Tuesday, June 30, 2026

कोरलई

       अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्‍याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ८ किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. रेवदंडा हा अलिबागच्या अष्टागरमधील शेवटचा थांबा! नारळी-पोफळीत झाकलेल्या या अष्टागरमधून बाहेर पडावे तो पाण्याने भरलेली कुंडलिका खाडी समोर येते   पल्याड मुरूड, तर अल्याड अलिबाग तालुका! गेली कित्येक शतके या दोन तीरांमध्ये नावा-बोटींचा संवाद सुरू होता. पुढे १९८६ मध्ये या खाडीवर साळावचा तो भलामोठा पूल झाला आणि हे दोन्ही भूभाग एकमेकांना जोडले गेले. साळावच्या या पुलावर आलो, की उजव्या हाताचे समुद्रात शिरलेले भूशीर त्याच्या माथ्यावरील एका गडाच्या तट-बुरुजांच्या शेला-पागोटय़ासह लक्ष वेधून घेते. आजची आपली वाट समुद्रातून डोके वर काढलेल्या या जलदुर्गावरच चढणार आहे. नाव कोर्लई!
  
 
      अथांग सिंधुसागर आणि त्याला खेटून असलेल्या कोकणाच्या या चिंचोळी पट्टीवर राज्य करणाऱ्या राजसत्तांच्या अनेक जलदुर्गापैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग! कुंडलिका खाडीच्या मुखाशी एका अंगाला हा कोर्लई तर दुसऱ्या रेवदंडा! जणू कुंडलिकेचे हे दोन्ही द्वारपाल! त्यांना विचारल्याशिवाय या खाडीत प्रवेश मिळणार नाही. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘..कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय! पश्चिमेच्या डोंगराला नांगराच्या फाळासारखी जी एक तिरकस सोंड फुटली आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाली आहे. त्या बाजूला तोच एक डोळय़ांत भरतो. श्रीमंतीने किंवा डामडौलाने नव्हे, तर नि:संग निरासक्त वृत्तीने. त्यावर झाडांची हिरवळ नाही, की दगडांची अडगळ नाही. भगवी छाटी पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला जणू तो एक ज्ञानभिक्षूच!’  भगवी वस्त्र पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला ज्ञानभिसूच.असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे व एका बाजूला जमिन आहे. 


      किल्ल्याचा डोंगर एखाद्या भूशिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. मुख्य किल्ला दक्षिणोत्तर एक हजार फूट आणि पूर्व-पश्चिम जेमतेम शंभर फूट एवढा विस्तारलेला आहे. तीन बाजूंनी पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला आहे. उंचीसुद्धा जेमतेम २७० फूट म्हणजे साधारणपणे मुंबईच्या नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीएवढी. सोळाव्या शतकात युरोपियन लोक या ठिकाणाला पोर्तुगीज नाव  Morro De Chaul म्हणजे  'चौलचा खडक' असे म्हणत असत.  कुलाबा गॅझेटीयरमध्ये याचे वर्णन असे आहे कि,  डोंगराच्या खाली कोरलई गाव आहे. या गावाचे वरचा गाव व खालचा गाव असे दोन भाग आहेत. वरच्या गावात ब्राह्मणांची पाच-सहा व कुणब्यांची चार-पाच अशी घरे आहेत व खालच्या गावात कोळी, आग्री व किरिस्ताव लोकांची बरीच घरे आहेत. कोरलई टेकडी २७१ फूट उंच असून, माथ्यापासून खालच्या सपाट प्रदेशापर्यंत तिला तट बांधलेला आहे. पुढच्या अंगास खडक असून, त्यावर एक कोट बांधलेला आहे. मुख्य किल्ला व हा कोट यांच्यामध्ये तीन आडव्या भिंती आहेत. या तटबंदीविषयी नैर्नसाहेब असे वर्णन करतो की, 'हिच्यासारखी बळकट तटबंदी ब्रिटिश सरकारच्या अमलाखालच्या सर्व कोकण प्रांतात दुसरी कोठेही नाही.'



     या गडाच्या इतिहासात डोकावल्यास,  पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा बहामनी राज्यातून फुटून निघाला आणि त्याने या भागाचा ताबा घेतला.  इ.स. १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली ,अहमदनगरच्या बादशाहाने पोर्तुगीज लोकांना चौल येथे किल्ला बांधण्यास परवानगी दिली आणि पोर्तुगिजांनी चौल (रेवदंडा) खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या कोरलईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का (त्रुसाची बातेरी किवा बाह्यकोट) बांधला." किल्ल्याची ही सर्वात खालची बाजू समुद्रसपाटीला आहे. तिला सांता क्रूज किंवा कुसाची बातेरी असेही म्हणतात. या खाडीच्या मुखाशी असलेल्या खंबायत नौदलाने (गुजरात नौदल) या बाह्यकोटावर लवकरच हल्ला केला, परंतु पोर्तुगिजांच्या कोरलई शिबंदीस चौलहून कुमक मिळाल्याने गुजराती सैन्याचे मोठे नुकसान होऊन पळ काढावां लागला.
        अहमदनगरचा बादशाहा बुन्हाण निजाम (इ.स. १५०८-१५५३) मरण पावल्यावर पुढे त्या राज्यात जो घोटाळा माजला. तेव्हा इ.स. १५५७ मध्ये 'कोरलई आम्हास वेगळा तोडून द्या, असे पोर्तगीज लोकांनी मुसलमानांशी बोलणे लावीले..परंतु त्यावेळी अहमदनगरच्या गादीवर आलेल्या हुसेन निजामशहाने ही मागणी साफ धुडकावून लावली व त्याने पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने १५५८ मध्ये रुपीखान आणि मौलाना शहामहमद उस्ताद यांना सैन्य व तोफखाना देऊन रेवदंडधास पाठविले. सोबत त्याने कॉरलई दुर्गास भक्कम तटबंदी बांधण्यासाठी निष्णात स्थापत्यविशारद पाठविले. पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला. पोर्तुगिजांशी झालेल्या वल्पशा चकमकीनंतर पोर्तुगिजांनी निजामशहाशी तह केला व त्यानुसार किल्ल्यास तटबंदी नसावी असे ठरले. नंतर हा धक्का किंवा बाह्यकोट मुसलमानांनी पाहून टाकला. परंतु पोर्तुगीज नोंदीनुसार अगदी शेवटच्या उत्तर टोकावर असलेला लहान लाकडी शिश्चन क्रुस मुसलमान सैनिक कापू शकले नाहीत. किवा त्यांचे हत्ती त्यास तुडवू शकले नाहीत. मुर्तझा निजामशहा (१५६५-१५८८) याने पोर्तुगिजांवर चाल करून चौल किल्ल्यास वेढा घातला होता. निजामशाही अधिकारी व पोर्तुगिजांत पत्त्रव्यवहार सुरू झाल्याने मुर्तझा निजामशहाने तो बेढा उठविला. मुर्तझा निझामशहा नंतर मीरान हुसेनशहा हा अल्पकाळ गादीवर राहिला.
        जेमेली कॅरेरी (Gemelli Careri) आपल्या चचिल चौथा या पुस्तकात पृ. २०० वर लिहितो की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगिजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने जणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. भारतात दुर्लभ असलेले हे घोडे त्यास आदिलखानाशी लढाईत वापरावयाचे होते.
        परंतु बुरहाने मासीर (लेखक सय्यद अली) नुसार हुसेन निजामशहाने सैन्य व तोफखाना रेवदंड्यास पाठविला. पोर्तुगिजांना ही बातमी लागताच त्यांनी आपला वकील निजामशहाकडे पाठविला आणि आपल्या कृत्यकर्माची क्षमा मागितली. यापुढे अशी चूक होणार नाही असे कळविले. पोर्तुगिजांचा निरोप मिळाल्यावर निजामशहाने आपले सैन्य परत. बोलविले.
         त्यानंतर गादीवर आलेला दुसरा बुरहान निजामशहा (१५९०-१५९४) याचा पोर्तुगिजांवर राग होता.नंतर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पोर्तुगीजांनी इथ किल्ला उभारण्याची आपली मागणी पुढे रेटली. कारण तोवर तिथे फक्त मजबूत धवका अन् क्रुसाची बातेरी एवढच काय ते उभारून झाले होते,  निजामशहाने यातील धोका ओळखला. अन आपल्या मुलुखात दुर्ग उभारावा आणि आपणच बळकट ठिकाण उभारून शह देण्याचे त्यान ठरवल.. इथे किल्ला उभारला तर पोर्तुगीजांना शह देता येईल, अन किरग्यांच्या हालचालीला चांगला पायबंध घालता येईल  हे त्याला माहित होत. त्यावेळी अहमदनगरचा तोफखाना रुपीखानाच्या ताब्यात होता. दुसऱ्या बुरहान निजामशहाने सर्व जड तोफखाना रेवदंडचास हलविला. बुरहान निजामशहा पोर्तुगिजांशी लढाईच्या मोहिमेवर असताना १५९२ मध्ये कोरलईच्या टेकडीवर बुरहान दुर्ग नामक अभूतपूर्व भक्कम असा पूर्ण किल्ला बांधला. किल्ल्याचे काम फारच बळकट केले होते. या वेळी किल्ला बांधण्याचे कारण असे झाले की, पोर्तुगीज व मुसलमान यांच्यामध्ये मोठी निकराची लढाई सुरू झाली होती व कोरलई येथून रेवदंड्याच्या तटबंदीवर मुसलमानांचा चांगला मारा लागू पडत असे. तेथून त्याने खाडीपलीकडील रेवदंडा किल्ल्याची बरीच तटबंदी उध्वस्त केली. अपूरी तयारी पाहूनी त्यांनी वसईत असलेल्या दो अल्वारू अज्ञान्वेस या सरदाराला कुमक घेऊन बोलावल, दीड हजार सैन्य घेऊन तो त्वरीत धावून आला.
        दिनांक ४ सप्टेंबर १५९४ रोजी पोर्तुगिजांना चौल-रेवदंडा भागातील अहमदनगर राजवटीच्या ताब्यातील कोरलई बाजार उध्वस्त करून तिचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वसई व साष्टीवरून मोठी कुमक मिळाली. चौलचा एक पोर्तुगीज कप्तान कॅप्टन काफिलारने १,५०० पोर्तुगीज व बच्पुच स्थानिक विश्वासू सैनिकांसह (एकूण ४,००० सैनिक) लहान नावांनी खाडी पार करून कोरलई किनाऱ्यावर उतरला. त्यावेळी किल्ल्याबाहेर ताजस्तान आणि अण्णेराव हे आपल्या फौजेसह तयार होते. त्यांच्यावर पहिला हल्ला होताच त्यांनी किल्ल्याकडे पळ काढला. दिनांक १३ सप्टेंबर १५९४ च्या रात्री झालेल्या चकमकीत मुसलमानांना कोरलई दुर्गाच्या बाह्यकोटापर्यंत खदेडून लावले. यात अहमदनगर सेनेचा साफ पराभव झाला. नेर्नच्या माहितीनुसार कोटाच्या दरवाजात हत्ती मरून पडल्यामुळे तो बंद झाला. वरून पडणारे दुर्गरक्षकही पोर्तुगिजांची वाट अडवत होते. यातून मार्ग काढून पोर्तुगिजांना प्रवेश करावा लागला. या लढाईत पोर्तुगिजांकडून अँटोनिओ नावाचा फान्सिस्कन पाद्रीही लढत होता." तो ठार झाल्यामुळे रागावलेल्या पोर्तुगिजांनी दुसऱ्या दरवाजापर्यंत धडक मारली. या दरवाजातही घोडा मरून पडल्याने आतील दुर्गरक्षकांना तो बंद करता आला नाही. पोर्तुगिजांनी दुर्गाच्या अंतर्भागात प्रवेश "केला आणि कत्तलीस सुरुवात केली. या गोंधळामुळे किल्ल्यातील सरदार फरहादखान, असदखान आणि इतर अमीर झोपेतून जागे झाले. परंतु प्रतिकाराची कोणतीच तयारी त्यांना करता आली नाही. या लढाईत १,००० मुसलमान मारले गेले तर पोर्तुगिजांचे केवळ २१ सैनिक कामी आले व ५० जखमी झाले. त्याशिवाय पोर्तुगिजांना भरपूर दारूगोळा, घोडे, पाच हत्ती, ७७ तोफा आणि लहानसहान शस्त्रांचे कोठार हाती लागले. फरहादखान, त्याची बायको व मुलगी कैद झाली. त्याच्या बायकोस दंड भरून सोडविण्यात आले. परंतु फरहादखान व त्याच्या मुलीस बाटवून ख्रिश्चन करण्यात आले. तथापि जखमी फरहादखान काही दिवसातच मरण पावला. चौलला त्याचे मोठ्या इतमानाने दफन करण्यात आले. पण मुलगी मात्र बाटली ती बाटलीच त्या मुलीला त्यांनी प्रथमतः गोव्यास पाठवून दिले व नंतर पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बेन येथे पाठवून दिले. या वेळी पोर्तुगीज लोकांना अतिशय लूट सापडली; या किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगिजांजवळ पुरेसे सेनादल नसल्यामुळे त्यांनी उत्तरेकडील सांता क्रूज बातेरीचा भाग व टेकडीच्या माथ्यावरील तटबंदी (बालेकिल्ला) सोडून बाकीचा भाग उध्वस्त केला.व वर थोडीशी शिबंदी ठेवली.
     हा किल्ला पाडण्यापूर्वी डो कूटो याने इ.स. १६०२ मध्ये याचे असे वर्णन केले आहे की, या किल्ल्याइतका बळकट किल्ला सर्व पृथ्वीत विरळाच, असे म्हटले तरी चालेल.एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती.  जमिनीकडच्या बाजूस मोठा खंदक असून, त्यावर घालता काढता येण्यासारखा एक लाकडी पूल आहे. या खंदकाच्या आतल्या बाजूस एक मोठी भक्कम व उंच अशी भिंत आहे. तिला दोन मोठे बुरूज असून, त्यांच्यामध्ये एक मोठा पितळेचा सिंह बसविला आहे. या सिंहावर 'माझ्याशी लढल्याशिवाय मी पुढे जाऊ देणार नाही', अशी अक्षरे खोदलेली आहेत. टेकडीच्या माथ्यावरील किल्ला अतिशय बळकट असून, त्यावर सर्वांत उंच ठिकाणी एक पितळेचा गरुड पक्षी बसविलेला आहे. या गरुड पक्ष्यावर 'एकदम पळ काढल्याशिवाय माझे जवळून जाण्याची कोणाची छाती नाही,' अशा अर्थाचा लेख लिहिलेला आहे. किल्ल्यात बरीच घरे आहेत. किल्ल्याच्या रक्षणार्थ मोठमोठ्या ७० तोफा व कायमची शिबंदी ७००० आहे. फक्त मूर लोक मात्र किल्ल्याच्या बाहेर राहतात. किल्ल्याला लागूनच बाजाराची जागा आहे व तेथे ७००० लोकांची वस्ती आहे, येथे व्यापार फार मोठा चालतो. पण हि अतिशयोक्ती असावी कारण इतक्या लहान किल्ल्यावर इतकी माणसे राहणे शक्य नाही व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही आढळत नाही. 
 इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवीसन १६४६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. मे १६५० मध्ये चौलचा कॅप्टन फर्नाव दे मिरांडा हेन्रीक्स इथला कप्तान क्रिस्तोवाव दे अब्र्यू दे अझवेदो यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.
    संभाजीराजा छत्रपती होऊन सिंहासनाधिष्ट होत नाही तोच औरंगजेब बादशहा सर्व सामर्थ्यानिशी चालून आला. गत तीन वर्षांपासून औरंगजेब बादशहा आणि छत्रपती संभाजीराजा कल्याणच्या रणात अखंड झुंजत होते. मराठा वीर मरत होते पण हटत नव्हते. वसईहून कल्याणच्या रणांगणात मोगलांना रसद पुरवठा करून पोर्तुगीजांनी मात्र संभाजी राजांना क्रोधित केले. दगलबाज पोर्तुगीजांनी ऐन वख्ताला पाठीत वार केला होता. या रसद पुरवठ्याच्या मोबदल्यात बादशहा कडून संभाजीराजांचा काही किनाऱ्याचा भाग मिळवा याकरीता पोर्तुगीज व्हाईसराय पत्रामध्ये बादशहास चक्क भिक मागू लागला.
मात्र झाले विपरीत, तीन वर्षे झुंजूनही मोगलांना कल्याणच्या रणांगनात यश मिळवता आले नाही. बादशहाने अखेर सन १६८३ च्या एप्रिल महिन्यात कल्याणातून आपले सैन्य व खाडीतून आपले आरमार परत बोलावले. बादशहा परास्त केला, आता वेळ होती दगलबाज पोर्तुगीजांना शासन करण्याची. आणि शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले.
      आगीत तेल ओतणारे या आगीपासून दूर राहू म्हणतात तरी कसे ? ही आग आता त्यांची राख केल्याशिवाय राहणार नव्हती.! कारण ही गाठ कुन्या सुलतानाशी नव्हती .!
मुंबईच्या खालच्या अंगास किनाऱ्यावरील चौल, रेवदंडा व कोरलई या पोर्तुगीज किल्ल्यावर  खुद्द संभाजीराजांनी आक्रमण केले. जेधे शकावली म्हणते-
शके १६०५ रूधिरोदगारी संवछरे जेष्ठ वद्य ११ संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंगीयासी बिघाड केला, रेवदंडीयासी वेढा घातला ।।
अर्थात खुद्द संभाजीराजे स्वार होऊन रेवदंड्यावर चालून गेले. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण सुरूवातीस पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. पश्चात मराठ्यांनी रेवदंड्याला घट्ट वेढा घातला.पेशवा निळोपंतही या मोहीमेत होता.
२ ऑगस्ट १६८३ रोजी २००० स्वार व ६००० पायदळ चौलावरही चालून गेले. रेवदंडा व चौलासोबतच मराठ्यांनी कोरलाई किल्ल्यावर हल्ला चढविला. तटबंदीवर तोफा धडाडू लागल्या. माद्रि-द-देऊश नावाचे चर्चात बसून पाद्री धावा करू लागले. सागराच्या बाजूस किल्ल्यावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्याने मराठे चढू लागले. किल्ल्यातून कॅप्टन तोफा चालवून प्रतिकार करू लागला. याच सुमारास निळोपंत पेशवा वसईच्या कोटावर चालून गेला. अशाप्रकारे उत्तर फिरंगानाचा फास आवळला जाऊ लागला. उत्तर फिरंगानाचा फास सुटावा म्हणून घाबरून व्हाईसरायने गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घालण्याची आगळीक केली.
आणि पेशवा निळोपंतावर मोहीम सोपवून संभाजीराजे खुद्द फोंड्याकडे निघून गेले. फोंड्याचे युद्ध जिंकून संभाजीराजे खुद्द गोव्यावर चालून गेले. आणि काही महिन्यात उत्तर व दक्षिण फिरंगान संभाजीराजांच्या घोड्यांच्या टाचेखाली आला. स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांच्या अवस्थेचे आपल्या पत्रातून वर्णन करतांना इंग्रज म्हणतात की-
फोंड्यावर जो पोर्तुगीजांचा संपूर्णत: पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचा चढेलपणाचा पारा खूपच खाली आला. उत्तरेकडेही त्यांची धूळधाण उडाल्याने त्यांची शौर्याची घमेंड आणि क्रूर नाठाळ व्रूत्ती बरीच सुधारेल. राजांशी युद्ध करताना मनुष्य व संपत्ती बलाचा त्यांनी विचार केला नाही. उतावळेपणाच्या परिणामाची जाणीव त्यांना झाली आहे आणि त्यांची मस्ती पूर्णपणे जिरली आहे..(संदर्भ-शौर्यशंभू३३३)
लवकरच व्हाईसरायने तहाची याचना केली. अशाप्रकारे सन १५०० पासून स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांना या मराठी राजाने आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पश्चात चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला व पोर्तुगीजांना हळूहळू वसई आदि मुलूख कायमचा सोडावा लागला.
  इ.स. १७२८ मध्ये या किल्ल्याचे असे वर्णन केलेले आहे की, 'यावर १३० पहारेकरी लोक आहेत.' या किल्ल्याची हल्लीची लांबी २८२८ फूट व रुंदी ८९ फूट आहे. किल्ल्यात जाण्याला एकंदर ११ दरवाजे आहेत. त्यापैकी ४ बाहेर व ७ आत आहेत. पूर्वेकडील तट शिवाय कबाकीचा भाग अद्यापि कायम आहे. किल्ल्याला एकंदर ७ बुरुज असून, प्रत्येकाला ७ पोर्तुगीज साधूची निरनिराळी नावे दिलेली आहेत.

      हा किल्ला इ.स. १७३९ मध्ये फिरंग्यांच्या मुळावर उठलेल्या चिमाजीअप्पाने तळगडाचा हवालार सुभानजी माणकरला कोर्लईवर पाठविले ते मार्च महिन्यातः त्यानी किल्ल्याभोवती करकचून वेढा आवळला. अन कुठल्याच हल्ल्याचा परीणाम होऊ  दिला नाही. सन १७३९ मध्ये चिमाजी व पोर्तुगीज यांच्यात वसईचा तह झाल्यावर पहिला बाजीराव व पोर्तुगीज अधिकारी इंचवर्ड यांची १४ जानेवारी १७४० ला भेट झाली. त्यांच्या वाटाघाटीनंतर  ७ सप्टेंबर १७४० ला झालेल्या तहानुसार २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला.  याच दुर्गावर मराठ्यांनी तोफा बनविण्याचा कारखाना काढला. याच सुमारास शेजारची रेवदंड्याची गढी  मानाजी आंग्र्याने जिंकली कोरलर्डवरच्या  बांधकामात मराठ्यांनी काही बदल केले नाहीत. त्यामुळे इथली पोर्तुगीज धारणी कायम राहिली. तेव्हापासून इ.स. १८१८ पर्यंत तो मराठ्यांच्या ताब्यात होता. याची मुख्य खूण म्हटली म्हणजे मराठे लोकांनी वर सांगितलेल्या ७ बुरुजांना त्यांची पोर्तुगीज नावे काढून टाकून मराठी नावे दिली आहेत.  मराठ्यांनी सगळ्या बुरूजांना नवीन नावे दिली. सॅन थियागोला पुस्ती बुरूज, सॅन फ्रांसिस्को झेवियरला गणेश बुरूज, सॅन पेड्रोला पश्चिम बुरुज, सॅन इग्नाशियोला ला देवी बुरूज व सॅन फिल्लिपला चौबुरजी बुरूज अशी नावे मिळाली. उरलेल्या दोघांना राम बुरुज व पाण बुरुज अशी नावे दिली गेली. शिवाय किल्ल्यात गणपती, मांजरादेवी, वेदिकादेवी वगैरे २९४ देवतांची पडापड झालेली देवालये आहेत. किल्ल्यात थोड्याशा तोफा आहेत; परंतु त्या गंजून गेलेल्या आहेत. दिनांक ६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण चहले.

        पण या कोर्लई गावाचे या व्यतिरिक्तही आणखी एक वैशिष्टय़! अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.

        ‘वाँ नॉम की?’ असा एखादा प्रश्न येतो आणि कोर्लईच्या या जगावेगळय़ा वैशिष्टय़ाला तोंड फुटते. संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत ही फुललेली! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही  ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही.
        या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. १७३९ पर्यंत पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते याच काळात कोरलईचा परिसर विकसित झाला असावा. या गावात ख्रिश्चनांची वस्ती अधिक होती.ती आज गावाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे कोरलईच्या किल्ल्यावर तीन पोर्तुगीज शिलालेख आढळले आहेत. १७४० मध्ये कोरलईचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला गेला १८१८ मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. कोरलईचा एवढा इतिहास या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेबद्दल काही अंदाज बांधण्यासाठी पुरेसा ठरावा.
  कोरलईच्या गावकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार व्हर्गीस ,मार्व्हीस, गोम्स, वार्तिझ व कलेमेंट्स या आडनावांची पाच कुटुंबे प्रथम येथे स्थायिक झाली. आजचे गावकरी ही त्यांचे वंशत कोरलईत आज बोलल्या जाणाऱ्या अनोख्या भाषेवर असणाऱ्या पोर्तुगीज भाषेच्या प्रभावाचे मूळ येथे आहे. आजही या गावात जाऊन आल्यानंतर पुण्याचे भाषातज्ञ डॉक्टर अशोक केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ही भाषा 'पोर्तुगीज पिगीन' असल्याचे त्यांनी सांगितले
  मॉरिशस सारख्या प्रदेशात बोलली जाणारी क्रिओल ही या पिगीन ( Pidgin ) प्रकारात मोडते विशेषता इंग्रजी ,पोर्तुगीज किंवा डच भाषेचा झालेला अपभ्रंश अशा स्थानिक भाषात मिसळून तयार होणारे नवी भाषा. जेव्हा एकत्र आलेले लोक एकमेकांची भाषा समजू शकत नाही तेव्हा एकमेकांशी संवाद साधण्याच्या गरजेतून अशी भाषा तयार होते, असा पिगीन या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड शब्दकोशात देण्यात आला आहे. आज शुद्ध पोर्तुगीज भाषा ही गोव्यात आणि त्यातही वास्कोला बोलली जाते. दमण हेही ही भाषा बोलली जाण्याचे दुसरे ठिकाण. वसई हा पोर्तुगिजांचा एकेकाळचा बालेकिल्ला.पण तेथेही आता पोर्तुगीज भाषा बोलली जात नाही,

         क्रिओल या शब्दाचाही असाच अर्थ आहे विशेषता ज्या ठिकाणी व्यापारी केंद्र ( विशेषतः बंदरे ) आहेत अशा ठिकाणी अतिशय सोपे व्याकरण असणारी व विविध भाषेतील शब्दांचा समावेश असणारी नवी भाषा तयार होते असेही नमूद करण्यात आले आहे. कोरलईचे भौगोलिक स्थान आणि ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतले तर या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेचे गुढ काही प्रमाणात उकलण्यास मदत होते. कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी, कोळी, आगरी, तुळू, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषातील शब्दांची सरमिसळ झालेली आहे.
  कोरलईतील जी तीनशे, साडे तीनशे कुटुंबे ही भाषा बोलतात ती सर्व कुटुंबे शेती करतात .यापैकी कोणीही बंदराशी वा व्यापाराशी संबंधित नाही आजही भातशेती,भाज्या आणि रताळ्यांच्या उत्पादनावर या कुटुंबाचे गुजराण चालते. तरीही पिगीन प्रकारची भाषा या ठिकाणी कशी रुजली असा प्रश्न पडतो. गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जी पहिली पाच कुटुंबे रेवदंड्यातून कोरलईत आली, त्या कुटुंबात या भाषेचे उगमस्थान असावे. कालानुरुप त्यात विविध शब्दांची सरमिसळ होऊन एक नवीन भाषा तयार झाली असावी.





