कलेची सुरुवात कुठे झाली असे पाहायला गेल्यास लक्षात येते की, अन्य वनचरांप्रमाणे मानवही मिळेल ते खात होता. एवढेच नाही तर इतर सर्व प्राण्यांमध्ये तो शिकारीच्या दृष्टीने निर्बुद्ध आणि अकुशल होता. इतर प्राण्यांनी मारून खाऊन टाकलेले तो खात होता. किती शतके अशी गेली हे ठाऊक नाही. परंतु अनुभवाने त्याचा विकास झालेला दिसतो. कठोर कवचाच्या फळांना चिकटलेला गर हा अन्य दगडाने किंवा लाकडाच्या कपचीने खरडून काढता येतो असे त्याच्या लक्षात आले. आपल्याला हव्या असणाऱ्या आकाराच्या कपच्या उपलब्ध नसल्यास एका दगडावर दुसऱ्या दगडाने प्रहार करून मनाजोगता आकार देता येतो हे त्याला उमगले. पुढे पुढे आघात करायला कोणता दगड घ्यावा आणि आकार द्यायला, घडवायला कोणता दगड घ्यावा तसेच यांच्यातला टणकपणा वेगळा असतो ह्याचेही त्याला ज्ञान झाले. ज्या दिवशी पहिल्यांदा एक दगड उचलून त्याने दुसऱ्या दगडावर घाव घालायचा प्रयत्न केला असेल त्या दिवशी जगातला पहिला कलाकार जन्माला आला. जगामध्ये अनेक मानव समूहांमध्ये अशीच सुरुवात झाली असणार. परंतु असे आढळले आहे की, भारतामध्ये आढळलेल्या या कलेचे नैपुण्यही थोडे उजवेच होते असे म्हणावे लागेल. पाषाण युगातील आफ्रिका खंडात सापडणाऱ्या दगडी हत्यारांपेक्षा समकालीन भारतात सापडलेली हत्यारे ही कित्येक पटीने रेखीव आणि धाटणीमध्ये उत्कृष्ट अशी आढळलेली आहेत.
असाच एक मानव समूह स्थलांतर करीत करीत (आजच्या मध्य प्रदेश या प्रांतात ) नर्मदा नदीपासून दूर थोड्या उंच अशा डोंगराळ प्रदेशात पोहोचला. इथले वातावरण अत्यंत वेगळे होते.प्रचंड अशा वालुकापाषाणाच्या शिळांमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या खोबणी तयार झालेल्या त्यांना आढळल्या. एक आयता आडोसा आणि तोही इतका भक्कम त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. हेच या विशेष समूहांबाबत जे घडले ते जगामध्ये आदिम काळात अन्यत्र कधी घडले नव्हते ओणि त्यानंतरही तसे कुठेही घडले नाही. अश्मयुगात साधारणतः काही दशके किंवा एक दोन शतके एवढ्यास ३ कालखंडात एखादी वस्ती केल्याचे आढळून येते. फार तर क्वचित प्रसंगी एक दोन सहस्रके. इथे मात्र सलग एक लाख वर्षांहून अधिक काळापर्यंत वस्ती असल्याचे अवशेष सापडलेले आहेत. होत.
खरं तर हेही एवढे जुने आहे आणि तेही भारतात याच्यावर आधुनिक काळात कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. १८६८ मध्ये किंकेड नावाचा इंग्रज अधिकारी सर्वेक्षणाच्या निमित्ताने तिथे गेला. त्याने तिथल्या भिंतींवरील असणाऱ्या काही चित्रांचीही नोंद केली, परंतु तसल्याच प्रकारच्या चित्राकृती त्याला जवळपासच्या वनात राहणाऱ्यांच्या घरावर पण दिसल्या असाव्यात. यामुळे याच मंडळींनी गुरे चारता चारता डोंगरावरील गुफांमध्येही त्या चितारल्या असाव्यात असा समज त्याने करून घेतला. त्यातील काही आकृत्यांमध्ये गेंड्याच्या शिकारीचे चित्र होते, ते पाहून विसाव्या शतकाच्या पूर्वाधात होऊन गेलेल्या गार्डन नावाच्या संशोधकाने त्या चित्रांचा काळ केवळ तीनशे वर्षांपूर्वीचा असावा असे ठोकून दिले. त्याचे समर्थन करण्यासाठी बाबरला गेंड्याच्या शिकारीचा नाद होता, त्यामुळे ही चित्रकला बाबरच्या काळातील असावी असा जावई शोधही त्याने लावून टाकला.
१९५८ मध्ये एक प्रवासी घाईघाईने भोपाळच्या रेल्वेस्थानकावर गाडी पकडण्यासाठी आला. त्याला नागपूरला जायचे होते. गाडी सुटल्यावर सुमारे पाऊण तासाने त्याने खिडकीबाहेर पाहिले तेव्हा त्याला एका डोंगरावर बेड्यावाकड्या आकारांच्या काही प्रचंड शिळा दिसल्या. कुतूहलापोटी त्याने सहप्रवाशाला विचारले, की हे काय आहे. त्यावर तो उत्तरला माहीत नाही नक्की काय आहे ते, परंतु तेथे काही खूप प्राचीन काळातल्या गुहा आहेत असे म्हणतात. गाडी वेगाने पुढे धावत होती आणि ह्या प्रवाशाची नजर दूरदूर जाणाऱ्या त्या शिळांवरून हालत नव्हती. त्याने पुन्हा शेजाऱ्याला विचारले की. पुढील स्टेशन कधी येईल त्यावर त्याने होशंगाबादपर्यंत गाडी कुठेही थांबणार नसल्याचे सांगितले.दहाच मिनिटांनी काही सहप्रवासी आपले सामान उचलून दाराकडे चालू लागले.
"अरे, तुम्ही तर म्हणालात की गाडी मध्ये थांबत नाही."
"हो ! ते खरं आहे. पण आमचे गाव इथेच जवळ आहे."
"पण तुम्ही उतरणार कसे?"
"काही नाही, पुढील स्थानकाच्या अलीकडे एक मोठे वळण असल्यामुळे गाडीचा वेग थोडा मंदावतो आणि आम्ही त्याच वेळेस पटापट उड्या मारतो. आम्हाला हे रोजचेच आहे."
याही प्रवाशाने घाईघाईने आपले सामान गोळा केले व त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. वळणावर गाडी हळू होताच त्यांच्या पाठोपाठ यानेही सामानासकट चालत्या गाडीतून स्वतःला झोकून दिले. सवयीचे नसल्यामुळे खाली पडताना अंग भरपूर खरचटले. त्याच अवस्थेत त्याने जवळच असणारे बरखेडा स्थानक गाठले. तिथून नागपूरला आपण येऊ शकत नाही अशी तार करून टाकली आणि त्या डोंगरावरील शिळांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. १५ ते २० मैलांचा तो प्रवास त्याने जंगलातून आणि काट्याकुट्यातून वाट काढत काढत केला आणि उन्हे उतरत असताना तो तिथे पोहोचला. अत्यंत निर्मनुष्य आणि घनदाट अरण्यात असणाऱ्या त्या शिळांखालील एका गुहेत एक साधू राहत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यास विचारले, "इस जगह का नाम क्या है ?"
साधू म्हणाला, "भीमबेटका."
"ऐसा क्यूं ?"
"ऐसा माना जाता है, इन शिलाऑपर भीम बैठा करता था। ये तो मानो कि भीम की बैठक है।"
त्या प्रवाशाने घरून आणलेला डबा साधूबरोबर संपवून रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी त्या जंगलातून वाट काढत शिळांमधील अन्य गुहांचा शोध घेतला. त्यात अनेक ठिकाणी भिंतीवर असंख्य चित्रे काढलेली दिसली. भारतीय चित्रकलेतल्या प्राचीनत्वाचा शोध घेण्याचा तो सोनियाचा दिवस उजाडला होता. त्या संशोधकाचे नाव आहे, विष्णू श्रीधर उपाख्य हरिभाऊ वाकणकर.

चित्र क्र. ४ : भीमबेटका येथील चित्रकला
पुढील पंधरा वर्षे एकट्याने अभ्यास करून आणि त्यावेळेस महिना केवळ चारशे रुपये असूनही शनिवार, रविवार आणि अन्य सुट्यांच्या दिवशी उज्जैन ते भोपाळ ते भीमबेटका असा प्रवास करून अविरत संशोधन सुरू ठेवले. ह्या संपूर्ण काळात हरिभाऊंची टिंगल आणि उपेक्षा त्यांच्या विक्रम विश्व विद्यालयातील सहकाऱ्यांनी केली. परंतु त्यांच्या अढळ विश्वासाने चालणाऱ्या या शोधयज्ञाची सांगता अखेर त्या चित्रांची प्राचीनता सिद्ध करूनच झाली. गॉर्डनच्या तर्क विसंगत विधानांचे समूह उच्चाटन केले गेले आणि बाबरचा काळ तर सोडाच पण यातील काही चित्रे ही सुमारे दहा हजार वर्षापूर्ण काढली गेली असावीत ह्या हरिभाऊंच्या शास्त्रशुद्ध निकषाला जगाने आज मान्यता दिली आहे.
हरिभाऊंच्या ह्या शोधामागे शास्त्रीय पुरावे, उत्खननातील पुरावे आणि इतर अनेक निकषांची हो जरी दिली गेली असली तरी खरा शोध हरिभाऊंनी लावला तो त्या आदिम काळातील आहे चित्रकारांच्या भावविश्वामध्ये प्रवेश करूनच. आपल्या भावभावनांचा आणि भोवतालच वातावरणाचा अत्यंत कल्पक आविष्कार त्या वेळच्या चित्रकारांनी आपल्याला इथल्या रेखाचित्रांमध केलेला दिसतो. अत्यंत ओबडधोबड अशा चित्रफलकावर (कॅनव्हासवर) तितक्याच ओबडधोब कुंचल्याने तो एकदाच टेकवून रेष पूर्ण करण्याच्या अटीवर साकारलेली ही अचाट चित्रकला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि तुटपुंजी आणि अपूर्ण साधने असून सुद्धा भावनात्मक गतिमानतेर साक्षात्कार घडवत जाण्याची ही प्रेरणा पुढील काळामध्ये भारतीय कलांची जणू ओळखच होऊन गेलं आहे. भारतीय कलांचे 'भीमबेटका' हे जणू तीर्थक्षेत्रच आहे.
भीमबेटका येथील चित्रांची प्राचीनता ठरविण्यासाठी त्या चित्रांच्या शैलींनुसार त्याचे पृथक्करण हरिभाऊंना करावेसे वाटले. ते स्वतःही उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांना त्यातील आधीच्या आरि नंतर विकसित होत गेलेल्या शैलीतील फरक कळला. भित्तीचित्रांच्या शैलींवरून त्यांची प्राचीनत आणि कालखंड ठरविण्याची ही अभिनव पद्धत हरिभाऊ वाकणकरांनी जगाला आणि पुरातत्त्वाला दिलेली एक देणगीच आहे.
स्पष्ट तरीही गूढ इतिहास
भीमबेटकामध्ये जरी दहा हजार वर्षांपासून ते सुमारे तीन हजार वर्षांपर्यंतच्या कालखंडात कलेमधला इतिहास सलगपणे दिसत असला तरीही, आपल्या देशातील अन्य कलांचा इतिहास तसा आढळत नाही. इ.स. पूर्व ५००० ते इ.स. पूर्व २००० या कालखंडातील अत्यंत प्रगत संस्कृतीच्या खुणा आणि अवशेष आपल्याला आढळतात. आधुनिक काळातील फर्माना, राखीगढी, खंबात य सारख्या स्थानांवरील उत्खननांमुळे हा कालखंड याच्याही तीन एक हजार वर्षे तरी मागे जातो. परंतु या सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या पुराव्यांमध्ये त्यांच्या लिपीचे वाचन न होऊ शकल्यामुळे त्यालाही प्रागैतिहासिक काल असेच संबोधले जाते. या अवशेषांमध्ये मात्र अन्य कलांच्याबरोबरच शिल्पकलेचेही पुरावे मिळतात. या मध्ये घडवलेल्या दगडांच्या विविध आकारांपासून (Lathe-turned stones) ते पाषाण आणि धातू शिल्पित केलेली दिसतात. यातील प्रसिद्ध शिल्पे धोलाविरा (इ.स. पूर्व ३५००) येथील शिवलिंगासारखे लंबवर्तुळाकार दगड आणि सिंधू संस्कृतीतील (इ.स.पूर्व ३००० ते इ. स. पूर्व २०००) मोहेंजोदरो आणि हडप्पा येथे सापडलेली पाषाण शिल्पे आणि एका नर्तकीचे धातू शिल्प ही होत. पाषाण शिल्पामध्ये एक दाढीवाल्या पुरुषाचे अर्धशिल्प (Bust) सापडले आहे. त्याचा चेहरा तर अत्यंक सुबकपणे कोरलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या खांद्यावरील शालीवरील नक्षीचा तपशीलही ठळकपणे दिसतो त्यावरून तो एक ज्येष्ठ पुजारी असावा किंवा धर्मगुरू असावा असा तर्क आहे. धातू शिल्पातील नर्तकी ही शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ, जाड ओठांची आणि विवस्त्र आहे. यामुळे अतिशय विकसित कलेच्या अवस्थेत असलेल्या या कलाकृतींचा हेतू मात्र स्पष्ट होत नाही. याच कालखंडातील अनेक आकारांची मातीची भांडी, रांजणे इ. अत्यंत उत्कृष्टपणे रंगवलेली आढळतात. याचा अर्थ त्या काळातील प्रयोगसिद्ध कला (Performing Art) आणि उपयुक्त कला (Applied Art) या एकाच वेळेस अत्यंत प्रगत आणि समृद्ध होत्या. तरीही त्यांचा हेतू हा नंतरच्या विकसित झालेल्या कलांशी साधर्म्य ठेवणारा नसल्यासारखा वाटतो. एकूणच आपल्या इतिहासातील हा कालखंड आणि त्या दरम्यान विकसित झालेल्या कल्पना, नगर रचना आणि समृद्धीच्या पाऊलखुणा या एका क्षणभर प्रदीप्त होणाऱ्या अग्निगोलाप्रमाणे आहेत. या संस्कृतीला समकालीन असणाऱ्या जगातील अन्य देशातील संस्कृती सुद्धा अशाच आणि इतक्याच प्रगत होत्या, सुमेरियन, इजिप्तियन आदी. परंतु त्याही तशाच क्षणभर चमकून नाहीशा झाल्या. सरस्वती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यापासून पंजाब ते गुजरात आणि महाराष्ट्राचे उत्तर टोकापर्यंत पसरलेल्या या संस्कृतीचाही लोप झाला. हा भूप्रदेश भारतात असल्यामुळे आपण त्याला आपली संस्कृती असे मानतो. काही अभ्यासकांनी तर त्यात सापडलेल्या (Seals) मुद्रांवरील लिपी वाचताना त्या ऋग्वेदाच्याच ऋचा आहेत असेही म्हटले आहे. एका मुद्रेवरील प्राण्यांमध्ये बसलेल्या मानवी आकृतीला पशुपतिनाथही म्हटले आहे. खरे काय ते अजून अज्ञातच आहे. परंतु या कलांच्या काही शतकांनंतर विकसित झालेल्या हिंदू शिल्पकलेशी या परंपरेचा थेट संपर्क असावा असे मात्र दिसत नाही.पाश्चात्त्यांचे चमत्कारिक निकष
ऋग्वेदामधील ऋचांमध्ये अनेक विषयांचा समावेश आहे. ज्यामध्ये तत्कालीन घटनांचा परामर्श घेतलेला आहे. सर्व काही पाठ करून ठेवण्याची पद्धत असल्यामुळे कुठलेही पाल्हाळ न लावता कमीत कमी शब्दांमध्ये त्याची रचना करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यातील काही ऐतिहासिक घटनांचे वर्णन दोन दोन शब्दातच केलेले दिसते. ऋग्वेदांमधील दुसऱ्या मंडलातील अकरावे सूक्त गृत्समद-शौनकाचे
आहे. यातील प्रत्येक ऋचेच्या शेवटी 'जनास इंद्रः' असे शब्द येतात. म्हणूनच याला इंद्राचे पालुपद सूक्त असेही म्हणतात. शेवटल्या पालुपदाचा अर्थ "अरे अमुक अमुक करणारा तो इंद्र असा आहे" असा होतो. या सूक्तांमध्ये गृत्समद ऋषी एका ऐतिहासिक सत्याचा उल्लेख करून जातात. याची पार्श्वभूमी अशी आहे की, इंद्र हा वैदिक काळातील लोकांचा म्हणजेच आर्यांच्या सेनेचा सेनापती होता. तो ज्यांच्याकडून लढायचा त्यांना युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावयाचा. त्याच्या रणांगणावरील असामान्य शौर्यामुळे इंद्राच्या काही दुर्गुणांकडे नुसता कानाडोळा केला जायचा एवढेच नाही त्याचा अनुचित लाभही घेतला जायचा. त्यामुळे अनेकदा शत्रुपक्षाचे लोक त्याचे अपहरण करून त्याला घेऊन जात, सोमरस पाजून तृप्त करत आणि त्यांच्या बाजूने लढण्यास उद्युक्त करत. अशाच एका सैन्याचा तो सेनापती होता की ज्या गावामध्ये गृत्समद ऋषी राहत होते. इंद्राचे अपहरण करायला रात्री शत्रू सैन्याचे लोक आले. तेव्हा गृत्समद ऋषींनी इंद्राची वस्त्र प्रावरणे आणि त्याचीच युद्धावर जाताना घालायची रक्षक वस्त्रे धारण केली. अपहरण करायला आलेल्या शत्रू सैन्यातील लोकांना तोच इंद्र वाटला आणि त्यांनी वेषांतर केलेल्या गृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडून नेले. गृत्समद ऋषींचा बेत यशस्वी झाला आणि खरा इंद्र गावातच राहिला. शत्रूच्या छावणीच्या अगदी जवळ आल्यावर गृत्समद ऋर्षीनी बोलायला सुरुवात केली आणि त्या वेळेस त्यांनी जे त्या लोकांना सांगितले ते म्हणजे या अकराव्या सूक्तातील ऋचा आहेत. त्यात त्यांनी इंद्राचे वर्णन करताना त्याचे अनेक गुणविशेष सांगितले. प्रत्येक ऋचेमध्ये ते इंद्राचे वर्णन करावयाचे आणि शेवटी म्हणायचे 'स जनास इंद्र:' या वर्णनांमुळे इंद्रासंबंधीची बरीच माहिती मिळते. तो उंचापुरा, धिप्पाड तरीही अतिचपळ होता. त्याचे केस, दाढी इतकेच काय भुवयाही सोनेरी होत्या. हे सगळे वर्णन करताना गृत्समद ऋषी या सैनिकांना सांगत होते की अशा गुणांनी संपन्न असलेला जो आहे असा 'स जनास इंद्रः' अरे, तो इंद्र या नावाने ओळखला जातो. थोडक्यात काय की ते असे सांगायचा प्रयत्न करत होते की तो मी नव्हेच. तुम्ही मला कशाला धरून आणले आहे. या सूक्ताच्या तिसऱ्या ऋचेमध्ये ते असे म्हणतात,
'यो हत्वाहिमरिणातसप्तसिंधून्यो गा उदाजदयधावलस्य ।
यो आश्मनोरंतरग्नि जजान सवृक्समत्स् स जनास इंद्रः । (ऋग्वेद २.१२.३, अथर्ववेद २०.३४.३ )
याचा अर्थ असा होतो की, हे लोकांनो, अहिचा वध करून सप्तसिंधूंना विमुक्त करणारा, वलाच कैदखान्यातील धेनूंना बंधमुक्त करणारा, मेघातून अग्नी उत्पन्न करणारा, तसेच युद्धात शत्रुसंहार करणारा इंद्र हा असा आहे. यामध्ये उल्लेखलेल्या सात नद्यांमध्ये (सप्तसिंधून्यो) सरस्वती ही एक नदी हो पंजाबातील आजच्या पाच नद्या आणि सिंधू नदी या उर्वरीत सहा नद्या आहेत.
तसेच ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये (क्र. ४.११.३, ८.९३.१, १०.४३.३ आणि १०.४९. आणि या इंद्राच्या सूक्तांमध्ये सप्त नद्यांना प्रवाही केल्याचा स्पष्ट उल्लेख येतो. इंद्र अडलेले नद्यांचे पाणी प्रवाही करतो असा उल्लेख येतो. ऐतिहासिक दृष्ट्या या घटना म्हणजे इंद्र त्या आटत चाललेल नद्यांच्या प्रवाहांना डोंगरात जाऊन स्फोटकांच्या साहाय्याने दगड फोडून मोकळे करत होत पंजाबातील पाच नद्या, सिंधू आणि सरस्वती ह्या त्या उल्लेखिलेल्या सप्त सिंधू आहेत. यातील पहिल्य पाच नद्या आणि सिंधू नदी आजही प्रवाही आहेत. परंतु सरस्वती नदी मात्र आटून गेली. भूगोलातील पुराव्यानुसार हा कालखंड इ.स.पू. २२०० असा आहे. या सरस्वती नदीचे पात्र हे अधिकाधिक २० किलोमीटर (हिमाचल प्रदेशात) आणि कमीतकमी ८ किलोमीटर (राजस्थानात) एवढे होते. हा सर्व प्रवाह अचानक एका रात्रीत आटू शकत नाही. तो हळूहळू क्षीण होत जातो. याचा कालावधीसुद्धा अनेक शतकांचा असतो, किमान १००० वर्षांचा तरी नक्कीच. याचा अर्थ असा की इ.स. पूर्व २२०० मध्ये आटलेल्या नदीचा क्षीण होणारा प्रवाह गृत्समद ऋषींनी त्याच्या किमान १००० वर्षांपूर्वी (किंवा त्याहूनही अधिक वर्षे) नक्की पाहिला असणार. सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये ६५ वेळा येतो एवढेच नाही तर तिचे वर्णन त्यांनी नदीतमे अम्बितमे देवीतमे सरस्वती, म्हणजे महान नदी, महान माता आणि महान देवी असे केले आहे. गृत्समद ऋर्षीनी पूर्ण रूपाने प्रवाहित असणाऱ्या सरस्वतीला नक्कीच पाहिले असणार. तो काळ गृत्समद ऋषींपेक्षा १००० वर्षे जुना असू शकतो. म्हणजे इ.स. पूर्व ५००० ते ४००० वर्षे, वैज्ञानिक सत्याच्या आधारावर ऋग्वेदाचा काळ हा इ.स. पूर्व १५०० च्या खूपच मारे जातो. या सत्याचा स्वीकार आता जगाने केला आहे.
२. भारतीय शिल्पकलेची सुरुवात
भौगोलिक घटनांच्या आधारे एक गोष्ट मात्र नक्की की सरस्वती नदीच्या सुकाण्याची सुरुवात होण्याच्या पूर्वीचा काळ इ.स. पूर्व ५००० ते ३००० हा नक्की होता. त्याच्या नंतर हळूहळू प्रवाह आटत गेला आणि इ.स. पूर्व २२०० ते इ.स. पूर्व १९०० या दरम्यान पूर्ण आटला. याच कालखंडात सरस्वती-सिंधू संस्कृती विकसित झाली आणि या नदीबरोबरच नामशेषही झाली.
ऋग्वेदामधील उल्लेख याच नदीच्या पूर्ण प्रवाही अवस्थेचे आढळतात. त्याचबरोबर आणखी एक अत्यंत सूक्ष्म खगोलशास्त्रीय निरीक्षण नोंदल्याचे आढळून येते. ऋग्वेदात वसंत संपात हा मृगनक्षत्रात येत असल्याचा उल्लेख आहे. ही प्रक्रिया सुमारे इ.स. पूर्व ५५०० ते इ.स. पूर्व ३००० पर्यंत होत होती. इ.स. पूर्व ३००० नंतर वसंत संपात कृत्तिका नक्षत्रात येत असल्याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेत येतो. लोकमान्य टिळकांच्या 'ओरायन' या ग्रंथात याचे विस्तृत निवेदन आहे. या दोन्ही घटनांच्या उल्लेखानुसार ऋग्वेदाची रचना करायचा कालखंडही इ.स. पूर्व ५००० नंतर सुरू झालेला असणार कारण त्या वेळेस वसंत संपात मृग नक्षत्रात होत होता. पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मते सिंधू संस्कृतीचा हास हा इ.स. पूर्व २००० मध्ये झाला. मग त्या पुढील ५०० वर्षाचा काळ हा ऐतिहासिक दृष्ट्या या देशामध्ये अंधकारमय होता. लोक जंगलामध्ये किंवा छोट्या खेड्यांमध्ये राहत होते आणि या बिचाऱ्यांवर बाहेरून आलेल्या आर्यांनी तुफानी आक्रमण करून त्यांना पराजित केले. इ.स. पूर्व १५०० च्या दरम्यान याच आर्यांनी वेदांची निर्मिती केली. या युक्तिवादामध्ये आर्य बाहेरूनच वेद घेऊन आले असे निदान सांगितले जात नाही किंवा असे म्हणायला ते धजावले नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे वेदांमध्ये उल्लेखलेल्या नद्या, डोंगर आणि अन्य स्थळे ही सर्व भारतातीलच आहेत.
वैदिक भारतीय आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीतील भारतीय हे समकालीन का एकच ? यावर अद्याप वाद सुरू आहेत. परतु भारतीय कलांच्या इतिहासाचा विचार करता आपल्याला वेदाच आधार चारावा लागतो. याचे कारण असे की आजपर्यंतच्या कला परंपरांचे बीज हे थेट वेदशा में आढळते. त्यामुळे या परंपरेची अक्षुण्णता हाच धागा धरून आपल्याला भारतीय कलांचा मात्र घ्यावा लागतो. ऋग्वेदामध्येच अनेक कलांचे तपशीलवार वर्णन येते. ज्यामध्ये प्रामुख्याने नृत्य संगीत आहे. परंतु ऋग्वेदामध्ये कठीण परिस्थिती आलेल्या व्यक्तीने दहा गावे देऊन कोण मान इंद्राला विकत घेईल अशी पृच्छा केलेली आढळते. दुसऱ्या उल्लेखात इंद्राला दहा हजार किंवा श हजारालाही न विकण्याची चर्चा केली आहे. (नी. पु. जोशी, ऋग्वेद ४.२४.१० आणि ऋग्वेद ८.१.० याचा अर्थ देवदेवतांच्या मूर्ती ह्या नक्कीच कोरल्या जात होत्या. परंतु त्या दगडी नसून काष्ठ शिल असाव्यात. पुढील काळामध्ये म्हणजे इ.स. पूर्व ३०० (मौर्य काळात) दगडी शिल्पांचे उत्कृष्ट को काम सुरू झाले असावे. याचे फार थोडे पुरावे सापडलेले आहेत. पटना संग्रहालयामध्ये असतं दीदारगंज यक्षी या नावाने प्रसिद्ध असणारे शिल्प हे त्या काळातले मानले जाते. आजच्या पटल शहराजवळच दीदारगंज आहे. तेथे नदी काठावर अनेक वर्षे चिखलात गाडल्या गेलेल्या परंतु अत्या गुळगुळीत अशा एका दगडाचा वापर कपडे धुण्यासाठी तिथले धोबी करत होते. एक दिवशी दगडाखाली साप गेला असा संशय येऊन त्याला काढण्यासाठी हा दगड उचलला गेला. तेव्हा त्यांच लक्षात आले की अनेक दशके ते ज्याच्यावर कपडे धूत होते तो दगड नसून एका स्त्री मूर्तीची पाठ आहे हीच त्या दीदारगंजच्या यक्षीची शोध कथा. या मूर्तीविषयी एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते की स्त्री देह शिल्पांकन कसे करावे हे त्या काळातच निश्चित झाले होते. हे शिल्प पाहताना स्त्री सौंदर्याचे मानुषीका (Womanhood personifide) झाले असेच म्हणावे लागेल. खरेतर ही यक्षीची मूर्ती नाही तर ती एक चौरीधारक स्त्रीची आहे. याचा अर्थ हिचे प्रतिबिंबरूप दुसरीही मूर्ती असली पाहिजे. त्याचबरोबर तिच्च हातातल्या चौरीने ती ज्या मूर्तीला वारा घालत असावी ती एखाद्या राजाची किंवा देवाची मूर्तीही त काळी असावी.
भारतीय शिल्पकलेचा उगम जरी या कालखंडात झाला असला तरी त्याला गती मिळाली ती शु काळामध्ये, सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याच्या मृत्यूनंतर (इ.स. पूर्व १८७) शुङ्ग वंशातीत असणाऱ्या आणि त्याच्याच सैन्याचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राचा राज्याभिषेक झाला. सम्राट अशोकाच्या काळापासून असलेला बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला. तसेच सम्राट अशोकाच्या अहिंसेचे अतिरेकी आणि अविवेकी आग्रहही पुष्यमित्राने सोडून दिले त्यामुळे तो अत्यंत लोकप्रिय झाला. असे असले तरीही बौद्ध पंथाचे अनुयायी हे समाजात होते. त्यामुळे राजाश्रयाशिवाय तो टिकवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. याच कालखंडात अफगाणिस्तानच्या प्रदेशातील काही ग्रीक लोकही बौद्ध झाले होते आणि त्यांना उपासनेसाठी मूर्तीची आवश्यकता जाणवत होती. ग्रीक संस्कृतीमध्ये मूर्तिपूजा प्रचलित होती. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीकांनी बांधलेती मंदिरे आणि त्यांचे अवशेष आजही त्यांच्या भव्यतेची साक्ष देतात. या मंदिरात ते त्यांच्या देवांच्या मूर्ती बसवत आणि त्याचे पूजन करत. तीच पद्धत त्यांनी त्यांच्या विस्तारलेल्या साम्राज्यातही आणली. पुढे हे ग्रीस देशापासून लांब राहणारे जेव्हा बौद्ध झाले तेव्हा त्यांना उपासनेसाठी आराध्य दैवताच्या मूर्तीची आवश्यकता भासू लागली. बौद्ध पंथात मूर्तिपूजा नव्हती तरी या ग्रीकांनी मूर्ती घडवून त्यांचे पूजन सुरू केले.
याच काळात विशेषतः उत्तर भारतात भागवत धर्म मोठ्या प्रमाणात प्रभावी होता. विष्णू प्रमुख देव झाला होता. त्यामुळे त्या वैष्णवांनी विष्णूच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली होती. त्याच प्रमाणे शैव पंथाचे अनुयायी लिंग रूपात शिवाचे पूजन करत होते. त्यामुळे बौद्धांनाही मूर्तिपूजनाची आवश्यकता अधिकच वाटू लागली. पांथिक स्पर्धेमुळे भारतीय मूर्तिकलेला खूपच मोठे प्रोत्साहन मिळाले.
सनातन धर्मात, ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो, देवांची उपासना आणि पूजन हे व्यक्तिगत होते. त्याच्या विरुद्ध बौद्ध हा पंथ असल्यामुळे त्याची रचना श्रेणीशः होती. एकेश्वरवादी सर्व पंथांमध्ये अशीच रचना असते. त्यामुळे सामूहिक उपासना तिथे अपरिहार्य ठरते. आपल्या पंथातील अनुयायी टिकवून ठेवण्यासाठी हे करावेच लागते. अशा पंथांमध्ये सण फारच थोडे असतात. सतत सामूहिक पूजन करत असल्यामुळे एकत्रित येऊन काही 'साजरे' करायचे याचे प्रयोजनच राहत नाही. सामूहिक एकत्रीकरणासाठी काही विशेष वास्तूंची निर्मिती करावी लागते. अशा प्रकारच्या विशाल प्रार्थनास्थळांची निर्मिती मध्य आशियात, ग्रीस आणि रोम येथे झाली होती. बौद्धांच्या सामूहिक एकत्रीकरणासाठी अशा वास्तूंची निर्मिती झाली असावी असे स्तूप किंवा चैत्य लेणे यांचे स्थापत्य पाहून वाटते.
सनातन धर्मात अशा सार्वजनिक पूजा करण्याच्या वास्तूंची आवश्यकताच नव्हती त्यामुळे त्या काळात जेव्हा मोठ्या प्रमाणात स्तूप आणि लेण्यांची निर्मिती होत होती तेव्हा देऊळ ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. म्हणूनच त्या वेळेस देवळे बांधली गेली नाहीत. वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर ते ज्ञान शाश्वत करण्यासाठी देवळे बांधण्याची गरज भासली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर मोठी देवळे बांधली गेली.
हिंदू धर्मात सणांचे वेगळे महत्त्व होते. त्या दिवशी समाजातील सर्वांनी भेदभाव विसरून एकत्रित येऊन आनंद साजरा करायचा. एकत्रित गायन आणि नर्तन त्यात होत असे. बदलत्या ऋतूप्रमाणे वर्षातील दिवस नक्की केले होते. त्या ऋतूप्रमाणे आरोग्याला हितकारक पक्वान्ने आणि मिष्टान्ने करून सर्वांनी एकत्रित भोजन करावे अशी रचना होती.
हिंदू समाजाच्या आजच्या अवनत अवस्थेचे हेही एक कारण आहे. वैयक्तिक किंवा कुटुंबांपुरते मर्यादित असणाऱ्या देवांना चौरस्त्यावर नेले आणि त्यांचे सामूहिक पूजन सुरू केले; सामूहिकपणे साजरे करायचे सण मात्र फक्त कुटुंबांमध्ये साजरे होऊ लागले.
३ पूजास्थळांची निर्मिती को स्तूप आणि मंदिर
४. सहेतुक शिल्पकलेच उषःकाल-कोरीव लेणी
५. हिंदू शिल्पांची निर्मिती
मूर्तिशास्त्राचा उगम :-
६. मंदिर कल्पनेचा विस्तार आणि विकास
चित्र क्र. १४: भूवराह, उदयगिरीलेणी मंदिरे
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये काही मंदिरे बांधली गेली, परंतु त्यातील एकही वास्तू सापडलेले नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देवायतन असा उल्लेख येतो. कुठल्या चौकात कुठले मंदिर असाई असेही त्रोटक उल्लेख आहेत. परंतु ह्या सगळ्या लहान वास्तू असाव्यात असे वाटते. मूर्तिशास्त्राचे निका प्रमाणित झाल्यावर या मूर्तीना कुठेतरी बसवले गेले पाहिजे हे तर नक्कीच होते. त्यासाठी प्रचलित लेणी कोरण्याच्या पद्धतीमध्ये लेणी मंदिरे करण्याचा प्रयोग झाला. गुप्त वंशाचा चंद्रगुप्त द्वितीय (इ.स. ३८० ते ४२०) याच्या कारकिर्दीत मध्य प्रदेशमध्ये विदिशाजवळ लेणी मंदिर कोरण्याचा प्रयोग झाला आजच्या भिलसा या गावी 'उदयगिरी गुंफा' या नावाने ते प्रसिद्ध आहे. यामध्ये एकाच डोंगरात दोन- तीन मंदिरे करण्याचा तो प्रयोग होता. त्यातल्या एका गुहे बाहेर स्तंभावर आधारित छत असेहे करण्याचा प्रयोग केला. आज तो भाग अस्तित्वात नाही. यामध्ये एक केवळ शेषशायी विष्णूचेही शिल्प एका गुहेत कोरले आहे. त्याच्या शेजारी वराहाचे मोठे शिल्प असलेली गुंफा हे तेथील सर्वात मोठे लेणीमंदिर. यातील मूर्तीचे तपशील पुढे येतीलच. देशातील अन्य काही लेणी मंदिरांमध्ये कर्नाटकातील बदामी, ऐहाळे (इ.स.६. वे-७ वे शतक), आंध्र प्रदेशमधील अक्कण्णा मादण्णा, मोगलाजपुरम्, उंडवली (इ.स.७ वे ८ वे शतक), महाराष्ट्रातील वेरुळ (क्रमांक १४ ते ३१), घारापुरी-मुंबई, पाताळेश्वर-पुणे (इ.स. ७ वे ते ९ वे शतक) यांचा उल्लेख करता येईल.
चित्र क्र. १५: उदयगिरी लेणी, विदिशा

