Friday, April 4, 2025

शरभ, व्याल, वीरगळ, गध्देगाळ, कीर्तिमुख

 
 मुख्य मंदीराच्या बाह्य अंगावर सर्वात खाली पीठ, आम्रभंजीकांनी अलंकृत केलेला वेदीबंध, भिंतीच्या भागावर तीन जंघा पट्ट आणि कपोतालीच्या वर लतिन शिखर आहे. कोपर्यावर असणार्या शिखरावर भुमी आमलक असून मुख्य मंदीराच्या शिखरावर असे सहा भुमीआमलक दिसतात. पीठावर जाड्यकुंभ, अंतरपत्र, कणी आणि त्यावर वेदीबंध असे थर आहेत. गर्भगृहाच्या मागील हरिहरपितामहार्क तर उरलेल्या दोन भद्रावर नृत्य करणारा भैरव आणि बसलेला दशभुज सदाशिव, कोपर्यावरील पट्टावर दिकपाल आणि वसु दाखवले आहेत. तसेच कोण आणि भद्र यांच्यामधील भागात अप्सरा दाखवल्या आहेत. 

 याशिवाय इथे आणखी एक आवर्जून बघण्यासारखी गोष्ट म्हणजे व्याल. व्याल म्हणजे संयुक्त प्राणी ( hybrid) एका प्राण्याचे धड आणि दुसर्या प्राण्याचे शीर.अधीक गुण अथवा ताकद दर्शविण्यासाठी असा प्रयोग केला आहे. हे व्याल विवीध प्रकारचे आहेत.जसे नरव्याल, गजव्याल, शुकव्याल वगैरे. खजुराहोच्या मंदीरातही असे व्याल आहेत. बहुतेक संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्याल दिसतातच. जसे इजिप्तमध्ये जगप्रसिध्द स्किंफ व्यालच आहे. या मंदिरावर इतके वेगवेगळ्या प्रकारचे व्याल दाखविले आहेत कि प्रत्येक व्याल वेगळ्या प्रकारचा आणि अद्वितीय आहे. कदाचित शिल्पकाराची कल्पनाशक्ती आटली तेव्हा मधूनमधून साधू दाखवले आहेत.

व्याल मूर्ती

 Posted byFearless Explorer'sFebruary 9, 2021

मंदिरांच्या भीतीवर, स्तंभांवर, द्वारशाखांवर दिसणारा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा हा प्राणी म्हणजेच ‘व्याल‘ होय. यालाच वारालक, वराल, वीराल,व्रलीका, वरालीक, अशी नावे आहेत. दक्षिण भारतात ‘याली‘ तर ओरिसात याला “बीडाल” म्हणतात.
व्याल निर्मिती नेमकी कधीपासून चालू झाली यावर अभ्यासकांत दुमत आहे. मात्र व्याल ही संकल्पना सिथीयन किंवा ऍकमेनिडियन(इराणी) शिल्पकलेतून गांधार स्थापतींच्या माध्यमातून मौर्यकालखंडात भारतात आली असावी. गुप्तकाळात आणि नंतर मध्ययुगात व्यालाचा वापर वाढला होता. मूळ इराणी परंपरेतील व्यालाला असलेले पंख मात्र भारतीय शिल्पात दिसून येत नाहीत. सांची स्तूपावरील आणि जुनागढ(क्षत्रप काळ) संग्रहालयातील व्याल हे पंखयुक्त आहेत.

नंतरच्या होयसळ, चौल, पल्लव या सर्वच स्थापत्यकारांनी व्यालाचा पुरेपूर वापर केला. दहाव्या शतकातील ब्रह्मपुरीश्वर मंदिरात व्यालाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार बघायला मिळतो. या नंतरच्या विजयनगर स्थापत्यात व्याल मूर्ती सर्वाधिक वापरल्या गेल्या. कलात्मक दृष्ट्या खुजुराहो च्या व्यालमूर्ती डोळ्यात भरतात.
शिल्पशास्त्रातील अभ्यासक याला एक कल्पनाविलास मानतात, याच संकल्पनेतून विष्णूचा हायग्रीव, वराह अवतार, हत्तीची सोंड असलेला श्री गणेश, हनुमान, या देवता सुद्धा उत्क्रांत झालेल्या आहेत.
हीच पशु-मानव संकल्पना मूर्तिकारांनी मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी वापरली आहे.
सुळे व जीभ बाहेर आलेली, आखूड कान, बटबटीत डोळे, उग्र अविर्भाव असे अर्ध मानव अर्ध प्राणी असलेले. माणसाचे धड त्यावर सिंहाचे शीर,सोबतच हत्ती, साप, वाघ, माकड, हरीण, कोंबडा, मोर अश्या अनेक प्राण्यांचे शरीरापासून बनलेले जवळपास विसपेक्षा जास्त प्रकारच्या व्यालमूर्ती श्री ढाके यांनी त्यांच्या प्रबंधात मांडल्या आहेत. वास्तुशिल्पात गजव्याल, अजव्याल, वृषव्याल, अश्वव्याल, सर्पव्याल, नरव्याल,सिंहव्याल, मेशव्याल,खरवव्याल, गंडकीव्याल, अशे अनेक प्रकारचे व्याल आपल्याला भारतात पाहायला मिळतात.
व्याल हे सहसा एकटे खोदले जात नाहीत, कधी ते हत्तीवर आरूढ झालेले, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेलेले, कधी आपल्या पाठीवर एखादी सुरसुंदरी वाहणारे, कधी झेप घेण्याच्या पवित्र्यात, कधी कोण्या योध्यासोबत युद्ध करताना, तर कधी द्वारशाखेत एकमेकांवर एक असे सलग व्याल खोदले जातात.

सोबत दिलेल्या छायाचित्रांमध्ये असेच काही व्याल मूर्ती दाखवलेले आहेत, पैकी तामिळनाडूच्या धारसुरम इथल्या मंदिरात स्तंभ तोलणारे व्याल किंवा याली हे विशेष असून, सिंहाचे शरीर, हत्तीची सोंड, शिंगे, गाईची शेपटी अस त्यांचं स्वरूप आहे.


सोळाव्या शतकानंतर मात्र मंदिरं स्थापत्यातील बाह्य नक्षीकाम मंदावले आणि आपसूकच व्यालमूर्ती सुद्धा मंदिर स्थापत्यातुन नाहीश्या झाल्या.

व्यलशाखा – भुलेश्वर मंदिर, यवत
व्याल – भुलेश्वर मंदिर, यवत
द्वारशाखेवरील व्यालशाखा – श्री गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
गजव्याल-सिंहव्याल, भुलेश्वर मंदिर, यवत
योध्याशी युद्ध करणारा व्याल
स्तंभ तोलणारे गजव्याल -ऐरावतेश्वर मंदिर, तमिळनाडू
हत्तीवर आरूढ व्याल – गोदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
 किर्तीमुख🦑🦑🦑


आपले मंदिरे नुसती बांधायची म्हणून अजिबात बांधलेली नाहीत, मंदिर कुठलंही बघा त्यामागे मंदिराची रचना, स्थान, भौगोलिक स्थिती या सर्वांचा जबरदस्त मेळ घालुनच ते बनविलेले असते, त्यावर असलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीचाही काहींना काही अर्थही  नक्कीच असतो... पण माहिती अभावी आज मात्र कशाचा कशालाच ताळमेळ नसतो... आणि म्हणून अनावधानाने त्या-त्या शिल्पाचे, मूर्तीचे नुकसान ही होत असते,आता हेच बघा ना

तुम्ही मंदीरात गेल्यावर मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या तोंडासारख एक शिल्प कोरलेले असंत. 

या शिल्पाला “किर्तीमुख” अस म्हणतात. हे किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागच्या दोन प्रचलित पौराणिक कथा आहे.त्यातील पहिली.....

जालंधर नावाचा एक राक्षस होता. तो महादेवाचा मोठा भक्त होता त्याला प्रचंड भुक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी संपायची नाही. अश्याही स्थितीत त्याने घोर तपश्चर्या केली. 

 महादेव प्रसन्न झाले....

 बोलले....काय पाहिजे...???

  जालंधर न मागून-मागून मागितल तरी काय, त भूक लागली खायला द्या😂😂

  महादेवाने त्याला स्वत:च शरीर  खायला सांगितले,त्याने पायापासून खायला सुरवात केली उरलं फक्त तोंड आणि डोकं...तरीही त्याची भूक संपली नाही....! देवा अजून भूक लागली...म्हटल्यावर भोळ्याशंकराने मस्तपैकी स्माईल देऊन त्याला जालीम उपाय सांगितला...की जिथं जिथं मी असेल... तिथं तिथं माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या  सर्वांची पाप खाऊन टाक...!!!

न संपणारा भंडारा आहे तो...

 कितीही खाय...तुला ती कधी कमी पडणार नाही.🤣🤣

आणि म्हणून या किर्तीमुखाच शिल्प मंदिरा च्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली !!

कथा दुसरी.....


        एकदा पार्वतीच्या सौंदर्याची महती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहू ला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला, आणि त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली. हे  ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण आक्राळविक्राळ प्राणी तयार झाला, आणि तो राहूवर धावून गेला. त्या प्राण्यांचे महाभयंकर रूप पाहून राहूची चिक्कार फाटली...! मग करेल तरी काय... त्याने महादेवाच्या पायावर डोकं ठेवल...! त्यामुळे महादेवाने राहूला माफ केले. राहू तिथून निघून गेल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले.

