Saturday, August 10, 2024

जैन, बौद्ध मुर्तीशास्त्र

 
bbc.com

तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप - BBC News मराठी


तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप

ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा बौद्ध स्तूप

फोटो कॅप्शन, ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा बौद्ध स्तूप
  • Author, उमेर सलिमी
  • Role, बीबीसी उर्दू

बौद्ध धर्म जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक समजला जातो. पण पाकिस्तानात या धर्माचं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत. तरीही गौतम बुद्धांच्या अनुयायांसाठी इथे प्राचीन स्थळं आणि मौल्यवान कलाकृती आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान त्यांच्या देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्तारपूर कॉरिडोरसह अनेक योजनांवर काम करतोय.

आता पाकिस्तानात जुन्या काळी असलेल्या गांधार संस्कृतीमध्ये परदेशी पर्यटकांचा रस पाहून बौद्धधर्मियांसाठी कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत.

इसवीसन पूर्व पाचशे ते तीनशे या काळात आताच्या पाकिस्तानात असणारं तक्षशिला बौद्ध शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र समजलं जायचं. इथे आजही अनेक स्तूप, पूजा स्थळं आणि पुरातत्विक अवशेष आहेत ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.

तक्षशिला पाकिस्तानातलं एक प्राचीन स्थळ तर आहेच पण त्याबरोबरीने बौद्धधर्मियांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पूजा स्थळ आहे.

जगात भारत, म्यानमार, कोरिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये या धर्माला मानणारे लोक आहे.

तक्षशिलेतल्या बौद्धधर्मियांसाठी इथे काही दिवसांपूर्वी एका विशेष पूजा समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. कोरियाच्या बौद्ध भिख्खूनी इथे शांततेचा संदेश दिला.

कोरियातले जेष्ठ भिख्खू डॉ. सिनम यांचं म्हणणं होतं की, "आमच्यासाठी जगातली सात स्थळं सर्वांत पवित्र आहेत. तक्षशिला त्यापैकी एक आहे. इथे ब्रम्हांडाची शक्ती एकवटलेलली आहे."

तक्षशिलेतला स्तूप खानपूर बांधजवळ एका टेकडीवर स्थित आहे. हे प्राचीन स्थळ वरतून एका क्रॉससारखं दिसतं ही यातली सर्वांत रंजक गोष्ट. गांधार संस्कृतीच्या काही शेवटच्या खुणांपैकी एक ही जागा आहे.

या स्तूपाला भामाला स्तूप असं म्हणतात. इथे जाण्यासाठी खानापूर बांधपासून एक रस्ता जातो. रस्त्याची अवस्था फारशी बरी नाही, पण इथल्या टेकड्यांमधलं दृश्य तुमचा थकवा पळवून लावतो.

हा प्राचीन स्तूप 1930 साली ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी शोधला होता. यांनी सिंध प्रांतातल्या लारकाना शहरात मोहेंजदडोचा शोध लावला होता.

मोहेंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात.

मोहंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात

फोटो कॅप्शन, मोहेंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात

इथे पोहचल्यानंतर आणि बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला क्रॉसच्या आकारातला स्तूप दिसतो. इथे जवळच्या हजारा विद्यापीठातले विद्यार्थी स्तूपाचं निरीक्षण करताना दिसतात. इथे तीन वेळा खोदकाम झालेलं आहे.

संशोधकांना आशा आहे की इथे प्राचीन संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या खूणा सापडतील.

या स्तूपाच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत आणि बौद्धधर्मिय इथे पूजा करायला येतात. इथे चुन्याच्या मुर्ती, पूजा करायची जागा आणि प्राचीन मूर्ती आसपास दिसतात.

स्वप्नील बुद्धाची प्रतिमा

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भामाला स्तूपात सापडलेली एक मूर्ती कंजूर खडकापासून बनलेली आहे आणि कदाचित या प्रदेशातल्या सर्वांत जुन्या मूर्तींपैकी एक आहे.

तक्षशिला संग्रहालयाचे क्यूरेटर अब्दुल नासिर यांनी बीबीसीला सांगितलं की, "अफगाणिस्तानात हेदा आणि पाकिस्तानात तक्षशिला गांधार संस्कृतीच्या अवशेषांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत."

ते म्हणतात, "ही कला घरात नाही तर स्तूपांमध्ये भिख्खूव्दारे रेखाटली, मूर्तीत घडवली जायची. ज्या प्रकारे मुस्लीम मशीद बनवतात तसंच या मूर्ती खास पुजांच्या वेगवेगळ्या प्रथांचं प्रतीक आहे. या मूर्तींचे कपडे, दागिने आणि शैली संपूर्ण जगात एकसारख्या आहेत."

स्वप्नील बुद्ध

फोटो कॅप्शन, स्वप्नील बुद्ध

भामाला स्तूपात सापडलेल्या मूर्तीबदद्ल ते म्हणतात की इथल्या 'स्वप्नील' बुद्धाच्या मूर्तीची विशेष गोष्ट अशी की यात गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण दाखवलं आहे.

धार्मिक पर्यटनसाठी धार्मिक सलोख्याची गरज

स्तूपात होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक शामिल सदफ रजा यांनी सांगितलं की, "पाकिस्तान सरकारबरोबर इथल्या गांधार संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करता येईल हे पाहायला कोरियाचे भिख्खू इथे आलेले आहेत."

"जर आपण या जागा त्यांच्यासाठी उघडल्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम केलं तर आपल्या देशातलं पर्यटन वाढेलच, पण या लोकांनाही एक शांततामय जागा मिळेल."

भिख्खू डॉ. सिनम यांनी या प्रसंगी काश्मीर मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांची इच्छा आहे इथे शांतता नांदावी.

ते म्हणाले, "आपण सगळे एक आहोत. तुम्ही बौद्ध धर्म मानणारे असा किंवा नसा पण पाकिस्तान आमच्यासाठी आमच्या देशासारखाच आहे. देवाची इच्छा नाही की आपण एकमेकांचा तिरस्कार करावा. असं केलं तर आपण देवाच्या आज्ञेचा भंग करतो आहोत."

 

 

प्रतिमा शिल्प में बुद्ध की विभिन्न मुद्राएं

भारतीय शिल्पकला में हिन्दू एवं बौद्ध प्रतिमाओं में प्रमुखता से आसन एवं हस्त मुद्राएं अंकित की जाती है। हमें प्राचीन स्थलों पर आसनस्थ बुद्ध विभिन्न मुद्राओं में दिखाई देते हैं। जिनमें प्रमुख अभय मुद्रा, ध्यान मुद्रा, धर्म चक्र मुद्रा, एवं भूमि स्पर्श मुद्रा है। इसके साथ ही बज्र मुद्रा, वितर्क मुद्रा,ज्ञान मुद्रा, करण मुद्रा तथा बुद्ध के महानिर्वाण को भी शिल्प में स्थान दिया गया है। कुछ बुद्ध प्रतिमाएं विभिन्न मुद्राओं में देखिए। 
भूमि स्पर्श मुद्रा बुद्ध, राजिम छत्तीसगढ़
भूमि स्पर्श मुद्रा थिम्पू भूटान
अभय मुद्रा, धौली भुवनेश्वर उड़ीसा
धम्म चक्र परवर्तन मुद्रा- धौली भुवनेश्वर उड़ीसा
पद्मासन ध्यान  मुद्रा- सिरपुर छत्तीसगढ़ 
वज्र मुद्रा- कान्धार शैली







बौद्ध प्रतिमा


चित्र क्र. १२९ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ

गौतम बुद्ध :-

    भगवान बुद्ध इ.स.पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेले. इ.स. पूर्व ५६३ ते ४८३ या काळात वैचारिक प्रगती बरोबरच भारतामध्ये भौतिक भरभराटही झाली होती. सरस्वती-सिंधू-संस्कृती नंतरचे दुसरे नागरीकीकरण झालेले होते जे परत एका समृद्ध अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले होते.
    भटक्या टोळ्यांचे समुदाय, पोटासाठी फिरणारे असे समाजाचे स्वरूप जाऊन महाजनपदांमध्ये भौगोलिक वाटणी होऊन त्यांच्या प्रमुख राजधान्या आणि राजघराणी प्रस्थापित झालेली होती. त्यापैकी मगध साम्राज्य हे सर्वात बलशाली होते. त्याची राजधानी राजगृह म्हणजे आजचे बिहार प्रांतातले राजगीर. गंगेच्या उत्तरेस लिच्छवींचे एक राज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती. गंगेच्या वायव्येस कोसलांचे राज्य होते ज्यांची राजधानी श्रावस्ती होती. कोसल देशाच्या पूर्वेस रोहिणी नदी वाहत होती आणि या नदीच्या तीरांवर समोरासमोर शाक्य आणि कोलिय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्ये होती. शाक्य हे क्षत्रिय कुल होते व त्यांची कपिलवस्तू ही राजधानी होती ज्यात शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता.
     शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून त्याही वेळेस वाद सुरू होते. या दोन्ही गणराज्यांनी रोहिणी नदीवर एक धरण बांधले होते आणि पाणी वाटपाचा करारही केला होता. पूर्वीपासून तेथे कधी लहान संघर्ष आणि काही युद्धेही या पाणी वाटपावरून झालेली होती. कोलिय राजाने पाणी संघर्ष मिटविण्यासाठी, महामाया आणि महाप्रजापती नावाच्या आपल्या दोनही मुलीची लग्ने शुद्धोदन राजाशी लावून पारिवारिक संबंधही दृढ केले होते. बऱ्याच वर्षानंतर मोठी राणी महामाया हि झाली. तिला प्रसूतीसाठी तिच्या माहेरी देवदेह नगरीत पाठविण्यात आले. प्रवासामध्ये विश्रांतीसाठी लुम्बिनी नामक उपवनात ती थोड्यावेळ थांबली होती. (लुम्बिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे ) तिथे तिने एका झाडाची फांदी धरली असता ती तिथेच उभ्या उभ्या प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. प्रसूतीनंतर तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आले. हा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, ज्याचे राशीनाम गौतम होते. प्रसूतीनंतर सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि महाप्रजापती हि गौतमची दुधाई आणि पुढे तीच त्याची आई झाली.
   गौतमाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल, परंतु त्याने कुठलेही दु:ख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त शालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले होते. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलामध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतुंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गयक, वादक यांचाही समावेश होता. सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. त्याच्या जवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहल ठेवले गेले. त्याच सुमारास एक दिवस त्याला वाड्याबाहेरील जग पाहण्याची इच्छा झाली. शुध्दोधनाने आधी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो हट्टालाच पेटला तेव्हा त्याने त्याला अनुमती दिल्ली. परंतु त्याच्या नगर संचाराच्या वेळी त्याला कोणीही पंगु, म्हातारे, रोगी दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नगरात सर्व व्यवस्था केली गेली ते सजवले गेले आणि मगच गौतमाची स्वारी बाहेर पडली.

