Saturday, April 11, 2026

मोहनदर (शिडका) किल्ला


नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे.सातमाळ डोंगररांगेतील अहिवंतगड या प्रसिद्ध किल्ल्याच्या शेजारी शिडका नावाचा डोंगर असून, या डोंगरावर पाण्याची टाकी व खोदीव पायऱ्या असे कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष आढळून येतात. या स्थापत्य अवशेषांच्या सूक्ष्म निरीक्षणातून नाशिक येथील दुर्गअभ्यासक गिरीश टकले यांनी शिडका डोंगर हा नुसता डोंगर नसून, तो किल्ला असल्याचे शोधून काढले. तसेच, या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी या गावाच्या नावावरून गिरीश टकले यांनी या किल्ल्याला 'मोहनदर' असे नाव दिले आहे. 
Mohandar(Shidaka)


Achala and Taula

        नासिकचा कळवण तालूक्याचा परिसर म्हणजे म्हणजे नेढी आणि पातळ अश्मभिंती अर्थात डाईकच्य अश्मरचनांची मांदियाळी. याच तालूक्यात पिंपळागडाच्या रूपाने सह्याद्रीतले सर्वात विशाल नेढे आहे तर घनघोर युद्ध झालेले कण्हेर गडाचे नेढे प्रसिद्ध आहे. धोडपचा किल्ला तर तिहेरी गुणवैशिष्ट्ये बाळगणारा - नेढं, डाईक आणि व्होल्कॅनिक प्लग.  मोहनदरी किल्ल्याचं नेढं अगदी दुरून साद घालणारं. निसर्गाची एक अदभूत निर्मीती म्हणजे या नेढ्यांची निर्मीती. सह्याद्रीचे ते व्यवच्छेदक लक्षण.  
          मोहनदर किल्ल्यावर कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष असले तरी शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटिशकालीन कागदपत्रांमध्ये या किल्ल्याबाबत कुठलाही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे मोहनदर स्वतंत्र किल्ला होता की अहिवंतगडाचाच सहायक किल्ला होता, याबाबत शंका उपस्थित होते. कदाचित मोहनदर हा अहिवंतगडाचा पहारेकरी किल्ला असावा, असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख नसलेला; परंतु बन्यादे स्थापत्य अवशेष बाळगून असलेला किल्ला म्हणजे 'मोहनदर' ह वरील मर्यादा लक्षात घेता या किल्ल्याला पहारेदार किल्ला म्हणूनच संबोधावा लागेल. अहिवंतगड या मुख्य किल्ल्यावर पूर्व बाजून शत्रूच्या होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असणार, यात शंका नसावी. परंतु, या किल्ल्यावर स्वतंत्र अधिकारी न नेमता अहिवंतगडाच्याच अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला असणार. त्यामुळेच या किल्ल्याचा स्वतंत्र उल्लेख असलेले कागदपत्र दिसून येत नाहीत. 
      आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाच्या आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असला तरी तोहि जागा मोकळा न सोडितां बांधोन मजबूद करावा. याच तत्त्वानुसार मोहनदर किल्ल्याची निर्मिती झाली असावी. सप्तश्रृंगीगडावर जाणार्‍यांचे लढ मोहनदरीच्या नेढ्याकडे वळले नाही तर नवल. इतिहास काळात कुठल्या तरी राजवटीत मोहनदरीच्या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. याचा उद्देश नांदूरी घाटावर लक्ष देण्यासाठी निर्माण केला असावा. तसा हा सातमाळा डोंगररांगेचा चौकदार म्हणून शोभून दिसतो.  
      अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो. हे नेढे निसर्गनिर्मित परंतु लहान आकाराचे असावे. नंतर काळा ओघात ते मोठे झाले असावे.  मोहनदर किल्ल्याला असलेले नेढे या किल्ल्याची स्वतंत्र ओळख टिकवून आहे. अशा प्रकारचे नेढे नाशिक व खानदेश भागात मोहनदर, कण्हेरगड व गोरखगड या तीनच किल्ल्यांवर दिसून येतात.
मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य (४० फ़ुट रोप, हार्नेस इत्यादी) वापरुन १२ ते १५ फ़ुट प्रस्तर चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिक सापुतारा रस्त्यावर वणीच्या पुढे नांदुरी गाव आहे. नांदुरी गावातून अभोण्याला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नांदुरी पासून ३.५ किमीवर मोहनदरी गावात जाणारा फ़ाटा आहे. मोहनदरी गावात शासकीय आश्रमशाळा आहे. गडावर जाणार्‍या सर्व वाटा या आश्रम शाळेपासुनच सुरु होतात.
मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.) वापरुन या अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.
२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात.
३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

नांदुरी हून   मोहनदारी गावाचे अंतर जवळपास १०-१५ किमी असेल. नांदुरी गावातून मोहनदरी गावाकडे जाण्यासाठी वळतो त्याठिकाणी ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. तसेच नांदुरी अभोणा रस्त्यावर मोहनदरीला जाण्यासाठी फ़ाटा आहे तेथेही ४ वीरगळ आणि एक सर्प शिल्प पाहायला मिळते.

 मोहनदरी गावातून मोहनदरी किल्ला

गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. शक्यतो वळसा मारून जायचे . गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो.  मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. दोन वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.

Fort
Fort


आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे दोन टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. 

मोहनदरी किल्ल्याचा माथा


मोहनदरीच्या माथ्यावर झालेलं अविस्मरणीय स्वागत !!!

खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवायचे.  मोहनदरीच्या माथ्यावरून दिसणा-या बागलाण बाजूच्या विस्तृत प्रदेशाचं दृश्य मात्र केवळ अवर्णनीय आहे. पलीकडच्या गावांमधील शेतं,त्यांची कौलारू घरं,चणकापूर धरण हा नजारा अप्रतिम !!! भान विसरून कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत होतो. मोहनदरी किल्ल्याचा कातळकडाही या पठारावरून सुरेख दिसत होता. नशीब चांगलं असेल तर साल्हेर - सालोटया पर्यंतचा मुलुख दिसू शकतो. 
 मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. 


तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून झाल्यावर परत दरवाज्या पाशी आल्यावर फेरी पूर्ण  होते. 

माथ्यावरून दिसणारा मोहनदार(शिडका) किल्ला 

पाण्याने तुडुंब भरलेला टाक्यांचा समूह..


शिडका किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीचे अवशेष...

मोहनदरी वरून कण्हेरा किल्ला

पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण ८-१० कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. 
 मोहनदरीचा उजवीकडचा कातळकडा आणि मध्यभागी नेढं

इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण १६ मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो.  नेढ्याच्या पायथ्याला पोहचतो तर  अजून एक आव्हान वाट पाहत असते. नेढ्यात चढण्यासाठी उभा १२ फुटांचा पॅच चढायचा आहे. चढावाच लागेल. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. . ह्यात बऱ्यापैकी बसण्यासाठी जागा असली तरी अखंड सावध असावे ह्या पध्दतीनेच इथे बसावे. 

मोहनदरी गावातून किल्ल्याचं नेढं आणि त्यावरचा झेंडा


नेढयाकडे नेणारी शेवटची चढण


नेढयापासून समोर दिसणारा दिलखुलास देखावा. धुक्यात बुडालेला सप्तशृंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव !!

नेढं

 नेढं किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असले तरी पूर्वेला किल्ला बराच विस्तारलेला आहे. ह्याच्या माथ्यावरून  कधी मेघ धावतात तर कधी उन्ह. मधल्या विस्तारात जामशेत, आंबुर्डी गावे  अंग सैल टाकून पहुडलेले . मागे मोहनदरी गाव. जवळच पण इतरस्त्र पसरलेली सातमाळ रांग. तश्या नाशिकला असंख्य रांगा पण  सर्वांची अनभिषिक्त सम्राज्ञी सातमाळा रांग !!! हातगड पासून सुरू झालेली ही रांग अखेर धोडप - कांचना मंचना पर्यंत धावते. सप्तशृंगी गडाचे गगनाला भिडणारा पर्वत धुक्यात पहुडलेला तरी विशेष लक्षवेधी.   हे सारं विलोभनीय.  भर्राट वारा  धूळ घेवून इथ येतो  आणि अख्या साह्यमंडळावर फिरवतो. इथ उभ राहिल्यावर हा प्रदेश न्याहाळताना आणि वाहत्या वाऱ्याचा झोत स्विकारताना चढणारी बेहोशी लवकर न उतरणारी. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण १० फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.  सह्याद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा मोहनदरी किल्ला मात्र आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असाच आहे !!

 

 









 

 


नेढयापासून किल्ल्याच्या डाव्या कातळककडयाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यातून अर्धा तास आडवं गेलो की उजवीकडे माथ्याकडे नेणारी वाट दिसते आणि आपला माथ्यावर प्रवेश होतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण 



लांबलचक कातळकडयाचा मोहनदरी किल्ला !!!



 

 

 





















गिरीदुर्ग नाशिक सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
कठीण
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3900
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक


किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Mohandar(Shidaka)

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.

मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य (४० फ़ुट रोप, हार्नेस इत्यादी) वापरुन १२ ते १५ फ़ुट प्रस्तर चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.

महत्त्वाची ठिकाणे

गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड व त्याच्या बाजूच्या डोंगरामधील घळीत एका बुरुजाच आणि तटबंदीच बांधकाम पाहायला मिळत.

गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते.

नांदुरी गावातून मोहनदरी गावाकडे जाण्यासाठी वळतो त्याठिकाणी ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. तसेच नांदुरी अभोणा रस्त्यावर मोहनदरीला जाण्यासाठी फ़ाटा आहे तेथेही ४ वीरगळ आणि एक सर्प शिल्प पाहायला मिळते.

कसे पोहोचावे

मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिक सापुतारा रस्त्यावर वणीच्या पुढे नांदुरी गाव आहे. नांदुरी गावातून अभोण्याला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नांदुरी पासून ३.५ किमीवर मोहनदरी गावात जाणारा फ़ाटा आहे. मोहनदरी गावात शासकीय आश्रमशाळा आहे. गडावर जाणार्‍या सर्व वाटा या आश्रम शाळेपासुनच सुरु होतात.

मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.) वापरुन या अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात.

३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ मोहनदरी गावातून दिड ते दोन तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात राहाण्याची सोय होते.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय ५ किमी वरील नांदुरीत होते.

