Friday, March 22, 2024

बारव स्थापत्य

 https://thinkmaharashtra.com/%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5/

गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन

0
347
_gad_kille

गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे – “… तसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थल तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तली – टाकी पर्जन्यकालापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी.” गड किल्ले यांची उभारणी करताना आधी उदकपाण्याची सोय करूनच किल्ला बांधावा या विचारातून शिवरायांची दूरदृष्टी आढळते. 
आज्ञापत्रातील पुढील उद्गारांतून पाण्याचे महत्त्व स्पष्ट होते- “गडावर झराही आहे, जैसे तैसे पाणी पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानावी. उद्योग करावा. कि निमित्य की जुझामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होताना आणि पाण्याचा खर्च विशेष लागते, तेव्हा संकट पडते या करिता तैसे जागा जखिरियाचे पाणी म्हणोन दोन – चार तली – टाकी बांधून ठेवून त्यातील वाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे”

लढ्यांच्या वेळी दारूगोळ्यांमुळे जिवंत झरे आटण्याचा संभव असतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक गडावर पाणीसाठा असला पाहिजे. कृत्रिमपणे साठवून ठेवलेल्या त्या पाण्याला ‘जखिरियाचे पाणी’ असे म्हटले जात असे. ते पाणी सडू नये म्हणून काळजी घेतली जात असे.

डॉ. मिलिंद पराडकर यांनी दुर्गबांधणीच्या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे मांडले आहेत –

अशा शिल्पशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र अशा कोणत्याही विषयांवरील ‘प्राचीन, अर्वाचीन ग्रंथांमध्ये दुर्गांबद्दल बारकाव्याने विचार केला गेलेला आहे. तो अन्य कोठेही धून सापडत नाही. त्या नियमाला अपवाद दोन! अर्थशास्त्राचा कर्ता कौटिल्य अन् फिलो ऑफ बायझॉण्टिअम. अन्यत्र तितका नेमस्त, कालानुरूप अन् तर्कसुसंगत विचार दुर्मीळ आहे.’
मुंबई प्रदेशात व कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांतील गडकिल्ल्यांची संख्या सुमारे एकशेएकेचाळीस आहे. रायगड जिल्ह्यात लहानमोठे सत्तावन्न गडकिल्ले आहेत. गोपाळ चांदोरकर या वास्तुशास्त्रज्ञाने लिहिलेल्या श्रीमद् रायगिरौ या पुस्तकात ‘रायगडावरील पाणीपुरवठा’ हे स्वतंत्र प्रकरण आहे. भुईकोट, जलदुर्ग, वनदुर्ग, मिश्रगड असे विविध प्रकार त्यांत आढळतात. त्या सर्व गडकिल्ल्यांवर पाणीव्यवस्था विविध प्रकारे केलेली आहे. तलाव, विहिरी आहेतच, पावसाचे पाणी साठवण्यासाठी; तसेच, खडकांतून पाझरणारे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या, हौद आढळतात. उतारावर बांध घालून पाणी अडवून साठवणे आणि गुहा खोदून पाणी साठवणे असे तंत्र आहे.

त्या शिलालेखातही पाण्याला प्राधान्य आढळते. इसवी सन 1671 – 72 च्या एका जाबत्यामध्ये (समकालीन कागदपत्र) रायगडासाठी पन्नास हजार होनांची तरतूद झालेली दिसते. त्यांपैकी दोन तलावांसाठी वीस हजार होन, दुर्गासाठी पाच हजार होन, चुनेगच्चीसाठी दहा हजार होन व तटबंदीच्या कामासाठी पंधरा हजार होन अशी ती तरतूद होती. तेथे हे कलम महत्त्वाचे आहे, की पन्नास हजार होनांपैकी चाळीस टक्के रक्कम ही तलावांच्या म्हणजेच, पाण्याच्या सोयीसाठी वर्ग झाली होती. दुर्गांच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ती बाब पुरेशी आहे असा विचार गडअभ्यासक मिलिंद पराडकर यांनी मांडला आहे.
टाकी खोदण्याची पद्धत सातवाहन काळापासून प्रचलित आहे असा उल्लेख अनेक तज्ज्ञांनी केलेला आहे. टाकी खोदण्याची विशिष्ट पद्धत त्या काळात होती. जमिनीवर प्रथम सरळ खोदत जायचे. पुरेसे खाली गेल्यावर, भुयाराप्रमाणे आडवे खोदत जायचे. मात्र ते आडवे खोदकाम करताना; वरून छत कोसळू नये म्हणून, मध्ये मध्ये खांब सोडले जात असत. परंतु त्या पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन होऊन (सूर्यप्रकाशाचा संपर्क होऊन पाण्याचे वाफेत रुपांतर होते) तेथील पाण्याचा साठा लवकर नष्ट होत असे; तसेच, ते साठवलेले पाणी खराब होत असे.

प्र. के घाणेकर यांनी लिहिले आहे, की गडकिल्ल्यांवर टाक्यांची रचना अभ्यासपूर्वक केलेली असते. महाराष्ट्राच्या भूरचनेमध्ये जलसमृद्ध आणि जलाभेद्य अशा दोन प्रकारचे खडक आढळतात. ते दोन थर सरळ तुटलेले कडे आणि तिरकस उताराचे भाग असे ओळखता येतात. जलाभेद्य थराच्या वरील भागात आणि जलसमृद्ध भागाच्या तळाशी टाकी खोदली तर त्यात पुरेसे पाणी बराच काळ उपलब्ध होते. ते पाणी त्या खडकातून पाझरत येत असल्यामुळे जमिनीतील क्षार त्यात विरघळतात. सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी असल्याने ते थंडगार व चविष्ट असते.’

_gad_killeरायगड ही शिवरायांची राजधानी होती. तेथील पाणीव्यवस्था आदर्श आहे. रायगडाची पुनर्रचना करताना, हिरोजी इंदुलकर यांनी कोरवून घेतलेल्या एका शिलालेखात पुढील माहिती आहे – “विहिरी, टाकी, तळी, उपवने, मार्ग, स्तंभ, हत्तीशाळा आणि राजवाडे इत्यादी नाना प्रकारची बांधकामे आणि खोदकामे शिवछत्रपतींनी रायगडावर करविली.” रायगडावरील वस्ती ठिकठिकाणी विखुरलेली होती. त्या वस्त्यांवरील सर्व लोकांना पाणीपुरवठा होईल अशा दृष्टिकोनातून तलाव खोदलेले आहेत. रायगडावर हत्तीतलाव, गंगासागर, कुशावर्त, कोळिंब, बामण टाके, काळा हौद, हिरकणीचा तलाव असे सात भलेमोठे तलाव आहेत. बालेकिल्ल्यामधील पडणाऱ्या पावसाचे पाणी, त्याचे भूपृष्ठाखालील मार्ग शोधून काढून, त्याच्या आधारे कुशावर्तेश्वराच्या मंदिराशेजारील एका जलमंदिरात जमा होऊन, तेथून ते कुशावर्त तलावात साठवले जाते. त्या प्रकारची प्रणाली इतर कोणत्याही दुर्गावर आढळलेली नाही. जलमंदिर आज भग्नावस्थेत आहे. आजही, रायगड दर्शनासाठी जे लोक येतात, त्यांना गंगासागर तलावातील पाणी उपलब्ध करून दिले जाते.
रायगडावर खडकात खोदलेली जवळ जवळ सव्वीस टाकी आहेत. काही टाक्यांची रचना स्नानगृहे आणि शौचकूप यांसाठी केली आहे. छत्रपतींच्या वाड्याच्या दक्षिणेस आणि तटबंदीच्या विरूद्ध दिशेला- उत्तरेला एक द्वार आहे. त्या द्वाराला लागून सुमारे सात फूट रुंद, चौदा फूट लांब आणि पाच फूट खोल असा चिरेबंदी हौद आहे. हौदाच्या तळाशी जलविसर्गासाठी दगडांच्या जाळ्या बसवलेल्या आहेत. तो विसर्गमार्ग बाहेरच्या बाजूस असलेल्या शौचकुपांच्या जलविसर्गाशी थेट जमिनीखालून जोडला आहे. भूमिगत जलविसर्जनाचे मध्ययुगातील ते अत्यंत दुर्मीळ असे उदाहरण आहे. त्या प्रकारची व्यवस्था हिंदुस्थानातील इतर कोणत्याही प्राचीन वा मध्ययुगीन दुर्गात वा प्रासादामध्ये आढळलेली नाही असे मिलिंद पराडकर यांनी नमूद केले आहे. त्यातील बरेचसे बांधकाम भग्नावस्थेत आढळते.

काही जोडटाकी रायगडावर आहेत. हनुमान टाके हे त्यांपैकी एक उदाहरण. त्या टाक्याच्या अलिकडील एका भिंतीवर हनुमानाची उठावदार कोरलेली मूर्ती भग्नावस्थेत आहे. बारटाकीचा खळगा हे नाव बारा टाक्यांमुळे त्या विभागाला दिले गेले. बाराटाकी म्हणजे उत्तम जलसंचय आहे. ती सर्व टाकी खडकात खोदून काढली आहेत. ती बाराही टाकी आतून एकमेकांस जोडली गेलेली आहेत असा समज आहे, पण तो खरा नाही. त्या टाक्यांतील जलसंचयाची पातळी वेगवेगळी आढळते असे गो.नी. दांडेकर यांनी लिहिले आहे. रायगडावरील काही तलाव, टाकी कोरडे पडलेले आढळतात. 

खुद्द रायगड आणि रायगड जिल्ह्यातील सर्व गड यांवर पाणी साठवणे, उतारावर बांध घालून पाणी अडवणे, पावसाचे पाणी साठवून टाक्यात सोडणे, तलाव खोदणे इत्यादी विविध उपाय केलेले आहेत. पाणी साठवण्यासाठी टाक्या रायगड जिल्ह्यातील खांदेरी, उंदेरी, जंदिरा, कोरलई, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या सर्व गडांवर बांधलेल्या आहेत. खांदेरी किल्ल्यावर दीपगृहाच्या मागील बाजूस असलेल्या एका मोठ्या टाक्यावर पंप बसवून, त्याचे पाणी दीपगृहाजवळील पाण्याच्या टाकीत आणलेले आहे. खांदेरी किल्ल्यावर असलेली ती टाकी पावसाळ्यात साठवलेल्या पाण्याची आहेत. पाणी साठवण्यासाठी तीन टाकी उंदेरी किल्ल्यावर आहेत. _gad_kille_pani_vyavasthapanतिसरा हौद मोठा आहे. तो जलसाठा दगडी भिंत घालून सुरक्षित केला गेला आहे. अलिबागजवळ कुलाबा हा मिश्रदुर्ग आहे. त्या किल्ल्यामध्ये असलेल्या गणेशमंदिरासमोर चारी बाजूंनी बंदिस्त अशी सुंदर पुष्करणी (तलाव) आहे. जंजिरा हा मुरूड तालुक्यातील जलदुर्ग आहे. त्या किल्ल्यावर उत्तर तलाव, दक्षिण तलाव आणि सध्या रिकामी असलेली एक मोठी टाकी आढळते.

कोरलई गडावर असलेला पाणीसाठा एका वाड्यात आढळतो. त्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, दीड फूट लांबीरुंदी व दगडी काठाळी असलेले खोल खोल खड्डे पाहण्यास मिळतात. काठाळी म्हणजे हौदाच्या कडा घासून त्या गुळगुळीत केल्या जातात. कारण त्याचे काठ लागून इजा होऊ नये. त्यातून खाली डोकावून पाहिल्यास स्वच्छ पाण्याची टाकी दिसते. गडपायथ्याच्या दीपगृहाजवळ त्याच टाक्याच्या नळातून पाणी नेलेले असून, तो जलसाठा दिवसरात्र उपसा असूनही वर्षाचे बारा महिने भरलेला असतो. फारशा जलसाठ्याची ती अभिनव योजना कोणत्याही गडावर आढळत नाही असा उल्लेख भगवान चिले यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे नाव श्रीस्थानक. त्या जिल्ह्यात छत्तीस किल्ले आहेत. त्यामधील महत्त्वाचा किल्ला म्हणजे अर्नाळा जलदुर्ग. तो किल्ला बाजीराव पेशव्यांनी 23 मे 1737 रोजी बांधून पूर्ण केला असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. त्या किल्ल्यावर असलेल्या मुबलक पाणीसाठ्यामुळे गडाच्या मधील भूभागावर शेती केली जाते ही वैशिष्ट्यपूर्ण बाब होय. किल्ल्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अष्टकोनी विहीर आढळते. गडाच्या मध्यभागी असलेल्या दर्ग्यामागेही विहीर आहे. जीवधन, वसई, घोडबंदर, धारावी हे किल्ले ठाणे शहरानजीक आहेत. त्या किल्ल्यांवर मोठ्या टाक्या, विहिरी बांधून पाण्याची सोय केली आहे. शहरीकरणाच्या वेगामुळे त्या गडकिल्ल्यांच्या मूळच्या स्वरूपात बदल झाला आहे. जीवधन, धारावी या गडांवर देवीच्या यात्रा, उत्सव साजरे केले जातात.

मुंबई जिल्ह्यात शीव, वरळी, शिवडी, मुंबई किल्ला – फोर्ट, धारावी, माहीम, वर्सोवा असे आठ किल्ले आहेत. शीव किल्ल्यातील तलाव सध्या प्रदूषित आहे. वरळी किल्ला मुंबई शहराच्या दाटीवाटीत शोधावा लागतो. त्या किल्ल्यात डाव्या हाताला किल्ल्यातील शिबंदीचा प्राण असलेली विहीर आढळते. त्या किल्ल्याची उभारणी ब्रिटिशांनी समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १६७५ मध्ये केली. मुंबई किल्ला- फोर्ट परिसरातील डिमेलो रोड, बॅलार्ड इस्टेट, बॅकस्ट्रीट, काळा घोडा, जन्मभूमी मार्ग, नगीनदास मार्ग, हुतात्मा चौक या ठिकाणी पाणीसाठे अस्तित्वात आहेत आणि त्यांचा उपयोग वर्तमानकाळातही केला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात अठरा गड आहेत. त्यांपैकी जयगड, गोपाळगड, पूर्णगड या गडांवरील पाणी साठ्यांविषयीची माहिती आहे. जयगडावरील बालेकिल्ल्यात तीन विहिरी आहेत. पण त्या विहिरी चाळीस ते पन्नास फूट खोल आहेत. त्यामुळे त्या विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. जयगडच्या समुद्राकाठी कातळात बांधून काढलेली इतिहासकाळातील गोड्या पाण्याची विहीर आहे. अथांग समुद्रकिनाऱ्यापाशी असलेला तो गोड्या पाण्याचा साठा म्हणजे अद्भुत चमत्कार आहे. त्या किल्ल्याच्या सपाट प्रदेशातील लोकवस्तीतील लोक कदाचित त्या पाण्याचा उपयोग करत असावेत. पूर्णगडाचा आकार छोटा आहे. पूर्णगडावर विहीर, तलाव, टाकी आढळत नाहीत ही आश्चर्यकारक बाब आहे. पाण्याची सोय गडाच्या पूर्व दरवाज्याबाहेरील विहिरीतून केलेली आहे. ती विहीर कोरडी पडलेली आढळते. पाणी नाही तेथे गड नाही हे शिवरायांचे तत्त्व होते. पूर्णगड हा त्यांच्या कारकिर्दीत बांधला गेला नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

_baravगोपाळगडावर विहीर खोदलेली आहे. ती खोल नाही. विहिरीत उतरण्याकरता पायऱ्या आहेत. मात्र त्या विहिरीला कुंडाप्रमाणे कमी पाणी आहे. काही किल्ल्यांवर आणि मंदिरात कुंड असतात. तेथे पाणी खूपच कमी असते. त्यांचा वापर केवळ अंघोळ, हात-पाय धुण्यासाठी होतो. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानमोठे असे बावीस गड आहेत. सिंधुदुर्ग हा शिवरायांच्या आरमाराचा आरंभ आहे. सुमारे पन्नास एकर क्षेत्रफळ असलेल्या त्या समुद्रगडावर एक तलाव आणि साखरबाव, दहीबाव, दुधबाव या तीन विहिरी आहेत. गडावर राहणारे लोक त्या विहिरीतील पाणी वापरतात. सिंधुदुर्गापासून जवळच पद्मकोट, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले जणू सिंधुदुर्गाचे थोड्या अंतरावरील पहारेकरी आहेत आणि जमिनीबरोबर सिंधुदुर्गाचा संपर्क ठेवणारे ते किल्ले म्हणजे सिंधुदुर्गाच्या संरक्षणव्यवस्थेची सर्वात बाहेरची फळी आहे असा उल्लेख प्रवीण भोसले यांनी केला आहे.
 (प्रस्तुत लेखिकेने सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली तेव्हा प्रवीण भोसले त्या किल्ल्याची व्यवस्था पाहत असत). 

– सुनिती पेंडसे 9004311115 sunitipendse21@gamail.com
(जलोपासना, दिवाळी अंक २०१३वरून उद्धृत)

 
 

 

बारव ( पायऱ्यांच्या विहिरी )

महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्याच्या बाबतीत आढळून येणारी वैशिष्ट्ये, इतर स्थापत्य व शिल्पप्रकारात सुद्धा आढळून येतात. हे प्रकार म्हणजे बारव ( पायऱ्यांच्या विहिरी ). यांची प्राचीनता महाराष्ट्रात आठव्या शतकापर्यंत जाते.

मंदिर व त्याच्या आसपासच्या परिसरात भेट दिल्याने पापक्षालन होते अशी भावना यामुळे या स्थळांना तीर्थक्षेत्राचे महत्व आले. त्यामुळेच अशा ठिकाणी यात्रा भरवण्याची प्रथा सुरु झाली आणि त्यातूनच अशा स्थळी स्नानकुंड व बारव बांधण्याचा प्रघात सुरु झाला असावा. अशा प्रकारच्या पायाविहीर किंवा बारव बांधण्याची कला प्राचीन महाराष्ट्रातील स्थपतींना अज्ञात नव्हती.



      चालुक्य आणि राष्ट्रकूट काळातील अशा बारव ऐहोळी (जि.धारवाड ) आणि कंधार (जि.नांदेड )  येथे आजही वापरात आहेत.      




 :- भाग एक

अगदी प्रारंभिक काळात लेण्यांच्या निर्मिती बरोबर "पाणीयपोढी" किंवा "पाणपाठी" म्हणजे पिण्याचे पाणी साठविण्याची टाकी आणि "न्हानकोढी" म्हणजे स्नानासाठी व अन्य उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी विविध आकाराच्या टाक्या खांदण्यात आल्या. किल्ल्याची निर्मिती होत असताना सर्वप्रथम निश्चित जलस्रोताचा शोध घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टाक्या व कूप तयार केल्याचं दिसतात. गोदावरी, कृष्णा, मांजरा, चंद्रभागा अशा नद्यांच्या परिसरात ज्याठिकाणी वसाहती निर्माण झाल्या तेथे प्रामुख्याने घाट बांधण्यात आले. निसर्गत उपलब्ध नदीच्या काठाचा योग्य उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने अशा वैशिष्ट्यपूर्ण घाटांची निर्मिती सातवाहन काळापासून होत असावी, अन्य स्थानांवर नगर वसवताना मात्र भूगर्भातील जलाशयाचा शोध घेऊन विविध प्रकारचे आड, विहिरी, बारव व पोखरणी यांची निर्मिती करण्यात आली. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर सारख्या जंबू द्विपावर जाणीवपूर्वक अनेक तीर्थ व पुष्करणी यांची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये लोणार येथे उल्कापातातून निर्माण झालेल्या विवराच्या परिसरात अनेक बारवांची निर्मिती करण्यात आली. विविध राजवटीतील प्रमुख स्थाने व तीर्थक्षेत्रे उदा, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ आंढा नागनाथ, माहूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी अनेक कुंड, कल्लाळ यांची निर्मिती झाली. या स्थानावरील जनसमुहाची पाण्याची गरज भागविण्याच्या दृष्टीने अशा वास्तूंची निर्मिती होत असतानाच पुण्यप्राप्तीविषयक संकल्पनाही जनमाणसात रुजविली गेली.
एका मोठ्या बारवेच्या बांधकामासाठी घ्यावे लागणारे परिश्रम हे एका मंदिर संकुलाची उभारणी करता येईल एवढे असत. बारवेच्या संदर्भामध्ये त्यांचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने अनेक लोककथा रूढ झाल्याचे विविध स्थल महात्म्यातून दिसते व पौराणिक संदर्भही याला पुष्टी देतात. बारव निर्मितीचे तंत्र आणि त्यांचे आकार-प्रकार याविषयी प्राचीन ग्रंथातून उल्लेख आढळतात.
नगररचनेचा विचार करता बारवेला स्वतंत्र असे स्थान होते. ज्या गावात मध्यभाग सखल व इतर भाग उंच आहे, ज्या गावात मध्यभागी बारव आहे आणि तेथील घरांची रचना वर्तुळाकार आहे अशा वस्तीला 'उत्तन मल्लकाकार' असे संबोधले जाई. बारव निर्मितीची प्रेरणा स्मृतीग्रंथ व पुराणांनी सतत दिली आहे. बारव स्थापत्याच्या विकासाबरोबरच त्यातील देवताविषयक संकल्पनाही स्पष्ट होत गेल्या. कंधार येथील राष्ट्रकूटकालीन विहिरीमध्ये देवता ठेवण्यासाठी रिक्त जाग मुद्दाम ठेवली असली तरी देवकोष्ठ बांधलेले नाही. सप्तमातृका किंवा नागदेवता यांची विहिरीलगत स्थापना करणे येथपासून अष्टदिक्पाल तसेच विष्णूच्या चोवीस रूपांची स्थापना बारवेत करणे यासारख्या बाबींचा विकास झाला. जागजी (जिल्हा उस्मानाबाद), पिंगळी (जिल्हा परभणी) याठिकाणी अशा मूर्तीची स्थापना झाली. ईडोळी (जिल्हा जालना) येथे एकादशरुद्रमूर्तीची स्थापना करण्यात आली, तर लोणार येथील बारवेत आज मूर्ती नसल्या तरी तेथे असलेल्या देवकोष्ठावरून एकूण 31 देवतांची स्थापना झाली असावी असे दिसते.
मध्ययुगीन बारवेंच्या संदर्भामध्ये शेषशाही विष्णूमूर्ती ही प्रमुख देवता असल्याचे स्पष्ट होते. गुजरातमधील अनहिलवाह-पाटण जवळील 'राणीकी बाव' याठिकाणी एकूण सात मजली विहीर साळुंकी वंशाने निर्माण केली, ज्यात 250 पेक्षा अधिक देवतामूर्ती होत्या. एवढी मोठी बारव महाराष्ट्रात आढळत नाही. असे असले तरी सिंदखेडराजा येथील पुतळा बारव ही महाराष्ट्र मधील मोठी आहे.
बारव निर्मिती जरी अशोकाने सुरू केली असली तरी भारतात मोठया प्रमाणात निर्माण केले ते चालुक्यांनी. त्यानी बारव निर्मितीला एक वेगळे स्थान प्रदान केले. विविध पद्धतीच्या अलंकारिक पध्दतीने बांधलेल्या बारव आजही उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रातील बारवांची वर्गवारी अनेकप्रकारे केली जाऊ शकते. उदा. त्यांचे रूढ नाव, त्यांचे विधान, त्यांचा उपयोग, त्यातील देवकूलीकांची संख्या इ. बारवांचे स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य, त्यांचे विधान व प्रवेश (मुख) ह्या अनुसार
1) कुंड:
कुंड म्हणजे तीर्थस्थानाच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेला मोठ्या आकाराचा हौद यांचा आकार साधारणतः 2 ते 3 मीटर खोल व 10 मीटर चौरस रुंद असा आढळतो. तेर (जिल्हा उस्मानाबाद) येथे राज्य पुरातत्व विभागाने केलेल्या साफसफाईच्या वेळी आढळलेले कुंड हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कुंड असून ते विटानी बांधलेले आहे. 8.30 चौ. मी. आकाराच्या या कुंडाची तळापासून उंची 2.70 मी. आहे व 90 सें. मी. चा एक टप्पा असे तीन टप्पे यात आहेत. इ. स. च्या पहिल्या शतकातील सातवाहन काळातील हे कुंड आहे, तर विदर्भातील मांढळ (जिल्हा नागपूर) येथे चौथ्या शतकातील विटांनी बांधलेले कुंड उपलब्ध झाले आहे. हे वाकाटककालीन असून वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन व दुसरा पृथिवीषेण यांचे ताम्रपट येथे मिळाले आहेत. कुंड या प्रकारात येणाऱ्या वास्तूंची उदाहरणे होइल, मुखेड, माहूर (जिल्हा नांदेड), पाली (जिल्हा बीड), त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) इ. ठिकाणी आहेत. मुद्दाम तयार केलेल्या जलाशयालगतसुध्दा प्रसंगी कुंडांची निर्मिती करण्यात येई.
2) विहीर :-
एक प्रवेश असलेली वापी म्हणजे विहीर. याला पायविहीर असेही म्हणतात. यामध्ये वर्तुळ, अष्टकोन व चौरस असे आकार आढळतात.
3) आड:-
द्वारहीन जलाचा संग्रह म्हणजे कूप. यालाच आड असे म्हणता येईल. ही केवळ मर्यादित उपयोगासाठी बांधलेली वास्तू असून याला प्रवेश मार्ग नसतो. आडाचा आकार साधारणपणे एक मीटरपेक्षा कमी व्यासाचा असतो. यामध्ये प्रामुख्याने चौरस, अष्टकोनी आकार आढळतात. कंधार येथे अष्टकोनी आकारातील आड असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखादी टोपली विणावी त्याप्रमाण दगडी शिळांची रचना असलेला हा आड खालील बाजूस निमुळता होत जातो. मुखेड (जिल्हा नांदेड) येथील चालुक्यकालीन दाशरथेश्वर मंदिराजवळील चौरस आड 90 x 90 सें. मी. चा आहे.
4) कल्लोळ :-
कुंड या वास्तू प्रकारचे थोडं विकसित स्वरूप म्हणजे कल्लोळ प्रामुख्याने मंदिराच्या समोर किंवा प्राकारात बांधलेले असतात. याला बारवंसारखे प्रवेशमार्ग व टप्पे असतात, पण बारवेच्या तुलनेत आकार व विस्तार, लहान असतो. हतनूर (जिल्हा परभणी) येथील कल्लोळ हे यादवकालीन असून शके 1223 मध्ये या स्थानाचा जीर्णोध्दार केल्याचा लेख उपलब्ध आहे.
5) पोखरणी:-
पोखरणी हा शब्द यादव काळात पुष्करणी यासाठी रूढ होता. पोखरणी हे पुष्करणीचे प्राकृत रूप होय. लीळाचरित्रातूनही ही संज्ञा येते. बारवेपेक्षा विस्तीर्ण जलाशय म्हणजे पोखरणी. याचे स्थापत्य शास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे कमी खोलीवर विस्तीर्ण असा भाग तळाशी ठेऊन बांधकाम करतात. स्वाभाविकपणे यात टप्पे असत नाहीत. बारवेच्या तुलनेत कमी रुंदीचे बांधकाम असते. पोखरणीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे समतल भाग जास्तीतजास्त मोठे ठेऊन कमीतकमी टप्यात पूर्ण केलेले बांधकाम होय. अशा वास्तूचे वर्णन करताना कमलवेलीनी युक्त असलेला जलाशय म्हणजे पुष्करणी असेही म्हटले जाते. याच्या मध्यभागी काही वेळा मंडप उभारतात. विशेषतः दक्षिण भारतात अशा वास्तू आढळतात. मद्रास येथील कपिलेश्वर मंदिराजवळील जलाशय, तिरूपती व मदुराई येथील जलाशय उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ (जिल्हा परभणी), अंबड (जिल्हा जालना), त्र्यंबकेश्वर (जिल्हा) नाशिक), होट्टल (जिल्हा नांदेड)
5) तडाग :-
पोखरणीपेक्षा मोठ्या जलाशयाला तडाग-तळे किंवा तलाव म्हणतात. निसर्गतः उपलब्ध पाणलोट क्षेत्राची निवड करून योग्य ठिकाणी बंधारा बांधून निर्माण केलेला जलाशय म्हणजे तडाग,
उर्वरित लेख फक्त बारव बद्दल दुसऱ्या भागात..
Ref:-
1) अपराजितपृच्छा
2) बृहत्कल्पसूत्रभाष्य
3) Maharashtra gazatter
4) G.B.Degulkar
5) A.V. Naik




बारव स्थापत्य :- भाग दोन
कुंड हा मुळात या वास्तुप्रकाराचा आधारभूत घटक ठरतो. या कुं डाच्या वर विशिष्ट पायऱ्या ठेऊन एक पटांगण-सोपान (टप्पा) ठेवतात. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेऊन झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. थोडक्यात, एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असतं. बारवेत विविध देवतांची स्थापना केली जाते. त्यासाठी असलेली देवकोष्ठे सर्वात वरच्या सोपानावर स्वतंत्र अशी किंवा अगदी संरक्षक भिंतीत आणि प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंना ठेवतात. बारवेत प्रामुख्याने चौरस आकार आढळतो. आयत व क्वचित् अष्टकोनी आकार पहावयास मिळतात. बारवेस एक ते चार मुख-प्रवेश असतात.
श्री. भुवनदेव यांनी लिहिलेल्या "अपराजितपृच्छा" (सन 1175 ते 1250) या ग्रंथात "वापीकूपतडागादिनिर्णयोनाम" या मथळ्याचे प्रकरण आहे. ह्यात विश्वकर्मा आणि त्याचा नातू अपराजित ह्याच्या मध्ये वास्तनिर्मिती ह्यावर संभाषणे आहेत. यात म्हटल्याप्रमाणे नगराच्या बाहेर व आत निरनिराळ्या प्रकारचे जलाशय असावेत. विहीर, वापी हे कूपाचे प्रकार होत. कुंड म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेले मोठ्या आकाराचे पण उथळ हौद होत. कूपाचे दहा, वापीचे चार, कुंडाचे चार व तडागाचे सहा प्रकार या ग्रंथात दिले आहेत.
1) नन्दा भद्रा जया चैव चतुर्थी विजया तथा ।
एकवक्त्रा त्रिकूटा च नन्दा नाम वरप्रदा ॥ 9 ॥
अर्थ:- वापी किंवा बारव चे चार प्रकार आहेत - (१) नंदा (२) भद्रा (३) जया (४) विजया
यापैकी 'नंदा' वापी एकमुखी आहे आणि तीन बाजूंनी बंद आहे. मुख म्हणजे विहिरीच्या पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी विहरीला असलेला प्रवेशमार्ग. कूट म्हणजे चौरस खोली, मंडप किंवा माड होय. हे चौरस किंवा आयताकृती असतात. अशाप्रकारे नंदा नावाचे वापी हे नावानुसार वरदान आहे.
1) द्विवक्त्रा च षट्कूटा भद्रा नाम सुशोभिता त्रिवक्त्रा नवकूटा च जया वै देवदुर्लभा ॥ 10 ॥
अर्थ:-"भद्रा" नावाच्या दुसऱ्या वापीला दोन मुख आहेत, म्हणजे त्यात दोन बाजूंनी प्रवेश आहे, त्यांना सहा कूट आहे, अशा प्रकारे भद्रा सजवली आहे.
"जया" नावाच्या तिसऱ्या वापीला तीन मुख आहेत, आणि नऊ कूट आहेत. हे खूप चांगले आहे. अशी वापी देवतांना सुद्धा दुर्मिळ मानली जाते.
3) चतुर्वक्त्रा सूर्यकूटा विजया सर्वतोमुखी II
अर्थ:-विजया नावाच्या चौथ्या वर्णाच्या वापीलाचार मुख आणि बारा कूट आहेत.
बारव स्थापत्यामध्ये विविध आकार व प्रकार आढळतात. तसेच बारवेत कूट किंवा मंडप पण दिसतात. लोकभाषेत अशा बारवांना 'माड' म्हणतात. बारवेची पुढील अवस्था म्हणजे कूट, सज्जायुक्त मंडप होय. हे चौरस आकारातील बहुतांश आयताकार असतात. बारवात जसे एक ते चार प्रवेशद्वार आढळतात तसेच आजूबाजूला सर्व वाजून विकसित झालेला मंडप आढळतो. महानुभाव साहित्यात अशा बारवांना "जलमांडवी" म्हटलं आहे. अन्य बारवेच्या बांधकामापेक्षा हे जास्त खर्चिक असतं. बारव निर्मितीची या स्थापत्याची उपयुक्तताच यातून स्पष्ट होते. त्यातील प्रकार खालीलप्रमाणे,
1) एकमंडपयुक्त बारव :-
ह्यात एक मंडप असतो. लोणी भापकर येथे अशी बारव असून त्यात एक मंडप 28 देवकोष्ठ आहेत. मंडपाच्या स्तंभावरील अलंकरण लक्षणीय आहेत. तसेच ब्राम्हणी (अहमदनगर) येथे सुद्धा आहे.
2) दोन मंडपयुक्त बारव:-
उत्तर-दक्षिण भागात दोन मंडप असतात. तीन टप्पे असून. दोन बाजूस स्वतंत्र मंडप बांधलेले असलेला मंडप खालील मुख्य कुंडापर्यंत पुढे आलेले असतात. लोणार (जिल्हा बुलढाणा) या ठिकाणी लिंबी बारव एक महत्त्वपूर्ण बारव असून गावात अन्य कुंडही आहेत. केंद्रिय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली ही वास्तू 26 चौ. मी. आकाराची असून एकूण पाच टप्प्यात पूर्ण करण्यात आली आहे. बारवेत सर्वात शेवटी असलेल्या कुंडानंतर पाच पायऱ्या ठेऊन त्यावर एक सोपान ठेवला आहे. हा 25 सें. मी. रुंदीचा आहे. टप्प्यावरील पायऱ्यांना कोठेही पुढे आलेला दट्टा अथवा तोंडशिळा दिसत नाही. यावरील दुसरा सोपान पाच पायऱ्यानंतर असून तो 70 सें. मी. रुंदीचा आहे. त्यानंतरचा सोपान 73 सें. रुंदीचा आहे. यावरील सोपान सर्वात रुंद असून तो 2.10 मी. आहे. या सोपानावर सर्व बाजूंनी मंडप बांधलेला होता. मुळात असलेला हा मंडप आज अस्तित्वात नसून केंद्रिय पुरातत्व जतनविषयक कामानंतरसुध्दा येथे दिसणाऱ्या अवशेषावरून या मंडपाची कल्पना स्पष्ट होते. मंडपातून बाहेर पडणारे प्रवेश मार्ग उत्तर-दक्षिण पश्चिम बाजूस आहेत.
3) तीन प्रवेशयुक्त बारव :-
वस्तुतः बारव या स्थापत्य प्रकारामध्ये चार प्रवेश हा सर्वसामान्य प्रकार आढळतो. पण काही वेळा उपलब्ध क्षेत्र व स्थानिक काही कारणांमुळे तसेच पाण्याच्या कमीअधिक उंचीवरील उपलब्धतेमुळे मूळ आराखड्यात काही बदल केल्याचे दिसतात व यातूनच तीन प्रवेशयुक्त बारवांची निर्मिती झाली असावी.
4) चार प्रवेशयुक्त बारव :-
बारव स्थापत्यात सर्वत्र रूढ असलेला हा प्रकार असून मधोमध असलेले कुंड व त्यावर विकसित होत जाणारे टप्पे, मुख्य सोपानानंतर असलेली संरक्षक भिंत व चारही बाजूंनी असलेला प्रवेश अशी याची रचना आहे. संरक्षक भिंत उभारताना एक सलग गजथर उभारून त्यावर विविध दवदेवतांसाठी स्वतंत्र अशी 24 देवकोष्ठ निर्माण केली आहेत. याशिवाय विविध देवता, देवांगना, देवानुचर, देवता परिवार व असूर यांचे शिल्पांकन येथे आहे. विविध प्रकारची भौमितीक नक्षी, अश्वारूढ योध्दे, त्यांच्या कवायती. याशिवाय हंसथर व नृत्यांगना पहावयास मिळतात. देवकोष्ठ उभारताना विकसित मंदिराची लहान प्रतिकृतीच साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.
"बृहत्कल्पसूत्रभाष्य" या जैन ग्रंथा मध्ये सुद्धा बारव बद्दल माहिती आहे. ह्यातील श्लोक खालील प्रमाणे :-
1) नन्दा नन्दवती पुनर्नन्दोत्तरा नन्दिषेणा अरजा विरजा गतशोका वीतशोका विजय वैजयन्ती जयन्ती च।। ९६९।।
अवरा। अपराजिता च रम्या रमणीया सुप्रभा च चरमा पुनः सर्वतोभद्राः। एताः सर्वा रत्नतट्यो लक्षयोजनप्रमिताः पूर्वदिग्भागादितो ज्ञातव्याः।। ९७०।।
अर्थ:- नन्दीश्वर द्वीप च्या पुर्व दिशेला नन्दा, नन्दवती, नन्दोत्तरा आणि नन्दिषेणा ह्या चार वापिका आहेत दक्षिण दिशा मध्ये अरजा, विरजा, गतशोका आणि वीतशोका; पश्चिम दिशा मध्ये विजया, वैजयन्ती, जयन्ती आणि अपराजिता. उत्तर दिशा मध्ये रम्या, रमणीया, सुप्रभा और सर्वतोभद्रा ह्या चार वापिका आहेत हैं. ह्या सर्व वापीकांचे तट अलंकारीत आहेत. ह्या १००००० योजन प्रमाण च्या आहेत.
2) अनन्तरं तासां वापीनां स्वरूपमाह—सव्वे समचउरस्सा टंकुक्किण्णा सहस्समोगाढ़ा। वेदियचउवण्णजुदा जलयरउम्मुकजलपुण्णा।I९७१।।
सर्वाः समचतुरस्राः टज्रेत्कीर्णाः सहस्रमवगाधाः। वेदिकाचतुर्वर्णयुता जलचरोन्मुक्तजलपूर्णाः।। ९७१।।
सव्वे ताः सर्वाः समचतुरस्राष्टज्रेत्कीर्णाः सहस्रयोजनावगाधाः l
वेदिकाभिश्चतुर्वनैश्च युक्ताः जलचरोन्मुक्तजलपूर्णाः स्युः।। ९७१।।
अर्थ:- ह्या सर्व वापिका एक लाख योजन लांब आणि एक लाख योजन रुंद अर्थात् समचतुरस्र आकार च्या आहेत. टज्रेत्कीर्ण अर्थात् वरून खाल पर्यंत समान आहेत. खोली १००० योजन प्रमाण आहे. ह्या वापी एक ते चार जंगल च्या जवळ आहेत.
मोठ्या प्रमाणात या वास्तूंची निर्मिती अकराव्या ते तेराव्या शतकात झाली. अभिलेखीय नोंद उपलब्ध असलेल्या बहुतांश बारवा या बाराव्या शतकातील आहेत. उदा. गणेशवाडी येथील विक्रमादित्य सहावा याच्या काळातील लेख, होट्टल येथील चालुक्यकालीन शिलालेख, लातूर येथील भूतनाथ मंदिरातील लेख किंवा धर्मापुरी येथील शिलालेख आज अस्तित्वात असलेल्या वारवांचा विचार करता त्या तंत्रदृष्ट्या उत्कृष्ट होत्या असे म्हणता येईल. त्यामुळे आजही अशा वास्तू कमी-अधिक प्रमाणात उपयोगात आणल्या जातात. जेथे बारव, जलमांडवी, पोखरणी आहेत त्याठिकाणी उपलब्ध शिलालेखांचा अभ्यास करताना हे स्पष्ट होते की, अशा वास्तूची निर्मिती होत असताना केवळ कुठल्या एका विशिष्ट राजवंशाची सत्ता नव्हती; किंबहुना राष्ट्रकूट, कल्याणचे चालुक्य, शिलाहार, कलचुरी यादव या राजवंशांची सत्ता असताना त्या त्या स्थानावरील महत्वाकांक्षी सनानी सामंत, श्रेष्ठी व क्वचित जागी सामान्य गणिकांनीही स्वतंत्रपणं याची निर्मिती केली आहे. स्वाभाविकपण रूढ आराखड्यांना स्वीकारून ही निर्मिती झाली असली तरी काही स्थानिक वैशिष्ट्यंही त्यातून व्यक्त झाली आहेत. उत्तर काळात साधारणतः चौदाव्या शतकानंतर मंदिराची निर्मिती कमी झाली, तसंच अशा प्रकारच्या बारवांची निर्मितीही थांबली. यानंतर विहिरीत चौरस व वर्तुळाकार आणि एका बाजूने प्रवेश असलेल्या विहिरी निर्माण झाल्या. प्रामुख्याने ज्या राजवटीत प्रार्थना मंदिरांवर गोलघुमट बांधण्यात आले त्या काळात कटोरा बावडी हा प्रकार लोकप्रिय झाला. मोठ्या आकाराचे अनेक मजले व दालने असलेल्या विहिरींचीही निर्मिती झाली. यांना कुपागार म्हणणे योग्य ठरते. उत्तर काळातसुध्दा शाश्वतमुल्य असलेल्या बारवांची जपणूक झाली.
फोटो आभार:- Rohan Gadekar
Reference:-
1) अपराजितपृच्छा
2) बृहत्कल्पसूत्रभाष्य
3) Maharashtra gazatter
4) G.B.Degulkar
5) A.V. Naik


