Monday, February 19, 2024

ढवळगड

महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गवैभवाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या दुर्गवैभवाला अभिमान व पराक्रमाची एक ऋणानुबंधाची झालर आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत दूरवर विखुरलेली ही दुर्गसंस्कृती गिर्यारोहकांसह पर्यटकांना वारंवार खुणावत असते. इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत की इतिहासाने त्याची नोंदच घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक गडापैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त प्रसिध्दीस आलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १३० मी.) उंचीवर वसलेला आहे. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११० फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे.
महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत, ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख ‘गडʼ असा केला जातो. उदा., जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साताऱ्याजवळील साखरगड इत्यादी. पण ही सगळी तटबंदीयुक्त देवस्थाने असून त्यांना ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ याची परिमाणे लागू होत नाहीत. ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे. पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो किल्ला असल्याचे दर्शवितात. त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्त्व असणारा गड आहे, असे निश्चित सांगता येते.
मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे.केवळ स्थानिकांना व अभ्यासकांना ढवळगड-ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला म्हणुन दुर्गप्रेमीच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओंकार ओंक व डॉ.सचिन जोशी यांचे असले तरी यापुर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणुन उल्लेख आला आहे. 
ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृ. वा पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे. इ. स. १९४० साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दप्तर  मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते. पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो. गो.नी.दांडेकर यांनी आपल्या किल्ले या पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख किल्ला असाच केला आहे शिवाय प्रा. प्र.के.घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराव एक्के यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे. बराच काळ उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे. पण शेवटी ढवळगडला भेट देऊन आल्यावर याला किल्ला म्हणावे कि टेहळणीचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच. पुरंदरचे धुरंदर  या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिले आहे. किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या किल्ल्याचे विस्तृत वर्णन अन्य गड-किल्ले संबंधित ग्रंथांमध्ये आलेले नसल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरते.
   ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही; पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो; तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही. काळाच्या ओघात ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे.

स्थानिक गावकर्याना  हा ढवळगड माहित आहे. मात्र, त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला. त्यामुळे गिर्यार्रोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिज्ञच होते.विस्मृतीइ गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील एका गिर्यारोहकाला यश आले आहे. ओंकार ओक असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. या ढवळगडच्या स्थान निश्चितीबद्दल सांगताना ओक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात काही मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो तेव्हा एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर, बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले. पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉ. सचिन जोशी या इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. याचप्रकारे यापूर्वी म्हणजे २०१२ मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लोंजा या किल्याची स्थाननिश्चिती केली होती. ओक व डॉ. जोशी यांनी शनिवारी (१९ मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादर केला.
गडावर जाण्यासाठी २ मार्ग असून त्यातला पहिला मार्ग जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड–वनपुरी–सिंगापूर–पारगाव चौफुला–वाघापूर–आंबळे असा रस्ता आहे.पुण्याहून ढवळगडाला जाण्यासाठी अंतर साधारण ५५ कि.मी. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी. आहे. गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग  पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळी कांचन गावातून असून जवळच असणारे डाळिंब हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे. डाळिंब गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो.डाळिंब गावापासून गड माथा किंवा ढवळेश्वर मंदिर २५५ मी. उंचीवर आहे. डाळिंब गावापासून रेल्वेमार्ग पार करून १४० मी. चढून आल्यावर मेटाचे अवशेष दिसून येतात. या मेटावर खडकात खोदलेले आणि नंतर बांधलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याचा आकार साधारणतः १५ फूट x ८ फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर हे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती झाली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्याच्या छपराखाली पगडी घातलेली गणपतीची मूर्ती असून ती पेशवे काळातील असावी. कारण अशाच स्वरूपाची गणेश मूर्ती अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात आहे. ढवळगडच्या माचीवरील या गणेश मंदिरासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसते.
किल्ल्यावर जाण्याच्या दोन मार्गांपैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर राबता जास्त असतो. आंबळे गावात शिरण्यापुर्वी उजवीकडून एक कच्चा रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेला आहे. या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा फाटा असुन हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेला आहे. येथुन चालत १५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. गडावर येण्यासाठी पुणे-लोणीकाळभोर- उरुळीकांचन- डाळिंब हा दुसरा मार्ग असुन हे अंतर ४० कि.मी.आहे. गाडीमार्गे हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्याच्या गावातुन ढवळगडावर येण्यास उभा चढ असुन दिड तासाची तंगडतोड करावी लागते. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीची असुन आंबळे गावचा नगरकोट व पेशव्यांचे घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पहाता येतो. गावातल्या लोकांनां किल्ला कुठं आहे विचारलं तर त्यांना किल्ला आहे म्हणून माहित नाही त्याच किल्ल्याला ते ढवळेश्वराचं मंदिर म्हणून ओळखतात. गडाकडे जाताना गावात वाटेत गढी दिसते तेव्हा तिथं थांबून गढी पाहायची सरलष्कर दरेकर इनामदार यांची हि गढी. छत्रपती शाहू महराजांनी आंबळे हे गाव सरदर दरेकरांना इनाम म्हणून व लष्करी खर्चासाठी दिले होते त्याच आंबळे गावात हि गढी पाहायला मिळते. गढीचा काही भाग संवर्धन करून त्यावर रंगरांगोटी करून स्मारक उभं केलं आहे तर काही काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत व मोठे दरवाजे सुस्थितीत पहायला मिळतात. गढी समोरच असलेल्या मंदिराच्या बाजूने देखील तट व दरवाजे आहेत. गढी पाहून  पुढे गडाकडे निघायचे.
सरलष्कर दरेकर यांचं गाव, महान पराक्रमी दरेकर घराणे, यांचे दोन अतिभव्य असे वाडे आहेत, सुसज्ज दरवाजे, तटबंदी, गावातील मंदिरे  भैरवनाथ मंदिर, राजेश्वर मंदिर, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, काळा मारुती, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, गरुड मंदिर, गावात अष्टमी चैत्र वैद्य महिण्यात मोठी यात्रा असते. गावात दरेकर, जगताप, काळे, कुंजीर, बधे,गायकवाड, शेंडगे, रोकडे, शेम्बडे, बिचकुळे, थोरात, ढोणे, ढोले, होले, शेख, अशी आडनाव मिळून 2000 लोकसंख्या आहे. गावात माहिती घेतली असता ढवळगड चा ढवलेश्वर झाला असे सांगतात. पाणंद रस्ताने गेल्यावर आपल्याला ढवळगड दिसतो, गावच्या पश्चिम उत्तरेस उभा राहिला आहे.

 

 या वाटेवर माथ्याच्या खाली गडाचे दुसरे मेट आहे. कच्च्या रस्त्याच्या शेवटी आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो.
 
 
 या घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या मेटावर बांधलेला चुन्याचा घाणा आजही अस्तित्वात आहे. घाण्याशेजारी जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. 
 
येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच त्याखाली असलेली माची नजरेस पडते. घाण्यापासून बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात विटांचे बांधकाम केलेले आहे. येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते.
 
 
 
 
 किल्ल्याच्या मुख्य चढावर हनुमानाचे शिल्प कोरलेला दगड आहे. एकाच दगडात पाठीला पाठ लावून हनुमानाची दोन शिल्पे कोरलेली आहेत. जणु या मुर्त्या येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या. चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
 
 तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात.
 
 गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटीमध्ये ठेवलेले आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्या शेजारील अर्ध्या भागातील तटबंदीची भिंत आणि बुरूज उभे आहेत.
 
 
 
 
 
  दरवाजाची उंची ३.७ मी. असून अस्तित्वात नसलेल्या अर्ध्या कमानीचे दगड तेथेच खाली पडलेले आहेत. दरवाजातून आत उजवीकडे देवडी (पहारेकऱ्यांची खोली) आहे. मात्र सध्या या मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरल्याचे दिसते. देवडीच्या आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते. कारण पेशवेकालीन विटांचा सर्रास वापर या बांधकामात केलेला दिसतो. तेथे आत एक खोली आहे. दरवाजात एका बाजूची बिजागरीची जागा राहिलेली असून अडसर लावण्याची एका बाजूची जागा तेथे दिसते. दरवाजापासून पूर्व पश्चिम १२ मी. लांब आणि १ मी. रुंद तटबंदी उभी असलेली दिसते. दरवाजा समोर गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर घालण्याची जागा दिसुन येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११० फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे. गडमाथा अतिशय लहान आहे. दरवाजा व तटाला लागुनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत. 
 
याच्या पुढील भागात तटाला लागुनच एक १५-२० फुटांचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील पाणी जमीनीत मुरु नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे टाके कोरडेच आहे.  टाक्याच्या बाहेरील बाजूस बांधकाम करून त्याला कठडा बांधला आहे. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर.गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे म्हणजे ढवळेश्वर महादेव मंदिर. मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग असुन सभामंडपात नंदीची स्थापना केली आहे. मंदिराला बाहेरील बाजूंस गोमुखही आहे. बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवेकाळात झाले असावे.
 
 
काही वर्षांपूर्वी मंदिराचीही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर म्हणजेच पूर्वेला पाण्याचे दुसरे टाके असून या टाक्यात खांब कोरलेला आहेत. या टाक्याची देखील दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसते. टाक्याला तसेच आतील खांबाला चुन्याचा गिलावा केलेला आहे. या टाक्याची लांबी रुंदी ३.१५ मी. x ४.३० मी. असून खोली ५.४८ मी. आहे. टाक्याच्या समोरील उतारावर तटबंदीचे भग्न झालेले अवशेष असून ते सहजासहजी दिसून येत नाहीत. गडाला सर्व बाजूंनी तटबंदी होती; परंतु काळाच्या ओघात नैसर्गिक आपत्तींमुळे ती ढासळलेली दिसते. पूर्वेकडील व उत्तरेकडील तटबंदीचे अवशेष देखील तुरळक प्रमाणात दिसतात.  मंदिराच्या मागील बाजुस वृंदावन असुन त्याशेजारी एक घुमटी व नंदी दिसुन येतो. गडाच्या तटबंदीच्या खालून गडाला प्रदक्षिणा घालताना ठिकठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात.  इतर अनेक किल्ल्यांवर तटबंदीमध्ये खोल्या असतात, तशा स्वरूपाची तटबंदीमध्ये असलेली खोली पश्चिमेकडील तटामध्ये दिसते. तट पडून गेल्याने ही फक्त खोली शिल्लक आहे. सध्या येथे एक मंदिर आहे. या खोली समोरच एक तुळशी वृंदावन आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे तुळशी वृंदावन बांधले असावे.गडाच्या उत्तरेकडील उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे गडाच्या परिसरातील तिसरे टाके होय. साधारणपणे दहा फूट खोली असलेले हे टाके मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडे होते. गडाच्या माथ्यावरून पश्चिमेकडे शिंदवण्याचा घाट दिसतो. गडावरून पहाताना डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर काही प्रमाणात झाडी दिसुन येते. या झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. डाळिंब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पहायचे असल्यास गडफेरी करण्यास एक तास लागतो अन्यथा गडमाथा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
हा गड उजेडात येत असताना काही वाद झाले. ओंकार ओक यांचा प्रतिसाद उपलब्ध होउ शकला.

ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ. सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते. आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती. तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या (घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची "किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा, तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा, तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा. श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री. अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
ओंकार ओक
 
संदर्भ :-
१)  पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
२) https://www.discovermh.com/dhavalgad/
३) https://maheshnilangekar.blogspot.com
४)  साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
५) एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
 ६)  जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.
७) www.durgbharari.in   हि बेवसाईट







































 सरदार दरेकर वाडे - आंबळे
(इतिहासवाटा - ८१ ) 

माझ्या लहानपणी मोठ्या लोकांच्या बोलण्यात कधीतरी हमखास येणार वाक्य म्हणजे," अमुक तमुक काय स्वतःला आंबळेचा जहागीरदार समजतोय का ?" आज हा संवाद आठवायच कारण म्हणजे पुरंदर तालुक्यातील आंबळे गावातील सरदार दरेकर यांचे ऐतिहासिक वाडे पाहाण्याचा योग आला. वरील वाक्य व सरदार दरेकर यांचा काही संबंध आहे याची मला निश्चित व शाश्वत माहिती नाही पण गतकाळातील संवाद सहजच मनात येणे ही नैसर्गिक भावना आहे असे मला व्यक्तीशः वाटते.आज दि.२४ /१०/२०२१ रोजी मला दैनंदिन कामकाजाला सुट्टी असणारा दिवस आणि दिवसभर घरात राहणे हे माझ्या व्यक्तिमत्वाला व स्वभावाला न रूचणारे वास्तव. मग पुरंदर तालुक्यात कार्यरत असणारे श्री.पी.एच.राऊत हे पूर्वी भोर तालुक्यात कार्यरत असताना त्यांच्यात व माझ्यामधे एक अभेद्य बंध निर्माण झाला होता, तो आजहि तसाच भक्कम आहे. मी शनिवारी सासवडला येतोय असा चलभाषवर निरोप दिला आणि त्यांनी " या, नक्की या" प्रतिसाद दिला. माझ्या मनात पुरंदर तालुक्यातील आंबळे गावातील सरदार दरेकर यांचे वाडे पाहण्याचा संकल्प होता कारण ऐतिहासिक वाडे व गढी या समुहावर अनेक वेळा वाड्याची प्रकाशचित्रे व माहिती वाचनात आली होती. सकाळी ८ :३० वाजता दुचाकीवरून सासवडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कापुरव्होळ मार्गे सासवडला जाताना उजव्या बाजूला असलेला किल्ले पुरंदरचे मोहक दर्शन होत होते. छ.संभाजी महाराजांचे जन्मस्थान, मुरारबाजींचा पराक्रम, फतहखानाशी झालेला विजयी संग्राम, मिर्झा राजा जयसिंगाशी झालेला पुरंदरचा तह अशा अनेक दृश्यांचे चलचित्रण डोळ्यासमोर क्षणात तरळून गेले. साधारणतः दहा वाजता श्री.राऊत यांच्या सासवडमधील निवासस्थानी पोहोचलो. तेथे चहा, शिरा व पोहे खाऊन राऊंतांच्या चारचाकीत बसलो. त्यांचे स्नेही श्री.सुतार यांना सोबत घेऊन आम्ही आंबळे गावच्या दिशेने प्रवास सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास आम्ही आंबळे गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला भाला मोठा बुरूज दिसून आला. गावातील पूर्वाभिमुख असलेल्या कालभैरवनाथ मंदिराच्या प्रागंणात चारचाकी उभी करून खाली उतरलो. ग्रामदैवच्या समोरच पश्चिमेस भव्य प्रवेशद्वार असलेला सरदार दरेकर यांच्या वारसा कथन करणारी वास्तू दिसून येते. दरम्यान श्री.अशोक थोरात ह्या गावातील व्यक्तिची ओळख झाली आणि सरदार दरेकरांचे ऐतिहासिक वाडे पाहण्यात मदत मिळाली. त्यानंतर पूर्वेस उताराच्या रस्त्यावर अगदी जवळच समोरासमोर दक्षिण व उत्तरेस भव्य मुख्य प्रवेशद्वारे असलेले दोन सरदार दरेकरांचे वाडे दृष्टीस पडले. दक्षिणाभिमुख वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दुमजली कोरीव तीन दगडी कमानी असणारी तत्कालीन वास्तू आपले लक्ष वेधून घेते तर तिच्या समोरील सरदार दरेकरांचा भव्य व दुरूस्तीसह रंगरंगोटी केलेला वाडा गतकालीन वैभवाची साक्ष देण्यास पुरेसा आहे.  