चित्र क्र. १३० : गौतमाचा गृहत्याग, सांची

       ते दृश्य पाहून गौतम हरखून गेला. राजवाड्याबाहेरील जग हे सुंदरच आहे असे त्याला बाटले. परंतु थोड्याच वेळाने त्याला जर्जर म्हातारा दिसला. छन्न नावाच्या आपल्या सारथ्याला त्याने विचारले की, "याला काय झाले?" त्यावर सारथ्याने त्याला म्हातारपण आले आहे असे सांगितले. "म्हणजे मी पण एक दिवस असाच कुरूप होईन का ? माझ्याही अंगावर असेच व्रण आणि सुरकुत्या येतील का?" यावर छन्न म्हणाला, "होय महाराज, हे सर्वांच्याच नशिबी चाढून ठेवलेले असते." आपले हे तारुण्याचे तेज, हे सौंदर्य आणि हा तारुण्याचा आवेश एक दिवस नष्ट होणार या कल्पनेनेच गौतमाला अतीव दुःख झाले. पुढे त्याला एका महारोग्याचे दर्शन झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की नुसतेच वार्धक्य येते असे नाही तर अनेक व्याधीही या शरीराला ग्रासू शकतात. पुढे त्याला एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि आपणही एक दिवस मरणार हे कटू सत्य त्याला कळले. हे जग जेवढे दिसते तेवढे सुंदर तर नाहीच नाही परंतु सुखी तर अजिबातच नाही हे त्याच्या लक्षात आले. येथून त्याचे चिंतन बदलले आणि तो अंतर्मुख होऊन रात्रंदिवस विचार करू लागला. आषाढ पौर्णिमेच्या मध्यरात्री तो उठला आणि त्याने यशोधरेला आणि तिच्या कुशीत झोपलेल्या राहुलला एकदा डोळे भरून पाहिले आणि तो महालातून बाहेर पडला. त्याने छन्न नावाच्या सारथ्याला उठवले आणि त्याच्या आवडत्या कंथक नावाच्या घोड्यावर बसून तो नगरातून बाहेर पडला. छन्नही त्याच्याबरोबरच निघाला. पहाटेच्या सुमारास तो अनोमा नदीच्या तटापाशी आला. तेथे त्याच्या राज्याची सीमा संपत होती. त्याने आपले रेशमी वस्त्र आणि अलंकार उतरवले त्या वेळेस छन्नाच्या लक्षात   की हा घर सोडून निघाला आहे. त्याने त्याच्या परीने त्याला अडवायचा बराच प्रयत्न केला. परंतु याचा निर्धार कायम होता. शेवटी तो म्हणाला की, तुमच्या जाण्याने तुमचे आई वडील, तुमची आणि मुलगा हे किती दुःखी होतील याचा विचार करा. त्यावर गौतमाने त्याला उत्तर दिले की, श्री साऱ्या जगाचेच दुःख दूर करण्यासाठी निघालो आहे आणि तसे जर झाले तर यांचेही दुःख आप नष्ट होणारच आहे. (जोशी, भा.स.को.: १९७०)

चित्र क्र. १३१ : बोधीवृक्ष, सांची
   
      शिल्पकलेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील ह्या टप्प्या पर्यंतची शिल्पे आढळतात, ज्यामध्ये महामायेचे स्वप्न, आसिताची भविष्यवाणी आणि गौतमाचा गृहत्याग आणि अन्य काही प्रसंगाचे शिल्पांकन असते. गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी छन्नाला अलंकार दिले ते स्थान केसरीया या गावी बिहारमध्ये असून तेथे एक भव्य स्तूप सापडला आहे.
     गृहत्यागा नंतरची जवळजवळ १४ वर्षे त्याच्या कठोर साधनेची आणि उग्र तपश्चर्येची होती. सुरवातीला आलार कालाम या राजगृहाजवळ राहणाऱ्या संन्यासाचे शिष्यत्व घेतले, त्याच्याकडून तो नास्तिकवाद शिकला. नंतर त्याने उद्रक नावाच्या दुसऱ्या गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त केले. परंतु तरीही याचे समाधान झाले नाही. पुढे सहा वर्षे त्याने योग साधना करून हठयोगाचे काही उग्र प्रकारही केले. त्याचे संपुर्ण शरीर अस्थिपंजर झाले. एका वृक्षाखाली बसून त्याने अनेक दिवस साधना केली आणि एके दिवशी त्याला बोधी प्राप्त झाली. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुजाता नावाची गुरे राखणारी मुलगी उभी होती. तिने फळांचा रस त्याला दिला. ( पुढे बौद्ध वाङ्‌मयात सुजाता ही राजकन्या होती असे लिहिले गेले आणि तिने सुवर्ण पात्रात बुद्धाला खीर दिली असा उल्लेख येतो). याच्या नंतरही त्याने सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्याला धर्मत्तत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्याचे पूर्वाश्रमीचे पाच सहयोगी हे वाराणसी जवळच्या ऋषीपत्तनात राहतात हे कळल्यावर तेथे गेला आणि त्या पाचही जणांनी याचे शिष्यत्व घेतले. तेथून जवळच असलेल्या सारनाथ येथे त्याचे पहिले प्रवचन झाले. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी त्याला कारणीभूत असणारी तृष्णा संपली पाहिजे असे  त्यानी सांगितले आणि त्याने आठ तत्त्वांचे निवेदन केले, ज्याला त्याने निर्वाणप्राप्तीचा अष्टांग मार्ग असे म्हटले. याच पाच शिष्यांसह त्याने बौद्ध संघ सुरू केला आणि तिथून बौद्ध पंथाचा उदय झाला. (जोगी भा.सं.को. १९७०)

चित्र क्र. १३२ : बुद्धाचे प्रवचन, सांची

    याच्या प्रचारासाठी त्याने संघटनात्मक बांधणी केली आणि त्याची ही संघटन त्याच्या मृत्यूनंतर १३०० वर्षे हिंदुस्थानात कार्यरत होती. मृत्यूनंतरही ते कार्य तितक्याच दृढतेने आणि निष्ठेने वर्धिष्णू ठेवण्याचे श्रेय हे जसे त्याच्या असंख्य अनुयायांना जाते तसेच ते भगवान बुद्धाचे व्यक्तित्मत्त्व त्यांचे विचार आणि त्यांच्या विशेष अशा कार्यप्रणालीलाही जाते. त्या वेळच्या वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या समाजामध्ये समृद्धीबरोबर येणारी विलासीनताही बोकाळली होती. इतकेच नाही तर यज्ञाचे मूळ उद्दिष्ट जाऊन तेथे हजारो प्राण्यांचे बळी देण्याचे भयानक कर्मकांड सुरू होते. याला योग्य दिशा देण्याचे काम हे भगवान बुद्धाने केले. ज्यांनी तो पंथ स्वीकारला नाही त्यांनीही त्यातल्या योग्य गोष्टी मात्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. च्या सातव्या, आठव्या शतकानंतर भारतातून बौद्ध पंथाचा ऱ्हास झाला. परंतु गौतम बुद्धांच्या विचारांचा परिणाम सर्व भारतीयांच्या जीवनावर आजही दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य वा चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे बोलणे आणि खरे वागणे याला बुद्धांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राण्यांनाही जीव असतो म्हणून त्यास मारू नये ही अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. आपल्या चैनीसाठी इतरांचे धन किंवा संसाधने वापरणे याला त्यांनी चोरी (अस्तेय) म्हटले. ब्रह्मचर्य याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळायचे शील. या शीलाचा आग्रह धरणारे भगवान बुद्ध हे पहिले संत म्हणावे लागतील. मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे हे त्यांचे विचार खरोखरच थक्क करणारे आहेत. यामुळे या पंथाला गती मिळाली आणि अनेक शतके मोठ्या प्रमाणात राजाश्रयही मिळाला.
       इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने याला खूपच मोठी चालना दिली. त्याने स्वतः हा पंथ स्वीकारला नाही परंतु आपल्या मंत्रीगणांमध्ये धर्ममहामात्र हे पद निर्माण केले आणि हे एक संन्यासी भिक्षुच धारण करू शकत असे. अशोकाचे राज्य हे आजच्या इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ सर्व भारतभर पसरलेले होते. एवढ्या मोठ्या सलग प्रदेशाचा एकछत्री अंमल असणारा जगातला तो एकमेव राजा आहे. भौगोलिक विस्तार आणि धर्मप्रशासक याच्यामुळे तिबेट आणि सिलोनमध्येही हा पंथ त्या वेळेस त्याने पोहोचवला. अफगाणिस्थानच्या परिसरातील काही ग्रीक सुद्धा बौद्ध झाले. असे असले तरीही बहुसंख्य प्रदेशांमध्ये वैदिक धर्माचाही प्रभाव तितकाच होता आणि आता याला थोडे धार्मिक स्पर्धेचे स्वरूप आले होते. बौद्ध शिल्पे - भारतातील देव प्रतिमांचे प्रमाणिकीकरण होण्याच्या आधीपासून बौद्ध स्थापन (स्तूप) आणि बौद्ध शिल्पकला ही लेण्यांमधून विकसित झालेली होती. गौतम बुद्धाने आपली मुर्ती किंवा चित्र (प्रतिमा) हे करू नये आणि याचे पूजनही नये असे आग्रहाने म्हटले होते. धर्माची तत्त्वे प्रस्थापित होण्यासाठी विचारमंथन होणे आवश्यक असते त्याप्रमाणे अशी तीन मंथने झाली. त्याला संगिती असे म्हटले जाते. पहिली संगिती बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच तर तिसरी संगिती अशोकाने भरवली होती. परंतु अशोकाला मात्र त्याचे काही स्मारक असावे असे वाटल्यामुळे त्याने स्तुपांची रचना केली. यामध्ये भगवान बुद्धांचे शारीर रुपाने दर्शन होत नाही. इ.स.च्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बौद्ध शिल्पांमध्ये हे असेच दिसते.

चित्र क्र. १३३ : शालभंजिका, सांची

महामायेचे स्वप्न - गौतमाच्या जन्माच्या आधी त्याच्या आईला (महामायेला) स्वप्नात एक शुभ्र ली दिसत असे. तिच्या पोटी एक महान पुत्र जन्माला येणार याचा तो संकेत मानला जातो. एक झोपलेली स्त्री आणि तिच्यावर अधांतरी असा एक हत्ती आणि बाजूला उभे असलेले काही दास दासी असे हे शिल्पात दिसते.
     शालभंजिका- साल वृक्षाखाली त्याची फांदी धरून उभी असताना गौतम बुद्धाच्या आईची प्रसुती झाली असल्यामुळे साल वृक्ष हा पवित्र मानला गेला आणि तशा उभ्या असणाऱ्या स्त्रियांची शिल्ये त्या काळात आणि नंतरही दिसतात. काही शिल्पांमध्ये शालभंजिकेच्या शेजारी हातांमध्ये वस्त्र घेतलेला एक पुरुष उभा असलेला दाखवतात. त्या वस्त्रावर नवजात गौतम आहे असे मानले जाते कारण सती रूपात दाखवायची सोय नव्हती. काही ठिकाणी त्या पुरुषाला इंद्र असल्याचेही मानले जाते.
     सुरुवातीच्या काळातील (इ.स.पू. दुसरे ते इ.स. दुसरे शतक) शिल्पांमध्ये गौतम बुद्धाला दाखविण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केला गेला. त्यात
१) पांढरा हत्ती
२) कमळ - बुद्धाने टाकलेली पहिली सात पावले
 ३ ) घोडा- अलंकृत घोडा ज्यावर छत्र धरले आहे, ह्या घोड्यावर बसून त्याने गृहत्याग १ (महाभिनिष्क्रमण) केला.
४) बोधीवृक्ष- बुद्धगयेला पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली त्याला 'बोधीवृक्ष' असे नाव दिले गेले. त्या काळातील शिल्पांमध्ये दाखविलेला वृक्ष म्हणजेच गौतम बुद्ध यात काही ठिकाणी वृक्षाच्या खाली चौथरा किंवा काही ठिकाणी सजवलेला कठडाही दिसतो.
५) वज्रासन- बोधीवृक्षाखाली किंवा नुसतेच आसन काढलेले असते. त्यावर बसून बुद्धाने तप केले असे मानले जाते.
६) गंध कुटी- गृहत्यागा नंतर काही वर्षे आम्रकुंजात ज्या कुटीत तो राहिला होता त्याचे है प्रतीक मानले जाते.
७) भिक्षापात्र काही शिल्पात केवळ भिक्षापात्र दिसते.
८) उष्णीष- बुद्ध मूर्तीतील डोक्यावर असणारा उंचवटा.
९) प्रभा मंडल आसनामागे एक प्रभा काढलेली असते.
१०) धर्मचक्र जे प्रतीक आजही आपल्या राष्ट्र ध्वजावर आहे.
११) पदचिन्हे- आसनावर दोन पावलांचे ठसे ज्यांना सामान्यतः आज आपण पादुका म्हणतो.
१२) त्रिरत्न- त्रिशूळासारखे एक चिन्ह
१३) स्तूप- अर्धगोलाकार उंचवटा आणि त्याभोवती वेदिका (कठडे) अशा स्वरूपातील वास्तू.