https://www.facebook.com/groups/2976328375814407/user/100002150256055/
 
 
 

बारव

 महाराष्ट्र बारव मोहीम

(Maharashtra Stepwells Campaign)

Conservation of Maharashtra’s stepwells through people’s participation

One of the areas of knowledge India excelled in the past was building efficient water management systems. The historical water conservation and supply systems in the arid regions of India are testimony to this fact. However, thanks to the changed notion of development, many of the structures which served the need of people for centuries suddenly became redundant and are lying in the state of misery today. At a time when several parts of the country are facing severe water shortage, the need to revive these invaluable water sources cannot be emphasised more.

Stepwell is undoubtably one of such system which served the water requirement of people for drinking, bathing, washing and even irrigation occasionally. The State of Maharashtra has thousands of Stepwells. If revived, they could become an excellent source of water for drinking and domestic use for people in rural areas. And the first step to do this is to map and document all the stepwells in the state. 

With this goal in mind, we have set out on a journey to explore the historic stepwells in Maharashtra and have mapped 1300+ Stepwells so far.

Our Goals : 
~ Creating the largest and most reliable database of Stepwells in Maharashtra for research and conservation purposes.
~ Identify thousands of Stepwells (capturing gps coordinates and mapping them on custom google map for public view).
~ Capture Photographs/Drone Shots of Stepwells.
~ Collaborating with colleges for study of architectural designs of stepwells.
~ Organize cleanliness drives.
~ Collaborating with people and government for conservation of stepwells.
~ Encourage villagers / local heritage explorers to also identify unique stepwells as tourist attractions.
~ Organize free study tours for students.
~ Sharing good work done by respective village locals/authorities in conserving stepwells through social and print media to motivate other villages/states.
~ Ecological water purification system for stepwells.

Our Vision : 
~ Urbanized Areas/Cities : Heritage Conservation and Tourism Development.
~ Village/Remote Interior Areas : Water can be used for Irrigation Purpose / Water can be utilized during Drought Times.
~ Study ancient trade routes as stepwells were built along the trade routes.
~ Celebrate Stepwell Mahotsav in Maharashtra, our stepwells to be lit up with Diyas and we familiarize our People/International Visitors about Indian History and Culture at each Stepwell Site region wise : State/District/Taluka/Village.

ध्येय आणि दृष्टी :
महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत आम्ही महाराष्ट्रातील स्टेपवेल्स चे मॅपिंग, दस्तऐवजीकरण करणार आहोत आणि फोटोग्राफी, ड्रोन फोटो काढून सार्वजिनक लोकांना उपलब्ध करून देणार आहोत ह्या Website च्या माध्यमातून आम्ही आता पर्यंत महाराष्ट्र मधले १००० स्टेपवेल्स  खाली उपलब्ध करून दिलेल्या नकाशावर मॅप केले आहेत.
~ महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा प्रकल्प.
~ जन जागृती करून स्टेपवेल्स चे जतन-संवर्धन करायचं ध्येय आहे.
महाराष्ट्र बारव महोत्सव साजरा करायचा आणि आपल्या स्टेपवेल्स दिव्यांनी, फुलांनी, रांगोळीनी साजवायच्या आणि ह्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास परप्रांतीय लोकांना परिचय करून देणं... 


We are Exploring Stepwells in Maharashtra which includes बारव/बाव/घोडबाव, पायविहीर, कुंड, पुष्करणी, पोखरण, Helical स्टेपवेल्स.

Instructions in English : 
Google Map for Viewing Stepwell Locations : 
*Open the below map in your google maps by clicking on the right top corner box.
*Zoom in and click on the Pin Locations (Blue-White Circle). It will reflect the Stepwell Location and Pic if available of the Stepwell.
*Click on the Direction Button and it a route will start to guide you to the stepwell location.
*This customized google map will get automatically get stored in your google maps and everytime we add new stepwells, it will get updated in your google maps.

Instructions in Marathi : 
*कृत्रिम पद्धतीने बनवलेला नकाशा गुगल मॅप मध्ये उघडा (वरती उजव्या बाजूच्या चौकोनावर क्लिक करा).
*नकाशा झूम करा व निळ्या-पांढऱ्या वर्तुळावर क्लीक करा. तुम्हाला सगळ्या बारवांची नकाशा मध्ये स्थाने व छायाचित्रे दिसतील.
*त्या ठिकाणी जाण्यासाठी 'Direction' वर क्लीक करा. आता तिकडे कसं जायचे व तुम्ही तुमच्या स्थानापासून ती बारव किती लांब आहे हे कळेल.
*सगळ्या बारावांचे नकाशे व स्थाने तुमच्या गुगल मॅप मध्ये संग्रहित झालेले असतील, आणि जेवढे बारव आढळतील तेवढे त्या नकाशात संग्रहित होतील. 
(आता यापुढे तुम्ही थेट गुगल मॅप वर नेहमी सगळ्या बारावांचे नकाशे बघू शकता).

Exact Locations of Stepwells in Google Maps

==========================
Stepwells in Konkan Region
(Raigad ~ Ratnagiri ~ Sindhudurg ~ 
Mumbai ~ Thane ~ Palghar)

Sapteshwar Temple Stepwell
Village : Sangameshwar
Taluka : Sangameshwar
District : Ratnagiri
Mapped No # 261
Photo Credits : Rohan Kale


Dirba Devi Temple Stepwell
Village : Jamsande
Taluka : Devgad
District : Sindhudurg
Mapped No # 258
Photo Credits : Rohan Kale

Ganpatipule Temple Stepwell
Village : Ganpatipule
Taluka : Ratnagiri
District : Ratnagiri
Mapped No # 310
Photo Credits : Rohan Kale

Bramhandev Temple Stepwell
Village : Hirlewadi
Taluka : Malvan
District : Sindhudurg
Mapped No # 369
Photo Credits : Rohan Kale

Madhe Ghat Stepwell
Village : Ranwadi Khurd
Taluka : Mahad
District : Raigad
Mapped No # 128
Photo Credits : Rohan Kale

Aditeshwar Mandir Stepwell
Village : Sandelavagan
Taluka : Ratnagiri
District : Ratnagiri
Mapped No # 356
Photo Credits : Rohan Kale

Redeghumat Stepwell
Village : Banda
Taluka : Sawantwadi
District : Sindhudurg
Mapped No # 239
Photo Credits : Rohan Kale

Kankeshwar Stepwell
Village : Kankeshwar
Taluka : Alibaug
District : Raigad
Mapped No # 131
Photo Credits : Surekha Kolhal

Bhoke Stepwell
Village : Bhoke
Taluka : Ratnagiri
District : Ratnagiri
Mapped No # 252
Photo Credits : Rohan Kale




==========================
Stepwells in Paschim MH Region
(Ahmednagar ~ Pune ~ Satara ~ Sangli ~ Solapur ~ Kolhapur)

Karanjgaon Stepwell
Village : Karanjgaon
Taluka : Mawal
District : Pune
Mapped No # 82
Photo Credits : Manoj Sinkar

Mallikarjun Temple Pushkarni
Village : Loni Bhapkar
Taluka : Baramati
District : Pune
Mapped No # 56
Photo Credits : Rohan Kale

Manchar Stepwell
Village : Manchar
Taluka : Ambegaon
District : Pune
Mapped No # 69
Photo Credits : Rohan Kale

Bakuli cha Mala Stepwell
Village : Mavadi Kadepathar
Taluka : Purandar
District : Ratnagiri
Mapped No # 53
Photo Credits : Rohan Kale

Shakambhari Mata Temple Stepwell
Village : Nagewadi
Taluka : Satara
District : Satara
Mapped No # 123
Photo Credits : Rohan Kale

Helical Stepwell
Village : Shendurjane
Taluka : Wai
District : Satara
Mapped No # 111
Photo Credits : Rohan Kale
Baneshwar Temple Stepwell
Village : Talegaon Dabhade
Taluka : Mawal
District : Pune
Mapped No # 33
Photo Credits : Manoj Sinkar

Ramling Temple Stepwell
Village : Gursale
Taluka : Khatav
District : Satara
Mapped No # 36
Photo Credits : Rohan Kale

Bhandgaon Stepwell
Village : Bhandgaon
Taluka : Parner
District : Ahmednagar
Mapped No # 91
Photo Credits : Rohan Kale

Bramhani Stepwell
Village : Bramhani
Taluka : Rahuri
District : Ahmednagar
Mapped No # 93
Photo Credits : Rohan Kale

Nighoj Stepwell
Village : Nighoj
Taluka : Parner
District : Ahmednagar
Mapped No # 144
Photo Credits : Manoj Sinkar

Belwandi Kothar Stepwell
Village : Belwandi Kothar
Taluka : Shrigonda
District : Ahmednagar
Mapped No # 590
Photo Credits : Manoj Sinkar


Ballaleshwar Mandir Stepwell
Village : Jejuri
Taluka : Purandar
District : Pune
Mapped No # 66
Photo Credits : Rohan Kale


==========================

Nagnath Mandir Stepwell
Village : Hatnoor
Taluka : Sailu
District : Parbhani
Mapped No # 229
Photo Credits : Rohan Kale

Arvi Stepwell
Village : Arvi
Taluka : Parbhani
District : Parbhani
Mapped No # 474
Photo Credits : Rohan Kale

Devgiri Fort Stepwell
Village : Devgiri (Daulatabad)
Taluka : Aurangabad
District : Aurangabad
Mapped No # 189
Photo Credits : Rohan Kale

Stepwell near Gokuleshwar Mandir
Village : Charthana
Taluka : Jintur
District : Parbhani
Mapped No # 207
Photo Credits : Rohan Kale

Stepwell near Mahadev Mandir
Village : Helaswadi
Taluka : Mantha
District : Jalna
Mapped No # 287
Photo Credits : Rohan Kale

Stepwell near Renuka Mata Mandir
Village : Longaon
Taluka : Bhokardan
District : Jalna
Mapped No # 450
Photo Credits : Rohan Kale

Paradgaon Stepwell
Village : Paradgaon
Taluka : Ghansawangi
District : Jalna
Mapped No # 462
Photo Credits : Rohan Kale

Pingleshwar Mandir Stepwell
Village : Pingli
Taluka : Parbhani
District : Parbhani
Mapped No # 227
Photo Credits : Rohan Kale

Stepwell besides Mahadev Mandir
Village : Raipur
Taluka : Sailu
District : Parbhani
Mapped No # 473
Photo Credits : Rohan Kale

Stepwell near Renuka Devi Temple
Village : Dahegaon Devi
Taluka : Ghansawangi
District : Jalna
Mapped No # 459
Photo Credits : Rohan Kale

Shukanand Math Stepwell
Village : Basmat
Taluka : Basmat
District : Hingoli
Mapped No # 488
Photo Credits : Rohan Kale

Amrut Tirth (Stepwell)
Village : Verul
Taluka : Khultabad
District : Aurangabad
Mapped No # 190
Photo Credits : Rohan Kale

======================

https://www.indianstepwells.com/2020/02/maharashtra-stepwells.html

 प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे



उरूस, 12 मार्च 2021 

कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत. 

परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत. 

11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी,  ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्‍यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती. 

परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्‍यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले.  धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्‍यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला. 

हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्‍न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही. 

हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत.  परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते? 

13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.    

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती


उरूस, 18 जानेवारी 2021 

औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते. 

मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्‍या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्‍याने उपसता येते. बारवेला पायर्‍या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्‍याची गरज नाही. 

औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे. 

औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या. 

औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.

दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्‍या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे  बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक. 

चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्‍या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.

पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्‍हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.


मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्‍याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्‍यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 

नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो. 

बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही. 

औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा. 

(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)        

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर


मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर

मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर –

ग्रामीण भागातील प्रत्येक गावचे एक वैशिष्ट्य बघायला मिळते.त्याचे ऐतिहासिक पुरातन पाऊलखुणा पाहण्यास मिळतात असेच ऐतिहासिक गाव म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गाव नुकतेच गावाला भेट देण्याची योग आला..मित्रबंधू गणेश गोब्बूर यांच्या सहकार्याने मैंदर्गी गावातील विविध स्थळाला भेट घेतली त्यातलीच ऐतिहासिक पुरातन प्याटी बावी विहीर आहे.

अक्कलकोट तालुक्यातील महत्त्वाचे गाव शहर मेंदर्गी हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.

गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराचे अवशेषानी बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.

मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.अशा ऐतिहासिक मैंदर्गी गावातील प्याटी विहीर बदल सांगणार आहे.

ग्रामीण भागात मोठमोठ्या विहीर दिसून येतात मैंदर्गी येथील पुरातन प्याटी बावी विहीर भव्य आहे.मैंदर्गी गावात विहीर आहे.यंदा पाऊस भरपूर झाल्याने विहीर पाण्यानी भरलेले आहे.जसे पाण्याचे झरे लागतात तशी विहीरीची रचना केली आहे.विहीरीची भव्यता बघण्या सारखे आहे.वैशिष्ट्यपूर्ण काळ्या दगडी बांधकाम केले आहे.अजूनही बांधकाम भक्कम आहे.विहिरीत खाली जाण्यासाठी पायरी व्यवस्था केलेली आहे.आतापर्यंत एकदा विहीर तळ दिसला नाही.पाणी अटलेला नाही असे जाणकार जुने मंडळी सांगतात.

विहिरीत भिंतीवर शिलालेख बसवले आहे यंदा पाणी जास्त असल्यामुळे शिलालेख दिसले नाही.माहिती नुसार या शिलालेखात गणपतराव बापूसाहेब पटवर्धन आधिपती कुरुंदवाड संस्थान यांनी शके.१७९८ मध्ये प्याटी विहिरीचे जिर्णोदार करण्यात आले आहे.सध्या ऐतिहासिक विहीर मैंदर्गीत प्रवेश केल्यानंतर बस स्थानककडे जाताना उजव्या बाजूला लागतो.विहीरचा सुरक्षित विचार करून स्थानिक नगरपरिषदने लोंखडी चाळी बसलेले आहेत.

विहीरत वरच्या बाजूला पाणी काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे रोल बसविले आहेत.सध्या विहीर च्या बाजूला बांधकाम सुरू आहे.विहीरी च्या चौही बाजूने घरे असून मध्यभागी विशाल व भव्य विहीर आहे.ऐतिहासिक पुरातन प्याटी विहीर हे मैंदर्गी शहराचे वैभवात भर टाकणारी स्थळ आहे.त्याची जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.खरोखरच एक ऐतिहासिक व पुरातन विहीर वास्तू पाहून मन प्रसन्न झालं.मैदर्गी सामाजिक कार्यकर्ते मित्रबंधू गणेश गोब्बुर यांच्या मुळे शक्य झालं.

मैंदर्गी गाव ऐतिहासिक गाव आहे.अनेक पुरातन गोष्टी मैंदर्गीत पाहण्यास मिळतात यापुढे पुन्हा मैंदर्गी च्या ऐतिहासिक पुरातन गोष्टी पाहणार आहोत…

धन्यवाद

फोटो व संकलन – धोंडपा नंदे,वागदरी

 

 प्राचीन वारसा जपणार्‍या हतनुरचा आदर्श घ्या..

 


उरूस, 30 डिसेंबर 2020 

प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले. 

या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही. 

हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्‍यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची. 

पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्‍यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले. 

गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला. 

मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला. 

हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्‍यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात. 

याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे. 

बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्‍यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष. 

मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.

जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्‍न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.

हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्‍यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. 

मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत. 

प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच. 

रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या. 

रोहन काळे मंुंंबई- 9372496819  

(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)

 
 

खानदेशातील जलसंस्कृती

 खानदेशातील जलसंस्कृती

असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
खानदेश हा १९०६ पूर्वी एकच जिल्हा होता पण प्रशासकीय सोयीसाठी नंतर त्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे २ भाग करण्यात आले. १९६० साली पूर्व खानदेश हा जळगाव जिल्हा झाला, १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचा धुळे जिल्हा झाला आणि पुढे १ जुलै १९९८ ला नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे तेव्हापासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे याचे आत्ताचे ३ जिल्ह्यांचे स्वरूप आले. अशा या खानदेशातील पुरातत्वीय कालखंड ते आधुनिक काळापर्यंतच्या जलसंस्कृतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा, सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे शोधणे शक्य झाले आहे. १९५२-५३ पासून डॉ. शंकर साळी, बी. के. थापर, बोपर्डीकर, डॉ. वसंत शिंदे या तज्ञ पुरातत्ववेत्त्यानी केलेल्या संशोधनांतून २०० पेक्षा जास्त अश्मयुगीन, १०० पेक्षा अधिक ताम्रपाषाण व जवळपास ५० उत्तर हरप्पा कालीन वसाहती खानदेशात होत्या हे उजेडात आले.१ यातून सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती तो म्हणजे प्राचीन काळी मानवी वसाहती या जलसमृद्ध असलेल्या प्रदेशातच होत असत म्हणजेच खानदेशची भूमी हि खऱ्या अर्थाने जलसंपन्न होती. माझ्या अल्पमती ज्ञानानुसार जगाच्या पाठीवर कोणत्याही एका जिल्ह्यात इतकी पुरात्वीय स्थळे नाहीयेत जितकी एकट्या धुळे जिल्ह्यात आहेत.
खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२ याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.
याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत (पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य केले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या शतकात ज्याची निर्मिती सुरु झाली त्या पितळखो-याच्या लेणी निर्मितीसाठी पाटणे हे एक मदत केंद्र नक्कीच ठरलेले असणार. पुरातत्ववेत्ते एम. एन. देशपांडे यांच्या मतानुसार पितळखो-याच्या जगप्रसिद्ध यक्षाचे नाव संकारी असल्यावरूनच येथील गावाला संकारी हे नाव दिले असावे. पिंपळनेरच्या ताम्रपटानुसार बदामीच्या चालुक्यांचीहि येथे सत्ता होती. पुढे अभीर, यादव यांनी येथे राज्य केले. पाटणादेवीच्या मंदिरातील इ.स. ११५३ व इ.स. १२०७ च्या शिलालेखानुसार हे स्थळ म्हणजे निकुंभ राजांनी आपली राजधानी बनविले होते. तेर, पैठण (तत्कालीन प्रतिष्ठान) ते सोपारा (कल्याण) या प्राचीन व्यापारी मार्गावरील पाटणे हे एक महत्वपूर्ण स्थळ होते.४ शासनाच्या एका ग्रंथ लेखनाच्या कामानिमित्त या सर्व परिसरातील मंदिरांचा जेव्हा आम्ही सर्वे केला त्या मंदिरांच्या शिल्प स्थापत्यांवरून तसेच उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ५, शिलालेख – ताम्रपट यांच्या अभ्यासावरून हि नृत्य, संगीत, शिल्प या कलांचीही भूमी असल्याचे स्पष्ट होते.
याच पाटणादेवीच्या धवलतीर्थाच्या परिसरात १२ व्या शतकात गणित व ज्योतिष शास्त्राचा महान अभ्यासक भास्कराचार्य यांनी गणित लिलावती, लिलावती भाष्य, सिद्धांतसारशिरोमणी सारख्या ग्रंथांची रचना केली. आणि जवळच असलेल्या डोंगरी व तित्तूर च्या काठावर असलेली चाळीसगाव हि फोटोग्राफी व चित्रकलेचा ध्येयवेडा कलावंत केकी मूस यांची कर्मभूमी आहे. गंगा-यमुनेचे अप्रतिम शिल्प निर्माण करणाऱ्या या कलावंताचे जीवन म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी प्रेमकहाणी आहे.
गिरणा नदीच्याच काठावर नुकतेच २०१७-१८ मध्ये प्रस्तुत लेखकाला प्राप्त झालेल्या अवशेषांवरून डेक्कन कॉलेज, पुणे येथील श्री. निलेश जाधव व इतर ४ संशोधकांच्या टीमने केलेल्या सर्व्हेनुसार हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ३० लहान-मोठी वसाहत स्थळे प्राप्त झाली आहेत.६
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३ नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली आहेत (विस्तार भयास्तव त्यांची अधिक माहिती येथे वगळलेली आहे) त्याच प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.७
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण अभिलेखात येतो. हे घराणेही रत्नपूरच्या कलचुरीप्रमाणेच सूर्यवंशीय होते. विशेष म्हणजे यातील प्रतिकंट या राजाचे ‘महाराष्ट्र’ हे व्यक्तिनाम. संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एकाही राजाचे ‘महाराष्ट्र’ नाव या व्यतिरिक्त दुसरे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे. इ.स. ८०७ पासून हि सत्ता या तापीच्या खोऱ्यात नांदत होती. ८ अशा या २ संपन्न जलसंस्कृतीचा वारसा देणाऱ्या तापी व गिरणा यांचा संगम जळगाव व चोपडा तालुक्याच्या सीमेवर होतो.
आत्तापर्यंतच्या या प्राचीनतम संदर्भा बरोबरच मध्ययुगीन कालखंडातील खानदेशातील जलसंस्कृतीचे संदर्भ आपणाला प्राप्त होतात. भारतीय इतिहासात साधारणतः १२ वे शतक ते १८५७ पर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ मानला जातो.

ज्ञानेश्वरीत उल्लेख आल्याप्रमाणे
शके बाराशे बारोत्तरे तै टिका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंदबाबा अत्यादरे लेखकू जाहला ||
या प्रमाणे शके १२१२ मध्ये म्हणजेच इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण झाले याच्याच अवघ्या काही वर्षानंतर खानदेशातील तापी नदीच्या या काठावरच मेहूण येथे हठयोगी वटेश्वर चांगदेवाची गुरु आद्य स्त्री साहित्यक संत, मुक्ताई समाधीस्थ झाली. नामदेव गाथेतहि येथीलच तापीकाठच्या सोमेश्वराचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. नाथपंथाच्या तत्वसार या महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मितीहि इ.स. १३१२ मध्ये येथेच तापी तीरावर झाली.९
महानुभाव साहित्यातील इ.स. १४१८ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘ऋद्धिपूरवर्णन’ या महान काव्याचा रचियता नारायण बास – नारोबास हा बहुळा नदीच्या काठावर राहणारा असल्याने त्यांना बहाळीये हे संबोधन प्राप्त झाले.१० यातील एकूण ६४१ ओव्यांपैकी कांही ओव्यात बहुळा नदीकाठचे जनजीवनाचे सुंदर वर्णन कवीने केलेले आहे.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली. जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)११
नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. येथे ज्वारी हे मुख्य पीक असून कांही ठिकणी ते ३ वेळा काढले जाते. येथे उत्तम प्रतीचा तांदूळ होतो. फळफळावळ विपुल असून विड्याची पानेही भरपूर आहेत. येथे चांगल्या प्रतीचा कापड तयार होतो व धरणगावचा ‘सिरी साफ’ व ‘भिरीन’ हा कपडा प्रसिद्ध आहे. एदलाबाद हे देखील चांगले शहर असून त्या नजीकच्या तलावाचा जलसिंचनास्तव उपयोग होतो. चोपडा हे मोठे समृद्ध शहर असून डांभूर्णी गाव व जामोद परगणा सधन आहे.१५ या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, ट्र̆व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन, थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५, ११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पॉ͘डेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४ ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या (वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते. आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना १३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर, वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ. स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात. पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद, पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड केल्याचे उल्लेख मिळतात.१७
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात. एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने – आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती. तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. एकूण ५३८ शाळा त्यावेळी होत्या. याचाच अर्थ बदललेल्या पर्जन्यमानामुळे पश्चिम खानदेशचा नंदुरबार सारखा भाग होरपळलेला होता परंतु पूर्व खानदेशात विशेषतःरावेर, सावदा, फैजपूर या भागावर त्याचा कोणताच दुष्परिणाम झालेला नव्हता, आजही भारतातील केळीच्या एकूण उत्पन्नापैकी २०% केळीचे उत्पादन तापीच्या याच पट्ट्यात होते. तरीदेखील १८ वे ते २० वे शतक या दरम्यान धुळे जिल्ह्यात जाल्संकृतीचे रक्षण करण्यासाठी फड पद्धतीचा विकास झाला ज्या १९८४ मध्ये धुळ्यास वास्तव्यास असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी मैसूर संस्थानातही मोठया प्रमाणात उपयोग केला.
स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.

खानदेशच्या आधुनिक जलसंस्कृतीत दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नोंद करणे इथे संयुक्तिक ठरते.
पाण्याचा थेंब थेंब रुजवून अब्जावधी लिटर पाण्याची बचत करावी या उद्दिष्टाने याच खानदेशच्या मातीतील सुपुत्राने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशन ची स्थापना करून खऱ्या अर्थाने जलक्रांती घडवली. एक महान स्वप्न उराशी बाळगून स्वप्न त्यांनीच उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव च्या ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या पदयात्रेत मला हे पाहायला मिळाले की सातपुड्याच्या कुशीत कुंड्यापाणी हे ७०० लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावात डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा केवळ पाण्याचा झरा हे एकमात्र साधन असतानाही लागेल तेवढेच पाणी वापरून कधीही पाण्यासाठी संघर्ष न करणारे हे एक आनंदी गाव आहे. तसेच गिरणेच्या काठावर जळगाव तालुक्यात लमांजन हे एक असे गाव आहे की ज्याच्या शेजारून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठे मोठे पाषाण आहेत पण ज्या गावाने ४६ वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित केला की ‘जो कोणी नदीतच नव्हे तर नदीकडील बाजूला जरी शौचाला गेले तर तो गावातून हद्दपार करण्यात येईल, संपूर्ण गाव त्याच्यावर बहिष्कार टाकेल. आपल्या गावाच्या नदीचे पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखण्याची जबाबदारी आपली आहे.’ आणि आजही सर्व ग्रामस्थ याचे पालन करतात.
खरे म्हणजे आजच्या काळात हि अत्यंत आदर्श अशी उदाहरणे आहेत कारण आपण जर नदी, तलाव इ. मध्ये शौच व इतर घाण करत असू आणि आपण जर कितीही फिल्टर लावले, कितीही पाणी शुद्धीकरण यंत्र वापली तरी आपल्याला पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून कोणीही वाचवू शकत नाही.
जलसंस्कृतीचा असा आदर्श निर्माण करून देणाऱ्या खानदेशचे आपण वारस आहोत त्यामुळे हा घेतला वसा टाकू नका, पाणी वाया घालू नका, वाया कोणाला घालू देऊ नका, हि जलसंस्कृतीची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.

संदर्भ
१. साळी, डॉ. चेतन शंकर – संदर्भ महाराष्ट्र, इंटेलक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ, प्रथम आवृत्ती, २००५, पृष्ठ क्र. ७६४
२. जळगाव जिल्हा ग̆झेटयिर- मराठी आवृत्ती १९९४, पृष्ठ क्र. ५४-५५
३. साळी, शंकर अण्णाजी – ‘दि अप्पर प̆लिओलिथिक कल्चर अ̆ट पाटणे, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र’ रिसेंट अ̆डव्हान्सेस इन इंडो प̆सिफिक प्रिहिस्टरी, १९८५, पृ. क्र. १३९-१४०
४. कित्ता २, पृ. क्र. ५५
५. सकाळ वृत्तपत्र – दि. १ जानेवारी २०१७, गिरणेच्या काठावर आढळले ३७०० वर्षापूर्वीचे अवशेष
६. बोपर्डीकर, बी. पी. – ‘अर्लि स्टोन एज साईट अट मानेगाव ऑन दि पूर्णा रिव्हर, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र,’ इंडियन अ̆न्टीक्वरी, खंड क्र. ४, १९७०, पृ. क्र. ८ – १२
७. कित्ता २ पृ. क्र. ६५
८. मराठी वांग्मयाचा इतिहास, खंड क्र. १, १९८४ पृ.क्र ६२४-२७
९. दिवेकर डॉ. ह. रा. – तत्वसार ग्रंथ, १९३६
१०. कित्ता ८ पृ. क्र. ३६६
११. शेरवानी, एच. के. व जोशी, पी. एम. (संपा.)- हिस्ट्री ऑफ मिडिव्हल डेक्कन, आंध्र गव्हर्न्मेंट
प्रकाशन, प्रथम आवृत्ती, हैद्राबाद, १९७६, पृ. क्र. ६
१२. इब्नबतुता की भारत यात्रा – चौदहवी शताब्दी का भारत – नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी
दिल्ली, चौथी आवृत्ती, २००५, पृ.क्र. १८७.
१३. बोबडे, बी. आर. – तबकाते-ए-अकबरी व चचनामा, अरुणा प्रकाशन, लातूर, प्रथम आवृत्ती,
२०१७ (प्रकाशित तसेच मूळ हस्तलिखित उपलब्ध आहे)
१४. बोबडे, बी. आर. – मूळ हस्तलिखित उपलब्ध – लेखक हफिजुधीन अहमद, मूळ नाव गंज इ –
मानी, तवारिखे दक्खन, २८९ पृष्ठे.
१५. कित्ता ११, पृ. क्र. २३२
१६. शहा, जी. बी. – पेशवेकालीन खानदेश- अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, पुणे विद्यापीठ, पुणे
१७. भामरे, डॉ. सर्जेराव – खानदेशातील अभिनव फड सिंचन पद्धत, जलसंवाद स्मरणिका, जानेवारी
२०१८



माहितीपूर्ण आहे खरा, पण खूप विस्कळित आहे आणि प्रदीर्घ आहे. लेख जर दोन तीन भागांत विभागला असता तर थोडा मुद्देसूद वाटला असता. खूपशी जंत्री आहे. असो.
१)प्रकाशा येथे कुंभमेळ्याची परंपरा खरेच आहे का? ही माहिती मला नवीन आहे.
२)सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मृत्यु दि. १२/४/१९६२ रोजी झाला. १९८४मध्ये नव्हे.
३)"नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२'' हे वर्णन इब्न बतूताचे आहे हे तळटीप बघितल्यावरच कळते. शिवाय हे सर्व आधुनिक शुद्ध हिंदी रूपांतर आहे ह्याचा उल्लेख हवा होता.
४)केळ्यांची लागवड खानदेशात पूर्वापार असली तरी तिला खरा बहर कोंकणात ठाणे जिल्ह्यातली लागवड रोगग्रस्त झाल्यावर म्हणजे १९७० नंतर आला. तोपर्यंत हिरव्या सालीच्या केळ्यांची ग्रोझ मिशेल व तत्सम उपजाती आणि वेलची, मुठेळी, राजेळी वगैरे ठाणे जिल्ह्यातल्या जाती मुंबईत लोकप्रिय होत्या. पाठ्यपुस्तकांतही वसईच्या केळ्यांविषयी माहिती असे.

