Thursday, October 20, 2022

कुंजरगड

 सन १६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली आणि बागलाणमार्गे ते स्वराज्यात परत येण्यासाठी निघाले.हि खबर लागताच त्यांचा मार्ग अडवला तो चार हजार फौज, हत्ती,घोडे घेउन आलेल्या  दाउदखानाने.पण शिवछत्रपतींनी बरोबर आणलेली संपत्ती रवळ्या-जवळ्या व मार्किंड्याच्या खिडीतुन पुढे पाठवून दिली आणि दाउदखानाचा संपुर्ण पराभव कांचन-मांचनगडाच्या खिंडीत १७ ऑगस्ट १६७० ला केला. मिळालेल्या या यशानंतर मराठे सैन्य शांत राहिले असते तरच नवल. विजयाच्या धुंदीत मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात कोंबड्किल्ला जिंकला. मात्र जेधे शकावली प्रमाणे हा गड शिवाजी राजांनी ३ नोव्हेंबरलाच घेतला होता. दाउदखानाचा पराभव झाल्यावर त्याचा एक हत्ती घेउन महाराज इथे आले.त्या हत्तीचा काही संबध गडाच्या नावाशी आहे कि गडाचे नाव त्याच्या हत्तीसारख्या आकारावरुन पडले समजत नाही.मात्र शिवछत्रपतींनी बहुतेक घेतलेल्या गडाचे नाव बदलले आणि नवीन ठेवलेले नाव संस्कृत भाषीक आहे.उदा.प्रतापगड, राजगड, संतोषगड इत्यादी.कोंबडकिल्ल्याचे नाव कुंजरगड हे बहुतेक महाराजांनी ठेवले असावे असा अंदाज आहे.कुंजर म्हणजे हत्ती ! मराठयांची फौज येथे विश्रांतीसाठी थांबली असता दिंडोरीच्या लढाईतील जखमींवर येथे उपचार केले गेले. कदाचित या परिसरातील इतर दुर्ग म्हणजे हरिश्चंद्रगड्,कलाडगड वगैरे याच काळात स्वराज्यात आले असावेत असा अंदाज आहे. मात्र पुढे या कुंजरगडाचा इतिहासात काहीच उल्लेख मिळत नाही.  अर्थात प्रत्यक्ष शिचछत्रपतींचा सहवास लाभलेल्या कुंजरगडाला त्याची निश्चितच खंत नसेल. शिवस्पर्शाच्या त्या काही सोनेरी क्षणांनी त्याला कायमचे समाधान मिळवून दिले असेल यात शंका नाही. 
   विहीर गावातून कुंजरगडाचे दर्शन
 
  आज ज्या कुंजरगडावर आपल्याला चढाई करायची आहे तो अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले या दुर्गसंपन्न  तालुक्यात मोडतो. येथील हरिश्चंद्रगड हा बहुतेक दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. येथील निसर्गसौंदर्याने मोहित होऊन दुर्ग भटक्यांनी कधी ना कधी या किल्ल्याला भेट दिलेली असते. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी एक अपरिचित दुर्ग म्हणजे कुंजरगड. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासूनसुरू होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड उर्फ कोंबडगड हा टेहळणीचा किल्ला आहे. हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. 
      पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.
१) खाजगी वाहानाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलालगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात.सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उन तापण्या अगोदर कलालगड करावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. ) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड करुन परतीचा प्रवास करावा.
  जर सरकारी बससेवेचा वापर करुन या परिसरात यायचे असेल तर अकोलेहून पाचनईला संध्याकाळी ६ वा. मुक्कामी बस आहे.कोथळेसाठी सकाळी १०.३० व संध्याकाळी ५,३० ला मुक्कामी बस आहे. अर्थात बसची खात्री नाही, तसेच या मार्गावर खाजगी जीपही तुरळक असतात.त्यामुळे या परिसरातील भटकंतीला स्वतःच्या वहानाशिवाय पर्याय नाही. 
मुळा नदीच्या खोर्यातील इतर दुर्ग आणि कुंजरगड
कुंजरगडला जाण्यासाठी रत्स्याचा नकाशा
 
   कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
आपण आधी फोफसंडी गावातून चढाईचा मार्ग समजावून घेउया आणि मग विहीरमार्गे चढाई करुया.
 फोफसंडी गावाकडून :-
    फोफसंडी हे एन डोंगराच्या गाभ्यात वसलेले दुर्गम गाव. मात्र समाजमाध्यमाच्या कृपेने या गावाची ओळख बहुतेकांना झाली ते 'सर्वात कमी सुर्यप्रकाश असलेले गाव' म्हणून.फोफसंडी गावाजवळ देवनाळ धबधबा, घरीचा धबधबा, टाकोरी धबधबा, पिनाकी धबधबा हे पावसाळी धबधबे आहेत.फोफसंडी गावात फोफसंडी टुरिझम , हॉटेल कुंजरगड अशी हॉटेल आहेत.
फोफसंडी गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. फोफसंडी गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असुन फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते.     
     खिरेश्वर मधून फोफसंडीला जाण्यासाठी कोल्हेवाडी मार्गे एक वाट चढते. कोल्हेवाडीत जाउन उंबारल्याच्या वाटेने चढून उंबारल्याची टेकडी गाठायची. हि वाट म्हणजे गायदरा. हि वाट नागमोडी आणि मळलेली आहे.  याशिवाय कोल्हेवाडीतून वाघाची वाडी येथे जाउन वाघाची वाडीमधून फोफसंडीच्या दिशेने जायला दोन वाटा म्हणजे पर्याय आहेत. एक म्हणजे टकोरीच्या खिंडीतून उतरणारी वाट. पुर्वी फोफसंडीत गाडी रस्ता नव्हता तेव्हा अगदी अलिकडच्या काही वर्षांपर्यंत या मंडळीचा वाण समान बाजारासाठी मढ भागात येण्यासाठी हाच घाट वापरता होता.दुसरा पर्याय म्हणजे फोफसंडीतील सर्वात जास्त वापरली जाणारी अगदी अबाल वृध्दांपासून लहान मोठे ते गुर ढोरं ने आण करण्या योग्य असलेली  गायदरा घाटाची वाट.या वाटेने खिरेश्वर ते फोफसंडीला जाण्यासाठी पाच तास लागतात.
 गायदरा घाट
 
 या भागातील मंडळी या इथे सोयरीक असल्याने काही कार्य किंवा कामानिमित्त अजूनही याच वाटांनी ये जा करतात. गाडी रस्त्याचा फेर आणि लागणारा वेळ पाहता ही वाट कधीही सोयीची. या तिन्ही घाटवाटेची खिरेश्वर कोल्हेवाडी भागातून चढाई उतराई १५०० ते १८०० फूट सहज असेल. तिथून समोर दिसणार्या खिंडीच्या मागे डोंगर आहे. तिथून पुढे टकोरीच्या खिंडकडे जाणार्या वाटेने फोफसंडीच्या गवताळ पठारावर जाता येते. अवाढव्य पसरलेल्या या पठारावरील डोंगरकडेला सदाहरीत जंगल चांगलेच बहरलेले जांभूळ, अंजन, बेहडा, हिरडा तसेच निवडुंग व करवंदांच्या जाळीची गर्दी. कातळ टप्प्यात अनेक ठिकाणी निसर्ग निर्मित लहान मोठ्या गुहा. या कुंजरगड फोफसंडी परिसराचे एकंदरीत वनक्षेत्र एकूण १९०० हेक्टर एवढं आहे. या पठाराच्या खाली या भागातला मोठा घारीचा धबधबा आहे, अर्थात पावसाळ्यातच असतो. पठाराच्या उजवीकडे दरी पल्याड जीतवाना धबधबा आहे. 
 
  
  
  

 पिंपळगाव जोगा जलाशय आणि काठावर दिसणारे हरिश्चंद्रगड आणि सिंदोळा
 
 पठारावरुन वायव्य दिशेला हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला डोकावतो तर खाली पिंपळगाव जोगा धरणाचा फुगवटा त्या काठी वसलेल्या गवारवाडी, वाघाचीवाडी, कोल्हेवाडी इतर वाडी वस्त्या, दूरवर खिरेश्वर, खुबी पर्यंत जाणारी धरणाची भिंत, त्या पल्याड माळशेज, नाणेघाट पासून देवदांड्या, भोजगिरी, गुण्या, उधळ्या डोंगर ते सिंदोळा, हडसर, गणेशखिंड पासून दक्षिणेला हाटकेश्वर पर्यंत अफाट मुलुख दिसतो. तसे पाहिले तर ही हरिश्चंद्रगड पासून निघालेली बालाघाट पर्वतरांग हरिश्चंद्रगड कारकाई बाळूबाई तिकडे पूर्वेला भैरोबा दुर्ग कुंजरगड तर नैऋत्यला वारल्याचा डोंगर निरोळी पासून पार रांजणा पर्यंत.. खिरेश्वर पिंपळ्गाव जोगा धरणा जवळून हि रांग भलतीच मोहक दिसते. या डोंगरच्या एका बाजुला मानखंदा शिखर त्याच्या उजव्या बाजूला निरोळी तर डावीकडे रांजणा शिखर दिसते. टकोरीची खिंड ही निरोळीच्या दिशेला आहे.
  २) दुसरा मार्ग असा आहे. मुंबइवरुन माळशेज घाटमार्गे कल्याण -आळे फाटा- अहमदनगर रस्त्यावरील बनकर फाट्यावर यावे, किंवा पुणे-नाशिक रस्त्यावरुन आळेफाट्याला डावीकडे कल्याणच्या दिशेने वळून बनकर फाट्यावर जाता येईल. बनकर फाटा पुढील उदापूर गाठावे. उदापूरहून डावी मारत, मुथाळणे कोपरे रोड पकडावा. वाटेवर दिशादर्शक पाटी आहे. 
 मांदारणे  मुथाळणे पर्यंत सहा किमीचा अरुंद वाटेचा कठीण घाट
 
वाटेतले मांदारणे सोडल्यावर मुथाळणे पर्यंत सहा किमीचा अरुंद वाटेचा कठीण घाट. तो चढून वर आल्यावर उजवीकडे वाघोबा देव, तिथेच थोडा वेळ बसायला हरकत नाही.
 घाटाच्या खिंडीतील वाघोबा देव
 
 मग मात्र सुरु  डोंगर दरींचा प्रदेश सुरु होतो. पुर्ण रस्ता घाटाचा, डोंगर उतारावर छोटी छोटी घरे काही ठिकाणी लहान लहान वाड्या वस्त्या. कोपरे या भागातले शेवटचे गाव. कहिश्या दुर्गम अशा ठिकाणी जुन्नर ओतुर या भागातून इथवर एस्टी येते. कोपरे सोडल्यावर आधीच अरुंद असलेला डांबरी रस्ता गायब होतो. इथून पुढे फोफसंडी साठी मोठा रस्ता नाही.
 
 इथून फोफसंडी सात किमी आहे. सुरुवातीला माती छोटी दगड मग काहीसा बरा खडी टाकलेला.  गाव मागे पडले कि घाट रस्ता सुरु होतो. मध्ये जंगल पट्टा लागतो, या भागात तर ना दगड ना खडी. हा शांत निर्जण निसर्गरम्य घाट रस्ता आहे. मध्ये मध्ये ओढे लागतात. पावसाळ्यात हा रस्ता घसरडा असतो, तेव्हा त्या काळात या मार्गे न येणे चांगले  पुढे एका मोठ्या ओढ्यावरील पुलावर आलो कि इथून पुढे मात्र खडी मिश्रित रस्ता दिसतो. हाच देवनाळ्याचा पूल इथून फोफसंडीची हद्द सुरु होते. चढ चढून सपाट रस्ता लागतो. कोपरे ते फोफसंडी या प्रवासाला कच्च्या रस्त्यामुळे जवळपास पाऊण तास लागतो. फोफसंडीच्या अलीकडे एक दरी आहे.. ताम्हिणी घाटाच्या प्लस व्हॅली ( plus valley ) सारखी.मुथाळणे ते फोफसंडी रस्ता म्हणजे ऑफरोडिंग साठी एक पर्वणी आहे..
 फोफसंडी गाव
 
गावच्या सुरुवातीची दोन चार घरं सोडल्या वर एका घरावर ‘सह्याद्री दर्शन पथिकालय’ असा बोर्ड लावलेला दिसतो.श्री दत्तात्रय मुठे’ हे स्थानिक व्यक्ती आपली मदत करतात.  श्री. मुठे यांच्याकडे माहितीचे भंडार आहे. नवी जुनी काही कागदपत्र माहिती पत्रे आहेत. 
सह्याद्री दर्शन पथिकालय
 
  कोपरे ते फोफसंडी हा रस्ता पुर्णपणे वनविभागाच्या अख्यरित असल्याने मंजुरी मिळणं अवघड झाले आहे. कोपरे पुणे जिल्ह्यात तर फोफसंडी नगर जिल्ह्यात. वाटेत लागलेला तो देवनाळ्याचा पूल ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा. जर पक्का रस्ता झाला तर कोपरे ओतुर मार्गे इथून माळशेज घाट अगदी जवळ होईल..असो.

फोफसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दर्या खोर्यात वसलेले १०००-१२०० लोकवस्तीचे लहानसे गाव. अशा या भौगोलिक स्थानामुळे इथे सुर्योदय काहीसा उशिरा तर सूर्यास्त लवकर होतो. पावसाळी शेती त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडा सारख्या वनस्पतीची विक्री आणि जोडीला थोडे फार पशूधन हेच काय उपजीविकेचे साधणं. या भागातील बघण्यालायक ठिकाण म्हणजे फोफसंडीचे कुलदैवत दर्याबाई मंदीर. गावापासून ४ किमी अंतरावर असलेले राणुबाई मंदिर त्याच्या आसपास मोठ मोठ्या गुहा. तसेच रानात वसलेले ग्रामदैवत कळमजाई मंदीर. ज्यावरुन नदीला नाव पडले त्या मांडवी हृषिनी तप केले ती घोडगडद नावाची गुहा. घारीचा, धुळगडीचा, कावडाच्या, भदभड्याचा इ अनेक लहान मोठे धबधबे. चारण गडद, गहीन्याची गडद इ अनेक मोठ मोठ्या गुहा.  इथे एका गुहेत मांडव्य ऋषीनी तपस्या केली आणि एक नदी अवतरली.. ती मांडवी नदी इथे उगम पावते..खरचं हे सारं पहायच असेल तर पायगाडीला पर्याय नाही, प्रत्येक ठिकाण पाऊण ते तासभराच्या अंतरावर टप्पा टप्प्यांत केलेला छोटा ट्रेकच. या साठी तीन चार दिवसांची सवड काढून फोफसंडीला जायला हवे. 

  फोफसंडीला आणखी एका मार्गे जाता येते. माळशेज घाट-ओतुर- ब्राम्हणवाडा -कोतुळ- पळसुंदे-फोफसंडी असा आहे. हा रस्ता ही पुर्ण घाटाचा अनेक चढ उतार व तीव्र वळणावळणचा आहे. या रस्त्यावर डोंगर दरी लहान लहान वाडी वस्त्या, ओढे नाले बंधारे यांचे जणू चित्र वाटावे असे देखावे दिसतात. कोतुळ ६ ते ७ किमी वर पळसुंदेला  भैरोबाचे मंदीर आहे.कोतुळवरुन फोफसंडीला जाण्यासाठी साधारण एक तास लागतो. हा रस्ता राज्य महामार्ग असुनही यथा तथाच आहे.
    गावच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारण १९२५ च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी मपोपफ हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करुन या दरीत उतरले. त्या वेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खुप आवडला. इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आले आहे त्या नदी तिरावरील टेकडीवर रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्यांचं पारण फेडणारे रूप अनेक धबधबे पाहत असे. पोपच्या रहण्याने या गावला मपोफसंडी म्हणू लागले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रुढ झाले.
      गाव तसे सुविधा पासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रम शाळेत. २००४-५ नंतर वीज व रस्ते आले. त्यात ही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. दत्तात्रय मुठेनी त्या साठी शासन दरबारी बरीच पायपीट केली. सध्या गावात अकोलेहून सायंकाळी मुक्कामी एस्टी येते. लवकरच दहावी पर्यंत शाळा होणार. आरोग्य सुविधा तसेच शेतीला पुरक व्यवस्था व पर्यटनावर भार द्यायचा त्यांचा मानस आहे. 



 
 
    फोपसंडी गाव कुंजरगडाच्या दक्षिणेस मांडवी खोऱ्यात, समुद्रसपाटीपासुन १०३५ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथुन गडावर ३६५ मीटर चढावे लागते.कोतुळ येथुन बाळाई डोंगराच्या खिंडीतुन येथे गाडीमार्ग आहे. खिंड १२६५ मीटर उंचावर आहे.  फोफसंडीतून कुंजरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गावातून व दुसरा पिचडवाडीतून किल्ल्याला जाता येते.. बाळूबाई डोंगराच्याकडेने एक कच्चा रस्ता आहे तो मुंडे वाडीत जातो..मोटासायकल असेल थेट मुंडेवाडी पर्यंत जाते.परंतु हा कच्चा रस्ता थोडा अवघड आहे.. पाऊस असल्यास पुढे गाडी नेता येत नाही.त्यामुळे पायथ्यापासून दोन तीन किमी अंतरावर उभी करून पायपीट करून पायथा गाठला तरी चालेल.
 
तीन ते चार घरांचा झाप असलेल्या मुंडे वाडीतून किल्ल्यास चढाई सुरुवात केल्यास लगेच एक छोटी टेकडी लागते.या टेकडीवर वराई, भात शेती आहे.समोरच कुंजरगड डाव्या बाजूला मधला कोंबडा सुळका व उजव्या बाजुस बाळूबाईचा डोंगर आहे दिसतो. यानंतर सुळक्याच्या पोटा पोटाने आपण कुंजरगड व कोंबडा सुळक्याच्या खिंडीत पोहचतो.. या खिंडीतून उत्तरेकडील विहीरगाव परिसर दिसतो व दक्षिणेकडे फोफसंडी गाव व गगनाला भिडणारी डोंगररांग दिसते.
 
