पुणे बंगलोर हायवरील कापुरहोळ गावापर्यंत आल्यानंतर हायवे सोडून कापूरहोळ – सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर साधारण ३.५ किमीवर बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.
त्याएवजी सासवडकडून आल्यास पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर आहे. गावात जाताना पुरंदर किल्ला सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं सुंदर देऊळ.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध नारायणपूर गावात हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. नारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो,
या मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे.
वीर मारुती

नारायणेश्वर मंदिर
मंदीराच्या आवारात एका झाडाला कट्टा केलेला आहे. इथे एक दगडी राजंण पुरलेला दिसतो.
मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे.
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लांबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
गाभारार्यातील नारायणेश्वराचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराने बाहेर पडावे. या दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. या व्दारासमोर धनकेश्वराच देऊळ आहे.
नारायणेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर –
आपण पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या दिवेघाटातून सासवडला जाऊन तेथून पुढे नारायणपूर ला जाऊ शकतो किंवा सातारा रोडने गेल्यास कापूरहोळ वरून डावीकडे वळून नारायणपूरकडे पोहोचू शकतो. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे श्री. चांगदेव महाराजांचे गाव आहे. या गावात जूना औंदूंबर वृक्ष आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी आहे. श्री. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात.श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते.पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.
सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. "जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता" असा मंत्र येथे जपला जातो.
श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. दत्तजन्म पाळणा हलवून करतात. नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते.रात्री शोभेचे दारूकाम, दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात. या मिरवणूकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांचा हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो.सोहळ्यासाठी प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत.
श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते.
प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे
मूळच्या तिरुमला-तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे. मूळचं मंदिर हे आंध्र प्रदेशात व्यंकटाचल पहाडावर ८४० मीटर उंचीवर आहे, तर केतकावळे येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. मूळ मंदिराचा परिसर शेकडो एकरांचा आहे. मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं आहे. तर केतकावळे येथील देवस्थानाचा परिसर सुमारे २३ एकरांचा आहे. प्रत्यक्ष मंदिर हे अडीच एकरांवर बांधलेलं आहे. मूळ देवस्थानाच्या तुलनेत ते खूप छोटं आहे.

तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर आहे, तसंच मुख्य मंदिराच्या बाजूने परिवार मंदिरं आहेत. त्यात विविध देवदेवता आहेत. केतकावळे इथेही मुख्य मंदिरासमोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेलं आहे, तसंच मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात सुदर्शनस्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता व वेणुगोपालस्वामी अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराहस्वामी यांची मंदिरं आहेत. ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत.
पिवळ्या धमक रंगात त्यांचे कळस रंगवलेले आहेत. कळसावर त्या त्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरांचा बाह्य भाग निळसर करड्या रंगाचा. त्यात बर्या च प्रमाणात लाल रंगाचाही वापर केलेला दिसतो.
महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरांमध्ये अशी रंगसंगती क्वचितच आढळते. या मंदिरांच्या प्रथम दर्शनातच त्यावरील दाक्षिणात्य छाप जाणवते.

मुख्य मंदिरातही रंगांची उधळण केलेली दिसते. तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणेच इथेही मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. आगम शास्त्रानुसार या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. श्री बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्यांचं इथे पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजीचे शरीरावयव आहेत.
उदाहरणार्थ, गर्भगृह म्हणजे मस्तक व राजगोपुरम म्हणजे चरण. यामध्ये अर्थमंडप, अंतराळ मंडप, मुखमंडप, सोपनम, ध्वजस्तंभम, बलिपीठम हे भाग आहेत.

केतकावळे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाळिग्रामाची असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानांत कर्णफुलं, खांद्यावर नाग व केशसंभार रुळलेला आहे. तिच्या चार हातांपैकी एकेका हातात शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर उभट आकाराचा मुकुट चढवला जातो, तसंच तिला विविध अलंकारांनी सजवण्यात येतं.
केतकावळे येथील मंदिरातील मूर्तीमध्येही ही सर्व वैशिष्ट्यं आढळून येतात.

