Saturday, April 11, 2026

सप्तश्रुंगी

        नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे. किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहेमंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून वरच्या भागात गड आहे. परंतू हा श्रध्देचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही.
Saptashringi gad, temple from Markandeya





 महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ मानले जाते. सप्तशृंग म्हणजे सात शिखरांचा पर्वत. या सात शिखरांवर ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, इन्द्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांचा वास असल्याचे मानले जाते. याशिवाय गडावर जगदंबा मातेचे म्हणजेच वणीच्या देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केल्याचे मानले जाते. इतिहासात सातमाळ डोंगररांगेतील किल्ला म्हणुन संदर्भ असणारे हे ठिकाण आज केवळ तीर्थक्षेत्र म्हणुनच ओळखले जाते.

       महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.
एकपीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर | तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी।।
ॐकारातील म कार पूर्ण रूप ही आदिमाया मानली जाते. तीच सप्तशृंगी देवी.
         सप्तशृंगी गडाला पौराणिक अन् धार्मिक महत्त्व आहे तेवढेच प्राचीन अन् ऐतिहासिक संदर्भही आहेत. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगितले जाते. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नवनाथांना प्राप्त झाली, असे म्हणतात. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध आला होता. तर सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामनिी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते, असे सांगितले जाते. गडावर मार्कंड ऋषींनी तपस्या केली आहे तर संत गाडगे महाराज समाज प्रबोधनासाठी गडावर थांबल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात. देवीचे भक्त संत दाजिबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते त्यांची समाधी गडावर आहे.

lord shiva with sati body
          प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनातील शक्ती उपासनेला विशेष महत्त्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून, या शक्तिपीठांपैकीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजेच सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी, असे मानले जाते. सप्तशृंगी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला योग्य मान दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचा देह हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली. यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ होय, अशी व याचबरोबर आणखी काही आख्यायिका सांगितल्या जातात. सप्तशृंगी म्हणजे सप्त (सात) आणि शृंग म्हणजे शिखर. सात शिखरांचा पर्वत म्हणजे सप्तशृंग. या सातही शिखरांवर नारसिंह, इंद्राणी, वैष्णवी, वाराही, कार्तिकेयी चामुंडा व शिवा या सात देवता राहतात अन् या सर्वांची थोरली जगदंबा म्हणजेच सप्तशृंगी देवी असेही म्हटले जाते. राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असताना हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असताना त्या पर्वताचे सात तुकडे या भागात पडले ते म्हणजे सप्तशृंगी पर्वत असल्याचेही म्हटले जाते. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवीत असे म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून ते पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रगट झाली व देवीने महिषासुराचा वध केला. दूष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. तसेच पराशर ऋषींनी पारेगावातून देवीच्या नजरेसमोर बारावर्ष तपश्चर्या केल्याची अख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाईने देवीचे गडावर दर्शन घेतल्याची जशी आख्यायिका आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनीही गडावर देवीची उपासना केल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वरीतही ज्ञानेश्वरांनी गडाचा उल्लेख केला आहे. तर मच्छिंद्रनाथांचे येथे काही काळ वास्तव होते. यावरून सप्तशृंगी देवीच्या भक्ती अन् शक्तीचा अंदाज येतो.

भागवतामध्ये आदिमाया शक्तीची  १०८ शक्तीपीठे सांगितलेली आहेत. त्यातील आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत. त्यापैकीच हे अर्धे शक्तीपीठ आहे. देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी देवी या सप्तशृंगी गडावर राहिल्याचे पौराणिक कथेत सांगितले जाते. त्याचप्रमाणे राम आणि सीता येथील आरण्यात वनवासात असताना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आल्याचेही काही ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तसेच राम आणि रावण यांच्या युद्धात इंद्रजीताच्या शस्त्र माऱ्यामध्ये रामाचे बंधू लक्ष्मण धारातीर्थ झाले असता हनुमंत राया ने द्रोणागिरी पर्वत उचलून चालवला होता याचा काही भाग खाली पडून सप्तशृंगी गड तयार झाल्याचे एका कथेत सांगितले जाते.
  प्राचीन काळी दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. जे कोणी पूजापाठ उपासना करत त्यांना पकडून तुरुंगात डांबून ठेवले जात असे! जप-तप करणाऱ्या ऋषिमुनींचे आश्रम जाळणे, गुरेढोरे पळवणे, सोनेनाणे लूटून नेणे असा दुराचार चालू असल्याने देवलोकही चिंताग्रस्त झाला होता. अंती ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्र येऊन दिव्य शक्ती निर्माण केली, त्या महादिव्य शक्तीने महापराक्रमाची ज्या पवित्र अशा चार ठिकाणी प्रचीती दाखवली ती ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली यांच्या त्रिगुणात्मक रूपातील साडेतीन शक्तिपीठे! अवघ्या असुरातील अत्याचारी महिषासुर आणि त्याचे दोन बंधू यांनी असुरी प्रवृत्तीने पापांची परिसीमा गाठली होती. त्यांनी आम्हीच तुमचे देव। आमचीच पूजा करा असा आदेशच आमजनांना दिला असल्याने तो मोडून देवपूजा करणाऱ्यांना मरण पत्करावे लागत असे. महिषासुर नावाच्या राक्षसाने भगवान शिव शंकरांच्ची घोर तपश्चर्या नंतर देव,दानव, मानव अशा कोणाकडूनही त्याचा मृत्यू  होणार नाही असा वर मिळवलेला होता. परंतु वर देताना ब्रह्मदेवांनी स्त्री असा उच्चार केला नव्हता. ह्याच महिषासुर राक्षसाने पुढे पृथ्वीवर भयंकर अन्यायाचा हैदोष माजवला होता आणि त्याने पुढे स्वर्गावरही आक्रमण करून इंद्रदेवांनाही हाकलून लावले होते. अशातच सर्व देव,ऋषीमुनी, साधू, आणि संत एकत्र येऊन भगवान शंकरांकडे गेले आणि या जाचातून वाचण्याची या सर्वांनी देवांना विनंती केली. परंतु महादेवाने मी त्याला मारू शकत नाही कारण त्याने ब्रह्मदेवांकडून  वरदान मिळालेले आहे.
        भगवान दत्तात्रेय महाराज आणि भगवान महादेव अरण्यात फिरत असताना त्यांना अरण्यात कोणीतरी तपश्चर्या करीत असल्याचे समजताच त्यावेळी महादेव दत्तगुरूंना ते पाहण्यासाठी पाठवतात आणि दत्तगुरू त्यांना महादेवाकडे घेऊन येतात. व दत्तगुरु आणि महादेव त्याला म्हणतात की तुझी सर्व इच्छा सप्तशृंगी माता पूर्ण करेल. याचाच अर्थ त्यावेळी सुद्धा सप्तशृंगी मातेचे स्थान या गडावर होते. असे नवनाथ भक्तिसार या पोथीत वर्णन केलेले आढळते. तसेच शाबरी विद्या ची सुरुवात याच सप्तशृंगी गडावरून झाल्याचे सांगितले जाते. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तशृंगी मातेचि कठोर उपासना केल्याचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात सांगितले आहे.


   हे काम फक्त आता पार्वती देवीच करू शकते असे सांगून पार्वती देवीकडे त्यांनी हे काम सोपवले. देवांच्या आज्ञेने पार्वतीने भयंकर असे रुद्र रूप धारण करून याच सप्तशृंगी गडाजवळ महिषासुराचा वध केला. आणि देवी विश्रांतीसाठी सात शिखरे असलेल्या सप्तशृंगी गडावर जाऊन बसली. या गडाला सात शिखरे असल्यामुळेच सप्तशृंगी गड असे नाव पडले. देवीला तेथे सप्तशृंगी माता असे म्हटले जाऊ लागले. बलदंड असुरांपैकी महिषासुरांच्या दोन्ही भावांचा त्यांच्याशी प्रखर लढा देऊन आदिशक्ती देवीने वध केला. मात्र महिषासूर रेड्याच्या शरीरात प्रवेशून राहत असल्याने त्याला मारणे अवघड झाले होते. अखेर, देवीने सारे सामर्थ्य पणाला लावून त्या रेड्याचा शिरच्छेद केला तेव्हा महिषासूर एवढ्या ताकदीने पळाला, की त्याच्या उड्डाणाने डोंगराला मोठे खिंडारच पडले! महिषासुराने चवताळून जाऊन देवीशी निकराचे युद्ध सुरू केले जे देवीनेही अफाट शक्तिसामर्थ्यांने नऊ दिवस करून महिषासुराचा अंती वध केला. 
    देवीने महिषासुराचा वध करताच देवदेवतांनी स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी केली. देवीने विसाव्यासाठी नि पुढे भक्तांच्या चिरंतन सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, या गडावर वास्तव्य केले. तोच तो सप्तशृंगीमातेचा सप्तशृंगगड
      सप्तशृंगगडावरील देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. महिषासुराचा वध करण्यासाठी जेव्हा त्यांनी यज्ञ केला तेव्हा देवी त्यांच्यावर प्रसन्न होऊन प्रगटली आणि तिने महिषासुराला ठार मारले. मार्कंडेय ऋषी सप्तशृंगगडाच्या समोरच असलेल्या पर्वतावर आश्रम बांधून राहत असत. ते दररोज सप्तशृंगगडावर येऊन देवीला पुराणातील कथा सांगत असत; देवीदेवतांची स्तोत्रं म्हणून दाखवत असत. त्यांचा आश्रम समोरच्या पर्वतावर होता. त्यामुळे त्या पर्वतालाही मार्कंडेय ऋषींच्या नावाने ओळखले जाऊ लागले.

         प्रभू रामचंद्र व दशानन रावण यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा रावणपुत्र इंद्रजित याच्या बाणाने रामबंधू लक्ष्मण जखमी झाला. त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती आणण्याकरिता हनुमानाला द्रोणागिरी पर्वतावर पाठवण्यात आले. पण त्याला त्या ओळखता येईनात. मग त्याने द्रोणागिरी पर्वतच जमिनीतून उपटून काढला आणि तो तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे जाऊ लागला. जाता जाता या परिसरात द्रोणागिरी पर्वताचे सात तुकडे पडले. हे सात तुकडेच सप्तशृंग पर्वत म्हणून पुढे प्रसिद्धीस आले.
एकदा एका धनगराचा मुलगा गुरांना चरवण्यासाठी या डोंगरावर आला. जसा सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसा तो गुरांना घेऊन परत जाऊ लागला. पण अंधारामुळे त्याला वाट सापडेना. धनगर वाट चुकला आणि एका गुहेत आला. तिथे त्याने रात्र काढण्याचे ठरवले. मग तो त्या गुहेत झोपला. दुसऱ्या दिवशी तांबड फुटल्यावर तो जागा झाला. क्षणभर त्याला कळेना की आपण कुठे आहोत. मग तो इकडे-तिकडे बघू लागला. इतक्यात त्याला कातळावर असलेले मधमाश्यांचे पोळे दिसले. पोळ्यात किती मध आहे हे पाहण्यासाठी त्याने डोक्यावरून अंगावर घोंगडी लपेटून घेतली आणि हातातील काठी त्या पोळ्यात खुपसली. जेव्हा त्याने ती काठी बाहेर काढली तेव्हा त्या काठीला शेंदूर लागलेला होता. मग त्याने काळजी घेत सावकाशपणे ते पोळे उतरवले तेव्हा त्याला कातळात कोरलेली देवीची प्रतिमा दिसली! त्या देवीच्या प्रतिमेकडे पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो लगोलग तिथून निघाला अन् आपल्या गावात येऊन पोहोचला. त्याने साऱ्या गावकऱ्यांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला. मग गावकरी गुहेत आले आणि त्यांनी प्रतिमेच्या आसपासची जागा स्वच्छ केली तेव्हा त्यांना देवीचे कातळात कोरलेले मूर्त स्वरूप स्पष्ट दिसले. सात शृंग म्हणजे सात शिखरे असलेल्या डोंगरावर ही देवीची प्रतिमा आढळली म्हणून तिचे नाव सप्तशृंगीदेवी असे पडले आणि त्या स्थानाला नाव दिले गेले 'सप्तशृंगगड.'

      सप्तशृंगीदेवीचा महिमा ‘सप्तशृंगी पाठावली’ म्हणून ओळखला जातो. तिची ख्याती नवसाला पावणारी देवी म्हणून आहे. तिचा अतुल पराक्रम नि मार्कंडेय ऋषींची दिव्य भक्ती याविषयी वर्णन सप्तशती ग्रंथात आलेले आहे. त्याची साक्ष सप्तशृंगगडाच्या पठाराच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय पर्वत देतो. मार्कंडेय ऋषींनी घोर तप त्या पर्वतावर केले, म्हणून त्याला मार्कंडेय पर्वत या नावाने ओळखतात. सप्तशृंगीदेवी तिचा पाठ भक्तांकडून भक्तियुक्त अंतःकरणाने अहंकाररहित राहून नित्यनेमाने केला गेल्यास ती प्रसन्न होते. मार्कंडेय ऋषींनी भीमासूर दैत्याचा नायनाट तिचा पाठ करूनच केला होता.


इतिहासात सातमाळ डोंगररांगेतील किल्ला म्हणुन संदर्भ असणारे हे ठिकाण आज केवळ तीर्थक्षेत्र म्हणुनच ओळखले जाते. नाशिकपासून अवघ्या दीड तासांवर नाशिक-सापुतारा रस्त्यावर वणी हे गाव लागते. वणीतही अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले जगदंबा देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पाहून नांदूरी गावात गेल्यावर उजव्या हाताला सप्तशृंगीगड जाणारा घाट लागतो. घाटाचा रस्ता चांगला केल्याने घाट अनुभवायला मजा येते. साधारण पाच-सात किलोमीटरचा घाट ओलांडून सह्याद्रीच्या पर्वत रांगेत डोंगर पठारावर वसलेला सप्तशृंगगड पाहताना गडावरील देवीच्या दर्शनाची ओढ लागते.  
      नाशिक-कळवण मार्गावरील नांदुरी हे गडपायथ्याचे गाव नाशिकहुन ५२ कि.मी.अंतरावर असुन वणीपासुन १२.कि.मी.अंतरावर आहे. नांदुरी गावातुन गडाच्या माचीवर रस्ता गेला असुन हे अंतर साधारण १० कि.मी.आहे.  जुन्या रडतोंडीच्या मार्गाने, तर नांदुरी मार्गे गडावर जाता येते. आधी महिषासुराचे नि गणेशाचे पायथ्याशी दर्शन घ्यायचे. नंतर पायऱ्या चढून कुलस्वामिनीचे मंदिर गाठायचे असा सर्वसाधारण प्रघात आहे.  

 
     वणी - नांदुरी (१३ कि.मी) दर अर्ध्या तासाला बसेस आहेत. नांदुरी-सप्तशृंगी हा १० कि.मी. चा रस्ता पूर्ण घाटरस्ता आहे. नांदुरी मधून जीप सेवा उपलब्ध आहे. सप्तशृंगी गडाचा घेर हा मोठा आहे. नांदुरी पासून साधारण २० मिनटात सप्तशृंगी गडा च्या पठारावर येऊन पोहोचतो. पठारावरून मंदिरात जायला २ पयाय उपलब्ध आहेत , एक म्हणजे पायगाडी, ४५०-५०० पायऱ्यांची तंगडतोड केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण मंदिरात पोहोचतो . 



भाविकांच्या सोयीकरिता सध्या सप्तशृंगी पठार ते देवीचे मंदिर इथपर्यंत ६० माणसांची क्षमता असलेली फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्यात आली आहे. फ्युनिक्युलर ट्रॉली मुळे हे अंतर अवघ्या ८७ सेकंदात पार करता येते. याचे सध्याचे तिकीट ७० रुपये आहे.
    याशिवाय नांदुरी गावातुन गडावर जाण्यासाठी पायवाट असून या वाटेवर साधारण ३५० पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन माचीपर्यंत जाताना पाच शिलालेख पहायला मिळतात. यातील एक शिलालेख संस्कृत भाषेत तर उर्वरित चार शिलालेख मराठीत आहेत. या शिलालेखात कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन भावानी जेष्ठ शके १६९० सर्वधारी संवत्सर शुक्रवार ते चैत्र शके १६९१ विद्रोही संवत्सर म्हणजेच इ.स.१७६८ दरम्यान या पायऱ्या बांधल्याचा उल्लेख येतो. या शिलालेखात त्यांचे आडनाव रायराव व वडिलांचे नाव गिरमाजी असा उल्लेख आला असुन पायऱ्यासोबत त्यांनी धर्मशाळा, गणपती मंदिर व रामतीर्थ कुंड बांधल्याचा उल्लेख येतो. 
गडाचे बालेकिल्ला व माची असे दोन भाग पडले असून बालेकिल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४०५० फुट तर माचीची उंची ३७०० फुट आहे.सप्तशृंगी देवीचे मंदिर बालेकिल्ल्याच्या कातळकड्यालगत असुन तिथपर्यंत जाण्यासाठी ४७२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या पेशव्यांचे सरदार खंडेराव दाभाडे यांची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी इ.स.१७१० साली बांधल्या. या पायऱ्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे.
    

