नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ब्रम्हगिरी किल्ल्यावरून उगम पावणारी गोदावरी येथुन दक्षिणेकडे वाहत आंध्रप्रदेशात राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक स्थान व गोदावरी नदीचा उगम असलेला ब्रह्मागिरी पर्वत भाविकांनी कायम गजबजलेला असतो. एकेकाळी इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारा हा किल्ला आज केवळ गोदावरीचे उगमस्थान म्हणुन प्रसिध्द असुन आपली मुळची ओळख हरवुन बसला आहे. आपण मात्र ब्रम्हगिरी पर्वताला किल्ला म्हणुनच भेट देणार असुन त्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत. सातवाहनकाळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी उर्फ श्रीगड किल्ला बांधला गेला. बारा ज्योतिर्लिंगांतील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण किल्ल्याच्या पायथ्याला असल्याने हा किल्ला त्रिंबकगड या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. दक्षिण गंगा गोदावरी आणि मुंबईची जीवनदायिनी वैतरणा या दोन महत्वाच्या नदी प्रणालींना विभागणारी डोंगर रांग म्हणून ब्रह्मगिरी आणि शेजारील पर्वतरांगेकडे पाहता येईल. नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे.

याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रम्हगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रम्हगिरी पर्वतावर उगम पावते. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजे हा ब्रम्हगिरीचा पर्वत. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपस्चर्या केली त्यामुळे या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. ब्रम्हगिरीचा डोंगर म्हणजे साक्षात शिवाचे रूप आहे असे भाविक मानतात.. या डोंगरावरील पाच शिखरे म्हणजे शिवशंभूची पाच रूपे आहेत: वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि व्योमजटा.. यातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे ब्रम्हाद्री..त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात. मात्र या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे असणारे ऐतिहासिक महत्व थोडे फार डोंगर भटके आणि ट्रेकर सोडल्यास फार कमी लोकांना माहित आहे.
इतिहासकाळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रम्हगिरी पर्वत हा एक नांदता गड होता. त्र्यंबकगड नावाने ब्रम्हगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. याच त्र्यंबकगडाला एक उपदुर्ग देखील आहे ज्याला दुर्गभांडार असे म्हणतात. दुर्गभांडार हा तसा स्वतंत्र किल्ला नसून त्र्यंबकगडाचाच एक भाग आहे. तर अशा या ब्रम्हगिरीच्या पौराणिक महात्म्याकडे जास्त न वळता आपण त्र्यंबकगडाची व त्याचा उपदुर्ग असणाऱ्या दुर्गभांडारची एक सहल करू.नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा ब्रम्हगिरी हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फुट उंच आहे. याचा घेर १० मैल इतका मोठा असून किल्ल्याच्या जवळ जवळ सर्वच बाजुंनी ३०० ते ४०० फुट उंचीचा कातळकडा आहे.ब्रम्हगिरी किल्ल्यावर पाय ठेवणे पूर्वी निषिद्ध मानले जायचे पण कराचीचे सेठ लालचंद यांनी १९०८ साली या पर्वतावर ५०० पायऱ्यांचे बांधकाम केले. सरकारने आता दुतर्फा रेलिंगही घातले आहे, त्यामुळे भक्तगणांना त्याचा आधार मिळतो. ब्रम्हगिरीच्या डोंगरावर गंगाद्वार, गोरक्षनाथ गुंफा, आणि १०८ शिवलिंग असलेली गुंफा आहे.. शंकराने जटा आपटल्या ते ठिकाण, गोदावरी उगमस्थान, वैतरणा नदीचे उगमस्थान. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.


गडावर चढाई करण्या आधी आपण या गडाचा इतिहास समजून घेउया.
आख्यायिका
पुराणात अशी आख्यायिका आहे की गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर घोर तपश्चर्या केली व भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यांची इच्छा काय ते विचारल्यानंतर गौतम ऋषींनी त्यांच्या जटेतील गंगेची मागणी केली. पण गंगा मात्र येण्यास राजी नव्हती. तेंव्हा भगवान शंकराने आपल्या जटा या इथे आपटल्या व ब्रम्हगिरीवर गंगा अवतीर्ण झाली. गौतम ऋषींनी गोहत्येचे पाप निवारण करून गाईला पुन्हा सजीव केले. म्हणून तीच नाव पडलं गोदावरी.
दुसरी आख्यायिका अशी की, एकदा विष्णु ब्रम्हदेवाला म्हणाले, मी पुष्कळ तप केले, परंतु अजूनही मला शिवाचे ज्ञान झाले नाही. तेव्हा त्यांनी ठरवले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा व विष्णूने चरणाचा शोध घ्यायचा. पुष्कळ शोध घेऊनही दोघांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. केतकी व पुष्प यांची खोटी साक्ष उभी करून ब्रम्हाने सांगितले की मी शिवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलांनी व दुधाने अभिषेकही केला. त्यावर कृद्ध होऊन शिवाने केतकीला व दूध देणार्या गाईला शाप दिला. त्यावर चिडून जाऊन ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला, ‘‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील.’’ रागाचा आवेग ओसरल्यावर ब्रम्हाने दिलेला शाप मागे घेतला आणि स्वत:च भूतलावर पर्वताचे रूप घेवून त्याचे नाव ब्रम्हगिरी असे ठेवले.
किल्याचा इतिहास
या किल्याचा इतिहासातील पहिला उल्लेख बाराव्या शतकाच्या मध्यावर सापडतो. इ.स. १२७१ ते १३११ च्या दरम्यान देवगिरीचा राजा रामचंद्र देव यादव याच्यावतीने त्याच्या भावाची सत्ता त्र्यंबकेश्वर व आसपासच्या परिसरावर होती. यादवांच्या अस्तानंतर हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. बहामनी राज्य संपुष्टात आल्यावर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. निजामशहाच्या मृत्यूनंतर निजामशाही वाचविण्यासाठी मुर्तूजा या छोट्या निजामशहाला मांडीवर बसवून स्वत: त्याचा वजीर बनून इ.स. १६२९ ते १६३३ पर्यन्त राज्य सांभाळले. तोपर्यंत त्र्यंबकगड शहाजी राजांच्या ताब्यात होता. शहाजी राजांची बगावत सहन न झाल्यामुळे मुघल पातशाहा शहाजंहान याने शहाजी राजांचा माहुली येथे पराभव केला व ८ हजारची फौज देऊन सेनापती खानजमान याला त्र्यंबकगडावर सोडला. त्र्यंबकगड खानजमानने जिंकून घेतल्यावर काही काळ तो मुघलांकडेच होता.
नोव्हेंबर १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराज्यांच्या काळात मुघलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली सुरू होत्या. त्यावेळी गडाचा किल्लेदार होता सामराज पद्मनाभी. इ.स. १६८२ च्या सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मुघली फौजेत दाखल करण्यात आले. त्याने आक्रमक पवित्रा घेऊन गडाखालील तीन वाड्या जाळून टाकल्या. बादशाही कृपा झाली तर त्र्यंबकगड मुघलांना मिळवून देतो या अटीवर फेब्रुवारी १६८३ च्या सुमारास राघो खोपडा हा फितूर होऊन अनामतखानला जाऊन मिळाला. राघो खोपड्याने त्र्यंबकगडाच्या किल्लेदाराला आमिष दाखवून वश करण्याचा प्रयत्न केला. पण किल्लेदार बधला नाही. तो शंभाजीराजांशी एकनिष्ट राहिला. खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे मुघलांनी त्यालाच कैद केला. नोव्हेंबर १६८४ मध्ये अकरमत खान व महमतखान यांनी पुन्हा एकदा गडाखालील वाड्या जाळल्या व तेथील जनावरे पळविलीत. इ.स. १६८२ ते १६८४ पर्यन्त मुघलांनी हरप्रकारे किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ऑगस्ट १६८८ मध्ये मुघल सरदार मातबरखानने किल्ल्याला वेढा घातला.
औरंगजेब आणि त्र्यंबकगड
त्यावेळी औरंगजेबाला लिहीलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महीन्यापासून वेढा घातला होता. किल्ल्याभोवती चौक्या बसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे-जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील.’’ यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला हरप्रकारे घेण्याचा प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’ त्यावर मातबरखान किल्ला कसा घेतला हे बादशहला पत्रातून कळवितो, ‘‘गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिति पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मानसबी द्याव्यात याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार व भावाबरोबर पाठविल्या आहेत. त्या पहाण्यात येतील.’’ याशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, त्याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार, हजार पायदळ देवून मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्ल्यदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’’ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो, ‘‘साल्हेरच किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेताना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली. तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना द्यावी.’’ किल्ला ताब्यात आल्यावर बादशहा औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या, तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंड्याचा मान आणि तीस हजार रुपये रोख देण्यात येत आहे.’’
यावरुन त्र्यंबकगड किती महत्वाचा होता हे दिसून येते. इ.स. १६९१ च्या सुमारास या भागात मराठ्यांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यू झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे. तो कर्जबाजरी झाला आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्र्यंबकगड सांभाळणे शक्य नाही. कुणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’ इ.स. १७१६ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची मागणी मुघलांच्याकडे केली, पण त्यांनी ती फेटाळली. इ.स. १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून किल्ला घेतला. २ डिसेंबर १७५१ मध्ये पेशव्यांनी भेदनीतीचा वापर करून त्र्यंबकगड ताब्यात घेतला. २२ एप्रिल १८१८ ला कर्नल मॅकडॉवेलने त्रिंबकगड उर्फ श्रीगड घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला अपयश आले.पण २४ एप्रिल १८१८ रोजी प्रखर हल्ल्यामुळे गडकर्यांना हत्तीमेट गमवावे लागले. पण हत्ती दरवाज्यात तेरा इंग्रज व ४ स्वदेशी सैनिकांना मरण पत्करावे लागले. त्यानंतर मात्र लगेच २६ एप्रिल १८१८ मध्ये मराठ्यांशी कडवी झुंज देऊन त्र्यंबकगड इंग्रजांनी ताब्यात घेतला.
किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यापैकी हत्तीमेट हि वाट कड्यातून वर येते तर दुसरी राजदरवाज्याची मुख्य वाट त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर येते. यातील पहिली हत्तीमेटची वाट वापरात नसुन या वाटेवर दरड कोसळली असल्याने या वाटेवरील दरवाजा दगडाखाली गाडला गेला आहे व हि वाट धोकादायक बनली आहे. या वाटेचीही आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
गडावर येणारी दुसरी वाट हि सोपी असुन सतत वाहती आहे. ब्रह्मगिरीचा पूर्व पश्चिम विस्तार आहे २.५ किलो मीटर. उत्तरदक्षिण सुद्धा थोड्या फार फरकाने तेवढाच. शे दोनशे मीटर कमी असेल. डोंगराचा माथा आहे १०४० मीटर पेक्षा उंच. पायथ्याशी ज्योतिर्लिंग असणाऱ्या मंदिर भागाची उंची आहे ७२० मीटर. २०० मीटर उंच चढाई केली कि आपण ब्रह्मगिरीच्या माचीवर पोहचतो.
त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शन घेउन कुशावर्त मार्गे पुढे गंगासागर तलाव ओलांडून एम टी डी सी च्या हौलिडे रिसॉर्ट वरून ब्रम्हगिरीच्या पायर्यांनी चढायला सुरुवात होते. गावातील मंदिरापासून गंगाद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागले की १५ मिनिटात आपण गंगाव्दाराकडे जाणार्या पायर्या जिथे सुरू होतात तेथे येऊन पोहोचतो. तिथून डावीकडे एक मोठी पायवाट वर चढत ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाते. या वाटेवर दोन्ही बाजूस चांगली गर्द झाडी असल्याने ती मस्त सावलीतून जाते.त्र्यंबकेश्वर मंदिराकडून गंगाद्वारकडे जाताना पाय-या सुरू होताना डावीकडे एक पायवाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर हि वाट पुढे गावातुन येणाऱ्या दुस-या पाय-यांच्या वाटेला मिळते व आपला गडप्रवास सुरु होतो.
पायऱ्या चढायला सुरुवात केली कि निरनिराळ्या देव-देवता, पायऱ्यांच्या दोन्ही बाजुस वसलेल्या नजरेस पडू लागतात त्या. या मुर्ती, मुबलक प्रमाणात आहेत. वाटेत ठिकठिकाणी जंगलात असलेल्या वन्य पशूंची माहिती आणि चित्र लावलेले फलक आम्हाला खूप चांगली माहिती देत होते. खंड्या, बुलबुल, किंगफिशर, मोर, घारी, पांढऱ्या पाठीचं गिधाड, बिबटे अश्या पशूंचा वावर असल्यामुळे दुपारी चार नंतर ब्राम्हगिरीवर जाण्यास मज्जाव केला आहे तो अगदी पहाटे सहा पर्यँत.
तळापासून साधारण ५०० पायऱ्या चढुन आल्यावर थोडीशी सपाट वाट चालु होते. पुढे काही अंतरावर वाटेच्या डाव्या बाजुला एक मोडकळीस आलेले दगडी बांधकामातील मंदीर दिसते. द्वारपट्टीवर असणारे गणेशशिल्प हे शिवमंदीर असल्याचे सुचवते पण आत दरवाजातच एका देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
वाटेच्या शेजारी असणाऱ्या झुडुपात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष व दोन लहान विहिरी असुन गड नांदता असताना या भागात काही वस्ती असावी असे वाटते. मंदिरासमोर वाटेच्या बाजुला दोन उध्वस्त बुरूज असुन त्यांच्या शेजारी काही तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील हे पहाऱ्याचे मेट आहे.
 |
धर्मशाळा
 |
या मेटावरून पुढे आल्यावर उजव्या बाजुला एका चौथऱ्यावर दगडी बांधकामातील एक दुमजली वास्तू असून तिच्या दर्शनी भागात गणेशमुर्ती व काही शिल्पे कोरलेली आहेत. हि वास्तू म्हणजे सिंध प्रांतातील व्यापारी मुलतानी लालचंद भंभानी यांनी शके १९१३ मध्ये यात्रेकरूना राहण्यासाठी बांधलेली धर्मशाळा असुन तसा शिलालेख या धर्मशाळेच्या भिंतीवर लावला आहे. त्यांनी या वास्तुबरोबर गडाकडे जाणाऱ्या काही पायऱ्यादेखील बांधुन काढल्या. धर्मशाळेच्या दोन्ही मजल्याचे दोन भाग केलेले असुन मागील बाजुस जेवणासाठी व यज्ञविधी करण्यासाठी वेगळी वास्तू आहे. या इमारतीला तीन कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर कोरीव शिल्प आहेत. दुसऱ्या मजल्याला नक्षीकाम केलेले खिडकीवजा झरोके देखील आहेतधर्मशाळेचा परीसर दगडांनी बांधुन काढलेला असुन वरच्या मजल्यावर जाण्याकरता बाहेरील बाजुस जिना आहे. हि दुमजली इमारत एक जुना वाडाच शोभावा अशी दिमाखदार व सुंदर आहे. मात्र काही कपाळकरंट्या व नतद्रष्ट लोकांनी इतक्या सुंदर वास्तूची सगळीकडे नावे लिहून पार वाट लावली आहे.
 |
| धर्मशाळे च्या मागील बाजूस असलेली पुष्करणी |
धर्मशाळेच्या मागील बाजुस दगडी बांधकामातील ७०-८० फुट खोल पायऱ्या असलेली बारव असुन तिच्या काठावर एक दगडी ढोणी व झिजलेला शिलालेख दिसुन येतो. धर्मशाळेसमोर उघडयावर एक हनुमानाची मुर्ती असुन हि मुर्ती मेटाबाहेर असलेल्या दगडी मंदिरातील असण्याची शक्यता आहे. ब्रम्हगिरीवर जाणार्या पायर्या या वास्तू जवळूनच सुरू होतात.येथुन पुढील वाटेवर सुरवातीला बांधीव दगडी पायऱ्या असुन नंतरची वाट व पायऱ्या मात्र कातळात कोरून काढल्या आहेत.
येथून पायऱ्यांच्या वाटेने जाताना एक वाट उजवीकडे कड्याजवळ जाते. हि पायऱ्यांची वाट गंगाद्वार कडे घेऊन जाते. येथे सुद्धा गौतमी गंगा एका गोमुखात उगम पावून, एका कुंडात जाऊन पुन्हा लुप्त होते. पुढे ती त्र्यंबकेश्वर गावातील पुष्करणी मध्ये उगम पावते. गंगाद्वाराच्या पुढे दोन गुहा असून एकात १०१ शिवलिंग स्थापित केलेली आहेत. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिने त्यांची स्थापना केल्याची व येथेच त्या दोघांचे वास्तव्य असायचे अशी कथा सांगितली जाते.
त्या पुढची गुहा मच्छिंद्र नाथांची आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये पाहण्याचे अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे संत श्री ज्ञानेश्वरांचे गुरु - संत श्री निवृत्ती नाथांचे समाधीस्थळ जेथे त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.गंगाद्वारापासून समांतर ब्रह्मगिरीच्या उत्तर बुरुजाच्या दिशेने आणि दोन ठिकाण वाट वाकडी करून पाहण्यासारखी आहेत. एक आहे कोटी लिंग आणि दुसरं नाथ गुहा.
दीड फुट उंचीच्या या पायऱ्यावर आधारासाठी लोखंडी कठडे रोवले आहेत. येथुन पंधरा मिनिटे चढाई केल्यावर खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा लागते. या गुहेत एक खोली असुन टेहळणीसाठी असलेल्या या गुहेत सध्या ब्रह्मदेवाची मुर्ती विराजमान आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात माकडं असुन ती खाण्यासाठी पर्यटकांना त्रास देत असल्याने जवळ शक्यतो काठी बाळगावी. वाटेत माकडं तुम्हाला खिंडीत गाठतात. पाठीवरच्या सॅकची झिप उघडून हाताला मिळेल ते काढायची हिम्मत ते करतात.इथपर्यंतच्या ४०० पायर्या कुणा दानशूर भावीकाने बांधून काढलेल्या आहेत. मात्र त्यापुढील पायर्याचा मार्ग पुरातन आहे.
एका बाजूला कातळकडा व दुसर्या बाजूला कातळभिंत या मधून जाणारा हा पायर्यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले जीने होय. हे चढताना आपली चांगलीच दमछाक होते.
येथुन पुढील वळणावर खडकात खोदलेली दहा फुट उंचीची हनुमानाची मुर्ती असुन यात हनुमानाने आपल्या पायाखाली राक्षसाला दाबून धरले आहे. येथुन पुढील भागात वाटेवरील दुसरी गुहा समोर येते. या गुहेत शिरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूने लहानसा दरवाजा कोरलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस दोन ऋषींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुहेचा कड्याकडील भाग संपुर्ण उघडा असुन गुहेत दोन कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत.
येथुन काही अंतर पुढे गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा समोर येतो. हा दरवाजा अत्यंत साधा असून त्यावर कोणतेही शिल्पकाम नाही.दरवाजाच्या अलीकडे उजव्या बाजुला दोन कातळशिल्पे आहेत. संपुर्ण कातळात खोदलेला हा दरवाजा आपल्याला सातवाहन काळाची आठवण करून देतो. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन वर गेल्यावर गडाचा दुसरा कातळात कोरलेला दरवाजा समोर येतो.
गडाचे दोन्ही दरवाजे उत्तराभिमुख असुन पहिला दरवाजा साधारण आहे तर दुसऱ्या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. अत्यंत सुबक धाटणीचा हा दूसरा दरवाजा दक्षिणाभिमुखी असून तो काताळाच्या बेचकीत खोदलेला आहे.
दरवाजाबाहेर खालील बाजुस चौथऱ्यावर दोन हत्ती कोरलेले असुन वरील बाजुस दरवाजाची चौकट, चर्या व फुले कोरलेली आहेत. दरवाजाबाहेर डाव्या बाजुस एक देवळी कोरलेली असुन त्यात देवीचे शिल्प कोरले आहे तर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या कोरल्या आहेत.

किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा दरवाजातून काही पायऱ्या चढून वर गेलो की आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. त्रिंबकगड समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट उंचावर असुन ४०० एकरपेक्षा जास्त परिसरात पुर्वपश्चिम पसरला आहे. त्रिंबकगडचा माथा म्हणजे मध्यभागी एक टेकडी व तिच्या चहुबाजुला प्रशस्त पठार आहे. गावापासून माथ्यावर यायला आपले तास-दीड तास सहज खर्ची पडललेले असतात. साधारण आयताकृती आकार असलेल्या या किल्ल्याला तीन सोंडा असुन एका सोडेवर हत्तीमेट दरवाजा तर दुसऱ्या सोडेसमोर दुर्गभांडार किल्ला आहे. तिसरी सोंड सरळसोट कडा असल्याने येथे कोणतीही सरंक्षण व्यवस्था नाही. माथ्यावर आल्यावर दरवाजाच्या परीसरात किल्ल्याची जुजबी तटबंदी दिसुन येते. त्याच्या सर्व अंगाला कातळकडे असल्यामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. सतत भाविकांच्या वर्दळीमुळे किल्ल्यावर फिरण्याच्या पायवाटा चांगल्याच मळलेल्या आहे. गडमाथ्यावर उभे राहिले की समोर एक डोंगर आडवा येतो. याच्या डाव्याबाजूस म्हणजे दक्षिणेकडे एक टेकडी आहे. तिला ‘पंचलिंग शिखर’ असे म्हणतात.