 
 

औरंगाबाद परिसरांतील बारवा

 

बारवा


(शिवतीर्थ वेरूळ)

औरंगाबाद परिसरांतील बारवा
(गवाक्ष दिवाळी अंक २०२१ ) 

बारव म्हणजेच पायर्‍या असलेली विहिर. केवळ बारव या नावाने आपण याला ओळखत असलो तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायर्‍यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आलेली आहे. इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहर्‍याचा वापर करावा लागतो. किंवा मुळात या वहिरीचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो.

पण बारवेच्या बाबतीत मात्र पाणी मोटेने उपसणे हा हेतूच नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. हीला पायर्‍या असल्याने त्याचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे असा असतो.

बारवा जेंव्हा मंदिर परिसरांत बांधल्या जातात त्याला कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात.  कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर तर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव ही चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवर्‍या असलेली आहे. आता या बारवेतच देवीचे मंदिर बनविल्या गेले आहे. चारठाण येथील पुष्करणी बारवही चारही बाजूने ओवर्‍यांचे बांधकाम केलेली अशी विस्तीर्ण आहे. ज्या अतिशय विस्तीर्ण अशा बारवा आहेत त्यांना पुष्करणी म्हणतात. अतिशय विस्तीर्ण असा तलाव कंधार येथे आहे त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिल्या गेले आहे.

महाराष्ट्रात हीनयान बौद्ध काळांत लयनस्थापत्यांत पाण्याच्या टाक्यांची निर्तिती झाल्याचे तज्ज्ञ मांडतात. त्यानंतर महाराष्ट्रात भव्य मंदिरांचे निर्माण होवू लागले तेंव्हाच पाणी साठवण्यासाठी व्यवस्थापनासाठी बारवांची निर्मिती मंदिर परिसरांत झालेली आढळते. मराठवाड्यांतील प्राचीन मंदिरांपैकी औंढा, निलंगा, जामखेड (ता.अंबड) येथे बांधलेल्या दगडी विहिरी आढळतात.

मराठवाड्यांत साधारणत: राष्ट्रकुटांच्या काळात मंदिरांची निर्मिती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्याच काळात बारवांची निर्मितीची सुरवात दिसून येते. आज ज्या बारवा महाराष्ट्रात आढळून येतात त्यांचा कालखंड उत्तर चालुक्यांचा होय. (दहावे-अकरावे-बारवे शतक)

औरंगाबाद परिसरांतील तीन प्रमुख बारवा ज्या अतिशय भव्य आकर्षक आणि बारव वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांची दखल घ्यावी लागेल.

1. वेरुळचे शिवालय तीर्थ : ही बारव फार पुरातन आहे. अहिल्याबाईंनी हीचा इ.स. 1769 मध्ये जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय देखणे असे हे बांधकाम आहे. लाल चिर्‍यांत ही बारव बांधल्या गेली आहे. चारही बाजूंनी हीला करण्यासाठी सुंदर पायर्‍या आहेत. एका खाली एक असे सात टप्पे अशी पायर्‍यांची रचना केली आहे. बारवेच्या चारही बाजूनी अष्टकोनी आकाराचे बुरूजासारखे भक्कम बांधकाम केलेले आहे.

प्रत्येक बाजूस एकूण 56 पायर्‍या या बारवेस आहेत. चौथ्या टप्प्यांत चार दिशांना चार आणि चार कोपर्‍यांत चार अशी आठ देवळे आहेत. या आठही देवळांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळी आहेत. आठ दिशांच्या आठ देवता असे अष्ट दिक्पाल येथे दाखविले आहेत.

2. शेकटा बारव : औरंगाबाद जवळ वाळूजपासून शेंदूरवाद्याकडे एक रस्ता जातो. खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा आहे. या शेंदूरवाद्याच्या बाजूला आताच्या बीडकीन पासून येणार्‍या मोठ्या रस्त्यावर (शेंद्रा-बीडकीन-नगर रोड) शेकटा आहे. शेकट्याची बारव औरंगाबाद परिसरांतील सर्वात भव्य आणि खोल अशी बारव आहे. ही बारव चौरस आकाराची आहे. पश्‍चिम बाजूला हीला दोन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या आहेत. प्रवेशाच्या पायर्‍या संपल्यावर एक सोपान (सपाट अशी जागा) सोडलेली आढळून येते. तेथून पर चौरस आकारात पायर्‍या उतरत उतरत निमुळत्या होत जातात. बारवेच्या दक्षिण बाजूला चार खांबावरचे शिवायलय आहे. त्याचे खांब आता ढासळले असून केवळ चौथरा शिल्लक आहेत. सहसा बारवेत न आढळणारी गोष्ट या बारवेत दिसून येते. पाणी उपसण्यासाठीची दगडी रचना दक्षिण काठावर केलेली आहे. मोटेने उपसलेले हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडी हौद आणि पन्नास फुट अंतरापर्यंत दगडी नाला कोरलेला आहे. हे सहसा बारवेत आढळत नाही.
या बारवेत एकूण प्रत्ये बाजूला दोन असे आठ देवकोष्टके आहेत. पण यात आता देवतांच्या मुर्ती आढळून येत नाहीत.  शिवालयातील महादेवाची पिंडी शाबुत आहे. आजही शिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो.
बारवेला भव्य अशी संरक्षक भिंतही बांधलेली आहे. सहसा बारवा संपूर्णत: जमिनीतच असल्याने अशा भिंती आढळून येत नाहीत. पण शेकट्याची बारव ही याला अपवाद आहे.

3. खुफिया बावडी : ही बारव देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे फतेयाबाद गावात आहेत. हीला खुफिया बावडी असे म्हणतात. हे निजामशाहीच्या काळातील बांधकाम असल्याचे मानले जाते. एका खाजगी शेतात ही बावडी आहे. उत्तरदिशेने जमिनीत उतरत गेलेल्या पायर्‍या आहेत. तीन तीन ओवर्‍यांच्या तीन भव्य बाजू आणि प्रवेशाची चौथी बाजू अशी ही खुफिया बावडी. गुप्त मसलतीसाठी हीचा वापर केला जायचा. चौरस आकाराच्या या बावडीच्या तीनही बाजूस कमानींची मोठी दालने आहेत. कमानींवर घुमट बांधण्याची शैली बहमनी कालखंडात मराठवाड्यात आढळून येते. पूर्वीच्या काळात अशा दगडी कमानी नाहीत.

खुफिया बावडीचे बांधकाम अजूनही भक्कम आहे. या बावडीचे पाणी शेतकरी आजही वापरतात.

याच खुफिया बावडीची लहान बहिण शोभावी अशी तीन ऐवजी एकाच कमानीच्या चार बाजू चार ओवर्‍या अशी छोटी वीटांनी बांधकाम केलेली बावडी औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरा जवळ उत्तर बाजूला शेतात आहे. ही बारव मोगलांच्या काळातील असावी. भाजलेल्या दगडी पातळ विटांनी हीचे बांधकाम केले आहे.

बीडकीन शहरांत तीन अतिशय चांगल्या बारवा आहेत. एक तर अगदी अलीकडच्या कळातील भर बाजारात असलेली किल्लीच्या आकराची बारव आहे. एका बाजूने पायर्‍या आहेत. ही बारव गोल अकाराची आहे. पायर्‍यां जवळ देवकोष्टक असून त्यात सात आसरा आहेत. दुसरी बारव मुस्लीम कबरस्तानात असून चौकोनी आकाराची आहे. त्या परिसरांत मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. एकेकाळी इथे महादेव मंदिर असल्याच्या खुणा आजही आढळून येतात. तिसरी बारव  एकात एक चार टप्पे असलेली आहे. एका बाजूने या बारवेला प्रवेशाच्या पायर्‍या आहेत. बारवेत समोरा समोर असे दोन मंडप आढळून येतात. एका देवकोष्टकांत शेषशायी विष्णुची मूर्ती ठेवली आहे. औरंगाबाद परिसरांत बारवेत ज्या देवता आढळून येतात त्याचा पुरावा केवळ बीडकीन येथेच मिळतो. इतर ठिकाणच्या मुर्ती आता अस्तित्वात नाहीत. शेषशायी विष्णु मुर्ती ही केवळ जलाशयापाशीच आढळून येते. क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडलेले विष्णु आणि त्यांची पाय दाबणारी लक्ष्मी अशी ही मुर्ती असते. याच मुर्तीच्या प्रभावळीत अष्टदिक्पाल यांच्याही मुर्ती आढळतात.

शेकट्याच्या जवळच्या शिवारात एका बुजलेल्या आवारात आजही ही शेषशायी विष्णुची मुर्ती झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्याचे संवर्धन गावकर्‍यांनी नुकतेच केले आहे.  

प्रत्यक्ष औरंगाबाद शहर आणि परिसरांत एकूण 18 बारवांची नोंद केल्या गेली आहे. खरं तर अजूनही काही बारवा सापडतील पण त्या बहुतांश नष्ट झाल्या, बुजल्या, कचरा टाकल्या गेला अशा आहेत. बांधकाम दृष्ट्या त्यांच्यात काही फारसे महत्त्वाचे नाही.

हर्सूल देवी परिसरांत तीन बारवा आहेत. एक तर प्रत्यक्ष देवीच्या मंदिरासमोरचे कुंडच आहे. त्याचा आकार चौरस आहे. त्याचा आकारही लहान आहे. बाकी दोन बारवा जरा दुर अंतरावर आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जी मोठी बारव आहे ती एका मोठ्या बांधकामाचा महलाचा भाग असावा अशी आहे. जाळी उभारून तीला संरक्षीत केल्या गेले आहे. तिचा आकार चौरस आहे. याच बारवेजवळ एक सतीचा बुरूज आहे. शिवाय एक राजस्थानी शैलीतील एक समाधीसारखे बांधकामही आहे. हा संपूर्ण महल असावा. आता तिथे केवळ मोकळी जागा आहे. जोत्याचे दगडी अवशेष काही ठिकाणी सापडतात.

शहरांतील एक अष्टकोनी छोटी बारव समर्थनगर मध्ये आहे. (प्लॉट क्र.244 च्या बाजूची खुली जागा). हीला पुर्वकडून उतरण्यास पायर्‍या असून त्या परत उत्तरेकडे वळल्या आहेत. बारव अष्टकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम उत्तम अवस्थेत आहे. बारवेत भरपुर पाणी आहे. यशवंतराव होळकरांच्या काळात याच जागी एक महाल होता. त्या महालाच्या घुमटाचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. जिथे आता अतिक्रमण केल्या गेले आहे. त्या महालाचा एक भाग म्हणजे ही बारव असावी.

विद्यापीठ परिसरांत सोनेरी महाल येथे दोन बारवा आहेत. या बारवांचे बहुतांश बांधकाम शाबूत आहे. शिवाय परिसरांत अजून एक मोठी बारव आहे.

जिचा खास उल्लेख करावा लागेल अशी एक बारव म्हणजे हिमायत बागेतील शक्कर बावडी. औरंगजेबाचा काळात हिमायत बाग विकसित केल्या गेली. यात आयताकृती अशी ही शक्कर बावडी आहे. एका बाजूला वीटांचे भक्कम असे कमानी कमानीचे बांधकाम असून त्यावर मोट लावण्याची दगडी रचना आहे. तिथून पाणी उपसले जायचे. बाकी तीनही बाजूंनी बांधीव अशी ही बावडी आहे.

सातारा परिसरांत खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरांत दोन बारवा आहेत. या बारवांची पडझड झालेली आहे. अहिल्याबाईंनी या खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. त्याच काळात या बारवाही दुरूस्त केल्या असाव्यात. पण त्या आता चांगल्या अवस्थेत नाहीत.

प्रत्यक्ष औरंगाबाद शहराचा जो भाग आता मुख्य वस्तीचा भाग आहे त्याला फारसा प्राचीन इतिहास नाही. याउलट औरंगाबाद लेण्या, हर्सूल देवी परिसर, सातारा डोंगर परिसर, कर्णपुरा, जाधववाडी येथे जूने संदर्भ आहेत. त्यामुळे जून्या बारवा या शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी नसून बाह्य भागात आहेत.

औरंगाबाद ही सैनिकांची वस्ती होती. नंतर मलिक अंबर काळापासून या शहराला चेहरामोहरा प्राप्त झाला. मलिक अंबर काळात पाणी व्यवस्थापनाची वेगळी अशी व्यवस्था नहरींद्वारे केली गेली. याचा परिणाम म्हणजे या परिसरांत बारवांची अवश्यकता राहिली नाही. कारण खापरी नळांद्वारे पाणी संपूर्ण परिसरांत खेळवले गेले होते. तसे नळ जागजागी आढळतात.

सातारा डोंगरावर खंडोबाचे मुळ प्राचीन मंदिर आहे. त्याला कालखंड अगदी यादवांच्याही आधी उत्तर चालूक्यांच्या काळापर्यंत जातो. याच मंदिरा जवळ दगडी बांधकाम असेलेले कुंड आहे. या कुंडाच्या तीन बाजू नीट बांधलेल्या आहेत. उतराची तिसरी पश्चिमेकडची बाजू मोकळी आहे. म्हणजे तेथूनपाणी वहात येवून या कुंडात साठवले जात असे. आजही या कुंडात पाणी साठते.

महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्‍या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.

 
1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11.  गंगा बावडी - 437
12.  हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276  

(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)

(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)

  औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती


उरूस, 18 जानेवारी 2021 

औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते. 

मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्‍या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्‍याने उपसता येते. बारवेला पायर्‍या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्‍याची गरज नाही. 

औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे. 

औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या. 

औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.

दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्‍या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे  बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक. 

चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्‍या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.

पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्‍हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.


मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्‍याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्‍यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 

नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो. 

बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही. 

औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा. 

(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)        

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
 
 
 
 
 

गड, कोटांवरचे जलव्यवस्थापन

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभुत गरजा मानल्या जातात. पाणी हि मानवाची किती अंत्यतिक गरज आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. एकवेळ अन्नाशिवाय माणुस काही दिवस काढेल, वस्त्र हि त्यानंतरची गरज पण अल्प वस्त्र किंवा ईतर पर्यायाचाही मानवाने वापर केल्याचा दिसून येतो, निवारा हे कदाचित प्राधान्यक्रमात शेवटी येईल, पण निवार्‍याखेरीजही माणुस काही काळ राहु शकेल.मात्र सर्वाधिक मह्त्वाची गरज म्हणजे पाणी. मानवी शरीरातच सत्तर टक्के पाणी असल्यामुळे पाण्याशिवाय एक दिवसही काढणे कठीण. 'जल नही होता तो ये जग जाता जल' यासाठीच म्हणले आहे.
      अर्थात प्राचीन काळापासून दुर्ग उभारताना पाणी या घटकाचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. पाण्याची व्यवस्था होईल असे न वाटल्यामुळे शिवाजी महाराजांनी मालवणजवळ भरतगडाची उभारणी केली नाही. सह्याद्रीत अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या ढाकोबा या शिखरावर दुर्गउभारणी होउ शकली नाही. पाण्याची व्यवस्था ही कोणत्याही प्रकारच्या मानवी समूहासाठी एक मुलभूत गरज आहे. सह्याद्रीतल्या उंचच उंच किल्यांचा विचार करता आणखीच महत्वाची ठरते! रामचंद्र अमात्य आपल्या आज्ञापत्रामध्ये  लिहितात:
    "गडावर  आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक म्हणून बांधणे झाले तर आधी खडक फोडून तळी,टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पुरेल अशी बांधावी. गडावर झराही आहे. जसे-तसे पाणी मुरते म्हणून तितकीयावरिच  निश्चिंती न  मानावी. झुन्जामध्ये  भांडीयाचे आवाजाने(तोफांच्या आवाजाने) झरे स्वल्प होतात तेव्हा संकट पडते. या करिता तसे जागी जखीरीयाचे(साठवणीचे) पाणी  म्हणून दोन-चार तळी,टाकी बांधावी. त्यातील पाणी खर्च न होऊ देणे. गडाचे पाणी बहुत जतन करावे"
    हा वरील उतारा गडावरील जलव्यवस्थेच मर्मच कथन करतो. ह्या कारणास्तव आपणास दुर्गभ्रमंती करताना जागोजाग पाण्याची टाकी दिसून येतात.  किंबहुना अनेक गडांवर पाण्याची टाकी हेच काही मोजके अवशेष राहिले आहेत. टाकी ही सर्वच गडांवर  आहेत. अनेक गडांवर खोदीव टाक्यांचा समुहच आढळून येतो.
आकाशातून पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी सर्वत्र सारखेच एकाच रंगरूपाचे व चवीचे सर्वत्र असते, पण भूमीत सामावले गेल्यावर भूमीच्या अंतर्भागातील रसाने पाण्याची चव बदलते. जमिनीतील क्षाराप्रमाणे पाण्याचे गुणधर्म बदलतात, विशेषत: विहिरीतील पाण्यात गोड, मचूळ, खारट, तुरट, कडवट इत्यादी रुचीवैविध्य दिसून येते.
    मनुष्याने आपल्या अनुभवातून आणि निरीक्षणातून पाणवठ्याच्या जागा निश्चित करून तिथे वस्ती केली, शेती करता येऊ लागल्यावर नदीकिनारी वसाहती होऊ लागल्या, कोट-किल्ले आणि नगरे उभी राहू लागली. नगर म्हटले की, जनतेला आवश्यक सोयी-सुविधा, रस्ते, गटारे, उद्योगधंदे आलेच आणि त्याबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आली. ख्रिस्तपूर्व पाचव्या सहस्त्रकात शेतीचा विकास व स्थिर ग्रामीण जीवन भारतामध्ये निर्माण झाले होते. १९२१ सालापासून वायव्य व पश्चिम भारतात केलेल्या उत्खननात हडप्पा व रूपड (पंजाब), मोहेंजोदडो, चन्हुदडो, आमरी (सिंध), महेश्वर व नावडातोडी (मध्य भारत), रंगपूर, प्रभासपट्टण, सोमनाथ (काठेवाड), लोथल (गुजरात) इत्यादी विस्तृत प्रदेशातील नदीकिनारील शहरांचे अवशेष सापडले आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा येथे जुन्या भग्नावशेषांवर सात वेळा नवीन वस्ती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे उत्कर्ष व लयाबद्दल पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. अजूनही होत आहे. मोहेंजोदडो व हडप्पा ही दोन्ही शहरे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसली असल्यामुळे त्यातील संस्कृतीला प्राचीन सिंधू संस्कृती किंवा सैंधव संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दोन्ही शहरांच्या नगररचनेत साम्य आहे. येथील बरीचशी घरे दुमजली व क्वचित तीन मजली होती. सामान्यत: प्रत्येक घरात मध्यभागी चौक व चोहोबाजूस राहण्याच्या खोल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यास घराबाहेरून अरुंद व उंच जिना असे. प्रत्येक घरात स्नानगृह, मोरी, मधल्या चौकात विहीर, वरच्या मजल्यावरही स्नानगृह आढळले आहेत. यावरून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र बिऱ्हाडे असावीत. स्नानगृहास एका बाजूस उतरती फरसबंदी असे व आतील बांधकाम पक्के करीत.
     अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून वर डांबराचा दाट थर देत व कोठेही पाणी मुरणार नाही, याची काळजी घेत वरच्या मजल्यावरील सांडपाणी खालच्या तळमजल्यात सोडण्याची व्यवस्था असे आणि मग हे सांडपाणी बंदिस्त गटारातून दूरवर नदीत सोडत. हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना एका ओळीत ही घरे असत. मोहेंजोदडो येथील किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण स्नानगृहाचा विस्तार १८०' x १०८' एवढा प्रचंड आहे. त्याच्या मध्यभागी ३९' x २३' x ८' खोल स्नानकुंड आहे. कुंडात उत्तरेच्या बाजूस लहान मुलांच्या सोयीसाठी पायऱ्यांजवळ कुंडाची खोली कमी आहे. तलाव साफ करण्याच्या सोयीसाठी नैऋत्येच्या बाजूस तळमोरी ठेवलेली आहे. आग्नेयेस असलेल्या विहिरींमधून तलावास पाणीपुरवठा केला जाई. येथील घरांमध्ये आड (विहीर) असले तरी काही ठिकाणी सार्वजनिक विहिरी आढळतात. नदीकाठावरील ही शहरे असल्याने विहिरींना भरपूर पाणी लागत असे. येथे दोरीनेच पाणी शेंदून काढावे लागे. विहिरीभोवती चुनेबंदी असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधीव गटारे आढळतात. जमिनीखालील जलस्रोतांचे विहिरीमध्ये संचय करून जीवनोपयोगी पाणी वर्षभर कसे पुरवावे, हे त्यावेळच्या लोकांना माहीत झाले होते.
       चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात तलाव व धरणे बांधून पाटाने किंवा कालव्याने शेतीला आणि शहराला पाणीपुरवठा करण्याच्या तांत्रिक बाबी अवगत झाल्या होत्या. चंद्रगुप्त मौर्य याचा गिरनार येथील सुभेदाराने गिरनारच्या डोंगरातील प्रवाह अडवून 'सुदर्शन तलाव' बांधला. त्यानंतर सम्राट अशोकाने (इ. स. पूर्व ३०४ - इ. स. पूर्व २३२) त्यामध्ये सुधारणा करून त्यातील पाणीपुरवठा शेतीला करण्याची उत्तम सोय केली गेली. त्या तलावाची रचना व पाणी सोडण्याची व्यवस्था आजच्या इतकीच आधुनिक होती. इ. स. पूर्व ४च्या शतकात चंद्रगुप्त मौर्य याचा गुरू विष्णूगुप्त तथा कौटिल्य हा महाज्ञानी व बुद्धिमान होता. त्याच्या कौटिलीय अर्थशास्त्रातील स्थापत्यविषयक ग्रंथात नगररचना, यांत्रिकीतंत्र व नियोजनबद्ध जलव्यवस्थापन योजना आजही प्रत्यक्ष वापरात आहेत. त्यात धरणे कशी बांधावीत, धरण बांधण्याचे नियम, बागायती जमिनीचे महत्त्व, शेतीसाठी पाट व कालव्याच्या पाण्याचा वापर, पाणी व जमीन यांचे व्यवस्थापन, पर्जन्यमापक (पाऊस मोजण्याचे साधन) इत्यादींची सविस्तर माहिती त्यात आहे. इ. स. पूर्व चौथ्या शतकातील हा ग्रंथ पाहता प्राचीन काळी भारतीयांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, स्थापत्य तसेच तंत्रज्ञानात जी प्रगती केली होती तिचा आवाका लक्षात घेतल्यास थक्क व्हायला होतो. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीपासून मौर्य काळापर्यंत अडीच-तीन हजार वर्षांत विहिरी, तलाव, धरणे, पाटबंधारे, कालवे काढून शेतीला व नगराला पाणीपुरवठा करण्याचे तंत्र चांगलेच अवगत झाले होते.
    गुप्तकाळात (इ. स. ४९०-५८७), वराहमिहीर हा प्रकांड पंडित व निष्णात खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा 'बृहत्संहिता' हा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे महाविश्वकोशच आहे. या संहितेत 'अर्थ दृगार्गल' म्हणजे जमिनीतील पाण्याचे झरे समजण्याचे शास्त्र व विहीर कशी खोदावी व कशी बांधावी याची माहिती त्यात आहे. वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून जमिनीखालील वाहत्या जलस्रोताचा वेध घेऊन वाळवंट, माळरान, डोंगरमाथा व खडकाळ जमिनीवर विहीर कशी खोदावी, जमिनीत नेमके पाणी कुठे आहे, ते ओळखण्यासाठी नैसर्गिक साधने कोणती याची विस्मयकारक माहिती या ग्रंथात दिली आहे. विहीर खोदण्यासाठी, त्यातील खडक फोडण्यासाठी कुदळ, फावडी, पहार, टाकी, हातोडा ही अवजारे प्रामुख्याने लागतात. दगड-माती काढण्यासाठी घमेले, टोपल्या यांचा उपयोग होई. पण कधी कधी जमिनीखाली एखादा मोठा दगड लागला आणि फोडायला अतिशय कठीण असला, तर त्यावर चालणाऱ्या हत्यारांची धार वारंवार बोथट होते. अशा वेळी हत्यारांना घासून त्यांना वज्रासारखे काठीण्य आणण्यासाठी लागणारे रसायन कोणते होते, गड-किल्ल्यांवरील व विहार-लेण्यातील पाण्याची टाकी कशी खोदली जात असत, हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्याची उकल वराहमिहीर याच्या 'बृहत्संहिता' ग्रंथातील 'अथ दृगार्गल' प्रकरणातून होऊ लागते.या प्रकरणातील जिवंत पाण्याच्या झऱ्याचे संशोधन' या विषयावर दिलेल्या तपशिलावरून या बाबतीत कसे शोध,किती व कशी कशी प्रगती केली,याविषयीचे चित्र पहावयास मिळते.याप्रकारणावर नंतर १२०० वर्षात बर्याच टीका लिहिल्या गेल्या.त्यात थोड्या अधिक तपशिलाची भर पडली असली तरी बृहतसंहितेत असलेली मुलतत्वे अनुभवाने पटल्याची ग्वाही दिली आहे.या प्रकरणाच्या १२५ श्लोकात वृक्षांच्या वाढीवरून,कीटकांच्या अस्तित्वावरून,जमिनीच्या किंवा खडकाच्या रंगरूपावरून अथवा गुणधर्मावरून पाणी शोधण्याचा मार्ग सांगितला आहे.पाण्याचा हा शोध गिरीदुर्गांसाठी फारच उपयोगी ठरला.मुळातले दुर्गम गिरिदुर्ग पाण्याच्या सोयीमुळे अजूनच दुर्गम झाले.याचे एक उदाहरण म्हणजे सिंहगड.येथे सुमारे तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात.बहुतेक सर्व देवटाक्याचे पाणी पितात.एवढा प्रचंड उपसा असूनही आजही हे देव टाक्या कोरडे पडलेल्या नाहीत.

कर्नाळ्याचा सुळक्याचा पायथा पाण्याच्या टाक्यांनी पोखरुन काढला आहे.

    याउलट कर्नाळ्याचे उदाहरण देता येते.कर्नाळा किल्ल्यावर डोंगरात एक खोदीव टाकी आहे.त्यात पाण्यावर हवेचा दाब पडणार नाही,अशी त्या टाकीची पातळी ठेवली होती.पण एकदा टाकीच्या बाहेरील भिंतीवर वीज पडून त्यात पोकळी निर्माण झाल्याने बारमाही,सतत तुडुंब भरून राहणारे टाके पूर्णतः कोरडे पडले.पाण्याच्या झऱ्यांच्या अस्तित्वाचे तत्व सांगताना वराह मिहीर लिहितो'डोंगर,दर्‍या,जमीन,वा दगड असो,सर्वत्र कमी अधिक झरे वाहणाऱ्या शिरा पृथ्वीत असू शकतात.
     किल्ल्यावरील हे पाणी साठे किल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगून जातात. किल्ल्यावर किती शिबंदी असावी, किल्ला बांधला त्यावेळेचे पडणार्‍या पावसाचे प्रमाण, किल्ल्याचे महत्व वाढल्यावर पाणी साठवण्यासाठी केले गेलेले नवे उपाय यांचा अंदाजही या पाणी साठ्यांवरून करता येतो. किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक अन्नधान्या इतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठ्याला महत्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे,  त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्याकाळच्या स्थापतींनीं) शोधून काढल्या होत्या. 
महाराष्ट्राच्या भूरचनेमध्ये जलसमृद्ध आणि जलाभेद्य अशा दोन प्रकारचे खडक आढळतात. ते दोन थर सरळ तुटलेले कडे आणि तिरकस उताराचे भाग असे ओळखता येतात. जलाभेद्य थराच्या वरील भागात आणि जलसमृद्ध भागाच्या तळाशी टाकी खोदली तर त्यात पुरेसे पाणी बराच काळ उपलब्ध होते. ते पाणी त्या खडकातून पाझरत येत असल्यामुळे जमिनीतील क्षार त्यात विरघळतात. सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी असल्याने ते थंडगार व चविष्ट असते.’
 सह्याद्रीच्या खडकाला असलेले स्तर

 सह्यद्री हा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. या बेसॉल्टमध्येही वेगवेगळे थर आहेत. कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्ट. यातील कॉम्पॅक्ट बेसॉल्ट खडकात चिरा असतात. जमिनीतून मुरणारे पाणी या चिरांमध्ये साठून राहाते. या खालचा थर अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा असतो या थरात पाणी मुरत नाही. ही रचना समजून घ्यायची असेल तर पावसाळ्यात खंडाळा किंवा कुठल्याही घाटातून जाताना घाट बनवण्यासाठी खडकांच्या कापलेल्या भिंती असतात त्या पाहिल्या तर सर्वात वरचा थर मुरुमाचा दिसतो. त्यातून मुरलेलं पाणी खालच्या चिरा असलेल्या कॉम्पॅक्ट खडकात उतरल्यामुळे तोही ओला झालेला दिसतो. पण त्याखालचा अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा थर मात्र कोरडाठाक असतो. कारण यात पाणी मुरत नाही. सह्यद्रीत कोरलेली लेणी याच अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टच्या थरात कोरलेली आहेत. त्यामुळे ही लेणी आतून कोरडी राहतात. ज्या ठिकाणी लेणी खोदताना दुसऱ्या प्रकारचा दगड लागला तिथे एकतर लेणी अर्धवट सोडलेली आढळतात किंवा त्याच टाक्यात रूपांतर केलेले पाहायला मिळते. कोकणात चिऱ्याचा दगड मोठय़ा प्रमाणात आढळतो. हा दगड सच्छीद्र आणि ठिसूळ असल्याने त्यात लेणी किंवा टाकी खोदणे शक्य नसते. त्यामुळे कोकणातल्या किल्ल्यांवर टाक्य़ांऐवजी विहिरी खोदलेल्या पाहायला मिळतात.


 किल्ल्यांवर, लेण्यात पाण्याची टाकी कोरलेली दिसतात आणि तीही पाण्याने भरलेली असतात. मग हे कसे काय? यामागे आहे हा कॉम्पॅक्ट बेसॉल्ट खडक. त्यात तयार झालेल्या फटी आणि पोकळ्य़ांमध्ये पावसाचे पाणी साठते. हा दगड जिथे संपून ॅमेग्डोलाइड बेसॉल्ट खडक चालू होतो तेथे या खडकात टाकी खोदली जातात. ॅमेग्डोलाइड बेसॉल्टच्या थरात पाणी मुरत नाही तसेच त्याला भेगाही नसतात, त्यामुळे कॉम्पॅक्ट बेसॉल्टच्या फटी आणि पोकळ्यांमधून साठणारे पाणी झिरपत कडय़ाच्या पोटात असलेल्या टाक्यात येऊन साठते. किल्ल्यांवर पावसाळ्यानंतरही काही महिने या भेगांतून ठिबकणारे पाणी टाक्यात पडताना पाहायला मिळते. हे पाणी दगडातून झिरपत येत असल्यामुळे त्यात विविध क्षार विरघळलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पाण्याला एक वेगळीच चव असते.
      महाराष्ट्रातील गड, कोटांवर पाण्याच्या स्त्रोताचे मुख्यतः चार प्रकार आढळतात.
१) पाण्याचे कोरीव टाके
२) तलाव ( बांधीव किंवा नैसर्गिक )
३) अर्धबांधीव तलाव किंवा टाके.
४) विहीरी
 या तीनही प्रकारांचा विचार करु.

   १) पाण्याचे टाके:-

 सर्वात आधी गडावर पाण्याच्या कोरीव टाक्याचा विचार करु. बहुतेक गडांवर पाण्याची कोरीव टाकी दिसतात. कारण गडाच्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रफळाचा विचार केला तर टाके खोदणे हाच सर्वात सोयीचा मार्ग आहे. बहुतेक वेळा एकापेक्षा अधिक टाकी कोरलेली दिसतात.बहुतेक वेळा पाण्याची टाकी तटबंदीच्या आत सुरक्षित जागेत कोरली असली तरी काही गडावर अपवाद गडाच्या बाहेरही पाण्याची टाकी कोरलेली दिसतात. उदा. मालेगावजवळील कंक्राळा या गडाच्या बाहेरच्या उतारावर पाण्याची टाकी आहेत.
 मालेगावजवळील कंक्राळागडाच्या उतारावर कोरलेली टाकी

    टाकी कोरताना गडाच्या सर्व बाजुच्या पहारेकर्‍यांना पाण्याचा स्त्रोत जवळ राहील असे पाहीले जाते. उदा.रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या रसाळगडाच्या ईशान्य टोकाशी खांब टाके कोरून त्या टोकावर असणार्‍या पहारेकर्‍यांची पाण्याची व्यवस्था केलेली दिसते.
रसाळगडावरचे खांब टाके

     कडय़ांच्या पोटात कोरलेल्या टाक्यांची रचना साधारणपणे लेणींसारखी असते. काही काही टाक्यांत छताला आधार देण्यासाठी खांबही कोरलेले असतात. या टाक्यांचा फायदा म्हणजे ही टाकी बंदिस्त असल्यामुळे त्यात केरकचरा जाण्याचे प्रमाण कमी असते. पाणी खडकामधील भेगांमधून झिरपत असल्यामुळे त्यात गाळाचे प्रमाणही कमी असते. तसेच सूर्यकिरण थेट पाण्यावर पडत नसल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी होतो. अशा प्रकारच्या टाक्यांनासातवाहनकालिन टाकीम्हणतात. पट्टा, प्रचितगड, भरवगड (शिरपुंजे) नायगावचा किल्ला इत्यादी अनेक पुरातन किल्ल्यांवर खांब टाकी पाहायला मिळतात.
 अवचितगडावरील पाण्याचा टाक्याचा समुह. या ठिकाणी काठाशी दिव्यासाठी खांब उभारलेला दिसतो आहे.

