मेथी ता. सिंदखेडा जि.धुळे या गावी मंदीराचा समुह आहे. यातील लक्ष्मी आणि नारायणाची मंदीरे आहेत. हि दोन्ही मंदीरे अनेक अर्थाने अद्वितीय आहेत. हि दोन्ही मंदीरे शेजारी असून १.८२ मीटर उंच जगतीवर उभी आहेत. मंदीरात प्रवेश करण्यासाठी दोन्ही मंदीरावर पायर्या आहेत. नारायण मंदीरासमोर गरुड असलेला मंडप होता हे दाखविण्यापुरते अवशेष शिल्लक आहेत. या मंदीरापैकी लक्ष्मी मंदीर काहीसे लहान असून त्याचा मंडपही जरा वेगळ्या प्रकारचा आहे.
या मंदीराच्या शैलीवरुन हे मंदीर इ.स. १२ व्या शतकात बांधले गेले असावे. धुळे शहरापासुन अवघ्या ४६ किलोमीटर वर मेथी हे गाव वसलेले असुन येथील अतिप्राचीन मंदिरांना अवश्य भेट द्या.
हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव | Discover Maharashtra

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –
खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)
पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.
काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.
एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.
येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.
शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .
शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.
हा प्रसंग जेथे घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत. आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.
या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.
कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.
अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत. हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .
पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .
या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.
ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।। ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.
हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.
या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.
भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.
सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.
येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.
बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.
पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.
पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.
श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे. पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.
काही असो, हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.
संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव
https://www.deshdoot.com/local-news/nasik/glory-of-malegaon-ancient-mahadev-temple
मालेगांव शहरातील ( Malegaon City ) काही वास्तू-स्थळांना ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यात मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे.
साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर ( Shri Mahadev Mandir- Malegaon )निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तिन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा व चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. भव्यता आणि दिव्यतेमुळे आपोआपच भाविक नतमस्तक होतात.
संपूर्ण पंचक्रोशीत या मंदिराला तोड नाही. मंदिराचे स्वरूप म्हणजे मुख्य गाभारा, ज्यात भव्य अशी शंकराची पिंड आहे. गाभार्यात दुर्गादेवीची सिंहारुढ मूर्ती नंतर बसविण्यात आली आहे. दुसरे नंदी सभागृह आहे. तेथे श्री गणेशाची शेंदुर चर्चीत भव्य पाच फूट उंचीची दगडी मूर्ती भाविकांना आशीर्वाद देत असते.
काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती साधारणपणे शिवलिंगासमोर सरळ रेषेत असलेली! ध्यानमग्न अवस्तेतील मुद्रा असलेली नंदीचा मुर्ती, नागांचे स्वतंत्र छोटेखानी दगडी मंदिर तसेच कासव व द्वारपालांच्या दगडी मूर्ती, मंदिराबाहेर महाबली हनुमानाची गदाधारी शेंदूर चर्चीत वीरमुद्रा असलेली मूर्ती व मंदिर.
मंदिराच्या भोवतालचा परिसर हा घडीव दगडी बांधकामाचा असून मोसमनदी किनारी दगडी घाट व पायर्या बांधलेल्या आहेत. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व एक भुयार आहे. राजपरिवारासंबंधीत काही समाधीसुद्धा आहेत. शहरीकरणाच्या विस्तारापूर्वी सदर घाटावर भाविक व जनता पिण्याचे पाणी भरण्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी येथेच येत असत.
मंदिर व्यवस्थापनासाठी गुरव परिवाराला पाचारण केलेले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी घरे व शेतजमीनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, हरी-हरभेट इत्यादी उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी असे. सदर मंदिरात आतापर्यंत असंख्य रूद्रपूजा, अभिषेक, होमहवन व आरत्या होऊन शिवलींग अत्यंत पावन व जागृत झालेले आहे. येथे भाविकांची निस्सीम व अढळ श्रद्धा आहे. असे वैभवशाली परंपरा असलेले मंदिर व परिसर कालांतराने काही प्रासंगिक व नैसर्गिक कारणांमुळे दुर्लक्षित झाले. अनेक पूर तसेच 1979 चा महापूर सुद्धा मंदिराने सहन केला.