येथुन उजव्या व डाव्या बाजुला जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते तर समोरील वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या दिशेने जाते. उजव्या बाजूस म्हणजे उत्तरेकडे एक छोटी पण उंच टेकडी लागते. या टेकडीवर चढून जाणारी वाट पूर्वेकडे उतरते. टेकडीवर चढण्यापूर्वी वाटेत डावी-उजवीकडे पाण्याची टाकी लागतात. टेकडीवरुन खाली उतरणारी वाट डावीकडे गोदावरी नदीच्या उगमस्थानापाशी जाते. परतताना हा भाग आपण पाहणार असल्यामुळे आपण आपला मोहरा उजवीकडील डाईक सदृश टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जटामंदिर किंवा जटास्थानाकडे वळवायचा.
| दक्षिण टोकावर दिसणाऱ्या काही जुन्या वास्तूंचे अवशेष |
किल्ल्याच्या दक्षिण टोकावरून दिसणारे पंचलिंग शिखर
|
डाव्या बाजुच्या वाटेने सुरवात केल्यावर आपल्याला सर्वप्रथम घडीव दगडांनी बांधलेल्या दोन समाध्या दिसुन येतात. या समाध्यांच्या वरील बाजुस एक प्रशस्त तलाव असुन सध्या तो कोरडा पडलेला आहे. तलावाच्या वरील बाजुस एका वाड्याचे अवशेष असुन खालील बाजुस असलेल्या बुरुजावर चौकीचे अवशेष दिसुन येतात. तलावापासुन ५०० फुट अंतरावर दारूगोळ्याचे कोठार व इतरही बरेच अवशेष दिसुन येतात. ते पाहुन मुळ वाटेवर येऊन टेकडीकडे निघावे. या वाटेवरील पायऱ्या चढताना बारकाईने पाहिल्यास एका ठिकाणी उध्वस्त तटबंदी व बुरुजाचे अवशेष दिसतात. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी सुरु होत असावी. पुढे या वाटेवर डाव्या बाजुस एक चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. वाट सोडुन चाकाच्या वरील बाजुस गेल्यावर सातवाहनकालीन खांबटाके दिसुन येते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजुस एक आश्रम दिसतो. या आश्रमाच्या मागील बाजुस गडावर आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली एक मोठी उध्वस्त वास्तू दिसते. हि वास्तू म्हणजे गडावरचे धान्यकोठार आहे. धान्यकोठाराकडून एक बांधीव वाट समोरच असलेल्या झाडीमधून टेकडाकडे जाताना दिसते. या वाटेच्या शेवटी डोंगराच्या पोटात खोदलेली एक मोठी गुहा आहे. या गुहेत सध्या एक साधु मुक्कामाला आहे. गुहेच्या शेजारीच खडकात खोदलेले एक गोलाकार टाके अथवा विहीर आहे. हे पाहून पुन्हा मुळ वाटेला लागावे. या वाटेने आपण गडाच्या मधील उंचवट्यावर पोहचतो. येथुन डावीकडील वाट गोदावरी मंदिराकडे तर उजवीकडील वाट जटाशंकर मंदिराकडे जाते.
डावीकडील वाटेने पुढे जाताना पुन्हा एकदा बालेकिल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीचे दर्शन होते. वाटेत एका ठिकाणी अर्धवट गाडलेल्या सतीशिळेचे दर्शन करत ५ मिनिटांत आपण गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या मुळगंगा म्हणजे ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचतो.वाटेत एक छप्पर नसलेल दगडी बांधकाम होत या मंदिराच्या कळसावर 'ब्रम्हगिरी मुख्यदर्शन' अस लिहल आहे
| गोदावरी उगमस्थाना पासून दिसणारा ब्रम्हगिरी डोंगराचा विस्तार आणि समोरील विहंगम दृश |

ब्रम्हगिरी मंदिर अथवा गोदावरी उगम स्थान

|
कड्यालगत असलेले मुळगंगा हे मंदीर म्हणजे चारही बाजुंनी भिंती व मध्यभागी पाण्याचे चौकोनी टाके व टाक्याच्या तीन बाजुस ओवऱ्या व त्यात देवांची स्थापना अशी याची रचना आहे.
मंदिराच्या वरील बाजुस खडकात खोदलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके दगडांनी बांधुन बंदिस्त केले आहे. या टाक्यातील पाणी गंगातीर्थ म्हणुन वापरले जाते. या पाण्याला एक वेगळीच चव आणि तृप्ती आहे.टाक्याच्या वरील बाजुस एक समाधीचा दगड असुन खालील बाजुस उध्वस्त तटबंदी व इतर अवशेष दिसुन येतात.
पुढे गोदामाईची मूर्ती व गौमुखातून गोदावरी नदीचं उगम स्थान असणारे गोदातीर्थ आहे.
तसेच पुढे चालत गेलो कि एका मंदिरात कनक ऋषी आणि गौतम ऋषी पती-पत्नी अशी जोडीने बसलेली मूर्ती दिसते. हा मंदिर परिसर मात्र नव्याने बांधलेला वाटतो आणि या परिसरात भाविकांची वर्दळ देखील जास्त असते. आपण या गर्दीतून बाहेर पडायचं आणि पंचलिंग शिखराच्या बाजूने ब्रम्हगिरीच्या दक्षिण टोकाकडे निघायच. हत्तीमेट दरवाजावरून गडावर येणारी वाट या ठिकाणी आपण आलेल्या वाटेला मिळते.
 |
| Shiv Jatta Temple in other corner |
गोदावरी नदीचा उगम या कुंडात होतो
जटामंदिर शेजारील पाण्याचे टाके. पाणी पिण्यास योग्य आहे.
जटाशंकर मंदीराच्या आत |
हा परीसर पाहुन सरळ जाणाऱ्या वाटेने आपण जटाशंकर मंदिराकडे पोहोचतो. या ठिकाणी शंकराने जटा आपटून गंगानदी भूतलावर आणली अशी कथा आहे.वास्तविक इथे खडकावर दिसणार्या जटांच्या खुणा म्हणजे रोपी लावा आहे. दुध गार होताना त्यावर तयार होणारी साय जशी सुरकुत्या पडून तयार होते तसे इथे लाव्हा रस थंड होताना, त्यावर सुरकुत्या तयार होउन असा रोपी लाव्हा बनतो.
मंदिराच्या मागील बाजुस खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. मंदिरात एक लहानस पाण्याचा झरा दिसतो गौतम ऋषींचे गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटामंदिरात प्रकट केले अशी श्रद्धा आहे. एका खडकावर शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात आणि तिथेच एक पाण्याची बारीक धार दिसते. मंदिरा शेजारीच एक पाण्याचे टाके असून त्यातले पाणी पिण्यास योग्य आहे. हे मंदिर ब्रम्हगिरीच्या पश्चिमेकडे अगदी कड्यालगतच आहे. मंदिर प्रशासनाने या मंदिर परिसरात व डोंगर कड्याला रेलिंग्ज बसवलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजूने एक लहान पायवाट टोकावरील दुर्गभांडार किल्ल्याकडे जाते. या वाटेवर खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके असुन तटाला लागुन व टोकावरील बुरुजावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात.
सर्वात डावीकडे कपडा, नंतर ब्रम्हा डोंगर, मागे हळूच डोकावणारा हरिहर (हर्षगड), त्याच्यामागे उतवड डोंगर. तर उजवीकडे दुर्गभांडार
 |
मंदिराबाहेर उभे राहिले असता समोर कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर तर हरिहर आणि बसगड हे किल्ले दिसतात.
| दुर्गभांडारकडे जाणाऱ्या वाटेवरून मागे दिसणारे पंचलिंग शिखर |
ज्या ठिकाणी मूळ गंगा मंदिर आहे तेथून वरती ब्रम्हगिरी पर्वताचे सर्वात उंच ठिकाण म्हणजे पाच शिखरे आहेत याला पंचलिंग असे म्हणतात. या सर्वोच्च ठिकाणा वर जाण्याची वाट भलतीच अवघड आणि बिकट आहे पण रोमांचक पण तितकीच आहे. तेथून दिसणारे निसर्ग सौंदर्य म्हणजे अफलातून अफलातून आणि अफलातून असे आहे. थंडगार वाऱ्याचे झोत अंगावर घेत दूर दूर पर्यंत दिसणारे निसर्ग सौंदर्य कवेत भरून घेण्याचा आनंद काही औरच आहे. तेथून पूर्वेकडे पाहिल्यास ३० कि मी दूर असलेल्या गंगापूर धरणाचे पाणी दिसते. दक्षिणेकडे अवाढव्य पसरलेले वैतारणा धरण, उत्तरेकडे सप्तशृंगीचा डोंगर आणि अन्य पर्वत रांगा. आणि पश्चिमेकडे वृक्षराजीने नटलेला जव्हारचा घाट. निसर्गाचे हे सर्व विराट रूप बघून आपल्याला आपले अस्तित्व किती नगण्य आहे याची जाणीव होते.

या पंचलिंग म्हणजे पाच शिखरापैकी एका शिखराच्या पोटात एक पाण्याचा गडू दडलेला आहे. म्हणजे नैसर्गिक पाण्याचा साठा. त्याचे मुख केवळ एका कपाच्या तोंडा इतकेच आहे, पण आत थंडगार पाण्याचा भला मोठा साठा आहे. त्यात नळी टाकून पाणी ओढता येते. इतक्या उंचावर जाऊन घमेजलेले झाल्यावर असे थंडगार पाणी मिळणे म्हणजे काय सुख असते ते तेथे गेल्यावरच समजते. पण एवढ्या मोठ्या शिखरात एका कपाच्या आकाराचे ते छिद्र शोधणे म्हणजे सोबत माहितगार असल्या शिवाय शक्य नाही.
तसही ब्रम्हगिरीच्या मध्यावर १९९६-१९९७ साली मध गोळा करणाऱ्या स्थानिक आदिवासी लोकांना एक पाण्याचे गुप्त कुंड सापडले आहे त्याचेहि पाणी थंडगार आणि पिण्यायोग्य आहे. कुंड एका भूयारी मार्गातून खूप आत गेल्यावर दिसते. आत मध्ये टॉर्च किंवा मशालीचाही उजेड फारसा पडत नाही इतका मिट्ट काळोख असतो. पण ते कुंड बघण्याचा अनुभव अत्यंत रोमांचकारी असाच आहे.
यानंतर आपण जाणार आहोत त्रिंबकगडाच्या सर्वात महत्वाच्या आकर्षणाकडे अर्थातच दुर्गभंडारकडे ! पण त्या आधी दुर्गभंडारकडे चढणार्या दुसर्या वाटेची माहिती घेउया.
गौतमी मंदिराच्या मागील बाजूस हत्ती दरवाजा आहे. हेच या दुर्गाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हत्ती सुद्धा सहज जावू शकेल इतके मोठे असल्याने याला हत्ती दरवाजा असे म्हणत असावेत. या ठिकाणी दगडी बांधकाम, बुलंद दरवाजाचे अवशेष, मंदिरे, देवी देवतांच्या मुर्ती, हे सर्व या दुर्गाचा वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही येथे अस्तित्वात आहेत. ( पंच लिंगावर आणि हत्ती दरवाजा येथे देखील भग्न तोफा आणि निकामी तोफगोळे आढळून यायचे म्हणे ) येथे उतरण्या साठी एक लोखंडी शिडी पण बसवलेली आहे. आपण दुर्ग चढताना ज्या बाजूने चढतो ती खर तर दुर्गाची मागील बाजू आहे आणि हत्ती दरवाजा हि मुख्य म्हणजेच पुढील बाजू आहे. हि ठिकाण बघितल्यावर हा दुर्ग चांगला समजून घेता येतो. पण पंचलिंग किवा हत्ती दरवाजा येथे जास्त पर्यटक जात नाहीत. बरेचशे गौतमी मंदिरा पासूनच दर्शन घेऊन परत फिरतात. हा भाग जर बघायचा असेल तर कोणी तरी माहितगार व्यक्ती सोबत असायलाच हवा. आता आपला शेवटचा गडभाग पहायचा शिल्लक राहिल्याने दरीच्या काठाकाठाने ब्रम्हगिरीच्या नैऋत्य टोकाकडे चालत राहायचे. वाटेत दोन अनामिक समाध्या व छप्पर नसलेले दारुकोठार लागते आणि अखेर आपण हत्ती मेटाकडील दरवाज्यापाशी येतो. खरंतर हत्ती मेटावरील दरवाजा हा दक्षिणेकडील दरवाजा आहे. त्यावर येण्यासाठी खालून गावाकडील मार्गाने यावे लागते. हाही मार्ग माहीत असलेला बरा म्हणून आपण तेथूनच माहिती घेऊ. 
नेहमीच्या त्र्यंबक दरवाज्या ऐवजी हत्ती दरवाज्यातून चढाई करायची असल्यास वाहनाने पलीकडच्या दक्षिण बाजूने तळाशी असलेल्या'कोजूली' नामक गावात जावे लागते. इथे आपली गाडी आणली असेल तर पार्क करुन तेथून पायवाटे सारखा रस्ता आहे . एका धारेवरून मळलेल्या वाटेने चढत जाऊन मधल्या पठारावरील हत्ती मेट ह्या वाडीत जायचे आहे. या वाडीला झोल्याची मेट असेही नाव आहे. चढ तसा फार उभा नाही. किल्ल्याच्या उतारावर पूर्वीच्या काळी टेहळणी साठी चौक्या - पहारे असायचे त्यांना मेट असे संबोधले जायचे. हत्ती मेट हे असेच हत्ती दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेवर पहाऱ्यासाठी असावे. हे हत्ती मेट म्हणजे ८० उम्बरांची वाडी. शेती, पशुपालन असे येथील लोकांचे व्यवसाय. दाणा गोटा डोक्यावर उचलून आणावा लागतो. पाण्याची टंचाई. वेताळ, मरीआई, हनुमान, अंबिका देवी असे ह्यांचे ग्राम दैवत पठारावर आहेत. पूर्वेला अंजनेरी पर्वत आपले अजस्त्र बाहू फैलावून दिसतो तसेच पश्चिमेला हरिहर किल्ला, ब्रह्मा पर्वत आणि दोघांच्या मध्ये बसगड (भास्करगड) दिसतात.
 |
| हत्ती मेट वाडीतून दिसणारा त्र्यंबक गड |
समोर दिसणाऱ्या कडयाला उजवीकडे ठेवून एका नळीतून हत्ती दरवाज्याची वाट जाते. वाडीतील लोकांची गोदातीर्थावर जाण्याची नेहमीची वाट असल्यामुळे बऱ्यापैकी मळलेली. अंबिका देवीच्या मंदिराजवळ काही वीरघळ विखुरलेल्या दिसतात. गावकऱ्यांसाठी हे सगळेच देव.इथे थोडी विश्रांती घेऊन ताजे तवाने होऊन पुढे नळीत चढायला लागायचे..
कातळ खोदीव पायऱ्या
अंबिका मंदिरा कडून नळीच्या दिशेने जाताना
वाट जेथे उजवीकडच्या कड्याला मिळते तेथे खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. खालच्या पायऱ्या दरड कोसळल्यामुळे लुप्त झाल्या आहेत. येथून सभोवारचे दृश्य फार छान दिसते. नळीत काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष देखील दृष्टीस पडतात. पुढचा घळीतला रस्ता सावलीतून आहे.इथे तटबंदीचे अवशेष दृष्टीला पडतात. घळीत एक भली मोठी भिंत बांधून काढली आहे. पडझड झालेल्या भिंतीचे भले मोठे तुकडे येथे विखुरले आहेत.
पहिल्या टेकडीवर हा पाडा लागतो. थोडा सपाट भाग आणि मग खाडी चढाई.

याच्या पल्याड मंदिरं आहेत.
या पुढे आलेल्या टोकाच्या डाव्या बाजूने नळीतून जावे लागते. मागच्या वर्षी दरड कोसळल्यामुळे रस्ता नाहीसा झाला होता.
भिंतीमध्ये भुयारी मार्ग असावा कारण येथे दरवाज्याच्या कमानीसाठी दगडावर कोरीव काम केल्याच्या काही खुणा दिसतात. परंतु काही वर्षांपूर्वी दरड कोसळल्यामुळे तो मार्ग पूर्णपणे बंद झालेला असून उजवीकडे भिंतीवर चढण्यासाठी शिडी लावली आहे. शिडी चढून वर गेल्यावर कळते कि भिंतीमध्ये कोनाडे आणि जंग्या आहेत. उजवीकडच्या कड्याला भिंत घालून बंदिस्त केले आहे. पावसाळ्यात हे दगड आणि शिडीचा मार्ग घसरडा बनतो. त्याकाळात या बाजुने जाणे टाळलेलेच बरे.
भिंतीमध्ये मोठे भगदाड आहे तेथून पूर्वी मार्ग असावा
मोठ मोठ्या प्रस्तारांवर चढून डावीकडे गेल्यावर एक कातळात कोरलेली गुहा आणि एक महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात शिव पिंड असून छोट्या दरवाज्यातून कसेबसे आत डोकावून पाहिल्यास गाभाऱ्यात छतावर कमळ कोरलेले दिसते. मंदिरा समोरच्या (घळीतून पाहिल्यास उजवीकडच्या) कड्यात अजून एक छोटी गुहा व त्यात उतरण्यासाठी ३ - ४ पायऱ्या आहेत. टेहळणी / पहाऱ्यासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांना या दोन्ही गुहांचा उपयोग होत असावा.
महादेवाचे इटुकले मंदिर व रक्षकांसाठी गुहा
हत्ती दरवाजा जवळील संरक्षक तटबंदी
हत्ती दरवाजा व त्याचे संरक्षणार्थ असलेले बुरुज
घळीत भले मोठे अगणित प्रस्तर पडलेले असल्यामुळे येथून पुढे त्या प्रस्तरांवरच आरोहण करून चढावे लागते. समोर उंचच उंच पंचलिंग शिखर साद घालत असते आणि दोन्ही बाजूंनी उंच तटबंदी मागून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्याचा भास होतो. गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या वाटेवरचे बांधकाम अतिशय योग्य आहे. थोडे चढून गेल्यावर आपला मार्ग अडवणारी एक भिंत समोर येते आणि तेथपर्यंत जाण्यास थोडा घसारा. त्यानंतर आपल्या दृष्टीला जे दिसतं ते केवळ अद्भुत पण तेव्हडच दुर्दैवी.
हत्ती दरवाज्या समोर पडलेला भला मोठा प्रस्तर आणि जमिनीत अर्धवट गाडल्या गेलेल्या हनुमान व इतर देवता.
अर्धवट गाडला गेलेला हत्ती दरवाजा
एक अतिशय सुंदर कोरीवकाम असलेला कातळात खोदून काढलेला महादरवाजा (हत्ती दरवाजा), त्याच्या दोन्ही बाजूस - उजवीकडे दगडांनी बांधलेला भक्कम बुरुज तर डावीकडे कातळ तासून केलेला बुरुज आहेत. उजवीकडे भिंतीत एक वीर हनुमान आणि त्यापुढे काही अज्ञात शिल्पे आहेत. दुर्दैवाने महादरवाजा अर्धा अधिक जमिनीत गाडला गेला आहे. सध्या दरवाज्याचा कमानी पर्यन्तचा भाग पूर्णत: मातीने भरून गेलेला आहे. दरवाज्याच्या वरील भागात वेलबुट्टीच्या तोरणावर ओळीने एकावर असे सात कलश, वरील कलशात आंब्याची पाने व त्यात श्रीफळ तर मधल्या कलशाच्या वरील बाजूस मनुष्य सदृश्य राक्षसाचा मुखवटा कोरलेला आहे. कामनीच्या मध्यभागी कमलिका व दोन्ही बाजूस व्याल चित्रित केले आहेत. कामनीखाली गणेश पट्टीवर मध्यभागी श्रुंखला सहित घंटा व तिच्या दोन्ही बाजूस गोलाकार पुष्पे कोरली आहेत. गणेशपट्टीवर श्रीगणेश मूषकावर विराजमान आहेत. महादरवाज्याच्या डावीकडील कातळावर चढून पुढे गेल्यावर काही अंतरावर अजून असाच एक दरवाजा दिसतो. पूर्वीच्या काळी येथे जमिनीच्या पृष्ठभागाखाली कातळात खोदलेली पायऱ्यांची वाट असली पाहिजे. ह्या कोसळलेल्या दरडीखाली प्रचंड इतिहास दडला गेला असेल. कित्येक महापुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा आज ह्या मातीखाली लुप्त झाल्या असतील. हे सगळे स्वच्छ केल्यास किती सुंदर कोरीवकाम आपणास पहावयास मिळेल. अश्या मोठ्या शिळा बाहेर काढणे काही सहज सोप्पे काम नव्हे. हत्ती दरवाजाच्या वरती दगडात खोदलेला एक पाण्याचा साठा आहे तेथे माकडे पाणी पिण्यासाठी येतात. म्हणून स्थानिक लोक त्याला 'माकड तळे' म्हणतात. या माकड तळ्याची सफाई करताना मागील वर्षी तेथे एक छोटी तोफ सापडली होती. आजही ती तोफ झोल्याची मेट येथे (धूळ खात ) पडून आहे.
ह्या दरवाज्यातून पुढे आपण गडावरच्या पठारावर, पंचलिंग शिखराच्या प्रदक्षिणेचा मार्गावर येतो.शिखराला उजवीकडे ठेवून सरळ मार्गाने गेलो असता, वाटेत एका उंबराच्या झाडाजवळ अज्ञात व्यक्तीच्या समाधीचे दर्शन होते.