गडावर सुमारे पाच हजार वस्ती आहे. मात्र तेथे एकही कावळा नसल्याचे सांगतात. अठराव्या शतकात सरदार दाभाडे यांनी गडावर जाण्यासाठी डोंगर फोडून केलेल्या पायऱ्या फार उंच आहेत. मात्र नव्या पायऱ्या करताना हा ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. पादत्राणाशिवाय पायऱ्यांनी देवीच्या दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. नव्याने बांधलेल्या पहिल्या पायरीशेजारी म्हसोबा आणि गणपती मंदिर आहे. त्यानंतर रामटप्पा, कासव टप्पा, औदूंबर टप्पा त्यानंतर गणेश मंदिर व गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजवीकडे जुन्या मंदिराचे वाघाचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुजा पाठासाठीच्या जागेत तांब्याचा सिंह लक्ष वेधून घेतो. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून, शेंदुराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली १८ हातांची महिषासुरमर्दिनी सप्तशृंगी मातेचे मनोहारी रूप डोळ्यात साठवून पुन्हा त्याच वाटेने गड उतरतो. गडावरून परिसराचे मनोहारी रूप अनोखे वाटते.

Saptashrungi Bhramari Shaktipeeth

गडावर सिद्धेश्वर मंदिराजवळ शिवतीर्थ तळे आहे. ब्रह्मदेवाने नारदाला त्या तीर्थस्थानाने शुचिर्भूत होऊन नंतर देवीचे दर्शन घेण्यास सांगितले असा पुराणात उल्लेख आहे. लक्ष्मी, सरस्वती नि काली यांचे त्रिगुणात्मक दर्शन सप्तशृंगी मातेच्या स्वयंभू मूर्तीत घडते. तिचे दर्शन ॐकारस्वरूप असते. 


सप्तशृंग गडाच्या पठारावर पाण्याने भरलेली आहेत. पैकी सरस्वती कुंड, लक्ष्मी कुंड, तांबुल कुंड, अंबालय कुंड, शीतला कुंड ही पाच लहान कुंडे आहेत. तर काळीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन कुंडे आकाराने मोठी आहेत. तेथील शिवालयकुंड हे तर मोठे स्नानगृहच आहे. देवीदर्शनासाठी आलेले भक्त त्या कुंडात स्नान करतात. त्याचे पाणी स्वच्छ नि गोड आहे. त्या कुंडाजवळ हेमाडपंथी बांधणीचे सिद्धेश्वर मंदिर आहे. भाविक स्नानानंतर सिद्धेश्वराचे दर्शन घेतात.

 देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं अशी अख्यायिका आहे. जवळच जलगुंफा आहे. ही गुंफा देवीच्या लत्ताप्रहारानं निर्माण झाली आहे. त्यात पाणी साठलेले असते. कपारीत जलगुंफा व मत्स्यतीर्थ नावाचे कुंड आहे. पूर्व दिशेला दाजीबा मंदिरापासून जवळच सूर्यकुंड व कालीकुंड आहेत. ती पेशव्यांच्या सरदार छत्रसिंग ठोकेंनी बांधली आहेत. प्रत्येक कुंडाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. 

गड म्हणण्यामागे डोंगराची भव्यता एवढाच विषय सध्या अनुभवायला मिळतो. मात्र इतिहासात सप्तशृंगीगडाचा उल्लेख किल्ला म्हणूनही आला आहे. मार्कंड डोंगराकडील दिशेला थोडीफार तटबंदी पहायला मिळते मात्र आता किल्ला म्हणून खाणाखुणा दिसत नाहीत. गडाचे स्वरूप पूर्वी अगदी लहानशा खेड्यासारखेच होते. अगदी १९७५ पर्यंत गडावर काही मोजक्या वास्तू होत्या हे विजय भावसार यांचे दुर्मिळ छायाचित्रातून स्पष्ट होते. त्यावेळी नगारखाना, पुजारी निवास, श्री गुरूदेव आश्रम, आदिवासींचा पाडा, सिद्धेश्वर महादेव मंदिर, शिवालय तलाव, धर्मशाळा, सार्वजनिक विहीर, चांदवडकर धर्मशाळा व पुजारी निवास, मारूती मंदिर, दत्त मंदिर, गवळीपाडा, दीक्षित पुजारी वाडा, वरच्या आळीची आदिवासींची घरे, देवी ट्रस्टचे कार्यालय, शाळेच्या खोल्या व गावातील काही घरे व सप्तशृंगी गड एवढेच गडाचे स्वरूप होते. आता मात्र एक लहानसे शहर वसल्यासारखे वाटते.


           देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून तेथील एका डोंगराला महिषासुराला मारताना देवीचा बान लागला होता ती खून म्हणजे डोंगराला पडलेली चीर तेथे पाहावयास मिळते.  सप्तशृंगी देवीचे मंदिर दोन शिखरांमधील गुहेत असुन  देवीची मूर्ती गडाच्या कातळात कोरलेली आहे.  ॐकारातील म कार पूर्ण रूप ही आदिमाया मानली जाते.  देवीचे दर्शन गडाच्या दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्या चढून गेल्यानंतर, दोन शिखरांमध्ये गुहेसारख्या एका भागात शिरल्यावर होते.मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीची आठ फूट उंचीची भव्य दिव्य आणि प्रसन्न अशी मूर्ती दिसते. तीच सप्तशृंगी देवी. ती देवी अठरा हातांची असून आठ फूट उंचीची आहे. ती खूपच भव्य आहे. 

महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा रूप धारण केलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीच्या मूर्तीकडे प्रदक्षिणा क्रमानुसार उजव्या बाजूला खालून वरच्या भागात आणि नंतर डावीकडून वरून खालील भागात पाहिल्यावर आपल्याला आयुधांची निश्‍चित माहिती मिळते. लांब पल्ल्यासाठी वापरले जाते ते अस्त्र आणि कमी पल्ल्यासाठी वापरले जाते ते शस्त्र. अशा अस्त्र अन् शस्त्रांना आयुध संबोधले जाते. या आयुधांचा देवीच्या उजव्या बाजूने खालून वरच्या भागात पाहावयाचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : वज्र (इंद्र), चक्र (भगवान विष्णू), मुसळ (विश्‍वकर्मा), बाण (वायुदेवता), त्रिशूल (शंकर), मुदगल (विश्‍वकर्मा), अंकुश (विश्‍वकर्मा), परशू (विश्‍वकर्मा), तलवार (कालदेवता). देवीच्या डाव्या बाजूने वरील भागातून खालील भागातील आयुधांचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : ढाल (कालदेवता), कालदंड (यम), पाश (वरुणदेवता), तर्जनी (विश्‍वकर्मा), डमरू (शंकर), धनुष्य (वायूदेवता), घंटा (इंद्र), पानपात्र (कुबेर), शक्ती (अग्निदेवता).
मूळ मूर्तीमधील आयुधांचा क्रम बदलून मधल्या कालखंडातील मूर्तीच्या आयुधांचा क्रम केव्हापासून अस्तित्वात आला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते गूढ आहे. कोणतीही गोष्ट तर्काने अथवा अनुमानाने सिद्ध होत नाही. निश्‍चित सिद्धांत होत नाही.  तरीसुद्धा मूळ मूर्तीच्या हातांमधील आयुधे डामर तंत्रानुसार आणि मधल्या कालखंडातील मूर्तीच्या हातातील आयुधे ही श्री वैकृतिक रहस्य ग्रंथानुसार शास्त्रोक्त आहेत. त्यामुळे दोन्हीही वेळच्या आयुधांच्या मूर्ती या शास्त्रोक्त आणि नित्यपूजेतील पूजनीय आहेत. म्हणून दोन्हीही रूपे पूजनीय आहेत. मूळ मूर्तीचे रूप त्रिशूळाने महिषासूर वध करतानाचे आहे. भगवतीच्या पायाखाली महिषासुराचे धड आणि शीर हे पाचशे पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूला आहे, 

Saptashrungi Bhramari Shaktipeeth
   देवीचे प्रखर तेज डोळ्यांत न मावणारे आहे.  त्या देवीची उंची आठ फूट असल्यामुळे तिची विधिवत पूजा शिडी लावून करावी लागते.  येथे पहाटेची काकड आरती झाल्यानंतर देवीची पूजा केली जाते. मूर्तीला स्नान थंड जलाने नित्य घालतात. मात्र मंगळवारी नि शुक्रवारी तिला गरम जलाने अभिषेक करून भरभरून शेंदूर लावतात. देवीच्या भुवया नि पापण्या रंगाने कोरतात, भलेमोठे कुंकू लावतात, सौंदर्य न्याहळण्यासाठी तिला आरसा दाखवतात. पूजेनंतर देवीला वस्त्र चढवले जातात. देवीची मूर्ती उंच असल्यामुळे देवीला पैठणी किंवा अकरा वार शालू नेसवला जातो. देवीला नेसवल्या जाणाऱ्या पैठणीचे प्रत्येक दिवसानुसार रंग ठरवलेले असतात. सोमवारी पांढरी, मंगळवारी हिरवा, बुधवारी जांभळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळा शनिवारी लाल आणि रविवारी गुलाबी रंगाचा शालू देवीला नेसवला जातो. भाविकांना ज्या दिवशी पूजा करायची आहे त्यानुसार साडीचा रंग सांगितला जातो. सोन्याचे विविध दागिने देवीला घातले जातात.नवग्रहांची शक्ती देवी मध्ये असल्यामुळे त्यानुसार आधी मायेचा शृंगार केला जातो.

     वारानुसार कुंकू लावले जाते. सोमवारी ओम किंवा बेल पान, मंगळवार आणि बुधवार पिंपळपान, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी गोल पाकळी,शनिवारी शंख आणि रविवारी सूर्य अशाप्रकारे वारानुसार देवीला कुंकू लावले जाते. दीड ते दोन तास सुरू असलेली ही पूजा मन अगदी प्रसन्न करते. रामनवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची गर्दी वाढू लागते. खानदेश मधून येथे बरीच मंडळी पायी दिंडीत येत असतात. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांची एक छबिना मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तिला केवळ नवरात्रोत्सवात अलंकार, नथ, गळसरी लेवून खीरपुरीचा महानैवेद्य दाखवतात, नाना वाद्यांच्या गजरात तिची त्रिकाळ आरती होते. तेव्हा मंदिरातील घंटा निनादतात, मोठमोठी झुंबरे प्रकाशतात. 
         गडावर असलेल्या शिवालय तलावावर स्नान करून त्यांनी सोबत आणलेल्या मूर्तींना शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करत अर्धनारी नदेश्वर देवीचे पूजन करून छबीन्याला  सुरुवात होते. सप्तशृंगी माता,यल्लमा माता आदि देवींच्या मूर्तींना साज चढवून नैवेद्य साडीचोळी आणि पूजा करून त्यांचा छबिना काढण्यात येतो. शिवालय ते सप्तशृंगी मंदिराच्या पहिल्या पायरी पर्यंत डफांच्या निनादात या मिरवणुकीत भक्तिरसात नाहून निघालेल्या या तृतीयपंथी मिरवणुकीत वाद्याच्या तालावर ठेका धरत नृत्य करतात. याचप्रमाणे महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये ही देवीची विशेष पूजा होते .
तिला अकरा वारी साडी, रोज एका विशिष्ट रंगाची अशी आठवडाभर नेसवली जाते. तिच्या चोळीसाठी तीन खण वापरले जातात. तिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातील कर्णफुले आदी अलंकारही शोभून दिसतात. वणी येथील देवीच्या दर्शनासाठी आलेले काही उपासक नासिकच्या पंचगंगा, रामकुंड, येथील ‘पवित्र’ जल घेऊन येतात व ते देवीच्या मंगलस्नान अभिषेकासाठी वापरतात.
    तिच्या पराक्रमाची, तिने महिषासूर व चंडमुंड अशा असुरांच्या केलेल्या वधाची आणि तिच्या अमाप शक्तिसामर्थ्याची वीरगाथा तिच्या सिंहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो । वधुनी महिषासूर मर्दियले चंडमुंड हो ।। या आरतीतून गायली जाते. 
   अपराध सहस्त्र भाजनं पतितं देवी भवानी भूतले । अगदि शरणागतं शिवे कृपया देहि पदेषु देहि मां ।। असा तिच्या स्तोत्राचा प्रारंभ आहे. ते सप्तशृंगगडावर सकाळ-सायंकाळ गायले जाते; सायंकाळी, आरतीच्या वेळी, दुर्गासप्तशतीतील शक्रादिस्तुतीच्या चौथ्या अध्यायाचे पठन होते. त्या सोबत श्रीमद्शंकराचार्यरचित ‘अपराधक्षमापन’ स्तोत्रही म्हटले जाते. सप्तशृंगगडवासिनी संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता आहे. सोळाव्या शतकातील संतकवी त्र्यंबकराज यांना तिने प्रकाशज्ञान दिले, म्हणून त्यांनी सप्तशृंगगडावर येऊन तिचे अखंड ध्यान केले. समर्थ रामदास स्वामींनी रचलेला ‘ज्वालामुखी ते अंबिका । सप्तशृंगीची चंडिका ’ हे स्तोत्र तीर्थावली दंडीगाण (दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍या, गोसाव्यांची एक जमात) यात सापडते. सप्तशृंगी देवी माता | चरणी ठाव देई आता । असे मागणेही भक्तांकडून मागितले जाते.    सप्तशृंगी मातेचा महिमा ऐशी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो । अमर दुर्लभ रमणे करिसी सप्तशृंग निवास हो।। असा तिच्या आरतीतूनही आर्तपणे आळवला जातो.
सप्तशृंगी देवीची रोज त्रिकाल पूजा होते. मंत्राभिषेकानंतर सर्वांग सिंदूरचर्चित केले जाते. रोज देवीला लावले गेलेले वेगवेगळ्या रंगांचे कुंकू विशेष लक्ष वेधून घेते. तिचे नवरात्रही वैशिष्ट्यपूर्ण असते. देवीची यात्रा नवरात्रात पहिल्या माळेपासून पंधरा दिवस असते. त्यात गाथा, सप्तशतीचे नि अन्य पुराणांचे पाठ, कवन, आरत्या, आदींचे पठण होते. काही जण त्या सात शिखरांना तीन किलोमीटर पाऊलवाटेने प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणावाटेवर परशुराम बाबांचे दर्शन घडते. आदिशक्तीचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेस झाला असल्याने तेथे चैत्रोत्सवही होतो. सुरथ राजाला देवीच्या कृपेने राजपद लाभल्याने त्यानेच हा उत्सव सुरू केल्याचे सांगतात. शंकराचार्यांनीही तेथे नवचंडी याग केला, तेव्हा दूधगंगा प्रकट झाली होती अशी आख्यायिका आहे.


