मिडीया
लोकसहभागातून,सक्षम लोकशाहीकडे
सातवाहन बौद्ध राजांनी जम्बुद्विपातील दक्षिणेला त्यांच्या ३० पिढ्या राज्य केलं..हो आणि त्यांची अर्थिक राजधानी महाराष्ट्रातील पैठन हे शहर होतं.

पुणे:
सातवाहन बौद्ध राजांनी जम्बुद्विपातील दक्षिणेला त्यांच्या ३० पिढ्या
राज्य केलं..हो आणि त्यांची अर्थिक राजधानी महाराष्ट्रातील पैठन हे शहर
होतं.सातवाहन काळापासून पर्वीचे सातवाहन बौद्ध लोक नागवंशीय,
महाष्मसंस्कृतीचे महार (महाराष्ट्रात) म.प्रदेश मध्ये मेहर हे मातृवंश
संस्कृतीला महत्व देत. कार्ला लेणी गौतमीपुत्र अग्रीमित्रनाक, माईलापुत्र
महादेवनाक, सियागुणनिकापुत् नंद, कान्हेरी लेणी – गौतमीपुत्र
गौतमीपुत्र सातकर्णी राजाची राणी हि अंग नागवंशीय ‘नागनिका होती तिचा जुन्नरच्या नानेघाटात शिलालेख आहे.
सातवाहन
काळात वैदिक संस्कृती होती त्यात प्रचलीत देवता ह्या निसर्गस्वरूप होत्या
त्यात वैदिक परंपरेनुसार भरपुर दान धर्म केला जात असत.बौध्दभिक्षुंच्या
दिनचर्येसाठी अनेक गावे त्यांनी दत्तक दिलेली आहेत यावरून सातवाहन राजा
जरी ब्राह्मण असला तरी बौध्दधर्माला त्यानं राजाश्रय दिला होता शिवाय बौध्द
राजाश्रय दिल्यामुळेच त्याने नागवंशीय कन्या अंग नागवंशीय नागनिकेशी विवाह
केला होता त्यामुळे तेंव्हा बौध्द धर्माच्या मानवतावादी धर्मामुळे अनेक
आशियाई राजे देखील आकर्षित झाले होते.उदा.राजा मिलिंद. कारण उच्च नीच असा
जातीय भेदच या धर्मात नव्हता.
श्रीयज्ञ (सातकर्णीराजा-सातवाहन) नाशिक
(त्रिरश्मीलेणी ) वेलीदत्तपुत्र छकलेपकीय रामनाक यांचा या सर्व लेण्यात दान
देताना मातृवंश परंपरेला खुप महत्व दिलं जात होतं .. म्हणून सातवाहन लोक
आपली ओळख सांगताना आपल्या मातेचं नाव आधी सांगत असत आणि तेच आजदेखील
प्रत्येक गावात ‘मरिआई देवतेला आजपावेतो महार किंवा इतर ठिकाणी मेहर लोक
पंजाब, महाराष्ट्र, ओरिसा, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार आणि
दक्षिण भारतात पुजा करत.. प्रत्येक गावात फक्त मरिआई देवतेला पुजन्याचा
अधिकार वंशपरंपरेने महारांचा होता कांही ठिकाणी असेलही. बौद्ध धर्मात लहान
बालकांचे संरक्षण करणारी ‘हरीता देवता म्हणुन देखील उल्लेख आहे…म्हणुनच
आजदेखील जन्मलेल्या मुलास पाच दिवस झाल्यानंतर पाचवी पुजली जात असत. आणि तो
विधी करण्याचा अधिकार फक्त महारांचा/मेहर लोकांचा होता.. १ जानेवारी १८१८
ला भिमाकोरेगाव ला जो ५०० लोकांनी जो विजय मिळवून दिला आहे.. त्यातील
बहुसंख्येने ‘नाक’ उपपद असणारे व भिमाकोरेगाव स्तंभावरील अधोरेखीत २३
योध्दे है
देखील नागवंशीय महारच होते..( धर्मातील ) प्रचार प्रसार
करण्याऱ्या व्यक्तींच्यासाठि ( भिक्खू – धर्म गुरू ) पावसाळ्यात (
वर्षा_वास ) चार महिने राहण्यासाठीचे ठिकाण म्हणजे
#शैलगृह_गिरीगृह_लेणी.मौर्य काळा आधी असे कोणतेही वास्तूशिल्प आपल्याला
पाहायला मिळत नाहीत. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीत या
वास्तूशिल्प मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आल्या. चक्रवर्ती सम्राट अशोक आणि
त्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेले सातवाहन राजांनी या कलेला व बौध्द धम्माला
राजाश्रय दिले.सातवाहन राजे जे बौध्द धम्म अनुयायी होते त्यांचे
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भूभागावर राज्य होते. भारतात
जवळपास १२०० ते १५०० लेण्या आहेत , ( विषेश म्हणजे सगळ्यात जास्त लेण्या
म्हणजे १२०० लेण्या या एकट्या महाराष्ट्राच्या पठारावर आहेत.) त्यातील ८०%
लेण्या या बौध्द धम्मासाठीच्या आहेत, १५ % या जैन धर्मासाठीच्या आहेत तर
५% या #शैव पंथासाठीच्या आहेत. यावरून बौध्द धर्माला येथे राजाश्रय
मिळालेला आपणास पाहावयास भेटेल.सांचीमधील सम्राट अशोक कालीन चैत्याच्या
दक्षिण द्वाराचं काम हे सातवाहनांकडूनच झालं आहे.सातवाहन हे मातृसंस्कृतीने
प्रेरीत होते त्यामुळे त्यांची ओळख सांगताना प्रथम आईचे नाव व नंतर
स्वतंचे व शेवटी नागवंशीय असल्याने ‘नाक’ हा शेवटी नागवंशीय असल्याचे
प्रमाण दाखवण्यासाठी वापरत.



मौर्य काळात म्हणजे खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट अशोक (इ. स. पू ३०४ – इ. स. पू २३१ ) यांच्या कारकीर्दीत सूरू झालेला हा वास्तु प्रकार ( Architecture ) बौद्ध धम्मातील ( धर्मातील ) प्रचार प्रसार करण्याऱ्या व्यक्तींच्यासाठि ( भिक्खू – धर्म गुरू ) पावसाळ्यात ( वर्षावास ) चार महिने राहण्यासाठीचे ठिकाण म्हणजे शैलगृह गिरीगृह लेणी.

मौर्य काळा आधी असे कोणतेही वास्तूशिल्प आपल्याला पाहायला मिळत
नाहीत. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीत या वास्तूशिल्प मोठ्या
प्रमाणावर खोदण्यात आल्या.
चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेले सातवाहन राजांनी या कलेला व बौध्द धम्माला राजाश्रय दिले.
सातवाहन राजे जे बौध्द धम्म अनुयायी होते त्यांचे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भूभागावर राज्य होते.
इ.
स. पू २३० ते इ. स.२२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर यांनी राज्य केले,
४५० वर्षे यशस्वीपणे राज्य करणारे हे राज घराणे होते. एकूण ३० राजे या
घराण्यात होऊन गेले. पैठण ही त्यांची राजधानी.गौतमी पुत्र सातकर्णी यांची
कारकीर्द विषेश गाजली.सातवाहन काळात मोठ्या प्रमाणावर जनता धनधान्याने
समृध्द झाली होती आणि याच कालावधीत आपले बाहेरील जगताशी मोठ्याप्रमाणावर
व्यापार सुरू झाले होते , व्यापाराच्या निमित्ताने आलेले ग्रीक व रोमन
कलाकारांना ईथे मोठ्या प्रमाणावर वाव मिळत गेले.इथली जनता धनधान्याने
समृद्ध असल्याने त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर हे वास्तू प्रकार तयार
करण्यासाठी दान दिल्याचे आपल्या शैलगृहातील /लेणीतील शिलालेखात नोंदी
सापडतात.
समाजातील
प्रत्येक स्तरातून दान दिल्याच्या नोंदी आहेत. मग स्त्री असो पुरूष असो
मोठ्यातला मोठ्या व्यापार्या पासुन ते सामान्य व्यक्तीने देखील दान दिलेले
आपल्या पाहायला मिळते तर विदेशी पर्यटकांनी देखील सढळ हाताने दान
दिल्याच्या नोंदी आपल्याला शिलालेखाच्या माध्यमातून आज देखील पाहायला
मिळतात.
हा वास्तु प्रकार म्हणजे शैलगृह अथवा लेणी या एका रात्रीत
खोदलेल्या नसून ते अनेक शतकांपासून या सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या
गर्भगृहात खोदण्यात आलेल्या आहेत.

प्राचिन
शहर तगर आताचे तेर येथुन विविध वस्तु निर्यात केल्या जात असत व त्याकाळी
मातृदेवतेस खुप महत्व असल्या कारनाने तेर पासुन औरंगाबाद येथुन
,कल्याण,सोपारा ,भरोच या व्यापारी बंदराचा वापर केला जात असत व तेथुन रोमला
सिल्क मार्गाने प्रवास केला जात असत. तेर येथे एक हिंगळजवाडी म्हणुन गाव
आहे व त्या मातृदेवतेचे नाव देखील हिंगळजमाता आहे…त्यावेळी मातृदेवतेस
महत्व असल्या कारणाने प्रवासाच्या रस्त्याने मातृदेवताची पुजा अर्चा केली
जात असत याच गावातील देवीचे नावाचे मंदीर पाकिस्थानातील बलुचिस्थान येथे
आपणास पाहण्यास भेटेल तेथील मुस्लीम बांधव देखील त्याची उपासना करतात हे एक
आंतरराष्ट्रीय एकतेचे प्रतिक मानावयास हरकत नाही.पुर्वी मातृदेवतेस खुप
महत्व दिलं जात असत.त्यासाठी नागवंशीय महणजेच महाष्मसंस्कृतीची सातवाहन हे
आपली ओळख आपल्या नावाच्या सुरुवातीला आईचे नाव सांगत व नंतर स्वत:ची ओळख
सांगत व मातृप्रधान संस्कृतीचे उदा. आपणास पहावयास भेटेल..येथे सातवाहनांची
मातृप्रधान संस्कृती व त्याचा जनमाणसावरील प्रभाव पडुन नंतर मरीमाता या
देवतेस ग्रामीण भागात महत्व आले व त्याची पुजा अर्चा करण्याचा हक्क फक्त
नागवंशीयांनाच असत.नंतर मग अशाच मरीमाता देवस्थानाचा विकास होऊन
व्यापार्यांकडून देणग्या येऊन सिल्क मार्गावर एक शक्तीपीठ मातृदेवतेचे
आपणास पाकिस्थानात पहावयास भेटेल(हिंगळजमाता)
Tip-मातृदेवतेच्या
प्रभावामुळे मरीमाता व त्यांचीच देवस्थाने आज खुप मोठी शक्तीपिठे झालेली
आपणास पहावयास भेटेल मग दंतकथा कोणत्याही असोत.आपण संस्कृतीचीच जोपासना
करतो.सिल्क मार्गावर जेवढ्या मातांची देवस्थाने आहेत ते फक्त सातवाहन
महाष्मसंस्कृती म्हणजेच नागवंशीयांची देन आहे.
Tip :-मित्रांनो आता map
घेऊन सर्च मध्ये ज्यावेळी आपण ‘हिंगलजमाता ‘असं टाकाल त्यावेळी तुम्हाला
सातवाहनांची संस्कृतीचं दर्शन घडेल.गुजरात,मध्यप्रदेश ,राजस्थान ,किंवा
पाकिस्थान जेथे जेथे सिल्क मार्ग पोहचले विचारांची देवाण घेवाण झाली व
मातृसंस्कृती वाढण्यास मदत झाली परंतू मातृसंस्कृतीचे नंतर दैवीकरण झालेले
आहे.

युवा.नेता.शरदभाऊ घोडके-आझाद समाज पार्टी
खालील PDF स्वरुपातील पुस्तक डाऊनलोड करू शकता.
( नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त दैनिक संचार मध्ये प्रकाशित झालेला लेख)
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर छत्रपती शिवाजी
महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार
नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय
दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात
शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच
मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा
महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि
सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी
घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा
दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त
मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु
महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व
केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण
इतिहास महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या लेखा मागील उद्देश
आहे.
प्राचीन कालखंड म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २३० चा तो कालखंड होता. संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.
वैदिक धर्मीय असणाऱ्या सातवाहनांनी अश्वमेध, राजसूय, अनारंभनीय इत्यादी यज्ञ करून आपला दरारा संपूर्ण भारत खंडामध्ये निर्माण केला होता. या घराण्याने भारतीय इतिहासाला अनेक वीर राजे दिले आहेत. याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने “तीसमुद्दतोयपीतवान” (म्हणजे ज्याच्या वाहनाने घोड्याने तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे) ही बिरुदावली धारण केली होती. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र वैभवाच्या उत्तुंग शिखरावर होता. ही संपन्नता पाहून नहपान नावाचा एक शक राज्यकर्ता महाराष्ट्रावर आक्रमण करु लागला. इसवी सन १२५ च्या सुमारास नहपान आणि गौतमिपुत्रामध्ये नाशिक येथील गोवर्धन परिसरात घनघोर युद्ध झाले. यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा दारुण पराभव केला आणि त्याच्या चांदीच्या व सोन्याच्या सर्व नाण्यांवर आपली विजय मुद्रा उमटवली आणि ती चलनात आणली. नाशिक येथील जोंगलटेंभी येथे झालेल्या उत्खननामध्ये अशा १३,२५० नाण्यांचा संचय सापडला आहे. पराभूत नहपान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लपून बसला असता, त्याचा पाठलाग करून गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ उच्छेद केला. नहपान शकाच्या नाशामुळे महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची कोणत्याही परकीय आक्रमकाची छाती झाली नाही. तसेच वायव्येकडील ग्रीक व पह्लवांनी गौतमीपुत्राची चांगलीच धास्ती घेतली होती. गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार मध्यप्रदेशातील विदिषा नगरी पर्यंत वाढवला होता. याच्या कालखंडात दक्षिण व मध्य भारतामध्ये सातवाहनांची प्रबळ सत्ता होती.
नाशिक येथील गौतमीपुत्राच्या आईने खोदलेले देवी लेणे
सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. अशा उत्तम कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता!
सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती. याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती. तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
तेर येथे उत्खननामध्ये मिळालेली हस्तिदंती बाहुली
इटलीतील संग्रहालया मधील बाहुली
बहुतांश सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
नागनिकेचे नाणे
स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे. सातवाहन राजांनी अनेक गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या कालखंडामध्ये केली होती. हेच गड-किल्ले पुढील शिलाहार व राष्ट्रकूट वंशी राज्यांनी वापरले. छत्रपती शिवरायांनी ज्या गड-किल्ल्यांच्या जोरावर हिंदवी साम्राज्य उभे केले त्यातील काही किल्ले हे कदाचित सातवाहन स्थापित असतील !
साहित्य, स्थापत्य, शिल्पकला याबरोबरच व्यापार-उद्योग, धार्मिक समन्वय आणि सुनियोजित शासन व्यवस्था अशा अनेक कसोट्यांवर सातवाहन घराण्याने महाराष्ट्राला जागतिक पटलावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते. महाराष्ट्र दिन साजरा करताना या सुवर्ण इतिहासाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
संदर्भ ग्रंथ- १. सातवाहन कालीन महाराष्ट्र (रा. श्री. मोरवंचीकर)
२. प्राचीन भारताचा इतिहास (जी. बी. देगलूरकर)
३. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (डॉ. वा. वि.मिराशी)
सातवाहन साम्राज्य - Wikiwand
सातवाहन (मराठी: सातवाहन साम्राज्य ; रोमन लिपी: Sātavāhana ;) हे इ.स.पू. २३० ते इ.स. २३० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य करणारे राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली व्यापारी शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून असल्याचे पैठण येथील मिळालेल्या नाण्यावरून त्याची ओळख पटते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते सातवाहन राजे आपल्या नावा आधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी वाशिष्टीपुत्र पुळूमावी इत्यादी सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. सातवाहन हे बौद्ध धर्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते. सातवाहन हे बौद्ध धर्मीय मरहट्ट (महारठी ; आजचे महारठ्ठा) असल्याचे नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होते. त्यांनी बौद्ध स्तुपांसाठी आर्थिक मदत केल्याचेही आढळते. नाशिकच्या पांडवलेणी मध्ये गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने म्हणजेच माता बलश्रीने शिलालेख कोरून घेतला आहे, ज्यात गौतमीपुत्र सातकर्णीनी क्षत्रप(शक) यांना हरवून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अबाधित ठेवली असा स्पष्ट उल्लेख आढळतो. आणि त्या काळात राज्यव्यवस्था सूत्र क्षत्रिय सांभाळत असत. मराठा समाजातील साळवे हे कूळ सातवाहनांचेच वंशज आहे असं माहितीतून समोर येत. सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ शासन गौतमीपुत्र सातकर्णी हा होईल गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा वर विजय मिळवला या विजयाने सातवाहनांची प्रतिष्ठा उंचावली गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण वापरतात दिग्विजय केला त्यांनी दक्षिणेकडील राज्य अवंती सुराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला त्याचप्रमाणे मध्य भारतात व राजस्थान येथे असलेल्या गणराज यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले नाशिक जिल्ह्यात जोगलटेम्भी येथे एका नाणेनिधी मिळालेला आहे शकराजा नहपानाची याच्या नाण्यांवर गौतमीपुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात त्यावरून नहपानावर विजय मिळवून त्याने आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं हे स्पष्ट आहे गौतमिपुत्रा नंतर वशिष्ठपुत्र फुलमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे सातवाहन घराण्यात होऊन गेले त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला आणि शक आणि सातवाहानांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बल होत गेली
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ४६० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केले. या राजघराण्याची सत्ता महाराष्ट्राट गोदावरीच्या खोऱ्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली आणि नंतर दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पसरली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हणले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारताच्या पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरूनच पडलेली आहेत, यावरून या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हणले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरून बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हणले तर वावगे होणार नाही. बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार-योजना, कोरीव नक्षीची कामे, अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती.
सातवाहन काळात या राजघराण्याच्या तीस राज्यकर्ते होऊन गेले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी जुन्नर जिल्हा पुणे येथील नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्याच तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे.

नाणेघाटातील शिलालेखात ब्राह्मी लिपीत कोरून ठेवलेली खालील नावे दिसून येतात:
- राजा सिमुक सातवाहन,
- राणी नागनिका,
- राजा श्री सातकर्णी (नागनिकेचा पती),
- कुमार भाय (राजपुत्र),
- महारठि त्रनकयिर अथवा महारथी त्रनकयिर (राणी नागनिकेचे पिता),
- कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
- कुमार सातवाहन (राजपुत्र)
हे अतिशय समृद्ध असे राज्य होते.

महाराष्ट्र राज्य गॅझेटियर (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढीलप्रमाणे नोंदवितो.
- सिरि सातवाहन (सातवाहन घराण्याचा संस्थापक) सातवाहन घराण्याची स्थापना ही सिरि सातवाहन यांच्यापासून झालेली आपणास पैठण येथील नाण्यामधून माहिती होते. सातवाहन हे सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मांडलिक म्हणून काम करत होते. महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश म्हणून देखील यांच्याकडे पहिले जाते.
- सिमुक सातवाहन(सातवाहन साम्राज्याचा संस्थापक (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)


सिमुक सातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून कण्वाची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
- कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
- पहिला सातकर्णी (नागनिकेचा पती.):
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती नाणेघाट येथील शिलालेखात आहे. अप्रतिहतचक्र ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
- वेदिश्री
- सतिसिरी (शक्तिश्री)
- हाल सातवाहन
- गौतमीपुत्र सातकर्णी
- आपिलक
- कुंतल
- सुनंदन
- सुंदर
- वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
- वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
- वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
- गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
- गौतमीपुत्र विजय सातकर्णी
- चंड सातकर्णी
- वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
- पुलुमावी (पुळुमावी)
- यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौशिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणाऱ्या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.
- गाथा सप्तशती (सुमारे ७०० कवितांचा संग्रह)
- नागनिका (कादंबरी, लेखिका : शुभांगी भडभडे)
- रसिक महाराष्ट्र (गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद : कवी : रामचंद्र गोविंद चोथे व शशांक रामचंद्र चोथे)
- हाल सातवाहनाची गाथा सप्तशती (जोगळेकर)
- हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी)
| सिमुक सातवाहन | कृष्ण सातवाहन | ||||||||||||||||||||||||||||||||||
| पहिला सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| वेदिश्री | शक्तिश्री | ||||||||||||||||||||||||||||||||||
| पूर्णोत्संग | |||||||||||||||||||||||||||||||||||
| स्कंदस्तंभि | |||||||||||||||||||||||||||||||||||
| दुसरा सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| लंबोदर | |||||||||||||||||||||||||||||||||||
| अपिलक | |||||||||||||||||||||||||||||||||||
| मेघस्वाती | |||||||||||||||||||||||||||||||||||
| स्वाती सातवाहन | |||||||||||||||||||||||||||||||||||
| स्कंदस्वाती | |||||||||||||||||||||||||||||||||||
| मृगेंद्र | |||||||||||||||||||||||||||||||||||
| कुन्तल | |||||||||||||||||||||||||||||||||||
| स्वातिवर्ण | |||||||||||||||||||||||||||||||||||
| पहिला पुलुमावी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| अरीष्टकर्ण | |||||||||||||||||||||||||||||||||||
| हाल सातवाहन | |||||||||||||||||||||||||||||||||||
| मण्टलक | |||||||||||||||||||||||||||||||||||
| पूरींद्रसेन | |||||||||||||||||||||||||||||||||||
| सुंदर सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| चकोर | |||||||||||||||||||||||||||||||||||
| शिवस्वाती | |||||||||||||||||||||||||||||||||||
| गौतमीपुत्र सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| वासिष्ठीपुत्र पुलुमावि | वासिष्ठीपुत्र स्कंदसातकर्णी | वासिष्ठीपुत्र सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||
| गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| माठरीपुत्र शकसेन | |||||||||||||||||||||||||||||||||||
| गौतमीपुत्र विजय सातकर्णी | |||||||||||||||||||||||||||||||||||
| वासिष्ठीपुत्र चंद्रस्वाती | |||||||||||||||||||||||||||||||||||
| तिसरा पुलुमावी | |||||||||||||||||||||||||||||||||||
- सातवाहनांचा इतिहास (इंग्रजी मजकूर)
- "पुराणकालीन इतिहासाचा सेतू" सातवाहन (इंग्रजी मजकूर)
पेशवेकालीन इतिहासातील वाड्यांचे स्थापत्य - भाग २
वाड्यातील चौक व ओसरी
शास्त्र हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ सूत्ररूपाने मांडलेले ‘ज्ञान.’ स्थापत्य ही कला आहे. वास्तुशास्त्र हे इतर शास्त्रांगत शास्त्र आहे, की निसर्गनियमास धरून असलेल्या वास्तुज्ञानाचा भाग आहे हे जाणून घेणे आवश्यक वाटते. पृथ्वीवरील निसर्गनियमन ज्या मूळ तत्त्वांवर अवलंबून आहे ती पंचमहाभूते सृष्टीच्या म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीला कारण असलेली मूलतत्त्वे आहेत. पंचमहाभूतांपासून बनलेल्या या चराचर सृष्टीत मानवाचे शरीरही पंचमहाभूतांपासून बनले आहे. चराचर सृष्टी, मानवी शरीर व वास्तुसंरचनेत समतोलपणा व सुसंवाद साधण्यासाठी वास्तुज्ञानातून स्थापत्यरचना विकसित होत गेली.
ही रचना अधिक सुदृढ बनवण्यासाठी सूर्यप्रकाश, वाऱ्याची दिशा, जमिनीचा चढ-उतार, मातीचा प्रकार, घरातील खोल्यांची रचना, पृथ्वीवरील चुंबकीय प्रवाह, गुरुत्वाकर्षण इत्यादींच्या सखोल अभ्यासातून निष्कर्ष काढले आहेत. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अवलोकनातून मानवी जीवन सुखी करण्यासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्त्वे उल्लेखित ग्रंथात लिहून ठेवली आहेत. सहाव्या शतकाच्या आरंभी, आचार्य वराहमिहिरांनी निवासस्थानाविषयीच्या ग्रंथात अभियांत्रिकी स्वरूपाच्या तांत्रिक बाबींविषयी बहुआयामी विवेचन करून ठेवले आहे. म्हणून आचार्यांनी या विवेचनास वास्तुशास्त्र न म्हणता ‘वास्तुज्ञान’ असे म्हटले आहे. कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी वरील नैसर्गिक घटक समजून वास्तुरचना करणे योग्य ठरते. वास्तूची नेमकी जागा अथवा स्थान कुठे असावे व तिची लाभदायकता याविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे वास्तुशास्त्र! पेशवेकालीन वाड्यांचे निरीक्षण केले असता तत्कालीन वाडा संरचनेत वरील नैसर्गिक घटकांचा (पर्यावरण) पुरेपूर उपयोग करून त्याचा लाभ घेतल्याचे दिसून येते. म्हणून पेशवेकालीन वाडा संस्कृती अधिक काळ टिकून राहिली.
वाडा शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत ‘वाटक:’ या शब्दावरून बनली आहे. वाटक: हे ‘वाटिका’चे रूप आहे. वाड म्हणजे थोर अथवा मोठे. थोडक्यात, वाडा म्हणजे चौकोनी अथवा आयाताकृती भूखंडावरील सर्व बाजूंनी परिवेष्ट व एक किंवा अनेक चौक असलेली भव्य इमारत असे शब्दकोशकारांचे मत आहे. निवास म्हणजे चार भिंतींच्या आधारावर बनवलेले आकारमान नसून, त्यात राहणाऱ्या माणसांच्या शारीरिक, मानसिक सुखसोयींची पूर्तता करणारे, आरोग्यमय जीवन, तसेच भावनिक पूर्णता प्राप्त करून देणारे स्थान असते.
मानवी जीवनात ‘निवास’ ह्या भौतिक स्थानास खूप महत्त्व आहे. म्हणूनच घर अथवा वाडा यांसारख्या दोन अक्षरी शब्दांत प्रत्येकांचे विश्व सामावलेले असते! ह्या शब्दांमागची संकल्पना थोडक्यात अशी - वस् या संस्कृत धातुपासून ‘वास्तू’ शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. वास्तूचा अर्थ ‘सुरक्षित निवास’ असा होतो. परंतु निवास करण्यासाठी वास्तूची गरज असते. कालांतराने निवासासाठी बांधलेल्या लहान-मोठ्या आकारमानास वेगवेगळ्या नावाने ओळख मिळत गेली. सामान्य अथवा मध्यम घरापेक्षा मोठे क्षेत्रफळ व आकारमान असलेल्या निवासास ‘वाडा’ असे नाव रूढ झाले.
पुरंदरे वाडा प्रवेशद्वार
साधारणत: चौदाव्या शतकापासूनचा पूर्वपेशवेकालीन वाड्याचा स्थापत्य-प्रवास आपणास ज्ञात आहे. चौदाव्या ते सोळाव्या शतकात बांधलेले प्राचीन वाडे पैठण येथे आढळतात. २६ फेब्रुवारी १५९९ रोजी संत एकनाथ महाराजांनी देह ठेवला, त्या पैठण येथील वाड्याचे मंदिरात रूपांतर केले आहे. नंतर मुघल राजवटीत बांधलेले शिवपूर्वकालीन मराठे सरदारांचे काही वाडे आजही अस्तित्वात आहेत. पुरंदरे वाडा हा त्यापैकी एक होय.
संत एकनाथ महाराज वाडा, पैठण
सिंदखेड येथील सरदार लखुजी जाधवांच्या वाडा-संरचनेत मुघल वास्तुशैलीचा प्रभाव आढळतो. ब्रिटिश राजवटीत निरनिराळ्या प्रांतांत अनेक भारतीय संस्थानिकांनी भव्य आकारातील वाडे बांधले. ग्वाल्हेर, म्हैसूर, हैदराबाद ही त्याची उदाहरणे होत. सतराव्या शतकातील पेशवेकालीन वाड्यांची रचना समजून घेताना प्राचीन भारतीय संस्कृती व स्थापत्य–प्रवास कसा होत गेला याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. कारण प्राचीन भारतातील स्थापत्यकलेचे परिपक्व स्वरूप मध्ययुगीन कालखंडात पहावयास मिळते.
सरदार पुरंदरे वाडा व मंदिर
मराठेकालीन वाड्यांचा स्थापत्य-इतिहास सोळाव्या शतकापासून गृहीत धरला, तर त्याची सुरुवात बाळाजी विश्वनाथ भट (१६६०-१७२०) ह्या पहिल्या पेशव्यापासून करावी लागेल. बाळाजी विश्वनाथ यांची हरिहरेश्वर येथे स्वनिर्मित वास्तू असूनदेखील त्यांच्या जीवनातील बहुतांश काळ सासवड येथील पुरंदरे वाड्यात गेल्याचे समजते. मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे समकालीन मल्हारराव बर्वे यांनी इ. स. १६९५मध्ये नाशिक जिल्ह्यातील डुबेरे येथे वाडा बांधला.
साधारणत: याच शतकात, खासगी निवास आणि कार्यालयीन कामकाज एकत्र असणारे वाडे बांधण्यास सुरुवात झाली. अशा निवासरचनेतून मिळणारी नैसर्गिक ऊर्जा मानवी जीवनात फलदायी ठरल्यामुळे ‘पर्यावरणस्नेही’ वाडे समृद्ध व उच्चभ्रू पेशवेकालीन मानकऱ्यांच्या जीवनशैलीचे प्रतीक बनली. ह्या समृद्ध जीवनशैलीचा लाभ पुढील पिढ्यांना मिळत राहिला.
डुबेरे गाव- हवाई छायाचित्र
पुरातन वाडे पाहण्याच्या आकर्षणातून पुणे, सातारा, वाई व कोल्हापूर येथील अनेक पेशवेकालीन वाड्यांना भेट देण्याचा प्रसंग आला. २०१६मध्ये ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’आयोजित ‘नाशिक जिल्हा संस्कृति वेध’ मोहिमेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व निफाड तालुक्यातील काही मोजक्या पेशवेकालीन वाड्यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली. पेशवेकालीन गावरचना व वाडा संस्कृतीच्या खाणाखुणा असलेले डुबेरे गाव व गावात असलेला बर्वे वाडा हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डुबेरे गाव डोंगरपायथ्याशी असलेल्या हिरव्यागार झाडाझुडपात डुबलेले, म्हणून ‘डुबेरे’ नाव!
मल्हारराव बर्वे यांनी हे गाव वसवले व इ. स. १६९५च्या दरम्यान गावाच्या मध्यभागात वाडा बांधला. वाड्याच्या आजूबाजूस कौले शाकारलेली बैठी दुमजली घरे आढळतात. आजतागायत विकासकार्याची धग न पोहोचलेल्या डुबेरे गावची ठेवण प्राचीन मोहें-जो-दरो, हडप्पा शहर आराखडासदृश असल्याचे आढळते. गावरचनेतील मुख्य गल्ल्या (रस्ते) व बोळ (अरुंद रस्ते) एकमेकास समांतर व काटकोनात छेदणारे आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी वसवलेल्या डुबेरे गावाची रचना व वाड्याचे स्थान हवाई छायाचित्रात दिसून येते. मल्हारराव बर्वे, पहिल्या बाजीराव पेशव्यांचे मामा. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म दिनांक १८ ऑगस्ट १७०० रोजी बर्वे वाड्यात झाला असे समजते.
Born
in 1982, Ameet Shrikant Lomate is an architect who lives in the Panmala
neighbourhood of Pune. He is a numismatist interested in coins from the
Satavahana dynasty, the Shilahara rulers, and the Yadava rulers, all of
whom played a major role in shaping the political character of
Maharashtra. Lomate refers to these rulers as the kings of the
Dakshinapath, the southern-central expanse of India.
The ancient coins that Lomate has collected were often minted for commemorative purposes or during times of financial urgency. He started collecting in the early 2000s and was able to streamline his particular interests as per historical era or rulers around 2005–06. Around this time, he acquired a coin belonging to King Satkarni I, a major Satavahana ruler. The coin was nearly 2,000 years old and sparked his interest in the largest dynasty to rule Maharashtra after the pan-India rule of the Mauryas. Lomate is also interested in coins belonging to the Yadava period. The Yadavas were patrons of the Marathi language and encouraged its use in an official capacity. Their influence can still be seen in their seats of power in and around Aurangabad today.
The language of the rulers and their subjects also forms part of Lomate’s process of learning through numismatics. For example, coins from King Satkarni’s period were inscribed in the Brahmi script, which lacked the many accents that are necessary to lengthen or shorten names and words. Therefore, the inscriptions on the royal coinage were accordingly Sanskritised, which was not the norm at the time.
One of the rarest coins in Lomate’s collection, which he came to possess around 2009, is one that was minted under the orders of the Satavahana queen Naganika, wife of Satkarni I. The Satavahanas were known to manufacture coins from a brittle mixture called potin, an alloy that was also used by the Romans and Greeks. The coins that Queen Naganika minted bore, and were issued in, her name and were very few in number. Given the matrilineal bent of society at the time, it was common for coins to bear images of women, but highly uncommon for a woman to order the issuing of such coins. These special coins were produced after Queen Naganika conducted an Ashwamedha Yajna (a ritual including a horse sacrifice, conducted to reaffirm a ruler’s sovereignty) in Junnar. They were for a commemorative purpose only and were not part of regular currency.
Other items in Lomate’s collection include Maratha coins from the Peshwa rule, as well as coins minted earlier, with some dating back to the time of the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj. The Maratha ruler had ordered the production of coins for the occasion in what is present-day Kudal in Maharashtra. According to Lomate, there are mentions of this to be found even in a Dutch newspaper. Other coins in his collection are from the reign of Tarabai Bhosale, wife of Rajaram and daughter-in-law of Shivaji. Unlike the Satavahana coins mentioned above, these were ordered by Queen Tarabai during a time of financial urgency. Lomate also collects bronze statues from the Deccan region. Some of these belong to the Chalukya Empire from the eighth and ninth centuries.
Lomate
is a member of the International Collectors’ Society of Rare Items
(ICSRI), a group founded in 1995 in Pune to facilitate and celebrate the
hobby of collection, as well as other groups dedicated more
specifically to numismatics. However, he is more of a collector than an
exhibitor, and due to his work as an architect cannot always be a part
of such events. He also feels that the miscellaneous range of interests
at the ICSRI can sometimes lead to a lack of concentrated work in any
one field.
Lomate’s interest has much to do with the history of Maharashtra, but the role of Pune, the modern-day cosmopolis, in it is not as significant. Around the time the above-mentioned dynasties were in power, Pune, as we know it today, did not even exist, and the more attractive trade centres were cities like Junnar and Paithan.
Lomate is an avid reader of history and believes in the exchange of information across all platforms, including social networking sites. He speaks highly of the many knowledgeable people—fellow numismatists but also historians and professors—who make themselves easily approachable through social media platforms such as Facebook. This not only helps his collection but also strengthens his interest in history. His other sources of knowledge include the Oriental Numismatics Society, the Indian Institute for Numismatics Research in Nashik, and senior collectors living in Pune, such as Basti Solanki.
Lomate’s collection is private, and he does not consider it to be part of any museum. It is normally not open to viewing for interested parties since he is an architect and is usually busy with professional commitments.
सातवाहनकालीन स्त्रिया
सातवाहन घराणे म्हणजे पराक्रमी, महत्त्वाकांक्षी आणि आपल्या जिंकलेल्या प्रदेशाचे उत्कृष्ट नियोजन करणारे यशस्वी राज्यकर्ते. आणि त्यांच्या स्त्रियाही तशाच खंबीर आणि दृढनिश्चयी. कसे होते सातवाहन? त्यांच्या स्त्रिया कशा असतील आणि कसा असेल तो एकूण कालखंड? हे जाणून घ्यायचे असेल, तर काळाचा पट अनेक शतके मागे जाऊन उलगडावा लागेल.प्रतिष्ठान म्हणजे आपले आजचे पैठण. प्राचीन दिमाखाने वावरणारी वैभवशाली नगरी. आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एक जुनेजाणते शहर. पैठण म्हटले की आपल्याला आठवतो आजचा नाथसागरचा विस्तीर्ण जलाशय. जायकवाडीचे भव्य धरण. रेशमी पैठणी. नाथांचे पैठण. पण ते एकेकाळी समृद्ध राजधानीचे शहर होते, हे फार कमीजणांना माहिती आहे. बलाढ्य राज्यकर्ते असलेल्या सातवाहनांनी स्थापन केलेली प्रतिष्ठान ही राजधानी. सातवाहनांच्या आगमनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात एक नवे दालन उघडले गेले. तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकारणास स्थैर्य प्राप्त होऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली. त्यामधूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची पायाभरणी होऊन महाराष्ट्राचे नाव राजकीय तसेच व्यापारी पटावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदवले गेले. सातवाहनांनी शक, क्षत्रप अशी परकीय आक्रमणे परतवून लावली आणि त्यांच्या कारकिर्दीपासूनच महाराष्ट्रावर एकछत्री अंमल सुरू झाला. त्यांनी इ.स. पूर्व २३० ते इ.स. २३० अशी तब्बल साडेचारशे वर्षे राज्य केले. इतका प्रदीर्घ काळ राज्य करणारे तेच एकमेव एतद्देशीय घराणे आहे. त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भूमीने सुवर्णकाळ उपभोगला. .सातवाहन राजघराण्यामध्ये अनेक पराक्रमी लढवय्ये राजे होऊन गेले. सिमुक, सातकर्णी, पुळुमावी, वेदिश्री, घराण्याचं नाव ज्याच्यावरून पडलं तो सातवाहन, हाल हे एकाहून एक सरस राजे या घराण्याने दिले. या प्रत्येक राजाचे खास वैशिष्ट्य आहे. गाहा सत्तसई म्हणजेच गाथा सप्तशती लिहिणारा ग्रंथकर्ता हाल हा सातवाहन राजा कवीही होता. नोंदींनुसार सिमुक राजा घराण्याचा संस्थापक असला, तरी संशोधकांच्या मते सातवाहन राजा हाच कुळसंस्थापक आहे. वासिष्ठीपुत्र पुळुमावी, गौतमीपुत्र सातकर्णी यांचे पराक्रम आणि दिग्विजय शिलालेखांतून पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहेत. या वीर राजांच्या नावांमध्ये एक खासियत आढळते, ती म्हणजे त्यांच्या नावातच आलेले त्यांच्या आईचे नाव. याचा अर्थ हे घराणे मातृसत्ताक असावे किंवा मग त्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांना आदराचे आणि महत्त्वाचे स्थान दिले जात असावे हे नक्की. त्यावेळच्या समकालीन इतर राज्यकर्त्यांच्या वंशावळीत चुकूनमाकूनच अशी उदाहरणे सापडतात. याच्या मुळाशी असलेले एक खंबीर कारण म्हणजे सासरप्रती असलेला जाज्वल्य अभिमान. सातवाहन घराणेसुद्धा तसेच होते. पराक्रमी, महत्त्वाकांक्षी आणि आपल्या जिंकलेल्या प्रदेशाचे उत्कृष्ट नियोजन करणारे यशस्वी राज्यकर्ते. आणि त्यांच्या स्त्रियाही तशाच खंबीर आणि दृढनिश्चयी. कसे होते सातवाहन? त्यांच्या स्त्रिया कशा असतील आणि कसा असेल तो एकूण कालखंड? हे जाणून घ्यायचे असेल, तर काळाचा पट अनेक शतके मागे जाऊन उलगडावा लागेल.सातवाहनांचा इतिहास जाणून घेताना इसवी सनाच्या आधी दुसऱ्या शतकात जाऊन डोकवावे लागते. घराण्याचा मूळपुरुष हा किताब सिमुकाचा जरी असला, तरी त्याचा मुलगा पहिला सातकर्णी अधिक प्रसिद्ध आणि पराक्रमी राजा होता यावर अभ्यासकांमध्ये दुमत नाही. त्याची राणी म्हणजे नागनिका.सातवाहन वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. नागनिकेने विवाहपश्चात सासरचा धर्म अंगीकारला आणि तो जोपासलाही. खरेतर या काळात श्रौतधर्म मागे पडून यज्ञ, याग करण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना नागनिकेने अश्वमेध, गवामयन, दाशरात्रसारखे मोठे यज्ञ केल्याची नोंद सापडते. याशिवाय सातकर्णी आणि नागनिका या दोघांनी मिळून राजसूय, अग्न्याध्येय, अन्वारंभणीय, अंगारिक भगल, अंगिरसामयन, त्रयोदशरात्र, अप्तोर्याम, गर्गत्रिरात्र, शततिरात्र, छंदोपवमानत्रिरात्र असे अनेक यज्ञ केले. नागनिका स्वतः यज्ञदीक्षादिकात निष्णात होती आणि तिने या सर्व यागांमध्ये उत्साहाने भाग घेतला होता. या सर्व यज्ञांत विद्वान ब्राह्मणांना हत्ती, घोडे, रथ, सोन्याचांदीचे अलंकार, कार्षापण (चांदीची नाणी) आणि गायी दान केल्याचे अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ कोकणात उतरणाऱ्या प्राचीन नाणेघाटात काही सातवाहनकालीन गुंफा आहेत. एका गुंफेत असलेली नागनिकेने कोरवून घेतलेली शिल्पे आणि मोठा शिलालेख प्रसिद्ध आहे. तो अनेक मुद्द्यांसाठी विचारात घ्यावा लागतो. राजकीय व धार्मिकदृष्ट्या तर तो महत्त्वाचा ठरतोच, पण तत्पूर्वी त्या शिलालेखावरून नागनिकेला लाभलेले अग्रस्थान, राजघराण्यातील एक ज्येष्ठ स्त्री म्हणून तिचे महत्त्व स्पष्ट होते. वास्तविक पाहता स्त्रीचा उल्लेख तिच्या पतीनंतर केला जात असे. पण नाणेघाटातल्या गुंफेतील शिलालेखात नागनिकेचा उल्लेख तिच्या पतीपूर्वी केला आहे, हे विशेष. तसेच नागनिकेच्या वर्णनपर लेखातूनसुद्धा तिचे राजमान्य व्यक्तिमत्त्व समोर येते. सातवाहनांनी वैदिक धर्मास उदार आश्रय दिला, हे नागनिकेच्या लेखातून स्पष्ट होते. नाणेघाटामध्ये आढळणाऱ्या शिल्पांमध्ये सिमुक राजानंतर प्रथम नागनिकेचा पुतळा दिसतो. शेजारी तिचा पती सातकर्णीचा पुतळा आहे. या घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा सिमुकानंतर कोरण्यात आली आहे. सातकर्णीनंतर त्याच्या दोन मुलांचे पुतळे आणि मग तिच्या वडिलांचा पुतळा आढळतो. सातवाहन कुळात आपल्या पित्याचा पुतळा कोरणारी नागनिका ही पहिली राणी असावी. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीने आपले व नागनिकेचे असे चांदीचे जोडनाणे प्रचारात आणले होते. त्यावरून त्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो. सातवाहनकाळात स्त्रियांचे राजकीय स्थान काय होते हे समजून घेताना सर्वात पुढे नाव येते ते नागनिकेचेच.सातवाहन कालखंडाच्या उत्तरार्धात उदयास आलेली गौतमी बलश्री ही सातवाहन राजवंशातली स्त्री राजमाता म्हणून प्रसिद्ध पावल्याचे नाशिक येथे सापडलेल्या शिलालेखातून स्पष्ट होते. या लेखात तिचा पुत्र सातकर्णी याने केलेल्या पराक्रमाचे वर्णन आहे.
सदर शिलालेख वाचताना त्यातले माता-पुत्रप्रेम सोडल्यास गौतमीपुत्र एक मोठा राज्यकर्ता होण्यामागे गौतमी बलश्रीचा किती मोठा सहभाग होता याचा निर्देश नक्की होतो. आणि हेच तिचे मोठे राजकीय योगदान ठरते. बलश्री ही शिवस्वाती राजाची राणी होती असे समजते. नाशिकच्या लेखात ती स्वतःला महादेवी म्हणवते, त्यावरून शिवस्वातीला महाराज पदवी असावी असे वाटते. ती अतिशय महत्त्वाकांक्षी स्त्री होती. सातकर्णीच्या कारकिर्दीच्या चोविसाव्या वर्षातला तिचा हा लेख आहे. त्याने आपल्या घराण्याच्या नावामागे गौतमीपुत्र असे मातृपरक नाव धारण केले होते. त्याच्यानंतर त्या घराण्यातल्या पुढच्या अनेक राजांनी अशा प्रकारची मातृपरक नावे लावलेली आढळतात. उदा. वासिष्ठीपुत्र पुळुमावी, कौशिकीपुत्र सातकर्णी, माढरीपुत्र सातकर्णी इत्यादी. कधी आईच्या तर कधी तिच्या
माहेरच्या गोत्रावरून आपले नाव धारण केलेले आढळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाशिकमधील तिसऱ्या क्रमांकाच्या लेण्यास देवी लेणे म्हटले जाते, कारण गौतमी बलश्रीच्या आदेशावरून या लेण्यात लेख कोरला गेला. गौतमीपुत्राने क्षत्रप राजा नहपानाचा पराभव केल्यानंतर तेथील बौद्ध भिक्षूंना राजाश्रय दिला. परंतु, दरम्यानच्या काळात क्षत्रपांनी ते दान केलेले शेत व गाव पुन्हा जिंकून घेतले होते. म्हणून सातकर्णीने भिक्षूंना दुसरे दान दिले. हे दान गौतमी बलश्री व गौतमीपुत्र सातकर्णी यांनी मिळून दिले, असे या लेखात म्हटले आहे. यावरून तिचे राजकीय महत्त्व अधोरेखित होते. तिच्या नातवाच्या कारकिर्दीत तिने हा शिलालेख लिहून घेतला आहे. तिचे वय तेव्हा त्र्याऐंशीच्या आसपास असावे. बलश्री अशी एक भाग्यवान राजमाता होती, जिने पुत्राची, प्रपौत्राची कारकीर्द अनुभवली होती. उतरत्या वयात तिच्या पराक्रमी पुत्राच्या आठवणींनी व्याकूळ झालेले तिचे मन त्या लेखातून स्पष्ट जाणवते. याशिवाय सातवाहनांनी बौद्ध धर्मासही उदार आश्रय दिला हे बलश्रीच्या नाशिक शिलालेखांतून उघड होते. सातवाहन राजे स्वतः वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते, पण बौद्ध धर्मालाही त्यांनी वेळोवेळी संरक्षण दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवस्वाती राजा कट्टर वैदिक धर्माभिमानी असला, तरी त्याची पत्नी गौतमी बलश्री बौद्ध धर्मावर नितांत श्रद्धा बाळगून होती असे दिसते. कुडा येथील एका ब्राह्मण उपासकाच्या भार्येने बौद्ध धर्म स्वीकारल्याचे तिथल्या शिलालेखांतून सिद्ध होते. . त्या काळात यज्ञसंस्थेप्रमाणे पुण्यप्राप्तीसाठी लोकांचा कर्म मार्गावर आणि पूर्वकृत्यावर भर असे. कर्ममार्गात दानधर्म, तीर्थयात्रा, व्रते, उपवास यांचा अंतर्भाव होतो, तर पूर्वकृत्यात लोकोपयोगी कार्यांचा समावेश होतो. सातवाहन काळात
ही सर्व कर्मे केली जात होती. नागनिका उपवास करणारी, तपस्विनीप्रमाणे जगणारी, दीक्षा, व्रते, यज्ञ, अनुष्ठान करणारी होती. तर राणी गौतमी बलश्री तप, दम व उपवास करणारी, दान, क्षमा, अहिंसा या तत्त्वांनुसार जगणारी सम्राज्ञी होती. या एकाच वंशातील भिन्न कालखंडातल्या स्त्रियांनी राजवंश बलशाली होण्यासाठी केलेले प्रयत्न किती समान आहेत हे नाणेघाट व नाशिकच्या शिलालेखांमधून सिद्ध होते.बलश्रीची सून, वासिष्ठीपुत्र पुळुमावीची राणी ही क्षत्रप राजा रुद्रदामन याची कन्या होती. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर काही काळ सातवाहन व क्षत्रप यांच्यात मैत्रीसंबंध प्रस्थापित झाले आणि या काळातच रुद्रदामनने आपली कन्या पुळुमावीस दिली असल्याचे दिसते. या विवाहाला राजकीय महत्त्व प्राप्त झालेच, पण त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वही मिळाले. त्यामुळे सातवाहनांच्या वेशभूषा, केशभूषेत फार मोठा बदल झालेला जाणवतो. शिल्पांमध्ये पुळुमावी ग्रीक रोमन राजपुत्रासारखा दाखवलेला आढळतो, एवढेच नव्हे त्याने काढलेल्या नाण्यातही या दोन भाषा दिसतात. नाणी आणि शिल्पांमधून पुळुमावीच्या पत्नीचा घराण्यावर पडलेला प्रभाव आणि राजकीय हस्तक्षेप
स्पष्ट दिसतो.सातवाहन काळातल्या स्त्रियांसंबंधी महाराष्ट्रात अजूनही काही लेख सापडतात. महाडजवळ कोल येथील एका उपासकाची कन्या आणि शिवदत्ताची पत्नी धर्मश्रीने लेणे कोरल्याचे म्हटले आहे, पण तो खर्च कसा केला ते समजत नाही. काही दाने परिव्राजिकांनी दिली होती. ती त्यांनी बहुधा खास वर्गणी गोळा करून दिली असावीत. असे एक दान दिल्याचा उल्लेख कुडा येथील शिलालेखात सापडतो. ते दान भदंतपातीमित व भदंतआगिमित यांची भाची आणि परिव्राजिका नागनिका हिची कन्या पदुमलिका हिने दिले होते. तिने त्यात एक लेणे व टाके खोदून भिक्षुसंघाला दान दिल्याची नोंद लेखात सापडते. .या सगळ्या शिलालेखांमधून स्त्रियांचे आर्थिक सामर्थ्य चांगले सबळ असावे असे वाटते. पण तत्कालीन सामाजिक परिस्थिती निराळे रूप दर्शवते. तत्कालीन सूत्रग्रंथामधून असे निर्देशित होते, की कुटुंबप्रमुखाच्या निधनानंतर त्याच्या मालमत्तेच्या वाटण्या झाल्यास पितृक संपत्तीची समान विभागणी होत असे. पती-पत्नी संयोगातून कुटुंब निर्माण होत असल्याने पत्नीच्या वेगळ्या अस्तित्वाची दखल सूत्रकारांनी घेतलेली नाही. त्यामुळे तिचा स्वतंत्र हिस्सा नाकारला आहे.
परंतु पती परदेशी असताना पतीच्या संपत्तीमधून नैमित्तिक दान देण्याचा तिचा अधिकार मान्य केल्याचे दिसते. म्हणजे स्त्रीला आर्थिक साहाय्य मिळत नसे. ती आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान नसावी. कारण सेवा करणाऱ्या, म्हणजे दासी म्हणवणाऱ्या स्त्रियांना अर्थस्वरूपात मोबदला मिळत असे. त्या स्त्रिया सोडल्या, तर इतर स्त्रियांच्या हातात अर्थसामर्थ्य नव्हते. म्हणजे दानांपुरते स्त्रियांना अर्थसामर्थ्य मिळत होते असा निष्कर्ष निघू शकतो. मग स्त्रियांना शिक्षण मिळत होते का? असाही प्रश्न उमटतो.सातवाहनकालीन स्त्री वेदकाळाइतकी शिक्षित नसली, तरी ती सुशिक्षित होती हे नक्की. त्याकाळी मुलींचे उपनयन संस्कार होत असत आणि त्या वयात येईपर्यंत शिक्षण घेत असत. नंतर सामान्यतः त्यांचा विवाह होत असे. पण काही मुली लग्न न करता वेदाध्ययन करीत असत. त्यांस ब्रह्मवादिनी म्हणत असत. काही स्त्रिया
आजन्म ब्रह्मचर्य पाळीत आणि अध्यापनाचे कार्य करीत असत. त्यांना उपाध्याया म्हटले जाई. वर उल्लेखिलेल्या राजकन्या व राजस्त्रिया मात्र सुशिक्षित होत्या हे निश्चित, कारण त्यांनी त्यांच्या हयातीत वर उद्धृत केल्याप्रमाणे शिलालेख करवून घेतले होते. त्याकाळी विवाह फक्त अनुलोम पद्धतीने म्हणजे समानवर्णीयच प्रचलित होते, असा उल्लेख गाथा सप्तशतीमध्ये आढळतो. प्रतिलोम निषिद्ध मानला जाई. वैवाहिक जीवनात पुत्र नसेल तर नियोग समाजमान्य होता. दत्तक वारस नामंजूर होता. सातवाहन वंशावळीत खरोखरच एकही दत्तकपुत्र दिसून येत नाही. सातवाहनकाळात कुटुंबपद्धती संयुक्त प्रकारची अस्तित्वात होती हेसुद्धा या शिलालेखांमधून समजते. स्त्रीची भूमिका प्रामुख्याने गृहिणीचीच होती. पण त्या समाजात पडदापद्धती नव्हती. सातवाहनकालीन शिल्पांमध्येही कुठेही पडदानशीन स्त्रिया आढळत नाहीत. उलटपक्षी समाजात स्त्रियांसाठी खास सणसमारंभ आयोजित केले जात. इंद्रध्वज, मदनोत्सव व फाल्गुनोत्सव हे तत्कालीन प्रसिद्ध उत्सव होते. त्यांच्या पोषाखाची व अलंकरणाची कल्पना सातवाहनकालीन शिल्पकलेतून येते. आणि त्यांच्या केशभूषा तर फारच वैशिष्ट्यपूर्ण आढळतात. भारहूत, सांची, कार्ले, पितळखोरा येथील सातवाहन लेण्यांमधील शिल्पांवरून समकालीन वेशभूषेची माहिती मिळते. उत्खननांमध्ये सापडलेल्या हस्तिदंती बाहुल्यांवरून स्त्रिया सकच्छ वस्त्रे नेसत असत व अंगावर लांबलचक ओढणी पांघरत असत. शिल्पांमध्येही अशाच प्रकारची रचना दिसते. दोन्ही बाजूंना मोठमोठे सोगे सोडलेले दिसतात. तलम, रेशमी वस्त्रे समाजातील वरच्या वर्गात लोकप्रिय असल्याचे शिल्पांवरून समजते. त्यांच्या वस्त्रविशेषांत स्त्रिया बहुतकरून नेसूचे आणि उत्तरीय अशी वस्त्रे परिधान करताना दिसतात. गाथा सप्तशतीमध्ये कंचुकी व साडीचाही उल्लेख आढळतो. सातवाहनकालीन स्त्रिया दोन प्रकारची वस्त्रे वापरीत. उत्तरीय व कमरेखाली लुंगीसारखे, शिवाय कंचुकी, पायजम्यासारखी इतरही वस्त्रे वापरत. साडीही काही ठिकाणी परिधान केलेली आढळते. स्त्रियांची वस्त्रे साधारणपणे तोकडी होती. अजिंठ्यातील सातवाहनकालीन लेण्यांमधल्या चित्रांवरून रंगीबेरंगी वस्त्रेही प्रचलित असावी असे समजते. .स्त्रियांच्या आकर्षक केशभूषेत अनेक पेडांच्या वेण्या व विपुल केशसंभार ही त्यांची वैशिष्ट्ये मानवी लागतील. त्यात इतकी विविधता आहे, की तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषयच होईल. केस भरपूर असतील, तर उंच केशरचना केली जाई अन्यथा साधी भांगवेणी घातली जाई. केस बांधण्यासाठी मोत्याची झालर वापरली जात असे. विपुल केशसंभार दर्शविणाऱ्या स्त्री-मूर्ती नेवासे, पैठण येथे
मिळाल्या आहेत. आश्चर्य म्हणजे चेहऱ्याची ठेवण सगळीकडे जवळपास सारखीच आहे. गोल चेहरा, गुबगुबीत गाळ, मोठे पसरट नाक, मोठे डोळे, खालचा ओठ थोडासा जाड अशी सर्वसाधारण सातवाहन स्त्री-प्रतिमा दिसते. राजस्त्रिया पायांत पैंजण, हातांत कंकण, बोटांत अंगठ्या, बाहूंवर केयूर, कमरेवर मोत्यांचा किंवा रत्नांचा कंबरपट्टा अशी आभूषणे वापरत असत. केसांत गजराही माळत असत. स्त्रियांना दागिन्यांचा विशेष सोस होता, असे सातवाहनकालीन शिल्पे पाहिल्यावर वाटते. त्या काळात स्त्रिया कोणते अलंकार वापरत असाव्यात यासाठी शिल्पे बघावीत. शिल्पांमधून व मृण्मूर्ती मृण्मय मूर्तींमधून बांगड्या, मणी, ताईत, पाटल्या, गोठ, कर्णभूषणे, बाजूबंद, मेखला,
अनेकपदरी हार, कपाळावर बिंदी इत्यादी शृंगारसाधनांची रेलचेल दिसते. एका उत्खननात सापडलेला तांब्याचा आरसा विशेष उल्लेखनीय आहे. काचेचे, हस्तिदंताचे, धातूचे दागिने वापरले जात. यावरून त्याकाळातल्या स्त्रियांना शृंगाराची किती आवड होती ते लक्षात येते.गाथा सप्तशतीमध्ये सातवाहन काळात समाजात आढळणारी अनेक रूपे व भिन्न स्वभाव याचे वर्णन केले आहेत. कन्या, प्रेयसी, पत्नी, सवत, व्यभिचारिणी, आई, सासू, सून, आत्या, मामी, गणिका या सर्व नात्यांमधून स्त्रीरूप प्रकटते. या सर्वांत तिला पुरुषाच्या अर्धांगिनीचे रूप दिले गेले आहे. पण तिला घरदार, शृंगार, विरह या चौकटीत गुंतवून ठेवले आहे असे जाणवते. असे असूनही स्त्रियांचा राजकीय सहभाग दर्शवणाऱ्या काही शिल्परचनाही उपलब्ध आहेत. भाजे इथल्या शिल्पपटात एक राजपुरुष चार घोडे जोडलेल्या रथातून भरधाव दौडताना दिसतो. या रथाबरोबर काही अश्वारूढ स्त्रियाही दिसतात आणि एकीच्या पायात रिकीब दिसते. रिकिबीचे हे अत्यंत प्राचीन उदाहरण म्हणता येईल. त्या शिल्पपटावरून स्त्रिया राजाच्या अंगरक्षक म्हणून कार्य करत होत्या असे म्हणता येऊ शकेल. त्या शिल्पपटात एका स्त्रीरूपी राक्षसाच्या अंगावरून रथ जातो आहे, असे चित्र असल्याने किमान राजाच्या स्त्री शत्रूंपासून संरक्षण करण्याचे काम त्या करत असाव्यात असे म्हणायला हरकत नसावी. याचा अर्थ, स्त्रियांना घोडेस्वारी आणि सैनिकी शिक्षणही दिले जात असावे असा तर्क वाजवी ठरतो. स्त्रियांना या काळात सन्मान मिळत होता हे तर या सगळ्या लक्षणांवरून निश्चित करता येते. यात आणखी एका लक्षणाची दखल घ्यावी लागेल, ती म्हणजे सतीप्रथा. सातवाहन काळात सतीप्रथा बहुतेक नसावी. तत्कालीन लेखांमध्ये किंवा धर्मसूत्रांमध्येही तसा उल्लेख अजिबातच आढळत नाही. स्मृतिग्रंथांमध्ये पतीनिधनानंतर विधवेने आमरण संयमी वृत्तीने यमनियमांचे आचरण करीत पतिव्रतेचे जीवन जगावे असे म्हटले आहे. त्याप्रमाणे नागनिका व बलश्री या राण्या आपले वैधव्य व्यतीत करत होत्या आणि सती गेल्या नव्हत्या. कारण नाणेघाट व नाशिक शिलालेखांचा तसा पुरावाच उपलब्ध आहे.अशा सुवर्णकाळातल्या महाराष्ट्राची भूमी कशी असेल याची कल्पना करून मनाला अतिशय हर्ष होतो, अभिमान वाटतो. आजही त्या इतिहास, पराक्रम गाजवलेल्या जागा, ती शहरे, लेणी आणि शिल्पपट मुद्दाम पाहावेसे वाटतात. इतक्या मोठ्या कालखंडात होऊन गेलेल्या सगळ्या महान नृपतींचे आभार मानावेसे वाटतात. पण सातवाहनांच्या आटपाट नगराची गोष्ट केवळ त्यांच्या पराक्रमापर्यंत आणि शौर्यगाथेपर्यंत येऊन संपत नाही हे महत्त्वाचे. म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच असते. आणि सातवाहनांच्या अशा अनेक भिंतीसारख्या सबळ आणि महत्त्वाकांक्षी स्त्रियांनी ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे म्हणून त्यांना पहिले नमन.
(नीती मेहेंदळे इंडॉलॉजीच्या अभ्यासक व लेखिका आहेत.
हे कुठून आले?
१. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा प्रारंभीचा काळ :-- "शक सत्रपांनी
पश्चिम भारतात राज्ये स्थापन केली. त्याचा भारतीयांना त्रास होइ. त्यांचा
सडकून पराभव गौतमीपुत्राने केला."
२. इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी :- कुषाण तर थेट आख्ख्या उत्तर
भारतात पसरले. फार मोथे साम्राज्य त्यांनी स्थापले विम- कुजुल कॅडफिसस च्या
नेतृत्वाखाली . त्यांचा वारसदार कनिष्क तर पामीर पठार ओलांडून जाणारा
पहिलाच भारतीय सत्तेचा प्रमुख ठरला. मथुरेपासून उत्तर्-पश्चिमेकडे त्याचा
मजबूत अंमल होता. काश्मीर पार करून त्याने मध्य आशियायी भागातही धाडक मारत
थेट चीनच्या राजाला हैर्राण केले.
३. इसवीसनाचे चौथे शतक :- गुप्त सम्राटांनी (चंद्रगुप्त गुप्त व
समुद्रगुप्त गुप्त ह्यांनी ) बराच काळ हूण स्वार्यांना थोपवून धरले. नंतर
हूणांनी पश्चिम उत्तर भारतात नास्धूस सुरु केलीच.
४. चौथ्या शतकाचा उत्तरार्ध :- पांढर्या हूणांनी थेट प्रबळ रोमन सत्तेला
आव्हान देत मोठा लढा उभा केला. खुद्द हंगेरी,बल्गेरियामधील बराच भाग काबीज
केला. अटिला हूण ह्याच्या काळात तर मोठ्या लढाईत पराभव झाल्यावरही पुन्हा
खुद्द इटालीवरच (रोमन साम्राज्याच्या मुख्य प्रभावक्षेत्रात) एक मोठी मोहीम
काढली.
५. बारावे शतक :- मंगोल... बाराव्या शतकापर्यंत जगाने कधीही न
बघितलेल्या आकाराचे साम्राज्य उदयास आणणारा संघ. पुढील दीडेकशे सर्वाधिक
क्रौर्याचा, आक्रमकतेचा उच्चांक गाठायला निघालेला एक समूह. तेमुजिनच्या
(चंगीझ खाना) नेतृत्वाखाली उभा राहिला. आजवर कुठलीच सत्ता इतक्या दूरवर
इत्क्या वेगाने पसरली नव्हती. तोवर वेगाने वाढलेले मुस्लिम धर्माचे
उमय्याद किंवा अब्बासिद साम्राज्याहूनही, चीनी, रोमन, मौर्य्, कुषाण, अशा
आजवरच्या कुठल्याही साम्राज्याहूनही हे काही पट मोठे होते.
६.चौदावे शतक :- तुर्क्....दिल्लीवर आक्रमण करुन ऐबकने स्थापन केलेले
गुलाम घराणे संपवणारी, थेट मध्य आशियापासून ते दिल्लीपर्यंतचा मुलुख काही
काळ का असेना काबीज करनारी एक सत्ता. (मुळात हे तैमुरच्या नेतृत्वात
तुर्क्-मंगोल होते, ओरिजनल तुर्क नव्हेत.)
.
हे असे उल्लेख सतत इतिहासात डोकावत असतात. तेव्हा साहजिकच "हे कोण? कुठून आले?" असे प्रश्न पडतात.
किंवा हूण हे जर चीनच्या प्रांतातील लोक असतील तर ते इतक्या दूरवर ,
युरोपात जाउन सत्ता स्थापन कशी काय करु शकले? (ते ही सलग असे मूळ
स्थानापासून मदत नसताना. कुठलीही सप्ल्याय लाइन नसताना.) चीन पासून थेट
युरोप? आणि तिथवर जाइपर्यंत कुठे कुठे गेले? त्याचे स्पष्ट कुठेच उल्लेख
कसे नाहीत? पश्चिमेकडेच चालले होते खुश्कीच्या रस्त्यतील उत्तरेच्या
रस्त्याकडून, तर भारतात पूर्वेला कशाला वळले? असे अनेकानेक प्रश्न पडतत.
मंगोल्-तुर्क -तार्तार ह्यांचा संबंध आहे का? कुणी तुर्कांना इराणी
पठारावरील एक जमात असे म्हणतात तर कुणी हे ही चीनच्या प्रांतातून आले
म्हणतात.
तर शंअका अशा :-
१. हे सगळे कुठून कुठे गेले?
२. हे ह्याच वेळी(वरती उल्लेख केलेल्या वेळी) एकाएकी पेतून कसे उठले? अचानक उदय कसा व्हायचा ह्यांचा?
३. हे ह्यांच्या मूळ ठिकाणी आजही सापडतात का?
४. ह्यांचा पराभव, उच्चाटन वगैरे विक्रमादित्य, यशोधर्मन
,गौतमीपुत्र्,गुप्त सम्राट वगैरेंनी केला म्हणतात. म्हणजे नक्की काय केले.
लढाईत ह्यांचा संपूर्ण पराबह्व वगैरे झाला. पण एवढा जो लोकसमूह त्यांच्या
सोबत होता, त्याचे काय झाले? ते सगळेच देश सोडून निघून गेले का?(गेले असतील
हे पटत नाही. पण मग त्यांचे पुढे काय झाले?)
५. शकांनी आक्रमण केले,लुटले वगैरे म्हणतात. पण कुठलाही आक्रमक सीमेवरील
भागात लुटपाट करु शकतो. बरोबर? आतल्या भागात, मुख्य वस्तीपर्यंत घुसलाच, तर
लूटमार करुन परतही जाइल, पण तिथेच वर्षानुवर्षेच नव्हे तर दशकानुदशके
अपल्या हजारपट लोकसंख्येवर (स्थानिक मदतीशिवाय) राज्य कसे करेल? स्थानिक
मदत आज मिळाली तरी उद्या तेच मदतकर्ते स्थानिक वरचढ होणार नाहीत का? हे लोक
इतके वर्षे राज्य करुच कसे शकले?(जुलुमी, विध्वंसक असे ते होते, हे गृहितक
आहे. भारतीयांना तसे सांगितले जाते. त्यांचा पराभव हा "शक शालीवाहन"
वगैरे करुन साजराही करतात; इतका त्यांचा पराभव होणे आवश्यक होते. )
.
अजूनही बरेच प्रश्न आहे. चर्चाप्रस्ताव उच्च दर्जाचा नसेलही. पण ह्या
पडणार्या शंका जाहीर ठिकाणी विचारुन अधिकाधिक माहिती मिळवणे हा उद्देश
आहे. व्यनि करुन किती लोकांकडून किती माहिती मिळवता येते ह्यावर मर्यादा
येतात.
हे सर्व प्रश्न अरविंद कोल्हटकर ह्यांच्या एका प्रति दुसर्या स्थळावरील प्रतिसादामुळे पडलेले आहेत.
--मनोबा
Comments
हे का आले?
ते आले लुटालुटीच्या आणि सर्वायवलच्या उद्देशाने. चंगीजखानासारख्या ज्या रानटी जमाती होत्या त्यांना जीव घेणे, जाळपोळ करणे, बलात्कार करणे वगैरे साधारण गोष्टी होत्या. शहरे वसवून, नियंत्रणाखाली राहणारे नागरिक या हिंसेला तोंड देण्यास तयारीचे नव्हते. रानावनांत लपणे, उपाशी राहणे, दिवसेंदिवस घोड्याच्या पाठीवर बसणे, अचानक हल्ले करणे हे सर्व प्रकार शहरी लोकांना जमणारे नव्हते. परंतु एकदा सत्ता काबीज केल्यावर या रानटी लोकांना हळूहळू शासनाचे, सत्ताविकासाचे महत्त्व कळून चुकले. बाकी नंतर...
इतिहास साक्षी आहे.. 'शालीवाहन शके'ची व्युत्पत्ती कशी झाली ? ते कुणी आणि कधी सुरू केले ? वाचा सविस्तर
मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्नोति’पासून निष्पन्न झाला.