पूर्णपणे गाडला गेलेला दुसरा दरवाजा
हत्ती दरवाज्यातून निघाल्यावर अर्धा तासाच्या चालीनंतर आपण गौतमी गंगेच्या - गोदावरी नदीच्या उगमस्थानी म्हणजे गोदातीर्थला पोहोचतो. गंगा येथे एका कुंडात उगम पावते व पुन्हा लुप्त होते. अश्याच प्रकारे पुढे ती गोमुख, जटा मंदिर, गंगाद्वार अश्या ठिकाणी उगम पाऊन लुप्त होते. या प्रत्येक पुज्य स्थानी ब्राह्मण बसलेले असतात व त्या त्या ठिकाणाची महती सांगतात. गडावर पाणी मिळण्याच्या याच तुरळक जागा आहेत.

दुर्ग भांडार -/ मेटघरचा किल्ला :-
जटामंदीरा पाठीमागेच एक वाट ब्रम्हगिरीच्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दुर्गभांडारकडे जाते. हि वाट “बिकट वाट” या प्रकारातील आहे. एका बाजूस डोंगर तर डाव्या बाजूस खोल दरी अशी हि वाट सततच्या वापरातील नसल्याने थोडी गचपण, बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेली व घसाऱ्याची आहे. त्यामुळे ट्रेकींगचा योग्य पूर्वानुभव असल्याशिवाय दुर्गभांडार या उपदुर्गावर जाणे टाळावे.
 |
| दुर्ग भांडार च्या दिशेला जाताना |
या वाटेने काळजीपूर्वक २० मिनिटे चालल्यानंतर उजव्या हातास एक जमिनीत खोदलेले खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यापासून एक छोटी अस्पष्ट पायवाट उजवीकडे टेकडीला वळसा घालून पुन्हा ब्रम्हगिरीच्या सुरवातीच्या पायऱ्या किंवा पठारावरील खाण्यापिण्याच्या टपऱ्यापाशी जाते.
आपण मात्र टाक्यापासून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाटेने चालत राहिलो की समोर दिसतो कातळकड्यांनी वेढलेला दुर्गभांडार. या ठिकाणावरून दुर्गभांडार दक्षिणोत्तर पसरलेला आणि एका चिंचोळ्या दगडी पुलाने ब्रम्हगिरीला जोडलेला दिसतो. मात्र प्रश्न पडतो कि त्या ठिकाणी पोहोचायचे तरी कसे? थोडे पुढे चालत गेले की या प्रश्नाचे उत्तर लगेच उलगडते कारण समोर येतो चक्क कातळ कोरून जमिनीत खालपर्यंत तयार केलेला जिना.
 |
दुर्ग भांडार च्या पायऱ्या सुरु होतात
 |
इथेच सुरु होतो दुर्गभांडार किल्ल्याचा आगळावेगळा, चित्तथरारक आणि मंतरलेला प्रवास जो आपण कधीच विसरू शकत नाही.
दुर्गभांडारकडे जाणाऱ्या वाटेवर कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती
|
येथे खिंडीच्या सुरवातीलाच एक हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे.
 |
| दुर्ग भांडार वरील सुंदर कातळ कोरीव पायऱ्या |
उभ्या कातळात कोरलेल्या,जणु पाताळात नेणारा ताशीव जिना उतरायचा आहे. हा जीना तासून काढलेला खंदक जर व्यवस्थित झाकला तर कोणत्याही शत्रूला गडावर जाण्याचा मार्ग मिळणार नाही अशी याची रचना वाटते.
पुढे दीड फुटाची एक पायरी अशा पन्नास पायऱ्या उतरल्या कि समोर येतो कातळातला दरवाजा.
प्रथमदर्शनी हा दरवाजा पाहून प्रश्न पडतो कि हा नक्की दरवाजा आहे कि खिडकी कारण हा दरवाजा फक्त दोन फुट इतकाच शिल्लक राहिलेला असून बाकी पूर्णपणे जमिनीत गाडला गेलेला आहे. हा दरवाजा, सुरक्षा म्हणून खरंच असा बांधला आहे कि जमिनीत गाडला गेला आहे हे कळत नाही. इथे आपण खरंच गुडघ्यावर येतो कारण हा दरवाजा रांगत तो पार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दरवाज्यावरच ठाण मांडून बसलेली माकडे आपले अक्षरशः 'सिक्युरिटी चेक करतात. या छोट्या दरवाज्यातून रांगत पलीकडे पोहोचलो कि समोर येतो ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार यांना जोडणारा फक्त आठ फुट रुंदीचा दगडी पूल.
अश्या प्रकारचा पूल दुसर्या कोणत्याच किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. दोन्ही बाजूला अंदाजे १००० फूट खोल दरी आणि समोर कातळकडा. हा २५० फुट लांब आणि ५-१ फूट रुंद पूल पार करून आपण आजून एका २ फुटी दरवाज्याजवळ पोहचतो.
हे दुर्गभांडारचे प्रवेशद्वार आहे.या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या व डाव्या बाजूला जेमतेम एक माणूस उभा राहील एवढा चबुतरा दिसतो. तेथे किल्ल्यातील सैनिक शस्त्र सज्ज होऊन पहारा देत असत. शत्रू सैन्याला आत प्रवेश करतांना या अडीच तीन फुट दरवाजातून प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसायचा. प्रवेश करतांना साहजिकच प्रथम शिपायाचे शिर आत जाणार आणि नंतर शरीर प्रवेश करणार. आत प्रवेश करणारा जर शत्रू सैन्यातील शिपाई असेल तर त्याला बचावाची कोणतीही संधी न देता त्याचे शिर तत्काळ धडा वेगळे करणे किल्ल्यातील शिपायाला अत्यंत सोपे जाई. आणि गड सुरक्षित राही. हेच कारण असावे ज्या मुळे हा दरवाजा इतका छोटा ठेवण्यात आलेला असावा.
दुर्गभांडारकिल्ल्याकडील दरवाजा. हा दरवाजा देखील वरून फक्त २ फूटच शिल्लक आहे.
|
हे सुद्धा मागच्या दरवाज्यासारखाच गाडले गेले असल्यामुळे पुन्हा द्राविडी प्राणायाम करीत आत शिरायचे की मग सुरू होतात किल्ल्यावर जाणार्या पायर्या. या पायर्यासुद्धा काताळात कोरत थेट वरपर्यंत नेलेल्या आहेत. दीड-दोन फूट उंच असलेल्या या ५०-६० पायर्या चढताना चांगलाच दम काढतात आणि खर्या अर्थाने आपला दुर्गभांडार किल्ल्यावर प्रवेश होतो.
 |
| Narrow stone cut rocks |
आता थोडी विश्रांती घेण्यासाठी पायवाटेवरच दहा पावलावर असणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्यापाशी थांबायचं. एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. थंडगार पाणी पिऊन फ्रेश व्हायचं आणि मागे वळून आपण केलेल्या चित्तथरारक प्रवासाचे अवलोकन करायचे. दुर्गभांडार हा गंगाद्वार आणि गहनीनाथांची गुहा असणाऱ्या कातळकड्याच्या बरोबर वर आहे. त्यामुळे येथून गंगाद्वारकडे येणाऱ्या पायऱ्या खूप सुंदर दिसतात. मागे अजस्त्र ब्रम्हगिरी उभा असतो. आपण चालून आलेली चिंचोळी पायवाट पाहून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची आणि उरलेला किल्ल्याचा भाग बघायला निघायचं.
| बुरुजाकडे जाण्यासाठी कातळ फोडून तयार केलेली चिंचोळी वाट आणि पायऱ्या |
किल्ल्याच्या उत्तर टोकावरील दगडी चिलखती बुरुज
|

दुर्गभांडारचा पसारा आटोपशीर आहे. त्यामुळे पाचच मिनिटात आपण, डोंगराचा माथा करवतीने कापल्याप्रमाणे कातळ खोदून खिंडीत तयार केलेल्या पायर्यांनी, उत्तर टोकाकडे असलेल्या चिलखती बुरूजापाशी येतो. १८० अंश कोनाचे वळण, समोर दरी, त्यामुळे बुरूजात उतरताना सांभाळून उतरावे लागते. हा बुरूज चिलखती बांधणीचा आहे. याला काही जण ‘बदामी बुरूज’ असेही म्हणतात.
| दुर्गभांडार किल्ल्यावरून मागे दिसणारा अजस्त्र ब्रम्हगिरी पर्वत आणि दुर्गभांडार किल्ल्याकडे येणारी चिंचोळी बिकट वाट |
दुर्गभांडार किल्ल्यावरून खाली त्र्यंबकेश्वर गाव, गंगाद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या, मागे पहिने नवरा-नवरी डोंगर, मागे अंजनेरी आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके
|
ब्रम्हगिरी दुर्गभांडार यांच्या माथ्यावरून दिसणारा आसमंत…… पूर्वेकडे लांबवर पसरलेले त्र्यंबकेश्वर शहर, नवरा नवरीचे सुळके त्याच्या शेजारी एकाच सरळ रेषेत अंजनेरी, मागे रांजणगिरी, त्याच्याही मागे गडगडा, अंजनेरीच्या उजव्या बाजूस कावनाई, नैऋत्येस त्रिंगलवाडी, पश्चिमेस कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर, हरिहर किंवा हर्षगड व बसगड किंवा भास्करगड, वायव्य दिशेस दुर्गभांडारच्या मागे वाघेरा इत्यादी किल्ले पाहता येतात.
या बुरुजाच्या टोकावरून दिसणार दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार होत. उजव्या बाजूला तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, कुशावार्ता तलाव, समोर आणि डाव्या बाजूला हवाहवासा वाटणारा सह्यपरीसर.
दुर्गभांडार किल्ल्यावरील पाण्याची टाकी. यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे.
दुर्गभांडारच्या माचीवर एक-दोन पाण्याच्या टाक्या आणि दोन-तीन घराची जोती आहेत. मात्र गवत भयंकर असल्यामुळे ती ही शोधावी लागतात.त्यामुळे आता किल्ल्याला रामराम ठोकून आल्या रस्त्यानेच तोच चित्तथरारक प्रवास पुन्हा अनुभवत सावकाश जटामंदिरापाशी पोहोचायच. काळ्या कातळाच्या गढी रचून तटबंदीचे चिलखत उभे केलेले किल्ले आपण खूप पाहिलेले असतात, पण दुर्गभांडार हा बहुतेक एकमेव असेल जिथे कातळ उभा कोरून पायऱ्या, दरवाजे, बुरुज बांधले गेलेत.टीप-१) गडावर खूप माकड असून सुट्टे सामान हातात ठेवू नये. माकडांना इजा पोहचनार नाही याची काळजी घ्या. त्यांना खायला घालणं टाळा नाहीतर ते तुमचा पिच्छा सोडणार नाहीत.२) दुर्गभांडरचा ट्रेक हा मध्यम श्रेणीत मोडणारा आहे.
अंजनेरी- ब्रम्हगिरी दरम्यान रोप वे
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तििलगापैकी एक असून दर बारा वर्षांनी याठिकाणी कुंभमेळा भरतो. परिसरात कुशावर्त आणि संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर असून नारायण नागबली हा विधी देशभरात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होत असल्याने देशभरातून भाविक पूजेसाठी येत असतात. या परिसरात अंजनेरी आणि ब्रम्हगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने बहुतांश भाविकांना या पर्वतांवर जाणे शक्य होत नाही. याठिकाणी रोप वे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रम्हगिरी या पवित्र स्थळांना निश्चितच भेट देवू शकतात, या विचारातून रोप वे उभारण्यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे.प्रस्तावित रोप वे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारने सल्ला संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
https://www.loksatta.com/nashik/survey-anjaneri-bramhagiri-ropeway-project-ysh-95-2691036/
त्र्यंबकेश्वरला कसे जाणार?
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची -अमित बोरोले
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
४) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे]
६) संजय तळेकर, मुंबई यांचे लिखाण
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in हि वेबसाईट
९) http://samontreks.blogspot.com
१०) https://charudattasawant.com
११) https://www.loksatta.com/nashik/survey-anjaneri-bramhagiri-ropeway-project-ysh-95-2691036/
१२) https://www.misalpav.com
१३) https://killebramanti.blogspot.com
१४) vatadya139873074.wordpress.com
१५)
दुर्ग भांडार -
जटा
मंदिरा जवळून सरळ पुढे २० मिनिटे चालत गेलो की आपण पोहोचतो त्र्यंबक
गडावरील अजून एका अद्भुत ठिकाणी. याचे नाव दुर्ग भांडार. येथे जाताना तोल
सांभाळूनच जावे कारण वाटेच्या उजवीकडे डोंगरधार तर डावीकडे खोल दरी. येथे
माकडांचा वावर पुष्कळ. त्यांच्यापासून सांभाळूनच राहावे.
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri – लेखक: संजय तळेकर, मुंबई
‘‘दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपूरी’’ असे ज्याचे माहात्म्य श्री संत नामदेव महाराजांनी सांगितले आहे., तो त्र्यंबकेश्वर
उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर नाशिक पासून अवघ्या २९ किलोमीटर अंतरावर आहे.
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर
पायथ्यापासून अंदाजे १९०० फूट उंचीवर असून त्याचा घेरा १० मैल इतका प्रशस्त
आहे. त्याच्या सर्वच बाजूंनी ३००-४०० फुट उंचीचे नैसर्गिक काताळकडे
असल्यामुळे जिंकण्यास तर तो निव्वळ अजिंक्यच. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे
वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर
तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली
‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा
जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक
ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात.
या ब्रम्हगिरीला (Trimbakeshwar Alias Brahmagiri)
जोडून वायव्य दिशेस एक उपदुर्ग आहे त्याला दुर्गभांडार असे म्हणतात. हा
स्वतंत्र किल्ला नसून ब्रम्हगिरीचाच एक भाग आहे. त्र्यंबकगाव पार
केल्यानंतर ‘गंगाद्वार’कडे जाणार्या वाटेने चालू लागलो की १५ मिनिटात आपण
गंगाद्वाराकडे जाणार्या पायर्या जेथून सुरू होतात तिथे येऊन पोहचतो. इथून
डावीकडे एक मोठी पायवाट ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाते. गर्द झाडीच्या मस्त
सावलीतून अर्धातास चालत गेल्यावर उजव्या बाजूस असलेली एक ऐतिहासिक वास्तु
आपली नजर आकर्षित करते. ही दुमजली इमारत एक जुना वाडा शोभावा अशी दिमाखदार व
सुंदर आहे. या इमारतीला तीन महिरपी कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर
कोरीव शिल्प आहेत. दुसर्या मजल्याला नक्षीकाम केलेल्या तीन महिरपी
खिडक्या आहेत. या वास्तूच्या थोडे मागे एक दगडी विहीर बांधलेली आहे.
इतिहासकाळात या वास्तूचा वापर बहुधा धर्मशाळा म्हणून केला जात असावा.
ब्रम्हगिरीवर जाणार्या पायर्या या वास्तू जवळूनच सुरू होतात. पायर्या
चढत असताना प्रथम उजवीकडे काताळात खोदलेली एक गुहा आणि त्या पुढे
शेंदूरचर्चित मारुतीरायाची दगडात कोरलेली भव्य मूर्ती लागते. इथपर्यंतच्या
४०० पायर्या कुणा दानशूर भावीकाने बांधून काढलेल्या आहेत. मात्र त्यापुढील
पायर्याचा मार्ग पुरातन आहे. एका बाजूला कातळकडा व दुसर्या बाजूला
कातळभिंत या मधून जाणारा हा पायर्यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले
जीने होय. हे चढताना आपली चांगलीच दमछाक होते. नळीतून जाणार्या पायर्या
चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुखी प्रवेशद्वारापाशी येतो. उभा
आयताकृती दगडात खोदलेला हा दरवाजा अत्यंत साधा असून त्यावर कोणतेही
शिल्पकाम नाही. त्या नंतर पुन्हा काही पायर्या चढून आपण किल्ल्याच्या
मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. अत्यंत सुबक धाटणीचा हा दूसरा दरवाजा
दक्षिणाभिमुखी असून तो काताळाच्या बेचकीत खोदलेला आहे. याच्या दोन्ही बाजूस
शतकमलपुष्प व मध्यभागी कमानीवर साखळीसह घंटेच शिल्प कोरलेल आहे. दोन्ही
दरवाज्याच्या तळाला गजशिल्प असून लवकरच ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा पायर्यांनी वर गेलो की आपण
किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. गावापासून माथ्यावर यायला आपले तास-दीड तास
सहज खर्ची पडललेले असतात. ब्रम्हगिरी किल्ल्याचा माथा खूपच विस्तीर्ण
पठारासारखा दक्षिणोत्तर लांबवर पसरलेला आहे. त्याच्या सर्व अंगाला कातळकडे
असल्यामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. सतत
भाविकांच्या वर्दळीमुळे किल्ल्यावर फिरण्याच्या पायवाटा चांगल्याच मळलेल्या
आहे. गडमाथ्यावर उभे राहिले की समोर एक डोंगर आडवा येतो. याच्या
डाव्याबाजूस म्हणजे दक्षिणेकडे एक टेकडी आहे. तिला ‘पंचलिंग शिखर’ असे
म्हणतात.
उजव्या बाजूस म्हणजे उत्तरेकडे एक छोटी पण उंच टेकडी लागते. या टेकडीवर
चढून जाणारी वाट पूर्वेकडे उतरते. टेकडीवर चढण्यापूर्वी वाटेत डावी-उजवीकडे
पाण्याची टाकी लागतात. टेकडीवरुन खाली उतरणारी वाट डावीकडे गोदावरी
नदीच्या उगमस्थानापाशी जाते. परतताना हा भाग आपण पाहणार असल्यामुळे आपण
आपला मोहरा उजवीकडील डाईक सदृश टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जटामंदिर
किंवा जटास्थानाकडे वळवायचा.
आख्यायिका
पुराणात अशी आख्यायिका आहे की गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी गौतम
ऋषींनी ब्रम्हगिरीवर घोर तपश्चर्या केली व भगवान शंकराला प्रसन्न करून
घेतले. शिवाने त्यांची इच्छा काय ते विचारल्यानंतर गौतम ऋषींनी त्यांच्या
जटेतील गंगेची मागणी केली. पण गंगा मात्र येण्यास राजी नव्हती. तेंव्हा
भगवान शंकराने आपल्या जटा या इथे आपटल्या व ब्रम्हगिरीवर गंगा अवतीर्ण
झाली. गौतम ऋषींनी गोहत्येचे पाप निवारण करून गाईला पुन्हा सजीव केले.
म्हणून तीच नाव पडलं गोदावरी.
दुसरी आख्यायिका अशी की, एकदा विष्णु ब्रम्हदेवाला म्हणाले, मी पुष्कळ
तप केले, परंतु अजूनही मला शिवाचे ज्ञान झाले नाही. तेव्हा त्यांनी ठरवले
की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा व विष्णूने चरणाचा शोध घ्यायचा. पुष्कळ
शोध घेऊनही दोघांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. केतकी व पुष्प यांची खोटी साक्ष
उभी करून ब्रम्हाने सांगितले की मी शिवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलांनी
व दुधाने अभिषेकही केला. त्यावर कृद्ध होऊन शिवाने केतकीला व दूध
देणार्या गाईला शाप दिला. त्यावर चिडून जाऊन ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप
दिला, ‘‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील.’’ रागाचा आवेग ओसरल्यावर ब्रम्हाने
दिलेला शाप मागे घेतला आणि स्वत:च भूतलावर पर्वताचे रूप घेवून त्याचे नाव
ब्रम्हगिरी असे ठेवले. या मंदिरात खडकावर जटा आपटल्याची खूण (खर तर हा
लाव्हारसचा एक भाग आहे) व एखादी पाण्याची धार दिसते. गंगा गोदावरी
मंदिराशेजारी पाण्याचे टाके आहे. या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. हे
मंदिर ब्रम्हगिरी किल्ल्याच्या पश्चिमेकडील कड्याला बिलगून असल्यामुळे
मंदिर प्रशासनाने कड्याला व परीसराला लोखंडी रेलिंग्ज बसवलेले आहेत.
आपले पुढचे लक्ष असते ते म्हणजे दुर्गभांडार. जटामंदिर पाठीमागे टाकून
वायव्य टोकाकडे जाणारी पायवाट आपल्याला थेट दुर्गभांडारकडे आणून सोडते. ही
वाट ‘बिकट वाट’ या प्रकारात मोडते. एका बाजूस डोंगर व दुसर्या बाजूस खाई,
अशी ही वाट सतत वापरात नसल्यामुळे बिकट, तर तेथील माती वाहून गेल्यामुळे
घासर्याची झाली आहे. त्यामुळे ट्रेकिंगचा पूर्वानुभव नसलेल्या नवशिक्यांनी
येथे स्वत:ची काळजी घेतलेली बरी. या वाटेने २० मिनिटे काळजीपूर्वक
चालल्यानंतर उजव्या हातास जमिनीलगत एक बिन वापरातील पाण्याचे टाके लागते या
टाक्यापासून एक पाउलवाट उजवीकडील टेकडीला वळसा घालून जेथून आपण गडफेरीला
सुरुवात केली त्या ठिकाणी जाते.
त्या वाटेकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे जाणार्या पायवाटेने चालत राहिलो
की काताळात खोदलेल्या दगडी जिन्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. समोर दिसतो
दक्षिणोत्तर पसरलेला, काताळकड्यांनी वेढलेला आणि एका चिंचोळया दगडी पुलाने
ब्रम्हगिरीला जोडलेला दुर्गभांडार. ब्रम्हगिरी पासून खाली असलेल्या दगडी
पुलाला जोडलेला उताराचा जिना, चक्क काताळात कोरून तयार केलेला आहे.