     शारीर रूपातील बौद्ध मूर्ती - अफगाणिस्थानामधील काही ग्रीक हे बौद्ध झाले आणि त्यांना शरीर रूपातील मूर्तीची आवश्यकता भासली म्हणून गांधार कलेमध्ये अस्थिपंजर झालेले शरीर दाखवून ध्यानस्थ बुद्ध मूर्ती सुरुवातीला आढळते. मथुराकलेमध्ये यावर त्यांनी तडजोडीचा तोडगा काढला. त्यांनी बोधीसत्त्वाच्या मूर्ती केल्या, ज्यामध्ये गौतम बुद्धांची ही बोधी प्राप्त करण्यापूर्वीची अवस्था सांगितली गेली. पटना (बिहार) येथील संग्रहालयाच्या दारातच धोतर नेसलेला, हातात भिक्षापात्र घेतलेल्या, दाढी असलेल्या एका पुरुषाची विशाल मूर्ती दिसते. तिला 'बल भिख्खू' असे म्हटले जाते.
     इ.स. पहिल्या शतकानंतर (कुशाण काळानंतर) बुद्ध मूर्तीचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, ज्यामध्ये आपल्याला सामान्यतः बुद्ध मूर्ती म्हटल्यानंतर जी मूर्ती डोळ्यासमोर येते त्याचा अंतर्भाव झालेला दिसतो. महापुरुषांची सात लक्षणे सांगितली गेली आहेत, जी बौद्ध आणि जैन मूर्तिकलेत समान पद्धतीने वापरलेली दिसतात.

चित्र क्र. १३४ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ

१. उष्णीष - अलंकृत पागोटे, डोक्यावर अंबाड्यासारखा वर आलेला केस करळे दाखवल्यामुळे बुद्धमूर्तीमध्ये केसांचीच मारलेली गाठ असावी असे दिसते. परंतु ते तसे नसते. गौतम बुद्धाने मुंडन केलेले होते. परंतु तसे मस्तक शिल्पात दाखवल्यास सौंदर्याला बाधक अकते म्हणून त्यावर कृत्रिम कुरळ्या केसांची रचना केली गेली. डोक्यातून वर आलेला भाग हा उष्णीष असून सामान्य माणसापेक्षा त्याचा मेंदू हा खूप मोठा असल्यामुळे तो कवटीत न सामावता येण्याएवढा असावा हे दाखविण्यासाठी ही कल्पना केली गेली. त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे ते प्रतीक होय.
३.उर्णा- काही शिल्पांमध्ये हे लक्षण ठळकपणे दिसते. दोन भुवयांमध्ये कुंकवासारखा एक गोलाकार उंचवटा कोरलेला असतो. ते कुंकू नसून भगवान बुद्धाचा तो तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षु होय. सामान्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने असणाऱ्या त्यांच्या दिव्यदृष्टीचे ते प्रतीक मानले जाते.
३. लांब कान- खांद्यापर्यंत लांब असलेल्या कानाच्या पाळ्या. सामान्य मानवी चेहऱ्यापेक्षा वेगळेपण दिसावे हा त्याचा हेतू.
४. मानेवरती आडव्या रेषा - शिल्पामध्ये गळ्याभोवती कोरलेल्या या रेषांची संख्या सात असावी असा संकेत असतो. बुद्धाच्या या जन्मापूर्वीच्या सात जन्मांच्या पुण्याईचे ते प्रतीक होय. परंतु सर्वच मुर्तीवर हे आढळते असे नाही तसेच या रेषांची संख्याही कमी जास्त असते.
५. छातीवरील चिन्ह - काही मूर्तीच्या छातीवर त्रिरत्न हे चिन्ह कोरलेले दिसते. पुढील काळात हिंदू शिल्पकलेत हेच चिन्ह विष्णू मूर्तीच्या छातीवर कौस्तुभ मण्याचे प्रतीक म्हणून दिसते. (भृगु ऋर्षीनी झोपलेल्या विष्णूला उठविण्यासाठी लाथ मारल्यावर विष्णूने त्यांना "आपल्या पायाला इजा तर झाली नाही ना?" असे नम्रपणे विचारल्यावर ऋषींनी प्रसन्न होऊन त्रिरत्न विष्णूला दिले असे म्हणतात, जे विष्णुने छातीवर धारण केले).
६. आजानुबाहू - गुडघ्यापर्यंत लांब हात असणे हे महापुरुषांचे लक्षण मानले गेले असल्यामुळे काही उभ्या मूर्तीमध्ये याचे शिल्पांकन केलेले दिसते.
७)  इंद्रिय निग्रह- हे लक्षण फक्त जैन मूर्तीमध्ये दिसते. ह्यामध्ये मूर्तीतील इंद्रिय अत्यंत लहान दाखवले जाते. इंद्रियविजयाचे ते लक्षण मानले जाते. बुद्ध प्रतिमेत वस्त्रे दाखविल्यामुळे हे लक्षण दिसत नाही.
     ही सर्वच्या सर्व महापुरुषाची लक्षणे साऱ्याच मूर्तीमध्ये दिसतात असे नाही. यातील तीनच गोष्टी या चटकन नजरेत भरणाऱ्या असतात. डोक्यावरील उष्णीष, लांब कान, आणि काही ठिकाणी उर्णा किवा त्रिरत्न, गुप्त काळापासून यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे अर्थोन्मिलीत डोळे अणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न असे मंद स्मित.

बुद्ध प्रतिमेच्या मुद्रा :-

     बुद्धाचे मूर्ती रूपातील शिल्पांकनात बसलेल्या स्थितीत कोरलेल्या मूर्तीमध्ये बुद्धाचे चारच प्रकार दिसतात आणि शिवाय झोपलेल्या अवस्थेत महानिर्वाण मुद्रा हा प्रकार दिसतो.
    १. ध्यान मुद्रा - या मुद्रेत भगवान बुद्ध हे ध्यान अवस्थेत दाखवलेले असून त्यांनी मांडी घातलेली असते. दोन्ही हात हे मांडीच्यामध्ये ठेवलेले असून एका तळव्यावर दुसरा तळवा ठेवलेला असतो.
    २. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा - ह्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीचे कधी मांडी घातलेली तर कधी पाय खाली सोडलेले असे शिल्पांकन असते. यामध्ये दोन्ही हात छातीजवळ असून दोन्ही बोटांचे पंजे एकमेकाला चिकटलेले परंतु बोटे फाकलेली असतात किंवा काही शिल्पांमध्ये फाकलेल्या बोटांपैकी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीवर दिसतो. धर्माच्या रुतलेल्या चाकाला मी गती देतो आहे या त्यांच्या संदेशाचे स्मरण यातून केले जाते.
    ३. प्रवचन मुद्रा- ही मुद्रा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेप्रमाणेच असते. हातांच्या ठेवणीमध्ये त्यात थोडा फरक केलेला दिसतो. ज्यामध्ये डाव्या हाताची तीन किंवा चार बोटे अंगठ्याखाली मुडपलेली असून उजव्या हाताच्या मुठीने सुटी दोन बोटे किंवा करंगळी धरलेली असते. प्रवचन देताना धर्मतत्त्वांची बोटांवर मोजणी करतानाचे हे प्रतीक असते. या शिल्पामध्ये आसनाखाली हात जोडून बसलेले शिष्य आणि एक किंवा दोन हरिणे दिसतात. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला काही हरिणेही तेथे येऊन बसली होती असे सांगतात म्हणून हा हरिणांचा समावेश बुद्ध मूर्तीच्या शिल्पांकनात दिसतो. याशिवाय बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या खाली सिंह ही दाखवलेले असतात. हे सिंह त्यांच्या राजघराण्यातल्या जन्माची ओळख सांगतात.
    भगवान बुद्धांच्या शिल्पांकनामध्ये एकीकडे संन्यस्त जीवन आणि एकीकडे राजपुत्र याचे मिश्रण करावे लागले. कुरळे केस आणि सिंह हे त्यांच्या संन्यस्त वृत्तीच्या विरुद्ध स्वभावाचे होते तसेच अत्यंत रुंद खांद्यांचे सुदृढ शरीर आणि चेहऱ्यावर मात्र समाधिस्त योग्याचे भाव यावर फर्ग्यूसन नामक अभ्यासकाने छान टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते हे शिल्पांकन म्हणजे अलंकार नसलेला राजा आणि स्मश्रू न केलेला संन्यासी. (In sculpture he is depicted as king without jewels, and a monk without tonsure.)
    ४. भूमिस्पर्श मुद्रा- गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली यावर तत्कालीन अनेक धुरिणांनी शंका घेतली. या प्रसंगाचे साक्षीदार कोण असे बुद्धांना वारंवार विचारण्यात येऊ लागले तेव्हा त्यांनी ही भूमीच माझी साक्षीदार आहे असे बसल्या बसल्या पटकन जमिनीला हात लावून म्हटले. नंतर गौतम बुद्धाची तपश्चर्या भंग करण्यासाठी मारानेही खूप प्रयत्न केले. परंतु ते सगळे विफल झाले. बुद्धाने आधीच्या जन्मात सात पारमिता पार केल्या होत्या याची साक्ष देण्यासाठी पृथ्वी आली. अशीही एक कथा या बद्दल सांगितली जाते. शिल्पांमध्ये ध्यान मुद्रेत मांडी घालून बसलेल्या बुद्ध मूर्तीचा डावा हात ठेवलेला असून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करताना दाखवले जाते.
     ५. महानिर्वाण मुद्रा- भगवान बुद्धांचा मृत्यू झाला त्या वेळेस त्यांच्या शेजारी त्यांचा आनंद शिष्य होता. शिल्पांमध्ये डोक्याखाली हात घेऊन उशीवर डोके ठेवलेली उजव्या किंवा डाव्या झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आढळते. निर्वाणासमयी भगवान बुद्धांचे वय जवळजवळ एंशी वर्षे असूनही या प्रकारच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा मात्र तरुणच दाखवला जातो. याशिवाय भगवान बुद्धांच्या बसलेल्या किंवा उभ्या मूर्ती दिसतात, ज्यामध्ये उजवा हात अभय आणि डावा हात बरद मुद्रेत किंवा डाव्या हातात भिक्षापात्र घेतलेले दिसते.

अन्य बौद्ध देवता :-

     जसे हिंदूचे देव, त्यांचे अवतार आणि अनेक इतर प्रकार झाले, तसे बौद्ध पंथातही करणे आवश्यक झाले. भक्तिमार्गाच्या उदयानंतर वैचारिक स्तरावर आणि कलेतही जी घौडदौड सुरू झाली त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आवश्यक झाले. बुद्धाचे चोवीस अवतार मानले गेले आहेत. हे भूतकाळाचे बुद्ध मानले जातात यातील शेवटच्या सातांना मानुषी बुद्ध म्हटले जाते आणि यातील आठव्या मानुषी बुद्धाला 'मैत्रेय' असे म्हटले जाते, जो पुन्हा भविष्यात बुद्ध होणार असे मानले जाते. याशिवाय बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात.