फोफसंडी गावातून कुंजरगडावर चढणारी वाट सोपी आणि साधारण १ ते १.३० तासांची आहे. गावातून गड दिसत नाही, तो एका टेकडाच्या मागे आहे. भाताच्या, वालाच्या मळ्यांतून आणि उतारावर लावलेल्या नाचणीतून वाट काढत निघालो कि समोरच्या डोंगरावर किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी स्पष्टपणे दिसायला लागते. गडाची तटबंदी समोर दिसत असली तरी माथ्यावर चढणारी वाट फिरुन जाते. अर्थात वेळ वाचावायचा असल्यास आणि पुरेसा आत्मविश्वास असल्यास तटबंदीला लागून असणारा कातळटप्पा चढून जाता येते. मात्र असे कडे चढण्याचा सराव असणे आवश्यक आहे. तटबंदी नजरेसमोर ठेवून चाल सुरु ठेवायची. इथून एक टेकडी पार करून  एका पठारावर  येतो. एका झाडाखाली एक थडगे होते आणि त्यावर भगवा झेंडा दिसतो. या पठारावरून उजवीकडून वाट फिरून गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाते. 
 

कुंजरगडाच्या माथावरुन दिसणारे फोफसंडी गाव

 
पण शॉर्ट्कट हवा असेल तर समोरची लहानशी चढण पार करुन तटाला लागून असलेल्या कातळाला भिडायचे. लहानसा कातळटप्पा पार केला कि खालून पाहिलेल्या त्या तटबंदीजवळ आपण पोहोचतो. ही गडाची डावी बाजू, याच तटबंदीला पाणी वाहून जाण्यासाठी एक नलिका बनवली आहे. वर तटबंदीवर पोहोचलो कि गड आलाच. लगेच गडफेरी सूरु करायची.मात्र या मार्गाने गडावर आल्यास हनुमानाची व काळोबाची मुर्ती पहायला मिळत नाही. त्यासाठी डोंगराला वळसा घालून विहिर गावाच्या बाजूस जाऊन परत फिरावे लागते. तसेच नैसर्गिक गुहा पहाण्यासाठी वेगळा फेरा पडतो.
फोफसंडी- राजुर रस्त्यावर वेळ आणि इच्छा असल्यास सह्याद्रीच्या आणखी एका शिखरावर चढाईचा आनंद घेता येतो.तो म्हणजे बाळुबाई.
बाळूबाई शिखर :- 
   फोफसंडी ते कोतूळ रस्त्यावर फोफसंडी पासून ३-४ किमी अंतरावर एक खिंड लागते.. बाळूबाई आणि डोंगरांना जोडणारा.. या खिंडीतून दोन-एकशे मिटर पुढे जाताच डावीकडे वर एक मंदिर दिसते आणि खाली पायवाट हीच बाळूबाई शिखराची वाट.एक पायवाटेने आपण शिखर गाठू शकतो. १५ मिनिटात मंदिर गाठता येते.. मंदिराच्या उजव्या अंगाला काही विरगळ उभ्या केल्याचे दिसतात. राणूबाईची मूर्ती म्हणजे एक शेंदाराने नटलेली शिळा आहे.इथे काही क्षण विश्रांती घेवून मंदिराच्या उजव्या अंगाला खेटून सरळ पुढे जाणारया पायवाटेने निघालो कि साधारण वीस मिनिटात आपण ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या नाकाडापाशी येवून पोचतो.. इथे एक वाट झाडीमधून मागे फिरून तिरपी वर जाताना  दिसते.साधारण पंचवीस मिनिटाची चढाई करून आपण वर येतो.. इथे बाळूबाई शिखाराचा डोंगर लांबलचक डावीकडे आडवा पसरल्याचे दिसतो.इथे एका खडकाला पडलेल्या ५-६ झरोक्यापैकी एका झरोक्यात पाण्याचा साठा आहे. देवाची करणी आणि कातळात पाणी दुसर काय ! मात्र हा खडक नेमका सापडायला एखादी स्थानिक व्यक्ती पाहिजे. इथे बाटल्या भरून घ्यायच्या आणि डोंगराच्या खालच्या अंगाने माथा डावीकडे डोक्यावर आणि दरी उजवीकडे ठेवत मधल्या टापूतील माळ तुडवीत साधारण ३-४ किमी चा ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या पल्याडच्या टोकाशी पोचलो कि शिखराच्या टोकाकडे डाव्या अंगाला वर चढयला सुरवात करायची, तिथ खिंड लागते.इथून खाली उतरायचे कि थेट मंदिराजवळ पोहचतो. अर्थात मंदीर म्हणजे फक्त काही दगड रचले आहेत.हेच बाळुबाईचे मंदिर.इथे मध्यभागी एक दगड आणि भोवताली अर्धवर्तुळात गारगोटीचे दगड रचल्याचे दिसतात. बाळूबाईला दंडवत घालायचा आणि मंदिराच्या इथून थोड वर चढून जाताच सह्याद्रीच्या विश्वरूपातील एक नजारा सामोरा येतो.मंदिराच्या मागच्या बाजूस पाठ करून उभे राहताना डावीकडे समोर आडवा पसरलेला कुंजरगड/कोबड किल्ला, त्यामागून हळूच डोके वर काढणारा, हरिश्चंद्र डोंगर, टोलार खिंड अगदी डावीकडे अम्बेदरा आणि त्यावरची डोंगररांग आणि दूरवर पसरलेला सह्याद्रीचा डोंगर-दर्याने वेढलेला मुलुख अस्सा भन्नाट नजारा या ठिकाणी आहे.
 
 कोंबडा आणी बाळूबाई
 
    आता आल्या वाटेने न जाता उतरण्याचा आणखी एक पर्याय आहे.  खिंडीकडे पाठ करून उजवीकडे एक वाट डोंगराच्या मधल्या अंगाला खाली उतरल्याचे दिसते. इथे एक भला मोठा ट्राव्हर्स आहे.बाळूबाई शिखराला घड्याळाच्या उलट्या दिशेने उजव्या अंगाने वळसा मारणार्या. पायवाटेने उतरु लागलो कि .समोर अंबेदराच्या वरचा डोंगर आणि घुबडी डोंगर तर उजवीकडे कुंजरगड मोठ्या दिमाखात उभे ठाकल्याचे दिसतात.. चालताना पायवाटेवर पाण्याचे एक-दोन साठे असल्याचे दिसतात.. पाणी अर्थातच पावसाळ्यात. उन्हाळ्यात मात्र इथे पाण्याची वानवा असेल हे नक्की.डोंगराला माथ्याने वळसा मारीत चागला ४-५ किमी चा फेरफटका मारून राणूबाई मंदिराशी येवून पोहचतो.
 विहीर गावातून कुंजरगडाकडे :-
 विहिर गाव डोंगररांगेच्या उत्तरेस मुळा खोऱ्यात, बोटा-कोतुळ-लव्हाळी मार्गावर, समुद्रसपाटीपासुन ८७५ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथुन गडावर ५२५ मीटर चढावे लागते. चढ छातीवरचा असुन सर्व सामान्य माणसास गडावर पोहोचण्यास २.५ तास लागतात.फोफसंडी गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असुन फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. त्यामानाने विहीर गावातुन या किल्ल्यावर जाताना कमी दमछाक होते. मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर या मार्गाने विहीर गावात जाता येते. विहीर गाव म्हणजे काही घरांची एक छोटी वस्ती आहे. विहीर गावामागे उत्तर दिशेला कुंजरगड खरोखर एखाद्या हत्तीसारखा पसरलेला दिसतो. कुंज या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो. याचाच अपभ्रंश होऊन कुजंरगड असे पडले असावे.
१) विहिर गावातून :- विहिर गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाव गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने (१६ किमी) ब्राम्हणगाव - (१६ किमी) कोतूळ -(१६ किमी) विहिर गाव आहे.विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
(अ) कुंजरगड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीतून गडावर जाता येते.विहीर गावातील मंडळी लग्नकार्यासाठी, अथवा इतर कार्यक्रमांसाठी फोफसंडी गावात जाण्यासाठी या खिंडीमार्गे जाणाऱ्या वाटेचा वापर करतात. 
(ब) कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते.दुसरी वाट गडाला वळसा मारून बाळाई आणि गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीतून वर गडावर चढते.
त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गड चढतांना खिंडमार्गे चढावा तर उतरतांना बाजूच्या डोंगरवरून उतरावा म्हणजे सर्व अबषेश पाहून होतात.
      विहीर गाव म्हणजे काही घरांची एक छोटी वस्ती आहे. विहीर गावामागे उत्तर दिशेला कुंजरगड खरोखर एखाद्या हत्तीसारखा पसरलेला दिसतो.विहीरला गावात वळल्यावर लगेचच एका घरावर झेंडा दिसतो.हे मंदिर आहे. मंदिरासमोरील पटांगणात गाडी लावतो येते. कुंजरगडाची उंची आहे १४०० मीटर. किल्ला आणि त्याशेजारीच उजवीकडील डोंगर (विहीर गावातून) या मध्ये खिंड आहे. ती आहे १३०० मीटरवर. विहीर गाव आहे ९०० मीटर उंचीवर. म्हणजे सुरवातीला ४०० मीटर सरळ चढाई  करायची आहे. गाव किल्ल्याला खेटूनच आहे. 
          
मुक्ताई माता मंदिर - विहीर गाव - कुंजरगड

   विहीर गावात असलेल्या शाळेच्या बाजुने असलेल्या शेतवाडीच्या मार्गाने  सरळ निघायचे. गावातन बाहेर पडताच १०.-१५ मिनीटात एक छोट देऊळ लागलं, या देवळाच्या मागुनच रस्ता जातो.खिंडीला लागुन असलेल्या डोगराचे उद्दिष्ट समोर ठेऊन सरळ चालत जायचे. शेतांवरून चालत जाऊन  एका तासाच्या पायपिटीनंतर आपण गडाच्या पायथ्याला असलेल्या झापांजवळ येऊन पोहोचतो. 

आता आपला प्रवास या गच्च भरलेल्या कारवितील वाटेने सुरु होतो. हि खडी चढाई पार करायला पाऊन ते एक तास लागतो. येथून पुढे शेवटपर्येंत खडा चढ सुरु होतो. एकूण ४ टप्प्यांमध्ये हा किल्ला आहे.  खड्या चढणीच्या मार्गे पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचलो कि खिंड आपल्या उजव्या बाजूला ठेवत वर चढत रहायचे.  खिंडीच्या दिशेने दोनेकशे मीटर चढल्यावर आपण  वाट सोडायची. किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या दिशेने आता वाट चढू लागते. 
पहील्या टेकाडावरुन - विहीर गाव

गडाच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला विहीर गाव लांब लांब जाताना दिसते. मजल दरमजल करत गडाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो कि येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या मार्गे हा दुसरा टप्पा पार केला. हळु हळु आता खिंडीचा मार्ग दिसतो. गडाचा तिसरा टप्पा चढुन वरच्या बाजुस येतो. येथे थोडं आडवा चालत जायचं.

वाट थोडीशी झाडोर्यात शिरते तो समोर मारुती आणि काळोबा उभे आहेत. विहीर परिसरातील हे एक देवाचं ठाणं. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसऱ्या मुर्तीला गावकरी काळोबा म्हणतात. एका झाडाखाली दगडी घुमटी, भैरोबाची आणि मारुतीची मुर्ती आहे तसेच भगवे झेंडे लावले आहेत. येथेच मागे असलेल्या उंच टेकाडावर गडाची तटबंदी दिसते. हे बघुन आपण पुढे जायचं. येथुन पुढे गडाचा कातळकडा उजव्या हाताला ठेऊन आणि दरी डाव्या हाताला ठेऊन आडव सरळ चालत जायचं. १५ मिनिटात आपण बाळाई डोंगर आणि कुंजरगड यामध्ये असलेल्या खिंडीत येऊन पोहोचतो. 
कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद" 
कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद"
येथे पोहचल्यावर आपण प्रथम बाळाई डोंगराच्या दिशेने जाउया. या डोंगरावर २ मोठी मानवनिर्मित भुयारे आहेत.खाली कपारीत गुहा दिसतेय. तिच्या तोंडावर दगडांची चळत लावून भिंत उभी केलीय.   आतमध्ये वटवाघुळे असल्याने काळजीपुर्वक आणि टॉर्च लावून आत जावे लागते. या भुयाराची उंची साधारण ३ फुट आहे, आपण आरामात बसुन भुयाराच्या शेवटपर्येंत जाऊ शकतो. येथे बसता येईल असा एक मोठा खड्डा आहे आणि "T" शेप मध्ये हे भुयार अजुन पसरलेले आहे. तसेच अजुन एक भुयार या डोंगरावर आहे, याच्या शेवटपर्येंत गेल्यावर एक गणपतीची मुर्ती आहे पण या भुयारात पाणी असल्याने शेवटपर्येंत जाता येत नाही.
खिंडीतून दिसणारं विहिर गाव 
        ही दोन्ही भुयारे बघुन परत खिंडीच्या दिशेने निघायचे. उजवीकडे नजर टाकली असता, हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि तारामती शिखर उंच उभे दिसतत. तसेच अजून उजवीकडे कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंज्याचा भैरवगड, गवळदेव, घनचक्कर-मुडा अशी डोंगररांग दिसते. १० मिनिटात आपण खिंडीमध्ये परत येतो.कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या झाडीतून आपण अर्ध्या तासात दोन डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. आत्तापर्यंत आपण जी खडी चढाई केली ती या खिंडीतून खाली आलेल्या दगडांवर सफर करत आलोय. या वाटेने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. फोफसंडी गावाकडून येणारी वाट खिंडीच्या या बाजूला येऊन मिळते. आपण जर फोफसुंडी गावातून प्रवासाला सुरुवात केली तर आपली भेट इथेच होईल.
 
 शेवट्चा चढ
 
        या खिंडीत आल्यावर समोरच गडाची ढासळलेली तटबंदी दिसते. येथुन डावीकडुन जाणाऱ्या पायवाटेने आपल्याला गडावर जाणाऱ्या पायऱ्याकडे जाता येते किंवा थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करुन उजवीकडील तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो पण सर्व अवशेष पहायचे असल्यास पायवाटेने जाणेच योग्य. आता आपण डाव्या हाताच्या पायवाटेने चालायला लागायचे. या वाटेने जाताना आपल्याला एका बाजूला कुंजरगड आणि दुसऱ्या बाजूला दरी ठेवत तिरकी चाल करत आपण पुढे जात राहायचे. या वाटेने आपण गडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. गडाचे चार कातळटप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यावर गडमाथा आहे. आपण दोन कातळटप्पे चढून तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो.

   

येथे एका झाडाखाली तुरबत, दगडी घुमट आणि अनेक भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात.याच्याच मागे असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एकसलग अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल. गडाचा हा तिसरा टप्पा पाहून गडाचा मुख्य माथा डाव्या हाता लाब ठेवत वर जाणाऱ्या पायवाटेने चढत राहायचे. याच वाटेवर एक यु-टर्न मारल्यावर गडाच्या अंतिम टप्प्यासाठी कातळात खोदलेल्या अरुंद पायऱ्या जवळ आपण येऊन पोहोचतो.
 
या पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक नैसर्गिक गुहा असुन ती काही प्रमाणात खोदलेली आहे. या वाटेने काही १०० फुट अंतर गेल्यावर आपल्याला गडावरील सर्वात मोठे आश्चर्य दिसते.या वाटेवरच कुंजरगडाची प्रसिद्ध गुहा आहे,  याला स्थानिक लोक कोंड्या नवल्याची गुहा म्हणतात.
 
 
 
कुंजरगडाच्या पोटात असलेली गुहा 
येथे फोफसंडी गावाच्या दिशेने तोंड करून एक कातळात खोदलेली गुहा आहे. हे भुयार दुसऱ्या बाजुने उघडे असल्याने येथे वटवाघुळे टिकत नाहीत.या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत डोंगराच्या पुर्व-पश्चिम आरपार जाणारे एक नैसर्गिक भुयार असुन या भुयाराची रूंदी केवळ एक माणूस रांगत जाईल एवढी आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या भुयारात शिरावे लागते. 

 
सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते.सुरवातीला पायावर बसत, पुढे वळणावर सरपटत आणि मग पुन्हा बसत गुहेतून जात येतं येथून आत शिरल्यावर पुढे हे भुयार मोठे होत जाते. भुयारात प्रवेश अवघड गोष्ट म्हणजे ही अरुंद गुहा वळणाची आहे. जिथे ती सर्वात अरुंद होते तिथेच वळण आहे. वळणाच्या पुढे काय वाढून ठेवलय ते दिसत नाही. चिंचोळ्या बंद अनोळखी जागेत शरीर घुसवायचं म्हणजे दडपण येतं. केल्यावर दोन मिनिटात आपण विहिर गावाकडे असलेल्या मुखाने बाहेर येतो.
पश्चिमेला विहीर गावाकडे गुहा उघडते तिथे एक छोटीशी नैसर्गिक खोली आहे. झोपून थोडंसं कुशीवर वळून, कमरेत वाकत इथून जावं लागतं. 
गुहेतून दिसणारा दरीचा नजारा 

काळजाची धडधड जरा वाढलेलीच. प्रकाश दिसतो, थोडं आणि पुढे गेल्यावर समोर निळंशार आकाश. सर्व दृश्य मनाला वेगळाच आनंद देत . निसर्गाची काय ती किमया, वेगळेच त्याचे सौंदर्य.या भुयाराच्या टोकाला एकावेळी चार पाच जण उभे राहू शकतात. त्या छोट्याशा साहसाचा, तिथून दिसणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेऊन, फोटो काढून परत निघायचे.
ढासळलेल्या पायऱ्या आणि दरवाजा 

ढगात हरवलेला गडमाथा  

     पायऱ्यांनी पुढे गेल्यावर आपल्याला गडावर एका भग्न दरवाजातून प्रवेश करावा लागतो. हा गडाचा शेवटचा टप्पा, येथे थोडासा वळसा घालून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश करतो. पायथ्यापासुन चढाईला सुरवात केल्यानंतर दिड तासात आपण गडावर पोहोचतो. 

