
बारामतीतील 'नाईकांचा वाडा'
श्री. सिद्धेश्वर मंदिर :-



बारामतीचा भुईकोट :-
मेडद

Fort Entrance





Road inside the Fort premises

दौंड येथील विठ्ठल मंदीर :-
सुरूवातीला नवीन सभामंडप बांधला आहे . आतील काम संपूर्ण दगडी आहे. साधारण हे मंदिर ३०० वर्ष जुनं असावं. परंतु आतली दोन्ही सभामंडप खूपच भव्य आहेत. मध्यभागी कोरीवकाम केलेले चार स्तंभ आहेत तसेच कक्षासनात चार वामनस्तंभ असून सहा अर्धस्तंभ आहेत.


सांगवी-सांडस येथील मंदिरे व शिलालेख
![]() |
| विष्णू, महादेव व गणेश मंदिरे, सांगवी सांडस |
![]() |
| गणेश शिल्प |
![]() |
| विष्णू शिल्प, सांगवी-सांडस |
![]() |
| विष्णू मंदिराच्या गर्भगृहाचे वितान |
![]() |
| गणेश मंदिर |
![]() |
| विष्णू मंदिरासमोरील घाट व भीमा नदी |
![]() |
| शिव मंदिर |
![]() |
| श्रीनाथाचे नवीन मंदिर |
![]() |
| शिलालेख: स्वच्छ करण्यापूर्वी |
![]() |
| शिलालेख: स्वच्छ केल्यानंतर |
![]() |
| दुसरा लेख, सांगवी सांडस |
![]() |
| तिसरा लेख, सांगवी सांडस |
![]() |
| सांगवी गावातील वाडा |
![]() |
| सांगवी गावातील बुजलेली बारव |
![]() |
| हनुमान मंदिर, सांगवी सांडस |
सोमेश्वर मंदीरः-
गर्भगृहात शिवलिंग जमीनीपासून बरेच खाली आहे.
मंदीराच्या आवारात काही शिवलिंग आणि वीरगळ दिसतात.
एका कोपर्यात नंदी दुर्लक्षित अवस्थेत दिसतो.
मंदीराची भिंत एखाद्या तटबंदी सारखी आहे. मंदीराच्या आवारात काही खोल्या आहेत.म्म्दीराच्या आवारात तुळशी वृंदावन आणि यज्ञकुंड आहे.
श्री क्षेत्र निरगुडे, जिल्हा पुणे
पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून १० किमी अंतरावरील ‘निरगुडे’ हे गाव येथे असणाऱ्या मारुती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वताच्या उंच-सखोल डोंगररांगांनी वेढलेले हे गाव मीना नदीकिनारी वसले आहे. या नदीमुळे या भागात शेती फुलली आहे. त्यामुळे समृद्धीची गंगा अवतरली आहे. मीना नदीच्या दुसऱ्या काठावर ‘बेलसर’ नावाचे एक दुसरे गाव आहे. प्राचीन काळापासून या भागात वेगवेगळे कार्य-कलाप झालेले दिसून येतात. रोमन व्यापारी सर्वप्रथम या भागात स्थिरावल्याचे दिसून येते. जुन्नर परिसरात जेथे सुरुवातीच्या काळात लेणी खोदली गेली ते ‘तुळजा लेणी’ हे ठिकाण निरगुडे गावापासून खूपच जवळ आहे.
![]() |
| मारुती मंदिर, निरगुडे |
तुळजा लेणी
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह म्हणून तुळजा लेणी प्रसिद्ध आहे. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. हे ठिकाण निरगुडे या गावापासूनही खूप जवळ आहे. मध्ययुगात केव्हातरी लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले.
| तुळजाभवानी |
तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यात एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. याशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली
आहेत. या लेण्यांत आजतागायत एकही शिलालेख आढळलेला नाही.
लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. आतील डावीकडील व मागील भिंतीत प्रत्येकी दोन व उजवीत एक अशा एकूण पाच खोल्या बौद्ध-भिक्षूंच्या निवासासाठी खोदलेल्या आहेत.
लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून या समूहातील वैशिष्ठ्यपूर्ण लेणे आहे. त्याचा व्यास ८.२३ मी. असून जमिनीपासून छतापर्यंतची उंची ७.६२. मी. आहे. या लेण्याच्या मध्यभागी २.५९ मी. व्यास व ३ मी. उंची असलेला साधा स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग (१.३२ मी. उंच) पिंपासारखा व वरील भाग म्हणजेच ‘अंड’ (१.६७ मी. उंच) घुमटाकृती आहे. घुमटाच्या वर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे.
| तुळजा लेणी |
स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ (प्रत्येकी उंची ३.३५ मी.) असून त्यांचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत. स्तंभांच्या भोवती वर्तुळाकार प्रदक्षिणापथ (१.०७ मी. रुंद) आहे.
स्तूपाच्या वर घुमटाकार छत असून, त्यावर प्रदक्षिणेच्या छतावर लेणे कोरले त्यावेळी लाकडी फासळ्या (तुळया) बसविल्या होत्या. तसेच छतावर व बाजूच्या भिंतींवर मातीचा गिलावा लावून त्यावर रंगीत चित्रे काढली होती. एका उभ्या स्त्रीचे चित्र आणि अस्पष्टपणे दिसून येणारी पुष्पनक्षी अजिंठा येथील लेणे क्र. १० मधील चित्रांच्या समकालीन असावी असे दिसून येते. अष्टकोनी स्तंभांवरही चित्रे काढण्यात आली होती. लेण्याचा दर्शनी भाग अस्तित्त्वात नसल्याने त्याचे संपूर्ण विधान ओळखणे कठीण आहे. या चैत्यगृहाच्या स्तूपासमोर इतर चैत्यगृहात आढळतो तसा आयताकार सभामंडप नसावा असे दिसते. परंतु चैत्यगृहाला दरवाजा असल्याच्या खुणा येथे आढळतात.
चैत्याचा गोल आकार व वर्तुळात मांडणी केलेले स्तंभ असे हे पश्चिम भारतातील एकमेव चैत्यगृह आहे. सुरेश जाधव यांनी तुळजा लेणे क्र. तीनशी पितळखोरा लेणे क्र. ३, अजिंठा लेणे क्र. १०, भाजा व कोंडाणे येथील चैत्यगृहांचा तौलनिक अभ्यास करून तुळजा लेणे क्र. तीनचा काळ इ.स.पू. सुमारे ६५-५३ ठरविला आहे. तसेच स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील प्रारंभीच्या लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या पहिल्या टप्प्यातील उदाहरणे असून इ.स.पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली गेली असावीत.
लेणे क्र. ४ लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे आणि बाजूच्या खोलीत तुळजाभवानीची स्थापना केली आहे.
लेणे क्र. ५ ते १२ यांचा दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत कडयाच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे कोरलेल्या दिसतात. शिल्पात स्तूपाची पूजा करणारे भक्त, युगल व उडता किन्नर किंवा गंधर्व दिसतात. किन्नराचा कमरेवरील भाग मानवी असून त्याने तुरेदार फेटा परिधान केला आहे. त्याचे पाय पक्ष्याचे असून त्याला मोरपिसारा आहे. या कलाकुसरीचे व शिल्पांचे साम्य मानमोडी टेकडीवरील भूतलेणी समूहातील शिल्पांशी मिळते-जुळते आहे.
लेणे क्र. १३ हे या गटातील शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतीत खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असावा. अलीकडेच तुळजा लेणींच्या पश्चिमेस साफ-सफाईचे काम चालू असताना अजून काही खोल्या आढळून आल्या आहेत.
मारुती मंदिर (१९.१८९९४४, ७३.८२१७४५)
निरगुडे गावाच्या मध्यभागी उत्तराभिमुख असे मारुतीचे मंदिर आहे. कला-स्थापत्याच्या दृष्टीने ते अत्यंत देखणे आहे. संपूर्ण मंदिरावर नक्षीकाम व शिल्पे साकारलेली दिसतात. मंदिर प्राकार-भिंतीने बंधिस्थ असून त्यास उत्तरेकडून छोटेशे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिराची संपूर्ण वास्तू पाहता येते. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची सर्वसाधारण रचना आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ उभी आहे. मंदिरावरील शिखराचा भाग सोडल्यास संपूर्ण मंदिर हे पाषाणात बांधले आहे. शिखराचा भाग विटांनी बांधलेला दिसतो.
![]() |
| मारुती मंदिर, निरगुडे |
![]() |
| मारुती मंदिराचा तलविन्यास, निरगुडे |
सभामंडप
मारुती मंदिराचा सभामंडप बाहेरून ७६२ सेमी लांब x ७६७ सेमी रुंद आहे, तसेच आतल्या बाजूने हा ५९६ सेमी लांब व ५८९ सेमी रुंद आहे. संपूर्ण सभामंडप व गर्भगृह उंच अशा पीठावर उभे आहेत. या उप-पीठावर काही ठिकाणी पुष्पाकृती, व्याळ व गाय यांचे मुखौटे लावण्यात आले आहेत. या सभामंडपाला पूर्व-पश्चिम व उत्तर दिशांना मिळून तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरेला आहे.
![]() |
| गायमुख |
![]() |
| व्याळ |
![]() |
| सभामंडप |
सभामंडपाची द्वारे
उत्तरेकडील द्वार सुंदर अशा नक्षीकामाने सजवलेले आहे. द्वारावर दोन स्तंभ कोरले आहेत. त्यांच्या वरच्या बाजूला लोंबकळत असलेल्या घंटा कोरल्या आहेत. खालच्या बाजूला द्वारपाल उभे आहेत. त्यांच्या हातात कट्यार, भाले किंवा दंड दिसत आहेत. या द्वाराच्या ललाटपट्टीवर गणेशाचे शिल्प आहे. या ललाटपट्टीच्या वर एक सुंदर असा मराठी शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्याच्या उदुम्बरावर दोन कीर्तिमुख व मध्यभागी पुष्पनक्षी कोरली आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन अतिरिक्त अर्धस्तंभ पहावयास मिळतात. या द्वारासमोर एक नंदी शिल्प दिसून येते. तसेच द्वारातून आत येण्यास पायऱ्यांची रचना पहावयास मिळते.
![]() |
| नंदी |
![]() |
| उत्तरेकडील द्वार |
![]() |
| द्वारपाल |
![]() |
| द्वारपाल |
![]() |
| उदुम्बर |
![]() |
| गणेश |
![]() |
| सभामंडपाचे पश्चिमेकडील द्वार |
![]() |
| सभामंडपाचे पश्चिमेकडील द्वार |
![]() |
| गणेश |
सभामंडपाच्या पूर्वेकडील द्वार हे एकंदरीत पश्चिमेकडील द्वारासारखेच दिसते. फरक फक्त एव्हढा आहे की या द्वाराचा उपयोग बाहेर किंवा आत येण्यासाठी होत नसावा. कारण या द्वारासमोर पायऱ्यांची रचना दिसून येत नाही. या द्वाराच्या ललाट-पट्टीवर गणेश शिल्पाऐवजी गोल पुष्पाकृती कोरली आहे. कदाचित या द्वाराचा उपयोग भक्तांना सभामंडपात येण्यासाठी होत नसावा म्हणून ललाटपट्टीवर देखील गणेश शिल्पाऐवजी केवळ एक पुष्पाकृती कोरली आहे. या द्वाराच्या उंबरठ्यावर मानवी-मुख कोरले आहे.
![]() |
| सभामंडपाचे पूर्वेकडील द्वार |
![]() |
| कूर्म-शिल्प |
![]() |
| गोल पुष्पाकृती |
![]() |
| गजशिल्प |
![]() |
| गजशिल्प |
![]() |
| वितान |
![]() |
| सभामंडपातील कमान |
गर्भगृह
मारुती मंदिराचे गर्भगृह आकर्षक आहे. गर्भगृहाची बाहेरून लांबी ४५८ सेमी, तर रुंदी ६०८ सेमी आहे. हे मोजमाप आतून ३४९ सेमी लांब व ३४८ सेमी रुंद असे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी नक्षीकामाने नटलेले एक सुंदर प्रवेशद्वार आहे. यास पुष्प व पाने असलेल्या दोन द्वारशाखा आहेत. यांच्या दोन्ही बाजूंना दोन अर्धस्तंभ आहेत. यापलीकडे दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल कोरले आहेत. ललाट-पट्टीवर गणेश शिल्प आहे. तर उदुम्बरावर एक मानवी मुख कोरलेले दिसते.
![]() |
| मारुती मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार |
गणेशपट्टीच्या वर असलेल्या कमानीत वरच्या बाजूला एक छोटा लेख कोरलेला आहे. कमानीच्या वरती दोन पुष्पाकृती असून मध्यभागी कीर्तिमुख आहे. या कीर्तीमुखाच्या वर अजून एक विस्तीर्ण असा लेख लावलेला दिसतो.
गर्भगृहात मध्यभागी कोरीव लाकडी मेघडंबरी आहे. ती इ.स. १८८० साली बसविण्यात आली असावी, हे त्यावर कोरलेल्या लेखावरून समजते. या मेघडंबरीत मध्यभागी चपेटदान मुद्रेतील मारुतीची सुंदर अशी शेंदूरचर्चित मूर्ती बसविण्यात आली आहे. मारुतीच्या मूर्तीजवळ एक शिवलिंग व गणेश शिल्प ही दिसून येते. गर्भगृहाचे वितान अत्यंत आकर्षक व कोरीवकाम केलेले आहे.
![]() |
| गर्भगृहाचे वितान |
![]() |
| गर्भगृहातील मारुती |
![]() |
| कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
| कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
| कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
| कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
| गर्भगृहातील मारुती मूर्ती |
मंदिराचे बाह्यांग
मंदिराचे बाह्यांग एकंदरीत सपाट असले तरी काही ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. बाह्यांगाच्या खालच्या बाजूला व अन्य ठिकाणी अर्ध-पुष्पाकृतीयुक्त नक्षीकाम दिसते.
![]() |
| मंदिराचे बाह्यांग |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
| मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
गर्भगृहाच्या बाह्यांगावर तिन्ही बाजूंना कोरीव नक्षीयुक्त झरोखे/खिडक्या आहेत. यांपैकी गर्भगृहाच्या मागील बाजूला असणाऱ्या जाळीदार खिडकीवर पक्षी कोरले असून वरती वेणूगोपालाचे एक लहान शिल्प आहे. मंदिराच्या शिखराचा भाग व सभामंडप-गर्भगृह यांच्यामध्ये असणाऱ्या भागावर बिल्वपत्रांची ओळ आहे.
![]() |
| कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
![]() |
| कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
![]() |
| कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
मंदिराचे शिखर
मारुती मंदिराचे शिखर अप्रतिम असून वेगळ्याच धाटणीचे आहे. गर्भगृहावर असलेल्या शिखराच्या रचनेमध्ये मध्यभागी एक मोठा मुख्य (dome) भाग व त्याच्या सभोवताली चारी बाजूंनी लघुशिखरांची लहान ओळ आहे. तर मागील भागात दोन कोपऱ्यांत बंगाली छप्परासारखी स्वतंत्र परंतु लहान शिखरे आहेत.
![]() |
| मारुती मंदिराचे शिखर |
![]() |
| मारुती मंदिराचे शिखर |
![]() |
| मारुती मंदिराचे शिखर |
मुख्य शिखराला असणाऱ्या लघुशिखरासदृश्य भागात दशावतार व अन्य देवदेवतांच्या काही प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. यांमध्ये मत्स्यावतार, कूर्मावतार, वराहवतार, विदारण नरसिंह, वामनावतार, वेणूगोपाल, श्रीराम, गणेश, विठ्ठल, सरस्वती इ. प्रतिमा आहेत. या प्रतिमा मूळ मंदिरासमवेत बसविण्यात आल्या असाव्यात का? हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. कारण या भागावर संपूर्णपणे रंग-रंगोटी केली गेली आहे.
सभामंडपावर, मध्यभागी देखील एक शिखर आहे. या शिखराच्या चारी बाजूंना चार लघु शिखरे आहेत. येथे दोन साधुंशिवाय अन्य प्रतिमा दिसत नाहीत. परंतु समोरील दोन लघु-शिखरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत रामदास यांच्या प्रतिमा दिसतात. तसेच या दोघांच्या मध्ये खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती व आजूबाजूला हात जोडून बसलेल्या दोन अन्य व्यक्ती दिसत आहेत. खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर पुणेरी पगडी परिधान केली आहे. हे शिल्प सटाणा जिल्हा धुळे येथील देव मामलेदार यांचे आहे. ब्रिटीश कालखंडात त्यांच्या न्यायदानाची कीर्ती सर्वत्र पसरली होती. हे पद आजच्या तहसीलदाराप्रमाणेच मानले जाते. आजही सटाणा येथे त्यांची खुर्ची, कपडे व इतर सामान ठेवलेले आहे. तेथील तहसीलदार त्यांना आपला आदर्श मानून व दररोज पूजा करून आपल्या कामकाजाची सुरुवात करतात. अशा प्रकारचे हे आगळे-वेगळे शिल्प निरगुडे गावातील मारुती मंदिरावर पहावयास मिळते.
![]() |
| मंदिरावरील शिल्पे |
मंदिराच्या आवारातील शिल्पे व वास्तू: मंदिराच्या आवारात गजलक्ष्मी, गणेश, व वीरपुरुषाचे शिल्प दिसते. यांपैकी गजलक्ष्मीच्या शिल्पात, ती दोन गजासमवेत आहे. ते गज तिला अभिषेक घालत आहेत. ही मूर्ती मारुती मंदिरांपेक्षाही जुनी असावी, असे वाटते. वीरपुरुषाच्या हातात तलवार व ढाल दिसत आहे. याशिवाय मंदिराच्या मागे एक तुळशी-वृंदावन आहे. यावर गणेश व कुऱ्हाड-ढाल धारण केलेल्या एका व्यक्तीची प्रतिमा आहे. या वृन्दावनाजवळ अज्ञात व्यक्तीची समाधी आहे. या गावाच्या हद्दीतील एका आमराईत देखील वीरपुरुषाचे शिल्प व काही समाध्या पहावयास मिळतात.
![]() |
| गजलक्ष्मी |
![]() |
| वीरपुरुष |
![]() |
| गणेश |
![]() |
| वीरपुरुष |
मारुती मंदिरातील शिलालेख
मारुती मंदिर व परिसरात असे एकूण पाच शिलालेख कोरण्यात आले आहेत. या सर्व शिलालेखांचे वाचन सर्वप्रथम डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. गिरीश मांडके यांनी केले. त्यांनी २०१४ साली या मंदिराला भेट दिली, तेंव्हा या मंदिराचे यथोचित निरीक्षण त्यांच्याकडून निश्चितपणे झाले असणार. शिवाय त्यांनी अन्य शिलालेख देखील वाचले असणार. शिलालेख क्र. १ चे पुढे दिलेले संपूर्ण वाचन त्यांनी केलेल्या वाचनावरच आधारित आहे.
शिलालेख क्र. १. (मंदिरातील गर्भगृहाच्या द्वारावरील शिलालेख)
मारुती मंदिराला असणाऱ्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर संस्कृत भाषेतील व देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरला आहे. हा लेख ६ ओळींचा असून स्पष्ट व उठावदार पद्धतीचा आहे. या शिलालेखाचे वाचन सोपे असले तरी अर्थ काढणे तितके सोपे नाही. सदर शिलालेख वाचनाचे व त्याचा अर्थ काढण्याचे संपूर्ण श्रेय हे डॉ. मांडके यांनाच जाते. शिलालेखाचे वाचन खालीलप्रमाणे आहे.
![]() |
| मंदिरातील गर्भगृहाच्या द्वारावरील शिलालेख |
शिलालेखाचे वाचन:
१. ग्रामाणां त्रितयं पुरातनमिदं मीनापगातीरगं वछीसावरसंज्ञकं वटपुरं तत्राद्दी(धि)कारद्वये
२. वारुण्यां शिवपर्वतस्य निकटे कालं च कौंतीपुरं तस्मिन्केवलमेव लेखनमनुष्यास्ते चिरं भूतिदं
३. प्राचीनार्जित भूरिपुण्यजनिताद्रुद्रप्रसादादयं जातः सर्वसुखस यादव मंहादेवु: कुलेदीपकः
४. इत्थं (त्छं) श्रीहनुमत्पदाब्ज भजनप्राप्ताश्रयः श्रीभुजा येनाकारि भुजार्जितेन वसुना श्रीमारुतेरालयं
५. शाकेकारि नृपौर्मिते प्रभवनामाब्दे तपस्ये सिते पक्षे खेंदुतिथौ शनाव दतिभे सौभाग्ययुक्तैतिले
६. एवं सर्वसुशोभने कमलिनीनाथे खमध्यस्थिते होरायां शशिजस्य पुर्णमभवद्वातात्मजस्यालयं
अर्थ: मीना नदीच्या तीरावर तीन गावांचा समूह आहे. दोन अधिकार असलेले, वछीसावर संज्ञा असलेले वटपूर, पश्चिमेला शिवपर्वताच्या जवळ असलेले काल आणि केवळ लेखनकर्मावर उपजीविका करणारी माणसे जेथे राहतात ते कौतीपूर.
प्राचीन काळी पुष्कळ पुण्य मिळविल्याने ज्याने रुद्राची प्रसन्नता झाल्यामुळे जन्माला आलेला यादव महादेव कुलदीपक झाला. अशाप्रकारे, श्री हनुमानाच्या पदकमलाच्या भक्तीमुळे ज्याला आश्रय मिळाला आणि त्यामुळे जो वैभव भोगतोय, त्याने हे मारुतीचे देवालय उभारले.
शके १६६४ (नृप-१६, अरि-षड् रिपू-६, क-ब्रह्मा-४) फाल्गुन (तपस्या) महिना, प्रभवनाम संवत्सर, शुक्ल पक्ष (सित पक्ष), दशमी (ख-आकाश-०, इंदु-चंद्र-१), शनवार, सौभाग्य तैतिल, या शुभमूहूर्तावर सूर्य मध्यानी असताना (खमध्यस्थिते), बुधाचा होरा असताना वायूपुत्राचे देऊळ बांधून पूर्ण केले. शिलालेखात दिल्याप्रमाणे शके १६६४ ही तारीख इंग्रजीत इ.स. १७४२ अशी येते.
शिलालेख क्र. २. (गुढमंडपाच्या मुख्य दरवाजावरील लेख)
या मंदिरातील दुसरा महत्त्वाचा शिलालेख हा गूढमंडप किंवा सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर कोरलेला आहे. हा लेख १२ ओळींचा असून, तो मराठी आणि देवनागरी लिपीत आहे. तो उठावदार पद्धतीत असला तरी, बऱ्याच ठिकाणी अस्पष्ट आहे. लेखातील अक्षरे अगदीच लहान असल्याने वरचेवर लेखाचे वाचन अस्पष्ट होत चालले आहे. तसेच सततच्या उन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे तो अनेक ठिकाणी पुसटसा झाला आहे. याचे वाचनही यापूर्वी डॉ. मांडके सरांनी केलेलेच असणार. शिलालेख पुसट होत चालल्याने त्याची कुठेतरी लवकरात लवकर नोंद होणे आवश्यक होते. म्हणून जेवढे वाचन शक्य झाले आहे, तेव्हढे येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखातील पहिल्या काही ओळी ह्या स्पष्ट असल्याने शिलालेख बसविण्यात आलेली तारीख आपणास समजते.
![]() |
| गुढमंडपाच्या मुख्य दरवाजावरील लेख |
शिलालेखाचे वाचन:
१. श्री गजानन श्री शके
२. १६६८ नृप [क्षय] नाम संव
३. छरे मार्गेश्वर शुध
४. ****वासर प्राा श्री रामदुत