केतकावळे येथील बालाजीचे सर्व पूजाविधी तिरुपतीप्रमाणेच आहेत. सुप्रभातम (देवतेला जागृत करणे), अभिषेकम (देवतेला आंघोळ घालणे), नैवेद्यम (देवतेला अन्न अर्पण करणे), आरती (दिवे ओवाळणे) इत्यादी. मंदिरात तीन वेळा पूजा आणि दोन वेळा सेवा केल्या जातात. सुप्रभातम आणि एकान्तसेवा या त्या दोन सेवा. दर गुरुवारी भाविकांना नेत्रदर्शन घडवलं जातं. या मंदिरात वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा मार्च-एप्रिलमध्ये ब्रह्मोत्सव. ब्रह्मोत्सव हा उत्सव पंधरा दिवस चालतो. या काळात मंदिरातील नेहमीच्या विधींशिवाय अन्य कार्यक्रमही होतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये वैकुंठ एकादशी, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अन्नकुटोत्सव, इत्यादी वर्षभर विविध उत्सव आयोजित केले जातात.

तर असं हे केतकावळ्याचं बालाजी देवस्थान- तिरुपतीच्या मूळ बालाजीचं दर्शन घडवणारं. बालाजीचे भक्त भारताच्या सर्व भागांत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. या मंदिरामुळे इथल्या भाविकांची बालाजीच्या दर्शनाची सोय झाली आहे. तथापि, मूळ बालाजीची प्रतिकृती उभारण्याचं प्रयोजन काय आणि ती इथे का उभारली, हे प्रश्न पडू शकतात.
बालाजीवर असलेल्या श्रद्धेतून या मंदिराची निर्मिती झाली आहे. या समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांची तिरुपती बालाजीवर मोठी श्रद्धा होती. हे त्यांचं कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरुपतीला जाणं शक्य होत नाही म्हणून बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही; पण पुढे व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही इच्छा पूर्ण केली. ही भावंडं या मंदिराची व्यवस्था पाहतात. कंपनीने पुण्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेल्या केतकावळे गावात हुबेहूब तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृतीच उभारली आहे.दहा एकर जागेवर १९९६ पासून २००३ पर्यत सात वर्ष विविध भागातून आलेल्या शेकडो कारागीरांच्या अथक मेहनतीने हे मंदिर उभारले गेले आहे.. या मंदिराच्या उभारणीस अंदाजित १५ ते २५ कोटी रुपये खर्च आल्याचे समजते.

मूळ देवस्थानाचं पावित्र्य इथेही काटेकोरपणे जपलं जातं, असं इथल्या अधिका-यांनी सांगितलं. याच दृष्टिकोनातून दक्षिणेकडील पुजा-यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे. इथे भाविकांसाठी सर्व व्यवस्था सेवाभावी वृत्तीने करण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं. भाविकांना उपलब्ध करण्यात आलेल्या कोणत्याही सेवेसाठी इथे शुल्क घेतलं जात नाही. इथे येणा-या भाविकांच्या वाहनांकरिता पार्किंग, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पादत्राणं काढून ठेवण्याची सोय, दर्शनानंतर प्रसाद व भोजनाची सोय अशा अनेक सेवा इथे दिल्या जातात.

तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो. इथेही तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी थेट तिरुपतीहून आचारी आणण्यात आले आहेत. तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. भाविक तिथे मुंडण करून घेतात. केतकावळे इथेही ही व्यवस्था आहे. तथापि, मूळ देवस्थानाच्या तुलनेत इथे मुंडण करून घेणा-या भाविकांची संख्या अल्प दिसते. व्यवस्थापनातील नियोजन व शिस्त हे केतकावळे येथील बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य ठरू लागलं आहे.
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) श्री. गो.नि.दांडेकर, प्र.के.घाणेकर यांचे लिखाण
३) www.durgbharai.in हि वेबसाईट
४) www.trekshitiz.in हि वेबसाईट
८)
रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे | Discover Maharashtra
पुणे जिल्ह्यात
पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे
सुमारे दोन हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. याच गावात व्यंकटेश्वरा
हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं
आहे.
मूळच्या तिरुमला-तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे. मूळचं
मंदिर हे आंध्र प्रदेशात व्यंकटाचल पहाडावर ८४० मीटर उंचीवर आहे, तर
केतकावळे येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. मूळ मंदिराचा परिसर
शेकडो एकरांचा आहे. मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं
आहे. तर केतकावळे येथील देवस्थानाचा परिसर सुमारे २३ एकरांचा आहे.