पडक्या अवशेषांमध्ये उभा असलेला मारुतीराया 

गडावर प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. वाड्याच्या पायऱ्या आणि काही इमारतींच्या आतील देवळ्या  असे अवशेष आजही मोडकळीला आलेल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात. एकंदरीत रचनेवरून हा किल्लेदाराचा वाडा व सदर असावी. कदाचित याच वास्तुत शिवाजी महाराजांचे वास्तव्य झाले असावे. या वास्तुच्या भिंतीलगत एक मारुतीची मुर्ती ठेवलेली आहे.  
 
या वाड्याच्या मागील भागात उतारावर दगडात कोरलेली पाण्याची अजुन सहा टाकी असुन यात एक कपारीत खोदलेले टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध असते.तसेच एका मोठया जोडटाक्याच्या भिंतीवर दोन झिजलेली शिल्पे दिसुन येतात.
 
 
 

 
गडाचा माथा उजवीकडे अतिशय चिंचोळा असुन या भागात केवळ पाण्याचे एक मोठे उध्वस्त जोडटाके आहे. गडाच्या या टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गड ७ एकर परिघात दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडावरील सर्व अवशेष प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजुस आहे. 
 
 आपण डाव्या हाताला जाऊन गडाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या कातळकोरीव टाक्यावर पोहोचायचे. या टाक्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत व एका बाजूने जादा झालेले पाणी बाहेर टाकण्यासाठी एक खाच देखील मारलेली आहे. या टाक्यातील पाणी कधी कधी पिण्यायोग्य असू शकते पण याची खात्री देता येत नाही.हे टाके पाहून आपण गडाच्या निमुळत्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या टोकाकडे जायचे. 

गडाची उजवीकडची सोंड 

सोंडेवरील पाण्याचं टाकं 

सोंडेच्या टोकवरील पिण्याच्या पाण्याचं टाकं



 कुंजरगड टॉप
 
या वाटेने डाव्या बाजूच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजुला डोंगर उतारावर ठराविक अंतरावर पाण्याची ५ सुकलेली टाकी दिसतात. यात एक जोडटाके असुन एक पावसाळी साचपाण्याचे टाके आहे. परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य मुळीच नाहीये.
 
 
 




वाटेत एक भुयारासारखी रचना आपल्याला दिसते. रतनगडावरील गुप्त टाक्याची आठवण येते. परंतु यात आतमध्ये थोडेफार पाणी असले तरी हे टाके नसून गुहा आहे यात गणेशाची मूर्ती आहे असे भटके सांगतात. गडाच्या या टोकावर एकसलग अशी तटबंदी बघायला मिळते.गडाची हि बाजू पाहून झाल्यावर गडाच्या वरील एका उंच भूभागावर आपण पोहोचायचं. आपल्याला येथे एक पाण्याचे टाके दिसते त्यात मध्ये बांध घातलेला आहे. 

गडाच्या माथ्याजवळ असलेली टाकी 

उध्वस्त तटबंदी आणि बुरूज
 
 
 

 

 
 
या टाक्यांच्या मधील भागात एका लहानशा उध्वस्त वास्तू अवशेषात एक नव्याने बांधलेला सिमेंटचा नंदी व शिवपिंडी असुन गवतात भग्न झालेली हनुमानाची मुर्ती आहे. आता आपण बालेकिल्ल्यावर आहोत. हल्ली इथे महाशिवरात्रीला उत्सव भरायला सुरवात झाली आहे.

 
पुढे आपल्याला हनुमंताचे एक भग्न शिल्प बघायला मिळते व इथेच एक भव्य असा पाण्याचा तलाव आहे. त्यातील पाणी कायम गढूळ वाटते म्हणून कदाचित याला गढूळ पाण्याचा तलाव बरेच भटके म्हणतात.
बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार
 
पुढे आपण गडाच्या तटबंदी जवळील टोकाकडे जायचे. इथे आपल्याला या तटबंदीवर चढून निसर्गाचा आनंद घेता येतो. यासाठी तटबंदीवर जायला आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात. तटावरून चौफेर नजर टाकताना  आजूबाजूच्या कातळकड्यांचा रौद्र परिसर आपल्या नजरेस पडतो.कुंजरगड हा हरिश्चंद्रगडाच्या पाठीमागे असल्याने इथून आपल्याला हरिश्चंद्रगडाची टोलारखिंडीकडील बाजू व्यवस्थितपणे बघता येते.


 गडाच्या माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांग दिसते. येथुन अहमदनगरच्या राकट, उंच कातळकडे असलेल्या डोंगर रांगांचे दर्शन होते. आपल्या नाकासमोर तारामती आणि हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला बघताना वेगळीच मजा येते. तसेच समोर घनचक्कर, गवळदेवची डोंगररांग दिसते. 
 हा आहे दौंड्या डोंगर, याच्या पोटामधे मोठमोठी नैसर्गिक विवरं (गुहा) आहेत, त्यामधे पावसाळ्यात स्थानिक बांधव आपापली पाळीव जनावरं घेऊन मुक्कामास असतात

  येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गडावर शक्यतो पाणी नसते त्यामुळे इथे कॅम्पिंग चा विचार स्वताच्या जबाबदारीवर घ्यावा.  किल्ल्याचा दक्षिण बुरुज तुटलेला आहे, त्यातून एक वाट खाली उतरते. थोडं खाली उतरल्यावर छोटासा रॉक पॅच आहे. तो उतरून  किल्ल्याच्या दक्षिण खिंडीकडे जाऊ लागले कि खाली खिंडीकडे एक कबर  दिसते. कबरीकडे उतरून उजवीकडे खिंडीकडे प्रस्थान करायचे..गडाच्या दक्षिण खिंडीत आलो कि खाली गावाकडे वाट उतरते. वाट एकाच उंचीवरून सरळ चालते. खिंड आपल्या पाठी असते. सावलीचा भाग संपतो आणि वाट थोडी उतरू लागते. विहीर गाव अगदी उजव्या हाताला आल्यावर ती सोंड सोडून गावाकडे उतरू लागायचे कि अर्ध्या तासात विहीर गावात.
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिम्गारो ट्रेकर्स
३) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! -प्र्. के. घाणेकर
४) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा - सतिश अक्कलकोट
५) www,durgbharai.in  हि वेबसाईट
६) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
७)  https://www.akolemaza.com, http://ahireyogesh.blogspot.com,  https://kunjargadview.blogspot.com, http://treklikevaibhavsachin.blogspot.com/     हे ब्लॉग
 
https://www.facebook.com/photo/?fbid=4332733413513295&set=pcb.4332757873510849





































कारकाई 

चिंतामणच्या दारात बुलेट लावली. चहा नाश्ता घेत खिरेश्वर सोडेपर्यंत साडेनऊ झाले. यंदा निमित होेते हरिश्चंद्रगड बालाघाट रांगेतील हरिश्चंद्रगडचा शेजारी कारकाई सोबतीला, अश्विनी आणि साधना
       

गावाची आश्रमशाळा सोडून शेतीवरील बांधावरून चालू पडलो. वाटेत काही मुलं खेळताना दिसली त्यांना विचारत वाटेची खात्री करून घेतली. टोलार खिंडीला डावीकडे ठेवत समोरच्या महाकाय डोंगराची दिशा धरली. सुरूवातीस वाट झक्क मळलेली नंतर एका टेकडीला वळसा घालून आतल्या बाजूने वर चढू लागली. आधी वाटलं हि टेकडी चढून पदरात जाऊ मग विरूद्ध बाजूला असलेल्या मुख्य धारेवर येऊ. काही मिनिटातच दोघं तिघं गवताचे भारे वाहून आणताना भेटले. त्यांनी तर कारकाई ला इकडून वाट नाही अस स्पष्ट सांगून टाकले. हि लोकं आतल्या बाजूस लाकूडफाटा गोळा करायला जातात, तसेच टेकडीच्या माथ्यावर जनावरं घेऊन.  माघारी वळून मुख्य ओढा पार करून पलीकडील बाजूस गेलो. एक अस्पष्टशी वाट धरली आत खोलवर जंगलात शिरत ती वाट काही चढाईला लागेना. दिशेप्रमाणे उजवीकडे कारवीच्या रानात घुसखोरी केली. ते पार करत मग ठिसूळ बारीक दगडगोटे तीव्र चढाई त्यात स्क्री. 

काही मिनिटातच त्या गचपणातून बाहेर येत आडव्या अरुंद अशा ट्रेव्हर्स वर आलो. आता समोरच्या बाजूस उजवीकडे होती ती कारकाई ची वाट त्याच वाटेला काहीजण खराड असेही म्हणतात. पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र कोनात असलेली अरूंद वाट पार करून पदरात दाखल झालो. थोडं उजव डावं करत मुख्य वाटेवर आलो. काही अंतर जाताच दोघेजण दिसले विचारपूस केल्यावर कळले की कारकाई ला खिरेश्वर हून सहसा कुणी जात नाहीत, हि मुख्य वाट कोल्हेवाडीतून येते. साधारण अर्धा पाऊण तास दाट जंगलातून चाल, तांबट चा कुटर कुक तर अधून मधून कानी पडणारा शिळकरी कस्तुर. पदरातील वाट थेट कड्याला चिकटून बाहेर आली. खाली पाहिलं तर आम्ही बरीच ऊंची गाठली होती. पिंपळगाव जोगा धरणाचा निळाशार फुगवटा, खिरेश्वर आसपासच्या वाड्या वस्त्या तर समोर डोंगराचे कातळकडे नजर थेट टोलारच्या दिशेने जात हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यातच. 

उजवीकडे कडा तर डावीकडे दरी अशी अरूंद वाट तिरक्या रेषेत चढाई. अधे मध्ये पिवळीधम्मक गवताची पाती. वीसेक मिनिटातच मुख्य नाळेत आलो याच वाटेला खराड दरा असे म्हणतात. सुरूवातीस बऱ्यापैकी रूंद असलेल्या नाळेत फार अशी झाडं नाहीच. तुरळक कारवी, कुठे खुरटी झुडपं तर मध्येच एखाद दुसरं ऊंबराचे झाडं, भर उन्हात तेच काय सावलीचे ठिकाण. नेहमीप्रमाणेच जसजसे वर जाऊ लागलो नाव अरूंद होत आजूबाजूचे कडे चांगलेच भेदक वाटू लागले. शेवटच्या टप्प्यातील दगडांचा खच आणि भयंकर घसारा दोन तीन पावलं वर गेलं तर एखादा पाऊल खाली येणारच. डावं उजवं करत कड्याचा आधार घेत अस्तेकदम वर पोहचलो. 

फार सपाट नसलेल्या ऊंच सखल माथ्यावर गवताळ पठारावरून आजूबाजूचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेस वारल्याची टेकडी, निरोळी कडील बाजू. पश्चिमेला पिंपळगाव जोगा जलाशया मागे उधळ्या, सिंदोळा, भोजगिरी कडील बाजू तर उत्तरेला हरिश्चंद्रगडाचा पसारा. अर्थात वातावरण धुसर असल्याने फार अजून काही पाहता आलं नाही. 

मळलेली एक वाट घेतली त्यानुसार साधारण हरिश्चंद्र दिशेने निघालो.साधना तर आधी म्हणत होती असेच जाऊ व टोलार खिंडीत उतरू. हे म्हणायला जरी सोपं असलं तरी हा कारकाईचा डोंगर जो हरिश्चंद्रगडाचा शेजारी जरी असला तरी तो टोलारच्या दिशेला टप्पा टप्प्यात टेकडीने जोडला आहे. सहाजिकच खिंड व काहीशी अवघड चढाई उतराई. वाट एका ठिकाणी कोरड्या ओढ्यात उतरत नाहिशी झाली. आम्ही तसेच पुढे उजवीकडे दरीच्या काठावर जाऊन पाहिलं तर खाली डाव्या बाजूला बर्‍यापैकी दूरवर भैरोबा दुर्ग. 

आमचं नियोजन त्याच भागात म्हणजे खिरेश्वरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या कोथळे उतरून वळसा घेत टोलार खिंड मार्गे खिरेश्वर परत. थोडक्यात असा लुप ठरविला होता. या ठिकाणी आणखी एक जाणवलं ते म्हणजे ही कारकाई निरोळी मानखंदा ते रांजणा पर्यंत ची रांग कोल्हेवाडी खिरेश्वर बाजूला सरळसोट तुटलेली आहे. त्यामुळेच या बाजूने भव्य एकसलग बसाल्टची महाकाय पर्वतरांग दिसते तर पल्याड मांडवी, फोफसंडी  खोऱ्यात व कोथळे बाजूस सौम्य टप्प्यांत उतरण आहे. 
         दरीच्या काठाने चालू लागलो, एखादी वाट त्या बाजूला उतरते का ते पाहत. तसंच जात वरच्या भागात आलो  एका लहानश्या ओढ्याला चांगल स्वच्छ वाहतं पाणी, ऐन जानेवारीत असं पाणी मिळणं हे भारीच. 

तसेही दुपारचं जेवणाला या पेक्षा चांगली जागा नसावी. घरून आणलेले डबे काढत ईन मीन तीन भिडू बसले. जेवण झाल्यावर ओढ्याच्या कडेला सावली पाहून ताणून द्यावीशी वाटत होती. या निर्जन एकाकी डोंगरावर अशा ठिकाणी मुक्काम करायला नक्कीच मजा येईल. नीरव शांततेत अगदी निवांत, रमणीय सुर्यास्त, गुढ संधीप्रकाश, तारकासमूह पाहात लागणारी झोप, सकारात्मक ऊर्जेने भारावलेला सुर्योदय. सारंच हवंहवस.असो.....
          देवा घाणेकर ने हा ट्रेक आधी केला होता. त्याला कोथळे कडील वाट कन्फर्म करायला फोन लावला. त्याने कोथळे च्या वाटेने चढाई केली होती त्या वाटेला मसाईदरा असं म्हणतात. देवाने फोन वर सविस्तर माहिती देत काही फोटोज पाठवले. त्यावरून दिशेप्रमाणे अंदाज बांधून ओढ्याच्या पलीकडील बाजूच्या घळीने उतरायला सुरूवात केली. आधी करवंदाची जाळी मग कारवी पण दगडातून अगदी रचाई केलेली वाटावी अशी मळलेली वाट. म्हटलं चला भारीच काम झालं. तीन चारशे फूट उतरल्यावर उजवीकडे प्रशस्त गुहा लागली. कारवीचे बारीक दांडे त्यावर शेण माती लिंपून आडोसा तयार केलेला आत मध्ये डोकावत पाहिलं तर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, तेलाचा कॅन व चटई. सरत्या पावसात कोथळे परिसरातील गावकरी इथे नक्कीच गुरं ठेवत असावीत. 

हरिश्चंद्रगड फोफसंडी परिसरातील अनेक डोंगरावर अशा गुहा आहेत. काही अंतर जाताच सेम अजून एक गुहा डावीकडे लागली. त्यातही माणसांचा वावर असल्याच्या खुणा पण सध्या मात्र कुणीही नाही. 

तसेच खाली उतरत राहिलो, वाट अधून मधून ओढ्यातून जाऊ लागली काही ठिकाणी तीव्र उतरण. दूरवर कोथळे परिसरातील घरे व शेतजमिनी दिसू लागल्या. चला तर परफेक्ट वाटेला लागलो. आता सारं नियोजनबद्ध जुळून येणार तेच पुढे असलेली साधना बसलेली दिसली. तिचा चेहरा वेगळाच वाटू लागला, जवळ गेल्यावर काय ते समजून गेलो. वाट The End होऊन खाली सरळ तीनशे साडेतीनशे फुटांचा फाॅल. 

थोडक्यात सर्व ठिक आहे असं वाटत असतानाच मार्ग खुंटला. आम्हा तिघांची अवस्था एकसारखीच.. पुन्हा गेल्या मार्गी वर धापा टाकत आलो तसाही दुसरा पर्याय नव्हताच. देवाने दिलेल्या फोटो प्रमाणे काही अंतर आणखी पुढे जात डावीकडे एक धार कोथळे बाजूस उतरलेली वरून तरी दिसत होती. त्यात साधना म्हणाली तिथे न जाता सरळ आणखी वरच्या भागात जाऊन मग कोल्हेवाडीत उतरता येईल बहुदा ती उंबारल्याची वाट पण वेळचं गणित पाहता उंबारल्याचा ऑप्शन तर फारच कठीण तर कोथळे बाजूस जर उतरायचे झाले तरी मसाई दरा उतराई मग भैरोबा दुर्ग ला वळसा घालून त्या बाजूने टोलार खिंड चढाई मग खिरेश्वरला उतराई हा पण मोठा फेरा. घड्याळात पाहिलं तर चार वाजून गेलेले सारासार विचार करत मी आलो त्याच खराड मार्गे उतरायचे जाहीर केले. हाच एकमेव ऑप्शन अंधार पडायच्या आत खिरेश्वर पोहचणे जो एकदम सुरक्षित. हे ठरल्यावर अश्विनी काहीशी नाराज झाली दुसरी वाट उतराई राहून ट्रेक ठरल्याप्रमाणे होणार नव्हता तर तिला पुन्हा ती खराड दरा ची ती तीव्र घसराईवाली वाट आणि मुख्य म्हणजे सकाळी जसे वाट शोधत घुसून चढलो तो प्रकार नको होता. तिला म्हणालो, हा खराडचा अगदी सुरूवातीचा घसराई पॅच सावकाश पार करू मग पदरात गेल्यावर थेट खिरेश्वर कडे उतरायचे प्रयोग न करता सरळ आडवी मारत मळलेल्या कोल्हेवाडीच्या वाटेने जाऊ. तसेही साधना ने कोल्हेवाडी सुळका क्लांईब केला होता त्यामुळे पुढची वाट तीला माहीत होती. ठरलं तर, मघाच्या ओढ्यातून अर्धवट पाण्याचा बाटल्या पूर्ण भरून उतराईला सुरूवात केली. 