     दुसऱ्या प्रकारची टाकी डोंगरउतारावर, कडय़ाखाली, कातळावर उघडय़ावर कोरलेली असतात. जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग यांचा अभ्यास करून ही टाकी कोरली जात. अनेक ठिकाणी पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी टाक्यांपर्यंत आणण्यासाठी जमिनीवरील कातळात चर खोदलेले पाहायला मिळतात. या टाक्यांत येणारे पाणी जमिनीवरून वाहात येत असल्याने सोबत गाळ, केरकचरा घेऊन येणे साहजिकच आहे. तो केरकचरा थेट टाक्यात जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी टाक्यात येणारे पाणी ज्या उतारावरून येते किंवा चरातून येते, तेथे कातळात रांजण खळगे खोदलेले असतात. गाळमिश्रित पाणी या खगळ्यातून जाताना स्थिर होते आणि त्यातील गाळ खाली बसतो.  
जळगाव जिल्ह्यातील लोंझा किल्ल्यावर एका खाली एक कोरलेली टाकी

काही ठिकाणी एकाखाली एक टाकी खोदलेली पाहायला मिळतात. या रचनेमुळे पाण्याबरोबर येणारा गाळ पहिल्या टाक्यात जमा होतो. टाके भरले की स्थिर झालेले पाणी पुढच्या टाक्यात जमा होते.
अशा प्रकारे उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे सूर्यप्रकाश, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केलेले पाहायला मिळतात. टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोके केलेली दिसतात. त्यांचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. त्यावर कापड टाकून पाण्याचे केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. दुसरा उपाय म्हणजे एक सलग मोठे टाक खोदण्यापेक्षा लहान लहान टाकी खोदली जात. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या पाण्याचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ  कमी होतो. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होत असे. या रचनेचा अजून एक फायदा म्हणजे एखाद्या टाक्यातले पाणी काही कारणाने खराब झाले (नासले) तरी बाकीच्या टाक्यातील पाणी वापरता येत असे.
  घरगड किल्ल्यावरील पाण्याचे टाके

  याशिवाय काही किल्ल्यांवर वेगळ्या प्रकारची टाक आढळतात. नेरळच्या पेब ऊर्फ विकटगड आणि नाशिक जिल्ह्य़ातील गडगडा किल्ल्यावर टाक्यांची वेगळीच रचना पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी कातळ कडय़ाखाली फूट x फूट आकाराचे चौकोनी भुयार खोदलेले आहे. या भुयारातून रांगत गेल्यावर भुयाराच्या टोकाला एक ऐसपस टाक खोदलेले पाहायला मिळते. हे टाक कायम पाण्याने भरलेले असते.
भांगसाई गडावरच्या एका टक्यात असलेली चार टाकी

 देवगिरी किल्ल्याजवळ भांगसी नावाचा छोटासा किल्ला आहे. किल्ल्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी आहेत. पण या किल्ल्यावर सर्व प्रकारची टाकी पाहायला मिळतात. त्यातील एका टाक्याची रचना वैशिष्टय़पूर्ण आहे. या टाक्यात आयताकार खोदलेल्या मोठय़ा टाक्याच्या तळाला चौकोनी खिडक्या (झरोके) कोरलेल्या आहेत. मुख्य टाक्यातील पाणी आटल्यावर टाक्याच्या तळाशी असलेल्या या वेगवेगळ्या टाक्यात पाणी राहते. या झरोक्यांची तोंडे खोलवर आणि छोटी असल्यामुळे त्यातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. मराठवाडय़ातील लहुगड या किल्ल्यावर पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी टाक्याचे तोंड छोटे ठेवलेले आहे, पण आतल्या बाजूला टाक ऐसपस कोरलेले आढळते.
  पाण्याची तुलना संपत्तीशी केली जाते. त्यामुळे बऱ्याच टाक्यांच्या िभतीवर कुबेराची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. टाक्यात पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागत असल्यामुळे पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य राखण्यासाठी टाक्यांच्या िभतीवर देवता कोरलेल्या असतात किंवा टाक्यांच्या परिसरात देऊळ किंवा मूर्तीची स्थापना केलेली असते. त्यामुळे त्या जागेची स्वच्छता राहण्यास आपसूकच मदत होते. पेब (विकटगडाच्या) टाक्याच्या िभतींवर कुबेराची प्रतिमा कोरलेली आहे. बाजूलाच पेबी देवीचे आणि शंकराचे मंदिर आहे. रायगडावरील पाण्याच्या टाक्यावर हनुमानाची मूर्ती कोरल्यामुळे ते हनुमान टाक म्हणून प्रसिद्ध आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच खराब होऊ नये यासाठी अनेक योजना केलेल्या पाहायला मिळतात.  
टाक्याच्या बाजूला दगडात एक-दोन फुटी गोल खड्डा कोरलेला असतो. टाक्यातीत पाणी त्यात काढून घेऊन मगच वापरण्याचा दंडक असे.
अनेक किल्ल्यांवर टेहळणीच्या जागांवर टेहळ्यांची बसण्याची जागा असते तेथेही अशा प्रकारचे कातळात कोरलेले खड्डे पाहायला मिळतात. त्यात पाणके ठरावीक वेळेला येऊन पखालीतून पाणी भरून जात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळत असे, तसेच पाण्यासाठी तरी टेहळ्यांना त्यांची जागा सोडण्याची गरज भासत नसे. काही पाण्यांच्या टाक्यांजवळ दगडाच्या डोणी असतात. त्यात पाणी काढून मगच वापरले जात असे. टाक्यातील पाणी वापरण्याबद्दलचे नियम काटेकोरपणे पाळले जात. या अशा उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या काळातही पाणीसाठा पुरेसा असे.
अलंग गडावरील खोदीव टाक्यांचा समूह:

चावंड गडावरील असाच ७ खोदीव टाक्यांचा समूह:

काही अभ्यासकांच्या मते ७ ह्या संख्येचा संबंध सात आसरा ह्या जलदैवतांशी संबधित असू शकतो. अवचितगडा,मुल्हेर ह्या गडांवरसुद्धा असाच ७ टाक्याचा समूह आपणस दिसून येतो.
राजगड बालेकिल्ल्यावरील चन्द्रकोर तळे:

अनेकदा ही टाकी जिथे खोदली जात त्या परिसरातील तटबंदी तसेच इतर बांधकाम करताना हा खोदलेला दगडच चिरे बनवून वापरला जात असावा. राजगडाचा पद्मावतील तलाव आणि रायगडावरील गंगासागर तलाव  ही ह्या बाबतीत चपखल उदाहरणे आहेत.
कड्याच्या पोटाशी असणारे खोदीव टाक:

याशिवाय गडांवर अजून एक आढळणारा महत्वाचा टाक्यांचा प्रकार म्हणजे खांबटाकी!
     गडाच्या डोंगरावरील कड्याच्या पोटाशी आडवे खोदत  जाऊन अशी टाकी  निर्माण केली जात व मध्ये ठराविक अंतरावर कड्यामध्ये खोदताना खांब सोडले जात. अश्या टाक्यांची निर्मिती बहुतांशी  शिवपुर्वकाळामध्ये केलेली आढळते. पावसाचे खडकामधून झिरपून आलेले पाणी असल्याने ह्या टाक्यांमधील पाणी अजूनही थंडगार व  शंखनितळ असते!  आपल्यासारख्या ट्रेकर्सना गडाची चढण चढून आल्यावर अश्या टाक्यांमधून पोटभर पाणी पिण्यात काही औरच मजा मिळते!
जळगाव जिल्ह्यातील लोंझा  किल्ल्यावरील सुळक्याच्या पोटातील खांबटाके:
























शिवनेरी किल्यावरील कमानी टाके:
 
     पाण्याच्या टाक्यांच्या रचनेवरून तसेच त्यावर असलेल्या छिन्नीच्या घावांवरूनही टाक कुठल्या काळात खोदले असेल याचा ढोबळ अंदाज बांधता येतो. लेणी खोदण्यासाठी छिन्नी प्रथम सरळ आणि त्यानंतर आडवी ९० अंशांच्या कोनात चालवली जात असे. त्या कालखंडात खोदलेल्या टाक्यांवर उभ्या छिन्नीच्या खुणा पाहायला मिळतात. शिवकाळात छिन्नीचा घाव तिरका म्हणजेच ४५ अंशांत मारला जात असे. महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांवरची काही जुनी टाकी शिवकाळात रुंद केली गेली, वाढवली गेली त्यावर जुन्या भागात छिन्नीच्या उभ्या खुणा आणि वाढवलेल्या भागात तिरक्या खुणा पाहायला मिळतात.
   पाण्याच्या टाक्याचा वापर जसा सृजनांसाठी केला गेला तसाच विध्वंसासाठीही पाण्याची टाकी कोरली गेली होती. त्याचे उत्तम उदाहरण रायगड किल्ल्यावर पाहायला मिळते. रायगडाच्या महाद्वारच्या वरच्या बाजूला कडय़ाच्या पोटात चार टाकी आहेत. शत्रू सन्याने जर रायगडाच्या महाद्वारापर्यंत धडक मारली तर ही टाकी फोडून टाकायची. या टाकीतील पाण्याचा लोंढा डोंगर उतारावरून येताना आपल्या सोबत दगड, माती, चिखल घेऊन येईल आणि दरवाजातील शत्रू वर धडकेल अशी योजना करण्यात आली होती.

एकात एक असलेले टाके

  खुपदा एका टाक्याच्या आत दुसरे टाके कोरलेले आढळते. आधीच्या टाक्यातील पाणी संपले तरी खालच्या टाक्यातील पाणी राखीव साठा म्हणून वापरता येत असे. संगमेश्वरजवळील प्रचितगडावर तर एका टाक्याच्या आत दुसरे टाके आढळते.आधीच्या टाक्यातील पाणी संपले किंवा त्यात शत्रुने विष मिसळले तरी हा जादाचा साठा उपयोगी पड्त असे.
औरंगाबाद जिल्हातील भांगसाई गडावरचे प्रशस्त खांब टाके.

टाकी खोदण्याची पद्धत सातवाहन काळापासून प्रचलित आहे असा उल्लेख अनेक तज्ज्ञांनी केलेला आहे. टाकी खोदण्याची विशिष्ट पद्धत त्या काळात होती. जमिनीवर प्रथम सरळ खोदत जायचे. पुरेसे खाली गेल्यावर, भुयाराप्रमाणे आडवे खोदत जायचे. मात्र ते आडवे खोदकाम करताना; वरून छत कोसळू नये म्हणून, मध्ये मध्ये खांब सोडले जात असत. परंतु त्या पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन होऊन (सूर्यप्रकाशाचा संपर्क होऊन पाण्याचे वाफेत रुपांतर होते) तेथील पाण्याचा साठा लवकर नष्ट होत असे; तसेच, ते साठवलेले पाणी खराब होत असे. 

 २) तलाव ( बांधीव किंवा नैसर्गिक )

किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं. पण राज्यविस्ताराबरोबर अनेक किल्ल्यांवर भरभक्कम, विस्तीर्ण तळी आणि खंदकांचे बांधकाम झाले.
किल्ल्यावरील पाण्यासाठी टाक्यांव्यतिरिक्त मोठमोठय़ा तळ्यांची रचनादेखील आपल्याकडे करण्यात आली होती.
 मुल्हेर किल्ल्याचा जोडदुर्ग  मोरा ह्या किल्ल्यावरील विस्तृत  बांधीव तलाव

 जेव्हा एखादा किल्ल्यावर राबता वाढतो, तो किल्ला राजकिय कारणाने महत्त्वाचा होत जातो, लष्करीदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढते किंवा तो किल्ला राजधानी होतो  तेव्हा त्या किल्ल्यावरील पाणी सुविधादेखील तितक्याच मोठय़ा प्रमाणात विकसित करावि लागते.
     अशा मोठय़ा किल्ल्यांवर पाणीपुरवठय़ासाठी तलाव खोदले जातं. रायगडवरीलगंगासागर तलाव आणि हत्ती तलावतर सर्वाना परिचित आहेत. या तलावातून तसेच किल्ल्यांवर खोदलेल्या टाक्यांमधून निघणारा दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. नैसर्गिकरीत्या तयार झालेले तलावही काही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. त्यात भुदरगडावरचा दुधसागर तलाव, टंकाई किल्ल्यावरचा तलाव, नरनाळा किल्ल्यावरचा शक्कर तलाव इत्यादी मोठे तलाव आहेत. अहिवंतगड, महिमतगड, इत्यादी अनेक किल्ल्यांवर बांधीव तलाव पाहायला मिळतात. गडावरचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उतार, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग यांचा अभ्यास करून असे तलाव बांधलेले आढळतात. बांधीव तलावाच्या चारही बाजू दगडांनी बांधून घेतलेल्या असतात.
धारूर, उदगीर इत्यादी किल्ल्यांवर विहारासाठी खास तलाव बांधलेले आहेत. तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्याबाहेरील तलावातून खापरी नळांच्या (पाईपांच्या) द्वारे आणलेले पाणी या तलावात सोडले जात असे. धारूर किल्ल्यात असलेल्या तलावाच्या वरच्या बाजूसहवामहालआहे. तलावाच्या पाण्यावरून येणारी हवा गार होऊन या हवामहालात येते. अंकाई किल्ल्यावर कातळात कोरलेला एक सुंदर तलाव आहे. त्याच्या मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे.
       औसा या लातूर जिल्ह्यतील किल्ल्यात दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव आहे. यालाजलमहालया नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जिना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पाहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छतामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छतामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात राहण्यासाठी केला जात असे. जमिनीखाली बांधलेला महाल वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे.
    धारूर किल्ल्यात दोन वैशिष्टय़पूर्ण तलाव आहेत. त्यांना गोडी दिंडी आणि (सोलापूर) खारी दिंडी या नावांनी ओळखतात. गोडी दिंडी हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्यापलीकडे खंदक आहे. तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत (४० मीटर लांब मीटर रुंद १२ मीटर उंच) दरीतून बांधून काढलेली आहे. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकारे होत होता. संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण इतर वेळी वर्षभर पाणीपुरवठा करणारा तलाव.
      उस्मानाबाद जिल्ह्यतील नळदुर्ग किल्ला म्हणजे पाण्याचा विविध प्रकारे वापर कसा करता येईल याचा वास्तुपाठ आहे. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजेजलमहालनळदुर्गाच्या चारही बाजूला खंदक आहे. तुळजापूरहून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पात्र वळवून पाणी खंदकात खेळवून संपूर्ण किल्ल्याला संरक्षण दिले आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसऱ्या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला गेला. या बंधाऱ्याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसऱ्या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. हा बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल आणि गणेश महाल असे दोन महाल बांधलेले आहेत. जलमहालाच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नल (नर) आणि दमयंती (मादी) या नावाच्या दोन मोऱ्या ठेवलेल्या आहेत. पावसाळ्यात या मोऱ्यांमधून पाणी वाहते तेव्हा महालातून अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. बंधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी या बंधाऱ्यावरून वाहते, पण आतील भागात असणाऱ्या एका वास्तूलासुद्धा त्याचा स्पर्श होत नाही. या जलमहालाच्या वरून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन. या धरणात साठवलेल्या पाण्याचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. धरणाच्या आतल्या बाजूला एक पाणचक्की बसवलेली आहे. अन्नधान्य दळण्यासाठी त्याचा वापर होत असे. धरणातून सोडलेले पाणी विविध बंधाऱ्यांद्वारे अडवून शेतीसाठी पुरवले जात असे. नळदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूलाही एक आडवी भिंत बांधून छोटा जलाशय निर्माण केलेला आहे. त्याला मछली म्हणतात. यावरून त्याकाळी या भागात मत्स्य शेतीही होत असावी असा अंदाज करता येतो. भुईकोट किल्ल्यांच्या भोवती जो खंदक खोदला जात असे त्यात आजूबाजूच्या जलस्रोतातले पाणी खेळवले जात असे किंवा खंदक पावसाच्या पाण्याने भरला जाईल याची काळजी घेतली जाई. यामागे संरक्षणाबरोबरच भुईकोट किल्ल्यातील विहिरी, तलाव, पुष्करणी यांना भूजल पुनर्भरणासाठीही याचा उपयोग होत असे.
गंमत म्हणजे वर ज्या तलावांची माहिती दिली आहे ते आजच्या कायम अवर्षणग्रस्त असलेल्या मराठवाडय़ातील किल्ल्यात आहेत. काही शतकांपूर्वी असलेले हे ज्ञान अचानक कुठे गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे.
    मेळघाटातल्या नरनाळा किल्लय़ावरील सर्वच तलाव हेरेन वॉटर हार्वेस्टिंगतंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. नरनाळ्यावरील सर्वात मोठा तलाव म्हणजे शक्कर तलाव. या तलावाच्या उजव्या बाजूस उतारावरून वाहणारे पाणी तलावात वळवण्यासाठी कमानदार बोगदा बांधून काढलेला आहे. तलावाच्या डाव्या बाजूस कातळ आहे. या कातळावर पडणारे पावसाचे पाणी तलावातच जावे यासाठी कातळात ठिकठिकाणी चर कोरून काढलेले आहेत.
 उरणजवळ द्रोणागिरी नावाचा छोटासा गड आहे.या गडावर एक चर्च आणि त्या चर्चसमोर एक बांधीव तलाव आहे, त्यावर कमानी उभारलेल्या आहेत.या कमानींमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हायला मदत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेताळवाडी गडावरचा प्रशस्त तलाव

३) अर्धबांधीव तलावः-

  तलाव उभारण्यासाठी गडावर विस्तृत जागा लागते.मात्र शिंबदी जास्ती व पाणी साठवण्याच्या तलावासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर जमीनीला असणार्‍या नैसर्गिक उताराचा उपयोग करुन एका बाजुला भिंत बांधली जाते. यामुळे निर्माण होणार्‍या घळईत पाणी साठविले जाते आणि कमी खर्चात आणि जागेत मुबलक पाण्याची सोय होते. अश्या अर्धबांधीव तलावाचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे रायगडावर असलेला हत्ती तलाव. 
असावागडावरचा अर्धबांधीव तलाव

    अर्थात अश्या प्रकारच्या तलावासाठी नैसर्गिक रचनाही आवश्यक असल्याने फार कमी ठिकाणी असे तलाव दिसतात.
 ४) विहीरी:-
   अत्यंत कमी जागेत आणि विश्वसनीय पाण्याचा स्त्रोत म्हणजे विहीरी. बहुतेकदा विहीरी कोकणातील किल्ले किंवा मराठवाड्यातील कमी पावसाच्या भागातील भुईकोटांमध्ये पहायला मिळतात. सह्याद्रीच्या कण्यात महामुर पाउस पडत असल्यामुळे टाक्यात साठणारे पाणी किंवा तलावात साठविलेले पाणी वर्षभर पुरते.
 काही गडांवर डोंगर एकसलग खोदत जाऊन भव्य विहिरी खोदलेल्या आढळतात. पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद पायऱ्या असे हे एकंदर विहिरींचे(Step Wells) स्वरूप दिसते.





































कराडजवळील पाटणच्या दातेगड(सुन्दरगड) इथे असणारी जांभ्या दगडात खोदलेली विहीर:


अश्या प्रकारच्या विहिरी कमळगड, संतोषगड इथंही पहावयास मिळतात!

पुष्करणी:

ही एक प्रकारची विहीर (Step Well) किंवा टाकेच अस म्हणता येईल. पुष्करणी सामान्यपणे चौकोनी असून २ किंवा ३ बाजूनी उतरण्यास   पायऱ्या असतात. एका बाजूला  विविध देवतांच्या मूर्तीचे कोनाडेसुद्धा दिसून येतात. पुष्करणी आपणास काही गडांवर पाहण्यास मिळतात.




























हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध पुष्करणी:




























चावंड गडावरील छोटेखानी पुष्करणी:
 
  फक्त पाणी साठविण्यासाठी विहीर हि आपली संकल्पना कोल्हापुर भागातील किल्ले पाहिले कि दुर होते. या भागातील सामानगड, कलानिधीगड या गडांवर चक्क विहीरीत कैदखान्याची सोय दिसते.
कुलंगगडावरचा बंधारा

या शिवाय डोंगरामध्ये असलेल्या नैसर्गिक घळींचा वापर करुन निर्माण झालेला जलौघ साठविण्यासाठी बंधारा बांधून पाण्याचा साठा केलेला दिसतो. कळसुबाईच्या रांगेतील कुलंगगड किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळील महिपतगडावर असे बंधारे दिसतात.
काही गडांचा आकार छोटा असूनही त्यावर प्रचंड मोठ्या आकाराच्या विहीरी दिसतात. संकेश्वरजवळील हरगापुर या गडावर किंवा धुळे जिल्ह्यातील सोनगिर या गडावर खुप खोल आणि मोठ्या विहीरी दिसतात,. मात्र या गडांचा आकार विचार करता ईथे मोजकीच शिंबदी असणार. मग ईतक्या खोल विहीरी कशासाठी हा प्रश्न पडतो.

विविध प्रकारच्या दुर्गावर केले जाणारे जलव्यवस्थापनः-
 मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७०मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंतांनी गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. २२८ फूट खोल खोदल्यावर विहिरीला पाणी लागले.  


  नागपूरजवळ असलेला नगरधन किल्ला येथे वाकटाकांची राजधानी होती. या किल्ल्यात वैशिष्टय़पूर्ण विहिरी पाहायला मिळतात. किल्ल्यात भुयारीदेवीचे मंदिर एका विहिरीत आहे. येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात पाण्याच्या सान्निध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो. याच किल्ल्यात एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फुटांवर एक विहीर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात बाजूंनी पायऱ्या असलेला एक उथळ हौद आहे. पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा कमळाची फुलं ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी.
    धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर एक बाव (विहीर) आहे. आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी आहे असे म्हणतात. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणी आहे. पूर्वी या विहिरीतून पाणी काढून पुष्करणीत साठविले जात असावे.
जंजिर्‍यावरचा गोड्या पाण्याचा तलाव

      जलदुर्गावर आपण फिरतो तेव्हा त्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरी पाहून आपण चकीत होतो. चारी बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात गोड पाणी येते कुठून. त्यामागील भौगोलिक सत्य असे आहे- बेट आणि समुद्रकिनारा एकाच सलग प्रस्तराने जोडलेले असतातत्यामुळे किनाऱ्यावरील जमिनीत झिरपणारे पाणी प्रस्तराखालून वाहत असल्यामुळे बेटावरच्या विहिरीत येते. या पाण्याचा उपसा व्यवस्थित करावा लागतो अन्यथा आजूबाजूला असलेले खारे पाणी विहिरीत येऊन गोडय़ा पाण्याचे स्रोत कायमचे बंद होऊ  शकतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील दुधबाव, दहीबाव या गोडय़ा पाण्याच्या विहिरी अशाप्रकारच्या गोडय़ा पाण्याच्या स्रोतांचे उत्तम उदाहरण आहे. सर्वच बेटांवर अशाप्रकारे भूगर्भातले गोड पाणी मिळत नाही. अशावेळी साच पाण्याचे, तलाव टाकी बांधले जातात. त्यात पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरले जाते. जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी जलदुर्गावर अशा प्रकारची रचना केलेली पाहायला मिळते.
लोहगडावरचा बांधीव तलाव

      त्या काळची शहरे म्हणजे किल्ले असे समजण्यास काही हरकत नाही. किल्ले हे मुख्यत: चार प्रकारचे. भुईकोट, डोंगरी, वनदुर्ग व जलदुर्ग. स्वत: राजा, त्याचे अफाट सैन्य, घोडदल, हत्तीदल, मंत्री आणि संबंधित असलेली प्रजा ही किल्ल्यामध्येच रहात असे. आंध्र प्रदेशातील वरंगल येथील काकतीय राजवटीतील किल्लादेखील असाच आकाराने मोठा आहे. औरंगाबादजवळील देवगिरीचा किल्ला, हैद्राबादचा गोलकोंडा अशी अनेक उदाहरणे देता येतील. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरूड जंजिरा, जयदुर्ग हे समुद्रातील किल्ले आहेत. 
 
     इतिहासात एखाद - दुसरा अपवाद सोडला, तर असा कोठेही संदर्भ येत नाही की, किल्ल्यामध्ये पाणीसाठा कमी पडला, राजधानीचे स्थलांतरण झाले इत्यादी. विजयनगरचे साम्राज्य संपले, पण तो वारसा डोळ्यासमोर ठेवून मराठी राज्य उदयास आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सतराव्या शतकाच्या शेवटी, राज्यारोहणाचा भव्य असा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम मे - जून महिन्यात ऐन उन्हाळ्यात घडून आला असावा, पण अशी कोठेही नोंद आढळत नाही की, रायगडावर पाण्याची चणचण भासली. आजही रायगड पहातांना त्या गडावर अवती - भवती अनेक पाण्याचे साठे दिसतात. किती असावेत ? कोणी मोजले नाहीत. सिंहगडावरही अशीच स्थिती आहे. किल्ले पुरंदर, देवगिरी, गुजरातमधील पावागड, तापीच्या उत्तरेकडील आशीरगड व त्याच्या अलिकडे अनकाई, टनकाई, पेमागिरी, कोल्हापूर भागातील पन्हाळा, साताऱ्याजवळ अजिंक्यतारा, सज्जनगड, विदर्भातील गावीलगड, नरनाळा, राजस्थानातील चितोड, अशी किती तरी उदाहरणे देता येतील की, ज्या ठिकाणी जमिनीवर मातीची - दगडाची भिंत बांधून व खडक कोरून मोठ्या संख्येत लहान - मोठे पाण्याचे साठे निर्माण केलेले चित्र दिसून येते. महाराणा प्रतापच्या चित्तोड गडावरील महाल (राणी पद्मीनी, संत मीरा व पन्नादायी इ.) हे तलावातच आहेत. अशा साठवलेल्या पाण्याचा उपयोग एकाच वर्षासाठी नाही, तर पावसाने ताण दिला तरी पुढील वर्षात पाण्याचा तुटवडा भासू नये अशी पध्दतीने होत असावा. गडावर पडलेल्या पाण्याचा थेंब वाहून जावू न देता त्याला अडवून, साठवून त्याचा वापर पुढील काळात करण्याचे कौशल्य दोन अडीच हजार वर्षांपासून या भूमीवर राबविलेले आहे हे आपणास सहज दिसते.
     समुद्रातील किल्ल्यांमध्येही हेच तत्व अंगिकारले आहे. चोहोबाजूने खारे पाणी, पण समुद्रातील त्या जमिनीच्या लहानशा भागावर मात्र मुबलक गोड पाणी, ही निसर्गाची किमया आहे. त्याला शास्त्रीय आधार आहे. भूप्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी, त्याच ठिकाणी मुरवून विहीरी, बारव, तलाव यांच्या माध्यमाने वापर करण्याचे तंत्र त्या समाजाने विकसित केलेले दिसून येते.
      भुईकोट किल्ल्यातील जलव्यवस्थापन याही पेक्षा पुढे जाते. किल्ल्याभोवती कालवा (खंदक) खोदून त्यातून अविरतपणे पाणी खेळवून किल्ल्यातील पाणीपुरवठ्यासाठी पुनर्भरण केलेले आपणास दिसते. असा एकही भुईकोट किल्ला नाही की ज्याच्या भोवती खंदक नाही. अगदी पुण्याच्या जवळील लहानशा चाकण व इंदोरी किल्ल्याचे उदाहरण घेतले तरी चालेल. तेथे उत्तम खंदक आहेत. खंदकातील पाणी जरी किल्ल्याचे संरक्षण करीत असले, तरी त्याचे महत्वाचे काम पुनर्भरणाचे आहे, हे सहजपणे समजून येते. यामुळेच किल्ल्यातील विहीरींना, बारवांना, तलावांना अविरतपणे भूजलाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
हे खंदक - कालवे जवळच्याच नदी, ओढा वा तलावास जोडलेले आहेत. अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह खंदकात वळविलेले आहेत. यमुनेकाठचा आग्रा किल्ला, दिल्ली परिसरातील अनेक किल्ले, तंजावरचा बृहदेश्वरचा किल्ला अशी अनेक उदाहरणे देता येतील. काही किल्ल्यांच्या वरच्या भागात तलाव बांधून, (करमाळा, सोलापूर, चंद्रपूर इत्यादी) तलावांचे पाणी खंदकाला जोडलेले आहे. गुलबर्गा येथील किल्ल्याचे वैशिष्ट्य मात्र वेगळे आहे. एका लहानशा नदीला वळवून खंदकात घेण्यात आले आहे व या खंदकाचे जास्तीचे पाणी जगत नावाच्या तलावात घेण्यात आल्याचे आजही आपणास दिसते. या तलावांच्या खाली भाताची शेती कसली जाते. सोलापूरजवळील नळदुर्गचा किल्ला हा अभियांत्रिकी शास्त्रामधील एक उत्कृष्ट नमुना आहे. वरंगलच्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने तो स्वयंपूर्ण म्हणावयास हरकत नाही. मंगळवेढा, अक्कलकोट या गावांच्या भोवती खंदक पाहावयास मिळतो. या खंदकांना त्यांच्या वरच्या भागातील तलावांनी जोडले आहे.
     राष्ट्रकुटांची राजधानी कंधार (नांदेड) व त्या ठिकाणचा जगतुंगसागर आजसुध्दा (1400 वर्षांपूर्वीचा) दिमाखाने उभा आहे. त्यानंतरच्या यादवांच्या काळात पाणी व्यवस्थापनातील कौशल्याने परमोच्च बिंदू गाठलेला दिसतो. राज्याची, सैन्याची वास्तव्याची ठिकाणे म्हणजे किल्ले. किल्ले जलसंवर्धनाचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत. देवगिरीचा गिरीदुर्ग जमिनीपासून 250 - 300 मीटर उंच व त्यावर पाण्याचे सात टाके आहेत. ते पण भुयारी मार्गाने एकमेकास जोडलेले व खडकात कोरलेले आहेत. आज पण जीवंत दिसतात. सिंहगडच्या किल्ल्यावर अनेक तलाव होते. आज 100 एक पहावयास मिळातात. यातील काही खडकात कोरलेले तर काही पृष्ठभागावर मातीचे वा दगडांचे बांध घालून निर्माण केलेले आहेत. जवळ जवळ असेच चित्र सर्व गिरीदुर्गांवर पहावयास मिळतात. रायगड, प्रतापगड, पुरंदर, तोरणा, अशीरगड, शिवनेरी, विशालगड, नरनाळा, अनकाई, पेमगिरी इत्यादी. या व अशा अनेक गिरीदुर्गावर तलावाची मालिकाच निर्माण केलेली आपणास पहावयास मिळते. नरनाळा, गाविलगड, पुरंदर वर तलावाची मालिकाच आहे. पाण्यामध्ये विपुलता निर्माण करणारी ही इतिहासकाळातील उत्तम उदाहरणे आहेत. पडलेले पाणी पृष्ठभागावर वा भूमिगत साठवणीत साठवून ठेवायचे आणि किल्ल्यातील वास्तव्यासाठी (राजघराणी, सैन्य, घोडदळ, हत्ती इ. ची) कायमची बारमाही पाण्याची सोय करण्याचे तत्व त्यांनी उत्कृष्टपणे हाताळलेले दिसते.
 खर्ड्याच्या भुईकोटातील हि विहीर

भुईकोट किल्ला तर जलसंधारणाचा एक आदर्श नमुनाच आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजवटीत निर्माण केलेले भुईकोट किल्ले हजारोंच्या संख्येमध्ये सापडतील. महाराष्ट्रातही अनेक आहेत. किल्ला म्हणजे शहरच. देवगिरीच्या पायथ्याच्या किल्ल्यामध्ये त्या काळी (11 वे / 12 वे शतक) लाखापेक्षा अधिक लोक रहात असावेत असे इतिहासकार सांगतात. अशा किल्ल्याला मजबूत अशा तटबंदी व त्याच्या बाहेर खंदकाची मालिका अशी त्यांची संरक्षणाच्या दृष्टीने रचना आहे. खंदकामध्ये बारा महिने पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था आहे. किल्ल्याच्या आत मात्र विहीर व बारवाद्वारे पाणी वापरण्याची व्यवस्था केलेली आहे. या विहीरी आणि बारवांना बारा महिने मुबलक पाणी पुरवठा होण्याचे गमक हे किल्ल्याच्या भोवती असलेल्या पाण्याच्या कड्यामुळे. म्हणून खंदक हे सुरक्षिततेपेक्षा पुनर्भरणाचे एक उत्तम साधन म्हणून वापरले जात होते असेच या निरीक्षणातून दिसून येते. आणि म्हणून किल्ल्यात पाण्याची चणचण जाणवली नाही. देवगिरीच्या पायथ्याचा किल्ला नगर, बीड, धारूर, परांडा, करमाळा, औसा नळदुर्ग, उदगीर, सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट, सिन्नर, बाळापूर, अकोला, आचलपूर, चंद्रपूर, विजापूर, बिदर, गुलबर्गा, फत्तेपूर सिक्री, आग्रा, दिल्लीचा लाल किल्ला, जुना किल्ला, तुघलक किल्ला, तंजावरचा किल्ला, कंधारचा किल्ला, चाकण, गोवळकोंडा, अशी अनेक इतिहासकालीन जलसंधारणाची, किल्ल्याच्या स्वरूपातील उदाहरणे आजपण जीवंत अवस्थेत पहावयास मिळतात. अशा खंदकात पाणी आणण्याची व्यवस्था ही आगळी वेगळीच आहे. गोवळकोंड्याच्या किल्ल्यात साधारणत: 5 कि.मी अंतरावरील दुर्गया या तलावातून भूमिगत कालव्याद्वारे पाणी आणल्याचे दिसून येते. कंधारच्या किल्ल्यासाठी वर जगतुंगसागर बांधलेला आहे. करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा व विजापूर येथील किल्ल्यासाठी तलावांची व्यवस्था आहे. नळदुर्गच्या खंदकात बोरी नदीच वळविलेली आहे. आग्रा व दिल्लीच्या लाल व जुन्या किल्ल्याच्या खंदकात यमुना नदी वळविलेली आहे. बीडच्या किल्ल्यात बिंदुसरा नदी वळविलेली आहे. औशाचा व परांडाचा किल्ला वाटीच्या आकाराचा आहे.

काही किल्ले नदीतच बांधलेले आहेत आणि यामुळे किल्ल्याचा एक तट तलावाची पाळ म्हणून काम करतो. सोलापूरच्या किल्ल्याने सिध्देश्वर तलाव निर्माण केला. चंद्रपूरच्या किल्ल्याने रामाळा तलाव निर्माण केला. फत्तेपूरसिक्रीचा किल्ला आणि तुघलक किल्ला हे तलावातच बांधलेले आहेत. तंजावरच्या राजवाड्याच्या खंदकातून ग्रॅड ऐनिकटचा कालवाच वहातो आहे.

किल्ल्याच्या तटबंदीचा उपयोग करून जसे किल्ल्याबाहेर तलाव निर्माण करण्यात आले त्याप्रमाणेच किल्ल्याच्या आत देखील तलाव निर्माण केलेली उदाहरणे आपणास अशीरगड, सिंहगड, गावीलगड, नरनाळा या ठिकाणी आजपण जीवंत अवस्थेत पहावयास मिळतात.

