महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याला खुप मोठया प्रमाणात दुर्गवैभव लाभले आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने जाताना नाशिक शहराच्या आसपास आपल्याला अनेक किल्ले दिसुन येतात. यातील एक किल्ला म्हणजे किल्ले गडगडा उर्फ घरगड. नाशिकपासुन केवळ २३ कि.मी. अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा पायरीमार्ग इंग्रजांनी नष्ट केल्याने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दुष्कर झाला आहे. त्यामुळे हा किल्ला अत्यंत कठीण श्रेणीत गणला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे साहित्य व तंत्र अवगत असणे गरजेचे असल्याने दुर्गभटक्यांची पावले सहजपणे या किल्ल्याकडे वळत नाही.
गडगडा किल्ल्यावर जाण्यासाठी गडगडा-सांगवी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई- कसारा मार्गे घोटी फाटा पार केल्यावर साधारण १७ कि.मी.अंतरावर वाडीव्हरे गावात जाण्यासाठी फाटा आहे. या फाट्यापासून वाडीव्हरे गाव २ कि.मी. अंतरावर असुन त्यापुढे गडगडा-सांगवी गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. यस.टी बसची सोय केवळ वाडीव्हरे गावापर्यंत असल्याने पुढील ४ कि.मी. अंतर आपल्याला पायी पार करावे लागते. सोबत खाजगी वाहन असल्यास आपण थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकतो.
गावात प्रवेश करताना गावामागे असलेली तीन शिखरे आपले लक्ष वेधुन घेतात. यातील डावीकडील शिखर अघोरी तर उजवीकडील शिखर अंबोली नावाने ओळखले जाते. या दोन शिखरामध्ये असलेला डोंगर म्हणजे गडगडा किल्ला.
किल्ल्याच्या कातळकड्याखालील गुहेत भवानी देवीचे मंदीर असुन तेथे फासलेल्या चुन्यामुळे हे मंदीर लांबुनही उठुन दिसते. या मंदिराकडूनच काही अंतरावर किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. किल्ल्याखालील माचीवर एक आश्रम व हनुमानाचे मंदीर असुन या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गावातुन कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने जाताना वाटेच्या उजव्या बाजुला काही नव्याने बसवलेल्या वीरगळ पहायला मिळतात.
या वाटेने अर्ध्या तासात आपण माचीवरील हनुमान मंदिरात पोहोचतो. हनुमान मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या थोडे अलीकडे वाटेच्या डावीकडे डोंगर उतारावर एक लहान तळे पहायला मिळते. मंदिराकडे पायऱ्याची विहीर असल्याचे अनेक ठिकाणी आपल्या वाचनात येते पण आता ती विहीर इतिहासजमा झाली असुन गावकऱ्यांनी मंदीर व आश्रम परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीच्या जागी हे तळे निर्माण केले आहे.

तळ्यासमोर काही अंतरावर उघडयावर शिवलिंग व नंदी असुन समोरील बाजुस एका कट्ट्यावर हनुमान व शनीदेवाची मुर्ती आहे. तळ्याकडून किल्ल्याकडे म्हणजेच कड्याखालील मंदीराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
यातील पहिला मार्ग हनुमान मंदीराकडून गडावर जातो. या वाटेने आपण मंदिराच्या कड्याखाली असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्यापर्यंत जातो. पायऱ्यांच्या सुरवातीस गणपतीचे एक लहान मंदीर असुन पुढे उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला थेट गडावरील देवीच्या मंदीरापर्यंत नेतात. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग तळ्याकडुन सरळ चढाई करत अघोरी डोंगर व गडगडा किल्ल्याला जोडणाऱ्या किल्ल्याच्या डोंगरसोंडेकडे येतो.

त्या हनुमान मंदीराच्या मागूनच गडाकडे जाण्याचा मार्ग आहे जो आपल्याला कोरलेल्या पायर्यांपर्यंत घेउन जातो.. त्या पायर्या अगदी गडावरील देवीच्या मंदीरापर्यंत आहेत.. त्यांना पांढर्या चुन्याने विचित्रपणे मढवले असल्याने अगदी दुरुनही हा मार्ग समजून जातो.. पावसात तर कदाचित त्या पांढर्या रंगामुळे धबधबा कुठला नि कोरलेल्या पायर्या कुठल्या हा प्रश्नच पडावा !
जर आपण ही कोरलेल्या पायर्यांची वाट उतरताना घेणार असेल तर तेव्हा ती उजवीकडची वाट सोडून सरळच चढाई करत जायचे जिथे 'अघोरी' व 'गडगडा' हे डोंगर हातमिळवणी करतात..

इथेही एक उंबराच्या झाडाला लागून छप्परवजा पाषाणीमुर्तीचे छोटे देउळ आहे... नि मग इथूनच 'गडगडा'वर स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या पायर्या दिसतात..

या पायर्यांजवळ आलो की पलिकडचे दृश्य पहायला मिळते जिथे 'डांग्या सुळका' मोठया तटस्थपणे उभा दिसतो.. ! हाच 'डांग्या सुळका' जो अनेक गिर्यारोहकांना तांत्रिक चढाईसाठी आव्हान देत असतो.. इथेच चढाई करताना मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडली होती जिथे 'संदीप पाताडे' या ठाण्यातील गिर्यारोहकाचा पडून मृत्यू झाला होता..
'गडगडा' उर्फ घरगडचा विस्तार तसा मोठाच आहे.. डावीकडून एक छोटया कातळापासून सुरवात होते.. त्या पायर्यांनी याच कातळाच्या खाली येतो नि वरती जाण्यासाठी कातळाला वळसा घालून जाणारी वाट दिसते..

इथून दिसणारा डांग्या सुळका व भवताल..
हा छोटा कातळ नि गडगडाचा डोंगर यांच्यामधील छोटया भेगसदृश घळीमध्येच गावकर्यांनी नव्याने दगडी पायर्यांचे बांधकाम केले आहे.. जेमतेम पाच-सहा असणार्या ह्या पायर्यांमुळे भेग बुजवलेली दिसते..

या छोटया कातळावर आलो की मग एव्हाना डावीकडे असणारा 'अघोरी' मागील बाजूस उभा दिसतो.. ह्या डोंगराला 'अघोरी' म्हणण्याइतपत काय अघोरी कृत्य केले होते कुणास ठाउक ! तेव्हाची दिलेली नावेसुद्धा डोंगराप्रमाणे किती आकर्षक ! त्या छोटया कातळमाथ्यावर जात्यासाठी कोरलेल्या खुणा आढळतात..
.jpg)
या सोंडेच्या टोकाशी असलेला कातळ एका लहानशा भेगेने सोंडेपासुन वेगळा झाला आहे. या कातळाला वळसा घालुन मागील बाजुस आल्यावर गावकऱ्यांनी या भेगेत एकावर एक दगड रचुन ५-६ पायऱ्या केल्या आहेत. या पायऱ्यांनी वर चढुन आपण किल्ल्याच्या सोंडेवर पोहोचतो. या सोंडेवर कड्यापर्यंत जाण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्यावर जाण्याचा हा मुळ मार्ग पण सध्या किल्ल्यावर व मंदिराकडे जाण्यासाठी हनुमान मंदिराकडील पायरीमार्गाचा वापर होत असल्याने या पायऱ्यांवर मोठया प्रमाणात माती साठली आहे.

