Thursday, December 10, 2020

वरळीचा किल्ला

 मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर इंग्रजांनी ‘‘वरळीचा किल्ला‘‘ बांधला. ह्या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला.
वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी ‘यू‘ या अक्षरा सारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणी नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथे समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वहातूक होत असे. ह्या जलवहातूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला.
वरळीच्या टेकडीवर असलेल्या ह्या किल्ल्याची नुकतीच डागडुजी पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. छोट्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाज्याच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टॉवर आहे. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजुला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे. ह्या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. १७ व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांचा वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहाता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
दादरहून वरळी कोळीवाड्यात जाणार्‍या (१६९;५६) बेस्ट बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन मच्छिमार वसाहतीतून १० मिनीटे चालत गेल्यावर आपण ह्या किल्ल्याजवळ पोहोचतो. किल्ला छोटा व आटोपशिर असल्यामुळे अर्ध्यातासात पाहून होतो.

वरळीचा किल्ला
साधारण १६७५ साली बांधलेला हा किल्ला अगदी दुरूनही सहज नजरेत भरतो. मात्र किल्ल्यावर जायचं तर वरळी कोळीवाड्यातल्या शेकडो घरांची रांग ओलांडावी लागते. कुठे चुकत चुकत, तर कुठे किल्ल्यावर जायचा रस्ता विचारात आपण थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशीच येऊन थबकतो. मुंबईमध्ये असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात सुस्थितीत असलेला हा किल्ला आहे. आजुबाजूच्या परिसरातले रहिवासी किल्ल्याची आणि किल्ल्यात असलेल्या मंदिराच्या स्वच्छतेची अगदी नीट काळजी घेतात. किल्ल्यावरून समोरच्या वांद्रे-वरळी सी लिंकचा अगदी अप्रतिम नजारा दिसतो.

वरळीचा किल्ला :-  १५६१ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. मुंबई बेटांसोबत १६६५ साली हा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मुंबईतल्या इतर कोणत्याही किल्ल्यावर  आढळणारा पाण्याचा स्त्रोत या किल्ल्यावर आढळतो. पाण्याची सोय महाराष्ट्रातील प्राचीन वा मध्ययुगीन दुर्गांवर नेहमीच आढळते. त्यामुळे कदाचित दुर्ग जरी पोर्तुगीजांनी बांधलेला असला तरीही कदाचित हा दुर्ग, माहिमच्या दुर्गाच्या सोबतीने बांधला गेल्याची शक्यताही असू शकते.
वरळीचा किल्ला - छाया. मंगेश नाबर
वरळीचा किल्ला – छाया. मंगेश नाबर

  वरळी - प्रभादेवी च्या रस्त्याने पुढे जात आम्ही मुंबईच्या पश्चिम किनारपट्टी वर असलेल्या वरळी किल्ल्यावर आलो. कोळीवाड्यात असल्याने किल्ल्याकडे जाताना दिसले ते कामात मग्न असलेले कोळी मित्र. कोळीवाड्यातील शेवटच्या बस स्टॉप वरून साधारण १५ मिनिटे चाल करून किल्ल्याच्या प्रवेश द्वाराशी आम्ही पोहोचलो होतो पण आता दिवसभराच्या दगदगीने थकवा जाणवायला लागला होता पण किल्ल्यात प्रवेश करताच बांद्रा - वरळी सी लिंक च्या विहंगम दृष्याने आमचा थकवा पूर्णपणे नाहीशा झाला. किल्ल्यात हनुमानाचे एक छोटेखानी मंदिर आहे आणि एक छोटीशी व्यायामशाळा सुद्धा आहे. मुंबईतील सकाळपासून बघितलेल्या किल्ल्यापैकी हा किल्ला सगळ्यात स्वछ असा किल्ला होता. किल्ल्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा होत असल्यामुळे सुद्धा स्वच्छता असावी.
स्थळ दर्शक माहिती : 19.023675, 72.816998 (19°01’25.2″N 72°49’01.2″E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : एल्फिस्टन मार्ग (पश्चिम मार्गिका)
वरळी किल्ला
Worli Fort - 1.jpegप्रभादेवीच्या टोलेजंग इमारती
Sky Line - 1.jpegबांद्रा - वरळी समुद्री पुल
Sea Link - 1.jpeg
आता संध्याकाळ आपले पंख पसरवायला लागली होती आणि नभात रंगाची उधळण होत होती. एका बाजूला सुंदर असा समुद्री पुल आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रभादेवीच्या टोलेजंग इमारती ह्या रंगसंगती मधे तर फारच आकर्षक दिसत होत्या. त्यांची छबी टिपण्याचा केलेला हा एक प्रयत्न