चित्र क्र. १६: दशावतार मंदिर, देवगड
बांधलेली मंदिरे (इ.स. ४ थे ते ८ वे शतक)
या लेणी मंदिरे कोरण्याच्या कालखंडात दगडावर दगड रचून मंदिरे करण्याचाही प्रयोग सुरू झाला. देवगड, नचना, भुमराह या गावी ही सुरुवातीच्या काळात बांधलेली मंदिरे आढळतात. एका चौथऱ्यावर ज्याचे माप साधारण २०-२० फूट आणि ज्याच्यावर साधारण १०-१० फूट उंचीचे चौकोनी बांधकाम. ज्यामध्ये एक गर्भागृह आहे असे यांचे स्थापत्य आहे. संपूर्ण देशभर अशा पद्धतीची दगडी मंदिरे बांधण्याचे किंवा लेणी मंदिरे कोरण्याचे काम या काळानंतर सुरू झालेले दिसते. बांधलेल्या मंदिरामध्ये सातव्या शतकापर्यंत लहान आकाराचीच मंदिरे प्रामुख्याने बांधली गेली. यांची सर्वात मोठी प्रयोग शाळा कर्नाटकमधील पट्टदकल आणि ऐहोळे या गावी आढळते. येथे विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मंदिरांचे प्रयोग केलेले दिसतात. नागर, द्राविड इ. शैलींची मंदिरे इथे दिसतात. नागर म्हणजे वर निमुळते होत जाणारे शिखर. तर द्राविड म्हणजे आडव्या थरांमध्ये विभागून निमुळते होणारे शिखर. अशी या शैलींची नावे आणि प्रकार आहेत. या समूहातील सर्वात मोठे मंदिर (विरुपाक्ष मंदिर) हे साधारणतः ३० फूट उंचीचे आहे.
चित्र क्र. १७: पार्वती मंदिर, नचना
मोठी मंदिरे (इ.स. ८ वे ते १३ वे शतक)
या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे वेदकाळापासून सातव्या शतकापर्यंत या वैचारिक आणि धार्मिक प्रगती बरोबरच वैज्ञानिक प्रगतीही समांतर आणि तितक्याच गतिमानतेने धावत होती. किंबहुना अनेक वेदांमधल्या कथांपासून पुराणकथांमध्ये वैज्ञानिक सिद्धान्ताचे संदर्भ दिसतात. वेदकाळापासून भारक वैज्ञानिकांची एक अक्षय्य परंपराही सातत्याने दिसते. याच परंपरेमध्ये सातव्या शतकामध्ये २० प्रदेशामध्ये कायथा या गावी वराहमिहीर नावाच्या एका थोर शास्त्रज्ञाचा जन्म झाला. त्याच्य 'बृहद्ङ्कथा' या ग्रंथामध्ये स्थापत्यशास्त्रावर एक स्वतंत्र अध्यायच आहे. त्यात त्याने स्थपतिर ब्रह्मांडाची प्रतिकृती ज्यात दिसेल अशी वास्तू साकारण्याचे आवाहन केले आहे. यानंतरच्या काळात मंदिर स्थापत्यांमध्ये केवळ देवदेवतांच्या मूर्तीना ठेवण्याचे स्थान असा हेतू न राहता, त्याचबरोबर प्रचंड आकारमानाच्या वास्तूंचीही निर्मिती करण्याचे चिंतन आणि प्रयोग सुरू झाले. विशाल मंदिर निर्मितीच्या परंपरेला या देशातील शास्त्रज्ञ कारणीभूत ठरले आहेत.
चित्र क्र. १८: रथमंदिर, महाबलीपुरम
महाबलीपुरम् येथे अखंड दगडातून कोरून मंदिर करण्याचेही प्रयोग सातव्या शतकात सुरू झाले होते. यामध्ये पाच पांडवांचे रथ हा त्यापैकीच एक प्रयोग. इथे समुद्रकिनाऱ्यावर असलेले दगडात बांधलेले एक मोठे मंदिर आहे. ज्याला 'शोर टेम्पल' असे म्हणतात. महाबलीपुरम्ची मंदिरे नरसिंहवर्मन पहिला (इ.स. ६३० ते ६७०) या राजाच्या काळात बांधली गेली. आठव्या शतकात सुरुवातीला कांचीपुरम येथे कैलासनाथान मंदिराचे बांधकाम झाले. राजा नरसिंहवर्मन दुसरा (इ.स. ६९० ते ७१५) व त्याची राणी रंगपताका यांच्या प्रयत्नांनी हे कैलास मंदिर उभारण्यात आले. मोठ्या आणि भव्य मंदिराची सुरुवात इथून आली. याच्यानंतर राजा नंदिवर्मन (इ.स. ७१७ ते ७७९) याच्या कालखंडात कांचीपुरमचे प्रसिध्द वैकुंठ-पेरूमाळ मंदिराचे बांधकाम झाले. आजही हे भव्य मंदिर तेथे आहे. परंतु जीर्णोद्धारामध्ये त्या मूळ स्वरूप गेले आहे. मंदिरे बांधायचे कार्य सुरू झाले आणि या कालखंडानंतर हजारो मंदिरांचे
निर्मिती देशभरात झाली असली तरी त्यातली विकसित आणि भव्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे.
या पुढील काळात विकसित अवस्थेतील मंदिराचे स्थापत्य प्रस्थापित होऊ लागले होते. मुखमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः या मंदिरांची रचना होती आणि गर्भगृहावरती उत्तुंग असे शिखर ज्याची उंची ५० फुटापेक्षाही अधिक होती. ही झाली मोठी मंदिरे बांधण्याची सुरुवात. यानंतर देशातील अन्य भागातही अशी मंदिरे बांधण्याचे प्रयोग सुरू झाले.

चित्र क्र. १९: कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
राष्ट्रकूट वंशाचा राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५६ ते ७७३) याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वेरुळ मधल्या कैलास मंदिराचे काम सुरू झाले. असे म्हणतात की त्याची राणी माणिकावती हिने कांचीपुरम येथील कैलासनाथाच्या मंदिरासारख्या पण त्याहूनही भव्य अशा महाराष्ट्रात बांधल्या गेलेल्या मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करणार नाही अशी विचित्र प्रतिज्ञा केली. एका व्यक्तीच्या उपोषण काळात पन्नास फुटाहून अधिक उंचीचे आणि भव्य मंदिर बांधून काढणे अशक्यच होते. या समस्येवर मात करण्यासाठी पैठणचा एक अज्ञात शिल्पी पुढे सरसावला. त्याने डोंगरावर जाऊन दोन दिवसांमध्ये एका देवळाचा केवळ कळस कोरला व तो त्या राणीला दाखवून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली असे म्हणतात. इथून एका डोंगरातून संपूर्ण आणि एकसंध मंदिर कोरण्याच्या अचाट प्रयोगाची सुरुवात झाली. हे मंदिर कोरण्याचे काम जे इसवी सनाच्या आठव्या शतकात (सुमारे इ.स. ७७० पासून) सुरू झाले ते दहाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (इ.स. ९१३) म्हणजे कृष्ण राजाच्या पतवंडांपर्यंत सुरू होते. शंभर फूट उंच, १७० फूट रुंद आणि जवळ जवळ १७५ फूट लांब असे विराट मंदिर साकार झाले. कांचीपुरमच्या मंदिराशी स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे दक्षिण भारतीय धाटणी (द्राविड शैलीचे) असूनही परंतु महाराष्ट्रात प्रकटलेले, तसेच महाराष्ट्रातले हे सर्वात मोठे मंदिर आहे.

चित्र क्र. २०: कैलास मंदिर, वेरूळ
दहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात खजुराहो येथे चंदेल घराण्याच्या महासत्तेचा उदय झाला.या कालखंडात येथे मंदिर बांधण्याच्या कामाला विलक्षण गती आलेली दिसते. याच वंशातील यशोवर्मन (लक्ष्मण वर्मा) (इ. स. ९२५ ते ९५०) याने खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर हे पहिले भव्य मंदीर बांधले. याचा मुलगा धंगदेव (इ.स. ९५० ते १००२) याने विश्वनाथ आणि पार्श्वनाथ ही दोन देखणी बांधली. त्यानंतर राज्यावर आलेल्या गंडदेवाच्या कारकिर्दीत जगदंबी आणि चित्रगुप्त ही मंदिरे बांधली गेली. ह्यानंतर याचा मुलगा विद्याधर (इ.स. १००४ ते १०२९) हा गादीवर बसला. त्याने इ.स. १०१९ ते १०२२ या काळामध्ये महंमद गजनीचा दोनदा युद्धात पराजय केला. यानेच खजुराहो मधल्या खंडारिया महादेव या मंदिराची निर्मिती केली. इ.स. ११०० पर्यंत खजुराहोमध्ये एकूण ८५ मंदिरे बांधली गेली. त्यातील आज १० ते १२ शिल्लक आहेत. एकाच परिसरात भव्य मंदिरांची निर्मिती असणारे हे भारतातील एकमेव स्थान आहे.

चित्र क्र. २१ : लक्ष्मण मंदिर, खजुराहो
१०० फूट उंचीची लक्ष्मण, विश्वनाथ आणि खंडारिया महादेव अशी तीन मंदिरे खजुराहो येथील पश्चिम समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानात आहेत. या नंतरच्या काळातील भव्य मंदिराची निर्मिती तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथे झाली. चोल घराण्याचा राजराजा चोल (इ.स. ९८५ ते १०१२) आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल (इ.स. १०१२३ १०४४) याच्या कारकिर्दीत भारतातील अतिभव्य अशा दोन मंदिरांची निर्मिती झाली. यातील तंजावर येथील बृहदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम राजराजाच्या कारकिर्दीत सुरू झाले परंतु ते संपूर्ण होण्याला आतच त्याचा मृत्यू झाला, त्याचा मुलगा राजेंद्र चोल याने ते बांधकाम पूर्ण करून घेतले. परंतु त्याचबरोबर तिथून जवळच गंगाईकोंडचोलापुरम येथे दुसरे बृहदीश्वर गंगाईकोंडचोलेश्वराचे मंदिर बांधले. दोन्ही मंदिराचे वैशिष्ट्य असे की तत्कालीन मध्यम आकारांच्या मंदिरापेक्षा जवळजवळ ४० पटीने हैं मंदिरे मोठी आहेत. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराला 'दक्षिण मेरू' असे संबोधले आहे आणि भगवान शिव म्हणजे अवकाश या कल्पनेचे हे परमाकाश असे रूप आहे. (वात्स्यायन १९९६, नागास्वामीः ३०१ - ३०८). ह्या दोन्ही मंदिरांची उंची अनुक्रमे २०० फूट आणि १८० फूट एवढी आहे.

चित्र क्र. २२: बृहदीश्वर मंदिर, तंजावर
तेराव्या शतकामध्ये ओरिसामध्ये राजा नरसिंह देव दुसरा (इ.स. १२३४ ते १२६८) याने इ.स. १२५८ मध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर बांधले. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराची उंची २२० फूट एवढी होती. भारतातील हे सर्वात मोठे मंदिर होते. सतराव्या शतकात हा भाग ढासळला आणि आज त्याचे १८० फूट उंचीचे जगमोहनावरील शिखर उभे आहे. इ.स. १२४४ मध्ये राजा नरसिंह देव याने बंगालवर स्वारी केली आणि तेथील सुलतान तुघ्रील तुघान याचा दारुण पराभव करून तो प्रदेश मुक्त केला. त्याच्यात त्याला प्रचंड मोठी संपत्ती मिळाली. ही मिळालेली संपत्ती त्याने सर्व सैनिकांमध्ये वाटून टाकण्याची योजना केली. हे त्याच्या आईला कळताच तिने त्याला विचारले की या संपत्तीवर फक्त सैनिकांचाच अधिकार कसा? तुम्ही रणांगणावर लढत असताना येथील सर्व समाजही तुमच्या लढ्यात सामील असतोच. तेव्हा या संपत्तीवर सर्व समाजाचा अधिकार आहे, म्हणूनच या धनाचा विनियोग समाजहितासाठीच झाला पाहिजे. हे ऐकल्यावर राजाने आपला निर्णय बदलला आणि या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी तो पैसा वापरला. या मंदिर निर्मितीचा सर्व तपशील बय चकडा या १३ व्या शतकात सापडलेल्या हस्तलिखितात आढळतो.
मंदिराचे स्थापत्य अभ्यासताना असे लक्षात येते की भारतामध्ये १०० फूट किंवा अधिक उंचीची फारच थोडी मंदिरे शिल्लक आहेत. खजुराहो येथील वैद्यनाथ मंदिर आणि त्यासारखी तिथली अन्य मोठी मंदिरे ही १५ व्या शतकात आलेल्या सिकंदर लोधी याने तर विदिशा येथील बीजमंडल हे भव्य सूर्य मंदिर १७ व्या शतकात औरंगजेब याने उद्ध्वस्त केले. तसेच चंदेल घराण्याने बांधलेली सिंहोनिया येथील भव्य मंदिरेही अत्यंत भग्न अवस्थेत उभी आहेत.

चित्र क्र. २३ : सूर्यमंदिर, कोणार्क
७. प्रमुख देव - ब्रह्म

चित्र क्र. २४: ब्रह्मदेव, देवगड
मंदिराच्या निर्मितीचे प्रयोजन हे अत्यंत विकसित अवस्थेत पोहोचलेल्या शिल्पकलेन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून होते. या शिल्पांमध्ये प्रामुख्याने देवदेवतांची शिल्प असतात, ज्यामध्ये मुख्य देवता, उपदेवता आणि इतर देवतांचा समावेश केलेला असतो. परंतु मंदिरावरील सर्व शिल्पे ही फक्त देवांचीच नसतात. त्यात काही अन्य शिल्पांचाही समावेश केलेल दिसतो. यामध्ये यक्ष, गंधर्व, दिक्पाल, नवग्रह इ., सुरसुंदरी, नायिका, व्याल आणि कामशिल्पे बांच अंतर्भाव असतो.
ब्रह्मदेव :-
पूजेमध्ये असलेले ब्रह्मदेवाचे स्वतंत्र राजस्थानामधील पुष्करतीर्थ येथे एक देऊळ आहे. मुळ देवळाचा जीर्णोद्धार झाल्यामुळे आज तेथे थोड्या नवीन धाटणीचेच मंदिर दिसते. मूळ मंदीर इ.स. १८०२ मध्ये बांधले होते. (बॅनर्जी : १९४१) हा अपवाद सोडल्यास प्राचीन मंदिरांमध्ये ब्रह्मदेव मंदिरे दुधही आणि खजुराहो (म.प्र.), खेड ब्रह्मा (इडर, गुजराथ), वसंतगड (राजस्थान), उन्का (हुबळीजवळ, कर्नाटक) आणि गौड (माल्डा, बंगाल) येथे आहेत. यातील खजुराहोचे मंदिर, ब्रह्माचे नसून शिवाचे आहे. गर्भागृहामध्ये असलेल्या चतुर्मुखी लिंगामुळे त्या मंदिराला ब्रह्मा मंदिर हे नाव दिले गेले. सर्व मंदिरांमध्ये ब्रह्मदेवाचे शिल्प मात्र आढळते. साधारणतः सर्व ठिकाणी तीन तोंडाची ही पुरुषाची मूर्ती बसलेली किंवा उभी असते. चौथे तोंड हे मागच्या बाजूला असल्याने दर्शकाने ते असल्याचे गृहीत धरायचे असते. मधल्या मुखाला लांब दाढी असते आणि ही मूर्ती कमळावर बसलेली असते. डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत व काही शिल्पांमध्ये मृगाजिन असते. या मूर्तीला चार हात असतात आणि उजव्या खालच्या हातामध्ये अक्षमाला, उजव्या वरच्या हातामध्ये स्रुवा, डाव्या खालच्या हातामध्ये कमंडलू असते आणि डाव्या वरच्या हातामध्ये पुस्तक (पोथी). काही मूर्तीमध्ये खालचा उजवा हात अभय किंवा वरद मुद्रेतही असतो. त्याचे वाहन हंस असते आणि त्याच्याबरोबर एक स्त्री (सावित्री) किंवा दोन स्त्रिया (सावित्री आणि गायत्री किंवा सावित्री आणि सरस्वती) असतात.
चित्र क्र. २५ :ब्रह्मदेव सावित्री, पाटण
ब्रह्मदेव हा ब्राह्मण, वेदांचा स्रोत आणि यज्ञाचा पुरस्कार करणारा आहे. त्याने आपल्या चार तोंडांनी चार वेदांना प्रकट केले. संहाराशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्याच्या हातात शस्त्र दिसत नाही. त्याचे पोट किंचित सुटलेले व शरीर थोडे स्थूल दाखवतात. (जोशीः १९७९) चार मुखे ही चार वेदांचे प्रतीक मानली जातात. काही प्रतिमांमध्ये त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दाखवल्या जातात, जे चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात. ब्रह्मदेवाचे शिल्पांकन काही संयुक्त प्रतिमांमध्येही दिसते. यामध्ये हरी-हर-सुर्य-पितामह किंवा ब्रम्हेशानजनार्दनार्क, (ब्रम्हदेव, ईशान (शिव), जनार्दन ( विष्णु ) अर्क ( सुर्य ) या प्रकारच्या मूर्तीमध्ये चार मुखांची आणि आठ हातांची देव प्रतिमा असते ज्यामध्ये दोन कमले, खट्वांग, त्रिशूल, शंख व कमंडलू -माला अशी आयुधे दिसतात. विष्णु, शंकर, सूर्य आणि ब्रह्मदेवाचे एकत्रित शिल्पांकन असते. याशिवाय लिंगोद्भव शिव या मूर्तीतही ब्रह्मदेवाचे शिल्पांकन असते. शेषशायी विष्णू या शिल्पांमध्ये विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर बसलेली ब्रह्मदेवाची छोटी प्रतिमा दिसते. तसेच वामन त्रिविक्रम या शिल्पातही विष्णूने स्वर्ग व्यापायला उचललेल्या पायाशी ब्रह्मदेवाची मुर्ती दिसते.
ब्रह्म देवाची चार मुखे ही चार वेद, चार उपवेद (आयुर्वेद, धर्नुवेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद) चार युगे, चार ऋत्विज (होता, उद्गाता, अद्वर्यु आणि ब्रह्मा स्वतः), चार धर्म (विद्या, दान, तप आणि सत्य), चार आश्रम, चार यज्ञद्वय (षोडशी आणि उक्थ, चयन आणि अग्निस्तोम, आप्तोर्याम आणि ऐतरात्र, वाजपेय आणि गोसव), चार दिशा अशा अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. (भागवत पुराण ३,१२,३४-४१)

दक्षिण भारतामध्ये आढळणाऱ्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीना दाढी दिसत नाही आणि काही ठिकाण पायापाशी हंस देखील नसतो.
८. प्रमुख देव विष्णू
अवतार मूर्ती आणि त्यांची व्युत्पत्ती
कूर्मावतार :-
वराहावतार :-
नृसिंह :-
वामनावतार :-
मानवी अवतार :-
दशावतार :-
चातुर्विंशती विष्णुमूर्ती :-
विष्णूच्या अन्य मूर्ती :-
खजुराहो येथील विष्णूचे प्रमुख मंदिर

लक्ष्मण मंदिरातील विशेष शिल्पे
ज्ञान परंपरेचे महत्त्व :-आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे असा सहज उल्लेख केला जातो. परंतु खजुराहोमधील शिल्यांकन पाहिल्यावर गुरुशिष्य ही आपली परंपरा नसून ती शिक्षण पद्धती आहे. परंपरा ही ज्ञानाची किंवा ज्ञानार्जनाची आहे. हे ज्ञान अति पवित्र असते. त्यामुळे ते सगळ्यांना वाटायचेही नसते. इति गुह्यतमं शास्त्रं असे पंधराव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे. खजुराहोच्या संग्रहालयामध्ये या वाक्याचे प्रतिनिधित्व करणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. पद्मासनात बसलेल्या विष्णूने आपल्या डाव्या हाताची तर्जनी तोंडावर ठेवलेली आहे. हे विष्णूनारायणाचे गोप्ता किंवा मौन-व्रती (रहस्यधारी, गुप्तता पाळणारा) हे रूप आहे. अठरा अक्षौहिणीचे विराट सैन्य सभोवती होते त्यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि ज्ञानीही होते. संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारे साक्षात भगवंत तेथे होते, तरीही श्रोता मात्र एकच होता. हे ज्ञान एकाने एकालाच द्यावयाचे असते हा संकेत होता.
कूर्म नारायण :-
समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने कूर्माचे रूप घेतले आणि त्या वेळेस त्याने नारदाला काही ऋषींच्या उपस्थितीत ते दिव्य ज्ञान दिले. या शिल्पामध्ये हा प्रसंग दाखवला आहे. कुर्मावरील विष्णू चार हातांचा असून तो पद्मासनात बसलेला आहे आणि त्याचे नैसर्गिक दोन हात ध्यान मुद्रेत आहेत आणि वरील डाव्या उजव्या हातात अनुक्रमे चक्र आणि गदा आहेत. त्याच्या समोर हात जोडून नारद आणि काही तपस्वी बसलेले आहेत. आणि विष्णूच्या मागे सहा ऋषी उभे आहेत.

चित्र क्र. ४७ :कूर्मनारायण, खजुराहो
मत्स्य नारायण :-
महाप्रलयामध्ये संपूर्ण सृष्टीचा विलय झाला, त्या वेळेस विष्णूने मत्स्याचे रूप घेऊन वैवस्वत मनू आणि सप्त ऋषींना वाचवले. या शिल्पपटात वरील प्रमाणेच ध्यानस्थ विष्णूची पद्मासनातील मूर्ती असून त्याच्या मांडीखाली आसनावर लांब मासा कोरलेला दिसतो. शेजारी अत्यंत वयोवृद्ध मनू हात जोडून बसलेला आहे. ज्याच्या सोबतीला दोन सेवक आहेत. या शिवाय विष्णूच्या मागे सहा उभे आणि पायाशी एक बसलेले असे सात ऋषी - अत्री, वशिष्ठ, कश्यप, गौतम, भारद्वाज, विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत, ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जाते.

चित्र क्र. ४८ : मत्स्यनारायण, खजुराहो
विष्णु-नारायण :-
याचा उल्लेख महाभारतातील एका कथेत येतो. एकदा एकत, द्वित आणि त्रित ह्या नावाचे तीन त्रि शिखंडीन संन्यासी साधू नारायणाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे श्वेत द्वीपावर गेले, तेजोमय वातावरणाने त्यांचे डोळे दिपले आणि दृष्टी गेली. त्यांनी तेथे शंभर वर्ष घोर तपस्या केली, ज्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे त्यांना तिथल्या नारायणाच्या साधनेत असलेल्या तेजःपुंज तपस्वींचे दर्शन झाले. अचानक एक प्रखर प्रकाशाचा झोत प्रकटला आणि रमः असे म्हणत ते श्वेत द्विपवासी हात जोडून तिकडे धावले. या तिघांना साक्षात नारायण प्रकटले असल्याचे समजले. परंतु अति जर्जर झाल्यामुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत किंवा त्याला पाहू शकले नाहीत. त्या वेळेस आकाशवाणी होऊन नारायणाने त्यांना दिव्य ज्ञान दिले, जे घेऊन ते परत आले. या शिल्पपटात पद्मासनात ध्यान मुद्रेत बसलेली विष्णूची मूर्ती असून त्याच्या वरच्या डाव्या उजव्या हातात अनुक्रमे शंख आणि चक्र आहेत. त्याच्या मागे सहा श्वेतद्विपावरील ऋषी उभे असून त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे प्रभावळ दाखवली आहे. दोन्ही गुढघे आणि कमरेभोवती योगपट्ट गुंडाळून देवाकडे पाठ करून बसलेला एक ऋषी आहे ज्याचे शरीर खंगून अस्थिपंजर झाल्याचे दाखवलेले आहे. हा त्या तिघांपैकी एक तर दुसरीकडे दोन श्वेत द्विपवासी यांनी मध्ये होम पेटवून ते त्यात आहुती देत आहेत.

चित्र क्र. ४९: योगनारायण, खजुराहो
कृष्ण लीला :-
या मंदिरामध्ये एकत्रितपणे अनेक कृष्णलीलांचे मनोहारी शिल्पांकन केलेले आहे. गर्भगृहाच्या भोवती आपल्याला ही शिल्पे दिसतात. ही शिल्पे अन्य शिल्पांच्या मध्ये मध्ये कोरलेली आहेत. डावीकडून प्रदक्षिणेला सुरुवात केल्यास १. तृणावर्तवधाचे शिल्प आहे. हा वादळाचे रूप असणारा राक्षस गवताच्या काड्यांचा वेश घेऊन आला. परंतु कृष्णाने त्यास ओळखले व मारले. २. निमिषारण्यामध्ये बलरामाने रोमहर्षणसुताला मारल्याचे शिल्प आहे. ३. कृष्णाने चाणुराला (कंसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प आहे. ४. कुवलयपीड नावाच्या कंसाच्या हत्तीला कृष्णाने ठार मारल्याचे शिल्प आहे. पश्चिमेकडील (मागील बाजूस)

चित्र क्र. ५० : कृष्णालीला, शकट भंग, खजुराहो
भितीवर ५. कालिया मर्दनाचे यामध्ये मनुष्यरूपी कालिया जो कमरेखाली सर्प रूपात दिसत आहे ठार करतानाचे शिल्प आहे. ६. कृष्णाने शालाला (कसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प त्यानंतर कृष्णाद्वारे कुब्जेचा उद्धार हे शिल्प आहे. ८. शकट भंग - कृष्णाने बैलगाडी तोडताना शिल्प. त्यानंतर उत्तरेकडील भिंतीवरील शिल्पे ९. कृष्णाद्वारे बैल रूपात आलेल्या अरिष्टासुराचा वध केलेले शिल्प आहे. १०. त्यानंतर यमलार्जुन वधाचे शिल्प आहे शापित होऊन वृक्ष रूपात अडकले दोन यक्षांना कृष्णाने ते वृक्ष तोडून मुक्त केले. ११. पुढे पूतनावधाचे शिल्प आहे. तर शेवटी वासराच्या रूपात आलेल्या वत्सासुराचा वध करताना कृष्णाचे शिल्प आहे.
खजुराहोतील अन्य विष्णू मंदिरे
वराह मंडप :-लक्ष्मण मंदिरांच्या समोरच एका मंडपाखाली महावराहाचे शिल्प आहे. याला स्वतंत्र वराह जरी म्हटले गेले असले तरीही ज्याप्रमाणे शिव मंदिरासमोर नंदी असतो, विष्णू मंदिरासमोर या मूर्ती स्थापना करण्याची पण पद्धत होती. हा मंडप तंतोतंत जरी या पद्धतीत बसणारा नसला हो साधारण प्रयोजन तसेच दिसते. यामध्ये एक विशाल वराहाचे (त्याची लांबी पावणे नऊ आणि पावणे सहा फूट आहे) शिल्प असून त्याच्या अंगावर असंख्य देव कोरलेले आहेत. यज्ञवराह शिल्पाचे नाव आहे. हे विष्णूचे 'सर्वदेवमय' असे रूप असते. या वराहाच्या पायाखाली एक प्रचंड कासव कोरलेले आहे. आणि वराहाच्या पायांमध्ये शेष सर्प कोरलेला आहे. आदी कुर्मावर शेष त्यावर विष्णू अशी या रचनेची संकल्पना आहे. वराहाच्या डाव्या सुळ्याला धरून उभ्या असलेल्या लक्ष्मीची पूर्णाकृती मूर्ती कोरली होती. आज केवळ तिची पावलेच दिसतात. वरच्या तोंडावा सा

चित्र क्र. ५१ : वराह मंडप, खजुराहो

चित्र क्र. ५२ : यज्ञवराह वराह मंडप, खजुराहो
९. शिवमुर्तीशास्त्र
केवलमूर्ती :-
यामध्ये एकटा शिव समभंग अवस्थेत (दोन्ही पायावर सरळ) उभा असतो. या मूर्तिप्रकारात फारसे लालित्य नसते. प्रसंगी त्याच्या मागे नंदीही काडलेला असतो. त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व अन्य हातांमध्ये डमरू, सर्प इ. लांछने असतात. वेरुळच्या कैलास मंदिरामध्ये अनेक ठिकाणी याचे शिल्पांकन दिसते.भिक्षाटनमूर्ती :-
पुराणातील एका कथेनुसार शिव-पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत असताना पार्वतीने शिवाचे त्रिभुवनासहीत सर्व वस्त्रेही जिंकून त्याला दिगंबर केले. त्यामुळे शिवाला भिक्षा मागत फिरावे लागले. भिक्षापात्र घेऊन उभा असलेल्या शिवाचे शिल्प अनेक मंदिरांमध्ये आढळते. या मूर्तीला भिक्षाटन शिव असे म्हणतात. वेरुळ येथील कैलासमंदिराच्या मागील (पूर्वेकडील) विथिकेत (व्हरांड्यात) हे शिल्प आढळते. येथे शिवाला भिक्षा वाढणारी स्त्री ही अन्नपूर्णा पार्वतीमाताच असते.