या वाटेने वर कडयाच्या टोकाला जाऊन उजव्या बाजूने (कडा डावीकडे ठेवत) कडयाला बिलगुन जाणाऱ्या पायवाटेने आपण देवीच्या मंदिराकडे पोहोचतो. हनुमान मंदिराकडून येणारी कोरलेल्या पायऱ्याची वाट या ठिकाणी मुळ वाटेला येउन मिळते. तळ्यापासून दोन्ही वाटांनी इथवर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. येथुन कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढुन आपण देवीच्या मंदिरात पोहोचतो.

अगदी साल्हेर, अलंग-मदन ला आहे तशी वाट.. इथेच कोरलेल्या पायर्यांची वाट येउन मिळते..

चढताना पाठीमागे दिसणारा अघोरी आणि खालच्या बाजूस छोटा कातळमाथा
पुढील वाट ही डोंगराच्या खाचेतून देवीच्या मंदीराकडे जाते.. हे मंदीर एका लहानशा गुहेत असुन त्यात दोन देवींच्या व वाघांच्या मुर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. येथुनच गडावर जाण्याचा मुळ पायरीमार्ग होता व हे मंदीर पहारेकऱ्याच्या देवडीत स्थापन करण्यात आले असावे. ऊन-पावसापासून देवीच्या मूर्तीला संरक्षण मिळावे म्हणून, इथे एक पत्र्याची शेड बांधलेली आहे. या मंदीराची नव्याने रंगोटी झालेली दिसते.. दोन वाघांच्या नि दोन देवींच्या अश्या मुर्त्या आहेत.. दशभुजा देवीची लहान मुर्ती खूपच सुंदर ! पुरेसे पाणी जवळ बाळगल्यास या मंदीरातही मुक्काम होउ शकतो ! दहा- पंधराजण सहज झोपू शकतात.

मंदिराच्या मागील बाजूस कड्यात खोदलेल्या काही कातळकोरीव पायऱ्या आहेत. ही गडावर जाणारी मुख्य वाट आहे. त्यामुळे इथून वर जाण्याचा मोह आपल्याला नक्कीच होईल पण, तो तिथेच टाळणे योग्य आहे. कारण सुरुवातीला जरी ही वाट सोपी वाटली तरी, नंतर मात्र या पायऱ्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वरील भागात एक कातळकोरी दरवाजा आहे. तो मात्र आपण किल्ल्यावर गेल्यावर पाहणार आहे.इतर गडांप्रमाणे इथेही ब्रिटीशांची अवकृपा दिसून आली.. ! साहाजिकच हा गड त्यामुळे कठीण श्रेणीत गणला जातो ! पायर्या उडवल्या म्हणून काय झाले.. गडमाथ्यावर जाण्यासाठी अजुन एक वाट आहे जी मंदीराच्या पुढे जाते व डोंगराला वळसा घालून खिंडीत येते जिथे अंबोली पर्वताशी हातमिळवणी झालेली दिसते.
या मंदीराच्या वरील बाजुस पायऱ्या तोडण्यासाठी खोदलेल्या सुरुंगाच्या खुणा व काही तुटलेल्या पायऱ्या तसेच कडयाच्या टोकावर असलेला किल्ल्याचा दरवाजा दिसुन येतो. येथुन किल्ल्यावर जाता येत नसले तरी उतरताना गिर्यारोहण तंत्राचा वापर करत दोर लावुन येथे उतरता येते. किल्ल्यावर जाणारी नवीन वाट अंबोली पर्वत व गडगडा किल्ला यामधील खिंडीतुन गडगडा किल्ल्याच्या कातळकड्याला चिटकुन वर जाते.
गडमाथ्यावर जाण्यासाठी मंदिराच्या पायऱ्या उतरुन पुढे कातळ कड्याखालील वाटेने वर कडयाच्या दिशेने थोडे चालत गेल्यावर आपण गडगडा किल्ल्याच्या कातळाला भिडतो. या ठिकाणी कातळात वाढलेले एक मध्यम आकाराचे झाड आहे. किल्ल्यावर जाण्याची हि खुण लक्षात ठेवुन येथुनच किल्ला चढण्यास सुरवात करावी. या झाडाला धरून वर चढल्यावर पुढील टप्पा मात्र आपल्याला गिर्यारोहण तंत्राचा वापर करत चढावा लागतो.गिर्यारोहणाची तयारी होईपर्यंत आपण या भागात असलेले इतर अवशेष पाहुन घ्यावेत. इथे एक भला मोठा दगड बाहेरच्या बाजूस आला असल्यामुळे हा या करण्यासाठी दोर लावणे आवश्यक आहे. यालाच क्लायंविंगच्या भाषेत 'ओव असे म्हणतात.
आपण असलेल्या कड्याकडून एक पायवाट गडगडा किल्ला व अंबोली पर्वत यामधील खिंडीत उतरते. खिंडीत उतरुन समोरील टेकडीवर चढले असता तेथे कातळात कोरलेले एक शिवलिंग व त्यासमोर दगडात कोरलेला नंदी पहायला मिळतो. शिवलिंग पाहुन परत खिंडीत उतरुन डाव्या बाजुच्या पायवाटेने अंबोली पर्वताला वळसा घालत गेल्यावर ५ मिनिटात आपण कातळात कोरलेल्या ३ x ३ आकाराचे तोंड असलेल्या गुहेजवळ पोहोचतो.

घसाऱ्याच्या या वाटेने जाताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे तसेच या वाटेवर एका ठिकाणी आपल्याला कातळाला बिलगुन जावे लागते. सरळ रेषेत खोदलेल्या या गुहेत रांगत गेल्यावर साधारण २५ फुट अंतरावर या गुहेला Y आकारात दोन फाटे आहेत. यातील उजवीकडील बाजुस १० फुट अंतरावर भुयाराच्या खालील पातळीत कातळात कोरलेली लहान खोली आहे तर डावीकडे १० फुट अंतरावर भुयाराच्या खालील पातळीत पुन्हा एक लहान दरवाजा असुन त्याच्या आतील बाजुस ८ x ८ आकाराची एक खोली आहे. या गुहेत मोठया प्रमाणात धुळ साठलेली आहे. हे सर्व पाहुन गडगडा किल्ल्याच्या कातळटप्प्याकडे परत येईपर्यंत आपली किल्ला चढण्याची तांत्रीक तयारी पुर्ण झालेली असते.

- -

झाडाला पकडून वर आल्यावर आपण निमुळत्या जागेत येतो. येथुन दोरीच्या सहाय्याने साधारण १५-२० फुटाचा अवघड कातळटप्पा चढावा लागतो. या टप्प्यातून वर येऊन उजवीकडे थोडे आडवे गेल्यावर दुसरा अंदाजे २० ते २५ वीस फुट उंचीचा कातळटप्पा लागतो. या टप्प्यावर पकडीसाठी खोबणी असल्याने हा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा काही प्रमाणात सोपा आहे पण सुरक्षा यंत्रणा हवीच! एका बाजूस डोळे फिरवणारी, भयाभया वाटणारी दरी, तर दुसऱ्या बाजूस मुरूमाच्या मातीचा घसारा, यामुळे सर्व मंडळींची चांगलीच तारांबळ उडाते. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही आणि घरगड सर करायचाच !