     
            श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन आणि विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. वर्षानुवर्षे त्यावर शेंदूर लेपन सुरू आहे. तसेच सप्तश्रृंग गडावरील वातावरण, देवीच्या डोंगरावर असलेले मंदिर आणि त्यातून होत असलेले पाण्याचे झिरपणे यामुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात आले होते. पुरोहितांनी २०१२-२०१३ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनाची मागणी करीत पाठपुरावा केला होता. त्यानुसार सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने सर्व पुरातत्व विभाग, आयआयटी पवई यांचे अहवाल आणि प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अजिंक्यतारा कन्सल्टन्सी, नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरु केले होते.मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भगवतीच्या स्वरुपावरील गेल्या कित्येक वर्षांपासून साचलेले शेंदूर लेपनाचे कवच धार्मिक, शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आले. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरून ११०० किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आई सप्तशृंगी देवीचे मूळ रूप आता  समोर आले 



       भगवती मूर्तीच्या खालील बाजूला चौथरा संवर्धनाच्या कामात आढळून आला. हे काम इसवी सन १७६८ मध्ये झाल्याची नोंद पेशवेदप्तरात आहे. या चौथऱ्याकडे पाहताना डाव्या बाजूला कमळ, मध्यभागी पिंडी, वरील भागात दोन पोपट, मधल्या भागात गणपती आणि त्याखाली दोन गजराज, उजव्या बाजूला कमळ, त्यात मध्यभागी शंभू महादेवाचे वाहन वृषभ, त्यावर दोन पोपट असे सुंदर नक्षीकाम करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते,  मराठा कालखंडानंतर प्रत्यक्ष भगवती मूर्तीच्या संबंधाचे मोठे काम आता झाले आहे. संवर्धन कामानिमित्त विविध पूजापाठ, आराधना करण्यात आली आहे. मूर्तीवरील लेपन काढण्यापूर्वी कलाकर्षण विधी झाला. मग मूळ मूर्तीचा कलातत्त्व पुनर्विन्यास विधी, उदक शांती, आघोर होम, मुख्य देवता मंत्रजप, मुख्य देवता मंत्रहोम, जीवकला न्यासविधी, तत्त्वन्यास होम, जीवकला न्यास होम, श्रीसहस्त्रकलश महाभिषेक विधी करण्यात आला. 
   सप्तशृंग गडाच्या कातळाला देवीचे रूप मानले गेल्याने या कातळावर पाय ठेवण्यास म्हणजेच बालेकिल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. येथुन वर गडावर जाण्याचा मान दरेगावचे पाटील घराण्याला असुन ते दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री गडावर चढुन नवा ध्वज व दिवा लावतात. डोंगरमाथ्यावर एक पांढरा खांब आहे. बुटीगाव पाटलांची मुले परंपरेने त्यावर चैत्री पौर्णिमेला देवीचा ध्वज चढवतात. तो अतिशय अवघड कडा आहे. ती मुले केवळ सप्तशृंगीदेवीवरील असीम श्रद्धेने ते कठीण कार्य करू शकतात. 
         देवीची प्रदक्षिणा करण्यासाठी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे पण सतत दरड कोसळत असल्याने हा मार्ग बंद आहे. आपल्याला मंदिर पाहुन झाल्यावर किल्ला म्हणुन जो काही भाग पहाता येतो तो फक्त माचीचा भाग. तीर्थक्षेत्रामुळे माचीवर एक लहानसे बकाल शहर वसले आहे व यात किल्याचे सर्व अवशेष हरवुन बसले आहेत. गडाच्या दक्षिणेस अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालय नावाचे कुंड आहे. याच्या काठावर सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणुन ओळखले जाणारे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आसपास अनेक अवशेष विखुरलेले असून चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. मंदिराबाहेर उजवीकडे अनेक प्राचीन मूर्ती मांडलेल्या असुन डाव्या बाजूला एक बारव व अनेक लहान मोठ्या समाधी आहेत. त्याच्याजवळच गंगा आणि यमुना ही दोन टाकी आहेत. शिवालय तीर्थाजवळच मारुतीचे व गणपतीचे मंदिर आहे. गणेश मंदिरात मंदिराच्या बांधकामाचा शिलालेख आहे. शिवालयापासून जवळच शीतकडा आहे. या शीतकड्यासमोर मार्कंडेय किल्ला उभा आहे. या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात किल्ल्याचे अवशेष म्हणजेच ढासळलेली तटबंदी तसेच खाली उतरत जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला तटबंदी बांधण्यासाठी कातळात काढलेले लांबलांब चिरे पहायला मिळतात. सतीकड्या जवळ उभे राहुन सप्तशृंगी मंदिराकडे पाहिले असता काळ्या दगडात बांधलेले एक मंदीर आपले लक्ष वेधुन घेते. सप्तशृंगी ट्रस्टच्या धर्मशाळेमागुन या महाकालेश्वर मंदिराकडे जाता येते. संपुर्णपणे काळ्या दगडात बांधलेले हे महाकालेश्वर मंदीर गुजरातमधील धरमपुर येथील सूरतच्या एका राजाने बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजुला या राजाच्या समाधीचा चौथरा असून त्यावर पडझड झालेले वीट बांधकाम आहे. या मंदिराजवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विटांची सुरेख बारव आहे. या बारवेचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. पुर्वी गडावर १०८ कुंड असल्याचे स्थानिक सांगतात पण सद्यस्थितीत गडाच्या माचीवर १२ ते १५ कुंडे आहेत. यात पाण्याने भरलेली आठ दगडी कुंड आहेत. यातील सरस्वती कुंड, लक्ष्मीकुंड, तांबुलकुंड, अंबालयकुंड, शीतलकुंड ही पाच लहान कुंडे तर कालीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन मोठी कुंडे आहेत. माचीच्या उत्तर बाजूस असलेल्या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा असल्याने हे कुंड तांबूलकुंड म्हणुन ओळखले जाते तर काजलकुंड या कुंडातील पाणी काळसर रंगाचे आहे. पुर्वेला दाजीबा मंदिरापासून जवळच सूर्यकुंड व कालीकुंड आहेत. ती पेशव्यांच्या सरदार छत्रसिंग ठोकेंनी बांधली आहेत. नांदुरी गावातुन पायथ्यापासुन चालत आल्यास मंदीर व संपुर्ण माची पाहण्यासाठी ६ तास लागतात.
 संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४)  शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७)  www.durgbharari.in   हि वेबसाईट
८ ) thinkmaharashtra.com
९ ) blogs.maharashtratimes.indiatimes.com
१० ) pandharichivari.com
११ ) dnyanbatukaram.com
१२ ) http://saketghanekar1.blogspot.in/2017/11/blog-post_86.html
१३ ) thetempleguru.com

 


 















गिरीदुर्ग नाशिक अजंठा सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
4600
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Saptashringi gad, temple from Markandeya

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.

महत्त्वाची ठिकाणे

किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहेमंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून वरच्या भागात गड आहे. परंतू हा श्रध्देचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही.

कसे पोहोचावे

किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडी रस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात. नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ नांदुरी गावातून अर्धातास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ सर्व ऋतुत.

जवळील गावे

वणी

 
 

उंची : ३९८० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ मानले जाते. सप्तशृंग म्हणजे सात शिखरांचा पर्वत. या सात शिखरांवर ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, इन्द्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांचा वास असल्याचे मानले जाते. याशिवाय गडावर जगदंबा मातेचे म्हणजेच वणीच्या देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केल्याचे मानले जाते. इतिहासात सातमाळ डोंगररांगेतील किल्ला म्हणुन संदर्भ असणारे हे ठिकाण आज केवळ तीर्थक्षेत्र म्हणुनच ओळखले जाते. नाशिक-कळवण मार्गावरील नांदुरी हे गडपायथ्याचे गाव नाशिकहुन ५२ कि.मी.अंतरावर असुन वणीपासुन १२.कि.मी.अंतरावर आहे. नांदुरी गावातुन गडाच्या माचीवर रस्ता गेला असुन हे अंतर साधारण १० कि.मी.आहे. याशिवाय नांदुरी गावातुन गडावर जाण्यासाठी पायवाट असून या वाटेवर साधारण ३५० पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन माचीपर्यंत जाताना पाच शिलालेख पहायला मिळतात. यातील एक शिलालेख संस्कृत भाषेत तर उर्वरित चार शिलालेख मराठीत आहेत. या शिलालेखात कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन भावानी जेष्ठ शके १६९० सर्वधारी संवत्सर शुक्रवार ते चैत्र शके १६९१ विद्रोही संवत्सर म्हणजेच इ.स.१७६८ दरम्यान या पायऱ्या बांधल्याचा उल्लेख येतो. या शिलालेखात त्यांचे आडनाव रायराव व वडिलांचे नाव गिरमाजी असा उल्लेख आला असुन पायऱ्यासोबत त्यांनी धर्मशाळा, गणपती मंदिर व रामतीर्थ कुंड बांधल्याचा उल्लेख येतो. गडाचे बालेकिल्ला व माची असे दोन भाग पडले असून बालेकिल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४०५० फुट तर माचीची उंची ३७०० फुट आहे.सप्तशृंगी देवीचे मंदिर बालेकिल्ल्याच्या कातळकड्यालगत असुन तिथपर्यंत जाण्यासाठी ४७२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या पेशव्यांचे सरदार खंडेराव दाभाडे यांची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी इ.स.१७१० साली बांधल्या. या पायऱ्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर दोन शिखरांमधील गुहेत असुन देवीची अठरा हातांची ८ फूट उंच मुर्ती कातळात कोरलेली आहे. तिच्या प्रत्येक हातात धनुष्य, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, कुऱ्हाड, गदा, ढाल,पाश, शक्ती या शस्त्रांसोबत, मणिमाळा,शंख, घंटा, दंड,पानपात्र, कमंडलू व कमळ आहे. देवीची मूर्ती गडाच्या कातळात कोरलेली असुन या कातळाला देवीचे रूप मानले गेल्याने या कातळावर पाय ठेवण्यास म्हणजेच बालेकिल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. येथुन वर गडावर जाण्याचा मान दरेगावचे पाटील घराण्याला असुन ते दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री गडावर चढुन नवा ध्वज व दिवा लावतात. देवीची प्रदक्षिणा करण्यासाठी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे पण सतत दरड कोसळत असल्याने हा मार्ग बंद आहे. आपल्याला मंदिर पाहुन झाल्यावर किल्ला म्हणुन जो काही भाग पहाता येतो तो फक्त माचीचा भाग. तीर्थक्षेत्रामुळे माचीवर एक लहानसे बकाल शहर वसले आहे व यात किल्याचे सर्व अवशेष हरवुन बसले आहेत. गडाच्या दक्षिणेस अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालय नावाचे कुंड आहे. याच्या काठावर सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणुन ओळखले जाणारे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आसपास अनेक अवशेष विखुरलेले असून चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. मंदिराबाहेर उजवीकडे अनेक प्राचीन मूर्ती मांडलेल्या असुन डाव्या बाजूला एक बारव व अनेक लहान मोठ्या समाधी आहेत. त्याच्याजवळच गंगा आणि यमुना ही दोन टाकी आहेत. शिवालय तीर्थाजवळच मारुतीचे व गणपतीचे मंदिर आहे. गणेश मंदिरात मंदिराच्या बांधकामाचा शिलालेख आहे. शिवालयापासून जवळच शीतकडा आहे. या शीतकड्यासमोर मार्कंडेय किल्ला उभा आहे. या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात किल्ल्याचे अवशेष म्हणजेच ढासळलेली तटबंदी तसेच खाली उतरत जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला तटबंदी बांधण्यासाठी कातळात काढलेले लांबलांब चिरे पहायला मिळतात. सतीकड्या जवळ उभे राहुन सप्तशृंगी मंदिराकडे पाहिले असता काळ्या दगडात बांधलेले एक मंदीर आपले लक्ष वेधुन घेते. सप्तशृंगी ट्रस्टच्या धर्मशाळेमागुन या महाकालेश्वर मंदिराकडे जाता येते. संपुर्णपणे काळ्या दगडात बांधलेले हे महाकालेश्वर मंदीर गुजरातमधील धरमपुर येथील सूरतच्या एका राजाने बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजुला या राजाच्या समाधीचा चौथरा असून त्यावर पडझड झालेले वीट बांधकाम आहे. या मंदिराजवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विटांची सुरेख बारव आहे. या बारवेचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. पुर्वी गडावर १०८ कुंड असल्याचे स्थानिक सांगतात पण सद्यस्थितीत गडाच्या माचीवर १२ ते १५ कुंडे आहेत. यात पाण्याने भरलेली आठ दगडी कुंड आहेत. यातील सरस्वती कुंड, लक्ष्मीकुंड, तांबुलकुंड, अंबालयकुंड, शीतलकुंड ही पाच लहान कुंडे तर कालीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन मोठी कुंडे आहेत. माचीच्या उत्तर बाजूस असलेल्या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा असल्याने हे कुंड तांबूलकुंड म्हणुन ओळखले जाते तर काजलकुंड या कुंडातील पाणी काळसर रंगाचे आहे. पुर्वेला दाजीबा मंदिरापासून जवळच सूर्यकुंड व कालीकुंड आहेत. ती पेशव्यांच्या सरदार छत्रसिंग ठोकेंनी बांधली आहेत. नांदुरी गावातुन पायथ्यापासुन चालत आल्यास मंदीर व संपुर्ण माची पाहण्यासाठी ६ तास लागतात.
 
 
thinkmaharashtra.com

वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)

थिंक महाराष्ट्रhttp://thinkmaharashtra.com

_saptashrungi_devi

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.

एकपीठ ते तुळजापूर । द्वितीय पीठ ते माहूर | तृतीय पीठ ते कोल्हापूर । अर्धपीठ सप्तशृंगी।।

ॐकारातील म कार पूर्ण रूप ही आदिमाया मानली जाते. तीच सप्तशृंगी देवी. ती देवी अठरा हातांची असून आठ फूट उंचीची आहे. ती खूपच भव्य आहे. तिच्या हातात अठरा शस्त्रे व साधने – कमळ, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, मणिमाला, कुऱ्हाड, गदा, ढाल; यांसोबत पाश, शक्ती, शंख, घंटा, दंड, धनुष्य, पानपात्र, कमंडलू – आहेत. देवीचे प्रखर तेज डोळ्यांत न मावणारे आहे. तिला अकरा वारी साडी, रोज एका विशिष्ट रंगाची अशी आठवडाभर नेसवली जाते. तिच्या चोळीसाठी तीन खण वापरले जातात. तिला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ, कानातील कर्णफुले आदी अलंकारही शोभून दिसतात. वणी येथील देवीच्या दर्शनासाठी आलेले काही उपासक नासिकच्या पंचगंगा, रामकुंड, येथील ‘पवित्र’ जल घेऊन येतात व ते देवीच्या मंगलस्नान अभिषेकासाठी वापरतात.

तिच्या पराक्रमाची, तिने महिषासूर व चंडमुंड अशा असुरांच्या केलेल्या वधाची आणि तिच्या अमाप शक्तिसामर्थ्याची वीरगाथा तिच्या सिंहारूढ होऊन रूप धरिले महाचंड हो । वधुनी महिषासूर मर्दियले चंडमुंड हो ।। या आरतीतून गायली जाते. 

अपराध सहस्त्र भाजनं पतितं देवी भवानी भूतले । अगदि शरणागतं शिवे कृपया देहि पदेषु देहि मां ।। असा तिच्या स्तोत्राचा प्रारंभ आहे. ते सप्तशृंगगडावर सकाळ-सायंकाळ गायले जाते; सायंकाळी, आरतीच्या वेळी, दुर्गासप्तशतीतील शक्रादिस्तुतीच्या चौथ्या अध्यायाचे पठन होते. त्या सोबत श्रीमद्शंकराचार्यरचित ‘अपराधक्षमापन’ स्तोत्रही म्हटले जाते. सप्तशृंगगडवासिनी संत ज्ञानेश्वरांची कुलदेवता आहे. सोळाव्या शतकातील संतकवी त्र्यंबकराज यांना तिने प्रकाशज्ञान दिले, म्हणून त्यांनी सप्तशृंगगडावर येऊन तिचे अखंड ध्यान केले. समर्थ रामदास स्वामींनी रचलेला ‘ज्वालामुखी ते अंबिका । सप्तशृंगीची चंडिका ’ हे स्तोत्र तीर्थावली दंडीगाण (दंडी हे वाद्य घेऊन फिरणार्‍या, गोसाव्यांची एक जमात) यात सापडते. सप्तशृंगी देवी माता | चरणी ठाव देई आता । असे मागणेही भक्तांकडून मागितले जाते. 

