महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते.

महागावच्या महाशिवरात्री उत्सवाने जपली सामाजिक एकोप्याची परंपरा
- सुनील पु. आरेकर
महाराष्ट्राच्या भूमीत
प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली
इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ
जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या
दुनियेत घेऊन जाते. शिवशंकर व भगवान विष्णू यांची मूर्ती असल्यामुळे
संयुक्त असे विदर्भातील एकमेव मंदिर म्हणता येईल. तेथे महाशिवरात्रीच्या
पावन पर्वावर सामाजिक एकोपा निर्माण करणारा यात्रा महोत्सव
वर्षानुवर्षांपासून साजरा केला जातो.
दारव्हा-आर्णी राज्य मार्गावर
असलेल्या महागाव कसबा येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक
एकात्मता जपणारा महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला
जातो. प्रेरणादायी परंपरेची साक्ष देणारे भव्य
शिवमंदिर आजही डौलात उभे
आहे. प्राचीन संस्कृती, कलेचे दर्शन घडविणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
महागावचे हेमाडपंती शिवालय होय. कळमेश्वरी नदीच्या तीरावर ते वसले आहे.
विशेष म्हणजे कळसाखाली विष्णू तर गाभाऱ्यात शंकराचे अधिष्ठान आहे. भगवान
विष्णूंच्या मूर्तीसमोर गरुड व शिवलिंग असलेल्या गाभाऱ्यासमोर नंदी हे
दोन्ही देवतांचे वाहन आराधना करतानाचे मनोहारी दृश्य प्रसन्न करते. या
वैशिष्ट्यामुळे कळमेश्वर मंदिर या नावाने संबोधले जाते. यादवकालीन राजवटीत
१२६९-७० दरम्यान हेमाद्री नावाचा प्रधान हा प्रख्यात पंडित व शिल्पतज्ज्ञ
होता. त्याने उभारलेल्या मंदिरांना हेमाडपंती म्हणून संबोधले जाते. गावात
प्रवेश केल्यावर कळमेश्वराचे हेमाडपंती शिवालय मोठ्या दिमाखात आपला डोलारा
सांभाळून उभे दिसते. सदर मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुखी असून दुमजली आहे.
पुरातत्त्व विभागाने मुख्य प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे. पडझड
झालेल्या प्रवेशद्वाराची उभारणी झाल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर
पडली आहे. मंदिराची रचना अचंबित करणारी आहे. बाहेरच्या बाजूने चार व आतील
बाजूने चार अशा अष्ट स्तंभावर हे मंदिर विराजमान आहे. महाद्वाराचे स्तंभ
चित्तवेधक असून आत प्रवेश केल्यावर कोरीव खांबावर आधारलेले सभामंडप आढळते.
प्रत्येक खांबावर रामायणकालीन चित्रे कोरलेली आहेत. दहा पायºया उतरल्या की
गाभाºयात मधोमध शिवशंकराचे स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडते. शिवलिंगाच्या
अगदी समोर मंदिराच्या पूर्वेला नंदी मंदिर आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ
अशा आभूषणांनी सजलेला भव्य नंदी लक्ष वेधून घेतो. हा नंदी म्हैसूरच्या
चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे.
पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा केली जाते. मंदिराची शिल्परचना औंढा
नागनाथ, वेरु ळचे कैलास लेणे आदी प्राचीन वस्तूच्या शिल्पासारखी आहे. या
मंदिराला क वर्ग तीर्थक्षत्र दर्जा प्राप्त आहे. भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण विभागाने केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून मंदिराच्या
प्रवेशद्वाराचा जीर्णोद्वार केला असून या प्राचीन शिवालयाला गतवैभव प्राप्त
करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मंदिरालगत लघुसिंचन प्रकल्प पूर्णत्वास
आल्यामुळे हा परिसर हिरवळीने नटला असून पर्यटकांना खुणावतोय.
शिवमंदिरात
महाशिवरात्री सप्ताहात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. भागवत, भजन, कीर्तन
आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सप्ताहात दिवसरात्र अखंड टाळ
-वीणेच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा हरिनाम जप केला जातो. सातही
दिवस अन्नदान केले जाते. महाशिवरात्रीला आबालवृद्ध भाविक उपवास करतात.
शिवलिंगाची पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते. विदर्भातून हजारो भाविक
दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे दोन दिवस सामाजिक एकोपा जपणारा
यात्रा महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरतो. यामध्ये सर्वधर्मीय उत्साहात
सहभागी होतात. ग्रामीण भागातील महागावची जत्रा एक नवी ऊर्जा देऊन जाते.
https://www.lokmat.com/manthan/mahashivratri-festival-mahagaon-celebrates-tradition-social-cohesion/
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
काही महिन्यांपूर्वी अकोल्याला जाणे झाले तेव्हा पुनश्च एकदा असद
गडावरून इतिहासाची वाटचाल सुरू झाली आणि मग बार्शी टाकली जाण्याची इच्छा
झाली.
बार्शी टाकळी येथील कालिका देवी मंदिर हे अतिशय प्राचीन असे
सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. हे मंदिर गर्भगृह अंतराळ सभामंडप
युक्त असे आहे. या मंदिराची बांधणी सुरेख असून त्याच्या कलशाचा भाग नष्ट
झाला आहे. मात्र तत्कालीन शिल्पकलेचा तो एक आजोड आणि अप्रतिम नमुना आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमीप्रमाणे गाभाऱ्याच्या
समोर नसून
सभामंडपाच्या बाजूस काटकोनात आहे. ते गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस आहे.