💧

पाणी उपलब्धता

गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ नोव्हेंबर ते मार्च

जवळील गावे

मोहनदरी

 

 
अहिवंतगडाचा पहारेदार किल्ले मोहनदर
सातमाळ डोंगररांगेतील अहिवंतगड या प्रसिद्ध किल्ल्याच्या शेजारी शिडका नावाचा डोंगर असून, या डोंगरावर पाण्याची टाकी व खोदीव पायऱ्या असे कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष आढळून येतात. या स्थापत्य अवशेषांच्या सूक्ष्म निरीक्षणातून नाशिक येथील दुर्गअभ्यासक गिरीश टकले यांनी शिडका डोंगर हा नुसता डोंगर नसून, तो किल्ला असल्याचे शोधून काढले. तसेच, या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी या गावाच्या नावावरून गिरीश टकले यांनी या किल्ल्याला 'मोहनदर' असे नाव दिले आहे.
मोहनदर किल्ल्यावर कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष असले
तरी शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटिशकालीन कागदपत्रांमध्ये
या किल्ल्याबाबत कुठलाही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे मोहनदर स्वतंत्र किल्ला होता की अहिवंतगडाचाच सहायक किल्ला होता, याबाबत शंका उपस्थित होते. कदाचित मोहनदर हा अहिवंतगडाचा पहारेकरी किल्ला असावा, असे वाटते. आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाच्या आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असला तरी तोहि जागा मोकळा न सोडितां बांधोन मजबूद करावा. याच तत्त्वानुसार मोहनदर किल्ल्याची निर्मिती झाली असावी.
मोहनदर किल्ला नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५५ किलोमीटर अंतरावर असून, या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याकरिता नाशिक येथून दिंडोरी व वणीमार्गे सप्तशृंगगडाजवळील नांदुरी या गावी जावे लागते. नांदुरी गावाशेजारीच मोहनदरी हे गाव असून, हे गाव मोहनदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. मोहनदरी गावातून मोहनदर किल्ल्यावर चढाई करता येते.
मोहनदर किल्ल्यावरील स्थापत्य अवशेषांमध्ये पाण्याच्या खोदीव टाक्यांचा विशेष भरणा आहे. या किल्ल्यावर पाण्याची खोदीव सहा टाके आहेत. याचबरोबर तटबंदी, खोदीव पायऱ्या व इमारतीचे अवशेषही दिसून येतात. मोहनदर किल्ला प्रमुख किल्ला नसून, तो सहायक किल्ला अथवा पहारेदार किल्ला असल्याने या किल्ल्यावर फारसे स्थापत्य अवशेष आढळून येत नाहीत.
पश्चिम बाजूला असलेल्या नेत्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. या नेढ्यांसंबंधी एक आख्यायिका प्रसिद्ध असून, त्यानुसार पुरातन काळात सप्तशृंगगडावर देवी सप्तशृंगी व म्हैसासुर राक्षस यांच्यात प्रचंड युद्ध झाले. या युद्धाच्यावेळी देवी सप्तशृंगीच्या एका प्रचंड अस्त्राने रेड्याच्या रूपात असलेल्या म्हैसासुराला अत्यंत वेगाने उडवून लावले. यावेळी या रेड्यारूपी म्हैसासुराच्या धडकेने सप्तशृंगी गडाच्या उत्तर बाजूला असलेल्या मोहनदर ऊर्फ शिडका डोंगराला
छिद्र पडले. तेच हे नेढे होय. अर्थात ही एक आख्यायिका अन् हे नेढे निसर्गनिर्मित परंतु लहान आकाराचे असावे. नंतर काळा ओघात ते मोठे झाले असावे.
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख नसलेला; परंतु बन्यादे स्थापत्य अवशेष बाळगून असलेला किल्ला म्हणजे 'मोहनदर' ह वरील मर्यादा लक्षात घेता या किल्ल्याला पहारेदार किल्ला म्हणूनच संबोधावा लागेल. अहिवंतगड या मुख्य किल्ल्यावर पूर्व बाजून शत्रूच्या होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असणार, यात शंका नसावी. परंतु, या किल्ल्यावर स्वतंत्र अधिकारी न नेमता अहिवंतगडाच्याच अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला असणार. त्यामुळेच या किल्ल्याचा स्वतंत्र उल्लेख असलेले कागदपत्र दिसून येत नाहीत. याचबरोबर मोहनदर किल्ल्याला असलेले नेढे या किल्ल्याची स्वतंत्र ओळख टिकवून आहे. अशा प्रकारचे नेढे नाशिक व खानदेश भागात मोहनदर, कण्हेरगड व गोरखगड या तीनच किल्ल्यांवर दिसून येतात.
पृष्ठ सोजन्य
लेखातील सर्व छायाचित्रे श्रीकांत कासट, व्यवस्थापकीय संपादक, दुर्ग
श्री. दिलीप देशमुख इंदिरानगर, नाशिक. मो. ९८२३५०२१३५
 




मोहनदर उर्फ शिडका

    सप्तशृंगी देवी आणि राक्षस ह्यांच्यात तुंबळ युद्ध चालू होतं. कोणीही माघार घ्याला तयार नाही. युद्ध कित्येक दिवस चालले. देवीच्या वाढत्या आक्रमणांनी असुर हैराण झाले. आपला फारसा काही निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर असुर पळ काढू लागले. देवीने पाठलाग केला. पाठलागात मोहनदरीची  पूर्व पश्चिम पसरलेली कातळ भिंत आडवी आली त्याच त्वेषात देवीने त्या भिंतीवर लाथ मारली आणि एक भलं मोठं भगदाड पाडले.
तेच ते हे नेढं! (आख्यायिका) 


   मोहनदरी गावापासून वाट वर चढताना डावीकडे सरकत जाते. चढ अंगावर आलेला. घाम नेहमीप्रमाणे आमंत्रण न देता अंगावर खेळू लागला. मी सवयीप्रमाणे मागे राहिलो. माझ्या मागे नाना माझी धडपड बघत होते. नेढं खुणावत होत. अर्ध्या तासाच्या खड्या चढाईत हायस हुस करीत नेढ्याच्या पायथ्याला पोहचलो. एवढे करतोय न करतो तर  अजून एक आव्हान वाट पाहत होते. नेढ्यात चढण्यासाठी उभा १२ फुटांचा पॅच चढायचा होता. चढावाच लागेल. सहकाऱ्यांचे पहिले एक दोन  प्रयत्न फसल्यावर आघाडी घेवून एकदाचे नेढ्यात पोहोचलो. ह्या बऱ्यापैकी बसण्यासाठी जागा असली तरी अखंड सावध असावे ह्या पध्दतीनेच इथे बसावे. नेढं किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असले तरी पूर्वेला किल्ला बराच विस्तारलेला आहे. ह्याच्या माथ्यावरून  कधी मेघ धावतात तर कधी उन्ह. मधल्या विस्तारात जामशेत, आंबुर्डी गावे  अंग सैल टाकून पहुडलेले . मागे मोहनदरी गाव. जवळच पण इतरस्त्र पसरलेली सातमाळ रांग. तश्या नाशिकला असंख्य रांगा पण  सर्वांची अनभिषिक्त सम्राज्ञी सातमाळा रांग !!! हातगड पासून सुरू झालेली ही रांग अखेर धोडप - कांचना मंचना पर्यंत धावते. सप्तशृंगी गडाचे गगनाला भिडणारा पर्वत धुक्यात पहुडलेला तरी विशेष लक्षवेधी.   हे सारं विलोभनीय.  भर्राट वारा  धूळ घेवून इथ येतो  आणि अख्या साह्यमंडळावर फिरवतो. इथ उभ राहिल्यावर हा प्रदेश न्याहाळताना आणि वाहत्या वाऱ्याचा झोत स्विकारताना चढणारी बेहोशी लवकर न उतरणारी.

   हनुमान मंदिरात घरून आणलेल्या शिदोरी खाऊन थोड्याशा विश्रांतीनंतर मोहनदरी गावात पोहचलो. गावाच्या अखेर आश्रम आहे तेथे पोहोचलो. तेथे इयत्ता पहिली ते १२वी पर्यंतची मुले -मुली शिकतात आणि तिथेच राहतात. त्यातीलच दोघांना घेऊन मोहनदरी चढायला घेतला होता. आणि इथं नेढ्यात पोहचलो होतो.
     नेढ्याच्या पलीकडील बाजूने उतरून कडा उजव्या हाताला ठेवत गवताने भरलेल्या निमुळत्या वाटेने चालू लागलो. थोडासा पाय घसरला तर थेट किल्ल्याचा पायथाच. नानांनी आघाडी घेतली त्यांच्या मागून येऊन एका खिंडीतून मोहनदरीच्या माथ्यावर आलो. वा.. काय दृश्य!!!
दिलखुष नजारा.. सूर्यनारायण अस्ताला जात होता. पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली आणि उतरण्याची घाई केली. किल्ल्यावर ४ पाण्याची टाकी आणि थोडीशी तटबंदी नीट पाहल्यास लक्षात येते. पुन्हा मोहनदरी गावात आलो तेव्हा गडाला एक संपूर्ण प्रदक्षिणा झाली होती.   
पुन्हा अहिवंतच्या दरेगावात पोहचलो. पावसाची रिपरिप चांगलीच सुरू झाली. आजचा ट्रेक वेळेत संपला.  गावातली वीज गायब होती तरीसुद्धा अजिबात हयगय न करता कोंबडीचे जीवन सार्थकी लावून गप्पांसाठी बैठक मांडली. अतिशय महत्त्वाचे मुद्दे नानांची आपल्या अनुभवाच्या गोठडीतून उघडले. ट्रेकिंग बॅग कशी असावी. त्यात काय काय असावे, घ्यावयाची काळजी अशा अनेक विषयांवर गप्पा रंगल्या.




















त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.
किल्ले मोहनदर उर्फ शिडका
आता माझ्यासारख्या नवख्या ट्रेकवेड्याला ह्या मातब्बर ट्रेकर्स बरोबर जायला मिळते तेव्हा "ट्रेकसाठीची जागा" हा मुद्दा फारसा महत्वाचा ठरत नाही, कारण त्यांच्याबरोबर कुठेही जाणार असलो तर माझ्यासाठी सगळे नवीनच असते. ह्यावेळीही नाशिकमधल्या वणी जवळच्या किल्ले मोहनदर (शिडका) आणि कण्हेरगडचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. सुदैवाने त्याने अजून प्लॅन जाहीर न केल्याने मला जागा नक्की मिळणार होती. शनिवारी रात्री निघून रविवारी परत. असा साधा प्लॅन होता. हापिसात शुक्रवार पर्यंतचा वेळ कसाबसा काढला. शनिवारी घरातली काही कामं पण आटपून घेतली. संध्याकाळी नेहमीचीच तयारी केली आणि सव्वा आठ ला घराबाहेर पडलो. गिरीश कुलकर्णी ह्यांची भेट घेऊन आम्ही बरोब्बर 9:25 ला विनीतच्या घरी पोचलो. 2-4 मिनिटातच सचिन जगताप आला आणि ठरल्याप्रमाणे साडेनऊला तिथून निघालो. वाटेत भूषणला घेतले आणि मध्यरात्री मसाला दूध न विसरता घेऊन पहाटे पावणे 3 ला मोहनदर गावात अगदी ग्रामपंचायतीसमोर पोचलो. मस्तपैकी जाळीच्या compound मध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात तंबू टाकला आणि 3 ला झोपलो सुद्धा. 5 ला तशीही जाग यायला लागली पण सध्या उशिरापर्यंत अंधार असल्याने थोडा वेळ पडून राहिलो आणि साडेपाच नंतर उठलो. गांव तसं जागं झालेलंच असतं ह्यावेळी. त्यातून आमच्यासारखे असे अचानक उगवलेले नवीन प्राणी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जरासे कुतूहल असते. त्यामुळे बादलीभर पाणी मिळणे काही अवघड गेले नाही. दंत-मार्जन आणि वाघ-ससे मारण्याचे कार्यक्रम लगेचच सगळ्यांनी उरकून घेतलंनी. रात्री लक्षात न आलेला मोहनदर किल्ला त्याचा प्रचंड भिंतीरूपी फणा काढून आमच्या डोक्यावरच होता. त्यातून ह्या किल्ल्याला प्रचंड असं नेढं आहे. जणूकाही त्याचा डोळाच.