पंधरा ते वीस मिनिटात खराड दरा ला आलो. खोलवर डावीकडे धरणाचे पाणी मावळतीकडे जाणाऱ्या सुर्य किरणानी चकाकत होते. सावधगिरीने पावलं टाकत योग्य ठिकाणी काठीचा आधार घेत तो घसारा टप्पा व्यवस्थित पार झाला. एक दोन थांबे घेत नाळेतून बाहेर येत गवताळ आडवी पकडली मग पदरातून झटपट पुढे जाऊ लागलो. मळलेलेल्या वाटेने आणखी एक टप्पा खाली उतरत मोकळवनात आलो. इथे काही ढोरवाटा चकवू पहात होत्या आम्ही मात्र दिशेप्रमाणे एकदम परफेक्ट सरकत होतो. मध्येच जंगलाचे टप्पे मग परत मोकळं पुन्हा जंगलात. असं आडव बरंच चालत होतो. साधनाला विचारत, कधी येईल तुझा सुळका ? ती पण न वैतागत येणार येणार म्हणत चालत होती. अखेर एकदाचा पदराला खालच्या बाजूने बिलगून असलेला कोल्हेवाडीचा सुळका दिसला. खाली कोल्हेवाडी सुध्दा व्यवस्थित नजरेत. आकाशातील रंगारंगांच्या छटा पाहत क्षणभर विश्रांती आणि आम्हा तिघांचा एक सेल्फी घेऊन चालू पडलो. 

आत वाट सुळक्याला वळसा घालून नाळेतून खाली उतरू लागली. अर्ध्या पाऊण तासात ती दगड धोंड्यातली नाळ पार करून शेवटचा टेपाड उतरून सपाटीवर आलो. मग शेतं पार करत कोल्हेवाडीत दाखल झालो तेव्हा सुर्यास्त झाला होता. 

वाडीतील नौशाद नावाचा मुलगा साधनाच्या ओळखीचा होता. त्याचाच घराच्या अंगणात विसावलो, गार पाणी मग त्याच्या अम्मीने कोरा चहा पाजला. खरंच तरतरी आली. नौशाद ने आम्हाला खिरेश्वर ला सोडले तेवढीच दीड दोन किमीची डांबरी रस्त्याची तंगडतोड वाचली.....
        दुसरी वाट झाली नाही, पण वेळेत कारकाई  पाहून खाली आलो हेही काय कमी नाही.
        वाटाड्या अथवा गाईड घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.. मी तरी हे सारासार विचार करून ठरवतो. तरीही मला विना गाईड, अनुभव आणि कौशल्य वापरून केलेली भटकंती खुप आवडते. सर्व व्यवस्थित घडलं तर बल्ले बल्ले नाहीतर आहेच जमा होणारा अनुभव...


                                                                             योगेश चंद्रकांत आहिरे








 

अलंग मदन कुलंग, रतनगड, नवरा नवरी,नाफ्ता,सांधण दरी, घनचक्कर ,मध्येच दूरवर धुक्यातून कळसुबाई शिखर आपलं अस्तित्व दाखवत होतं. दोन डोळ्यात हे सारं भरून घेत तिसऱ्या डोळ्याने क्लिकक्लिकाट चालू झाला.मन भरलं. उतरण्यास प्रारंभ केला. झपाट्याने खाली उतरत होतो. बऱ्याचं ठिकाणी घसरण असल्याने काळजीपूर्वक उतराव लागतं नाहीतर दाणकन पार्श्वभाग आपटण्याची शक्यता. आधारास कारवी होतीच. थोड्याच वेळात खाली पोहोचलो. गरमागरम पोहे व फोडणीचा भात हाणत कुमशेत कडे निघालो. पुढचं लक्ष्य  होतं कात्राबाई डोंगर. चढाईस सुरूवात केली तेव्हा नारायणराव माथ्यावर आले होते. पण उकाडा जाणवत नव्हता . समोरच अजस्त्र असा कात्राचा डोंगर आमची प्रतीक्षा करत होता .  ही डोंगरवाट आपलसं करीत होती. या डोंगरवाटांवर  मनसोक्त बागडण्यासाठी तर भटके एवढया दुरवर येतात. काही ठिकाणी वाट चिंचोळी होती. कात्राची घनदाट जंगलवाट मन सुखावून टाकत होती. मजल दरमजल करत कात्राची वाट कापत होतो. कात्राच्या वाटेत मैलाचे दगड आहेत. असं म्हणतात कि गोरा साहेब भंडारदऱ्याहून रतनगडवर कात्राच्या खिंडीतून घोड्यावरून जायचा. वाटेत कात्राबाईचं मंदिर लागतं. तिथे नतमस्तक होत टॉपवर चढाईस सुरूवात केली. बाजूला गगनाला स्पर्श करणारे बेलाग डोंगर. पुढची वाट निमुळती आहे. तोल सांभाळावा लागतो. खाली नजर टाकली कि भंडारदऱ्याचा जलसंचय लक्ष वेधतो. एका बऱ्यापैकी मोठ्या चढाईनंतर कात्राचा टॉप दिसू लागतो. मोठच्या मोठं पसरलेलं विस्तीर्ण पठार. रतनगडाची भेट घेण्यासाठी माथ्याच्या कडेवर आलो. सह्याद्रीतलं हे रत्न समोरचं उभं ठाकलं होतं. खालची दरी छातीत धडकी भरवत होती. रतनगडचा खुट्टा दिमाखात उभा होता. थोड्या ढगाळ वातावरणामुळे बाकीचे गड लपून बसले होते. कात्राचा एक आगळा अनुभव घेत खाली उतरलो. वाटेत पिठलं भात खाऊन तृप्त होत गावची वाट धरली. एक आगळी मोहीम सुखरूपपणे पार पडली. बस तयार होतीचं. वाटाड्यांना निरोप दिला. बस भरधाव परतीच्या प्रवासास निघाली. सवंगड्यांना पुढच्या भटकंतीसाठी भेटण्याचं आश्वासन देत निरोप घेतला व मुंबईत परतण्यास आळेफाट्याला उतरलो ते ट्रेकच्या सुखद आठवणी सोबत घेऊनच.






IT मध्ये काम करत असलो तरी नजर सतत सह्याद्रीवर भिरभिरत असतेसतत आस लागलेली असते वीकएंडचीफिरतीचे चक्र सोमवार पासुनच डोक्यात सुरु होतेया वेळेस अशीच नजर भिरभिरत पडली ती अकोले तालुक्यातील कुंजरगड आणि कोथळ्याच्या भैरवगडावर (जिल्हा अहमदनगर). तयारीला सुरुवात झाली सगळ्यांना मेसेज पोहोचते झाले टाळकी (yms, निखिल, विवेक आणि मी) या ट्रेक साठी तयार झालीमंगळवार पासुनच माहिती काढणेगरजेच्या वस्तु जमवणेमुक्कामाची जागापायथ्याचे गाव अशी सगळी माहिती सर्व जण जमवु लागलेदिवस ठरला  नोव्हेंबरशनिवार या दिवशी ट्रेक करायचा आणि  नोव्हेंबरला रात्री निघायचेसगळे जण वाट बघतच होते कोण कधी प्लॅन टाकत आहेमी माझी गाडी एकदम चकाचक करून घेतलीखुप दिवसांनी ट्रेकला जायचा प्लॅन ठरला होता.



२ नोव्हेंबर, शुक्रवार उजाडला. शुक्रवार संध्याकाळ म्हटलं की लोकांची तयारी होते इकडे जाऊ, त्या हॉटेल ला जाऊ, आज या movie ला जाऊ पण आम्हा ट्रेकर्स ची जमातच वेगळी आहे. आज संध्याकाळी ८ वाजता निघायचे असे ठरवले होते. पण येत्या आठवड्यात दिवाळी आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही, सगळीकडे लोकांची नुसती धावपळ चालु होती. सगळ्या रस्त्यांना गर्दी होती. सर्वजण ठरलेल्या वेळेप्रमाणे ६ वाजता ऑफिस मधुन निघाले खरे पण सर्वजण जमुन निघायला १० वाजले आणि लक्षात आले जाता जाता हर्षलकडे असलेला आमचा टेन्ट घ्यायचा आहे. ट्राफिक असल्याने आम्हाला तोच रस्ता सोयीचा होता. हर्षल कडुन टेन्ट घेतला आणि आळंदी मार्गे आम्ही चाकणच्या दिशेने प्रवास चालु केला. मजल दरमजल करत आम्ही ११ वाजता चाकण मध्ये पोहोचलो. आता सर्वांना भुका लागल्या होत्या. चाकण सोडुन पुढे गेल्यावर मध्ये एका हॉटेलमध्ये सर्वांनी जेवण करून घेतले आणि पुढचा प्रवास सुरु केला. पुढे नारायणगाव, आळेफाटा, ओतुर, ब्राह्मणवाडा, कोतुळ पालथे घालत पहाटे ३ वाजता विहीर गावात पोहोचलो.

पहाटेचे ६ वाजले आणि गजर झाला, २-३ तासांची झोप घेतली आणि सर्वजण आवरा आवरी करायला लागले. कुंजरगडाच्या मागील बाजुने हळु हळु सुर्य उगवत होता. मी सोबत आणलेला गॅस बाहेर काढला आणि readymade उपमा बनवायला सुरुवात केली. पुढच्या ५ मिनिटांमध्ये उपमा तयार झाला सर्व जणांनी हात पाय धुवून नाश्ता करून घेतला. सर्वांचं यावरून होईपर्येंत ७.३० वाजले, गावात असलेल्या भांगरे काकांचा आम्ही निरोप घेतला आणि कुंजरगडाच्या दिशेने कुच केली. इतिहासात या किल्ल्याला एक विशेष महत्व आहे. कांचनबारीच्या लढाईनंतर शिवाजी राजे १६७० साली येथे काही दिवस विश्रांती साठी होते. अहमदनगरच्या राकट प्रदेशात असलेल्या बेलाग किल्ल्यांपैकी हा एक, जास्ती करून सर्व ट्रेकर्स अलंग-मदन-कुलंग, रतनगड हरिश्चंद्रगड यांना भेट देतात पण त्यात बाजुला राहिलेले किल्ले कलाडगड, कुंजरगड. विहीर गावांमधुन कुंजरगड आडवा पसरलेला दिसतो, या किल्ल्याची एक सोंड विहीर गावाच्या बाजुला उतरते. या किल्ल्याला लागुनच बाळाईचा डोंगर आहे. कुंजरगडाचे दुसरे नाव कोंबड किल्ला. या किल्ल्याची उंची साधारण समुद्रसपाटीपासून ४०००-४५०० फूट आहे. किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत एक वाट विहीर गावातुन जाते तर दुसरी वाट फोफसंडी गावातुन जाते. विहीर गावातुन दोन वाटा गडावर जातात, एक वाट सरळ खिंडीतून वर चढते, याच मार्गे पलीकडे फोफसंडी गावात जात येते. विहीर गावातील मंडळी लग्नकार्यासाठी, अथवा इतर कार्यक्रमांसाठी फोफसंडी गावात जाण्यासाठी या खिंडीमार्गे जाणाऱ्या वाटेचा वापर करतात. दुसरी वाट गडाला वळसा मारून बाळाई आणि गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीतून वर गडावर चढते.









 वाटेत कुठे-कुठे पिवळ्या फ़ुलांचे गालीचे होते तर कुठे हिरवीगार भाताची शेत डोलत होती. क्लीकत क्लीकत चाललो होतो.





हिरवी शेते




नेहमीप्रमाणे माननीय श्री. आनंद पाळंदे यांचे "डोंगरयात्रा" पुस्तक बरोबर होतेच. त्यात म्ह्टल्याप्रमाणे विहीर गावातुन कुंजरगडावर दिड तासात पोहोचता येते. पण प्रत्यक्षात आम्हाला पावणे तीन तास लागले. मी म्ह्टलं त्यांनी कुंजरगडावरुन विहीर गावात ऊतरायला दिड तास म्ह्ट्लं असेल आपल्याला चढुन जायचं असल्याने थोडा जास्त वेळ लागला. पण तरीही एवढा फ़रक पडत नाही कधी आनंद पाळंदे यांनी दिलेल्या वेळेमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये. काहीही असो पण पुन्हा एकदा वेळेचा अंदाज चुकला होता एवढ मात्र खरं.
दुस-या टेकाडावर

दुस-या टेकाडावरुन विहीर गाव

वाटेतील हनुमान मंदिर

दाट झाडीतुन जाणारी वाट

साधारण ३.०० च्या सुमारास कुंजरगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर विशेष काहीही नाही. पुस्तकात म्हट्लं आहे "माथ्याच्या डावीकडे गेल्यावर एकमेव टाके आहे" पण प्रत्यक्षात आम्हाला तीन टाकी दिसली ("डोंगरयात्रा"चा आणखी एक धक्का) असो.
कणीस ?

कणसाचे दाणे (झुम)

गवत



"गडाच्या उत्तर टोकाजवळ एक खोदीव बोगदा आहे, यातुन रांगत आत गेल्यावर कड्यावर उघडणारे दुसरे तोंड आढळते" (इती "डोंगरयात्रा"). जाऊन पाहिले खरच एक खोदीव बोगदा आहे पण रांगत जाणे कठीण वाट्ले शिवाय आतमध्ये पाणी साठ्ले होते आणि पुढे वाकुन पाहिले तर बुजवल्यासारखे वाटले त्यामुळे रांगत जाऊन कड्यावर उघडणारे दुसरे तोंड बघायचा मोह आम्ही आवरला.
बोगदा

मी आणि गिरीष




तिथेच एका टाक्यापाशी खाऊन घेतलं टाक्यातल गार पाणी पिऊन त्रुप्त झालो आणि निघालो. ऊतरत असताना वाटेत पुन्हा त्या मामाचा फ़ोन आला बराच वेळ झाला कुठे आहात? म्हटलं येतोच अर्ध्या तासात. साधारण साडेपाच वाजता पुन्हा विहीर गावात आलो. येतानाच आज आपला कलाडगड काही होणार नाही तेव्हा ऊद्या तीन गड करण्यापेक्षा कलाडगड ड्रॊप करुन आज भैरवगडावर जाऊन राहु असं ठरलं.