पण बाहेर आलेल्या प्राण्यांची भूक वाढत होती. त्याने महादेवाला विचारले, मी खाऊ तरी काय? महादेवांनी सांगितले, की खा स्वतःलाच.... देवाधिदेव महादेवाची चा हुकूम सर आखोंपर मानून ह्या प्राण्यांने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त त्याचे डोके!!🦑 पहिला प्रश्न देवा भूक लागली😂😂


 या खाऊगिरी वर महादेव जाम खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख  आणि काम ही दिलं.... तेच पाप खायचं✨

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप,अमर्याद अशी भूक लागलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे.!!!

ऐकंदरीत दोन्ही कथा मिळत्या-जुळत्या...!!!

व आशय ही सारखाच....


फक्त महादेवच नाही... तर  मंदिर  कुठलही असो आता हा दिसतो म्हणजे दिसतोच!!!

जागा मात्र कधी-कधी बदलत असतो...कधी मंदिराच्या शिखरावर...कधी मूर्ती मागच्या प्रभावळीवर....कधी प्रवेशद्वारच्या वर....


 जागा कुठंही असो पण काम आपलं तेच पापखायच...

असा हा कीर्तिमुख🦑✨

हल्लीच्या काळात यांच्यावरही बेरोजगारी च संकट आलं आहे....

कारण आपले येडे अंधभक्त🤦🏽‍♂️.....!!!याच्यावर पाय ठेवून मंदिरात जाण्याऐवजी यालाच ऑइल पेंट मारत आहे...कुणी पेढा खाऊ घालत आहेत...कुणी हळदी-कुंकू खाऊ घालत आहेत... तर कुणी याच्यावर बेलफुल टाकून बुजवून टाकत आहेत ह्याला....!!!🙈🙉🙊

 हे टाळायला पाहिजे🙏🏽🙏🏽

कदाचित याचमुळे  तो सध्या जरा नाराज दिसतो...🙃🙏🏽

वरच सर्व दोन-तीन वेळा वाचलं की तुम्ही कुठल्याही प्राचीन मंदिरात जा... तुम्हांला  किर्तीमुख दिसलाच म्हणून समजा...😊

(📸फोटू:-हिंडून फिरून मीच काढलेले आहेत)

✍🏾निखील

 

शिवालयों में कीर्तिमुख अलंकरण

शिवालयों में द्वारपट, स्तंभों, भित्तियों में एक भयावह मुखाकृति बनी दिखाई देती है। इस आकृति को शिल्पकार अपनी कल्पना शक्ति के अनुसार भयावह निर्मित करते थे। देखने से प्रतीत होता है कि किसी राक्षस की प्रतिमा है। भक्तजन इस मुखाकृति को प्रणाम कर आगे बढ जाते हैं। परन्तु उनके मन में हमेशा इस मुखाकृति के प्रति कौतुहल बना रहता है। कुछ मित्र मुझसे इस आकृति के विषय में हमेशा चर्चा कर अपनी जिज्ञासा शांत करते हैं। उनका प्रश्न रहता है कि इस आकृति को शिवालयों में क्यों निर्मित किया जाता है? यह आकृति शिवालयों के साथ जैन मंदिरों के शिल्प में भी पाई जाती है। खजुराहो के पार्श्वनाथ मंदिर में भी इस मुखाकृति को मंदिर शिल्प में स्थान दिया गया है।

कीर्तिमुख (भीमा-कीचक) मल्हार छत्तीसगढ़

इस मुखाकृति को कीर्तिमुख कहा गया है। पौराणिक कथाओं के अनुसार इसका जीवंत निर्माण लंका के प्रवेशद्वार पर शुक्राचार्य द्वारा किया गया था। वर्णन है कि शुक्राचार्य ने "रुद्र कीर्तिमुख" नाम का दारुपंच अस्त्र लंका के प्रवेशद्वार पर स्थापित किया, बाहर होने वाली प्रत्येक गतिविधि इस पर चित्रित होकर दिखाई देती थी। इसके मुख से अग्नि का गोला निकल कर शत्रु का संहार करता था। लंका में कीर्तिमुख का अस्त्र के रुप में प्रयोग किया गया। वर्तमान में हम घरो, दुकानों एवं अन्य महत्वपूर्ण स्थानों पर सी सी टी वी कैमरों का इस्तेमाल करते हैं, इसी तरह कीर्तिमुख अस्त्र का निर्माण कर प्रयोग किया गया था।

कीर्तिमुख के विषय में एक कथा मत्स्य पुराण अ 251 में आती है -  अंधकासुर के वध के समय भगवान शंकर के ललाट से पृथ्वी पर जो स्वेद बिंदू गिरे उनसे एक भयानक आकृति का पुरुष प्रकट हुआ। जिसने अंधकगणों का रक्त पान किया, परन्तु अतृप्त ही रहा। अतृप्त होने के कारण वह भगवान शंकर का ही भक्षण करने चल दिया। इस कारण महादेवादि देवों ने इसे पृथ्वी पर सुलाकर वास्तु देवता के रुप में प्रतिष्ठित किया और उसके शरीर में सभी देवताओं ने वास किया।  इसलिए यह वास्तु पुरुष या वास्तु देवता कहलाने लगा। देवताओं ने वास्तु को  गृह निर्माण, वापी, कूप, तड़ाग, गरी, मंदिर, बाग बगीचा, जीर्णोद्धार, यग्य मंडप निर्माणादि में पूजित होने का वरदान दिया। तब से यह वास्तु देवता के रुप में पूजित एवं प्रतिष्ठित है।

कीर्तिमुख (ताला) छत्तीसगढ़

एक अन्य कथा में  बताया गया है कि प्राचीन काल में  जलंधर नामक एक महाशक्तिशाली दैत्य उत्पन्न हुआ जिसने अपनी तपस्या के बल पर  ब्रह्मा को खुश करके कई वरदान प्राप्त कर लिये। इसने जंगल के मध्य अपने लिए एक भव्य भवन का निर्माण कराया और एक राक्षसी सेना भी तैयार कर ली। इससे इसकी ताकत बहुत बढ़ गई और मन में अहंकार भी समा गया। अब वह प्रतिदिन संध्या समय एक सुंदर रथ पर सवार होकर भ्रमण के लिए निकलता था और  ऐसे-ऐसे कार्यों को अंजाम दे डालता था जिससे प्रजा त्राहि-त्राहि कर उठती थी।

इसी क्रम में एक दिन जलंधर रथ पर सवार होकर घूम रहा था कि एक मादक सुगंध उसके नाक में समा गई जिससे वह चकित हो उठा और चतुर्दिक दृश्यों को निहारने पर एक अद्वितीय सुंदर नारी जंगल में घूमती हुई दिखाई दी। तब वह चौंका – कौन है यह नारी? इस सुन्दरी के अंदर तो सृष्टि की सारी सुघड़ता सिमटी जैसी दिखाई दे रही है। ‘यह कैलासपति शिव की पत्नी पार्वती है’, एक सेवक ने उत्तर दिया तो वह हंस पड़ा, ‘भला उस बूढ़े शिव के साथ इस अनुपम सुन्दरी का क्या काम? मैं इसे अपनी पटरानी बनाऊंगा।’ दैत्य ने मन में ठान लिया और बेचैन होकर महल में वापस लौट आया फिर अपने एक सेवक को दूत बनाकर शिव के पास भेजा।

कीर्तिमुख पंचायतन शिवालय सुरंग टीला सिरपुर छत्तीसगढ़

इस सेवक का नाम रोनू था। वह कैलास पर्वत पर पहुंचा तो भोलेनाथ योगसाधना में मगन थे। इससे रोनू तनिक सहमा किंतु शीघ्र अपनी राक्षसी प्रवृत्ति के अनुकूल जोर-जोर से चिल्लाने लगा, ‘आप पार्वती को तुरंत हमारे हवाले करें क्योंकि दैत्यपति जलधर को वह पसंद आ गयी है।’ शिव कुछ सुन नहीं पाये क्योंकि उनकी आंखें मुंदी थीं और पूरा शरीर एकदम स्थिर था। मगर रोनू का हठ तो पराकाष्ठा पर पहुंच गया और अपनी बात चिल्ला-चिल्ला कर बताने लगा। उसकी चिल्लाहट से शिव की तंद्रा टूट गयी और और उन्होंने रोनू की तरफ लाल-लाल आंखों से देखा फिर क्रोध से अपने त्रिनेत्र खोल लिये। इस त्रिनेत्र के खुलते ही आक्रोश की एक रक्तिम धारा बहने लगी जिससे एक विचित्र जीव पैदा हो गया। 

इस जीव के चेहरे का आकार बाघ पशु के समान चौड़ा एवं मजबूत था जबकि हाथ-पैर रस्सी की भांति पतला तथा छिन्न। यह जीव जन्म लेते ही भूख-भूख चिल्लाने लगा और रोनू की ओर लपका। वह शिव के चरणों में गिर पड़ा और प्राण रक्षा के लिए गुहार लगाने लगा। रोनू के गिड़गिड़ाने से शिव को दया आ गयी और उन्होंने माफ कर दिया, पर उस जीव की भूख को मिटाना आवश्यक था। इससे शिव सोच में पड़ गये किंतु शीघ्र ही इस जीव का नामकरण कीर्तिमुख किया फिर प्रेमपूर्ण दृष्टि से निहारते हुए समझाया – पुत्र कीर्तिमुख, जब तक भोजन का प्रबंध नहीं होता तब तक अपने ही हाथ-पैर खाकर भूख मिटा लो।

कीर्तिमुख कंसुवा शिवालय कोटा (फ़ोटो - रिंकेश अग्रवाल कोटा)

बस फिर क्या कहना था, कीर्तिमुख अपने ही हाथ-पैर पर टूट पड़ा और पेट-पीठ भी खा गया। इसके बाद गर्दन की ओर बढ़ा तो शिव ने रोकते हुए कहा  पुत्र कीर्तिमुख, तुम्हारा जीवित रहना आवश्यक है ताकि मेरी कुटिया की सुरक्षा होती रहे अत: तुम द्वार पर नियुक्त हो जाओ। शिव से आदेश पाकर कीर्तिमुख इनके द्वार  का प्रहरी बन गया और अपने जीवन को धन्य कर लिया। इस जीव के अंदर शिव-मस्तिष्क का कल्याण समाहित है, इसलिए शिवालयों में इसकी दैत्यनुमा आकृति बनाने की परम्परा है और यह भी मान्यता है कि जो व्यक्ति कीर्तिमुख की पूजा करके शिवालय में प्रवेश करता है उसकी प्रार्थना शिव तुरंत सुनते हैं। इसी मान्यता स्वरुप शिवालयों में कीर्तिमुख का निर्माण किया जाता है।

 

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

॥ श्री गणेशाय नमः ॥

भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .

 चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया .

विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट असलेल्या शरभाचे रूप धारण करून नृसिंहास फाडले आणि त्याचे कातडे पांघरले व डोके मुकुटावर धारण केले अशी एक कथा आहे. ( संदर्भ : मूर्तिविज्ञान, डॉ. गणेश हरि खरे ) .

हल्लीच्या काळामध्ये जसे सामर्थ्याचे प्रतीक पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा चित्र दरवाजावर लावण्याची पद्धत आहे तीच पद्धत जुन्या काळामध्ये किल्ल्यांच्या दरवाजावरती शरभाचे शिल्प कोरण्यात दिसून येते . तसंच लढाईच्या वेळेस स्फुरण चढण्यासाठी हर हर महादेव म्हणणार्या मराठ्यांच्या किल्ल्यांवर शंकराचे रूप असणाऱ्या शरभाचं शिल्प हा निव्वळ योगायोग असावा का? तसंच महापराक्रमी राजांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ कोरल्या जाणाऱ्या काही वीरगळांच्या कलशाभोवती देखील शरभ आढळतात . वीरगळ म्हणजे ?

 शरभ या प्राण्याचे अनेक प्रकार असून त्यात पंखधारी , पंख विरहित , गज जेता म्हणजे ज्याने पायात हत्तींना दाबून धरले आहे ( ह्यावरून शरभाच्या सामर्थ्य आणि विराटरूपाची कल्पना करता येते . ) , व्याघ्रजेता म्हणजे ज्याने वाघाला स्वतःच्या पायात धरले आहे असे अनेक प्रकार आहेत .

 चित्र क्रमांक २ . भुईकोट सोलापूर येथील बुरुजावरील शरभशिल्प .

सोलापूरच्या भुईकोटात जीर्णोद्धाराच्या वेळेस ही  शरभ शिल्प कोरण्यात आली . महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मराठ्यांनी जिंकल्यावर त्यांचा  जीर्णोद्धार करण्यात आला .

 चित्र क्रमांक ३ . जलदुर्ग किल्ले जंजिरा ( मुरुड ) येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

किल्ले जंजिरा हा सिद्दी नावाच्या मुसलमान राज्यकर्त्याने बांधलेला किल्ला होता . हा अभेद्य किल्ला आजवर कोणत्याही हिंदू राज्यकर्त्यांनी जिंकला नाही हे जग जाहीर आहे .तरीही या किल्ल्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजावर ती शरभाचे शिल्प दिसून येतं .

 चित्र क्रमांक ४ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील केवल शरभ शिल्प .

 चित्र क्रमांक ५ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक . ५ मधील शरभ हा व्याघ्रजेता शरभ आहे . म्हणजे त्याने वाघाला पायात धरले आहे किंवा त्यावर विजय मिळवला आहे . शरभाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात . उघडलेले तोंड आणि बाहेर आलेली जीभ त्याच्या आक्रमकतेचे प्रदर्शन करतात .

 चित्र क्रमांक ६ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील मुख्य प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक सहा मध्ये शरभाचं सर्वात आक्रमक रूप दिसतं . द्विगज विजयी शरभात् पराभूतौ पक्षीदेहधारी गंडभेरुंड,  म्हणजे  एका पायात गंडभेरूड ( दोन तोंडे असणारा पक्षी ) तर बाकी दोन पायात हत्तींना चिरडणारा असा शरभ शिवनेरीच्या प्रवेश द्वारावर आढळतो . ह्या शरभाचं पण अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात म्हणून त्याचं पक्षीदेह धारी असं यथार्थ वर्णन केले आहे .

 गंडभेरुंड हासुद्धा एक पौराणिक पक्षी असून तोही  अत्यंत सामर्थ्यवान आहे . त्याची छायाचित्रे आणि माहीती मी वेगळ्या लेखात सविस्तर पणे देईन .

लोभ असावा !

- राहुल अभ्यंकर , विरार .

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

 

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् ।

तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥ 

भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. "

आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात . 

वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन काळ म्हणजे सुमारे २२०० वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे .सातवाहनांच्या व्यतिरिक्त वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकुट, यादव ते अगदी मराठा साम्राज्य पर्यंत नियमित युद्ध आपण ऐकत आलो आहोत . साम्राज्यविस्तार आणि साम्राज्य संरक्षण ह्या दोन्हीसाठी युद्ध अटळ होतं. आज आपण जो वीरगळ बघणार आहोत तो महाराष्ट्रातला अत्यंत अनोखा असा नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला आणि

महाराष्ट्रातला एकमेव ( नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला ) शिल्पपट आहे.

 चित्र क्रमांक १ . बोरीवली मधील एकसार गावातील शिलाहार कालीन नौकादल निदर्शक वीरगळ .

वर निर्देशित केल्याप्रमाणे चित्र क्रमांक एक मध्ये वीरगळाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवपिंडी दिसून येते आणि संपूर्ण चित्रात वेगळी आणि उठावदार दिसणारी वस्तू म्हणजे त्या शिवपिंडीवर वाहिलेलं गुलाबी रंगाचे फूल ! वस्तुतः याच्या बाजुलाच एक अत्यंत सुंदर आणि लहानसं शिवमंदिर आहे .पण जुनं ते सोनं या हिशोबाने लोक आजही या वीरगळावरच्या शिवपिंडीला आस्थेने पुजतात .त्यामुळे आजही अज्ञान आणि आस्थेचा सुंदर मिलाफ बऱ्याचशा वीरगळांवरती दिसून येतो . म्हणूनच या लेखामध्ये मी वीरगळाचा प्रत्येक टप्पा आणि कप्पा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .

चित्र क्रमांक २ . एकसार गावातील वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा (लढाई निर्देशक ).

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा टप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवण्यासाठी असतो . यामध्ये विविध प्रकार असून त्याप्रमाणे वीरगळांचं वर्गीकरण केलं जातं. चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे सदर वीरगळ हा नौका दलाच्या युद्धामध्ये आलेल्या वीराच्या वीरमरणाला दर्शवण्यासाठी उभारला गेला आहे . या सर्वात खालच्या कप्प्यामध्ये ३ नौका दिसून येतात. बारकाईने निरीक्षण केल्यास त्या शिडाच्या नौका होत्या हे दिसून येतं .सातवाहन काळामध्येच मोसमी वाऱ्यांचा शोध लागला होता आणि त्याचा वापर मुख्यत्वे व्यापारासाठी केला जात होता .सातवाहनांच्या नाण्यांवरती मिळालेलं जहाजाचं चित्र हे अधोरेखित करतं की अगदी तेव्हापासून आरमाराचं अस्तित्व भारतात होतं. शिडांव्यतिरिक्तही वल्ह्यांचा वापर नौकानयनासाठी केला जात असल्याचं दिसतं. मधल्या बोटीत बारकाईने लक्ष दिलं तर लढणारी माणस धनुष्यबाणाचा वापर करताना दिसतात तर काहीजण वल्ही मारताना दिसतात त्याचबरोबर नौकेच्या शेवटी एक माणूस सुकाणू धरून नौकेला दिशा दाखवताना स्पष्ट दिसून येतो आणि त्याला लागूनच असलेला दुसरा माणूस शिडाची दोरी सांभाळताना दिसतो. शिल्पकाराच्या कमी जागेत खच्चून जास्त शिल्प भरण्यामागचा उद्देश हा त्या घनघोर लढाईचं स्पष्ट शिल्पांकन व्हावं असा दिसतो. थोडक्यात ज्या वीराला मरण आलं ते ह्या नौका दलाच्या युद्धामध्ये आलं आणि ती लढाई बरीच घनघोर झाली असावी असं यातून आकलन होतं .