          या भाषेत ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचे देवनागरी लिपीत एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. 'नॉ लिंग सु इस्तोर' असे त्याचे नाव इस्तोर याचा अर्थ गोष्ट. या पुस्तकातील गोष्टींची शीर्षके वाचली तरी भाषेच्या मिसळची कल्पना येते हुशार र्‍हात सु ईस्तॉर अशी एक गोष्ट त्यात आहे 'सोने देणारा सिंह सु ईस्तॉर, गवळी आणि आदीव सु ईस्तॉर, ठकास महाठक सु ईस्तॉर,आणि माय विशींग सु ईस्तॉर  ही त्यातील काही उदाहरणे.
बंगाली भाषेत नाव याला नॉम म्हणतात वॉ नॉम की ( तुझं नाव काय ) हे कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेतील एक वाक्य. पोर्तुगीज भाषेत पाण्याला आग्वा म्हणतात. तर कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेत उदक. वास्तविक उदक हा संस्कृत शब्द आहे. मंगलोर भागात आणि तुळू भाषेत ही पाण्याला उदक असेच म्हणतात अशीही भाषेची सरमिसळ झाली आहे. हे कसे झाले याचे मूळ कदाचित चौल रेवदंडा परिसरात चालणाऱ्या व्यापारात आणि तेथील बंदरात असू शकेल.मॉरिशस् मध्येही स्थानिक भाषा ही फ्रेंच च्या गडद प्रभावाखाली असलेली क्रिऑल आहे.

   कोरलई हे तसे एका टोकाचे गाव. ह्या गावावरूनच मुरुड, जंजिऱ्याला जाण्यासाठी रस्ता असला तरी वाटेत थांबण्याची तसदी कोणी न घेतल्यानेच हे गाव आणि तेथील भाषा ही प्रसिद्धीपासून दूरच राहिली. इतिहासाच्या अभ्यासकांना कोरलई किल्ला माहिती आहे पण त्यांच्याही कानापर्यंत ही भाषा पोचली नाही कदाचित ही भाषा पोर्तुगीजच असावी या समजामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही
     भौगोलिक कारणामुळे ही या गावाकडे तसे दुर्लक्ष झाले. या ठिकाणी अलिबागहून यायचे तर होडी शिवाय दुसरा मार्ग नव्हता विक्रम इस्पातचा कारखाना रोह्यात झाल्यानंतर साळाव- रेवदंडा फुलाने जोडले गेले. त्यामुळे ही हे गाव अप्रकाशित राहिले. या गावातील लोकही फारसे बाहेर पडलेले नसावेत शेतीचा माल विकण्यासाठी त्यांना सर्वात जवळचा बाजार म्हणजे रेवदंड्याचा.आणि बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याची त्यांची भाषा ही मराठीत. किनारपट्टीवर राहणारा सर्वसामान्य कोकणी माणूस बोलतो त्याच शब्दात आणि सुरावटीत कोरलईवासीयांचे मराठी बोलणे असल्याने हे काही वेगळे आहे ही शंका कुणालाही आली नसावी.
      आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारे आणि नव्या पिढीला ही घरात सक्तीने आपलीच भाषा बोलायला लावून तिचे जतन करणारे हे कोरलईवासी निश्चितच अभिनंदनाला पात्र आहेत. या गावातल्या शाळेतले शिकवण्याचे माध्यम हे मराठी आहे. गावातील चर्चमध्ये प्रार्थना ही मराठीतुनच होते. तरीही आपल्या घरी परतल्यानंतर एकमेकांशी बोलताना हे गावकरी आपल्याच भाषेत बोलतात.
    ही भाषा काही वेगळी आहे याची जाणीव काहीजणांना आहे. या गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेत सांगितलेल्या गोष्टीचे देवनागरी लिपीतील पुस्तक आहे. हे पुस्तक 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज' आणि 'नॅशनल एंडोमेंट फॉर ड्युमानिटीज' यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आले आहे.  दमनचे काही जण ही भाषा कोणती ते शोधण्यासाठी येथे येऊन गेले ही माहिती गावकऱ्यांकडूनच समजली. काही वर्षांपूर्वी बडोदे विद्यापीठाच्या वस्तूसंग्रहालयशास्त्र विभागाचे प्रमुख बेडेकर यांनी या गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला होता. पण त्याबाबत अन्य तपशील समजू शकला नाही. खरंतर या गावात बोलली जाणारी भाषा जतन व्हायला हवी असे येथे आल्यानंतर मनापासून वाटले.
     जर अमेरिकन लोक येथील भाषेचे पुस्तक काढण्यासाठी पुढे येतात तर आपल्या शासनाने तरी याबाबतीत मागे राहिला नको. कोकणचा बराचसा भाग अद्याप व प्रकाशित आहे कोरलई गाव हे त्यातीलच एक. जर या भाषेच्या उगम स्थानाचा पत्ता लागू शकला तर या राज्याच्या वैभवात या नव्या इतिहासाची भर पडेल हे नक्की याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस अनेक संवादबोली लुप्त होत असताना कोर्लई बेटावरच्या या भाषावैभवाने खरेच भुरळ पाडते. मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.
 
      साळावच्या त्या पुलावरून समोरचा देखावा पाहात हे वर्णन आठवावे आणि कोर्लईचे कौतुक करत त्याच्याकडे मार्गस्थ व्हावे. पुलापलीकडे आलो, की आपण रोहय़ातून मुरूडकडे गेलेल्या रस्त्यावर येऊन पोहोचतो. या रस्त्यावरच उजवीकडे हा कोर्लई किल्ला आणि पायाशी कोर्लई गाव! रेवदंडा ते कोर्लई पाऊण तास लागतो. कोळी लोकांची ही वस्ती, पण गावात शिरण्यापूर्वीच त्याची ‘गंधवार्ता’ नाकापर्यंत पोहोचते. साऱ्या गावभर प्रत्येकाच्या अंगणात उन्हाळी पापड वाळत घालावेत त्याप्रमाणे सुके मासे वाळत घातलेले असतात.  कोळीवाड्यातून किल्ल्याकडे जायचं. वाटेत बाबा स्वामींची समाधी आहे. तिथून चढ सुरू होतो.
कोर्लई, कोरलई, कोरले अशा अनेक नावांनी इतिहासापासून ओळख सांगत आलेला हा जलदुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन! यातील उत्तर दिशेने कुंडलिका खाडी, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सिंधुसागराचा वेढा! पाण्याच्या या अगाध डोहात सहय़ाद्रीचे हे चुकार भूशीर इथे मध्येच समुद्रातून आकाशाकडे झेपावले आहे. त्यावरच कोर्लईचा हा दुर्ग!

         उजव्या हाताला एका उंच टेकडीवर कोर्लई किल्ला, तर डावीकडे अथांग पसरलेला समुद्र! कोळीवाडय़ाची गजबज जाऊन एकदम आलेली शांतता या समुद्राच्या पुन्हा प्रेमात पाडते. या दीपस्तंभाकडून एक पायरीमार्ग गडावर चढतो. याशिवाय गडावर जाण्यासाठी आणखीही तीन प्रवेशमार्ग आहेत, पैकी दोन तळातील माचीकडून तर एक उत्तरेकडील कोर्लई गावातून थेट बालेकिल्ल्यात येतो. दक्षिण टोकाकडील कोरलाई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो.


 पूर्वेकडे तोंड असलेल्या दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. पण आपण माहिती घेणार आहोत दीपस्तंभाकडून चढणार्या वाटेची. बहुतेक पर्यटक आणि कोरलईला भेट देणारे याच बाटेने किल्ला बघतात.
कोर्लई गावातून गडाला वेढा मारत एक रस्ता दक्षिणेकडे समुद्रकाठावर कोर्लई दीपस्तंभाकडे येतो. रस्ता डोंगरावरील दीपगृहापर्यंत जातो.
 चढ सुरु होतो तेथून कॉंक्रिटचा रस्ता बनवला आहे पण खूपच अरुंद आहे. समोरून गाडी आली तर कोणाला तरी माघार घ्यावी लागेल. रस्ता वळणावळणाचा आहे व जराही गाडी काँक्रिटच्या धारेहून खाली उतरली तर उलटण्याची शक्यता.

 
दीपगृह. सध्या येथे शुल्क भरुन प्रवेश करता येतो
 

 
 
 

 
    अलिबागच्या या अष्टागरमध्ये खांदेरी आणि कोर्लई या दोन किल्ल्यावर दीपस्तंभ आहेत. समुद्रावर स्वार झालेल्यांना रात्री हे दीपस्तंभच त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा प्रकाशझोतांनी दिशादर्शन करत असतात. हा प्रत्येक प्रकाशझोत विशिष्ट पद्धतीचा असतो आणि तोच त्याचा पत्ताही! यावरूनच दर्यावर्दी त्यांच्या दिशा, स्थळ, मार्ग ठरवतात. हे दीपस्तंभ आणि त्यांचे कार्य नाममात्र शुल्क भरून पाहता येते. इथे कोर्लईला ही सोय आहे. तेव्हा हा दीपस्तंभ जरूर पाहावा आणि मग गडाकडे निघावे.
दीपगृहाच्या बाजूने कच्ची वाट व काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या पश्चिम दरवाजापर्यंत पोहचतो. वेळ साधारण १५ मिनिट. 







           दीपस्तंभाकडून आलेल्या वाटेने पंधरा-वीस मिनिटांत आपण गडाच्या मधल्या भागात पोहोचतो. हा किल्ला म्हणजे एखादी अरुंद सरळसोट माचीच आहे. जवळपास किलोमीटरभर लांबी आणि अवघी २७ मीटरची रुंदी असलेला हा आयताकृती पट्टा. पश्चिमेकडे समुद्रात शिरलेल्या एका टोकापासून ते पूर्वेकडे उंच होत गेलेल्या पर्वतापर्यंत कोर्लईचा हा गड वर चढत गेलेला आहे.
 
कोरलई गडाचा नकाशा
 
 या आडव्या भागात पुन्हा काही ठरावीक टप्प्यावर आडव्या भिंती-दरवाजे घालत या किल्ल्याचे तब्बल नऊ भाग केले आहेत. या भागात ११ दरवाजे आहेत. यातील पहिले तीन-चार भाग म्हणजे गडाच्या माचीचाच भाग, तर उर्वरित बालेकिल्ला म्हणावा लागेल. या किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी ८६१.९७ मी. आणि दक्षिणोत्तर रुंदी २७.१२ मी. व तटभितीची उंची १.५२ मी. आहे. किल्ल्यावरून मारा करण्यासाठी तटभितीला गोळी-बारासाठी ३०५ जंगी आहेत. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे असून त्यापैकी चार बाहेरच्या तटबंदीस व सात आतील बाजूस आहेत.










ह्या शिल्पकृतीला क्रुसाची बातेरी असे नाव आहे.











 




         अगदी तळातील भागापासून कोर्लईचे हे दर्शन सुरू होते. गडाचा हा समुद्राकडील तळाचा भाग समुद्राचे पाणी पित बसलेला असतो. काठावरच्या चार दिशांना बांधलेल्या चार बुरुजांनी जणू वरून धावत आलेल्या या तटाला वेसण घातली आहे. या माची-धक्क्यावरच कोर्लई किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. कोर्लईची तळातील माची चार खणखणीत बुरूज बांधून बंदिस्त केलेली आहे. इथेच गडावर येण्यासाठी दोन दरवाजेही आहेत. पश्चिमेकडे असलेला दरवाजा समुद्राभिमुख आहे तर पूर्वेचा दरवाजा कुंडलिका नदीचे मुख आणि तिथं असलेल्या जेटीच्या बाजूला उघडतो. सैनिकांच्या खोल्या, दारूगोळय़ाचे कोठार, तटावरील चार तोफा इथे दिसतात.तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृष्य उत्तमपैकी दिसते. कोर्लाई किल्ल्याच्या दोन बाजुस समुद्र एका बाजुस कुंडलिका नदीच्या खाडीचा जलाशय असल्यामुळे ह्या माचीवरून भोवतालच्या सिंधुसागराचे विहंगम दृश्य दिसते. माचीवर डाव्याबाजूस समुद्रकिनार्याकडे असलेला किल्ल्याचा दरवाजा दिसतो. इथं कॅव्हेलेरो नावाचा प्रचंड बुरुज असून अनेक कमानींचे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. त्याला लागूनच सांताक्रूस बुरुज आहे. अनेक तोफा इथं मांडलेल्या आपल्याला दिसू शकतात. किल्ल्याची हि प्रशस्त माची आणि सभोवतालच्या समुद्राचे सौन्दर्य डोळ्यात साठवुन परत मागे बालेकिल्ल्याची वाट पकडावी.

 

 
 

 
     थोडे वर चढल्यावर पहिला दोन बुरुजांचा दरवाजा व त्यानंतर दुसरा दोन बुरुजांचा दरवाजा लागतो. त्यावर S. FRAXAVER अशी अक्षरे आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर तिसरा मोठा दरवाजा लागतो. त्याच्या कमानीची लांबी सुमारे ६.७१ मी. असून त्यातून पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण किल्ल्याचा मध्यभाग येतो.
 
 
 
येथून कुंडलिका खाडी व रेवदंडा परिसराचे रम्य दर्शन होते.







येथून परत फिरून आपण दक्षिण दिशेला चालत येऊन येथील दरवाजातून आपण आत प्रवेश करतो.
येथिल बुरुजावरील तोफ
याच्यापुढे आणखी एक दरवाजा आहे. याच्या माथ्यवरही काही तोफा आहेत.
ठिकठिकाणी सागराचे नयनरम्य दर्शन होते
      यानंतर जसजसे वर जावे तसे गडाचे एकेक टप्पे उलगडत जातात. या प्रत्येक टप्प्याला विभागणारी एक अंतर्गत भिंत आणि दरवाजा आहे. यातील काही दरवाजांवर पोर्तुगीज भाषेतील शिलालेखही आहेत. या लेखांशिवाय, वेगवेगळय़ा आकारांतील तोफा, पाण्याचे हौद, टाक्या, कोठारे, चर्च, महादेवाचे मंदिर, चौथरे असे एकेक दुर्गावशेष दिसू लागतात.डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर आहे तो बालेकिल्ला ज्याला पोर्तुगीजांनी फोर्टलेझा रियल (राजेशाही दुर्ग) असे नाव दिले होते  इथून पुढे जात असताना कात्रीच्या आकाराचं बुरुजाचे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या वास्तुरचनेवर पोर्तुगीज बांधकामाची छाप जागोजागी स्पष्टपणे दिसते. या ठिकाणच्या कात्रीच्या आकारातील बुरुजांच्या रचनेचे Orelha De लिब्रे म्हणजे सशाचे कान असे बारसे केलेले आहे. हा बालेकिल्ल्याचा भाग असून येथील सांत बुरुजांपैकी पाच बुरुजांना सॅम थिओगो, सॅम फान्सिस्को झेविअर, सॅम पेद्रो, सॅम इग्नॅसिओ आणि सॅम फिलिप या पोर्तुगीज संतांची नावे होती. मराठ्चांनी किल्ला काबीज केल्यानंतर १७४० मध्ये बुरुजांची नावे पुढीलप्रमाणे बदलली:- पुसत्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुरजी, राम व पान. सध्या एकाही नावाची खूण दिसत नाही. यानंतर लागणाऱ्या चौथ्या दरवाजाच्या समोर एक खड्डा असून त्याच्या बांधीव दगडी भिती दिसतात. तेथे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधिव हौद असावा.








 









   समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो.
या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. 
कोर्लईवरीलच पोर्तुगीजांचे 'आर्म्स ऑफ कोट' चिन्ह
  किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दरवाजावर खालीलप्रमाणे आठ ओळींचा शिलालेख वाचता येतो.
(1) ESTE CASTELO MANDO V. FAZER
(2) OVIZORI. DA INDIA DO FELIPHE
(3) MZSE DNOV BRODE 1646 ANOS 9
(4) SENDOCAPCTAO DE CHAVL. FE
(5) RNAO DE MIRANDA E RIQEAS DA
(6) CABOV SENE MAIO DE 1880 SENDO
(7) CAPITAO DE SAPRACACRIS TOVAO
(8) DABREV DAZEVEDO.
 
 सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये (पृ. ३३१-३२) त्याचा खालील-प्रमाणे इंग्रजी अनुवाद केलेला आहे :-
      "This castle was commanded to be built by the Viceroy of India D. Fellipe Mascarenhas in November of the year 1646, Fernao Miranda Henriques being Captain of Chaul, and was finished in May 1680, Christovao d Abreu, d' Azevedo being Captain of this fort. "
इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवीसन १६४६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. मे १६५० मध्ये चौलचा कॅप्टन फर्नाव दे मिरांडा हेन्रीक्स इथला कप्तान क्रिस्तोवाव दे अब्र्यू दे अझवेदो यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.
   या शिलालेखावर मध्यभागी क्रूसाचे चिन्ह, ढाल व पोर्तुगीज तारे (quines) आहेत. या चिन्हात एका मोठय़ा ढालीच्या आत सात किल्ले आणि पाच ढाली दाखवलेल्या असतात. आतल्या बाजूस असलेल्या पाच ढाली, पोर्तुगीज राजा अल्फान्सो – एक याने पाच मूरीश राजांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून दाखवतात. या ढालींवर पाच उंचवटे कोरलेले असतात. ते येशू ख्रिस्ताला झालेल्या पाच जखमांचं प्रतीक म्हणून दाखवतात. पाच ढालींच्या बाहेरच्या बाजूला सात किल्ले दाखवलेले असतात. पोर्तुगीज राजा अल्फान्सो – तीन याने जिंकलेल्या सात मूरीश किल्ल्यांचे हे प्रतीक आहे. ढालीच्या बाहेरच्या बाजूला ऑलिव्हची पानं कोरलेली असतात. ढालीवर मुकुट कोरलेला असतो.
बाकी दोन शिलालेखांपैकी एक प्रमुख प्रवेशद्वारावर व दुसरा किल्ल्यातील चॅपलच्या पुजास्थानाचे वर आहे. हे दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत.
ज्या कमानीमधून बालेकिल्ल्यातून चर्चपाशी प्रवेश करतो कमानीवर पोर्तुगाल भाषेतील एक शिलालेख आणि पोर्तुगीजांचे युद्धचिन्ह कोरलेले दिसते.
 


 नवीन भूमीच्या शोधात निघालेल्या पोर्तुगीज दर्यावर्दीच्या झेंडय़ावर असणारा आर्मिलरी स्पियर द्वारचिन्ह म्हणून कोरलेला आढळतो. या चिन्हात पृथ्वी गोलावर अक्षांश-रेखांश दाखवतात तशा रेषा कोरलेल्या असतात. त्या सर्वाना छेदणारा एक पट्टाही कोरलेला असतो. पोर्तुगीज राजा मॅन्युअल -एक याचं हे राजचिन्ह होतं. नंतरच्या काळात जगभर पसरलेल्या पोर्तुगीज सत्तेचं प्रतीक म्हणून हे वापरलं गेलं. बऱ्याचदा आर्मिलरी स्पियर हा कोट ऑफ आर्मच्या मागे कोरलेला असतो.  आर्मिलरी स्पियर आणि कोट ऑफ आर्म यांना पोर्तुगीजच्या नकाशावर स्थान मिळालेलं आहे.

कोर्लई किल्ल्यावरील पोर्तुगीजांचे जागतिक स्वामित्व दाखवणारे चिन्ह

समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या दीपगृहाला पाणी पुरवठा केला जातो. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत.

 
 
 
 गडाच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोर एक छोटेसे शन्कराचे, रत्नेश्वराचे मन्दिर दिसते. मंदिरासमोर एक छोटेसे तुळशी वृंदावन असुन मंदिराच्या कडेने छोटासा ओटा बांधलेला दिसतो.किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याच्या झाडाला बहर आलेला पाहताना खूप छान वाटतं.  येथे उजव्या (दक्षिण) वाजूला मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदिरे मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर वांधलेली आहेत. त्यात गणेश मंदिर (३.६४ x ४.८६ मी.), मांजरादेवी (२१.२८ ९.२२ मी.) व वेदिकादेवी मंदिर (६.३८ ४ ४.८६ मी.) यांचा समावेश आहे. परंतु एकाही मंदिरात सध्या मूर्ती  नाही.  मंदिराच्या भितीचे अवशेष शिल्लक आहेत .
 मंदिराच्या जवळच एक भूमिगत असलेले पाण्याचे टाके दिसते. येथील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या दीपगृहाला पाणी पुरवठा केला जातो.
 
      बालेकिल्ल्याच्या या भागात काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठार आहे तर पश्चिम आणि उत्तर तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन चारही बाजूने तटबंदीने वेढलेला आहे.बालेकिल्ल्याच्या चारही बाजूस चार बलदंड बुरुज उभारलेले दिसतात. बुरुजांवर चढायला पायऱ्यांची रचना केलेली दिसते. बालेकिल्ल्यावरील ह्या बुरुजांवर एकुण ७ तोफा दिसतात.
 

 
 
 
 
येथून आणखी एका दरवाजातून प्रवेश केला कि आपण चर्च जवळ येतो.

 





बालेकिल्ला ओलांडून पुढे गेल्यावर चर्चचे बांधकाम दिसते.  कोर्लाई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना सुमारे सोळाव्या शतकात चर्चचे बांधकाम झाले असावे मात्र आजही हे बांधकाम बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. प्रवेशदवारावरील नक्षीकाम, आतील छोटेसे सभागृह, सभागृहातील पायऱ्यांची रचना, भिंतींमध्ये केलेले कोनाडे, छतावरचे नक्षीकाम पाहून जुन्या काळातील ह्या चर्चच्या सौन्दर्याची कल्पना येते. चर्चच्या आजूबाजूला काही बांधकामांच्या पायांचे जोते आणि भिंती दिसतात.पोर्तुगीज काळात बांधलं गेलेलं नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसलं तरीही त्याचं बांधकाम आणि वेदीची म्हणजेच आल्टर ची जागा आपल्याला नीट पाहता येते.

बाजूलाच पडक्या वाड्याचे अवशेष आहेत

 चॅपलच्या पाठीमागे राजवाडयाच्या धाटणीची इमारत लागते. या मुस्लिम वास्तुशैलीच्या इमारतीला एक मजला आहे. इमारतीचे दगडी बांधकाम अजून सुस्थितीत आहे. ही इमारत मुसलमानी अमदानीत बांधकाम केलेल्या वास्तूवर पोर्तुगिजांनी बांधली असावी. इमारतीच्या पाठीमागे उजव्या तटबंदीच्या आतील बाजूस कमानीचे अर्धवट अवशेष आहळून येतात, तसेच कमानीच्या समोर मोठ्या दगडी चौयऱ्याच्या पूर्व बाजूच्या भितीचे अवशेष दिसतात. यावरून हे अनुमान करता येते. ही इमारत बहुधा सेनापतीच्या निवासासाठी असावी. इमारतीच्या पाठीमागे बरीच मोकळी जागा आहे.

  चर्चच्या उजव्या बाजूला थोडे खाली पायऱ्या उतरून गेल्यास किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. आठव्या टप्प्यावरच गडाचा तो उत्तरेकडील दरवाजाही येऊन मिळतो. हा दरवाजा पूर्वेकडे तोंड असलेल्या दोन बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. यातील समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सेंट दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सेंट फ्रांसिस्को.  काही पायऱ्या असून नंतर हि वाट कोर्लई गावच्या कोळी वाड्यापर्यंत जाते. या बाजूने किल्यावर येण्यास साधारण पाऊण तास लागतो . दरवाजाच्या रचनेवरून पूर्वीच्या काळी हाच मुख्य दरवाजा असावा. त्याच्या कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झाले असावे असा आभास निर्माण होतो. या दारावरच गोलाकार साओ पेद्रो बुरुज बांधलेला दिसतो.
 किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकाला अजून-सुद्धा भक्कम तटबंदी असून त्याला दोन बुरूज आहेत. तटबंदीच्या खाली दक्षिणेकडील जमिनीच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तेथे खंदक असून त्यावर लाकडी पूल होता. सध्या पूल अस्तित्वात नाही.
 येथून पुढे आपण दक्षिण टोकावरील बुरुजांकडे जातो.
 
 
 
तोफा ठेवलेला एक अष्टकोनी बुरुज.

 
 किल्ल्यावर व परिसरात ठिकठिकाणी अनेक तोफा आहेत. येथे  एकूण ३४ तोफा आहेत असे समजले.
 
कुंडलिका खाडी व समुद्र दोहोंचे मनोहर दर्शन

  प्रवेशद्वार पाहून परत चर्च पाशी येऊन चर्चच्या मागे थोडे अंतर चालत गेल्यावर  एका भिंतीत छोटासा दरवाजा आहे. त्यापुढेही भिंत असल्याने येथे किल्ला संपला असे वाटते. पण दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे वळून आपण परत उघड्यावर येतो.
  पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. पोर्तुगीज बांधणीचे तट-बुरूज आणि त्यांच्या संस्कृतीतल्याच अन्य अवशेषांनी एका वेगळय़ा जगात जायला होते. एका परकीय साम्राज्याच्या या पाऊलखुणा पाहात शेवटच्या टोकावर आपण येतो.   कोर्लाई किल्ल्याची गडफेरी पूर्ण होते. चर्चच्या मागील बाजूस तटबंदी व बुरुजांचे अवशेष दिसतात.
इथून तळात सुमद्रापर्यंत उतरलेला तो गड नजरेत येतो आणि मग त्याची व्याप्ती आणि धास्ती मनात ठसते. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. 
  कोर्लाई किल्ला पाहताच नकळतपणे पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या दुर्ग बांधणीच्या पद्धतीमध्ये तुलना करावीशी वाटते. कोर्लई गडावर गोमुखी पद्धतीचे, वळणदार आणि बुरुजांमध्ये लपवलेले गडाचे मुख्य प्रवेशद्वार आढळत नाही. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या दिसत नाहीत. गडावरील अनेक दरवाजांवर, बुरुजांवर गणपती, हनुमान इत्यादी देवता किंवा कमळ, मोर, हत्ती, व्यालशिल्प, शरभ ह्यांचे कोरीवकाम येथे दिसत नाही. कोर्लाई गडावर बंदिस्त असा भूमिगत जलसाठा असून मराठ्यांच्या दुर्गबांधणीमध्ये पाण्याचे टाके हे खडकामध्ये सपाटीवर किंवा डोंगराच्या कपारीत खोदले जाते. अर्धगोलाकार बुरुजांएवजी येथे कोनांमध्ये बांधलेले, षट्कोनी, पंचकोनी आकाराचे बुरुज दिसतात. परंतु तरीही इतरांपेक्षा निराळा असलेला हा पोर्तुगीज धाटणीचा सुंदर कोर्लाई किल्ला सहजच आपल्याला त्याच्या सौन्दर्यात रममाण होण्यास भाग पडतो.
       दो कु टो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने या किल्ल्याचे त्या वेळी लिहून ठेवलेले वर्णन आहे, ते असे,.. ‘हा किल्ला खूपच भव्य असून त्यावर फक्त जमिनीकडूनच हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र आणि खाडी यांच्यामध्ये एक खंदक असून, त्याच्यावरील पूल काढला की किल्ला अभेद्य होतो. या खंदकाच्या आत भक्कम कोट असून त्याच्या प्रवेशद्वारावर एक भलामोठा ब्राँझचा सिंह आहे. त्याच्या खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा लेख आहे. किल्ल्याच्या माथ्यावर त्याचा बालेकिल्ला असून, त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी असून तेथेही ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माश्यांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे दपरेक्तियुक्त वचन कोरलेले आहे.’
..आज शेकडो वर्षे उलटली, पण कोर्लईच्या या टोकावर उभे राहिले की या वर्णनातील धाक आजही अंगावर काटा उभा करतो.इतिहासाच्या अद्भुत जगात भ्रमंती करत असताना सूर्य मावळतीला जातो आणि पश्चिमेला क्षितिजावर अनोखा अविष्कार पाहायला मिळतो.  पश्चिमेचे रंग आता आकर्षक होऊ लागलेले असतात. जवळजवळ पाचशे मीटर लांब असलेली दगडी तटबंदी सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली असते. समुद्राचे पाणी आता सोनेरी दिसायला लागलेले असते आणि त्यावर एखाद्या मासेमारी बोटीचा ठिपका आपलं लक्ष वेधून घेत असतो.



















































































   पण या कोर्लई गावाचे या व्यतिरिक्तही आणखी एक वैशिष्टय़!
‘वाँ नॉम की?’ असा एखादा प्रश्न येतो आणि कोर्लईच्या या जगावेगळय़ा वैशिष्टय़ाला तोंड फुटते. संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत ही फुललेली! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही  ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही. या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस अनेक संवादबोली लुप्त होत असताना कोर्लई बेटावरच्या या भाषावैभवाने खरेच भुरळ पाडली.

कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा..

अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.
इ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.
या कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे.
ही मंडळी धर्मांतरीत नसून मूळचीच पोर्तुगीज होती. उत्तर कोकणातून पोर्तुगीज हटले आणि त्यांचा अन्य मूळ पोर्तुगीजांशी संपर्क राहिला नाही. तशातच मिश्र विवाहामुळे रक्तातील पोर्तुगीज अंशदेखिल पातळ होऊ लागला! आता ही मंडळी पूर्ण भारतीयच आहेत.
    यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते
क्रीऑल नावाची अशी कुठली एक भाषा नसते. दोन वा अधिक भाषांच्या मिश्रणातून बनलेल्या "सुधारीत" भाषेस क्रीऑल अशी संज्ञा आहे.
(मिश्र "असुधारीत" भाषेस पिजिन अशी संज्ञा आहे)
बाकी तो संपूर्ण पट्टा मनोहर आहे, यात शंका नाही!
मॉरिशस् मध्येही स्थानिक भाषा ही फ्रेंच च्या गडद प्रभावाखाली असलेली क्रिऑल आहे.





१७३९ पर्यंत पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते याच काळात कोरलईचा परिसर विकसित झाला असावा. या गावात ख्रिश्चनांची वस्ती अधिक होती.ती आज गावाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे कोरलईच्या किल्ल्यावर तीन पोर्तुगीज शिलालेख आढळले आहेत. १७४० मध्ये कोरलईचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला गेला १८१८ मध्ये पेशवाईच्या अस्तानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. कोरलईचा एवढा इतिहास या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेबद्दल काही अंदाज बांधण्यासाठी पुरेसा ठरावा.
  कोरलईच्या गावकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार व्हर्गीस ,मार्व्हीस, गोम्स, वार्तिझ व कलेमेंट्स या आडनावांची पाच कुटुंबे प्रथम येथे स्थायिक झाली. आजचे गावकरी ही त्यांचे वंशत कोरलईत आज बोलल्या जाणाऱ्या अनोख्या भाषेवर असणाऱ्या पोर्तुगीज भाषेच्या प्रभावाचे मूळ येथे आहे. आजही या गावात जाऊन आल्यानंतर पुण्याचे भाषातज्ञ डॉक्टर अशोक केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ही भाषा 'पोर्तुगीज पिगीन' असल्याचे त्यांनी सांगितले
  मॉरिशस सारख्या प्रदेशात बोलली जाणारी क्रिओल ही या पिगीन ( Pidgin ) प्रकारात मोडते विशेषता इंग्रजी ,पोर्तुगीज किंवा डच भाषेचा झालेला अपभ्रंश अशा स्थानिक भाषात मिसळून तयार होणारे नवी भाषा. जेव्हा एकत्र आलेले लोक एकमेकांची भाषा समजू शकत नाही तेव्हा एकमेकांशी संवाद साधण्याच्या गरजेतून अशी भाषा तयार होते, असा पिगीन या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड शब्दकोशात देण्यात आला आहे.
         क्रिओल या शब्दाचाही असाच अर्थ आहे विशेषता ज्या ठिकाणी व्यापारी केंद्र ( विशेषतः बंदरे ) आहेत अशा ठिकाणी अतिशय सोपे व्याकरण असणारी व विविध भाषेतील शब्दांचा समावेश असणारी नवी भाषा तयार होते असेही नमूद करण्यात आले आहे. कोरलईचे भौगोलिक स्थान आणि ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतले तर या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेचे गुढ काही प्रमाणात उकलण्यास मदत होते. कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी, कोळी, आगरी, तुळू, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषातील शब्दांची सरमिसळ झालेली आहे.
  कोरलईतील जी तीनशे, साडे तीनशे कुटुंबे ही भाषा बोलतात ती सर्व कुटुंबे शेती करतात .यापैकी कोणीही बंदराशी वा व्यापाराशी संबंधित नाही आजही भातशेती,भाज्या आणि रताळ्यांच्या उत्पादनावर या कुटुंबाचे गुजराण चालते. तरीही पिगीन प्रकारची भाषा या ठिकाणी कशी रुजली असा प्रश्न पडतो. गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जी पहिली पाच कुटुंबे रेवदंड्यातून कोरलईत आली, त्या कुटुंबात या भाषेचे उगमस्थान असावे. कालानुरुप त्यात विविध शब्दांची सरमिसळ होऊन एक नवीन भाषा तयार झाली असावी.
         या भाषेत ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचे देवनागरी लिपीत एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. 'नॉ लिंग सु इस्तोर' असे त्याचे नाव इस्तोर याचा अर्थ गोष्ट. या पुस्तकातील गोष्टींची शीर्षके वाचली तरी भाषेच्या मिसळची कल्पना येते हुशार र्‍हात सु ईस्तॉर अशी एक गोष्ट त्यात आहे 'सोने देणारा सिंह सु ईस्तॉर, गवळी आणि आदीव सु ईस्तॉर, ठकास महाठक सु ईस्तॉर,आणि माय विशींग सु ईस्तॉर  ही त्यातील काही उदाहरणे.
बंगाली भाषेत नाव याला नॉम म्हणतात वॉ नॉम की ( तुझं नाव काय ) हे कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेतील एक वाक्य. पोर्तुगीज भाषेत पाण्याला आग्वा म्हणतात. तर कोरलईत बोलल्या जाणाऱ्या भाषेत उदक. वास्तविक उदक हा संस्कृत शब्द आहे. मंगलोर भागात आणि तुळू भाषेत ही पाण्याला उदक असेच म्हणतात अशीही भाषेची सरमिसळ झाली आहे. हे कसे झाले याचे मूळ कदाचित चौल रेवदंडा परिसरात चालणाऱ्या व्यापारात आणि तेथील बंदरात असू शकेल.
   कोरलई हे तसे एका टोकाचे गाव. ह्या गावावरूनच मुरुड, जंजिऱ्याला जाण्यासाठी रस्ता असला तरी वाटेत थांबण्याची तसदी कोणी न घेतल्यानेच हे गाव आणि तेथील भाषा ही प्रसिद्धीपासून दूरच राहिली. इतिहासाच्या अभ्यासकांना कोरलई किल्ला माहिती आहे पण त्यांच्याही कानापर्यंत ही भाषा पोचली नाही कदाचित ही भाषा पोर्तुगीजच असावी या समजामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही

     भौगोलिक कारणामुळे ही या गावाकडे तसे दुर्लक्ष झाले. या ठिकाणी अलिबागहून यायचे तर होडी शिवाय दुसरा मार्ग नव्हता विक्रम इस्पातचा कारखाना रोह्यात झाल्यानंतर साळाव- रेवदंडा फुलाने जोडले गेले. त्यामुळे ही हे गाव अप्रकाशित राहिले. या गावातील लोकही फारसे बाहेर पडलेले नसावेत शेतीचा माल विकण्यासाठी त्यांना सर्वात जवळचा बाजार म्हणजे रेवदंड्याचा. आणि बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याची त्यांची भाषा ही मराठीत. किनारपट्टीवर राहणारा सर्वसामान्य कोकणी माणूस बोलतो त्याच शब्दात आणि सुरावटीत कोरलईवासीयांचे मराठी बोलणे असल्याने हे काही वेगळे आहे ही शंका कुणालाही आली नसावी.
      आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारे आणि नव्या पिढीला ही घरात सक्तीने आपलीच भाषा बोलायला लावून तिचे जतन करणारे हे कोरलईवासी निश्चितच अभिनंदनाला पात्र आहेत. या गावातल्या शाळेतले शिकवण्याचे माध्यम हे मराठी आहे. गावातील चर्चमध्ये प्रार्थना ही मराठीतुनच होते. तरीही आपल्या घरी परतल्यानंतर एकमेकांशी बोलताना हे गावकरी आपल्याच भाषेत बोलतात.

    ही भाषा काही वेगळी आहे याची जाणीव काहीजणांना आहे. या गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेत सांगितलेल्या गोष्टीचे देवनागरी लिपीतील पुस्तक आहे. हे पुस्तक 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज' आणि 'नॅशनल एंडोमेंट फॉर ड्युमानिटीज' यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आले आहे.  दमनचे काही जण ही भाषा कोणती ते शोधण्यासाठी येथे येऊन गेले ही माहिती गावकऱ्यांकडूनच समजली. काही वर्षांपूर्वी बडोदे विद्यापीठाच्या वस्तूसंग्रहालयशास्त्र विभागाचे प्रमुख बेडेकर यांनी या गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला होता. पण त्याबाबत अन्य तपशील समजू शकला नाही. खरंतर या गावात बोलली जाणारी भाषा जतन व्हायला हवी असे येथे आल्यानंतर मनापासून वाटले.

     जर अमेरिकन लोक येथील भाषेचे पुस्तक काढण्यासाठी पुढे येतात तर आपल्या शासनाने तरी याबाबतीत मागे राहिला नको. कोकणचा बराचसा भाग अद्याप व प्रकाशित आहे कोरलई गाव हे त्यातीलच एक. जर या भाषेच्या उगम स्थानाचा पत्ता लागू शकला तर या राज्याच्या वैभवात या नव्या इतिहासाची भर पडेल हे नक्की

 






' कोकणात दूर एका टोकाला असलेले कोर्लई हे गाव. या गावाचे वेगळेपण म्हणजे तिथली अनोखी भाषा. ही भाषा नक्की कोणती, तिथंच फक्त कशी ती बोलली जाते, त्या भाषेची लिपी कोणती, या प्रश्नांचा कोर्लईला प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेला वेध.
44 एका गावात एक वेगळीच भाषा बोलली जाते. बेडेकरांनी ही माहिती दिली आहे. कधी त्या कोर्लई गावात जाऊन ये. चांगली बातमी मिळेल." असे एका कोकणप्रेमी 'पटक्या' मित्राने सांगितले, उत्युक्ता जागी झाली. कोकणच्या रत्नभूमीवर असे एखादे गाय असेल, असे वाटले नव्हते.
इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर यांची भेट घेतली आणि त्यांनीही "जाऊन या. काही नवं समजलं, तर मलाही सांगा." असे सांगितले. त्यांना मिळालेली काही माहितीही दिली, कोलंईला जाण्यापूर्वी थोडा गृहपाठ करावा म्हणून रायगड जिल्ह्याचे 'गॅझेटिअर' चाळले. कोर्लईच्या किल्ल्याचा उल्लेख तिथे जागोजागी सापडला. पण
गावातव फेरफटका मारायचा असे ठरवले, समोर दिसणान्या एका गावक-याला विचारले, तो सुद्धा देण्यासाठी तयार झाला. आमच्या येथे येण्याचा उद्देश त्याला सांगितला आणि त्याने लगेचच," एऽऽ मेरी, एऽऽ शालू, ए 5 बड़ी जीजी, नाँ लीग मु" अशा अगम्य भाषेत हाकारे घालायला सुरवात केली, गावात महिलांचे आणि ज्येष्ठांचेच राज्य होते. त्यांच्याशी संवाद साधला. मासळीचा बास आणि तिथल्या लोकांचा गोशाख आणि जवळच असणारा समुद्र किनारा हे पाहून हे सर्गेजण मच्छीमार असावेत, असा समज झाल्या पण आम्ही शेतकरी असल्याचे या लोकांनी सुरवातीलाच सांगून टाकले. कुंदलिका नदी किया ज्याला रोद्याची खाडी म्हटले जाते ती ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, तिथे तिच्या दक्षिण किनाऱ्यावर कोलंईचा जलदुर्ग आहे. त्याच्याच मागे हे कोराले किवा कोई गाय आहे. या गावाचाच भाग असलेल्या पण काहीशा वेगळ्या पडलेल्या शंभर सव्वाशे घरांच्या दाटीत एका छोट्याशा चौकात आम्ही उभे होतो, आमचा वाटाड्या केव्हाच निघून गेला होता. आमच्याकडे पाहात आणि एका वेगळ्याच भाषेत परम्परांशी बोलत तिथले गावकरी आमच्या भोवती गोळा झाले होते. आम्ही त्यांची भाषा 'टेप करून' घेणार आहोत, हे त्यांना समजल्याचे त्यांच्या बोलण्यातील 'टेपरेकॉर्डर' या शब्दाने आम्हाला कळले,
ही अनोखी भाषा कोणती, ती इथंच का बोलली जाते, या भाषेची लिपी कोणती, असे प्रश्न या परिसरात बोलल्या जाणाऱ्या कुठल्याही वेगळ्या भाषेचा उल्लेख त्यात नव्हता
गेल्या आठवड्यात या कोर्लई गावात पोचल्यावर कानावर पहिले बोल पडले ते तेथल्या शाळकरी मुलांचे. एका हॉटेलात चहा घेण्यासाठी थांबली, तर छायाचित्रकार मिलिंद वाडेकर बाहेरून पळतच आत आला. "अरे ही मुलं काही वेगळ्याच भाषेत बोलताहेत," असे त्याने सांगितले, त्यानेच या मुलांना हाक मारून बोलावले, तर ती लाजून पळून गेली." या समोरच्या वस्तीतले लोक आमच्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. समोरच्या चर्चमध्ये जा, माहिती मिळेल थोडीफार," असे हॉटेलमालकाने सांगितले.
चर्चमध्ये जाण्याअगोदर साहजिकच पडले होते. "पूर्वीचा आमचा आजोबा का पणजोबा, कुणीतरी रेवदंडधाहून इथं आला. तेव्हा पूल नव्हता, तरीतून यायला लागायचा. तेव्हा पाचच घर आली होती हो. तेव्हापासून आम्ही इर्थ राहाला, नंतर आग्री, कोली यांच्यात राहून आमच्या भाषेतील "सब्द गेला." है एकाने सांगितले. पण इतिहास त्यापलीकडे सरकेना.

अमित गोळवलकर

"आमचं भासा पूर्तुगिऽज' या पलीकडे या गावकऱ्यांना त्याबद्दल जास्त काही माहिती नव्हती. पोर्तुगीज भाषेशी जवळीक 'ही भाषा पोर्तुगीज भाषेशी जवळीक साधणारी नक्की आहे. पण ती पूर्णतः पोर्तुगीज नक्कीच नाही.' ही माहिती आमच्या बरोवर

अनोख्या भाषेचे कोर्लई

आलेल्या आणि बराच काळ गोव्यात काढलेल्या एका मित्राने लगेचच दिली. या गावातल्या शाळेतील प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व मातीस हे पोर्तुगीज आडनाव धारण करणाऱ्यानेही याला लगेचच दुजोरा दिला. आज शुद्ध पोर्तुगीज भाषा ही गोव्यात आणि त्यातही वास्कोला बोलली जाते. दमण हेही ही भाषा बोलली जाण्याचे दुसरे ठिकाण. वसई हा पोर्तुगिजांचा एकेकाळचा बालेकिल्ला. "पण तेथेही आता पोर्तुगीज भाषा बोलली जात नाही," असे माउंट कार्मेल चर्चमधील नन सिस्टर लीना अल्मेडा यांनी सांगितले, पोर्तुगीज भाषेशी मिळतीजुळती ही भाषा कोणती, ती इथं कशी आली; हे पाहण्यासाठी इतिहासात डोकवावे लागेल. (पान ६ पाहा)








            कोरलई : (मुरुड ता., १८० ३०' उ., ७२० ५०′ पू., उंची ८२.६० मी.) रेवदंडा गावासमोर रोहा लाडीच्या डाव्या किनाऱ्यावर कोरलई हा जलदुर्ग आहे. जलदुर्गाच्या दक्षिणेस कोरलई तथा कोराले गाव आहे. येथे खिश्चनांची वस्ती अधिक होती. इतिहासकार मेर्न, द कुन्दा, घेवेनॉट, दो कुटो, अंतोनो बोकारो, फेरिश्ता इत्यादींनी कोरलईचे वर्णन लिहून ठेवले आहे.
      इतिहास : हा दुर्ग सोळाव्या शतकात युरोपियन लोकांना चौलचा रॉक या नावाने माहीत होता. सन १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरले तथा कोरलईचा अधिकारी दियोग लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली असता पोर्तुगिजांनी चौल (रेवदंडा) खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या कोरलईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का (त्रुसाची बातेरी किवा बाह्यकोट) बांधला." किल्ल्याची ही सर्वात खालची बाजू समुद्रसपाटीला आहे. तिला सांता क्रूज किंवा कुसाची बातेरी असेही म्हणतात. या खाडीच्या मुखाशी असलेल्या खंबायत नौदलाने (गुजरात नौदल) या बाह्यकोटावर लवकरच हल्ला केला, परंतु पोर्तुगिजांच्या कोरलई शिबंदीस चौलहून कुमक मिळाल्याने गुजराती सैन्याचे मोठे नुकसान होऊन पळ काढावां लागला. सन १५५३ मध्ये बुरहान निजामशहा मरण पावला. त्यानंतर सुमारे चार-पाचः वर्षे तेथे गादीवरून यादवी चालली. तिचा फायदा उठवावा या हेतूने पोर्तुगिजांनी अहमदनगरकडे कोरलाई पोर्तुगिजांना अभ्यर्पित करण्याची मागणी केली. परंतु त्यावेळी अहमदनगरच्या गादीवर आलेल्या हुसेन निजामशहाने ही मागणी साफ धुडकावून लावली व त्याने पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने १५५८ मध्ये रुपीखान आणि मौलाना शहामहमद उस्ताद यांना सैन्य व तोफखाना देऊन रेवदंडधास पाठविले. २१ सोबत त्याने कॉरलई दुर्गास भक्कम तटबंदी बांधण्यासाठी निष्णात स्थापत्यविशारद पाठविले. पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला. पोर्तुगिजांशी झालेल्या वल्पशा चकमकीनंतर पोर्तुगिजांनी निजामशहाशी तह केला व त्यानुसार किल्ल्यास तटबंदी नसावी असे ठरले. नंतर हा धक्का किंवा बाह्यकोट मुसलमानांनी पाहून टाकला. परंतु पोर्तुगीज नोंदीनुसार अगदी शेवटच्या उत्तर टोकावर असलेला लहान लाकडी शिश्चन क्रुस मुसलमान सैनिक कापू शकले नाहीत. किवा त्यांचे हत्ती त्यास तुडवू शकले नाहीत. मुर्तझा निजामशहा (१५६५-१५८८) याने पोर्तुगिजांवर चाल करून चौल किल्ल्यास वेढा घातला होता. निजामशाही अधिकारी व पोर्तुगिजांत पत्त्रव्यवहार सुरू झाल्याने मुर्तझा निजामशहाने तो बेढा उठविला. मुर्तझा निझामशहा नंतर मीरान हुसेनशहा हा अल्पकाळ गादीवर राहिला.
      कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८ वरील तळटिप क्र. ३. जेमेली कॅरेरी (Gemelli Careri) आपल्या चचिल चौथा या पुस्तकात पृ. २०० वर लिहितो की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगिजांना ३०० पशियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने जणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. भारतात दुर्लभ असलेले हे घोडे त्यास आदिलखानाशी लढाईत वापरावयाचे होते.
         कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८. परंतु बुरहाने मासीर (लेखक सय्यद अली) नुसार हुसेन निजामशहाने सैन्य व तोफखाना रेवदंड्यास पाठविला. पोर्तुगिजांना ही बातमी लागताच त्यांनी आपला वकील निजामशहाकडे पाठविला आणि आपल्या कृत्यकर्माची क्षमा मागितली. यापुढे अशी चूक होणार नाही असे कळविले. पोर्तुगिजांचा निरोप मिळाल्यावर निजामशहाने आपले सैन्य परत. बोलविले.
त्यानंतर गादीवर आलेला दुसरा बुरहान निजामशहा (१५९०-१५९४) याचा पोर्तुगिजांवर राग होता. त्यावेळी अहमदनगरचा तोफखाना रुपीखानाच्या ताब्यात होता. दुसऱ्या बुरहान निजामशहाने सर्व जड तोफखाना रेवदंडचास हलविला. बुरहान निजामशहा पोर्तुगिजांशी लढाईच्या मोहिमेवर असताना १५९२ मध्ये कोरलईच्या टेकडीवर बुरहान दुर्ग नामक अभूतपूर्व भक्कम असा पूर्ण किल्ला बांधला व तेथून त्याने खाडीपलीकडील रेवदंडा किल्ल्याची बरीच तटबंदी उध्वस्त केली. दिनांक ४ सप्टेंबर १५९४ रोजी पोर्तुगिजांना चौल-रेवदंडा भागातील अहमदनगर राजवटीच्या ताब्यातील कोरलई बाजार उध्वस्त करून तिचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वसई व साष्टीवरून मोठी कुमक मिळाली. चौलचा एक पोर्तुगीज कप्तान १,५०० पोर्तुगीज व बच्पुच स्थानिक विश्वासू सैनिकांसह (एकूण ४,००० सैनिक) लहान नावांनी खाडी पार करून कोरलई किनाऱ्यावर उतरला. त्यावेळी किल्ल्याबाहेर ताजस्तान आणि अण्णेराव हे आपल्या फौजेसह तयार होते. त्यांच्यावर पहिला हल्ला होताच त्यांनी किल्ल्याकडे पळ काढला. दिनांक १३ सप्टेंबर १५९४ च्या रात्री झालेल्या चकमकीत मुसलमानांना कोरलई दुर्गाच्या बाह्यकोटापर्यंत खदेडून लावले. यात अहमदनगर सेनेचा साफ पराभव झाला. नेर्नच्या माहितीनुसार कोटाच्या दरवाजात हत्ती मरून पडल्यामुळे तो बंद झाला. वरून पडणारे दुर्गरक्षकही पोर्तुगिजांची वाट अडवत होते. यातून मार्ग काढून पोर्तुगिजांना प्रवेश करावा लागला. या लढाईत पोर्तुगिजांकडून अँटोनिओ नावाचा फान्सिस्कन पाद्रीही लढत होता." तो ठार झाल्यामुळे रागावलेल्या पोर्तुगिजांनी दुसऱ्या दरवाजापर्यंत धडक मारली. या दरवाजातही घोडा मरून पडल्याने आतील दुर्गरक्षकांना तो बंद करता आला नाही. पोर्तुगिजांनी दुर्गाच्या अंतर्भागात प्रवेश "केला आणि कत्तलीस सुरुवात केली. या गोंधळामुळे किल्ल्यातील सरदार फरहादखान, १९ असदखान आणि इतर अमीर झोपेतून जागे झाले. परंतु प्रतिकाराची कोणतीच तयारी त्यांना करता आली नाही. या लढाईत १,००० मुसलमान मारले गेले तर पोर्तुगिजांचे केवळ २१ सैनिक कामी आले व ५० जखमी झाले. त्याशिवाय पोर्तुगिजांना भरपूर दारूगोळा, घोडे, पाच हत्ती, ७७ तोफा आणि लहानसहान शस्त्रांचे कोठार हाती लागले. फरहादखान,
त्याची बायको व मुलगी कैद झाली. त्याच्या बायकोस दंड भरून सोडविण्यात आले. परंतु फरहादखान व त्याच्या मुलीस बाटवून चिश्चन करण्यात आले. तथापि जखमी फरहादखान काही दिवसातच मरण पावला. चौलला त्याचे मोठ्या इतमानाने दफन करण्यात आले. या किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगिजांजवळ पुरेसे सेनादल नसल्यामुळे त्यांनी उत्तरेकडील सांता क्रूज बातेरीचा भाग व टेकडीच्या माथ्यावरील तटबंदी (बालेकिल्ला) सोडून बाकीचा भाग उध्वस्त केला.
        पोर्तुगिजांनी किल्ला उध्वस्त करण्याआधी दो फुटो याने किल्ल्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे." " हा किल्ला फारच भव्य असून त्यावर फक्त जमिनीच्याच बाजूने हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र व खाडी यांच्यामधून एक खंदक खणलेला असून फक्त त्याच्यावरील पुलावरूनच आत प्रवेश करता येतो. हा पूल उडवून टाकला की, किल्ला अगदी अभेद्य आहे. खंदकाच्या आत भक्कम भित बांधलेली होती. या भितीत दोन मोठ्या बुरुजांतून असलेल्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एक मोठा ब्राँझचा सिह हाँ.जा. त्याखाली 'माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही' (None passes me but fights) अशी अक्षरे आहेत.
  किल्ल्याच्या माथ्यावर मध्यवर्ती बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरूड पक्षी काढलेला आहे. तेथे 'माझ्या तावडीतून माशांबेरीज कुणाचीच सुटका नाही' (None passes me but flies) असे दर्पोक्तियुक्त वचन कोरलेले ." अधिक माहिती १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये आहे. देण्यात आलेली असल्यामुळे तिची येथे पुनरावृत्ती केलेली नाही.
    ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीने चौलबरोबरच कोरलई घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने तळागडचा हवालदार सुभानजी माणकर यास कोरलईवर पाठवून किल्ल्याची कोंडी केली. सन १७३९ मध्ये चिमाजी व पोर्तुगीज यांच्यात वसईचा तह झाल्यावर पहिला बाजीराव व पोर्तुगीज अधिकारी इंचवर्ड यांची १४ जानेवारी १७४० ला भेट झाली. त्यांच्या वाटाघाटीनंतर ७ सप्टेंबर १७४० ला झालेल्या तहानुसार नोव्हेंबर १७४० ला चौल व कोरलई किल्ले पोर्तुगिजांकडून मराठघांना मिळाले." कोरलईचा महत्त्वाचा जलदुर्ग पेशव्यांच्या हाती येताच त्याचा तावा कुलाबकर आंगरेकडे देण्यात आला. आंगरेने तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलली. सन १८१८ मध्ये पेशवाई समाप्त झाल्यावर इतर किल्ल्यांबरोबरच कोरलई दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला. दिनांक ६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण चहले.
६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण जडले. या किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी ८६१.९७ मी. आणि दक्षिणोत्तर रुंदी २७.१२ मी. व तटभितीची उंची १.५२ मी. आहे. किल्ल्यावरून मारा करण्यासाठी तभितीला गोळी-बारासाठी ३०५ जंगी आहेत. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे असून त्यापैकी चार बाहेरच्या तटबंदीस व सात आतील बाजूस आहेत. मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस असून अजूनही सुस्थितीत आहे. त्यावर पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहे. किल्ल्याच्या पश्चिम टोकाजवळ घोड्यांची पागा सुस्थितीत आहे. उत्तर टोकास बांधलेला धक्का अजून शाबूत आहे. येथे सपाट मैदान आहे. येथील बुरुजावर तीन तोफा आहेत. थोडे वर चढल्यावर पहिला दोन बुरुजांचा दरवाजा व त्यानंतर दुसरा दोन बुरुजांचा दरवाजा लागतो. त्यावर S. FRAXAVER अशी अक्षरे आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर तिसरा मोठा दरवाजा लागतो. त्याच्या कमानीची लांबी सुमारे ६.७१ मी. असून त्यातून पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण किल्ल्याचा मध्यभाग येतो. हा बालेकिल्ल्याचा भाग असून येथील सांत बुरुजांपैकी पाच बुरुजांना सॅम थिओगो,
सॅम फान्सिस्को झेविअर, सॅम पेद्रो, सॅम इग्नॅसिओ आणि सॅम फिलिप या पोर्तुगीज संतांची नावे होती. मराठ्चांनी किल्ला काबीज केल्यानंतर १७४० मध्ये बुरुजांची नावे पुढीलप्रमाणे बदलली:- पुसत्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुरजी, राम व पान. सध्या एकाही नावाची खूण दिसत नाही. यानंतर लागणाऱ्या चौथ्या दरवाजाच्या समोर एक खड्डा असून त्याच्या बांधिव दगडी भिती दिसतात. तेथे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधिव हौद असावा. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. डाव्या बाजूला पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष असावेत. पाण्याच्या टाक्याजवळ महादेवाचे अलीकडच्या काळातील मंदिर आहे. टाक्यातील पाणी दुर्गाच्या खाली दक्षिण बाजूला असलेल्या दीपस्तंभामध्ये नेले आहे.
       पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्यानंतर किल्ल्याचे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेख भग्नावस्थेत पडलेला आहे. दक्षिणेकडे पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष आहेत. यानंतर चॅपलची इमारत लागते. इमारतीचा पुढील भाग ढासळलेला आहे. छत्त मात्र अजून शिल्लक आहे. चॅपलच्या पाठीमागे राजवाडयाच्या धाटणीची इमारत लागते. या मुस्लिम वास्तुशैलीच्या इमारतीला एक मजला आहे. इमारतीचे दगडी बांधकाम अजून सुस्थितीत आहे. ही इमारत मुसलमानी अमदानीत बांधकाम केलेल्या वास्तूवर पोर्तुगिजांनी बांधली असावी. इमारतीच्या पाठीमागे उजव्या तटबंदीच्या आतील बाजूस कमानीचे अर्धवट अवशेष आहळून येतात, तसेच कमानीच्या समोर मोठ्या दगडी चौयऱ्याच्या पूर्व बाजूच्या भितीचे अवशेष दिसतात. यावरून हे अनुमान करता येते. ही इमारत बहुधा सेनापतीच्या निवासासाठी असावी. इमारतीच्या पाठीमागे बरीच मोकळी जागा आहे. येथे उजव्या (दक्षिण) वाजूला मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदिरे मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर वांधलेली आहेत. त्यात गणेश मंदिर (३.६४ x ४.८६ मी.), मांजरादेवी (२१.२८ ९.२२ मी.) व वेदिकादेवी मंदिर (६.३८ ४ ४.८६ मी.) यांचा समावेश आहे. परंतु एकाही मंदिरात सध्या मूर्ती  नाही.
        मंदिराच्या भितीचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकाला अजून-सुद्धा भक्कम तटबंदी असून त्याला दोन बुरूज आहेत. तटबंदीच्या खाली दक्षिणेकडील जमिनीच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तेथे खंदक असून त्यावर लाकडी पूल होता. सध्या पूल अस्तित्वात नाही.
कोरलई किल्ल्यावर तीन पोर्तुगीज शिलालेख आहेत. पैकी फक्त किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दरवाजावर खालीलप्रमाणे आठ ओळींचा शिलालेख वाचता येतो.
(1) ESTE CASTELO MANDO V. FAZER
(2) OVIZORI. DA INDIA DO FELIPHE
(3) MZSE DNOV BRODE 1646 ANOS 9
(4) SENDOCAPCTAO DE CHAVL. FE
(5) RNAO DE MIRANDA E RIQEAS DA
(6) CABOV SENE MAIO DE 1880 SENDO
(7) CAPITAO DE SAPRACACRIS TOVAO
(8) DABREV DAZEVEDO.
११० कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३३२, तळटिप.
११८ गॅझेटिअर कार्यालयाने फेब्रुवारी १९९२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार.
सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये (पृ. ३३१-३२) त्याचा खालील-प्रमाणे इंग्रजी अनुवाद केलेला आहे :-