कुंजरगड
6–7 minutes

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४७२१ फुट

श्रेणी : मध्यम

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्गसंपन्न तालुका. येथील हरिश्चंद्रगड हा बहुतेक दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. येथील निसर्गसौंदर्याने मोहित होऊन दुर्ग भटक्यांनी कधी ना कधी या किल्ल्याला भेट दिलेली असते. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी एक अपरिचित दुर्ग म्हणजे कुंजरगड. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासूनसुरू होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड उर्फ कोंबडगड हा टेहळणीचा किल्ला आहे. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या एका बाजुला फोफसंडी हे गाव तर दुसऱ्या बाजुला विहीर हे गाव वसले आहे. फोफसंडी गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असुन फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. त्यामानाने विहीर गावातुन या किल्ल्यावर जाताना कमी दमछाक होते. मुंबईहुन माळशेज घाटमार्गे ओतूर-बामणवाडा- कोतुळ किंवा मुंबई-घोटी– भंडारदरामार्गे राजूर या मार्गाने विहीर गावात जाता येते. विहीर गाव म्हणजे काही घरांची एक छोटी वस्ती आहे. विहीर गावामागे उत्तर दिशेला कुंजरगड खरोखर एखाद्या हत्तीसारखा पसरलेला दिसतो. कुंज या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो. याचाच अपभ्रंश होऊन कुजंरगड असे पडले असावे.किल्ल्याची चढाई पायथ्याच्या विहीर गावातून सुरू होते. गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. एक म्हणजे कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. दुसरा म्हणजे गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणाऱ्या वाटेने गडावर जाता येते. दुसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. सुरूवातीला किल्ल्यावर जाणारी पायवाट आणि पुढील खडी चढण आपल्याला खिंडीच्या साधारणत: पाऊण उंचीवर आल्यावर डावीकडे वळते. पुढचा प्रवास गड उजव्या बाजूला ठेवून डोंगराला वळसा घालून करावा लागतो. या वाटेने जाताना सर्वप्रथम झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसऱ्या मुर्तीला गावकरी काळोबा म्हणतात. या मुर्ती पाहून कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या झाडीतून आपण अर्ध्या तासात दोन डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. या वाटेने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. फोफसंडी गावाकडून येणारी वाट खिंडीच्या या बाजूला येऊन मिळते. या खिंडीत आल्यावर समोरच गडाची ढासळलेली तटबंदी दिसते. येथुन डावीकडुन जाणाऱ्या पायवाटेने आपल्याला गडावर जाणाऱ्या पायऱ्याकडे जाता येते किंवा थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करुन उजवीकडील तुटलेल्या तटबंदीमधून गडप्रवेश करता येतो पण सर्व अवशेष पहायचे असल्यास पायवाटेने जाणेच योग्य. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरवातीलाच एक नैसर्गिक गुहा असुन ती काही प्रमाणात खोदलेली आहे. या गुहेच्या अलीकडे उजवीकडे कड्याला लागुन एक समांतर वाट आहे. या वाटेने काही १०० फुट अंतर गेल्यावर आपल्याला गडावरील सर्वात मोठे आश्चर्य दिसते. येथे फोफसंडी गावाच्या दिशेने तोंड करून एक कातळात खोदलेली गुहा आहे. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत डोंगराच्या पुर्व-पश्चिम आरपार जाणारे एक नैसर्गिक भुयार असुन या भुयाराची रूंदी केवळ एक माणूस रांगत जाईल एवढी आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या भुयारात शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भुयार मोठे होत जाते. भुयारात प्रवेश केल्यावर दोन मिनिटात आपण विहिर गावाकडे असलेल्या मुखाने बाहेर येतो. या भुयाराच्या टोकाला एकावेळी चार पाच जण उभे राहू शकतात. हि गुहा पाहुन परत मूळ वाटेवर आल्यावर पायऱ्याच्या मार्गाने आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश करतो. पायथ्यापासुन चढाईला सुरवात केल्यानंतर दिड तासात आपण गडावर पोहोचतो. गडावर प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. या वास्तुच्या भिंतीलगत एक मारुतीची मुर्ती ठेवलेली आहे. गडाचा माथा उजवीकडे अतिशय चिंचोळा असुन या भागात केवळ पाण्याचे एक मोठे उध्वस्त जोडटाके आहे. गडाच्या या टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गड ७ एकर परिघात दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडावरील सर्व अवशेष प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजुस आहे. या वाटेने डाव्या बाजूच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजुला डोंगर उतारावर ठराविक अंतरावर पाण्याची ५ सुकलेली टाकी दिसतात. यात एक जोडटाके असुन एक पावसाळी साचपाण्याचे टाके आहे. या टाक्यांच्या मधील भागात एका लहानशा उध्वस्त वास्तू अवशेषात एक नव्याने बांधलेला सिमेंटचा नंदी व शिवपिंडी असुन गवतात भग्न झालेली हनुमानाची मुर्ती आहे. वाटेच्या उजव्या बाजुस टेकडावर एका मोठ्या वास्तूचे अवशेष दिसतात. एकंदरीत रचनेवरून हा किल्लेदाराचा वाडा व सदर असावी. या वाड्याच्या मागील भागात उतारावर दगडात कोरलेली पाण्याची अजुन सहा टाकी असुन यात एक कपारीत खोदलेले टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध असते. तसेच एका मोठया जोडटाक्याच्या भिंतीवर दोन झिजलेली शिल्पे दिसुन येतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांग दिसते. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार कुंजर गडासमोरील डोंगरावर तीन गुहा असुन या गुहांचा वापर ते पावसाळ्यात आपली गुरे बांधण्यासाठी करतात. गडावर चढून आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजूला लागून असणाऱ्या या डोंगरावरून खाली उतरल्यास कपारीतील या तीन गुहा पाहायला मिळतील. या गुहा पाहुन तो डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते. इतिहासात या किल्ल्याचा ओझरता उल्लेख मिळतो. ऑक्टोबर १६७० मध्ये दिंडोरीच्या लढाईनंतर शिवाजी महाराज कुंजरगडावर आले होते. मराठयांची फौज येथे विश्रांतीसाठी थांबली असता दिंडोरीच्या लढाईतील जखमींवर येथे उपचार केले गेले.
© Suresh Nimbalkar

कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) किल्ल्याची ऊंची :  4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग
जिल्हा :  श्रेणी : मध्यम
कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्‍या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

सुचना
१) खाजगी वाहानाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलालगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात.सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उन तापण्या अगोदर कलालगड करावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. त्याची साईट वरील माहिती वाचुन घ्यावी) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड करुन परतीचा प्रवास करावा.
२)वरील सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर लिहीलेली आहे

पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्‍या मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्‍यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.

या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. हि गुहा पाहुन पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.


येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्‍या डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) विहिर गावातून :- विहिर गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाव गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने (१६ किमी) ब्राम्हणगाव - (१६ किमी) कोतूळ -(१६ किमी) विहिर गाव आहे.विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
(अ) कुंजरगड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीतून गडावर जाता येते.
(ब) कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते.

त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गड चढतांना खिंदी मार्गे चढावा तर उतरतांना बाजूच्या डोंगरवरून उतरावा म्हणजे सर्व अबषेश पाहून होतात.

२) फोफसंडी गावाकडून :- फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. गावातून एकच वाट कुंजर गडावर जाते. या मार्गाने गडावर आल्यास हनुमानाची व काळोबाची मुर्ती पहायला मिळत नाही. त्यासाठी डोंगराला वळसा घालून विहिर गावाच्या बाजूस जाऊन परत फिरावे लागते. तसेच नैसर्गिक गुहा पहाण्यासाठी वेगळा फेरा पडतो.
फोफसंडी गावाकडून गड चढून विहिर गावात उतरता येईल. परंतु या भागात एसटीची सेवा मर्यादीत आहे. त्यामुळे स्वत:चे खाजगी वहान असल्यास उत्तम.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) विहिर गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात. २) फोफसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी

कारकाई

चिंतामणच्या दारात बुलेट लावली. चहा नाश्ता घेत खिरेश्वर सोडेपर्यंत साडेनऊ झाले. यंदा निमित होेते हरिश्चंद्रगड बालाघाट रांगेतील हरिश्चंद्रगडचा शेजारी कारकाई... सोबतीला, अश्विनी आणि साधना.
गावाची आश्रमशाळा सोडून शेतीवरील बांधावरून चालू पडलो. वाटेत काही मुलं खेळताना दिसली त्यांना विचारत वाटेची खात्री करून घेतली. टोलार खिंडीला डावीकडे ठेवत समोरच्या महाकाय डोंगराची दिशा धरली. सुरूवातीस वाट झक्क मळलेली नंतर एका टेकडीला वळसा घालून आतल्या बाजूने वर चढू लागली. आधी वाटलं हि टेकडी चढून पदरात जाऊ मग विरूद्ध बाजूला असलेल्या मुख्य धारेवर येऊ. काही मिनिटातच दोघं तिघं गवताचे भारे वाहून आणताना भेटले. त्यांनी तर कारकाई ला इकडून वाट नाही अस स्पष्ट सांगून टाकले. हि लोकं आतल्या बाजूस लाकूडफाटा गोळा करायला जातात, तसेच टेकडीच्या माथ्यावर जनावरं घेऊन. माघारी वळून मुख्य ओढा पार करून पलीकडील बाजूस गेलो. एक अस्पष्टशी वाट धरली आत खोलवर जंगलात शिरत ती वाट काही चढाईला लागेना. दिशेप्रमाणे उजवीकडे कारवीच्या रानात घुसखोरी केली. ते पार करत मग ठिसूळ बारीक दगडगोटे तीव्र चढाई त्यात स्क्री. काही मिनिटातच त्या गचपणातून बाहेर येत आडव्या अरुंद अशा ट्रेव्हर्स वर आलो. आता समोरच्या बाजूस उजवीकडे होती ती कारकाई ची वाट त्याच वाटेला काहीजण खराड असेही म्हणतात. पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र कोनात असलेली अरूंद वाट पार करून पदरात दाखल झालो. थोडं उजव डावं करत मुख्य वाटेवर आलो. काही अंतर जाताच दोघेजण दिसले
विचारपूस केल्यावर कळले की कारकाई ला खिरेश्वरहून सहसा कुणी जात नाहीत, हि मुख्य वाट कोल्हेवाडीतून येते. साधारण अर्धा पाऊण तास दाट जंगलातून चाल, तांबट चा कुटर कुक तर अधून मधून कानी पडणारा शिळकरी कस्तुर. पदरातील वाट थेट कड्याला चिकटून बाहेर आली. खाली पाहिलं तर आम्ही बरीच ऊंची गाठली होती. पिंपळगाव जोगा धरणाचा निळाशार फुगवटा, खिरेश्वर आसपासच्या वाड्या वस्त्या तर समोर डोंगराचे कातळकडे नजर थेट टोलारच्या दिशेने जात हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यातच. उजवीकडे कडा तर डावीकडे दरी अशी अरूंद वाट तिरक्या रेषेत चढाई. अधे मध्ये पिवळीधम्मक गवताची पाती. वीसेक मिनिटातच मुख्य नाळेत आलो याच वाटेला खराड दरा असे म्हणतात. सुरूवातीस बऱ्यापैकी रूंद असलेल्या नाळेत फार अशी झाडं नाहीच. तुरळक कारवी, कुठे खुरटी झुडपं तर मध्येच एखाद दुसरं ऊंबराचे झाडं, भर उन्हात तेच काय सावलीचे ठिकाण. नेहमीप्रमाणेच जसजसे वर जाऊ लागलो नाव अरूंद होत आजूबाजूचे कडे चांगलेच भेदक वाटू लागले. शेवटच्या टप्प्यातील दगडांचा खच आणि भयंकर घसारा दोन तीन पावलं वर गेलं तर एखादा पाऊल खाली येणारच. डावं उजवं करत कड्याचा आधार घेत अस्तेकदम वर पोहचलो. फार सपाट नसलेल्या ऊंच सखल माथ्यावर गवताळ पठारावरून आजूबाजूचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेस वारल्याची टेकडी, निरोळी कडील बाजू. पश्चिमेला पिंपळगाव जोगा जलाशया मागे उधळ्या, सिंदोळा, भोजगिरी कडील बाजू तर उत्तरेला हरिश्चंद्रगडाचा पसारा. अर्थात वातावरण धुसर असल्याने फार अजून काही पाहता आलं नाही. मळलेली एक वाट घेतली त्यानुसार साधारण हरिश्चंद्र दिशेने निघालो.साधना तर आधी म्हणत होती असेच जाऊ व टोलार खिंडीत उतरू. हे म्हणायला जरी सोपं असलं तरी हा कारकाईचा डोंगर जो हरिश्चंद्रगडाचा शेजारी जरी असला तरी तो टोलारच्या दिशेला टप्पा टप्प्यात टेकडीने जोडला आहे. सहाजिकच खिंड व काहीशी अवघड चढाई उतराई. वाट एका ठिकाणी कोरड्या ओढ्यात उतरत नाहिशी झाली. आम्ही तसेच पुढे उजवीकडे दरीच्या काठावर जाऊन पाहिलं तर खाली डाव्या बाजूला बर्‍यापैकी दूरवर भैरोबा दुर्ग. आमचं नियोजन त्याच भागात म्हणजे खिरेश्वरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या कोथळे उतरून वळसा घेत टोलार खिंड मार्गे खिरेश्वर परत. थोडक्यात असा लुप ठरविला होता. या ठिकाणी आणखी एक जाणवलं ते म्हणजे ही कारकाई निरोळी मानखंदा ते रांजणा पर्यंत ची रांग कोल्हेवाडी खिरेश्वर बाजूला सरळसोट तुटलेली आहे. त्यामुळेच या बाजूने भव्य एकसलग बसाल्टची महाकाय पर्वतरांग दिसते तर पल्याड मांडवी, फोफसंडी खोऱ्यात व कोथळे बाजूस सौम्य टप्प्यांत उतरण आहे.
दरीच्या काठाने चालू लागलो, एखादी वाट त्या बाजूला उतरते का ते पाहत. तसंच जात वरच्या भागात आलो एका लहानश्या ओढ्याला चांगल स्वच्छ वाहतं पाणी, ऐन जानेवारीत असं पाणी मिळणं हे भारीच. तसेही दुपारचं जेवणाला या पेक्षा चांगली जागा नसावी. घरून आणलेले डबे काढत ईन मीन तीन भिडू बसले. जेवण झाल्यावर ओढ्याच्या कडेला सावली पाहून ताणून द्यावीशी वाटत होती. या निर्जन एकाकी डोंगरावर अशा ठिकाणी मुक्काम करायला नक्कीच मजा येईल. नीरव शांततेत अगदी निवांत, रमणीय सुर्यास्त, गुढ संधीप्रकाश, तारकासमूह पाहात लागणारी झोप, सकारात्मक ऊर्जेने भारावलेला सुर्योदय. सारंच हवंहवस.असो.....
देवा घाणेकर ने हा ट्रेक आधी केला होता. त्याला कोथळे कडील वाट कन्फर्म करायला फोन लावला. त्याने कोथळे च्या वाटेने चढाई केली होती त्या वाटेला मसाईदरा असं म्हणतात. देवाने फोन वर सविस्तर माहिती देत काही फोटोज पाठवले. त्यावरून दिशेप्रमाणे अंदाज बांधून ओढ्याच्या पलीकडील बाजूच्या घळीने उतरायला सुरूवात केली. आधी करवंदाची जाळी मग कारवी पण दगडातून अगदी रचाई केलेली वाटावी अशी मळलेली वाट. म्हटलं चला भारीच काम झालं. तीन चारशे फूट उतरल्यावर उजवीकडे प्रशस्त गुहा लागली. कारवीचे बारीक दांडे त्यावर शेण माती लिंपून आडोसा तयार केलेला आत मध्ये डोकावत पाहिलं तर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, तेलाचा कॅन व चटई. सरत्या पावसात कोथळे परिसरातील गावकरी इथे नक्कीच गुरं ठेवत असावीत. हरिश्चंद्रगड फोफसंडी परिसरातील अनेक डोंगरावर अशा गुहा आहेत. काही अंतर जाताच सेम अजून एक गुहा डावीकडे लागली. त्यातही माणसांचा वावर असल्याच्या खुणा पण सध्या मात्र कुणीही नाही. तसेच खाली उतरत राहिलो, वाट अधून मधून ओढ्यातून जाऊ लागली काही ठिकाणी तीव्र उतरण. दूरवर कोथळे परिसरातील घरे व शेतजमिनी दिसू लागल्या. चला तर परफेक्ट वाटेला लागलो. आता सारं नियोजनबद्ध जुळून येणार तेच पुढे असलेली साधना बसलेली दिसली. तिचा चेहरा वेगळाच वाटू लागला, जवळ गेल्यावर काय ते समजून गेलो. वाट The End होऊन खाली सरळ तीनशे साडेतीनशे फुटांचा फाॅल. थोडक्यात सर्व ठिक आहे असं वाटत असतानाच मार्ग खुंटला. आम्हा तिघांची अवस्था एकसारखीच.. पुन्हा गेल्या मार्गी वर धापा टाकत आलो तसाही दुसरा पर्याय नव्हताच. देवाने दिलेल्या फोटो प्रमाणे काही अंतर आणखी पुढे जात डावीकडे एक धार कोथळे बाजूस उतरलेली वरून तरी दिसत होती. त्यात साधना म्हणाली तिथे न जाता सरळ आणखी वरच्या भागात जाऊन मग कोल्हेवाडीत उतरता येईल बहुदा ती उंबारल्याची वाट पण वेळचं गणित पाहता उंबारल्याचा ऑप्शन तर फारच कठीण तर कोथळे बाजूस जर उतरायचे झाले तरी मसाई दरा उतराई मग भैरोबा दुर्ग ला वळसा घालून त्या बाजूने टोलार खिंड चढाई मग खिरेश्वरला उतराई हा पण मोठा फेरा. घड्याळात पाहिलं तर चार वाजून गेलेले सारासार विचार करत मी आलो त्याच खराड मार्गे उतरायचे जाहीर केले. हाच एकमेव ऑप्शन अंधार पडायच्या आत खिरेश्वर पोहचणे जो एकदम सुरक्षित. हे ठरल्यावर अश्विनी काहीशी नाराज झाली दुसरी वाट उतराई राहून ट्रेक ठरल्याप्रमाणे होणार नव्हता तर तिला पुन्हा ती खराड दरा ची ती तीव्र घसराईवाली वाट आणि मुख्य म्हणजे सकाळी जसे वाट शोधत घुसून चढलो तो प्रकार नको होता. तिला म्हणालो, हा खराडचा अगदी सुरूवातीचा घसराई पॅच सावकाश पार करू मग पदरात गेल्यावर थेट खिरेश्वर कडे उतरायचे प्रयोग न करता सरळ आडवी मारत मळलेल्या कोल्हेवाडीच्या वाटेने जाऊ. तसेही साधना ने कोल्हेवाडी सुळका क्लांईब केला होता त्यामुळे पुढची वाट तीला माहीत होती. ठरलं तर, मघाच्या ओढ्यातून अर्धवट पाण्याचा बाटल्या पूर्ण भरून उतराईला सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटात खराड दरा ला आलो. खोलवर डावीकडे धरणाचे पाणी मावळतीकडे जाणाऱ्या सुर्य किरणानी चकाकत होते. सावधगिरीने पावलं टाकत योग्य ठिकाणी काठीचा आधार घेत तो घसारा टप्पा व्यवस्थित पार झाला. एक दोन थांबे घेत नाळेतून बाहेर येत गवताळ आडवी पकडली मग पदरातून झटपट पुढे जाऊ लागलो. मळलेलेल्या वाटेने आणखी एक टप्पा खाली उतरत मोकळवनात आलो. इथे काही ढोरवाटा चकवू पहात होत्या आम्ही मात्र दिशेप्रमाणे एकदम परफेक्ट सरकत होतो. मध्येच जंगलाचे टप्पे मग परत मोकळं पुन्हा जंगलात. असं आडव बरंच चालत होतो. साधनाला विचारत, कधी येईल तुझा सुळका ? ती पण न वैतागत येणार येणार म्हणत चालत होती. अखेर एकदाचा पदराला खालच्या बाजूने बिलगून असलेला कोल्हेवाडीचा सुळका दिसला. खाली कोल्हेवाडी सुध्दा व्यवस्थित नजरेत. आकाशातील रंगारंगांच्या छटा पाहत क्षणभर विश्रांती आणि आम्हा तिघांचा एक सेल्फी घेऊन चालू पडलो. आत वाट सुळक्याला वळसा घालून नाळेतून खाली उतरू लागली. अर्ध्या पाऊण तासात ती दगड धोंड्यातली नाळ पार करून शेवटचा टेपाड उतरून सपाटीवर आलो. मग शेतं पार करत कोल्हेवाडीत दाखल झालो तेव्हा सुर्यास्त झाला होता. वाडीतील नौशाद नावाचा मुलगा साधनाच्या ओळखीचा होता. त्याचाच घराच्या अंगणात विसावलो, गार पाणी मग त्याच्या अम्मीने कोरा चहा पाजला. खरंच तरतरी आली. नौशाद ने आम्हाला खिरेश्वर ला सोडले तेवढीच दीड दोन किमीची डांबरी रस्त्याची तंगडतोड वाचली.....
दुसरी वाट झाली नाही, पण वेळेत कारकाई पाहून खाली आलो हेही काय कमी नाही.
वाटाड्या अथवा गाईड घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.. मी तरी हे सारासार विचार करून ठरवतो. तरीही मला विना गाईड, अनुभव आणि कौशल्य वापरून केलेली भटकंती खुप आवडते. सर्व व्यवस्थित घडलं तर बल्ले बल्ले नाहीतर आहेच जमा होणारा अनुभव...


