गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य
(छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे
प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे – “… तसेच गडावरी आधी उदक पाहून
किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थल तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी
खडक फोडून तली – टाकी पर्जन्यकालापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत
बांधावी.” गड किल्ले यांची उभारणी करताना आधी उदकपाण्याची सोय करूनच किल्ला
बांधावा या विचारातून शिवरायांची दूरदृष्टी आढळते.
आज्ञापत्रातील पुढील उद्गारांतून पाण्याचे महत्त्व स्पष्ट होते- “गडावर
झराही आहे, जैसे तैसे पाणी पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानावी.
उद्योग करावा. कि निमित्य की जुझामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प
होताना आणि पाण्याचा खर्च विशेष लागते, तेव्हा संकट पडते या करिता तैसे
जागा जखिरियाचे पाणी म्हणोन दोन – चार तली – टाकी बांधून ठेवून त्यातील
वाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे”
लढ्यांच्या वेळी दारूगोळ्यांमुळे जिवंत झरे आटण्याचा संभव असतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक गडावर पाणीसाठा असला पाहिजे. कृत्रिमपणे साठवून ठेवलेल्या त्या पाण्याला ‘जखिरियाचे पाणी’ असे म्हटले जात असे. ते पाणी सडू नये म्हणून काळजी घेतली जात असे.
डॉ. मिलिंद पराडकर यांनी दुर्गबांधणीच्या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे मांडले आहेत –
अशा शिल्पशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र अशा कोणत्याही विषयांवरील
‘प्राचीन, अर्वाचीन ग्रंथांमध्ये दुर्गांबद्दल बारकाव्याने विचार केला
गेलेला आहे. तो अन्य कोठेही धून सापडत नाही. त्या नियमाला अपवाद दोन!
अर्थशास्त्राचा कर्ता कौटिल्य अन् फिलो ऑफ बायझॉण्टिअम. अन्यत्र तितका
नेमस्त, कालानुरूप अन् तर्कसुसंगत विचार दुर्मीळ आहे.’
मुंबई प्रदेशात व कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे
जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांतील गडकिल्ल्यांची संख्या सुमारे एकशेएकेचाळीस
आहे. रायगड जिल्ह्यात लहानमोठे सत्तावन्न गडकिल्ले आहेत. गोपाळ चांदोरकर या
वास्तुशास्त्रज्ञाने लिहिलेल्या श्रीमद् रायगिरौ या पुस्तकात ‘रायगडावरील
पाणीपुरवठा’ हे स्वतंत्र प्रकरण आहे. भुईकोट, जलदुर्ग, वनदुर्ग, मिश्रगड
असे विविध प्रकार त्यांत आढळतात. त्या सर्व गडकिल्ल्यांवर पाणीव्यवस्था
विविध प्रकारे केलेली आहे. तलाव, विहिरी आहेतच, पावसाचे पाणी साठवण्यासाठी;
तसेच, खडकांतून पाझरणारे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या, हौद
आढळतात. उतारावर बांध घालून पाणी अडवून साठवणे आणि गुहा खोदून पाणी साठवणे
असे तंत्र आहे.
त्या शिलालेखातही पाण्याला प्राधान्य आढळते. इसवी सन 1671 – 72 च्या एका
जाबत्यामध्ये (समकालीन कागदपत्र) रायगडासाठी पन्नास हजार होनांची तरतूद
झालेली दिसते. त्यांपैकी दोन तलावांसाठी वीस हजार होन, दुर्गासाठी पाच हजार
होन, चुनेगच्चीसाठी दहा हजार होन व तटबंदीच्या कामासाठी पंधरा हजार होन
अशी ती तरतूद होती. तेथे हे कलम महत्त्वाचे आहे, की पन्नास हजार होनांपैकी
चाळीस टक्के रक्कम ही तलावांच्या म्हणजेच, पाण्याच्या सोयीसाठी वर्ग झाली
होती. दुर्गांच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ती बाब
पुरेशी आहे असा विचार गडअभ्यासक मिलिंद पराडकर यांनी मांडला आहे.
टाकी खोदण्याची पद्धत सातवाहन काळापासून प्रचलित आहे असा उल्लेख अनेक
तज्ज्ञांनी केलेला आहे. टाकी खोदण्याची विशिष्ट पद्धत त्या काळात होती.
जमिनीवर प्रथम सरळ खोदत जायचे. पुरेसे खाली गेल्यावर, भुयाराप्रमाणे आडवे
खोदत जायचे. मात्र ते आडवे खोदकाम करताना; वरून छत कोसळू नये म्हणून, मध्ये
मध्ये खांब सोडले जात असत. परंतु त्या पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन होऊन
(सूर्यप्रकाशाचा संपर्क होऊन पाण्याचे वाफेत रुपांतर होते) तेथील पाण्याचा
साठा लवकर नष्ट होत असे; तसेच, ते साठवलेले पाणी खराब होत असे.
प्र. के घाणेकर यांनी लिहिले आहे, की गडकिल्ल्यांवर टाक्यांची रचना अभ्यासपूर्वक केलेली असते. महाराष्ट्राच्या भूरचनेमध्ये जलसमृद्ध आणि जलाभेद्य अशा दोन प्रकारचे खडक आढळतात. ते दोन थर सरळ तुटलेले कडे आणि तिरकस उताराचे भाग असे ओळखता येतात. जलाभेद्य थराच्या वरील भागात आणि जलसमृद्ध भागाच्या तळाशी टाकी खोदली तर त्यात पुरेसे पाणी बराच काळ उपलब्ध होते. ते पाणी त्या खडकातून पाझरत येत असल्यामुळे जमिनीतील क्षार त्यात विरघळतात. सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी असल्याने ते थंडगार व चविष्ट असते.’
रायगड
ही शिवरायांची राजधानी होती. तेथील पाणीव्यवस्था आदर्श आहे. रायगडाची
पुनर्रचना करताना, हिरोजी इंदुलकर यांनी कोरवून घेतलेल्या एका शिलालेखात
पुढील माहिती आहे – “विहिरी, टाकी, तळी, उपवने, मार्ग, स्तंभ, हत्तीशाळा
आणि राजवाडे इत्यादी नाना प्रकारची बांधकामे आणि खोदकामे शिवछत्रपतींनी
रायगडावर करविली.” रायगडावरील वस्ती ठिकठिकाणी विखुरलेली होती. त्या
वस्त्यांवरील सर्व लोकांना पाणीपुरवठा होईल अशा दृष्टिकोनातून तलाव खोदलेले
आहेत. रायगडावर हत्तीतलाव, गंगासागर, कुशावर्त, कोळिंब, बामण टाके, काळा
हौद, हिरकणीचा तलाव असे सात भलेमोठे तलाव आहेत. बालेकिल्ल्यामधील पडणाऱ्या
पावसाचे पाणी, त्याचे भूपृष्ठाखालील मार्ग शोधून काढून, त्याच्या आधारे
कुशावर्तेश्वराच्या मंदिराशेजारील एका जलमंदिरात जमा होऊन, तेथून ते
कुशावर्त तलावात साठवले जाते. त्या प्रकारची प्रणाली इतर कोणत्याही
दुर्गावर आढळलेली नाही. जलमंदिर आज भग्नावस्थेत आहे. आजही, रायगड
दर्शनासाठी जे लोक येतात, त्यांना गंगासागर तलावातील पाणी उपलब्ध करून दिले
जाते.
रायगडावर खडकात खोदलेली जवळ जवळ सव्वीस टाकी आहेत. काही टाक्यांची रचना
स्नानगृहे आणि शौचकूप यांसाठी केली आहे. छत्रपतींच्या वाड्याच्या दक्षिणेस
आणि तटबंदीच्या विरूद्ध दिशेला- उत्तरेला एक द्वार आहे. त्या द्वाराला
लागून सुमारे सात फूट रुंद, चौदा फूट लांब आणि पाच फूट खोल असा चिरेबंदी
हौद आहे. हौदाच्या तळाशी जलविसर्गासाठी दगडांच्या जाळ्या बसवलेल्या आहेत.
तो विसर्गमार्ग बाहेरच्या बाजूस असलेल्या शौचकुपांच्या जलविसर्गाशी थेट
जमिनीखालून जोडला आहे. भूमिगत जलविसर्जनाचे मध्ययुगातील ते अत्यंत दुर्मीळ
असे उदाहरण आहे. त्या प्रकारची व्यवस्था हिंदुस्थानातील इतर कोणत्याही
प्राचीन वा मध्ययुगीन दुर्गात वा प्रासादामध्ये आढळलेली नाही असे मिलिंद
पराडकर यांनी नमूद केले आहे. त्यातील बरेचसे बांधकाम भग्नावस्थेत आढळते.
काही जोडटाकी रायगडावर आहेत. हनुमान टाके हे त्यांपैकी एक उदाहरण. त्या टाक्याच्या अलिकडील एका भिंतीवर हनुमानाची उठावदार कोरलेली मूर्ती भग्नावस्थेत आहे. बारटाकीचा खळगा हे नाव बारा टाक्यांमुळे त्या विभागाला दिले गेले. बाराटाकी म्हणजे उत्तम जलसंचय आहे. ती सर्व टाकी खडकात खोदून काढली आहेत. ती बाराही टाकी आतून एकमेकांस जोडली गेलेली आहेत असा समज आहे, पण तो खरा नाही. त्या टाक्यांतील जलसंचयाची पातळी वेगवेगळी आढळते असे गो.नी. दांडेकर यांनी लिहिले आहे. रायगडावरील काही तलाव, टाकी कोरडे पडलेले आढळतात.
खुद्द रायगड आणि रायगड जिल्ह्यातील सर्व गड यांवर पाणी साठवणे, उतारावर
बांध घालून पाणी अडवणे, पावसाचे पाणी साठवून टाक्यात सोडणे, तलाव खोदणे
इत्यादी विविध उपाय केलेले आहेत. पाणी साठवण्यासाठी टाक्या रायगड
जिल्ह्यातील खांदेरी, उंदेरी, जंदिरा, कोरलई, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या
सर्व गडांवर बांधलेल्या आहेत. खांदेरी किल्ल्यावर दीपगृहाच्या मागील बाजूस
असलेल्या एका मोठ्या टाक्यावर पंप बसवून, त्याचे पाणी दीपगृहाजवळील
पाण्याच्या टाकीत आणलेले आहे. खांदेरी किल्ल्यावर असलेली ती टाकी
पावसाळ्यात साठवलेल्या पाण्याची आहेत. पाणी साठवण्यासाठी तीन टाकी उंदेरी
किल्ल्यावर आहेत. तिसरा
हौद मोठा आहे. तो जलसाठा दगडी भिंत घालून सुरक्षित केला गेला आहे.
अलिबागजवळ कुलाबा हा मिश्रदुर्ग आहे. त्या किल्ल्यामध्ये असलेल्या
गणेशमंदिरासमोर चारी बाजूंनी बंदिस्त अशी सुंदर पुष्करणी (तलाव) आहे.
जंजिरा हा मुरूड तालुक्यातील जलदुर्ग आहे. त्या किल्ल्यावर उत्तर तलाव,
दक्षिण तलाव आणि सध्या रिकामी असलेली एक मोठी टाकी आढळते.
कोरलई गडावर असलेला पाणीसाठा एका वाड्यात आढळतो. त्या वाड्याच्या
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, दीड फूट लांबीरुंदी व दगडी काठाळी असलेले खोल
खोल खड्डे पाहण्यास मिळतात. काठाळी म्हणजे हौदाच्या कडा घासून त्या
गुळगुळीत केल्या जातात. कारण त्याचे काठ लागून इजा होऊ नये. त्यातून खाली
डोकावून पाहिल्यास स्वच्छ पाण्याची टाकी दिसते. गडपायथ्याच्या दीपगृहाजवळ
त्याच टाक्याच्या नळातून पाणी नेलेले असून, तो जलसाठा दिवसरात्र उपसा
असूनही वर्षाचे बारा महिने भरलेला असतो. फारशा जलसाठ्याची ती अभिनव योजना
कोणत्याही गडावर आढळत नाही असा उल्लेख भगवान चिले यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे नाव श्रीस्थानक. त्या जिल्ह्यात
छत्तीस किल्ले आहेत. त्यामधील महत्त्वाचा किल्ला म्हणजे अर्नाळा जलदुर्ग.
तो किल्ला बाजीराव पेशव्यांनी 23 मे 1737 रोजी बांधून पूर्ण केला असा
उल्लेख तेथील शिलालेखात आहे. त्या किल्ल्यावर असलेल्या मुबलक
पाणीसाठ्यामुळे गडाच्या मधील भूभागावर शेती केली जाते ही वैशिष्ट्यपूर्ण
बाब होय. किल्ल्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अष्टकोनी विहीर
आढळते. गडाच्या मध्यभागी असलेल्या दर्ग्यामागेही विहीर आहे. जीवधन, वसई,
घोडबंदर, धारावी हे किल्ले ठाणे शहरानजीक आहेत. त्या किल्ल्यांवर मोठ्या
टाक्या, विहिरी बांधून पाण्याची सोय केली आहे. शहरीकरणाच्या वेगामुळे त्या
गडकिल्ल्यांच्या मूळच्या स्वरूपात बदल झाला आहे. जीवधन, धारावी या गडांवर
देवीच्या यात्रा, उत्सव साजरे केले जातात.
मुंबई जिल्ह्यात शीव, वरळी, शिवडी, मुंबई किल्ला – फोर्ट, धारावी,
माहीम, वर्सोवा असे आठ किल्ले आहेत. शीव किल्ल्यातील तलाव सध्या प्रदूषित
आहे. वरळी किल्ला मुंबई शहराच्या दाटीवाटीत शोधावा लागतो. त्या किल्ल्यात
डाव्या हाताला किल्ल्यातील शिबंदीचा प्राण असलेली विहीर आढळते. त्या
किल्ल्याची उभारणी ब्रिटिशांनी समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण
ठेवण्यासाठी १६७५ मध्ये केली. मुंबई किल्ला- फोर्ट परिसरातील डिमेलो रोड,
बॅलार्ड इस्टेट, बॅकस्ट्रीट, काळा घोडा, जन्मभूमी मार्ग, नगीनदास मार्ग,
हुतात्मा चौक या ठिकाणी पाणीसाठे अस्तित्वात आहेत आणि त्यांचा उपयोग
वर्तमानकाळातही केला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात अठरा गड आहेत. त्यांपैकी जयगड, गोपाळगड, पूर्णगड या
गडांवरील पाणी साठ्यांविषयीची माहिती आहे. जयगडावरील बालेकिल्ल्यात तीन
विहिरी आहेत. पण त्या विहिरी चाळीस ते पन्नास फूट खोल आहेत. त्यामुळे त्या
विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. जयगडच्या समुद्राकाठी कातळात
बांधून काढलेली इतिहासकाळातील गोड्या पाण्याची विहीर आहे. अथांग
समुद्रकिनाऱ्यापाशी असलेला तो गोड्या पाण्याचा साठा म्हणजे अद्भुत चमत्कार
आहे. त्या किल्ल्याच्या सपाट प्रदेशातील लोकवस्तीतील लोक कदाचित त्या
पाण्याचा उपयोग करत असावेत. पूर्णगडाचा आकार छोटा आहे. पूर्णगडावर विहीर,
तलाव, टाकी आढळत नाहीत ही आश्चर्यकारक बाब आहे. पाण्याची सोय गडाच्या पूर्व
दरवाज्याबाहेरील विहिरीतून केलेली आहे. ती विहीर कोरडी पडलेली आढळते. पाणी
नाही तेथे गड नाही हे शिवरायांचे तत्त्व होते. पूर्णगड हा त्यांच्या
कारकिर्दीत बांधला गेला नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
गोपाळगडावर
विहीर खोदलेली आहे. ती खोल नाही. विहिरीत उतरण्याकरता पायऱ्या आहेत. मात्र
त्या विहिरीला कुंडाप्रमाणे कमी पाणी आहे. काही किल्ल्यांवर आणि मंदिरात
कुंड असतात. तेथे पाणी खूपच कमी असते. त्यांचा वापर केवळ अंघोळ, हात-पाय
धुण्यासाठी होतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानमोठे असे बावीस गड आहेत. सिंधुदुर्ग हा
शिवरायांच्या आरमाराचा आरंभ आहे. सुमारे पन्नास एकर क्षेत्रफळ असलेल्या
त्या समुद्रगडावर एक तलाव आणि साखरबाव, दहीबाव, दुधबाव या तीन विहिरी आहेत.
गडावर राहणारे लोक त्या विहिरीतील पाणी वापरतात. सिंधुदुर्गापासून जवळच
पद्मकोट, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले जणू सिंधुदुर्गाचे थोड्या अंतरावरील
पहारेकरी आहेत आणि जमिनीबरोबर सिंधुदुर्गाचा संपर्क ठेवणारे ते किल्ले
म्हणजे सिंधुदुर्गाच्या संरक्षणव्यवस्थेची सर्वात बाहेरची फळी आहे असा
उल्लेख प्रवीण भोसले यांनी केला आहे.
(प्रस्तुत लेखिकेने सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली तेव्हा प्रवीण भोसले त्या किल्ल्याची व्यवस्था पाहत असत).
– सुनिती पेंडसे 9004311115 sunitipendse21@gamail.com
(जलोपासना, दिवाळी अंक २०१३वरून उद्धृत)
बारव ( पायऱ्यांच्या विहिरी )
:- भाग एक
बारव
महाराष्ट्र बारव मोहीम
![]() |
Sapteshwar Temple Stepwell Village : Sangameshwar Taluka : Sangameshwar District : Ratnagiri Mapped No # 261 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Dirba Devi Temple Stepwell Village : Jamsande Taluka : Devgad District : Sindhudurg Mapped No # 258 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Ganpatipule Temple Stepwell Village : Ganpatipule Taluka : Ratnagiri District : Ratnagiri Mapped No # 310 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Bramhandev Temple Stepwell Village : Hirlewadi Taluka : Malvan District : Sindhudurg Mapped No # 369 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Madhe Ghat Stepwell Village : Ranwadi Khurd Taluka : Mahad District : Raigad Mapped No # 128 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Aditeshwar Mandir Stepwell Village : Sandelavagan Taluka : Ratnagiri District : Ratnagiri Mapped No # 356 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Redeghumat Stepwell Village : Banda Taluka : Sawantwadi District : Sindhudurg Mapped No # 239 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Kankeshwar Stepwell Village : Kankeshwar Taluka : Alibaug District : Raigad Mapped No # 131 Photo Credits : Surekha Kolhal |
![]() |
Bhoke Stepwell Village : Bhoke Taluka : Ratnagiri District : Ratnagiri Mapped No # 252 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Karanjgaon Stepwell Village : Karanjgaon Taluka : Mawal District : Pune Mapped No # 82 Photo Credits : Manoj Sinkar |
![]() |
Mallikarjun Temple Pushkarni Village : Loni Bhapkar Taluka : Baramati District : Pune Mapped No # 56 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Manchar Stepwell Village : Manchar Taluka : Ambegaon District : Pune Mapped No # 69 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Bakuli cha Mala Stepwell Village : Mavadi Kadepathar Taluka : Purandar District : Ratnagiri Mapped No # 53 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Shakambhari Mata Temple Stepwell Village : Nagewadi Taluka : Satara District : Satara Mapped No # 123 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Helical Stepwell Village : Shendurjane Taluka : Wai District : Satara Mapped No # 111 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Baneshwar Temple Stepwell Village : Talegaon Dabhade Taluka : Mawal District : Pune Mapped No # 33 Photo Credits : Manoj Sinkar |
![]() |
Ramling Temple Stepwell Village : Gursale Taluka : Khatav District : Satara Mapped No # 36 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Bhandgaon Stepwell Village : Bhandgaon Taluka : Parner District : Ahmednagar Mapped No # 91 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Bramhani Stepwell Village : Bramhani Taluka : Rahuri District : Ahmednagar Mapped No # 93 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Nighoj Stepwell Village : Nighoj Taluka : Parner District : Ahmednagar Mapped No # 144 Photo Credits : Manoj Sinkar |
![]() |
Belwandi Kothar Stepwell Village : Belwandi Kothar Taluka : Shrigonda District : Ahmednagar Mapped No # 590 Photo Credits : Manoj Sinkar |
![]() |
Ballaleshwar Mandir Stepwell Village : Jejuri Taluka : Purandar District : Pune Mapped No # 66 Photo Credits : Rohan Kale |
==========================
![]() |
Nagnath Mandir Stepwell Village : Hatnoor Taluka : Sailu District : Parbhani Mapped No # 229 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Arvi Stepwell Village : Arvi Taluka : Parbhani District : Parbhani Mapped No # 474 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Devgiri Fort Stepwell Village : Devgiri (Daulatabad) Taluka : Aurangabad District : Aurangabad Mapped No # 189 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Stepwell near Gokuleshwar Mandir Village : Charthana Taluka : Jintur District : Parbhani Mapped No # 207 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Stepwell near Mahadev Mandir Village : Helaswadi Taluka : Mantha District : Jalna Mapped No # 287 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Stepwell near Renuka Mata Mandir Village : Longaon Taluka : Bhokardan District : Jalna Mapped No # 450 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Paradgaon Stepwell Village : Paradgaon Taluka : Ghansawangi District : Jalna Mapped No # 462 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Pingleshwar Mandir Stepwell Village : Pingli Taluka : Parbhani District : Parbhani Mapped No # 227 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Stepwell besides Mahadev Mandir Village : Raipur Taluka : Sailu District : Parbhani Mapped No # 473 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Stepwell near Renuka Devi Temple Village : Dahegaon Devi Taluka : Ghansawangi District : Jalna Mapped No # 459 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Shukanand Math Stepwell Village : Basmat Taluka : Basmat District : Hingoli Mapped No # 488 Photo Credits : Rohan Kale |
![]() |
Amrut Tirth (Stepwell) Village : Verul Taluka : Khultabad District : Aurangabad Mapped No # 190 Photo Credits : Rohan Kale |
======================
प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे
उरूस, 12 मार्च 2021
कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत.
परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत.
11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी, ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती.
परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले. धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला.
हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही.
हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत. परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते?
13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती
उरूस, 18 जानेवारी 2021
औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते.
मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्याने उपसता येते. बारवेला पायर्या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्याची गरज नाही.
औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे.
औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या.
औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.
दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही.
बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक.
चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.
पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.
मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते.
सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे.
नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे. याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो.
बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही.
औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा.
(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)
-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर

मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर –
ग्रामीण भागातील प्रत्येक गावचे एक वैशिष्ट्य बघायला मिळते.त्याचे ऐतिहासिक पुरातन पाऊलखुणा पाहण्यास मिळतात असेच ऐतिहासिक गाव म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गाव नुकतेच गावाला भेट देण्याची योग आला..मित्रबंधू गणेश गोब्बूर यांच्या सहकार्याने मैंदर्गी गावातील विविध स्थळाला भेट घेतली त्यातलीच ऐतिहासिक पुरातन प्याटी बावी विहीर आहे.
अक्कलकोट तालुक्यातील महत्त्वाचे गाव शहर मेंदर्गी हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.
गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराचे अवशेषानी बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.
मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.अशा ऐतिहासिक मैंदर्गी गावातील प्याटी विहीर बदल सांगणार आहे.
ग्रामीण भागात मोठमोठ्या विहीर दिसून येतात मैंदर्गी येथील पुरातन प्याटी बावी विहीर भव्य आहे.मैंदर्गी गावात विहीर आहे.यंदा पाऊस भरपूर झाल्याने विहीर पाण्यानी भरलेले आहे.जसे पाण्याचे झरे लागतात तशी विहीरीची रचना केली आहे.विहीरीची भव्यता बघण्या सारखे आहे.वैशिष्ट्यपूर्ण काळ्या दगडी बांधकाम केले आहे.अजूनही बांधकाम भक्कम आहे.विहिरीत खाली जाण्यासाठी पायरी व्यवस्था केलेली आहे.आतापर्यंत एकदा विहीर तळ दिसला नाही.पाणी अटलेला नाही असे जाणकार जुने मंडळी सांगतात.
विहिरीत भिंतीवर शिलालेख बसवले आहे यंदा पाणी जास्त असल्यामुळे शिलालेख दिसले नाही.माहिती नुसार या शिलालेखात गणपतराव बापूसाहेब पटवर्धन आधिपती कुरुंदवाड संस्थान यांनी शके.१७९८ मध्ये प्याटी विहिरीचे जिर्णोदार करण्यात आले आहे.सध्या ऐतिहासिक विहीर मैंदर्गीत प्रवेश केल्यानंतर बस स्थानककडे जाताना उजव्या बाजूला लागतो.विहीरचा सुरक्षित विचार करून स्थानिक नगरपरिषदने लोंखडी चाळी बसलेले आहेत.
विहीरत वरच्या बाजूला पाणी काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे रोल बसविले आहेत.सध्या विहीर च्या बाजूला बांधकाम सुरू आहे.विहीरी च्या चौही बाजूने घरे असून मध्यभागी विशाल व भव्य विहीर आहे.ऐतिहासिक पुरातन प्याटी विहीर हे मैंदर्गी शहराचे वैभवात भर टाकणारी स्थळ आहे.त्याची जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.खरोखरच एक ऐतिहासिक व पुरातन विहीर वास्तू पाहून मन प्रसन्न झालं.मैदर्गी सामाजिक कार्यकर्ते मित्रबंधू गणेश गोब्बुर यांच्या मुळे शक्य झालं.
मैंदर्गी गाव ऐतिहासिक गाव आहे.अनेक पुरातन गोष्टी मैंदर्गीत पाहण्यास मिळतात यापुढे पुन्हा मैंदर्गी च्या ऐतिहासिक पुरातन गोष्टी पाहणार आहोत…
धन्यवाद
फोटो व संकलन – धोंडपा नंदे,वागदरी
प्राचीन वारसा जपणार्या हतनुरचा आदर्श घ्या..
उरूस, 30 डिसेंबर 2020
प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले.
या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही.
हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची.
पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले.
गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला.
मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला.
हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात.
याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे.
बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष.
मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.
जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.
हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत.
प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच.
रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या.
रोहन काळे मंुंंबई- 9372496819
(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)
खानदेशातील जलसंस्कृती
खानदेशातील जलसंस्कृती
असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी
कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस
सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर
पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या
अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी
मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
खानदेश हा १९०६ पूर्वी एकच जिल्हा होता पण प्रशासकीय सोयीसाठी नंतर त्याचे
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे २ भाग करण्यात आले. १९६० साली पूर्व
खानदेश हा जळगाव जिल्हा झाला, १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचा धुळे जिल्हा झाला
आणि पुढे १ जुलै १९९८ ला नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे
तेव्हापासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे याचे आत्ताचे ३ जिल्ह्यांचे स्वरूप
आले. अशा या खानदेशातील पुरातत्वीय कालखंड ते आधुनिक काळापर्यंतच्या
जलसंस्कृतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी
यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच
सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने
जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन
भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे
गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि
शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले
आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून
तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा,
सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे
जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे
शोधणे शक्य झाले आहे. १९५२-५३ पासून डॉ. शंकर साळी, बी. के. थापर,
बोपर्डीकर, डॉ. वसंत शिंदे या तज्ञ पुरातत्ववेत्त्यानी केलेल्या
संशोधनांतून २०० पेक्षा जास्त अश्मयुगीन, १०० पेक्षा अधिक ताम्रपाषाण व
जवळपास ५० उत्तर हरप्पा कालीन वसाहती खानदेशात होत्या हे उजेडात आले.१
यातून सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती तो म्हणजे प्राचीन काळी मानवी वसाहती
या जलसमृद्ध असलेल्या प्रदेशातच होत असत म्हणजेच खानदेशची भूमी हि खऱ्या
अर्थाने जलसंपन्न होती. माझ्या अल्पमती ज्ञानानुसार जगाच्या पाठीवर
कोणत्याही एका जिल्ह्यात इतकी पुरात्वीय स्थळे नाहीयेत जितकी एकट्या धुळे
जिल्ह्यात आहेत.
खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती
झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर
असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील
सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२
याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर
केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील
दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे
कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता
येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या
समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड
नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.
याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत
(पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या
काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा
गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव
वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य
केले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या शतकात
ज्याची निर्मिती सुरु झाली त्या पितळखो-याच्या लेणी निर्मितीसाठी पाटणे हे
एक मदत केंद्र नक्कीच ठरलेले असणार. पुरातत्ववेत्ते एम. एन. देशपांडे
यांच्या मतानुसार पितळखो-याच्या जगप्रसिद्ध यक्षाचे नाव संकारी असल्यावरूनच
येथील गावाला संकारी हे नाव दिले असावे. पिंपळनेरच्या ताम्रपटानुसार
बदामीच्या चालुक्यांचीहि येथे सत्ता होती. पुढे अभीर, यादव यांनी येथे
राज्य केले. पाटणादेवीच्या मंदिरातील इ.स. ११५३ व इ.स. १२०७ च्या
शिलालेखानुसार हे स्थळ म्हणजे निकुंभ राजांनी आपली राजधानी बनविले होते.
तेर, पैठण (तत्कालीन प्रतिष्ठान) ते सोपारा (कल्याण) या प्राचीन व्यापारी
मार्गावरील पाटणे हे एक महत्वपूर्ण स्थळ होते.४ शासनाच्या एका ग्रंथ
लेखनाच्या कामानिमित्त या सर्व परिसरातील मंदिरांचा जेव्हा आम्ही सर्वे
केला त्या मंदिरांच्या शिल्प स्थापत्यांवरून तसेच उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ५,
शिलालेख – ताम्रपट यांच्या अभ्यासावरून हि नृत्य, संगीत, शिल्प या
कलांचीही भूमी असल्याचे स्पष्ट होते.
याच पाटणादेवीच्या धवलतीर्थाच्या परिसरात १२ व्या शतकात गणित व ज्योतिष
शास्त्राचा महान अभ्यासक भास्कराचार्य यांनी गणित लिलावती, लिलावती भाष्य,
सिद्धांतसारशिरोमणी सारख्या ग्रंथांची रचना केली. आणि जवळच असलेल्या डोंगरी
व तित्तूर च्या काठावर असलेली चाळीसगाव हि फोटोग्राफी व चित्रकलेचा
ध्येयवेडा कलावंत केकी मूस यांची कर्मभूमी आहे. गंगा-यमुनेचे अप्रतिम शिल्प
निर्माण करणाऱ्या या कलावंताचे जीवन म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी
प्रेमकहाणी आहे.
गिरणा नदीच्याच काठावर नुकतेच २०१७-१८ मध्ये प्रस्तुत लेखकाला प्राप्त
झालेल्या अवशेषांवरून डेक्कन कॉलेज, पुणे येथील श्री. निलेश जाधव व इतर ४
संशोधकांच्या टीमने केलेल्या सर्व्हेनुसार हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ३०
लहान-मोठी वसाहत स्थळे प्राप्त झाली आहेत.६
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे
गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या
संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३
नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या
दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह
खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर
प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी
प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या
ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात
जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची
परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश
येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात
तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली
आहेत (विस्तार भयास्तव त्यांची अधिक माहिती येथे वगळलेली आहे) त्याच
प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ
चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा
पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.७
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या
संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे
वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा
मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा
खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण
अभिलेखात येतो. हे घराणेही रत्नपूरच्या कलचुरीप्रमाणेच सूर्यवंशीय होते.
विशेष म्हणजे यातील प्रतिकंट या राजाचे ‘महाराष्ट्र’ हे व्यक्तिनाम.
संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एकाही राजाचे ‘महाराष्ट्र’ नाव या
व्यतिरिक्त दुसरे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे. इ.स. ८०७ पासून हि सत्ता
या तापीच्या खोऱ्यात नांदत होती. ८ अशा या २ संपन्न जलसंस्कृतीचा वारसा
देणाऱ्या तापी व गिरणा यांचा संगम जळगाव व चोपडा तालुक्याच्या सीमेवर होतो.
आत्तापर्यंतच्या या प्राचीनतम संदर्भा बरोबरच मध्ययुगीन कालखंडातील
खानदेशातील जलसंस्कृतीचे संदर्भ आपणाला प्राप्त होतात. भारतीय इतिहासात
साधारणतः १२ वे शतक ते १८५७ पर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ मानला जातो.
ज्ञानेश्वरीत उल्लेख आल्याप्रमाणे
शके बाराशे बारोत्तरे तै टिका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंदबाबा अत्यादरे लेखकू जाहला ||
या प्रमाणे शके १२१२ मध्ये म्हणजेच इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन
पूर्ण झाले याच्याच अवघ्या काही वर्षानंतर खानदेशातील तापी नदीच्या या
काठावरच मेहूण येथे हठयोगी वटेश्वर चांगदेवाची गुरु आद्य स्त्री साहित्यक
संत, मुक्ताई समाधीस्थ झाली. नामदेव गाथेतहि येथीलच तापीकाठच्या
सोमेश्वराचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. नाथपंथाच्या तत्वसार या
महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मितीहि इ.स. १३१२ मध्ये येथेच तापी तीरावर झाली.९
महानुभाव साहित्यातील इ.स. १४१८ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘ऋद्धिपूरवर्णन’
या महान काव्याचा रचियता नारायण बास – नारोबास हा बहुळा नदीच्या काठावर
राहणारा असल्याने त्यांना बहाळीये हे संबोधन प्राप्त झाले.१० यातील एकूण
६४१ ओव्यांपैकी कांही ओव्यात बहुळा नदीकाठचे जनजीवनाचे सुंदर वर्णन कवीने
केलेले आहे.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत
केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये
आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या
शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी
मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली.
जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य
देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख
लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)११
नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५
ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के
लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक
तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल
यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई
आदमी मद्यसेवन नही करता. १२
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये,
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित
ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची
वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये
अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड
गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या
तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. येथे
ज्वारी हे मुख्य पीक असून कांही ठिकणी ते ३ वेळा काढले जाते. येथे उत्तम
प्रतीचा तांदूळ होतो. फळफळावळ विपुल असून विड्याची पानेही भरपूर आहेत. येथे
चांगल्या प्रतीचा कापड तयार होतो व धरणगावचा ‘सिरी साफ’ व ‘भिरीन’ हा कपडा
प्रसिद्ध आहे. एदलाबाद हे देखील चांगले शहर असून त्या नजीकच्या तलावाचा
जलसिंचनास्तव उपयोग होतो. चोपडा हे मोठे समृद्ध शहर असून डांभूर्णी गाव व
जामोद परगणा सधन आहे.१५ या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी
लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान
फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक
वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, ट्र̆व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन,
थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व
पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५,
११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पॉ͘डेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा
प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने
आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४
ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत
असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन
शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे
पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या
(वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे
आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व
तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर
नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते.
आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना
१३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही
मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की
मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध
जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ
शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व
भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा,
एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी,
चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर,
वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ.
स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात.
पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील
पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या
काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद,
पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका
ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड
केल्याचे उल्लेख मिळतात.१७
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात.
एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई
प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट
दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर
मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने –
आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार
खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती.
तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. एकूण ५३८ शाळा त्यावेळी
होत्या. याचाच अर्थ बदललेल्या पर्जन्यमानामुळे पश्चिम खानदेशचा नंदुरबार
सारखा भाग होरपळलेला होता परंतु पूर्व खानदेशात विशेषतःरावेर, सावदा,
फैजपूर या भागावर त्याचा कोणताच दुष्परिणाम झालेला नव्हता, आजही भारतातील
केळीच्या एकूण उत्पन्नापैकी २०% केळीचे उत्पादन तापीच्या याच पट्ट्यात
होते. तरीदेखील १८ वे ते २० वे शतक या दरम्यान धुळे जिल्ह्यात जाल्संकृतीचे
रक्षण करण्यासाठी फड पद्धतीचा विकास झाला ज्या १९८४ मध्ये धुळ्यास
वास्तव्यास असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी मैसूर संस्थानातही