चित्र क्रमांक ३ . एकसार गावातील वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( स्वर्ग प्राप्ती निर्देशक )

सर्वात खालच्या कप्प्यात लढाईचा प्रसंग घडल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यात सहसा त्या वीराला स्वर्ग प्राप्ती झाली असं अभिप्रेत करणारे शिल्प कोरलं जातं. वीराचं शौर्य आणि पराक्रम या कप्प्यातून सहज दाखवलं जातं. चित्र क्रमांक तीन मध्ये मध्यभागी असलेली शिवपिंडी वीर शिवाचा उपासक असल्याचा दर्शवते. त्याच बरोबर वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्वर्ग प्राप्तीचा प्रसंग दर्शवते.  चित्र क्रमांक तीन मध्ये शिवपिंडीवर  (उजवीकडे) वाहिलेल्या गुलाबी रंगाच्या फुला च्या बाजूला एक पुरोहित उभा दिसतो. उजव्या हातातल्या भस्माच्या पुरचुंडीतून तो शंकरावरती भस्मलेपन करत असल्याचं दिसतं. पुरोहिताच्या मागे असलेल्या अप्सरा या सितार / वीणा सदृश्य तंतुवाद्य घेऊन गायन वादन करताना दिसतात. त्याच सोबत अप्सरांच्या वरती पुरोहिताचे काही शिष्यगण हे मंत्रोच्चारण करताना दिसतात . शिवपिंडीच्या दुसऱ्या बाजूला (डावीकडे) वीरगती प्राप्त झालेला वीर ( शिल्प भग्नावस्थेत ) चौरंगावर बसलेला दिसून येतो.  पुरोहित त्या वीराला वेदमंत्र सांगतात .

चित्र क्रमांक ४ . एकसार गावातील वीरगळाचा खालून तिसरा कप्पा  (स्वर्गरोहण )

वेदमंत्रांनी संपन्न झालेल्या शिव पूजनानंतर स्वर्गप्राप्ती झालेल्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. चित्र क्रमांक चार मध्ये मधोमध वीर चौरंगावर बसलेला आढळतो ( वीराची मूर्ती पूर्ण भग्नावस्थेत ). त्याच्या आजूबाजूला चवऱ्या ढाळत उभ्या असलेल्या अप्सरा त्याच्या स्वर्गरोहणाची स्थिती दर्शवतात. वीराचा वेगळा कप्पा हा त्याने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाचं द्योतक असतं. बऱ्याचदा अप्सरा वीराला खांद्यावर उचलून नेताना दाखवतात किंवा या शिल्पाप्रमाणे त्याच्यासाठी विशेष यानाची व्यवस्था केली जाते. 

चित्र क्रमांक ५ . एकसार गावातील वीरगळावरील कलश (मोक्षप्राप्ती ).

वीरगळावरचा कलश मांगल्यासोबतच मोक्षप्राप्तीचंही प्रतिक आहे. चित्र क्रमांक पाच मध्ये कलश अत्यंत सुबकपणे कोरलेला आहे .त्यावरती श्रीफळ ( नारळ ) शोभून दिसतं . श्रीफळाभोवती यक्षिणी फेर धरून नाचताना दिसतात . कलशाचं भव्य आकारमान आणि सौंदर्य , सुबकता हे एका राजाचं वीरगळ असल्यांचं दर्शवतात. कारण इतकं भव्य, सुबक आणि सुरेख शिल्प कोरणाऱ्या शिल्पकाराला उत्तम मानधन द्यावं लागे आणि त्यासाठी राजा किंवा त्याचं राजघराणंच समर्थ असे.

सर्वसाधारणतः कोणत्याही वीरगळावर ब्राम्ही किंवा तत्सम लिपीतला शिलालेख उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यामागचा अचूक इतिहास हा छातीठोकपणे सांगता येत नाही. परंतू इतिहासकारांच्या मते एकसार येथील वीरगळाबाबत दोन मतप्रवाह आहेत. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता हेन्री कझिंग यांच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धात वीरमरण पावलेल्या सोमेश्वराचे हे शिल्पचित्रण आहे. तर डॉ. शिल त्रिपाठी यांच्या मते हे स्मारक गुजरातच्या परमार भोज राजा याच्या कोकण विजयाचे प्रतीक आहे. व इ.स. १०२० साली साष्टी येथील नौकादल निदर्शक वीरगळ जमीन एका ब्राम्हणाला दान दिली, असा निष्कर्ष काढला आहे. 

संदर्भग्रंथ : - इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा, श्री. अनिल दुधाणे.

 

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥

चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी ! 

मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात.

चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र .

चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र .

वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं.

टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा.

नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, कानात झुलणारी भली मोठी कर्णकुंडलं लक्ष वेधतात. ( चित्र क्र १ . पाहावे ) . 

टप्पा क्र २ . खालून दुसरा कप्पा.

खालून दुसरा कप्पा हा मृत्यूपश्चात घडणाऱ्या गोष्टींचं वर्णन करतो. युद्धभूमीत मृत्यू आलेल्याला स्वर्ग मिळतो अशी शास्त्रात नोंद आहे. त्याप्रमाणे दोन अप्सरा ( हिरवा रंग )ह्या मृत्यू पावलेल्या स्रीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आलेल्या दिसतात. स्वतःच्या खांद्यावर बसवून त्या वीर स्त्रीच्या आत्म्याला स्वर्गात नेताना दिसतात. वीर स्त्री स्वत:चे दोन्ही हात अप्सरांच्या खांद्यावर ठेवून उभी दिसते. सोबतच अप्सरा हातातल्या चवऱ्या ( लाल रंग ) ढाळताना दिसतात. चवऱ्या म्हणजे पूर्वी राजे महाराजांच्या बाजूला दासी उभी राहून वारा घालत ते साधन. 

टप्पा क्र ३ . खालून तिसरा कप्पा.

या कप्प्यात वीर स्त्री मांडी घालून बसलेली दिसते. समोरच असलेल्या शिवपिंडी समोर नतमस्तक होऊन शिवआराधना करताना दिसते. स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर स्वतःच्या आराध्य देवाचं पूजन करण्याचा प्रसंग सर्वच वीरगळांवर आढळतो. असं असलं तरी बहुतांश वीरगळांवर शिवपिंडच आढळते हे विशेष.

टप्पा क्र ४ . सर्वात वरचा कप्पा.

सर्वात वरचा कप्पा हा सदर वीरेला मोक्ष प्राप्ती झाली हे कलशाच्या माध्यामतून दर्शवतो. कलश हा वीरगळाचा आणि वीर मनुष्याचं अंतिम ध्येय दर्शवतो. सहसा कलशाच्या रक्षणासाठी वाघ हत्ती शरभ इ. प्राणी किंवा काही मंगलचिन्ह कोरलेली असतात. ती इथे कुठेही मला आढळली नाहीत.

नेहमीप्रमाणे वीरगळावर कोणताही शिलालेख नसल्याने त्याचा काळ, लढाईचं विशिष्ट कारण इ. गोष्टींचा सहज बोध होत नाही. पण अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या प्रसिद्धी पावलेल्या रणरागिणींसोबतच अश्या काही प्रसिद्धी न पावलेल्या स्त्रियाही संसारासोबतच संरक्षणातही कर्तव्य चोखपणे बजावत होत्या हे कौतुकास्पदच ! 

लोभ असावा !

राहुल अभ्यंकर, विरार.

 

वीरगळ - गोधन संरक्षक ( भंडारदरा रतनवाडी )

गोधन संरक्षणाचा वीरगळ - अमृतेश्वर मंदिराजवळ , रतनवाडी, भंडारदरा

॥ हर हर महादेव ॥

यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) . 

 ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत . आणि जर या प्रसंगात ते मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांच स्मारक दगडात घडवलं जाई जे येणाऱ्या पिढ्यांना साक्ष देई . असाच एक पशुधनाशी संबंधित एक वीरगळ आपण पाहणार आहोत .

चित्र क्र . १. बेवारस पडलेले वीरगळ, रतनवाडी , भंडारदरा .

चित्र क्रमांक १ मध्ये वीरगळ असेच झाडाच्या कडेला टेकवून ठेवलेले दिसत आहेत . न जाणो किती ऊन पावसाळे पाहीले असतील त्यांनी ! 

चित्र क्र . २ वर्षानुवर्षांच्या ऊन पावसाच्या आघाताने झिजलेला वीरगळ

चित्र क्रमांक दोन मध्ये झिजलेला वीरगळ दिसतो . वीरगळावर बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नाही . त्यामूळे त्याच्या इतिहासाचा स्पष्ट मागोवा घेता येत नाही . तरीही त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रसंग पुन्हा एकदा उभा केला जाऊ शकतो. सदर वीरगळ झिजला असल्याने मी त्याला थोडं संपादित करून समजता येईल असा प्रयत्न केला आहे .

चित्र क्र . ३ . वीरगळाचे संपादित केलेले छायाचित्र .

चित्र क्रमांक ३ मध्ये दाखावलेल्या वीरगळाचे एकूण ४ कप्पे करून त्याला समजता येईल आणि प्रसंग पुन्हा उभा करता येईल . ( चित्र क्रमांक २ आणि ३ ची तुलना करून पाहाणे ) .

कप्पा क्र १ - सर्वात खालचा कप्पा .

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा हा त्याच्या मृत्युचं कारण दर्शवतो . सर्वात खालच्या कप्प्यात ( पिवळ्या रंगात ) वीर मरून पडलेला दिसतो . त्याच्या सभोवती ( पांढऱ्या रंगात ) पशुधन उभे दिसते. प्रथमदर्शनी पाहताना असे वाटू शकते की तो वीर त्यांच्या पायदळी आला असावा . मात्र ते तसं नसून त्यांना वाचवताना तो धारातिर्थी पडला असं अभिप्रेत आहे.