चित्र क्र. ६२: केवल शिव, कैलास मंदिर, वेरूळ
हरिहरमूर्ती :-
सामाजिक ऐक्यासाठी कोरलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश करावा लागेल. शैव आणि वैष्णव यांच्यात उफाळलेल्या संघर्षाला उत्तर म्हणून या मूर्तीची निर्मिती झाली. ही दोन्ही वेगळी तत्त्वज्ञाने नसून एकाच वैदिक तत्त्वज्ञानाची ही दोन अंगे आहेत. ह्या उभ्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या उजवीकडील अंग हे शिवाचे. उजव्या हातात त्रिशूल, डोक्याच्या अर्ध्या भागावर जटामुकुट आणि त्याखाली कोपऱ्यात नंदी ही शिवाची लक्षणे तर त्यातील शिवाच्या डाव्या बाजूला डोक्यावर विष्णूचा मुकुट, डाव्या वरच्या हातात चक्र, डाव्या खालच्या हातात शंख आणि खाली कोपऱ्यात हात जोडून बसलेला मानवी रूपातील गरुड ही सर्व विष्णूची लक्षणे. कैलास मंदिरातील पूर्वेकडील म्हणजे मागच्या विधिकेतील शिल्पपटात बरोबर मधोमध हे शिल्प कोरलेले आहेत.वीणाधर शिव :-
या मूर्तीमध्ये शंकराच्या हातात वीणा दाखवलेली असते. वेरुळच्या कैलास मंदिराभोवताली असणाऱ्या उत्तरेकडील विथिकेमध्ये हे शिल्प आहे. या मध्ये शंकर पार्वती बसलेले दाखवलेले असून, शंकराने हातात वीणा धरलेली दाखवली आहे. काही मंदिरांमध्ये नृत्य मुद्रेमध्ये सुद्धा शिवाने वीणा धरल्याचे दिसते.
चित्र क्र. ६४: हरिहर मूर्ती, कैलास मंदिर, वेरूळ
लिंगोद्भवमूर्ती :-
शिव मूर्तीच्या शिल्पांकनांचे तीन गट पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्त. ज्या मूर्ती शारीर रूपात शिव दिसतो त्याला व्यक्त म्हणतात. अव्यक्त रूप म्हणजे शिवलिंग आणि त्याचे प्रकार.लिंगोद्भव शिव हे शिवाच्या व्यक्ताव्यक्त या प्रकारात येते. या शिल्पात मधोमध एक शिवलिंग असते ज्यामध्ये एक ज्योतीचा आकार कोरलेला असतो. त्यामध्ये एक उभी मानवाकृती कोरलेली असते जो आयुध विरहित शिव असतो. शेजारी चार मुखी ब्रह्मदेव उभा असतो आणि त्यान डोक्यावर हंसाचे रूप घेऊन तो आकाशात उड्डाण करताना दिसतो. तर शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजुला विष्णु उभा असून त्याच्या पायाजवळ तो वराह रूपाने पाताळात जाताना दिसतो. यांची कथा (शिवपुराण, अ.२ श्लोक ३० ते ५०), एकदा ब्रह्मा आणि विष्णुमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाल त्यांचे भांडण विकोपाला गेले. त्यावेळेस एक प्रचंड मोठी ज्वाला (अग्री स्तंभ) दोघांमध्ये प्रकर दोघांपैकी जो याच्या टोकाचा थांग लावेल तो श्रेष्ठ असे ठरले. हंसाचे रूप घेऊन ब्रह्माने आकाशाचे टोक शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे खालचे टोक शोधायला वराहाचे रूप घेऊन विष्णु पाताळात गेला. त्या दोघांनाही ते टोक काही सापडले नाही परत येऊन भेटल्यावर ब्रह्याने आपल्याला टोक सापडले असे खोटेच सांगितले. तेव्हा त्या स्तंभातून साक्षात शिव स्वतः प्रकट झाले आणि माझा थांग तुम्हाला लागणार नाही असे सांगितले. खोटे बोलल्याबद्दल ब्रह्माला त्यांनी शाप दिला. शैव पंथाचे माहात्य्य सांगणारे हे कथानक आणि त्याला अनुसरून केलेले हे शिल्प आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
परंतु या शिल्पामध्ये काळ अवकाश यांची अथांगता आणि अवकाश-ऊर्जेचे नाते स्पष्टपणे दाखविण्याचा प्रयत्न असावा असेही मत आहे (झिमर: १९९०, पृ.४८-५०). कैलासमंदिराच्या पायऱ्या उजवीकडून चढून जाताना प्रवेशद्वारावरील उजवीकडील भिंतीवर हे शिल्प दिसते.
नटेश अथवा नटराज :-
शिवाच्या तांडवमूर्ती :- सर्व साधारणपणे कलाकारांचा देव म्हणून परिचित असलेले नटराजाचे धातूचे शिल्प सर्वांना परिचित रूप आहे. शिवाच्या तंडू नावाच्या भक्तापासून या नृत्याची निर्मिती झाली, म्हणून याला 'तांडव' असे म्हणतात. तांडवाचे एकूण १०८ प्रकार असतात. चिदम्बरम (तामिळनाडू) येथील तिल्लई नटराज मंदिराच्या गोपुराच्या (प्रवेशद्वाराच्या) भिंतीवर हे सर्व १०८ प्रकार कोरलेले आहेत. तसेच तामिळनाडूमधल्या कुंभकोणम् येथील शारङ्गपाणी मंदिर, वृद्धाचलम येथील वृद्धगिरीश्वरार मंदिर आणि तिरुवनमलई येथील अन्नमलैयर मंदिराच्या गोपुरावरही हे १०८ प्रकार कोरलेले आढळतात.कटीसम तांडव :-
वेरुळमधील रामेश्वर लेण्यात (क्र.२१) याचे अत्यंत श्रेष्ठ असे शिल्पांकन दिसते. यात शंकराचे डावे पाऊल पूर्ण उचललेले असून केवळ त्याची बोटे खाली टेकलेली आहेत आणि उजवे पाऊल अर्धवट उचललेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्नी असून खालचा उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात नृत्य मुद्रेत आहे. कानात कुंडले, गळ्यात कंठी आणि हार, पोटाभोवती उरबंध, हातात कंकणे, दंडावर सर्पकेयूरे व कंबरेत मेखला आहे. त्याने वाघाच्या कातड्याचे वस्त्र नेसले असून त्या वस्त्राच्या टोकाला बारीक वाघनखेही दिसतात. त्या शिल्पाच्या मागील भिंतींवर शिवाच्या डाव्या हाताच्या बाजूला वायू, कुबेर, इंद्र आणि यम हे अष्ट दिक्पालांपैकी चार दिक्पाल आपापल्या वाहनांसहित आहेत आणि शिवाच्या उजव्या हातावर काही आकाशमार्गाने उडणारे तपस्वी आणि गंधर्व आहेत.
चित्र क्र. ६५: कटीसम तांडव, रामेश्वर लेणे, वेरूळ

चित्र क्र. ६६ : तबलावादक महिला, भाजे लेणे
शिवाच्या उजव्या पायाशेजारी तीन वादक असून त्यांच्यावरच्या अंगाला एका हत्तीचे डोके दिसते. तो गणपती आहे. शिवाच्या डावीकडे एक मिशा असलेला पुरुष उभा असून त्याच्या समोर कडेवर बाळ कार्तिकेयाला घेउन एक स्त्री उभी आहे. त्या दासीच्यासमोर शिवाकडे तोंड करून पार्वती बसली आहे आणि पार्वतीकडे तोंड करून वादन करणारी एक स्त्री आहे. तिच्यामागे उभ्या असलेल्या दासीचा चेहरा आणि गळा तेवढाच दिसतो. शिवाच्या पायामध्ये एक छोटा अस्थिपंजर गण (भृंगी) नाचताना दिसतो.या नृत्य प्रकाराला 'कटीसम तांडव' म्हणतात. नटराजाच्या या शिल्पाची गणना भारतातील श्रेष्ठ शिल्पात केली जाते.
'वामांगीचा लास्यविलासु ! जो हा जगतूप आभासु !
तो तांडव मिसें कळासू ! दाविसी तू !' (ज्ञा. अध्याय १७ ओवी ८)
पार्वती जणू काही म्हणते की, , सृष्टीच्या निर्मितीची प्रसूती वेदना तर माझी, केवळ तांडवाच्या रूपाने हे (शिव) नृत्यातून दाखवतात आणि निर्मितीचे सारे उत्पत्ती आणि लयाचे हे अविरत चालणारे चक्र दाखविण्यासाठी त्याने तालवादकाचर्चा श्रेय बळकावतार।
हे केलेली आहे. सम म्हणजे निर्मिती (जन्म) आणि काल म्हणजे लय (मृत्यू) प्रत्येक आवर्तनार जन्म आणि एकदा मृत्यू अशी कल्पना करून संगीतामध्येही आपल्या पुनर्जन्माच्या प्रतिनिधित्व केलेले आहे. काळाचे चक्र अविरत फिरत असून त्यात पुनःपुन्हा घटना घडतात असे असले तरी आपल्या जीवनात एकदाच जन्म आणि मृत्यू येत असतो आपल्या दृष्टीने काळ हा चक्रका नसून एकमार्गी (unidirectional) असतो. कारण आपल्या दृष्टीने आपण काळात सतत पुढेच कसे असतो. हे दाखविण्यासाठी शंकराच्या डाव्या पायाखालील स्त्री वादकाच्या हातात तालाच्या प्रत्ये मात्रेवर वाजणारे एक वाद्य आहे. तिच्यासाठी सम आणि काल नाही तर तिचा ताल एकमार्गी शिवाचे वैश्विक नर्तन हे चक्राकार (cyclic) असून त्याची पार्थिव अनुभूती मात्र एकमार्गी (unidirectional) असते हे सांगण्यात कलाकार यशस्वी झाला आहे.
तांडवाच्या शिल्पांच्या कल्पकतेसमोर जगातील कलाकार आणि विद्वान विनम्र होतात. रोडी (Rodin) या जगप्रसिद्ध फ्रेंच शिल्पीने तर हे शिल्प पाहिल्यावर असे म्हटले आहे की, यातील परिपूर्णता पाहून मला छिन्नी आणि हातोडी फेकून शिल्पकलेतून निवृत्त व्हावेसे वाटते. उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे हे महान नृत्य ज्या रंगमंचावर चालते त्याला चिदंबरम् असे नाव दिलेले आहे.आनंद कुमारस्वामी हे जन्माने सिलोनी असले तरी भारतीय शिल्पशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्याने नटराजाचे हे नृत्य चालणाऱ्या रंगमंचाचे नाव चिदंबरम् का? यावर भाष्य केले आहे. ते असे म्हणतात की चिदंबरम् या शब्दावर श्लेष केलेला आहे. त्याचा दुसरा अर्थ मानवी अंतःकरणाचा केंद्रबिंदू असाही होतो. कुमारस्वामी पुढे म्हणतात, की या भारतीय कलाकारांची महती काय तर त्यांच्या शब्दात "While the artists of the world were trying to understand and imitate nature ancient Hindu artists were trying to understand nature's nature."
नादंत तांडव :-
कलेच्या कार्यक्रमात रंगमंचावर हे शिल्प नेहमी दिसते किंवा नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे त्याचे पूजन केले जाते. धातुमुर्तीमध्ये गोलाकार वलयामध्ये एका पायावर उभ्या असलेल्या शंकराची नृत्य मुद्रा यात दिसते. वलयावर प्रत्येकी पाच ज्वाला असलेल्या अग्नीचे शिल्यांकन असते.चार हातांच्या ह्या मूर्तीतील वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्री असून, उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात गजहस्त (हत्तीच्या साडेसारखा झुलणारा) उजव्या मनगटाखाली डाव्या हाताचे मनगट असते, डाव्या हाताच्या बोटाने त्याने उचललेल्या पायाकडे अंगुलीनिर्देश केलेला असतो. तोल सावरण्यासाठी किंचित गुडघ्यात वाकविलेल्या उजव्या पायाखाली एक व्यक्ती दिसते. हात पाय दुमडून बसलेल्या या व्यक्तीच्या पाठीवर शिवाचा उजवा पाय असतो. तांडवाचे एकूण एकशे आठ प्रकार आहेत. त्यातील या मुद्रेला नादंत तांडव असे म्हणतात. शंकराभोवताली असणारे हे ज्वालांचे वलय यातील प्रत्येक ज्वालेला पाच शिखा असतात. पंचमहाभूतांचे ते निर्देशक आहे. यांची संख्या सत्तावीस असून हे सत्तावीस नक्षत्रांमध्ये बद्ध असलेल्या आपल्या आकाशगंगेचे रूप असते. डमरू हे उत्पत्तीचे रूप. ब्रह्मांडामध्ये सर्वप्रथम महानाद झाला आणि मानवी बोधाचे शब्द प्रकरणे-अइउण्। ऋलृक् । एओङ्। ऐऔच्। हयवरट्। लण्। अमड. णनम्। झभ ञ। घढधष् । जबगड्रदश् । ख फ छठ थचटतव्। कपय्। श ष सर्। हल् ।
या महानादाच्या पाठोपाठ झालेल्या स्फोटातून प्रचंड मोठा अग्नी निर्माण झाला. या ज्वाळा ब्रह्मांडाची मूलभूत ऊर्जा आहे. म्हणून शिवाच्या डाव्या हातात अग्ग्री दाखविलैला असतो. यातून नंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली. महाभूतांच्या मिश्रणातून सृष्टी उत्पन्न झाली.
काहीही निर्माण करण्यासाठी काही तरी वापरावे लागते, काही तरी तोडावे लागते, मोडावे लागते किंवा त्याचे आहे ते स्वरूप बदलावे लागते. आधी केलेले सर्व तोडून मग नवीन आणि पुन्हा हे सर्व मोडून त्यातून नवीनतम करायचे म्हटल्यास सगळेच क्षणाक्षणाला नष्ट करावे लागेल. मग सृष्टी राहणार कशी म्हणून शिवाचा उजवा हात अभय मुद्रेत असतो. जे इष्ट आहे, जे सुष्ट आहे त्याला त्वरित न तोडता तसेच राखण्याचे आश्वासन तो देतो. परंतु जे अनिष्ट आहे त्याचे रूपांतर म्हणजे लय आणि जे दुष्ट आहे त्याचा नाश म्हणजे संहार तो करतो. हे कार्य त्याचे अविरत सुरू असते म्हणून त्यांच्याभोवती फिरण अग्रिगोलकांचे वलय हेच सुचित करत असते. याला 'तिरोभाव' असे म्हणतात

चित्र क्र. ६९: नावंत तांडव, दशावतार लेखणे, वेरूळ
शिवाचा पाय हे त्याच्या अनुग्रहाचे निर्देशक असते. जर त्याचे दोन्ही पाय टेकलेले दाखवले गेले असते कोणालाच मुक्ती देत नाही असा त्याचा अर्थ झाला असता. शिवाने एक पाय उचलल्यामुळे ध्यास घेतलेल्या मुमुक्षांना तो मुक्ती मार्गावरून जाऊ देतो. त्यासाठी त्याने (शिवाने) त्यांना (मुमु अनुमती दिली आहे हे त्याच्या डाव्या पावलाकडे निर्देश करणाऱ्या डाव्या हातांच्या बोटांवरुन केले जाते. ब्रह्मांडातील दुष्ट शक्तींचा, दुष्ट प्रवृत्तींचा आणि उपद्रवी घटकांचा कधीही समूळ नाश करता येत नाही. त्यांचे फक्त दमन करता येऊ शकते किंवा त्यांच्यावर तात्कालिक नियंत्रण ठेवता येते. त्याच्या पायाखालील व्यक्तीच्या रूपात या दुष्ट शक्तीचे प्रतिनिधित्व केलेले असते. याला 'अप पुरुष' असे म्हणतात. त्यामुळे तांडवाच्या शिल्पाचे उत्पत्ती (डमरू), स्थिती (अभय मुद्रा), (अग्नी), तिरोभाव (प्रभावळ) आणि अनुग्रह (उचललेला पाय) हे पाच गुणधर्म मानले आहे धातूशिल्पांमध्ये दिसणारे हे रूप पाषाणशिल्पांमध्ये मात्र क्वचितच दिसते. पाषाणशिल्पांमध्ये तांडवाची अन्य रूपे कोरलेली दिसतात याचे कारण धातूमूर्ती ओततानाची काही तांत्रिक बंधने येथे नसतात. तसेच पाषाण शिल्पांमध्ये उचललेला पाय पण दाखविताना त्याचा त्रिमितीचा आभास निर्माण करणे तसे अवघडच जाते.
नादंत तांडवाचे एक विलोभनीय शिल्प वेरुळमधील दशावतार लेण्यामध्ये (वेरुळ क्रं. १५) कोरलेले आहे. या शिल्पात नृत्य मुद्रेत असलेला शिव हा आठ हातांचा असून त्याचा डावीकडचा एक आणि उजवीकडचा एक असे कोणत्याही दोन हातांचा विचार केल्यास त्यातून एक नृत्य मुद्रा प्रकटते.
वेरुळ मधल्या विविध तांडव मूर्ती
ललित तांडव - हे लंकेश्वर लेण्यातील (लेणी क्र. १६) शिल्प असून अत्यंत गतिमान नृत्याचे शिल्पांकन आहे. जवळजवळ आठ फूट उंचीच्या या मूर्तीमध्ये कलाकाराने त्याची प्रतिभा पणाला लावलेली दिसते. गती दाखविण्यासाठी त्याचे हललेले केस, उडणारे वस्त्र याशिवाय त्याच्या डाव्या हातात डमरू दाखवलेला आहे. इतकी गती आहे की पाहणाऱ्याला डाव्या हाताच्या ठिकाणी उजवा हात असल्याचा भ्रम होतो.
चित्र क्र. ७० ललित तांडव, लंकेश्वर लेणे, र
भुजंगत्रासित तांडव साप पाहिल्या नंतर दचकून पाय जसा उचलला जातो त्याप्रमाणे डावा पाय उचलून भुजंग त्रासित ही मुद्रा नृत्यात केली जाते. साधारणपणे रंगमंचीय प्रस्तुतीकरणात मांडी जमिनीला समांतर होईल या उंचीपर्यंत नर्तकाचा पाय उचललेला असतो, या शिल्पात मात्र शंकराची ही मुद्रा असल्यामुळे त्याचा गुडघा, हनुवटीपर्यंत उचललेला दिसतो. हे शिल्प कैलास मंदिरातील प्रदक्षिणा पथावर मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर कोरले आहे.
ऊर्ध्वजानू तांडव :-याची कथा अशी कालीचे नृत्य आणि शंकराचे तांडव याची स्पर्धा सुरू झाली. शिवाप्रमाणे कालीने सर्व तांडवांचे प्रकार लीलया करून दाखवले. शेवटी शंकराने नृत्य करताकरता एका पायावर नृत्य सुरू केले आणि उजव्या पायाचा अंगठा हातानी धरून आपल्या कपाळावर टेकवला. ही मुद्रा कालीलाही करणे शक्य होते परंतु स्त्रीसुलभ संकोचाने तिने ते तसे केले नाही. (शिवरामामूर्तीः १९७४१. ३७९). कैलास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील डावीकडच्या भिंतीवर हे शिल्प आपल्याला दिसते यात शंकराचा उजवा पाय ताठ होऊन त्याच्या खांद्यावर गेल्याचे कोरलेले आहे.

चित्र क्र. ७२ : ऊर्ध्वजानु तांडव, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
दक्षिणामूर्ती - शिवाच्या बसलेल्या मूर्तीमध्ये ध्यानस्थ शिव अशी मूर्ती आपल्याला दिसते. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिण भारतात प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. काहींच्या मते कला, संगीत व इतर भौतिक शास्त्रे यांचा उपदेश देत असताना शंकराचे तोंड दक्षिण दिशेकडे होते. श्रीमद शंकराचार्यांनी इतरांबरोबर दक्षिणामूर्तींचेही बरेंच स्तवन केले आहे. वेरुळमध्ये कैलास मंदिराखाली पश्चिम भिंतीवर याचे विराट शिल्प आहे. या शिल्पात झाडाखाली पद्मासना बसलेली, उजवा हात मांडी घातलेल्या उजव्या गुडघ्यावर असून डावा हात डाव्या मांडीच्या गुडघ्यावर जमिनी बोटे असलेल्या स्थितीत (भूमी मुद्रेमध्ये) आहे. एका आसन बसलेली ही शिवाची मूर्ती आहे. निर्माण करणाऱ्या त्या महायोगा समाधी लागली. आता नवनिर्मिती कशी होणार ह्या चिंतेतून अष्टदिश देव धावत आले. शिल्पाच्या वारच्या भागात आपापल्या वाहनांवर देव शिवाला हात जोडून विनंती करताना दिसतात. शिवाच्या खालच्या बाजूला दोन गण दाखवले आहेत. समाधी सोडण्याची त्यातील एक जण ढोल बडवतो आहे तर दुसरा त्याच्या वाद्याचा कर्कश आवाज काढून शिवाला जागे करावयाचा प्रयत्न करतो आहे. या गणांच्या वादनाने अन्य योग्यांची समाधी भंग पावली. शिवाच्या बाजूला गुडघ्याभोवती योगपट्ट गुंडाळलेले योगी दिसतात. भगवान शिव मात्र अविचलित आणि शांतच बसलेले दिसतात.

चित्र क्र. ७३ : महायोगी शिव, कैलास मंदिर, वेरूळ
लकुलीश - इ.स. पहिल्या शतकात लकुलीश नावाच्या एका आचायनि कायावरोहण (गुजरात) या तीर्थक्षेत्री पाशुपत पंथाची स्थापना केली. पुढे यालाच शिवाचे रूप म्हणून मान्यता प्राप्त झाली. कमळावर किंवा आसनावर बसलेली ही शिवाची मूर्ती असून त्याच्या हातात एका सोटा दाखवला जातो. याला लगुड असेही म्हणतात. ही मूर्ती नेहमी उर्ध्वलिंगी या स्वरूपातच कोरलेली असे. वेरुळमध्ये घुमार लेणे (क्र.२९) येथे याचे मोठे शिल्प आहे. तसेच कैलास मंदिरामागील पश्चिम भिंतींवरील व्हरांड्यात याची उभी मूर्तीही दिसते.

चित्र क्र. ७४ : लकुलीश, धुमार लेणे, वेरू
उमामहेश्वर आलिंगन मूर्ती-
उमामहेश्वर या शिल्पामध्ये नंदीवर आरूढ शंकर आणि पार्वती ज्यामध्ये दोघांचेही दोन्ही पाय नंदीच्या एकाच बाजूला (दर्शनी बाजूला) सोडलेले दिसतात. शंकराचा डावा हात पार्वतीच्या कमरेभोवती असून त्याने तिला एक हलके आलिंगन दिलेले असते. या शिल्पाला उमामहेश्वरालिंगन मूर्ती असे म्हणतात. कैलास मधील दक्षिणे-कडील व्हरांड्यात हे शिल्प आहे.
चित्र क्र. ७५: उमामहेश्वर, कैलास मंदिर, वेरूळ
अर्धनारीश्वर शिवाच्या शिल्पांमधील सर्वपरिचित आणि लोकप्रिय असलेले हे शिल्प. बहुतेक वेळा ही मूर्ती उभी असते. पण क्वचित प्रसंगी बसलेलीही आढळते. हरिहर मूर्ती प्रमाणेच हे एक जोड शिल्प आहे. यातील मूर्तीचा उजवीकडचा अर्धा भाग हे शंकराचे अंग आणि डावीकडील भाग हे पार्वतीचे अंग. यामध्ये डोक्यातील केश रचना सुद्धा वेगळी दिसते. तसेच चेहरा आणि अन्य शरीराचे भाग ह्यातील वेगळेपण दाखवायला अत्यंत कौशल्याने कोरलेले दिसतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये आरसा दिसतो. स्वतःला पूर्णत्व आणण्यासाठी ती शिवाशी एकरूप होते. परंतु तोंड वळवून ते न पाहता असल्यामुळे आरशात बघून त्याची खात्री करून घेते. सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष आणि प्रकृती ऐक्य सांगणारे, वैश्विक तत्वज्ञानातील जड आणि चेतन किंवा वेदातील अद्वैत कल्पना साका शिल्प असून असून अणूची संरचना आणि कार्य याचे हे प्रतिक आहे. या एकरूपतेचे अत्यंत समर्पक निरूपण ज्ञानेश्वरांनी (ज्ञानेश्वरी, अध्याय ५ ओवी क्र. १३२ ते १३५) केले आहे.

चित्र क्र. ७६ : अर्धनारीश्वर, गंगैकॉडचोलपुरम, तमिळनाडू
कल्याणसुंदर - -
कल्याण म्हणजे लग्न. शंकर पार्वतीच्या लग्नाचे अत्यंत मनोहारी शिल्पांकन अनेक मंदिरात दिसते. या शिल्पामध्ये साधारणतः शंकराने पार्वतीय पाणिग्रहण केलेले दाखवते त्यामध्ये खाली होम पेटलेला असतो आणि ब्रह्मदेव पौरोहित्य करताना दिसतो. याशिवाय पार्वतीच्यामागे तिचे वडील हिमवान, तिची आई मेना आणि शिवाचे गण, दासदासी वगैरे ही दाखवलेले असतात. दशावतार लेणीतील (वेरुळ लेणी क्र. १५) एका शिल्पात पार्वतीने आपले दोनही शंकराच्या हातात दिलेले दिसतात. कैलास मंदिरातील पूर्व भिंतीवर मात्र या मालिकेतील सर्वात सुंदर शिल्प कोरलेले आहे. या शिल्पामध्ये पार्वतीने आपल्या उजव्या हाताने शंकराचा हात पकडलेला असे अजब शिल्पांकन आहे. ही कलाकाराची चूक नसून त्याची असामान्य प्रतिभा इथे प्रगटलेली दिसते. या शिल्पात वधू पार्वती लज्जेने मान झुकविलेली (अधोवदना) व नजर खाली वळविलेली (सलज्जा) आणि डावा पाय किंचित वाकवून (सविनया) अशी उभी आहे. पण गंमत पहा तिने शंकराचा हात हाती घेतला आहे. कलाकाराची चूक तर नव्हे ? नाही, अहो हेच व्हावे म्हणून पार्वतीनेच तर तप केले होते. हे जमविण्यातला तिने घेतलेला पुढाकार यात दर्शविलेला आहे. पण हे धारिष्ट्य सर्वांसमोर करावे लागले त्यामुळे ती संकोचली आहे. ज्यामुळे तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने उजव्या पायाचा अंगठा घासते आहे. निर्जीव पाषाणात साकार केलेला हा जिवंत देखावा खरोखरच पाहण्यासारखा आहे. शंकराचाही उजवा गुडघा किंचित वाकलेला आहे. साहजिकच आहे. मी मी म्हणणाऱ्या नवरदेवांप्रमाणे साक्षात महादेवाचीही बोहल्यावर चढल्यावर अशीच गत झाली असेल नाही का?
सारिपाट क्रीडा :-
शिव पार्वती यांचा विवाहानंतर संसार सुरू झाला, स्वाभाविकच पती- पत्नींच्या मनोरंजनाचेही कार्यक्रम सुरू झाले. शंकर पार्वती सारिपाट खेळावयास बसले. नवविवाहितांच्या मानसिकतेप्रमाणे सुरुवातीचे डाव शंकर मुद्दाम हरत राहिले. एकेक गोष्ट पणाला लावत पार्वतीच्या आग्रहाने त्यांनी त्यांच्या प्रिय नंदीलाही पणास लावले आणि हरले. नंदीला घेऊन जायला पार्वतीची दासी गेली आणि तिने त्याला कानाने ओढून नेत असल्याचे कलाकाराने दाखविले आहे. बलाढ्य नंदी आता दास झाला आहे हे कळल्यावर शिवाच्या काही गणांनी त्याला त्रास द्यावयाला सुरुवात केली. कोणी शेपूट चावत आहे तर कोणी शिंग धरत आहे, तर तो जाऊ नये म्हणून कोणी त्याचे पाय धरत आहे. अन्य गण नंदीच्या दहशतीतून मुक्त झाल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. कोणी दुसऱ्याचे केस उपटतो आहे तर कोणी मुष्टिप्रहार करतो आहे, कोणी आपला पृष्ठभाग उघडा करून दाखवितो आहे, तर कोणी चक्क वाकुल्या दाखवितो आहे, वर्गातून शिक्षक बाहेर गेल्यानंतर बालवाडीमध्ये आपणही हेच करत नव्हतो का ?
शिल्पामध्ये वरील भागात खेळाला वेगळीच कलाटणी मिळालेली कलाकाराने दाखवली आहे. हातात फासे घेऊन अजून एक शेवटचा डाव खेळायचा आग्रह शिवाने केला. पार्वतीच्या लक्षात आले की हा अंतर्यामी महादेव आतापावेतो हरलेले सर्व काही परत मिळविणार, म्हणून तिने डाव सोडून जायची तयारी केली. तिच्या उठण्याच्या हेतूचे शिल्पांकन कलाकाराने तिच्या डाव्या हाताखालील उशी दबली गेली असल्याचे दाखवून केले आहे. तसेच तिचे डावे ढोपरही सरळ आहे. तिचा उजवा हात विस्मय मुद्रेमध्ये आहे. जणू काही ती शिवाला विचारते आहे, "काय देवा, हे तुम्हाला शोभते का ? काय काय डावावर लावायचं आणि कोणचे दान पडणार हेही तुम्हीच ठरविणारे, माझी काय फजिती करण्यासाठी हा आग्रह सुरू आहे का? " भगवान शंकराची मुद्रा मात्र अत्यंत बोलकी आहे. ते म्हणत आहेत की कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्यासाठी खेळ खेळला जात नाही.खेळ तर केवळ खेळासाठी असतो. एवढ्याशा कारणाने खेळ कधीही अर्धवट सोडता कामा नये कारण हा केवळ सारिपाट नव्हे तर संसाराचाच खेळ असतो.
सोमास्कंद मूर्ती :-
(स उमा स्कंद) पार्वती आणि स्कंद - कार्तिकेय यांच्यासह असणारे हे शिल्प असते. या शिल्पामध्ये शंकर आणि पार्वती यांच्या बरोबरच छोटासा (बाल) स्कंदही असतो. तो उभा, नाचताना किंवा आईच्या मांडीवरही असू शकतो. शिव पार्वती अर्थातच बसलेले असतात. वेरुळमध्ये हे शिल्प कैलास मंदिराच्या गर्भगृहाबाहेरील उजवीकडच्या भिंतीवर आहे. यातील पार्वतीचे डोके मात्र आता नाही. शिवाच्या मांडीवर बाल स्कंद असून तो आपल्या आईकडे बघतो आहे, परंतु त्याचा उजवा हात उचललेला असून त्याची मूठ वळलेली आहे. तो आपल्या छोट्या तर्जनीने शिवाकडे बोट दाखवून आपले बाबा हे किती मोठे आहेत हे अभिमानाने सांगतो आहे.
असेच शिल्प महाबलिपुरमच्या समुद्र किनाऱ्याजवळील मंदिरातही आहे. तेथे कार्तिकेयाच उजवा हात अशाच प्रकारे शंकराकडे बोट करताना दिसतो, तर त्याचा डावा हात त्याने स्वतःच छातीवर ठेवला आहे. माझे बाबा आहेत असे तो आग्रहाने दाखवतो आहे.
गंगाधर मूर्ती :-
भगीरथाने दीर्घ प्रयत्न करून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता स्वर्गातून गंगेला आणण्याच उपक्रम केला, वेरुळ येथील कैलास मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गंगावतरणाचे विलक्षण शिल्प कोरले आहे. डाव्या कोपऱ्यातील तप करणाऱ्या भगीरथाच्या तपश्चर्येने गंगेचे अवतरण झाले आहे. ती शिवशंकराच्या खांद्यावर आरूढ आहे, श्रीशंकराने आपली एक बट मोकळी करून गंगेला प्रवाही केले आहे. जन्हु राजाने तिला अडवली. शिल्पामध्ये डावीकडे जन्हु राजा बसलेला दिसतो. त्याची समजूत काढल्यावर त्याने तिला न गिळता आपल्या कानातून वाट काढून दिली. त्याला कानातून ती पुन्हा वाहू लागली. शिल्पाच्या खालच्या बाजूला मुक्तीची वाट पाहत बसलेले सगरपुत्र दिसतात. गंगेच्या पावन स्पशनि त्यांना मुक्ती मिळाली. कलाकाराची कल्पकता मात्र या शिल्पात कोरलेल्या पार्वतीमुळे उठून दिसते. तिला वाटले की तिच्या नवऱ्याने सवत आणली म्हणून ती चिडते, रुसते. शंकराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचा हात झिडकारताना दाखवली आहे. तरीही तो तिची हनुवटी उचलून तिला जणू काही हे सांगतो की, अगं वेडाबाई ही सवत नाही, तिच्यावर उगीच रागावू नकोस. भरतभूमीवर घडणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याला डोळे भरून पाहा, केवळ सगरपुत्रांनाच नव्हे तर कोट्यवधी मानवांना शतकानुशतके मुक्ती देण्याकरता, भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याकरता ही पावन गंगा आज पृथ्वीवर अवतरते आहे तिचे स्वागत कर. पार्वती मात्र संतापाने काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शिवाचा हात ती त्वेषाने झिडकारते आहे. कोण्या मूखनि तिच्या तोंडावरच घणाचा घाव घातल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील क्रोधित मुद्रा मात्र आज दिसू शकत नाही.