मोठया प्रमाणात उपयोग केला.
स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या
जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर
बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान
कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून
दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक
वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये
की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित
आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.
खानदेशच्या आधुनिक जलसंस्कृतीत दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नोंद करणे इथे संयुक्तिक ठरते.
पाण्याचा थेंब थेंब रुजवून अब्जावधी लिटर पाण्याची बचत करावी या
उद्दिष्टाने याच खानदेशच्या मातीतील सुपुत्राने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन
यांनी जैन इरिगेशन ची स्थापना करून खऱ्या अर्थाने जलक्रांती घडवली. एक महान
स्वप्न उराशी बाळगून स्वप्न त्यांनीच उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन,
जळगाव च्या ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या पदयात्रेत मला हे पाहायला
मिळाले की सातपुड्याच्या कुशीत कुंड्यापाणी हे ७०० लोकवस्तीचे छोटेसे गाव
आहे. या गावात डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा केवळ पाण्याचा झरा हे
एकमात्र साधन असतानाही लागेल तेवढेच पाणी वापरून कधीही पाण्यासाठी संघर्ष न
करणारे हे एक आनंदी गाव आहे. तसेच गिरणेच्या काठावर जळगाव तालुक्यात
लमांजन हे एक असे गाव आहे की ज्याच्या शेजारून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठे
मोठे पाषाण आहेत पण ज्या गावाने ४६ वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित केला
की ‘जो कोणी नदीतच नव्हे तर नदीकडील बाजूला जरी शौचाला गेले तर तो गावातून
हद्दपार करण्यात येईल, संपूर्ण गाव त्याच्यावर बहिष्कार टाकेल. आपल्या
गावाच्या नदीचे पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखण्याची जबाबदारी आपली
आहे.’ आणि आजही सर्व ग्रामस्थ याचे पालन करतात.
खरे म्हणजे आजच्या काळात हि अत्यंत आदर्श अशी उदाहरणे आहेत कारण आपण जर
नदी, तलाव इ. मध्ये शौच व इतर घाण करत असू आणि आपण जर कितीही फिल्टर लावले,
कितीही पाणी शुद्धीकरण यंत्र वापली तरी आपल्याला पाण्यापासून होणाऱ्या
आजारांपासून कोणीही वाचवू शकत नाही.
जलसंस्कृतीचा असा आदर्श निर्माण करून देणाऱ्या खानदेशचे आपण वारस आहोत
त्यामुळे हा घेतला वसा टाकू नका, पाणी वाया घालू नका, वाया कोणाला घालू देऊ
नका, हि जलसंस्कृतीची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.
संदर्भ
१. साळी, डॉ. चेतन शंकर – संदर्भ महाराष्ट्र, इंटेलक्चुअल बुक ब्युरो, भोपाळ, प्रथम आवृत्ती, २००५, पृष्ठ क्र. ७६४
२. जळगाव जिल्हा ग̆झेटयिर- मराठी आवृत्ती १९९४, पृष्ठ क्र. ५४-५५
३. साळी, शंकर अण्णाजी – ‘दि अप्पर प̆लिओलिथिक कल्चर अ̆ट पाटणे,
डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र’ रिसेंट अ̆डव्हान्सेस इन इंडो
प̆सिफिक प्रिहिस्टरी, १९८५, पृ. क्र. १३९-१४०
४. कित्ता २, पृ. क्र. ५५
५. सकाळ वृत्तपत्र – दि. १ जानेवारी २०१७, गिरणेच्या काठावर आढळले ३७०० वर्षापूर्वीचे अवशेष
६. बोपर्डीकर, बी. पी. – ‘अर्लि स्टोन एज साईट अट मानेगाव ऑन दि पूर्णा
रिव्हर, डिस्ट्रीक्ट ग̆झेटयिर जळगाव, महाराष्ट्र,’ इंडियन अ̆न्टीक्वरी, खंड
क्र. ४, १९७०, पृ. क्र. ८ – १२
७. कित्ता २ पृ. क्र. ६५
८. मराठी वांग्मयाचा इतिहास, खंड क्र. १, १९८४ पृ.क्र ६२४-२७
९. दिवेकर डॉ. ह. रा. – तत्वसार ग्रंथ, १९३६
१०. कित्ता ८ पृ. क्र. ३६६
११. शेरवानी, एच. के. व जोशी, पी. एम. (संपा.)- हिस्ट्री ऑफ मिडिव्हल डेक्कन, आंध्र गव्हर्न्मेंट
प्रकाशन, प्रथम आवृत्ती, हैद्राबाद, १९७६, पृ. क्र. ६
१२. इब्नबतुता की भारत यात्रा – चौदहवी शताब्दी का भारत – नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी
दिल्ली, चौथी आवृत्ती, २००५, पृ.क्र. १८७.
१३. बोबडे, बी. आर. – तबकाते-ए-अकबरी व चचनामा, अरुणा प्रकाशन, लातूर, प्रथम आवृत्ती,
२०१७ (प्रकाशित तसेच मूळ हस्तलिखित उपलब्ध आहे)
१४. बोबडे, बी. आर. – मूळ हस्तलिखित उपलब्ध – लेखक हफिजुधीन अहमद, मूळ नाव गंज इ –
मानी, तवारिखे दक्खन, २८९ पृष्ठे.
१५. कित्ता ११, पृ. क्र. २३२
१६. शहा, जी. बी. – पेशवेकालीन खानदेश- अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, पुणे विद्यापीठ, पुणे
१७. भामरे, डॉ. सर्जेराव – खानदेशातील अभिनव फड सिंचन पद्धत, जलसंवाद स्मरणिका, जानेवारी
२०१८
माहितीपूर्ण आहे खरा, पण खूप विस्कळित आहे आणि प्रदीर्घ आहे. लेख जर दोन
तीन भागांत विभागला असता तर थोडा मुद्देसूद वाटला असता. खूपशी जंत्री आहे.
असो.
१)प्रकाशा येथे कुंभमेळ्याची परंपरा खरेच आहे का? ही माहिती मला नवीन आहे.
२)सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मृत्यु दि. १२/४/१९६२ रोजी झाला. १९८४मध्ये नव्हे.
३)"नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना
१३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से
नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई
वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का
तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और
कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२'' हे वर्णन इब्न बतूताचे आहे हे तळटीप
बघितल्यावरच कळते. शिवाय हे सर्व आधुनिक शुद्ध हिंदी रूपांतर आहे ह्याचा
उल्लेख हवा होता.
४)केळ्यांची लागवड खानदेशात पूर्वापार असली तरी तिला खरा बहर कोंकणात ठाणे
जिल्ह्यातली लागवड रोगग्रस्त झाल्यावर म्हणजे १९७० नंतर आला. तोपर्यंत
हिरव्या सालीच्या केळ्यांची ग्रोझ मिशेल व तत्सम उपजाती आणि वेलची,
मुठेळी, राजेळी वगैरे ठाणे जिल्ह्यातल्या जाती मुंबईत लोकप्रिय होत्या.
पाठ्यपुस्तकांतही वसईच्या केळ्यांविषयी माहिती असे.
औरंगाबाद परिसरांतील बारवा
बारवा
बारव म्हणजेच पायर्या असलेली विहिर. केवळ बारव या नावाने आपण याला ओळखत असलो तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायर्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आलेली आहे. इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहर्याचा वापर करावा लागतो. किंवा मुळात या वहिरीचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो.
पण बारवेच्या बाबतीत मात्र पाणी मोटेने उपसणे हा हेतूच नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. हीला पायर्या असल्याने त्याचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे असा असतो.
बारवा जेंव्हा मंदिर परिसरांत बांधल्या जातात त्याला कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात. कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर तर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव ही चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवर्या असलेली आहे. आता या बारवेतच देवीचे मंदिर बनविल्या गेले आहे. चारठाण येथील पुष्करणी बारवही चारही बाजूने ओवर्यांचे बांधकाम केलेली अशी विस्तीर्ण आहे. ज्या अतिशय विस्तीर्ण अशा बारवा आहेत त्यांना पुष्करणी म्हणतात. अतिशय विस्तीर्ण असा तलाव कंधार येथे आहे त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिल्या गेले आहे.
महाराष्ट्रात हीनयान बौद्ध काळांत लयनस्थापत्यांत पाण्याच्या टाक्यांची निर्तिती झाल्याचे तज्ज्ञ मांडतात. त्यानंतर महाराष्ट्रात भव्य मंदिरांचे निर्माण होवू लागले तेंव्हाच पाणी साठवण्यासाठी व्यवस्थापनासाठी बारवांची निर्मिती मंदिर परिसरांत झालेली आढळते. मराठवाड्यांतील प्राचीन मंदिरांपैकी औंढा, निलंगा, जामखेड (ता.अंबड) येथे बांधलेल्या दगडी विहिरी आढळतात.
मराठवाड्यांत साधारणत: राष्ट्रकुटांच्या काळात मंदिरांची निर्मिती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्याच काळात बारवांची निर्मितीची सुरवात दिसून येते. आज ज्या बारवा महाराष्ट्रात आढळून येतात त्यांचा कालखंड उत्तर चालुक्यांचा होय. (दहावे-अकरावे-बारवे शतक)
औरंगाबाद परिसरांतील तीन प्रमुख बारवा ज्या अतिशय भव्य आकर्षक आणि बारव वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांची दखल घ्यावी लागेल.
1. वेरुळचे शिवालय तीर्थ : ही बारव फार पुरातन आहे. अहिल्याबाईंनी हीचा इ.स. 1769 मध्ये जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय देखणे असे हे बांधकाम आहे. लाल चिर्यांत ही बारव बांधल्या गेली आहे. चारही बाजूंनी हीला करण्यासाठी सुंदर पायर्या आहेत. एका खाली एक असे सात टप्पे अशी पायर्यांची रचना केली आहे. बारवेच्या चारही बाजूनी अष्टकोनी आकाराचे बुरूजासारखे भक्कम बांधकाम केलेले आहे.
प्रत्येक बाजूस एकूण 56 पायर्या या बारवेस आहेत. चौथ्या टप्प्यांत चार दिशांना चार आणि चार कोपर्यांत चार अशी आठ देवळे आहेत. या आठही देवळांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळी आहेत. आठ दिशांच्या आठ देवता असे अष्ट दिक्पाल येथे दाखविले आहेत.
2. शेकटा बारव : औरंगाबाद जवळ वाळूजपासून शेंदूरवाद्याकडे एक रस्ता जातो. खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा आहे. या शेंदूरवाद्याच्या बाजूला आताच्या बीडकीन पासून येणार्या मोठ्या रस्त्यावर (शेंद्रा-बीडकीन-नगर रोड) शेकटा आहे. शेकट्याची बारव औरंगाबाद परिसरांतील सर्वात भव्य आणि खोल अशी बारव आहे. ही बारव चौरस आकाराची आहे. पश्चिम बाजूला हीला दोन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायर्या कोरलेल्या आहेत. प्रवेशाच्या पायर्या संपल्यावर एक सोपान (सपाट अशी जागा) सोडलेली आढळून येते. तेथून पर चौरस आकारात पायर्या उतरत उतरत निमुळत्या होत जातात. बारवेच्या दक्षिण बाजूला चार खांबावरचे शिवायलय आहे. त्याचे खांब आता ढासळले असून केवळ चौथरा शिल्लक आहेत. सहसा बारवेत न आढळणारी गोष्ट या बारवेत दिसून येते. पाणी उपसण्यासाठीची दगडी रचना दक्षिण काठावर केलेली आहे. मोटेने उपसलेले हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडी हौद आणि पन्नास फुट अंतरापर्यंत दगडी नाला कोरलेला आहे. हे सहसा बारवेत आढळत नाही.
या बारवेत एकूण प्रत्ये बाजूला दोन असे आठ देवकोष्टके आहेत. पण यात आता देवतांच्या मुर्ती आढळून येत नाहीत. शिवालयातील महादेवाची पिंडी शाबुत आहे. आजही शिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो.
बारवेला भव्य अशी संरक्षक भिंतही बांधलेली आहे. सहसा बारवा संपूर्णत: जमिनीतच असल्याने अशा भिंती आढळून येत नाहीत. पण शेकट्याची बारव ही याला अपवाद आहे.
3. खुफिया बावडी : ही बारव देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे फतेयाबाद गावात आहेत. हीला खुफिया बावडी असे म्हणतात. हे निजामशाहीच्या काळातील बांधकाम असल्याचे मानले जाते. एका खाजगी शेतात ही बावडी आहे. उत्तरदिशेने जमिनीत उतरत गेलेल्या पायर्या आहेत. तीन तीन ओवर्यांच्या तीन भव्य बाजू आणि प्रवेशाची चौथी बाजू अशी ही खुफिया बावडी. गुप्त मसलतीसाठी हीचा वापर केला जायचा. चौरस आकाराच्या या बावडीच्या तीनही बाजूस कमानींची मोठी दालने आहेत. कमानींवर घुमट बांधण्याची शैली बहमनी कालखंडात मराठवाड्यात आढळून येते. पूर्वीच्या काळात अशा दगडी कमानी नाहीत.
खुफिया बावडीचे बांधकाम अजूनही भक्कम आहे. या बावडीचे पाणी शेतकरी आजही वापरतात.
याच खुफिया बावडीची लहान बहिण शोभावी अशी तीन ऐवजी एकाच कमानीच्या चार बाजू चार ओवर्या अशी छोटी वीटांनी बांधकाम केलेली बावडी औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरा जवळ उत्तर बाजूला शेतात आहे. ही बारव मोगलांच्या काळातील असावी. भाजलेल्या दगडी पातळ विटांनी हीचे बांधकाम केले आहे.
बीडकीन शहरांत तीन अतिशय चांगल्या बारवा आहेत. एक तर अगदी अलीकडच्या कळातील भर बाजारात असलेली किल्लीच्या आकराची बारव आहे. एका बाजूने पायर्या आहेत. ही बारव गोल अकाराची आहे. पायर्यां जवळ देवकोष्टक असून त्यात सात आसरा आहेत. दुसरी बारव मुस्लीम कबरस्तानात असून चौकोनी आकाराची आहे. त्या परिसरांत मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. एकेकाळी इथे महादेव मंदिर असल्याच्या खुणा आजही आढळून येतात. तिसरी बारव एकात एक चार टप्पे असलेली आहे. एका बाजूने या बारवेला प्रवेशाच्या पायर्या आहेत. बारवेत समोरा समोर असे दोन मंडप आढळून येतात. एका देवकोष्टकांत शेषशायी विष्णुची मूर्ती ठेवली आहे. औरंगाबाद परिसरांत बारवेत ज्या देवता आढळून येतात त्याचा पुरावा केवळ बीडकीन येथेच मिळतो. इतर ठिकाणच्या मुर्ती आता अस्तित्वात नाहीत. शेषशायी विष्णु मुर्ती ही केवळ जलाशयापाशीच आढळून येते. क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडलेले विष्णु आणि त्यांची पाय दाबणारी लक्ष्मी अशी ही मुर्ती असते. याच मुर्तीच्या प्रभावळीत अष्टदिक्पाल यांच्याही मुर्ती आढळतात.
शेकट्याच्या जवळच्या शिवारात एका बुजलेल्या आवारात आजही ही शेषशायी विष्णुची मुर्ती झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्याचे संवर्धन गावकर्यांनी नुकतेच केले आहे.
प्रत्यक्ष औरंगाबाद शहर आणि परिसरांत एकूण 18 बारवांची नोंद केल्या गेली आहे. खरं तर अजूनही काही बारवा सापडतील पण त्या बहुतांश नष्ट झाल्या, बुजल्या, कचरा टाकल्या गेला अशा आहेत. बांधकाम दृष्ट्या त्यांच्यात काही फारसे महत्त्वाचे नाही.
हर्सूल देवी परिसरांत तीन बारवा आहेत. एक तर प्रत्यक्ष देवीच्या मंदिरासमोरचे कुंडच आहे. त्याचा आकार चौरस आहे. त्याचा आकारही लहान आहे. बाकी दोन बारवा जरा दुर अंतरावर आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जी मोठी बारव आहे ती एका मोठ्या बांधकामाचा महलाचा भाग असावा अशी आहे. जाळी उभारून तीला संरक्षीत केल्या गेले आहे. तिचा आकार चौरस आहे. याच बारवेजवळ एक सतीचा बुरूज आहे. शिवाय एक राजस्थानी शैलीतील एक समाधीसारखे बांधकामही आहे. हा संपूर्ण महल असावा. आता तिथे केवळ मोकळी जागा आहे. जोत्याचे दगडी अवशेष काही ठिकाणी सापडतात.
शहरांतील एक अष्टकोनी छोटी बारव समर्थनगर मध्ये आहे. (प्लॉट क्र.244 च्या बाजूची खुली जागा). हीला पुर्वकडून उतरण्यास पायर्या असून त्या परत उत्तरेकडे वळल्या आहेत. बारव अष्टकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम उत्तम अवस्थेत आहे. बारवेत भरपुर पाणी आहे. यशवंतराव होळकरांच्या काळात याच जागी एक महाल होता. त्या महालाच्या घुमटाचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. जिथे आता अतिक्रमण केल्या गेले आहे. त्या महालाचा एक भाग म्हणजे ही बारव असावी.
विद्यापीठ परिसरांत सोनेरी महाल येथे दोन बारवा आहेत. या बारवांचे बहुतांश बांधकाम शाबूत आहे. शिवाय परिसरांत अजून एक मोठी बारव आहे.
जिचा खास उल्लेख करावा लागेल अशी एक बारव म्हणजे हिमायत बागेतील शक्कर बावडी. औरंगजेबाचा काळात हिमायत बाग विकसित केल्या गेली. यात आयताकृती अशी ही शक्कर बावडी आहे. एका बाजूला वीटांचे भक्कम असे कमानी कमानीचे बांधकाम असून त्यावर मोट लावण्याची दगडी रचना आहे. तिथून पाणी उपसले जायचे. बाकी तीनही बाजूंनी बांधीव अशी ही बावडी आहे.
सातारा परिसरांत खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरांत दोन बारवा आहेत. या बारवांची पडझड झालेली आहे. अहिल्याबाईंनी या खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. त्याच काळात या बारवाही दुरूस्त केल्या असाव्यात. पण त्या आता चांगल्या अवस्थेत नाहीत.
प्रत्यक्ष औरंगाबाद शहराचा जो भाग आता मुख्य वस्तीचा भाग आहे त्याला फारसा प्राचीन इतिहास नाही. याउलट औरंगाबाद लेण्या, हर्सूल देवी परिसर, सातारा डोंगर परिसर, कर्णपुरा, जाधववाडी येथे जूने संदर्भ आहेत. त्यामुळे जून्या बारवा या शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी नसून बाह्य भागात आहेत.
औरंगाबाद ही सैनिकांची वस्ती होती. नंतर मलिक अंबर काळापासून या शहराला चेहरामोहरा प्राप्त झाला. मलिक अंबर काळात पाणी व्यवस्थापनाची वेगळी अशी व्यवस्था नहरींद्वारे केली गेली. याचा परिणाम म्हणजे या परिसरांत बारवांची अवश्यकता राहिली नाही. कारण खापरी नळांद्वारे पाणी संपूर्ण परिसरांत खेळवले गेले होते. तसे नळ जागजागी आढळतात.
सातारा डोंगरावर खंडोबाचे मुळ प्राचीन मंदिर आहे. त्याला कालखंड अगदी यादवांच्याही आधी उत्तर चालूक्यांच्या काळापर्यंत जातो. याच मंदिरा जवळ दगडी बांधकाम असेलेले कुंड आहे. या कुंडाच्या तीन बाजू नीट बांधलेल्या आहेत. उतराची तिसरी पश्चिमेकडची बाजू मोकळी आहे. म्हणजे तेथूनपाणी वहात येवून या कुंडात साठवले जात असे. आजही या कुंडात पाणी साठते.
महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.
1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11. गंगा बावडी - 437
12. हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276
(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)
(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)
औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती
उरूस, 18 जानेवारी 2021
औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते.
मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्याने उपसता येते. बारवेला पायर्या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्याची गरज नाही.
औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे.
औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या.
औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.
दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही.
बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक.
चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.
पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.
मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते.
सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे.
नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे. याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो.
बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही.
औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा.
(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)
-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
गड, कोटांवरचे जलव्यवस्थापन
कर्नाळ्याचा सुळक्याचा पायथा पाण्याच्या टाक्यांनी पोखरुन काढला आहे.