महाराष्ट्र-गुजरात यांच्या सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगांमधील सप्तशृंग तथा वणीचा डोंगर निसर्गरम्य आहे. तेथे पूर्वी घनदाट वनराई होती. त्या ठिकाणी वसलेल्या गावाला वणी म्हणतात. ते नासिकपासून उत्तरेला केवळ पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे. गिरिजा नदीचा उगम त्या डोंगरातून आहे. मार्कंडेय ऋषींची तपस्या त्याच डोंगरावर झाली. त्यांना आदिशक्ती जगदंबा प्रसन्न झाल्याने त्यांनीच त्या ठिकाणी देवीची स्थापना केली. त्या डोंगराला सात शिखरे आहेत. ती सात सुळ्यांची मालिका काहीशी धनुष्याच्या आकाराची आहे. तेथील गडाच्या पायथ्याशी साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वीपासून असलेले जगदंबा मंदिर प्रसिद्ध आहे. तेथील देवीची मूर्ती सप्तशृंगी मातेच्या प्रतिरूपात पाहण्यास मिळते. सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर जगदंबा मातेचे दर्शन घडले, की यात्रा सफल होते अशी धारणा आहे. प्रभुरामचंद्रांनी सप्तशृंगगडवासिनीच्या सोबत वणीच्या जगदंबेचे दर्शनही घेतले अशी कथा आहे. ते मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरची दीपमाळ आणि तेथील गणेशतळ लक्षणीय आहे. तेथील मूर्ती आकर्षक व तेजस्वी आहे. जुन्या _saptashrungi_gadरडतोंडीच्या मार्गाने, तर नांदुरी मार्गे गडावर जाता येते. आधी महिषासुराचे नि गणेशाचे पायथ्याशी दर्शन घ्यायचे. नंतर पायऱ्या चढून कुलस्वामिनीचे मंदिर गाठायचे असा सर्वसाधारण प्रघात आहे. 

गडावर सुमारे पाच हजार वस्ती आहे. मात्र तेथे एकही कावळा नसल्याचे सांगतात. अठराव्या शतकात सरदार दाभाडे यांनी गडावर जाण्यासाठी डोंगर फोडून केलेल्या पायऱ्या फार उंच आहेत. गडावर सिद्धेश्वर मंदिराजवळ शिवतीर्थ तळे आहे. ब्रह्मदेवाने नारदाला त्या तीर्थस्थानाने शुचिर्भूत होऊन नंतर देवीचे दर्शन घेण्यास सांगितले असा पुराणात उल्लेख आहे. लक्ष्मी, सरस्वती नि काली यांचे त्रिगुणात्मक दर्शन सप्तशृंगी मातेच्या स्वयंभू मूर्तीत घडते. तिचे दर्शन ॐकारस्वरूप असते. 

सप्तशृंगी देवीची रोज त्रिकाल पूजा होते. मंत्राभिषेकानंतर सर्वांग सिंदूरचर्चित केले जाते. रोज देवीला लावले गेलेले वेगवेगळ्या रंगांचे कुंकू विशेष लक्ष वेधून घेते. तिचे नवरात्रही वैशिष्ट्यपूर्ण असते. देवीची यात्रा नवरात्रात पहिल्या माळेपासून पंधरा दिवस असते. त्यात गाथा, सप्तशतीचे नि अन्य पुराणांचे पाठ, कवन, आरत्या, आदींचे पठण होते. काही जण त्या सात शिखरांना तीन किलोमीटर पाऊलवाटेने प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणावाटेवर परशुराम बाबांचे दर्शन घडते. आदिशक्तीचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेस झाला असल्याने तेथे चैत्रोत्सवही होतो. सुरथ राजाला देवीच्या कृपेने राजपद लाभल्याने त्यानेच हा उत्सव सुरू केल्याचे सांगतात. शंकराचार्यांनीही तेथे नवचंडी याग केला, तेव्हा दूधगंगा प्रकट झाली होती अशी आख्यायिका आहे.

सप्तशृंगी मातेचा महिमा ऐशी तुझी ख्याती महिमा न कळे ब्रह्मादिका हो । अमर दुर्लभ रमणे करिसी सप्तशृंग निवास हो।। असा तिच्या आरतीतूनही आर्तपणे आळवला जातो.

हे ही लेख वाचा – 
अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
तांबवे गावची वज्रेश्वरी देवी
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी

सप्तशृंगी मातेचे रूप हे आदिमाया आदिशक्तीचे मूळ रूप आहे, नि ते तसे पूर्ण रूप आहे असे मानले जाते. शिवाय ती महिषासुरमर्दिनी देवी म्हणजे साक्षात् महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीही आहे. देवीने महिषासुराचा वध महापराक्रमाने केल्यानंतर ती विसाव्यासाठी त्या सप्तशृंगगडावर आली अशी आख्यायिका आहे. राम-रावण युद्धात लक्ष्मणाला ज्यावेळी मूर्छा आली त्यावेळी मारुतीने आवश्यक औषधी वनस्पती न मिळाल्याने त्याच्या उपचारासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. त्यावेळी द्रोणागिरीचा काही शिळाखंड खाली पडला, तोच हा सप्तशृंगगड अशीही आख्यायिका महानुभावीय ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात आलेली आहे. संत निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस कुलदेवता सप्तशृंगवासिनी मातेची उपासना केली नि तिच्याकडे समाधिस्थ होण्यासाठी अनुमती मागितली आणि तिच्या संमतीनंतरच समाधी घेतली अशीही आख्यायिका आहे. 

प्राचीन काळी दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. जे कोणी पूजापाठ उपासना करत त्यांना पकडून तुरुंगात डांबून ठेवले जात असे! जप-तप करणाऱ्या ऋषिमुनींचे आश्रम जाळणे, गुरेढोरे पळवणे, सोनेनाणे लूटून नेणे असा दुराचार चालू असल्याने देवलोकही चिंताग्रस्त झाला होता. अंती ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्र येऊन दिव्य शक्ती निर्माण केली, त्या महादिव्य शक्तीने महापराक्रमाची ज्या पवित्र अशा चार ठिकाणी प्रचीती दाखवली ती ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली यांच्या त्रिगुणात्मक रूपातील साडेतीन शक्तिपीठे! अवघ्या असुरातील अत्याचारी महिषासुर आणि त्याचे दोन बंधू यांनी असुरी प्रवृत्तीने पापांची परिसीमा गाठली होती. त्यांनी आम्हीच तुमचे देव। आमचीच पूजा करा असा आदेशच आमजनांना दिला असल्याने तो मोडून देवपूजा करणाऱ्यांना मरण पत्करावे लागत असे. तशा बलदंड असुरांपैकी महिषासुरांच्या दोन्ही भावांचा त्यांच्याशी प्रखर लढा देऊन आदिशक्ती देवीने वध केला. मात्र महिषासूर रेड्याच्या शरीरात प्रवेशून राहत असल्याने त्याला मारणे अवघड झाले होते. अखेर, देवीने सारे सामर्थ्य पणाला लावून त्या रेड्याचा शिरच्छेद केला तेव्हा महिषासूर एवढ्या ताकदीने पळाला, की त्याच्या उड्डाणाने डोंगराला मोठे खिंडारच पडले! महिषासुराने चवताळून जाऊन देवीशी निकराचे युद्ध सुरू केले जे देवीनेही अफाट शक्तिसामर्थ्यांने नऊ दिवस करून महिषासुराचा अंती वध केला. 

देवीने महिषासुराचा वध करताच देवदेवतांनी स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी केली. देवीने विसाव्यासाठी नि पुढे भक्तांच्या चिरंतन सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, या गडावर वास्तव्य केले. तोच तो सप्तशृंगीमातेचा सप्तशृंगगड. त्या गडाच्या अवघड पायऱ्या चढून पठारापर्यंत पोचताना सहा शिलालेख पाहण्यास मिळतात. त्यांत तेथील विकासकार्यासंबंधी, बांधकामाविषयीची माहिती असल्याचे आढळून येते. एक शीलालेख संस्कृत भाषेतील तर बाकीचे मराठी भाषेतील आहेत. सप्तशृंगीदेवीचे दर्शन आठशेबावीस पायऱ्या चढून गड गाठल्यावर घडते. देवीभक्त अंबाबाई दाभाडे यांनी त्या पायऱ्या 1710 मध्ये बांधून दिल्या आहेत. पायऱ्यांचा पहिला टप्पा तीनशेपन्नास पायऱ्यांचा तर दुसरा चारशेबहात्तर पायऱ्यांचा आहे. कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन देवीउपासक भावंडांनी मिळून त्या पायऱ्यांची पुनर्रचना 1768 मध्ये केली. त्याच तीन बंधूंनी भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, तिच्याजवळ गणपतीचे सुंदर मंदिर नि रामतीर्थ नावाचे कुंडही बांधून गड सुशोभित केला. 

_devi_saptashrungiआठ दगडी कुंड सप्तशृंग गडाच्या पठारावर पाण्याने भरलेली आहेत. पैकी सरस्वती कुंड, लक्ष्मी कुंड, तांबुल कुंड, अंबालय कुंड, शीतला कुंड ही पाच लहान कुंडे आहेत. तर काळीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन कुंडे आकाराने मोठी आहेत. तेथील शिवालयकुंड हे तर मोठे स्नानगृहच आहे. देवीदर्शनासाठी आलेले भक्त त्या कुंडात स्नान करतात. त्याचे पाणी स्वच्छ नि गोड आहे. त्या कुंडाजवळ हेमाडपंथी बांधणीचे सिद्धेश्वर मंदिर आहे. भाविक स्नानानंतर सिद्धेश्वराचे दर्शन घेतात. डोंगरमाथ्यावर एक पांढरा खांब आहे. बुटीगाव पाटलांची मुले परंपरेने त्यावर चैत्री पौर्णिमेला देवीचा ध्वज चढवतात. तो अतिशय अवघड कडा आहे. ती मुले केवळ सप्तशृंगीदेवीवरील असीम श्रद्धेने ते कठीण कार्य करू शकतात. देवीचे दर्शन गडाच्या दुसऱ्या टप्प्यातील पायऱ्या चढून गेल्यानंतर, दोन शिखरांमध्ये गुहेसारख्या एका भागात शिरल्यावर होते. त्या देवीची उंची आठ फूट असल्यामुळे तिची विधिवत पूजा शिडी लावून करावी लागते. मूर्तीला स्नान थंड जलाने नित्य घालतात. मात्र मंगळवारी नि शुक्रवारी तिला गरम जलाने अभिषेक करून भरभरून शेंदूर लावतात. देवीच्या भुवया नि पापण्या रंगाने कोरतात, भलेमोठे कुंकू लावतात, सौंदर्य न्याहळण्यासाठी तिला आरसा दाखवतात. तिला केवळ नवरात्रोत्सवात अलंकार, नथ, गळसरी लेवून खीरपुरीचा महानैवेद्य दाखवतात, नाना वाद्यांच्या गजरात तिची त्रिकाळ आरती होते. तेव्हा मंदिरातील घंटा निनादतात, मोठमोठी झुंबरे प्रकाशतात. सप्तशृंगीदेवीचा महिमा ‘सप्तशृंगी पाठावली’ म्हणून ओळखला जातो. तिची ख्याती नवसाला पावणारी देवी म्हणून आहे. तिचा अतुल पराक्रम नि मार्कंडेय ऋषींची दिव्य भक्ती याविषयी वर्णन सप्तशती ग्रंथात आलेले आहे. त्याची साक्ष सप्तशृंगगडाच्या पठाराच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय पर्वत देतो. मार्कंडेय ऋषींनी घोर तप त्या पर्वतावर केले, म्हणून त्याला मार्कंडेय पर्वत या नावाने ओळखतात. सप्तशृंगीदेवी तिचा पाठ भक्तांकडून भक्तियुक्त अंतःकरणाने अहंकाररहित राहून नित्यनेमाने केला गेल्यास ती प्रसन्न होते. मार्कंडेय ऋषींनी भीमासूर दैत्याचा नायनाट तिचा पाठ करूनच केला होता.



blogs.maharashtratimes.indiatimes.com

भक्तीशक्तीचा सप्तशृंगीगड

रमेश पडवळ

महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्मस्वरूपिणी रूप म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी. देवीचे स्थान मनाला जेवढं भावतं तेवढच गडावरील १०८ कुंड, प्राचीन मंदिरे, उत्सव, मलखांब, अनेक संतांचा व सरदारांच्या दान वृत्तीच्या अनेक आख्यायिकांनी मन तृप्त होतं. सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येकाला संप्तशृंगडाच्या वैभवाचा अनोखा अनुभव पदरात पाडून घेता येतो.

प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनातील शक्ती उपासनेला विशेष महत्त्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून, या शक्तिपीठांपैकीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजेच सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी, असे मानले जाते. सप्तशृंगी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला योग्य मान दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचा देह हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली. यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ होय, अशी व याचबरोबर आणखी काही आख्यायिका सांगितल्या जातात. सप्तशृंगी म्हणजे सप्त (सात) आणि शृंग म्हणजे शिखर. सात शिखरांचा पर्वत म्हणजे सप्तशृंग. या सातही शिखरांवर नारसिंह, इंद्राणी, वैष्णवी, वाराही, कार्तिकेयी चामुंडा व शिवा या सात देवता राहतात अन् या सर्वांची थोरली जगदंबा म्हणजेच सप्तशृंगी देवी असेही म्हटले जाते. राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असताना हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असताना त्या पर्वताचे सात तुकडे या भागात पडले ते म्हणजे सप्तशृंगी पर्वत असल्याचेही म्हटले जाते. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवीत असे म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून ते पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रगट झाली व देवीने महिषासुराचा वध केला. दूष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. तसेच पराशर ऋषींनी पारेगावातून देवीच्या नजरेसमोर बारावर्ष तपश्चर्या केल्याची अख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाईने देवीचे गडावर दर्शन घेतल्याची जशी आख्याय‌िका आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनीही गडावर देवीची उपासना केल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वरीतही ज्ञानेश्वरांनी गडाचा उल्लेख केला आहे. तर मच्छिंद्रनाथांचे येथे काही काळ वास्तव होते. यावरून सप्तशृंगी देवीच्या भक्ती अन् शक्तीचा अंदाज येतो.

नाशिकपासून अवघ्या दीड तासांवर नाशिक-सापुतारा रस्त्यावर वणी हे गाव लागते. वणीतही अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले जगदंबा देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पाहून नांदूरी गावात गेल्यावर उजव्या हाताला सप्तशृंगीगड जाणारा घाट लागतो. घाटाचा रस्ता चांगला केल्याने घाट अनुभवायला मजा येते. साधारण पाच-सात किलोमीटरचा घाट ओलांडून सह्याद्रीच्या पर्वत रांगेत डोंगर पठारावर वसलेला सप्तशृंगगड पाहताना गडावरील देवीच्या दर्शनाची ओढ लागते. गडावरील देवीपर्यंत जाण्यासाठी चारशे पायऱ्या आहेत. पण, पूर्वीच्या पायऱ्यांचे वैभव काही निराळे होते. त्या पायऱ्या नाशिकचे कोन्हेर, रुद्राजी व कृष्णाजी यांनी १७६८-९९ मध्ये बांधल्या होत्या. जुन्या पायऱ्यांनी जाताना सप्तशृंग स्वाभिनीचें मंदिर होते. खंडेराव दाभाड्याची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी १७१० साली या वरील पायऱ्या बांधल्या होत्या. या पायऱ्या बांधल्याचा उल्लेख एक संस्कृत व ४ मराठी अशा ५ शिलालेखातून या पायऱ्यावर कोरण्यात आल्या होत्या. मात्र नव्या पायऱ्या करताना हा ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. पादत्राणाशिवाय पायऱ्यांनी देवीच्या दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. नव्याने बांधलेल्या पहिल्या पायरीशेजारी म्हसोबा आणि गणपती मंदिर आहे. त्यानंतर रामटप्पा, कासव टप्पा, औदूंबर टप्पा त्यानंतर गणेश मंदिर व गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजवीकडे जुन्या मंदिराचे वाघाचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुजा पाठासाठीच्या जागेत तांब्याचा सिंह लक्ष वेधून घेतो. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून, शेंदुराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली १८ हातांची महिषासुरमर्दिनी सप्तशृंगी मातेचे मनोहारी रूप डोळ्यात साठवून पुन्हा त्याच वाटेने गड उतरतो. गडावरून परिसराचे मनोहारी रूप अनोखे वाटते.