हा टप्पा पार केल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडगड सांगवी गावातून गडमाथा गाठण्यास २ ते ३ तास लागतात. त्रिकोणी आकाराचा गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३०३५ फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण ६ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्यावर वावर नसल्याने मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन या गवतातुन मार्ग काढत आपल्याला अवशेष शोधावे लागतात.
पुढे येऊन डावीकडे वळल्यावर आपण किल्ल्याच्या उध्वस्त उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. भवानी मंदिराकडून पाहीले असता हाच दरवाजा आपल्या नजरेस पडतो. दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन दरवाजाची दगडी चौकट तग धरून आजही आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. दरवाजाच्या बाहेरील भागात देवळाकडे उतरणाऱ्या ५-६ पायऱ्या असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर डावीकडे असलेल्या कपारीत खडकात खोदलेले पाण्याचे कोरडे टाके पहायला मिळते.


हे टाके पाहुन मूळ वाटेवर येऊन थोडे पुढे चालत गेल्यावर कातळात कोरलेल्या ५ टाक्यांचा समुह नजरेस पडतो. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. हे पाणी पिण्यायोग्य आहे. यांपैकी एका टाक्याच्या आत आणखी एक टाके आहे. या टाक्यांची ठेवण सुबक असून ती एकसंध कातळात कोरलेली दिसतात. जणूकाय आधी फुटपट्टीने आखणी करून मग ही टाकी खोदली असावीत.
या टाक्यांच्या उजवीकडे खालील बाजुस डोंगर उतारावर अजून एक पाण्याने भरलेले कोरीव टाके आहे. या टाक्यांमधील पाणी मात्र पिण्यास योग्य नाही. विशेष करून या पाण्यावर शेवाळे जमा झाले असल्यामुळे हे पाणी बऱ्यापैकी खराब झालेले आहे.
टाक्याच्या समुहाकडून पुढे आल्यावर गवतात हरवलेले ७ वास्तुंचे अवशेष दिसतात. यातील दोन वास्तु मोठया तर इतर वास्तुचे लहान चौथरे आहेत. वास्तु अवशेष पाहुन गवतातुन वाट काढत पुढे आल्यावर आपण हिरव्यागार पाण्याने भरलेल्या चार टाक्यांच्या समुहाजवळ येतो. टाक्याच्या डाव्या बाजुने पुढे आल्यावर आपण गडाच्या अघोरी शिखराच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून किल्ल्यावर येणारा मुळ मार्ग पुर्णपणे नजरेस पडतो. येथुन टाक्याकडे परत येत उजव्या बाजूने तटाला फेरी मारताना काही ठिकाणी तटबंदी नजरेस पडते तर एका ठिकाणी कातळात कोरलेले पण मातीने बुजलेले टाके नजरेस पडते. तटाला फेरी मारत दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. दरवाजातुन तीन-चार पायऱ्या उतरल्यावर ९० फुट रॅपलिंग करत आपण थेट मंदीराजवळ उतरतो. किल्ल्याचा आकार व त्याचे स्थान पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
गडमाथ्यावरुन पुर्वेला डांग्या सुळका, अंजनेरी व वालदेवी धरण तर पश्चिमेला मुकणे धरण, पट्टा, औंढा, बीतनगड व कळसुबाई डोंगररांग दिसते. गडगडा किल्ला त्याच्या इतिहासाबाबत अबोल आहे. शिवाजी महाराजांच्या काळात १६७०- ७२ दरम्यान हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. छ ३ साबान (१८ जुलै १७४८) गडगडा किल्ला शंकराजी केशव सबनीस यांनी घेतल्याचें समजते पण कोणाकडुन ते मात्र कळत नाही.
इ.स.१६८८-८९ च्या सुमारास मोगलांनी हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. पुढे हा किल्ला निजामाकडून मराठ्यांनी घेतल्याचा एक उल्लेख पत्रामध्ये आलेला आहे.इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्सने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी गडाला दोन दरवाजे असल्याचा उल्लेख येतो.
अतिरिक्त माहिती
१) गडगडा किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२) सोबत १०० फूटी व ३०फूटी असे दोन वेगवेगळे दोर घेतल्यास दोनही कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही. दोन्ही रॉक पॅचमध्ये व पहिल्या रॉकपॅच पूर्वी जागा अरुंद असल्यामुळे ५ ते ६ जणांपेक्षा अधिक माणसे उभी राहू शकत नाहीत त्यासाठी दोन रोप असलेले चांगले.
३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
४) किल्ला उतरतांना प्रवेशद्वाराकडून देवीच्या देवळाकडे रोप लावून उतरणार असल्यास रोपचा ‘यू’ बनवावा. कारण येथे एक ‘घुमटाकार’(ओव्हर हॅग) असल्यामुळे रोप शिवाय खाली उतरता येत नाही. रोपचा ‘यू’ बनविल्यामुळे सर्वजण खाली उतरल्यावर रोप खेचून घेता येतो.
५) देवीच्या देवळाकडून गड चढता येत नाही. येथे पायर्या तुटल्या आहेत, तेथे ओव्हर हॅग असल्यामुळे येथून गडावर जाता येत नाही. परंतू २०२० साली या ठिकाणी लोखंडी रॉडस कातळात बसवलेले आहेत. त्यांच्या आधाराने गडावर जाता येते.
६) गावात कातळटप्प्याची खडानखडा माहिती असणारे वाटाडे आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांची मदत घ्यावी.
७) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
गडाचं नाव 'गडगडा' | Maayboli
''भटकंतीचे वेड लागले, की मग त्याला काळा-वेळाचे, ऋतू-हंगामाचे बंधन उरत नाही. मनाला वाटेल तेव्हा आणि शरीराला झेपेल तसे 'सॅक' घ्यायची आणि चालू पडायचे असेच अनेकांचे होते...." इति लोकसत्तामधील अभिजीत बेल्हेकर नामक लेखकाच्या भटकंतीवरील लेखातील ओळी वाचल्या.. नि मला 'ऑफबीट' ग्रुपची प्रिती अँड गँग आठवली..ही गँग जवळपास प्रत्येक विकांताला 'हा' ना 'तो' डोंगर, घाटरस्ता पालथा घालण्यात मग्नच असते... ह्यांचा कितीही हेवा वाटला तरी कमीच... इथे तर आमचा ट्रेकयोग जुळून येण्यात बर्याच अडचणी येत होत्या.. गेले दोन-अडीच महीने सह्याद्रीभेट घडली नव्हती नि आता तर 'चैत्र' महिनाच्या उकाडयात तशी शक्यता कमीच वाटत होती.. त्यामुळे मन अधिकच अस्वस्थ होते... ही अस्वस्थता नि नेहमीच्या कामाच्या गडबडीतून मिळालेली उसंत यांचा अगदी योग्यवेळी मिलाफ घडून आला नि ऑफबीटच्या प्रितीला कळवले 'येतोय ट्रेकला' !! 'गडगडा उर्फ घरगड' ट्रेक !
आता यो जातोय म्हणजे दोन- तीन मायबोलीकर आलेच.. तेव्हा 'गिरीविहार' व
'विनय भीडे' पण तयार ! गेली दोन-तीन वर्षे एकही मायबोलीकर माझ्यासोबतीला
नाही असा ट्रेक कुठला झालाच नाही.. नि तसे ठरवले तरी होणार नाही ह्याची
पक्की खात्री आहे ! 
काही गडांची नावे अशी दिलखेचक असतात की बस्स ! ऐकूनच मनात कुतूहलाचे प्रचंड काहूर माजते !! असेच कुतूहल निर्माण करणार्या एका गडाचं नाव 'गडगडा' ! यालाच 'घरगड' असेही म्हणतात.. पायथ्याशी असणार्या 'गडगड सांगवी' या गावाकडूनच या गडाला 'गडगडा' हे पद बहाल झाले असावे..
दिडेकवर्षापुर्वी ग्रुपबरोबर ट्रेकला जाणे झाले होते... नि आता पुन्हा
एकदा ग्रुपला उत्सुकतेने सामिल झालेलो.. साहाजिकच बसमध्ये दंगल-मंगल गाणी
सादर झाली.. दंगा संपून डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आम्ही गावात
पोहोचलोसुद्धा ! रात्रीचे साडेतीनची वेळ होती सो मिळालेल्या दोन तासात
ताणून देउया या उद्देशाने गाडीबाहेर पडलो तोच थंडगार वारा येउन थडकला !
शाळेच्या वरांडयात मॅट टाकून झोपायच्या आधीच या वार्याने आपला इरादा
स्पष्ट केला ! चैत्र महिन्यात नक्की उन्हाळा कि हिंवाळा असा विचार करण्यास
भाग पाडणारा असा हा वारा ! नाईलाजाने झोपण्यापेक्षा कुडकुडणेच पसंत करावे
लागले ! झोपण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत म्हणून की काय त्यात गावातलं
कोंबड आरवून 'अंगाईगीत' म्हणू लागला ! नि खरच इथे गिरीचे घोरणे पण सुरु
झाले ! त्या कोंबड्याची तरी चुकी काय म्हणा.. चार वाजले की कोंबडा आरवतोच
नि झोपायचे झाले की गिरी घोरतोच ! 
तांबडे फुटायची वेळ झाली पण थंडगार वारा काही स्तब्ध नव्हता.. क्षितीजकक्षा ओलांडून येणारा उगवतीचा सुर्य गावातूनच बघायला मिळणे ही खरीच लाजवाब गोष्ट ! आकाशातील कृष्णमेघांमुळे तर इथे सुर्योदयाच्या सौंदर्यात आणखीन भर पडत होती..