सह्यद्री हा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. या बेसॉल्टमध्येही वेगवेगळे थर आहेत. कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि अॅमेग्डोलाइड बेसॉल्ट. यातील कॉम्पॅक्ट बेसॉल्ट खडकात चिरा असतात. जमिनीतून मुरणारे पाणी या चिरांमध्ये साठून राहाते. या खालचा थर अॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा असतो या थरात पाणी मुरत नाही. ही रचना समजून घ्यायची असेल तर पावसाळ्यात खंडाळा किंवा कुठल्याही घाटातून जाताना घाट बनवण्यासाठी खडकांच्या कापलेल्या भिंती असतात त्या पाहिल्या तर सर्वात वरचा थर मुरुमाचा दिसतो. त्यातून मुरलेलं पाणी खालच्या चिरा असलेल्या कॉम्पॅक्ट खडकात उतरल्यामुळे तोही ओला झालेला दिसतो. पण त्याखालचा अॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा थर मात्र कोरडाठाक असतो. कारण यात पाणी मुरत नाही. सह्यद्रीत कोरलेली लेणी याच अॅमेग्डोलाइड बेसॉल्टच्या थरात कोरलेली आहेत. त्यामुळे ही लेणी आतून कोरडी राहतात. ज्या ठिकाणी लेणी खोदताना दुसऱ्या प्रकारचा दगड लागला तिथे एकतर लेणी अर्धवट सोडलेली आढळतात किंवा त्याच टाक्यात रूपांतर केलेले पाहायला मिळते. कोकणात चिऱ्याचा दगड मोठय़ा प्रमाणात आढळतो. हा दगड सच्छीद्र आणि ठिसूळ असल्याने त्यात लेणी किंवा टाकी खोदणे शक्य नसते. त्यामुळे कोकणातल्या किल्ल्यांवर टाक्य़ांऐवजी विहिरी खोदलेल्या पाहायला मिळतात.
१) पाण्याचे टाके:-
काही ठिकाणी एकाखाली एक टाकी खोदलेली पाहायला मिळतात. या रचनेमुळे पाण्याबरोबर येणारा गाळ पहिल्या टाक्यात जमा होतो. टाके भरले की स्थिर झालेले पाणी पुढच्या टाक्यात जमा होते.