पूर्वी गडावर १०८ कुंड असल्याचा उल्लेख आहे. त्यातील दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं अशी अख्यायिका आहे. जवळच जलगुंफा आहे. ही गुंफा देवीच्या लत्ताप्रहारानं निर्माण झाली आहे. त्यात पाणी साठलेले असते. कपारीत जलगुंफा व मत्स्यतीर्थ नावाचे कुंड आहे. पूर्व दिशेला दाजीबा मंदिरापासून जवळच सूर्यकुंड व कालीकुंड आहेत. ती पेशव्यांच्या सरदार छत्रसिंग ठोकेंनी बांधली आहेत. प्रत्येक कुंडाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. गड म्हणण्यामागे डोंगराची भव्यता एवढाच विषय सध्या अनुभवायला मिळतो. मात्र इतिहासात सप्तशृंगीगडाचा उल्लेख किल्ला म्हणूनही आला आहे. मार्कंड डोंगराकडील दिशेला थोडीफार तटबंदी पहायला मिळते मात्र आता किल्ला म्हणून खाणाखुणा दिसत नाहीत. गडाचे स्वरूप पूर्वी अगदी लहानशा खेड्यासारखेच होते. अगदी १९७५ पर्यंत गडावर काही मोजक्या वास्तू होत्या हे विजय भावसार यांचे दुर्मिळ छायाचित्रातून स्पष्ट होते. त्यावेळी नगारखाना, पुजारी निवास, श्री गुरूदेव आश्रम, आदिवासींचा पाडा, सिद्धेश्वर महादेव मंदिर, शिवालय तलाव, धर्मशाळा, सार्वजनिक विहीर, चांदवडकर धर्मशाळा व पुजारी निवास, मारूती मंदिर, दत्त मंदिर, गवळीपाडा, दीक्षित पुजारी वाडा, वरच्या आळीची आदिवासींची घरे, देवी ट्रस्टचे कार्यालय, शाळेच्या खोल्या व गावातील काही घरे व सप्तशृंगी गड एवढेच गडाचे स्वरूप होते. आता मात्र एक लहानसे शहर वसल्यासारखे वाटते.

सप्तशृंगी गडाला पौराणिक अन् धार्मिक महत्त्व आहे तेवढेच प्राचीन अन् ऐतिहासिक संदर्भही आहेत. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगितले जाते. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नवनाथांना प्राप्त झाली, असे म्हणतात. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध आला होता. तर सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वाम‌निी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते, असे सांगितले जाते. गडावर मार्कंड ऋषींनी तपस्या केली आहे तर संत गाडगे महाराज समाज प्रबोधनासाठी गडावर थांबल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात. देवीचे भक्त संत दाजिबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते त्यांची समाधी गडावर आहे. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळअष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव साजरे केले जातात. यात चतुर्दशीच्या रात्री गडाच्या शिखरावर मानकऱ्यांकडून ध्वज लावला जातो. ही प्रथा पाचशे वर्ष जुनी आहे. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. तसेच गडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. यासाठी प्रदक्षिणेचा मार्ग चांगला करण्यात आला. मात्र दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे हा मार्ग बंद आहे.

गडावरून दक्षिणेस दिसणारे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालय नावाचे कुंड गडाचे सौंदर्य वाढविताना दिसते. गिरिजातीर्थ किंवा शिवतीर्थ नावाने ओळखले जाते. त्याजवळच एक हेमाडपंती मंदिर आहे. त्याला सिद्धेश्वर महादेव मंदिर असेही म्हटले जाते. मंदिराच्या आजूबाजूला मंदिराचे अनेक अवशेष विखुरलेले पहायला मिळतात. मंदिरातून बाहेर पडताना उजव्या हाताला शिवतीर्थात अनेक प्राचीन मूर्ती मांडलेल्या दिसतात तर डाव्या हाताला बारव व अनेक लहान मोठ्या समाधी आहेत. त्यामागे आदिवासींच्या वीरगळी व चीरा पहायला मिळतात. जवळच गंगा आणि यमुना ही दोन्ही कुंडे आहेत. शिवतीर्थाजवळील सिद्धेश्‍वर मंदिर, मारुतीचे, गणपतीचे, देवीच्या डोंगराच्या मागील परशुराम मंदिर आहे. गणेश मंदिरात मंदिराबाबतचा एक शिलालेख आहे. सप्तशृंगगडाचे निसर्गसौंदर्य अफाट आहे. दुर्मिळ औषधी वनस्पतींचा हा डोंगर खजिना मानला जातो. तरीही गडावर सागाचे झाड, नाग व कावळा याचे अस्तित्व नसल्याचे दिसते सप्तशृंगी ट्रस्टने भाविकांची चांगली व्यवस्था ठेवल्याचे सुदर्शन दहातोंडे सांगतात.

शिवालयापासून जवळच शीतकडा आहे. येथील दरी बाराशे फूट खोल आहे. याला शीतकडा किंवा सतीचा कडा असेही म्हणतात. एखादी वस्तू कडावरून पडली तर तिचे शीतासारखे तुकडे होतात म्हणून याला शीतकडा म्हटले जाते. या शीतकड्यासमोर मार्कंडेय पर्वत उभा आहे. मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेऊन सप्तशृंगी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयाच्या दिशेने जाताना ट्रस्टच्या धर्मशाळेमागील महाकालिश्वर मंदिराकडे जाता येते. पूर्वेकडील श्री महाकालिश्वर मंदिराचे पूर्ण बांधकाम काळ्या दगडात झालेले आहे. गुजरात राज्यातील धरमपूर येथील सूरतच्या एका राजाने या मंदिराची उभारणी केली. आपला घात होईल, या भीतीपोटी राजा गडावर आला होता. तेव्हा त्याला ‘समाधी’ नावाचा वैष्णव भेटला. तेव्हा त्याने गडावर महादेवाचा नंदी बांधण्याचा संकल्प केला होता. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तेथे विधिवत शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वीच राजाचा वध झाला, अशी मंदिराविषयी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाजूला राजाची पडझड झालेली समाधी आहे. जवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विटांची सुरेख बारव आहे. या बारवेचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. मात्र हे मंदिर उपेक्षितच राहिले आहे. मंदिर पाहण्यासाठी येथे जाण्याची कोणतीही सोय नसल्याने अनेकांना हे मंदिर पाहता येत नाही. तसेच ते काट्याकुट्यांनी वेढलेले आहे. मंदिर पर्यटकांसाठी खुले करायला हवे.

महाकाल‌श्विर मंदिराजवळच गणेश कुंडात श्रीगणेशाचे मंदिर आहे. तर त्या शेजारी आणखी एक कुंड आहे. या दोन्ही कुंडाचे पाणी नागरिक वापरतात. या कुंडातून लग्नसमारंभात लग्नाची भांडी येत असल्याची आख्यायिका प्रसिद्ध असल्याचे राजेश गवळी सांगतात. सप्तशृंगीगडाने अनेकांना लढण्यासाठी बळ दिलेले आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे भिक्षुकी करणारे १७-१८ वर्षांचे युवक बाळंभट्टदादा देवधर निफाड तालुक्यातील कोठूरे गावचे. एकदा निजामाच्या मल्लांशी लढण्यासाठी पेशव्यांचे मल्ल असमर्थ ठरल्याने हे आव्हान बाळभट्टांनी स्वीकारले व भक्तीशक्ती प्रतिक होण्यासाठी सप्तशृंगीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली. यावेळी कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभट्टदादांना वर दिला की प्रत्यक्ष मारुतीराय त्यांना दर्शन देऊन कुस्तीचे डाव शिकवतील. त्याप्रमाणे साक्षात बजरंगबलींनी त्यांना दृष्टांत दिला व एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले. बाळंभट्टदादांची ही विद्या पुढे मलखांब म्हणून प्रसिद्धीस आली. मात्र ही विद्या त्यांना सप्तश्रृंगी गडावर मिळाली याचा मागमूसही गडावर आता मिळत नाही. गडाच्या परिपूर्ण माहितीसाठी तसेच गडावर येणाऱ्या प्रत्येकाला गडावर आल्यावर काय काय पाहता येईल, यासाठी छोटी माहिती पुस्तिका मिळाली तर गडाचा इतिहास अन् माहात्म्य या बरोबरच पर्यटन या अंगानेही विकासाला संधी आहे. म्हणूनच भक्तिशक्तिचे रूप असलेल्या सप्तशृंगी गडाबद्दल संत निवृत्तीनाथ पांडुरंगाची आळवणी करताना म्हणतात..

आता खरे चला तुम्ही सप्तशृंगा //

कार्य पांडुरंग सिद्धीस न्यावे //


pandharichivari.com

सप्तशृंगी माता- वनी | Saptashrungi Mata-Vani » पंढरीची वारी


देव देवतांची आणि संत महात्म्याची भूमी असलेल्या महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची आणि संतांची मंदिरे आहेत. त्यापैकीच एक गोदावरी तीरावर नाशिक पासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात आदिमाया शक्ती सप्तशृंगी मातेचा Saptashrungi Mata -vani गड आहे. सुमारे 4569 फूट उंचीवर असलेला हा सप्तशृंगी मातेचा गड नाशिक जवळील कळवण तालुक्यात वनी येथे नांदुरी गावाजवळ सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत आहे.

ब्रह्मदेवांच्या कमंडलू मधून गिरीजा नदी उत्पन्न झाल्याचे सांगितले जाते. महिषासुराला मारताना देवीने धारण केलेले अठराभुजा रूप आपणास येथे पाहावयास मिळते. येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू असून मंदिराच्या गाभाऱ्याला असणाऱ्या तीन दरवाजांना शक्तीद्वार,सूर्यद्वार आणि चंद्रद्वार अशी नावे दिलेली आहेत. विशेष म्हणजे या तीनही दरवाजा मधून देवीचे दर्शन घेता येते.तसेच सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाण्याचा आणि परत मागे येण्याचा अशी वेगवेगळी दोन मार्गे आहेत. दोन्हीही मार्ग मजबूत पायऱ्यांनी बनवलेले असून गडावर जड वस्तू नेहण्यासाठी लिफ्ट ची सोय केलेली आहे.

भागवतामध्ये आदिमाया शक्तीची 108 शक्तीपीठे सांगितलेली आहेत. त्यातील आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत. त्यापैकीच हे अर्धे शक्तीपीठ आहे. देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी देवी या सप्तशृंगी गडावर राहिल्याचे पौराणिक कथेत सांगितले जाते. त्याचप्रमाणे राम आणि सीता येथील आरण्यात वनवासात असताना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आल्याचेही काही ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तसेच राम आणि रावण यांच्या युद्धात इंद्रजीताच्या शस्त्र माऱ्यामध्ये रामाचे बंधू लक्ष्मण धारातीर्थ झाले असता हनुमंत राया ने द्रोणागिरी पर्वत उचलून चालवला होता याचा काही भाग खाली पडून सप्तशृंगी गड तयार झाल्याचे एका कथेत सांगितले जाते.

तसेच भगवान दत्तात्रेय महाराज आणि भगवान महादेव अरण्यात फिरत असताना त्यांना अरण्यात कोणीतरी तपश्चर्या करीत असल्याचे समजताच त्यावेळी महादेव दत्तगुरूंना ते पाहण्यासाठी पाठवतात आणि दत्तगुरू त्यांना महादेवाकडे घेऊन येतात. व दत्तगुरु आणि महादेव त्याला म्हणतात की तुझी सर्व इच्छा सप्तशृंगी माता पूर्ण करेल. याचाच अर्थ त्यावेळी सुद्धा सप्तशृंगी मातेचे स्थान या गडावर होते. असे नवनाथ भक्तिसार या पोथीत वर्णन केलेले आढळते. तसेच शाबरी विद्या ची सुरुवात याच सप्तशृंगी गडावरून झाल्याचे सांगितले जाते. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तशृंगी मातेचि कठोर उपासना केल्याचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात सांगितले आहे.

महिषासुर नावाच्या राक्षसाने भगवान शिव शंकरांच्ची घोर तपश्चर्या नंतर देव,दानव, मानव अशा कोणाकडूनही त्याचा मृत्यू  होणार नाही असा वर मिळवलेला होता. परंतु वर देताना ब्रह्मदेवांनी स्त्री असा उच्चार केला नव्हता. ह्याच महिषासुर राक्षसाने पुढे पृथ्वीवर भयंकर अन्यायाचा हैदोष माजवला होता आणि त्याने पुढे स्वर्गावरही आक्रमण करून इंद्रदेवांनाही हाकलून लावले होते. अशातच सर्व देव,ऋषीमुनी, साधू, आणि संत एकत्र येऊन भगवान शंकरांकडे गेले आणि या जाचातून वाचण्याची या सर्वांनी देवांना विनंती केली. परंतु महादेवाने मी त्याला मारू शकत नाही कारण त्याने ब्रह्मदेवांकडून  वरदान मिळालेले आहे.

हे काम फक्त आता पार्वती देवीच करू शकते असे सांगून पार्वती देवीकडे त्यांनी हे काम सोपवले. देवांच्या आज्ञेने पार्वतीने भयंकर असे रुद्र रूप धारण करून याच सप्तशृंगी गडाजवळ महिषासुराचा वध केला. आणि देवी विश्रांतीसाठी सात शिखरे असलेल्या सप्तशृंगी गडावर जाऊन बसली. या गडाला सात शिखरे असल्यामुळेच सप्तशृंगी गड असे नाव पडले. देवीला तेथे सप्तशृंगी माता असे म्हटले जाऊ लागले. या ठिकाणी देवीची वारा प्रमाणे आभूषणे ठरवले जातात. वर्षभर या देवीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मुख्य मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे पाचशे ते सहाशे च्या दरम्यान पायऱ्या चढाव्या लागतात.

देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून तेथील एका डोंगराला महिषासुराला मारताना देवीचा बान लागला होता ती खून म्हणजे डोंगराला पडलेली चीर तेथे पाहावयास मिळते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीची आठ फूट उंचीची भव्य दिव्य आणि प्रसन्न अशी मूर्ती दिसते. देवीच्या 18 हातामध्ये वेगवेगळी अविधे आहेत. डोक्यावर सुवर्ण मुकुट, कानामध्ये कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, कमरपट्टा पायात तोडे, गळ्यात आणि अंगावर विविध अलंकार देवीला घातलेले आपल्याला दिसतात.

वर्षभरात देवीचे प्रमुख तीन उत्सव साजरे केले जातात. त्यातील पहिला शाकंभरी पौर्णिमा उत्सव, दुसरा चैत्र नवरात्रीचा आणि तिसरा आश्विन नवरात्रीचा उत्सव सप्तशृंगी गडावर साजरा केला जातो. या तीनही वेळेस विविध तीर्थक्षेत्रावरून कावडीने पाणी आणून देवीचा अभिषेक केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखलं जातं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजदेखील सुरतेची लूट केल्यानंतर देवीच्या दर्शनाला येथे आले होते असे सांगितले जाते. हे तीर्थक्षेत्र 14000 वर्षांपूर्वीचे असून महर्षी मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशृंगीची संकल्पना मांडली ती याच शिखराजवळ.

येथे पहाटेची काकड आरती झाल्यानंतर देवीची पूजा केली जाते. पूजेनंतर देवीला वस्त्र चढवले जातात. देवीची मूर्ती उंच असल्यामुळे देवीला पैठणी किंवा अकरा वार शालू नेसवला जातो. देवीला नेसवल्या जाणाऱ्या पैठणीचे प्रत्येक दिवसानुसार रंग ठरवलेले असतात. सोमवारी पांढरी, मंगळवारी हिरवा, बुधवारी जांभळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळा शनिवारी लाल आणि रविवारी गुलाबी रंगाचा शालू देवीला नेसवला जातो. भाविकांना ज्या दिवशी पूजा करायची आहे त्यानुसार साडीचा रंग सांगितला जातो. सोन्याचे विविध दागिने देवीला घातले जातात.नवग्रहांची शक्ती देवी मध्ये असल्यामुळे त्यानुसार आधी मायेचा शृंगार केला जातो.