"This castle was commanded to be built by the Viceroy of India D. Fellipe Mascarenhas in November of the year 1646, Fernao Miranda Henriques being Captain of Chaul, and was finished in May 1680, Christovao d Abreu, d' Azevedo being Captain of this fort. "
या शिलालेखावर मध्यभागी क्रूसाचे चिन्ह, ढाल व पोर्तुगीज तारे (quines) आहेत. बाकी दोन शिलालेखांपैकी एक प्रमुख प्रवेशद्वारावर व दुसरा किल्ल्यातील चॅपलच्या पुजास्थानाचे वर आहे. हे दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत.























संभाजीराजा छत्रपती होऊन सिंहासनाधिष्ट होत नाही तोच औरंगजेब बादशहा सर्व सामर्थ्यानिशी चालून आला. गत तिन वर्षांपासून औरंगजेब बादशहा आणि छत्रपती संभाजीराजा कल्यानच्या रणात अखंड झुंजत होते. मराठा वीर मरत होते पण हटत नव्हते. वसईहून कल्यानच्या रणांगनात मोगलांना रसद पुरवठा करून पोर्तुगीजांनी मात्र संभाजी राजांना क्रोधित केले. दगलबाज पोर्तुगीजांनी ऐन वख्ताला पाठीत वार केला होता. या रसद पुरवठ्याच्या मोबदल्यात बादशहा कडून संभाजीराजांचा काही किनाऱ्याचा भाग मिळवा याकरीता पोर्तुगीज व्हाईसराय पत्रामध्ये बादशहास चक्क भिक मागू लागला.
मात्र झाले विपरीत, तिन वर्षे झुंजूनही मोगलांना कल्यानच्या रणांगनात यश मिळवता आले नाही. बादशहाने अखेर सन १६८३ च्या एप्रिल महिन्यात कल्यानातून आपले सैन्य व खाडीतून आपले आरमार परत बोलावले. बादशहा परास्त केला, आता वेळ होती दगलबाज पोर्तुगीजांना शासन करण्याची. आणि शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले..!
आगीत तेल ओतणारे या आगीपासून दूर राहू म्हणतात तरी कसे… ही आग आता त्यांची राख केल्याशिवाय राहणार नव्हती.! कारण ही गाठ कुन्या सुलतानाशी नव्हती रे बाबा..!
मुंबईच्या खालच्या अंगास किनाऱ्यावरील चौल, रेवदंडा व कोरलाई या पोर्तुगीज किल्ल्यावर संभाजीराजांनी खुद्द आक्रमन केले. जेधे शकावली म्हणते-
शके १६०५ रूधिरोदगारी संवछरे जेष्ठ वद्य ११ संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंगीयासी बिघाड केला, रेवदंडीयासी वेढा घातला ।।
अर्थात खुद्द संभाजीराजे स्वार होऊन रेवदंड्यावर चालून गेले. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण सुरूवातीस पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. पश्चात मराठ्यांनी रेवदंड्याला घट्ट वेढा घातला.पेशवा निळोपंतही या मोहीमेत होता.
२ ऑगस्ट १६८३ रोजी २००० स्वार व ६००० पायदळ चौलावरही चालून गेले. रेवदंडा व चौलासोबतच मराठ्यांनी कोरलाई किल्ल्यावर हल्ला चढविला. तटबंदीवर तोफा धडाडू लागल्या. माद्रि-द-देऊश नावाचे चर्चात बसून पाद्री धावा करू लागले. सागराच्या बाजूस किल्ल्यावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्याने मराठे चढू लागले. किल्ल्यातून कॅप्टन तोफा चालवून प्रतिकार करू लागला. याच सुमारास निळोपंत पेशवा वसई च्या कोटावर चालून गेला. अशाप्रकारे उत्तर फिरंगानाचा फास आवळला जाऊ लागला. उत्तर फिरंगानाचा फास सुटावा म्हणून घाबरून व्हाईसरायने गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घालण्याची आगळीक केली.
आणि पेशवा निळोपंतावर मोहीम सोपवून संभाजीराजे खुद्द फोंड्याकडे निघून गेले. फोंड्याचे युद्ध जिंकून संभाजीराजे खुद्द गोव्यावर चालून गेले. आणि काही महिन्यात उत्तर व दक्षिन फिरंगान संभाजीराजांच्या घोड्यांच्या टाचेखाली आला. स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांच्या अवस्थेचे आपल्या पत्रातून वर्णन करतांना इंग्रज म्हणतात की-
फोंड्यावर जो पोर्तुगीजांचा संपूर्णत: पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचा चढेलपणाचा पारा खूपच खाली आला. उत्तरेकडेही त्यांची धूळधान उडाल्याने त्यांची शौर्याची घमेंड आणि क्रूर नाठाळ व्रूत्ती बरीच सुधारेल. राजांशी युद्ध करताना मनुष्य व संपत्ती बलाचा त्यांनी विचार केला नाही. उतावळेपणाच्या परिणामाची जाणीव त्यांना झाली आहे आणि त्यांची मस्ती पूर्णपणे जिरली आहे..(संदर्भ-शौर्यशंभू३३३)
लवकरच व्हाईसरायने तहाची याचना केली. अशाप्रकारे सन १५०० पासून स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांना या मराठी राजाने आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पश्चात चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला व पोर्तुगीजांना हळूहळू वसई आदि मुलूख कायमचा सोडावा लागला.
२५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. मराठ्यांनंतर १८०६ मध्ये इंग्रजांनी यांचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हे किल्ले जिंकले. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
असो,






कोर्लई

गिरीदुर्ग रायगड डोंगररांग नाही

🏔️

श्रेणी नुसार स्तर

मध्यम

📏

समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)

272

🏰

किल्ल्याचा प्रकार

गिरीदुर्ग

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्‍याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ८ किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. कोर्लईपर्यंत बसने जाता येते. इथून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे‘ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे व एका बाजूला जमिन आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्‍हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत…:च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्‍या बुर्‍हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्‍या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.

महत्त्वाची ठिकाणे

लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. इथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला दिसतो. चिंचोळ्या डोंगरमाथ्यामुळे किल्ल्याची रूंदी कमी आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे व डावीकडे प्रवेशव्दारे दिसतात. ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर २ तोफा दिसतात. पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते, याच्या माथ्यावर ४ तोफा पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला पांढर्‍या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. त्याच्या समोर पाण्याची टाकी आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून टाकी वरून बांधून काढलेली आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

येथून पुढे गेल्यावर एक प्रवेशव्दार आहे. त्याच्या माथ्यावर पोर्तुगलचा कोट ऑफ़ आर्म आणि त्याखाली शिलालेख कोरलेला दगड बसवलेला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण उध्वस्त चर्च समोर येतो. त्या़च्या जवळच एका वाड्याचे जोत आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर एक शिलालेख पडलेला आहे. प्रवेशद्वाराच्या रचनेवरून असे वाटते की, पूर्वीच्या काळी हेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असावे. चर्च वरुन पुढे गेल्यावर अजून एक प्रवेशद्वार आहे. पुढे अष्टकोनी बुरुज आहे. या बुरुजावरुन वाट दक्षिण टोका वरील बुरुजांकडे जाते. या बुरुजांवर तोफा आहेत. बुरुजाच्या खाली खंदक खोदुन किल्ला संरक्षित केलेला आहे.

किल्ल्याचा दक्षिण टोका वरील बुरुज पाहुन परत लाईट हाऊस कडून येणार्‍या वाटेवर असलेल्या प्रवेशद्वाराजवळ येऊन आता डाव्या बाजूची २ प्रवेशद्वारे ऒलांडून गेल्यावर उतार चालू होतो. समोर अर्धगोलाकार पसरलेली तटबंदी व त्यामागे पसरलेला अथांग सागर यांचे दर्शन होते. या तटबंदीत पूर्वेला एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर समुद्रावर एक जेटी बांधलेली आहे. पश्चिमेला तटबंदीत एक दरवाजा आहे. उत्तर टोकाला एक बुरुज आहे. यावर ४ तोफा व क्रुस आहे. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रूज म्हणतात. हे सर्व पाहून पुन्हा लाईट हाऊस पाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.

कसे पोहोचावे

मुरुड जंजिर्‍याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते अथवा आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने जाऊन २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो . गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो.
१) अलिबागहून मुरुड जंजिर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो , तर डावीकडचा रस्ता बिर्ला मंदिराकडे (गणपती मंदिर) जातो. उजवीकडच्या रस्त्याने कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारा व किल्ला यांच्या मधून कच्चा रस्ता लाईट हाऊस पर्यंत जातो. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण १० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
२) कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरुन डोंगर चढून गेल्यावर एक खंदक लागतो. खंदक पार केल्यावर आपण कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास ४० मिनीटे लागतात.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ कोर्लई गावातून चालत किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून जाण्यास १५ मिनीटे लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, रेवदंडा किंवा मुरूडला राहण्याची सोय होऊ शकते.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत…: करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पाण्याची टाकी आहे. पाणी काढण्यासाठी आपल्या बरोबर दोर आणि बादली घेऊन जावी.
 
 
 
 
 
 
 
 

कोरलई | Durgbharari


प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २९५ फुट

श्रेणी : सोपी

अलिबागच्या दक्षिणेस २४ कि.मी.वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. रेवदंडयाहून कुंडलिका खाडीवरचा पूल पार करून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. कोर्लईचा किल्ला कुलाबा व मुरुडच्या मधे कुंडलिका नदीच्या मुखापाशी बांधला आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या लहानशा टेकाडावर तो बांधला असून त्याची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. संपुर्ण किल्ला आठ भागात विभागला असुन त्याला ११ दरवाजे आहेत. दक्षिणेकडे जमीनीच्या एका अरुंद पट्टीने तो मुख्य भूमीला जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील असा गाडीमार्ग कोरलाई गावातून किल्ल्यापर्यत जातो. निमुळत्या टेकडीवर असलेल्या कोर्लई किल्ल्याची लांबी १ कि.मी. असून रुंदी साधारण १०० फुट आहे व तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. ३०० फुट उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. दक्षिण टोकाकडील कोरलाई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडे तोंड असलेल्या दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. यातील समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सेंट दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सेंट फ्रांसिस्को. बालेकिल्ल्याच्या या भागात काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठार आहे तर पश्चिम आणि उत्तर तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन चारही बाजूने तटबंदीने वेढलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या दीपगृहाला पाणी पुरवठा केला जातो. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृष्य उत्तमपैकी दिसते. इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरु केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की निजामाने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यापैकी एक. इथे एक मजबूत कोट आहे. १५९४ साली पहिला बुऱ्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये. आणि पोर्तुगीझांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसऱ्या बुऱ्हाण निजमाने मात्र पोर्तुगीझांणा न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीझांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली. आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीझ गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला. झालेल्या युद्धात निजामशाही सैन्य पराभूत झाले व १३ सप्टेंबर इ.स. १५९४ रोजी किल्ला पोर्तुगिजांकडे गेला. मात्र गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. सन १६०२ मधील एका साधनात आठ हजार लोक व सत्तर तोफा असलेला भक्कम किल्ला असा उल्लेख सापडतो पण हि अतिशयोक्ती असावी कारण इतक्या लहान किल्ल्यावर इतकी माणसे राहणे शक्य नाही व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही आढळत नाही. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने सुभानजी मानकरला किल्ल्यावर हल्ला करायला पाठवले. त्याने गडाला वेढा घातला व तो इतका आवळला की पोर्तुगिजांना शरणागती घ्यावी लागली. त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला तोफा तयार करण्यासाठी वापरला. मराठ्यांनी सगळ्या बुरूजांना नवीन नावे दिली. सॅन थियागोला पुस्ती बुरूज, सॅन फ्रांसिस्को झेवियरला गणेश बुरूज, सॅन पेड्रोला पश्चिम बुरुज, सॅन इग्नाशियोला ला देवी बुरूज व सॅन फिल्लिपला चौबुरजी बुरूज अशी नावे मिळाली. उरलेल्या दोघांना राम बुरुज व पाण बुरुज अशी नावे दिली गेली.
 
 
 

 

कोरकई। कोर्लई

कुंडलिकेने सिंधुसागराला अलिंगन दिले, त्या प्रितिसंगमावरचा हा तीर्योपाध्यायच आहे. पश्चिमेच्या डोंगराळा नांगराच्या काळासाररी जी एक तिरकस सोंड फुटकी आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाळी आहे. (य) बाजुळा लोच एक डोक्यात भरत श्रीमतीने किंवा डामडौळाने नव्हे तर निसंग-निराकार वृत्तीने. त्याबर झांडाची हिरवळ नाही कि दगडांची अडगळ नाही भगवी घरा पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला ज्ञानभिसूच. कोर्लईच्या अंगाला एक कोळीवाडा बसकेका आहे.. किल्ल्यावर जायच तर त्यातूनच जाव लागत. किल्ल्याच्या फोन पावध्याशी आहे बाबा स्वामीची समाधी तिथूनच गडाचा चढाव सुरू  होतो - अवधी ९० मी | २७१ फूट  उंचीची टेकडी- किल्ल्याच्या पूगंगाळा कुंडलिकेच तोंड केलेले प्रवेशद्वार आहे, दक्षिणोत्तर बांधलेल्या या जळदुर्गाची बोली भरते एक हजार मीटर तर रूंदी आहे. अवधी तीस मीटर, दक्षिणेकडून मुख्य भूमीचे बोट धरून राहिलेल्या या किनारी दुर्गाचा उरलेल्या तीनही बाजुना सिंधू -सागराच्या याव्याच्या लाटा आदळताल- याला पूर्वी चौळचा खडक म्हणत. इ.स. १५२१ मध्ये दियो को पिश दि सिकेर पोर्तुगीज गर्मरने अह‌मदन -गरच्या बुताण निजामशहाकडे येथे तहबंदी करण्याची अनुमती मागितली. प्रथ या न्म मजबूत धक्का उत्तर टोकाळा ते मग खडकाच्या सरजक सपाटीवर उभारली मुसाची बातेरी किंवा सांतानुस म्हणजे भाची, ३ मीटर उंचीच्या घथा बंदिस्त भागात धकाचाच्या ऐन तोंडाशी आहे अन् पश्चिमेस आहे, दारुगोळ्याचे कोगर, वश्चिम व उत्तर अंगाला आग ओकणान्या तोफा स्थापन केन्या होत्या. इंधून पूर्वाभिमुख झाल की फोर्ताम रियाळची चढण सुरू होते या या चढणीवर मारगिरीच्या बुरुजाने आपल स्वागत होत- खग पुढे आहे आवळ्या जवळ्या बुरुजांची दुक्कळ, समुद्राकडचा पश्चिम बुरुज त्याच नाव होता सा दिव 'दियोगु अन् खाडीकडचा पूर्व बुरूज, त्याच नाव होत साँ कासीरकु.,
सात दरवाजे ओनार्डीत गेल की आपण बनिकिल्ल्याच्या माध्याशी येतो-जेमतेम १० भी, केद अब शंभर मीटर लांबीचा हा वरचा बाले किल्ला. इथल्या दोन चुनेगच्ची बुरुजावर जायला आतून जिना आहे. इथल्या तोफा शत्रुवर नाम्ली ...चा पाऊस पाडीत पाव्याच्या साठवणी -चा बोधीत हौद आणि माहि द देऊस च उत्तराभिमुख चर्च आता मोडकळीस आळ ओहे.
किल्ल्याच्या मुरम प्रवेशदारापाशी एक सिंह अळंकृत केलेला आहे- 'येथे कढल्याशिवाय प्रवेश नाही' अशी दर्पों क्ती कोरून ठेवली आहे. त्याच्या खाळीच येथे पोहचण्यापूर्वी वरचा मार्ग पत्करा - क ळागळ' अस मोठ्या मर्दाने किछन ठेवळ आहे.
१५९४ साळी मान इज्य दुवा एक मजेशी र प्रकरण घडळ - अहमदनगरचा बुन्हाण -शहा मरण पावका अन नंतर निर्माण आलेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा देव्यासाणि पोर्तुगीजांनी इथ किल्ला उभारख्याची आपली मागणी पुढे रेटली. कारण लोवर त्तिय कवत मजबूत धवका अन् मुसाची बातेरी एवढच काय ते उभारून झाव. होत, हुसेन निजामशहाने यालीक धोका ओकरतळा. अन आपल्या मुळखात दुर्ग उभारावा अस आपणच बळकट उभारून रेखदेड्याठा त्यान ठरवल.. इथे किल्ला चांगा शह देता येईल, अन किरग्यांच्या हालचालीका चांगला पायबंध घाळला. येर्दक हे त्याला माहित होत. त्यान पाठतिळे -ज्या मंडळीनी तिथ बोधाकामाला सुरवात केळी. तेव्हा पोर्तुगीजांनी हे होऊ व्यायच निर्णय घेतला. काही काळ झटापटी झाल्यानंतर दोघांनी पड खाव्याच ठरविले, निजामशहाने कोई किल्ला बांधू पोईनीजानी समुद्राव नाही असा नये. अन त्या बदल्यात निजाम शाहाने उपद्रव  देऊ नये या अटीवर ही तडजोड झाली. दरम्यान झाळेक बोधकाम मोडून सकाळ पुढे दुसरा बुहाण निजामशहा गादीवर आळा अन् त्यान इथ बळकट किल्ला फिरंग्यां च्या विरोधाला न जुमानता उभारला फत्तेरखान सारख्या उत्साही सरदाराका तेथे नेमून टाकळ
एके दिवशी या कहतेरनानन रेवदंड्याच्या फिरंगी कोटावर तोफा ठामल्या. अपूरी तयारी पाहूनी त्यांनी वसईत असलेल्या दो अल्वारू अज्ञान्वेस ट्या सरदाराका कुमक घेऊन बोळावल, दीड हजार सैन्य घेऊन में हारीत धावून आळा चौळचा सुभेदार कॅप्टन काफिलारने मग कोळईवरच हल्ला चढवळा. गडाखाळच्या वेळेत घुसळेल्या फिरंग्यावर फत्तेखानच सैन्य घसरळ, त्यांचा एक हत्ती जायबंदी होऊन तिथल्या खंदकात पडळा, तो तमाशा पहायला निजामशानी सैनिक इकले. ते बन्यात मोकळया दारातून बरेच पोर्तुगीज सैनिक किल्या तच घुसळे त्यात अंतेनियु नावाचा बादीही आत घुसळा. पण नेमका लोच भारला गेळा- आता पोर्तुगीज चिरडीस आले. व त्यांनी आणखी जोरात चढाई केली. -शस्म धरून बाळेकिल्ल्यात खुछ कटोखाल होता. पण त्याचा प्रतिकार अपूरा पडला. जखमी होऊन तो फिरंग्याच्या हाती सापडला. त्याची बायको मुस‌लमानांनी पैसे चारून सोडदळी ख्रिश्चन केलेळा फतेखान अन्या -वधीतच भेगा. पण आई आणि मुलगी नाटकी त्ती बाटलीच पण बाटवून हे बरा इतक अनपेक्षित होत तितकच ले कोळईच्या संरक्षणाची नवी जबाबदारी टाकणार होत- हो आपल्या आवाक्या बाहेरच आहे हे उमगले मग बाळे किल्ला सोडून उरलेळा फिरंग्यानी ल्या किल्ला पाडून टाकळा-
 पुढे १६८३ मधे शंभु छ भपलीनी हा किन्ला आपल्या ताब्यात आणण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला, मग १७३९ मध्ये फिंख्याच्या मुळावर उठलेल्या खरर चिमाजी अप्पाने तळगडाचा हवालार सुभानजी माणकराळा कोर्लईवर पाठविले ते मार्च महिन्यातः त्यान किल्ल्याभोवती करकचून वेळा हल्ल्याचा आपल्यादर आवळला. अन कुठल्याच दिग्य वरीणाम होऊ दिला नाही. वर्षअखेरीस किल्ला ताब्यात आला. पाच दुर्गावर मराठ्यांनी तोफा बनविव्याचा कारखाना काढला. याच सुमारास शेजारची रेवदंड्याची गढी  मानाजी  आंग्याने जिंकली कोळर्डवरच्या  बांधकामात मराठ्यांनी काही बदल केले नाहीत. त्यामुळे इथळी पोर्तुगीज धारणी कायम राहिली. पण इथल्या बुरुजांची नाव मात्र मराठयांनी बवळली साम थिआगो बुरुजाच नाव झाळ पुस्ती बुरुज, सास फ्रान्सस्को झेवियर बुरुज झाका गणेश बुरुज, साम पेड्रो बनळा पश्चिम बुरुज, साम इग्नाशियोळा नाव मिळाळ देवी बुरुज साम फिलीपचा झाळा चौबुरूजी. उरलेल्या दोन बुरुजांना राम बुरुज अनू पाण बुरुज अशी नाव निधी हो कुटो याने १६०२ साली के किल्ल्या - च्या मजबुतीच वर्णन केलेळ आढळते. ७० तोळा , बळकट बांधणी अनू ८000 शिलकी असणारा हा किल्ला म्हणजे पोर्तुगी जांचे एक बळस्थान होते


