Thursday, December 10, 2020

वांद्रा किल्ला अर्थात बांद्रा बॅण्डस्टॅण्ड

 

वांद्रा किल्ल्याची नवी ओळख बांद्रा बॅण्डस्टॅण्ड अशी आहे असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण तिथे किल्ला आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. बॅण्डस्टॅण्ड येथे असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलला लागून जो रस्ता जातो, तो रस्ता थेट आपल्याला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो.

आज जो किल्ल्याचा भाग आपल्याला दिसतो, त्या भागाला किल्ला किती म्हणायचे हा मोठा प्रश्न आहे. पण पेशवे दप्तरामध्ये “वेसाव्याचा किल्ला हा माहीम व वांद्रे येथील किल्ल्यांइतका मोठा आहे” असा उल्लेख आहे. म्हणजे पेशवेकाळात हा किल्ला आत्तापेक्षा भरपूर मोठा होता. किल्ला ज्या टेकडावर बांधलेला आहे त्याच्या आजूबाजूला बऱ्यापैकी खडकाळ समुद्रकिनारा आहे. किल्ल्यांची पश्चिम आणि दक्षिण बाजू तीव्र कड्याची असून पूर्व व उत्तर दिशेची बाजू कमी उताराची आहे.

बांद्रा किल्ला
बांद्रा किल्ला

जिथे रस्ता संपतो, तिथेच किल्ल्याचा ईशान्यभिमुख दरवाजा आहे. ह्या दरवाज्यावर पोर्तुगीज भाषेतील लेख आहे. लेखानुसार १६४० साली किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर दरवाज्याच्यावर शिलालेख असलेला चौकोनी दगड बसवलेला असेल. मुख्य दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे खोलीचे अवशेष दिसतात. ह्या खोलीचे प्रयोजन काय असावे हे कळून येत नाही.  मुख्य प्रवेशद्वार ते दुसरे दक्षिणाभिमुख दरवाज्यापर्यंत जमीन समतल असून ह्या भागात तटबंदी आहे. समुद्राच्या बाजूकडील तटबंदी आतल्या बाजूने फक्त कमरेइतकीच उंच आहे. आतल्या बाजूने तटबंदी कमी उंचीची असली तरी समुद्राच्या बाजूने ही भिंत चढून येणे कठीण आहे. ह्याच भागात किल्ल्याचा दुसरा तटबंदीयुक्त दक्षिणाभिमुखी दरवाजा आहे. ह्या दरवाज्याच्या वर बेहरामजी जीजीभॉय यांनी शिलालेख बसवला आहे. तो लेख पुढीलप्रमाणे:

BYRAMJEE JEEJEEBHOY POINT

THE LAND FORMING THIS POINT AND THE PATHWAY LEADING TO IT WAS PRESENTED TO THE PUBLIC BY BYRAMJEE JEEJEEBHOY ESQ RE C.S.I. WHO ALSO CONTRIBUTED A LARGE PORTION OF THE EXPENSES OF CONSTRUCTING THE SEA SIDE ROAD. AND IT IS THEREFORE ALSO CALLED AFTER HIM THE BYRAMJEE JEEJEEBHOY ROAD.

ह्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर नैसर्गिक दगडांनी बनलेला चढ आहे. ह्या ठिकाणी नंतरच्या काळात पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या भागातील तटबंदी पूर्णपणे पडून गेली आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी येतो. ह्या ठिकाणावरून माहीम खाडी, अरबी समुद्र आणि वरळी-बांद्रा सीलिंकचे उत्तम दर्शन होते. किल्ल्यावर इतर कोणतेही अवशेष नाही आहेत.

वरळी-बांद्रा सीलिंक
वरळी-बांद्रा सीलिंक

किल्ल्याचे दरवाजे ज्या भिंतीत बांधले आहेत त्या भिंती दगडी असल्या तरी दरवाज्याच्या वरचा भाग विटांनी बांधलेला आहे हे येथील दरवाज्यांचे वैशिष्ट्य.

आज आपल्याला जो वांद्रे किल्ल्याचा भाग दिसतो ते किल्ल्याचे पश्चिम बाजूकडील टोक आहे कारण बाकी किल्ला ब्रिटीशांच्या सल्ल्यानुसार १७३९ साली पोर्तुगिजांनीच पाडून टाकला होता.