- -.

डावीकडे गावापलीकडे पाहीले तर एक उत्तुंग डोंगररांग ढगांच्या धुक्यात निजलेली होती.. याच डोंगररांगेला अंबोली पर्वतरांग म्हटले जाते.. या रांगेच्या अगदी डावीकडचे शिखर म्हणजे 'अघोरी' नि उजवीकडचे शिखर म्हणजे 'अंबोली'.. नि या दोन शिखरांमध्ये पसरलेला डोंगर म्हणजे गडगडा !

(आम्ही मायबोलीकर - गिरिविहार व विनय भीडे)
उंची सुमारे ३१५० मीटरच्या आसपास.. जिल्हा: नाशिक.. ट्रेकक्षितीज संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे मुंबईहून नाशिकला जाताना १८ किमी अंतराच्या अलिकडे वैतरणा फाटा लागतो तिथेच पुढे वाडिव्हरे गाव लागते.. नाशिकहून दर तासाला वाडीव्हीरे गावात जाण्यासाठी एसटी सुटतात.. पण 'गडगडा'साठी पुढे अंदाजे ४ किमीचे अंतर पायपीट करुनच 'गडगड सांगवी' हे पायथ्याचे गाव गाठावे लागते.!! थोडक्यात 'गडगडा सांगवी' गावापर्यंत अजून एसटीचे हात पोहचलेले नाहीत..अहो आश्चर्यम !
गडगडा सांगवी हे तसे छोटेच गाव.. अंदाजे २०-३० घरांची वस्ती असावी.. बहुतांशी गावात असते त्याप्रमाणे एक छोटी शाळा व देउळ आहे.. बकर्या, कोंबडया, गुरं यांचा कल्लोळ कानावर पडतोच... या गावातूनच गडाकडे रस्ता जातो.. आम्ही नाश्ता-पाणी, ओळखपरेड रितसर आटपून सव्वासातच्या सुमारास चालायला घेतले.. पहाट तरी विलक्षण गारवा देणारी होती.. आता उर्वरीत दिवस गरमागरम जाणार हे मनात ठेवूनच होतो.. गाव सोडले की वाटेतच काही 'वीरगळी' दिसतात.. वाट एकदम ठळक नि सोप्पी.. वाटेत डावीकडे नजिक असणारा 'अघोरी' डोंगर फारच लक्ष वेधून घेत होता !

दुतर्फा असणारी करवंदीची जाळी आपल्याजवळील टपोरी करवंदाचा नजारा पेश करत होती.. अजुन पिकलेली नसली तरी नकळत हात जात होताच.. वाटेत गुराख्याची गुरं आडवी येत होतीच! एकूण अश्या ह्या प्रसन्न प्रभातसमयी एकच खटकणारी गोष्ट म्हणजे गडाच्या अगदी पायथ्याला असणार्या हनुमान मंदीरातून कर्कश आवाजात ओरडणारे कर्ण !! कुठल्यातरी भसाडया आवाजातील बेसुरी गाणी सकाळची शांतता भंग करीत होती.. आम्ही त्या मंदीराच्या जवळपास पोहोचेस्तोवर त्या गाण्यांमधील काही गंमतीदार ओळी विन्याच्या पाठपण झाल्या !!

जेमतेस अर्ध्यातासाच्या वाटचालीनंतर महादेवाचे छप्परवजा छोटे मंदीर लागते..बाजुलाच पायर्या असलेली छोटी विहीरदेखील आहे.. पाणी बर्यापैंकी पिण्यायोग्य वाटले.. पण हवय कुणाला ? आतापर्यंतची वाटचाल शीतल वातावरणामुळे अगदी सुखद झाली होती. सो घशातील व्याकुळता अजून प्रकटली नव्हती !