देवगिरीचा किल्ला हा गिरीदुर्ग व भुईकोट किल्ला यांचे उत्तम मिश्रण आहे. या ठिकाणची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील गिरीदुर्गाला देखील खंदक आहे. या खंदकासाठी जो खडक तासलेला आहे त्या ताशीव कामाला जगात तोड नसावी. या उंचावरील खंदकात पाणी कसे आणले असावे ? असा साहजिकच प्रश्न पडतो. आणि मग याचे उत्तर मिळते त्या काळी (1000 वर्षापूर्वी) त्या समाजाने जलगती (Hydraulics) आणि जलसंधारण (Rainwater Harvesting) या दोन शास्त्रात गाठलेल्या अत्त्युच्च उंचीकडून जवळच्याच साधारणत: 1 कि.मी अंतरावरील मौसाळा टेकडीवरून पावसाचे पाणी एकत्रित करून दोन नलिकाद्वारे (400 मि.मी व 200 मि.मी) जमिनीच्या चढउतारानुसार दगडी बांधकामात बांधून या खंदकात आणून सोडलेले आहे. जमिनीच्या चढउतारातील फरक हा 20 ते 25 मीटर इतका आहे. पावसाळ्याच्या अल्पकालावधीत या शुष्क प्रदेशात पडणारं तुटपुंज पाणी बारमाही वापरासाठी देवगिरीच्या खंदकात साठवून मोटेद्वारे पायथ्याच्या किल्ल्याभोवतीच्या प्रजेला, सैन्याला, हत्तीला पुरविण्याची व्यवस्था हा एक जल अभियांत्रिकी मधील जगातील उत्तम नमुना असावा. आज देखील ही व्यवस्था अभ्यासण्यासाठी व्यवस्थितपणे उपलब्ध आहे. या ठिकाणची वर्षा जल संधारणाची (Rainwater Harvesting) व्यवस्था, त्यासाठी वापरलेले जलगती शास्त्रातील तत्व हे जगातील, इतिहासकाळात उभे केलेले असं एकमेव उदाहरण असावे.
      देवगिरीसारख्या शुष्क प्रदेशात ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण 500 मि.मी आहे, तापमान 45 अंश च्या वर जाते आणि आर्द्रता ही 50 टक्के पेक्षाही कमी आहे, त्या ठिकाणी पाण्यात विपुलता निर्माण करण्यासाठी पाणी हाताळण्याची वेगवेगळी कौशल्य वापरलेली आपणास दिसतात. यादवकालीन बांधलेल्या तलावांची मालिका, शेवटच्या खंदकात (7 वा) बांधलेले ओळीतील बंधारे आणि त्यातून आजूबाजूच्या बारवांना व विहीरींना पाण्याचा मुबलक पुरवठा आजसुध्दा पहावयास मिळतो. यादवांनी जवळ जवळ 300 वर्षे राज्य केले. पाण्याच्या दृष्टीने निसर्गनिर्मित अवर्षणप्रवण अशा प्रदेशाचं रूपांतर मानवी कौशल्याच्याद्वारे पाण्याच्या विपुलतेत करण्यात आल्याचे उदाहरण येथे आपणास दिसते.
        यातून खालील प्रमुख कौशल्ये आपल्या नजरेसमोर येतात. 1. जलविज्ञान 2. जलगती शास्त्र 3. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) 4. Inverted siphon 5. पाणी साठवण 6. रॉक कटिंग 7. रेन वॉटर हार्वेस्टिंग 8. पाण्याचा बहुउपयोग इत्यादी पाणी उचलण्यास अडचण येवू नये म्हणून खंदकामध्ये (Diphragms) पडद्या ठेवलेल्या आहेत. त्या पडद्यातून एका ठराविक उंचीवरचे पाणी दुसऱ्या भागात जाते. पाणी व्यवस्थापनाचा सूक्ष्म विचार या व्यवस्थेतून आपल्याला दिसून येतो. पानकळा जर चांगला असेल तर खंदकामधील जास्तीचे पाणी बाहेर घेवून जाण्यासाठी एस्केपची (सांडवा) व्यवस्था केलेली आहे आणि या व्यवस्थेतून वाहणारे पाणी या किल्ल्याच्या शेवटच्या खंदकामधील बंधाऱ्याच्या साखळीत अडवून सिंचनाची व्यवस्था केलेली आज पण आपणास पहावयास मिळते. रेन वॉटर हार्वेस्टिंग एक जगातील उत्कृष्ट नमुना आणि त्याद्वारे खंदकामध्ये पाणी भरण्याची व्यवस्था आणि त्या पाण्याचा उपयोग वर्षभर करण्याची सोय हा यातील एक महत्वाचा धागा आपणास मिळतो.
       उस्मानाबाद - सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर करमाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अलिकडे म्हणजे 17 व्या शतकानंतर हैद्राबाद निजामाचा मराठी सरदार निंबाळकर यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे. हा भागसुध्दा दुष्काळी, पाऊस हा 500 मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान 45 अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे. या ठिकाणचा राजा रावरंभा निंबाळकर त्याच्या काळात बांधण्यात आलेले कमलादेवीचे मंदीर आणि त्याच्या पुढील भागात 96 पायऱ्यांची बारव आज देखील पहाण्यास उपलब्ध आहे.
करमाळा गावास मात्र जुना इतिहास आहे असे स्पष्टपणे या ठिकाणच्या वास्तूंवरून दिसते. त्या गावामध्ये एक लहानसा भुईकोट किल्ला आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या भोवती दोन खंदक आहेत. खंदकाच्या आत दोन यादव / चालुक्याच्या काळातील उत्कृष्ट देवळे आहेत. किल्ल्याला लागूनच एक बारव आहे. किल्ल्याच्या आत एक कारंजा बारव आहे. या किल्ल्याच्या अवतीभोवती जुने गाव आहे.
      त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार 150 - 200 फूट व्यासाचा आहे. तिची खोली 70 - 80 फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते. ही मोठ्या आकाराची प्रचंड विहीरी, विहीरखोदाईच्या शास्त्रातील आश्चर्य मानायला काही हरकत नाही. ती कढईच्या आकाराची आहे. ज्या लहानशा नाल्यावर हा तलाव बांधलेला आहे तोच नाला पुढे खंदकाला पाणी पुरवठा करतो. या सात विहीर नावाच्या मोठ्या विहीरीवरून करमाळा गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अलिकडे म्हणजे अगदी 1960 पर्यंत होत होता असे कळते. विहीरीपासून काढलेल्या एका नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असे. त्याला पुढे हौदाची मालिका जोडलेली आहे. ही व्यवस्था आजसुध्दा उध्वस्त झालेल्या अवस्थेत आपणास दिसते. दोन माणसाद्वारे किंवा रहाटाचा उपयोग करून या नलिकेला (पाईपलाईनला) सातत्याने पाणीपुरवठा केला जात होता असे सांगतात. अलिकडच्या काळात दूर अंतरावरून (सीना नदीतून) पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ही सर्व जुनी ऐतिहासिक व्यवस्था आज वापरात नाही.
   साधारणत: या गावाला जहागिरी जी मिळाली ती सतराव्या शतकापासून पुढची असेल, तर त्या ठिकाणच्या मंदिराचे अस्तित्व, विहीरीचे अस्तित्व यावरून या गावाचा इतिहास हा फार मागचा आहे हे दिसते. अशा कोरड्या हवामानाच्या, कमी पावसाच्या भागात हे ठिकाण वसलेले असतांना सुध्दा तलाव, त्याला जोडून विहीरी, त्या तलावाच्या नाल्याला खंदकाला जोडणारी जी पाणी वापराची व्यवस्था आहे असे म्हणायला काही हरकत नाही. किल्ल्यामध्येही बारा महिने विहीरीच्या माध्यमाने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था म्हणून खंदकाचा पुनर्भरणासाठी उपयोग केला जात होता.
       अशा शुष्क भागातसुध्दा पावसाचे पाणी तलावात साठविणे आणि त्या पाण्याला जमिनीत मुरवून विहीरीद्वारे त्या पाण्याचा मानवाच्या वापरासाठी उपयोग करणे आणि त्याच्याच जोडीला जास्तीचे झालेले पाणी खंदकात घेवून खंदक भरून ठेवणे आणि किल्ल्यातील पाण्याची व्यवस्था करणे हे कौशल्य आपल्याला या व्यवस्थेतून सापडते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विहीरी निर्माण करण्यापूर्वी त्या विहीरीमध्ये पुनर्भरण होण्याची व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता त्या काळातील लोकांना पटली होती. ही आहे, म्हणून या व्यवस्थेला सातत्य लाभलेले आहे. आज आपण विहीरी खोदतो पण पुनर्भरणाची सोय करत नाही आणि म्हणून विहीरीच्या जीवंतपणात सातत्य राहत नाही.
    वरील दोन्ही उदाहरणे, एक डोंगरी किल्ल्याचे व एक भुईकोट किल्ल्याचे, पण दोन्हीही अवर्षणप्रवण, कोरड्या, हवामानातील, हलक्या जमिनीतील आहेत. निसर्गत: पाण्याची चणचण असतानासुध्दा मानवी कौशल्यातून त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात विपुलता गाठलेली आहे. त्या ठिकाणचे सैन्य, हत्ती, घोडे व प्रजा यांना पुरेल इतकी पाण्याची व्यवस्था त्यांनी सर्वप्रथम केलेली होती. करमाळा येथील मंदिरे, विहीरी, तलाव या व्यवस्था पुन्हा आपणास यादव काळ आणि त्यांच्याही पलिकडे घेवून जातात. या ठिकाणच्या 96 पायऱ्या असलेल्या विहीरीचा उपयोग हा मर्यादित असावा कारण त्याच्या वरच्या भागात भूजलाला आधार देण्यासाठी पुनर्भरणासाठी तलावाच्या स्वरूपात वा अन्य प्रकारची सोय नाही. ही सोय किल्ल्याच्या जवळील सात विहीरीला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जमिनीतून जितका उपसा कराल त्याच्यापेक्षा जास्त पाणी मुरविण्यासाठी आपण जोपर्यंत व्यवस्था करणार नाही तोपर्यंत पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेला सातत्य लाभणार नाही हा निष्कर्ष या व्यवस्थेतून आपणास मिळतो.

किल्ल्यांवरील पाणी स्थिरीकरण योजना. (Water Stabilisation Systems on the Forts)

पेडका किल्ल्यावरील एका खाली एक असलेले तलाव
  किल्ला लढता ठेवण्यासाठी सैनिक अन्नधान्या इतकेच किंवा त्याहून जास्तच पाणी साठ्याला महत्व होते. त्यामुळे हा पाणी साठा वाढवण्याचे,  त्या टाक्यात, तलावात जास्तीत जास्त पाणी साठवण्याच्या अनेक युक्त्या आपल्या पूर्वजांनी (त्याकाळच्या स्थापतींनीं) शोधून काढल्या होत्या.  
      पाणी स्थिरीकरण म्हणजे काय? डोंगरावरून, जमिनी वरून वहात येणारे पाणी आपल्या बरोबर माती, गाळ, कचरा घेऊन येते. हा गाळ टाकी, तलावात साठत जातो. या गाळावर पडणार्‍या साठलेल्या पाण्याच्या दाब पडल्यामुळे मातीचा थर सिमेंटसारखा घट्ट होतो. अशाप्रकारे दरवर्षी साठत जाणार्‍या गाळामुळे अनेक तलाव व धरण भरून जातात किंवा कायमची बाद होतात. पाण्याच्या दाबामुळे घट्ट झालेला हा गाळ काढणे ही मोठी खर्चिक व वेळकाढू बाब होते. त्यामुळे पाण्याबरोबर येणारा गाळ खाली बसावा, मुख्य टाक्यात, तलावात येऊ नये यासाठी वहाते पाणी थोडावेळ थांबवून (स्थिरकरून) त्यातील गाळ खाली बसवण्यात येतो. यालाच पाण्याचे स्थिरीकरण म्हणतात. महाराष्ट्रातल्या बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी अशा अनेक योजना राबवलेल्या पाहायला मिळतात.
पेडका किल्ल्यावर पाण्याचा मुख्य मोठा तलाव प्रवेशव्दाराच्या वरच्या अंगाला आहे. या तलावाच्या वर डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वहात येणारे पाणी थेट मोठ्या तलावात जाऊन तॊ गाळाने भरू नये यासाठी या तलावाच्या वर २ छोटे तलाव बनवलेले आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहाणारॆ पाणी व गाळ जमा होतो. तो तलाव भरला की वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या बांधीव तलावात येते. इथे पाण्याला पुन्हा एकदा स्थिर करून त्यातील गाळ खाली बसवला जातो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो. याशिवाय २ अतिरीक्त पाणी साठे तयार होतात आणि दरवर्षी वरच्या २ छोट्या तलावातील गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येतो.

मनोहर गडावरील पाणी जाण्यासाठी तटबंदीतील मोर्‍या
मनोहर गडावरील तलावाचे अवशेष
   
 मनोहर - मनसंतोषगड हे तळकोकणातले किल्ले, या भागात महामूर पाऊस पडतो. पावसाळ्यात मनोहर गडावरच्या वाड्यामागून एक ओढा वाहातो. आता गडाची तटबंदी जिथे कोसळलेली आहे तेथून या ओढ्याचे पाणी खालच्या दरीत पडते. किल्ला बांधतांना त्यावेळेच्या स्थापतींनी या ओढ्यातील पाण्याचा वेग कमी करण्यासाठी व पाणी साठवून त्याचा निचरा करण्यासाठी तटबंदी जवळ एक तलाव बांधला होता. तसेच तटबंदीत जागोजागी पाणी जाण्यासाठी मोर्‍या बांधल्या होत्या. आजही नीट पाहिले तर गाळात गाडल्या गेलेल्या तलावाचे अवशेष व ढासळलेल्या तटबंदीत पाणी जाण्यासाठी बांधलेल मोर्‍या पहायला मिळतात. ओढ्याचे पाणी आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन असे. ते पाणी तलावात आणून त्याचा वेग कमी केले जाई व पाणी स्थिर केल्यामुळे त्यातील गाळ ही खाली बसत असे. तलावाच्या बांधावरून बाहेर पडणारे पाणी तटबंदीतील मोर्‍यांवाटे दरीत जात असे. अशा प्रकारच्या योजनेमुळे ओढ्याच्या पाण्याचा अतिरीक्त दाब पडून तट्बंदीला धोका होत नसे व गडावरील वापरासाठी अतिरीक्त पाणी साठा पण तयार होई.
पाण्याचे टाकं, असावा 

                                                                                                                                                
               ठाणे जिल्ह्यातील बोईसर जवळ असावा किल्ला आहे. या किल्ल्यावर एक प्रचंड मोठ पाण्यचं टाक आहे. या टाक्याच्या तीन बाजू कातळात कोरलेल्या असून एक बाजू दगडांनी बांधलेली आहे. डोंगरावरचे पाणी कातळ उतरावरून टाक्यात पडते. त्या पाण्याबरोबर येणारा गाळ टाक्यात जाऊ नये म्हणून येथे कातळात जागोजागी रूंद व खोल खळगे कोरलेले आहेत. त्यात वहात्या पाण्यातला गाळ साठून रहात असे व शुध्द पाणी तलावात जात असे . तसेच या खळग्यात साठणारा गाळ काढणे पण सोपे होते.
         याशिवाय बर्‍याच किल्ल्यांवर पाणी स्थिरीकरणासाठी उतारावर एकाखाली एक पाण्याची टाकी कोरलेली पहायला मिळतात. या रचनेमुळे डोंगर उतारावरून येणार गाळमिश्रीत पाणी सर्वात वरच्या टाक्यात पडत असे. ते टाक भरल्यावर पाणी पुढच्या टाक्यात जात असे. अशाप्रकारे सर्वात वरच्या टाक्यातच जास्तीत जास्त गाळ साठत असे. त्यामुळे गाळ कमी पैशात व मनुष्यबळात उपसता येत असे.

शिवकाळातील जल व्यवस्थापन
 सह्याद्रीच्या शिखर माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे.' गड व पाण्याच्या देखभालीसाठी त्यांनी म्हटले की लोहार, सुतार, पाथरवट यांना गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवाव्या. लहान-सहान गडांवर यांचे नित्यकाम पडते असे नाही. याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्यांजवळी तयार असो द्यावी. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन त्यांनी दूरदृष्टीने करून ठेवले होते.

    शिवकाळात पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जात असे याचा अभ्यास म्हणून रायगडावर पाण्याचे व्यवस्थापन केले आहे ते पाहू.

किल्ले रायगड येथील पाण्याचे व्यवस्थापन

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड येथील जल व्यवस्थापन तर खास अभ्यासण्याजोगी आहे. रायगडावरील लेणी व डोंगराच्या पोटात खोदलेली खांब टाकी पाहिल्यावर लक्षात येते की रायगड हा प्राचीन गड असून त्याला किमान दीड हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. शिलाहार राजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक राजवटी रायगडावर नांदल्या आहेत. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यावर रायगड स्वराज्यात दाखल झाला. शिवाजी महाराज जातीने रायगडावर आले. सरळसोट भिंतीसारखे चहूबाजूने तुटलेले उभे कडे, दीड गाव उंच आणि वर चौरंगासारखा दीड मैल लांब आणि १ मैल रुंद सपाट माथा पाहिल्यावर 'तख्तास हाच जागा करावा' असे त्यांच्या मनात आले आणि स्वराज्याची राजधानी रायगड सजू लागला.
    राजधानी रायगडावर मुबलक पाणीसाठा आहे. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि निकामी झालेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत. त्यातील गंगासागर तलाव हा सर्वात मोठा असून राजवाड्यासमोरच तो बांधण्यात आला आहे. महादरवाजा, तटबंदी, बुरूज, राजवाडा, जगदीश्वर मंदिर आणि सेवकांची जवळजवळ तीनशे इमारती रायगडावर बांधण्यात आल्या. त्यासाठी लागणारा दगड गंगासागर व इतर तलावांतील दगड खाणीतून काढलेला आहे. राज्यभिषेकावेळी सप्तनद्यांचे पाणी गंगासागर तलावात टाकले आहे. या तलावांखेरीज पाऊणशे पाण्याची टाकी आहेत ती गडमाथ्यावर, गुंफेत व कड्याच्या पोटात राजवाड्यापासून भवानी टोकापर्यंत आणि वाघ दरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी त्या खोदलेल्या आहेत. रायगडावरील दहा हजाराच्या शिबंदीला पुरून उरेल एवढा प्रचंड पाण्याचा साठा रायगडावर होता. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाख असामी आले होते. हे तत्कालीन कागदपत्रे व इंग्रज, पोर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. या समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली होती. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. कौटिल्याने दोनहजार चारशे वर्षांपूर्वी पर्जन्यमापकाचा उपयोग शेती आणि धरणे बांधण्यासाठी केला होता. रायगडावरील दगडात बनवलेले हे पर्जन्यमापक त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे आधुनिकच म्हटले पाहिजे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजत असल्यामुळे रायगडावरील शिबंदीसाठी किती तळी खोदावी लागतील, त्यासाठी त्यांची लांबी-रुंदी व खोली किती ठेवायची म्हणजे त्यात साठलेले पाणी पुढील पर्जन्यकाळापर्यंत पुरेल याचा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यविशारदाने अंदाज घेऊन गडावरील विद्यमान तलाव बांधण्यात आले आहेत.
     पाऊस योग्य वेळी व योग्य तेवढाच पडला तर धान्य भरपूर पिकते आणि गवत चाऱ्याचेही चांगले पोषण होते. शेती हा भारतातील महत्त्वाचा व्यवसाय, त्यासाठी राज्याचा कोष हा मुख्यत्वे शेती उत्पन्नावर आधारित असल्यामुळे शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक श्री. गोपाळ चांदोरकर (अर्किटेक्ट) यांच्या प्रथम ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या 'वैभव रायगडचे' या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. बाजूचे छायाचित्र त्या दगडी पर्जन्यमापकाचे आहे. कुशावर्त तलावाच्या काठी एक शिवमंदिर आहे. त्याच्या उत्तरेकडील एका खोलगट भागात हे दगडी पर्जन्यमापक आहे. रायगडावर आठ तलाव होते. त्यापैकी गंगासागर आणि कोळीम तलावाचेच पाणी सध्या रायगडावर वापरण्यात येते. रायगडावर रोज येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्यावर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे पाहता साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे नियोजन किती दूरदृष्टीने केले होते याची कल्पना येते.
   शिवाजी महाराजांनी जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला आहे. सभोवताली तटबंदी आहे. आत २००' x ४००' फूट लांबी-रुंदीचे वाड्याचे जोते आहे. घोडे बांधण्यासाठी त्यात लोखंडी गोल कडी आहेत. वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर दगडी बांधकाम आहे. त्यावर दगडीबैठक आहे. हिला 'तक्क्याची विहीर' म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर अद्यापही जीवनरस उराशी घेऊन उभी आहे.
    किल्ले रायगड ज्या सह्यरांगेत उभा आहे त्याच्या जवळपास अनेक डोंगर, दऱ्या जरी असल्या तरी भौगोलिक दृष्टया किल्ले रायगड भागवत धर्माची पताका हातात घेऊन उभा असलेला एकांडा शिलेदार आहे. त्याच्या जवळपास असणाऱ्या सह्य रांगांतून मनमानी अवस्थेत वाहणाऱ्या काही बारमाही नद्या आहेत तर काही फक्त पाउसकाळी वहाणाऱ्या आहेत. त्यातून कोकणातील नद्या अल्पजीवी असल्यामुळे त्यांचे पाणी किती आणि कधी असेल ह्याचा भरवसा नाही. त्यातून अल्लड मुलींसारख्या धावत जाणाऱ्या नद्या ‘खो......’ अस म्हणत समिंदरात कधी विलीन होतात ते ही समजत नाही. जिथे त्या आपल्या पित्याच्या मांडीवर विसावतात त्या त्या ठिकाणी बंदरे बांधलेली आहेत. किल्ले रायगड परिसरात वहाणाऱ्या नद्या तरी किती ..... अंबा, कुंडलिका, गांधारी, सावित्री, मांदाड, भोगेश्वरी, निगडी, शहापूर, घोडनदी, निजामपूर, काळनदी, बामणघरनदी, नागेश्वरी, रामराजनदी, बालेनाडी, कामथी, गांधारी, पेरेनदी, चोलानदी एक न दोन........ पण ह्या नद्यांचा किल्ले रायगडावरील पाणी व्यवस्थेकरीता काहीही उपयोग नाही.
         किल्ले रायगडाच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल विचार करायचा तर त्याबाबत वाचनात आलेले पुढील प्रमाणे “राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडीयावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे...” थोडक्यात काय गडावर कुठेही पाणी घरून राहील अशी एकही जागा नाही. जरी किल्ले रायगड म्हणजे कोरा कातळ असेल तरी त्यातून पाणी कधी आणि किती वेळ सोडले जाईल ह्याचा काही नेम नाही......
      किल्ले रायगड म्हणजे प्रत्यक्ष राजधानी, अठरा पगड जातीची माणसे तिथे राबणार. विविध जाती धर्मांची राहायची ठिकाणे वेगळी, जायचे यायचे मार्ग वेगवेगळे, रीतीभाती वेगळ्या.इतक्या विचित्र आणि विविध पद्धती सांभाळायला पाणी कसे काय आणले जात असेल पाणके जरी असले तरी रोज खाली नदीवरून पाणी भरून गडावर आणणे निव्वळ अशक्य....
        मग कसे काय बर असेल व्यवस्थापन ?
      रायगडावर साधारण १० – १२ मोठे जलसाठे असून लहान मोठ्या टाक्यांची संख्या जवळपास ३० आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित “आज्ञापत्र” मध्ये गडावरील पाण्याचा विशेष उल्लेख केलेला आढळतो....”गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो अवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टांकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावर झराही आही, जसे तसे पाणी पुरते म्हणून तितकीयावारी निश्चिती न मानावी. किनिमित्य की, झुंजामध्ये भांडीयांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष वाढतो. जेव्हा संकट पडते, याकरीता तसे जागी जाखिरीयाचे पाणी म्हणून दोन-चार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे.... गडाचे पाणी बहुत जतन राखावे ....”
     श्री जगदिश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या शिलालेखातही शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांनी या जलसाठ्याचा ... वापी कूप तडाग राजिरुचीरं ... असा उल्लेख करून जलसाठ्याची वैविध्यता आवर्जून सांगितली आहे. आपण सामान्य माणसे किल्ले रायगडावरील पाण्याचा साठ्यासाठी काही ठराविक ठिकाणेच नजरेसमोर आणतो.... उदा. पहिला गंगासागर तलाव.
गंगासागर तलाव
      रायगडावरील बांधकामासाठी वापरलेला दगड प्रामुख्याने ह्या जागेवरून खणून काढला असून तेथे साधारणपणे १३० x ११० मीटरचा महाकाय खड्डा तयार झाला. त्याच्या उतारावर एक भिंत बांधून मोठा जलाशय निर्माण केला गेला. राजवाड्यालगतच असलेल्या या तलावाची निर्मिती पाणाडी याच्याकडून पाण्याचा ठाव धेऊन झाली. या तलावास बालेकिल्ल्याकडून बारमाही लहानमोठे झरे असावेत, नाही तर हा तलाव बालेकिल्ल्याच्या इतक्या नजीक खोदण्याची काही गरजच नव्हती. मुख्यत्वे हा तलाव राजमहालातील पाण्याची गरज भागवण्याकरीताच निर्माण केला गेला. गेल्या ३०० - ४०० वर्षात आजूबाजूच्या भागातून वाहून आणली जाणारी माती गंगासागर तलावात साचत राहिली. त्यामुळे तलावात पाणीसाठा कमी होत गेला. ह्या गाळाच्या दाबाने गंगासागराच्या भिंतीवरही दाब येत होता, साठत गेलेल्या गाळाने तिथल्या पाण्याची प्रत कमी होत होती. एखाद्या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तर गंगासागराचे तेच गढूळ पाणी वापरावे लागत होते. ह्या तलावातला गाळ काढण्याचे महाकठीण काम पुरातत्व खात्याने १९७२ साली करण्याचे योजले होते, पण त्याच सुमारास अत्यंत वादळी पाऊस पडल्याने ते काम पूर्णत्वाला गेले नाही. तद्नंतर १९८७ मध्ये विशेष पंपाच्या सहाय्याने तब्बल ५० हजार गणफुट  (50000 cu.ftयेवढा गाळ काढण्यात आला
गंगासागराच्या पाठोपाठ माहिती असलेला जलाशय म्हणजे कोळींब तलाव.
कोळींब तलाव.
श्री जगदीश्वर मंदिरातून पश्चिम दिशेच्या उंबरठ्याबाहेर पडलो की आपण रायगडाच्या राजपथावर येतो. त्या महामार्गाच्या एका बाजूला थोडासा खालच्या दिशेला अनेक जुने पुराणे अवशेष आहेत. या अवशेषांच्या बराच खाली कोळींब तलाव आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता उरलेल्या आठ महिन्यात कितीही उष्मा असला, किंवा कितीही पाणी शेंदले गेले तरी या तलावातील पाणी कमी होत नाही. कोळींब तलावातील पाण्याचा वापर श्री. जगदीश्वर मंदिराच्या ओवरीत वास्त्यव्याला रहाणारे भाविक, यात्रेकरू, भिक्षु वगैरे स्नान-संध्या, पूजा-अर्चा, अभिषेक, पिणे – धुणे यासाठी वापरत असत. सध्या ह्या तलावाची परिस्थिती काही वेगळी नाही. ह्यातही बराच गाळ साचलेला आहे, पण हा गाळ कधी उपसला गेला आहे की नाही ह्याची निदान माझ्या वाचनात तरी नोंद नाही.
या नंतर सर्वप्रचलीत असलेला तिसरा तलाव म्हणजे हत्ती तलाव.
हत्ती तलाव
हा तलाव पहाण्यासाठी आपल्याला रायगडावर जुन्या वाटेने चढून जावे लागते. त्या वाटेने गेल्यास जो पहिला मोठ्ठा तलाव लागतो तो म्हणजे “हत्ती तलाव”. या तलावाच्या तळाशी असणाऱ्या खडकात अनेक लहान मोठ्या भेगा असल्याने, पावसात सुद्धा ह्या तलावात हल्ली पाणी साठत नाही. त्याकाळात पाणी साठवले जात असावे कदाचित. ह्या तलावाला “हत्ती तलाव” हे नाव का पडले असावे ते ही कळत नाही. किल्ले रायगडावरील इतर वास्तू निर्मितीसाठी कदाचित ह्या ठिकाणाहून खोदकाम करून दगड काढले गेले असावेत. खडकात खोदलेला अंडाकृती खड्डा सुमारे ४० x ३० मीटरचा असून त्या खड्ड्यात पाणी साठवले जावे म्हणून बांध घातला गेला असावा. कदाचित ह्या तलावातील पाणी हत्तींना अंघोळ घालण्यासाठी वापरले जात असावे कारण ह्या तलावावरून हत्तीमहाल जवळच आहे. कदाचीत या तलावातील पाणी हुजूरबाजारातील बहुजन समाजाकडूनही वापरले जात असावे. ह्या तलावावर रहाट असण्याच्या खुणा आढळतात.
       हे झाले किल्ले रायगडावरील बहुचर्चीत जलाशय. आता आपण उरलेल्या अनेक छोट्या मोठ्या जलाशयांवर नजर टाकूया. त्यासाठी आपल्याला रज्जूमार्गाने किल्ले रायगडावरून उतरून हिरकणीवाडीतल्या आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पाचाड जवळील खुबलढा बुरुजमार्गे किल्ले रायगड परत एकदा सर करावा लागेल.   चला मग...... !
       हा रस्ता चढत असताना किल्ले रायगडावरील साधारणत: पहिल्या टाक्याचा उल्लेख मदारमाची जवळ असल्याचा आढळतो. “अदमासे अडीचशे फुट उंचावर चढल्यावर, मदारमाचीचा टप्पा लागतो. पण त्या आधी कड्याच्या डाव्या बाजूने गेल्यास एक टाके लागते. टाक्यांची वाट कठीण आहे,.... सध्या टाके ओहारलेले आहे. गाळाने भरून गेलेले आहे. तरी पण त्यातील दोन भाग स्पष्ट दिसतात. एका भागात छताला आधार देण्यासाठी खांब सोडलेले आहेत .”.
      येथून पुढे अगदी पार महादरवाजा लागेपर्यंत एकही टाके अथवा तळे असल्याचा उल्लेख नाही. महादरवाजाच्या कमानीतून आत गेल्यावर समोरचा रस्ता बंद असल्याचा आभास होतो. महादरवाजा पार करेपर्यंत आपण मेटाकुटीला आलेले असतो. त्यातून पुढचा रस्ता बंद असल्यासारखे वाटल्यावर आपण मटकन खालीच बसतो. ज्या ठिकाणी हे सर्व होते, ती जागा आहे महादरवाज्यावरील पहाऱ्याची.या ठिकाणी जरा वरच्या बाजूच्या कड्यात थोडीशी खोदलेली पाण्याची टाकी होती. या ठिकाणी घडून गेलेला एक विलक्षण प्रसंग इतिहासात नोंदलेला आहे .”इ.स.१७८७ मध्ये रायगडावर मुसळधार पाउस पडून महादरवाजावरील हौद रात्रीच्या वेळी फुटला व पाण्याचा तुफान लोट वाहू लागला. दरवाजा उघडून पाण्यास रस्ता करून देणे अवघड झाले. तेथील मोऱ्या तुंबल्या आणि पाणी जाईना.थोड्यावेळाने मोऱ्यावरून पाणी वाहून जाऊ लागले आणि दरवाजा कोसळण्याचा प्रसंग उभा राहिला.”  शहाजीराजांच्या भातवडी युद्धात त्यांनी वापरलेली रणनीती शिवाजी महाराजांनी महादरवाजा उभा करवताना वापरली असावी. किल्ले रायगड तळापासून बुद्धी आणि बळ वापरून उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करत शत्रूसैन्य जर महादरवाजापाशी पोहोचलेच आणि महादरवाजा सुद्धा त्यांच्या ताब्यात जायची वेळ आलीच तर ,गडावरून ही चारही टाकी फोडून टाकायची ज्यायोगे पाण्याचा महापूर येईल, सोबत दगड, धोंडे, झाडे, कचरा वगैरे बरोबर घेऊन ते पाणी धावत सुटेल. अशा प्रसंगी शत्रूची दाणादाण उडेल, आणि शत्रू चदाईचा नाद सोडून स्वत:चा जीव वाचवत माघारी फिरेल.असा विलक्षण विचार करून ह्या टाक्या बांधल्या गेल्या असाव्यात.
       महादरवाजा मागे टाकून, शाही माणसे किंवा ज्या मानकऱ्याना पालखीचा मान आहे ती माणसे, पुढे गेल्यावर त्यांच्या पालख्या “पालखी मार्गावरून” जात असाव्यात.त्या काळात दासी, कुणबिणी ह्याच पालखी मार्गावरून जा – ये करत असाव्यात. विशेषत: राजस्त्रियांच्या पालख्या सर्वांसमोरून किंवा सर्वसामान्य महाजन मार्गावरून साहजिकच जात नसाव्यात. आज जर आपण रायगडावर गेलो तर हा पालखीचा मार्ग कुठे आहे हे शोधूनच काढावे लागते. ह्या मार्गाने गेल्यास आपण सरळ पालखी महालाच्या समोरच्या पटांगणात येऊन पोहोचतो. ह्या रस्त्यावर पाण्याची काही टाकी आणि त्यांचे अवशेष नजरेत भरतात. आजमितीला या टाक्यात अजिबातच पाणी नसून नुसती माती आहे. 
      गंगासागर तलावावरून हिरकणी कड्याकडे जाताना थोड्या उतारावर पाण्याच्या टाक्यांचे अवशेष आहेत. ह्या टाक्यांच्या उपयोग गस्तीवरील शिपायांकडून केला जात असावा. याच रस्त्यावरून थोड पुढे गेल्यास बालेकिल्ल्यातील राणीनिवासाच्या मागच्या दिशेला थोड्या अंतरावर काही वाड्यांचे अवशेष आढळतात. (माझ्या अभ्यासानुसार हे वाडे चिटणीसांचे असावेत. काही महत्वाच्या पत्रलेखनाकरीता महाराजांना कधीही चिटणीसांची गरज भासत असे. प्रत्येक वेळी चिटणीस यांचे येणे – जाणे सर्वांनाच समजण्याचे काहीच कारण नव्हते. म्हणून त्यांचा वाडा महाराजांच्या निवासाजवळ बांधला असावा. तत्कालीन चिटणीस म्हणजे बाळाजी आवाजी चित्रे.त्याच्या वाड्याजवळ त्यांच्या स्वत:साठी पाण्याची वेगळी व्यवस्था होती. आज ह्या सुद्ध्या टाक्यात पाणी सोडून सर्व गोष्टी आहेत. ह्याचा टाक्याच्या पुढे चिटणीस घराण्यातील माणसांना पर्वकाळी स्नान करण्यासाठी वेगळा बंधारा सदृश जलाशय राखला गेला होता ह्याची नोंद आहे.
     या रस्त्यावरून हळू हळू चालत आपण हिरकणी कड्याच्या बाजूला पोहोचतो. आज ह्या कड्यावर आपला तोल जाऊ नये म्हणून उपाययोजना केलेली आहे. ह्या दिशेच्या बुरुजावर गस्त घालणाऱ्या सैनिकांसाठी आणि या भागातील गावकरी माणसांकरीता हिरकणी कड्यावर पाण्याची वेगळी व्यवस्था राखली गेली होती. आजही ह्या दिशेला भग्न असलेली पाण्याची टाकी दिसतात.
    रायगडावरील देशमुख उपहारगृहावरून आपण टकमक टोकाकडे जाऊ लागलो की आपल्या उजव्या हाताला कड्याजवळ चांभार टाके / हनुमान टाके लागते.
चांभार टाके
    संपूर्ण रायगडावर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यापैकी याच टाक्यांचे पाणी अतिशय स्वच्छ आणि थंडगार लागते. हे टाके सुमार ९ x ८ मीटर लांब रुंद आहे. ह्या टाक्याचा मध्ये विभाजक भिंत आहे. हत्ती तलाव, टकमक टोक आणि तेथील कोठारे या परिसरात असणाऱ्या वस्तीसाठी ह्या टाक्याची निर्मिती केली गेली असावी
कुशावर्त तलाव
      तुलनेत सर्वात कमी भेट दिली जाणारी जागा म्हणजे कुशावर्त तलाव आणि त्याच्या जवळच असलेले व्याडेश्वर / रामेश्वराचे मंदिर. काळकाईच्या खळग्यात उतरणाऱ्या जलप्रवाहाच्या मार्गात हा तलाव दगडांनी बांधून काढलेला आहे. सध्या त्यात फारच जरासे पाणी असते. तलावात आत उतरण्याकरिता पायऱ्या बांधलेल्या आहेत. ब्राम्हण वर्ग तसेच शाही माणसांच्या पर्वकाळी स्नानासाठी कुशावर्त तलावाची निर्मिती केली गेली असावी.
       कुशावर्त तलावाच्या जवळपास आपल्याला अनेक लहान मोठ्या वाड्यांचे भग्नावशेष दिसून येतात. माझा ज्ञानाप्रमाणे हे प्रधानमंडळाचे वाडे असावेत. यात मोरोपंत पिंगळे यांचा वाडा असावा. अत्यंत प्रशस्त बहुदालानी चौसोपी वाडा पंतप्रधानांचा असूच शकतो. ह्या वाड्याच्या जवळच एक अप्रतीम पाणवठा / त्याचे भग्न अवशेष आहेत. वाड्याच्या उतारावर जमिनीतून निघणाऱ्या जलप्रवाहाचा ठाव घेऊन त्यावर जाळी बसवली गेली असावी. त्या झऱ्याचे पाणी एका पन्हाळीतुन कुंडात आणि कुंडातून टाक्यात साठवले जावे अशी विलक्षण रचना केली असावी.
    त्या वाडेसमुहावरून उतारावर उतरून गेल्यावर एक टाक्यांच्या समूह लागतो. त्यातील डोंगराच्या पोटात खोदलेल्या टाक्याला वरील दगडी छत तोलून धरण्यासाठी एक चौकोनी खांब आहे. ह्या टाक्यांच्या थोडा समोर उतरणीवर अजून काही टाकी आहे.
     येथून पुढे पाय खेचत खेचत आपण दारू कोठारापर्यंत पोहोचतो आणि धपकन बसतो तिथेच. ह्या दारू कोठाराच्याजवळ आसमंतात वाडे, घरे असल्याच्या खुणा नाहीत. मात्र काही अंतरावर अग्निप्रलयकालीन संरक्षक योजना म्हणून पाण्याची टाकी आहेत. दारुकोठाराजवळच बाराटाकी आहेत.
बाराटाकी
बारा टाकी परिसरात लष्करी अधिकारी निवासस्थाने असल्याचा उल्लेख आहे. या लोकांकरिता वाड्याच्या एका बाजूस आणि जगदीश्वर मंदिराच्या खाली बंधारा घालून तलाव निर्माण केलेला आहे. हा बंधारा सध्या रिकामा असून त्यात भरपूर कचरा साठलेला आहे.
       बारा टाकी परिसरातून पुढे गेल्यावर आपण वाघदरा परिसरात येऊन पोहोचतो.  हशमांच्या वैयक्तिक गरजा, तक्रारी, रजा, गैरसोयी, मतभेद, अन्नधान्य, लाकुडफाटा वगैरे गोष्टींसाठी या ठिकाणी सदर होती. या बुरुजावर असणाऱ्या हशमांसाठी वाघदरा सदरीपासून बऱ्याच उतारावर पाण्याचे तळे होते असा उल्लेख मिळतो. शिवकाळात या तळ्याचा वापर भवानी बुरुजावरील सैन्यासाठीही  केला जात असावा. सध्या तिथे तळे होते याचा काहीच पुरावा / भग्नावशेष नाहीत. 
      श्रीभवानीकडा पाहून आपण मागे फिरल्यावर बऱ्याच उतारावर एक तलाव आहे, ज्याचे नाव आहे “काळा हौद” त्याच्या जवळपास असणाऱ्या हुजुरातीच्या सैनिकांना पाणी पुरवणारा हा तलाव आहे. ह्या तलावाला बाराही महिने पाणी असते.
      भवानीकडा, शिवसमाधी, श्री जगदीश्वर मंदिर वगैर वरून आपण पुन्हा राजपथावर येतो. ह्या राजपथाच्या डावीकडे कर्णिक निवासस्थाने, तसेच त्यांच्या समोर ब्राम्हण वसाहत असावी. या ब्राम्हण वसाहती करता स्वतंत्र अशा एका पाणलोटावर बंधारा घाऊन पाण्याची सोय केलेली दिसते. या पाणवठ्यावर पाणी भरणे, कपडे धुणे वैगैरे कामे घरची आश्रित मुले करत असत.
       गेल्या अनेक वर्षात या तलाव – टाकी आणि इतर पाण्याच्या स्त्रोतांकडे आपण सर्वानी पुरेसे दुर्लक्ष केले आहे. या अनेक तलाव आणि टाक्यांमध्ये दगड माती पडून गाळ साठला आहे, तर काही जलाशय नामशेष झालेले आहेत. आपल्याकडील हा ठेवा जपण्यासाठी, जलस्त्रोतांची नियमित स्वच्छता करण्यासाठी, त्यात घाण कचरा साठू नये, तसेच नियमित गाळ काढला जाऊन त्यात अमृताहून गोड पाणी कायम स्वरूपी साठवले जाईल, या साठी योग्य ती उपाययोजना करणे खूपच गरजेचे आहे.
   रायगडावर पुरातत्व खात्याच्या अध्यक्षतेखाली श्रमदान शिबिरे घेतली गेली पाहिजेत, असे झाले तरच गडावर उदंड स्वच्छ पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध होईल, ज्या ठिकाणचे पाझर कामी झाले आहेत ते साफ करून पुन्हा पूर्ववत करता येतील, ज्या काही कारणांमुळे तळाशी / बांधांमध्ये भेगा पडल्या आहेत, त्या कायमस्वरूपी बुजवून टाकता येतील, मात्र ही बांधकामे खूपच जुनी आहेत, त्यात पाणी साठवले गेले, आणि अचानक पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपल्याने भिंतीवर ताण येऊन ते कोसळणार तर नाहीत ना या कडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर पाणी साठवण्याच्या नादात तलाव कायमस्वरूपी रिकामे होतील, भग्न पावतील.ह्या गोष्टींकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि असे झाल्यास मंदिरातील शिलालेखातील “.......वापी कुपतडागराजी रुचिरं रम्य वनवितीके.....” हे वाक्य सुफळ संपूर्ण व्हायला वेळ नाही लागणार.
  इसवी सन १६७१- ७२ च्या एका जाबत्यामध्ये (समकालीन कागदपत्र) रायगडासाठी पन्नास हजार होनांची तरतूद झालेली दिसते. त्यांपैकी दोन तलावांसाठी वीस हजार होन, दुर्गासाठी पाच हजार होन, चुनेगच्चीसाठी दहा हजार होन व तटबंदीच्या कामासाठी पंधरा हजार होन अशी ती तरतूद होती. तेथे हे कलम महत्त्वाचे आहे, की पन्नास हजार होनांपैकी चाळीस टक्के रक्कम ही तलावांच्या म्हणजेच, पाण्याच्या सोयीसाठी वर्ग झाली होती. दुर्गांच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ती बाब पुरेशी आहे असा विचार गडअभ्यासक मिलिंद पराडकर यांनी मांडला आहे.
     शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले असेल. 