माहीम खाडीवर लष्करी ठाणे उभारणे पोर्तुगीजांना आवश्यक वाटले असावे म्हणून हा किल्ला बांधला असावा. १६व्या शतकातील नोंदीत “या खाडीत कोणत्याही आकाराची नौका यातून पुढे जाऊ शकणार नाही इतकी ही खाडी खडकाळ आहे” असा उल्लेख आढळतो. मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर  सरहद्दीवरील महत्वाचा किल्ला बनला. मराठ्यांनी साष्टी बेट जिंकल्यानंतरसुध्दा ह्या किल्ल्याचे महत्त्व कमी झाले नव्हते.

१५३४ साली गुजरातचा सुलतान बहादूर शाह याचा पराभव केल्यानंतर पोर्तुगीजांनी ह्या भागात आपला तळ उभारला. ह्याच काळात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ल्यांची उभारणी केली. त्यापैकीच मोक्याच्या जागी बांधलेला बांद्रा किल्ला. पोर्तुगीजांनी १६४० साली माहीमची खाडी, अरबी समुद्र आणि माहीम बेटांचे संरक्षण करण्यासाठी साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला बांधला. बांद्र्याच्या दक्षिणेला असलेली मुंबईची सात बेटे पोर्तुगीजांनी इंग्रजांना भेट दिल्यानंतर ह्या किल्ल्याचे महत्त्व फार वाढले. हा किल्ला दक्षिणेला असलेल्या माहीम खाडी, माहीम शहर आणि वरळी बेट, तसेच पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रावर लक्ष ठेवतो. तसेच मुंबई बंदरात उत्तरेकडून येणाऱ्या समुद्र मार्गाचे सरंक्षण करतो. पोर्तुगीज काळात ह्या किल्ल्यावर संरक्षणासाठी सात तोफा होत्या.

१७३७ साली मराठ्यांनी खंडोजी माणकरांच्या नेतृत्वाखाली किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण हा हल्ला फसला व ते वेढा घालून बसले. मराठ्यांनी बहुतांश साष्टी परिसर जिंकलेला असला तरी त्यांना वेसावे आणि वांद्रे हे दोन्ही किल्ले जिंकता आले नाही. ७ फेब्रुवारी १७३९ रोजी वेसावे किल्ला मराठ्यांनी जिंकल्यानंतर, तसेच ब्रिटीशांनी सुध्दा मराठ्यांचे वाढलेले बळ पाहून आम्हाला आता मदत करता येणार नाही असे पोर्तुगीजांना कळवून टाकले. वांद्रे किल्ला जर मराठ्यांच्या ताब्यात गेला तर मराठे त्याचा उपयोग आपल्याविरुध्द करतील असे ब्रिटिशांना वाटल्यामुळे त्यांनी पोर्तुगिजांना किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार १५ मार्च – २५ मार्च १७३९ या काळात पोर्तुगिजांनीच हा किल्ला पाडून टाकला. १८१८ सालानंतर भारताच्या बहुतांश भागावर ब्रिटीशांची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्यामुळे किल्ल्यांचे महत्त्व ओसरू लागले. १८५० साली बायरामजी जीजीभॉय यांनी किल्ल्याची जागा विकत घेतली आणि तिथे पर्यटनस्थळ बनवले.

आज ह्या किल्ल्याची ओळख फक्त बांद्रा बॅण्डस्टॅण्ड अशी राहिलेली आहे. एकेकाळी ज्या किल्ल्याने पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज ह्या सत्ता आपल्या अंगाखांद्यावर खेळवल्या, आज त्याच किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळतात लैलामजनू व प्रेमवीर. बहुधा काळाचा महिमा म्हणतात तो हाच. कालाय तस्मै नमः.

सूचना

ओहोटीच्या वेळेस समुद्रातील खडकावर जाणे टाळावे. भरतीचे पाणी वाढत असल्याचे लक्षात न आल्यामुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना ह्या परिसरात घडलेल्या आहेत, त्यामुळे समुद्रात आणि दगडावर बसण्याचा मोह टाळावा.