बोधिसत्त्व - शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. हे बोधिसत्त्व सृष्टीचा व्यापार सांभाळतात आणि आपले कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपात विलीन होतात. शिल्पांमध्ये दिसणारे प्रमुख बोधिसत्त्व म्हणजे वज्रपाणी, पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री.

चित्र क्र. १३५ : बोधीसत्व, लेणे क्र. ६ वेरूळ

चित्र क्र. १३६ : तारा, लेणे क्र. ६, वेरूळ

चित्र क्र. १३७: महामयूरी, लेणे क्र. ६, वेरूळ

    वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो.
   महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात (क्र. ६) हिचे पूर्णाकृती शिल्प आहे.
    तारा- कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते.

१७. जैन प्रतिमा


चित्र क्र. १३८: महावीर, जैन लेणे, वेरूळ

महावीर :-

       गौतम बुद्धांच्याच समकालीन असणाऱ्या भगवान महावीरांचा जन्म बिहारमध्ये कुंडग्रामी झाला (इ.स. १५९९ ते ५२७). आजच्या पटना या शहरापासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वैशाली गावाजवळ हे गाव आहे. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि मातेचे नाव त्रिशला होते. सिध्दार्थ हा वैशाली गणराज्याचा राजा होता. भगवान महावीराचे नाव वर्धमान होते. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला. सुरुवातीला त्याने अनेक गुरूंकडे राहून ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही. जुंभक नावाच्या गावात त्याने १२ वर्षे कठोर उपासना केली आणि आत्मविजय मिळविला. पुढील जीवनामध्ये त्याने बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूवरचा विजय हाच श्रेष्ठ आहे असा प्रचार केला. भगवान बुद्धाप्रमाणे त्याला नवीन पंथ स्थापन करावा लागला नाही. जैन पंथ हा त्याही आधीच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होता. वेद प्रामाण्य न मानणाऱ्यांचा हा पंथ होता. ज्याचा उल्लेख निगंठी  (म्हणजे वेद न मानणारे) असा केला जात असे.   केला.भगवान महावीरांच्या आधी या पंथाचे  २३ तीर्थकर (धर्मप्रमुख) होऊन गेले. महावीर हे या पंथांचे २४ वे तीर्थंकर होते. भगवान महावीरांचे योगदान दोन स्तरांवर होते. त्यांनी जैन पंथांमध्ये श्रमण संस्थेची प्रतिष्ठापना केली. ज्यामध्ये नवागत उपासकांपासून ते मुनीपर्यंत श्रेणी स्थापन केली. याशिवाय महिलांना आणि समाजातील सर्व स्तरांच्या लोकांना पंथात सामावून घेतले. त्यांचे स्वतःचे जीवन हे अत्यंत कर्मठ असल्यामुळे तीच वृती अनुयायांमध्ये आणि पंथांमध्ये आचरणात राहिली. त्यांचे दूसरे योगदान हे वैचारिक राहिलेले आहे. त्यांनी  अहिंसा ही अत्यंत आग्रहाने सांगितली आणि तीसुद्धा इतक्या पराकोटीची की सुक्ष्म जंतुंची देखील हत्या निषिद्ध ठरवली. इतकेच नाही तर जिवंत वनस्पती किंवा त्यापासून बनवलेली उत्पादनेही निषिद्ध ठरवली. याचबरोबर सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य याही बाबतीत ते भयंकर आग्रही होते तसेच सर्व उपासकांनीही असावे असा त्यांचा कटाक्ष आणि आग्रह होता. परंतु भगवान महावीरांनी सगळ्यात मोठे योगदान हे त्यांच्या पाचव्या तत्त्वामध्ये त्यांनी सांगितले ते म्हणजे अपरिग्रह, याचा अर्थ काटकसरीने जीवन जगणे. स्वतःसाठी किंवा कुटुंब पोषणासाठी आवश्यक तेवढाच धनधान्न जो इतर चीज वस्तूंचा संग्रह करावा यापेक्षा अधिक एका टाचणीचाही मोह किंवा संग्रह असतां कामा नये. तसेच विलासी आणि सुखासीन जीवनाची लालसा ठेवू नये.
    अपरिग्रह हा जरी त्यांनी जैन पंथांच्या लोकांसाठी सांगितला असला तरी तो इतका व्यवहारी होता आणि त्याबरोबरच संयमित जीवन आचरणात आणण्यासाठी आवश्यक असा मार्गदर्शक संदेश होता की, ज्यामुळे संपूर्ण भारतातल्या सर्व समाजावर त्याचा प्रभाव पडला. ज्याचा परिणामस्वरुप आपल्या देशांमधील मोठ्या प्रमाणात असणारा एक गट ज्याला आर्थिक दृष्ट्या मध्यम वर्ग असे म्हणतात. तो समाज आपले उत्पन्न पाहून त्याप्रमाणे सीमित व्यय करू लागला. इतकेच नव्हे तर सतत अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न करत राहिल्यामुळे आजही सर्व स्तरांमध्ये थोडीफार बचत केल्याचे दिसते. जगातील अन्य देशातही असे आर्थिक गट असले तरी ही बचतीची भारतीय सवय त्यांच्यात दिसत नाही. आधुनिक जगाच्या प्रचंड आर्थिक उलथापालर्थीमध्ये अनेक देश लयाला जाताना दिसत आहेत, परंतु भारत मात्र त्या धक्क्यांमध्येही तग धरून राहिलेला दिसतो. शतकानुशतके साधी राहणी आणि बचत करण्याची सवय याचे श्रेय महावीराना द्यावे लागेल. अपरिग्रहाचा संदेश आधुनिक काळामध्ये मात्र विस्मरणात दिसतो. तर जैन बधूच्या आचरणात त्याचा लवलेशही दिसत नाही. असे असूनही सढळ हस्ते दान करावे या भगवान महावीरांच्या शिकवणीचे मात्र पालन करण्याची अधुनिक काळातही दिसते. आजही लोककल्याणकारी कामांसाठी सर्वात मोठी दाने ही जैन समाजातील लोकांकडूनच येताना दिसतात. भगवान महावीरांनंतर हजारो वर्ष अव्याहतपणे हा पंथ आपले अस्तित्व टिकवून आहे याचे सर्व श्रेय भगवान महावीरांना जाते.

चित्र क्र. १३९ : पार्श्वनाथ, जैन लेणे, खेरूज
 
   शिल्पकलेप्रमाणे जैन शिल्पकला ही प्राचीन आहे. अनेक राजे त्या वेळेस जैन पंथाचा स्विकार करत होते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ओडीशा प्रांतात खारवेल नावाच्या राजाचे राज्य होते. उदयगिरी आणि खंडगिरी येथे त्या काळातील जैन लेणी आपल्याला आढळतात, भगवान महावीरांनीही त्यांची शरीर किंवा मूर्तिरूपात पूजा करू नये असे सांगितले होते. त्यामुळे त्या प्राचीन लेण्यांमध्ये भगवान महावीरही प्रतीकात्मक रूपात दिसत. इ.स.च्या सातव्या आठव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा र्हास झाला. त्या वेळेस जैन पंथ सावध झाला. बौद्धांनी केलेल्या चुका त्यांनी कटाक्षाने टाळल्या. जैन आचरण तर निर्दोष होतेच परंतु बौद्धांप्रमाणे त्यांनी जनसंपर्कही तुटू दिला नाही. भक्तिमार्गाच्या मुळे हिंदू देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात घडू लागल्यामुळे जैनांनाही त्या स्पर्धेमध्ये उतरावे लेगी कोरण्याबरोबरच हिंदूप्रमाणे दगडातील मंदिरेही बांधण्यास त्यांनी सुरुवात केली ज्यामध्ये भगवान महावीरांसकट अन्य तीर्थंकर आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीही बसविण्यात येऊ लागल्या.
 जैन पंथाला दुहीचा शाप मात्र आधीच लागला होता. या विभिन्न देवदेवतांच्यामुळे त्याच्यात भर पडली. याची सुरुवात झाली होती ती सम्राट चंद्रगुप्ताच्या कालखंडात. चाणक्याने राज्य स्थापन करून दिल्यानंतर चंद्रगुप्ताने ते इ.स.पू. ३०० पर्यंत चालवले. परंतु त्याच्या अंतिम काळात बारा वर्ष सलग दुष्काळ पडला. त्या वेळेस मगध राज्यातील जैन मुनी जे केवळ भिक्षेवर जगत त्यांचे जगणे तिथे कठीण झाले म्हणून त्यांना दक्षिण भारताकडे जावे लागले. दिगंबर अवस्थेतील जैन मुनी है मगधमध्ये परीचित होते. परंतु दक्षिण भारतात मात्र समाजाने त्यांना स्वीकारले नाही. अखेर तडजोड करुन त्यांनी केवळ कमरेभोवती एक श्वेत वस्त्र गुंडाळायला सुरुवात केली. दुष्काळ संपल्यावर जेव्हा हे जैन मुनी मगध मध्ये परत आले तेव्हा तेथील जैन संघानी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. यातुन प्रथम दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ जैन संघात झाले. पुढे यामध्ये भरच पडत गेली. अनेक उपपंथ आणि उपशाखा अस्तित्वात आल्या. या सर्वांची स्वतंत्र देवालये आणि अन्य शिल्पेही अस्तित्वात आली. त्यामुळे दहाव्या शतकानंतर बांधल्या गेलेल्या अनेक जैन मंदीरामध्ये असंख्य प्रकारच्या देव प्रतिमा दिसतात. त्यांचे अत्यंत क्लिष्ट वर्गीकरण आणि नामांकन मूळे त्यांची ओळख पटणेही कठीण होऊन जाते. इतकेच नाही तर यामध्ये अनेक हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांचाही थोडे फार फरक करून समावेश केलेला दिसतो. तर काही ठिकाणी सुरसुंदरी, नर्तकी आणि नायिकांचेही शिल्पांकन आढळून येते.

  जैन शिल्पकला :-

     जैन शिल्पकलेमध्ये सर्वात प्रमुख शिल्पांकन हे भगवान महावीर आणि इतर तीर्थंकरांचे असते. यांच्या शारीररूपातील मूर्ती बौद्ध मूर्तीप्रमाणेच असून त्यामध्ये काही ठिकाणी उष्णीष तर काही ठिकाणी केवळ केशविहीन डोके असते. लांब कान, ऊर्णा, श्रीवत्स आणि आजानुबाहू ही लक्षणे त्यात दिसतात. तर उभ्या मूर्तीमध्ये दिगंबर

चित्र क्र. १४० : बाहुबली, जैन लेणे, वेरुळ

मूर्ती असल्यामुळे सातवे महापुरुष लक्षणही दिसते (पाहा महापुरुष लक्षणे - बुद्ध मूर्ती), भगवान महावीरांच्या किंवा तीर्थंकरांच्या सर्वतोभद्र मुर्ती दिसतात. एकाच दगडात कोरलेल्या ज्यामध्ये चारही बाजूंना एकमेकांकडे पाठ केलेल्या चार मूर्तींचे संयुक्त शिल्प असते. महामायेच्या स्वप्नाप्रमाणे भगवान महावीरांच्या आईलाही हत्ती स्वप्नात दिसल्याचे शिल्प आढळते.

वेरुळमधील जैन प्रतिमा :-

    वेरुळची जैन लेणी (इ.स. ९-१० शतक) दिगंबर पंथियांची असून त्यात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर (बाहुबली), मातंग आणि सिद्धाविका अनेक शिल्पे दिसतात. यातील लेणी क्र. ३२ इंद्रसभा असे म्हटले जाते.