शिवकाळात सामान्यातून असामान्य कर्तृत्व करणारी अनेक घराणी छत्रपतिंच्या प्रेरणेने स्वराज्य स्थापनेत सहभागी होऊन इतिहासात गौरवाने वर्णिली गेली आहेत. क-हेपठारावरील अनेक घराण्याप्रमाणे दरेकर घराणे हे छत्रपतिच्या लष्कराचा महत्त्वाचा घटक होते हे गणोजी दरेकर, येसाजी दरेकर व बाळाजीराव दरेकर या सरदारांच्या नावाचा उल्लेखाने प्रमाणित होते. छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडात दरेकर लष्कराचा घटक असल्याचे उल्लेख आढळून येतो. छ.शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत अनेक पराक्रमी व्यक्तिमत्त्व उदयास आली. राणोजी शिंदे, सुभेदार मल्हारराव व इतरहि बहुसंख्य पराक्रमी सरदार निर्माण झाले तर सरदार दरेकरांना नावलौकिक मिळाला तो हा कालखंड होय. विशेषतः इ.स.१७५७ च्या सप्टेंबरमधे मराठ्यांनी कर्नाटकातील कडाप्पाचा नवाब अब्दुल मजीदखान मायणा याच्या ताबेदारीत असलेल्या कोलार, होसकोट व बाळापूर हल्ला केला तेव्हा सरदार इंद्रोजी कदम, सोनजी भापकर यांच्याबरोबर असलेल्या खंडेराव दरेकर यांनी पराक्रम करून विशेष प्रसिद्धी प्राप्त केली. पेशवे नारायणराव यांची शनिवारवाड्यात हत्येनंतर सरलष्कर खंडेराव दरेकरांनी राघोबादादांचा पक्ष सोडून बारभाई पक्षास सामील झाले.खंडेराव दरेकरांना सरलष्कर ही पदवी पेशवाईत मिळाली होती तर त्यांचे आजोबा दादाजी दरेकरांनी पानिपत युद्धात देह ठेवला होता. सरलष्कर दरेकरांकडे इ.स.१७९५ साली पुणे प्रांतातील आंबळे हा गाव इनाम होता तर बीडव पाथरीचे चौथाई अंमल होता. बारामती तालुक्यातील जळगाव, उंडवडी व पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या तीन गावांचा मोकासा होता. १७९५ साली दरेकरांकडे एकूण १ लाख १६ हजार ८५ रुपयेचा संरजाम असल्याचा उल्लेख आढळून येतो. याच वर्षी मराठे व निजाम यांच्यामधे खर्डा येथे झालेल्या लढाईत सरलष्कर खंडेराव पुत्र हणमंतराव दरेकरांनी तरवार गाजविल्याची नोंद आढळून येते. सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा शिक्का खालीलप्रमाणे  
                                श्री  
                          चरणी तत्पर
                     जयाजीसूत खंडेराव 
                       दरेकर सरलष्कर  
सरलष्कर दरेकरांचा हा सर्व इतिहास डोळ्यासमोरून जात असताना थोरल्या वाड्याच्या चाव्या घेऊन एक व्यक्ती हजर झाली होती. सरलष्कर खंडेरावांच्या पुढील पीढीतील वारसादारांचे वाडे येथे निर्माण झाले असावेत. डागडुजी केलेल्या वाड्याला मुख्य दरवाजा जरी उत्तरेला असला तरी त्याच वाड्याला पूर्वेकडील तटबंदीत एक भला दरवाजा आहे. त्याच्याच चाव्या घेतलेल्या इसमाने वाड्याच्या संरक्षक असलेल्या तटबंदीच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप उघडले होते. समोरच्या मोकळ्या जागेत हिरवळ व विविध रंगीबेरंगी फुलझाडे आकर्षक रचनेत लावलेली होती. मोकळ्या पटांगणातून पूर्वेकडील दरवाजाने आत प्रवेश केला गेला. दगडी बांधकामातील चौकात आम्ही उभे होतो. या चौकात उत्तरेचा भाग सोडून तीनहि बाजूंनी सोप्याची आकर्षक इमारत लक्ष वेधून घेत होती. दक्षिणेस जाणारा भुयारी मार्ग लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केल्याचे आढळून आले. दक्षिणेच्या सोप्यातील दालनात दिवाणखाना होता. उच्च अभिरुचीची बैठक व्यवस्था व घराण्यातील कर्तबगार व्यक्तीच्या तसबीरी व ढाल तरवार भिंतीवर लावलेली होती. मग आम्ही पहिल्या चौक व दुसरा चौक यांच्या दरम्यान असलेल्या भागातून पहिल्या चौकात पोहोचलो. हा चौक आयताकृती असून मुख्य प्रवेशद्वाराचा आतील भाग पाहत होतो. तीन फूटांच्या उंचीचा घडीव दगडी बांधकामातील चौक तत्कालीन वैभवाची मूकपणे साक्ष देत होता. आम्ही मुख्य दरवाजेच्या आतील बाजूस होतो, दरवाजाचे आतील असणाऱ्या देवड्या व त्याच्याशेजारी असलेल्या घडीव दगडी बांधकामातील पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या भुयारी मार्गाचे उतरते जीने दिसत होते. पूर्वेकडील भुयारी मार्ग हा पूर्वेकडील असलेल्या श्रीराम मंदिराकडे व पश्चिमेकडील भुयारी मार्ग हा ग्रामदैवताकडे जात असावा हा माझा फक्त अंदाज आहे. मग आम्ही मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजावर दगडी जीन्याच्या पायरी मार्गाने पोहोचलो.  