   जलव्यवस्थापन हा बराच गहन आणि विस्तृतपणे विचार करावा असा विषय आहे. या लेखात त्याचा शक्य तितका सखोलपणे आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. एखाद्या गडावर गेल्यानंतर फार अवशेष नाहीत म्हणून अनेक जण निराश होउन परत येतात.पण अगदी छोट्या गड, कोटावरही पाण्याचे व्यवस्थापन कसे आहे ईतकी बाब तरी आवर्जून पहावी.आपल्या ज्ञानात तर भर पडेलच पण कदाचित त्या माहितीचा रोजचा आयुष्यात ही उपयोग होउ शकेल.

  संदर्भग्रंथः-
१) आज्ञापत्र- रामचंद्रपंत आमात्य
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) श्री. अमित सामंत यांचे लिखाण
४) श्री. चिन्मय किर्तने यांच लिखाण
५) https://www.sakhiradnye.in हा ब्लॉग
६) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
७) अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर


 गडकोटांवरील पाणीव्यवस्था 🎪
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
देशभरामध्ये पाणीटंचाईमुळे भिषण दुष्काळ पडतो, लोकांना प्यायला पाणी भेटत नाही, कित्येक आया बहिणींना पाणी आणण्यासाठी जीवावर बेतून कित्येक मैल वणवण करावी लागते. प्राण्यांना चारा तर सोडा एकवेळ प्यायला पाणी मिळेना म्हणून लोकांनी जनावरे सोडून दिली, हे मुखे प्राणी पाण्याच्या व्याकुळतेने टाचा घासून मृत्यू पावले कारण ज्या ठिकाणी माणसालाच पाणी मिळेना त्या ठिकाणी या भाबड्याना कोठून पाणी मिळणार....
छ. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात असे बिकट दिवस यावे हि शोकांतिका व भविष्याची काळजी करणारी गोस्ट आहे. अरे महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून आपण शिकलो काय मग?? काय म्हणून आपण नुसता गर्व बाळगतो?? खरच आम्हाला छत्रपती समजले का?? खरच आम्ही त्यांचे विचार आत्मसात केले का??? महाराजांचा वैद्यानिक दृष्टिकोन पहिला का/ आत्मसात केला का??? या सर्वांच एकच उत्तर... "नाही".
एकीकडे राज्यात दुष्काळ स्थिती असताना 350 वर्षापुर्वीच्या गडकिल्यांवर पाणी मिळते याचा अर्थ आताच्या हजारपटिने चांगली त्याकाळची दूरदृष्टी होती म्हणूनच आज तुम्ही कोणत्याही गडांवर गेलात तर तुम्हाला पाण्याची भरलेली टाके, तळी, तलाव दिसतील.
आजकाल भरपूर लोक गडकोटांवर जातात पण ते पुरेश्या महितीअभावी म्हणा किंवा काहि लोक फक्त पीकनिक म्हणून येतात, तर काहीशे लोक फक्त ट्रेकिंग थरार असतो म्हणून गडकिल्याना भेट देतात, बर काही असो कोणत्या ना कोणत्या कारणानं का होहीना गडकोटांवर भटके वाढले किंवा गडकोट प्रेम वाढत चाललंय यातच एक प्रकारच समाधान मानुया.
गडकिल्ले/ स्वराज्य टिकवायचे म्हणजे गडांवर पाण्याचा मुबलक साठा झाला पाहिजे, कारण एकदा का युद्ध सुरु झाले कि ते 2-3 महिने चालत असे, अशावेळी गडावरून खाली येणे म्हणजे धोक्याचे किंवा शरणागती पत्करणे हा अखेरचा डाव असे त्यामुळेच छ. शिवराय आपल्या कारागिरांना संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करत असत, त्यांच्याकडून त्यापद्धतीने काम करून घेत असत म्हणूनच स्वराज्य निर्मितीच्या काळात जिगरबाज  मावळ्यांनी गडकोटांच्या मदतीने शत्रूला माघार घ्यावी लावली होती.
गडांवर पाणी साठवण्याची साधने म्हणजे कातळात कोरलेली पाण्याची टाके, पठारांवर तयार केलेली तळे/ तलाव, ठिकठिकाणी काळ्या कातळात खोदून निर्माण केलेले खळगे. पावसाळ्यात तयार होणारे झरे यांची अडवणूक करून बांधलेले छोटे बंधारे असे भरपूर नमुने आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळ्या निर्मितीत आपल्याला पाहायला मिळतात.
पाणीसाठा करताना इतरही गोष्टी विचारात घेतलेल्या दिसतात जसेकी, उघड्या पठारावर निर्मित केलेल्या टाक्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते व टाके लवकर मोकळे होते म्हणून टाक्याच्या चारी बाजूला गोल खोबण्या तयार केलेल्या आहेत, या खोबण्यामध्ये लाकूड घालून वरती पाचोळ्याचे किंवा कापडाचे आच्छादन तयार केले जात असे जेणेकरून बाष्पीभवन होत नसे. दुसरी गोस्ट म्हणजे पाण्याची टाके व दारुगोळा कोठार कधीच जवळ जवळ  बांधलेली नाहीयेत जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन पाणी कोठारामध्ये जाऊ नये याची दक्षता घेतलेली दिसते. किल्ले कुलंग, किल्ले हडसर, किल्ले हरिश्चंद्रगड या गडांवर पाण्याची टाके ज्या घळीतून पाण्याचा प्रवाह होतो त्या घळीमध्येच टाके तयार केलेली आहेत जेणेकरून गडावरून खाली पडणारे पाणी प्रथम या टाक्यांमध्ये पडून, टाके भरल्यानंतरच ते खाली पडत असे त्यामुळे टाके भरायला वेगळी व्यवस्था करायची गरज महाराजांना भासली नसावी.
तसेच दुर्गबांधणी मधेही आपल्याला चांगले बांधकाम पाहायला मिळते, ज्या ठीकानि देवडया (पहारेकर्यांची जागा) तेथे काळा कातळ असल्यामुळे पावसाळ्यात पाणी ओळघळून आतमध्ये येते म्हणून देवड्यांच्या वरती खाचा तयार करून ते पाणी बाजूला पाडले जाते, किल्ले हडसर वर हे काम पाहायला मिळते, तसेच अंबरखान्यामधेही हेच काम दिसते. गडाभोवती तटबंदी असते, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे तटबंदीला धोका पोहचू नये म्हणून तटबंदीमधून विशिष्ट खोबण्या तयार करून किंवा गायमुख सारखे चिरा तयार करून पाणी बाहेर पाडले जाते (किल्ले कुलंग व किल्ले चावंड वरती हे पाहायला भेटते).
जे किल्ले काळया कातळात घडवले आहेत अश्या किल्ल्यांवर पावसाळ्यात पायऱ्यांवर्ती शेवाळ वाढते व पायऱ्या पूर्णपणे घसरड्या होतात, यावरून कोण खाली पडू नये म्हणून पायऱ्यांवरती पकडण्यासाठी खोबण्या घडवलेल्या दिसतात, तसेच पायर्यांच्या बाजूने 70-80 cm ची चर खोदून पाणी पायऱ्यांवरती येणार नाही याची काळजी घेतलेली दिसते (किल्ले हरिहर, रतनगड वरती याचे उत्तम नमुने दिसतात).
याबरोबर पाणी साठवण्यासाठी टाक्यांबरोबर दगडामध्ये कोरून तयार केलेली भांडी आपणास भरपूर गडावर पाहायला मिळतात ( किल्ले रामसेज, किल्ले चावंड, किल्ले हडसर)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                संशोधन/ लेखन-
इतिहासप्रेमी. मनोज शिवाजीराव महाडिक
      स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
     9890354353/ 9156571313

शिवकाळातील जल व्यवस्थापन

सह्याद्रीच्या शिखर माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे.' गड व पाण्याच्या देखभालीसाठी त्यांनी म्हटले की लोहार, सुतार, पाथरवट यांना गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवाव्या. लहान-सहान गडांवर यांचे नित्यकाम पडते असे नाही. याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्यांजवळी तयार असो द्यावी. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन त्यांनी दूरदृष्टीने करून ठेवले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड येथील जल व्यवस्थापन तर खास अभ्यासण्याजोगी आहे. रायगडावरील लेणी व डोंगराच्या पोटात खोदलेली खांब टाकी पाहिल्यावर लक्षात येते की रायगड हा प्राचीन गड असून त्याला किमान दीड हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. शिलाहार राजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक राजवटी रायगडावर नांदल्या आहेत. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यावर रायगड स्वराज्यात दाखल झाला. शिवाजी महाराज जातीने रायगडावर आले. सरळसोट भिंतीसारखे चहूबाजूने तुटलेले उभे कडे, दीड गाव उंच आणि वर चौरंगासारखा दीड मैल लांब आणि १ मैल रुंद सपाट माथा पाहिल्यावर 'तख्तास हाच जागा करावा' असे त्यांच्या मनात आले आणि स्वराज्याची राजधानी रायगड सजू लागला.

राजधानी रायगडावर मुबलक पाणीसाठा आहे. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि निकामी झालेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत. त्यातील गंगासागर तलाव हा सर्वात मोठा असून राजवाड्यासमोरच तो बांधण्यात आला आहे. महादरवाजा, तटबंदी, बुरूज, राजवाडा, जगदीश्वर मंदिर आणि सेवकांची जवळजवळ तीनशे इमारती रायगडावर बांधण्यात आल्या. त्यासाठी लागणारा दगड गंगासागर व इतर तलावांतील दगड खाणीतून काढलेला आहे. राज्यभिषेकावेळी सप्तनद्यांचे पाणी गंगासागर तलावात टाकले आहे. या तलावांखेरीज पाऊणशे पाण्याची टाकी आहेत ती गडमाथ्यावर, गुंफेत व कड्याच्या पोटात राजवाड्यापासून भवानी टोकापर्यंत आणि वाघ दरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी त्या खोदलेल्या आहेत. रायगडावरील दहा हजाराच्या शिबंदीला पुरून उरेल एवढा प्रचंड पाण्याचा साठा रायगडावर होता. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाख असामी आले होते. हे तत्कालीन कागदपत्रे व इंग्रज, पोर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. या समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली होती. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. कौटिल्याने दोनहजार चारशे वर्षांपूर्वी पर्जन्यमापकाचा उपयोग शेती आणि धरणे बांधण्यासाठी केला होता. रायगडावरील दगडात बनवलेले हे पर्जन्यमापक त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे आधुनिकच म्हटले पाहिजे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजत असल्यामुळे रायगडावरील शिबंदीसाठी किती तळी खोदावी लागतील, त्यासाठी त्यांची लांबी-रुंदी व खोली किती ठेवायची म्हणजे त्यात साठलेले पाणी पुढील पर्जन्यकाळापर्यंत पुरेल याचा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यविशारदाने अंदाज घेऊन गडावरील विद्यमान तलाव बांधण्यात आले आहेत.

पाऊस योग्य वेळी व योग्य तेवढाच पडला तर धान्य भरपूर पिकते आणि गवत चाऱ्याचेही चांगले पोषण होते. शेती हा भारतातील महत्त्वाचा व्यवसाय, त्यासाठी राज्याचा कोष हा मुख्यत्वे शेती उत्पन्नावर आधारित असल्यामुळे शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक श्री. गोपाळ चांदोरकर (अर्किटेक्ट) यांच्या प्रथम ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या 'वैभव रायगडचे' या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. बाजूचे छायाचित्र त्या दगडी पर्जन्यमापकाचे आहे. कुशावर्त तलावाच्या काठी एक शिवमंदिर आहे. त्याच्या उत्तरेकडील एका खोलगट भागात हे दगडी पर्जन्यमापक आहे. रायगडावर आठ तलाव होते. त्यापैकी गंगासागर आणि कोळीम तलावाचेच पाणी सध्या रायगडावर वापरण्यात येते. रायगडावर रोज येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्यावर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे पाहता साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे नियोजन किती दूरदृष्टीने केले होते याची कल्पना येते.

शिवाजी महाराजांनी जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला आहे. सभोवताली तटबंदी आहे. आत २००' x ४००' फूट लांबी-रुंदीचे वाड्याचे जोते आहे. घोडे बांधण्यासाठी त्यात लोखंडी गोल कडी आहेत. वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर दगडी बांधकाम आहे. त्यावर दगडीबैठक आहे. हिला 'तक्क्याची विहीर' म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर अद्यापही जीवनरस उराशी घेऊन उभी आहे.

शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले असेल.

किल्ल्यांवरचे तलाव

अमित सामंत

किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं.

किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं. पण राज्यविस्ताराबरोबर अनेक किल्ल्यांवर भरभक्कम, विस्तीर्ण तळी आणि खंदकांचे बांधकाम झाले.

मागील लेखात आपण गडकिल्ल्यांवरील पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्राथमिक सुविधा पाहील्या. पण जेव्हा एखादा किल्ल्यावर राबता वाढतो, तो किल्ला राजकिय कारणाने महत्त्वाचा होत जातो, लष्करीदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढते किंवा तो किल्ला राजधानी होतो  तेव्हा त्या किल्ल्यावरील पाणी सुविधादेखील तितक्याच मोठय़ा प्रमाणात विकसित करावि लागते.

अशा मोठय़ा किल्ल्यांवर पाणीपुरवठय़ासाठी तलाव खोदले जातं. रायगडवरील ‘गंगासागर तलाव आणि हत्ती तलाव’ तर सर्वाना परिचित आहेत. या तलावातून तसेच किल्ल्यांवर खोदलेल्या टाक्यांमधून निघणारा दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. नैसर्गिकरीत्या तयार झालेले तलावही काही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. त्यात भुदरगडावरचा दुधसागर तलाव, टंकाई किल्ल्यावरचा तलाव, नरनाळा किल्ल्यावरचा शक्कर तलाव इत्यादी मोठे तलाव आहेत. अहिवंतगड, महिमतगड, इत्यादी अनेक किल्ल्यांवर बांधीव तलाव पाहायला मिळतात. गडावरचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उतार, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग यांचा अभ्यास करून असे तलाव बांधलेले आढळतात. बांधीव तलावाच्या चारही बाजू दगडांनी बांधून घेतलेल्या असतात. धारूर, उदगीर इत्यादी किल्ल्यांवर विहारासाठी खास तलाव बांधलेले आहेत. तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्याबाहेरील तलावातून खापरी नळांच्या (पाईपांच्या) द्वारे आणलेले पाणी या तलावात सोडले जात असे. धारूर किल्ल्यात असलेल्या तलावाच्या वरच्या बाजूस ‘हवामहाल’ आहे. तलावाच्या पाण्यावरून येणारी हवा गार होऊन या हवामहालात येते. अंकाई किल्ल्यावर कातळात कोरलेला एक सुंदर तलाव आहे. त्याच्या मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे.

औसा या लातूर जिल्ह्यतील किल्ल्यात दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव आहे. याला ‘जलमहाल’ या नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जिना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पाहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छतामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छतामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात राहण्यासाठी केला जात असे. जमिनीखाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे.

धारूर किल्ल्यात दोन वैशिष्टय़पूर्ण तलाव आहेत. त्यांना गोडी दिंडी आणि (सोलापूर) खारी दिंडी या नावांनी ओळखतात. गोडी दिंडी हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्यापलीकडे खंदक आहे. तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत (४० मीटर लांब ७ मीटर रुंद व १२ मीटर उंच) दरीतून बांधून काढलेली आहे. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकारे होत होता. संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतर वेळी वर्षभर पाणीपुरवठा करणारा तलाव.

उस्मानाबाद जिल्ह्यतील नळदुर्ग किल्ला म्हणजे पाण्याचा विविध प्रकारे वापर कसा करता येईल याचा वास्तुपाठ आहे. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजे ‘जलमहाल’ नळदुर्गाच्या चारही बाजूला खंदक आहे. तुळजापूरहून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पात्र वळवून पाणी खंदकात खेळवून संपूर्ण किल्ल्याला संरक्षण दिले आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसऱ्या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला गेला. या बंधाऱ्याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसऱ्या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. हा बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल आणि गणेश महाल असे दोन महाल बांधलेले आहेत. जलमहालाच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नल (नर) आणि दमयंती (मादी) या नावाच्या दोन मोऱ्या ठेवलेल्या आहेत. पावसाळ्यात या मोऱ्यांमधून पाणी वाहते तेव्हा महालातून अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. बंधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी या बंधाऱ्यावरून वाहते, पण आतील भागात असणाऱ्या एका वास्तूलासुद्धा त्याचा स्पर्श होत नाही. या जलमहालाच्या वरून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन. या धरणात साठवलेल्या पाण्याचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. धरणाच्या आतल्या बाजूला एक पाणचक्की बसवलेली आहे. अन्नधान्य दळण्यासाठी त्याचा वापर होत असे. धरणातून सोडलेले पाणी विविध बंधाऱ्यांद्वारे अडवून शेतीसाठी पुरवले जात असे. नळदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूलाही एक आडवी भिंत बांधून छोटा जलाशय निर्माण केलेला आहे. त्याला मछली म्हणतात. यावरून त्याकाळी या भागात मत्स्य शेतीही होत असावी असा अंदाज करता येतो. भुईकोट किल्ल्यांच्या भोवती जो खंदक खोदला जात असे त्यात आजूबाजूच्या जलस्रोतातले पाणी खेळवले जात असे किंवा खंदक पावसाच्या पाण्याने भरला जाईल याची काळजी घेतली जाई. यामागे संरक्षणाबरोबरच भुईकोट किल्ल्यातील विहिरी, तलाव, पुष्करणी यांना भूजल पुनर्भरणासाठीही याचा उपयोग होत असे.

गंमत म्हणजे वर ज्या तलावांची माहिती दिली आहे ते आजच्या कायम अवर्षणग्रस्त असलेल्या मराठवाडय़ातील किल्ल्यात आहेत. काही शतकांपूर्वी असलेले हे ज्ञान अचानक कुठे गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे.

मेळघाटातल्या नरनाळा किल्लय़ावरील सर्वच तलाव हे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. नरनाळ्यावरील सर्वात मोठा तलाव म्हणजे शक्कर तलाव. या तलावाच्या उजव्या बाजूस उतारावरून वाहणारे पाणी तलावात वळवण्यासाठी कमानदार बोगदा बांधून काढलेला आहे. तलावाच्या डाव्या बाजूस कातळ आहे. या कातळावर पडणारे पावसाचे पाणी तलावातच जावे यासाठी कातळात ठिकठिकाणी चर कोरून काढलेले आहेत.

नैसर्गिक आणि बांधीव तलावांव्यतिरिक्त गडांवर साचपाण्याचे तलाव असतात. पावसाचे पाणी खोलगट भागात साचून अशा प्रकारचे तलाव तयार होत. पावसाळ्यानंतरचे काही महिने या तलावात पाणी राहाते. किल्ल्यांवर पुष्कर्णीही बांधलेल्या पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगड, कुलाबा इत्यादी किल्ल्यांवर पुष्कर्णी बांधलेल्या पाहायला मिळतात.

किल्ल्यावर टाक तलावांव्यतिरिक्त विहिरीही पाहायला मिळतात. मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७०मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंतांनी गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. २२८ फूट खोल खोदल्यावर विहिरीला पाणी लागले.

नागपूरजवळ असलेला नगरधन किल्ला येथे वाकटाकांची राजधानी होती. या किल्ल्यात वैशिष्टय़पूर्ण विहिरी पाहायला मिळतात. किल्ल्यात भुयारीदेवीचे मंदिर एका विहिरीत आहे. येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात व पाण्याच्या सान्निध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो. याच किल्लय़ात एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फुटांवर एक विहीर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायऱ्या असलेला एक उथळ हौद आहे. पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फुलं ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी.

धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर एक बाव (विहीर) आहे. आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी आहे असे म्हणतात. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणी आहे. पूर्वी या विहिरीतून पाणी काढून पुष्करणीत साठविले जात असावे.

जलदुर्गावर आपण फिरतो तेव्हा त्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरी पाहून आपण चकीत होतो. चारी बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात गोड पाणी येते कुठून. त्यामागील भौगोलिक सत्य असे आहे- बेट आणि समुद्रकिनारा एकाच सलग प्रस्तराने जोडलेले असतात.  त्यामुळे किनाऱ्यावरील जमिनीत झिरपणारे पाणी प्रस्तराखालून वाहत असल्यामुळे बेटावरच्या विहिरीत येते. या पाण्याचा उपसा व्यवस्थित करावा लागतो अन्यथा आजूबाजूला असलेले खारे पाणी विहिरीत येऊन गोडय़ा पाण्याचे स्रोत कायमचे बंद होऊ  शकतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील दुधबाव, दहीबाव या गोडय़ा पाण्याच्या विहिरी अशाप्रकारच्या गोडय़ा पाण्याच्या स्रोतांचे उत्तम उदाहरण आहे. सर्वच बेटांवर अशाप्रकारे भूगर्भातले गोड पाणी मिळत नाही. अशावेळी साच पाण्याचे, तलाव टाकी बांधले जातात. त्यात पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरले जाते. जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी जलदुर्गावर अशा प्रकारची रचना केलेली पाहायला मिळते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

 कातळातलं पाणी





सह्याद्रीमधील किल्ले आणि घाटवाटा यांच्या आठवणी तेथील तलाव आणि टाक्यांशी निगडीत आहेत. या किल्ल्यांची बांधणी, दरवाजे, बुरुज, कमानी, आतील इमारती, मंदिरं आणि पाण्याच्या टाक्यांची बांधणी, रचना, त्यावरील शिल्पं हे सगळं  मोहात पाडतं. या किल्ल्याची बांधणी करताना त्यावेळच्या स्थापत्यकारांनी पाषाणात दडलेल्या पाण्याचा शोध कसा घेतला असेल आणि नेमक्या ठिकाणी पाण्याची टाकी, हौद तलाव कसे निर्माण केले असतील या विचारानं आपण अचंबित होतो.
 
पुण्याच्या परिसरातले किल्ले कितीतरी. त्या सगळ्या किल्ल्यावरच्या पाण्याची मुबलकता थक्क करणारी आहे. सिंहगडावर कितीतरी टाकी आहेत. अमृतेश्वराच्या देवळाखालचा पाण्याचा तलाव विस्तीर्ण आहे. त्यानंतरचे दोन तलाव राजाराममहाराजांच्या समाधीलगत आहेत. इथलं देवटाकं इतिहासप्रसिद्ध खरं, पण इतरही अगणित ठिकाणी असलेल्या टाक्यांचं पाणी तितकंच गोड आहे.
 
गडाच्या तिस-या दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशी प्रशस्त बांधीव टाकी आहेत. उजवीकडच्या टाक्यालगत पुन्हा टाकं आहे. त्या शेजारच्या प्रशस्त टाक्यात उतरायला दगडी पाय-याही आहेत. गडावरील रहिवासी त्यात कपडे धुतात. डावीकडच्या एका टाक्यात रंगीत मासे आहेत. हौद म्हणावेत अशी ही टाकी आहेत.
 पुरंदर किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था अगदी आदर्श म्हणावी अशी आहे. प्रचंड बांधीव असे पाषाणात कोरलेले तलाव हे पुरंदरचं वैशिष्टय़. यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात तिथं ‘नॅशनल कॅडेट कोअर’चं  केंद्र बरीच वर्ष होतं. वरच्या विस्तृत सपाट पठारावर परेड होत असे.
या तलावाखेरीज खडकाच्या पोटात कोरून काढलेली टाकीही आहेत. गडावर चहा करून प्रवाशांना देणारे विक्रेते याच लहान टाक्यातील पाणी पोह-यानं काढतात. आम्हीदेखील गडावर गेल्यावर देवीच्या देवळात जाण्यापूर्वी हे थंड पाणी पिऊन आणि या पाण्यानं पाय धुवून मंदिरात जातो.
 
पुरंदरला केदारेश्वराचं मंदिर बरंच उंचावर आहे. किल्ल्यापासून थोडं उंचावर पठार आणि त्याच्या एका अंगाला वर चढत गेलेली वाट मंदिराकडे जाते. माथ्यावर मात्र  पाणी नाही. मात्र मधल्या टप्प्यावर पुन्हा पाण्याचे तलाव आणि टाकी आहेत. हे पाणी  केवळ पावसाचं नाही. या टाक्यात खालून पाण्याचे प्रवाह वाहत आलेले आहेत. पाणी, स्वच्छ, मधुर आणि थंड आहे. मोठय़ा तलावात मात्र थोडाफार कचरा आहे. काही तलावांच्या कडेचे दगड फोडून त्यात तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती वाढलेल्या आहेत.
 
पुण्याजवळ वेल्ह्याकडे जाताना डावीकडे राजगड हा देखणा गड दिसतो. उन्नत असा बालेकिल्ल्याचा माथा आणि तिन्ही अंगाला बाहुप्रमाणे पसरलेल्या माच्या- सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी. त्यांवर आणि बालेकिल्ल्यावरही पाण्याची विपुल टाकी आणि तलाव आहेत. पद्मावतीच्या माचीवर पद्मावतीचं देऊळ आणि त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत. शिवाय खालच्या अंगाला विस्तृत असा पद्मावती तलाव खोदलेला आहे. याच माचीवर पाठीमागच्या खोलदरीत पाण्याचा तलाव आहे. घोडय़ांच्या पाण्याची ती सोय होती.
 
शिवाजीमहाराजांनी रायगड बांधून घेतला. तिथं त्यांचा राज्याभिषेक झाला. मराठी राज्याची राजधानी म्हणून रायगडचा मान असला तरी त्यापूर्वीची दोन तपं महाराजांच्या कारभाराचं मुख्य ठिकाण ‘राजगड’चा किल्लाच होतं. त्या सगळ्यांना पुरेल इतकं पाणी गडांतील या टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये असायचे. आताही आहे.
 
अवघड ठिकाणी असलेल्या बालेकिल्ल्यावरही कितीतरी टाकी आहेत. तिथलं चंद्रकोरीचं टाकं खरोखरच चंद्रकोरीच्या आकाराचं आहे. त्यालगतही इतर टाकी आहेत. भटकंतीनं झपाटलेल्या आमच्या काळात या चंद्रकोरीच्या टाक्यांत पोहल्याचं  आठवतं. पद्मावती माचीवरील पद्मावती तलावात कोणी पोहलं नाही असं होणारच नाही. केवढी मजा असते अशा पोहण्यात? उंचावरच्या तलावात पोहताना मन आणि शरीर कसं पिसासारखं हलकं होतं! पाण्याचा सुखद, थंड स्पर्श, शिरशिरी आणि तो अनुभव तुमच्या आत कुठेतरी उतरत जातो.
 
तोरण्याच्या बालेकिल्ल्यावर दोन-तीन टाकी आहेत; पण कोकण दरवाज्यातून बाहेर पडलं की डुब्याकडे जाणा-या सोंडेच्या दोन्ही अंगाला खाली कितीतरी टाकी आहेत. डुब्याच्या खाली एक मोठ्ठं चौकोनी टाकं आहे. तर डुबा डावीकडे ठेवत पाठीमागच्या घोडेजिनाच्या बाजूलाही एक टाकं आहे. पण ते बरंचसं बुजून गेलं होतं. आनंद पाळंदेंनी काही भटक्यांवर जबाबदारी सोपवली की, हे बुजलेलं टाकं साफ करा. अजय ढमढेरे आणि त्याच्या दोस्त मंडळींनी ते मनावर घेतलं आणि ते टाकं साफ केलं.
 
 तोरण्याच्या या पाठीमागच्या पण देशाकडील बाजूला गडाबाहेर जाण्याचा एक दरवाजा आणि बुरुज आहे. वाळूंज दरवाजा असं त्यांचं नाव. या दरवाजातून एक वाट खाली ‘भट्टी’ या गावात उतरली आहे. वाळूंज दरवाजानं बाहेर पडलं की उजव्या अंगाला पाण्याचं टाकं आहे. म्हणजे गडावर पाण्याची सोय केलेली आहे. वेल्हय़ांकडून तोरणा किल्ल्यावर येणा-यांची संख्या खूप आहे. पण भट्टीवरून वाळूंज दरवाजानं किल्ल्यावर येणारे लोक फार कमी.
 