पणजी : हिंदू
नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते.
हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या
राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव
‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही
उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव
यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक
महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या
सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी
भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय
समाजातील महत्त्व अबाधित आहे.
पुराणानुसार,
गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत
याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले.
हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान
आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी
नुसारच साजरे होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी
जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक
म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण
भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक
सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया 
मुळात
भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द
परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो.
शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला.
तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत
चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे
राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो.
त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने
काल गणणे शक्य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्नोति’पासून निष्पन्न झाला. 
प्रतिवर्षी
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला
जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन
मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या
आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच
पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले
जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने
जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.
पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
ही कालगणना नेमकी कुणी सुरू केली?
२०००
वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमणं व्हायची.
याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर
हल्ला केला. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा
त्यावेळी सत्तेवर होता. गौतमीपुत्र असं नाव लावणारे राजे त्या वेळच्या
मातृसत्ताक पद्धतीचे अनुकरण करणारे असल्याचेही काही अभ्यासक मानतात.
पुरातन पैठण शहराचा उल्लेख सुवर्णयुग म्हणून केला जातो.
इतिहास
अभ्यासकांनुसार, गौतमीपुत्राने या शक - क्षत्रप राजाचा हल्ला परतवून लावला
आणि त्याचा युद्धात पराभव केला. हे वर्ष होतं इसवी सन ७८. आत्ताच्या
नाशिकच्या परिसरात हे युद्ध लढले गेले. सातवाहनांच्या साम्राज्याची राजधानी
होती पैठण. महाराष्ट्राचे सुवर्णयुग असेही या तत्कालीन वैभवशाली
पैठणनगरीचं वर्णन केले जाते. 
गौतमीपुत्र सातवाहनाचा पराक्रम
इतिहासतज्ज्ञ
प्रभाकर देव यांचा प्राचीन भारताचा गाढा अभ्यास आहे. ते नांदेड इथल्या
महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी म्हटलं होतं, "इसवी सनपूर्व
२३६च्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य
स्थापन झालं. सातवाहनांतील सगळ्यांत श्रेष्ठ सम्राट म्हणून गौतमीपुत्र
सातकर्णी यांचे नाव घेतले जाते.
इसवी
सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन ७२ ते ९५ या काळात हा सत्तेवर
होता. या राजाशी संबधित एक शिलालेख नाशिकच्या लेण्यांमध्ये सापडला आहे."
पुढे "मौर्यांच्या साम्राज्यानंतर कुशान, हूण, पल्लव, शक यासारख्या परकीय
टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केलं. दक्षिण भारताला या परकीय
आक्रमणातून वाचवण्याचं काम हे गौतमीपुत्रानं केले . गौतमीपुत्रानं शकांचा
पराभव केला आणि त्या वेळेपासूनच शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली," असे
प्रभाकर देव यांनी सांगितलं होतं.
सातवाहन, सालाहन, साळीहन आणि शालिवाहन इत्यादि
"शालिवाहन
म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत
भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असे म्हटले आहे. त्याचे संस्कृतीकरण
जेव्हा झाले, तेव्हा ते शालीवाहन झाले," असे शालिवाहन साम्राज्याचे
अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना
उल्लेख केला होता. 
या
साम्राज्याचा बाविसावा राजा गौतमीपुत्र हा अतिशय पराक्रमी होता. त्याने
जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. गौतमीपुत्र आणि
शकांमध्ये साम्राज्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घनघोर युद्ध झालं. या
युद्धात गौतमीपुत्रानं शक-शत्रप घराण्यातल्या नहपान या राजाचा समूळ पराभव
करून त्याला मारून टाकले .सातवाहनांनी शकांच्या प्रदेशावर विजय
मिळवल्यानंतर शालिवाहन शके कालगणना सुरू झाली. गौतमीपुत्राने प्रतिस्पर्धी
शक शत्रप यांचा पराभव करून आपली नाणीही प्रचारात आणली
पैठणच्या
सातवाहन आडनावाच्या कोणा राजाने शक लोकांचा पराभव ज्या वर्षी केला त्या
वर्षापासून ही कालगणना पद्धती सुरू झाली. सातवाहनाने मातीचे घोडे व शिपाई
करून त्यांच्याकरवी शकांचा पराभव केला, अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा अर्थ
मी असा करतो – “शक लोकांचा अंमल महाराष्ट्रावर दोन हजार वर्षांपूर्वी
जुन्नर वगैरे स्थळी राज्ये स्थापून जेव्हा झाला, तेव्हा महाराष्ट्रातील लोक
मातीप्रमाणे निर्वीर्य व हतप्रभ झाले होते. अशा लोकांना उत्तेजन देऊन
पैठणच्या सातवाहन राजाने शकांचा उच्छेद केला. शिवाजीने मावळ्यांच्या करवी
जसा मोगलांचा पराभव केला तसा. शकांच्या या पराभवाला उद्देशून या कालगणना
पद्धतीस “शालिवाहनकृत शकपराभवकाल’ असे त्या वेळी लोक म्हणू लागले व
“शालिवाहन शककाले’ असा प्रयोग होऊ लागला. “शालिवाहनशक’ या सामासिक शब्दाचे
“शालिवाहन शक’ असे विशेषण होते. नंतर कालांतराने या लांबलचक सामासिक
शब्दाचा संक्षेप “शककाले’, “शकवर्षे’, “शके’ असा उत्तरोत्तर होत गेला –
तेव्हा शालिवाहन शककाल आपणा मराठ्यांचा मोठ्या अभिमानाचे द्योतक आहे.” असे
एके ठिकाणी प्राख्यात इतिहासकार राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे. 
चष्टन राजाने सुरू केला शक?
पुण्यातील
इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा
वेगळी माहिती दिली. त्यांनी म्हटलं होतं की, "सातवाहन राजाने शकांना हरवलं
आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे. शक हे
इराणधून - तिथल्या सिथिया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय
संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि
कार्दमक अशा दोन शाखा होत्या. शहरांपैकी नहपान याचं गुजरात आणि
राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक इथंही राज्य करत होता. त्याच्या
संदर्भातील शिलालेख पांडव लेण्यात सापडतात. नाशिकजवळ गोवर्धन इथं
गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि
क्षहरातांचा निर्वंश केला. त्यानंतर सातवाहन राजांनी नाशिक जवळील नहपानाचं
राज्य आपल्या अखत्यारीत घेतलं." असे इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली
पलांडे दातार म्हणतात. 
"गुजरातधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन ७८मध्ये चष्टनने स्वतःचे राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने काढलेल्या नाण्यांवर शकाचा पहिला उल्लेख आढळतो. तो त्याच्या वंशातल्या राजांनी ३०० वर्षं वापरला. पुढे वाकाटक राजा देवसेन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्या लेखातही आपल्याला शकाचा (शालिवाहन शक नव्हे) उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात शालिवाहन हे त्याला जोडलं गेलं आहे."
जुन्नरच्या लेण्यांध्येही शिलालेख
"जुन्नर
आणि परिसरातल्या लेण्यांमध्ये या काळाशी संबधित शिलालेख मिळाले आहेत.
रोमच्या व्यापारावर आपलं वर्चस्व असावं यासाठी त्याकाळी लढाया व्हायच्या.
गौतमीपुत्राने नहपानावर वर्चस्व मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक नाण्यावर
आपले शिक्के मारले", असं सायली पलांडे दातार म्हणाल्या. जर्मनीचे डॉ. हॅरी
फाल्क हे इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवीन माहिती
समोर आल्याचं सायली यांनी सांगितलं होतं.
शालिवाहन शके आणि मराठी नववर्ष
सातवाहनकालीन दरबारी पंडित गुणाढ्य यांनी ‘बृहत्कथा’ लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.
प्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ दिले.त्यांनी म्हटले होते की, "पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचे वर्णन केले आहे."
"पैठणचा उल्लेख तो ‘पैतान’ असे करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथे गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही २००० वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरे होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची," देव सांगतात.
४५० वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण
शालिवाहन
शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी
अपेक्षा देव यांनी व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं होतं, या साडेचारशे
वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली
गेली. १२०० पैकी ९०० लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर
व्यापारी बंदरे होती. तिथे मोठी शहरे उदयास आली. याच काळात इंडो-रोमन
व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवाने आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे.
गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचे साम्राज्य मोठे होते. कार्ले,
भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा
उल्लेख आढळतो.
इतिहासात शालिवाहन शकेबद्दल अनेक मते मंडळी गेली आहेत. मात्र इतिहासातील वैभवशाली कालखंडाचे ते गौरवशाली पान आहे यात मात्र दुमत नाही.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.
सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.
सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी.
Modern Maharastra as we see today and inherit a rich culture that originates from Satvahana dynasty, is a matter of great proud to all of us Maharashtrian’s. In brief, in this article I would like to throw some light on the history of Satvahana’s and their great contribution towards Agamik (Shaivait) and Buddhist religion, art, literature and culture.
ORIGIN:
We have few sources to determine origin of Satvahana’s. Satvahana's belonged to Oundra (Andhra) clan. Purana’s have referred them as Andhra-bhrutya or just Andhra satvahana’s. The first mention of Oundra along with Pundra, Mutib, Pulind, Shabar etc. as rulers of southern part of Vindhya Mountain appears in "Aitareya Brahmana". Also according to reference from Mahabharata, they were (Oundra, Pundra etc.) sons of Great King Asur Bali. This means that This dynasty belonged to ancient Asura culture and the origins of this culture can be traced back to Sindhu Culture. It is not surprising that name of first satvahana King is named as “Sindhuk”. If this account is taken into consideration, it is clear that Oundra’s known history dates back to at least 3500 BC.
Oundra’s had established kingdoms in Odisa (Odisa name hails from Oundra), Andhara Pradesh (Andhra is corrupted form of Oundra) and some parts of Maharashtra. PUndra’s ruled from Pundrapur (Modern Pandharpur) and Tiruvarur in south, (Tiruvarur originally was known as Pundrapur) and also ruled west Bengal from the capital “Pundrikvardhan.”
SATVAHANA’S:
All Oundra’s, Pundra’s, Shabar and Mutib’s originally belonged to ancient Naga kula, part of Asura culture. Satvahan (Actually sadvahan…Satvahan is corrupt Sanskrit form of original Prakrut.) “Sadvahan” means horse rider. Megasthenese praised Satvahan's for their cavalry. Satvahana’s belonged to Oundra clan those were out of the periphery of Vaidik religion and were called Shudra’s.
Purana’s have given list of 30 Satvahana kings those ruled Maharastra, central India, Andhra, and some part of Odisa from 200 BC till 230 AD, almost 450 years. Prior to establishment of their own empire predecessors of Satvahana’s were feudal lords and ruled under supremacy of Mouryan empire, while their blood relations (Oundra’s) maintained their supremacy in respective regions like Andhra Pradesh.
RELIGION:
Satvahana’s were “abode of Agama’s.” (Ref : Nashik rock inscription by Goutamiputra Satkarni.). This does clearly mean that Satvahana’s were Shaivaits. Veda’s are called as Nigama’s (Later) and Shaiva’s as well Jain scriptures are called as Agama’s. Agama means ancient (previous) and Nigama means followed by…(later) composed in later times.
There has been dispute over the religious faiths of Satvahana’s. But the fact is evident from the names of the Satvahana kings that they followed Shaivait religion. Shivashree, Skand, Chand, Pulumavi (Skand), Shaktishri, Shivswati etc. are the names those clearly belong’s to Shaivait tradition. The name of the founder of Satvahan dynasty is “Shimukh.” (Actually Sindhuk”)…which resembles with Shivmukh or can be related with Sindhu origin. The most revered name is of a woman in Satvahan dynasty and that is “Nagnika”, and all scholars agree that she belonged to Naga kula.
Most importantly Satvahana’s were matriarchal. This is evident from the fact that Satvahan Kings used to bear Mothers name before their own…such as Goutamiputra Satkarni, Vedistree, Vaasishtheeputra Satkarni, Vashishtheeputra Shivasree Pulumavi, kousikiputra satkarni….etc. Needless to say this is clearly Asura tradition, that precedes patriarchal system of family. Jain Acharya Jinprabhu Suri too has stated that Satvahana’s bloodline originated from Naga Vansh.
Still scholar’s like Dr. Ajay Mitra Shastri tries to establish that Satvahana’s were Brahmins.
Satvahana’s were secular in every respect. They have heavily donated to Bouddha vihara’s, Stupa’s and for creation of Buddhist rock-cut caves. They had donated many villages to the Buddhist monks. Many Rock cut caves, from nashik to Karle-Bhaje were carved during Satvahana period. In fact Cave sculptures were first introduced by Satvahana’s. Also they organized Yadnya’s too for vaidik Brahmins and had donated heavily to them. The inscription at Naneghat shows how heavily they had donated to the Vedic Brahmins for performing Yadnyas.
Satvahana’s married inter-religions, inter-regions…for example Hal Satvahan had married Lilavati, daughter of King of Cylone. (Sri Lanka) and one king married daughter of Rudradaman, a Shaka king.
(Satvahana Empire)
GREAT ACHEIVEMENTS:
Though Satvahana’s were feudal representatives in Maharashtra during Mouryan and Kanva period, bearing titles like Mahabhoj and Maharatthee. Junnar, Paithan and Amaravati were their alternative Capitals. Junnar was capital of Satvahan dynasty for longest period which was later shifted to Paithan.
Shimuk, (Sindhuk) is known as founder of the Satvahan dynasty who ruled the central India for over 23 years. He got this independence from Kanva dynasty of Bihar. Telangana region was his first choice from where he declared his freedom and occupied Vidarbha region in later times.
Satvahana’s in the times of Great of the Greatest king Goutamiputra Satvahana’s protected entire south India from the vicious advent of the Scythians. At that time he was ruling from present Junnar in Pune district. He had to wage wars with Indo-Greeks, Parada’s (Persians?) to bring back the peace in the country. He established his empire not only in present Maharashtra, but some part of Madhya Pradesh, Sourashtra, some part of Rajputana, and even the part of Andhra like Nagarjunkonda. He is credited by Purana’s for ruling all three oceans…he won every war and established his rule. He was almost ruler of entire south India and the situation continued to be same till next 150 years. Goutamiputra was a handsome and valiant man. He died in 90 AD. His victory over Sakas is still celebrated in form of the Gudi Padava. This festival is extant in the parts till date wherever he had ruled.
Last King from this glorious dynasty, noted by Purana’s was Pulomavi…(Skand) who ruled for only 7 years, from 212 to 218 AD.
Satvahana’s had great naval force. There are pictorial designs of then ships on various coins of those times. The sea-trade was with Arab’s, Romans, and Greeks. Their naval power was tremendous and had won over Sri Lanka using their naval fleets. They used to export muslin, cotton, honey etc. and used to import wine, gold, and lead from abroad. They established first sea-ports, almost 22, on both the sea-coasts.
There were almost 30 fortified cities and various forts built by Satvahana’s which is described by Greek Traveller Megasthenese. So, we can credit him with the first dynasty to identify importance of the forts.
ADMINISTRATION AND ORIGIN OF MARATHA’S
Satvahana’s were the kings believing in complete simplicity. The taxation was meager. They didn't built great palaces for themselves, but forts and fortified cities. The administration too was simple. They had divided the empire in provinces and in Rattha's (Modern districts.) The representative of Rattha would be called “Mahaaratthi” and the representative for provinces (group of Rattha’s) would be called as “Mahabhoj”. Maharatthaa post was not made ancestral…it was temporal and Maharatthi’s would be transferred from one Rattha to other. They were allowed to issue their own coins on behalf of the king, but had no role more than administration of respective Ratthas's and participating the wars if King summons them. Maharatthees could be from any caste. For example, legend is, an ancestor of satvahana’s was potter, by business. So caste system was not rigid in Satvahana period. Even Brahmins had adapted businesses of traders, sea-fare and warriors. Many had converted to Buddhism and Jainism. Maharatthaa’s could be from any class, if proven ability to administrate. would be appointed as Maharaathhaa.
So like Kulkarni, Deshpande, Inamdar…Maharatthaa too was a title and not a caste. But being feudal lords they continued to bear the same title, even after end of Satvahana dynasty. It seems that they adapted the title "Maharatthaa" as a caste in later times. Mahabjoja’s, as they would be far less in numbers, we today do not know, what happened with that high level administrative class.Later rulers like Vakatakas and Rashtrakutas could be the successors Maharatthis of previous era. It is clear from history that Maharatthi, in later times became ancestral. Present Maratha's, in all probabilities, are successors of Maharatthis of those times.
CULTURE
Satvahana’s, as they ruled for over 450 years as kings, have left their inimitable impact on the Marathi people and their language of today. Satvahana King Hala wrote and compiled 700 folk songs those were written mostly by women from 200 BC till 200 AD, written in Prakrut Maharashtree, are even today a matter of inspiration to any modern poets. Not a single inscription out of about 400 is in Sanskrit for Sanskrit was still evolving. We get a specimen of rudimentary Sanskrit from karle-Bhaje Tank inbscription, which was inscribed by order of Saka princes that was married to Satvahana king. Many literray works, rigght from Gunadhya's Kathasarisagar, Epic Lilavai, Gatha saptashati, Grammar Prakrit Prakash and so many others. Various forts, fortified cities spread all over Maharashtra, Shaivait temples; rock-cut Buddhist caves etc. till this date reminds us of their great legacy.
I have not enough words to express gratitude towards those secular kings of Satvahana dynasty. I shall write in depth on this in Marathi, very soon…a book…
स्वतंत्र राजसत्ता
महाराष्ट्री भाषेमुळे आपल्या समाजाला पृथगात्मता आली आणि या भाषेचा व या भूमीचा लोकांत अभिमान निर्माण होऊन त्याला अस्मिता प्राप्त झाली हे गेल्या दोन प्रकरणांत आपण पाहिले. आता या पृथगात्म झालेल्या महाराष्ट्रभूमीच्या राजसत्तेचा विचार करावयाचा. भाषेमुळे पृथगात्म झालेला समाज आपली स्वतंत्र अशी राजसत्ता निर्माण करू शकला नाही तर त्याच्या अस्मितेला स्थिरता येत नाही व त्याच्या संस्कृतीची, धर्माची, साहित्य, कला, शास्त्रे यांची जोपासना होऊ शकत नाही. मनुष्याला देह, मन, बुद्धी, प्रज्ञा सर्व प्राप्त होऊनही त्याची प्राणशक्ती जिवंत नसेल तर वरील सर्व संपदा असून नसल्यासारखीच होते. स्वतंत्र राजसत्तेचे राष्ट्रीय जीवनात असेच महत्त्व आहे. प्राणशक्ती देहाचे सर्व अवयव संघटित व सूत्रबद्ध करते आणि यामुळेच मन, बुद्धी, प्रज्ञा यांच्या सर्व व्यापारांना एकात्मता प्राप्त होते. त्याप्रमाणे राजसत्ता समाजाला संघटित व शासनबद्ध करून त्याच्या सर्व घटकांच्या भिन्न भिन्न व्यापारांना एकात्म, एकरस बनविते व अशी सत्ता दीर्घकाळ टिकली तरच त्या समाजाची पृथगात्मता जगन्मान्य होते व त्याच्या स्वतंत्र संस्कृतीला चिरंजीवित्व लाभते. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका - युनायटेड स्टेटस् – यांची तुलना येथे उद्बोधक होईल. दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना, पेरू, ब्राझील, चिली, इ. अनेक देशांची अनेक स्वतंत्र राज्ये आहेत. हे सर्व प्रदेश दोनतीन शतके स्पेनच्या अधिसत्तेखाली होते. पण ती सत्ता परकी होती. त्यामुळे ती या खंडप्राय प्रदेशाला एकात्म करू शकली नाही. नंतर दीडशे वर्षापूर्वी स्पेनची सत्ता नष्ट झाली. त्या वेळी या सर्व देशांत निरनिराळ्या स्वतंत्र राजसत्ता निर्माण झाल्या. त्यामुळे या देशांच्या संस्कृती अगदी परम्परभिन्न झाल्या. उत्तर अमेरिकेवर प्रथम अशीच इंग्लंडची साम्राज्यसत्ता होती. दीड वर्षापूर्वी तीही स्पेनप्रमाणेच नष्ट झाली. पण त्यानंतर तेथील तेरा संस्थानांनी सर्वांची मिळून एक राजसत्ता निर्माण केली आणि दृढनिश्रयाने ती टिकविली. यामुळेच हा विस्तीर्ण भूप्रदेश एकात्म, एकरस झाला व त्याची स्वतंत्र संस्कृती जोपासली गेली. राजसत्तेचा महिमा असा आहे.
सातवाहन घराणे
महाराष्ट्राच्या भाग्याने त्याच्या संस्कृतीच्या प्रारंभकाळीच त्याला अशी राजसत्ता लाभली. ती सत्ता म्हणजे विख्यात सातवाहन या राजघराण्याची होय. इ. स. पूर्व ३०० च्या सुमारास महाराष्ट्री भाषेमुळे महाराष्ट्रममाजाचा जन्म झाला; आणि सुदैवाने त्याच वेळी या भूमीत एक अत्यंत प्रभावी, बलशाली व समर्थ अशी राजसत्ता अवतरली. सातवाहनांची सत्ता येथे प्रस्थापित झाली, एवढेच नव्हे, तर या थोर राजघराण्याने साडेचारशे वर्षे आपली सत्ता अविच्छिन्न, अव्याहत, अखंड चालवून महाराष्ट्राची पृथगात्मता, अस्मिता व संस्कृती यांना पक्व, प्रौढ व दृढ असे रूप प्राप्त करून दिले.
सातवाहनपूर्व
भारतामध्ये येथील लहान लहान राज्ये वितळवून त्यांतून एक मोठे बलशाली साम्राज्य निर्माण करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न झाला तो मगधामध्ये. इ. स. पूर्व सहाव्या शतकात ५५० च्या सुमारास शैशुनाग वंशाने मगधात राज्य स्थापून हळूहळू अखिल उत्तर भारत, हिंदुकुशपासून आसामपर्यंतचा सर्व आर्यावर्त आपल्या साम्राज्याखाली आणला. बिंबिसार हा शैशुनाग घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता पुरुष होय. तेथून पुढे सुमारे दीडशे वर्षांनी या घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन राजसत्ता नंद घराण्याकडे गेली; नंतर सुमारे शंभर वर्षांनी नंद घराण्याचा उच्छेद करून चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. भारताच्या दृष्टीने मौर्य साम्राज्याचे महत्त्व विशेष आहे. पहिली गोष्ट म्हणजे चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या - यवनांच्या - आक्रमणाचे निर्दाळण केले ही होय. शिकंदराने भारतावर स्वारी करून वायव्य सरहद्दीजवळच्या पट्ट्यात यवनसत्ता प्रस्थापित केली होती. चंद्रगुप्ताने ती तर नष्ट केलीच, पण त्यानंतर सेल्युकस हा ग्रीक सेनापती प्रचंड सेना घेऊन पुन्हा स्वारी करून आला तेव्हा त्याच्याशी सीमेवरच मुकाबला करून चंद्रगुप्ताने त्याचा निःपात केला व यावनी सत्तेचा कणाच मोडून टाकला. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा म्हैसूरपर्यंतचा भूभाग जिंकून चंद्रगुप्ताने अखिल भारताचे एक साम्राज्य स्थापन केले ही होय. ज्ञात इतिहासात अखिल भारत एका साम्राज्यात एका सत्तेखाली या वेळी प्रथमच आला. यामुळे या घटनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शैशुनाग वंशाने साम्राज्य स्थापन केले होते. पण ते उत्तर भारतापुरते होते. इतिहासकाळात तसे साम्राज्य प्रथमच झाल्यामुळे त्यालाही महत्त्व आहे यात शंका नाही. पण चंद्रगुप्ताचे साम्राज्य अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे त्याचे महत्त्व अर्थातच असाधारण असे आहे.
अशोकाची अहिंसा
चंद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने पित्याने स्थापिलेले अखिल भारतीय साम्राज्य जसेच्या तसे टिकवून धरले. काहींच्या मते त्याचा विस्तारही केला. त्यानंतर सम्राट अशोक सत्ताधीश झाला. त्याने शस्त्रबळाने अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्न अशा धर्माचा प्रसार केला. आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ व परंजयी अशी राज्ययंत्रणा ढिली करून टाकली. त्यामुळे शंभर- सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे पुन्हा सुरू झाली आणि डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक ( यावनी ) राजे भारतात घुसून अयोध्येपर्यंत येऊन ठाण मांडून बसले. पूर्वी प्रचंड सेना घेऊन शिकंदरासारखा महाबल सेनानी आला होता. तरी त्याला तसू तसू भूमी लढूनच घ्यावी लागली. त्यामुळे वायव्य सीमेजवळच्या एका लहानशा पट्ट्यापलीकडे त्याला काहीच जिंकता आले नाही. सीमेजवळच्या भारतीयांच्या ठायी अशी प्रखर प्रतिकारशक्ती त्या वेळी होती. पण आता अशोकाने बौद्ध अहिंसा व वैराग्य यांचा प्रसार करून राष्ट्राची प्रतिकारशक्तीच नष्ट करून टाकली होती. समाजाला हतबल करून ठेविले होते. त्यामुळे डेमिट्रियस व मिनँडर, कापसात खड्ग घुसावे तसे भारतात घुसले. मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराजाच्या शांतवृत्तीने हे वस्त्रहरण पाहात बसला होता. याच वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो बृहद्रथाचा सेनापती. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाला कंठस्नान घातले आणि स्वतः सम्राटपदावर आरूढ होऊन यावनी आक्रमकांना भारताच्या सीमेबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले असे नाही, तर वैदिक संस्कृतीचेही पुनरुज्जीवन केले आणि त्याचे प्रतीक म्हणून अश्वमेध यज्ञही केला. पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्ष ( इ. पू. १८४ -७२ ) मगधाचे राज्य केले व त्यानंतर ४५ वर्षे म्हणजे इ. पू. ३० पर्यंत काण्ववंशाने सत्ता चालविली. पण पुष्यमित्रानंतरचे राजे विशेष कर्तबगार नव्हते. त्यामुळे तेव्हापासूनच साम्राज्याला उतरती कळा लागली होती; आणि काण्वांच्या राजसत्तेला मगधाबाहेर मुळीच प्रतिष्ठा राहिलेली नव्हती. यामुळे ग्रीक आक्रमकांनी पुन्हा डोके वर काढले होते आणि आता शक- कुशाणांच्या टोळधाडीही भारतावर येऊ लागल्या होत्या. या वेळी उत्तर भारतात त्यांचा प्रतिकार करील अशी संघटित साम्राज्यशक्ती एकही नव्हती. सर्वत्र लहान लहान क्षुद्र राजसत्ता विखरून राहिल्या होत्या. अशा वेळी दक्षिण भारताचीही स्थिती अशीच असती तर शककुशाणांनी दक्षिण भारताचा - म्हणजे पर्यायाने सर्व भारताचा ग्रास घेतला असता. पण अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. पू. २३६ च्या आसपास दक्षिणेत प्रतिष्ठान नगरीत एक बलशाली सत्ता प्रस्थापित झाली होती आणि शंभर वर्षांनी शककुशाणांच्या टोळधाडी येऊ लागल्या तेव्हा ही राजसत्ता साम्राज्यपदाला पोचून त्या परकी आक्रमणांना तोंड देऊन त्यांचा निःपात करण्यास समर्थ होऊन राहिली होती. सातवाहनांची राजसत्ता तीच ही बलशाली सत्ता होय. तिचाच इतिहास आता आपणास पाहावयाचा आहे.
दक्षिण संस्कृती
सातवाहन सत्ता ही महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासाला चिरंतन भूषणभूत होऊन राहील अशी सत्ता होती. एक तर भारताच्या इतिहासात विंध्याच्या दक्षिणेला निर्माण झालेली साम्राज्यप्रस्थापक अशी ही पहिलीच सत्ता होय. आर्यांच्या वसाहती प्रथम उत्तर भारतात झाल्या. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सर्व इतिहास उत्तरेत घडलेला आहे. रामायण, महाभारत या सर्व कथा उत्तरेतल्या आहेत. मगधातील शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग ही सर्व साम्राज्ये उत्तरेतच झाली. मनू, याज्ञवल्क्य, पाणिनी, पतंजली, बुद्ध, महावीर, हे सर्व विंध्याच्या उत्तरेकडचे होत. याचा अर्थ असा की या काळापर्यंत भारताची सर्व संस्कृती ही उत्तर भारताच्या कर्तृत्वाची होती. सातवाहनांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला प्रारंभ करून दिला. त्यांचे दुसरे अलौकिकत्व असे की इ. पू. २३५ ते इ. स. २२५ अशी चारशे साठ वर्षे या एका घराण्याने अखंड राजसत्ता चालविली. त्यातील पहिली दोनशे वर्षे तर तिचे वैभव अव्यय तेजाने सारखे प्रतिपच्चंद्ररेखेप्रमाणे वर्धिष्णूच होत राहिले. त्यानंतर काही वर्षे तिला पडता काळ आला. पण गौतमीपुत्र सातकर्णी या सम्राटाने शकांचा निःपात करून पुन्हा तिचे तेज वृद्धिंगत केले. साडेचार शतकांइतका दीर्घकाळ एकाच घराण्याने सत्ता चालविल्याचे उदाहरण भारताच्याच काय पण जगाच्या इतिहासातही दुर्मिळ आहे. सातवाहनांचेच शालिवाहन हे दुसरे अभिधान होते. त्या नावाची कालगणना शालिवाहन शक म्हणून विख्यात झालेली आहे. भारतात अनेक कालगणनांतून दोनच संवत् कायम टिकून राहिले आहेत. एक विक्रम संवत् व दुसरा शालिवाहन संवत्. डॉ. रा. गो. भांडारकरांनी म्हटले आहे की इ. पू. दुसऱ्या शतकापासून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत ( पुष्यमित्राच्या मृत्यू - पासून गुप्तवंशाच्या उदयापर्यंत ) शिलालेख व नाणी यात महाराष्ट्राचे सातवाहन वगळले तर कोणाही हिंदू राजाचे नाव आढळत नाही. ( कलेक्टेड वर्क्स, खंड १ ला, पृ. ३६ ) [ डॉ. भांडारकरांच्या या विधानाला, नवीन संशोधन पाहता, थोडी मुरड घातली पाहिजे. इ. सनाच्या दुसऱ्या शतकात पंजाब, राजस्थान येथील यौधेयगणांनी कुशाणांचा नाश करून आपले स्वतंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले होते. ' यौधेयानां जयः ' अशा अक्षरांनी अंकित अशी त्यांची नाणी सापडली आहेत. मालवांनीही शकांचा उच्छेद करून तिसऱ्या शतकात ' मालवानां जय: ' अशी मुद्रा करून आपली नाणी पाडली होती. (कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, पृ. २५५ ते २५७.) पण असे असले तरी ढोबळ मानाने भांडारकरांचे विधान खरेच आहे. ] भारतावर त्यावेळी केवढे संकट आले होते याची यावरून कल्पना येईल आणि त्यावरून सातवाहनांच्या साम्राज्याचे महत्त्व तेही ध्यानात येईल. भारतीय जनतेने सातवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयाचे स्मृतिचिन्ह म्हणूनच त्यांच्या नावाने मूळची शक कालगणना अलंकृत केली.
गतिमान चित्रपट
सातवाहनांचे साम्राज्य आंध्रदेश, कलिंग येथपासून माळवा, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान येथपर्यंत काही काळ मगधापर्यंत आणि दक्षिणेस कावेरीपर्यंत पसरले होते. आरंभीची दोनशे वर्षे या साम्राज्याला निर्बंध, अभंग शांतता लाभल्यामुळे तेथे भौतिक समृद्धीबरोबरच विद्या व कला यांचा विलक्षण उत्कर्ष झाला. सातवाहन हाल राजा तर त्याच्या विद्याभिरुचीसाठीच प्रसिद्ध आहे. त्याने संपादिलेला 'गाथासत्ततई ' ग्रंथ महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिलेला आणि लोकजीवनाचे वर्णन करणारा भारतातला पहिलाच ग्रंथ आहे. अन्य प्राकृत भाषांत वा अन्य प्रदेशांत ग्रामीण वास्तवजीवनाचे वर्णन करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. ग्रामीण जनतेच्या जीवनावर तिच्याच भाषेत रचलेला हा अनन्य ग्रंथ होय. संस्कृतचे विख्यात इंग्रज पंडित डॉ. कीथ गाथासत्तसईविषयी म्हणतात की या काव्यातल्याप्रमाणे सामान्य जीवनाचे खरेखुरे अगदी वास्तव दर्शन संस्कृतात क्वचितच आढळते. महाराष्ट्रीय जनतेचे हेच वैशिष्ट्य आहे. आजही या लोकांच्या ठायी अशीच अकृत्रिम स्वच्छंद वृत्ती व राकट गोडवा हे विशेष तसेच दिसून येतात. (हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर, डॉ. कीथ, प्र. २२४.) डॉ. के. गोपालाचारी सातवाहनसाम्राज्याविषयी लिहिताना म्हणतात, सातवाहनसाम्राज्याचा इतिहास म्हणजे एक रम्य काव्य आहे. हा इतिहास जड नसून चैतन्याने रसरसलेला आहे. ते स्थिरचित्र नसून तो एक गतिमान चित्रपट आहे त्यातील काही प्रसंग भव्य आहेत तर काही भयानक आहेत. पण प्रत्येक चित्र जिवंत व भावपूर्ण आहे. त्यामुळे वैदिक, बौद्ध, जैन सर्व पंथीयांनी त्यांचे दिव्य पराक्रम पारंपरिक कथा व दंतकथा यांच्या रूपाने अमर करून कालांतराने शककालाचे शालिवाहन काल असे नामकरण केले यात नवल नाही ( काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी, खंड २ रा, पृ २९३ ).
सातवाहन - मूळ पुरुष
महाराष्ट्राच्या विश्वसनीय इतिहासास सातवाहनांच्या राजसत्तेपासूनच प्रारंभ होतो ही राजसत्ता सातवाहननामक पुरुषाने इ. स. पूर्व २३० च्या सुमारास स्थापन केली. पुराणात या राजवंशाची माहिती दिली आहे. ती ढोबळ मानाने पुष्कळ बरोबर आहे. पण अलीकडे स्वतः सातवाहनांची सहस्रावधी नाणी व अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासातील घटनांना पुष्कळसे निश्चित रूप देणे शक्य झाले आहे. पुराणान्वये शिशुक किंवा शिनुक हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष होता. पण अलीकडे सातवाहन या पुरुषाचे नाव असलेलीच नाणी सापडली आहेत त्यावरून सातवाहन हाच या राजवंशाचा मूळ पुरुष होय व त्याच्यावरून या वंशाला हे नाव पडले, असा सिद्धांत म. म. वा. वि. मिराशी यांनी मांडला आहे. (संशोधन मुक्तावली -सर २ रा, पृ. ६४.) त्यामुळे या वंशाला सातवाहन हे नाव कसे पडले असावे याविषयीच्या आतापर्यंतच्या सर्व उपपत्ती काल्पनिक ठरून रद्द झाल्या आहेत. प्रा. मिराशी यांच्या मते सिमुक हा सातवाहन या मूळ संस्थापकाचा नातू असावा. म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे सातवाहनांचा जो आरंभकाळ ठरतो त्याच्या मागे दोन पिढ्या तो न्यावा लागतो.
सातवाहनांच्या प्रारंभकाळाबद्दल अनेक वाद आहेत, त्याचप्रमाणे हे घराणे महाराष्ट्रीय की आंध्र, वर्णाने ते ब्राह्मण, क्षत्रिय, की शूद्र, शालिवाहनशकाशी त्यांचा संबंध जोडणे कितपत युक्त आहे, या घराण्यात मातृवंशपरंपरा होती काय याबद्दलही खूप वाद आहेत. या वादामध्ये डॉ. रा. गो. भांडारकर ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन ), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ व २), डॉ. सुखटणकर (दि होम ऑफ दि सो कॉल्ड आंध्र किंग्ज, भांडारकर इन्स्टिटयूट, व्हॉ १, सुखटणकर मेमोरियल एडिशन, पृ. २५१), स. आ. जोगळेकर ( गाथासप्तशती - प्रस्तावना आणि दि होम ऑफ दि सातवाहनाज्, ॲनल्स् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, १९१७-४२, पृ. १९६ ), डॉ. के. गोपाळाचारी (अर्ली हिस्टरी ऑफ दि आंध्र कंट्री आणि कांप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १० वे ), डॉ. डी. सी. सरकार ( दि हिस्टरी अंड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड २ रा, भारतीय विद्याभवन - मुंबई, प्रकरण १३ वे ), विद्या- सागर बखले ( राजवाडे व शालिवाहन राजे, विविध ज्ञानविस्तार, मार्च व डिसें. १९२७ ), महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ( संशोधन मुक्तावली, सर १ ला व २ रा ) अशा मोठमोठ्या पंडितांनी भाग घेतला आहे. या वादाचा तपशील येथे देण्याचा विचार नाही. वरील प्रश्नासंबंधी मला जे निष्कर्ष ग्राह्य वाटले ते त्यांच्या कारणांसह येथे द्यावे व बाकीच्यांचा जरूर तेथे फक्त निर्देश करावा असे धोरण मी अंगीकारले आहे. ज्यांना मूळ वादात शिरावयाचे आहे त्यांनी कृपया मूळ ग्रंथ पाहावे.
महाराष्ट्रीय घराणे
सातवाहन हे महाराष्ट्रीय की आंध्र आणि त्यांचे मूळस्थान कोणते हा वादाचा पहिला प्रश्न आहे. पुराणात या वंशाला आंध्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे शिलालेख व नाणी यांचा शोध लागेपर्यंत हे आंध्रप्रदेशीय म्हणजे तेलंगणातले राजघराणे आहे व त्याचे मूळस्थान त्या प्रदेशातले आहे असा समज रूढ होता. पण शिलालेख व नाणी उपलब्ध झाल्यावर सर्वच चित्र पालटले. त्यावरून असे दिसून आले की कोणत्याही शिलालेखात वा नाण्यावर सातवाहन स्वतःला आंध्र म्हणवीत नाहीत. पुराणांखेरीज चुकूनसुद्धा त्यांना कोठे आंध्र म्हटलेले नाही. खारवेल, शक, कदंब यांचे हाथीगुंफा, गिरनार, तलगुंडा येथे शिलालेख आहेत. त्यांतही 'सातवाहन' असेच या वंशाला म्हटलेले आहे, आंध्र म्हटलेले नाही. दुसरे असे की सातवाहनांचे प्रारंभीचे सर्व शिलालेख नाशिक, कार्ले, नाणेघाट, कान्हेरी या महाराष्ट्रातील गावी सापडले आहेत. त्यांच्या साम्राज्याच्या अगदी उत्तर काळातील फक्त चार शिलालेख आंध्रप्रदेशात आहेत. प्रारंभीची नाणी सापडली तीही सर्व पश्चिम हिंदुस्थानातच सापडली. वसिष्ठीपुत्र पुलुमायी याचा शिलालेख व याची नाणी आंध्रप्रांतात आहेत. हा उत्तरकालीन राजा होय. यांवरून पंडितांनी असा निष्कर्ष काढला आहे की पुराणे लिहिली गेली त्या काळी सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रप्रदेशातच शिल्लक राहिली होती; तेवढ्यावरून पुराणांनी त्यांना आंध्र ठरविले असावे. वास्तविक ते मूळचे महाराष्ट्रीय होत.
भाषा
सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते.
कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
अंदरमावळातील
स. आ. जोगळेकर यांनी आपल्या 'दि होम ऑफ सातवाहनाज' या लेखात एक मोठे अभिनव, प्रबळ व ग्राह्य असे मत मांडले आहे. पुण्याशेजारी तळेगाव दाभाडे म्हणून एक लहानसे गाव आहे. त्याच्या नजीकच्या मावळाला अंदरमावळ - आंध्र मावळ -असे म्हणतात. त्याच्या जवळून दोन मैलांवरून आंध्रा याच नावाची नदी वहाते. ती राजापुरी या कार्ल्यापासून आठ मैलांवर असलेल्या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. नदीवरून पूर्वी प्रदेशाला व लोकांनाही (सरस्वती-सारस्वत, सिंधु - हिंदु ) अशी नावे पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आंध्रा या नदीवरून त्या प्रदेशाला आंध्रमावळ व तेथल्या लोकांना आंध्र असे नाव पडले असण्याची पूर्ण शक्यता आहे. त्या परिसरात आजही आंध्रे नावाचे मराठे घराणे राहात आहे. यावरून सातवाहनांचे मूलस्थान आज अंदरमावळ म्हणून प्रसिद्ध असलेले मावळ हेच असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
डॉ. सुखटणकर यांच्या मते कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा हे सातवाहनांचे मूलस्थान होय. या जिल्ह्यातील मायाकडोनी व हिरा हदगल्ली येथील कोरीव लेखांत सातवाहनी- हार व सातवाहनी रठ्ठ असे शब्द आले आहेत, हा पुरावा ते देतात. पण बेल्लारी हे सातवाहनांचे मूळस्थान असते तर प्रारंभीच्या सातवाहनांचे अनेक कोरीव लेख तेथे उपलब्ध व्हावयास हवे होते. हे लेख आहेत ते शेवटचा सातवाहन राजा पुलमायी याचे. त्यावरून हे अनुमान काढणे सयुक्तिक नाही. कर्नाटक हा सातवाहनमाम्राज्यात होता. तेव्हा तेथे त्याचे कोरीव लेख असणे हे स्वाभाविक आहे. तेवढ्यावरून ते त्याचे मूलस्थान ठरत नाही.
स्वभूमी - कर्मभूमी
पण माझ्या मते एखादे राजघराणे वा राजकुल हे आंध्र आहे का कन्नड आहे का महाराष्ट्रीय आहे हे त्या घराण्याने स्वभूमी कोणती मानली, कर्मभूमी कोणती स्वीकारली, पिढ्यान् पिढ्या ते कोणत्या देशात राहिले, कोणत्या भूमीच्या जीवनाशी ते एकजीव झाले यावरून ठरविले पाहिजे. नेपोलियन हा इटलीजवळच्या कोर्सिका बेटातला मूळचा. पण त्याने फ्रान्स ही कर्मभूमी निवडली, फ्रेंचांसह पराक्रम केले. तो फ्रेंच झाला. आयसेन होअर, रूझवेल्ट हे मूळ जर्मन, डच असे होते. पण काही पिढ्या ही घराणी अमेरिकेत राहिली, ती त्यांनी स्वभूमी मानली व ते अमेरिकन झाले. राष्ट्रकूट घराण्याविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, या घराण्याचा मूळ राजपुरुष दंतिदुर्ग याच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्या होत्या. त्यामुळे दंतिदुर्ग महाराष्ट्रीय झाला होता. मूळचे ते घराणे लातूर या कानडी भाषी परगण्यातले होते. ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, सं. यजदानी, पृ. २५० ). भारतातल्या अनेक राजघराण्यांचे असे आहे. अनेक घराणी आपल्या शिलालेखांत आपण चंद्रसूर्यवंशी असून मधुरा, अयोध्या हे आपले मूलस्थान, असे सांगतात. पण त्यावर काही अवलंबून नाही हे उघड आहे. ती घराणी पिढ्यान् पिढ्या कोठे राहिली, त्यांनी स्वभूमी - कर्मभूमी कोणती मानली यावरून हा निर्णय केला पाहिजे. आणि या दृष्टीने पाहिले तर सातवाहन हे घराणे संपूर्णपणे महाराष्ट्रीय होते याविषयी शंका राहात नाही. त्यांची राजधानी पैठण, त्यांचे कोरीव लेख नाशिक, कार्ले, कान्हेरी या परिसरात. त्यांच्या प्रारंभीच्या राजपुरुषांच्या प्रतिमा कोरल्या आहेत त्या जुन्नरजवळील नाणेघाटात. गाथासप्तशती हा ग्रंथ वर्णन करतो ते महाराष्ट्रजीवनाचे. यावरून या घराण्याचे महाराष्ट्रीयत्व वादातीत दिसते. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण ती भाषा घेऊन ते पिढ्यान् पिढ्या अन्य प्रांतात राहिले असते तर त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे अवघडच गेले असते. कांचीचे पल्लव हे सातवाहनाप्रमाणेच मोठे राजघराणे होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. त्यांची एकंदर चार घराणी झाली. त्यांतील पहिल्या दोन घराण्यांचे काही शिलालेख प्राकृतात आहेत, काही संस्कृतात आहेत, तामीळमध्ये एकही नाही. ते शिव, विष्णू यांचे उपासक होते. त्यांनी याच देवतांची मंदिरे बांधली, तामीळ वाङ्मयातील देवतांची बांधली नाहीत. ( जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, नोव्हें. १९२२, दि ऑरिजिन अँड अर्ली हिस्टरी ऑफ दि पल्लवाज - डॉ. एस. कृष्णस्वामी आयंगार. ) तरीही तामीळनाड या भूमीत त्यांनी शतकानुशतक निवास केला व पराक्रम तेथेच केले. म्हणून ते महाराष्ट्र-भाषी असले तरी त्यांना तामीळीच मानणे युक्त होय. याच विचारसरणीने सातवाहन हे महाराष्ट्रीय ठरतात. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती या प्रमाणाने हा निर्णय जास्त दृढ होतो यात शंका नाही.
प्रारंभकाळ
यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातवाहनांच्या प्रारंभकाळाचा. अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. स. पूर्व २३६ च्या आसपास सातवाहन सत्तेला प्रारंभ झाला असे म. म. मिराशी यांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण डॉ रा. गो. भांडारकर यांच्या मते हा काळ इ. स. पू. ७३ असा आहे आणि डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते तो इ. स. पूर्व ३० पर्यंत अलीकडे येतो. डॉ. गोपाळाचारी यांनी ' सातवाहन साम्राज्य ' या आपल्या लेखात इ. पू. २३५ हा काळ निश्चित केला आहे तो मला ग्राह्य वाटतो. शकक्षत्रप रुद्रदामा याचा गिरनार येथील शिलालेख हा इ. स. १५० या वर्षांचा आहे हे बहुमान्य झाले आहे. त्यात त्याने दक्षिणापथपती शातकर्णी याचा उल्लेख केला आहे. हा शातकर्णी सातवाहन म्हणजे शिवश्री पुलुमायी होय, हेही आज बहुमान्य झाले आहे. सातवाहन वंशात एकंदर ३२ राजे होऊन गेले. त्यात शिवश्री पुलुमयी हा सव्विसावा राजा होय. पुराणात त्याच्या आधीच्या राजांच्या राजसत्तेची गणना दिली आहे; तीवरून हिशेब करता इ. स. १५० च्या मागे आपणांस इ. स. पूर्व २३५ या वर्षापर्यंत जावे लागते. जुन्नर जवळील नाणेघाटात सातवाहनांचे जे शिलालेख उपलब्ध झाले आहेत ते त्यांतील लिपीवरून (अक्षरांच्या ठेवणीवरून ) इ. स. पूर्व २०० ते २५० या काळातील असले पाहिजेत असे व्यूलर या पंडिताचे मत आहे. आणि बहुतेक संशोधकांना ते मान्य आहे, असे डॉ. केतकर म्हणतात. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला पृ. ४०८ व ४०९ ) वर उल्लेखिलेल्या 'काँप्रिहेनसिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथात डॉ. जे. एन. बॅनर्जी यांनी 'उत्तर व पश्चिम भारतातील क्षत्रपसत्ता' हे प्रकरण लिहिले असून त्यात त्यांनी डॉ. के. गोपळाचारी यांच्याच मताला पुष्टी दिली आहे. सातवाहनसत्तेच्या अखेरीविषयी फारसे मतभेद नाहीत. तेव्हा इ. स. पूर्व २३५ ते इ. स. २२५ हा सातवाहन राजवंशाचा सत्ताकाळ होय, हे डॉ. के. गोपाळाचारी यांचे मत मान्य होईल असे वाटते. मूळ कुळपुरुष सातवाहन हा अर्थातच इ. पू. २३५ पूर्वीचा होय.
ब्राह्मण-क्षत्रिय ?
सातवाहन हे राजे वर्णाने ब्राह्मण होते की क्षत्रिय होते की शूद्र होते, हा प्रश्न बराच वादग्रस्त आहे. दंतकथा व पुराणे याअन्वये, मूळ सातवाहन हा ब्राह्मण स्त्री व नागपुरुष यांच्यापासून झाला, असे आहे. पण नाशिक येथील गौतमी बलश्री ( महाराज गौतमीपुत्र सातकर्णी याची माता ) हिने कोरविलेल्या लेखात आपल्या पुत्राचा 'एक ब्राह्मण', 'क्षत्रियदर्पमानमर्दन' असा गौरव केला आहे. 'एक बाह्मण' 'खतियदपमानमदन' असे मूळ शब्द आहेत. त्याचप्रमाणे तिने स्वतःला ' राजर्षि- वधू' असे म्हणविले आहे. यांवरून दंतकथा अगदीच त्याज्य होत, यात शंका नाही. पण वरील पदव्यांवरून निरनिराळे वाद निर्माण होतात, हेही खरे आहे. 'एक बह्मण' याचा ' असामान्य ब्राह्मण' असा सेनार्ट याने अर्थ केला आहे व 'ब्राह्मण या नावाला एकमेव योग्य ' असा बुल्हरने केला आहे. डॉ. भांडारकर 'ब्राह्मणांचा एकमेव प्रति- पालक' असा अर्थ घेतात. तो जास्त संयुक्तिक वाटतो. गौतम बलश्री स्वतःला राजर्षि- वधू म्हणविते. यावरून त्या घराण्याचे क्षत्रियत्वच सिद्ध होते. म्हणून डॉ. भांडारकरांचा अर्थ ग्राह्य वाटतो. पण ' खतिय-दप - मान-मदन' अशीही गौतमीपुत्राला पदवी आहे. ती वरील अनुमानाच्या विरुद्ध जाते. पण तेथे ' खतिय' याचा अर्थ सर्व क्षत्रिय राजे असा घेण्याचे कारण नाही. क्षत्रिय ही एक त्या काळी स्वतंत्र जमात असू शकेल. त्या काळी शूद्र हेही एका वर्णाचे नाव नसून जमातीचे नाव असल्याचे उल्लेख आहेत. डॉ. जयस्वाल यांच्या मते, येथे खतिय हे एका जमातीचे नाव मानणं युक्त आहे. सध्या खत्री नावाची जमात मुंबई प्रांतात व अन्यत्रही आहे. डॉ. कुमारी भ्रमर धोप यांनी 'दि कास्ट ऑफ दि सातवाहन रूलर्स आफ दि डेक्कन' या आपल्या लेखात वरील विवेचन करून, सातवाहन क्षत्रिय होते, असे अनुमान काढले आहे. ( इंडियन कल्चर-ऑक्टो. १९३४, पृ. ५१३. शूद्र ही एक जमात होती, असे त्याच अंकात बी. सी. लॉ यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. पृ. ३०४.) मनूने शकयवनपल्हवपारद यांना संस्कारलोपामुळे शूद्रत्व पावलेले क्षत्रिय असे म्हटले आहे. गौतमीपुत्राने शकांचा निःपात केला. तेव्हा त्यांना उद्देशूनही ' खतिय' हा शब्द वापरलेला असण्याचा संभव आहे. या सर्वावरून सातवाहन हे क्षत्रिय असावे असे मानण्याकडे कल होतो. तरी हा प्रश्न वादग्रस्त असून त्याचा समाधानकारक निर्णय लावता येत नाही हे खरे आहे. पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. जुन्या परंपरेप्रमाणे व पुराणांन्वये नंदवंश व मौर्यवंश यांचे संस्थापकही शूद्र होते. प्राचीन काळातले अनेक ऋषिमुनी अगदी हीनवंशीय होते. तेव्हा सातवाहन हे शूद्र होते असे ठरले तर त्यात खेदजनक असे काही नसून, हीनकुलीन पुरुषही इतक्या थोर पदवीला त्या काळात जाऊ शकत असत, त्यांच्या कर्तृत्वाला द्विजांइतकाच तेव्हा अवसर व मान होता, असे त्यावरून ठरत असल्यामुळे त्या काळच्या समाजरचनेला ते भूषणावह होते असेच मानावयास पाहिजे.
मेवाडच्या गोहिल किंवा गोहिलोट वंशातील राजांचे जे शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत त्यांवरून प्राचीन काळच्या घराण्यांचे ब्राह्मणत्व वा क्षत्रियत्व निश्चित करणे किती अवघड आहे व त्यामुळेच व्यर्थ आहे हे दिसून येते. शक्तिकुमार या गोहिलोटवंशीय राजाचा इ. स. ९७७ मधला शिलालेख ऐतपूर येथे सापडला आहे. त्यात म्हटले आहे की या वंशाचा मूळपुरुष गुहदत्त हा विप्रकुलानंदन महीदेव ( ब्राह्मण ) होता. चितोडचा इ. स. १२७४ चा लेख सांगतो की बाप्पारावळ हा विप्र होता. अचलेश्वरचा १२८५ चा लेख म्हणतो की बाप्पाने ब्रह्मतेज टाकून क्षात्रतेज स्वीकारले. चितोडच्या १२७४ च्या लेखात राजा अंबाप्रसाद याचे वर्णन आहे की तो भृगुपती परशुराम याप्रमाणे महातेजस्वी असून क्षत्रसंहारकारी होता. हा क्षत्रिय राजा असून तो क्षत्रसंहारकारी होता या म्हणण्याचा अर्थ काय ? पण म्हणून त्याला व त्याच्या घराण्याला ब्राह्मण म्हणावे तर अनेक लेखांत त्यांना क्षत्रियही म्हटले आहे. अंबाप्रसादाचा एक पूर्वज नरवाहन याला क्षत्रक्षेत्र म्हटले आहे. या घराण्याच्या सोयरिकी राष्ट्रकूट, चाहमान, परमार यांशी होत असत. आश्चर्य असे की प्रतीहार, चाहमान, परमार या कुळांनीही आपण ब्राह्मण असल्याचा दावा केलेला काही लेखांत आढळतो. इ. स. ८३७ चा जोधपूर येथील प्रतीहार वौक याचा लेख, आणि इ. स. ११६९ चा बिजोलिया येथील सोमेश्वर चाहमानाचा लेख याची साक्ष देतील. ( जी सी. रायचौधरी, गुहिलोट ऑरिजिन्स, देवदत्त भांडारकर व्हॉल्यूम, पृ. ३११–१६.)
मातृवंशपद्धती ?
सातवाहन घराण्यात मातृवंशपद्धती होती, मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, असे एक मत आहे. डॉ. केतकर व इतिहासाचार्य राजवाडे या मताचे पुरस्कर्ते आहेत. या घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुमायी अशी मातेचा निर्देश करणारी नावे दिसतात. यावरून या कुळात मातृवंशपद्धत होती असे राजवाडे म्हणतात. (राधामाधवविलासचंपू, पृ. १८० ) त्यांच्या मते मगधातून आलेल्या महाराष्ट्रिकांनी महाराष्ट्र बसविला. त्यांच्यात ही पद्धत नव्हती. यावरून सातवाहन हे. त्यांच्यात मातृवंशपद्धती असल्यामुळे, महाराष्ट्रीय नव्हत असेही राजवाडे म्हणतात डॉ. केतकरांनी गौतमीपुत्र, वसिष्ठीपुत्र इ. नावांचा आधार घेतलाच आहे. शिवाय भावाच्या घरी राहात असलेल्या एका ब्राह्मणविधवेला शेषापासून सातवाहन हा मुलगा झाला या दंतकथेचाही आधार त्यांनी घेतला आहे. शिवाय कोचीन, मलबार या प्रदेशांत स्त्री माहेरीच भावाजवळ राहाते, पती वरचेवर बदलते, पतीच्या घरी जात नाही अशी जी रुढी आहे, तिचा निर्देश केला आहे. सर्वात आश्रर्याची गोष्ट म्हणजे या दोघाही थोर पंडितांनी प्रत्यक्ष सातवाहनांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. पुराणे व कोरीव लेख यांच्या आधारे त्यांचा जो इतिहास दिसतो त्यावरून असे दिसते की प्रत्येक ठिकाणी पित्यामागून पुत्रच गादीवर आला आहे. चुकूनमुद्धा याउलट दिसत नाही. नागनिका, गौतमीवलश्री या स्त्रिया आपल्या पतीच्या घरीच रहात होत्या. आपले पती, पुत्र, नातू यांच्याशी असलेले नातेच त्या अभिमानाने सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर तापसीव्रताने जन्मक्षेप करतात. अशा स्थितीत या घराण्यात मातृकन्यापरंपरा होती, मातृ सत्ताककुटुंबपद्धती होती, ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र भाग २ रा, पृ. ५१ ) अशी विधाने करणे युक्त नाही.
डॉ. गोपाळाचारी यांनी आपल्या प्रबंधात विस्तृत विचार केला आहे. ते म्हणतात, सातवाहन घराण्यात ही मातेवरून निर्देश करण्याची पद्धत गौतमीपुत्रापूर्वी नव्हती. पुढे ती त्यांच्या घराण्यात दिसून येते. तशीच महारष्ट्रातील महारथी महाभोज या घराण्यातही दिसून येते. वेदकाळातील कौशिकीपुत्र, आलंबीपुत्र अशी मातृनिर्देश करणारी नावे आढळतात. बौद्धवाङमयातही वैदेहीपुत, मोगलीपुत अशी नावे ठेवण्याची पद्धत दिसते. माळव्यातल्या अनेक शिलालेखांत असा मातेवरून केलेला पुत्राचा निर्देश दिसतो. बुल्हरच्या मते आजही रजपुतांत अशी चाल आहे. कदाचित राजाला अनेक राण्या असतात, त्यामुळे पुत्राचा निर्देश करताना मातेचा निर्देश करण्याची पद्धत पडली असेल; पण त्यावरून त्या घराण्यात मातृसत्ताकपद्धती किं मातृवंशपद्धती होती असे म्हणण्याला अर्थ नाही.
शालिवाहन शक ?
सध्या दक्षिणेत शालिवाहन शक रूढ आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने तो स्थापिला असे स. आ. जोगळेकर म्हणतात. श्री. जी. बोस यांचेही तसेच मत आहे. पण हे मत टिकण्याजोगे नाही. गौतमीपुत्राने तो स्थापिला असता तर त्याच्या पुढील सातवाहनांनी तो आपल्या कोरीव लेखांत निश्चित योजिला असता. त्यांनी तर तो नाहीच योजिला, पण पुढे शकगणना ज्यांनी स्वीकारली त्यांनीही तिचा फक्त शककाल असाच उल्लेख केला आहे. शालिवाहन हे नाव तिच्याशी जोडले गेले ते इ. स. एक हजारनंतर ! पण शालिवाहन - सातवाहन - या नावाशी शककालगणना संलग्न झाली आहे व धर्मकृत्यांतही ती मानलेली आहे. तेव्हा बऱ्याच उत्तरकाळी मूळ शकराजांनी स्थापिलेल्या या गणनेला कोणीतरी शालिवाहनाचे नाव देऊन ती पावन करून घेतली असली पाहिजे, असे म्हणावे लागते. म. म. मिराशी, डॉ. के. गोपाळाचारी यांचे असेच मत आहे.
स्वराज्यस्थापना
वर सांगितकेच आहे की अशोकाच्या मृत्युच्या सुमारास सातवाहननामक पुरुषाने महाराष्ट्रातील प्रतिष्ठान या नगरीत सातवाहनसत्तेची स्थापना केली. मौर्य साम्राज्य दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. अर्थात महाराष्ट्राचा त्यात अंतर्भाव असलाच पाहिजे असे काही पंडितांना वाटते. अपरान्त म्हणजे उत्तर कोकण यावर मोर्यसत्ता होती याबद्दल वाद नाही. पण अशोकाचे शिलालेख महाराष्ट्रात नाहीत यावरून त्याची सत्ता महाराष्ट्रावर नसावी, असे डॉ. केतकर म्हणतात. मात्र त्यांचे धर्मप्रसारक महाराष्ट्रात पोचले होते हे त्यांना मान्य आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, प्रकरण ४४ वे.) पण याविषयी निश्चित असे काही सांगणे कठीण आहे. सातवाहन हे मौर्याचे मांडलीक होते, असेही एक मत आहे. पुराणात त्यांना कोठे आंध्र म्हटले आहे, कोठे आंध्रभृत्यही म्हटले आहे. आंध्रभृत्य हा समास कर्मधारय करून तो आंध्र हेच भृत्य, असा काही पंडित सोडवितात. आणि सातवाहन हे मूळचे आंध्र होते व ते मौर्यांचे भृत्य होते म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटले असावे, असे अनुमान करतात; पण यालाही निश्चित असा पुरावा काही नाही. सातवाहन या राजाने अशोकाच्या अखेरीच्या काळात आपले स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन केले एवढेच. त्याची जी नाणी अलीकडे सापडली आहेत त्यांच्या आधारे, आपणास आज म्हणता येते. हे राज्य स्थापिताना त्याला मौर्यसत्तेशी लढावे लागले असा कोठेही उल्लेख नाही. असा काही लढा झाला नाही यावरून मौर्यांचे साम्राज्य महाराष्ट्रात नसावे किंवा असल्यास या वेळी ती सत्ता अगदी दुर्बळ झाली असावी असे अनुमान करावे लागते.
मूळ संस्थापक श्री सातवाहन याचा पुराणात किंवा कोणत्याही शिलालेखात उल्लेख नसल्यामुळे त्याच्याविषयी अधिक काहीच माहिती उपलब्ध नाही. १९४५ साली त्याची नाणी सापडली तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचीही कोणास माहिती नव्हती. त्या नाण्यांमुळे तो मूळ संस्थापक होता हे कळले हेच विशेष होय. पुराणांनी व शिलालेखांनी उल्लेखिलेल्या या वंशातील पहिला राजा म्हणजे सिमुक सातवाहन हा होय. नाणेघाटातील कोरीव लेखात त्याची भग्नप्रतिमाही आहे. तिच्याखाली 'राया सिमुक सातवाहनो सिरिमातो' असा त्याचा निर्देश आहे. मौयसत्ता ज्या कोणत्या रूपात होती ती नष्ट करून त्याने स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळी त्याला रथिक व भोज या जमातींची फार मदत झाली, म्हणून त्याने स्वतः राया ही पदवी स्वीकारली त्यावेळी त्यांच्या प्रमुखांना महारथी ही पदवी दिली व त्यांच्याशी सोयरीकही केली. त्याने एकंदर इ. पू. २३५ ते इ. पू. २१३ असे तेवीस वर्षे राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार हा शिवछत्रपतींच्या प्रारंभीच्या विस्ताराइतका अल्प, प्रतिष्ठानच्या आसपासच्या परिसरापुरताच असणार हे उघड आहे.
साम्राज्य
सिमुकानंतर त्याचा भाऊ कान्ह अथवा कृष्ण हा गादीवर आला. त्याने आपल्या अठरा वर्षांच्या कारकीर्दीत राज्यविस्ताराचेच धोरण पुढे चालवून नाशिकपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्याच्यामागून सिमुकाचा पुत्र सिरी सातकणी - श्री सातकर्णी हा सत्तारूढ झाला. सातवाहन कुलात सम्राटपद प्रात करून घेणारा हा पहिला महाराजा होय. या वेळी उत्तरेत राजसत्ता ढिली झाली होती. डेमिट्रियस या बॅक्ट्रियाच्या ग्रीक राजाने अयोध्येपर्यंत आपली ठाणी वसविली होती. आणि सर्वत्र बौद्धधर्मातील अहिंसा तत्त्व प्रबळ झालेले असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिकार करीत नव्हता. मगधसम्राट बौद्धधर्मनिष्ठ असल्यामुळे व त्यांनाही शस्त्रविजयापेक्षा धम्मविजयच श्रेष्ठ वाटत असल्यामुळे सर्व उत्तर भारत निर्वीर झाला होता. आणि महाराष्ट्रात श्री सातकर्णी, कलिंगात खारवेल व मगधात पुष्यमित्र हे कर्तेपुरुष निर्माण झाले नसते तर सर्व भारत यवनांनी - ग्रीकांनी आक्रमिला असता. या सर्वात सातकर्णीने आघाडी मारून उत्तरेत चाल केली व पश्चिम माळवा, अनूप - ( नर्मदेचे खोरे) आणि विदर्भ आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. हे प्रदेश त्याने घेतले ते मौर्यसाम्राज्यातून. पण यावेळी मौर्य अगदी निष्प्रभ झाले होते. तेव्हा अयोध्येपर्यंत आलेल्या यवनांनी सहज गिळंकृत केले असते. सातकर्णीने ते घेतले म्हणूनच वाचले.
कलिंगराज खारवेल
या वेळी खारवेल हा एक अत्यंत प्रबळ राजा कलिंगाधिपती झाला होता. अशोकाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी चेदीवंशातील महामेघवाहन या पुरुषाने मौर्य साम्राज्याचे जू झुगारून देऊन कलिंग प्रदेश स्वतंत्र केला होता. खारखेल हा त्याचाच पुत्र किंवा नातू होय. भुवनेश्वराजवळील उदयगिरीवर हाथीगुंफानामक लेण्यात याच्या पराक्रमाचा दीर्घ शिलालेख आहे. त्यावरून असे दिसते की याने मगध साम्राज्यावर तीन वेळा स्वारी केली होती आणि एका स्वारीत मौर्यसम्राटाला पायाशी लोळवून तेथून अपार लूट कलिंगाला नेली होती. दुसऱ्या स्वारीचे कारण डेमिट्रियस हे होते. मौर्य- सम्राट बृहद्रथ हा त्याचा मुळीच प्रतिकार करीना. तेव्हा तो पाटलीपुत्रावर चाल करून येणार असा रंग दिसू लागला. म्हणून खारवेलानेच आधी चढाई केली. काही पंडितांचे मत असे की या स्वारीत त्याने डेमिट्रियसचा पराभव करून त्याला सिंधूपार पिटाळून लावले. दुसरे मत असे की डेमिट्रियसच्या स्वतःच्या बॅक्ट्रियाच्या राज्यातच शुक्रेडायटीम या प्रतापी पुरुषाने बंड केल्यामुळे त्याला घाईने परत जावे लागले. आणि खारवेलाच्या भीतीने तो पळून गेला असे श्रेय खारवेलाला उगीचच मिळाले. हा राजकीय पट पाहताना आपण एवढेच ध्यानात घ्यावयाचे की अशोकाने अहिंसा व धम्मविजय यांच्यापायी, चंद्रगुप्त मौर्याने उभारलेली समर्थ व कार्यक्षम राज्ययंत्रणा ढिली केली आणि लोकांतही बौद्धधर्माचा प्रसार केला. त्यामुळे मौर्यसाम्राज्य-राजे - आणि लोकही दुबळे होऊन गेले होते, आणि ते सर्वांचे भक्ष्य बनले होते. प्रतिकार असा तेथे कोणी करीतच नव्हता. त्यामुळे वायव्येकडून येणाऱ्या यवन आक्रमकांना पाटलीपुत्रापर्यंत सहज घुसता आले. पण त्याच वेळी सातकर्णी व खारवेल हे उदयास आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
महाराष्ट्रावर स्वारी
खारवेल हा मोठा प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुष होता. मगधाची लूट केल्यानंतर त्याने आपली दृष्टी सातवाहन साम्राज्याकडे वळविली आणि मूषिकनगरापर्यंत एक प्रचंड सेना धाडली. हे नगर कोणाच्या मते वाईनगंगेच्या तर कोणाच्या मते कृष्णेच्या तीरी आहे. याच वेळी खारवेलाला फार मोठा जय मिळाला असे हाथीगुंफेच्या लेखात वर्णन आहे. पण पंडितांच्या मते तसे काही झाल्याचे दिसत नाही. पुढील वर्षी वऱ्हाड, खानदेश व अहमदनगर या प्रदेशांवर खारवेलाने स्वारी केली, तेव्हा मात्र त्यास मोठा जय मिळाला हे सर्वमान्य आहे. खारवेल हा जैनधर्मी होता. पण एकतर तो धर्मसहिष्णू होता आणि दुसरे म्हणजे त्या धर्मातील अहिंसा तत्त्व त्याने राजकारणापासून दूर ठेविले होते; म्हणूनच त्याला एवढे पराक्रम करून यवन आक्रमणाला पायबंद घालता आला.
अश्वमेधकर्ता
श्री सातकर्णीच्या साम्राज्यावर खारवेलाचे दोनदा आक्रमण झाले तरी त्याने ते तत्काळ मोडून काढले, असे दिसते. कारण त्याने आपल्या अकरा वर्षांच्या लहानशा कारकीदींत ( इ. पू. १९४ ते इ. पू. १८५ ) दोनदा अश्वमेध यज्ञ केला आणि एकदा राजसूय यज्ञ केला. हे यज्ञ व अग्न्याधेय, अन्वारंभणीय, गवामयन, आप्तोर्याम, अंगिरसामयन, छंदोग - पवमान, अतिरात्र, दशरात्र, त्रयोदशरात्र इ. त्याने जे इतर अनेक यज्ञ केले, त्यांवरून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार करूनच त्याने साम्राज्य–विस्तार केला हे उघड आहे. दीर्घकालपर्यंत महाराष्ट्रात बौद्धवर्चस्व प्रस्थापित झाले होते. सातवाहनांनी ते नष्ट करून विजीगिषू, विश्वविजयी, साम्राज्यकांक्षी वैदिक धर्माचा पुनरुद्धार केला हे त्यांचे फार मोठे कार्य होय. श्री सातकर्णी याची राणी नायनिका अथवा नागनिका हिने जुन्नरजवळील नाणेघाटात जो मोठा लेख कोरविला आहे, त्यावरून सातवाहन हे वैदिकधर्मीय व हिंदु परंपरेचे अभिमानी होते हेच दिसून येते. त्या लेखात इन्द्र, संकर्षण, वासुदेव यांना प्रारंभी नमन आहे. नंतर यम, वरुण, कुबेर, वासव यांना नमन आहे. वर ज्या यज्ञांचा उल्लेख केला आहे त्यांत प्रत्येक वेळी ब्राह्मणांना किती गायी, अश्व व धन दक्षिणा दिली ते नमूद केलेले आहे. यावरून याविषयी संशयाला जागा कोठे राहात नाही.
नायनिका
सातकर्णीची राणी देवी नायनिका हिची म. म. मिराशी हे भारतवर्षातील महनीय स्त्रियांत गणना करतात. महाराष्ट्रात त्या वेळी अनेक नागसरदार होते. ते महारठी ही पदवी धारण करीत. सिमुक सातवाहनानेच त्यांना या पदव्या दिल्या होत्या, हे वर सांगितलेच आहे. अशाच एका महारठी त्रणकयिरो नावाच्या सरदाराची नायनिका ही कन्या होती. वेदिश्री, सतिश्री, हकुश्री या तिच्या पुत्रांचे पुतळेही नाणेघाटात आहेत. सातकर्णी मृत्यू पावला त्या वेळी कुमार वेदश्री हा लहान होता. त्यावेळी आपल्या पित्याच्या साह्याने देवी नायनिकेने साम्राज्याचा कारभार उत्तम चालविला. पतिनिधनानंतर तापसीव्रताने ती राहात असे, असे शिलालेखात तिने वर्णन आहे. तापसीव्रताने राहून राज्यकारभार करणाऱ्या या महाराणीचे वर्णन वाचून देवी अहल्याबाईचे वाचकांना सहज स्मरण होईल.
पुष्यमित्र शुंग
सम्राट श्री सातकर्णी इ. पू. १८५ या वर्षी मृत्यू पावला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४ साली मगधात राज्यक्रान्ती झाली. अशोकानंतरचे राजे दुबळे व प्रतिकारशून्य असल्याने साम्राज्याची वाताहात होत होती आणि सर्वत्र बजबज माजून प्रजेत अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. यावनी आक्रमणाची भीती तर सारखी वाढतच होती. अशा वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो मौर्यसम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. एकदा संचलनाचे वेळी उठावणी करून त्याने बृहद्रथाला ठार मारले व आपण सम्राटपद धारण करून आपल्या शुंगवंशाची स्थापना केली. या पुष्यमित्राने खुद्द पाटलीपुत्रातच अश्वमेध केला व दुबळ्या, निवृत्तिप्रधान बौद्धधर्माला बाजूस सारून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. या शुंगवंशाने इ. पू. १८४ ते इ. पू. ७२ असे ११२ वर्षे राज्य केले.
विदिशेपर्यंत
पहिल्या सातकर्णीनंतर तेवढाच पराक्रमी सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी हा होय. त्याने इ. स. १६६ पासून इ. पू. १११ पर्यंत म्हणजे ५६ वर्षे राज्य केले; आणि सातवाहन साम्राज्याला दृढता व स्थैर्य प्राप्त करून दिले. पहिल्या सातकर्णीने पश्चिम माळवा जिंकला होता. याने पूर्व माळवाही जिंकला. विदिशेला (भिलसा ) एका शिलालेखात सातकर्णीचा उल्लेख आहे तो याचाच असावा असे पंडितांचे मत आहे. साची येथील महाद्वारावर सातकर्णीच्या पदरी असलेला शिल्पकार वसिष्ठीपुत्र आनंद याचा दानविषयक एक लेख कोरलेला आहे. त्यावरून तेथपर्यंत सातवाहनसत्ता स्थिर झाली होती असे दिसून येईल. डॉ. केतकरांच्या मते, प्रयागजवळच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रा- शिक्के- या सातवाहनांच्या व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. तसे असले तर सातवाहनसाम्राज्य तेथपर्यंत पोचले होते असा अर्थ होईल. पण त्या मुद्रा वाकाटकांच्या आहेत असे डॉ. जयस्वाल यांचे मत आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, डॉ. केतकर, पृ. ३९९.)
वीर विक्रम ?
कालकाचार्यांच्या कथेतला वीर विक्रम म्हणजे हा दुसरा सातकर्णीच होय असे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांचे मत आहे. कालक हे जैन आचार्य. ते धर्मप्रसारार्थ उज्जयिनीस आले असता तेथील राजा गर्दभिल्ल तथा गंधर्वसेन याने त्यांची बहीण सरस्वती हिचे हरण केले. तिची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर आचार्यांनी शकराजांना उज्जयिनीवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिले. ( भारतीयांनी हीच परंपरा आजपर्यंत अखंडपणे चालविली आहे. ) त्याप्रमाणे बोलनघाटातून येऊन शक उज्जयिनीवर कोसळून पडले, त्यांनी गंधर्वसेनाचा नाश करून सरस्वतीची सुटका केली. पण काम झाल्यावर ते परत जाईनात. त्यांनी माळव्याचे राज्य बळकावले व प्रजेवर ते अनन्वित अत्याचार करू लागले. कालकाचार्यांचीही ते अप्रतिष्ठा करू लागले. तेव्हा त्यांचा उच्छेद करण्याच्या हेतूने सातवाहन राजाची मदत मागण्यासाठी आचार्य प्रतिष्ठानास आले. सातवाहन राजाने त्यांची मागणी मान्य केली व सेना घेऊन तो माळव्यात गेला व त्याने मालवगणांच्या मदतीने शकांना पिटाळून लावले. हा सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी होय, असे जोगळेकर म्हणतात. त्यांच्या मते मूळ कथेतला वीर विक्रम तो हाच होय. मात्र संवतकर्ता जो विक्रमादित्य त्याच्याशी ते याचा संबंध जोडीत नाहीत.
सातकर्णीने कालकाचार्यांच्या विनंतीवरून माळव्यात जाऊन शकांचा उच्छेद केला या घटनेला थोडा विश्वसनीय पुरावा सध्या उपलब्ध झाला आहे. जैनांचे पर्युषणपर्व श्रावणात असे ते कालकाचार्यांनी बदलून भाद्रपदात आणले असा इतिहास आहे. 'युग प्रधानस्वरूप ' या जैन ग्रंथाप्रमाणे हे कालकाचार्य इ. स. पू. १७१च्या सुमारास होऊन गेले. दुसऱ्या सातकर्णीचा हाच काळ आहे. आणि जैन कालकाचार्यकथेप्रमाणे हेच आचार्य प्रतिष्ठानला सातवाहन राजाकडे आले होते. यामुळे जोगळेकरांचे अनुमान खरे असावे असे वाटते.
पहिल्या सातकर्णीविषयीही जोगळेकरांनी थोडी निराळी माहिती दिली आहे. त्यांच्या मते पुष्यमित्राने मिनँडर - मिलिंद - या बौद्धधर्मी ग्रीक राजाचा पराभव केला व त्याला सीमापार केले, त्या वेळी त्याला या सातकर्णनि साह्य केले होते. पहिल्या सातकर्णीचा मृत्यू इ. पू. १८५ या साली झाला असे वर दिले आहे. पुष्यमित्राचा उदय त्यानंतर एक वर्षाने म्हणजे इ. पू. १८४ साली झाला व त्याने मिनेडरचा उच्छेद इ. पू. १७५ साली केला असे एक मत आहे. तेथपर्यंत सातकर्णी जिवंत होता असे जोगळेकर मानतात.
कुलव्रत
जोगळेकरांचे मत मान्य केले तर परकी आक्रमकांचा उच्छेद करणे हे सातवाहन कुलाचे प्रारंभापासूनच व्रत होते असे दिसून येईल. पहिल्या सातकर्णीने वर सांगितल्याप्रमाणे माळव्यात जाऊन शकांचे निर्दाळण केले आणि इ. सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने महाराष्ट्रातील शकसत्ता नाश करून टाकिली हे तर सर्वमान्यच आहे. सातवाहनकुलाचे हे वैभव अपूर्व होय यात शंका नाही.
हाल - गाहासत्तसई
दुसरा सातकर्णी हा सहावा सातवाहन राजा होय. त्यानंतर पुढच्या १४ राजांनी नावे पुराणात आहेत. पण लंबोदर, आपीलक व कुंतल सातकर्णी यांच्या त्रोटक माहितीपलीकडे पुराणांनी काहीच दिलेले नाही. पण मधल्या एकदोन राजांची माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे. उत्तरेन शुंगसत्ता इ. पू. १८० ते इ. पू. ७२ पर्यंत होती. शुंगांना एका सातवाहन राजानेच सत्ताच्युत केले, असे एक मत आहे. हा सातवाहन म्हणजे पूर्णाेत्संग असावा असे जोगळेकर म्हणतात. शुंगानंतर काण्व वंशाने ४५ वर्षे म्हणजे इ. पू. २७ पर्यंत मगधावर राज्य केले. त्या साली सातवाहन सम्राटाने काण्वांना पदच्युत करून आपली सत्ता स्थापन केली. हा सम्राट बहुधा पुलुमायी असावा. पुराणांनी मगधापर्यंत साम्राज्यविस्तार करण्याचे श्रेय सिमुकाला म्हणजे सातवाहन सत्तेच्या मूळ संस्थापकाला दिले आहे, पण ते चूक आहे. कारण सिमुकाचा काळ यापूर्वी दोनशे वर्षांचा आहे. म्हणून त्या वेळचा सम्राट पुलुमायीच असावा असे वाटते. त्यानंतरचा प्रसिद्ध सातवाहन सम्राट म्हणजे हालराजा होय. याचा काळ इ. स. २१ असा मानला जातो. सातवाहनांविषयी कसलीच गंधवार्ता नव्हती तेव्हा याचे नाव मात्र संस्कृत व प्राकृत साहित्यात गाजत होते. त्याचे कारण म्हणजे त्याने रचलेला गाथासप्तशती - गाहासत्तसई - हा काव्यग्रंथ होय. कवी कोऊहलाने रचलेला महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्याचा - लीलावईचा - हाच नायक होय हे मागे सांगिलेच आहे. त्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे, पण ते सर्व अद्भुतात जमा होणारे व दंतकथांवर आधारलेले आहे. इतिहासात त्याला स्थान देता येणार नाही. हालाच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे वर्णन सातवाहनकालीन साहित्याच्या वर्णनात येईलच.
गौतमीपुत्र
हाल सातवाहनानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचे चरित्र सांगावयाचे. ज्याचे यशोवर्णन करताना कवींना स्फूर्ती यावी, इतिहासकारांना अभिमान वाटावा व या भूमीला कृतज्ञतेने ज्याचे स्मरण राहावे असा हा सम्राट होता. सातवाहन कुलातील हा सर्वश्रेष्ठ राजा होय. मुस्लीम आक्रमणापासून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव जितक्या आदराने व भक्तिभावाने आपण घेतो तितक्या आदराने व भक्तिभावाने ज्याचे नाव घ्यावे असा महाराज, राजराज गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा राजा होऊन गेला. शकपल्हव यांनी केवळ भारतावरच नव्हे, तर पाश्चात्य जगावरही आक्रमण केले होते, आणि देशचे देश बेचिराख केले होते. सातवाहनांच्या साम्राज्यावरही इ. सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शकांची टोळधाड कोसळली. त्यांची धडक एवढी प्रचंड होती की काही काल हे बलशाली साम्राज्यही मूळापासून हादरले. पण गौतमीपुत्राचा उदय झाला व त्याने या शकांचे निर्दाळण केले. नाशिक येथे या महापुरुषाची माता गौतमी बलश्री हिने आपल्या प्रियपुत्राची प्रशस्ती, मोठा लेख कोरून, चिरंतन करून ठेविली आहे. त्यात क्षहरातवंश निरवशेषकर, शकपल्हवनिषूदन, त्रिसमुद्रतोयपीतवाहन, असा त्याचा गौरव केला आहे तो अगदी सार्थ आहे.
ग्रीकयवनांची जी भारतावर आक्रमणे झाली त्यांचा चंद्रगुप्त मौर्य, खारवेल व पुष्यमित्र शुंग यांनी निःपात केला, याचा निर्देश वर जागजागी आलाच आहे. यवनांच्या नंतर शकांच्या टोळधाडी भारतावर येऊ लागल्या. त्यानंतर युएची अथवा कुशान या रानटांचे आक्रमण झाले. त्यांनी तर दीर्घकालपर्यंत उत्तर भारतावर साम्राज्य स्थापिले होते. ते संपुष्टात आल्यावर हूणांच्या टोळधाडी येऊ लागल्या. पण भारतातले लोक त्या काळी समर्थ व पराक्रमी होते. त्यामुळे ही आक्रमणे त्यांनी निर्दाळून त्या आक्रमकांचा निःपात केला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक विजय मिळवून भारतीय समाजात व संस्कृतीत त्यांना संपूर्णपणे विलीन करून टाकले. शक लोक अशा क्रूर, रानटी जमातींपैकीच होते. उत्तरेत शुंगांनंतर समर्थ अशी राजसत्ता न राहिल्यामुळे त्यांना तेथे भराभर जय मिळाले व तेथे आपली राज्ये स्थापून ते नंतर दक्षिणेत घुसले. पण तेथे त्यांना गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलमायी, श्री यज्ञ सातकर्णी, असे प्रतापी सातवाहन सम्राट भेटले. त्यांनी दक्षिणेतून त्यांच्या सत्तेचे निर्मूलन करून टाकले.
यवन, शक, कुशाण ( युएची ) व हूण या चार जमाती इ. स. चौथ्या शतकापासून इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मधूनमधून आक्रमणे करीत होत्या. यांतील यवन हे ग्रीक होत. ते सुसंस्कृत होते. पण बाकीच्या तीन जमाती या रानटी होत्या. भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर एकापलीकडे एक थेट चीन देशापर्यंत शक- कुशाणांची वसतिस्थाने होती. भूगर्भात असलेल्या लाव्हारसासारखीच यांची स्थिती होती. मधूनमधून यांच्यातील अंतराची आग भडकत असे आणि मग यांच्या पाशवी शक्तीचे उद्रेक होऊन जग कंपायमान होई. इ. स. पूर्व पहिल्या शतकात हूणांची टोळधाड कुशाणांवर व त्यांची शकांवर कोसळून शक हे लाव्हाच्या लोंढ्यासारखे भारतात घुसले. त्यांच्या मागोमाग कुशाण हेही आत लोटले व त्यांनी उत्तर भारतावर सम्राज्यच स्थापन केले. शकांना साम्रज्यस्थापनेची ऐपत नव्हती. ते भारतात आधी आले, पण कुशाणांचे ते क्षत्रप–सरदार, सुभेदार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातील एका क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने प्रथम काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात आपली सत्ता स्थापन केली नव्हती. नहपान हा याचा मुलगा किंवा वंशज होता. हा व याचा जावई उपवदात ( ऋषभदत्त ) यांनी आपली सत्ता पुष्कळच वाढविली. त्यांनी माळवा आक्रमिला, नर्मदेचे खोरे जिंकले व ते महाराष्ट्रात उतरले. या वेळी म्हणजे इसवी सन १२५ च्या सुमारास मंदालक, पुरींद्रसेन हे प्रतिष्ठानच्या गादीवर असलेले सातवाहन राजे दुबळे होते. त्यामुळे वऱ्हाड, कोकण, कुंतल या भागांवर शकसत्ता स्थापन झाली. नहपान हळूहळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत. त्यांत त्याने मिळविलेल्या या यशाचा खूपच गौरव केलेला आहे.
शककुशाणांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. यांना स्वतःची अशी संस्कृती व धर्म नव्हता. त्यामुळे भारतात येताच ते बौद्ध व वैदिक धर्माचे अनुयायी होत. कुशाणसम्राट कनिष्क हा बौद्ध होता व त्याचा नातू वासुदेव हा परमभागवत म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. नहपानाचा जावई याने ऋषभदत्त है हिंदू नाव स्वीकारले होते व तो पौराणिक हिंदुधर्माचा कट्टा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक गावे ब्राह्मणांना दान दिली, लक्ष भोजने घातली, पुष्करतीर्थात स्नान करून गोप्रदाने दिली, असे उल्लेख त्याच्या शिलालेखांत आहेत. बौद्धांनाही त्याने अशाच उदार देणग्या दिल्या होत्या. यामुळे त्याची सत्ता जास्तच दृढ झाली आणि क्षणभर सातवाहन साम्राज्य नष्ट होणार व अखिल भारत परकीयांच्या सत्तेखाली जाणार अशी चिन्हे दिसू लागली. पण सातवाहनकुलात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व हे भयावह संकट टळले.
शकपल्हवनिपूदन
साधारणतः इ. स. ३५ ते ९० ही पन्नासपंचावन्न वर्षे महाराष्ट्र शक सत्तेखाली होता. इ. स. ७२ साली गौतमीपुत्र प्रतिष्ठानच्या गादीवर आला व पहिली पंधरासोळा वर्षे तयारीत घालवून नंतर त्याने शकांवर चढाई करण्यास प्रारंभ केला. प्रथम त्याने पुणेप्रांत, मावळ प्रांत मोकळा केला व मग उत्तरेस स्वारी करून रणांगणावर त्याने नहपान व उषवदात या दोघांनाही कंठस्नान घातले आणि मग दक्षिणेत जेवढे म्हणून शक, यवन, पल्हव होते त्यांच्या एकतर त्याने कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेत पिटाळून लावले. यवन हे बौद्ध झाले होते. साहजिकच त्यांचा ओढा या परकीयांकडे होता. त्यामुळे त्यांचेही गौतमीपुत्राने निर्मूलन केले. या विजयानंतर लगेच सतत स्वाऱ्या करून सम्राट सातकर्णीने पूर्वपश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र हे मुक्त केले. आणि उत्तरेकडील क्षत्रपांच्या ताब्यातील पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र हे प्रदेशही साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. पुढील काळात महेन्द्र, मलय, आंध्र, कलिंग हेही प्रदेश त्याने जिंकले व 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' - हे बिरुद त्याने सार्थ केले. नाशिकच्या लेखात त्याच्या मातेने त्याची राम, केशव, अर्जुन, भीमसेन यांच्याशी तुलना केली आहे, नहुप, जनमेजय, ययाती, सागर यांच्यासारखाच तो पराक्रमी होता असा त्याचा गौरव केला आहे. त्यात मातेचे कौतुक असले तरी सत्यार्थही बराच आहे असे आपणांस दिसून येईल.
सम्राट पुलुमायी
इ. स. ७२ ते इ. स. ९५ या आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शकआक्रमणाचा निःपात करून व सातवाहन साम्राज्यसत्ता पुन्हा दृढ व समर्थ करून गौतमीपुत्र मृत्यू पावला. त्याच्या मागून त्याचा पुत्र वसिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमायी हा गादीवर आला. तोही पित्यासारखाच पराक्रमी होता. त्याने सातवाहन साम्राज्य दृढ करून वर्धमानही केले. दोन डोलकाठ्यांनी जहाजे - ही चित्रे असलेली त्याची नाणी कॉरोमांडेल किनाऱ्यावरील नगरीत सापडली आहेत. त्यावरून त्याची सत्ता समुद्रापर्यंतच नसून समुद्रावर आणि त्याच्याही पलीकडे पसरली होती हे आता सिद्ध झाले आहे. गौतमी- बलश्री हिने पुत्रासंबंधी नाशिकला शिलालेख कोरविला तो याच्या राज्याच्या १९ व्या वर्षी होय. तिने त्यात 'महाराजपितामही' असे स्वतःचे वर्णन केले आहे. कारण पुलुमायी हा तिचा नातू त्या वेळी सम्राटपदी होता. पुलमायी ( २ रा ) याने इ. स. ९६ ते ११९ अशी २४ वर्षे राज्य केले. त्यानंतर वसिष्ठीपुत्र श्री सातकर्णी हा बहुधा त्याचा भाऊ किंवा नातू - गादीवर आला. हाही पराक्रमी होता. त्याने १२० ते १४९ अशी तीस वर्षे राज्य केले. त्यानंतर शिवश्री पुलमायी हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत सातवाहन —शकसंघर्ष पुन्हा सुरू झाला. वसिष्ठीपुत्र पुलुमायीच्या कारकीर्दीत अखेरीस दुसऱ्या एका शकवंशाने उत्तरेत सत्ता स्थापिली होती. चष्टन या त्या वंशातील क्षत्रपाने कच्छमध्ये राज्य स्थापन केले व हळूहळू राज्यविस्तारास प्रारंभ केला होता. त्याचा महत्त्वाकांक्षी नातू रुद्रदामा हा आता सत्तारूढ झाला. त्याचा शिवश्री पुलुमायीशी संघर्ष सुरू झाला व दोनदा त्याने पुलुमायीचा पराभव केला. गिरनार येथे रुद्रदाम्याचा शिलालेख आहे. त्यात 'रुद्रदाम्याने दक्षिणापथपतीचा दोनदा पराभव केला, पण त्याचा नाश केला नाही; कारण तो त्याचा जवळचा नातलग होता' असे वर्णन आहे. शिवश्री हा रुद्रदाम्याचा जावई होता असे एकमत आहे. दुसऱ्या मतान्वये वसिष्ठीपुत्र सातकर्णी हा जावई असून शिवश्री हा नातू होता. म्हणजे जवळचा नातलग होता हे निश्चित.
श्री यज्ञ सातकर्णी हा सातवाहन वंशातील शेवटचा मोठा सम्राट होय. इ. स. १६० ते इ. स. १८९ अशी सुमारे तीस वर्षे त्याने सत्ता चालविली. याची नाणी गुजराथ, काठेवाड, कोकण, चांदा, अकोला, गोदावरी, कृष्णा (आंध्रातील जिल्हे) या सर्व जिल्ह्यांतून विपुल प्रमाणात सापडली आहेत. त्यावरून रुद्रदाम्याचे आक्रमण परतवून याने पुन्हा सातवाहनसत्ता सर्वत्र प्रस्थापित केली असे दिसते. याच्या काही नाण्यांवर अश्वचिन्हही आहे. त्यावरून याने अश्वमेध केला असावा असे पंडित म्हणतात.
या सम्राटाच्या कारकीर्दीत सातवाहनसत्तेला उतरती कळा लागली. आता हा वंश थकला होता. सतत सव्वाचारशे वर्षे एका कुळात कर्ते पुरुष निर्माण होणे ही गोष्ट फार दुर्मिळ असते. इतकी वर्षे एकसारखे थोर पराक्रमी सम्राट निर्माण झाले हेच जास्त होय. आता निसर्गक्रमाने उद्भवणाऱ्या विघटक शक्ती प्रबळ होऊ लागल्या. सातवाहनांच्या शाखोपशाखांतील भाऊबंदांनी वऱ्हाड, कुंतल येथे स्वतंत्र राज्ये स्थापिली. आभीर ही एक नवीच जमात या वेळी वर उसळली व तिने सातवाहन- साम्राज्याचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. आंध्रातील इक्ष्वाकू हे सातवाहनांचे सरदार होते, तेही आता स्वतंत्र झाले. अशी सर्व बाजूंनी पोखरणी लागल्यामुळे पुढील ३०/३५ वर्षे प्रतिष्ठानला सातवाहनसत्ता अस्तित्वात होती, तरी ती फार मर्यादित व निष्प्रभ अशी होती. इ. स. २२५ च्या सुमारास तीही नष्ट झाली व चारसाडेचार शतके अव्याहत चाललेल्या या पहिल्या महाराष्ट्र साम्राज्यसत्तेचा अंत झाला.
अमर काव्य
सातवाहन घराण्याचा मूळ संस्थापक राजा सातवाहन आणि त्या राजघराण्यातील पहिला सातकर्णी, दुसरा सातकर्णी, हालराजा, गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी अनेक अद्भुतरम्य कथा भारतात रूढ झालेल्या आहेत. बृहत्कथा, कथासरित्सागर, पुराणे, लीलावईसारखी काव्ये या वैदिकपरंपरेतल्या साहित्यात त्या आहेतच, पण जैन, बौद्ध यांच्या वाड्ययातही सातवाहनांविषयीच्या अनेक रम्यकथा आढळतात. पण येथपर्यंत सांगितलेल्या त्यांच्या इतिहासावरून असे ध्यानात येईल की तसल्या काल्पनिक अवास्तव कथा पूर्णपणे वगळल्या तरी सातवाहन घराण्याचे चरित्र हे एक अद्भुतरम्य काव्य वाटावे इतके त्या राजपुरुषांचे पराक्रम अलौकिक आहेत. दक्षिणेत पहिली साम्राज्यसत्ता त्यांनी स्थापिली, शकपल्हव या आक्रमकांचे पुनःपुन्हा निर्दाळण करून दक्षिणेतून त्यांना निरवशेष करून टाकले, आपल्या साम्राज्याच्या मर्यादा उज्जयिनी, साची येथपर्यंत नेऊन भिडविल्या, साडेचारशे वर्षे हा साम्राज्यभार आपल्या मस्तकावर पेलून धरण्याचे सामर्थ्य असलेले कर्ते पुरुष महाराष्ट्राला दिले आणि राजसत्तेची स्थापना, धर्माचे पुनरुज्जीवन, विद्याकलांचे संवर्धन, कृपिव्यापारधनसमृद्धी यायोगे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया घातला, ही कृत्ये कमी अद्भुत आहेत काय ? कोणत्याही महाकवीला अमर काव्य निर्मिण्याची स्फूर्ती व्हावी असे हे पराक्रम आहेत. त्या पराक्रमांची स्मृती मनात घोळत ठेवूनच पुढील काळच्या महाराष्ट्राच्या राजघराण्यांचा इतिहास आपण आता पाहू.
गौतमीपुत्र शातकर्णी
खुलासा: खालील माहितीला लेखाचे स्वरूप देण्यात आले तरी ती अतिशय अपुरी माहिती आहे त्यामुळे सदस्यांनी त्याकडे चर्चेच्या नजरेतून पाहावे ही विनंती. लेखातील काही नावे इंग्रजी लेखांतून घेतल्याने त्यांचे योग्य उच्चार लिहिले गेले नसल्यास, ते सुधारून देण्यात मदत करावी. या राजघराण्याबद्दल कथा, आख्यायिका वाचल्या असतील तर सदस्यांनी त्या येथे नमूद कराव्यात.
----
महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.
यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -
सातवाहन राजघराणे
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते.
मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात.
त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून
त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले)
आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत:
अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले
दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५००
वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या
खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.
| सातवाहन राज्य |
अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.
गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .
गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.
अपरांत, अनुप*, सौराष्ट्र, कुरुक, अकारा* आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नाहपण* या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.
आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.
| शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी |
गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.
या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहर्त *(kShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत१ आहे..
शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती.
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा
घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला
आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की
शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता
येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या
नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि
नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर
काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या
मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक
विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.
आपले एक सदस्य वाचक्नवी यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.
आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:
सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
कृष्ण(भात) १०
श्रीशातकर्णी(श्रीमल्लकर्णी) १०
पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
स्कंधस्तंभ १८
शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
लंबोदर १८
आपीतक(आपीलक, दिविलक) १२
मेघस्वाति १८
स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
स्कंदस्वाति ७
मृगेंद्रस्वातिकर्ण ३
कुंतलस्वातिकर्ण ८
स्वातिवर्ण १
पुलोमावी ३६
अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
हाल ५
मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
पुरिकषेण(प्रविल्लसेन, पुरीषभीरु) २१
सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
चकोरशातकर्णी ६ महिने
शिवस्वाति २८
गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
पुलोमत् २८
शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
शिवश्री ७
शिवस्कंध ३
यज्ञश्री शातकर्णी २९
विजय ६
चंडश्री १०
पुलोमत् ७.
पैठणबद्दल म.टा. मधील एक जुना लेख मिळाला त्यातील काही भाग येथे चिकटवते.
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कारभारानंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदिप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली , ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरुळ , अजिंठा लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरी काठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले , भूमिगत गटार- योजना , कोरीव नक्षीची कामे , अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. याचा पुरावा बाळासाहेब पाटील यांच्या वस्तुसंग्रहालयातील वस्तूंमधून येतो.
गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या
साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची
कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि
आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा. वि. मिराशी यांनी सिद्ध
केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा,
पृष्ठ ६४ ).
वर दिलेल्या यादीतील पहिला राजा सिमुक हा त्याचा नातू. त्यामुळे गौतमीपुत्र हा २५ वा सातवाहन असावा.(चू.भू. दे. घे.)
दुसरा राजा कृष्ण ऊर्फ कान्ह ऊर्फ भात हा सिमुकाचा भाऊ. तिसरा
सिरीसातकर्णी(श्रीसातकर्णी) हा सिमुकाचा मुलगा. हा त्या कुळातला पहिला
सम्राट. त्याने उत्तरेला चाल करून पश्चिम माळवा, अनूप-(नर्मदेचे
खोरे) आणि विदर्भ मौर्यांकडून जिकून घेतले. यावरून सातवाहन अशोकाचे
मांडलिक नसावेत असे वाटते. (चू.भू. द्या. घ्या.) श्रीसातकर्णीची राणी
नागनिका(नायनिका). ही नागवंशीय होती. त्रणकयिरो नावाच्या सरदाराची कन्या.
पतीच्या मृत्य़ूनंतर हिने राज्यकारभार केला. ही आपली पहिली अहिल्याबाई!
हिने नाणेघाटात मोठा शिलालेख कोरवून घेतला आहे.
या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.
आरंभीच्या सातवाहनांचे सर्व शिलालेख कार्ले, नाणेघाट, कान्हेरी, जुन्नर, नाशिक या महाराष्ट्रातील गावीं सापडले असल्याने हे घराणे महाराष्ट्री बोलणारे महाराष्ट्रीय असले पाहिजे , आंध्रवासी नसावे. उत्तरकालीन सातवाहनांचे फक्त चार शिलालेख आंध्रात सापडले आहेत. याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती .पुणे जिल्ह्यात तळेगावजवळ मावळ प्रांत आहे. त्यात बारा (उप)मावळ आहेत. त्यातला एक आंदरमावळ(आंध्र मावळ). तिथे, ज्याच्या पाण्यावर टाटांचे कर्जतजवळच्या भिवपुरी येथे विद्युत्निर्मिती केंद्र आहे तो आंध्रा तलाव आहे. तिथून उगम पावलेली आंध्रा नदी पुढे कार्ल्यापासून तेरा किलोमीटरवर असलेल्या राजपुरी या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. सातवाहनांचे अनेक शिलालेख याच भागात असल्याने ते इथलेच मूळ रहिवासी असावेत.(पहा: ऍनल्ज् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टित्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम १९१७-४२, पृष्ठ १९६, येथील स. आ. जोगळेकर यांचा लेख:"दि होम ऑफ सातवाहनाज्").
लीलावई(लीलावती) या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने गाथासप्तसईकार(सप्तशतीकार) हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान(पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट(मराठी) होत्या असे वर्णन केले आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत सातवाहन राजा कुंतल प्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो असा उल्लेख केला आहे. या पुराव्यांवरून सातवाहन हे महाराष्ट्रीय होते हे पटायला हरकत नाही.
इसवीसनापूर्वी पहिल्या शतकात बोलन खिंडीतून हूणांची टोळधाड कुशाणांवर आणि त्यांची शकांवर कोसळून शक भारतात आले. पाठोपाठ कुशाण. शकांना राज्य करणे फारसे माहीत नव्हते. ते कुशाणांचे क्षत्रप(सरदार) किंवा सुभेदार. क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात सत्ता स्थापन केली. नहपान हा त्याचा मुलगा(की वंशज?). हा व त्याचा हिंदू नाव धारण करणारा जावई उषवदात(ऋषभदत्त) यांनी माळवा व अनूप-(नर्मदेचे खोरे) जिंकले आणि ते महाराष्ट्रात उतरले. नहपान हा हळूळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत.
गौतमीपुत्राने गादीवर आल्यानंतर १५-१६ वर्षे तयारी करून आधी पुणे प्रांत, मावळ, नंतर उत्तरेला जाऊन नहपान आणि उषवदात यांना कंठस्नान घातले. दक्षिणेला जेवढे शक, पल्हव, यवन होते त्यांच्या कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेला पिटाळले. यवन हे तोपर्यंत बौद्ध झाले होते. त्यांच्या निष्ठा परकीयांशी. त्यांचेही गौतमीपुत्राने निर्दालन केले. मुसलमानी आक्रमकांपासून महाराष्ट्राला मुक्त करणार्या शिवाजीच्या सोळाशे वर्षे आधी गौतमीपुत्राने तशीच कामगिरी केली होती. शिवाजीइतक्याच आदराने आणि भक्तिभावाने गौतमीपुत्र सातकर्णीचे नाव घ्यायला पाहिजे. त्याने उत्तरेला पूर्व आणि पश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र, पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र, महेंद्र, मलय, आंध्र, व कलिंग हे प्रांत जिंकून आपला पराक्रम सिद्ध केला.
म्हणूनच स्वत:ला राजर्षिवधू म्हणवून घेणार्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन त्रिसमुद्रतोयपीतवाहन"अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे.
सेच आपल्या "गुढीपाडवा" अर्थात आंध्र "युगादि" हा सण सातकर्णी / सातवाहन /
शालिवाहन याने पैठण जिंकून तेथे आपले राज्य स्थापन केल्यापासून सुरू झाला
असे वाचल्याचे स्मरते.
गौतमी ही शकांबरोबरच्या एका युद्धात हरलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या
राजाची पत्नी होती . ती रानावनात अत्यंत हालाखीत रहात होती. तिने आपल्या
मुलात शौर्याचे स्फुल्लिंग जागवून सामान्य - वनवासी लोकांतून सैन्य निर्माण
केले, शकांचा पराभव करवला आणि त्याला पुन्हा राजा बनवले. ज्या दिवशी
त्याने विजयी योद्धा म्हणून पैठणच्या राजधानीत प्रवेश केला त्या दिवशी
तेथील प्रजेने गुढ्या-तोरणे उभी करून त्याचे स्वागत केले. हीच प्रथा आपण
गुढीपाडव्याला पाळतो. तेंव्हापासून "शालिवाहन शके"(शक पराभव संवत्सर)
अस्तित्वात आले. त्यामुळे सातकर्णी नेहमी स्वतःला गौतमीपुत्र अशी उपाधी
लावत असे - अशी कथा लहानपणी वाचलेल्या एका मराठी गोष्टीच्या पुस्तकात वाचली
होती. (संदर्भ अर्थातच आठवत नाही ):(
असा इतिहास कोठे नमूद असल्यास अभ्यासकांनी माहिती द्यावी.
गौतमीबद्दल आपण सांगितलेली कथा एक अविश्वसनीय दंतकथा वाटते. बौद्धधर्मीय शकराजा कनिष्क याच्या नावाने हा शक सुरू झाला असे दिसते . म्हणूनच त्या वर्षगणनेला शक म्हणतात. या राजाने काश्मीर व पश्चिम हिंदुस्थान काबीज करून आपली सत्ता स्थापन केल्यावर हा शक प्रचारात आला असावा. तिबेट, ब्रम्हदेश, जावा, सिंहलद्वीप(श्रीलंका) वगैरे ठिकाणी हा शक चालू होता. मुळात इसवी सन १००० पर्यंतच्या लेखात शालिवाहन शकाचा उल्लेख नाही. प्राचीन लेखात याला शकनृपकाल, शकेंद्रकाल, शकनरपते: अतिताब्द अशी नावे होती. शेवटचे नाव अजूनही बंगाली पंचांगात वापरात आहे. तेव्हा बर्याच उत्तरकाळी मूळ शकराजांनी स्थापिलेल्या या शकाला कोणीतरी शालिवाहनाचे नाव देऊन पावन करून घेतले असे महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, डॉ. के. गोपाळाचारी या इतिहाससंशोधकांचे मत आहे.
नाणेघाट हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जुन्नर जवळून थेट पश्चिमेकडे आहे - म्हणजे हा माळशेज घाटाच्या दक्षिणेला आणि जिवधन ह्या किल्ल्याच्या उत्तरेला येतो. सातवाहन कालात हा घाट रोमन व इतर दलाल कल्याण बंदरापासून पैठण पर्यंत आपल्या मालाची ने आण करण्यासाठी वापरत. क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे. आज तिथे प्रवाशांसाठी बांधलेली गुहा आणि त्यातील शीलालेख्, व पठारावर पोहोचलं की कर वसूलीसाठी वापरात येणारा एक मोठा दगडी रांजण आहे. जवळच्या 'घाटघर' ह्या गावापर्यंत बस येते, तिथून पायी जावं लागतं. पायी रस्ता घाट माथ्यापासून खाली साधारण १ किलोमिटर दगडांनी 'कॉबल्ड' आहे (ह्याला मराठीत काय म्हणतात?)
ह्या घाटाबद्दल म्हणतात की परदेशी दलालांसाठी सातवाहन राजांना एक 'हमरस्ता' बांधायचा होता, तेंव्हा त्यांनी फर्मान काढलं की जो माणूस लवकरात लवकर प्रशस्त घाट बांधेल त्याला राजा बक्षीस देईल. दोन 'कॉन्ट्रॅक्टर' स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले - एकाचं नाव होतं 'नाना' आणि दुसरा 'गुणा'. नाना नि बांधलेला घाट आधी पूर्ण झाला - तो नाणेघाट, आणि गुणाचा घाट अर्धवट राहिला कारण सरकारी बक्षीस नानाला मिळाले. हा 'गुणाघाट' जीवधन किल्ल्याच्या दक्षिणेला येतो. मी ती जागा जीवधन वरून बघितली आहे, पण तिथे गेलो नाहिये.
पुलोमत् २८ च्या ऐवजी पुळुमावी असं पाहिजे बॉ यानं २५ वरीस राजगादी संभाळली.
रुद्रदामनाच्या लेकावर् अन कान्हेरीच्या लेकावर याचा उल्लेख येते म्हण्ते बॉ.
मंग यज्ञश्री इसवी सन् १६५ ला गादीवर आला.
नाशकात अन ठाण्यात सापल्डलेल्या नाण्यावरुन् अंदाज करतेत् बॉ.
बाबूराव येथे पाहा !
गौतमी आपल्या मुलाला एकब्राह्मण म्हणते यावरून सातवाहन कुळ ब्राह्मण असावे यावरून चर्चा सुरु झाली होती. यासंबंधी एक वेगळा संदर्भ त्रिपिटकांमधून समोर आल्यासारखे वाटले म्हणून हे इथे डकवत आहे. कोणास यावर प्रकाश पाडता आला तर आवडेल.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे? तेच वसिष्ठीपुत्र श्री पुलुमावी या नावाचे. ही घराणी मातृसत्ताक असावी असे नाही. पण राण्यांची नावे नद्यांना दिली गेली असतील का? किंवा उलटेही असू शकते. गौतमी हे नाशिकच्या प्रसिद्ध गोदावरीचे नाव आहे (किंवा तिच्या एखाद्या उपनदीचे) आणि तसेच वसिष्ठी हे चिपळूणजवळील नदीचे नाव आहे. अर्थात ही नावे कधीपासून प्रचलित आहेत कल्पना नाही, पण सातवाहनांच्या राज्यामधील नद्यांची नावे त्यांच्या घराण्यातून आली असतील का असा एक प्रश्न पडला. ( ह्या ठिकाणाहून राज्य करणार्या राजांनी नद्यांची नावे मातेसमान स्विकारलेली असू शकतात का? )
सातवाहनांच्या राण्यांपैकी नागनिका आणि गौतमी या दोघींची नावे प्रसिद्ध आहेतच.
सातवाहनांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. पण आपल्याला फार थोडे माहिती असते एवढेच वाटते. जे धागेदोरे लागतात ते तत्कालिन समाजपद्धतीवर जेमतेमच प्रकाश टाकतात, एकसलग, एकसंध चित्र उभे करू शकत नाहीत असे वाटते. त्यासाठी तत्कालिन साहित्यही वाचावे लागेल असे वाटते.
नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे.
नहपान हा गौतमीपुत्राचा समकालीन, पण गौतमीपुत्रापेक्षा वयाने मोठा होता. नहपानाचा जावई हा उज्जैनचा क्षत्रप रूद्रदामन आणि रूद्रदामनाचा जावई हा ऋषभदत्त (प्राकृत नाव-उषवदत्त)
रूद्रदामनाने आपल्या मुलीचा विवाह गौतमीपुत्राच्या मुलाशी म्हणजे वासिष्ठिपुत्र पुळुमावीशी करून दिला होता. वर्णसंकर न करणार्या सातवाहनांसाठी हा विवाह म्हणजे राजकारणाचाच एक भाग. गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर बर्याच काळाने रूद्रदामनाने परत नासिक भाग जिंकून घेतला व पुळुमावीचा पराभव केला परंतु सोयरसंबंधांमुळे त्यांचे संपूर्ण उच्चाटन केले गेले नाही. यांनत्र मात्र सातवाहन पैठण, आंध्र आणि दक्षिणेकडे सरकत गेले. त्यामुळेच नंतर त्यांना आंध्रभृत्य हे नाव पडले.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे
गौतमीपुत्राच्या आधी सातवाहन राजे हे वैदिक नावे लावत. उदा. वेदिश्री,
स्कंदश्री, हकुश्री. शक्तीश्री इ. गौतमीपुत्राच्या वेळी आईचे नाव लावण्याची
प्रथा सुरु झाली असावी. गौतमीपुत्र महान मातृभक्त होता यात शंकाच नाही
त्याच्या शिलालेखांवरूनही हे दिसते. तीच प्रथा त्याच्या पुढच्या
पिढ्यांकडूनही पाळली गेली.
उदा. वासिष्ठिपुत्र, कौशिकिपुत्र, मढारीपुत्र.
नद्यांना नावे पण बहुधा ह्याच राजांवरून दिली गेली असावीत.
माझे विकीपांडित्य सांगते की नहापणाचा जावई ऋषभदत्त, आणि रुद्रदमनाने आपली मुलगी पुळुमावीला दिली.
http://en.wikipedia.org/wiki/Nahapana
http://en.wikipedia.org/wiki/Rudradaman_I
रुद्रदमन आणि ऋषभदत्ताचे नाते काय होते हे विकीवरून कळलेले नाही.
बरोबर आहे.
माझी समजण्यात काही चूक झाली.
नहपानाचा जावई हा ऋषभदत्त. आणि रूद्रदामनाचा पुळुमावी.
रूद्रदामन हा महाक्षत्रप होता आणि त्याचा महाअमात्य हा ऋषभदत्त.
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
सचित्र माहिती देणारा लेख आवडला.
१. आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद
इतरत्र वाचला आहे. त्यात उल्लेखित संशोधनावरून आंध्रभृत्य हे नाव मुळात
पुण्याजवळील एका भूभागावरून आले आहे असे वाटते.सातवाहनांच्या इतिहासाची ती चर्चा महत्त्वाची आहे.
२.
सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियनिर्दालक' असेही येथे म्हटले आहे.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
तिकडची सविस्तर चर्चा वाचली, बरीच नविन माहितीही समजली.
आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे.
हे मत आहे ते सह्याद्रीकार स. आ. जोगळेकरांचे. अर्थात हा फक्त तर्कावर
आधारीत पुरावा असून त्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा (नाणी, शिलालेख,
उत्खनने) इ. स्वरूपात अजून मिळाला नाही.
पण सातवाहन हे महाराष्ट्रीय यात काहीच संशय नाही. ते आंध्राकडे सरकल्यानंतर
(पुळुमावीनंतर) बर्याच कालावधींनी पुराणे तयार झाली (साधारण इ.स. ४/५
व्या शतकात) त्यामुळे आधीच्या घटनांचा धांडोळा पुराणांकडून न घेतला जाता
सातवाहनांच्या शेवटच्या निवासावरून त्यांना आंध्रभृत्य ठरवले गेले.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
खतियनिर्दालक हा शब्द माझ्याकडून चुकीचा लिहिला गेला. मूळ शिलालेखातील शब्द आहे 'खतियदपमानदमन' अर्थात क्षत्रियांचा गर्व हरण करणारा (निर्दालन करणारा/नष्ट करणारा अशा अर्थाने नव्हे)
ब्राह्मणनस, खतियदपमानदमन ही बिरुदे सातवाहन ब्राह्मण आहेत असे सिद्ध करतात. अर्थात यावरही बरीच मतमतांतरे आहेतच.
संदर्भः
१. शास्त्री के.एन.ए.-मौर्यास ऑफ सातवाहन इन हिस्टरी ऑफ साउथ इंडिया -ऑक्सफर्ड १९५८,
२. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख-मिराशी वा. वि. १९७८.
गौतमीच्याच शिलालेखात हा उल्लेख आहे.
http://www.preservearticles.com/2011092013668/short-notes-on-gautamiputr...
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
(उपक्रमावरील प्रियाली यांच्या लेखात सिमुकाआधी बरेच राजे होऊन गेले आहेत असा उल्लेख आढळला. कदाचित तसे असेलही, पण माझ्या वाचनाप्रमाणे) या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा माझा एक कयास :) त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही.
हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो).
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते.
दुसरे एक आपण असे तपासू शकतो की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत होती का? कल्पना नाही. याआधी (ब्राह्मण) शुंगांनी स्वतःच्या अशा मूर्ती केल्या होत्या का हे बघावे लागेल. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात. यावरूनही काही अंदाज बांधता येईल असे वाटते.
[ अन्य टीपः कदाचित याचा काळाप्रमाणे काही संबंध असेल असे नाही. पण कुळकर(णी) हे पद सोपारा इ. भागात ऋषभदेवाच्या काळापासून जैनांमध्ये माहिती होते अशी माहिती कळते. जैनांच्या आदिनाथाचा (किंवा ऋषभदेवांचा) पिता नाभि राजा हा कुळकर होता असे समजले जाते. (आज आपल्याला माहिती असलेली 'कर्णी' याने अंत असलेली आडनावे ब्राह्मण असणे सूचित करू शकतात असे वाटते, पण म्हणून केवळ ब्राह्मणच असतीलच असे नाही). ]
राहिला मुद्दा आंध्रांचा, तर सातवाहनांचे सर्व शिलालेख हे पाकृतात आहे आणि तेलगूत एकही नाही.
वासिष्ठिपुत्र पुळुवामी नंतर सातवाहनांनी पश्चिम महाराष्ट्र गमावून दक्षिणेत स्थलांतर केले होते. त्यानंतर श्री यज्ञ सातकर्णीने परत गेलेला प्रदेश परत मिळवला. यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या र्हासाला सुरुवात होवून पैठणही गमावले गेले व त्यांना कायमस्वरूपी आंध्रात जावे लागले. पुराणांचा काळ त्यानंतरचा त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख हा पुराणांत आंध्रभृत्य असाच येतो.
पण एकंदरीत त्याकाळचा महाराष्ट्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहेच.
शिलालेखांसाठी वा. वि. मिराशींचे 'सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप-इतिहास आणि कोरीव लेख' हे पुस्तक अतिशय उत्तम आहे पण सध्या कुठेच मिळत नाही.
या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते.
सिमुख सातवाहन हा आद्य सातवाहन समजला जात असे, पण सातवाहन असे नाव
असलेली तांब्याची आणि शिशाची नाणी नासिक आणि नेवासे येथील उत्खननात मिळाली
असल्यामुळे सातवाहन हाच या घराण्याचा मूळ पुरुष होय असे अलीकडे मानले
जाते. याच्याच नावावरून सातवाहन कुलाची सुरुवात झाली. सिमुखाचा हा पिता
अथवा आजा असावा तथापि त्यांचे नक्की नाते तसेच आद्य सातवाहनाचा
राज्यविस्तार याबद्दल नक्की सांगता नाही.
कण्वाला पराभूत मूळ सातवाहनानेच केलेले असावे किंवा त्यानंतर सातवाहनांचा
राज्यविस्तार कण्वांना पराभूत करून सिमुकाने केलेला असावा. पण कालमापनाने
पाहिल्यास हेही जुळत नाही. कण्व सत्ता ही साधारण इ.स.पूर्व७५ ते इ.स.पूर्व
२६ अशी आहे तर सातवाहनांचा काळ त्याही आधीचा म्हणजे साधारण इ.स.पूर्व २३०
असा येतो. पुराणे आणि काही शिलालेखांवरून हा काळ निश्चित केला आहे. म्हणजे
कण्वांचा पराभव हा सातवाहनांच्या नंतरच्या पिढीच्या काळात झाला असावा.
अशोकाच्या मृत्युनंतरच्या दशकभरातच सातवाहन मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून
देउन सत्तेवर आले.
कण्व-सातवाहन यांत संघर्ष झाल्याचे कधी कुठल्याही शिलालेखात आलेले नाही हेही विशेष.
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
याबद्दल बरेचसे वाद आहेतच. सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते.
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला म्हणजे त्याच्या काळात वर्णसंकर होत नसे. त्याच्या आधी वर्णसंकर होताच. उदा. नागनिका. वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा विवाह राजकारणाचाच भाग हे निश्चितच पण हा विवाह कदाचित गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर झाला असावा. नक्की काळ माहित नाही. (कान्हेरी लेण्यामध्ये वाशिष्ठिपुत्राच्या पत्नीचा शिलालेख आहे त्यात तिच्या पित्याचा-रूद्रदामन क्षत्रपाचा उल्लेख आहे.)
जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती
जैनांबद्दल माहित नाही पण बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
सिमुकाबद्दल सहमत आहे, तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल. अर्थात त्याचे आधी सत्ताकेंद्राजवळ असणे (म्हणजे मांडलिकत्व) अध्याहृत आहे. (पण आद्य म्हणजे अनेकदा आपण म्हणतो आमच्या घराण्याचा मूळ पुरुष अमूक. त्याआधी घराणे होतेच, पण नावारुपाला आले ते या काळापासून, म्हणून आद्य).
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
>पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
मी ते पाहिलेले नाहीत. फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन. धन्यवाद.
तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल
सिमुक या कुळातील मुख्य राजा होताच हे मान्य. पण आद्य सातवाहन हाही मुख्य राजा असावा.ज्याअर्थी त्याची स्वतंत्र नाणी आहेत त्याअर्थी त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले होते हे निर्विवाद. अर्थात सिमुकापासूनच सातवाहन घराणे नावारूपाला आले यात काहीच संशय नाही.
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
नेवाशाचा संदर्भ वा.वि. मिराशींच्याच पुस्तकात आला आहे. बहुधा सांखलियांच्या पुस्तकातही तो आहे.
.फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन
फोटो वर दिलेलेच आहेत. फोटो क्र. १७,१८,१९,२० यात गौतमीपुत्राचा जीवनपट रूपकार्थाने कोरलेला आहे.
मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
माझ्या अजून थोड्या वाचनातून लक्षात आले की - त्रिपिटकामध्ये बुद्धाचे म्हणणे I call "a brahmana" (एकब्राह्मण), who is free from moral corruption and from attachment. (बाकीचे भोवडी ब्राह्मण! ) ह्याच्याशी गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा. गौतमीला बुद्धाचे त्रिपीटक माहिती होते किंवा महत्त्वाचे वाटत होते असे दिसते. ( आपण सध्या ज्या अर्थाने हे ब्राह्मण आणि क्षत्रिय धरतो तसेच अर्थ सातवाहनांच्या काळी धरले जात नसावेत असे वाटते, ब्राह्मण आणि क्षत्रिय वेगवेगळे असले तरी "जाती" तयार झालेल्या नव्हत्या असे दिसते. ).
मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
नाणेघाटातल्या गुहेत ही सर्व शिल्पे आहेत/होती पण दुर्दैवाने त्यांचे आज फक्त पायच शिल्लक आहेत. वर लिहिलेल्या शिलालेखांतील नावावरूनच ही शिल्पे नेमकी कोणाची हे ओळखता येते.
हा पहा मी काढलेला नाणेघाटातल्या गुहेतील शिल्पाचा पाय शिल्लक असलेला फोटो
गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा.
सातवाहन ब्राह्मण नसतीलही. ते ब्राह्मण असण्याचा किंवा नसण्याचा कोणताही
सबळ पुरावा उपलब्ध नाही. पण ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण
बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
त्याकाळी जाती नव्हत्याच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही व्यवस्थाच
सर्वसामान्यपणे प्रचलित होती. बरेचसे वैश्य मात्र बौद्ध झाले असावेत असे
विविध दातृत्वाच्या शिलालेखांवरून दिसते.
उद्देश ते ब्राह्मण नव्हतेच हे सिद्ध करण्याचा नाही. माझे म्हणणे खरे असले तर आता गौतमीचे लिहीणे असे दर्शवते की -
१. तिला बौद्ध साहित्य आणि विचार माहिती होते.
२. आपला मुलगा स्वच्छ मनाचा आणि मोहजालापासून दूर आहे (म्हणून बौद्ध
विचारांजवळ आहे) असे सिद्ध करायचे असावे. पण म्हणजेच बौद्धांना जवळ
ठेवणेही ती महत्त्वाचे समजत असावी. म्हणजे तो बौद्ध नसावा, ब्राह्मणही
असावा. :)
अजून काही
तुमच्या लेखात आले आहे की - "स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने
शत्रुलाही क्षमा केली आहे. " मला हे वाक्य असेच्या असे भांडारकरांच्या
भाषांतरात दिसलेले नाही. वरील वाक्यावरून तेव्हा जाती होत्या आणि तो केवळ
ब्राह्मणांचे रक्षण करत होता असे वाटण्याचा संभव आहे.
भांडारकरांनी दिलेल्या भाषांतरात
he protected all who sought asylum with him and regarded the happiness and misery of his subjects as his own
स्वजाती म्हटलेले नाही.
गौतमीच्या लेखाचे इतर कोणी केलेले भाषांतर (मिराशी?) वाचायला आवडेल.
पण माझ्या मते (आणि इतर काही अभ्यासकांच्या मते) आपण ज्याला आता ब्राह्मण म्हणतो तशा त्या जाती गौतमीपुत्राच्या काळी नव्हत्या, शिवाय ब्राह्मण हे वैदिक धर्माचे (म्हणजे यज्ञ वगैरे) आचरण करत असा अर्थ असल्याचे दिसते, बाकी मुख्य बेटीबंदी नव्हती, समुद्रबंदी नव्हती, हे तर सर्व दिसतेच आहे.
>ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
वर लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
गौतमीला त्रिपीटकांचे ज्ञान असावे. पण त्याविषयी नक्की माहित नाही शिवाय कुठला संदर्भही मिळत नाही.
पांडवलेण्यातील गौतमी बलश्रीच्या मूळ ब्राह्मी लेखाचे देवनागरीतील प्राकृत लिप्यंतर तसेच मराठीतील मिराशींचे पुस्तक सध्या तरी माझ्याजवळ नाही. ते लवकरच मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्याआधारेच मग नेमके शब्द त्या लेखात काय आहेत ते सांगता येईल. मूळ शिलालेख हा थोडासा खंडित असल्याने वाचणे अवघड आहे. माझ्याजवळच्या संदर्भात अशीच वाक्ये दिलेली आहेत. (मोरवंचीकर रा. श्री.)
जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित
झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील
शिलालेखाविषयीच्या जयंत कुलकर्णीच्या या लेखात सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत.
समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात
समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
ते पुढच्या भागात येणारच आहे. या पहिल्या भागाचा उद्देश फक्त नासिक
लेण्यांतील ३ व १० क्रमांकाच्या सर्वात महत्वाच्या अनुक्रमे नहपान आणि
गौतमी बलश्रीच्या लेण्यांची माहिती करून देणे हाच होता.
दुसर्या भागात इतरही काही शिलालेखांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
वल्ली, चित्रा, आणि अन्य सदस्य यांनीच ही चर्चा लेखाच्या निमित्ताने उत्तम चालवली आहे. आम्ही आपले उगाच मधेमधे. सातवाहनकाळाचा कितीतरी संदर्भ आपल्या महाराष्ट्राचा जसा आहे तसा अधिक संदर्भ आपल्या पैठणचा आहे. सातवाहनांची राजधानी पैठण असून इतिहासाचे काही ठसे पैठण मधे फारसे सापडत नाही. पालथी नगरीत खापरं सापडतात. कधी खूप मोठ्या विटा सापडतात. सोनं सापडतं. पुरातत्त्व विभागाने काही विशिष्ट भागाला तारेचे कुंपन टाकलेले आहे. उत्खनन मात्र काहीच केले नाही. असो,
बाकी, मन१ यांनी आपली आणि काही मराठवाड्यातील मित्रांची आठवण कालच काढली होती. बाकी, तुम्ही मिपावर नियमित येत चला. किती लांब दांडी मारली तुम्ही. चला अनुपस्थिती भरुन काढा. :)
![]() |
|
पैठण येथील हा स्तंभ सातवाहन काळातील आहेत असे म्हणतात. -दिलीप बिरुटे |
त्या स्तंभाबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. परंतु तो सातवाहनकालीन वाटत नाही. बांधकामाच्या शैलीवरून तो मध्ययुगीन कालखंडातला असावा.
उत्खनन होऊ शकतं. असो, तो वेगळा मुद्दा. बाकी,स्तंभाबद्दल माझ्याकडे काही अधिक माहिती नाही. स्तंभाला भेट देतेवेळेस माझ्यासोबत असलेले माझा मिपाकर मित्र सहजराव सोबत होते. स्तंभावर काही लिहिलेले दिसते की काय असे म्हणत होते. ते काही फोटोत टीपता आले नाही. स्तंभ सातवाहन काळातीलच आहे काय, या पुष्ट्यर्थ माझ्याकडे कोणाताही पुरावा नाही. पण डॉ. मोरवंचीकर म्हणता त्या प्रमाणे ' सातवाहनांच्या नाण्यावर बैल, हत्ती, सिंह, मानव, वृक्ष, गजलक्ष्मी,अश्व,चक्र, जहाज, आदि चिन्हे आढळतात'' [पृ.क्र.३४] यापैकी त्या स्तंभावर काही आहे, काय शोधलं पाहिजे.
नाणेघाट

नाणेघाट येथे, खिंडमार्गात, मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे अवशेष असून त्या प्रतिमांच्या वरील बाजूंस त्यांची नावे कोरलेली आहेत. येथील सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा व दानांचा प्रदीर्घ शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झाली असली, तरी त्यातील अवशिष्ट मजकुरावरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीवर बराच प्रकाश पडतो. येथील मुख्य लेण्याच्या मंडपात दोन बाजूंस बाके कोरलेली असून मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. मागील भिंतीत सातवाहन राजवंशातील सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या अशा : सिमुक सातवाहन, देवी नागनिका, श्रीसातकर्णी, कुमार भाय, महारठी त्रनकयिर, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन. यांपैकी एका जोडपुतळ्याच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा, असे वा. वि. मिराशी म्हणतात. तर शेवटचे दोन अनुक्रमे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकाचे लहान पुत्र होते आणि हे लेणे सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह असावे, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे.