चित्र क्र. ८० : गंगावतरण, कैलास मंदिर, वेरूळ
अनुग्रह मूर्ती :-
शिवाच्या अनुग्रह मूर्तीमध्ये रावणानुग्रह, चंडेशानुग्रह, विष्णवानुग्रह असे विविध प्रकार आढळतात. यातील रावणानुग्रह मूर्ती हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वेरुळ मध्ये रामेश्वर लेणे (क्र.२१), रावण की खाई (क्र. १४), दशावतार लेणे (क्र.१५) कैलास आणि लंकेश्वर (क्र.१६) आणि धुमार लेणे (क्र.२९) इथे हे शिल्प पाहावयास मिळते. याशिवाय घारापुरी, विरूपाक्ष मंदिर (पट्टदकल), परशुरामेश्वर मंदीर (ओडिशा), बृहिदश्वर मंदिर (तंजावर), आँढा नागनाथ या ठिकाणी हे शिल्प दिसते. एवढेच नाही तर कंबोडियातील मंदिरांमधेही याचे अत्यंत कल्पक शिल्पांकन आढळते. याशिवाय गंगाई कोंडचोलापुरम् (तामिळनाडू) येथे चंडेशानुग्रह यांचे सुंदर शिल्प आहे. कैलास मंदिराच्या दक्षिण भिंतीवर कोरलेले शिल्प हे या सर्वांमधील सर्वात भव्य आणि सर्वात श्रेष्ठ शिल्प आहे.
चंडेशानुग्रह :-
तमिळनाडूमधील ६३ नायनमार किंवा नयनार या शैव संतांची माहिती असणारे पेरीय पुराण १२व्या शतकात लिहिले गेले. यामध्ये चंडेश्वराची कथा येते. विचार सर्मण हे त्याचे मूळ नाव. या गावातील लोक गायींना नीट वागवत नाहीत हे पाहून त्याने स्वतः गायींची काळजी घ्यायचे ठरविले. यावर प्रसन्न होऊन गायी त्याला भरपूर दूध देत. हे सर्व दूध तो शिवाच्या वाळूच्या केलेल्या शिवलिंगावर रोज वाहून टाकायचा. हे त्याच्या वडीलांना कळले. त्यांनी रानात जाऊन पाहिले तर हा शिवपूजेत मग्न होऊन वाळूच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत होता. क्रोधाने त्यांनी त्याला काठीने मारायला सुरुवात केली. आपल्या भक्तीत व्यत्यय आणणाऱ्याकडे न पाहताच विचार सर्मणाने ती काठी हिसकावली आणि मारणाऱ्याच्या माध्य आपल्याच वडीलांच्या दिशेने भिरकावली. शिवकृपेने त्या काठीची कुऱ्हाड झाली आणि ती त त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. तरीही हा पूजेतच मग्न होता. त्याची ही निस्सिम भक्ती पाहून शिव झाले आणि पार्वतीसह ते प्रकट झाले. त्यांनी आपल्या भक्ताला आलिंगन दिले. त्यामुळे सर्मण सारुप्य मुक्ती मिळाली. शिव त्याला म्हणाले की, 'आता मीच तुझा पिता. तू चंडिकेश्वराच्या धामीड तिथे तुला माझ्याप्रमाणेच पूजतील'. यानंतर आपल्या गळ्यातील माळ स्वहस्ते चंडेशाच्या डोक्या फेट्यासारखी बांधली. आणि शिवपार्वती अंतर्धान पावले. विचार सर्मण चंडेश झाला. अशा निम्तो शिवभक्ताच्या हाताने मृत्यू आल्यामुळे त्याच्या वडीलांनाही मुक्ती मिळली आणि पितृहत्येचे चंडेशला लागले नाही. (शिवानंद : १९९९, पृ. २८). गंगाईकोंडचोलापुरम येथील मंदिरात या प्रमाण उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आहे.
चित्र क्र. ८१ : चंडेशानुग्रह, गंगैकोंडचोलपुरम, तमिळना
विष्णवानुग्रह :-
विष्णूने शिवाकडून सुदर्शन चक्र प्राप्त करण्यासाठी उग्र तपश्चर्या केली. त्याने फूले अर्पण करण्याचा संकल्प केला. ती फुले घेऊन तो शिवाला अर्पण करायला गेला तेव्हा एक फूल शिवाने लपवून ठेवले. प्रत्यक्ष फुले वाहताना एक फूल कमी असल्याचे जेव्हा विष्णुच्या
लक्षात आले तेव्हा त्याने त्या एका फुलाऐवजी आपला एक डोळाच काढून शंकराला अर्पण करून संकल्प पूर्ण केला. कमळ कमी पडले म्हणून कमल-नयन दिले! त्याची ही भक्ती पाहून प्रसन्न होऊन शिवाने त्याला सुदर्शन चक्र दिले (शिवपुराण, अ. ३१, ४०-५२). याचे एक शिल्प कांचीपुरम् येथील कैलासनाथच्या मंदिरात दिसते. यामध्ये आसनावर शिव-पार्वती बसलेले असून शिवाच्या उजवीकडे खाली विष्णू बसलेला असून तो आपला एक डोळा काढून शिवाला अर्पण करताना दाखवलेला आहे.
किरात- अर्जुनानुग्रहमूर्ती :-
पांडवांच्या वनवासात धर्मराजाने अर्जुनाला इंद्राकडून दिव्यशक्ती प्राप्त करून घ्यायला सांगितले. अर्जुन इंद्राला भेटला तेव्हा इंद्राने त्याला सर्व सामर्थ्यशाली शिवाकडून पाशुपतास्त्र घेण्यास सांगितले. अर्जुन हिमालयात गेला आणि त्याने घोर तपश्चर्या आरंभ केली. ती पाहून हिमालयातील ऋषींनी शंकरांना सांगितले की तो एवढी तपश्चर्या करतो आहे, तर त्याची इच्छा पूर्ण करावी. शंकराने अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवले. किरात वेष धारण करून शंकर अर्जुनाच्या जवळ पोचला. तेव्हा त्याला दिसले की, मूक नावाचा एक राक्षस वराहचे रूप घेऊन अर्जुनावर हल्ला करायच्या
चित्र क्र. ८२ : अर्जुनानुग्रह, महाबलीपुरम, तमिळनाडू
तयारीत आहे. म्हणून त्याने आपले धनुष्य काढले. तोपर्यंत अर्जुनानेही आपले धनुष्य सज्ज केले. शंकर म्हणाला की मी त्या वराहला आधी पाहिले म्हणून मी त्याला मारणार. अर्जुनाने किराताच्या बोलण्याचा अनादर करून वराहावर बाण सोडला. तिकडून शंकरानेही एक बाण सोडला. दोघांच्या बाणाने वराहरूपी मूकराक्षस याने आपले भयंकर रूप प्रकट केले आणि मरून पडला. वराहला कोणी मारले यावरून या दोघात वाद सुरू झाला. दोघांनीही एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. आपल्या बाणांनी किरातला काही होत नाही हे पाहून अर्जुन त्याच्या अंगावर धावून गेला. मग त्यांच्यात द्वंद्वयुद्ध झाले, मग मुष्ठीयुद्ध झाले.अर्जुनाचा पराक्रम पाहून शंकर प्रसन्न झाला आणि त्याने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला पाशुपतास्त्र दिले. (महाभारत, आरण्यपर्व, किरातपर्व, अ. ३८-४०),
वेरुळमधल्या महाभारताच्या शिल्पपटाची सुरुवातच या कथेने होते. त्यात सुरुवातीला वराहाभोवती दोन धनुर्धर दाखवले आहेत. नंतर त्यांच्यामध्ये झालेले मुष्टी युद्ध आणि द्वंद्र आणि त्यापुढे आसनस्थ शिव त्यांच्या पुढे गुडघे टेकून शंकराच्या पाया पडणारा अर्जुन दिसतो. महाबलिपुरम येथे अर्जुनाच्य तपश्चर्येचे हे शिल्प पंधरा फूट उंच आणि चाळीस फूट रुंद अशा विराट कातळावर कोरलेले आहे. शिल्पात दोन्ही हात डोक्यावर धरून डाव्या पायावर उभे राहून उजव्या पायाचा तळवा डाव्या गुढगा टेकून उभ्या असलेल्या तप करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प असून त्याच्या शेजारी चार हातांचा त्रिशुलधारी शिव उभा असल्याचे शिल्प आहे. अर्जुनाने केवळ वायू भक्षण करून हात वर करून स्थिर स्थितीत तप केले म्हणून या शिल्पात वृक्षासनामध्ये उभा असलेला अर्जुन दिसतो. या कातळावर असंख्य शिल्प असून अर्जुनानुग्रहाचा हा सर्वात मोठा शिल्पपट आहे.
रावणानुग्रह क्र. १ :-
रावणानुग्रहाच्या दोन प्रकारच्या मूर्ती दिसतात १) यामध्ये आपली दहा डोकी कापून शंकराल अर्पण करणाऱ्या रावणाचे एक शिल्प असते. याशिवाय २) शिव पार्वती ज्यावर विराजमान आहेत तर कैलास पर्वताला रावण उखडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिल्प असते.वेरुळमधील कैलास मंदिराभोवतालच्या उत्तरेकडील व्हरांड्यातील पहिले शिल्प रावणानुग्रहाचे आहे. एका पिंडीभोवती ९ मानवी शिरे कोरलेली दिसतात. रावणाने श्रीशंकराला अर्पण केलेली स्वतःची ९ मस्तके (नवविधा भक्तीची प्रतीके) आहेत. दहावे मस्तकही तो कापत असल्याचे थरारक दृश्य आहे. याची कथा अशी की रावण रोज सकाळी तलावातून कमळ तोडायचा. स्नान करून शंकराची पूजा करायचा. एकदा शंकराच्या मनात विचार आला की रावणाची भक्ती आपण तपासून पाहावी. शंकराने त्याच्या ताटातील फुले काढून घेतली. स्नान करून रावण आला. पाहतो तर काय ? तेथे कमळे नाहीत. आता फुले आणायला माघारी वळला तर संकल्प मोडतो आणि तसाच पूजेला देवळात देला तर देवाच्या पूजेसाठी रिकाम्या हाताने जावे लागणार. रावण काय ते समजला. क्षणाचाही विचार न करता तो तलवार घेऊन तरातरा तसाच पिंडीसमोर गेला आणि म्हणाला, देवा, परीक्षाच घ्यायची होती तर इतकी साधी कशाला ? दहा शिरकमले जी तू मला दिली आहेस, त्याचा उपयोग कधी होणार? असे म्हणून त्याने एका मागून एक आपली डोकी कापायला सुरुवात केली आणि पिंडीला तो अर्पू लागला. दहावे डोकेही कापण्याच्या तो तयारीत होता. शिल्पामध्ये एका हाताने कपाळ घट्ट धरलेले दिसते ते त्राग्याने नव्हे तर कापण्यासाठी, ते घट्ट धरून त्याचा निश्चय व्यक्त करण्यासाठी. समर्पित भक्तीची ही परिसीमाच नव्हे काय? ही भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला अनुग्रह दिला. देऊळ पाहायला सुरुवात केल्यावर विथिकेमध्ये अगदी प्रथमच हे शिल्प हेतूपुरस्सर कोरले आहे. इतकी अविचल निष्ठा आणि भक्ती आपल्या मनात असेल तर पायऱ्या चढून गेल्यावर त्या परब्रह्माचे दर्शन होऊ शकते, हा संकेत येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सूचकतेने दिलेला आहे. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास प्रसंगी शीर कापून द्यायची सुद्धा तयारी असेल तरच ते काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असते असा संदेश या शिल्पातून देण्याचा प्रयत्न दिसतो. (देगलूरकर : २००८, पृ.५१)
चित्र क्र. ८३ : रावणानुग्रहमूर्ती, कैलास मंदिर, वेरुळ
रावणानुग्रह क्र. २ :-
या प्रकारच्या शिल्पाला कैलास तोलन असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि तमिळनाडू या ठिकाणच्या मंदिरातील हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. ह्याच्या तीन कथा-आशय तोच ठेवून - तपशिलात थोड्याफार फरकाने आढळतात. रामायणामधील कथेमध्ये कुबेराचा पराजय केल्यानंतर रावणाने त्याचा आकाशमार्गे जाणारा पुष्पक रथ घेतला आणि तो त्यातून विहार करू लागला. त्याचा रथ कैलास पर्वतापाशी अडला. ते पाहून शंकराचे गण आणि नंदी जे त्या वेळेस मर्कटरूपात होते ते त्याला हसू लागले. तेव्हा चिडून जाऊन रावणाने रागाच्या भरात कैलास पर्वत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.चित्र क्र. ८४ : कैलासतोलन, कैलास मंदिर, वेरूळ
दुसन्या एका कथेमध्ये रावणाने शंकराला लकेत चलण्याचे आवाहन केले. तेव्हा आपण सोडून जाऊ शकत नसल्याचे शिवाने त्याला सांगितले. त्यावर उपाय म्हणून रावणाने कैलासासह शिवपार्वतीला लकेत न्यायचे ठरविले. म्हणून कैलास पर्वत उचकटण्याचा प्रयत्न त्याने केला.शंकराने कैलास हलल्यास ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल म्हणून आपल्या उजव्या पायाचा अंगठा दाबून स्थिर केले. तसेच रावणाचेही दमन केले. रावणाची ही भक्ती पाहून शिवाने त्याला चंद्रहास तलवार दिली. या कथेवर आधारित शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले दिसते.
तर तिसऱ्या कथेमध्ये शंकर पार्वती यांच्यामध्ये काही कारणाने विसंवाद निर्माण झाला त्यामुळे शिवाच्या द्वारपालाने रावणाला कैलासावर जाण्यापासून अडवले. या कथेवर आधारित संबध भारतातील हे एकमेव शिल्प असावे. (अपवाद लंकेश्वर लेण्यामध्ये याचा एक प्रयत्न झालेला दिसतो. )
वेरुळ येथील कैलास मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सर्वात विलक्षण, कल्पक, परिपूर्ण तोलनाचे शिल्प आहे. त्याची कथा अशी, रावण कुबेराचा पराभव करून आकाशमार्गे परतताना चाटेवर कैलास पर्वत दिसला. तो पाहण्याच्या इच्छेने तो पर्वतावर उतरला. उतरताक्षणी श्रीशंकराच द्वारपालांनी त्याला रोखले. उन्मत रावणाचा अहंकार जागृत झाला व मस्तीने तो म्हणाला, 'ज्या ठिकाणी मला मुक्त प्रवेश नाही, ती जागाच लंकेत घेऊन जातो. मग बघतो मला शंकराचे दर्शन घेण्यापासून कोण प्रतिबंध करतो ते." रागाच्या भरात तीरासारखा तो कैलास पर्वताच्या खाली गेला, वीरासनावर बसून आपल्या वीसही हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवून उखडून काढला. कैलासाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. त्या वेळी कैलासावर काय स्थिती होती बरे? शिव पार्वती असले तरी ते शेवटी नवराबायको. काही भांडण झाल्याने पार्वती तोंड फिरवून कृतक्कोपाने महादेवापासून दूर बसली होती. दासी तिची समजूत घालत होती. अचानक बसणाऱ्या हादऱ्यांनी दासी भयकंपित होत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळू लागली व पार्वती राग विसरून भयभीत होऊन शंकराला बिलगते. शिल्पकाराने खोदलेल्या बारकाव्यांमुळे हे शिल्प जिवंत झाल्यासारखे वाटते. पळणाऱ्या दासीला अंशात कोरलेले आहे, तिचा अंबाडा अर्धवट सुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तिचा वेग नजरेला जाणवतो. या गतीने पळताना समोर पाहून पळणे स्वाभाविक असते. पण या दासीचा नेत्रकटाक्षा मागे आहे, नवरा बायकोचे भांडण आता तरी मिटले की नाही हे पाहण्याच्या स्त्रीसुलभ उत्सुकने ! पार्वतीने भयकंपित होऊन शिवाचा दंड धरला आहे. तो तिने प्रेमाने घरलेला नसून भीतीने पकडला असल्यामुळे तिची बोटे विलग झाली आहेत. अत्यंत रेखीवपणे कोरलेले हे शिल्प तो क्षण आजही जणू जिवंत करते, कैलासाला बसलेल्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या निसर्गावर आणि मनुष्यमात्रांवर झालेला परिणाम तितक्याच उठावदारपणे कोरलेला आहे. झाडावरची माकडे भयभीत झालेली आहेत.शिवगण रावणावर दगडांचा वर्षाव करत आहेत तर वादन करणारे कलाकार आपली वाद्ये खांद्यावर पळायच्या तयारीत आहेत, हिमालयात तप करणारे ऋषी महादेवाकडे अपेक्षेने पाहत आहेत, देवा देवा आता कसे होणार ? पण हा सर्व कोलाहल श्रीशंकर शांतपणे न्याहाळत आहे. जणू त्याला विचारायचे आहे, अरे मी असताना तुम्हा सर्वांना इतके धाबरण्याचे कारण काय? तेही या यत्किचित रावणाला ? शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने किंचित दाब द्यायला सुरुवात केली. या किंचित दाबानेही रावणाच्या अंगावर प्रचंड दबाव येऊ लागला. त्याचा एकेक हात श्रमाने थकून खाली पडू लागला, एक चेहरा रडू लागला, एक चेहरा मर्कटासारखा वेडावाकडा झाला. त्याच्या लक्षात आले की कैलास उपटणे सोपे पण तो हलवणे अशक्य कारण ही झुंज तर प्रत्यक्ष महादेवाशी आहे. येथे आपली डाळ शिजणार नाही. अशा प्रसंगी शिवाची स्तुती केली तरच आपली सुटका होईल हे रावणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने एक स्तोत्र रचले. याला रावणविरचित शिवतांडवस्तोत्र असे म्हणतात. ते त्याने मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली.
"जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लब्मितां भुजंगतुंगमालिकाम् ।
डमड्डमड्डमड्मन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ।।"
अशा प्रकारच्या पंधरा श्लोकांचे हे स्तोत्र ऐकून प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने त्याला क्षमा केली. अचाट शक्तिशाली माणसाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी परमेश्वराच्या यत्किंचित अंगठा टेकवण्याएवढी शक्ती पुरेशी असते. या शिल्पातून बोध घ्यायचा आहे तो असा की जीवनात भूकंपासारखे प्रसंग येतात. प्रत्यक्ष भूमी हादरून किंवा कुटुंबात भूकंपसदृश घटना घडल्यानेसुद्धा अशा प्रसंगी प्रज्ञावान मंडळींनी ठामपणे उभे राहून धैर्याने त्याचा सामना केला पाहिजे. हीच गोष्ट भगवंताने गीतेत सांगितली आहे.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ।। भ. गीता २-५६ ।।
एका श्रेष्ठ तत्त्वज्ञानाला एका पुराणकथेच्या माध्यमातून अत्यंत नाट्यमय पद्धतीनी शिल्पांकित करून आजरामर करण्याचा हा एक असामान्य प्रयोग म्हणावा लागेल. कैलासतोलन या मालिकेतील जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.
मार्कडेयानुग्रह :-
मर्कड ऋर्षीना अनेक अपत्ये झाली. पण ती जगली नाहीत. ऋषींनी मग मृत्यूलाच साकडे घातले. यम प्रसन्न झाला आणि म्हणाला, मी तुम्हाला पुत्र देईन परंतु तो एक तर दीर्घजीवी आणि मतिमंद असेल किंवा अत्यंत हुशार परंतु अल्पजीवी असेल. मातापित्यांनी अल्पजीवी पण हुशार मुलगा होऊ दे असा वर मागितला. मुलगा झाल्यावर त्याचे नाव त्यांनी माकैडेय ठेवले. ही मार्कंडेय जन्माची कथा आहे. हा मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो हुशार असल्यामुळे शिवाची भक्ती करू लागला. तो सोळा वर्षाचा झाला तेव्हा यम त्याला न्यायला आला. मार्कंडेय शिवाच्या आराधनेत इतका गुंग झाला होता की त्याच्याभोवती यमाने पाश टाकला आहे याचेसुद्धा त्याला भान राहिले नाही. शिवाने पाहिले की, एक अनन्यसाधारण भक्त आपली इतकी मनोभावे आराधना करता असताना त्याच्यावर मृत्यूसुद्धा काय म्हणून झडप घालेल ? पिंडीतून शिव प्रकटला आणि त्याने यमावरतीच हल्ला केला. त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आणि कमरेत लाथ मारली. ती लाथ इतकी जबरदस्त आहे की, यम अक्षरशः भेलकांडत गेल्याचे कलाकाराने कोरले आहे. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे की, आपल्याला मारणारा हा कोण? शैव पंथांचे उदात्तीकरण करणारी ही कथा आहे. वेरुळमधील कैलास लेणे क्र.१६ तर दशावतार लेणे (क्र. १५) येथे कोरलेले हे कालारी या नावाने सुध्दा ओळखले जाणारे शिवाचे संहारशिल्प सर्वोत्तम म्हणावे लागेल. याशिवाय विघ्नेश्वरानुग्रह व नंदिशानु अशी अनुग्रह शिल्पेही असतात.चित्र क्र. ८५ : मार्कंडेयानुग्रह, कैलास मंदिर, वेरूळ
संहार मूर्ती :-
शिवाच्या तांडवाचे वर्णन करताना शिव त्याचा तिसरा डोळा उघडतो आणि तो सर्वांचा सा कमलो असे सांगितले जाते. यावरून आकांडतांडव करणे हा वाक्यचारही रूढ झाला आहे.परंतु शिल्पकलेत मात्र असे संहार तांडव दिसत नाही. उलट पक्षी निर्मितीचा परमानंद चेहऱ्यावर प्रकटलेले त्याचे प्रसन्न आणि शांत रूपच दिसते. शिवाचे आक्रमक रूप त्याच्या संहार शिल्पांमध्ये दिसते. निरनिराळ्या असुरांचा वध दर्शवणारी ही शिल्पे असतात, ज्यामध्ये भैरव, गजासुरवध, अंधकासुर, त्रिपुरांतक, कालारी, कामंतक, शरभ, ब्राह्म शिरच्छेदक, वीरभद्र आदी शिल्पांचा समावेश असतो.
भैरव मूर्ती :-
शिव पुराणामध्ये भैरव हे शिवाचे पूर्ण रूप. भैरव किंवा कालभैरव हा वाराणसीचा अधिपती मानला जातो. तसेच अनेक गावांचा रक्षक किंवा क्षेत्रपाल अशा देवाला भैरव असेही म्हणतात. या शिवाच्या रूपात त्याच्या जटा मुक्त झालेल्या असतात. भैरवाच्या गळ्यामध्ये नररूंडाची माळ असते. याशिवाय त्याच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू आणि मुंड इ. असतात. कानात सर्प कुंडले, कमरेत घंटा असलेला करगोटा आणि घुंगरू असलेले नुपूर असतात. चेहऱ्यावर अत्यंत उग्र असे भाव असतात. काही मूर्तीमध्ये तो विवस्त्र असतो. भैरवाचे एक अत्यंत सुरेख शिल्प हे राणी की वाव-पाटण येथे आहे. या मूर्तीला अठरा हात असून हातांची जणू एक महिरपच त्याच्या भोवती झालेली दिसते. चेहऱ्यावर उग्र भाव दाखविण्यासाठी केवळ त्याचे डोळे वटारलेले आहेत. परंतु त्याची परिणामकारकता दाखविण्यासाठी कलाकाराने चांगलीच कल्पकता दाखवलेली आहे. शंकराच्या पायाखाली एक राक्षस कोरला असून त्याचा एक हात त्याने कापून टाकला आणि मुंडके उडवले असे दाखवले आहे. तोडलेले मुंडके शंकराच्या खालच्या डाव्या हातात केसाने धरलेले असून त्याच्या खाली एक श्वान आहे जो त्याच्या मानेतून टपकणाऱ्या रक्ताचे थेंब चाटताना दाखवले आहे. शंकराच्या उजव्या पायाजवळ त्याचा एक अस्थिपंजर परंतु जटाधारी गण आहे जो त्या दैत्याचा तुटलेला हात चावून खायचा प्रयत्न करतो आहे. (बीभत्स रस हा दाखवू नये असा संकेत असला तरी कलाकाराने या शिल्पात तो अत्यंत सूचकतेने दाखवला आहे.) वेरुळमध्ये (कैलास लेणे) गजासुरवध आणि अंधकासुरवध या शिल्पांमध्ये शिवाचे उग्र रूप दाखवले आहे. अन्य असुरवध शिल्पांमध्ये मात्र त्याच्या चेहऱ्यावर सौम्यच भाव आहेत. भैरवाची एकूण ६८ रूपे आहेत. त्या सर्वांची वेगवेगळी नावे आहेत. याशिवाय बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव अशीही रूपे आढळतात.
चित्र क्र. ८६ : भैरव, रानी की बाव, पाटण
गजासुरवध :-
कूर्म पुराणात आलेल्या कथेप्रमाणे वाराणसीच्या कृत्तिवासेश्वर लिंगाचे पूजन करणाऱ्या ब्राम्हणांना त्रास देणाऱ्या हत्तीचा वेष घेतलेल्या एका असुराचा शंकराने संहार केला आणि त्याचे कातडे उत्तरीय म्हणून पांघरले. गजासुराच्या इतरही कथा आहेत. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे शंकराने या आसुरांचा नाश तंजावर जिल्ह्याच्या बळूवूल गावात केला. (जोशी: १९७९, पृ.२००),गजासुरवध वेरुळ :-
कैलास मंदिरात हे शिल्प महायोगी शिवाच्या बरोबर समोरच्या बाजूला कोरलेले आहे. भगवान शिवाचे एक आक्रमक रूप कोरलेले दिसून येते. नीलासुर हा राक्षस मातला आणि देवलोकांना त्रस्त करून सोडले. तेव्हा सर्व देवलोक श्रीशंकराकडे आले. शंकराने सर्व देवांकडे मागणी केली की या युद्धामध्ये तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने साहाय्य करावे. तेव्हा देवतांनी आपापल्या शक्ती त्याच्या मदतीला पाठवून दिल्या. त्या शक्ती शिल्पांमध्ये शंकराच्या पायाशी बसलेल्या मातृकांच्या रूपाने दिसतात. शिवाने डमरूचा भयंकर नाद करत गजासुरावर आक्रमण केले. प्रथम त्याचा दात तोडला. शिल्पामधील शिवाच्या वळलेल्या मुठीतील दात हे त्याच्या निग्रहाचे प्रतीक आहे. तर गजासुराचे चामडे सोलून ते सूर्याजवळ धरले आणि जाळून टाकले. अशा त-हेने गजासुराला मारले. युद्ध पाहण्यासाठी पार्वती पण आली होती. शिवाचे ते अक्राळविक्राळ रूप, आकाशपर्यंत पसरलेल जटा, विस्फारलेले नेत्र, गळ्यात नररूडांची माळ आणि त्याचा युद्धोन्माद पाहून पार्वती हळूच तेथून सटकण्याच्या तयारीत आहे. शिवाच्या हे लक्षात आल्यावर त्याने त्याही स्थितीमध्ये तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका हाताने तिची हनुवटी हळुवारपणे धरून तो जणू तिला सांगायचा प्रयत्न करतो आहे की माझा हा आवेश गजासुरासाठी आहे. तुझ्यासाठी मात्र प्रिये, मी भोळासांबच आहे. कथेतील हा भाग शिल्पकाराने या शिल्पात हुबेहूब साकारलेला आहे.चित्र क्र. ८७ : गजासुरवध, कैलास मंदिर, वेरूळा
अंधकासुरवध :-
ही कथा वराह, कूर्म आणि वामन पुराणात येते. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत झालेला हा असुर देवांना अतिशय त्रास देऊ लागला. ते शंकराकडे गा-हाणे घेऊन गेले असता अंधकासुराने शंकरावरच आक्रमण केले. शंकराने त्याला शूलावर उचलून घेतले. त्याच्या जखमांमधून गळणारे रक्तबिंदू जा जमिनीवर पडले तर त्यापासून पुन्हा एक असुर निर्माण होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून शिवाने आपल्या डोळ्यापासून योगेश्वरी (काली) नावाची एक मातृका उत्पन्न केली. तिने आपल्या हातातील कपालामध्ये ते थेंब धरले आणि त्या युद्धात शिवाने अंधकासुराचा नायनाट केला. हे शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी दिसते. परंतु त्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार दशावतार लेंणे (क्र.१५) मध्ये दिसतो. शिवाने अंधकासुराला म्हणजे अज्ञानाच्या राक्षसाला भाल्याच्या टोकावर घेतले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. ही क्रिया या शिल्पामध्ये अत्यंत आवेशपूर्ण दाखविली आहे. परंतु दैवीकरण करणे म्हणजे काय तर हेच कृत्य करायला माणसाला प्रचंड शक्ती वापरायला लागली असती. तर इथे मात्र शिवाने अत्यंत लीलया हे केल्याचे शिल्पकाराने कोरले आहे. त्या अचाट शक्तीला पाहून प्रभावित झालेली पार्वती शेजारी कोरलेली आहे. अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन अंधकासुर जन्माला येणार म्हणून ते पडणारे थेंब गोळा करायला कपाल घेऊन काली शिवाला साहाय्य करीत आहे. कालीचा अजस्त्र आकार शिल्पामध्ये चपखलपणेसामावलेला आहे. इथे कलाकाराला असे वाटले की, शिवाने भाला जर एवढ्या जोराने भोसकला असेल तर अंधकासुराच्या शरीरातून रक्ताबरोबर मांसाचेही तुकडे उडू शकतात, त्यांना हवेतल्या हवेत झेलण्यासाठी कलाकाराने एका उडणाऱ्या गरुडालाही शिवाच्या कपाल धरलेल्या हाताखाली कोरलेले आहे.शिल्पाचा विशाल आकार, त्यातील पात्रांची संरचना आणि यांचा आवेश हे सगळेच थक्क करणारे !
चित्र क्र. ८८ : अंधकासुरवध, कैलास मंदिर, वेरूळ
त्रिपुरांतकमूर्ती :-
त्रिपुर संहाराची कथा महाभारतात आहे. तारकासुराचे तीन मुलगे विद्यन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन किल्ल्याचे स्वामित्व मिळविले आणि असाही वर प्राप्त करून घेतला की हे किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरत असावेत. हजार वर्षात एकदा ते एका बिंदूवर यावेत आणि त्यावेळी एकाच बाणाने कोणी त्यांना पाडले तरच ते विनष्ट होऊ शकतील. मयासुराने त्या सोने, चांदी, व लोखंडाचे किल्ले बांधून दिले. याप्रमाणे बलवान होऊन त्यांनी देवांना अतिशय छळण्यास प्रारंभ केला. लिंगपुराणातील कथेत (७,२-४). शेवटी शंकराने मेरूपर्वताचे धनुष्य करुन त्याला वासुकी नागाची प्रत्यंच्या जोडून एक बाण ठराविक क्षणी मारून असुरांचा नाश केला व देवांची सुटका केली. (ढाल : २०००, पृ.२१४).या कथेचा अन्य काही तपशिलही अनेक ठिकाणी आढळतो. शंकराने पण या असूराचा नाशासाठी देवांच्या शक्तीची मागणी केली. त्याप्रमाणे सर्व देवांनी या युद्धात सहकार्य केले. शंकराने विष्णू, अग्नी, आणि यम यांचा बाण केला. मेरू पर्वताचे धनुष्य केले आणि त्यासाठी वासुकी सापाची प्रत्यंचा केली. पृथ्वीचा रथ केला, मंदर पर्वताचा अक्ष करून त्यावर चाके म्हणून चंद्र आणि सूर्य बसविले, उपचक्र म्हणून हिमालय आणि विंध्याद्री पर्वत बसविले. सप्तर्षीना चाकावर गोलाकार बसवून चाके सुशोभित केली. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्या चाकाच्या अक्षाच्या खिट्ट्या झाल्या. आकाश रथाचे छप्पर झाले, त्यांच्या रथाला चार वेदांचे अश्व जोडले. सर्पराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे घोड्यांना बांधणारे पट्ट झाले तर कृति, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य हे घोड्यांचे लगाम झाले. सोम अग्नि आणि विष्णू शंकराचा बाण झाले. ज्यात अग्नी हा बाणाची दांडी झाला. सोम बाणाचे शीर्ष झाला आणि स्वतः श्रीविष्णू बाणाचे टोक झाले. (डॉनिजर : १९७५, पृ.१२७-१३२).
त्रिपुरांतक मूर्ती या घटनेची जाणीव करून देते. येथे शिवाचे धनुष्य, बाण किंवा शरसंधान ह्या महत्वाच्या गोष्टी होत. दक्षिण भारतामध्ये या मूर्ती अधिक दिसतात. आगम साहित्यात याचे पुष्कळ वर्णन येते. त्यात त्याचे आठ प्रकार सांगितलेले आहेत. वेरुळमध्ये याचे कैलास आणि दशावतार लेण्यात शिल्प दिसते.
वेरुळमधील शिल्पांमध्ये दोन्ही पायात अंतर घेऊन शिव रथावर उभा असल्याचे दाखवले जाते. यातून अत्यंत गतिमान अशा रथावर त्याने तोल सांभळण्यासाठी घेतलेला पवित्रा लक्षात येतो. धनुष्यावर बाण दिसत नाही. परंतु शिवाचा उजवा हात कानाजवळ दिसतो. आकर्ण धनुष्य ओढून त्याने नुकताच तो बाण सोडल्याचे स्पष्ट होते. बाण सुटल्याने असुरांचा नाश झाला असल्यामुळे ते दशावतार लेणीतील शिल्पपटात कोरलेले दिसत नाही. परंतु कैलास लेण्यातील शिल्पपटात मात्र दोन असुर वर आणि एक असुर मारला गेल्यामुळे तो आकाशातून पडताना दिसतो. कैलास लेण्यात आणि दशावतार लेण्यात घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतींच्या कोपऱ्यावर कोरलेले आहेत. कलाकाराच्या या कल्पकतेमुळे या दृश्यातील रथाला गतीचा आभास झाल्यासारखा दिसतो.
तमिळनाडूमधील तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या भोवती दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भिंतीवर प्रत्येकी सहा देवकोष्ठ असून त्या सर्व देवकोष्ठांमध्ये शिवाची त्रिपुरांतक श्रेणीतील अगदी वेगळी शिल्पे आहेत. या देवळाच्या गर्भगृहाबाहेरील दर्शनी भिंतीची लांची जवळजवळ ४० फूट असून त्याची उंचीही जवळजवळ तेवढीच आहे. यामध्ये सहा सहा देवकोष्ठांचे दोन थर आहेत. त्यातील वरच्या थरामध्ये डाव्या हातात उभे धनुष्य आणि उजव्या हातात एक बाण पालेल्या शिवाच्या अठरा मूर्ती आहेत. प्रथम दर्शनी तर ही श्रीरामाचीच मूर्ती वाटते. कारण शिवाने डाव्या हातात धरलेले नुष्याचे एक टोक जमिनीला टेकलेले असते तर दुसरे त्याच्या डोक्याहूनही वर गेलेले आहे. मेरू पर्वताचेच धनुष्य ते, लहान कसे असणार. अन्यथा शिवाचे पिनाक हे धनुष्य सांबराच्या सिगापासून केलेले असल्यामुळे अन्य मूर्तीमध्ये ते लहानसेच दाखवले असते. बृहदीश्वर मंदिरातील या सर्व शिवाच्या मूर्ती जिगुरांतक शिव याचीच शिल्पे आहेत (नागास्वामी : २०१०).