भटकणं, मुख्यत: किल्ले भटकणं या नादानं जेव्हा आम्ही झपाटले गेलो होतो, तेव्हा अशा अनवट वाटांनी आम्ही खूप भटकायचो.  वर येताना वाळूंज टाक्यांतील पाण्यानं आमची तहान भागवली होती. राजगड-तोरण्याला जोडणा-या डोंगरधारेनं जाताना आपण राजगडच्या संजीवनी माचीकडून बाहेर पडतो. तेव्हाही पाणी भरून घ्यावं लागतं. संजीवनी माचीवर ओळीनं पाण्याची टाकी आहेत. आता काही टाकी खालून फुटली आहेत. क्वचित एखाद्या टाक्यात एकादा बेडूक किंवा मेलेला पक्षी पडलेला असतो; पण असा अपवाद वगळता आभाळाखालची ही टाकी थंड पाण्याची तहान भागवतात. त्या आठ-नऊ कि.मी.च्या डोंगरधारेवर एक-दोन ठिकाणी वाहतं पाणी मिळतं.
 
कमाल वाटते ती हरिश्चंद्रगडावरील पाण्याची. कोण होता याचा स्थापत्यविशारद? केवढी योजकता, केवढी कल्पकता त्यानं या गडावर दाखवली आहे! हरिश्चंद्रगड नवलाचाच आहे. गडाचा विस्तार प्रचंड आहे. वर सपाटी तशी कमी आहे. सगळा भाग उंचसखल. त्यावर लहान दऱ्या, खोंगळी, उंचवटे, शिखर, कडे, कपा-या, गुहा.  गडाच्या मधल्या खोलगटीत हरिश्चंद्रेश्वराचं देखणं मंदिर आहे. त्याच्या पुढे एक घळ डाव्या अंगाला पायनईच्या बाजूला उतरत गेली आहे. मंदिराच्या उजवीकडे हरिश्चंद्र आणि तारामतीची शिखरं आहेत. तारामतीच्या शिखराच्या आतल्या अंगाला कातळातून काढलेल्या काही गुहा आहेत. ब-याचशा नैसर्गिक शिखराच्या उंचीवरून पडणारं पावसाचं पाणी मंदिरापुढच्या खोलगटीत वाहत जातं. ही लहान कुडी मंगळगंगा नदी अशी गडावर उगम पावते.
 
हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर काळ्या पाषणातून बांधून झाल्यावर रचनाकारानं मंदिराच्या पुढय़ातील खोलगटही नीट दगडानं बांधून घेतली. मंगळगंगा नदीचा प्रवाह त्या लहान दगडी कालव्यांतून पुढे डावीकडे वाहत जाऊन दगडांवरून उडी मारून पाचनइकडे जातो. मंदिराला शिखर आहे आणि चारींबाजूनं दगडी भिंतही. विशेष म्हणजे मंदिराच्या अंगणातच बाहेरच्या भिंतीच्या आतल्या अंगाला काही गुहा आहेत. त्यांच्या बाहेरच्या अंगाला लागूनच कातळ कोरून काढलेली पाण्याची टाकी आहेत. कातळाच्या आतल्या अंगाला असल्यानं दगडी छताखाली पाणी आहे. डोळे आणि तृष्णा एकाच वेळी तृप्त करणारं! शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक धरायला लांब जायला नको. देवळालगतच पाण्याची सोय.
 
हरिश्चंद्र गडावर गर्दी नसायची तेव्हा आम्ही देवळामागच्या मोठय़ा गुहेत झोपायचो. पाणी अगदी पायाशीच असायचं. गर्दी खूप असली की, तारामती शिखराच्या आतल्या अंगाला असलेल्या मोठय़ा गुहांमधून भटके झोपतात. त्याही गुहांपुढे पाण्याची टाकी आहेत. पाऊसकाळ संपल्यानंतरही डिसें.-जानेवारीपर्यंत हरिश्चंद्र गडावरून पाण्याचे प्रवाह वाहत असतात.
 
मंदिराच्या डाव्या उताराच्या अंगाला दोन गुहा आहेत. एका गुहेत कमरेइतकं पाणी भरलेलं आहे आणि गुहेच्या मधोमध पाण्यामध्ये शंकराची पिंडी आहे. तिचा निम्मा भाग पाण्यात आहे. पिंडीभोवती पाण्यातूनच प्रदक्षिणा घालावी लागते. आपल्या कंठांत हलाहल धारण करणाऱ्या शंकराला गारवा लाभावा म्हणून त्यावर अभिषेक धरतात. इथं तर शंकराची पिंडींच चक्क पाण्यात! शंकराला इथला निवास नक्कीच प्रिय असणार. मंदिराच्या पुढय़ात जरा उंचावर एका अंगाला पाण्याची पुष्करणी आहे. तिथं स्नान करून वा पाय धुवून मंदिरात जायचं. पाणी असं किती अंगानं इथं भेटतं.
 
खडकाच्या पोटात खांब खोदून आतल्या अंगाला असलेली पाण्याची टाकीही बऱ्याच किल्ल्यावर आहेत. शिवनेरीवर गंगा-जमुना अशी दोन टाकी आहेत. किल्ल्यावर त्यांचंच पाणी प्यायलं जातं. त्यातून पाईपलाईन टाकून पाणी किल्ल्यावर नेलं आहे. पुरंदरवरही तशी सोय केलेली आहे. राजमाचीवर मनोरंजन-श्रीवर्धन असे दोन आवळेजावळे किल्ले आहेत. मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालाच उढेवाडीची महादेव कोळी आणि काही कुणबी अशी वस्ती आहे. मनोरंजन किल्ल्यावर पाण्याचा प्रशस्त तलाव आहे. त्यातून पाईप टाकून ‘सायफन’ तंत्रानं पाणी मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्यालगत असलेल्या खोदीव टाक्यांत सोडलेलं आहे. आता उढेवाडीत पाणीयोजना झाली; पण त्या पूर्वी पाण्याचा मुख्य स्रोत किल्ल्यावरचं पाणी हाच होता.
 
 श्रीवर्धन किल्ल्यावरही पाण्याची मोठी टाकी आहेत; पण पूर्वीइतकी त्याची धारणक्षमता राहिलेली नाही. उढेवाडीच्या पठारावर गावापासून अध्र्या कि.मी.वर ‘उदय सागर’ हा पेशवेकालीन पाण्याचा तलाव आहे. त्याकाठी शंकराचं मंदिर आहे. बरंचसं मातीत गाडलेलं होतं ते! गो.नी. दांडेकरांचा राजमाचीवर फार लोभ होता. त्यांनी गावक-यांकडून ते माती उकरून बाहेर काढलं.
 
एका भ्रमंतीत आमचा मुक्काम एक रात्र कर्नाळा किल्ल्यावर होता. इथं सुळक्याच्या पोटात ब-याच गुहा आणि टाकी आहेत. एका टाक्याच्या पायरीवर बसून बोलता-बोलता अनवधानानं मी टाक्यात पडले होते. आमच्या डोंगरभाऊंना पुढे हसायला कित्येक दिवस हा विषय पुरला होता!
 
चावंड हा खरं तर लहान किल्ला; पण जुन्नरजवळच्या या किल्ल्यावर सात टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमध्ये पाणी. एका टाक्यावर कमान व गणेशपट्टी कोरलेली आहे. त्यातून जाऊन टाक्यातल्या पाण्यात डुंबायला मोठी मजा येते. चावंड, हडसर, जीवधन ही दुर्गत्रयी जुन्नर परिसरातली. तिन्ही ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. याच परिसरातून कोकणात उतरणारी घाटवाट, ‘नाणेघाट’ आहे. सातवाहन राजवटीतील राणीनं हा घाट खोदला. या घाटवाटेनं जाणा-या व कोकणातून देशावर येणा-या व्यापा-यांच्या तांडय़ांसाठी नाणेघाटात ऐसपैस गुहा खोदली. शिलालेखही खोदून घेतला. पांथस्थांसाठी गुहेलगत कातळामध्ये पाण्याचे हौद खोदले. घाटाच्या माथ्यावर गणेशमूर्ती स्थापन केली. एका बाजूला रांजण ठेवला. त्याला जकातीचा रांजण म्हणतात. गणेश मूर्तीपाशी पुन्हा पाण्याचं एक टाकं आहे. कोकणातून देशावर माल घेऊन येणा-या-जाणा-या लमाणांच्या तांडय़ाला या पाण्याचा केवढा आधार वाटत असणार!
 
रायगड जेव्हा शिवाजीमहाराजांनी बांधून घेतला, तेव्हा खाणीतून खोदलेला दगड किल्ल्यावरील इतर इमारतींच्या बांधकामासाठी वापरला. आणि त्या खाणीचं रूपांतर मोठय़ा  तलावात केलं. ‘गंगासागर’ नावानं प्रसिद्ध असलेला हा तलाव रायगडावरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याशिवाही गडावर तलाव आणि टाकी आहेतच. हे राजधानीचं ठिकाण असल्यानं तिथं पाण्याची उपलब्धता असणं गरजेचं होतंच. त्याचा संपूर्ण विचार त्यावेळच्या स्थापत्यविशारदांनी कसा केला असेल?
 
हरिश्चंद्र गडावरून मळगंगेचा प्रवाह निर्माण झाला, तर ‘प्रवरा’ नदीचा उगम रतनगडच्या किल्ल्यावर झाला. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील हा जुना किल्ला. याच्या मुख्य डोंगरकण्याच्या पोटामध्ये तुडुंब भरलेलं टाकं आहे. नदीचा उगम तिथूनच होत असल्यानं त्याला ‘प्रवराकुंड’ म्हणतात. इथून बाहेर पडणारी धार गडाच्या अंगावरून लगेचच खाली उतरते. तीच ‘प्रवरा’ नदी. तिच्यावर ब्रिटिशांना भंडारदरा धरण बांधलं. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.
 
अलंग-कुलंग-मंडण ही दुर्गत्रयी आणि याच पंक्तीत बसणारा हरिश्चंद्रगड हे भटक्यांचं नंदनवन. ही त्रयी अहमदनगरच्या घाटकर जवळ आहे. त्या भागातले ते अनभिषिक्त सम्राटच आहेत. या किल्ल्यांवर खोदलेली टाकी पाहून नवल वाटतं. अलंग-कुलंगवर 10-11 टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमधून पाणी. मंडणवर मात्र टाक्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. या तिन्ही ठिकाणची टाकी आकारानं साधारण आयताकृती आणि मोठी आहेत.
 
आज आपण रेनवॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरतो; पण आपल्या पूर्वजांनी ते कधीच किल्ल्यांवर राबवलं. पाणी कुठे सापडेल, याचा अचूक अंदाज घेऊन टाकी खोदली. त्याचा दगड बांधकामाला, बांधबंदिस्तीला वापरला. काही ठिकाणी भूगर्भातील पाण्याचे प्रवाह मिळाले. शिवाय पावसाचं पाणी त्यात साठवता येऊ लागलं.
 
शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्रांत किल्ल्यांचं महत्त्व फार मोठं होतं. त्याचं अविभाज्य अंग म्हणजे किल्यांवरील पाणी. प्राचीन काळात दुर्गम डोंगर-दऱ्यांतून प्रवासाची आधुनिक साधनं नव्हती. बैल, घोडा, नाही तर पायी चालणं. अवघड घाटवाटांवरून तर फक्त पायीच प्रवास शक्य होता. अशा वेळी इतर मानव आणि मानवेतर जीवसृष्टीसाठी कातळ खोदून पाण्याची सोय त्यांनी केली. हे लोक महामानवच होते, असं म्हणावं लागेल.
 
http://rajukisanmisal.blogspot.com/2012/02/blog-post_1127.html
 
 
 

ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा

Bhakti's picture
Bhakti in मिपा कलादालन
28 Apr 2024 - 5:07 pm

A
खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते‌ गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.
तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.
पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).
पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12 किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही.
ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.
बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे.
आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.

बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस मराठे)
बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षांपूर्वीचा असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो.तोपर्यंत बारवेमध्ये तळाशी आलेल्या पाण्यात पिटुकल्या शंखांचा खजिना सापडला.तो गोळा करण्यात ती दंग झाली
शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे.
पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे.
मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.
या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते..
मंदिरामागे एक भव्य तलाव आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.
अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.
-भक्ती
खोलेश्वर मंदिर
अ
वामतीर्थ
इ
ब्राह्मणीची बारव
उ
च
बल्लाळ देवी मंदिर क
ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवलेला त्या रेड्याची प्रतिकृती
Q
अमृतानुभव खांब
ऐ
ओळखू न आलेली पैकी एक वेगळी मूर्ती
1
सुंदरी
च
घ
सुरेख सुंदर बाप्पाची पूजा
छ

 
 
 

Baravs – Punyache Paani


Introduction

Pune has witnessed the construction of several aqueducts, cisterns, ornamental pools, ponds, and tanks throughout history, similar to many other places in India. Many of these water structures represent the traditional wisdom and efficient water management practices of our ancestors.

This photo essay narrates the story of one such traditional water structure known as barav, which is a stepped pond or a well. A typical barav consists of a shaft penetrating deep inside the earth to tap groundwater. A steep flight of steps surrounds the shaft, providing access to the people for fetching groundwater. Baravs may be square, rectangular, or octagonal in shape with a parapet wall along their perimeter. One or more pavilions known as mandaps are sometimes present along the sides of the baravs. The name ‘barav’ comes from a traditional unit of measurement called ‘bav’, equivalent to 1.5 metres. Additionally, baravs are also known by the names kund, jalmandavi, and pushkarini.

The religious idea of attaining spiritual merit by performing acts of charity motivated many rulers, traders, money lenders, and priests to patronize the construction of baravs for the common good of the society at different places in Maharashtra. They were built with the financial support of the patrons, but were owned and maintained by the entire community, often transcending the social divides, as understood from the ancient stone inscriptions that exist near them. They were not only utilitarian structures, but also meeting places for people, especially women fetching their daily water, as well as sacred structures for holy bathing as part of religious rituals.

Sketch explaining the structure of a typical barav.

Baravs found in Pune

Once upon a time, baravs were an inherent part of many settlements and temple precincts in Pune. A barav next to a shade-giving tree is a common sight in some of villages of Pune even today. Elsewhere, although baravs may have been destroyed over a period, their memory remains intact amongst the older generation of people. Interestingly, in the Junnar taluka (a block) a village itself is named as ‘Barav’ after an old barav which once existed there. In short, baravs were an inseparable part of many settlements.

Map of Pune district showing the location of Manchar, Loni Bhapkar and the city of Pune.

This story talks about two baravs which are more than 600 years old, built somewhere in the early 14th century. One of them is found at Manchar town in Ambegaon taluka and the other one is found at Loni Bhapkar village in Baramati taluka of Pune district. The barav at Manchar is still used by the people for bathing and swimming. The one at Loni Bhapkar is part of a temple complex and has religious significance. Although its waters have become unfit for domestic use over time, it is an excellent piece of architecture displaying artwork in basalt rock.

The barav at Manchar

The town of Manchar was once a small village during medieval times, located on the trade route connecting the historic towns of Paithan (famous for its sarees) and Junnar. The barav found in Manchar is a beautiful one located next to a small water course called as ‘Khardi Nala’. This barav is fed by a natural spring and contains ample water throughout the year.

Interplay of colours and contrasts at the Barav at Manchar

The barav at Manchar is nearly a square which tapers from a width of 22 metres on its topmost side to nearly half the length (11 m) at the bottom side. It has two entrances – one from the south and another from the east. After descending down from these two entrances, one reaches to an intermediate landing that has a raised seating platform.

The intricate plan and section design of the barav at Manchar.
Bonding at the steps of a barav built six centuries ago at Manchar.

Steps are a striking feature of this barav. Adjacent steps contain protruding stone blocks at regular intervals to counterbalance the thrust of the soil from behind. They also act as intermediate seating platforms, creating a beautiful rhythmic pattern, which highlights the aesthetic side of structural elements.

A stone inscription housed in the western parapet wall, narrates an interesting story about the construction of this barav. According to the Sanskrit inscription, Manichar (previous name of Manchar) was a beautiful village stationed in the hills of Amargiri. In Manichar, there lived an able, just, brave, and handsome person named Ladidev, who was the son of the village head (mentioned as pattelvarya). One night in his dream, Ladidev sees Mother Earth expressing her wish to permanently reside in his village. Waking up the next day, Ladidev recollects his dream and decides to build a barav at a suitable spot in the village where Mother Earth would permanently reside in the form of water. He thinks that the barav would also help in relieving the water stress conditions experienced by the villagers of Manchar due to frequent droughts. With these considerations, Ladidev initiates the construction of the barav on an auspicious day in the Shaka Samvat year 1266 (i.e. 1344 A.D.) (Ref: Mandake, G, 2003).

Stone inscription housed in the parapet wall of the barav at Manchar.

Today, the barav is popular amongst the people of Manchar as ‘angholichi barav’ (meaning barav used for bathing). Many adults and school-going kids assemble at the barav during early morning hours for bathing.

“We love swimming in this historical barav. It is always full with water, even in summer. We come here as early as 5 am and enjoy swimming until the afternoon sometimes. Applying soap and bathing in the barav is prohibited, so as to keep its water clean”

– a regular user of the barav.

“We kids have competitions for jumping into the barav. Taking a dip into the barav is great fun. But now during times of Covid, police have put restrictions on the number of people bathing at a given time. So usually we come in groups not exceeding 10-15”

– a 12 year old school-going boy
Women washing clothes at a kund connected to the barav of Manchar.

A small channel carries water from the barav into a kund, which is a small stepped pond located on its eastern side. Women assemble at this kund daily for washing clothes. Thus, while the barav becomes a social interaction space for men, the kund becomes an interactive space for women, who get a break from their daily routine and find a few leisure moments for chatting with each other while washing their clothes.

The barav at Loni Bhapkar

Loni Bhapkar village contains a beautiful barav built way back in the 14th century. The barav is part of a sacred precinct, originally containing temples of Shiva and Vishnu. Today, the original Shiva temple is in a dilapidated condition, while a new Dattatray temple has been built in place of the Vishnu temple. Interestingly, the barav is placed strategically at the focal point of the two temples, highlighting its significance and sacredness in the entire complex. Earlier, as part of religious rituals, people would take a bath in the barav before entering the temple. They believed that such ritualistic bathing washed away their sins and purified them before entering the sacred temple.

Diagram explaining the position of barav within the temple complex.

This barav is square-shaped with sides measuring 21 m at top and 14 m at the bottom, containing a series of steps carved in basalt rock. The entrance to the barav is from the southern side from where one descends down a few steps to reach the intermediate landing. The barav stands out because of its parapet wall which contains attractive devkoshta (niches) and a mandap (pavillion).

The two-metre high parapet wall of the barav acts as a kind of threshold, separating terrain and water. It contains 24 attractive devkoshtas forming a rhythmic pattern. Once upon a time, they housed idols of Vishnu in different forms. They reminded people about the sacredness of baravs and discouraged them from indulging in any acts that would pollute their water. Such kind of architectural detailing highlights the effective use of religious and spiritual ideas to encourage the water management practices of health and hygiene amongst people.

Devkoshta (niches) within the parapet wall of the barav at Loni Bhapkar.
Devkoshta (niches) within the parapet wall of the barav at Loni Bhapkar.

A square mandap with a roof supported by brackets resting on four circular pillars protrudes into the barav from its western side. Since the mandap was located outside the Vishnu temple, it is believed to once contain the idol of Varaha – one of the incarnations of Vishnu having the head of a wild boar and the body of a man. The remains of this idol can be seen today beneath a tree next to the barav. Apart from housing the idol, the mandap has a seating platform for people to relax and reflect in the presence of water. The external surface of the mandap is divided into panels by columnar motifs. The panels contain figurative motifs depicting the different incarnations of Vishnu and scenes from the Ramayana.

View of the intricate carvings of the wall of the barav mandap at Loni Bhapkar.
Remains of the Varaha at Loni Bhapkar.
People from Manchar cleaning and desilting the barav. (Source: Raut, Dhanesh, 2022)

Despite the structural differences between the baravs at Manchar and Loni Bhapkar, both of them share some commonalities. Firstly, apart from minor structural damages, and wear and tear, both the baravs are in reasonably good conditions even after 600 years. They are fed by an ample quantity of safe groundwater even today. These facts demonstrate the engineering skills and hydrogeological knowledge of the people who built these baravs. Secondly, both the baravs are taken care of by their respective local communities. For instance, in 2019, few men from Manchar volunteered for cleaning and desilting the barav, as told by one of the volunteers Mr. Dhanesh Raut. He also said that every year during Diwali they light oil lamps on the steps of the barav.

People lighting oil lamps on the steps of barav at Manchar. (Source: Raut, Dhanesh, 2022)

Conclusion

In addition to the two baravs discussed in this photo-essay, there exist few others in and around Pune. However, most of them are in a ruined condition. Today, the usefulness of baravs as water storage structures may have declined due to relatively easy access to tap water. Despite this fact, we cannot neglect their value and turn them into places for dumping waste. We need to understand that baravs are much more than mere water storage structures. They have heritage value and have once served as community spaces with socio-cultural and socio-technical identity. Most importantly baravs connect people to water by enabling them to see, hear and touch water.

Currently, when water is increasingly seen as a commodity to be exploited to the fullest, protecting baravs becomes essential as they manifest our ancient cultural values of respecting, sharing and using water with utmost care, which is a precious gift from nature to humankind.

A barav at Jejuri which has become a place for dumping waste.

References

  • Dandawate, P.P.; Joshi, P.S. and Gajul, B.S. 2006. Traditional systems of water management in Maharashtra. In Chakravarty, K.K.; Badam, G.L. and Paranjpye, V. (Eds), Traditional Water Management Systems of India, pp. 3–7. Indira Gandhi Rashtriya Manav Sanghrahalay, Aryan Books International. Bhopal, New Delhi.
  • Mandake, G. (Ed). 2003. Man͂car yethīl ī.sa. 1344 madhīl shilalekha. In Shodha nibandha saṇgraha. Akhila Mahārāṣṭra Ithihās Pariṣad. Adhives̍an Akrāve. 2002-03. Chāndvaḍa.
  • Marathe, M. 2019. Reimagining water infrastructure in its cultural specificity. Case of Pune. Technical University Darmstadt. urn:nbn:de:tuda-tuprints-92810
  • Marathe, M. 2021. Baravas: An architectural exploration of the traditional groundwater storage structures of Pune, India. Ancient Asia. 12:1, pp. 1-1. DOI
  • Pāṭhaka, A. 2017. Mahārāṣṭrātīl bārava sthāpatya āni pāramparik jalvyavasthāpan. Aparānt. Pụne.
  • Raut, D. 2022. Photograph and video of barav at Manchar.
 
 https://punyachepaani.livingwatersmuseum.org/story/baravs/
 
 

बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )

॥ हर हर महादेव ॥

ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .



चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .

चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .

चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .

चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव (  पॅनारोमा ) .

बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples )  सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई )म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल . 

बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना . 


चित्र क्रमांक ४ . बारवेतली गणेश मूर्ती .

मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात . 


चित्र क्रमांक ५ .बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .

श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .


चित्र क्रमांक ६ . ११ रुद्रापैकी एक मूर्ती

गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.

चित्र क्रमांक ७ . आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न

मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते . 
संदर्भ : - मूर्ती विज्ञान , डॉ . गणेश हरि खरे .

चित्र क्रमांक ८ . बारव आणि त्यातली समृद्ध जैव विविधता

मानवासोबतच इतरही जीव बारवांशी जोडलेले असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे  कासव आणि मासे . आणि त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या पक्ष्याचं खंड्याचं ( King Fisher ) हे छायाचित्र .

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
 
 http://www.chaturthamiti.in/2022/06/blog-post_13.html
 
 
 

 इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली


        
                 

अश्या प्रकारे १०० कुंड्या आहेत
                  यातून पाण्याचा आवाज स्पष्ट येतो



 
  
                              
                                 नकाशा
                                लिफ्ट




मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बऱ्हाणपूर हे शहर अत्यंत महत्वाचे होते या काळात या शहरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या अगदी मुघल बादशहा अकबर,जहागिर,शहाजहान या भागात बराच काळ होते औरंगजेब तर बरेच वर्ष या भागात राहीला.मराठयांचा इतिहासही या भागाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही .एका दिवसाचा परतीचा दौरा म्हणून नेहमी प्रमाणे अचानक महाशिवरात्र सुटी म्हणून आशीरगडाच्या भेटीसाठी म्हणून आदल्या रात्री आमचे सुरेश देवकर सर,गजानन राऊत,सर व सुशिल पनाड सरांचे नियोजन झाले . सकाळी ७ वाजता निघून १० वाजता बुलढाण्यावरुन बऱ्हानपूर पोहचलो तेथे सुरेश देवकर सरांचे मित्र बऱ्हानपूर मधील प्रसिद्ध वकिल अँड कलिम खान साहेब अामची वाटच पाहत होते त्यांच्याकडूनच सर्व शहराची माहीती आम्हाला दिवसभरात झाली मोहीम अाशीरगडाची होती पण दिवसभरात बऱ्हानपूरचा काना कोपरा फिरलो वकील साहेबांच्या आदर तिथ्यासह सर्व ऐतिहासिक माहीती मिळाली पर्यटनातून ज्या ठिकाणी जाताही आले नसते ती ठिकाणे त्यांनी दाखविली त्यावर प्रत्येक वास्तु नुसार सचित्र आपण माझ्या ब्लॉग वर पाहत आहातच !
      आपण आता पाहू या कुण्डी भंडारा / खुनी भंडारा विषयी ..।
बऱ्हानपूर हे शहर त्या काळचे महत्वाचे व्यापारी केद्र होते .सुरत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा मानला जायचा .बरा२,जोधपूर,आग्रा,हैद्राबाद,औरंगाबाद ही महत्वाची शहरे व्यापारी दृष्टया बऱ्हानपूरशी जोडली गेली होती या बहुतेक महामार्गावर दुतर्फा झाडे जागोजागी विहीरी खोदलेल्या दिसतात .बऱ्हानपूर -सूरत बंदरातून टर्की,पोलंड,मास्को या देशात मलमलचा व्यापार चालत असे .जहागिर बादशहाच्या काळात बऱ्हाणपूर येथे टॉमस रो या इंग्रज व्यापाऱ्याला कपड्याच्या कारखाण्याची परवानगी देण्यात आली होती .
    अश्या शहरात व्यापार व प्रशासनच्या दृष्टीकोनातून ताप्ती नदीच्या काठावर शाही महल सारख्या अनेक इमारतीचे निर्माण झालेल दिसते .
कोणत्याही मोठया शहराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाण्याची व्यवस्था ही पाण्याची व्यवस्था जागतीक स्तरावर विचार करायला लावणारी आहे .
     मुगल शासक अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी असलेले अब्दुल रहीम खान खाना याने जहागिर बादशहाच्या काळात १६ १५ मध्ये या शहरासाठी अदभूत अश्या योजनेच्या माध्यमातून " कुण्डी भंडारा " निर्माण केले .

रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून
पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।
                                  ४०० वर्षापूर्वी या भव्य दिव्य योजनेच्या निर्माण कर्त्याचे वरील काव्य आहे.पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या या कुंडी विशिष्ट अंतरावर ठेवत या कुंडीतून विहीरी प्रमाणे पाणी काढण्याची सोय केली हे पाणी शेती ,बाग,महल,सामान्य लोकासाठी उपलब्ध झाले .तयार करण्यात आलेल्या कुंडीत उतरुन साफसफाई करता येते .मागील काळात या योजने कडे दुर्लक्ष होते त्यात घाण व इतर बऱ्याच समस्या होत्या पण आता प्रशासनाने याची साफसफाई करून पर्यटनासाठी खुले केले आहे त्यातून परीसरातील गावाला पाणी पुरवठा होत आहे .पाणी अतिक्षय गोड व थंड आहे प्रशासनाने ८० फुट खोल नहर मध्ये उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली अाहे.
       कुण्डीत पाणी एका मुख्य हॉल सारख्या भागात जमा होते त्याचा धो धो आवाज अगदी स्पष्टपणे येतो. वायु दाबाच्या प्रणालीवर ही योजना आजही सुरू आहे .पूर्वी बऱ्हापूरात हे पाणी पोहचत होते पण आता काही भागात हे पाणी जाते कारण मधे बऱ्याच विहीरी व बोअर यामुळे याला फटका बसलेला दिसतो .
    सोबत या पाण्याच्या योजनेचा नकाशा दिला आहे की कशा पद्धतीने हे पाणी शहराच्या विविध भागात जायचे .यामध्ये सूखा भंडारा,मूल भंडारा,चिलाहरण भंडारा,कुंडी भंडारा हे भाग आहेत .याच कुंण्डी भंडाराला खूनी भंडारा सुद्धा म्हटलं जात याचं कारण पूर्वी त्या कुण्डीत खून झाले होते म्हणून स्थानिक त्याला खूनी भंडारा म्हणू लागले.
   अशी विस्मयकारी स्थळ प्रत्यक्ष पाहींली की एक वेगळी उर्जा शरीरात संचारते व मन पुढच्या मोहीमेकडे वळते .
    पुढच्या भागात आपण माहीती पाहू या अगबराच्याही अगोदरच्या काळात बांधल्या गेलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या प्रसिध्द शाही जामा मज्जीत विषयी..............

https://shivjagars.blogspot.com/2020/05/blog-post_28.html
                       संजय खांडवे 
                        9011971122

 
 
 

बाहुली विहिर -






















Post By..
Vidarbha Darshan
- बाहुली विहिर -
महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या सांभाळली जातात व अडगळ नाहीशी केली जाते. परंतु, आपल्याकडे अडगळ जपून ठेवत ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो. याचेच उदाहरण म्हणजे "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक "बाहुली विहीर' आहे.
अमरावती-जबलपूर मार्गावरील वेळा-हरिश्‍चंद्र गावाच्या परिसरात प्राचीन दगडांपासून बनविलेली बाहुली विहीर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर देवी-देवतांचे कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने-जाणते लोक सांगतात. आता या ऐतिहासिक वास्तूला विकासाची आणि सौंदर्यीकरणाची "तहान' लागलेली आहे. विहिरीची तहान वेळीच भागविल्या न गेल्यास सुमारे 150 ते 200 वर्षे जुना ऐतिहासिक वारसा लवकरच इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.
अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगायला विसरत नाहीत. काही वर्षांआधीपर्यंत परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता लोकांसह प्रतिनिधींनी व सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक विहिरीला उतरती कळा आलेली आहे.
बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहणार आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या उपराजधानीच्या हाकेच्या अंतरावर लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे आहे.
इतिहास पुसल्या जाण्याची भीती
ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्‍या तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झालेली आहे.
"चिअर्स' अन्‌ "लवर्स पॉइंट'
शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटची पाकिटे हमखास आढळून येतात.
 
http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/12/blog-post.html

पांढर पाणी"येथील विहिर..





"पांढर पाणी"येथील विहिर... पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे दरम्यान एक छोटस पांढरपाणि नावाच एक खेड गाव लागत हे गाव जरी छोट असल ना पन ह्या गावाचा इतिहास फार मोठा आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून निसटले ना तेव्हा त्यांना वाटेत भुख लागली असता,, तेव्हा ह्या गावात थांबले होते व त्यांच्या जेवनाची सोय एका (माऊली) आजीबाईनीं केली होती.
त्यांचे आडनाव चाचे होते असे समजले ,,महाराजांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्या माऊलीचे आभार मानले.. आणि त्या माऊलींना विचारले बोला तुम्हाला काय हवे आहे. तेव्हा ती माऊली म्हणाली आम्हाला दुसर काहि नाही पाहिजे राज.... फक्त आम्हाला व आमच्या लेकरा बांळाना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्या बस एवढच बाकी काही नाही पाहिजे राज.... माझ्या रांजानी दिलेला शब्द तर ते पाळनारच ना हिच ती शिवकालीन विहीर आज पण हि विहीर एवढे दिस झाले तरी हि इतिहासाची साक्ष देत ताट मानेने उभी आहे. अजून पण ह्या विहीरीची दुरुस्ती करायची गरज पडली नाही. अजून पण इथले लोक ह्याच विहिरीचे पाणी पितात...
जिकडे माझ्या राजांच.....
पाऊलखुणा ना...
तिकडे च आमच मस्तक ,,नतमस्तक होत..

http://maharashtra-bhakti-shakti.blogspot.com/2019/08/blog-post.html


 बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती

 ॥ श्री गणेशाय नमः ॥


वसई विरार हा पूर्वीपासूनच  हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो .  पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी  सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली .


बावखळ

बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .

 चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये .

चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतारावरून  येणाऱ्या पाण्याला आत मध्ये झिरपण्यासाठी मदत करतात . बावखळ गोलाकार किंवा चौकोनी असतं . त्याचा व्यास विहीरी इतका किंवा त्यापेक्षा मोठाही असतो . आजूबाजूला चिंच आंबा अशा गर्द वृक्षांची लागवड करतात जेणेकरून सावलीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं . त्याच सोबत या पानांचा खच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो आणि बाष्पीभवन कमी करतो . भेंड आणि करंज यासारख्या झुडप वर्गीय वनस्पती माती घट्ट धरून ठेवतात जेणेकरून पाण्यासोबत माती बावखळाच्या आत जाणार नाही . ( माहिती सौजन्य : श्री सचिन मर्ती . )

विहीरीशी तुलना केल्यास विहीर ही गोलाकार असते आणि तिचा व्यास कमी असतो . विहीरीच्या कडा दगड विटांनी पक्क्या बांधलेल्या असतात . पावसाचं पाणी  विहीरीत झिरपावं अशी अपेक्षा नसते . उलट तळाशी असलेले नैसर्गिक झरे पाण्याची पातळी ठरवतात . पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे आजूबाजूला झाडांची लागवड करत नाहीत . कारण झाडांची पानं पाण्यात पडून पाण्याची गुणवत्ता खराब होते .


चित्र क्र . २ .बावखळ, सभोवतालची झाडं, मध्यभागी रहाटाची सुविधा .


चित्र क्र . ३ . बावखळा भोवतीची सावली साठी लावलेली झाडं .


चित्र क्र . ४ . बावखळाभोवतीची झुडूपं

स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -

स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक कुटूंबांचं मिळून एक बावखळ असे . प्रत्येक कुटूंब त्याचा आलटून पालटून वापर करत असे . बैलजोडी आणि रहाटाचा वापर पाणी उपसण्यासाठी केला जाई . रहाटाला मातीची मडकी जोडली जात , आणि त्यांची रचना अशी असायची की त्यातून थोडंसं पाणी पुन्हा बावखळात परत जाई . तसंच बैलजोडी वापरल्याने बैलांच्या क्षमतेनुसार पाणी उपसा होत असे . दिवसातून ८ तास काम केल्यावर बैलांनाही आराम दिला जाई . त्यामुळे पाणी उपसा नियंत्रित प्रमाणात होई आणि खाली गेलेली पाण्याची पातळी उरलेल्या सोळा तासांच्या कालावधीत पूर्ववत होत असे .  बाहेर पडलेलं पाणी लहान चर खोदून शेतांपर्यंत पोहोचवलं जाई . 