नेढं


ह्याची आख्यायिका आहे. जेव्हा सप्तशृंगी माता आणि महिषासुर यांचं युध्द झालं, तेव्हा महिषासुर रेडयाच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने रेडयाचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने डोंगराला धडक दिली. त्यामुळे देवीच्या मंदिरासमोरच्या डोंगरात हे खिंडार पडलं. ह्याबाबत अजून एक वेगळी आख्यायिकाही ऐकायला मिळते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. त्यावेळी महिषासुर मात्र रेड्याच्या रुपात पळाला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला आणि या डोंगराच्या मागे लपून बसला. तेव्हा त्याच्या पाठलाग करत आलेल्या देवीने या डोंगराला जोरात लाथ मारली आणि हे नेढ तयार झालं. हे नेढं ह्याच आख्यायिकेमुळे "देवीचा पाय" म्हणून प्रसिद्ध आहे. वणीला येणाऱ्या असंख्य भक्तांपैकी बहुतेकांना देवीचा पाय असलेला हा डोंगर, हा किल्ला आहे ह्याची कल्पनाही नाही. पिंपळा उर्फ कंडाळा किल्ल्याला तर सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेढं मिरावायचा मान मिळालेला आहे त्यामागेही एक आख्यायिका आहे. पिंपळा आणि धोडपच्या मोहिमेत त्याचा उल्लेख केलेला होता. ह्या मोहनदर उर्फ शिडका किल्ल्याचे नेढे त्याच्यापेक्षा लहान असले तरी ह्याचे सौंदर्य काही कमी नाही.

ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.
सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण.
आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे 2 टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवले कि मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण 8-10 कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण 15 मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण 10 फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.



आम्ही मोहनदारी गावाकडे निघालो. नांदुरी हून या गावाचे अंतर जवळपास १०-१५ किमी असेल. मोहनदारी गावात शिरताना ५-६ फुट उंचीच्या वीरगळी आणि सर्पशिल्प दिसतात.


                 थोड्यात वेळात आम्ही मोहनदारी गावात येउन पोचलो. इथे मुक्काम करावयाचा असल्यास नव्याने बांधलेली आश्रमशाळा आहे पण खाण्याची सोय नांदुरी गावात होते. आमच्या सोबत अनुभवी ट्रेकर पुण्याहून हर्षल कुलकर्णी ,साकेत घाणेकर आणि नाशिकचे मयुरेश जोशी सर होते. खालूनच समोर अवाढव्य असे नेढे दिसत होते 

        चढाई चालू करण्याआधी आम्ही सर्वांनी सदाशिव जोगळेकर सरांचे सह्याद्री स्तोत्र पठण केले, त्यातल्याच काही माझ्या मनाला भावलेल्या ओळी…

"सह्याद्री नामा नग हा प्रचंड

हा दक्षिणेचा अभिमान दंड !

ज्वाला मुखिनी जरी निर्मियेला

पवित्र तो रामपदे जाहला!"

  चढाईचा रस्ता हा घसरणीचा असल्याने हळू हळू चढत होतो. मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.)

२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत.

३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो. (संदर्भ- ट्रेकक्षितीज संस्था website)

    पहिल्या वाटेने साधारण एका तासात आम्ही नेढ्यात येउन पोचलो. हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. या बद्दलची आख्यायिका अशी की  महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.

या नेढ्याचा व्यास इतका मोठा आहे की प्रस्तरारोहण करून जावे लागते अजून आजूबाजूला मधमाशांची पोळी असल्यामुळे आम्ही पूर्ण चेहरा झाकला होता फक्त डोळे तेवढे उघडे. नेढे चढून त्या पलीकडे गेल्यावर डोंगराची भिंत उजवीकडे ठेवत अरुंद पायवाटेने आम्ही माथ्यावर गेलो. इथून जाताना फार काळजी घ्यावी. 

तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. 

तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून झाल्यावर परत दरवाज्या पाशी आल्यावर आमची फेरी पूर्ण झाली

माथ्यावरून दिसणारा मोहनदार(शिडका) किल्ला 

खिंडी पासून परततानाचा उतार हा तीव्र आणि घसरडा असल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली. पण हळू हळू सर्वजण सुखरूप खाली येउन पोचले. 

वरुन दिसणारे मोहनदारी गाव 

थोडे फ्रेश होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो वाटेत नांदुरी च्या पुढे एका हॉटेल मध्ये गावकडच्या जेवणावर ताव मारला त्यासाथीला सगळ्यांचे अभिप्राय नोंदवले गेले आमच्या सोबत एवरेस्ट बेस कॅम्प ला जाऊन आलेले आणि वयाची साठी ओलांडलेले सुनील देशमुख काका होते, हिमालयाच्या सरपास ट्रेक वर पुस्तक लिहणारा अजून एक अनुभवी ट्रेकर पंकज घारे सुद्धा होता त्यांनी सांगितलेल्या स्वानुभव हा सर्वांसाठी स्फूर्तीदायी होता. जेवण करून आम्ही निघालो आणि नंतर थकलेले सर्व चेहरे दोन दिवसांची ही सुखाची गाठोडी घेऊन झोपले.


किल्ल्याची दिसणारी कातळभिंत 

दोन दिवसात या वाटेतील तीन अनवट व अनगड किल्ल्यांची हि सफर भन्नाट होती यात शंका नाही. सोबत असणारे भटके आणि मल्हार सह्याद्रीचा बेभान माहोल…

 

उंच माझा आकाशदीवा मोहनदरीच्या नेढ्यात...


उंच माझा आकाशदीवा

मोहनदरीच्या नेढ्यात...

उंच माझा आकाशदीप

सह्याद्रीच्या शिखरी

शूरांसाठी एक दीवा

दुर्गांच्या दारी

भयकारी परचक्र 

उरावरी झेलले

तरवारीच्या तालावर 

कितीएक शत्रू लोळविले

तुर्क हबशी मुघल

त्राही त्राही झुंजविले

यवनादींचे फेरे

प्राण अर्पूनी भेदीले

समस्त त्या वीरांना

शतश:  करितो नमन

आकाशदीवा माझा

त्यांजसाठी अर्पण

।।जय हो।।

- प्रशांत, १४/११/२०२३

सह्याद्रीच्या उंच शिखरावर, गडकोटाच्या वरती मोठा आकाशदीप झळकावण्याचे माझे हे तिसरे  वर्ष. माझी आवड, छंद आणि व्यवसाय आकाशकंदिल बनविण्याचा असल्याने लहानात लहान आणि मोठ्यात मोठे अनेक आकाशकंदिल बनवत असतो. मागच्या वर्षी दुर्गभांडारच्या कडेलोट बुरूजावर ९ फुट उंचीचा भव्य आकाशकंदिल लावला होता, त्याच्या आदल्या वर्षी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर असाच नऊ फुट उंचीचा आकाशकंदिल लावला होता. यंदा बेत होता साल्हेरचा, पण काही कारणामुळे तो योग जुणून आला नाही. हातात वेळ थोडा मिळाल्याने मग मोहनदरीची निवड केली. 

मोहनदरी किल्ल्याचं नेढं अगदी दुरून साद घालणारं. निसर्गाची एक अदभूत निर्मीती म्हणजे या नेढ्यांची निर्मीती. सह्याद्रीचे ते व्यवच्छेदक लक्षण. त्यातही नासिकचा कळवण तालूक्याचा परिसर म्हणजे म्हणजे नेढी आणि पातळ अश्मभिंती अर्थात डाईकच्य अश्मरचनांची मांदियाळी. याच तालूक्यात पिंपळागडाच्या रूपाने सह्याद्रीतले सर्वात विशाल नेढे आहे तर घनघोर युद्ध झालेले कण्हेर गडाचे नेढे प्रसिद्ध आहे. धोडपचा किल्ला तर तिहेरी गुणवैशिष्ट्ये बाळगणारा - नेढं, डाईक आणि व्होल्कॅनिक प्लग. 

या सगळ्यात मोहनदरीचं नेढं एक वेगळंच रूप ल्यायलेलं. देवी दुर्गेने महिषासुराचा निपात करताना जो त्रिशूळ फेकुन मारला त्याने डोंगराला आरपार छिद्र पडलं अशी या मागची पौरिणिक कथा. सप्तश्रृंगीगडावर जाणार्‍यांचे लढ मोहनदरीच्या नेढ्याकडे वळले नाही तर नवल. इतिहास काळात कुठल्या तरी राजवटीत मोहनदरीच्या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. याचा उद्देश नांदूरी घाटावर लक्ष देण्यासाठी निर्माण केला असावा. तसा हा सातमाळा डोंगररांगेचा चौकदार म्हणून शोभून दिसतो. 

नासिकच्या पिंपळपारावरची रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट अनूभवली. नव्या पिढीची दमदार शास्त्रीय गायिका स्नीती मिश्रा यांच्या नितांत सुंदर गायिकीचे श्रवण करून तडक घर गाठले आणि आकाशकंदिलावर मोहनदरी, शिडका ही किल्ल्याची अक्षरे बनवायला घेतली. तोवर माझे आजच्या भटकंतीतले सवंगडी महेंद्र पाराशरे, किशोर व संगीता हे थेटे दंपती येऊन पोहोचणार होते. हो नाही करता तासभर लागला ही अक्षरे रंगीत कागदावर कापायला. मग ती चिकटवून आम्ही नासिक सोडले. तसं आम्हाला सकाळी १-३० वाजता निघायचे होते, पण आता निघायला बरोबर दुपारचे बारा वाजले.  