चित्र क्र. १४१ : सिद्धायिका, जैन लेणे, वेरूळ

       त्याच्या वरच्या मजल्यावर सिंहावर बसलेली सिद्धायिकेची भव्य मूर्ती आहे. तिच्याजवळ तिचे मूल असते. ते तिच्या बसलेले असून तिच्यामागे आम्रफळांनी बहरलेला वृक्ष, त्यावरील पक्षी आणि माकडेही आहेत. देगलूरकरांच्या मते, "इतकी सुरेख प्रतिमा अन्यत्र क्वचित पाहायला मिळते. कुरळ्या कपाळावरील महिरप धनुष्याकृती भुवया, सरळ धारदार नाक, कोमल ओठ, आकर्षक हनुवटी, शंखाकृती गळा, गोल व डौलदार खांदे, मृग स्तन, नितळ पोट, गजशुंडवत निमुळत्या मांड्या- यामुळे ती यक्षिणी असू शकते. सामान्य स्त्री नव्हे याची खात्री पटते' (देगलूरकर : २००८). समोरील कोनाड्यामध्ये हत्तीवर बसलेल्या मातंग या जैन देवतेचे असेच भव्य शिल्प आहे. त्याच्या मागे वडाचे झाड आहे. हा देव हत्तीवर आरूढ असल्यामुळे याला चुकून इंद्र समजले गेले. लेणीचे नाव इंद्रसभा असे दिले गेले.
 याच्या शेजारील लेणीमध्ये मुख्य गर्भगृहात भगवान महावीरांची मूर्ती असून गर्भगृहाच्या बाहेर पार्श्वनाथ आणि बाहुबली यांच्या उभ्या मोठ्या प्रतिमा आहेत. पार्श्वनाथाचे शिल्प ओळखण्यास सोपे असते. कारण त्यांच्या मागे डोक्यावर पाच किंवा सात फण्यांचा नाग कोरलेला असतो आणि त्याच्याभोवती यक्ष आणि शासन देवी असतात. याशिवाय काही भक्तही दिसतात. बाहुबलीच्या शिल्पाची ओळख ही त्याच्या दोन्ही मांड्यांभोवती आणि हाताभोवती असणाऱ्या वेलींवरून होते. त्याने इतकी वर्षे साधना केली की त्याचे शरीर वृक्ष वेलींनी वेढले गेले. या शिल्पाच्या खालच्या बाजूला अनेक प्राणी काढलेले आहेत. बाहुबलीच्या पायाशी एक मुंगुस कोरलेला असून त्याच्या शेजारी एक सापही काढलेला आहे. बाहुबलीचा प्रभाव असा की हे दोन जन्मजात शत्रू आपले हिंसात्मक स्वभाव सोडून एकमेकांशेजारी सलोख्याने नांदत आहेत. बाहुबलीचे सर्वात मोठे शिल्प कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे आहे. जवळजवळ ५० फूट उंचीचे हे शिल्प गोमटेश्वर या नावानेही प्रसिद्ध आहे.

क्र. १४२ मतंग, जैन लेणे. वेरूळ

मंदिरे :-

     जैन मंदिरे- संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी जैन आढळतात. यातील काही ठिकाणे ही स्थानमाहात्म्यामुळे अधिक प्रचलित झाल्यामुळे तेथे अनेक नव्या मंदिराचेही बांधकाम झालेले आढळते. उदा., पालिताना (गुजरात) येथील मंदिर समूह. भारतातील प्रसिद्ध जैन मंदिरामध्ये राजस्थानमध्ये माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर, गुजरातमधील तारंगा येथील अजितनाथाचे मंदीर आणि खजुराहोमधील जैन मंदिरे यांचा समावेश प्रामुख्याने होतो. दिलवाडा आणि राणकपुरच्या मंदिरातील शिल्पकला ही संगमरवरी दगडात केली असून दिलवाड्यातल्या कोरीव कामाची जगप्रसिद्ध आहे. तारंगा (गुजरात) येथील मंदिर हे १०-११ व्या शतकातील असून त्याची उंची १०७ फुटाहून अधिक आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर शेकडो शिल्प असून जैन शिल्प कलेतील देवीदेवतांचे अनेक प्रकार तर येथे दिसतातच परंतु काही अन्य विशेष शिल्पेही येथे आहेत. यामध्ये भुजंगत्रासित अभिसारिकेच्या शिल्पाचा उल्लेख करावा लागेल. प्रियकराला भेटायला निघाली असताना सापाची सळसळ ऐकू आल्यामुळे घाबरून तिने तिचा डावा पाय उचललेला असून भेदरलेल्या नजरेने ती त्या सापाच्या दिशेने पाहत आहे. या प्रकारच्या अभिसारिकेचे हे अत्यंत दुर्मिळ शिल्प येथे दिसते.

चित्र क्र. १४३: जैन मंदिर, तारंगा, गुजरात

खजुराहोमधील जैन मंदिरापैकी आदित्यनाथाचे मंदिर हे आधीचे हिंदू मंदिर असावे असे वा कारण त्याच्या बाहेरील मूर्तिकामामध्ये सर्व हिंदू देवदेवतांच्याच मूर्तीचे शिल्पांकन आहे. शेजारील पार्श्वनाथाच्या मंदिरांवर शिल्पांकन खजुराहोच्या अन्य मंदिराप्रमाणे असून त्यात अनेक देवदेवी दिसतात. या दोन्ही मंदिरांवर कामशिल्पे मात्र अजिबात नाहीत. पायातील घुंगरू बांधणार्या नर्तकीचे खजुराहोमधील प्रसिद्ध शिल्प आदित्यनाथाच्या मंदिराच्या उत्तर भिंतीवर आहे.



 जैन प्रतिमा

४२५

मध्यकालीन तीर्थंकर प्रतिमा :

या काळांत जरी स्वतः तीर्थंकराच्या प्रतिमेत काही फरक झाला नाही, तरी प्रतिमेच्या सजावटीत मात्र कित्येक फरक झाले (चित्रे १७९-१८०). जैन ग्रंथात जागोजागी त्या अलंकरणादिकाचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ बृहत्कल्पसूत्राच्या मासकल्पप्रकृतिसूत्रांत जिनबिंबाच्या खालील अलंकरणांचा उल्लेख सापडतो.'

१) चेइयदुम (चैत्यद्रुम) : तीर्थंकराच्या मस्तकावर असलेला वृक्ष.

२) पेढ छंदग (पीठ देवच्छन्द) प्रभावळी वर असलेल्या रथिका.

३) छत्ते (छत्र): जिनांच्या मस्तकांवरील छत्र.

४) चामराओ (चामरें) : तीर्थंकराच्या आजुबाजूस उभे असलेले चामरवर यक्ष, उत्तरमध्यकाळाच्या विशेषतः दक्षिण भारतीय प्रतिमांत चामर घेतलेले यक्ष न दाखविता नुसत्याच चौऱ्या दाखवितात.

५) आसण (आसन): जिनांचे मुख्य आसन किंवा सिंहासन.

६) अन्न करणिज्जं (अन्य करणीयम्) इतर अलंकरणें जसे, दोन हरिणांच्या मधे ठेवलेले धर्मचक्र, शासन देव, नवग्रह, इत्यादि.

७) देवदुंदुभि : जिनांच्या छत्रावर एक किंवा एकाधिक देव ढोलके वाजवतांना दिसतात. कधी कधी हा देव इतका अलंकारिक असतो की त्याचे डोके व ढोलके एवढेच दिसते.

८) देव, विद्याधर वगैरे : छत्राच्या दोन्ही बाजूला हत्तीवर बसलेले इंद्रादि देव व आकाशांत माळा घेऊन उडणारे विद्याधर मध्यकाळांत बरेच दिसतात.

९) यक्ष शासनदेवी : तीर्थंकराच्या आसनाजवळ, पायशिळेवर किंवा इतरत्र त्या तीर्थंकराचा यक्ष व शासन देवी आढळते; पण हे अनिवार्य मात्र नाही.

१०) पञ्चपरमेष्ठिन् : बऱ्याचशा तीर्थंकर प्रतिमांत मुख्य जिनाच्या आजुबाजूस चार जिनासारख्या प्रतिमा दिसतात. हे पांच मिळून पंचपरमेष्ठिन् हा गट (म्हणजे अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू) तयार होतो.

११) दोन हरिणांच्या मधे असलेले धर्मचक्र: मूळचे हे बौद्ध प्रतीक बुद्धाने सारनाथ (वाराणसी) येथे केलेल्या धर्मचक्र प्रवर्तनांकडे संकेत करते. मध्य काळांत धर्मचक्राच्या साम्यामुळे जैनांनी ही ते उचलले.

१२) चतुविंशतिका किंवा चौबीसी (चित्र १८१) सर्व तीर्थकरांना एकत्र अंकितकरणारी प्रतिमा चतुर्विंशतिका या नावाने ओळखतात. हिच्या रचनेत साधारणतः आदिनाथ मधे आणि इतर तेवीस आजुबाजूला असतात. कारीतलाई (जि. जबलपूर म.प्र.) येथून कलचुरी काळांतील (सु. १०-११ वे शतक) बरीच जैन शिल्पे मिळाली आहेत. त्यांत आदिनाथाच्या ऐवजी पार्श्वनाथाला मधोमध दाखविणाऱ्या चतुविंशतिका आहेत.''

१३) लांछन : बहुतेक पायशिळेवर यांचे अंकन करतात.

मध्यकाळातील जैनोपासनेची इतर प्रतीकें :

काही जैनप्रतीकांची चर्चा मागे केलीच आहे. मध्यकाळांतील इतर उल्लेखनीय प्रतीकें खालील होत :
[04/02, 9:45 pm] Swapnil Jirage: ४२४

उर्जा

भारतीय मूर्तिशास्त्र

प्रतिमेच्या डोक्यावर वृक्ष दाखविण्याची पद्धत बरेच दिवस होती, उत्तरेत ती काही शिल्पांतच दिसते. सुरुवातीच्या कलेत चैत्यवृक्षाचे अंकन कठड्याने घेरलेल्या एका झाडाच्या रूपांत केले जाते.

४) चैत्य स्तंभ : मथुरेच्या एका शुंगकलाकृतीत (चित्र १७७) जी कंकाली टीला येथूनच मिळाली आहे चैत्य स्तंभाच्या पूजनांचे दृश्य अंकित आहे. वरच्या टोकावर सिंह असलेला हा खांब कठड्याने आवृत आहे, व काही मंडळी त्याला प्रदक्षिणा करीत आहेत. (ल.सं.सं.जे. २६८) अशाच प्रकारचे चैत्यस्तंभ स्तूपाच्या अंगणांत उभारले जात. मधुरेहून मिळालेल्या एका आयागपट्टावर स्तूप व त्याच्या जवळचे चैत्य स्तंभ दिसतात (ल.सं.सं.जे. २५५).

याच स्तंभांतून मध्यकाळांत 'मानस्तंभा'चा उदय झाला. मानस्तंभांच्या वरच्या टोकांवर सर्वतोभद्र प्रतिमेप्रमाणे चार तीर्थंकर दिसतात.