वारानुसार कुंकू लावले जाते. सोमवारी ओम किंवा बेल पान, मंगळवार आणि बुधवार पिंपळपान, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी गोल पाकळी,शनिवारी शंख आणि रविवारी सूर्य अशाप्रकारे वारानुसार देवीला कुंकू लावले जाते. दीड ते दोन तास सुरू असलेली ही पूजा मन अगदी प्रसन्न करते. रामनवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची गर्दी वाढू लागते. खानदेश मधून येथे बरीच मंडळी पायी दिंडीत येत असतात. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांची एक छबिना मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

गडावर असलेल्या शिवालय तलावावर स्नान करून त्यांनी सोबत आणलेल्या मूर्तींना शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करत अर्धनारी नदेश्वर देवीचे पूजन करून छबीन्याला  सुरुवात होते. सप्तशृंगी माता,यल्लमा माता आदि देवींच्या मूर्तींना साज चढवून नैवेद्य साडीचोळी आणि पूजा करून त्यांचा छबिना काढण्यात येतो. शिवालय ते सप्तशृंगी मंदिराच्या पहिल्या पायरी पर्यंत डफांच्या निनादात या मिरवणुकीत भक्तिरसात नाहून निघालेल्या या तृतीयपंथी मिरवणुकीत वाद्याच्या तालावर ठेका धरत नृत्य करतात. याचप्रमाणे महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये ही देवीची विशेष पूजा होते .

येथील देवीची मूर्ती झुकलेली का आहे याविषयी एक कथा आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली होती. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक आणि पुराने ऐकवायचे आणि म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून झुकलेली असायची. म्हणून देवीची मूर्ती येथे झुकलेली आहे. मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 210 किलोमीटर असलेल्या या तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी आलेले भाविक नाशिक जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांनाही भेट देतात. जसे की भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र यापैकी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक  असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक मधील त्रिशीमाही पठारावर वसलेली जैन राजे यांनी बनवलेल्या पांडवलेणी गुफा. येथे जवळजवळ 24 लेण्या आहेत.

जैन शिलालेख आणि कलाकृती या व्यतिरिक्त येथे एक बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट असलेला दूध सागर धबधबा आणि देशातील सर्वात मोठा धार्मिक जमाव म्हणजे बारा वर्षातून चार वेळा भरला जाणारा लोकप्रिय कुंभमेळा, तसेच नाशिक मधील प्रसिद्ध धार्मिक स्थान म्हणजे 1794 मध्ये गोपीबाई पेशवे यांनी बांधलेले कालाराम मंदिर, तसेच ऐतिहासिक अत्यंत महत्त्वाचे स्थान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेले भगुर, बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला असलेले प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिर,तसेच सुला वाईन यार्ड आणि शिक्का संग्रहालय, तसेच हरिहर किल्ला अशा अनेक धार्मिक आणि पर्यटनीय स्थळांना येथे आलेले भाविक भेट देतात.





dnyanbatukaram.com

सप्तश्रृंगी देवी मूळ रुपात

See author's posts

मूर्तीचा काढला ११०० किलो

शेंदूर; देखभालीचे काम पूर्ण

वणी (नाशिक) : सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरून ११०० किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आई सप्तशृंगी देवीचे मूळ रूप आता पहिल्यांदाच समोर आले आहे. मूर्ती संवर्धन आणि देखभाल कामकाजामुळे दीड महिना देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचं दर्शन आता भाविकांना होत आहे.

भगवती मूर्ती संवर्धन आणि देखभालीसाठी मागील दीड महिन्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले गेले आहे. आता हे मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर आई भगवतीच्या रुपात झालेला मोठा बदल पाहायला मिळत आहे. मूर्तीचा एकदमच कायापालट झालेला दिसून येत आहे.

मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भगवतीच्या स्वरुपावरील गेल्या कित्येक वर्षांपासून साचलेले शेंदूर लेपनाचे कवच धार्मिक, शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आले. यानिमित्ताने ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केले गेले. त्यानंतर पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्र पूर्वी होणार आहे. २६ सप्टेंबर घटस्थापनेपासून देवी दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी सप्तशृंगी देवीचे मंदिर मूर्ती संवर्धन आणि देखभालासाठी बंद करण्यात आले होते. या दरम्यान वणी येथे सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मंदिराची संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे मूर्ती संवर्धन आणि मंदिराचे काम अशा दोन्ही कामांसाठी आणखी काही कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात भाविकांना पहिल्या पायरीच दर्शन उपलब्ध होते.श्री भगवतीची मूर्ती जवळपास १० फूट उंच आणि ८ फूट आकारात आणि एकूण १८ हातांत भिन्न प्रकारातील अस्त्र, शस्त्रे असून, त्यात उजव्या हातात खालील बाजूकडून वरील बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, तर डाव्या हातात खालील बाजूकडून वरील बाजूकडे कमंडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड शक्ती, पाष, घंटा, शेख आहे. ही शस्त्र-अस्त्रे विविध देवदेवतांची प्रतीके असल्याचे म्हटले जाते.

श्री भगवतीची मूर्ती अतिप्राचीन आणि विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे. वर्षानुवर्षे त्यावर शेंदूर लेपन सुरू आहे. तसेच सप्तश्रृंग गडावरील वातावरण, देवीच्या डोंगरावर असलेले मंदिर आणि त्यातून होत असलेले पाण्याचे झिरपणे यामुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोहोचत असल्याचे पुजारी वर्गाच्या लक्षात आले होते. पुरोहितांनी २०१२-२०१३ मध्येच विश्वस्त मंडळाकडे मूर्ती संवर्धनाची मागणी करीत पाठपुरावा केला होता. त्यानुसार सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने सर्व पुरातत्व विभाग, आयआयटी पवई यांचे अहवाल आणि प्रशासकीय परवानगीने पुरातत्व विभागाची मान्यता असलेल्या अजिंक्यतारा कन्सल्टन्सी, नाशिक या संस्थेमार्फत संवर्धनाचे काम सुरु केले होते.




वणी - नांदुरी (१३ कि.मी) दर अर्ध्या तासाला बसेस आहेत. नांदुरी-सप्तशृंगी हा १० कि.मी. चा रस्ता पूर्ण घाटरस्ता आहे. नांदुरी मधून जीप सेवा उपलब्ध आहे. सप्तशृंगी गडाचा घेर हा मोठा आहे. नांदुरी पासून साधारण २० मिनटात सप्तशृंगी गडा च्या पठारावर येऊन पोहोचतो. पठारावरून मंदिरात जायला २ पयाय उपलब्ध आहेत , एक म्हणजे पायगाडी, ४५०-५०० पायऱ्यांची तंगडतोड केल्यावर साधारण अर्ध्या तासात आपण मंदिरात पोहोचतो . भाविकांच्या सोयीकरिता सध्या सप्तशृंगी पठार ते देवीचे मंदिर इथपर्यंत ६० माणसांची क्षमता असलेली फ्युनिक्युलर ट्रॉली बसविण्यात आली आहे. फ्युनिक्युलर ट्रॉली मुळे हे अंतर अवघ्या ८७ सेकंदात पार करता येते. याचे सध्याचे तिकीट ७० रुपये आहे.



सप्तशृंगी गडाला वाणीचा गड असेही ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील एक असलेली हि देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे. लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान असलेलं सप्तशृंगी येथे दार वर्षी साधारण ३५-४० लाख भाविक दर्शनासाठी येतात.

सप्तशृंगी
२०१५ मध्ये ट्रॉली चे काम चालू असल्या कारणाने मंदिर व मार्केट पूर्ण पणे बंद होते .आम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागले. गडाच्या समोर रौद्र मार्कंड्या लक्ष वेधून घेतो. आल्या वाटेने आता आम्ही दरेगाव मध्ये पोहोचलो. आजचा मुक्काम दरेगावात करणार होतो. साधारणतः संध्याकाळचे ५. वाजत आले होते, आकाश पूर्णपणे निरभ्र होते, सूर्यास्ताच्या वेळेस आकाशातल्या तांबूस छटा मनाचं समाधान करत होत्या. मावळत्या सूर्याला वंदन करून दरेगावात पोहोचलो. 

पौर्णिमा समाप्तीचा चांदोमामा 
रात्री प्रचंड थंडीत ३००-४०० आदिवासांच्या सानिध्यात डोंगरीदेवाचा उत्सव साजरा केला. रात्री बाजरीची भाकरी आणि मुगाचं वरण असा प्रसाद घेतला आणि कुडकुडत झोपी गेलो.

डोंगरीदेव


 




सप्तशृंगी

आता आजच्या दिवसातला आमचा तिसरा टप्पा बाकी होता. दुपारचे ३.३० झाले होते, वणीची देवी  "सप्तशृंगी" च्या दिशेने निघालो. कोल्हेर, अहिवंतवाडी, दरेगाव, नांदुरी पेठे घालत आम्ही वाणीच्या मार्गे लागलो. दगड पिंपरी ते वाणी हे साधारण २४ किमीचे अंतर आहे. ४.३० वाजता आम्ही वाणीच्या मंदिरापाशी पोहोचलो. येथे येताना एक सुंदर घाट लागतो, रास्ता एकदम हायवे सारखा चकाचक आणि मोठा. घाट चढुन वरती आल्यावर एक मोठे पठार लागते. येथून समोरच मार्कंड्या, रवळ्या आणि जवळ्याचे उत्तम दर्शन होते. आम्ही आलो तेंव्हा मंदिराचे काम चालू होते. भले मोठे रेलट्रॅक उभे करून सामानाची वाहतुक सुरु होती. आम्ही पायथ्यापासुनच देवीचे दर्शन घेतले आणि परत निघालो.






आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. कुठलातरी सण सोहळा होता, उत्सुकता वाढलेली आणि गावातील लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ह्याला डोंगरीदेव किंवा डोंगरसण म्हणतात. मोठ्या जल्लोषात तयारी चालु होती. डोंगरीदेव सणाबद्दल खालील ब्लॉगवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

http://saketghanekar1.blogspot.in/2017/11/blog-post_86.html
 
 


देवी सप्तशृंगी : अठरा पुराणांपैकी 6 पुराणांमध्ये भगवतीच्या आयुधांचा उल्लेख

महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा


नाशिक :
आदिमाया-आदिशक्ती भगवतीला आयुधे कोठून मिळाली? ही आयुधे कोणत्या देव-देवतांनी दिली? या प्रश्‍नांची उत्तरे नाशिकचे स्मार्त चुडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी दिली. अठरापैकी सहा पुराणांमध्ये भगवतीच्या आयुधांचा उल्लेख आढळतो.

त्यात श्रीदुर्गा सप्तशतीमधील अध्याय दुसरा, श्रीउत्स वैकृतिक रहस्यमधील श्‍लोक ७-१३, श्रीमार्कंडेय, श्रीविष्णू धर्मोत्तर, श्रीदेवी भागवत, ब्रह्मवैवर्त या पुराणांचा समावेश असल्याचे श्री. भानोसे यांनी सांगितले.


महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा रूप धारण केलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीच्या मूर्तीकडे प्रदक्षिणा क्रमानुसार उजव्या बाजूला खालून वरच्या भागात आणि नंतर डावीकडून वरून खालील भागात पाहिल्यावर आपल्याला आयुधांची निश्‍चित माहिती मिळते. लांब पल्ल्यासाठी वापरले जाते ते अस्त्र आणि कमी पल्ल्यासाठी वापरले जाते ते शस्त्र. अशा अस्त्र अन् शस्त्रांना आयुध संबोधले जाते. या आयुधांचा देवीच्या उजव्या बाजूने खालून वरच्या भागात पाहावयाचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : वज्र (इंद्र), चक्र (भगवान विष्णू), मुसळ (विश्‍वकर्मा), बाण (वायुदेवता), त्रिशूल (शंकर), मुदगल (विश्‍वकर्मा), अंकुश (विश्‍वकर्मा), परशू (विश्‍वकर्मा), तलवार (कालदेवता). देवीच्या डाव्या बाजूने वरील भागातून खालील भागातील आयुधांचा क्रम पुढीलप्रमाणे असून (पुराणातील उल्लेखानुसार कंसात ते आयुध दिलेल्या देवांचे नाव दर्शवते) : ढाल (कालदेवता), कालदंड (यम), पाश (वरुणदेवता), तर्जनी (विश्‍वकर्मा), डमरू (शंकर), धनुष्य (वायूदेवता), घंटा (इंद्र), पानपात्र (कुबेर), शक्ती (अग्निदेवता). श्री. भानोसे यांना पुराणाचा अभ्यास आणि संशोधनातून ही माहिती मिळाली आहे.

मूळ मूर्तीमधील आयुधांचा क्रम बदलून मधल्या कालखंडातील मूर्तीच्या आयुधांचा क्रम केव्हापासून अस्तित्वात आला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते गूढ आहे. कोणतीही गोष्ट तर्काने अथवा अनुमानाने सिद्ध होत नाही. निश्‍चित सिद्धांत होत नाही. विद्वान त्यावर संशोधन करत आहेत. लवकरच त्यासंबंधीचे सिद्धांत पुढे येतील, अशी आशा करू या. तरीसुद्धा मूळ मूर्तीच्या हातांमधील आयुधे डामर तंत्रानुसार आणि मधल्या कालखंडातील मूर्तीच्या हातातील आयुधे ही श्री वैकृतिक रहस्य ग्रंथानुसार शास्त्रोक्त आहेत. त्यामुळे दोन्हीही वेळच्या आयुधांच्या मूर्ती या शास्त्रोक्त आणि नित्यपूजेतील पूजनीय आहेत. म्हणून दोन्हीही रूपे पूजनीय आहेत. मूळ मूर्तीचे रूप त्रिशूळाने महिषासूर वध करतानाचे आहे. भगवतीच्या पायाखाली महिषासुराचे धड आणि शीर हे पाचशे पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूला आहे, असेही श्री. भानोसे यांनी स्पष्ट केले.

मराठा कालखंडानंतर मोठे काम
भगवती मूर्तीच्या खालील बाजूला चौथरा संवर्धनाच्या कामात आढळून आला. हे काम इसवी सन १७६८ मध्ये झाल्याची नोंद पेशवेदप्तरात आहे. या चौथऱ्याकडे पाहताना डाव्या बाजूला कमळ, मध्यभागी पिंडी, वरील भागात दोन पोपट, मधल्या भागात गणपती आणि त्याखाली दोन गजराज, उजव्या बाजूला कमळ, त्यात मध्यभागी शंभू महादेवाचे वाहन वृषभ, त्यावर दोन पोपट असे सुंदर नक्षीकाम करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते, असे सांगून श्री. भानोसे म्हणाले, की मराठा कालखंडानंतर प्रत्यक्ष भगवती मूर्तीच्या संबंधाचे मोठे काम आता झाले आहे. संवर्धन कामानिमित्त विविध पूजापाठ, आराधना करण्यात आली आहे. मूर्तीवरील लेपन काढण्यापूर्वी कलाकर्षण विधी झाला. मग मूळ मूर्तीचा कलातत्त्व पुनर्विन्यास विधी, उदक शांती, आघोर होम, मुख्य देवता मंत्रजप, मुख्य देवता मंत्रहोम, जीवकला न्यासविधी, तत्त्वन्यास होम, जीवकला न्यास होम, श्रीसहस्त्रकलश महाभिषेक विधी करण्यात आला. आता स्थानिक २४ पुरोहितांच्या माध्यमातून मूर्ती नित्यपूजन सुरू आहे. अनुष्ठान केले जात आहे. सोळाशे देवी अथर्वशीर्ष पाठ, प्रतिदिन सोळाशे नवार्ण मंत्रजप, नित्यदुर्गा सप्तशतीपाठ करण्यात येत आहे. शिवाय दहा हजार संख्या पूर्ण होईपर्यंत दुर्गा सप्तशतीचे पाठात्मक आयुत चंडी महानुष्ठान सुरू आहे. मग पुढे सहस्त्रचंडी यज्ञ केला जाईल.