चित्र क्र. ९० : त्रिपुरांतक, बृहदीश्वर मंदिर, तंजावर

चित्र क्र. ८९: त्रिपुरांतकमूर्ती, कैलास मंदिर, वेरुळ
शिवाच्या अन्य मूर्ती
सदाशिव मूर्ती :-
पाच तोंडाचा व दहा हातांचा शंकर हा 'सदाशिव' या नावाने ओळखला जातो. तसेच अनेक मुखांच्या शंकराच्या मूर्तीलाही सदाशिव म्हटले जाते. अशा वर्णनाच्या काही विशेष मूर्ती आढळतार परंतु साधारणपणे अनेक मुख असणाऱ्या शंकराच्या शिल्पाला सदाशिव म्हणतात. तत्पुरुष, वामदेश अघोर, सद्योजात, आणि ईशान अशी याच्या पाच मुखांची नावे असतात. मूर्तीमध्ये हा तीन किंवा चा तोंडाचा दिसतो. त्याचे समोर मध्यभागी असणाऱ्या मुखाला तत्पुरुष असे म्हणतात. त्याचा डावीकडील वामदेव तर उजवीकडील मुखाला अघोर म्हणतात. डोक्यावरील मुखाला ईशान म्हणतात तर पाचवे मुख जे दिसत नाही त्याला सद्योजात म्हणतात. ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित करतात. यातील डोक्यावरील मुख ईशान हे आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते काही शिल्पांमध्ये दाखवले जात नाही. घारापुरी (एलिफंटा) येथील त्रिमूर्ती या नावाने प्रसिद्ध असलेले शिल्प हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांचे नसून सदाशिवाचे शिल्प आहे. या शिल्पात तीनच मुखे दिसतात आणि डोक्यावरील ईशान दाखवलेला नाही. शिवाच्या डावीकडील तोंडाचे नाव वामदेव. वामदेव म्हणजे परिष्कृत निर्मिती म्हणून याचा चेहरा अत्यंत सुकुमार तरुणाप्रमाणे कोरलेला आहे. त्याचे उजवे तोंड म्हणजे अघोर. यातील अघोर म्हणजे निर्मिती साठी लागणारी ऊर्जा आणि शक्तीचे रूप. हातोडीचा ठोका कठीण पदार्थाबर घालताना दाताखाली ओठ चावून भुवया विस्फारून अत्यंत त्वेषाने तेवढाच नियंत्रित आणि संयमित करून तो ठोका घालावा लागतो याचे ते प्रतीक आहे. या शिल्पातीत अघोराने चावलेला ओठ आणि त्याची वक्र झालेली भुवई यांची साक्ष देतात. या दोन्हीतील समतोल साधणारा निःपक्ष म्हणूनच निर्विकार तरीही निर्मितीचे समाधान दाखवणारा चेहरा हा मधल्या तोंडावर म्हणजे तत्पुरुषाचा असतो, घारापुरीतील हे शिल्प खरं तर अर्धशिल्पच (bust) आहे. शंकराच्या छातीपर्यंतच कोरलेले हे शिल्प आहे. हे शिल्प २१ फूट उीचे आहे. अर्धशिल्पांमध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.एकपाद शिव मूर्ती :-
ही शिल्पे संख्येने अतिशय कमी असतात आणि साधारणतः तांत्रिक पंथाच्या मंदिरात ही दिसतात. यामध्ये कमरेवरील शंकराचे शरीर पूर्ण असते आणि कमरेखाली एकच पाय दोन्ही पायाच्या जागी कोरलेला असतो. या शिल्पात शंकर ऊर्ध्वलिंगी दाखवलेला असतो. भुवनेश्वर उबळील हीरापूर येथील चौसष्ठ योगिनींच्या मंदिरात हे शिल्प दिसते.चित्र क्र. ९२ : विलक्षण चतुष्पाद सदाशिव, खजुराहो

चित्र क्र. ९१: एकपाद शिव, हीरापुर
खजुराहो येथील खंडारीया महादेव मंदिरामध्ये हे शिल्प दिसते. आणखी एक शिल्प खजुराहो येथील संग्रहालयात आहे. या शिल्पात आठ तोंडाचा शिव म्हणजे दर्शनी भागात खांद्यावर तीन मुखं आणि त्याच्यावर तीन छोटी मुखे, या दोन्ही स्तरांमध्ये चवथे मुख मागील बाजूला आहे हे गृहीत धरले जाते. अशी त्याच्या आठ मुखांची रचना आहे. डोक्यावर मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे. या मूर्तीला चार पाय असून त्यातील दोन पाय पद्मासनात आणि खाली सोडलेले दोन पाय जमिनीवर टेकलेले दिसतात. या मूर्तीला बारा हात होते. परंतु आता त्यातला एकच शिल्लक आहे. चतुष्पाद म्हणजे चार पायांचा. या ठिकाणी पाद शब्दावर श्लेष केलेला आहे. शैव पंथांच्या अनुयायांसाठी चार मार्ग किंवा चार पाद सांगितले आहेत. शैव सिद्धान्तामधील हे चार मार्ग म्हणजे योग-पाद, ज्ञान- पाद, क्रिया-पाद आणि चर्या-पाद. सदाशिवाच्या
पद्मासनात असलेले दोन पाय म्हणजे ज्ञान आणि योग पाद होय आणि खाली सोडलेले दोन पाय क्रिय पाद (उपासना पद्धत) आणि चर्या पाद (आचरणाचे नियम) होय. केवळ या मूर्तीच्या दर्शनाने भक्तांन जीवनात मुक्ती देणाऱ्या चार मार्गांचे स्मरण व्हावे अशी यांची योजना आहे.

चित्र क्र. ९३ : एकादश रुद्र, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
ज्या शिल्पातून सगळे तत्त्वज्ञान साकारले जाते, अशा शिल्पांना डॉक्टर गो. बं. देगलूरकर यांचा मते 'बिंब ब्रह्म' असे म्हणतात. याशिवाय अष्ट मुख आणि द्वादश मुख शिव अशीही शिवाची शिले असतात. काही शिल्पांमध्ये सिंहासह शिव कोरलेला असतो.
शिवाचे शिल्पांकन अनेक प्रकारे होते. त्यातील सर्वच प्रकार सर्व मंदिरात दिसत नसल्यामुळे येथे सर्वाधिक प्रचलित आणि संख्येने जास्त असणाऱ्या तसेच सामान्यतः अनेक देवळांमध्ये प्रकर्षनि आढळणाऱ्या शिल्पांचेच वर्णन प्रामुख्याने केले आहे. अकरा रुद्र यांचे एकत्रित किंवा स्वतंत्र शिल्पांकन दिसते. (कांचीपुरम - तामिळनाडू येथील कैलासनाथाचे मंदिर, सिद्धापूर-गुजराथ येथील शिव मंदिर) तसेच अज मुख, अघोर, नीलकंठ, वीणाधर, हनुस्पर्श (पार्वतीच्या हनुवटीला हात लावलेला बालशिव, विषपायी आवक्ष, महेशमूर्ती अशी विविध रूपेही दिसतात. (जोशी : १९७९, पृ.२०२- २०३).
तालागाव (बिलासपूर, छत्तीसगढ) येथे दहाव्या अकराव्या शतकातील रुद्र शिवाची एक उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातात आयुधे नाहीत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर विविध प्राणी अंकित केलेले आहेत. छाती, पोट, मांड्या यावर सात मानव मुखे आहेत. गुडघ्याच्या ठिकाणी दोन सिंहाची तोंडे दिसतात. पोट हे महाकुर्माचे रूप, भुवयां ऐवजी मासे, एका विशाल कपाळावर टिळ्याच्या ऐवजी पाल, बुबुळाऐवजी मानवी कवट्या, याशिवाय डोके, कान, लिंग यासारख्या अवयवांवर साप, मोर, मगर वगैरे प्राणीही लहानमोठ्या प्रमाणात दिसतात. डॉ. देगलूरकर झांनी याला 'सर्वभूतवहित्र' असे म्हटले आहे.
पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये एक द्विभुज मूर्ती आहे. त्याच्या माथ्यावर आधी तीन फणांचा व त्याखाली पंधरा फणांचा नाग आहे. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याला दाढी असून त्याच्या डाव्या हातात नाग आणि उजव्या भग्नावस्थेत असलेल्या हातात बटवा आहे. सर्पाच्या साहाय्यात असत्यामुळे श्री. नि.पु. जोशी (जोशी: १९७९) यांनी याला धन्वंतरी शिव असे म्हटले आहे. डॉक्टर देगलूरकरांच्या मते (देगलूरकर : २००७) ही धन्वंतरीचीच मूर्ती असून हे विष्णूचे रूप असल्याचे म्हटले आहे.
शिवाची १ ०८ रुपे
महादेव
वीरूपाक्ष
चंद्रार्धककृतशेखर
अमृत
शाश्वत
स्थानू
नीलकंठ
पिनाकी
वृषाभाक्ष
महाज्ञेय
पुरुष
सर्वकामद
कामारी
कामदहन
कामरूप
कपर्दी
विरूप
गिरीश
भीम
सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)
रक्तवासा
योगी
काल दहन
त्रिपुरघ्न
कपाली
गूढव्रत
गुप्त मंत्र
गंभीर
भाव गोचर
अणिमादीगुणाधार
त्रिलोकेश्वर्यदायक
वीर
वीरहंता
घोर
विरूप
मासल
पटू
महामासाद
उन्मत
भैरव
महेश्वर
त्रैलोक्यद्रावण
लुब्ध
लुब्धक
यज्ञसूदन
कृतिकासुतयुक्त
उन्मत
कृत्तीवासा
गजकृत्तीपरिधान
क्षुब्द
भुजंग भूषण
दत्तालंब
वेताल
घोर
शाकिनी पूजित
अघोर
घोरदैत्यग्न
घोरघोष
वनस्पती
भस्मांग
जटिल
शुद्ध
भेरुड शतसेवित
भूतेश्वर
भूतनाथ
पंचभूताश्रित
खग
क्रोधित
निष्ठूर
चंड
चंडिश
चंडिका प्रिय
चंडतुंड
गरुत्मान
निस्त्रिश
शव भोजन
लेलिहान
महारौद्र
मृत्यू
मृत्यूर गोचर
मृत्योमृत्यु
महासेन
स्मशानारण्यवासी
राग
विराग
रागांध
वितराग
शतार्ची
सत्व
रज
तम
धर्म
अधर्म
वासनवानुज
सत्य
असत्य
सदृप
असदृप
अहेतुक
अर्धनारीश्वर
भानू
भानुकोटीशतप्रभ
यज्ञ
यज्ञपती
रुद्र
ईशान
वरद
शिव
शिवाची १ ०८ रुपे
१०. स्त्री देवता (शक्ती) आणि त्यांच्या मूर्ती
स्त्री देवता :-
दुर्गा :-
महिषासुरमर्दिनी :-
पार्वती :-
सप्तमातृका :-
चौसष्ट योगिनी :-
नागकन्यांची उल्लेखनीय शिल्पे
पानगाव (जिल्हा लातूर) :-येथील विठ्ठल मंदिरात (इ.स. ११वे शतक) एका नागकन्येने तिच्या उजव्या हातामध्ये एका प्रचंड नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डाव हात डोक्यावरती असून त्यावर एक मुंगुस बसले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे. तो मुंगुस अशा पद्धतीने दबा धरून बसलेला आहे की कधी तिचे लक्ष उडते आणि तो सापावर झेपावतो. तर तो नाग तिच्या दोन बोटांच्या चिमटीतून सुटण्यासाठी तोंड उघडून सळसळतो आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या नजरेतून स्पष्ट दिसतो आहे.
चित्र क्र. १०८ : नागकन्या विठ्ठल मंदिर, पानगाव
नागकन्यांच्या मालिकेतील सर्वोत्तम शिल्प हे राणी की बाव, पाटण येथे आहे. पूर्णाकृती असलेल्या ह्या शिल्पामध्ये तिच्या दंडावर आणि मनगटावर रुद्राक्षाच्या दोन बांगड्या आणि गळ्यात रुद्राक्षांचीच एक कंठी एवढेच तिच्या अंगावर आहेत. तिच्या उजव्या हातात एक वाटी असून त्यात एक मासा आहे, ज्याचे प्रलोभन ती एका महाभयंकर सर्पाला देते आहे. ज्याचे तोंड त्या वाटीजवळ असून त्या सपनि तिच्या मागून त्याच्या शेपटीचे वेटोळे तिच्या डाव्या मांडी भोवती गुंडाळलेले आहे. तिचा डावा हात तिने त्याच्यावर उगारलेला आहे. तिच्या पायामध्ये एक मोर आहे. इथेही या दोन जन्मजात शत्रूना लीलया नियंत्रणात ठेवणाऱ्या या विषकन्येचे हे अप्रतिम असे शिल्पांकन आहे. तिच्या ओटीपोटावर दोन आडव्या वळ्या आहेत, ती कुमारिका नसल्याचे ते लक्षण आहे. तिच्या डोक्यावर अशुभदर्शक तीन घुबडे कोरलेली आहेत. शरीर शास्त्राच्या दृष्टीने आणि तिच्या हालचालींना पोषक असे शरीराच्या अंगोपांगाचे बारकावे थक्क करणारे आहेत. या उन्मुक्त आणि अनावृत अशा रूपाच्या प्रथमदर्शी मोहात जरी कोणी पडले तरी त्याने ती एक विषकन्या आहे याचे स्मरण ठेवावे.
*शक्ती रुपे*
भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .
देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .
रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .
१)महालक्ष्मी
सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .
२)नंदा
ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.
३)क्षेमकरी
चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.
४) शिवदुती
ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .
५)महाचंडी
ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .
६)भ्रामरी
ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.
७)सर्वमंगला
चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .
८)रेवती
दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .
९) हरिरिध्द
ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.
अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .
सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे एका श्लोकामधे सांगितली आहे .
प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।
तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥
पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।
साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥
नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।
उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥
वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'
माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'
व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'
व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'
सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'
सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'
गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '
नंदी वाहन असलेली 'महागौरी '
कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'
ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा
ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.
भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.
संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून
११. कार्तिकेय
कार्तिकेयाच्या प्रतिमा कुषाण, गुप्त आणि यौधेयांच्या नाण्यांवर आढळतात. वेद काळात त्याचे कुमार हे नाव असावे आणि पुढे स्कंद या नावाने तो प्रचलित झाला. सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र, स्कंदामह अशी त्याची नावे होती. तर त्यांच्या प्रतिमांची नावे देवसेनापती, गांगेय, शिवसुत, षडानन इ. होती. प्राचीन काळापासून स्कंद पूजा सुरू होती. दक्षिण भारतात षण्मुगम किंवा सुब्रह्मण्यम् या नावाने याची पूजा होते. प्राचीन वाङ्मयामध्ये सनत्कुमार हाच स्कंद होता. तो महेश्वराचा मुलगा होता, तो विभावसू अग्नीचा पुत्र होता असे उल्लेख येतात. तर पुराण काळात तो शिव पार्वतीचा पुत्र होता. शिव पुराणाच्या अठराव्या अध्यायात त्याच्या जन्माची कथा येते. तारक नावाच्या असुराने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मांडात उच्छाद मांडायला सुरुवात केली. देवांची सेना त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडू लागली. त्यांना एका सक्षम सेनापतीची गरज होती ब्रह्मदेवाने देवांना सांगितले की शिव पार्वतीचाच पुत्र सेनापती झाल्यास तो तारकासुराचा वध करेत. भगवान शंकर महायोगी आणि ब्रह्मचर्येचे व्रत घेतलेले, त्यामुळे त्यांची आधी मनधरणी करून त्यांना लग्नाला तयार केले. इकडे पार्वतीने पंचाग्नी तप आरंभले होते ते त्यासाठीच. अखेर त्या दोघांचा विवाह झाला परंतु पंधरा वर्षे ते कामक्रीडेतच मप्न राहिले. पृथ्वीला हा भार असह्य झाल्यामुळे सर्व देवांसा इंद्राने कैलासावर जाऊन त्यांची याचना केली. या दरम्यान वार्यावर उडून त्याचे काही वीर्याचे गंगेत पडले. तेथे सहा कृत्तिका स्नान करत होत्या आणि त्या सहा कृत्तिकांच्या गर्भातून याचा जन्म झाला. म्हणून त्याचे नाव 'कार्तिकेय' असे झाले. हे सहा डोकी असणारे मूल जन्माला आले म्हणून त्याला षडानन किवा षण्मुगम असे म्हणतात. पुढे हा पराक्रमी मुलगा देवसेनेचा सेनापती झाला आणि त्याने भीषण झालेल्या रणकंदनामध्ये तारकासुराचा वध केला. गुप्तकालापासून दिसणाऱ्या शिल्पांमध्ये कार्तिकेयाचे वाहन मोर असून त्याच्या हातात त्रिशूळ, पाश, सर्प, आदी आयुधे दिसतात. (जोशी : १९७९).
कार्तिकेयाच्या काही शिल्पांमध्ये त्याच्या हातात कोंबडा धरलेला असतो. याचे कारण असे की कोंबडा हे कामवासनेचे प्रतिक मानले जाते. ब्रह्मपुराणामध्ये या युद्धानंतर विजयी झाल्यावर कार्तिकेयाने देवाच्या बायकांवरही अत्याचार करावयास सुरुवात केली. शेवटी पार्वतीने एक युक्ती केली, कार्तिकेयाने कुठल्याही स्त्रीला धरण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे पार्वतीचेच रूप दिसेल. त्यानंतर कार्तिकेयाने सर्व स्त्रियांना, माता समजून पाहण्याची प्रतिज्ञाच करून टाकली. कार्तिकेयाच्या अशा चारित्र्यामुळे महाराष्ट्रात आजही कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो.
वेरुळमध्ये रामेश्वर लेणे क्र. २१ मध्ये कार्तिकेयाचे मोठे शिल्प आहे. त्याच्या शेजारी मेषाची तोंडे असणारे दोन सेवक असून त्यांची नावे नैगमेष आणि छग्वत्र अशी असतात. कार्तिकेयाच्या पायाजवळ एक मोठा मोर काढलेला असून त्याच्या डाव्या हातात त्याने कोंबडा धरलेला आहे. कोंबड्याचे आणि मोराचे मुख तुटलेले आहे.
दक्षिण भारतातील काही शिल्पांमध्ये मोरावर पत्नीसह बसलेला कार्तिकेय दिसतो. त्याला 'सेनापती' असे म्हणतात. याचे कारण देवसेना ही त्याची शक्ती होती जिला स्त्री रुपात दाखवले जाते.
कर्नाटकात ऐहोळे येथील शिल्पात (इ.स. ८ कार्तिकेय हातात तलवार आणि शक्ती घेऊन तारकासुराशी युद्ध करीत असल्याचे शिल्प आहे. वारंगळ ( आंध प्रदेश) येथील रामप्पा मंदिरात (इ.स.१३ वे शतक) सहा डोक्याचा कार्तिकेय तारकासुराशी युध्द करताना दाखवला आहे. दक्षिण भारतात या देवाची लोकप्रियता गणपती इतकी किंवा त्याहून अधिकच असावी असे वाटते.

सर्व विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ज्याचे स्मरण मांगल्याची देवता म्हणून आज आसेतुहिमाचल केले जाते असा हा आधुनिक सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. प्राचीन काळात जेव्हा इंद्र, ब्रह्मा, शंकर, विष्णू किंवा कार्तिकेय या देवतांची पूजा हात होती तेव्हा त्यात गणपती कुठेही नव्हता. वेद, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत इतकेच काय प्राचीन शिलालेखातही याचा उल्लेख आढळत नाही.
याच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. (जोशी: १९७९)
१. पार्वतीच्या अंगातून आलेल्या मळातून त्याचा जन्म झाला आणि तिने त्याला दारावर उभे केले. त्याने शंकराला अडविल्यावर शंकराने त्याचे मुंडके उडवले. मग पार्वतीने तो आपला मुलगा आहे सांगितल्यावर शंकराने त्याला हत्तीचे डोके आणून बसविले.
२. पार्वतीला मुलगा झाला तेव्हा त्याला देव पाहायला आले. शनीने पाहाताच त्या मुलाचे मुंडके गळून पडले. एकच हाहाकार झाला तेव्हा शंकराने हत्तीचे डोके त्याला लावले.
३. पृथ्वीवर पाप वाढल्यामुळे देव चिंतीत झाले व ते रुद्राकडे गेले. रुद्राने पार्वतीकडे पाहिले आणि प्रकाशतत्त्वाचा प्रतिनिधी एक पुरुष प्रकटला. पार्वती त्याचे सौंदर्य न्याहाळू लागली त्यावर चिडून शंकराने त्याला शाप दिला की तुला हत्तीचे तोंड असेल, तू सापाचे जानवे घालशील आणि तुझा देह मोठा होऊन पोट सुटलेले असेल. याच वेळेस अनेक विनायकांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून आणि शंकराच्या कृपेने गजानन हा सर्व विनायकांचा अधिपती झाला.
४. शिवपार्वती विहार करण्यासाठी पर्वतावर गेले. तेथे गज दाम्पत्याची क्रीडा पाहून त्या दोघांनीही तशीच रूपे घेतली. त्या प्रसंगाचे फल म्हणजे गणपतीची उत्पत्ती होय.
५. स्कंद पुराणामध्ये आणखीन एक कथा मिळते. सिंदुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्याकरता विष्णूने पार्वतीच्या पोटी अवतार घेण्याचे ठरविले. सिंदुरासुराला ही गोष्ट कळली त्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून मुलाचे डोके कापले व नर्मदेत फेकून दिले. मस्तकहीन परंतु जिवंत मूल जन्माला आले. शंकराने एका हत्तीला मारून त्याचे मुंडके त्याला बसवले. या गजाननाने पुढे त्या सिंदुरासुराचा वध केला.
मूर्तिरूपात पूजल्या जाणाऱ्या देवांसाठी अनेक कथा निर्माण झाल्याचे दिसते. पूजनीयता प्राप्त करण्यासाठी देवांनाही पराक्रम करायला भाग पाडले जाते. मूर्ती घडवण्यासाठी प्रचलित झालेल्या कथांमधून विशिष्ट देवतांना लोकप्रिय करण्याचेही प्रयत्न झाल्याचे जाणवतात. तसेच मूर्तीच्या निर्मितीचे प्रयोजन आणि त्याचे समर्थनही करावे लागते असे दिसून येते.
शिल्परूपात गणपती :-
बौद्ध शिल्पांमध्ये ठेंगण्या आणि तुंदिलतनू अशा यक्षांच्या मूर्ती दिसतात. यातील काही मूर्तीना प्राण्यांचीही तोंडे लावलेली असतात. वेरुळमध्ये विश्वकर्मा लेणे (क्र. १०) या सहाव्या शतकातील बौद्ध लेण्यामध्ये अशा गणाचे शिल्प दिसते. या लेणीतील प्रवेशद्वारा आतल्या बाजूला एका रांगेत नाचणारे गण कोरले आहेत. त्यामध्ये एक गजमुख गण आहे. गुप्त काळाच्या सुमारास गणपतीचे शिल्पांकन झालेले दिसते. सुरुवातीच्या काळातील शिल्पांमध्ये अलंकार नसलेले मुख आणि सर्पाचे यज्ञोपवीत दिसते. दोन किंवा चार हातांच्या मूर्ती त्या काळात होत्या. नंतरच्या काळात मात्र अनेक हात, अनेक तोडे अनेक सोंड अशी त्याची शिल्पे आढळतात.
चित्र क्र. ११३ : उच्छिष्ठ गणेश, देलमाल, गुजरात
गणपतीची स्वतंत्र मंदिरे मात्र प्राचीन काळात नव्हती, पंचायतन पद्धतीच्या मंदिरांमध्ये गणपतीची मंदिरे दिसतात. पंचायतन मंदिरे म्हणजे मुख्य मंदिर मध्यभागी आणि त्याभोवती बाकी देवतांची चार उपमंदिरे त्याभोवती अशा स्थापत्यामध्ये मध्यभागी शंकर, विष्णू, देवी किंवा सूर्याचे मंदिर असावयाचे. परंतु गणपती मात्र उपमंदिरातच स्थापन केलेला असावयाचा. साधारणतः गणपतीच्या हातामध्ये पाश, अंकुश, परशु, मोदक वगैरे दिसतात व त्याचे वाहन उंदीर असते. ऋिद्धी व बुद्धी किंवा सिद्धी या त्याच्या दोन बायका, काही शिल्पांमध्ये एक किंवा दोन्ही बायका दिसतात. मांडीवर बसलेल्या स्त्रीच्या हनुवटीला, स्तनांना आणि मांडीला सोंडेने स्पर्श करतानाचे गणपतीचे शिल्प असल्यास त्याला उच्छिष्ठ गणेश असे म्हणतात. नृत्य गणेश किंवा तांडव करणाऱ्या गणपतीची शिल्पेही अनेक ठिकाणी आढळतात. परंतु खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरामध्ये गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.
महाभारताचे लेखन करण्यासाठी गणपती आपला लेखनिक व्हावा, अशी मागणी महर्षी व्यासांनी केली. गणपतीने हे कार्य एका अटीवर करण्याचे मान्य केले. ती अट अशी की व्यासांनी त्यांची काव्य रचना करीत असतानाच त्यांनी ती सांगायची आणि गणपतीने ती लिहून घ्यायची, परंतु हे करत असताना व्यासांनी कुठेही अडखळायचे किंवा थांबावयाचे नाही. महाकाव्याची रचना करण्याचे ते काम होते. ते पाठ केलेल्या कवितेप्रमाणे कोणीही सांगणे हे शक्य नव्हते. परंतु व्यासच ते, गुरुचे गुरू, त्यांनी ही अट मान्य करताना गणपतीलाही एक अट घातली की प्रत्येक लोकाचा अर्थ समजूनच त्याने तो लिहावा. याला गणपती तयार झाला. महर्षी व्यास हे काही सामान्य कवी नव्हते. त्यांनी महाभारताची रचना करताना मध्ये मध्ये काही कुट श्लोकांचीही रचना केली. कूट श्लोक महणजे कोडी. ती कोडी इतकी क्लिष्ट असायची की अनेकदा त्याचा अर्थ समजून घ्यायलासुद्धा गणपतीला काही काळ विचार करायला लागायचा. त्या काळामध्ये महर्षी व्यास पुढील काव्याची रचना करून ठेवायचे. असे म्हणतात की ना कधी व्यास अडखळले, ना गणपतीची लेखणी थांबली. (महाभारत, आदिपर्व, अनुक्रमणी पर्व, अ. २)

चित्र क्र. ११४ : गणपती, लक्ष्मण मंदिर, खजुराहो
महाभारतातील तो प्रसंग खजुराहो- मधील लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवरील देवकोष्ठात गणपतीच्या शिल्पात साकारला आहे. या शिल्पातील गणपती नृत्यमृद्रेत असून हातातील लेखणीने मांडवरच्या वस्त्रावर लिहिण्याचा जणू अभिनय करतो आहे असे वाटते. कानावर पडलेला प्रत्येक शब्द समजून लिहिताना होणारी एकाग्रता त्यांच्या मुखावरील भाव स्पष्ट दर्शवितात. महाभारतातील तो प्रसंग सूचकतेने साकारण्याचा प्रयत्न कलाकाराने केला असावा असे वाटून जाते.

