाले. म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.

   बहुतेक सगळ्या इतिहासकारांनी यांचे वर्णन ‘निधड्या छातीचा, बलदंड शरीराचा व युयुत्सु वृत्तीचा’ असेच केलेले आढळते. काही दिवस भायखळ्याच्या तुरुंगात ठेवून नंतर त्यांना काळ्या पाण्याला अंदमानला पाठवण्यात आले. जेलर बेरी  आणि त्याची छळछावणी जगप्रसिद्धच आहे. कोलू चालवणे, काथ्या कुटणे, सतत मार खाणे, अपमान, कदान्न भक्षण हे दाजींच्याही नशिबी आले!

     दाजींनी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली जेलमध्ये अन्न सत्याग्रह, संप, आंदोलने, सर्व हिरिरीने केली. बेरीला जेरीस आणले. तेथेही त्यांनी देशभक्तांचे जाळे विणले. त्यामुळे एकदा त्यांना काही देशद्रोही, धर्मद्रोही सावरकरांवर विषप्रयोग करणार असल्याची खबर आधीच लागली. त्यांनी तात्यारावांना सावध केले व मोठे अरिष्ट टळले. 

     दाजी शाळेत मास्तर असल्याने येथेही शाळा उघडली गेली. अनेकांना साक्षर केले. तेथे हिंदू-मुसलमान हा भेद मुळीच ठेवला नाही. सावरकर राजबंद्यांना सोडण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे सतत अर्ज पाठवत असत. त्याचा उपयोग होऊन जे राजबंदी सोडण्यात आले, त्यात वामनरावांचाही नंबर लागला व त्यांना दहा वर्षांनी भारतात पाठवण्यात आले. पण, ते सुटले असे झाले नाही. भारतात त्यांना येरवड्याच्या तुरुंगात आणून ठेवले. तेथे राजबंदी असूनही त्यांना दीड वर्ष खुनी, दरोडेखोर यांच्या बरोबर ठेवले गेले. येथेही अंदमानसारख्याच ‘दंडाबेडी’, ‘आडवीबेडी’ अशा शिक्षा भोगाव्या लागल्या. या अत्याचारांमुळे जेव्हा १९२२ साली त्यांची सुटका झाली, तेव्हा शरीराने ते खूपच दुर्बळ झाले होते, पण मनाने भक्कम होते.

     समशेरपूरला परत आले तेव्हा संपूर्ण कुटुंबाची अगदी वाताहत झाली होती. बंधू, भावजयी, आई निर्वतले होते. भावाची लहान मुले रडत होती. चरितार्थाचा मोठाच प्रश्न होता. वामनरावांनी उर्वरित सर्व कुटुंबीयांना खूप प्रेम दिले, त्यांचा अतिशय प्रेमाने, परंतु शिस्तीने सांभाळ केला.

     आपल्या सर्व पुतण्यांना/नातवंडांना मुलगा-मुलगी हा भेद न करता चांगले शिकवले. सर्वजण चांगले शिकले. त्यातील शरयू या उत्तम शिकून शिक्षकी पेशातच गेल्या. शरयू मामींनी संग्रामपूर येथील घरातून कष्टाने जुनी कागदपत्रे हुडकली, तेव्हा दाजी काकांच्या हस्तलिखितात लिहिलेले आत्मचरित्र मिळाले. त्यांनी अपार मेहनत करून ते नीट लिहिले व दि. २६ जनेवारी २०१६ रोजी भगूर येथे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. तेव्हा कुठे दाजी काकांचे महात्म्य  प्रकाशात आले.

     वामनराव स्वतः हुशार होते. व्ह. फा. परीक्षेत ते नाशिक शहरात दुसरे व संबंध नाशिक जिल्ह्यात सातवे आले होते. त्यामुळे मुलामुलींनी खूप शिकावे, यासाठी ते आग्रही असत. ते उत्तम चित्रकार होते. संगीताचे भोक्ते होते. स्वतः संवादिनी उत्तम वाजवत. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला अगदी घरच्या गाईंनादेखील त्यांनी प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिले. ते इतके स्वाभिमानी की, त्यांनी कधीही स्वातंत्र्यसैनिक म्हणून अर्ज करून पेन्शन मागितली नाही.

    क्रांतिकारकांवर लिहिणारे देशभक्त वि. श्री. जोशी हे मुद्दाम समशेरपूरला आले, दाजींना भेटले. नंतर त्यांनी पुराव्यानिशी पत्र पाठवले ते थेट स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना – पंडित नेहरूंना. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून एक हजार रुपयांचा चेक आला व पुढे अजून थोडीशी रक्कम आली. बस्स!

     स्वा. सावरकरांचा आणि दाजींचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे. पुढे १९५५ मध्ये दाजींचे मेव्हणे लक्ष्मण कुलकर्णी यांनी दाजी व तात्यारावांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. ही श्रीराम-भरत भेट  सावरकर सदनात दादर येथे झाली. दोघांनाही अश्रू आवरेनात. त्यांनी एकमेकांना मिठी मारत मनसोक्त रडून घेतले.

   सरकारने उपेक्षा केली, पण राष्ट्रभक्तांच्या हृदयात दाजी काकांना कायमचे मानाचे स्थान मिळाले.

१४ जानेवारी, १९६४… संक्रांत होती. दाजींनी सर्वांना तीळगूळ दिला व आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद दिले आणि आपले पुतणे भास्कर ब्रह्मदेव जोशी यांच्या मांडीवर शांतपणे अखेरचा श्वास घेतला….

   ‘नाही चिरा, नाही पणती’ अशा अनाम वीरांच्या मांदियाळीतील अजून एक तारा निखळून पडला…

  अंदमान,सेल्युलर जेलला भेट देणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने, त्या पहिल्या तीन नावांचे वाचन केल्यावर,आपली मान झुकवली पाहिजे. दाजी विषयी माहिती सर्वांना करून दिली पाहिजे.त्यांच्या अफाट त्यागाचे थोडेतरी मोल होईल!!.

   वरील छायाचित्रे ,आमचे सर्व प्रवासी मित्र श्री.रविंद्र  प्रभूणे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचे नमुने आहेत. त्यांना धन्यवाद.

 

 

 

 

 http://dwraut.com/andaman/

 

अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.

रस्ते छोटेच पण छान आहेत. अगदी गुळगुळीत. वाहन भाड्याने घेऊन पॉइंट टू पॉइंट फिरावे लागते. काही ठिकाणी जाण्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते. उदा, हॅवलॉक बेटावर जाण्यासाठी १-२ दिवस आधीपासून बुकिंग केलेले बरे. मध्यंतरी झालेल्या बोटीच्या अपघातानंतर सगळ्या खासगी बोटींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी बोटीत मर्यादित जागा उपलब्ध असतात.

वरील चारही फोटो आमच्या हॉटेलच्या डेक वरून घेतले आहेत. ती एक नितांत सुंदर जागा होती. समोर समुद्र बघत गार वार्‍यावर बसलो की समाधी लागलीच म्हणून समजा. याच डेकच्या खाली रेस्टॉरंट होते. त्याबाहेर फारच मजेशीर माहिती लावली होती. वीस रुपयाच्या नोटीवर जे चित्र आहे ते त्या ठिकाणाहून दिसते. तिथूनच जवळपासच्या कोणत्यातरी ठिकाणाहून काढला आहे तो फोटो!

हे ते दृश्य

आणि हा तो माहितीफलक :

इंग्रज जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांनी ज्या बेटावर वस्ती केली ते हे रॉस आयलंड.

नंतर १९४२ साली इथे एक भुकंप झाला आणि त्यानंतर इंग्रजांनी इथली वस्ती उठवून स्मिथ आयलंड वर आणली. या स्मिथ आयलंडवरच पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे. रॉस आयलंडवर आता भग्नावशेष उरले आहेत पण ते ही बघायला फार छान वाटते. ढासळलेल्या इमारतींमधून प्रचंड मोठी मोठी झाडे वाढली आहेत. इथे अनेक हरणं आणि मोर दिसतात. हे आयलंड आता नेव्हीच्या अखत्यारीत आहे आणि इथे कोणी रहात नाही. मात्र इथे खूप छान निगा राखली जाते. अतिशय स्वच्छता आहे. पण रात्री मात्र एकदम अमानवीय वाटेल हां. रामसे बंधूंनी हे बेट कसं काय मिसलं देव जाणे!

इथे हरीण आणि मोर शोधा :

जुने चर्च :

मूळ चर्चचा फोटो आणि माहिती :

बेटावरील तळे आणि सिट- आऊट्स :

इतर बघण्यासारखी बेटे म्हणजे हॅवलॉक आणि नील. हॅवलॉकला सुंदर राधानगर बीच आहे. तिथे जाण्यासाठी एक दिवसीय सहली देखिल आहेत पण खरी मजा अनुभवायची असेल तर तिथे जाऊन राहिलेले उत्तम. नील बेटावर स्कूबा डायव्हिंग, हायकिंग वगैरे अ‍ॅक्टिविटीज करता येतात. बाराटांग भागात मड व्होल्कॅनो आहे आणि चुनखडीच्या गुहा आहेत. बॅरन आयलंडवर जिवंत ज्बालामुखी आहे. अर्थात तेथे जाण्यास परवानगी नाही.

त्या वीस रुपयाच्या नोटीबद्दलचा जो माहितीफलक आहे त्यावर दाखवलेल्या माउंट हॅरियेट या उंचावरील व्हू पॉइंटवरून अतिशय सुंदर दृश्य दिसते. या बेटावर जाण्यासाठी आपले वाहन बोटीवर घालून नेता येते. :

तेच ते रु. २० च्या नोटवरील दीपगृह वेगळ्या कोनातून. दिसलं का? :
<

माउंट हॅरीयेटवरून बोट सुटली. :

आणि पुन्हा पोर्टब्लेअर कडे जाऊ लागली :

अंदमानात सकाळी पाचवाजता सुर्यदेव ड्युटीवर हजर असत. आमच्या रूममधून समोरच समुद्र दिसत असे. अशीच एका सकाळी चहाचा कप घेऊन बाल्कनीत आले तर समोरच एक क्रूझलायनर अंदमानात त्या दिवसाकरता मुक्काम करण्यासाठी येत होती :

अंदमानमध्ये अनेक म्युझियम्सही बघण्यासारखी आहेत. चाथम सॉ मिल मधील म्युझियम, समुद्रिका म्युझियम (अजिबात चुकवू नका आणि येथिल डॉक्युमेंटरीही नक्की पहा), अँथ्रोपोलीजिकल म्युझियम, अंदमान फिशरीज म्युझियम (हे स्किप केलं तरी चालेल). त्यातील काही निवडक फोटो :

सी अ‍ॅनिमोन्स

स्टार फिश. किती सुंदर रंग आहेत ना!

सी-अर्चिन्स

अत्यंत सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची प्रवाळेही होती समुद्रिकामध्ये पण त्यांचे फोटो काढण्याची परवानगी नव्हती.

 https://www.maayboli.com/node/48311

 

 

 

 

 अंदमान चे ’काळे पाणी’...........

 सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.

अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.
इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.
संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे .
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.
दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.
नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे.

संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

 सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.

अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.

इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.

संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांनी इथेच लिहिले असे म्हणतात. http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.

दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.

नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे. संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

 

 

अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम

 

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय. या बेटांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपल्याला जालावर मिळेलच , मी मात्र माझ्या नजरेतुन अनुभवलेला आणि भावलेला अंदमान तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही शक्यतो टुर कंपनीसोबत फिरणं टाळतो त्यामुळे कसं आपल्याला वाट्टेल तेव्हा वाट्टेल तस फिरता येतं. म्हणून या प्रवासाला लागते ती पुर्वतयारी तशी ६ महिने आधी सुरु झाली होती. डिसेंबर मधे आम्ही आमच्या सुट्ट्यांचा अंदाज घेऊन तिकिटं बुक केली आणि अंदमान बेटांचा अभ्यास सुरु केला. काय करावं, काय करु नये हे वाचलं. आणि आम्ही साधारण कसे आणि किती फिरणार हे ठरवलं.

( www.andamans.gov.in आणि अजून एक nic ची साईट आहे त्यावर अभ्यास केला. शिवाय inter island प्रवासाची माहिती घेण्यासाठी वww.and.nic.in ही साईट. खूप छान दिलय त्यांनी डिट्टेलवार. त्याशिवाय मी जेव्हा पोर्ट ब्लेअर मधल्या टुरिजम डिपार्टमेंट मधे गेले होते तेव्हाही न कंटाळता सगळी माहिती दिली आणि शंका दूर केल्या होत्या माझ्या.

पहिल्या दिवशी रात्री जेवल्यावर आम्ही एक फेरफटका मारायला गेलो होतो शहरात. तर तेव्हा तिथलं सचिवालय, वेगवेगळ्या खात्यांची offices रात्रीचीही सुरु होती. पर्यटन खात्याच्या office मधे गेले तर एका दादांनी खूप मस्त माहिती दिली. अंदमान ट्रंक रोड वर एका लिमिट पर्यंतच दुचाकी नेता येते, पुढे ट्रायबल एरियामधे compulsory चार चाकी. त्या शिवाय ट्रायबल एरियातले किंवा ट्रायबल्स चे फोटो नाही घेता येत. त्यांना खाऊ पिऊ नाही देता येत. ते काम पोलीस करतात. हे अन बरेच काही. तिथे offices ६ वाजता उघडतात. ३ साडे तीन ला बंद होतात. आणि शिफ्ट्स मधे २४ तास सुरु असतात. फक्त सह्या वगैरे office hours मधे. इतर मदत सतत सुरु असते.)

आता फक्त शरीर तिथे पोचायचं राहिलं होतं. मन तर कधीचच पोचलं होतं. शेवटी हो ना करता ९ मे उजाडला. आणि सकाळी ७.२० च्या विमानाने आम्ही चेन्नै ला निघालो. पोर्ट ब्लेअर साठी आमचं विमान १०.४० ला होतं. तेवढ्यात जे काही कस काय अन चेपु खेळुन घ्यायचय तेवढं घेतलं. कारण तिकडे फक्त बीएसेनेल , ऐर्टेल अन वोडाफोन हे तीनच सर्विस प्रोवाईडर आहेत. आणि २जी स्पीड बडी मुश्किल से मिलती है अस होटेलवाल्याकडुन कळलं होत. ठरलेल्या वेळी आमचं विमान निघालं वीर सावईकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं. दिडेक तासाने काही पाचूची बेटं दिसु लागली. विमानातुन जमतील तसे फोटो घेतलेत.

1

2

विमानतळ जवळ आल्यावर क्यामेरे बंद केले. आमच्या गोव्यासारखाच हासुद्धा डिफेन्स एअर्पोर्ट आहे. सामान घेण्याचे सोपस्कार केल्यावर अंदमानच्या पर्यटन विभागाचा हेल्पडेस्क वर प्रिपेड टॅक्सी , बाईक रेंटल वगैरे ची चौकशी केली आणि विमानतळाबाहेर जाऊन टॅक्सी करुन गेलो. इथेच अंदमानी लोकांच्या नियमप्रियतेचा/प्रामाणिकपणाचा पहिला अंदाज आला. पठ्ठ्याने प्रिपेड टॅक्सी च्या दरापेक्षा एक रुपया अधिक घेतला नाही. तेवढ्या अंतरासाठी आमच्या गोव्यात ५०० रुपडे सहज घेतले असते इथल्या टॅक्सीवाल्यांनी.

फ्रेश होऊन सरळ सेल्युलर जेल बघायला गेलो. सगळी जेल फिरुन बघताना अंगावर शहारे येत होते. कश्या परिस्थितीत ह्या लोकांनी इथे दिवस काढले असतील आपण कल्पनाही करु शकत नाही. खूप मराठी माणसं भेटली तिथे. सावरकरांच्या कोठडीत सगळे पायताणं काढुन गेलो. देवळाइतकीच पवित्र जागा होती ती. बसलो थोडा वेळ. जयोस्तुते चं सामुहिक गायन झालं आणि मग उर्वरीत भाग बघितला.

सेल्युलर जेल
cellular jail

cellular jail 1

सेल्युलर जेल च मुळ स्वरुप सात आरे असलेल्या स्टार फिश सारखं होतं. त्यातले तीनच आरे उभे आहेत. एका आर्‍याच्या जागी सरकारी इस्पितळ उभं आहे. मधल्या मनोर्‍याच्या खांबांवर तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांची नावं आहेत. या इमारतींची रचना अशी होती की एका इमारतीतल्या कैद्यांना समोरचे कैदी दिसू नयेत. फोटोत व्हरांड्यासमोर समोरच्या खिडक्या दिसतायेत. त्या खिडक्यांनाही उतरती छपरे. आणि खोलीत त्याही उंचावर. म्हणजे फक्त उजेड आणि हवा थोडीफार येणार. काळ्या पाण्याची शिक्षा... आणि या इमारती कैद्यांकडूनच बांधून घेतल्या होत्या. कोठडीचे दरवाजे गडगंज आडण्यांनी(कड्यांनी) बंद असत. हे तिथे अजूनही पाहता येतात. त्यातही तात्याराव जास्त डेंजर कैदी , म्हणून त्यांना सगळ्यात शेवटची, कोपर्‍यातली कोठडी दिली होती. जिथे एका भक्कम दरवाज्यातुन आत गेल्यावर अजून एक दरवाजा लागायचा आणि मग आत तात्याराव. कोलू आणि काथ्याचा ठराविक कोटा पूर्ण झाला नाही तर जेवण देण्यात येत नसे. हात सोलवटून जात, रक्तं येत पण काथ्या कुटलाच पाहिजे. थोड्या जुन्या आणि त्यातल्या त्यात मवाळ कैद्यांना लाकूड्तोडीसाठी नेत. या कैद्यांवर आदिवासी लोकांचे हल्ले होत, तसे ते आताही होतात जर तुम्ही आदिवाश्यांच्या भागात "शिरलात" तर . अंदमानी लाकूड अत्यंत टिकाऊ असतं. खार्‍या पाण्यानेसुद्धा त्याला अपाय होत नाही. तिथल्या अंगणात जिथे कैद्यांना कोलूवर चढवायचे, काथ्या कुटायला लावायचे, तेल घाण्याला जुंपायचे, लाकूड कामाला लावायचे , छळाचे इतर प्रकार प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटलं. सावरकरांचं पुस्तक आधीच वाचून गेल्याने अजून जास्त फरक पडला. बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर वेगवेगळ्या आर्‍यांमधे होते. त्यांची प्रत्यक्ष भेटही खूप सायासांनी तब्बल दोन वर्षांनी झाली.

सेल्युलर जेल मधे तेवत असलेली स्वातंत्र्य ज्योत. (फोटो tripadvisor.com वरुन साभार)

cellular jail2

cellular jail 3

cellular jail 4

सावरकरांच्या कोठडीत मी
a

cellular jail 5

cellular jail 6

cellular jail 7

फाशीपूर्व अंतिम विधी करण्याचे स्थान
last rights before hanging

फाशीघर
gallows

फाशीघरात
inside gallows

inside gallows 2

विविध छळप्रकार

kolhu

विविध प्रकारच्या बेड्या
bedya

लाईट अँड साउंड शो अक्षरशः शहारे आणतो अंगावर. प्रत्येक गोष्ट त्या त्या कोठडी किंवा जागेवर प्रकाशझोत टाकुन जिवंत करुन माहिती दिली जाते.

जेल च्या आवारात एक पिंपळाच झाड आहे. त्याला बेरीबाबा का पेड म्हणतात. तिथला त्याकाळचा जेलर बेरी ह्याच ते "निवाड्याचं" स्थान होतं. इथुनच तो "गोड शब्दात"कैद्यांचे निवाडे करत असे/ शिक्षा करत असे. सध्याच्या जेलमधे एक प्रदर्शन आहे त्यात इत्थंभूत माहिती फोटोंसकट आहे. गाईड हवा असल्यास जेलच्या ऑफिसमधे नाममात्र शुल्क भरुन मिळवता येतो. या प्रदर्शनातले काही फोटोज द्यायचा प्रयत्न करते.

1

2

3

4

5

6

7

अंदमानमधे तसे सहा महिने खूप जास्त पावसाचे आणि उरलेले सहा महिने कमी पावसाचे असतात, त्यामुळे तिथे डांस , चिलटं इ. त्रासदायक मंडळीही भरपूर होती/आहेत तर हासुद्धा एक खूप त्रासाचा प्रकार असे कैद्यांसाठी. एस्पेशली ज्यांना जंगलात लाकूडतोडीसाठी नेले जायचे त्यांच्यासाठी. आणि लाकूडतोड कितीही पाऊस असो ठरलेला कोटा झाल्याशिवाय परत येणए नसायचेच. अंदमान मधली जंगलं ट्रोपिकल डेसिड्युअस / एवरग्रीन फॉरेस्ट्स मधे मोडतात. ही अजस्त्र खोडं असतात. हयाचाही एक नमुना टाकेन येत्या भागांमधे.

हे सेल्युलर जेलच्या वरच्या गच्चीवरुन घेतलेली प्रचि

रॉस बेट

ross

जेलवरची गच्ची
gachchi

नॉर्थ बे बेट
north bay

अंदमान सरकारी इस्पितळ
govt hosp

हे सगळं बघताना एक तर आम्ही भावुक झालो होतो आणि अंधारही झाला होता. मग एक बाईक रेंटवर घेतली आणि पेटपूजा करुन सरळ होटेल गाठुन झोपलोच.

हे लक्षात ठेवा
जेल संध्याकाळी ५ वाजता बंद होते, सोमवारी सुट्टी असते, रविवारी खुली असते. ५.३० वाजता आणि अजून एक उशीरा असे २ लाईट अँड साऊंड शो होतात.

क्रमशः

 

लवकर झोपी गेल्यामुळे मला दुसर्‍या दिवशी पहाटे ४ लाच जाग आली. उठल्यावर माझं घड्याळ बिघडलय का काय झालय हे कळेचना थोडा वेळ. सुर्य उगवायला लागला होता. मग लक्षात आलं की काल ५.३० लाच अंधारुन आलं होतं!! मग काय नवरोबाला उठवला लगेच पटपट आवरलं आणि पोर्ट ब्लेअर च्या आबर्दीन जेट्टी कडे गेलो.

आम्हाला थोडक्यासाठी एक सुंदर सुर्योदय चुकला होता, म्हंटल जाऊदेत आता उद्या पाहुयाच. बराच वेळ तिथे घालवल्यावर मग मन मारेल तस आणि रस्ता फुटतो तिथे भटकायचं ठरवलं आणि बाईक घेऊन आम्ही निघालोच. हे त्या वाटेतले काही फोटो.

1

2

ही आबर्दीन जेटी
3

4

हे जहाज बहुतेक हॅवलॉक ला निघालय
5

हे नॉर्थ बे बेट. ह्याला तुम्ही कुठेतरी पाहिलय (नक्की), आठवतय का काही?
6

7

8

9

10

11

12

13

आता आम्ही कोर्बिन्स कोव्ह बीच च्या रस्त्याला लागलो होतो

14

कोर्बिन्स कोव्ह बीच ची किनारपट्टी
15

कोर्बिन्स कोव्ह बीच
16

इथे थोडावेळ क्लिकक्लिकाट करुन पुढच्या रस्त्याला लागलो. कुठे वगैरे काही माहित नाही. वाटेत कित्येक खेडी लागली. त्या खेड्यातल्या वस्त्या, घरं, जनावरं, आणि मुख्य म्हणजे तिथले लोक यांच निरीक्षण करत आम्ही जात होतो. अंदमानी लोक खूप भोळे-भाबडे, मदतीला अत्यंत तत्पर, नियमप्रिय, प्रामाणिक , मायाळु आहेत. आपल्या घरांमधे कोणतीही भाषा का बोलेनात तुमच्याशी अगदी अस्खलित हिंदी बोलतात. जिथे जिथे आम्ही वाटेत थांबलो तिथे तिथे लोकांनी आमची चौकशी केली. आम्हाला काही हव नको ते विचारलं. ह्यामागे त्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती. मला खरं सांगायचं तर त्या प्रेमाने अगदी भरून आलं.

17

या बेटांवर अजूनही ठिकठिकाणी त्सुनामीच्या वाताहातीच्या खुणा दिसतात. अर्थात लोकांची घरं , उडलेली छपरं , जहाजं वगैरे दुरुस्त झालीत पण तेव्हा पडलेल्या मोठमोठाल्या झाडांचे ओंडके, समुद्राच्या वाढलेल्या पातळीमुळे बुडलेले रस्ते आणि मग बांधलेले नवे रस्ते ई. इथे झालेल्या वाताहातीचा अंदाज येतो. अश्याच एका पडलेल्या झाडाचा ओंडका.
18

19

हे महाशय बराच वेळ लपाछपी झाल्यानंतर असे सापडले
20

21

22

23

मला नेहमी नव्या प्रदेशात गेल्यावर तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या घरांबद्दल, संस्कृतीबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं .ही अंदमानमधली काही घरं. ही घरं बघितल्यावर मला "गोव्याची" सय आलीच. अंदमानी लोकही आमच्या गोवेकरांसारखे रंगांच्या प्रेमात आहेत. अंदमान अजुन एका अंगाने माझा वाटायला लागला.