 

 

 Fort: Worli
Type: Sea fort
Location: Worli (south Mumbai)

The Bandra Worli Sea-Link bridge from the Worli fort

The Worli fort
The Worli fort entrance


This fort was built in 1675 by the British to keep a watch over the sea and to ward off enemies and pirates from the sea. It now houses a gym inside the fort. The above pictures seem to be of a facelifted fort done by some NGO and is not the actual fort. The actual fort lies just behind this one and is razed to the ground.

 

मुंबई बेट सुरक्षित करण्यासाठी पोर्तुगीजांनी मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले, त्यापैकीच वरळी कोळीवाड्यातील छोट्याश्या टेकडीवर बांधलेला हा वरळीचा किल्ला. वांद्रे-वरळी सीलिंकवरून जाताना ह्या किल्ल्यावर घंटा लावण्यासाठी असलेला मनोरा लक्ष वेधून घेतो आणि किल्ल्याबद्दल असलेली उत्सुकता आणखीन वाढते.






वरळी किल्ला

वरळीच्या किल्ल्याची बांधणी पोर्तुगीजांनी १५६१ साली केली. तळाकडे जाड होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती, त्रिकोणाकृती बुरुज आणि ह्या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी मनोरा इ. पोर्तुगीजकालीन स्थापत्याची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यात दिसून येतात. मुंबई बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाले त्यावेळी ह्या किल्लाचा ताबा ब्रिटीशांना मिळाला. ब्रिटन आणि फ्रांस यांच्या दरम्यान सप्तवार्षिक युध्दात वरळी किल्ल्यावर जादा शिबंदी आणि तोफा ठेवण्यात आल्या होत्या असे उल्लेख मिळतात.






तळाशी रुंद भिंत, त्रिकोणी बुरुज आणि मनोरा

वरळी कोळीवाड्यातील छोट्याश्या रस्त्याने जेव्हा आपण किल्ल्याच्या समोर येतो, तेव्हा सगळ्यात पहिले लक्ष जाते ते किल्ल्याच्या तटबंदीकडे. हा किल्ला साधारणपणे १.५० मीटर उंचीच्या जोत्यावर बांधला आहे. जोत्याच्या भिंती तटबंदी सारख्याच उताराच्या आहेत. किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरुवातीला जोत्याच्या उंचीपर्यंत आणि नंतर दरवाजाच्या उंचीपर्यंत जातात.