दुर्गभांडार किल्ल्याचा चित्तथरारक प्रवास
इथून सुरू होतो दुर्गभांडार किल्ल्याचा रोमहर्षक, चित्तथरारक आणि
मंतरलेला प्रवास, जो आपण कधीच विसरू शकणार नाही. खिंडीच्या सुरुवातीला
हनुमानाची सुबकशी मूर्ती कोरलेली आहे. पुढचा प्रवास सुखकारक होण्यासाठी या
मारुतीरायाला साकड घालून, अंधार्या वक्राकार वाटेने दीड फूट उंचीची एक
पायरी, या हिशोबाने अंदाजे ५०-६० पायर्या उतरल्या की समोर येतो काताळातला
दरवाजा. प्रथमदर्शनी हा दरवाजा पाहून आपल्याला प्रश्न पडतो की हा दरवाजा
आहे की खिडकी. कारण दोन फूट सोडल्यास हा पूर्णत: मातीने बुजला आहे. त्यातून
रांगत, सरपटत पलीकडे उतरले की समोर उभा ठाकतो दुर्गभांडार आणि त्याला
जोडलेला फक्त ७-८ फूट रुंदीचा निसर्गनिर्मित दगडी पूल.
अश्या प्रकारचा पूल दुसर्या कोणत्याच किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. हा
दगडी पूल सावकाश ओलांडून आपण दुर्गभांडार किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी
येतो. हा सुद्धा मागच्या दरवाज्यासारखाच गाडला गेलेला असल्यामुळे पुन्हा
द्राविडी प्राणायाम करीत आत शिरायचे की मग सुरू होतात किल्ल्यावर जाणार्या
पायर्या. या पायर्यासुद्धा काताळात कोरत थेट वरपर्यन्त नेलेल्या आहेत.
दीड-दोन फूट उंच असलेल्या या ५०-६० पायर्या चढताना चांगलाच दम काढतात आणि
खर्या अर्थाने आपला दुर्गभांडार किल्ल्यावर प्रवेश होतो.
पुढे पायवाटेवर एक पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य असल्यास
आपली तृष्णा भागवायची आणि मागे वळून आपण केलेल्या चित्तथरारक पराक्रमाचे
आपणच कौतुक करून, उगीचच आपली पाठ, आपणच थोपटून घ्यायची. दुर्गभांडार हा
गंगाद्वार आणि गहनीनाथांची गुहा असणार्या काताळकड्याच्या बरोबर वरच्या
दिशेस आहे. त्यामुळे येथून गंगाद्वाराकडे चढत येणार्या पायर्या खूप सुंदर
दिसतात. पाठीशी उभा असतो भव्य ब्रम्हगिरी.
दुर्गभांडारचा पसारा आटोपशीर आहे. त्यामुळे पाचच मिनिटात आपण, डोंगराचा
माथा करवतीने कापल्याप्रमाणे कातळ खोदून खिंडीत तयार केलेल्या पायर्यांनी,
उत्तर टोकाकडे असलेल्या दगडी बुरूजापाशी येतो. १८० अंश कोनाचे वळण, समोर
दरी, त्यामुळे बुरूजात उतरताना सांभाळून उतरावे लागते. हा बुरूज चिलखती
बांधणीचा आहे. याला काही जण ‘बदामी बुरूज’ असेही म्हणतात. दुर्गभांडारच्या
माचीवर एक-दोन पाण्याच्या टाक्या आणि दोन-तीन घराची जोती आहेत. मात्र गवत
भयंकर असल्यामुळे ती ही शोधावी लागतात.
इथं अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण झाली की आपण पुन्हा तोच चित्तथरारक
प्रवास अनुभवत ब्रम्हगिरीच्या नैऋत्य टोकाकडे जाण्यासाठी, जटामंदिर पार
करून उजव्या हाताच्या दरीकाठावर बांधलेल्या रेलिंग्जच्या काठाकाठाने,
गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ पोहोचायचे. या ठिकाणी घडीव दगडात बांधलेले
सुंदर शिवमंदिर असून त्याला ‘ब्रम्हगिरी मंदिर’ म्हणतात. त्यापुढे नव्याने
बांधलेले पाणटाके असून, त्या पलीकडील उतारावर उंबराच्या झाडाखाली मूळ
गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. कुंडात गोदामाईची मूर्ती असून कुंडाला
‘गोदातीर्थ’ असे म्हणतात. जवळच दगडी मंडप असून त्यात कनक ऋषी, सपत्नीक
बसलेले गौतम ऋषी, ब्रम्हदेव व काही भग्न मूर्त्या आहेत. याच ठिकाणी गौतम
ऋषींनी शिवाची आराधना केली होती असे मानले जाते.
एका आख्यायिकेनुसार याच ब्रम्हगिरी पर्वतावर गौतम ऋषींचा आश्रम होता व
या भूमितच त्यांनी भाताचे पीक काढण्याचा पहिला यशस्वी प्रयोगही केला होता.
संपूर्ण गडावर असलेल्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असेलच याची खात्री
नसल्यामुळे जिवंत झरा असलेल्या या टाकीतील पाणी पुढच्या प्रवासासाठी भरून
घ्यायचे.
हत्ती मेट मार्गे ब्रम्हगिरीवर चढाई करण्यासाठी त्र्यंबक गावापलीकडील
‘कोजूली’ गावात उतरायचे. तेथून एका मळलेल्या वाटेने धारेवरून चढत जाऊन
मधल्या पाठरावरील ‘हत्ती मेट’ या वाडीत उतरायचे. किल्ल्याच्या या मेटावर
पूर्वीच्याकाळी चौकी पहारे होते. हत्ती मेट हे हत्ती दरवाज्यातून
येण्या-जाणार्यां व्यक्तींवर लक्ष ठेवण्याकरिता वसवले असावे. कड्याला
उजवीकडे ठेवत समोरून दिसणार्या नळीतून हत्ती दरवाज्याची वाट जाते. वाटेत
अंबिकादेवी मंदिर व विखुरलेले वीरगळ लागतात. वाडीतील लोकांची गोदावरी
तीर्थावर जाण्याची नेहमीची वाट असल्यामुळे इथ पर्यंतची वाट बर्यापैकी
मळलेली आहे.
पुढे नळीतून चढाईला प्रारंभ होतो. जिथे वाट उजवीकडील कड्याला बिलगते
तिथे खडकात पायर्या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणच्या पायर्या दरड
कोसळल्यामुळे गाडल्या गेल्या आहेत. नळीतून चढाई करीत असताना काही ठिकाणी
तटबंदीचे बांधकाम आढळते. पुढे एके ठिकाणी भली मोठी उभी भिंत, तटबंदी सारखी
बांधून काढलेली आहे. या भिंतीच्या पोटात गुहा कोरलेली दिसते. भिंतीची
प्रचंड प्रमाणात पडझड झाल्यामुळे गुहेचे तोंड मोकळे झाले आहे. दोन्ही
बाजूच्या कड्यांचा बुरूजासारखा वापर करून घेत येथे भिंत वजा तटबंदी बांधून
तिचा वापर पहारेकर्यांच्या देवडी करिता व तेथूनच पुढे किल्ल्यावर
जाण्याकरिता केला जात असावा.
भिंतीच्या वरील बाजूस कोनाडे व जंग्या ठेवलेल्या आहेत. येथून वर जायला
मार्ग नसल्यामुळे उजव्या बाजूस भिंत व काताळकडा याला धरून लावलेल्या
लोखंडाची शिडीने वर जाता येते. वरील बाजूस मोठ-मोठ्या प्रस्तरखंडावर चढून
डावीकडे गेल्यावर काताळात कोरलेली गुहा व महादेवाचे मंदिर लागते. मंदिरात
शिवलिंग असून आतील बाजूस छतावर कमळ कोरलेले आहे. मंदिरा समोरील कड्यात आणखी
एक छोटी गुहा आहे. त्यात उतरण्यासाठी २-३ पायर्याही कोरलेल्या आहेत. या
दोनही गुहांचा वापर पहारेकर्यांसाठी होत असावा.
या पुढचा प्रवास अत्यंत खडतर आहे. घळीत पडलेल्या मोठ-मोठाल्या अगणित
प्रस्तरखंडावर उडया मारत तर कधी मुक्त प्रस्तारारोहण करूनच वर चढावे लागते.
दोन्ही बाजूने असलेली उंच तटबंदी गडाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किती
महत्वाची आहे याची चढताना जाणीव होते. थोडे चढून गेल्यावर मार्ग अडवणारी
आणखी एक भिंत आणि थोडा घसारा ओलांडला की आपण गडाच्या मुख्यद्वारपाशी
म्हणजेच हत्ती दरवाजा जवळ येतो. अतिशय सुंदर कोरीवकाम असलेला हा दरवाजा
अख्खा कातळात कोरून काढलेला आहे. याच्या उजवीकडील बाजूस दगडांनी बांधलेला
भक्कम बुरूज व डावीकडे काताळात तासून कोरलेला बुरूज किल्ल्याच्या
अजिंक्यपणाची ग्वाही देतात.
सध्या दरवाज्याचा कमानी पर्यन्तचा भाग पूर्णत: मातीने भरून गेलेला आहे.
दरवाज्याच्या वरील भागात वेलबुट्टीच्या तोरणावर ओळीने एकावर असे सात कलश,
वरील कलशात आंब्याची पाने व त्यात श्रीफळ तर मधल्या कलशाच्या वरील बाजूस
मनुष्य सदृश्य राक्षसाचा मुखवटा कोरलेला आहे. कामनीच्या मध्यभागी कमलिका व
दोन्ही बाजूस व्याल चित्रित केले आहेत. कामनीखाली गणेश पट्टीवर मध्यभागी
श्रुंखला सहित घंटा व तिच्या दोन्ही बाजूस गोलाकार पुष्पे कोरली आहेत.
गणेशपट्टीवर श्रीगणेश मूषकावर विराजमान आहेत.
महादरवाज्याच्या डावीकडील काताळावर चढून पुढे गेल्यावर दूसरा दरवाजा
लागतो. हा सुद्धा असाच मातीने पूर्ण गाडला गेलेला आहे. कुठे तरी या
दरवाज्याचा अंश नजरेस पडतो आणि इथे आणखी एक दरवाजा आहे याची खात्री पटते.
हा भाग साफ केल्यास सुंदर अश्या दरवाज्याचा नजराणा आपल्याला निश्चित पहायला
मिळेल. हा दरवाजा पाहून आपण ब्रम्हगिरीच्या माथ्यावर येतो. येथे
उत्तरेकडून येणारी वाट गोदावरी उगमस्थानाकडे घेऊन जाते अन इथे आपली
ब्रम्हगिरी दुर्गभांडारची मोहीम पूर्ण होते.
ब्रम्हगिरी दुर्गभांडार यांच्या माथ्यावरून दिसणारा आसमंत…… पूर्वेकडे
लांबवर पसरलेले त्र्यंबकेश्वर शहर, नवरा नवरीचे सुळके त्याच्या शेजारी एकाच
सरळ रेषेत अंजनेरी, मागे रांजणगिरी, त्याच्याही मागे गडगडा, अंजनेरीच्या
उजव्या बाजूस कावनाई, नैऋत्येस त्रिंगलवाडी, पश्चिमेस कापडा, ब्रम्हा,
उतवड, फणी असे डोंगर, हरिहर किंवा हर्षगड व बसगड किंवा भास्करगड, वायव्य
दिशेस दुर्गभांडारच्या मागे वाघेरा इत्यादी किल्ले पाहता येतात.
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri – लेखाचे सर्वाधिकार – लेखक: संजय तळेकर, मुंबई
(सांप्रतकाळात अनेक शिवभक्तांनी, दुर्गवीरांनी व संस्थांनी
स्वेच्छेने दुर्ग संवर्धनाची जबाबदारी स्विकारून अनेक गड किल्ल्यांवर
पाणटाक्या, तटबंद्या, पायर्या, महाद्वारे यांची डागडुजी व जिर्णोद्धार
केला आहे व करीत आहेत. त्यामुळे दिलेल्या माहितीमध्ये बदल असण्याची शक्यता
आहे.)
त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – छायाचित्रे
Image Source: https://www.facebook.com/media/set/?vanity=sanjay.talekar.92&set=a.2869389999776510
हे देखील वाचा:
https://charudattasawant.com/2021/07/11/trimbakeshwar-alias-brahmagiri/
दक्षिण गंगा गोदावरी आणि मुंबईची जीवनदायिनी वैतरणा या दोन महत्वाच्या नदी प्रणालींना विभागणारी डोंगर रांग म्हणून ब्रह्मगिरी आणि शेजारील पर्वतरांगेकडे पाहता येईल. त्र्यंबकेश्वरला खेटून उभा असणारा डोंगर. श्रावणातल्या सोमवारी त्याला प्रदक्षिणा मारणाऱ्या भक्तांची रीघ असते. मस्तवाल माकडांचा मुक्त संचार. सप्टेंबरचा महिना म्हणजे हिरवागार डोंगर, निळं आकाश, पांढरे कापसाचे ढग, फुलणारी सोनकी, तेरडा. त्यात या वर्षी फुललेली कारवी. आधीच पवित्र असणाऱ्या डोंगरातली चैतन्याची परिसीमा. ब्रह्मगिरी संपूर्ण पाहायचा म्हणजे संपूर्ण दिवस हाताशी पाहिजे. माथ्यावरील गंगा उद्गम मंदिर, जटा शंकर मंदिर (भूगोलाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक), ब्रह्मगिरीचा उंच माथा, वरची प्रदक्षिणा वाट. मी एक दोनदा ब्रह्मगिरी केलाय. तरी पुन्हा पुन्हा करावीत अशी ठिकाणं त्यावर आहेत. त्यातलं एक कौतुक म्हणजे दुर्गभांडार. ब्रह्मगिरीच्या गंगाद्वाराकडल्या टोकाला ब्रह्मगिरीचा एक भाग अलग सुटलाय त्याला म्हणायचं दुर्गभांडार. हा दुर्गभांडार ब्रह्मगिरीशी जोडलाय १० मीटर रुंद बाय १०० मीटर लांब अग्निजन्य खडकांनी. या सांध्याची उंची ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडार दोहोंपेक्षा ५० मीटरने कमी आहे. त्यामुळे या सांध्यावर उतरायला दोन्ही ठिकाणी ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडार दोन्ही ठिकाणी कातळाच्या पोटात जिना खोदलाय. ब्रह्मगिरीकडला जिना उतरवून सांध्यावर यायच आणि दुगभांडारचा जिना चढून किल्ल्याच्या उत्तर टोकावर. या खेपेस आम्ही ब्रह्मगिरी भेट देतोय ते खास दुर्गभांडारच सौन्दर्य अनुभवायला. चला तर.
ब्रह्मगिरीचा पूर्व पश्चिम विस्तार आहे २.५ किलो मीटर. उत्तरदक्षिण सुद्धा थोड्या फार फरकाने तेवढाच. शे दोनशे मीटर कमी असेल. डोंगराचा माथा आहे १०४० मीटर पेक्षा उंच. पायथ्याशी ज्योतिर्लिंग असणाऱ्या मंदिर भागाची उंची आहे ७२० मीटर. २०० मीटर उंच चढाई केली कि आपण ब्रह्मगिरीच्या माचीवर.
पूर्वीच्या ब्रह्मगिरी वारीत मी गंगाद्वार पाहिलेलं नाही या खेपेस ते पाहूया. तिथे जवळच पार्किंग आहे. त्यासाठी त्र्यंबक गावाच्या पुढे सापगावला यावं लागतं. त्र्यंबक गावात गाडी शिरते तो ३० रुपये फी आहे. तिथे गंगाद्वारच्या पार्किंगची चौकशी केली. वाट खात्री करून घेतली. तशी आधी गुगल नकाशात त्याची पारायणं करून झालीत. ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारच सर्वात उत्तरेच टोक. तिथे एक कडा तासून बुरुज केलाय. त्या बुरुजाकडून एक सोंड खाली उतरते, तिच्या पायथ्याशी गाड्या पार्क केल्यात. पुन्हा पार्किंग फी.
आज पिठोरी अमावस्या. संध्याकाळी त्र्यंबक गावातल्या बैलाचं लग्न लावतील, त्यांची सजवून मिरवणूक. शेतीची काम आटपलीत आता बैलांना आराम. गाड्या पार्क करून सोंड ओलांडून आम्ही गंगाद्वाराकडे निघालोय. त्र्यंबक गावापेक्षा आम्ही पार्किंग केली ती जागा ५० मीटर उंच आहे. दुर्गभांडारच्या सांध्यावर आणि बुरुजावर माणसं दिसताहेत. तो बुरुज आजच आमचं अंतिम लक्ष्य आहे.
गंगाद्वाराच्या पायऱ्या आमचा ग्रुप चढतोय. दोन गाड्यातून आम्ही ७ जण आलोय.
एक टाकं आहे. गंगा माईची मूर्ती आणि पायाशी गोमुख. वरच्या मंदिरात लुप्त झालेली गंगा इथे प्रगटली. इथून पुढे लुप्त होऊन खालच्या कुंडात. पूर्ण गंगा सिरीज लिहायला थोडा अभ्यास करावा लागेल.
गंगाद्वाराजवळ भाविकांची गर्दी आहे. गंगाद्वारापासून समांतर ब्रह्मगिरीच्या उत्तर बुरुजाच्या दिशेने आणि दोन ठिकाण वाट वाकडी करून पाहण्यासारखी आहेत. एक आहे कोटी लिंग आणि दुसरं नाथ गुहा.
या खेपेस आधी ना पाहिलेल्या गोष्टी पाहण्यास पराधान्य आहे. नाथ गुहा पाहून आम्ही दक्षिणेला त्रयंबक ब्रह्मगिरी वाटेला येऊन मिळतो. धर्मशाळा लागते आणि पुढे पायऱ्या. पायऱ्यांच्या वाटेने अर्ध्या तासात किल्ल्याच्या माचीवर. पण ते एवढं सोपं नाहीय. वाटेत माकडं तुम्हाला खिंडीत गाठतात. दीप्तीच्या पाठीवरच्या सॅकची झिप उघडून हाताला मिळेल ते काढायची हिम्मत ते करतात. हाताला हेअर क्लिप लागली. ती अनावश्यक वस्तू आहे, माकडांना सुद्धा कळतं. हातातली काठी रेलिंग वर वाजवत सावध आम्ही वर चढतो. दमलेल माणूस कोण आहे हे माकडांना कसकाय कळतंय?
माचीवर मोकळा वारा आहे. दुपारचे दोन वाजलेत. पत्र्याचं झोपडीवजा घर आहे. त्याच्या आधाराने आम्ही डबे खाऊन घेतो. अरुणाताईंनी दहीभात आणलाय. थोड्या विश्राम नंतर जटा शंकर मंदिर. लाव्हारस वाहल्याच्या खुणा इथे शंकराच्या जटा म्हणून पुजल्या जातात. भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी हि जागा नक्की पाहायला हवी. मंदिराच्या पाठून एक छोटीशी वाट उत्तरेकडे निघालीय. जांभळी कारवी फुललीय त्यातल्या दोन झुडपांना पांढरी फुलं आहेत. इथल्या पांढऱ्या फुलांच्या झाडांची संख्या वाढते का याचा अभ्यास करायला हवा. इतर कुठे आधी पांढरी कारवी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही.
कारवी फुललीय आणि आमची फुलपाखरं दुर्गभांडार कडे निघालीत.अभिजीतला पुढे रहायला सांगितलंय. सोबत शरद धुमाळ आहेत. मी पाठी राहणाऱ्या भिडूंना पिटाळायला. आमच्या भिडूंपैकी कुणीच दुर्ग भांडार आधी केलेला नाही. काही जणांचा ब्रह्मगिरी सुद्धा पहिल्यांदा. ब्रह्मगिरी मला नेहमीच भुरळ घालतो. त्याचा तो उंच माथा. तिथे जायला पुन्हा कधीतरी यायला हवं. आणि त्याची प्रदक्षिणा वरून आणि खालून श्रावणातल्या सोमवारी. डोंगर माणसाला त्याचं खुजेपण जाणवू देतात. त्याला शरण जावं, त्यावर प्रेम करावं म्हणजे ते सुद्धा तुम्हाला आपलंस करतात. अशाच तत्वाला कुणी देव शोधतो. दुर्गभांडारची वाट तशी कमी वापराची. पाण्याच्या टाक्यांपाशी दोन साप ऊन शेकत पडलेले. मी येतिस्तोवर तो पुढे सरकतात. लँडस्केप, पोर्ट्रेट आणि मॅक्रो. सर्व प्रकारची मुक्त फोटोग्राफी चालू आहे. डाव्या अंगाला खाली भातशेती दिसतेय. दूर अप्पर वैतरणा जलाशय. हरिहर वगैरे किल्ले.
नवीन जागा पाहायची म्हणजे मला अवर्णनीय आनंद होतो. जे कवतिक पाहायला आम्ही सकाळी चारला उठून घरातून आलो ते जवळ आलंय.