नाणेघाट लेण्यात कोरलेला नागनिकेचा वर उल्लेखिलेला शिलालेख ब्राह्मी लिपीत असून प्राकृत भाषेत आहे. शिलालेखाच्या अक्षरवटिकेवरून या शिलालेखाचा काळ योहान ब्यूलर, मिराशी यांसारख्या पुराभिलेखविद्यावंतांच्या मते साधारणतः इ.स.पू. दुसरे-पहिले शतक असावा. सध्या अस्तित्वात असलेला शिलालेख वीस ओळींचा असून डाव्या भिंतीवर शिलालेखाच्या दहा ओळी कोरल्या असून उर्वरित दहा ओळी उजव्या भिंतीवर कोरल्या आहेत. डब्ल्यू. एच. साईक्स याने ह्या शिलालेखाचा सर्वप्रथम उल्लेख १८३७ च्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये केला. पुढे जेम्स प्रिन्सेप, रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन, भगवानलाल इंद्रजी, ब्यूलर, मिराशी, अजयमित्र शास्त्री, शोभना गोखले प्रभृतींनी या शिलालेखाचे वाचन करून अन्वयार्थ लावले आहेत.
अंगियकुलवर्धन वंशातील त्रनकयिरनामक महारठीची कन्या नागनिका ही सातवाहन राजा पहिला सातकर्णी याची पत्नी आणि वेदिश्री राजाची व श्रीमान सती (शक्ती) याची माता होती. पतीच्या निधनानंतर नागनिकेने सातवाहन साम्राज्याची धुरा वाहिली. सम्राज्ञी नागनिकेला ज्या विशेषणांनी संबोधित केले आहे, त्यावरून राणी वैराग्यपूर्ण जीवन जगत होती, हे सिद्ध होते. या लेखाच्या प्रारंभी प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण, वासुदेव, चंद्र, सूर्य, कुमार आणि चार दिक्पाल–यम, वरुण, कुबेर, इंद्र–यांना अभिवादन केले आहे. या शिलालेखात नागनिकेने सातकर्णी राजाबरोबर केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचा –उदा., दोन अश्वमेध व एक राजसूय तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र इत्यादिकांचा– निर्देश आहे. या अनेक यज्ञांच्या उल्लेखावरून तत्कालीन धार्मिक स्थितीत यज्ञसंस्थेचे महत्त्व दिसून येते. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशाबरोबरच लेखात ब्राह्मणांना दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादिकांचे उल्लेख आहेत. त्यावरून तत्कालीन आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. तसेच या शिलालेखात कार्षापण आणि प्रसर्पक या नाण्यांचा असलेला उल्लेख प्राचीन नाणकशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त या शिलालेखात आकड्यांचा विपुल प्रमाणात केलेला उल्लेख बघता प्राचीन संख्याशास्त्राच्या प्रगत अवस्थेची कल्पना येते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जनतेला सातवाहन सम्राज्ञीने केलेल्या धार्मिक कार्याची व सातवाहनांच्या समृद्धीची ओळख व्हावी, असा हा शिलालेख कोरण्याचा उद्देश असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. प्राचीन ऐतिहासिक कालखंडात, या परिसरात मार्गानुक्रमण करणाऱ्या परकीय तसेच भारताच्या विविध प्रदेशांतील व्यापारी, सार्थवाह, यात्रेकरू या सर्वांवर सातवाहन राजवंशाची महानता ठसविण्यात या शिलालेखाने निश्चितच अनन्यसाधारण भूमिका बजावली.
नाणेघाटापासून सुमारे २८ किमी. अंतरावर असलेल्या जुन्नर या गावी प्रसिद्ध नाणकशास्त्रज्ञ पी. जे. चिन्मुळगुंद यांना इ. स. १९७६ मध्ये सातकर्णी आणि नागनिका यांचे चांदीचे संयुक्त नाणे एका शेतकऱ्याकडून मिळाले. त्यावर ब्राह्मी लिपीत नायनिका (नागनिका) व सिरी सातकनी (श्रीसातकर्णी) असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे नाणेघाटापासून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर, काही अंतरावर असलेल्या एका पाण्याच्या टाक्यावर असलेला सातवाहन राजा वासिष्ठिपुत्र स्कंद सातकर्णीचा शिलालेख भगवानलाल इंद्रजी यांनी प्रकाशित केला आहे. या दोन्ही बाबींचा उल्लेख नाणेघाटाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.
नाणेघाटातील राणी नागनिकेचा शिलालेख आणि सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह यांना प्राचीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने नाणेघाटाला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.
राज्यातला सर्वांत मोठा शिलालेख
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
जुन्नर तालुका ऐतिहासिकदृष्ट्या खूपच संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भागातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं जुन्नर भागाविषयी देशात, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना बालपणापासून आकर्षण असतं. याशिवाय, जुन्नर भाग अडीच-तीन हजार वर्षांपासून कायम सत्तेच्या केंद्रभागी राहिलेला आहे. सातवाहनाचा उत्कर्षाचा काळ, त्यांचं वैभव आणि अफाट पसरलेले साम्राज्य या भागानं बघितलेलं आहे.
एवढंच नाही, तर संपूर्ण भारतात आढळणाऱ्या लेणींपैकी २०० ते २५० लेणी फक्त जुन्नर परिसरात अस्तित्वात आहेत. त्यामध्ये लेण्याद्री आहे, शिवनेरीच्या साखळी मार्गावर कोरलेली काही लेणी आहेत, अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणीसमूह आहे, तुळजा सारखे दुर्मीळ चैत्यगृह असलेली लेणी आहेत. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, अशी कितीतरी नावे सांगता येतील.
जुन्नरपासून थोड्या अंतरावर नाणेघाटची लेणी खोदण्यात आली. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्यापार करण्यासाठी नाणेघाट येथे हा मार्ग ‘खोदून’ तयार करण्यात आला. त्या काळातील राष्ट्रीय महामार्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
पतीच्या निधनानंतर सक्षमपणानं राज्य चालवणाऱ्या सातवाहन सम्राज्ञी नागणिकाचं कर्तृत्व नाणेघाट येथील गुहेत कोरलेल्या शिलालेखातून आपल्याला समजतं. एवढंच नव्हे, तर सातवाहन राजा-राणी, युवराज यांचे पुतळेही या लेणीत कोरले होते, अगदी त्यांच्या नावासकट. आज मात्र त्यांच्या पायांचा काही भागच आपल्याला दिसतो.
या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.
पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.
पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.
हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.
हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.
सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.
महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.
एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.
अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.
डेक्कन कॉलेजमध्ये माझे मास्टर्स सुरू असताना डॉ. दांडेकर सरांनी आम्हाला इथे ब्राह्मी लिपीविषयी महत्त्वाची माहिती सांगत वाचण्यासाठी मार्गदर्शन केले होते. आम्ही इथंच ब्राह्मी खऱ्या अर्थानं शिकलो. या लेणीच्या समोरून जो मार्ग जातो, त्यावर एक दगडी रांजण ठेवलेलं आहे. हा व्यापारी मार्ग असल्यामुळं या भल्यामोठ्या दगडी रांजणात जकातीची नाणी जमा करण्यात येत असत असं सांगण्यात येतं. पण त्याला कसलाही पुरावा नाहीये.
नाणेघाट समृद्ध आहे. पावसाळ्यात स्वर्गासम भासणारा हा भाग आहे. जवळच चावंड, जीवधन, निमगिरी हे किल्ले तर कुकडेश्वरसारखं अतिसुंदर मंदिर आहे. हा संपूर्ण भाग पाहायला निदान दोन दिवस तरी हवेत.
संदर्भ :
- Shastri, Ajay Mitra, The Satavahanas and The Western Kshatrapas : A Historical Framework, Nagpur, 1998.
- महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर : इतिहास प्राचीन काळ , खंड १, मुंबई, २००३.
- मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
...
"प्रसाद प्रकाशन, पुणे" यांनी १९५६ साली प्रसिद्ध केलेला 'गाथासप्तशती' हा (४४०+६८०=)११२० पृष्ठांचा ग्रंथ आहे.त्याचे संपादन स.आ. जोगळेकर यांनी केले असून त्यांनी ४४० पृष्ठांची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. उर्वरित ६८० पृष्ठांत एक हजार (७००+३००) गाथा आहेत.प्रत्येक गाथेची संस्कृत छाया आहे.मराठी अर्थ आणि विवरण संपादकांनी मोठ्या रसिकतेने लिहिले आहे.
दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या या गाथा महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहेत. गाथांविषयी जयवल्लभ नावाचा टीकाकार लिहितो: "ओठातल्या ओठात लाडिकपणे घोळलेले अर्धस्फुट बोल,विलासोन्मुख मुग्धेचे स्मित आणि अपांगावलोकन यांचे स्वारस्य प्राकृत गाथांच्या परिशीलनानेच प्रत्ययास येते. गाथांचे स्वरूप प्रेयसी सारखे आहे.सालंकृत,सुलक्षणीआणि सौरभपूर्ण...गाथांचे अंतर्याम आणि युवतींचे मन यांचे मर्म रसिकांनाच उमजते......ललित आणि मधुर, शृंगारिक आणि युवतिजनप्रिय अशा गाथा उपलब्ध असताना संस्कृत काव्ये कोण वाचणार?"
आणखी एक टीकाकर म्हणतो: "संस्कृत शब्दांना प्राकृत रूप मिळते तेव्हा त्यांना मार्दव आणि माधुर्य प्राप्त होते. या लाडिकपणामुळे संस्कृत पंडितही प्राकृत भाषेवर लुब्ध झाल्याचे दिसते....संस्कृत कठोर तर प्राकृत सुकुमार.राकट पुरुष आणि नाजुक स्त्री यांमधे आहे तेव्हढे अंतर संस्कृत आणि प्राकृतात आहे."
प्रत्येक गाथा दोन ओळींची असून ती आर्या अथवा गीती वृत्तात आहे.या गाथा ग्रामीण तसेच नागरी भागांतील कवींनी२००० वर्षांपूर्वी रचल्या.रचनाकारांची नांवे अज्ञात आहेत.
हाल सातवाहन (इ.स.१ ले शतक,पूर्वार्ध) या राजाला प्राकृत भाषा प्रिय होत्या.तो प्राकृत कवींचा आश्रयदाता होता.राजसभेतील कवींच्या सहकार्याने हालाने या लोकगाथा गोळा केल्या आणि त्यांचा कोश केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्री प्राकृतात सिद्ध झालेला हा आद्य ग्रंथ होय.
संपादक जोगळेकर लिहितात: ''संस्कृत ही अल्पसंख्य आर्यांची भाषा.ती बहुजन समाजाची भाषा कधीच नव्हती.धार्मिक कृत्यांसाठी संस्कृतचा वापर करणार्या आर्यांची घरगुती व्यावहारिक भाषा प्राकृतच होती. तसे नसते तर 'यज्ञदीक्षा पुरी होईपर्यंत प्राकृतात बोलूं नये' असा दण्डक सूत्रकारांनी घातला नसता."
*********************************************************
संपादकांची प्रस्तावना:
अभ्यासपूर्ण आणि विसृत अशी ही ४४० पानांची प्रस्तावना म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच म्हणायचा.दोन हजार वर्षांपूर्वींच्या आपल्या पूर्वजांची राहाणी,रीतिरिवाज,आर्थिकस्थिती,उद्योगधंदे,नैतिक कल्पना, कामजीवन अशा सर्वांगांचे गाथांच्या माध्यमातून संशोधन करूनही प्रस्तावना लिहिली आहे.
त्या काळी नैतिक बंधने शिथिल होती.तरुण तरुणींच्या विवाह्पूर्व संकेत भेटी होत.भेटीचे निरोप पोचविण्यासाठी दूती असे.आई, आत्या, यांची या प्रकाराला मूक संमती असे.बालविवाहाची पद्धती नव्हती.सुनेच्या छळाचा उल्लेख एकाही गाथेत नाही.मुलगा प्रवासाला गेल्यावर एका आईच्या तोंडी गाथा अहे,: "आता या सुनेची मला काळजी घ्यायला हवी. कारण माझ्या मुलाची ही जीवन संजीवनी आहे."
अशाच एका सासूला वाकून नमस्कार करताना सुनेच्या हातातील दोन कंकणे गळून पडली. तेव्हा सासूचे डोळे पाणावले.(पतिविरहामुळे सून कृश झाली होती.)
काही गाथा:
हालसातवाहनाने ७०० गाथांचा कोश केला.पुढे जयवल्लभ नावाच्या टीकाकाराने आणखी ३०० गाथा गोळा करून या कोशात भर घातली. या सर्व १००० गाथा स. आ.जोगळेकर संपादित सप्तशतीत आहेत.
बहुतेक गाथा ग्रामीण भागातील असून शृंगार हा त्यांचा मुख्य विषय असला तरी त्या ग्राम्य नाहीत. त्यांचा आस्वाद नागर विदग्धतेनेच घ्यायला हवा. तरच त्यांतील काव्य, अलंकार,प्रतिमा, संकेत इ.चे आकलन होऊ शकेल. "चोलीके पीछे क्या है ।" या प्रकारची ही कल्पनाशून्य छचोर गाणी नव्हेत.
गाथा आर्यावृत्तात आहेत. त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे.
........
१.अमिअं पाउअ कव्वं,पढिउं सोउं अ, जे ण आणंती।
कामस्स तत्ततन्तिं, कुणन्ति ते कहं ण लज्जन्ति ?।
..
संस्कृत छाया: अमॄतं प्राकृत काव्यं,पठितुं श्रोतुं च ये न जानन्ति ।
कामस्य तत्त्वचिन्तां,कुर्वन्ति ते कथं न लज्जन्ति ।
...
अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा ऐकणे ज्यांना माहीत नाही आणि जे कामशास्त्रातील तत्त्वांची (शुष्क) चर्चा मात्र करीत असतात त्या (संस्कृत पंडितांना ) लाज कशी वाटत नाही?
......
२.साळीचे शेत पिकून पांढरे झाले आहे.(ते शेतकरी कापतील व आपले भेटीचे एकान्त स्थळ नष्ट होईल) म्हणून मान खाली घालून का रडतेस? नटीने मुखाला हरितालाचा रंग लावून सज्ज व्हावे त्या प्रमाणे तागाचे शेत (पिवळ्या धमक फ़ुलांनी )नटले आहे, ते पाहा.
...
३. अण्ण महिला पसंगं, दे देव करेसु अम्ह दइअस्स ।
पुरिसा एक्कंतरसा, ण हु दोसगुणे विआणन्ति।
...
अन्य महिलाप्रससंगं, हे देव कुर्व स्माकं दयितस्य।
पुरुषा एकान्तरसा, न खलु दोषगुणौ विजानन्ति।
.....
देवा, माझ्या पतीचा संबंध अन्य स्त्रियांशी येऊं दे.(म्हणजे तरी त्याला माझे गुण समजतील.) एकनिष्ठ पुरुषांना (आपल्या पत्नीचे) गुण समजत नाहीत आणि दोषही उमजत नाहीत.
.......
४.धूम्ररहित अग्निगोलां सारखे लकाकणारे आपल्या नवपरिणित श्यामल पत्नीचे स्तन पाहून शेतकयाने माघमहिन्यात(ऐन हिवाळ्यात) आपली ऊबदार पांघरुणे विकून बैल खरेदी केला. (ऊबेची सोय झाली आहे. शेतीसाठी बैल हवा आहे.शेतकरी गरीब आहे.)
५. जेत्ति अमेत्ता रच्छा, णिअम्ब!कह तेत्तिओ ण जाओसि?
जं छिपाइ गुरुगण लजिओ,सरन्तो वि सो सुहओ ।
...(.एक युवती म्हणते)...नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणानुसार विस्तृत का झाला नाही?
तसे झालां असतां तर, वडिलांच्या सान्निध्यामुळे संकोच वाटल्याने मुद्दाम दुरून जाणार्या प्रियकराला मला स्पर्श तरी करता आला असता!
गाथा सुरेख आहेत.
गाथा २ आणि ४ टंकायच्या राहील्या का?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्राकृत भाषा कशी असते याचा नमुना म्हणून काही गाथा टंकित केल्या. तसेच काही गाथांची संस्कृत छाया लिहिली. प्रत्येक गाथा लिहिण्याची आवश्यकता वाटली नाही. तसेच वाचक कंटाळतील असेही वाटले. पुस्तकात प्रत्येक गाथा, तिची संस्कृत छाया, अर्थ आणि विवरण आहे.
३. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती अशी, की एखाद्या शब्दाच्या संस्कृत आणि प्राकृत रूपांची तुलना केल्यास प्राकृत रूपामध्ये संस्कृत रूपातील बरीचशी व्यंजने फेकून देऊन अधिकतर केवळ स्वर टिकवून ठेवण्याकडे कल दिसतो.
आपले नीरिक्षण फारच सूक्ष्म आहे. यावर तज्ञ काय म्हणतात हे ऐकण्यास उत्सूक आहे. सध्या भाषेतल्या ध्वनींच्या प्रवाहावर एक पुस्तक वाचत आहे. त्यामुळे हे नीरिक्षण एकदम नजरेत भरले.
प्राकृताचे विश्लेषण आवडले.
प्रत्येक गाथेची संस्कृत छटा दिली असती तर गाथेचे मूळ प्राकृत शब्द आणि तिचा अर्थ यांची सांगड घालायला सोपे झाले असते.
खरे आहे आणि त्या निमित्ताने या भाषेतील खाचाखोचा अधिक कळल्या असत्या. एखाद्या भाषेकडे किंवा तिच्या विशेषाकडे पाहायचे झाले तर त्यातील जास्तीत जास्त उदाहरणे समोर हवीत असे वाटते.
तुमच्या चौथ्या मुद्द्यातला प्रश्न आधी वाचला, तेव्हा आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, ते ध्यानात आले नव्हते. आता परत एकदा वाचल्यावर साधारण कल्पना आली. माझ्या तर्काप्रमाणे मी आपल्याला उत्तर देते.
स्वर जरी सारखे असले, तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यंजने बदललेली दिसतात. पण कुठल्याही व्यंजनाच्या जागी इतर कुठलेही व्यंजन ऍट रँडम वापरायचे, असे नाही. काही विशिष्ट व्यंजनांच्या जागी काही विशिष्ट व्यंजने वापरायची. जसे तुम्ही वरच्या एका मुद्द्यात म्हटले आहे, की श आणि ष चा स होतो. म्हणजे जिथे जिथे स येईल तिथे तिथे आपण श किंवा ष घालून बघू. प घालून बघणार नाही. जसे पहिल्या गाथेत ठ चा ढ झालेला दिसतो आहे. म्हणजे ट-वर्गातल्या दुसर्या व्यंजनाच्या जागी चौथे व्यंजन वापरण्याची पद्धत दिसते असे म्हणता येईल. (अर्थात त्यासाठी एकच उदाहरण पुरेसे नाही.) हे सर्व वर्गांच्या बाबतीत म्हणजे क-वर्ग, च-वर्ग वगैरे, दिसते का ते तपासायचे. याचाच अर्थ कुठल्या व्यंजनाच्या जागी कुठलं व्यंजन येणार हे कळलं की, अर्थातली संदिग्धता बर्याच अंशी निघून जाईल.
आता आपला मुद्दा कळला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मला वाटते, या व्यंजन काढून टाकणे आणि व्यंजन बदलणे प्रकारांत काहीतरी रेग्युलॅरिटी निश्चितच असणार. ती शोधून काढावी लागेल. मला आधी वाटले होते, की क,च,ट,त,प वर्गांतील केवळ तिसरी व चौथी व्यंजनेच वापरली जातात की काय, प्रथम २ व्यंजने वापरली जातच नाहीत की काय! परंतू प आणि क वापरले जात असल्याचे दिसत आहे. तसेच काही अनुनासिके वापरली जात असून इतर गायब आहेत. गायब अनुनासिके सर्वच ठिकाणी गायब असतात की जोडाक्षरात आली तरच गायब होतात, तसेच प, क हे फक्त जोडाक्षरातच वापरले जातात का वगैरे वगैरे बघावे लागेल. त्यासाठी अधिक प्राकृत वाक्ये व त्यांच्या संस्कृत छाया मिळाल्या तर उत्तम.
हे अवांतर आहे याबाबत मी सहमत आहे. मूळ साहित्यिक विषयाचा आस्वाद एक मोठी चर्चा आहे. अपभ्रंशांवरील विवेचन हाही मोठा विषय आहे, आणि सहित्यिक चर्चा भरकटण्यास मीही येथे जबाबदार आहे.
टग्या हे अत्यंत वैज्ञानिक दृष्टीने विचार करत आहेत.
आणखी एक उदाहरण घ्यायचे झाल्यास पाचव्या गाथेतील 'णिअम्ब' म्हणजे 'नितंब' (बटक्स) की 'निलंब' (सस्पेन्शन) हे कशावरून ठरवायचे? की केवळ संदर्भावरून?
किंवा एक मराठीकृत उदाहरण घायचे झाल्यास, याच प्रतिसादातील पहिले वाक्य घ्या. हेच वाक्य जर मी "माआ चौआ मु'आ किंइत वे'आ होआ."
हे अर्थातच अशक्य आहे. प्राकृत भाषा या "अपभ्रंश" म्हणून संस्कृतच्छाया काही प्रकारे "मूळपाठ्य" अशा वाचू नयेत. आपण मराठीही तशी वाचत नाही. त्या बोलीभाषा होत्या, आणि त्यांच्यात असंदिग्धता (भाषांना जितपत असते तितकी) स्वयंभू होती.
आता मराठीतही "थान" हा शब्द दोन प्रकारे येऊन संदिग्धता असल्यचे वाटू शकते - स्थल->थळ तसे स्थान->थान (हे चूक आहे आपल्याला माहीत आहे)
किंवा स्तर->थर सारखे स्तन->स्तान->थान
म्हणजे थान (मराठी)ची संस्कृतच्छाया काय असावी? स्थान की स्तन? ही संदिग्धता कोण्या अमराठी संस्कृत जाणणार्याला वाटू शकेल.
मराठी माणसाला (तसेच महाराष्ट्री प्राकृत बोलणार्याला) संकृतच्छायेशी काही सोयरसुतक नसते. त्याच्या दृष्टीने हा असंदिग्ध शब्द आहे.
जर मराठी माहीत नसेल तर अशा संदिग्ध परिस्थितीत संदर्भावरून शब्दाची संस्कृतच्छाया ठरवता येते. एखादा संदर्भ संदिग्ध असेल, पण भाषेचे साहित्य विस्तृत असेल, तर दुसरा, असंदिग्ध वापर सापडतो.
त्या प्राकृत भाषा लुप्त झाल्या, त्यांच्या थोड्याफार जवळची (मराठीच्या मानाने जवळची) संस्कृत भाषा अजून शिकली जाते म्हणून संस्कृतच्छायेचा आपल्याला फार उपयोग होतो. त्या मर्यादित दृष्टीने संस्कृतच्छाया वापरावी.
मग प्रसिद्ध व्याकरणग्रंथ (मोग्गलान, कच्छायन, प्राकृतप्रकाश वगैरे) अपभ्रंशाचे नियम सांगून प्राकृत भाषांचे व्याकरण का करतात? उदा मोग्गलानचा पालीसाठी नियम :
व-नंतर आलेला किंवा शब्दाच्या सुरुवातीचा ऋ=>उ. उदाहरण
वृषभ=>उसभ
(जसे स्तन->थान हा नियम मराठी भाषकांसाठी अप्रस्तुत आहे. थान शब्द आहे तसा शब्दकोशात सापडावा, किंवा घरात/गल्लीत शिकावा. त्याच प्रमाणे पाली-भाषकाला उसभ शब्द घरी/गल्लीत/शाळेत आपोआप कळेल.) काही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ प्राकृत भाषांमध्ये लिहिले गेले आहेत. पुढे त्या प्रचलित बोली राहिलेल्या नव्हत्या, पण संस्कृत प्रचलित सुशिक्षित भाषा राहिलेली होती. त्यामुळे मुळातच पालीचे वगैरे व्याकरण लिहिण्यापेक्षा अपभ्रंशाचे नियम लिहिणे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी झाले असेल. पण त्या भाषांच्या पुरते बघता अपभ्रंशाचे नियम पूर्णपणे अप्रस्तुत ठरावेत.
हे नियम ज्ञात नसते, तर टग्या करतात तसेच संदिग्धातून असंदिग्धाकडे प्रवास करत अर्थ लावावे लागले असते. त्यामुळे हे नियम शोधणार्या त्यांच्या विचाराच्या झेपेचे कौतुक करावे तितके थोडके. पण हे नियम खूप आहेत, आणि आपल्या हातात कोडे सोडवण्यासाठी साहित्याचे नमुने फार थोडे आहेत.
कोडे स्वतःहून सोडवणे अशक्य झाल्यास हेमचंद्र, वररुची, चंड, वगैरेंनी यांनी पूर्वीच्या काळात शोधलेले, लिहिलेले अपभ्रंशाचे नियम उपयोगी ठरावेत.
(माझ्यापाशी पैकी कुठल्याच प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथांच्या प्रती नाहीत. पण त्यांचे उल्लेख असलेले ग्रंथ आहेत :-)
>>> गाथा आर्यावृत्तात आहेत. त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे.
म्हणून पाहिल्या. आर्येत म्हणता येत आहेत - थोडा मात्रांचा गोंधळ कधीकधी होतो आहे. याचा अर्थ जी अक्षरे एरवी "लघु" वजनाची आहेत त्यापैकी काही "गुरु" वजनाने म्हणायची असणार. पण भाषेचा संदर्भ नसल्याने अदमासाने म्हणताना अदमासाने वजन टाकावे लागते.
आता मुख्य विषय - गाथा यांविषयी. २००० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा एक दस्तावेज म्हणून हे सारे काम महत्त्वाचे आहेच. पण "चोली के पीछे" हा प्रकार या गाथांच्या संदर्भात कल्पनाशून्य आणि छचोर का ठरावा ते समजले नाही. स्तनानितंबादि अवयवांच्या (यात पुढे पुरुषांच्या इंद्रियांचे इतके स्वैर् उल्लेख आहेत का ते माहीत नाही. म्हणजे मग हे "रेटेड् आर्" आहे का "नॉट् रेटेड्" आहे ते कळेल) मुबलक उल्लेखांवरून असे दिसते की अलिकडील काळात लावणी या साहित्य-प्रकाराचे ग्रामीण जनमानसात जे स्थान आहे ते या "गाथां"चे त्या काळात असावे काय ? (मी साहित्यप्रकार या अर्थाने असे विचारत आहे. लावणीप्रमाणे गाथा कुणी नृत्यसंगीताबरोबर म्हणून दाखवत असतील असे म्हणायचे नाही.) स्तोत्रे, श्लोक, ऋचा या प्रकारांमधे ज्याप्रमाणे वर्ण्यविषय परमेश्वर/निसर्ग असतो आणि त्यांचे स्वरूप ज्याप्रमाणे आराधना/स्तुती/तत्वविवेचन असे असते तसे याठिकाणी दिसत नाही.
...नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणानुसार विस्तृत का झाला नाही?
बाबो!!!
काही खरं नाही.
सौंदर्याचे नक्की काय 'माप' दंड होते त्याकाळी
यावर पण काही प्रकाश कुणी टाकावा...
आपल्या तुफान आवडलंय!
अजून येवू द्या
दोन हजार वर्षांपूर्वी खेडेगावातील रस्त्याची रुंदी किती असेल याची कल्पना करावी. वाहने नव्हतीच. रस्ता म्हणजे पायवाटच असावी.
गाथा रोचक आहेत. यावरून एक मुद्दा मनात आला. ह्या गाथा दोन हजार वर्षांपूर्वीच्या. कामसूत्र इ. स. दोनशे मधले. खजुराहो इ. स. ९५० ते इ. स. १०५० मधले. म्हणजे अकराव्या शतकापर्यंततरी भारतीय संस्कृतीमध्ये आत्ताच्या पाश्चात्य जगतात आहे तितकी (किंवा अधिक?) लैंगिक मोकळीकता होती असे मानायला हरकत नाही. आणि हा प्रवास असाच चालू राहिला असता तर आत्ताच्या भारतीय समाजाचे चित्र बरेच वेगळे दिसले असते. प्रश्न असा की नंतरच्या हजारेक वर्षांमध्ये असे काय झाले की आपण लैंगिकतेच्या बाबतीत घूमजाव करून अगदी प्रागैतिहासिक काळात गेलो?
डोक्यावर पदर घेणे, सायंकाळनंतर घराबाहेर न पडणे या सारखी अनेक बंधने याच काळात आली असणार. अभ्यासक यावर योग्य तो प्रकाश टाकतील असा विश्वास आहे.
बरोबर.. मुसलमानांनी आपल्या (हिंदू) संस्कृतीतले गुण उचलले नाहीत उलट (हिंदुत्ववादी) हिंदूंनी मात्र इस्लाम मधील अवगुण बरोबर उचलले.
कामसुत्र आणि खजुराहो ज्या संस्कृतीत घडले तिथे आता व्हॅलेंटाईन डे ला दुकाने फोडली जातात हे त्याचेच द्योतक! आणि आयरनी म्हणजे हे लोकंही स्वतःला 'संस्कृती रक्षक' म्हणवतात!!
रोचक मुद्दा आहे. याचा संदर्भ मिळू शकेल का? गौतम बुद्धाचा काळ इसपू ५६३ ते ४८३ असा होता. त्याचा परिणाम दीड हजार वर्षांनंतर कसा झाला हे नीट कळले नाही.
प्रियालींनी मांडलेल्या मुद्यांमधे थोडीशी खालील भरः
गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे झालेला परीणाम (भयाण शांतता वगैरे...) ह्याला कारण बुद्धापेक्षा, बौद्ध धर्म होता. प्रेषितांचे धर्म हे त्यांचे अनुयायी तयार करतात स्वतः प्रेषित नाही. हेच हिंदू धर्मांतर्गत थोडेफार काही पंथांसंबधी बोलता येईल. हे अनुयायी नंतर नंतर अतिरेक तयार करतात. अतिरेक अथवा अतिरेकी विचार म्हणजे केवळ भौतिक अथवा वैचारीक हिंसा असते अशातला भाग नाही तर कुठलेही टोक असू शकते. सम्राट अशोकाने केलेल्या कलींगच्या युद्धानंतर ज्या स्मशानशांततेचा त्याला अनुभव आला, त्याच्या मुळे आलेल्या मानसीक अवस्थेला तोंड देण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी बौद्ध धर्म स्विकारला आणि त्याचा प्रचार चालू केला. हा प्रकार जरी ख्रिस्तपूर्व २३० मधला असला तरी त्याचा हळू हळू परीणाम वाढत गेला. बरं, स्वतः गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तिसाठी संसार आणि राज्यावर पाणि सोडले आणि नंतर भिक्षू होऊन मठात राहीला. पण अशोकाने मात्र कितीही चांगले राज्य केले असले तरी बौद्ध धर्म स्विकारताना स्वतःचे सम्राट पद सोडले नाही आणि बळजबरीने बौद्ध धर्म स्विकारायला लावला. भारतीय इतिहासात तो एकच कालखंड असा आहे की जेंव्हा भारतात "रिलीजन स्टेट" आले. नाहीतर राष्ट्राला कधी रिलीजन या अर्थी आधिही धर्म नव्हता आणि नंतरही. अर्थात याचा अर्थ धार्मिक स्वातंत्र्य होते. नंतरचा काही काळ तर असा होता की जो पर्यंत एकीकडे राज्य करायचे आणि दुसरीकडे अहिंसा असे चालू शकत नाही. तो क्षात्र धर्म होऊ शकत नाही. परीणामी गाडा गडगडायला लागला. पुढे अनेक शतकात अनेक घटना घडत गेल्या, पुष्यमित्रशृंगाने ग्रिकांची परत झालेली आक्रमणे आणि नंतर विक्रमादित्याने शक-कुशाणांची आक्रमणे हटवली. पण "स्टेट स्पोन्सर्ड - बौद्ध धर्म" हा वेगवेगळ्या रुपाने राहीला. आणि समाजात विघटन करण्यास (त्यातील तत्वांमुळे नाही तर ती चुकीच्या अर्थाने अहंकाराने वापरणार्या त्यातील अनुयायांमुळे ) कारणीभूत झाला....
बाकी इस्लामचे आक्रमण हे बाहेरील प्रथमच सांस्कृतिक आक्रमण होते ज्याचे परीणाम प्रियालींनी थोडक्यात सांगितल्याप्रमाणे झाले...
पुश्यमित्र शुङ्ग (हे नाव असे लिहायचे का?) आणि शुङ्ग घराण्याबद्दल विश्वासार्ह वाचनीय फारसे न मिळाल्याने माझ्याकडील माहिती थोडी अपुरी आहे. परंतु,
बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे संन्यास स्वीकारावा असे नसावे. भारतासह अनेक पौर्वात्य राष्ट्रेही बौद्ध धर्म स्वीकारत गेली परंतु त्यांनी युद्धे केली, हिंसा केली. त्यामुळे बौद्ध धर्मातील नेमके काय तिथे प्रसारित झाले असा प्रश्न मला पडतो.
गौतम बुद्धाने संन्यास स्वतःच्या मर्जीने स्वीकारला पण आपल्या सर्वच अनुययांनी संन्यास स्वीकारावा असे त्याने सांगितले असावे असे वाटत नाही. (संन्यास स्वीकारला तर नैसर्गिक रित्या धर्म वाढायचा कसा? ;-))
परंतु,
पण अशोकाने मात्र कितीही चांगले राज्य केले असले तरी बौद्ध धर्म स्विकारताना स्वतःचे सम्राट पद सोडले नाही आणि बळजबरीने बौद्ध धर्म स्विकारायला लावला.
याचा अधिक विस्तार करता येईल का? कारण अशोकाने श्रीलंका, द.पूर्व आशिया, यवनी प्रांत (सेल्यूकस निकेटरचे राज्य), नेपाळ, उर्वरीत भारत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र) इ. भागांत आपले प्रतिनिधी (मिशनरी) पाठवले पण त्यांनी बळजबरीने धर्मप्रसार केल्याचे ऐकीवात नाही. सेल्यूकसच्या राज्यात आणि अशोकाच्या राज्यात घरोबा असल्याने (बहुधा सेल्यूकसच्या मुलीशी चंद्रगुप्ताने लग्न केले होते आणि या दोन्ही राज्यांतील संबंध चांगले होते.) बौद्ध धर्माला तेथे आश्रय मिळाला. अफगाणिस्तानातील बौद्ध धर्म यामुळेच विकसित झाला. याच बरोबर, पुश्यमित्राने फिका पडणार्या हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी बौद्ध भिक्षूंची निर्घृण हत्या केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात.*
खरंतर, कलिंगच्या लढाईने व्यथित होऊन अशोकाने धर्म का बदलावा याचे सयुक्तिक कारण मला मिळालेले नाही. बौद्ध धर्म आणि जैन धर्म मौर्य राज्याला नवा नव्हता.
मौर्य घराण्यापूर्वीचे शिशुनाग घराणे, बिंबिसार, अजातशत्रू (आम्रपालीची आख्यायिका) इ. राजेही बौद्ध धर्म मानत होते.
कुशाण राजेही बौद्धच होते. त्यातील कनिष्क हा भारतील एक उत्तम राज्यकर्ता समजला जातो.
तसेच भारतातील ग्रीक राजेही बौद्ध झाले. मिनँडरचे उदाहरण आहेच.
सम्राट हर्षवर्धन हा ही बौद्ध होता.
त्यामुळे बौद्ध धर्माचा स्वीकार म्हणजे संन्यास असे नसावे, अशोकानेही ते तसे पाळले नसावे. हर्षवर्धनानंतर आलेल्या शासकांनीही बौद्ध धर्मीयांवर अत्याचार केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात. परंतु त्यानंतर येणार्या अनेक राजघराण्यांनी (पाल, राष्ट्रकूट इ.) हिंदू धर्मासोबत बौद्ध आणि जैन धर्म/पंथांना राज्याश्रय दिला. आदि शंकराचार्यांमुळे हिंदू धर्माला पुन्हा सोन्याचे दिवस आले असे वाटते. १० व्या शतकानंतर मात्र मुसलमान राज्यकर्त्यांमुळे भारतीय संस्कृतीत बराच बदल झाला.
अशोकाने बौद्ध धर्म कशा रितीने (कोणत्या टर्म्स आणि कंडिशन्स लक्षात घेऊन) स्वीकारला यावर कोणी प्रकाश पाडावा. मला फारशी कल्पना नाही.
बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे भारतातील राज्यांना मरगळ आली असे एक विधान केले जाते. त्यातही फारसे तथ्य वाटत नाही. शूर बौद्ध राजे आणि अनेक धर्मांना आश्रय देणारे हिंदू राजे यांची उदाहरणे प्रतिसादात दिली आहेत, अधिकही देता येतील. माझ्यामते झाले असे की सुपीक जमीन, चांगले हवामान आणि कमी नैसर्गिक आपत्ती यामुळे भारतीय "देतोय हरी खाटल्यावरी..." या मोड मध्ये गेले. म्हणजे राज्यविस्तार करणार कुठे? अफगाणिस्तानातल्या वाळवंटात? ईशान्येतल्या घनदाट जंगलांत का हिमालयातल्या बर्फाळ वाळवंटात? आणि तसे करून नुकसान कोणाचे आपलेच कारण सैन्याचा खर्च, लढाईचा खर्च भागवून नेणे आणि नंतर अशा ओसाड प्रदेशांवर राज्य करणे म्हणजे नुकसानच नुकसान. त्यामुळे आपापसांतील लुटुपुटूंच्या लढायांत भारतीय खुश राहिले.
परंतु, बौद्ध आणि हिंदू धर्माने मात्र आपापसांत कुरघोडी करण्यासाठी साहित्यातून एकमेकांवर अनन्वित अत्याचार केले आहेत असे ऐकून आहे. (चू. भू. दे. घे.)
* याचे विश्वासार्ह संदर्भही मिळालेले नाहीत. बौद्ध साहित्यात तसे उल्लेख येतात परंतु विश्वासार्हता तपासलेली नाही.
पुष्यमित्र शुंग-मुद्दाम शुङ्ग लिहायची गरज नाही. ष्य मात्र हवा, श्य चालणार नाही.
चन्द्रगुप्ताच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने हिंदुस्थानचे साम्राज्य टिकवून ठेवले. त्यानंतर आलेल्या अशोकाने शस्त्रबळाच्या जोरावर अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्न अशा धर्माचा प्रसार केला; आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ आणि परक्यांवर सहज विजय मिळवू शकणारी राज्ययंत्रणा ढिली केली.. त्यामुळे शंभर-सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे परत सुरू झाली. डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक राजे भारतात सहजपणे अयोध्येपर्यंत घुसले. पूर्वी अलेक्झॅन्डरला इंचइंच भूमी लढून मिळवावी लागली होती. आता तसे झाले नाही. अशोकाने देशाची प्रतिकारशक्ती नष्ट केली होती.
मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराज्याच्या वृत्तीने हे शांतपणे पाहात बसला होता. त्यावेळी बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्राचा उदय झाला. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाचा वध केला आणि यावनी आक्रमकांना सीमेबाहेर हाकलून दिले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले नाही तर वैदिक संस्कृतीचेही केले. त्याचे प्रतीक म्हणून त्याने अश्वमेध यज्ञदेखील केला होता.
पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्षे(इ.स.पू. १८४ ते ७२) मगधाचे राज्य केले. त्यामुळे पुष्यमित्र शुंगाने देशहितासाठी काही बौद्धधर्मीयांचा छळ केला असेल तर ते समजण्यासारखे आहे.
'गाथासप्तशती' उपक्रम सुरू करण्यासाठी श्री. य.ना. वालावलकरांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
हालाच्या 'गाथासत्तसई'च्या निमित्ताने प्राकृत भाषेबद्दल खूपच माहिती मिळाली.
मूळ गाथेबदल -
येथे सर्व गाथा अर्थासह देणे हा फारच कष्टाचा उपक्रम आहे याची जाणीव होते.
शक्य असेल तर उत्तमच! पण नसेल तर विषयवार विभागणी करून त्या काळातल्या
लोकजीवनाची वाचकांना संपूर्ण माहिती होईल अशा महत्वाच्या गाथा देता आल्या
तर बरे होईल. (उदा. राहणी, पोषाख, व्यापारउदीम, दळणवळण, राजकारण, घरे,
वातावरण इ.)
येथे दिलेल्या गाथा वाचता त्याकाळातील स्त्रीपुरुष संबंधांबाबत काहीसा उदार (आजच्या तुलनेने) दृष्टीकोन दिसतो. परंतु एक अज्ञ शंका अशीही आली की हे काव्य त्या काळातील 'ग्राम्य' काव्य तर नव्हते? (वात्स्यायनाची कामसूत्रे संस्कृत भाषेतील अभिजात साहित्यकृती म्हणता येईल का?) याबात तज्ञांची मते जाणून घ्यायची आहे.
असे 'लैगिक' साहित्य (विशेषत: चित्रफीती) आर्वाचिन भाषांमध्येही प्रसिद्ध होते. ते वेगळ्या दृष्टीने प्रसिद्धी पावते. परंतु कालांतराने ते कोणा संशोधकाला सापडले तर त्यावरून भविष्याच्या पूर्वीच्या काळातले (वर्तमानकाळातले) स्त्रीपुरुष संबंध सैल होते असा निष्कर्ष निघेल का?
अपभ्रंश -
संस्कृत आणि प्राकृत भाषेतील साम्यस्थळे, शब्दांची अपभ्रष्ट रूपे आणि
अपभ्रंशाचे नियम याबद्दल लक्ष्मीधरकृत 'षड्भाषाचंद्रिका' हे पुस्तक
मायक्रोसॉफ्ट आणि मिलियन बुक्स प्रोजेक्टच्या कृपेने -
येथे मिळाले.
तेथे त्रिविक्रमाचे 'प्राकृत व्याकरण' ही उपलब्ध आहे असे दिसते.
षड्भाषाचंद्रिकेप्रमाणे अपभ्रष्ट भाषांमध्ये - महाराष्ट्री, प्राच्य,
शौरसेनी, मागधी, (अर्धमागधी, ),अवंती,(बहालिकी),शाकारी,
चांडाळी,शाबरी,(अभिरी, औधुरी),टक्की, नागर, उपनागर, पैशाची इ. अनेक भाषांचा
समावेश होतो.
अभ्यासकांसाठी ही सहज मिळू शकणारी दोन्ही पुस्तके मुळातूनच वाचण्याजोगी आहेत.
शककर्ता शालिवाहन- गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी.
हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मला पुस्तकांतुन, आंतरजालावरुन मिळालेली माहिती व माझ्या संग्रही असलेली काही नाणी खास माबोकरांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह.
शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती
मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा
आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत
धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता.
बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील
कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच शालिवाहनाची देण आहे आणि हे कळल्यावर तुम्हाला थोडे नवलच वाटेल कान्हेरी लेणी ही त्या काळचे विद्यापिठ होते यावर आजुनही खोल संशोधन चालु आहे.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा
उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला.
त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे
शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी
जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले
जाते.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे
त्या नाण्याची पाठची बाजु.
सातकर्णी तांब्याची नाणि

यात जाणकार आजुन भर घालतीलच
त्या चिन्हाला नंदीपद असं म्हणतात (नंदीपाडा नाही)
युरी गागारिन, नाणी, शिलालेख, स्तंभ यांचं कार्बन डेटिंग होत नाही. बहुतांश शिलालेखांमधे काळाचा उल्लेख असतो. तो शक संवत् मधेच असतो असं नाही, पण राजांच्या नावांमुळे, राजघराण्यांच्या नावांमुळे किंवा अक्षरांच्या/लिपीच्या शैलीवरून लेखाचा/ नाण्याचा काळ ठरवला जातो.
महाराष्ट्र टाईम्स गुढी पाडवा विशेषंकात आलेला गौतमी सातकर्णी वरिल लेख
लेखक >> संजय सोनवणी
शालिवाहन मुळचा शब्द तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी
सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहनांनी शकांचे हनन
केले. ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
..........
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.
सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.
सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी
( नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त दैनिक संचार मध्ये प्रकाशित झालेला लेख)
महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर छत्रपती शिवाजी
महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार
नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय
दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात
शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच
मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा
महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि
सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी
घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा
दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त
मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु
महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व
केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण
इतिहास महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या लेखा मागील उद्देश
आहे.
प्राचीन कालखंड म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २३० चा तो कालखंड होता. संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.
वैदिक धर्मीय असणाऱ्या सातवाहनांनी अश्वमेध, राजसूय, अनारंभनीय इत्यादी यज्ञ करून आपला दरारा संपूर्ण भारत खंडामध्ये निर्माण केला होता. या घराण्याने भारतीय इतिहासाला अनेक वीर राजे दिले आहेत. याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने “तीसमुद्दतोयपीतवान” (म्हणजे ज्याच्या वाहनाने घोड्याने तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे) ही बिरुदावली धारण केली होती. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र वैभवाच्या उत्तुंग शिखरावर होता. ही संपन्नता पाहून नहपान नावाचा एक शक राज्यकर्ता महाराष्ट्रावर आक्रमण करु लागला. इसवी सन १२५ च्या सुमारास नहपान आणि गौतमिपुत्रामध्ये नाशिक येथील गोवर्धन परिसरात घनघोर युद्ध झाले. यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा दारुण पराभव केला आणि त्याच्या चांदीच्या व सोन्याच्या सर्व नाण्यांवर आपली विजय मुद्रा उमटवली आणि ती चलनात आणली. नाशिक येथील जोंगलटेंभी येथे झालेल्या उत्खननामध्ये अशा १३,२५० नाण्यांचा संचय सापडला आहे. पराभूत नहपान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लपून बसला असता, त्याचा पाठलाग करून गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ उच्छेद केला. नहपान शकाच्या नाशामुळे महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची कोणत्याही परकीय आक्रमकाची छाती झाली नाही. तसेच वायव्येकडील ग्रीक व पह्लवांनी गौतमीपुत्राची चांगलीच धास्ती घेतली होती. गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार मध्यप्रदेशातील विदिषा नगरी पर्यंत वाढवला होता. याच्या कालखंडात दक्षिण व मध्य भारतामध्ये सातवाहनांची प्रबळ सत्ता होती.
नाशिक येथील गौतमीपुत्राच्या आईने खोदलेले देवी लेणे
सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. अशा उत्तम कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता!
सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती. याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती. तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
तेर येथे उत्खननामध्ये मिळालेली हस्तिदंती बाहुली
इटलीतील संग्रहालया मधील बाहुली
बहुतांश सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
नागनिकेचे नाणे
स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे. सातवाहन राजांनी अनेक गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या कालखंडामध्ये केली होती. हेच गड-किल्ले पुढील शिलाहार व राष्ट्रकूट वंशी राज्यांनी वापरले. छत्रपती शिवरायांनी ज्या गड-किल्ल्यांच्या जोरावर हिंदवी साम्राज्य उभे केले त्यातील काही किल्ले हे कदाचित सातवाहन स्थापित असतील !
साहित्य, स्थापत्य, शिल्पकला याबरोबरच व्यापार-उद्योग, धार्मिक समन्वय आणि सुनियोजित शासन व्यवस्था अशा अनेक कसोट्यांवर सातवाहन घराण्याने महाराष्ट्राला जागतिक पटलावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते. महाराष्ट्र दिन साजरा करताना या सुवर्ण इतिहासाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
संदर्भ ग्रंथ- १. सातवाहन कालीन महाराष्ट्र (रा. श्री. मोरवंचीकर)
२. प्राचीन भारताचा इतिहास (जी. बी. देगलूरकर)
३. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (डॉ. वा. वि.मिराशी)
चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक - डॉ. मंजिरी भालेराव
![]() |
| गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू |
![]() |
| नाशिक येथील गौतमीपुत्र सातकर्णी याचा लेख असलेली गुहा |
![]() |
| नाशिक येथील नहपानाचा जावई उषवदात याचा लेख असलेली गुहा |
वासिष्ठीपुत्र पुळुमावी
वासिष्ठीपुत्र पुळुमावी
गौतमीपुत्रानंतर इ.स. १३२ मध्ये त्याचा ज्येष्ठ पुत्र पुळूमावी हा राजगादीवर आला. त्याच्या आईचे गोत्र वासिष्ठी असल्याने त्याला वाशिष्ठीपुत्र म्हणले गेले आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ' शिवश्री पुळूमावी ' असाही येतो. त्याने जवळपास २८ वर्षे राज्य केले. सातवाहनांच्या विशाल साम्राज्यावर एकछत्री अंमल करणारा पुळूमावी हा अखेरचा सम्राट.
टोलेमी च्या भुवर्णनाप्रमाणे त्याची राजधानी होती पैठण. पुळूमावीला नावनरस्वामी, दक्षिणापथेश्वर, दक्षिणापथस्वामी अशी बिरुदे लावलेली दिसतात.
त्याच्या कारकीर्दीत पूर्व आणि पश्चिम माळवा, काठेवाड आणि राजपुतान्याचा प्रदेश पश्चिमीक्षत्रपांनी जिंकून घेऊन क्षत्रपराजा रुद्रदामन याने दक्षिणापथस्वामी पुळूमावी याचा दोनदा पराभव केला. तथापि रुद्रदामान आणि पुळूमावी याचे जवळचे नाते असल्यामुळे रुद्रदामनला समेट करावा लागला. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पत्नी होती. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर काही काळासाठी सातवाहन व क्षत्रप राजांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते, त्याच काळात हा विवाह झाला असावा. क्षत्रप - सातवाहन विवाहाला राजकीय महत्वाबरोबरच संस्कृतिक महत्त्व देखील होते. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पट्टराणी होती. त्यामुळे सातवाहनांच्या चालिरीतीमध्ये, वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये फार मोठा फरक झालेला दिसतो. पुळूमावी त्याच्या नाण्यांवर ग्रीक - रोमन राजपुत्रा सारखा दाखवलेला असून नाणेही ग्रीक - रोमन नाण्यांसारखे जोडभाषेत काढण्यात आले आहे.
उत्तरेतील सत्ता गेली तरी पुळुवामीचे राज्य महाराष्ट्र, कोकण, वऱ्हाड, आंध्र ते दक्षिणेस पाँडिचेरी पर्यंत पसरले होते. नंतरचे क्षत्रपांचे हल्ले पुळूमाविने परतवून लावले. या सोबतच दक्षिणेतील कुंतलचा विस्तृत प्रदेश त्याने जिंकून घेतला आणि दक्षिण भारतावरील आपली सत्ता मजबूत केली. गौतमीपुत्र सातकर्णीच्या क्षत्रपांविरुद्धच्या अभियानामध्ये पुळूमाविने मोठी कामगिरी बजावल्याचे दिसते. प्रतिष्ठान ही त्याची आवडती राजधानी होती. क्षत्रपांनी आक्रमणात पैठणची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे दिसते. पैठण मध्ये क्षत्रपांची नाणी आणि ते ओतण्याचा साचा देखील मिळालेला आहे त्यावरून पैठण हे काही काळ क्षत्रपांनी जिंकून घेतले होते असे दिसते. नंतर पैठण जिंकून घेऊन पुळूमाविने नव्याने घडी बसविल्याचे दिसते.
क्षत्रपांच्या धर्तीवर स्वतःचा मुखवटा असलेली प्राकृत व द्राविडी भाषेतील नाणी त्याने प्रचारात आणली. पैठण येथे अशी नाणी मिळालेली आहेत. इथे सापडलेल्या नाण्याच्या दगडी साच्यात पुळूमाविचे भिन्न वयातील तीन मुखवटे कोरलेले आहेत ( तरुण, मध्यम, वृद्धत्व). गरूडा सारखे बाकदार नाक, किंचित पुढे आलेला खालचा ओठ आणि भारदस्त चेहेरा ही त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिषट्ये उठून दिसतात. त्यानेही रोमन राजपुत्रा प्रमाणे आपले केस मोकळे ठेवले असून भोवती रत्नांचा पुंजका असणारी रिबीन बांधलेली आहे. हा क्षत्रपांच्या संपर्काचा परिणाम असावा.
पुळूमावी हा महाराष्ट्राच्या समृध्द कारकीर्दीचा शेवटचा राजा म्हणता येईल. पुळूमावी नंतर सातवाहन साम्राज्याचे विभाजन झाले असावे. महाराष्ट्रात स्कंद सातकर्णी तर आंध्र प्रदेशात वाशिष्ठीपुत्र सत्करणीने राज्य केले असावे असे त्यांच्या नाण्यांवरून दिसते.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे
कथा ब्राम्ही लिपीची...!!!
महाराष्ट्राचा आद्य वंश – सातवाहन घराणे
महाराष्ट्रावर शकांचे राज्य
महाराष्ट्रावर शकांचे राज्य
- मॉइस वा मोगा हा त्यांचा पहिला शासक, तो गांधारचा राजा होता. त्याची राजधानी सिरकप होती (आजचे पंजाब, पाकिस्तान). त्याने आजूबाजुचा इंडोग्रीक परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. याने पाडलेल्या अनेक नाण्यांवर बौद्ध आणि हिंदू चिन्हं होती. तसेच ग्रीक आणि खरोश्ती भाषेचा वापर केलेला होता.
- याचाच वंशज चास्तना किंवा चेस्तनने शकांचे राज्य उजैनपर्यंत वाढवले. यालाच पश्चिम क्षत्रप म्हणूनही ओळखले जाते. ख्रिस्ताच्या अंतानंतर ७८व्या शतकापासून शक कालगणना सुरु झाली असावी असा अंदाज आहे. चास्तनाने भद्रमुख म्हणून शक क्षत्रप साम्राज्याची उभारणी केली.
- शक साम्राज्याची दुसरी शाखा क्षहरता म्हणून ओळखली जाते, जिचा शासक नहापना हा होता. याचाच पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणीने पराभव केला.
- रुद्रदमन हा श्रेष्ठ शक शासक म्हणून ओळखला जातो. हा चास्तनाचा नातू होता. याने आपल्या काळात कोकण, नर्मदेचं खोरं, काठियावाड, माळवा आणि गुजरातच्या इतर भागात आपले राज्य वाढवले. काठियावाडमधील सुदर्शन तळ्याची डागडुजी केली. याने हिंदु मुलीशी लग्न केलं आणि तो हिंदु धर्म मानू लागला. संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यातही याचा सहभाग होता. तो स्वतःला महाक्षत्रप म्हणत असे. आपली मुलगी याने सातवाहन कुळात दिली होती. याच्या काळात ग्रीक लेखक यवनेश्वर भारतात राहिला होता, त्याने यवनजातक या ग्रंथाचे ग्रीकमधून संस्कृतमध्ये भाषांतर केले.
- कालांतराने सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणी याने शक साम्राज्याचा पराभव केला. ख्रिस्ताच्या अंतानंतर ४थ्या शतकात शक राजा रुद्रसिंह तिसरा याचा चंद्रगुप्त दुसरा याने पराभव केला आणि भारतातील मध्य आणि पश्चिमेतील शक साम्राज्य संपुष्टात आले.
भोकरदन (भोगवर्धन)
प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ७
सातवाहन कलानुभूती
Updated on:
- दुर्गा आजगांवकर
दक्षिणपथांवरून मौर्यांचं आधिपत्य नाहीसं होताच आंध्रसत्तेची पूर्वेकडून पश्चिमकडं नांदी सुरू झाली. अशातच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या मानचित्रावर स्थान मिळवून देणारा इतिहास घडत होता. महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान (सध्याचं पैठण) इथं आपली राजधानी स्थापन करणारा सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रातला ‘पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश’ म्हणून जन्माला आला.
या वंशाला कोरीव लेखांत ‘सातवाहनकुल’, तर पुराणांत आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटलं आहे, म्हणून त्यांच्या उदयकाळाबद्दल विसंगती आहे. मात्र, त्यांचा इतिहास प्राचीन भारतातल्या अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो.
इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत खंडाच्या दक्षिण भागावर (दख्खन प्रांत) सातवाहनांनी राज्य प्रस्थापित केलं. या वंशाचा प्रणेता म्हणून ‘सिमुक (श्रीमुख)’ सातवाहन याचं नाव पुराणांत येतं.
त्यासमवेत त्याचा उल्लेख जुन्नरजवळच्या नाणेघाटातल्या लेण्यांमध्ये कोरलेल्या पुतळ्याखालच्या पीठांवर आढळतो. वंशावळरूपी हे आठ पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावं अवशिष्ट आहेत. सध्याचं पुणं, नाशिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत त्यानं सत्ता स्थापन करून प्रतिष्ठान हे राजधानीचं ठिकाण निश्चित केलं.
सातवाहन राजवंशाला साधारणतः तीसेक राज्यकर्ते जवळजवळ ४६० वर्षं सर्वात प्रबळ शासक म्हणून लाभले. सातवाहनांच्या कलेची व्याप्ती स्थापत्य, नाणी, शिलालेख, चित्रकला आणि विविध पुराणांमधून आढळते.
सातवाहनांनी रोमनांबरोबरच्या व्यापारउदीमाला उत्तेजन दिल्यानं शेती, उद्योग यांचं प्रतिबिंब राजकीय कारकीर्दीबरोबरच प्रतिभासंपन्न कलेतही दिसून येतं. तत्कालीन काळाशी संबंधित जे कलेचे प्रकार निर्मिले गेले, त्या कलाविष्कारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘सातवाहनकला’ असं संबोधलं गेलं.
या संबोधनाला राजकीय संदर्भासह भौगोलिक पार्श्वभूमीही आहे. याच्या देखण्या खुणा म्हणजे पश्चिम भारतात या शासकांच्या कालावधीत निर्मिलेल्या वैभवशाली ‘बौद्धगुंफा’ होत. सातवाहन राजे कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्ध भिक्षूंकरिता लेणी कोरून घेऊन ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत मिळतात.
मौर्यांनी सुरू केलेली ही लेणीपरंपरा सातवाहनांनी पुढं विकसित केली. यामध्ये चैत्य आणि विहार हे नवीनात नवीन. सह्याद्री पर्वतरांगेतल्या कोंडिवते, भाजे, तुळजा, पितळखोरा, कोंडाणे, अजिंठा, नाशिक, बेडसा, जुन्नर, कार्ले, कुडा, महाड, कराड आणि कान्हेरी अशी ठिकाणं सातवाहनांच्या स्थापत्याची साक्ष देतात.
सातवाहनकालीन समजल्या गेलेल्या चैत्यगृहांच्या रचनेत दोन्ही बाजूंना स्तंभांची रांग व मागच्या बाजूला अर्धवर्तुळाकार जागा आहे. तिथं गोलाकार स्तूप आणि त्याभोवती प्रदक्षिणापथ, स्तूपावर हर्मिका व एकावर एक तीन छत्रं, स्तूपाच्या समोर मध्यभागी दरवाजा इत्यादी व त्यावर आत प्रकाश पडावा म्हणून अर्धवर्तुळाकृती मोठं वातायन असे.
त्याच्या आकारावरून त्याला घोड्याच्या नालाची खिडकी (Horseshoe Window) म्हणण्याचा प्रघात पडला. याचं उत्तम उदाहरण म्हणून भाजे इथल्या लेणी सर्वांत प्राचीन आणि प्रतिभासंपन्न समजल्या जातात. भाजे-पितळखोरा-कार्ले ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीनं लक्षणीय आहेत. त्यांत स्त्रीपुरुष नर्तकांची दम्पती व मिथुनशिल्पांचा समावेश आहे.
त्यांतल्या काही चित्रांत गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखवल्या आहेत. राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि औद्योगिक लोकांनी दान देऊन ही लेणी शिल्प-चित्रांनी भूषवली होती, असं काही लेखांवरून समजतं.
भारतातली सर्वांत प्राचीन ऐतिहासिक चित्रं सातवाहनकाळातली आहेत. यांमध्ये अजिंठा गुंफा क्रमांक ९ आणि क्रमांक १० यांचा समावेश होतो. जातककथा हे चित्रांचे मुख्य स्रोत असून गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं पूर्वजीवन अशा विषयांवरच्या प्रसंगांतून संपूर्ण स्तंभ आणि छत आच्छादलेलं होतं.
त्याचबरोबर फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा अतिशय कौशल्यानं साकारलेल्या पाहायला मिळतात. ही चित्रं भाजे, अमरावती, सांची आणि जगय्यापेट इथल्या शिल्पांशी, मुद्रा आणि वैशिष्ट्यं यांच्याबाबतीत साधर्म्य बाळगतात.
सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.
जणू लाकडांमध्ये कोरीव काम करावं इतक्या सहजतेनं दगडावर कोरलेल्या कलाकृती अमरावती, नागार्जुनकोंडा इथं दिसून येतात. कुमारस्वामींनी अमरावती (आंध्र प्रदेश) इथल्या शिल्पकलेचं वर्णन करताना, ‘भारतीय कलेचं अत्यंत विलासी आणि सुकुमार पुष्प’ असं म्हटलेलं आहे. अमरावतीशैली अधिक प्रवाही, जोमदारपणे विकसित झालेली दिसते. सातवाहनांची परंपरा निश्चितच महान आहे. भारतीय कलेतल्या एकात्मतेतून हे सूक्ष्मातिसूक्ष्म साम्य निर्माण झालं असावं यात शंका नाही.
सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत.
या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत.
सातवाहनकालीन कला-इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय स्वरूपात अभ्यासता येतो. सातवाहनांनी तांबं, शिसं, पोटीन आणि चांदी या माध्यमांत नाणी पाडली. त्यातली सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी संबंधित असून ती ‘हत्ती’ प्रकारची आहेत.
त्यांना ‘कार्षापण’ ही संज्ञा असून नाण्यांवरचे लेख प्राकृत भाषेत आहेत व त्यांत ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींचा उपयोग दिसतो. सातकर्णीच्या नावानं पाडल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या नाण्यांवर हत्ती, सिंह, प्राणी, झाड, नंदीपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हं आणि सातवाहन घराण्याचं राजचिन्ह म्हणता येईल असं ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ आदी प्रकारविशेष आढळतात.
‘गजलक्ष्मी’ दैवताचं चित्रण आणि जहाज, नौका या छापांची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविकसंबंधांचं आणि सामर्थ्याचं सुस्पष्ट चित्रण यावरून समजतं. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांमधले लेख आहेत. प्रदेशपरत्वे तिथल्या परिचित लिपीत लेख कोरण्याची कला यांतून दिसून येते. सातवाहनकालीन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून तयार केली गेलेली असली तरी प्रारंभीच्या काळातली ‘आहत’ नाणीही ज्ञात आहेत.
सातवाहन वंशातला एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ याला दिली गेलेली कोरीव लेखांमधली ‘तिसमुदतोयपीतवाहन’ (ज्याचे घोडे अरबी समुद्र, दक्षिण महासागर आणि बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचं पाणी प्यायलेले आहेत) ही उपमा सार्थ आहे. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.
तत्कालीन रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापारामुळं कलेला वाव मिळून त्यांतून व्यापारीमार्गांवर कलाकेंद्रे उदयाला आल्याचं दिसतं. या कलांचं राजधानी प्रतिष्ठान हे मुख्य केंद्र होतं. कल्याण, चौल, सोपारा आदी महत्त्वाची सागरी बंदरं आणि जुन्नर, नाशिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारीकेंद्रे व राजकीय केंद्रे होती.
या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.
त्या इटलीतल्या
पोम्पेई इथल्या स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवतात. याशिवाय, इतरत्र काही
रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझचे पुतळे सापडले. त्यांवरून, व्यापाराबरोबरच
सातवाहन आणि रोमन यांच्यातली कलेमधली देवाणघेवाण स्पष्ट होते. जवळजवळ
अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी घडवलेला हा कलात्मक खजिना
पाहिल्यावर मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही!
नमस्कार..
आज २८ मार्च २०१७ म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
शालिवाहन शके १९३९ व्या संवत्सराचा चा प्रथम दिवस..
अर्थात गुढीपाडव्याचा सण..
हा सण “फक्त” असे नाही पण “Exclusively” महाराष्ट्रात साजरा केला जातो हे खूप आधीपासून माहिती होते. पण असे का? आणि हे “शालिवाहन संवत्सर” हा काय प्रकार आहे याबद्दल पण उत्सुकतासुद्धा खूप आधीपासून होती.
“गुढीपाडवा” सणाबद्दल आपल्याला लहानपणासून एवढच सांगितलं जातं की श्रीराम जेव्हा रावणवध आणि वनवास पूर्ण करून अयोध्येमध्ये पुन्हा परतले तेव्हा लोकांनी गुढया उभारून त्यांचे स्वागत केले. ही गोष्ट लहानपणी ऐकली होती आणि गुढी आणि गुढीपाडवा याचा तेवढाच इतिहास ज्ञात होता..
त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या “गुढीची” महाभारतातली पण एक गोष्ट ऐकून होतो ती अशी:
उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनांचा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.
या कथेत गुढीचे जुने स्वरूप इंद्रध्वजाच्या रुपात दिसून येते. म्हणजेच (फक्त महाभारताचा reference वापरून) “गुढी ही एकेकाळी इंद्रपुजेचे प्रतिक असावी” असे म्हणायला हरकत नाही.
पण ह्या गुढीचा तथाकथित “हिंदू” नववर्षाशी कसा संबंध आला हे आता बघूया..
प्राचीन भारतामध्ये म्हणजे अगदी वेदांमध्ये “काळ” याअर्थी काही विशेष Mention केलेलं दिसत नाही. हां.. “ऋतू” ही संकल्पना आहे.. “संवत्सर” कीवा “वर्षं” Concept प्रचलित होती असे फार प्राचीन पुरावे सापडत नाहीत.
आपल्या काळाशी संबंधित ज्या ज्या कल्पना होत्या किंवा आहेत त्या “ज्योतिष” या संकल्पनेशी निगडीत होत्या. म्हणजे आपली कालगणना ही आकशातील चंद्र-ताऱ्यांवर, नक्षत्रांवर Based होती.
आपण काळ या गोष्टीला अनादी आणि अनंत मानतो अर्थात “ज्याला सुरुवात आणि शेवट नाही असा” आता imagine करा एखाद्याला अशा काही “Beginning-less” आणि “Endless” गोष्टी दिल्या आणि ते मोजायला सांगितले तर कोणीही साहजिक म्हणेल जर का हे अनंत infinite आहे तर मोजायचे कशाला? आणि ते मोजताही येणार नाही!
..आणि म्हणूनच आपण Time मध्ये पुढे सरकत आहोत म्हणून ते “Record” करण्यासाठी “वर्ष” या संकल्पनेचा शोध लागला आहे याचा कुठे पुरावा नाही आणि आपण भारतीय काळ या गोष्टीला “Cyclic” किंवा “चक्रीय” मानतो…
म्हणजेच-
आत्ता हे जे काही मी टाईप केलं आहे तेच मी काही (हजार/लाख) वर्षांनी परत
करणार आहे आणि हेच सर्व तुम्ही काही (हजार/लाख) वर्षांनी परत वाचणार आहात..
त्यामुळे या अशा विचारसरणीमुळे आपल्याला कधी वेळ “लिहून” ठेवावी किंवा “मोजावी” असे वाटले नाही आणि यात काही विशेष आश्चर्य वाटायचीही गरज नाही.
मग खरंच गुढीपाडवा आणि so called हे “हिंदू नववर्ष” किती जुनं आहे?
याचं उत्तर तर आपल्याला कॅलेंडर वरच लिहीलेलं सापडतं-
For Example-
आजच्या दिवशी कॅलेंडर वर बघा: श्री शालिवाहन शके १९३९ प्रारंभ
म्हणजे अवघं १९३८ वर्षं जुनं!
तर.. १९३८ वर्षं जुनं असलेलं “आपलं” कॅलेंडर..
आता हे खरंच calender आहे का?
Calender या शब्दाचा अर्थ आहे “पुस्तक” आणि त्याचा आत्ताचा अर्थ आहे “तारखा आणि महत्वाचे दिवस दाखवणारी कागदाची सुरळी”
मग खरंच असं कुठलं calender १९३८ वर्षांपूर्वी “Publish” झालं होतं का?
तर कुठलंही calender हे प्रसिद्ध झालेलं नाही..
आपल्याला हे माहीत असतं की भारतामध्ये राज्य करणारे राजे आपापल्या नावाने एक कालगणना सुरु करत. For Example, आपल्याला शिवशक किंवा विक्रम संवत या संवत्सराबद्दल ठाऊक असेलच.
यामधले शिवशक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला सुरु केले..
तर विक्रमसंवत हे “विक्रमादित्य” (identity unknown) या राजाने ख्रिस्तपूर्व ५७व्या वर्षाच्या वैशाख महीन्यात सुरु केलेलं संवत्सर आहे..
आता प्रश्न असा पडतो की ही दोन आणि तिसरं शालिवाहन अशी तीनच संवत्सर आपल्याला माहीत आहेत आणि कालगणना सुरु करायला असे किती कष्ट घ्यावे लागतात? म्हणजे एका राजानी सरळ declare करावं की “आजपासून माझ्या नावचं संवत्सर सुरु!” मग एवढी तीनच संवत्सर का टिकली असावीत?
याचं कारण आहे लोकमान्यता!
नुसते संवत्सर सुरु करून भागत नाही त्याला तत्कालीन लोकानी पाठींबा द्यायला हवा आणि त्यासाठी ते संवत्सर सुरु करणारा राजासुद्धा चांगला (न्यायी, दयाळू, पराक्रमी) हवा नाहीतर लोकांना तो गेल्यानंतर त्याला (आणि त्याच्यानावे असलेल्या संवत्सराला) Follow करावसं का वाटेल?
त्यामुळे ही संवत्सरं टिकण्यामागची कारणे तर स्पष्ट आहेत…
आता “शके” या शब्दाबद्दल:
मुळात “शक” हे भारतातले एकेकाळचे शासक होते. त्यांना “क्षत्रप” असेही नाव होते. यांचे पुन्हा दोन गट होते:
एक म्हणजे पश्चिम भारतात वर्चस्व असलेले “पश्चिमी क्षत्रप” किंवा “तक्षशीला क्षत्रप” आणि
दुसरे उत्तर भारतातले “उत्तरी क्षत्रप” किंवा “मथुरा क्षत्रप” हे क्षत्रप किंवा शक म्हणजे Scythia या प्रांताचे:
Scythia या प्रांतामधल्या अनेक टोळ्या स्थलांतरित होऊन किंवा राजकीय
कारणासाठी पूर्वेकडे पसरल्या त्यापैकीच एका टोळीचे हे वंशज. त्यामुळे “शक”
या शब्दाचा अर्थ “वर्षं” असा नसून ते एक नाव आहे.
आता आजच्या दिवसाबद्दल अर्थात “शालिवाहन शकाबद्दल”:
या शकाबद्दल २ मुख्य गोष्टी किंवा थिअरीज बघायला मिळतात:
१) पहीली गोष्ट आहे “सातवाहन” या घराण्यातल्या राजाची..
या सातवाहन राजांचे राज्य म्हणजे आत्ताचे आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश एवढे! आणि हो शिवस्वाती नावाच्या एका सातवाहन राजाच्या काळापर्यंत जुन्नर ही त्यांची राजधानी! झालं असं की वर सांगितलेल्या तक्षशीला क्षत्रपांपैकी “क्षहरात” नावाच्या क्षत्रपांमधल्या “नहपान” या राजाने या सातवाहनांवर आक्रमण केले आणि शिवस्वाती ला युद्धात मारले पुढे त्याने अपरांत (कोकण) आणि जुन्नर (राजधानी) हे प्रांत जिंकले. त्याच्या या साम्राज्यविस्ताराच्या धोरणामुळे शिवस्वाती सातकर्णी चा मुलगा “गौतमीपुत्र सातकर्णी” हा पूर्वे कडे गेला आता जुन्नर तर शत्रूच्या हातात मग राज्याला नवी राजधानी ही गरजेची! म्हणूनच त्याने “प्रतिष्ठान” (आजचे पैठण) ला नवीन राजधानी बनवली आणि या नहपानाच्या विरोधात कुर, आनंद यासारख्या प्रादेशिक सत्तांना एकत्र केले आणि नाशिक जवळ गोवर्धन इथे त्याला युद्धात ठार केले आणि स्वतःचं गेलेलं साम्राज्य परत मिळवलं तसंच क्षहरात या क्षत्रपांच्या शाखेला संपवून टाकलं. गौतमीपुत्र सातकर्णी ने नहपानाचे वर्चस्व असलेल्या गुजरात सारख्या प्रदेशात साम्राज्यविस्तार केला नाही स्वतःचे जेवढे राज्य होते तेवढेच परत मिळवले. ही घटना घडते इसवी सन ७८ मध्ये आणि असं म्हणलं जातं की पुन्हा एकदा साम्राज्य प्राप्त झाल्यावर त्याने “सातवाहन” किंवा “शालिवाहन” या संवत्सराला सुरुवात केली. आणि गुढीवर गडू उपडा टाकायचे “गौतमीपुत्र हा कुंभार कुळात जन्मलेला होता” हे कारणसुद्धा बरेच् जण मानतात.
नहपानाचे नाणे:
२) दुसरी कथा ही सुद्धा याच क्षत्रपांशी संबंधित..
इकडे नाशिक ला क्षहरात क्षत्रप संपल्यावर नहपानाचे गुजरात भागातील जे राज्य होते त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी “कार्दमक” (पश्चिमी क्षत्रपांची दुसरी शाखा) या घराण्याचा “चष्टन” नावाचा राजा गादीवर आला. आणि असे मानले जाते की त्यानेच स्वतःच्या घराण्याच्या नावे हे “शक” संवत्सर सुरु केले. हा सुद्धा काळ इसवी सन ७८ चाच! पुढे त्याच्या वंशजांनी हेच संवत्सर चालू ठेवले. एवढेच नाही तर पुढे चंद्रगुप्त II ने हे कार्दमक घराणे संपवल्यावर त्यानेसुद्धा तेच शक संवत्सर सुरु ठेवले! यामुळे शक या शब्दाचा अर्थ रूढ होत होत “वर्ष” असं झाला आणि “शके” असे म्हणून त्या त्या वर्षाचा जो असेल तो क्रमांक लिहायची पद्धत दिसून येते..(शालिवाहन शके १९३९ प्रारंभ)
चष्टनाचे नाणे:
या पैकी कुठलीतरी एकच गोष्ट खरी ठरली तरीसुद्धा ironically आज आपण या संवत्सराला “शालिवाहन शक” संवत्सर म्हणतो!
आता शक संवत्सर, गुढी, आणि नववर्ष यांचा संबंध कसा आला असावा याविषयी:
मुळात वैदिक विचारांनुसार चैत्र हा पहिला महिना नाहीच..मार्गशीर्ष हा आहे. मग चैत्र हा महिना पहिला कसा झाला असावा?
दिनांक २० मार्च २०१७ ला म्हणजेच एक आठवड्यापूर्वी “विषुवदिन” साजरा झाला म्हणजेच या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्ताला ९० अंशामध्ये होता आणि तेव्हापासून आपल्याकडचा प्रसिद्ध वसंत ऋतू सुरु होतो आणि हा ऋतू नेहमीच सर्व ऋतुंमध्ये पहिला येतो (ऋतुगणनेची सुरुवात वसंत ऋतू पासून होते) अगदी कालिदासाच्या ऋतुसंहार मध्ये सुद्धा! भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण म्हणतो “मासानां मार्गाशिर्षोsहमृतुनां कुसुमाकरः” – सर्व महिन्यांत मार्गशीर्ष (श्रेष्ठ) मी आहे..आणि सर्व ऋतूंत वसंत (श्रेष्ठ ऋतू) मी आहे!
मला असं वाटतं, की या वसंत ऋतूचा आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या “Creation” किंवा “नवनिर्मिती” या ideasचं Contribution हे चैत्र महिना पहीला होण्यामागे असावं. असो. यावर माझं अजून काम सुरु आहे..
आता गुढीबद्दल:
ज्याप्रमाणे कुठल्याही धार्मिक विधीला Practical जगामध्ये शून्य अर्थ असतो तसंच या गुढीचं सुद्धा आहे..
या गुढीची पूजा एकेकाळी इंद्रध्वज म्हणून करत असावेत, हे आपण वर पाहिलं, किंवा याला स्वागत करण्यासाठी आजकालच्या फ्लेक्स, पोस्टर्स सारखं याचं स्वरूप असावं असाही एक निष्कर्ष अयोध्येच्या उभारलेल्या “Welcome गुढयांवरून” निघू शकेल.
मला असं वाटतं गुढीपाडवा हा “हिंदूंचा” एकमेव असा सण असेल जो इतक्या उत्साहाने समाजातील सर्व घटक साजरे करतात, ज्यामध्ये विधीसाठी लागणाऱ्या बऱ्यापैकी वस्तू लागतात (हार, वस्त्र, गढू वगरे) आणि तरीदेखील ज्याला भटजी, गुरुजी, ब्राह्मण, पुरोहीत यांची गरज नाही!
हां आता दिवाळीतले भाऊबीज, लक्ष्मीपुजन असे सण आहेत पण तो घरातल्या घरात आटपायचा विधी आहे त्याचा गुढीसारखं प्रदर्शन होत नाही..
याचं कारण म्हणजे हा सण किंवा विधी हा एवढी वर्षं झाली तरी (ब्राह्मण, आणि पुरोहीतांची involvement नसल्यामुळेच!) “RIGID” किंवा “STRICT” नाही! यामध्ये बाकी कुठल्याही पूजेसाठी लागणारे असले कडक नियम नाहीत दक्षिणा वगरे तत्सम प्रकार नाहीत उगाच गावजेवण नाही तर हा एक freestyle प्रकारचा हा सण आहे..
ज्याला जसं वाटतंय, जेवढी ऐपत आहे, जेवढी इच्छा आहे, तेवढं त्यानी करावं…आणि त्यामुळेच हा विधी एवढा बदलून सुद्धा केवळ लोकमान्यतेमुळे टिकून आहे!
तर..
मातीचा कुंभ असो असो किंवा चांदीचा गढू..
एखादं साधं वस्त्र असो किंवा पैठणी..
खारीक आणि खोबरं असो किंवा साखरेच्या गाठी..
गुढीचं स्थान युगानुयुगे किंवा “संवात्सरानुसंवत्सरे” अढळ राहील यात शंका नाही…!
सातवाहन कलानुभूती
- दुर्गा आजगांवकर
दक्षिणपथांवरून मौर्यांचं आधिपत्य नाहीसं होताच आंध्रसत्तेची पूर्वेकडून पश्चिमकडं नांदी सुरू झाली. अशातच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या मानचित्रावर स्थान मिळवून देणारा इतिहास घडत होता. महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान (सध्याचं पैठण) इथं आपली राजधानी स्थापन करणारा सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रातला ‘पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश’ म्हणून जन्माला आला.
या वंशाला कोरीव लेखांत ‘सातवाहनकुल’, तर पुराणांत आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटलं आहे, म्हणून त्यांच्या उदयकाळाबद्दल विसंगती आहे. मात्र, त्यांचा इतिहास प्राचीन भारतातल्या अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो.
इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत खंडाच्या दक्षिण भागावर (दख्खन प्रांत) सातवाहनांनी राज्य प्रस्थापित केलं. या वंशाचा प्रणेता म्हणून ‘सिमुक (श्रीमुख)’ सातवाहन याचं नाव पुराणांत येतं.
त्यासमवेत त्याचा उल्लेख जुन्नरजवळच्या नाणेघाटातल्या लेण्यांमध्ये कोरलेल्या पुतळ्याखालच्या पीठांवर आढळतो. वंशावळरूपी हे आठ पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावं अवशिष्ट आहेत. सध्याचं पुणं, नाशिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत त्यानं सत्ता स्थापन करून प्रतिष्ठान हे राजधानीचं ठिकाण निश्चित केलं.
सातवाहन राजवंशाला साधारणतः तीसेक राज्यकर्ते जवळजवळ ४६० वर्षं सर्वात प्रबळ शासक म्हणून लाभले. सातवाहनांच्या कलेची व्याप्ती स्थापत्य, नाणी, शिलालेख, चित्रकला आणि विविध पुराणांमधून आढळते.
सातवाहनांनी रोमनांबरोबरच्या व्यापारउदीमाला उत्तेजन दिल्यानं शेती, उद्योग यांचं प्रतिबिंब राजकीय कारकीर्दीबरोबरच प्रतिभासंपन्न कलेतही दिसून येतं. तत्कालीन काळाशी संबंधित जे कलेचे प्रकार निर्मिले गेले, त्या कलाविष्कारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘सातवाहनकला’ असं संबोधलं गेलं.
या संबोधनाला राजकीय संदर्भासह भौगोलिक पार्श्वभूमीही आहे. याच्या देखण्या खुणा म्हणजे पश्चिम भारतात या शासकांच्या कालावधीत निर्मिलेल्या वैभवशाली ‘बौद्धगुंफा’ होत. सातवाहन राजे कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्ध भिक्षूंकरिता लेणी कोरून घेऊन ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत मिळतात.
मौर्यांनी सुरू केलेली ही लेणीपरंपरा सातवाहनांनी पुढं विकसित केली. यामध्ये चैत्य आणि विहार हे नवीनात नवीन. सह्याद्री पर्वतरांगेतल्या कोंडिवते, भाजे, तुळजा, पितळखोरा, कोंडाणे, अजिंठा, नाशिक, बेडसा, जुन्नर, कार्ले, कुडा, महाड, कराड आणि कान्हेरी अशी ठिकाणं सातवाहनांच्या स्थापत्याची साक्ष देतात.
सातवाहनकालीन समजल्या गेलेल्या चैत्यगृहांच्या रचनेत दोन्ही बाजूंना स्तंभांची रांग व मागच्या बाजूला अर्धवर्तुळाकार जागा आहे. तिथं गोलाकार स्तूप आणि त्याभोवती प्रदक्षिणापथ, स्तूपावर हर्मिका व एकावर एक तीन छत्रं, स्तूपाच्या समोर मध्यभागी दरवाजा इत्यादी व त्यावर आत प्रकाश पडावा म्हणून अर्धवर्तुळाकृती मोठं वातायन असे.
त्याच्या आकारावरून त्याला घोड्याच्या नालाची खिडकी (Horseshoe Window) म्हणण्याचा प्रघात पडला. याचं उत्तम उदाहरण म्हणून भाजे इथल्या लेणी सर्वांत प्राचीन आणि प्रतिभासंपन्न समजल्या जातात. भाजे-पितळखोरा-कार्ले ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीनं लक्षणीय आहेत. त्यांत स्त्रीपुरुष नर्तकांची दम्पती व मिथुनशिल्पांचा समावेश आहे.
त्यांतल्या काही चित्रांत गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखवल्या आहेत. राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि औद्योगिक लोकांनी दान देऊन ही लेणी शिल्प-चित्रांनी भूषवली होती, असं काही लेखांवरून समजतं.
भारतातली सर्वांत प्राचीन ऐतिहासिक चित्रं सातवाहनकाळातली आहेत. यांमध्ये अजिंठा गुंफा क्रमांक ९ आणि क्रमांक १० यांचा समावेश होतो. जातककथा हे चित्रांचे मुख्य स्रोत असून गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं पूर्वजीवन अशा विषयांवरच्या प्रसंगांतून संपूर्ण स्तंभ आणि छत आच्छादलेलं होतं.
त्याचबरोबर फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा अतिशय कौशल्यानं साकारलेल्या पाहायला मिळतात. ही चित्रं भाजे, अमरावती, सांची आणि जगय्यापेट इथल्या शिल्पांशी, मुद्रा आणि वैशिष्ट्यं यांच्याबाबतीत साधर्म्य बाळगतात.
सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.
जणू लाकडांमध्ये कोरीव काम करावं इतक्या सहजतेनं दगडावर कोरलेल्या कलाकृती अमरावती, नागार्जुनकोंडा इथं दिसून येतात. कुमारस्वामींनी अमरावती (आंध्र प्रदेश) इथल्या शिल्पकलेचं वर्णन करताना, ‘भारतीय कलेचं अत्यंत विलासी आणि सुकुमार पुष्प’ असं म्हटलेलं आहे. अमरावतीशैली अधिक प्रवाही, जोमदारपणे विकसित झालेली दिसते. सातवाहनांची परंपरा निश्चितच महान आहे. भारतीय कलेतल्या एकात्मतेतून हे सूक्ष्मातिसूक्ष्म साम्य निर्माण झालं असावं यात शंका नाही.
सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत.
या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत.
सातवाहनकालीन कला-इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय स्वरूपात अभ्यासता येतो. सातवाहनांनी तांबं, शिसं, पोटीन आणि चांदी या माध्यमांत नाणी पाडली. त्यातली सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी संबंधित असून ती ‘हत्ती’ प्रकारची आहेत.
त्यांना ‘कार्षापण’ ही संज्ञा असून नाण्यांवरचे लेख प्राकृत भाषेत आहेत व त्यांत ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींचा उपयोग दिसतो. सातकर्णीच्या नावानं पाडल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या नाण्यांवर हत्ती, सिंह, प्राणी, झाड, नंदीपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हं आणि सातवाहन घराण्याचं राजचिन्ह म्हणता येईल असं ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ आदी प्रकारविशेष आढळतात.
‘गजलक्ष्मी’ दैवताचं चित्रण आणि जहाज, नौका या छापांची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविकसंबंधांचं आणि सामर्थ्याचं सुस्पष्ट चित्रण यावरून समजतं. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांमधले लेख आहेत. प्रदेशपरत्वे तिथल्या परिचित लिपीत लेख कोरण्याची कला यांतून दिसून येते. सातवाहनकालीन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून तयार केली गेलेली असली तरी प्रारंभीच्या काळातली ‘आहत’ नाणीही ज्ञात आहेत.
सातवाहन वंशातला एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ याला दिली गेलेली कोरीव लेखांमधली ‘तिसमुदतोयपीतवाहन’ (ज्याचे घोडे अरबी समुद्र, दक्षिण महासागर आणि बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचं पाणी प्यायलेले आहेत) ही उपमा सार्थ आहे. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.
तत्कालीन रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापारामुळं कलेला वाव मिळून त्यांतून व्यापारीमार्गांवर कलाकेंद्रे उदयाला आल्याचं दिसतं. या कलांचं राजधानी प्रतिष्ठान हे मुख्य केंद्र होतं. कल्याण, चौल, सोपारा आदी महत्त्वाची सागरी बंदरं आणि जुन्नर, नाशिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारीकेंद्रे व राजकीय केंद्रे होती.
या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.
त्या इटलीतल्या पोम्पेई इथल्या स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवतात. याशिवाय, इतरत्र काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझचे पुतळे सापडले. त्यांवरून, व्यापाराबरोबरच सातवाहन आणि रोमन यांच्यातली कलेमधली देवाणघेवाण स्पष्ट होते. जवळजवळ अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी घडवलेला हा कलात्मक खजिना पाहिल्यावर मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही!
(लेखिका ह्या चित्रकार व पुरातत्त्व-सहाय्यक संशोधक असून हैदराबाद इथल्या ‘प्लीच इंडिया फाउंडेशन’मध्ये कार्यरत आहेत.)
राजवंश भारती : सातवाहन वंश
लेखक : ॲड. सुशील अत्रे
एक जनमान्य समज विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला. याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.
म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद! (saptarang marathi article on Satavahana dynasty news)
महाभारत काळ किंवा त्याही आधीपासून ज्या केंद्रीय मुख्य सत्ता भारतात होत्या, त्या बहुतांश उत्तरेकडे किंवा वायव्य आणि ईशान्य भारतात होत्या, असं दिसतं. यापैकी बराच मोठा कालखंड तर मगध सत्तेचा होता, म्हणजे ‘पाटलीपुत्र’ ही राजधानी. दक्षिणेत असलेली राज्ये ही बहुधा मांडलिक किंवा अंकित राज्ये होती.
शुंग वंशाचे पतन होईपर्यंत हीच परिस्थिती होती. शेवटचा शुंग राजा देवभूती याची हत्या करून वासुदेव काण्व राजा झाला. पण, काण्व वंशाचे केवळ चार राजे झाले. एकूण फक्त ४५ वर्षे त्यांची सत्ता होती. अशी धारणा आहे, की चौथा काण्व राजा सुशर्मा याला ‘सिमुक सातवाहन’ याने मारले (की केवळ पदच्युत केले?) आणि सत्ता ताब्यात घेतली.
या सत्तांतराविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नसली, तरी सातवाहन वंश हा काण्वांनंतर लगेच सत्तेवर आला, हे नक्की. युरोपिअन इतिहासकार मानतात, की सातवाहनांची सत्ता इ. स. पूर्व सुमारे पहिले शतक (अखेर) ते इ. स. तिसरे शतक, अशी अंदाजे २९० वर्षे होती.
मात्र, भारतीय पुराणांमधील नोंदी वेगळे सांगतात. वायू पुराण, मत्स्य पुराण आणि विष्णू पुराण आदी प्राचीन ग्रंथांमध्ये सातवाहन वंशाचा उल्लेख ‘आन्ध्र’ अथवा ‘आन्ध्रभृत्य’ असा येतो. पुराणांतील उल्लेखानुसार सुमारे ४६० वर्षे या वंशाची सत्ता होती आणि या वंशाचे एकूण ३० राजे होऊन गेले. त्यांची यादी वरील पुराणांमध्ये दिलेली आहे. (latest marathi news)
सातवाहनांचा संस्थापक ‘सिमुक’ होता, यावर मात्र एकमत आहे. हा ‘श्रीमुख’चा अपभ्रंश वाटतो. याच नावाचा उल्लेख कधी शिशुक, तर कधी सिंधुक असाही येतो. ‘सातवाहन’ हे वंशनाम कशावरून रूढ झाले, यावरही मतांतरे आहेत. या नावाचा त्यांचा एक पूर्वज होता, हे एक मत आहे; तर या वंशातील राजे सूर्यवंशाशी नाते सांगत असल्याने सात (घोड्यांचे) वाहन- रथ असलेला आराध्य देव सूर्य; म्हणून सातवाहन हे नाव त्यांनी घेतले, हेही मत आहे.
यालाच जवळ जाणारे ‘सातकर्णी’ हे नाव एका राजाने घेतले आणि पुढे तेच नाव ‘बिरूद’ म्हणून इतर वंशजांनीही लावले. आंध्र या पर्यायी नावाबद्दल असं म्हणतात, की हे नाव नंतर रूढ झाले, कारण महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात त्यांची सत्ता पसरली. याउलट, सध्याच्या तेलंगणातील धरणीकोटा अथवा अमरावती ही सातवाहनांची आधी राजधानी होती, असेही मत आहे. नंतर ती प्रतिष्ठान (आताचे पैठण) येथे आणली. मात्र, सातवाहन वंश कीर्ती शिखरावर असताना त्यांची राजधानी प्रतिष्ठानलाच होती. सातवाहनचे आणखी एक पर्यायनाम ‘शालिवाहन’ असेही आहे.
आंध्र वंशाची एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या रूपाने अनेक शतकांमध्ये पहिल्यांदाच भारताचे सत्ताकेंद्र दक्षिणेत आले. दुसरी-आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवाहनांनी ‘महाराष्ट्र’ आकाराला आणला. ते महाराष्ट्राचे पहिले राजघराणे आहे.
त्यांच्याच काळात संस्कृतपासून वेगळी अशी ‘प्राकृत’ भाषा उदयाला आली; जिचा एक आविष्कार ‘महाराष्ट्री’ भाषा हा आहे, तीच पुढे प्रगल्भ होऊन ‘मराठी’ भाषा झाली. त्यामुळे ‘महाराष्ट्रा’चा असा स्वतंत्र राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास सातवाहनांपासून सुरू होतो.
जुन्नरजवळ नाणेघाट आहे. या नाणेघाटातून एके काळी व्यापारी वर्दळ चालायची. याच घाटमाथ्यावर एक भला मोठा दगडी रांजण आहे. तो सातवाहन काळात, जकात गोळा करण्यासाठी ठेवला होता, असे म्हणतात. ही जकात ‘कार्षापण’ या नाण्यांच्या चलनात असे.
इथेच जवळ दगडी शिळेवरती राणी नागनिकेच्या दानधर्माबद्दल मोठा शिलालेख आहे.
पहिला सातवाहन राजा सिमुक याच्यापासूनच त्यांचे एक मुख्य ध्येय होते; ते म्हणजे शकांचा नि:पात! शक अथवा सीथिअन्स ही प्राचीन इराणी वंशाची एक आक्रमक जमात होती. त्यांनी ग्रीकांच्या पाठोपाठ भारतावर अनेक हल्ले केले.
तोवर दुबळी झालेली मगध राजसत्ता शकांपुढे हतबल होती. सातवाहन राजांनी शकांना आपला शत्रू क्रमांक एक मानले आणि त्यांच्या अनेक पिढ्या शकांशी लढल्या. शकांच्या टोळीप्रमुखाला राजा अथवा महाराज हे संबोधन नसून, ‘क्षत्रप’ हे नाव होते. असे अनेक क्षत्रप तेव्हा भारतात ठिकठिकाणी आक्रमणे करीत होते. काही प्रदेश त्यांच्या ताब्यात गेलाही होता; पण त्यांना प्रतिकारही तेवढाच जबरदस्त होत होता. (latest marathi news)
गौतमीपुत्र सातकर्णी
सातवाहन वंशाच्या ३० राजांची यादी उपलब्ध असली, तरी त्यांच्यापैकी सर्वांत कर्तृत्ववान आणि श्रेष्ठ राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. सातकर्णी हे तर आधीपासूनच उपनाम म्हणून वापरलेले आहे. आणि हा वंश मातृसत्ताक असावा, असे दिसते. राजाच्या आईचे नाव ‘गौतमी बलश्री’. त्यामुळे तो स्वत: ‘गौतमीपुत्र!’ आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो.
‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला आणि याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.
म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!
सिमुकाचा मुलगा सिरी सातकर्णी याची पत्नी नागनिका हिचा उल्लेख आपण नागवंश पाहतानाच केला आहे. ती स्वत: राज्यकर्ती होती. तिच्या नावाची नाणी आहेत. या राजांपैकी सात-आठव्या राजाचे नाव ‘हाल सातवाहन’. याची ओळख रणांगणामुळे नाही, तर एका ग्रंथामुळे आहे. ‘गाथा सप्तशती’ किंवा तत्कालीन भाषेत ‘गाहा सत्तसई’ हा प्राकृत मराठीतील ग्रंथ त्याने संपादित केला आहे. याशिवाय, कवी गुणाढ्याने रचलेला ‘कथासरित्सागर’ किंवा ‘बृहद्कथा’ हा ‘पैशाची’ भाषेतील ग्रंथही सातवाहन काळातलाच आहे.
गौतमीपुत्राएवढा नसला, तरी बराच कर्तबगार असलेला अखेरचा राजा होता यज्ञश्री सातकर्णी. त्याच्यानंतर सातवाहन वंशाला उतरती कळा लागली. अखेरचा राजा पुलुमवी- चौथा, मृत्यू पावला, तेव्हा सातवाहन राज्याची शकले झाली आणि दबलेल्या शक क्षत्रपांनी ठिकठिकाणी पुन्हा उठाव करून जुने प्रदेश बळकावले.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती. या नाण्यांचे संशोधन व प्रकाशन प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी (१८९३—१९८५) यांनी प्रथम केले.
संचयातील ६८४ नाण्यांपैकी ६८२ नाणी शिसे या धातूची तर दोन तांब्याची होती. १९३९ साली सापडलेल्या सातवाहनांच्या तऱ्हाळे नाणेसंचयानंतर (१६०० नाणी) महाराष्ट्रात सापडलेला हा सर्वांत मोठा नाणेसंचय आहे. नाणेसंचयातील सर्व नाणी गोलाकार आहेत.
तांब्याची नाणी : नाणेसंचयात तांब्याची केवळ दोन नाणी सापडली आहेत. ती दुसऱ्या ठिकाणाहून आली असावीत. यांपैकी एक नाणे गंजलेले आहे. त्याच्या दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती असून त्याच्या पाठीवर तक असा लेखाचा तुटक भाग दिसतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. हे नाणे बहुधा सातकर्णी नावाने शेवट होत असलेल्या सातवाहन राजाचे असावे. दुसरे नाणे तुटलेल्या अवस्थेत आढळले.
शिशाची नाणी : शिशाच्या ६८२ नाण्यांपैकी ३६९ नाणी वाशिष्ठीपुत्र शिव श्री पुळुमावी, १९१ नाणी वासिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णीची, तर उर्वरित १२२ नाण्यांवरचे लेख अतिशय अस्पष्ट असून ओळखता येत नाहीत.
शिवश्री पुळुमावीची नाणी : मिराशी यांच्या मते, शिवश्री पुळुमावी व वाशिष्ठिपुत्र पुळुमावी हे दोन भिन्न राजे नसून एकच आहेत; तथापि या बाबतीत दोन विभिन्न मतप्रवाह आढळतात व त्याप्रमाणे इतर नाणेसंशोधक व तज्ज्ञांच्या मते हे दोन भिन्न राजे होते. नाण्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा असून नाण्याच्या गोलाकार कडेवर रञो वासिष्ठीपुतस सिव- सिरी- पुळुमाविस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून काही वेळा उज्जैन चिन्हांच्या वर्तुळांवर चंद्रकोर आढळते. नाण्यांच्या आकारामध्ये व वजनांमध्ये वैविध्य आढळते.
स्कंद सातकर्णीची नाणी : स्कंद सातकर्णीच्या नाण्यांवर दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा व रञो वसिठी- पुतस खद- सातकणिस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्यांच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून त्यावरील वर्तुळांवर काही वेळा चंद्रकोर दिसून येते.
नाणेसंचयाचे महत्त्व : या नाणेसंचयातील नाण्यांवर प्रथमच शिवश्री पुळुमावी व स्कंद सातकर्णी या सातवाहन नृपतींचा मातृकुलवाचक उल्लेख असणारा मोठा लेख आढळून आला. तसेच या नाण्यांमुळे सातवाहनांच्या उत्तर कालखंडात त्यांच्या आधिपत्याखाली हा भाग असल्याचे कळले.
संदर्भ :
- Sarma, I. K., Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade-Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
- मिराशी, वा. वि., जर्नल ऑफ न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, खंड : ३४, वाराणसी.
- पाठक, ए. एस. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
समीक्षक : मंजिरी भालेराव
|| शालिवाहन शक उर्फ शक-संवताचे उपाख्यान ||
मध्यंतरी
काही वर्षांपूर्वी मायबोलीवर कुणीतरी शालिवाहन-कुंभार-शकनिर्दालन-शालिवाहन
शक या दंतकथेवर एक धागा काढला होता. तिथे मी त्या दंतकथेचे ऐतिहासिक
वास्तव काय आहे यावर एक प्रतिसाद तपशीलात लिहिला होता. मग पुढची एक दोन
वर्षे दर गुढीपाडव्याला फेसबुक किंवा इथेच परत त्या मजकुराचे पुनर्लेखन,
दुवे देऊन रिक्षा फिरवणे असे उद्योग केले. गेल्या वर्षी ही रिक्षा फिरवायला
जरा संकोचच वाटत होता, पण सध्याच्या वाढत्या ' एकमात्र हिंदू नववर्षाच्या
शुभेच्छांच्या' फेसबुकीय आणि वॉट्सॅपीय उन्मादामुळे आवर्जून तपशीलात सोशल
मीडियावर लिहिलेच, शिवाय लोकांशी वादविवादही केले. आता बास की! असं माझं
मलाच वाटलं आणि तो मुद्दा मागेच पडला डोक्यातून.. पण एकुणात लक्षात आलं आहे
की दरवर्षी नेमेचि येणार्या पावसाळ्याप्रमाणे अगदी नेमेचि येणारा हिंदू
नववर्षाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा पूर काही थांबणारा नाही. तेव्हा निदान
या संबंधीची ऐतिहासिक माहिती काय आहे हे सर्वांसमोर परत एकदा यायलाच हवी
म्हणून. माझे गेल्या वर्षीचे प्रतिसाद, उत्तरं, टिपणं असं सगळं एकत्र
संकलित करून इथे देते आहे. त्यात मधे मधे जर पुनरावृत्ती झाली किंवा
वेगवेगळे परिच्छेद एकत्र केल्याने थोडेसे विस्कळित वाटले तर तेवढं गोड
मानून घ्या अशी विनंती...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल
होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता
राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी
याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव
केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा
संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक
त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या
राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे
अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं.
त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द
कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत
दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित
असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य
लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच
कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या
शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती.
तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात
जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४)
आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा
यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम
उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक
भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील
हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा
उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष,
शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात.
आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल
किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही
बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना
वापरली आहे...... साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख
संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच
अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या
राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली त्याला शिवराज्याभिषेक शक म्हणतो
साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार
राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या
काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत
चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या
शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत,
कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे
अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला
सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.
आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून
काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि
सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या
नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय
आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य
नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या
एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर
सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या
'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे
लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक
दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा
पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक
संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला......
पुरावे एवढंच
सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या
आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर
शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली
असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली
असोसिएशन नंतरची आहे.)
आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित
नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत.
दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म
पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली.
आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका)
उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी
सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे
लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात
भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या
थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे
होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार
कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि
कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी
वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल....
भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक
महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक
वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी
कालगणना असावी.
हो, आणि शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....
गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...
|| इत्यलम् ||
चष्टनाची प्रतिमा असेलेले त्याने पाडलेले नाणे
सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं.
औरंगाबाद, हैद्राबाद, अकोला येथे जमिनीवर आणि कोंडापूर, नेवासे येथे
उत्खननात सातवाहन नामक राजाची नाणी सापडली आहेत. त्यावर पुढील बाजूस हत्ती
आणि सभोवती 'रञो सिरि सादवाहनस' (राजा श्री सातवाहन) आणि मागील बाजूस
उज्जैन चिन्ह आहे. हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष असावा कारण ह्याचेच नाव
पुढे कुलाला पडलेले दिसते.
शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे
चष्टनाने स्वतःचे राज्यगणना वर्ष सुरु केले हे काहीसे असंभवनीय वाटते कारण
चष्टन हा स्वतंत्र राजा नसून क्षत्रप होता. अर्थात क्षत्रपाचा स्वामी
सामर्थ्यशाली राजा नसल्याने तो स्वतंत्र झाला होता. अर्थात कोणत्याच
प्राचीन संवतांचे (शक्/विक्रम)उल्लेख संस्थापकाच्या नावाने येत नाहीत, तर
ते कालांतराने प्रचलित होतात. ह्याच वेळी त्याचा समकालीन असलेल्या
नहपानाच्या लेखातही संवताचा उल्लेख आहे ह्याचाच अर्थ चष्टन किंवा नहपान
यांचा अधिपती असलेल्या कुणा प्रभावी राजाने हा संवत सुरु केला असला पाहिजे.
तो म्हणजे कुशाण वंशीय कनिष्क. कनिष्क हा संवताचा संस्थापक असावा हे मत
फर्ग्युसनने मांडले. कनिष्काने आपल्या विशाल भूभागाच्या शासनार्थ विविध
क्षत्रपांची नेमणूक केली. कार्दमक, क्षहरात, भूमक ही क्षत्रपांची कुळेच.
कनिष्काने आपला संवत सुरु केला होता व हुविष्क्, वासुदेव इत्यादी त्याच्या
वंशजांनी तो सुरु ठेवला होता व त्याच्या क्षत्रपांनी देखील त्याचे निष्ठेने
पालन केले. कुशाण कमजोर झाल्यावर क्षत्रप स्वतंत्र झाले, मात्र त्यांनी
हेच संवत पुढे प्रचलित ठेवल्याने शक हे नामाधिमान त्याला चिकटले असावे असे
मानता यावे.
शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक
भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि
आसपासच्या भागात राज्य करणार्या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!)
राजाचा, अॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे
हे संवतही माळवा, राजपुताना आदी भागातील शकांनी प्रचलित ठेवले, पुढे शेकडो
वर्षांनी चंड्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्य ह्याने वाकाटक नृपतीची मदत
घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः
खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व
माळवा तसेच उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या ह्या पराक्रमामुळेच
अॅझेसने सुरु केलेल्या संवताला विक्रम हे नाव चिकटले असावे.
१. या सगळ्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध? वेगवेगळ्या संवतांमध्ये नववर्षाची सुरुवात एकाच दिवशी कशी? (काही पंचांगे वेगळी आहेत म्हणा, पण तो वेगळा मुद्दा). की फक्त वर्षगणना राज्याभिषेकानुसार होत असे आणि नवीन वर्ष = चैत्र प्रतिपदा हे आधीपासूनच पक्के गृहीतक आहे?
२. उत्तरेत दिवाळी पाडव्याला राम आयोध्येत आला असे मानतात, आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला... ह्या गोष्टी कशा रूढ झाल्या?
३. चैत्र प्रतिपदा हे नववर्ष सर्वप्रथम कुणी मानले? का?
४. सुरुवातीलाच तुम्ही म्हणता की शालीवाहन नावाचा कुणी राजा नव्हता. आणि त्याच लेखात पुढे 'शालिवाहनाने मातीचे पुतळे ...' आणि '१२व्या शतकापासून ..... उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो' असे लिहिले आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी ब्रिटीश गॅझेटियर्स आणि परमार राजे यांनी लिहिलेल्या जरी असल्या, तरी ते नक्की कुणाला 'शालिवाहन' म्हणतात? आणि असे नाव का वापरले गेले?
डोंगरवेडा -
१. सातवाहन हे त्या कुलाचं नाव आहे. राजाचं नाव सिरि किंवा श्री आहे.
सातवाहन राजाचा मूळपुरुष सिमुक नामक एक राजा होता. सातवाहनांना आंध्रभृत्य
असे म्हणले जात असले तरी त्यांचे सुरुवातीचे पुरावे पश्चिम दख्खनमध्येच
सापडले आहेत. या विषयात रस असेल तर डॉ शैलेन्द्र भंडारे यांच्या पीएचडीचा
प्रबंध वाचा. त्यात त्यांनी नाण्याच्या पुराव्यांचं अतिशय सुरेख विश्लेषण
केलेले आहे. हा प्रबंध अॅकेडेमिया.एज्यु वर उपलब्ध होता, अजूनही असावा
२. कनिष्काने शक संवत सुरू केला हे जुनं मत आहे. हे मत आता विश्वसनीयरीत्या
मोडीत निघाले आहे. हॅरी फाल्क यांनी आता कनिष्काच्या राज्यारोहणाचे वर्ष इ
स १२७ असावे असे मत मांडले आहे आणि ते बहुतांशीरीत्या मान्य झालेले आहे.
ज्यांचे याविषयी मतभेद आहेत तेही कनिष्काने शक संवत सुरू केला हे आता म्हणत
नाहीत.
शंतनू
१. चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला
माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे
होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म
पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली.
आणि भविष्यपुराणात पताका, कमानी उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे.
इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये
ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी
नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख
बरेच नंतरचेही असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे
होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा नंतरच आली असणार कारण
त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि
कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी
वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. काही प्रदेशात नववर्ष वैशाख
महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं.
२. रामाची गोष्ट कुठे कशी रूढ झाली किम्वा याच्याशी जोडली गेली यावर माहिती
उपलब्ध नाही. त्यासाठी कुणाला तरी जेठा मारून बसून नव्याने काम करावं
लागेल बहुदा
३. शालिवाहन असा राजा नसला तरी सातवाहन या नावाचे प्राकृत रूप शालिवाहन
किंवा सालाहण हे आपल्याला ७व्या ८व्या शतकापासून दिसू लागते. शालिवाहन राजा
प्रतिष्ठान नगरीत राज्य करत असताना अशी अगदी टिपिकल सुरुवात करून बर्याच
दंतकथा/मिथककथा नंतरच्या साहित्यात आपल्याला दिसून येतात. त्या सातवाहन
कुलाची ती सांस्कृतिक आठवण मिथककथेमधे एका राजाच्या रूपात साठवली गेली आहे
असे आपण म्हणू शकतो
हिम्सकूल -
वेदकाळापासून आपल्याला महिन्याची आणि तिथीची गणना होत असे दिसून येते.
वेदातल्या उल्लेखानुसार फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या दिवसाला नवे वर्ष सुरू
होत असे म्हणे. ही चांद्रमासीय कालगणना होती आणि पाच वर्षांच्या कालावधीत
दोनवेळा अधिकमास मिळवला जात असे. मात्र कशा पद्धतीने त्याचे तपशील
आपल्याकडे नाहीत.
जाता जाता - अवांतर वेदाच्या भाषेत युग म्हणजे पाच वर्षांचा काळ (इथेही वर्षाला संवत्सर म्हणले जात असे)
माझ्या हाताशी आत्ता सर्व संदर्भ ग्रंथ नाहीत तेव्हा जशी आठवेल तशी माहिती इथे लिहिली आहे. किंचित कुठे चुभू असू शकते, पण माझ्या स्मृतीप्रमाणे तपशील बरोबर आहे.
सातवाहनांची नाणी (Satavahana Coins)
प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ठरावीक भूभागांशी संबंधित आहेत. भौगोलिक कक्षेने मर्यादित आणि समकालीन नागरी वस्त्यांनी निर्देशित अशा प्रकारची चलनव्यवस्था या मौर्योत्तर कालखंडाचे एक वैशिष्ट्य मानायला हरकत नाही; किंबहुना हा नाणकशास्त्रीय परिणाम पूर्ण भारतभर दिसून येतो.