हे मंदीर वाटेला लागूनच डावीकडे आहे.. तर उजवीकडची वाट हनुमान मंदीराकडे घेउन जाते.. इथवर आलो म्हणजे अर्धी चढाई झाल्यात जमा ! त्या हनुमान मंदीराच्या मागूनच गडाकडे जाण्याचा मार्ग आहे जो आपल्याला कोरलेल्या पायर्यांपर्यंत घेउन जातो.. त्या पायर्या अगदी गडावरील देवीच्या मंदीरापर्यंत आहेत.. त्यांना पांढर्या चुन्याने विचित्रपणे मढवले असल्याने अगदी दुरुनही हा मार्ग समजून जातो.. पावसात तर कदाचित त्या पांढर्या रंगामुळे धबधबा कुठला नि कोरलेल्या पायर्या कुठल्या हा प्रश्नच पडावा !
आम्ही मात्र ही कोरलेल्या पायर्यांची वाट उतरताना घेणार होतो.. तेव्हा ती उजवीकडची वाट सोडून आम्ही सरळच चढाई करत गेलो जिथे 'अघोरी' व 'गडगडा' हे डोंगर हातमिळवणी करतात.. इथेही एक उंबराच्या झाडाला लागून छप्परवजा पाषाणीमुर्तीचे छोटे देउळ आहे... नि मग इथूनच 'गडगडा'वर स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या पायर्या दिसतात.. या पायर्यांजवळ आलो की पलिकडचे दृश्य पहायला मिळते जिथे 'डांग्या सुळका' मोठया तटस्थपणे उभा दिसतो.. !

- -

हाच 'डांग्या सुळका' जो अनेक गिर्यारोहकांना तांत्रिक चढाईसाठी आव्हान
देत असतो.. इथेच चार- पाच महिन्यांपुर्वी चढाई करताना मधमाश्यांच्या
हल्ल्यामुळे दुर्घटना घडली होती जिथे 'संदीप पाताडे' या ठाण्यातील
गिर्यारोहकाचा पडून मृत्यू झाला होता.. 
'गडगडा' उर्फ घरगडचा विस्तार तसा मोठाच आहे.. डावीकडून एक छोटया कातळापासून सुरवात होते.. त्या पायर्यांनी याच कातळाच्या खाली येतो नि वरती जाण्यासाठी कातळाला वळसा घालून जाणारी वाट दिसते..
इथून दिसणारा डांग्या सुळका व भवताल..
हा छोटा कातळ नि गडगडाचा डोंगर यांच्यामधील छोटया भेगसदृश घळीमध्येच गावकर्यांनी नव्याने दगडी पायर्यांचे बांधकाम केले आहे.. जेमतेम पाच-सहा असणार्या ह्या पायर्यांमुळे भेग बुजवलेली दिसते.. आम्ही इथे येइस्तोवर आमच्याआधीच एक चार-पाच जणांचा ग्रुप पुढे गेला होता..त्यांच्या त्या छोटया कातळावर घुटमळणार्या मानवी आकृत्या खालून येतानाच टिपल्या होत्या..

या छोटया कातळावर आलो की मग एव्हाना डावीकडे असणारा 'अघोरी' मागील बाजूस उभा दिसतो.. ह्या डोंगराला 'अघोरी' म्हणण्याइतपत काय अघोरी कृत्य केले होते कुणास ठाउक ! तेव्हाची दिलेली नावेसुद्धा डोंगराप्रमाणे किती आकर्षक ! त्या छोटया कातळमाथ्यावर जात्यासाठी कोरलेल्या खुणा आढळतात.. बाकी ही जागा मला उडीसाठी चांगलीच वाटली सो उडीबाबा प्रकटम !

त्या छोट्या कातळमाथ्याला मागे सोडून आता आम्ही 'गडगडा'च्या कातळमाथ्यावर चढाई सुरु केली.. इथेही अधुनमधून पायर्या आहेत.. चकाकते उन व सोनसळी गवत ह्या दोन गोष्टींमुळे हा कातळमाथा जणू वाघाचे कातडे पांघरुन घेतल्यागत भासत होता..
ऑफबीटचे प्रमुखलोक्स एव्हाना कामाला लागले होते.. तांत्रिकचढाईसाठी लागणारे साहित्य त्यांच्या अवजड पाठपिशवीतून बाहेर पडले.. एका माणसाएवढ्या अवजड पाठपिशव्या घेउन हे दोस्तलोक्स इतक्या सहजतेने वावरतात हेच मुळी कौतुकास्पद ! शिवाय पुढे लगेच चढाईसाठी रोप सेट-अप लावण्याच्या तयारीत गुंतायचे !

- -

- -
आम्ही त्यांची ही तयारी होइपर्यंत भोवतालचा परिसर न्याहाळत बसलो.. खिंडीतून पलिकडे वालदेवी धरणाच्या जलाशयाचा परिसर छानच दिसत होता..! आमच्याआधी चार-पाच जणांचा एक ग्रुप पुढे गेल्याने त्यांचे प्रस्तरारोहण होइस्तोवर थांबावे लागणारच होते.. तेव्हा आम्ही तिघे- चौघेजण खिंडीतूनच आंबोली डोंगराला वळसा घालून जाणार्या वाटेने पुढे गेलो.. पुढेच कुठेतरी गुहा असल्याचे ऐकून होतो.. थोडीशी निमुळती असणार्या ह्या वाटेने जपुनच जावे लागते.. काही अंतरावरच मानवनिर्मित ३-४ फूट उंच अशी चौकोनी गुहा नजरेस पडली.. म्हटले कितपत आता जाता येते ते बघूया म्हणून टॉर्च घेउन रांगतच आत शिरलो.. जशे आत शिरलो तसे गारवा जाणवू लागला.. ही गुहा आत सरळ रेषेत खोदलेली आहे.. वाटले होते वटवाघुळ वा त्यांची घाण असेल पण तसे काही नाही.. फक्त मातीच काय ती.. जवळपास पंधरा फूट आत शिरलो होतो नि पुढे पाहीले तर हीच गुहा इंग्रजी अक्षर 'T' च्या आकारात डावीकडे नि उजवीकडे वळत होती.. टॉर्चच्या प्रकाशात दिसले की डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला भुयारसदृश खड्डा होता नि पुढे अजुन एक गुहाच दिसत होती..उत्सुकता वाढल्याने अगदी सावधगिरीने त्या भुयारात उतरलो.. इथे उतरलो नि चक्क उभा राहू शकलो ! तिथेच मग वाकून पुढल्या गुहेत पाहीले तर अगदी छोटीशी खोलीसदृश गुहा वाटली.. हे सगळे बांधकाम थक्क करणारे होते पण नक्की वापर कशासाठी हे गुलदस्त्त्याच राहीले ! मातीत लोळण घातल्यागत अवतार करुन आम्ही बाहेर आलो नि आमचा अवतार बघून इतरांनी बाहेरूनच गुहेला सलाम ठोकला..

(गुहेतून बाहेर पडताना विन्या व उजवीकडच्या फोटोत भुयार आणि गुहा)
आम्ही पुन्हा खिंडीत आलो तर आमच्यातल्या दोघा-तिघांनी पहिला कातळटप्पा चढायला सुरवात केली होती..
- -

फारशी जागाही नव्हती उभे रहायला.. एका झाडाला पकडून वरती निमुळत्या जागेत उभे रहायचे.. तिथेच मग दोरीच्या सहाय्याने चढाई करायचे.. अंदाजे पंधरा फूटी कातळटप्पा असावा.. अगदीच सरळ रेषेत नसल्यामुळे फारसे अवघड नव्हते.. तरीसुद्धा दोन-तीन ठिकाणी पकड मिळवणे थोडे कठीणच होते शिवाय सगळ्यांनाच चढणे शक्य नव्हते... इथे ऑफबीटच्या तांत्रिकमंडळाने सुरक्षिततेबद्दल जराही कसूर बाकी ठेवली नव्हती व त्यामुळे सगळ्यांसाठी हा टप्पा सुकर झाला !