कप्पा क्र . २ खालून दुसरा कप्पा

हा कप्पा घनघोर युद्ध दर्शवतो . धारातिर्थी पडलेला वीर ( पिवळ्या रंगात डावीकडे ) हातात ढाल आणि तलवार ( हिरवा रंग ) घेऊन लढताना दिसतो . तर त्याच्या समोर घोड्यांवर ( पांढरा रंग ) बसून हातात तलवारी ( हिरवा रंग ) घेऊन  दोन स्वार ( पिवळा रंग ) येताना दिसतात . लढाई तुल्यबळ नसली तरी अशा सेने समोर धावून जाऊन त्वेषाने लढण्याचा पराक्रम वीराने केलेला दिसतो .

कप्पा क्र . ३ खालून तिसरा कप्पा

हा कप्पा वीराला वीरगती प्राप्त झाली असं दर्शवतो . डावीकडे एक पुरोहीत ( पिवळा रंग ) ( जटाभारा वरून ओळखावं ) शिवपिंडीवर भस्मलेपन करताना आणि मंत्रोच्चारण करताना दिसतो . उजवीकडे दोन वीर ( पिवळा रंग ) शिवलिंगाची पूजा करताना दिसतात . वीर मरणामुळे झालेली स्वर्गप्राप्ती ह्या कप्प्यात दर्शवतात .

कप्पा क्र . ४ सर्वात वरचा कप्पा .

हा कप्पा कलश ( आकाशी रंग ) दर्शवतो . सदर कलश हा त्या वीराला मोक्ष प्राप्त झाला याचं प्रतिक आहे . सर्वसाधारणतः कलशाभोवती वाघ, सिंह किंवा शरभ ( शरभ म्हणजे ? ) हे कलशाचे संरक्षक म्हणून कोरले जातात . किंवा सुर्य चंद्र ( यावत् चंद्र दिवाकरो ) कोरले जातात . सदर  वीरगळावर कलशाभोवती जे काही कोरलं आहे ते अत्यंत अस्पष्ट आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही .

थोडक्यात सदर वीरगळ न बोलताही त्या काळची शिल्पकला , समाजव्यवस्था, लोकांच्या मनोअवस्था आणि तत्कालीन समजुतीं बदद्ल बरंच काही सांगून जातो . म्हणूनच यांचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . वस्तूचं मूल्यं माहीत नसेल तर कसं काय कोणी तिला सांभाळेल ? ती कळावी म्हणून हा लेखप्रपंच .

लोभ असावा ....!

राहुल अभ्यंकर , विरार

अजून माहीती, छायाचित्र आणि अभिप्रायासाठी इन्स्टाग्राम वर संपर्क करा .

 

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥

वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल.

चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र.

चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.

 चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा

 चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा

नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ.

कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ )

सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे. 

कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेला हात ( चित्र क्र २ नारिंगी रंग )

स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत सती जाण्याची प्रथा होती.  सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर आत्मदहन करून घेणे. ( सदर प्रथा काळाच्या ओघात बंद झाली असल्याने त्यावर कोणतीही टिपण्णी म्हणजेच कमेंट करू नये ही वाचकांना नम्र विनंती ). जसं युद्धात वीरमरण आलं की स्वर्ग मिळे ही भावना समाजात रूढ होती तीच भावना सती जाणे ह्या चाली बद्दल होती. त्यामुळे वीराच्या चितेवर सती जाणं हे भाग्याचं समजलं जाई. सदर वीराची पत्नी सती गेली हे दर्शवण्यासाठी कोपरापासून दुमडलेला हात दाखवला आहे. हातावर ठळकपणे दिसणाऱ्या बांगड्या पत्नी सौभाग्यासह स्वर्गवासी झाली हे ठळकपणे दर्शवण्यासाठी आहेत.

कप्पा क्र. ३ वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( चित्र क्र. ४ )

हा टप्पा वीराच्या मृत्युनंतरचा प्रसंग दर्शवतो. सदर वीर हा मृत्युपश्चात शिवपिंडीची पूजा आणि आराधना करताना दिसतो. पाय दुमडून बसलेला नंदी, त्याच्या पाठीवरचं कुबड अगदी स्पष्ट दिसतं. वीराच्या पाठी त्याची पत्नी सुद्धा हात जोडून बसलेली दिसते. शिव आराधना करून त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असं दर्शवले आहे.

कप्पा क्र. ४ सूर्य, चंद्र आणि कलश 

चित्र क्र २ मध्ये कलशाच्या खाली चंद्रकोर आणि संपूर्ण सूर्य कोरलेले दिसतात. यावत्चंद्रदिवाकरो  म्हणजेच जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर यांची किर्ती टिकेल असा त्याचा अर्थ आहे. पण त्यावर शिलालेख नसल्याने लढाईचं कारण, वीराचं नाव आणि इतर बारकावे लक्षात येत नाहीत. सर्वात वर कलश काढलेला आहे. कलशाचा अर्थ सदर वीर दांपत्याला मोक्षपद मिळाला असा असतो. 

लोभ असावा !

राहुल अभ्यंकर, विरार.

वीरगळ – हुतात्मा वीरांचे स्मारक Memorial Stone in Maharashtra

वीरगळ –

          महाराष्ट्रभूमी म्हणजे समरभूमी ! देव देश धर्म रक्षणार्थ पेटलेले अग्निकुंड !!! स्वातंत्र्यदेवतेच्या या यज्ञात अनेकांनी प्राणाहुती दिल्या. या हुतात्मा वीरांची स्मृती चिरकाल जिंवंत रहावी म्हणून त्यांचे स्मारक ‘वीरगळ’ रुपात उभारण्यात येई. शूरवीरांच्या पराक्रमगाथा सांगत असलेले हे स्मारक आज मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. चला त्यांच्या कथा व्यथा जाणून घेऊयात ...

वीरगळ म्हणजे काय ?

       वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू-वीरकळ-वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रूढ झाला. ‘कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात . इंग्रजीत वीरगळास ‘Herostone’ असे संबोधतात.

       थोडक्यात वीरगळ म्हणजे वीराचा दगड, अर्थात वीराच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेला दगड.

       वीरगळ हा शब्द पुल्लिंगी आहे.

वीरगळचा इतिहास :

         अभ्यासकांच्या मते , महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ साधारण आठव्या ते तेराव्या शतकातील आहेत. नंतरच्या काळात अगदी १८ व्या शतकापर्यंत वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिळांवर वीरशिल्प आढळते. कर्नाटकातील वीरगळांवर शिलालेख असल्याने त्या वीराबद्दल आणि वीरगळबद्दल माहिती समजते.

        महाराष्ट्रातील वीरगळांवर मात्र शिलालेख आढळत नाही. त्यामुळे वीराचे नाव, त्याच्या मृत्यूची तिथी, युद्धप्रसंग याबाबत इतिहास मूक आहे.

     वीरगळ अभ्यासताना त्यावर शिलालेख नसल्याची उणीव नेहमी भासते. बऱ्याच वीरांचा इतिहास अंधारात राहिला.

वीरगळ रचना :

       छायाचित्रावरून वीरगळ रचना सहज लक्षात येईल.

    वीरगळ वाचन नेहमी तळातील चौकटीपासून वरपर्यंत करावे. त्यामुळे घटनाक्रम व्यवस्थित समजतो.

     तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, ज्या युद्धात वीर धारातीर्थी पडला.

     त्यावरच्या चौकटीत अप्सरा हुतात्मा वीराला स्वर्गात नेत आहेत असे दिसते. {वीराचे स्वर्गारोहण}

     सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गवासी झालेला दाखवतात. तो शिवलिंग पूजताना दिसतो. सोबत शिवगण कोरलेले असतात.

   त्यावर शिखर असते. तिथे कलश व इतर शिल्पे आढळतात.

चौकट प्रसंगात व शिखरात आढळणारी विविधता :

     बहुतांश वीरगळांमध्ये चौकटप्रसंगातील क्रम सारखा असतो . खालपासून वरपर्यंत ‘युद्धप्रसंग- वीराचे स्वर्गारोहण – स्वर्गवासी वीर – शिखर याच क्रमाने शिल्पे कोरतात. यामध्ये आढळणारी विविधता....

१} युद्धप्रसंग :-

      वीरगळ मध्ये तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, त्यात वीरास वीरमरण येते. काहींमध्ये तळातील दोन चौकटीत दोन युद्धप्रसंग दिसतात. हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच वीराचे असून एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील असतात. काही ठिकाणी तळातील चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो.

     युद्धप्रसंगात वीर व त्याच्याविरूद्ध लढणारे शत्रू यांची शिल्पे दिसतात. वीरांची वेशभूषा, शत्रूसंख्या, सर्वांच्या हातातील शस्त्रे यांचे निरीक्षण करावे.

     येथे- पायदळ, घोडदळ, गजदळ, नौकायुद्ध, द्वंद्वयुद्ध यांसारखे विविध युद्धप्रकार आढळतात.

छायाचित्रे –

(१.१) यामध्ये एक वीर ढाल तलवार घेऊन दोन शत्रूंपासून लढताना दिसतो. हे पायदळातील युद्ध आहे.

१.२) या छायाचित्रात वीर एका शत्रूसोबत तलवारीने लढताना दिसेल. हे द्वंदयुद्ध आहे.

(१.३) येथे दोन युद्धप्रसंग आढळतात. प्रथम वीर चार पायदळ सैनिकांविरुद्ध लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो अश्वावर स्वार होऊन लढताना दिसेल.

हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील आहेत.