नित्यपूजनाच्या तीन पद्धती
भगवतीच्या मूळरूपाला नित्य पूजनात वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांमुळे हानी पोचू नये म्हणून नित्यपूजनाच्या तीन पद्धती उपलब्ध आहेत. त्यानुसार मूळ मूर्ती आरशात पाहून आरशावर नित्यपूजन करणे. त्याला ‘प्रतिबिंब पूजन’ असे म्हणतात. देशातील काही मंदिरांमध्ये ही पद्धत वापरली जाते. याशिवाय यंत्राचेही नित्यपूजन केले जाते. राज्यातील आदिमाया-आदिशक्तीच्या आद्यपीठ स्थानात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीनुसार उत्सवमूर्ती तयार करून तिचे नित्यपूजन करता येऊ शकेल, असा मुद्दा आतापर्यंतच्या इथल्या मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने झालेल्या विचारविनिमयातून पुढे आला आहे. श्री सप्तशृंग निवासिनी विश्‍वस्त मंडळातर्फे उत्सवमूर्ती चांदीची तयार करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी भगवतीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती तयार केली जाईल. दरम्यान, समाजामध्ये सात्त्विकता वाढावी, या उदात्त हेतूने व भाविकांचे कल्याण व्हावे म्हणून पेशव्यांनी शास्त्रोक्त षोडशोपचार पूजा सुरू केली. ही शास्त्रोक्त पूजा त्रिकाळ नैवेद्य, आरतीसह यथासांग व्हावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

''श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्तीचे स्थान हे लेणी की गुहास्वरूप आहे, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित होतो. पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांची माहिती आणि एकूणच भगवतीच्या मंदिराची रचना पाहता, अन्य शिल्प नसल्याने मंदिर हे लेण्यातील नाही. गुहा स्वरूपातील अखंड पाषणातील मंदिर आणि भगवतीच्या मूळ स्थानाची रचना आहे. त्याचप्रमाणे देशभरात पाषणातील मूर्ती मोठ्या आहेत, परंतु पूजेत असणारी देशातील सर्वांत मोठी मूर्ती श्री सप्तशृंग निवासिनी भगवतीची असल्याचा उल्लेख मूर्ती संवर्धनाचे काम सुरू असताना सातत्याने समोर आलाय.'' - शांतारामशास्त्री भानोसे, स्मार्त चुडामणि, नाशिक

 
 
 सप्तशृंग गड
 
महाराष्ट्रातील ५१ शक्तिपीठांपैकी साडेतीन पीठे ही प्रमुख मानली जातात. यांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि तुळजापूरची भवानी ही पूर्ण पीठे आहेत. तर वणी सर्वांत आद्य अर्धशक्तिपीठ मानले जाते. त्यामुळे वणीची देवी सप्तशृंग मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सप्तशृंग गडावरील सप्तशृंग माता हे उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. सप्तशृंग: सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखर. सात शिखरांचा पर्वत त्याला सप्तशृंग म्हणतात, येथील देवीला 'सप्तशृंग म्हणजेच जगदंबा' असे नाव देखील पडले आहे.
या सातही शिखरांवर प्रत्येकी इंद्राणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा व नारसिंह या सात देवता राहतात असेही समजले जाते. या सर्वांची थोरली माता 'जगदंबा' म्हणजेच सप्तशृंगीची देवी आहे. या सप्तशृंग किल्ल्याच्या निर्मितीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्याबद्दलची एक- रामरावण युद्धाच्या वेळी लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असताना या भागात त्याचे सात तुकडे खाली पडले आणि हे सात तुकडे म्हणजे सप्तशृंग पर्वत. सप्तशृंग गडावरील देवी ही स्वयंभू मानली जाते. त्याबद्दलची कथा ही अशी : एकदा एक धनगर गुरे चारत असताना वाट चुकला आणि इकडे आला. त्याला खडकात मधाचं पोळं दिसलं. त्यामधील मध काढण्यासाठी त्याने पोत्नात काठी खुपसली असतांना त्या काठीचा रंग शेंदरी झाला. मग हळूहळू मधाचं पोळ उतरवताना त्यामागे देवीची अस्पष्ट मूर्ती दिसायला लागली. धनगर जेव्हा गावात परतला तेव्हा त्याने ही नवलाईची गोष्ट चार-चौघांना सांगितली. मग गावकऱ्यांनी त्या जागेवर जाऊन संपूर्ण रंग खरवडून काढला, तेव्हा देवीचे संपूर्ण रूप त्यांच्या नजरेस पडले आणि स्थान निश्चित झाले.
सप्तशृंग देवीबद्दल आणखी एक कथा अशी सांगितली जाते की या देवीची नामार्कडेय ऋषींनी केली. त्याची साक्ष समोरचा मार्कंड्या पर्वत देतो. हे ऋषी विलास्तोत्रे आणि पुराणे ऐकवत असत. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय प्रायांनी एक यज्ञ केला, त्या यज्ञातून प्रसन्न होऊन ही देवी प्रगट झाली. काही कालानंतर या देवीने महिषासुराचा वध केला. पराशर ऋषींचा आश्रमही येथेच होता. श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा या देवीची उपासना केली होती. ज्ञानेश्वरीतही या गडाचा उल्लेख आहे, तर मच्छिंद्रनाथांचे इथे काही काळ वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. 'अष्टभुजा धरीली अष्टदशास्त्रे' असं सप्तशृंगी देवीचं भव्य रूप असणारी तिची मूर्ती आहे.
    जणूकाय अठरा हातात अठरा अस्त्रे धरून ती आपल्या खास पवित्र्यात उभी आहे. महिषासुर राक्षसावर तिने पाय ठेवला असल्यामुळे तिला महिषासुरमर्दीनी असे देखील म्हटले आहे. विशेष पवित्र्यात उभी असलेली ही मूर्ती एका खडकात असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्याची सोय नाही. जर प्रदक्षिणा घालायची असेल, तर संपूर्ण पर्वताला प्रदक्षिणा घालावी लागते. या प्रदक्षिणामार्गाची लांबी साधारणपणे साडेचार कि.मी. आहे. आता सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे इथे पोहोचायचे कसे?
   नाशिकपासून नांदुरी ५० कि.मी.वर आहे. नाशिक-कळवण रस्त्यावर नांदुरी गाव लागते. नांदुरीवरून सप्तश्रृंगी देवीच्या पठारावर जाण्यास 'मिनी बसेस' आहेत. याशिवाय खाजगी रिक्षा किंवा टेंपोची देखील सोय होऊ शकते. जर गाडीमार्गाने जायचे नसेल तर आपल्यासारख्या ट्रेकर्स मंडळींना पूर्वेकडून 'साठीच्या पायऱ्यांचा' एक मार्ग आहे. सध्या मात्र तो वापरात नसल्याने त्याच्या वाटेला न लागणेच योग्य आहे. दक्षिण बाजूस ३५० पायऱ्यांचा एक मार्ग थेट पठारावर जातो, तोच सध्याचा प्रचलित मार्ग आहे. सुमारे ११५ वर्षापूर्वी कोण्हेरे, कृष्णाजी आणि रुद्राजी नावाच्या तीन भावांनी या पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांवर पाच ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत. यांपैकी एक शिलालेख संस्कृतमध्ये आहे, तर इतर चार शिलालेख मराठीमध्ये कोरलेले आहेत. यात वर सांगितलेल्या तीन भावांशिवाय त्यांच्या वडिलांचा 'गिरमाजी' असा उल्लेख आलेला आहे. त्यात यांचे आडनाव 'रायराव' म्हणून आलेले आहे. ज्येष्ठ शके १६९० सर्वधारी संवत्सरापासून शुक्रवार, चैत्र शके १६९१ विद्रोही संवत्सरापर्यंत या पायऱ्यांचे काम चालू होते, असे उल्लेख आलेले आहेत. एकदा का पठारावर पोहोचलो की, हुश्श म्हणून चालणार नाही, कारण देवीच्या दर्शनासा अजून ४८० पायन्या चढून जायच्या बाकी असतात. या पायऱ्या इ.स. १७१० मध्ये उमाजी दाभाडे यांनी बांधल्या.
    सप्तशृंगी गडाच्या पठारावर भक्तांसाठी महाराष्ट्र ट्ररीझम डिपार्टमेंटची निवासस्थान उपलब्ध आहेत. याशिवाय काही खाजगी उपहारगृहे देखील बांधलेली आहेत. इथे देवीच्या मंदिराशिवाय अजून काही देवालये बांधलेली आहेत. यात प्रामुख्यान अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालयतीर्थ, सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. या शिवाय शीतकडा म्हणजेच सतीचे स्थान यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नवरात्रामध्ये इथे देवीची १५ दिवस मोठी यात्रा भरते. या वेळी चैत्रपौर्णिमेस सर्वात उंच शिखरावर देवीचे मुख्य स्थान आहे, त्या कड्यावर जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्याचा सोहळा केला जातो. प्रथेप्रमाणे दरेगाव येथील पाटील घराण्याकडे हा मान असल्याने ते लोक हा सोहळा करतात. चैत्र पौर्णिमेस रात्रीतून चढून पहाटे नवा ध्वज आणि दिवा लावतात.
किल्ला म्हणावी अशी एकही खूण आज इथे शिल्लक नाही. पूर्व बाजूस मार्कड्याच्या दिशेला थोडीफार तटबंदी काय तेवढी शिल्लक आहे. मात्र सप्तशृंग इथे किल्ला असल्याचे उल्लेख इतिहासात आलेला आहे.
सप्तशृंगीची देवी ऊर्फ वणीची किंवा गडावरची देवी ही उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने इथे भक्तांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल चालू असते.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून १४२० मीटर (४६६० फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी: सोपी
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याची गावे : वणी, नांदुरी
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर वणी गावातून गाडीने अर्धा तास
जवळचे एस.टी. स्थानक : वणी, कळवण, नांदुरी
राहण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय होऊ शकते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतूंमध्ये जाता येते.
किल्ला फिरायला लागणारा वेळ : किल्ला फिरायला १ तास पुरतो.
जवळपासची गावे : वणी, नांदुरी
 
 



माता सप्तश्रृंगी देवी



नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे.

सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

माता सप्तश्रृंगी देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

हे स्थान नाशिक जिल्ह्यात उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे.

देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. 

https://shantarambhoye.blogspot.com/2020/08/blog-post_29.html

------------------------------------------------------

Mother Saptashrungi Devi

There is a temple of Goddess Saptashrungi at Vani in Nashik district. Of the 108 peethas mentioned in the Puranas, it is half of the three and a half peethas of the Goddess in Maharashtra.

Saptashrungi is a fort in the state of Maharashtra, India. It is located near Nanduri village near Nashik and is the pilgrimage site of Saptashrungi Devi, the family deity of many families. The octagonal form of the goddess can be seen here. The temple has three gates namely Shaktidwar, Suryadwar and Chandradwar. Darshan of Goddess takes place through these three doors.

The idol of Goddess Saptashrungi is 8 feet high. This idol is covered with redlead. Here the goddess Saptashrungi holds different weapons in each hand. The goddess wears a sari eleven times and the choli wears three. On the head is a gold crown, earrings, nose. Also Mangalsutra and statues have been reached around the neck. The goddess is adorned with belts and legs.

This place is on the border of Dindori-Kalwan taluka at a distance of 55 km to the north in Nashik district. This place falls in the east-west range of Sahyadri. Located on the Sahyadri Plateau, this place is about 4569 feet above sea level.

There are 472 steps on one side to take darshan of Goddess. There is a climbing route and a return route on the other side after visiting. Both ways are steps. The temple of Goddess Saptashrungi opens at 5 am. Kakad Aarti was at six o'clock. The Mahapuja of the Goddess begins at eight o'clock. In this puja, the idol is adorned with Panchamrut bath, paithani or shalu. Offerings of pedas and various fruits are shown. The Mahanaivedya Aarti was at twelve o'clock. The neighbors are at 7.30 pm and the doors of the temple are closed.

 
  
तालुका : कळवण
 
जिल्हा : नाशिक
 
४७ ।। देवीमाहात्म्य
 
हा किल्ला नाशिक शहाराच्या ईशान्येला एका डोंगरावर बांधण्यात आला आहे. या किल्ल्यावरील श्रीसप्तशृंगी देवी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून ख्याती असलेल्या देवीच्या स्थानालाही सप्तशृंग हेच नाव असून ते कसे पडले याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत :
सात शिखरांचा डोंगर म्हणून याला सप्तशृंग असे म्हणतात आणि त्या शिखरांवर इंद्राणी, कार्तिकेयी, वराही, वैष्णवी, चामुंडा, शिव, नृसिंह या सात देवीदेवतांचे वास्तव्य असून श्रीजगदंबा किंवा श्रीसप्तशृंगी देवी ही त्यांतील मुख्य देवता आहे.
प्रभू रामचंद्र व दशानन रावण यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा रावणपुत्र इंद्रजित याच्या बाणाने रामबंधू लक्ष्मण जखमी झाला. त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती आणण्याकरिता हनुमानाला द्रोणागिरी पर्वतावर पाठवण्यात आले. पण त्याला त्या ओळखता येईनात. मग त्याने द्रोणागिरी पर्वतच जमिनीतून उपटून काढला आणि तो तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे जाऊ लागला. जाता जाता या परिसरात द्रोणागिरी पर्वताचे सात तुकडे पडले. हे सात तुकडेच सप्तशृंग पर्वत म्हणून पुढे प्रसिद्धीस आले.
एकदा एका धनगराचा मुलगा गुरांना चरवण्यासाठी या डोंगरावर आला. जसा सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसा तो गुरांना घेऊन परत जाऊ लागला. पण अंधारामुळे त्याला वाट सापडेना. धनगर वाट चुकला आणि एका गुहेत आला. तिथे त्याने रात्र काढण्याचे ठरवले. मग तो त्या गुहेत झोपला. दुसऱ्या दिवशी तांबड फुटल्यावर तो जागा झाला. क्षणभर त्याला कळेना की आपण कुठे
आहोत. मग तो इकडे-तिकडे बघू लागला. इतक्यात त्याला कातळावर असलेले मधमाश्यांचे पोळे दिसले. पोळ्यात किती मध आहे हे पाहण्यासाठी त्याने डोक्यावरून अंगावर घोंगडी लपेटून घेतली आणि हातातील काठी त्या पोळ्यात खुपसली. जेव्हा त्याने ती काठी बाहेर काढली तेव्हा त्या काठीला शेंदूर लागलेला होता. मग त्याने काळजी घेत सावकाशपणे ते पोळे उतरवले तेव्हा त्याला कातळात कोरलेली देवीची प्रतिमा दिसली! त्या देवीच्या प्रतिमेकडे पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो लगोलग तिथून निघाला अन् आपल्या गावात येऊन पोहोचला. त्याने साऱ्या गावकऱ्यांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला. मग गावकरी गुहेत आले आणि त्यांनी प्रतिमेच्या आसपासची जागा स्वच्छ केली तेव्हा त्यांना देवीचे कातळात कोरलेले मूर्त स्वरूप स्पष्ट दिसले. सात शृंग म्हणजे सात शिखरे असलेल्या डोंगरावर ही देवीची प्रतिमा आढळली म्हणून तिचे नाव सप्तशृंगीदेवी असे पडले आणि त्या स्थानाला नाव दिले गेले 'सप्तशृंगगड.'
सप्तशृंगगडावरील देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. महिषासुराचा वध करण्यासाठी जेव्हा त्यांनी यज्ञ केला तेव्हा देवी त्यांच्यावर प्रसन्न होऊन प्रगटली आणि तिने महिषासुराला ठार मारले. मार्कंडेय ऋषी सप्तशृंगगडाच्या समोरच असलेल्या पर्वतावर आश्रम बांधून राहत असत. ते दररोज सप्तशृंगगडावर येऊन देवीला पुराणातील कथा सांगत असत; देवीदेवतांची स्तोत्रं म्हणून दाखवत असत. त्यांचा आश्रम समोरच्या पर्वतावर होता. त्यामुळे त्या पर्वतालाही मार्कंडेय ऋषींच्या नावाने ओळखले जाऊ लागले.
 
।। दंतकथेतील तथ्यांश ।।
 
वरील दंतकथेला ऐतिहासिक साधनांमधून दुजोरा मिळण्याची शक्यता नाही.
 
 








 

Saptashrungi Bhramari Shaktipeeth - Saptshringi Temple Info


Saptashrungi Bhramari Shaktipeeth or Saptshringi Temple is a site of Hindu pilgrimage situated 60 kilometres from Nashik in the Indian state of Maharashtra. According to Hindu legends, each of the seven mountain peaks is home to the goddess Saptashrungi. Shrung refers to peaks, and sapta refers to seven. It is in the Indian village of Nanduri, Kalwan taluka, close to Nashik. The goddess is venerated by the Marathas and some Hindu tribes for a very long time, and some consider it to be their kuldaivat.