चोवीस तीर्थंकर :

तीर्थकरांची साधारण चर्चा मागे झाली आहे. पुढील तक्त्यांत या चोवीस जिनांची लांछने, वर्ण, वृक्ष, वगैरे माहिती संकलित केलेली आहे." :

रेखा चित्र ४५

-लांडा कान

१-३. तीर्थंकराच्या छातीवर असणाऱ्या श्रीवत्साचे प्रकार ४. बोधिवृक्ष ५. बुद्धमुखाचे भाग
[04/02, 9:45 pm] Swapnil Jirage: जैन प्रतिमा

शांतिनाथ (ल.सं.सं.जे. २३२)

सुमतिनाथ (म.सं.सं. ४७.३३३३)

गुप्तकाळातही फारशी लांछने आलेली नाहीत, पण प्रारंभ मात्र झालेला दिसतो. राजगीर (बिहार) येथून मिळालेल्या नेमिनाथाच्या गुप्तकालीन अभिलिखित प्रतिमेच्या पायशिळेवर त्याचे लांछन 'शंख' यांचे दर्शन घडते." श्वेतांबर किंवा दिगंबर वाङ्मयात मात्र लांछनाचा उल्लेख सातव्या आठव्या शतकांपर्यंत दिसत नाही.'

गुप्तकालीन तीर्थंकर प्रतिमा :

मथुरेपुरते बोलावयाचे झाल्यास कुषाण काळापेक्षा गुप्तकाळांतील तीर्थंकर प्रतिमांचा आकडा कमी आहे. ऊर्णाचिन्ह आता लुप्त होते, मुखांवर प्रसन्नतेची छटा दिसू लागते, कान खांद्यापर्यंत लोंबतात व प्रभामंडळाच्या अलंकरणांत वैविध्य दृष्टीगोचर होते (चित्र १७३).

त्याचप्रमाणे परिवार देवतांचीही वाढ होते. मालाधारी गंधर्व, चामरधारी सेवक, पूजन सामग्री घेऊन उडणारे देव, वगैरे दिसू लागतात (ल.सं.सं.जे. ११८, जे ११९, ते १२१; म.सं.सं. १२.२६८, बी ६ बी ७ इत्यादि). उतरत्या गुप्तकालांपासून आठ ग्रह दिसू लागतात (म.सं.सं.बी. ७५). पुढें त्याचा आकडा नऊ होतो. तीर्थंकराची विशिष्ट शासनदेवी आणि यक्ष हे मात्र दिसत नाहीत.

कुषाणकालीन इतर जैन प्रतीकें :

१) आयागपट्ट : (चित्रे १७४, १७६) तीर्थंकर प्रतिमांचे लोकप्रियता वाढण्याचे अगोदर जैनांचे आवडते पूजन प्रतीक दोन-सव्वादोन फूट लांबीचा वर्गाकार दगड असे. याच्यावर स्तूप, धर्मचक्र, स्वस्तिक, तीर्थंकर प्रतिमा, त्रिरत्न, अष्टमंगल चिन्हे वगैरे कोरलेली असत. अशा दगडांवरील लेखांत त्याला आयागपट्ट ही संज्ञा दिली असून तो 'पूजेकरिता बसविला गेला' अशी नोंद आढळते. मथुरेहून असे बरेच आयागपट मिळाले आहेत. (ल.सं.सं.जे. २५२ जे. २५०, जे २४८, जे २५३ इत्यादि म.सं.सं.क्यू. २) कुषाण काळानंतर यांची लोकप्रियता मावळलेली दिसते.

२) स्तूप : कोणत्याची मान्य व वंदनीय अशा आचार्यांच्या उत्तरक्रियेनंतर त्याचे अवशिष्ट पाञ्चभौतिक अवशेष एका घटांत-धातुकरण्डकांत स्थापन करून त्यावर छत्राच्या आकाराची 'स्तूप' नावाची वास्तू उभारीत. स्तूप बांधण्यांची पद्धत जैन व बौद्ध या दोघांसही मान्य होती. दोघांतही 'स्तूप' हे उपासनेचे प्रत्यक्ष प्रतीक मानले जात असे (चित्रे १७५, १७६, १७८). बौद्धांत याला फार मान्यता मिळाली, व त्यांचे स्तूप भारतभर पसरले. त्यांच्याबद्दल पुढे पाहू. वाङ्मय आणि पुरातत्त्व यांचे आधारावर असे विधान करणे शक्य आहे की पूर्वी कोटिकापूर, पावा, पाटणा (पाटलीपुत्र). कलिंग देश, पेशावर वगैरे जागी जैन स्तूप होते, पण त्यापैकी मथुरेच्या स्तूपांइतका सुप्रसिद्ध कोणताच नव्हता." मथुरेला आज ज्या ठिकाणी कंकाली टीला म्हणून जागा आहे (आता त्या शेजारी एक महाविद्यालय उभे आहे) त्या ठिकाणी इसवीसनाच्या सुरवातीच्या शतकांत एक महास्तूप होता. येथूनच जैन धर्माची प्रारंभिक काळातील हजारो शिल्पें आपल्या हाती लागली आहेत.

३) चैत्य वृक्ष : बोधिवृक्षांप्रमाणे तीर्थंकरांच्या निमित्तानें काही वृक्षांना पावित्र्य मिळाले पण येथे बौद्धांप्रमाणे यांचे फार माहात्म्य वाढलेले दिसत नाही, त्याचप्रमाणें या वृर्भात वैविध्यही दिसत नाही. दक्षिणेंत तीर्थंकर

४२३
[04/02, 9:46 pm] Swapnil Jirage: ४२२

भारतीय मूर्तिशास्त्र

परंपरेची मान्यता आहे. ऋषभनाथाने उभ्यानेच कार्योत्सर्ग केला होता.

निकूडं सविसेसं वयाणुरूवं वलाणुरुवं च खाणुव्व उद्धदेहो काउसग्गं तु ठाइज्जा - कार्योत्सर्गशतक ६९

(मुनी नथमल, कायोत्सर्ग मुद्राके अंकन और जैन परंपरा, जोशी, २९)

२) तीर्थंकराचे मस्तक मुंडित असते किंवा अंगुष्ठ मात्र केसाच्या कुरळाने आच्छादित असते. याचे एकाधिक प्रकार आहेत (चित्र १७१). চাল

३) कान खांद्यापर्यंत लोंबलेले नसतात; गुप्तकालापासून ते खाली लोंबू लागतात (चित्र १७३).

४) मुखावर विशेष भाव नसतो, असलेच तर हलके स्मित असते.

५) ध्यानमुद्रेत बसलेल्या तीर्थंकरांच्या तळहातावर चक्र आणि तळपायावर त्रिरत्न आणि चक्र दिसते. याशिवाय बोटांच्या पुढच्या पेरांवर श्रीवत्सादि मंगल चिन्हें दिसतात.

६) पुरुषोत्तमत्वाचे लक्षण म्हणून तीर्थंकराच्या वक्ष स्थलांवर श्रीवत्सचिन्ह व भुवयांमधे ऊर्णा प्रामुख्याने दिसते. (रे.चि. पंचेचाळीस १, २).

७) जैन तीर्थंकर व साधू यांच्या प्रतिमा पूर्ण दिगंबर असतात, फक्त अर्धफालक संप्रदायाचे साधू याला अपवाद आहेत.

८) बसलेल्या तीर्थंकरांचे आसन कधी कधी सिंहाच्या डोक्यावर दिसते, हे त्याचे चक्रवर्ती पदांचे द्योतक होय.

९) कुषाणकालीन तीर्थंकर प्रतिमेचा एक दुसरा प्रकार म्हणजे 'सर्वतोभद्र' प्रतिमा हा होता (चित्र १७२). या प्रतिमेंत चार दिशांकडें तोंड करून उभे असलेले चार तीर्थंकर दाखवतात. बहुतेक यांच्या पैकी एक आदिनाथ आणि दुसरा पार्श्वनाथ असतो. बाकी दोन क्रमाने नेमी व महावीर असावेत असा तर्क करता येतो. मथुरेच्या प्रारंभिक कुषाण कलेतही मुख्यत्वे याच चार जिनांचे अंकन मिळते.

लाञ्छनें :

चोवीस तीर्थंकरांच्या प्रतिमा जवळ जवळ एकसारख्याच असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख पटण्याचे मुख्य साधन म्हणजे लांछन होय; पण लांछनाचा प्रारंभ सुरुवातीच्या कलेत झालेला नाही. कुषाणकाळांत आदिनाथाची ओळख त्याच्या खांद्यावर दिसणाऱ्या केसांच्या बटा, पार्श्वनाथाची डोक्यावरची सर्पफणा व नेमिनाथाची त्याच्या आजुबाजूला असलेले वासुदेव आणि बलभद्र ही होती. या चिन्हांव्यतिरिक्त प्रतिमेवर अंकित लेखांत तीर्थंकरांचे नांव असले तरच ओळख पटणे शक्य असे. अभिलेखांच्या मदतीने मथुरेच्या कुषाण कलेत आतापर्यंत खालील तीर्थंकरांची ओळख पटली आहे :

संभवनाथ (ल.सं.सं.जे.१९)

ऋषभनाथ (ल.सं.सं.जे. २६)

अरिष्टनेमी (ल.सं.सं.जे. ८)

मुनिसुव्रत (ल.सं.सं.जे. २०)

वर्धमान (ल.सं.सं.जे. ९, १४, १६, २२, ३१, ३४, ४५ वगैरे)

पार्श्वनाथ (ल.सं.सं.जे. ६७)
[04/02, 9:46 pm] Swapnil Jirage: जैन प्रतिमा

४२१

येईल. तीर्थंकर नेमिनाथाच्या आजुबाजूला बलराम आणि वासुदेव कृष्ण दिसतात. नवग्रहांचे ही दर्शन होते. तीर्थंकरांच्या शासन देवतामध्ये अंबिका, गोमुख यक्ष, क्षेत्रपाल, नेगमेष, यक्ष ब्रह्मा, वगैरे अन्य उदाहरणें म्हणून दाखवता येतील (J.N. Banerjee, DHI., pp.५६१-६३) या प्रकारच्या अंकनांत तीर्थकरांचे श्रेष्ठत्व स्थापन करण्यासाठी इतरांना त्यांचे उपासक, शासन देव, किंवा यक्ष या रूपांत दाखवणे जैनांच्या दृष्टीने क्रमप्राप्त होते.

बौद्ध धर्मीय प्रतिमांत दोन दृष्टिकोण आढळतात. एकतर जैनांच्याच प्रमाणे बुद्ध किंवा बोधिसत्त्वाचे श्रेष्ठत्व सुचविण्यासाठी ब्राह्मण धर्मीय देव प्रतिमांच्या डोक्यावर किंवा आजूबाजूला बुद्धाला दाखवणे. या प्रकारांत श्रेष्ठत्वाचा संदेश आहे. हा प्रकार सूर्य लोकेश्वर, विष्णू लोकेश्वर, हरि-हर-सूर्य-बुद्ध (J.N. Banerjee, DHI., pl. XLVIII. 1,3,4 p. 554-5) ध्यानी बुद्धासहित पंचायतनलिंग, वगैरे प्रतिमांत दिसतो.

दुसऱ्या प्रकारात मात्र फक्त श्रेष्ठत्व नसून दुर्भावना, तिरस्कार, अपमान वगैरेचे भरपूर मिश्रण दृष्टोत्पत्तीस येते. हीं प्रवृत्ती बौद्धांच्या वज्रयानी तांत्रिक प्रतिमांत स्पष्टपणे दिसते. अपराजिता व पर्णशबरी यांना गणपतीला पायाखाली दाबताना किंवा त्याला मुठीने मारताना दाखवतात, विघ्नांतक गणपतीला तुडवतो, तसेच वज्रज्वालानार्क, कालचक्र क्रमाने विष्णू, भैरव, रूद्र आणि अनंग (कामदेव) यांना पायाखाली तुडवताना व त्यांच्यावर नांचताना दिसतात. प्रसन्नतारा, त्रैलोक्य विजय, हे वज्र, मारीची, यांच्या पायाखाली इंद्र, शिव, ब्रह्मा, विष्णू, शिव-गौरी, वगैरे दिसतात. वज्रवाराही कालरात्रीला पदाक्रान्त करते. लाल तारा/ तारोद्भवकुरकुल्ला रती आणि मदनावर आरुढ असते. (रेखा चतुर्वेदी, बौद्ध संघाट प्रतिमाएँ, इतिहास दर्पण (अखिल भारतीय इतिहास संकलन योजना की शोधपत्रिका) नई दिल्ली, अंक १५ (वर्षप्रतिपदा १.२-१०, पृ. ५६-६१).