५. हनुमत प्रहार सीधारुस्यावतार
६. सीव शंकर दीन (त) ** तो कुळदेव
७. ना मा द नंदन ***सिपकर** येतया
८. *******नाममुळे ** श्रामपुरा
९. ******नृप मतर मौज ग्रामे दोनी निर गु
१०. ********त मातुलिंग तर फे
११. ******सावसरे व ३ हाणिले गाव चे असति
१२. जोसी कुळकर्णी चे**
शिलालेखाचा अर्थ: शके १६६८, नृप[क्षय]नाम संवत्सरे मार्गशीष शुद्ध महिन्यात म्हणजेच १–१४ नोव्हेंबर, इ.स. १७४६ ला रामदूत हनुमानाच्या मंदिराचा सभामंडप बांधला (असावा). अशा आशयाचा मजकूर किंवा अर्थ या लेखातून काढता येतो.
शिलालेख क्र. ३ गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील लेख
हा लेख गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर खोदला आहे. शिलालेख स्पष्ट असून देवनागरी लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. सदर लेखात प्रभु रामचंद्रांचा उल्लेख आहे. अशा प्रकारचा शिलालेख हा दुर्मिळ प्रकारातील आहे. या लेखात तो केंव्हा बसविण्यात आला, त्याची तारीख नसली तरी त्याच्या अक्षरांची वळणे ही शिलालेख क्र. १ प्रमाणे असल्याने हा लेखही साधारणपणे याच सुमारास म्हणजे इ.स. १७४४ साली कोरण्यात आला असावा, असे दिसते.
![]() |
| गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील दुसरा लेख |
शिलालेखाचे वाचन:
१. श्री राम जय
२. राम जय जय
३. राम रघुपती
४. राजा राम I
शिलालेख क्र. ४. (गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख)
मारुती मंदिराच्या गर्भगृहात असणाऱ्या लाकडी मेघडंबरीवर दोन्ही बाजूंना काही अक्षरे कोरली आहेत. त्यांपैकी मेघडंबरीच्या उजव्या बाजूला ‘माघ शुद्ध ५’ ही अक्षरे असून डाव्या बाजूला ‘शके १८०२’ हे शक सन दिलेले आहे. हा लेख देवनागरी लिपीत आहे.
![]() |
| गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख |
![]() |
| गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख |
भाग १.: माघ शूध्धै ५
भाग २: शके १८०२
अर्थ: सदर मेघडंबरी माघ शुद्ध ५ शके १८०२ म्हणजेच रविवार, १५ फेब्रुवारी इ.स. १८८० साली बसविण्यात आली असावी. यावेळी प्रमाथी संवत्सर सुरु होते.
शिलालेख क्र. ५. मारुती मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वारावरील लेख
मारुती मंदिराच्या प्राकारभिंतीला असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ काही अक्षरे कोरण्यात आली आहेत. ती सर्व अक्षरे/शब्द एकाच लेखाचे भाग आहेत. असे त्याच्या वाचनावरून लक्षात येते. हा लेख तीन भागात असून त्यातील काही अक्षरे पुसट झाली आहेत.
![]() |
| मारुती मंदिर संकुलाचे प्रवेशद्वारावर |
![]() |
| मारुती मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख |
![]() | |
|
![]() | |
|
भाग पहिला :
श्री
हनुमान
प्रसन्न
जिर्णोद्धार
भाग दुसरा:
भाद्रपद
शुद्ध १
भाग तिसरा
शके १८**
अर्थ: या शिलालेखांवरून असे समजते की भाद्रपद शुद्ध १, शके १८०० (?) रोजी हनुमान मंदिराच्या या भागाचा जीर्णोद्धार केला गेला.
कथा-दंतकथा/ सण/ उत्सव
निरगुडे येथील मारुती मंदिराशी संबंधित काही कथा व प्रथा येथे प्रचलित आहेत. तसेच काही सण-समारंभ व उत्सव येथे साजरे केले जातात. मारुती मंदिरातील मूर्तीवर वर्षातून दोनदा सूर्यकिरणे पडतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ८:३० ते १० या दरम्यान हा किरणोत्सव पहावयास मिळतो. ही सूर्यकिरणे पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करतात. तर हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान ही किरणे पश्चिमेकडून मंदिरात प्रवेश करतात. हा अद्भुत किरणोत्सव पाहण्यास अनेक भक्त येथे येत असतात.
श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी मारुतीरायचा छबीना काढून पालखीची मिरवणूक काढली जाते. हा उत्सव किंवा धार्मिक विधी रात्री ९ ते १२ या दरम्यान साजरा केला जातो. यावेळी पालखी समवेत मारुती मंदिराला पाच फेऱ्या मारल्या जातात. ही परंपरा फार पूर्वीपासून येथे सुरु आहे.
चैत्र शुद्ध एकादशी ते हनुमान जयंतीपर्यंत, या पाच दिवसांत एक तासाचे नारदीय कीर्तन असते. या कीर्तनाचा खर्च वगैरे श्री. निरगुडकर व कुटुंबीय करतात. या मंदिराचे पुजारी म्हणून श्री. सुर्यकुमार शंकरराव निरगुडकर व त्यांचे तीन बंधू कामकाज पाहतात. हे ब्राह्मण कुटुंबीय पूर्वीपासूनच या मंदिराची देखरेख करत आले आहे. आजही यांच्या मार्फत पुजाऱ्याची नियुक्ती केली जाते. यांच्या मार्फत देवाची पूजा, नैवद्य व आरती पार पाडली जाते.
भाद्रपद शुद्ध आमावस्या (बैल-पोळा) या सणादिवशी मारुती मंदिराच्या समोरील मुख्य दरवाजातून गावातील बैल मंदिर संकुलात नेले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सु. १ मीटर असणाऱ्या या दरवाजातून सर्व बैल व्यवस्थितपणे आतमध्ये प्रविष्ठ होतात. प्राकार-भिंतीतून आत आल्यानंतर बैलांकडून मंदिराची प्रदक्षिणा करवून घेतली जाते. यानंतर पुन्हा याच दरवाज्यातून बैलांना बाहेर काढले जाते.
निष्कर्ष व चर्चा
एकंदरीत मारुती मंदिर हे वास्तुकलेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम येथील शिलालेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे इ.स. १७४४, तर सभामंडपाचे काम इ.स. १७४८ साली झाले असावे. मंदिराला असणारी प्राकारभिंत व प्रवेशद्वार यांचे काम किंवा जीर्णोद्धार हा १९व्या शतकात झाला असल्याचे येथील शिलालेखांवरून दिसून येते. तरीही यातील काही मजकूर अस्पष्ट असल्याने तारखेच्या बाबतीत थोड्या-फार मर्यादा येतात. मारुतीची स्वतंत्र उपासना ही फार पूर्वीच प्रचलित होती. परंतु, त्यांची आद्य मंदिरे ही खूप कमी आहेत. सतराव्या शतकात संत रामदासांनी मारुतीची काही मंदिरे बांधल्याचा संदर्भ मिळतो. परंतु त्या मंदिरांचे स्थापत्य साधारण होते. मराठा-पेशवे काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारुती मंदिरे बांधण्यात आली. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील मुखई व तळेगाव-ढमढेरे, वाघोली येथील मारुती मंदिर, गणेगाव खालसा येथील रोकडोबा (हनुमान मंदिर), पुण्यातील, नारायणगाव येथील मारुती मंदिर इ. मंदिरे ही मारुतीची आहेत. परंतु या सर्व मंदिरांमध्ये निरगुडे येथील मंदिर सर्वात आदीचे आणि भव्य म्हणता येईल.
![]() |
| तुळशी वृंदावन |
![]() |
| निरगुडे यांचा वाडा |
![]() |
| मंदिर परिसरातील समाधी |
![]() |
| दीपमाळ |
![]() |
| मारुती मंदिर परिसरातील समाधी मंदिर |
पिंपळे जगताप (जिल्हा पुणे) येथील धर्मनाथ मंदिर व मराठी शिलालेख
(Dharmnath temple and Marathi inscriptions at Pimple Jagtap in Pune District)
पुणे शहरापासून सु. ३७ किमी अंतरावर तसेच भीमा कोरेगावपासून अवघ्या सात किमी अंतरावर पिंपळे जगताप नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाच्या बाहेरून एक लहान ओढा वाहतो. गावात जगताप आडनावांची बरीच कुटुंबे राहतात, तसेच गावाची पाटीलकीदेखील वर्षांनुवर्षे त्यांच्याकडेच राहिली आहे. या सर्व कारणांमुळे या गावाच्या नावामागे ‘जगताप’ हे प्रत्यय रूढ झाले आहे. तसेच महाराष्ट्रात ‘पिंपळे’ नावाची अनेक गावे असल्याने हे गाव ‘जगतापांचे पिंपळे’ म्हणून ओळखले जाते. या गावात धर्मनाथ, महादेव, विठ्ठल, गणेश, मारुती, दत्त यांची मंदिरे व काही विहिरी आहेत. या गावातील सर्व मंदिरांमध्ये धर्मनाथाचे मंदिर भव्य व तुलनेने जुने आहे.
![]() |
| धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप (Dharmnath temple, Pimple Jagtap) |
पिंपळे गावाच्या मध्यभागी जगताप-पाटील यांच्या गढीजवळ इ.स. १७७९ मध्ये धर्मनाथाचे मंदिर (१८.७०९१०५, ७४.०६०७३९) बांधण्यात आले. मंदिर एका विशाल प्राकारभिंतीने वेढले असून याला पूर्वेकडून एक द्वार आहे. द्वारातून आत आल्यानंतर वाहन म्हणून वाघाचे शिल्प व समोर एका उंच जोत्यावर धर्मनाथाचे मंदिर दिसते.
![]() |
| धर्मनाथ मंदिर (दर्शनी भाग), पिंपळे जगताप |
![]() |
| धर्मनाथ (?), पिंपळे जगताप |
शिलालेखाचे वाचन:
II श्री II
II श्री धर्मराजश्रींचे चरण अर्पन राघोजी बीन र II
II त्नोजी पाटील जगताप मोकदम मौजे पींपळे तर्फ
चाकन प्रांती श्रीमती गोदाबाई गाईकवाड यांचा
II सुत सयाजीराव बीन गोवींदराव गाईकवाड ते II
II ना सदास पेलेस मनेरषा शहर कसबे बडोदे II
II भाद्रपद ५ सेके १७०६ (१७०१ पाहिजे) वीकारीनाम सं II
II वंसरे (अधिक) श्रावण मासे सुक्ल पक्षे १३ ईंदवासरे II
अर्थ : शालिवाहन शकाच्या १७०१ व्या वर्षी विकारीनाम संवत्सरातील (अधिक) श्रावण शुद्ध त्रयोदशी या दिवशी सोमवारी (२४ ऑगस्ट, १७७९) चाकण तर्फातील पिंपळे या गावातील राघोजी बीन रत्नोजी जगताप पाटील तसेच श्रीमती गोदाबाई गाईकवाड यांचा पुत्र सयाजीराव बीन गोविंदराव गाईकवाड तेना सदास पॅलेस मनेरषा शहर कसबा बडोदे यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केले किंवा बांधायला.
![]() |
| धर्मनाथ मंदिरातील शिलालेख, पिंपळे जगताप |
![]() |
| गणेश, धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप |
![]() |
| धर्मनाथ, धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप |
धर्मनाथ हे नाथ संप्रदायातील एक योगी होते. तसेच गुजरात येथील धिनोधर मठाचे ते महंत होते. त्यांचा कालखंड १४व्या शतकातील सांगितला जातो. महाराष्ट्रामध्ये त्यांचे महत्त्व कसे वाढले याबाबत निर्णायकपणे सांगता येत नाही. परंतु पिंपळे गावातील धर्मनाथ मंदिरातील शिलालेखामुळे हे कोडे थोडेसे स्पष्ट करून सांगता येऊ शकते. असे सांगितले जाते की या गावात जगताप-पाटील यांच्या घरी बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील मुलगी सून म्हणून दिली होती. गायकवाड घराण्याचे राज्य गुजरातमध्ये सर्वदूर पसरले होते. त्यामुळे कच्छ परिसरातील धर्मनाथ या सत्पुरुषाच्या नावलौकिकाचा प्रभाव यांच्यावरही पडला असावा. पुढे गायकवाड घराण्यातील मंडळींचा पिंपळे गावाशी संपर्क आल्याने तेथे धर्मनाथांचे मंदिर बांधण्यात आले असावे. या गावाच्या जुन्या भागात धर्मनाथांची पाउतके आजही दाखविली जातात.
श्री. तेंडुलकर यांनी संपादित केलेल्या शिलालेखाशिवाय पिंपळे-जगताप येथे अजून तीन अप्रकाशित लेख मला माझ्या सर्वेक्षणात आढळून आले. यातील पहिला लेख गावाबाहेरील महादेव मंदिरात आहे. दुसरा लेख माईंच्या विहिरीत (बारव) आहे. तर तिसरा लेख नानासाहेबांच्या विहिरीत आहे. माई व नानासाहेब यांच्या नावाने असलेल्या विहिरी चावीच्या आकाराच्या आहेत. या विहिरींच्या पायऱ्या उतरताना डाव्या-उजव्या बाजूंना असलेल्या देवळ्यांत गणेश व शिवलिंग ठेवलेले दिसते.
शिलालेख क्र. १. (महादेव मंदिरातील लेख)
पिंपळे गावातील महादेव मंदिर साधारण असून ते हनुमान मंदिराच्या मागे आहे. या मंदिराचा सभामंडप ४५० X ४५० सेमी आकाराचा असून मध्यभागी चार सपाट स्तंभ व भिंतींना आठ देवळ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाचा आकार ३०० X ३०० सेमी इतका आहे. गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग असून मागे एक मोठी देवळी/देवकोष्ठ आहे. गर्भगृहात प्रकाशयोजनेसाठी उजव्या व डाव्या भिंतींना झरोखे ठेवले आहेत. या मंदिरासमोर दोन मोठी नंदीशिल्पे दिसतात.
![]() |
| महादेव मंदिर, पिंपळे जगताप |
![]() |
| नंदी, महादेव मंदिर, पिंपळे जगताप |
लेखाचे वाचन:
१. श्री
२. श्री शिवसाभं चरणि त
३. त्पर रघुनाथराव सुत
४. विटलराव पाटिल ज
५. गताप मोकदम मौ
६. जे पिपळे तरफ चाक
७. ण सन १२४९ शके १७६१
८. विकारिनाम सवसरे
९. श्रावण शुक्ल ३ ईंदुवास
१०. र शुभं भवतु
![]() |
| महादेव मंदिरातील शिलालेख, पिंपळे जगताप |
अर्थ: पिपळे तर्फ चाकण येथील शिवभक्त रघुनाथराव पाटील जगताप यांचे पुत्र मोकदम विठ्ठलराव पाटील जगताप यांनी विकारीनाम संवत्सरात श्रावण महिना व शुक्ल ३, सोमवारी, शके १७६१, सन (फासली) १२४९ म्हणजेच इ. स. १२ ऑगस्ट, १८३९, सोमवार या दिवशी महादेव मंदिराचे बांधकाम सुरु किंवा पूर्ण केले.
जी.पी.एस.: (१८.७०९२३९, ७४.०५९४९३)
शिलालेखाचे स्थान: महादेव मंदिरातील गर्भगृहाच्या दर्शनी भागावर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका गुळगुळीत केलेल्या शिळेवर लेख कोरला आहे.
अक्षरपद्धती: कोरीव व स्पष्ट स्वरूपाचा लेख आहे.
भाषा: मराठी
लिपी: देवनागरी
प्रयोजन:- मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७६१ विकारीनाम संवत्सरे श्रावण शुक्ल ३ ईंदुवासर (सोमवार)
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. १२ ऑगस्ट, १८३९ सोमवार
कारकीर्द:- ब्रिटीश/गायकवाड संस्थान
व्यक्तिनाम:- रघुनाथराव पाटील जगताप व विठ्ठलराव पाटील जगताप
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
काही शब्दांची शुद्ध रूपे व अर्थ: चरणि=चरणी, विटलराव=विठ्ठलराव, सवसरे=संवत्सरे, इंदुवासर=सोमवार
शिलालेखाचे महत्त्व:- या शिलालेखामध्ये या गावातील इतर लेखांप्रमाणे काही शब्दांचे संक्षिप्त अर्थ दिले नसून ते पूर्णपणे कोरले आहेत. उदा. ‘पाा’ हे संक्षिप्त रूप ‘पाटील’ असे पूर्ण कोरले आहे. लेखातील शब्द सध्या प्रचलित असलेल्या मराठी भाषेच्या जवळ आहेत. शालिवाहन शके या कालगणनेशिवाय फासली १२४९ हे सालही लेखात दिले आहे, हे विशेष आहे. ब्रिटीश काळातही जगताप घराण्यातील व्यक्तींना मानाचे स्थान असावे किंवा त्यांचा दबदबा या काळातही सुरु असल्याचे दिसते. ब्रिटीश काळातही हिंदू मंदिरे बांधली जात होती, हेही दिसून येते. या लेखातील काही अक्षरांवरती रेषा ओढलेल्या नाहीत. तसेच लेख कोरताना अगोदर आखणी केल्याचे दिसून येते.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p.81.
शिलालेख क्र. २. (माईंच्या मळ्यातील विहीर लेख)
पिंपळे गावाच्या वेशीवर शिलालेख असणाऱ्या चावीच्या आकाराच्या दोन विहिरी आहेत. यांपैकी एक शिलालेख गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या माईंचा मळा येथील बांधीव विहिरीत आहे. संपूर्ण विहीवर झाडे-झुडपांचे साम्राज्य वाढल्याने येथे जाण्यास थोडी अडचण निर्माण होते. विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील भिंतीवर सदर लेख सहज लक्ष वेधून घेतो. हा लेख कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा आहे. लेखाची लिपी देवनागरी असून भाषा मराठी आहे. तसेच तो उघड्या डोळ्यांनीही सहज वाचता येतो.
![]() |
| माईंच्या विहिरीतील शिलालेख, पिंपळे जगताप |
![]() |
| माईंच्या विहिरीतील शिलालेख |
१. श्री धर्मज चरनी तत्पर आनंदराव
२. सुत देवराव पाा व वीटलराव सुत
३. क्रुष्णराव पाा जगताप माो पीपळे ताा चा
४. कन सके १७३६ श्रीमुखनाम सवछरे
५. माघ सुध १३ गुरुवार समोप्त (घ?) ती
अर्थ:- शालिवाहन शकाच्या १७३६ श्रीमुखनाम संवत्सरात माघ शुद्ध १३ म्हणजेच गुरुवार इ.स. २ किंवा ३ फेब्रुवारी १८१४, या दिवशी मौजे पिंपळे तर्फ चाकण येथील आनंदराव जगताप यांचे पुत्र देवराव जगताप पाटील व विठ्ठलराव जगताप पाटील यांचे पुत्र कृष्णराव जगताप पाटील यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले.
शिळेचे मोजमाप: २२ सेमी उंच व ४० सेमी रुंद
जी.पी.एस.: (१८.७११३७८, ७४.०५९३५८)
शिलालेखाचे स्थान: विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील दर्शनी भागावर आहे.
अक्षरपद्धती: कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
प्रयोजन:- विहीर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७३६ श्रीमुखनाम संवत्सरे माघ शुद्ध १३ गुरुवार
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. २/३ फेब्रुवारी १८१४ गुरुवार
कारकीर्द:- उत्तर मराठा कालखंड
व्यक्तिनाम:- धर्मराज (धर्मनाथ), आनंदराव जगताप, देवराव जगताप, विठ्ठलराव जगताप, कृष्णराव जगताप (पाटील)
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
शिलालेखाचे महत्त्व:- जगताप पाटील घराण्यातील व्यक्तींची नावे या शिलालेखात आल्याने, याचा उपयोग या घराण्याची वंशावळ काढण्यासाठी होऊ शकतो. तसेच या घराण्यातील व्यक्तींनी विहीर खोदून समाजोपयोगी कार्ये केल्याचे निदर्शनास येते.
संक्षेप: पाा=पाटील, माो=मोकादम, ताा=तर्फ, धर्मज=धर्मराज,
काही शुद्ध/अशुद्ध शब्दांची रूपे: सके=शके, चरनी=चरणी, क्रुष्णराव=कृष्णराव, सवछरे=संवत्सरे, सुध=शुद्ध.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p. 30
शिलालेख क्र. ३. (नानासाहेबांच्या विहिरीतील लेख)
पिंपळे गावाच्या पूर्वेला मुख्य रस्त्याच्या कडेला एका चावीच्या आकाराच्या विहिरीत हा लेख कोरलेला आहे. सदर विहिरीला नानासाहेबांची किंवा दादासाहेबांची विहीर या नावाने ओळखले जाते. विहिरीत पायऱ्याने उतरताना समोरली दर्शनी भागावर एक लेख कोरलेला आहे किंवा शिलालेख असलेली शिळा बांधकामात लावली आहे. या विहिरीजवळ एका अज्ञात व्यक्तीची समाधी देखील दिसून येते.
![]() |
| नानासाहेबांची विहीर, पिंपळे जगताप |
![]() |
| नानासाहेबांच्या विहिरीतील शिलालेख, पिंपळे जगताप |
१. श्री धरमराज प्रसन चेरनी तते
२. पर रघोजी वलद रत्नोजी पाा जग
३. ताप माो मवजे पीपळे ताा चाकन सके
४. १७३१ शुक्लनाम सवछरे श्रावन सुध १
अर्थ:- शालिवाहन शकाच्या १७३१ शुक्लनाम संवत्सरात श्रावण शुद्ध १ म्हणजेच शनिवार इ.स. १२ ऑगस्ट १८०९, या दिवशी मौजे पिंपळे तर्फ चाकण येथील राघोजी जगताप पाटील यांनी विहिरीचे बांधकाम प्रारंभ किंवा पूर्ण केले.
शिळेचे मोजमाप: २४ सेमी उंच व ५९ सेमी रुंद
जी.पी.एस.: (१८.७०९७७१, ७४.०६४८२७)
शिलालेखाचे स्थान: विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील दर्शनी भागावर आहे.
अक्षरपद्धती: कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा: अशुद्ध मराठी
लिपी: देवनागरी
प्रयोजन:- विहीर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७३१ शुक्लनाम संवत्सरे श्रावण शुद्ध १ शनिवार
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. १२ ऑगस्ट १८०९ शनिवार
कारकीर्द:- उत्तर मराठा कालखंड (पेशवे)
व्यक्तिनाम:- धर्मराज (धर्मनाथ) व राघोजी जगताप (पाटील)
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
शिलालेखाचे महत्त्व:- रघोजी/राघोजी पाटील जगताप यांनी धर्मनाथांच्या मंदिराशिवाय विहीर खोदण्याचे समाजोपयोगी कार्य केल्याचे दिसून येते. तसेच रघोजी हे इ. स. १७७९ पासून ते इ.स. १८०९ पर्यंत हयात असल्याचे धर्मनाथ मंदिर व या विहिरीतील लेखांवरून कळते. यामुळे त्यांची कारकीर्द समजण्यास मदत मिळते. हे वरील लेखाचे महत्त्व सांगता येऊ शकते.
संक्षेप: पाा=पाटील, माो=मोकादम, ताा=तर्फ
काही अशुद्ध शब्दांची शुद्ध रूपे: धरमराज=धर्मराज, प्रसन=प्रसन्न, चेरनी=चरणी, ततेपर=तत्पर, मवजे= मौजे, सके=शके, सवछरे=संवत्सरे, श्रावन=श्रावण, सुध=शुद्ध.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p. 21.