 किल्ले कुंजरगड सफर (Trek to Kunjargad)

आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण कमवतो तर काही आपल्याला फक्त नशिबाने मिळतातं आणि त्यात आपलं काहीच कर्तृत्व नसतं. आशा गोष्टींचा दुर्दम्य अभिमान बाळगावा असं मला स्वतःला तरी वाटत नाही. आपला जन्म हा यांपैकीच एक; पण तरीही तो महाराष्ट्रात झाला आणि तोही मराठी म्हणून, हे एकचं मी माझे अहोभाग्य समजतो.

स्वराज्य कसे मिळवावे, त्याचं सुराज्य कसे करावे याचा प्रत्यय देणारा एकमेव राजा छत्रपती इथे, या मातीतचं झाला आणि आपण त्यांचेच अनुयायी आहोत. 

इथला सह्याद्री आणि त्यावरचे गडकिल्ले हे फक्त दगड-मातीच्या इमारतींचे अवशेष नसून, ते राज्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याने, त्यागाने पवित्र झालेले यज्ञकुंडच आहेत. म्हणूनच हे गड किल्ले म्हणजे पर्यटनक्षेत्र नसून रणक्षेत्र आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन आणि संगोपन आपण केले पाहिजे.

कुंजरगड! लोहगडासारखा विंचूकाटा आहे या गडाला; पण या काट्यावर लोखंडी रेलिंगची तोरण लावून त्याची पार लया घालवलीय आता! तटबंदी बर्यापैकी शिल्लक आहे, यावर, दोन-तीन दगड लावून डागडुजी करून गडाचं गडपण राखून ठेवता आलं असतं पण...असो..१६७० मध्ये राजे दिंडोरीची लढाई लढून इथे आले होते. गडावर मावळ्यांची मलमपट्टी आणि विश्रांती झाली होती.



कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट ओलांडल्यावर एक डोंगरावर सतत अंगावर येत असते, बालाघाट डोंगररांग. हरिशचंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग बीड जिल्हापर्यंत जाऊन संपते. पुणे आणि अहमदनगर जिल्हाची सीमा माळशेज घाटात हीच डोंगररांग ठरवते. हा किल्लाही तसाच जवळपास दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे पण नकाशावर तो अहमदनगरच्या अकोले तालुक्यात येतो. हरिशचंद्राच्या मागच्या बाजूस असणाऱ्या या डोंगररांगेत कलाडगड, दोन भैरव (कोलथे आणि शिरपुंजे), कुंजरगड इत्यादी किल्ले येतात. बाकी सर्व किल्ले पाहून झाले होते, कुंजर सोडून म्हणून मग ही रेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवाळी संपण्याची वाट पाहत होतो.'

कुंज' म्हणजे हत्ती, पायथ्याच्या विहीर गावातून हत्तीसारखा दिसतो म्हणून 'कुंजरगड' हे नाव. कोंबडकिल्ला हे या गडाचं इकडंच स्थानिक नाव.

'कुंजर' आडवाटेवर असणारा दुलक्षित किल्ला म्हणून मग, सायटिका या माझ्या पाठीशी लागलेल्या आजाराला थोडी बगल देऊन पुन्हा आमच्या दोनचाकी घोड्यावर टांग मारली. जुन्या शेड्युलप्रमाणे भल्या पहाटे सकाळी ४ ला निघून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्याच्या थोड्या अलीकडे पहिला ब्रेक घेतला तेव्हा ६ वाजले होते. डोंबिवलीपासून आतापर्यंत अपेक्षित थंडी काही जाणवत नव्हती तरी प्रथेप्रमाणे कटिंग मारून पुन्हा दोन तासाचा प्रवास सूरु केला. त्या उफळत्या चहा बरोबर समोरच्या डोंगररांगेतून उगवत्या सूर्याचं देखणं रूप...अहाहा...दिन बन गया!! पुन्हा बाईकवर बसलो आणि आणि थोडा गारवा जाणवायला लागला, हाच अनुभवण्यासाठी आमच्यासारखे अनेक फिरस्ते निघतात या सिजनमध्ये. पुढे ओतूर गाठायचा अगोदर 'उदापुर' जवळून एक फाटा 'फोपसंडी' साठी जातो. कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक विहीर गावातून तर दुसरी फोपसंडी मधून, आम्ही दुसरी वाट निवडली. उदापुर मार्गे अनेक लहान डोंगरी गावांतून वाट फोपसंडिला जाते. रस्ता अतिशय खराब, कोपरे गावातून पुढे तर कच्चा आणि खडतर रस्ता आहे. त्या निमित्ताने आमची ऑफरोड बायकिंगची हौस पण पूर्ण झाली ट्रेकिंग बरोबर. या वाटेवर अनेक धबधबे आहेत आणि तेच बघण्याचा मोहापायी मी सचिनला या वाटेने जाण्याचा आग्रह केला होता पण थोडं लेट झालो आम्ही आणि फक्त डोंगर-दऱ्या पहिल्या मिळाल्या.

फोपसंडी गावातून ट्रेक सोपा आणि लहान आहे साधारण १ ते १.३० तासांचा. गावात बाईक पार्क करून आम्ही गडाची वाट धरली. गावातून गाद दिसत नाही तो एका टेकडाच्या मागे आहे. भाताच्या, वालाच्या मळ्यांतून आणि उतारावर लावलेल्या नाचणीतून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. आणि समोरच्या डोंगरावर किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी स्पष्टपणे दिसायला लागली. वाटेत एका झापात एक कुटुंब विसावल होतं, घराची म्हातारी ऊन खात बसली होती. लहान चिऊ आणि एक दादा मचाणाला बांधलेल्या झोक्याला झुलत होते, घरचा मोठा दादा समोरच्या डोंगरावर गुरं घेऊन गेला होता. आमचा आवाज ऐकुन घराचा कर्ता पण बाहेर आला. गडाची तटबंदी समोर दिसत होती पण आमच्या माहितीप्रमाणे वाट फिरुन जात होती. वेळ वाचवा म्हणून तटबंदीला लागून असणारा कातळटप्पा चढून जाता येईल का याची चौकशी केली. थोडं आढवेढ घेऊन आणि आमच्याकडे निरखून पाहून म्हणाला, हाय, पण जरा अवघड हाय, जमेल वाटत तूम्हाला. मग काय, ती तटबंदी नजरेसमोर ठेवून आम्ही चालू लागलो. तटावर पोहोचल्यावर इशारा द्या, असे बजावले या बाजीप्रभूने आम्हला आणि त्या झापाच्या दारातून वर पोहोचेपर्यंत तो आम्हाला पाहत आणि आवाज देत होता. इथून एक टेकडी पार करून आम्ही एका पठारावर आलो इथे संपुर्ण भारतभर दिसणारे असे कॉमन दृश्य दिसले, एका झाडाखाली एक थडगे होते आणि त्यावर भगवा झेंडा लावलेला होता. या पठारावरून उजवीकडून वाट फिरून गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाते पण आम्ही काही सरळमार्गी नव्हतो. समोरची लहानशी चढण पार करुन तटाला लागून असलेल्या कातळाला लागलो. सचिनने सुरवात केली आणि सहज पार केला, मागून मी तो लहानसा कातळटप्पा पार केला. खालून दिसणाऱ्या त्या तटबंदीला पोहोचलो. ही गडाची डावी बाजू, याच तटबंदीला पाणि वाहून जाण्यासाठी एक नलिका बनवली आहे. वर तटबंदीवर पोहोचताच त्या बजीप्रभुची आरोळी आम्हाला आली तिला हुंकार देऊन आम्ही आमची गडफेरी सूरु केली.

तटबंदीवरुन वर जाऊन आम्ही डाव्या बाजूने फिरायला सुरवात केली. तटबंदीच्या जवळच दोन बर्यापैकी मोठी पाण्याची टाकी आहेत. यांची रचना एका मागे एक आहे जेणेकरून एक टाक भरलं की पाणि दुसऱ्या टाक्यात जाईल आणि ते भरलं की तटबंदीला केलेल्या निचऱ्यातून बाहेर. पुढे समारोच्या डोंगराच्या आणि गडाच्या दरीमूळे किल्ल्याची खरी उंची कळत होती. पुढे ३ टाक्यांचा एक समूह लागतो. यालाच लागून मागे वाड्याचे काही अवशेष आहेत. हे वाड्याचे अवशेष पाहून पुढे आल्यावर आपण गडाच्या माचीवर पोहचतो. लोहगडाच्या विंचूकाट्या सारखी गडावरून दूर जाणारी माची आहे या गडाला. वाड्याच्या प्रवेशद्वारातुन बाहेर आल्यावर आजच्या बाजूला शंकराची पिंड, नंदी नुकतेच वसवले आहेत. या मंदिराच्या उजव्या बाजूला लागूनच दोन पाण्याची टाकी आहेत आणि डाव्या बाजूला पुढे पाण्याचं अजून एक टाक आहे. टाक्याला व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथून पुढे माचीवर एका वाड्याचे अवशेष आहेत आणि त्यात एक मारुतीची मूर्ती आहेत. हा मारुती मस्त मिशी बाळगून आहे चेहऱ्यावर. पुढे या माचीच्या टोकापर्यंत जाऊन आलो. मध्ये आजून दोन पाण्याची टाकी आहेत माचीवर. एका टाक्याला तर भुयारी मार्गासारखे चौकोनी भुयार केले आहे, आत वाकून पाहिलं तर आत बऱ्यापैकी पाणि होतं, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी दगडाच्या आत टाकं खोदल असावं बहुतेक. लोखंडी रेलिंगने हीचा कणखरपणा बोथट केल्यासारखा वाटला. या माचीवरून डाव्या बाजूला मागे हरिशचंद्राची रांग, तारामती सुळका, त्याच्या पुढे, कलाड, भैरव अगदी स्पस्ट दिसत होते. पायथ्याचे विहीर गाव एका लहानश्याया वस्तीसारखे दिसत होते. मागे वळून आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. प्रवेशद्वाराचे अवशेष असे काही उरले नाही आहेत पण काही दगडी पायऱ्या आहेत इथे. दोन्ही गावांतून, फोपसंडी आणि विहीर, येणाऱ्या वाटा इथे येऊन मिळतात. याच वाटेवर दोन मोठया नैसर्गिक गुहा आहेत. आजून थोडं पुढे जाऊन या किल्ल्याच वैशिष्ट्य असलेली गुहा आहे, डोंगराच्या आरपार खोदलेली ही गुहा एका बाजूला विहीर आणि दुसऱ्या बाजूला फोपसंडी गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आली असावी. सचिनने प्रयत्न केला पण माझ्या शरीरयष्टीमुळे मला तोही करता आला नाही. खुपच अरुंद आहे ही, जवळजवळ सरपटत जावं लागतं. गुहेत अजुनही पाणि साठलेलं होत आणि त्या अरुंद बोळात पुढे चिखलही होता म्हणुन मग सचिनही मागे फिरला. गडफेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा फोपसंडी गावाच्या वाटेला लागलो. वाटेत पुन्हा ते काका भेटले, गुरं राखताना, न पाहता आलेल्या गुहेच्या बद्दल विचारपूस केली आणि तेच उत्तर मिळालं, अर्ध्यापर्यंत सरपटत किंवा ओणव्याने जावं लागतं. पुढे एका ठिकाणी अंग तिरप करून कुशीवर सरकाव लागतं आणि मग आपण विहीर गावाच्या बाजूला बाहेर निघतो. माझ्याकडे पुन्हा पाहून काका म्हणाले, 'ह्यांना नसतं जमलं !!'....सचिन तर आपला एव्हरग्रीन आणि सडपातळ बांधा म्हणून माझा आदर्श आहेचं पण साला अश्यावेळी थोडी जळतेच !!  फोपसंडी गावातून साधारण एकला निघून ६च्या दरम्यान आम्ही घरी परतलो.

कुंजरगड, पाण्याच्या टाक्यांचा किल्ला. जवळपास १० टाकी आहेत या किल्ल्यावर. तटबंदी, बुरुजही अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. गडांची उंची आणि उंचीवरचे गड कसे असतात, कसे राखले जायचे हे पाहायचं असेल तर वाट वाकडी करून जरूर पहावा असा एक किल्ला !!

- वैभव आणि सचिन.

Comments

  1. खूप छान माहिती

फोफसंडी

        संतांचे माहेर जसे पंढरपूर तसे आम्हा शहरी भटक्या मंड़ळीचे हरिश्चंद्रगड. हल्ली वाढत्या गर्दीमुळे जरी जाणं होत नसले तरी मनात कुठेतरी ठाण मांडून बसलेला. 

याच हरिश्चंद्रगड परिसरात कलाडगड, भैरवगड, भैरोबा दुर्ग, कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ला असे या भागातील मातब्बर गडकोट. 

    यावेळी इथल्या कुंजरगड फोफसंडी मांडवीचे खोरं या परिसरात बाईक राईड करायचे ठरवले. सुरुवातीलाच एक दोघांचा नकार ऐकल्यानंतर मग काय, एकला चलो रे... विजयादशमीचा आदला दिवस शनिवार, तो निवडला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास सर्व तयारीनिशी बुलेटला किक मारली. टारगेट, चलो फोफसंडी... दोन तासात माळशेज टॉप. 

गार हवेत घाटात दोन चार फोटो मारुन, आरामात पुढच्या पाऊण तासात बनकर फाटा पुढील उदापूर गाठले. उदापूरहून डावी मारत, मुथाळणे कोपरे रोड पकडला. वाटेवर दिशादर्शक पाटी होतीच. 

वाटेतले मांदारणे सोडल्यावर मुथाळणे पर्यंत सहा किमीचा अरुंद वाटेचा कठीण घाट. तो चढून वर आल्यावर उजवीकडे वाघोबा देव, तिथेच थोडा वेळ सकाळचा गार वारा खात बसलो. 

आता मात्र सुरु झाला तो डोंगर दरींचा प्रदेश. पुर्ण रस्ता घाटाचा, डोंगर उतारावर छोटी छोटी घरे काही ठिकाणी लहान लहान वाड्या वस्त्या. कोपरे या भागातले शेवटचे गाव. कहिश्या दुर्गम अशा ठिकाणी जुन्नर ओतुर या भागातून इथवर एस्टी येते. 

कोपरे सोडल्यावर आधीच अरुंद असलेला डांबरी रस्ता गायब. इथून पुढे फोफसंडी साठी मोठा रस्ता नाही हे माहित होते पण निदान कच्चा तरी बरा असावा...कसले काय.. फोफसंडी अंदाजे सहा ते सात किमी असावे. गावाबाहेर पडताच एकाला रस्त्याबद्दल विचारलं. "थोडा खराब आहे पुढं देवनाळ्या पासून डांबरी आहे". हरकत नाही बघू काय तें म्हणून किक मारली. सुरुवातीला माती छोटी दगड मग काहीसा बरा खडी टाकलेला. पण काही ठिकाणी खडी एवढी की बाईक घसरुन पडावी. गाव मागे पडून टिपिकल घाट रस्ता सुरु. मध्ये जंगल पट्टा लागला, या भागात तर ना दगडी ना खडी नुसता लाल चिखल बाईकवर तोल सांभाळत कसरत. हा शांत निर्जण निसर्गरम्य घाट रस्ता मला सारखं डिगा ते खानू रस्त्याची आठवण करुन देत होता. पुर्ण रानात फक्त बुलेटचा काय तो डूग डूग आवाज. काही अंतर जात उतार मग ओढा, उतारावर बाईक कण्ट्रोल करत झपकन ओढ्यातून बाहेर काढली मग पुढचा चढ दगड गोट्याचा सावकाश पार केला. हे होत नाही तर पुढे बर्यापैकी वाहत्या पाण्याचा ओढा. मनाचा हिय्या करुन टाकली पण ऐन मध्यभागी आल्यावर तोल सावरायला पाय टेकवावे लागले. बुटात पाणी गेल्याचं दुःख नाही पण बाईक नको मध्ये बंद पडायला, रेस करुन कशीबशी बाहेर काढली. आता या दोन प्रसंगा नंतर मला रस्त्याची काळजी वाटू लागली. पुढे काय वाढून ठेवले असणार ? जर काही झालं तर मदतीला सोबत कुणी नाही, जवळपास वस्ती नाही. आता पर्यंत नितांत सुंदर वाटत असलेल्या रानात अचानक मळभ दाटून आल्यासारखे वाटले. पाणी पित जरा वेळ शांत बसून राहिलो. एक विचार असाही आला की परत मागे फिरुन ओतुर कोतुळ मार्गे जावे का पण नाही क्षणात तो विचार झटकून टाकला. तसेही परत जायला हे दोन पडाव आहेतच, त्या पेक्षा जाऊ, पुढे पाहू काय होईल ते. जे होतं ते चांगल्यासाठीच हा विचार करुन किक मारली. काही अंतर जाताच दरी पल्याड एक घर आणि जवळ चारचाकी उभी दिसली. ते पाहून जरा हायसं वाटलं. पण तिथवर पोहचण तेवढं सोपं नव्हतं. मधल्या डोंगराला वळसा घालून तिथे जायचं होते. वाटेत पुन्हा एक मोठा चिखलचा टप्पा, इथे मात्र उतरुन गाडी ढकलत न्यावी लागली. एक गोष्ट लक्षात आली, जंगल टप्प्यात ओढ्या जवळील रस्ते सदासावलीमुळे चिखलाचे तेच मोकळं वनातील उन्हामुळे कोरडे ठाक. गाववाला चांगला रस्ता लागेल असं म्हणाला होता पण सद्यस्थिती पाहून मला तर कुठे चांगली चिन्ह दिसेना. उतारा वरील खडकाळ टप्पा पार करुन एका मोठ्या ओढ्यावरील पुलावर आलो, इथून पुढे मात्र खडी मिश्रित रस्ता दिसला. 