24

25

26

इथे एकही नदी नाहीये. मात्र पावसाच्या पाण्याला ते साठवतात
27

28

29

30

ही खरंतर एका मिडल स्कूल ची इमारत आहे. तिचं काम पाहिलत का? लाकडी आहे ती शाळा. पारंपारिक अंदमानी घरं अशीच असतात लाकडाची. ओट्यापासुन जमिनीपर्यंत सगळं लाकडाचं. सुनामीनंतर लोकं काँक्रिटची घरं बांधु लागले आहेत
31

अंदमानी मगरी कुठेही आढळु शकतात त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून अश्या जाळ्या/ तारा लावल्या आहेत
32

इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित बांधलाय .
33

34

35

ही सुद्धा एक सरकारी शाळाच आहे. नो युनिफॉर्म!! इतक्या मस्त शाळेत मला आवडेल बाबा शिकायला.
36

37

38

39

40

41

केवढाले वृक्ष होते एकेक. हे उगाच माझ्या क्षुद्रतेच्या अंदाजासाठी. हे मूळ आहे फक्त झाडाचं जे सुनामी मधे मुळासकट उपटुन गेलं होतं.
42

हे सगळे मला माझेच वाटु लागले. माझ्या एकेकाळच्या गोव्यासारखेच डोंगर,झाडं, समुद्र तर होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर आणि श्रीमंत !!! अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्‍यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.

43

44

क्रमशः

 

नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच. फुलपाखरं आणि पक्षी क्यामेर्यात कैद नाही करु शकले :( आम्ही फुलपाखरं बघुन थांबलो एके ठिकाणी तर ती आमच्याच अंगावर नाचत होती. फार मजा आली अशी अंगा खांद्यावर बागडुन उडणारी फुलपाखरं बघताना.

45

46

वाटेत एके ठिकाणी आम्ही आमच्या शिदोर्‍या सोडुन खायला बसलो, तिथे काही पोरं मासे पकडत होती आणि कितीतरी जेलीफिश कार्टून सारखे बागडत होते. खायचं सोडून त्यांनाच बघत बसलो आम्ही. अश्या वेळी मी नेहमी एक गोष्ट पाळते आणि इतरांनाही सांगते, माश्यांना किंवा इन जनरल कोणत्याही जंगली प्राण्याला तुमच्याकडचा खाऊ आयुष्यात देऊ नका, आणि पर्यावरणाचे /निसर्गाचे नियम पाळा. अंदमानी लोक कसोशीने हे नियम पाळतात. आपण तिथे जाऊन तिथला तोल बिघडवु नये.

47

48

49

50

मग आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तर एक बॉटॅनिकल झूलोजिकल गार्डन लागलं. तिथे अंदमानी मगरी , घोरपडी , अस्वलं, अंदमानी पक्षी त्यांच्या हॅबिटॅट मधे स्वच्छंद बागडताना बघितले, प्रत्येक झाडावर त्याचं सायंटिफिक नाव लावलं होतं. तिथुन बाहेर पडेस्तो जोरदार पाऊस आला. खूप भिजले पावसात. अंदमानमधला पाऊस खूप बेधुंद असतो, कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने कितीही वेळ पाऊस कोसळु शकतो. मुसळधार पाऊस म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. मग तिथुन अजुन थोडं पुढे मुंडा पहाड च्या पायथ्याला मुंडा पहाड बीच वर पोचलो. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला मग सुरक्षित क्षेत्रात आंघोळ केली. कपडे बदलायला आणि शावर घ्यायला सरकारने व्यवस्था केलीय लाकडी घरांची तिथे जाऊन कपडे बदलले आणि पुढल्या वाटेला लागलो.

51

52

53

54

सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे
55

56

अंघोळीसाठीचे सुरक्षित क्षेत्र जाळीने मार्क केलय . इथे प्रत्येक बीचवर लाईफगार्ड, पोलीस कंपल्सरी असतातच. आणि अंघोळीसाठी सुरक्षित क्षेत्र मार्क करतात. पर्यटकांनी त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते.
57

मग आम्ही जिथे गेलो ती जागा माझ्यासाठी स्वर्ग होती. त्या गावाचं नाव मंजेरी . पुर्ण रिजर्व फॉरेस्ट एरिया. तिथे जाण्यासाठी परमिट काढावं लागतं. ही जागा महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक हिस्सा असलेल्या १५ बेटांपैकी एक आहे.

हे मंजेरीच्या वाटेतले फोटो

58

59

60

इथल्या दलदलीत मगरी आहेत
61

@ मंजेरी फॉरेस्ट चेक पोस्ट.
62

63

64

@मंजेरी जेटी

इथे फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे. आम्ही तिथे गेलो आणि मला परत यायचच नव्हत!! एक तर तिथे अज्जिबात माणसं नव्हती. फक्त आम्ही दोघंच आणि सोबतीला इतका सुंदर निसर्ग. आम्ही पोचलो तेव्हा भरती येत होती तिथे. काय काय नाही पहिलं तिथे? हजारो प्रकारचे जिवंत कोरल्स, आजपर्यंत फक्त डिस्कवरी वर पाहिलेले मासे, मगरीने एका मोठ्या माशाला खातानाचा लाईव्ह शो, माश्यांचे खेळ बापरे!!! शब्दातीत अनुभव होता.

65

आमचं वाहन
66

67

68

69

70

71

72

73

इथुन तृप्त मनाने निघालो तेव्हा ५ वाजले होते. लगेच सुर्यराव पश्चिमेला गुडुप होणार होते . वाटेत कुठेतरी हा सुर्यास्त टिपला .

उद्या महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक भाग असलेलं जॉली बॉय बेट बघायचं अस ठरवुनच गुडुप झालो अंधारात.

क्रमशः

 

अंदमान - एक अविस्मरणीय सफर

 https://www.misalpav.com/node/33551

अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो. पहिल्या दिवशी फार वेळ नसल्याने, रुमवर फ्रेश होऊन, लगेचच कॉर्बिन्स कोव्ह या पोर्ट ब्लेअरच्याच एका जवळच्या बीचवर गेलो. दुपारी ३ ते ५ असा चांगला वेळ गेला. सायंकाळी ५ वाजताच सूर्यास्त झाल्याने कोजागिरीच्या चंद्राचा आनंद घेता आला.

कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
१.
Corbyn's cove

२.
Corbyn's cove

३.
Corbyn's cove

४. तोच चंद्रमा नभांत
Corbyn's cove
त्यानंतर, गाडी लगोलग सेल्युलर जेलकडे वळवली. पण त्या दिवशी जेल बंद असल्याने फक्त 'लाईट आणि साऊंड शो' बघितला. तो अगदी अवश्य बघण्यासारखा आहे. सावरकरांसारखेच बंगाल आणि पंजाब मधले असंख्य क्रांतिकारक या तुरुंगात होते आणि त्यातले काही तर तिथेच छ्ळवणुकीला बळी पडले. जेलचा इतिहास आणि त्यावेळची आतली परिस्थिती, अगदी जिवंतपणे तुमच्या समोर उभी करतात तेंव्हा अंगावर काटा उभा रहातो.
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघायचे होते. पण तिकडे चार साडेचारलाच कोंबडे आरवायला सुरवात झाली. सकाळी ८ वाजता नाश्ता आटोपून ठीक ९ वाजताची बोट गांठली. एक तासाचा प्रवास करुन आम्हाला नॉर्थ बे आयलंडला नेण्यांत आले.

५.
नॉर्थ बे कडे जाताना
North Bay

६. जेटी
jetty

७. नॉर्थ बे आयलंड
North Bay

तिथे मोठी बोट किनार्‍यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आम्हाला एका छोट्या होडीत बसवण्यांत आले.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवण्यांत आली होती. वर ऊन होते, म्हणून आमच्या सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरले. पुढच्या २० मिनिटांत आम्हाला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी झाली. त्यानंतर आमच्या चॉईस प्रमाणे आम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत आले. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील!
त्या छोट्या खोलीत तो स्कुबाचा वन पीस घालताना माझी अवस्था अगदी कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुम सारखीच झाली. त्यातून मागचे झिप लागेचना! शेवटी तशाच अवस्थेत बाहेर येऊन एकाकडून ते झिप लावून घेतले.बाहेर चिक्कार महिला वर्ग बसला होता. पण त्यांना या साठीपार बुढ्ढ्याकडे बघण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्या बुढ्ढ्यानेही लाज कधीच सोडून दिली असल्यामुळे, काही प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही दोघंही म्हातारा-म्हातारे त्या तसल्या ड्रेसमधे डुगुडुगु चालत, कासवे जशी पाण्याकडे जातात तसे पाण्यांत उतरलो. इतरांचे ट्रेनिंग चालू असल्याने आणि त्या दिवशी इन्स्ट्रक्टर लोक कमी असल्याने, आम्हाला आमचा नंबर येईपर्यंत पाण्यांत डुंबण्याचा सल्ला मिळाला.
साधारण पाऊणतास पाण्यांत डुंबल्यावर आमचे ट्रेनिंग सुरु झाले. मास्क चढवून आणि मागे ऑक्सिजन सिलिंडर लावून, तोंडानेच श्वास-उच्छवासाची क्रिया जमायला थोडा वेळ लागला. पाण्याखाली तोंड बुडवून तसा सराव केल्यावर दोन माणसांनी आमची बखोटी धरुन, आम्हाला पाण्याखाली नेले. खालचे दृश्य पाहिले आणि आम्ही थरारलो. पुढचा अर्धा तास, खालचे अविस्मरणीय जिवंत कोरल्स आणि रंगीबेरंगी मासे बघण्यांत कसा गेला ते कळलेच नाही. ते हलणारे, आपल्या चाहुलीने स्वतःला मिटून घेणारे, वेगवेगळ्या आकाराचे कोरल्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आमचे अंडर वॉटर फोटो काढून त्याची एक सीडीही करुन देण्यांत आली. बाहेर आल्यावर तो स्पेशल सूट अंगापासून वेगळा करायला, पुन्हा एकदा लोकांची मदत घ्यावी लागली. सगळे आवरेपर्यंत थोडा उशीर झाला. आमची बोट वाट पहात उभी होती. बोटीवरचा माणूस आम्हाला शोधायला आला होता. बोटीत बसल्यावर आमचा प्रवास रॉस आयलंडकडे सुरु झाला.

 

रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.

१. My Dear

२.
more

३.
Black

तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.

४.
Garden

दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्‍यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्‍यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.

५.
Tsunami

त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.

६.
Benches

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.

७.विजयनगर बीच-हॅवलॉक
vijaynagar

८.
vijaynagar

९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
Resort

१०. राधानगर बीच - हॅवलॉक

Radhanagar

११.
radhanagar

१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक

kala patthaar

१३.
kala Patthar

१४. आमची परतीची क्रूज

Cruise

हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्‍याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्‍यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्‍यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.

१५. स्पीडबोटीतून उतरताना

Boat

१६. गुहेकडे जाताना

guha

१७.
road

१८. परतीचा प्रवास

return

बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.

१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.

L & S

२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत

jail

बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?

एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.

 सावरकरांच्या कोठडीकडे जाताना- शेवटची कोठडी सावरकरांची.

way

२. आंत शिरताना

saavarkar

३. नतमस्तक

jayostute

४. कोलू

kolu

५. कोलू फिरवताना मॉडेल

kolu

६. बेड्या

Bedya

७. सेल्यूलर जेल

jail

 अंदमानची सर्व च्या सर्व बेटे अतिशय सुंदर आहेत. भारतातील प्रत्येक माणसाने थायलंड किंवा दुबई ला जाऊन परदेशाना पैसे देण्यापेक्षा आपल्या देशातील नितांत सुंदर अशा गोष्टी प्रथम पाहिल्या पाहिजेत. पण भारतातच फिरायला गेलो हे डाऊन मार्केट वाटणारे रेसिडेंट नॉन इंडियन्स फार दिसतात.
सेल्युलर जेल पाहताना आणी तेथील सर्व गोष्टी पाहताना स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या अनन्वित हाल अपेष्टान्चे दर्शन पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा फोटो पाहून मी एक मिनिट नतमस्तक होऊन शांत उभा होतो. त्या माणसाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची झलक पाहून तुम्ही किती क्षुद्र आहात याची जाणीव होते आणी आपण लोकांनी देशाची काय स्थिती करून ठेवली आहे ते पाहून स्वतःची लाज वाटते. प्रत्येक देशभक्त माणसाने एकदा तरी भेट द्यावी असे स्थळ आहे. 

 http://www.misalpav.com/node/20137

 ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..!

नुकतच काही दिवसांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. कार्यालयीन काम असल्यामुळे केवळ दोनच दिवस तिथे राहण्याचे ठरले होते (वरून संमती मिळाली होती). कार्यालयातर्फे राहाण्याची व प्रवासाची सोय करण्यात आल्यामुळे तसा निश्चिंत होतो पण तरी एकटेच जावे लागणार म्हणून थोडा नाराजसुध्हा होतो. तिथली भाषा कोणती यावर तीन वेगवेगळे इनपुटस मिळाल्याने आणखीच गोन्धळलो.

तर हैद्राबाद ते चेन्नै १तास आणि तिथुन विमान बदलुन पोर्ट ब्लेअर २तास असा एकूण प्रवास . पोर्ट ब्लेअर करिता चेन्नैवरून केवळ तीनच फ्लाइट्स आहेत; इन्डिअन एअरलाएंस, किंगफिशर आणि जेट. त्यासुद्धा सकाळि १० वाजण्यापूर्वी. पोर्ट ब्लेअरला कोलकात्याहुन सुद्धा जाता येतं. चेन्नैवरून आमच्या विमानात ३० ते ४० जेष्ठ मन्डळि चढलित. सगळ्यांनी पिवळ्या टोप्या घतलेल्या होत्या. त्यांच्या संभाषणारून ते सर्व पुण्याचे असल्याचे कळले.

चहापानानंतर भेजा फ्राय २ बघता बघता थोडि झोप लागली तोच लोकांचा गल़़का आणि कॅमेर्‍याच्या आवाजांनी जाग आली सगळे लोक आपापल्या कॅमेर्‍यातून बाहेरचे फोटो घेत होते. ते दृष्यच तसे विहंगम होते. कुठे निळ्या तर कुठे हिरव्या रंगाचे ते समुद्राचे पाणी त्यात मधुनच एखादे छोटेसे बेट. समुद्राचा तळ स्पष्ट्पणे दिसत होता. माझा कॅमेरा मी बॅगेत ठेउन चेक इन केल्यामूळे मनाचा खूप जळफळाट झाला. त्यावर कडी म्हणजे माझे आसन नेमके विमानाच्या पंखावर मग काय जेव्हा जेव्हा विमान माझ्या बाजूने कलायचे तेव्हा तो नजारा बाघायाला मिळायाचा.

शेवटि एकदाचे विमान वीर सावरकर विमानतळावर उतरले. हे विमानतळ अगदिच लहान आहे. बाहेर हॉटेलची गाडि घ्यायला आलेली होतीच. एक सांगायची गोष्ट म्हणजे पोर्ट ब्लेअरला फिरायाला आटो रिक्षाच वापरा टॅक्सिच्या फंदात पडु नये कारण विमानतळ ते हॉटेल करीता आटो ५० रू घेतो तर टॅक्सी रू.१५०. पोर्ट ब्लेअर अंदमानची राजधानी असूनसुद्धा एका लहान जिल्ह्याच्या ठिकाणाप्रमाणेच आहे. तर हॉटेलला जाऊन फ्रेश झालो नास्ता केला आणि थोडा फिरायाला निघालो पायीच.

जवळच एक संग्रहालय आहे 'समुद्रीका नॅवल मरिन म्युजिअम ' २०रू चे प्रवेश तिकिट आणि कॅमेर्‍याची पास काढून आत गेलो.

प्रवेशद्वारतच एक मोठा सांगाडा ठेवलेला आहे 'निळ्या देवमाश्याचा' त्याच्या आकारावरूनच खरोखरचा देवमासा किती मोठा असावा याचा अंदाज येतो.
.

.

आत संग्रहालयात अंदमान व निकोबार बेटांची रचना, तिथले मूळ निवासी, समुद्री जीवसृष्टी, शिकारिच्या पद्धती, निरनीराळे शंखशिंपले, मत्स्यालय इत्यादींची सचित्र माहिती व प्रत्यक्ष नमुने ठेवलेले आहेत.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

तिथे दीड तास घालवल्यावर साहेबांचा फोन आला त्यामुळे परत नेट कॅफे जवळ करावा लागला. सगळे काम संपेस्तोवर ६ वाजले. हॉटेलला जाऊन विचारणा केल्यावर कळले की सेल्यूलर जेलचा लाईट आणि साउंड शो ६.३०ला असतो पण तो मिळण्याची शक्यता धूसरच होती. ऑटो घेऊन तिथे पोचलो तर दार बंद करण्याची तयारि सुरू होती तसाच तिकिट खिडकिला गेलो व तिकिट घेऊन आत घुसलो. पूढचा एक तास हा शब्दातीतच म्हणावा लागेल. सेल्यूलर जेल म्हणजे हेच ते कुप्रसिद्ध काळ्या पाण्याचं कारागार. खरं सांगतो त्या कार्यक्रमामधिल वर्णनं ऐकून अशृ थंबवणे कठिण झाले होते. नरकयातना म्हणतात त्याची कल्पना तिथे आली.











.

कॅमेरा तात्पूरता गंडला होता म्हणुन काही फोटो नीट आले नाहित. कार्यक्रम संपल्यावरच ठरवले काहिही झाले तरी उद्या परत यायचे दिवसाच्यावेळि म्हणजे कारागाराचा परिसर नीट पहाता येइल.अंदमानला रात्र थोडि लवकरच होते व सोबत कुणीच नव्हते म्हणून एकट्यानी जास्त धाडस करू नये म्हणून मुकाट परत आलो हॉटेलला.
दुसर्‍या दिवशी ऑफिसचे काम उरकता उरकता १२ वाजलेत. लागलीच हॉटेलला फोने करून कुठे जाता येईल याची विचारणा केली असता कळले की एकूण ३ बेटांचा टूर असं पॅकेज असतं वायपर, रॉस आणखी एक. त्यासाठी सकळी ९ वाजता निघावं लागत. मला ऊशिर झाल्यामूळे ते शक्य नव्हते. मग फक्त ऱोस बेटावर जायचे ठरले. राजीव गांधि जलक्रिडा संकुलातून फेरी जातात तिथं पोहोचलो तर सारा शुकशूकाट. तिकीट काढलं व फेरी येइपर्यंत जरा आजुबाजूला फेरफटका मारला.

.

.

हे सुनमी स्मारक. सुनामीच्या विध्वंसात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली. सुनामीच्यावेळी या फेरी कित्येक कीमी दूर आणि उंचावर जाऊन पडल्या होत्या.

शेवटि एकदाची फेरी आली. फेरित मी एकटाच होतो कारण चूकिची वेळ. ते दूर तिथे डोंगरावर दिसतयं ते कारागृह.

.

फेरी प्रमाणेच या बेटावर सुद्धा मी एकटाच होतो. परत प्रवेश तिकिट कॅमेरा पास तयार करून आत गेलो तर तिथं हरिणांचे मुक्त कळप. खुशाल हात लावा त्यांना.

.

या बेटावर गोर्‍या साहेबांचे क्वार्टस होते एके काळि आता फक्त भग्न अवशेष.
.

.

तिथे एक छान स्वछं छोटासा बीचपण आहे परंतु तिथे उतरायच्या पयर्‍या तुटलेल्या असल्याने केवळ फोटोंवरूनच आनंद मानावा लागला.

.

.

.

१ तासाची पायपीट वरून प्रचंड आर्द्रता त्यामूळे येणारा घाम आणि कहर म्हणजे बेटावर जलपानाची काहीच सोय नाही. तस एक छोटं कँटिन आहे पण ते बंद होतं.
२ वाजायला आले होते आणि पोटात कावळे ओरडत होते पण सहन करण्याशिवाय उपाय नव्हता.
तिथून परतीची फेरी घेतली. पण परत येऊन सुद्धा खायला काहिच मिळालं नाही. म्हटलं ठिक आहे एक दिवस असापण.

तिथे जवळच पायर्‍या आहेत कारागृहाला जाण्याकरीता. ५० पायर्‍या असाव्यात पण एक एक पायरी चढताना पायाला कित्येक किलोंच वजन बांधल्या प्रमाणे जाणवत होतं.
शेवटि एकदाचा वर पोचलो आणि ते प्रवेशद्वार पाहिलं ' सेल्यूलर जेल - राष्ट्रिय स्मारक'.

.

.
परत तिकिट काढलं आणि तिथल्या संग्रहालयात दाखल झालो. हे संग्रहालय म्हणजे त्या हुतात्म्यांना आदरांजली आहे ज्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी वाहिलं. भींतिंवर चहुबाजुला त्या वीरांच्या तसबिरी आहेत. हजारांवर नक्कीच असतील. ज्यांनी जीव गमावला त्यांची तपशिलवार माहिती इथे बघायला मिळते.

हा कारगृहाचा गणवेश.

.

हा यातना देण्यासाठिचा वेगळा गणवेश.

.

या वेगवेगळ्या शिक्षा.
.

हे सगळं पहाताना आजूबाजूचा आवाज नाहीसा होतो निशब्द व्हायला होतं.

नंतर मुख्य करागारकडे वळलो. तिथे दारातच हे शब्दं.

https://lh4.googleusercontent.com/-HpLif3K5sn4/Tu4pbHzp4LI/AAAAAAAAAE4/q...

थोडं आत गेल्यावर आहे ही स्वातन्त्र्य ज्योती.
.

ही या कारागाराची प्रतिकृती तारामाश्याच्या आकाराची.

.

त्याच्या प्रत्येक बाजूवर तीन मजले व प्रत्येक मजल्यावर ५ बाय ६ च्या आकारच्या २० ते ३० बराकी.

मला ओढ लागून होती ती स्वातंत्र्यवीरांची बराक पाहाण्याची.

जसा जसा पायर्‍या चढू लागलो ह्रूदयाचे ठोके वाढू लागले. सोबतीला लाकडि पायर्‍यांचा आवाज. इथे सुद्धा मी एकटाच होतो. त्या बराकिंसमोरून जाताना कमालिची भिती वाटत होती. सावरकरांची बराक एकदम टोकाला आहे. संपूर्ण कारागारात केवळ याच बराकिवर नावाची पाटि आहे.
.

जोडे बाहेर काढले आणि आत गेलो.
.

भिंतीव सावरकरांचे पेटिंग आणि त्यावर हार माळलेला. आदल्या दिवशी जे मराठी मंडळ माझ्या विमानात होते त्यांच्या हाती मी तो हार पाहिला होता.

.

फोटोपुढे दंडवत घातला आणि थोडा वेळ तिथंच बसलो. माझ्या आयुष्यातील काही अनमोल क्षणांपैकी हा एक.

.

.

त्या लोखंडी दारातून हे जे दिसते आहे ते आहे फाशीघर सावरकरांच्या अगदि दारा पुढे खालिल बाजुस व वरिल झरोक्यातून ऐकू येतो तो दूरवर असलेल्या समुद्राच्या गाजांचा आवाज. (अवांतर - स्वातंत्रवीरांना त्यांचे वडिल बंधु गणेश सुद्धा याच कारागारात आहेत हे तब्बल दोन वर्षानी कळलं).

.

त्यानंतर वर सेन्ट्रल टॉवर मधे गेलो. हा वरून दिसणारा नजारा.

.

खाली गेलो फाशीघर सुद्धा पाहिलं. मग मात्र मनं भरून आलं काहिही करण्याची ईछा राहिली नाही. परत येताना पायीच बाजारपेठेचा चक्कर मारला पण विकत घेण्यायोग्य काहीच वाटलं नाही. जेवणं केलं आणि हॉटेलला परतलो.

हिंदी ही इथली सामान्य बोलीभाषा. अंदमान केंद्रशासित प्रदेश असल्याने इथे मद्य अतिशय स्वस्त दरात मिळतं. तश्या मित्रांच्या खूप फर्माईशी होत्या पण उड्डाण नियमांची माहिती नसल्याने ते विकत घेण्याचा बेत रद्द केला. तसा अंदमानचा टूर हा ३ ते ४ दिवसांचा होउ शकतो पण मला थोड्या मर्यादा असल्याने तो आटोपता घ्यावा लागला.

रात्री बाहेरच मस्तं जेवण करून हॉटेलला परतलो. दुसर्‍या दिवशी सकाळि परत निघयचं होतं.

माझी भटकंती : अंदमान..