सभामंडप साधारणत चौकोनी असून गाभारा हा चांदणीच्या आकाराचा आहे.
सभामंडपास चार प्रमुख नक्षीदार खांबांचा आधार आहे. त्यावर देवदेवतांच्या
आकृती कोरलेल्या आहेत. मंदिरा वरील विविध देवतांच्या ज्या प्रतिमा आहेत
त्यामध्ये प्रमुख महाकाली महिषासुरमर्दिनीच्या आहेत.
मंदिराच्या भिंती नक्षीदार असून त्यावर विविध आकृत्या कोरलेल्या अनेक स्तरांनी युक्त आहेत.
गर्भगृह व सभामंडप यांच्या बाहेरील एका पट्टीत देवादिकांची शिल्पे आहेत. काही मिथुन शिल्पेही आहेत.
मंदिराच्या
भिंतीवर एक लांबलचक संस्कृत भाषेतील शिलालेख आढळतो. मात्र तो बऱ्याच
प्रमाणात नष्ट झालेला आहे. तरी त्यावरील तारीख गुरुवार वैशाख शुक्ल ७,
दुर्मुख संवत्सर शके १०९८ अशी, म्हणजे ७ एप्रिल ११७७ अशी आहे.(महाराष्ट्र व
गोवे शिलालेख)
हा लेख संस्कृत व नागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. या
शिलालेखाप्रमाणे टेक्कली येथून यादवांचा एक मांडलिक राजा राज्य करीत होता.
दंतुराज हा या राजवंशाचा मूळपुरुष तर लेख घेताना हेमाद्रीदेव हा राजा शाशन
करीत होता.
हिमाद्रीदेवाने आपल्या राजधानीवर चालून आलेल्या मालुगीपुत्र राजल याचा पराभव केल्याचा उल्लेख शिलालेखात केलेला आहे.
या राजाने आपल्या सत्कृत्यांनी राजधानी टेक्कलीस वाराणसीचे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे असा उल्लेख त्यात केला आहे.
लेखांमध्ये
पुढे वंशपरंपरेने मंत्रीपद भोगत असलेल्या भिल्लम या वल्लभ गोत्रीय
मंत्र्याची वंशावळ दिलेली आहे. या घराण्यातील गामियाय या व्यक्तीने
टेक्कलीस विष्णूचे मंदिर बांधले तसेच लोककल्याणासाठी विहिरी व तलाव
बांधल्याचा उल्लेख केलेला आहे.
असो, प्रस्तुत मंदिरातील कालिंका मातेची मूर्ती काही दूर अंतरावर असलेल्या खोलेश्वर शिव मंदिरांमध्ये स्थापन केलेली आहे.
![]() |
| खोलेश्वर मंदिरात स्थापन केलेली कालिंका मूर्ती |
दुसरे महत्त्वाचे म्हणजे यादवांचा सेनापती खोलेश्वर याचा हा प्रशासकीय भाग असावा कारण बार्शीटाकळी तसेच अकोला व इतरही भागामध्ये खोलेश्वर या नावाने शिव मंदिरे बांधलेली आहेत.
![]() |
| काही दूर अंतरावर असलेले खोलेश्वर मंदिर |
आता प्रश्न येतो तो बार्शी टाकळी येथील हिंदू प्रजेचा घट व मुस्लिम
संख्येची वाढ. त्यास मला असे कारण वाटते की बहामनीच्या कालखंडांमध्ये हा
मुलुख कुण्यातरी मुस्लिम सरदाराकडे असावा. बहामनी राजवटीचा अभ्यास करताना
त्यामध्ये हसन बार्शी असं एका मुस्लिम सरदाराचा नाव आढळत. बहुतेक हसन
बार्शी या सरदाराकडे व्यवस्थेसाठी हा मुलुख असावा. त्याने येथे आपली जहागीर
वाढविली व टेक्कली या गावास बार्शी टाकली असे नाव प्राप्त झाले असावे असे
वाटते. अर्थात अभ्यास सुरू आहे, ज्ञान असीम आहे!
असो, असे हे अप्रतिम
कलेचे दिव्य स्थान आज बार्शीटाकळी गावाच्या बाहेर बाजूस एकाकी अवस्थेत
पडलेले आहे. यादवकाळातील टेक्कळीचे सुवर्णयुग आता राहिले नसले तरी
नंदादीपाप्रमाणे या मंदिराचे तेच आजही शाश्वत आहे. शासनातर्फे त्याच्या
पुनर्निर्माणाचे कार्य बहुतेक अर्धवट राहिल्याचे दिसते, काम थांबले असावे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील विशेष म्हणजे विदर्भातील
महाकालीचे हे मंदिर हा कलेचा अजोड नमुना आजही सामान्यांच्या दृष्टीपासून
फार दूर आहे.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर











































































































No comments:
Post a Comment