नाण्यांच्या पुराव्यांवरून त्यांचा उदय इ. स. पू. १५० च्या सुमाराला दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणात झाला, असे दिसते. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते. त्यांतील वासिष्ठीपुत्र सिमुक (श्रीमुख) नावाच्या राजाने पैठण-नेवासे (मराठवाडा) प्रांत व्यापून तेथून उत्तरेला नाशिक आणि दक्षिणेला वाई-कऱ्हाड या भागांत आपला अंमल बसवला आणि सातवाहन घराण्याच्या साम्राज्यवर्धनाला सुरुवात झाली. त्यांची सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी विवक्षित अशा ‘हत्ती’ प्रकारची आहेत. सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष ‘सातवाहन’ याच नावाचा राजा होता, असे मत काही नाण्यांच्या आधारे वा. वि. मिराशी यांनी मांडले होते; पण नाण्यांचा अभ्यास करता ‘सातवाहन’ असे नाव असणारी बरीच उत्तरकालीन नाणीही आता ज्ञात झाली आहेत. ती घराण्याच्या नावाला लेखात प्राधान्य देऊन काढली असावीत. दक्षिण भारतात सातवाहनांनी प्रथम राजनामांकित नाणी पाडण्यास आरंभ केला. ती तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. त्यांना ‘कार्षापणʼ ही संज्ञा असून नागनिकेच्या नाणेघाटातील लेखात विविध श्रौत यज्ञांत हजारो कार्षापणांची दाने दिल्याचा उल्लेख आहे. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे.
सिमुकानंतर झालेला राजा सातकर्णी (सातकणी) याने सातवाहनांची साम्राज्यकक्षा पैठण-नाशिक-जुन्नर या महाराष्ट्रातल्या प्रांतांपासून विदर्भ आणि खानदेश, माळव्यातल्या नर्मदा आणि बेतवा या नद्यांच्या खोऱ्यांत असलेल्या नागरी वस्त्या तसेच जबलपूर-नजीकचे त्रिपुरी हे प्राचीन शहर येथपर्यंत वाढवली. या सर्व भूभागांतून सातकर्णीच्या नावाने पाडलेली अनेक विवक्षित प्रांतिक प्रकारांची नाणी ज्ञात आहेत. या नाण्यांवर हत्ती, सिंह, इत्यादी राजपददर्शक प्राणी, कुंपणातील झाड, नंदिपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हे आणि सातवाहन घराण्याचे राजचिन्ह म्हणता येईल असे ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ इत्यादी प्रकारविशेषांचा समावेश आहे. किंबहुना, सातकर्णीचा काल हा प्रकारशास्त्रीय ‘भौगोलिक विवक्षितते’चा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. सातकर्णी आणि त्याची पट्टराणी नागनिका या दोघांच्या संयुक्त नावाने पाडलेली नाणी हा प्राचीन भारतीय नाणकशास्त्रातला एक अनुपम प्रकारशास्त्रीय आविष्कार मानला जातो. ‘गजलक्ष्मी’ सारख्या दैवताचे चित्रणही सातकर्णीच्या नाण्यांवर दिसते.
सातकर्णीच्या कारकिर्दी अखेरीस सातवाहन साम्राज्य दोन किंवा तीन वेगवेगळ्या राजांच्या आधिपत्याखाली विभागले गेले, असे नाण्यांवरून दिसते. साति सिरी, जो सातकर्णीचा मुलगा होता आणि सिमुक हे साम्राज्याच्या पूर्व भागात राज्य करू लागले, असे त्यांची नाणी दर्शवतात. विदर्भ/उत्तर तेलंगण भागात राज्य करणारा सिमुक आणि सातवाहन घराण्याचा उद्गाता सिमुक हे दोन भिन्न राजे असल्याचे नाण्यांवरून स्पष्ट झाले आहे.
सातकर्णीच्या उत्तर काळात त्याचे नाव सातवाहन घराण्यात उपनावाप्रमाणे वापरले जाऊ लागले. कोसिकीपुत्र सातकर्णी आणि कोछीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजांची माहिती मुख्यत्वे नाण्यांमुळे ज्ञात होते. या राजांचे राज्य फक्त महाराष्ट्राच्या काही भागांपुरतेच मर्यादित होते. या दोघांची नाणी हत्ती, सिंह, तीन कमानींचा पर्वत, इत्यादी चिन्हांनी मंडित आहेत. यानंतरच्या काळात सातवाहन घराण्याला उतरती कळा लागली आणि त्यांच्या महागामिक, महासेनापती, महाभोज इत्यादी मांडलिकांनी स्वतःची नाणी प्रचारात आणली.
रोमानांशी व्यापार सुरू झाल्यानंतर त्यांच्या चांदीच्या नाण्यांच्या रूपाने भारतात व्यापार होऊ लागला. या सुमारास शक क्षत्रपांनी सातवाहनांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामतः त्याचे पडसाद सातवाहन नाण्यांत उमटलेले दिसतात. शक राजा नहपान तसेच सातवाहन राजे शिव सातकर्णी आणि गौतमीपुत्र सिरी सातकर्णी यांनी एकमेकांची नाणी पुनर्मुद्रित केली. गौतमीपुत्र सातकर्णीने पुनर्मुद्रित केलेल्या नहपानाच्या नाण्यांचा एक मोठा साठा जोगळटेंभी (नाशिक जिल्हा) येथे सापडला (१९०७). गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीपासून सातवाहन साम्राज्याची नव्याने वाढ झाली आणि त्यांच्या नाण्यांचे स्वरूपही बदलले.
गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र सिरी पुळुमावी (कार. इ. स. १०६-१३०) याने सर्वप्रथम स्वतःची छबी असणारी चांदीची नाणी प्रचलित केली. पुळुमावीच्या कारकिर्दीत सातवाहनांचा राज्यविस्तार दक्षिण आणि पूर्वेकडे झाला. या प्रांतात त्याने सिंह, तीन किंवा सहा कमानींचा पर्वत इत्यादी प्रकारांची नाणी काढली. याशिवाय पुळुमावीची साम्राज्यात सर्वत्र चालणारी ‘हत्ती’ प्रकारची नाणीही प्रचलित होती. साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेचे ‘नाणकीय केंद्रीकरण’ करण्याच्या दृष्टीने चांदीची छबीयुक्त नाणी आणि ही ‘हत्ती’ प्रकारची नाणी या दोन मूल्यांकांचे प्रचलन महत्त्वाचे ठरते.
पुळुमावीनंतर त्याच्या अनेक वारसदारांनी छबीयुक्त नाणी पाडली. यात सिव सिरी पुळुमावी, सिरी सातकर्णी, खद (स्कंद) सातकर्णी आणि विजय सातकर्णी, तसेच यञ (यज्ञश्री) सातकर्णी यांचा समावेश होतो. उत्तरकालीन सातवाहन राजांचीही छ्बीयुक्त नाणी ज्ञात आहेत. यज्ञश्री सातकर्णीची जहाज, नौका छापाची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविक संबंधांचे आणि सामर्थ्याचे सुस्पष्ट चित्रण या नाण्यांतून आढळते.
बहुतेक सातवाहन नाण्यांवर लेख आढळतात. ते माहाराष्ट्री प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. लेखांची सुरुवात राजपददर्शक ‘रञो’ शब्दाने होते आणि ते षष्ठी विभक्ती-रूपात, म्हणजेच नाणे कोणा‘चे’ आहे, ते दर्शवतात. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांतील लेख आढळतात. प्रदेशपरत्वे तेथील परिचित लिपीत त्यांवर लेख कोरले आहेत.
सातवाहन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून बनवली असली तरी प्रारंभीच्या काळातील आहत नाणीही ज्ञात आहेत. बहुतेक नाणी मिश्र धातू स्वरूपात असून तांबे, शिसे, जस्त इत्यादी धातूंना प्राधान्य होते. आंध्र-कर्नाटकातील नाण्यांत शिशाच्या नाण्यांची बहुलता आढळते. सातवाहन राजांची कालनिश्चिती, त्यांचा साम्राज्यविस्तार, धार्मिक धोरण, वित्तीय बदल आणि त्यांचा व्यापार-उदीम इत्यादी बाबींवर त्यांची नाणी प्रकाश टाकतात.
संदर्भ :
- Bhandare, Shailendra & Garg, Sanjay, Eds., ‘Linking the Past : Overstruck Coins and Chronology of the Satavahanasʼ, Felicitas : Essay in Numismatics, Epigraphy and History in Honour of Joe Cribb, 2011.
- मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
समीक्षक : मंजिरी भालेराव
सातवाहनांचा कालखंड खरा सुवर्णकाळ !
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'भारतात सर्वाधिक ४६० वर्षे राजवट करणारे सातवाहन राजे एकमेव आहेत. आयात-निर्यातीतून संपन्नता आणणारे सातवाहन राज्य विस्तारलेले होते. व्यापार, शेती, स्थापत्य, कला, संगीत या माध्यमातून सातवाहनांनी खरा सुवर्णकाळ आणला', असे प्रतिपादन रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने न. शे. पोहनेरकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी 'सातवाहनांचा सुवर्णकाळ' या विषयावर रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड यांनी विचार मांडले. 'मसाप'च्या मुख्य सभागृहात शनिवारी सायंकाळी व्याख्यान झाले. यावेळी 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कोषाध्यक्ष के. एस. अतकरे उपस्थित होते. इंग्रजांचे इतिहास संशोधन ते सद्यस्थितीचे दाखले देत धोंड यांनी सातवाहनांचा कालखंड उलगडला. 'वेगवेगळ्या पुराणात सातवाहन राजांची नामावली आढळते. पण, त्याला ऐतिहासिक पुरावा मानता येत नाही. कारण वेगवेगळ्या पुराणात सातवाहनांची नावे आणि कालखंड वेगवेगळा आहे. त्यात एकवाक्यता दिसत नाही. पुराणांना इतिहासाचे पुरावे मानता येत नसले तरी टाळतासुद्धा येत नाही, असे इतिहासकार श्रीधर केतकर यांनी म्हटले होते. त्यानुसार शिलालेख, नाणी यांची सांगड पुराणातील नामावलीशी जोडून काही उलगडा होतो. १८३७मध्ये नाणेघाटावरील पहिला लेख प्रसिद्ध झाला. त्यात सातवाहनकालीन अश्वमेध यज्ञाचा उल्लेख होता. हा कालखंड इ. स. पूर्व १७५ ते १८० मानून तिथून संशोधनाची गती वाढली. सातवाहनाचे मूळ नाव 'सालाहन' असून कालौघात शालीवाहन, सातवाहन, सातकर्णी असा बदल झाला', असे धोंड म्हणाले.
सातवाहन साम्राज्य भारतवर्षात सर्वाधिक ४६० वर्षे टिकले असे इतिहास संशोधक रा. श्री. मोरवंचीकर यांनी म्हटले आहे. पण, आसाम राज्यातील अहोम राजवट सर्वाधिक ६०० वर्षे होती. तुलनेने अहोम छोटे राज्य होते. साम्राज्याचा विचार करता सातवाहन खऱ्या अर्थाने साम्राज्य होते, असे धोंड म्हणाले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.
\Bव्यापारातून वाढली समृद्धी
\Bसातवाहन कालखंडात अन्य देशांशी व्यापार झाल्याचे पुरावे सापडतात. तेरमधील उत्खननात सापडलेल्या हस्तीदंती बाहुलीसारखी बाहुली इटली आणि कंबोडीयातही सापडली आहे. त्यावरुन आयात-निर्यात स्पष्ट होते. मलमल, मसाले, हस्तीदंती वस्तूंच्या निर्यातीतून सातवाहन काळात संपन्नता आली, असे धोंड म्हणाले.
औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण
ठळक मुद्देशहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहेया जात्याला आडवी दांडी, एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : पूर्वी घरोघरी महिला जात्यावरच दळण दळत असत; मात्र काळाच्या ओघात जाते मागे पडले. आता फक्त लग्नाच्या विधीपुरतेच जात्याचे महत्त्व मर्यादित राहिले आहे. सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ते दगडी जाते एवढे जड आहे की फिरवण्यासाठी दोन महिला लागत.
‘कोंबड्याची बांग.. आली कानावर बाई... ये गं दळण दळाया, सई बाई गं बाई....सासराच्या जात्यात... जीव अडकतो लई, गरागरा फिरताना.. हात थांबतच न्हाई’, अशा ओव्या म्हणत सासुरवाशिणी पहाटे पायलीपायलीने दळण दळत असत. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खाची न संपणारी वीण यांचे दर्शन पहाटेच्या जात्यावरच्या ओव्यांमधून होत असे. या जात्यांची व ओव्यांची आठवण शहरातील पुराणवस्तू संग्राहक रमेश रुणवाल यांनी त्यांच्याकडील सातवाहनकालीन जाते दाखविल्याने झाली. टिळकपथ रोडवरील आपल्या दुकानातील माळवदावर त्यांनी हा दुर्मिळ, ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. जाते तर सर्वांना माहीत आहे. मग, या जात्याचे वैशिष्ट्य काय... असे आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.
आजही अनेकांच्या घरात दगडी जाते आहे; पण त्यास फिरविण्यासाठी एकच दांडा असतो; मात्र रुणवाल यांच्याकडील जात्याला उभा नव्हे आडवा दांडा आहे. एक नव्हे, तर दोन महिला समोरासमोर बसून या जात्यावर दळण दळत असत. इतिहास संशोधकांच्या मते सातवाहन काळात या जात्याची निर्मिती झाली असावी. तेव्हा जात्याला आडवी दांडी असे. रमेश रुणवाल यांनी सांगितले की, पुराणवस्तूच्या शोधासाठी ते देशभर फिरत असतात.
३६ वर्षांपूर्वी नेवासा येथील त्यांचे मित्र मोहिते यांच्या घरी त्यांना हे आडव्या दांडीचे जाते दिसले. मोहित्यांनी ते जाते रुणवाल यांना दिले. हे जाते सातवाहनकालीन असल्याचा निर्वाळा तेव्हाच इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांनी दिला होता. रुणवाल यांनी हे जाते नंतर आपल्या पोटच्या मुलासारखे सांभाळले आहे; मात्र आता जात्याच्या दगडाची झीज झाली आहे. खालच्या पाळूला तडेही गेले आहेत. आता हे जाते जतन करणे अवघड होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय किंवा सोनेरी महल येथील पुरातनवस्तुसंग्रहालयात हे प्राचीन जाते देण्याचा त्यांचा विचार आहे.
अशी जाती दुर्मिळच
इतिहास
संशोधक डॉ.रा.श्री. मोरवंचीकर हे जात्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की,
‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मी सातवाहनकालीन जात्याचा उल्लेख
केला आहे. सिंधू संस्कृतीत पाट्यांचा वापर केला जात असे. पाट्यांप्रमाणे
सातवाहन घरांत जाती सापडली आहेत. धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथम
याच काळात केला गेला. या जात्याची खालची तळी पातळ व बर्हिगोल असून, वरची
तळी उभट गोल आकारात असत. वरच्या तळीस उंचावलेले तोंड असून, या तोंडाच्या
गळ्यातून आडवा लाकडी दांडा घालण्याकरिता आरपार छिद्र आहे. वरची तळी खालच्या
तळीमध्ये अडकवलेल्या उभ्या लोखंडी खिळ्याभोवती बसविली जाते. दोन महिला
परस्परांसमोर बसून आडव्या दांड्याच्या मदतीने जाते गोलाकार फिरवीत. आजच्या
जात्याच्या सुटसुटीतपणापुढे हे जाते थोडेसे अवघड वाटते.
उत्खननात सापडतात...
आडवी
दांडी असलेले हे जाते सातवाहनकालीन आहे. कोल्हापूर, शिरपूर, नेवासा,
भोकरदन या पट्ट्यात उत्खन्नात अशी जाती सापडली आहेत. ५० वर्षांपूर्वी
नेवासा भागात डेक्कन कॉलेजने डॉ. साकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले
होते. त्यात आडव्या दांडीचे तीन जाते सापडले होते. काही संग्राहालयांत अशी
जाती आपणास बघण्यास मिळतील.
- साईली पलांडे-दातार, पुरातत्व अभ्यासक
गौतमीपुत्र शातकर्णी
खुलासा: खालील माहितीला लेखाचे स्वरूप देण्यात आले तरी ती अतिशय अपुरी माहिती आहे त्यामुळे सदस्यांनी त्याकडे चर्चेच्या नजरेतून पाहावे ही विनंती. लेखातील काही नावे इंग्रजी लेखांतून घेतल्याने त्यांचे योग्य उच्चार लिहिले गेले नसल्यास, ते सुधारून देण्यात मदत करावी. या राजघराण्याबद्दल कथा, आख्यायिका वाचल्या असतील तर सदस्यांनी त्या येथे नमूद कराव्यात.
----
महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.
यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -
सातवाहन राजघराणे
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते.
मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात.
त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून
त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले)
आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत:
अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले
दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५००
वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या
खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.
| सातवाहन राज्य |
अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.
गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .
गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.
अपरांत, अनुप*, सौराष्ट्र, कुरुक, अकारा* आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नाहपण* या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.
आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.
| शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी |
गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.
या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहर्त *(kShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."
मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत१ आहे..
शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती.
शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा
घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला
आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की
शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता
येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या
नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि
नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर
काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या
मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक
विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.
आपले एक सदस्य वाचक्नवी यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.
आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:
सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
कृष्ण(भात) १०
श्रीशातकर्णी(श्रीमल्लकर्णी) १०
पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
स्कंधस्तंभ १८
शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
लंबोदर १८
आपीतक(आपीलक, दिविलक) १२
मेघस्वाति १८
स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
स्कंदस्वाति ७
मृगेंद्रस्वातिकर्ण ३
कुंतलस्वातिकर्ण ८
स्वातिवर्ण १
पुलोमावी ३६
अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
हाल ५
मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
पुरिकषेण(प्रविल्लसेन, पुरीषभीरु) २१
सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
चकोरशातकर्णी ६ महिने
शिवस्वाति २८
गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
पुलोमत् २८
शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
शिवश्री ७
शिवस्कंध ३
यज्ञश्री शातकर्णी २९
विजय ६
चंडश्री १०
पुलोमत् ७.
---------
१ विकिपीडियावर निरखून पाहिले असता हा भाग खिरें यांनी लिहिलेला
आढळला. बहुधा ते आपले उपक्रमी सदस्य खिरे असावेत. नसल्यास चू. भू. दे. घे.
* या उच्चारांबद्दल शंका आहेत. योग्य उच्चार माहित असल्यास ते प्रतिसादांत लिहावेत.
या लेखातील काही शंकांचे निरसन केल्याबद्दल वाचक्नवी यांची आभारी आहे.
संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.
ही राजधानी असल्याचे संदर्भही मिळाले. मला वाटतं की काही सातवाहन राज्यकर्त्यांच्या काळात राज्यावर स्वार्या, हल्ले, राज्याचा भाग आधिपत्याखालून जाणे असे घडले असावे आणि त्याकाळात राजधानी बदलली असावी. किंवा राज्य मोठे झाल्यावर पैठण क्षेत्र राजधानीचे म्हणून ठरवण्यात आले असावे. अर्थात, हा फक्त अंदाज आहे, पुरावा नाही.
पैठणबद्दल म.टा. मधील एक जुना लेख मिळाला त्यातील काही भाग येथे चिकटवते.
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कारभारानंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदिप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली , ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरुळ , अजिंठा लेणी खोदली गेली.
पैठणच्या दक्षिणेला गोदावरी काठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले , भूमिगत गटार- योजना , कोरीव नक्षीची कामे , अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. याचा पुरावा बाळासाहेब पाटील यांच्या वस्तुसंग्रहालयातील वस्तूंमधून येतो.
मूळ लेख येथे वाचा.
विक्रम संवत आणि शालिवाहन शक या व्यतिरिक्त अजून कोणत्या कालगणना भारतात होत्या?
याखेरीज कोणत्या कालगणना होत्या त्या येथे आणि येथे वाचा. बाकीचा लेखही वाचनीय आहे. खालील चित्र पाहा. कालच पाहण्यात आले पण ही कालगणनेची पद्धत कोणती ते नीट वाचता येत नाही. कोणाला कळले तर जरूर लिहावे.
| पुरातन हिंदू कॅलेंडर |
गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या
साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची
कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि
आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा. वि. मिराशी यांनी सिद्ध
केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा,
पृष्ठ ६४ ).
वर दिलेल्या यादीतील पहिला राजा सिमुक हा त्याचा नातू. त्यामुळे गौतमीपुत्र हा २५ वा सातवाहन असावा.(चू.भू. दे. घे.)
दुसरा राजा कृष्ण ऊर्फ कान्ह ऊर्फ भात हा सिमुकाचा भाऊ. तिसरा
सिरीसातकर्णी(श्रीसातकर्णी) हा सिमुकाचा मुलगा. हा त्या कुळातला पहिला
सम्राट. त्याने उत्तरेला चाल करून पश्चिम माळवा, अनूप-(नर्मदेचे
खोरे) आणि विदर्भ मौर्यांकडून जिकून घेतले. यावरून सातवाहन अशोकाचे
मांडलिक नसावेत असे वाटते. (चू.भू. द्या. घ्या.) श्रीसातकर्णीची राणी
नागनिका(नायनिका). ही नागवंशीय होती. त्रणकयिरो नावाच्या सरदाराची कन्या.
पतीच्या मृत्य़ूनंतर हिने राज्यकारभार केला. ही आपली पहिली अहिल्याबाई!
हिने नाणेघाटात मोठा शिलालेख कोरवून घेतला आहे.
या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.
आरंभीच्या सातवाहनांचे सर्व शिलालेख कार्ले, नाणेघाट, कान्हेरी, जुन्नर, नाशिक या महाराष्ट्रातील गावीं सापडले असल्याने हे घराणे महाराष्ट्री बोलणारे महाराष्ट्रीय असले पाहिजे , आंध्रवासी नसावे. उत्तरकालीन सातवाहनांचे फक्त चार शिलालेख आंध्रात सापडले आहेत. याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती .पुणे जिल्ह्यात तळेगावजवळ मावळ प्रांत आहे. त्यात बारा (उप)मावळ आहेत. त्यातला एक आंदरमावळ(आंध्र मावळ). तिथे, ज्याच्या पाण्यावर टाटांचे कर्जतजवळच्या भिवपुरी येथे विद्युत्निर्मिती केंद्र आहे तो आंध्रा तलाव आहे. तिथून उगम पावलेली आंध्रा नदी पुढे कार्ल्यापासून तेरा किलोमीटरवर असलेल्या राजपुरी या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. सातवाहनांचे अनेक शिलालेख याच भागात असल्याने ते इथलेच मूळ रहिवासी असावेत.(पहा: ऍनल्ज् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टित्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम १९१७-४२, पृष्ठ १९६, येथील स. आ. जोगळेकर यांचा लेख:"दि होम ऑफ सातवाहनाज्").
लीलावई(लीलावती) या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने गाथासप्तसईकार(सप्तशतीकार) हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान(पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट(मराठी) होत्या असे वर्णन केले आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत सातवाहन राजा कुंतल प्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो असा उल्लेख केला आहे. या पुराव्यांवरून सातवाहन हे महाराष्ट्रीय होते हे पटायला हरकत नाही.
इसवीसनापूर्वी पहिल्या शतकात बोलन खिंडीतून हूणांची टोळधाड कुशाणांवर आणि त्यांची शकांवर कोसळून शक भारतात आले. पाठोपाठ कुशाण. शकांना राज्य करणे फारसे माहीत नव्हते. ते कुशाणांचे क्षत्रप(सरदार) किंवा सुभेदार. क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात सत्ता स्थापन केली. नहपान हा त्याचा मुलगा(की वंशज?). हा व त्याचा हिंदू नाव धारण करणारा जावई उषवदात(ऋषभदत्त) यांनी माळवा व अनूप-(नर्मदेचे खोरे) जिंकले आणि ते महाराष्ट्रात उतरले. नहपान हा हळूळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत.
गौतमीपुत्राने गादीवर आल्यानंतर १५-१६ वर्षे तयारी करून आधी पुणे प्रांत, मावळ, नंतर उत्तरेला जाऊन नहपान आणि उषवदात यांना कंठस्नान घातले. दक्षिणेला जेवढे शक, पल्हव, यवन होते त्यांच्या कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेला पिटाळले. यवन हे तोपर्यंत बौद्ध झाले होते. त्यांच्या निष्ठा परकीयांशी. त्यांचेही गौतमीपुत्राने निर्दालन केले. मुसलमानी आक्रमकांपासून महाराष्ट्राला मुक्त करणार्या शिवाजीच्या सोळाशे वर्षे आधी गौतमीपुत्राने तशीच कामगिरी केली होती. शिवाजीइतक्याच आदराने आणि भक्तिभावाने गौतमीपुत्र सातकर्णीचे नाव घ्यायला पाहिजे. त्याने उत्तरेला पूर्व आणि पश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र, पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र, महेंद्र, मलय, आंध्र, व कलिंग हे प्रांत जिंकून आपला पराक्रम सिद्ध केला.
म्हणूनच स्वत:ला राजर्षिवधू म्हणवून घेणार्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन त्रिसमुद्रतोयपीतवाहन"अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे.
--वाचक्नवी
नाणेघाट हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जुन्नर जवळून थेट पश्चिमेकडे आहे - म्हणजे हा माळशेज घाटाच्या दक्षिणेला आणि जिवधन ह्या किल्ल्याच्या उत्तरेला येतो. सातवाहन कालात हा घाट रोमन व इतर दलाल कल्याण बंदरापासून पैठण पर्यंत आपल्या मालाची ने आण करण्यासाठी वापरत. क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे. आज तिथे प्रवाशांसाठी बांधलेली गुहा आणि त्यातील शीलालेख्, व पठारावर पोहोचलं की कर वसूलीसाठी वापरात येणारा एक मोठा दगडी रांजण आहे. जवळच्या 'घाटघर' ह्या गावापर्यंत बस येते, तिथून पायी जावं लागतं. पायी रस्ता घाट माथ्यापासून खाली साधारण १ किलोमिटर दगडांनी 'कॉबल्ड' आहे (ह्याला मराठीत काय म्हणतात?)
ह्या घाटाबद्दल म्हणतात की परदेशी दलालांसाठी सातवाहन राजांना एक 'हमरस्ता' बांधायचा होता, तेंव्हा त्यांनी फर्मान काढलं की जो माणूस लवकरात लवकर प्रशस्त घाट बांधेल त्याला राजा बक्षीस देईल. दोन 'कॉन्ट्रॅक्टर' स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले - एकाचं नाव होतं 'नाना' आणि दुसरा 'गुणा'. नाना नि बांधलेला घाट आधी पूर्ण झाला - तो नाणेघाट, आणि गुणाचा घाट अर्धवट राहिला कारण सरकारी बक्षीस नानाला मिळाले. हा 'गुणाघाट' जीवधन किल्ल्याच्या दक्षिणेला येतो. मी ती जागा जीवधन वरून बघितली आहे, पण तिथे गेलो नाहिये.
क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे.
हे वर्णन कोठे वाचायला मिळेल. दुवा असेल तर कृपया द्यावा.
क्लॉडियस टोलेमीने बनवलेले नकाशे ख्रिस्तोफर कोलंबसने वापरल्याचे म्हटले जाते, तो भूगोलतज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता अशी थोडीफार माहिती सोडली तर मला याविषयी माहिती नाही. त्याने लिहिलेले ग्रंथ इ. अस्तित्वात आहेत का?
दुसरीकडे हीच चर्चा नुकतीच झाली म्हणून तेथला दुवा देत आहे. विसुनाना यांनी तिकडे येथील चर्चेचा दुवा दिला आहे. (हे सर्व विकिपिडियावर लिंक करता आले तर बरे होईल).
http://misalpav.com/node/19395
तेथील माझा प्रतिसाद इथल्या कोणी अधिक प्रकाश टाकावा म्हणून इथे दुवा देत आहे.
गौतमी आपल्या मुलाला एकब्राह्मण म्हणते यावरून सातवाहन कुळ ब्राह्मण असावे यावरून चर्चा सुरु झाली होती. यासंबंधी एक वेगळा संदर्भ त्रिपिटकांमधून समोर आल्यासारखे वाटले म्हणून हे इथे डकवत आहे. कोणास यावर प्रकाश पाडता आला तर आवडेल.
http://misalpav.com/node/19395#comment-347379
(हे मी अजूनपर्यंत जी पुस्तके चाळली तेथे कोठेही वाचलेले नाही, सहज चाळताना संबंध जाणवला, यात तथ्य वाटते का असे विचारावेसे वाटले). तसेच असे इतर कुठे वाचले आहे काय? नसल्यास आणि तथ्य वाटत असल्यास लहानसा शोध लागू शकण्याचा आनंद होईल, हे नक्कीच. :)
उसका छोटा भाई कन्ह (कृष्ण) राजा बना क्योंकि सिमुक पुत्र शातकर्णि अवयस्क
था। कृष्ण के पश्चात सिमुक का अवयस्क पुत्र श्री शातकर्णि (प्रथम शातकर्णि)
शासक हुआ। शातकर्णि प्रथम प्रारम्भिक सातवाहन नरेशो में सबसे महान था। उसने
अंगीय कुल के महारठी त्रनकयिरों की पुत्री नागविका के साथ विवाह किया।
नागनिका ने नानाधाट अभिलेख से शातकर्णि प्रथम के शासन-काल के विषय में
महत्वपूर्ण सूचनायें मिलती है। शातकर्णि प्रथम पश्चिमी मालवा, अनूप (नर्मदा घाटी)
तथा विदर्भ के प्रदेशो की विजय की। उत्तरी कोंकण तथा गुजरात के कुछ भागो को
जीतकर उसने अपने राज्य में मिला लिया था। हाथीगुम्फा लेख से पता चलता है
कि अपने राज्यारोहण के दूसरे वर्ष उसने कलिंग नरेश खाखेल के शातकर्णि विपरीत
अभियान किया परन्तु वापस लौटना पड़ा। यह अभियान एक धावा मात्र था।
शातकर्णि प्रथम ने दो अश्वमेध तथा राजसूय यज्ञों का अनुष्ठान किया। उसने
‘दक्षिणापथपति’ तथा ‘अप्रतिहतचक्र’ जैसी महान उपाधियाँ धारण की।
शातकर्णि प्रथम से लेकर गौतमीपुत्र शातकर्णि के उदय पूर्व तक का लगभग
एक शताब्दी का काल सातवाहनों के हृास का काल है।
पुराणो के अनुसार गौतमीपुत्र शातकर्णि सातवाहन वश्ं ा का 23 वाँ राजा था।
उसके पिता का नाम शिवस्वाति तथा माता का नाम गौतमी बलश्री था। राज्यारोहड़
के 17 वे वर्ष एक बड़ी सेना के साथ क्षहरात नरेश नहपान तथा उषावदात को
पराजित कर मारे डाला। अपनी विजय के बाद उसने नासिक के बौद्ध संध को
‘अजकालकिय’ नामक क्षेत्र दान में दिया था। तत्पश्चात कार्ले के भिक्षु संघ को
उसने ‘करजक’ नामक ग्राम दान में दिया। यह पहले उषावदात के अधिकार में था।
क्षहरातो के साथ-साथ शक, यवन, पहलव आदि विदेशी जातियो को पराजित कर
या तो मार डाला या अपने साम्राज्य से बाहर भगा दिया।
नासिक गुहालेख से ज्ञात होता है कि ऋषिक (कृष्णा नदी का तटीय प्रदेश),
अस्मक (गोदावरी का तटीय प्रदेश), मूलक (पैठन का समीपवर्ती भाग), सुराष्ट्र
(दक्षिणी काठियावाड़), कुकुर (पश्चिमी राजपूताना), अपरान्त (उत्तरी कोकं ण), अनूप
(नर्मदा घाटी), विदर्भ (बरार), आकर (पूर्वी मालवा), अवन्ति (पश्चिमी मालवा) का क्षेत्र
उसके प्रत्यक्ष शासन में था।
नासिक प्रशस्ति में उसे विन्ध्य, ऋक्षवत (मालवा के दक्षिण का विन्ध्यपर्वत का
भाग), पारियात्र (पश्चिमी विन्ध्य तथा अरावली), सहृअ (नीलगिरि के उत्तर का
पश्चिमी घाट), मलय (त्रावनकोर पहाड़ियाँ), महेन्द्र (पूर्वी घाट) आदि पर्वतों का स्वामी
कहा गया हैं। इसी प्रशस्ति में यह भी कहा गया है कि उसके वाहनों (अश्वों) ने
तीनो समुद्रो का जल पिया था। यहाँ तीनो समुद्रो से तात्पर्य बगं ाल की खाड़ी, अरव
सागर तथा हिन्द महासागर से है।
वह क्षत्रियों के दर्प को चूर्ण करने वाला एकच्छत्र शासक था जिसने ‘राजराज’
‘महाराज’ ‘स्वामी’ आदि उपाधियाँ धारण की थी। उसका शासन काल 106-130 ई
तक था।
गौतमी पुत्र शतकर्णि
गौतमी पुत्र शतकर्णि सातवाहन वंश का सबसे पराक्रमी राजा था । शकों के आक्रमण के
कारण सातवाहन राज्य छिन्न-भिन्न हो गया और उसने सातवाहन वंश की गौरव और प्रतिष्ठा को
आगे बढाया, उसका पुत्र पुलमावि के अभिलेख में उसकी विजयों का उल्लेख मिलता है । वह
महान विजेता एवं प्रजा पालक था ।
वाशिष्टी पुत्र पुलमावि
गौतमी पुत्र शतकर्णि के पश्चात वाशिष्टी पुत्र पुलमावि शासक बना । पुराण में उसे प्रबोमा
भी कहा गया है । पुलमावि के शासन काल में सातवाहन संघर्ष पुन: प्रारम्भ हो गया । रूद्रदामन
के जूनागढ़ (गिरनार) अभिलेख ज्ञात होता है कि उसने दक्षिणापथपति शातकर्णि को दो बार हराया
पुलमावि ने महाक्षत्रप रूद्रदामन की पुत्री के साथ विवाह किया था । उसने प्रतिष्ठान को अपनी
राजधानी बनाया । पुलमावि ने ‘महाराज’ और दक्षिणापलेश्वर की उपाधि धारण की ।
यज्ञश्री सतकर्णि
सातवाहन वंश का अन्तिम शासक यज्ञश्री सतकर्णि था । वह महान विजेता शासक था ।
उसने शको को परास्त किया उसका साम्राज्य पूर्व में बंगाल की खाड़ी से लेकर अरख सागर तक
फैला था । यज्ञश्री सतकर्णि की मृत्यु के पश्चात् सातवाहनो का पतन प्रारम्भ हो गया । महाराष्ट्र अमीरों
और दक्षिण भारत पर इक्ष्वाकुओं और पल्लवी ने अधिकार कर लिया । इस प्रकार तीसरी शताब्दी
ईस्वीं में सातवाहन शक्ति समाप्त हो गयी ।
मौर्यो ने उत्तर भारत मे प्रथम साम्राज्य स्थातिप किया था । सम्राट अशोक की
मृत्यु के बाद आन्तरिक दुर्बलताओं के कारण मौर्य साम्राज्य का विघटन हो
गया । साम्राज्य के उत्तर पश्चिमी भाग पर यूनानियों, शकों, पार्थियनों और
कुषाणों के अधिकार कर लिया था । मगध और उसके आस-पास के प्रदेश पर शुंग वंश
ने अपना आधिपत्य जमाया । कुछ समय बाद काण्व वंश के शासक ने शुंग शासक को
हटाकर मगध पर अधिकार जमा लिया ।
दक्षिण और मध्य भारत भी मौर्य साम्राज्य का एक महत्वपूर्ण अंग था । यहां मौर्यो के उत्तराधिकारी सातवाहन बने जिन्हें आंध्र भी कहा जाता है । नर्मदा नदी के दक्षिण में स्थापित इस राज्य को सबसे पुराना और महत्वपूर्ण राज्य समझा जा सकता है । यह साम्राज्य लगभग 28 ईसा पूर्व से 219 ई. तक सत्ता में रहा और इसने शासन प्रबंध परम्पराएं धरोहर रूप में छोड़ी । विस्तार की दृष्टि से यह मौर्य साम्राज्य से छोटा था परन्तु सुसंगठित था । इसलिए इसने उत्तर से किसी भी विदेशी को दक्षिण में नहीं जाने दिया ।
सातवाहनों का उद्भव और शासन तिथिक्रम
सातवाहनों के मूल निवास और उनके शासन तिथि क्रम के विषय में विद्वानों में बहुत मतभेद है । परन्तु अभिलेखों और सिक्कों के प्रमाण के आधार पर कहा जाता है कि सातवाहनों का उद्भव प्रतिष्ठान (महाराष्ट्र के वर्तमान पैठान) के आस-पाास हुआ था । बाद में वे कर्नाटक और आंध्र प्रदेश में फैले । इसीलिए यह वंश आंध्र कहा गया । जहां तक सातवाहनों की शासन तिथि क्रम का संबंध है मत्स्य पुराण के अनुसार इस वंश के 30 राजाओ शातकर्णीने लगभग 4000 वर्ष तक शासन किया । वायु पुराण के अनुसार इस वंश के 19 राजाओं ने 300 वर्ष तक शासन किया । साधारणतया वायु पुराण का मत स्वीकार किया जाता है । सातवाहनों के उद्भव और मूल निवास के विषय में विद्वानों में मतभेद है । विश्वास किया जाता है कि सातवाहनों का मूल निवास पश्चिमी भारत था । साधारणतया यह माना जाता है कि इस वंश के 19 राजाओं ने 300 वर्ष तक शासन किया था ।
राजनीतिक इतिहास
सातवाहन वंश का प्रथम शासक सिमुक था । वह 28 ईसापूर्व गद्दी पर बैठा था और उसने 23 वर्ष तक शासन किया । पुराणों के अनुसार सिमुक ने मध्य-भारत के कुछ भाग पर अपना अधिपत्य जमा लिया था । उसने प्रतिष्ठान को अपनी राजधानी बनाया । सिमुक का उत्तराधिकारी उसका भाई कृष्ण था जिसने 5 ईसा पूर्व से 13 ईस्वी तक 18 वर्ष राज्य किया । उसने अपना राज्य नासिक तक बढ़ाया । नासिक अभिलेख मे शातकर्णीउसे कान्हा कहा गया है ।
प्रारम्भिक सातवाहनों में सबसे महान शासक शातकर्णी प्रथम था । वह कृष्ण का उत्तराधिकारी था । उसने 13 से 32 ई. तक शासन किया । उसने सातवाहनों की सत्ता को सर्वोच्च बनाया । प्रसिद्ध नानघाट अभिलेख मे शातकर्णीशातकर्णी की सफलताओं का उल्लेख है । इसमें उसे दक्षिणपथपति (दक्षिण का स्वामी) कहा गया है । उसके समय के जो सिक्के मिले हैं उन पर श्रीशत अकिंत है । शातकर्णी प्रथम ने पश्चिमी मालवा और उसके दक्षिण का क्षेत्र-अनुभा ‘‘नर्मदा घाटी’’ और विदर्भ (बरार) तथा पूर्वी मालवा विलय कर ऐश्वर्य प्राप्त किया । उसने 20 वैदिक अनुष्ठान और यज्ञ किए जिनमें एक राजसूय और दो अश्वमेघ यज्ञ शामिल थे । इस प्रकार शातकर्णी प्रथम ने सम्राट का पद धारण किया । तथापि सातवाहन साम्राज्य की प्रगति और सम्पन्नता सातकण्र्ाी प्रथम के साथ समाप्त हो गई । शक पश्चिमी भारत में अपना राज्य स्थापित कर चुके थे । उन्होंने सातवाहनों से पवूर् ी और पश्चिमी मालवा, उत्तरी कोंकण, उत्तरी महाराष्ट्र और दक्षिण महाराष्ट्र छीन लिया था । गौतमीपुत्र शातकर्णी (106-130 ई.) ने सातवाहनों के ऐश्वर्य को पुन: प्राप्त किया । उसे शक, यवन और पàन का नष्ट करता-सिथियनों, इण्डो-यूनानियों और पथियनों का नष्ट करता और सातवहानो शातकर्णीका कुल यश और प्रतिष्ठा स्थापित करने वाला कहा गया है । उसे विन्ध्य और पूर्वी घाट का स्वामी भी कहा जाता है । उसने शक वंश के नेता नहपान को पराजित कर शकों की सत्ता नष्ट कर दी । यह उसकी एक महत्वपूर्ण सफलता थी । इसका प्रमाण है नासिक जिले में जोगलथेम्बी में मिला सिक्कों का ढेर । इसमें नहपान द्वारा जारी किए ऐसे बहुत से सिक्के है जिन पर गौतमीपुत्र शातकर्णी द्वारा फिर से ढालने के चिन्ह है । उसने शकों से वे प्रांत पुन: प्राप्त कर लिए थे जो कभी शकों ने सातवाहनों से छीन लिए थे । ये प्रान्त थे- पूर्वी और उत्तरी मालवा, नर्मदा घाटी, विदर्भ (बरार) उत्तरी महाराष्ट्र और उत्तरी कोंकण । गौतमीपुत्र शातकर्णी ने शकों से पश्चिमी भारत का प्रान्त जीतकर अपने साम्राज्य मे शातकर्णीशामिल कर लिया था । गौतमीपुत्र शातकर्णी का उत्तराधिकारी वाशिष्टीपुत्र पुलुमावि (130-150 ई.) था । यही पहला सातवाहन शासक था जिसके सिक्के और अभिलेख आंध्र में पाए गए हैं । वाशिष्टीपुत्र ने न केवल अपने पिता से प्राप्त साम्राज्य को बनाए रखा वरन् उसे बढ़या भी । उसने दक्षिणापथ स्वामी और महाराजा की उपाधि भी धारण की ।
वाशिष्टीपुत्र की मृत्यु के बाद सातवाहनों और शंकों में कोणकण तट और मालवा को लेकर संघर्ष छिड़ गया । पश्चिमी भारत के शक शासक रूद्रदमन ने सातवाहनों को दो बार पराजित किया । तथापि उसने सातवाहन वंश को समूल नष्ट नहीं किया क्योंकि सातवाहन वंश के एक राजा से उसकी पुत्री का विवाह हुआ था । रूद्रदमन ने मालवा, दक्षिणी गुजरात, उत्तरी कोणकण और नर्मदा नदी पर महिषमति प्रदेश विजय किया । इस प्रकार कुल काल के लिए सातवाहन वंश को ग्रहण सा लग गया था ।
बाद के सातवाहन शासकों में केवल यज्ञश्री (165-194 ई.) ही एक महान् शासक हुआ । उसके काल में साम्राज्य काफी बड़ा था । उसने शकों को हटाकर उन क्षेत्रों को पुन: प्राप्त कर लिया था जो कभी सातवाहनों के हाथ से निकल गए थे । शकों के सिक्कों से मिलते-जुलते उसके सिक्के पश्चिमी भारत में पाए गए हैं । इनसे पता चलता है कि उसने शकों को पराजित किया था । यज्ञश्री के कुछ सिक्कों पर जहाज का चित्र अंकित है । इससे संकेत मिलता है कि उसे नौ-परिवहन से प्रेम था और उसका समुद्र पर भी प्रभुत्व था । उसका शासन काल शकों और सातवाहनों के बीच संघर्ष का अंतिम दौर था ।
बाद के शासक शायद इतने निर्बल थे कि वे सारे साम्राज्य पर अपना अधिकार नहीं रख पाए थे । साम्राज्य नई शक्तियों में बंट गया । पश्चिम में नासिक के आस-पास के क्षेत्र अमीरों ने अधिकार कर लिया था । कृष्णा-गन्दूर क्षेत्र पर इक्ष्वाकू स्वतंत्र राज्य बन गया था । दक्षिण-पश्चिमी भाग में चुट्टु तंश शिक्त्शाली हो गया था । उन्होंने अपना अधिकार उत्तर पूर्व में भी बढ़ा लिया था । दक्षिण पूर्वी भाग पल्लवों के अधीन था । इस प्रकार सातवाहन साम्राज्य का विघटन होने लगा और तीसरी शताब्दी ईस्वी में सातवाहनों की सत्ता समाप्त हो गई । सातवाहनों ने 28 ईसा पूर्व राज्य किया । आरम्भिक शासकों में सिमुक, कृष्णा और शातकर्णी प्रथम थे । शातकर्णी प्रथम के उत्तराधिकारियों से शकों ने बहुत से क्षेत्र छीन लिए थे। गौतमीपुत्र शातकर्णी ने शकों के राजा नहपान को हराकर फिर से सातवाहनियों का ऐश्वर्य प्राप्त किया था । वाशिष्टीपुत्र ने सातवाहनों के आधिपत्य को आन्ध्र क्षेत्र तक बढ़ाया । यज्ञश्री शातकर्णी ने सातवाहनों के आधिपत्य को आन्ध्र क्षेत्र तक बढ़ाया । यज्ञश्री शातकर्णी ने शकों को पराजित कर उन क्षेत्रों को प्राप्त कर लिया था जो कभी शकों ने अपने अधीन कर लिए थे । उसकी मृत्यु के बाद सातवाहन साम्राज्य का विघटन हो गया और तीसरी शताब्दी में सातवाहनों की सत्ता समाप्त हो गई ।
सातवाहन शासन प्रबंध
सातवाहन राजाओं ने अपने साम्राज्य में एक सुदृढ़ शासन प्रबंध की व्यवस्था की थी और इसीलिए वे विदेशियों को दक्षिण से आने से रोक सके । धर्म शास्त्रों के आदर्शो के अनुरूप उन्होंने राजतंत्रात्मक शासन स्थापित किया था । फिर भी उन्होंने स्थानीय और ग्रामीण संस्थाओं को स्वशासन का अधिकार दे रखा था ।
शासन का प्रमुख राजा था । कुषाणों की भांति सातवाहन राजाओं को ईश्वरीय शक्तियां प्राप्त थी । उसकी तुलना राम, अर्जुन और भीम से की जाती थी । राजा का मूल्य कर्तव्य साम्राज्य की सुरक्षा करना और उसे बढ़ाना था । युद्ध के समय वही सेनानायक होता था । शासन कार्य में उसकी सहायता के लिए अमात्य, सचिव, महापात्र और प्रतिहार जैसे अधिकारी थे । सामन्तों की तीन श्रेणियां थी- राजा, महाभोज और महारथी, सेनापति । सेनापति का पद महत्वपूर्ण था । वह सेना का संचालन करने के साथ प्रान्तीय शासक (राज्यपाल) भी होता था । सातवाहन अभिलेखों में कटक और स्कंधावर जैसे शब्दों का आम प्रयोग किया गया है । इससे ही पता चलता है कि सातवाहन शासन का सैनिक चरित्र था । ये सैनिक शिविर और उपनिवेश होते थे जो अस्थायी राजधानी और प्रशासनिक इकाई के रूप में कार्य करते थे ।
समस्त सातवाहन साम्राज्य जपनदों (प्रान्तों) और आहरों (जिलों) में बंटा हुआ था । कुछ आहरों का उत्तरदायित्व अमात्यों पर था । कहीं-कहीं आहर महामात्र के नियन्त्रण में होते थे । सातवहान काल में नगर प्रशासन का उत्तरदायित्व निगम जैसी संस्थाओं के हाथ में था । गांव का प्रबंध ग्राम पंचायत करती थी जिसकी सहायता के लिए ग्रामिक नाम का एक अधिकारी होता था। गोल्मिक नामक अधिकारी ग्रामीण क्षेत्र में शान्ति और व्यवस्था बनाए रखता था । सातवाहन काल में ब्राम्हणों और बौद्ध भिक्षुओं को कर मुक्त भूमि देने की प्रथा थी । यह भूमि राजकीय अधिकारियों के हस्तक्षेप से मुक्त थी । भू-स्वामी ही कर वसूल करते और शान्ति बनाए रखते थे । इस प्रकार अनुदान या उपहार में मिली भूमि पर ये स्वतन्त्र शासक के समान थे। भूमि अनुदान प्रथा से सातवाहन शासन काल में सामन्तवाद को प्रोत्साहन मिला । शक्तिशाली सामन्तों का उदय ही अन्य में सातवाहनों के साम्राज्य के विघटन के लिए उत्तरदायी सिद्ध हुआ। सातवाहन शासन का प्रमुख राजा था । समस्त साम्राज्य जनपदों, आहरों और ग्रामों में बंटा हुआ था । सातवाहन राजा नागरिक अधिकारियों और धार्मिक व्यक्तियों को कर मुक्त भूमि देते थे। वे अपने क्षेत्र में कर वसूल करते और व्यवस्था बनाए रखते थे । सातवाहन प्रशासन सैनिक चरित्र का था ।
आर्थिक दशा
सातवाहन काल में आर्थिक क्षेत्र में महत्वपूर्ण उन्नति हुई । विदेशी व्यापार और आन्तरिक अर्थव्यवस्था समृद्ध थी । अर्थव्यवस्था का मुख्य आधार कृषि था । सातवाहन अभिलेखों में बहुधा गाय, भूमि और गांव उपहार रूप में देने का उल्लेख आता है । इससे पता चलता है कि भूमि और कृषि कितनी महत्वपूर्ण थी । लोहे के औजारों और धान रोपने की जानकारी ने कृषि उत्पादन बढ़ाने में बहुत योगदान दिया। चावल मुख्य भोजन था । यहां धान के अतिरिक्त गेहूं, दाल, ज्वार, बाजरा, लौंग, तिल, काली मिर्च और कपास की भी खेती की जाती थी । राजा कृषि उत्पादन का 1/6 भाग किसानों से कर के रूप में लेता था । यह ‘भाग’ कहलाता था । जो भूमि राजकीय कर्मचारियों या धार्मिक व्यक्तियों को अनुदान रूप में मिली होती थी उसका लगान भूमि-स्वामी ही लेते थे । इस लगान पर राजा का कोई अधिकार नहीं होता था। राजा ‘भोग’ नामक कर भी वसूल करता था । खानों और नमक भण्डारों पर राजा का एकाधिकार था ।
सातवाहन काल में उद्योग और शिल्प उन्नत दशा में थे । समकालीन प्रमाणों में कुम्हार (मिट्टी का काम करने वाले) तेली (तेल बनाने वाले) बढ़ई (बांस का काम करने वाले) लोहार और सुनार आदि शिल्पकारों का उल्लेख है । प्रत्येक व्यवसाय श्रेणी (गिल्ड) में संगठित था । इसका प्रमुख श्रेष्ठी या सेठी कहलाता था । श्रेणी धर्म या गिल्ड के नियमों को कानूनी दर्जा प्राप्त था । श्रेणी के सदस्यों को सुरक्षा के साथ-साथ मान-प्रतिष्ठाा भी मिलती थी । श्रेणी की मुख्य विशेषता थी बैंकों की भांति रूपये का लेन-देन करना । यह जनसाधारण से धन लेती और उन्हें ऋण देती थी । श्रेणी लोकहित के लिए मन्दिर, बाग, विश्रामगृह आदि बनवाती थी । राज्य भी प्रत्यक्ष रूप में श्रेणी के कार्यो में रूचि लेता था ।
सातवाहन काल में मौद्रिक अर्थव्यवस्था (पूंजीवादी अर्थव्यवस्था) विकसित हुई थी । सातवाहनों के कम मूल्य के अनेक सिक्के साम्राज्य के बहुत बड़े भाग में मिले है । इसी काल में अनेक समृद्ध नगरों का विकास हुआ । प्रतिष्ठान, नासिक, जूनागढ़ और वैजयन्ती जैसे नगर व्यापारिक केन्द्र बन गए । ‘पीरिप्लस’ आफ दि एरिथियन सी’ नामक पुस्तक में भढौच, सोपरा और कल्याणी नामक बन्दरगाहों का उल्लेख मिलता है । सातवाहनों की सुदृढ़ अर्थव्यवस्था के कारण व्यापारिक गतिविधियों को प्रोत्साहन मिला । सातवाहन पश्चिमी तट से पश्चिमी देशों से व्यापार करते थे । व्यापार उन्नत था । पोरिप्लस आफ द एरिथियन सी’ नामक पुस्तक के अनुसार सारे भारत और चीन में चीजें पहले भडोच मे शातकर्णीएकत्र की जाती थीं और फिर वहां से रोम साम्राज्य को भेजी जाती थी । इसी पुस्तक के अनुसार भारत से हाथी दांत, (रेशम) सिल्क, कालीमिर्च, धागा, हीरे और मोती निर्यात किए जाते थे । रोम साम्राज्य से आयात की जाने वाली वस्तुएं थी- पुखराज, टिन, सीसा, चकमक पत्थर, शीश और सोने चांदी के सिक्के । दर्शन दक्षिण में लोकप्रिय हो चुका था । सातवाहन शासकों का दावा है कि उन्होंने अश्वमेघ, बाजपेय और राजसूय जैसे वैदिक अनुष्ठान तथा यज्ञ किए थे । शातकर्णी प्रथम ने ब्राम्हणों को गाय, हाथी, धन आदि दक्षिणा रूप में दिए । आपको याद होगा कि ब्राम्हणों को भूमि भी उपहार रूप में दी गई थी । सातवाहन शासकों ने बौद्ध धर्म को भी प्रोत्साहन दिया था । इस काल के बहुत से स्तूप और चैत्य व्यापारियों द्वारा दिए गए दान े स े ही बने थे । इस काल में बौद्ध धर्म की लोकप्रियता को सिद्ध करते है नासिक, कार्ले, अमरावती और नागर्जुकोंडा के स्मारक । जब जैन धर्म उत्तर में अपना प्रभुत्व खो बैठा तो सातवाहन काल में दक्षिण मे शातकर्णीस्थापित हुआ।
कुछ विद्वानों के मतानुसार राजा सिमुक जैन धर्म का अनुयायी था । पशु, वृक्ष, पर्वत और नदियों में देवी शक्ति मानी जाने लगी और गाय और सर्प की पूजा योग्य माना गया । जिस प्रकार कैलश पर्वत को शिव से जोड़ा हुआ है उसी प्रकार विष्णुकुण्ठ को विष्णु से माना जाने लगा । सातवाहन शासकों के अधीन दक्षिणी भाग मे शातकर्णीवैदिक धर्म लोकप्रिय बन गया था । सातवाहन राजा ब्राम्हण होने का दावा करते थे । इन्होंने बौद्ध और जैन धर्म को प्रोत्साहन दिया । इस काल की अनेक बौद्ध गुफाएं खोज निकाली गई है । वृक्षों और पशुओं की पूजा का प्रचलन था । खानों और नदियों को पवित्र माना जाता था ।
सांस्कृतिक विकास
सातवाहन राजा कला और साहित्य के महान पोषक थे । इस काल की कला में प्रचलित धार्मिक विश्वास अभिव्यक्त किए जाते थे । सातवाहन शासकों के संरक्षण में अनेक बौद्ध बिहार और चैतय बने । नासिक और कर्ले के विहार बहुत प्रसिद्ध है । ये सुन्दर निर्माण एक ही चट्टान को काट कर तैयार किए गए थे । इस काल में अनेक स्तूप भी बनाए गए । अमरावती और नागार्जुनकोंडा के स्तूप अधिक महत्वपूर्ण है । अमरावती का स्तूप मूर्तियों से सजा है । ये मूर्तियां युद्ध के जीवन के विभिन्न दृश्य प्रदर्शित करती है जो कलाकृतियाँ स्मारकों पर दिखाई देती हैं । ये कला और मूर्तिकला के उन्नत होने का प्रमाण है ।
सातवाहन शासक प्राकृत भाषा के संरक्षक थे । मौर्यकाल की भांति सभी अभिलेख प्राकृत भाषा में रचे गए और ब्राम्हणी लिपि में लिखे गए थे । साहित्य रचनाओं में प्रसिद्ध हैं- सातवाहन राजा हाल द्वारा छद्मनाम से लिखी गई, 700 पद्यों वाली ‘गाथा सप्तशती’ और गुणाध्या द्वारा लिखित ‘वृहत् कथा’ ।
सातवाहन काल में कला और साहित्य का विकास उच्च कोटि का था । वास्तुकला के सुन्दर नमूने हैं, बौद्ध चैतय, बिहार और स्तूप जो एक ही चट्टान को काटकर बनाए गए है । साहित्य के क्षेत्र में कहा जा सकता है कि सातवाहन राजाओं न े प्राकृत भाषा को संरक्षण प्रदान किया ।
सातवाहन राजघराण्याचा इतिहास- भाग १