एकंदरीत, या पिंपळे गावात जगताप-पाटील या घराण्याच्या कृपेने मंदिरे व विहिरी बांधण्यात आल्या. धर्मनाथ मंदिर, गणपती मंदिर व विठ्ठल मंदिर ही मंदिरे त्यांच्या स्थापत्य शास्त्रानुसार समकालीन वाटतात. वरील सर्व शिलालेखांमधून जगताप-पाटील घराण्यातील व्यक्तींची ‘धर्मनाथ’ या महापुरुषावर असणारी निष्ठा दिसून येते. तसेच जगताप-पाटील घराण्यातील व्यक्तींची माहिती मिळते. या घराण्यातील वंशावळ समजण्यास या शिलालेखांचा उपयोग होतो. पिंपळे जगताप या गावात जगताप घराण्यातील राघोजी बीन रत्नोजी पाटील जगताप यांचा इ.स. १७७९ साली प्रथम उल्लेख आढळून येतो. यानंतर इ.स. १८०९ सालातील लेखात रघोजी पाटील जगताप यांचा उल्लेख आलेला आहे. बहुदा राघोजी यानांच रघुनाथराव या नावाने नंतरच्या शिलालेखात संबोधले असावे. याशिवाय विठ्ठलराव, कृष्णराव, आनंदराव, व देवराव या व्यक्तींचा नामनिर्देश लेखांत येतो. संभवतः विठ्ठलराव हे रघुनाथ/राघोजी यांचे पुत्र असावेत.
याशिवाय मुळच्या बडोदा येथील गोदाबाई गायकवाड व त्यांचे पुत्र सयाजीराव बीन गोविंदराव गायकवाड यांचे नामनिर्देश ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. गाव परिसरात काही तुळशी वृन्दावने व समाध्या आजही सुस्थितीत असल्याचे दिसून येते.
![]() |
| जगताप वाडा, पिंपळे जगताप |
![]() |
| धर्मनाथ मंदिराचा सभामंडप, पिंपळे जगताप |
![]() |
| माईंच्या विहिरीतील लेख, पिंपळे जगताप |
![]() |
| जगताप पाटील यांचा वाडा, पिंपळे जगताप |
Written by Dr Vijay Sarde
पारगाव (सालू-मालू) येथील मुहम्मद तुघलकाचा मराठी शिलालेख (गधेगळ) व महादेव मंदिर
(Pargaon Salu-Malu Inscription of Muhammad Tughalaq and Mahadev temple )
तेराव्या शतकाच्या शेवटी आणि चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्खन म्हणजेच आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या इतिहासात खूप मोठ्या घडामोडी घडून आल्या. देवगिरीचे यादव, वारंगळचे काकतीय, द्वारसमुद्राचे होयसळ व दक्षिणेतील इतर राज्यांना परकीय आक्रमणांच्या तीव्र झळा पोहोचल्या. हळूहळू दक्षिणेमध्ये इस्लाम राज्यकर्त्यांचा शिरकाव सुरु झाला. या सुमारास दक्खनच्या उत्तरभागावर (विशेषतः सध्याच्या महाराष्ट्रावर) यादव नृपती रामचंद्र किंवा रामदेव याचे राज्य होते. सर्व काही सुरुळीत चालत असताना उत्तर भारतात स्थिरावलेल्या अल्लाउद्दिन खिलजीने आपले साम्राज्य विस्ताराचे धोरण आखले. मलिक काफूरच्या नेतृत्त्वात दक्खनवर अनेक आक्रमणे होऊ लागली. इ.स. १२९६ साली यादव साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीवर अल्लाउद्दिनने आक्रमण करून मोठ्या प्रमाणात धन-दौलत लुटली. देवगिरीतून प्राप्त झालेल्या अपार संपत्तीमुळे त्याची धन-प्राप्तीची लालसा अजून प्रबळ झाली. इ.स. १३१७ पर्यंत देवगिरी पूर्णपणे खिलजी साम्राज्यात म्हणजेच दिल्ली सल्तनतमध्ये विलीन झाले. परंतु खिलजीचे हे वर्चस्व जास्त काळ टिकू शकले नाही. त्याच्या मृत्युनंतर इ.स. १३२१ साली दिल्लीच्या गादीवर आलेल्या घियासुद्दिन तुघलकाने आपला पुत्र उलुघ खान (मुहम्मद बिन तुघलक) याला दक्षिणेतील वारंगळ व जाजनगरच्या विजयासाठी पाठविले (Mahdi,१९३८:५६). त्याने अल्पावधीतच काकतीय, होयसळ व पांड्य राज्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले. दक्षिण भारतावर आपली प्रभावी पकड निर्माण करण्यासाठी त्याने इ.स. १२२७ साली दिल्लीऐवजी देवगिरीला आपली राजधानी बनविले. तसेच देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’ ठेवण्यात आले. परंतु तुघलकांना अनेक स्थानिक विद्रोह व अशांतीला तोंड द्यावे लागले. परिणामस्वरूप लवकरच तुघलकी साम्राज्य संपुष्टात आले. यानंतर दक्षिणेत विजयनगर (इ.स. १३३६) व बहामनी (इ.स. १३४७) साम्राज्यांची स्थापना झाली. या संक्षिप्त ऐतिहासिक पार्श्वभूमिनंतर आपण पारगाव सालू-मालू येथील महादेव मंदिर व तेथील शिलालेखांवर प्रकाश टाकू.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पारगाव (सालू-मालू) येथे महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मागे काही अंतरावरून भिमा नदी वाहते. या मंदिराजवळच तुकाईचे एक अन्य मंदिरदेखील आहे. पुणे-सोलापूर महामार्गाने किंवा वाघोली-दौंड राज्यमार्गाने येथे पोहोचता येते. पुणे येथून पारगाव हे सु. ६२ किमी अंतरावर आहे. गावात काही पुरातन मंदिरांचे अवशेष, वीरगळ, गधेगाळ, समाध्या, दर्गा व अन्य काही अवशेष पहावयास मिळतात. संत तुकारामांच्या काळातील सालू-मालू हे मूळतः या गावातील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गावाच्या नावामागे ‘सालू-मालू’ हे नाव जोडले गेले. ब्रिटीशकाळात येथे मोठ्या प्रमाणावर बंड झाले होते. म्हणून या गावास ‘बंडाचे पारगाव’ या नावानेही ओळखले जाते. गावाजवळ असणाऱ्या भिमा नदीवर ‘नावघाट’ म्हणून एक ठिकाण आहे, तेथे पूर्वी एका किनाऱ्याहून दुसरीकडे जाण्यासाठी नावांच्या फेऱ्या होत असत.
महादेव मंदिर
महादेवाचे मंदिर पुर्वाभिमुख असून त्रिदल पद्धतीचे आहे. मंदिराला सु. २ मीटर उंचीची प्राकारभिंत आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी प्राकारभिंतीला दक्षिणेकडून एक पायऱ्या असणारा मार्ग आहे. प्रवेशमार्गावर काही अक्षरे कोरली आहेत. परंतु ती खूपच अस्पष्ट असल्याने अवाचनीय आहेत. प्राकारभिंतीवर चढण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्यांची सोय केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर पूर्णतः पडून गेलेल्या नंदीमंडपाचा थोडासा उंच भाग दिसतो. मूळ नंदीप्रतिमा काढून त्याजागी नवीन नंदी बसविण्यात आलेला आहे. संभवतः मंदिर एका अधिष्ठानावर उभे असावे, परंतु मातीचा थर वाढल्याने ते बुजून गेले आहे. सभामंडपाच्या बाहेर दोन्ही बाजूंना दोन कोनाडे आहेत. तर सभामंडपात प्रकाश यावा म्हणून, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पानांच्या आकाराचे नक्षीकाम असलेली विशिष्ठ प्रकारची जालवातायने (गवाक्ष) तयार करण्यात आली आहेत. सभामंडपाचे द्वार साधारण असून ते नंतर कधीतरी बदलले असावे, असे दिसते. कारण मूळ द्वाराचा काही भाग (निधी व द्वारपाल) शिलालेखांच्या बाजूंना मंदिराबाहेर ठेवलेला दिसतो. तसेच मंदिरासमोर काही खंडित शिल्पे आजही दिसतात. याचा अर्थ मूळ मंदिराचा काही भाग कधीतरी काढला गेला असावा. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर गणेशशिल्प आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन अर्धस्तंभ असलेली कक्षासने आहेत. सभामंडपाच्या आतील भागाची लांबी ५९० सेमी असून रुंदी ६५५ सेमी आहे. तसेच चतुष्कीच्यामधील रंगशिलेचा भाग ३२७ सेमी लांब व ३४५ सेमी रुंद आहे. सभामंडपात चार मुख्य स्तंभ (चतुष्की) तर १२ अर्धस्तंभ आहेत. स्तंभांची उंची (स्तंभशीर्षांपासून) २४५ सेमी आहे. सभामंडपात एका भिंतीवर एका व्यक्तीने स्वतःचे शिश्न स्वतःच्या तोंडात घेतल्याचे अंकन आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूंना दोन उपगर्भगृहे आहेत. यांची द्वारेही तीन शाखांची आहेत. त्याखाली निधी, द्वारपाल व गंगा-यमुना अंकित केल्या आहेत. उपगर्भगृहांत सध्या मुर्तीविरहित पादपीठे दिसून येतात. उजवीकडील उपगर्भगृहाची लांबी ३२० सेमी असून रुंदी २२० सेमी आहे. डावीकडील उपगर्भगृहाचा आकारही सर्वसाधारणपणे असाच असावा. या गर्भगृहांत जाण्यासाठी पायऱ्यांची सोय दिसत नाही. अंतराळाच्या बाजूला दोन रिकामी देवकोष्ठे आहेत. मंदिराच्या अंतराळाची लांबी २५० सेमी असून रुंदी २७५ सेमी आहे. अंतराळाच्या दर्शनी भागात दोन स्तंभ टेकू म्हणून उपयोगात आणले आहेत. त्यांवर तुळईंचा भाग तोलला गेला आहे. अंतराळात दोन्ही बाजूंना दोन रिकामी देवकोष्ठे आहेत. यानंतर मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते, ते त्रिशाखांचे आहे. हे प्रवेशद्वारही इतर उपगर्भगृहांच्या द्वाराप्रमाणेच आहे. ललाटपट्टीवर गणेशशिल्प आहे. यानंतर आपण गर्भगृहात पोहोचतो.
गर्भगृहाची लांबी व रुंदी २७२ सेमी असून मध्यभागी शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या पाठीमागे एक देवकोष्ठ आहे. त्यात बहुदा पार्वतीचे शिल्प असावे. अभिषेकासाठी पाणी एकत्रित करण्यासाठी एक मोठे पात्र गर्भगृहात ठेवले आहे. मंदिरातील सर्व विताने समतल प्रकारची आहेत.
![]() |
| महादेव मंदिर, पारगाव सालू-मालू |
महादेव मंदिराच्या बाह्यांगावर विशेष नक्षीकाम नाही. परंतु सभामंडपाच्या उजव्या कोनाड्यावर दोन ओळींत काही अक्षरे कोरली आहेत. त्यांपैकी पहिल्या ओळींत ‘श्री विठल देव’ व खाली इतर अक्षरे दिसतात. उजव्या बाजूकडील उपगर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर काही रेखाटने आहेत. त्यांमध्ये एक लज्जागौरीप्रमाणे एक स्त्री अंकित आहे. एका दुसऱ्या अंकनात एका व्यक्तीने आपले लिंग व अंडकोष यांना एका दोरीने बांधून त्याचा भार खांद्यावर तोलला आहे. तर त्यापुढील एका रेखांकनात एक स्त्री व दोन पुरुष यांच्या समागमाचे दृश्य आहे.
मंदिराच्या शिखराच्या उर्वरित भागावरून ते भूमिज शैलीतील आहे, हे सहज लक्षात येते. शिखरावर एकावर एक असे पाच कूटस्तंभ असावेत. कूटस्तंभांची सर्वांत वरची एक ओळ पडून गेली आहे. शिखर पंचभौम प्रकारातील आहे. शिखरावरील मूलमंजरी व शूरसेनकाचा भाग दिसतो. आमलक व कलशाचा भाग नष्ट झालेला आहे. एवढेच नाही तर या शिखराचा उत्तरेकडील भाग सोडल्यास इतर सर्व भाग पडून गेलेला आहे. अंतराळावरती शुकनासिका आहे. परंतु तिचाही दक्षिणेकडील भाग मोठ्या प्रमाणात पडून गेला आहे. उपगर्भगृहे व सभामंडपावर नंतर बनवलेली प्रतीकात्मक शिखरे दिसतात. मंदिराच्या दक्षिणेकडे गर्भगृहाबाहेर अभिषेकासाठीचे जल ओतण्यासाठी अभिषेकपात्र आहे, तर दक्षिणेकडे गर्भगृहातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रणालक आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक छोटीशी वास्तू आहे. तिच्या रचनेवरून ती महादेव मंदिराच्या समकालीन वाटते. मातीच्या थरामुळे ती काही अंशी जमिनीत गाडली गेली आहे. ही वास्तू बहुदा एखाद्या थोर व्यक्तीची समाधीही असू शकते. मंदिरासमोर गणेशाच्या दोन, विष्णू, देवी व राशीचक्र पाहावयास मिळते. राशीचक्र विशेष असून त्याची रचना एका मंडलाप्रमाणे आहे. यावर पशु, पक्षी, मनुष्य यांची छोटी-छोटी शिल्पे चारी बाजूंनी कोरण्यात आली आहेत. याशिवाय एका कोनाड्यात एका शिळेवर पद्मासनात बसलेला योगी कोरला आहे.
शिलालेख क्र. १ (१८.५६३१७१, ७४.३७३५३६)
वर्णन:
महादेव मंदिराच्या आवारात लेख असलेल्या दोन शिळा ठेवल्या आहेत. या शिळांवर गाढव व स्त्री यांचे अंकन असल्याने यांना ‘गधेगाळ’ असेही म्हटले जाते. या दोन शिलालेखांपैकी उजवीकडील लेख हा मुहम्मद तुघलकाच्या काळातील आहे. सदर शिळा ९८ सेमी उंच असून ३१.५ सेमी रुंद आहे. लेख एकूण १३ ओळींचा आहे. लेखाच्या वरती उजव्या बाजूला चंद्र व डाव्या बाजूला सूर्य कोरले आहेत. लेख संपल्यानंतर खाली गाढव व स्त्री हे समागम करत असतानाचे अंकन आहे. लेखाच्या मध्यभागातील बराचसा भाग ऊन, वारा, पाऊस व मानवी हस्तक्षेपामुळे वाचनास कठीण होऊन बसला आहे. सदर लेख वाचण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे, तरीही खडबडीत भागावरील लेखन वाचनात काही त्रुटी येऊ शकतात.
शिलालेखाचा पाठ:
१. स्वस्ति श्री सके १२५१ वीभव
२. सेवंचरे श्रुताण माहामु-
३. ददेवै नायकं स्रव अधी-
४. कर(री) परगै(णै)]सी सेवलीतच
५. मदेऊ [द्वा]परे स्मस्तीपतीं
६. सोमन(र)सु अेकक्षु(रू) गुरो मालि
७. तेली सीपा सोनारू हेय अक-
८. र पाचै पाढैल ***म लदे-
९. ऊ ऐआंकु[कृ] * धर्मु **दे वेधे ना-
१०. याक देवाची [ही] पर्वडी पाली ते-
११. अचा धर्मु न पली
१२. तेअचीऐ मऐ ग-
१३. धो
संक्षिप्त अर्थ: “स्वस्ति श्री सके १२५१ विभव संवत्सरात सर्व अधिकार असलेला सुलतान माहमूद याने (कर) लावला आहे. हा कर बहुदा त्याने गुरव, माळी, तेली, शिंपी व सोनार यांना लावला आहे. नायक देव (मुहम्मद बिन तुघलक) याने लावून दिलेली ही व्यवस्था (परवडी) पाळेल तो धर्माप्रमाणे आचरण करत आहे, असे समजावे. जर कोणी या व्यवस्थेचे पालन करीत नसेल तर त्याच्या आईला गाढव लागेल, असा शेवटी शिवीवजा शाप दिलेला आहे.
![]() |
| शिलालेख क्र.१. मुहम्मद बिन तुघलाकाचा शिलालेख |
अक्षरवटिका, लेखनपद्धति, भाषा व काळ
लेख देवनागरी लिपीत असून मराठी भाषेत आहे. लेखावर यादवकालीन लेखनशैलीच्या वळणाचा प्रभाव आहे. लेख ज्या शिळेवर कोरला आहे ती शिळा सुरुवातीला घासून गुळगुळीत केलेली दिसते. लेखातील अक्षरे काहीशी लहान असली तरी स्पष्टपणे कोरण्यात आल्याचे दिसून येते. लेखातील काही शब्द हे अशुद्ध लिहिले गेले आहेत. काही अक्षरांवर अनुस्वार आहेत.
प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी ‘स्वस्ति श्री शके १२५१ विभव संवत्सरे’ असा स्पष्ट कालोल्लेख आहे. परंतु काल्लोलेखात महिना, तिथी, वार यांचा उल्लेख केलेला नाही. पिल्ले जंत्रीप्रमाणे वरील कालगणना इंग्रजीत जानेवारी ते मार्च या महिन्यांत इ.स. १३२९ अशी येते. या कालखंडात माघ, फाल्गुन व चैत्र हे भारतीय महिने येतात.
शिलालेख क्र. २.
हा गधेगाळ वरील शिलालेखाच्या उजव्या बाजूला उभा ठेवला आहे. याची उंची ९८ सेमी व रुंदी ३० सेमी आहे. लेखाच्या शिळेवरती कलशाप्रमाणे रचना आहे. त्याखाली चंद्र व सूर्य कोरले आहेत. त्यानंतर देवनागरी लिपीत व मराठी भाषेत पाच ओळी कोरल्या आहेत. सर्वांत खाली गाढव व स्त्री यांच्या समागमाचे अंकन आहे. लेख स्पष्ट असला तरी खालील काही भाग ओबड-धोबड आहे. लेखाचा संपूर्ण अर्थ लागत नाही. सध्या या लेखाची येथे केवळ नोंद घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या शब्दांची व अक्षरांची व्यवस्थित ओळख पटलेली आहे, ती खाली दिलेली आहे. सदर लेखातील अक्षरे ही यादवकाळाला जवळची आहेत. अक्षरांचे एकूण वळण पाहता, हा लेख पहिल्या लेखाच्या समकालीन वाटतो. लेखातील अंतिम शब्द ‘रेऐलें’ असा आहे. या शब्दाचा अर्थ ‘रचणे किंवा बांधणे’ असा होतो. त्यामुळे लेखात एखादी वास्तू बांधण्याचा उल्लेख असावा, असे दिसते.
शिलालेखाचा पाठ:
१. प्रस्वम [?] प्य मा क * I
२. * कि व[१?] * * ऐक I
३. धजे देवाची ऐक I
४. वरावाटे [मावटे] साकाभ I
५. रेऐलें II
![]() |
| शिलालेख (गधेगळ) क्र.२. |
निष्कर्ष
वरील सर्व विवरणावरून असे लक्षात येते की दक्खनमध्ये व दक्षिण भारताच्या इतर भागांवर यादव, काकतीय, होयसळ, पांड्य यांच्या काळात निर्माण झालेली स्थापत्य शास्त्रीय व सांस्कृतिक बैठक दिल्ली येथून आलेल्या सुलतानांना एकदम मोडता आली नाही. दक्खनमध्ये या राज्यकर्त्यांना साम्राज्याची घडी बसविण्यासाठी यादव काळात प्रबळ असलेल्या स्थानिक हिंदू नायक व व्यक्तींना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक होते. बहुसंख्यक हिंदू जनतेला अजूनही तुघलकी पद्धतिची पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे हिंदूंना काही प्रमाणात का होईना धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांत सवलती प्राप्त होत्या/द्याव्या लागल्या, असे दिसते. पुढे चौदाव्या-पंधराव्या शतकातही मराठी भाषेचा उपयोग हा सुरूच होता, हे महाराष्ट्रात आढळलेल्या अन्य अनेक मराठी शिलालेखांवरून स्पष्ट होते.
उपलब्ध झालेल्या शिलालेखांमध्ये मंदिराविषयीचा थेट उल्लेख आढळून येत नाही. परंतु मंदिराच्या कला-स्थापत्यावरून शिलालेख व मंदिर समकालीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या शिखरावर काही अंशी इस्लामिक स्थापत्यात असणारी कमानीदार वास्तू-प्रकार आढळून येतो. यावरून हेही स्पष्ट होते की या काळात मंदिर निर्माण कार्य एकदम बंद पडू शकले नाही. ते पुढे बहामनी काळातही सुरूच होते. हे या काळातील प्राप्त झालेल्या या व अन्य अनेक मंदिरांवरूनही लक्षात येते. याचे पारगाव सालू-मालू येथील महादेव मंदिर एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. १३व्या शतकातील मूर्तीकला व तिची विषयवस्तू १४व्या शतकातही सुरु असलेली दिसते. महादेव मंदिराच्या भिंतींवर अंकित केलेल्या प्रतिमांवरून हे कळून येते. परंतु या काळातील मंदिरांवर पूर्वीसारखे मोठ्या प्रमाणावर असलेले अलंकरण मात्र दिसत नाही.
महादेव मंदिराच्या आवारात प्राप्त झालेला मुहम्मद बिन तुघलकाच्या काळातील शिलालेख दक्खनमधील समाजिक व सांस्कृतिक परिस्थिती समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुहम्मद बिन तुघलकाचे नाव असलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच शिलालेख आहे, हे विशेष. मुहम्मद या शब्दामागील ‘देव’ हे प्रत्यय नाविन्यपूर्ण आहे. या लेखात सुलतान मुहम्मद तुघलक याचा राज्यकर्ता म्हणून उल्लेख आहे. तसेच हा लेख जेव्हा देवगिरी ही संपूर्ण भारताची राजधानी होती, त्या कालखंडात कोरला असल्याने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. इ.स. १३२७ ते १३३५ पर्यंत देवगिरी ही तुघलक साम्राज्याची राजधानी राहिली. या लेखावरून तुघलकाने आपली प्रशासनावरील पकड कशाप्रकारे मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता, हे दिसून येते.
भाषिकदृष्ट्या फारशी शब्दांचा प्रभाव या लेखावर दिसत नाही. बहुतेक शब्द हे त्यापूर्वी प्रचलित असलेल्या मराठी भाषेतील आहेत. सुलतान या शब्दाचे ‘श्रुताण’ हे रूप नाविन्यपूर्ण आहे. तसेच या लेखात परवडी, स्रव, नायक इ. पारंपारिक शब्दावलीचा उपयोग आढळून येतो.
विशेष आभार: शिलालेखातील काही अक्षरे व शब्द यांचा छडा लावण्याकामी श्री. कृष्णा गुडदे यांचे सहकार्य मला प्राप्त झाले. डॉ. शिवाजी वाघमोडे व श्री. अनिल दुधाने यांचे मार्गदर्शनही मला मिळाले. मी या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे.
संदर्भ
१. Husain, Agha Mahdi, The Rise and Fall of Muhammad Bin Tughluq, London, Luzac and Co. 1938.
२. तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख
३. Pillai, S. An Indian Ephemeris,Vol. IV, 1922: 260.
- डॉ. विजय सरडे
(७५०७६३२३१२, e-mail:vijaysarde@gmail.com)
(टीप: सदर लेखात पारगाव सलू-मालू येथील नवउपलब्ध शिलालेखावर विशेष प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्राथमिक लेखात बऱ्याच अंशी शिलालेख क्र. १ वाचून त्याचे विश्लेषण करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला गेला आहे. लवकरच येथील संपूर्ण शिलालेख (अवाचानीय अक्षरे व शब्द) व याला चिटकून येणाऱ्या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न अजून एका स्वतंत्र लेखात केला जाईल.)
संदर्भ:
· जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
· जामखेडकर, अ. प्र. (संपा.) महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
· Jadhav, Suresh V., Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. A thesis submitted to the University of Poona, 1980.
· Nagraju, S., Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.
· Suresh Vasant, Tulja Leni and Kondivte Chaityagrihas: A Structural Analysis, Ars Orientalis, Michigan, 2000.
-डॉ. गिरीश मांडके यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती.
· - निरगुडे गावातील ग्रामस्थांकडून प्राप्त झालेली माहिती.
· -सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती.
शिलालेखातून उलगडला वाघेश्वर मंदिराचा इतिहास - MPCNEWS