टाकी खोदण्याची पद्धत सातवाहन काळापासून प्रचलित आहे असा उल्लेख अनेक तज्ज्ञांनी केलेला आहे. टाकी खोदण्याची विशिष्ट पद्धत त्या काळात होती. जमिनीवर प्रथम सरळ खोदत जायचे. पुरेसे खाली गेल्यावर, भुयाराप्रमाणे आडवे खोदत जायचे. मात्र ते आडवे खोदकाम करताना; वरून छत कोसळू नये म्हणून, मध्ये मध्ये खांब सोडले जात असत. परंतु त्या पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन होऊन (सूर्यप्रकाशाचा संपर्क होऊन पाण्याचे वाफेत रुपांतर होते) तेथील पाण्याचा साठा लवकर नष्ट होत असे; तसेच, ते साठवलेले पाणी खराब होत असे.
२) तलाव ( बांधीव किंवा नैसर्गिक )
३) अर्धबांधीव तलावः-
पुष्करणी:
किल्ल्यांवरील पाणी स्थिरीकरण योजना. (Water Stabilisation Systems on the Forts)
पेडका किल्ल्यावरील एका खाली एक असलेले तलाव
|
पाण्याचे टाकं, असावा
|
सह्याद्रीच्या शिखर माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे.' गड व पाण्याच्या देखभालीसाठी त्यांनी म्हटले की लोहार, सुतार, पाथरवट यांना गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवाव्या. लहान-सहान गडांवर यांचे नित्यकाम पडते असे नाही. याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्यांजवळी तयार असो द्यावी. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन त्यांनी दूरदृष्टीने करून ठेवले होते.
शिवकाळात पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जात असे याचा अभ्यास म्हणून रायगडावर पाण्याचे व्यवस्थापन केले आहे ते पाहू.
किल्ले रायगड येथील पाण्याचे व्यवस्थापन
राजधानी रायगडावर मुबलक पाणीसाठा आहे. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि निकामी झालेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत. त्यातील गंगासागर तलाव हा सर्वात मोठा असून राजवाड्यासमोरच तो बांधण्यात आला आहे. महादरवाजा, तटबंदी, बुरूज, राजवाडा, जगदीश्वर मंदिर आणि सेवकांची जवळजवळ तीनशे इमारती रायगडावर बांधण्यात आल्या. त्यासाठी लागणारा दगड गंगासागर व इतर तलावांतील दगड खाणीतून काढलेला आहे. राज्यभिषेकावेळी सप्तनद्यांचे पाणी गंगासागर तलावात टाकले आहे. या तलावांखेरीज पाऊणशे पाण्याची टाकी आहेत ती गडमाथ्यावर, गुंफेत व कड्याच्या पोटात राजवाड्यापासून भवानी टोकापर्यंत आणि वाघ दरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी त्या खोदलेल्या आहेत. रायगडावरील दहा हजाराच्या शिबंदीला पुरून उरेल एवढा प्रचंड पाण्याचा साठा रायगडावर होता. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाख असामी आले होते. हे तत्कालीन कागदपत्रे व इंग्रज, पोर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. या समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली होती. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. कौटिल्याने दोनहजार चारशे वर्षांपूर्वी पर्जन्यमापकाचा उपयोग शेती आणि धरणे बांधण्यासाठी केला होता. रायगडावरील दगडात बनवलेले हे पर्जन्यमापक त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे आधुनिकच म्हटले पाहिजे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजत असल्यामुळे रायगडावरील शिबंदीसाठी किती तळी खोदावी लागतील, त्यासाठी त्यांची लांबी-रुंदी व खोली किती ठेवायची म्हणजे त्यात साठलेले पाणी पुढील पर्जन्यकाळापर्यंत पुरेल याचा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यविशारदाने अंदाज घेऊन गडावरील विद्यमान तलाव बांधण्यात आले आहेत.
पाऊस योग्य वेळी व योग्य तेवढाच पडला तर धान्य भरपूर पिकते आणि गवत चाऱ्याचेही चांगले पोषण होते. शेती हा भारतातील महत्त्वाचा व्यवसाय, त्यासाठी राज्याचा कोष हा मुख्यत्वे शेती उत्पन्नावर आधारित असल्यामुळे शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक श्री. गोपाळ चांदोरकर (अर्किटेक्ट) यांच्या प्रथम ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या 'वैभव रायगडचे' या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. बाजूचे छायाचित्र त्या दगडी पर्जन्यमापकाचे आहे. कुशावर्त तलावाच्या काठी एक शिवमंदिर आहे. त्याच्या उत्तरेकडील एका खोलगट भागात हे दगडी पर्जन्यमापक आहे. रायगडावर आठ तलाव होते. त्यापैकी गंगासागर आणि कोळीम तलावाचेच पाणी सध्या रायगडावर वापरण्यात येते. रायगडावर रोज येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्यावर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे पाहता साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे नियोजन किती दूरदृष्टीने केले होते याची कल्पना येते.
शिवाजी महाराजांनी जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला आहे. सभोवताली तटबंदी आहे. आत २००' x ४००' फूट लांबी-रुंदीचे वाड्याचे जोते आहे. घोडे बांधण्यासाठी त्यात लोखंडी गोल कडी आहेत. वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर दगडी बांधकाम आहे. त्यावर दगडीबैठक आहे. हिला 'तक्क्याची विहीर' म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर अद्यापही जीवनरस उराशी घेऊन उभी आहे.
गंगासागर तलाव
|
कोळींब तलाव.
|
हत्ती तलाव
|
येथून पुढे अगदी पार महादरवाजा लागेपर्यंत एकही टाके अथवा तळे असल्याचा उल्लेख नाही. महादरवाजाच्या कमानीतून आत गेल्यावर समोरचा रस्ता बंद असल्याचा आभास होतो. महादरवाजा पार करेपर्यंत आपण मेटाकुटीला आलेले असतो. त्यातून पुढचा रस्ता बंद असल्यासारखे वाटल्यावर आपण मटकन खालीच बसतो. ज्या ठिकाणी हे सर्व होते, ती जागा आहे महादरवाज्यावरील पहाऱ्याची.या ठिकाणी जरा वरच्या बाजूच्या कड्यात थोडीशी खोदलेली पाण्याची टाकी होती. या ठिकाणी घडून गेलेला एक विलक्षण प्रसंग इतिहासात नोंदलेला आहे .”इ.स.१७८७ मध्ये रायगडावर मुसळधार पाउस पडून महादरवाजावरील हौद रात्रीच्या वेळी फुटला व पाण्याचा तुफान लोट वाहू लागला. दरवाजा उघडून पाण्यास रस्ता करून देणे अवघड झाले. तेथील मोऱ्या तुंबल्या आणि पाणी जाईना.थोड्यावेळाने मोऱ्यावरून पाणी वाहून जाऊ लागले आणि दरवाजा कोसळण्याचा प्रसंग उभा राहिला.” शहाजीराजांच्या भातवडी युद्धात त्यांनी वापरलेली रणनीती शिवाजी महाराजांनी महादरवाजा उभा करवताना वापरली असावी. किल्ले रायगड तळापासून बुद्धी आणि बळ वापरून उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करत शत्रूसैन्य जर महादरवाजापाशी पोहोचलेच आणि महादरवाजा सुद्धा त्यांच्या ताब्यात जायची वेळ आलीच तर ,गडावरून ही चारही टाकी फोडून टाकायची ज्यायोगे पाण्याचा महापूर येईल, सोबत दगड, धोंडे, झाडे, कचरा वगैरे बरोबर घेऊन ते पाणी धावत सुटेल. अशा प्रसंगी शत्रूची दाणादाण उडेल, आणि शत्रू चदाईचा नाद सोडून स्वत:चा जीव वाचवत माघारी फिरेल.असा विलक्षण विचार करून ह्या टाक्या बांधल्या गेल्या असाव्यात.
चांभार टाके
|
कुशावर्त तलाव
|
बाराटाकी
|
शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले असेल.
जलव्यवस्थापन हा बराच गहन आणि विस्तृतपणे विचार करावा असा विषय आहे. या लेखात त्याचा शक्य तितका सखोलपणे आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. एखाद्या गडावर गेल्यानंतर फार अवशेष नाहीत म्हणून अनेक जण निराश होउन परत येतात.पण अगदी छोट्या गड, कोटावरही पाण्याचे व्यवस्थापन कसे आहे ईतकी बाब तरी आवर्जून पहावी.आपल्या ज्ञानात तर भर पडेलच पण कदाचित त्या माहितीचा रोजचा आयुष्यात ही उपयोग होउ शकेल.
१) आज्ञापत्र- रामचंद्रपंत आमात्य
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) श्री. अमित सामंत यांचे लिखाण
४) श्री. चिन्मय किर्तने यांच लिखाण
५) https://www.sakhiradnye.in हा ब्लॉग
६) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
७) अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के.घाणेकर
गडकोटांवरील पाणीव्यवस्था 🎪
छ. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात असे बिकट दिवस यावे हि शोकांतिका व भविष्याची काळजी करणारी गोस्ट आहे. अरे महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून आपण शिकलो काय मग?? काय म्हणून आपण नुसता गर्व बाळगतो?? खरच आम्हाला छत्रपती समजले का?? खरच आम्ही त्यांचे विचार आत्मसात केले का??? महाराजांचा वैद्यानिक दृष्टिकोन पहिला का/ आत्मसात केला का??? या सर्वांच एकच उत्तर... "नाही".
आजकाल भरपूर लोक गडकोटांवर जातात पण ते पुरेश्या महितीअभावी म्हणा किंवा काहि लोक फक्त पीकनिक म्हणून येतात, तर काहीशे लोक फक्त ट्रेकिंग थरार असतो म्हणून गडकिल्याना भेट देतात, बर काही असो कोणत्या ना कोणत्या कारणानं का होहीना गडकोटांवर भटके वाढले किंवा गडकोट प्रेम वाढत चाललंय यातच एक प्रकारच समाधान मानुया.
जे किल्ले काळया कातळात घडवले आहेत अश्या किल्ल्यांवर पावसाळ्यात पायऱ्यांवर्ती शेवाळ वाढते व पायऱ्या पूर्णपणे घसरड्या होतात, यावरून कोण खाली पडू नये म्हणून पायऱ्यांवरती पकडण्यासाठी खोबण्या घडवलेल्या दिसतात, तसेच पायर्यांच्या बाजूने 70-80 cm ची चर खोदून पाणी पायऱ्यांवरती येणार नाही याची काळजी घेतलेली दिसते (किल्ले हरिहर, रतनगड वरती याचे उत्तम नमुने दिसतात).
संशोधन/ लेखन-
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
9890354353/ 9156571313
शिवकाळातील जल व्यवस्थापन
सह्याद्रीच्या शिखर माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी, उद्योग करावा, की निमित्त की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोनचार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे.' गड व पाण्याच्या देखभालीसाठी त्यांनी म्हटले की लोहार, सुतार, पाथरवट यांना गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवाव्या. लहान-सहान गडांवर यांचे नित्यकाम पडते असे नाही. याकरिता त्यांचे कामाची हत्यारे त्यांजवळी तयार असो द्यावी. गडावरील शिबंदीला वर्षभर पाणी कसे पुरेल याचे नियोजन त्यांनी दूरदृष्टीने करून ठेवले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड येथील जल व्यवस्थापन तर खास अभ्यासण्याजोगी आहे. रायगडावरील लेणी व डोंगराच्या पोटात खोदलेली खांब टाकी पाहिल्यावर लक्षात येते की रायगड हा प्राचीन गड असून त्याला किमान दीड हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. शिलाहार राजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक राजवटी रायगडावर नांदल्या आहेत. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव केल्यावर रायगड स्वराज्यात दाखल झाला. शिवाजी महाराज जातीने रायगडावर आले. सरळसोट भिंतीसारखे चहूबाजूने तुटलेले उभे कडे, दीड गाव उंच आणि वर चौरंगासारखा दीड मैल लांब आणि १ मैल रुंद सपाट माथा पाहिल्यावर 'तख्तास हाच जागा करावा' असे त्यांच्या मनात आले आणि स्वराज्याची राजधानी रायगड सजू लागला.
राजधानी रायगडावर मुबलक पाणीसाठा आहे. गंगासागर तलाव, कोळीम तलाव, कुशावर्त तलाव, हत्ती तलाव, काळा तलाव आणि निकामी झालेले तीन तलाव धरून एकूण आठ तलाव रायगडावर आहेत. त्यातील गंगासागर तलाव हा सर्वात मोठा असून राजवाड्यासमोरच तो बांधण्यात आला आहे. महादरवाजा, तटबंदी, बुरूज, राजवाडा, जगदीश्वर मंदिर आणि सेवकांची जवळजवळ तीनशे इमारती रायगडावर बांधण्यात आल्या. त्यासाठी लागणारा दगड गंगासागर व इतर तलावांतील दगड खाणीतून काढलेला आहे. राज्यभिषेकावेळी सप्तनद्यांचे पाणी गंगासागर तलावात टाकले आहे. या तलावांखेरीज पाऊणशे पाण्याची टाकी आहेत ती गडमाथ्यावर, गुंफेत व कड्याच्या पोटात राजवाड्यापासून भवानी टोकापर्यंत आणि वाघ दरवाज्यापासून टकमक टोकापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी त्या खोदलेल्या आहेत. रायगडावरील दहा हजाराच्या शिबंदीला पुरून उरेल एवढा प्रचंड पाण्याचा साठा रायगडावर होता. शिवराज्यभिषेकाला रायगडावर एक लाख असामी आले होते. हे तत्कालीन कागदपत्रे व इंग्रज, पोर्तुगीज यांनी लिहून ठेवले आहे. या समारंभातील सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान गडावरील या पाणवठ्यांनी भागवली होती. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले, त्याचा पुरावा रायगडावरच पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी रायगडावर सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. कौटिल्याने दोनहजार चारशे वर्षांपूर्वी पर्जन्यमापकाचा उपयोग शेती आणि धरणे बांधण्यासाठी केला होता. रायगडावरील दगडात बनवलेले हे पर्जन्यमापक त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे आधुनिकच म्हटले पाहिजे. वर्षाला सरासरी किती पाऊस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजत असल्यामुळे रायगडावरील शिबंदीसाठी किती तळी खोदावी लागतील, त्यासाठी त्यांची लांबी-रुंदी व खोली किती ठेवायची म्हणजे त्यात साठलेले पाणी पुढील पर्जन्यकाळापर्यंत पुरेल याचा शिवाजी महाराजांच्या स्थापत्यविशारदाने अंदाज घेऊन गडावरील विद्यमान तलाव बांधण्यात आले आहेत.
पाऊस योग्य वेळी व योग्य तेवढाच पडला तर धान्य भरपूर पिकते आणि गवत चाऱ्याचेही चांगले पोषण होते. शेती हा भारतातील महत्त्वाचा व्यवसाय, त्यासाठी राज्याचा कोष हा मुख्यत्वे शेती उत्पन्नावर आधारित असल्यामुळे शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते. रायगड अभ्यासक व संशोधक श्री. गोपाळ चांदोरकर (अर्किटेक्ट) यांच्या प्रथम ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या 'वैभव रायगडचे' या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. बाजूचे छायाचित्र त्या दगडी पर्जन्यमापकाचे आहे. कुशावर्त तलावाच्या काठी एक शिवमंदिर आहे. त्याच्या उत्तरेकडील एका खोलगट भागात हे दगडी पर्जन्यमापक आहे. रायगडावर आठ तलाव होते. त्यापैकी गंगासागर आणि कोळीम तलावाचेच पाणी सध्या रायगडावर वापरण्यात येते. रायगडावर रोज येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्यावर आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे पाहता साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याचे नियोजन किती दूरदृष्टीने केले होते याची कल्पना येते.
शिवाजी महाराजांनी जिजाऊसाठी पाचाडला वाडा बांधला आहे. सभोवताली तटबंदी आहे. आत २००' x ४००' फूट लांबी-रुंदीचे वाड्याचे जोते आहे. घोडे बांधण्यासाठी त्यात लोखंडी गोल कडी आहेत. वाड्यात दोन विहिरी आहेत. विशेष म्हणजे एकीला खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून वर दगडी बांधकाम आहे. त्यावर दगडीबैठक आहे. हिला 'तक्क्याची विहीर' म्हणतात. महाराजांनी जिजाऊंना बसण्यासाठी ती खास बनवून घेतली. एका मराठमोळ्या राजाची जीवन आणि जिव्हाळा जपणारी साधीसुधी मराठमोळी विहीर अद्यापही जीवनरस उराशी घेऊन उभी आहे.
शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की गडावर झऱ्याचे पाणी भरपूर आहे म्हणून त्यावर विसंबून न राहता एकदोन तळी अधिक बांधून राखीव ठेवावी. प्रसंगी ती कामास येतील हे लक्षात घेऊन व निसर्गचक्राचा रोख पाहून यापुढे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे किती गरजेचे आहे, हे अलीकडचे बदलते वातावरण पाहून आपल्या लक्षात आले असेल.
किल्ल्यांवरचे तलाव
किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं.
किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं. पण राज्यविस्ताराबरोबर अनेक किल्ल्यांवर भरभक्कम, विस्तीर्ण तळी आणि खंदकांचे बांधकाम झाले.
मागील लेखात आपण गडकिल्ल्यांवरील पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्राथमिक सुविधा पाहील्या. पण जेव्हा एखादा किल्ल्यावर राबता वाढतो, तो किल्ला राजकिय कारणाने महत्त्वाचा होत जातो, लष्करीदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढते किंवा तो किल्ला राजधानी होतो तेव्हा त्या किल्ल्यावरील पाणी सुविधादेखील तितक्याच मोठय़ा प्रमाणात विकसित करावि लागते.
अशा मोठय़ा किल्ल्यांवर पाणीपुरवठय़ासाठी तलाव खोदले जातं. रायगडवरील ‘गंगासागर तलाव आणि हत्ती तलाव’ तर सर्वाना परिचित आहेत. या तलावातून तसेच किल्ल्यांवर खोदलेल्या टाक्यांमधून निघणारा दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. नैसर्गिकरीत्या तयार झालेले तलावही काही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. त्यात भुदरगडावरचा दुधसागर तलाव, टंकाई किल्ल्यावरचा तलाव, नरनाळा किल्ल्यावरचा शक्कर तलाव इत्यादी मोठे तलाव आहेत. अहिवंतगड, महिमतगड, इत्यादी अनेक किल्ल्यांवर बांधीव तलाव पाहायला मिळतात. गडावरचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उतार, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग यांचा अभ्यास करून असे तलाव बांधलेले आढळतात. बांधीव तलावाच्या चारही बाजू दगडांनी बांधून घेतलेल्या असतात. धारूर, उदगीर इत्यादी किल्ल्यांवर विहारासाठी खास तलाव बांधलेले आहेत. तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्याबाहेरील तलावातून खापरी नळांच्या (पाईपांच्या) द्वारे आणलेले पाणी या तलावात सोडले जात असे. धारूर किल्ल्यात असलेल्या तलावाच्या वरच्या बाजूस ‘हवामहाल’ आहे. तलावाच्या पाण्यावरून येणारी हवा गार होऊन या हवामहालात येते. अंकाई किल्ल्यावर कातळात कोरलेला एक सुंदर तलाव आहे. त्याच्या मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे.
औसा या लातूर जिल्ह्यतील किल्ल्यात दगडात बांधून काढलेला मोठा चौकोनी तलाव आहे. याला ‘जलमहाल’ या नावाने ओळखतात. या तलावाच्या एका बाजूला आत उतरण्यासाठी जिना आहे. विजेरी घेऊन यात उतरावे लागते. खाली उतरल्यावर आतमध्ये अनेक कमानी असलेला महाल पाहायला मिळतो. हा महाल बरोबर तलावाच्या खाली येतो. या महालात हवा आणि प्रकाश आत येण्यासाठी छतामध्ये झरोके अशाप्रकारे बांधलेले आहेत की त्यांचे तोंड तलावाच्या पाण्याच्या पातळीच्या वर उघडेल. यामुळे तलावात पाणी भरले तरी महालाच्या छतामध्ये असलेल्या झरोक्यातून पाणी खाली येत नसे. या महालाचा उपयोग उन्हाळ्याच्या दिवसात राहण्यासाठी केला जात असे. जमिनीखाली बांधलेला महाल व वर असलेले तलावातील पाणी यामुळे महालात गारवा असे.
धारूर किल्ल्यात दोन वैशिष्टय़पूर्ण तलाव आहेत. त्यांना गोडी दिंडी आणि (सोलापूर) खारी दिंडी या नावांनी ओळखतात. गोडी दिंडी हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरून काढलेला आहे. या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्यापलीकडे खंदक आहे. तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत (४० मीटर लांब ७ मीटर रुंद व १२ मीटर उंच) दरीतून बांधून काढलेली आहे. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकारे होत होता. संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतर वेळी वर्षभर पाणीपुरवठा करणारा तलाव.
उस्मानाबाद जिल्ह्यतील नळदुर्ग किल्ला म्हणजे पाण्याचा विविध प्रकारे वापर कसा करता येईल याचा वास्तुपाठ आहे. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजे ‘जलमहाल’ नळदुर्गाच्या चारही बाजूला खंदक आहे. तुळजापूरहून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पात्र वळवून पाणी खंदकात खेळवून संपूर्ण किल्ल्याला संरक्षण दिले आहे. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसऱ्या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला गेला. या बंधाऱ्याच्या एका टोकाला नळदुर्ग तर दुसऱ्या टोकाला किल्ल्याचा जोडकिल्ला रणमंडळ आहे. हा बंधारा १७४ मी. लांब, अडीच ते चौदा मी. रुंद आणि १९ मी. उंच आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल आणि गणेश महाल असे दोन महाल बांधलेले आहेत. जलमहालाच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नल (नर) आणि दमयंती (मादी) या नावाच्या दोन मोऱ्या ठेवलेल्या आहेत. पावसाळ्यात या मोऱ्यांमधून पाणी वाहते तेव्हा महालातून अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. बंधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी या बंधाऱ्यावरून वाहते, पण आतील भागात असणाऱ्या एका वास्तूलासुद्धा त्याचा स्पर्श होत नाही. या जलमहालाच्या वरून जेव्हा पाणी पडते, तेव्हा त्याच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे मीर इमादीन. या धरणात साठवलेल्या पाण्याचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. धरणाच्या आतल्या बाजूला एक पाणचक्की बसवलेली आहे. अन्नधान्य दळण्यासाठी त्याचा वापर होत असे. धरणातून सोडलेले पाणी विविध बंधाऱ्यांद्वारे अडवून शेतीसाठी पुरवले जात असे. नळदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूलाही एक आडवी भिंत बांधून छोटा जलाशय निर्माण केलेला आहे. त्याला मछली म्हणतात. यावरून त्याकाळी या भागात मत्स्य शेतीही होत असावी असा अंदाज करता येतो. भुईकोट किल्ल्यांच्या भोवती जो खंदक खोदला जात असे त्यात आजूबाजूच्या जलस्रोतातले पाणी खेळवले जात असे किंवा खंदक पावसाच्या पाण्याने भरला जाईल याची काळजी घेतली जाई. यामागे संरक्षणाबरोबरच भुईकोट किल्ल्यातील विहिरी, तलाव, पुष्करणी यांना भूजल पुनर्भरणासाठीही याचा उपयोग होत असे.
गंमत म्हणजे वर ज्या तलावांची माहिती दिली आहे ते आजच्या कायम अवर्षणग्रस्त असलेल्या मराठवाडय़ातील किल्ल्यात आहेत. काही शतकांपूर्वी असलेले हे ज्ञान अचानक कुठे गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे.
मेळघाटातल्या नरनाळा किल्लय़ावरील सर्वच तलाव हे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तंत्राचा वापर करून बांधलेले आहेत. उतारावरून वाहणारे पाणी बोगदे खणून, कातळात उतार कोरून तलावात आणलेले आहे. नरनाळ्यावरील सर्वात मोठा तलाव म्हणजे शक्कर तलाव. या तलावाच्या उजव्या बाजूस उतारावरून वाहणारे पाणी तलावात वळवण्यासाठी कमानदार बोगदा बांधून काढलेला आहे. तलावाच्या डाव्या बाजूस कातळ आहे. या कातळावर पडणारे पावसाचे पाणी तलावातच जावे यासाठी कातळात ठिकठिकाणी चर कोरून काढलेले आहेत.
नैसर्गिक आणि बांधीव तलावांव्यतिरिक्त गडांवर साचपाण्याचे तलाव असतात. पावसाचे पाणी खोलगट भागात साचून अशा प्रकारचे तलाव तयार होत. पावसाळ्यानंतरचे काही महिने या तलावात पाणी राहाते. किल्ल्यांवर पुष्कर्णीही बांधलेल्या पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगड, कुलाबा इत्यादी किल्ल्यांवर पुष्कर्णी बांधलेल्या पाहायला मिळतात.
किल्ल्यावर टाक तलावांव्यतिरिक्त विहिरीही पाहायला मिळतात. मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७०मध्ये शिवरायांनी पाहणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंतांनी गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. २२८ फूट खोल खोदल्यावर विहिरीला पाणी लागले.
नागपूरजवळ असलेला नगरधन किल्ला येथे वाकटाकांची राजधानी होती. या किल्ल्यात वैशिष्टय़पूर्ण विहिरी पाहायला मिळतात. किल्ल्यात भुयारीदेवीचे मंदिर एका विहिरीत आहे. येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात व पाण्याच्या सान्निध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो. याच किल्लय़ात एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फुटांवर एक विहीर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायऱ्या असलेला एक उथळ हौद आहे. पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फुलं ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी.
धुळ्याजवळ असलेल्या सोनगीर किल्ल्यावर एक बाव (विहीर) आहे. आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी आहे असे म्हणतात. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणी आहे. पूर्वी या विहिरीतून पाणी काढून पुष्करणीत साठविले जात असावे.
जलदुर्गावर आपण फिरतो तेव्हा
त्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरी पाहून आपण चकीत होतो. चारी बाजूंनी
खाऱ्या पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात गोड पाणी येते कुठून. त्यामागील
भौगोलिक सत्य असे आहे- बेट आणि समुद्रकिनारा एकाच सलग प्रस्तराने जोडलेले
असतात. त्यामुळे किनाऱ्यावरील जमिनीत झिरपणारे पाणी प्रस्तराखालून वाहत
असल्यामुळे बेटावरच्या विहिरीत येते. या पाण्याचा उपसा व्यवस्थित करावा
लागतो अन्यथा आजूबाजूला असलेले खारे पाणी विहिरीत येऊन गोडय़ा पाण्याचे
स्रोत कायमचे बंद होऊ शकतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील दुधबाव, दहीबाव या
गोडय़ा पाण्याच्या विहिरी अशाप्रकारच्या गोडय़ा पाण्याच्या स्रोतांचे उत्तम
उदाहरण आहे. सर्वच बेटांवर अशाप्रकारे भूगर्भातले गोड पाणी मिळत नाही.
अशावेळी साच पाण्याचे, तलाव टाकी बांधले जातात. त्यात पावसाचे पाणी साठवून
वर्षभर वापरले जाते. जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग इत्यादी जलदुर्गावर
अशा प्रकारची रचना केलेली पाहायला मिळते.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com
कातळातलं पाणी
पुण्याच्या
परिसरातले किल्ले कितीतरी. त्या सगळ्या किल्ल्यावरच्या पाण्याची मुबलकता
थक्क करणारी आहे. सिंहगडावर कितीतरी टाकी आहेत. अमृतेश्वराच्या देवळाखालचा
पाण्याचा तलाव विस्तीर्ण आहे. त्यानंतरचे दोन तलाव राजाराममहाराजांच्या
समाधीलगत आहेत. इथलं देवटाकं इतिहासप्रसिद्ध खरं, पण इतरही अगणित ठिकाणी असलेल्या टाक्यांचं पाणी तितकंच गोड आहे.
पुण्याजवळ
वेल्ह्याकडे जाताना डावीकडे राजगड हा देखणा गड दिसतो. उन्नत असा
बालेकिल्ल्याचा माथा आणि तिन्ही अंगाला बाहुप्रमाणे पसरलेल्या माच्या-
सुवेळा, पद्मावती आणि
संजीवनी. त्यांवर आणि बालेकिल्ल्यावरही पाण्याची विपुल टाकी आणि तलाव
आहेत. पद्मावतीच्या माचीवर पद्मावतीचं देऊळ आणि त्याच्या दोन्ही बाजूला
पाण्याची टाकी आहेत. शिवाय खालच्या अंगाला विस्तृत असा पद्मावती तलाव
खोदलेला आहे. याच माचीवर पाठीमागच्या खोलदरीत पाण्याचा तलाव आहे.
घोडय़ांच्या पाण्याची ती सोय होती.
हरिश्चंद्रेश्वराचं
मंदिर काळ्या पाषणातून बांधून झाल्यावर रचनाकारानं मंदिराच्या पुढय़ातील
खोलगटही नीट दगडानं बांधून घेतली. मंगळगंगा नदीचा प्रवाह त्या लहान दगडी
कालव्यांतून पुढे डावीकडे वाहत जाऊन दगडांवरून उडी मारून पाचनइकडे जातो.
मंदिराला शिखर आहे आणि चारींबाजूनं दगडी भिंतही. विशेष म्हणजे मंदिराच्या
अंगणातच बाहेरच्या भिंतीच्या आतल्या अंगाला काही गुहा आहेत. त्यांच्या
बाहेरच्या अंगाला लागूनच कातळ कोरून काढलेली पाण्याची टाकी आहेत.
कातळाच्या आतल्या अंगाला असल्यानं दगडी छताखाली पाणी आहे. डोळे आणि तृष्णा
एकाच वेळी तृप्त करणारं! शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक धरायला लांब
जायला नको. देवळालगतच पाण्याची सोय.
चावंड
हा खरं तर लहान किल्ला; पण
जुन्नरजवळच्या या किल्ल्यावर सात टाक्यांचा समूह आहे. सगळ्यांमध्ये पाणी.
एका टाक्यावर कमान व गणेशपट्टी कोरलेली आहे. त्यातून जाऊन टाक्यातल्या
पाण्यात डुंबायला मोठी मजा येते. चावंड, हडसर, जीवधन ही दुर्गत्रयी जुन्नर
परिसरातली. तिन्ही ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. याच परिसरातून कोकणात
उतरणारी घाटवाट, ‘नाणेघाट’ आहे.
सातवाहन राजवटीतील राणीनं हा घाट खोदला. या घाटवाटेनं जाणा-या व कोकणातून
देशावर येणा-या व्यापा-यांच्या तांडय़ांसाठी नाणेघाटात ऐसपैस गुहा खोदली.
शिलालेखही खोदून घेतला. पांथस्थांसाठी गुहेलगत कातळामध्ये पाण्याचे हौद
खोदले. घाटाच्या माथ्यावर गणेशमूर्ती स्थापन केली. एका बाजूला रांजण
ठेवला. त्याला जकातीचा रांजण म्हणतात. गणेश मूर्तीपाशी पुन्हा पाण्याचं एक
टाकं आहे. कोकणातून देशावर माल घेऊन येणा-या-जाणा-या लमाणांच्या तांडय़ाला
या पाण्याचा केवढा आधार वाटत असणार!
हरिश्चंद्र
गडावरून मळगंगेचा प्रवाह निर्माण झाला, तर ‘प्रवरा’ नदीचा
उगम रतनगडच्या किल्ल्यावर झाला. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा धरणाच्या
परिसरातील हा जुना किल्ला. याच्या मुख्य डोंगरकण्याच्या पोटामध्ये तुडुंब
भरलेलं टाकं आहे. नदीचा उगम तिथूनच होत असल्यानं त्याला ‘प्रवराकुंड’
म्हणतात. इथून बाहेर पडणारी धार गडाच्या अंगावरून लगेचच खाली उतरते. तीच
‘प्रवरा’ नदी. तिच्यावर ब्रिटिशांना भंडारदरा धरण बांधलं. ही नदी पुढे
गोदावरीला जाऊन मिळते.
आज
आपण रेनवॉटर हार्वेस्टिंगचे तंत्र वापरतो; पण आपल्या पूर्वजांनी ते कधीच
किल्ल्यांवर राबवलं. पाणी कुठे सापडेल, याचा अचूक अंदाज घेऊन टाकी खोदली.
त्याचा दगड बांधकामाला, बांधबंदिस्तीला वापरला. काही ठिकाणी भूगर्भातील
पाण्याचे प्रवाह मिळाले. शिवाय पावसाचं पाणी त्यात साठवता येऊ लागलं.ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा

खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं.
खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा
साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं
जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते
गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.
तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर.
गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन
दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.
पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ
नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे
आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ
हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).
पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12
किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा
अजिबात ताण भासत नाही.
ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात
घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.
बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा
पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी
अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा
आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा
एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी
तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू
शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक
कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना
एकत्रित येण्याची संधी मिळत असे.
आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत
त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा
एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.
बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव
लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला
कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस
मराठे)
बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर
प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत
शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव.
या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे
वर्षांपूर्वीचा असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप
जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप
उंचावर दिसतो.तोपर्यंत बारवेमध्ये तळाशी आलेल्या पाण्यात पिटुकल्या शंखांचा
खजिना सापडला.तो गोळा करण्यात ती दंग झाली
शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे.
पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे
आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम
आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा
आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची
आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे
ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास
होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती
,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही
विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे.
मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील
मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती
जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे
मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे
आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य
नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा
एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे
जुने मंदिर आहे.
या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर
महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ
देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी
'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून
आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले
त्याची प्रतिकृती मानली जाते..
मंदिरामागे एक भव्य तलाव आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत
मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर प्रवेशासाठी
चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू
बाजूचे मंदिरे पडलेले आहे.
अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.
-भक्ती
खोलेश्वर मंदिर