 CASTELLA de AGUADA (Or BANDRA FORT)
Location: Bandra
Significance: A watchtower located around a freshwater spring.
Popularly known as the Bandra Fort, Castella de Aguada was built by the Portuguese in 1640 as a watchtower overlooking Mahim Bay to the south, the Arabian Sea to the West and southern islands of Mahim. Also meant to the guard the northern sea route into Mumbai Harbour during the Portuguese rule, the fortifications used to be armed with seven cannons  and smaller guns. Translated, Castella de Aguada means ‘Fort of the Waterpoint,’ which is apt considering that there is a freshwater spring  in the vicinity that supplied potable water to the ships cruising the coasts.
At the beginning of the 18th century, following the defeat of the Portuguese, the Marathas were emerging as strong political powers and all British properties in India were under threat. So the British did the one thing they could to ensure that they wouldn’t lose control over their properties and demolished a part of the ‘killa’ so that the Marathas wouldn’t be able to capture and use it to their advantage against the British army.
Despite the precautions that had been taken, the Marathas captured the island in 1739  and reigned over it until they lost it to the British in the First Anglo-Maratha War in 1774. Afterwards, in 1830, the British donated various portions of Salsette Island including Land’s End (where Castella de Aguada is located) to a Parsi philanthropist, Byramjee Jeejeebhoy. He established his residence here and ultimately, the region was renamed to Byramjee Jeejeebhoy Point.
Did you know? It is believed that “Castella” is really a misspelling for Portuguese word “Castelo” meaning castle This means the intention might have been to name it Castelo de Aguada.

 

























 If you are a true history lover and if you respect our historical monuments, try to get here as early as possible around 6 am to 7 am. After that slowly this area will turn into a lover spot. You will notice the couples on each corner of this majestic monument. I don't understand, why they need corners to express their love?  


The 15-20 stairs take us to a dead end, The fort is in demolished condition. The small garden on the top of the hill is now maintained by Bandra Band Stand Residents’ Trust. This area could be a part of the fort at those time. The view of Bandra-Worli Sea-link from fort was simply awesome.

 

 

How to reach Bandra fort or Castella de Aguada:

Best Bus number 211 going from Bandra Railway station west to Father Agnel Ashram will drop you to the bandra fort. 

Best Time to Visit:

As early as possible to explore the fort otherwise you will forced to explore something else. 

History: 

  The fort was built by the Portuguese in 1534 as a base after defeating Bahadur Shah of GujaratCastella de Aguada was one such strategically located fort, overlooking the Mahim Bay to the south, the Arabian Sea to the west, the islands of Worli to the south and the town of Mahim to the south west. The fort also guarded the northern sea route into Mumbai Harbour. This sea route, a large estuary, was later reclaimed from the sea in the nineteenth century. During the Portuguese rule, it was armed with seven cannons and other smaller guns as defense. A freshwater spring in the vicinity supplied potable water to passing ships, thus lending the fort its name.

After the decline of the Portuguese in the early 18th century, the Marathas became the largest threat to British possessions. Sensing an impending Portuguese defeat, the British partially demolished the fort as a precautionary measure. In 1739 the island was invaded by the Marathas; it was ruled by them until 1774 when the British gained possession of the area during the First Anglo-Maratha War.

Final Words:

The bandra fort or Castella de Aguada is worth watching. The view of Bandra Worli sea-link from here is must watch. Visit this place as early as possible to avoid couples. Please respect our historical monuments. And for couples, Ask yourself that if this is your true love then why you need corners of forts to express it?

 

 वांद्र्याचा किल्ला
वांद्र्याचा प्रसिद्ध बँडस्टँड ओलांडून पुढे गेलं की ताजच्या पंचतारांकित हॉटेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला. अगदी समुद्रकिनारी वसलेला असल्यानं इथे येणं हा छान अनुभव असतो. किंबहुना म्हणूनच प्रेमी युगुलांनी हा किल्ला कायम भरलेला असतो. वरळीच्या किल्ल्यातून दिसणाऱ्या सी लिंकच्या बरोबर दुसऱ्या टोकाला हा किल्ला आहे. १६४०च्या सुमारास पोर्तुगीजांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरचा पोर्तुगीज भाषेतला शिलालेख अगदी ठळकपणे नजरेत भरतो. केस्टेला डी अग्वादा हे या किल्ल्याचं पोर्तुगीजकालीन नाव आहे.