प्रत्यक्ष मंदिर हे अडीच एकरांवर बांधलेलं आहे. मूळ देवस्थानाच्या तुलनेत
ते खूप छोटं आहे.
तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व
गरुड मंदिर आहे, तसंच मुख्य मंदिराच्या बाजूने परिवार मंदिरं आहेत. त्यात
विविध देवदेवता आहेत. केतकावळे इथेही मुख्य मंदिरासमोर ध्वजस्तंभ व गरुड
मंदिर उभारलेलं आहे, तसंच मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत.
त्यात सुदर्शनस्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता व वेणुगोपालस्वामी अशा
देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.
ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत.
पिवळ्या धमक रंगात त्यांचे कळस
रंगवलेले आहेत. कळसावर त्या त्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिरांचा बाह्य भाग निळसर करड्या रंगाचा. त्यात बर्या च प्रमाणात लाल
रंगाचाही वापर केलेला दिसतो.
महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरांमध्ये अशी रंगसंगती क्वचितच आढळते. या मंदिरांच्या प्रथम दर्शनातच त्यावरील दाक्षिणात्य छाप जाणवते.
मुख्य
मंदिरातही रंगांची उधळण केलेली दिसते. तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणेच
इथेही मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. आगम शास्त्रानुसार या मंदिराचं
बांधकाम करण्यात आलं आहे. श्री बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो.
त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्यांचं इथे
पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे
बालाजीचे शरीरावयव आहेत.
उदाहरणार्थ, गर्भगृह म्हणजे मस्तक व राजगोपुरम
म्हणजे चरण. यामध्ये अर्थमंडप, अंतराळ मंडप, मुखमंडप, सोपनम, ध्वजस्तंभम,
बलिपीठम हे भाग आहेत.
केतकावळे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती
येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाळिग्रामाची
असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानांत कर्णफुलं,
खांद्यावर नाग व केशसंभार रुळलेला आहे. तिच्या चार हातांपैकी एकेका हातात
शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर उभट
आकाराचा मुकुट चढवला जातो, तसंच तिला विविध अलंकारांनी सजवण्यात येतं.
केतकावळे येथील मंदिरातील मूर्तीमध्येही ही सर्व वैशिष्ट्यं आढळून येतात.
केतकावळे येथील बालाजीचे सर्व पूजाविधी तिरुपतीप्रमाणेच आहेत. मंदिरात तीन वेळा पूजा आणि दोन वेळा सेवा केल्या जातात. सुप्रभातम आणि एकान्तसेवा या त्या दोन सेवा. दर गुरुवारी भाविकांना नेत्रदर्शन घडवलं जातं. या मंदिरात वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रह्मोत्सव. ब्रह्मोत्सव हा उत्सव पंधरा दिवस चालतो. या काळात मंदिरातील नेहमीच्या विधींशिवाय अन्य कार्यक्रमही होतात.
तिरुपती येथील मूळ
मंदिरात भाविकांनी बालाजीला केस वाहण्याची प्रथा आहे. तशी सोय येथील
मंदिरातही उपलब्ध करण्यात आली आहे. मूळ मंदिरात मिळतो त्याप्रमाणे या
मंदिरातही लाडूचा प्रसाद मिळतो. मूळ मंदिरात जशा दान-दक्षिणेसाठी हुंड्या
ठेवलेल्या आहेत तशा इथेही आहेत. मूळ मंदिरात व्यंकट रमणा गोविंदा अशी
तेलुगू भजनं ऐकू येतात, त्याच भजनांच्या ध्वनिफिती इथे ऐकवण्यात येतात.
व्यंकट रमणा गोविंदा हा गजर इथे सतत चालू असतो.
तर असं हे केतकावळ्याचं
बालाजी देवस्थान- तिरुपतीच्या मूळ बालाजीचं दर्शन घडवणारं. बालाजीचे भक्त
भारताच्या सर्व भागांत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. या
मंदिरामुळे इथल्या भाविकांची बालाजीच्या दर्शनाची सोय झाली आहे. तथापि, मूळ
बालाजीची प्रतिकृती उभारण्याचं प्रयोजन काय आणि ती इथे का उभारली, हे
प्रश्न पडू शकतात.