"यह तीर्थ महातीर्थों का है
मत कहो इसे काला पानी ।
तुम सुनो यहा की धरती के
कण कण से गाथा बलिदानी ॥"
---- गणेश दामोदर सावरकर

मराठी माणसाला अंदमानची ओळख आहे ती सावरकर बंधुंच्या "सजा-ए-कालापानी" मुळे... मीही जेव्हा अंदमानला निघालो, तेव्हा मनात उत्सुकता होती ती "सेल्युलर जेल" ला बघण्याचीच ! एकदा तिथे पोहचल्यावर मात्र सौंदर्य, विविधता आणि इतिहासाची पाखरण असलेल्या ह्या भुमीला पाहुन वाटलं की, ये सफर यादगार रहेगा !!
कोलकात्याहुन उडून पोर्ट ब्लेअरला उतरलो. मनापासुन सांगतो, मी आजपर्यंत पाहीलेल्या सगळ्या भारतीय शहरांमध्ये हे सगळ्यात निटनेटकं शहर आहे ! अक्षरशः सुईपासुन प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी भारताच्या मुख्य भुमीवरुन येते, अश्या ठिकाणी हे लोक इतके आटोपशीर, नीट कसे राहतात ह्याचच मला नवल वाटत होतं.
पोर्ट ब्लेअर वरुन आम्ही जवळच्याच एका किनार्‍यावर गेलो. जातांना वाटेत जागोजागी त्सुनामी ने केलेल्या हानीचे अवशेष दिसत होते. हा एक नमुना

ह्याचा मुळ्यांचा पसारा फोटोत माववणं म्हणजे एक दिव्यच होतं..

त्या बीचवर पोहोचल्यावर मात्र आम्ही वेडावलो. सर्वदुर निळ्या रंगाच्या छटा दाखवणारा अथांग सागर पहुडला होता. त्यातल्या मी त्या आधी पाहिलेला समुद्र म्हणजे मुंबईचा, मग तुम्ही माझी अवस्था ओळखु शकता. तिथुन आम्ही दुसर्‍या एका बेटावर निघालो. ह्याचं नाव "कोरल आयलंड"..

इथे जातांना मी पुन्हा एकदा स्वर्गाला खो देऊन परत आलो. झालं असं, की मी बोटच्या समोरच्या टोकावर उभा होतो. माझा विचार होता की किनारा जवळ आल्यावर उडी मारीन. किनारा अद्याप दुरच होता, तेवढ्यात मला पोज मध्ये पाहुन एका मित्राने मस्तीत दिला की मला ढकलून ! आम्ही बुडबुड करत तळाशी... (मला पोहता येत नाही बरोबर). नाकतोंडात खारट पाणी गेल्यावर हात पाय झाडत वर आलो. वर येवून पाहतो, तर बोट सरळ माझ्या उरावरच येत होती. मी आपला "इकडं (उरावर येणारी) बोट नी तिकडं समुद्र" ह्या अवस्थेत. शेवटी पुन्हा एकदा बुडबुडत वर आलो, अंगावर येण्यार्‍या बोटीलाच रेटा मारुन किनार्‍याकडं हातपाय मारले नी आमचे चरण जमिनीला टेकले... :-)
इथे स्नॉर्केलिंग करुन, पाण्यात डुबक्या मारुन आम्ही परत पोर्ट ब्लेअरला आलो...
संध्याकाळी "सेल्युलर जेल"ला लाईट अँड साउंड शो बघायला गेलो. अगदी "मस्ट सी" आहे हा शो. जेलच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाश पाडून, त्यांना अतिशय योग्य अशा संवादांची आणि संगिताची जोड देत हा शो आपल्या डोळ्यांसमोर "सजा-ए-कालापानी" चा काळाकुट्ट इतिहास उभा करतो..
रात्रीच्या वेळी घेतलेले जेलचे दर्शन...

आणि जेलच्या समोर पार्कमधे असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा....

मात्र रात्रीच्या वेळी जेलचे दर्शन घ्यायला परवानगी नसते. म्हणुन मग नंतर यायचे ठरवून परत गेलो..

दुसर्‍या दिवशी आम्हाला दक्षिण अंदमान मधल्या "बारटांग" नावाच्या द्विपावर जायचे होते. पोर्ट ब्लेअर ते बारटांग ह्या प्रवासात तुम्ही जंगलातुन प्रवास करता, जिथे "जारवा" नावाच्या "प्रिमिटीव्ह" आदिवासी समुहाचे वास्तव्य आहे. जारवा लोक आधुनिकते पासुन अतिशय दूर असुन ते बाहेरच्यांशी संपर्क टाळतात. तरीही प्रवासात आम्हाला काही जारवा दिसले. त्यांना फोटो घेतलेला आवडत नाही म्हणुन मी ते टाळलं. रस्त्यात आम्हाला एक जारवा स्त्री तिच्या चिमुकल्यांसह दिसली. आणि खरंच, शप्पथ सांगतो.. कमरेपासुन वर ती विवस्त्र असुनही मला एकदम स्ट्राइक झाला तो तिचा चेहरा ! अतिशय आखीव आणि तेजस्वी असा तो चेहरा कुठल्याही "फेअर अँड लव्हली" ब्युटी कन्सेप्टच्या कानफडीत मारेल असा होता.. :-०

बारटांग ला पोहचल्यावर आम्ही "मड वल्कॅनो" बघायला गेलो.

एका एकरभराच्या जागेत,काहीतरी रासायनिक प्रक्रियेनी जमिनीतून सतत चिखल वाहत असतो. हा अनोखा प्रकार पाहुन मजा आली. इथे ह्या वल्कॅनोज चा वैज्ञानिक अभ्यासही सुरु आहे.

बाराटांगच्या दुसर्‍या भागात चुनखडीच्या गुहा आहेत. भुगोलात शिकलेल्या "स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स" वगैरे इथे बघायला मिळतात. (उजेड बरोबर नसल्याने फोटोज काही चांगले आले नाही मात्र).. इथे जाण्यासाठी "मॅनग्रोव्हस" च्या जंगलातून जावे लागते. पाण्यात मगरी-बिगरी असल्याने प्रवास मस्तपैकी टरकीफाईंग होतो.

इथल्या जंगलात काही दिसलेल्या काही सुंदर छटा...

परत पोर्ट ब्लेअरला आलो. पुढचा टप्पा होता "हॅवलॉक आयलँड".... इथे जाण्यासाठी दोन-अडीच तासांचा समुद्रप्रवास करावा लागतो. समुद्र सूर्याच्या सोबतीने प्रकाशाच्या किमया दाखवत होता..

हॅवलॉकला पोहचलो आणि .... आ हा हा !! सुखावलो. पुन्हा एकदा निळाईची जादू पसरायला लागली. आणि "सी ग्रीन" किंवा "ब्ल्यु ग्रीन" च्या कुठल्याही रंगछटेत न समावणारी ती कलाकारी समोर होती..

त्यातल्या त्यात मला हा किनारा आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे बर्‍याच दुरपर्यंत हा किनारा उथळ आहे. जवळजवळ अडीच-तिनशे मीटर आतपर्यंत माणसाच्या खांद्याच्या वर पाणी येत नाही. मी नुकताच "स्वर्गसुख" उपभोगता उपभोगता
परत आयटमपणा करण्याच्या मुडमध्ये नव्हतो. ओहोटीत तर किनार्‍याचा विस्तार स्पष्टपणे समोर येत होता...

इथे खुप भटकलो मी..
वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे शंख-शिंपले गोळा केले. (कुणासाठी ते नाही सांगणार आमि, जा ! ;-))

इथं कुणीतरी लपलेले आहे. शोधा बरं जरा...

इथुन आम्ही राधानगरी बीचला गेलो. आशियातील टॉपच्या १० बीचेस मधे ह्याचा नंबर लागतो. इथला सुर्यास्त प्रसिद्ध आहे. पण आम्हाला मात्र ढगाळ वातावरणामुळे तो बघायला मिळाला नाही. इथे खेकड्यांनी बनवलेली रांगोळी किनाराभर पसरलेली होती..

ह्याला कॅमेर्‍यात कैद करता करता माझी पार वाट लागली. एका बिळावरुन दुसर्‍या बिळावर त्यांना टिपायला मी फिरत होतो. शेवटी म्हटलं, एका ठिकाणी कॅमेरा धरुन वाट बघू, तर हे महाशय लपंडाव खेळायच्या मुड मधे. भोकाच्या तोडांशी आल्यावर मी क्लिक करणार एवढ्यात पुन्हा तुरुतुरु आत.. पुन्हा बाहेर आले, मी क्लिकतो म्हटलं का पुन्हा भोकात पसार... अक्षरशः भोकाशी आली होती !

दुसर्‍या दिवशी परत पोर्ट ब्लेअर ला आलो. आज सेल्युलर जेलला जायचेच, असं ठरवलं होतं.. दुपारी आम्ही त्या स्वातंत्र स्मारकात पोहोचलो.

सुरुवातीला सेल्युलर जेल ७ रांगांचे बनलेले होते. (मॉडेल खाली) मात्र दुसर्‍या विश्वयुद्धाच्या काळात जर्मन-जपानी सैन्याच्या बॉम्बवर्षावात त्याचे चार भाग नष्ट झाले.

आत कैद्याना देण्यात येणार्‍या अमानुष वर्तणुकीचे दृष्य दाखवणारे काही मॉडेल्स ठेवलेले होते.

हे बघून झाल्या-झाल्या आम्हाला सगळे बाहेर चलायला सांगू लागले. मी म्हटलं, मला सावरकरांची कोठडी पहायचीय. तिथले अधिकारी म्हणत होते की ती तिसर्‍या मजल्यावर एकदम टोकाला आहे, वेळ लागेल. मी त्यांना बोललो, "पाच मिनिटं थांबा." आणि सुस्साट पळत सुटलो. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीसमोर पोहचलो आणि.... अंगभर रोमांच दाटून आले. पाय पुढे रेटेना. माझा मित्र मागुन आला नी म्हणाला, "अरे, अंदर क्यों नही जाता?" मी म्हटलं, थांब. थोड्या वेळाने आत गेलो. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला.. थोडा वेळ कोठडीत डोळे मिटून उभा राहीलो. कोठडीचे फोटो काढून बाहेर आलो. मात्र त्या कोठडीत उभं राहून फोटो काढून घ्यायची माझी हिंमत झाली नाही. फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...

ह्या काळ्यापाण्याच्या प्रदेशातली हिरवळ आणि निळाई मनात ठेवून, दुसर्‍या दिवशी चेन्नईला रवाना झालो...

http://www.misalpav.com/node/15257

 

 अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती . मात्र कनेक्टिंग विमाने मुंबईहून जास्त होती. अर्थात पुणे-मुंबई फारसे अंतर नसल्याने बाय रोड जायला आमची काहीच हरकत नव्हती.माझ्या नेहमीच्या एजंटकडून प्लॅन मागवला असता ४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले. त्यात हॉटेलचे वेगवेगळे पर्याय होते त्याप्रमाणे किंमत थोडीफार कमी जास्त होणार होती. परंतु विमानाचे तिकीट बघता एकूण चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी परिस्थिती होती. पण हातात वेळ कमी होता आणि तेव्हढ्यातच सगळे बसवायचे म्हणजे पदराला खार लागणारच असा "सुज्ञ" विचार करून निमूटपणे बुकिंग करून टाकले. मग हापिसातील कामाचे डोंगर उपसायला सुरुवात केली.(असे म्हटले की कसे छान वाटते) आणि सगळ्या मीटिंगांमध्ये अंदमान सहलीबद्दल एखाद दोन वाक्य टाकून देऊ लागलो. उगाच कोणी आयत्या वेळी म्हणायला नको की "तू असा कसा न सांगता गेलास?" अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलिया ,कॅनडा, अमेरिका,इंग्लंड आणि कुठल्या कुठल्या लोकांना मी अंदमानला चाललोय हे समजले. आणि त्यांची असूया बघून मला आसुरी आनंद होऊ लागला.(पुढे परत आल्यावर मी नसताना त्यांचे काहीच कसे अडले नाही हे ऐकून दु:ख झाले, ते असोच)

तर यथावकाश तो दिवस उजाडला आणि आम्ही पुण्याहून मुंबईस प्रस्थान करते झालो. दरवेळी मुंबईत गेल्यावर रस्ते, मेट्रो,नवनवीन उड्डाणपूल वगैरे बघून "हीच का ती"? असा प्रश्न मला पडतो. आयुष्याची कित्येक वर्षे जिथे उभा आडवा तिरका (म्हणजे सेंट्रल/वेस्टर्न/हार्बर) फिरलो, त्या मला आता जे व्ही एल आर /एस व्ही एल आर म्हटले की बाउन्सर जातात. चेंबूरहून कुलाब्याला १५ मिनिटात पोचता येते हे पाहून डोळे पाणावतात. घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाताना साकीनाक्याचे ते संध्याकाळचे ट्राफिक आठवते. आता तर म्हणे शिवडीहून न्हावा शेवाला थेट पूल होणार आहे २२ कि.मी. चा. कालाय तस्मै नमः
==============
पुढील माहिती विकीवरून साभार

तेराव्या शतकात झाओ रुगुआ यांनी लिहिलेल्या झु फॅन झी या पुस्तकात अंदमानचे नाव मध्य चिनी भाषेत 'ąanh də man( आधुनिक मँडरिन चिनी भाषेत युंटुओमन) या नावाने आले आहे. 'कंट्रीज इन द सी' या पुस्तकाच्या ३८ व्या अध्यायात झाओ रुगुआ यांनी स्पष्ट केले आहे की, लांब्री (सुमात्रा) येथून सेलानकडे जाताना प्रतिकूल वाऱ्यामुळे जहाजे अंदमान बेटांच्या दिशेने वाहतात. १५ व्या शतकात वू बेई झीच्या माओ कुन नकाशात झेंग हे च्या प्रवासादरम्यान अंदमानची नोंद "अँडेमन माउंटन" (आधुनिक मंदारिन चिनी भाषेत आंदेमान शॅन) म्हणून केली गेली. आतापर्यंत नोंदवलेले सर्वात जुने पुरातत्त्वीय पुरावे सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत; तथापि, अनुवांशिक, सांस्कृतिक आणि विलगीकरण अभ्यासातील संकेत असे सूचित करतात की या बेटांवर मध्य पॅलेओलिथिक (सुमारे 60,000 वर्षांपूर्वी) च्या सुरुवातीच्या काळात वस्ती असावी. मूळ अंदमानी लोक त्या काळापासून ते १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या बेटांवर मोठ्या प्रमाणात विलगीकरणात राहत असल्याचे दिसून येते. राजेंद्र चोल दुसरा याने अंदमान निकोबार बेटांचा ताबा घेतला. अंदमान आणि निकोबार बेटांचा वापर त्यांनी श्रीविजय साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी सामरिक नौदल तळ म्हणून केला. इ.स. १०५० च्या तंजावूर शिलालेखात सापडलेल्या या बेटाला चोलांनी मा-नक्कावरम ("महान खुली/नग्न भूमी") असे संबोधले.युरोपियन प्रवासी मार्को पोलो (१२ वे-१३ वे शतक) यांनीही या बेटाचा उल्लेख 'नेक्युवेरान' असा केला आहे आणि नक्कावरम या तमिळ नावाच्या भ्रष्ट स्वरूपामुळे ब्रिटिश वसाहतकाळात निकोबार हे आधुनिक नाव पडले असावे.

https://en.wikipedia.org/wiki/Andaman_islands
==========================================
तर यथावकाश ट्रॅफिकमधून वाहत वाहत एकदाचे विमानतळावर पोचलो आणि भरून पावलो. रात्री विमानतळावर दिवस उजाडलेला असतो. एकतर मुंबई कधीच झोपत नाही. त्यातून हे विमानतळ प्रकरण तर नाहीच नाही. तर चेक इन करून मोकळे झालो आणि इकडे तिकडे करत वेळ घालवू लागलो.
a

d

c

विमानतळावर इतके काही बघण्यासारखे असते (शॉपिंग शिवायही) की बरेचदा वेळ भर्रकन निघून जातो.
d
मुंबई विमानतळावरचे काही सजावटीचे प्रकार
c

a
a

d

c

तसा तो गेलाच आणि आम्ही प्रथम चेन्नई आणि मग पोर्ट ब्लेअर अशी दोन विमाने पकडून सकाळी ७ च्या सुमारास वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

चेन्नई विमानतळावरील सजावट--कॉलिंग प्रचेतस फॉर माहीती

d

c

a

d

b

b
b

b

अंदमानला पोचल्यावर सगळ्यात प्रथम जाणवले ते म्हणजे वेळेचा फरक. अंदमान हे जरी भारतात असले तरी नकाशाप्रमाणे ते मिझोराम च्या खाली आणि थायलंडजवळ आहे. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळच पाळली जात असली तरी वेळेत साधारण तासाभराचा फरक आहे. घड्याळात ७ वाजले असले तरी ८-८.३० सारखे ऊन होते. १० मिनिटात आम्ही हॉटेलवर पोचलो . आज सकाळी मोकळा वेळ होता आणि दुपारी सेल्युलर जेल आणि लाईट आणि साउंड शो बघायला जायचे होते. तसेही रात्रभराचा प्रवास झालेला असल्याने डोळे गपागप मिटत होते. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि मस्त ताणून दिली. ३-४ तास मस्त झोप झाल्यावर जरा बरे वाटले. हॉटेलवारचे मेन्यू कार्ड बघितले पण ते काही एव्हढे खास वाटले नाही. झोमॅटो स्वीगी उपलब्ध होते पण गुगलवर शोधले तर जवळपास ५०० मीटरच्या अंतरावरही हॉटेल्स दिसत होती. त्यामुळे चालतच जायचे ठरवले. हॉटेलवरून निघालो आणि अंदाजे चालत पुढे गेलो असता पाहिले एक छान सुपरस्टोर दिसले. लगेच मंडळी आत शिरली आणि सटरफटर खरेदी झाली. थोडेच पुढे एक "ग्रीन पार्क" नावाचे हॉटेल दिसले.

b

नावावरून जरा घोटाळा झाला पण आत शिरल्यावर मालकाच्या डोक्यावरच्या देवादिकांच्या तसबिरी बघून दाक्षिणात्य हॉटेल असल्याची खूण पटली आणि आम्ही निर्धास्त आत गेलो.तिथे एकदम टिपिकल केरळी पद्धतीचे थाळी जेवण मिळत होते. ३-४ भाज्या,रसम,सांबार, ढीगभर भात आणि अपलम पापड. अहाहा !! मजा आली आणि इथे असेतोवर जेवायला इकडेच यायचा निश्चय केला.

पोटभर जेवणानंतर पुन्हा हॉटेलवर जाऊन टी व्ही बघत लोळत होतो. ३ वाजत आले होते. तेव्हढ्यात ड्रायव्हरचा फोन आला आणि त्याने आम्हाला थोड्याच वेळात सेल्युलर जेलच्या दारात सोडले. एका ऐतिहासिक वास्तूच्या दाराशी आम्ही उभे होतो.

b

b

ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर किंवा इतरत्र राज्य केले तेव्हा समुद्राच्या आजूबाजूचे प्रदेश त्यांनी तुरुंग म्हणून वापरले जसे की अंदमान,मंडाले,रत्नागिरी,ब्रिटिश गयाना,फ्रेंच गयाना बेटे वगैरे. पण त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की अजून १०० वर्षांनी ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातील. जसे प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसासाठी मंडाले हे नाव टिळकांशी आणि गीतारहस्य ग्रंथाशी जोडले गेले आहे तसेच अंदमान हे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि कमला या महाकाव्याशी. ब्रायटन हे त्यांच्या "ने मजसी ने" गीताशी जोडले आहे तर मार्सेली हे नाव जहाजाच्या पोर्ट होल मधून मारलेल्या उडीशी, लंडनमधील इंडिया हाऊस हे बॉम्ब बनविण्याशी आणि पुस्तके कोरून पिस्तुले भारतात पाठवण्याशी अशा अनेकानेक जागा. त्या पवित्र वास्तूमध्ये आत शिरलो आणि पहिले उजव्या हाताला एक बोर्ड दिसला.
b

तिथेच आत एक संग्रहालय होते जिकडे सेल्युलर जेलचे मॉडेल ठेवले होते आणि काही माहितीदर्शक फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून गाइडबरोबर आत जेलच्या फेरिसाठी निघालो.

गाईड एका कुटुंबाचे २०० रुपये आकारतो पण ते जी माहिती देतात त्यामानाने ही किंमत फार नाही. (एकुणातच अंदमान महागडे नाही, किमती वाजवी आहेत)
b

पुढील माहिती विकिपीडियावरून
==================================
अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हे कारागृह आहे. मुख्य भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून हजारो किलोमीटर दुर्गम अशा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी हे ब्रिटीशांनी बांधले होते. काळ्या पाण्याच्या नावाखाली ती बदनाम होती.

ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा मूक साक्षीदार असलेल्या या कारागृहाचा पाया १८९७ मध्ये रचला होता. या कारागृहात ६९४ खोल्या आहेत. ह्या खोल्या बांधण्याचा उद्देश कैद्यांमधील परस्पर संवाद थांबविणे हा होता. ऑक्टोपस प्रमाणेच सात शाखांमध्ये पसरलेल्या या तुरुंगाच्या आता केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. येथे एक संग्रहालय देखील आहे ज्यामधून शस्त्रे ज्यावरून स्वातंत्र्य सैनिकांवर छळ करण्यात आला होता.

अंदमानमधील वसाहतीच्या मुख्य उद्देश म्हणजे समुद्राच्या वादळात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित जागा पुरविणे. असा विचार केला होता की बंदरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे हाच एक उपाय आहे. या बेटांवर तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न १७८९ मध्ये झाला जेव्हा कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअरने चथम आयलँडमध्ये सेटलमेंट केली. ही जागा नेव्हिगेशनल म्हणून गणली जात असल्याने ही वस्ती उत्तर अंदमानमधील पोर्ट कॉर्नवालिस येथे नंतर हलविण्यात आली. वसाहतीचा तोडगा काढण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता आणि १७९६ मध्ये संपुष्टात आला.

६० वर्षांनंतर, या बेटांवरील बंदरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न आला होता, परंतु पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांना पेरण्यासाठी वास्तविकपणे १८९७ मध्ये बंदिवान वसाहतीची स्थापना केली गेली. अंदमान आणि निकोबार आणि निकोबार बेटांवर १० मार्च १८५८ रोजी २०० स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या आगमनाने कैद केलेल्या वसाहतीची कारावास सुरू झाली. बर्मा आणि भारतातील मृत्यूदंडातून काही कारणास्तव जगलेल्या सर्व दीर्घावधी व आजीवन कारागृहात असलेल्या देशभक्तांना अंदमानच्या बंदिवासात वसाहतीत पाठविण्यात आले.

पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, वहाबी बंडखोरी, मणिपूर विद्रोह इत्यादींशी संबंधित सैन्य व इतर देशभक्तांना ब्रिटीश सरकारविरूद्ध आवाज उठवण्याच्या गुन्ह्याखाली अंदमानच्या बंदिवासात असलेल्या वसाहतींमध्ये पाठवण्यात आले.
=================================================
७ शाखा आणि मध्ये वॉच टॉवर अशा पद्धतीने बांधण्यात आले असले तरी आता या कारागृहाचे केवळ १,६,७ ह्याच शाखा शिल्लक आहेत. बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात आली आहेत.

प्रत्येक शाखेच्या समोर पुढच्या शाखेची पाठ येते जेणेकरून कैदी एकमेकांना पाहू शकणार नाहीत. खुद्द सावरकर बंधूना २ वर्षे माहित नव्हते की ते दोघे अंदमानात आहेत. कैद्यांनी कामे करायचे कारखाने प्रत्येक शाखेच्या समोर आहेत. तेथे ठेवलेली तेल काढण्याची आणि काथ्या वळण्याची यंत्रे बघितली तर आजही अंगावर शहारा येतो.
b

b

b

दररोज तेल आणि काथ्याचा ठरलेला कोटा पूर्ण केला नाही तर ज्या शिक्षा देत असत त्या बघून कैद्यांचा किती भीषण छळ होत असेल याची पुरेपूर कल्पना येते.

b

आणि सर्वात कहर म्हणजे आजही तेथे असणारी फाशी देण्याची जागा. एका बंद झोपडीवजा खोलीत ३ फाशीचे दोर , त्याखाली पांढरी खूण केलेली कैदी उभी करण्याची जागा आणि एका बाजूला असलेली एक लोखंडी लिव्हर. ३ कैदी आणि मृत्यू यांच्या मधला अखेरचा दुवा.

b

b

किती जणांनी तिथे परमेश्वराकडे अखेरची प्रार्थना केली असेल? हा आपला शेवटचा क्षण आहे हे समजून किती जणांना तिथे रडू आले असेल? मृत्यू परवडला पण इथल्या कठोर शिक्षांमधून आता सुटका होणार या भावनेने किती जणांना तिथे आनंद झाला असेल? मला तिथे उभे राहवेना. हळूहळू समोरचे दृश्य डोळ्यातील अश्रुनी पुसट होत गेले.