पुलापलिकडे दोघं जण मस्त पैकी म्हशीला अंघोळ घालत होते. वाहत्या पाण्यात मी पण चिखलात माखलेले बूट धुवून घेतले. हाच देवनाळ्याचा पूल इथून फोफसंडीची हद्द सुरु होते. चढ चढून सपाट रस्ता, काही अंतर जात मघाशी दिसलेले घर उजवीकडे. 

अंगणात दोघे बसलेले विचारलं तर म्हणाले, "ही काय आली फोफसंडी ..पुढे डांबरी रस्ता आहे." घडल्या प्रकरणात कोपरे ते फोफसंडी माझा पाऊण तास गेला. गावच्या सुरुवातीची दोन चार घरं सोडल्या वर एका घरावर ‘सह्याद्री दर्शन पथिकालय’ असा बोर्ड लावलेला. 

गाडीचा आवाज ऐकून गृहस्थ बाहेर आले. ‘दत्तात्रय मुठे’ त्यांचे नाव, आपुलकीने स्वागत केले. विचारपुस झाल्यावर मीच रस्त्याचा विषय काढला. दोन दिवस आधी पर्यंत संध्याकाळी पाऊस होता त्यामुळे ही अवस्था. तसेच कोपरे ते फोफसंडी हा रस्ता पुर्णपणे वनविभागाच्या अख्यरित असल्याने मंजुरी मिळणं अवघड. कोपरे पुणे जिल्ह्यात तर फोफसंडी नगर जिल्ह्यात. वाटेत लागलेला तो देवनाळ्याचा पूल ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा. जर पक्का रस्ता झाला तर कोपरे ओतुर मार्गे इथून माळशेज घाट अगदी जवळ होईल..असो.

      कुंजरगड माझ्या नियोजनात नव्हता. त्या पेक्षा निरोळी रांजणा सारखी अजून काही अल्प परिचित ठिकाणं जाणुन घ्यायची होती. मुठे काकांनी माहितीचे भंडार उघडले. नवी जुनी काही कागदपत्र माहिती पत्रे दाखवली. फोफसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दर्या खोर्यात वसलेले १०००-१२०० लोकवस्तीचे लहानसे गाव. अशा या भौगोलिक स्थानामुळे इथे सुर्योदय काहीसा उशिरा तर सूर्यास्त लवकर होतो. पावसाळी शेती त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडा सारख्या वनस्पतीची विक्री आणि जोडीला थोडे फार पशूधन हेच काय उपजीविकेचे साधणं.  

    गावच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारण १९२५ च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी मपोपफ हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करुन या दरीत उतरले. त्या वेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खुप आवडला. इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आले आहे त्या नदी तिरावरील टेकडीवर रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्यांचं पारण फेडणारे रूप अनेक धबधबे पाहत असे. पोपच्या रहण्याने या गावला मपोफसंडी म्हणू लागले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रुढ झाले. गाव तसे सुविधा पासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रम शाळेत. २००४-५ नंतर वीज व रस्ते आले. त्यात ही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. दत्तात्रय मुठे काकांनी त्या साठी शासन दरबारी बरीच पायपीट केली. सध्या गावात अकोलेहून सायंकाळी मुक्कामी एस्टी येते. लवकरच दहावी पर्यंत शाळा होणार. आरोग्य सुविधा तसेच शेतीला पुरक व्यवस्था व पर्यटनावर भार द्यायचा त्यांचा मानस आहे. काकांनी ही सारी माहिती दिली. 

   मला खिरेश्वर कोल्हेवाडी कडील भाग पहायचा होता. वेळ पहाता निरोळी रांजणा दोन्ही होणं शक्य नव्हते. त्यामुळे मानखंदा व खिरेश्वर भागात उतरणारया पुरातन वाटा पाहायचा हे काकांसोबत चर्चा करुन ठरवलं. जुन्या वाटा म्हंटल की आमची उत्सुकता वाढते. काकांचे भाऊ ‘देवराम’ सोबत यायला तयार झाले. पुन्हा देवनाळ्या जवळ आलो. 

तिथेच डावीकडे या भागातला मोठा घारीचा धबधबा, सध्या बारीक धार सुरु होती. तिथं न जाता पुलाच्या डावीकडून वर चढायला सुरुवात केली. धापा टाकत वरच्या टेपाड वर आलो. काही वेळ आडव जात पुन्हा आणखी एका मोठ्या टेकडीला वळसा घालून भल्या मोठ्या गवताळ पठारावर आलो. 

उजवीकडे दरी पल्याड जीतवाना धबधबा. पठारावर काही अंतर जात वायव्य दिशेला हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला डोकावला. 

रोहिदास तारामतीवर काहिसं धुकं पसरलं होतं. झटपट पावलं टाकत कड्यावर आलो, धावतच जात टोकावर उभा राहिलो. इथून उलगडला तो पुर्ण माळशेज परिसराचा देखावा. वातावरण थोडं धुसर, धुप छाव टाईप, तरी डोळ्यांना व्यवस्थीत दिसत होते.

 खाली पिंपळगाव जोगा धरणाचा फुगवटा त्या काठी वसलेल्या गवारवाडी, वाघाचीवाडी, कोल्हेवाडी इतर वाडी वस्त्या, दूरवर खिरेश्वर, खुबी पर्यंत जाणारी धरणाची भिंत, त्या पल्याड माळशेज, नाणेघाट पासून देवदांड्या, भोजगिरी, गुण्या, उधळ्या डोंगर ते सिंदोळा, हडसर, गणेशखिंड पासून दक्षिणेला हाटकेश्वर पर्यंत. तसे पाहिले तर ही हरिश्चंद्रगड पासून निघालेली बालाघाट पर्वतरांग हरिश्चंद्रगड कारकाई बाळूबाई तिकडे पूर्वेला भैरोबा दुर्ग कुंजरगड तर नैऋत्यला वारल्याचा डोंगर निरोळी पासून पार रांजणा पर्यंत.. खिरेश्वर पिंपळ्गाव जोगा धरणा जवळून हि रांग भलतीच मोहक दिसते. याच खिरेश्वरहून फोफसंडी भागात येणार्या वाटांबद्दल कुतूहल होते. अशाच एका जुन्या टकोरीची खिंड या वाटेवर आम्ही निघालो. आता आम्ही होतो तो मानखंदा याच्या उजव्या बाजूला निरोळी तर डावीकडे रांजणा म्हणजे दोन्ही परस्पर विरुध्द बाजूला. टकोरीची खिंड ही निरोळीच्या दिशेला. 

पठारावरून क्रेस्ट लाईन पकडून चालू पडलो. अजूनही बहुतेक ठिकाणी ओढ्यात वाहत पाणी. अवाढव्य पसरलेल्या या पठारावरील डोंगरकडेला सदाहरीत जंगल चांगलेच बहरलेले जांभूळ, अंजन, बेहडा, हिरडा तसेच निवडुंग व करवंदांच्या जाळीची गर्दी. कातळ टप्प्यात अनेक ठिकाणी निसर्ग निर्मित लहान मोठ्या गुहा. या कुंजरगड फोफसंडी परिसराचे एकंदरीत वनक्षेत्र एकूण १९०० हेक्टर एवढं आहे. पाऊण तासात मोठ्या झाडीभरल्या खिंडीजवळ आलो. 

;हिच टकोरीची खिंड, या वाटेने खाली खिरेश्वर गावाजवळील वाघाची वाडी येथे जाता येते. तेथील मंडळी या भागात सोयरीक असल्याने काही कार्य किंवा कामानिमित्त अजूनही याच वाटांनी ये जा करतात. गाडी रस्त्याचा फेर आणि लागणारा वेळ पाहता ही वाट कधीही सोयीची. याच खिंडी मागचा आणखी एक डोंगर चढून गेल्यावर उंबारल्याची टेकडी तिथून उंबारल्याची वाट खाली दुसर्या कोल्हेवाडीत उतरते. हि झाली फोफसंडीतून खिरेश्वर भागात उतरणारी दुसरी वाट. 

;;आता आम्ही आल्यापावली मागे फिरलो ती फोफसंडीतील सर्वात जास्त वापरली जाणारी अगदी अबाल वृध्दांपासून लहान मोठे ते गुर ढोरं ने आण करण्या योग्य असलेल्या गायदरा घाटाच्या वाटेला. पुन्हा मानखंदा येऊन रांजणाच्या दिशेनं निघालो. दोन मोठे टेपाड चढून गायदराच्या खिंडीत आलो. 



अगदी पध्दतशीर पणे मळलेली घाटाची वळणं वळणं घेत उतरलेली लयबध्द वाट. काही अंतर खाली घाटाने खाली जाऊन पुन्हा वर आलो. नव्वदच्या दशकात पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले. त्या वेळी मढ खुबी भागातील लहान लहान गावं विस्थपित झाली. पुर्वी फोफसंडीत गाडी रस्ता नव्हता तेव्हा अगदी अलिकडच्या काही वर्षांपर्यंत या मंडळीचा वाण समान बाजारासाठी मढ भागात येण्यासाठी हाच घाट वापरता होता. या तिन्ही घाटवाटेची खिरेश्वर कोल्हेवाडी भागातून चढाई उतराई १५०० ते १८०० फूट सहज असेल.

   गायदरा अलिकडच्या पठारावर एक म्हातारा आजा गुरे चारत होता. मला देवा सोबत पाहून, "काय पाव्हण ? कुठलं तुम्ही ?" चौकशी सुरु.... मग जुन्या काळच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. "अंगा खांद्यावर ३०-४० किलोची ओझी वाहत या वाटेने आम्ही जायचो, आमची सारी हयात गेली. आताची पोरं नुसतं एवढं चालायची बी नाय." म्हसाच्या यात्रेवेळी गुर घेऊन या गायदराने उतरुन पुढे खुबी मग जुन्या माळशेज घाटाने सावर्नेत पहिला मुक्काम दुसरा धसईत मग तिसर्या दिवशी म्हसा पोहचत. हे सारं सांगताना आजाच्या डोळ्यात चांगलीच चमक होती. खरचं पुर्वापार वहीवाटेतल्या या वाटा.

    एके ठिकाणी पाणवठा पाहून जेवणाला थांबलो, जेवण अर्थातच घरून आणलेलं. थोडा वेळ विसावा घेऊन उतरणीला लागलो. वारल्याच्या डोंगरा वरुन सरळ नजर फिरवत कुंजरगडाचे वेगळ्या कोनातून दर्शन झाले. समोर माथ्यावर मंदीर असलेला बर्डीनाथ महादेव, आजूबाजूच्या लहान वाडीवस्तीतील लोकांची महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. 


   अडीच पावणेतीनच्या सुमारास खाली आलो. मुठे काकांसोबत चहा झाला. काकांनी पुन्हा या भागातील बघण्यालायक ठिकाणांची नाव सांगितली. फोफसंडीचे कुलदैवत दर्याबाई मंदीर. गावापासून ४ किमी अंतरावर असलेले राणुबाई मंदिर त्याच्या आसपास मोठ मोठ्या गुहा. तसेच रानात वसलेले ग्रामदैवत कळमजाई मंदीर. ज्यावरुन नदीला नाव पडले त्या मांडवी हृषिनी तप केले ती घोडगडद नावाची गुहा. घारीचा, धुळगडीचा, कावडाच्या, भदभड्याचा इ अनेक लहान मोठे धबधबे. चारण गडद, गहीन्याची गडद इ अनेक मोठ मोठ्या गुहा. खरचं हे सारं पहायच असेल तर पायगाडीला पर्याय नाही, प्रत्येक ठिकाण पाऊण ते तासभराच्या अंतरावर टप्पा टप्प्यांत केलेला छोटा ट्रेकच. या साठी तीन चार दिवसांची सवड काढून नक्की येणार. मुठे काका व देवराम यांचा निरोप घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघालो. नियोजनाप्रमाणे परतीला कोतुळ ब्राम्हणवाडा ओतुर माळशेज घाट असेच ठरवलं होतं. देवराम म्हणाला होता सातेवाडी पाझर तलाव कडून एक कच्चा रस्ता थेट मुथाळणे ला निघतो. पुन्हा कच्चा रस्ताची परिक्षा मला नको होती, त्यामुळे ठरल्याप्रमाणे निघालो. 

 
फोफसंडी ते पळसुंदे कोतुळ हा रस्ता ही पुर्ण घाटाचा अनेक चढ उतार व तीव्र वळणावळणचा डोंगर दरी लहान लहान वाडी वस्त्या, ओढे नाले बंधारे या दिवसात तर आणखीनच उठून दिसणारे जणू चित्र वाटावे असे देखावे. सहाजिकच कुठे थांबू कुठे नाही अशी अवस्था. अर्ध्या पाऊण तासात आरामात पळसुंदेच्या भैरोबाला थांबलो. इथून कोतुळ ६ ते ७ किमी. फोफसंडी सोडल्यापासून बरोबर तासाभरात कोतुळ गाठले, तिथून उजवी मारुन ब्राम्हणवाडा पुढे घाट ओलांडून ओतुर. हा रस्ता राज्य महामार्ग असुनही यथा तथाच. आणखी एक गोष्ट जाणवली म्हणजे या भागात उसा व्यतिरीक्त गहू, बाजरी, मका, त्यात कांद्याचे प्रमाण लक्षणीय, परतीचा पावसाने मात्र त्याची भलतीच हानी इथं केलेली दिसली. दसरा आल्यामुळे फुलांची रास तेवढी जागोजागी दिसली.असो.. ओतुरहून माळशेज हायवेला लागलो. करंजाड खिंड ओलांडून पुन्हा पिंपळ्गाव जोगा धरणाचा फुगवटा दिसला, त्या पलिकडे हिच हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. जवळून पाहिलेल्या रांजणाचे पुन्हा एकवार दर्शन झाले. सायंकाळच्या सोनेरी उन्हात ही पुर्ण रांग खुलून दिसत होती. बराच वेळ ते पाहतच खुबीफाट्याला कडक चहा घेतला. तिथून पुढे सव्वादोन तासात सुंदर दिवसाची सांगता करुन नॉनस्टॉप घरी. 
अर्थात बाईकने दिलेल्या दमदार साथीमुळे हे शक्य झाले त्यामुळे तिचा उल्लेख करुन कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

 http://ahireyogesh.blogspot.com/2020/11/phopsondi.html

योगेश चंद्रकांत आहिरे..


कुजंरगड कोंबडकिल्ला Kombadkilla Kunjargad

Kunjargad Kombadkilla
अकोल्यापासून चे अंतर : 36.2 km.

कुजंरगड किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो.

हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्यात या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. “कुंज” या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन “कुजंरगड” असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्याा वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्याय मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्यां चा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपर्यातत एक सापट तयार झाली आहे. विजेर्यांधच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो. गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो. गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते. या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्याब आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. हि गुहा पाहुन पायर्यां च्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्याे डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) विहिर गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात.
२) फोफसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात.

https://www.akolemaza.com/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-kombadkilla-kunjargad/

टाटा नैनो.. सह्याद्रीत घाटवाटा तुडवण्यास सज्ज झाली.. बाळकृष्ण मुंबईहून येणार असल्याने.. त्याला पुणे रेल्वे स्टेशन वर पिक-अप करून आळेफाट्याकडे निघालो.. रोखीची चणचण असल्याने.. आड गावातला हा नोटाबंदीनंतरचा पहिलाच ट्रेक.. त्यामुळे बेताने खर्च करण्याचे ठरले. आळे-फाट्याला चाय-पाणी ब्रेक उरकून..  ओतूर कडे निघालो आणि पुढे उदापूर - मुठाळणे घाट रस्ता चढू लागलो.. एकदा घाट चढला की आपण दरी उजवीकडे ठेवत एका उंचीवरून वळणावळणाच्या वाटेने पुढे सरकत राहतो.. आधी कोपरे गाव.. आणि मग फोफसंडी.. फोफसंडीच्या अलीकडे एक दरी आहे.. ताम्हिणी घाटाच्या plus valley सारखी.. मुथाळणे ते फोफसंडी रस्ता म्हणजे ऑफरोडिंग साठी एक पर्वणी आहे..