कोर्लई किल्ला

पुलावरून कुंडलिकेची खाडी ओलांडायची आणि उजवीकडे असलेल्या कोर्लई किल्ल्याकडे मोहरा वळवायचा. रेवदंडा ते कोर्लई पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या पायथ्याशीच कोर्लई गाव आहे. शेजारीच कोळीवाडा आहे. कोळीवाड्यातून किल्ल्याकडे जायचं. वाटेत बाबा स्वामींची समाधी आहे. तिथून चढ सुरू होतो. किल्ल्याचा डोंगर एखाद्या भूशिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. मुख्य किल्ला दक्षिणोत्तर एक हजार फूट आणि पूर्व-पश्चिम जेमतेम शंभर फूट एवढा विस्तारलेला आहे. तीन बाजूंनी पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला आहे. उंचीसुद्धा जेमतेम २७० फूट म्हणजे साधारणपणे मुंबईच्या नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीएवढी. किल्ल्याचं प्रवेशद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. आत शिरलं की गोड्या पाण्याची विहीर लागते. उत्तरेकडील सखल भागात 'क्रूसाची बातेरी' नावाची माची आहे. समुद्रपातळीपासून दहा फूट उंचीवर भिंत उभारून ही माची बांधलेली आहे. पश्चिमेकडे दारूचं कोठार आहे. या सगळ्या गोष्टींवर नजर फिरवून मुख्य किल्ल्याच्या म्हणजे बालेकिल्ल्याच्या चढणीला लागायचं. प्रथम मारगिरीचा बुरूज लागतो. त्यानंतर पूर्व-पश्चिम दिशेस असलेले दोन बुरूज लागतात. या बुरुजांच्या मधून पुढे गेलं की सात दरवाजे ओलांडून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचायचं. जेमतेम २०० × २५ फूट मापाचा माथा आहे हा. वर पाण्याचा एक बांधीव हौद आणि चर्चचे उ‌द्ध्वस्त अवशेष याव्यतिरिक्त काही शिल्लक नाही. हा किल्ला भटकायला दोन तास पुरतात.
या किल्ल्याच्या उभारणीपूर्वी या भागाला 'चौलचा खडक 'म्हणत. पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा बहामनी राज्यातून फुटून निघाला आणि त्याने या भागाचा ताबा घेतला. १५२१ मधे पोर्तुगिजांनी अहमदनगरच्या निजामशहाकडे या चौलच्या खडकावर माची बांधण्याची परवानगी मागितली. ती मिळताच आपली गलबतं उभी करण्यासाठी आधी मजबूत धक्का बांधला. नंतर क्रूसाची बातेरी ही माची उभारली. १५६४ मधे त्यांनी किल्ला रचण्याची परवानगी मागितली, पण निजामशहानं ती नाकारली. कालांतराने बुऱ्हाण नावाच्या. दुसऱ्या निजामशहानं या ठिकाणी स्वतःच भक्कम किल्ला बांधला. त्यावर तोफा चढवल्या आणि पोर्तुगिजांकडे असलेल्या रेवदंडा किल्ल्यावर तोफांचा मारा करून तो जिंकायचा प्रयत्न केला, पण झालं

 

 

 कोरलई किल्ला -

     कोरलई किल्ला व गाव हे एकेच ठिकाणी आहेत. हा किल्ला डोंगरी असून, तो रेवदंड्याच्या दक्षिणेस सुमारे १० मैलांवर रेवदंड्याच्या किंवा रोह्याच्या खाडीच्या दक्षिण तीरावर आहे. त्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी आहे. येथे ख्रिस्ती लोकांचे एक देवालय आहे व डोंगराच्या खाली कोरलई गाव आहे. या गावाचे वरचा गाव व खालचा गाव असे दोन भाग आहेत. वरच्या गावात ब्राह्मणांची पाच-सहा व कुणब्यांची चार-पाच अशी घरे आहेत व खालच्या गावात कोळी, आग्री व किरिस्ताव लोकांची बरीच घरे आहेत. कोरलई टेकडी २७१ फूट उंच असून, माथ्यापासून खालच्या सपाट प्रदेशापर्यंत तिला तट बांधलेला आहे. पुढच्या अंगास खडक असून, त्यावर एक कोट बांधलेला आहे. मुख्य किल्ला व हा कोट यांच्यामध्ये तीन आडव्या भिंती आहेत. या तटबंदीविषयी नैर्नसाहेब असे वर्णन करतो की, 'हिच्यासारखी बळकट तटबंदी ब्रिटिश सरकारच्या अमलाखालच्या सर्व कोकण प्रांतात दुसरी कोठेही नाही.'
  सोळाव्या शतकात युरोपियन लोक या ठिकाणाला 'चौलचा खडक' असे म्हणत असत. या ठिकाणी पूर्वी पोर्तुगीज व मुसलमान यांच्या भयंकर रक्तस्रावाच्या लढाया झाल्या. इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या बादशाहाने पोर्तुगीज लोकांना चौल येथे किल्ला बांधण्यास परवानगी दिली. त्या वेळी त्यांनी कोरलई टेकडीच्या उत्तरेकडील पायथ्याशी एक धक्का बांधला. पुढे खंबायत येथील गुजरातच्या आरमाराने कोरलईवर हल्ला केला; परंतु पोर्तुगीज लोकांनी चौलाहन कोरलईस मदत पाठविली व गुजरातच्या आरमाराचा पराभव करून त्यांन पिटाळून लावले. अहमदनगरचा बादशाहा बुन्हाण निजाम (इ.स. १५०८-१५५३) मरण पावल्यावर पुढे त्या राज्यात जो घोटाळा माजला. तेव्हा इ.स. १५५७ मध्ये 'कोरलई आम्हास पृथक तोडन द्या, असे पोर्तगी लोकांनी मुसलमानांशी बोलणे लाविले. अहमदनगरच्या बादशाहाने ते बोलणे अमान्य करून कोरलई ये मजबूत किल्ला बांधण्याकरता आपले स्वतःचे लोक पाठवून दिले. पोर्तुगीज लोकांनी त्यांना पुष्कळ अडथळा मुसलमानांच्या बऱ्याच झटापटी होऊन शेवटी असे ठरले की, मुसलमानांनी तेथे किया बांधू नये. यावेळी पोर्तुगीज लोकांनी पूर्वी जो मुसलमानांनी थोडासा भाग बांधला होता, तोही पाडून टाकला. या वेळची अशी एक चमत्कारिक दंतकथा सांगतात की, तट पाडला त्या वेळी तेथे पोर्तुगीज लोकांनी पूची एक लाकडी क्रूस पुरला होता, तो मात्र मुसलमानांच्या तरवारीने तुटेना व हत्ती लावले तरी त्यांच्याने तो केला. त्यांच्या व उपटून काढवेना.
    पुढे दुसरा बुऱ्हाण निजाम (इ.स. १५९०-१५९४) याने इ.स. १५९४ मध्ये तो किल्ला बांधला. किल्ल्याचे काम फारच बळकट केले होते. या वेळी किल्ला बांधण्याचे कारण असे झाले की, पोर्तुगीज व मुसलमान यांच्यामध्ये मोठी निकराची लढाई सुरू झाली होती व कोरलई येथून रेवदंड्याच्या तटबंदीवर मुसलमानांचा चांगला मारा लागू पडत असे. इ.स. १५९४च्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेस पोर्तुगीज सरदार अन्ब्राँचिस याने १५०० पोर्तुगीज व १५०० काळे लोक बरोबर घेऊन कोरलईच्या किल्ल्यावर हल्ला केला. या वेळी उभय पक्षांची फारच मोठी लढाई झाली. पोर्तुगीज लोकांनी अहमदनगरच्या बादशाहाचा सरदार फत्तेखान याला कैद केले व किल्ला सर केला. या सरदाराने मरताना ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. त्या वेळी त्याची बायको व मुलगी याही पोर्तुगीज लोकांच्या हाती सापडल्या. बायकोला तिच्या भावाबंदांनी पुष्कळ पैसे भरून सोडवून नेले. मुलीने मात्र ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तिला त्यांनी प्रथमतः गोव्यास पाठवून दिले व नंतर पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बेन येथे पाठवून दिले. या वेळी पोर्तुगीज लोकांना अतिशय लूट सापडली; परंतु किल्ल्याचे संरक्षण करण्यापुरती पोर्तुगीज लोकांजवळ शिबंदी नव्हती, म्हणून त्यांनी टेकडीच्या माथ्यावरील तटबंदी कायम ठेवून बाकीचा सर्व भाग पाडून टाकला व वर थोडीशी शिबंदी ठेवली.
     हा किल्ला पाडण्यापूर्वी डो कूटो याने इ.स. १६०२ मध्ये याचे असे वर्णन केले आहे की, या किल्ल्याइतका बळकट किल्ला सर्व पृथ्वीत विरळाच, असे म्हटले तरी चालेल. जमिनीकडच्या बाजूस मोठा खंदक असून, त्यावर घालता काढता येण्यासारखा एक लाकडी पूल आहे. या खंदकाच्या आतल्या बाजूस एक मोठी भक्कम व उंच अशी भिंत आहे. तिला दोन मोठे बुरूज असून, त्यांच्यामध्ये एक मोठा पितळेचा सिंह बसविला आहे. या सिंहावर 'माझ्याशी लढल्याशिवाय मी पुढे जाऊ देणार नाही', अशी अक्षरे खोदलेली आहेत. टेकडीच्या माथ्यावरील किल्ला अतिशय बळकट असून, त्यावर सर्वांत उंच ठिकाणी एक पितळेचा गरुड पक्षी बसविलेला आहे. या गरुड पक्ष्यावर 'एकदम पळ काढल्याशिवाय माझे जवळून जाण्याची कोणाची छाती नाही,' अशा अर्थाचा लेख लिहिलेला आहे. किल्ल्यात बरीच घरे आहेत. किल्ल्याच्या रक्षणार्थ मोठमोठ्या ७० तोफा व कायमची शिबंदी ७००० आहे. फक्त मूर लोक मात्र किल्ल्याच्या बाहेर राहतात. किल्ल्याला लागूनच बाजाराची जागा आहे व तेथे ७००० लोकांची वस्ती आहे, येथे व्यापार फार मोठा चालतो. यानंतर हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी पुन्हा एकवार दुरुस्त केला. इ.स. १७२८ मध्ये या किल्ल्याचे असे वर्णन केलेले आहे की, 'यावर १३० पहारेकरी लोक आहेत.' या किल्ल्याची हल्लीची लांबी २८२८ फूट व रुंदी ८९ फूट आहे. किल्ल्यात जाण्याला एकंदर ११ दरवाजे आहेत. त्यापैकी ४ बाहेर व ७ आत आहेत. पूर्वेकडील तट शिवाय कबाकीचा भाग अद्यापि कायम आहे. किल्ल्याला एकंदर ७ बुरुज असून, प्रत्येकाला ७ पोर्तुगीज साधूची निरनिराळी नावे दिलेली आहेत.
     हा किल्ला इ.स. १७३९ मध्ये मराठ्यांनी घेतला, तेव्हापासून इ.स. १८१८ पर्यंत तो मराठ्यांच्या ताब्यात होता. याची मुख्य खूण म्हटली म्हणजे मराठे लोकांनी वर सांगितलेल्या ७ बुरुजांना त्यांची पोर्तुगीज नावे काढून टाकून मराठी नावे दिली आहेत. शिवाय किल्ल्यात गणपती, मांजरादेवी, वेदिकादेवी वगैरे २९४ देवतांची पडापड झालेली देवालये आहेत. किल्ल्यात थोड्याशा तोफा आहेत; परंतु त्या गंजून गेलेल्या आहेत.

शिलालेख इंग्रजी व मराठी भाषेत आहे-

 

 

 

 


कोर्लई: जलदुर्गापैकी एक महत्त्वाचा दुर्ग

या मालिकेत आपण मागे रेवदंडय़ाची सफर केली. रेवदंडा हा अलिबागच्या अष्टागरमधील शेवटचा थांबा! नारळी-पोफळीत झाकलेल्या या अष्टागरमधून बाहेर पडावे तो पाण्याने भरलेली सशक्त अशी कुंडलिका खाडी समोर येते

या मालिकेत आपण मागे रेवदंडय़ाची सफर केली. रेवदंडा हा अलिबागच्या अष्टागरमधील शेवटचा थांबा! नारळी-पोफळीत झाकलेल्या या अष्टागरमधून बाहेर पडावे तो पाण्याने भरलेली सशक्त अशी कुंडलिका खाडी समोर येते. पल्याड मुरूड, तर अल्याड अलिबाग तालुका! गेली कित्येक शतके या दोन तीरांमध्ये नावा-बोटींचा संवाद सुरू होता. पुढे १९८६ मध्ये या खाडीवर साळावचा तो भलामोठा पूल झाला आणि हे दोन्ही भूभाग एकमेकांना जोडले गेले. साळावच्या या पुलावर आलो, की उजव्या हाताचे समुद्रात शिरलेले भूशीर त्याच्या माथ्यावरील एका गडाच्या तट-बुरुजांच्या शेला-पागोटय़ासह लक्ष वेधून घेते. आजची आपली वाट समुद्रातून डोके वर काढलेल्या या जलदुर्गावरच चढणार आहे. नाव कोर्लई!
अथांग सिंधुसागर आणि त्याला खेटून असलेल्या कोकणाच्या या चिंचोळी पट्टीवर राज्य करणाऱ्या राजसत्तांच्या अनेक जलदुर्गापैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग! कुंडलिका खाडीच्या मुखाशी एका अंगाला हा कोर्लई तर दुसऱ्या रेवदंडा! जणू कुंडलिकेचे हे दोन्ही द्वारपाल! त्यांना विचारल्याशिवाय या खाडीत प्रवेश मिळणार नाही.
पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘..कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय! पश्चिमेच्या डोंगराला नांगराच्या फाळासारखी जी एक तिरकस सोंड फुटली आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाली आहे. त्या बाजूला तोच एक डोळय़ांत भरतो. श्रीमंतीने किंवा डामडौलाने नव्हे, तर नि:संग निरासक्त वृत्तीने. त्यावर झाडांची हिरवळ नाही, की दगडांची अडगळ नाही. भगवी छाटी पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला जणू तो एक ज्ञानभिक्षूच!’
साळावच्या त्या पुलावरून समोरचा देखावा पाहात हे वर्णन आठवावे आणि कोर्लईचे कौतुक करत त्याच्याकडे मार्गस्थ व्हावे. पुलापलीकडे आलो, की आपण रोहय़ातून मुरूडकडे गेलेल्या रस्त्यावर येऊन पोहोचतो. या रस्त्यावरच उजवीकडे हा कोर्लई किल्ला आणि पायाशी कोर्लई गाव! कोळी लोकांची ही वस्ती, पण गावात शिरण्यापूर्वीच त्याची ‘गंधवार्ता’ नाकापर्यंत पोहोचते. साऱ्या गावभर प्रत्येकाच्या अंगणात उन्हाळी पापड वाळत घालावेत त्याप्रमाणे सुके मासे वाळत घातलेले असतात. पण या कोर्लई गावाचे या व्यतिरिक्तही आणखी एक वैशिष्टय़!
‘वाँ नॉम की?’ असा एखादा प्रश्न येतो आणि कोर्लईच्या या जगावेगळय़ा वैशिष्टय़ाला तोंड फुटते. संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत ही फुललेली! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही  ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही. या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस अनेक संवादबोली लुप्त होत असताना कोर्लई बेटावरच्या या भाषावैभवाने खरेच भुरळ पाडली. असो! तर आपण आपले मराठीत गडाचा मार्ग विचारावा आणि पुढील वाटेला भिडावे. कोर्लई, कोरलई, कोरले अशा अनेक नावांनी इतिहासापासून ओळख सांगत आलेला हा जलदुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन! यातील उत्तर दिशेने कुंडलिका खाडी, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सिंधुसागराचा वेढा! पाण्याच्या या अगाध डोहात सहय़ाद्रीचे हे चुकार भूशीर इथे मध्येच समुद्रातून आकाशाकडे झेपावले आहे. त्यावरच कोर्लईचा हा दुर्ग! कोर्लई गावातून गडाला वेढा मारत एक रस्ता दक्षिणेकडे समुद्रकाठावर कोर्लई दीपस्तंभाकडे येतो. अलिबागच्या या अष्टागरमध्ये खांदेरी आणि कोर्लई या दोन किल्ल्यावर दीपस्तंभ आहेत. समुद्रावर स्वार झालेल्यांना रात्री हे दीपस्तंभच त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा प्रकाशझोतांनी दिशादर्शन करत असतात. हा प्रत्येक प्रकाशझोत विशिष्ट पद्धतीचा असतो आणि तोच त्याचा पत्ताही! यावरूनच दर्यावर्दी त्यांच्या दिशा, स्थळ, मार्ग ठरवतात. हे दीपस्तंभ आणि त्यांचे कार्य नाममात्र शुल्क भरून पाहता येते. इथे कोर्लईला ही सोय आहे. तेव्हा हा दीपस्तंभ जरूर पाहावा आणि मग गडाकडे निघावे.
उजव्या हाताला एका उंच टेकडीवर कोर्लई किल्ला, तर डावीकडे अथांग पसरलेला समुद्र! कोळीवाडय़ाची गजबज जाऊन एकदम आलेली शांतता या समुद्राच्या पुन्हा प्रेमात पाडते. या दीपस्तंभाकडून एक पायरीमार्ग गडावर चढतो. याशिवाय गडावर जाण्यासाठी आणखीही तीन प्रवेशमार्ग आहेत, पैकी दोन तळातील माचीकडून तर एक उत्तरेकडील कोर्लई गावातून थेट बालेकिल्ल्यात येतो. दीपस्तंभाकडून आलेल्या वाटेने पंधरा-वीस मिनिटांत आपण गडाच्या मधल्या भागात पोहोचतो. हा किल्ला म्हणजे एखादी अरुंद सरळसोट माचीच आहे. जवळपास किलोमीटरभर लांबी आणि अवघी २७ मीटरची रुंदी असलेला हा आयताकृती पट्टा. पश्चिमेकडे समुद्रात शिरलेल्या एका टोकापासून ते पूर्वेकडे उंच होत गेलेल्या पर्वतापर्यंत कोर्लईचा हा गड वर चढत गेलेला आहे. या आडव्या भागात पुन्हा काही ठरावीक टप्प्यावर आडव्या भिंती-दरवाजे घालत या किल्ल्याचे तब्बल नऊ भाग केले आहेत. यातील पहिले तीन-चार भाग म्हणजे गडाच्या माचीचाच भाग, तर उर्वरित बालेकिल्ला म्हणावा लागेल. अगदी तळातील भागापासून कोर्लईचे हे दर्शन सुरू होते. गडाचा हा समुद्राकडील तळाचा भाग समुद्राचे पाणी पित बसलेला असतो. काठावरच्या चार दिशांना बांधलेल्या चार बुरुजांनी जणू वरून धावत आलेल्या या तटाला वेसण घातली आहे. या माची-धक्क्यावरच कोर्लई किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या पर्वताला पूर्वी ‘चौलचा खडक’ असे म्हणत. चौल-रेवदंडय़ात राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांना आपले राज्य सुरक्षित करण्यासाठी या पर्वतावर गड बांधण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी इसवी सन १५२९ मध्ये त्यांचे गव्हर्नर दि योगु लोपीश दि सिकैर याने तशी अहमदनगरच्या निजामशहाकडे परवानगी मागितली. यानुसार त्यांनी इथे ही माची, त्यावर त्यांच्या क्रुसाची बातेरी ऊर्फ सांताक्रुझची उभारणी केली. पण पुढे पोर्तुगीज आणि निजामशाहीचे बिनसले आणि किल्ल्याचे काम अर्धवट राहिले. पुढे पोर्तुगीजांचा वाढता धोका ओळखून निजामशहानेच १५९२ मध्ये इथे हा जलदुर्ग उभारला आणि त्याला ‘बुरहान दुर्ग’ असे नावही दिले. हे एवढय़ावरच थांबले नाही, तर १३ सप्टेंबर १५९४ रोजी या दुर्गावरूनच पोर्तुगीज आणि निजामशाहीत संघर्ष उडाला. यामध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि गडाचा ताबा  पोर्तुगीजांकडे आला. पोर्तुगीजांचा हा कालखंड प्रदीर्घ असल्यामुळे या दुर्गाच्या स्थापत्यावरही मग त्यांचा प्रभाव पडला. शिवकाळातही हा गड त्यांच्याकडेच होता. ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने कोर्लई मिळवला आणि मराठय़ांचा जरीपटका गडावर फडफडू लागला. यानंतर इंग्रजांबरोबरच्या शेवटच्या युद्धापर्यंत हा गड मराठय़ांकडेच होता.
कोर्लईची तळातील माची चार खणखणीत बुरूज बांधून बंदिस्त केलेली आहे. इथेच गडावर येण्यासाठी दोन दरवाजेही आहेत. सैनिकांच्या खोल्या, दारूगोळय़ाचे कोठार, तटावरील चार तोफा इथे दिसतात. यानंतर जसजसे वर जावे तसे गडाचे एकेक टप्पे उलगडत जातात. या प्रत्येक टप्प्याला विभागणारी एक अंतर्गत भिंत आणि दरवाजा आहे. यातील काही दरवाजांवर पोर्तुगीज भाषेतील शिलालेखही आहेत. या लेखांशिवाय, वेगवेगळय़ा आकारांतील तोफा, पाण्याचे हौद, टाक्या, कोठारे, चर्च, महादेवाचे मंदिर, चौथरे असे एकेक दुर्गावशेष दिसू लागतात. यातील आठव्या टप्प्यावरच गडाचा तो उत्तरेकडील दरवाजाही येऊन मिळतो. पोर्तुगीज बांधणीचे तट-बुरूज आणि त्यांच्या संस्कृतीतल्याच अन्य अवशेषांनी एका वेगळय़ा जगात जायला होते. एका परकीय साम्राज्याच्या या पाऊलखुणा पाहात शेवटच्या टोकावर आपण येतो. इथून तळात सुमद्रापर्यंत उतरलेला तो गड नजरेत येतो आणि मग त्याची व्याप्ती आणि धास्ती मनात ठसते. दो कु टो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने या किल्ल्याचे त्या वेळी लिहून ठेवलेले वर्णन आहे, ते असे,.. ‘हा किल्ला खूपच भव्य असून त्यावर फक्त जमिनीकडूनच हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र आणि खाडी यांच्यामध्ये एक खंदक असून, त्याच्यावरील पूल काढला की किल्ला अभेद्य होतो. या खंदकाच्या आत भक्कम कोट असून त्याच्या प्रवेशद्वारावर एक भलामोठा ब्राँझचा सिंह आहे. त्याच्या खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा लेख आहे. किल्ल्याच्या माथ्यावर त्याचा बालेकिल्ला असून, त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी असून तेथेही ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माश्यांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे दपरेक्तियुक्त वचन कोरलेले आहे.’
..आज शेकडो वर्षे उलटली, पण कोर्लईच्या या टोकावर उभे राहिले की या वर्णनातील धाक आजही अंगावर काटा उभा करतो.
abhijit.belhekar@expressindia.com

https://www.loksatta.com/trekit/kolei-coastal-land-fort-in-maharashtra-384413/

 
 अलिबागकडून येताना रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल (साळाव पूल) ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो. आम्ही काशिदकडून परतीच्या प्रवासात येथे जाणार असल्याने मुख्य रस्त्यापासून डावीकडे वळण घेत दोन किमीवरील कोर्लई या गावात पोहचलो.एका गल्लीत घराच्या स्लॅबचे काम सुरु असल्याने गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. गाडी फिरवून गावाच्या बाहेरील रस्त्याने समुद्राच्या किनाऱ्याने जावे लागले. रस्ता डोंगरावरील दीपगृहापर्यंत जातो. चढ सुरु होतो तेथून कॉंक्रिटचा रस्ता बनवला आहे पण खूपच अरुंद आहे. समोरून गाडी आली तर कोणाला तरी माघार घ्यावी लागेल. रस्ता वळणावळणाचा आहे व जराही गाडी काँक्रिटच्या धारेहून खाली उतरली तर उलटण्याची शक्यता. सुदैवाने जाताना व येतांना कोणतेही वाहन आडवे आले नाही

 

 

कोर्लई चा फिरंगी किल्ला

कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे. आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार कोर्लई चा किल्ला. या ठिकाणाला Morro De Chaul म्हणजे चौलचा डोंगर असे पोर्तुगीज नाव होते. कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर मुखापाशी रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला आहे त्यामुळे या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सैनिकी जल वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण करणे या दोन किल्ल्यांच्या मदतीने शक्य होत असावं.

कोर्लई गाव या किल्ल्याच्या पायथ्याशी असून पूर्वेकडे गावातून आणि पश्चिमेकडे दीपगृहाकडून अशा दोन वाटांनी किल्ल्यावर जाता येते. या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर आहे तो बालेकिल्ला ज्याला पोर्तुगीजांनी फोर्टलेझा रियल (राजेशाही दुर्ग) असे नाव दिले होते. भूशिराच्या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आहे आणि समुद्राकडे उघडणारे दार. या दोन भागांना जोडणारी दगडी तटबंदी बालेकिल्ला ते समुद्र अशी सहा भागांमध्ये उतरत गेली आहे.

गावातून पायऱ्या आणि पायवाटेने चढून आल्यावर दिसणारे बालेकिल्ल्याचे दार शाबूत आहे. त्याच्या कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झाले असावे असा आभास निर्माण होतो. या दारावरच गोलाकार साओ पेद्रो बुरुज बांधलेला दिसतो.

तिथून आत आल्यानंतर दक्षिणेकडे पाहिले तर अथांग समुद्र अन कोर्लई गावचा किनारा आपल्याला दिसू शकतो. तिथंच एक तोफ अजूनही पडलेली आहे. या वास्तूत इतिहासाच्या पाऊलखुणा तोफांच्या रूपाने आणि शिलालेखांच्या रूपाने विविध ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणच्या कात्रीच्या आकारातील बुरुजांच्या रचनेचे Orelha De लिब्रे म्हणजे सशाचे कान असे बारसे केलेले आहे.

सेंट इनॅसिओ, सेंट फ्रान्सिस्को अशा विविध संतांची नावे इथल्या बुरुजांना दिलेली आहेत आणि काही ठिकाणी तसं कोरलेले दगडी लेखही आपल्याला दिसू शकतात. बालेकिल्ल्यात जाताना अनेक दरवाजे आणि बंदिस्त रस्ते पार करत आपण आतमध्ये प्रवेश करत जातो.

इथून पुढे जात असताना कात्रीच्या आकाराचं बुरुजाचे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या वास्तुरचनेवर पोर्तुगीज बांधकामाची छाप जागोजागी स्पष्टपणे दिसते.

किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याच्या झाडाला बहर आलेला पाहताना खूप छान वाटतं. तिथेच रत्नेश्वराचे ठिकाण आणि तुळशी वृन्दावनही दिसते.

पोर्तुगीज काळात बांधलं गेलेलं नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसलं तरीही त्याचं बांधकाम आणि वेदीची म्हणजेच आल्टर ची जागा आपल्याला नीट पाहता येते.

इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवीसन १६४६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. मे १६५० मध्ये चौलचा कॅप्टन फर्नाव दे मिरांडा हेन्रीक्स इथला कप्तान क्रिस्तोवाव दे अब्र्यू दे अझवेदो यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.

उत्तरेकडे आपण अनेक बुरुज आणि दरवाजांची मालिका ओलांडत समुद्राच्या दिशेने चालत जाऊ शकतो. जसजसे आपण या अरुंद माथ्यावरून उत्तरेला जातो तसतशी टेकडीची उंची कमी होते आणि आपण किनाऱ्याकडे उतरत जातो.

समुद्रसपाटीवर जाऊन पोहोचले की दोन दरवाजे दिसतात. पश्चिमेकडे असलेला दरवाजा समुद्राभिमुख आहे तर पूर्वेचा दरवाजा कुंडलिका नदीचे मुख आणि तिथं असलेल्या जेटीच्या बाजूला उघडतो.

इथं कॅव्हेलेरो नावाचा प्रचंड बुरुज असून अनेक कमानींचे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. त्याला लागूनच सांताक्रूस बुरुज आहे. अनेक तोफा इथं मांडलेल्या आपल्याला दिसू शकतात.

संध्याकाळपर्यंत ही भटकंती आटोपून पुन्हा एकदा किल्ल्याच्या माथ्यावर चढून यायचे. पश्चिमेचे रंग आता आकर्षक होऊ लागलेले असतात. जवळजवळ पाचशे मीटर लांब असलेली दगडी तटबंदी सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली असते.

कोर्लई गावाला अतिशय सुंदर असा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. नितळ निळे पाणी आणि फेसाळणाऱ्या लाटा पाहता पाहता संध्याकाळ ओसरू लागते आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा नारिंगी रंग या निळाईत शिरू लागतो. १५२१ मध्ये इथं धक्का, तटबंदी आणि क्रूसाची बातेरी बांधण्याची परवानगी पोर्तुगीजांनी दिएगो लोपेझ दे सिक्वेरा मार्फत निजामशाहीकडे मागितली होती. पहिला बुऱ्हाण निजामशहा गेल्यावर जे अराजक माजले त्याचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी १५९४ साली इथं जम बसवण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामशहाने पोर्तुगीजांना हाकलून इथं स्वतः दुर्ग बांधण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात दोघेही मागे हटले.

त्यानंतर दुसऱ्या बुऱ्हाण निजामाने ही जागा जिंकून रेवदंड्याच्या पोर्तुगीज किल्ल्याला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला. १५९२ साली रुपी खान नामक सरदाराबरोबर मोठी कुमक आणि तोफखाना देऊन निजामशाहीने कोर्लईवर कब्जा केला आणि बुऱ्हानदुर्ग नामक किल्ला बांधून काढला. त्याचे अवशेष काही ठिकाणी आजही बांधकामात दिसू शकतातत्यानंतर इथूनच रेवदंड्यावर तोफखान्याचा हल्ला सुरु झाला. आजही कोर्लईच्या पूर्व तटावरून रेवदंड्याची सातखणी म्हणजेच सांता बार्बाराचा मनोरा स्पष्ट दिसतो..

१५९४ साली कोर्लई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. सुमारे चार हजार सैनिकांची फौज घेऊन हल्ला केला आणि कोर्लई जिंकला. या लढाईत त्यांना ५ हत्ती अनेक घोडे आणि ७७ तोफा मिळाल्या व निजामशाहीचे हजार सैनिक ठार झाले. पोर्तुगीजांची मात्र २१ माणसे कामी आली. त्यानंतर पुरेशी शिबंदी नसल्याने पोर्तुगीजांनी बुऱ्हानदुर्गाचे बांधकाम पाडून टाकले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश लाभलं नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी कोर्लई जिंकून घेतला.

इतिहासाच्या अद्भुत जगात भ्रमंती करत असताना सूर्य मावळतीला जातो आणि पश्चिमेला क्षितिजावर अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. समुद्राचे पाणी आता सोनेरी दिसायला लागलेले असते आणि त्यावर एखाद्या मासेमारी बोटीचा ठिपका आपलं लक्ष वेधून घेत असतो.

कोर्लई किल्ल्याच्या पश्चिमेला असलेले दीपगृह नक्की पाहायला हवे मात्र ते पाहण्यासाठी संध्याकाळची ठराविक वेळ गाठावी लागते. कोर्लई गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक ख्रिस्ती कुटुंबे आहेत जी एक विशेष भाषा बोलतात. पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांच्या संगमातून घडलेल्या भाषेला ते नो लिंग म्हणजे आमची भाषा असे म्हणतात. विशेष म्हणजे लिपी म्हणून ते देवनागरी वापरतात. दर्या फिरस्ती कोकणातील अशा अनेक अद्भुत ठिकाणांची चित्रयात्रा आहे. या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांनाही दर्याफिरस्ती बद्दल सांगा ही आग्रहाची विनंती.


 
सुमारे चौदा-पंधराव्या शतकामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच ह्या परकीय व्यापाऱ्यांनी सागरी मार्गाने व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थानात पाय ठेवले आणि नन्तर हळुहळु व्यापारासोबत साम्राज्यविस्तारही करु लागले. ह्या परकीय शत्रूंनी आपल्या संरक्षणासाठी काही किल्ल्यांची उभारणी केली. त्यापैकी एक आहे पोर्तुगीजांनी उभारलेला रायगड जिल्ह्यातील कोर्लाई किल्ला.
Korlai Fortअलिबाग पासुन सुमारे २५ किमी अंतरावर कोर्लाई गावाच्या मागे समुद्रकिनाऱ्याजवळ एका छोट्या टेकडीवर कोर्लाई किल्ला बांधलेला आहे. अलिबागनन्तर असलेले चौल, रेवदंडा हि गावे सोडून पुढे असलेल्या कुंडलिका नदीवरील पुल ओलांडल्यावर ६ किमी वर कोर्लाई गाव वसलेले आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्रास मिळते तिथे नदीच्या खाडीवर सागरी व्यापारमार्गाच्या मोक्याच्या जागी कोलाई किल्ल्याची उभारणी केलेली दिसते. म्हणूनच किल्ल्याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी “कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे” असे म्हणून गौरवले आहे.
Korlai Fortपंधराव्या शतकामध्ये हा प्रदेश निजामशाहीच्या ताब्यात होता. तेव्हा पोर्तुगीजांनी कोर्लाई गावाजवळील टेकडीच्या पायथ्याशी व्यापारी बोटींसाठी धक्का बांधायची परवानगी मागितली. शतकाच्या उत्तरार्धात निजामशाहीमध्ये झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेऊन पोर्तुगीज  टेकडीवर तटबंदी बांधू लागले. हुसेन निजाम ह्या निजाम बादशहाला हे कळताच त्याने पोर्तुगीजांचे हे बांधकाम बंद केले आणि कोर्लाईच्या टेकडीवर स्वतःच एक किल्ला उभारला. मात्र सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी ह्या निजामाच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला आणि सर्व किल्ला पाडून पोर्तुगीज पद्धतीने किल्लाचे पुनर्निर्माण केले. पोर्तुगीजांच्या काळामध्ये किल्ल्यावर एकूण ७० तोफा आणि सुमारे ८००० सैन्य असल्याचा उल्लेख आढळतो. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. पुढे १७३९ साली बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ, चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध काढलेल्या कोकण मोहिमेमध्ये सुभानराव मानकर यांना कोर्लाईवर पाठवले आणि वर्षभरात किल्ला हाती आला. किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर किल्ल्यावरील बुरुजांची पोर्तुगाल नावे बदलून मराठी नावे ठेवण्यात आली. सान्त दियागोचे नाव पुस्ती बुरुज व सान्त फ्रान्सिस्कोचे नाव गणेश बुरुज ठेवण्यात आले.
Korlai Fort Entranceकोर्लाई गावाच्या मागे समुद्रकिनाऱ्याच्या बाजुला एक दीपगृह उभारलेले दिसते. ह्या दिपगृहाच्या बाजूनेच किल्ल्यावर जायला उत्तम पायऱ्यांचा मार्ग आहे. टेकडीची उंची जास्त नसल्याने सुमारे १०-१५ मिनिटात किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. एका लांब टेकडीवर बांधलेल्या ह्या किल्ल्यामध्ये तटबंदी आणि बुरुजांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून अनेक छोटे छोटे विभाग पडलेले आहेत. प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला काही अंतर चालत गेल्यावर समुद्र किनाऱ्याजवळ असलेली किल्ल्याची माची नजरेस येते. कोर्लाई किल्ल्याच्या दोन बाजुस समुद्र एका बाजुस कुंडलिका नदीच्या खाडीचा जलाशय असल्यामुळे ह्या माचीवरून भोवतालच्या सिंधुसागराचे विहंगम दृश्य दिसते. माचीवर डाव्याबाजूस समुद्रकिनार्याकडे असलेला किल्ल्याचा दरवाजा दिसतो.
किल्ल्याची हि प्रशस्त माची आणि सभोवतालच्या समुद्राचे सौन्दर्य डोळ्यात साठवुन परत मागे बालेकिल्ल्याची वाट पकडावी. ह्या वाटेवर डाव्या बाजुला एकाठिकाणी एक तोफ दिसते. Korlai Fortगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताच समोर एक छोटेसे शन्कराचे, रत्नेश्वराचे मन्दिर दिसते. मंदिरासमोर एक छोटेसे तुळशी वृंदावन असुन मंदिराच्या कडेने छोटासा ओटा बांधलेला दिसतो. मंदिराच्या जवळच एक भूमिगत असलेले पाण्याचे टाके दिसते. येथील पाणी पिण्यायोग्य आहे.बालेकिल्ल्याच्या चारही बाजूस चार बलदंड बुरुज उभारलेले दिसतात. बुरुजांवर चढायला पायऱ्यांची रचना केलेली दिसते. बालेकिल्ल्यावरील ह्या बुरुजांवर एकुण ७ तोफा दिसतात.
बालेकिल्ला ओलांडून पुढे गेल्यावर चर्चचे बांधकाम दिसते. ज्या कमानीमधून बालेकिल्ल्यातून चर्चपाशी प्रवेश करतो कमानीवर पोर्तुगाल भाषेतील एक शिलालेख आणि पोर्तुगीजांचे युद्धचिन्ह कोरलेले दिसते. कोर्लाई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना सुमारे सोळाव्या शतकात चर्चचे Korlai fortबांधकाम झाले असावे मात्र आजही हे बांधकाम बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. प्रवेशदवारावरील नक्षीकाम, आतील छोटेसे सभागृह, सभागृहातील पायऱ्यांची रचना, भिंतींमध्ये केलेले कोनाडे, छतावरचे नक्षीकाम पाहून जुन्या काळातील ह्या चर्चच्या सौन्दर्याची कल्पना येते. चर्चच्या आजूबाजूला काही बांधकामांच्या पायांचे जोते आणि भिंती दिसतात. चर्चच्या उजव्या बाजूला थोडे खाली पायऱ्या उतरून गेल्यास किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वाराच्या थोडे आधी जमिनीवर तटबंदीला टेकवून ठेवलेला पोर्तुगाल भाषेतील एक शिलालेख आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर देखील पोर्तुगीजांचे युद्धचिन्ह कोरले आहे. प्रवेशद्वार पाहून परत चर्च पाशी येऊन चर्चच्या मागे थोडे अंतर चालत गेल्यावर कोर्लाई किल्ल्याची गडफेरी पूर्ण होते. चर्चच्या मागील बाजूस तटबंदी व बुरुजांचे अवशेष दिसतात.
कोर्लाई किल्ला पाहताच नकळतपणे पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या दुर्ग बांधणीच्या पद्धतीमध्ये तुलना करावीशी वाटते. कोर्लई गडावर गोमुखी पद्धतीचे, वळणदार आणि बुरुजांमध्ये लपवलेले गडाचे मुख्य प्रवेशद्वार आढळत नाही. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकरांच्या देवड्या दिसत नाहीत. गडावरील Korlai Fortअनेक दरवाजांवर, बुरुजांवर गणपती, हनुमान इत्यादी देवता किंवा कमळ, मोर, हत्ती, व्यालशिल्प, शरभ ह्यांचे कोरीवकाम येथे दिसत नाही. कोर्लाई गडावर बंदिस्त असा भूमिगत जलसाठा असून मराठ्यांच्या दुर्गबांधणीमध्ये पाण्याचे टाके हे खडकामध्ये सपाटीवर किंवा डोंगराच्या कपारीत खोदले जाते. अर्धगोलाकार बुरुजांएवजी येथे कोनांमध्ये बांधलेले, षट्कोनी, पंचकोनी आकाराचे बुरुज दिसतात. परंतु तरीही इतरांपेक्षा निराळा असलेला हा पोर्तुगीज धाटणीचा सुंदर कोर्लाई किल्ला सहजच आपल्याला त्याच्या सौन्दर्यात रममाण होण्यास भाग पडतो.

 कोर्लईचा किल्ला -
९.३० च्या सुमारास आम्ही अलिबाग सोडून आम्ही दक्षिणेला मुरुडच्या दिशेने निघालो ते कोर्लईचा किल्ला पाहण्यासाठी. अलिबाग पासून सुमारे २५-१ किलोमीटरवर आहे हा किल्ला. कोस्टल रोड पकडून येताना रेवदंडा पार केल्यावर चौल गावाजवळ एक सुंदर कौलारू राममंदिर दिसलं आणि आम्ही काही वेळ इथे घालवला.




रेवदांड्यापासून ८ किलोमीटरवर पुलावरून जाताना डावीकडे कुंडलिकेची खाडी आणि उजवीकडे डोंगरावर एक भक्कम तटबंदी दिसत होती. हाच होता कोर्लईचा किल्ला. पूल संपल्यावर उजवीकडे कोर्लई गावात आम्ही शिरलो.



समोर सोंडेवरून किल्याच्या बुरुजाला भिडणारी एक पायवाट दिसत होती; या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३०-१ मिनिट लागणार होते. पण आम्ही लाईटहाऊस कडून जाण्याचं ठरवलं. मग विचारपूस केल्यावर डोंगराच्या डाव्या बाजूने जाणारा कच्चा रस्ता आम्ही धरला. आमचं नशीब; लाईट हाऊसच काम चालू असल्याने प्रवेश बंद होता. मग बाजूच्या पायऱ्या १० मिनिटात पार करून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.



डाव्या बाजूला दोन दरवाजे समुद्राच्या दिशेने दिसत होते तर उजवीकडे एक दरवाजा आणि किल्ल्याच बांधकाम दिसत होतं. आम्ही उजवीकडे निघालो. किल्ला निमुळत्या जमिनीच्या पट्टीवर निमूळताच बांधला आहे. आत शिरताच एक लहानस शंकराचं मंदिर लागलं. पुढे आजून एक दरवाजा लागला आणि पारशी भाषेत काही शिलालेख दरवाज्यावर दिसले. पुढे पुन्हा एक दरवाजा आणि चर्च सारखी वस्तू नजरेस पडली. या पूर्ण किल्ल्यावर पोर्तुगीज स्थापत्यकलेचा भरणा उठून  दिसत होता. डाव्या बाजूला कुंडलिका खाडीच्या बाजूस उघडणारा एक दरवाजा लागला त्याच्या पायऱ्या खाली कोर्लई गावापर्यंत घेऊन जात होत्या. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला एका बुरुजावर एक मेंढा तोफ आराम करताना दिसली. ह्या बुरुजावरून खाली कोरलाईची वस्ती अगदी ठळक दिसत होती आणि बरोबर दिसत होता लागून असलेला समुद्र किनारा. उत्तर टोकाला येऊन आम्ही उरलेले दोन दरवाजे पण पहिले. याच दरवाज्यातून एक तटबंदी खाली समुद्रात जेटीवर जात होती. दूरवर नजर टाकल्यावर कुलाबा किल्ल्याच्या मंदिराचा कळस पुसटसा दिसत होता.





तीन बाजुंनी पाण्याने वेढलेल्या मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला निजामाने बांधला व नंतर पोर्तुगीजांनी कब्जा केला. संभाजी राजांनी पण एक असफल प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.



आमचा गेला ट्रेक; देवकुंड हा कुंडलिका नदीचा उगम होता तर कोर्लई येथे याच नदीचा शेवट !

पुढे आम्ही मुरुड मार्गे रोहा जाण्याचं ठरवलं कारण होत तिसऱ्या रत्नाची माहिती काढणं; 'पद्मदुर्ग'. मुरुड समुद्रकिनारी खोल समुद्रात दिमाखात उभा असलेला. थोडी माहिती काढून दंड राजपुरीतून आम्ही रोह्याला निघालो. जंजिरा पण दिसत होता किनाऱ्याच्या जवळ. इथून रोहा ३४-१ किलोमीटर आहे. रस्ता चांगला पण फणसाटच्या अभयारण्यातून जाणारा आहे. रात्रीच्या वेळी माकडे खूप त्रास देतात या वाटेवरून. आम्ही जेव्हा रोह्यात पोहचलो तेव्हा १.४५ झाले होते. या उकड्यात जवळजवळ २ किलोच कलिंगड दोघात जेवलो आम्ही आणि वाकण मार्गे मुंबईच्या रस्ताला लागलो.




अलिबागच्या बीच लव्हर्सने दुर्लक्षित केलेला कुलाबा असो किंवा जवळच समुद्रात नांगर टाकून डौलाने उभा असलेला कोर्लई असो हे आमच्यासारख्या भटक्यांनसाठी पर्वणीच आहेत. या उन्हात करण्यासारखे अनेक किल्ले आपल्याला लाभले आहेत पण बिचवरून फुरसत मिळाली तर ना!


चौल चे दत्त मंदिर हे फार प्राचीन अगदी उंच टेकडीवर वसलेलं त्यामुळे पावसाळ्यातील इथले सौंदर्य तर अप्रतिमच.  पूर्वी तर इथे जायला नीट रस्ताही नव्हता आता मात्र छान डांबरी रस्ता अगदी आपल्याला पूर्ण पायथ्याशी घेऊन जातो आणि मग फक्त काही पायऱ्या चढून आपल्याला लगेच दत्त महाराजांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होतं.  आताचे मंदिर नीट व्यवस्थित  बांधलेले आहेसाधारण एका वेळेला १०-१५ जण व्यवस्थित दर्शन घेऊन शकतात इतकी मुख्य गाभार्याच्या समोर जागा आहेवरून आपल्याला संपूर्ण चौल आणि रेवदंड्यात पसरलेल्या नारळी-पोफळीच्या बागांचे आणि लांबवर रेवदंड्याच्या खाडीचे सुंदर दृश्य दिसते. दत्त जयंतीला तर इथे फार मोठी यात्रा भरतेपेण,अलिबाग अगदी लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात.  थोडा वेळ विसावून आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोथोडी विचारपूस केल्यावर तिथल्याच एका मुलाने आम्हाला एक शॉर्टकट सुचवला जो तुम्हाला रेवदंडा किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल असे त्याने सांगितले मग आता आलोय तर रेवदंडा किल्लाही पाहूया अशी हेमंत ने गळ घातली.
अरे तिथे आता किल्ला नाहीये . फक्त तटबंदी पाहण्यासारखी आहेत्याला रेवदंड्याची तटबंदी म्हणतातमाझ्यातल्या इतिहासकाराने माहिती पुरवली.
"ठीक आहे नाजे काही आहे ते पाहूया" . आम्ही सचिन कडे पाहिलं.
"अरे माझी तर इथे वस्तीला राहायची पण तयारी आहे. " सचिन तर इथले पावसाळ्यातील सौंदर्य पाहून वेडाच झाला होता
त्या मुलाने सुचवल्याप्रमाणे थोड्याच वेळात आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याजवळ पोहोचलो.  किल्ला म्हणून आता त्याचे अस्तित्व फारसे काही दिसत नाही आता तिथे त्याचे फक्त भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात.
कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या  रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी १५ व्या शतकात खाडीच्या मुखावर हा किल्ला बांधला१६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला केला परंतु किल्ला काही जिंकता आला नाहीसंभाजी महाराजांचे चरित्र वाचताना आपल्याला या लढाईचा उल्लेख केलेला मिळतो
रेवदंड्याच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह पाहायला मिळते. किल्ल्यावर सातखणी मनोर्‍याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. काही तोफा आपल्याला मनोऱ्याच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. इथले मुख्य आकर्षण म्हणजे "रेवदंड्याची तटबंदी." तिचा परीघ साधारण ४-५ कि.मी. चा आहे. या किल्ल्याचं  आणखी एक विशेष म्हणजे तटबंदीच्या खाली असलेला भुयारी मार्ग. परंतु ते आता वापरात नाहीत.
तेथूनच पुढे किनाऱ्यावरून आपल्याला कोर्लई चे दर्शन होते. सुट्टीचा दिवस नसल्याने आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. त्यामुळे सगळीकडे निरव शांतता होती. सचिन बापडा तर फारच खुश होता. समुद्रकिनाऱ्यावरची अशी छान शांतता तो अगदी मस्त अनुभवत होता, तो तर तिथून निघायलाच तर नव्हता. पण अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे असे सांगून त्याला तिथून काढता पाय घ्यायला लावला.
साधारण ७-८ कि.मी. अंतर पार केल्यावर आम्ही कोर्लई गावात पोहोचलो.  किल्ल्यावर जायचा मार्ग हा कोर्लई गावातूनच जातो.  गावातून बाहेर पडल्यानंतर किल्ल्याकडे जाणारा चिंचोळा रास्ता सुरु होतो.  डाव्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र, उजवीकडे कोर्लईचा डोंगर आणि समोर दिसणारा द्विपगृह (Light house) आणि त्यातून होणार आपला प्रवास  अहाहा!! हा अनुभव तर अवर्णनीयच !!  द्विपगृहाजवळ जवळ पोहोचल्यावर आम्हाला वरती किल्ल्यावर जायचे आहे असे सांगितल्यावर तेथील सरकारी कर्मचाऱ्याने गेट उघडून आम्हाला आत प्रवेश दिला कारण लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायऱ्या चढूनच आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. तशी एक दुसरी वाटहि आहे ती दुसऱ्या मार्गाने आतून गावातून वरती थेट बालेकिल्ल्याजवळ नेते.
किल्ल्याची रुंदी जरी कमी असली तरी हा दक्षिणोत्तर चांगलाच पसरलेला आहे. मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही ठिकाणी प्रवेश द्वारे आपल्याला दिसतात.  डावीकडे गेल्यावर तटबंदीच्या बाजूला काही तोफा ठेवलेल्या आपल्याला दिसतात. तसेच खाली एक निमुळता रास्ता जातो तो आपल्याला थेट समुद्र किनाऱ्यालगत घेऊन जातो.  आम्हीही तिकडे निघालो. वरूनच उजवीकडे पाहिल्यावर समोरून येणारी कुंडलिका नदी आणि समुद्र यांचा संगम दिसतो जणू काही ती समुद्राला आलिंगनच देत आहे असा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.
हा किल्ला समुद्रकिनारी वसला असल्याने आपल्याला वरून विहंगम दृश्याचे दर्शन होते. समुद्र किनारा स्वच्छ असून निळ्याशार रंगाचे पाणी पाहायला मिळते. तीनही बाजूने वेढलेला समुद्र, फक्त एका बाजूने असणारी जमीन आणि वरून दिसणारे कुंडलिका नदीचं मिलन. हे कोर्लई चे वैशिष्टय.  असा किल्ला इतरत्र पाहणे दुर्मिळच आणि पावसाळी तर हा अगदी सौंदर्याने न्हाउनच निघालेला असतो. त्यामुळे हा अनुभव अवर्णनीयच!!
पुन्हा पाठीमागे येऊन ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. तिथेही समोर २ तोफा दिसत होत्या. डावीकडे पाहिल्यावर आपल्याला रेवदंड्याची आजही भक्कम असलेली तटबंदी पाहायला मिळते. आणखी एका प्रवेश द्वारातून पुढे गेल्यावर माथ्यावर काही तोफा पाहायला मिळतात. गडावर बऱ्याच ठिकाणी तटबंदीजवळ आपल्याला तोफा पाहायला मिळतात. त्यांना पाहून समोरून येणाऱ्या शत्रूवर या किती अंतरापर्यंत मारा करत असतील याचा उगाच अंदाज घ्यायचा प्रयत्न मी करत होतो.  किल्ल्यावर असणारी स्वच्छता आणि समोर असलेल्या चर्चचे झालेले डागडुगीचे काम प्रकर्षाने दिसून येत होते. उजव्या हाताला पांढऱ्या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. आणि तिथेच थोड्याच बाजूला पाण्याची टाकी आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायऱ्या आहेत हीच ती वाट जी आपल्याला गावात घेऊन जाते. किल्ल्यावर असणारा चर्च, तेथील  प्रवेश द्वाराच्या माथ्यावर असलेले शिलालेख आणि तेथील असणारे बुरुज असा हा पोर्तुग्रीज थाटणीचा किल्ला आपल्याला त्याचे वेगळेपण दाखवून देतो.
अरे मयूर. रोनाल्डो ला जर इथे आणला तर तो किती खुश होईल ना!! आपल्या पूर्वजांची केलेली कामगिरी पाहून. असा एक मिश्किल टोमणा हेमंत ने मारला. आम्हीही त्याला हसून दाद दिली.
आमच्या तिघांशिवाय किल्ल्यावर कोणीही नव्हते त्यामुळे बराच वेळा आम्ही तिघेही त्या "रत्नाकराकडे" मंत्रमुग्ध होऊन पाहत होतो. गर्दी नाही कसला गोंधळ नाही. सगळे कसे मनाला शांत आणि प्रसन्न करणारे वातावरण. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मिळणारे हे काही निवांत क्षण, निसर्गाच्या सान्निध्यातले आम्ही मुक्त मनाने अनुभवत होतो. थोडी विश्रांती, थोड्या गप्पा, थोडे फोटोसेशन केल्यावर तिथून आम्ही निघालो खरं पण जरा पाऊले जड होऊनचं.
खाली गेल्यावर आम्ही चौकशी केली असता कळलं कि इथे कोणाला रात्री वस्तीला राहता येत नाही. बाजूलाच द्विपगृह असल्याने तशी परवानगीही नाही. तिथल्याच बोअरवेल चे पाणी तोंडावर मारून तिघेही परतीच्या प्रवासासाठी ताजेतवाने झालो. जाता -जाता पुन्हा कोर्लईचे दर्शन आणि समोर दिसणाऱ्या अथांग समुद्राचे ते नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये साठवत आणि एक नवा उत्साह घेत परतीचा प्रवास सुरु केला.

कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा..

अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.

इ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.

या कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे.

ही मंडळी धर्मांतरीत नसून मूळचीच पोर्तुगीज होती. उत्तर कोकणातून पोर्तुगीज हटले आणि त्यांचा अन्य मूळ पोर्तुगीजांशी संपर्क राहिला नाही. तशातच मिश्र विवाहामुळे रक्तातील पोर्तुगीज अंशदेखिल पातळ होऊ लागला! आता ही मंडळी पूर्ण भारतीयच आहेत.

यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते

क्रीऑल नावाची अशी कुठली एक भाषा नसते. दोन वा अधिक भाषांच्या मिश्रणातून बनलेल्या "सुधारीत" भाषेस क्रीऑल अशी संज्ञा आहे.

(मिश्र "असुधारीत" भाषेस पिजिन अशी संज्ञा आहे)

बाकी तो संपूर्ण पट्टा मनोहर आहे, यात शंका नाही!

मॉरिशस् मध्येही स्थानिक भाषा ही फ्रेंच च्या गडद प्रभावाखाली असलेली क्रिऑल आहे.















Note:- This article has been published in 10th feb 2017 lokprabha magazine.




We entered the light house where we were introduced to new form of bribery the gate keeper at the guest house greeted us with a warm smile (a rarity from a security personnel) Lekin asli baat to baad me samaj me aayi when he informed us that if we want to visit the light house we will get a guided tour of the light house but in return we must pay unofficial fee to the caretaker of Rs 10 per head and Rs 20 for the camera if you are carrying any. I thought sahi hai boss jab ministers log mal bana rahe hai to neeche wala ka to param hak banta hai…Ab bechara anna bi kya karega…. Anyway lets not get political,
Inside the Light House


View from the Light House


 after visiting the light house we moved from rear of the Light House to the farthest end of the fort.
beautiful landscape like background
As we made our way the beauty of the surrounding locales were overwhelming us. The splash of water on the rocks and beautiful landscape like background is a sight which I cannot still shake off. 
We entered the fort from the sea side and Korlai Fort  being a sea fort it is indeed very beautiful.Something the words cannot describe.
The splash of water on the rocks




The moment we enter we see a big courtyard with cannons at various vantage points.


Large courtyard of the  Korlai Fort

Cannons are Vantage points

As the time was 1.30 pm so we thought of taking a break for lunch. We all sat down under the shade of the tree with lovely cool breeze and in the lap of nature had our lunch . My wife felt so comfortable here that she just lazed and was ready for a short nap. 


Caught Taking a nap..
Lekin kya kare the breeze was so enchanting...boss ek nap toh banta hai

No one wanted to move now as the pleasure of food,sea,breeze aur friends was irresistible so we all took a small break here and after ½ hrs started our further exploration of the fort.
Getting ready for Lunch...
Well Deserved Lunch break
The fort is maintained quite well, matter of fact some restoration work was also going on. I have not dealt much on the history and geography of the fort which  most of you are intelligent enough to check on Wikipedia I presume...Right Boss !!!!

Check out the glimpses of Korlai Fort 
Inside Korlai Fort


Inside Korlai Fort
After going thru the  fort  one realises that the fort quite long in 

length The fort is 2828 feet long, and its average breadth is eighty-

nine feet. The enclosing wall is  5' 3" high and has 305 battlements 

for guns. It is entered by eleven gates - four are outer and seven are inner. ..
Aaj ke liye itna gyan bahut hai...kyo ki is ke aage yaad rakna bii bhari kaam hai

There are different Portuguses inscriptions on the fort walls and stones ...meri samaj me toh ek bi nahi aaya phir bi maine pics nikal liya...koi na koi intelligent prani is ko samaj hi lega....Doosra as a wanderer and tourist yeh sab photos bi zaroori hota hai....


Portuguese Inscriptions at Korlai Fort 


Portuguese Inscriptions at Korlai Fort 

we moved on to descend from the other side of the fort which took us to the village 
Old Church in the Fort and on the left hand side you can see stairs, we took these stairs to reach the village while returning.
At the Village we had refreshing chilled ...don't get excited it was not beer but just a cold drink and then from here we started walking back to the bus stop, Just when we were nearing the Bus stop we were dismayed to see that the bus has already reached the stop...However Samarth ran like wild as if his life depended on this to stop the bus because missing this bus could have delayed us by atleast half an hour. Anyway we managed to halt the bus and all the member of the gang was onboard ...Hurray!!!.

 

Korlai Fort

It is another beautifully located fort near alibag. Fort was built in 1521 by the Portuguese. Now there is light house on the fort. Fortification is still in good condition. Fort has seven bastions, each of them bears name of saint. You will be amazed by the landscapes during sun-set.

How to reach there: Alibag- Chaul- Revdanda- Korlai( on the way to Murud)

first glimpse from Korlai village

Beautiful Korlai beach

route towards fort

Light house












२३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते.

९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.

कोरलई हा पोर्तुगिजकालीन किल्ला हा लांबच लांब असुन रुंदीला अगदिच थोटका. पायथ्यालाच दीपगृह आहे.

किल्ल्यावर बरेच अवशेष आहेत. काही तोफा आहेत. पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहेत.

किल्ल्यावरुन चौफेर दृश्य दिसते. अलीबाग, नागाव, रेवदंडा किनारा, रेवदंडा खाडी पूल, विक्रम पोलाद कारखाना ई.

नंतर काशिद किनार्‍यावर गेलो. एवढा स्वछ रुपेरी पांढराशुभ्र किनारा प्रथमच पाहिला. काशिद्चे वैशिट्य म्हणजे तिथे लाटा फरच मोठ्या येतात तरीही सुरक्षित असा किनारा आहे. तिथे मस्त डुंबण्याचा आनंद घेतला. पाठिमागेच फणसाडचे वन्यजीव अभयारण्य आहे. रात्री परत कर्पेवाडीला मुक्काम.

दुसर्‍या दिवशी सकाळ, दुपार नागावच्या किनार्‍यावर समुद्रस्नान स्वछ, सुन्दर लांब किनारा पण तिथे काशिदची मजा नाहिच.

सुर्यास्तानंतर नागाव सोडले ते रात्री ८ वाजता महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले.

११ वाजत घरी पोहोचलो ते परत इथे येण्याचा संकल्प करुनच.

अलिबागहून मुरुड-जंजिर्‍याकडे जाताना वाटेत रेवदंड्याची खाडी लागते. ती पार करून, मुरुडला जाण्यासाठी उजवीकडे वळले, की पहिलेच गाव लागते - कोरलई.

मुरुडकडे सुसाट न पळता थोडे ह्या गावात रेंगाळा. फार मजेशीर गोष्टी समजतील. हे गाव बहुतांशी ख्रिस्ती. गावकर्‍यांचा तोंडावळादेखिल थोडा वेगळा. आणि भाषा? ती तर फारच वेगळी!! म्हणजे तुमच्या-आमच्याशी अगदी व्यवस्थित मराठीत बोलतील पण आपापसात ती मंडळी काय बोलतात याचा तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही! कारण ती भाषा आहे जुनी पोर्तुगिज - मराठी मिश्रित.

चौल ही चिमुकली पोर्तुगिज वसाहत. १६८३ साली संभाजी महाराजांनी एका झडपेत चौल काबीज केले. त्यावेळी चौलमधिल काही पोर्तुगीज कुटुंबे जीव वाचवण्यासाठी खाडी ओलांडून कोरलईला आली आणि तिथेच स्थायिक झाली. उत्तरेला वसई आणि दक्षिणेला गोवा येथे मोठ्या पोर्तुगिज वसाहती होत्या पण त्यांचा कुणाशीच संबंध राहिला नाही आणि एक चिमुकला पण वेगळाच समाज निर्माण झाला!

कोकण किनार्‍यावर असे बरेचदा घडले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलहून आलेले ज्यू नागावच्या किनार्‍यावर येऊन थडकले तर इराणहून आलेले पारशी संजाणच्या किनार्‍याला लागले. आपल्या मूळ स्थानापासून दूरावलेले हे समाज नव्या ठिकाणी अगदी पूर्णपणे रुजले - फेरलावणी केलेल्या पिकासारखे!


Korlai Indo-Portuguese is a creole language based on Portuguese, spoken by approximately 1,000 inhabitants of the Korlai Village. The language is referred to as Korlai Creole Portuguese, Korlai Portuguese, Kristi or 'nɔ ling' by the speakers themselves, translating to 'our language'. The speakers are a part of a very close-knit community, commonly referred to as the 'Kristi' community due to their affiliation to Roman Catholicism.[2] Korlai is situated in the Raigad District (Colaba District) of the Konkan region, 150 kilometers south of Mumbai, in Maharashtra, India. The speakers are of a homogenous Roman Catholic pocket in an area dominated by Hindu and Muslim Marathi speaking inhabitants.[2]

DEVELOPMENT OF KORLAI CREOLE PORTUGUESE[EDIT]

The village of Korlai viewed from Korlai Fort

The development of the language can be traced back to the 1500s with the conception of the new element of society, the native Indian Catholics and Eurasian offspring. The existing caste system within India had a great influence on the creation of KCP (Korlai Creole Portuguese). The Eurasian offspring and the Indian-Eurasian offspring were isolated from the pure-blood Portuguese and other castes. This isolation led them to intermarry and children began learning the pidgin their parents spoke.[3] The Korlai creole emerged among the slaves and their offspring who converted to Christianity and became a part of the Portuguese community while still adhering to existing caste distinctions.[4]  The social isolation this community faced contributed to the maintenance and growth of Korlai creole.

In today's context, the Kristi community is geographically separated from the rest as the community lives in the 'varcha bhag' [Upper Korlai]. The community also differs from the rest of the area occupationally. Korlai Creole Portuguese speakers are agriculturists whereas the other dominant occupation is of fishers from the Koli, Mali, Agari and a few Maratha communities. Apart from the geographical and occupational differences, the Kristi community differentiates itself linguistically, by the use of 'nɔ ling', an important marker of their identity.[4] However, with the changing times and better connectivity between Korlai and the rest of the world, the language evolving. The newer generation prefers the use of Marathi as it is dominant language of the state and the insistence of the Church in order to create unison.[4] This is causing a huge influence of Marathi on the language and its development.

SOCIO-HISTORICAL BACKGROUND[EDIT]

Chaul was an important trade city near Korlai and was first visited by the Portuguese in 1505. This area was previously under the Muslim rule from 1318. The Portuguese and the Muslim ruler maintained a friendly relation, however, the relation soon experienced tension and a war broke out. During this time 600 casados, i.e. Portuguese men married the native women who were living outside the Chaul fort along with a large number of Hindu and Muslim shopkeepers.[2] In 1594, the Portuguese took over the fort along with Korlai in the valley of the marro (hill). By 1630, a small Christian community grew when the church, Nossa Senhora do Mar 'Our Lady of the Sea' was built on the hill. The slaves and the offspring of the casados [Portuguese men] and soldadas [Soldiers] were mainly Christian converts.[4] The Portuguese abandoned Chaul and the hill to move to Goa in 1740. After the departure of the Portuguese, many Christians moved to other Portuguese territories while the Christians of the lower-castes moved closer to the church as the Marathas took control of the region.[4]

FEATURES OF KORLAI CREOLE PORTUGUESE[EDIT]

Korlai Portuguese vowels are similar to the Middle Portuguese, which was spoken by Portuguese soldiers that came to the region. The sole difference being the point of articulation of the central vowel. Both Marathi and Korlai Creole Portuguese had a decline in nasal vowels and this process of denasalisation is connected for both languages.[3] In the younger generation, Korlai Creole Poruguese also shows an increase in the borrowing of Marathi lexical items.[4] Clements indicated that the language had SVO word order but recent data shows the language now utilizes a SOV word order, which could be attributed to increased influence of Marathi.[4]

EXAMPLES OF NƆ LING[EDIT]

Thanks a lot: Muit'obrigad! From Port. Muito Obrigado
I: yo; From Port. eu
You (singular): wo; From Port. vós
You (formal): usé; From Port. você
He and She: el; From Port. ele (he) and ela (she)
We: no; From Port. nós
You (plural): udzó; From Port. vós outros
They: eló; from Port. eles outros
Numerals: ũ, doy, tre, kwat, sink, sey, set, oyt, nob, dey; From Port. um, dois, três, quatro, cinco, seis, sete, oito, nove, dez
First, Second: Primer, Sigun; From Port. Primeiro, Segundo
How are you?: Use, kile te?
All are eating and drinking their fill: tud gent cumen beben tem fart; From Port. toda a gente come e bebe até farta

Song of Korlai:

Maldita Maria Madulena,
Maldita firmosa,
Ai, contra ma ja foi a Madulena,
Vastida de mata!

Portuguese translation:

Maldita Maria Madalena,
Maldita Formosa,
Ai, contra minha vontade foi a Madalena,
Vestida de mata!

English translation:

Cursed Maria Madalena,
Cursed Beautiful one,
Oh, against my will it was Madalena,
Dressed in leaves and branches!




कोर्ट ऑफ आर्म :- पोर्तुगीजांच्या ध्वजावर असलेले कोर्ट ऑफ आर्म वसईकोर्लईरेवदंडा इत्यादी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या किंवा त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा चच्रेसवर पाहायला मिळतोया चिन्हात एका मोठय़ा ढालीच्या आत सात किल्ले आणि पाच ढाली दाखवलेल्या असतातआतल्या बाजूस असलेल्या पाच ढालीपोर्तुगीज राजा अल्फान्सो – एक याने पाच मूरीश राजांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून दाखवतातया ढालींवर पाच उंचवटे कोरलेले असतातते येशू ख्रिस्ताला झालेल्या पाच जखमांचं प्रतीक म्हणून दाखवतातपाच ढालींच्या बाहेरच्या बाजूला सात किल्ले दाखवलेले असतातपोर्तुगीज राजा अल्फान्सो – तीन याने जिंकलेल्या सात मूरीश किल्ल्यांचे हे प्रतीक आहेढालीच्या बाहेरच्या बाजूला ऑलिव्हची पानं कोरलेली असतातढालीवर मुकुट कोरलेला असतो.
 कोर्लईवरीलच पोर्तुगीजांचे 'आर्म्स ऑफ कोट' चिन्ह(शिलालेखाचा संक्षिप्त अर्थ: हा किल्ला बांधण्याची आज्ञा भारताचा व्हाईसरॉय डॉंम फिलिपे मस्कारेन्हास याने १६४६ मध्ये दिली आणि चौलचा कॅप्टन फर्नाओ मिरांडा हेन्रीक्स याने १६८० मध्ये हे काम संपवले. ह्या किल्ल्याचा कॅप्टन(किल्लेदार) क्रिस्ताव डी अबेइरू डी अझेवेदो हा आहे)
अशेरीवरील पोर्तुगीज चिन्ह
आर्मिलरी स्पियर:- नवीन भूमीच्या शोधात निघालेल्या पोर्तुगीज दर्यावर्दीच्या झेंडय़ावर असणारा आर्मिलरी स्पियर द्वारचिन्ह म्हणून कोरलेला आढळतोया चिन्हात पृथ्वी गोलावर अक्षांश-रेखांश दाखवतात तशा रेषा कोरलेल्या असतातत्या सर्वाना छेदणारा एक पट्टाही कोरलेला असतोपोर्तुगीज राजा मॅन्युअल -एक याचं हे राजचिन्ह होतंनंतरच्या काळात जगभर पसरलेल्या पोर्तुगीज सत्तेचं प्रतीक म्हणून हे वापरलं गेलंबऱ्याचदा आर्मिलरी स्पियर हा कोट ऑफ आर्मच्या मागे कोरलेला असतो.  आर्मिलरी स्पियर आणि कोट ऑफ आर्म यांना पोर्तुगीजच्या नकाशावर स्थान मिळालेलं आहे.
कोर्लई किल्ल्यावरील पोर्तुगीजांचे जागतिक स्वामित्व दाखवणारे चिन्ह
वसईचा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांची  उत्तर कोकणातील राजधानी! १७३९ ला चिमाजी अप्पांनी किल्ला जिंकून मराठ्यांचे राज्य या भागात स्थापन केले. या किल्यामध्ये जागोजागी आपणास पोर्तुगीज शिलालेख  आणि शिल्पे आढळून येतात.

ढाल आणि राजमुकुट  (बालेकिल्ला वसई), ख्रिस्ती क्रॉस आणि पृथ्विगोल




























  वसईवरील पोर्तुगीजांचे नाविक सत्तेचे चिन्ह
वसईवरीलच इंग्रजांच्या नाविक सत्तेचे चिन्ह (हे किल्ला पेशव्यानंतर इंग्रजांकडे गेल्यानंतरचे आहे)
वसईवरीलच काठ्या (की मेणबत्त्या?) तोंडात पकडलेल्या कुत्र्यांचे इंग्रजकालीन शिल्प
 रायगड तालुक्यातील रेवदंडा ह्या कुंडलिका खाडीच्या तोंडावर असलेल्या किनारी दुर्गाच्या प्रवेशद्वारावरील ढाल आणि मुकुट शिल्प:





































रेवदंडा किल्यातील प्रेवेश्द्वारावर असलेले क्रॉस चे शिल्प:
























कुंडलिका खाडीच्याच तोंडावर वसलेल्या कोरलई किल्ल्यावर सुद्धा पोर्तुगीज राजसत्तेचा अंमल होता. ह्या किल्ल्यावर मूळ निजाम शाह कालीन बांधकाम आणि नंतरचे पोर्तुगीज स्थापत्य ह्या दोन्ही शैली नजरेस पडतात.
    कोरलई किल्ल्याचे दोन भाग आहेत. खालील टप्पा हा समुद्र  किनारालगत आहे तर मुख्य किल्ला खालील भागालगत असलेल्या टेकाडावर आहे.
    खालील भागातील किल्यावर छोट्या मनोरा असेल त्याप्रमाणे असलेल एक दुर्ग शिल्प अथवा वास्तू तटबंदीमध्ये सापडते:





































ह्या शिल्पकृतीला क्रुसाची बातेरी असे नाव आहे.





सन१५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा पोर्तुगीज अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास चौलगावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४ च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला. एकूण तत्कालिन पोर्तुगीज नौदल हे बलाढ्य असल्याने त्यांना हे शक्य झाले. व छत्रपती अजून यावयाचे होते.
असो,

कोरलई
निमुळत्या टेकडीवर असलेला कोरलाई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण ३० मी. पेक्षा याची रुंदी जास्त नाही. ९० मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. त्यापैकी सागराच्या धक्का्याच्या बाजूस डोंगर चढून आम्ही दर्या दरवाजाकडून किल्ल्यात प्रवेश केला. येथून डावीकडे तो दिंडी दरवाजा तर उजवीकडे आहे चर्च व बालेकिल्ला.
मोहिमदार प्रा उगलेसर मुंजाळसर पारडेसर ढोबळेसर आणि मी

येथून आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून अनेक मोठी दालने व बुरूज ओलांडून आपण चर्चकडे जातो तेव्हा वाटेत बाजूला छोटेसे महादेवाचे मंदिर लागते. त्यासमोर दोन वृंदावन आहेत. पुढे चालून गेल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो.
तटबंदीच्या बुरुजावर बऱ्याच तोफा आहेत. काही दरवाजे

ममाद्रि-द-देऊश

ओलांडून गेल्यावर माद्रि-द-देऊश नावाचे एक मोठे चर्च लागते. अर्थात त्यात मूर्ती नसून ते भयाण पडले आहे. तरी त्याच्या उंच छतावरील नक्षी नजरेस भरते. पोर्तुगीज बांधनीतील दरवाजांच्या व
खिडक्यांच्या गोलाकार कमानी गोवा, वसई आदिंची आठवन करून देतात.

पोर्तुगीज ध्वज शिल्प

चर्च नंतर लागतो बालेकिल्ला. कोरलाईचा हा सर्वोच्च असा हा माथा आहे. हा चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. सर्व शिलालेख हे पोर्तूगाली भाषेतील आहेत.
रेवदंडा व कोरलाई असा मुलूख बघतांना इतरत्र खुशाल पहुडलेल्या तोफा दिसल्या. आता जणू बागेतील खेळण्याप्रमाणे त्या पर्यटकांना लूभावून टाकण्याचा केवीलवाना प्रयत्न करताना दिसत होत्या…की बघा आम्ही तोफा आहोत बुवा, पोर्तुगीज~तोफा! आमच्याकडेही जरा या…!

मात्र केविलवान्या मुखाची गार पडलेली ही तोफांची धुडे कधीकाळी सागरी सत्तेने माजून गेली होती.
या विचाराने ती माजोरी धुडे मला पेटलेली भासत होती. त्यांच्या मुखातून निघणारी आग, धूपट, सागरावर हेलकावणारी गलबत दिसत होती. आणि-सोबतच आसमंत भेदून टाकणाऱ्या हर हर महादेवच्या किलकाऱ्यां आणि घोड्यांच्या टापा कर्ण भेदू लागल्या. आणि शौर्यशंभू च्या शौर्याच प्रचंड गलबत नजरेच्या सागरात तरळू लागलं…
… संभाजीराजा छत्रपती होऊन सिंहासनाधिष्ट होत नाही तोच औरंगजेब बादशहा सर्व सामर्थ्यानिशी चालून आला. गत तिन वर्षांपासून औरंगजेब बादशहा आणि छत्रपती संभाजीराजा कल्यानच्या रणात अखंड झुंजत होते. मराठा वीर मरत होते पण हटत नव्हते. वसईहून कल्यानच्या रणांगनात मोगलांना रसद पुरवठा करून पोर्तुगीजांनी मात्र संभाजी राजांना क्रोधित केले. दगलबाज पोर्तुगीजांनी ऐन वख्ताला पाठीत वार केला होता. या रसद पुरवठ्याच्या मोबदल्यात बादशहा कडून संभाजीराजांचा काही किनाऱ्याचा भाग मिळवा याकरीता पोर्तुगीज व्हाईसराय पत्रामध्ये बादशहास चक्क भिक मागू लागला.
मात्र झाले विपरीत, तिन वर्षे झुंजूनही मोगलांना कल्यानच्या रणांगनात यश मिळवता आले नाही. बादशहाने अखेर सन १६८३ च्या एप्रिल महिन्यात कल्यानातून आपले सैन्य व खाडीतून आपले आरमार परत बोलावले. बादशहा परास्त केला, आता वेळ होती दगलबाज पोर्तुगीजांना शासन करण्याची. आणि शंभूराजांनी पोर्तुगीजांविरूद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले..!
आगीत तेल ओतणारे या आगीपासून दूर राहू म्हणतात तरी कसे… ही आग आता त्यांची राख केल्याशिवाय राहणार नव्हती.! कारण ही गाठ कुन्या सुलतानाशी नव्हती रे बाबा..!
मुंबईच्या खालच्या अंगास किनाऱ्यावरील चौल, रेवदंडा व कोरलाई या पोर्तुगीज किल्ल्यावर संभाजीराजांनी खुद्द आक्रमन केले. जेधे शकावली म्हणते-
शके १६०५ रूधिरोदगारी संवछरे जेष्ठ वद्य ११ संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंगीयासी बिघाड केला, रेवदंडीयासी वेढा घातला ।।
अर्थात खुद्द संभाजीराजे स्वार होऊन रेवदंड्यावर चालून गेले. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण सुरूवातीस पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. पश्चात मराठ्यांनी रेवदंड्याला घट्ट वेढा घातला.पेशवा निळोपंतही या मोहीमेत होता.
२ ऑगस्ट १६८३ रोजी २००० स्वार व ६००० पायदळ चौलावरही चालून गेले. रेवदंडा व चौलासोबतच मराठ्यांनी कोरलाई किल्ल्यावर हल्ला चढविला. तटबंदीवर तोफा धडाडू लागल्या. माद्रि-द-देऊश नावाचे चर्चात बसून पाद्री धावा करू लागले. सागराच्या बाजूस किल्ल्यावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्याने मराठे चढू लागले. किल्ल्यातून कॅप्टन तोफा चालवून प्रतिकार करू लागला. याच सुमारास निळोपंत पेशवा वसई च्या कोटावर चालून गेला. अशाप्रकारे उत्तर फिरंगानाचा फास आवळला जाऊ लागला. उत्तर फिरंगानाचा फास सुटावा म्हणून घाबरून व्हाईसरायने गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घालण्याची आगळीक केली.
आणि पेशवा निळोपंतावर मोहीम सोपवून संभाजीराजे खुद्द फोंड्याकडे निघून गेले. फोंड्याचे युद्ध जिंकून संभाजीराजे खुद्द गोव्यावर चालून गेले. आणि काही महिन्यात उत्तर व दक्षिन फिरंगान संभाजीराजांच्या घोड्यांच्या टाचेखाली आला. स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांच्या अवस्थेचे आपल्या पत्रातून वर्णन करतांना इंग्रज म्हणतात की-
फोंड्यावर जो पोर्तुगीजांचा संपूर्णत: पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचा चढेलपणाचा पारा खूपच खाली आला. उत्तरेकडेही त्यांची धूळधान उडाल्याने त्यांची शौर्याची घमेंड आणि क्रूर नाठाळ व्रूत्ती बरीच सुधारेल. राजांशी युद्ध करताना मनुष्य व संपत्ती बलाचा त्यांनी विचार केला नाही. उतावळेपणाच्या परिणामाची जाणीव त्यांना झाली आहे आणि त्यांची मस्ती पूर्णपणे जिरली आहे..(संदर्भ-शौर्यशंभू३३३)
लवकरच व्हाईसरायने तहाची याचना केली. अशाप्रकारे सन १५०० पासून स्वतः स अजिंक्य समजणाऱ्या पोर्तुगीजांना या मराठी राजाने आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पश्चात चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला व पोर्तुगीजांना हळूहळू वसई आदि मुलूख कायमचा सोडावा लागला.
२५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. मराठ्यांनंतर १८०६ मध्ये इंग्रजांनी यांचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हे किल्ले जिंकले. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
असो,

कोरलईच्या त्या किल्ल्यावरून मावळत्या सुर्याचे मोहक दर्शन मोठे मर्म सांगून जात होते….उदय आणि अस्त हा निसर्गाचा नियम मानवासही लागू पडतो !!
सत्ता येतात आणि जातात, मात्र त्यांची कथा सांगावयास तटबंद्या अन् बुरूज मागे राहतात !
सत्तांची खंडरे बनतात पण शौर्य गाथा ह्रदयातून जिवंत राहतात..!!!
फिरंगीयासी परास्त करणाऱ्या, परकिय तोफांचा माज उतरवीणाऱ्या त्या मराठी तलवारीस अन् त्याच्या राजास-शौर्यशंभूस कोट कोट प्रणाम !!!

||फक्तइतिहास||
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

https://faktitihas.wordpress.com/page/7/


 
 
 








कोरलई

कोरलई : (मुरुड ता., १८० ३०' उ., ७२० ५०′ पू., उंची ८२.६० मी.) रेवदंडा गावासमोर रोहा लाडीच्या डाव्या किनाऱ्यावर कोरलई हा जलदुर्ग आहे. जलदुर्गाच्या दक्षिणेस कोरलई तथा कोराले गाव आहे. येथे खिश्चनांची वस्ती अधिक होती. इतिहासकार मेर्न, द कुन्दा, घेवेनॉट, दो कुटो, अंतोनो बोकारो, फेरिश्ता इत्यादींनी कोरलईचे वर्णन लिहून ठेवले आहे.
      इतिहास : हा दुर्ग सोळाव्या शतकात युरोपियन लोकांना चौलचा रॉक या नावाने माहीत होता. सन १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरले तथा कोरलईचा अधिकारी दियोग लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली असता पोर्तुगिजांनी चौल (रेवदंडा) खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या कोरलईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का (त्रुसाची बातेरी किवा बाह्यकोट) बांधला." किल्ल्याची ही सर्वात खालची बाजू समुद्रसपाटीला आहे. तिला सांता क्रूज किंवा कुसाची बातेरी असेही म्हणतात. या खाडीच्या मुखाशी असलेल्या खंबायत नौदलाने (गुजरात नौदल) या बाह्यकोटावर लवकरच हल्ला केला, परंतु पोर्तुगिजांच्या कोरलई शिबंदीस चौलहून कुमक मिळाल्याने गुजराती सैन्याचे मोठे नुकसान होऊन पळ काढावां लागला. सन १५५३ मध्ये बुरहान निजामशहा मरण पावला. त्यानंतर सुमारे चार-पाचः वर्षे तेथे गादीवरून यादवी चालली. तिचा फायदा उठवावा या हेतूने पोर्तुगिजांनी अहमदनगरकडे कोरलाई पोर्तुगिजांना अभ्यर्पित करण्याची मागणी केली. परंतु त्यावेळी अहमदनगरच्या गादीवर आलेल्या हुसेन निजामशहाने ही मागणी साफ धुडकावून लावली व त्याने पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने १५५८ मध्ये रुपीखान आणि मौलाना शहामहमद उस्ताद यांना सैन्य व तोफखाना देऊन रेवदंडधास पाठविले. २१ सोबत त्याने कॉरलई दुर्गास भक्कम तटबंदी बांधण्यासाठी निष्णात स्थापत्यविशारद पाठविले. पोर्तुगिजांनी त्यास विरोध केला. पोर्तुगिजांशी झालेल्या वल्पशा चकमकीनंतर पोर्तुगिजांनी निजामशहाशी तह केला व त्यानुसार किल्ल्यास तटबंदी नसावी असे ठरले. नंतर हा धक्का किंवा बाह्यकोट मुसलमानांनी पाहून टाकला. परंतु पोर्तुगीज नोंदीनुसार अगदी शेवटच्या उत्तर टोकावर असलेला लहान लाकडी शिश्चन क्रुस मुसलमान सैनिक कापू शकले नाहीत. किवा त्यांचे हत्ती त्यास तुडवू शकले नाहीत. मुर्तझा निजामशहा (१५६५-१५८८) याने पोर्तुगिजांवर चाल करून चौल किल्ल्यास वेढा घातला होता. निजामशाही अधिकारी व पोर्तुगिजांत पत्त्रव्यवहार सुरू झाल्याने मुर्तझा निजामशहाने तो बेढा उठविला. मुर्तझा निझामशहा नंतर मीरान हुसेनशहा हा अल्पकाळ गादीवर राहिला.
      कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८ वरील तळटिप क्र. ३. जेमेली कॅरेरी (Gemelli Careri) आपल्या चचिल चौथा या पुस्तकात पृ. २०० वर लिहितो की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगिजांना ३०० पशियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने जणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. भारतात दुर्लभ असलेले हे घोडे त्यास आदिलखानाशी लढाईत वापरावयाचे होते.