मग पुन्हा खाली उतरून आल्या मार्गाने म्हणजेच पूर्वेकडील दरवाजाने बाहेर पडलो. पूर्वेकडील रस्त्याच्या पलिकडे पडझड झालेल्या मोठ्या आकाराच्या तटबंदीत सुरेख पूर्वाभिमुख मंदिरे आहेत. या परिसराच्या दक्षिणेस दोन लहानमोठ्या घडीव दगडी बांधकामातील पाण्याने भरलेल्या बारवा आहेत. मोठ्या बारवेत उतरण्याठी पश्चिमेकडून पायऱ्या आहेत परंतु वापरात नसल्यामुळे आसपास गवत व झुडुपे वाढलेली आहेत. बारवा पाहून आम्ही मंदिराजवळ आलो. पेशवाई कालखंडात दगडी बांधकामातील श्री राम मंदिर व तुळजा भवानीचे अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचे शिखर भाजक्या वीटांचे केलेले आहे. श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण व सीतामाईच्या सुबक मूर्ती स्थानापन्न असून ह्या सर्व मूर्ती बखतराम नावाच्या राजस्थानी व्यक्तिने तयार करून पेशव्यांना दिलेल्या होत्या, त्या पेशव्यांनी सरलष्कर दरेकरांना भेट दिलेल्या आहेत. याच मंदिराच्या पिछाडीस थोरल्या वाड्यातून भुयारी मार्ग येतो असे म्हणतात. मंदिराच्या पाठीमागील जेथे भुयारी मार्ग येते तेथे तळघर असून तेथे ध्यान मंदिर असल्याची माहिती मिळते. या तळघराला लागूनच पश्चिमेस चौकोनी विहीर आहे ती आपणांस दिसून येते. मंदिर परिसरातील पडझड झालेल्या पूर्व - पश्चिम तटबंदीत दोन भव्य दगडी बांधकामातील प्रवेशद्वारे अस्तित्वात आहेत. श्रीराम मंदिराच्या पूर्वेस लहान पण सुरेख हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या पूर्वेस अतिशय प्रेक्षणीय श्री राजेश्वर शंभू महादेव मंदिर आहे. मंदिर सभागृह व गर्भगृह स्वरूपात असून सभामंडपात तीन कलाकुसर केलेल्या दगडी कमानीत आहे. पेशवेकालीन स्थापत्यकलेने ओतप्रोत असलेले दगडी स्तंभ तत्कालीन उच्च अभिरुचीची जाणीव करुन देतात. दक्षिण व उत्तरेच्या भिंतीत दोन्हीहि बाजूच्या कोनाड्यात श्री गणपति मूर्ती आहेत. तर गर्भगृहालगत असलेल्या दोन्ही कोनाड्यात उत्तरेस पन्हळी असलेल्या शिवपिंडी आहेत. गर्भगृह काहीसे खोलट असून शिवलिंग स्थापित केलेले असून पाठीमागील दोन कोनाड्या दोन अप्रतिम परंतु अपरिचित मूर्ती आहेत.या मंदिराचे शिखर भाजक्या वीटांमधे गोपुर पद्धतीने बांधलेले आहे. या मंदिर समुहास देऊळवाडा या नावाने संबोधले जाते. 

मग आम्ही पुन्हा ग्रामदैवताजवळ पोहोचलो व तेथून उत्तरेच्या गावातील रस्त्याने गेल्यावर पूर्वाभिमुख वाड्याचे प्रवेशद्वार व थोडीशी तटबंदी पडझड झालेली दिसून आली तर समोरील बाजूस दगडी बांधकामातील बारव दिसून आली. ती पाहून परत चारचाकीजवळ आलो. स्थानिक असलेल्या श्री.अशोक थोरातांना धन्यवाद देऊन मोरगांवच्या दिशेने प्रवास सुरू केला.गावातून बाहेर पडताना ऐतिहासिक बांधकामाच्या खूणा दर्शविणारे अनेक अवशेष दिसत होते.   

 

 

 

 

 

इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. फेसबुक च्या एक पोस्ट वरून या किल्ल्याबद्दल समजलं .भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1932 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो.

गडावर पाहण्याची ठिकाणे -
किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे.

पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत.

गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.

गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड आणि भुलेश्वर .

गडाच्या अधिक माहिती खाली दिलेला विडिओ पहा आणि अजून ही असाच गडांच्या माहिती साठी "Subscribe" करा SPOTVAR

धन्यवाद!!
https://youtu.be/-Yp0HE0ylmY


ढवळगडासंदर्भात काही माहिती देतो. गाव -आंबळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे समुद्रसपाटीपासून उंची 885 मीटर, पुरंदर दुर्ग च्या उत्तरेस, भुलेश्वर डोंगर रांगेवर उभा ठाकलेला, आत्तापर्यंत चा दुर्ग. गिरीमित्र ओंकार ओक आणि इतिहास संशोधक श्री सचिन जोशी यांनी अथक प्रयत्न करून हा गड शोधला. पुणे- फुरसुंगी -दिवे घाट- सासवड - सिंगापूर - वाघापूर - आंबळे असे आपण जाउ शकतो. अतिप्राचीन गाव, सरलष्कर दरेकर यांचं गाव, महान पराक्रमी दरेकर घराणे, यांचे 2 अतिभव्य असे वाडे आहेत, सुसज्ज दरवाजे, तटबंदी, गावातील मंदिरे तर काय बोलावे जबरदस्त भैरवनाथ मंदिर, राजेश्वर मंदिर, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, काळा मारुती, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, गरुड मंदिर, गावात अष्टमी चैत्र वैद्य महिण्यात मोठी यात्रा असते. गावात दरेकर, जगताप, काळे, कुंजीर, बधे,गायकवाड, शेंडगे, रोकडे, शेम्बडे, बिचकुळे, थोरात, ढोणे, ढोले, होले, शेख, अशी आडनाव मिळून 2000 लोकसंख्या आहे. गावात माहिती घेतली असता ढवळगड चा ढवलेश्वर झाला असे सांगतात. पाणंद रस्ताने गेल्यावर आपल्याला ढवळगड दिसतो, गावच्या पश्चिम उत्तरेस उभा राहिला आहे. गडाकडे निघाल्यावर अगदी 5 मिनिट अंतरावर वेगळ्या धाटणीचा हनुमान पाहायला मिळतो , एकाच दगडात दोन्ही बाजूंनी कोरीव मारुतीराया आहे, अप्रतिम आहे. मग थोडं पुढं गेल्यावर जुजबी तटबंदी मग गणेश मूर्ती दिसते अप्रतिम आहे. मग अर्धा पडलेला दरवाजा, शेजारी एक बुरुज, वर विटांचे बांधकाम, आणि शेजारी लागून उंच तटबंदी आहे. त्याला लागून 3 दगडी खोल्या आहेत. दरवाजा पुरातन अस्तिव दाखवून देतो. मग पुढं गेल्यावर एक कोरीव कमी बांधीव विहीर टाक आहे अंदाजे 20 फूट खोल. तसच पुढं एक खांब टाक आहे 15 फूट बाय20 फूट एक कोरीव खांब दिसतो. बरोबर मंदिर दरवाजा समोर आहे, सुंदर आहे. मग मुख्य मंदिर ढवलेश्वर अप्रतिम कोरीव पिंड, शिवलिंग खूप खूप खूप सुंदर आहे. सभामंडप, नंदी अफलातून आहे, मुख्य गाभारा तर सुबक आहे. 2 दरवाजे ,मुख्य दरवाजा सगळं कसं अप्रतिम आहे. पूर्वेला दौलतमंगळ गड (भुलेश्वर मंदिर), दक्षीण दिशेने पुरंदर वज्रगड, पश्चिमेला मल्हार गड उत्तरेस रेल्वे रूळ आणि 3 बोगदे .संपुर्ण गड फेरीत या व्यतिरिक्त काही ही अवशेष सापडले नाही. नैसर्गिक तटबंदी, बांधीव नाही. छोटेखानी टेहळणी दुर्ग असावा.
हा गड उजेडात येत असताना काही वाद झाले. ओंकार ओक यांचा प्रतिसाद उपलब्ध होउ शकला.
ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ. सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते. आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती. तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या (घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची "किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा, तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा, तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा. श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री. अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
ओंकार ओक