 सध्याची परिस्थिती : -

गेल्या पंचावीसेक वर्षांत वसई विरार नगरपालिका आणि आजच्या घडीला महानगरपालिकेने बरीच धरणं बांधली आणि घरोघरी नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली . तसंच ह्या भागात झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमुळे इथल्या तरुणाईला परदेश आणि तिथलं जीवनमान आकर्षित करू लागलं. त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागलं . जमिनींना सोन्याचे भाव आले आणि बावखळ जमिनीचा बराचसा भाग व्यापत असल्यामुळे त्यांना बुजवून नवीन इमारती आणि नवीन घर बांधण्याकडे लोकांचा कल वाढला .

औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची जागा मोटरनी घेतली . त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळेत आणि किती पाणी उपसा करायचा यावर बंधन उरलं नाही . परिणामी जवळ असलेल्या समुद्राचं खारट पाणी बावखळात जमिनी खालच्या झऱ्यांमधून शिरू लागलं. पाण्याची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडली . काही बावखळं तर आज बेवारस पणे पडून आहेत . त्यांत कचरा घाणीचं साम्राज्य आहे . फक्त काहीच बावखळं अशी आहेत ज्यांचा आजही सिंचना साठी वापर होतो . ती बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत ( चित्र क्रं. २, ३, ४ ) .


चित्र क्र. ५ . बावखळांची दुर्दशा .



पृथिव्यां त्रीणि रत्नानी जलमन्नं सुभाषितं ।
मुढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थात पृथ्वीवर तीनच रत्न आहेत . जल अन्न आणि सुभाषित ! पण मुर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न संज्ञेने ओळखतात .

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .

https://www.chaturthamiti.in/2022/07/blog-post.html


 बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )

॥ हर हर महादेव ॥

ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .



चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .

चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .

चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .

चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव (  पॅनारोमा ) .

बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples )  सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई )म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल . 

बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना . 


चित्र क्रमांक ४ . बारवेतली गणेश मूर्ती .

मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात . 


चित्र क्रमांक ५ .बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .

श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .


चित्र क्रमांक ६ . ११ रुद्रापैकी एक मूर्ती

गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.

चित्र क्रमांक ७ . आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न

मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते . 
संदर्भ : - मूर्ती विज्ञान , डॉ . गणेश हरि खरे .

चित्र क्रमांक ८ . बारव आणि त्यातली समृद्ध जैव विविधता

मानवासोबतच इतरही जीव बारवांशी जोडलेले असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे  कासव आणि मासे . आणि त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या पक्ष्याचं खंड्याचं ( King Fisher ) हे छायाचित्र .









https://maitri2012.wordpress.com/2024/09/
भाग १० : किल्ला आणि बंधारे

ग्वाल्हेरच्या माणसाला ग्वाल्हेर किल्ल्याचे प्रचंड आकर्षण व तेवढेच अप्रूप..दिसायला निःसंशय अतिशय देखणा..पर्शियाहून आलेला निळा रंग वापरून ” मान मंदिर ” चे अनोखे रूप,तो तजेला अजूनही तेवढाच मोहात पाडतो. मी जेव्हा मुंबईला प्रथम आले आणि पूज्य मामंजी म्हणाले, “मी जरा मुंबईला जाऊन येतो हं,” मी दचकलेच ..”आपण मुंबईतच आहोत ना ?” पण नंतर खसखस पिकली, कळताच की ही जुनी पिढी अजूनही फक्त दक्षिण मुंबईलाच मुंबई मानते. इतर फक्त उपनगरे..तसेच ग्वाल्हेरला प्रथम जाणारा माणूस भांबावतो. स्टेशनवर उतरताच त्याच्या कानी टेम्पो, रिक्षावाल्यांची पृच्छा ऐकू येते, ” साब, ग्वालियर, ग्वालियर ??..”
कारण तेथेही बिरला नगर, लष्कर, ग्वालियर, मुरार असे भाग पाडले आहेत. किल्ला हा ” ग्वालियर ” भागात येतो. पूर्वी तो पायथा इतका गजबजलेला नव्हता.. आता भयंकर दाटी वाटी झाली आहे. सर्वच शहरांची ही वाढीव लोकसंख्या पूर्वीचे निसर्ग सौंदर्य नष्ट करीत आहे याचा खेद वाटतो.

 

 

असे म्हणतात..सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हा किल्ला अस्तित्वात आहे. येथेच एक शिलालेखही मिळतो ज्यावरून सिद्ध होते की ‘ शून्य ‘ ही भारताचीच देणगी आहे . असे सांगतात, या किल्ल्याची सुरवात राजा सूर्य सेनने केली. बेसाल्ट खडक असलेल्या या डोंगराला ” गोपाचल किंवा गोपगिरी  ” म्हणत असत.याचाच अर्थ कृष्णाचे गोप म्हणजे  ” ग्वाल ” येथे राहत.. त्यांच्या सहच ..”अय्यर ” राहत.. त्याचा अपभ्रंश होत ..इयर ..झाले आणि नाव पडले ..ग्वालियर. नूतनीकरण केलेला किल्ला ही तोमर राजपूत राजे ..मानसिंग तोमरचे कार्य आहे. ग्वाल्हेर नावाबद्दलही अनेक कथा ऐकायला मिळतात. किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आणि जुना आहे. रसिक वाचकांना त्याबद्दल भरपूर व्हिडीओज अथवा माहिती महाजालावर मिळते. आता तेथे ” साऊंड आणि लाईट शो ” उत्तम प्रतीचा बघायला मिळतो.

महाराज मानसिंग एकदा मृगया करण्यास गेले असता त्यांना निन्नी नावाची एक गवळण दिसली. दोन धृष्टपुष्ट वळू त्वेषाने एकमेकांवर चालून जात होते. त्यांचे ते महाभयंकर नाक फुलवित, फुत्कार सोडीत होणारे युद्धच जणू ..या मुलीने लीलया सोडवले. ते बघून राजा आरक्त..!. तिला पट्टराणी करणारच, हे ठरविल्याने इतर मंत्रीगण नाराज झालेत पण राजाची इच्छा! ती स्वाभिमानी मुलगी, गरीब, खालच्या जातीची पण बाणेदार ..तिने तीन अटी घातल्या

१..मी या सांक नदीचेच पाणी पिणार..
२..मी वेगळ्या महालात राहणार ..
३..तुम्ही जर युद्धावर गेलात तर मी देखील येणार ..

‘मृगनयनी’ कादंबरीचे मुखपृष्ठ

तिच्या या तीनही अटी मान्य झाल्या. ते गुजरी महल देखील बघण्यासारखे आहे. तिच्यासाठी मोठमोठाले पाईप्स घालून सांक नदीचे पाणी तिच्या महालापर्यंत आणले. ती पाईपलाईन अजूनही दिसते. ती संगीतज्ञ होती, असेही सांगतात. आख्यायिकाही असू शकतात. राग..गुर्जरी तोडी ..हा तिनेच तयार केला .. म्हणतात. अकबराच्या नवरत्नांपैकी तानसेनने ‘मियाँ की तोडी’ जसा तयार केला. ती देखील दंतकथा आहे असे म्हणतात. तिचे डोळे सुंदर मृगासारखे असल्याने राजाने तिचे नाव  ” मृगनयनी ” ठेवले. मध्यप्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वृंदावनलाल वर्मा हे वडिलांचे परिचित..त्यांनी ‘मृगनयनी’ नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांच्याच हातून ती मला बक्षीस मिळाली, हा अपूर्व योग होता. त्यांच्या तोंडून त्या कथा ऐकणे म्हणजे मेजवानीच होती. आमच्या शाळेचा हा आणखी एक अनोखा उपक्रम.

त्या किल्ल्यावर आम्ही पुढील बाजूने चढूनही जात असू, कधी कधी मागील रस्त्याने कारने जात असू. ते खास किल्ल्यावर असलेल्या शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी. खूप सुंदर रंगमंच होता त्यांचा..खुले रंगमंदिर ..दगडी पायऱ्या वगैरे. श्रीमंत जीवाजीराव शिंदे पण बघायला येत. याच शाळेत हिंदी चित्रपट नट सलमान खान, नितीन मुकेश वगैरे शिकत असत. एकदा गंमतच झाली .. वडिलांना काम असल्याने ते लवकर उठले. खरे तर असा एक अलिखित नियम होता ( अगदी दंडक नव्हे पण ) की राजे निघून गेल्यावरच इतर जातील..पण आमची प्रशस्त कार निघाली ..आणि त्या वळणदार रस्त्यावर, गोल गोल उतरत जाणाऱ्या त्या वाटेवर प्रत्येक वळणावर शिपाई खाडकन उभे राहत होते, आम्हाला सलाम करीत होते. काही वेळानंतर लक्षात आले, ते असे का वागले आणि खूप हसू लागले सर्व. आमचा कारचालक तर अगदी आनंदी..

त्या किल्ल्यासमोरच आमचे एक काका राहत असत. त्यांच्या गच्चीवरून मानमंदिर दिसे..रेखाटने करायला सोपे .

 

गूजरीने जेथून सांक नदीचे पाणी आणवले तो बांध बघायला आम्ही जात असू. तिगरा डॅम. माझ्या वडिलांना सर्वांना घेऊन सहलीला जायला आवडत असे. स्वतः इतके व्यस्त. वकील, लेखक, कवी, पुढारी, समाजकार्यात झोकून देणारे पण सहलीसाठी ही वेळ काढत. त्यासाठी खूप मोठा लाकडी पेटाराही बनवून घेतला होता. त्यात आजकाल मॉड्युलर किचनमध्ये असतात तसे अनेक कप्पे. ज्यात वाट्या, भांडी हा पसारा व्यवस्थित राहत असे. सहलीच्या जागी मस्त जागा शोधून मुलांचा नाश्ता पाणी होई. ती भांडी नदीवर जाऊन आम्ही मुले धुवतही असू.. बहुधा बहिणीच. भाऊ झाडावर चढून मस्ती करण्यात दंग किंवा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात. तो पेटारा मोठ्या कारमध्ये सहज मावत असे..असाच एक भरपूर मोठा पाच खणी डबा.. त्यात अगदी खाली कडी कोयंडा, जाळीदार डबा..ज्यात निखारे ठेवलेले.. वरील डब्यातील अन्न गरमागरम राहावे म्हणून ..  माझ्या बहिणीच्या मैत्रिणी गायिका..त्यासुद्धा येत कधी.. त्यांच्या गायनाने रंगत येई.

असेच हरसी डॅम, रमौवा डॅम, देवखोह, बुराखोह, बलदेव कुंडी, कुंवर बाबा ही स्थळे. जेथे पोहणे अनिवार्य. बालपणी पाण्याला प्रचंड घाबरणारी मी. पण सर्व आलेच पाहिजे हा वडिलांचा दंडक. त्यामुळे कितीही वेळा आईच्या पदराआड लपण्याचा प्रयत्न केला तरी ते मामाच्या मदतीने खेचणारच मला…त्याचमुळे सर्व मुले छान पोहू लागली. माझी बहिण वनिता तर सर्वोत्तमच पट्टीची पोहणारी..अजूनही पोहते. बुराखोला तर मामाला एकदा वाघीण आणि तिची पिल्ले देखील दिसली होती.


देवखोह अतिशय रम्य परिसर आहे. कारने वर चढत जाणे, पुनः खाली उतरणे… नंतर पायऱ्या उतरून त्या खोहमध्ये जाणे. ती जागा चारी बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द सावलीत विसावलेली. जवळच झुळझुळ वाहणारी नदी. तेथे आम्ही बरेचदा जात असू. इतरही काही समूह येत. अशा जागी मानावयाचे नियम धाब्यावर बसविणारे. एकदा असेच दुसऱ्या लोकांनी धूर केला. त्यामुळे त्या झाडावरच्या पोळातील मधमाश्या चवताळल्या. खाली धुराच्या साम्राज्यात तर जाणे कठीण आमच्याच बाजूला आल्यात. नुसती पळापळ ..आरडाओरडा. सगळे सामान तेथेच टाकून त्या ओबडधोबड पायऱ्या चढून वर जाणे आणि कारमध्ये बसणे केवळ अशक्य. सर्वात जास्त माझ्याच अंगावर. भाऊ घाबरला. त्याने काळजीपोटी माझ्या अंगावर जाड सतरंजी टाकली, त्यामुळे खूप मधमाश्या त्याच्या अंगावर गेल्या आणि मी वाचले. त्या सतरंजीच्या आत डोळ्यात, कानात जाणाऱ्या मधमाश्या मला दिसत होत्या. थोड्या वेळाने माझी शुद्धच हरपली. माझ्या बहिणी सांगतात ..किती तरी वेळ नंतर त्या माझ्या अंगावरील अडकलेले डंख काढीत होत्या. सर्वात मोठ्या भावाने तर अगदी चक्क विदेशी बनावटीचा नवीन सुंदर कॅमेरा फेकून दिला. माणसाला प्राणापेक्षा अधिक काय प्रिय असू शकते हे जाणवले.

त्या दिवशी आमच्या ड्रायव्हरची कमाल होती. स्वतःला वाचवित, कारमध्ये शिरलेल्या असंख्य  मधमाश्यांना टॉवेल गुंडाळलेल्या एका हाताने सावरीत, एका हाताने स्टीयरिंग व्हील  धरीत, त्या टेकडीवरून हळूहळू कारचा पहिला, दुसरा गियर बदलत चढणे, उतरणे किती अवघड ..घृ घृ करत कार कशीबशी वर चढत होती .खूप लांबवर आल्यानंतर त्या मधमाश्या कमी झाल्यात. हळूहळू दिसेनाश्या .. असे वेगवेगळे अनुभव कधी गमतीशीर तर कधी भयावह.
पण जीवन शिकविणारे. गरजेचे.

पुढील अंकी समापन ]

–  ©️ सौ.स्वाती वर्तक,
खार (प), मुम्बई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com



कुंआ: मानव सभ्यता की पहचान

ल ही जीवन है, क्षितिज, जल, अग्नि, गगन एवं हवा आदि पंच तत्वों में अनिवार्य तत्व जल भी है। बिना जल के जीवन की कल्पना भी नहीं की जा सकती। मानव ने सभ्यता के विकास के क्रम में जल की अनिवार्य आवश्यकता की पूर्ति हेतु नदियों एवं प्राकृतिक झीलों के किनारे अपना बसेरा किया। वह नदियों एवं झीलों के जल से निस्तारी करता था। जब मानव समूह विशाल रुप लेने लगे तो गाँव एवं नगर बसने  लगे। निवासियों के लिए जल उपलब्ध कराने की दृष्टि से कुंए, तालाब इत्यादि निर्मित किए जाने लगे। आवागमन के मार्गों पर जल की व्यवस्था कुंए एवं प्याऊ के रुप में की जाने लगी। इस तरह भू-गर्भ जल की उपस्थिति को मनुष्य ने जान लिया और मानवकृत जल के संसाधन विकसित होने लगे।
हड़प्पाकालीन नगर लोथल (गुजरात) के कुंए का निरीक्षण करते हुए विनोद गुप्ता जी के साथ
पेयजल की उपलब्धता के लिए प्राचीन काल से मानव ने कुंए, बावड़ियों एवं तालाबों का निर्माण किया। पुरातात्विक स्थलों के उत्खनन के दौरान प्राचीन नगर बसाहटों में कुंए मिलते हैं। हड़प्पा काल में नगर के मध्य एवं व्यापारिक केन्द्रों में पक्के कुंए होते थे। मोहन जोदड़ो, हड़प्पा, लोथल इत्यादि स्थानों पर उत्खनन के दौरान पक्के कुंए प्राप्त हुए हैं। इसी तरह छत्तीसगढ़ अंचल के सिरपुर में पक्के प्राचीन कुंए उत्खनन में प्राप्त हुए हैं, जिनमें अभी भी मीठा जल उपलब्ध है। इसके साथ ही प्राचीन व्यापार मार्गों पर भी कुंओं के अवशेष मिलते हैं। 

तुलसीदास जी ने रामचरित मानस में रावण की वाटिका वर्णन करते हुए लिखा है - बन बाग उपवन वाटिका, सर कूप वापी सोहाई। जल के बिना जीवन नहीं है, अत: रावण की लंका में भी कूप, वापी सरोवरों की बहुतायता पाई गई। स्नान के लिए सरोवर, पेयजल की प्राप्ति के लिए कूप एवं सिंचाई तथा पशुओं की निस्तारी के लिए बावड़ियों का निर्माण कराया गया था। राज्य द्वारा प्रजा की सुविधाओं को ध्यान में रखते हुए जल की उत्तम व्यवस्था की जाती थी। 

संस्कृत साहित्य के प्रसिद्ध कवि बाण अपनी कृति कादंबरी (सातवीं शताब्दी) में पोखर-सरोवर खुदवाने को सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानते थे. लोक-कल्याण हेतु इस प्रकार के खुदवाए गए जलकोष को चार वर्गों में विभाजित किया गया है- 1.कूप जिसका व्यास 7 फीट से 75 फीट हो सकता है और जिससे पानी डोल-डोरी से निकाला जाए, 2. वापी, छोटा चौकोर पोखर, लंबाई 75 से 150 फीट हो और जिसमें जलस्तर तक पाँव के सहारे पहुँचा जा सके, 3.पुष्करणी, छोटा पोखर, गोलाकार, जिसका व्यास 150 से 300 फीट तक हो, 4.तड़ाग पोखर, चौकोर, जिसकी लंबाई 300 से 450 फीट तक हो.।

जल की व्यवस्था हमारे समाज के लिए कभी मजबूरी रही होगी परन्तु कालांतर में इसने परम्परा का रुप ले लिया। पोखर की चर्चा ऋग्वेद में भी है. गृह्मसूत्र के अनुसार, किसी भी वर्ग या जाति का कोई भी व्यक्ति, पुरूष या स्त्री पोखर खुदवा सकता है और यज्ञ करवाकर समाज के सभी प्राणियों के कल्याण-हेतु उसका उत्सर्ग कर सकता है. आज भी यह काम पुण्य कमाने का समझा जाता है। कुंआ पोखर आदि निर्माण करने को प्रोत्साहित करने के लिए शास्त्रों द्वारा महिमा मंडन किया गया, कहते है - जो धनी पुरुष उत्तम फल के साधन भूत ‘तडाग’ का निर्माण करता है और दरिद्र एक कुआँ बनवाता है, उन दोनों का पुण्य समान होता है। जो पोखरा खुदवाते हैं, वे भगवान् विष्णु के साथ पूजित होते हैं।

महाभारत में भीष्म पर्व के माध्यम से वेदव्यास ने कोई तालाब कितने समय के लिए पानी संचित रख सकता है उसके अनुरूप उनका विभाजन किया है। उन्होंने इस तरह के तालाबों के निर्माण से मिलने वाले पुण्य की भी व्याख्या की है। हिन्दू संस्कृति में इस तरह के जल-स्रोतों का निर्माण एक धार्मिक कृत्य माना जाता रहा है और इसे अपनी कीर्ति रक्षा का सबसे सहज उपाय भी बताया गया है। कूप या कुएं इस श्रृंखला की सब से छोटी इकाई हुआ करते थे जो कि न केवल पेय जल के स्रोत थे वरन उनके आकार के अनुसार उनसे सिंचाई की भी संभावनाएं बनती थीं। 
सिरपुर के बाजार क्षेत्र के मध्य कुंआ
कवि केशवदास ने कविप्रिया में नगर वर्णन करते हुए लिखा है -  खाई कोट अट ध्वजा, वापी कूप तड़ाग, वार नारी असती सती, वरनहु नगर सभाग। पदमावत में जिक्र है कि वारी सुफ़ल आहि, तुम बालापन में ही फ़ल गई, मध्यकाल में वाटिका लगाने के बाद उसका विवाह किया जाता था। तब तक लगाने वाला उसका फ़ल न खाता था। वाटिका लगाने एवं फ़लने के बाद वापी कूप तड़ाग का विवाह करने के बाद ही स्वामी उनका उपभोग करता था। व्यंग्य करते हुए कहा है कि - तुम्हारी वाटिका तो कुंवारी ही फ़ल गई।

कुंओं का निर्माण करना साधारण कार्य नहीं था। भू-गर्भ से जल निकालने के लिए भू-तल तक उत्खनन करना पड़ता था। कुंओं का निर्माण करने के लिए शिल्पशास्त्रों ने विधान बताया है। शिल्पशास्त्र मयमतम के रचयिता कहते हैं - ग्राम आदि में यदि कूप नैऋत्य कोण में हो तो व्याधि एवं पीड़ा, वरुण दिधा में पशु की वृद्धि, वायव्य कोण में शत्रु-नाश, उत्तर दिशा में सभी सुखों को प्रदान करने वाला तथा ईशान कोण में शत्रु का नाश करने वाला होता है । ऐसा कहा गया है ॥१-२॥ वराह मिहिर ने कहा है -  यदि ग्राम के या पुर के आग्नेय कोण में कूप हो तो वह सदा भय प्रदान करता है तथा मनुष्य का नाश करता है । नैऋत्य कोण में कूप होने पर धन की हानि तथा वायव्य कोण में होने पर स्त्री की हाने होती है । इन तीनों दिशाओं को छोड़कर शेष दिशाओं में कूप शुभ होता है ॥४-५॥

स्थान चयन के लिए परम्परागत साधनों से भू जल की उपस्थिति जांचने के बाद समस्त देवताओं का आहवान एवं पूजन करके कूप का निर्माण निश्चित किया जाता था। सही मुहूर्त में कूप का निर्माण प्रारंभ किया जाता था। भूमि के आधार पर कुंओं को खोदने के पृथक पृथक निर्माण विधि प्रयोग में लाई जाती थी। जहाँ मिट्टी मजबूत होती थी वहाँ वांछित गहराई तक कुंआ खोदने के पश्चात उसे ईंटों या पत्थरों से पक्का बांधा जाता था। जहाँ रेत पाई जाती है वहाँ जमीन पर ही कुंओं की चिनाई करके बाद उसके नीचे की रेत धीरे-धीरे सावधानीपूर्वक निकाली जाती है। इसे स्थानीय भाषा में "कोठी गलाना" कहते हैं। यह विधि खतरनाक भी  है क्योंकि यहाँ कुंओं में जल सामान्य से अधिक उत्खनन के पश्चात निकलता है। कभी कभी ईटों के भसकने के कारण मजदूरो के दब जाने से जान लेवा दुर्घटनाएँ हो जाती हैं।

शास्त्रकार कूप निर्माणकार के प्रोत्साहन की दृष्टि से नारद पुराण कहता है- एकाहं तु स्थितं पृथिव्यां राजसन्तम। कुलानि तारयेत् तस्य सप्त-सप्त पराण्यपि।।65।। अर्थात्-जिसकी खुदवाई हुई पृथ्वी में केवल एक दिन भी जल स्थित रहता है, वह जल उसके सात कुलों को तार देता है। दीपालोक प्रदानेन वपुष्मान् स भवेन्नरः। प्रेक्षणीय प्रदानेन स्मृतिं मेधां च विंदति।।66।। अर्थात्- ‘दीप दान’ करने से मनुष्य का शरीर उत्तम हो जाता है और जल के दान के कारण उसकी स्मृति और मेधा बढ़ जाती है। -बृहस्पति स्मृति।  

शास्त्रों में नृपों के लिए स्पष्ट निर्देश देकर जल प्रदुषित एवं जल साधन नष्ट करने वाले के लिए दंड का विधान किया गया है। लिखित स्मृति कहती है- पूर्णे कूप वापीनां वृक्षच्छेदन पातने। विक्रीणीत गजं चाश्वं गोवधं तस्य निर्द्दिशेत्।। अर्थात्- जो मनुष्य कुआँ या बावड़ी को पाट देता है, वृक्षों को काट कर गिरा देता है तथा हाथी या घोड़े को बेचता है, उसे ‘गौ के हत्यारे’ के समान मानकर दण्डित करना चाहिए। ‘तडाग देवतागार भेदकान् घातयेन्नृपः।।‘ ‘अग्नि पुराण’ में राजाओं के लिए स्पष्ट निर्देश है कि यदि कोई व्यक्ति जलाशय या देवमंदिर को नष्ट करता है तो राजा उसे ‘मृत्युदण्ड’ से दण्डित करे। स्कंद पुराण के माहेश्वर खण्ड में कहा गया है कि जो व्यक्ति पोखरा को बेच देते हैं, जो जल में मैथुन करते हैं तथा जो तालाब और कुओं को नष्ट करते हैं, वे ‘उपपातकी’ हैं। ऐसे व्यक्ति जब दुबारा जन्म लेते हैं तो वे अपने ‘हाथों’ से वंचित होते हैं।
सिरपुर के प्राचीन बाजार क्षेत्र के मध्य कुंआ
जल सर्वकाल में मानव एवं चराचर जगत के लिए जीवन का स्रोत है, इसके महत्व को प्राचीन काल के मानवों ने समझा तथा जल की समुचित व्यवस्था की ओर ध्यान देते हुए जल के संसाधनों के रुप में कूप, तालाबों का निर्माण करवाया। हरियाणा, राजस्थान एवं उत्तर प्रदेश के हरितक्षेत्र में कुंआ पूजन का विधान है। पुत्र जन्म होने पर स्त्रियाँ सद्य: प्रसुता से कुंए की समारोह पूर्वक पूजा करवाती हैं। यह जल संसाधन के प्रति सम्मान एवं कृतज्ञता प्रकट करने का सामाजिक नियम निर्मित किया गया है। इस तरह कुंए प्राचीन काल से मानव सभ्यता एवं प्राणी जगत की जलापूर्ति का साधन बने हुए हैं। बढती हुई जनसंख्या के समक्ष जलापूर्ति एक विकराल समस्या के रुप में सामने आ रही है। भू-जल का स्तर निरंतर गिरता जा रहा है। पर्जन्य से जितना जल पृथ्वी पर आता है उसे बचाकर भू-गर्भ के जल की वृद्धि करने का प्रयत्न करना चाहिए।

Tale of Three Baolis


Baolis, or baoris, or vavs, or step-wells, are underground water sources that have been popular in India from the ancient times, especially in the dry areas of this subcontinent. These step-wells generally consisted of two parts, a rectangular tank or kund, and a circular well that extended down to reach the water table. The well provided potable water for drinking, while the tank or kund was primarily used for bathing, washing, and watering crops. During summers the baolis with attached rooms also served as cool resting places for the pilgrims, passing caravans, and other travellers. These architectural marvels were generally commissioned by members of the royal families or by wealthy patrons, for the benefit of the common people.

While varying in style, where the baolis could vary from a L-shaped structure, to a rectangular one, to a circular form, they showed some common features too, such as a flight of stairs that led from the ground level to the water below. Many baolis built under Hindu patronage also served as temples that had figures of gods, goddesses, and animals; shaded pavilions with trabeate columns; corbelled domes; and elaborate carvings. Baolis under Islamic patronage had less ornamentation, no human or animal forms, and had the true domes and arches. In the later periods, often both styles were fused. Both types had circular wells for potable water, where a pulley system was sometimes used for drawing water.

The earliest step-wells in India were first seen in the 3rd century CE. These were basic in architecture, and were designed more out of necessity to store monsoon rain waters for use during the arid summer months. It was necessary to have a year-round water supply, especially in the dry north-western parts of India. Over the centuries, the basic baoli forms gave way to complex architectural structures. According to the historians, by early 19th century there were several thousand step-wells, built on various scales, thriving in India.  However, by the early 20th century, only few baolis remained in functional condition, as the British viewed these structures as unhygienic. So they were often filled in, or simply destroyed. Besides this, modern technology brought in plumbing lines and the tap water system that made baolis redundant. Currently the government has started with the preservation and conservation of baolis that still remain, marking them as heritage/ancient monuments.

untitled-1

Abhaneri or Chand baoli built in 8th -9 th CE in Rajasthan beside the Harshad Mata temple. The arched upper parts are clearly a later addition, while it is likely that the lower parts which show trabeate form of columns and niches are a part of the orginal structure of the baoli.

Dholpur baoli (Rajasthan)

Hidden behind the Ghazra ka tomb, is this pretty red sandstone 19th centory baoli. The structure, though unknown to most that visit this little town, is unique for its beautiful double pillars and delicate arches that surround its long rectangular tank and a circular well at the back. Hemmed in by buildings on all sides, the structure looks better conserved  than the neighbouring Ghazra ka tomb, though in terms of cleanliness much needs to be done. The tank water, as usual, remains dirty, though the well water appeared clean.

dsc_0038

the Dholpur baoli- surrounding residences and unclean waters of the tank fail to dim its unique beauty

dsc_0032

unique double pillars and delicate arches are the main attractions of the Dholpur baoli

dsc_0043

the well at the back, which is double-storied

dsc_0048

the circular pattern of the well (the arches show distinct Mughal influence)

dsc_0047

the circular well water looks relatively clean

Gwalior fort step-well (Madhya Pradesh)

Inside the Gwalior fort is a step-well, situated on the left side as one enters the palace complex gates. It is a single, circular, deep well, situated beside a many-pillared hall, which earlier held a shiva-lingum that was thrown down the fort walls by Emperor Jahangir, later to be discovered by a peasant tilling his grounds, and is now placed inside a temple outside the fort gates.

dsc_0321

entrance gate to the baoli (note the arches) within the Gwalior fort

dsc_0333

The circular baoli with its mossy green waters. There is a pillared passage that runs round the well. The entrance to the well is closed, with the steps plastered off to stop people from reaching the waters down below.

dsc_0334
The circular baoli with pillared hall at top

Raniji ki baoli at Bundi (Rajasthan)

Raniji ki baoli is a beautiful step-well, situated in Bundi. According to the signboard outside the baoli complex, the story goes that in late 16th century the king of Bundi married Rani Nathavati, as his previous queen failed to produce an heir. Rani Nathavati in due course gave birth to a son, which led to the previous queen turning envious. After placing her son under custody of the elder queen, Rani Nathavati devoted her entire life in caring for her subjects, wherein she built this step-well in 1699. The baoli has beautiful carvings mainly of elephants and is 46 meters deep. It has high-arched gates with niches for various deities.  At the entrance is a gate comprising of four tall pillars, joined beautifully at the top by elephant figures on beams and S –shaped (ogee) slender arches (brackets).

dsc_0115

The gate as one enters the Raniji ki baoli. Beautiful elephants and S-shaped arches adorn it

dsc_0106

the intricately carved arch above the tank water, with two elephants serving as brackets at two corners. The arches are distinctly Mughal influenced

dsc_0108

the well wall at the back, with an imposing arch and a small passage in the foreground separating the well from the tank in front

dsc_0107

deities carved in niches on the well wall at the back

dsc_0111

figures of elephants carved on the passage (balcony) wall that separates tank from well

dsc_0117

intricately carved elephant (with a mahout on its back) serving as a bracket in Raniji ki baoli

dsc_0116

delicate carvings on the four pillared gate at the entrance

(This article was published on Virasat E Hind)






अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वापी (बारव) बांधलेला एक नवीन शिलालेख!!!!!!!
===================================
परतूर येथील वापी (बारव ) शिलालेख !!!!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याच्या ठिकाणी महंमद अली रोड वर मुख्य रस्त्यालगत असलेल्या महादेव मंदिराच्या शेजारच्या बारवेच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस वरच्या थरावर एका शिळेवर कोरलेला आहे .सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून तीन ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी –संस्कृत मिश्र भाषेत आहेत .लेखाची शिळा आयताकृती असून त्यावरील अक्षरे सुवाच्च एक सारख्या आकाराची कोरलेली आहेत .लेखाच्या प्रत्येक ओळीत सुरुवातीला व शेवटी उभे दंड दिले असून काही ठिकाणी विसर्ग देखील दिले आहेत .अनेक वर्ष लेख उघड्यावर असून त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून काही अक्षरे थोड्या प्रमाणात झिजली आहेत .तरी देखील लेख स्पष्टपणे दिसून सहज वाचता येतो
===================================
शिलालेखाचे वाचन :
१.||श्री सुत :श्री व्यंकटेश सहित: शांडिल्य गोत्रज:|
२.||वासुदेवा सिध(व)श्व के(क्ते) सुधा सागर वापि कां ||
३.|शके १६२४ चित्रभानौ अक्षय तृतीयाशी || श्री ||
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६२४व्या वर्षी चित्रभानु सवंत्सरात वैशाख शुद्ध तृतीया .म्हणजेच १९ एप्रिल १७०२ अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर रविवार या दिवशी व्यंकटेशाच्या पुत्राबरोबर शांडिल्य गोत्री वासुदेव यांनी अमृतासारखे पाणी असणारी वापी (बारव) बांधली.
===================================
शिलालेखाचे महत्व :- , शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील अक्षरे देखील सुबक असून एकसारखीच आहेत . शिळेवर पहिल्या ओळीच्या सुरवातीला व शेवटी उभे दंड दिले आहेत. श्री व्यंकटेश सहित शांडिल्य गोत्र असलेले वासुदेव यांनी अमृतासारखे पाणी असलेली बारव बांधली आहे . त्यांनी लोकांच्या सेवेकरिता पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून एक सामाजिक व लोकहिताचे पुण्यकार्य केलेले आहे .अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांनी पुढाकार घेवून ईश्वर कृपेने प्रयत्न करून बारवे सारखे एक जलतीर्थ निर्माण करणे ही एक विशेष बाब आहे .एक भव्य बारव बांधून तेथील जनसामान्य करिता जनहिताचे .सामाजिक ,धार्मिक ,जल निर्मितीचे पुण्य कार्य करून ती माहिती शिलालेख स्वरूपात करून सर्वासमोर ठेवणे हेच या शिलालेख चे विशेष महत्व आहे
===================================
अक्षय तृतीया मुहूर्त :-अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी केलेले कार्य, दान आणि उपवास अक्षय (अविनाशी) मानले जातात, म्हणूनच याला अक्षय्य तृतीया म्हणतात. . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी दान-धर्म करणे, विशेषतः पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.व देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते, जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो, तो पापांतून मुक्त होतो, अशी धारणा आहे. या दिवशी केलेले कार्य नेहमीच शुभ आणि सकारात्मक परिणाम देतं, असं मानतात. अक्षय तृतीया हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, जो विविध प्रकारे साजरा केला जातो.
===================================
गावाचे नाव : मु पो.परतूर ता.परतूर , जि. जालना
जी.पी.एस. :१९ .५९ ” ५४. ९३ ,७६.२१ ’’६८ ’७६
शिलालेखाचे स्थान :- बारवेच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस वरील थरावर कोरला आहे.
अक्षरपद्धती : उठावाचा स्वरूपाचा लेख आहे
भाषा : देवनागरी लिपी मराठी संस्कृत मिश्र भाषा
प्रयोजन : वापी (बारवेचे) बांधकाम पूर्ण झालेची स्मृती जपणे .
मिती / वर्ष : –शके १६२४ चित्रभानु नाम संवत्सरी वैशाख शुद्ध तृतीया
काळ वर्ष : १८ वे शतक -१९ एप्रिल १७०२ रविवार.
कारकीर्द :-औरंगजेब –महाराणी ताराराणी कालखंड
व्यक्तिनाम : श्री व्यंकटेश ,वासुदेव
शिलालेखाचे वाचक : श्री .अनिल किसन दुधाणे .
संक्षेप :- का.काम,
संदर्भ -(IE VI -२०६ )
टीप ... सदर कार्यात अथर्व पिंगळे व रोहन काळे यांची मदत व सहकार्य लाभले
##############################
@©अनिल दुधाणे











 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...