वाट उतरते, सांध्यावर येते आणि पुन्हा चढू लागते. दुर्गभांडारचा जिना सुरु होण्यापूर्वीचा दरवाजा गाळाने भरलाय. त्यातून वाकून किंवा सरपटून प्रवेश करावा लागतो. अतिशय आनंद झालाय. शिवाय ओळखीचे, आवडीचे सहकारी. भांडाराच्या उत्तर बुरुजावर बसून आम्ही आनंदसोहळा साजरा करू म्हणतोय. खडक कोरून बुरुज केलाय त्याला थोडासा खंदक. खाली आमच्या गाड्या पार्क केलेल्या दिसताहेत. तोंड गोड करून साजरा करूया म्हणतो. पण मी चुकतोय. भांडारावर आम्ही सोडून इतर गडकरी आहेत त्याची मी कल्पना केली नाहीये. खाण्याची पिशवी बाहेर निघते तो एक दांडगट आमच्या दिशेने आलंय. आम्ही शांत आणि स्तब्ध. इट हॅज कॉट अस बाय सरप्राईज.
खाली पडलेला जिन्नस खाऊन त्याने आमच्या बॅगकडे मोर्चा वळवलाय. एव्हाना आम्ही बरेच बुरुजापासून पाठी हटलोय. मधुरा तशी द्वाड. तिची देहबोली आक्रमक. चढताना वाटेत माकडाला तिने ढकललं होतं. आता धक्का खायची पाळी तिच्यावर आहे. कदाचित खालच्या माकडाने फोन करून इथे निरोप पोहोचवलाय. 😓ती बॅग झाकायचा प्रयत्न करते. दोन वेळा माकड तिच्यावर दोन्ही हाताच्या तळव्यांनी चार्ज करत. एका बाजूने पाठीवर. तस तिला इजा करायचा त्याचा उद्देश दिसत नाहीये. पण त्याला त्याचा डॉमिनन्स दाखवून द्यायचाय. धक्का प्रकरणानंतर आम्ही बुरुजाकडून काढता पाय घेतो.
ब्रह्मगिरी सुदंर दिसतोय आणि खाली त्र्यंबक.
पुन्हा जटा मंदिर. तिथून पुढे गंगा मंदिर. संध्याकाळ झालीय आम्ही किल्ला उतरायला घेतलाय. आता माकडांची शिफ्ट संपलीय. शिवाय उतरताना लोकांकडे खायला नसतं त्यांना माहिती आहे. पार्किंग कडे येण्या पूर्वी एकदा चहा भजी आणि नॉनस्टॉप कळवा स्टेशन. दीप्ती अरुणा उतरतात. आजचा ट्रेक माझ्यासाठी संपलाय.
सहजच फेसबुकवर फेरफटका मारताना एक पोस्ट वाचनात आली. 'दुर्ग भांडार' नावाच्या; त्र्यंबकगडाच्या जवळच्या; बऱ्याच जणांना माहिती नसेल अश्या एका गडाबाबत होती ती. मी पण याच 'बऱ्याच जणांमध्ये' होतो. मग काय!... अरे सचिन, रविवारी काय करतोयस??....नेहमीचा फोन नंबर आणि सध्या नेहमीचाच झालेला प्रश्न....आणि उत्तर हि नेहमीचच.
ती लहानशी पोस्ट वाचून वाढलेली उत्कंठा घेऊन आम्ही त्र्यंबकगडाच्या पायथ्याशी सकाळी ८.३० वाजता पोहोचलो. डोंबिवलीतून निघताना चेक केलेला नाशिकचा ६ डिग्री पारा इथे पोहचता-पोहचता -६ डिग्री झाल्यासारखा वाटत होता. हातातील बाइक आणि नाकातुन वाहणार पाणी, दोघांनाही मोठ्या शिताफीने कंट्रोल करत आम्ही पूर्ण प्रवास अक्षरशः संपवला.
सकाळी ५ च्या सुमारास निघून २ तासात आम्ही पहिला ब्रेक घेतला तो 'घाटणदेवीला'. आजपर्यंत या रेंज मध्ये केलेल्या सर्व ट्रेकमध्ये अंगवळणी पडलेली एक सवय म्हणजे, 'कसारा घाटातील घाटणदेवीला नचुकता केलेला नमस्कार'. पुढचा प्रवास १.३० तासात संपवून आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी पोहचलो आणि त्या तिर्थक्षेत्री स्व:आत्मास वडाउसळीचा नैवेद्य दाखवून त्र्यंबकगडच्या पायऱ्यांना लागलो.
त्र्यंबकगड/ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार -
(४२४८ फूट)
आपल्या पायथ्याशी, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र बाळगलेला गड म्हणजे 'त्र्यंबकगड'. गोदावरीचा उगम याच गडावरून होतो. गौतम ऋषींचे गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने इथे जटा आपटल्या अशीही एक आख्यायिका आहे. अनेक ऋषीमुनींनी इथे तपस्याहि केल्या आहेत. अश्या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे ऐतिहासिक महत्व थोड कमी पडल्याच जाणवतं ते वर चढून जाणाऱ्या अध्यात्मिकांच्या गर्दीमुळे. देवगिरीच्या यादवांनी बांधलेला, मुघलानी १६३६ च्या दरम्यान जिंकून घेतलेला व पुढे इंग्रजांनी १८१८ ला मराठ्यांकडून घेऊन उध्वस्त केलेला हा गड. गडाची एकूण रचना आणि ठिकाण पाहता हे एक टेहळणीच ठाण असावं. डावीकडे त्र्यंबकेश्वर आणि बरोबर जव्हार-मोखाडा प्रांतावर करडी नजर ठेवून हा गड उभा असल्यामुळे याचाही महत्व थोड नसाव आपल्या इतिहासात.
आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली व नजरेस पडू लागल्या त्या निरनिराळ्या देव-देवता, पायऱ्यांच्या दोन्ही बाजुस वसलेल्या. या मुर्त्या, मुबलक प्रमाणात आलेल्या तिर्थक्षेत्रींसाठी जरी पूजनीय असल्या तरी आम्हाला मात्र कंटाळा आणत होत्या. एक दोनदा मला तर इथे येण्याचं डिसीजन चुकल्यासारख पण वाटल.
उजव्या बाजूला कातळभिंत ठवून दगडात उभ्या कोरलेल्या या पायऱ्या चढताना जास्त स्ट्रेंथ लागत होती. जवळ जवळ ४५ मिनिट चढून गेल्यावर आम्ही दगडातच कोरलेल्या एका दरवाज्या समोर येऊन पोहोचलो. काहीच कोरीवकाम नसलेला कातळातच कोरलेल्या या दरवाज्याचा साधेपणा मनात भरला. दरवाज्या मागच्या दोन देवड्या या गडावर आपल्या उमेदीच्या काळात चांगलाच राबता असेल याची ग्वाही देत होत्या. थोडं पुढे जाऊन दुसरा दरवाजा लागला, तो पार करून आम्ही ब्राम्हगिरच्या पठारावर पोहचलो.
समोरची एक छोटी टेकडी पार करून पलीकडे 'जटेश्वर आणि मूळगंगा उगमस्थान' हि श्रद्धास्थानं होती पण आमची पावल निघाली ती आमच्या श्रद्धास्थानाच्या शोधात. येताना, वेळ मिळाला तर, हि दोन्ही ठिकाण पाहू अस ठरवून, याच टेकडीच्या पायथ्यापासून उजवीकडे वळून आम्ही लागलो 'दुर्गभांडार' च्या वाटेला. सुकलेल्या गवतात हरवलेली व मध्ये-मध्ये तुटलेली वाट, उजव्या बाजूला खोल दरी आणि डाव्या बाजूला डोंगर ठेवून आम्ही तुडवायला सुरवात केली. सकाळपासून कंटाळवाणी वाटलेली तीर्थयात्रा आता खऱ्या अर्थी ट्रेक वाटू लागली होती.
या वाटेने २०-१ मिनिटं चालल्यावर एक खराब पाण्याच टाक लागलं. जटेश्वर मंदिरापासून येणारी वाट इथेच मिळत होती. हि वाट पाठमोरी ठेवून आम्ही सरळ चालत राहिलो; समोर दिसत होता तो काळ्याक्षार कातळकडा, 'दुर्गभांडार'. ते रौद्र रूप खरंच शंकराच्या जटांसारखं वाटत होत.
गड आणि त्याला जोडणारा पूल तर समोर दिसत होता पण अप्रोच कुठून दिसत नव्हता, थोड पुढ गेल्यावर डाव्या बाजूला एक खंदक दिसला आणि उत्तर मिळालं. थोड जवळ जाऊन पाहिल्यावर नजरेस पडल ते दुर्गभांडारच खरं आश्चर्य, वेगळेपण, उभ्या कातळात कोरलेल्या, पाताळात नेणारा तोशिव जिना. हे खंदक जर व्यवस्तीत झाकलं तर कोणत्याही शत्रूला गडावर जाण्याचा मार्ग मिळणार नाही अशी याची रचना होती. या ५०-१ दगडी पायऱ्या आणि इथे वास्तव्य करणाऱ्या मार्कटांचा थरारक अनुभव घेऊन आम्ही पोहोचलो पहिल्या दरवाज्यापाशी. फक्त २ फूट उरलेला हा दरवाजा, सुरक्षा म्हणून खरंच तसा बांधलाय कि जमिनीत गडाला गेलाय हे कळत नव्हतं. इथे आम्ही खरंच गुडघ्यावर आलो, रांगत तो पार करण्यासाठी. दरवाज्यावरच ठाण मांडून बसलेल्या माकडांनी आमचं 'सिक्युरिटी चेक अक्षरशः आमच्याच खांदयावर बसून केलं'.
दरवाज्यातून बाहेर पडताच समोर तो दगडी पूल दिसत होता, दुर्गभांडरला जोडणारा. काय विव्ह होता!...दोन्ही बाजूला अंदाजे १००० फूट खोल दरी आणि समोर कातळकडा. हा २५० फुट लांब आणि ५-१ फूट रुंद पूल पार करून आम्ही आजून एका २ फुटी दरवाज्याजवळ पोहचलो.
बहुतेक हे दुर्गभांडार च प्रवेशद्वार असावं. पुन्हा रंगून आत गेल्यावर, पायऱ्या लागल्या, अगदी तशाच. २-२ फुटाची एक-एक पायरी चढून गेल्यावर आम्ही पोहचलो गडावर. थोड्याच अंतरावर दोन पाण्याची टाकी होती पण पाणी पिण्याजोग नव्हत. इथून मागे पाहिल्यावर ब्रम्हगिरी ठामपणे उभा दिसत होता. गंगाद्वार आणि गोरक्षनाथांची गुहा असलेल्या कातळकड्याच्या शिरावर आता आम्ही उभे होतो. इथून पुढे उत्तरेकडे एक वाट आम्हाला गडाच्या शेवटच्या टोकाकडे घेऊन गेली. समोर कातळातच नीटस कोरलेला एक चिलखती बुरुज होता. या बुरुजाच्या टोकावरून दिसणार दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार होत. उजव्या बाजूला तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, कुशावार्ता तलाव, समोर आणि डाव्या बाजूला हवाहवासा वाटणारा सह्यपरीसर. बुरुजावर बसून थोडा वारा अंगावर घेऊन आम्ही गडाला रामराम ठोकला.
परत येतानाच्या वाटेवर, पहिल्या लागलेल्या पाण्याच्या टाक्यापासून सरळ जात आम्ही जटेश्वर मंदिर गाठलं. मंदिरात एक लहानस पाण्याचा झरा दिसत होता आणि एक 'पुरो'हीत, भाविकांना 'मम्' म्हणायला लावून शंकराच्या पिंडीवर ठेवलेली १०-२० रुपयांची आचमनं ग्रहण करताना दिसला. याच पिंडीला नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या बाजूलाच एक न पिण्याच्या पाण्याचा टाक होत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून आम्ही निघालो मुळगंगा म्हणजे गोदावरी उगमस्थानाकडे. वाटेत एक छप्पर नसलेल दगडी बांधकाम होत या मंदिराच्या कळसावर 'ब्रम्हगिरी मुख्यदर्शन' अस लिहल होत. आतमधील भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आम्ही वरूनच हि वास्तू पहिली आणि पोहोचलो गोदावरी उगमस्थानाकडे. इथेही पौरोहित्य जोरात चालू होत. या कुंडातलं पाणी मनसोक्त पिऊन आम्ही आमची तहान भागवली. मी जास्त अध्यात्मिक नाही, पण खरंच एक वेगळीच चव आणि तृप्ती होती त्या पाण्यात!....
काळ्या कातळाच्या गढी रचून तटबंदीचे चिलखत उभे केलेले किल्ले आतापर्यंत खूप पाहिलेत, पण दुर्गभांडार हा बहुतेक एकमेव असेल जिथे कातळ उभा कोरून पायऱ्या, दरवाजे, बुरुज बांधले गेलेत.
एक वेगळीच गडबांधणी पाहिल्याचा आनंद मनात भरून, सकाळी ९ ला सुरु केलेली पायपीट संपवून आम्ही १.३०च्या सुमारास मुंबईच्या रस्ताला लागलो.
वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे 'त्र्यंबकगड आणि दुर्गभांडार' पाहून त्या पाथरवटांना मनापासून सॅल्युट कारावासा वाटतो.....
टीप-
# गडावर खूप माकड असून सुट्टे सामान हातात ठेवू नये. माकडांना इजा पोहचनार नाही याची काळजी घ्या. त्यांना खायला घालणं टाळा नाहीतर ते तुमचा पिच्छा सोडणार नाहीत.
# दुर्गभांडरचा ट्रेक हा मध्यम श्रेणीत मोडणारा आहे.
ब्रह्मगिरी - दुर्ग भंडार
सह्याद्री मधील पट्टीच्या भटक्यांना काही नवीन ठिकाणांची माहिती मिळाल्यावर तेथे जाईस्तोवर त्या ठिकणाबद्दलची एक अनामिक ओढ मनाला लागून राहाते. असेच काहीसे झाले होते 'दुर्ग भंडार' ह्या किल्ल्याबद्दल ऐकल्यावर आणि तिथली छायाचित्रे (फोटो) पाहिल्यावर. जाण्याचा योग अद्याप येत नव्हता. सन २००७ मध्ये ब्रह्मगिरी ला तशी भेट देऊन झाली होती परंतू त्या वेळेस ह्या ठिकाणाबद्दल पुरेशी माहिती नव्हती. गेल्या वर्षी आमच्या एका भटक्या मित्राने - मयुरेश जोशी ने फेसबुक वर ब्रह्मगिरी किल्ल्याची व हत्ती दरवाज्यातून चढाईची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्याकडे इतके आकृष्ट झालो कि कधी एकदा ब्रह्मगिरी वर चढाई करायची आणि ह्या न पाहिलेल्या व अनेक लोकांच्या खिजगणतीतही नसलेल्या ठिकाणाला भेट द्यायची ओढ मनाला लागून राहिली. एकदाचा बेल भंडारा उधळायचाच असे ठरवून चैत्र गुढी पाडव्याला निघून हा बेत तडीस न्यायचा मुहूर्त निश्चित केला. दुर्ग भंडार हा ब्रह्मगिरी चाच एक भाग असल्याने तो देखील सोबत होऊन जाणार होता.
नेहमीप्रमाणे अनेक उत्सुक टाळकी तयार होतीच परंतु गुढी पाडव्याचा मुहूर्त आणि घरातील इतर महत्वाची कामे यांच्या कात्रीत सापडलेल्या मित्रांना त्यांच्या त्यांच्या घरीच सोडून शनिवार २१ मार्च रोजी रात्री १० वाजता आम्ही सहा भटके (विनायक वंजारी, ज्योती डसके, सचिन वाडेकर, पंकज गिरकर, सदानंद आपटे काका आणि मी - समीर पटेल) चार चाकीने त्र्यंबकेश्वर कडे रवाना झालो. गुडी पाडवा असल्यामुळे बरेचसे लोक घरी असावेत कारण इतर वेळेस रस्त्यावर असणारी गर्दी यावेळेस मात्र नव्हती. शिर्डीच्या श्री साई बाबांच्या पालखी सोबत पायी जाणारे अनेक भाविक मात्र खूप दिसले. सत्यवान (आमच्या चार चाकीचा चालक) ने गाडी भलतीच दामटली आणि आम्हाला पहाटे २:३० वाजता त्र्यंबकेश्वर ला पोहोचवलं. झोप काही झाली नव्हती, उकाडा आणि डासांमुळे ती लागतही नव्हती. भल्या पहाटे प्रभातफेरी करून येऊ म्हणून ज्योती आणि पंकज सोडून बाकीचे आम्ही ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानी पोहोचलो. मंदिर ५:३० वाजता दर्शनासाठी उघडणार होते. कुंडाजवळील महादेवाच्या मंदिराच्या भिंतीवरील विविध कोरीव शिल्प तसेच श्री विष्णू ची दशावतारी शिल्पे पाहून आम्ही पुन्हा चारचाकी पाशी परतलो. इतरांना उठवून पुन्हा मंदिरा कडे गेलो, श्री त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही चहा, बिस्कीट आणि कांदेपोह्यांचा आस्वाद घेतला.
ब्रह्मगिरी म्हणजेच त्र्यंबकगड. नाशिक हून जवळपास २५ किलोमीटर वर असलेले, त्र्यंबकेश्वर हे पायथ्याचे गाव. येथील महादेवाचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे प्रसिद्ध असून मागच्याच ब्रह्मगिरी पर्वतावर गौतमी गंगा अथवा गोदावरी नदी चे पवित्र असे उगम स्थान आहे. अनेक ठिकाणी उगम पाऊन, पुन्हा लुप्त होत शेवटी ती नाशिक मधील पंचवटी हून पुढे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.
 |
| हत्ती मेट वाडीतून दिसणारा त्र्यंबक गड |
एव्हड्यात उजाडले होते आणि उन्हे वर यायच्या आत चढाई ला प्रारंभ करायचा होता. नेहमीच्या त्र्यंबक दरवाज्या ऐवजी हत्ती दरवाज्यातून चढाई करायची असल्या कारणाने आम्ही वाहनाने पलीकडच्या 'कोजूली' नामक गावात पोहोचलो. गावकऱ्याकडून जुजबी माहिती विचारून घेऊन बरोबर सकाळी ७:१५ वाजता चढाई ला प्रारंभ केला. एका धारेवरून मळलेल्या वाटेने चढत जाऊन मधल्या पठारावरील हत्ती मेट ह्या वाडीत जायचे होते. चढ तसा फार उभा नव्हताच आणि उन्हाचे चटके देखील जाणवू लागले नव्हते परंतु रात्रभर झोप नसल्यामुळे थोडा त्रास जाणवू लागला होता. किल्ल्याच्या उतारावर पूर्वीच्या काळी टेहळणी साठी चौक्या - पहारे असायचे त्यांना मेट असे संबोधले जायचे. हत्ती मेट हे असेच हत्ती दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेवर पहाऱ्यासाठी असावे. हे हत्ती मेट म्हणजे ८० उम्बरांची वाडी. शेती, पशुपालन असे येथील लोकांचे व्यवसाय. दाणा गोटा डोक्यावर उचलून आणावा लागतो. पाण्याची टंचाई. वेताळ, मरीआई, हनुमान, अंबिका देवी असे ह्यांचे ग्राम दैवत पठारावर आहेत. पूर्वेला अंजनेरी पर्वत आपले अजस्त्र बाहू फैलावून सूर्यनारायणाचे स्वागत करीत होता पश्चिमेला हरिहर किल्ला, ब्रह्मा पर्वत आणि दोघांच्या मध्ये बसगड (भास्करगड) कोवळ्या सूर्य किरणांत न्हाऊन निघत होते.
 |
| अंबिका मंदिरा कडून नळीच्या दिशेने जाताना |
 |
| कातळ खोदीव पायऱ्या |
समोर दिसणाऱ्या कडयाला उजवीकडे ठेवून एका नळीतून हत्ती दरवाज्याची वाट जाते. वाडीतील लोकांची गोदातीर्थावर जाण्याची नेहमीची वाट असल्यामुळे बऱ्यापैकी मळलेली. अंबिका देवीच्या मंदिराजवळ काही वीरघळ विखुरलेल्या होत्या. गावकऱ्यांसाठी हे सगळेच देव. थोडी विश्रांती घेऊन ताजे तवाने होऊन पुढे नळीत चढायला प्रारंभ केला. वाट जेथे उजवीकडच्या कड्याला मिळते तेथे खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. खालच्या पायऱ्या दरड कोसळल्यामुळे लुप्त झाल्या आहेत. येथून सभोवारचे दृश्य फार छान दिसत होते. नळीत काही ठिकाणी तटबंदी चे अवशेष देखील दृष्टीस पडले. पुढचा घळीतला रस्ता सावलीतून असल्यामुळे थंड वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्नता देत होती थकवा दूर करत होती. त्याच वेळेस दृष्टीला पडणारे विविध तटबंदीचे अवशेष उत्सुकता वाढवत होती. घळीत एक भली मोठी भिंत बांधून काढली आहे. पडझड झालेल्या भिंतीचे भले मोठे तुकडे येथे विखुरले आहेत. भिंतीमध्ये भुयारी मार्ग असावा कारण येथे दरवाज्याच्या कमानीसाठी दगडावर कोरीव काम केल्याच्या काही खुणा दिसल्या. परंतु काही वर्षांपूर्वी दरड कोसळल्यामुळे तो मार्ग पूर्णपणे बंद झालेला असून उजवीकडे भिंतीवर चढण्यासाठी शिडी लावली आहे. शिडी चढून वर गेल्यावर कळते कि भिंतीमध्ये कोनाडे आणि जंग्या आहेत. उजवीकडच्या कड्याला भिंत घालून बंदिस्त केले आहे.