आज दिवाळीच्या सुट्टीमुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यात नासिक सापूतरा हा रस्ता तुलनेने चिंचोळा. ढकांबे, दिंडोरी येथे तर नेहमीच वाहतूक खोळंबलेली असते. नासिक ते नांदूरी हे किलो मिटरचे अंतर पार करायला तब्बल दोन तास लागले. तरी बरं वाटेत आम्ही कुठेही थांबलो नाही. आता थोडी पोटपूजा आणि सोबत आणलेला आकाशकंदिल किल्ल्याच्या शिखरावर नेण्याची तयारी करायची होती. अगोदर ९ फुट उंचीचा आकाशकंदिल लावण्याचे नियोजन होते, परंतू त्यासाठी मुक्कामी येण्याची आवश्यकता होती. त्यासाठी कोणी सवंगडी न भेटल्याने आकाशकंदिलाचा आकार थोडा कमी करून ५ फुट उंचीचा करण्यात आला. तोही घरीच बनवून घेतला म्हणजे किल्ल्यावर जास्त वेळ जाणार नाही. त्या गडबडीत एका बाजूच्या झिरमिळ्या निघून गेल्या. सोबत काही अवजारे आणली नव्हीत, तेव्हा गावात सुईदोरा मिळवून झिरमिळ्या शिवण्यात आल्या. २-५० वाजता आमची किल्ल्यावर चढाई सुरू झाली. आज किल्ल्यावर सोबत येण्यासाठी कोणी भेटेनात. उपसरपंचांशी बोलून रघू साबळा हा सोबत यायला तयार झाला. 

तशा मोहनदरीच्या वाटा माहितीतल्या होत्या, परंतू सह्याद्रीत भकटकंती करताना स्थानिकांची सोबत केव्हाही आवडीची आणि उपयोगाची गोष्ट ठरते. रघूमुळे नेड्याच्या शंभर मिटर उजवीकडे यंदाच्या पावसाळ्यात कडा कोसळल्याचे समजला. तसं खालून ते दिसतच होतं. हा टप्पा काळजीपूर्वक पार करून आम्ही कडक उन्हात ४० मिनीटात गड गाठला, एरवी नेड्या पर्यंत पोहोचायला वीस मिनीटे पुरेशी ठरतात. 

वाटेत रघूला महत्वाचा प्रश्न विचारला कड्यावर काही मधमाशांची पोळी आहेत का? या हंगामात सह्याद्रीत तशी ती सर्वत्रच असतात, परंतू नेमकी नेढ्यावर तीन मध्यम आकाराची पोळी होती. आता आम्ही मधमाशांची कडक आचारसंहिता अवलंबली. तसंही आमच्या पैकी कोणीही अत्तर, डियो स्प्रे मारून आलेलं नव्हतं. धूर करण्याचा किंवा पोळ्याला दगड मारण्याचा प्रश्न नव्हता, आवाजाने त्या चवताळायला नको याची काळजी घेणे आवश्यक होते. थोडावेळ परिसर न्याहाळल्यानंतर आकाशकंदिल कुठे लावायचा याचे आकलन सुरू केले. कुठल्याही परिस्थितीत दगडात खिळा ठोकायचा नव्हता मग अगोदरच मनात ठरवले त्या प्रमाणे नेढ्याच्या वर जाऊन दोर सोडायचा व आकाशकंल वर ओढून नेढ्याच्या मधोमध बांधायचा हा निर्णय पक्का केला. फक्त मधमाशांची पोळी असल्याने मधोमध न घेतो तोउजवीकडे घेण्याचे ठरवले. रघू सोबत असल्याने नेढ्यावर जाण्याचा विषय सुकर झाल. दक्षिण बाजूने काहीशा आव्हानात्मक कड्यावरून त्याने नेढ्यवर मुक्त आरोहण केले. इथली काही मंडळी याच मार्गाने मुक्तपणे नेढ्यावर किंवा नेढ्याच्या पलिकडे जातात. रघूला वर पाहोचायला २० मिनीटे लागली. त्याने खाली दोर सोडलाही, पण आता त्याला आकाशकंदिल बांधूनही तो दोर ओढेना. त्याचा फोनही उचलेना. मग मी वर जाऊन त्याला सांगण्याची तयारी केली. खालून ओरडून सांगून काहीउपयोग नव्हता. वर त्याच्या पर्यंत आवाज पोहोचणार नव्हता. शिवाय मधमाशांना त्याने डिवचले गेले असते. सुदैवाने दहा बारा मिनीटांनी रघूने फोन उचलला आणि आमचा आकाशकंदिल नेढ्याच्या मधे लागला. नेढ्यात आकाशकंदिल देखणा दिसत होता. भारताच्या तिरंगा ध्वजाच्या रंगसंगतीत हा लाकूड व सुती कापडापासून तयार करण्यात आला.  याच्यावर मोहनदरी आणि शिडका ही किल्ल्याची अक्षरे चिकटवण्यात आलेली होती. आम्हाला किल्ल्यावर पोहोचाला उशिर झाल्याने फार वेळ न दवडता उतराई सुरू करणे आवश्यक होते, अजून तर शिखर माथाही गाठला नव्हता. नेड्याचा लहानसा कातळटप्पा उतरून पलिकडे गेलो तर तिथेही वरच्या भागात मधमाशाचे पोळे दिसले. ही चारही पोळी आमच्या पासून जवळ होती, आमच्याकडून त्यांना आवाजाचे वा इतर कुठलेही आव्हान वाटेल असे काहीही न घडल्याने बाका प्रसंग उदभवला नाही हे नशिब. इथून पुढे जवळच अगदी वाटेवर मधमाशा एक आणखी एक पोळं बनवत असल्याच्या दिसल्या. येत्या काळात या पोळ्यामुळे ही वाट पर्यटक व ट्रेकर्ससाठी निशिद्य ठरेल. 

गडमाध्याकडे जात असताना सूर्य अस्ताकडे झुकलेला दिसला. सह्याद्रीतले हे अमुल्य दृष्य मनभर साठवून घेतले. काही छायाचित्रे टिपले आणि रघूला आणण्यासाठी नेढ्याच्या टपाकडे प्रयाण केले. टपावर जाण्यासाठी वरून एक कातळटप्पा उतरावा लागतो. त्याचा खालचा भाग आव्हानात्मक आहे.  तिथून रघूला वर बोलावून घेतले. आता आमची स्पर्धा वेळे सोबत होती. ''ज्यांच्यामुळे आपण सगळे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकतोय त्या शूरवीरांना आणि राजे


तथा सरदारांना मन:पूर्वक वंदन करून व दीपावलीच्या सदिच्छा देऊन आम्ही परतीची वाट धरली. वाटेत एक पाण्यने तुडुंब भरलेलं टाकं लागलं. आणखी पुढे तीन मोठा टाक्यांचा समूह लागला तो शिगोशिग पाण्याने भरलेला होता. दोन कोरडी टाकीही लागली. म्हशींचा टोळीने आमची वाट आडवली. आमचा परिवेश पाहून त्यांना, अभ्यागत कोणीतरी आपल्या क्षेत्रात आल्याची जाणिव झाली. रघूने त्यांना बाजूला गेला. बाले किल्लावर असे पर्यंत उजेड होती. तिथून घाली उतरदाना दुहेरी तटबंदीचे ध्वस्त तळाचे अवशेष लागले. ते उतरत असताना सूर्य बुडाला. आता आम्हाला मुरमाड, गवताळ, घसार्‍याची वाट पार करायची होती. त्यात महेद्रचा पाय दुखावला त्यामुळे मी शेवटी राहून त्याला सोबत केली. एके ठिकाणी थोडी चुकामुक झाली, परंतू मळलेली वाट पुन्हा गवसली. विजेरीच्या प्रकाशात जंगल पार करताना जंगलातून काही प्राण्यांची चाहूल लागली. काही मोर झपकन बाजूने उडताना दिसले. समोर सप्तश्रृंगी गडाच्या घाटात वाहनांची मोठी  वर्दळ अखंड सुरू असल्याचे दिसत होते. ७-०४ वाजता आम्ही मोहनदरी गावात पाऊल ठेवले. 

घरात पाडव्याचा सण असल्याने लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेचे आमचे गणित कोलमडले होते, परंतू एक नितांत सुंदर भटकंती घडल्याचे मनस्वी समाधान होते. विशेष म्हणजे आमचा पारंपारिक, पर्यावरणपूरक आकाशकंदिल सह्याद्रीतल्या शूरवीरांना पुन्हा एकदा समर्पित केल्याचे समाधान होते. 



पाण्याने तुडुंब भरलेला टाक्यांचा समूह...↖↖↖↖个个个个个个



शिडका किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीचे अवशेष...
कोकणकडा, हरिश्चंद्रगड...५/११/२०२१

दुर्गभांडार, ब्रम्हगिरी... २६/१०/२०२२

आजच्या भटकंतीतले सवंगडी:

 http://prashantpardeshi.blogspot.com/2023/11/blog-post.html

 
 
आता सूर्यास्त व्हायची वेळ आलेली. आम्ही खाली उतरू लागलो आणि साधारण ६ वाजता मुख्य रस्त्याला लागलो. आता आम्हाला पोचायचे होते मोहनदरी गावात. आता आम्ही निवांत होतो. जाता जाता वाटेतच आम्ही सुर्यास्त पाहत होतो. मधेच थांबून आम्ही फोटोस घेतले. आम्ही मोहनदरच्या जवळ पोचलो. रस्त्यावरून मोहनदरचे नेढे साफ दिसत होते. संधी प्रकाशात ते नेढे सुदर केसरी रंगात न्हायले होते. सुंदर ते रूप. ७ वाजता आम्ही मोहनदरी गावात पोहोचलो. आता सूर्यास्त व्हायची वेळ आलेली. आम्ही खाली उतरू लागलो आणि साधारण ६ वाजता मुख्य रस्त्याला लागलो. आता आम्हाला पोचायचे होते मोहनदरी गावात. आता आम्ही निवांत होतो. जाता जाता वाटेतच आम्ही सुर्यास्त पाहत होतो. मधेच थांबून आम्ही फोटोस घेतले. आम्ही मोहनदरच्या जवळ पोचलो. रस्त्यावरून मोहनदरचे नेढे साफ दिसत होते. संधी प्रकाशात ते नेढे सुदर केसरी रंगात न्हायले होते. सुंदर ते रूप. ७ वाजता आम्ही मोहनदरी गावात पोहोचलो. या गावात एक मोठी शाळा आहे. येथे आम्ही मुक्काम करणार होतो. या शाळेत आम्ही पोचलो. येथे आम्ही वाघमारे सारान्नाशोधात होतो तेवढ्यात वाघमारे सर समोरून आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेऊन चहा पाजला आणि शाळेची माहिती दिली. वातावरण मस्त थंड होते. आम्ही शाळेत समान ठेऊन बाहेर आलो आणि वाघमारे सरांशी गप्पा मारू लागलो. आम्हाला ओंकारने सांगितले होते की मुंबईचा प्रसिद्ध समुह trekshitiz अचला आणि अहिवंतगड करून दरेगाव मध्ये थांबले आहेत आणि तेही उद्या मोहनदरी किल्ल्यावर येणार आहेत. आमची अजून जेवण व्हायची होती. दरेगाव हे मोहनदरी पासून फक्त ४-५ किमी च्या अंतरावर आहे. रात्री ९ वाजता आम्ही गाडीला किक मारली आणि नांदुरी-वणी रस्त्याने दरेगाव मध्ये हजार झालो.