१२११ कित्ता, पृ. ३२८; द कुन्हाज चौल, पू. ३५.
***
भ. ग. कुंटे, अहमदनगरची निजामशाही (बुरहाने मासीर - लेखक संय्यद अलीच्या फारशी ग्रंथाचा सर वुल्सले हेग याचा इंग्रजी अनुवाद व या इंग्रजी
अनुवादाचा मराठी अनुवाद), पृ. १२०.

कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२८. परंतु बुरहाने मासीर (लेखक सय्यद अली) नुसार हुसेन निजामशहाने सैन्य व तोफखाना रेवदंड्यास पाठविला. पोर्तुगिजांना ही बातमी लागताच त्यांनी आपला वकील निजामशहाकडे पाठविला आणि आपल्या कृत्यकर्माची क्षमा मागितली. यापुढे अशी चूक होणार नाही असे कळविले. पोर्तुगिजांचा निरोप मिळाल्यावर निजामशहाने आपले सैन्य परत. बोलविले.

किंत्ता, पू. ३२८.

त्यानंतर गादीवर आलेला दुसरा बुरहान निजामशहा (१५९०-१५९४) याचा पोर्तुगिजांवर राग होता. त्यावेळी अहमदनगरचा तोफखाना रुपीखानाच्या ताब्यात होता. दुसऱ्या बुरहान निजामशहाने सर्व जड तोफखाना रेवदंडचास हलविला. बुरहान निजामशहा पोर्तुगिजांशी लढाईच्या मोहिमेवर असताना १५९२ मध्ये कोरलईच्या टेकडीवर बुरहान दुर्ग नामक अभूतपूर्व भक्कम असा पूर्ण किल्ला बांधला व तेथून त्याने खाडीपलीकडील रेवदंडा किल्ल्याची बरीच तटबंदी उध्वस्त केली. दिनांक ४ सप्टेंबर १५९४ रोजी पोर्तुगिजांना चौल-रेवदंडा भागातील अहमदनगर राजवटीच्या ताब्यातील कोरलई बाजार उध्वस्त करून तिचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी वसई व साष्टीवरून मोठी कुमक मिळाली. चौलचा एक पोर्तुगीज कप्तान १,५०० पोर्तुगीज व बच्पुच स्थानिक विश्वासू सैनिकांसह (एकूण ४,००० सैनिक) लहान नावांनी खाडी पार करून कोरलई किनाऱ्यावर उतरला. त्यावेळी किल्ल्याबाहेर ताजस्तान आणि अण्णेराव हे आपल्या फौजेसह तयार होते. त्यांच्यावर पहिला हल्ला होताच त्यांनी किल्ल्याकडे पळ काढला. दिनांक १३ सप्टेंबर १५९४ च्या रात्री झालेल्या चकमकीत मुसलमानांना कोरलई दुर्गाच्या बाह्यकोटापर्यंत खदेडून लावले. यात अहमदनगर सेनेचा साफ पराभव झाला. नेर्नच्या माहितीनुसार कोटाच्या दरवाजात हत्ती मरून पडल्यामुळे तो बंद झाला. वरून पडणारे दुर्गरक्षकही पोर्तुगिजांची वाट अडवत होते. यातून मार्ग काढून पोर्तुगिजांना प्रवेश करावा लागला. या लढाईत पोर्तुगिजांकडून अँटोनिओ नावाचा फान्सिस्कन पाद्रीही लढत होता." तो ठार झाल्यामुळे रागावलेल्या पोर्तुगिजांनी दुसऱ्या दरवाजापर्यंत धडक मारली. या दरवाजातही घोडा मरून पडल्याने आतील दुर्गरक्षकांना तो बंद करता आला नाही. पोर्तुगिजांनी दुर्गाच्या अंतर्भागात प्रवेश "केला आणि कत्तलीस सुरुवात केली. या गोंधळामुळे किल्ल्यातील सरदार फरहादखान, १९ असदखान आणि इतर अमीर झोपेतून जागे झाले. परंतु प्रतिकाराची कोणतीच तयारी त्यांना करता आली नाही. या लढाईत १,००० मुसलमान मारले गेले तर पोर्तुगिजांचे केवळ २१ सैनिक कामी आले व ५० जखमी झाले. त्याशिवाय पोर्तुगिजांना भरपूर दारूगोळा, घोडे, पाच हत्ती, ७७ तोफा आणि लहानसहान शस्त्रांचे कोठार हाती लागले. फरहादखान,
त्याची बायको व मुलगी कैद झाली. त्याच्या बायकोस दंड भरून सोडविण्यात आले. परंतु फरहादखान व त्याच्या मुलीस बाटवून चिश्चन करण्यात आले. तथापि जखमी फरहादखान काही दिवसातच मरण पावला. चौलला त्याचे मोठ्या इतमानाने दफन करण्यात आले. या किल्ल्याच्या रक्षणासाठी पोर्तुगिजांजवळ पुरेसे सेनादल नसल्यामुळे त्यांनी उत्तरेकडील सांता क्रूज बातेरीचा भाग व टेकडीच्या माथ्यावरील तटबंदी (बालेकिल्ला) सोडून बाकीचा भाग उध्वस्त केला.

१२५ कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. १२००
१२६ या पराभवाचा उल्लेख सय्यद अली बुरहाने मासीर मध्ये करीत नाही, परंतु फेरिश्ता मात्न करतो, फेरिश्ता, भाग २, पृ. ३०४, (कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९ वरील तळटिप यात चुकून १५९३ असा उल्लेख असावा.)
कुलाबा गॅझेटिअर, १८८३, ५. ३२९.
१२८ कित्ता, पृ. ३२९.
१२१ कित्ता, पृ. ३२९ नुसार फत्तेहखान तर फेरिश्ता (कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९.) नुसार फरहादखान.
कित्ता, पृ. ३२९. तथापि फेरिश्तानुसार दहाबारा हजार मुसलमान मारले गेले (कुंटे अहमदनगरची निजामशाही, पृ. २७९).
१९ नेने, इंडियन अॅटिक्वरी, खंड २, पृ. १८२; कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२९.

पोर्तुगिजांनी किल्ला उध्वस्त करण्याआधी दो फुटो याने किल्ल्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे." " हा किल्ला फारच भव्य असून त्यावर फक्त जमिनीच्याच बाजूने हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र व खाडी यांच्यामधून एक खंदक खणलेला असून फक्त त्याच्यावरील पुलावरूनच आत प्रवेश करता येतो. हा पूल उडवून टाकला की, किल्ला अगदी अभेद्य आहे. खंदकाच्या आत भक्कम भित बांधलेली होती. या भितीत दोन मोठ्या बुरुजांतून असलेल्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एक मोठा ब्राँझचा सिह हाँ.जा. त्याखाली 'माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही' (None passes me but fights) अशी अक्षरे आहेत.
  किल्ल्याच्या माथ्यावर मध्यवर्ती बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरूड पक्षी काढलेला आहे. तेथे 'माझ्या तावडीतून माशांबेरीज कुणाचीच सुटका नाही' (None passes me but flies) असे दर्पोक्तियुक्त वचन कोरलेले ." अधिक माहिती १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअर मध्ये आहे. देण्यात आलेली असल्यामुळे तिची येथे पुनरावृत्ती केलेली नाही.
    ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीने चौलबरोबरच कोरलई घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने तळागडचा हवालदार सुभानजी माणकर यास कोरलईवर पाठवून किल्ल्याची कोंडी केली. सन १७३९ मध्ये चिमाजी व पोर्तुगीज यांच्यात वसईचा तह झाल्यावर पहिला बाजीराव व पोर्तुगीज अधिकारी इंचवर्ड यांची १४ जानेवारी १७४० ला भेट झाली. त्यांच्या वाटाघाटीनंतर ७ सप्टेंबर १७४० ला झालेल्या तहानुसार नोव्हेंबर १७४० ला चौल व कोरलई किल्ले पोर्तुगिजांकडून मराठघांना मिळाले." कोरलईचा महत्त्वाचा जलदुर्ग पेशव्यांच्या हाती येताच त्याचा तावा कुलाबकर आंगरेकडे देण्यात आला. आंगरेने तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलली. सन १८१८ मध्ये पेशवाई समाप्त झाल्यावर इतर किल्ल्यांबरोबरच कोरलई दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला. दिनांक ६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण चहले.
६ जून १८१८ ला (शके १७४०, ज्येष्ठ शुद्ध २) या किल्ल्यावर इंग्रजांचे निशाण जडले. या किल्ल्याची पूर्व-पश्चिम लांबी ८६१.९७ मी. आणि दक्षिणोत्तर रुंदी २७.१२ मी. व तटभितीची उंची १.५२ मी. आहे. किल्ल्यावरून मारा करण्यासाठी तभितीला गोळी-बारासाठी ३०५ जंगी आहेत. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे असून त्यापैकी चार बाहेरच्या तटबंदीस व सात आतील बाजूस आहेत. मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस असून अजूनही सुस्थितीत आहे. त्यावर पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहे. किल्ल्याच्या पश्चिम टोकाजवळ घोड्यांची पागा सुस्थितीत आहे. उत्तर टोकास बांधलेला धक्का अजून शाबूत आहे. येथे सपाट मैदान आहे. येथील बुरुजावर तीन तोफा आहेत. थोडे वर चढल्यावर पहिला दोन बुरुजांचा दरवाजा व त्यानंतर दुसरा दोन बुरुजांचा दरवाजा लागतो. त्यावर S. FRAXAVER अशी अक्षरे आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर तिसरा मोठा दरवाजा लागतो. त्याच्या कमानीची लांबी सुमारे ६.७१ मी. असून त्यातून पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण किल्ल्याचा मध्यभाग येतो. हा बालेकिल्ल्याचा भाग असून येथील सांत बुरुजांपैकी पाच बुरुजांना सॅम थिओगो,

११२ कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३२९-३३ (नेनं, पूर्वोक्त, पृ. १८१).
१२ सरदेसाई, मराठी रियासत, खंड २, (सुधारित आवृत्ती), १९८९, पृ. ५१.
११० कित्ता, खंड ३, १९८९, पृ. ५५३.
१२५ दा. गो. ढबू, कुलाबकर आंग्रे सरखेल आंग्रे घराण्याचा इतिहास, पू. ३६८.
*** अवळसकर, आंगरेकालीन अष्टागर, पू. ९९ वरील टिप्पणी क्र. ७१७.

सॅम फान्सिस्को झेविअर, सॅम पेद्रो, सॅम इग्नॅसिओ आणि सॅम फिलिप या पोर्तुगीज संतांची नावे होती. मराठ्चांनी किल्ला काबीज केल्यानंतर १७४० मध्ये बुरुजांची नावे पुढीलप्रमाणे बदलली:- पुसत्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुरजी, राम व पान. सध्या एकाही नावाची खूण दिसत नाही. यानंतर लागणाऱ्या चौथ्या दरवाजाच्या समोर एक खड्डा असून त्याच्या बांधिव दगडी भिती दिसतात. तेथे पावसाचे पाणी साठविण्यासाठी बांधिव हौद असावा. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. डाव्या बाजूला पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष असावेत. पाण्याच्या टाक्याजवळ महादेवाचे अलीकडच्या काळातील मंदिर आहे. टाक्यातील पाणी दुर्गाच्या खाली दक्षिण बाजूला असलेल्या दीपस्तंभामध्ये नेले आहे.
       पाण्याच्या टाक्यापासून पुढे गेल्यानंतर किल्ल्याचे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेख भग्नावस्थेत पडलेला आहे. दक्षिणेकडे पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष आहेत. यानंतर चॅपलची इमारत लागते. इमारतीचा पुढील भाग ढासळलेला आहे. छत्त मात्र अजून शिल्लक आहे. चॅपलच्या पाठीमागे राजवाडयाच्या धाटणीची इमारत लागते. या मुस्लिम वास्तुशैलीच्या इमारतीला एक मजला आहे. इमारतीचे दगडी बांधकाम अजून सुस्थितीत आहे. ही इमारत मुसलमानी अमदानीत बांधकाम केलेल्या वास्तूवर पोर्तुगिजांनी बांधली असावी. इमारतीच्या पाठीमागे उजव्या तटबंदीच्या आतील बाजूस कमानीचे अर्धवट अवशेष आहळून येतात, तसेच कमानीच्या समोर मोठ्या दगडी चौयऱ्याच्या पूर्व बाजूच्या भितीचे अवशेष दिसतात. यावरून हे अनुमान करता येते. ही इमारत बहुधा सेनापतीच्या निवासासाठी असावी. इमारतीच्या पाठीमागे बरीच मोकळी जागा आहे. येथे उजव्या (दक्षिण) वाजूला मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदिरे मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर वांधलेली आहेत. त्यात गणेश मंदिर (३.६४ x ४.८६ मी.), मांजरादेवी (२१.२८ ९.२२ मी.) व वेदिकादेवी मंदिर (६.३८ ४ ४.८६ मी.) यांचा समावेश आहे. परंतु एकाही मंदिरात सध्या मूर्ती  नाही.
        मंदिराच्या भितीचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याच्या अगदी पूर्व टोकाला अजून-सुद्धा भक्कम तटबंदी असून त्याला दोन बुरूज आहेत. तटबंदीच्या खाली दक्षिणेकडील जमिनीच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तेथे खंदक असून त्यावर लाकडी पूल होता. सध्या पूल अस्तित्वात नाही.
कोरलई किल्ल्यावर तीन पोर्तुगीज शिलालेख आहेत. पैकी फक्त किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दरवाजावर खालीलप्रमाणे आठ ओळींचा शिलालेख वाचता येतो.
(1) ESTE CASTELO MANDO V. FAZER
(2) OVIZORI. DA INDIA DO FELIPHE
(3) MZSE DNOV BRODE 1646 ANOS 9
(4) SENDOCAPCTAO DE CHAVL. FE
(5) RNAO DE MIRANDA E RIQEAS DA
(6) CABOV SENE MAIO DE 1880 SENDO
(7) CAPITAO DE SAPRACACRIS TOVAO
(8) DABREV DAZEVEDO.
११० कुलाबा गॅझेटिअर, १८८३, पृ. ३३२, तळटिप.
११८ गॅझेटिअर कार्यालयाने फेब्रुवारी १९९२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार.
सन १८८३ मध्ये प्रकाशित कुलाबा गॅझेटिअर मध्ये (पृ. ३३१-३२) त्याचा खालील-प्रमाणे इंग्रजी अनुवाद केलेला आहे :-

"This castle was commanded to be built by the Viceroy of India D. Fellipe Mascarenhas in November of the year 1646, Fernao Miranda Henriques being Captain of Chaul, and was finished in May 1680, Christovao d Abreu, d' Azevedo being Captain of this fort. "
या शिलालेखावर मध्यभागी क्रूसाचे चिन्ह, ढाल व पोर्तुगीज तारे (quines) आहेत. बाकी दोन शिलालेखांपैकी एक प्रमुख प्रवेशद्वारावर व दुसरा किल्ल्यातील चॅपलच्या पुजास्थानाचे वर आहे. हे दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत.




 A visit to Korlai fort also called "Castle Curlew or EL Moro" and Korlai lighthouse

Monsoon was in its end of season mood with rains coming for few hours in a day or at times it was complete dry spell of heat. Taking into consideration the variance in temperature, Dr Ajay suggested that we do some offbeat treks and not go for pure treks. It was finalized that we go for small trek to Korlai fort and lighthouse near Alibaug. It was interesting and I decided to join them. As I had been to Kanhoji Angre lighthouse near Alibaug and this was going to be my 2nd lighthouse visit. It was going to be on Sunday - Oct 13th and meeting place was decided at Churchgate station at 7 am.


Korlai fort history : Korlai also called Castle Curlew or EL moro is a Portuguese fort in village of Korlai. It was built on the island of Moro de Chaul which guards the way to Revdanda creek. This strategic position of fort helped Portuguese defend their interest from Korlai to Bassein. This fort was built in 1521 under the permission from Sultanate of Ahmednagar. The fort moved from hands of Portuguese to Ahmednagar sultanate and back to Portuguese and finally in hands of Maratha's from 1739 - 1818. 


The fort is 2828 feet long and and average breath is 89 feet. It had 305 battlement for guns and could be entered by 11 gates (four outer and seven inner). Vestiges of Portuguese occupation are manifested in distinct dialect spoken by Korlai villagers till date which is "Kristi" which is mix of Portuguese Creole and local Marathi.

My Visit : Since last 15 days there were some news about cyclone Phalin going to hit the east coast of India and as the day came near, it turned out that the cyclone was strongest to hit Indian shores in a decade or more. Though the cyclone was in the Bay of Bengal, the depression caused some rains here in Mumbai a night before our visit. I was hoping that on our day of visit, it shouldn't rain for it would spoil the view and our photo shoot of the place. I woke up early around 5 am only to find it was drizzling a bit. By the time I started my train journey to Churchgate from Borivali, it has started to rain heavily. My heart sank thinking about rains playing spoilsport and visit was going to be a disaster as rains would come with fog and we would not be able to capture the place in our lens. Drenched in rains, I just reached Gateway in nick of time for our yacht was about to depart to Alibaug. We were only 5 of us and some of our group members had cancelled due to Phalin rains fear or due to last day of Navratri festival. 


So here we were, 5 musketeers on the way to explore what Korlai had to offer. Luckily moment we left the shores of Mumbai, rains had stopped, Our yacht was not crowded as compared to normal Sunday's. As Mumbai skyline move farther away from us, we got spectacular closeup of ships docked in the sea. Amazing to see some of them as high as 5-6 stories or more and were as good as small housing societies. Some were dredgers, some like floating oil rigs and multi-purpose vessels. We also got a chance to see a submarine peeping out of the sea !!!!





It took almost one hour to reach Mandwa port and from there it was 40 minutes bus ride to Alibaug ST stand. As everyone had left early from the house, We all were dead hungry and our first stop was at Udipi restaurant opposite ST stand. With hunger controlling our mind, we stopped looking at the ticking time, Consequences of which was that moment we reached ST stand to catch a bus for Murud, one bus just zipped past us and next bus was only one hr later at 11.30am !!!! It was hilarious situation for us that bus we wanted to board just went past us and we just kept starring. Now rather than waiting for one hour we decided to explore the option of tum-tum and Korlai is approx 20kms from Alibaug.

If we hire own tum-tum, it was costing Rs 200/- till Korlai while shared one till Revdanda market would cost Rs 15/- and from there to Korlai would be another Rs 20/-. It was unanimous choice to go for shared one. It was bumpy joy ride all the way to Revdanda and then till Revdanda bridge. We decided to walk down from the bridge as it would allow us to check the Korlai village life.












Walking past the paddy fields on one side and Revdanda creek on the other, we could see the Korlai fort standing tall at a distance. Rains had completely stopped and it was bright and sunny now. Disadvantage was that its was quite hot as we walked towards the village. Korlai village population would around 5000 people. We walked past small row houses and narrow lanes, being a Sunday afternoon, not much people were on the roads. There was one unique temple in middle of village called Bapuji temple. It didn't really look like one from outside. It was huge village house but inside they it housed the local deity and framed pictures of Hindu god's and goddess adorned the walls inside.


On asking direction, we were told that there is one of way to go to fort is from the lighthouse compound and road to the lighthouse is typical coastal road with sea on one side and mountain on the other. We decided to follow the coastal road. The village houses close to the seashore were uniquely painted. Each house wall was painted in different bright colours and it really looked awesome. Some houses in the village were huge ones, may be belonged to the elite class of the village.














Korlai beach was clean and view spectacular. A quite serene beach with alternate white and black sand. It was completely empty and seems to stretch on forever. Would have loved to take a dip in waves hitting the shores but our destination was the lighthouse and then the fort. The way to the lighthouse is narrow strip of coastal road cut from the mountains. On our way, we stopped for quite a few occasions for a photo shoot as the view was spectacular with beaches down below and hill fort above.




Lighthouse from the village is only a small distance away and we were standing at the gate in no time. Gate seemed closed but light of hope was few bikes parked outside the gate. As we walked inside, we found a security and a caretaker sitting inside. The lighthouse compound was neatly done garden and some cannons put on show and there were small cabins just after the gates. It also had huge satellite dish and quarters to stay at the backyard. There was huge steel structure which seems to house something like a telescope which we later found was a radar and a telescope remotely connected all the way to Shipping ministry in Delhi.





On enquiring caretaker was more than glad to give us a tour of the lighthouse, charges were nominal at Rs 10/- per head and camera charges at Rs 20/-. The way to the top was through spiral staircase from inside a room. One thing which was striking was that entire compound was neat and clean. We climbed all the way to the top of lighthouse tower. View from here was simply awesome. The fort was clearly visible at the back and in front it was blue sea as far as we could see.












On talking with caretaker, we found that he was an engineer stationed at the lighthouse. He first asked us to do photo shoot if we wanted and then he would give us insight about the entire place works. Seemed pretty exciting for us. Again photo shoot followed. On talking with him, we found that the lighthouse was built in 1955 and fully automated, helping ships navigate and stay on their channel (route). Also explained in details how there was a set of 4 backups for the lighthouse to function without any breakdown. The tall structure which was close by was radar to keep a close eye and was constantly beaming pictures via satellite to our coast guards. He also provided insight on bright colour of lighthouse and how each lighthouse would have different set of colour combination and how the ship captain would identify on basis of this from his manual of his exact location and his channel. It was truly amazing to know how the entire lighthouse functioned and the caretaker gave us complete insight. Thanking the caretaker heartily we now decided to explore the fort, one of the route to the fort was neatly carved steps from the lighthouse compound.



The steps were steep but not many and in no time we were standing at the entrance of the fort which had stood by time and was reminiscent of our rich history. The fort was covered with thick growth of vegetation.








We decided to first explore the north side. Huge entrances welcomes the visitors on each side of the fort. View of the entire sea and Revdanda creek was spectacular, clearly making one wonder the importance of fort and its strategic location. It was around 12.30pm so we decided to have our packed lunch in shade of the fort gate.












Now it was time to go down south, as we were told at the lighthouse that southern part of fort was where the some attraction was and also it was our way back to the village. On the way we came across some water cisterns.Some canons still hold guard at strategic locations of the fort, they are truly the silent spectator of the forgone years.











The best part of this fort is that on eastern side lies the Arabian sea and on the western side lies the Revdanda creek so if we climb and peep from the walls of the fort on either side one would see blue waters. We also saw some inscription in Portuguese on the two of the gates. At the southern end of fort lies the abandoned church. We spend some time sitting in the church and doing some photo shoots again.








After exploring the fort, We moved down to the village through the western side of the fort. I really wanted to listen to villagers conversation in local dialect of "Kristi" but we couldn't find any. The sun had taken toll on us but small shop in heart of village came to our rescue. The lady at the shop not only sold us chilled water but also gave us lime, sugar and salt which we made into fresh numbu pani. Luckily we also got rickshaw for Revdanda immediately and were back at Alibaug by 4.30pm. On reaching Alibaug we only found that there was no boat for Gateway before 6.30pm and we had almost one hr 30 minutes gap. Again tea and some snacks followed. By the time we reached Mandwa port it was almost 7pm and sun had already set. On the way back the ships parked in middle of sea sported completely different look with full lights on and Mumbai skyline looked like glittering diamonds in the night. Before moving back home by train. We stopped at famous Parsi ice cream shop Warden to feast on their sandwich ice creams which I have cherished from my days in college at Jai-hind in early nineties. It was yet another of my adventures coming to an end.





Next weekend hoping to be on another of my adventure trips to some other exotic locations. Till then Au revoir ......




https://heritagechronicles.blogspot.com/2013/10/a-visit-to-korlai-fort-also-called.html

































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...