व्यंकटेश्व्रा हॅचरीज ट्रस्टच्या इथल्या जनसंपर्क
अधिका-यांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की बालाजीवर असलेल्या
श्रद्धेतून या मंदिराची निर्मिती झाली आहे. या समूहाचे संस्थापक डॉ. बी.
व्ही. राव यांची तिरुपती बालाजीवर मोठी श्रद्धा होती. हे त्यांचं कुलदैवत.
सर्वसामान्य भाविकांना तिरुपतीला जाणं शक्य होत नाही म्हणून बालाजीचं मंदिर
उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही;
पण पुढे व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही
इच्छा पूर्ण केली. ही भावंडं या मंदिराची व्यवस्था पाहतात.
मूळ देवस्थानाचं पावित्र्य इथेही काटेकोरपणे जपलं जातं, असं इथल्या अधिका-यांनी सांगितलं. याच दृष्टिकोनातून दक्षिणेकडील पुजा-यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे. इथे भाविकांसाठी सर्व व्यवस्था सेवाभावी वृत्तीने करण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं. भाविकांना उपलब्ध करण्यात आलेल्या कोणत्याही सेवेसाठी इथे शुल्क घेतलं जात नाही. इथे येणा-या भाविकांच्या वाहनांकरिता पार्किंग, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पादत्राणं काढून ठेवण्याची सोय, दर्शनानंतर प्रसाद व भोजनाची सोय अशा अनेक सेवा इथे दिल्या जातात.
तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो. इथेही तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी थेट तिरुपतीहून आचारी आणण्यात आले आहेत. तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. भाविक तिथे मुंडण करून घेतात. केतकावळे इथेही ही व्यवस्था आहे. तथापि, मूळ देवस्थानाच्या तुलनेत इथे मुंडण करून घेणा-या भाविकांची संख्या अल्प दिसते. व्यवस्थापनातील नियोजन व शिस्त हे केतकावळे येथील बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य ठरू लागलं आहे.
https://www.discovermh.com/prati-balaji-temple-ketkawle/
- तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे च पुण्यातील प्रति (Balaji Temple) बालाजी मंदिर येथे पण सर्वजन पूजा आणि सेवा करतात. शुध्दी आणि एकांतसेवा विधी देखील येथे दररोज होतात आणि दर शुक्रवारी मंदिरात अभिषेक आणि उंजल-सेवा केली जाते.
- बालाजी मंदिरात राम नवमी, विजया दशमी आणि दीपावली सारखे सण देखील साजरे केले जातात. वैकुंठ एकादशी, कानू पोंगल आणि गुढीपाडवा देखील येथे साजरा केला जातो.
- तमिळ नववर्षाचे आशीर्वाद घेण्यासाठीही लोक येथे येतात. त्या दिवशी मंदिर फुलांनी आणि चमकदार रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते.
- येथे तुम्ही अन्नदानम, मिठाई आणि पोंगल खरेदी आणि देवाला अर्पण करू शकता. आणि तुम्ही मंदिराच्या भेटीदरम्यान मोफत जेवण – महाप्रसादमचा आनंद देखील घेऊ शकता.
लाजी मंदिर (केतकावळे, पुणे)
प्रति
बालाजी मंदिर हे व्येकटेश्वरा हॅचरीसचे संस्थापक स्वर्गीय पद्मश्री डॉ.
बी.व्ही.राव यांचे एक स्वप्न होते जे त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या सौ.
अनुराधा देसाई यांनी सत्यात उतरविले आहे. कंपनीने पुण्यापासुन ३५ किमी
अंतरावर असलेल्या केतकावळे गावात हुबेहूब तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची
प्रतिकृतीच उभारली आहे.दहा एकर जागेवर १९९६ पासून २००३ पर्यत सात वर्ष
विविध भागातून आलेल्या शेकडो कारागीरांच्या अथक मेहनतीने हे मंदिर उभारले
गेले आहे.. या मंदिराच्या उभारणीस अंदाजित १५ ते २५ कोटी रुपये खर्च
आल्याचे समजते.