परिवर्तन हाच जगताचा नियम आहे. हे मानणाऱ्या हिंदू धर्मात देवांच्याही लोकप्रियतेत बदल घडत जातात, हे या धर्माचे मोठे आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी फारसा लोकप्रिय नसलेला गणपती हा पेशव्यांच्या काळापासून सर्वाधिक लोकप्रिय देव झाला. १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी त्याचा सार्वजनिक उत्सव सुरू केल्यामुळे त्यात भरच पडली. तर गेल्या शतकात संतोषी मातासारखी दैवतेही अत्यंत लोकप्रिय झाली होती. तसेच काही संतपुरुषांनाही आज देवत्व प्राप्त झाल्याचे दिसते.
१३. सूर्य
१४. नवग्रह
१५. दिक्पाल
कणाद ऋषींनी दिग् हा शब्द अवकाश या अर्थाने वापरला आहे. दिशांचे भान आल्याशिवाय अवकाशाची जाणीव होत नाही. पृथ्वीला दोन ध्रुवस्थाने असल्याने दक्षिण आणि उत्तर ह्या दिशा समान पाहत असून पूर्व पश्चिम ह्या स्थानसापेक्ष राहतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहत असणाऱ्या लोकांना ध्रुव ताऱ्यामुळे उत्तर दिशेचे निश्चितीकरण हे करता येते. याशिवाय या चार दिशांमधील अन्य चार जगदिशा आणि वर आणि खाली (ऊर्ध्व आणि अधर) अशा एकूण दहा दिशांची कल्पना केलेली आहे. यांपकी ऊर्ध्व आणि अधर सोडून अन्य दिशांच्या रक्षक देवतांना किंवा अधिपतींना दिक्पाल ही संज्ञा आहे त्या त्या दिशांचे ते रक्षण करतात अशी समजूत आहे. पूर्वेचा इंद्र, पश्चिमेचा वरुण, उत्तरेचा कुबेर,दक्षिणेचा यम, अग्नेयचा अग्नी, नैऋत्येचा निर्ऋती, वायव्येचा वायू आणि ईशान्येचा ईश्वर किंवा ईशान अशी या आठ म्हणजे अष्ट दिक्पालांची नावे आहेत. मंदिरांमध्ये हे दिक्पाल त्या त्या दिशांना वसवलेले आढळतात. मंदिरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात दोन याप्रमाणे हे दिक्पाल त्या त्या दिशांना तोंड करून बसविलेले असतात. काही मंदिरांमध्ये ते एकमेकांपासून ठराविक अंतरावर वसविलेले असतात. दिक्पाल ओळखणे फार सोपे असते. कारण ते त्या त्या दिशांनाच असतात. खिद्रापूरच्या (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपात सर्व दिक्पाल त्यांच्या शक्तींसमवेत वाहनांवर आरूढ असल्याचे दिसतात.
चित्र क्र. १२६ : दिक्याल ईशान, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
इंद्राचे वाहन ऐरावत (हत्ती) आणि शस्त्र वज्र आणि अंकुश असते. शची त्याची पत्नी असते. वरुणाचे वाहन मकर (मगरीसारखा प्राणी) असून त्यांच्या हातात पद्म, पाश, शंख, घट (रत्नपात्र) असते. त्याच्या पत्नीचे नाव गौरी असते. कुबेराचे वाहन नर (जिवंत माणूस) असून त्यांच्या हातात गदा आणि शक्ती ही आयुधे असतात. त्याच्या पत्नीचे नाव वृद्धी असते. यमाचे वाहन महिष (रेडा) असून, त्याच्या हातात त्रिशूळ, दंड किंवा खड्ग असते. त्याच्या पत्नीचे नाव धुमोर्णा अग्नीचे वाहन मेष. त्यांच्या हातात ज्वाळा किंवा त्रिशूल असून त्यांची पत्नी स्वाहा असते. निर्ऋतीचे वाहन शव (प्रेत) असून त्याच्या हातात खड्ग, खेटक आणि मुंड (माणसाचे कापलेले मुंडके) असते. हे भैरवाचे रुप असल्यामुळे अनेक शिल्पात तो नग्न दाखवला जातो (जैन मंदिर, खजुराहो). याला चार बायका असतात. त्यांची नावे देवी, कृष्णांगी, कृष्णवदना, कृष्णपाशा अशी असतात ईशान हे शंकराचेच रूप असल्यामुळे त्याचे वाहन बैल असते. त्याच्या हातामध्ये नाग आणि त्रिशूळ ही त्याचे आयुधे असतात. वायूला 'उत्तमभूत', 'अशरीरी 'आकाश', आणि 'शीघ्रग' अशी नावे दिली आहेत. हेच वायूचे खरे चित्रण होय. असून त्याचे वाहन प्रामुख्याने मृग म्हणजे हरीण असते. क्वचित ठिकाणी चालणारा माणूसही त्याचे वाहन असते. त्याच्या पत्नीचे नाव शिवा
खजुराहोच्या मंदिरातील वायूच्या प्रतिमा चौभुजी आहेत. तिथे त्याच्या हातात ध्वज, पुस्तक, कमळाची कळी, अक्षमाला आणि कमंडलू आहेत. (जोशीः १९७९).
चित्र क्र. १२७ : दिक्पाल अग्नी, सूर्य मंदिर, मोढेरा
चित्र क्र. १२८ : दिक्पाल, डावीकडून ईशान, अग्नी, वायू आणि वरुण, वेरूळ
सर्वच मंदिरांमध्ये दिक्पालांचे शिल्पांकन नसते. खजुराहोच्या मंदिरांप्रमाणे मोढेरा (गुजरात) येथील अकराव्या शतकातील सूर्यमंदिरात मोठ्या आकारात बसविलेल्या दिक्पालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. वेरुळच्या कैलास मंदिराच्या दर्शनी भिंतीवर (समोरच) अष्ट दिक्पालांचे शिल्पांकन केलेले दिसते. इथे कलाकारांनी त्यांना एका सरळ रेषेत म्हणजे एकाच दिशेला तोंड करून कोरलेले आहेत.
१६. बौद्ध प्रतिमा
गौतम बुद्ध :-
भगवान बुद्ध इ.स.पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेले. इ.स. पूर्व ५६३ ते ४८३ या काळात वैचारिक प्रगती बरोबरच भारतामध्ये भौतिक भरभराटही झाली होती. सरस्वती-सिंधू-संस्कृती नंतरचे दुसरे नागरीकीकरण झालेले होते जे परत एका समृद्ध अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले होते.भटक्या टोळ्यांचे समुदाय, पोटासाठी फिरणारे असे समाजाचे स्वरूप जाऊन महाजनपदांमध्ये भौगोलिक वाटणी होऊन त्यांच्या प्रमुख राजधान्या आणि राजघराणी प्रस्थापित झालेली होती. त्यापैकी मगध साम्राज्य हे सर्वात बलशाली होते. त्याची राजधानी राजगृह म्हणजे आजचे बिहार प्रांतातले राजगीर. गंगेच्या उत्तरेस लिच्छवींचे एक राज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती. गंगेच्या वायव्येस कोसलांचे राज्य होते ज्यांची राजधानी श्रावस्ती होती. कोसल देशाच्या पूर्वेस रोहिणी नदी वाहत होती आणि या नदीच्या तीरांवर समोरासमोर शाक्य आणि कोलिय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्ये होती. शाक्य हे क्षत्रिय कुल होते व त्यांची कपिलवस्तू ही राजधानी होती ज्यात शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता.
शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून त्याही वेळेस वाद सुरू होते. या दोन्ही गणराज्यांनी रोहिणी नदीवर एक धरण बांधले होते आणि पाणी वाटपाचा करारही केला होता. पूर्वीपासून तेथे कधी लहान संघर्ष आणि काही युद्धेही या पाणी वाटपावरून झालेली होती. कोलिय राजाने पाणी संघर्ष मिटविण्यासाठी, महामाया आणि महाप्रजापती नावाच्या आपल्या दोनही मुलीची लग्ने शुद्धोदन राजाशी लावून पारिवारिक संबंधही दृढ केले होते. बऱ्याच वर्षानंतर मोठी राणी महामाया हि झाली. तिला प्रसूतीसाठी तिच्या माहेरी देवदेह नगरीत पाठविण्यात आले. प्रवासामध्ये विश्रांतीसाठी लुम्बिनी नामक उपवनात ती थोड्यावेळ थांबली होती. (लुम्बिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे ) तिथे तिने एका झाडाची फांदी धरली असता ती तिथेच उभ्या उभ्या प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. प्रसूतीनंतर तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आले. हा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, ज्याचे राशीनाम गौतम होते. प्रसूतीनंतर सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि महाप्रजापती हि गौतमची दुधाई आणि पुढे तीच त्याची आई झाली.
गौतमाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल, परंतु त्याने कुठलेही दु:ख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त शालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले होते. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलामध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतुंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गयक, वादक यांचाही समावेश होता. सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. त्याच्या जवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहल ठेवले गेले. त्याच सुमारास एक दिवस त्याला वाड्याबाहेरील जग पाहण्याची इच्छा झाली. शुध्दोधनाने आधी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो हट्टालाच पेटला तेव्हा त्याने त्याला अनुमती दिल्ली. परंतु त्याच्या नगर संचाराच्या वेळी त्याला कोणीही पंगु, म्हातारे, रोगी दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नगरात सर्व व्यवस्था केली गेली ते सजवले गेले आणि मगच गौतमाची स्वारी बाहेर पडली.
ते दृश्य पाहून गौतम हरखून गेला. राजवाड्याबाहेरील जग हे सुंदरच आहे असे त्याला बाटले. परंतु थोड्याच वेळाने त्याला जर्जर म्हातारा दिसला. छन्न नावाच्या आपल्या सारथ्याला त्याने विचारले की, "याला काय झाले?" त्यावर सारथ्याने त्याला म्हातारपण आले आहे असे सांगितले. "म्हणजे मी पण एक दिवस असाच कुरूप होईन का ? माझ्याही अंगावर असेच व्रण आणि सुरकुत्या येतील का?" यावर छन्न म्हणाला, "होय महाराज, हे सर्वांच्याच नशिबी चाढून ठेवलेले असते." आपले हे तारुण्याचे तेज, हे सौंदर्य आणि हा तारुण्याचा आवेश एक दिवस नष्ट होणार या कल्पनेनेच गौतमाला अतीव दुःख झाले. पुढे त्याला एका महारोग्याचे दर्शन झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की नुसतेच वार्धक्य येते असे नाही तर अनेक व्याधीही या शरीराला ग्रासू शकतात. पुढे त्याला एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि आपणही एक दिवस मरणार हे कटू सत्य त्याला कळले. हे जग जेवढे दिसते तेवढे सुंदर तर नाहीच नाही परंतु सुखी तर अजिबातच नाही हे त्याच्या लक्षात आले. येथून त्याचे चिंतन बदलले आणि तो अंतर्मुख होऊन रात्रंदिवस विचार करू लागला. आषाढ पौर्णिमेच्या मध्यरात्री तो उठला आणि त्याने यशोधरेला आणि तिच्या कुशीत झोपलेल्या राहुलला एकदा डोळे भरून पाहिले आणि तो महालातून बाहेर पडला. त्याने छन्न नावाच्या सारथ्याला उठवले आणि त्याच्या आवडत्या कंथक नावाच्या घोड्यावर बसून तो नगरातून बाहेर पडला. छन्नही त्याच्याबरोबरच निघाला. पहाटेच्या सुमारास तो अनोमा नदीच्या तटापाशी आला. तेथे त्याच्या राज्याची सीमा संपत होती. त्याने आपले रेशमी वस्त्र आणि अलंकार उतरवले त्या वेळेस छन्नाच्या लक्षात की हा घर सोडून निघाला आहे. त्याने त्याच्या परीने त्याला अडवायचा बराच प्रयत्न केला. परंतु याचा निर्धार कायम होता. शेवटी तो म्हणाला की, तुमच्या जाण्याने तुमचे आई वडील, तुमची आणि मुलगा हे किती दुःखी होतील याचा विचार करा. त्यावर गौतमाने त्याला उत्तर दिले की, श्री साऱ्या जगाचेच दुःख दूर करण्यासाठी निघालो आहे आणि तसे जर झाले तर यांचेही दुःख आप नष्ट होणारच आहे. (जोशी, भा.स.को.: १९७०)
शिल्पकलेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील ह्या टप्प्या पर्यंतची शिल्पे आढळतात, ज्यामध्ये महामायेचे स्वप्न, आसिताची भविष्यवाणी आणि गौतमाचा गृहत्याग आणि अन्य काही प्रसंगाचे शिल्पांकन असते. गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी छन्नाला अलंकार दिले ते स्थान केसरीया या गावी बिहारमध्ये असून तेथे एक भव्य स्तूप सापडला आहे.
गृहत्यागा नंतरची जवळजवळ १४ वर्षे त्याच्या कठोर साधनेची आणि उग्र तपश्चर्येची होती. सुरवातीला आलार कालाम या राजगृहाजवळ राहणाऱ्या संन्यासाचे शिष्यत्व घेतले, त्याच्याकडून तो नास्तिकवाद शिकला. नंतर त्याने उद्रक नावाच्या दुसऱ्या गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त केले. परंतु तरीही याचे समाधान झाले नाही. पुढे सहा वर्षे त्याने योग साधना करून हठयोगाचे काही उग्र प्रकारही केले. त्याचे संपुर्ण शरीर अस्थिपंजर झाले. एका वृक्षाखाली बसून त्याने अनेक दिवस साधना केली आणि एके दिवशी त्याला बोधी प्राप्त झाली. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुजाता नावाची गुरे राखणारी मुलगी उभी होती. तिने फळांचा रस त्याला दिला. ( पुढे बौद्ध वाङ्मयात सुजाता ही राजकन्या होती असे लिहिले गेले आणि तिने सुवर्ण पात्रात बुद्धाला खीर दिली असा उल्लेख येतो). याच्या नंतरही त्याने सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्याला धर्मत्तत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्याचे पूर्वाश्रमीचे पाच सहयोगी हे वाराणसी जवळच्या ऋषीपत्तनात राहतात हे कळल्यावर तेथे गेला आणि त्या पाचही जणांनी याचे शिष्यत्व घेतले. तेथून जवळच असलेल्या सारनाथ येथे त्याचे पहिले प्रवचन झाले. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी त्याला कारणीभूत असणारी तृष्णा संपली पाहिजे असे त्यानी सांगितले आणि त्याने आठ तत्त्वांचे निवेदन केले, ज्याला त्याने निर्वाणप्राप्तीचा अष्टांग मार्ग असे म्हटले. याच पाच शिष्यांसह त्याने बौद्ध संघ सुरू केला आणि तिथून बौद्ध पंथाचा उदय झाला. (जोगी भा.सं.को. १९७०)
याच्या प्रचारासाठी त्याने संघटनात्मक बांधणी केली आणि त्याची ही संघटन त्याच्या मृत्यूनंतर १३०० वर्षे हिंदुस्थानात कार्यरत होती. मृत्यूनंतरही ते कार्य तितक्याच दृढतेने आणि निष्ठेने वर्धिष्णू ठेवण्याचे श्रेय हे जसे त्याच्या असंख्य अनुयायांना जाते तसेच ते भगवान बुद्धाचे व्यक्तित्मत्त्व त्यांचे विचार आणि त्यांच्या विशेष अशा कार्यप्रणालीलाही जाते. त्या वेळच्या वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या समाजामध्ये समृद्धीबरोबर येणारी विलासीनताही बोकाळली होती. इतकेच नाही तर यज्ञाचे मूळ उद्दिष्ट जाऊन तेथे हजारो प्राण्यांचे बळी देण्याचे भयानक कर्मकांड सुरू होते. याला योग्य दिशा देण्याचे काम हे भगवान बुद्धाने केले. ज्यांनी तो पंथ स्वीकारला नाही त्यांनीही त्यातल्या योग्य गोष्टी मात्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. च्या सातव्या, आठव्या शतकानंतर भारतातून बौद्ध पंथाचा ऱ्हास झाला. परंतु गौतम बुद्धांच्या विचारांचा परिणाम सर्व भारतीयांच्या जीवनावर आजही दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य वा चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे बोलणे आणि खरे वागणे याला बुद्धांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राण्यांनाही जीव असतो म्हणून त्यास मारू नये ही अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. आपल्या चैनीसाठी इतरांचे धन किंवा संसाधने वापरणे याला त्यांनी चोरी (अस्तेय) म्हटले. ब्रह्मचर्य याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळायचे शील. या शीलाचा आग्रह धरणारे भगवान बुद्ध हे पहिले संत म्हणावे लागतील. मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे हे त्यांचे विचार खरोखरच थक्क करणारे आहेत. यामुळे या पंथाला गती मिळाली आणि अनेक शतके मोठ्या प्रमाणात राजाश्रयही मिळाला.
इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने याला खूपच मोठी चालना दिली. त्याने स्वतः हा पंथ स्वीकारला नाही परंतु आपल्या मंत्रीगणांमध्ये धर्ममहामात्र हे पद निर्माण केले आणि हे एक संन्यासी भिक्षुच धारण करू शकत असे. अशोकाचे राज्य हे आजच्या इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ सर्व भारतभर पसरलेले होते. एवढ्या मोठ्या सलग प्रदेशाचा एकछत्री अंमल असणारा जगातला तो एकमेव राजा आहे. भौगोलिक विस्तार आणि धर्मप्रशासक याच्यामुळे तिबेट आणि सिलोनमध्येही हा पंथ त्या वेळेस त्याने पोहोचवला. अफगाणिस्थानच्या परिसरातील काही ग्रीक सुद्धा बौद्ध झाले. असे असले तरीही बहुसंख्य प्रदेशांमध्ये वैदिक धर्माचाही प्रभाव तितकाच होता आणि आता याला थोडे धार्मिक स्पर्धेचे स्वरूप आले होते. बौद्ध शिल्पे - भारतातील देव प्रतिमांचे प्रमाणिकीकरण होण्याच्या आधीपासून बौद्ध स्थापन (स्तूप) आणि बौद्ध शिल्पकला ही लेण्यांमधून विकसित झालेली होती. गौतम बुद्धाने आपली मुर्ती किंवा चित्र (प्रतिमा) हे करू नये आणि याचे पूजनही नये असे आग्रहाने म्हटले होते. धर्माची तत्त्वे प्रस्थापित होण्यासाठी विचारमंथन होणे आवश्यक असते त्याप्रमाणे अशी तीन मंथने झाली. त्याला संगिती असे म्हटले जाते. पहिली संगिती बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच तर तिसरी संगिती अशोकाने भरवली होती. परंतु अशोकाला मात्र त्याचे काही स्मारक असावे असे वाटल्यामुळे त्याने स्तुपांची रचना केली. यामध्ये भगवान बुद्धांचे शारीर रुपाने दर्शन होत नाही. इ.स.च्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बौद्ध शिल्पांमध्ये हे असेच दिसते.
महामायेचे स्वप्न - गौतमाच्या जन्माच्या आधी त्याच्या आईला (महामायेला) स्वप्नात एक शुभ्र ली दिसत असे. तिच्या पोटी एक महान पुत्र जन्माला येणार याचा तो संकेत मानला जातो. एक झोपलेली स्त्री आणि तिच्यावर अधांतरी असा एक हत्ती आणि बाजूला उभे असलेले काही दास दासी असे हे शिल्पात दिसते.
शालभंजिका- साल वृक्षाखाली त्याची फांदी धरून उभी असताना गौतम बुद्धाच्या आईची प्रसुती झाली असल्यामुळे साल वृक्ष हा पवित्र मानला गेला आणि तशा उभ्या असणाऱ्या स्त्रियांची शिल्ये त्या काळात आणि नंतरही दिसतात. काही शिल्पांमध्ये शालभंजिकेच्या शेजारी हातांमध्ये वस्त्र घेतलेला एक पुरुष उभा असलेला दाखवतात. त्या वस्त्रावर नवजात गौतम आहे असे मानले जाते कारण सती रूपात दाखवायची सोय नव्हती. काही ठिकाणी त्या पुरुषाला इंद्र असल्याचेही मानले जाते.
सुरुवातीच्या काळातील (इ.स.पू. दुसरे ते इ.स. दुसरे शतक) शिल्पांमध्ये गौतम बुद्धाला दाखविण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केला गेला. त्यात
१) पांढरा हत्ती
२) कमळ - बुद्धाने टाकलेली पहिली सात पावले
३ ) घोडा- अलंकृत घोडा ज्यावर छत्र धरले आहे, ह्या घोड्यावर बसून त्याने गृहत्याग १ (महाभिनिष्क्रमण) केला.
४) बोधीवृक्ष- बुद्धगयेला पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली त्याला 'बोधीवृक्ष' असे नाव दिले गेले. त्या काळातील शिल्पांमध्ये दाखविलेला वृक्ष म्हणजेच गौतम बुद्ध यात काही ठिकाणी वृक्षाच्या खाली चौथरा किंवा काही ठिकाणी सजवलेला कठडाही दिसतो.
५) वज्रासन- बोधीवृक्षाखाली किंवा नुसतेच आसन काढलेले असते. त्यावर बसून बुद्धाने तप केले असे मानले जाते.
६) गंध कुटी- गृहत्यागा नंतर काही वर्षे आम्रकुंजात ज्या कुटीत तो राहिला होता त्याचे है प्रतीक मानले जाते.
७) भिक्षापात्र काही शिल्पात केवळ भिक्षापात्र दिसते.
८) उष्णीष- बुद्ध मूर्तीतील डोक्यावर असणारा उंचवटा.
९) प्रभा मंडल आसनामागे एक प्रभा काढलेली असते.
१०) धर्मचक्र जे प्रतीक आजही आपल्या राष्ट्र ध्वजावर आहे.
११) पदचिन्हे- आसनावर दोन पावलांचे ठसे ज्यांना सामान्यतः आज आपण पादुका म्हणतो.
१२) त्रिरत्न- त्रिशूळासारखे एक चिन्ह
१३) स्तूप- अर्धगोलाकार उंचवटा आणि त्याभोवती वेदिका (कठडे) अशा स्वरूपातील वास्तू.
शारीर रूपातील बौद्ध मूर्ती - अफगाणिस्थानामधील काही ग्रीक हे बौद्ध झाले आणि त्यांना शरीर रूपातील मूर्तीची आवश्यकता भासली म्हणून गांधार कलेमध्ये अस्थिपंजर झालेले शरीर दाखवून ध्यानस्थ बुद्ध मूर्ती सुरुवातीला आढळते. मथुराकलेमध्ये यावर त्यांनी तडजोडीचा तोडगा काढला. त्यांनी बोधीसत्त्वाच्या मूर्ती केल्या, ज्यामध्ये गौतम बुद्धांची ही बोधी प्राप्त करण्यापूर्वीची अवस्था सांगितली गेली. पटना (बिहार) येथील संग्रहालयाच्या दारातच धोतर नेसलेला, हातात भिक्षापात्र घेतलेल्या, दाढी असलेल्या एका पुरुषाची विशाल मूर्ती दिसते. तिला 'बल भिख्खू' असे म्हटले जाते.
इ.स. पहिल्या शतकानंतर (कुशाण काळानंतर) बुद्ध मूर्तीचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, ज्यामध्ये आपल्याला सामान्यतः बुद्ध मूर्ती म्हटल्यानंतर जी मूर्ती डोळ्यासमोर येते त्याचा अंतर्भाव झालेला दिसतो. महापुरुषांची सात लक्षणे सांगितली गेली आहेत, जी बौद्ध आणि जैन मूर्तिकलेत समान पद्धतीने वापरलेली दिसतात.
१. उष्णीष - अलंकृत पागोटे, डोक्यावर अंबाड्यासारखा वर आलेला केस करळे दाखवल्यामुळे बुद्धमूर्तीमध्ये केसांचीच मारलेली गाठ असावी असे दिसते. परंतु ते तसे नसते. गौतम बुद्धाने मुंडन केलेले होते. परंतु तसे मस्तक शिल्पात दाखवल्यास सौंदर्याला बाधक अकते म्हणून त्यावर कृत्रिम कुरळ्या केसांची रचना केली गेली. डोक्यातून वर आलेला भाग हा उष्णीष असून सामान्य माणसापेक्षा त्याचा मेंदू हा खूप मोठा असल्यामुळे तो कवटीत न सामावता येण्याएवढा असावा हे दाखविण्यासाठी ही कल्पना केली गेली. त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे ते प्रतीक होय.
३.उर्णा- काही शिल्पांमध्ये हे लक्षण ठळकपणे दिसते. दोन भुवयांमध्ये कुंकवासारखा एक गोलाकार उंचवटा कोरलेला असतो. ते कुंकू नसून भगवान बुद्धाचा तो तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षु होय. सामान्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने असणाऱ्या त्यांच्या दिव्यदृष्टीचे ते प्रतीक मानले जाते.
३. लांब कान- खांद्यापर्यंत लांब असलेल्या कानाच्या पाळ्या. सामान्य मानवी चेहऱ्यापेक्षा वेगळेपण दिसावे हा त्याचा हेतू.
४. मानेवरती आडव्या रेषा - शिल्पामध्ये गळ्याभोवती कोरलेल्या या रेषांची संख्या सात असावी असा संकेत असतो. बुद्धाच्या या जन्मापूर्वीच्या सात जन्मांच्या पुण्याईचे ते प्रतीक होय. परंतु सर्वच मुर्तीवर हे आढळते असे नाही तसेच या रेषांची संख्याही कमी जास्त असते.
५. छातीवरील चिन्ह - काही मूर्तीच्या छातीवर त्रिरत्न हे चिन्ह कोरलेले दिसते. पुढील काळात हिंदू शिल्पकलेत हेच चिन्ह विष्णू मूर्तीच्या छातीवर कौस्तुभ मण्याचे प्रतीक म्हणून दिसते. (भृगु ऋर्षीनी झोपलेल्या विष्णूला उठविण्यासाठी लाथ मारल्यावर विष्णूने त्यांना "आपल्या पायाला इजा तर झाली नाही ना?" असे नम्रपणे विचारल्यावर ऋषींनी प्रसन्न होऊन त्रिरत्न विष्णूला दिले असे म्हणतात, जे विष्णुने छातीवर धारण केले).
६. आजानुबाहू - गुडघ्यापर्यंत लांब हात असणे हे महापुरुषांचे लक्षण मानले गेले असल्यामुळे काही उभ्या मूर्तीमध्ये याचे शिल्पांकन केलेले दिसते.
७) इंद्रिय निग्रह- हे लक्षण फक्त जैन मूर्तीमध्ये दिसते. ह्यामध्ये मूर्तीतील इंद्रिय अत्यंत लहान दाखवले जाते. इंद्रियविजयाचे ते लक्षण मानले जाते. बुद्ध प्रतिमेत वस्त्रे दाखविल्यामुळे हे लक्षण दिसत नाही.
ही सर्वच्या सर्व महापुरुषाची लक्षणे साऱ्याच मूर्तीमध्ये दिसतात असे नाही. यातील तीनच गोष्टी या चटकन नजरेत भरणाऱ्या असतात. डोक्यावरील उष्णीष, लांब कान, आणि काही ठिकाणी उर्णा किवा त्रिरत्न, गुप्त काळापासून यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे अर्थोन्मिलीत डोळे अणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न असे मंद स्मित.
बुद्ध प्रतिमेच्या मुद्रा :-
बुद्धाचे मूर्ती रूपातील शिल्पांकनात बसलेल्या स्थितीत कोरलेल्या मूर्तीमध्ये बुद्धाचे चारच प्रकार दिसतात आणि शिवाय झोपलेल्या अवस्थेत महानिर्वाण मुद्रा हा प्रकार दिसतो.१. ध्यान मुद्रा - या मुद्रेत भगवान बुद्ध हे ध्यान अवस्थेत दाखवलेले असून त्यांनी मांडी घातलेली असते. दोन्ही हात हे मांडीच्यामध्ये ठेवलेले असून एका तळव्यावर दुसरा तळवा ठेवलेला असतो.
२. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा - ह्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीचे कधी मांडी घातलेली तर कधी पाय खाली सोडलेले असे शिल्पांकन असते. यामध्ये दोन्ही हात छातीजवळ असून दोन्ही बोटांचे पंजे एकमेकाला चिकटलेले परंतु बोटे फाकलेली असतात किंवा काही शिल्पांमध्ये फाकलेल्या बोटांपैकी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीवर दिसतो. धर्माच्या रुतलेल्या चाकाला मी गती देतो आहे या त्यांच्या संदेशाचे स्मरण यातून केले जाते.
३. प्रवचन मुद्रा- ही मुद्रा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेप्रमाणेच असते. हातांच्या ठेवणीमध्ये त्यात थोडा फरक केलेला दिसतो. ज्यामध्ये डाव्या हाताची तीन किंवा चार बोटे अंगठ्याखाली मुडपलेली असून उजव्या हाताच्या मुठीने सुटी दोन बोटे किंवा करंगळी धरलेली असते. प्रवचन देताना धर्मतत्त्वांची बोटांवर मोजणी करतानाचे हे प्रतीक असते. या शिल्पामध्ये आसनाखाली हात जोडून बसलेले शिष्य आणि एक किंवा दोन हरिणे दिसतात. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला काही हरिणेही तेथे येऊन बसली होती असे सांगतात म्हणून हा हरिणांचा समावेश बुद्ध मूर्तीच्या शिल्पांकनात दिसतो. याशिवाय बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या खाली सिंह ही दाखवलेले असतात. हे सिंह त्यांच्या राजघराण्यातल्या जन्माची ओळख सांगतात.
भगवान बुद्धांच्या शिल्पांकनामध्ये एकीकडे संन्यस्त जीवन आणि एकीकडे राजपुत्र याचे मिश्रण करावे लागले. कुरळे केस आणि सिंह हे त्यांच्या संन्यस्त वृत्तीच्या विरुद्ध स्वभावाचे होते तसेच अत्यंत रुंद खांद्यांचे सुदृढ शरीर आणि चेहऱ्यावर मात्र समाधिस्त योग्याचे भाव यावर फर्ग्यूसन नामक अभ्यासकाने छान टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते हे शिल्पांकन म्हणजे अलंकार नसलेला राजा आणि स्मश्रू न केलेला संन्यासी. (In sculpture he is depicted as king without jewels, and a monk without tonsure.)
४. भूमिस्पर्श मुद्रा- गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली यावर तत्कालीन अनेक धुरिणांनी शंका घेतली. या प्रसंगाचे साक्षीदार कोण असे बुद्धांना वारंवार विचारण्यात येऊ लागले तेव्हा त्यांनी ही भूमीच माझी साक्षीदार आहे असे बसल्या बसल्या पटकन जमिनीला हात लावून म्हटले. नंतर गौतम बुद्धाची तपश्चर्या भंग करण्यासाठी मारानेही खूप प्रयत्न केले. परंतु ते सगळे विफल झाले. बुद्धाने आधीच्या जन्मात सात पारमिता पार केल्या होत्या याची साक्ष देण्यासाठी पृथ्वी आली. अशीही एक कथा या बद्दल सांगितली जाते. शिल्पांमध्ये ध्यान मुद्रेत मांडी घालून बसलेल्या बुद्ध मूर्तीचा डावा हात ठेवलेला असून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करताना दाखवले जाते.
५. महानिर्वाण मुद्रा- भगवान बुद्धांचा मृत्यू झाला त्या वेळेस त्यांच्या शेजारी त्यांचा आनंद शिष्य होता. शिल्पांमध्ये डोक्याखाली हात घेऊन उशीवर डोके ठेवलेली उजव्या किंवा डाव्या झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आढळते. निर्वाणासमयी भगवान बुद्धांचे वय जवळजवळ एंशी वर्षे असूनही या प्रकारच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा मात्र तरुणच दाखवला जातो. याशिवाय भगवान बुद्धांच्या बसलेल्या किंवा उभ्या मूर्ती दिसतात, ज्यामध्ये उजवा हात अभय आणि डावा हात बरद मुद्रेत किंवा डाव्या हातात भिक्षापात्र घेतलेले दिसते.
अन्य बौद्ध देवता :-
जसे हिंदूचे देव, त्यांचे अवतार आणि अनेक इतर प्रकार झाले, तसे बौद्ध पंथातही करणे आवश्यक झाले. भक्तिमार्गाच्या उदयानंतर वैचारिक स्तरावर आणि कलेतही जी घौडदौड सुरू झाली त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आवश्यक झाले. बुद्धाचे चोवीस अवतार मानले गेले आहेत. हे भूतकाळाचे बुद्ध मानले जातात यातील शेवटच्या सातांना मानुषी बुद्ध म्हटले जाते आणि यातील आठव्या मानुषी बुद्धाला 'मैत्रेय' असे म्हटले जाते, जो पुन्हा भविष्यात बुद्ध होणार असे मानले जाते. याशिवाय बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात.बोधिसत्त्व - शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. हे बोधिसत्त्व सृष्टीचा व्यापार सांभाळतात आणि आपले कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपात विलीन होतात. शिल्पांमध्ये दिसणारे प्रमुख बोधिसत्त्व म्हणजे वज्रपाणी, पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री.
चित्र क्र. १३५ : बोधीसत्व, लेणे क्र. ६ वेरूळ
वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो.
महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात (क्र. ६) हिचे पूर्णाकृती शिल्प आहे.
तारा- कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते.
१७. जैन प्रतिमा
महावीर :-
गौतम बुद्धांच्याच समकालीन असणाऱ्या भगवान महावीरांचा जन्म बिहारमध्ये कुंडग्रामी झाला (इ.स. १५९९ ते ५२७). आजच्या पटना या शहरापासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वैशाली गावाजवळ हे गाव आहे. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि मातेचे नाव त्रिशला होते. सिध्दार्थ हा वैशाली गणराज्याचा राजा होता. भगवान महावीराचे नाव वर्धमान होते. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला. सुरुवातीला त्याने अनेक गुरूंकडे राहून ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही. जुंभक नावाच्या गावात त्याने १२ वर्षे कठोर उपासना केली आणि आत्मविजय मिळविला. पुढील जीवनामध्ये त्याने बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूवरचा विजय हाच श्रेष्ठ आहे असा प्रचार केला. भगवान बुद्धाप्रमाणे त्याला नवीन पंथ स्थापन करावा लागला नाही. जैन पंथ हा त्याही आधीच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होता. वेद प्रामाण्य न मानणाऱ्यांचा हा पंथ होता. ज्याचा उल्लेख निगंठी (म्हणजे वेद न मानणारे) असा केला जात असे. केला.भगवान महावीरांच्या आधी या पंथाचे २३ तीर्थकर (धर्मप्रमुख) होऊन गेले. महावीर हे या पंथांचे २४ वे तीर्थंकर होते. भगवान महावीरांचे योगदान दोन स्तरांवर होते. त्यांनी जैन पंथांमध्ये श्रमण संस्थेची प्रतिष्ठापना केली. ज्यामध्ये नवागत उपासकांपासून ते मुनीपर्यंत श्रेणी स्थापन केली. याशिवाय महिलांना आणि समाजातील सर्व स्तरांच्या लोकांना पंथात सामावून घेतले. त्यांचे स्वतःचे जीवन हे अत्यंत कर्मठ असल्यामुळे तीच वृती अनुयायांमध्ये आणि पंथांमध्ये आचरणात राहिली. त्यांचे दूसरे योगदान हे वैचारिक राहिलेले आहे. त्यांनी अहिंसा ही अत्यंत आग्रहाने सांगितली आणि तीसुद्धा इतक्या पराकोटीची की सुक्ष्म जंतुंची देखील हत्या निषिद्ध ठरवली. इतकेच नाही तर जिवंत वनस्पती किंवा त्यापासून बनवलेली उत्पादनेही निषिद्ध ठरवली. याचबरोबर सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य याही बाबतीत ते भयंकर आग्रही होते तसेच सर्व उपासकांनीही असावे असा त्यांचा कटाक्ष आणि आग्रह होता. परंतु भगवान महावीरांनी सगळ्यात मोठे योगदान हे त्यांच्या पाचव्या तत्त्वामध्ये त्यांनी सांगितले ते म्हणजे अपरिग्रह, याचा अर्थ काटकसरीने जीवन जगणे. स्वतःसाठी किंवा कुटुंब पोषणासाठी आवश्यक तेवढाच धनधान्न जो इतर चीज वस्तूंचा संग्रह करावा यापेक्षा अधिक एका टाचणीचाही मोह किंवा संग्रह असतां कामा नये. तसेच विलासी आणि सुखासीन जीवनाची लालसा ठेवू नये.अपरिग्रह हा जरी त्यांनी जैन पंथांच्या लोकांसाठी सांगितला असला तरी तो इतका व्यवहारी होता आणि त्याबरोबरच संयमित जीवन आचरणात आणण्यासाठी आवश्यक असा मार्गदर्शक संदेश होता की, ज्यामुळे संपूर्ण भारतातल्या सर्व समाजावर त्याचा प्रभाव पडला. ज्याचा परिणामस्वरुप आपल्या देशांमधील मोठ्या प्रमाणात असणारा एक गट ज्याला आर्थिक दृष्ट्या मध्यम वर्ग असे म्हणतात. तो समाज आपले उत्पन्न पाहून त्याप्रमाणे सीमित व्यय करू लागला. इतकेच नव्हे तर सतत अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न करत राहिल्यामुळे आजही सर्व स्तरांमध्ये थोडीफार बचत केल्याचे दिसते. जगातील अन्य देशातही असे आर्थिक गट असले तरी ही बचतीची भारतीय सवय त्यांच्यात दिसत नाही. आधुनिक जगाच्या प्रचंड आर्थिक उलथापालर्थीमध्ये अनेक देश लयाला जाताना दिसत आहेत, परंतु भारत मात्र त्या धक्क्यांमध्येही तग धरून राहिलेला दिसतो. शतकानुशतके साधी राहणी आणि बचत करण्याची सवय याचे श्रेय महावीराना द्यावे लागेल. अपरिग्रहाचा संदेश आधुनिक काळामध्ये मात्र विस्मरणात दिसतो. तर जैन बधूच्या आचरणात त्याचा लवलेशही दिसत नाही. असे असूनही सढळ हस्ते दान करावे या भगवान महावीरांच्या शिकवणीचे मात्र पालन करण्याची अधुनिक काळातही दिसते. आजही लोककल्याणकारी कामांसाठी सर्वात मोठी दाने ही जैन समाजातील लोकांकडूनच येताना दिसतात. भगवान महावीरांनंतर हजारो वर्ष अव्याहतपणे हा पंथ आपले अस्तित्व टिकवून आहे याचे सर्व श्रेय भगवान महावीरांना जाते.
शिल्पकलेप्रमाणे जैन शिल्पकला ही प्राचीन आहे. अनेक राजे त्या वेळेस जैन पंथाचा स्विकार करत होते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ओडीशा प्रांतात खारवेल नावाच्या राजाचे राज्य होते. उदयगिरी आणि खंडगिरी येथे त्या काळातील जैन लेणी आपल्याला आढळतात, भगवान महावीरांनीही त्यांची शरीर किंवा मूर्तिरूपात पूजा करू नये असे सांगितले होते. त्यामुळे त्या प्राचीन लेण्यांमध्ये भगवान महावीरही प्रतीकात्मक रूपात दिसत. इ.स.च्या सातव्या आठव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा र्हास झाला. त्या वेळेस जैन पंथ सावध झाला. बौद्धांनी केलेल्या चुका त्यांनी कटाक्षाने टाळल्या. जैन आचरण तर निर्दोष होतेच परंतु बौद्धांप्रमाणे त्यांनी जनसंपर्कही तुटू दिला नाही. भक्तिमार्गाच्या मुळे हिंदू देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात घडू लागल्यामुळे जैनांनाही त्या स्पर्धेमध्ये उतरावे लेगी कोरण्याबरोबरच हिंदूप्रमाणे दगडातील मंदिरेही बांधण्यास त्यांनी सुरुवात केली ज्यामध्ये भगवान महावीरांसकट अन्य तीर्थंकर आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीही बसविण्यात येऊ लागल्या.
जैन पंथाला दुहीचा शाप मात्र आधीच लागला होता. या विभिन्न देवदेवतांच्यामुळे त्याच्यात भर पडली. याची सुरुवात झाली होती ती सम्राट चंद्रगुप्ताच्या कालखंडात. चाणक्याने राज्य स्थापन करून दिल्यानंतर चंद्रगुप्ताने ते इ.स.पू. ३०० पर्यंत चालवले. परंतु त्याच्या अंतिम काळात बारा वर्ष सलग दुष्काळ पडला. त्या वेळेस मगध राज्यातील जैन मुनी जे केवळ भिक्षेवर जगत त्यांचे जगणे तिथे कठीण झाले म्हणून त्यांना दक्षिण भारताकडे जावे लागले. दिगंबर अवस्थेतील जैन मुनी है मगधमध्ये परीचित होते. परंतु दक्षिण भारतात मात्र समाजाने त्यांना स्वीकारले नाही. अखेर तडजोड करुन त्यांनी केवळ कमरेभोवती एक श्वेत वस्त्र गुंडाळायला सुरुवात केली. दुष्काळ संपल्यावर जेव्हा हे जैन मुनी मगध मध्ये परत आले तेव्हा तेथील जैन संघानी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. यातुन प्रथम दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ जैन संघात झाले. पुढे यामध्ये भरच पडत गेली. अनेक उपपंथ आणि उपशाखा अस्तित्वात आल्या. या सर्वांची स्वतंत्र देवालये आणि अन्य शिल्पेही अस्तित्वात आली. त्यामुळे दहाव्या शतकानंतर बांधल्या गेलेल्या अनेक जैन मंदीरामध्ये असंख्य प्रकारच्या देव प्रतिमा दिसतात. त्यांचे अत्यंत क्लिष्ट वर्गीकरण आणि नामांकन मूळे त्यांची ओळख पटणेही कठीण होऊन जाते. इतकेच नाही तर यामध्ये अनेक हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांचाही थोडे फार फरक करून समावेश केलेला दिसतो. तर काही ठिकाणी सुरसुंदरी, नर्तकी आणि नायिकांचेही शिल्पांकन आढळून येते.
जैन शिल्पकला :-
जैन शिल्पकलेमध्ये सर्वात प्रमुख शिल्पांकन हे भगवान महावीर आणि इतर तीर्थंकरांचे असते. यांच्या शारीररूपातील मूर्ती बौद्ध मूर्तीप्रमाणेच असून त्यामध्ये काही ठिकाणी उष्णीष तर काही ठिकाणी केवळ केशविहीन डोके असते. लांब कान, ऊर्णा, श्रीवत्स आणि आजानुबाहू ही लक्षणे त्यात दिसतात. तर उभ्या मूर्तीमध्ये दिगंबर
चित्र क्र. १४० : बाहुबली, जैन लेणे, वेरुळ
मूर्ती असल्यामुळे सातवे महापुरुष लक्षणही दिसते (पाहा महापुरुष लक्षणे - बुद्ध मूर्ती), भगवान महावीरांच्या किंवा तीर्थंकरांच्या सर्वतोभद्र मुर्ती दिसतात. एकाच दगडात कोरलेल्या ज्यामध्ये चारही बाजूंना एकमेकांकडे पाठ केलेल्या चार मूर्तींचे संयुक्त शिल्प असते. महामायेच्या स्वप्नाप्रमाणे भगवान महावीरांच्या आईलाही हत्ती स्वप्नात दिसल्याचे शिल्प आढळते.
वेरुळमधील जैन प्रतिमा :-
वेरुळची जैन लेणी (इ.स. ९-१० शतक) दिगंबर पंथियांची असून त्यात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर (बाहुबली), मातंग आणि सिद्धाविका अनेक शिल्पे दिसतात. यातील लेणी क्र. ३२ इंद्रसभा असे म्हटले जाते.त्याच्या वरच्या मजल्यावर सिंहावर बसलेली सिद्धायिकेची भव्य मूर्ती आहे. तिच्याजवळ तिचे मूल असते. ते तिच्या बसलेले असून तिच्यामागे आम्रफळांनी बहरलेला वृक्ष, त्यावरील पक्षी आणि माकडेही आहेत. देगलूरकरांच्या मते, "इतकी सुरेख प्रतिमा अन्यत्र क्वचित पाहायला मिळते. कुरळ्या कपाळावरील महिरप धनुष्याकृती भुवया, सरळ धारदार नाक, कोमल ओठ, आकर्षक हनुवटी, शंखाकृती गळा, गोल व डौलदार खांदे, मृग स्तन, नितळ पोट, गजशुंडवत निमुळत्या मांड्या- यामुळे ती यक्षिणी असू शकते. सामान्य स्त्री नव्हे याची खात्री पटते' (देगलूरकर : २००८). समोरील कोनाड्यामध्ये हत्तीवर बसलेल्या मातंग या जैन देवतेचे असेच भव्य शिल्प आहे. त्याच्या मागे वडाचे झाड आहे. हा देव हत्तीवर आरूढ असल्यामुळे याला चुकून इंद्र समजले गेले. लेणीचे नाव इंद्रसभा असे दिले गेले.