Places of Worship

Discover more

Hinduism

Geographic Reference

Places of Worship

Saptashrungi Bhramari Shaktipeeth is one of the 51 Shaktipeeth. The goddess of this temple is also called the goddess of seven hills. Every day devotees come from all over India for the darshan of Mother Saptashrungi Devi. The Devi is said to be swayambhu (self-manifested) on a rock on the sheer face of a mountain. She is surrounded by seven (sapta-in Sanskrit) peaks (shrunga-in Sanskrit), hence the name- Sapta Shrungi Mata (mother of the seven peaks).

Geographic Reference

Story Behind Saptashrungi Bhramari Shaktipeeth

The goddess of Dakshayani, Sati, Parvati, or Durga Hinduism’s most important woman and most powerful deity is called Shakti. Durga Devi, Mahakali, and Gowri are the three main manifestations of Shakti, the power goddess. She is Adi Shakti’s avatar.

Sati was the Prajapati Daksha’s daughter, and she married Lord Shiva despite Her father’s wishes. Prajapati Daksha once put together a massive yagya, but he didn’t call his daughter and son-in-law. Sati was very saddened by Her father’s actions. When she got there, her father ignored the Sati and insulted her. She could not bear the insult of his husband (Lord Shiva) and she jumped into the fire of Yagya and committed suicide. She passed away, but her body didn’t burn. Lord Shiva had taken His Virabhadra Rupa out of rage. Daksha’s head was cut off by him, but in the end, He forgave him by bringing him back to life.

Discover more

City & Local Guides

Tourist Destinations

Historical Sites & Buildings


Lord Shiva, devastated, had taken Sati’s body and wandered the universe. Finally, Lord Vishnu used His Chakra to break the Sati’s body into pieces. Each body part transformed into Shakti Pitha. The temple had emerged where the body part had fallen to the ground. In order to safeguard the Shakti Pitha, Lord Shiva created 51 Bhairava for each one.

Discover more

City & Local Guides

Hinduism

Historical Sites & Buildings

The temple is famous in Maharashtra as the ‘Three and half Shakti Peeth’. According to Hindu traditions, the goddess Saptashringi resident is located within seven mountain peaks. Sapta means seven and shrung means peak. The Goddess’s location is surrounded by the seven hills of Saptashringi, a mountain. which is commonly known as Ghads. Peaks average approximately 4500 feet in height on average.

Places of Worship

Saptashrungi Bhramari Shaktipeeth

Saptashrungi Bhramari Shaktipeeth is One of the 51 Shaktipeeth Temples. The goddess of this temple is called the goddess of seven slopes. In the Godavari river valley in Nasik city fell both parts of the chin of Goddess Sati. Saptashrungi Bhramari Shaktipeeth is also known as chibuka.

History of Saptashrungi Bhramari Shaktipeeth

Saptashrungi Devi is said to be Mahishasur Mardini, the buffalo-shaped demon who was killed by Saptashrungi. It is believed that the sage Markandeya wrote the Devi Mahatmya, a sacred book that praises Devi’s greatness and her accomplishments. Markandeya performed arduous penance on a hill opposite the one where Devi lives, which is now named after him.

Geographic Reference

Saptashrungi Bhramari Shaktipeeth

These eighteen hands of Devi are described by Akhyaika in the Devi Mahatmya. It is accepted that a savage evil presence named Mahishasura began to inconvenience everybody. By doing penance to Lord Brahma, Mahishasura got a boon of immortality. However, only a woman could cause Mahishasura’s demise. All the deities invoked Adishakti to kill Mahisharoor.

Places of Worship

Discover more

City & Local Guides

Hinduism

Tourist Destinations

Furthermore, the goddess battled with Mahishasura and killed him. Additionally, this took place on seven hills within the Saptshrungi Mata mandir. Vani devi (Saptashrungi Mata) is also known as Mahishasur Mardhini because of this. Devi was given 18 weapons from all the gods to kill Mahishasura. Additionally, she has 18 hands full of those 18 weapons.

The architecture of Saptashrungi Bhramari Shaktipeeth

The Devi is said to be swayambhu (self-manifested) on a rock on the sheer face of a mountain. She is surrounded by seven (sapta-in Sanskrit) peaks (shrunga-in Sanskrit), hence the name- Sapta Shrungi Mata (mother of the seven peaks).

Saptashrungi Bhramari Shaktipeeth

The design of the Saptashrungi Bhramari Shaktipeeth resembles that of the portico structure temples of the last centuries and is attributed to Satara Commander N Chief. The Vani Saptashrungi devi is decorated daily with a nose ring (Natni), crowns on her head, gold necklaces, and a colourful saree. Since the idol of Saptashrungi devi is 8 feet tall, she needs a 10.05-meter saree (11 varsadi) and 3-meter cloth for choli.

Saptashrungi Bhramari Shaktipeeth

The Devi is a massive figure that stands about 10 feet tall and has 18 hands holding various weapons. Sindoor, which is regarded as beneficial in this region, is always applied to the idol’s exterior. It holds weapons like Strings of Beads Battle Axe, Mace Arrow, Thunderbolt Lotus, Bow Water Pot, Cudgel Lance, Sword Shield, Conch Bell, Wine Cup Trident and Noose Spinning Disc which is known as the Sudarsana Chakra.

Facts about Saptashrungi Bhramari Shaktipeeth

  • Saptashrungi Bhramari Shaktipeeth is a Hindu temple situated near Nanduri village in Nashik. The temple lies atop the cliff with an altitude of 1,230 m.
  • The temple is dedicated to Goddess Saptashrungi. The temple is known popularly as one of the ‘three and a half Shakti Peethas’ of Maharashtra.
  • The temple is also one among the 51 Shakti Peethas located on the Indian subcontinent and is a location where one of Sati’s limbs, her right arm is reported to have fallen
  • The image of the Devi is huge-about 10 feet tall with 18 hands, holding various weapons.
  • The idol is always coated with Sindoor, which is considered auspicious in this region.
  • It is one of the most important of the places of Goddesses in Maharashtra. There is an old path with steps cut out of the mountain, which starts right at the foothills. However, now, a motorable road has been built, which goes up to an altitude of 1150 meters.
  • There are several other shrines close to the Saptashrungi temple. Some of these shrines include Jalagumpha, Kalikund and Suryakund, Shivtirtha, Markendeya Darshan, Tambultirtha and SatichaKada.
  • She is also known as Brahmasvarupini (“one who has the form of Brahma”). The goddess is reported to have appeared from the kamandalu (water pot) of the creator-god Brahma.

Festivals In Saptashrungi Bhramari Shaktipeeth

  • Durga Puja. (Winter) – Devotees celebrate Navaratri at this temple in the month of Ashwin (Sep-Oct).
  • Navaratri. (Summer) – They celebrate other Navaratri in the fortnight of the Chaitra (March-April). At each nine days, they worship Navadurga (nine Durgas).
  • Diwali – Diwali is one of the most admired and auspicious festivals in the town.
  • Gudhipadwa: Gudi Padwa is the festival that augments the new year and is usually celebrated on the first day of the Indian month of Chaitra according to the Hindu lunar calendar.
  • Chaitrotsav: The festival starts on Rama Navami (the ninth lunar day in the bright fortnight of the Hindu month of Chaitra) and culminates on Chaitra Poornima (full moon day), the biggest day of the festival.
  • Mahashivratri– Mahashivaratri is the day when the Shiva Tattva touches the earth. Shivaratri is like a new year for a saadhak (seeker).

How to Reach Saptashrungi Bhramari Shaktipeeth

Nashik is one of the major cities, districts, and pilgrimage centres in Maharashtra, India, and is thus well connected by road, rail, and air networks to all major cities in India.

Places of Worship

By Air: Ojhar Nashik International Airport is located just 24 km away from the city.

By Railway: The distance between Nashik Road Railway Station to Saptashrungi Bhramari Shaktipeeth is 4 Km by road while Nashik Railway Station is at a distance of nearly 78.8 kilometres from the Holy Temple.

By Road: There are regular bus services available for the temple. The buses run from the Nashik CBS bus stop. Reach Nashik and take a Taxi or Bus from Nashik City to Vani. You can go by your private vehicle to the top of Nanduri gad Nashik.

 
 
 SAPTASHRUNGI GAD-ROUTE    Image

Image

Earlier one had to walk through the pathway cut in the 1150mtrs high mountain.Image

ImageToday proper roadway has been constructed. Since this temple is located on the mountain regular buses run from Vani to the Gad. From the foot of the temple one has to climb 500 steps to reach the shrine. On way to the temple we get some interesting sights to see. On way, one can stop at the Maharashtra Engineering Research Institute (MERI) or at Sitakund, at Mhasrul village, where Goddess Sita used to have her bath. This location reveals stories and legends connected to the Ramayana.

SAPTASHRUNGI GAD

ImageSaptashrunga Gad  is 60 kms from Nashik. It is believed to be as one of the most visited and holy place in Maharashtra. Saptashringa defines the seven Mountain Peaks and Saptashrunga Gad is the place where Godess Bhagwati resides. Saptashrung Mountain which was a part of the Dandakaranya forest where, as per the story in the Ramayana, Lord Rama, along with Seeta had come to seek the blessings Amba. Variety of Medicinal plants can be seen along the periphery of this Gad. It is also mentioned that Lord Hanuman had taken the Herbal Medicine from this Gad Lord Laxmana was wounded. Approximately 108 water reservoirs are found on the hill reason for this is that the temple is located on the hill at an altitude of 1230 mtrs above the sea level. These Reservoirs are full of water throughout the year The natural beauty seen here is the point of attraction of the pilgrims. Towards the East one can see the Markandeya Hill. It is believed that after doing tapacharaya Sage Markandeya had written Devi Mahatmaya, part of Markandeya Puran. Towards the South is the Ganesh Temple.

FACILITIES

  • Recently this area has been renovated.
  • Railings are provided along the road side and the staircase for the safety of the pilgrims.
  • To protect the devotees from heat and rain Shed covers the staircase.
  • There are two separate routes for going up and coming down.
  • Benches have been provided at intervals so that devotees can take rest while climbing the 500 steps,.
  • For a night’s halt, Dharmashala having 200 rooms is available which is open from 6:00 in the morning to 11:00 in the night. The rooms are made available for one day only. Blankets and mattresses are made available for the pilgrims.

DHARAMSHALA Image

One can have meals in the Prasadalaya which is made available to the devotees in the morning from 11:00 am to 2:30 pm and in the night from 7:00 pm to 9:30 pm.

  • Sarees and expensive items which are to be offered to the Goddess have to be registered first in the Office located at the entrance.
  • Rest houses have been constructed by MTDC.
  • Entire pooja sahitya required for offering to the Goddes are available along the road side shops. Besides this cassettes, photos, etc are also available hereImage

             ROAD SIDE SHOPS

  • Priests are there to perform Pujas. They also make cheap and clean food available to the pilgrims in their houses
  • Temple is open from 6am to 8pm

HOLY PLACES FOR VISITING

KALI KUNDA & SURYA KUND   Image

In the ancient period there were 108 water reservoirs on the Saptashrungi Gad But today only10 to 15 water reservoirs can be seen. Remaining have been closed. While walking in the East direction from the Gad one can avail the Darshan of Lord Hanuman On moving few steps ahead we can see the Samadhi of Dajiba Maharaj Just close to this Samadhi are the Kali Kund and Surya Kund which were built by the Peshwai Sardar , Chatrasingh Thoke. Water of this reservoir is used daily for bathing the Goddess

SHIVTIRTH   Image

 This Shivalaya was initially constructed by Ahilyabai Holkar. It  is situated South of Saptashrungi Gad. It was later on taken up by the Trust. It is believed that by taking bath in this Shivalaya one gets relieved of all Diseases. Close to the Shivalaya one can visit Sidheswar Temple and Maruti Temple.

JALGUNF

This is a natural water reservoir. Its origin is from the feet of Goddess, Due to darkness here the quantum of water cannot be judged A three eyed fish can be seen here This reservoir is also known as Machateertha

TAMBULTIRTH

Towards the back side of Goddess Saptashrungi little towards the North is an Octagonal shaped Kund. Water of this kund is Red Reason for same is that Goddess after chewing the beetle leaves had thrown the same on this side. Part of the surrounding area also turned red. There is another tirth known as Kaajal Tirth where Goddess had washed her eyes after putting Kaajal.

SHEETAKADA    Image

On moving a little further from the temple one will come across a peak called Sheetkada and 1500 deep valley. It is said that a lady asked Goddess Bhagawati to bless her with a son and in case her wish was not fulfilled she had promised to jump into the valley sitting on a bullock cart. By the grace of Goddess Bhagwati she was blessed with a son. She had fulfilled her promise as made by her. Even today marks of bullock-cart are visible on the Sheetkada which is approximately 4638 feet from the sea level.

MARKANDEYA DARSHAN      Image

Goddess Saptashrungi faces East From here one can see the view of the Markandeya Hill. Initially the life of Sage Markandeya was very short but long lived by the blessing of Saptarishi Sitting on this Gad Markandeya used to tell Goddess stories of her bravery

SAPTASHRUNGI DEVI    

Image     Image

DEVI CHARAN YANTRA

Saptashrungi temple is located at Vani near Nashik. It is one among the 51 Shakti peethas  It is believed that this Devi is self-manifested on a rock(Svayambhu). Seven peaks surround the goddess, As such the Goddess is named as Sapta Shrungi Mata The Goddess is about 10 feet tall. She has 18 hands, holding 18 different weapons positioned to fight the demons. This Goddess is at a height, This enables her devotees to have her darshan from a distance too. The idol is always coated with Sindoor. Also known as Mahishasur Mardini, because she had killed Mahishasur demon  who had taken the form of a buffalo.  Just as  one starts climbing the steps, one can see the head of a buffalo, made in stone, which believed to be that of Mahishasur.
Image

Sparkling eyes,with Nath in the nostril and Veeda in the mouth increase the beauty of the Goddess. Rush of her devotees can be seen every Monday, Wednesday, Full Moon Day and during Navratri. 11 meter sari is used to cover the goddess.

The Holy Symbol

ImageA huge Trishul, which is the Holy Symbol of Shakti, can be seen at the beginning of the staircase

The Holy Flag

ImageThe Holy Flag of Goddess Bhagawati flutters in the north of Sapta Shrungi Gad. The ritual of hoisting the flag can be seen on a particular day

FESTIVALS CELEBRATED ON SAPTASHRUNGI GAD

Gudipadwa

Image

Gudi is erected in the morning on this day Mahapuja is offered along with Panchamrut Abhishek. All ornaments add to the beauty of the Goddess on this day

Chaitra Utsav

Chaitra utsav starts from Ram Navmi to Chaitra Pornima, when Panchamrut Snan is offered to the Goddess everyday,On this day the Holy Flag is also kept for the darshan

Gokulashtami

Image

On this day special pooja is done In the temple of Lord Krishna along the steps After this Mahapooja and Aarti of Saptashrungi Mata is done The program  concludes at 12 in the night

Navratri Utsav

Image

This utsav of nine days starts from Ashwin Shudha Pratipada and commences on the night of Kojagiri Pornimat by offering Mahapooja, Daily Shantipath, Saptashatipath and Mahapooja is done. Mahanaivedya of Pooran poli is offered to the Goddess everyday. On the Ninth day hom-hawan is done and Flag is hoisted on the Shikhar of the Mandir.On the tenth day there is program of purna-ahooti,

Kojagiri Utsav

Image

After Dushera kojagiri utsav is celebrated on a large scale at Saptashrungi Gad. On this day the Mahapooja is offered Holy water brought from the rivers Tapi, Narmada, Kshipra,and Godavari are used for bathing the Goddess. This is a traditional celebration of the moon and is also called the Kaumudi celebration It is believed that on this day Goddess Lakshmi goes from place to place asking “Who is awake?” showing pleasure on those whom she finds awake

Lakshmi Poojan

Image

On Lakshmipoojan day all the Ornaments of Goddess Bhagwati are brought to the office for worshipping. All poojaries are called to the office at the time of offering shantipath and dakshina is given to all pandits. Later on crackers are burnt

Harihar Milan

Image

On this day Abhishek is done on the Mahadeva’s Linga. After the Mahapooja of Goddess Bhagwati the program of HariHar Milan is done.

Mahashivratri

Image

On this day Panchamrut Mahapooja is performed at 10 in the night. After the Aarti at 12 in the night Prasad is distributed amongst the devotees.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...