Prati Balaji Mandir at Ketkawale: Famous Temple in Pune - eindiatourism.in
प्रति बालाजी मंदिराचे ठिकाण
केतकावळे येथील प्रती बालाजी मंदिर हे भगवान व्यंकटेश्वराला समर्पित असलेले मंदिर आहे, ज्यांना बालाजी असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 45 किमी अंतरावर असलेल्या नारायणपूरजवळील केतकवळे गावात आहे, भारत पुण्यातील प्रति बालाजी मंदिरात दिवे घाट आणि सासवड येथून किंवा कात्रज घाट आणि मुंबई-पुणे-सातारा रोड येथून पुण्याजवळील प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आहे . , पुणे ते जेजुरी-प्रतिबालाजी मंदिरादरम्यान कॅबने एक दिवसाची सहल
प्रती बालाजी मंदिर उघडण्याची वेळ / प्रवेश शुल्क
केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिर दररोज पहाटे ५:०० ते रात्री ८:०० या वेळेत पाहुण्यांसाठी खुले असते. मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. तथापि, अभ्यागतांनी मंदिराच्या देखभाल आणि स्वच्छतेसाठी नाममात्र देणगी देणे अपेक्षित आहे
करण्यासारख्या गोष्टी/प्रति बालाजी मंदिर अवश्य पहा
केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. प्रति बालाजी मंदिरात अभ्यागत पुढील गोष्टी करू शकतात:
- पंचलोह (पाच धातूंनी) बनलेल्या आणि चार हात आणि मुकुट असलेल्या भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीचे दर्शन (पाहणे) घ्या. मूर्ती दागिने आणि फुलांनी सजलेली आहे. लक्ष्मी आणि पद्मावती या त्यांच्या पत्नींनी देखील या मूर्तीला देवी म्हणून पूजले आहे.
- सुप्रभातम (देवतेला जागृत करणे), अभिषेकम (देवतेला आंघोळ घालणे), नैवेद्यम (देवतेला अन्न अर्पण करणे), आरती (दिवे ओवाळणे) इत्यादी मंदिरात केल्या जाणाऱ्या विधी आणि समारंभांचे साक्षीदार व्हा. मंदिर देखील मार्च-एप्रिलमध्ये ब्रह्मोत्सव, डिसेंबर-जानेवारीमध्ये वैकुंठ एकादशी, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अन्नकुटोत्सव, इत्यादी वर्षभर विविध उत्सव आयोजित केले जातात.
- हनुमान मंदिर, गणेश मंदिर, पद्मावती मंदिर इ. मंदिराच्या संकुलात असलेली इतर मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे पहा. ही मंदिरे भगवान व्यंकटेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाच्या विविध रूपांना आणि पैलूंना समर्पित आहेत.
- मंदिरापासून आजूबाजूच्या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घ्या. अभ्यागतांना मंदिरातून पुरंदर किल्ला, कर्हा नदी, नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर इत्यादी पाहता येतात. या मंदिरातून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्यही पाहायला मिळते
प्रति बालाजी मंदिराचे महत्व
केतकावळे येथील प्रती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती मानली जाते, जे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे लोक याला मिनी तिरुपती किंवा प्रति तिरुपती असेही म्हणतात. हे तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) यांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेले आहे, जे मूळ मंदिराचे व्यवस्थापन करते.
केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिर हे भगवान व्यंकटेश्वराच्या भक्तांचे श्रद्धास्थान आहे. भगवान व्यंकटेश्वर हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात जे आपल्या भक्तांना संकटांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर आले होते. पौराणिक कथेनुसार, भगवान वेंकटेश्वराने पृथ्वीची राजकन्या पद्मावतीशी लग्न केले आणि तिरुमला टेकडीवर एक कर्जबाजारी देवता म्हणून स्थायिक झाले जी संपत्तीची देवता कुबेराचे ऋण फेडण्यासाठी आपल्या भक्तांकडून देणगी स्वीकारते.
केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिर हे स्थापत्य आणि कलात्मक सौंदर्याचे ठिकाण आहे. हे मंदिर द्रविडीयन वास्तुशैलीत दगड आणि चुन्याच्या मोर्टारने बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर मूळ मंदिराप्रमाणेच नक्षीकाम आहे. आणि आतील भाग लाकूडकाम आणि हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांमधील दृश्ये दर्शविणारी चित्रे यांनी सजवलेले आहे. मंदिराचे मुख्य दैवत, भगवान व्यंकटेश्वर, लाकडात कोरलेले आणि राखाडी तेल पेंटने रंगवलेले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 1996 ते 2003 पर्यंत जवळपास 7 वर्षे लागली
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिरात कसे जायचे?
उत्तर: केतकवळे येथील प्रती बालाजी मंदिरापर्यंत रस्त्याने, रेल्वेने किंवा विमानाने जाता येते. सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे केतकवळे पासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जेजुरी रेल्वे स्टेशन आहे, जे केतकवळे पासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे. पुणे किंवा मुंबईहून केतकवळे येथे जाण्यासाठी बस, टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाने जाता येते. केतकवळे हे महाराष्ट्र आणि भारतातील इतर शहरांशीही रस्त्याने चांगले जोडलेले आहे
प्रश्न: केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिरात जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे?
उत्तर: केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, जेव्हा हवामान आल्हाददायक आणि थंड असते. याच वेळी ब्रह्मोत्सवम उत्सव होतो, जो भगवान व्यंकटेश्वराचा मुख्य उत्सव आहे आणि लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. तथापि, वर्षभरात केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिराला वर्षभर कधीही भेट देता येते कारण त्याचे वर्षभर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
प्रश्न: केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिरात जाण्यासाठी कोणते नियम आणि कायदे आहेत?
उत्तर: केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिराला भेट
देताना अभ्यागतांनी काही नियम आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
केतकवळे येथील प्रति बालाजी मंदिर हे हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे म्हणून नम्रपणे आणि आदराने कपडे घालणे.
मंदिराच्या संकुलातील कोणत्याही मंदिरात किंवा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शूज आणि चामड्याच्या वस्तू काढून टाकणे.
केतकवळे येथे मद्य, मांस किंवा अंडी खाऊ नका कारण ते शाकाहारी शहर आहे.
मंदिर किंवा त्याच्या सभोवतालच्या परिसरात कचरा टाकू नये किंवा प्रदूषित करू नये.
त्यांच्या परवानगीशिवाय मंदिरात आंघोळ करताना किंवा धार्मिक विधी करत असलेल्या लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत.
स्थानिक संस्कृती आणि चालीरीतींचा आदर करणे आणि तेथील शांतता आणि सौहार्दाला बाधा न आणणे
https://eindiatourism-in.translate.goog/prati-balaji-mandir-at-ketkawale/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.
गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्याच्या हाती डमरु आणि नाग आहे.
----
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
श्री क्षेत्र नारायणपूर
दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.
नारायणेश्वर मंदिर
पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.
मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.
नारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.
हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो, सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.
या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.
पोटभर प्रसाद
श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा
प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व
ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र
पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे
दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम
होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व
पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ
जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे
असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील
प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.
पुरंदर किल्ला
नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे. या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.
कसे जाल :
नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.
- स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
- सासवड > नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
- स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
- स्वारगेट > हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)
अजून काय पहाल :
प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)पांडेश्वर मंदिर
भुलेश्वर मंदिर
पुरंदर, व्रजगड किल्ला
कानिफनाथ मंदिर
पुरंदर- वज्रगड किल्ला
संगमेश्वर मंदिर
नारायणेश्वर मंदिर
वटेश्वर मंदिर
बालाजी विश्वनाथ यांची समाधी
मल्हारगड
जेजुरी
पूरचा नारायणेश्वर
पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला
सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं
सुंदर देऊळ.
माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन
आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता
येतो.
ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.
वीर मारुती
एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर – डिसेंबर २०१८
नारायणपूर, पुरंदर किल्ला 🏰, चांगावटेश्वर मंदिर🛕, सासवड, मल्हारगड ०७-मे-२०२२
नारायणेश्वर मंदिर | Discover Maharashtra
नारायणेश्वर मंदिर – नारायणपूर
नारायणपूर हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याच गावात प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे.