क्र. १४२ मतंग, जैन लेणे. वेरूळ
मंदिरे :-
जैन मंदिरे- संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी जैन आढळतात. यातील काही ठिकाणे ही स्थानमाहात्म्यामुळे अधिक प्रचलित झाल्यामुळे तेथे अनेक नव्या मंदिराचेही बांधकाम झालेले आढळते. उदा., पालिताना (गुजरात) येथील मंदिर समूह. भारतातील प्रसिद्ध जैन मंदिरामध्ये राजस्थानमध्ये माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर, गुजरातमधील तारंगा येथील अजितनाथाचे मंदीर आणि खजुराहोमधील जैन मंदिरे यांचा समावेश प्रामुख्याने होतो. दिलवाडा आणि राणकपुरच्या मंदिरातील शिल्पकला ही संगमरवरी दगडात केली असून दिलवाड्यातल्या कोरीव कामाची जगप्रसिद्ध आहे. तारंगा (गुजरात) येथील मंदिर हे १०-११ व्या शतकातील असून त्याची उंची १०७ फुटाहून अधिक आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर शेकडो शिल्प असून जैन शिल्प कलेतील देवीदेवतांचे अनेक प्रकार तर येथे दिसतातच परंतु काही अन्य विशेष शिल्पेही येथे आहेत. यामध्ये भुजंगत्रासित अभिसारिकेच्या शिल्पाचा उल्लेख करावा लागेल. प्रियकराला भेटायला निघाली असताना सापाची सळसळ ऐकू आल्यामुळे घाबरून तिने तिचा डावा पाय उचललेला असून भेदरलेल्या नजरेने ती त्या सापाच्या दिशेने पाहत आहे. या प्रकारच्या अभिसारिकेचे हे अत्यंत दुर्मिळ शिल्प येथे दिसते.
चित्र क्र. १४३: जैन मंदिर, तारंगा, गुजरात
खजुराहोमधील जैन मंदिरापैकी आदित्यनाथाचे मंदिर हे आधीचे हिंदू मंदिर असावे असे वा कारण त्याच्या बाहेरील मूर्तिकामामध्ये सर्व हिंदू देवदेवतांच्याच मूर्तीचे शिल्पांकन आहे. शेजारील पार्श्वनाथाच्या मंदिरांवर शिल्पांकन खजुराहोच्या अन्य मंदिराप्रमाणे असून त्यात अनेक देवदेवी दिसतात. या दोन्ही मंदिरांवर कामशिल्पे मात्र अजिबात नाहीत. पायातील घुंगरू बांधणार्या नर्तकीचे खजुराहोमधील प्रसिद्ध शिल्प आदित्यनाथाच्या मंदिराच्या उत्तर भिंतीवर आहे.
१८. सुरसुंदरी (भाग १)
क्र. १४४: डालमालिका, खजुराहो
प्राचीन मंदिरात आपल्याला देवातांच्याच एव्हढ्या संख्येनी आणि त्याच आकारमानाची अनेक शिल्पेही दिसतात. त्यामध्ये सप्तमातृकांव्यतिरिक्त योगिनी, कंदुक क्रीडा करणाऱ्या, सापाशी खेळणार्या किंवा सापाच्या वेटोळे अंगावर असणाऱ्या, माकड, मुंगुस, पोपट, मोर इत्यादी प्राणी किंवा पक्षी यांच्यासह असणाऱ्या, तसेच विविध भावमुद्रांमध्ये उभ्या असलेल्या स्त्रियांची अनेक शिल्पे आतात. या पैकी वादन करणाऱ्या स्त्रीशिल्पांना मर्दला असे म्हणतात. नृत्यमग्न शिल्पे नर्तकींची असून अनेकदा मरतमुनीच्या नाट्यशास्त्रात ज्यांना 'करण' म्हणतात त्या नृत्यमुद्रांमध्ये त्या कोरलेल्या असतात. (दाते: २०१०,३९) याशिवाय ज्या आणखी एक प्रकारच्या स्त्रीयांचे शिल्यांकन आढळते ज्यांना सुरसुंदरी म्हटले जाते.
सुरसुंदरी म्हणजे अप्सरा किंवा पऱ्या असा समज आहे. शिल्पशास्त्राच्या ग्रंथांमध्येही यांच्यावर थोडे लिखाण झाल्याचे आढळते. शिल्पप्रकाश, क्षीरार्णव अशा ग्रंथात यांचे अनुक्रमे १६ आणि ३२ प्रकार सांगिलते आहेत. आपल्यातील विकार नाहीसे व्हावेत, त्यांचे दमन व्हावे, जीवनदृष्टी निर्मल व्हावी तसेच आपल्या तत्त्वज्ञानातल्या काही गोष्टी सूचकपणे सांगण्याच्या उद्देशाने यांचे शिल्पांकन केलेले असते. ( देगलूरकरः २००४, पृ. ५-६) सगळ्याच मंदिरातील शिल्पांमध्ये त्या असतात असे नाही. वेरुळमध्ये तर त्यापैकी एकही आढळत नाही तर खजुराहो येथील मंदिरात त्या शेकड्याने कोरलेल्या आहेत. परंतु सर्वसाधारणपणे दहाव्या शतकानंतर बांधलेल्या मंदिरात त्या ठळकपणे दिसतात. काही वैशिष्ट्यपूर्ण सुरसुंदरींचे प्रकार आणि सामान्यतः अनेक मंदिरात दिसणारी त्यांची शिल्पे खालीलप्रमाणे आहेत.
शुभगामिनी-
जया, पद्मगंधा आणि डालमलिका -
पत्रं पुष्यं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥ (भगवद्गीता ९-२६)
मंदिरात जाताना देवासाठी काहीतरी घेऊन गेले पाहिजे. धन किंवा अन्य नैवैद्य नसेल तर फळे किंवा फुलेसुद्धा चालतात याची आठवण करून देणारी सुरसुंदरी म्हणजे डालमलिका.