या टप्प्यातून वरती आलो की थोडी घसार्याची छोटी वाट वरती येते.. नि पुन्हा समोर अजुन एक अंदाजे वीस फुट उंचीचा कातळटप्पा लागतो..खालचे सगळेजण येइपर्यंत इथेच भर उनात क्षणभर विश्रांती झाली ! दुपारच्या बाराची वेळ.. उनाने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली होती..पण वेळीच ढग धावून आले नि उनसावलीचा खेळ सुरु झाला.. त्याचे पडसाद भूतलावर उमटू लागले.. मग काय तेच पाहत बसण्याचा विरंगुळा सुरु झाला.. अजुन एक गोष्ट अशी की अधुनमधून आकाशातून 'धुडडूम' असा मोठा आवाज कानावर पडत होता.. मग कळले की जवळच 'ओझर'ला मिग या लढाउ विमानांचा कारखाना आहे.. त्यांची चाचणी इथे होत असते..
अंबोली पर्वताची डोंगररांग
मार्गातील दुसरा कातळटप्पा झाला की गडमाथ्यावर पोहोचणार होतो.. पुन्हा एकदा एकेकजण ताकदीने दोरीच्या सहाय्याने चढू लागले.. इथे पकडीसाठी खोबणी आहेतच.. जवळपास पहिल्या टप्प्यासारखाच हा टप्पा ! हासुद्धा आरामात सर झाला.. !

- - -

- - --
हुर्रे !
आतापर्यंत विनम्रपणे वागणारे सुर्यनारायन कठोर बनले होते.. माथ्यावर आलो तर सगळीकडे रखरखाट होता.. माजलेले सुके रान... गडमाथ्यावर बाकीचे येईपर्यंत कुठे सावली दिसतेय का बघून झोकुन देण्याचा विचार होता.. सावली मिळणे तसे कठीणच वाटत होते.. इथून छोट्या पाउलवाटेने पुढे गेलो तर डावीकडे उद्ध्वस्त प्रवेशदार दिसले..

त्या ब्रिटीशांनी सुरुंग लावून पायर्या उडवल्या नसत्या तर देवीच्या मंदीराकडून थेट या प्रवेशद्वारापर्यंत येता आले असते.. असो.. आम्ही उतरताना इथूनच अंदाजे १०० फूट खोल रॅपलिंग करुन उतरणार होतो.. आम्ही त्या पाउलवाटेने पुढे गेलो नि पाण्याच्या टाक्या नजरेस पडल्या.. काही वेगळीच रचना.. कातळात कोरलेल्या आहेत.. उतरण्यासाठी अगदी पायर्या आहेत.. शिवाय टाकीत दोन चौकोनी दालनंसुद्धा कोरलेली दिसतात.. पण येथील पाणी आता पिण्यायोग्य वाटले नाही...

गडावर पुढे अजुन एक टाक्यांचा समूह आढळतो.. तर काहीठिकाणी रानामध्ये लुप्त झालेले दोन तीन अवशेष नजरेस पडले.. आता मात्र सावलीचा शोध घेणे गरजेचे होते.. अगदीच नाही मग बोराच्या एका छोटया झाडाखालचे सुकलेले रान जबरदस्तीने आडवे करुन त्यावरच मॅट अंथरुन बसलो! मागाहून आलेले सगळेजण मग इथेच दाटीवाटीने बसले नि सामुहीक भोजनाचा कार्यक्रम उरकला.. गप्पागोष्टी आटपून काहीजण मग गडफेरीसाठी गेले.. तांत्रिकमंडळ रॅपलिंगच्या तयारीला गेले.. काहीजण फोटुग्राफीसाठी हिंडायला गेले.. तर काहीजण त्याच झाडाखाली आडवे झाले.. चॉईस अपनी अपनी !

आता रॅपलिंगसाठी पुन्हा आमचे क्रम लागले.. तांत्रिक-मंडळाने चोख बंदोबस्त ठेवला होता.. प्रवेशद्वराजवळ तीन-चार पायर्या उतरल्या की थेट रॅपलिंगला सुरवात होत होती.. तिथूनच थेट मंदीराजवळ उतरता येत होते..

- - -
''मायबोलीकर विन्याला ढकलून देतेय ओवर !!'' इति वॉकीटॉकीवरून कॅप्टन प्रिती 

विन्या : मम्मीsss
- - -
रॅपलिंग सारांश
- -

देवीचे पुन्हा एकदा दर्शन घेतले नि पायर्या उतरायला घेतल्या.. ही पायर्यांची वाट वाटते तितकी सोप्पी मुळीच नव्हती.. थोडा पाय चुकला वा तोल गेला की घरंगळत दहा पायर्या खाली अश्या धोकादायक पायर्या आहेत.. इथून चढणे म्हणजे गडाला छातीवर घेण्यासारखे !

(माथ्यावर भगव्याच्या डावीकडे असणार्या भेगेत जे झाड दिसतेय तिथून खाली
मंदीरापर्यंत उतरलो नि मग त्या कोरलेल्या पायर्यांच्या मार्गाने खाली
उतरलो.. किती मस्त
)
या पायर्या संपताच वाटेलाच एका बाजुला लंबोदरांची सुबक मुर्ती दिसते.. पुढे लागणारी पाउलवाट हनुमान मंदीराजवळ नेउन सोडते.. इथेही दर्शन घेतले.. एकदा गडाकडे मागे वळून पाहिले नि गावाच्या दिशेने चालू पडलो..

- - -

पुन्हा सकाळसारखाच भणभणता वारा आमचा निरोप घ्यायला हजर झाला होता..काही अवधीतच गाव गाठले....
ट्रेकमध्ये सारे काही अनकुल घडले होते.. चैत्र महिना असुनही हवेत गारवा
अनुभवता आला.. एक छोटे पण सुंदर गाव पहायला मिळाले होते.. अजुन एक
आडवाटेवरची अपरिचित अशी डोंगररांग पहायला मिळाली.. दोन शिखरांच्या जोडीने
असलेला हा गडगडा उर्फ घरगड कसलीही गडगड न होता सर झाला होता.. नि ह्याच
आनंदाच्या भरात एक 'ऑफबीट' ट्रेक संपुर्णम केल्याचा जल्लोष झाला
जा सके।