गेले पावणे तीनशे वर्ष ऊन, वारा, पावसाचे आघात झेलून मंदिर व परिसराची दुरावस्था झाली होती. मंदिराचे दगड सुद्धा तुटून चोरीला गेले होते. परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. लोक परिसरात प्रात:विधी व गैरकृत्य करू लागल्यामुळे मंदिर बरीच वर्षे बंद राहू लागले. अधून-मधून उत्सवापुरते उघडले जात. मंदिराच्या वरच्या बाजूला शवविच्छेदनगृह होते. त्यामुळे भाविकांना परिसरात येण्याची भिती वाटे. काही वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिरात पुनश्च नित्य आरती, पूजापाठ सुरू केले. मंदिर व परिसराची देखभाल, पूजाअर्चा, उत्सव साजरे करून शहरातील भाविकांना मंदिराकडे आकृष्ट केले.
भाविकांनी एकत्र येऊन दैनंदिन पूजाअर्चा व उत्सव साजरे करण्यास हातभार लावत मंदिराची देखभाल, जीर्णोद्धार, उत्सव साजरे करणे व उदभवलेल्या समस्यांचे निस्तरीकरण आदी कार्य स्वखुषीने आपल्या खांद्यावर घेतले. नंतरच्या काळात पंकज रामेश्वर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची श्री महादेव सेवा समिती स्थापन झाली. त्यावेळी अनिल मोरे, सुनील मोराणकर, संजय जगताप, अनिल परदेशी, वसंत श्रीवास्तव, भिका साखरे, कैलास सोनवणे, मिलींद गवांदे, रमेश मंडाळे, सचिन जाधव, संतोष जाधव, नारायण गवळी, रणजीत भाटी, खेमचंद तलरेजा, राकेश पगारे, प्रसन्न शिनकार, गजानन शिरसाठ आदी अनेक कार्यकर्त्यांचे तन, मन, धनाने सहकार्य लाभले. सोबतच समितीच्या स्थापनेपुर्वीच्या ज्येष्ठ सदस्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत होते.
समितीने आत्तापर्यंत भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा आतुन व बाहेरुन संपूर्ण जीर्णोद्धार केला असून मुळ रचनेला कुठलाही धक्का न लावता प्राचीन वास्तूकला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.
महादेवाच्या पिंडीला सुद्धा वेळोवेळी डागडूजी करून आधी तांब्याचे कवच आणि सध्या पितळी कवच चढवण्यात आले आहे. बाहेरुन सुद्धा कळसाचे जीर्ण झालेले प्लास्टर काढून मुळ रचनेतच नवीन प्लॉस्टर व रंगरंगोटी झाली आहे. लोकप्रतिनिधी दीपक भोसले व अॅड. ज्योती भोसले, राजेश गंगावणे, ताराबाई शिरसाठ, चिंतामण पगारे, मच्छिंद्र अहिरे आदींनी नगरसेवक निधी देऊन परिसराला वॉल कंपाउंड व तार कंपाउंडने संरक्षित करण्यास सहकार्य केले. तरीही थोडे काम शिल्लक आहे. त्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून नगरसेविका दीपाली विवेक वारुळे यांचे सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मंत्री दादा भुसे यांनी शोभिवंत लाईट, स्ट्रीटलाईट उभारून दिले. तसेच नगरसेविका वारुळे यांनी प्रयत्न करून सभोवताली पेव्हरब्लॉक व मंदिराच्या पाठीमागे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करून दिले आहे. इतर नगरसेवकानी इलेंट्रीक पोल, बाकडे इत्यादि देऊन सहकार्य केले आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मंदिरासाठी बोअरवेल करून दिली आहे.