एमपीसी न्यूज – च-होलीच्या श्री वाघेश्वर मंदिराच्या बांधकामात असलेला प्राकृत भाषेतील शिलालेख सापडला. इतिहासप्रेमी तरुणांनी इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत या शिलालेखाचा अर्थ शोधला. त्या शिलालेखातून वाघेश्वर मंदिराच्या बांधकामाचा इतिहास उलगडण्यास मदत झाली आहे.
च-होलीतील श्री वाघेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर हा शिलालेख उपलब्ध आहे. परिसरातील इतिहासप्रेमी तरुणांनी हा शिलालेखाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली. इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांच्यामार्फत शिलालेखाचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये हा शिलालेख मूळ प्राकृत भाषेतील व देवनागिरी लिपीमधील आहे.
- त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की, पुणे जिल्ह्यातील च-होलीमध्ये श्री वाघेश्वर मंदिरास महान स्थळ म्हणून संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बजापाटील याचा मुलगा सोमाजी याचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स. १७२५ मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली, असा उल्लेख आढळला आहे.
The Vāghēśvara Temple in Charholi Budruk stands as a testament to the region's rich history and cultural significance, especially during the Late Marāṭhā era. The temple (18°39'11.98"N, 73°54'20.45"E) stands to the west of Charholi Budruk village on an elevated platform. The village itself is located along the northern bank of the Indrayani River. Pune city is around 21 km away from Charholi Budruk. The journey is approximately one hour by regular vehicles. The temple's proximity to Alandi, which is only 4 km away, makes it easily accessible for those visiting Alandi. Public transport, such as buses, is also available for those who wish to use it.
Historical Significance: The construction of the Vāghēśvara Temple has been commissioned by the Dabhade family, as denoted by inscriptions on the temple premises. During the Late Marāṭhā period, the village's Patil (a village head or chief) hailed from the Tapkir family. Within Charholi Budruk village, there are three Vāḍās (traditional large residential complexes) that belonged to the Tapkir family. These Vāḍās offer a glimpse into the architecture and lifestyle of the Late Marāṭhā period. The association with the Dabhade and Tapkir families roots the temple deep into the history of the region. For those interested in the Late Marāṭhā period, the temple and the associated Vāḍās offer an opportunity to dive deep into the era's architecture, politics, and social structures.