फोफसंडी डोंगर राजीमध्ये वसलेले एक टुमदार गाव.. या गावाला एक चांगला इतिहास आहे बर का !.. कुण्या एके काळी पोप नामक इंग्रज इकडे दर संडे ला हवा पालटायला इथे येत असे.. इथे त्याचा एक बंगला होता.. असे म्हणतात.. म्हणून या गावाचे नाव पोप-संडे असे आणि कालांतराने.. फोफसंडी असे पडले.. इथे एका गुहेत मांडव्य ऋषीनी तपस्या केली आणि एक नदी अवतरली.. ती मांडवी नदी इथे उगम पावते.. तसेच कुंजरगड फोफसंडी मधूनही सर करता येतो.. कुंजरगडाला पलीकडून विहीर गावातून देखील वाट आहे.. फोफ संडी मध्ये नाष्ट्याची सोय लावण्यास रेकी सुरु केली.. शाळेजवळ एक तरुण तडफदार.. सकाळची कोवळी उन्ह खात असल्याचे पाहून संवाद साधला.. १०-एक मिनिट जोरदार संभाषण झाल्यावर.. इथे दर्याबाई मंदिर आणि मांडवी नदीचा उगम असल्याचे कळले.. भाऊकडे चहा नाश्त्याची सोय लावली आणि बाळूबाई शिखराकडे निघालो..




बाळूबाई शिखर :- फोफसंडी ते कोतूळ रस्त्यावर फोफसंडी पासून ३-४ किमी अंतरावर एक खिंड लागते.. बाळूबाई आणि डोंगरांना जोडणारा.. या खिंडीतून दोन-एकशे मिटर पुढे जाताच डावीकडे वर एक मंदिर दिसते आणि खाली पायवाट.. हीच बाळूबाई शिखराची वाट.. नैनो रस्त्याच्या कडेला सोडून पायवाटेने निघालो.. १५ मिनिटात मंदिर गाठले.. मंदिराच्या उजव्या अंगाला काही विरगळ उभ्या केल्याचे दिसते.. राणूबाई ची मूर्ती म्हणजे एक शिळा  आहे.. शेंदाराने नटलेली शिळा.. इथे काही क्षण विश्रांती घेवून मंदिराच्या उजव्या अंगाला खेटून सरळ पुढे जाणारया पायवाटेने निघालो.. साधारण वीस मिनिटात.. आपण ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या नाकाडापाशी येवून पोचतो.. इथे एक वाट.. झाडीमधून मागे फिरून तिरपी वर जाताना  दिसते.. साधारण पंचवीस मिनिटाची चढाई करून आपण वर येतो.. इथे.. बाळूबाई शिखाराचा डोंगर लांबलचक डावीकडे आडवा पसरल्याचे दिसतो.. इथे काही गुराखी जनावरे सोडून गावगप्पा मारीत असल्याचे दिसले.. तिकडे काही माहिती मिळते का म्हणून निघालो.. इथे एका खडकावर ते तहान मांडून बसले होते.. दुपारचे उन्ह चांगलच तापू लागल होतं तसे.. गुराख्यांनी विचारल पाणी प्यायच का? इथे त्या झरोक्यात पाणी आहे.. आणि पहिला तर खडकाला पडलेल्या ५-६ झरोक्यापैकी एका झरोक्यात.. पाण्याचा साठा होता.. देवाची करणी आणि कातळात पाणी दुसर काय.. ! बिगीबिगी बाटल्या भरून घेतल्या आणि बाळूबाई मंदिराकडे कस जायचं याची माहिती घेतली.. “असच खालच्या अंगाने सरळ पुढ जा.. मग तिथडल्या टोकाकड डाव्या अंगाला वर ह्येंगा.. आणि तिथ खाली खिंड लागल .. मग खाली उतरायचा.. की आल मंदिर”.. काय नाही.. अस दगड रचिले हायेत तिकड..तेच मंदिर..


क्षणभर विश्रांती घेवून डोंगर डावीकडे डोक्यावर आणि दरी उजवीकडे ठेवत मधल्या टापूतील माळ तुडवीत.. पुढे निघालो साधारण ३-४ किमी चा ट्राव्हर्स मारीत बाळूबाई डोंगराच्या पल्याडच्या टोकाशी पोचलो.. डावीकडे वर चढताच खिंड दिसू लागली.. उतत्या पायवाटेने खिंडीत पोचलो आणि .. बाळूबाईचे मंदिर दिसले.. इथे मध्यभागी एक दगड आणि भोवताली अर्धवर्तुळ.. गारगोटीचे दगड रचल्याचे दिसले.. मंदिराच्या इथून थोड वर चढून जाताच सह्याद्रीच्या विश्वरूपातील एक लहानसा नजारा आहे.. मंदिराच्या मागच्या बाजूस पाठ करून उभे राहताना.. डावीकडे समोर.. आडवा पसरलेला कुंजरगड/कोबड किल्ला.. त्यामागून हळूच डोके वर काढणारा.. हरिश्चंद्र डोंगर.. टोलार खिंड.. अगदी डावीकडे अम्बेदरा आणि त्यावरची डोंगररांग.. आणि दूरवर पसरलेला सह्याद्रीचा डोंगर-दर्याने वेढलेला मुलुख..  अस्सा भन्नाट नजारा या ठिकाणी आहे..


बाळूबाईला दंडवत घातले आणि फळ-पाणी ब्रेक घेवून.. मागे फिरलो .. आता आल्या वाटेने न जाता.. खिंडीकडे पाठ करून उजवीकडे एक वाट डोंगराच्या मधल्या अंगाला खाली उतरल्याचे दिसले.. इथे एक भला मोठा ट्राव्हर्स आहे.. बाळूबाई शिखराला घड्याळाच्या उलट्या दिशेने उजव्या अंगाने वळसा मारणारा.. तिकडे उतरलो आणि पायवाटेने.. वळसा मारू लागलो.. समोर.. अंबेदरा च्या वरचा डोंगर आणि .. घुबडी डोंगर उजवीकडे.. कुंजरगड मोठ्या दिमाखात उभे ठाकल्याचे दिसले.. चालताना पायवाटेवर.. पाण्याचे एक-दोन साठे..असल्याचे दिसले.. उन्हाळ्यात मात्र इथे पाण्याची वानवा असेल हे नक्की..


डोंगराला मध्यान्ही वळसा मारीत.. ४-५ किमी चा फेरफटका मारून राणूबाई मंदिराशी येवून पोचलो.. इथे मंदिराच्या सावलीत.. डोंगरगप्पा करीत एक ब्रेक घेतला आणि पुन्हा नैनो पाशी येवून पोचलो.. साधारण ३.३० वाजले असावेत.. सह्याद्रीचे एक शिखर आज सर झाल्याचा आनंद मन भारावून गेला..याची देही याची डोळा.. बाळूबाई शिखराची चढाई अनुभवता आली याचा आनंद विशेष होता.. इथे उद्याच्या शिखराची निश्चिती केली.. शिरपुंजे.. भैरवगड.. मग ट्राव्हर्स मारून घनचक्कर.. आणि वेळ मिळाल्यास गवळदेव.. असा मार्ग ठरला

फोफसंडी गावाजवळ देवनाळ धबधबा, घरीचा धबधबा, टाकोरी धबधबा, पिनाकी धबधबा हे पावसाळी धबधबे आहेत. Great place in mansoon and winter season. Main attraction in this area are people leave in caves and Ranjhana Waterfall. Beautiful scenic place are here. Local Guide Mr Vale arrange meals for tourists. There is lots of amazing places like saptakund.
Rappelling on Ranjhana Waterfall is amazing experience but you have to do with experts and well maintained equipments.

फोफसंडी गावात फोफसंडी टुरिझम , हॉटेल कुंजरगड अशी हॉटेल आहेत.

तर विहीर गावात हॉटेल दादुस आहे

किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बुलंद आणि बेलाग उपमांना साजेसे असे खूप किल्ले आहेत. या सर्व गडांचे वैशिष्ट्य म्हणजे हे किल्ले १२०० ते १३०० मीटर सरासरी उंचीच्या गगनाला भिडलेल्या पहाडांवर उभे आहेत.यातील हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग या उत्तुंग गडांवर दुर्गप्रेमी पुन्हापुन्हा जातात पण या गडांच्या प्रभावळीत खऱ्या अर्थाने उठून दिसणाऱ्या कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ल्याकडे फारसे दुर्गयात्री फिरकत नाही.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुंजरगडाचे स्वरूप आणि ट्रेकर्स साठी एक थरार नक्की अनुभवावा असेच आहे.

किल्ल्याचे नाव- कुंजरगड, कोंबडा किल्ला

समुद्रसपाटीपासून उंची- १३५० मी.

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग

डोंगररांग- बालाघाट डोंगररांग 

चढाईची श्रेणी- मध्यम

ठिकाण- विहीर व फोफसुंडी गाव, अकोले तालुका

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- चांगली
किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?


किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्हाला सुरुवातील संगमनेर बसस्थानकावरून अकोले स्थानकावर यायचे. इथून १०:३० ला सकाळी व संध्याकाळी ५:३० वाजता कोठले गावास जाणारी बस सुटते. त्या बसने आपण कोथळे गावाच्या अलीकडेच लागणारे विहीर गावात उतरून घ्यायचे.
गडावर जाण्याचा दुसरा मार्ग हा फोफसुंडी गावातून आहे. पुण्यावरून आळेफाटा आणि त्यानंतर ओतूर मार्गे आपण या गावात पोहोचू शकता.

भेटीची वेळ- वेळेचे बंधन नाही

किल्ल्यावर प्रवेश करताना-

गडावर पोहोचल्याशिवाय मध्ये कोठेही पाण्याची व्यवस्था नाहीये आणि कदाचित उन्हाळ्यात गडावर देखील पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही. गडाची  चढाई थोडी थकवणारी असल्यामुळे शक्यतो पाठीवर जास्त वजन घेऊन न जाता आपल्या पिशव्या गडपायथ्याला असलेल्या झापांमध्ये ठेऊन मग चढण्यास सुरुवात करावी.

विहीर गावाच्या मार्गाने आपण गडावर पोहोचुयात. विहीर गावात उतरल्यावर गावाच्या मागेच आपल्याला आडवा पसरलेला कुंजरगडाचा डोंगर दृष्टीक्षेपात पडतो. विहीर गावातील शाळेसमोरून शेतीवाडीतून एक पायवाट गडाकडे जाते. त्या वाटेने आपण चालू लागायचं. एका तासाच्या पायपिटीनंतर आपण गडाच्या पायथ्याला असलेल्या झापांजवळ येऊन पोहोचतो. आता आपला प्रवास या गच्च भरलेल्या कारवितील वाटेने सुरु होतो. हि खडी चढाई पार करायला पाऊन ते एक तास लागतो आणि आपण खिंडीत येऊन पोहोचतो.आपल्या डाव्या हाताला आता कुंजरगड आहे. आत्तापर्यंत आपण जी खडी चढाई केली ती या खिंडीतून खाली आलेल्या दगडांवर सफर करत आलोय. आता खिंडीतून खाली जाण्यासाठी एक वाट आहे. हि वाट फोफसुंडी गावात जाते, आपण जर फोफसुंडी गावातून प्रवासाला सुरुवात केली तर आपली भेट इथेच होईल.


आता आपण डाव्या हाताच्या पायवाटेने चालायला लागायचे. या वाटेने जाताना आपल्याला एका बाजूला कुंजरगड आणि दुसऱ्या बाजूला दरी ठेवत तिरकी चाल करत आपण पुढे जात राहायचे. या वाटेने आपण गडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. गडाचे चार कातळटप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यावर गडमाथा आहे. आपण दोन कातळटप्पे चढून तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो.येथे एका झाडाखाली तुरबत, दगडी घुमट आणि अनेक भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात.


याच्याच मागे असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एकसलग अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल. गडाचा हा तिसरा टप्पा पाहून गडाचा मुख्य माथा डाव्या हातालाब ठेवत वर जाणाऱ्या पायवाटेने चढत राहायचे. याच वाटेवर एक यु-टर्न मारल्यावर गडाच्या अंतिम टप्प्यासाठी कातळात खोदलेल्या अरुंद पायऱ्या जवळ आपण येऊन पोहोचतो. या पायऱ्यांनी पुढे गेल्यावर आपल्याला गडावर एका भग्न दरवाजातून प्रवेश करावा लागतो.


गडावर पोहोचल्यावर आपल्याला गडाच्या भव्यतेचा अंदाज येतो. गड लांबलचक पण अरुंद असा आहे. आपण डाव्या हाताला जाऊन गडाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या कातळकोरीव टाक्यावर पोहोचायचे. या टाक्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत व एका बाजूने जादा झालेले पाणी बाहेर टाकण्यासाठी एक खाच देखील मारलेली आहे. या टाक्यातील पाणी कधी कधी पिण्यायोग्य असू शकते पण याची खात्री देता येत नाही.


हे टाके पाहून आपण गडाच्या निमुळत्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या टोकाकडे जायचे. वाटेत आपल्याला अनेक पाण्याची टाकी लागतात परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य मुळीच नाहीये. वाटेत एक भुयारासारखी रचना आपल्याला दिसते. रतनगडावरील गुप्त टाक्याची आठवण येते. परंतु यात आतमध्ये थोडेफार पाणी असले तरी हे टाके नसून गुहा आहे यात गणेशाची मूर्ती आहे असे भटके सांगतात. गडाच्या या टोकावर एकसलग अशी तटबंदी बघायला मिळते.

गडाची हि बाजू पाहून झाल्यावर गडाच्या वरील एका उंच भूभागावर आपण पोहोचायचं. आपल्याला येथे एक पाण्याचे टाके दिसते त्यात मध्ये बांध घातलेला आहे. या टाक्यांच्या समोरच उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बालेकिल्ल्यावर आहोत, येथे आपल्याला भव्य अशा राजवाड्याच्या इमारतीच्या चौथऱ्याचे अवशेष बघायला मिळतात. वाड्याच्या पायऱ्या आणि काही इमारतींच्या आतील देवळ्या  असे अवशेष आजही मोडकळीला आलेल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात. पुढे आपल्याला हनुमंताचे एक भग्न शिल्प बघायला मिळते व इथेच एक भव्य असा पाण्याचा तलाव आहे. त्यातील पाणी कायम गढूळ वाटते म्हणून कदाचित याला गढूळ पाण्याचा तलाव बरेच भटके म्हणतात.

पुढे आपण गडाच्या तटबंदी जवळील टोकाकडे जायचे. इथे आपल्याला या तटबंदीवर चढून निसर्गाचा आनंद घेता येतो. यासाठी तटबंदीवर जायला आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात. तटावरून चौफेर नजर टाकताना  आजूबाजूच्या कातळकड्यांचा रौद्र परिसर आपल्या नजरेस पडतो.कुंजरगड हा हरिश्चंद्रगडाच्या पाठीमागे असल्याने इथून आपल्याला हरिश्चंद्रगडाची टोलारखिंडीकडील बाजू व्यवस्थितपणे बघता येते.




आता गडावरील सर्वात आकर्षक अशा गुहे कडे जायचे. हि गुहा म्हणजे कुंजरगडाच्या दोन्ही बाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेली गुहा. या गुहेच्या तोंडाला खूप मोठी जागा आहे पण जर आपल्याला दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचायचे झाल्यास काही वेळा गुडघ्यावर तर काहीवेळा सरपटत पुढे जावे लागते. पण दुसऱ्या टोकाला पोहोचून तिथे उभे राहुन काहीतरी वेगळ केल्याचा आनंद हा मनाला समाधान देऊन जातो. (हे सर्व करत असताना विजेरीची सोबत असणे गरजेचे आहे)




  गडावर हे सर्व वैभव बघितल्यानंतर आपण आपल्या मार्गाला लागायचे. गड उतरायला सुरुवात करायची. गडावर शक्यतो पाणी नसते त्यामुळे इथे कॅम्पिंग चा विचार स्वताच्या जबाबदारीवर घ्यावा.

इतिहास-

कुंजरगडाचा उल्लेख इतिहासात मुख्यत्वे केला जातो. शिवचरित्रात याचा उल्लेख आढळतो. इतिहास सांगण्या अगोदर मला पडलेला प्रश्न असा की इतर रतनगडासारखा दुर्गरत्न असताना, हरिश्चंद्रगडासारखा पाठीराखा असताना महाराजांचा मुक्काम हा कुंजरगडावरच का? याचा अर्थ एकच की या भागातील बाकी किल्ल्यांच्या संरक्षणात वसलेला कुंजरगड हा मजबूत आणि पाठीराखा किल्ला आहे. महाराजांच्या पहिल्या सुरत लुटीवेळी महाराजांनी कांचनबारीच्या लढाईत पराक्रम गाजवून विश्रांतीसाठी हा गड निवडला होता. १६७० मध्ये महाराज सुरतेची दुसऱ्यांदा लुट करून महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर आणि मग पुणे रायगड असा प्रवास करणार होते. कांचनबारी येथे मुघलांशी महाराजांचे युद्ध झाले आणि याचे नेतृत्व महाराजांनी करत मोकळ्या मैदानात महाराजांनी मोगलांचा पराभव केला. आता युद्धामुळे फौजेला विश्रांतीची आणि जखमींना सुश्रुषेची गरज होती. त्यामुळे महाराजांनी कुंजरगडावर हि सर्व व्यवस्था केली. येथेच प्रतापराव, आनंदराव व व्यंकोजीपंत यांच्यासह महाराज पुढचे बेत ठरवत होते. याच गडावर महाराज विश्रांती घेत असताना मोरोपंतानी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण रोवले हा आनंद वेगळाच होता. कुंजरगडावरच मुक्काम करून राजे काही दिवसाने येथूनच ताज्या दमाने कारंज्याच्या मोहिमेवर निघाले.

राहण्याची व खाण्याची व्यवस्था-

गडावर स्वताचा टेंट घेऊन जाऊन राहण्याची व्यवस्था होईल पण ती योग्य नाहीये त्यापेक्षा विहीर गावातील शाळेच्या पडवीत राहण्याची व्यवस्था होऊ शकेल व गावकरयांना सांगून जेवणाची देखील व्यवस्था होईल.
 
https://www.garvanemarathi.com/2020/05/kunjargad.html
 
 













No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...