नदीविकास आराखड्यात संगमेश्वर ते महादेव मंदिर असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. उत्सव व विविध उपक्रमांसाठी मुळ मंदिराची जागा अपुरी पडत असल्यामुळे मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार करण्याचे समितीने काम हाती घेतले आहे. मंदिरच्या समोर जोडूनच एकसंघ सभामंडप व इतर बाजूंनी वाढवून विस्तारीत कार्य स्ट्रक्चरवर छतापर्यंतची उभारणी लोकसहभागातून केली आहे. ंकृषीमंत्री भुसे यांच्याकडून सुद्धा सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजेबहादूर परिवाराकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होत असते. सध्या वर्षभरात श्रीमहाशिवरात्री उत्सव, श्रावण महिना, श्री हरिहर भेट उत्सव आदी साजरे केले जातात. तसेच नित्य आरती, अनुषंगिक धार्मिक परंपरा जतन केल्या जातात. समिती स्थापण्यासोबतच जयशंकर भजनी मंडळाची देखील स्थापना केली गेली आहे. भजनी मंडळाद्वारे दरसोमवारी रात्री दोन तास भजन केले जाते. प्रसंगानुरूप विविध आमंत्रणावरून अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला जातो.
https://www.discovermh.com/sangameshwar-temple-nagardevale/
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे | Discover Maharashtra

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे…
नगरदेवळे गावाच्या वायव्येस तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर ! तीन नद्यांच्या पवित्र संगमावर एका उंच टेकडीवर या मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने त्याला संगमेश्वर महादेव म्हणतात.
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे मंदिराचे नंदीगृह, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग पडतात. तीनचार वर्षांपासून या मंदिराचे जीर्णोद्धार कार्य भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरू केले आहे. नंदीगृहाचे पुनर्निर्माण नव्याने केले आहे. त्यात प्राचीन नंदीची मूर्ती आहे . त्याची उंची तीन फूट लांबी चार फुटांपर्यंत आहे. गळ्यात घंट्यांची सुंदर साखळी माळ आहे . नंदिसमोर भद्र कलशधारी अलगद कोरलेला असून तो नंदिसमोर बसलेला आहे त्याचे तोंडमात्र शिवाकडे आहे अशा प्रकारचं नंदीशिल्प पाटणादेवी परिसरात पण आहे. येथे नंदीची शिंगे व कानांची मात्र झीज झाली आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला एक वराह नंदी आहे .याचा आकार वराहासारखा असतो . त्यांना यज्ञवराह असेही म्हणतात. मूर्तीशास्त्रानुसार त्याला भूवराह असेही म्हणतात .
आता आपण सभागृहात प्रवेश करतो . डाव्या हाताला भिंतीला उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते . मूर्तीची सोंड नंतर दुरुस्त केलेली असली तरी हात व पायांची ठेवण प्रमाणबद्ध आहे . प्रत्येक पायात दोन असे चारही पैंजणांचे कोरीव काम सुबक आहे .कंबरेचा नंदीपाश , यज्ञोपवीत , मूषक हातातील परशु , अंकुश, मोदक ठळकपणे दिसतात.वरदहस्त मात्र भग्न झाला आहे .
सभागृहात उजव्या हाताला देवडीत तीन मुर्ती आहेत. पैकी एक डाव्या सोंडेची गणेशाची आहे . उजवा व डावा असे दोन गणेश असा दुर्मिळ योग्य येथे पहावयास मिळतो . ( पद्मालय सोडल्यास )
गणपतीच्या बाजूला चंडिकेची अर्धमूर्ती पहावयास मिळते . ही सप्तमातृकांमधील एक देवी म्हणून ओळखली जाते .ही देवी चालुक्यवंशाची कुलदेवता आहे त्यामुळे हे मंदिर चालुक्य कालीन असावे का ? असाही प्रश्न निर्माण होतो .
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पोट खपाटलेले असून पोटावर विंचू कोरलेला आहे . तो भुकेचे प्रतीक आहे . तिला सहा हात असून ती शस्त्रधारी आहे .उजव्या हातात बालक मूर्ती कोरलेली दिसते . कंबरेला मेखला घंटाकर आहे .
चंडिकेच्या बाजूला पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे .या मूर्त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांचे सौंदर्य दिसत नाही . त्याच्याच बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे .
सभा मंडपाला प्रत्येक कोपऱ्यात तीन असे बारा खांब आहेत . खांबावरील कोरीव काम वाखाणण्याजोगे आहे . सभा मंडपाचे काम गोलाकार असून हवा व उजेड येण्यासाठी मोकळे ठेवले असावे .
आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो .गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असून अप्रतिम सुबक कोरीवकाम त्यावर आढळून येते . उंबरठ्याच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहे .विशेषतः शिवमंदिराच्या पायऱ्यांवर व इतर मुर्तींच्या मागे किंवा डोक्यावर किर्तीमुख कोरलेले असते . या ठिकाणी दोन शिंगे असलेली बटबटीत डोळ्यांची दोन किर्तीमुखे आहेत .त्यांचा चेहरा सिंहाचा आहे .
पद्मपुराणाच्या एका दंतकथेनुसार या किर्तीमुखाचा संबंध शिवाशी येतो . राहू आणि शिव यांच्या वादात शंकराच्या क्रोधाग्नीतून किर्तीमुख हा भयंकर प्राणी जन्माला आला . परंतु राहूने क्षमायाचना केल्यावर शंकराने किर्तीमुखास थांबविले .पण किर्तीमुखास भयंकर भूख लागली . तो मांसाची याचना करू लागला .तेव्हा शंकराच्या आदेशाने तो स्वतःचेच मांस खायला लागला . शेवटी त्याचे मुखच शिल्लक राहिले . या आज्ञाधारक पणाबद्दल शंकर त्याची प्रशंसा करतात व त्याला थांबवतात .तेव्हापासून किर्तीमुख हा शिवाच्या पायाशीच असतो .
किर्तीमुखाच्या डाव्या व उजव्या बाजूला शिल्पमालेत असंख्य देवी देवतांच्या शिल्पाकृती आहेत . तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस अनेक देवतांच्या मूर्ती आहेत . त्यांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल . मध्यभागी गणेशाची आकृती असून त्यामागे गणसेना असावी .
सभामंडप व गर्भगृहाचे खांब तसेच भव्य तुळया पाहिल्यावर थक्क व्हायला होते .साधारणतः 11 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम पाहता कुठलेही तंत्रज्ञान विकसित नव्हते असे म्हणणे धाडसाचेच होईल .आपल्या पूर्वजांच्या तंत्रशुद्ध ज्ञानाबद्दल आपण विस्मित होतो .
मंदिराचा बाह्यभाग अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. मंदिर बांधकाम करतांना कुठेही चुन्याचा वापर करण्यात आला नाही . दगडी तुळया व खांब एकमेकांत साखळी पध्दतीने गुंफलेले आहेत . मंदिराची लांबी 50 फुटांपेक्षा अधिक आहे . चारही बाजूंनी मंदिर पाहतांना त्याची भव्यता जाणवते . एका नजरेत मंदिर पाहता येत नाही .
मंदिर परिसरात अनेक दुर्मिळ शिल्पे आढळतात .पैकी शिवपार्वती शिल्प अप्रतिम आहे . शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे .तिच्या डोक्यावर नागाने फणा उभारला आहे . शिव हे नंदीवर पद्मासनात बसलेले आहेत . मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती आहे .शिवपार्वतीच्या मागे दोन दंडधारी उभे आहेत . ते वीरभद्र व कार्तिकेय असावेत असे वाटते .
शंकराची अजून एक मूर्ती नंदीवर विराजमान आहे. स्थानिक लोकांनी शेंदूर चढविल्यामुळे मूर्तींचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. उघडयावर असल्याने या मूर्तींची झीज झाली आहे . पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारसोबत या शिल्पकृतींचे पण संवर्धन करावे ही अपेक्षा !!!
संजीव बावसकर, नगरदेवळे

बडगुजर समाजाची देवस्थाने
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे.
बडगुजर समाजाची देवस्थाने:
- चामुंडा-चोटीला – जुनागड-गुजरात
- शेलू-मेथी-शिंदखेडा, धुळे जिल्हा
- चोपडा
- सुरत
- पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगांव
या मंदिर परिसरातील आपला ग्रुप फोटो तुम्ही पाठवू शकतात. निवडक फोटोंना या पेजवर प्रसिद्ध
करण्यात येईल .
























































No comments:
Post a Comment