 |
| भिंतीमध्ये मोठे भगदाड आहे तेथून पूर्वी मार्ग असावा |
मोठ मोठ्या प्रस्तारांवर चढून डावीकडे गेल्यावर एक कातळात कोरलेली गुहा आणि एक महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात शिव पिंड असून छोट्या दरवाज्यातून कसेबसे आत डोकावून पाहिल्यास गाभाऱ्यात छतावर कमळ कोरलेले दिसते. बाकीचे थोडीशी पोटपूजा करत असताना मी व आपटे काका अजून काय अवशेष सापडतात म्हणून शोधू लागलो तर मंदिरा समोरच्या (घळीतून पाहिल्यास उजवीकडच्या) कड्यात अजून एक छोटी गुहा व त्यात उतरण्यासाठी ३ - ४ पायऱ्या दृष्टीस पडल्या. टेहळणी / पहाऱ्या साठी असलेल्या सुरक्षा रक्षकांना या दोन्ही गुहांचा उपयोग होत असावा.
 |
| महादेवाचे इटुकले मंदिर व रक्षकांसाठी गुहा |
 |
| हत्ती दरवाजा जवळील संरक्षक तटबंदी |
 |
| हत्ती दरवाजा व त्याचे संरक्षणार्थ असलेले बुरुज |
घळीत भले मोठे अगणित प्रस्तर पडलेले असल्यामुळे येथून पुढे त्या प्रस्तरांवरच आरोहण करून चढावे लागते. समोर उंचच उंच पंचलिंग शिखर साद घालत असते आणि दोन्ही बाजूंनी उंच तटबंदी मागून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्याचा भास होतो. गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या वाटेवरचे बांधकाम अतिशय छान आहे. थोडे चढून गेल्यावर आपला मार्ग अडवणारी एक भिंत समोर येते आणि तेथ पर्यंत जाण्यास थोडा घसारा. त्यानंतर आपल्या दृष्टीला जे दिसतं ते केवळ अद्भुत पण तेव्हडच दुर्दैवी.
 |
| हत्ती दरवाज्या समोर पडलेला भला मोठा प्रस्तर आणि जमिनीत अर्धवट गाडल्या गेलेल्या हनुमान व इतर देवता. |
 |
| अर्धवट गाडला गेलेला हत्ती दरवाजा |
एक अतिशय सुंदर कोरीवकाम असलेला कातळात खोदून काढलेला महादरवाजा (हत्ती दरवाजा), त्याच्या दोन्ही बाजूस - उजवीकडे दगडांनी बांधलेला भक्कम बुरुज तर डावीकडे कातळ तासून केलेला बुरुज आहेत. उजवीकडे भिंतीत एक वीर हनुमान आणि त्यापुढे काही अज्ञात शिल्पे आहेत. दुर्दैवाने महादरवाजा अर्धा अधिक जमिनीत गाडला गेला आहे. महादरवाजा वर कमलपुष्पे, व्याल आणि साखळीला अडकवलेला घंटा कोरलेले आहेत. महादरवाज्याच्या डावीकडील कातळावर चढून पुढे गेल्यावर काही अंतरावर अजून असाच एक दरवाजा दिसतो. पूर्वीच्या काळी येथे जमिनीच्या पृष्ठभागाखाली कातळात खोदलेली पायऱ्यांची वाट असली पाहिजे. ह्या कोसळलेल्या दरडीखाली प्रचंड इतिहास दडला गेला असेल. कित्येक महापुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा आज ह्या मातीखाली लुप्त झाल्या असतील. हे सगळे स्वच्छ केल्यास किती सुंदर कोरीवकाम आपणास पहावयास मिळेल. अश्या मोठ्या शिळा बाहेर काढणे काही सहज सोप्पे काम नव्हे. ह्या दरवाज्यातून पुढे आपण गडावरच्या पठारावर, पंचलिंग शिखराच्या प्रदक्षिणेचा मार्गावर येतो.
सदानंद आपटे काकांनी पंचलिंग शिखराची प्रदक्षिणा व दुर्ग भांडार चा ट्रेक केला असल्यामुळे पुढील मोहिमेचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले. शिखराला उजवीकडे ठेवून सरळ मार्गाने गेलो असता, वाटेत एका उंबराच्या झाडाजवळ अज्ञात व्यक्तीच्या समाधीचे दर्शन होते.
 |
| पूर्णपणे गाडला गेलेला दुसरा दरवाजा |
हत्ती दरवाज्यातून निघाल्यावर अर्धा तासाच्या चालीनंतर आपण गौतमी गंगेच्या - गोदावरी नदीच्या उगमस्थानी पोहोचतो. गंगा येथे एका कुंडात उगम पावते व पुन्हा लुप्त होते. अश्याच प्रकारे पुढे ती गोमुख, जटा मंदिर, गंगाद्वार अश्या ठिकाणी उगम पाऊन लुप्त होते. या प्रत्येक पुज्य स्थानी ब्राह्मण बसलेले असतात व त्या त्या ठिकाणाची महती सांगतात. गडावर पाणी मिळण्याच्या याच तुरळक जागा आहेत.
 |
| गोदावरी नदीचा उगम या कुंडात होतो |
दुर्ग भांडार -
 |
| दुर्ग भांडार च्या दिशेला जाताना |
जटा मंदिरा जवळून सरळ पुढे २० मिनिटे चालत गेलो की आपण पोहोचतो त्र्यंबक गडावरील अजून एका अद्भुत ठिकाणी. याचे नाव दुर्ग भांडार. येथे जाताना तोल सांभाळूनच जावे कारण वाटेच्या उजवीकडे डोंगरधार तर डावीकडे खोल दरी. येथे माकडांचा वावर पुष्कळ. त्यांच्यापासून सांभाळूनच राहावे.
 |
| दुर्ग भांडार च्या पायऱ्या सुरु होतात |
 |
| दुर्ग भांडार वरील सुंदर कातळ कोरीव पायऱ्या |
जेथे वाट संपते तेथे कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला कड्याच्या तळाशी घेऊन जातात. कडा जणू मधोमध उभा चिरला आहे. पायऱ्या सुरु होतात तेथेच मारुतीराया खडकात खोदला आहे. जवळपास दीड फुट उंचीच्या या पायऱ्या उतरून गेल्यावर एक अर्धवट बुजलेल्या दरवाजातून सरपटत आपण एका अरुंद, ज्याची रुंदी जेमतेम ८ फूट असावी अश्या कातळधारेवर येतो. पुढे अजून अश्याच एका दरवाज्यातून सरपटत गेल्यावर पुन्हा पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून आपण आता गडाच्या एका टोकावर आलेलो असतो. अद्याप टोक गाठायचे असते. असेच पुढे चालत गेल्यावर दोन पाण्याची टाकी दृष्टीस पडतात. एका टाक्यातील पाणी थोडे हिरवे दिसले तरी पिण्यालायक आहे तर दुसऱ्या टाक्यातील पाणी पिवळे आहे. अनेक मधमाश्या असल्यामुळे आम्ही दबकत, आवाज न करता निसटलो आणि कड्याच्या टोकावर खडकात खोदलेल्या एका बुरुजापाशी आलो. बुरुजात उतरायला काही पायऱ्या असून ह्या स्थानाला कडेलोटाची जागा ,म्हणून संबोधतात. अतिशय सुंदर अश्या या स्थानाच्या दुर्ग भांडार या नावाची व्युत्पत्ती मात्र होत नाही.
 |
| अखंड कातळात खोदून काढलेला त्र्यंबक दरवाजा |
गेल्या वाटेन पुन्हा जटामंदिराकडे येउन समोरचं टेकाड चढून एका टपरीवर लिंबू पाणी घेतलं आणि त्र्यंबक दरवाजा कडे मोर्चा वळवला. आपटे काकांनी माचीवर विखुरलेल्या अवशेषांची माहिती दिली आणि आम्ही पायऱ्यांच्या वाटेने उतरू लागलो. सरकारने नेहमी प्रमाणे संवर्धनाच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव रेलीन्ग्स लावल्या आहेत. सरकारच्या नावाने बोंबा मारत उतरत असतानाच एक म्हातारं जोडपं चढत असताना दिसलं. लागलीच डोक्यात प्रकाश पडला. आपल्यासाठी किळस वाणे वाटत असलेल्या ह्या रेलीन्ग्स चा गोदावरी उगमस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या म्हाताऱ्या बाया माणसांना किती उपयोग होत असेल. परंतू महत्वाचा त्र्यंबकदरवाजा तरी मोकळा सोडायला हवा होता. कंत्राटदाराने बिनडोक पणे काम केल्याचा हा नमुना आहे. असो.
त्र्यंबक दरवाजाने उतरल्यावर आपण येतो एका धर्मशाळेजवळ. फार सुंदर असे हे बांधकाम असून ह्याच्या सर्व भिंतींवर लोकांनी आपापली नावे चितारून ठेवली आहेत. त्याच्या मागे पाणी साठवण्यासाठी एक अतिशय सुंदर पुष्करणी असून त्याची एक भिंत मोडकळीस आलेली आहे.
येथून पायऱ्यांच्या वाटेने खाली न उतरता सरळ गेलो की एक वाट डावीकडे कड्याजवळ जाते. हि पायऱ्यांची वाट गंगाद्वार कडे घेऊन जाते. येथे सुद्धा गौतमी गंगा एका गोमुखात उगम पावून, एका कुंडात जाऊन पुन्हा लुप्त होते. पुढे ती त्र्यंबकेश्वर गावातील पुष्करणी मध्ये उगम पावते. गंगाद्वाराच्या पुढे दोन गुहा असून एकात १०१ शिवलिंग स्थापित केलेली आहेत. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिने त्यांची स्थापना केल्याची व येथेच त्या दोघांचे वास्तव्य असायचे अशी कथा सांगितली जाते. त्या पुढची गुहा मच्छिंद्र नाथांची आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये पाहण्याचे अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे संत श्री ज्ञानेश्वरांचे गुरु - संत श्री निवृत्ती नाथांचे समाधीस्थळ जेथे त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.
एव्हड्या तंगडतोडीनंतर देखील अवाढव्य पसरलेल्या त्र्यंबकगडावर बऱ्याच गोष्टी (पंचलिंग शिखर, शिखर परिक्रमा, माचीवरील नानाविध अवशेष) पहायच्या अजून शिल्लक आहेत. सर्व तीर्थक्षेत्रांचे मनोभावे दर्शन घेऊन व पुढच्या भेटीच्या वेळेस हे राहिलेले सर्व पाहण्याचा संकल्प करून आम्ही संध्याकाळी ४:३० वाजता परतीच्या मार्गाला लागलो.
टीप : या सबंध भटकंती मध्ये माकडांचा खूप उपद्रव होतो त्यामुळे हातात काठी असलेली बरी. परंतु माकडे त्यांच्यावर काठी उगारताच अंगावर धावून येतात म्हणून त्यांच्यापासून लांब राहिलेलेच बरे. त्यांना काहीही खायला देऊ नये आणि पाठीवरच्या दप्तरात दिसेल अश्या प्रकारे काहीही खाण्याचे पदार्थ ठेवू नयेत. शक्यतो एकट्या दुकट्याने ही भटकंती मोहीम करू नये.
गोदावरी उगम स्थान सोडले तर त्र्यंबक गडावर इतरत्र पाण्याची सोय नाही. परंतू पर्यटकांचा राबता असल्यामूळे बाटलीबंद पाणी मिळू शकते.
http://samontreks.blogspot.com/2015/04/blog-post.html
नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रम्हगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रम्हगिरी पर्वतावर उगम पावते. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजे हा ब्रम्हगिरीचा पर्वत. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपस्चर्या केली त्यामुळे या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात.
मात्र या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे असणारे ऐतिहासिक महत्व थोडे फार डोंगर भटके आणि ट्रेकर सोडल्यास फार कमी लोकांना माहित आहे. इतिहासकाळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रम्हगिरी पर्वत हा एक नांदता गड होता. त्र्यंबकगड नावाने ब्रम्हगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. याच त्र्यंबकगडाला एक उपदुर्ग देखील आहे ज्याला दुर्गभांडार असे म्हणतात. दुर्गभांडार हा तसा स्वतंत्र किल्ला नसून त्र्यंबकगडाचाच एक भाग आहे. तर अशा या ब्रम्हगिरीच्या पौराणिक महात्म्याकडे जास्त न वळता आपण त्र्यंबकगडाची व त्याचा उपदुर्ग असणाऱ्या दुर्गभांडारची एक सहल करू.
|
| ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग. |
नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा ब्रम्हगिरी हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फुट उंच आहे. याचा घेर १० मैल इतका मोठा असून किल्ल्याच्या जवळ जवळ सर्वच बाजुंनी ३०० ते ४०० फुट उंचीचा कातळकडा आहे. गावातील मंदिरापासून गंगाद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागले की १५ मिनिटात आपण गंगाव्दाराकडे जाणार्या पायर्या जिथे सुरू होतात तेथे येऊन पोहोचतो. तिथून डावीकडे एक मोठी पायवाट वर चढत ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाते. या वाटेवर दोन्ही बाजूस चांगली गर्द झाडी असल्याने ती मस्त सावलीतून जाते. अर्धा तास चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक ऐतिहासिक वास्तू आपली नजर तिकडे आकर्षित करते. हि दुमजली इमारत एक जुना वाडाच शोभावा अशी दिमाखदार व सुंदर आहे. मात्र काही कपाळकरंट्या व नतद्रष्ट लोकांनी इतक्या सुंदर वास्तूची सगळीकडे नावे लिहून पार वाट लावली आहे. या इमारतीला तीन कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर कोरीव शिल्प आहेत. दुसऱ्या मजल्याला नक्षीकाम केलेले खिडकीवजा झरोके देखील आहेत. या वास्तूच्या थोडे मागे एक दगडी बाव बांधलेली दिसते. बहुदा इतिहासकाळात या वास्तूचा धर्मशाळा म्हणून उपयोग होत असावा.
 |
| किल्ल्याच्या पायऱ्या सुरु होण्याअगोदर उजव्या हाताला हि ऐतिहासिक वास्तू दिसते. |
हि दुमजली वास्तू एखादा सुंदर वाडा असावा किंवा मग पूर्वीच्या काळी वापरली जाणारी धर्मशाळा. या वास्तूच्या खांबावर सुंदर मुर्त्या कोरलेल्या आहेत. |
ब्रम्हगिरीला जाणाऱ्या पायऱ्या या ऐतिहासिक वास्तू जवळूनच सुरु होतात. किल्ल्यावर चढण्यासाठी उत्तरेच्या बाजुने एका दानशूर व्यक्तीने या ४०० पायर्या बांधल्या. या नवीन बांधलेल्या पायऱ्या चढत असताना प्रथम उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि थोडे पुढे मारुतीरायाची एक दगडात कोरलेली भव्य मूर्ती. येथून पुढे खऱ्या अर्थाने दगडात कोरलेल्या पुरातन पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. हा पायऱ्यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले जिनेच म्हणावे लागतील. कारण उजव्या बाजूला आहे किल्ल्याचा ताशीव कातळकडा तर डावीकडे आहे दगडाची कातळभिंत.
| ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तरेकडून नवीन बांधलेल्या ४०० पायर्या. |
| पायऱ्या चढत असताना उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि नंतर मारुती व इतर मुर्त्या कोरलेल्या दिसतात. |
|
| किल्ल्याच्या या पायऱ्या चढताना माकडांच्या पासून खूप सावध राहावे लागेत. त्यासाठी एखादी काठी जवळ ठेवणे हा उत्तम पर्याय. |
नळीतून जाणाऱ्या पायऱ्या चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख कातळात कोरलेल्या दरवाज्यापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार अत्यंत साधे असून यावर कोणतेही शिल्पकाम नाही. यानंतर पुन्हा काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या मुख्य दुसऱ्या दक्षिणाभिमुख प्रवेशद्वाराजवळ येतो. हा संपूर्ण कातळात खोदलेला दरवाजा अत्यंत सुबक धाटणीचा असून याच्या दोन्ही बाजूस कमळाची तर मध्यभागी कमानीवर घंटेचे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्याच्या पायथ्याला दोन्ही बाजूस हत्ती कोरलेले असून त्यांचे अस्तित्व आता जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा पार केला कि लगेच आपण किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचतो. त्र्यंबकेश्वर गावातून येथे पोहोचण्यासाठी साधारण दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो. या किल्ल्याच्या सपाटीवर चहा, लिंबू सरबत व खाण्यापिण्याची अनेक छोटी दुकाने असून आत्तापर्यंत चढून आलेला थकवा येथे थांबून दूर करता येतो.
| कातळात कोरलेला पहिला दरवाजा |
| गडावर जाणारा कातळकोरीव पायऱ्यांचा जिना |
| किल्ल्याचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा |
| दुसऱ्या दरवाज्यावर दोन्ही बाजूस कमळ तर मध्यभागी घंटेचे शिल्प कोरलेले आहे. दोन्ही बाजूस हत्ती देखील कोरलेले आहेत. |
ब्रम्हगिरीचे पठार खूपच भव्य आणि दक्षिणोत्तर बरेच लांबवर पसरलेले आहे. पठारावर उभे राहिलो कि समोरच एक छोटा डोंगर अडवा येतो. या डोंगराच्या डाव्याबाजूस (दक्षिणेकडे) एक उंच शिखर उठावलेले दिसते ज्याला “पंचलिंग शिखर” म्हणतात तर उजव्या बाजूस (उत्तरेकडे) डाईक सारखी रचना असणारा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला एक मोठा प्रस्तरखंड दिसतो. पठारावरून मागे पूर्वेकडे लांबवर पसरलेले त्र्यंबकेश्वर शहर, अंजनेरी पर्वत आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके नजरेस पडतात. पठारावर असणाऱ्या गोदावरी उगम स्थान, जटास्थान मंदिर व सिद्धाची गुहा अशा अनेक पौराणिक स्थानांमुळे सर्वच पायवाटा प्रशस्थ व मोडलेल्या आहेत. आपण खाण्यापिण्याच्या या टपऱ्यापासून थोडे बाहेर येऊन समोरील अडवा डोंगर प्रथम चढून जायचा व उत्तरेकडे असणाऱ्या डाईक सदृश टेकडीच्या पायथ्याचे जटामंदिर किंवा जटास्थान गाठायचे.
| किल्ल्याच्या सपाटीवरून त्र्यंबकेश्वर शहर, अंजनेरी पर्वत आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके |
गौतम ऋषींचे गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटामंदिरात प्रकट केले अशी श्रद्धा आहे. एका खडकावर शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात आणि तिथेच एक पाण्याची बारीक धार दिसते. मंदिरा शेजारीच एक पाण्याचे टाके असून त्यातले पाणी पिण्यास योग्य आहे. हे मंदिर ब्रम्हगिरीच्या पश्चिमेकडे अगदी कड्यालगतच आहे. मंदिर प्रशासनाने या मंदिर परिसरात व डोंगर कड्याला रेलिंग्ज बसवलेले आहेत. मंदिराबाहेर उभे राहिले असता समोर कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर तर हरिहर आणि बसगड हे किल्ले दिसतात.