वामतीर्थ

ब्राह्मणीची बारव


बल्लाळ देवी मंदिर 
ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवलेला त्या रेड्याची प्रतिकृती

अमृतानुभव खांब

ओळखू न आलेली पैकी एक वेगळी मूर्ती

सुंदरी


सुरेख सुंदर बाप्पाची पूजा

- प्रतिसाद द्या
- 475 वा
Baravs – Punyache Paani
Introduction
Pune has witnessed the construction of several aqueducts, cisterns, ornamental pools, ponds, and tanks throughout history, similar to many other places in India. Many of these water structures represent the traditional wisdom and efficient water management practices of our ancestors.
This photo essay narrates the story of one such traditional water structure known as barav, which is a stepped pond or a well. A typical barav consists of a shaft penetrating deep inside the earth to tap groundwater. A steep flight of steps surrounds the shaft, providing access to the people for fetching groundwater. Baravs may be square, rectangular, or octagonal in shape with a parapet wall along their perimeter. One or more pavilions known as mandaps are sometimes present along the sides of the baravs. The name ‘barav’ comes from a traditional unit of measurement called ‘bav’, equivalent to 1.5 metres. Additionally, baravs are also known by the names kund, jalmandavi, and pushkarini.
The religious idea of attaining spiritual merit by performing acts of charity motivated many rulers, traders, money lenders, and priests to patronize the construction of baravs for the common good of the society at different places in Maharashtra. They were built with the financial support of the patrons, but were owned and maintained by the entire community, often transcending the social divides, as understood from the ancient stone inscriptions that exist near them. They were not only utilitarian structures, but also meeting places for people, especially women fetching their daily water, as well as sacred structures for holy bathing as part of religious rituals.

Baravs found in Pune
Once upon a time, baravs were an inherent part of many settlements and temple precincts in Pune. A barav next to a shade-giving tree is a common sight in some of villages of Pune even today. Elsewhere, although baravs may have been destroyed over a period, their memory remains intact amongst the older generation of people. Interestingly, in the Junnar taluka (a block) a village itself is named as ‘Barav’ after an old barav which once existed there. In short, baravs were an inseparable part of many settlements.

This story talks about two baravs which are more than 600 years old, built somewhere in the early 14th century. One of them is found at Manchar town in Ambegaon taluka and the other one is found at Loni Bhapkar village in Baramati taluka of Pune district. The barav at Manchar is still used by the people for bathing and swimming. The one at Loni Bhapkar is part of a temple complex and has religious significance. Although its waters have become unfit for domestic use over time, it is an excellent piece of architecture displaying artwork in basalt rock.
The barav at Manchar
The town of Manchar was once a small village during medieval times, located on the trade route connecting the historic towns of Paithan (famous for its sarees) and Junnar. The barav found in Manchar is a beautiful one located next to a small water course called as ‘Khardi Nala’. This barav is fed by a natural spring and contains ample water throughout the year.
The barav at Manchar is nearly a square which tapers from a width of 22 metres on its topmost side to nearly half the length (11 m) at the bottom side. It has two entrances – one from the south and another from the east. After descending down from these two entrances, one reaches to an intermediate landing that has a raised seating platform.



Steps are a striking feature of this barav. Adjacent steps contain protruding stone blocks at regular intervals to counterbalance the thrust of the soil from behind. They also act as intermediate seating platforms, creating a beautiful rhythmic pattern, which highlights the aesthetic side of structural elements.
A stone inscription housed in the western parapet wall, narrates an interesting story about the construction of this barav. According to the Sanskrit inscription, Manichar (previous name of Manchar) was a beautiful village stationed in the hills of Amargiri. In Manichar, there lived an able, just, brave, and handsome person named Ladidev, who was the son of the village head (mentioned as pattelvarya). One night in his dream, Ladidev sees Mother Earth expressing her wish to permanently reside in his village. Waking up the next day, Ladidev recollects his dream and decides to build a barav at a suitable spot in the village where Mother Earth would permanently reside in the form of water. He thinks that the barav would also help in relieving the water stress conditions experienced by the villagers of Manchar due to frequent droughts. With these considerations, Ladidev initiates the construction of the barav on an auspicious day in the Shaka Samvat year 1266 (i.e. 1344 A.D.) (Ref: Mandake, G, 2003).

Today, the barav is popular amongst the people of Manchar as ‘angholichi barav’ (meaning barav used for bathing). Many adults and school-going kids assemble at the barav during early morning hours for bathing.
“We love swimming in this historical barav. It is always full with water, even in summer. We come here as early as 5 am and enjoy swimming until the afternoon sometimes. Applying soap and bathing in the barav is prohibited, so as to keep its water clean”


“We kids have competitions for jumping into the barav. Taking a dip into the barav is great fun. But now during times of Covid, police have put restrictions on the number of people bathing at a given time. So usually we come in groups not exceeding 10-15”

A small channel carries water from the barav into a kund, which is a small stepped pond located on its eastern side. Women assemble at this kund daily for washing clothes. Thus, while the barav becomes a social interaction space for men, the kund becomes an interactive space for women, who get a break from their daily routine and find a few leisure moments for chatting with each other while washing their clothes.
The barav at Loni Bhapkar

Loni Bhapkar village contains a beautiful barav built way back in the 14th century. The barav is part of a sacred precinct, originally containing temples of Shiva and Vishnu. Today, the original Shiva temple is in a dilapidated condition, while a new Dattatray temple has been built in place of the Vishnu temple. Interestingly, the barav is placed strategically at the focal point of the two temples, highlighting its significance and sacredness in the entire complex. Earlier, as part of religious rituals, people would take a bath in the barav before entering the temple. They believed that such ritualistic bathing washed away their sins and purified them before entering the sacred temple.

This barav is square-shaped with sides measuring 21 m at top and 14 m at the bottom, containing a series of steps carved in basalt rock. The entrance to the barav is from the southern side from where one descends down a few steps to reach the intermediate landing. The barav stands out because of its parapet wall which contains attractive devkoshta (niches) and a mandap (pavillion).
The two-metre high parapet wall of the barav acts as a kind of threshold, separating terrain and water. It contains 24 attractive devkoshtas forming a rhythmic pattern. Once upon a time, they housed idols of Vishnu in different forms. They reminded people about the sacredness of baravs and discouraged them from indulging in any acts that would pollute their water. Such kind of architectural detailing highlights the effective use of religious and spiritual ideas to encourage the water management practices of health and hygiene amongst people.


A square mandap with a roof supported by brackets resting on four circular pillars protrudes into the barav from its western side. Since the mandap was located outside the Vishnu temple, it is believed to once contain the idol of Varaha – one of the incarnations of Vishnu having the head of a wild boar and the body of a man. The remains of this idol can be seen today beneath a tree next to the barav. Apart from housing the idol, the mandap has a seating platform for people to relax and reflect in the presence of water. The external surface of the mandap is divided into panels by columnar motifs. The panels contain figurative motifs depicting the different incarnations of Vishnu and scenes from the Ramayana.



Despite the structural differences between the baravs at Manchar and Loni Bhapkar, both of them share some commonalities. Firstly, apart from minor structural damages, and wear and tear, both the baravs are in reasonably good conditions even after 600 years. They are fed by an ample quantity of safe groundwater even today. These facts demonstrate the engineering skills and hydrogeological knowledge of the people who built these baravs. Secondly, both the baravs are taken care of by their respective local communities. For instance, in 2019, few men from Manchar volunteered for cleaning and desilting the barav, as told by one of the volunteers Mr. Dhanesh Raut. He also said that every year during Diwali they light oil lamps on the steps of the barav.
Conclusion
In addition to the two baravs discussed in this photo-essay, there exist few others in and around Pune. However, most of them are in a ruined condition. Today, the usefulness of baravs as water storage structures may have declined due to relatively easy access to tap water. Despite this fact, we cannot neglect their value and turn them into places for dumping waste. We need to understand that baravs are much more than mere water storage structures. They have heritage value and have once served as community spaces with socio-cultural and socio-technical identity. Most importantly baravs connect people to water by enabling them to see, hear and touch water.
Currently, when water is increasingly seen as a commodity to be exploited to the fullest, protecting baravs becomes essential as they manifest our ancient cultural values of respecting, sharing and using water with utmost care, which is a precious gift from nature to humankind.