पुढे निघालो आणि ७ व्या शाखेत तिसऱ्या मजल्यावरची शेवटची खोली बघायला गेलो. काय विशेष आहे या खोलीत? जश्या इतर ६९३ खोल्या तशीच ही पण एक.

b
पण नाही. या खोलीचे नशीब इतके विलक्षण की एक असामान्य कैदी तिथे काही वर्षे वास्तव्यास होता. त्या खोलीत त्याला मुद्दामून ठेवले होते. त्या खोलीत जायला नेहमीच्या दाराशिवाय अजून एक लोखण्डी दार आहे जेणेकरून कैदी पळून जाऊ नये. त्या खोलीतून समोरची फाशीची जागा सतत दिसत राहते आणि तिथल्या किंकाळ्या रोज ऐकू येत राहतात. तिथे राहणाऱ्या कैद्यांचे मन खच्ची व्हावे यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर हजारो लोकांना दिशा दाखवणाऱ्या भयंकर जहाल आणि धोकादायक माणसासाठी एव्हढी तयारी तर हवीच.
b

b

पण कसले काय? ५० वर्षे मुदतीच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा एकत्र सुनावणाऱ्या न्यायाधीशाला हा कैदी म्हणाला होता "तुम्हाला नक्की खात्री आहे की अजून पन्नास वर्षे तुमचे राज्य आमच्यावर राहील?" जेलमधील हिंदू मुस्लिम कैद्यांना एकमेकांविरुद्ध भडकविण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न त्याने हाणून पाडला. दंडाबेडी वाजवून एकमेकांशी बोलायची भाषा तयार केली आणि कैद्यांना शिकवली. कमला हे महाकाव्य रचले. आणि तेलाच्या घाण्याला जुंपून शिवाय चाबकाचा मार देणाऱ्या बारी साहेबाला ठणकावले की "खबरदार यापुढे हात उचललास तर, आम्ही तर शीर तळहातावर घेऊन बाहेर पडलोय, तू मात्र सांभाळ--की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'

एकीकडे पावले यंत्रवत पुढे पुढे जात होती तर डोक्यात हे सगळे विचार धावत होते. त्या नादातच खाली उतरलो आणि बाहेर पडलो. थोडावेळ समोरच्या बागेत वेळ घालवून पुन्हा लाईट आणि साउंड शो साठी आत शिरलो. या शो बद्दल मी काय लिहिणार?

b

b

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच असा हा जबरदस्त शो आहे. शाखा १ आणि ७ च्या भिंतीचा पडदा करून प्रोजेक्टरने जी कथा तासभर दाखवली जाते ती पाहून एखाद्याचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल.

b

b

शो च्या शेवटी राष्ट्रगीत चालू झाले आणि शेवटी उत्स्फूर्त पणे भारतमाता की जय असा जयघोष झाला. यंत्रवत बाहेर पडलो आणि गाडीत बसलो.

वाटेत बोलताना सगळेच या अनुभवाने भारावून गेले होते. पुढे एका चढावर बरेच ट्राफिक लागले. वाहने अडकली होती. काही कारण तर दिसत नव्हते. गाडी हळूहळू पुढे सरकली आणि ड्रायव्हरने सांगितले डावीकडे पहा. तिथे एक वाईन शॉप होते आणि ते बंद व्हायला शेवटची ५ मिनिटे बाकी असल्याने तिथे आडव्या तिडव्या गाड्या लावून दारू घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. क्षणात धाडकन वर्तमानात आलो आणि हसत हसत हॉटेलवर पोचलो.(क्रमश:)

https://traveltriangle.com/

मी आत्तापर्यंत श्रीलंका, मॉरिशस आणि अंदमान अशा ३ ट्रिप ह्या साईटवरुन बूक केल्या आहेत. सहसा विमान प्रवासाची तिकिटे स्व्तः काढणे चांगले कारण आयत्या वेळी काही बदल झाल्यास आपल्याला थेट समजते. एकदा आपला प्लान दिला की आपल्याला २-३ एजंटचे कोट येतात. त्यापैकी जे आवडेल्/परवडेल ते घ्यायचे. ट्रिप कस्टमाईझ करायची असेल (१-२ दिवस कमी जास्त किवा ठिकाणे कमी जास्त करणे) तर तसेही करुन मिळते. विमानतळावर शक्यतो स्थानिक एजंटची गाडी पिक अप करायला येते. तेथुन पुढची जबाबदारी त्यांची. काही समस्या आल्यास लोकल एजंट आणि ट्रॅव्हल ट्रँगल दोन्ही मदत करतात(एस्कलेशन करता येते, पण एकुण अनुभव चांगला आहे). बोलुन काम झाले नाहीच तर गूगल रिव्ह्यु खराब करायची धमकी द्यावी, म्हणजे सुतासारखे सरळ येतात.


विमानतळाचे नाव अजूनही सावरकरांच्या नावाने आहे हे नशीबच!
त्या विमानतळाला दुसरे कोणतेही नाव इतके जास्त शोभणार नाही.
.
.
साठ हजार रुपये प्रत्येकी की चौघांचे? आणि पुणे ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास मुंबई ते पोर्ट ब्लेअर पेक्षा १०००-१५०० कमी दिसतोय. दिवसांनुसार कमी जास्त होत असावा, तरी पुणे ते मुंबई प्रवास करण्यापेक्षा पहिला पर्याय जास्त सोयीस्कर असावा.
.
.
चेन्नई विमानतळावरील निर्गमन कक्षातील त्या शिल्पांचे फोटो मीसुद्धा प्रचेतस यांना विचारण्यासाठी काढले होते, पण राहून गेले.
.
.
सेल्युलर जेल खरोखर तीर्थक्षेत्रच आहे! लाईट अँड साऊंड शो सुंदर दिसतोय. सावरकरांचे कार्य आणि विचार इतके प्रेरणादायी आहे की भारावून जाणे साहजिक आहेच. क्रमशः असल्याने इतर निसर्ग आणि समुद्र किनारे पुढील भागात येतीलच.
.
.
अवांतर : चेन्नई विमानतळावरील एक शिल्पसंच -
1

२. डावी़कडील शिल्प - पोपट वाहन असलेला केवळ कामदेव माहिती आहे. पण त्याच्या हातात धनुष्यबाण असतो. इथे हातात वीणा असल्याची स्थिती दिसते.
2

३. उजवीकडील शिल्प - हंसावरील देवी - सरस्वती? हाता वीणा असावी असे हातांच्या स्थितीवरून वाटते. काही ठिकाणी रतीचे वाहन हंस असल्याचंही वाचलंय. शिवाय डावीकडे कामदेव आहे.
3

४. मधील चित्र - दाक्षिणात्य शैली वाटते. डावीकडे नंदी. डोक्यावर जटा+चंद्रकोर = शिव आहे का? पण शिवाच्या पायाखाली कोण आहे?
4


१. शिवाचं रूप: उजवा पाय अगदी मस्तकपर्यंत उचलला आहे. त्याचा काही अर्थ आहे का?

२. खालील रांग: मध्ये कार्तिकेय, त्याच्या उजवीकडे विष्णू, मग ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या उजवीकडे कोण आहे?


शिवाचं बहुतेक तांडवनृत्य सुरू असावं. मस्तकापर्यंत उचललेला पाय म्हणजे ललाटतिलक मुद्रा.
ब्रह्मदेवाच्या उजवीकडे हिरव्या रंगाचा पोपटाची चोच असलेला शुकमुनी असावा. हा व्यासांचा अयोनीज पुत्र. शिव एकदा पार्वतीला कथा सांगत असताना एक पोपटही तो कथा ऐकू लागला आणि ऐकता ऐकता मध्येमध्ये हुंकार भरू लागला, त्याने पार्वतीची एकाग्रता भंग झाल्याने शिवाला राग आला व तो शुकाला मारायला धावला, भेदरलेल्या शुकाने व्यासांच्या आश्रमात प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश केला आणि दडून राहिला, व्यासांनी अभय दिल्याने तो बाहेर आला व व्यासपुत्र बनला व पुढे शिवभक्त झाला अशी थोडक्यात कथा.

 "४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले"

यात लहान मुले किती? दोन रूम दिल्या का एकच? खर्च चौघांचा मिळून असेल तर जेवण, भटकंतीसाठी गाडी, प्रत्येक ठिकाणाची प्रवेश फी , वॉटर स्पोर्ट्स इ. खर्च वेगळा असेल ना?

रु.६०,०००/- चौघांसाठी घेतले.(२ लहान,२ मोठे) त्यात राहणे( प्रत्येक ठिकाणी २ सेपरेट ए.सी. रूम), जीप ने फिरणे, पोर्ट ब्लेअर ते हॅव्लॉक आणि परतीचे बोटीचे तिकिट, जेल व लाईट आणि साउंड शो चे तिकिट हे समाविष्ट होते. वॉटर स्पोर्ट वगैरे गोष्टी आम्ही स्वतःच्या खर्चाने केल्या. विमानाची तिकिटे ही स्वतः काढली. पुर्ण खर्च २.२५ लाखाच्या आसपास झाला. (पुणे-मुंबई+खरेदी वगैरे मिळुन)

विमान प्रवासाचा खर्च धरला तर थायलंड, व्हिएतनाम, मालदीव, दुबई या सर्व टूर अंदमान पेक्षा कमी बजेट मधे बसतात. तीस वर्षांपूर्वी शाळेत असताना तिथे भेट दिली होती. आताचे फोटो बघून बरेच renovation झाले आहे असे वाटते. मी गेलो तेव्हा तात्यारावांची कोठडी खोली धुळीने भरलेली होती. भिंतीचा रंग उडालेला होता आणि फक्त एक फोटो लावला होता. मला माझ्या शिक्षकांनी जाण्यापूर्वीच तिथे सावरकरांना साष्टांग नमस्कार घालायला सांगितले होते. मी तिथे कोठडीत तसा साष्टांग दंडवत घातला. तर सोबतचे लोक आणि मुख्यत: शहरी पोरे पोरी खूप हसले, चेष्टा केली. माझे कपडे धुळीने माखले. मी दुर्लक्ष केले. पण त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप वाईट वाटलं होतं.

बाकी फाशी गेटचे दोरखंड आणि लिव्हर ओढल्यावर पायाखाली उलटणारा तक्ता हे पाहून जुनी आठवण जागी झाली. तेव्हा एका विचित्र हौसेने तो फास गळ्यात घालून घेतला होता. आणि एकदम भान येऊन धडकी भरली. दोर उतरवला.

तो तुरुंग आहे हे क्षणभर बाजूला ठेवले (कठीण आहे ते) तर असे म्हणता येईल की ही वास्तू अतिशय निसर्गरम्य सुंदर जागी आहे. अथांग समुद्र दिसतो. हे तात्यारावांनी देखील नोंदवले आहे. अनेक तुरुंग अशा निसर्गरम्य जागी आहेत. गोव्यातही एक आहे असाच सी फेसिंग.

ऑस्ट्रियामध्ये एक नाझी छळछावणी बघायला गेलो होतो. तिचेही लोकेशन नितांत सुंदर होते. अशा ठिकाणी अनेक जण हालात जगले आणि क्रूर पद्धतीने मारले गेले हा विरोधाभास फारच विचित्र वाटतो.

आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
b

आज पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉक बेटावर बोटीने जायचे होते. त्यामुळे पटापट नाश्ता करायला खाली उतरलो. पण अजून सातच वाजले असल्याने नाश्ता तयार नव्हता. त्यामुळे किचनमधून आम्हाला सँडविच आणि फ्रुटीची पाकिटे पार्सल म्हणून दिली गेली. ती सॅकमध्ये टाकून सामान घेऊन खाली उतरलो. तोवर गाडी आम्हाला घ्यायला आलीच होती.

b

१०-१५ मिनिटात जेट्टीवर पोचलो. आमच्यासारखे बरेच पर्यटक पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक प्रवास करणार होते त्यामुळे तिथे थोडी रांग लागली होती. विमानतळावर असते तशीच सुरक्षा तपासणी सुद्धा होत होती. सी आय एस एफ चे जवान बारकाईने लक्ष ठेवून होते. कदाचित इथे एकूणच सैन्याचा प्रभाव जास्त असावा. त्यामुळे की काय माहित नाही, पण एकूणच लोक शांत प्रवृत्तीचे वाटले. पूर्ण सहलीत कुठेही फार कटकटी, भांडणे वगैरे ऐकू आली नाहीत. सुरक्षा तपासणी करणाऱ्या एका जवानाच्या शर्टावर देशमुख असे नाव दिसले त्यामुळे मी पुढे होऊन जरा आस्थेनी मराठीत चौकशी केली. तर ते औरंगाबादचे होते. मराठी ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर जरा स्मित झळकले. परमुलखात अचानक माहेरची माणसे भेटल्यावर कसे होईल तसेच काहीसे. पुढे होऊन बाकड्यावर विसावलो. बोट यायला वेळ होता. २-३ टी व्ही लावले होते त्यावर टिपिकल बॉलीवूडी गाणी लावली होती. मिका सिंग, बादशाह आणि कोण कोण रॅपर्स अंगविक्षेप करताना दिसत होते. गाडीत सुद्धा तसलीच बॉलीवूडी श्रीमंती प्रेम विव्हळ गीते किंवा तेनुं काला चष्मा सारखी ढिनच्यॅक गाणीच वाजताना दिसत होती. एकुणातच इथले लोक बॉलिवूडचे दिवाने असावेत. आसपास पोरांचे रडणे,खाणे,आयांचे धपाटे घालणे असा मस्त गदारोळ चालू होता. त्यातल्या त्यात छान म्हणजे हनिमूनला आलेले बरेच लव्हबर्ड्स दिसत असल्याने नेत्रसुख होते. तर अशा तर्हेने वाट बघता बघता अर्धा तास गेला आणि एकदाची बोट बंदराला लागली. आधीचे उतारू उतरले आणि आम्ही आत गेलो. आमच्या बोटीच्या बाजूलाच भारतीय नौसेनेची तुलनेने प्रचंड जहाजे उभी होती. एक तर जवळजवळ ४ मजली होते.

b

b

b

यथावकाश बोट निघाली आणि पोर्ट ब्लेअरहून बाहेर पडून खुल्या समुद्रात जाऊ लागली.
b

b

खानपान सेवा सुरु झाली आणि त्याबरोबरच फोटो काढायची स्पर्धाही.
b

b

b

b

बोटीला सगळीकडे खिडक्या असल्याने लोक कुठे कुठे बसून फोटोसाठी पोझ देत होते. बाहेरही सुंदर देखावे दिसत होते. गुगल मॅप बोटीचे ठिकाण दाखवत होता. इथे रेंज मिळणार नाही अशा बेतानेच अंदमानला आलो होतो, पण मित्तल गुरुजेनच्या कृपेने बहुतेक ठिकाणी ५ जी सेवा मिळत होती. तरीही एक सूचना- जवळ बऱ्यापैकी रोख रक्कम ठेवावी कारण बऱ्याच ठिकाणी रेंज असली तरी यु पी आय चालले नाही.

जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर बोट हॅवलॉक बंदरात पोचली आणि सामानसुमान घेऊन बाहेर पडायची लगबग सुरु झाली. बाहेर पडायचा अरुंद मार्ग ,प्रवाशांची दाटीआणि त्यातच त्यांना घेण्यासाठी आलेले ड्रायव्हर लोक्स याची नुसती वर्दळ उडाली. सुदैवाने आमच्या ड्रायव्हरला मी आधीच फोन करून ठेवला असल्याने जास्त अडचण आली नाही आणि आम्ही गाडीपाशी पोचलो. ह्या ड्रायव्हरची हेअर स्टाईल बघून आम्ही त्याला उडता पंजाब नाव देऊन टाकले. दहाच मिनिटातच गाडीने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि दुपारी ३ वाजता तयार राहण्याची सूचना देऊन उडता पंजाब निघून गेला. हे हॉटेल पोर्ट ब्लेअरच्या हॉटेलपेक्षा मस्त होते.

b

b

प्रशस्त आणि स्वच्छ खोल्या, आजूबाजूला नारळ सुपारीचे झाडे यामुळे अचानक कोकणात आल्यासारखे वाटू लागले.

b

बाहेर ऊन सणसणीत तापले होते, त्यामुळे पहिले आत जाऊन ए सी लावला आणि गारेगार झालो. मग सावकाशीने अंघोळी वगैरे उरकल्या आणि खोलीवरच जेवण मागवले. टी व्ही ला मस्त अमेझॉन फायरस्टिक लावली होती, त्याच्यामुळे नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम,झी स्टुडिओ सगळेकाही उपलब्ध होते. त्यामुळे दुपार आनंदात गेली. गारेगार खोलीत तंगड्या ताणून पडलेले असतानाच पुन्हा उडता पंजाब चा फोन आला आणि नाईलाजाने खाली उतरलो.
b

संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे राधानगरी बीचवर पोहणे हा होता. १०-१५ मिनिटात गाडीने आम्हाला तिथे नेऊन सोडले. जगातला ७ क्रमांकाचा स्वच्छ बीच अशी ह्याची ख्याती आहे आणि खरोखरच "टरकॉईज ब्लु " (मराठीत??) रंगाचे नितळ पाणी बघून आम्हाला वेड लागायची पाळी आली.

b

b

b

कपडे बदलायला आणि अंघोळीला खोल्या आणि कपडे ठेवायला लॉकर अशी छान सोय असल्याने धन्य झालो. आपल्याकडे कोकणात इतके सुंदर समुद्रकिनारे आहेत, तिथे माफक दरात नाही का अशा सोयी करता येणार? असा विचार मनात आलाच.

b

सुरुवातीला थोडेफार फोटो काढून झाल्यावर सरळ पाण्यात शिरलो आणि २ तास मस्त दंगा केला. आजूबाजूला काही मराठी/गुजराती लोक पोहत होते त्यामुळे तुम्ही कुठले आम्ही कुठले वगैरे झाले. मनसोक्त पोहून झाल्यावर भूक लागल्याने नाईलाजाने बाहेर यावे लागले आणि तोवर निघायची वेळही झाल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे कपडे बदलून आणि थोडेफार खाऊन तेथून निघालो आणि हॉटेलवर येऊन पोचलो. उतरताना ड्रायव्हरलाच विचारले की जवळपास कुठली चांगली रेस्टोरंटस आहेत का? त्याने एक दोन नावे सांगितली.

b

रात्री जेवायला तिथेच गेलो आणि चांदण्यात , रातकिड्यांची आवाज ऐकत शतपावली करत हॉटेलवर परत आलो. दुपारी ब्रम्हास्त्र बघून डोके पिकले असल्याने यावेळी रिस्क न घेता दिल चाहता है लावला आणि बघता बघता झोपून गेलो. (क्रमश:)


दुर्दैवाने अंदमानचे तिकीट मुंबई पासून साधारण माणशी २५ हजार एकेरी इतके येते. म्हणजेच जोडप्याचा नुसता १ लाख रुपये खर्च विमानाच्या तिकिटावर येतो.

यामुळे यावर्षी परत एकदा अंदमानला जायचा बेत मी रद्द केला. या मार्गावर सरकारने तिकिटाच्या किमतीवर बंधन टाकले पाहिजे असे वाटते.

अर्थात असेही वाटते कि एवढे तिकीट असल्यामुळेच अंदमानमध्ये इतर ठिकाणी आहे तशी पर्यटकांची तोबा गर्दी नाही. आणि ती ठिकाणे अजूनही अत्यंत सुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.

मौरिशसच्या निम्म्या आणि मालदीव च्या एक चतुर्थांश खर्चात तुम्हाला तेवढीच मजा करता येते हे हि खरे.


अंदमानला जाणारे प्रवासी भरपूर आहेत. केवळ पर्यटक नव्हे.

त्यात बरेचसे सरकारी नोकर आहेत आणि त्यांना चेन्नई किंवा कोलकाता येथून जाण्यायेण्यासाठी प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते. कारण अंदमानला जाणारी विमाने कायमच भरलेली असतात.

यामुळेच बर्याच लष्करी अधिकाऱ्यांना आयत्या वेळेस तेथे जायचा प्रसंग आला तर ( ताम्बरम) चेन्नई येथून हवाई दलाच्या वाहतूक करणाऱ्या विमानातून बाकड्यावर बसून प्रवास करावा लागतो. असा प्रवास मी एकदा केलेला आहे. (तो मुळीच आरामदायक नाही)

प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते.
हा एक मुद्दा नकीच असेल , असे इतरत्र हि होताना पहिले आहे

क्वांटास या ऑस्ट्रेलियातील विमानसेवककडे देशात जवळ जवळ एकाधिकारशाही आहे ( अजून एक दोन विमान सेवा आहेत पण त्या कधी जगतात कधी नामशेष होतात) येथील अंतरे आणि कमी लोकसंख्या यामुळे काही मार्गांवर जे भाडे आकारले जाते ते प्रचंड असते, त्या पैशात त्यापेक्षा लांबवर म्हणजे आशियात जाता येते

अर्थात विमान प्रवासाचे भाडे हे एक शास्त्र असावे कारण त्यात इतके अनाकलनीय प्रकार बघायला मिळतात
- काही सेवा ह्या काही श्रीमंत सरकारने चालवलेलया असतात आणि भरपूर पैशाचे पाठबळ असल्यामुळे टाय स्वस्तात शिरकाव करून घेतात जेणेकरून केवळ मुक्त बाजारपेठेतील
- काही जागी दुर्गम ठिकाणी पूर्ण विमान हे "फ्लाय इन फ्लाय आऊट" वाले खाण कामगारांनी भरलेले असते त्यांना "किती भाडे" हा प्रश्न नसतो.. फटका बसतो तो एका दुसऱ्या सर्वसामान्य प्रवाश्याला )
- असे बरेचदा ऐकले आहे कि मुंबई दिल्ली एवढया पैशात मुबई दुबई/ बँकॉक जाता येते ? खरे का ?
- एक अनुभव असा कि ऑस्ट्रेल्यात ते मुबई ( युएई मार्गे ) जे भाडे होते त्यात फक्त २०% जास्त घालून थेट लंडन पर्यंत जाता येत होते .. आता बघा हे गणित कसे जमते? २०% अधिक देऊन जवळ जवळ ७५% जास्त अंतरावर कसे काय जात येते ?


हलकटपणा ?!
नाही म्हणणार अगदी धंद्याचे गणित आहे ते शेवटी ,
जाहिरातीतील "चापलुसी " मात्र विमान कंपन्या नक्कीच करतात , विशेष करून उभे / आडवे लांब पसरलेलय देशात
जाहिरात असते "चला बाली ला केवळ ३०० $ आपण बघायला जातो तर
ते भाडे एकतर
- फार कमी दिवशी उपलब्ध असते
- प्रत्येक उड्डाणात फार कमी जागा या दारात असतात
- निघायचे ठिकाण ज्वलंत जवळचे असते - पर्थ बाली केवळ ३ तास ४५ मिनिटे पण हि जाहिरात करतात सिडनी ला ! जिथून बाली आहे ६ तास १५ मिनिटे एवढे !
- म्हणजे चाल कोलंबो ला फक्त क्सक्सक्स रुपयात असे म्हणायचे आणि ते असणार फक्त कोची ते कोलबाबा आणि जाहिरात करणार दिल्ली भागात किंवा अमृतसर ला!

याउलट कधी गंमतशीर फायदा हि होतो
"जनता क्लास" मध्ये पूर्वी रिकाम्या शीटा असतील तर जो तो झोपायःची सोय होतीय का बघायला धडपडत असतो .. एकदा प्रवासाचं आधी विमान कंपनी चे ई-मेल आले कि "३ च्या रांगेत तुम्ही एकटेच आहेत तर तुम्हाला उरलेली दोन "शिट " अगदी स्वस्त दारात विकत घायचंय आहेत का ?"
मी घेतल्या निदान ७ तासाच्या रात्रीच्या प्रवासात जरा तरी आडव पडायला मिळटाय तर हि किंमत फार नवहती
...! अर्थात जवळच्या प्रवासाचं डोळ्यातील असूया दिसली .. शेवटी एकाला ३ बोर्डिंग स दाखवले .. तो हि बहुतेक मनात म्हणाला असेल कि "काय चक्रंम आहे हा माणूस" ३ इकॉनॉमी तिकिटे काढण्या पेक्षा हा माणूस सरळ बिझिनेस क्लास चे तिकीट का नाही काढत आहे ! अर्हताःत त्याला मी अंदरकी बात सांगत बसलो नाही ..