ढवळगड गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पुणे सोलापूर महामार्गाने गेल्यास उरुळी कांचन मधून आतल्या बाजूला नऊ किमी गेलं की कोल्हापूर रेल्वे मार्ग लागतो अन आंबळे गाव लागतं त्या गावातून गडावर पायवाट जाते. दुसरं म्हणजे सासवड रोड ने गेल्यास काळेवाडी मधून आतल्या बाजूला जाऊन दोन चार गावे मागे टाकली कि आंबळे गावात पोहोचतं. गाव तसं छोटंसं, गावात स्वराज्यातील सरलष्कर प्रमुख दरेकर यांचा भला मोठा वाडा आहे आणि बरेच लहान मोठे वाडे आहेत. आंबळे गावातून गेल्यास गाडी गडावर जाते. गडावर प्रवेश केल्यास प्रथमतः
१)चुन्याचा घाना दिसतो.
२)पवनसुत हनुमान मूर्तीचे अखंड दोन्ही बाजूंनी शिल्प दिसते.
३)गणपती बाप्पा मंदिर आहे.
४) समोरच बुरुज व भग्नावस्थेत असणारा दरवाजा आहे.
५)तटबंदी व पाण्याच्या टाक्या आहेत.
६)धवळेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे.
असा हा गडाचा परिसर दिसतो. गडाच्या चारही बाजूंनी गावं वसलेली आहेत. माझ्या अंदाजानुसार भुलेश्वर पर्वत रांगेतील शेवटच्या टेकडीवर वसलेला हा गड टेहाळणीच्या कामी येत असावा. आसपासच्या पंधरा किलोमीटर अंतरावरील प्रदेश गडावरून दिसतो.

https://www.discovermh.com/dhavalgad/


पावसाळी भटकंती - धवलगड
अजून म्हणावा असा पाऊस नसल्याने, खूप गरम होत असल्यामुळे आणि सहकुटुंब असल्यामुळे आम्ही अगदी छोटा असा गड निवडला होता. पुण्यापासून जवळपास ५० किमी च्या अंतरावर भुलेश्वर मंदिराजवळ काहीसा दुर्लक्षित आणि निर्जन असा हा गड.
पुणे सासवड यवत असा मार्ग घेतला होता बोपदेव घाट उतरल्यानन्तर ऑस्करवाडी मिसळ ला थांबून नाश्ता केला आणि तासाभरात गडाच्या पायथ्याजवळ गेलो तोच मुलांना हरीण दिसले. मग गाडी थांबवून आम्ही हरीण पाहत बसलो त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले. हरीण दिसल्यामुळे मुलं भलतीच खुश झाली होती ते पाडस बहुतेक त्याच्या कळपापासून लांब आला होता आम्ही दिसल्यामुळे मग ते पळून गेला. १५ - २० मिनिटांमध्ये आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोचलो. गडावर विशेष असे काहीच अवशेष शिल्लक नाहीत. अगदी अर्ध्या पाऊण तासात गड पाहून होतो. ढवळेश्वर मंदिर आणि एक पडकी भिंत. पण स्थानिक लोक बहुतेक रोज गडावर येत असावेत कारण महादेवाच्या पिंडी ला ताजी फुले वाहून यथोचित पूजा केलेली दिसत होती गडावरून खाली उतरून आम्ही गावात एक वाडा आणि मंदिर आहे त्याला भेट दिली आणि पुढे आम्ही पुरंदर ला गेलो . अगदी अर्ध्या दिवसात होईल असा हा ट्रेक किंवा सहकुटुंब भटकंती आणि आराम करण्यासाठी एकदम निवांत जागा. शनिवार रविवार पण अतिशय कमी गर्दी.

मिसळ

हरीण

दोन्ही बाजूने कोरलेली मूर्ती

गडाची भिंत

गणेश मूर्ती

ढवळेश्वर मंदिर

शिवलिंग

फुलपाखरू

आजूबाजूचा परिसर

सहजच

वाडा

वाड्यासमोरील मंदिर

वाड्यासमोरील मंदिर

निसर्ग

http://www.misalpav.com/node/50532 

 संडे भटकंतीनामा - ढवळगड व किल्ले दौलतमंगळ (भुलेश्वर मंदिर)


आषाढ उजाडू लागला कि आभाळात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागते. गेली तीन-चार महिने पिवळा मळवट भरून बसलेला सह्याद्री हिरवा शालू पांघरण्यास सज्ज होतो. उन्हानं तापलेल्या त्या कातळकड्यांना आस लागते ती सह्यद्रीच्या जटांमधून कोसळणाऱ्या जलधारा आपल्या अंगाखान्द्यावर झेलण्याची. पावसाळा म्हंटल कि वर्षाऋतू पण हाच वर्षाऋतू शेतकऱ्यांसाठी व उन्हानं सैर-भैर फिरणाऱ्या पक्षी प्राण्यांसाठी आनंद ऋतू बनून येतो. पावसाळ्यात स्वातंत्र्य दिनाची मोहीम सोडली तर आम्ही जास्त कुठं भटकायला जात नाही पण आमच्या ठेलेल्या तारखा सोडून इतरवेळीची रविवार ते रविवारची भटकंती चालूच असते. रविवारी भटकायचा प्लॅन करणं म्हणजे महाकठीण काम कारण कामांमुळे रविवारी सुट्टी मिळते का नाही याची खात्री नसते अन मिळालीच तरी पूर्ण दिवस नाही १० ते ११ पर्यंत माघारी फिरावं लागतंय पण भटकायची आवड असली कि काही ना काही करून सवड मिळतेच फक्त अंगात भटकायचा किडा असला पाहिजे. आमच्या वारी गडकोटांचीच्या परिवाराचे सरदार उमराव शुभम बाबा पंक्या त्यांच्या त्यांच्या जहागिरीत व्यस्त असल्यामुळं त्यांना सकाळी एवढ्या लवकर उठून येणं जमत न्हवतं. तरी राहुल्या,बाबा, पंक्या कधी कधी येत असत, शुभम निगडीला असल्यानं त्याला येणं शक्य न्हवतं. स्वप्न्या यायचा पण फलटणला गेल्या पासून तोही बंद झाला त्यामुळं मी अन विक्याच. आमचं नशीब पण भारी कि घरापासूनच जवळच असलेली भुलेश्वर डोंगररांग व इतिहास संपन्न वैभवशाली पुरंदर तालुका लाभला. जर रविवारी याच डोंगरांगेत कुठं ना कुठं तरी भटकत रहायचं हे चालूच असायचं कधी कानिफनाथ, कधी मल्हारगड, कधी रामदरा तर कधी आमचा वडकीचा मिनी केंजळगड, कधी मस्तानी तलाव मार्गे ज्वाला मारुती तर कधी दिवे घाटाच्या अंगाखांद्यावर. हा ब्लॉग अशाच आमच्या जून,जुलै महिन्यात झालेल्या रविवारच्या उनाडक्यांचा भटकंतीनामा आहे. 