दरेगाव मध्ये ओंकार ने सांगितल्याप्रमाणे हनुमान मंदिरात trekshitiz हजर होते. येथे आम्ही अमित सामंत, निमिष जोशी आणि प्रसिद्ध पुस्तक नकाशातून दुर्गभ्रमंतीचे लेखक महेंद्र गोवेकर यांच्याशी संवाद साधला. तेवढ्यात त्यांनी गरमागरम manchow  सुप आणले आणि आमचा आत्मा शांत झाला. त्यांचा निरोप घेऊन वणी-नांदुरी रस्त्यावर असलेल्या सौरभ हॉटेल मध्ये आम्ही जेवण केले आणि मोहनदरी मध्ये परतलो. येथे मोठी रूम असतानाही आम्ही शाळेच्या आवारात तंबु मांडला आणि ऐट बघा म्हणजे तंबू असा मांडला की सकाळी जाग  येताच समोर नेढे दिसले पाहिजे. पण रात्री १२ वाजता पाऊसाने दगा दिला. रात्री बारा वाजता आमची झोपमोड करून आम्हाला आतमध्ये (शाळेत) पळवून लावले. मग निमुटपणे आम्ही शाळेतच आमची गाडी पसरली आणि झोपी गेलो.

दिवस तिसरा)


दिवस तिसरा (२९ नोव्हेंबर २०१५) : मोहनदरी









आज आमच्या प्रवासाचा शेवटचा दिवस, दिवस तिसरा. पाहते ६. ला आरामात उठुयात असे ठरवले पण छे ५.३० लाच जाग आली. आता जाग आलीच आहे तर उशीर कशाला असे म्हणून आम्ही उठलो आणि सर्व समान आवरायला लागलो. हर्शल चहा बनवत होता तो पर्येंत मी समान आवरत होतो. आम्ही मस्त पैकी साजूक तुपातल्या शिऱ्याचा आणि सोसायटी चहाचा आस्वाद घेतला. मी पटेल आणि भांडे धुवायला लागलो तोपर्येंत हर्शल बाहेर जाऊन बाकीचे लोक आले का ते बघत होता. तो त्याची bag आवरून पटपट पुढे निघून गेला. मी माझी bag आवरून मागुन आलो आणि तेवढ्यात हर्शल म्हणाला साकेत बघ कोण आलाय. मी बघितलं तर काय खुद्द नाना (संजय अमृतकर) आमच्या समोर होते आणि सोबतीला मयुरेश जोशी सुद्धा होता. आज आमचे भाग्य उजळले होते. नानांसोबत ट्रेक करण भाग्यात/नशि
बात असाव लागत. सर्व मोठी मंडळी आज आमच्या सोबत होती.



सगळ्यांशी गाठ-भेट झाली, गप्पा झाल्या आता आम्ही सर्वांसोबत चढायला सुरुवात केली. आता ८ वाजले होते. आम्हाला किल्ला पूर्ण बघून पुण्याला परत जायचे होते. साधारण ८. वाजता आम्ही वरच्या बाजूस असलेल्या नेढ्यापर्येंत पोहोचलो. येथे नेढे चढायला १६ फुटांचा कातळ टप्पा पार करावा लागतो. तसेच वरती आग्या मधमाश्यांचे साधारण २-३ फुटांचे पोळे होते. जास्त आवाज करून चालणार नव्हते. नशिबाने आमच्या जवळ रोप होते. आम्ही त्या रोपला गाठी मारून ते वरती लावले. साधारण ४५ लोक त्या कातळ टप्प्यावरून येणार होते. त्यांना साधारण १ तास लागेल म्हणून आम्ही नेढ्याला डाव्या बाजूस वळसा घालून पुढे गेलो. डाव्या बाजूस दरी तर उजव्या बाजूस मोहनदरीचा कातळ टप्पा. साधारण २० मिनिटे चालत गेल्यावर आम्ही खिंडीपाशी येऊन पोहोचलो. ही वाट जर बरी असून डाव्या बाजूस खूप exposure आहे. या खिंडीतून वळसा घालून नेढ्याच्या दुसऱ्या बाजूस जायचे होते. हि वाट अजिबात चांगली नाही. नशिबाने काल पाऊस पडल्याने सगळी माती बसली होती. या वाटेने नेढ्यापर्येंत पोहोचायला ४० मिनिटे लागली. या वाटेने नेढ्यापर्येंत पोहोचेपार्येंत सर्व लोक नेढे चढुन आले होते. आम्ही नवीन वाट explore केली होती.








मोहनदरीचे नेढे म्हणजे पिंपळा किल्ल्या नंतरचे सह्याद्रीमधील दुसरे मोठे नेढे आहे. नेढयामध्ये पोहोचून आम्ही बराच वेळ विश्रांती घेतली. आता किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यास हालचाल केली. नाना आणि मंडळी आधीच वरती गेलेले. आम्ही trekshitiz सोबत वरती जाऊ लागलो. सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुस आणि उजव्या बाजुस माची लांबवर पसरलेली आहे. समोरच सप्तशृंगी तसेच धोडपचे उत्तम दर्शन होते. आम्ही आधी उजव्या बाजूस असलेल्या माचीवर गेलो. येथे एक पाण्याचे टाके आहे आणि ध्वजस्तंभ आहे. या टाक्यातील पाणी पिण्याजोगे नाही. येथून मोहनदरीच्या दुसऱ्या बाजूचे उत्तम दर्शन होते. हे बघून आम्ही दुसऱ्या माचीच्या दिशेने निघालो येथे मध्ये पाण्याचे ३ टाके आहेत. यातील एका टाक्याचे पाणी पिण्याजोगे आहे. येथून सरळ आम्ही दुसऱ्या माचीवर गेलो. येथून सातमाळ रांगेचे उत्तम दर्शन होते. हे बघून आम्ही टाक्यांपाशी परतलो आणि नानांसोबत जेवण करायला बसलो. आता पर्येंत १ वाजला होता. आमचे जेवण उरकले आणि आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.


परत जाताना मोहनदर आणि त्याच्या बाजुस असलेल्या डोंगराच्या मध्ये असलेल्या नाळेतून आम्ही उतरू लागलो. वाट फारसी वापरात नाही पण तरीही पायवाट आहे. या वाटेने आम्ही पहिली टेकडी पार करून आम्ही वळसे घालत पुढच्या बाजुस आलो. येथील वाट थोडी घसाऱ्याची असल्याने जर जपूनच जावे लागते. साधारण १.५० ला आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आम्ही थेट शाळेत जाऊन पटापट समान आवरले आणि बाईक घेऊन सर्वांच्या गाडीपाशी आलो. येथे आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो. आजपण जेवण नीटसे झाले नसल्याने खूप भूक लागली होती म्हणून वणी-नांदुरी रस्त्यावरील सौरभ हॉटेल मध्ये जेवण उरकले. आता आम्हाला २९० किमीचा प्रवास करायचा होता. आम्हाला हॉटेल मधून निघायला दुपारचे ३ वाजले. नाशिक सोडताच एका टपरीवर मस्तपैकी चहा मारला आणि बाईकला किक मारली. मी एकदाच मागे वळून बघितलं आणि मनात म्हटले सातमाळ करण्यासाठी परत येईन आणि पुण्याच्या दिशेने वाट धरली. मजल दरमजल करत आम्ही रात्री १० वाजता पुण्यात परतलो आणि आमच्या प्रवासाची सांगता केली.


आमचा हा plan पुर्ण व्हावा या साठी ओंकार आणि विकास ने मदत केली या बद्दल त्यांचे शतशः आभार अर्थात मला नाशिकचे वेड लावणाऱ्या हर्षलचे लाख आभार. आता आमचा किडा एवढा वाढला आहे की सातमाळ ५ दिवसात करायचे स्वप्न आहे. बस आता डोळ्यासमोर, स्वप्नामध्ये सतत दिसत आहे ती सातमाळ डोंगररांग.
 
 

किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - I


ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर बहुतांशी Netherlands ला असल्याने ट्रेक चुकले होते. युरोपात नवीन देश आणि शहरं पहात असलो तरी एक कान आणि डोळा सह्याद्रीकडे होता. त्यातून WhatsApp आणि फेसबुक इतर ट्रेकर्सनी केलेले ट्रेक दाखवून त्यावर मीठ शिंपडत होतं. आधीचे ट्रेक मित्र एक तर संसारात व्यस्त आहेत आणि काही जण आपापले Trek groups काढून त्यात गुंतलेले आहेत. पण ट्रेकप्रेमी मात्र कमी नाहीत आणि हक्काने फोन करावा असे नंबरपण शाबूत आहेत. तसंही भारतात आल्यावर मालवणची एक कौटुंबिक मोहीम काढून झाली होती आणि 2 तारीख मोकळीच होती, ट्रेकसाठी खडा टाकून ठेवलेलाच होता. न राहवून विनीतला फोन केला. अगदी त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.

किल्ले मोहनदर उर्फ शिडका

आता माझ्यासारख्या नवख्या ट्रेकवेड्याला ह्या मातब्बर ट्रेकर्स बरोबर जायला मिळते तेव्हा "ट्रेकसाठीची जागा" हा मुद्दा फारसा महत्वाचा ठरत नाही, कारण त्यांच्याबरोबर कुठेही जाणार असलो तर माझ्यासाठी सगळे नवीनच असते. ह्यावेळीही नाशिकमधल्या वणी जवळच्या किल्ले मोहनदर (शिडका) आणि कण्हेरगडचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. सुदैवाने त्याने अजून प्लॅन जाहीर न केल्याने मला जागा नक्की मिळणार होती. शनिवारी रात्री निघून रविवारी परत. असा साधा प्लॅन होता. हापिसात शुक्रवार पर्यंतचा वेळ कसाबसा काढला. शनिवारी घरातली काही कामं पण आटपून घेतली. संध्याकाळी नेहमीचीच तयारी केली आणि सव्वा आठ ला घराबाहेर पडलो. गिरीश कुलकर्णी ह्यांची भेट घेऊन आम्ही बरोब्बर 9:25 ला विनीतच्या घरी पोचलो. 2-4 मिनिटातच सचिन जगताप आला आणि ठरल्याप्रमाणे साडेनऊला तिथून निघालो. वाटेत भूषणला घेतले आणि मध्यरात्री मसाला दूध न विसरता घेऊन पहाटे पावणे 3 ला मोहनदर गावात अगदी ग्रामपंचायतीसमोर पोचलो. मस्तपैकी जाळीच्या compound मध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात तंबू टाकला आणि 3 ला झोपलो सुद्धा. 5 ला तशीही जाग यायला लागली पण सध्या उशिरापर्यंत अंधार असल्याने थोडा वेळ पडून राहिलो आणि साडेपाच नंतर उठलो. गांव तसं जागं झालेलंच असतं ह्यावेळी. त्यातून आमच्यासारखे असे अचानक उगवलेले नवीन प्राणी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जरासे कुतूहल असते. त्यामुळे बादलीभर पाणी मिळणे काही अवघड गेले नाही. दंत-मार्जन आणि वाघ-ससे मारण्याचे कार्यक्रम लगेचच सगळ्यांनी उरकून घेतलंनी. रात्री लक्षात न आलेला मोहनदर किल्ला त्याचा प्रचंड भिंतीरूपी फणा काढून आमच्या डोक्यावरच होता. त्यातून ह्या किल्ल्याला प्रचंड असं नेढं आहे. जणूकाही त्याचा डोळाच.