काल संध्याकाळीच हॉटेलवर सोडताना उडता पंजाब ने सकाळी ७.३० ला तयार राहायचे फर्मान सोडले होते. कारण ८ वाजता एलिफंटा बीचवर जाण्यासाठी बोट सुटणार होती.तिकिटे तिथेच काढायची असल्याने वेळेत जाणे सोयीचे होते. त्याप्रमाणे आम्ही ७ वाजताच तयार होऊन बसलो. थोडाफार नाश्ताही करून घेतला. इकडे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळत होता. कदाचित सगळा माल बाहेरून मागवावा लागत असेल किंवा दाक्षिणात्य लोक तसेही नाश्त्याला पुरी खातात म्हणून असेल. पण तेच तेच बघून कंटाळा येत होता. तरीही दोन घास खाल्ले. गाडीची वाट बघत बसलो पण ती काही येईना. मग फोनाफोनी सुरु झाली. पहिले ड्रायव्हर आणि मग ट्रॅव्हल एजंट यांचे डोके खाल्ले आणि शेवटी एकदाची गाडी आली. दहा मिनिटात फेरीबोटच्या धक्क्याशी पोचलो.
b

तिथे बरेच तिकीट काउंटर होते आणि वॉटर स्पोर्ट साठी तिकिटे विकत होते. प्रत्येक एजंटचा काउंटर ठरलेला दिसत होता त्याप्रमाणे आमच्या एजंटने एका टेबलाकडे मला नेले. तिथल्या मुलीने सगळी माहिती दिली. योजना बरी वाटली. प्रत्येक खेळाचे ६०० रुपये अशी तुम्हाला पाहिजे तेव्हढी कुपन्स घ्यायची. मग बोट तुम्हाला एलिफंटा बीचवर नेणार. तिथे तुम्हाला पाहिजे ते खेळ खेळायचे.जितकी तिकिटे उरतील ती इथे आल्यावर परत करायची आणि ते पैसे परत घ्यायचे.
b

ही योजना फक्त पॅरासेलिंग या प्रकाराला लागू नव्हती कारण ते सगळ्यात महाग होते (प्रत्येकी ३५०० रुपये). शिवाय स्नॉर्केलिंग साठी अधिकचे १००० रुपये दिल्यास १५-२० मिनिटे जास्त फिरून प्रवाळ बघायला मिळतील असे सांगितले. अर्थातच आम्ही त्याला तयार होतो. तर अशा तर्हेने व्यवस्थित लुटून झाल्यावर आम्हाला एका बोटवाल्याच्या ताब्यात दिले गेले. १० जणांची फायबर बोट. सुझुकी किंवा यामाहाचे इंजिन पण एकाच गोष्ट चांगली म्हणजे सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. बोटवाल्यानेही हयगय न करता ते घातले होते. एकुणातच लोकांच्या सुरक्षेची काळजी (कायद्याच्या धाकाने असेल किंवा कसेही) घेतली जाते होती.
b

b

बोट सुरु झाली आणि किनाऱ्यापासून १००-१५० मीटर आतल्या बाजूने एलिफंटा बीचकडे प्रवास सुरु झाला. ऊन मी म्हणत होते, पण दूरवर कुठेतरी काळ्या ढगांचा पुंजकाही दिसत होता.

b

मधेच वाऱ्याची झुळूक येऊन जात होती. १०-१५ मिनिटात एलिफंटा बीचला पोचलो. इथेही कपडे बदलायला साध्याच पण खोल्या होत्या. माफक दरात लॉकर होते. स्टॉलवर खाण्यासाठी भेळपुरी, सामोसा, सरबत, चहा /कॉफी, फळे असे प्रकार होते. मंडळी उत्साहात तयार झाली पण तोवर लांबवर दिसलेला पाऊस आमच्या भेटीला तिथे येऊन पोचला आणि वातावरण कुंद झाले. टपटप पडणारे थेम्ब म्हणता म्हणता धारा बनले आणि सुरक्षेच्या कारणास्तव सगळे खेळ थांबले. मंडळी जरा हिरमुसली. वेळ घालवायला म्हणून थोडे खान पान झाले. सुदैवाने पाऊस ओसरला आणि खेळ पुन्हा सुरु झाले.
b

प्रथम स्नॉर्केलिंगचा आनंद घेतला. साधे पोहताना पाणी स्वच्छ होते त्यामुळे समुद्र तळ दिसत होताच, पण मास्क लावून जरा ५० मीटर आत गेल्यावर तळाचा नजारा जो खाडकन बदलला की माझा आपल्या नजरेवर विश्वासच बसेना. अचानक समुद्रतळ खोल झाला आणि मी जणू काही एखाद्या पर्वत शिखरावरून खाली बघतोय असे वाटू लागले. खालच्या खोल काळोखी दऱ्यांचा अंदाजच येईना. सर्वत्र फक्त प्रवाळ दिसत होते. आता आमच्या गाईडने आम्हाला रव्याच्या पुड्या हाती दिल्या आणि थोडा थोडा रवा बाहेर सोडायला सांगितले. त्याबरोबर रंगीबेरंगी माशांच्या झुंडीच्या झुंडी आमच्या बरोबर खेळू लागल्या आणि रवा खायला धडपडू लागल्या. मासे अक्षरश: हाताला लुचत होते आणि पुडी ओढायचा प्रयत्न करत होते. त्यांचे इतके नानाविध रंग होते की मी लहान मुलासारखा हरखून गेलो. काय काय बघू असे झाले. स्कुबा पेक्षा हा प्रकार मला आवडला. तांत्रिक बाजूनेही सोपा वाटला.

b

१० मिनिटात स्नॉर्केलिंग करून झाले आणि आम्ही इतर खेळ खेळायला मोकळे झालो.

b

सगळीकडे असतात तसेच खेळ इथेही होते त्यामुळे विशेष काही लिहिण्यासारखे नाही.

b

थोडा वेळ खेळून झाले आणि पुन्हा ढग दाटून आले. यावेळी मात्र पावसाचा नूर काही वेगळाच होता. सपासप धारा सुरु झाल्या आणि सगळे बोटवाले आणि वॉटर स्पोर्ट्स वाले आपापली दुकाने आवरू लागले. खेळाचे सामान किनाऱ्यावर आणून ठेवू लागले. बोटी एकमेकींना बांधून ठेवू लागले. खेळ थांबल्याने लाईफ जॅकेट अशी झाडाला टांगली गेली

b

थोडा वेळ लोकांनी खाण्यापिण्याच्या दुकानांवर गर्दी केली, परंतु लवकरच सगळ्यांना कळून चुकले की मेरीटाईम बोर्ड किंवा जी कोणती नियामक संस्था आहे तिच्या इशाऱ्याने सगळे खेळ थांबवले गेले होते. हळूहळू पर्यटक पांगू लागले. स्टाल वालेही दुकाने आवरू लागले. सकाळपासून इथवर उकाड्यात आलो असल्याने सुरुवातीला पाऊस छान वाटत होता. मात्र आता थंडीने अंग काकडून सगळे गार पडले. त्यातच आमचा बोटवाला कुठे दिसेना. हळूहळू इतर पर्यटक एक एक करून बोटीत बसून निघू लागले. गर्दी कमी होऊ लागली. तितक्यात आमचा बोटवाला दिसला. तो कुठल्या घाईत होता काय नाहीत पान आम्हा सगळ्यांना एकाच ठिकाणी बसायला सांगून तो कुठेतरी गायब झाला. अजून १०-१५ मिनिटे गेली. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चेष्टेवारी नेणारी मंडळी आता मात्र कातावली. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती कि स्टाल वाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या जंगलझाडीतून मुख्य बेटावर चालत जाण्यासाठी रस्ता होता. अर्थातच ते लोक स्थानिक असल्याने त्यांच्या रोजच्या वापरातील असला तरी आम्हाला काही तो झेपला नसता. पान अगदीच बोट न आल्यास निदान एक पर्याय होता. मात्र आमचा अंत पाहून शेवटी बोटवाला आला. काय झाले होते माहित नाही, मात्र त्याने हिकमतीने लांबून कुठून तरी आमची बोट आणली होती. पटापट बोटीत बसलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला. येताना छान वाटणाऱ्या लाटा आणि उडणारे तुषार आता मात्र तितके छान वाटत नव्हते. समुद्र खवळलेला होता. जरी आम्ही किनाऱ्यापासून १०-१५० मीटर आतमध्ये होतो तरी तिथे पाणी चांगलेच खोल होते. दहा माणसांची छोटी बोट थपडा खात खात पुढे जात होती. वरतून पडणाऱ्या थंडगार पाऊसधारा आणि समोरून चापचाप उबदार समुद्री पाण्याचा मारा अशा दुहेरी कात्रीत आम्ही सापडलो होतो. तोच लांबवर एक मोठे जहाज दिसले . बोटवाल्याला विचारले तर तो म्हणाला की हे रेस्क्यू जहाज आहे. अशी ४ जहाजे इथे आसपास तैनात आहेत, त्यामुळे तूम्ही घाबरू नका. थोडा धीर आला. यथावकाश तो २५-३० मिनिटाचा एरोलार कोस्टर प्रवास संपवून आम्ही किनाऱ्याला आलो आणि जीव भांड्यात पडला. एकुणात सकाळी गमती जमतीत सुरु झालेली सहल हवामान बदलल्याने एकदम साहसी झाली होती. आधीच्या सगळ्या "पेड" वॉटर स्पोर्ट पेक्षा हा येतानाचा खेळ सर्वात भारी ठरला.(क्रमश:)


काल दमून भागून हॉटेलवर परतल्यावर अर्थातच अजून काहीही करायची इच्छा उरली नव्हती. वातावरणही पावसाळी होते, त्यामुळे उरलेला दिवस आराम केला आणि रात्री लवकर जेवून गॅलरीत गप्पा मारत बसलो. मग गुडूप झोपलो. आज सकाळी लवकरच पुन्हा जेट्टीवर पोचायचे होते आणि पोर्ट ब्लेअरला जाणारी बोट पकडायची होती. शिवाय दिवसही लौकरच उजाडत असल्याने जागही लवकर येत होती. वेळ न घालवता आवरून घेतले आणि नाश्ता केला.सामान आवरलेलेच होते, त्यामुळे टेन्शन नव्हते. ७.३० पर्यंत गाडी येऊन उभी राहिली आणि १० मिनिटात आम्ही जेट्टीवर पोचलो सुद्धा.

b

बोट येऊन उभी होती पण कर्मचारी अजून आले नव्हते. त्यामुळे निवांत धक्क्यावर फिरत होतो. खाली पाण्यात पहिले तर मोजकेच मासे आणि जेलीफिश नितळ पाण्यात पोहत होते. डोक्यात एक कल्पना आली. पिशवीतला बिस्किटाचा पुडा काढला आणि बिस्किटे थोडी थोडी चुरून पाण्यात टाकू लागलो. आणि काय आश्चर्य? काळ स्नॉर्केलिंग करताना दिसले त्यापेक्षा जास्त विविध रंगी मासे झुंडीने ,येऊ लागले. चुरा खाण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच सुरु झाली. हजार रुपयांच्या ट्रीपमध्ये जे पहिले दहा रुपयांच्या बिस्किटांनी सुद्धा केले होते. फक्त इथे आम्ही पाण्यात नव्हतो तर १५-२० फूट वरती उभे होतो. उरलेला चुरा खायला भरपूर चिमण्या गोळा होऊ लागल्या. थोडा वेळ हा खेळ चालला , मात्र आता बोटीचा कर्मचारीवर्ग आल्याने दरवाजे उघडले आणि आम्ही लगबगीने सामान घेऊन बोटीत स्थानापन्न झालो. थोड्याच वेळात बोट भरली आणि सुटली. खानपान सेवा सुरु झाली. एकीकडे टॉम अल्टर ची कुठलीतरी जंगल मुवि पडद्यावर दिसत होती. अर्थात टॉम अल्टर बद्दल मला आदरच आहे. पण गम्मत वाटली की ज्या ब्रिटिशांच्या कब्जातून अंदमान सोडवायला भारतीय स्वातंत्र्य सेनानी धडपडले त्यातीलच एक ब्रिटिश अंदमानला या म्हणून जाहिरात करतो आहे. काव्यगत न्याय कि काय म्हणतात ते हेच असावे.

२ तासात पोर्ट ब्लेअरला पोचलो. आज फक्त सायंकाळी कॉर्बिन कोव्ह बीचला भेट देणे आणि खरेदी इतकाच कार्यक्रम होता. त्यामुळे दिवस तास मोकळाच होता. मग आम्ही कार्यक्रमात थोडा बदल केला आणि रॉस बेट बघायचे ठरवले. हे बेट सेल्युलर जेल आणि आसपास फिरताना समोरच दिसत राहते. असे म्हणतात की ब्रिटिश लोकांनी प्रथम रॉस बेटावरच वस्ती केली आणि तिथून ते पोर्ट ब्लेअरला ये जा करत (कारण पोर्ट ब्लेअर हे मुख्यतः जेल म्हणून वापरले जायचे). नंतर मात्र काही कारणाने रॉस बेट मागे पडले आणि पोर्ट ब्लेअरच प्रमुख सत्ता केंद्र झाले.

तर आम्ही ड्रायव्हरला सांगितले की तू आमचे सामान हॉटेलवर नेऊन टाक, आणि वाटेत आम्हाला रॉस बेटावर जाणाऱ्या बोटी मिळतात तिथे सोड. जाऊन येऊन साधारण ३-४ तास लागणार होते त्यामुळे आम्ही दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणार होतो. या नवीन योजनेनुसार ड्रायवरने आम्हाला रॉस बेटाकडे जाणाऱ्या बोटीच्या धक्क्यावर सोडले आणि तो सामान घेऊन निघून गेला. आम्ही बोटीची तिकिटे काढली आणि बोटीत बसलो. ही बोट काही लोकांना रॉस बेटावर सोडून पुढे नॉर्थ बे ला जाणार होती. नॉर्थ बे मुख्यतः वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे. पण ते आम्ही आधीच केलेले असल्याने आम्हाला नॉर्थ बे ला जायचे कारण नव्हते. १५-२० मिनिटात आम्ही रॉस बेटावर उतरलो. उतरल्यावर सगळ्यात पाहिले आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे २ हरिणे जणू प्रवाशांचे स्वागत करायला उभी होती.

b

जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांकडून ती मजेत हात लावून घेत होती, खाणे स्वीकारत होती आणि फोटोला पोझही देत होती. आम्हीही त्यांचे जरा लाड करून पुढे झालो आणि बघतो तर पुढे जवळ जवळ १००-१५० हरणांचा कळप फिरत बागडत होता. रॉस बेटावर इतकी हरणे कुठून आली असावीत बरे? असा विचार करतच आम्ही पुढे झालो. पण सगळीच हरणे काही माणसाळलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या शिंगांपासून काळजी घ्यावी लागत होती, पण एकूणच सगळी मोकळीच फिरत होती.

b

b

रॉस बेट साधारण ०.३ वर्ग कि.मी इतके आहे. पण उंच सखल असल्याने चालत फिरणे थोडे दमणूक करणारे ठरते त्यामुळे आम्ही सरळ विजेच्या गाडीचा पर्याय निवडला . ही गाडी तुम्हाला बेटावरील मुख्य ठिकाणे दाखवते आणि उच्चतम बिंदुला नेऊन सोडते.

b

b

तिथून तुम्हाला पायऱ्या उतरून मागच्या बाजूला असलेले दीपगृह बघून परत यावे लागते आणि मग तीच गाडी तुम्हाला परत आणते. एका गाडीचे भाडे ६०० रुपये.

b

तूनळीवर आधीच पहिल्या प्रमाणे इथे अनुराधा राव नावाच्या एक मराठी बाई वस्तीला आहेत आणि त्या हरणांशी बोलतात. त्यांनी बोलावले की हरणे जवळ येतात असे बघितले होते. पण त्या आम्हाला कुठे दिसल्या नाहीत.

b

b

तर आम्ही गाडीतून बेटावरच्या मुख्य इमारती बघत बघत उच्चतम बिंदूवर पोचलो. आता जवळपास दोनशे पायऱ्या उतरून मागच्या बाजूला खाली जायचे होते. बेटाचा शेवटचा बिंदू म्हणजे दीपगृह आम्हाला खुणावत होता आणि त्याच्या मागचा उसळता समुद्र भुरळ घालत होता.

b

घनदाट झाडांमधून रस्ता खाली उतरत होता. त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. सरते शेवटी रस्ता संपला आणि उथळ समुद्रात उभारलेले खांब आणि त्यावर टाकलेले लाकडी पूल पार करून आम्ही शेवटच्या बिंदूवर पोचलो.
b
इथून पुढे रस्ता नव्हता आणि दीपगृह तर अजून लांब होते. पण हाती असलेल्या वेळेत एक अजून जागा बघितल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही परतलो. सर्वोच्च बिंदूवर आलो तर तिथे नुकतेच एक झाड पडले होते, सुदैवाने काही जीवित हानी झाली नव्हती.

b

पण त्यामुळे परतीची गाडी पकडायला जास्त चालावे लागणार होते. यथावकाश गाडी पकडून परत आलो आणि दुसऱ्या महायुद्धात बांधलेला एक जपानी बंकर पाहून परतीच्या बोटीत बसलो.
b

पोर्ट ब्लेअरला परतून ग्रीन पार्क मध्ये जेवलो आणि हॉटेलवर आलो.

भरपूर दमणूक झालेली असल्याने थोडा वेळ मस्त झोप काढली. झोपेतून उठून बाहेर पाहिले तर संध्याकाळ उतरली होती. मुलांनी तर आधीच गुगलवर बघून बीच बोअरिंग असल्याचे जाहीर केले होते आणि दांडी मारली होती. ड्रायव्हरचा फोन आला तेव्हा क्षणभर मनात आले की इथेच आराम करूया किंवा खरेदीला बाहेर पाडूया. कशाला मरायला कॉर्बिन कोव्ह बीचला जायचे? पण आळसावर मात केली आणि एक कडक चहा पिऊन गाडीत बसलो. ७-८ कि.मी प्रवास करून गाडीने आम्हाला बीचवर सोडले आणि २ तासाने परत येतो सांगून निघून ड्रायव्हर गेला. कुठल्याही बीचसारखा साधारण बीच , फिरायला लांबलचक , थोडेफार खाण्यापिण्याचे स्टॉल , वॉटर स्पोर्टच्या सोयी वगैरे होते. गप्पा मारत मारत बीचला एक फेरी मारली.मग थोडे खाल्ले.

b

पाण्यात पाय सोडून बसलो आणि आजूबाजूची वर्दळ बघत बसलो. आज ट्रिपचा शेवटचा दिवस होता. उद्या सकाळी परतीचा प्रवास. त्यामुळे निवांतपणा होता.

b

संध्याकाळ हळूहळू उतरत चालली होती. सूर्य मावळत होता आणि अंधार पसरू लागला होता.

b
हळूहळू लोक कमी कमी होऊ लागले, तसे आम्हीसुद्धा आवरते घेतले आणि ड्रायव्हरला फोन लावला .

b

पण फोन लागेचना. बरेचदा प्रयत्न केले पण यश नाही. मग ट्रिप को ऑर्डिनेटरला फोन केला. तो म्हणाला काळजी करू नका मी बघतो. ५ मिनिटात त्याचा फोन आला की ड्रायव्हरला चिडिया टापू नावाच्या ठिकाणी पाठवले आहे, तिथे रेंज नसल्याने फोन लागत नाही. पण तो थोड्याच वेळात पोचेल. तुम्ही तिथेच थांबा. आम्ही थांबलो. अजून १५-२० मिनिटे गेली. अंधार झाला. २-४ रिक्षा होत्या. काही गाड्या होत्या. तितक्यात एक बस समोर येऊन उभी राहिली. ती शहरात जाणारी होती , साधारण नावावरून हॉटेलजवळ जाईल असे वाटत होते. पुन्हा को ऑर्डिनेटरला फोन केला आणि बसने जाऊ का? म्हणून विचारले, पण त्याचे आपले एकाच. थोडे थांबा गाडी येईलच. इकडे बस निघून गेली. अंधार वाढला, रिक्षा कमी झाल्या. लोकही तुरळक राहिले. आता मात्र माझी सटकली आणि मी किमान १५ व्या वेळी को ऑर्डिनेटरला फोन केला आणि त्याला शिव्या घातल्या .त्यानंतर त्याच्या दिल्लीच्या मुख्य ऑफिसात फोन करून तिथल्या बाईला झापले आणि गुगलवर तुमचा रिव्ह्यू माझ्या हातात आहे म्हणू धमकावले. ही मात्रा बरीक लागू पडली आणि तिने बिनशर्त माफी मागून समोर दिसेल ती रिक्षा पकडा, पैसे मी देते म्हणू सांगितले. अर्थात माझा मुद्दा तो नव्हताच मुळी. इतके पैसे खर्च केल्यावर शंभर दोनशे साठी कोण वाद घालतोय? पण गैरसोय झाल्याचा राग होता. तणतणत समोर दिसेल ती रिक्षा पकडली. किर्रर्र अंधारात रिक्षा वळण वळणाच्या रस्त्याने धावू लागली. उजवीकडे समुद्र साथ करत होता. पण आता तो मागास एव्हढा छान वाटत नव्हता. तुरळक एखादी गाडी बाजूने जात होती, पण बाकी सुनसान होते. १० मिनिटे अशीच तणावात गेली आणि रिक्षाने एक वळण घेतले मात्र अचानक कायापालट झाल्याप्रमाणे किंवा नाटकात जसा फिरता रंगमंच असतो त्याप्रमाणे दृश्य बदलले आणि आम्ही शहराच्या गजबजलेल्या भागात आलो. इथे समुद्रकिनारा तटबंदी करून सुशोभित केला होता .इतकी सुंदर दिवाबत्ती केली होती आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक फिरत होते, की १० मिनिटापुरवी आपण किती तणावात होतो हे आठवून माझे मलाच हसू आले. कदाचित रिक्षावाल्याला सुद्धा माझ्या भावना पोचल्या असाव्यात. तो जरा मोकळा झाला आणि म्हणाल "साहेब, काळजी करू नका, अंदमान एकदम सुरक्षित जागा आहे, इथे पर्यटक बिनधास्त फिरू शकतात, घाबरायचे कारणच नाही." यथावकाश त्याने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही हॉटेलवर पोचलो मात्र थोड्याच वेळात फोन वाजू लागले आणि एक एक जण भेटायला येऊ लागला. थोडक्यात दिल्ली ते अंदमान चाव्या फिरल्या होत्या आणि आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागायला लोक भेटू इच्छित होते. पण चूक कोणाची हि चर्चा करत बसण्यापेक्षा झालेगेले विसरून जाण्यातच शहाणपणा होता. त्यामुळे मी सौम्य शब्दात एकेकाची हजेरी घेतली आणि प्रकरणावर पडदा टाकला. एकुणात ट्रिपचा शेवट लक्षात राहील असा झाला. पण ५ दिवसांचा एकूण हिशोब मांडायचा तर ५ टक्के त्रास आणि ९५ टक्के मजा असे धरून ट्रिप छानच झाली होती. वातावरण चांगले होते, लोक चांगले भेटले, खूप गैरसोय, कोणी आजारी पडणे असले काही झाले नाही. एक सुंदर अनुभव पदरी पडला. हॉटेलवरच जेवण मागवले आणि सामानाची आवरा आवरी केली. आता उद्या सकाळी पोर्ट ब्लेअर ते चेन्नई आणि तिथून पुणे. (समाप्त)











समुद्र में मोती : अंडमान निकोबार द्वीप समूह की यात्रा (Andaman Trip - Hindi Blog)


यात्रा मात्र एक शब्द ही नहीं बल्कि अपने आप में एक ऐसी परिकल्पना है जो किसी भी मनुष्य में रोमांच का संचार कर देता है। यूँ तो मैंने बहुत से जगहों की यात्रायें की है लेकिन बचपन से किसी यात्रा के बारे में ज्यादा आकांक्षित था वो जगह बस एक ही था अंडमान एवं निकोबार द्वीप समूह (Andaman and Nicobar Island)। वर्ष 2019 में विवाह के पश्चात अपनी पत्नी के साथ घूमने के लिए हमने इसी स्थान को चुना। अंडमान एवं निकोबार द्वीप समूह एक केंद्र शासित प्रदेश है जो सुदूर बंगाल की खाड़ी के मध्य में स्थित है. यह 572 छोटे बड़े द्वीपों का एक समूह है जिसमे 37 द्वीपों पर लोग रहते हैं। 

अपने विवाह के पश्चात् मैं अपने पत्नी के साथ लखनऊ के चौधरी चरण सिंह विमानतल से अंडमान एवं निकोबार द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) की राजधानी पोर्ट ब्लेयर(Port Blair) में स्थित वीर सावरकर विमानतल की ओर वायु मार्ग से बढ़ चला। यह कोलकाता होते हुए 4-5 घंटे की लम्बी यात्रा था। आसमान से बंगाल की खाड़ी(Bay of Bengal) की नीली सतह को देखना अद्भुत अनुभव था। कुछ घंटो की यात्रा के उपरांत समुद्र के मध्य में खूबसूरत द्वीप समूह ऐसे नज़र आने लगे जैसे मोतियों की माला को किसी से बहुत ही सलीके से पिरोया हो।मन का रोमांच हिलोरे मार रहा था कि जैसे हम अपने सपनो के मंज़िल की ओर बस पहुंचने ही वाले हैं। हमारी यह यात्रा 6 रात्रि / 7 दिन की थी जिसको मैं प्रतिदिन के हिसाब से वर्णन करूँगा। 


➨ पहला दिन ( लखनऊ से पोर्ट ब्लेयर / सेलुलर जेल / कोरबिन कोव बीच )