A view of the newly developed Temple Śikhara

A view of the new addition between the temple and the Nandīmaṇḍapa
Architecture: The temple's architectural layout comprises the garbhagṛha, guḍhamaṇḍapa, and nandīmaṇḍapa. A new mandap has been added between the temple and the nandīmaṇḍapa, which is made in a modern style and does nothing to add to the old beauty of the temple.
Garbhagṛha: The entrance door to the garbhagṛha is elegantly adorned with intricate silver designs, and on either side of it stand two finely crafted śarabha figures. The garbhagṛha has a square layout, with the central placement of the Śivaliṅga. On the rear wall, a niche houses a brass icon of a deity. Additionally, the Garbhagṛha features two jālavātāyanas (windows) that allow for lattice-like ventilation.
Guḍhamaṇḍapa: The temple encompasses a concealed inner sanctum referred to as the Guḍhamaṇḍapa with its entrance embellished with intricate botanical motifs, notably of leaves and blossoms. Within the confines of the Guḍha maṇḍapa, one can discern the presence of four stately pillars complemented by twelve pilasters. These architectural elements culminate in apexes, which are graced with elaborate carvings representing diverse Bhāravāhaka forms: Matsya Avatār, Kūrma Avatār, Varāha Avatār, Paraśurāma, Kārtikeya, Vīra Mārutī, Garuḍa, Gaṇḍabheruḍa, and anthropomorphic figures with variable arm counts. Ofcourse, as usual with such temple, the thick layer of paint takes away the beauty of such sculptures.
The guḍhamaṇḍapa is punctuated by ten niches, wherein the leftmost one is dedicated to the deity, Gaṇeśa. A central emblematic tortoise motif serves as an anchor for the viewer's gaze, while the foremost portion of the chamber presents twin lattice windows, or jālavātāyanas. Architecturally, the roof is constructed in the Navaraṅga style. The verāṇḍikā segment of the temple is punctuated by ornate patterns, enhancing the overall visual appeal. Of note is the śikhara, which has undergone recent modifications and currently showcases a contemporary design.

Guḍhamaṇḍapa

Nandīmaṇḍapa.
Inscription: Above the entrance to the Guḍha maṇḍapa, a seven-line inscription in the hybrid Devanāgarī-Moḍī script, captures the observer's attention. This inscription, etched within the temple's bounds, refers to a date of 23rd January 1726 CE, underscoring the temple's historicity and importance. The transcription of this ancient inscription was first meticulously deciphered by Dr. Pramod Borhade. Subsequently, its authenticity was confirmed by Shri Raj Memane, an eminent scholar proficient in the Moḍī script. Here is the reading of the inscription:
श्री गणेशायनम् : स्वस्ति श्री नृपशालिवाहन शके
१६४७ विश्वावसुनाम् संवत्सर् माघ शुद्ध प्रतिपदा ते दि
वसी श्री वाघेश्वर् महास्थळ च-होली तर्फे हवेली
प्रगणे पुणे परियेसी येथे बज पाटील् सुत् सोमाजी
तयाचा पुत्र् कृष्णाजी दाभाडे निमे मोकादम् मौजे
मजकूर् याणी मालीमावैसी देवालय बांधीले ये संपूर्ण मिळाये
सी ll१ll अक्षर् सुमार् १२१ येकसे येकवीस् छ ११

A seven-line inscription.
Concluding Remarks: The temple dedicated to Vāghēśvara Mahārāja, the patron deity of Charholi village, boasts a rich historical lineage. It was Krishnaji Dabhade, a devout adherent of Śambhū Mahādev, who envisioned and subsequently actualized the construction of this sacred edifice atop a quaint hillock, aiming to contribute positively to the spiritual well-being of the local community.
From an architectural perspective, the Vāghēśvar temple is emblematic of the Late Marāṭhā period. While a myriad of temples from this epoch exhibit discernible influences of Islamic architecture, the Vāghēśvar temple prominently upholds the quintessence of traditional medieval temple design. One can observe the quintessential Navaraṅga style in its guḍhamaṇḍapa, a hallmark of its architectural pedigree. On the path leading to the temple, one can spot the nearby Gaṇeśa and Mahādev temples on the path leading to the temple. The village also has temples dedicated to deities such as Śiva, Hanumān, Kṛṣṇa and Kāniphanātha.
The village of Nirvangi, situated 25 km from Indapur in the Pune district, takes its name from the Nira River, a tributary of the Bhima. Located on the left bank of this river is the Nandīkeśvara Temple, an ancient edifice constructed in the 13th-14th century. A significant part of the temple is buried underground, concealing its lower structure.
Within the temple premises, a grand Nandī statue captures attention. This Nandī is believed to be associated with Mahādeva at Shikhar Shinganapur. Architecturally, the temple is constructed in the Bhūmija style. Notably, it's among the few temples in the Pune district that have preserved Bhūmija-style śikharas. While comprehensive information about the temple has yet to be published, it still remains in good condition.
.jpg)
Nandīkeśvara temple.
Architecture: The temple's general structure includes nandīmaṇḍapa, sabhāmaṇḍapa, antarāḷa, and garbhagṛha. The nandīmaṇḍapa houses a massive Nandī image, which is 434 X 434 cm in size. The original brick śikhara on the nandīmaṇḍapa is still intact, but some construction work was done between the nandīmaṇḍapa and sabhāmaṇḍapa during the British period.

The Nandīmaṇḍapa.
Sabhāmaṇḍapa: The sabhāmaṇḍapa of the temple is 597 cm wide and 616 cm long, with beautiful gavākṣas on both sides of the facade. The entrance is located in the centre of these gavākṣas and has three dvāraśākhās. The peḍyā has sculptures of nidhī, śaiva dvārapālas, and Gaṅgā-Yamunā, while a Gaṇeśa sculpture is on the lalāṭapaṭṭa. Five śikharas are on the uttrāṅga. A Devanāgarī inscription of six lines is carved on a stone plate above the entrance, but the year or date is not mentioned.