किले के शीर्ष पर एक क्षतिग्रस्त प्रवेश द्वार और इसके अलावा देवद्या देख सकते हैं। यहाँ से नक्काशीदार पत्थर की सीढ़ियाँ देखी जा सकती हैं। क्षतिग्रस्त संरचना के कारण आरोही और अवरोही केवल रस्सी की मदद से किया जा सकता है। अगले समूह के प्रवेश द्वार को देखते हुए देखें कि आपको पत्थरों में खुदी हुई पानी की टंकियाँ कब मिलती हैं। पानी की टंकी में प्रवेश करने के लिए 5 सीढ़ियाँ हैं। अंतिम 2 पानी की टंकियों में नक्काशी का काम देखा जा सकता है। पानी की टंकी में पानी पीने योग्य है।
हम पानी की टंकियों के समूह को देख सकते हैं जहाँ पीने योग्य पानी उपलब्ध नहीं है। यहां से खूबसूरत मैदान देखा जा सकता है। किले के पश्चिम की ओर हम डांग्या शिखर, अंजनेरी और वलदेवी भी देख सकते हैं मुंबई – नासिक राजमार्ग, मुकाने बांध और बेल्ट, औंधा, बिटानागड़ा, ये किले और कलसुबाई पहाड़ी श्रृंखला देखी जा सकती है। ( गडगडा | घरगड किल्ला | Gadgada | Ghargad | गडगडा | घरगड किल्ला | Gadgada | Ghargad )
गडगडा घरगड किल्ला इतिहास