References
- Dandawate, P.P.; Joshi, P.S. and Gajul, B.S. 2006. Traditional systems of water management in Maharashtra. In Chakravarty, K.K.; Badam, G.L. and Paranjpye, V. (Eds), Traditional Water Management Systems of India, pp. 3–7. Indira Gandhi Rashtriya Manav Sanghrahalay, Aryan Books International. Bhopal, New Delhi.
- Mandake, G. (Ed). 2003. Man͂car yethīl ī.sa. 1344 madhīl shilalekha. In Shodha nibandha saṇgraha. Akhila Mahārāṣṭra Ithihās Pariṣad. Adhives̍an Akrāve. 2002-03. Chāndvaḍa.
- Marathe, M. 2019. Reimagining water infrastructure in its cultural specificity. Case of Pune. Technical University Darmstadt. urn:nbn:de:tuda-tuprints-92810
- Marathe, M. 2021. Baravas: An architectural exploration of the traditional groundwater storage structures of Pune, India. Ancient Asia. 12:1, pp. 1-1. DOI
- Pāṭhaka, A. 2017. Mahārāṣṭrātīl bārava sthāpatya āni pāramparik jalvyavasthāpan. Aparānt. Pụne.
- Raut, D. 2022. Photograph and video of barav at Manchar.
बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )
इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली
बाहुली विहिर -
Post By..
Vidarbha Darshan
- बाहुली विहिर -
अमरावती-जबलपूर मार्गावरील वेळा-हरिश्चंद्र गावाच्या परिसरात प्राचीन दगडांपासून बनविलेली बाहुली विहीर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. प्राचीन रेखीव काम आणि त्यावर देवी-देवतांचे कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक विहिरीला एक मोठा इतिहास असल्याचे जुने-जाणते लोक सांगतात. आता या ऐतिहासिक वास्तूला विकासाची आणि सौंदर्यीकरणाची "तहान' लागलेली आहे. विहिरीची तहान वेळीच भागविल्या न गेल्यास सुमारे 150 ते 200 वर्षे जुना ऐतिहासिक वारसा लवकरच इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.
अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगायला विसरत नाहीत. काही वर्षांआधीपर्यंत परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता लोकांसह प्रतिनिधींनी व सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक विहिरीला उतरती कळा आलेली आहे.
बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहणार आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या उपराजधानीच्या हाकेच्या अंतरावर लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे आहे.
इतिहास पुसल्या जाण्याची भीती
ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्या तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झालेली आहे.
"चिअर्स' अन् "लवर्स पॉइंट'
शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटची पाकिटे हमखास आढळून येतात.
पांढर पाणी"येथील विहिर..
"पांढर पाणी"येथील विहिर... पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे दरम्यान एक छोटस पांढरपाणि नावाच एक खेड गाव लागत हे गाव जरी छोट असल ना पन ह्या गावाचा इतिहास फार मोठा आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून निसटले ना तेव्हा त्यांना वाटेत भुख लागली असता,, तेव्हा ह्या गावात थांबले होते व त्यांच्या जेवनाची सोय एका (माऊली) आजीबाईनीं केली होती.
जिकडे माझ्या राजांच.....
पाऊलखुणा ना...
तिकडे च आमच मस्तक ,,नतमस्तक होत..
बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती
॥ श्री गणेशाय नमः ॥
वसई विरार हा पूर्वीपासूनच हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो . पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली .
बावखळ
बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .
चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतारावरून येणाऱ्या पाण्याला आत मध्ये झिरपण्यासाठी मदत करतात . बावखळ गोलाकार किंवा चौकोनी असतं . त्याचा व्यास विहीरी इतका किंवा त्यापेक्षा मोठाही असतो . आजूबाजूला चिंच आंबा अशा गर्द वृक्षांची लागवड करतात जेणेकरून सावलीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं . त्याच सोबत या पानांचा खच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो आणि बाष्पीभवन कमी करतो . भेंड आणि करंज यासारख्या झुडप वर्गीय वनस्पती माती घट्ट धरून ठेवतात जेणेकरून पाण्यासोबत माती बावखळाच्या आत जाणार नाही . ( माहिती सौजन्य : श्री सचिन मर्ती . )
विहीरीशी तुलना केल्यास विहीर ही गोलाकार असते आणि तिचा व्यास कमी असतो . विहीरीच्या कडा दगड विटांनी पक्क्या बांधलेल्या असतात . पावसाचं पाणी विहीरीत झिरपावं अशी अपेक्षा नसते . उलट तळाशी असलेले नैसर्गिक झरे पाण्याची पातळी ठरवतात . पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे आजूबाजूला झाडांची लागवड करत नाहीत . कारण झाडांची पानं पाण्यात पडून पाण्याची गुणवत्ता खराब होते .
स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -
सध्याची परिस्थिती : -
बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )
ग्वाल्हेरच्या माणसाला ग्वाल्हेर किल्ल्याचे प्रचंड आकर्षण व तेवढेच अप्रूप..दिसायला निःसंशय अतिशय देखणा..पर्शियाहून आलेला निळा रंग वापरून ” मान मंदिर ” चे अनोखे रूप,तो तजेला अजूनही तेवढाच मोहात पाडतो. मी जेव्हा मुंबईला प्रथम आले आणि पूज्य मामंजी म्हणाले, “मी जरा मुंबईला जाऊन येतो हं,” मी दचकलेच ..”आपण मुंबईतच आहोत ना ?” पण नंतर खसखस पिकली, कळताच की ही जुनी पिढी अजूनही फक्त दक्षिण मुंबईलाच मुंबई मानते. इतर फक्त उपनगरे..तसेच ग्वाल्हेरला प्रथम जाणारा माणूस भांबावतो. स्टेशनवर उतरताच त्याच्या कानी टेम्पो, रिक्षावाल्यांची पृच्छा ऐकू येते, ” साब, ग्वालियर, ग्वालियर ??..”
कारण तेथेही बिरला नगर, लष्कर, ग्वालियर, मुरार असे भाग पाडले आहेत. किल्ला हा ” ग्वालियर ” भागात येतो. पूर्वी तो पायथा इतका गजबजलेला नव्हता.. आता भयंकर दाटी वाटी झाली आहे. सर्वच शहरांची ही वाढीव लोकसंख्या पूर्वीचे निसर्ग सौंदर्य नष्ट करीत आहे याचा खेद वाटतो.
महाराज मानसिंग एकदा मृगया करण्यास गेले असता त्यांना निन्नी नावाची एक गवळण दिसली. दोन धृष्टपुष्ट वळू त्वेषाने एकमेकांवर चालून जात होते. त्यांचे ते महाभयंकर नाक फुलवित, फुत्कार सोडीत होणारे युद्धच जणू ..या मुलीने लीलया सोडवले. ते बघून राजा आरक्त..!. तिला पट्टराणी करणारच, हे ठरविल्याने इतर मंत्रीगण नाराज झालेत पण राजाची इच्छा! ती स्वाभिमानी मुलगी, गरीब, खालच्या जातीची पण बाणेदार ..तिने तीन अटी घातल्या
१..मी या सांक नदीचेच पाणी पिणार..
२..मी वेगळ्या महालात राहणार ..
३..तुम्ही जर युद्धावर गेलात तर मी देखील येणार ..
तिच्या या तीनही अटी मान्य झाल्या. ते गुजरी महल देखील बघण्यासारखे आहे. तिच्यासाठी मोठमोठाले पाईप्स घालून सांक नदीचे पाणी तिच्या महालापर्यंत आणले. ती पाईपलाईन अजूनही दिसते. ती संगीतज्ञ होती, असेही सांगतात. आख्यायिकाही असू शकतात. राग..गुर्जरी तोडी ..हा तिनेच तयार केला .. म्हणतात. अकबराच्या नवरत्नांपैकी तानसेनने ‘मियाँ की तोडी’ जसा तयार केला. ती देखील दंतकथा आहे असे म्हणतात. तिचे डोळे सुंदर मृगासारखे असल्याने राजाने तिचे नाव ” मृगनयनी ” ठेवले. मध्यप्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वृंदावनलाल वर्मा हे वडिलांचे परिचित..त्यांनी ‘मृगनयनी’ नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांच्याच हातून ती मला बक्षीस मिळाली, हा अपूर्व योग होता. त्यांच्या तोंडून त्या कथा ऐकणे म्हणजे मेजवानीच होती. आमच्या शाळेचा हा आणखी एक अनोखा उपक्रम.
त्या किल्ल्यावर आम्ही पुढील बाजूने चढूनही जात असू, कधी कधी मागील रस्त्याने कारने जात असू. ते खास किल्ल्यावर असलेल्या शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी. खूप सुंदर रंगमंच होता त्यांचा..खुले रंगमंदिर ..दगडी पायऱ्या वगैरे. श्रीमंत जीवाजीराव शिंदे पण बघायला येत. याच शाळेत हिंदी चित्रपट नट सलमान खान, नितीन मुकेश वगैरे शिकत असत. एकदा गंमतच झाली .. वडिलांना काम असल्याने ते लवकर उठले. खरे तर असा एक अलिखित नियम होता ( अगदी दंडक नव्हे पण ) की राजे निघून गेल्यावरच इतर जातील..पण आमची प्रशस्त कार निघाली ..आणि त्या वळणदार रस्त्यावर, गोल गोल उतरत जाणाऱ्या त्या वाटेवर प्रत्येक वळणावर शिपाई खाडकन उभे राहत होते, आम्हाला सलाम करीत होते. काही वेळानंतर लक्षात आले, ते असे का वागले आणि खूप हसू लागले सर्व. आमचा कारचालक तर अगदी आनंदी..
त्या किल्ल्यासमोरच आमचे एक काका राहत असत. त्यांच्या गच्चीवरून मानमंदिर दिसे..रेखाटने करायला सोपे .

गूजरीने जेथून सांक नदीचे पाणी आणवले तो बांध बघायला आम्ही जात असू. तिगरा डॅम. माझ्या वडिलांना सर्वांना घेऊन सहलीला जायला आवडत असे. स्वतः इतके व्यस्त. वकील, लेखक, कवी, पुढारी, समाजकार्यात झोकून देणारे पण सहलीसाठी ही वेळ काढत. त्यासाठी खूप मोठा लाकडी पेटाराही बनवून घेतला होता. त्यात आजकाल मॉड्युलर किचनमध्ये असतात तसे अनेक कप्पे. ज्यात वाट्या, भांडी हा पसारा व्यवस्थित राहत असे. सहलीच्या जागी मस्त जागा शोधून मुलांचा नाश्ता पाणी होई. ती भांडी नदीवर जाऊन आम्ही मुले धुवतही असू.. बहुधा बहिणीच. भाऊ झाडावर चढून मस्ती करण्यात दंग किंवा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात. तो पेटारा मोठ्या कारमध्ये सहज मावत असे..असाच एक भरपूर मोठा पाच खणी डबा.. त्यात अगदी खाली कडी कोयंडा, जाळीदार डबा..ज्यात निखारे ठेवलेले.. वरील डब्यातील अन्न गरमागरम राहावे म्हणून .. माझ्या बहिणीच्या मैत्रिणी गायिका..त्यासुद्धा येत कधी.. त्यांच्या गायनाने रंगत येई.
असेच हरसी डॅम, रमौवा डॅम, देवखोह, बुराखोह, बलदेव कुंडी, कुंवर बाबा ही स्थळे. जेथे पोहणे अनिवार्य. बालपणी पाण्याला प्रचंड घाबरणारी मी. पण सर्व आलेच पाहिजे हा वडिलांचा दंडक. त्यामुळे कितीही वेळा आईच्या पदराआड लपण्याचा प्रयत्न केला तरी ते मामाच्या मदतीने खेचणारच मला…त्याचमुळे सर्व मुले छान पोहू लागली. माझी बहिण वनिता तर सर्वोत्तमच पट्टीची पोहणारी..अजूनही पोहते. बुराखोला तर मामाला एकदा वाघीण आणि तिची पिल्ले देखील दिसली होती.

देवखोह अतिशय रम्य परिसर आहे. कारने वर चढत जाणे, पुनः खाली उतरणे… नंतर पायऱ्या उतरून त्या खोहमध्ये जाणे. ती जागा चारी बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द सावलीत विसावलेली. जवळच झुळझुळ वाहणारी नदी. तेथे आम्ही बरेचदा जात असू. इतरही काही समूह येत. अशा जागी मानावयाचे नियम धाब्यावर बसविणारे. एकदा असेच दुसऱ्या लोकांनी धूर केला. त्यामुळे त्या झाडावरच्या पोळातील मधमाश्या चवताळल्या. खाली धुराच्या साम्राज्यात तर जाणे कठीण आमच्याच बाजूला आल्यात. नुसती पळापळ ..आरडाओरडा. सगळे सामान तेथेच टाकून त्या ओबडधोबड पायऱ्या चढून वर जाणे आणि कारमध्ये बसणे केवळ अशक्य. सर्वात जास्त माझ्याच अंगावर. भाऊ घाबरला. त्याने काळजीपोटी माझ्या अंगावर जाड सतरंजी टाकली, त्यामुळे खूप मधमाश्या त्याच्या अंगावर गेल्या आणि मी वाचले. त्या सतरंजीच्या आत डोळ्यात, कानात जाणाऱ्या मधमाश्या मला दिसत होत्या. थोड्या वेळाने माझी शुद्धच हरपली. माझ्या बहिणी सांगतात ..किती तरी वेळ नंतर त्या माझ्या अंगावरील अडकलेले डंख काढीत होत्या. सर्वात मोठ्या भावाने तर अगदी चक्क विदेशी बनावटीचा नवीन सुंदर कॅमेरा फेकून दिला. माणसाला प्राणापेक्षा अधिक काय प्रिय असू शकते हे जाणवले.
त्या दिवशी आमच्या ड्रायव्हरची कमाल होती. स्वतःला वाचवित, कारमध्ये शिरलेल्या असंख्य मधमाश्यांना टॉवेल गुंडाळलेल्या एका हाताने सावरीत, एका हाताने स्टीयरिंग व्हील धरीत, त्या टेकडीवरून हळूहळू कारचा पहिला, दुसरा गियर बदलत चढणे, उतरणे किती अवघड ..घृ घृ करत कार कशीबशी वर चढत होती .खूप लांबवर आल्यानंतर त्या मधमाश्या कमी झाल्यात. हळूहळू दिसेनाश्या .. असे वेगवेगळे अनुभव कधी गमतीशीर तर कधी भयावह.
पण जीवन शिकविणारे. गरजेचे.
[ पुढील अंकी समापन ]
कुंआ: मानव सभ्यता की पहचान
![]() |
| हड़प्पाकालीन नगर लोथल (गुजरात) के कुंए का निरीक्षण करते हुए विनोद गुप्ता जी के साथ |
![]() |
| सिरपुर के बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
![]() |
| सिरपुर के प्राचीन बाजार क्षेत्र के मध्य कुंआ |
Tale of Three Baolis
Baolis, or baoris, or vavs, or step-wells, are underground water sources that have been popular in India from the ancient times, especially in the dry areas of this subcontinent. These step-wells generally consisted of two parts, a rectangular tank or kund, and a circular well that extended down to reach the water table. The well provided potable water for drinking, while the tank or kund was primarily used for bathing, washing, and watering crops. During summers the baolis with attached rooms also served as cool resting places for the pilgrims, passing caravans, and other travellers. These architectural marvels were generally commissioned by members of the royal families or by wealthy patrons, for the benefit of the common people.
While varying in style, where the baolis could vary from a L-shaped structure, to a rectangular one, to a circular form, they showed some common features too, such as a flight of stairs that led from the ground level to the water below. Many baolis built under Hindu patronage also served as temples that had figures of gods, goddesses, and animals; shaded pavilions with trabeate columns; corbelled domes; and elaborate carvings. Baolis under Islamic patronage had less ornamentation, no human or animal forms, and had the true domes and arches. In the later periods, often both styles were fused. Both types had circular wells for potable water, where a pulley system was sometimes used for drawing water.
The earliest step-wells in India were first seen in the 3rd century CE. These were basic in architecture, and were designed more out of necessity to store monsoon rain waters for use during the arid summer months. It was necessary to have a year-round water supply, especially in the dry north-western parts of India. Over the centuries, the basic baoli forms gave way to complex architectural structures. According to the historians, by early 19th century there were several thousand step-wells, built on various scales, thriving in India. However, by the early 20th century, only few baolis remained in functional condition, as the British viewed these structures as unhygienic. So they were often filled in, or simply destroyed. Besides this, modern technology brought in plumbing lines and the tap water system that made baolis redundant. Currently the government has started with the preservation and conservation of baolis that still remain, marking them as heritage/ancient monuments.

Abhaneri or Chand baoli built in 8th -9 th CE in Rajasthan beside the Harshad Mata temple. The arched upper parts are clearly a later addition, while it is likely that the lower parts which show trabeate form of columns and niches are a part of the orginal structure of the baoli.
Dholpur baoli (Rajasthan)
Hidden behind the Ghazra ka tomb, is this pretty red sandstone 19th centory baoli. The structure, though unknown to most that visit this little town, is unique for its beautiful double pillars and delicate arches that surround its long rectangular tank and a circular well at the back. Hemmed in by buildings on all sides, the structure looks better conserved than the neighbouring Ghazra ka tomb, though in terms of cleanliness much needs to be done. The tank water, as usual, remains dirty, though the well water appeared clean.

the Dholpur baoli- surrounding residences and unclean waters of the tank fail to dim its unique beauty

unique double pillars and delicate arches are the main attractions of the Dholpur baoli

the well at the back, which is double-storied

the circular pattern of the well (the arches show distinct Mughal influence)

the circular well water looks relatively clean
Gwalior fort step-well (Madhya Pradesh)
Inside the Gwalior fort is a step-well, situated on the left side as one enters the palace complex gates. It is a single, circular, deep well, situated beside a many-pillared hall, which earlier held a shiva-lingum that was thrown down the fort walls by Emperor Jahangir, later to be discovered by a peasant tilling his grounds, and is now placed inside a temple outside the fort gates.

entrance gate to the baoli (note the arches) within the Gwalior fort

The circular baoli with its mossy green waters. There is a pillared passage that runs round the well. The entrance to the well is closed, with the steps plastered off to stop people from reaching the waters down below.

Raniji ki baoli at Bundi (Rajasthan)
Raniji ki baoli is a beautiful step-well, situated in Bundi. According to the signboard outside the baoli complex, the story goes that in late 16th century the king of Bundi married Rani Nathavati, as his previous queen failed to produce an heir. Rani Nathavati in due course gave birth to a son, which led to the previous queen turning envious. After placing her son under custody of the elder queen, Rani Nathavati devoted her entire life in caring for her subjects, wherein she built this step-well in 1699. The baoli has beautiful carvings mainly of elephants and is 46 meters deep. It has high-arched gates with niches for various deities. At the entrance is a gate comprising of four tall pillars, joined beautifully at the top by elephant figures on beams and S –shaped (ogee) slender arches (brackets).

The gate as one enters the Raniji ki baoli. Beautiful elephants and S-shaped arches adorn it

the intricately carved arch above the tank water, with two elephants serving as brackets at two corners. The arches are distinctly Mughal influenced

the well wall at the back, with an imposing arch and a small passage in the foreground separating the well from the tank in front

deities carved in niches on the well wall at the back

figures of elephants carved on the passage (balcony) wall that separates tank from well

intricately carved elephant (with a mahout on its back) serving as a bracket in Raniji ki baoli

delicate carvings on the four pillared gate at the entrance
(This article was published on Virasat E Hind)


































































































































No comments:
Post a Comment