आता आपले पुढचे लक्ष असते ते म्हणजे दुर्गभांडार. जटामंदीरा पाठीमागेच एक वाट ब्रम्हगिरीच्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दुर्गभांडारकडे जाते. हि वाट “बिकट वाट” या प्रकारातील आहे. एका बाजूस डोंगर तर डाव्या बाजूस खोल दरी अशी हि वाट सततच्या वापरातील नसल्याने थोडी गचपण, बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेली व घसाऱ्याची आहे. त्यामुळे ट्रेकींगचा योग्य पूर्वानुभव असल्याशिवाय दुर्गभांडार या उपदुर्गावर जाणे टाळावे. या वाटेने काळजीपूर्वक २० मिनिटे चालल्यानंतर उजव्या हातास एक जमिनीत खोदलेले खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यापासून एक छोटी अस्पष्ट पायवाट उजवीकडे टेकडीला वळसा घालून पुन्हा ब्रम्हगिरीच्या सुरवातीच्या पायऱ्या किंवा पठारावरील खाण्यापिण्याच्या टपऱ्यापाशी जाते. आपण मात्र टाक्यापासून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाटेने चालत राहिलो की समोर दिसतो कातळकड्यांनी वेढलेला दुर्गभांडार.
| दुर्गभांडार या उपदुर्गाकडे जाणारी अवघड व घसाऱ्याची वाट |
| दुर्गभांडारच्या वाटेवर लागणारे पाण्याचे टाके. पाणी पिण्यास योग्य नाही |
या ठिकाणावरून दुर्गभांडार दक्षिणोत्तर पसरलेला आणि एका चिंचोळ्या दगडी पुलाने ब्रम्हगिरीला जोडलेला दिसतो. मात्र प्रश्न पडतो कि त्या ठिकाणी पोहोचायचे तरी कसे? थोडे पुढे चालत गेले की या प्रश्नाचे उत्तर लगेच उलगडते कारण समोर येतो चक्क कातळ कोरून जमिनीत खालपर्यंत तयार केलेला जिना. इथेच सुरु होतो दुर्गभांडार किल्ल्याचा आगळावेगळा, चित्तथरारक आणि मंतरलेला प्रवास जो आपण कधीच विसरू शकत नाही. येथे खिंडीच्या सुरवातीलाच एक हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे. पुढे दीड फुटाची एक पायरी अशा पन्नास पायऱ्या उतरल्या कि समोर येतो कातळातला दरवाजा. प्रथमदर्शनी हा दरवाजा पाहून प्रश्न पडतो कि हा नक्की दरवाजा आहे कि खिडकी कारण हा दरवाजा फक्त दोन फुट इतकाच शिल्लक राहिलेला असून बाकी पूर्णपणे जमिनीत गाडला गेलेला आहे. या छोट्या दरवाज्यातून रांगत पलीकडे पोहोचलो कि समोर येतो ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार यांना जोडणारा फक्त आठ फुट रुंदीचा दगडी पूल.
| दुर्गभांडारकडे जाणारी भुयार सदृश कातळात कोरलेली वाट |
| कातळकोरीव जिना आणि शेवटी दरवाजा |
| हा दुर्गभांडार किल्ल्याकडे नेणारा दरवाजा वरून फक्त २ फूटच शिल्लक आहे. बाकी बहुदा गाडला गेला असावा |
हा दगडी पूल सावकाश ओलांडला कि आपण दुर्गभांडार किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार ही अगदी तसेच जमिनीत गाडले गेलेले. रांगत हा दरवाजा पार करायचा कि मग पुन्हा सुरु होतात किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या. या पायऱ्या देखील तश्याच कातळात वर पर्यंत खोदत नेलेल्या. दोन फुटी अवाढव्य अशा या पायऱ्या चढताना चांगलाच दम काढतात आणि खऱ्या अर्थाने आपला दुर्गभांडार किल्ल्यावर प्रवेश होतो. आता थोडी विश्रांती घेण्यासाठी पायवाटेवरच दहा पावलावर असणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्यापाशी थांबायचं. एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. थंडगार पाणी पिऊन फ्रेश व्हायचं आणि मागे वळून आपण केलेल्या चित्त थरारक प्रवासाचे अवलोकन करायचे. दुर्गभांडार हा गंगाद्वार आणि गहनीनाथांची गुहा असणाऱ्या कातळकड्याच्या बरोबर वर आहे. त्यामुळे येथून गंगाद्वारकडे येणाऱ्या पायऱ्या खूप सुंदर दिसतात. मागे अजस्त्र ब्रम्हगिरी उभा असतो. आपण चालून आलेली चिंचोळी पायवाट पाहून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची आणि उरलेला किल्ल्याचा भाग बघायला निघायचं.
| समोर दुर्गभांडार आणि ब्रम्हगिरीला जोडणारा निमुळता दगडी पूल |
| पुन्हा कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग. या पायऱ्या दीड फुटापेक्षा हि जास्त उंच असल्याने चढताना चांगलाच दम काढतात. |
दुर्गभांडारचा विस्तार खूपच छोटा आहे त्यामुळे पाचच मिनिटात आपण येतो किल्ल्याच्या शेवटच्या उत्तर टोकावर. येथे पुन्हा कातळ खोदुन तयार केलेली एक खिंड आणि पायऱ्या दिसतात. या पायऱ्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दगडी बुरुजाकडे नेतात. हा बुरुज चिलखती बांधणीचा आहे. या बुरुजावर बसून थंडगार वारा अंगावर घेत सभोवताल बघण्यात एक वेगळीच मजा येते. दुर्गभांडारवर याशिवाय दोन तीन जुनी बांधकामाची जोती आहेत मात्र भयंकर वाढलेल्या गवतामुळे ती हुडकणे थोडे अवघड जाते. त्यामुळे आता किल्ल्याला रामराम ठोकून आल्या रस्त्यानेच तोच चित्तथरारक प्रवास पुन्हा अनुभवत सावकाश जटामंदिरापाशी पोहोचायच.
जटामंदिरापासून मळलेली प्रशस्थ पायवाट पश्चिमकड्याच्या बाजूबाजूने दक्षिणेकडे असणाऱ्या गोदावरी उगमस्थानापाशी जाते. येथे एक घडीव दगडातील शिवमंदिर बांधलेले असून त्याला ब्रम्हगिरी मंदिर म्हणतात. पुढे गोदामाईची मूर्ती व गौमुखातून गोदावरी नदीचं उगम स्थान असणारे गोदातीर्थ आहे. तसेच पुढे चालत गेलो कि एका मंदिरात कनक ऋषी आणि गौतम ऋषी पती-पत्नी अशी जोडीने बसलेली मूर्ती दिसते. हा मंदिर परिसर मात्र नव्याने बांधलेला वाटतो आणि या परिसरात भाविकांची वर्दळ देखील जास्त असते. आपण या गर्दीतून बाहेर पडायचं आणि पंचलिंग शिखराच्या बाजूने ब्रम्हगिरीच्या दक्षिण टोकाकडे निघायच.
दक्षिण टोकाकडे जाताना एक छप्पर नसलेले दारूकोठार दिसते. याच दक्षिण टोकाकडे ब्रम्हगिरी किल्ल्यावर पायथ्याच्या “मेट” गावातून येणारा महादरवाज्याचा किंवा हत्तीमेटचा एक मार्ग आहे असे श्री. भगवान चिले व अमित बेलोरे यांच्या पुस्तकातून वाचण्यात आले होते. मात्र दक्षिण टोकावर बराच शोध घेऊनही आम्हाला हा दरवाजा सापडला नाही. याच महादरवाज्याच्या वाटेवर किल्ल्याच्या हत्तीमेटाची जागा, दगडी बुरुज, मातीत गाडले गेलेले एक मंदिर व बांधीव तटबंदीचे काही अवशेष सापडतात. आता हे सर्व न पाहिलेले अवशेष बघण्यासाठी ब्रम्हगिरीची अजून एक भेट मात्र नक्की घ्यावी लागणार.
त्र्यंबकगडाचा इतिहास फार मोठा आहे त्यामुळे आत्ता पर्यंत माझा ब्लॉग वाचून गडफेरी केलेल्या वाचकांना तो सर्व इतिहास वाचायला लावून आणखी वेळ घालवत नाही. त्यामुळे हा धावता इतिहास पाहू. त्र्यंबकगडाचा प्रथम उल्लेख इसवी सन १२०० च्या सुमारास आढळतो. १२७१ ते १३११ या दरम्यान देवगिरीचा राजा रामदेव याच्या भावाचा अंमल या परिसरावर होता. नंतर हा किल्ला बहनमी सत्तेच्या अधिपत्याखाली होता. १५५३ च्या आसपास निजामशहा पहिला याच्या ताब्यातील किल्ल्यांमध्ये त्र्यंबकगडाचा उल्लेख आढळतो. पुढे १६३३ ते १६३६ हा किल्ला निजामशाहीच्या वतीने शहाजीराजांकडे होता. निजामशाहीच्या अस्तानंतर तो मुघलांकडे गेला. १६७० मधे हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात आणला. १६९१ मधे तो मुघलांनी पुन्हा जिंकून घेतला. १७५० च्या दरम्यान पेशवेकाळात गड पुन्हा मराठ्यांकडे आला. आणि सरते शेवटी सर्वच गिरीदुर्गा प्रमाणे १८१८ मधे त्र्यंबकगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
ब्रम्हगिरीचा किल्ला संपूर्ण पाहण्यास व दुर्गभांडारला भेट देण्यासाठी किमान ८ तासाचा कालावधी जवळ हवा. त्यामुळे त्र्यंबकेश्वर गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी लवकर ब्रम्हगिरी पाहण्यासाठी जावे. त्र्यंबकेश्वर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्याने राहण्याच्या व जेवणाच्या असंख्य सोयी गावात उपलब्ध आहेत. वेळ हाती असल्यास ब्रम्हगिरी पर्वताच्या आसपास असणारे गंगाद्वार तीर्थ, गोरक्षनाथ व गह्नीनाथ यांच्या गुहा, निवृत्तीनाथांचे समाधी स्थान अशा गोष्टी पाहू शकतो.
The biggest happiness that one can derive is when an often failed plan materialises and becomes a reality, Some thing similar happened with me when most often my plan to Bhramgiri trek used to get cancelled. Four years I waited and finally it happened for me. Thanks to my friend Sanjay Khadeji who informed me that they are going for this trek and I readily jumped upon this opportunity.
We left at 11.pm from Kalyan and it was 3.30 am when we reached the base of Bhramgiri trek. We felt it would be too dark so thought it wiser to catch a small cat nap and start around 6.00 am.
What I like about treks and especially the one like Bhramgiri is the stories attached to them.Now whether the stories are true or not is not my concern, it excites me and in a way help me to feel more about the place that I am visiting.
Time For Some Story Time:Bhramgiri as the name sounds means the hill of Brahma, According to the mythology Saint Gautam and his wife Ahalaya resided on this hill.It so happened that saint Gautam unintentionally killed a cow ( Hai ! Gau Hatya) so to wash away his sins he worshipped Lord Shiva to bring Ganga on earth from the heaven. Lord Shiva was impressed by the devotion of Gautam and hence requested Mata Ganga to to flow down to earth in form of Godavari to wash away the sins and purify him. Perhaps due to this reason the river is also called Gautami river.Then there is another story which considers Brahmagiri Hill as a huge form of lord Shiva and hence climbing this mountain was considered to be a sin.(Hai! Paap).
In the year 1908 seth Lalchand of Karachi (dont forget pakistan was once part of India) and sheth Ganeshdas built 500 stone steps at the cost of Rs 40000.Now our Story:We started our trek from these Rs 40000 worth stone stairs which are thankfully reconstructed. It was still dark so we had our head lamps on, As the initial route was from the stairs so there was no worries of falling from the cliff.This been a holy pilgrim place so its not uncommon to find devotees climbing like us in wee hours of the day. |
| Trek starts from the stone stair case (with Niraj and Sanjog) |
Early morning climb accompanied by cool breeze was the perfect recipe for us, laughing cracking jokes and some of us trying to take pictures in low light was the order of the day till now.As we were climbing through proper stairs, so hike was not at all a tough preposition.
After climbing for an hour or so these stone stairs bring you to spot where there is a narrow passage and the first Darwaza. Enclosed passage with high stone walls can give eerie feelings.  |
| Mountain and a lake...a perfect union |
However just before entering this narrow passage the scene looks absolutely amazing, red skyline atop the mountain range and a lake below was a perfect setting, the time stood still.
 |
| Time stood still |
As I stood admiring the beauty around me I was jolted to reality when something happened which I was wishing away, Someone shouted "Arre dekho Bandar aage" Yes it was the attack of monkeys. Actually I don't know who was more afraid they or us. There were monkeys all over the rocks ready to pull ambush on us. Thankfully Nikam sir had borrowed stout stick from the tea seller at the base and like a trained warrior I must say he started hitting the stick on the rock and ensuring that we all keep moving safely. It was not a long battle but when it lasted it did lasted and before we could realise we were at the first Gate.
Photography was done under the most stressful conditions and once we entered the gate we could breathe easy.These rock stairs keep going even after the Darwaza.
 |
| Ancient Stone Entrance |
Little climb and we could see a plateau. Just out of the stress everyone took out their Cameras and we had our photo session Koi pattar per chad kar toh koi fence par. Sanjayji had to push everyone to move from there and finally we moved our bums and started further walk towards the right side after coming out from these stone stairs and one can see the hanuman idol.
Walking through this part was really a joyful experience especially when you see yellow, white, purple flowers smiling and waving at you in sheer happiness ( Ab yeh mat bolna ki fake mar raha hai....arre kabhi william wordsworth ki Daffodil padhi hai kya, bas woh wala ahsaas tha...Kya samjhe !!)
 |
phoolo ke dere hain, saaye ghanere hain , jhoom rahi hain havaayen,aise nazaaro mein, khilti bahaaro mein pyaar mile to ruk jaayen |
 |
Nazare ka luft lejiye hazoor... Oye Niraj mudkar kya dekh raha hai |
I must have hardly moved out walking from this blissful experience of flowers and country side view and taking this stone laden path,that another mesmerising moment was waiting to happen.
Yes!! The moment that I always look forward to with a baited breath, the moment when the sun rise, cutting across the maze of clouds and spilling the golden gleam over the humanity.... ( kuch jyada toh nahi ho gaya na... arre bhawnao me bah gaya yaaro.)But just have a look at pictures and tell me ...Kon nahi hoga yamlaa pagala deewana.😄
 |
| Thank God for such amazing morning |

 |
| Sunrise at mountain top |
After enjoying the Mountain top sunrise we reached the plateau which spreads like a big playground sloping downwards and standing atop from here on our left side is the Bhramagiri Temple and on the right side is Jatayu temple.
 |
| Amazing view from the Plateau |
 |
| Bhramagiri Temple on the left from where we stood |
 |
| Jata Mandir on the right side |
There are actually stairs leading towards the Bhramgiri Temple. one has to descend little and you reach Bhramgiri Temple.
 |
| View of Bhramgiri Temple |
The temple is almost perched on the edge and standing along the railing one can see the Harihar, Basgad Forts.
I was told that in Shravan season one can see hordes of pilgrims coming to this place, luckily for us it was deserted today. Once you enter the temple you see a small kund and on the right side of the gate the sacred Shivling is there and as usual the nandi outside it.
 |
| Shivling of Bhramagiri Temple |
 |
| Nandi |
And just opposite this Shivling is the idol of Devi Godamai and just below that there is Goumuk from which the river originates and pours into the Kund.
 |
| Devi Godamai with water flowing from Goumukh |
We paid our respect and moved on to another temple little ahead of this.Few steps forward and on our left we see another kund , though neglected in today's time, I couldn't find any historical reference to it. Probably it may be a storage tank in the olden days.
 |
| Old neglected Pond |
After checking out this enclosed water pond and taking the picture I moved out from here and I come across the Mulganga temple, purported to be the source of sacred River Godavari.Source situated at an altitude of 1298 mts. |
| Mulganga..Source of Godavari River |
If you ask me I was very excited to come and watch the source of Godavari River but Yeh kya such ill kept place , Arre I really felt bad for Mother Godavari. With so much Pilgrims coming and visiting I dont understand why can't they maintain it in a much better manner.Such holy place aur yeh haal...Uff  |
| Oh! Is this the source of Godavari River |
One look around this temple we see different idols all around. Most prominently perched on a slab is the idols of Rishi Gautam and his wife Ahalya.  |
| Rishi Gautam and Wife Ahalya |
You must be wondering what significance does this Idol of Rishi Gautam and his wife holds at the spot of source of Godavari River, Well India is country of tales. Ab yahan bhi ek kahani hai (here is also there another story) Ab jaise film Kahani pasand aayi thi toh aap ko Kahani 2 ka intezaar tha , waise hi agar yeh blog pasand aaya ho to intezaar kare meri bhi Kahani 2 ka.We had just finished our Bhramgiri Trek (You can click on this link to read), the source of Godavari river. We rested a bit,snatching few moments for early morning breakfast which extended from chapatis to pickle and nimbu pani and tea.It was now time to move towards our next destination, DurgBandar Fort. We left the temple premise and started walking along the railing towards the Shiv Jatta Mandir.
The colossal plateau offers some of the most amazing viewseach scene unfolded just like a picture book in front of us.
The undulating mountains left me speechless.But just like a true traveler I cannot afford to fall in love with the place, got to move on..... Kyo ki Nazaaro ke liye rukh gaya toh Manzil bura maan jayegi.
Enroute to Bandardurg we first come across the Shiv Jatta Mandir. Its a small temple on the opposite corner of the Bhramgiri Temple.
 |
| Shiv Jatta Temple in other corner |
 |
| Outside view of Shiv Jatta Mandir |
 |
| Inside view of Shiv Jatta Mandir |
Now there is a folklore associated with this temple. It is believed that after the sin of Gau hatya (Killing Of the cow) was committed by Rishi Gautami he was advised to pray to Lord Shiva who will absolve him from his sins by releasing the river Ganga so as to wash away his sins, pleased with the penance Lord Shiva gave river Ganga to him, however Ganga was very attached to Lord Shiva so she refused to let go his hairs where she resided.Lord Shiva was infuriated and he started his Tandav Nritya and dashed his jata(Hairs) on the stone,frightened by this the Ganga appeared there.(Source of the story Internet)
Another thing that I noticed were these small stones kept one over the other, The locals told me that people do this so that there wishes are granted.I remembered seeing this at Bhimashankar Temple and yes even at few of the Himalayan treks that I did.Its all matter of Faith....Jider baat Vishwaas ki hoti hai.... toh koi logic nahi chalega
 |
| Peculiar Stone stacking ...its all about Prayers and wishes |
Next to the Shiv Jatta Temple is a small water cistern or well, I was told that it has a potable water, Seeing the water I wont take the chances but on lighter note I would say as Indians we can drink any kind of water and nothing can happen to us.(Disclaimer: Don't take this observation of mine too seriously 😃)  |
| Water well next to Shiv Jatta Temple |
It was now time to move on from here to our next thrilling experience, hence we started to walk between the Shiv Jatta Mandir and the water well as seen in above picture, but towards the back side of the temple to our next destination, that's Durg Bhandar.
 |
| View from backside of the Shiv Jatta Mandir |
The walk from here was through dense vegetation with the valley on our left side our walk was through thick vegetation as we had gone after the rainy season.Walking through the thick vegetation though irritating and dangerous due to danger of snakes giving a sweet little peck on our feet 😅 ) but felt interesting due to the presence of lovely yellow flowers all around us.
and picturesque surroundings and the inviting looks of the dome shaped Bhandardurg ahead. .
 |
That's the place where we want to go....Bhandardurg Here I come |
this walk through the vegetation lasted for hardly a 10 minutes and we come across a small water cistern and little further walk as we start to really feel the presence of being near our destination and we see the dome shape of the Bhandardurg ahead  |
Sanjog here trying to capture the Dome shaped mountain of Bhandardurg. |
Our trek is like walking on top of the mountain till we reach the stone steps.The picture below will help you understand our trek.
This walk abruptly comes to an end near a narrow passage with stones steps going down 20-30 steps and giving almost mystical experience as you descend to the bottom.
 |
| Mouth of the stone steps going down. |
 |
| Narrow stone stairs |
Climbing down these narrow stairs were making me feel very claustrophobic, I actually hate close spaces but thankfully I was immersed in the eerie feeling of the place that I didn't realised when I had reached the bottom of this stairs but before I could let out sigh of relief I saw this small hole like stone doorway through which I had to crawl to get out of this place. Hey Ram! ab yeh kya naya stunt !
 |
| OMG ! Am I got to crawl through this....No way |
yes that's what my first reaction was.. Omg! am I to crawl through this...No way 😰, someone from the gang tapped on my shoulder and said "buddy this is the only way! well, ab marta, kya na karta, so Chal pada" a little crawl and I come out on the other side in a bright sunlight.
 |
| Uff...out in the sunlight again |
Standing here I could see long ridge on which I had to walk to reach the outer side.
 |
| Ready to walk on this ridge |
Walking on the ridge is always a thrilling experience as you can feel the breeze and the thrill factor is always on top form.As soon as this ridge walk ends We see another small entry door , something similar that we left behind so crawling time again 😄😄
 |
| Crawl time again |
Crawling through this small entry door we again reach the narrow passage of stone stairs. so this time we got to climb to reach the top.  |
| Climb thru the dark stairs |
Coming out of this narrow stairway we reach the top of bhandardurg but still little walk through narrow stone cut rocks were awaiting us.
Walking through this narrow path was quite awesome because the view of the lake and the civilization below looked very beautiful from here
 |
| Beautiful views |
There is a small bastion , where we all assembled together and had mini breakfast break with a group selfie thrown in and some personal photo shoot.
 |
| Selfie Time |
 |
| I was here....Moment !!! |
It was now time to go back and the return journey was quick albeit the monkey scare that we got on our way back to the base.It was a fun trek which can be easily done in a day.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
ज्योतिर्लिंग आहे. ब्रम्हगिरी किल्ल्यावरून उगम पावणारी गोदावरी येथुन
दक्षिणेकडे वाहत आंध्रप्रदेशात राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते.
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक स्थान व गोदावरी नदीचा उगम असलेला ब्रह्मागिरी
पर्वत भाविकांनी कायम गजबजलेला असतो. एकेकाळी इतिहासात महत्वाची भूमिका
बजावणारा हा किल्ला आज केवळ गोदावरीचे उगमस्थान म्हणुन प्रसिध्द असुन आपली
मुळची ओळख हरवुन बसला आहे. आपण मात्र ब्रम्हगिरी पर्वताला किल्ला म्हणुनच
भेट देणार असुन त्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत. सातवाहनकाळात
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून
जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी उर्फ श्रीगड किल्ला बांधला
गेला. बारा ज्योतिर्लिंगांतील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण किल्ल्याच्या
पायथ्याला असल्याने हा किल्ला त्रिंबकगड या नावाने जास्त प्रसिद्ध आहे.