नेढं

ह्याची आख्यायिका आहे. जेव्हा सप्तशृंगी माता आणि महिषासुर यांचं युध्द झालं, तेव्हा महिषासुर रेडयाच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने रेडयाचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने डोंगराला धडक दिली. त्यामुळे देवीच्या मंदिरासमोरच्या डोंगरात हे खिंडार पडलं. ह्याबाबत अजून एक वेगळी आख्यायिकाही ऐकायला मिळते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. त्यावेळी महिषासुर मात्र रेड्याच्या रुपात पळाला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला आणि या डोंगराच्या मागे लपून बसला. तेव्हा त्याच्या पाठलाग करत आलेल्या देवीने या डोंगराला जोरात लाथ मारली आणि हे नेढ तयार झालं. हे नेढं ह्याच आख्यायिकेमुळे "देवीचा पाय" म्हणून प्रसिद्ध आहे. वणीला येणाऱ्या असंख्य भक्तांपैकी बहुतेकांना देवीचा पाय असलेला हा डोंगर, हा किल्ला आहे ह्याची कल्पनाही नाही. पिंपळा उर्फ कंडाळा किल्ल्याला तर सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेढं मिरावायचा मान मिळालेला आहे त्यामागेही एक आख्यायिका आहे. पिंपळा आणि धोडपच्या मोहिमेत त्याचा उल्लेख केलेला होता. ह्या मोहनदर उर्फ शिडका किल्ल्याचे नेढे त्याच्यापेक्षा लहान असले तरी ह्याचे सौंदर्य काही कमी नाही.


ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.

सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण.

आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे 2 टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवले कि मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण 8-10 कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण 15 मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण 10 फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.

गावात परत आलो तेव्हा 11 वाजत आले होते, त्यातून गावकऱ्यांचा चहाचा आग्रह मोडवेना. मग त्यांच्याशी गप्पा मारत अजून वेळ गेला. पण त्यांच्या त्या आपुलकीने मूड अजून फ्रेश होतो. आम्ही अपरात्री अचानक प्रकटतो काय, कोणाच्याही दारावर टकटक न करता तंबू टाकून झोपतो काय, सकाळीही कोणाला त्रास नाही, आवाज, आरडा-ओरडा नाही, रात्री राहिलो तरी कुठे कचरा नाही ह्याचे त्यांना अप्रूप होते.

 

सातमाळेतला रक्षणकर्ता: मोहंदरी गड


मोहंदरी उर्फ शिडका किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. अचला, अहिवंत आणि मोहंदरी हे तीन किल्ले जवळच आहेत. हा किल्ला अहिवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आला होता. या किल्ल्याच्या खाली असलेल्या डोंगराला छिद्र असल्यामुळे हा किल्ला लांबून दिसतो. ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ 3900 फूट आहे.

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या नाशिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगेत खूप किल्ले आहेत. मोहंदरी किल्ला उर्फ ​​शिडका किल्ला त्यातीलच एक आहे. हा किल्ला छिद्रामुळे पटकन ओळखला जातो. मोहनदरी किल्ला हा सप्तश्रृंगी गडापासून 13 कि.मी. आणि अहिवंत किल्ल्यापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.

पूर्वेकडील बाजूने प्रवेश केल्यावर तिथे तटबंदीचे अवशेष दिसतात. पश्चिम दिशेकडे जाताना पठारावर पाण्याची मोठी टँक आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या पश्चिम काठावर तटबंदी असून तेथे छिद्रे खालच्या बाजूला आहेत. त्यावर एक केशर रंगाचा झेंडा बसविला गेला आहे, ज्यामुळे तो सहजपणे ओळखण्यायोग्य होतो. 

पूर्वेकडील प्रवेशद्वारातून जाताना वाटेत दोन कोरड्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून पुढे जाताना घरांच्या काही इमारती दिसू लागतात आणि पुढे जाताना तीन पाण्याच्या टाक्या आहेत, त्यापैकी एकही पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यापासून जवळच असलेल्या डोंगराच्या मध्यभागी पडलेल्या फाट्याच्या मधोमध एक बुरुज व तटबंदी आहे.

या किल्ल्यापासून पश्चिमेस अहिवंतगड, पूर्वेस कन्हेरा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, दक्षिणेस धोडप व उत्तरेस अभोणा गाव व चणकापूर धरण दिसते.

-------------------------------------------------------------------

The savior of Satmala: Mohandari Gad

Mohandari alias Shidka fort is located in Kalwan Taluka of Nashik district. This fort is an important fort in Nashik district. Anchala, Ahivant and Mohandari are the three forts nearby. This fort was built to protect Ahivant fort. The fort is visible from a distance as there is a hole in the hill below the fort. The height of this fort is about 3900 feet.

There are many forts in the Satmala range of Nashik district which stretches from east to west. Mohandari fort alias Shidka fort is one of them. This fort is quickly identified by its holes. Mohandari fort is 13 km from Saptshrungi fort. And 5 km from Ahivant fort is at a distance.

Upon entering from the east side, there are remnants of fortifications. There is a large water tank on the plateau heading west, but the water is not potable. The fort is fortified on the west side with holes at the bottom. It has a Kesari flag on it, which makes it easily recognisable.

There are two dry water tanks on the way through the east entrance. From here you can see some of the houses and on the way there are three water tanks, none of which is potable. There is a bastion and ramparts in the middle of the fork in the middle of the hill near the fort.

From the fort you can see Ahivant gad in the west, Kanhera, Saptshrungi, Markandya, Rawalya-Jawalya in the east, Dhodap in the south and Abhona Village and Chanakapur dam in the north.

 
 
 
 

 किल्ल्यांच्या जिल्ह्यात - भिलाई - चौल्हेर - पिंपळा - मोहनदरी (साजूक तुपातला ट्रेक)

नोवेंबर चे दिवस होते....थंडी नुकतीच पडायला सुरुवात झाली होती. वातावरणात गारवा जाणवायला लागला होता. अशा परिस्थितीत एखादा भटका हुंदडायला नाही गेला तरच नवल.. त्यात नाशिक चे किल्ले दरवर्षी प्रमाणे खुणावत होते. गोठवणार्या थंडीत पुण्यावरून नाशिक बाइक वर गाठायचे आणि तिथले किल्ले पहायचे असा दर वर्षीचा किडा या वेळी वळवळला नसता तरच नवल हो. तसेही वर्षाला नाशिक मधले १५-२० किल्ले होतातच पण बाइक वर यायची मज काही औरच ... अहो पुण्यापासून २५०-३०० किलोमीटर वाइक चालवणे... तिथले किल्ले आरामात पहायचे ... तिथल्या भौगोलिक परिसराचा अभ्यास करायचा .. किल्ल्यांचा चित्रीकरण.. अजून बरच काही.. फार विलक्षण अनुभव असतात हे....एकूण प्रत्येकाकडे कमीत कमी १०-१० किलो ती sack . पण त्याच्या जोडीला मानसिक, शारीरिक तयारी आणि मोहीम आखणी हे सगळ्यात जास्त महत्वाचं असत.. असो........
From Left Takara-Salher-Salota
ऑक्टोबर ते फेबृआरी म्हणजे भटकायचे दिवस. कधी एकदाची बाइक पुण्यातून बाहेर निघतीये असं होत... साकेत आणि माझी नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सातमाळ रांगेची मोहीम आखणी चालू होती..तेवढ्यात साकेत ने हळूच एक पिल्लू सोडल.. "हर्षा..... सातमाळ च्या आधी एखादा ट्रेक करून येऊ ना नाशिक मधला"... एका नाशिक वेड्याला दुसरा नाशिक वेडा भेटला होता...आता ट्रेक होणार याची खात्री होती.. मी म्हणालो "थोडेसे दुर्लक्षित किल्ले (ऑफ बीट) करूयात" आणि या मतावर दोघही सहमत झालो. भिलाई - चौल्हेर - पिंपळा - प्रेमगिरी - मोहनदर किल्ले निवडले..
Bhilai Fort
एकमेकांपासून जरी हे किल्ले जवळ असले तरीही चौल्हेर सोडला तर बाकी किल्ले फारसे प्रचलित नाहीत हे आम्हाला कळून चुकले होते.. "पिंपळा फोर्ट" असं गुगल वर सर्च केल असता त्याने "पिंपळे सौदागर" दाखवलं आणि "भिलाई फोर्ट" सर्च केल असता चक्क गुगलने "भिलाई प्लांट" ची माहिती दिली.. चला म्हणजे गुगल ने आपली दारं बंद केली असं कळून चुकलं. परंतु भगवान चिले सरांच्या पुस्तकात माहिती उपलब्ध झाली. मोहीम आखणी झाली, तयारी झाली आणि तारीख ठरली ती म्हणजे १९-२०-२१ नोवेंबर.. आणि जे घडू नये ते झाल..१७ तारखेला साकेत बुआ आजारी पडले....१९ ला घेतलेली सुट्टी रद्द करावी लागली.. आणि गप गुमान कामाला गेलो.. योगायोग असा कि २० आणि २१ नोवेंबरला पुण्याला / नाशिकला पावसाने जोरदार बदडले ..किंबहुना देवाने साकेत ला योग्य वेळेत आजारी पाडलं ह्याची जाणीव करून दिली...मग आता मोहीमेसाठी २६-२७-२८ नोवेंबर तारीख अंतिम ठरली..