इस किले के बारे में बहुत कम इतिहास जाना जाता है। त्र्यंबकगढ़ के पतन के तुरंत बाद इस किले ने अंग्रेजों के सामने आत्मसमर्पण कर दिया। कैप्टन ब्रिग्स ने 1818 में इस किले पर कब्जा कर लिया। यह किला भारतीय स्वतंत्रता तक अंग्रेजों के नियंत्रण में था।
Trek to Ghargad Fort(Gadagada)
Type : Hill forts
Fort Range : Nashik
Grade : Hard(Rope climbing, Rappelling is required)
History : Not known
Base Village : Gadgadsangvi, Nashik
Maximum Height : 3,010 feet
Best Time : Winter
As a not so explored trek place, we choose Ghargad OR Gadagada fort for Winter trek. We were five in friends Jayesh’s Car, decided to reach the Base village, Gadgadsangvi Village is on Mumbai-Nashik National Highway.
And Jayesh Insanely drive was like Pedal-to-Medal
We need to take a left turn on Wadiware village, is 16km short from Nashik Check post. As we started over-night Journey to reach early on base village, we reached Wadiware Naka at 4am while it was dark and freezing.
And the small board we found
We tried to ask few, but nobody is aware of this Village, some how we manage to get find the perfect turn to Wadiware, and from here few kms, we can reach the base village. Population is 429, !!!
As it was freezing, we found one more group waiting for morning, we set up campfire.
We started when Sun was about to rise, route is clear, first check-point is to reach the Hanuman Temple.
There are stairs which leads to Mata temple, but we choose the old way which goes sideways please check route-map image. There are some God Idols in near this Hanuman Temple.
There is Shivling and a Well here, moving ahead you’ll be exactly side of this mountain, some steps are built here.
On other side we can view a interesting pinnacle see extreme right of below image :
Crossing the Mata Temple :
Moving on the route you’ll meet the Mata Temple steps, above Mata Temple is the place you’ll rappel down, climbing from here is difficult. Other roure is to keep moving ahead and go behind mountain and climb from there. There are 3-points where you will require to setup a rope.
Here is the 1st Patch could be climbed directly, here very less space is there to stand. Just above this patch is again a 2nd Patch, here ropes are required.
Climbing Path-2 again Patch-3 is there, here again rope is required.
Crossing this Patch, you are now at the top of Mountain and consist flat plateau. There is a water cistern but water is not consumable. Not much to explore fort.
Some remains of the fort.
Having lunch over here, we proceeded for descending, there are proper fortification seen at this point, some say Britishers damaged this walls as this was the entrance to the fort, but now it is vetical wall remain, we can only rappel down.
Rappelling is always fun, but we should be always careful
Once rappelling down, we all decided to descend from steps and do a Marathon to reach back base. All insanely runn’d like all it is end-of-the-world. We reached base and decided to go to a Gorge which Jayesh was know to it. I would not write-up any more info on this Gorge
After relaxing here, we went for Mumbai again.
Below are some extra shots :
Catch you another adventure
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Gadgada (Ghargad)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
प्रस्तावना
नाशिकपासून १८
किमीवर असलेल्या "गडगड सांगवी" गावाच्या मागे एक डोंगररांग पसरलेली आहे
स्थानीक लोक या डोंगररांगेस अंबोली पर्वत या नावाने ओळखतात. या पर्वत
रांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. यातील उजवीकडील शिखराला
‘अंबोली‘ व डावीकडील शिखराला ‘अघोरी’ या नावाने ओळखतात. या दोन
शिखरांच्यामध्ये असलेले शिखर म्हणजे ‘गडगडा किल्ला’ होय. हा किल्ला सर
करण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. किल्ल्याचे स्थान
पाहाता याचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी केला जात असावा.
महत्त्वाची ठिकाणे
गडगड सांगवी गावामागील या किल्ल्यावर
गावामागील कच्च्या रस्त्याने जाताना, वाटेत वीरगळांचा समुह पाहाता येतो. या
रस्त्याने आपण पायर्या असलेल्या विहिरीपाशी येतो. या विहिरीतील पाणी
पिण्यायोग्य आहे. विहिरीजवळ शिवलींग व नंदी आहे. येथून सरळ जाणारी वाट
किल्ल्याकडे जाते, तर उजवीकडे जाणारी वाट जिर्णोध्दारीत हनुमान मंदिराकडे
जाते. या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिरात विश्राम घेऊन पुन्हा
विहिरीपाशी येऊन किल्ला चढण्यास सुरुवात केल्यावर, १० मिनिटात आपण छोट्या
कातळ माथ्यापाशी येतो. हा कातळमाथा मुख्य किल्ल्यापासून मोठ्या भेगेने
वेगळा झालेला आहे. या छोट्या कातळमाथ्याला वळसा घालून मागील बाजूस गेल्यावर
भेगेमध्ये दगड रचून गावकर्यांनी बनविलेल्या पायर्या दिसतात. या पायर्या
चढून वर आल्यावर उजवीकडे भेगेमुळे वेगळा झालेला कातळ दिसतो, तर डावीकडे
किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. प्रथम छोट्या उजवीकडे कातळमाथ्यावर जावे, तिथे
टोकाला जात्यासाठी कातळ कोरलेला पाहता येतो. येथून पुन्हा मुळ किल्ल्याकडे
वळून थोडी चढाई केल्यावर, पुन्हा आपण किल्ल्याच्या गडगड सांगवी गावाच्या
दिशेला येतो. किल्ल्याच्या कातळकड्याखालून जाणारी वाट आपल्याला भवानी
मातेच्या देवळाकडे घेऊन जाते. त्यासाठी आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्या
चढून जावे लागते. देवीच्या देवळापासून किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्या
आहेत. पूर्वी या पायर्यांनी थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येत
असे, परंतू इंग्रजांनी येथील पायर्यांची नासधूस केल्यामुळे आता येथून
किल्ल्यावर जाता येत नाही. २०२० साली या भागात काही लोखंडी रॉडस कातळात
ठोकलेले आहेत. त्यांच्या आधाराने येथून किल्ल्यावर जाता येते. किल्ला
उतरतांना मात्र दोर लावून (रॅपलिंग करुन) येथून उतरता येते.
देवीचे
दर्शन घेऊन कातळ कड्याखालील वाटेने थोडे चालत गेल्यावर आपण गडगडाकिल्ला व
अंबोली पर्वत यामधील खिंडीत येतो. येथून एक पायवाट खिंडीत उतरुन अंबोली
पर्वताला वळसा घालून जाते. या पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर दगडात
खोदलेली ३ फूटी उंचीची गुहा पाहाता येते. या मानवनिर्मित गुहेत रांगत जाता
येते.(सोबत टॉर्च असणे आवश्यक). थोडे अंतर गेल्यावर गुहा काटकोनात वळते.
स्थानिक लोक याला भूयार म्हणतात. ही गुहा पाहायला जाताना मात्र जपून जावे
लागते कारण अनेक ठिकाणी घसारा(स्क्री) आहे, तर दोन ठिकाणी कातळात असलेल्या
खोबणीत हात घालून रस्ता पार करावा लागतो.
गुहा पाहून पून्हा गडगडा
किल्ल्याच्या कातळमाथ्यापाशी आल्यावर उजव्या बाजूला (गडगड सांगवी गावाच्या
विरुध्द बाजूस) गेल्यावर कातळाचा छोटा टप्पा लागतो. हा टप्पा पार केल्यावर
आपण एका निष्पर्ण झाडाखाली येतो. या झाडाची मुळे कातळात खोलवर गेलेली आहेत.
या मुळांना व झाडाच्या फांद्यांना पकडून वर चढल्यावर आपण कातळाच्या अरुंद
पट्टीवर येतो. येथून पुढे वर चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे
आवश्यक आहे. हा पहिला कातळटप्पा साधारणपणे १५ फूट उंचीचा आहे (गिर्यारोहण
तंत्रात ‘चिमणी क्लाईंब’ नावाने ओळखतात) हा टप्पा चढून दोर(रोप) वर
असलेल्या झाडाला बांधून मग त्यावरुन इतरांना वर चढता येते.
पहिला
रॉक पॅच संपल्यावर थोडीशी चढण आहे. या चढणीवर घसारा(स्क्री) असल्यामुळे
जपून चालावे लागते. चढण संपल्यावर दुसरा (कातळटप्पा) रॉक पॅच आहे. हा
साधारणत: २० फूटाचा आहे. वर चढण्यासाठी खोबणी आहेत. त्यावरुन वर जाऊन
किल्ल्याच्या माथ्यावरील झाडाला दोर बांधावा व इतरांना वर चढवून घ्यावे.
किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर डाव्या बाजूस उध्वस्त प्रवेशद्वार व
त्याबाजूच्या देवड्या पाहाता येतात. येथून दगडात कोरलेल्या पायर्या खाली
उतरतांना दिसतात. या पायर्या पूर्वी देवीच्या देवळापर्यंत होत्या. त्या
आता उध्वस्त झाल्यामुळे आता येथून (रोप लावल्या शिवाय) चढता - उतरता येत
नाही. प्रवेशद्वार पाहून पुढे आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या
पाण्याच्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. यात ५ टाकं आहेत टाक्यात
उतरण्यासाठी पायर्या आहेत. शेवटच्या दोन टाक्यात चौकोनी दालन कोरलेली
आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर उध्वस्त
वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. या पुढे पुन्हा एक पाण्याच्या टाक्यांचा
समुह आहे. यात चार टाकी असून यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडावरुन
आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश दिसतो. डांग्या सुळका, अंजनेरी व वालदेवी डॅम
किल्ल्याच्या पश्चिमेला, तर मुंबई - नाशिक महामार्ग , मुकणे डॅम व
त्यामागील पट्टा, औंढा, बीतनगड,हे किल्ले व कळसुबाई डोंगररांग दिसते.
गडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी आपण आलेल्या मार्गाने रॅपलींग करत उतरु
शकतो किंवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला दोर बांधून रॅपलिंग करत देवीच्या
मंदिरापाशी उतरु शकतो.
कसे पोहोचावे
मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईपासून १६३
कि.मी वर (घोटी पासून १६ किमी) व नाशिकच्या अलिकडे १८ कि.मी वर वैतरण्याला
जाणारा फाटा आहे. या फाट्यापासून २ किमी वर "वाडीव्हीरे" गाव आहे. गावातून
बाहेर पडल्यावर एक चौक लागतो. या चौकातून उजव्या हाताचा रस्ता ४ किमी वरील
"गडगड सांगवी" या गडाच्या पायथ्याच्या गावात जातो. या रस्त्याच्या
सुरुवातीलाच एक कमान उभारलेली असून त्यावर ‘हनुमान व भवानी मंदिर, अंबोली
पर्वत परिसर, गडगड सांगवी’ असे लिहलेले आहे. नाशिकहून दर तासाला वाडीव्हीरे
गावात जाण्यासाठी एसटी बस आहेत, परंतू गडगड सांगवी गावात एसटी जात नाही.
वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खाजगी
वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ गडगड सांगवी गावातून गडमाथा गाठण्यास २ ते ३ तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडगड सांगवी गावातील शाळेच्या पडवीत १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या हनुमान मंदिरात १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय स्वत: करावी किंवा गडगड
सांगवी गावापासून मुंबई - नाशिक महामार्ग ६ किमी वर आहे, तेथे अनेक धाबे
आहेत.
पाणी उपलब्धता
१) गडावरील प्रवेशद्वाराजवळील टाक्यात पिण्यायोग्य पाणी १२ महिने उपलब्ध असते.
२) हनुमान मंदिराजवळ असलेल्या विहिरीत बारामाही पाणी असते.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
१) गडगडा किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२)
सोबत १०० फूटी व ३०फूटी असे दोन वेगवेगळे दोर घेतल्यास दोनही कातळटप्पे
चढता उतरताना खोळंबा होत नाही. दोन्ही रॉक पॅचमध्ये व पहिल्या रॉकपॅच
पूर्वी जागा अरुंद असल्यामुळे ५ ते ६ जणांपेक्षा अधिक माणसे उभी राहू शकत
नाहीत त्यासाठी दोन रोप असलेले चांगले.
३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
४)
किल्ला उतरतांना प्रवेशद्वाराकडून देवीच्या देवळाकडे रोप लावून उतरणार
असल्यास रोपचा ‘यू’ बनवावा. कारण येथे एक ‘घुमटाकार’(ओव्हर हॅग) असल्यामुळे
रोप शिवाय खाली उतरता येत नाही. रोपचा ‘यू’ बनविल्यामुळे सर्वजण खाली
उतरल्यावर रोप खेचून घेता येतो.
५) देवीच्या देवळाकडून गड चढता येत
नाही. येथे पायर्या तुटल्या आहेत, तेथे ओव्हर हॅग असल्यामुळे येथून गडावर
जाता येत नाही. परंतू २०२० साली या ठिकाणी लोखंडी रॉडस कातळात बसवलेले
आहेत. त्यांच्या आधाराने गडावर जाता येते.
६) गावात कातळटप्प्याची खडानखडा माहिती असणारे वाटाडे आहेत. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांची मदत घ्यावी.
७) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.
जवळील गावे
गडगड सांगवी
उंची : ३०३० फुट
श्रेणी : अत्यंत कठीण
© Suresh Nimbalkar



































































No comments:
Post a Comment