पुणे बंगलोर हायवरील कापुरहोळ गावापर्यंत आल्यानंतर हायवे सोडून कापूरहोळ – सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर साधारण ३.५ किमीवर बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध नारायणपूर गावात हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश करता येतो.
नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो.
मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या
खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे.
मंदिरातील गाभार्याीच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या
आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या
असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा
बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो “राक्षस” गण असून
दुसरा “देव” गण आहे. गाभार्याहच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले
आहे.
गाभार्याषत उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार
खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना
ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात.
उपेक्षित पाणपोई ?
( क्रमांक ६८ )
सासवडचा पुरंदरे वाडा
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या दोनपैकी मुख्य वास्तू म्हणजे पुरंदरे यांचा भुईकोट! अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना पाहून क्षणभर मती गुंग होते. दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर आतील चारचौकी वाड्यांचे चार मजले पेलण्याचे सामर्थ्य असलेल्या जोत्यांवरून नजर फिरवल्यावरून त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही.
तटाच्या भिंतींना लागून गणेशमंदिराचे प्रवेशद्वार आहे. तसे मंदिर वाड्याच्या आत आहे. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यास पाच-सहा पायऱ्या चढून वर जावे लागते. गणेशाचे वैशिष्ट्य असे, की तो द्विभुज आहे. मंदिराला जोडून उभी असलेली तटबंदीची चिरेबंदी भिंत, त्यावरील जंग्या आणि इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यांनी पडलेली थोडीफार भगदाडे पाहून तिच्या भक्क्मपणाची मातब्बरी पटते. तो वाडा अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा! वाड्याच्या मागच्या बाजूस पाठभिंतीस जोडून अप्रतिम भैरवनाथ मंदिर आहे. त्यात एक पोर्तुगीज घंटा आहे.
पहिल्या
वाड्याच्या शेजारी, बोळासारखे अंतर सोडून पुरंदरे यांचा दुसरा वाडा आहे.
वाड्याचे प्रवेशद्वार पहिल्या वाड्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आहे. ते
प्रवेशद्वारसुद्धा अंबारीसह हत्ती जाईल इतक्या उंचीचे आहे. त्यावरील नगारखाना डौल सांभाळून आहे. वाडा उत्तराभिमुख आहे. त्याचा दरवाजा भक्कम आहे. त्यावरील नक्षीदार सज्जा लांबरुंद, नाजूक आहे.
दोहो बाजूंला देवड्या, समोर सोफा... तेथे राहतात श्री सुनील पुरंदरे. चौसोपी, तिघई, दुमजली अशा त्या वाड्याचे जुने स्वरूप बऱ्यापैकी जपले गेले आहे. दिवाणखान्याचे स्वरूप मनोहरी असे दिसते. पंचवीस बाय पस्तीस या आकाराचा दिवाणखाना सुरूचे खांब, दोन खांबांमधील महिरप, कोरीव भक्कम तक्तपोशी धारण करून, त्याच्या धन्याचे वैभव दाखवून जातो. तीन फूट जाडीच्या भिंतीत प्रत्येक दहा फुटांवर खिडकी असून खिडकीच्या लाकडी दारावर नक्षिकाम केलेले दिसते. दिवाणखान्याच्या दारात कारंजाचा हौद आहे. त्याच्या रचनेचे कौशल्य विलक्षण आहे. एका बाजूच्या दुमजली सोप्यात काही पुरंदरे मंडळी राहतात. त्याच्या समोरचे सोपे पडलेले आहेत. दरवाज्यावरील सोप्यात मात्र जुन्या खुणा दिसून येतात. उत्तम प्रकारची तक्तपोशी, भिंतीवरील हिरमुजी रंग व त्यावरील नक्षिकाम टिकून आहे. पुन्हा खाली उतरल्यावर पडलेल्या सोप्याच्या भिंतीच्या वर पाण्याची टाकी आहे. तेथून पूर्ण वाड्यास पाणीपुरवठा होत असे.
खाली दोन चौकी जोत्यांवर दुमजली इमारती आहेत. मुख्य वाड्यास जोडून चार चौक आहेत. तेथे काही कुटुंबे राहतात.