नाणेघाटातील भलामोठा लेख
त्यामुळे सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा मूळ कर्ता नक्कीच ठरत नाही. सातवाहन याच्या नंतर पुढे कधीतरी हा सिमुक गादीवर आला असावा असे वाटते. याचा उल्लेख नाणेघाटात असणाऱ्या नायनिकेच्या लेखात येतो. नाणेघाटात या सर्व राजांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि त्याच्या खाली त्यांची नावे दिलेली आहेत. तिथे याचा उल्लेख ‘सिमुक सातवाहनो’ असा आलेला आहे. या राजाने खुप मोठा पराक्रम गाजवला हे नाणेघाटातील लेखावरून कळून येते. नायनिका ही एका शूर, वीर व अजिंक्य राजाची स्नुषा होती असे वर्णन नाणेघाटात आलेले आहे. या लेखाचा बराच भाग हा उडाला आहे, तो जर मिळाला असता तर कदाचित या सिमुकाबद्दल अधिक माहिती मिळू शकली असती. पुराणात सुद्धा याच सिमुकापासून वंशावळ सुरु झाल्याचे दिसून येते. सिमुकानंतर काही वेळ श्री सातकर्णी मोठा होईपर्यंत सिमुकाचा भाऊ कृष्ण याने सत्ता सांभाळली होती. या कृष्णाचा उल्लेख हा नाशिकच्या लेण्यात आढळतो तो म्हणजे ‘सातवाहनकुले कन्हे राजिनि’. सातवाहन कुळात कृष्ण नावाचा राजा राज्य करत असताना समण नावाच्या एका माणसाने हे लेणे कोरले असा त्याचा अर्थ.
- हे फोटो श्री जोगळेकर यांच्या गाथा सप्तशती या पुस्तकातील आहेत. त्यांनी प्रत्येक राजाचे सुंदर विश्लेषण केले आहे
सिधम सातवाहनस!!!
सातवाहन राजांविषयी अभ्यास करताना जाणवते की हा विषय अतिशय दुर्लक्षित केलेला आहे. त्यामुळे मध्ययुगीन इतिहासाच्या बरोबर या विषयाचा अभ्यास झाल्यास त्याकाळी समाजजीवन कसे होते आणि तिथला व्यापार कसा होता हे समजणे सोपे जाईल. या अभ्यासाला लेण्यांच्या भटकंतीची जोड दिल्यास काही नवीन बाबी सुद्धा समोर येऊ शकतात. तूर्तास हा लेख इथेच थांबवतो. पुढच्या भागात या राजघराण्याविषयीच्या माहितीसोबत आणि काही interesting गोष्टी घेऊन नक्की भेटू.
संदर्भ:-
- ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप
यांचा इतिहास व कोरीव लेख’ - श्री. मिराशी
- 'सह्याद्री' - श्री.
सदाशिव जोगळेकर
- www.coinindia.com
हालसातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य.
१९७१ साली एका महाविद्यालयात मित्राला भेटायला गेलो होतो. नुकताच
मॅट्रीक होऊन कॉलेजला प्रवेश घेतला होता. अभ्यासाच्या नावाने बोंब
असल्यामुळे अवांतर वाचनाच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. फ्रॅंझ
काफ्का, मार्क्स, हेमिंग्वे, स्टाईनबेक, विल्यम शिरर, जे. कृष्णमूर्ती, आणि
असे अनेक लेखक ज्यांच्या लेखनावर चर्चा करत ही वर्षे गेली. त्या वर्षांचे
आभार कसे मानावेत हे मला कळत नाही..... असो. मी या महाविद्यालयाबद्दल बोलत
होतो. या माझ्या मित्राला त्यांच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा भयंकर
अभिमान होता. ते मी बघावे अशी त्याची त्या काळात फार इच्छा होती. ताजमहाल
बघायला जाणार्याच्या मनात काय उत्कंठा असावी त्यापेक्षाही जास्त
उत्कंठतेने मी त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पाऊल टाकले आणि माझी छाती
दडपून गेली. जे माझ्या स्वप्नातही बघणे शक्य नव्हते अशी ती ग्रंथसंपदा बघून
माझे मन तृप्त झाले.
“हे तर काहीच नाही. आपल्याला अजून सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचे आहे”
मित्र म्हणाला. आता अजून काय बघायला मिळणार या उत्सुकतेने मी त्याच्या
मागोमाग जिना चढायला लागलो. जिना अर्थातच लाकडी, कुरकुरणारा. जसे जसे आम्ही
वर जाऊ लागलो तसे धुळीचे साम्राज्य दिसू लागले. शेवटी पोहोचल्यावर तर
धुळीशिवाय काही दिसेना. नीट बघितल्यावर त्याच्या खाली लपलेली असंख्य
पुस्तके मला दिसली.
“चायला, हे रे काय ? ही अवस्था?” मी म्हटले.
“तुला हस्तलिखिते बघायची होती ना ? चल जरा त्या टोकाला जावे लागेल” मित्र म्हणाला.
त्याने पुढे पाउल टाकले आणि माझ्या लक्षात आले की तो पुस्तकांवरून चालतोय. पण दुसरा मार्गच नव्हता. त्या मजल्यावर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पुस्तकेच पुस्तके जमिनीवर पसरून पडली होती. ज्या पुस्तकावर त्याचा पाय पडला होता ते मी झटकून उचलले आणि बघितले तर ते होते “हालसातवाहनाची गाथा सप्तशती” लेखक होते श्री. जोगळेकर. या गाथेबद्दल पूर्वी कोणाकडूनतरी एकले होते. या जाडजूड पुस्तकातून चांगली माहिती मिळेल या आशेने ते उचलले आणि मित्राच्या नावावर ते नोंदवून पुण्याला घेऊन आलो. दुर्दैवाने त्याने या जगातून दोन महिन्यानेच एक्झीट घेतली आणि ते पुस्तक माझ्याकडे तसेच राहिले. नंतर जवळ जवळ सात आठ वर्षाने मी ते वाचायला काढले तेव्हा अर्थातच मनात मित्राच्या आठवणी दाटल्या होत्या पण त्याहूनही आपण काहीतरी वेगळेच वाचतोय हीही भावना मनात येत होती. पुस्तक वाचून झाल्यावर सातवाहनांवर बरेच वाचून काढले पण त्या बद्दल परत केव्हातरी. आज आपण या गाथेबद्दल वाचणार आहोत.
सत्त सताइं कईवच्छलेण कोडिअ मज्झाअरैम्मि ।
हालेण विरईआइं सालंकाराणँ गाहाणम् ॥
जमलेल्या एक कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट, अलंकाराने नटलेल्या सातशे गाथा निवडून हालाने हा ग्रंथ रचला असा अर्थ या वरील गाथेचा किंवा ओवीचा होतो. या कोटी गाथा त्याने का जमविल्या व कशा जमवल्या असतील हे त्यालाच ठावूक. पण त्याबद्दल एक दंतकथा नंतर लिहिलेल्या अनेक टीकांमधून सापडते. हालाला विद्वत्तेचे भयंकर आकर्षण होते. त्याची एक चंद्रलेखा नावाची पट्टराणी होती. तिच्या समवेत तो एकदा जलक्रिडा करत असताना त्याने राणीच्या अंगावर पाणी उडवले. ते बघून राणीने त्याला संस्कृतमधे पाणी न उडविण्याची विनंती केली त्यात तिने मोदकै: हा समास वापरला होता. त्याचा अर्थ न कळून हालाने तिच्या समोर मोदक आणून हजर केले. ते बघून राणीने इतर राण्यांच्या समोर हालाचा उपहास केला. रागावून हालाने सरस्वतीची आराधना केली व ती प्रसन्न झाल्यावर तिच्याकडे जो वर मागितला तो भन्नाट होता. त्यात त्याने स्वत:च्या उपहासाचा बदला तर घेतलाच पण अशी परिस्थिती परत कोणावर ओढवू नये याचीही काळजी घेतली. त्याने वर मागितला “ माझे सर्व प्रजाजन हे कवी व सुशिक्षित होऊ देत” देवीचाच वर असल्यामुळे एक कोटी का दहा कोटी कवी त्याच्या राज्यात निर्माण झाले. त्यांच्यासाठी हालाने राज्यात दवंडी पेटवून त्यांना कविता लिहायचे आव्हान केले व त्यासाठी मानधनही जाहीर केले. त्यामुळे या एक कोटी गाथा जमा झाल्या. त्या वाचून हालाने त्यातील उत्कृष्ट अशा सातशे निवडल्या. अर्थात सगळ्यांनाच काहीना काहीतरी बक्षिस देण्यात आले. ही दंतकथा सोडल्यास हालाने त्याला संस्कृत व्याकरण शिकवण्यासाठी दोन थोर शिक्षकांची शिकवणी लावली होती व त्याने राज्यात दवंडी पेटवून काव्य सादर करण्याचे आवाहन केले होते हे सत्य आहे. त्या शिक्षकांची नावे आपल्याला माहीत असतील. एक होता गुणाढ्य तर दुसरा होता शर्ववर्मा. शर्ववर्म्याने हे काम सहा महिन्यात संपविल्यामुळे त्याला कच्छची सुभेदारी बक्षिस देण्यात आली असा उल्लेख कथासरित्सागरात आला आहे. जर तुम्ही या सर्व गाथा वाचल्यात तर तुम्हाला अजून एका काव्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे जगप्रसिद्ध “मेघदूत”. या गाथांमधील अनेक कल्पनांचा उल्लेख आपल्याला मेघदूतात आढळेल. याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा हे मी वाचकांवर सोडतो.
इतिहासात अनेक देश विदेशात राजांनी, सम्राटांनी आपल्या पदरी भाट बाळगले होते. राजकवी, राजगायक, राज जोतीष, राज नर्तिका इत्यादी पदे निर्माणकरून कलांना राजाश्रय देण्यात येई. पण सर्वसामांन्यांच्या कलेला किंवा प्रतिभेला उत्तेजन देण्यासाठी हालाने जी युक्ती वापरली त्याचे हे उदाहरण एकमेवच असेल. सातव्या शतकाच्या पहिल्या भागात होऊन गेलेला महाकवि बाणभट्ट आपल्याला माहितीच आहे. त्याच्या हर्षचरित्रात या गाथांचा उल्लेख केलेला आहे तो मोठ्या कौतूकाने...
अविनाशिनमग्राम्यमकरोत्सातवाहन: ।
विशुद्धजातिभि: कोशं रत्नेरिव सुभाषितै:
याचा स्वैर अर्थ होतो –ज्या प्रमाणे एखादा राजा आपल्या प्रजेकडून न संपणारा निधी गोळा करतो त्याप्रमाणे सातवाहन राजाने अत्यंत विशूद्ध जातिछंदात रचलेली ही सुभाषिते गोळा केली व त्यांचा एक कोश रचला. किती खरे आहे... एकवेळ राजाचा खजिना संपेल, त्याच्या खजिन्यातील रत्ने संपतील पण या सुभाषितांच्या रत्नांचा खजिना या जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. हे आपल्या येथे (भारतात) अनेक ग्रंथांच्या बाबतीत सिद्धही झाले आहे.
सर्वसामान्यांकडून जमा झालेल्या या गाथांची भाषाही त्यामुळे
सर्वसामान्यांचीच आहे. त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत ही
भाषा बोलली जात असे. संस्कृत व आत्ताची मराठी यामधे कुठेतरी ही भाषा आहे
असे मानायला जागा आहे. पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे प्राकृत ही अत्यंत
गोड व मधाळ भाषा आहे. उदाहराणार्थ वर दिलेली किंवा कुठलीही गाथा आपण जर
वाचून बघितली तर आपल्याला आढळेल की आपल्या वाणीतील कठोर शब्द, हेल नाहीसे
झाले आहेत. उत्तरेतील हिंदी व ब्रज भाषा यामधेही हाच फरक आहे.
दुर्दैवाने/सुदैवाने मराठीने संस्कृतची कास धरली म्हणून तीही तिच्या सारखी
आघातप्रिय, कठोर भाषा झाली. जर मराठीने प्राकृताची कास धरुन आपला प्रवास
केला असता तर मराठी आज आहे त्याहूनही गोड झाली असती. अर्थात त्यात एक तोटा
झाला असता तो म्हणजे मराठी शिव्यांचा दरारा लोप पावला असता. :-)
.
ख्रि.पू. दुसर्या शतकात पतंजलिच्या प्रेरणेने पुष्यमित्र शुंग व पहिला
सातकर्णी यांनी बौद्ध पण परकीय मिनॅंडरचा पराभव केला. ख्रि.पू. पहिल्या
शतकात दुसर्या सातकर्णीने माळव्यात प्रस्थापित झालेल्या शकांचा नाश केला.
याच काळात प्रबळ झालेल्या सातवाहनांनी प्राकृत भाषेचा पुरस्कार केला व
महाराष्ट्री प्राकृत उदयास आली असे म्हणायला हरकत नाही. या भाषेला
महाराष्ट्री प्राकृत म्हणायचे मुख्य कारण म्हणजे यात बरेच देशी शब्द आहेत
जे इतर ठिकाणी बोलण्यात येणार्या प्राकृतात सापडत नाहीत.
श्री जोगळेकरांच्या मते प्राकृतात प्रचलित असलेल्या शब्दांचे तीन गट पडतात. एक म्हणजे संस्कृतातून तसेच्या तसे उचलले शब्द, दुसरा म्हणजे काही सुधारणा होऊन आलेले शब्द. या सुधारणा म्हणजे बहुतेककरून जोडाक्षरे काढून शब्दोच्चारात सुलभता आणणे या होत्या. तिसरा गट आहे देशी शब्दांचा. याचा संस्कृतशी काहीही संबंध नाही. अर्थात काळाच्या ओघात दोन्हीही भाषांचा एकामेकांवर प्रभाव पडत गेला त्यांच्यात दुसर्या भाषेचे शब्द विपूलतेने आढळू लागले. हॉलमधे आपण आपल्या बायकोला हाका मारतो व शयनगृहात हाका मारतो यात जो फरक आहे तो संस्कृत व प्राकृतात आहे. एक व्यवहार, परक्यांशी संवाद साधण्यासाठी वापरली जायची तेव्हा ती रोखठोकच असायची. दुसरी आपल्या लोकात प्रेमाने संवाद साधाण्यासाठी त्यामुळे ती मृदू, कमी त्रास देणारी इ... अशीच असणार. प्राकृत भाषेबद्दल वाक्पतिराजाने काय म्हटले आहे ते बघुया –
णमवत्थ-दंसणं संनिवेस-सिसिराओ बंध-रिद्धैओ ।
अविरलमिणमो आभुवन-बंध्मिह णवर पययम्मी ॥
सयलाओ इमं वाया विसन्ती एत्तो य णेन्ति वायाओ ।
एन्ति समुद्दंचिय णेन्ति सायराओच्चिय जलाइं ॥
हरिस विसेसो वियसवओ य मऊलावओ य अच्छीण ।
इह बहि-हुजो अन्तो-मुहो य हिययस्स विप्फुरई॥
“अभिनव आशय, समृद्ध रचना आणि मृदु शब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत सर्व भाषेत श्रेष्ठ आहे. जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरालाच जाऊन मिळते त्या प्रमाणे सर्व भाषा प्राकृतातूनच निर्माण झाल्या आहेत व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतातून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो, आनंदाने नेत्र विकसित होतात (विस्फारले जातात) व तृप्तीने मुकुलित ही होतात (मिटतात).”
या गाथा सम्राट हाल याच्या राज्याच्या अनेक विभागातून आल्या असल्यामुळे यात त्या राज्यांच्या विवीध भागातील लोकजीवनाचे प्रतिबंब पडते. त्या भागात कसली झाडे आहेत, कुठल्या नद्या आहेत, घरे कशी आहेत, कुठले पर्वत आहेत, तेथे रहाणार्या जनतेची वस्त्रे, तेथे मिळणारी विविध प्रकारची मद्ये, त्याचा परिणाम, एवढेच काय काही कॉकटेल्सचीही माहिती मिळते. त्यातील जी माहिती संकलीत करण्यात यश मिळाले आहे त्याबद्दल आपण वाचणार आहोतच..या गाथा हालाने संकलित केल्या इ.स. २१ ते ४५ साली. म्हणजे जवळ जवळ दोन हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात सामान्य जनतेचे आयुष्य कसे होते, कपडे कसे होते, त्यांची करमणूकीची साधने कुठली होती, त्या काळी कुठले पक्षी प्राणी होते अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. एखाद्या राज्यातील सगळ्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याची ही युक्ती हालाने वापरली त्यामुळे आपल्याला त्या काळात वावरता येते...............
गाथेची सुरवात शंकराला नमन करून केली आहे..
पसुवईणो रोसारूणपडिमासंकन्तगोरिमुहन्दम ।
गहिअग्धापङ्ग्कअं विअ संझासलिलंजलिं णमह ॥
मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पशूपतीने ओंजळीत पाणी घेतले आहे. आकाशातील तांबड्या रंगाच्या उधळणीमुळे त्याच्या हातातील हे पाणी लाल दिसत आहे अशा पशूपतीला नमन असो.
देवाला नमन करून झाल्यावर लगेचच दुसर्या गाथेमधे ज्या भाषेत या गाथा तयार झाल्या आहेत त्या प्राकृत भाषेचे उपकार स्मरून तिची थोरवी गायली आहे. सामान्य माणसांनी या गाथा रचल्या आहेत याचे अजून एक उदाहरण. खेडेगावातील सामान्य माणूस सभ्यतेचे अवडंबर न माजवता स्वत:च्या गोष्टींची थोरवी सांगताना दुसर्याचा कमीपणा दाखविल्याशिवाय रहात नाही. तसेच येथेही दिसून येते –
अमिअं पाउअकव्वं पढिउं सोउं अजे ण आणन्ति।
कामस्य तत्त्तन्तिं कुणन्ति ते कहॅंण लज्जन्ति ?॥
अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा त्याचे श्रवण करणे ज्यांना माहीत नाही
ते कामशास्त्रातील तत्वांची मात्र जोरजोरात चर्चा करत असतात. असे करताना
त्यांना लाज कशी वाटत नाही ? थोडक्यात काव्यशास्त्राचा आनंद घेण्यासाठी
प्राकृत साहित्याचा उपभोग घ्यायचा सोडून हे पंडीत कामशास्त्राकडे वळतात
याची त्यांना लाज का वाटत नाही ? (हे कामशास्त्रांवरचे ग्रंथ रचणार्यांना
उद्देशून असावे) कामक्रिडे इतकाच आनंद प्राकृत साहित्य देते हे यांना ठावूक
नाही का ?
त्या काळी म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी समाजाचे सामाजिक नियम शृंगार व नितीमत्तेच्या बाबतीत बरेच सैल असावेत. आपल्याला याची उदाहरणे बर्याच नंतरच्या काळातील देवळातील कामशिल्पे देतातच. याही गाथेत त्या सैल असलेल्या बंधनांचे प्रतिबिंब आपल्याला पडलेले दिसेल. उदाहरणार्थ स्त्रियांनी पुरषांची त्याच्या बायकोवरून केलेली चेष्टा इ.इ. किंवा विवाहीत स्त्रीने लग्नानंतर आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवणे...मैत्री ठेवणे या सगळ्या गोष्टींना मर्यादेपर्यंत मान्यता होती असे दिसते. (१९६९ साली मी इगतपूरी ते जून्नर असा दहा दिवसाचा एक ट्रेक केला होता, त्या वेळी एका आदिवासी पाड्यात आमचा मुक्काम पडला होता. सकाळी पाणवठ्यावर आम्हीही पाणी भरायला गेलो असताना तेथे एका नवीन लग्न झालेल्या मुलाची तेथील मूलींनी जी चेष्टा मस्करी चालवली होती ती अश्लिल तर होतीच पण मला जाणवले की ते सगळे त्याचा मोकळेपणाने आनंद घेत होते. ) मद्यपान तर सर्वचजण करत असत. स्त्रियांना गोड मद्य आवडत असे तर पुरषांना कडक.. अशा अनेक गोष्टींवर या सामान्य जनतेने लिहिलेल्या गाथा प्रकाश टाकतात. आता आपण गाथेतून काय माहीती मिळते ते बघू... जेथे अत्यंत चांगल्या गाथा किंवा मजेदार गाथांचा उल्लेख असेल त्या गाथाही अर्थासहित येथे द्यायचा प्रयत्न करेन.
या प्रकारच्या गाथा जेव्हा नंतरच्या काळात टिकाकारांच्या हातात पडल्या तेव्हा हालाच्या या कल्पनेची टिंगल टवाळी झाली. काही ज्ञानी मंडळी या गाथांना अश्लील, साहित्यिक दर्जा नसलेली कलाकृती मानायला लागली. अर्थात ते तसे नाही हे आपल्या पूढे वाचल्यावर लक्षात येईलच..............
श्री. जोगळेकरांनी त्यांच्या पुस्तकात सर्व गाथांचा अभ्यास करून प्रत्येक गाथेमधील वेगवेगळ्या गोष्टींच्या उल्लेखांचे वर्गीकरण करून त्यावेळच्या परिस्थिवर प्रकाश टाकून एक अवाढव्य काम केले आहे असेच म्हणावे लागेल. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात ते काही खोटे नाही. “गाथांनी मला झपाटून टाकले. गाथेशिवाय त्या काळात माझ्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नसे ना मला तहान भूकेची जाणीव होत होती”...खरेच त्यांनी असे काम केले म्हणून आपल्याला हा खजिना मोकळा झाला नाहीतर त्या गाथांवर काळाची धूळ जमा झाली असती व वर्तमान काळात आपल्या सारख्यांना ती झटकणे अशक्य झाले असते.
त्या काळात कुठल्या नद्या होत्या किंवा वहात होत्या ते अगोदर बघूया.
नद्या या कुठल्याही संस्कृतीच्या जीवनदायी असतात त्यामुळे त्यांचा उल्लेख
महत्वाचा ठरतो.
गिरिनदी : या नदीचा उल्लेख गिरिणई म्हणून आला आहे.
गोदावरी या नदीचा उल्लेख गोआअरी, गोदा, गोला, गोलाई इत्यादी नावाने झालेला
दिसतो. सातवाहनांना या नदीचे महत्व वाटत होते यात काही आश्चर्य नाही कारण
त्यांची राजधानीच या नदीच्या किनारी वसलेली होती. या नदीकिनारी नाशीकच्या
डोंगराळ भागात सिंहाची वस्ती आहे असेही उल्लेख सापडतात. तापी व नर्मदा
नदीचाही उल्लेख काही गाथांमधे सापडतो. एका गाथेमधे मुरला नावाच्या नदीचा
उल्लेख सापडतो पण ती कुठे होती याचा पत्ता लागत नाही. यमुनेचाही ओझरता
उल्लेख सापडतो.
नदी म्हटली की नदी किनार्यावर फिरायला जाणारे प्रियकर प्रेयसी आपल्याला
बर्याच कथा कादंबर्यात आढळतात. येथेही ते दोघे गोदावरी काठी फिरायला गेले
आहेत व तेथे जे झाले त्याचा त्यांना कधीही विसर पडणार नाही...काय झाले
असावे बरे....
गोलाविसमोआरच्छलेण अप्पा उरम्मि से मुक्को ।
अणुअम्पाणिद्दोसं तेण वि सा आढमुवऊढा ॥
गोदावरीचे पात्र ओलांडताना बिचारीची त्रेधातिरपीट उडाली. उतारावर घसरताना सावरण्याच्या निमित्ताने तिने त्याच्या छातीवर भार टाकला. तिची ती त्रेधातिरपीट उडालेली बघून केवळ अनुकंपेने त्याने तिला हात दिला पण पुढे नाईलाजाने त्याने तिला तेथेच अलिंगन दिले. पण तो खरोखरच निर्दोष आहे.
गाथासप्तशतीमधे नद्यांप्रमाणे पर्वतांचेही उल्लेख सापडतात त्यात मंदर पर्वत (ज्याच्यावर कुबेराचे घर आहे), मलय पर्वत म्हणजे सह्याद्रीचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग, विंध्य पर्वताचा उल्लेख तर अनेक गाथांमधे आला आहे. एखाद्या पर्वताचा उल्लेख बघू. खालील गाथेत विंध्य पर्वताचा उल्लेख सापडतो-
सव्वत्थ दिसामुहपसॉरिएहिं अण्णोण्ण्कडअलग्गेहिं ।
छल्लिं व्व मुअइ विञ्झो मेहेहिं विसंघ्हडन्तेहिं ॥
या गाथेत पावसाळ्याअगोदर जे घनदाट ढग आकाशात गर्दी करतात त्याला या कवीने विंध्य पर्वताच्या वल्कलांची उपमा दिली आहे. नाणे घाटात पावसाळ्याच्या अगोदर दोन तीन दिवस जर तुम्ही बसलात तर खालून वर येणारे ढग त्या काळ्या कातळावर आपटून त्याचे तुकडे होताना आपल्याला दिसतील तसेच विंध्य पर्वतावर व एकामेकांवर आपटून त्या काळ्या मेघाचे तुकडे होत आहेत जणू विंध्य पर्वताने आपली वल्कले सोडून ठेवली आहेत. ( आणि तो नवीन वल्कले परिधान करायची तयारी करत आहे, नवीन हिरवळ, पालवी इत्यादी.....)
गाथासप्तशतीमधे वृक्षांचा उल्लेख बर्याच गाथेत आहे ते नैसर्गिकच म्हटले
पाहिजे कारण तेथे रहाणार्या गिरिजनांनीही या उपक्रमला काव्ये पाठविली
असणारच. अशोक, आंबा, एरंड, कदम्ब, कमळ, करंज, कवठ, काश (गवताचा एक प्रकार),
कुटज, कुंद, कुरबक, कुसुम्ब, केतकी, कोसम्ब, खाजरी, गुंज, चंदन, जांभूळ,
ताल-ताड, देवदार हा वृक्ष हिमालयात आढळतो. याचा उल्लेख बहुतेक सांकेतीक
असावा. याशिवाय मोगरा, कडूनिंब,पळस, पाटल (हा आता आढळत नाही.) फलिणी, बकूळ,
बेल, बोर, मधूक म्हणजे मोह, मरवा, मालती, वड, विषकंदली, वेळू म्हणजे
बांबू, शिरीष, शेफालिका, हरिद्रा, हलाहल-म्हणजे विषारी वृक्ष अशा वृक्षांचा
गाथासप्तशतीमधे उल्लेख सापडतात. याचा अर्थ दोन हजार वर्षापूर्वी ही झाडे
येथे अस्तित्वात होती आणि ती अस्सल भारतीय म्हणून त्याला मान्यता द्यायला
तज्ञांची हरकत नसावी. सध्याच्या मोनोकल्चरच्या जमान्यात खरे म्हणजे एखादे
जंगल तयार करायचे असल्यास कोणती झाडे लावावीत याची ही यादीच हालाने
आपल्याला दिली आहे. त्याचा उपयोग करणे आपल्या हातात आहे.
कदम्ब वृक्षाचा उल्लेख एका गाथेत कसा आला आहे ते बघुया –
तालूरममाउल्खुडिअकेसरो गिरिणईए पूरेण ।
दरबड्डउबुड्डणिबुड्डमहुअरो हीरइ कलम्बो ॥
याचा गर्भितार्थ श्री जोगळेकरांनी ओढून ताणून एका प्रेयसीने प्रियकराला भेटायच्या स्थळाबद्दल संकेत दिला आहे असा लावला आहे. पण मला तर याच्यात एका खेडेगावातील माणसाला नदीत कदम्बाची फांदी वाहताना दिसल्यावर सुचलेले एक भन्नाट काव्य दिसते. याचा अर्थ असा आहे – डोंगरातून वाहत आलेल्या नदीला पूर आला आहे. त्या पूरात अनेक फांद्या, झाडे वाहत आहेत पण एक फांदी कदम्बाची आहे ती लक्षात येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावरील फुलांचे पराग तुटून गेले आहेत. त्या फुलांवर बसलेला भूंगा त्या फांदीबरोबर पाण्यात थोडा बुडतो व परत वरती येतो. (गटांगळ्या खातोय). याच्यातून इतर काय माहिती काढता येते ते बघूया – एक म्हणजे या प्रदेशातील नद्या डोंगरात वाहतात. त्यांना ज्या काळात कदम्बाच्या फुलांना पराग येतात त्या काळात पूर येतो. म्हणजे त्याच्या अगोदर काही दिवस पावसाळा चालू होतो. अजून एका वृक्षाचा, आंब्याचा उल्लेख बघू –
दिट्ठा चुआ, अग्घाइआ सुरा, दक्खिणाणिलो सहिओ ।
कज्जाइं व्विअ गरूआई मामि ! को वल्लहो कस्स ? ॥
घरातील जेष्ठ स्त्रीला एक गृहस्वामीनी म्हणते “ मामी ! ते लवकर परत यावेत म्हणून मी आम्रांकूराचे दर्शनही घेतले (पूजा असणार) व थोडेसे मद्यही घेतले. दक्षिणेकडून येणार्या वार्याची झुळूक अंगावर घेत मी येथे उभी आहे (दरवाज्यात वाट बघत) माझ्यापेक्षा त्यांना कामाचे महत्व जास्त वाटते.....कोण कोणाचा नाही....प्रियकर तर नाहीच नाही.....
गाथासप्तशतीतील पशूंपक्षांचा उल्लेखही या पशूंचा महाराष्ट्रातील वावर
सिद्ध करतो. काही तज्ञांचे म्हणणे असे आहे की गाथासप्तशती ही उत्तरेकडे
रचण्यात आली पण त्याकडे विशेष गांभिर्याने लक्ष द्यायची गरज नाही कारण एकतर
ही हालाने संपादित केली व यातील नव्वद उल्लेख टक्के महाराष्ट्रातील आहेत.
जे काही उल्लेख उत्तरेकडचे आहेत ते सांकेतीक आहेत म्हणजे उदाहरणार्थ
“हिमालयाएवढा उंच”.
अच्छभल्लाची म्हणजे अस्वलाची त्याकाळात त्याच्या चरबीसाठी शिकार करत असावेत
अशा प्रकारचा एक उल्लेख सापडतो. कमठ म्हणजे कासव, कण्हसार म्हणजे काळवीट,
गवा, गाढव, गाय, बैल, चितळ, चित्ता, पाठीण नावाचा मोठा तळ्यातील मासा,
माकड, मांजर, मुंगूस, हरिण, मेस-मेंढा (मेष), रण्णुंदर म्हणजे घूस,
रानडुक्कर, रेडा, म्हैस, वाघ, शरभ या काल्पनिक प्राण्याचाही गाथेमधे उल्लेख
आहे. याचे शरिर सिंहाचे तर तोंड हत्तीसारखे असते. याच्या प्रतिमा आपल्याला
अनेक मंदिरावर सापडतील. या प्राण्यांबरोबर सिंह, हत्ती ( हे अर्थात
कर्नाटक भागात असावेत). गायीच्या उल्लेखाचे एक उदाहरण घेऊ-
कहॅं सा णिव्वण्णिज्जइ जीअ जहा लोइअम्मि अंङ्गम्मि ।
दिट्ठी दुव्वलगाई व्व पङ्कपडिआ ण उत्तरइ ? ॥
अर्थ : चिखलात रुतलेल्या दुर्बल गाईला ज्या प्रमाणे चिखलात रुतलेल्या गाईला
आपला पाय काढता येत नाही त्या प्रमाणे माझी अवस्था झाली आहे. तुझ्या एकेक
अवयवांकडे माझी दृष्टी तेथेच अडकून पडते. मी त्यातच घायाळ होतो. मी तुझ्या
संपूर्ण सौंदर्याचा आनंद कसा घेणार या काळजीने मला ग्रासले आहे.
या अर्थातून काय अनुमान काढता येते ते बघा – तेथे गावात गाई फसण्याएवढा
चिखल होता. जनावरे सहसा चिखलात फसत नाहीत मग गाय फसली याचा अर्थ तिच्या
मळलेल्या वाटेवर हा चिखल नव्याने आलेला दिसतोय. म्हणजेच त्या काळात तेथे
रस्त्यांची बोंब दिसते. पण इतर गाथेत शहरातील रस्ते चांगले आहेत असा उल्लेख
आढळतो याचा अर्थ हे खेडेगाव असावे. स्त्रिच्या सौंदर्याबद्दल काय अनुमान
काढावे मला वाटते हे सांगायची आवश्यकता नाही.
आता त्या काळात कुठकुठले पक्षी होते ते बघूया. बरेचसे आत्ताही आहेतच. कावळ्याला बिचार्याला त्याही काळात आजच्यासारखाच माणसांचा दुस्वास सहन करावा लागत होता. एका गाथेत बाहेर अंगणात ठेवलेल्या अन्नावर झडप घालताना शेजारीच पडलेली फुटकी बांगडी बघून कावळा दचकतो असा उल्लेख आहे. तर ही खालची गाथा बघा -
परिहूएण बि दिअहं घरघरभमिरेण अण्णकज्जम्मि ।
चिरजीविएण इमिणा खविअह्मो दङ्ढकाएण ॥
याच्यावरून संस्कृत ओळी कशा तयार करता येतात त्यासाठी हे संस्कृतमधेही खाली देत आहे -
परिभूतनापि दिवसं गृहगृहभ्रमणशीलेनान्यकार्ये ।
चिरजीवितेनानेन क्षपिता: स्मो दग्धकायेन ॥
अर्थ: लोकांनी तिरस्कार केला व पुन्हां: पुन्हां: हाकलून लावले तरीही कावळा अन्नासाठी लोंचटासारखा पुन्हां: पुन्हां: घरोघर जातो व जळके जीवन चिरकाल जगतो. याच प्रमाणे (म्हातारी झालेली वेश्या म्हणते) वारंवार अपमान झाला तरी तो सोसून मला पोटासाठी दारोदार फिरावे लागते
पोपटाच्या रंगामुळे त्यांना पाचुची उपमा देताना हा अजून एक ग्रामकवी म्हणतो -
उअ पोम्मराअम्रगअसंवलिआ णहअलाओ ओअरइ ।
णहसिरिकण्ठब्भट्ठ व्व कण्ठिआ कीररिञ्छोली ॥
पहा पोपटांचा थवा आकाशातून झाडावर उतरत आहे. जणू आकाशाचा कंठा तुटून त्यातील पाचू व माणके ओघळत आहेत.... सुंदर...
इतर पक्षात पारवा, कोंबडा, जलरड्कुण-पाणकोंबडी, बलाआ म्हणजे बगळा, भ्रमराचा उल्लेख असलेली गाथाही अशीच श्रुंगारिक आहे -
भरिमो से गहिआहरधुअसीसपहोलिरालआउलिअम ।
वअणं परिमलतरलिअभमरालिपइण्णकमलं व।
अर्थ: मी तिचा ओठ माझ्या दातात धरल्यावर तो सोडविण्याच्या धडपडीत तिचे केस
सैल झाले व ते तिच्या मुखावर ओघळले/पसरले. ते केस बघून वासाने धुंद झालेले
भुंगे कमळाभोवती जमतात त्या दृष्याची मला आठवण आली. अजून मोर, सारिका-मैना
यांचेही उल्लेख सापडतात.
पक्षांबरोबर किडे, व सरपटणारे प्राण्यांबद्दलही उल्लेख सापडतात. कोळी, झिल्ली म्हणजे रातकिडा, णिम्बईड म्हणजे कडू लिंबावरचा एक किडा, विच्छुअ, साप, सालूरी –बेडूक व हरिआल म्हनजे आत्ता दिसतो पक्षी नसून एक मुंग्या खाणारा छोटा प्राणी आहे. आपण झिल्लीच्या उल्लेखाची एक गाथा बघूया. त्या अगोदर माझा एक अनुभव सांगतो. एकदा दांडेलीहून कारवारला जात असताना मे मधे (मुलांना सुटी असल्यामुळे) दूपारी दोन वाजता त्या आरण्यात उंचच उंच सरळसोट झाडांमधे अत्यंत कर्कश्य असा रातकिड्यासारखा आवाज येत होता. एखादा क्षण मधेच थांबायचा व परत चालू व्हायचा. कर्कर्श म्हणजे अती कर्कर्श. आम्ही चहा प्यायला एका टपरीवर थांबलो तेव्हा तेथे बसलेल्या अदिवासी म्हातार्याला, “हा कुठल्या किड्यांचा आवाज आहे असे विचारल्यावर त्याने उत्तर दिलेले माझ्या अजून लक्षात आहे “झिली”. (त्याने हेही सांगितले की हे किडे पहिला पाऊस झाला कि मरून खाली पडतात). दोन हजार वर्षात या नावातील फक्त एक “ल” कमी झाला..कमाल आहे. या गाथेत उल्लेख झालेला आवाज असल्याच किड्यांचा असणार याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही...यात म्हटल्याप्रमाणे मोसमही तोच होता.
रोवन्ति व्व अरण्णे दूसहरइकिरणफंससंतत्ता ।
अइतारझिल्लिविरूएहिं पाअवा गिम्हमज्झन्हे ॥
अर्थ: उन्हाळा आहे. उन मी म्हणते आहे. त्या उन्हात तापलेले वृक्ष
त्यांच्या वरील किटकांच्या कर्कश्य आवाजाच्या रुपाने जणू आक्रोश करत आहेत.
माझ्या अनुभवाने सांगतो मला त्या दुपारी शपथ असेच वाटले होते. मलाच काय
कोणलाही असेच वाटेल असा तो आवाज आहे. रातकिड्यांच्या आवाजाला एक प्रकारचा
ताल व किणकीण असते. हा आवाज म्हणजे नुसता कोरडा आक्रोश बस्स ! हाच शब्द
त्याला योग्य आहे.
गाथासप्तशतीतील लोकजीवन आजच्या मावळातील कुठल्याही खेड्यातील लोकजीवनाप्रमाणे होते. सिप्पर म्हणजे छप्पर ही त्या काळी गवताने शाकारलेली असत. बांबूची बेटे विपूल होती. छोटी गावे होती तशी शहरेही होती असा उल्लेख आहे. कदम्बाची झाडे फुललेली असून ती विपूल आहेत. गावातून ओढे वाहत आहेत व देवळांचा सुकाळ आहे. घराची बांधणी आपण आत्ता बघतो तशीच आहे. खोल्या आहेत व त्याच्या भिंती कुडाच्या आहेत. घराच्या भिंती चित्रांनी सजवलेल्या आहेत. एका गाथेत तर गृहस्वामिनीने पति गावाला गेल्यावर दिवस मोजण्यासाठी खूणा केलेल्या आहेत.
ओहिदिअहागमासंकिरिहिं सहिआहि कुडुलिहिआओ ।
दोतिण्णि तहिं विअ चोरिआए रेहा पुसिज्जन्ति ॥
पतिने किती दिवसाने परत येणार याचे वचन दिलेले आहे. त्या वचनाप्रमाणे तेवढ्या रेघा भिंतीवर मारलेल्या आहेत. तेवढे दिवस उलटून जाणार हे लक्षात येताच तिच्या मैत्रिणींनी त्या रेषा तिच्या नकळत वाढविल्या. पण इकडे रेषा कमी केल्यामुळे आपला पति लवकर परत येईल या आशेने तिनेही त्यातील काही पुसून टाकल्या.
घरांना उंबरे आहेत. बर्याच घरांना ओसरी आहे ज्याला त्यावेळी अलिन्दक म्हणत. गोठ्याचे अनेक उल्लेख गाथामधे आलेले आहेत त्यावरून गोधनाचे महत्व लक्षात यावे. शेतातील घराला ओवालअ म्हणत. शयनगृह जे आतील भागात असे, त्याला अन्तेउर असे संबोधले आहे. पावसाळ्यात घरे गळत होती व ती दुरूस्त करायची कामे पुरुष करायचे. त्या काळी सामान साठवायचा लोभ नसावा कारण घरातील वस्तूंचा फारसा उल्लेख कुठल्याही कविंनी केलेला नाही. बसण्यासाठी गवतावर हरणाचे किंवा वाघाचे कातडे वापरत. शहरात मात्र पल्लंक (पलंग) वापरत. एका गाथेत पलंगाभोवती डासापासून संरक्षणासाठी गब्भहरण लावलेली आहे. मुसळे व सुपे प्रत्येक घरात आहेतच. पाणी साठविण्यासाठी मातीचे कुंभ वापरत असावेत तर शकूनासाठी धातूचे मंगलकलश अस्तित्वात होते. सिंदूर भरायची व कुंकू लावायची रीत त्याही काळी होती असे दिसते कारण हे ठेवण्याच्या डब्यांची वर्णने गाथेत आली आहेत. मद्य ठेवण्यासाठी स्फटिकपात्र व पिण्यासाठी चषक वापरत. घरात पुरूष स्त्रियांना मद्याचा आग्रह करत व चटूक नावाच्या लाकडी भांड्याचाही उल्लेख आहे. ते भिक्षा देण्यासाठी वापरत. रात्री प्रकाशासाठी तेलांच्या दिव्याचा वापर होई. यांना काचा नसत असे म्हणायचे कारण म्हणजे एका गाथेत दिव्याची ज्योत विरहिणीच्या अश्रूंनी विझते असा उल्लेख आहे. दिव्याची ज्योत हाताने विझवायची प्रथा होती क्वचितच फुंकरेने ती विझवत असत. काही काही दिवे तर तेल संपले तरीही पेटते रहात उदा...
द्ठ्ठूण तरूणसुरअं विविहविलासेहि करणसोहिल्लम ।
दीओ वि तग्गामणो गअं पि तेल्लं ण लक्खेइ ॥
तरूण युगुलांच्या विलासी रतिक्रिडा बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही.
गाथासप्तशतीतील नातीगोती काय होती त्यावर एक नजर टाकूयात कारण
माणसांमधील नाती ही बर्याच वेळा माणसांपेक्षाही महत्वाची होतात.... घराचा
कुटुंब प्रमूख गृहपती... गाथांमधे गृहपती शक्यतो बावळट दिसतो म्हणजे त्याची
गृहस्वामिनीतरी त्याला बावळट समजते असे दिसते पण तो घरादाराचे संरक्षणाचे
काम चोख बजावताना दिसतो. शेतीवाडीची कामेही मोठ्या तडफेने करतो पण बहुदा
आजच्याप्रमाणे त्याचेही आपल्या बायकोपुढे काही चालत नाही असे दिसते.
त्याच्याकडे तलवार असते व तो त्याचा वापर करायला मागेपुढे पहात नाही. एका
गाथेत अशाच एका श्रीमंत गृहपतीच्या उनाड मुलाच्या वागणूकीबद्दल लिहिले
आहे...हेही आजच्या सारखेच. ससूर-सासरा, देवर-दीर, सासू यांचा उल्लेख बरेच
आहेत. गाथांमधील सासू प्रेमळ आहे. सुनेच्या दु:खाने ती अश्रू ढाळताना
दिसते. सुनेच्या छळाचा कुठेही उल्लेख नाही. अत्ता-आत्या, पिउच्छा, माऊच्छा व
मामि ही नाती म्हणजे घरातील जेष्ठ स्त्रिया असाव्यात. माआ, माइआ, माउआ
म्हणजे आई. गाथांमधे सवतींचा उल्लेख अनेक वेळा आढळतो. दोन तीन लग्ने करायची
पद्धत सर्रास असावी असे वाटते. सधन घरात तर होतीच होती.
सवतीमत्सराच्या हकीकती गाथांमधे आहेत. उदा. –
जो तीए अहरराओ रत्तिं उव्वासिओ पिअअमेण ।
सो व्विअ दीसइ गोसे सवत्तिणाणेसु संकन्तो ॥
तिच्या ओठांचा लाल रंग तिच्या पतिने रात्री स्वत:च्या ओठांनी पुसून घेतला. पण सकाळ झाल्यावर तिच्या सवतीच्या नजरेस हे पडल्यावर तो रंग तिच्या डोळ्यात प्रकट झाला. (तिचे डोळे रागाने आरक्त झाले.)
गाथासप्तशतीतील स्त्री कशी आहे तिची दिनचर्या कशी होती याबद्दल श्री
जोगळेकरांनी गाथा धुंडाळून संशोधन केले आहे ते तसेच्या तसे येथे देण्याचा
मोह मला आवरत नाही. गाथा वाचून त्यातून काय काय माहिती काढता येते त्याचा
हा उत्तम नमुनाच आहे. –
“लग्नाच्यावेळी तिचे वय जाणते असे. तो काळ उलटल्यावर त्या विवाहासाठी अतूर
होत. त्या सुशिक्षित आहेत व पतीला पत्रही लिहितात व त्याची वाचतात.
लग्नानंतर तिच्या वागणूकीत गांभीर्य येते. रात्री जागरण झालेले असले तरीही
कुलवधू पहाटे उठून कामाला लागते. उजाडण्यापूर्वी न उठणारी स्त्री नवर्याची
पट्टराणी असली तरी सगळ्यांच्या निंदेस पात्र ठरते. झाडलोट झाल्यावर ती
स्नान करते व स्वयंपाकाला लागते. पण माहेरी गेल्यावर मात्र ती उशीरा आंघोळ
करते. ती स्वयंपाककलेत निपूण आहे व आल्यागेल्याला भिक्षा वाढते. स्वयंपाक
झाल्यावर काकबली देते. शेतावर घरधन्याला व त्याच्या कामगारांना न्याहारी
घेऊन जाते. ती सणाला नांगराची पूजा करते व जरूरी पडल्यास शेतात कामेही
करते. दळण, कांडणही तिलाच बघावे लागते. दिवसभर कामे करून दुपारी जरा आडवे
झाले की तिला टिकेला सामोरे जावे लागतेच. पति गावाला गेला असला की ती वेळ
मिळाला की पतीची वाट बघत दारात उभी रहाते व तो आल्यावर त्याचे स्वागत करते.
ती पतीच्या यशाने आनंदीत होते व त्याचा संसार आनंदाने करते. पतीचे चित्त
बाहेर कुठे गुंतले असले तरीही ती क्रोध मनात ठेवताना दिसते. स्वत:च्या
शिलाचे संरक्षण करण्यासाठी ती काहीही करू शकते. ती शेजारणीलाही सर्व
प्रकारची मदत करताना दिसते. आपल्या कुटूंबाची विपन्नावस्था ती प्रकट होऊ
देत नाही. गरीबीत आपले डोहाळेही मनातल्या मनात पूरवते. कुटुंबापुढे आपल्या
सर्व हौसांवर ती पाणी सोडते. कुटूंब एकत्र ठेवण्यात तिचा मोठा सहभाग असतो.
माहेरची ओढ असली तरी ती सासरचा अभिमान धरते. पती गावाला गेला असेल तर ती
वेणी फेणी करत नाही, डोळ्यात काजळ घालत नाही किंवा तिला ते सुचत नाही.
स्त्रियांना पुरेसे स्वातंत्र्य असे. एका गाथेत असे म्हटले आहे की ज्या
घरात स्त्रिया मोकळ्या मनाने बोलतात, अकृत्रिमपणे वागतात, मोकळेपणाने हसू
शकतात, निष्पापपणे वावरतात ती कुटुंबे धन्य होत !”
ही आहे दोन हजार वर्षापूर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्त्री. तिच्याकडून केल्या जाणार्या व आत्ताच्या स्त्रिकडून केल्या जाणार्या अपेक्षांमधे फारसा फरक दिसत नाही. फक्त एकच फरक दुर्दैवाने पडलेला दिसतो तो म्हणजे त्या काळात बायकोला दारू पिऊन मारहाण केल्याचा उल्लेख सापडत नाही आणि सध्या ते आपल्याला सर्रास दिसते.
त्या काळात देवळांना अज्जाघर म्हणत व अज्जघराचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. ही देवळे छोटी असून त्याची पटांगणे मात्र मोठी असत. उतारूंची रहायची सोय या देवळात हमखास असे. आजही आपण ट्रेकला गेलो की हमखास देवळात झोपतो... मूर्ती गणपातीच्या, अज्जाच्या आहेत. काही गाथांमधे सतीच्या प्रथेचे उल्लेख आहेत. सती जाणे ही फार चांगली प्रथा आहे असे मानले जात नसावे. कारण चिता विझावी अशी इच्छा मनात धरणारी एक गाथा आहे –
विज्जाविज्जइ जलणो गहवइधूआइ वित्थअसिहो वि ।
अणुमरणघणालिङ्गणपिअअमसुहसिइज्जिरङ्गीए ॥
घरधन्याची मुलगी सती जाण्यासाठी चितेवर चढली. मरायच्या अगोदर तिने पतीच्या प्रेताला अलिंगन दिले. त्यातही झालेल्या सुखाने तिला घाम आला व ती चिता त्यात विझून गेली..... आता काय म्हणावे या गाथेला ? कोणी लिहिली असावी ही गाथा ?
गाथेतून त्याकाळी काय काय समजूती होत्या तेही कळून येते. बर्यारचशा समजूती आजही तशाच आहेत. शकून अपशकूनावर गाढ विश्वास आहे, देवाची प्रार्थना काहीतरी मिळविण्यासाठी केली जाते. स्वर्ग व नरक या कल्पना अस्तित्वात होत्या. चांगले वाईट व धर्म याबद्दलही काही गाथात लिहिलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दैव या कल्पनेवर (?) एका गाथेत दैवावर थोडाफार पण सुंदर प्रकाश टाकलेला दिसतो -
ज जं आलिहइ मणो आसावट्टीहि हिआफलअम्मि ।
तं तं बालो व्व विही णिहुअं हसिऊण पम्हुसइ ॥
अर्थ : माझ्या ह्र्दयाच्या पाटीवर मी आशेच्या कुंचल्यांनी मी स्वप्ने विविध
रंगांनी रंगवली पण हाय ! दैवाने एका खट्याळ मुलाप्रमाणे खदाखदा हसत ती
चित्रे निष्ठूरपणे एका क्षणात पुसून टाकली.
काय सुंदर कल्पना आहे बघा !
घरातील कोणी प्रवासाला निघाल्यास दरवाजात प्रस्थानकलश ठेवण्यात येई. त्यात पाणी, आंब्याची पाने व कमळ खोचण्यात येई. मोरांच्या पिसांनी एखद्याला संमोहित करता येते अशी श्रद्धा होती. नागाच्या फण्यावर रत्न असते अशी आज असणारी समजूत त्याही काळी होतीच... भूत संमंधावर व पूनर्जन्मावर विश्वास ठेवला जाई.
सातवाहनांच्या काळात किंवा गाथासप्तशतीच्या काळात वैदिक धर्माचे आचरण होत असे. नाणे घाटात असलेल्या शिलालेखात अनेक यज्ञांचा उल्लेख दिसतो तो त्यामुळेच. सातवाहन वैदिक धर्म पाळत पण ते भागवत धर्माचे अनुयायी होते. त्या काळात अग्नि, इंद्र, प्रजापति, रुद्र, वामन सूर्य व कृष्ण या देवांची पूजा होत असे. हे सर्व वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले आहेत.
गाथासप्तशतीच्या काळात लोक काय खात असावेत ? ते त्यावेळी त्याबाबत आलेल्या उल्लेखावरून उमगते. ही यादी बघा-
अण्ण-अन्न, इच्छू-उंस, कञ्जी-कांजि, कलम-साळी, गुड-गुळ, घिअ-तूप, चणस
म्हणजे चणे, जव-जवस, तण्डूल-तांदूळ, तिल-तीळ, तुवरी-तूर, दुद्ध-दूध, पाऊ
म्हणजे न्याहारी, पिट्ठ-पीठ, मिट्ठ म्हणजे मिष्टान्न, राइआ-मोहरी, लड्डूअ,
लोण म्हणजे लवण, सिन्धव म्हणजे सैन्धव या एवढ्या खाद्यपदार्थांचा उल्लेख
गाथामधे आला आहे.
गाथेमधे मद्याचाही उल्लेख अकरा गाथांमधे आलेला आहे. त्यात मदिरा, मधुरस,
सरक, सुरा व सीधू या प्रकारच्या मद्यांचा उल्लेख आला आहे. या काळात
महाराष्ट्रात चौल बंदरातून ग्रीक व्यापारी द्राक्षाची मद्ये व अरब व्यापारी
खजुराची मद्ये आणत. या मद्यांचे कुंभ बर्याच ठिकाणी सापडले आहेत. मधुरस
ही मोहाच्या फुलांची दारू तर याच्याही अगोदरपासून प्रचिलीत होतीच.
कदम्बाच्या फुलापासूनही मद्य तयार होत असे. तांदूळ व उसाच्या रसा पासूनही
मद्य तयार होत असे.
एका गाथेत तर सुरा जूनी झाली की त्याची प्रत वाढते असा उल्लेख आहे -
पउरजुवाणो गामो महुमासो जोअणं पई ठेरो ।
जुण्णसुरा साहीणा असई मा होउ, किं मरउ ?
ती तरूण आहे, स्वतंत्र आहे. तिचा पती वृद्ध आहे. गावात बरेच तरूण आहेत. या वसंत ऋतूत तिच्याकडे बरेच जूने मद्य शिल्लक आहे...तर तिने तरी काय करावे ? (का मरावे?)
मद्य मिळण्याच्या ठिकाणाला पानकुटी म्हणत.
त्या काळात सामान्य ग्रामजन वेळ कसा घालवित असतील हा प्रश्न बर्याच
जणांना पडला असेल किंवा पडेल. त्या काळात करमणूकीची साधने अत्यंत कमी
असल्यामुळे आपल्या कुटुंबियांशी गप्पा मारत वेळ व्यतीत करणे हे एक महत्वाचे
साधन होते. पती पत्नी अर्थातच कामक्रिडेमधे चांगला वेळ घालवत. एका गाथेत
पुरूष ढोल वाजवतोय व पत्नी नृत्य करते असाही उल्लेख आहे. पती जर गावाला
गेला असेल तर स्त्रियांचा त्याची वाट बघण्यात वेळ चांगला जात असे. शिवाय
गावभर भटकण्यातही त्यांचा चांगला वेळ जाई. नटून थटून बाजारात फेरफटका मारणे
हेही त्याकाळात स्त्रियांचे वेळ घालविण्याचे चांगले साधन होते. भिंतीवर
चित्रे काढणे, किंवा प्रेयसीच्या अंगावरही चित्रे काढली जात.
याबाबतीत एक गंमतशीर गाथा एका माणसाने लिहिली आहे –
मह पइसणा थणजुअले पत्तं लिहिअं ति गव्विआ कीस ? ।
आलिहइस महं पि पिओ जइत से कंपो च्चिअ ण होइ ॥
तुझ्या उरोजांवर तुझ्या पतीने लिहिले आहे म्हणून भाव खाऊ नकोस. माझ्यावरील प्रेमाने त्यावेळी माझ्या पतीचा हात थथरत होता म्हणून नाहीतर त्याने माझ्या स्तनांवर चित्रेच काढली असती......
पुरूषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर बहुतेकांना एका पेक्षा जास्त बायका असल्यामुळे त्यांना वेळ घालवायचा काही प्रश्न नसावा असे वाटते. याच बरोबर सणवार, नाचणे, गाणे, कथाकथन हे प्रकार होतेच. सवतींच्या भांडणांमुळेही बराच वेळ जात असावा. पुरूषांना गृहस्वामिनी सोडून दुसर्या स्त्रियांकडे जायची सोय असल्यामुळे ते त्यातही काळ व्यतीत करत. अशाच एका सवतीचे हे उदगार आपल्याला व्यथित करून जातील –
गोत्तक्खलणं सोऊण पिअअमेा अज्ज तीअ खणदिअहे ।
वज्झमहिसस्स माल व्व मण्डणं उअह ! पहिहाइ ॥
स्वैरार्थ : सणाच्या दिवशी ती नटून थटून त्याच्या बरोबर बसली असताना त्याने चुकून दुसरीचेच नाव घेतले. ते ऐकताच तिच्यावर आभाळच कोसळले. बळी देण्यासाठी रेड्याला जसे सजवतात तसे तिला वाटले........
खालील गाथेत या बिचार्या पुरूषाला वेगळ्या कारणासाठी वेळ घालवायचा आहे....
णिक्क्म्माहिं वि छेत्ताहि पामरो णेअ वच्चए वसइसम ।
मुअपिअजाआसुण्णइिअगेहदु:क्खं परिहरन्तो॥
या पामराला पत्नीचे निधन झाल्यामुळे, शुन्यवत झालेल्या घरात जावेसे वाटत नाही म्हणू तो काम नसले तरीही शेतात वेळ काढत आहे..........
त्या काळी मनोरंजनासाठी खेळही खेळले जात. बायका फुगडी व सगळेच सोंगट्या खेळत. त्याला त्या काळात पाशक-शारी म्हणत.( माझ्या वयाचे जे असतील त्यांना सोंगट्या हा खेळ माहीत असेल. पटावर हत्ती, घोडे, शेळी, उंट अशा नावाच्या चार सोंगट्या घेऊन खेळायचा हा खेळ. दान पाडायला कवड्या किंवा फासे असत. एका वेळी चार, सहा, आठ जण खेळू शकत.) कुस्तीही खेळली जाई. नदीवर पोहायला जाणे हाही स्त्री पुरूषांचा आवडता खेळ असे.
सणही साजरे होत त्यांचे उल्लेख छण म्हणजे सण, फग्गुच्छण म्हणजे फाल्गुनोत्सव (होळी), मअ ण म्हण्जे मदनोत्सव ( हा अर्थात वैयक्तिक पातळीवर साजरा व्हायचा पण त्यालाही उत्सव म्हटले आहे), वसंतोत्सव इत्यादि नावाने आले आहेत.
दइ्अकरग्घलुलिओ धम्मिल्लो सीहगन्धिअं वअवणम ।
मअ्णम्मि एत्तिअं चिअ पसाहणं हरइअ तरूणीणम् ॥
प्रियकरामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे धुंद झालेले मुख, या उत्सवात (मदोनत्सव) एवढाही श्रुंगार तरूणींना बास होतो....
आता या ठिकाणी थांबतो. अजून बरेच लिहायचे आहे पण हे लिखाण व माहिती आपल्याला आवडली तर पुढच्या काही भागात गाथासप्तशती ज्या काळात रचली गेली त्या काळातील अजून बर्याच गोष्टींचा उहापोह करण्यात येईल.... विशेषत: स्त्रिसौंदर्य, श्रुंगार इत्यादी ज्यांच्यामुळे गाथासप्ताशती बदनाम झाली त्या गाथांबद्दल अजून लिहायचे आहे. तो पर्यंत आपला निरोप घेतो....पण जाता जाता एक नमूना -
जइथ वि हु दिल्लिंदिलिआ तह वि हु मा पुत्ति ! णग्गिआ भमसु ।
छेआ णअदर्जुआणो माअं धुआइ लक्खंति ॥
ए पोरी तू लहान आहेस, मान्य आहे पण अशी उघडी बागडी फिरू नकोस.
गावातील चावट तरूण, मुलीवरून तिची आई कशी असेल याची कल्पना करतात...
जयंत कुलकर्णी.
आभार : श्री. जोगळेकर व श्री. वेबर यांनी या विषयावर केलेले लेखन आणि अर्थातच संपादक सम्राट हाल सातवाहन !
सातवाहनांच्या इतिहासाची साधने
लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-
सातवाहनकालीन नाणी-
Roaring lion standing left facing yupa (sacrificial altar), with Brahmi legend 'Siri Satavahanasa' above and 3-arched hill belowRef: www.vcoins.com
सातवाहन वंश
प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते.
या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत; तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही.
पुराणांत या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे; परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती; म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत.
सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.
सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही; कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे; तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा.
जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत.
सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते.
सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.
कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे; तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते; पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा.
सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यावर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती; पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले.
सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे.
सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’असे केले आहे. [⟶ नागनिका].
वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत; पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल हा गाथा सप्तशती नामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे.
हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचेसाम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते.
प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे.
शककर्ता शालिवाहन- गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी.
हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मला पुस्तकांतुन, आंतरजालावरुन मिळालेली माहिती व माझ्या संग्रही असलेली काही नाणी खास माबोकरांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह.
शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती
मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा
आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत
धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता.
बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील
कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच शालिवाहनाची देण आहे आणि हे कळल्यावर तुम्हाला थोडे नवलच वाटेल कान्हेरी लेणी ही त्या काळचे विद्यापिठ होते यावर आजुनही खोल संशोधन चालु आहे.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा
उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला.
त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे
शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी
जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले
जाते.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे

त्या नाण्याची पाठची बाजु.
सातकर्णी तांब्याची नाणि
दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे ,
कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण,जुन्नर, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी
सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला
असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व
गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत.
सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या
अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले
झाड, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची
चित्रे आहेत.
यात जाणकार आजुन भर घालतीलच
आणखी एक - त्या चिन्हाला नंदीपद असं म्हणतात (नंदीपाडा नाही)
युरी गागारिन, नाणी, शिलालेख, स्तंभ यांचं कार्बन डेटिंग होत नाही. बहुतांश शिलालेखांमधे काळाचा उल्लेख असतो. तो शक संवत् मधेच असतो असं नाही, पण राजांच्या नावांमुळे, राजघराण्यांच्या नावांमुळे किंवा अक्षरांच्या/लिपीच्या शैलीवरून लेखाचा/ नाण्याचा काळ ठरवला जातो.
महाराष्ट्र टाईम्स गुढी पाडवा विशेषंकात आलेला गौतमी सातकर्णी वरिल लेख
लेखक >> संजय सोनवणी
शालिवाहन मुळचा शब्द तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी
सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहनांनी शकांचे हनन
केले. ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
..........
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. पुराणकारांनी प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. परंतु या सणामागे गौतमीपुत्र सातकणीर्च्या नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयामध्ये आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. गुढीपाडव्याचा व शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.
सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसवीसन पूर्व २२० ते २३० अशी जवळपास साडेचारशे वर्ष सत्ता गाजवली. आजचा महाराष्ट्र, त्याची संस्कृती सातवाहनांचीच खरी देणगी आहे. महाराष्ट्रातील असंख्य गिरिकिल्ले त्यांचीच निर्मिती आहे. सातवाहन हे औंड्र वंशीय, पशुपालक, वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेत शूद्र गणले गेलेल्या समाजांतून पुढे येत काण्व राजांचा पराभव करत सत्ता स्थापणारे लोक. छिमुक सातवाहन हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक. साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' खरे तर गनिमी काव्याचा आद्य जनक गौतमीपुत्र सातकर्णी होय! शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. त्याचे साम्राज्य पुन्हा स्वतंत्र झाले. महाराष्ट्रीय जनतेने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला. ही घटना इसवी सनाच्या ७८ मध्ये घडली. या संपूर्ण विजयाचा दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव प्रजा साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा दिवस. गौतमीपुत्राने अत्यंत अभिमानाने 'क्षहरात वंस निर्वंस करस' अशी या विजयाची नाशिकच्या शिलालेखात नोंद करुन ठेवली आहे. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. पुढे हाल सातवाहनाने (तोच हाल ज्याची गाथासत्तसई (गाथा सप्तशति) आजही जगभर अमोलिक काव्यभांडार म्हणून प्रसिद्ध आहे!) तर श्रीलंकेवर विजय मिळवून तेथील राजकन्येशी विवाहही केला. त्यावर लीलावती हे महाकाव्यही लिहिले गेले.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.
सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी
शालीवाहनाचा राजवंश नावाचे डॉ पु. नी. फडके यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचून झाले. (मंगेश प्रकाशन नागपूर, किं. ६० रु.) डॉ. फडके हे नागपुरात राहतात. नुकताच त्यांचा परिचय झाला. मूळ अकाउंटस ऑफिसर असलेले फडके, सेवानिवृत्तीनंतर (१९८९) प्राचीन भारतीय इतिहासात रस घेऊ लागले. त्यांनी १९९१ साली एम्.ए आणि त्यानंतर १९९७ साली पी.एच्.डी मिळवली. (डॉ. इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली). उत्खनन आणि इतिहास या दोहोतील त्यांचा व्यासंग चकित करणारा वाटला
पुस्तक छोटे आहे (११४ पाने.) त्यात तळटीपा नाहीत, संदर्भ पुस्तकांची यादी आहे पण नेमके कुठचे काय वाचायचे हे नाही. पुस्तकात अनेक अटकळी आहेत त्याबद्दल लिहिताना त्यांनी विरुद्ध अटकळींबाबत विचार केलेला दिसतो. पण तो अपूर्ण वाटतो. हे सोडल्यास पुस्तकातल्या अटकळी आणि त्यांचे विवेचन खूप नवीन विचारांना चालना देते. याशिवाय भरपूर माहिती मिळते. पुस्तक विस्कळीत वाटते पण शेवटपर्यंत वाचल्यावर त्यातील प्रकरणांची संगती लागते.
त्यांचे शालीवाहन राजवटीवरचे प्रतिपादन साधारणपणे असे आहे. शक हे मध्य अशियातले लोक. पर्शियाच्या सायरस -दरायसने इसपु ५५० च्या सुमारास गांधार आणि सिंधुपार प्रदेश इराणी साम्राज्याला जोडला. त्यावेळी शकांच्या वसाहतीतील काही भारताकडे सरकले. मौर्य साम्राज्यात फारसा टिकाव न धरता आल्याने ते दक्षिणे कडे सरकू लागले. आणि विदर्भात वैनगंगेच्या तिरी पवनी येथे आले. इसपू २३० मधे (अशोकाच्या मृत्युनंतर) आपले राज्य त्यांनी घोषित केले. इस. २३० (म्हणजे एकंदरीत ४६० वर्षे) त्यांचे राज्य विदर्भातून गोदावरी तिरी पैठण आणि नंतर आंध्रात स्थिरावले. याच दरम्यान सागरी आणि नद्यांमधील जलवाहतुकीमुळे भारताच्या दक्षिण भागात सुबत्ता आली. परशुराम हा देखील याच दरम्यान माहूर येथे राहत असे. त्याने दक्षिणेत (आणि कोकणात) नागरीकरण आणण्यास मदत केली. 'आश्वलायन गृह्यसूत्रे' हा या भागातील एक महत्वाचा ग्रंथ. यात चैत्यपूजा आहे. या प्रकारच्या चैत्यपूजेतून बुध्दपूर्वकालीन वेळी महाराष्ट्रात अनेक गुंफा तयार झाल्या. (भारतात १२०० गुंफा आहेत त्यातील ९०० महाराष्ट्रात आहे.) अस्थि मडक्यात घालून जमीनीत पूरून त्यावर समाधी बांधायची असा या समाजात रिवाज होता. त्याचेच रूपांतर नंतर खांबांवर उभारलेल्या स्तुपासारख्या चैत्यमंदिरात झाले. 'चितपावन' (कोकणस्थ) हे याच 'चैत्य' शब्दाचे रूप आहे.
या प्रतिपादनाच्या अनुषंगाने या पुस्तकात अनेक विषय हाताळले गेले आहेत. भारतात लेखनकला साधारण इसपू ६०० साली आली. (तत्पूर्वी चित्रलिपी असायची.) 'भास' (पाणिनी देखिल) नाटककार याच सुमारासाचा (भासाच्या नाटकांवरून आपल्या प्रतिपादनाला उपयुक्त अशा गोष्टी यात घेतल्या आहेत.). विदर्भात झालेले उत्खनन, सापडलेली नाणी यावरून केलेला कालनिर्णय. मृतांच्या समाधीत केलेली शिळावर्तुळाची योजना विदर्भात अनेक ठिकाणी सापडते. (ही पद्धत शकांची होती.) त्याचबरोबर माहूर (रेणूका-परशुरामाचे ठिकाण) येथेही ती मिळाली. याच भागात सापडलेल्या शिलालेखांवरून त्यांच्या प्रतिपादनास पुराव्यांची जोड मिळते.
फोनेशियन व्यापारांनी केलेले साहसी प्रवास. (त्यांनी अफ्रिका खंडाला वळसा घातला होता.) फोनेशियन हे वेताच्या होड्या वापरत असत. म्हणून ते भारतीय असावेत. ते सूर्यपूजक होते. आणि कोकणात त्याच प्रकारच्या सूर्यमूर्ती खूप मिळाल्या आहेत. (या फोनेशियन/फिनिशियन लोकांवर अधिक वाचायची उत्सुकता वाढली आहे.) इसपू. २७० मधील ग्रीक लेखक इरॅस्टोथेनिस याने असे वर्णन केले होते की गंगासागरातून श्रीलंकेला जाण्यास २० दिवस लागत. हेच व्यापारी पॉलेनिशियन बेटांवर (पॅसिफिक मधल्या) जात असत. ऑस्ट्रेलियात गेले होते. एवढेच नाहीतर या बेटांवर त्यांच्या सूर्यमूर्तीच्या खुणा अजून टिकून आहेत.
त्यांच्या प्रतिपादनातील मुद्यांमुळे कित्येक विषयातली उत्सुकता जागृत झाली. भासाची नाटके या प्रकरणात त्यांनी भासाच्या रामायणावरील व महाभारतातील नाटकांवर लिहिले आहे. आणि हे सगळे हल्लीच्या रामायण महाभारता विषयीच्या कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे. रामाला कळते की आपले वडील गेले. तिकडे रावण आचार्याच्या वेषात येऊन सांगतो की श्राध्दासाठी हरणाचे मांस (कांचनमृगाचे) सगळ्यात चांगले. राम शिकारीस जातो आणि सीताहरण होते. वनवास फक्त १२ महिन्यांचा असतो. भरत आपल्या आजोळी गेला असतो. वाटेत येताना तो एका गुहेत दशरथाचे चित्र पाहतो. त्यावरून समजते की ते आता नाहीत. (या दोन्ही पद्धती शकांच्या.) अशाच कथा महाभारताच्या आणि त्यावर नाटके आहेत. मराठी विश्वकोषात यावर चाळले असता असे कळले की भासाची ही नाटके मराठीत भाषांतरीत होऊन १९३१ साली प्रकाशित झाली आहे.
प्रतिपादनात अतिशयोक्ति असेल असे वाटते. पण मांडलेले विचार बर्याच पुराव्यांनी दिले आहेत. पुराव्याच्या आधारे लेखक स्वतःचे विचारविश्व उभे करतात. ते सुसूत्र आहे. पुस्तक जर अधिक संदर्भासह असते तर त्यावर विश्वास ठेवता आला असता. लेखकाच्या इतर पुस्तकात (वा शोधनिबंधात) हे कदाचित आले असणार. उत्सुकता मात्र मोठया प्रमाणात चाळवली गेली हे नक्की.
प्रमोद
Comments
गौतमीपुत्र शातकर्णी
उत्तम माहिती. येथे अधिक चर्चा करता यावी.
गौतमीपुत्र शातकर्णीवरील मागे झालेली चर्चा येथे संदर्भासाठी देते.
परशुराम हा देखील याच दरम्यान माहूर येथे राहत असे. त्याने दक्षिणेत (आणि कोकणात) नागरीकरण आणण्यास मदत केली.
हा परशुराम नेमका कोणता? रेणुकापुत्र परशुरामाला इतक्या नंतर अस्तित्वास आणले तर रामायण महाभारताला कोठे ठेवायचे? की परशुराम ऐतिहासिक मानायचा?
त्यावेळी शकांच्या वसाहतीतील काही भारताकडे सरकले.
विक्रमादित्य शक राजा होता ना? त्याच्या कारकिर्दित विक्रम शके संवत्सर सुरु झाले. शातकर्णीने त्यावर विजय मिळवून शालिवाहन शक हे नवे कॅलेंडर सुरु केले ना?
लेख वाचून गोंधळ निर्माण झाला आहे. अधिक प्रश्न वेळ होईल तसे विचारते.
परशुराम
गौतमीपुत्र शातकर्णीवर झालेली चर्चा वाचली. मी वाचलेल्या पुस्तकात यातील बहुतेक मुद्दे आले आहेत. पुस्तक वाचल्यावर नाणेघाटात जायची इच्छा होत आहे.
लेखकाने दिलेल्या माहिती नुसार. परशुरामाचा उल्लेख 'राम जामदग्न्य' असा होत असे. ऋग्वेदात (दहाव्या मंडलात सूक्त ११०) मधे राम जामदाग्न्य असा उल्लेख आहे. याच ऋचा अथर्ववेदात आहेत. लेखकाच्या म्हणण्यानुसार ऋग्वेदात ही सुक्ते नंतर घालण्यात आली. याचेच उदाहरण म्हणून पुरुषसुक्ताचा उल्लेख केला आहे. पुरुषसुक्तात शूद्रवर्णाचा उल्लेख आहे. पण असा वर्ण मात्र ऐतिहासिक काळात आला असे लेखकाचे म्हणणे आहे. अथर्ववेदाच्या वेळी जमदग्नी होता. त्याचा उल्लेख 'भार्गव वैदर्भी' असा केला आहे. (यावरून तो विदर्भात माहूरला असण्याबद्दल पुष्टी मिळते.) माहूरमधील उत्खननात शिळावर्तुळे सापडल्याने पुढील कयास बांधला आहे. लेखकाच्या मते परशुराम हे नाव रामजामदग्न्य नावाऐवजी वापरण्याचा काळ यानंतरचा. म्हणून सातवाहन शिलालेखात जामदग्न्य असा उल्लेख आहे. भासाने देखिल असाच उल्लेख केला आहे.
रामायण महाभारतातील परशुरामाच्या कथा या नंतर आल्या आहेत (लिखाणाच्या वेळी) व त्या कथा काढल्यातरी मूळ कथांना कसली बाधा पोचत नाही. असे ही लेखकाचे म्हणणे आहे.
विक्रमादित्य शक राजा होता ना? त्याच्या कारकिर्दित विक्रम शके
संवत्सर सुरु झाले. शातकर्णीने त्यावर विजय मिळवून शालिवाहन शक हे नवे
कॅलेंडर सुरु केले ना?
यावर पुस्तकात कसलाच उल्लेख नाही. माझी अशी समजूत होती की शकांना हरवून
शालिवाहनाने स्वतःची कालगणना सुरु केली. पण पुस्तकातील प्रतिपादनाने त्या
समजुतीस तडा गेला.
प्रमोद
माझीही
माझी अशी समजूत होती की शकांना हरवून शालिवाहनाने स्वतःची कालगणना सुरु केली.
-माझीही अशीच समजूत होती.
सातवाहन का॑ आन्ध्र घराणे
इतिहासाच्या इंग्रजी पुस्तकांच्यात सातवाहन राजांचा उल्लेख आन्ध्र
राजघराणे असा येतो.हे नाव या राजघराण्याला का पडले असावे या बद्दल कोणी
काही सांगू शकेल का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
आंध्र
(थोडक्यात लेखकांनी लिहिलेले मांडतो.)
सातवाहनांना पुराणांनी आंध्र म्हणून संबोधिले आहे. (बहुदा भविष्यपुराणाचा
हा उल्लेख आहे.) त्यात कुठेही सातवाहन हे नाव नाही. या वंशाचे ३० राजे
होऊन गेले. आणि प्रत्येकाचा कार्यकाल पुराणांनी दिला आहे. महाराष्ट्रातील
(पश्चिम) गुहांमधे जे शिलालेख होते त्यातील राजांची यादी पुराणातल्या
यादीत जुळते. मात्र शिलालेखांमधे कुठेही आंध्र म्हणून संबोधन नाही.
मौर्यकालात फक्त विदर्भातील राज्याला 'अश्मक' म्हणायचे. त्याच्या
सीमांच्या वर्णनावरून हे निश्चित होते. हा भाग सातवाहनांकडे होता अशा
तर्हेचा शिलालेख ओरिसात (कलिंग) आहे. याशिवाय विदर्भात सातवाहन राजांची
नाणी भरपूर प्रमाणात सापडली. अकोला १६००, अडम (नागपूर जवळील एक गाव)
६०००. याउलट आंध्र वा पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अशा खुणा कमी
सापडल्या. कोटलिंगला सातवाहन २३४, सातकर्णी ४७ आणि चिमुक २५ अशी नाणी
सापडली. जास्त शिलालेख प. महाराष्ट्रात आहे. अन्य विद्वानांच्या
(मिराशी) मते सातवाहन पूर्वी जुन्नरला होते. तिथून ते पैठणला गेले आणि
शेवटी आंध्रात गेले. लेखकाच्या मते ते पवनी (पूर्वीचे नाव पोतनम्) आधी
होते. यात एक श्लोक, एक शिलालेख आणि पवनी, अडम इत्यादी ठिकाणचे उत्खनन असे
बाजुने पुरावे आहेत.
पहिल्या वीसराजांच्या नावात 'श्वात' आहे हा मध्य अशियातील श्वात, सुवात नदीचा उल्लेख आहे असे लेखकाचे म्हणणे आहे.
प्रमोद
बरीच वेगवेगळी माहिती
पुस्तक वाचताना विस्कळित वाटले असेल, त्याची कल्पना येत आहे.
विचार करण्यासारखी खूप माहिती आहे.
पुस्तकाची ओळख दिल्याबाबत धन्यवाद.
हराप्पा संस्कृतीच्या त्यातल्या त्यात आधुनिक (म्हणजे तरी प्राचीनच) स्तरांमध्ये अस्थि पुरायची मडकी सापडली होती, त्याबद्दल दा.ध.कोसंबी संदर्भ देतात. जर हा रिवाज मध्य-आशियाई असेल, तर बहुधा त्याचा भारतात संकर आधीपासून झाला असावा. फक्त शकांपासूनच नव्हे. शकांनी प्रथा दक्षिणेपर्यंत पोचती केली असेल - माहीत नाही.
आश्वलायन गृह्यसूत्रे शकांची हे वैशिष्ट्यपूर्ण... गृह्य सूत्रांबद्दल आणि श्रौत सूत्रांबद्दल संदर्भ, आणि त्यातील वचने प्रमाण म्हणून संस्कृत शास्त्रार्थ-वाङ्मयात खूपदा दिसतात. प्रथांबद्दल आधारसामग्री म्हणून इतिहासाच्या आधुनिक चर्चेतसुद्धा हे गृह्य-श्रौत-सूत्रवाङ्मय येते. शिवाय "ज्याचा संदर्भ ग्रंथांत आहे, त्या आचार्याचा काळ ग्रंथाच्या पूर्वीचा मानावा" अशा प्रकारच्या प्रमाणांतही गृह्य-श्रौत-सूत्रवाङ्मय उल्लेखले जाते. या वाङ्मयाशी माझी मुळीच ओळख नाही, याबद्दल थोडेसे शल्य वाटते. ओळख चांगली असती, तर शकांच्या चर्चेत त्यांचे महत्त्व अधिक जोखून-पारखून समजले असते.
हराप्पा
हराप्पा संस्कृतीबद्दल लेखकाने फारशी टिपणी केली नाही. मडक्यात अस्थि पुरायच्या आणि सोबत शिळा वर्तुळे करायची ही शक लोकांची पद्धत. याच पद्धतीचे अनेक दाखले विदर्भातील उत्खननात मिळतात. (उदा. माहूर येथील उत्खनन )
याशिवाय चैत्य लाकडाचे असल्याने आज शिल्लक नाहीत. पण त्यांची चित्रे आहेत असे लेखक सांगतो.
आश्वलायन गृह्यसुत्रावर अधिक (मूळ स्वरूपातील ग्रंथ) वाचायची इच्छा आहे.
प्रमोद
वा
छान ओळख करून दिलीत.
थोडक्यात लेखका विषयीची ओळख वाचून अजूनच आवडले.
पुस्तक मिळाले तर नक्की वाचेन.
(थोडे आधी कळते तर मागवताही आले असते.)
-निनाद
आतापर्यंतचे सर्वोत्तम
चर्चा चांगली चालली आहे. इतिहासाबाबत असलेल्या नावडीमुळे ह्याबद्दल अधिक मत देता येत नाही.
पण मी असे नेहमीच म्हणतो की, सध्या मानव जसे जीवन जगत आहे, ते आतापर्यंतचे सर्वोत्तम आहे.
माहिती की ठोकताळे?
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
पुस्तक विस्कळीत आहे हे जाणवते. शिवाय स्पष्ट संदर्भ, तळटीपा यांविना पुस्तकात ऐतिहासिक माहिती आहे की ठोकताळे? असा प्रश्न पडला.
तरीही पुस्तकातली (धाडसी वाटणारी) विधाने तपासण्याजोगी आहेत हे नक्कीच.
उदा. भारतात लेखनकला साधारण इसपू ६०० साली आली. (तत्पूर्वी चित्रलिपी
असायची.) - हे खरे असेल तर ही चित्रलिपी आणि अर्वाचिन लेखनकला यांचा
'रोझेटा स्टोन' कुठे मिळण्याची शक्यता आहे? या चित्रलिपीचा हरप्पन लिपीशी
काही संबंध आहे काय? वगैरे.
छान लेख
माहिती देणारा छान लेख.
कुशाण टोळ्यांचे पारीपत्य केल्यावर शालिवाहनाने सुरु केलेले शालीवाहन शक हे माहिती होते फक्त आता पर्यंत.
आन्ध्र राजघराणे
माझ्याकडे ए.व्ही.विलियम्स जॅकसन व वि न्से न्ट ए. स्मिथ या
लेखकांनी लिहिलेल्या व 1906 या साली प्रसिद्ध झालेल्या हिस्टरी ऑफ इंडिया
या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. यावर खालील माहिती मला मिळाली
इ.स.पूर्व 27 या कालात सुशर्मन हा कण्व किंवा कण्वायन कुलातला राजा दख्खन
(कृष्णा व गोदावरी नद्यांच्या खोर्यातील प्रदेश) प्रदेशात राज्य करत होता.
आन्ध्र राजकुलातील एका राजाने त्याचा वध करून हे राज्य स्वत:च्या ताब्यात
घेतले. आन्ध्र हे राजकुल इ.स.पूर्व 220 या कालापासूनच अस्तित्वात होते.
त्यामुळे त्या कुलापैकी कोणत्या राजाने सुशर्मन राजाचा वध केला हे सांगता
येत नाही. आन्ध्र राजांची राजधानी कृष्णा नदी काठी असलेले श्रीकाकुलम हे
गाव होते. आन्ध्र राजघराण्याचे सर्व राजे स्वत:ला सातवाहन कुलाचे मानत असत व
स्वत:ला सातकर्णी हे पद लावून घेत असत. त्यांचे वैयक्तिक नाव हे ज्ञात नसे
त्यामुळे कोणता राजा राज्य करत होता हे सांगणे बर्याचदा अवघड होते. 17
व्या आ न्ध्र राजाचे नाव 'हल' हे होते ही माहिती सप्तशतकी या मराठी काव्य
ग्रंथात त्याच्या नावाचा उल्लेख असल्याने आपल्याला मिळते. आन्ध्र
घराण्यातील 21 ते 23 क्रमांकाच्या राजांची माहिती त्यांनी पाडलेल्या
नाण्यांच्या वरून मिळते. 21वा राजा पहिला विलिवायकुर हा राजा इ.स.84 मधे
गादीवर आला. हा फक्त 6 महिने गादीवर होता. त्याच्या नावाने पाडलेली नाणी
उपलब्ध आहेत. या नंतर शिवलाकुर हा त्याचा पुत्र गादीवर आला. त्याने 28
वर्षे राज्य केले व नंतर राजदंड आपला मुलगा दुसरा विलिवायकुर याच्याकडे
सोपवला. शिवलाकुर हा मोठा पराक्रमी होता. त्याच्या राज्याच्या पश्चिमेस
असलेल्या शक, पल्लव व यवन राजांचा त्याने पराभव केला. या राजांची राज्ये
मालवा,गुजरात आणि काठियावाड येथे होती. (या तिन्ही राज्यांबद्दल या
पुस्तकात बरीच माहिती दिलेली आहे.)नाहक आणि नहापणा या राजांनी आ न्ध्र
राजांशी युद्धे सतत चालू ठेवून बरीच हानी पोहोचवली होती. इ.स.126 मधे
विलिवायकुर दुसरा या आन्ध्र राजाने या सर्व पश्चिमेकडच्या शत्रूंचा पूर्ण
नाश केला न नहापणा या राजाचा वध केला व चाष्टण या आपल्या क्षत्रपाची उज्जैन
येथे नेमणूक केली. इ.स.144 मधे दुसरा विलिवायकुर या राजाची आई 'बलश्री'
हिने एक शिला लेख लिहून आपल्या मुलाचे कर्तुत्व रेकॉर्ड करून ठेवले आहे.
चाष्टण क्षत्रपाचा वंश उज्जैन च्या गादीवर पुढे अनेक पिढ्या राहिला. चवथ्या
शतकात हो ऊन गेलेला चंद्रगुप्त विक्रमादित्य राजा याच्याच वंशातला होता.
इ.स.138 मधे दुसर्या विलिवायकुर राजाचा मुलगा दुसरा पुलमयी हा गादीवर
आला. चाष्टण या क्षत्रपाचा नातू रुद्रदमन याने आपली मुलगी दक्षमित्रा हिचा
विवाह पुलमयी राजाशी करून त्याच्याशी नाते जोडले. हे नाते असूनही पुलमयी व
रुद्रदमन यांच्यात इ.स. 145 मधे युद्ध झाले व त्यात रुद्रदमन विजयी झाला.
पुलमयी आपला जावई असल्याने त्याने फक्त आपला मुलुख परत ताब्यात घेऊन
पुलमयीला सोडून दिले.
हा सर्व इतिहास सत्य मानला तर मग खालील प्रश्न उरतात.
शालीवाहन राजा कोण? त्याच्या नावाने शक का सुरू केला? आणि या शालीवाहन राजाने कोणत्या विक्रमादित्याचा पराभव केला?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
प्रादेशिक सीमा
१९४७ पर्यंत व काही अंशी पुढेही कधीच प्रादेशिक सीमा कायमस्वरुपी नसलेल्या ह्या देशात, भाषिकप्रदेश निर्माण करुन लोकांना त्यातच राहायला सांगितले जात आहे. एखाद्या विभागाने वेगळे होणे मागितले तर त्यात गैर काय हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. अजुन किती वर्षे भारतात हेच प्रदेश असेच राहू शकतील?
याआधीची चर्चा
या आधीची चर्चा आणि त्यातील वंशावळ वाचली तर शातकर्णी आणि सातवाहनांची माहिती मिळते. स्वातीकर्णी, शातकर्णी, सातकर्णी हे बहुधा पद असावे कारण त्या वंशावळीत अनेक राजांनी ती उपाधी लावलेली दिसते.
सातवाहन या नावाचा अर्थ माझ्यामते सूर्य असा होत असावा. चू. भू. दे. घे. सूर्याच्या वाहनाला सात घोडे असतात म्हणूनही असेल. कदाचित आपण सूर्यवंशी आहोत हे दर्शविण्यासाठी असावे परंतु नेमके माहित नाही.
शालिवाहन याला गौतमीपुत्र या नावाने ओळखले जाते. शालिवाहन हे नाव त्याने नंतर धारण केले असावे? यातील "शालि" या शब्दाचा अर्थ शाळीग्रामाशी संबंधित आहे का? किंवा वरील सात हे देखील एखाद्या शब्दाचे भ्रष्ट स्वरुप आहे का? असे करून (शाळीग्राम) विष्णूशी वगैरे संबंध दाखवायचा आहे का वगैरे प्रश्न मनात आले.
गौतमीपुत्र
मी वर दिलेल्या संदर्भाप्रमाणे इ.स.144 मधला शिलालेख कोरून
घेणार्या राजमातेचे नाव बलश्री असे असून ती गौतम घराण्यातील असल्याने तिला
गौतमी असे म्हणत असत. तिचा पुत्र दुसरा विलिवायकुर हा राजा असावा.
हा विलिवायकुर म्हणजे प्रियाली यांनी दिलेल्या यादीतला 23वा राजा किंवा
गौतमीपुत्र शातकर्णी असला पाहिजे. म्हणजे शातकर्णी, सातवाहन, शालीवाहन ही
सर्व या दुसर्या विलिवायकुर राजाची पदे किंवा घेतलेली नावे असावीत.
अवांतर
आईच्या नावाने हा राजा ओळखला जात होता ते तेंव्हाच्या पितृसत्ताक पद्धतीत कसे मान्य झाले ते कळत नाही?
त्याचप्रमाणे विलिवायकुर हे नाव संस्कृतोद्भव वाटत नाही. हे राजे तमिळ असू शकतात का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
आईच्या नावाने ओळखणे
आईच्या नावाने ओळखणे हे आपल्या संस्कृतीस नवे नाही.
उदा.
ऐलराजवंश इलेच्या मुलांचा म्हणून ओळखला जातो.
अशी आणखीही उदाहरणे आहेत. सध्या कामात असल्याने आठवत नाहीत पण नंतर लिहिन.
पुलमयी राजा
दुसर्या विलिवायकुर राजाचा पुत्र किंवा 24व्या सातवाहन राजाचे नाव मी वर दिलेल्या संदर्भाप्रमाणे पुलमयी आहे. ते प्रियालीताईंनी दिलेल्या पुलोमत या नावाशी बरेच मिळते जुळते वाटते. तसेच विलिवायकुर राजाच्या बापाचे नाव या संदर्भात शिवलाकुर असे दिले आहे ते प्रियालीताईंच्या यादीत शिवस्वाती आहे. दुसरा विलिवायकुर राजा हाच शालीवाहन असला पाहिजे या साठी हे आणखी दोनसंदर्भ वाटतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
गोदावरी
थोडा प्रतिसाद आधी दिला आहे.
लेखकाच्या म्हणण्यानुसार सातवाहनांनी जलमार्गाची वाहतूक सुरु करून दक्षिणेस
भरभराटीला आणले. पश्चिम किनार्यावर माल उतरवायचा, नाणेघाट मार्गे
घाटावर चढवायचा. मग गोदावरीतून पूर्व किनार्यावर न्यायचा. (आणि उलट
सुद्धा). गोदावरीचा जलवाहतुकीसाठी उपयोग हा त्यातील एक भाग असावा.
विदर्भातील वैनगंगा (पवनी) आणि पैनगंगा (माहूर) या नद्या गोदावरीच्या
उपनद्या (पण गोदावरी पेक्षा जास्त जलसाठा असलेल्या) याच जल वाहतुकीतील एक
टप्पा मानता येतो.
आंध्रतील त्यांचे अस्तित्व त्यामुळे साहजिक आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार पुराणे इस ३००-४०० मधे झाली असल्याने त्यांच्यात जागांचा इतिहास नीटसा नाही. ना सातवाहन नावांचा.
प्रमोद
भासाची नाटके
भासाची नाटकांबद्दल उत्सुकता वाटते. त्याबद्दल अधिक वाचायला आवडेल.
आणि हे सगळे हल्लीच्या रामायण महाभारता विषयीच्या कल्पनेपेक्षा फार वेगळे आहे.
शक्य आहे परंतु याला भास एकटाच अपवाद नसावा. विशाखादत्ताचे मुद्राराक्षसही याच प्रकारचे आहे. त्यात पर्वतकाचा मृत्यू विषकन्येमुळे होतो. या विषकन्येला आधी चंद्रगुप्ताचा नाश करण्याकरता पाठवलेले असते. पर्वतक म्हणजेच पुरु (पोरस) असा सर्वसामान्य संकेत आहे. परंतु प्रत्यक्षात पुरुचा मृत्यू हे चाणक्याचे षड्यंत्र नव्हते.
भासाची नाटके नाट्यशास्त्राचे नियम पाळत नाहीत असे विकीवर वाचले. मागे गूगलबुक्सवर मुद्राराक्षसात नाट्यशास्त्राचे नियम कसे पाळावे यावर एक पुस्तक वाचले होते. दुर्दैवाने मला ते आता मिळत नाही. (मी नेमके काय सर्च केले होते ते आठवत नाही परंतु ते पुस्तक अतिशय रोचक होते.)
असो. तर, भासाची नाटके नाट्यशास्त्राचे नियम पाळत नाहीत याबाबत लेखक काही लिहितात का?
भासाची नाटके आणी मुद्राराक्षस
लेखकाने दोन्हींचा उल्लेख काही पाने भरून केला आहे.
भासाची काही नाटके दु:खांत आहेत हे नाट्यशास्त्राच्या नियमाला धरून नाहीत. म्हणून ती त्यापूर्वीची आहेत.
त्याच्या नाटकात रामायण महाभारतापेक्षा वेगळ्याच गोष्टी येतात. पंचरात्र
नाटकात दूर्योधन एका यज्ञाच्या समाप्तीनंतर दक्षिणा वाटताना दिसतो.
त्यात गुरु द्रोण 'कौरव पांडवात' समेट व्हावा अशी दक्षिणा मागतात.
दूर्योधन अट घालतो की त्यांनी पाच दिवसात त्यांना शोधले तर तो समेट करेल.
म्हणून विराटावरचा हल्ला. त्यात अभिमन्यु कौरवांकडून लढतो आणि अर्जुनाला
ओळखतो. दूर्योधन अर्धे राज्य देऊन समेटास तयार होतो. (शेवटी युद्ध होते
ते वेगळे.)
उरूभंग नाटकात, दुर्योधन धारातिर्थी पडला असताना समेट करतो. सगळ्यांची क्षमा मागून मरतो.
मुद्राराक्षसात आर्य चाणक्य ज्या साम्राज्याचा उल्लेख करतो त्यात दक्षिणे कडचे देश नाहीत. (यावरून सातवाहन हे पूर्वी विदर्भात होते याला पुष्टी मिळते.) या गोष्टीचा उल्लेख लेखकाने केला आहे.
प्रमोद
सहमत
भासाची काही नाटके दु:खांत आहेत हे नाट्यशास्त्राच्या नियमाला धरून नाहीत. म्हणून ती त्यापूर्वीची आहेत.
भासाची नाटके नाट्यशास्त्राच्या पूर्वीची असावीत हे मीही वाचले आहे. दु:खांताबद्दल आठवत नाही पण मला वाटते, स्टेजवर मृत्यू दाखवू नये, लढाई दाखवू नये, पात्रांनी कोण-कोणत्या भाषांत बोलावे, सूत्रधाराने नाटकाची सुरुवात करावी असे अनेक नियम त्यात होते.
मला ते पुस्तक पुन्हा वाचायला मिळाले तर बरे होईल पण शोधून सापडत नाही आता.
वाचनीय
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल त्यांचे तसेच चर्चेत विविध संदर्भपैलूंबाबत उलगडा करण्याचे प्रयत्न करणाऱ्या इतर सहभागी उपक्रमींचे मनःपूर्वक आभार. आजवर माहीत नसलेल्या गोष्टींचा संक्षिप्त आढावा म्हणून हा चर्चा-प्रस्ताव (तथा इतर संदर्भ-दुवे) मी वाचला—अधिक जाणून घेण्याची लालसा उत्पन्न न झाली तर नवलच!
ही सगळीच
सर्वच माहिती नवीन आहे.
>>चैत्यपूजेतून बुध्दपूर्वकालीन वेळी महाराष्ट्रात अनेक गुंफा तयार
झाल्या. (भारतात १२०० गुंफा आहेत त्यातील ९०० महाराष्ट्रात आहे.)
माझी अशी समजूत होती, की बुद्धाच्या काळानंतर या चैत्यभूमी तयार केल्या
गेल्या. बहुतांशी व्यापारी/व्यापारउदीमाच्या मुख्य ठाण्यांना जोडणार्या
मार्गांलगतच्या टेकड्यांमध्ये.
चित्पावनांमध्ये समारंभांनंतर बोडणाचा एक विशिष्ट विधी असतो. त्याचेही मूळ शोधायला हवे असे वाटते.
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
मिसळपाव नव्या रूपात सुरू करताना श्रीगणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्रीगणेश लेखमालेची सुरुवात होत आहे. यात पहिले पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे, ते महाराष्ट्राच्या पहिल्या ज्ञात इतिहासाच्या रूपात. महाराष्ट्राच्या आद्य इतिहासात इथे दंडकारण्य होतं असं मानलं जातं. त्यानंतर काही आदिम जमातींनी वसाहती केल्या. पण लिखित किंवा इतर काही पुराव्यांच्या स्वरूपात इथला त्या काळचा इतिहास फारसा आढळत नाही. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सुरू होतो तो प्रबळ पराक्रमी सातवाहनांपासून.
सातवाहन, भारत देशीच्या विस्तृत भूभागावर सुमारे ४५० ते ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ राज्य केलेली एकमेव भारतीय राजवट, महाराष्ट्राचा आद्य राजवंश. सातवाहनांच्या पूर्वकाळातील अशोकाच्या शिलालेखांत रथिक, भोजक व पेतेनिक यांचे उल्लेख आढळतात पण ते तेव्हढ्यापुरतेच.
सातवाहनांच्या उदयानंतर मात्र त्यांनी खोदवलेल्या गुहा, तत्कालिन शिलालेख, त्यांनी पाडलेली नाणी, इ. पुरातत्वीय पुरावे तसेच गुप्तकाळात निर्माण झालेली पुराणे, हाल सातवाहनाने संकलित केलेली गाथा सप्तशती, गुणाढ्याची बृहत्कथा, शुद्रकाचे मृच्छकटिक यांसारख्या ऐतिहासिक दस्तावेजांमुळे तत्कालिन कालखंडाविषयी बरीचशी माहिती मिळू शकते.
अर्थात सातवाहनांवर काही लिहायचे म्हणजे तो एका मोठ्या लेखमालेचाच विषय होईल. त्यामुळे याविषयी फारसे विस्तारात न जाता सातवाहन आणि त्यांचे परंपरागत शत्रू शक-क्षत्रप यांच्या संघर्षावर काही प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे.
तत्कालीन सातवाहन साम्राज्य नकाशा
कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःच्या नावाची तांब्या-शिशाची नाणी पाडली व सातवाहन राज्याची मुहूर्तमेढ रोविली. (साधारण इस. पूर्व २३०)याच्या नंतरच्या पिढीचा, बहुधा सातवाहनाचा पुत्र सिमुक (श्रीमुख) सातवाहन गादीवर आला. याच्या कारकिर्दीत सातवाहन राज्य लहानसेच असावे पण याच्या नावाची स्वतंत्र नाणी आहेत. सिमुकानंतर त्याचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने सिमुकाचा भाऊ कण्ह (कृष्ण)हा सातवाहनांच्या गादीवर आला व कण्हानंतर पहिला सातकर्णी हा सातवाहन राजा झाला. कण्हाचे व प्रथम सातकर्णीचे संबंध तणावाचे असून त्याला आपले राज्य कण्हाशी लढूनच मिळवावे लागले असावे असे अभ्यासक मानतात कारण नाणेघाटातल्या प्रतिमा लेखात कण्हाची प्रतिमा दिसत नाही.
ह्या प्रथम सातकर्णीने सातवाहनांचे राज्य मध्यप्रदेशातल्या विदिशा पर्यंत नेऊन भिडवले असावे असे सांची येथील शिलालेखावरून समजते. हा अत्यंत सामर्थ्यवान सातवाहन राजा. याची पत्नी प्रख्यात सातवाहन सम्राज्ञी नागनिका उर्फ नयनिका. प्रथम सातकर्णीच्या काळातच नाणेघाटाची निर्मिती झाली. नाणेघाटाच्या सुरुवातीचीला कड्यात नागनिकेने गुहा खोदविली तेच सातवाहनांचे एकमेव ऐहिक लेणे. सातवाहनांनी केलेले अश्वमेध, राजसूयादिक यज्ञयाग, त्यात केलेला विपुल दानधर्म तसेच सातवाहनांच्या राजेकुलाच्या प्रतिमा व त्याखाली त्यांची नावे इ. उल्लेख त्यात कोरलेले आहेत.
नाणेघाटातल्या प्रतिमालेखाबद्दल श्री जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ह्या धाग्यावर अधिक माहिती मिळेल.
http://www.misalpav.com/node/18892
नाणेघाटाची नळी
सातवाहनांचे नाणेघाटातील ऐहिक लेणे
नाणेघाटाबरोबरच इतरही अनेक घाटवाटा व त्यांचे संरक्षक दुर्ग मुख्य सह्यधार व त्यांच्या उपत्यकेत निर्माण केले गेले. बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला गेला. ग्रीक, रोमन लोकांबरोबर व्यापाराला सुरुवात झाली. रोम, इस्तंबूल, अलेक्झांड्रिया आदी शहरांमधून येणार्या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल (चौल), कलियान (कल्याण), श्रीस्थानक (ठाणे), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरात येऊन पडू लागल्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून खोदीव घाटमार्ग पार करू लागले व पैठण, तेर, नाशिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. हळूहळू व्यापाराची भरभराट होऊन सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले. राज्य विस्तार पावू लागले. पैठण ही सातवाहनांची राजधानी. तिची किर्ती दूर दूर पसरू लागली व याच व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातवाहनांच्या समृद्ध राज्यात क्षत्रपांचा प्रवेश झाला.
क्षत्रप म्हणजे प्रांताधिपती. क्षत्रप मूळचा संस्कृत शब्द नाही तो पर्शियन भाषेतील शब्द क्षत्रपन यांपासून बनलेला आहे. क्षत्र म्हणजे राष्ट्र. राष्ट्राचा कारभार पाहणारे ते क्षत्रपन. मध्यपूर्वेतून शकांच्या रानटी टोळ्यांची वरचेवर आक्रमणे होऊ लागली. शक मूळात वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेले असल्याने शकांना स्वतंत्र असे नेतृत्व नव्हते. प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असे.
सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले. प्रथम कनिष्काने कच्छ जिंकून तेथे त्याने कार्दमक वंशीय 'चष्टन' याची आपला क्षत्रप म्हणून नेमणूक केली. पुढे कनिष्काने महाराष्ट्राच्या उत्तर भागात 'भूमक' हा क्षहरात वंशी दुसरा क्षत्रप नेमला. क्षहरात हा सुद्धा पर्शियन शब्द असून क्षहर म्हणजे नगर व राद् म्हणजे अधिपती. अर्थात नगराधिपती. भूमकाने गुजरात, काठेवाडाचा काही भाग, माळवा या प्रांतांवर आक्रमण करून त्यांचा ताबा मिळवला. त्याने महाराष्ट्राचा किती प्रदेश जिंकला होता याचे उल्लेख मात्र सापडत नाही. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण राजवट कमजोर होऊन शकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली व ते स्वतःस स्वामी, राजा, महाक्षत्रप अशा विशेषणांनी गौरवू लागले. क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या निरनिराळ्या प्रांतात लहान लहान राज्ये चालवू लागली. मथुरा, पंजाब, तक्षशीला यांवर अंमल करणार्या क्षत्रपांस 'उत्तरी क्षत्रप' तर माळवा, गुजरात, उज्जैन, उत्तर महाराष्ट्र यांवर अंमल करणार्यांस पश्चिमी क्षत्रप म्हणत असत. भूमकाच्या नंतरच्या पिढीतील नहपान क्षत्रपाने सातवाहनांची बरीचशी राज्यलक्ष्मी हरण करून जुन्नर, नाशिक, कोकण, विदर्भ आदी विस्तृत प्रदेश बळकावत सातवाहनांना पार प्रतिष्ठान (पैठण) पर्यंत ढकलले. स्वतः नहपानाने जुन्नर ही राजधानी केली असावी असे काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार मानले जाते. नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा कालउल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.
नहपान क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे
शक क्षत्रपांच्या सततच्या हल्ल्यांनी जेरीस आल्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन गेली. सह्याद्रीतील घाटमार्ग क्षत्रपांच्या ताब्यात गेल्यामुळे सातवाहनांकडे येणार्या संपत्तीचा ओघ खुंटला गेला. तत्कालिन सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात सातवाहन राज्य गलितगात्र होऊन गेले. त्याच्या अमलाखाली फक्त दक्षिण महाराष्ट्राचा भूभाग राहिला होता असे दिसते. अशातच शिवस्वाती सातकर्णी याची पत्नी गौतमी बलश्री हिच्या पोटी एका पराक्रमी पुत्राचा जन्म झाला तोच गौतमीपुत्र सातकर्णी.
गौतमीपुत्र सातकर्णी अतिशय कुशल, धोरणी आणि महाप्रतापी होता. त्याने आपल्या कारकिर्दीच्या पंधरा सोळा वर्षात हळूहळू आपले सामर्थ्य वाढवत नेऊन परकी आक्रमकांच्या दास्यातून आपले साम्राज्य मुक्त करण्याचा निश्चय केला. सर्वप्रथम त्याने विदर्भावर स्वारी करून वेण्णा(वैनगंगा) नदीच्या काठावर असलेल्या पौनी (कुशावती) ह्या नगरीच्या क्षत्रपांचा उच्छेद केला व स्वतःला 'बेणाकटकस्वामी' म्हणून घोषित केले. नंतर त्याने पश्चिमेकडच्या प्रदेशात चाल करून नहपानाने बळकावलेल्या प्रदेशावर आक्रमण केले. त्याची आणि नहपानाची घनघोर लढाई नाशिकजवळच्या गोवर्धन पर्वताजवळ झाली. हा गोवर्धन पर्वत नेमका कुठला ते आता समजत नाही पण हा बहुधा त्र्यंबकेश्वरनजीकचा डोंगरी प्रदेश असावा. तीत नहपानाचा संपूर्ण पराभव होऊन तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधे आश्रयार्थ पळून गेला. या विजयानंतर गौतमीपुत्राने लागलीच नाशिकच्या लेण्यांस भेट देऊन तेथील बौद्ध भिक्षुसंघास 'अजकालकीय' नावाचे शेत निर्वाहासाठी दान केले व तसा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये केला. याच लेखात गौतमीपुत्र स्वत:ला बेणाकटकस्वामी म्हणवतो. नाशिकचे युद्ध गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी झाले होते. गौतमीपुत्राच्या राज्यारंभाचे वर्ष निश्चितपणे माहीत नाही पण नहपानाच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष शके ४६ आहे. त्यानुसार इस. १२५ मध्ये ही घटना घडली असावी.
नाशिक येथील विजयानंतर गौतमीपुत्राने सह्याद्रीमध्ये नहपानाचा पाठलाग करून त्याचा समूळ वंशविच्छेद केला व लागलीच कार्ले येथील लेणीला भेट देऊन तिथल्या बौद्ध संघाला निर्वाहासाठी करजक नावाचे गाव दान देऊन तसा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरविला. दोन्ही शिलालेखांतील वर्णनानुसार ह्या दोन युद्धात सुमारे पंधरा दिवसांचे अंतर होते असे दिसते. गौतमीपुत्राच्या कार्ले शिलालेखावरून नहपानाचा विच्छेद मावळप्रांती झाला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या युद्धात फार मोठी कत्तल झाली. गौतमीपुत्राने नहपानाची सर्व नाणी जप्त करून त्यावर पुन्हा आपली मुद्रा उमटवून ती नाणी परत वापरात आणली. अशी जवळजवळ तेरा हजार नाणी सापडली आहेत.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदीचे नाणे
नहपानाच्या पराभवानंतर स्वस्थ न बसता गौतमीपुत्राने आणखी मोहिमा उघडल्या व गुजरात, राजस्थान, ओरिसा, मध्यप्रदेश इ प्रदेशापर्यंत त्याचा राज्यविस्तार केला. ह्या पराक्रमामुळे त्याची किर्ती संपूर्ण भरतखंडात पोहोचली.
क्षहरात कूळ समूळ नष्ट केल्याबद्दल त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले गेले. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा गौरवपूर्वक उल्लेख केला गेला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असेही त्याला म्हटले गेले. उत्तर,दक्षिण मोहिमांमध्ये गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असे म्हटले गेले आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' अर्थात एक ब्राह्मण म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदम' असेही नाशिक शिलालेखात म्हटले आहे.
गौतमीपुत्रानंतर त्याचा पुत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी गादीवर आला. हा सुद्धा आपल्या पित्यासारखाच पराक्रमी होता. गौतमीपुत्राच्या निधनानंतर उज्जैनचा महाक्षत्रप कार्दमकवंशीय रूद्रदामन आणि सातवाहन यांच्यात सख्य होऊन रूद्रदामनाने आपली कन्या पुळुवामीला दिली. पण तरीही सातवाहन आणि क्षत्रपांमधले संघर्ष चालूच राहिले. वासिष्ठिपुत्र पुळुवामीला नर्मदेच्या उत्तरेचा प्रदेश आणि कोकणचा काही भाग गमवावा लागला. रूद्रदामनाने वासिष्ठिपुत्र पुळुवामीचा दोनदा पराजय केला पण तो जावई असल्यामुळे त्याचा समूळ उच्छेद केला नाही असे त्याने गौरवाने जुनागढच्या शिलालेखात कोरून ठेविले आहे. या शिलालेखातच पुळुवामीचा उल्लेख 'दक्षिणापथपति' असा केला आहे यावरून पुळुवामीच्या सामर्थ्याची कल्पना यावी. ह्याला उत्तरेकडचा थोडासा प्रदेश जरी गमवावा लागला असला तरी ह्याने दक्षिणेत प्रचंड विस्तार करून आख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात आणला होता.
रूद्रदामन क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे
पुळुवामीनंतर गौतमीपुत्र श्रीयज्ञसातकर्णी हा गादीवर आला. हा सुद्धा स्वतःच्या नावापुढे गौतमीपुत्र असे बिरुद लावत असे. हा शेवटचा महाप्रतापी सातवाहन सम्राट. याने अपरान्ताचा गमावलेला प्रदेश पुन्हा एकदा रूद्रदामनाच्या वंशजांकडून जिंकून घेतला व सातवाहन राज्ये पुन्हा एकदा कळसास पोचवले. ह्याने सत्तावीस वर्षे राज्य केले व आपली सत्ता पश्चिमसमुद्रापासून पूर्वसागरापासून प्रस्थापित केली. विदिशा व काठेवाडापर्यंतही त्याचा अंमल असावा असे काही तेथे सापडलेल्या यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवरून दिसते. पुळुवामी आणि यज्ञसातकर्णीने शिडाच्या जहाजांची मुद्रा असलेली नाणी पाडली होती यावरून त्यांचे समुद्रावरचे प्रभुत्त्व सिद्ध होते.
वासिष्ठिपुत्र सातकर्णीचे शिडाच्या जहाजाची मुद्रा असलेले नाणे
श्री यज्ञ सातकर्णीचे नाणे
श्री यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या साम्राज्याच्या र्हासाला प्रारंभ झाला. सातवाहनांची सामंत घराणी प्रबळ होत जाऊन त्यांनी पैठणची सातवाहनांची केंद्रिय सत्ता झुगारून दिली. व्यापारही बंद पडू लागल्याने सातवाहन साम्राज्य कमजोर होत गेले. उत्तरेत इशवदात (ईश्वरदत्त) महाक्षत्रपाने शके १५१ (सन. २२९) मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचा पाडाव करून सत्ता बळकावली. ह्या ईश्वरदत्ताने सुमारे २० वर्षे राज्य केले असावे. इस. २५० मध्ये पुन्हा एकदा राज्यक्रांती होऊन आभीरवंशीय ईश्वरसेनाने क्षत्रपांचा पराजय करून उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. याच्या आधीच इस. २३० मध्ये विदर्भातही सातवाहनांची सत्ता संपुष्टात येऊन मुंडवशीयांनी आपले राज्य स्थापन केले व सातवाहन पूर्णतः दक्षिणेत (आंध्रात) ढकलेले गेले व दक्षिणेतही थोडक्याच कालावधीत त्यांचा इक्ष्वाकूवंशी शतमूलाने पाडाव केला व सातवाहन सत्ता पूर्णपणे लयास गेली.
गुजरात, काठेवाड, माळवा ह्या पश्चिमेकडच्या प्रदेशात मात्र पश्चिमी क्षत्रपांचा अंमल गुप्तांच्या राजवटीपर्यंत चालू राहिला. समुद्रगुप्ताने विदिशेपर्यंत गुप्त साम्राज्य स्थापन केले व त्याच्या पुढे चंद्रगुप्ताने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व अशा तर्हेने जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत आपल्या साम्राज्यात आणला व तत्पुर्वी खाली दक्षिणेत सातवाहनांची राजवट संपूर्ण नष्ट होऊन लहान लहान प्रांतिक राज्ये निर्माण होऊन दक्षिण भारताचा चेहरामोहरा बदलला.
अशा तर्हेने एक वैभवशाली राज्य समाप्त झाले. सातवाहनांनी विस्तृत प्रदेशात केवळ दिर्घकाळ राज्य केले इतकेच नव्हे तर स्थापत्य, कला, साहित्य, संस्कृती, शिल्प, चित्रकला यातही संस्मरणीय अशी प्रगती केली. व्यापारास उत्तेजन देऊन जनतेस सुखी, समृद्ध केले आणि परकियांशी प्राणपणाने लढून आपले गमावलेले राज्य परत मिळविले व मातृभूमीस स्वतंत्र केले. याकाळात सातवाहनांची सतत क्षत्रपांबरोबर लहानमोठी युद्धे होत राहिली. प्रदेश मिळवावे लागले, गमवावे लागले. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० ह्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी महाराष्ट्र देशी तसेच आंध्रातही सत्ता टिकवून धरली व महाराष्ट्राचे पहिले स्वतंत्र ज्ञात राज्यकर्ते झाले. ह्या सातवाहनांनीच सह्याद्रीत बांधलेल्या बहुतांश किल्ल्यांचा वापर गुप्तांनी,चालुक्यांनी, राष्ट्रकूटांनी, शिलाहारांनी व नंतर यादवांनी केला तसेच अधिक किल्ले बनवून भरही घातली. यादवसत्तेच्या पाडावानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी मात्र हे किल्ले, येथील प्रदेश आपल्या साम्राज्यात आणिला पण पुढे ह्याच सह्याद्रीच्या एका सातवाहननिर्मीत शिवनेरी नामक दुर्गावर छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व पुढे ह्याच किल्ल्यांच्या सहाय्याने तसेच नवे किल्ले उभारून महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचे दिवस दाखवले. असे सातवाहनांचे मोठे ऋण इये देशी आहे.
सातवाहन राजघराण्याचा इतिहास- भाग १
- November 13, 2018
- By Shantanu Paranjape
- 0 Comments
![]() |
| नाणेघाटातील भलामोठा लेख |
![]() |
| नाणेघाटातील भलामोठा लेख Photo Credits- Google Images |
![]() |
वाशिष्ठीपुत्र सातकर्णी याचे नाणे Reference- www.indianetzone.com |
![]() |
| Roaring lion standing left facing yupa (sacrificial altar), with Brahmi legend 'Siri Satavahanasa' above and 3-arched hill belowRef: www.vcoins.com |
त्यामुळे सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा मूळ कर्ता नक्कीच ठरत नाही. सातवाहन याच्या नंतर पुढे कधीतरी हा सिमुक गादीवर आला असावा असे वाटते. याचा उल्लेख नाणेघाटात असणाऱ्या नायनिकेच्या लेखात येतो. नाणेघाटात या सर्व राजांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि त्याच्या खाली त्यांची नावे दिलेली आहेत. तिथे याचा उल्लेख ‘सिमुक सातवाहनो’ असा आलेला आहे. या राजाने खुप मोठा पराक्रम गाजवला हे नाणेघाटातील लेखावरून कळून येते. नायनिका ही एका शूर, वीर व अजिंक्य राजाची स्नुषा होती असे वर्णन नाणेघाटात आलेले आहे. या लेखाचा बराच भाग हा उडाला आहे, तो जर मिळाला असता तर कदाचित या सिमुकाबद्दल अधिक माहिती मिळू शकली असती. पुराणात सुद्धा याच सिमुकापासून वंशावळ सुरु झाल्याचे दिसून येते. सिमुकानंतर काही वेळ श्री सातकर्णी मोठा होईपर्यंत सिमुकाचा भाऊ कृष्ण याने सत्ता सांभाळली होती. या कृष्णाचा उल्लेख हा नाशिकच्या लेण्यात आढळतो तो म्हणजे ‘सातवाहनकुले कन्हे राजिनि’. सातवाहन कुळात कृष्ण नावाचा राजा राज्य करत असताना समण नावाच्या एका माणसाने हे लेणे कोरले असा त्याचा अर्थ.
- हे फोटो श्री जोगळेकर यांच्या गाथा सप्तशती या पुस्तकातील आहेत. त्यांनी प्रत्येक राजाचे सुंदर विश्लेषण केले आहे
आजचा महाराष्ट्र निर्माण करणारे सातवाहन!
ज्ञात इतिहासातील महाराष्ट्राचे आद्य राजघराणे म्हणजे सातवाहन आणि याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णीने शक नृपती नहपान या महाराष्ट्र गिळंकृत करणा-या सम्राटावर महाविजय प्राप्त करून महाराष्ट्र परकीय जोखडातून मुक्त केला आणि राजकीय दृष्ट्या आजच्या महाराष्ट्राला एक तर केलेच पण आपल्या साम्राज्याच्या सीमा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही विस्तारल्या.
महाराष्ट्राला भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आजच्या मराठी भाषेची पूर्वज माहाराष्ट्री प्राकृत भाषेलाही देशव्यापी माहात्म्य प्राप्त करून दिले. इतके कि उत्तर भारतातील विद्वानही माहाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असत.
आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण दुर्दैवाने आम्हीच मराठी माणसे एवढी कृतघ्न कि सातवाहन घराण्याचे आमच्यावरील अपार ऋण तर विसरलोच, पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याशी संबंध नसलेल्या भाकडकथांवरच जास्त विश्वास ठेवत गेलो आणि या उत्सवाचे मांगल्य आणि महत्व विसरून गेलो. या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आला अशी कथा असो कि या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरु केली अशी उत्तर काळातील व्रतराजामध्ये येणारी कथा असो, तिच्यावरच आम्ही अंधश्रद्धेने विश्वास ठेवत गेलो आणि या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपून बसलो. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पहायला हवा.
इसवीसनपूर्व २२० मध्ये महाराष्ट्रातील जुन्नर भागात आंद्रा नदीच्या खो-यात सातवाहन घराणे उदयाला आले. आंद्राचे कृत्रिम संस्कृत रूप बनवण्याच्या नादात पुराणकारांनी त्याचे रूप आंध्र असे बनवून या घराण्याचे मुलनामही बदलण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. या घराण्याचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकसंघ नव्हता. अनेक राज्यात वाटला गेला होता. आंदरा नदीच्या खो-यातील असल्याने स्वाभाविकच जुन्नर ही या घराण्याची पहिली राजधानी बनली. छिमुख सातवाहन हा या घराण्याचा मुळपुरुष. पुढे राज्याचा विस्तार वाढल्यानंतर पैठण येथे राजधानी हलवली गेली. ही सत्ता पुढे साडेचारशे वर्ष, म्हणजे इसवी सन २३० पर्यंत कायम राहिली.
या घराण्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळची उभारणी सातवाहन काळात झाली. “तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन” अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, विमल सुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य “पउमचरीय’, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखा नितांतसुंदर काव्यसंग्रह, “तरंगवई”, “पउमचरीय”सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली.
आजही महाराष्ट्राचे भूषण असलेल्या असंख्य लेणी खोदायची सुरुवातही त्यांच्याच उदार सहाय्याने झाली. पुर्वी रट्ठांचा (रठ्ठ म्हणजे छोटा प्रदेश) समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले व या भूभागाला महारठ्ठ (संस्कृतमध्ये महाराष्ट्र) हे सार्थ नाव दिले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच. त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही.
या घराण्याने साडेचारशे वर्ष राज्य केले असले तरी हा सर्वच प्रवास निर्वेध झाला नाही. त्यात अडथळेही आले. यात क्षहरात वंशाच्या नहपान या सम्राटाने महाराष्ट्रावर आक्रमण केले. त्यांच्या रानटी आक्रमणात महाराष्ट्र चिरडला गेला. कुशाण सत्ताधा-यांनी विविध प्रान्तांवर नेमेलेल्या शक क्षत्रपांमधून हे घराणे उदयाला आले. मंदसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्वाकांक्षी होता. त्याने सत्तेत येताच आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवाहनचा पराजय केला. त्याने नाशिक, पैठण जिंकून तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला. कोकणही सातवाहनांच्या ताब्यातून घेऊन तेथील व्यापारी बंदरांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. सातवाहनांचे राज्य सातारा व क-हाड भागापुरतेच उरले. अशाच काळात सातवाहन घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला. हा धाडसी, शुर तर होताच पण अत्यंत धोरणी होता. आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्याने ओळखून गनिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरु केला. स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले. हा लढा सोपा नव्हता. नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिणेतही विस्तारलेले होते. तब्बल वीस वर्ष हा संघर्ष चालला. दरम्यान एका आख्यायिकेनुसार गौतमीपुत्राने काही कुशल हेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाठ दानधर्म करायला उद्युक्त तर केलेच पण त्याच्या सैन्यदलाची अनेक गुपिते माहित करून घेतली. शेवटी त्याने नाशिक जवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निकराचे युद्ध केले आणि इसवी सन ७८ मध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात वंस निर्वंस करस.” (क्षहरात वंशाला निर्वंश केले.) महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला. “पेरीप्लस ऑफ अरेथ्रीयन सी” या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमीपुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन आलेले आहे.
शकांपासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य. या स्वातंत्र्योत्सवाचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरु केले. जैन मराठी प्राकृतात सातवाहनचा उच्चार सालाहन असा केला जात असे. त्याच शब्दाचे संस्कृत रुपांतर शालिवाहन शक होय. हा आनंद घोषित करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. तेव्हापासून या दिवसाला गुढीपाडवा म्हणायची प्रथा निर्माण झाली जी आजतागायत सुरु आहे, पण मुळचे कारण मात्र आपल्याला माहित नसावे हे एक दुर्दैव होय.
सातवाहन घराणे हे तत्कालीन खुल्या समाजव्यवस्थेतून आलेले. त्यांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. बौद्ध-जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला. जैनांची लोहगड, पाले व खानदेशातील लेणीही याच काळात निर्माण झाली. नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यात त्यांचे महत्वाचे शिलालेख कोरलेले आहेत. यात भिक्षुसंघाला दिलेले दानलेखही आहेत. त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले. पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेउल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे. त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे. उद्योग-व्यवसायाला व विदेश व्यापाराला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. साहित्यदृष्ट्या हा काळ अपार समृद्धीचा होता. रामावरील पहिले महाकाव्य मराठी प्राकृतात त्यांच्याच कारकिर्दीत इसवी सन ४ मध्ये लिहिले गेले असावे ही बाब तर मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी. शास्त्र-विज्ञान यातही त्यांच्या काळाने अद्भुत प्रगती केली. एकंदरीत सातवाहन हे आजच्या महाराष्ट्राचे सर्व दृष्ट्या संस्थापक होत.
आणि याच घराण्याच्या बलशाली सम्राटाने, गौतमीपुत्र सातकर्णीने शक आक्रमकावर जो महान विजय प्राप्त करून त्याला युद्धात ठार मारले या महाविजयाची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्योत्सवाची ही स्मृती आजही आपण गुढीपाडव्याच्या रूपाने ठेवतो. घरोघर गुढ्या उभारून या महान सम्राटाला मानवंदना देत असतो. फक्त त्यामागील इतिहास तेवढा आपल्याला माहित नसतो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे कि जेथेही सातवाहनांचे साम्राज्य होते तेथेच हा उत्सव साजरा केला जातो, अन्यत्र नाही.
-संजय सोनवणी
सातवाहन
आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. सिमुक (किंवा सिंधुक) सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्यापुर्वी ते काण्व राजांचे महाराष्ट्रातील मांडलिक असावेत असे पुराणे सुचवतात. डा. अजय मित्र शात्री यांच्या मते ते मौर्य घराण्याचे महाराष्ट्रातील राज्यपालही असू शकतील. ही सत्ता साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला. महाराष्ट्राची आजच्या संस्कृतीचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" (औंड्र...ओंडर...आंदर...मावळ) असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसल्या असाव्यात. आंध्र नांवामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच "आंध्र जातीय" असाही केला आहे. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातीलच मुळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय येण्याचे कारण नाही कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजानेच शासित केलेला प्रदेश असल्याने व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्याने एखादी शाखा प्राचीन काळीच महाराष्ट्रातही वसली असल्यास आश्चर्य नाही.
महाराष्ट्रात सातवाहन पुरातन काळापासून वसले असल्याचा पुरावा म्हणजे सातवाहनांचे आरंभीचे सारे शिलालेख हे जुन्नर, पैठण व नाशिक प्रांतातच सापडलेले आहेत. पौंड्र जसे बंगाल-ओरिसातही होते तसे ते महाराष्ट्रातही होते हे आपण श्री विठ्ठलाच्या संदर्भात पाहिलेलेच आहे. या औंड्र लोकांचे मुलस्थान ओडिसा असण्याची शक्यता अधिक आहे कारण यांना महाभारतात राजा बळीचे पुत्र म्हटलेले आहे. पशुपालक असल्याने त्यांचे दक्षीणेकडे पांगणे व नंतर त्या त्या भागात स्थायी होणे स्वाभाविक आहे. सनपुर्व चवथ्या -पाचव्या शतकानंतर ते सनपुर्व दुस-या शतकाच्या काळात महाराष्ट्र व आंध्रात मेंढपाळ लोकांचेच मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते. शेती अजून फारच प्राथमिक अवस्थेत होती व फक्त नद्यांच्या काठांवरच होत होती असे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. यासाठी आपल्याला महापाषाणयुगाचा आधार घ्यायला लागेल.
महापाषाणयुग
ताम्रपाषाण युगाच्या अस्ताच्या काळात (सनपूर्व १२००) महारष्ट्रात शुष्क हवामानाचा काळ सुरू झाला. पर्जन्यमान खूप घटले. आद्य शेतक-यांच्या ज्याही काही थोडक्या वसाहती होत्या त्याही निर्मनुष्य झाल्या. तरीही शेळ्या-मेंढ्या घेऊन निमभटके धनगर महाराष्ट्रात तग धरून राहिले. इसपू आठव्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात पाषाणयूग अवतरले. या काळाचे सर्व पुरावे मध्य भारत व दक्षीण भारतात मोठ्या प्रमानावर मिळून आलेले आहेत. खानदेश, विदर्भ व माराठवाड्यांतील पुरावे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या काळाला महापाषाणयुग म्हणण्याचे कारण म्हणजे या लोकांनी बांधलेली थडग्याभोवतीची मोठ्या शिळांची वर्तुळे. ही विशिष्ट प्रकारची दफनपद्धती होती. यात प्रेतास अथवा त्याच्या अस्थिंना खड्ड्यात पुरले जाई व सोबत अनेक मातीच्या भांड्यांतून मृतासाठी अन्नपाणी ठेवले जाई. याखेरीज कु-हाडी, तलवारी, भाले, घोड्यांचे अलंकारही पुरले जात व थडग्याभोवती शिळांची वर्तुळाकार रचना करण्यात येई.
या शिलावर्तुळांच्या आसपास या लोकांच्या काही तात्पुरत्या वसाहतीही सापडलेल्या आहेत. नायकुंड येथे गोल झोपड्यांचे अवशेष मिळाले असून त्यामुळे महापाषाणयुगातील लोक गोल झोपड्यांमध्ये राहत असावेत असे मत अजय मित्र शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.. झोपडीच्या आतल्या बाजुस दोन मोठे खड्डे सापडले असून त्यात शेळ्या-मेंढ्या, हरिणांची अर्धवट जळकी हाडे सापडलेली आहेत. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते स्थिर लोकांची प्रवृत्ती ही आयताकृती घरे बांधण्याची असते तर अस्थिर-निमभटके लोक गोलाकार घरे बांधतात असे डा. म. के. ढवळीकर यांनी नोंदवलेले आहे. (महाराष्ट्र राज्य ग्यझेटियर; इतिहास-प्राचीन काळ, खंड १, पान १००)
शेळ्या-मेंढ्यांचे अवशेष आणि निमभटक्या लोकांना साजेशा गोलाकार झोपड्या सापडणे, घोड्यांचीही दफने सापडने यावरुन हे सिद्ध होईल कि सनपुर्व आठव्या शतकापासून महाराष्ट्रात धनगरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते तर स्थिर वसत्यांचे प्रमाण नगण्य होत गेले होते. ढवळीकर म्हणतात, "महापाषाणयुगीन लोक फक्त पावसाळ्यापुरते एका ठिकाणी वसती करुन राहत. उरलेल्या आठ महिन्यात मात्र भटके जीवन जगत असावेत. कारण उदरनिर्वाहासठी ते पशुपालन व मेंढपालनावर अवलंबून होते."
यावरुन हे स्पष्ट होते कि महाराष्ट्र तसेच आंध्र या काळात निमभटक्या मेंढपाळांनी व्यापलेला होता. नागर संस्कृतीने पुन्हा बस्तान बस्तान बसवायला सनपुर्व तिनशेपर्यंत वेळ घेतला असला तरी प्राबल्य हे मेंढपाळांचेच होते. त्यामुळे स्थानिक सत्ताही त्यांच्याच असणे स्वाभाविक आहे. दफनांची ही वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती त्यांनी प्राकृतिक उत्पातामुळे केली असली तरी ती नंतर त्यांनी सोडून दिली. पाषाणदैवते मात्र कायम राहिली.
सातवाहन नांव
सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप)
सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसेच स्विकारावे लागते. सादकणीचे कृत्रीम रूप संस्कृतात सातकर्नी करुन "सात कानांचा असा अर्थही कसा चुकीचा होतो असे विद्वानांनीच मान्य केले आहे. थोडक्यात सातवाहन या नांवाचा (जसा महाराष्ट्रातील अनेक आडनांवांचा आज अर्थ लागत नाही.) अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे.
पण सर्वात मोठी कमाल डा. अजय मित्र शास्त्री व वा. वि. मिराशींनी केली आहे. त्यांनी सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवायचा प्रयत्न केला आहे. त्याचेही निराकरण येथे करणे गरजेचे आहे.
नाशिकच्या वासिष्टीपुत्र पुलुमावि याच्या शिलालेखात "एकबम्हण" आणि "खतियदपमानमदन" या शब्दांचा त्यांनी "गौतमीपुत्र सातकर्णी हा अनुपम अथवा अद्वितीय ब्राह्मण होता व त्याने क्षत्रियांचा गर्व व अभिमानाचे दमन केले होते." असा घेतला आहे. मिराशींनीही हाच कित्ता गिरवला आहे. सातवाहन ब्राह्मण असते तरी आम्हाला त्यावर आक्षेप नव्हता, पण जे नाही ते कसे स्विकारले जाणार?
पहिली बाब ही लक्षात घेतली पाहिजे कि पुराणे सातवाहनांना स्पष्टपणे शूद्र म्हणतात. एवढे मोठे ब्राह्मण राजघराणे असते तर पुराणांनी त्यांना शूद्र म्हणण्याचे धादस केले नसते. उलट महाकाव्ये लिहिली असती. दुसरी बाब म्हणजे "औंड्र" (आंध्र) हे शुद्रच आहेत असे ऐतरेय ब्राह्मणानेही म्हटलेले आहे. महाभारतात त्यांना बळीराजाचे पुत्र म्हणजेच असूर म्हटले आहे. आरंभीच्या सातवाहनांचा नागवंशीयांशी रक्तसंबंध होता हे तिसरा सातवाहन राजा याच्या राणीच्या "नायनिका" (नागनिका) या नांवावरुनही स्पष्ट होते. एवढे सारे असतांना "एकबम्हण" या एकाच ठिकाणी येणा-या एकाच शब्दावरून त्यांना ब्राह्म्कण ठरवायचा प्रयत्न करणे याला मी वर्चस्ववाद करत सांस्कृतिक अपहरणाचा कट म्हणतो.
सातवाहन जर वैदिक असते तर सातवाहन या शब्दाचा वैदिक अर्थ लागला असता, पण तो तसा लागत नाही हे आपण पाहिले. ते वैदिक असते तर शिलालेखात त्यांच्या गोत्राचा उल्लेख अवश्य आलाच असता, पण तो येत नाही.
दुसरे असे डा. डी. आर. भांडारकर यांनी एकबम्म्हण या शब्दाचा अर्थ "ब्राह्मणांचा रक्षक" असा घेतला आहे. खतिय हा शब्द क्षत्रियांना उद्देशून नसून शक क्षत्रपांना उद्देशून आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. के. गोपालाचारीही या मताशी सहमत आहेत. इतिहासकार शैलेंद्र नाथ सेन आपल्या Ancient Indian History and Civilization ग्रंथात स्पष्टपणे म्हणतात कि सातवाहन राजे सहिष्णू असल्याने त्यांनी बुद्धिष्ट लेण्यांना जशी दाने केली तशीच ब्राह्मणी धर्मालाही आश्रय दिला व स्वत:ला एकबम्म्हण म्हणवून घेतले. (पान १७४)
गौतमीपुत्र सातवाहनाने नहपान या शक क्षत्रपाचा उच्छेद करुन गमावलेले साम्राज्य मिळवले होते. हे लक्षात घेता क्षत्रपांना (Xathroi) खतियांचा गर्व उतरवणारा असे सातवाहन म्हणत असतील तर या शब्दाचा अर्थ परशुरामाप्रमाणे क्षत्रियांचा गर्व उतरवणारा असा करुन मिराशी व शास्त्री आपला फुकाचा गर्व वाढवत आहेत हे उघड आहे. या संदर्भात माझा एक लेख महाराष्ट्र टाईम्समधे प्रकाशित झल्यावर रविकिरण साने यांनी सातवाहन ब्राह्मणच या अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. त्याला मी उत्तर दिले होते. म. टा. ने ते प्रसिधही केले. ते मी येथे त्तसेच्या तसे देत आहे, म्हणजे सांस्कृतिक लबाड्या आजही कशा सुरु आहेत हे तुमच्या लक्षात येईल!
"मटा’च्या १ एप्रिलच्या (२०१२) अंकात माझ्या "गौतमीपुत्राच्या विजयाची परंपरा" या लेखावरील श्री. रविकिरण साने यांचा "शककर्ते सातवाहन ब्राम्हणच!" हा प्रतिसाद वाचला. महत्वाचे सर्व पुरावे सोडुन द्यायचे आणि एका शिलालेखातील "एक बम्हण" (साने म्हणतात तसे एक ब्राह्मण" नव्हे. प्रत्त्येक प्राक्रुत शब्दाचे संस्क्रुतीकरण करण्याचा हा छंद बरा नव्हे. शिवाय या शब्दापुढील शिलालेखातील शब्द कालौघात तुटले आहेत त्यामुळे त्यापुढे मुळात काय लिहिले होते हे समजायला मार्ग नाही.) या शब्दाचा अर्थ फारतर "ब्राह्मणांचा संरक्षक" एवढाच घेता येतो, "आपण ब्राह्मण आहोत" असा नव्हे. तसाच घोळ सानेंनी "खतियदपमानदमन" या शब्दाबाबत घातला असून त्याचा अर्थ ते क्षत्रियांचे गर्वहरण करणारा असा लावतात. सातवाहनांनी गर्व उतरवला तो नहपान या शक क्षत्रपाचा पुर्ण पराजय करुन. "खतीय" शब्द येथे क्षत्रियासाठी येत नसून क्षत्रपांना उद्देशुन आहे व ते ऐतिहासिक वास्तवही आहे.
साने अजुन पुढे जातात व ते म्हणतात यद्न्य करण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच होता. त्यांचे म्हणने अर्धवट खरे आहे. मुळात ब्राह्मणांना राजसुय व अश्वमेध यद्न्य करण्याची परवानगी मनुस्म्रुती, याद्न्यवक्ल्य स्म्रुती, नारद स्म्रुती अशा अनेक स्म्रुतींनी दिलेलीच नाही. हे यद्न्य फक्य क्षत्रियांसाठीच राखुन ठेवलेले आहेत. बहुदा सानेंनी स्म्रुत्या कधी वाचल्या नसाव्यात, म्हणुन त्यांचा असा घोळ झाला असावा. त्यामुळे सातवाहन ब्राह्मण होते हा त्यांचा बालसुलभ अट्टाहास पुरा होवू शकत नाही. वास्तव हे आहे कि ऐतरेय ब्राह्मणाने औंड्र, पुंड्र, शबर, मुतीब, पुलिंद ई. पन्नास शुद्र जाती दक्षीणेत राज्य करतात असे स्पष्ट म्हटले आहे. महाभारतात याच जमातींना असुर राजा महाबळीचे पुत्र मानलेले आहे. हा समाज पशुपालकच होता. आजचे धनगर/कुरुब/गोपालक हे त्यांचेच वंशज. पेरिप्लसही त्यांचा उल्लेख "आंड्रेई" ( Andarae) असाच करतो. वायु पुराण, मत्स्य पुराण ते अन्य सर्वच पुराणे त्यांना "आंध्र" व काहींना "आंध्रभ्रुत्य" असेच म्हणतात. हे बहुदा सानेंनी पाहिले नसावे. जर सातवाहन ब्राह्मण असते तर पुराणकारांनी तसे स्पष्ट म्हटले असते व त्यांना डोक्यावर घेत महाकाव्येही लिहिली गेली असती. पण तसे झालेले नाही. त्यामुळे आंध्र राजे (अर्थात औंड्र सातवाहन) हे वैदिक व्यवस्थेने शुद्रच (अवैदिक) मानले होते असे स्पष्ट दिसते.
दुसरे असे कि सातवाहनांचे नाणेघाट वगळता सर्वच्या सर्व शिलालेख बौद्ध लेण्यांत आहेत. मुळात जवळपास सर्वच लेण्यांची कामे सातवाहनांनीच सुरु केली, उदारपणे देणग्या दिल्या. मग खरे तर त्यांना आपण बौद्ध धर्मीयच ठरवायला पाहिजे. पण तसे कोणी म्हणत नाही. पण फक्त एका "एक बम्हण" शब्दावरुन सातवाहनांना चक्क ब्राह्मण ठरवण्याचा जोर लावत प्रयत्न करायचा हे मात्र अनाकलनीय आहे. सत्य हे आहे कि तत्कालीन सर्वच राजे हे आजच्यासारखे जातीयवादी नव्हते. ते सर्वच धर्मांना उदारपणे सहाय्य करत. त्यामुळे त्यांनी असंख्य लेण्यांना, जैन धर्मियांना मदत केली तशीच वैदिकांच्या समाधानासाठी काही यद्न्यही केले, एवढाच त्याचा अर्थ होतो. "सालाहण" हा शब्द जसाचा तसा नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात आलेला आहे, त्यामुळे सानेंच्या अद्न्यानाधारित कुतर्कावर मी अधिक भाष्य करत नाही. एनकेन प्रकारेन इतिहासातील सर्वच महनीयांना एक तर मारुन मुटकुन ब्राह्मण ठरवायचे किंवा त्यांच्या बोकांडी ब्राह्मण बसवायचे असले असांस्क्रुतिक इतिहास विघातक उद्योग आता तरी बंद व्हावेत.
आता त्यांनी संस्क्रुतबाबत काही अनैतिहासिक विधाने केली आहेत व ते त्यासाठी ऋग्वेदाच्या काळाचा दाखला देतात व संस्क्रुत भाषा पुरातन आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. संस्क्रुत भाषा ही मुळात प्राक्रुतावर संस्कार करत बनवली गेलेली क्रुत्रीम भाषा आहे याबाबत कोणाही विद्वानाचे दुमत नाही. म्हणजेच प्राक्रुत भाषा याच पुरातन ठरतात. प्राक्रुतचा अर्थच "मुळचा" असा आहे तर संस्क्रुतचा "संस्कारित". आता प्रश्न असा कि संस्क्रुत नेमकी बनली कधी? पहिली बाब म्हणजे संस्क्रुत म्हनता येईल अशा (प्राक्रुत-संस्क्रुत मिश्रीत) भाषेतील पहिला शिलालेख मुळात शक छत्रप रुद्रदामनाच्या काळातील, म्हणजे इस. १६० चा आहे. तत्पुर्वीचे भारतभरचे व्रज, मागधी, पाली, माहाराष्ट्री प्राक्रुत, तमिळ ई भाषांतले शिलालेख इसपु 1000 पासुन आढळतात. संस्क्रुतचा एकही नाही. दुसरे असे कि संस्क्रुतमद्धे ताम्रपट, शिलालेख क्रमश: वाढण्याचे प्राबल्य हे इसच्या चवथ्या शतकानंतरचे आहे व हे सर्व लेख ब्राह्मी (क्वचित खरोष्टी) लिपीतील आहेत. संस्क्रुतची स्वत:ची अशी कधीही लिपी नव्हती. आजही नाही. आज जिला आपण देवनागरी म्हणतो ती मुळची नागरी लिपी असून तिला "देव" हा शब्द उत्तरकाळात चिकटवला गेलेला आहे. ऋग्वेद हा मुळ "पर्शियन" भाषेच्या पुरातन रुपात (अवेस्तन) लिहिला गेला होता. हा धर्म भारतात धर्मांतरांच्या माध्यमातून पसरला. ऋग्वेदाचा भुगोल व भाषेतील दुवे या मताशी मेळ खातात. पुढे बौद्ध धर्म वाढतोय हे लक्षात येताच पाली भाषेचे अनुकरण करत (पाली हीसुद्धा क्रुत्रीम भाषा आहे.) वैदिक संस्क्रुत भाषा क्रुत्रीमपणे सर्वच प्राक्रुत भाषांतील शब्द घेत (अगदी द्रवीडी भाषेतीलसुद्धा) बनवली गेली. उपलब्ध ऋग्वेदातील भाषा ही पाणिनीय संस्क्रुतची पुर्वावस्था मानली जाते. पाणिनीने सरासरी इ.स. च्या तिस-या शतकात "अष्टाध्यायी" लिहुन संस्क्रुतचे नियमबद्ध व्याकरण बनवले. रामायण, महाभारत, ते सर्वच पुराणे ही पाणिनीच्या व्याकरणाचे नियम पाळत असल्याने त्यांची संस्क्रुत भाषेतील निर्मिती ही पाणिनीनंतरच्या काळातील आहे हेही उघड आहे. मुळ प्राक्रुत ग्रंथांचे संस्क्रुत भाषांतर नंतर केले गेले. आज आढळणारी सर्वच पुरातन मानली जाणारी महाकाव्ये अंतिम संस्कार होवुन तिस-या-चवथ्या शतकातच तयार झाली याबाबतही विद्वानांत कसलेही दुमत नाही. म्हणजेच ती मुळ अन्य प्राक्रुत भाषांत लिहिली गेलेली होती...जशी गाथा सप्तशती, लीलावती, कथासरित्सागर, सिंहासन बत्तीशी इ. दुसरे असे कि संस्क्रुत हा शब्द खुद्द ऋग्वेदापासुन ते तिस-या शतकापर्यंतच्या ग्रंथांत एकदाही येत नाही. तो येतो सर्वप्रथम रामायणात, ज्याचे अंतिम संस्करण चवथ्या शतकात झाले. पाणिनीही "छंदस"चे व्याकरण लिहित होता...तो स्वत:ही आपण संस्क्रुतचे व्याकरण लिहित आहोत असे म्हणत नाही...विपुल बौद्ध व जैन साहित्यातही "संस्क्रुत" हा शब्द येत नाही.
मग ज्या भाषेला चवथ्या शतकापर्यंत स्वतंत्र नांवही नव्हते ती भाषा पुरातन कशी? असती तर अन्य प्राक्रुत साहित्य जसे आपापल्या भाषांचे अभिमानाने उल्लेख करते तसे संस्क्रुत साहित्यातही घडले असते. सत्य हे आहे कि बौद्धांनी धर्मप्रचारासाठी पाली विकसीत केल्यानंतर वैदिक समाजाने संस्क्रुत भाषा तयार करायला सुरुवात केली. संस्क्रुत ही नितांतसुंदर भाषा आहे हे खरे, पण तिचा काळ कसल्याही स्थितीत दुस-या शतकाच्या पलीकडे जावू शकेल असा एकही पुरावा उपलब्ध नाही. सानेंच्या तर्काने आणि व्रुथाभिमानाने संस्क्रुत साठ हजार काय, सहा अब्ज वर्षांपुर्वीही तयार झाली असू शकेल आणि असे म्हणायला काय जाते? ज्याचे पुरावेच अस्तित्वात नसतात त्याबद्दलच अशी विधाने असू शकतात.
थोडक्यात सातवाहन ब्राह्मण तर नव्हतेच आणि संस्क्रुतचा उदयही त्यांच्या काळात झालेला नव्हता."
मला वाटते, वरील उत्तर सातवाहनांच्या मुळ स्वरुपावर प्रकाश टाकण्यासाठी पुरेसे आहे. याहून अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही.
सातवाहन सत्ता व महत्कार्य
सिंधूक अत्य्हवा सिमुख सातवाहनाने काण्वांचे राज्यपालपद धुडकावत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मद्ध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याची "बृहत्कथा", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे. महाराष्ट्रातील आजचे गिरिदुर्ग ही सातवाहनांचीच निर्मिती. रायगड हा मुळचा सातवाहनांनी बांधलेला किल्ला.
सातवाहन घराण्यात एकुण तीस राजे झाले. सातवाहन हे आगम (शैव) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते.
एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय क्षत्रप नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.'
शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. (ज्या साली शकांचे हनन केले तेंव्हापासून सुरु होणारे संवत्सर) या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
हा महान वंश सन २२० पर्यंत सत्तेवर होता. जवळपास ४५० वर्ष या वंशाने राज्य चालवले. आजच्या महाराष्ट्राच्या संस्कतीची बीजे तर रोवलीच पण माहाराष्ट्री प्राकृत साहित्यात स्वत:ही मोलाची भर घालत आजच्या मराठीची पायाभरणी केली. महाराष्ट्र म्हणजे सातवाहन. सातवाहनांच्या काळत लोकांवर धार्मिक बंधने नव्हती. जातींची बंधने मुक्त होती. कोणीही कोणत्याही व्यवसायात जाऊ शके. स्त्री-पुरुषांतही केवढी समता होती हे हालाच्या गाथा सप्तशतीवरुन स्पष्ट दिसते. कररचना सौम्य होती. सातवाहनांनी एवढे किल्ले व नगरे उभारली पण स्वत:चे राहणीमान साधे ठेवले. जुन्नर व पैठण या त्यांच्या दोन राजधान्या. पैठणला त्यांनी जागतिक व्यापाराचे केंद्र बनवले. व्यापारी मार्ग बांधले. बंदरे उभारली. बलाढ्य आरमार उभारले. कुशाण सत्तेला विंध्यापाशीच थोपवून धरले. शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले. आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवाहनाचा भव्य अश्वारुढ पुतळा आहे...एवढेच!
इसवी सन पूर्व पहिल्या दशकात शकांचे साम्राज्य होते. शक हे मूळचे मंगोलियाचे. शकांचे साम्राज्य म्हणजे अक्षरशः जुलमी राजवट. शक साम्राज्य संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने सिमुक या सातवाहन राजाने स्वराज्याची स्थापना केली. पण, शकांचे साम्राज्य एवढे विस्तारलेले होते की, सातवाहनांच्या २० पिढ्या शकांना नेस्तनाबूत करण्यात कामी आल्या. ’सातवाहन’ हा भारताचा प्राचीन राजवंश होता. त्यांनी इ. स. पूर्व २३० पासून तिसर्या शताब्दीपर्यंत दक्षिण भारतावर राज्य केले. पुराणातील काही संदर्भांनुसार, दक्षिण क्षेत्रात साम्राज्याची स्थापना करणारा हा पहिला वंश होता. भारतीय इतिहासात हा वंश ’आंध्र वंश’ नावाने विख्यात आहे. सातवाहन वंशाच्या राजांनी विदेशी आक्रमणकर्त्यांबरोबर संघर्ष करून त्यांना कधीच स्थिरावू दिले नाही. सातवाहनांच्या शासनकाळाबाबत विभिन्न पुराणांनुसार मतमतांतरे आढळतात. ’मत्स्यपुराणा’नुसार सातवाहनांनी ४६० वर्षे राज्य केले, तर ’ब्राह्मणपुराणा’नुसार त्यांनी ४५६ वर्ष सत्ता उपभोगली. मात्र, वायुपुराण सातवाहनांची ४११ वर्षांची सत्ता दर्शविते, तर ’विष्णुपुराणा’नुसार सातवाहनांचा सत्ताकाळ केवळ ३०० वर्षे असल्याचा दाखला देते. वर्तमानातील कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या भागात सातवाहनांची सत्ता होती.
मौर्य वंशाच्या पतनानंतर सातवाहन साम्राज्य शक्तिशाली झाले. सम्राट अशोकाच्या काळात सातवाहन त्याचे मांडलिक होते. त्याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर इ. स. पू. २२५-२३० पर्यंत सातवाहनांनी महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्रीय भाषा ही सातवाहनांची राजभाषा होती. (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरित झाली) सत्कारणी याने त्याच्या काळात सुरू केलेला ’शालिवाहन शक’आजही सुरू आहे. पुराणात सातवाहनांना ’आंध्र’ असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते, असाही उल्लेख पुराणात आढळतो. आंध्र म्हणजे ‘ऐतरेय ब्राह्मण’ व महाभारतात ज्यांचा उल्लेख ’औंड्र’ असा आला आहे त्या वंशाचे. मूळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्राना ’असूर राजा महाबळीचा पुत्र’ असे उल्लेखलेले आहे. पुरातन काळापासून हा समाज दक्षिणेत वास्तव्य करून होता. ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही ’औंड्र’ वरूनच पडली.
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडानंतर पैठण (जुने नाव प्रतिष्ठान) मध्ये सातवाहनांचे राज्य स्थापन झाले. त्यांच्या काळात पैठणचा सर्वाधिक विकास झाला. सातवाहन राजे कला व विद्येचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची सुरू झालेली परंपरा ही वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकली.
सिमुक हा सातवाहनांचा संस्थापक होता. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगाची सत्ता संपुष्टात आणली व सातवाहनांचे राज्य स्थापित केले. अमरावतीजवळ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात धरणीकोटा हे त्यांचे सुरुवातीचे राजधानीचे शहर होते. मात्र, कालांतराने औरंगाबाद येथील प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे राजधानीचे शहर बनले. नाणेघाट येथील लेण्यांमध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुकने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून ’दक्षिणापथपति’ ही पदवी धारण केली होती. त्याने तांब्यापासून बनविलेली नाणी प्रचलित केली. सिमुक याला ‘शिशुक,’ ‘सिन्धुक,’ ‘शिप्रक’ या नावांनीही संबोधले जात असे. सिमुकने आपल्या काळात अनेक जैन, बौद्ध मंदिरे बांधली.
सिमुकनंतर त्याचा छोटा भाऊ कान्हा (कृष्ण) राजा बनला. त्याने १८ वर्षांच्या कार्यकाळात साम्राज्यविस्तार केला. नाशिक शिलालेखात आढळते की, त्याच्या कार्यकाळात सातवाहनांचे साम्राज्य नाशिकपर्यंत पसरले होते. कान्हानंतर सत्करणी प्रथम हा गादीवर आला. सातवाहनांचा संस्थापक सिमुकचा हा मुलगा. नाणेघाट शिलालेखानुसार त्याने आपल्या साम्राज्याचा खूप विस्तार केला. हा सातवाहन वंशाचा सर्वश्रेष्ठ शासक मानला जातो. ’अप्रतिहतचक्र’ ही उपाधी याच्या नावापुढे लावली जात असे. सातवाहन शासकांमध्ये प्रिय आणि प्रचलित असलेले सत्करणी हे नाव धारण करणारा हा प्रथम सम्राट. सत्करणी प्रथमच्या मृत्यूनंतर त्याची दोन अल्पवयीन मुले वेदश्री, सतश्री सिंहासनावर बसले, परंतु अल्पवयीन असल्याने प्रशासन त्यांची आई नयनिका हिच्या हाती आले. तिने आपल्या वडिलांच्या मदतीने शासनाचा कारभार सुरू ठेवला होता. कालांतराने सतश्री याने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. गौतमीपुत्र सत्करणी या सातवाहन साम्राज्याचा २३वा शासक. याच्या काळात सातवाहनांनी अनेक पराक्रम गाजवले, तसेच आपला साम्राज्यविस्तार केला. सत्करणी याने सौराष्ट्र, बेरार, मालवा, कोकण ही राज्ये आपल्या साम्राज्याला जोडली. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन करताना असे म्हटले जाते की, ’त्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी पीत असत.’ आपल्या कार्यकाळात त्याने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केले. याच्या कारकिर्दीत मध्य भारत सातवाहनांच्या अधिपत्त्याखाली असल्याचे आढळते. तो वैदिक धर्माचा पोषक असून अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीतही त्याचे धोरण उदार होते. त्याने बौद्धांच्या तत्कालीन संघांना बरीच मदत केली होती. सध्या मुंबई येथील कार्ले नावाच्या बौद्ध संघाला त्याने त्यावेळी करजक नावाचे गाव दान केले होते. त्याने आपल्या कालखंडात अनेक नाणी पाडली. त्यातील बर्याचशा नाण्यांवर सत्करणीचा चेहरा मुद्रित केलेला आढळतो. त्याने जवळपास २० वर्षे शकांबरोबर संघर्ष केला. अखेर नाशिकमधील गोवर्धनजवळ त्याने शक राजा नहपान याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. या युद्धानंतर सातवाहनांचा उत्कर्ष सुरू झाला. शक राज्यकर्ता नहपानच्या पराभवानंतर सत्करणीने त्याचे सर्व शिक्के ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्याचे मुद्रण केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर ही शकांची राजधानी तसेच प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्यावर सातवाहनांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले स्वकीय साम्राज्य होते. कल्याण, सोपारा (नालासोपारा), भोगवर्धन (भोकरदन), तगेर (तेर), करहाटत (कर्हाड), नेवासा ही शहरे सातवाहनांच्या काळात समृद्ध झाली. या शहरांतील उत्खननातून सातवाहनांचा इतिहास जगासमोर आला. तत्कालीन राजांची नाणी उत्खननादरम्यान आढळली. सातवाहनांची प्रमुख भाषा प्राकृत होती. सातवाहन राजकुमारांना ’कुमार’ असे संबोधिले जात असे. सरकारी खजिन्याचे प्रमुख स्त्रोत हे भूमिकर, मिठावरील कर तसेच न्यायशुल्क हे होते. सातवाहनांचे महारथी, महासेनापती, महाभोज असे तीन प्रकारचे सामंत असत. व्यापार्यांना ’नैगम’ म्हटले जात असे. व्यापारी समूहाच्या प्रमुखाला ’सार्थवाह’ संबोधले जात असे. सातवाहनांच्या काळात बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षुकांच्या निवासस्थानांची बर्याच प्रमाणात बांधणी झाली. ब्राह्मणांना भूमिदान अथवा जहागिरी देण्याची प्रथा सर्वप्रथम सातवाहनांनी सुरू केली. यांच्याच काळात अंजिठा-वेरूळची बौद्ध लेणी कोरली गेली. सातवाहनांनी सह्याद्री पर्वत परिसरात अनेक किल्ल्यांची निर्मिती केली, घाट बांधले. सातवाहनकालीन गुंफा पुणे जिल्ह्यातील कार्ले, कान्हेरी, भाजे येथे आढळून आली आहेत. सातवाहनांची नगररचना सर्व सोईंनी युक्त अशी होती. विविध नमुन्यांच्या पक्क्या भाजलेल्या विटा, छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार योजना, कोरीव नक्षीकाम अशी सुसज्ज अशी नगररचना यांच्या काळात विकसित होती.
सातवाहनांचे एकूण ३० शासक झाले. ते हिंदू धर्माचे अनुयायी होते. त्यांनी बौद्ध आणि जैन विहारांना बर्याच प्रमाणात साहाय्य केले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्या तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे. द्वितीय शताब्दीच्या अंती सातवाहनांचे पश्चिमेत काठियावाड, कृष्णाखोरे आणि दक्षिण पूर्वेत तामिळनाडू येथे राज्य प्रस्थापित होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट, अमरावती, महाराष्ट्रातील जुन्नर, पैठण (प्रतिष्ठान) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. त्यापैकी पैठण हे राजधानीचे शहर होते. नाशिक येथील पांडवलेणी या बौद्ध लेण्यांच्या कोरीव कामात, ’’सातवाहनांनी दान दिले,’’ असा उल्लेख आढळतो. सातवाहनांचा काळ हे महाराष्ट्रासाठी सुवर्णयुग ठरल्याने इतिहाससंशोधक सातवाहनांना ’महाराष्ट्राचे राजे’ मानतात. तिसर्या शताब्दीत त्यांची शक्ती क्रमशः क्षीण होऊ लागली आणि त्यांचे स्थानीय शासक स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करू लागले. दरम्यान इक्ष्वांकू, पल्लव, कलिंग, वाकाटक या छोट्या संस्थानांनी आंध्रमधील छोटे छोटे प्रदेश बळकावून आपल्या साम्राज्यात विलीन केले. पूर्वेला चालुक्य साम्राज्य अस्तित्वात येईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत सातवाहन साम्राज्य संपुष्टात आले होते.
- रश्मी मर्चंडे
हे पानही पहा : गुढी पाडवा २०२० ते २०२२ https://anandghare.wordpress.com/2020/03/25/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a6/
नरेंद्र गोळे यांच्या फेसबुक फलकावरून साभार
लेखक : Santosh Karkhanis Thane
गुढीपाडवा…….
महापराक्रमी राजा गौतमीपूत्र सातकर्णी याच्या शक क्षत्रपावर विजय मिळवून प्रजेला सुखी केल्याचा आनंदोत्सव
चीनमध्ये चीनी नववर्ष दिनाला चीनी नववर्ष दिन म्हणून म्हटले जाते. तद्वत आपण गुढीपाडव्याला मराठी (अथवा वाटले तर भारतीय म्हणा .. पण ते चुकीचे आहे) नव वर्ष दिन म्हणूया. मराठी नववर्ष दिनाच्या शुभेच्छा!
अनेक जण त्याचा उल्लेख ‘हिंदू नववर्ष दिन’ असा चुकीने करतात. गुढीपाडवा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नवा वर्ष दिन म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतवर्षात नाही. या दिवशी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन राजाने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. त्याची आठवण म्हणून शालिवाहन कालगणना चालू केली. शालिवाहन राजाचे साम्राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात असल्याने येथे शालिवाहन शक पाळले जाते. तसेच कंबोडिया या देशातही नवे वर्ष गुढीपाडव्यालाच चालू होते. इंडोनेशिया येथेही मागील शतकापर्यंत नवे वर्ष गुढीपाडव्यालाच सुरु होत होते. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते?
आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. ती पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे. एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’
शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला . त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस”
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धामिर्क स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मादेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे. खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगणात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिलाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे…
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना.
गुढीपाडवा साजरा करतांना गौतमीपूत्र सातकर्णी या महान सम्राटाला पुन्हा अभिवादन करुयात!
************************************
नवी भर दि.२९-१२-२०२३ :
क्षत्रिय मराठा सातवाहन राजवंश
|| ऐतिहासिक वाडे व गढी || ·
वंदना भोसले ·
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास भाग 2
सातवाहन हा महाराष्ट्रावर शासन करणारा पहिला ज्ञात क्षत्रिय मराठा राजवंश आहे. सातवाहनांचा शासन काळ हा इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असा होता म्हणजे 450 वर्ष इतक्या प्रदीर्घकाळ सातवाहन राजवंशाने महाराष्ट्रावर एक छत्र शासन केले. काही विद्वानांच्या मते सातवाहन शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो भगवान सूर्य देवाच्या रथाला सात घोडे असतात म्हणजे सात – वाहन म्हणून या वंशाला सातवाहन म्हटले गेले सातवाहन हे सूर्यवंशी होते. सातवाहनांची सत्ता आधी फक्त पुणे मावळ प्रांतात होती. ते मूळचे आंद्रा नदी किनारी वसलेल्या अंदर मावळचे होते. म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर अंदर सातवाहन चा आंध्र सातवाहन झाला. (आंध्रप्रदेश शी त्याचा काही संबंध नाही.)
सातवाहन पहिले मौर्य काळात मौर्य साम्राज्याचे सामंत होते. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा कण्व वंशाला सुरुवात झाली तेव्हा सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मन ला सिमुक सातवाहन यांनी हरवले व स्वतःला स्वतंत्र घोषित केले. या सिमुक सातवाहन यांनाच सातवाहन वंशाचा मूळ पुरुष मानले जाते. यांनीच सातवाहन साम्राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना केली.
सिमुख सातवाहन यांनी दक्षिण भारतातील अनेक छोटे छोटे प्रांत जिंकले त्यात अपरांतक (कोकण), गोमंतक (गोवा), अश्मक (पैठणच्या आसपासचा प्रदेश), विदर्भ, नासिक्य (नाशिक), कान्हादेश (जळगाव, धुळे, नंदुरबार) कुंतलदेश ( कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव) तर हे सर्व प्रांत जिंकून सिमुख सातवाहन यांनी आपल्या साम्राज्यात सामील करून घेतले व या सर्व प्रांतांना मिळून महाराष्ट्र हे नाव दिले.
सिमुक सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून सार्वभौम राज्यकारभार चालू केल्यानंतर प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याच्या पैठण ला मुख्य राजधानी बनवले व जीर्णनगर म्हणजे सध्याच्या जुन्नर ला उपराजधानी बनवले.
सिमुक सातवाहन नंतर सातकर्णी प्रथम यांनी सातवाहन साम्राज्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग मिळून एका मोठ्या विशाल साम्राज्यात केला. सातकर्णी प्रथम नंतर त्यांची पत्नी राणी नागणिका ही सातवाहन साम्राज्याची राणी झाली. राणी नागणिका ही भारतातील पहिली महिला शासिका होती त्याचबरोबर स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी पहिली राणी देखील राणी नागरिका होती.
सातवाहन साम्राज्याच्या काळात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आपली स्वतंत्र ओळख मिळाली आपण जे आज अभिमानाने स्वतःला मराठी म्हणून घेतो आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा आपल्या चालीरीती रूढी परंपरा ह्या ज्या आहेत त्याची सुरुवात सातवाहन काळात झाली. सातवाहन काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन काळात महाराष्ट्रातील पैठण, जुन्नर, नाशिक, भोकरधन, तेर, नेवासे हे मुख्य प्रसिद्ध व भरभराटीला आलेले शहर होते.
तसेच शूरपारक म्हणजे सध्याचे नालासोपारा हे प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर होते. येथून थेट रोमशी आपला व्यापार व्हायचा नालासोपारावरून व्यापारी माल जुन्नर नाणेघाट मार्गे पैठणला आणला जायचा जुन्नर जवळील नाणेघाट हा व्यापारी मार्ग देखील सातवाहनांनी चालू केला व त्या ठिकाणी एक लेणे देखील खोदले आहे ज्यामध्ये सातवाहन कुळाची माहिती देणारा एक मोठा शिलालेख ब्राह्मी लिपी मध्ये आहे.
इतिहासकार सातवाहन राजांना महाराष्ट्राचे निर्माते मानतात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लेण्यांची निर्मिती सातवाहन राजांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक किल्ले देखील सातवाहन राजांनी बांधले ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला देखील सातवाहन राजांनी बांधला होता. सातवाहनांची राजभाषा प्राकृत महाराष्ट्री होती लिपी ब्राम्ही होती तिचेच रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. सातवाहन वंशातील राजा हाल सातवाहन ने गाथासप्तशती हा ग्रंथ प्राकृत महाराष्ट्री भाषे मध्ये लिहिला आहे. ज्यामध्ये पैठणचे व महाराष्ट्राचे 2000 वर्षांपूर्वीचे वर्णन आहे याला मराठीतील आद्यग्रंथ म्हणता येईल.
सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने वैदिक सनातन हिंदू धर्माचा आणि मंदिरांचा ऱ्हास केला होता, वर्ण व्यवस्था आणि गुरुकुल भ्रष्ट केले होते. त्यांना पुन्हा स्थापित करण्याचे काम सातवाहन राजांनी केले. सातवाहन राजांनी वर्ण व्यवस्था सुरळीत करून गुरुकुल उभारले, संत आणि ब्राह्मणांना अभय दिले. बौद्ध आणि विदेशी आक्रमकांमुळे नष्ट आणि भ्रष्ट झालेल्या अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण केले आणि अनेक मंदिरे देखील बांधली.
सातवाहन साम्राज्या बद्दल अधिक माहिती आपल्याला वायुपुराण व मत्स्य पुराणामध्ये मिळते. त्याचबरोबर सातवाहनांच्या शिलालेखांवरून मिळते.
सातवाहन राजवंशाच्या 450 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण 30 राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजाराणींचे नाव पुढे देत आहे.
●सिमुक सातवाहन
●कृष्ण सातवाहन
●सातकर्णी प्रथम
●राणी नागणिका
●हाल सातवाहन
●राणी गौतमी बलश्री
●गौतमीपुत्र सातकर्णी
●वाशिष्ठीपुत्र पुलुमावी
●वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
●वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
●गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
●गौतमीपुत्र विजय सातकर्णी
●चंड सातकर्णी
●पुलुमावी तृतीय
या सर्वांमध्ये सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांच्या नावा अगोदर त्यांनी त्यांच्या आईचे म्हणजे गौतमी बलश्री चे नाव लावले यावरून आपली हिंदू मराठी मातृसत्ताक संस्कृती समजते. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. यांनी सातवाहन साम्राज्य खूप वाढवले व शक, कुशाण, हुन, यवन यांसारख्या विदेशी आक्रमकांपासून सनातन वैदिक आर्य हिंदू धर्माचे व दक्षिण भारताचे रक्षण केले.
गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळात भारतावर विदेशी शकांचे आक्रमण झाले होते या मध्य आशियातून (सध्याच्या इराण मधून) आलेल्या लुटारू टोळ्या होत्या यांनी अफगाणिस्तान राजस्थान मार्गे भारतात प्रवेश केला यांच्यात दोन भाग पडले एक उत्तरी शक आणि एक दक्षिणी शक. हे शक स्वतः ला क्षत्रप म्हणवत तर या दक्षिणी शकांचा राजा होता नहपान हा क्षहरात वंशातील शक राजा होता. याने गुजरात सौराष्ट्र जिंकले, पुढे हा महाराष्ट्रात घुसला, याने सातवाहनांचा नाशिक जुन्नरचा प्रदेश देखील जिंकला.
या शकांच्या आक्रमणामुळे सातवाहनांना आपली राजधानी जुन्नर व पैठण सोडून काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले त्यामुळे त्यांनी आंध्रप्रदेश मधील धरणीकोट व अमरावती या शहरांना राजधानी बनवले.
नहपान आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यामध्ये अनेक युद्धे झाली. त्यांची अंतिम लढाई नाशिक जवळ गोवर्धन या ठिकाणी झाली. या लढाईमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव करून नहपानाचा शिरच्छेद केला. या विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांनी राजधानी पैठण मध्ये गोदावरी नदी किनारी एक विजयस्तंभ बांधला ज्याला आज तीर्थखांब म्हणून ओळखले जाते. व शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची म्हणजेच गुढीपाडव्याची सुरूवात केली, जिचे आज 1945 वे वर्ष चालू आहे. याच शालिवाहन शकाच्या सुरुवातीला आपण गुढीपाडवा म्हणतो महाराष्ट्रातील जनतेने शकांवरील विजयाचा आनंदउत्सव म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी व सेनेचे गुढ्या उभारून स्वागत केले. पहिली गुढी नाशिकच्या सातपूर वसाहतीमध्ये उभारली गेली त्यानंतर जुन्नर पैठण व संपूर्ण महाराष्ट्रात गुढ्या उभारल्या गेल्या आणि तेव्हापासून गुढीपाडवा हा सण सुरू झाला.
त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी त्रिसमुद्रतोयपितवाहन (ज्याच्या घोड्यांनी तीनही समुद्राचे पाणी पिले आहे असा राजा), दक्षिणापथपती (संपूर्ण दक्षिण भारताचा अधिपती) अश्या उपाध्या धारण केल्या.
त्यानंतर विदेशी ग्रीक यवन राजा डेमिस्ट्रियसने देखील सातवाहन साम्राज्यावर आक्रमण केले होते त्याचा देखील पराभव गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केला. व संपूर्ण दक्षिण भारताचे विदेशी आक्रमकांपासून रक्षण केले. नंतर उरलेल्या व युद्धात शरण आलेल्या या शक व यवन लोकांना सातवाहन साम्राज्याच्या बाहेर म्हणजे गुजरात कच्छच्या पुढे आजच्या राजस्थान पर्यंत हाकलून दिले. याच लोकांना नंतर राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले
गौतमीपुत्र सातकर्णी नंतर त्यांचा पुत्र वाशिष्ठीपुत्र पुलुमावी यांनी देखील सातवाहन साम्राज्याचे रक्षण केले व साम्राज्यविस्तार केला वाशिष्ठीपुत्र पुलुवामी यांच्या नाण्यावर जहाजाचे चित्र आहे यावरून त्यांचे आरमार किती मजबूत होते याची प्रचिती येते.
गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी ने आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप चालना दिली त्यांच्या काळात सातवाहन साम्राज्याचा अर्थात महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय व्यापार भरभराटीला आला होता त्यांचा काळ हा सातवाहन साम्राज्याचा सुवर्णकाळ होता.
सातवाहन साम्राज्याचे शेवटचे शासक होते पुलुमावी तृतीय यांच्या काळात सातवाहन साम्राज्याची सार्वभौमता नष्ट झाली सातवाहन साम्राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या सामंत राजांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. जसे कान्हादेशातील अभिर वंशीय राजांनी स्वतंत्र कारभार सुरू केला, आंध्रातील आंध्र इक्ष्वाकु वंशीय राजांनी स्वतंत्र कारभार सुरू केला, विदर्भातील वाकाटक वंशीय राजांनी स्वतंत्र कारभार सुरू केला आणि सातवाहनांच्या पतनानंतर वाकटक राजा विंध्यशक्तीने इसवी सन 250 मध्ये महाराष्ट्रात वाकाटक साम्राज्याची स्थापना केली अशाप्रकारे मराठा सातवाहन साम्राज्याचा अंत होऊन मराठा वाकाटक साम्राज्याला सुरुवात झाली.
सातवाहन राजवंशाबद्दल समजगैरसमज:-
1) सातवाहन महाराष्ट्राचे होते की आंध्र प्रदेशचे…?
:- पुराणांमध्ये काही ठिकाणी सातवाहनांचा उल्लेख आंध्र सातवाहन असा आला आहे. व काही काळ त्यांची राजधानी आंध्र प्रदेश मधील धरणीकोट व अमरावती होती यावरून काहींनी त्यांना आंध्र प्रदेशचे घोषित केले. पण त्यांचा आंध्रप्रदेश शी संबंध नंतर आला ते मूळचे महाराष्ट्रातीलच आंद्रा नदी किनारी वसलेल्या अंदर मावळचे होते म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर आंध्र सातवाहन झाला. व शकांचे सातवाहन साम्राज्यावर आक्रमण झाल्यानंतर त्यांना काही काळापुरते आपली राजधानी पैठण व जुन्नर सोडून दक्षिणेत जावे लागले तेव्हा त्यांनी आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती ला आपली राजधानी बनवले पण गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केल्यानंतर त्यांनी पैठण व जुन्नर या आपल्या पहिल्या मूळ राजधान्यांनाच परत राजधानी बनवले.
2) सातवाहन हिंदू होते की बौद्ध…?
:- काहींनी सातवाहन राजांना बौद्ध घोषित केले त्यांनी काही बौद्ध भिक्खूंना राज्यात आश्रय दिला व बौद्ध स्तूप बांधायला दानधर्म केला याचा अर्थ ते बौद्ध होते असा होत नाही त्याचा काही संबंध नाही सातवाहन वैदिक हिंदू धर्माचे अनुयायी होते त्यांनी शालिवाहन शक ही हिंदू कालगणना सुरू केली. सातवाहन राजांनी वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ यांसारखे यज्ञ त्यांनी केले याची नोंद नाणेघाट शिलालेखात आहे जे वैदिक हिंदू करतात. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला व मंदिरे बांधली. त्यामुळे सातवाहन हे सनातन वैदिक हिंदूच होते.
3) सातवाहन क्षत्रिय मराठा होते की कुंभार…?
:- सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी बद्दल एक काल्पनिक कथा प्रचलित आहे की शालिवाहन हा कुंभाराचा मुलगा होता त्याने मातीचे पुतळे, हत्ती, घोडे बनवले आणि जेव्हा उज्जैनचा राजा विक्रमादित्याने पैठण वर आक्रमण केले आणि काही ठिकाणी राक्षसांनी आक्रमण केले असा उल्लेख आहे तेव्हा शालिवाहन राजाने त्या मातीच्या पुतळ्यात हत्ती घोड्यांमध्ये जीव ओतला आणि राजा विक्रमादित्य किंवा राक्षसांचा नाश केला या कथे वरून काहींनी त्यांना कुंभार घोषित केले. कथा वाचूनच तुम्हाला समजले असेल की ही काल्पनिक कथा आहे हिचा वास्तवाशी संबंध नाही गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते त्यांच्या अगोदरच्या 22 राजांची वंशावळ मिळते यावरून ते क्षत्रिय मराठा होते हे सिद्ध होते.
4)सातवाहन क्षत्रिय मराठा होते की ब्राह्मण..?
:- काही उत्तर भारतीय ब्राह्मण इतिहासकारांनी नाशिक शिलालेखाचा ज्याला नाशिक प्रशस्ती म्हटले जाते याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना ब्राह्मण घोषित तर केलेच पण क्षत्रिय विरोधी देखील घोषित केले. नाशिक प्रशस्ती मध्ये क्षत्रियांचा मानमर्दन केला असा उल्लेख आहे असं यांचं म्हणणं आहे पण जे स्वतःच क्षत्रिय आहेत ते स्वतःच्याच वर्णातील लोकांचे मानमर्दन का करतील…? आणि सातवाहनांची लढाई कुठल्या क्षत्रियांबरोबर झाली..? त्यांची लढाई तर विदेशी शकां बरोबर झाली आणि हे शक स्वतःला क्षत्रप म्हणत होते. तर त्या शिलालेखात सातवाहनांनी शकांचे म्हणजे क्षत्रपांचे मानमर्दान केले असे वर्णन आहे. तर त्याचा चुकीचा अर्थ क्षत्रप ऐवजी क्षत्रिय असा यांनी काढला.
दुसरी गोष्ट त्या शिलालेखात ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आहे तर ब्राह्मणांना भूमिदान व दान धर्म केले असा तो उल्लेख आहे याचा अर्थ त्यांनी ते स्वतः ब्राह्मण आहे असा लावला.
सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा फक्त क्षत्रिय असतो त्यामुळे सातवाहन हे क्षत्रियच होते 450 वर्ष इतक्या दीर्घकाळ राज्य करणे व विदेशी आक्रमकांपासून साम्राज्याचे रक्षण करणे हे क्षात्र तेज एका क्षत्रियातच असते.
सातवाहन हे हिंदू क्षत्रिय मराठा होते आत्ताच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील शिर्के, साळवे, भोईटे, विचारे या 4 कुळातील लोक सातवाहनांचे वंशज आहेत.


. . . . फेसबुकवरून साभार दि.२९-१२-२०२३
————
Makarand Karandikar
April 3, 2019
·
सोप्या भाषेत गुढीपाडवा आणि गुढी यांची माहिती—
आपल्या धार्मिक गोष्टींची , सणांची माहिती अवाजवी तपशीलासह किंवा बोजड उदाहरणांसह दिलेली असते. त्यात सांगणाऱ्याचा दोष नसतो कारण ती तशाच प्रकारे आजवर सांगितली जाते.म्हणून हा थोडा FAQ धर्तीवर सोपा धर्मार्थ सांगण्याचा प्रयत्न आहे.
मला माहिती असलेले कांही संदर्भ असे —-
१) पूर्वापार म्हणजे मोहेंजोदरो व हडप्पा संस्कृतीच्या काळातसुद्धा प्रत्येक घरावर उंच ठिकाणी दिवा लावलेला असे. ध्वजा, पताका , गुढ्या (नंतरच्या काळात आकाशकंदील ) लांबून पटकन दिसतील अशा ठिकाणी लावण्याची खूप जुनी परंपरा आहे. कुठल्याही सार्वजनिक आनंदाच्या महोत्सवाला गुढ्या–तोरणे उभारली जातात.
२) घरात सहज उपलब्ध असलेली बांबूची काठी आणि रंगीत रेशमी वस्त्र यासाठी वापरले जाते.
३) आंब्याची फळे पाडव्यापर्यंत बरीचशी तयार होतात तरीही कांही कारणाने तसाच राहिलेला मोहोराचा तुरा आणि पाने गुढीला बांधतात. आंब्याची पाने धार्मिक विधीत पवित्र मानली जातात आणि मोहोर हा अंकुराचे, वृद्धीचे प्रतीक आहे. त्याचा गोड वासही मोहवितो म्हणून तो मोहोर !
४ ) पाण्याने भरला असेल तरच तो कलश अन्यथा तो तांब्याच असतो. तो उलटा घालण्यामागे तो ओसंडून वाहिल्याचा, रिता झाल्याचा संकेत असतो. त्याच्या चमकदारपणामुळे, गुढी खूप लांबूनही नजरेत भरते. कावळ्यासारखे कांही पक्षी ही गुढी उचकटण्याची शक्यता असते. हे पक्षी चमकदार तांब्यापासून घाबरून दूर राहतात.
५) गुढीला गोड कांहीतरी म्हणून साखरेच्या गाठ्यांची / बत्ताशांची माळ घालण्याची पद्धत अलीकडे अस्तित्वात आलेली आहे. या माळा होळीला बाजारात मिळतातच म्हणून त्या पुढे गुढीला घातल्या जात असाव्यात.
६ ) कडुनिंब हा सौम्य परंतु अत्यंत परिणामकारक जंतू आणि कीटकनाशक आहे. माणसाला त्रास न होता जंतूंचा नाश करण्याची क्षमता त्यात आहे. त्याची चटणी खाण्यामागे, कडक उन्हाळ्यात शरीराच्या अंतर्गत शुद्धीकरणाचा उद्देश आहे. भारत हा मधुमेह्यांची जागतिक राजधानी होण्याच्या मार्गावर आहे. कडुनिंब हा मधुमेहाला प्रतिबंध करतो. दंतमंजनात कडुनिंब अत्यंत परिणामकारक आहे.या परंपरेमुळे कडुनिंबाचे महत्व अधोरेखित होते.
७) या दिवशी पंचांगातील वर्षफलाचे वाचन केले जाते.पूर्वी शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेतीची प्राथमिक कामे या काळात सुरू झालेली असतात. या दृष्टीने वर्षभराच्या कामांचे नियोजन करता येण्यासाठी ते फारच उपयुक्त होते. ते ऐकायला सर्व कुटुंबीय सणाच्या दिवशी एकत्र बसत असत ही त्याची आणखी एक कौटुंबिक – सांस्कृतिक बाजू!
८) केक खाऊन, मद्यप्राशन करून, मांसाहार करून न्यू इयर सेलिब्रेट करण्याची पद्धत आणि संस्कृती इथली नाही. इतक्या कडक उन्हाळ्यात या गोष्टी इथे पचतही नाहीत. इथला वर्षारंभ हा इथले वातावरण, निसर्ग आणि परंपरा यांच्याशी पूर्णपणे निगडित आणि शास्त्रशुद्ध आहे.
मात्र याचे भान सर्वांनीच अत्यंत अभिमानाने ठेवायला हवे.
६ एप्रिलपासून सुरु होत असलेले श्री शालिवाहन शके १९४१, विकारीनाम संवत्सर तुम्हा सर्वांना अत्यंत शुभकाराक, सुखकर, मंगलदायक, आरोग्यसंपन्नतादायक जावो!
( हा लेख शेअर केल्यास तो कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)
***** मकरंद करंदीकर.
दैनिक लोकमत : कोण होता शालिवाहन ?
Published On: Mar 23, 2012, माधव सावरगावे, औरंगाबाद
23 मार्चआजचा गुढीपाडवा… हा शालिवाहन शक 1934 चा वर्षांरभ..पण हा शालिवाहन कोण होता ? आपण मराठी माणसं त्याच्या नावाने कालगणना का करतो ? 2000 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असं काय झालं, ज्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील. आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करत आहे. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.
ठिकाण नाशिक..वर्ष इसवी सन 78..मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता. आणि त्यांना परतवून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमीपुत्रासमोर.. आणि त्यानं ते मोठं आव्हान लीलया पेललं..तेव्हापासूनच.. महाराष्ट्रात.. गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली.
शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा…प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये मागणी होती. सुमारे 450 लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच.. त्यावेळच्या सुबत्तेची कल्पना येते.
इतिहासकार रा श्री मोरवंचीकर यांनी गौतमीपुत्र आणि संपुर्ण शालिवाहन कुळाचा अभ्यास केला. ते सांगतात की, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमीपुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत. म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला.पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमीपुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. किमान गुढीपाडव्याच्या दिवशी तरी आपण या आद्य मराठी शुरांचं स्मरण नक्कीच करायला हवं.
——————————–
शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. हे शककर्ते राजे कोण होते? गुढीपाडवा का साजरा करतात? मराठी नववर्षदिन म्हणजे नेमकं काय? शालिवाहन शककर्त्यांबद्दल जाणून घ्या.
निरंजन छानवाल, बीबीसी मराठी प्रतिनिधी
https://www.bbc.com/marathi/india-43441606
नवी भर दि. ०२-०४-२०२२:
सर्व मित्रांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
श्री.मधुसूदन थत्ते यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांचा एक सुंदर लेख देत आहे