टेंट , स्टोव , काडेपेटी , काडेपेटी, गरम कपडे, गाळण, पातेलं , चहाच, जेवणाच साहित्य अगदी साजूक तुपासकट सगळा संसार सोबत घेऊन २५ ला संध्याकाळी ६ वाजता पुणे सोडलं.. 
संसार 
अतिउच्च रोड मुळे आमचा युनिकॉर्न नावाचा रनगाडयावर हळू-हळू चाकण - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - बोटा - संगमनेर - सिन्नर करत करत आम्ही ११.४५ ला नाशिक मध्ये पोहोचलो.. साकेत ने पहिल्यांदाच पुणे नाशिक बाइक वर केले होते.. त्यामुळे त्याची परिस्थिती थोडी बिकट झाली होती आणि माझी साधारण १२ वि बाइक खेप होती.. धुळीमुळे आणि सतत लाईट मुळे डोळ्यावर ताण पडत होता.. साकेतचे डोळे लालभडक झाले होते.. आता बाइक माझ्या हातात घेतली.. जेल रोड च्या बायपास ने ओझर - पिंपळगाव बसवंत - सोग्रस फाटा - देवळा - मुंज्वाड मार्गे पहाटे २.३० वाजता डांगसौंदाणे मध्ये पोहोचलो.. म्हणावी तशी थंडी नव्हती. पण झोप आवरत नव्हती....साडेआठ तासात ३३० किलोमीटर चा पल्ला गाठला होता.. ग्रामपंचायत व्हरांड्या मधेच टेंट टाकला आणि अर्ध्या मिनटात आडवे झालो. ५.३० वाजताच दोघांच्या हि फोन मधल्या कर्णकर्कस्श्य गजराने झोपेचं खोबरं केलं...उठल्यावर गावातल्या बोरसे नामक एका गृहस्थान्सोबत बोलता बोलता ओळख झाली...आणि पाहुणचार तो बघा ..आम्हाला घरी नेलं..चहा पाजला.. हात पाय तोंड धुवायला गरम पाणी!!!!! अश्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो.. हि अशी माणुसकी खेड्यात अजून शिल्लक आहे.. 
Bhilai Fort
दिवस पहिला:
आता सकाळचे ७ वाजले होते. भिलाई किल्ला आमची आतुरतेने वाट पाहत होता.. कोवळ उन थंडीवर मात करू पाहत होत.. तरी अंगावरील स्वेटर काढायची काही आमची हिम्मत होत नव्हती... आम्ही तडख निघालो आणि डांगसौंदाणे-सटाणे-तताणे फाटा वरून आवळबारी खिंडी मध्ये येउन पोहोचलो. खिंडीत गाडी लावल्यावर उजव्या दांडा वरून साधारण ४५ मिनटांच्या खड्या चढाई नंतर भिलाई च्या सुळक्या खाली असलेल्या कड्या पाशी आलो.
तिथून कडा उजवीकडे ठेवत आडवे जाउन पाच मिनिटात एक छोटासा १५ फुटाचा कातळ टप्पा (श्रेणी सोपी)  लागला , 

तो चढून परत थोडा डावीकडे २ मिनिट आडव जाउन पाण्याच्या टक्यापर्यंत येउन पोहोचलो. ३-४ कोरडी टाकी , २ टाक्यांमध्ये बर्यापेइकि पाणी होते पण ते पिण्यालायक नव्हते.. येथून माथ्यावर जायला १० मिनिट पुरतात (घसारा आहे , जपून जावे) खाली उतरताना उजवीकडील गुहा हि पाहता येतील.. 




वातावरण प्रचंड धुसर असल्या कारणाने समोरच असलेला साल्हेर - सालोटा व पूर्ण डोलबारी रांग अंधुक दिसत होती.. सूर निगारास हो च्या त्या सुरांनी प्रातः काळ सुशोभित केला.. ९.३० वाजता आवळबारी खिंडीत परतलो .. आणि डांगसौंदाणे कडे रवाना झालो.. बोरसे काकांकडे ठेवलेले सामान पटापट घेतल.. आणि वाडी चौल्हेर च्या दिशेने कूच केली. डांगसौंदाणे-निकवेल-तिळवण-वाडी चौल्हेर अशा मार्गाने वाडी चौळेर मध्ये दाखल झालो. वाडी चौल्हेर च्या अंगणवाडी शाळे मधील सोनावणे आणि गुंजाळ सर आमच्या स्वागताला हजर होते.. आम्ही बाइक ने इथवर आलोये यावर त्यांचा काही विश्वास बसेना.. १५-२० मिनिट गप्पा झाल्यावर आम्ही चौल्हेर ला निघालो..



 अगदी राजमार्गाने १ तासात आम्ही पहिल्या दरवाज्यापर्यंत येउन पोहोचलो. 








३ दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे माची , तळे व शेवटी तटबंदीचे अवशेष पहिले. दवाज्यापासून उजवीकडील वाटेने १५ मिनटात आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. वाटेतले मोती टाक्या मधील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन सगळा शीण निघून जातो..
Kothmirya

बालेकिल्ल्यावर ४ जोडटाकी आहेत. वातावरण साफ असल्यास सातमाळ व सेलबारी - डोलबारी रांग अप्रतिम दिसते..पायथ्यापासून किल्ला चढायला १.३० तास व किल्ला पाहायला १.३० तास आणि उतरायला १ तास असा एकूण संपूर्ण किल्ला पाहण्यास ४.३० तास पुरतात.







आता संध्याकाळचे ४.१५ वाजले होते.. आणि आम्ही गावात परतलो.. चांगल्या तासभर गुंजाळ सरांसोबत गप्पा रंगल्या .. आता पोटातील भूक मी म्हणत होती.. सोबत असलेल्या शिध्या मधील मग साजूक तुपातील म्यागी, कोळंबी चे सूप असा ताव मारला.. मग टेंट काय असतो व तो कसा लावतात याचं प्रात्यक्षिक झाल .. शाळेमधील सगळी आदिवासी मुल-मुली टेंट च्या आत मध्ये नक्की आत काये हो अश्या कुतूहलाने पाहू लागली.. संध्याकाळचे आता ६ वाजत आले होते चौल्हेर च्या मागून आता नारायण अस्ताला जात होता. आम्ही वाडी चौल्हेर मधेच मुक्काम करूयात अस ठरलं.. आमच्या हातात शाळेच्या चाव्या देऊन गुंजाळ, आणि सोनावणे सर सटाण्याला घरी निघून गेले. आता संध्याकाळचे ६.३० वाजले होते.. पण झोप काही आवारत नव्हती.. मग २ तास वामकुक्षी घेऊन ८.३० ला स्वयंपाकाला सुरुवात केली.. 

साजूक तुपातली मुग-डाळीची गरमागरम खिचडी ने जिभेचे चोचले पुरवले आणि आम्ही ९.४५ वाजता टेंट मध्ये जाउन घोरू लागलो.. 






दिवस दुसरा:

पहाटे ५.३० ला जाग आली.. बोचरी थंडी आता टेंटच्या आत शिरू लागली होती.. फक्कड चहाची दोघांनाही गरज होती.. डोळे चोळत चोळत स्टोव पेटवला आणि वेलचीयुक्त चहा घशात गेल्यावर घशाला जर शेक मिळाला.. आज पिंपळा-प्रेमगिरी असे दोन किल्ले आमच्या आखणी मध्ये होते.. सामानाची अव्रावर करून ७.१५ ला वाडी चौल्हेर सोडलं.. मग पिंपळा किल्ल्याच्या दिशेने कूच केली..

From Right to Left Dhodap-Ikhara-Lekurwali- Kanchana-Manchana-Koldeher

Bhilai-Salher-Salota

वाडी चौल्हेर - दहिंदुले - डांगसौंदाणे - धायने डिगर - चिंचपाडा करत करत सावरपाडा गावात पोहोचलो.. रमेश ठाकरे आमच्या स्वागतासाठी हजरच होता.. 

Ramesh Thakre


त्याच स्वताच गावात एक किरण मालाचा दुकान होतं.. फणी पासून विडी पर्यंत सगळा माल भरला होता.. तीन चार बेल बोटंम प्यांट मधली टाळकी , २-३ वयोवृद्ध तरुण(त्यांच वय झालंय असं वाटत नव्हतं), ६-७ शेंबडी पोर, नववारी मधल्या २-३ बायका, तंबाखू चोळत बसलेले आजोबा हे सगळे आम्हा दोघांकडे जणू आम्ही दोघ जण जणू परग्रहा वरून आलोय कि काय या नजरेने पाहत होते.. कुणी आमच्या वेस्ट पौच मध्ये डोकं खुपसत होतं तर कुणी भल्या मोठ्या sack मध्ये काय आहे तरी काय अश्या कुतूहलाने बघत होते.. १०-१५ मिनटात आम्ही रमेश ला सोबत घेऊन पिंपळा किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली.. किल्ला गावापासून लांब होता.. गावाच्या वेशीतून बाहेर पडल्यावर ५ च मिनिटा मध्ये किल्ला आणि नेढ स्पष्ट दिसायला लागल..





आज वातावरण कमालीचं साफ होतं.. थंडी मध्ये एवढ स्पष्ट वातावरण पहायची सवय नव्हती.. १५-२० मिनिटांच्या सपाटी नंतर खडा चढ पहिल्या टेकाडावर घेऊन गेला.. मग तिथून अर्ध्या तासाच्या सपाटी नंतर आता ३५ मिनिटांचा अंगावर येणारा घसारायुक्त चढ चढून नेढ्यात जाउन पोहोचलो.. गावापासून इथपर्यंत यायला साधारण १.१५ ते १.३० तास लागला.. पण वर गेल्या गेल्या नेढ्यातून येणारी गार हवा आता हवी हवीशी वाटत होती.. 
Kothmirya - Dir-Bhavjay Dongar



नेढ्या मध्ये ५-१० मिनिट थांबल्यावर वर किल्ल्यावर गेलो. आजूबाजूचा परिसर मंत्रमुग्ध करून टाकणारा होता..समोरच टकारा - साल्हेर - सालोटा - मागे हनुमान डोंगर - हरगड - मुल्हेर - मोरा - तांबोळया - मांगी चं टोक - भिलाई - दीर भावजय डोंगर - चौल्हेर - कोथमिर्या डोंगर - अस्पष्ट चांदवड - इंद्राई - थोडा खाली लपलेला राजदेहेर - कोळदेहेर - शिंगमाळ - बाफळया - मान्चना - कांचना - हंड्या - लेकुरवाळी - विखारा - धोडप (सह्यादरी मधलं माझं पाहिलं प्रेम) - जवळया - रवळया - मार्कांड्या - सप्तशृंगी - मोहनदर - अहिवंत - अचला - तौला डोंगर असा अफाट परिसर डोळ्याचे पारणं फेडत होतां.. एखाद्या भटक्या ला अजून काय पाहिजे सांगा ना.. सातमाळ व डोलबारी - सेलबारी डोंगर रांगेचे दर्शन घडवून देणारा पिंपळा किल्ला आयुष्य भर लक्षात राहील असाच आहे. 