(१.४) यामध्येही दोन युद्धप्रसंग दाखवले आहेत. पहिल्या प्रसंगात वीर हत्तीवर स्वार होऊन लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो पायीच एका घोडेस्वार शत्रूविरुद्ध लढतोय.

(१.५) यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो. त्यावरच्या चौकटीत तो दोन शत्रूंसोबत लढत आहे. असा प्रसंग कोरला आहे. त्याच्या हातात ‘फिरंगी’ तलवार आहे.

 २} स्वर्गारोहण :-

      युद्धप्रसंगाच्या वरच्या चौकटीत वीराचे स्वर्गारोहण दाखवतात. धारातीर्थी पडलेल्या विराला अप्सरा कैलासात नेत आहेत , या आशयाचे शिल्प असते. वीर नेहमी मध्यभागी असतो.

      वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा, तितका तो वीर मोठ्या पदावरचा समजावा. काही ठिकाणी विराला पालखीचा मान मिळतो.

छायाचित्रे :

(२.१)या वीरगळामध्ये वीरासोबत दोन अप्सरा दिसतात.

(२.२) यामध्ये वीरासोबत चार अप्सरा कोरलेल्या आहेत.

(२.३) वीर पालखीत बसून स्वर्गास गेलेला दिसतो.

(२.४)येथे वीर प्रथम पालखीतून व नंतर पायी चालत स्वर्गाकडे मार्गस्थ झालेला आहे.

३) स्वर्गवासी वीर:

      सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गास गेलेला दाखवतात. वीर शिवलिंग पुजताना दिसतो. वीरासोबत शिवगणही आढळतील. वीर डाव्या बाजूस तर शिवगण उजव्या बाजूस असतात.

     काही वीरगळांमध्ये वीर – फक्त शिवलिंग , काहींमध्ये नंदीवरील शिवलिंग पूजताना दाखवतात. काहींमध्ये तर वीराला प्रत्यक्ष भगवान शिव पूजनाचा मान मिळतो. वीराच्या अधिकारपदानुसार ही विविधता आढळते.काही दुर्मिळ वीरगळांमध्ये स्वर्गवासी झालेला वीर त्याची आराध्य देवता अथवा त्याच्या पंथाची देवता पूजताना दिसतो. मग ती विष्णू, सरस्वती, गणपती अशी कोणतीही असू शकते...

छायाचित्रे :

(३.१) यामध्ये वीर शिवलिंग पूजताना दाखवला आहे. सोबत एक शिवगणही दिसतो.

(३.२) यामध्ये वीर नंदीवरील शिवलिंग पुजत आहे. सोबत सहा-सात शिवगण सनई व इतर वाद्ये वाजवताना दिसतात.

(३.३)

यामध्ये वीराला प्रत्यक्ष भगवान शंकर पूजन्याचा मान मिळाला आहे.

४} शिखर :

     वीरगळांचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिखर. काही वीरगळांमध्ये शिखर आढळत नाही.

      शिखारामध्ये विविध शिल्पे – शुभलक्षणी चिन्हे कोरलेली असतात. येथे कलशासोबत पक्षी कोरले असतील तर त्यास कलशवाहक व प्राणी असतील तर त्यांना कलशसंरक्षक म्हणतात. याशिवाय येथे चंद्र-सूर्य, किर्तीमुख, कमळपुष्प यांसारखी शिल्पे आढळतात.

छायाचित्रे :

(४.१) या वीरगळामधील शिखरावर कलश कोरला आहे. कलश स्वर्गारोहनाचे प्रतिक आहे.

(४.२) यामध्ये कलशासोबत चंद्र सूर्यही कोरलेले आहेत. वीरांची कीर्ती आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हा त्यामागचा उद्देश !

(४.३) या छायाचित्रात शिखरावर मयुरशिल्पे दिसतात. ते सुंदरतेचे प्रतिक आहेत.

(४.४) येथे शिखरावर रत्नशाखा व कमळपुष्प आढळते. ती समृद्धीची  प्रतिके म्हणून कमळपुष्प कोरतात.

(४.५) या ठिकाणी काळाशासोबत सिंह दिसतो. येथे सिंह कलशसंरक्षक आहे.

(४.६) येथे कलश व त्याच्या बाजूला हत्ती, कीर्तिमुख आढळतात. ते कलशसंरक्षक म्हणून कोरले असावेत.

(४.७) या छायाचित्रात कलशासोबत मारुती दिसतो. हुतात्मा वीराचे इष्ट दैवत म्हणून मारुती कोरला असावा.

(४.८) या छायाचित्रात एक पादुका, ढाल व सतीचा हात कोरला आहे. या वीराची पत्नी सती गेली , त्यामुळे येथे सतीचा हात दिसतो.

(४.९) येथे शिखरावर कीर्तिमुख कोरलेले आढळते. कीर्तिमुख मनुष्याचे पाय खाते, अशी दंतकथा आहे.

गोधनगळ :

           वीर जर त्याच्या गोधनाचे रक्षण करताना हुतात्मा झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ गोधनगळ उभारतात.

          यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी वीर त्याच्या गोधनासोबत दाखवतात. त्यावर युद्धप्रसंग , स्वर्गारोहण प्रसंग, स्वर्गवासी वीर, शिखर असे अनुक्रमे कोरतात.

व्याघ्रशिल्प असलेला वीरगळ:

     वाघाला मारताना वीर मुत्युमुखी पडला असेल तर त्याच्या स्मरणार्थ व्याघ्रगळ उभारला जाई.

     यात तळातल्या चौकटीत वीर वाघासोबत लढताना दाखवला जात असत. त्यावर स्वर्गारोहण , स्वर्गवासी वीर, शिखर कोरलेले असत.

स्तंभ वीरगळ :

      काही ठिकाणी एकाच दगडाच्या चारही बाजूला चार वीरगळ कोरलेले आढळतात. ते चार वेगवेगळ्या वीरांच्या स्मारके असतात.

      या चारही वीरगळमधील चार वीर एकाच कुटुंबातील/गावातील असतात. ते सर्व एकाच युद्धात मारले गेले असतील, तर त्यांचे स्मारक अशा स्वरूपाचे आढळते.

वीरांगनागळ :

     इतिहासातील काही वेळा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही रणांगणात उतरावे लागले. या युद्धात योद्धा स्त्रियांना वीरमरण आले. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ वीरगळप्रमाणे वीरांगनागळ उभारली गेली.

आत्मबलिदानवीरगळ :

            ही दुर्मिळ प्रकारची वीरगळ . युद्धदेवतेस बळी लागतोच अशी आपल्याकडे समजूत आहे. त्यामुळे युद्ध सुरु होण्याआधी एखादा धैर्यवान वीर आपली मान कापून शीर समरभूमीस अर्पण करी. त्याच्या स्मरणार्थ आत्मबलिदानवीरगळ उभारीत. फलटण शहरातील स्मशानभूमीजवळ आत्मबलिदानगळ पहायला मिळते.   

वीराच्या अधिकारपदानुसार वीरगळात आढळणारे बदल

      युद्धात गावकरी ,सामान्य शेतकरी यांच्यापासून ते सेनापती, राज्यापर्यंत कोणीही मृत्युमुखी पडे.

    या वीरांच्या अधिकारपदानुसार वीरगळात काही फरक असतात.  

१} मोठ्या वीरांच्या वीरगळ आकाराने मोठ्या असतात.

२} स्वर्गारोहण प्रसंगात वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा तितका तो वीर मोठा समजावा. मोठ्या पदावरचे वीर पालखीतून स्वर्गारोहन करताना दाखवतात.

३} सामान्य वीराला शिवलिंग पूजनाचा मान मिळतो. मात्र वीर मोठ्या पदावरचा असेल तर त्यास नंदीवरील शिवलिंग किंवा भगवान शिवपूजनाचाही मान मिळतो. तसेच स्वर्गात त्याच्यासोबत जास्त शिवगण दाखवतात. शिवगण वाद्ये वाजवताना दिसतील.

४} मोठ्या पदावरील वीरांच्या वीरगळात शिखर कोरतात. तिथे शुभलक्षणी चिन्हेही दाखवतात. 

 देगाव येथील दशानन / रावणाचे अंकन केलेली वीरगळ

             युद्धभूमीवर रणसंग्रामात ज्यांना वीरगती प्राप्त झाली ते वीर चंद्र-सूर्य असेपर्यंत आपल्या स्मरणात राहावे यासाठी कर्नाटकांतून आलेल्या ह्या शिल्पप्रकाराला वीरगळ संबोधले गेले. अनेक विस्मरणात गेलेले शूर आणि पराक्रमी योद्धे यांच्या स्मरणार्थ केलेलं हे एक स्मारक म्हणजे इतिहासाचे मूक साक्षिदार. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या वीरगळ आढळतात, त्यांतील वीरगळींवर अंकण केलेल्या लढाया, सशस्त्र सैनिक, लढाईसाठी सज्ज असलेले घोडदळ किंवा  पायदळ, सागरी युद्ध, गोधनाचे रक्षणकर्ते, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करतानाचे शिल्पकारांनी केलेले हे सजीव सादरीकरण खूपच बोलकं आहे. आयताकृती (फक्त समोरील बाजूस अंकण केलेली) आणि स्तंभ वीरगळी (चारही बाजूंनी अंकण केलेली) असे वीरगळीचें मुख्य प्रकार पडतात. सर्वात खालच्या बाजूस वीर झोपलेला आणि ज्या कारणांमुळे वीरमरण आले त्या लढाईचे किंवा प्रसंगाचे चित्रण असते. त्याच्या वरच्या भागात वीर अप्सरांबरोबर किंवा स्वर्गरोहण चित्रण केलेले असते. शेवटच्या टप्प्यात वीर एकटा किंवा पत्नीसह शंकराच्या पिंडीची पूजा करताना म्हणजेच मोक्षप्राप्ती झालेला दाखवलेला असतो. त्यावर कलश किंवा चंद्र सूर्य यांच्या सुद्धा प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या वीरपुरुषाची पत्नी सती गेली असेल तर कोपऱ्यात दुमडलेल्या हाताचा भाग हा सतीशिळेवर कोरलेला असतो. 

              रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देगाव या गावी अश्याच एका वेगळ्या स्वरूपाच्या युद्धाचे अंकण केलेली वीरगळ आहे. म्हसळा-माणगाव रस्त्यावर मोरबे / मोर्बे गावातून वाट वाकडी करून गाडीरस्त्याने ३ किलोमीटरचा प्रवास करत आपण देगाव या गावी पोहचतो. गावाच्या शेवटी असलेल्या शेतालगत शिवमंदिराच्या प्रांगणात आठ ते नऊ वीरगळी ठेवलेल्या आहेत. त्यातील एका वीरगळीवर दशानन म्हणजेच दहा डोके असलेला धनुर्धारी वीरपुरुष हा एका प्राण्यावर उभा राहून तिर मारताना दिसतो. कदाचित शिल्पकाराला हा वीर रावणासारखा शूर असावा असे दाखवायचे असावे. रावणाला दहा तोंडे होती त्यामुळे त्यास दशमुखी हे नाव पडले. दहा तोंडे याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता, त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. दहा पंडितांची विद्वत्ता एकट्या रावणामध्ये एकवटली असल्याने त्याला दहा तोंडाचा असे म्हंटले जाते. दहा तोंडची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावली जाते. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण संबोधित असे. म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले. कदाचित रावणाच्या ह्याच प्रकृतीचे अंकण ह्या वीराबद्दल शिल्पकाराने केले असावे. 

               चारही बाजूंनी चित्रण केलेल्या पाच वीरगळी आपल्याला आजही पाहता येतात. उभ्या ठेवलेल्या तिसऱ्या वीरगळीवर स्वर्गप्राप्तीच्या रकान्यात फणा काढलेल्या नागाची प्रतिमा कोरलेली आहे. स्वर्गरोहणात छत्रचामर प्राप्त झालेल्या ह्या वीरगळी दंडनायकाच्या असाव्यात. आजूबाजूला पुरातन शिवमंदिराचे अवशेष विखरून निपचित पडून राहिलेले दिसतात. त्यात कोरीव खांब, नक्षीदार छताचा भाग काही वीरगळ यांचा समावेश आहे. मंदिरात शिवलिंग असून काही जीर्ण झालेल्या मुर्त्या दिसून येतात. माणगाव - म्हसळा रस्त्याने प्रवास करताना आपल्यासारख्या इतिहासप्रेमी मंडळींनी वेळात वेळ काढून ही आगळी वेगळी वीरगळ पाहायलाच हवी. ह्या अवशेषांवरून इतिहासाचा उलघडा होईलच असे नाही पण काहीतरी नवीन पहिल्याच समाधान नक्कीच मिळेल. 

संदर्भ ग्रंथ :- 

१) इतिहासाचे मूक साक्षिदार 'वीरगळ आणि सतीशीळा' - श्री. अनिल किसन दुधाने - मराठीदेशा फाउंडेशन 

२) शिल्पसमृद्ध कोकण - प्र. के घाणेकर, आशुतोष बापट - स्नेहल प्रकाशन 

https://www.royalbhatka.com/2023/03/blog-post_22.html

 नौदल युद्धाचे चित्रण केलेली मुंबईतील एक्सर गावातील वीरगळ


युद्धप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्र आणि कर्नाटकात बऱ्याच वीरगळी उभारलेल्या दिसतात. मुंबईतील बोरिवलीजवळील एक्सर गावात, सेंट लॉरेन्स शाळेजवळ या सहा विरगळी आहेत. एक्सरच्या खाडीत झालेल्या युद्धाची आठवण करून देणाऱ्या ह्या सहाफुट उंचीच्या वीरगळी आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पहिल्या दोन वीरगळी ह्या जमिनीवरील युद्धप्रसंग दर्शवतात, त्यात चिलखती हत्तीसमवेत धारातीर्थी पडलेल्या वीरांचे चित्रण केलेले आहे. तर उर्वरित चार वीरगळींवर नौदल युद्धांची दृश्ये कोरलेली आहेत. तिसऱ्या विरगळीवर चार पटल आहेत. पहिल्या पटलावर पाच शिड्यांची जहाजे असून त्यात युद्धासाठी सज्ज असलेले सैनिक आणि वल्हे मारणारे शिपाई दिसून येतात. दुसऱ्या पटलावर चार जहाजे एका मोठ्या जहाजावर हल्ला करत आहेत आणि त्यामुळे जहाज व समुद्रात होणारी जीवितहानी दाखवली आहे. याच पटलावर एक अस्पष्ट शिलालेख आहे. तिसरा आणि चौथा भाग स्वर्गलोकप्राप्ती झाल्याचा आहे.




चौथी वीरगळ ही आठ पटलांची आहे. पहिल्या पटलावर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैनिकांची अकरा जहाजे, त्यांच्या उंच डोलकाठ्या आणि वल्ही दाखवली आहेत.  दुसऱ्या पटलावर उजवीकडून येणाऱ्या बोटीने समोर असलेल्या पाच जहाजांवर हल्ला चढवलेला दिसतो. तिसऱ्या पटलावर विजयानंतर परतणारी नऊ जहाजे दिसतात. चौथ्या पटलावर सैनिक जहाजातून उतरताना दिसत आहेत.  पाचव्या भागात सैन्य दाखवले आहे जे प्रतिष्ठित व्यक्तींसोबत मोर्चा काढत आहेत. वरच्या बाजूंस अमृतकुंभ असून त्याखाली स्वर्गलोक प्राप्त झालेला वीर चित्रित केलेला दिसतो. पाचव्या विरगळीवर चार पटल आहेत.  पहिल्या भागांत सैन्य,  सात जहाजे आणि छताखाली विराजमान झालेला त्यांचा मुख्य अधिकारी दाखवला आहे. दुसऱ्या पटलावर प्रत्येकी तीन जहाजे डावीकडून आणि उजवीकडून लढाईकरिता पुढे येत आहेत. उर्वरित दोन पटलांमध्ये शिवलिंगाची पूजा करणारा वीर आणि सुरांगनांची दृश्ये आहेत.  



सहावी वीरगळ ही दोन पटलांची आहे.  खालच्या भागांत जहाजांवरील सैन्य युद्धात गुंतलेले दाखवले आहे  आणि वरच्या पटलावर एक योद्धा बसलेला दाखवला आहे. एक्सरच्या काही वीरगळींवर शिलालेख आहेत, परंतु त्यांची झीज झाल्यामुळे शिलालेखांचा उलगडा होऊ शकत नाही. अन्यथा या नौदल युद्धात नेमके कोण सहभागी होते आणि त्याची नेमकी तारीख कळू शकली असती. या प्रदेशाचा इतिहास आणि नौदल युद्धात कोणत्या प्रकारच्या कलाकुसरीचा वापर केला जातो, या दोन्ही दृष्टीने या वीरगळी महत्त्वाच्या आहेत. कालपरत्वे या वीरगळींना मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्बल लावल्यामुळे जमिनीत गाडली गेली आहेत. 

शिलाहारांचा राजा सोमेश्वर याने  साधारण १० वर्षे राज्य केले. त्याच काळात यादवांची वक्रदृष्टी या प्रदेशावर .पडली. अनेक प्रयत्न करूनही यादवांना शिलाहारांचा संपूर्ण पाडाव करता येत नव्हता. त्या भागांतील बंदरे आणि आर्थिक सुबत्ता यादवांना खुणावत होती. म्हणूनच १२६५ मध्ये यादव राजा महादेव याने मोठे सैन्य घेऊन सोमेश्वरावर स्वारी केली. या सैन्यात चिलखती हत्तींचाही समावेश होता. निकराची लढाई झाली, त्यात सोमेश्वराचा पाडाव होऊ लागला. हे लक्षात येताच त्याच्या युद्धनौका घेऊन तो समुद्रात उतरला. महादेवाने त्याचा पाठलाग केला. समुद्रातही घनघोर युद्ध झाले. महादेवाने शेवटी सोमेश्वराला त्याच्या युद्धनौकेसह जलसमाधी दिली आणि मुंबईच्या इतिहासातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. सोमेश्वराचे अंत्यसंस्कार समुद्रकाठच्या एक्सर गावात करण्यात आले. एक्सरच्या वीरगळींची भव्यता आणि त्यावरील अंकनांचा तपशील पाहता, यावर चित्रित केलेले युद्ध कोणतेही लहान युद्ध नसावे आणि म्हणूनच ह्या विरगळी आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

संदर्भसूची :- 

1) S Tripathi - Ships on Hero Stones from the West Coast of india. 