चित्र क्र. १४६ : डालमलिका, खजुराहो
उजवा हात उचलून ती झाडावरून पाने तोडताना किंवा फुले काढताना शिल्पात दिसते. ज्या सुरसुंदरीच्या हातामध्ये कमळाचे फूल किंवा कळी असते तिला 'पद्मगंधा' म्हणतात आणि जिच्या हातात पोटाजवळ किया एका हाताने खांद्याजवळ घरलेला कलश असतो तिला 'जया' असे म्हणतात.
क्र. १४७ : आलसकन्या, खजुराहो
आलसिका किंवा आलस कन्या-
चित्र क्र. १४९ : पुत्रवल्लभा, खजुराहो
पुत्रवल्लभा -
माकड आणि स्त्री-
चित्र क्र. १५०: माकड आणि सी, रानी की बाव, पाटन
या मालिकेतील अत्यंत कल्पक शिल्प खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरात पाहायला मिळते. एका पुरुषाच्या हातात एक काठी आहे, जिचे समोरचे टोक आकड्यासारखे वाकलेले आहे. त्याच्या कुटील मनाचे ते सूचक आहे. त्या वाकड्या टोकाला प्रलोभन समजून त्याच्याशी ते माकड खेळते आहे. माकडाला घाबरून एक तरुणी त्याच्या जवळ आली आहे. ती थोड्या भीतियुक्त कुतूहलाने माकडाकडे पाहाते आहे. आयत्या हातात आलेल्या संधीचा फायदा घेत त्या पुरुषाने डाव्या हाताने तिच्या कमरेला विळखा घातला आहे. हे शठ नायकाचे शिल्पांकन असून कलाकाराने त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर अत्यंत , मिस्कील भाव दाखवलेले आहेत.
चित्र क्र. १५१ : माकड आणि पुरुष खजुराहो
१९. नायिका
चित्र क्र. १५२ : दर्पणा, खजुराहो
मंदिरावरील शिल्पांमध्ये ज्ञान, विज्ञान (इथे विज्ञानाची व्याप्ती ही ब्रह्मांडशास्त्र या विषयापुरतीच निगडीत आहे), तत्त्वज्ञान यावर आधारित शिल्पांमधून आपल्या देशातील श्रेष्ठ ज्ञान परंपरेचे जतन कसे केले गेले हे आपल्याला कळते तसेच त्या ज्ञानाची व्याप्ती आणि प्रगल्भताही कलाकारांच्या तपश्चर्येतून साकार झालेली दिसते.
ज्ञानशाखांइतकीच साहित्याची देखील एक अत्यंत समृद्ध परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे, ज्यामध्ये कथा, काव्य आणि नाट्य यांचे देखील विपुल लेखन झालेले दिसते.
या समृद्ध साहित्य परंपरेचे शिल्पांकन मंदिरावरील सर्वस्पर्शी शिल्पकलेत न दिसते तरच नवल वाटले असते. अगदी प्राचीन लोकसाहित्यापासून ते संस्कृतमधील अभिजात साहित्यात प्रेम, बिरह आणि पुनर्मीलन हे कथानकाचे आधारभूत स्तंभ राहिले आहेत. याशिवाय यामध्ये खलनायक, विदूषक, दूत किंवा दूती अशा पात्रांचाही भरणा असतो. यामध्ये नायक जरी कथेचा केंद्रबिंदू असता तरी नायिकेच्या भावभावनांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. नायिकांप्रमाणे नायकांच्याही प्रकारांचे वर्णन केलेले आढळते. वात्स्यायनाने नायकाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये शश, वृष आणि अश्व यांचा समावेश होतो. परंतु हे त्यांच्या स्वभाव विशेषांप्रमाणे नसावे असे वाटते, नागरिक था अर्थाने नायक असल्यास त्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. उत्तम, मध्यम आणि नीच. त्यांच्या गुणांप्रमाणे त्यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे आणि त्यातील उत्तम नायक म्हणजे जो कुशल, विद्वान तसाच सदव्यवहारी आहे. त्याला ६४ कलांचे ज्ञान आहे आणि ज्याच्या गुणामुळे त्याच्यावर स्त्रिया भाळतात. पुढील साहित्यात हरिहर याच्या मते भद्र, दत्त, चुमार आणि पांचाल हे नायकांचे चार प्रकार सांगितले आहेत. या वर्णनामुळे कथेमधील नायक हा बरेच वेळेला धीरगंभीर किंवा धीरउदात असाच रंगवला जाई. परंतु याशिवाय स्त्रीला वश करण्यासाठी अनेक खोट्यानाट्या युक्त्या किंवा प्रसंगी थोडे कपटही करणाऱ्या नायकाला शठ नायक म्हणत. (वाकड्या काठीने माकडाशी चाळे करणारा) नायकांच्या प्रकारांमध्ये पती, उपत्ती, वैषिक हे प्रकार दिसतात, तर त्यांच्या स्वभावानुसार दक्षिण, भ्रष्टा (धूर्त), शठ (प्रच्छन्न, प्रकाश), मानिन, चतुर (वाकःचातुर, क्रियाचातुर) असे नायकांचे प्रकार आढळतात. याशिवाय त्यांच्या काही अवस्थांचे वर्णन केले आहे. त्या म्हणजे प्रोषित, आमिलीत, विरहीन इ. नायकांबरोबरच त्यांच्या साहाय्यकांचेही वर्णन दिसते. कथेमध्ये आणि रंगमंचावर ही पात्रे सूत्रधार, विदूषक किंवा सेवक अशा भूमिकांमध्ये वावरतात. तर अनेक वेळा प्रमुख शिल्पाच्या खालील आकृतीत हे साहाय्यक म्हणून दिसतात. ह्यांचे पीठमर्द, विट, चेट आणि विदूषक असे चार प्रकार सांगितले आहेत. तसेच नायकांच्या मानसिकतेप्रमाणे एक वर्गीकरण दिसते ज्याचे चार प्रकार श्रावणानुरागी, दर्शनानुरागी, चित्रानुरागी आणि स्वप्नानुरागी हे होत (राय: १९८३).
यातील अनेक नायक त्यांच्या ह्या वैशिष्ट्यांसह शिल्पांमध्ये दिसतात. परंतु कथा कादंबऱ्यांमध्ये शब्दात वर्णन केले असल्यामुळे ते पात्र आपल्या डोळ्यासमोर सहज उभे राहते. शिल्पकलेत मात्र हे सर्व ज्ञात असले तरी दर्शकांना शिल्पातील नायक किंवा नायिका कुठल्या भावमुद्रेत किंवा भूमिकेत आहेत हे हुडकून काढावे लागते.
स्वभावाप्रमाणे वात्स्यायनाने नायिकांचे तीन भेद सांगितले आहेत. ज्यामध्ये मृगी, बडवा आणि हस्तिनी यांचा समावेश आहे. मृगी ही अत्यंत भावनाप्रधान असते, ती प्रेमकुशल असून मत्सराला भिणारी असते. बडवा ही गोड आवाजाची, सहानुभूत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची असते. मत्सराचे भय तिलाही असते. हस्तिनी ही बडबडी, रागीट आणि अत्यंत आतल्या गाठीची असते. वात्स्यायनाने त्यांच्या शरीर भेदाप्रमाणेही वर्गीकरण केलेले आहे. ज्यामध्ये पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी यांचा समावेश होतो. परंतु ही वर्णने त्यांच्या शारीरिक अवस्थांची वाटतात. कथेमधील भूमिके अनुसार किंवा विशिष्ट प्रसंगी होणाऱ्या मानसिक अवस्थेप्रमाणे जो स्त्री मनाचा वेध घेतला गेलेला आहे, त्या वर्गीकरणाला अष्टनायिका असे सर्व साधारणपणे संबोधले जाते. यांचाही उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये दिसतो. वात्स्यायनाचे कामसूत्र, अनंगरंग, नगरसर्वस्व, रतिमंजरी, रतिरत्न, प्रदीपिका, रतिरहस्य, समर दीपिका हे सगळे कामशास्त्रावरील ग्रंथ असले तरीही त्यातही नाविकांची वर्णने आणि नायिकाभेद सविस्तरपणे दिलेले आढळतात. शृंगाररसप्रबंध दीपिका तसेच कालिदासाचे रघुवंश, मेघदूत आणि शाकुंतल यामध्ये या नायिकांची नावे. त्यांचे प्रकार आणि उपप्रकारांची तपशीलवार वर्णने आढळतात.
आठ प्रमुख नायिका, दोन उपनायिका आणि त्यांचे विविध प्रकार यातून या नायिकांचे पाचशे अधिक प्रकार होऊ शकतात.
नायिका आणि त्यांचे भेद :-
साधारणतः अष्टनायिका म्हणजे नायिकांचे आठ प्रकार हे सर्वांना परिचित किंवा ऐकून माहिले असतात. प्राचीन साहित्यात मात्र त्यांचे फारच खोलात जाऊन वर्गीकरण केले गेले होते असे आढळते राम कुमार राय यांनी नायिकांचे ९ प्रमुख प्रकार सांगितले असून त्यांनी त्यांचे तपशिलात पृथक्करण करून त्यांचे विस्तृत वर्गीकरणही केले आहे. यांच्या मते ते वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.प्रमुख प्रकार उप प्रकार
१. स्वाधीनपतिका : १. दूतीवंचिका २. भाविशंकिता
२. वासकसज्जिका : १. अवसितप्रवासपतिका
३. विरहोत्कंठिता: १. कार्यविलंबिता (५ प्रकार) दर्शन अनुतापिता, श्रवण-अनुतापिता, चित्र- अनुतापिता, स्वप्न अनुतापिता आणि
अनुत्पन्न - संभोग
४. विप्रलब्धा : १. नायकवंचिता २. सखीवंचिता
५. खंडिता : १. मानावती (३ प्रकार) गुरुमाना, मध्यमाना, लघुमाना २. धीरा ३. अधारा ४, धीराधीरा ५ अन्यसंभोगदुःखिता (४
प्रकार) दूतीसंभोगदुःखिता, दूतीसमासक्तिदुःखिता, इतररतिश्रुतिखिन्ना, ईर्ष्यागर्विता
६. कलहान्तरिता : १. ईर्ष्याकलहान्तरिता २. प्रणयकलहान्तरिता
७. वक्रोक्तिगर्विता : १. प्रेमगर्विता २. सौंदर्यगर्विता (४ प्रकार) स्मितगर्विता, यौवनगर्विता, सौकुमार्यगर्विता, विलासगर्विता ३.
सौभाग्यगर्विता, ४. नैपुण्यगर्विता
८. प्रोषितभर्तृका : १. प्रवस्थपतिका (१ प्रकार) विगलितप्रस्थानपतिका २. प्रवसतपतिका ३. प्रोषितापतिका (१ प्रकार) सख्यनुतापिता
९. अभिसारिका : १. ज्योत्स्ना अभिसारिका २. तमो अभिसारिका ३. दिवा अभिसारिका ४. गर्व अभिसारिका ५. काम अभिसारिका ६. प्रेमवाक्य अभिसारिका
वरील सर्व प्रकारच्या नायिकांचे त्यांच्या वर्तणुकीनुसार उत्तमा, मध्यमा आणि अधमा असे ३ प्रकार असतात. उत्तमा म्हणजे शालीन, मध्यमा म्हणजे थोडी मोकळी आणि अधमा म्हणजे उत्तान आणि उच्छृंखल अशी नायिका. तसेच या नायिकात, स्वीया, परकीया आणि सामान्या असे ३ उपप्रकार असतात, स्वीया ही पत्नीच असते तर परकीया ही प्रेयसी किंवा अन्य कुणाची पत्नी असु शकते. सामान्या म्हणजे गाव भवानी. या उपप्रकारच्या नायिकांचेही वर्गीकरण केले गेले हैं खालीलप्रमाणेः
स्वीया नायिका (३ प्रकार) १. मुग्धा, २. मध्या आणि ३. प्रगल्भा. त्याशिवाय या सर्वांचे ज्येष्ठा आणि कनिष्ठा है दोन प्रकार असतात.
मुग्धा नायिका (२ प्रकार) १. ज्ञातयौवना २. अज्ञातयौवना (२ प्रकार नवोढा आणि विश्रब्धा)
मध्या नायिका : (२ प्रकार) १. प्रच्छन्नमध्या २. प्रकाशमध्या यांचे धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.
प्रगल्भा नायिका (३ प्रकार) १. स्वीया (हिचे २ प्रकार रतिप्रीतिमति आणि रत्यानंदप्रवषा) २. परकीया ३. प्रगल्भा यांचेही धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.
• परकीया नायिका : (२ प्रकार) १. कन्या २. परोधा
परोधा नायिका : (२ प्रकार) उद्धा आणि उद्बोधिता
उदुद्धा नायिका : (३ प्रकार) गुप्ता, निपुणा (स्वयं दूती) आणि लक्षिता
गुप्ता नायिका : (३ प्रकार) वृत्त सुरत गोपन, वर्तिष्यमान सुरत गोपन आणि वृत्त- वर्तिष्यमान सुरत गोपन
निपुणा नायिका : (३ प्रकार) वाण निपुणा, क्रिया निपुणा आणि रतिवंचना निपुणा
लक्षिता नायिका : (२ प्रकार) प्रच्छन्न लक्षिता आणि प्रकाश लक्षिता
प्रकाश लक्षिता : (४ प्रकार) कुलटा, मुदिता, अनुशयाना आणि साहसिका
अनुशयाना नायिका : (३ प्रकार) विघटितसंकेता, अप्राप्तभाविसंकेता आणि शंकितसंकेता- जारागमना
३. सामान्या नायिका : (४ प्रकार) १. स्वतंत्रा २. जनन्यधीना ३. नियमिता ४. कल्पितानुरागा (राय: १९८३)
स्वाधीनपतिका, वासकसज्जिका, विरहोत्कंठिका, विप्रलब्धा, खंडिता, कलहान्तरिता, प्रोषितभर्तृका आणि अभिसारिका या आठ प्रमुख नायिका आपल्याला परिचित असतात. वक्रोक्तीगर्विता ही नववी नायिका गणली जाते. याशिवाय विशेषतः शिल्पांमध्ये दहावी मुग्धा ही एक उपनायिका तिच्या तरल भावदर्शनामुळे अत्यंत लोकप्रिय आहे.
नायिकांच्या या प्रकारांचे अधिक वर्गीकरण केले गेले आहे. त्यात सामान्या, स्वीया आणि परकीया हे प्रमुख प्रकार, यातील स्वीया प्रकारची नायकी हि नायकाची पत्नी असते. परकीया हि प्रेयसी किंवा अन्य स्त्री असते. क्वचित प्रसंगी दुसऱ्याची पत्नी किंवा परस्त्री सुद्धा असू शकते तर सामान्या नायिका हि गणिका किंवा वरांगणा असते. ( उदा. वसंतसेना ) या भेदाशिवाय नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्या उत्तमा, मध्यमा, अधमा अशाही असतात. याशिवाय नायिकांच्या वयोगटाप्रमाणे सुध्दा त्यांचे वर्गीकरण असून, बाला, तरुणी, प्रौढा, वृद्धा (प्रगल्भा) असेही त्यांचे चार प्रकारचे वर्गीकरण केलेले आढळते. त्यामुळे या सर्वांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्यांच्या शेकडो छटा मंदिरातून दिसतात.
स्वाधीनपतिका-
सुरतातिरसेर्बद्धो यस्याः पार्श्वे तु नायकः ।सान्द्रामोद्गुणप्राप्ता भवेत् स्वाधीनभर्तुका ।। (नाट्य शास्त्र २४ पा. २१४)
चित्र क्र. १५३ : स्वाधीनपतिका, खजुराहो
उचिते वासके या तु रतिसम्भोगलालसा ।
मण्डनं कुरुते द्रष्टा सा वै वासकसज्जिता ।।
(नाट्यशास्त्र २४ पा. २१२)
नायकाच्या आगमनाची वार्ता कळल्याने साजशृंगार करून अत्यंत अधीरतेने नायकाची प्रतीक्षा करणारी, रतीक्रीडेसाठी उत्सुक असलेल्या नायिकेस 'वासकसज्जीका' असे म्हणतात.
ही नायिका पूर्ण नट्टापट्टा करून घरीच प्रियकराची वाट पाहत असते. शिल्पांमध्ये ती उभी कोरलेली असून तिच्या हातातला आरसा तिने तीच्या खाली सोडलेल्या सरळ हातात धरलेला असतो. साजशृंगार नुकताच पूर्ण झाल्याचे ते लक्षण असते. खजुराहोमधील खंडारिया महादेव मंदीरावरील शिल्पात तिने डाव्या हातातला आरसा खाली धरला असून उजवा हात भुवयांवर ठेवून दूरवर नजर लावलेली आहे. भुवयांमधील आठीमुळे तिची उत्कंठाही स्पष्ट दिसते. (पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, बायकांचा मेकअप पूर्ण होईपर्यंत कोणी आपल्याला पाहू नये असे त्यांना वाटते, मग त्याला कितीही वेळ लागो. परंतु तो पूर्ण झाल्याबरोबर लगेचच सगळ्यांनी आणि विशेषतः 'ह्यांनी' पाहून कौतुक करावे ही अपेक्षा असते.) अन्य काही शिल्पांमध्ये घराच्या सज्जावर उभी असलेली दूरवर नजर लावून बसलेली आणि कानातील डुलांशी किंवा गळ्यातील माळेशी चाळा करताना ती शिल्पांमध्ये दिसते.
चित्र क्र. १५४: वासकसजिका, खजुराहो
विरहोत्कंठिता-
अनेककार्यव्यासङ्गाद्यस्या नागच्छति प्रियः ।तद्भागतदुःखार्ता विरहोत्कंठिता तु सा ।। (नाट्य शास्त्र २४ षा. २१३)
जिच्यापासून प्रियतम लांब गेला असल्यामुळे त्याची ती आतुरतेने वाट बघत असे. अनेक शिल्पांमध्ये ही नायिका थोडी उदास असते.
चित्र क्र. १५५ :दिशोत्कंठिता, खजुराहो
खजुराहोमधल्या जैन मंदिरावर ह्याचे एक उत्कृष्ट स्पष्ट शिल्प आहे. या शिल्पामध्ये प्रियकराचे तिला पत्र आले असून तो येणार असल्याची वार्ता कळल्यामुळे एका हातामध्ये पत्र आणि दुसरा हात तिने छातीवर ठेवला असून चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे दिसतो.
विप्रलब्धा-
यस्या दूर्ती प्रियः दत्वा संकेतमेव वा ।नागतः कारणेनेह विप्रलब्धा तु सा भवेत् ।।
(नाट्य शास्त्र २४ पा. २१७)
ही नायिका संकेत स्थळाला आधी पोचते परंतु तिथे तिचा प्रियकर मात्र पोचलेला नसतो. ती त्याची वाट पाहत असते. या नायिकेच्या अनेक छटा आपल्याला शिल्पांमध्ये दिसतात. गतभेटीच्या स्मृतीत हरखून जाऊन मंद स्मित करीत असताना ती दिसते तर कुठे दूतीने पत्र दिले असेल का? या विचाराने शंकित असणारी, तर एका ठिकाणी वाट पाहून कंटाळा आल्यामुळे हाताने आळस देत चिडलेली अशीही दिसते. (पानगाव, जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) चिडलेल्या नायिकेचे उत्कृष्ट शिल्प आहे. जगत (राजस्थान) येथील देवी मंदिरातील (१० वे शतक) एका शिल्पात ती आपल्या सखी बरोबर संकेत स्थळाला पोचलेली दाखवलेली असून तिने प्रियकरासाठी एक मोठे फूल आणलेले असते. तो न आल्यामुळे चिडून जाऊन ती फुलाच्या पाकळ्या खुडताना दाखविले आहे.
चित्र क्र. १५६ : विप्रलब्धा, राजारानी मंदिर, ओडिशा
खंडिता-
व्यासङ्ङ्गादुचिते यस्या वासके नागतः प्रियः ।
तदनागमदुःखार्ता खण्डिता सा प्रकीर्तिता ।।
(नाट्य शास्त्र २४ पा. २१६)
चित्र क्र. १५७ : खंडिता, रानी की वाव, पाटण
प्रियकराची आपल्याच घरी किंवा अन्यत्र कुठेही वाट पाहून ती आल्यामुळे निराश झालेली नायिका. खंडित नायिकेचे बारा प्रकार सांगितले आहेत. त्यातला सर्वात दुःखदायक प्रकार म्हणजे तिच्याऐवजी अन्य दुसऱ्या स्त्रीकडे नायक गेल्यामुळे तिचा विश्वासघात झाल्यामुळे दु:खी झालेली नायिका. शिल्पांमध्ये याचे अनेक प्रकार कल्पकतेने कोरलेले दिसतात. नायकाची वाट पाहाणार्या नायिकेला त्याचे पत्र येते. ज्यात त्याने लिहिले असते की तो आज येऊ शकत नाही. एका हातात पत्र आणि दुसऱ्या हाताच्या तर्जनीने ती डोळ्याच्या कडा पुसताना दाखवलेली दिसते. पत्रामध्ये असे लिहिले असेल की तो कधीही येणार नाही तर ती दोन किंवा अधिक बोटांनी डोळे पुसताना दाखलेली असते. हाताची सर्व बोटे वापरून अश्रू पुसताना दाखविलेल्या शिल्पांत तिचा चेहरा झाकला जाईल म्हणून असे दाखवले जाते. खजुराहोमधील मंदिरात हे दोन्ही प्रकार दिसतात. रानी की वाव, पाटण (११ वे शतक, गुजरात) मध्ये हिच्या उचललेल्या डाव्या हातामध्ये प्रियकराचे पत्र असून त्यातील मजकूर केवळ तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला समजू शकतो. मूर्तिमंत कारुण्य तिथे प्रकटले आहे. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू टपटप पडत असल्याचा भास होतो.
कलहांतरिता-
चित्र क्र. १५८ : कलहांतरिता, कैलास मंदिर, वेरूळ
प्रोषितभर्तृका :-
अनेक दिवस अनेक वर्ष दूर देशी गेलेल्या नायकाचे अचानक आगमन झाल्यामुळे होणाऱ्या आनंदाने मुर्च्छा यावी अशी उत्कंठा आणि हुर्हुर यांचे वर्णन प्राचीन साहित्यात नेहमी दिसते.वेरुळमधील दशावतार लेणी (क्र.१५) मध्ये असणाऱ्या रंगमंडपावरील हे शिल्प थोडे जीर्ण झाले असले तरी, त्यातील उत्कटता मात्र लक्ष वेधून घेते. नायकाच्या अंगावर तिने धाव घेतली आणि त्याच्या आलिंगनातच तिला मूर्च्छा आल्यामुळे ती खाली कोसळत आहे आणि नायक अत्यंत धीराने तिला हळुवारपणे सावरून घेतो आहे असे हे प्रोषितभ्रर्तृकेचे एक दुर्मिळ शिल्प आहे.
अभिसारिका - हित्वा लज्जान्तु या श्लिष्टा मदेन मदेनन च अभिसारयते कान्तं सा भवेद्भिसारिका ।।
(नाट्य शास्त्र २४, पा. २१९)
मदनावेगाने वश होऊन लोकलज्जा आणि भय असूनही संकेतस्थानाकडे नायकाच्या आकर्षणाने निघालेली नायिका.
चित्र क्र. १५९ : प्रोषितभर्तृका, दशावतार लेणे, वेरूळ
हिचे सहा प्रकार सांगितलेले आहेत. ज्योत्स्नाभिसारिका, तमोभिसारिका (रात्र अभिसारिका), दिवाभिसारिका, गर्वाभिसारिका, कामाभिसारिका आणि प्रेमवाक्याभिसारिका. शिल्पांकनामध्ये मागे वळून तळपायातला काटा काढताना ही दिसते. जवळजवळ सर्व मंदिरांमध्ये हे शिल्प दिसते. यातल्या काही छटा अत्यंत मनोहारी आहेत. रात्रअभिसारिका आहे दाखविण्यासाठी तारंगा (गुजरात ) येथील जैन मंदिरात भुजंग त्रासित अभिसारिकेचे शिल्पांकन दिसते. अंधारात निघालेली असताना सापाची सळसळ ऐकू येते. क्षणभर थांबून डावा पाय उचलून त्यावेळी वस्त्र ती एका हाताने घट्ट धरीत असून सळसळ जेथून ऐकू आली त्या दिशेला भयभीत होऊन पाहतानाचे हे शिल्प आहे. प्रियकराला भेटायला निघालेल्या अभिसारिकेची अनेकविध रूपे वेरुळ मध्येही दिसतात. दिवसाढवळ्या बाहेर पडलेली ती दिवाभिसारिका आहे. त्यामुळे लोकलज्जेचे भय अधिक, परंतु अचानक वाटेतील एकांतस्थळी त्याने तिला गाठले आणि पटकन चुंबन घेऊन तो चालता झाला, तर रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडायची रक्त चोरी, परंतु संकेतस्थळाला पोहोचल्यानंतर अत्यंत निर्धास्तपणे गाढालिंगन देणारी रात्राभिसारिका. या दोघींचेही शिल्पांकन वाखाणण्याजोगे आहे. वेरुळमध्ये कैलासमंदिराच्या प्रदक्षिणापथावर ही दोन आलिंगन शिल्पे दिसतात. त्यातील पहिल्या शिल्पात ती दिवाभिसारिका आणि दुसऱ्या शिल्पात राजाभिसारिका दाखवली आहे. या प्रकारांमध्ये घरातून बहाणा करून बाहेर पडलेल्या देवळात जायच्या निमित्ताने किंवा नदीवरून पाणी आणायच्या निमित्ताने निघालेल्या अभिसारिकांना गुप्ताभिसारिकाही म्हणतात, म्हणजे दाखवायचे निमित्त एक पण अंतस्थ हेतू मात्र दुसराच.
चित्र क्र. १६०: अभिसारिका, खजुराहो
चित्र क्र. १६१: दिवभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ
चित्र क्र. १६२ : रात्राभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ
वक्रोक्तगर्विता -
वक्रोक्तगर्विता नायिकेचे प्रेमगर्विता, सौभाग्यगर्विता, नैपुण्यगर्विता, सौंदर्यगर्विता असे चार रकार सांगितले आहेत.या नायिकेचे स्मितगर्विता, यौवनमर्विवा मौकुमार्यागर्विता आणि विलासगर्विता हे हि प्रकार सांगितले आहेत. परंतु शिल्पकलेमध्ये याचे नेमकेपण ओळखणे थोडे अवघड जाते. सौदर्यगर्विता यामध्ये शुकभासिका आणि कर्पूरमंजिरी या सुरसुंदरीचा समावेश होउ शकतो, कारण आपल्या सौंदर्याच्या बळावर त्या प्राण्यांना वश करताना दिसतात.नैपुण्यगर्विता-
वक्रोक्तगर्वितांपैकी नैपुण्यगर्विता नायिकेचे शिल्पांकन अनेक ठिकाणी आढळते. काही असामान्य गुणांची प्राप्ती झाल्यामुळे त्याचा अहंकार आलेला असतो. पानगाव (जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) सर्पाशी खेळणाऱ्या युवतीचे शिल्प आहे. केवळ रूपाचाच नाही तर कर्तृत्वाचा सुद्धा अहंकार येऊ शकतो हे दाखवणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प इथे दिसते. या सुंदरीने तिच्या उजव्या हातामध्ये एका नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डावा हात डोक्यावर धरलेला असून त्यावर एका मुंगसाला तिने ठेवले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे.चित्र क्र. १६३ : नैपुण्यगर्विता, केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी
या शिल्पाची सुधारित आवृत्ती आपल्याला धर्मापुरी (जि. बीड) येथील केदारेश्वर मंदिरातील (११वे शतक) शिल्पांमध्ये दिसतात. त्यातील एका शिल्पामध्ये त्या मुंगुसाने तिच्या हातावरून उडी मारली आणि आता आपण थेट त्या भुजंगाच्या तोंडात जाणार हे लक्षात आल्यावर त्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. त्याच्या पायाच्या हालचालीने त्या युवतीचे उडलेले केस कलाकाराने दाखवले आहेत. धारासुर (जि. परभणी) येथील मंदिरात (११वे शतक) एका हातात विंचू आणि एका हातात कासव धरलेल्या नैपुण्यगर्वितेचे अनाकलनीय शिल्प आढळते. या दोन प्राण्यांवरती नियंत्रण मिळविण्याचा तिचा हेतू स्पष्ट होत नाही.
चित्र क्र. १६४: मुग्धा नायिका, खजुराहो
मुग्धा-
स्वाधीनपतिका नायिकेतील एका प्रकारची ही नायिका, खरे पाहता ती एक उपनायिका असते. परंतु मंदिरामध्ये या प्रकारचे विपुल शिल्पांकन पाहायला मिळते. ही नायिका नायकाची पत्नीच (स्वीया) असते. शयनगृहात त्याची वाट पाहत असताना त्याला विलंब लागतो आहे हे लक्षात आल्यावर ती वस्त्रे बदलावयाला सुरुवात करते आणि अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता धाडकन तो प्रवेशतो. यातून तिची होणारी तारांबळ दाखवणारे हे शिल्पांकन असते. या मुग्धेचेही काही प्रकार असून त्यात अज्ञात यौवना, ज्ञात यौवना, ज्यात प्रौढा आणि प्रगल्भा असे दोन प्रकार असतात. त्याचप्रमाणे शिल्पांकनामध्ये अर्थावृत आणि अनावृत असे दोन प्रकारही दिसतात. अज्ञात यौवना म्हणजे नववधू, खजुराहो मधील शिल्पात तिचे कमरेवरील शरीर उघडे असून तिने लाजून झटकन वळून हाताने तोंड झाकलेले दिसते. त्या धांदलीमध्ये आपले शरीर उघडे पडले आहे याचेही तिला भान राहत नाही. काव्यात याचे असे वर्णन येते की, तोंडावर हात ठेवून तर ती वळते परंतु पुढे समईची मोठी ज्योत तेवत असते, तोंड झाकले तरी नायक आपल्याला न्याहाळत असेल या कल्पनेने ती दुसरा हात समईवर मारून ज्योत विझवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू तिला हात कशाने भाजला असे विचारते. रंगमंचावर "केहो कारण हात जलाई?" या काव्यावर आधारित नृत्य रचनेतून मुग्धेचे दर्शन नृत्यातून आजही होते. परंतु हीच नवयौवना नववधू काही दिवसांनी ज्ञातयौवना होते. बाहेर उगाच मित्रांच्या गराड्यात अडकलेल्या नवऱ्याचे आत लक्ष वेधण्यासाठी केवळ त्यालाच दिसेल अशा पद्धतीने अंगावरचा पदर ढळू देते. तो सावरण्याचा कुठलाही प्रयत्न न करता लाजल्यासारखे दाखविण्यासाठी हाताने तोंड झाकते आणि तर्जनी आणि अन्य बोटे यांच्यात किंचित अंतर करून त्या फटीतून तो नक्की आतच येत असल्याची खात्री वेगवेगळ्या छटा दाखवणारी अनेक शिल्पे आहेत. औंढ्या नागनाथ येथील मंदिरात तर मुग्धा पूर्ण विवस्त्र असून अर्धवट वळून तिने असाहाय्यपणे दोन्ही हात डोक्यावर धरलेले दिसतात.चित्र क्र. १६५ : मुग्धा नायिका, खजुराहो
रानी की बाव,(पाटण, गुजरात) मध्ये तर तिची उडालेली तारांबळ ही कल्पनातीत दाखवलेली आहे. पूर्ण विवस्त्र अवस्थेत असताना तो अचानक समोरूनच आल्यामुळे तिने एका हाताने आपले तोंड झाकले असून दुसरा हात तिने कमरेपाशी धरून तिची अगतिकता व्यक्त केली आहे. जीवनातल्या ह्या अत्यंत तरल परंतु पूर्णपणे खाजगी अशा क्षणाचे शिल्पांकनही करून दाखविणारे शिल्पी हे जगावेगळेच म्हणावयास पाहिजेत.
मुग्धा नायिकेचे शिल्पांकन हे अतिशय कठीण असते. जीवनातला तो प्रसंग चित्रपटामध्ये 'सुहाग रात' म्हणून अतिशय तरलतेने दाखविला जातो. त्याचे शिल्पांकन करणे म्हणजे खरोखरच एक दिव्य आहे. खजुराहोमध्ये नायिका लाजेने पटकन वळली आहे आणि तिचे वस्त्र ढळले आहे असे अज्ञातयौवना नायिकेचे शिल्प आढळते, तर लटकेच लाजल्याचे नाटक करून हाताने चेहरा तर झाकल्यासारखा करते, परंतु दोन बोटांच्या फटीतून आता तरी नायक नक्की शयनगृहात येतो आहे ना याची खात्री करणारी ज्ञातयौवना किंवा प्रगल्भा मुग्धा नायिकेचे शिल्पही दिसते.
चित्र क्र. १६६ : मुग्धा नायिका, रानी की वाव, पाटण
चित्र क्र. १६७: सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो
आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेल्या गोष्टींचे अत्यंत सूचकतेने दर्शन घडविण्यासाठी सुरसुंदरींच्या शिल्पांची रचना केलेली दिसते. गीतेच्या १३ व्या अध्यायामध्ये (ग्लोक ४ आणि ५) भगवंताने मानवी शरीराला क्षेत्र असे म्हटले आहे. हे मूलतःच विकार युक्त असते. त्यामुळे यातील एक अर्थ असाही निघतो की ज्ञानेंद्रियेही विकारात्मक होऊ शकतात. कारण ती जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशी ती विकारांचीही होऊ शकतात. त्यामध्ये गुणांचे वर्णन करताना एक सावधगिरीचा इशारापण दिला आहे. त्याच्यावर ज्ञानदेवांनी स्पष्ट निरूपण केले आहे. (ज्ञा.१३ ओवी क्र. ११७ ते १२४) शरीराची पाच ज्ञानेंद्रिये ही जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशीच ती विकारांचीही प्रवेशद्वारे ठरू शकतात. शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ही माध्यमे विकारांनाही कारणीभूत ठरू शकतात. या विकारांपासून सावध राहण्याचा इशारा देणाऱ्या काही स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी असे संबोधतात, आरशात स्वतःचे रूप पाहणाऱ्या, अत्तराची कुपी उघडून वासाने धुंद होणाऱ्या, अतिरेकी मद्यपान करून विंगणाऱ्या किंवा प्रियकराला चोरून पत्र लिहिणाऱ्या स्त्रियांची शिल्पेही रूपविकार, गंधविकार, अविकार, शब्दविकार आणि स्पर्शविकार दर्शवितात. परंतु ही ज्ञानेंद्रिये कामविकाराने ग्रासली गेल्यास ज्ञानांऐवजी विकारांचेच दर्शन घडवतात (भगवद्गीता: अ.१३, श्लोक ५-६), (शानेश्वरी अ. १३. ओबी क्र. ११७-१२४).
या विकारांवर विजय मिळविण्यासाठी मनाचे संयमन करणे आवश्यक असते. व्यवहारामध्ये हे कितीही खरे असले तरीही कोणालाही सांगायला गेल्यास त्याला ते रुचत नाही. सरळ सांगितले (स्पष्टोक्ती) तर त्याला राग येतो. उपहासाने सांगितले (वक्रोक्ती) तर अपमान वाटून तो दुखावला जातो. परंतु जर सूचकतेने सांगितले (अन्योक्ती) तर ते समजून ग्रहण करण्याची शक्यता पण असते. गीतेतील या प्रबोधनाचे शिल्पांकन कलाकारांनी काही सुरसुंदरींच्या शिल्पांद्वारे केलेले आहे. इतक्या रूक्ष विषयाचे इतके मनोहारी शिल्पांकन प्रशंसनीय तर आहेच, परंतु पिढ्यापिढ्यांमध्ये यातील अनेक छटा प्रकट करणारी आणि त्यातील विविधता दर्शवणारी कलाकारांची वैचारिक प्रगल्भता थक्क करणारी आहे.
चित्र क्र. १६८ : सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो
रूपविकार-
हातात आरसा घेऊन त्यामध्ये आपले रूप असते की त्यात दुसऱ्या कोणाच्या रूपावर भाळायची न्याहाळणारी नवयौवना ही जवळजवळ सगळ्या मंदिरांमध्ये दिसते. ती आपलेच रूप न्याहाळताना इतकी गढून गेलेली शक्यताही नसते. या सुरसुंदरीला 'दर्पणा' असे म्हणतात. काही शिल्पांमध्ये ती आपले असे (चोरून) रूप न्याहाळत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहत नाही ना? याचाही ती एका डोळ्यानी वेध घेताना दिसते. इतकेच नाही तर काही दर्पणांच्या शिल्पात तिच्या हातात अर्धगोल आरसा धरलेला असतो. या आरशातील वरच्या गोलार्धात तिला आपले रूप दिसत असते. तर निम्न गोलार्धात ती आपलेच यौवन न्याहाळत असते.सौंदर्य केवळ रूपाचेच नसते, तर यौवनाचेही असते. एवढेच नाही तर त्याचा रूपाप्रमाणेचेच त्याचाही अहंकार असतो. एका हातामध्ये पिकलेले आंबे आणि तिच्या दुसऱ्या हातावर एक पोपट दाखवलेला असतो हिला 'शुकसारिका' असे म्हणतात. शिल्पामधील ही सुंदरी तिच्या एका हातातल्या पोपटाला ती तिच्या दुसऱ्या हातात धरलेल्या आंब्यांबरोबर तिच्या यौवनाचेही प्रलोभन देते.
कर्पूरमंजरी या नावाने ओळखली जाणारी सुरसुंदरी नुकतेच स्नान करून आपले लांब सडक केस पिळताना दिसते. हिच्या शेजारी एक किंवा दोन पक्षीही दिसतात. ह्यामध्ये दोन कल्पना आहेत. तिचे घनदाट काळे केस त्या चातक पक्षाला ढगासारखे भासतात आणि त्यातून पडणारे पाणी पावसाचे थेंब समजून तो चोच वर करून पिताना दिसतो. अन्य शिल्पात तिच्या खाली हंस असतो. हा पक्षी मोती खातो असा समज आहे. तिच्या अंगावरून पडणारे थेंब सकाळच्या सूर्याच्या किरणांमध्ये मोत्यासारखा चमकताना दिसतात. त्यांना मोती समजून ते खायचा प्रयत्न तो हंस करतो आहे असे दिसते. टपटप पडणारे पाण्याचे थेंब हे स्थिर शिल्पामध्ये कोरण्याची अफाट किमया या कलाकारांनी केलेली आहे. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिरावर असलेल्या कर्पूरमंजिरीच्या शिल्पात तिच्या खाली दोन्ही पक्षी एकत्रित दाखवलेले आहेत. एकाच वेळेस दोन पक्ष्यांना आपल्या सौंदर्यान मोहित केल्याचा अहंकार तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. रूपाचा हा विकारच असा आहे की तो मनुष्याला आत्मकेंद्रित आणि संकुचित करून टाकतो. त्यामुळे क्षणभंगुर अस्तित्वाच्या देह सौंदर्याच्या मर्यादा ओळखून सावध राहिले पाहिजे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न असतो.
चित्र क्र. १६९ : कर्पूरमंजिरी, खजुराहो
रसविकार-
हे शिल्प तसे थोडे दुर्मिळच म्हणावे लागेल.मनुष्यमात्राला रोज भोजन घेता यावे आणि ते रुचकरही असावे यासाठी तोंड आणि जिव्हा ही इंद्रिये दिली आहेत. परंतु भोजना- बरोबरच किंवा त्या आधी 'रसपान' ही करण्याची काहींना आवश्यकता भासते. या विकारापासून सावध करण्यासाठी या सुंदरीचे शिल्प कोरलेले असते. खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरावर (१० वे शतक) आणि खंडारिया महादेव मंदिरावर (११वे शतक) मद्यपान करून झिंगणाऱ्या युगलाचे शिल्प आहे. त्यांच्या पायाशी तीन रिकामे कुंभ पडले असून हातात घरलेल्या रिकाम्या कुंभातील शेवटचा थेंब घेण्यासाठी ते दोघे धडपडताना दिसतात, मद्याचा अंमल चढला असल्यामुळे त्यांचे डोळे जवळजवळ मिटलेले असून गाल सुजलेले दिसतात. देवळाच्या बाहेरील भिंतीवर हे शिल्प मुद्दाम लावलेले आहे. भक्तांसाठी इशारा असा आहे की जर यावर विजय मिळवता येत नसेल तर मंदिरात आत जाण्याची आवश्यकता नाही. अशा भक्तांना परमेश्वराचे दर्शन कदापि होणे शक्य नाही.चित्र क्र. १७०: रसविकार, खजुराहो
गंधविकार -
श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो
शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.
स्पर्शविकार-
स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहेचित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो
गंधविकार -
श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.
चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो
शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.
स्पर्शविकार- स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहे १७८ / प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे
चित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो
चित्र क्र. १७३ : स्पर्शविकार, विंचू आणि स्त्री, खजुराहो
आणि मानवी देहाचे हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. हा विकार क्षणात उत्पन्न होऊ शकतो. कामदेवाला दिलेल्या शापाप्रमाणे तो वायुरूपाने तर संचार करतोच, परंतु कुठेही आणि कधीही जाऊन तो त्याचा परिणाम साधू शकतो. याचे शिल्पांकन करताना कलाकाराने वापरलेल्या कल्पकतेतून जगातील असामान्य आणि अद्भुत अशा कलाकृती निर्माण केल्या गेल्या. यातील सर्वात ठळकपणे दिसणाऱ्या सुरसुंदरीचे शिल्प म्हणजे दर्शकाकडे तोंड करून मांडीवर विंचू कोरलेली तरुणी. अंगावर विंचू चढत असल्यामुळे त्याला हाताने झटकून टाकण्याऐवजी दोन्ही हातांनी कमरेजवळील निऱ्या सैल करून अंगावरील वस्त्रच झटकून टाकताना ती दिसते. हा अंगावर चढणारा विंचू काल्पनिक असतो. अनेक ठिकाणी त्याला गोमेसारखे असंख्य पाय काढलेले असतात. त्याच्या पुढील नांग्या खेकड्याप्रमाणे आणि त्याचे शेपूट त्याच्या टोकावरील असणाऱ्या विषकुपी सहित कोरलेले असते. हा विंचू म्हणजे एकनाथ महाराजांच्या 'विंचू चावला, विंचू चावला' या भारुडामधील विंचू आहे. तो कामविकाराचा विंचू आहे. त्याने एकदा डंख मारला की त्याचे विष सर्वांगात भिनते आणि अंगांगाची लाही लाही होते. अंगावरची वस्त्रेही नकोशी होतात. शिल्पामधील सुरसुंदरी अशीच बेभान होऊन अत्यंत निर्लज्जपणे निर्वस्त्र व्हायला जराही संकोच करताना दिसत नाही. अशा सुरसुंदरीचे शिल्प पानगाव, पाटण , खजुराहो, खिद्रापूर यांसह अनेक देवळांमध्ये दिसते.
या शिल्पांकनाचे एक कल्पक, मनोहारी परंतु थोडेसे उत्तान शिल्पांकनही बघावयास मिळते. आलसकन्यांसारखे हे शिल्प असते. उन्मादाच्या आवेगात तिच्या प्रियकारानी तिच्या पाठीवर नखाचे ओरखडे काढले तरी तिच्या ती लक्षात आले नाही. कालांतराने वेदना कशाची म्हणून ती आपल्या उजव्या हातांच्या बोटांनी पाठ चाचपडताना दिसते. खजुराहोमधील या शिल्पात तिच्या उघड्या पाठीवरील उमटलेले नखांचे ओरखडेही स्पष्टपणे दिसतात. याला नखःछेद असेही म्हणतात. या विकारांचे अधिक सूक्ष्म दर्शनही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते.
चित्र क्र. १७४: स्पर्शविकार, खजुराहो
२१. कामशिल्पे
चित्र क्र. १७९: कामशिल्पपट, खंडारिया महादेव मंदिर, खजुराह
संदर्भ सूची
Sun sculpture found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh on 30-10-2020 and its significance.
Sun sculpture found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh on 30-10-2020 and its significance.

Suryadeva / Sun God sculpture found on 30-10-2020: A sculpture of Sun God has been found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh, G Shiva Kumar, Joint Secretary, Rayadurgam Heritage Association said on Friday, 30-10-2020[1]. According to the officer, Nagendra, a farmer of the village was digging his field on Friday and the two feet high stone sculpture was found[2]. Kumar came to know of it, visited the field, took photographs and sent them to Em Sivanagi Reddy, a historian and CEO of Cultural Centre of Vijayawada and Amaravati (CCVA)[3]. Reddy in his observations said that the sculpture found on the banks of river Vedavati is that of Surya, the Sun God who has lotus in both hands[4]. It is in the architectural style of Nolamba Pallavas and dates to 10th century AD, he added[5]. It is unbelievable and astonishing as to why historians are still using AD, BC etc., in India. As the stone sculpture was found in the field, the landowner informed the matter to village Revenue Officer Hanumanta Rao[6]. Gummagatta Mandal Tehsildar Venkatachalapati informed the matter to the higher authorities[7]. Local police also visited the site[8]. A priest from nearby temple performed “pooja” to the idol. Kumar requested the officials to preserve the statue and place it in the Government Museum Anantapur. So, the entire process has been ritualized by the concerned authorities / persons in their own way. Of course, this news, obviously picked up from “The Hindu,” has been repeatedly appearing in other media.

According to Vedveer Arya, the date could go to the Satavahana period: However, certain researchers claim that the date of the sculpture could go beyond the medieval period[9]. Vedveer Arya says[10], “An inscribed stone inscription was found to the north of this site. This inacription belongs to the Nolamba king Maydammarasa. It is written in Kannada language and Telugu-Kannada characters of 2nd cent CE. Interestingly, it mentions the death of a person Kilgunte (self-sacrifice of a person for the death of his master). But this inscription has no link with the sculpture of Sun God. The art of the sculpture indicates the period of Shatavahanas or Ikshvaku kings of Andhra.” It has to be verified that inscriptions with “Kannada language and Telugu-Kannada characters of 2nd cent CE,” have been found and recorded in the Epigraphica Karnataka and Epihgraphia Indica volumes.

Nolumba temple complex at Amaravati, Anatapur: There has been a Doddeswara temple complex of the Nolumbas at Hemavati, with many temples / sannidhis inside. Many of the sannidhis have been in a ruined condition. A museum is nearby, where, hundreds of broken sculptures are kept inside and outside the museum building. The broken sculptures are found in and around the temple complex, in the fields and nearby remote places. Sivaramamurti noted[11], “Surya, however, as in the case of regular Chalukya figures, has amazons, warlike figures with bow and arrow, flanking him, driving out darkness by shooting it out (pl. XXXVI). This feature is invariable the case of Surya in northern sculpture, a tradition followed by the Chalnkys sculptors but not by the Tamil school (pi. XXXVIIIa), where always Surya stands in solitary glory. He is, however, bare-footed, as, in spite of the penetration and absorption of other northern traditions in the Chalnkya school, the top-boots of Surya are absent”. Douglas Barret[12] also noted that, “To the right of the Surya (plate.13) stands a broken pillar with a long Kanarese inscription which mentions the greatest of the Nolamba rulers.” Shama Sastry[13] has also pointed out. Therefore, if the period of the inscriptions is to be equated with the nearby sculptures, then, the dates have to be changed. In India, the sculptures are dated relatively either based on the style, or the inscriptions found on them or nearby. And this has been the practice for more than 150 years by the European Indologists, followed by the Indian counterparts.

The second Nolamba Surya sculpture in the Madras museum: Sivaramamurti, described about another Nolamba Suya sculture in the Madras museum[14], “This most elaborately worked image of Surya (pl. V) in high relief is a great masterpiece of Nolamba art. In this all the elaborate patterns of ornamentation in Nolamba sculptures can easily be observed. The kirita is elaborate and of the karanda type with profuse ornamentation. Makara-kundalas adorn the ear lobes. There are elaborate courses of neck ornament, the bottom-most with mango-shaped pendants with an amount of decorative work covering his entire chest. Ornamental tassels are present on the shoulders and elaborate keyuras on his arms. ………Both the arms of the figure and the lotuses held in the hands are broken and lost. This is one of the finest examples of Surya of this period. The udarabandha is very elaborately worked as a band with a course of tassels suspended in a row all along..” Though, he noted that, “Both the arms of the figure and the lotuses held in the hands are broken and lost,” he has not given any reason for breakage and loss. Incidentally, Rajendra Chola had come here and taken away 50 pillars from the Doddeswara temple, proving that the temple complex was in shambles and deserted .

About the Fifty Nolamba Pillars[15]: About this, also C. Sivaramamurti gives the details: At Tiruvaiyar seven miles from Thanjavur, is an ancient Chola temple adjunct of which is the Apparsvami shrine. This small temple is associated with the great Saiva – saint who converted the Pallava king Mahendravarman to Saivism and the sacred spot has a temple erected by Rajendra (1014-1044 CE). An inscription on the plinth gives the prasasti of Rajendra Chola. Around the temple are corridors with rows of pillars. There are about fifty exquisitely carved pillars in greenish basalt with intricate carving in a style so different from all around that they stand out distinctive entirely variant from their surroundings[16]. These are in fact Nolamba pillars brought as war trophies by the great connoisseur of art Rajendra, as considered by the historians.

Comparison of the three Surya sculptures: If all the three are Nolamba sculptures, then, they can be compared. Why the Nolambas of the same dynasty, period and sculptors of the sculptures in question should vary in the style, character and form of them? Whether he sculptors changed or they had been ordered to do so, has to be critically analyzed.
| Surya sculpture at the Madras Museum | Surya sculpture at the Hemavati Museum | Surya sculpture discovered now in 2020 |
| Northern style/ Hoysala style. Face exhibits distinguishable Gupta features. | Normal | Regular feature May be resembling Surya Narayana. |
| Elaborate ornamentation | Normal. Two female devatas are found at the feet oneither side of the legs. | Simple, the sacred thread is prominently visible. Holding two lotuses with cords. |
| `123Broken condition, two upper hands are missing. | Broken condition, two upper hands are missing. Here, the outer prabha portion is seen in broken condition. | It is with two hands, no indication of other two hands. Others portions might have been broken. |
Therefore, it is clear that the three sculptures differ in many iconographical factors and therefore, they cannot belong to the same period. Here, the Sun God has been found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh, in buried condition. Therefore, it is implied and evident that it was buried as it was mutilated and cannot be worshipped in a temple. Many idols were left in field and remote places “as is where is condition,” as they were defiled by the mlechas.

Why the sculptures are found in broken condition?: After 10th century, as Malikafur invaded Southern India, during 1309-1311, he ransacked many temples and looted wealth. Therefore, he could have gone to Hemavati area and plundered. In 1309, Alauddin sent Malik-Kafur on an expedition to the Kakatiya kingdom and Kafur’s army reached the Kakatiya capital, Warangal, in January 1310, and breached its outer fort after a month-long siege. The Kakatiya ruler, Prataparudra, surrendered and agreed to pay tribute. Kafur returned to Delhi in June 1310 with a huge amount of wealth obtained from the defeated king.The Koh-i-Noor diamond was said to be among the loot. He led another expedition of looting set off on 19 October 1310, and reached the extremity of peninsular India. On 25 February 1311, Kafur besieged Dwarasamudra, and looted. Kafur proceeded to the Pandya kingdom, where he raided several places, obtaining much treasure and many elephants and horses. Kafur occupied Madurai on 24 April, and reached Delhi in triumph on 18 October 1311.

The Sun temple must have existed there: The hundreds of broken sculptures in the Hemavati museum prove that many temples must have been destroyed and thus, the broken sculptures were brought and dumped there inside and outside. The sculptures and idols Saptamata and other goddesses strewn here and there, show that a Sakti temple was destroyed. The other sculptures related to tantric worship implies that such temple was also destroyed. The Sun sculpture and other broken Navagraha sculptures prove the existence of a Sun temple. Therefore, the existence of Sun temple there proves the Sun worship. Even the broken sculpture at Sangameswarar temple, Alampur complex prove.
© K. V. Ramakrishna Rao
03-11-2020.

[1] The Hindu, Stone idol of Sun God discovered, Special Correspondent, ANANTAPUR , OCTOBER 31, 2020 11:47 IST; UPDATED: OCTOBER 31, 2020 11:47 IST.
[2] https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/stone-idol-of-sun-god-discovered/article32989153.ece
[3] Business World, 10th Century Sun God Sculpture Found In Agriculture Field In Andhra Pradesh, by ANI, 31October, 2020
[4] http://www.businessworld.in/article/10th-Century-Sun-God-sculpture-found-in-agriculture-field-in-Andhra-Pradesh/31-10-2020-337665/
[5] India TV News Desk, Andhra village farmer finds 10th century Sun God sculpture while digging agricultural field, New DelhiPublished on: October 31, 2020 9:13 IST
[6] https://www.indiatvnews.com/news/india/10th-century-sun-god-sculpture-found-andhra-pradesh-agricultural-field-661262
[7] ZeeNews, 10th Century Sun God sculpture found in agriculture field in Andhra Pradesh, October 31, 2020.
[8] https://www.zee5.com/zee5news/10th-century-sun-god-sculpture-found-in-agriculture-field-in-andhra-pradesh/
[9] MyIndiaGlory, Sculpture of Sun God discovered in Andhra Farmland: 2000+ year old?, October 31 2020.
[10] https://www.myindiamyglory.com/2020/11/02/sculpture-of-sun-god-discovered-in-andhra-farmland-2000-year-old/
[11] C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Maddras Government Musuem, Bulletin on the Madras Government Museum, New Series, General Section, Vol.IX, No.1, 1964, p.12.
[12] Douglas Barret, Hemavati, Bhulabhai Memorial Institute, Bombay, 1958.
[13] R. Shama Sastry, South Indian Inscriptions (Texts), Vol..IX, Part-I, Madras, 1939, No.19, pp.8-9.
[14] C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Maddras Government Musuem, Ibid, p.16.
[15] K. V. Ramakrishna Rao, The Nolamba Temple Pillars brought by Rajendra Chola from Hemavati to Thanjavur, Proceedings of the 41st Session of Andhra Pradesh History Congress , Anantapur, 2017, pp.
[16] C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Madras Government Musuem, opt.cit, pl. XXV.






.jpg)




























































































_(8637289891).jpg)




































.jpg)










.jpg)

.jpg)






































.jpg)
































.jpg)









.jpg)
.jpg)
















































.jpg)

.jpg)























































































































No comments:
Post a Comment