A doorway to the sabhāmaṇḍapa.
The raṅgamaṇḍapa in the sabhāmaṇḍapa is 282 X 282 cm in size, and the height of the stamps is 220 cm. Some kīrtīmukhas and Sugrīva-Vālī combat sculptures are carved on the stambhas. The sabhāmaṇḍapa has four empty devakoṣhṭhas, some of which have sculptures of Gaṇeśa and śivaliṅgas. One of the devakoṣhṭhas has nidhīs, śaiva dvārapālas, and river sculptures carved like an entrance.
The antarāḷa of the temple is 226 cm wide and 206 cm long, leading to the garbhagṛha, which houses a 230 X 230 cm sized śivaliṅga. The garbhagṛha's entrance has three dvāraśākhās, and the peḍyā has sculptures of nidhīs, śaiva dvārapālas, river sculptures, and a Gaṇeśa sculpture on the lalāṭapaṭṭa.

Sabhāmaṇḍapa

Sugrīva-Vālī combat
Exterior: The exterior of the Nandīkeśvara temple is simple, with three devakoṣhṭhas on the exterior of garbhagṛha from all three sides. The temple's brick śikhara of pañcabhūma type is in its original state, with beautiful flower decorations on the creepers around it. The grīvhā, āmalaka, and kalaśa parts of the śikhara are visible, and there is a small śikhara on the sabhāmaṇḍapa. However, the śukanāsikā adjacent to the śikhara is not visible.

Details of the śikhara.

Another view of the temple
Concluding Remarks: Although the Nandīkeśvara temple is a beautiful example that has survived in the Bhūmija style, unscientific restoration work is currently being carried out in the name of restoration and leak prevention. Attempts are being made to strengthen the śikhara with cement without considering its original art or carvings. Therefore, the State Archeology Department should take care of this beautiful temple and preserve it scientifically.
Malegaon Budruk is situated in Baramati tehsil. It is 8 km from Baramati City and 102 km from Pune City. There are historical structures in the town such as the Jadhavrao mansion, Kāśī-Viśveśvara temple, Gaurī-Śaṅkara temple, Viṭṭhala temple, Bhairavanātha temple. The east-facing temple of Nāgeśvara (18.135346, 74.502393) is located west of the town on the Baramati-Nira Road. It is in its original form to a reasonable extent and can be assigned to the 14th-15th century CE based on its architectural style.

Temple of Nāgeśvara
Architecure: It is constructed on a high plinth and consists of nandīmaṇḍapa, gūḍhamaṇḍapa, antarāḷa, and garbhagṛha.
Nandīmaṇḍapa: There is a square in front of the temple and two Nandī sculptures are installed in it. Both of them are facing Śiva in garbhagṛha. There is a Śivaliṅga before these Nandī sculptures. The pillars in the maṇḍapa indicate that it was renovated.
Gūḍhamaṇḍapa: The gūḍhamaṇḍapa has an ornate entrance in the east. The door-jamb consists of diamond, pillar, and plain sections/branches. Two yogīs are also carved on the stambhaśākhā of the door. Śaiva Dvārapāla, Nidhī, Gaṅgā , and Yamunā have been carved on the peḍyā of the door of gūḍhamaṇḍapa. There are two Nandī sculptures carved beside the Dvārapāla. The gūḍhamaṇḍapa is square in plan and it has two projections coming out on the outside in two corners. The kakṣāsana has two dwarf pillars (Vāmana pillars) ornated with sculptures. There are four main pillars and ten pilasters in the maṇḍapa. The four pillars balance four shafts and a ceiling whcih probably has a Gajāsura-vadha sculpture. The pillar structure is as follows: from bottom to top – square base, rectangular shaft, three octagonal rings and two round rings between them, pillar center, octagonal ring, oval top, round ring, square top, and capitals with cobra motif. The rectangular shafts bear Surasundarī sculptures, and the pillar center parts bear scenes from epics, sculptures of yogī, and warfare. The gūḍhamaṇḍapa has four aediculae: two near the antarāḷa passage walls and two in the right and left walls. These aediculae possess some sculptures from the Marāṭhā period. Of them, one sculpture seems to be of Keśava-Viṣṇu and appears old and broken.
Antarāḷa: There are four pilasters in the four corners of the antarāḷa. Two pillars are supporting the shaft at the entrance of the antarāḷa passage. There are no aediculae in the antarāḷa and the ceiling is plain and unornate.
Garbhagṛha: The doorjamb of the garbhagṛha features three distinct sections or branches, mirroring the design found on the doorjamb of the gūḍhamaṇḍapa. Beyond these intricate details, the rest of the entrance maintains a simplistic and unadorned style. The lintel boasts a carving of Gaṇapatī, though the area above it is left plain. To access the garbhagṛha, one must descend five steps. Inside, four pilasters are positioned at each corner, while a central Śiva liṅga stands prominently. The overhead ceiling retains a minimalist design, free of intricate details. Notably, a stone vessel originally from the garbhagṛha has been relocated and now rests outside the temple, placed beneath a lamp-post.

A ground plan of the Nāgeśvara temple.

Nandīmaṇḍapa

An ornate entrance of the gūḍhamaṇḍapa.

Yogī carved on the stambhaśākhā of the door.

Yogī carved on the stambhaśākhā of the door.

Peḍyā of the door of gūḍhamaṇḍapa

Peḍyā of the door of gūḍhamaṇḍapa

Gūḍhamaṇḍapa

Gajāsura-vadha sculpture

Keśava-Viṣṇu

Antarāḷa

Garbhagṛha
Exterior of the temple: The temple's exterior is plain, unornate only except for the facade. There are no aediculae or decorations on the walls. A stone vessel is fixed in the south wall to carry all the water for garbhagṛha. The water and other substances poured on the Śiva liṅga during abhiṣeka, are channeled out and collected in the basin (kuṇḍa) in the north. The superstructure of the temple was renovated in the year of 1995, so there is no way of knowing what the original śikhara looked like. Also, there are no signs of a fencing wall as of now. However, the temple complex is preceded by a large entrance. Probably this entrance was built in the Marāṭhā period. There is a simple lamp post on the temple premises.

The exterior of the temple
.jpg)
An entrance to the temple complex.
Iconographic description: There are some sculptures in and outside the temple. Some sculptures are carved on the four pillars in the gūḍhamaṇḍapa. The part of kakṣāsana bearing sculptures has recently been covered with some intrusive construction. Below are all the sculptures on the two dwarf pillars and the 4 main pillars of the gūḍhamaṇḍapa.
The sculptures on the dwarf pillar from kakṣāsana (north): On the dwarf-pillar 1, the killing of Mārīca, the meetings of Sītā and Hanumāna, Rāma and Bhārata are carved. On the dwarf-pillar 2, a kīrtīmukha, Kṛṣṇa with cattle, Śarabha, and a club-fight scene between two men are carved

Killing of Mārīca

Meeting of Sītā and Hanumāna

Rāma and Bhārata

Śarabha and a man with a mace or club.
Sculptures in the gūḍhamaṇḍapa – Pillar 1: On the central part of the pillar, a kīrtīmukha is carved on the eastern side, a Kṛṣṇalīlā is carved on the south and a dancing girl is carved on the same side, on the lower part of the pillar. On the western side of the central pillar part, the Vālī-Sugrīva fight is carved, while on the northern side, a seated person is carved accompanied by two musicians on either side.

Vālī-Sugrīva fight

Musicians
Sculptures in the gūḍhamaṇḍapa – Pillar 2: A fight between a man and Śarabha is carved on the east on the central part of the pillar, a person seated on Makara (crocodile) is carved on the south, a dancing girl accompanied by two musicians is on the west.

A fight between a man and Śarabha

a person seated on Makara

A dancing girl accompanied by two musicians
While on the north, a panel of Kānhā and Yoginī Bahuḍī has been depicted on the stambha-madhya portion of the first left pillar and near the entrance of the hall. Kānhā is shown on the right side of the coconut tree, and Yoginī Bahuḍī on the left side. Four coconuts are shown on each side of the tree.

Kānhā and Yoginī Bahuḍī
On the lower part of the pillar Śiva with is carved Nandī.

Śiva with a Nandī.
Sculptures in the gūḍhamaṇḍapa – Pillar 3: There is a dancing Gaṇeśa accompanied by drum players carved on the eastern side of the central part of the pillar.

Dancing Gaṇeśa
On the southern side, there is, what probably seems to be, the fight scene between Kṛṣṇa and Kuvalayapīḍa.

Fight scene between Kṛṣṇa and Kuvalayapīḍa
On the western side, Kṛṣṇa is depicted along with cattle and Gopikās. Two swans are carved on the north.

Kṛṣṇa is depicted along with cattle and Gopikās.
Sculptures in the gūḍhamaṇḍapa – Pillar 4: Elephant and Vyāḷa sculptures are carved on the central part of the pillar on the east. In the south, probably the killing of Kuvalayapīḍa is depicted.

Killing of Kuvalayapīḍa
On the western side, a pun-in-sculpture and a human figure with three legs is carved.

Human figure with three legs
On the northern side, two peacocks are carved facing each other.

Two peacocks
In the aediculae from antarāḷa, there are two Nāga sculptures on the aedicule to the right hand and a human figure sculpture on the aedicule to the left.

Two Nāga sculptures

Human figure
In the aedicule in the south of gūḍhamaṇḍapa, there is, what seems to be, a Viṣṇu sculpture. The sculptures in the aediculae look primitive.

Viṣṇu sculpture
There are some sculptures carved on the exterior side of the gūḍhamaṇḍapa. There are Bhairava, Kṛṣṇa/Venugopal, a female with a bow (Tripurasundarī?), and a hunting scene of a boar. On the right side, Vidāraṇa Narasiṃha, Cāmuṇḍā, Nṛvarāha, a couple, and Putravallabhā have been carved. Some of them are shown below.

Bhairava

A female with a bow (Tripurasundarī?)

Hunting scene of boar

Putravallabhā
Below these sculptures, there are diamond bands on both sides. On the north and south sides of the entrance to the kakṣāsana, two male guardian figures are carved.

Male Guardian
Additionally, several detached sculptures are placed in front of the temple, possibly belonging to the temple. The most significant among these is the Saptamātṛkāpaṭṭa panel, which is in a wornout condition. Such Saptamātṛkā panel with the vahānas is very rare in Pune district. Furthermore, the temple grounds house three samādhis.

Saptamātṛkāpaṭṭa panel
Inscriptions: There are two inscriptions altogether in the temple and the premises. Of them, one inscription is on a loose stone slab. The inscription is contemporary to the temple. The second inscription is in Devanāgarī and easily readable, and seems to be recent. The inscription has four lines and mentions Rajāram, a mason from Jejuri. The inscription near the nandīmaṇḍapa is important. It is in Devanāgarī script and Sanskrit language. There are seven lines in this inscription. Sun and moon have been carved on the top. A Śivaliṅga is also carved beneath those. According to Mr. Anil Dudhane, this inscription contains ślokas of Śiva. The inscription is wearing off and it needs to be preserved.

Sanskrit Inscription
Conclusion: The temple stands out for its well-preserved state . Representing the architectural finesse of the 14th-15th century CE in the Malegaon region, this temple is a testament to the era's craftsmanship, though the thick coat of paint hide the beauty of many sculptures. It holds significance for followers of both the Nātha Saṃpradāya and Kṛṣṇa Saṃpradāya traditions. For those interested in studying temple architecture from this period, this temple provides a valuable reference point.
At a distance of 18 km from Indapur, there is an ancient east-facing temple of Mahādeva (18.050716, 74.896785) at Pitkeshwar. This temple is situated on a heath a little away from the village. The villagers also call this temple ‘Śiva Śambhū’. At first sight, it does not look like an old temple, but on closer inspection, it can be immediately understood that it must be centuries old. Since some part of the original temple has gone below the earth’s surface. The original temple based on the remians must be at least 500 years old. In proximity to this temple, there is an inscription which states that Ahilyabai Holkar gave donation to build a bārava (well).

Mahādeva temple.

Buried portion of the temple.
Architecture: The temple layout incorporates an open sabhāmaṇḍapa, antarāḷa, and a garbhagṛha. Access to the sabhāmaṇḍapa is facilitated through entrances located in the east and south directions. This congregational hall is supported by four main stambhas and twelve ardhastambhas, designed in an older architectural style.
In terms of iconography, Gaṇeśa is carved into the north side of the first pillar on the left, while a Bhairava sculpture is found on the south side of the second introductory pillar in the sabhāmaṇḍapa. On the eastern side of the rear pillars, śaiva dwārapālas stand guard. Additionally, two Nandī sculptures are placed within the sabhāmaṇḍapa, although their original location might have been in a separate external maṇḍapa. Within the garbhagṛha, the inner sanctum houses a śivaliṅga. Alongside it, sculptures that are likely representations of Umā-Maheśvara and Gaṇeśa can also be seen.

Sabhāmaṇḍapa of the temple.

Another view of hall and vestibule.
Temple Exterior: The exterior of the temple’s garbhagṛha is flat and has been restored. There is a sculpture of Gaṇeśa at a place on it. The śikhara has also been restored. In front of the temple, there is a tulasī vriṅdāvana and a dīpamāḷa at some distance. A huge circular well which is built of stones is at a distance behind the dīpamāḷa.

The exterior of the temple.
Inscription: There is a bārava at a distance of approximately one km. from the village. It is called as ‘Ahilyabai’s Bārava’. There are two Devanāgarī inscriptions in this bārava. They have been read by Mr Nilesh Shelke previously.
First Inscription,
|| Śrī ||
Śrī Pitkeshvara yethila stha
la vara vihira keli Śāli
vāhana śake 1710 Kīlaka nāma
samvatsara || Śrī Mallārī caraṇī
tatpara Ahilyabai Holkar ni
rantara ||
Translation: Ahilyabai Holkar built this well at Śrī Pitkeshwar on Śālivāhana śaka 1710, kīlaka nāma samvatsara which means in the year 1788.
Second inscription:
Śrī Pit(?)keshvara caraṇī tatpara
Ahilyabai Holkar
nirantara ||
Śrī Harahara |

An inscription of Ahilyadevi Holkar.
Concluding Remarks: Based on the architectural features, it's evident that the temple dates back to the 14th century CE, making it the oldest in the village. This lends credence to the idea that the village name, 'Pitkeshvar,' likely originates from the 'Śiva-Śambhū Mahādeva' temple. In addition to this significant Śiva temple, there is also a temple dedicated to a goddess in the village.
Ahilya Devi Holkar, known for her extensive temple restoration and construction efforts across the Indian subcontinent, has left her mark here as well. She was responsible for building temples, ghāṭas, dharmaśāḷās, bāravas, and wells, particularly in significant pilgrimage centers. The presence of a well in Pitkeshvar attributed to her suggests that the village was a prominent pilgrimage site in the 18th century or possibly even earlier.
Given that the Śiva-Śambhū Mahādeva temple predates Ahilya Devi Holkar, it is plausible that she visited this ancient site. It's reasonable to speculate that the restoration work on the dīpamāḷa in front of the temple and possibly the garbhagṛha could have been undertaken by her.
शितोळे घराण्याचे ऐतिहासिक गाव रोटी,श्री रोटमलनाथ आई जोगेश्वरी आणि श्री तुकाईदेवी मंदिर,रोटी.
पराक्रमी शितोळे- सरकार घराणे
पराक्रमी शितोळे- सरकार घराणे :-
राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे-सरकार
राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे-सरकार:-
#सरदार_शितोळे_वाडा- कसबा पेठ, पुणे भाग-२
#सरदार_शितोळे_वाडा-
पोस्टसांभार : Vikas Chaudhari|
ऐतिहासिक वाडे व गढी |
#सरदार_शितोळे_वाडा- (कसबा पेठ, पुणे) भाग-१
#सरदार_शितोळे_वाडा-
ऐतिहासिक वाडे व गढी |

Creativity
requires the courage to let go certainty and that is what we do as a
team. Each one in the team has a hidden talent and when they open their
talent box we come up with something new. This time Gopal opened his box
and we landed in Pedgaon and Parwadi.
How to reach:
1. Roadways: Mumbai to Pune via expressway post-Pune take Nagar road till Daund and then take a left turn to Pedgaon.
2. Railways: Take any train going to solapur which has hault at daund. From Daund one needs to take roadways.
Dharmaveergad is located approximately 19Km from Daund and was formerly known as Bahadurgad or Pedgaon cha killed. You can reach Dharmaveergad from Daund. The road heading to Dharmaveergad is in the worst condition and takes about an hour to cover 19-20 km.
The Fort got its new name in memory of Sambhaji Raje. This fort has a dismaying history where Sambhaji Raje was taken from Sangameshwar (after capture) and was tortured and eventually given brutal death.