From Right Saptshrungi - Markandya - Ravlya - Javlya - Dhodap - Ikhara - Lekurwali - Handya - Kanchana - Manchana
किल्ला पाहून आम्ही १ च्या सुमारास खाली गावात परतलो..रमेश ला राम राम ठोकत आम्ही प्रेमगिरी किल्ल्याकडे रवाना झालो.. पोटातल्या कावळ्यांना आता भाजलेल्या कोंबडीची भूक लागली होती.. कळवण शिवाय काही पर्याय नव्ह्ता मग सावरपाडा - कनाशी - हिंगळवाडी मधून कळवण ला पोहोचलो आणि पोटाची आग शमवली.. हे सगळ होईपर्यंत आता ३.३० वाजत आले होते. आणि वेळेच गणित चुकलं. तरीही आम्ही प्रेमगिरी च्या पायथ्याला असलेले हिंगळवाडी मध्ये जाउन किल्ल्याकडे निघालो.. पार शेवटपर्यंत जिथ जाईल तिथ गाडी घातली.. ह्या सगळ्या मध्ये आता ४.१५ झाले. आता इथून पुढे वाट शोधून वर जाण्यात काही अर्थ नव्ह्ता .. 
Premgiri
तरीही किल्ल्याच्या सोंडेवरून आम्ही चढलो पण शेवटी वर चांगला ३५-४० फुटाचा rock patch असल्याने आम्ही वर जायचे धाडस केले नाही. प्रेमगिरी राहिला..आणि ह्या मोहिमे मधला एक किल्ला आता मुकणार याची जाणीव झाली.. आता संध्याकाळचे ५.३० वाजत आले होते. आज आमचा मुक्काम मोहनदरी गावात होतां ..प्रेमगिरी चे स्वप्न मनात ठेऊन आम्ही आता मोहनदरी ला निघालो.. 

Achala and Taula

हिंगळवाडी - अभोणा - मोहनदरी. ७.३० वाजता आम्ही मोहनदरी गावात पोहोचलो.. भल्या मोठ्या आश्रमशाळेत आमचा आज मुक्काम होतां .. यशोधन वाघमारे सरांनी आमची उत्तम सोय करून दिली.. ८.३० ला ओंकार ओक ला फोन लावला आणि ट्रेकक्षितीज ची मंडळी पलीकडे दरेगाव(अहिवंत गडाचा पायथा) मधेच आहेत असा कळल... आणि ते हि उद्या सकाळी मोहनदर ला येणार आहेत असा लक्षात आल..मग रात्री ९ वाजता बाईक ला किक मारली आणि ४-५ किलोमीटर वर असलेल्या दरेगावात जाउन आम्ही सगळ्यांना भेटून आलो. मग सगळ्यांशी ओळख पाळख झाली.. बाइक वर पुण्यावरून कसे आलात असा बर्याच मंडळींचा सूर होता.. ह्या सगळ्या गप्पा गोष्टी झाल्यावर मग सौरभ डायनिंग हौल मध्ये पोट फुटोस्तोवर जेवून परत मोहनदर मध्ये आलो..

दिवस तिसरा:
पहाटे ६ वाजता जग आली.. ६.३० ला गरमागरम साजूक तुपातला शिरा खाल्ल्यावर झोप हि येणारच होती..पण किल्ला महत्वाचा होतां .. ब्याग प्याक करून आम्ही मोहनदरी ला निघालो.. तेजोनिधी हळू हळू वर सरकत होतां.. निघतानाच "हर्षल तू आहेस का रे.." असा आवाज आला... आवाज ओळखीचा वाटत होतां.. थोडा जवळ जाउन पाहिलं तर समोर खुद्द नाना (संजय अमृतकर) .. 
Sanjay Amrutkar aka Nana

मला दोन मिनिट काही सुचेनासं झालं.. नानान्सोबत ट्रेक करणे म्हणजे नशीबच..गळाभेट झाल्या नंतर ५-७ मिनिट गप्पा झाल्या आणि मग ट्रेकक्षितीज ची मंडळी आली आणि आमचा लाडका साथीदार मयुरेश जोशी आमच्या समोर आला.. नाशिक म्हंटल कि मयुरेश आमच्या ट्रेक ला नाही असा फार कमी वेळा झालं असेल..
Mayuresh Joshi
From Left : Saket, Me, Nana
 अशी आम्ही एकूण ५०-५५ जण मोहनदर च्या दिशेने निघालो.. ४० मिनिटात नेढ्याच्या पायथ्याला येउन पोहोचलो..




 १६ फुटाचा rock patch आणि नेढ्या च्या वर आग्या मोहोळ असा एक विचित्र गणित आहे ह्या नेढ्याच.. त्यात ५० जण ह्या हा rock patch वर चढायला किती वेळ लावतील ह्याची कल्पना नव्हती.. मग मी आणि साकेत ने वळसा घालून नेढ्या च्या मागच्या बाजूला येऊ असा निर्णय घेतला.. ३० मिनिटा मध्ये आम्ही आता गडाच्या पश्चिमच्या बाजूस आलो.. वाट भयंकर निसरडी होती .. आता इथून परत पलीकडच्या बाजूने तेवढेच नेढ्याच्या दिशेने चालत जायचे होते.. परंतु वाट फारशी वापरातली नसल्या कारणाने जरा जास्तच निसरडी होती.. घाणेरीच्या काट्यांनी हात सोलवटून निघाला... पाऊन तासानंतर आम्ही नेढ्या च्या खाली जाउन पोचलो.. नेढ्या मधील थंड हवा खाल्ली वर व किल्ल्यावर कूच केली.. 

 
  



समोर सप्तशृंगी - मार्कांड्या, जवळया - रवळया , उजीवाकडे अहिवंत, मागे चणकापूर धरण इत्यादी परिसर न्याहाळून किल्ला पाहायला सुरुवात केली.. तासाभरात किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्ला व त्या बाजूचा डोंगर या मधील नाळेमधून अर्ध्या तासात गावात उतरलो.. 






दुपारचे १.३० वाजत आले होते.. व आता डोळ्या समोर मोहनदर - नासिक - पुणे प्रवास दिसत होतां.. क्षणाचा हि विलंब न करता सगळ समान पाठीवर घेतल आणि पुण्याच्या दिशेने कूच केली.. अशक्य अशी वाटणारी मोहीम आता पूर्ण झाली होती.. या अनुभवाचे गाठोडे पाठीशी बांधून आम्ही सातमाळ रांगेचे स्वप्न उराशी बाळगत पुण्याच्या दिशेने रवाना झालो...

एकंदर ७५० किलोमीटर चा प्रवास झाला .. आणि जास्त कौतुक म्हणजे साकेत चं.. अंगात किडा असल्याशिवाय माणूस ट्रेकर बनत नाही हे वेळोवेळी दाखवून देतो हा पठ्ठ्या...

ओंकार ओक आणि विकास कडुस्कर या दिग्गज मंडळींची या मोहिमे मध्ये कमालीची मदत झाली..
 
 
 काल रात्री धुक्यात पूर्णपणे बुडालेला मोहनदरी किल्ला आज मात्र सकाळच्या कोवळ्या उन्हात लख्ख चमकत होता. त्याचं ते भलंमोठं नेढंही आता जागं झालं होतं. सकाळचा अप्रतिम चवीचा चहा घेऊन बरोबर साडेसहा वाजता आम्ही मोहनदरीची पायवाट तुडवू लागलो (बाय द वे चहा मी बनवला होता !!!).

सर्व फोटोज © ओंकार ओक

मोहनदरी गावातून मोहनदरी किल्ला

वरच्या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे नेढ्याच्या डावीकडे एक कातळकडा आहे आणि उजवीकडे एक कातळकडा आहे. उजव्या कातळकड्यावर पाण्याची टाकी असून डावीकडच्या कातळकड्यावर कसलेही अवशेष नाहीत. गावातून निघालो की आधी पाण्याची टाकी बघून आपण नेढ्याकडे जाऊ शकतो किंवा आधी नेढं बघून उजव्या कातळकड्याला डावीकडे ठेवत त्याच्या पोटातून आडवं जात शेवटी जिथे वाट संपते तिथून त्याचा माथा गाठू शकतो. मोहनदरी गावातून थेट नेढ्यात जायचं असेल तर एक तासभर पुरे. नेढ्यात जाण्यासाठी मळलेली अशी पाऊलवाट नसून तिथपर्यंत जाणा-या चढावर अनेक ढोरवाटा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यातली एखादी योग्य वाट निवडायची आणि नेढं गाठायचं. या नेढ्याची कथा अशी सांगितली जाते - एकदा सप्तशृंगी देवी आणि एका असुराचं तुंबळ युद्ध सुरु होतं. कित्येक दिवस हे युद्ध चाललं. अखेर देवीचं सामर्थ्य सहन न होऊन त्या असुराने पळ काढायला सुरुवात केली. देवीने त्याचा पाठलाग सुरु केला. आणि तितक्यात देवीच्या आणि त्या असुराच्या वाटेत मोहनदरीच्या या डोंगराचा हा कातळकडा आला. देवीने या कातळकड्याला लाथ मारली. त्या लाथेच्या प्रहारामुळे या कातळकड्याला हे भलंमोठं छिद्र (नेढं) पडलं अशी या परिसरातल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे नेढंही आजूबाजूच्या परिसरात पवित्र मानलं जातं. मोहनदरीच्या या नेढयाची जागा मात्र लाजवाब आहे !!! सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून उन्मत्तपणे आणि बेभान होऊन विहरणारा वारा इथे बसूनच अनुभवावा !! एक कधीच विसरता न येणारा अनुभव म्हणजे तुम्ही या नेढ्यात घालवलेले काही क्षण. नेढ्यात पोचण्यासाठी दहा - बारा फुटांचा एक किंचित अवघड असा पॅच आहे. तसंच नेढ्याच्या वरच्या बाजूला मधमाशांची पोळी असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं आवश्यकच आहे.

मोहनदरी गावातून किल्ल्याचं नेढं आणि त्यावरचा झेंडा

नेढयाकडे नेणारी शेवटची चढण

नेढयापासून समोर दिसणारा दिलखुलास देखावा. धुक्यात बुडालेला सप्तशृंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव !!

नेढयापासून किल्ल्याच्या डाव्या कातळककडयाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यातून अर्धा तास आडवं गेलो की उजवीकडे माथ्याकडे नेणारी वाट दिसते आणि आपला माथ्यावर प्रवेश होतो. मोहनदरीच्या माथ्यावरून दिसणा-या बागलाण बाजूच्या विस्तृत प्रदेशाचं दृश्य मात्र केवळ अवर्णनीय आहे. पलीकडच्या गावांमधील शेतं,त्यांची कौलारू घरं,चणकापूर धरण हा नजारा अप्रतिम !!! भान विसरून कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत होतो. मोहनदरी किल्ल्याचा कातळकडाही या पठारावरून सुरेख दिसत होता. नशीब चांगलं असेल तर साल्हेर - सालोटया पर्यंतचा मुलुख दिसू शकतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण सह्याद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा मोहनदरी किल्ला मात्र आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असाच आहे !!

मोहनदरी किल्ल्याचा माथा

मोहनदरीच्या माथ्यावर झालेलं अविस्मरणीय स्वागत !!!

मोहनदरीचा उजवीकडचा कातळकडा आणि मध्यभागी नेढं

मोहनदरी वरून कण्हेरा किल्ला

लांबलचक कातळकडयाचा मोहनदरी किल्ला !!!

नऊ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...