वांद्र्याचा किल्ला :- वांद्रे म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सहासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातली तेढ १६१२ सालच्या सुरतेच्या युद्धापासून मूळ धरून होती. त्यामुळे ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणा-या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी हा दुर्ग १६४० मध्ये बांधला. पुढे याचा उपयोग ब्रिटीशांच्या ताब्यात असलेल्या मुंबई बेटांना शह देण्यासाठीही झाला. १७३७ साली मराठ्यांच्या आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्धं झाली. या वर्षी पूर्ण साष्टी जिंकूनही वांद्रे व वेसावे हे किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत. १७३९ सालच्या स्वारीत मराठ्यांचा जोर पाहून ब्रिटिशांनी हा किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला आणि १७३९ च्या मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला.
(५) वांद्रे किल्ल्याचे प्रवेशद्वार : छाया. मंगेश नाबर
(५) वांद्रे किल्ल्याचे प्रवेशद्वार : छाया. मंगेश नाबर
किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर  Castella de Aguada (Portuguese: Fort of the Waterpoint) ही पाटी आमचे लक्ष वेधून घेत होती.  आम्ही गेलो तेव्हा काही तरुण मुलंमुली भर उन्हात आपापली प्रकाशचित्रे काढण्यात मग्न होती. तेवढ्यात समोरच्या समुद्रात मात्र कुणी बुडाल्याची हाकाटी कानावर आली आणि पाच मिनिटात अग्नीशमन दलाची मंडळी हजर झाली होती. किल्ल्याच्या लगत उभे आहे  ताज समुहाचे गगनचुंबी हॉटेल.  समोरचा विस्तीर्ण समुद्र किनारा आज बॅंडस्टॅंड या नावाने अधिक ओळखला जातो, असे मी म्हटले की तुम्हाला पटकन कळेल. नाहीतर या वांद्र्याच्या किल्ल्यावर कोण कशाला जातो ?  डॉ. मिलिंद पराडकर मात्र त्या तळपत्या उन्हात आम्हाला त्या काळातील परिस्थितीचे यथार्थ चित्र उभे करण्यात दंग झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठ्यांनी या किल्ल्यावर जी आक्रमणे केली ती सारी करतांना मराठे खुश्कीच्या मार्गाने आले होते. पण त्यांना शेवटपर्यंत मुंबई जिंकणे शक्य झाले नाही.  युरोपियनांचे आरमारी वर्चस्व पाहूनच मराठ्यांनी आरमाराला महत्व दिले होते. पुढील इतिहासात  कान्होजी आंग्रे यांच्या प्रबळ आरमाराची विशेष नोंद आहे.
t was now time to move the second fort of the itinerary i.e. “Castella de Aguada”which is commonly known as “Bandra Fort”.
Bandra Fort Doorway Arch
Bandra Fort Doorway Arch
But here only one or two remains from the past can be seen now. One is this big doorway arch and other is rampart wall. Rest all the fort is converted into a garden.
Bandra Worli Sea Link as seen from Bandra Fort
Bandra Worli Sea Link as seen from Bandra Fort
Efforts from eminent Member of Parliament Shabana Azmi and conservation program led by Bandra Band Stand Resident’ Trust made some walls and arch of the fort sustain erosion. (The history of the fort as mentioned on wiki page can be read here https://en.wikipedia.org/wiki/Castella_de_Aguada#History)
Sorrow state of the forts
Sorrow state of the forts
These Mumbai forts are taking their last breaths and are on the verge of falling down. Once a moment of glory and pride these forts are now being overlooked all. My effort was just to try get some pics, relive the history and put small efforts in documentation.
Who knows if our next generation will be able to see these forts or NOT
~ Virag 
Fort Location on GPS:
1) Mahim Forthttps://goo.gl/maps/FsUXR9ATwdA2
2) Bandra Forthttps://goo.gl/maps/SzT1byHiRC42
Co-ordinates:
1) Mahim Fort – 19°02’31.6″N 72°50’16.4″E
2) Bandra Fort – 19°02’30.8″N 72°49’06.1″E
Distance: 160km approx (From Pune)
Travel Mode: Black Pearl
Trek Mates: Ruchira and Me
Route: Pune – Lonavala – Navi Mumbai – Dadar – Mahim – Bandra – Navi Mumbai – Lonavala – Pune
Food: We carried snacks and fruits with us
Water: We carried water with us.
Places of Interest:
1) Mahim Fort – Old walls, sea view, escape route
2) Bandra Fort – Old wall and arch, Sea link view
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...