त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन वाटा असुन यापैकी हत्तीमेट हि वाट कड्यातून वर येते तर
दुसरी राजदरवाज्याची मुख्य वाट त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर
येते. यातील पहिली हत्तीमेटची वाट वापरात नसुन या वाटेवर दरड कोसळली
असल्याने या वाटेवरील दरवाजा दगडाखाली गाडला गेला आहे व हि वाट धोकादायक
बनली आहे. गडावर येणारी दुसरी वाट हि सोपी असुन सतत वाहती आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराकडून गंगाद्वारकडे जाताना पाय-या सुरू होताना डावीकडे
एक पायवाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर हि वाट पुढे गावातुन येणाऱ्या
दुस-या पाय-यांच्या वाटेला मिळते व आपला गडप्रवास सुरु होतो. तळापासून
साधारण ५०० पायऱ्या चढुन आल्यावर थोडीशी सपाट वाट चालु होते. पुढे काही
अंतरावर वाटेच्या डाव्या बाजुला एक मोडकळीस आलेले दगडी बांधकामातील मंदीर
दिसते. द्वारपट्टीवर असणारे गणेशशिल्प हे शिवमंदीर असल्याचे सुचवते पण आत
दरवाजातच एका देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. वाटेच्या शेजारी
असणाऱ्या झुडुपात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष व दोन लहान विहिरी असुन गड
नांदता असताना या भागात काही वस्ती असावी असे वाटते. मंदिरासमोर वाटेच्या
बाजुला दोन उध्वस्त बुरूज असुन त्यांच्या शेजारी काही तटबंदीचे अवशेष
दिसतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील हे पहाऱ्याचे मेट आहे. या मेटावरून पुढे
आल्यावर उजव्या बाजुला एका चौथऱ्यावर दगडी बांधकामातील एक दुमजली वास्तू
असून तिच्या दर्शनी भागात गणेशमुर्ती व काही शिल्पे कोरलेली आहेत. हि
वास्तू म्हणजे सिंध प्रांतातील व्यापारी मुलतानी लालचंद भंभानी यांनी शके
१९१३ मध्ये यात्रेकरूना राहण्यासाठी बांधलेली धर्मशाळा असुन तसा शिलालेख या
धर्मशाळेच्या भिंतीवर लावला आहे. त्यांनी या वास्तुबरोबर गडाकडे जाणाऱ्या
काही पायऱ्यादेखील बांधुन काढल्या. धर्मशाळेच्या दोन्ही मजल्याचे दोन भाग
केलेले असुन मागील बाजुस जेवणासाठी व यज्ञविधी करण्यासाठी वेगळी वास्तू
आहे. धर्मशाळेचा परीसर दगडांनी बांधुन काढलेला असुन वरच्या मजल्यावर
जाण्याकरता बाहेरील बाजुस जिना आहे. धर्मशाळेच्या मागील बाजुस दगडी
बांधकामातील ७०-८० फुट खोल पायऱ्या असलेली बारव असुन तिच्या काठावर एक दगडी
ढोणी व झिजलेला शिलालेख दिसुन येतो. धर्मशाळेसमोर उघडयावर एक हनुमानाची
मुर्ती असुन हि मुर्ती मेटाबाहेर असलेल्या दगडी मंदिरातील असण्याची शक्यता
आहे. येथुन पुढील वाटेवर सुरवातीला बांधीव दगडी पायऱ्या असुन नंतरची वाट व
पायऱ्या मात्र कातळात कोरून काढल्या आहेत. दीड फुट उंचीच्या या पायऱ्यावर
आधारासाठी लोखंडी कठडे रोवले आहेत. येथुन पंधरा मिनिटे चढाई केल्यावर खडकात
खोदलेली पहारेकऱ्याची गुहा लागते. या गुहेत एक खोली असुन टेहळणीसाठी
असलेल्या या गुहेत सध्या ब्रह्मदेवाची मुर्ती विराजमान आहे. या वाटेवर
मोठया प्रमाणात माकडं असुन ती खाण्यासाठी पर्यटकांना त्रास देत असल्याने
जवळ शक्यतो काठी बाळगावी. येथुन पुढील वळणावर खडकात खोदलेली दहा फुट उंचीची
हनुमानाची मुर्ती असुन यात हनुमानाने आपल्या पायाखाली राक्षसाला दाबून
धरले आहे. येथुन पुढील भागात वाटेवरील दुसरी गुहा समोर येते. या गुहेत
शिरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूने लहानसा दरवाजा कोरलेला असुन दरवाजाच्या
दोन्ही बाजुस दोन ऋषींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुहेचा कड्याकडील भाग
संपुर्ण उघडा असुन गुहेत दोन कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. येथुन काही
अंतर पुढे गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा समोर येतो. दरवाजाच्या अलीकडे
उजव्या बाजुला दोन कातळशिल्पे आहेत. संपुर्ण कातळात खोदलेला हा दरवाजा
आपल्याला सातवाहन काळाची आठवण करून देतो. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन
वर गेल्यावर गडाचा दुसरा कातळात कोरलेला दरवाजा समोर येतो. गडाचे दोन्ही
दरवाजे उत्तराभिमुख असुन पहिला दरवाजा साधारण आहे तर दुसऱ्या दरवाजावर
मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. दरवाजाबाहेर खालील बाजुस चौथऱ्यावर दोन
हत्ती कोरलेले असुन वरील बाजुस दरवाजाची चौकट, चर्या व फुले कोरलेली आहेत.
दरवाजाबाहेर डाव्या बाजुस एक देवळी कोरलेली असुन त्यात देवीचे शिल्प कोरले
आहे तर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या कोरल्या आहेत. या
दरवाजातून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
पायथ्यापासुन येथवर येण्यास एक तास लागतो. त्रिंबकगड समुद्रसपाटीपासून ४२४८
फूट उंचावर असुन ४०० एकरपेक्षा जास्त परिसरात पुर्वपश्चिम पसरला आहे.
त्रिंबकगडचा माथा म्हणजे मध्यभागी एक टेकडी व तिच्या चहुबाजुला प्रशस्त
पठार आहे. साधारण आयताकृती आकार असलेल्या या किल्ल्याला तीन सोंडा असुन एका
सोडेवर हत्तीमेट दरवाजा तर दुसऱ्या सोडेसमोर दुर्गभांडार किल्ला आहे.
तिसरी सोंड सरळसोट कडा असल्याने येथे कोणतीही सरंक्षण व्यवस्था नाही.
माथ्यावर आल्यावर दरवाजाच्या परीसरात किल्ल्याची जुजबी तटबंदी दिसुन येते.
येथुन उजव्या व डाव्या बाजुला जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते तर समोरील
वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या दिशेने
जाते. डाव्या बाजुच्या वाटेने सुरवात केल्यावर आपल्याला सर्वप्रथम घडीव
दगडांनी बांधलेल्या दोन समाध्या दिसुन येतात. या समाध्यांच्या वरील बाजुस
एक प्रशस्त तलाव असुन सध्या तो कोरडा पडलेला आहे. तलावाच्या वरील बाजुस एका
वाड्याचे अवशेष असुन खालील बाजुस असलेल्या बुरुजावर चौकीचे अवशेष दिसुन
येतात. तलावापासुन ५०० फुट अंतरावर दारूगोळ्याचे कोठार व इतरही बरेच अवशेष
दिसुन येतात. ते पाहुन मुळ वाटेवर येऊन टेकडीकडे निघावे. या वाटेवरील
पायऱ्या चढताना बारकाईने पाहिल्यास एका ठिकाणी उध्वस्त तटबंदी व बुरुजाचे
अवशेष दिसतात. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी सुरु होत असावी. पुढे या वाटेवर
डाव्या बाजुस एक चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. वाट सोडुन चाकाच्या
वरील बाजुस गेल्यावर सातवाहनकालीन खांबटाके दिसुन येते. यातील पाणी
पिण्यायोग्य आहे. टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजुस एक
आश्रम दिसतो. या आश्रमाच्या मागील बाजुस गडावर आजही मोठया प्रमाणात शिल्लक
असलेली एक मोठी उध्वस्त वास्तू दिसते. हि वास्तू म्हणजे गडावरचे धान्यकोठार
आहे. धान्यकोठाराकडून एक बांधीव वाट समोरच असलेल्या झाडीमधून टेकडाकडे
जाताना दिसते. या वाटेच्या शेवटी डोंगराच्या पोटात खोदलेली एक मोठी गुहा
आहे. या गुहेत सध्या एक साधु मुक्कामाला आहे. गुहेच्या शेजारीच खडकात
खोदलेले एक गोलाकार टाके अथवा विहीर आहे. हे पाहून पुन्हा मुळ वाटेला
लागावे. या वाटेने आपण गडाच्या मधील उंचवट्यावर पोहचतो. येथुन डावीकडील वाट
गोदावरी मंदिराकडे तर उजवीकडील वाट जटाशंकर मंदिराकडे जाते. डावीकडील
वाटेने पुढे जाताना पुन्हा एकदा बालेकिल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीचे दर्शन
होते. वाटेत एका ठिकाणी अर्धवट गाडलेल्या सतीशिळेचे दर्शन करत ५ मिनिटांत
आपण गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचतो.
कड्यालगत असलेले हे मंदीर म्हणजे चारही बाजुंनी भिंती व मध्यभागी पाण्याचे
चौकोनी टाके व टाक्याच्या तीन बाजुस ओवऱ्या व त्यात देवांची स्थापना अशी
याची रचना आहे. मंदिराच्या वरील बाजुस खडकात खोदलेली पाण्याची दोन टाकी
असुन यातील एक टाके दगडांनी बांधुन बंदिस्त केले आहे. या टाक्यातील पाणी
गंगातीर्थ म्हणुन वापरले जाते. टाक्याच्या वरील बाजुस एक समाधीचा दगड असुन
खालील बाजुस उध्वस्त तटबंदी व इतर अवशेष दिसुन येतात. हत्तीमेट दरवाजावरून
गडावर येणारी वाट या ठिकाणी आपण आलेल्या वाटेला मिळते. हा परीसर पाहुन सरळ
जाणाऱ्या वाटेने आपण जटाशंकर मंदिराकडे पोहोचतो. या ठिकाणी शंकराने जटा
आपटून गंगानदी भूतलावर आणली अशी कथा आहे. मंदिराच्या मागील बाजुस खडकात
खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या मागील बाजूने एक लहान पायवाट
टोकावरील दुर्गभांडार किल्ल्याकडे जाते. या वाटेवर खडकात खोदलेले एक
पाण्याचे टाके असुन तटाला लागुन व टोकावरील बुरुजावर चौकीचे अवशेष पहायला
मिळतात. गडाच्या टोकाला दुर्गभांडारवर जाण्यासाठी खडकात खोदलेला सुंदर
पायरीमार्ग आहे. या वाटेने टेकाडाला वळसा घालत आपण गडाच्या अलीकडील माचीत
जेथुन सुरवात केली तेथे पोहोचतो. गडाच्या माचीच्या या भागात देखील खुप
मोठया प्रमाणात वस्तीचे अवशेष दिसुन येतात. येथे आपली गडफेरी पुर्ण होते.
गडाची माची खुप मोठी असल्याने संपुर्ण परीसर फिरणे शक्य नसले तरी वास्तू
अवशेष असणारा गडमाथा फिरण्यास दोन तास लागतात. गडावरील एकूण वास्तू पहाता
गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते.
गडमाथ्यावरून अंजनेरी, हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी असा दूरवरचा परिसर दिसतो.
देवदर्शन व साहस असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ब्रह्मागिरी- दुर्गभांडार
भटकंती एकदा तरी करायला हवी. ब्रह्मगिरी किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख
पुराणात येतो. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर
तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले व त्यांच्या जटेतील गंगेची भुतलावर
मागणी केली. पण गंगा राजी नसल्याने महादेवाने त्याच्या जटा ब्रम्हगिरीवर
आपटल्या व गंगा भुतलावर आणली. किल्याच्या ब्रम्हगिरी या नावामागे सुद्धा एक
आख्यायिका आहे. विष्णू व ब्रम्हदेवाने शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी
ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा
शोध करायचा ठरवले. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत तेव्हा ब्रह्मदेवाने
आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केले आणि त्यांची खोटी
साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले की मी शिवाच्या मस्तकाचा शोध लावला आणि
केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाचे कारस्थान
शिवाला कळल्यावर शिवाने कृद्ध होऊन ब्रम्हदेवाला आजपासून भूतलावर तुझी पूजा
करणार नाही असा शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला भूतलावर पर्वत होऊन
राहण्याचा प्रतिशाप दिला. शिवाने भूतलावर पर्वताचे रूप घेतले तोच हा
ब्रम्हगिरी पर्वत.ब्रम्हगिरी किल्ल्याची बांधकाम शैली पहाता हा किल्ला
सातवाहन काळात बांधला गेला असावा पण गडाचा इतिहास ज्ञात होतो तो यादव
काळापासून. इ.स.१२७१ -१३०८ या काळात या परिसरावर राजा रामदेवराय यादव याची
सत्ता होती. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या
मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता निवृत्तिनाथांना
ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे
दर्शन घडले अशी कथा आहे. पुढील काळात किल्ला बहमनी राजवटीच्या अमलाखाली
आला. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन
करणाऱ्या मलिक अहमदने सन १४८७ साली हा किल्ला ताब्यात घेतला पण नंतर तो
मोंगलाकडे गेला. इ.स.१६२९मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला व आजूबाजूचा परिसर
जिंकला. शाहजानने हा परिसर परत घेण्यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले.
इ.स.१६३३ मध्ये त्रिंबकगडचा किल्लेदार मोगलांकडे गेला. १७ जुन १६३६ रोजी
मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व निजामशहाला कैदेत टाकले
त्यावेळी शहाजीराजांनी निजामाचा एक वंशज मुर्तुजा याला निजामशहा म्हणून
घोषित करून स्वतः वजीर बनले. इ.स.१६३६ मध्ये उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे
शहाजीराजांचा माहुली येथे पराभव झाला व त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान
ह्याच्या हवाली केला गेला. इ.स.१६७० मध्ये मराठयांनी मोरोपंत पिंगळे
यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकगड जिंकला. १६८२ च्या सुमारास सुमारास
खानजमानचा मुलगा मुझ्झफरखान याच्या मोगली फौजेने गडाच्या पायथ्याच्या तीन
वाड्या जाळल्या. १६८३च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा फितुर होऊन मुघल
सरदार अनामतखान याला जाऊन मिळाला. त्रिंबकगडच्या किल्लेदाराला फितुर
करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मोगलांनी त्यालाच कैद केले. इ.स.१६८४ च्या
नोव्हेंबर महिन्यात अक्रमखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या
वाडया जाळुन तेथील जनावरे पळवली. १६८२ ते १६८४ या काळात मोगलांचे गड
जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसले. इ.स. १६८८च्या ऑगस्ट महिन्यात मोगल सरदार
मातबरखानाने किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो
त्रिंबकच्या किल्ल्याभोवती मी चौक्या बसविल्या असुन सहा महिन्यांपासून
किल्ल्यामध्ये रसद व लोकांचे येणेजाणे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक
हवालदील होतील आणि शरण येतील. यावर औरंगजेब त्याला लिहिलेल्या प्रोत्साहनपर
पत्रात म्हणतो त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा
तुमच्या कामाचे चीज होईल. यावर मातबरखान औरंगजेबाला पत्रातून किल्ला कसा
घेतला ते कळवितो. गुलशनाबाद म्हणजेच नाशिकच्या ठाण्यात आपले सैन्य कमी
असल्याने मी त्रिंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८
जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली
उतरले व किल्ला ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना द्यावयाच्या मनसबी
यादीत दिल्या आहेत. त्यांची अर्जी आणि किल्ल्याच्या चाव्या पाठविल्या आहेत.
याशिवाय मातबरखान कळवितो या मोहिमेत औंढाचा किल्लेदार श्यामसिंग याचा
मुलगा हरिसिंग याने मोठी कामगिरी केल्याने त्याला तीनशे स्वार व हजार पायदळ
देऊन त्रिंबकगड सांभाळण्यास ठेवले आहे. साल्हेरचा किल्ला ताब्यात घेतांना
जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा
किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी. यावर पाठविलेल्या फर्मानात
औरंगजेब लिहितो कि तुमची अर्जी पोहोचली. आपण त्रिंबकगड जिंकून त्रिंगलवाडी
किल्ल्याला वेढा घातल्याचे कळले. आपण पाठविलेल्या त्रिंबकच्या चाव्या
मिळाल्या असुन तुमची कामगिरी पसंत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात
आली असुन तुम्हाला खिलतीचा पोशाख झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये देण्यात
येत आहे. पुढे १६९१च्या सुमारास येथील अधिकारी मुकर्रबखान बादशहास लिहीतो
त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला असुन त्याचा मुलगा लहान व
कर्जबाजारी आहे. त्याच्यावर सावकाराचा तगादा चालू असुन त्याला त्रिंबकगड
सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून
पाठवावा अन्यथा किल्ल्यावर संकट कोसळेल. इ.स.१७१६ मध्ये शाहू महाराजांनी
या किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली पण ती फेटाळली गेली. इ.स.१७३० साली
कोळयांनी बंड करून किल्ला घेतला व पुढे १८१८पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात
होता.
© Suresh Nimbalkar
मागे जा
दुर्ग – भंडार किल्ला
जटास्थानाच्या मागे एक टेकाड आहे याला उजवीकडे ठेवत एक निमुळती वाट..
आपल्याला दुर्ग-भंडार कडे जाणाऱ्या भुयारी कातळ जिन्याकडे घेवून येते.. हा
१५० पायऱ्यांचा जिना उतरून जाताच एक चौकट दिसते.. ती रांगून पार करताच एक
निमुळती वाट समोरच्या डोंगराकडे जाते.. तिथे पोचताच आणखी एक झरोका आपल्याला
भूयारी मार्गाने पल्याडच्या डोंगर माथ्याकडे म्हणजे दुर्ग भंडार कडे
नेतो.. या किल्ल्यावर बुरुज, पाण्याची टाकी आणि सैनिकांच्या पहाराच्या जोती
आहे..
खुदी हुई है।
चट्टान में उकेरी गई हनुमान की मूर्ति (रास्ते में)
सुंदर चट्टानों को काटकर बनाई गई मूर्तियों वाली छोटी गुफाएँ
प्रवेश द्वारों पर सुंदर नक्काशी की गई है
सीढ़ियाँ चढ़ने के बाद शीर्ष पठार पर पहुँचते हैं जो बहुत विशाल है। ब्रह्मगिरि पठार में विभिन्न दृश्य बिंदु और मंदिर, एक झील और कुछ खंडहर हैं। यह पठार बहुत सुंदर है और दुर्ग भंडार का प्रवेश द्वार है। रेलिंग उपलब्ध होने के कारण पठार पर जाना सुरक्षित है।
ब्रह्मगिरि से हरिहर, ब्रह्म पर्वत और कई अन्य पर्वत देखे जा सकते हैं।
दूर अंत में दुर्ग भंडार और ब्रह्मगिरि पठार।
ब्रह्मगिरि एक छोटा रास्ता है लेकिन चढ़ने के लिए अधिक सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। हालाँकि एक फिट व्यक्ति इसे आसानी से कर सकता है जबकि वृद्ध लोगों को अधिक समय की आवश्यकता होगी। चूंकि बहुत से लोग गोदावरी के मुख्य स्रोत, जहां मंदिर है, पर पूजा करने के लिए आते हैं, सभी उम्र के लोग ऊपर चढ़ते हैं।
दुर्ग भंडार का रास्ता शिव जटा के एक मंदिर से शुरू होता है जहां रास्ता पहाड़ के पश्चिम की ओर से होकर गुजरता है। रास्ता आसान और अच्छी तरह से परिभाषित है। यह सीधे चट्टान की दरार की ओर ले जाता है जहाँ सीढ़ियाँ खुदी हुई हैं।
शिव जटा मंदिर (दुर्ग भंडार का प्रारंभ बिंदु)
ऊपर से देखने पर दुर्ग भंडार का आकार घनाकार प्रकार का है, जिसमें ब्रह्मगिरि को दुर्ग से जोड़ने वाले चट्टानी पुल का गड्ढा है।
दरार की शुरुआत चट्टान को काटकर बनाई गई सीढि़यों से चट्टानी पुल तक नीचे जाने से होती है। यह दरार लगभग 100 फीट गहरी है और अद्भुत ढंग से बनी है। सीढ़ियाँ
या दरार इस तरह से बनाई गई है कि यह आधार से कहीं भी दिखाई नहीं देती है
और केवल तभी दिखाई देती है जब कोई इसके पास आता है। दुश्मन से छिपने और छिपने का एक अचूक और स्मार्ट तरीका। इसमें कोई आश्चर्य नहीं कि यह इतना मजबूत प्रहरीदुर्ग था।
सीढ़ियाँ दरार के दोनों ओर गहराई तक जाती हैं।
चट्टानी पुल अद्भुत और संकरा है। पुल पर सावधान रहना होगा. हालाँकि यह देखने में काफी चौड़ा है लेकिन फिर भी इसके किनारों पर बूंदें बहुत गहरी हैं।
दुर्ग भण्डार की ओर दरार का खुलना।
दुर्ग भंडार के अंत में एक गढ़ है जो काफी छोटा है और इसका उपयोग क्षेत्र की रक्षा या निगरानी करने के लिए किया जाता था। कडेलोट के लिए बिल्कुल सही जगह।
यह पर्वत और किला बहुत पवित्र है क्योंकि यह त्र्यंबकेश्वर में स्थित है और सह्याद्रि का स्रोत है। यह त्र्यंबकेश्वर के छोटे-छोटे घरों और कस्बों से घिरा हुआ है। कोई एमटीडीसी पर भी रुक सकता है जो चढ़ाई का प्रारंभिक बिंदु है।
कोई
त्र्यंबकेश्वर में या ब्रह्मगिरि पर्वत की चोटी पर स्थित विभिन्न मंदिरों
के भी दर्शन कर सकता है क्योंकि यह स्थान कई मंदिरों से भरा हुआ है। गंगाद्वार, गोरक्षनाथ गुफा दुर्ग भंडार के आधार पर स्थित है, जबकि मंदिर का मुख्य स्रोत ब्रह्मगिरि पठार पर स्थित है।
दुर्ग भंडार किला ट्रेक मार्ग मानचित्र
No comments:
Post a Comment