सुप्रभात, मित्रांनो….
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे “गुढीपाडवा” . ही शालिवाहन शकाची सुरुवात.
शालिवाहन…कोण हा..?
असेल कुणी एक कुंभार-पुत्र ज्याने मातीचे सैन्य तयार केले आणि मग त्यावर पाणी शिंपडले आणि त्या सैन्याला सजीव केले. मग त्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला
आणि ह्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरु झाला असेहीअसेल.
पण हे तर रूपक.
लोक चेतनाहीन, पराक्रम-हीन बनले…शत्रूला जिंकू शकले नाहीत…अशांमध्ये त्या लोकात शालिवाहनाने चैतन्य निर्माण केले असा अर्थ घेऊया.
शत्रू..? हे बाहेरचे जसे तसे आतले पण…आतले म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर…हे.
आजच्या काळात हे शत्रूच माणसाचा पराभव करत विनाश करतात.
आज अशाच एका आपल्यातच असलेल्या शालिवाहनाची गरज आहे.
आपल्यात निसर्गदत्त सुप्त विशिष्ठ शक्ती आहेत त्यांना जागविण्याची गरज आहे. विषादाने भारलेल्या आपल्यातल्या अर्जुनाला गरज आहे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाची.
गुढी…विजय पताका…भोगावर योगाचा विजय. विकारांवर विचारांचा विजय. असे विजय प्राप्त करायचे आणि शांत, स्थिर, सात्विक मन घेऊन गुढी उभारायची.
कडुलिंब पाला खाऊन दिवसाची (खरे तर वर्षाची) सुरुवात करायची. हे सेवन केल्याने आपण निरोगी होतो.
कसला कडुलिंब ? मनात येणारे कित्येक विचार सात्विक असतात पण आचरणात आणायला जमत नाही…कडू वाटतात ते विचार. पण त्यानुसार आचरण केले तर जीवन उदात्त बनवतात.
सारांश, निष्क्रीय बनलेल्या आपल्यामध्ये चेतना भरून अस्मिता जागी व्हावी.
जसे त्या कुंभार-पुत्राने मातीच्या सैनिकात केले.
ज्याने त्याने ह्यावर जरूर विचार करावा…जीवनाला दिशा मिळवावी.
मधुसूदन थत्ते
२९-०३-२०१६
आधारभूत ग्रंथ: संस्कृती-पूजन: लेखक: पांडुरंगशास्त्री आठवले.
****************************************
नवी भर दि. १२-०७-२०२३:
नववर्षाचे_निमित्ताने
आज_शालिवाहन_शकाची_सुरवात_झाली
याचा_इतिहास_नेहमी_प्रमाणे_वादाचा_विषय_आहे.
भारतीय पंचांग इंग्रजी वर्षाचे ७८ वर्ष मागे आहे.
काही लोकांचे मते ह्याची सुरवात सम्राट कनिष्कापासून झाली ,तर काहींचे मते सातवाहन राजा गौतमीपुत्र सातवाहन याचे पासून झाली . सम्राट कानिष्कानेही शक सूरु केला होता व त्याचा कार्याकालही ई . स ७८ पासूनच होता .सम्राट कनिष्काचा मराठी विश्वाकोशामध्ये शककर्ता असा उल्लेख आहे .
*******
वेब दुनियामध्ये(३ मार्च १९१५) शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला असेही मानले जाते. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.
तसेच मध्यंतरी चित्रलेखाचे अंका मध्येहि असेच मत मांडणेत आले होते
**********
२६ मे २०१२ रोजी विठ्ठल खोत यांचे ब्लॉग मध्ये खालील प्रमाणे विवेचन आहे
शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे-
संदर्भ
१.विकिपीडिया
२.महाराष्ट्र गेझीटियर
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा. वि. मिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा, पृष्ठ ६४)
सातवाहन साम्राज्यातील गौतमी पुत्र सातकर्णी या धनगर राजाचा विजय उत्सव म्हणजे “”गुढीपाडवा””. पण समाजाने चुकीच्या पुराण कथा लिहिल्या. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली तसेच श्री रामाचा संबंध याचेशी समाजाने जोडला.
विशेष पाहता धनगर सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी या महाराष्ट्री प्राकृत महापराक्रमी राजाने शकांना २० वर्ष लढाई करून हरविले. आणि मराठी काळ गणना सुरु केली त्याला शके आपण म्हणतो.
अहिर -धनगर शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले. याचे
एकंदरीत संदर्भ पहिले तर सम्राट कनिश्क हा त्यावेळी खूपच बलाढ्य होता व तेंव्हा पासून हि कालगणना सयुक्तिक वाटते . कारण सातवाहन राज्यांचे कालसंदर्भ फारसे जुळत नाहीत .
अर्थात_यावर वाद न घालता संशोधन व्हावे हि अपेक्षा . वरील संदर्भाचे अधिक माहिती साठी प्रत्यक्ष ब्लॉग पाहावेत .
नववर्षाच्या_सर्वांना_शुभेच्छा
Satavahana dynasty | Ancient Indian Empire, History & Culture
सातवाहन राजवंश , पुराणांवर आधारित काही व्याख्यांनुसार (प्राचीन धार्मिक आणि पौराणिक लेखन) भारतीय कुटुंब होते.आंध्र जाती ("जमाती") आणि पहिली होती दक्षिणेकडील भागात म्हणजेच दक्षिणेकडील प्रदेशात दख्खनी राजवंशाने साम्राज्य उभारले . त्यांच्या सत्तेच्या शिखरावर, सातवाहनांनी पश्चिम आणि मध्य भारतातील दूरवरचे प्रदेश ताब्यात घेतले.
पुराणिक पुराव्यांच्या आधारे, सातवाहनांच्या उदयाची सुरुवात इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या अखेरीस झाली असे म्हणता येते , जरी काही अधिकाऱ्यांच्या मते हे कुटुंब इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात अस्तित्वात होते . सुरुवातीला सातवाहनांचे राज्य पश्चिम दख्खनच्या काही भागात मर्यादित होते . नानाघाट, नाशिक , कार्ली आणि कान्हेरी येथील गुहांमध्ये सापडलेले शिलालेख , सुरुवातीच्या शासक सिमुक, कृष्ण आणिशतकर्णी पहिला .
सुरुवातीच्या सातवाहन राज्यापासून, पश्चिम किनारी बंदरांची सुलभता, जी इंडो-रोमन व्यापाराच्या या काळात भरभराटीला आली आणि पश्चिम क्षत्रपांशी जवळीक असल्याने दोन्ही भारतीय राज्यांमध्ये जवळजवळ अखंड युद्धांची मालिका सुरू झाली. या संघर्षाचा पहिला टप्पा क्षत्रप नहापनाच्या नाशिक आणि पश्चिम दख्खनच्या इतर भागात घुसखोरीद्वारे दर्शविला जातो. सातवाहन शक्तीचे पुनरुज्जीवन झाले.गौतमीपुत्र शतकर्णी (राज्यकाळ सुमारे १०६-१३० इ.स. ) हा या घराण्याचा सर्वात महान शासक होता. त्याचे विजय वायव्येकडील राजस्थानपासून आग्नेयेकडील आंध्र आणि पश्चिमेकडील गुजरातपासून पूर्वेकडील कलिंगापर्यंत पसरलेल्या विस्तृत प्रादेशिक विस्तारावर पसरले होते . १५० च्या काही काळापूर्वी, क्षत्रपांनी सातवाहनांकडून यापैकी बहुतेक प्रदेश परत मिळवले आणि त्यांच्यावर दोनदा पराभव केला.
गौतमीपुत्राचा मुलगावशिष्ठिपुत्र पुलुमावी (शासनकाळ सुमारे १३०-१५९) यांनी पश्चिमेकडून राज्य केले. त्यांचा विस्तार पूर्वेकडे आणि ईशान्येकडे होता असे दिसते. वशिष्ठिपुत्र पुलुमावी यांचे शिलालेख आणि नाणी आंध्रमध्ये देखील आढळतात आणि शिवश्री शतकर्णी (शासनकाळ सुमारे १५९-१६६) हे कृष्णा आणि गोदावरी प्रदेशात सापडलेल्या नाण्यांवरून ज्ञात आहेत. वितरण क्षेत्रश्री यज्ञ शतकर्णी यांचे (शासनकाळ सुमारे १७४-२०३) प्रादेशिक नाणी कृष्णा आणि गोदावरी तसेच मध्य प्रदेशातील चांदा प्रदेश , बेरार , उत्तर कोकण आणि सौराष्ट्र येथे पसरलेले आहेत.
श्रीयज्ञ हे सातवाहन राजवंशाच्या इतिहासातील शेवटचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे . त्यांनी क्षत्रपांवर विजय मिळवला, परंतु त्यांचे उत्तराधिकारी, जे बहुतेक पुराणिक वंशावळी आणि नाण्यांवरून ओळखले जातात, त्यांनी तुलनेने मर्यादित क्षेत्रावर राज्य केले.
नंतरच्या नाण्यांच्या मुद्द्यांचे "स्थानिक" स्वरूप आणि त्यांचे वितरण स्वरूप सातवाहन साम्राज्याच्या नंतरच्या तुकडीचे संकेत देते. आंध्र प्रदेश प्रथम इक्ष्वाकु आणि नंतर पल्लवांकडे गेला . पश्चिम दख्खनमधील वेगवेगळ्या भागात नवीन स्थानिक शक्तींचा उदय झाला - उदा. कुटूस, अभिरस आणि कुरु. बेरार प्रदेशात चौथ्या शतकाच्या सुरुवातीला वाकाटक एक प्रबळ राजकीय शक्ती म्हणून उदयास आले. या काळापर्यंत सातवाहन साम्राज्याचे विभाजन पूर्ण झाले होते.
ईसापूर्व चौथ्या-तिसऱ्या शतकात दख्खनमध्ये उत्तर मौर्यांचे यश असूनही , सातवाहनांच्या काळातच या प्रदेशात ऐतिहासिक काळ सुरू झाला. केंद्रीकृत प्रशासकीय व्यवस्था विकसित झाली की नाही याचे कोणतेही स्पष्ट संकेत नसले तरी, संपूर्ण साम्राज्यात चलनाची एक व्यापक व्यवस्था सुरू झाली. या काळात इंडो-रोमन व्यापार शिगेला पोहोचला आणि परिणामी भौतिक समृद्धी बौद्ध आणि ब्राह्मण समुदायांच्या उदारमतवादी संरक्षणात दिसून येते , ज्याची गणना समकालीन शिलालेखांमध्ये केली आहे.
https://marathispandan.com/2022/07/16/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%A4/
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा नकाशा आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हा हिंदू धर्म अस्तित्वात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच…..
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्राची काय ओळख होती. हा प्रश्न नक्कीच सर्वांच्या मनात येत असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणते क्षत्रिय मराठा राजवंश होऊन गेले कोणते राजे होऊन गेले त्याबद्दलची माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत.
तर महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश कोणता…? तर तो आहे सातवाहन राजवंश मग सातवाहनांच्या अगोदर महाराष्ट्रावर कुठल्या क्षत्रीय मराठा राजवंशाने राज्य केले…? तर सातवाहनांच्या अगोदर भाषावार प्रांत नव्हते भाषेनुसार प्रांतांची रचना नव्हती त्या अगोदर भारतात महाजनपत पद्धती होती. या आर्यावार्तामध्ये भारतामध्ये 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये होते आणि #अश्मक हे एक मात्र महाजनपद दक्षिण भारतामध्ये होते. या अश्मक महाजनपदावर भगवान #श्रीरामाचे वंशज म्हणजे #इश्वाकू वंशातील राजे राज्य करीत होते.
भगवान श्रीरामाच्या इक्ष्वाकू वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची स्थापना केली म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदावर राज्य करणाऱ्या याच इश्वाकू वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले. भोसले कुळ याच शिसोदे वंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच कुळातील म्हणून त्यांना #रघुकुलराज म्हणजेच भगवान श्रीरामाच्या कुळातील म्हटले गेले. याच शिसोदे कुळाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाड ला गेली तिथे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला. या अश्मक महाजनपदाची राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ही होती.
तर हे महाजनपद इसवी सन पूर्व 6 व्या शतकापर्यंत म्हणजे आज पासून 2600 वर्षे पूर्वीपर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर भाषेनुसार प्रांतांची रचना व्हायला लागली तेव्हा वेगवेगळ्या प्रांतांचा उदय झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये सातवाहन वंशाचा उदय झाला. काही विद्वानांच्या मते सातवाहन शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो भगवान सूर्य देवाच्या रथाला सात घोडे असतात म्हणजे सात – वाहन म्हणून या वंशाला सातवाहन म्हटले गेले सातवाहन हे सूर्यवंशी होते. सातवाहनांची सत्ता आधी फक्त पुणे मावळ प्रांतात होती. ते मूळचे #आंद्रानदी किनारी असलेल्या #अंदरमावळचे होते. म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर अंदर सातवाहन चा आंध्र सातवाहन झाला. (आंध्रप्रदेश शी त्याचा काही संबंध नाही.)
सातवाहन पहिले मौर्य काळात मौर्य साम्राज्याचे सामंत होते. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा कण्व वंशाला सुरुवात झाली तेव्हा सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मन ला सिमुक सातवाहन यांनी हरवले व स्वतःला स्वतंत्र घोषित केले. या #सिमुकसातवाहन यांनाच सातवाहन वंशाचा मूळ पुरुष मानले जाते. यांनीच सातवाहन साम्राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना केली. महाजनपद नष्ट झाल्यानंतर भारतात अनेक छोटे छोटे प्रांत होते. त्यात दक्षिण भारतात देखील अनेक छोटे छोटे प्रांत होते. त्यात अपरांतक (कोकण), गोमंतक (गोवा), अश्मक (पैठणच्या आसपासचा प्रदेश) , विदर्भ, नासिक्य (नाशिक), कान्हादेश (जळगाव,धुळे) तर या सर्व प्रांतांचा मिळून सिमुक सातवाहनांनी महाराष्ट्र घडवला. सिमुक सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केल्या नंतर #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे #पैठण ला मुख्य राजधानी बनवले व #जीर्णनगर म्हणजे सध्याच्या #जुन्नर ला उपराजधानी बनवले. सातवाहन राजवंशाचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 पर्यंत होता म्हणजे सुमारे 450 वर्ष सातवाहनांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशावर राज्य केले. सातवाहन साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग मिळून एक मोठे विशाल साम्राज्य होते. सातवाहन साम्राज्याच्या काळात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आपली स्वतंत्र ओळख मिळाली आपण जे आज अभिमानाने स्वतःला मराठी म्हणून घेतो आणि आपली मराठी संस्कृती आपली मराठी भाषा आपल्या चालीरीती रूढी परंपरा ह्या ज्या आहेत त्याची सुरुवात सातवाहन काळात झाली. सातवाहन काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन काळात महाराष्ट्रातील पैठण, जुन्नर, नाशिक, भोकरधन, तेर, नेवासे हे मुख्य प्रसिद्ध व भरभराटीला आलेले शहर होते. तसेच शूरपारक म्हणजे सध्याचे नालासोपारा हे प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर होते. येथून थेट रोमशी आपला व्यापार व्हायचा नालासोपारावरून व्यापारी माल जुन्नर नाणेघाट मार्गे पैठणला आणला जायचा जुन्नर जवळील #नाणेघाट हा व्यापारी मार्ग देखील सातवाहनांनी चालू केला व त्या ठिकाणी एक लेणे देखील खोदले आहे ज्यामध्ये सातवाहन कुळाची माहिती देणारा एक मोठा शिलालेख ब्राह्मी लिपी मध्ये आहे. इतिहासकार सातवाहन राजांना महाराष्ट्राचे निर्माते मानतात महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लेण्यांची निर्मिती सातवाहन राजांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक किल्ले देखील सातवाहन राजांनी बांधले ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला देखील सातवाहन राजांनी बांधला होता. सातवाहनांची राज्यभाषा #प्राकृतमहाराष्ट्री होती लिपी #ब्राम्ही होती तिचेच रूपांतर नंतर मराठी भाषेमध्ये झाले. सातवाहन वंशातील राजा हाल सातवाहन ने #गाथासप्तशती हा ग्रंथ प्राकृत महाराष्ट्री भाषे मध्ये लिहिला आहे. ज्यामध्ये पैठणचे व महाराष्ट्राचे 2000 वर्षांपूर्वीचे वर्णन आहे याला मराठीतील आद्यग्रंथ म्हणता येईल.
सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने वैदिक सनातन हिंदू धर्माचा आणि मंदिरांचा ऱ्हास केला होता वर्ण व्यवस्था आणि गुरुकुल भ्रष्ट केले होते. त्यांना पुन्हा स्थापित करण्याचे काम सातवाहन राजांनी केले. सातवाहन राजांनी वर्ण व्यवस्था सुरळीत करून गुरुकुल उभारले संत आणि ब्राह्मणांना अभय दिले. बौद्ध आणि विदेशी आक्रमकांमुळे नष्ट आणि भ्रष्ट झालेल्या अनेक मंदिरांचे पुनरनिर्माण केले आणि अनेक मंदिरे देखील बांधली.
सातवाहन राजवंशाच्या 450 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण 30 राजे झाले त्यापैकी काही महत्त्वपूर्ण राजाराणींचे नाव पुढे देत आहे.
● राजा सिमुक सातवाहन
● राजा कृष्ण सातवाहन
● राणी नागनिका
● हाल सातवाहन
● राणी गौतमी बलश्री
● गौतमीपुत्र_सातकर्णी
● वाशिष्ठीपुत्र पुलुमावी
● वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
● वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
● गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
● गौतमीपुत्र विजय सातकर्णी
● चंड सातकर्णी
या सर्वांमध्ये सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते #गौतमीपुत्रसातकर्णी यांच्या नावा अगोदर त्यांनी त्यांच्या आईचे म्हणजे गौतमी बलश्री हिचे नाव लावले यावरून आपली हिंदू मराठी मातृसत्ताक संस्कृती समजते. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. यांनी सातवाहन साम्राज्य खूप वाढवले व शक, कुशाण, हुन, ग्रीक यवन यांसारख्या विदेशी आक्रमकांपासून सनातन वैदिक आर्य हिंदू धर्माचे व दक्षिण भारताचे रक्षण केले.
गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळात भारतावर विदेशी शकांचे आक्रमण झाले होते या मध्य आशियातून आलेल्या लुटारू टोळ्या होत्या यांनी अफगाणिस्तान राजस्थान मार्गे भारतात प्रवेश केला यांच्यात दोन भाग पडले एक उत्तरी शक आणि एक दक्षिणी शक हे शक स्वतः ला क्षत्रप म्हणवत तर या दक्षिणी शकांचा राजा होता #नहपान हा #क्षहरात वंशातील शक राजा होता याने गुजरात सौराष्ट्र जिंकले पुढे हा महाराष्ट्रात घुसला याने सातवाहनांचा नाशिक जुन्नरचा प्रदेश देखील जिंकला.
या शकांच्या आक्रमणामुळे सातवाहनांना आपली राजधानी जुन्नर व पैठण सोडून काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले त्यामुळे त्यांनी आंध्रप्रदेश मधील धरणीकोट व अमरावती या शहरांना राजधानी बनवले.
नहपान आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यामध्ये अनेक युद्ध झाले त्यांची अंतिम लढाई नाशिक गोवर्धन या ठिकाणी झाली. या लढाईमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराकरून नहपानाचा शिरच्छेद केला. या विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांनी #शालिवाहन_शक ही हिंदू कालगणना सुरू केली जिचे आज 1944 वे वर्ष चालू आहे व राजधानी पैठण मध्ये गोदावरी नदी किनारी एक #विजयस्तंभ बांधला ज्याला आज #तीर्थखांब म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकरणी यांनी #त्रिसमुद्रतोयपितवाहन (ज्याच्या घोड्यांनी तीनही समुद्राचे पाणी पिले आहे असा राजा), दक्षिणापथपती ( संपूर्ण दक्षिण भारताचा अधिपती) अश्या उपाध्या लावल्या.
त्यानंतर विदेशी ग्रीक यवन राजा डेमिस्ट्रियसने देखील सातवाहन साम्राज्यावर आक्रमण केले होते त्याचा देखील पराभव गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केला. व संपूर्ण दक्षिण भारताचे विदेशी आक्रमकांपासून रक्षण केले. नंतर उरलेल्या व युद्धात शरण आलेल्या या शक व ग्रीक यवन लोकांना सातवाहन साम्राज्याच्या बाहेर म्हणजे गुजरात कच्छच्या पुढे आजच्या राजस्थान पर्यंत हाकलून दिले. याच लोकांना नंतर राजस्थानातील अबू पर्वतावर अग्निसंस्कार करून हिंदू केले तेच आज स्वतःला #राजपूत म्हणवतात.
सातवाहन साम्राज्या बद्दल अधिक माहिती आपल्याला वायुपुराण व मत्स्य पुराणामध्ये मिळते. त्याचबरोबर सातवाहनांच्या शिलालेखांवर मिळते.
सातवाहन राजवंशाबद्दल समजगैरसमज:-
1) सातवाहन महाराष्ट्राचे होते की आंध्र प्रदेशचे…?
:- पुराणांमध्ये काही ठिकाणी सातवाहनांचा उल्लेख आंध्र सातवाहन असा आला आहे. व काही काळ त्यांची राजधानी आंध्र प्रदेश मधील धरणीकोट व अमरावती होती यावरून काहींनी त्यांना आंध्र प्रदेशचे घोषित केले. पण त्यांचा आंध्रप्रदेश शी संबंध नंतर आला ते मूळचे महाराष्ट्रातीलच आंद्रा नदी किनारी असलेल्या अंदर मावळचे होते म्हणून त्यांना अंदर सातवाहन म्हटले गेले त्याचा अपभ्रंश नंतर आंध्र सातवाहन झाला. व शकांचे सातवाहन साम्राज्यावर आक्रमण झाल्यानंतर त्यांना काही काळापुरते आपली राजधानी पैठण व जुन्नर सोडून दक्षिणेत जावे लागले तेव्हा त्यांनी आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती ला आपली राजधानी बनवले पण गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केल्यानंतर परत त्यांनी पैठण व जुन्नर या आपल्या पहिल्या मूळ राजधान्यांनाच परत राजधानी बनवले.
2) सातवाहन हिंदू होते की बौद्ध…?
:- काहींनी सातवाहन राजांना बौद्ध घोषित केले त्यांनी काही बौद्ध भिक्खूंना राज्यात आश्रय दिला व बौद्ध स्तूप बांधायला दानधर्म केला याचा अर्थ ते बौद्ध होते असा होत नाही त्याचा काही संबंध नाही सातवाहन वैदिक हिंदू धर्माचे अनुयायी होते त्यांनी शालिवाहन शक ही हिंदू कालगणना सुरू केली. सातवाहन राजांनी वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ यांसारखे यज्ञ त्यांनी केले याची नोंद नाणेघाट शिलालेखात आहे जे वैदिक हिंदू करतात. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला व मंदिरे बांधली. त्यामुळे सातवाहन हे सनातन वैदिक हिंदूच होते.
3) सातवाहन क्षत्रिय मराठा होते की कुंभार…?
:- सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी बद्दल एक काल्पनिक कथा प्रचलित आहे की शालिवाहन हा कुंभाराचा मुलगा होता त्याने मातीचे पुतळे, हत्ती, घोडे बनवले आणि जेव्हा उज्जैनचा राजा विक्रमादित्याने पैठण वर आक्रमण केले आणि काही ठिकाणी राक्षसांनी आक्रमण केले असा उल्लेख आहे तेव्हा शालिवाहन राजाने त्या मातीच्या पुतळ्यात हत्ती घोड्यांमध्ये जीव ओतला आणि राजा विक्रमादित्य किंवा राक्षसांचा नाश केला या कथे वरून काहींनी त्यांना कुंभार घोषित केले. कथा वाचूनच तुम्हाला कळले असेल की ही काल्पनिक कथा आहे हिचा वास्तवाशी संबंध नाही गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते त्यांच्या अगोदरच्या 22 राजांची वंशावळ मिळते यावरून ते क्षत्रिय मराठा होते हे सिद्ध होते.
4)सातवाहन क्षत्रिय मराठा होते की ब्राह्मण..?
:- काही उत्तर भारतीय ब्राह्मण इतिहासकारांनी नाशिक शिलालेखाचा ज्याला नाशिक प्रशस्ती म्हटले जाते याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना ब्राह्मण घोषित तर केलेच पण क्षत्रिय विरोधी देखील घोषित केले. नाशिक प्रशस्ती मध्ये क्षत्रियांचा मानमर्दान केला म्हणजे माज मोडला असा उल्लेख आहे असं यांचं म्हणणं आहे पण जे स्वतःच क्षत्रिय आहेत ते स्वतःच्याच वर्णातील लोकांचे मानमर्दन का करतील…? आणि सातवाहनांची लढाई कुठल्या क्षत्रियांबरोबर झाली..? त्यांची लढाई तर विदेशी शकां बरोबर झाली आणि हे शक स्वतःला #क्षत्रप म्हणत होते. तर त्या शिलालेखात सातवाहनांनी शकांचे म्हणजे क्षत्रपांचे मानमर्दान केले असे वर्णन आहे. तर त्याचा चुकीचा अर्थ क्षत्रप ऐवजी क्षत्रिय असा यांनी काढला.
दुसरी गोष्ट त्या शिलालेखात ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आहे तर ब्राह्मणांना भूमिदान व दान धर्म केले असा तो उल्लेख आहे याचा अर्थ त्यांनी ते स्वतः ब्राह्मण आहे असा लावला.
सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा फक्त क्षत्रिय असतो त्यामुळे सातवाहन हे क्षत्रियच होते 450 वर्ष इतक्या दीर्घकाळ राज्य करणे व विदेशी आक्रमकांपासून साम्राज्याचे रक्षण करणे हे क्षात्र तेज एका क्षत्रियातच असते.
सातवाहन हे हिंदू क्षत्रिय मराठा होते आत्ताच्या क्षत्रिय मराठ्यांच्या 96 कुळातील #शिर्के आणि #साळवे कुळातील लोक सातवाहनांचे वंशज आहेत.
लेखक – आशिष इंगळे पाटील.
औन्द्र वंशीय अहिर -धनगर सातवाहन साम्राज्य
- राजा सिमुक सातवाहन,
- राणी नागणिका,
- राजा श्री सातकर्णी (नागणिकेचा पती),
- कुमार भाय (राजपुत्र),
- महारठि गणकयिरो अथवा महारथी गणरयिर (राणी नागणिकेचे पिता),
- कुमार हुकुसिरी (राजपुत्र)
- कुमार सातवाहन (राजपुत्र)
- सिमुक सातवाहन(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
- कृष्ण सातवाहन( सिमुकचा धाकटा भाऊ..)
- सातकर्णी पहिला (नागनिकेचा पती.)
- वेदिश्री
- सतिसिरी (शक्तिश्री)
- हाल सातवाहन
- गौतमीपुत्र सातकर्णी
- आपिलक
- कुंतल
- सुनंदन
- सुंदर
- वाशिष्ठीपुत्र सातकर्णी
- वाशिष्ठीपुत्र शिवश्री पुलुमावी
- वाशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी
- गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी
- गौतमीपुत्र विजय सातकर्णी
- चंड सातकर्णि
- वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी
- पुलुमावी (पुळुमावि)
- यज्ञ सातकर्णी
- सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
- कृष्ण(भात) १०
- श्रीशातकर्णी(श्रीमल्लकर्णी) १०
- पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
- स्कंधस्तंभ १८
- शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
- लंबोदर १८
- आपीतक(आपीलक, दिविलक) १२
- मेघस्वाति १८
- स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
- स्कंदस्वाति ७
- मृगेंद्रस्वातिकर्ण ३
- कुंतलस्वातिकर्ण ८
- स्वातिवर्ण १
- पुलोमावी ३६
- अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
- हाल ५
- मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
- पुरिकषेण(प्रविल्लसेन, पुरीषभीरु) २१
- सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
- चकोरशातकर्णी ६ महिने
- शिवस्वाति २८
- गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
- पुलोमत् २८
- शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
- शिवश्री ७
- शिवस्कंध ३
- यज्ञश्री शातकर्णी २९
- विजय ६
- चंडश्री १०
- पुलोमत् ७.
सातवाहन
| इस लेख अथवा भाग में इस समय विस्तार अथवा सुधार किया जा रहा है। इसको बनाने एवं सम्पादित करने में आपकी किसी भी सहायता का स्वागत है। यदि इस पृष्ठ को बहुत दिनों से सम्पादित नहीं किया गया है, कृपया यह टैग हटाएँ। इस को अन्तिम बार EatchaBot (वार्ता| योगदान) द्वारा सम्पादित किया गया था। (20 दिन पहले) (परिष्करण) |
| इस लेख में सन्दर्भ या स्रोत नहीं दिया गया है। कृपया विश्वसनीय सन्दर्भ या स्रोत जोड़कर इस लेख में सुधार करें। स्रोतहीन सामग्री ज्ञानकोश के उपयुक्त नहीं है। इसे हटाया जा सकता है। (सितंबर 2014) |
| सातवाहन साम्राज्य | ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
Approximate extent of the Satavahana empire under Gautamiputra Satkarni
| ||||||||||||||||||
| राजधानी | प्रतिस्ठान, अमरावती | |||||||||||||||||
| भाषाएँ | प्राकृत, तेलगू, तमिल, संस्कृत[1][2][3][4][5] | |||||||||||||||||
| धर्म | हिन्दू, | |||||||||||||||||
| शासन | राजतंत्र | |||||||||||||||||
| सम्राट | ||||||||||||||||||
| - | 100-70 ईसा पूर्व | सीमुक (प्रथम) | ||||||||||||||||
| - | दुसरी शताब्दी ईसवी | विजय (अन्तिम) | ||||||||||||||||
| ऐतिहासिक युग | पुरातन | |||||||||||||||||
| - | स्थापित | 1ली शताब्दी ईसा पूर्व | ||||||||||||||||
| - | अंत | 2री शताब्दी ईसवी | ||||||||||||||||
| ||||||||||||||||||
| आज इन देशों का हिस्सा है: | ||||||||||||||||||
| Warning: Value specified for "continent" does not comply | ||||||||||||||||||
| सातवाहन राजा | |
| सीमुक | (100-70 ईसा पूर्व) |
| कान्हा | (70-60 ईसा पूर्व) |
| सतकर्नी | (212 - 195 ईसा पूर्व) |
| शिवस्वति | (पहली शताब्दी ईसवी) |
| गौतमीपुत्र सातकर्णि | (दूसरी शताब्दी ईसवी) |
| वशिष्ठिपुत्र पुलूमवी | (दूसरी शताब्दी ईसवी) |
| वशिष्ठिपुत्र सातकर्णि | (दूसरी शताब्दी ईसवी) |
| शिवस्कंद सातकर्णि | (दूसरी शताब्दी ईसवी) |
| यज्ञश्री शातकर्णी | (दूसरी शताब्दी ईसवी) |
| विजय | (दूसरी शताब्दी ईसवी) |
सातवाहन प्राचीन भारत का एक राजवंश था। इसने ईसापूर्व २३० से लेकर दूसरी सदी (ईसा के बाद) तक केन्द्रीय दक्षिण भारत पर राज किया। यह मौर्य वंश के पतन के बाद शक्तिशाली हुआ था। इनका उल्लेख ८वीं सदी ईसापूर्व में मिलता है। अशोक की मृत्यु (सन् २३२ ईसापूर्व) के बाद सातवाहनों ने खुद को स्वतंत्र घोषित कर दिया था। सीसे का सिक्का चलाने वाला पहला वंश सातवाहन वंश था, और वह सीसे का सिक्का रोम से लाया जाता था।
परिचय
प्राचीन भारत में मौर्य वंश के अन्तर्गत पहली बार राजनैतिक एवं सांस्कृतिक एकता स्थापित करने का प्रयास किया। बाद में चलकर सातवाहन वंश ने इस प्रयास को आगे बढ़ाया। यद्यपि इतिहासकार सातवाहनों को दक्कन में मौर्यों का उत्तराधिकारी हैं तथापि इस वंश के उदय को अशोक के बौद्ध राज्य के विरूद्ध सामान्य जैन तथा हिन्दु प्रक्रिया के रूप में भी समझा जाना चाहिए। सातवाहन वंश की स्थापना मौर्य वंश के पराभव से लगभग पचास वर्ष पहले हुई। उनका साम्राज्य दक्षिण भारत का सबसे प्राचीन और बड़ा साम्राज्य था। उत्तर भारत निरन्तर बदलते राजवंशीय परिदृश्य (जहां मौर्यों के पतन के बाद छोटे-छोटे अन्तराल पर शुंग, कण्व तथा कुषाण वंशो की स्थापना हुई) के विपरित सातवाहनों ने दक्कन में अटूट, अविभाज्य तथा दीर्घकाल तक स्थाई रूप से चलने वाले एक साम्राज्य की स्थापना की जिसने लगभग साढ़े चार सौ वर्षों तक शासन किया।
इस काल के विषय में जितनी जानकारी हमें प्राप्त हुई है उससे हमें सातवाहनों की विलक्षणता तथा विभिन्न क्षेत्रों में उनकी अद्वितिय गतिविधियों का ज्ञान होता है। यदि पुराणों के वक्तव्यों पर विशवास किया जाए तो दक्कन के इस साम्राज्य की सीमाएं उत्तर भारत तक फैली हुई थी। मगध इस साम्राज्य का एक हिस्सा था, दक्षिणी भारत में भी फैलाव था तथा पूर्वी से पश्चिमी समुन्द्र तक इसकी सीमाएं विस्तृत थी। उत्तर तथा दक्षिण भारत की मालव, भोज, पठनिक, रथिक, आन्ध्र, पारिन्द तथा द्राविड़ आदि विभिन्न प्रकार की प्रजातियों के समन्वय से इस साम्राज्य का निर्माण हुआ था तथा इस दृष्टि से क्षेत्रफल में मौर्य साम्राज्य से कम होते हुए भी सातवाहन साम्राज्य उससे कहीं अधिक सुगठित था। ये सातवाहनों द्वारा मध्य भारत तथा दक्कन में प्रदत्त लम्बे एवं शान्तिपूर्ण शासन काल का ही परिणाम था कि कला एवं स्थापत्य का विकास हुआ जिनके उदाहरण हम पश्चिम भारत की शिलाओं में तराशी हुई गुहाओं तथा पूर्वी भारत के स्तूपों एवं विहारों में पा सकते है। इस काल में संस्कृति का भी अत्यधिक विकास हुआ तथा प्रकृत भाषा का आकर्षण राजदरबारों तक पहुँचा। सातवाहन राज्य के आधीन बौद्ध धर्म का अद्वितिय विकास हुआ। व्यापार, वाणिज्य एवं जल परिवहन के क्षेत्रों में भी उन्नति अत्यधिक हुई।
ऐतिहासिक स्रोत
सातवाहनों के विषय में जानकारी देने वाले एवं स्रोतों का नितान्त अभाव है। उनसे सम्बन्धित शिलालेखों की संख्या बहुत कम है और इस प्रस्तुत शिलालेखों में दिए गए सन्दर्भों में भी सातवाहनों के विषय में पूर्ण जानकारी नही मिलती। उनके विषय में हमारे पास पूर्वी दक्कन से प्राप्त उन्नीस शिलालेख ही हैं। जो इस वंश के तीस राजाओं तथा साढ़े चार सौ वर्षों के लम्बे शासन काल के विषय में जानकारी देने के लिए किसी भी दृष्टिकोण से प्रयोग नही है। यद्यपि पुरातत्व विभाग ने प्राचीन हैदराबाद राज्य (जो अर्वाचीन तेलंगाना प्रदेश का हिस्सा था तथा आधुनिक आन्ध्र प्रदेश की राजधानी है एवं जिसे सातवाहनों को उद्गम क्षेत्र माना जाता है) में पैठान, मास्की तथा पोण्डापुर में खुदाई करवाई परन्तु यहाँ से अधिक साक्ष्य नही मिले। इस विषय में सातवाहन वशं के राजाओं द्वारा प्रचलित सिक्के जो पूर्वी तथा पश्चिमी दक्कन एवं मध्य प्रदेश से मिले हैं, से हमें इस वंश के विषय में महत्वपूर्ण जानकारी मिलती है। थामस, रैपसन, कनिघम, भगवान लाल इन्द्रा जी तथा स्कॉट जैसै विद्वानों नें इन सिक्कों से महत्वपूर्ण जानकारी प्राप्त की है। परन्तु इन सिक्कों के भंगित तथा कुछ सिक्कों के जाली होने के कारण कई विवाद उठ खड़े हुए हैं। इस विषय में साहित्यिक स्त्रोतों ने तो और भी अधिक निराश किया है। मौलिक पुराणों में कालान्तर में जुड़े अंशो के कारण इनमें सातवाहनों के विषय में दी गई सूचनाएं अब विश्वसनीय नही रह गई हैं। साथ ही विभिन्न पुराणों में सातवाहनों के सन्दर्भ में मर्तक्य न होने के कारण स्थिति ओर भी सन्देहास्पद हो गई है। यद्यपि गुणाढ़य द्वारा रचित बृहद कथा को सातवाहन राज्य संरक्षण में लिखा हुआ माना जाता है तथापि यह कृति अब मूल रूप में नही मिलती तथा इा पर आधारित उसके बाद के संस्करणों में दी गई सूचनाओं की व्यवस्था विभिन्न विद्वानों अलग-अलग की है। इसी प्रकार लीलावती जो कि सातवाहन शासक काल के सैनिक अभियानों एवं विजयों से सम्बन्धित है, पर भी अधिक अधिक विश्वास नही किया जा सकता। इस कारणवश सातवाहन काल के विषय में अभी हमारी जानकारी सीमित है।
सातवाहनों का उदय तथा उनका मूल निवास स्थान
सातवाहनों के अभ्युदय तथा उनके मूल निवास स्थान को ले कर विभिन्न विद्वानों में गहरा मतभेद है। कुछ विद्वान कहते हैं की उनका उदय आंध्र में हुआ। शिलालेख तथा सिक्कों में वर्णित सातवाहन और शातकर्णी शासकों को पुराणों में आन्ध्र, आन्ध्र-मृत्य तथा आन्ध्र जातीय नामों से पुकारा गया है। इस आधार पर विद्वान इस निर्णय पर पहुँचे है कि सातवाहन अथवा शातकरणी राजा आन्ध्रों के समतुल्य थे। रैपसन, स्मिथ तथा भण्डारकर के अनुसार सातवाहन शासक आन्ध्र देश से सम्बन्धित थे। आन्ध्र लोगों के विषय में पुराण कहते है कि वे लोग प्राचीन तेलगु प्रदेश जो कि गोदावरी तथा कृष्णा नदी के मध्य में स्थित था, के निवासी थे। एतरेय ब्राह्मण में उनका उल्लेख ऐसी जाति के रूप में हुआ है जो आर्यों के प्रभाव से मुक्त थी। इंडिका में मैगस्थनीज उनकी शक्ति एवं समृद्धि का उल्लेख किया ह। अशोक के शिलालेखों में उनका वर्णन ऐसे लोगों के रूप में हुआ है जो कि उसके साम्राज्य के प्रभाव में थे। परन्तु मौर्य साम्राज्य के पतन के बाद उनका क्या हुआ इसका पता नही चलता। सम्भवतः उन्होनं अपने आपको स्वतन्त्र घषित कर दिया। ऊपर वर्णित इतिहासकार यद्यपि आन्ध्रप्रदेश को सातवाहनों का मूल निवास स्थान मानते है तथापि उनकी शक्ति के केन्द्र को लेकर इन विद्वानों में मतभेद हैं। जहाँ स्मिथ श्री काकुलम् को सातवाहनों अथवा आन्ध्रों की राजधानी मानते हैं। परन्तु सातवाहन के आन्ध्रों के साथ सम्बन्ध को लेकर विद्वानों में मतभेद है। सामवाहन वंश के शिलालेखों में इा काल के शासकों को निरन्तर रूप से सातवाहन अथवा शातकर्णी कहा गया है। साहित्यिक ग्रन्थों में इनके लिए यदाकदा शाली वाहन शब्द का भी प्रयोग हुआ है। परन्तु इस सन्दर्भ में आन्ध्र शब्द का प्रयोग इस वंश के किसी भी शिलालेख में नही है। दूसरी ओर शिलालेखों, सिक्कों तथा साहित्यिक स्रोतों के आधार पर पश्चिमी भारत को इनका मूल निवास स्थान माना गया है। इस तथ्य का प्रमाण नानाघाट (पुना जिला) तथा साचीं (मध्यप्रदेश) के आरम्भिक शिलालेखों से भी मिलता है। इस आधार पर डॉ॰ गोपालचारी ने प्रतिष्ठान (आधुनिक पैठान जो कि महाराष्ट्र के औरंगाबाद जिले में स्थित है) तथा उसके आसपास के क्षेत्र के सातवाहनों का मूल निवास स्थान माना है। इसके अतिरिक्त वी0एस0 सुकूथानकर ने बेल्लारी जिले को; एच0सी0राय0 चौधरी ने अन्य देश के दक्षिणी हिस्से को तथा वी0वी0 मिराशी ने वेन गंगा नदी के दोनों किनारों से लगे बरार प्रदेश को सातवाहनों का मूल निवास स्थान माना है। इस आधार पर सातवाहनों तथा आन्ध्रों का समतुल्य एवं सजातिय होना सन्देहास्पद ही है। इस विषय में विद्वानों ने यह सुझाया है कि सातवाहनों ने अपने आरम्भिक जीवन की दक्कन से शुरुआत की तथा कुछ ही समय में आन्ध्र प्रदेश को भी जीत लिया। कालान्तर में जब शक तथा अमीर आक्रमणों के कारण सातवाहन साम्राज्य के पश्चिमी तथा उत्तरी क्षेत्र उनके हाथों से जाते रहे तब कदाचित उनकी शक्ति गोदावरी तथा कृष्णा नदी के मध्य क्षेत्र अर्थात आन्ध्र प्रदेश तक सीमित हो गई तथा अब सातवाहनों को आन्ध्रों के नाम से जाना जाने लगा।
सातवाहनों की उत्पति के विषय में भी हमें जानकारी नही है। कुछ विद्वानों ने उनकी तुलना अशोक के शिलालेखों में वर्णित सतीयपुत्रोंसे तथा कुछ ने प्लिनी द्वारा वर्णित सेतई से की है। कुछ अन्य विद्वानों ने शब्द भाशा विज्ञान के आधार पर शातकर्णी तथा सातवाहन शब्दों को परिभाषित किया है चाहे इन शब्दों की महत्ता कुछ भी रही हो परन्तु सातवाहन वंश के शिलालेखों के आधार पर यह लगभग निश्चित है कि सातवाहन भी शुंग तथा कण्व शासकों की तरह ब्राह्मण थे। इस बात का प्रमाण नासिक शिलालेख से भी मिल जाता है जिसमें गौतमी पुत्र श्री शातकर्णी को एक ब्राह्मण (अद्वितिय ब्राह्मण) तथा खतिय-दप-मान-मदन अर्थात क्षत्रियों का मान मर्दन करने वाला आदि उपाधियों से सुशेभित किया है। इसी शिलालेख के लेखक ने गौतमीपुत्र की तुलना परशुराम से की है। साथ ही दात्रीशतपुतलिका में भी शालीवाहनों को मिश्रित ब्राह्मण जाति तथा नागजाति से उत्पन्न माना गया है।
सातवाहनों का शासनकाल तथा कालक्रम
सातवाहनों के कालक्रम को लेकर विद्वानों में गहरे मतभेद हैं। ऐत्रेयय ब्राह्मण जो कि पाँच सौ ई0पूर्व में लिखा गया था उसमें आन्ध्रों को ऐसे दस्यु बताया गया है जो कि आर्य परिधि से बाहर थे तथा जो विश्वामित्र के वंशज थे। इस आधार पर डॉ॰डी0आर0 भण्डारकर ने 500 ई0पूर्व को सातवाहनों की आरम्भिक स्थिति माना है। डॉ॰वी0ए0 स्मिथ के अनुसार आन्ध्र पहले अधीनस्थ थे परन्तु उसकी मृत्यु के पश्चात् वे सिमुख के नेतृत्व में स्वतन्त्र हो गए तथा यह घटना तीसरी शताब्दी ई0पूर्व में हुई। इस विषय में स्मिथ ने पुराणों का ही आधार माना है जिनके अनुसार आन्ध्रों के कुल तीस शासकों ने लगभग 460वर्षों तक शासन किया। डॉ॰गोपालचारी ने भी इस तथ्य को स्वीकारते हुए यह माना है कि सातवाहन वंश की स्थापना लगभग 235ई0पूर्व तथा उसका पतन लगभग 255 ईस्वी में हुआ। कलिंग के शासक खारखेल के राज्यकाल में उत्कीर्ण हाथी गुम्फा शिलालेख के आधार पर रैपसन सातवाहन वंश का आरम्भ 220 ई0पूर्व तथा 211 ई0पूर्व के बीच मानते है परन्तु सातवाहनों के यासन काल को लेकर विभिन्न पुराणों में भी मतान्तर है। एक ओर जहा मत्स्यपुराण उनका कुल यासन काल 460वर्ष बताता है वहीं दूसरी ओर ब्राह्मणपुराण में यह अवधि 456 वर्ष बताई गई है।
वायुपुराण के अनुसार सातवाहनों ने 411 वर्षों तक शासन किया जबकि विष्णुपुराण उनकी शासन अवधि 300 वर्ष मानता है। दूसरी आर डॉ॰ आर0 जी0 भण्डारकर सातवाहन वंश की स्थापना 72.73 ई0पूर्व को मानते हैं। पुराणों में वर्णित एक वक्तव्य के आधार पर उन्होंने यह माना है कि, ‘‘शुंग मृत्य’’ कण्व शासक शुंग शासकों के सेवक थे तथा पेशवाओं की भांति उनके साथ-साथ शासन करते थे तथा सिमुक अथवा शिशुक नामक सातवाहन वंश के संस्थापक ने कण्व राजा सुश्रमन को मारकर कण्व तथा शुंग दोनो वंशो का अन्त कर दिया तथा उनके साम्राज्य को अपने आधीन कर लिया। परन्तु यह तथ्य अविश्वसनीय है क्योकिं हम यह भली-भांति जानते है कि शुंग तथा कण्व वंश के शासकों ने कभी संयुक्त रूप से शासन नही किया तथा कण्व वंश के संस्थापक वासुदेव कण्व ने अन्तिम शुंग शासक देवभूति की हत्या कर शासन की बागडोर सम्भाली थी। वायुपुराण के उस वक्तव्य जिसके आधार पर डॉ॰भण्डारकर ने गलत व्याख्या की है, को डॉ॰राय चौधरी ने सही ढ़ंग से परिभाषित किया है। उनके अनुसार यह गंद्याश मात्रा इतना ही बताता है कि सिमुक ने जब कण्व वंश का अन्त कर सातवाहन वंश की स्थापना की तो उसने उन शुंग उपशासकों भी समाप्त कर दिया जो कि कण्व वंश के हाथों शुंग शासकों के पराजित होने के बाद भी बचे रह गए थे। अतएव सातवाहन शासकों ने 29 ई0पूर्व (72ई0पूर्व -45वर्ष) में कण्व वंश का अन्त कर स्वयं शासन की बागडोर संभाली। परन्तु इस सब कारकों के होते हुए भी इस सम्भावना से इनकार नही किया जा सकता कि सिमुक जिसने 23वर्षों तक शासन किया वह कुछ समय पहले ही अर्थात पहली शताब्दी ई0पू0 के मध्य में ही सिंहासनारूढ़ हो गया होगा।
सातवाहन वंश के शासक
सिमुक
सिमुक (235 ई0पू0 - 212 ई0पू0) सातवाहन वंश का संस्थापक था तथा उसने 235 ई0पू0 से लेकर 212ई0पू0 तक लगभग 23 वर्षों तक शासन किया। यद्यपि उसके विषय में हमें अधिक जानकारी नही मिलती तथापि पुराणों से हमें यह ज्ञात होता है कि कण्व शासकों की शक्ति का नाश कर तथा बचे हुए शुंग मुखियाओं का दमन करके उसने सातवाहन वंश की नींव रखी। पुराणों में उसे सिमेक के अतिरिक्त शिशुक, सिन्धुक तथा शिप्रक आदि नामों से भी पुकारा गया है। जैन अनुश्रुतियों के अनुसार सिमुक ने अपने शासन काल में जैन तथा बौद्ध मन्दिरों का निर्माण करवाया, परन्तु अपने शासन काल के अन्तकाल में वह पथभ्रष्ट तथा क्रुर हो गया जिस कारणवश उसे पदच्युत कर उसकी हत्या कर दी।
कान्हा तथा कृष्ण (212ई0पू0 - 195ई0पू0)
सिमुक की मृत्यु के पश्चात उसका छोटा भाई कान्हा (कृष्ण) राजगद्दी पर बैठा। अपने 18 वर्षों के कार्यकाल में कान्हा ने साम्राज्य विसतार की नीति को अपनाया। नासिक के शिलालेख से यह पता चलता है कि कान्हा के समय में सातवाहन साम्राज्य पश्चिम में नासिक तक फैल गया था। शातकर्णी-प् (प्रथम) कान्हा के उपरान्त शातकर्णी प्रथम गद्दी पर बैठा। पुराणों के अनुसार वह कान्हा पुत्र था। परन्तु डॉ॰ गोपालचारी सिमुक को शातकर्णी प्रथम का पिता मानते हैं। कुछ विद्वानों ने यह माना है कि इसका शासन काल मात्रा दो वर्ष रहा परन्तु नीलकण्ठ शास्त्री ने उसका शासन काल 194 ई0पू0 से लेकर 185 ई0पू0 माना है। जो भी हो यह सुस्पष्ट है कि उसका शासन काल बहुत लम्बा नही था। परन्तु छोटा होते हुए भी शातकर्णी प्रथम का कार्यकाल कुछ दृष्टिकोणों से बड़ा महत्वपूर्ण है। सातवाहन शासकों में वह पहला था जिसने इस वंश के शासकों में प्रिय एवं प्रचलित, ‘‘शातकर्णी’’ शब्द से अपना नामकरण किया। नानाघाट शिलालेख के अनुसार शातकर्णी ने अपने साम्राज्य का खुब विस्तार किया तथा अपने कार्य काल में दो अश्वमेघ यज्ञ तथा एक राजसुय यज्ञ किया। उसकी रानी नयनिका के एक शिलालेख से हमें यह ज्ञात होता है कि शातकर्णी प्रथम ने पश्चिमी मालवा के साथ-साथ अनुप (नर्मदा घाटी का क्षेत्र) तथा विदर्भ (बरार) प्रदेशों भी जीत लिया। यदि शातकर्णी प्रथम ही वह शासक है जिसका उल्लेख सांची स्तूप के तोरण में हुआ है तो यह भी इस बात को प्रमाणित करता है कि उसके समय में मध्य भारत सातवाहनों के अधिकार में था। वह अपने छाटे से कार्य काल मे सम्राट बन गया तथा उसने दक्षिण पथपति तथा अप्रतिहत चक्र आदि उपाधियाँ धारण की। नानाघाट लेख तथा हाथी गुम्फा लेखों में प्रयुक्त लिपि की समानता के आधार पर ही यह सुझाया गया है कि कदाचित इसी शातकर्णी शासकों के शासन काल के दूसरे वर्ष में कलिंग के महान शासक खारखेल ने युद्ध क्षेत्र में हराया था। शातकर्णी प्रथम की पत्नी नयनिका अथवा नागनिका अंगीय कुल के एक महारथी त्रणकाइरो की पुत्री थी।
वेदश्री तथा सतश्री (अथवा शक्ति श्री)
शातकर्णी प्रथम की मृत्यु के पश्चात उसके दो अल्पव्यस्क पुत्र वेदश्री तथा सतश्री सिंहासन पर बैठे। परन्तु अल्पव्यस्क होने के कारण प्रशासन की सारी बागडोर उनकी मां नयनिका के हाथों में आ गई जिसने अपने पिता की सहायता से शासन चलाया। ऐसा प्रतीत होता है कि वेदश्री की अल्पायु में ही मृत्यु हो गई तथा सतश्री ने उसके उत्तराधिकारी के रूप में शासन संभाला। परन्तु पुराण इस विषय में एकमत है कि शातकर्णी प्रथम के पश्चात् पूर्णोत्संग नामक राजा सातवाहन सिंहासन पर आसीन हुआ। चाहे चतुर्थ सातवाहन शासक का नाम कुछ भी रहा हो, यह तो निश्चित है कि इस शासक के शासन काल में ही पुष्यमित्र शुंग ने अंतिम मौर्य शासक ब्रहद्रथ को मार कर मगध राज्य पर अधिकार कर लिया था। मत्स्यपुराण में स्कन्दस्तम्भी का उल्लेख सातवाहन वंश के पाँचवें शासक के रूप में केया है परन्तु अधिकतर विद्वान इस नाम को कल्पित मानते हैं।
शातकर्णी द्वितिय
शातकर्णी द्वितिय ने लगभग 166 ई0पू0 से लेकर 111 ई0पू0 तक शासन किया। यह कदाचित वही शासक था जिसका वर्णन हीथीगुम्फा तथा भीलसा शिलालेखों में हुआ है। यह प्रतीत होता है कि इसके शासन काल में सातवाहनों ने पूर्वी मालवा को पुष्यमित्र शुंग के एक उत्तराधिकारी से छीन लिया।
पुराणों के अनुसार शातकर्णी द्वितिय के पश्चात् लम्बोदर राजसिंहासन पर आसीन हुआ। लम्बोदर के पश्चात् उसका पुत्र अपीलक गद्दी पर बैठा। अपीलक जो कि आठवाँ सातवाहन शासक था, इन दोनां के मध्य का काल सातवाहनों के सन्दर्भ में अंधकार युग माना गया है जिसमें केवल कुन्तल शातकर्णी के काल को ही अपवाद माना जा सकता है। कुन्तल शातकर्णी, अपीलक के पश्चात् सातवाहनों का अगला महत्वपूर्ण शासक था। कामसूत्र में वात्सायन ने कुन्तल शातकर्णी का उल्लेख करते हुए लिखा है कि उसने अपनी उंगलियों को कैंची के रूप में प्रयोग किया तथा इसके प्रहार से उसकी पटरानी मलयवती की मृत्यु हो गई। काव्यमिंमाशा में राजेश्वर ने कुनतल शातकर्णी का वर्णन करते हुए कहा है कि उसने अपने रनिवास में रहने वाली अपनी रानियों को यह आदेश दिया था कि वे केवल प्राकृत भाषा का प्रयोग करें।
- === हाल (20 ई0पू0 - 24 ई0पू0)===
हाल सातवाहनों का अगला महत्पूर्ण शासक था। यद्यपि उसने केवल चार वर्ष ही शासन किया तथापि कुछ विषयों उसका शासन काल बहुत महत्वपूर्ण रहा। ऐसा माना जाता है कि यदि आरम्भिक सातवाहन शासकों में शातकर्णी प्रथम योद्धा के रूप में सबसे महान था तो हाल शांतिदूत के रूप में अग्रणी था। हाल साहित्यिक अभिरूचि भी रखता था तथा एक कवि सम्राट के रूप में प्रख्यात हुआ। उसके नाम का उल्लेख पुराण, लीलावती, सप्तशती, अभिधान चिन्तामणि आदि ग्रन्थों में हुआ है। यह माना जाता है कि प्राकृत भाषा में लिखी गाथा सप्तशती अथवा सतसई (सात सौ श्लोकों से पूर्ण) का रचियता हाल ही था। बृहदकथा के लेखक गुणाढ्य भी हाल का समकालीन था तथा कदाचित पैशाची भाषा में लिखी इस पुस्तक की रचना उसने हाल ही के संरक्षण में की थी। कालानतर में बुद्धस्वामी की बृहदकथा‘यलोक-संग्रह, क्षेमेन्द्र की बृहदकथा-मंजरी तथा सोमदेव की कथासरितसागर नामक तीन ग्रन्थों की उत्पति गुणाढ्य की बृहदकथा से ही हुई।
हाल के प्रधान सेनापति विजयानन्द ने अपने स्वामी के आदेशानुसार श्रीलंका पर आक्रमण कर उसे जीत लिया। इस विजय अभियान से वापिस लौटते समय वह कुछ समय के लिये सप्त गोदावरी भीमम् नामक स्थान पर रूका। वहाँ विजयानन्द ने श्रीलंका के राजा की अति रूपवान पुत्री लीलावती की चर्चा सुनी जिसका वर्णन उसने अपने राजा हाल से किया। हाल ने प्रयास कर लीलावती से विवाह कर लिया। किवदंती है कि हाल ने पूर्वी दक्कन में कुछ सैनिक अभियान किये परन्तु साक्ष्यों के अभाव में अधिकतर विद्वान इसे गलत मानते हैं। यद्यपि हाल तक के सातवाहन शासकों के शासनकाल में राजनैतिक क्षेत्र के अतिरिक्त साहित्यिक तथा आर्थिक क्षेत्रों में भी अत्याधिक विकास हुआ तथा व्यपार-वाणिज्य शहरों के विकास एवं जलपरिवहन की उन्नति हुई जो कि प्रथम शताब्दी ई0 के दूसरे मुण्डलक अथवा पुरिद्रंसेन के शासन काल में अपने उत्कर्ष की पराकाष्ठा पर पहुँच गई, तथापि आने वाले लगभग पचास वर्ष सातवाहन साम्राज्य के लिए बड़े ही कठिन साबित हुए। ऐसा प्रतीत हुआ मानो के पश्चिम क्षत्रपों के रूप में हुए विदेशी आक्रमण के साथ ही सातवाहन साम्राज्य का पतन होने को है। कुषाण उत्तर-पश्चिम में अपना प्रसार कर रहे थे तथा उनके दबाव में शक तथा पहलाव शासक मध्य तथा पश्चिमी भारत की ओर आकर्षित होकर सातवाहनों से संघर्ष करने को आतुर थे। क्षहरात वंश के पश्चिमी क्षत्रपों ने अपने को पश्चिमा राजपुताना, गुजरात तथा काठियावाड़ में स्थापित कर लिया था। इन शक शासकों ने 35 ई0 से लेकर लगभग 90ई0 तक सातवाहन राज्य पर आक्रमण किये। उन्होंने सातवाहनों से पूर्वी तथा पयिचमा मालवा प्रदेशों को जीता; उत्तरी कोंकण (अपरान्त) उत्तरी महाराष्ट्र, जो कि सातवाहन शक्ति का केन्द्र था तथा बनवासी (वैजयन्ती) तक फैले दक्षिणी महाराष्ट्र पर भी अपना प्रभुत्व जमा लिया। क्षहरात वंश का पहला शासक घूमक था जिसकी जानकारी के स्रोत कुछ सिक्कें है जो कि अधिकांशतः गुजरात काठियावाड़ के तटीय प्रदेश तथा यदाकदा मालवा से पाए हैं। घूमक का उत्तराधिकारी नहपान था जिसकी जानकारी हमें उसके बहुसंख्य सिक्कों पर राजा (अथवा राजन्) की उपाधि धारण की है। वहीं शिलालेखों उसकी उपाधि क्षत्रप तथा महाक्षत्रप मिली। नासिक, कारले तथा जुनार (उत्तरी महाराष्ट्र) के उसके शिलालेख; एसके बहुसंख्य सिक्कें तथा उसके जामाता शक अशवदात के द्वारा उत्तरी तथा दक्षिणी भारत में दिए गए दान सब के सब ये प्रमाणित करते हैं कि नहपान के समय में क्षहरात वंश का साम्राज्य काफी विस्तुत था तथा उसने सातवाहन शासकों से काफी बड़ा प्रदेश छीन कर ही अपने साम्राज्य को इतना विशाल बनाया था। नहपान तथा उसके जामाता शक अशवदत ने मालवा, नर्मदा घाटी, उत्तरी कोंकण, बरार का पश्चिमा भाग एवं और दक्षिणी महाराष्ट्र को जीतकर पश्चिमी दक्कन में सातवाहन शक्ति को ल्रभ्र उखाड़ फैंका। वे सातवाहन राजा जो नहपान के हाथों पराजित हुए कदाचित सुन्दर शातकर्णी, चकोर शातकर्णी तथा शिवसाती थे जिनका कि कार्यकाल बहुत ही छोटा था (इनमें से पहले दो का शासन काल मात्रा डेढ़ वर्ष था) परन्तु यह परिस्थितियां अधिक समय तक नही चली तथा गौतमी पुत्र श्री शातकर्णी के सातवाहन शासक बनते ही इस क्षहरात-सातवाहन संघर्ष में नया मोड़ आया।
गौतमी पुत्र श्री शातकर्णी (70ई0-95ई0)
लगभग आधी शताब्दी की उठापटक तथा शक शासकों के हाथों मानमर्दन के बाद गौतमी पुत्र श्री शातकर्णी के नेतृत्व में अपनी खोई हुई प्रतिष्ठा को पुर्नस्थापित कर लिया। गौतमी पुत्र श्री शातकर्णी सातवाहन वंश का सबसे महान शासक था जिसने लगभग 25 वर्षों तक शासन करते हुए न केवल अपने साम्राज्य की खोई प्रतिष्ठा को पुर्नस्थापित किया अपितु एक विशाल साम्राज्य की भी स्थापना की। गौतमी पुत्र के समय तथा उसकी विजयों के बारें में हमें उसकी माता गौतमी बालश्री के नासिक शिलालेखों से सम्पूर्ण जानकारी मिलती है। कुछ विशेषज्ञों द्वारा गौतमिपुत्र सत्कर्णी को राजा शालीवाहन भी माना जाता है। उन्होंने पूरे भारत को एकजुट कर दिया और विदेशी हमलावरों के खिलाफ बचाया। उसके सन्दर्भ में हमें इस लेख से यह जानकारी मिलती है कि उसने क्षत्रियों के अहंकार का मान-मर्दन किया। उसका वर्णन शक, यवन तथा पहलाव शससकों के विनाश कर्ता के रूप में हुआ है। उसकी सबसे बड़ी उपलब्धि क्षहरात वंश के शक शासक नहपान तथा उसके वंशजों की उसके हाथों हुई पराजय थी। जोगलथम्बी (नासिक) समुह से प्राप्त नहपान के चान्दी के सिक्कें जिन्हे कि गौतमी पुत्र शातकर्णी ने दुबारा ढ़लवाया तथा अपने शासन काल के अठारहवें वर्ष में गौतमी पुत्र द्वारा नासिक के निकट पांडु-लेण में गुहादान करना- ये कुछ ऐसे तथ्य है जों यह प्रमाणित करतें है कि उसने शक शासकों द्वारा छीने गए प्रदेशों को पुर्नविजित कर लिया। नहपान के साथ उनका युद्ध उसके शासन काल के 17वें और 18वें वर्ष में हुआ तथा इस युद्ध में जीत कर र्गातमी पुत्र ने अपरान्त, अनूप, सौराष्ट्र, कुकर, अकर तथा अवन्ति को नहपान से छीन लिया। इन क्षेत्रों के अतिरिक्त गौतमी पुत्र का ऋशिक (कृष्णा नदी के तट पर स्थित ऋशिक नगर), अयमक (प्राचीन हैदराबाद राज्य का हिस्सा), मूलक (गोदावरी के निकट एक प्रदेश जिसकी राजधानी प्रतिष्ठान थी) तथा विदर्भ (आधुनिक बरार क्षेत्र) आदि प्रदेशों पर भी अधिपत्य था। उसके प्रत्यक्ष प्रभाव में रहने वाला क्षेत्र उत्तर में मालवा तथा काठियावाड़ से लेकर दक्षिण में कृष्णा नदी तक तथा पूवै में बरार से लेकर पश्चिम में कोंकण तक फैला हुआ था। उसने 'त्रि-समुंद्र-तोय-पीत-वाहन' उपाधि धारण की जिससे यह पता चलता है कि उसका प्रभाव पूर्वी, पश्चिमी तथा दक्षिणी सागर अर्थात बंगाल की खाड़ी, अरब सागर एवं हिन्द महासागर तक था। ऐसा प्रतीत होता है कि अपनी मृत्यु के कुछ समय पहले गौतमी पुत्र शातकर्णी द्वारा नहपान को हराकर जीते गए क्षेत्र उसके हाथ से निकल गए। गौतमी पुत्र से इन प्रदेशों को छीनने वाले संभवतः सीथियन जाति के ही करदामक वंश के शक शासक थे। इसका प्रमाण हमें टलमी द्वारा भूगोल का वर्णन करती उसकी पुस्तक से मिलता है। ऐसा ही निष्कर्ष 150 ई0 के प्रसिद्ध रूद्रदमन के जूनागढ़ के शिलालेख से भी निकाला जा सकता है। यह शिलालेख दर्शाता है कि नहपान से विजित गौतमीपुत्र शातकर्णी के सभी प्रदेशों को उससे रूद्रदमन ने हथिया लिया। ऐसा प्रतीत होता है कि गौतमीपुत्र शातकर्णी ने करदामक शकों से वैवाहिक सम्बन्ध स्थापित कर रूद्रदमन द्वारा हथियाए गए अपने क्षेत्रों को सुरक्षित करने का प्रयास किया।https://www.mahamtb.com/Encyc/2018/2/4/Article-on-Satwahana-Empire-By-Rashmi-Marchande-.html
आंध्र-सातवाहन वंश (30 ई.पू. से 250 ई0)
इस वंश का संस्थापक सिमुक था। सातवाहन वंश का शासन क्षेत्र मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश और कर्नाटक था। पुराणों में इन्हें ‘आंध्रभृत्य’ कहा गया है तथा अभिलेखों में ‘सातवाहन’ कहा गया है। सातवाहन वंश की राजधानी प्रतिष्ठान/पैठान थी तथा इसकी राजकीय भाषा ‘प्राकृत’ तथा लिपि ‘ब्राम्ही’ थी। इस वंश की जानकारी हमें अभिलेख, सिक्के तथा स्मारक तीनों से प्राप्त होती है, जो निम्नलिखित हैं-
- रानी नागनिका का नानाघाट अभिलेख (पुणे, महाराष्ट्र)
- गौतमीपुत्र शातकर्णी के नासिक से प्राप्त दो गुहालेख
- गौतमी बलश्री का नासिक गुहालेख
- वशिष्ठीपुत्र पुलुमावी का नासिक गुहालेख
- वशिष्ठीपुत्र पुलुमावी का कार्ले गुहालेख
- यज्ञश्री शातकर्णी का नासिक गुहालेख
सातवाहन वंश किसी-न-किसी रूप में लगभग तीन शताब्दियों तक बना रहा, जो प्राचीन भारत में किसी एक वंश का सर्वाधिक कार्यकाल है।
सातवाहन वंश के प्रमुख शासक
शातकर्णी प्रथम
- यह सातवाहन वंश का पहला यशस्वी शासक था। उसकी उपलब्धियों की जानकारी रानी नागनिका (नायनिका) के नानाघाट अभिलेख से मिलती है।
- शातकर्णी प्रथम ने दो अश्वमेध यज्ञ और एक राजसूय यज्ञ किया था।
- शातकर्णी प्रथम ने ‘दक्षिणापथपति’ तथा ‘अप्रतिहतचक्र’ की उपाधियां धारण कीं।
- शातकर्णी प्रथम ने मालव शैली की गोल मुद्राएं तथा अपनी पत्नी के नाम पर रजत मुद्राएं उत्कीर्ण करवाईं।
- उसके सिक्कों पर ‘श्रीसात’ (शातकर्णी का सूचक) का उल्लेख मिलता है।
हाल
- सातवाहन वंश में हाल महानतम् शासक था। वह एक बड़ा कवि तथा कवियों एवं विद्वानों का आश्रयदाता था।
- हाल ने ‘गाथासप्तशती’ नामक एक मुक्तक काव्य की रचना की थी। इसकी भाषा ‘प्राकृत’ है।
- उसकी राजसभा में ‘बृहत्कथा’ (पैशाची प्राकृत भाषा में रचित) के रचयिता गुणाढ्य तथा ‘कातंत्र’ नामक संस्कृत व्याकरण के लेखक सर्ववर्मन निवास करते थे।
गौतमीपुत्र शातकर्णी (106 ई0-130 ई0)
- गौतमीपुत्र शातकर्णी सातवाहन वंश का सबसे महान शासक था।
- उसकी विजय की जानकारी उसकी माता गौतमी बलश्री के नासिक अभिलेख से प्राप्त होती है। इस अभिलेख में उसे अद्वितीय ब्राम्हण (एकब्राम्हण) कहा गया है। इस अभिलेख के अनुसार उसके घोड़ों ने तीनों समुद्रों का पानी पिया था।
- गौतमीपुत्र शातकर्णी ने वेणकटक स्वामी की उपाधि धारण की तथा वेणकटक नामक नगर की स्थापना की। इसके अलावा उसने ‘राजाराज’ तथा ‘विंध्यनरेश’ की भी उपाधि धारण की।
- उसने बौद्ध संघ को ‘अजकालकिय’ तथा कार्ले के भिक्षुसंघ को ‘करजक’ नामक ग्राम दान में दिये।
- उसका साम्राज्य संभवतः उत्तर में मालवा से लेकर दक्षिण में कर्नाटक तक फैला हुआ था।
- नासिक (जोगलथंबी) से चांदी के लगभग 8 हजार सिक्के प्राप्त हुए हैं, जिनमें एक तरफ़ नहपान तथा दूसरी तरफ गौतमीपुत्र शातकर्णी का नाम है।
- गौतमीपुत्र शातकर्णी ने शक शासक नहपान को हराया था।
वशिष्ठीपुत्र पुलुमावी (130 ई0-154 ई0)
- गौतमीपुत्र शातकर्णी के बाद उसका पुत्र वशिष्ठीपुत्र पुलुमावी शासक बना।
- आंध्र प्रदेश पर विजय के पश्चात् उसे प्रथम आंध्र सम्राट कहा गया।
- पुलुमावी ने अपनी राजधानी आंध्र प्रदेश के औरंगाबाद जिले में गोदावरी नदी के किनारे पैठान या प्रतिष्ठान बनाई।
- उसने शक शासक रूद्रदामन को दो बार पराजित किया। उसे ‘दक्षिणापथेश्वर’ भी कहा गया है। पुराणों में उसका नाम ‘पुलोमा’ मिलता है।
- पुलुमावी के बाद शिवश्री शातकर्णी (154-165 ई0) तथा शिवस्कंदशातकर्णी (165-174 ई0) राजा हुए।
यज्ञश्री शातकर्णी (174-203 ई0)
- यज्ञश्री शातकर्णी सातवाहन वंश का अंतिम महत्वपूर्ण राजा था। उसने शकों के विजित क्षेत्र पर पुनः अधिकार कर लिया।
- यज्ञश्री शातकर्णी व्यापार एवं जलयात्रा का प्रेमी था। उसके सिक्कों पर जहाज के चित्र बने हुए हैं, जो उसके जलयात्रा एवं व्यापार के प्रति प्रेम का द्योतक है।
- उसके सिक्के आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश एवं गुजरात से प्राप्त हुए हैं।
- यज्ञश्री के मृत्यु के बाद सातवाहनों का साम्राज्य विभाजित हो गया, जिसका मुख्य कारण विद्रोह एवं केन्द्रीय शासन की दुर्बलता थी।
सातवाहनकालीन प्रशासनिक व्यवस्था
- सामंतिक लक्षण का आभास सर्वप्रथम सातवाहन काल में ही मिलता है। इस काल में सामंतों की तीन श्रेणियां थीं-
- प्रथम-राजा,
- द्वितीय-महाभोज,
- तृतीय-सेनापति ।
- अहार- जिला को कहा जाता था।
- ‘अमात्य’ और ‘महामात्य’- सातवाहन शासन में अधिकारी को कहा जाता था।
- गौल्मिक- ग्रामीण क्षेत्रों में प्रशासक को कहा जाता था। गौल्मिक एक सैनिक टुकड़ी का प्रधान होता था, जिसमें नौ रथ, नौ हाथी, पच्चीस घोड़े और पैंतालीस पैदल सैनिक होते थे।
सातवाहनकालीन आर्थिक व्यवस्था एवं मुद्राएं
- ‘मिलिंदपन्हो’ एवं ‘महावस्तु’ से व्यवसायों एवं शिल्पियों की विभिन्न श्रेणियों का पता चलता है, जिसके प्रधान को ‘श्रेष्ठिन’ कहा जाता था।
- इस काल में आंतरिक एवं बाह्य दोनों ही व्यापार होते थे। पश्चिमी देशों के साथ-ही-साथ श्रीलंका, जावा, सुमात्रा आदि के साथ जल मार्ग से व्यापार होता था।
- इस काल में कृषि की उन्नति के साथ व्यापार-वाणिज्य की भी प्रगति हुई। राजा कृषकों के उपज का छठा भाग कर के रूप में प्राप्त करता था।
- सातवाहन काल में व्यापार-व्यवस्था में चांदी एवं तांबे के सिक्कों का प्रयोग होता था, जिसे कार्षापण’ कहा जाता था।
- सोने की मुद्रा का ‘सुवर्ण’ कहा जाता था, जो 35 चांदी के ‘कार्षापणों’ के बराबर होती थी। सातवाहनों ने ही सर्वप्रथम सीसे की मुद्रा चलाई थी।
सातवाहनकालीन सामाजिक संगठन
- सातवाहन दक्कन के कबीलाई लोग थे, लेकिन वे ब्राम्हण बना दिये गए थे।
- गौतमीपुत्र शातकर्णी ने चातुर्वर्ण्य व्यवस्था (चार वर्णों वाली व्यवस्था) को फिर से स्थापित किया और वर्णसंकर व्यवस्था (वर्णों और जातियों के सम्मिश्रण) को रोका।
- इस काल में महिलाओं की दशा अच्छी थी। महिलाएं शिक्षित थीं, पर्दा प्रथा नहीं थी। स्त्रियां भी संपत्ति में भागीदार होती थीं।
- यद्यपि राजाओं के नाम मातृप्रधान हैं किन्तु सारतः सातवाहन राजकुल पितृतंत्रात्मक था क्योंकि राजसिंहासन का उत्तराधिकारी पुत्र ही होता था। समाज में अंतर्जातीय विवाह होते थे।
- राजपरिवार की महिलाएं बौद्ध धर्म को प्रश्रय देती थीं। जबकि पुरूष वैदिक धर्म को।
- सातवाहनों ने ब्राह्मणों और बौद्ध भिक्षुओं को कर-मुक्त ग्रामदान देने की प्रथा आरंभ की।
सातवाहनकालीन धार्मिक व्यवस्था
- सातवाहन शासकों ने राज्य में निवास करने वाले सभी नागरिकों के प्रति धार्मिक सहिष्णुता की नीति का अनुशीलन किया।
- हाल की गाथासप्तशती के प्रारंभ में ही शिव की पूजा की गई है तथा इंद्र, कृष्ण, पशुपति एवं गौरी की पूजा का भी इसमें उल्लेख मिलता है।
- सातवाहन काल में राजा स्वयं के साथ देवताओं का तादाम्य स्थापित करने लगे, जैसे-गौतमी पुत्र शातकर्णी ने स्वयं को कृष्ण, बलराम और संकर्षण का रूप स्वीकार किया था।
- गौतमीपुत्र शातकर्णी को नासिक प्रशस्ति में ‘अद्वितीय ब्राम्हण’ कहा गया है।
कला एवं भाषा
- सातवाहनों की राजकीय भाषा प्राकृत और लिपि ब्राम्ही थी। सातवाहनों की महत्वपूर्ण स्थापत्य कला है-कार्ले का चैत्य एवं अमरावती स्तूप कला का विकास।
सातवाहन
मौर्य साम्राज्य के पतन के बाद, आंध्र का इतिहास, राजनीतिक और सांस्कृतिक घटनाओं के निरंतर विवरण के रूप में, एक राजनीतिक शक्ति के रूप में सातवाहन के उदय के साथ शुरू होता है। मत्स्य पुराण के अनुसार इस वंश के 29 शासक थे। उन्होंने ईसा पूर्व दूसरी शताब्दी से लगभग 400 वर्षों तक दक्कन सहित आंध्रदेश पर शासन किया। दूसरी शताब्दी ई. से आगे तक सातवाहनों को सलिवाहन और शातकर्णी भी कहा जाता था। तीसरी शताब्दी ईसा पूर्व में, सातवाहन राजवंश के संस्थापक सिमुख ने विभिन्न आंध्र रियासतों को एक राज्य में एकीकृत किया और इसके शासक बने (271 ईसा पूर्व – 248 ईसा पूर्व)। गुंटूर जिले में अमरावती के पास धरणीकोटा सिमुखा की पहली राजधानी थी, लेकिन बाद में उन्होंने अपनी राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिले में पैठण) में स्थानांतरित कर दी।
शातकर्णी द्वितीय, राजवंश का छठा शासक (184 ईसा पूर्व) एक सक्षम शासक था जिसने मालवा पर विजय प्राप्त करके अपने राज्य को पश्चिम तक बढ़ाया। शिलालेखीय साक्ष्यों के अनुसार, उसने अपने राज्य की सीमाओं को विंध्य के पार मध्य भारत तक फैलाया, शायद गंगा नदी तक। उन्होंने 56 वर्ष की लम्बी अवधि तक शासन किया। शातकर्णी द्वितीय के लंबे शासनकाल के बाद क्रमिक रूप से आठ शासकों ने शासन किया, जिनमें से किसी को भी किसी उल्लेखनीय उपलब्धि का श्रेय नहीं दिया जा सकता। यह पुलुमावी प्रथम का राज्यारोहण था जिसने उनके राज्य में नई ताकत और गौरव लाया। उसने 28 ईसा पूर्व में कण्व शासकों में से अंतिम सुसरमन को मार गिराया। और मगध पर कब्ज़ा कर लिया। इस प्रकार सातवाहनों ने नंदों, मौर्यों, शुंगों और कण्वों के उत्तराधिकार में शाही शासकों के रूप में अखिल भारतीय महत्व ग्रहण किया। ऐसा प्रतीत होता है कि उनके उत्तराधिकारी राजाओं को शकों द्वारा महाराष्ट्र से बाहर उनकी गृह भूमि आंध्र में वापस भेज दिया गया था। उस धुंधले माहौल में एकमात्र उम्मीद की किरण 17वें सातवाहन राजा हाला की उत्कृष्ट साहित्यिक कृति गाथासप्तसती थी।
सातवाहनों का प्रशासन
सातवाहन प्रशासन में शास्त्रों के दिशानिर्देशों का पालन करते थे। उनकी सरकार मौर्यों की तुलना में कम भारी थी, और इसमें कई स्तर के सामंत शामिल थे: राजन, वंशानुगत शासक राजा, छोटे राजकुमार जिन्होंने अपने नाम के सिक्के चलाए, महारथी, वंशानुगत स्वामी जो अपने नाम पर गाँव दे सकते थे और उनका रखरखाव कर सकते थे। शासक परिवार के साथ वैवाहिक संबंध महाभोज महासेनापति (पुलुमावी द्वितीय के तहत नागरिक प्रशासक; पुलुमावी चतुर्थ के तहत एक जनपद के राज्यपाल) महातलवरा (“महान चौकीदार”) शाही राजकुमारों (कुमारों) को प्रांतों के वाइसराय के रूप में नियुक्त किया गया था। ऐसा प्रतीत होता है कि आहार सातवाहन राज्य व्यवस्था का सबसे बड़ा भौगोलिक उपखंड था। कई शिलालेखों में अहारों का उल्लेख है जिनका नाम उन पर शासन करने के लिए नियुक्त राज्यपालों के नाम पर रखा गया है (उदाहरण के लिए गोवर्धनहारा, ममलहारा, सतावनिहारा और कपूरहारा)। इससे पता चलता है कि सातवाहनों ने एक औपचारिक प्रशासनिक और राजस्व संग्रह संरचना बनाने का प्रयास किया था। गौतमीपुत्र शातकर्णी के शिलालेख एक नौकरशाही संरचना के अस्तित्व का सुझाव देते हैं, हालांकि यह निश्चित नहीं है कि यह संरचना कितनी स्थिर और प्रभावी थी। उदाहरण के लिए, नासिक गुफा 11 के दो शिलालेखों में तपस्वी समुदायों को कृषि भूमि का दान दर्ज है। उनका कहना है कि तपस्वियों को शाही अधिकारियों से कर छूट और गैर-हस्तक्षेप का आनंद मिलेगा। पहले शिलालेख में कहा गया है कि अनुदान को राजा के मौखिक आदेश पर गौतमीपुत्र के मंत्री शिवगुप्त द्वारा अनुमोदित किया गया था, और “महान राजाओं” द्वारा संरक्षित किया गया था। दूसरे शिलालेख में गौतमीपुत्र और उनकी मां द्वारा दिए गए अनुदान का उल्लेख है, और श्यामाका को गोवर्धन आहार के मंत्री के रूप में उल्लेख किया गया है। इसमें कहा गया है कि चार्टर को लोटा नाम की एक महिला द्वारा अनुमोदित किया गया था, जो पुरातत्वविद् जेम्स बर्गेस की व्याख्या के अनुसार, गौतमीपुत्र की मां की मुख्य महिला-इन-वेटिंग थी। सातवाहन-युग के शिलालेखों में तीन प्रकार की बस्तियों का उल्लेख है: नगर (शहर), निगमा (बाजार शहर) और गामा (गाँव)।
सातवाहनों के दौरान अर्थव्यवस्था
सातवाहनों ने कृषि के गहनीकरण, अन्य वस्तुओं के उत्पादन में वृद्धि और भारतीय उपमहाद्वीप के भीतर और बाहर व्यापार के माध्यम से आर्थिक विस्तार में भाग लिया (और इससे लाभान्वित हुए)। सातवाहन काल के दौरान, उपजाऊ क्षेत्रों में, विशेषकर प्रमुख नदियों के किनारे, कई बड़ी बस्तियाँ उभरीं। वन मंजूरी और सिंचाई जलाशयों के निर्माण के परिणामस्वरूप, कृषि उपयोग के तहत भूमि की मात्रा में भी काफी वृद्धि हुई। सातवाहन काल के दौरान खनिज संसाधनों वाले स्थलों का दोहन बढ़ गया होगा, जिससे इन क्षेत्रों में नई बस्तियों का उदय हुआ। ऐसी साइटों ने वाणिज्य और शिल्प (जैसे सिरेमिक बर्तन) की सुविधा प्रदान की। सातवाहन काल के दौरान बढ़ा हुआ शिल्प उत्पादन कोटालिंगला जैसे स्थलों पर पुरातात्विक खोजों के साथ-साथ कारीगरों और गिल्डों के पुरालेखीय संदर्भों से स्पष्ट है। सातवाहनों ने भारतीय समुद्री तट को नियंत्रित किया और परिणामस्वरूप, रोमन साम्राज्य के साथ बढ़ते भारतीय व्यापार पर उनका प्रभुत्व हो गया। एरिथ्रियन सागर के पेरिप्लस में दो महत्वपूर्ण सातवाहन व्यापार केंद्रों का उल्लेख है: प्रतिष्ठान और तगारा। अन्य महत्वपूर्ण शहरी केंद्रों में कोंडापुर, बनवासी और माधवपुर शामिल थे। नानाघाट एक महत्वपूर्ण दर्रे का स्थल था जो सातवाहन राजधानी प्रतिष्ठान को समुद्र से जोड़ता था।
सातवाहनों के दौरान महत्वपूर्ण शिलालेख
सातवाहन काल के कई ब्राह्मी लिपि शिलालेख उपलब्ध हैं, लेकिन इनमें से अधिकांश में व्यक्तियों द्वारा बौद्ध संस्थानों को दिए गए दान का रिकॉर्ड है, और राजवंश के बारे में अधिक जानकारी नहीं मिलती है। सातवाहन राजघरानों द्वारा जारी किए गए शिलालेख भी मुख्य रूप से धार्मिक दान से संबंधित हैं, हालांकि उनमें से कुछ शासकों और शाही संरचना के बारे में कुछ जानकारी प्रदान करते हैं। सबसे पुराना सातवाहन शिलालेख नासिक गुफा 19 से है, जिसमें कहा गया है कि गुफा का निर्माण राजा कान्हा के शासनकाल के दौरान नासिक के महामात्र समन ने करवाया था। नानेघाट में सातकर्णी प्रथम की विधवा नयनिका द्वारा जारी एक शिलालेख मिला है। इसमें नयनिका की वंशावली दर्ज है और शाही परिवार द्वारा किए गए वैदिक बलिदानों का उल्लेख है। नानेघाट के एक अन्य शिलालेख में सातवाहन राजघरानों के नाम शामिल हैं, जो उनके आधार-राहत चित्रों पर लेबल के रूप में दिखाई देते हैं। चित्र अब पूरी तरह से नष्ट हो गए हैं, लेकिन शिलालेख को पुरालेख के आधार पर नयनिका के शिलालेख के समकालीन माना जाता है। अगला सबसे पुराना सातवाहन-युग का शिलालेख सांची में स्तूप 1 के मूर्तिकला प्रवेश द्वार तत्व पर दिखाई देता है। इसमें कहा गया है कि यह तत्व आनंद द्वारा दान किया गया था, जो सिरी सातकर्णी के कारीगरों के फोरमैन का बेटा था। यह शिलालेख संभवतः शातकर्णी द्वितीय के शासनकाल का है।
सातवाहन राजवंश (60 ई.पू. से 240 ई.)
- स्थापना – 60 ई.पू. से 240 ई.
- संस्थापक – सिमुक।
- अंतिम शासक – विजय।
सातवाहन वंश भारत का एक प्राचीन राजवंश था, जिसने केन्द्रीय दक्षिण भारत पर शासन किया था। भारतीय इतिहास में यह राजवंश ‘आन्ध्र वंश’ के नाम से भी विख्यात है। इस वंश के राजाओं ने विदेशी आक्रमणकारियों से जमकर युद्ध किया था। इन राजाओं ने शक आक्रांताओं को सहजता से भारत में पैर नहीं जमाने दिये।
सातवाहन वंश का इतिहास
सातवाहन भारत का एक राजवंश था, जिसने केन्द्रीय दक्षिण भारत पर राज किया। भारतीय परिवार, जो पुराणों (प्राचीन धार्मिक तथा किंवदंतियों का साहित्य) पर आधारित कुछ व्याख्याओं के अनुसार, आंध्र जाति (जनजाति) का था और दक्षिणापथ अर्थात दक्षिणी क्षेत्र में साम्राज्य की स्थापना करने वाला यह पहला दक्कनी वंश था। सातवाहन वंश के संस्थापक सिमुक ने 60 ई.पू. से 37 ई.पू. तक राज्य किया। उसके पश्चात उसका भाई कृष्ण और फिर कृष्ण का पुत्र सातकर्णी प्रथम सिंहासन पर बैठा। इसी के शासनकाल में सातवाहन वंश को सबसे अधिक प्रतिष्ठा मिली। वह खारवेल का समकालीन था। उसने गोदावरी नदी के तट पर प्रतिष्ठान नगर को अपनी राजधानी बनाया।
सातवाहन वंश में कुल 27 शासक हुए थे । ये हिन्दू धर्म के अनुयायी थे। साथ ही इन्होंने बौद्ध और जैन विहारों को भी सहायता प्रदान की। यह मौर्य वंश के पतन के बाद शक्तिशाली हुआ 8वीं सदी ईसा पूर्व में इनका उल्लेख मिलता है। अशोक की मृत्यु (सन् 232 ईसा पूर्व) के बाद सातवाहनों ने स्वयं को स्वतंत्र घोषित कर दिया था।
सातवाहन वंश के शासक
सातवाहन वंश में कुल 9 राजा ही हुए, जिनके नाम निम्नलिखित हैं:-
- सिमुक
- कृष्ण
- सातकर्णि
- गौतमीपुत्र सातकर्णि
- वासिष्ठीपुत्र पुलुमावी
- वशिष्ठिपुत्र सातकर्णि
- शिवस्कंद सातकर्णि
- यज्ञश्री शातकर्णी
- विजय
सिमुक
सिमुक (235 ई. पू. – 212 ई. पू.) सातवाहन वंश का संस्थापक था तथा उसने 235 ई. पू. से लेकर 212ई.पू. तक लगभग 23 वर्षों तक शासन किया। यद्यपि उसके विषय में हमें अधिक जानकारी नही मिलती तथापि पुराणों से हमें यह ज्ञात होता है कि कण्व शासकों की शक्ति का नाश कर तथा बचे हुए शुंग मुखियाओं का दमन करके उसने सातवाहन वंश की नींव रखी। पुराणों में उसे सिमेक के अतिरिक्त शिशुक, सिन्धुक तथा शिप्रक आदि नामों से भी पुकारा गया है। जैन अनुश्रुतियों के अनुसार सिमुक ने अपने शासन काल में जैन तथा बौद्ध मन्दिरों का निर्माण करवाया, लेकिन अपने शासन काल के आखिर में वह पथभ्रष्ट तथा क्रुर हो गया जिसके कारण उसे पदच्युत कर उसकी हत्या कर दी गई।
कृष्ण
सिमुक की मृत्यु के पश्चात उसका छोटा भाई कान्हा (कृष्ण) राजगद्दी पर बैठा। अपने 18 वर्षों के कार्यकाल में कान्हा ने साम्राज्य विसतार की नीति को अपनाया। नासिक के शिलालेख से यह पता चलता है कि कान्हा के समय में सातवाहन साम्राज्य पश्चिम में नासिक तक फैल गया था। शातकर्णी-प् (प्रथम) कान्हा के उपरान्त शातकर्णी प्रथम गद्दी पर बैठा। पुराणों के अनुसार वह कान्हा पुत्र था। परन्तु डॉ. गोपालचारी सिमुक को शातकर्णी प्रथम का पिता मानते हैं।
कुछ विद्वानों ने यह माना है कि इसका शासन काल मात्रा दो वर्ष रहा परन्तु नीलकण्ठ शास्त्री ने उसका शासन काल 194 ई.पू. से लेकर 185 ई.पू. माना है। जो भी हो लेकिन यह सुस्पष्ट है कि उसका शासन काल बहुत लम्बा नही था। लेकिन छोटा शासन काल होते हुए भी शातकर्णी प्रथम का कार्यकाल कुछ दृष्टिकोणों से बड़ा महत्वपूर्ण है। सातवाहन शासकों में वह पहला था जिसने इस वंश के शासकों में प्रिय एवं प्रचलित, ‘‘शातकर्णी’’ शब्द से अपना नामकरण किया।
सातकर्णि
कृष्ण के बाद उसका भतीजा (सिमुक का पुत्र) प्रतिष्ठान के राजसिंहासन पर पदासीन हुआ। उसने सातवाहन राज्य का बहुत विस्तार किया। उसका विवाह नायनिका या नागरिका नाम की कुमारी के साथ हुआ था, जो एक बड़े महारथी सरदार की दुहिता थी। इस विवाह के कारण सातकर्णि की शक्ति बहुत बढ़ गई, क्योंकि एक शक्तिशाली महारथी सरदार की सहायता उसे प्राप्त हो गई। सातकर्णि के सिक्कों पर उसके श्वसुर अंगीयकुलीन महारथी त्रणकयिरो का नाम भी अंकित है।
शिलालेखों में उसे ‘दक्षिणापथ‘ और ‘अप्रतिहतचक्र‘ विशेषणों से संभोधित किया गया है। अपने राज्य का विस्तार कर इस प्रतापी राजा ने राजसूय यज्ञ किया, और दो बार अश्वमेध यज्ञ का अनुष्ठान किया था, क्योंकि सातकर्णी का शासनकाल मौर्य वंश के ह्रास काल में था, अतः स्वाभाविक रूप से उसने अनेक ऐसे प्रदेशों को जीत कर अपने अधीन किया होगा, जो कि पहले मौर्य साम्राज्य के अधीन थे। अश्वमेध यज्ञों का अनुष्ठान इन विजयों के उपलक्ष्य में ही किया गया होगा। सातकर्णी के राज्य में भी प्राचीन वैदिक धर्म का पुनरुत्थान हो रहा था।
इनमें जो दक्षिणा सातकर्णि ने ब्राह्मण पुरोहितों में प्रदान की, उसमें अन्य वस्तुओं के साथ 47,200 गौओं, 10 हाथियों, 1000 घोड़ों, 1 रथ और 68,000 कार्षापणों का भी दान किया गया था। इसमें कोई सन्देह नहीं कि सातकर्णी एक प्रबल और शक्ति सम्पन्न राजा था। कलिंगराज खारवेल ने विजय यात्रा करते हुए उसके विरुद्ध शस्त्र नहीं उठाया था, लेकिन हाथीगुम्फ़ा शिलालेख के अनुसार वह सातकर्णी की उपेक्षा दूर-दूर तक आक्रमण कर सकने में समर्थ हो गया था।
सातकर्णी देर तक सातवाहन राज्य का संचालन नहीं कर सका। सम्भवतः एक युद्ध में उसकी मृत्यु हो गई थी, और उसका शासन काल केवल दस वर्ष (172 से 162 ई. पू. के लगभग) तक रहा था। अभी उसके पुत्र वयस्क नहीं हुए थे। अतः उसकी मृत्यु के उपरांत रानी नायनिका ने शासन-सूत्र का संचालन किया। पुराणों में सातवाहन राजाओं को आन्ध्र और आन्ध्रभृत्य भी कहा गया है। इसका कारण इन राजाओं का या तो आन्ध्र की जाति का होना है, और या यह भी सम्भव है कि इनके पूर्वज पहले किसी आन्ध्र राजा की सेवा में रहे हों। इनकी शक्ति का केन्द्र आन्ध्र में न होकर महाराष्ट्र के प्रदेश में था।
पुराणों में सिमुक या सिन्धुक को आन्ध्रजातीय कहा गया है। इसीलिए इस वंश को आन्ध्र-सातवाहन की संज्ञा दी जाती है। शिलालेखों में इस राजा के द्वारा किए गए अन्य भी अनेक यज्ञों का उल्लेख है।
गौतमीपुत्र सातकर्णि
लगभग आधी शताब्दी की उठापटक तथा शक शासकों के हाथों मानमर्दन के बाद गौतमी पुत्र श्री शातकर्णी के नेतृत्व में अपनी खोई हुई प्रतिष्ठा को पुर्नस्थापित कर लिया। गौतमी पुत्र श्री शातकर्णी सातवाहन (सेंगर वंश) वंश का सबसे महान शासक था जिसने लगभग 25 वर्षों तक शासन करते हुए न केवल अपने साम्राज्य की खोई प्रतिष्ठा को पुर्नस्थापित किया, बल्कि एक विशाल साम्राज्य की भी स्थापना की। गौतमी पुत्र के समय तथा उसकी विजयों के बारें में हमें उसकी माता गौतमी बालश्री के नासिक शिलालेखों से सम्पूर्ण जानकारी मिलती है। उसके सन्दर्भ में हमें इस लेख से यह जानकारी मिलती है कि उसने क्षत्रियों के अहंकार का मान-मर्दन किया था।
उसने ‘त्रि-समुंद्र-तोय-पीत-वाहन‘ उपाधि धारण की जिससे यह पता चलता है कि उसका प्रभाव पूर्वी, पश्चिमी तथा दक्षिणी सागर अर्थात बंगाल की खाड़ी, अरब सागर एवं हिन्द महासागर तक था। ऐसा प्रतीत होता है कि अपनी मृत्यु के कुछ समय पहले गौतमी पुत्र शातकर्णी द्वारा नहपान को हराकर जीते गए क्षेत्र उसके हाथ से निकल गए। गौतमी पुत्र से इन प्रदेशों को छीनने वाले संभवतः सीथियन जाति के ही करदामक वंश के शक शासक थे। इसका प्रमाण हमें क्लाडियस टॉलमी द्वारा भूगोल का वर्णन करती उसकी पुस्तक से मिलता है। ऐसा ही निष्कर्ष 150 ई. के प्रसिद्ध रूद्रदमन के जूनागढ़ के शिलालेख से भी निकाला जा सकता है। यह शिलालेख दर्शाता है कि नहपान से विजित गौतमीपुत्र शातकर्णी के सभी प्रदेशों को उससे रूद्रदमन ने हथिया लिया।
ऐसा प्रतीत होता है कि गौतमीपुत्र शातकर्णी ने करदामक शकों से वैवाहिक सम्बन्ध स्थापित कर रूद्रदामन द्वारा हथियाए गए अपने क्षेत्रों को सुरक्षित करने का प्रयास किया। उसका वर्णन शक, यवन तथा पहलाव शासको के विनाश कर्ता के रूप में हुआ है। उसकी सबसे बड़ी उपलब्धि क्षहरात वंश के शक शासक नहपान तथा उसके वंशजों की उसके हाथों हुई हार थी।
वासिष्ठीपुत्र पुलुमावी
वशिष्ठिपुत्र पलुमवी एक सातवाहन सम्राट बने जो सातवाहन सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी का पुत्र था। गौतमपुत्र सातकर्णी के बाद वर्ष 132 इसवी में वह शनिवाहन का राजा बना अपने शासनकाल के दौरान, क्षत्रप ने नर्मदा की भूमि उत्तर और उत्तरी कोंकण में ले ली। पुलुमावी और रुद्रदामन (उज्जैन के क्षत्रप) के बीच दो बार युद्ध हुआ। इन दोनों युद्धों में, रूद्रामन ने वशिष्ठिपुत्र पलुमवी को हराया लेकिन उनकी बेटी वस्तीति के बेटे शातकर्णी द्वितीय (पुलुवामी के छोटे भाई) को इसके कारण समझौता किया गया था। वैशालीपुत्र पलूमावई अपने स्वयं के मुखौटा के साथ चांदी के सिक्के ले आए थे।
पुरानो में उनका नाम पुलोमा शातकर्णी और टॉलमी के विवरण में सिरों-पोलिमेओस के रूप में मिलता है। संभवतः उसी ने नवनगा की स्थापना की थी। उसने भी महाराज और दक्शिनाप्थेश्वर की उपाधि धारण की जिसका उल्लेख अमरावती लेक में मिलता है आन्ध्र प्रदेश पर विजय प्राप्त करने के बाद इसे प्रथम आन्ध्र सम्राट कहा गया।
वशिष्ठिपुत्र सातकर्णि
वशिष्ठिपुत्र सातकर्णि सातवाहन वंश के राजा थे जिन्होंने द्वितीय शताब्दी में दख्खन क्षेत्र पर शासन किया। वे वशिष्ठिपुत्र श्री पुलमावी के भाई थे जो महान सातवाहन विजेता गौतमीपुत्र सतकामी के पुत्र थे। वशिष्ठिपुत्र सातकर्णि का राज्यकाल अलग-अलग अनुमानित किये जाते हैं। कुछ शोध उनके शासनकाल को जैसे 38-145 ई के बीच पाते हैं, तथा अन्य के अनुसार यह काल 158-165 ई तक था।
सातवाहन वंश का कालक्रम
इतिहासकारों द्वारा सातवाहन राजाओं के पुनर्निर्माण दो श्रेणियों में आते हैं। पहले एक के अनुसार, मौर्य साम्राज्य के पतन के तुरंत बाद सिमुक के शासन से शुरू होकर, 30 सतवाहन राजाओं ने लगभग 450 वर्षों तक शासन किया। यह दृश्य पुराणों पर बहुत निर्भर करता है, पुनर्निर्माण की दूसरी (और अधिक व्यापक रूप से स्वीकृत) श्रेणी के अनुसार, सातवाहन शासन पहली शताब्दी ईसा पूर्व के आसपास शुरू हुआ था। इस श्रेणी के कालक्रम में राजाओं की एक छोटी संख्या होती है, और पुराणिक अभिलेखों को पुरातात्विक, संख्यात्मक और पाठ्य प्रमाणों के साथ जोड़ा जाता है।
सातवाहन साम्राज्य की स्थापना तिथि के बारे में अनिश्चितता के कारण, सातवाहन राजाओं के शासनकाल के लिए पूर्ण तिथियां देना मुश्किल है। इसलिए, कई आधुनिक विद्वान ऐतिहासिक रूप से प्रमाणित सातवाहन राजाओं के शासनकाल के लिए पूर्ण तारीखों को निर्दिष्ट नहीं करते हैं, और जो एक दूसरे के साथ बहुत भिन्न होते हैं।
अन्य राजा
हाल (20 ई.पू. – 24 ई.पू.)
हाल सातवाहनों का अगला महत्पूर्ण शासक था। यद्यपि उसने केवल चार वर्ष ही शासन किया तथापि कुछ विषयों उसका शासन काल बहुत महत्वपूर्ण रहा। ऐसा माना जाता है कि यदि आरम्भिक सातवाहन शासकों में शातकर्णी प्रथम योद्धा के रूप में सबसे महान था तो हाल शांतिदूत के रूप में अग्रणी था। हाल साहित्यिक अभिरूचि भी रखता था तथा एक कवि सम्राट के रूप में प्रख्यात हुआ। उसके नाम का उल्लेख पुराण, लीलावती, सप्तशती, अभिधान चिन्तामणि आदि ग्रन्थों में हुआ है।
यह माना जाता है कि प्राकृत भाषा में लिखी गाथा सप्तशती अथवा सतसई (सात सौ श्लोकों से पूर्ण) का रचियता हाल ही था। बृहदकथा के लेखक गुणाढ्य भी हाल का समकालीन था तथा कदाचित पैशाची भाषा में लिखी इस पुस्तक की रचना उसने हाल ही के संरक्षण में की थी। कालानतर में बुद्धस्वामी की बृहदकथा‘यलोक-संग्रह, क्षेमेन्द्र की बृहदकथा-मंजरी तथा सोमदेव की कथासरितसागर नामक तीन ग्रन्थों की उत्पति गुणाढ्य की बृहदकथा से ही हुई।
महेन्द्र सातकर्णि
राजा हाल के बाद क्रमशः पत्तलक, पुरिकसेन, स्वाति और स्कंदस्याति सातवाहन साम्राज्य के राजा हुए। इन चारों का शासन काल कुल 51 वर्ष था। राजा हाल ने 16 ई. से शुरू कर 21 ई. तक पाँच साल राज्य किया था। स्कंदस्याति के शासन का अन्त 72 ई. में हुआ। पर इतना निश्चित है, कि इनके समय में सातवाहन साम्राज्य अक्षुण्ण रूप में बना रहा। स्कंदस्याति के बाद महेन्द्र सातकर्णि राजा बना। ’परिप्लस आफ़ एरिथियन सी’ के ग्रीक लेखक ने भी इसी महेन्द्र को ‘मंबर’ के नाम से सूचित किया है। प्राचीन पाश्चात्य संसार के इस भौगोलिक यात्रा-ग्रंथ में भरुकच्छ के बन्दरगाह से शुरू करके ‘मंबर’ द्वारा शासित ‘आर्यदेश’ का उल्लेख मिलता है।
सातवाहन वंश
प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते.
या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत; तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही.
पुराणांत या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे; परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती; म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत.
सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.
सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही; कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे; तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा.
जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत.
सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते.
सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.
कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे; तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते; पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा.
सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यावर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती; पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले.
सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे.
सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’असे केले आहे. [⟶ नागनिका].
वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत; पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल हा गाथा सप्तशती नामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे.
हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचेसाम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते.
प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे.
सातवाहन वंश प्राचीन भारत का एक महत्वपूर्ण राजवंश था, जिसने लगभग 230 ईसा पूर्व से 220 ईस्वी तक दक्षिण और पश्चिमी भारत के बड़े हिस्सों पर शासन किया। सातवाहन वंश का केंद्र वर्तमान महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, और तेलंगाना के क्षेत्रों में था। यह वंश मौर्य साम्राज्य के पतन के बाद उभरकर सामने आया और भारतीय इतिहास में विशेष योगदान दिया, खासकर दक्षिण भारत में।
सातवाहन वंश की मुख्य विशेषताएँ:
1. स्थापना और शासनकाल: सातवाहन वंश के संस्थापक सिमुक थे, जिन्होंने मौर्य साम्राज्य के पतन के बाद सत्ता स्थापित की। इस वंश के सबसे प्रसिद्ध राजा गौतमिपुत्र सातकर्णि थे, जिन्होंने वंश का विस्तार किया और शकों को पराजित कर अपने राज्य को सुदृढ़ किया।
2. संस्कृति और धर्म: सातवाहन शासक हिंदू धर्म के अनुयायी थे, लेकिन उन्होंने बौद्ध धर्म को भी समर्थन दिया। सातवाहनों ने बौद्ध मठों और स्तूपों का निर्माण करवाया, जिसमें अमरावती स्तूप और करले की गुफाएँ प्रमुख हैं।
3. व्यापार और वाणिज्य: सातवाहन वंश के दौरान समुद्री व्यापार बहुत उन्नत हुआ, और उनके साम्राज्य के बंदरगाहों से रोम और अन्य पश्चिमी देशों के साथ व्यापार हुआ। सातवाहनों ने सिक्कों का भी निर्माण किया, जिन पर संस्कृत और प्राकृत भाषा में लेख होते थे।
4. साहित्य और कला: सातवाहन काल में साहित्य और कला का भी विकास हुआ। इस काल में संस्कृत, प्राकृत और तेलुगु जैसी भाषाओं में साहित्य का सृजन हुआ। इसके साथ ही गुफा कला और मूर्तिकला में भी इस समय उन्नति हुई।
सातवाहन वंश का पतन लगभग तीसरी शताब्दी के प्रारंभ में हुआ, जब उनके उत्तराधिकारी कमजोर हो गए और वंश का अंत हो गया। इसके बाद क्षेत्रीय शक्तियों ने उनका स्थान लिया।
सातवाहन वंश (60 ई.पू. से 240 ई.) भारत का प्राचीन राजवंश था, जिसने केन्द्रीय दक्षिण भारत पर शासन किया था। भारतीय इतिहास में यह राजवंश 'आन्ध्र वंश' के नाम से भी विख्यात है। सातवाहन वंश का प्रारम्भिक राजा सिमुक था। इस वंश के राजाओं ने विदेशी आक्रमणकारियों से जमकर संघर्ष किया था। इन राजाओं ने शक आक्रांताओं को सहजता से भारत में पैर नहीं जमाने दिये।
इतिहास
भारतीय परिवार, जो पुराणों (प्राचीन धार्मिक तथा किंवदंतियों का साहित्य) पर आधारित कुछ व्याख्याओं के अनुसार आंध्र जाति (जनजाति) का था और 'दक्षिणापथ' अर्थात दक्षिणी क्षेत्र में साम्राज्य की स्थापना करने वाला पहला दक्कनी वंश था। इस वंश का आरंभ 'सिभुक' अथवा 'सिंधुक' नामक व्यक्ति ने दक्षिण में कृष्णा और गोदावरी नदियों की घाटी में किया था। इस वश को 'आंध्र राजवंश' के नाम भी जाना जाता है। सातवाहन वंश के अनेक प्रतापी सम्राटों ने विदेशी शक आक्रान्ताओं के विरुद्ध भी अनुपम सफलता प्राप्त की थी। दक्षिणापथ के इन राजाओं का वृत्तान्त न केवल उनके सिक्कों और शिलालेखों से जाना जाता है, अपितु अनेक ऐसे साहित्यिक ग्रंथ भी उपलब्ध हैं, जिनसे इस राजवंश के कतिपय राजाओं के सम्बन्ध में महत्त्वपूर्ण बातें ज्ञात होती हैं।
शासक राजा
सातवाहन वंश के राजाओं के नाम निम्नलिखित हैं-
सिमुक
सिमुक भारत के इतिहास में प्रसिद्ध 'सातवाहन राजवंश' का संस्थापक था। पुराणों के अनुसार सिमुक ने कण्व वंश के अन्तिम राजा सुशर्मा को मार कर मगध के राजसिंहासन पर अपना अधिकार स्थापित किया था। इसमें कोई सन्देह नहीं कि सातवाहन वंश के अन्यतम राजा ने कण्व वंश का अन्त कर मगध को अपने साम्राज्य के अंतर्गत किया था।
- हाथीगुम्फ़ा शिलालेख के अनुसार कलिंग का खारवेल सातवाहन वंश के सातकर्णि का समकालीन था, और खारवेल के समय को पहली सदी ईसवी पूर्व के पश्चात् कदापि नहीं रखा जा सकता।
- कण्व वंश का अन्त 28 ईसवी पूर्व में हुआ। यदि सिमुक के शासन का प्रारम्भ उस समय में हुआ, तो उसके पर्याप्त समय बाद का सातवाहन राजा सातर्णि खारवेल का समकालीन कैसे हो सकता है। यदि सातकर्णि खारवेल का समकालीन था तो राजा सिमुक का काल उससे पूर्व ही होना चाहिए। पौराणिक अनुश्रुति में कण्व वंश का अन्त करने वाले सातवाहन राजा का नाम देने में अवश्य ही भूल हुई है। सिमुक का शासन काल 23 वर्ष का था।
- 210 ई. पू. में सिमुक ने मौर्य शासनतंत्र के विरुद्ध विद्रोह किया और प्रतिष्ठान को राजधानी बनाकर 187 ई. पू. तक स्वतंत्र रूप से शासन किया।
- जैन गाथाओं के अनुसार सिमुक ने अनेक बौद्ध और जैन मन्दिरों का निर्माण कराया था।
- सिमुक के बाद उसका भाई कृष्ण या कन्ह सातवाहन राज्य का स्वामी बना।
- सिमुक का पुत्र सातकर्णि था, जो सम्भवतः अपने पिता की मृत्यु के समय तक वयस्क नहीं हुआ था। इसी कारण सिमुक की मृत्यु के अनन्तर उसका भाई कृष्ण राजगद्दी पर बैठा। पुराणों के अनुसार उसने 18 वर्ष तक राज्य किया। कृष्ण ने भी अपने भाई के समान विजय की प्रक्रिया को जारी रखा।
सातकर्णि
- कृष्ण के बाद उसका भतीजा (सिमुक का पुत्र) प्रतिष्ठान के राजसिंहासन पर आरूढ़ हुआ।
- उसने सातवाहन राज्य का बहुत विस्तार किया।
- उसका विवाह नायनिका या नागरिका नाम की कुमारी के साथ हुआ था, जो एक बड़े महारथी सरदार की दुहिता थी।
- इस विवाह के कारण सातकर्णि की शक्ति बहुत बढ़ गई, क्योंकि एक शक्तिशाली महारथी सरदार की सहायता उसे प्राप्त हो गई।
- सातकर्णि के सिक्कों पर उसके श्वसुर अंगीयकुलीन महारथी त्रणकयिरो का नाम भी अंकित है।
- शिलालेखों में उसे 'दक्षिणापथ' और 'अप्रतिहतचक्र' विशेषणों से विभूषित किया गया है।
- अपने राज्य का विस्तार कर इस प्रतापी राजा ने राजसूय यज्ञ किया, और दो बार अश्वमेध यज्ञ का अनुष्ठान किया था, क्योंकि सातकर्णी का शासनकाल मौर्य वंश के ह्रास काल में था, अतः स्वाभाविक रूप से उसने अनेक ऐसे प्रदेशों को जीत कर अपने अधीन किया होगा, जो कि पहले मौर्य साम्राज्य के अधीन थे। अश्वमेध यज्ञों का अनुष्ठान इन विजयों के उपलक्ष्य में ही किया गया होगा।
- सातकर्णी के राज्य में भी प्राचीन वैदिक धर्म का पुनरुत्थान हो रहा था।
- शिलालेखों में इस राजा के द्वारा किए गए अन्य भी अनेक यज्ञों का उल्लेख है। इनमें जो दक्षिणा सातकर्णि ने ब्राह्मण पुरोहितों में प्रदान की, उसमें अन्य वस्तुओं के साथ 47,200 गौओं, 10 हाथियों, 1000 घोड़ों, 1 रथ और 68,000 कार्षापणों का भी दान किया गया था।
- इसमें सन्देह नहीं कि सातकर्णी एक प्रबल और शक्ति सम्पन्न राजा था।
- कलिंगराज खारवेल ने विजय यात्रा करते हुए उसके विरुद्ध शस्त्र नहीं उठाया था, यद्यपि हाथीगुम्फ़ा शिलालेख के अनुसार वह सातकर्णी की उपेक्षा दूर-दूर तक आक्रमण कर सकने में समर्थ हो गया था।
- सातकर्णी देर तक सातवाहन राज्य का संचालन नहीं कर सका। सम्भवतः एक युद्ध में उसकी मृत्यु हो गई थी, और उसका शासन काल केवल दस वर्ष (172 से 162 ई. पू. के लगभग) तक रहा था।
- अभी उसके पुत्र वयस्क नहीं हुए थे। अतः उसकी मृत्यु के अनन्तर रानी नायनिका ने शासन-सूत्र का संचालन किया।
- पुराणों में सातवाहन राजाओं को आन्ध्र और आन्ध्रभृत्य भी कहा गया है। इसका कारण इन राजाओं का या तो आन्ध्र की जाति का होना है, और या यह भी सम्भव है कि इनके पूर्वज पहले किसी आन्ध्र राजा की सेवा में रहे हों।
- इनकी शक्ति का केन्द्र आन्ध्र में न होकर महाराष्ट्र के प्रदेश में था।
- पुराणों में सिमुक या सिन्धुक को आन्ध्रजातीय कहा गया है। इसीलिए इस वंश को आन्ध्र-सातवाहन की संज्ञा दी जाती है।
गौतमीपुत्र सातकर्णि
- राजा सातकर्णी के उत्तराधिकारियों के केवल नाम ही पुराणों द्वारा ज्ञात होते हैं।
- ये नाम पूर्णोत्संग (शासन काल 18 वर्ष), स्कन्धस्तम्भि (18 वर्ष), मेघस्वाति (18 वर्ष) और गौतमीपुत्र सातकर्णि (56 वर्ष) हैं।
- इनमें गौतमीपुत्र सातकर्णी के सम्बन्ध में उसके शिलालेखों से बहुत कुछ परिचय प्राप्त होता है। यह प्रसिद्ध शक महाक्षत्रप 'नहपान' का समकालीन था, और इसने समीपवर्ती प्रदेशों से शक शासन का अन्त किया था। नासिक ज़िले के 'जोगलथम्बी' नामक गाँव से सन् 1906 ई. में 13,250 सिक्कों का एक ढेर प्राप्त हुआ था। ये सब सिक्के एक शक क्षत्रप नहपान के हैं। इनमें से लगभग दो तिहाई सिक्कों पर गौतमीपुत्र का नाम भी अंकित है। जिससे यह सूचित होता है कि गौतमीपुत्र सातकर्णि ने नहपान को परास्त कर उसके सिक्कों पर अपनी छाप लगवाई थी। इसमें सन्देह नहीं, कि शकों के उत्कर्ष के कारण पश्चिमी भारत में सातवाहन राज्य की बहुत क्षीण हो गई थी, और बाद में गौतमीपुत्र सातकर्णि ने अपने वंश की शक्ति और गौरव का पुनरुद्धार किया।
- गौतमीपुत्र सातकर्णि की माता का नाम 'गौतमी बालश्री' था। उसने नासिक में त्रिरश्मि पर एक गुहा दान की थी, जिसकी दीवार पर एक प्रशस्ति उत्कीर्ण है। इस प्रशस्ति द्वारा गौतमी बालश्री के प्रतापी पुत्र के सम्बन्ध में बहुत सी महत्त्वपूर्ण बातें ज्ञात होती है। उसमें राजा गौतमीपुत्र सातकर्णि के जो विशेषण दिए हैं, उसमें से निम्नलिखित विशेष रूप से ध्यान देने योग्य हैं -
असिक असक मुलक सुरठ कुकुर अपरान्त अनूप विदभ आकर (और) अवन्ति के राजा, बिझ छवत पारिजात सह्य कण्हगिरि मच सिरिटन मलय महिद सेटगिरि चकोर पर्वतों के पति, जिसके शासन को सब राजाओं का मंडल स्वीकार करता था, क्षत्रियों के दर्प और मान का मर्दन करने वाले, शक यवन पह्लवों के निषूदक, सातवाहन कुल के यश के प्रतिष्ठापक, सब मंडलों से अभिवादितचरण, अनेक समरों में शत्रुसंघ को जीतने वाले, एकशूर, एक ब्राह्मण, शत्रुजनों के लिए दुर्घर्ष सुन्दरपुर के स्वामी आदि।
- इस लेख से स्पष्ट है कि असक (अश्मक) मूलक (मूलक, राजधानी प्रतिष्ठान), सुरठ (सौराष्ट्र), कुकुर (काठियावाड़ के समीप एक प्राचीन गण-जनपद), उपरान्त (कोंकण), अनूप (नर्मदा की घाटी का प्रदेश), विदर्भ (विदर्भ, बरार), आकर (विदिशा का प्रदेश) और अवन्ति गौतमीपुत्र सातकर्णी के साम्राज्य के अंतर्गत थे। जिन पर्वतों का वह स्वामी था, वे भी उसके साम्राज्य के विस्तार को सूचित करते हैं। विझ (विन्ध्य) छवत (ऋक्षवत् या सतपुड़ा), पारिजात (पश्चिमी विन्ध्याचल), सह्य (सहाद्रि), कण्हगिरि (कान्हेरी या कृष्णगिरि), सिरिटान (श्रीपर्वत), मलय (मलयाद्रि), महिन्द्र (महेन्द्र पर्वत) और चकोर (पुराणों में श्रीपर्वत की अन्यतम पर्वतमाला) उसके राज्य के विस्तार पर अच्छा प्रकाश डालते हैं।
- इस प्रशस्ति से यह निश्चित हो जाता है कि गौतमीपुत्र सातकर्णि सच्चे अर्थों में दक्षिणापथपति था, और काठियावाड़, महाराष्ट्र और अवन्ति के प्रदेश अवश्य ही उसके साम्राज्य के अंतर्गत थे।
गौतमीपुत्र सातकर्णि जो इतने विशाल साम्राज्य का निर्माण कर सका था, उसका प्रधान कारण 'शक यवन पल्हवों' की पराजय थी। शक, यवन और पार्थियन लोगों ने बाहर से आकर भारत में जो अनेक राज्य क़ायम कर लिए थे, उनके साथ सातकर्णि ने घोर युद्ध किए, और उन्हें परास्त कर सातवाहन कुल की शक्ति और गौरव को प्रतिष्ठापित किया। विदेशी शकों की भारत में बढ़ती हुई शक्ति का दमन करना सातकर्णि का ही कार्य था। अवन्ति, अश्मक, सौराष्ट्र आदि जिन अनेक प्रदेशों को सातकर्णि ने अपने अधीन किया था, वे पहले क्षहरात कुल के शक क्षत्रप नहपान के अधीन थे। शकों को परास्त करके ही सातकर्णि ने इन पर अपना आधिपत्य स्थापित किया था।
- गौतमीपुत्र सातकर्णि के इतिहास पर प्रकाश डालने वाले अनेक शिलालेख व सिक्के खोज द्वारा प्राप्त हुए हैं। इस प्रतापी राजा से सम्बन्ध रखने वाली एक जैन अनुश्रुति का उल्लेख करना भी इस सम्बन्ध में उपयोगी होगा। जैन ग्रंथ 'आवश्यक सूत्र' पर 'भद्रबाहु स्वामी'-विरचित 'निर्युक्ति' नामक टीका में एक पुरानी गाथी दी गई है, जिसके अनुसार 'भरुकच्छ' का राजा नहवाण कोष का बड़ा धनी था। दूसरी ओर प्रतिष्ठान का राजा सालवाहन सेना का धनी था। सालवाहन ने नहवाण पर चढ़ाई की, किन्तु दो वर्ष तक उसकी पुरी को घेर रहने पर भी वह उसे जीत नहीं सका। भरुकच्छ में कोष की कमी नहीं थी। अतः सालवाहन की सेना का घेरा उसका कुछ नहीं बिगाड़ सका। अब सालवाहन ने कूटनीति का आश्रय लिया। उसने अपने एक अमात्य से रुष्ट होने का नाटक कर उसे निकाल दिया। यह अमात्य भरुकच्छ गया और शीघ्र ही नहवाण का विश्वासपात्र बन गया। उसकी प्रेरणा से नहवाण ने अपना बहुत सा धन देवमन्दिर, तालाब, बावड़ी आदि बनवाने तथा दान-पुण्य में व्यय कर दिया। अब जब फिर सालवाहन ने भरुकच्छ पर चढ़ाई की, तो नहवाण का कोष ख़ाली था। वह परास्त हो गया, और भरुकच्छ भी सालवाहन के साम्राज्य में शामिल हो गया। शक क्षत्रप नहवाण (नहपान) के दान-पुण्य का कुछ परिचय उसके जामाता उषाउदात के लेखों से मिल सकता है।
- 'कालकाचार्य' कथानक के अनुसार जिस राजा 'विक्रमादित्य' ने शकों का संहार किया था, वह प्रतिष्ठान का राजा था। सालवाहन या सातवाहन वंश की राजधानी भी प्रतिष्ठान ही थी। इस बात को दृष्टि में रखकर श्री जायसवाल व अन्य अनेक ऐतिहासिकों ने यह स्थापना की है, कि भारत की दन्त-कथाओं और प्राचीन साहित्य का 'शकारि विक्रमादित्य' और सातवाहनवंशी प्रतापी राजा 'गौतमीपुत्र सातकर्णि' एक ही थे, और इस शक निषुदक राजा का शासन काल 99 ई. पू. से 44 ई. पू. तक था।
- पुराणों के अनुसार इसने 56 साल और जैन अनुश्रुति के अनुसार 55 साल तक राज्य किया था। यदि सातवाहन वंश के प्रथम राजा का शासन काल 210 ई. पू. के लगभग माना जाए तो पुराणों की वंशतालिका के अनुसार सातकर्णि का शासन काल समय यही बनता है। विक्रमी संवत का प्रारम्भ 57 ई. पू. में होता है। यह संवत शकों की पराजय सदृश महत्त्वपूर्ण घटना की स्मृति में ही प्रारम्भ हुआ था, और अनुश्रुति के अनुसार जिस राजा विक्रमादित्य के साथ इसका सम्बन्ध है, वह यदि गौतमीपुत्र सातकर्णि ही हो, तो इसमें आश्चर्य की कोई बात नहीं। पर इससे यह नहीं समझना चाहिए, कि विक्रम संवत का प्रारम्भ गौतमीपुत्र सातकर्णि द्वारा किया गया था। इस संवत का प्रारम्भ मालवगण की स्थिति से हुआ माना जाता है।
- शक आक्रान्ताओं ने जिस प्रकार सातवाहन के गौरव को क्षीण किया था, वैसे ही गणराज्यों को भी उन्होंने पराभूत किया था। शकों की शक्ति के क्षीण होने पर भारत के प्राचीन गणराज्यों का पुनरुत्थान हुआ। शकों की पराजय की श्रेय केवल सातवाहनीवंशी सातकर्णि को ही नहीं है। मालवगण के वीर योद्धाओं का भी इस सम्बन्ध में बहुत कर्तृत्व था। उनके गण की पुनःस्थिति से एक नए संवत का प्रारम्भ हुआ, जो बाद में विक्रम-संवत कहलाया। पर जायसवाल जी की यह स्थापना भी बड़े महत्त्व की है, कि गौतमीपुत्र सातकर्णि का ही अन्य नाम या उपनाम विक्रमादित्य भी था, और वही भारतीय अनुश्रुति का 'शकारि या शकनिषुदक विक्रमादित्य' था। पर यह मत पूर्णतया निर्विवाद नहीं है। सातकर्णि के काल के सम्बन्ध में भी ऐतिहासिकों में मतभेद है। अनेक इतिहासकार उसे दूसरी ई. पू. का मानते हैं।
वासिष्ठी पुत्र पुलुमावि
वासिष्ठी पुत्र पुलुमावि सातवाहन वंश के प्रतापी राजाओं में से एक था। वह अपने पिता गौतमीपुत्र सातकर्णि के बाद विशाल सातवाहन साम्राज्य का स्वामी बना था। उसका शासन काल 44 ई. पू. के लगभग शुरू हुआ था। पुराणों में उसका शासन काल 36 वर्ष बताया गया है। उसके समय में सातवाहन राज्य की और भी वृद्ध हुई। उसने पूर्व और दक्षिण में आन्ध्र तथा चोल देशों की विजय की।
- सुदूर दक्षिण में अनेक स्थानों पर वासिष्ठी पुत्र पुलुमावि के सिक्के उपलब्ध हुए हैं। चोल-मण्डल के तट से पुलुमावि के जो सिक्के मिले हैं, उन पर दो मस्तूल वाले जहाज़ का चित्र बना है। इससे सूचित होता है कि सुदूर दक्षिण में जारी करने के लिए जो सिक्के उसने मंगवाए थे, वे उसकी सामुद्रिक शक्ति को भी सूचित करते थे।
- आन्ध्र और चोल के समुद्र तट पर अधिकार हो जाने के कारण सातवाहन राजाओं की सामुद्रिक शक्ति भी बहुत बढ़ गई थी और इसीलिए जहाज़ के चित्र वाले ये सिक्के प्रचलित किए गए थे।
- इस युग में भारत के निवासी समुद्र को पार कर अपने उपनिवेश स्थापित करने में तत्पर थे और पूर्वी एशिया के अनेक क्षेत्रों में भारतीय बस्तियों का सूत्रपात हो रहा था।
- पुराणों के अनुसार अन्तिम कण्व राजा सुशर्मा को मारकर सातवाहन वंश के राजा सिमुक ने मगध पर अपना अधिकार स्थापित कर लिया था, जिसे पुराणों में 'आन्ध्र वंश' कहा गया है।
- कण्व वंश के शासन का अन्त सिमुक के द्वारा नहीं हुआ था। कण्व वंशी सुशर्मा का शासन काल 38 से 28 ई. पू. तक था। सातवाहन वंश के तिथिक्रम के अनुसार उस काल में सातवाहन वंश का राजा वासिष्ठी पुत्र श्री पुलुमावि ही थी। अतः कण्व वंश का अन्त कर मगध को अपनी अधीनता में लाने वाला सातवाहन राजा पुलुमावि ही होना चाहिए, न कि सिमुक।
- इसमें सन्देह नहीं कि आन्ध्र या सातवाहन साम्राज्य में मगध भी सम्मिलित हो गया था और उसके राजा केवल दक्षिणापथपति न रहकर उत्तरापथ के भी स्वामी बन गए थे।
- गौतमीपुत्र के समय सातवाहन वंश के जिस उत्कर्ष का प्रारम्भ हुआ था, अब उसके पुत्र पुलुमावि के समय में वह उन्नति की चरम सीमा पर पहुँच गया। किसी समय जो स्थिति प्रतापी मौर्य व शुंग सम्राटों की थी, वही अब सातवाहन सम्राटों की हो गई थी।
कृष्ण द्वितीय सातवाहन
- वासिष्ठीपुत्र श्रीपुलुमावि के बाद कृष्ण द्वितीय सातवाहन साम्राज्य का स्वामी बना।
- इसने कुल 24 वर्ष तक (8 ई. पू. से 16 ई. तक) राज्य किया।
- उसके बाद हाल राजा हुआ।
राजा हाल
- वासिष्ठीपुत्र श्रीपुलुमावि के बाद कृष्ण द्वितीय सातवाहन साम्राज्य का स्वामी बना।
- इसने कुल 24 वर्ष तक (8 ई. पू. से 16 ई. तक) राज्य किया। उसके बाद हाल राजा हुआ।
- प्राकृत भाषा के साहित्य में इस राजा हाल का बड़ा महत्त्व है।
- यह प्राकृत भाषा का उत्कृष्ट कवि था, और अनेक कवि व लेखक उसके आश्रय में रहते थे।
- हाल की लिखी हुई 'गाथा सप्तशती' प्राकृत भाषा की एक प्रसिद्ध पुस्तक है।
- राजा हाल का दरबार साहित्य और संस्कृति का बड़ा आश्रयस्थान था।
- उसके संरक्षण और प्रोत्साहन से प्राकृत साहित्य की बड़ी उन्नति हुई है।
महेन्द्र सातकर्णि
- राजा हाल के बाद क्रमशः पत्तलक, पुरिकसेन, स्वाति और स्कंदस्याति सातवाहन साम्राज्य के राजा हुए। इन चारों का शासन काल कुल 51 वर्ष था। राजा हाल ने 16 ई. से शुरू कर 21 ई. तक पाँच साल राज्य किया था।
- स्कंदस्याति के शासन का अन्त 72 ई. में हुआ। पर इतना निश्चित है, कि इनके समय में सातवाहन साम्राज्य अक्षुण्ण रूप में बना रहा। स्कंदस्याति के बाद महेन्द्र सातकर्णि राजा बना। *'परिप्लस आफ़ एरिथियन सी' के ग्रीक लेखक ने भी इसी महेन्द्र को 'मंबर' के नाम से सूचित किया है।
- प्राचीन पाश्चात्य संसार के इस भौगोलिक यात्रा-ग्रंथ में भरुकच्छ के बन्दरगाह से शुरू करके 'मंबर' द्वारा शासित 'आर्यदेश' का उल्लेख मिलता है।
कुन्तल सातकर्णि (74 ई. से 83 ई. तक) महेन्द्र सातकर्णि के बाद राजा बना।
- इसके समय में फिर विदेशियों के आक्रमण भारत में प्रारम्भ हो गए।
- जिन युइशि लोगों के आक्रमणों से शक लोग सीर नदी की घाटी के अपने पुराने निवास-स्थान को छोड़कर आगे बढ़ने के लिए विवश हुए थे, वे ही कालान्तर में हिन्दुकुश के पश्चिम में प्राचीन कम्बोज जनपद में बस गए थे। वहाँ के यवन निवासियों के सम्पर्क से युइशि लोग भी धीरे-धीरे सभ्य हो गए थे, और उन्नति के मार्ग पर बढ़ने लगे थे।
- जिस समय राजा वासिष्ठी पुत्र पुलुमावि ने कण्व वंश का अन्त कर मगध को विजय किया, लगभग उसी समय इन युइशियों में एक वीर पुरुष का उत्कर्ष हुआ, जिसका नाम कुषाण था। इस समय तक युइशियों के पाँच छोटे-छोटे जनपद थे, कुषाण ने इन सब को जीतकर एक सूत्र में संगठित किया और एक शक्तिशाली युइशि राज्य की नींव डाली।
- सातवाहन साम्राज्य का क्षय और कुषाणों का उत्कर्ष का आरम्भ हुआ। विम स्वयं हिन्दुकुश के उत्तर-पश्चिम में कम्बोज देश में रहता था।
- भारत के जीते हुए प्रदेश में उसके क्षत्रप राज्य करते थे।
आंध्र-सातवाहन राजवंश और गौतमीपुत्र सातकर्णि | Historyguruji
सातवाहन वंश
सातवाहन वंश भारत का एक प्राचीन राजवंश था, जिसने दूसरी शताब्दी ई.पू. के अंत में मध्य और दक्षिण भारत पर शासन आरंभ किया। मौर्य साम्राज्य के पतन के बाद, प्रतिष्ठान (गोदावरी नदी के तट पर स्थित पैठन) को राजधानी बनाकर सातवाहनों ने अपनी शक्ति का विस्तार किया। इस राजवंश ने लगभग चार शताब्दियों तक दक्षिणापथ में शासन किया, उत्तरापथ पर आक्रमण कर कुछ समय के लिए मगध को अधीन किया और विदेशी शक आक्रमणकारियों के विरुद्ध सफलता प्राप्त की। भारतीय इतिहास में कोई अन्य राजवंश इतने लंबे समय तक अबाध रूप से शासन नहीं कर सका।
ऐतिहासिक स्रोत
सातवाहन राजाओं के बारे में साहित्यिक और पुरातात्त्विक स्रोतों से महत्त्वपूर्ण जानकारी मिलती है। साहित्यिक स्रोतों में पुराण प्रमुख हैं, जिनमें इस वंश के तीस राजाओं के नाम उल्लिखित हैं। पुराणों से पता चलता है कि आंध्र जातीय सिमुक ने कण्व वंश के अंतिम शासक को हराकर और शुंगों की अवशिष्ट शक्ति को समाप्त कर सातवाहन वंश की स्थापना की।
इसके अलावा, ऐतरेय ब्राह्मण, मनुस्मृति, महाभारत, सातवाहन राजा हाल की गाथासप्तशती, सातवाहन अमात्य सर्ववर्मा के कातंत्र व्याकरण, गुणाढ्य की बृहत्कथा पर आधारित सोमदेव के कथासरित्सागर और क्षेमेंद्र की बृहत्कथामंजरी से भी सातवाहन राजाओं के विषय में कुछ सूचनाएँ मिलती हैं। यूनानी-रोमन लेखकों जैसे प्लिनी और टॉलमी के विवरण से सातवाहन कालीन इतिहास पर प्रकाश पड़ता है। पेरीप्लस ऑफ एरीथ्रियन सी के अज्ञात यूनानी लेखक ने भारत और पश्चिमी देशों के बीच व्यापार का वर्णन किया है। पश्चिमी तट पर स्थित भड़ौच (भरुकच्छ) इस काल का सबसे प्रसिद्ध बंदरगाह था, जिसे यूनानी लेखकों ने ‘बेरीगाजा’ कहा है।