सतीशीळा :

    पूर्वी पती मरण पावला की त्याच्या पत्नी सती जात. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सतीशिळा उभारत. सतीशिळेत सतीचा हात चुडेमंडीत कोरत असत तसेच ती स्वर्गात तिच्या पतीसोबत शिवलिंग उजळताना दाखवत. काही वेळा सती स्त्रीची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली जाई. त्यामुळे क्वचित सतीशिळांवर सती घोड्यावर बसलेली दाखवतात. बऱ्याचदा वीरांच्या एकापेक्षा अनेक सती जात. तेव्हा जितक्या पत्नी सती गेल्या तितके हात सतीशिळेवर कोरले जात.

गद्देगळ:

     एखाद्या मंदिरात दान दिले, वर्षासन दिले की त्याचा भंग होऊ नये म्हणून गद्देगळ उभारत. यात गाढव व स्त्रीचे संकर करतानाचे  शिल्प असते. त्यावर चंद्र सूर्य असतात.

    मंदिरात दिलेले वर्षासन / दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहो असा त्याचा अर्थ. या शिल्पांच्या वर-खाली मोकळ्या जागेत शिलालेख असतो.

यात मंदिरास दिलेल्या इनामाबाबत व शापवाणीबद्दल {शिवीचा} उल्लेख आढळतो.

    गद्देगळ एक प्रकारची शापवाणीच आहे. मंदिरास दिलेले वर्षासन जो मोडेल किंवा मंदिराचे इनाम चोरेल/ त्याचा गैरवापर करेल त्याला हा शाप लागतो, हा गद्देगळ कोरण्यामागचा उद्देश.

वीरगळांच्या व्यथा :

       युद्धात धारातीर्थी पडलेल्या किंवा परकीय आक्रमणापासून गावचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्यांचे स्मारक म्हणजे वीरगळ. पण आज त्यांची ओळख हरवली आहे. ते कुठेतरी महादेवाचे मंदिर , ग्रामदैवत किंवा गावकुसाबाहेरील दुर्लक्षित व भग्न अवस्थेत दिसतात. काही ठिकाणी तर देवाचे दगड म्हणून पूजले जातात. बहुतांश वीरगळांना शेंदूर फासल्याने त्याची झीज होते. सतीशिळा आणि गद्देगळ यांचीही तीच अवस्था. अज्ञात वीरांच्या स्मारकांची ही अवस्था म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान !

          वीरगळांची अशी उपेक्षा थांबली पाहिजे. त्यांना त्यांची हरवलेली ओळख मिळवून देणे, त्याबाबत जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे. इतिहासप्रेमी म्हणून वीरगळ संवर्धनासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.

वीरगळ संवर्धन

      वीरगळांची अवस्था खूप वाईट आहे. आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वीरगळांना शेंदूर किंवा रंग थापू नये, यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. अस्ताव्यस्त पडलेल्या वीरगळ त्यांना ऊन वारा पाऊस लागणार नाही , अशा ठिकाणी ठेवाव्यात . त्यामुळे त्यांची झीज थांबेल. जमल्यास वीरगळबाबत माहिती देणारा बोर्ड तिथे लावावा. पुरातत्व खात्याकडे वीरगळ नोंदणीचे फॉर्म मिळतात. त्यामार्फत वीरगळ नोंदणी करावी.

      आपली संस्कृती राखणाऱ्या वीरांना मानवंदना म्हणून एवढेतरी आपण करूच शकतो !!!

बा रायगड परिवाराने दुर्ग श्रीसुधागड वर केलेले वीरगळ संवर्धन.

कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बीड येथे शिवशक्ती प्रतिष्ठान ने वीरगळींचे खूप सुंदर स्मारक बनवले आहे .

लेख लिहिताना ....

      वरील लेख लिहिताना श्री. सदाशिव टेटवीकर यांच्या ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ या पुस्तकाची खूप मदत झाली.

      तसेच सतीश शिंदे {सह्याद्रीवेडा} , सागर सुर्वे, संतोष तुपे, अमित निंबाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नील खलाटे, संतोष तुपे, श्रीराम कुलकर्णी, बा रायगड परिवार यांनी छायाचित्रे पुरवली. हा लेख निखील आघाडे यांच्यामुळे pdf स्वरुपात आला.

लेख बनवण्यास मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे मनपूर्वक आभार....

     संकलन/लेखन – सुजय खलाटे   

(ब्लॉग मध्ये काही त्रुटी असल्यास कमेंटबॉक्स मध्ये नक्की कमेंट करा .)  

 https://bhimthadiheritage.blogspot.com/p/herostone.html

वीरगळ (Hero Stone)

वीरगळ (Herostone) : युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे वीरगळहोय. वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात. वीरगळाला वीराचा दगडकिंवा केवळ वीरम्हणूनही संबोधतात. वीरगळांचा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते. तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला. कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या राजघराण्यांची सत्ता ज्या प्रदेशांवर पसरली होती, तेवढ्याच भागात वीर-कल आढळतात. महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ मुख्यत्वे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा बोरिवलीपर्यंतचा भाग इतक्या प्रदेशात पसरलेले आहेत. यांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. बोरिवलीरेल्वे स्थानकाजवळ एकसर गावात उत्तम दर्जाच्या सात वीरगळ आहेत. त्यांवरील कोरीव कामात युध्दाचा प्रसंग दाखविलेला असून हत्तींचे चित्रण आहे. याशिवाय नौका आणि वल्ही यांचेही चित्रण आहे.  अनंत स. अळतेकर यांच्या मते हे युध्द शिलाहार राजा सोमेश्वर व यादव राजा महादेव यांच्यातील असावे यावरील शिल्पपट्टांच्या धाटणीवरून ते इसवी सनाच्या तेराव्या शतकातील असावेत. 

महाराष्ट्रात वीरगळांचे दोन प्रकार दिसतात : एका प्रकारात वीराच्या दगडावर तीन-चारबहुधा तीनचौकटी कोरून यांत काही प्रसंग कोरतात. तीन चौकटी असलेल्या वीरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. युध्दप्रसंगांत बरेच वैविध्य असते. उदा., ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक, घोडेस्वारांची लढाई, गाईच्या चोरीवरून लढाई झाली असल्यास गाईंचा कळप एका बाजूला असतो. त्याला गोवर्धन शिल्प म्हणतात. नाविक युध्द असल्यास अनेक वल्ह्यांच्या नावा दिसतात. खालून दुसऱ्या चौकटीत, वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत, असे चित्र कोरलेले असते. हा प्रवास कधी पालखीतून, तर कधी रथातून होताना दिसतो आणि सगळ्यांत वरच्या चौकटीत कैलासामध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखविलेला असतो. वीरगळाच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजूंस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर ह्या वीराची कीर्ती कायम राहील, हे ह्यातून सांगावयाचे असते. वीरगळावर कधीकधी चार वा पाच चौकटीही असतात. क्वचित दगडाच्या चारही बाजूंवर कोरीव काम केलेले आढळते. ह्या प्रकारातील वीरगळांचा काळ अकरावे ते तेरावे शतक असा सांगता येईल. दुसऱ्या  प्रकारात अर्धउठावातील मानवी आकृती दिसते. ह्या प्रकारातले वीरसतराव्या-अठराव्या शतकांतील आहेत, असे त्यांच्या शैलीवरून म्हणता येते. महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.


कर्नाटकातल्या वीरगळांशी महाराष्ट्रातल्या वीरगळांचे विशेष साम्य आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील वीरगळांवर वीर हा कैलासावर शिवाची पूजा करताना दिसतो; कैलासवासी होतो. मात्र कर्नाटकातील गदगसारख्या काही ठिकाणी तो शिवाऐवजी विष्णूची वा नरसिंहाची पूजा करताना दिसतो; वैकुंठवासी होतो. शैव-वैष्णव वादाची छाया वीरगळांवर ही पडलेली दिसते.


कर्नाटकातील वीर-कलांचे थोडे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यांचे मूळ स्मृतिमंदिरांत असल्याचे स्पष्ट होते. अनेक वीर-कलांवर, चित्रचौकटींवर मंदिरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. द्राविड मंदिरशिल्पाच्या प्रतिकृती स्पष्ट दिसतात. राजघराण्यांतील व्यक्तींच्या स्मरणार्थ देवांची मंदिरे बांधली जात. सामान्य माणसे मंदिरे बांधण्याऐवजी त्यांच्या छोटेखानी प्रतिकृती निर्माण करून वीरांची स्मृती जतन करीत. वीरगती पावलेल्या माणसांच्या स्मरणार्थ राजस्थानात पालियाउभारतात. मात्र येथे बऱ्याच वेळी दगडाऐवजी लाकडाचा वापर करून स्तंभ उभारले जातात. कधी फलकांचाही ह्यासाठी वापर केला जातो. 

१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ

२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ

३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ

४. 

यादवकालीन वीरगळ : बळसाणे, जि. धुळे (महाराष्ट्र), १३ वे शतक.

५.

गढेगाळ (शापवाणी शिल्प)

ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली. वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.
वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.
घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.
काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.

नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.

गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-

शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.

ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.

ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे

व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.

ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्‍याचशा पुसट झालेल्या आहेत.

रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.

अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.

स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||

स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल

तर काटी येथील गधेगाळात 'हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.

महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)

अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.

रतनवाडीतील हत्तीगाळ

 अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)

 पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)

दिवेआगर येथील श्री बाळ जोशी यांच्या खाजगी जागेत असलेला गधेगाळ शिलालेख यावर सन १२१४ मधील शिलाहार राजा अनंत देव यांच्या काळातील राम मंडलिक या अधिकार्याने गणपती नायक याला दिलेल्या एका दानपत्राचा उल्लेख आहे. 

संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...