सुबह 10 बजे हमारा विमान पोर्ट ब्लेयर के वीर सावरकर हवाई अड्डे(Veer Savarkar Airport) पर उतरा। हवाई अड्डे के निकास द्वार पे हमारे लिए गाड़ी खड़ी थी जिसके ड्राइवर रवि थे। रवि ने हमारे होटल "डी मरीना"(De Marina) तक पहुंचाने के क्रम में हमारा अभिवादन और स्वागत किया। होटल में ज़रूरी औपचारिकताओं को पूरा करने के बाद हम लोगो ने थोड़ा विश्राम किया। दोपहर 1 बजे हम लोग अपने ड्राइवर रवि के साथ सेल्लुलर जेल(Cellular Jail) देखने के लिए पहुंचे। इसे ही काला पानी की सजा भी कहा जाता था। इस जेल की नींव अंग्रेज़ो ने 1897 में रखी थी । इस तीन मंज़िली जेल में कुल 694 कोठरियां हैं जिसको इस ढंग से बनाया गया है कि बन्दी आपस में मेल मिलाप ना कर पाएं। ऑक्टोपस की तरह इसके सात शाखाएँ हैं जो मध्य में आपस में जुड़े हुए है। सबसे आखिरी में सावरकर कोठी(Savarkar Cell) है जहाँ वीर सावरकर ने अपने जीवन के 13 वर्ष (1911 -1924 ) गुज़ारे। सेलुलर जेल में घूमने के दौरान यह अनुभव करना ही भयानक था कि कैसे हमारे स्वतंत्रता सेनानियों ने अपना जीवन इन जेलों में कैद होकर काटा होगा। जेल परिसर में ही एक फांसी घर है। इस जेल में बंदियों को दी जाने वाली भयानक यातनाओं के बारे बताने के लिए  तथा स्वतंत्रता सेनानियों के जीवन परिचय के लिए एक राष्ट्रीय संग्रहालय एवं मेमोरियल भी है। 

सेलुलर जेल घूमने के बाद हम लोग पोर्ट ब्लेयर के पास स्थित कोरबिन कोव बीच(Corbyn Cove Beach) पहुंचे। यह एक बहुत ही खूबसूरत समुद्र तट है। नारियल के सुन्दर पेड़ों के नीचे  बैठकर नीले समुद्र को निहारना बेहद ही सुकून देने वाला था। नारियल पानी को हाथ में लिए हुए  रेत पर घूमने का मज़ा ही अलग था  कोरबिन कोव बीच पे कुछ अच्छा वक़्त बिताने के बाद हमें वापस सेल्लुलर जेल जाना था जहाँ 1 घंटे का लेज़र लाइट और साउंड शो होना था 

शाम होते ही लेज़र लाइट और साउंड शो(Laser Light & Sound Show) शुरू हुआ। इस शो में बॉलीवुड अभिनेता ओम पुरी जी की बेहद गंभीर आवाज़ में काला पानी और सेल्लुलर जेल में स्वतंत्रता सेनानियों पर ज़ुल्म और अत्याचार को उस जेल परिसर के एक पीपल की पेड़ की नज़रो से सुनाया गया है पीपल के पेड़ के द्वारा इस विवरण को सुनकर ही रूहें काँप जाती है। लेज़र लाइट और साउंड शो देखने के बाद अमर सेनानियों के बलिदान को याद करते हुए और सेल्लुलर जेल की मिट्टी को नमन करते हुए हम लोग वापस अपने होटल विश्राम करने आ गए


 दूसरा दिन ( हैवलॉक आइलैंड  / स्वराज द्वीप  /  राधानगर बीच )

अगली सुबह हम लोगो को हैवलॉक द्वीप(Havelock Island) जिसका नाम अब परिवर्तित करके स्वराज द्वीप(Swaraj Dwip) कर दिया के लिए निकलना था। करीब 113 वर्ग  किलोमीटर में  फैला हैवलॉक द्वीप सफ़ेद बालू के बीचों वाला जगह है जो कोरल रीफ और  हरेभरे जंगलो से घिरा हुआ है यह द्वीप पोर्ट ब्लेयर से करीब 39 किलोमीटर उत्तर पूर्व में स्थित है

सुबह 6  बजे हमारे ड्राइवर रवि ने हमको  पोर्ट ब्लेयर के जेट्टी पे पंहुचा दिया जहाँ  से हैवलॉक द्वीप(Havelock Island) तक की यात्रा हमको क्रूज(Cruise) से करना था। क्रूज का नाम सी-लिंक(Sea Link) था जो बेहद ही खूबसूरत और आरामदायक था। लगभग 2 घंटे की रोमांचक यात्रा के बाद हम लोग 8 बजे हैवलॉक द्वीप पहुंच गए। वहाँ के ड्राइवर प्रकाश ने हमको हमारे बीच रेसॉर्ट "गोल्ड इंडिया बीच रेसॉर्ट"(Gold India Beach Resort) पहुँचा दिया यह बहुत ही खूबसूरत बीच रेसॉर्ट नारियल के बगीचों से घिरा हुआ है और समुद्र तट के सामने है नाश्ता करने के बाद करीब 11 बजे हम लोग राधानगर बीच के लिए निकले। प्रकाश रास्ते में राधानगर बीच(Radhanagar Beach) की विशेषताएं बता रहा था। 

राधानगर बीच(Radhanagar Beach) एक बहुत ही खूबसूरत बीच है जो सफ़ेद रेत, फिरोज़ी नीले रंग के पानी और हरे वनस्पतियों  के लिए मशहूर है। इस बीच को टाइम पत्रिका(Time Magazine) द्वारा एशिया के तीन बेहतरीन बीचों में रखा गया है। यहाँ लोग स्विमिंग(Swimming),स्नॉर्कलिंग(Snorkeling), फिशिंग(Fishing) और स्कूबा डाइविंग(Scuba Diving) करने आते है। हम लोगों ने इस बीच पर काफी देर तक तैराकी किया और उसके बाद बीच के किनारे लगे सुन्दर पेड़ो के नीचे  बैठकर जंगली फलों का स्वाद लिया। हम लोगों ने फिश स्पा(Fish Spa) का आनंद भी लिया जिसमे पैर को छोटी छोटी मछलियों के टैंक में रखना होता है। डॉक्टर फिश नाम की ये मछलिया आपके पैरों के डेड स्किन को खा जाती है  4-5 घंटे इस बीच पर कब गुज़र गए पता ही नहीं चला। लगभग 6 बजे हम लोग अपने रेसॉर्ट वापस आ गए। शाम को चाय पीने  के बाद हम लोग अपने रेसॉर्ट के सामने बने बीच पर टहलने गए सूर्यास्त के बाद हवा के ठंडे झोकों के साथ शांत एवं मनोहारी वातावरण में रेत पर पड़ते कदम मन को बेहद ही लुभा रहे थे


तीसरा  दिन (हैवलॉक द्वीप / स्वराज द्वीप  /  एलीफैंट बीच )

नाश्ता करने के बाद ड्राइवर प्रकाश ने हम लोगो को हैवलॉक द्वीप(Havelock Island)  के जेट्टी पे पहुँचाया जहाँ स्टीमर से एलीफैंट बीच(Elephant Beach) पे जाना था। एलीफैंट बीच हैवलॉक द्वीप के दूसरे कोने पर है जहाँ आप जंगल से ट्रैकिंग करके 30 मिनट में पहुंच सकते है। दूसरा रास्ता स्टीमर का है जिसमे 15 मिनट में यहाँ पहुँचा जा सकता है।  स्टीमर वाले रास्ते में एक सुन्दर सा हाथी की शक्ल का लाइट हाउस दिखता हैं जो रात में पानी के जहाज़ों को दिशा बताता है। 

एलीफैंट बीच(Elephant Beach) के लोकप्रिय होने का कारण है यहाँ होने वाला वाटर स्पोर्ट्स(Water Sports)। जेट स्की(Jet Ski), सी वॉक(Sea Walk), सोफा राइड(Sofa Ride), स्नॉर्केलिंग(Snorkeling) और पैरासेलिंग(Parasailing) करने के लिए यहाँ पर्यटकों की भीड़ रहती है। हम लोगो ने जेट स्की और सोफा राइड का आनंद लिया और पैरासेलिंग का टिकट लेकर अपनी बारी आने का इंतज़ार करने लगे। बीच पर उत्सव जैसा माहौल था। बीच पर सूख कर नीचे गिरे हुए पेड़ इसकी खूबसूरती को चार चाँद लगा रहे थे। यहाँ के फलों से भरे प्लेट और नारियल पानी का मीठा स्वाद  शरीर में स्फूर्ति का संचार कर रहा था जो पैरासेलिंग करने के लिए ज़रूरी भी था। करीब 1 घंटे के बाद हमारा नंबर आया। पैरासेलिंग के लिए 10-12  लोगो के समूह को एक छोटे से स्टीमर द्वारा समुद्र में खड़े एक विशेष स्टीमर पर ले जाया गया जो पैरासेलिंग के लिए ख़ास उपकरणों से लैस था। पैरासेलिंग वाला स्टीमर हम लोगो को समुद्र के और अंदर लेकर गया और बारी बारी से सबको पैरासेलिंग कराने लगा। पैरासेलिंग में शरीर को पैराशूट से बांधकर एक रस्सी से आसमान की ओर छोड़ा जाता है और जैसे जैसे स्टीमर चलता है वैसे ही हमारी ऊंचाई ऊपर होने लगता है। पैरासेलिंग करते समय मनमोहक हवाओं के बीच आसमान की ऊंचाइयों से नीचे देखने पर गाढ़े नीले समुद्र में स्टीमर और उससे उठने वाली दूधिया लहरें बेहद ही सुन्दर दृश्य बना रही थी। यह 15 मिनट का अद्भुत अनुभव रोमांचित करने वाला और कभी ना भूलने वाला पल था।  स्टीमर पे बैठे पूरे समूह को पैरासेलिंग करने में 2.5 घंटे का समय लगा। पैरासेलिंग करने के बाद हम लोग वापस एलीफैंट बीच पर आ गए। कुछ वक़्त बीच पे बिताने के बाद हम लोग स्टीमर से  हैवलॉक द्वीप के जेट्टी से होते हुए वापस अपने रेसॉर्ट आ गये। रात के भोजन लिए रेसॉर्ट के तरफ से बीच के किनारे कैंडल लाइट डिनर(Candle Light Dinner) की व्यवस्था थी। समुद्र के किनारे कांच  के बोतलों में रखे मोमबत्ती के उजाले में साफ़ सुथरे आसमान में टिमटिमाते तारों के नीचे बैठना मनोहारी था। पैर  के नीचे रेत की परते, लहरों की कलरव ध्वनि और टेबल पे रखे ताज़े फूलों की महक के बीच डिनर करना बहुत ही कमाल  का अहसास था।


चौथा दिन (नील आइलैंड/शहीद द्वीप/सीतापुर बीच / भरतपुर बीच / स्कूबा डाइविंग / लक्ष्मणपुर बीच )

दो दिन हैवलॉक द्वीप पर बिताने के बाद हम लोगो को अपने अगले पड़ाव नील आइलैंड(Neil Island) जिसका नाम बदल कर अब शहीद द्वीप(Shaheed Dwip) कर दिया गया है की ओर निकलना था। नील द्वीप(Neil Island) पोर्ट ब्लेयर के उत्तर पूर्व में लगभग 36 किलोमीटर तथा हैवलॉक द्वीप से दक्षिण में 18 किलोमीटर में स्थित है। तिकोने आकार का यह द्वीप अंडमान द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) के ताज़े फलों और सब्ज़िओं का मुख्य स्रोत है।

हम लोग 9 बजे अपने क्रूज सी-लिंक से 1 घण्टे की यात्रा के बाद नील द्वीप पहुंच गए। ड्राइवर सुजीत ने हमको हमारे बीच रेसॉर्ट "टैंगो बीच रेसॉर्ट"(Tango Beach Resort) पहुंचाया। थोड़ा आराम करने के बाद हम लोग सीतापुर बीच(Sitapur Beach) के लिए निकले। यह बीच एक सूर्योदय पॉइंट था जहाँ समुद्र के अंदर से सूरज निकलता हुआ दिखता है। बीच के किनारे की हरियाली, यहाँ का सफ़ेद रेत और नीला पानी नहाने के लिए अच्छा विकल्प देता है। कुछ फोटो खींचने के बाद हम लोगो ने प्राकृतिक नज़ारों का लुफ्त उठाया।

सीतापुर बीच के बाद हम लोगों को भरतपुर बीच(Bharatpur Beach) जाना था जहाँ पर स्कूबा डाइविंग(Scuba Diving) करना था। स्कूबा डाइविंग में ऑक्सीजन सिलेंडर से लैस एक विशेष स्विमिंग ड्रेस पहनने के बाद समुद्र की गहराइयों में जल के अंदर के जीवन का दर्शन करना होता है। हमलोग स्कूबा डाइविंग के पेशेवर लोगों के साथ बोट में बैठकर समुद्र के अंदर एक पुराने टूटे हुए लाइट हाउस के पास पहुंचे। यह जगह अपने विशेष गहराई और लाइट हाउस के होने की वजह से स्कूबा के लिए बेहतरीन था। स्कूबा डाइविंग करवाने वाले प्रशिक्षित टीम में कुल 4 थे। जिसमे एक नाव चालक, एक स्कूबा डाइविंग के दौरान समुद्र के सतह से देखभाल करने के लिए तथा 2 स्कूबा डाइवर्स थे जिनको हम लोगो का स्कूबा करवाना था।  नाव में हम लोगो को सारे उपकरण की कार्यशैली और पानी के अंदर के संकेतों के बारे में बताया गया। नाव से समुद्र में उतरने के बाद मुँह से ऑक्सीजन कैलेंडर से सांस लेना सिखाया गया। सभी जरुरी प्रशिक्षण के बाद स्कूबा डाइविंग करने हम लोग समुद्र के अंदर जाने लगे। समुद्र के अंदर का नज़ारा बेहद ही खूबसूरत था।  कोरल , रंग बिरंगे पौधे और सुन्दर मछलियाँ बहुत ही अच्छी लग रही थी। बहुत सारे मछलियों का झुण्ड हमारे पास घूम रहा था। समुद्र के अंदर की दुनिया अतुलनीय और रंगीन थी। करीब 30 मिनट तक हम लोग पानी के अंदर ही रहे।  एक विशेष कैमरे से हमारा फोटो और वीडियो शूट भी हुआ। स्कूबा डाइविंग का बेहतरीन अनुभव लेने के बाद हम लोग अपने रेसॉर्ट वापस आ गए।

हमारे रेसॉर्ट से लगभग 1 किलोमीटर की दूरी पर लक्मणपुर बीच(Laxmanpur Beach) था जहाँ एक सनसेट पॉइंट(Sunset Point) था। हमारे रेसॉर्ट के सामने बने बीच से उस पॉइंट का रास्ता रेत पे चलते हुए जाना था।  यह कोई पक्का रास्ता नहीं बल्कि जंगल और समुद्र के लहरों के मध्य में फैले रेत का था। हरे पेड़ों के झुरमुट और रेत से साथ मिले सफ़ेद शंख और सीपियाँ इस रास्ते को बेहद मनमोहक बना रही थी। हम लोग लहरों के पास ही चल रहे थे और पानी का पैरों से टकराना ऐसा महसूस  करा रहा था जैसे हमारा स्वागत वो अपने ढंग से कर रहा हो। लगभग 15 मिनट चलने के बाद हम लोग सनसेट पॉइंट पहुंच गए। यह पॉइंट द्वीप के सबसे पश्चिमी छोर पे स्थित हैं जो त्रिभुज के आकर का है।

यहाँ एक ओर जमीन है और बाकि तीन ओर नीला विशाल सागर। यहाँ काफी भीड़ थी। स्थानीय लोगों ने यहाँ मैगी ,चाय और पकोड़े के छोटे अस्थाई दुकानें रखी थी। इन दुकानदारों ने अपने दुकान के सामने लकड़ी के बेंच बना रखे थे जहाँ बैठकर मैगी और चाय के चुस्कियों के साथ सूर्यास्त का नज़ारा(Sunset View) मन को मोह लेने वाला था। जैसे जैसे सूरज सागर के आँचल में जा रहा था वैसे वैसे आसमान की लालिमा बढ़ती जा रही थी। सूर्यास्त के समय समुद्र का पानी किसी सोने की माला के तरह चमक रहा था और लहरों के बीच खड़े लोगों की परछाइयां एक विहंगम दृश्य प्रस्तुत कर रहा था। 3 घण्टों का वक़्त कैसे गुज़र गया पता ही नहीं चला। हम लोग उन्ही रेत के रास्तों से होते हुए बाते करते करते वापस अपने रेसॉर्ट आ गए।


➨ पाँचवा दिन ( नील आइलैंड  / शहीद द्वीप    पोर्ट ब्लेयर मार्केट )

सुबह 8 बजे उठकर हम लोगो ने नाश्ता किया और अपने रेसॉर्ट के सामने नारियल के बगीचे और उसके सामने बने बीच पे टहलने के लिए गए। थोड़ी फोटोग्राफी करने के बाद हम लोगों को रेसॉर्ट से चेक आउट करना था। हमारे ड्राइवर सुजीत ने हमें नील द्वीप(Neil Island) के जेट्टी पे दोपहर 12 बजे पहुंचा दिया। 1 बजे हमारे क्रूज का प्रस्थान समय था। नियत समय पर हमारा क्रूज सी-लिंक पोर्ट ब्लेयर(Port Blair) के लिए रवाना हुआ। यह 2.5 घंटे की यात्रा थी लेकिन रास्ते में चक्रवात आ गया जिससे तेज़ बारिश होने लगा और लहरें  बहुत तेज़ और ऊँची उठने लगी। समुद्र की लहरें क्रूज के खिड़कियों से टकराने लगीं जो शीशे के बने थे। यह अनुभव थोड़ा डरावना सा लग रहा था क्योंकि हमारा क्रूज बहुत ही धीरे धीरे चल रहा था और काफी हिचकोले खा रहा था। तेज़ चक्रवात के क्रूज के फसने के कारन 2.5 घंटे की इस यात्रा को पूरा करने में 5 घंटे लग गए। जब समुद्र तट दिखने लगा तब कुछ जान में जान आयी। पोर्ट ब्लेयर के जेट्टी पर हमको ड्राइवर रवि मिला और उसने हम लोगो को वापस अपने होटल पंहुचा दिया।  

करीब 2 घंटे आराम करने के बाद हम लोग लोकल मार्किट में शॉपिंग करने के लिए निकले। यहाँ के स्थानीय मार्किट का मुख्य आकर्षण शंखों, सीपियों तथा मोती के बने हुए सुन्दर आभूषण तथा घर में सजावट के लिए हाथ से बने शो पीस हैं। यहाँ के बाजार में अंडमान निकोबार द्वीप समूह के विभिन्न जनजातिओं के लोगो की मूर्तियाँ भी मिलती हैं जो अपने ख़ास पहनावे की वजह से बहुत ही सुन्दर दिखती हैं।  हम लोगो ने ढेर सारी शॉपिंग किया और परिवार के लोगो के लिए उपहार भी खरीदे। शॉपिंग करने के बाद स्ट्रीट फ़ूड का भी लुफ़्त  लिया और वापस अपने होटल आ गए।


➨ छठा दिन ( बारातांग द्वीप   / जारवा जनजाति  / मैंग्रोव  वन  / लाइमस्टोन केव्स /  पोर्ट ब्लेयर )

बारातांग(Baratang) एक द्वीप है जो पोर्ट ब्लेयर से लगभग 101 किलोमीटर उत्तर दिशा में है। यहाँ जाने के लिए जंगल से होकर गुज़रना होता है जो कि एक जारवा फारेस्ट रिज़र्व(Jarawa Forest Reserve) है। हम लोग सुबह 3 बजे बारातांग(Baratang) के लिए सड़क मार्ग से निकले क्योंकि जारवा फारेस्ट रिज़र्व का गेट प्रतिदिन केवल 2 बार ही खुलता है। एक सुबह 6 बजे और दूसरा सुबह 9 बजे। हमलोगों ने 6 बजे का समय चुना था और लगभग 5  बजे जारवा जंगल के गेट पर पहुंच कर ज़रूरी परमिट लिया और 6 बजे गेट खुलने का इंतज़ार करने लगे। जारवा फारेस्ट रिज़र्व में सुबह 6 बजे गेट खुलने पर पर्यटकों के गाड़ियों का काफिला अंदर जाने लगा। सबसे आगे वन विभाग की गाड़ी थी। यह 40 किलोमीटर लम्बा घना जंगल जारवा जनजाति(Jarawa Tribe) का निवास स्थान है जो इस जंगल के मूलनिवासी है। हम लोगों ने जंगल के रास्ते में जारवा आदिवासी लोगों(Tribals) को देखा जो तीर धनुष लिए अपने पारंपरिक वेशभूषा में बहुत ही आकर्षक लग रहे थे। इन लोगो की बस्ती भी दूर से दिख रही थी । इन लोगो से हाथ मिलाने और खाने पीने की चीज़े देने की सख्त मनाही थी। वन विभाग के लोग इस बात का ख़ास ख्याल रख रहे थे कि जारवा लोगो को गाड़ी से चोट ना लगे। 

करीब 1 घंटे में हम लोग जारवा जंगल के दूसरे छोर पर पहुंच जहाँ से फेरी के माध्यम से हम लोग बारातांग द्वीप पहुंचे। बारातांग का मुख्य आकर्षण है यहाँ के मैंग्रूव के वन(Mangrove Forest) और लाइमस्टोन / चूना पत्थर के बने प्राकृतिक गुफाएं(Limestone Caves)। हम लोग एक स्टीमर पर बैठ कर लाइमस्टोन केव्स की और निकले। स्टीमर के रास्ते में मैंग्रोव के वनों(Mangrove Forest) से समुद्र के किनारे भरे पड़े थे। अपने लम्बे लम्बे जड़ों और विशेष रूप रंग के कारण ये वन बहुत अच्छे लग रहे थे। स्टीमर पर 20 मिनट की यात्रा के बाद जंगलों के बीच बने उस जगह पहुचें जहाँ से चूना पत्थर से बने प्राकृतिक गुफाएँ(Limestone Caves) देखने 2 किलोमीटर पैदल चलकर जाना था। लगभग 20 मिनट में हम लोग उन गुफाओं के प्रवेश द्वार पे पहुंच गए और इन गुफाओं की जानकारी के लिए एक गाइड ले लिया। शुरू में तो गुफा के अंदर थोड़ा उजाला था लेकिन जैसे जैसे हम लोग अंदर जाने लगे अंधकार बढ़ने लगा।  गुफायें सफ़ेद रंग के चूना पत्थर से प्राकृतिक रूप में बनी थीं। टॉर्च की रौशनी में हमारे गाइड ने हमको विभिन्न प्रकार की आकृतियों को दिखाया जिसमे शिवलिंग, हाथी की सूंढ़, कमल का फूल इत्यादि। यह गुफा प्रकृति द्वारा बनाया गया अद्भुत कृति था। इन् गुफाओं में हम लोगो ने 1 घंटा बिताया और स्टीमर से वापस बारातांग के फेरी तट पर पहुँच गए। यहाँ के स्थानीय ढाबा पर दोपहर का भोजन करने के बाद जारवा जंगल होते हुए वापस पोर्ट ब्लेयर(Port Blair) अपने होटल आ गए। 


➨ सातवा  दिन ( पोर्ट ब्लेयर से लखनऊ )

यह 6 दिन की यादगार यात्रा के बाद का घर वापसी का समय था। वीर सावरकर विमानतल से घर वापस जाने के क्रम में हम लोग अंडमान निकोबार द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) में बिताये गए अपने यादगार पलों को संजो रहे थे। यहाँ के लोगों की आतिथ्य दिल को छू लेने वाला था। यहाँ के सफ़ेद रेत और नीले समुद्र को निहारना एक बहुत ही सुकून देने वाला पल था।  हरे भरे जंगल, मैंग्रोव के वन, वाटर स्पोर्ट्स, जारवा जनजाति और प्राकृतिक खूबसूरती हमारे अंडमान के यात्रा अद्वितीय बना दिया था। हमारे स्वतंत्र सेनानियों के बलिदान की कहानी कहता यहाँ का सेलुलर जेल आपके मन में शहीदों के लिए सम्मान भर देता है। कुछ ही देर में हमारा विमान आसमान में था जहाँ से अंडमान निकोबार के द्वीप(Andaman and Nicobar Island) मोतियों की तरह फिर से दिखने लगे। वाकई में समुद्र में मोती हैं अंडमान निकोबार द्वीप समूह।

 *********

➝ अंडमान एवं निकोबार द्वीप में ये करना ना भूलें   : पैरासेलिंग, स्कूबा डाइविंग, जेट स्की, सी वाक, फोटोग्राफी।
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप कैसे पहुँचें  : सबसे अच्छा तरीका हवाई मार्ग से देश के सभी हिस्सों से जाया जा सकता है।  समुद्री मार्ग से कोलकाता , विशाखापट्टनम और चेन्नई से  पोर्ट ब्लेयर जा सकते है लेकिन समय काफी अधिक लगता है।  
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप  जाने का सबसे अच्छा समय :   अक्टूबर से अप्रैल
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप घूमने के लिए पर्याप्त दिन      :   6 रात  /  7 दिन 



















Video Links below:

1. Parasailing at Elephant Beach, Havelock Island, Andaman
2. Scuba Diving at Neil Island, Andaman
3. Mangrove Forest at Barataang, Andaman
4. Limestone Caves at Barataang, Andaman


Blogger Name: Pramod Kumar Kushwaha
For more information & feedback write email at : pktipsonline@gmail.com
https://www.pktipsonline.com/2020/04/blog-post_30.html

 

 

अंदमान - एक अविस्मरणीय सफर

 अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो. पहिल्या दिवशी फार वेळ नसल्याने, रुमवर फ्रेश होऊन, लगेचच कॉर्बिन्स कोव्ह या पोर्ट ब्लेअरच्याच एका जवळच्या बीचवर गेलो. दुपारी ३ ते ५ असा चांगला वेळ गेला. सायंकाळी ५ वाजताच सूर्यास्त झाल्याने कोजागिरीच्या चंद्राचा आनंद घेता आला.

कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
१.
Corbyn's cove

२.
Corbyn's cove

३.
Corbyn's cove

४. तोच चंद्रमा नभांत
Corbyn's cove
त्यानंतर, गाडी लगोलग सेल्युलर जेलकडे वळवली. पण त्या दिवशी जेल बंद असल्याने फक्त 'लाईट आणि साऊंड शो' बघितला. तो अगदी अवश्य बघण्यासारखा आहे. सावरकरांसारखेच बंगाल आणि पंजाब मधले असंख्य क्रांतिकारक या तुरुंगात होते आणि त्यातले काही तर तिथेच छ्ळवणुकीला बळी पडले. जेलचा इतिहास आणि त्यावेळची आतली परिस्थिती, अगदी जिवंतपणे तुमच्या समोर उभी करतात तेंव्हा अंगावर काटा उभा रहातो.
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघायचे होते. पण तिकडे चार साडेचारलाच कोंबडे आरवायला सुरवात झाली. सकाळी ८ वाजता नाश्ता आटोपून ठीक ९ वाजताची बोट गांठली. एक तासाचा प्रवास करुन आम्हाला नॉर्थ बे आयलंडला नेण्यांत आले.

५.
नॉर्थ बे कडे जाताना
North Bay

६. जेटी
jetty

७. नॉर्थ बे आयलंड
North Bay

तिथे मोठी बोट किनार्‍यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आम्हाला एका छोट्या होडीत बसवण्यांत आले.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवण्यांत आली होती. वर ऊन होते, म्हणून आमच्या सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरले. पुढच्या २० मिनिटांत आम्हाला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी झाली. त्यानंतर आमच्या चॉईस प्रमाणे आम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत आले. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील!
त्या छोट्या खोलीत तो स्कुबाचा वन पीस घालताना माझी अवस्था अगदी कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुम सारखीच झाली. त्यातून मागचे झिप लागेचना! शेवटी तशाच अवस्थेत बाहेर येऊन एकाकडून ते झिप लावून घेतले.बाहेर चिक्कार महिला वर्ग बसला होता. पण त्यांना या साठीपार बुढ्ढ्याकडे बघण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्या बुढ्ढ्यानेही लाज कधीच सोडून दिली असल्यामुळे, काही प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही दोघंही म्हातारा-म्हातारे त्या तसल्या ड्रेसमधे डुगुडुगु चालत, कासवे जशी पाण्याकडे जातात तसे पाण्यांत उतरलो. इतरांचे ट्रेनिंग चालू असल्याने आणि त्या दिवशी इन्स्ट्रक्टर लोक कमी असल्याने, आम्हाला आमचा नंबर येईपर्यंत पाण्यांत डुंबण्याचा सल्ला मिळाला.
साधारण पाऊणतास पाण्यांत डुंबल्यावर आमचे ट्रेनिंग सुरु झाले. मास्क चढवून आणि मागे ऑक्सिजन सिलिंडर लावून, तोंडानेच श्वास-उच्छवासाची क्रिया जमायला थोडा वेळ लागला. पाण्याखाली तोंड बुडवून तसा सराव केल्यावर दोन माणसांनी आमची बखोटी धरुन, आम्हाला पाण्याखाली नेले. खालचे दृश्य पाहिले आणि आम्ही थरारलो. पुढचा अर्धा तास, खालचे अविस्मरणीय जिवंत कोरल्स आणि रंगीबेरंगी मासे बघण्यांत कसा गेला ते कळलेच नाही. ते हलणारे, आपल्या चाहुलीने स्वतःला मिटून घेणारे, वेगवेगळ्या आकाराचे कोरल्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आमचे अंडर वॉटर फोटो काढून त्याची एक सीडीही करुन देण्यांत आली. बाहेर आल्यावर तो स्पेशल सूट अंगापासून वेगळा करायला, पुन्हा एकदा लोकांची मदत घ्यावी लागली. सगळे आवरेपर्यंत थोडा उशीर झाला. आमची बोट वाट पहात उभी होती. बोटीवरचा माणूस आम्हाला शोधायला आला होता. बोटीत बसल्यावर आमचा प्रवास रॉस आयलंडकडे सुरु झाला.

क्रमशः

रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.

१. My Dear

२.
more

३.
Black

तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.

४.
Garden

दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्‍यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्‍यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.

५.
Tsunami

त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.

६.
Benches

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.

७.विजयनगर बीच-हॅवलॉक
vijaynagar

८.
vijaynagar

९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
Resort

१०. राधानगर बीच - हॅवलॉक

Radhanagar

११.
radhanagar

१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक

kala patthaar

१३.
kala Patthar

१४. आमची परतीची क्रूज

Cruise

हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्‍याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्‍यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्‍यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.

१५. स्पीडबोटीतून उतरताना

Boat

१६. गुहेकडे जाताना

guha

१७.
road

१८. परतीचा प्रवास

return

बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.

१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.

L & S

२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत

jail

बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?

एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.

१. सावरकरांच्या कोठडीकडे जाताना- शेवटची कोठडी सावरकरांची.

way

२. आंत शिरताना

saavarkar

३. नतमस्तक

jayostute

४. कोलू

kolu

५. कोलू फिरवताना मॉडेल

kolu

६. बेड्या

Bedya

७. सेल्यूलर जेल

jail

काय मग? लग्नानंतर कुठे जाणार फिरायला?" हा लग्नसमारंभात भेटायला येणार्‍या लोकांनी विचारायच्या टॉप १० प्रश्नांपैकी एक हे आता कळून चुकले होते. मला त्या प्रश्नांची सवय झाली असली तरी लोकांना माझ्या उत्तराची सवय नसावी बहुतेक. मी सांगायचो "अंदमान" आणि लोक मग मला तिथे काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठविल्यासारखे "अंदमान?!?" असा प्रतिप्रश्न विचारायचे.
काहि लोकांनी अंदमान म्हटल्यावर विचारलेल्या शंकांनी तर माझं भलतंच मनोरंजन झालं
"स्वा. सावरकरांचा जन्म तिथलाच ना रे?"
"अरे तिथे फक्त आदिवसी रहातात ना.. तिथे जाणार आहेस?"
"ओह अंदमान.. मग लक्षद्वीप पण करणार का?"
"तिथे जायला सरकारची परवानगी लागते ना?"
"तिथे १० दिवस काय करणार? फक्त सेल्युलर जेल आणि १-२ बिचेस इतकच आहे ना तिथे बघायला?"
हे प्रश्न ऐकले आणि जाणवलं की भारताच्या ह्या अविभाज्य भागाबद्दल अजून बरेच समज-गैरसमज आहेत. खरंतर तेथील अनुभव, वर्णन लिहावं यासाठी स्फुर्ती लोकांच्या ह्या अशा प्रश्नांनी दिली. :)

काहि अंशी मजेचा भाग सोडला तरी अंदमान बेटे भारतातील सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत हे नक्की. केंद्रशासित असल्याने म्हणा, भारतापासून भौगोलिकदृष्ट्या दुर असल्याने म्हणा, कमी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा काहि सरकारी धोरणे/नियम यामुळे म्हणा ही बेटे अजूनही केवळ आणि केवळ सौंदर्यवान आहेत. जगातील सर्वोत्तम डायविंग साईट्स पैकी एक असणारे अंदमान विदेशी पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते आहे.

असो, तर (एकदाचे) लग्न आणि अंदमानचे वेध दोन्ही एकत्रच लागले. "कोणत्या टूर बरोबर चालला आहेस?" ह्या प्रश्नकर्त्यांना "स्वतःच सगळं अरेंज केलं आहे" हे सांगून अजून चिंतेत टाकत होतो. एरवी दारातूनच निश्चिंत टाटा करणारे आई-बाबा सून आल्याबरोबर चेन्नईच्या गाडीत बसवायला थेट सीएस्टी पर्यंत आले. अगदी "गाडी सुटली रुमाल हलले.. " वगैरे सीन झाला नसला तरी त्यांना दिसेनासे होईपर्यंत अच्छा केलं आणि आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. ट्रेनमधील मजेशीर प्रवासी नेहमीप्रमाणे माझी करमणूक करत होते. मजल दर मजल करीत चेन्नई आलं आणि तमिळ गलक्यातून वाचवणारी "प्री पेड रिक्षा" सर्विस बघुन आनंद झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी अंदमानचे विमान होते. अंदमानमधी वास्तव्याचे कन्फर्मेशन, विमानाची वेळ नक्की करून, रिक्षावाल्याला सकाळीच बोलावून लवकरच झोपलो. सकाळी वेळेवर आलेला रिक्षावाला सोडल्यास सांगण्यासारखं काहि विषेश घडलंच नाहि. आमच्या विमानाने चेन्नईहून उड्डाण केलं आणि भारताची मुख्यभूमी आम्ही त्या तिथे पलिकडे तिकडे जाण्यासाठी सोडली.

दोन तास विमानात काढले. विमानात अर्ध्याहून अधिक प्रवासी परदेशी होते. त्यांना अंदमानमधील विविध ठिकाणांबद्द्ल इत्यंभूत माहिती (आपल्या लोकांना नसलेली) होती हे विषेश. असो, तर विमानाने आपले नाक खाली केले आणि आम्ही खिडकीच्या काचेला लावले. समोर हिरव्या कंच वनश्रीने नटलेली बेटं, निळेशार पाणी आणि त्यांना दुभागणारी किनार्‍याची चंदरी रेघ हे तीनच रंग कलिजा खलास करत होते..

(वरील चित्र जालावरून साभार)

ते दृश्य बघूनच पुढील दहा दिवस पृथ्वीवरील एका वेगळ्या नितांत सुंदर भागात जाणार असल्याची खात्री पटली. "अहा!" या अर्थाच्या बहुभाषिक सार्वजनिक चित्कारांमधेच विमानाने जमिनीला पाय टेकले. पोर्ट ब्लेअर हा एक छोटेखानी विमानतळ. भारतातील बर्‍याचश्या शहरांप्रमाणे मुळ वायुदलाचा विमानतळ जो व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो. बाहेर आलो. टॅक्सीवाले बरेच होते पण भारतातील इतर शहरांच्या विपरीत टॅक्सीवाले भलतेच सोज्वळ निघाले. एकदा फारतर दोनदा टॅक्सी हवी आहे का विचारले आणि नको म्हटल्यावर मागे लागायचे नाहित. एखाद्या देशाचे कस्टम्सवाले त्या देशाचे आणि गावचे टॅक्सीवाले त्या गावच्या स्वभावाचे पहिले दर्शन घडवतात असे म्हणतात ते काहि खोटं नाहि. पुढे संपूर्ण ट्रीपभर आम्हाला ह्या त्रास न देण्याच्या किंबहूना मदतीसाठी तत्पर वागणूकीचा प्रत्यय येत राहिला.

तर आम्ही हॉटेलवर ब्यागा टाकल्या-जेवलो आणि तडक बाहेर पडलो. अंदमानला जायचे ठरल्यापासून "सेल्युलर जेल" - सावरकरांच्या व इतर अनेक क्रांतीकारकांच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तु- बघण्याची, अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आराम वगैरे न करता तडक निघालो. तसंही पंढरपूरला गेल्यावर आधी विठोबाचं दर्शन आणि मग इतर रिवाज करायचे असतात त्याप्रमाणे अखिल भारताच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याचे दर्शन घेऊन पुढील बेत आखणे योग्यच होते.

रिक्षा थांबली आणि समोर "सेल्युलर जेल" लिहिलेली उंच वास्तु उभी होती. एकेकाळी असंख्या क्रांतीवीराचे भक्तीस्थानच. इथे आलो की त्या देशभक्तांच्या कार्याला नवा अर्थ प्राप्त व्हायचा.

आत शिरलो आणि समोरचीच्या प्रमाणबद्ध वास्तुकडे बघतच राहिलो. अतिशय प्रमाणबद्ध रचना आणि त्यामुळे सौंदर्याचे दर्शन करवणारी ती इमारत एकेकाळी कितीतरी जुलुम बघत होती. एकेका 'सेल' समोरून जाताना मनात भावनांचे काहूर माजले होते. एकेका क्रांतीकारकाला ह्याच सेल मधे ठेवले जायचे. त्यात जेलर हा कर्दनकाळ! मुळ भूमीपासून इतक्या दूरवरचा जेलर म्हणजे तेथील अनभिषिक्त सम्राट. त्याने इथे काहिहि केले तरी बातमी बाहेर जाणे कर्मकठीण. ह्या जेलमधे फक्त जन्मठेपेचे आणि फाशीचे कैदीच येत. अश्याच वेळी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगमन झाले. त्यांचा दरारा इतका की त्यांच्या साठी एका कोपर्‍यातील सेल दिला गेला आणि त्यांच्या बाजुचा सेल रिकामा ठेवला गेला. त्यांना आणले हे इतके गुप्त होते की त्यांच्या भावाला वर्षभर हे माहित नव्हते की सावरकर व ते एकाच जेलमधे आहेत.

जेव्हा सावरकरांचा सेल जवळ येत होता तेव्हा मन धडधडत होते.. हा सेल अजूनहि तसाच जपला आहे. सावरकरांच्या पळून जाण्याच्या भीतीमुळे दोन दरवाजे असलेल्या त्या सेल मधे एकटाच आत गेलो.. थोडावे़ळ एकटाच थांबलो.. मन आणि डोळे दोन्ही भरून आले. हीच ती जागा जिथे तात्याराव वर्षानुवर्षे होते. त्यांना हे आकाश असेच दिसत असेल. (चौथा फोटो सावरकरांच्या सेल मधून दिसणारा बाहेरच्या जगातील तुकडा दाखवतो) ह्या गजांतून ह्याच परिसराच्या तुकड्याकडे बघत जेव्हा त्यांना पेन पेपर नाकारला तेव्हा भिंतीवर खंडकाव्य लिहिले असेल. शरीरावरचा रोम अन रोम पुलकित झाला होता. जड अंतकरणाने त्या सेल मधून बाहेर निघालो.

संध्याकाळ होऊन सूर्य विझेपर्यंत असाच अख्ख्या जेलभर भटकत होतो. जिथे फाशी द्यायचे ती जागा, कोलू चालवायला लावायचे ती जागा बघून अंगावर येणारा काटा घालवता जात नव्हता. संध्याकाळी होणारा लाईट अ‍ॅंड साऊंड शो हा देखील सुंदर. त्या जागेची उत्तम माहिती देणारा त्याच बरोबर स्वा. सावरकर, नेताजी बोस, योगेंद्र शुक्ला, बटुकेशवर दत्त यांच्या आठवणी जागवल्या जातात. अत्यंत धीरगंभीर आवाजात हे जेल आपल्याला त्याची कहाणी सांगते आणि आपण भारवलेल्या स्थितीत बाहेर पडतो.

हे जेल 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील एक काळी तितकीच स्फुर्तिदाय स्मृती जागृत ठेवतच आहे त्याच बरोबर वेळच्यावेळी डागडुजी, सफाई व रंगरंगोटी होते आहे हे बघून खूप बरे वाटले. प्रत्येकाने बघावेच असे हे स्थळ.. प्रत्येकाने इतिहास शोधण्यासाठी तर बघावेच पण स्वतःला शोधाण्यासाठी जरूर बघावे!

पोर्ट ब्लेअर हे शेवटी एक शहर आहे. एक संपूर्ण पर्यटन स्थळ! त्यामुळे कितीही छान असलं तरी सगळीकडे पर्यटक असायचे. अस्वच्छता, दुर्गंधी, फेरीवाले, धक्काबुक्की यांचा त्रास नसला तरी जाणवण्या इतपत वर्दळ होतीच. व्यावहारीक भाषा हिंदी, त्यामुळे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आल्यासारखं वाटेना. आम्ही पोर्ट ब्लेअरला तीनच दिवस रहाणार होतो. बाकी बराचसा वेळ हॅवलॉक आयलंड ह्या अजून पूर्वेला असणार्‍या एका दूरस्थ बेटावर काढण्याचे ठरवले होते. त्यामुळे ह्या दिवसांमधे रॉस आयलंड व जॉली बॉय करावे हा एकूणच हॉटेलवाल्यांचा / तेथील रिक्षावाल्यांचा ग्रह आणि आग्रह होता.

भारतापासून दूर त्या तिथे पलिकडे तिकडे फक्त पोर्ट ब्लेअर आहे; आणि जवळ असणारे रॉस आयलंड व जॉली बॉय ह्या सुंदर जागा आहेत हा अंदमानबद्दल असणार्‍या अनेक समजांपैकी एक. त्यातील जॉली बॉय हे स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या आधी अंदमानला जाऊन आलेल्यांनी जॉली बॉय बघितले होते, त्यांनी त्सुनामी नंतर जॉली बॉय आहे का ते बघ असे बजावले होते. ३-४ तासांच्या भेटीत प्रत्येक व्यक्तीवर अंदमानच्या समुद्राने त्याच्या रंगाने घातलेली मोहीनी मी त्यांच्या डोळ्यात बघितली होती आणि तेव्हाच मी अंदमानला जायचे ठरवले होते.

मात्र इथे आल्यावर जसजशी अंदमानची माहिती कळू लागली तसे मला रॉस आयलंड व जॉली बॉय बघण्यापेक्षा अंदमानच्या अंतरंगात शिरावेसे वाटू लागले. अंदमानला बरेच आदिवासी आहेत ही माहिती खरी आहे (मात्र फक्त आदीवासी नाहीत :) ). अंदमानला आदिवासींच्या एकूण ६ जमाती आहेत त्यातील दोन तर नरभक्षक आहेत. सुदैवाने भारतीय "मुलवासी जमाती संरक्षण कायदा, १९५६" (Aboriginal Tribes Regulation, 1956) मुळे ह्या सगळ्या जमाती संरक्षित आहेत.

तर मध्य अंदमानमधी बारतांग आयलंडला जाण्याच्या रस्त्यावर या जमातींपैकी जारवा जमातीमधील लोकांना बघायची संधी असते हे कळल्यावर रॉस आयलंड वगैरे ऐवजी अचानक बारतांग आयलंडला जायचं नक्की केलं. सकाळी लवकर उजाडत असल्याने पहाटे चारला ठरवलेली गाडी आली आणि त्यातून आमच्याच हॉटेलमधील ३-४ जण आणि आम्ही दोघे बारतांग आयलंडला निघालो. सूर्य उजाडायचा होता.. नीटसे फटफटलेदेखील नव्हते. परिसराचा अंदाज फिकट होत चाललेल्या आकाशाच्या काळ्या रंगामुळे येत होता.. प्रकाश वाढु लागला तोपर्यंत आमची गाडी घनदाट जंगलातून चालली होती. सुंदर निबिड अरण्य. भल्या सकाळी उठल्याने मंडळी पेंगुळलेली होती. लवकरच त्यांनी "होय होय होय - नाहि नाहि नाहि" सुरू केलं ;) . मग मी आणि ड्रायव्हर दोघेच जागे असल्याने त्याला झोप येईल या भीतीने मीच त्याच्याशी गप्पा मारू लागलो. सुरवातीला बुजत बोलणारा आमचा ड्रायव्हर हळुहळु नीट बोलु लागला.
"हा बघा.." डायवर सांगत होता...निबिड अरण्यात अचानक एक दलदलीचा पॅच लागला तिथली सगळी झाडं तुटली होती.. फक्त पाण्यातून बाहेर आलेली निष्पर्ण खोडं शिल्लक होती.."इथेही दाट जंगलच होतं.. मात्र एका लाटेने हे हाल झाले"
फक्त एका लाटेचा इतका तडाखा बघूनच हतबुद्ध झालो. पुढे त्सुनामीचे ठिकठिकणी लागलेले व्रण बघत जात होतो.

जसजसं जारवा रिझर्वस जवळ येऊ लागले तसे तसे रस्ते लहान आणि शंका मोठ्या होऊ लागल्या. मंडळी उठली होती. डायवर बोलता झालेला पाहून त्यांनी शंकांना वाट मोकळी करून द्यायला सूरवात केली
"काय हो? ते जारवा गाडीतून काहि उचलणार तर नाहित ना?"....
"नाहि"
"त्यांच्याकडे शस्त्र असतात??" ...
"हो.. पण घाबरू नका मिलट्री बरोबर असेल आपल्या"
"खातात काय हो ते?"..
"रानडुकरांची वगैरे शिकार करतात.. बाकी शेती वगैरे नाहि.. त्सुनामीपासून सरकार काहि धान्यांच्या पिशव्या त्या भागात टाकते असे ऐकलंय"
"ते घरात रहातात का गुहेत?"
"घरांत.. आत जंगलात त्यांच्या बांबुच्या झोपड्या आहेत."
"आपल्याला दिसतील?"
"नाहि. मीदेखील अजून बघितलेल्या नाहित"
"त्यांना हिंदी येतं?"
"नाहि. मात्र मिलिट्रीवाल्यांनी त्यांना "बचाव" शब्द शिकवला आहे :) "
यावर अख्खी गाडी (उगाच) हसली.
"बरं आता आपल्याला परमिट मिळेल.. मग दर दोन गाड्यांच्या मागे एक आणि पुढे एक अशी मिलिट्री व्हॅन असेल... गाडीच्या काचा उघडण्यास मनाई आहे.. वाटेत फोटो काढण्यास मनाई आहे.. जारवा दिसले तर त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करण्यास, त्यांना खायला देण्यास मनाई आहे.. गाडी ताशी ५०कीमीपेक्षा जास्त वेगात चालवणे सक्तीचे आहे.. तेव्हा पुढचे ४० किमीच्या पट्यात गाडी थांबणार नाहि. समोर टॉयलेट आहे "
सर्व सुचना एका दमात दिल्याने सगळ्यांना खूपच शंका होत्या मात्र शेवटच्या सुचनेमुळे त्या शंका थोपवून लोक लघुशंकांकडे लक्ष पुरवण्यास पळाले ;)
अर्ध्या तासात परमीट मिळाले व सगळ्या गाड्या एका रांगेत उभ्या राहिल्या. गाडीवानाने किल्ली फिरवली आणि स्त्रीसमुहाने का कोण जाणे देवाचे नाव वगैरे घेतले/पुटपुटले.. समोरच्या गाडीतून "शिवाजी महाराज की जय" वगैरे गर्जनाही झाल्या.. एकूणच काय, तर आमच्या डायवरप्रमाणेच इतर डायवरांनीही उत्सुकता ताणण्याचे आणि काहिसे घाबरवण्याचे व्यावसायिक कसब छान दाखवले होते.
एखाद्या मोहिमेवर निघाल्यागत आमची गाडी सुसाट निघाली. एकमार्गी रस्त्यावर ओवरटेकिंग करण्यास मनाई असल्याने एका वेगात एका रांगेत अत्यंत घनदाट अरण्यातून चाललेल्या गाड्या छान वाटत होत्या. पहिली काहि मिनीटे गाडी श्वास रोखून आणि जीव डोळ्यात आणून मंडळी परिसर बघत होती. न जाणो एखादा जारवा झाडावर दिसायचा. दहा एक मिनीटे झाली तरीही गाडीचे चालक, मिलिट्रीचे जवान आणि घाबरलेले उत्सूक वेडे पर्यटक सोडल्यास कोणत्याही जमातीचा मागमुस दिसेना. तेव्हा लोकांच्या दडलेल्या शंकांना कंठ फुटु लागला
" त्यांना खायला का द्यायचं नाहि?"
"त्यांना मिठाची सवय नाहि आहे. आजारी पडतात ते"
इतक्यात एक त्सुनामी प्याच आला
"ह्या लोकांपैकी त्सुनामीमधे बरेच गेले असतील नाहि बिचारे!"
"ह्यांच्यापैकी? एकही नाहि.. ह्यांना आधीच कळलं होतं बहुतेक .. घर सोडून संध्याकाळीच डोंगरावर चढून बसले होते"
इथे सगळ्या गाडीला आश्चर्यचकित व्हायलाही पुरेसा वेळ मिळाला नाहि .. कारण गाडीने एक वळण घेतले आणि समोरच एकही वस्त्र न पांघरलेले, हातात लाकडी काठ्या, अंगभर राख फासलेले एक कुटुंब (किंबहूना ५-६ मुलं, २ स्त्रीया आणि एक पुरुष) आमच्या गाड्यांकडे बघत हसत होते. गाडीतील सगळेजण त्या, फक्त डिस्कव्हरी चॅनेलमधेच दिसणार्‍या, आदिवासी मंडळींकडे भीती, आश्चर्य, रोमांच, कणव वगैरे अनेक भावांच्या मिश्रीत नजरेने बघत होते..
ते नजरेआड गेले आणि गाडीने रोखलेला निश्वास एकत्रच सोडला.
"ह्यांना शिक्षण दिलं पाहिजे. फक्त आपणच जगातल्या सगळ्या सोयी वापरायच्या हे काही बरोबर नाहि" इतका वेळ गप्प असणार्‍या, अन भल्यापहाटे मनसोक्त मेकअप केलेल्या एका काकुंचा सामाजिक बाणा अचानक जागृत झाला
"कशाला? किती मजेत दिसत होते ते!" गाडीतील बायकांपैकी फक्त आपल्यालाच सांसारिक विषय सोडून अश्या विषयांवर बोलता येते असा स्वतःच करून घेतलेला समज तुटल्याने दुखावलेल्या दुसर्‍या काकु फणकारल्या
"मजेत? बिचार्‍यांकडे धड कपडे देखील नव्हते. भारताने अश्या जमाती टिकवून काय फायदा? किती थंडी वाजत असेल त्यांना रात्री. काल मी तर ब्लँकेट घेऊन एसी बंद करून झोपले होते" मेकअप काकुंनी अन्न वस्त्र निवार्‍याच्या मुलभुत प्रश्नाला हात घातला
"जाऊदे, भारत अमेरिकन होत चालला आहे तितका पुरेसा नाहि का? आता ह्यांना कशाला त्या रॅटरेस मधे ओढताय?" मेकअप काकुंच्या अमेरिकन मुलाची कहाणी ऐकवुन झाली होती त्याचा वचपा असा!?
ही मजा अजून चालली असली पण डायवर अचानक "ते बघा अजून" म्हणाला आणि मंडळी दुसर्‍या जारवा मंडळींकडे बघण्यात गुंतली. इथे ह्या जारवांचे आमच्याकडे लक्षच नव्हते(तसे ते दाखवत नव्हते). एक कुठलेसे फळ सोलण्यास सगळे गर्क होते. पुढे हि मंडळी दिसत गेली, जाताना तसेच परतीच्या वाटेवरही. दिसायला आफ्रिकन वाटले तरीही ते भारतीय आहेत, माझ्याप्रमाणे तेही (त्यांना जाणीव असो नसो) याच देशाचे नागरीक आहेत आणि मला ही गोष्ट त्यांच्याशी जोडते आहे ही जाणीव फार वेगळी होती. वंश, धर्म, नीती-अनीती या सगळ्याच्या पलिकडे पोहोचलेल्या (किंवा ह्यासगळ्याच्या अलिकडे असलेल्या) आणि देश, नागरीकत्त्व वगैरे न मानणार्‍या ह्या निसर्गपुत्रांशी आपली (बळंच) नाळ जोडायला नागरीकत्त्वच वापरावं लागावं हा केवढा विरोधाभास!