सातवाहन कालीन इतिहास के निर्माण में साहित्यिक स्रोतों की अपेक्षा सिक्के, अभिलेख और स्मारक अधिक प्रमाणिक हैं। नागानिका के नानाघाट लेख से सातकर्णि प्रथम की उपलब्धियों का ज्ञान होता है। गौतमीपुत्र सातकर्णि के नासिक से प्राप्त दो लेख उसके व्यक्तित्व और कृतित्व पर प्रकाश डालते हैं। अन्य महत्त्वपूर्ण अभिलेखों में गौतमीबलश्री का नासिक गुहालेख, वाशिष्ठीपुत्र पुलुमावी का कार्ले गुहालेख और यज्ञश्री सातकर्णि का नासिक गुहालेख शामिल हैं। सातवाहन शासकों के बहुसंख्यक सिक्के विभिन्न स्थानों से प्राप्त हुए हैं, जिनसे राज्य-विस्तार, धर्म एवं व्यापार की प्रगति की सूचना मिलती है। नासिक के जोगलथंबी मुद्राभांड से शक-क्षत्रप नहपान के सिक्के मिले हैं, जो गौतमीपुत्र द्वारा पुनर्टंकित किए गए हैं और नहपान पर उनकी विजय के प्रमाण हैं। पुलुमावी के शीशे के एक सिक्के पर जलपोत का अंकन तत्कालीन समुद्री व्यापार का सूचक है। सातवाहन सिक्के सीसा, तांबा तथा पोटीन के हैं, जिन पर वृषभ, गज, अश्व, सिंह, पर्वत, जहाज, चक्र, स्वास्तिक, कमल, त्रिरत्न, उज्जैन चिन्ह आदि अंकित हैं। सातवाहन काल के अनेक चैत्य एवं विहार नासिक, कार्ले, भाजा आदि स्थानों से मिले हैं, जिनसे तत्कालीन धर्म, कला एवं स्थापत्य के विकास की जानकारी मिलती है।
सातवाहन वंश की उत्पत्ति
भारतीय इतिहास में सातवाहन राजवंश आंध्र वंश के नाम से भी प्रसिद्ध है। पुराणों में इस वंश के संस्थापक को आंध्र जातीय तथा आंध्र-भृत्य कहा गया है, जबकि इस वंश के राजाओं ने अपने अभिलेखों में स्वयं को सातवाहन कहा है। सातवाहन नरेश आंध्र जाति के थे या उनके पूर्वज आंध्र वंशीय राजाओं के भृत्य थे। प्राचीन काल में कृष्णा-गोदावरी नदियों के बीच का तेलुगु भाषी प्रदेश आंध्र कहा जाता था। ऐतरेय ब्राह्मण में यहां के निवासियों को ‘अनार्य’ कहा गया है। महाभारत में आंध्रों को ‘म्लेच्छ’ तथा मनुस्मृति में ‘वर्णसंकर’ एवं ‘अंत्यज’ बताया गया है। इस आधार पर आंध्रों को निम्न जातीय माना जा सकता है।
कुछ इतिहासकारों का मानना है कि ‘सातवाहन’ कुल का नाम है। सातवाहनों ने अपने अभिलेखों में जाति का उल्लेख न करके केवल कुल नाम का उल्लेख किया है। संभवतः सातवाहन नामक व्यक्ति इस वंश का संस्थापक था। हेमचंद्र रायचौधरी के अनुसार सातवाहन ब्राह्मण थे, जिनमें नागों के रक्त का मिश्रण था। इस वंश के शासक गौतमीपुत्र सातकर्णि को नासिक प्रशस्ति में ‘एकब्राह्मण’ और ‘क्षत्रियों का मान मर्दन करने वाला’ कहा गया है। इस आधार पर कुछ इतिहासकार इस वंश को ब्राह्मण मानते हैं। एक संभावना यह भी है कि सातवाहन शकों द्वारा पराजित होने के बाद अपना मूल स्थान छोड़कर आंध्र प्रदेश में बस गए, इसलिए उन्हें ‘आंध्र’ कहा गया।
‘एकब्राह्मण’ का अर्थ अद्वितीय ज्ञानी भी होता है, और क्षत्रिय-मान-मर्दन के आधार पर सातवाहनों को ब्राह्मण मानना अनुमान पर आधारित है। नंद वंश का शासक महापद्मनंद भी क्षत्रियों का अंत करने वाला ‘द्वितीय परशुराम’ था, लेकिन इस उपाधि के आधार पर नंदों को ब्राह्मण नहीं माना जाता। यदि सातवाहन ब्राह्मण होते, तो ब्राह्मण वंशीय कण्वों और शुंगों की शक्ति का नाश क्यों करते? इस प्रकार सातवाहनों को ब्राह्मण मानकर भारतीय संस्कृति और ब्राह्मण धर्म की रक्षा के लिए शस्त्र धारण करने का तर्क अनावश्यक है। लगता है, सातवाहन आंध्र जनजाति से संबंधित थे और मौर्यों की अधीनता में शासन कर रहे थे।
सातवाहनों का मूल स्थान
सातवाहनों के मूल स्थान के संबंध में इतिहासकारों में मतभेद है। रैप्सन, स्मिथ और भंडारकर आंध्र प्रदेश को सातवाहनों का मूल स्थान मानते हैं, लेकिन इन स्थानों से सातवाहनों का कोई अभिलेख या सिक्का अभी तक नहीं मिला है।
अधिकांश इतिहासकारों के अनुसार सातवाहनों का आदि स्थान महाराष्ट्र था। सातवाहन राजाओं के सर्वाधिक अभिलेख और सिक्के महाराष्ट्र के पैठन (प्रतिष्ठान) के समीपवर्ती क्षेत्रों से प्राप्त हुए हैं। नानाघाट, नासिक, कार्ले और कन्हेरी की गुफाओं में मिले अभिलेख आरंभिक सातवाहन शासकों—सिमुक, कृष्ण और सातकर्णि प्रथम के स्मृति चिह्न हैं। सातकर्णि प्रथम की रानी महारठी वंश की राजकुमारी थी। इससे लगता है कि सातवाहन पहले महाराष्ट्र में शासन करते थे और बाद में शकों द्वारा पराजित होने पर वे आंध्र चले गए, इसलिए उन्हें आंध्र-सातवाहन कहा गया। इनकी शक्ति का केंद्र आंध्र में न होकर महाराष्ट्र के प्रदेश में था और सातवाहनों के सिक्के भी इसी क्षेत्र से मिले हैं। इस प्रकार स्पष्ट है कि सातवाहनों का मूल स्थान पश्चिमी भारत में महाराष्ट्र क्षेत्र का पैठन (प्रतिष्ठान) था। आरंभ में इस वंश का शासन पश्चिमी दक्कन के कुछ हिस्सों तक ही सीमित था।
सातवाहन वंश के आरंभिक शासक
इस वंश का आरंभ सिमुक नामक व्यक्ति ने दक्षिण में कृष्णा और गोदावरी नदियों की घाटी में किया। पुराणों के अनुसार आंध्र जातीय सिमुक ने कण्व वंश के अंतिम राजा सुशर्मा को हराकर और शुंगों की अवशिष्ट शक्ति को समाप्त कर मगध के राजसिंहासन पर अपना अधिकार स्थापित किया। सिमुक का उल्लेख नानाघाट चित्रफलक अभिलेख में मिलता है और उसके कुछ सिक्के भी प्राप्त हुए हैं।
हाथीगुम्फा लेख के अनुसार कलिंग राजा खारवेल सातवाहन वंश के सातकर्णि का समकालीन था और खारवेल को पहली शताब्दी ई.पू. में रखा जाता है। यदि सातकर्णि खारवेल का समकालीन था, तो सिमुक का काल उससे पूर्व रहा होगा। सिमुक ने 23 वर्ष शासन किया। संभवतः लगभग 230 ई.पू. में सिमुक ने मौर्य साम्राज्य के विरुद्ध विद्रोह किया और प्रतिष्ठान को राजधानी बनाकर स्वतंत्र रूप से शासन किया। जैन गाथाओं के अनुसार सिमुक ने अनेक बौद्ध और जैन मंदिरों का निर्माण कराया।
सिमुक की मृत्यु के समय उसका पुत्र सातकर्णि वयस्क नहीं था, इसलिए सिमुक का भाई कृष्ण (कान्ह) सातवाहन राज्य का स्वामी बना। कृष्ण ने सातवाहन साम्राज्य का विस्तार किया और गोदावरी के तट पर प्रतिष्ठान को अपनी राजधानी बनाया। उसके ‘श्रमण’ नामक एक महामात्य ने नासिक में एक गुहा का निर्माण करवाया। पुराणों के अनुसार उसने 18 वर्ष तक राज्य किया।
सातकर्णि प्रथम
कृष्ण के बाद सिमुक का पुत्र सातकर्णि प्रथम प्रतिष्ठान के राजसिंहासन पर आरूढ़ हुआ, जो आरंभिक सातवाहन शासकों में सबसे महान था। सातकर्णि एक शक्तिशाली राजा था। उसका विवाह शक्तिशाली अंगीय कुलीन महारथी सरदार की पुत्री नयनिका या नागानिका के साथ हुआ। इस वैवाहिक संबंध से सातकर्णि की शक्ति बढ़ी, क्योंकि उसके सिक्कों पर ससुर महारठी त्राणकयिरो का नाम भी अंकित है।
सातकर्णि प्रथम की उपलब्धियाँ
नानाघाट लेख के अनुसार सातकर्णि ने पश्चिमी मालवा, अनूप (नर्मदा घाटी) तथा विदर्भ के प्रदेशों पर विजय प्राप्त की। संभवतः सातकर्णि ने शुंगों के कुछ प्रदेशों पर भी अधिकार किया। सातकर्णि के अमात्य वशिष्ठीपुत्र आनंद ने साँची स्तूप के तोरण पर अपना लेख खुदवाया, जो पूर्वी मालवा पर उसके अधिकार का प्रमाण है। पश्चिमी मालवा से प्राप्त ‘श्रीसात’ नामधारी सिक्के इस क्षेत्र पर उसके अधिकार के सूचक हैं।
हाथीगुम्फा अभिलेख से ज्ञात होता है कि उसकी पूर्वी सीमा कलिंग शासक खारवेल की पश्चिमी सीमा से लगी हुई थी। कुछ इतिहासकारों का विचार है कि कृष्णा नदी के दक्षिणी भाग पर खारवेल ने आक्रमण किया था। हाथीगुम्फा शिलालेख से ज्ञात होता है कि खारवेल ने विजय-यात्रा करते हुए सातकर्णि की उपेक्षा करते हुए कण्वेणा नदी तक आक्रमण किया और असिक नगर में आतंक फैलाया। यह क्षेत्र संभवतः सातकर्णि के अधिकार में था, लेकिन दोनों सेनाओं का आमना-सामना नहीं हुआ। यदि खारवेल विजयी होता, तो अपने लेख में इसका उल्लेख अवश्य करता। अधिकांश विद्वानों की मान्यता है कि सातकर्णि प्रथम के खारवेल से मैत्रीपूर्ण संबंध थे।
सातकर्णि प्रथम ने अपनी विजयों द्वारा राज्य का विस्तार कर राजसूय यज्ञ और दो अश्वमेध यज्ञों का अनुष्ठान किया और ‘दक्षिणापथपति’ तथा ‘अप्रतिहत चक्र’ जैसी उपाधियाँ धारण कीं। उसने ब्राह्मण पुरोहितों को 47,200 गायें, 10 हाथी, 1,000 घोड़े, 1 रथ और 68,000 कार्षापण दान किए। अश्वमेध यज्ञ के बाद उसने अपनी रानी के नाम पर रजत मुद्राएँ उत्कीर्ण करवाईं, जिन पर अश्व का अंकन मिलता है।
‘पेरीप्लस ऑफ एरीथ्रियन सी’ से पता चलता है कि ‘एल्डर सैरागोनस’ शक्तिशाली राजा के काल में ‘सुप्पर’ तथा ‘कलीन’ (सोपारा तथा कल्यान) के बंदरगाह अंतर्राष्ट्रीय व्यापार के लिए सुरक्षित थे। ‘एल्डर सैरागोनस’ की पहचान ‘सातकर्णि प्रथम’ से की जा सकती है।
सातकर्णि अधिक समय तक शासन नहीं कर सका। संभवतः एक युद्ध में उसकी मृत्यु हो गई और उसका शासनकाल केवल दस वर्ष (लगभग 180-170 ई.पू.) रहा। उसके दोनों पुत्र—वेदश्री तथा शक्तिश्री—अभी वयस्क नहीं थे, इसलिए उसकी मृत्यु के बाद शासन-सूत्र रानी नागानिका ने संभाला।
शक-सातवाहन संघर्ष
पुराणों में सातकर्णि प्रथम के बाद शासन करने वाले लगभग उन्नीस सातवाहन राजाओं के केवल नाम मिलते हैं। संभवतः कुछ काल के लिए सातवाहनों की शक्ति कमजोर पड़ी। रोमन-यूनानी स्रोतों से पता चलता है कि भारत-रोम व्यापार के कारण पश्चिमी तट के बंदरगाह आरंभिक सातवाहन काल से फल-फूल रहे थे। इस समृद्ध व्यापारिक क्षेत्र पर आधिपत्य के लिए पश्चिमी शक-क्षत्रपों और सातवाहनों के बीच संघर्ष हुआ। शक-सातवाहन संघर्ष के पहले चरण में क्षत्रप नहपान द्वारा नासिक और पश्चिमी दक्कन के क्षेत्रों पर आक्रमण की सूचना मिलती है। लगता है कि क्षहरात वंश के शक-क्षत्रपों ने सातवाहनों को पश्चिमी दक्कन से निष्कासित कर दिया। शक-क्षत्रप नहपान के सिक्के एवं अभिलेख नासिक प्रदेश के आसपास प्राप्त हुए हैं, जो इस क्षेत्र पर शक आधिपत्य के सूचक हैं। लेकिन सातवाहनों ने अपने महान शासक गौतमीपुत्र सातकर्णि के नेतृत्व में पुनः अपनी प्रतिष्ठा स्थापित की।
गौतमीपुत्र सातकर्णि
गौतमीपुत्र सातकर्णि की उपलब्धियों का ज्ञान उसके शिलालेखों और सिक्कों से होता है। पुराणों के अनुसार वह सातवाहन वंश का 23वां शासक था। उसके पिता का नाम शिवस्वाति और माता का नाम गौतमी बलश्री था। उसके तीन अभिलेख—एक कार्ले से और दो नासिक से मिले हैं। कार्ले और नासिक के पहले अभिलेख उसके शासन के 18वें वर्ष के हैं, जबकि नासिक का दूसरा अभिलेख 24वें वर्ष का है। गौतमी बलश्री की नासिक प्रशस्ति और पुलुमावी के नासिक गुहालेख से भी उसकी सैनिक सफलताओं और उपलब्धियों की सूचनाएँ मिलती हैं। नासिक जिले के जोगलथंबी से शक-क्षत्रप नहपान के सिक्कों का ढेर प्राप्त हुआ है, जिसमें दो तिहाई सिक्कों पर गौतमीपुत्र का नाम पुनर्टंकित है। इससे स्पष्ट है कि वह नहपान का समकालीन था और उसने नहपान को पराभूत कर समीपवर्ती प्रदेशों से शक शासन का उन्मूलन किया। इस प्रकार शकों के उत्कर्ष के कारण पश्चिमी भारत में सातवाहन सत्ता क्षीण हो गई थी, लेकिन गौतमीपुत्र के नेतृत्व में सातवाहनों की शक्ति का पुनरुद्धार हुआ।
पश्चिमी दक्कन के क्षहरात वंशीय क्षत्रपों पर विजय
गौतमीपुत्र सातकर्णि का पहला उद्देश्य पश्चिमी दक्कन के समृद्ध क्षेत्रों को क्षहरात वंशीय क्षत्रपों से मुक्त कराकर अपने वंश के गौरव को पुनर्स्थापित करना था। उसने सैनिक तैयारी करके क्षहरातों पर आक्रमण किया। इस अभियान में क्षहरात शासक नहपान और उषावदात पराजित हुए तथा मारे गए। अपनी विजय के बाद उसने नासिक के बौद्ध संघ को ‘अजकालकिय’ नामक क्षेत्र दान दिया। उसने कार्ले के भिक्षु संघ को ‘करजक’ (पुणे जिले में स्थित) नामक गाँव दान दिया, जो पहले उषावदात के अधिकार में था। उषावदात नहपान का दामाद था और उसके राज्यों के दक्षिणी प्रांतों का राज्यपाल था, जिसमें नासिक तथा पूना के क्षेत्र शामिल थे।
भू-आवंटन की कार्यवाही सैनिक अभियान के दौरान की गई। स्पष्ट है कि इस प्रदेश में गौतमीपुत्र की उपस्थिति क्षहरातों के विरुद्ध अभियान का द्योतक है। गोवर्धन के अमात्य को जारी एक राजाज्ञा में वह स्वयं को ‘वेणुकटक स्वामी’ कहता है। इससे पता चलता है कि उसने वैनगंगा का तटवर्ती क्षेत्र शक-क्षत्रपों से जीत लिया। गौतमीपुत्र की इस सफलता की पुष्टि जोगलथंबी मुद्राभांड के सिक्कों से भी होती है। इस मुद्राभांड से प्राप्त 13,250 मुद्राओं में से करीब दो तिहाई नहपान की मुद्राएँ गौतमीपुत्र द्वारा पुनर्टंकित हैं। मुद्राओं के मुख भाग पर चैत्य तथा मुद्रालेख ‘रञो गौतमीपुतस’ तथा ब्राह्मी और खरोष्ठी में नहपान के मुद्रालेख का अंश है। पृष्ठ भाग पर उज्जैन चिन्ह तथा यूनानी में नहपान के लेख का अंश उत्कीर्ण है।
जैन ग्रंथ आवश्यकसूत्र की ‘निर्युक्ति’ नामक टीका में भी सालवाहन राजा द्वारा नहपान-विजय का उल्लेख मिलता है। कालकाचार्य कथानक से पता चलता है कि प्रतिष्ठान का राजा विक्रमादित्य ने शकों का संहार किया था, लेकिन यह मत विवादास्पद है और गौतमीपुत्र को विक्रमादित्य से जोड़ना मिथकीय है।
नासिक प्रशस्ति में गौतमीपुत्र को शकों, यवनों, पह्लवों का निषूदक, सातवाहन कुल के यश का प्रतिष्ठापक, अनेक युद्धों में शत्रु सेनाओं को जीतने वाला, एकशूर, शत्रुओं के लिए दुर्घर्ष जैसे विशेषणों से सुशोभित किया गया है, जो उसकी सफलताओं के प्रमाण हैं। लेख से स्पष्ट है कि गौतमीपुत्र ने क्षहरात वंशीय नहपान के साथ उसके सहयोगी यवनों और पह्लवों को भी पराभूत किया। नहपान को परास्त करने से गौतमीपुत्र की साम्राज्य सीमा विस्तृत हो गई।
उत्तरी तथा दक्षिणी भारत की विजय
गौतमीपुत्र सातकर्णि अपने वंश का सबसे प्रतापी शासक था (लगभग 106-130 ई.)। उसके द्वारा उत्तरी तथा दक्षिणी भारत के अनेक क्षेत्रों पर विजय की पुष्टि उसकी माता गौतमी बलश्री के नासिक प्रशस्ति से होती है। इस लेख के अनुसार उसने असिक (कृष्णा का तटीय प्रदेश), अश्मक (गोदावरी का तटीय प्रदेश), मूलक (पैठन का समीपवर्ती क्षेत्र), सुराष्ट्र (दक्षिणी काठियावाड़), कुकुर (पश्चिमी राजपूताना), अपरांत (उत्तरी कोंकण), अनूप (नर्मदा घाटी), विदर्भ (बरार), आकर (पूर्वी मालवा) और अवंति (पश्चिमी मालवा) के राजाओं को पराजित किया। वह विंध्य, ऋक्षवत (सतपुड़ा), पारिजात (पश्चिमी विंध्याचल), सह्य (सह्याद्रि), कृष्णगिरि, श्रीपर्वत, मलय, महेंद्र और चकोर पर्वतों का पति था। प्रशस्ति में कहा गया है कि उसके घोड़े तीन समुद्रों (पूर्वी, पश्चिमी और दक्षिणी) का जल पीते थे। उसके कुछ सिक्के आंध्र प्रदेश में मिले हैं।
आंध्र प्रदेश की विजय
कुछ इतिहासकारों का मानना है कि गौतमीपुत्र सातकर्णि ने आंध्र प्रदेश को जीतकर अपने राज्य में मिलाया। संभवतः उसने आंध्र प्रदेश के कुछ क्षेत्रों पर विजय प्राप्त की। इस प्रकार गौतमीपुत्र ने शकों, यवनों तथा पह्लवों की शक्ति का दमन कर सातवाहन वंश के गौरव की पुनर्स्थापना की। उसकी विजयों के परिणामस्वरूप उत्तरी महाराष्ट्र, कोंकण, नर्मदा घाटी, सौराष्ट्र, मालवा, पश्चिमी राजपूताना तथा आंध्र प्रदेश के कुछ क्षेत्र उसके अधीन हो गए। गौतमीपुत्र सातकर्णि सच्चे अर्थों में ‘दक्षिणापथपति’ था।
गौतमीपुत्र सातकर्णि का प्रशासन
गौतमीपुत्र सातकर्णि विजेता होने के साथ-साथ योग्य प्रशासक भी था। उसने अपने साम्राज्य को आहारों में विभाजित किया और प्रत्येक आहार में एक विश्वसनीय अमात्य की नियुक्ति की। वह दुर्बलों, निर्बलों और दुखी लोगों के कल्याण पर ध्यान देता था और अपनी प्रजा के दुख में दुखी तथा सुख में सुखी होने वाला सम्राट था। उसने शास्त्रोक्त ढंग से शासन करते हुए प्रजा से अनावश्यक कर नहीं वसूला और वर्णाश्रम धर्म की प्रतिष्ठा की। प्रशस्ति के अनुसार वह राम, केशव, अर्जुन तथा भीम के समान पराक्रमी तथा नहुष, जनमेजय, सागर, ययाति, राम, अम्बरीष के समान तेजस्वी था। वह एक महान निर्माता भी था। उसने नासिक जिले में वेणकटक नामक नगर का निर्माण कराया।
गौतमीपुत्र सातकर्णि का काल
सातकर्णि के काल के संबंध में इतिहासकारों में विवाद है। पुराणों के अनुसार उसने 56 वर्ष शासन किया। यदि सातवाहन वंश का आरंभ सिमुक द्वारा लगभग 230 ई.पू. माना जाए, तो पुराणों की वंशावली के अनुसार इस ‘शक-निषूदक’ राजा का शासन काल लगभग 106-130 ई. था।
गौतमीपुत्र सातकर्णि की सांस्कृतिक उपलब्धियाँ
नासिक प्रशस्ति में गौतमीपुत्र सातकर्णि को वेदों का आश्रय, अद्वितीय ब्राह्मण और द्विजों तथा द्विजेतर जातियों के कुलों का वर्धन करने वाला कहा गया है। उसने नासिक के बौद्ध संघ को ‘अजकालकिय’ क्षेत्र तथा कार्ले के भिक्षु संघ को ‘करजक’ गाँव दान दिया। इन विवरणों से लगता है कि गौतमीपुत्र व्यक्तिगत रूप से वैदिक धर्म का पोषक था, लेकिन उसके राज्य में बौद्ध जैसे श्रमण समुदाय राज्य और प्रजा के बीच लोकप्रिय और सम्मानित थे।

गौतमीपुत्र सातकर्णि का व्यक्तित्व
गौतमीपुत्र सातकर्णि बहुमुखी प्रतिभा संपन्न शासक था। वह पराक्रमी विजेता होने के साथ-साथ विद्वान भी था। नासिक प्रशस्ति में उसके व्यक्तिगत गुणों का उल्लेख है। उसका मुख-मंडल दीप्तिमान था, बाल सुंदर तथा भुजाएँ बलिष्ठ थीं। उसका स्वभाव मृदु और करुणामय था। सभी की रक्षा करने को वह सदैव तत्पर रहता था। वह गुणवानों का आश्रयदाता, संपत्ति का भंडार तथा सद्वृत्तियों का स्रोत था। वह उज्ज्वल चरित्र वाला एक धर्मप्राण शासक था।
वाशिष्ठीपुत्र पुलुमावी
गौतमीपुत्र सातकर्णि के बाद उसका पुत्र वाशिष्ठीपुत्र पुलुमावी (लगभग 130-159 ई.) सातवाहन साम्राज्य का स्वामी हुआ। पुराणों में उसे पुलुमावी कहा गया है। उसके अभिलेख नासिक, कार्ले और अमरावती में मिले हैं। पुराणों के अनुसार उसने 28 वर्ष तक शासन किया।
वाशिष्ठीपुत्र पुलुमावी शक्तिशाली शासक था, लेकिन इस समय पश्चिम भारत में शकों की शक्ति बढ़ रही थी। पुलुमावी कार्दमक वंशीय शासकों—चष्टन और रुद्रदामन—का समकालीन था। टॉलमी ने अपने भूगोल में चष्टन को पश्चिमी मालवा तथा उज्जैन का स्वामी कहा है। चष्टन की मुद्राएँ गुजरात में काठियावाड़ से मिली हैं, लेकिन उसके पुत्र जयदामन की मुद्राएँ पुष्कर से भी प्राप्त हुई हैं। यह प्रदेश पूर्व में सातवाहनों के अधिकार में था। चष्टन ने अपने कुछ सिक्कों पर सातवाहनों के मुद्रा-चिह्न ‘चैत्य’ को अंकित करवाया। स्पष्ट है कि इन प्रदेशों को चष्टन ने पुलुमावी से छीना होगा। चष्टन के उत्तराधिकारी रुद्रदामन ने सातवाहनों के कुकुर, सुराष्ट्र, मरु, श्वभ्र, अवंति तथा आकर प्रांतों पर अधिकार कर लिया। अपने जूनागढ़ अभिलेख में रुद्रदामन दावा करता है कि उसने दक्षिणापथ के सातकर्णि को दो बार पराजित किया, लेकिन निकट संबंधी होने के कारण उसका विनाश नहीं किया। कन्हेरी अभिलेख के आधार पर कुछ इतिहासकार मानते हैं कि पुलुमावी के उत्तराधिकारी शिवश्री सातकर्णि ने महाक्षत्रप रुद्रदामन की पुत्री से विवाह किया।
शक प्रदेशों पर आक्रमण
रुद्रदामन की मृत्यु के बाद पुलुमावी ने शक प्रदेशों पर सफल आक्रमण किया एवं अपने कुछ खोए हुए प्रदेशों को पुनः प्राप्त किया। उसने पूर्व और दक्षिण में आंध्र तथा चोल देशों पर विजय प्राप्त की। पुलुमावी एकमात्र ऐसा सातवाहन शासक है, जिसका उल्लेख अमरावती के एक लेख में हुआ है। संभवतः इसी समय आंध्र प्रदेश में सातवाहन सत्ता का विस्तार हुआ। उसके सिक्के दक्षिण में अनेक स्थानों से उपलब्ध हुए हैं। चोल-मंडल के तट से पुलुमावी के शीशे के ऐसे सिक्के मिले हैं, जिन पर दो मस्तूल वाले जहाज का अंकन है। आंध्र और चोल के समुद्र तट पर अधिकार हो जाने से सातवाहन राजाओं की सामुद्रिक शक्ति बढ़ी और जहाज के चित्र वाले सिक्के प्रचलित किए गए। इस युग में अनेक भारतीय समुद्र पार कर अन्य देशों में उपनिवेश स्थापित कर रहे थे और पूर्वी एशिया के क्षेत्रों में भारतीय बस्तियों का सूत्रपात हो रहा था।

मगध पर अधिकार
पुराणों के अनुसार अंतिम कण्व राजा सुशर्मा को हराकर आंध्र वंश के राजा सिमुक ने मगध पर अपना अधिकार स्थापित किया। कुछ इतिहासकारों का विचार है कि सातवाहन शासक पुलुमावी ने कण्व वंश का अंत कर मगध पर सत्ता स्थापित की, लेकिन यह विवादास्पद है। मगध सातवाहन साम्राज्य में सम्मिलित हुआ और उसके राजा दक्षिणापथपति के साथ उत्तरापथ के भी स्वामी बने।
परवर्ती सातवाहन शासक
वाशिष्ठीपुत्र पुलुमावी के बाद कृष्ण द्वितीय सातवाहन साम्राज्य का स्वामी बना। उसके बाद हाल राजा हुआ।
हाल
हाल साहित्य और संस्कृति का संरक्षक था। उसके संरक्षण से प्राकृत साहित्य की उन्नति हुई। वह स्वयं प्राकृत भाषा का उत्कृष्ट कवि था और अनेक कवियों का आश्रयदाता था। हाल की रचना ‘गाथा सप्तशती’ प्राकृत भाषा की प्रसिद्ध पुस्तक है। उसका शासन काल लगभग पहली शताब्दी ई. में था।
पत्तलक, पुरिकसेन, स्वाति और स्कंदसाति
राजा हाल के बाद क्रमशः पत्तलक, पुरिकसेन, स्वाति और स्कंदसाति सातवाहन साम्राज्य के राजा हुए। इनका शासन काल कुल मिलाकर लगभग 50 वर्ष था।
महेंद्र सातकर्णि
स्कंदसाति के बाद महेंद्र सातकर्णि राजा बना। ‘पेरीप्लस ऑफ एरीथ्रियन सी’ के ग्रीक लेखक ने इसे ‘मम्बर’ के नाम से संबोधित किया है। इस ग्रंथ में भरुकच्छ के बंदरगाह से लेकर मम्बर द्वारा शासित आर्य देश तक का उल्लेख मिलता है।
कुंतल सातकर्णि
महेंद्र सातकर्णि के बाद कुंतल सातकर्णि ने शासन किया। इसके समय में नए विदेशी (यू-ची) आक्रमण हुए। सातवाहन शासकों ने इन आक्रमणकारियों का मुकाबला किया। कुंतल सातकर्णि ने यू-ची सेनाओं को पराजित कर सातवाहन साम्राज्य के गौरव को स्थापित किया। कथासरित्सागर से पता चलता है कि उसका साम्राज्य दक्कन, काठियावाड़, मध्य प्रदेश, बंग, अंग और कलिंग तक विस्तृत था। उत्तर के कई शासक उसके करद थे। उसने म्लेच्छों (शक व यू-ची) का संहार किया।
कुंतल सातकर्णि गुणाढ्य नामक प्रसिद्ध लेखक का आश्रयदाता था, जिसने प्राकृत भाषा में ‘बृहत्कथा’ की रचना की। गुणाढ्यकृत बृहत्कथा उपलब्ध नहीं है, लेकिन सोमदेव के ‘कथासरित्सागर’ व क्षेमेंद्र की ‘बृहत्कथामंजरी’ से उसके बारे में सूचनाएँ मिलती हैं। बृहत्कथा का एक तमिल अनुवाद भी दक्षिण भारत में मिलता है। यह सातवाहन साम्राज्य के वैभव का परिणाम था कि बृहत्कथा की कीर्ति सारे भारत में फैली।
सातवाहन राजा प्राकृत भाषा बोलते थे, लेकिन कुंतल सातकर्णि की रानी मलयवती की भाषा संस्कृत थी। राजा को संस्कृत सिखाने के लिए उसके अमात्य सर्ववर्मा ने सरल रीति से ‘कातंत्र व्याकरण’ की रचना की। व्याकरण से राजा इतना प्रसन्न हुआ कि उसने पुरस्कार स्वरूप भरुकच्छ प्रदेश का शासन सर्ववर्मा को दे दिया।

सातवाहन शक्ति का पतन
कुंतल सातकर्णि के बाद सुंदर सातकर्णि और फिर वाशिष्ठीपुत्र पुलुमावी द्वितीय ने शासन किया। संभवतः इसके समय में सातवाहन साम्राज्य का पतन आरंभ हुआ। यज्ञश्री सातकर्णि (दूसरी शताब्दी ई. के अंत में) सातवाहन वंश का अंतिम महत्त्वपूर्ण शासक था। उसने क्षत्रपों पर विजय प्राप्त की, लेकिन उसके उत्तराधिकारी सीमित क्षेत्र पर शासन कर सके। मुद्रा-प्रचलन के स्थानीय स्वरूप और प्राप्ति स्थलों से सातवाहन साम्राज्य के संकुचन की सूचना मिलती है।
तीसरी शताब्दी ई. में सातवाहनों की शक्ति क्रमशः क्षीण हुई और स्थानीय शासक स्वतंत्र सत्ता स्थापित करने लगे। आंध्र प्रदेश में इक्ष्वाकुओं ने सत्ता स्थापित की, दक्षिण-पूर्वी क्षेत्रों में पल्लवों ने स्वतंत्र राज्य स्थापित किया। पश्चिमी दक्कन में चुटु, आभीर और कुरु जैसी नई शक्तियाँ उभरीं। आभीरों ने महाराष्ट्र छीन लिया। उत्तरी कनारा और मैसूर में कुंतल और चुटु एवं उसके बाद कदम्ब शक्तिशाली हुए। बरार क्षेत्र में चौथी शताब्दी के आरंभ में वाकाटक अपराजेय राजनीतिक शक्ति के रूप में उभरे। इस समय तक सातवाहन साम्राज्य पूर्णतः विखंडित हो चुका था। हालांकि स्पष्ट प्रमाण नहीं हैं कि वहाँ कोई केंद्रीकृत प्रशासनिक प्रणाली थी, लेकिन संपूर्ण साम्राज्य में एक व्यापक मुद्रा-प्रणाली लागू थी।
सातवाहन शासन का महत्त्व
दक्षिण भारत के इतिहास में सातवाहनों ने महत्त्वपूर्ण भूमिका निभाई। सातवाहन शासकों ने शकों से संघर्ष कर एक विस्तृत साम्राज्य स्थापित किया, दक्षिण भारत को प्रशासनिक सुदृढ़ता प्रदान की, सामाजिक-आर्थिक व्यवस्था को सुव्यवस्थित किया और धर्म, कला, शिक्षा तथा साहित्य का विकास किया। इस काल में भारत-रोमन व्यापार चरमोत्कर्ष पर पहुंचा। इससे भारत में भौतिक समृद्धि आई, जिसकी झलक बौद्ध और ब्राह्मणवादी समुदायों को दिए गए उदार संरक्षण में दिखाई देती है। वस्तुतः जो कार्य उत्तरी भारत में कुषाणों ने किया, वही दक्षिण में सातवाहनों ने किया।
Satavahana empire[200 B.C. - A.D. 250]
Racially, the early people of the Deccan were hybrid race, a mixture of aboriginal Dravidians (or pre-Dravidians) and Scythians (Sakas), Parthians (pahlavas), and Greeks (Yavanas). Buddhism and Mauryan culture had built up a civilized structure even before the Satavahanas established their empire. In the third century AD the Satavahanas were ousted by the Ikshvakus, who were themselves from the Deccan.
The Royal Way of LifeFrom as early as the Mauryan-Sunga period there was six emblems to denote a royal personage. These were the ushnisa or turban, a pair of flywhisks, umbrella, sword, sandals, and the royal standard. Of these, the two most important and almost always used on all formal occasions were the umbrella and the flywhisks. The umbrella was white and gold for kings and nobles, and was carried by the chattradhara or umbrella carrier. The flywhsiks or Chauri were made of yak tails with gold handles, usually two, which were waved alternately by the chauri bearers. In addition to this a fan of palm leaves gaily chequered and made of bark, usira grass, or peacock feathers was waved by another attendant.
The sword or khadga, a symbol of power, was carried by a female attendant, the khadgavahini, on her shoulder. She normally stood close behind the king or prince. Thonged sandals originally of boarskin were the king’s prerogative. Both sword and sandals were said to rule the kingdom in the absence of the king.
e
of the Deccan were a hybrid race, a mixture of the aboriginal
Dravidians and foreign invaders. In the first century BC their costumes
too were an interesting mixture of foreign and indigenous garments. All
these clothes are represented in Caves IX and X in Ajanta.In the first Century BC we find tunics, Kancuka in the stripes or beehive design worn by attendants or hunters. The kancuka are of mid-thigh length with short or long sleeves; in some the opening is on the left side, and in others it is at the front. The tunic worn by a king in hunting dress has no discernible opening at the neck, so it is probably at the back. Necklines too differed in that some were V-shaped and others were round in shape. With the tunic a thick Kayabandh was wound once or twice around the waist. An elaborate turban ushnisa, intertwined with the long black hair of the aborigine wearers was also worn. In addition to these, hunters wore two-bar type sandals with a strap for buckling, which is still seen in the Deccan. As influences from the north and from foreign invaders percolated, the Dravidians aboriginal village women too changed their costume using short antariyas, large uttariyas with elaborate board borders covering the head and back, tikkas on the forehead and a series of conch or ivory bangles on the arms. Except for the skirt, they looked very much like the Lambadis who are a gypsy tribe of Deccan today.
In the royal court dress of the Mauryan-Sunga people the female attendant wore transparent long antariyas with loose kayabandhs tied in a knot at the centre having beautiful ornamental tips. Their many –stringed girdles or mekhala were made of beads. Shoulder-length hair held by fillets or top knots tied at the centre of the head seems to denote that these attendants were foreigners, although nothing in the garments worn seems foreign. The king and most of his courtiers wore indigenous antariya, short and informal at home, with the longer style worn in a variety of ways on ceremonial occasions. With this the decorative kayabandh was tied in different styles and knots. The kayabandh could be tied like a thick cord or be worn looped in a semi-circle at the front with conspicuous side tassels, or be made of thick twisted silk. The ushnisa was always worn and a crown or tiara was used when necessary.
Headgear and HairstylesThe aboriginal jungle women wore rolls and headbands with peacock feathers attached. Village women and commoners wore their hair in a simple knot at the nape covered by a large uttariya, which, at times, had elaborate broad borders. Court attendants and women of the richer classes wore their hair more fashionably, either in a topknot on the right side with a loop of flowers suspended or in a plait. A fillet, simple or gold embroidered could be worn to hold it in place.
Most often, the long hair of men was worn intertwined with lengths of cloth to form an ushnisa in a variety of ways. Frequently it had a knot - the original top knot of the aboriginal-covered with the cloth of the turban. This knot could be at centre front or protrude over the forehead in a conch-shell shape, or the tuft of hair could be visible on top of the turban.
Jewellery
Jewellery in this period had a massive primitive character in strong contrast to that worn in the later Satavahana period. When indigenous garments are shown on men, whether at court or in villages, all wear some form of jewellery. But when the foreign dress, the kancuka or tunic, is worn by hunters, attendants and soldiers, very little or no jewellery is seen. Most often it consists of just earrings of the wheel pattern type.
Indigenous jewellery however, consisted of Lambanam, earrings, and a pair of kangan and bajuband for the males. Women did not wear the baju band but wore a large number of bangles made of conch or ivory, disc-type earrings, the lambanam, and tikka on the forehead. Women attendants at court wore, in addition, the mekhala.

Military CostumeSoldiers wore short-sleeved tunics or jackets, with elaborate headgear consisting of either a turban with a topknot, chin band and earflaps or two topknots with a turban. They were equipped with axes, and bows and arrows, or carried sickles. Palace guards however wore the antariya with a heavy cloak draped over the left shoulder.
The uttariya for both men and women was usually white and of cotton or silk. It was however, at times, of beautiful colors and embroidered. Men could wear it across the back and over both shoulders are merely thrown over the chest, and they seldom wore it as a head covering. The antariya was still worn by both sexes in the kachcha fashion, which meant that one end was passed between the legs and tucked in behind, but this way of draping had its own fanciful fashions. For men it was normally to the knees or even shorter. Generally, the antariya appeared to have been made of almost transparent cloth and was worn very tight and clinging in the case of women. It is almost invisible in the early Andhra sculptures with only double incised lines to show the drape. The nivi bandha or preliminary knot to tie the antariya at the waist is often alluded to in the literature of ancient India.
The kayabandh tied in a bow-shaped knot was worn by both sexes to give further support to the uttariya at the waist. This item was worn in a variety of ways. The kayabandh in the form of a simple sash was called the vethaka. The women also wore the pattika, which was made of flat ribbon-shaped pieces of cloth, usually silk. A heavy-looking thick jewelled roll with hanging tassels-kakshyabandha-was worn by men. The kalabuka was a girdle made of many strips plaited together, and the muraja had drum-headed knots at the ends instead of tassels.
It is in the distinctive ways of wearing these three simple garments the antariya, uttariya and kayabandh and in the headgear and jewellery, that we can trace the evaluation of costumes and the fashion of the times in areas of India where they were in use. The true yajnopavita or sacred thread is found on the sculptures of this period. Before this, it existed more in the form of the uttariya worn draped over the left shoulder and under the right arm in the upavita fashion from which the term yajnopavita consisted of three cotton threads each of nine twisted strands, but of hemp for the kshatriya and of wool for the vaisya. At a later stage this sacred thread continued to be used in a limited way by other castes but was retained most strongly by the Brahmins.
A stitched skirt-like foreign garment called the kancuka was frequently used by attendants, grooms, guards and so on in the king’s court, and an indigenous long tunic was worn by eunuchs and other attendants in the women’s apartments in the palace. Women too wore the short kancuka with an indigenous antariya, or when calf-length it was worn with a kayabandh and uttariya, and in many other ways.
Headgear and HairstylesThe ushnisa of the men was generally wrapped around three or four times after covering the topknot of hair with one end. It was normally white but could also be of dyed cloth, and simple turbans were held in position by ornamental gold strips or pattabandha. Gold turbans were worn on special occasions. Kirta or crowns were also in use, of which one type was a short cylindrical cap studded with gems and ornamented with designs. The maulibandha was an elaborated turban wound with the hair which itself was decorated with strings of pearls or flowers wreaths. The turban normally covered the hair, which was arranged in a large topknot at centre front, and could have jewelled clasp or maulimani at the centre to hold in place the folds of the turban. This topknot could also be pear-shaped or elliptical to give it variety. Without the turban, the hair could be worn in one or two topknots, or one loop and one topknot. Short hair parted in the middle and reaching the neck was fairly prevalent, especially among the common people.
Women wore their hair in several ways. One was in the form of a plait, praveni, at the back, decorated with jewelled strips and tassels, as Bharat Natyam dancers do today. Another common style was the coil with five delicate plaits dangling from it, a favourite with all classes of women. In the kesapasa style the hair was looped close to the head in an elongated knot at the back of the head or lower downs at the nape. This could have veni, a small fillet of flowers, around it or a short garland of flowers dangling from it. If the hair was made in a simple knot it was known as kabaribandha. Th
e dhammilia
was elaborate dressing of the hair with flowers, pearls, and jewels
that often completely covered the hair like a close cap or turban. This
style was greatly admired in the Satavahana kingdom.Women no longer wore the turban of earlier periods. Special ornaments were designed to be worn in the hair. The chudamani was lotus-shaped, its petals composed of pearls and precious stones. It was worn normally in the centre of the knotted hair. The makarika was shaped like fish-crocodile and worn at the front parting of the hair, very like gold ornament worn by the uriya women in the northern circars. There were also small crown like fillets through which the hair was drawn and then plaited or hung loose.
JewelleryStrands of pearls were the main motif in all forms of jewellery particularly in the late period of the Satavahana empire. Both men and women wore earring, bracelets, armlets and necklaces as in previous periods, particularly the indigenous people. The more common design in earring was the kundala shaped like a coil, which could be simple or decorative. The talapatra originated from a small strip of palm leaf rolled and inserted into the lobe. This shape was later made from ivory or gold and could be gem-studded. A full-blown lotus design the kanaka- kamala set in rubies is still popular in South India, and a couple of generations ago the karnika or jimiki continued to be in use. This was in the shape of lotus seed-pod fixed upside down like a tassel. Necklaces or hara were mainly strung with pearls, sometimes consisting of only a single string called ekavali. A necklace of gems and gold beads was called yashti, the central bead being often larger than the others. Several of these necklaces could be worn together. Sometimes three or five slab-like gems, phalaka, were inserted at regular intervals. These held together the several strings of which a necklace was composed, and whole was called a phalakahara.
A simple perfumed cotton-thread necklace was known to have been in use, and tiger claws were strung around the necks of children probably to ward off the evil eye. The yajnopavita, or a sacred thread made of pearls called the muktayajnopavita, were prevalent. Kantha, the shorter form of necklace, continued to be in use and was often of gold set with rubies and emeralds. Also, the gold - coins necklace nishka strung on silk thread or plaited gold cord was worn in almost the same design as the modern putalya of Maharashtra and the malai of Tamil Nadu. These gold coins were sometimes replaced by mango-shaped pieces of gold or gold set with gems, like the contemporary mangamalai of South India. Men and women wore bracelets valaya of solid gold set with precious stones. The more delicate ones were made of filigree, and elegant rope-shaped ones of fine gold wire were worn generally by women. They also used bangles of ivory and rhinoceros horn. Slab-like gems when set into bracelets, like the phalakahara necklace, were called phalakavalaya.
Armlets or keyura for both sexes were close-fitting and could be engraved or set with jewels, or be in the shape of a snake; also they could be straight-edged or have an angular top edge. Jewelled girdles of one or many strings, mekhala, were worn only by women. These were made in several varieties from the tinkling kanci with bells to the rasana style made of a linked chain or strung with pearls, beads or precious stones. These girdles, besides being very attractive, held up the lower garment or antariya. In addition, cloth girdles or kayabandh like those of the men described earlier in this chapter, were also used for the same purpose.
Anklets, worn again only by women, had an astonishing variety. The manjira was hollow and light, coiling several times around the ankles loosely, and tinkling when in motion as it had gems inserted in the hollow. This type is still worn in Manwar. The nupura was plain while the kinkini had small bells suspended. A heavier looking one was the tulakotiI whose two ends were enlarged at their meeting point. This form is still worn in Andhra. Tinkling anklets of any kind were not worn by the wife in the absence of her husband. The finger ring or anguliyaka is visible on some of the Satavahana sculptures but only after A.D.150
The hemavaikasha was an ornament worn by women, seen more frequently in the Kushan period. It consisted of two long wreaths of flowers of pearls crossed at the breasts.
Military CostumeAndhra soldiers wore an antariya which was shortened by lifting it at the hemline and tucking it into the waist to facilitate marching, and the style is still used in Tamil Nadu. A cloth sash or kayabandh was wound tightly many times around the waist for support and was sometimes crossed at the chest for protection. This developed in later times into the Channavira, which was similar in function to the early Babylonian and Assyrian sword belts crossed at the chest with a metal buckle in the centre. In addition, the military personnel of this period occasionally wore earring and simple jewellery.
Saka foreign soldiers were employed by some of the Andhra kings in the royal bodyguard. They wore a heavy tunic with ruched sleeves which reached to the knees or mid-thigh. With it was worn a form of churidar or ruched trousers, and their helmet or sirastra had earflaps. A wide sash was worn at the waist. Sometimes a short quilted tunic was worn with a heavy drape over the left shoulder along with a turban-a mixture of the foreign and indigenous garment. Footwear was not incumbent for soldiers and was probably worn by foreign rather than indigenous troops.
The equipment of a trained fighter was mainly his sword, shield, bow, axe and spear; sometimes the mace, club, and javelin were used. Swords were either curved or straight and could have sharp edge on one or both sides. There were 30 inches long and beautiful crafted. Handles of Ivory or horn and hilts of precious metals encrusted with jewels were carried by those in command, and simpler ones of bamboo or wood were used by the common soldier. These swords in their sheaths, kosha, of fine-tooled leather were normally fastened on the left side of the waist. Smaller and more ornamental swords and draggers were fastened by gold chains.
Shields, mainly rectangular in shape, were purely functional and large enough to protect the body. The club or gada could be short or long but was immensely heavy and was used for striking the enemy forcefully. The bow or dhanush made of wood or horn was painted red and gaily decorated, but the bamboo bow was more common. The bowstring was made of sinew or hemp. The heads of arrows were of iron, bone, and wood and were carved into animal and other shapes, and had shafts of feathers affixed with sinews. Sometimes the arrow tips were dipped in poison.
Religious PersonsThe Buddhist monks were now in a very powerful position and had more or less abjured their vow of poverty. Their clothes now retained a semblance of patchwork but were composed of rich pieces of cloth of same color, symmetrically arranged together in checks, and most probably presented to the Buddhist order by rich donors, as referred to in the jatakas.
Hindu ascetics continued to wear their bark strip garments valkala with a deerskin over the left shoulder in the style know as ajinayajnopavita. Their hair was tied in a heavy bundled topknot of matted locks called jata-bhara and sometimes the hair was worn in small plaits. The priests were Brahmins who wore white garments but added a red turban when officiating at ceremonial functions.
Jain monks and nuns have retained their white robes to this day and all their beliefs and customs have remained unchanged because of their strong conservatism.
Textiles and DyesFrom Mauryan times and even earlier, the manufacture of textile in India had flourished and there are constant references to its variety in Brahmanical, Buddhist and Jain works. Coarse and fine varieties of cotton were in great demand. Silk formed an important part of rich person’s wardrobe. A very cheap material made of hemp was worn by the weavers and by labourers of all kinds. Wool was not need much in the part of India ruled by Satavahanas, which had a warm climate, but it was used in the form of chaddars or blankets in winter.
There was a variety of Dyes available from Vedic times, indigo, yellow, crimson, magenta, black and turmeric. Since washermen were also dyers, these colors were known to them and the knowledge of the dyeing processes was probably handed down to each successive generation. Varieties and mixtures of colors known to those countries with which the Satavahanas did a great deal of trade, like China, Persia and Rome, must also have been incorporated to extend their range of colored textiles.
Printed and woven designs on textile were plentiful and embroidery in gold was also common among the richer classes. The uttariya, in particular, was very often of silk and embroidered with flowers all over, or had a pattern of birds along with flowers. Precious stones were often used in the borders of these uttariyas or they were dyed blue or red, but a spotless white remained the favourite with men.
StyleThe late Satavahanas style expressed more directly the full impact of the Dravidians-Andhra ethos. With the crowded compositions of lean and strong bodies and the ferocious figures looming over terrified crowds, we feel a sense of frenzied activity and turbulence. The kayabandhs make complex arabesques, but there is less differentiation between the court and the people as they throng together.
- Simuka or Sisuka (r. 230-207 BCE). Also (271-248 BCE), ruled 23 years kotilingala,karim nagar district,A.P
- Krishna (r. 207-189 BCE), ruled 18 years.
- Sri Mallakarni (or Sri Satakarni), ruled 10 years.
- Purnotsanga, ruled 18 years
- Skandhastambhi, ruled 18 years
- Sātakarnī I (195 BCE), ruled 56 years
- Lambodara, ruled 18 years.(r. 87-67 BCE)
- Apilaka, ruled 12 years.
- Meghasvati (or Saudasa), ruled 18 years.
- Svati (or Svami), ruled 18 years.
- Skandasvati, ruled 7 years.
- Mahendra Satakarni (or Mrgendra Svatikarna, Satakarni II), ruled 8 years.
- Kuntala Satakarni (or Kuntala Svatikarna), ruled 8 years.
- Svatikarna, ruled 1 year.
- Pulomavi (or Patumavi), ruled 36 years.
- Riktavarna (or Aristakarman), ruled 25 years.
- Hāla (r. 20-24 CE), author of the Gathasaptasati, an Indian literature classic, ruled 5 years.
- Mandalaka (or Bhavaka, Puttalaka), ruled 5 years.
- Purindrasena, ruled 5 years.
- Sundara Satakarni, ruled 1 year.
- Cakora Satakarni (or Cakora Svatikarna), ruled 6 months.
- Sivasvati, ruled 28 years.
- Gautamiputra Sātakarni, or Gautamiputra, popularly known as Shalivahan (r. 25-78 CE), ruled 21 years.
- Vasisthiputra Sri Pulamavi, or Puloma, Puliman (r. 78-114 CE), ruled 28 years.
- Vashishtiputra Sātakarni (r. 130-160), or Shiva Sri, Sivasri, ruled 7 years.
- Shivaskanda Satakarni, (157-159), ruled 7 years.
- Yajna Sri Satakarni, (r. 167-196 CE), ruled 29 years.
- Vijaya, ruled 6 years.
- Canda Sri Satakarni, ruled 10 years.
- Puloma, 7 years.
- Madhariputra Svami Sakasena? (r. c.190)








.jpg)




























































प्रतिक्रिया
4 May 2022 - 6:31 pm | मुक्त विहारि
"गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल."
--------
परवाच एका भारतीय ब्रिटिशा बरोबर, हीच चर्चा झाली होती.
हिंदू धर्मात, स्त्रीयांना मानाचे स्थान होते. बहु पतीत्वाची चाल देखील, समाजाने स्वीकारलेली होती.
5 May 2022 - 3:12 pm | नगरी
बहू पतित्वाची? ऐकिवात किंवा वाचनात नाही.स्त्री राज्य होते वाचले होते, पण त्यालाही पुरावा नाही,काळही नाही. चांदोबा मध्ये वाचले होते बस.
5 May 2022 - 7:18 pm | मुक्त विहारि
प्रेमिकांना, जातीभेदाचा अडसर देखील न्हवता.
इतकेच नाही तर, विधवा स्त्री पुनःविवाह करू शकत होती.
त्यावेळी स्त्रीयांना जितके स्वातंत्र्य होते, तितके आज देखील नाही
उदाहरणार्थ, एखादी गणिका, कर देऊन मुक्त होत होती. (आत्ताच्या घटकेला, गणिकेला हे स्वातंत्र्य नाही.)
कौटिल्याचे अर्थशास्त्र, ह्या ग्रंथात, स्त्रीयां विषयक कायदे, लग्न संस्थे विषयी कायदे, ह्यात पुरेसा उल्लेख केलेला आहे...
(मला फोटो चिकटवता येत नाहीत. जमल्यास, कुणाला तरी सांगतो.)
5 May 2022 - 7:24 pm | मुक्त विहारि
वैयक्तिक आर्थिक, शैक्षणिक आणि सुसंस्कृत उन्नती साठी, कौटिल्याचे अर्थशास्त्र, हा ग्रंथ मला तरी उपयोगी पडला .... "साहित्य", हे कॅलिडोस्कोपिक असल्याने, ग्रंथ वाचना नंतर, तुमची प्रतिक्रिया माझ्या विरूद्ध लेखील असू शकते...
4 May 2022 - 7:29 pm | कंजूस
इतिहास अभ्यास आवडला.
ठिकठिकाणच्या लेण्यांना क्रमांक दिले आहेत. त्याबद्दल संक्षिप्त ओडिओ बनवल्यास तिथे गेल्यावर ऐकता येईल. हे काम पाच सहा जणांनी एकत्र येऊन वाटून केल्यास लवकर पूर्ण होईल.
4 May 2022 - 7:38 pm | sunil kachure
गौरव शाली इतिहास पण माहीत नव्हता.तुम्ही माहीत करून दिलात.धन्यवाद.
4 May 2022 - 7:55 pm | निमिष ध.
हा सुंदर लेख लिहील्याबद्दल धन्यवाद. मला नेहमीच मराठी उदयाच्या आधी महाराष्ट्रात असलेली सत्ता आणि राज्ये याचे आकर्षण राहिलेले आहे. सातवाहन असे राजे होते की ज्यांनी संस्कृत किंवा कन्नड भाषा न वापरता पाकृत ही आपली राज्यकारभाराची भाषा ठेवलेली होती. त्यामुळे राजाश्रया मुळे पुढे मराठीचा फायदा झाला असेल. त्यानंतर बर्याच वर्षांनी यादव राज्यामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला.
अजून तुम्हाला ज्ञान असेल तर लेखमाला तयार करून बाकीच्या राज्यांची माहिती करून दिल्यास नक्की आवडेल.
4 May 2022 - 7:56 pm | Bhakti
.
मलाही जुन्नरचा किल्ला पाहायची उत्सुकता होती,पण दोन तीन वर्षांत जेव्हा सातवाहन बद्दल समजले ,तेव्हा नाने घाट पाहायची उत्सुकता अधिक आहे.
उत्तम लेख.
4 May 2022 - 8:55 pm | कंजूस
१) लेण्याद्री आणि बाजूच्या लेण्या (१८ बहुतेक. खूप शीलालेख)
२) जुन्नरचा रविवारचा बाजार
३) जुन्नरच्या दक्षिणेलाही बऱ्याच लेण्या आहेत.
४) जुन्नर गावातलाच शिवनेरी ( सोपा गड)
५) घाटघर मार्गावर पूर मंदिर,
चावंड किल्ला (जरा अवघड) मोठा जलाशय. ( या जलाशयाच्या दुसऱ्या काठाने आल्यास निमगिरी,हडसर किल्ले)
घाटघर गावापुढे नाणेघाट सुरुवात आणि तो प्रसिद्ध सातवाहन कालीन रांजण, एक मोठं लेणं आणि घाट उतरून ( सोपा ) जुन्नर - कल्याण रस्त्याला येतो तिथून वैशाखरे गाव दोन किमी, टोकावडे पाच किमी.
4 May 2022 - 9:08 pm | प्रचेतस
नाणेघाटाचा संरक्षक आणि त्या परिसरातील सर्वात तालेवार दुर्ग जीवधन विसरलात :)
4 May 2022 - 9:58 pm | कंजूस
ती ओळ राहिलीच का!
पण असेही तो अवघडच आहे. त्याला पाहात पाहात नणेघाट उतरायचा. किंवा फार तर नानाचा अंगठा जाता येईल. एक मात्र की आपले वाहन असेल तर असून आडचण नसून खोळंबा.
5 May 2022 - 6:53 am | प्रचेतस
जीवधन तसा अवघडच आहे, घाटघरकडून येणाऱ्या मार्गावर पावठ्यांच्या ठिकाणी आता रेलिंग लावून मजा घालवलीय. कोकण दरवाजावर एक छोटा पॅच वगळता उतरणे तसे साधारण आहे मात्र पदरातल्या दाट झाडीत रस्ता हरवून जातो.
5 May 2022 - 3:36 pm | नगरी
दोस्तहो मला तिथून कोकणात उतरायचे आहे.
5 May 2022 - 3:41 pm | प्रचेतस
तिथून फक्त पश्चिम बाजूस असलेल्या नाणेघाटाच्या पठारावरच उतरता येईल. कोकणात उतरण्यासाठी तुम्हाला नाणेघाट किंवा भोरांड्याच्या दाराचा वापर करावा लागेल.
5 May 2022 - 6:36 am | Bhakti
वाह
👍
तूर्तास https://youtu.be/IbF6s__8PVY नाणेघाट
5 May 2022 - 10:44 am | तर्कवादी
जुन्नर किल्ला व लेण्या याबद्दल मिपावर एखादा धागा आहे का ? किंवा दुसरा कुठला ब्लॉग असल्यास लिंक देवू शकाल काय ?
5 May 2022 - 12:36 pm | Bhakti
हा घ्या धागा
जुन्नर
मिपावर काही शोधायचे असेल तर गुगलवर असे पायपोस करायचे
उदा. मिसळपाव जुन्नर
मिसळपाव अजिंठा
हाच उपाय मायबोली वरचे लेख शोधतांना करू शकता.
भटकंती साठी मराठीत मिळवणे मस्त झालय 😄
5 May 2022 - 12:40 pm | तर्कवादी
धन्यवाद भक्तीजी
5 May 2022 - 11:59 am | तर्कवादी
जुन्नर किल्ला व लेण्या याबद्दल मिपावर एखादा धागा आहे का ? किंवा दुसरा कुठला ब्लॉग असल्यास लिंक देवू शकाल काय ?
28 Oct 2022 - 3:00 pm | Bhakti
जुन्नरला पहिली छोटेखानी भटकंती झाली :)
वर्णन.
4 May 2022 - 9:21 pm | प्रचेतस
लेख आवडला, सातवाहनांबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच.
5 May 2022 - 4:11 pm | नागनिका
लेख आवडला, सातवाहनांबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच
अगदी खरं
4 May 2022 - 11:44 pm | सुखीमाणूस
धन्यवाद असा उत्तम लेख लिहुन आमचे महाराष्ट्रा बद्दलचे ज्ञान वाढवल्याबद्दल.
5 May 2022 - 4:13 am | वामन देशमुख
नागनिका, माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.
5 May 2022 - 6:57 am | प्रचेतस
ह्याच विषयावर पूर्वी थोड्या वेगळ्या अंगाने एक लेख लिहिला होता.
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
5 May 2022 - 11:05 am | तर्कवादी
सातवाहन कालखंडाबद्दलचा माहितीपूर्ण लेख आवडला. ह्या कालखंडालाच मध्ययुग म्हणतात ना ?
वर प्रचेतस यांनी नमूद केलेला धागाही वाचला होता...
मला इतिहासाची आवड आहे पण मुळातून अभ्यास करण्याची वा संदर्भ ग्रंथ वाचण्याची कुवत नसल्याने असे लेख म्हणजे पर्वणीच
बालपणी "भारत एक खोज" मालिका बघितली होती. आता २-३ वर्षापुर्वी पुन्हा थोडी बघण्याचा प्रयत्न केला पण त्यातील गाण्यांचा फार कंटाळा येतो, त्यातली गाणी काढून टाकलीत आणि मालिका पुन्हा नव्याने प्रसिद्ध केली तर बघायला आवडेल.
5 May 2022 - 4:08 pm | नागनिका
साधारणपणे इसवीसनाच्या दहाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत मध्ययुग समजले जाते.
5 May 2022 - 1:42 pm | sunil kachure
Ad इसवी सालानंतर.bc इसवी साल पूर्वी.
इसवी साल मोजतात
येशू ख्रिस्त ह्यांच्या जन्मा अगोदर एक वर्ष आणि जन्मा नंतर एक वर्ष.
पहिला गहन प्रश्न.
येशू ख्रिस्त ह्यांचा जन्म झाला ते वर्ष कोणते?
ते काल्पनिक आहे की खरे?
दुसरा गहन प्रश्न .
पिरामिड असु किंवा प्राचीन शिला लेख,प्राचीन भाषा,प्राचीन सर्व धर्माचे अत्यंत विचारशील धर्म ग्रंथ, .
ह्यांचा काळ पण सरासरी त्याच काळातील.
मग इतक्या पुरातन काळात .
लोक लिहीत होती,शिल्प तयार करत होती,जीवनाला मार्ग दर्शक ठरेल असेल विचार लिहीत होती.
विश्वाचे निर्मिती,ग्रह ,तारे ह्या विषयी पुर्ण माहिती होती.
मग त्या काळातील माणूस नक्कीच प्रगत असणार.
भाषेचा शोध आणि वापर.लिपी अतिशय कठीण काम त्या काळात झाले.कोणती फळं,धान्य , मांस मानवी शरीरास योग त्या काळी माहीत होते.
आणि तेव्हाचे सर्व प्रकार आज पण लागू होतात.
म्हणजे त्या वेळी माणूस खूप हुशार प्रगत असलाच पाहिजे.
5 May 2022 - 3:22 pm | नगरी
नाग कन्या,लेख अप्रतिम,बरेच खोदले आहे.पण हे वाचून अकलेत (dnyanat) भर पडली
5 May 2022 - 4:01 pm | नगरी
सगळे फोटो गायब आहेत
5 May 2022 - 8:01 pm | गामा पैलवान
नागनिका,
लेख छान आहे. माहितीत भर पडली. तुम्हीही त्या राणीचं नाव घेतलेलं दिसतंय. :-) हिच्यावरनं पुढील सातवाहनी राणी आठवली. तिचं नाव गौतमी बलश्री. तिने सातवाहनांच्या तीन पिढ्या ( पती, पुत्र व नातू ) घडवल्या. तिच्यासंबंधी इथे माहिती आहे : https://rupalimokashi.files.wordpress.com/2010/05/virmata.pdf ( रुपाली मोकाशी तुम्हीच तर नाही ....? )
साडेचार शतकं हा फार मोठा कालखंड आहे. सातवाहनांमुळे महाराष्ट्रास व भारतास कमालीचं स्थैर्य लाभलं. याच काळात भारताच्या पश्चिम तटावरून पूर्वतटापर्यंत खुष्कीचा मार्ग सुरक्षित केला गेला असावा असा माझा कयास आहे. अन्यथा युरोपीय जहाजांना अतिपूर्वेकडे जाण्यासाठी श्रीलंकेस वळसा घालून जावे लागे. तो मार्ग वादळे व इतर उपद्रवामुळे सुरक्षित नव्हता. त्याला पर्याय म्हणून दख्खन भूमार्ग सातवाहनांनी विकसित केला असावा.
आ.न.,
-गा.पै.
9 May 2022 - 12:46 pm | नागनिका
नाणेघाट हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल!
16 May 2022 - 9:16 am | गोरगावलेकर
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची अभ्यासपूर्ण ओळख आवडली