सुट्टी असली नसली तरी रविवारी पहाटे साडे-पाच सहाला विक्याला फोन करायचा, "हा निघतोय रे तिकडून उत्तर यायचं "हां ये" परत विक्याच्या घरी गेलं कि फोन करायचा कारण भाऊ कधी कधी हां ये म्हणून झोपी जायचा म्हणून परत फोन करून "हां ये खाली आलोय" मग भाऊ प्रकट व्हायचे अन ठरायचं कि आज इकडं जायचं. नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री विक्याचा फोन आला उद्या जाऊ म्हणून पण दरवेळी सारखं कुठं जायचं हे माहित नाही. सकाळी पहाटे साडे पाचलाच विक्याच्या इथे जाऊन थांबलो अन कॉल केला. अर्धा तास वाट बघितल्यावर पवार साहेब आले, तिथंच सोसायटीत थांबून कुठं जायचं याची शोध शोध सुरु होती. आमचा ढवळगड व किल्ले दौलतमंगळ ( भुलेश्वर मंदिर ) राहील होत लांब असल्यामुळं सारखं राहून जायचं ते आज करायचं ठरलं लगेच कसं,कोणत्या मार्गे जायचं हे सगळं काढून १० मिनटात प्लॅन बनवून गाडीला किक मारून बुंगाट. सोलापूर रोडने अंतर वाढत होत म्हणून दिवे घाट मार्गे निघालो. लांबूनच कानिफनाथांना नमस्कार करून दिवे घाटात आलो. दिवे घाट आता हिरवा शालू पांघरून सजला होता. दिवे घाट सर करून वर आल्यानंतर काळेवाडी मार्गे आंबळे कडे निघालो आधी ढवळगड करायचा होता. काळेवाडी रोडवर डाव्या हाताला थाटात विराजमान असलेला मल्हारगड उर्फ सोनोरीचा किल्ला होता तर उजव्या अंगाला आकाशाला गवसणी घालणारा इंद्रनील पर्वत पुरंदर व वज्रगड अजून ढगांच्या आड पहुडलेले होते. पुरंदर तालुक्याला अंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालं आहे आणि त्यासाठी लागणारं जमीन हस्तांकरण सरकारकडून चालू होत तेव्हा इथं पर्यंत विमानतळाची जमीन आहे विमानतळ झाल्यानंतर या भागला होणारा फायदा तिथलं अर्थकारण यावर मोक्कार चर्चा करत आम्ही दोघं निघालो होतो जस आंबळे जवळ येत होत GPS गायब होत चाललं एका फाट्यावर रस्ता विचारून पुढे निघालो. भेकराईनगर ते ढवळगड हे ४० किलोमीटर अंतर आहे. वाटेत सिंगापूर गाव लागतं. सिंगापूर झाल्यानंतर आंबळे गावची पाटी दिसते तिथून आत निघालो.


गावातल्या लोकांनां किल्ला कुठं आहे विचारलं पण त्यांना किल्ला आहे म्हणून माहित नाही त्याच किल्ल्याला ते ढवळेश्वराचं मंदिर म्हणून ओळखतात. गडाकडे जाताना गावात वाटेत गढी दिसली मग तिथं थांबून गढी पाहायला गेलो. सरलष्कर दरेकर इनामदार यांची हि गढी. छत्रपती शाहू महराजांनी आंबळे हे गाव सरदर दरेकरांना इनाम म्हणून व लष्करी खर्चासाठी दिले होते त्याच आंबळे गावात हि गढी पाहायला मिळते. गढीचा काही भाग संवर्धन करून त्यावर रंगरांगोटी करून स्मारक उभं केलं आहे तर काही काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत व मोठे दरवाजे सुस्थितीत पहायला मिळतात. गढी समोरच असलेल्या मंदिराच्या बाजूने देखील तट व दरवाजे आहेत. गढी पाहून आम्ही पुढे गडाकडे निघालो तेवढ्यात बारीक पाऊस चालू झाला.

प्रवेशद्वाराल लागून असलेली तटबंदी 

गढीला असणाऱ्या प्रवेशद्वारंपैकी एक प्रेवशद्वार 


चिखल असलेल्या कच्या रस्त्याने पुढे आल्यावर गड दिसू लागला. एका लहानश्या टेकडी वर किल्ला आहे. रस्ता खराब होता पण आम्ही जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडीवरच जाणार. गडाखाली असलेल्या हनुमान मूर्ती पर्यंत गाडी जाते. शेंदूर चढवलेल्या हनुमंताचं दर्शन घेतलं व मूर्तीच्या पलीकडं गेलो तर काय त्या साईडला पण सेमच मूर्ती या हनुमंतरायाची खासियत म्हणजे एकाच शिळेवर मागून पुढून हनुमान कोरलेले आहेत कुठूनही दर्शन घ्या. गड चढताना लिंबाच्या झाडाखाली गणपतीची मूर्ती दिसते. गड चढायला जास्त वेळ लागत नाही गाडी पासून १० मिनटात गडाच्या दरवाजा जवळ येतो. गडाचा दरवाजा पडलेला आहे त्याची फक्त आर्धी कमान शिल्लक आहे तसेच दरवाजाला लागून असलेला बुरुज थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. गडावर ढवळेश्वराचं मंदिर आहे. गडाचा माथा खूपच लहान आहे. गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. गडावरून सासवड पर्यंतचा प्रदेश न्ह्याळता येतो. गडावर पोहचल्यावर पाऊस बंद झाला. 

ढवळगडाचे प्रवेशद्वार

हा गड कोणी बांधला याचा इतिहास या बद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सह्याद्रीच्या दुर्गवैभवात असे काही अपरिचित किल्ले जे काळाच्या ओघात गर्दीपासून दूर आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहेत. ढवळेश्वराचं दर्शन घेऊन गड बघून झाल्यावर गाडी काढून निघालो जात असताना वाटेत चुन्याचा घाना दिसला व काही जोती देखील आमच्या अंदाजानुसार हा गड पुरंदर चा इशारा गड असावा किंवा या भुलेश्वर डोंगररांगेला जिथं जिथं घाट आहेत तिथं आपल्याला गड पाहायला मिळतो त्यामुळं घाटाचा पहारेकरी म्हणून हा गड असावा. पुन्हा पाऊस सुरु व्हायच्या आत आम्हाला भुलेश्वर गाठायचं होतं. आंबळे गावातून भुलेश्वर १२ किलोमिटर आहे. दौलतमंगळ किल्ला म्हणजेच आजचे भुलेश्वर मंदिर. भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले.

भुलेश्वर मंदिर  

देवगिरीच्या यादवांच्या काळात बऱ्याच हेमांडपंथी मंदिरांची बांधणी झाली त्यापैकीच १२ व्या शतकात बांधलेलं हे पुरातन मंदिर पुढे १६३४ साली आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने या मंदिराच्या भोवती तटबंदी बुरुज बांधून त्याला किल्ल्याचे रूप दिले. मंदिराकडे जाताना वाटेतच दोन भग्न बुरुजांचे अवशेष दिसतात. हे दोन बुरुज, पाण्याच्या टाक्या व तटबंदीचे काही अवशेष पडलेल्या कमानी इथं अगोदर किल्ला होता हे सांगायला आज एवढ्याच वास्तू इथे शिल्लक राहिल्या आहेत. पुढे छ. शाहू महाराजांच्या दरबारातील ब्रह्मेंद्रस्वामी यांनी १७३७ मध्ये भुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार होत राहिला पण त्याच मंदिराच्या संरक्षणसाठी जे तट बुरुज बांधले गेले ते मात्र जीर्णोद्धारा पासून कायम उपेक्षित राहिले. पूर्वाभिमुख असलेलं भुलेश्वर मंदिर हेमाडपंथी व मराठा या दोन्ही वास्तुशैलींच मिश्रण बघताच मंदिर क्षणी अचंबित करून टाकत. मंदिराच्या समोर असलेल्या नगरखान्याकडे जाताना द्वारपाल दिसतात त्यावरील आखीव रेखीव नक्षीकाम लक्ष वेधून घेतं. मंदिरासमोर मोठी घंटा टांगलेली आहे. नगारखाना, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिरात प्रवेश करताच भला मोठा नंदी पाहायला मिळतो. 