जैन कलेची सुरुवात :

काही जैन विद्वानांच्या मतें जैन कलेचा आरंभ सिंधुसभ्यतेपासून झाला आहे, पण हे मत संप्रदाय विशेषांतच ग्राह्य मानले जाते. वाङ्मयीन उल्लेखांच्या आधारावर असे सांगणे शक्य आहे की महावीराच्या प्रतिमेचे पूजन त्याच्या जीवनांत सुरू झाले होते.' महावीराची तो असतांना केलेली प्रतिमा 'जीवंतस्वामि' प्रतिमा म्हणून ओळखली गेली, व पुढें अशा प्रकारच्या सर्व प्रतिमा याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

जैन तीर्थंकराची सर्व प्रथम प्रतिमा बिहार मधे लोहानीपूर येथें मिळाली. पण सुरुवातीच्या या प्रतिमांची संख्या अगदीच मोजकी आहे. प्रारंभिक कुषाण काळच्या आयागपट्टांवर क्वचित तीर्थंकराचे दर्शन होत असले (चित्र १७४) तरी शुंगकालीन तीर्थंकराची स्वतंत्र प्रतिमा अद्यापि पाहण्यात आलेली नाही.

कुषाणकालीन तीर्थंकर मूर्ती :

कुषाणकाळात विशेषतः मथुरेत तीर्थंकर प्रतिमांचा बराच भरणा झालेला दिसतो. या प्रतिमाची खालील वैशिट्ये डोळ्यांत भरतात-

१) तीर्थंकर प्रतिमा फक्त दोनच स्थितीत असतात; उभ्या किंवा मांडी घालून बसलेल्या. उभ्या स्थितीला खड्‌गासन किंवा कायोत्सर्ग मुद्रा म्हणतात आणि दुसरीला ध्यानमुद्रा (चित्र ३.१७२).

* कायोत्सर्गमुद्रा जैन-साधना-पद्धतीतील एक मुख्य अंग आहे. 'कार्योत्सर्ग शतका' प्रमाणे कायोत्सर्ग उभ्या, बसलेल्या किंवा निजलेल्या स्थितीत होत असतो, पण समर्थ मुनीनें उभ्या स्थितीतच तो करावा अशी जैन
[04/02, 9:46 pm] Swapnil Jirage: 3

जैन प्रतिमा

भाग:9

आरंभ :

सनातनी विचारधारेप्रमाणें वेद प्रामाण्यांवर विश्वास न ठेवणारी व्यक्ती किंवा संप्रदाय नास्तिक म्हणवितो. या दृष्टीने बौद्ध व जैन ही दोन्ही मते नास्तिकवादी आहेत. जैनमत ईश्वराच्या कर्तुमकर्तुम्न्यथाकर्तुम् सामर्थ्यावर किंवा त्याने सृष्टीचे निर्माण केले अशा गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही, पण 'देववाद' जैन परिसरांच्या बाहेर आहे असेही नाही. आज जैनांत देवमूर्तिपूजनांचा चांगलाच प्रचार आहे, फरक एवढाच की काही जैनांच्या घरी प्रतिमा असल्या तरी त्याचे मुख्य पूजन, उपासना वगैरे प्रामुख्याने जैनालयांत किंवा जैन मंदिरातच होत असते.

'जिनां'चे अनुसायी ते जैन व जिनप्रतिपादित धर्म तो जैनधर्म अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. 'जिन' हे ईश्वराचे अवतार नव्हते, पण स्वतःच्या तपश्चर्येने कामक्रोधादि विकारावर विजय मिळवून कर्ममलाला बाजूला सारून आत्म्याला निर्मळ करून घेणारे लोकोत्तर पुरुष होते. यांनाच तीर्थंकर, केवली, अर्हत्, अरिहंत, वगैरे नांवे आहेत. आदिनाथ किंवा ऋषभनाथ हा प्रथम तीर्थंकर असून त्यानंतर बावीस आणि शेवटला महावीर किंवा वर्धमान असे एकूण चोवीस तीर्थंकर या धर्माचे मुख्य स्तंभ होत. मात्र आजचा इतिहास चोवीसपैकी फक्त तीन नेमी, पार्श्वनाथ आणि महावीर यांना सत्य सृष्टीतील पुरुष समजतो. महावीराचा काळ आज पासून सुमारे २,५०० वर्षे पूर्वीचा मानतात.

जैनमतांप्रमाणे आत्मा कर्माने बद्ध असतो. तपश्चर्या करून कर्माचा नाश करणे ही 'मुक्ती' होय. मुक्तांना 'सिद्ध' असेही म्हणतात. यांचे पूजनीय असे पांच प्रकार आहेत. सर्वांत श्रेष्ठ म्हणजे 'अर्हत' त्यानंतर 'सिद्ध', 'आचार्य', 'उपाध्याय' आणि 'साधू' असे ते पांच होत. जैन गृहस्थांना श्रावक आणि स्त्रियांना श्राविका असे म्हणतात.

जैन आणि बौद्धांचा ब्राह्मणधर्मीय प्रतिमांविषयक दृष्टीकोण :

हे दोन्ही धर्म वेदविरोधी म्हणजे 'नास्तिक' असून मुळात मूर्तिपूजेंला मान्यता देत नव्हते. पण बदलत्या काळाबरोबर दोन्ही क्षेत्रांत मूर्तिपूजा बळावली. प्रतिमांचा पसारा वाढला आणि कलेच्या जगात अनेक प्रकारच्या जैन व बौद्ध मूर्ती झळकू लागल्या. त्यांचा संक्षिप्त आढावा आपण मागील दोन प्रकरणांत घेतला आहे. या दोन धर्मियांचा ब्राह्मण धर्मीय प्रतिमांविषयीं काय दृष्टिकोण दिसतो, याचा येथे आपण विचार करणार आहोत. प्रथम जैनांकडे वळू.

जैन मूर्तिसंघात कुषाण काळापासूनच काही ब्राह्मण देवतांच्या प्रतिमा आढळतात. उदाहरण म्हणून मथुरेहून मिळालेली कुषाणकालीन अभिलिखित सरस्वती (मथुरा सं. जे. २४), पद्मा (राष्ट्रीय सं. दिल्ली, बी.८९), गजलक्ष्मीकडे बोट दाखवता

जैन प्रतिमामा

४३७

क्षेत्रपाल :

क्षेत्रपाल हा उभय संप्रदायांना मान्य आहे. काळा वर्ण, वाकडे दांत, भयंकर मुखाकृती, बर्बर केश, पायांत खडावा, आणि हातांत मुद्गर, डमरू, अंकुश आणि कुत्रा असणे ही त्याची लक्षणे होत. आचारदिनकर वीस हाताच्या क्षेत्रपालाचा उल्लेख करतो. इतरत्रही त्यांचे उल्लेख आढळतात. कुत्रा आणि मुद्गर या त्याच्या फार जवळच्या वस्तु होत व त्या त्याला ब्राह्मण धर्माच्या कालभैरवाजवळ नेऊन बसवितात. जैन देखील त्याची गणना भैरव आणि योगिनींत करतात. मथुरा संग्रहालयात द्विभुज क्षेत्रपालाची प्रतिमा आहे (म.सं.सं. ६०.४८६). त्याच्या उजव्या हातांत दंड असून डाव्यात बरोबर चालणाऱ्या कुत्र्याच्या गळ्याला बांधलेली दोरी आहे. चेहऱ्यावर भीषणता मात्र नाही. चतुर्भुज क्षेत्रपालाच्या प्रतिमा अन्यत्र मिळाल्या आहेत.

श्रुत देवता :

सरस्वतीच्या प्रतिमेचा वर उल्लेख झालाच आहे. श्रुतदेवींचाही विद्येशी संबंध असतो. मांडु (मध्य प्रदेश) जवळ फिरत असतांना एका मंदिरांत लेखकाला एक दगडी तुकडा पडलेला दिसला ज्यावर एका श्रुतदेवीचे चित्र जरी आता खंडितावस्थेत असले तरी तिच्या वर उचललेल्या डाव्या हातातील पुस्तक ती विद्या देवता असल्याचे पुरेसे प्रमाण आहे. पण याही पेक्षा विशेष म्हणजे तिच्या भोवताली जी कमलदलें काढलेली आहेत त्यांत सूत्रकृताङ्ग, समवायाङ्ग, वगैरे ग्रंथाचा पदसंख्येपूर्वक नामोल्लेख केलेला आहे. (चित्र १८७)२९

प्रस्तुत विषय संपविण्याच्या आधी तीन विशेष प्रकारच्या जैन प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

सवस्त्र तीर्थंकर प्रतिमा :

साधारणपणें सर्वच तीर्थंकर प्रतिमा दिगंबर म्हणजे पूर्ण नग्न असतात, पण त्याला काही संप्रदायांत अपवाद आहेत. सुमारे दहाव्या शतकांतील मध्यभारतांत मिळालेली एक चतुर्विंशतिकी प्रतिमेत (ल.सं.सं.जे. ९४९) आदिनाथ तलम पण व्यवस्थित वस्त्र नेसलेला दाखविला आहे.

मध्यभारतांतूनच मिळालेली सुमारे बाराव्या शतकाची आदिनाथाचीच सवस्त्र प्रतिमा झुरिखच्या संग्रहालयांत आहे.

गोमटेश्वर :

38

कर्नाटकांत श्रवण बेलगोला येथे चामुंडरायाने स्थापित केलेली गोमटेश्वराची जगप्रसिद्ध प्रतिमा आहे. गोमटेश्वर याची गणना तीर्थंकरांत होत नसली तरी जैन परंपरेत त्याचा मोठा सन्मान आहे. खड्गासनांत तप करणाऱ्या या महापुरुषाची एवढी तयारी झाली होती की शेजारच्या लता आणि वेली स्थाणुवत उभ्या असलेल्या त्याचा देहाला विळखा घालीत वर चढल्या. त्यामुळे गोमटेश्वराच्या प्रतिमांची ओळख तिच्या वर दाखविलेल्या लतावल्लरीने होते.

आदि मिथुन किंवा जुगलिया :

18-871

सृष्टीला चालू करणाऱ्या आदिमिथुनाचा मान प्रत्येक धर्मात आहे. उत्तरेत अशा कित्येक प्रतिमा मिळाल्या आहेत ज्यात एका वृक्षाखाली एक जोडपें सुखासनात बसले आहे, खाली मुले खेळत आहेत, झाडावर काही ठिकाणी घोरपडीसारखा एखादा प्राणी चढत आहे आणि झाडाच्या वर बारकेसे जिनबिम्ब ही विद्यमान आहे. (चित्र १८८) हे जोडपे जुगलिया अर्थात् आदियुगल या नांवाने ओळखले जाते.

***
[04/02, 9:44 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र

नारायण आणि बलदेव :

बावीसावा तीर्थंकर नेमि किंवा अरिष्टनेमी याचे बरोबर नारायण आणि बलदेव हे कुषाण काळांपासूनच दिसतात (म.सं.सं. ३४.२५०२, म.सं.सं.जे. ४७, जे. ११७ वगैरे) मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने यांच्यात आणि ब्राह्मण धर्मातील नारायण किंवा विष्णु बलराम ह्यांच्यात काहीच फरक नाही. गुप्तकाळांत व मध्यकाळांतही ही जोडी अशीच दिसते (चित्र १७९).