प्रवेशद्वार आणि पायऱ्या

किल्ल्याचा दरवाजा चार मीटर रुंदीच्या तटबंदीच्या भिंतीतून एखाद्या बोगद्यासारखा ठेवण्यात आला आहे. दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन कौलारू खोल्या, उत्तरेकडील खोलीलगतच्या तटबंदीमध्ये असेलेली आणखीन एक खोली आणि ह्या खोलीसमोर असलेली गोड्या पाण्याची विहीर व तटबंदीवर जाण्यासाठी जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. किल्ल्यात एवढेच  बांधकाम / अवशेष आहे. तटबंदीमध्ये असलेल्या खोलीचा वापर बहुधा दारुगोळा आणि बंदुका ठेवण्यासाठी केला जात असावा.
तटबंदीला लागून असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तटावरील गस्तीमार्गावर जाता येते. हा गस्तीमार्ग तटबंदीच्या चार मीटर रुंदीमुळे तयार झाला आहे. किल्ल्याला साधारणपणे चार मीटर रुंदीचा गस्तीमार्ग आणि त्याला अंदाजे १ मीटर उंचीचा कठडा आहे. कठड्यामध्ये तोफा ठेवण्याकरिता १५ खाचा आहेत. या खाचांच्या खालील भागात पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. खाचांच्या दोन्ही बाजूला आयताकार कट्ट्यांची उभारणी केली आहे. दोन खाचांच्या मधल्या भागात अर्धवट झाकलेले कोनाडे असून यांच्या तळाकडील भागात दिवे ठेवण्यासाठी गोलाकार खाचा आहेत. दिव्यांच्या उजेडाचा उपयोग फक्त पहाऱ्यावरील शिपायांनाच होईल, किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने प्रकाश दिसणार नाही अशी ह्या दिव्याच्या खाचांची रचना आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूला त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी दगडी मनोरा बांधलेला आहे.






गस्तीमार्ग
तोफांसाठी केलेले खाचे, आयताकार कट्टे आणि झाकलेले कोनाडे
घंटा बांधण्यासाठी बनवलेला मनोरा

किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी आकाराची विहीर आहे. विहिरीचा आतील भाग तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असून विहिरीला वर्षभर पाणी असते. मुंबई बेट आणि परिसरात पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला असावा आणि हे ह्या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
लष्करीदृष्ट्या वरळी किल्ला मोक्याच्या जागी आहे. माहिम भागातील समुद्रकिनारा उलट्या C सारखा आहे. या उलट्या C च्या दोन टोकांवर आहेत वांद्रे किल्ला आणि वरळी किल्ला. पोर्तुगीज काळात मुंबई सात बेटांची होती. वरळी व बांद्रे समुद्रालगतची बेटे असल्यामुळे ह्या दोन्ही बेटांचे सामरिक महत्त्व पोर्तुगीजांनी ओळखले होते आणि म्हणून त्यांनी वरळी, बांद्रे आणि मध्यभागी माहीमच्या किल्ल्याची उभारणी केली. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर नियंत्रण आणि समुद्रातील दळणवळणावर लक्ष ठेवणे हे ह्या किल्ल्याचे मुख्य काम.
वरळी किल्ला म्हणजे छोटी चौकी आहे, पण मोक्याच्या जागी असल्यामुळे वरळीच्या चौकीवजा किल्ल्याला भरपूर महत्त्व होते. तसेच मुंबई परिसरातील हा एकमेव किल्ला आहे ज्याची बाह्य तटबंदी आणि पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत. हेच ह्या किल्ल्याला भेट देण्याचे मुख्य कारण आहे. एकेकाळी शत्रूला धडकी भरवणारा हा किल्ला आपल्याकडे वारसास्थळांचे महत्त्व व जतन यांची माहिती नसल्यामुळे किल्ल्याचा बाह्यभाग कचरा व घाण यांच्या दुष्टचक्रात अडकला आहे.






 Location: Worli
Significance: One of the watchtowers of Mumbai
If you were to head down to the Worli Fort, the unmistakable smell of fish is likely to take over your senses thanks to its location in the middle of the Worli fishing village. But there is more to this place than just the tiny bylanes filled with fisherfolk that lead us to it. A magnificent structure that stands on the Arabian Sea that was built by the British around 1675 as a precaution against invasions, you might find it hard to believe now but the importance of this structure lies in its strategic location.
If not for this fortress, Bombay would have remained open to outsiders for attack. It was  strategically located in such a way that it overlooked the Mahim Bay at the time, and from here, the British could keep a lookout for enemy ships.
It is quite unfortunate that our Government has made no efforts to protect this heritage site and it is because of the British architectural brilliance that the ancient watchtower has managed to retain its old glory.
Did you know? Many wrongly assume that the fort was constructed by the Portuguese around the 16th century but in reality, it was built much after the Portuguese left the country.

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...