ह्या नव्या (काहिशा वदग्रस्त) ट्रंक रोडने (नॅशनल हायवे) ह्या जारवांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढला आहेच. गेल्या ७-८ वर्षांत त्यातील काहिंनी आपले शब्द शिकायला सुरवात केली आहे. सगळं जग सारखंच एका वासाचं, एका रंगांचं बनवु पहाणार्‍या तथाकथित 'आधुनिक' माणसांचा परिणाम पशुपक्षांवर दिसु लागला आहे, तर मग ह्या माणसाच्याच जमातीवर परिणाम न दिसेल तरच नवल. आता हे किती योग्य, अपरिहार्य आणि किती क्लेशकारक हे ज्याचे त्याने ठरवावे.
*१. माझे व्यक्तीशः अश्या भागांतून रहदारी / रोड जावा की नाहि याबद्दल ठाम नसलं तरी बरेचसे नकारात्मकतेकडे झुकलेले मत आहे. त्यामुळे माझे काहि एकांगी अनुभव न सांगता / टिप्पणी न करता नका इच्छुकांनी अधिक माहितीसाठी विकी आणि जालावरील इतर संदर्भ वाचावेत असे सुचवतो.
२. बाकी आता रोड आहेच, तर ह्या जमातींचे 'आधुनिकी'करण होण्याआधी भेट देऊन घ्या हा एका अर्थी स्वार्थी सल्ला!
*

असो. तर पुढे बारतांग आयलंड हे मध्य अंदमान मधील बेटावरील जिवंत पत्थराच्या गुंफा(living stones) बघायला जायचे होते. अश्या गुंफा बघायला इंडोनिशिया, जपान वगैरे ठिकाणी जाणे जमत नसेल तर अश्या गुंफा भारतात आहेत. अजूनही तिथे दर क्षणाला विश्व नवनिर्माण करत आहे. एक थंड, मनमोहक, लांब गुंफा हे त्याचे वैशिष्ट्य तर आहेच पण त्याहीपेक्षा रोचक वाटते ते सृष्टीचं आपल्यापुढे घडताना पाहणं. ह्या गुंफा कशा बनल्या वगैरे गोष्टीत रस असणार्‍यांनी पुढील फलक वाचुन काढावेत

ह्या गुंफांना जायचा रस्ता देखील मोठा रोचक आहे. एका स्पीड बोटीतून बॅकवॉटर्समधून तुम्ही अर्धातास जाता आणि मग अचानक एका तिवराच्या जाळीत बोट घुसते. चारी बाजूला तिवराची जाळी आणि बोगद्यात आपली बोट हा अनुभव (नावाड्याने तिवरात मगरी असतात सांगितल्याने अधिकच) रोचक वाटला.


आमचा ह्या गुंफांमधील वाटाड्या देखील मनापासून माहिती देत होता. इतर पर्यटनस्थळी गाईड नावाचे प्राणी जो बॉलीवूडचा इतिहास सांगतात त्यापेक्षा याचे माहितीपर वर्णन निश्चितच सुखावह होते. त्यात त्याने गुहेत शेवटी काहि क्षण सगळ्यांना विजेर्‍या आणि आवाज बंद करायला सांगितले. आणि तो मिनीट डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाहि असा अंधार बर्‍याच दिवसआंनी अनुभवला. प्रकाश आणि आवाजाचा अभाव सगळ्यांनाच हवाहवासा वाटला, आवडला.

इथे आम्हाला भेटलेल्या एका आजींचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाहि. ह्या गुंफेत दुसर्‍या एका ग्रुपबरोबर एक अमरावतीच्या आजी आल्या होत्या. त्यांनी आलेपाकाच्या वड्या पुढे करून आपणहून दोस्तीचा हात (वड्या) दिल्या आणि मग आमच्या प्रश्नांची वाट न पाहता सांगु लागल्या.. "आता मी ८२ वर्षांची आहे, भारतात हे इतकंच बाकी होतं, कुठुनसं कळलं हा मुंबईचा ग्रुप चाललाय म्हटलं माझं नाव आधी घाला. हे झालं की मग काय माझा जीव अडकायला नको.." संपूर्ण भारत भ्रमण केलेल्या त्या आजींच्या इच्छाशक्ती आणि निर्धाराच्या शंभरावा हिस्सा त्यांच्या वयात आपल्यात टिकला तर किती नशिबवान असु असे वाटून गेले आणि त्यांना बोलूनही दाखवले. त्या नुसत्याच हसल्या आणि एक श्रीखंडाची गोळी मिळाली :)

अंदमानच्या सफरीवर निघताना बारतांग / जारवा रिझर्व्स ही नावे माहित होती मात्र तिथे जायचा योग येईल असे मात्र वाटले नव्हते / ठरविले नव्हते. मात्र आता ही ठिकाणे हा अनुभव घेण्याच्या निर्णयाचे समाधान वाटते. अंदमानच्याही एका दूरस्थ कोपर्‍यातील हा अनुभव खुप श्रीमंत करून गेला.

अंदमानच्या हॅवलॉक आयलंडला भारतातील सर्वोत्तम बीचेस आहेत, तिथे स्कूबा डायविंग करता येते व जगातील सर्वोत्तम साईट्स पैकी काहि डाईव्ह साईटस आहेत हे कळल्यावर आमच्या सहलीत पूर्ण ६ दिवस त्या बेटावर काढण्याचे ठरवले होते. पोर्ट-ब्लेअरहून सकाळी एक व संध्याकाळी एक अश्या दोन फेरी बोटी त्या बेटावर जातात. अंदमानच्याही पूर्वेला दोन ते अडीच तासाचा प्रवास करून जेव्हा आपली फेरी या छोट्या बेटाच्या धक्क्याला लागते तेव्हाच स्वर्ग जवळ आहे याची चाहूल लागते. इथे असणार्‍या पाण्याचा रंग शब्दांत वर्णन करणे शक्य नाहि, यांत्रिक क्यामेराने आपला डोळा कितीही वाकवला-वटारला-झुकवला तरीही तो रंग त्यालाही टिपणे शक्य नाहि. तो हिरव्या-निळ्यासारख्या रंगाचा समुद्र आणि त्याला पांढर्‍याशुभ्र रंगाची किनार या नक्कीच अनुभवण्याच्या गोष्टी आहेत.

इथे आमचे रिसॉर्टही अत्यंत मस्त जागी होते. आम्ही टेंटेड कबाना घेतले होते.आतून सुसज्ज व्यवस्था, टिव्ही सारख्या क्षुद्र गोष्टी नसलेले ते तंबु, बाहेर दोन आराम खूर्च्या, झोपाळा, खायची-प्यायची सोय, समोर पाचुचा बीच आणि सोबत बायको.. अजून काय पाहिजे बोला? ;) इथे पोचल्यावर स्वर्ग दोन बोटे उरला होता. पुढील आठवडा इथे काढणार ही कल्पनाच सुखावह होती. हा डायविंग रिसॉर्ट असल्याने भारतीय मंडळी मात्र कमी होती.

जग २/३ (~७१%) जग पाण्याने व्यापलेले आहे, हे आपण लहानपणापासून ऐकतो-शिकतो आहोत. याचा दुसरा अर्थ असा, की जरी आपण जगातील प्रत्येक भूभागात, देशात जाऊन आलो तरी फक्त १/३ पृथ्वीचा आपण आस्वाद घेऊ शकतो. बाकीचे २/३ जग हे आपल्यासाठी निषिद्ध आहे. म्हणजे खरं पाहता, २/३ भागात पाणी आहे म्हणजे तीच खरी पृथ्वी आहे. तेव्हा पृथ्वीच्या अंतरंगात शिरून तिचा आस्वाद घ्यायचा असे फार दिवस मनात होते. अमेरिकेत असताना चौकशी केली होती पण तिथे सर्टीफाईड स्कूबा डाईवर असणे गरजेचे होते आणि सर्टीफिकेशनची फी खूप जास्त होती.

मात्र आपल्याकडे भारतात स्कूबा डायविंगची मस्त सोय आहे. शिकण्याची फी (बाहेरदेशांपेक्षा स्वस्त असली तरी)थोडी जास्त आहे. मात्र मिळणारा अनुभव लक्षात घेता ही फी वसूलच नव्हे तर दामदुप्पट परतवा आहे असे समजायला हरकत नाहि. चार दिवसाचा कोर्स होता, ज्यात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व सहा डाईव्ह मिळणार होत्या. हनिमूनला जाऊन प्रशिक्षण घेणे जरी वेडगळ वाटत असले तरी बायकोने "सकाळचे ४च तास तर जायचंय, बाकीचा वेळ आहेच की आपल्यासाठी" असा समंजसपणा दाखवून केवळ पाठबळ दिलं नाहि तर स्वतःदेखील कोर्समधे सामिल होऊन सक्रिय पाठिंबाच दिला. :)

कोर्स सूरू होण्याच्या आदल्या दिवशी या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती वर्गात शिकवली गेली. विडीयो दाखवले गेले. आणि कोर्सचा पहिला दिवस उजाडला. आमच्या नावेत नावाडी सोडून मी, माझी बायको, एक फिनीश तरूण आणि एक जर्मन तरूण असे चार विद्यार्थी आणि एक टर्की आणि एक भारतीय प्रशिक्षक असे एकून ६ जण होते. आजपर्यंत जलतरण पूलमधे, नदीमधे, तलावात अगदी विहीरीतही केले आहे. खोल समुद्रात उडी मारण्याचा योग पहिलाच. पहिला दिवस विविध उपकरणांची ओळख, आपत्कालिन प्रसंगी करावयाच्या क्रियांची प्रॅक्टीस आणि सर्वात मुख्य म्हणजे पाण्याखालच्या संवाद साधण्याच्या खाणाखूणा यांचे प्रशिक्षण मिळाले. पहिल्या दिवशी छान सूर्यप्रकाश असल्याने पाण्यात आमच्याप्रमाणेच जेलीफीश देखील डुंबायला आले होते. त्यामुळे हात आणि पायावरच्या उघड्या भागांवर त्यांनी यथेच्छ चाऊन घेतले. :(

डायविंग चे तंत्र/उपकरणे याची ओळख वाचकांची इच्छा असल्यास वेगळ्या लेखात करून देईन. इथे उल्लेख करतो तो दोन अप्रतिम डाईव्हज् चा. पहिली डाईव्ह आहे "मार्स". एक बुडालेले जहाज. ह्या डाईव्हच्या आधी कोरल्स, मासे असणार्‍या पाण्याखालील सपाट पृष्ठभूमीवर गेलो होतो. त्याची धुंदी अजून ताजी होती. आणि आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला एका बुडालेल्या जहाजाजवळ डाइव्ह घ्यायचं सुचवलं आम्ही लगेच तयार झालो.

पाण्यात उडी मारली प्रशिक्षकाकडे तोंड करून त्याच्या खूणा समजाऊन घेत शास्त्रशुद्ध उतरंड (डिसेंट) चालू केली. वाढत्या खोलीनिशी कानावर येणारा दबाव, वाढत्या दबावाने रक्तात मिसळणारा नायट्रोजन आदिंची काळजी घेण्यासाठी प्रत्येक डाईव्हचा डिसेंट आणि असेंट (बुडणे आणि उभरणे) दोन्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे लागते. तर काहि मिनिटांनी आमच्या कंबरेचा खोलीमापक १६मी. दाखवू लागला. खाली जमिन दिसू लागली. जमिनीवर भरपूर रंगेबीरंगी कोरल्स आणि त्याभोवती बरेच मासे होते. इतक्यात प्रशिक्षकाने मागे पहा सांगितले. आम्ही वळलो मात्र दोन मिनीटे श्वास आपोआप रोखला गेला. समोरच उंचच्या उंच जहाज पाण्याखाली चिरविश्रांती घेत होते. इतक्या जवळ जहाज असेल याची कल्पना नसल्याने दोन मिनीटे खरंच श्वास घ्यायला विसरलो आणि त्यामुळे अजून खाली जाऊ लागलो :) (पाण्यास न पोहता केवळ श्वासावर पाण्यातील पातळी सांभाळावी लागते). नंतर सांभाळलो आणि मग त्या जहाजाची सैर करायला निघालो. एके काळचे चाच्यांचे जहाज, त्यांनी बोटीवर खरडलेली चित्रे तशीच्या तशी होती. त्याच बरोबर ते जहाज अनेकविध मासे आणि कोरल्सने पूर्ण भरलेले होते. इतरत्र न दिसलेले अनेक मासे इथे बघायला मिळाले. अचानक प्रकाश थरथरू लागला म्हणून वर पाहिले तर एक छोट्याशा माश्यांचा मोठ्ठा कळप प्रचंड वेगाने डोक्यावरून चालला होता. एकूणच वातावरण भयचकित आणि त्याच बरोबर विस्मयचकित करणारं होतं.

दूसरी एक डाईव्ह म्हणजे "द वॉल". इथे जायच्या आधीच आमचा प्रशिक्षक म्हणाला होता की तुम्ही आता जगातील सर्वोत्तम डाईव्हजपैकी एक आता करणार आहात. आणि ते खरंच होते. इथे साधारणतः ११ मीटरला एक सपाट जमिन होती ज्यावर नानाविध कोरल्स-मासे-शैवालाचे जंगल होतेच शिवाय सूर्यप्रकाश भरपूर होता. थोडे पुढे जाताच हे मैदान अचानक संपायचे आणि तिथे होती अजून ४० मीटर खोल सरळ उभी भिंत - द वॉल. ही इतकी खोल होती की इतक्या स्वच्छ सूर्पप्रकाशातही तळ दिसणे दूरापास्त होते. आपच्या उपकरणांची मर्यादा १८ मी होती. (यापेक्षा खोल डाईव्ह साठी जास्त हवेचे सिलेंडर, लांब हातांचे सूट, कानाला विषेश प्रोटेक्शन, नायट्रोजनच्या प्रादुर्भावापासून वाचण्याचे विषेश ट्रेनिंग लागते) त्यामूळे भिंतीच्या वरच्या ७ मीटरवरील जलचरसृष्टी पहता येणार होती. मात्र याच पट्ट्यात इतके बघितले की डोळ्यांचे पारणे फिटले. सप्तरंगांतीलच काय पण कोणत्याही रंगाच्या दूकानातील प्रत्येक रंगांपेक्षा वेगळे आणि नैसर्गिक रंगांचे थैमान डोळ्यापुढे होते. ब्रेन कोरल्स सारखे नजरवेधक प्रकार, श्वासोच्छवास करणारे कोरल्स, मासे खाणार्‍या वनस्पती, दगडांआड लपलेले ऑक्टोपस, काटे फेकणारे/फूगणारे मासे, घोडेमासे, स्टारफिश, इल, छोट्या माशांचे थवे, डोक्यावर मोठ्ठा टिळा लाऊन आपल्याच ऐटीत फिरणारा मोठ्ठा नेपोलियन वगैरे नानारंगी नानाढंगी माश्याचे संमेलन तिथे होते. ह्या पृथ्वीतलावरच्या ह्या निसर्गाच्या जिवंत चत्कारांपूढे मी नतमस्तक झालो. ह्या सहा दिवसात निसर्गाने आपल्या विश्वाचा चिमुकला हिस्सा माझ्यापुढे धरला होता. त्यामुळेच मी इतका भारावलो होतो.
(माझ्याकडे पाण्याखालचा कॅमेरा नसल्याने फोटो नाहि आहेत)

अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, ह्या हॅवलॉक गावाचे वैशिष्ट्य, की इथे प्लॅस्टिक बंदी आहे. बाटली हॉटेलात एकदाच देतात तीच नेहमी भरून देण्याची सोय आहे. अत्यंत साधी माणसे, छोटे बेट जगाला खूप मोठे काहितरी देत होते. बाकी डायविंग करायचे नसणार्‍यांसाठी स्नॉर्कलिंगची सोय आहे. याशिवाय देखील केवळ आराम करण्यासाठीही हे उत्तम स्थळ आहे. पूर्वकिनारा असल्याने उगवता चंद्र, रात्री एक वेगळेच विश्व निर्माण करतो. त्या चंदेरी लाटांवर डूलणार्‍या बोटी आणि शुभ्र वाळूमधल्या गप्पा अजूनही मनात रुंझी घालतात.

असो. तर "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव भारतातल्याच पण भारताच्या मुख्य भूमीपासून दूर असणार्‍या पोर्ट ब्लेअरलाच संपेल असा जो अंदाज होता त्याच्या साफ फडशा उडाला होता. सार्‍या भावनांच्या पलिकडचे सेल्युलर जेल, त्या पलिकडे असणारे जारवांचे जग - बारतांग बेट, मुख्य अंदमानच्या पलिकडचे हॅवलॉक, या पृथ्वीवर जमिनीपलिकडचे- पाण्याखालचे जग आणि लग्नापलिकडील नवेकोरे विश्व या सार्‍यांनी "त्या तिथे पलिकडे तिकडे.." ही जाणीव एका समृद्ध अनुभवात परिवर्तित केली. कदाचित तिथे पुन्हा जाणे होणार नाहि, पण अलिकडच्या किनार्‍यावर बसून पलिकडील जंगलातल्या शिकारीच्या गोष्टी आठवून आठवून सांगणार्‍या आजोबांसारखे, त्या तिथले आठवणींचे कढ आयुष्यभर येत राहतील हे नक्की

समाप्त

टिपः
स्कूबा डायविंग ही शारिरिक व मानसिक परिक्षा पाहणारी क्रिडा आहे. योग्य आरोग्य नसताना/प्रशिक्षणाशिवाय/उपकरणांशिवाय/सोबतीशिवाय हा खेळ खेळणे जीवघेणे ठरू शकते

 

 

निसर्गाचे विलोभनीय दर्शन

 





मायावी सौंदर्याची दुर्मिळ अनुभूती 


बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे,निळेशार पाणी, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान.सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं विलोभनीय दर्शन! अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे.तसेच अंदमान म्हटलं की, आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!


अंदमानच्या पोर्ट ब्लेअर,नील,हॅवलॉक व रॉस या बेटावरील रमणीय समुद्रकिनारे पाहून झाल्यावर आम्ही  ’बारातांग’ च्या दिशेने निघालो. अगदी मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्रातून जातानाचा आनंद हा अगदी अवर्णनीय मनाला आल्हाद देणारा होता. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जहाजांनी गेल्यानंतर जिपने पुढचा प्रवास सुरू झाला रस्त्यांनी जाताना ’जारवा’ आदिवासी दिसले ते बरेचदा आपल्या गाडीजवळ येऊन आपल्या जवळचे कॅमेरे, खाण्याच्या वस्तू हिसकतात म्हणून तिथे गाडी न थांबवता जोरात नेली जाते. आदिवासी लोकांना छायाचित्रण, संवाद किंवा खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. ’जारवा’ आदिवासी राखीव क्षेत्राच्या मर्यादित क्षेत्रातून जाण्य़ासाठी काही ठराविक वेळा आहेत ज्या दरम्यान काफिल्याच्या सुरवातीला आणि शेवटी पोलिसांसह वाहनांना काफिल्यात जंगलात सोडले जाते. जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल.परत येताना मड आयलड पाहिले. येथे जिवंत ज्वालामुखी पाहता आला.


पोर्ट ब्लेअर परत न जाता आम्ही दिगलीपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. या प्रवासामध्ये एकदा जहाजातून गाडी टाकून दुस-या बेटावर गेलो. लांबचा प्रवास असल्याने दिगलीपूर येथे पोहचण्यास रात्र झाली. दिगलीपूर हे उत्तर अंदमान बेटावरचे छोटे शहर आहे. दुस-या दिवशी दिगलीपूरच्या ’एरियल बे’ जेट्टीवरून बोटीने ’रॉस आणि स्मिथ’ नावाच्या शांत जुळ्या बेटांवर जाण्यास निघालो. अथांग  निळ्याशार समुद्रातून छोट्या फायबर मोटरबोटीने ६ ते १० जणांना प्रवास करावा लागतो. ही दोन्ही बेट दिग्लिपूरपासून ८ किमी अंतरावर आहेत.तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. हा २५ मिनिटांचा बोटीचा प्रवास सुखद अनुभव आहे. या बोटीच्या प्रवासाला वनविभागाचा परवाना आवश्यक आहे.


उत्तर अंदमान मधली स्मिथची भव्य जुळी सुंदर बेटे आहेत. कोणाच्या फारशा परिचयाची नसलेली आणि घनदाट झाडींनी वेढलेली ही दोन बेटे!! पन्नास मीटर-लांब वाळूच्या पट्टीने जोडलेली आहेत. ही रेशमी पांढरी वाळूची पट्टी समुद्राच्या आत उंच भरतीच्या वेळी खाली येते आणि कमी भरतीच्या वेळी पुन्हा वर येते. समुद्रकिनाऱ्यावर कमी भरतीच्या वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालता येते. एक आश्चर्य पाहण्यास मिळते. एक किनारा निळाशार तर दुस-या किना-याला हिरवी झाक दिसते. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. ही अप्रतिम व्हर्जिन किनारे पाहताना आपण चित्र असल्याचा भास होतो.


अंदमान बेटांमधील एक लपलेले नंदनवन जेथे पर्यटकांचा एक नगण्य भाग आहे. त्यांना सुंदर म्हणणे हे कमी लेखणे आहे. या बेटांना भेट देणे म्हणजे 'जगाबाहेरचा' अनुभव आहे. बेटांच्या जोडीमध्ये अप्रतिम विस्तीर्ण व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला उथळ पोहण्याचे क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम डाईव्ह आणि स्नॉर्कलिंग साइट्स आहेत. दोन्ही किनारे सोयीयुक्त असून स्वच्छ ठेवण्यात आले आहेत. दोन्ही बेटांच्या किना-यांवर पोहण्याचा आंनद लुटता आला.


अंदमानमधल्या या जुळ्या बेटांवरून पाय निघत नाहीत पण या सुंदर बेटांवर राहण्याची परवानगी नसल्याने ’दिगलीपूर’ परतावे लागते. या बेटांवर जायाचे असल्यास अंदमान सहलीत तीन दिवस व बराच खर्च वाढतो. यासाठी पर्यटक या बेटांवर जात नाहीत. पण या जुळ्या बेटांना भेट न दिल्यास ’अंदमान सफर’ पूर्ण होणार नाही.

 http://vivektavatetreks.blogspot.com/search?updated-max=2021-09-15T23:16:00-07:00&max-results=7

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...