The Fort can be explored in 2 parts of which one part includes the temples located adjacent the bank of River Bhima and other is ruined fort and palace complex. There are total 4 temples to explore out of which the Laxmi Narayan temple is the most preserved Hemadpanthi style temple. The Figurines on the walls outside and inside the temple are inimitable. Every pillar inside this temple is carved with Deities and every window is given the best possible shape. The 180-degree view from this temple is marvellous.
Moreover, other 3 temples are not as ornamental as the Laxmi Narayan temple but they are beautiful in their own modest way. Other structures are in the ruined condition and were unable to identify the significance of these structures.






































Post exploring Dharmaveergad we took the blessings of Lord Ganesha at siddhatek which is around 13-15 km. Fortunately we could get the blessings without crowd in few minutes. We then started our journey to Parwadi which took another 2 hours to reach Parwadi Fort.





Parwadi
Parwadi Fort is located in the Parwadi Village in Baramati District. The Fort is still intact and has a huge Entrance and with an intact fortification. The building comprises of 4 bastions at the 4 corners of the Fort to protect against the foe. The walls of the Fort are still intact and one can even walk on this wall. There are Steps on either side just after the entrance to climb on the Fort wall. Their steps are huge and are in good condition.










After exploring these 3 places ,we were short of time and completely drained due to bad road conditions which consumed more time to reach each of these places, hence decided to take the return journey.
https://www.tripoto.com/maharashtra/trips/wandering-around-baramati-5c654131622b1
सासवडला जेवण करून तीन वाजता जेजुरीला पोहचलो. वेळ कमी होता. अक्षरशः पळतच पायऱ्या चढून खंडोबाचे मंदिर गाठले. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मंदिर तीन शतकांपूर्वी बांधलेले असून येथील दीपमाळा खूप सुंदर आहेत. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. खूप सुंदर मंदिर आहे.
जेजुरी गडावर शंकर व पार्वती हे खंडोबा व म्हाळसेच्या रूपात असल्याने
जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक
पिढय़ांपासून चालू आहे.
अशी अनेक जोडपी देवाला भंडारा उधळीत होती.
वरून दिसणारी जेजुरी
दर्शन घेऊन पायथ्याशी पोहचेपर्यंत चार वाजले होते. एका हॉटेलवाल्याला
चहाची ऑर्डर दिली व विनंती करून बाजूच्याच खोलीत लग्नासाठीचे कपडे
बदलण्यासाठी परवानगी मिळवली . अवघ्या दहा मिनिटात पुढे निघालो . जेजुरी ते
मोरगाव रस्ता अगदी चकाचक. २०-२५ मिनिटात मोरगावला लग्नाच्या ठिकाणी पोहचलो.
वरात हॉलच्या दरवाज्याशी पोहचतच होती. तासाभरात लग्न समारंभ आटोपला.
लग्नाला हजेरी लावल्याचा पुरावा म्हणून नवदाम्पत्याबरोबर एक ग्रुप फोटो
काढून घेतला. मैत्रिणीला म्हटलं तू आता खूप गडबडीत असशील तेव्हा नंतर
सवडीने बोलू आणि निरोप घेतला.
लगेच मयूरेश्वराच्या मंदिराकडे धाव घेतली. कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या
मोरगाव येथे हे मंदिर आदिलशाही कालखंडात बांधलेले आहे. काळ्या दगडात
बांधलेले हे मंदिर म्हणजे एक गढीच आहे. मंदिराला चारही उंच संरक्षक भिंत
आहे. तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठे दगडी कासव नजरेस पडते.
मंदिराच्या समोरच एक नंदिचीही मूर्ती आहे. असे सांगितले जाते कि शंकराच्या
मंदिरासाठी मूर्ती रथातून नेली जात असताना येथे रथाचे चाक तुटले त्यामुळे
मूर्त्ती येथेच ठेवण्यात आली. अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून श्री
मयुरेश्वर ओळखला जातो. सुदैवाने आम्ही पोहचलो तेव्हा गर्दी अजिबात नव्हती.
आरामात दर्शन झाले.
सात वाजले होते. मंदिराच्या बाहेर चहा घेतला.
जय मयुरेश्वर, जय मल्हार, "लढ, झगड, आगे बढ....." म्हणत परतीचा प्रवास
सुरु केला व रात्री साडे अकराला घरी पोहचलो आणि लेकीने रात्रपाळीसाठी
लॉगिन करत ऑफिसकाम सुरु केले.
अष्टविनायक : १
श्री मयुरेश्वराची मूर्ती :
गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे
|| गणपती बाप्पा मोरया ||
http;//maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
भीमथडी ते बारामती...वैभवशाली इतिहासाची सोनेरी पाने जिवंत होणार...
बारामती (पुणे) : पूर्वीची भीमथडी व आजची बारामती असलेल्या वैभवशाली परंपरा असलेल्या या टुमदार नगरीचा इतिहास आता पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. बारामतीचे भूषण असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या वाड्याची आता पुनर्बांधणी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
पेशव्यांचे सावकार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांचा शहरातील कऱ्हा नदीकाठी वाडा होता. वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा संपूर्ण परिसर आहे. या लगतच श्री सिद्धेश्वराचे मंदीर आहे. या वाड्याचे सुशोभिकरण करण्यासह या वाड्याच्या तटबंदीचे पुर्नबांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. बारामतीची सर्वांगिण माहिती बाहेरगावाहून येणाऱ्यांना या माध्यमातून देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख व्हावी, असा या मागचा उद्देश आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वास्तूविशारद पी. के. दास हे या वास्तूच्या पुर्नबांधणीचा आराखडा करीत आहेत. वाड्याच्या प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असायचा, त्याचीही नव्याने रचना केली जाणार आहे. नदीच्या बाजूला असलेल्या पूर्वीच्या अल्पबचत भवनचे पिलर काढून टाकले जाणार असून, तटबंदीची चारही बाजूंनी दुरुस्ती केली जाणार आहे. या वाड्याच्या आतील बाजूस असलेली टाउन प्लॅनिंग कार्यालयाची इमारत पाडली जाणार आहे. मागील बाजूनेही प्रवेश दिला जाणार असून, त्या ठिकाणी तिकीट काउंटर केले जाणार आहे. या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या हाताला असलेल्या जुन्या प्रांत कार्यालयाचे रुपांतर या वाड्याच्या प्रशासकीय इमारतीत होईल. सध्या ज्या ठिकाणी स्टँप व्हेंडर्स बसतात, तेथे बारामतीच्या संदर्भातील पुस्तके व इतर बाबींची विक्री करण्यासाठी शॉपी उभारली जाईल.
एक्झिबिशन सेंटर होणार
जुनी तहसील कचेरी इमारत जेथे आहे, तेथे एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे.
पूर्वीच्या भीमथडीपासून ते 2020 पर्यंत बारामतीने जी स्थित्यंतरे अनुभवली,
त्याचे दर्शन पर्यटकांना घडविण्याचा मानस आहे. दोन मजली इमारत येथे उभारली
जाणार असून, त्याला लागूनच एक सुंदर फाउंटन व कॅफेटेरिया उभारला जाईल. आतील
बाजूस जी जुनी क्वार्टर आहेत, त्या ठिकाणी एक अँम्फी थिएटर तयार होणार
आहे. या वाड्यातून दिसणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत लेझर
शो करण्याबाबतही रचना केली जाणार आहे.
तटबंदीवरून चालता येईल
विशेष म्हणजे या वाड्याच्या तटबंदीवरून चालत जाता येणार असून, चारही
बाजूंच्या तटबंदीला चालत फेरी मारता येईल. सध्याच्या पोलिस ठाण्याच्या
इमारतीला तसेच ठेवून त्याला जुना लूक देत येथे एक सभागृह करण्याचे नियोजन
करण्यात आले आहे.
पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष - बाबुजी नाईक - Maha News Live
उन्हाळ्याच्या बोधकथा – २
घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर हे शिवकाळाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे इतिहासाच्या जाणकारांचे म्हणणे आहे. पण बारामतीला एका शहराचे रुप देऊन बारामतीचे नाव देशाच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे पहिले श्रेय हे बाबुजी नाईक यांचे आहे.
शाहू महाराजांनी बाबुजी नाईकांच्या वडिलांना बारामतीचा भाग सोपवला. मात्र बारामती खऱ्या अर्थाने सजली ती बाबुजी नाईकांच्या काळात. पेशव्यांचे सावकार असे बाबुजी नाईकांचे वर्णन होत असले तरी दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंतच्या अनेक युद्धात ते एक शूर सरदार या नात्याने सहभागी असल्याचे दिसते. बारामतीतील बाबुजी नाईकांचा भव्य वाडा, मेडदचा किल्ला हे त्यांच्या त्यावेळच्या ताकदीचे दर्शन घडवितात. मोरोपंतांसारख्या कवीला त्यांनी आश्रय दिला, त्यातून केकावलीसारख्या रचना निर्माण झाल्या. त्यावेळीच बारामतीच्या कसब्यातील वाडे, बारामतीच्या पेठांची रचना बाबुजी नाईकांच्या काळात झाली. बारामतीतील मंदिरे पुरातन असली तरी त्यांचे आज जे स्वरुप आहे ते बाबुजी नाईकांनी केलेल्या जिर्णोद्धारामुळे आपल्याला दिसते आहे. याखेरीज बारामतीत अनेक मंदिरे अशी आहेत जी स्वत: त्यांनी उभी केलेली आहेत. बाबुजी नाईकांमुळे त्यावेळच्या बारामतीचे नाव दिल्लीपर्यंत घेतले जात होते. इतिहासाच्या पानांवर बाबुजी नाईकांचे नाव हे बारामतीकर म्हणूनच घेतले जात असल्याचे आपल्याला दिसते. बागा, तळी, नदीकाठाचे घाट अशा त्या काळातील परिपूर्ण शहराचे रुप बारामतीला देण्याचे पहिले श्रेय आपल्याला बाबुजी नाईकांना द्यावेच लागेल.
नोंद घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे बारामतीचे खऱ्या अर्थाने संस्थापक असणाऱ्या बाबुजी नाईकांच्या वंशजाच्या नावाची १ गुंठाही जमीन आज बारामतीत नाही. बारामती शहर हे बाबुजी नाईकांची देन आहे हे बारामतीत राहणाऱ्या बहुतेक लोकांना माहिती नाही. काळाची ताकद फार मोठी असते.
मोहीम कोणतीही असू दे पेशव्यांना पैशांचा पुरवठा बारामतीमधून व्हायचा...
१७०७ साली औरंगजेब मराठी मातीत गाडला गेला आणि एक एक पर्व संपले. या मुघली वादळात संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, राजाराम महाराज, भद्रकाली महाराणी ताराराणी यांनी संताजी धनाजी यांच्या सारख्या शूर लढवय्या सेनानींच्या सोबत स्वराज्य टिकवलं. औरंगजेबाचा नाश झाला आणि मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ सुरु झाला.
शंभूपुत्र शाहू महाराजांनी सातारा येथे गादी स्थापन करून छत्रपतीपदावर दावा सांगितला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिल्लीत खिळखिळ्या झालेल्या मुघल सत्तेला धडक देण्यास सुरवात केली.
विशेषतः पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सेनेने नर्मदापार घोडदौड केली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात मराठे अटकेपार जाऊन पोहचले. महादजी शिंदेनी तर दिल्लीच्या गादीवर वचक बसवला. पेशावर ते तंजावर मराठा साम्राज्य पसरले होते.
मराठा साम्राज्याच्या या पराक्रमात लढाईमध्ये लढणाऱ्या शूरवीरांचा वाटा तर होताच मात्र या यशात सैन्य शक्ती सोबत धनशक्तीचा देखील सिंहाचा वाटा होता. देशभर घोडदौड करणाऱ्या सेनेला रसद मिळवून देण्याचं काम ही धनशक्ती करत होती. पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्य पैशांच्या बाबतीत समृद्ध बनला होता.
कोणत्याही लढाई साठी कधीही आर्थिक चणचण भासू न देणारी सर्वात ‘स्ट्रॉंग सिस्टीम’ होती मराठा साम्राज्यातील सावकारांची.
थोरल्या शाहू महाराजांच्या काळात कर्ज देणाऱ्या सावकारांना विस्तारवादी धोरणांची जाणीव झाली. पेढी व्यवसायाला संस्थात्मक रूप आले. मराठ्यांच्या साम्राज्यात अनेक व्यापारी-सावकार प्रसिद्ध होते. त्यांमध्ये वैद्य, दीक्षित, पटवर्धन, भिडे, वानवले, कानडे, ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर, रास्ते, मोघे, गद्रे, अनगळ इ. मराठी सावकारांची नावे आपल्याला दिसून येतात.
यात एक नाव प्रचंड फेमस होत. ते होते बारामतीकर बाबूजी नाईक. खुद्द बाजीराव पेशव्यांची बहीण त्यांच्या घरात दिली होती.
हे नाईक म्हणजे मूळचे कोकणातल्या केळशी गावचे जोशी. त्यांच्यापैकी केशव नाईक नावाचा एक पुरुष काशीस जाऊन सावकारी करू लागला. हा बहुधा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन असावा. केशव नाईकास सदाशिव, कृष्ण व अंतोबा असे तीन पुत्र होते. त्यापैकी कृष्णाजी नाईक शाहूबरोबर दक्षिणेंत आले.
साता-यास येऊन राज्य मिळेपर्यंत शाहू महाराजांना निधी लागला तो नाईकांनी पुरविला, म्हणून शाहू छत्रपतींचा त्यांच्यावर लोभ जडून त्यांनी नाईकांना उदयास आणण्याची खटपट केली.
या कुटुंबातला सदाशिव नाईक हे देखील सावकारीत हुशार म्हणून गणले जात असत. त्यांच्या पेढया सर्व मोठमोठया ठिकाणी देशभर होत्या. कृष्णाजी नाईकांना शनिवार पेठेची चौधरी अमलदारी होती. तर कृष्णाजींचा थोरला मुलगा विश्वनाथ साता-यास सावकारी करी आणि दुसरा मुलगा नारायणराव नागपूरच्या भोसल्यांकडे दिवाणगिरी करत असे. त्यांचा मात्र एका लढाईंत मृत्यू झाला. याच नारायणरावाचा मुलगा कृष्णराव उत्तरपेशवाईंत प्रसिध्द झाला. आजही साता-यास जो नाईकाचा वाडा आहे, तो या कृष्णरावाने स. १६८५ त बांधला.
कृष्णराव नाईक हे पेशव्यांकडून टिप्पूजवळ वकील होते. पेशवाई बुडाल्यावर ते छत्रपतींच्या दरबारात खासगी कारभारी झाले. त्यांचा सन १८२५ च्या सुमारास मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज साता-यास राहतात.
सदाशिव नाईक हा बारामतीकरांचा मूळपुरुष समजला जातो. ते व त्यांचे मुलगे सावकारीचा धंदा करीत असत. शाहू महाराजांच्या कळत नाईकांचा दबदबा इतका वाढला होता की पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी आपली मुलगी भिऊबाई त्यांच्या थोरल्या मुलाला दिली. या सोयरिकीमुळे नाईकांना पेशवाईचा विशेष पाठिंबा मिळून त्यांना राज्याची कामे करण्यास संधि मिळाली.
सदाशिवराव नाईक यांचे द्वितीय पुत्र म्हणजे बाबूजी नाईक होय.
शाहू महाराजांच्या काळात कृपादृष्टी झाल्यामुळे बाबूजी नाईक यांना १७४३ साली बारामतीला जहागीर मिळाली आणि त्यांनी तेथे वाडा बांधून संपूर्ण नाईक कुटूंब बारामतीला राहू लागले. मधल्या काळात पेशव्यांशी त्यांचे वाद झाले होते पण पुढे १७५३ साली नाईकांनी पेशव्यांशी समेट केला.
पानिपतातील मोठ्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची घडी घालण्यास माधवराव पेशव्यांना त्यांनी मोठे साहाय्य केले. १७६२ साली बाबूजी नाईकांनी सरसेनापती धनाजी जाधव यांचे नातू, चंद्रसेन जाधवांचे पुत्र रामचंद्र माधव यांना निजामाकडून फोडून पेशव्याच्या बाजूस आणले.
माधवरावांच्या मृत्यूसमयी बाबूजी नाईक त्यांच्याजवळ थेउरास होते. रघुनाथराव पेशव्यांची मुलगी दुर्गाबाई ही बाबूजी नाईकांचा मुलगा पांडुरंगराव यांना दिलेली होती.
पेशव्यांचे महत्वाचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांची मुलगी बाबूजी नाईकांच्या धाकट्या मुलास दिली होती. हा मुलगा लग्नाच्या पंधराव्या दिवशी वारला. याच विधवा मुलीसंबंधाने पुनर्विवाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता.
नारायणरावाच्या खुनानंतर बाबूजी नाईक हे आपले व्याही रघुनाथरावांच्या विरोधात गेले होते.
भट घराण्यांत पेशवेगिरी गेल्यापासून सुमारे सत्तर वर्षे मराठेशाहीच्या कारभारांत वावरत असलेला असा बाबूजी नाईक हा एकच पुरुष दिसतो. ते रसिक व गुणज्ञ होते. कविवर्य मोरोपंत यांचा नावलौकिक होण्यास सावकार बाबूजी नाईकांचा आश्रय कारण झाला असं सांगितलं जातं.
कोकणातून आलेल्या मोरेश्वर पराडकर उर्फ मोरोपंत हे पुराणिक यांना बाबूजी नाईकांकडे राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
पेशव्यांच्या खजिन्याचे मुख्य खांब म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत बाबूजी नाईक स.१७८० च्या सुमारास वारले. त्यांचा मुलगा देखील फार काळ जगला नाही. त्यांच्या पश्चात या घराण्याची वाताहत झाली. मात्र बारामतीला पहिली ओळख बाबूजी नाईक यांच्यामुळेच मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी बारामतीचे भूषण असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या वाड्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून बारामतीची ऐतिहासिक व सांस्कृतिक संपूर्ण जगाला व्हावी, असा या मागचा उद्देश आहे.
बारामतीतील 'नाईकांचा वाडा' आता होणार पर्यटन क्षेत्र...
बारामती नगरी (The city of Baramati) कात टाकत असून ती 'मेट्रोसिटी'च्या (Metrocity) दिशेने वाटचाल करत आहे. बारामतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लवकरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पॅरिसमधील 'सिटी सर्कल'च्या (City Circle in Paris) धर्तीवर 'सिटी सेंट्रल' प्रकल्पाची उभारणी व भीमथडी ते बारामती या प्रवासाचा साक्षीदार असणारा शहरातील श्रीमंत बाबूजी नाईकांच्या वाड्याची ('Naik Wada' in Baramati) जुन्या धाटणीने नव्याने उभारणी करण्यात येणार आहे
बारामती: शहरातून
वाहणाऱ्या कहा नदीच्या काठावर १७४३ साली श्रीमंत बाबूजी नाईक यांनी भव्य
वाडा उभारला. हा ‘नाईक’वाडा भीमथडी ते बारामती अशा इतिहासाचा वैभवशाली
साक्षीदार आहे. हा इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन करण्याचा निर्णय राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार
‘नाईक’वाडा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणार असून सध्या त्याचे
काम सुरू झाले आहे.
श्रीमंत बाबूजी नाईक त्याकाळी रसिक व गुणज्ञ
व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कलावधीत कवी मोरोपंताना राजश्रय
मिळाला होता. त्यांनी अनेक विद्वान आणि गुणीजणांना आपलेसे केले होते. कऱ्हा
नदीच्या तीरावर हा वाडा १७४३ मध्ये उभारला. हा वाडा भीमथडी ते बारामती अशा
इतिहासाचा वैभवशाली साक्षीदार आहे. ही बाब विचारात घेऊन राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार या वाड्याचे जैसेथे
नूतनीकरण करण्यात येणार आहे.
या
वाड्यामध्ये संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार असून यात १७४३ ते १७८०
पर्यंतचा श्रीमंत बाबूजी नाईक यांचा जीवनपट उलगडणार आहे. तसेच १७८० ते २०१४
पर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घडामोडींचा घटनाक्रमांचे बदल आणि
बारामती तालुक्यात असणारे ऐतेहासिक दगडी शिलालेख पर्यटकांना पाहवयास मिळणार
आहेत. वाड्याच्या तटबंदीची दुरूस्ती करण्यात येणार असून तटबंदिवरून
पर्यटकांना चालता येणार आहे. त्याचबरोबर बुरुंज, नगारखाना, महाप्रवेशद्वार
यांच्या पडझड झालेल्या भागाची पुर्नबांधकाम केले जाणार आहे. नाईकवाडा
पर्यटन क्षेत्र विकासाचे काम सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे
वास्तुविशारद पी.के.दास यांनी ऐतहसिक बांधकाम तज्ञाच्या साह्याने या
वाड्याचा विकास आराखडा बनविला आहे. लवकरच हा वाडा बारामतीसह पर्यटकांना
पाहण्यासाठी सज्ज होणार आहे .अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी
दिली.
या वाड्यात नगारखाना, महाद्वार, वस्तु संग्रहालाय, ८ बुरूज
पुर्नबांधकाम, तटबंदी मजबुतीकरण, सभागृह, संपर्कं कार्यालय,लहान मुलांना
खेळण्यासाठी ग्राऊंड, उपहारगृहासह १० दुकाने
IST
बारामती नगरी (The city of Baramati) कात टाकत असून ती 'मेट्रोसिटी'च्या (Metrocity) दिशेने वाटचाल करत आहे. बारामतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी लवकरच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पॅरिसमधील 'सिटी सर्कल'च्या (City Circle in Paris) धर्तीवर 'सिटी सेंट्रल' प्रकल्पाची उभारणी व भीमथडी ते बारामती या प्रवासाचा साक्षीदार असणारा शहरातील श्रीमंत बाबूजी नाईकांच्या वाड्याची ('Naik Wada' in Baramati) जुन्या धाटणीने नव्याने उभारणी करण्यात येणार आहे
बारामती येथील सिध्देश्वर मंदिर
बारामती म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ती इथली लांबच लांब शेते! तसं बारामती हे प्रसिद्ध मराठी कविवर्य मोरोपंतांचे जन्मगाव आहे. श्रीधर यांनी लिहिलेला शिवलीलामृत हा पवित्र ग्रंथ बारामतीचाच आहे.
खरं तर, बारामतीमधून द्राक्षे आणि साखर निर्यात केली जाते. बारामती आणि त्याच्या आसपास अनेक धार्मिक मंदिरे आहेत.
शेतीच्या खालोखाल इथलं मुख्य आकर्षण म्हणजे येथील मंदिरे!
श्री काशीविश्वेश्वर मंदिर, श्री. सिद्धेश्वर मंदिर, मोरगावचा गणपती, सिद्धटेकचा गणपती, जेजुरीचा खंडोबा बारामतीच्या आसपास आहेत.
आज आपण यापैकी सिद्धेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत :
सुमारे 840 वर्षांपासून उभे असलेले हे मंदीर कऱ्हा नदीच्या पूर्व तीरावर आहे. असे म्हटले जाते की आपले गुरु मल्लिकार्जुन यांनी शिवलिंगांचा शहरभर प्रसार करावयास सांगितल्यामुळे श्री सिध्दरामेश्वरांनी स्वतः हे मंदिर बांधले.
शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.
इ.स.1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले. चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत. समोरुन नंदीकडे पाहिले तर असं वाटतं की त्याचा एक कान तुमचं म्हणणं ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे.. जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते.
औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. मंदिरामध्ये मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवलेली आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते. या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.
नमोस्तुते !
https://m.facebook.com/ShriSiddheshwarGaneshMandalBaramati/photos/a.407443792643547/407444009310192/?type=3&size=960%2C640&fbid=407444009310192
बारामती म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ती इथली लांबच लांब शेते! तसं बारामती हे प्रसिद्ध मराठी कविवर्य मोरोपंतांचे जन्मगाव आहे. श्रीधर यांनी लिहिलेला शिवलीलामृत हा पवित्र ग्रंथ बारामतीचाच आहे.
खरं तर, बारामतीमधून द्राक्षे आणि साखर निर्यात केली जाते. बारामती आणि त्याच्या आसपास अनेक धार्मिक मंदिरे आहेत.
शेतीच्या खालोखाल इथलं मुख्य आकर्षण म्हणजे येथील मंदिरे!
श्री काशीविश्वेश्वर मंदिर, श्री. सिद्धेश्वर मंदिर, मोरगावचा गणपती, सिद्धटेकचा गणपती, जेजुरीचा खंडोबा बारामतीच्या आसपास आहेत.
आज आपण यापैकी सिद्धेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत :
सुमारे 840 वर्षांपासून उभे असलेले हे मंदीर कऱ्हा नदीच्या पूर्व तीरावर आहे. असे म्हटले जाते की आपले गुरु मल्लिकार्जुन यांनी शिवलिंगांचा शहरभर प्रसार करावयास सांगितल्यामुळे श्री सिध्दरामेश्वरांनी स्वतः हे मंदिर बांधले.
शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.
इ.स.1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले. चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत. समोरुन नंदीकडे पाहिले तर असं वाटतं की त्याचा एक कान तुमचं म्हणणं ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे.. जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते.
औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. मंदिरामध्ये मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवलेली आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते. या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.
नमोस्तुते !
https://mr.quora.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0?force_dialog=1
Baramati Gadhi – There is a Police Station & Tehsilsar Court Office inside the premises of Baramati Land Fort.