दोन्ही वाड्यांचे पूर्ववैभव अंशत: जरी शिल्लक असले तरी त्यात एकेकाळी वास्तव्य करणाऱ्या अंबाजीपंत व त्र्यंबकपंत पुरदऱ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा व कर्तृत्वाचा वैभवशाली इतिहास अक्षय टिकून राहिला आहे. निष्ठा, नम्रता, ऋजुता, सर्जनशीलता, सुसंस्कृतता लेखणीने, वाणीने आणि समशेरीने सिद्ध करणारा पुरंदरे घराणे मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व व अजोड असे होऊन गेले.
शके 1625 (सन 1703) मधील एका पत्रात 'कसबे सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले.' अशी नोंद आहे. 'शके 1614 (सन 1692) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहेत.' अशी एका पत्रात नोंद आढळते. त्यावरून असे म्हणता येईल, की पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. त्या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीची असल्याचे दिसते. शके 1614 मध्ये पुरंदरे मराठ्यांचे नोकर होते. शके 1624 मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके 1623 मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्र पंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदऱ्यांचा दृढ परिचय होता. त्या घराण्यातील हेरंब नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयांखेरीज त्यांचे चुलतभाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या वकुबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापती धनाजी जाधवरावांच्या कृपेने त्यांना थोरपद प्राप्त झाले.
छत्रपती
शाहूमहाराज सुटून आल्यावर लांबकानी (खानदेश) येथे अंबाजीचा पुतण्या मल्हार
तुकदेव हा शाहुराजांना भेटला. त्यावेळी काही अत्रे मंडळीही
शाहुमहाराजांकडे सामील झाली.
शाहूराजे साताऱ्याला विधियुक्त अभिषेक करून (1708) छत्रपती झाले. अंबाजीपंत व खंडो बल्लाळ यांचा स्नेह जुळला. पंतांच्या साहाय्याने बाळाजी विश्वनाथाने कर्ज काढून फौज बनवली. शाहुराजांनी सेनापतीपदावरून चंद्रसेनास काढल्यावर त्याचा भाऊ संताजी यास नेमले. तो कर्तृत्वशून्य निघाल्यामुळे 1712 मध्ये मानसिंग मोरे यास सेनापती नेमले व त्याच्या दिमतीस अंबाजीपंत यास नेमले. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर 17 एप्रिल 1720 रोजी बाजीरावास छत्रपती शाहूमहाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा महादोबा, मल्हार तुकदेव ऊर्फ दादोबा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहुमहाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळत. 1737 मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व गणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. कोल्हापूरकर संभाजीराजे यांच्या व शाहुमहाराजांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते (1731). उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहुमहाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.
बाजीराव पेशव्यांशी अधिकारवाणीने अंबाजीपंत बोलत असत. तरीसुद्धा त्यांत आदब राखत असत. पेशवे लहान असले तरी अंबाजीपंतांस पत्रातून 'चिरंजीव' असे संबोधत असत. बाळाजी ऊर्फ नानासाहेब यांना जेव्हा दमाजी गायकवाडाने पकडले, त्यावेळी अंबाजीपंतांनी त्यांना दंड भरून सोडवले. बाजीरावांविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्रीच होते. त्यांचा मृत्यू भाद्रपद शुद्ध 8, शके 1656 (सन 1735) ला माहुली येथे झाला. त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांनी सहगमन केले. महादोबा व सदाशिव हे त्यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धात बाबा पुरंदरे होते. त्यांना ग्वाल्हेरच्या दरम्यान व्यवस्थेसाठी मागे ठेवले होते. महादोबा पुरंदरे हे नानासाहेबांच्या वेळी एक सज्जन व पेशव्यांच्या गुरुस्थानी होते.
मराठ्यांच्या इतिहासात कर्तृत्ववान व निष्ठावंत अशी बहुमोलाची माणसे त्या घराण्याने दिली.
(आधार - डॉ. सदाशिव शिवदे लिखित 'ऐतिहासिक वाडे - भाग 1')
(छायाचित्र - सदाशिव शिवदे)
#_श्री_क्षेत्र_नारायणपूर























































































No comments:
Post a Comment