नंदी

नंदीवर शिल्पांकित केलेला साजशृंगार अप्रतिम आहे. आम्ही आजवर बघतलेल्या प्राचीन मंदिरांपैकी हा नंदी मोठा होता. अगोदर स्वतंत्र नंदीमंदडप असावा जीर्णोद्धारानंतर संपूर्ण मंदिर एका छताखाली आलं. गाभाऱ्यात प्रवेश करतेवेळी उबंरठ्यावर दोन्ही बाजूला दोन कीर्तिमुख दिसतात तर चौकटीवर गणेशपट्टी कोरलेली आहे. गाभाऱ्यातील शिवलंगाचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या भिंतीवर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत त्यामध्ये युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ शिल्प आहे. दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दगडात जीव ओतून केलेली हि कलाकुसर स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे भुलेश्वर मंदिर. 


मंदिराला प्रदक्षिणा मारून बाहेर आलो बाहेर सायकलिंग करत आलेली मंडळी दिसली एवढ्या लांब सायकलिंग करत कसं काय येतात काय माहित ज्याची त्याची आवड. आमचं कसंय नको तिथं पाय कशाला दुखवायचे आम्ही तर जिथं पर्यंत गाडी जाते तिथवर थाटात गाडीवरच अन जात नसली तरी विक्या घालतोयच सुट्टी नाय. दहा वाजत आले होते विक्याला काम असल्यामुळं दौरा आवरता घेत बऱ्याच दिवसांपासून रखडत असेलेला ढवळगड अन भुलेश्वरचा प्लॅन पूर्ण झाला याचा आनंद घेऊन घराकडं निघालो. आजची भटकंती म्हणजे पावसाळी जत्रे पासून दूर सह्याद्रीच्या कुशीत इतिहासाच्या सानिध्यात पुरंदर तालुक्यातील अपरिचित ऐतिहासिक वास्तूंच्या शोधात इकडं फक्त दर्दी भटक्यांची वर्दी विकेंडला सकाळी १० पर्यंत अंथरुणात पडून राहण्यापेक्षा घराबाहेर पडून आम्हाला इतिहासात रमायला आवडतं चार नवीन गोष्टी अनुभवता अन जगता येतात. सकाळी ६ ला निघाल्यापासून १0: ३० पर्यंत या चार साडे-चार तासांत दोन किल्ले, एक गढी, पुरातन मंदिर एवढं सगळं अगदी निवांत बघून पुढच्या रविवारची वाट बघत आम्ही दोघ राहिलेला रविवार आपापल्या कामावर रुजू झालो, सुट्टी कसली मिळतीया. असा हा आमचा संडे भटकंतीनामा.

भटकंती दिनांक २१/०७/२०१९
ढवळगड, इनामदार गढी, किल्ले दौलतमंगळ(भुलेश्वर मंदिर)

भुलेश्वर मंदिरात असलेले रामायणातील प्रसंगाचे शिल्प 


गर्भगृहातील शिवलिंग

द्वारपाल 

किल्ले दौलतमंगळच्या बुरुजांचे अवशेष 

किल्ले ढवळगड 

ढवळेश्वर मंदिर 

ढवळगडावर असलेला चुन्याचा घाणा

हनुमान मूर्ती 

https://maheshnilangekar.blogspot.com/2020/04/blog-post_95.html

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे.

ढवळगड

किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड–वनपुरी–सिंगापूर–पारगाव चौफुला–वाघापूर–आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी. आहे. गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग उरुळी कांचन गावातून असून जवळच असणारे डाळिंब हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे. डाळिंब गावापासून गड माथा किंवा ढवळेश्वर मंदिर २५५ मी. उंचीवर आहे. डाळिंब गावापासून रेल्वेमार्ग पार करून १४० मी. चढून आल्यावर मेटाचे अवशेष दिसून येतात. या मेटावर खडकात खोदलेले आणि नंतर बांधलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याचा आकार साधारणतः १५ फूट x ८ फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर हे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती झाली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्याच्या छपराखाली पगडी घातलेली गणपतीची मूर्ती असून ती पेशवे काळातील असावी. कारण अशाच स्वरूपाची गणेश मूर्ती अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात आहे. ढवळगडच्या माचीवरील या गणेश मंदिरासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसते.

तट आणि बुरूज, ढवळगड.

किल्ल्यावर जाण्याच्या दोन मार्गांपैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर राबता जास्त असतो. या वाटेवर माथ्याच्या खाली गडाचे दुसरे मेट आहे. या मेटावर बांधलेला चुन्याचा घाणा आजही अस्तित्वात आहे. घाण्याशेजारी जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. घाण्यापासून पुढे किल्ल्याच्या मुख्य चढावर हनुमानाचे शिल्प कोरलेला दगड आहे. एकाच दगडात पाठीला पाठ लावून हनुमानाची दोन शिल्पे कोरलेली आहेत. गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटीमध्ये ठेवलेले आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्या शेजारील अर्ध्या भागातील तटबंदीची भिंत आणि बुरूज उभे आहेत. दरवाजाची उंची ३.७ मी. असून अस्तित्वात नसलेल्या अर्ध्या कमानीचे दगड तेथेच खाली पडलेले आहेत. दरवाजातून आत उजवीकडे देवडी (पहारेकऱ्यांची खोली) आहे. मात्र सध्या या मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरल्याचे दिसते. देवडीच्या आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते. कारण पेशवेकालीन विटांचा सररास वापर या बांधकामात केलेला दिसतो. तेथे आत एक खोली आहे. दरवाजात एका बाजूची बिजागरीची जागा राहिलेली असून अडसर लावण्याची एका बाजूची जागा तेथे दिसते. दरवाजापासून पूर्व पश्चिम १२ मी. लांब आणि १ मी. रुंद तटबंदी उभी असलेली दिसते.

पाण्याचे टाके, ढवळगड.

दरवाजातून पुढे पूर्वेकडे एक बुजलेले पाण्याचे एक टाके दिसते. या टाक्याची नजीकच्या काळामध्ये डागडुजी करून त्याला चुन्याचा गिलावा केला आहे. टाक्याच्या बाहेरील बाजूस बांधकाम करून त्याला कठडा बांधला आहे. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर. याचे बांधकाम दोन भागांत विभागलेले आहे, ते म्हणजे सभामंडप आणि गाभारा. मंदिराला बाहेरील बाजूंस गोमुखही आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचीही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर म्हणजेच पूर्वेला पाण्याचे दुसरे टाके असून या टाक्यात खांब कोरलेला आहेत. या टाक्याची देखील दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसते. टाक्याला तसेच आतील खांबाला चुन्याचा गिलावा केलेला आहे. या टाक्याची लांबी रुंदी ३.१५ मी. x ४.३० मी. असून खोली ५.४८ मी. आहे. टाक्याच्या समोरील उतारावर तटबंदीचे भग्न झालेले अवशेष असून ते सहजासहजी दिसून येत नाहीत. गडाला सर्व बाजूंनी तटबंदी होती; परंतु काळाच्या ओघात नैसर्गिक आपत्तींमुळे ती ढासळलेली दिसते. पूर्वेकडील व उत्तरेकडील तटबंदीचे अवशेष देखील तुरळक प्रमाणात दिसतात. गडाच्या तटबंदीच्या खालून गडाला प्रदक्षिणा घालताना ठिकठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तरेकडील उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे गडाच्या परिसरातील तिसरे टाके होय. साधारणपणे दहा फूट खोली असलेले हे टाके मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडे होते. गडाच्या माथ्यावरून पश्चिमेकडे शिंदवण्याचा घाट दिसतो.