Siddheshwar temple was closed for the afternoon. We climbed the nearby building to get a view from terrace. Thankfully, a local lady got it opened for us. Located in midst of bustling city, enclosed by the wall.This temple is an architecture marvel in its own as seen below.
Medad Fort is a Land fort, lying on the bank of Karha River. Only the Boundary walls (recently built) with Bastion was standing tall. Since, it was already afternoon and we were hungry. We had our lunch here. There are hardly any shops around. People had brought packed lunch from home. The area had lots of structures, mostly overtaken by the growing population. Now, there is a primary school inside the Fort.
Wandering around Baramati
Creativity
requires the courage to let go certainty and that is what we do as a
team. Each one in the team has a hidden talent and when they open their
talent box we come up with something new. This time Gopal opened his box
and we landed in Pedgaon and Parwadi.
How to reach:
1. Roadways: Mumbai to Pune via expressway post-Pune take Nagar road till Daund and then take a left turn to Pedgaon.
2. Railways: Take any train going to solapur which has hault at daund. From Daund one needs to take roadways.
Dharmaveergad is located approximately 19Km from Daund and was formerly known as Bahadurgad or Pedgaon cha killed. You can reach Dharmaveergad from Daund. The road heading to Dharmaveergad is in the worst condition and takes about an hour to cover 19-20 km.
The Fort got its new name in memory of Sambhaji Raje. This fort has a dismaying history where Sambhaji Raje was taken from Sangameshwar (after capture) and was tortured and eventually given brutal death.


https://www.tripoto.com/maharashtra/trips/wandering-around-baramati-5c654131622b1
मेडद
मेडद
प्रकार : गढी
जिल्हा : पुणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशवे जरी सत्तेच्या केंद्रस्थानी असले तरी
त्यांच्या वर्चस्वाखाली महाराष्ट्रात इतरही काही संस्थानिक निर्माण झाले
होते. या संस्थानिकांनी त्यांच्या प्रदेशात बरेच भुईकोट व गढ्या बांधल्या.
यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा
करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने
व लवकरच इंग्रजांचे राज्य भारतावर आल्याने इतिहासात या कोटांची फारसी
माहिती दिसुन येत नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व वाडे आज मोठया प्रमाणात
उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. असाच एक उध्वस्त
भुईकोट म्हणजे मेडदचा भुईकोट. काही काळाचा सोबती असलेल्या ह्या भुईकोटाचे
साक्षीदार होण्यासाठी त्याला लवकरात लवकर भेट दयायला हवी. मेडदचा भुईकोट
बारामती तालुक्यात मोरगाव –बारामती रोडवर असुन बारामती मेडद हे अंतर ५
कि.मी. तर पुणे मेडद हे अंतर ९२ कि.मी. आहे.
किल्ल्यात शिरण्यापूर्वी किल्ल्याबाहेर एका चौथऱ्यावर बांधलेले यादवकालीन
शिवमंदीर आपले लक्ष वेधुन घेते. संपुर्ण दगडी बांधणीतील हे मंदीर किल्ला
बांधण्यापुर्वी अस्तित्वात असावे. मंदिर पाहुन कोटाच्या दरवाजाकडे जाताना
वाटेत चुन्याच्या घाण्याचे चाक दिसते. आयताकृती आकाराचा हा किल्ला
पुर्वपश्चिम १.५ एकर परिसरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला
चार तटबंदीच्या मध्यावर दोन व दरवाजा शेजारी दोन असे एकुण आठ बुरुज आहेत.
कधीकाळी दुमजली असलेले ह्या वैशिष्टपूर्ण आकाराच्या बुरुजांचा वरील भाग
ढासळलेला असुन केवळ एका बुरुजाचा वरील भाग पहायला मिळतो. कोटाच्या
पुर्वाभिमुख दरवाजातून आत आल्यावर तटबंदीच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या
पहायला मिळतात. यातील एका देवडीशेजारी तटबंदीतुन बाहेर पडण्यासाठी लहानसा
भुयारी मार्ग आहे. हा मार्ग दरवाजा शेजारील बुरुजातून बाहेर पडतो. कोटाचे
लाकडी दरवाजे आजही शिल्लक असुन मुख्य दरवाजाला दिंडी दरवाजा आहे. संपुर्ण
कोटाची बांधणी घडीव दगडात केलेली असुन फांजीवरील भाग मात्र विटांनी बांधुन
काढलेला आहे. तटबंदी व बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत.
भुईकोटाच्या आत ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामपंचायतीची शाळा असुन आतील
वास्तु पुर्णपणे भुईसपाट करून खेळाचे मैदान बनवीले आहे. कोटाची आतील तटबंदी
ढासळली असल्याने फांजीवरून फेरी मारता येत नाही पण कोटाच्या दरवाजावरील
भागात मात्र जाता येते. येथुन संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. कोटाच्या दक्षिण
बाजुच्या तटबंदीतुन बाहेर जाण्यासाठी एक लहान दरवाजा बांधला आहे. कोटाच्या
आजही शिल्लक असलेल्या बुरुजाच्या आत एक तळघर असुन त्याचा वापर दारुगोळा
ठेवण्यासाठी अथवा सैनिकांच्या रहाण्यासाठी होत असावा. किल्ल्याच्या आवारात
असलेली आजमितीस एकही विहीर दिसुन येत नाही. खेळाचे मैदान बनविताना विहीर
बुजवली असावी कारण एका ठिकाणी दगडी बांधकामातील गोलाकार आकाराचा पाणी मुरून
झालेला खड्डा दिसतो. याशिवाय कोटात एकही अवशेष दिसुन येत नाही. आटोपशीर
असा हा भुईकोट पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar







.jpg)
.jpg)
.jpeg)
.jpg)

.jpg)


.jpg)



.jpeg)
.jpeg)
























































































.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)


















































No comments:
Post a Comment