किल्ल्याच्या माथ्यावर ढवळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी घुमटी व त्यापुढे नंदी असून हा भाग किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीला लागून आहे. इतर अनेक किल्ल्यांवर तटबंदीमध्ये खोल्या असतात, तशा स्वरूपाची तटबंदीमध्ये असलेली खोली पश्चिमेकडील तटामध्ये दिसते. तट पडून गेल्याने ही फक्त खोली शिल्लक आहे. सध्या येथे एक मंदिर आहे. या खोली समोरच एक तुळशी वृंदावन आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे तुळशी वृंदावन बांधले असावे.

महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत, ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख ‘गडʼ असा केला जातो. उदा., जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साताऱ्याजवळील साखरगड इत्यादी. पण ही सगळी तटबंदीयुक्त देवस्थाने असून त्यांना ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ याची परिमाणे लागू होत नाहीत. ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे. पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो किल्ला असल्याचे दर्शवितात. त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्त्व असणारा गड आहे, असे निश्चित सांगता येते.

ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृ. वा पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे. इ. स. १९४० साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दप्तर  मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते. पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो. पुरंदरचे धुरंदर  या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिले आहे. किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या किल्ल्याचे विस्तृत वर्णन अन्य गड-किल्ले संबंधित ग्रंथांमध्ये आलेले नसल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरते.

ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही; पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो; तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही. काळाच्या ओघात ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे.

संदर्भ :

  • एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
  • पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
  • साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
  • जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.










‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:04 PM2018-05-19T20:04:50+5:302018-05-19T21:02:54+5:30

आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे.

'dhavalgad' in Swarajya due to 'their' research | ‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर

‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर

Next

ठळक मुद्देपुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादरकिल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव खांबटाकी, ऐतिहासिक अवशेष

पुणे: महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गवैभवाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या दुर्गवैभवाला अभिमान व पराक्रमाची एक ऋणानुबंधाची झालर आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत दूरवर विखुरलेली ही दुर्गसंस्कृती गिर्यारोहकांसह पर्यटकांना वारंवार खुणावत असते. मात्र, आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील एका गिर्यारोहकाला यश आले आहे. ओंकार ओक असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला असून, गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक ग्रामस्थांमध्ये सुप्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ मार्ग असून त्यातला पहिला मार्ग सासवडहुन - वनपुरी - सिंगापूर- पारगाव चौफुला- वाघापूर- आंबळे असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. दुसरा मार्ग पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा उल्लेख आलेला आहे. त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले आहे. स्थानिक गावकºयांना  हा ढवळगड माहित आहे. मात्र, त्याच्यावर किल्ला या दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला. त्यामुळे गिर्यार्रोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिज्ञच होते. या ढवळगडच्या स्थान निश्चितीबद्दल सांगताना ओक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात काही मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो तेव्हा एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर, बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले. पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉ. सचिन जोशी या इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. याचप्रकारे यापूर्वी म्हणजे २०१२ मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लोंजा या किल्याची स्थाननिश्चिती केली होती. ओक व डॉ. जोशी यांनी शनिवारी (१९ मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादर केला. 
..................
पुण्यात आल्यावर डॉ. सचिन जोशी यांची भेट घेऊन याबद्दल सांगितले तेव्हा जोशी यांनीही या शोधमोहिमेत सहभागी होत पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव व खांबटाकी, मेटाचे अवशेष, चुन्याच्या घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या. त्यामुळे ढवळगड हाच ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला असल्याचे सिद्ध होऊन त्याची स्थाननिश्चिती करण्यात आली. - ओंकार ओक  

ढवळगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : २८४० फुट

श्रेणी : सोपी

इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत की इतिहासाने त्याची नोंदच घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक गडापैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त प्रसिध्दीस आलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला सासवड जवळील आंबळे गावामागील डोंगरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. केवळ स्थानिकांना व अभ्यासकांना ढवळगड-ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला म्हणुन दुर्गप्रेमीच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओंकार ओंक व डॉ.सचिन जोशी यांचे असले तरी यापुर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणुन उल्लेख आला आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कृ.वा पुरंदरे यांच्या १९४० साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातही ढवळगडाचा उल्लेख येतो. गो.नी.दांडेकर यांनी आपल्या किल्ले या पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख किल्ला असाच केला आहे शिवाय प्रा. प्र.के.घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराव एक्के यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे. बराच काळ उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे. पण शेवटी ढवळगडला भेट देऊन आल्यावर याला किल्ला म्हणावे कि टेहळणीचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच. पुण्याहून ढवळगडाला जाण्यासाठी सासवड- वनपुरी - वाघापूर -आंबळे असा रस्ता आहे. हे अंतर साधारण ५५ कि.मी. असुन आंबळे गावात शिरण्यापुर्वी उजवीकडून एक कच्चा रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेला आहे. या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा फाटा असुन हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेला आहे. येथुन चालत १५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. गडावर येण्यासाठी पुणे-लोणीकाळभोर- उरुळीकांचन- डाळिंब हा दुसरा मार्ग असुन हे अंतर ४० कि.मी.आहे. गाडीमार्गे हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्याच्या गावातुन ढवळगडावर येण्यास उभा चढ असुन दिड तासाची तंगडतोड करावी लागते. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीची असुन आंबळे गावचा नगरकोट व पेशव्यांचे घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पहाता येतो. कच्च्या रस्त्याच्या शेवटी आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. या घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच त्याखाली असलेली माची नजरेस पडते. बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात विटांचे बांधकाम केलेले आहे. येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचा दगडावर दोन बाजुला दोन मुर्त्या कोरल्या असुन जणु या मुर्त्या येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या. चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात. या वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीत गणपतीची मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोर गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर घालण्याची जागा दिसुन येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११० फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे. गडमाथा अतिशय लहान आहे. दरवाजा व तटाला लागुनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या पुढील भागात तटाला लागुनच एक १५-२० फुटांचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील पाणी जमीनीत मुरु नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे टाके कोरडेच आहे. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे म्हणजे ढवळेश्वर महादेव मंदिर. मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग असुन सभामंडपात नंदीची स्थापना केली आहे. बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवेकाळात झाले असावे. मंदिरासमोर पाण्याचे टाके असून यातील पाणी मंदिरासाठी व पिण्यासाठी वापरले जाते. गडाच्या इतर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन बारकाईने पाहिल्यास या तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या मागील बाजुस वृंदावन असुन त्याशेजारी एक घुमटी व नंदी दिसुन येतो. याशिवाय आंबळे गावाच्या विरुध्द बाजुने डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर एक खडकात खोदलेले १०-१२ फूट खोल कोरडे टाके आहे. गडावरून पहाताना डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर काही प्रमाणात झाडी दिसुन येते. या झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. डाळिंब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पहायचे असल्यास गडफेरी करण्यास एक तास लागतो अन्यथा गडमाथा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...