सरस्वती :

मथुरा येथील कंकाली टील्यातून मिळालेली जैन सरस्वतीची अभिलिखित प्रतिमा अद्वितीय आहे. कुषाण काळातील या मूर्तीचे विस्तृत वर्णन मागे झाले आहे. (पान २३६ चित्र १८३)

गजलक्ष्मी :

कंकालीटील्यातूनच कुषाणकालीन गजलक्ष्मीच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. यांचे विवेचन शक्तीप्रकरणांत झाले आहे (पान २१९). यापैकी काही प्रतिमा जैन संप्रदायाशी संबंधित असणे शक्य आहे.

चक्रेश्वरी :

प्रथम तीर्थंकर ऋषभ याची ही शासनयक्षी, हिच्या हातात चक्र असल्यामुळे हिला हे नांव प्राप्त झाले. हिचे वाहन गरुड होय. चक्रेश्वरी आणि चक्रेश्वरी विद्या या दोघींची ध्याने बरीच सारखी आहेत, फरक इतकाच असतो की विद्यादेवीच्या चारी हातात चक्रे असतात, चक्रेश्वरीच्या हातात अन्य आयुधें ही दिसतात. बऱ्याच ठिकाणी चक्रेश्वरी चतुर्भुजच दिसते पण त्याबरोबरच २,६,८,१०,१२,१६ आणि २० पर्यंतच्या चक्रेश्वरी प्रतिमाही पाहण्यात येतात २४ (दहा हातांची चक्रेश्वरी म.सं.सं.डी.६).

चक्र आणि गरुड यामुळे देवीच्या स्वरूपाचे ब्राह्मण धर्माच्या वैष्णवीशी थोडे फार साम्य उत्पन्न झाले आहे.

अंबिका :

श्वेताम्बरमते ही नेमीची शासनयक्षी आहे. उत्तरभारतात हिच्या बऱ्याच प्रतिमा मिळतात २५. लक्षण ग्रंथांप्रमाणे सिंह हिचे वाहन असून आंबा, पाश, मूल आणि अंकुश हिची मुख्य आयुधें होत. प्रत्यक्ष प्रतिमात मात्र हिची द्विभुज (ल.सं.सं.जी. ३३) आणि चतुर्भुज (ल.सं.सं.जी. ३१२) रूपें दिसतात. ही आंब्याच्या वृक्षाखाली बसलेली असून हिच्या हातात आम्रलुंबी किंवा आंब्याचा झुपका असतो.

हिचे ब्राह्मण धर्माच्या स्कंदमातेशी बरेच साम्य आहे.

पद्मावती (चित्र १८६) :

ही पार्श्वनाथाची शासनदेवी, हिची एक ओळख म्हणजे डोक्यावरची सापाची फणा ही होय. साधारणपणे ही चतुर्भुज असते. (ल.सं.सं.जी. ३१६). पण दिगंबर परंपरेत हिची सहा आणि चोवीस हातांची ध्यानें विद्यमान आहेत. २६

सिद्धायिका :

शेवटल्या तीर्थंकराची म्हणजे वर्धमान महावीराची ही शासन देवी चतुर्भुज असून सिंहावर बसलेली असते, पण मूल मात्र हिच्या जवळ नसते.
[04/02, 9:44 pm] Swapnil Jirage: जैन प्रतिमा

४३१

या सर्वांचे विवेचन करणें हा आपला उद्देश नाही व येथे ते संभवही नाही. तेव्हां काही ठळक देव, देवी आणि यक्ष यापर्यंतच आपण स्वतःला सीमित ठेऊ.

नेगमेश किंवा हरिनेगमेशिन् २१ (चित्र १८२)

बकऱ्याचे तोंड असलेला हा देव देवांच्या पायदळ सेनेचा मुख्य होय. ब्राह्मण जातीची स्त्री देवनंदा हिच्या गर्भातून महावीर वर्धमानाचा भ्रूण संक्रमित करून क्षत्राणी त्रिशलेच्या गर्भात पोचविण्याचे कार्य नेगमेशाने केले होते.

कुषाणकाळी मथुरेच्या क्षेत्रात याची पूजा बरीच प्रचलित असावी. यांच्या लहान व मोठ्या आकाराच्या प्रतिमा मथुरा व लखनऊच्या संग्रहालयात आहेत (ल.सं.सं.जे. ६२६, मधुरा सं.सं. ३४.२५४७, १५.१११५). याला बकऱ्याचे तोंड असून दोन हात असतात पण हातात आयुध किंवा वाहन, वगैरे विशेष काहीच नसते. कुषाण काळानंतर मात्र हा देव एकदम दडी मारून बसतो याचे वैशिष्ट्ये म्हणजे यांच्या प्रतिमेंत अंगाखांद्यांवर लहान मुलें दिसतात. ब्राह्मण धर्मांत नेगमेशाचा संबंध कुमार किंवा कार्तिकेयाशी होता हे आपण पाहिले आहेच.

रेवती :

जैन परंपरेप्रमाणे रेवती ही नेगमेशाची शक्ती होय. हिचे तोंड बकरीचे असते. मथुरा संग्रहालयात असलेल्या प्रतिमेत (सं.सं.ई. ४) ही मुल घेतलेली आढळते.

नेगमेश आणि रेवती हे दोघे आपण मागे विवेचन केलेल्या कार्तिकेय व माता यांच्या गोतावळ्यातलेच वाटतात.

यक्ष :

यक्षांविषयी थोडी चर्चा मागे झाली आहे. जैनांकडे तीर्थंकराच्या परिवार देवता म्हणून यक्ष-यक्षिणींना स्थान आहे. पुढील तक्त्याने ही गोष्ट जास्त स्पष्ट होईल.
[04/02, 9:44 pm] Swapnil Jirage: बलभद्र -

चक्रवर्ती -

वासुदेव -

जैन प्रतिमा

श्रेयांस, वासुपूज्य, विमल, अनंत, धर्म, शांती

कुथु, अर, मल्लि, सुव्रत, नमि, नेमि, पार्श्व, महावीर

अचल, विजय, भद्र, सुप्रभ, सुदर्शन, आनंद, नंदन, पद्म, राम

भरत, सागर, मधवा, सनत्कुमार, शांती, कुंथ, अरह, सुभौम, प्रद्य, हरिषेण, जयसेन, ब्रह्मदत्त

त्रिपृष्ठ, द्विपृष्ठ, स्वयंभू, पुरुषोत्तम, पुरुषसिंह पुरुषपुण्डरीक, दत्त, नारायण, कृष्ण

प्रतिवासुदेव -

अश्वग्रीव, तारक, मेरक, मधु, निशुंभबली, प्रल्हाद, रावण, जरासंध

एकूण शलाका पुरुष

भीमादि नारद

भीमबली इत्यादि रुद्र

बाहुबली वगैरे कामदेव

प्रत्येक तीर्थंकराचा पिता, एकूण

प्रत्येक तीर्थंकराची माता, एकूण

प्रतिस्वाति वगैरे कुलकार



४२९

(মামা)





६३

1 2



११

२४

२४

२४

१४

१०६

जैन देवतासंघाचा पसारा किती मोठा आहे याची थोडीशी कल्पना देण्यांकरिता त्याचे तिसऱ्या पद्धतीचे वर्गीकरण पुढील तक्त्यांच्या रूपाने देत आहे.

115 818

His Fay in forms the taste marked on agr shallow things
[04/02, 9:45 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिशास्त्र

क) अष्टमंगले' : जैनकलेंत कुषाण काळांपासून अष्टमंगलांचे चित्रण मिळते. जैनांप्रमाणे बौद्ध व ब्राह्मण धर्मातही अष्टमंगल चिन्हांना मान्यता आहे, पण त्यांच्या याद्यांत मात्र काही फरक आढळतात. जैन कलेत आयगपट्टावर दिसणारी आठ चिन्हें म्हणजे (१) माशांची जोडी (मीनयुगल) (२) स्वस्तिक (३) झाकण ठेवलेली भरलेली वाटी (शरावसंपुट) (४) श्रीवत्स (५) पूर्णघट (६) फुलाची टोपली (पुप्फ पडलग) (७) विमान (८) तिवईसह पोथी.

तिलोयपणत्ति ही यादी थोडी निराळी देते." ती अशी १) भृंगार (झारी), २) कलश ३) दर्पण ४) चामर ५) ध्वज ६) छत्र ७) व्यजन ८) सुप्रतिष्ठित (आसन).

ख) सोळास्वप्ने " जैन मान्यतेप्रमाणे शलाका पुरुषांच्या माता ते गर्भात आले असतांना मंगल स्वप्नें पाहतात. शलाका पुरुषाच्या स्तरांप्रमाणे त्यांचा आकडा बदलतो. उदाहरणार्थ तीर्थंकर माता सोळा स्वप्नें पाहते तर बलदेवाच्या आईस चारच दिसतात. तीर्थंकर मातेची सोळा स्वप्ने खालील होत :

ऐरावत, बैल, सिंह, देवी पद्मा श्री (गजलक्ष्मी), फुलांच्या दोन माळा, चंद्र, उगवता सूर्य, कमळांनी भरलेले दोन पूर्ण कुंभ, मीनमिथुन, पुष्करिणी, उसळणारा समुद्र, सिंहासन, विमान, नागेन्द्रभवन, रत्नराशी, निघूम अग्नी. कुठे कुठे जैन मंदिराच्या दारांवर ही सोळा स्वप्ने कोरलेली दिसतात.

ग) सिद्धचक्र किंवा नवदेवता : पंचपरमेष्ठी आणि सम्यक्ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चरित आणि सम्यक् तप ही चार पदे असे मिळवून हे नवदेवता चक्र तयार करीत असतात. ही चक्रे जैन संघात पूजनार्थ ठेवलेली असतात.

घ) समवसरण : प्रत्येक तीर्थंकराची देशना किंवा उपदेश ऐकण्याकरिता एका विशाल स्थनांवर देव, मनुष्य, पशू, वगैरे एकत्र होत असतात व चारी दिशांकडे निर्धारित स्थानांवर बसतात. उपदेश देणारा जिन सर्वांना समान रूपानेच दिसत असतो. या विशाल स्थळाची रचना म्हणजेच समवसरणांची रचना होय. समवसरणांची प्रतीकें तयार करून पूजेंत ठेवीत असत. सर्वतोभद्रप्रतिमा (तीर्थंकर चौमुखी) आणि दिगंबर संप्रदायांत दिसणारे मानस्तंभ हे सगवसरणांपासून उचललेले सुलभ असे अभिप्राय आहेत.

जैन देव आणि देवी

तीर्थंकर प्रतिमा नंतर त्यांचे यक्ष, शासन देवी आणि इतर प्रतिमांचा विचार करू.

कोणताही तीर्थंकर स्वतः कोणत्याही प्रतिमेचे पूजन करीत नाही. मानवी स्वभावाप्रमाणें त्याचे अनुयायीच त्याचे पूजन करू लागतात. जैन देवता संघाचा उगम मूळ तीर्थंकर प्रतिमांपासून आहे. चोवीस तीर्थंकर, आणि प्रत्येकाचा एक यक्ष आणि एक शासन देवी असा पसारा वाढत जातो; श्वेताम्बर आणि दिगंबरांच्या मतभिन्नतेमुळे त्याचा विस्तार आणीकही मोठा होतो. हा सर्व विस्तार तक्त्याच्या रूपाने पाने ४२६-४२७ वर दाखविला आहे. याला आपण प्रथम वर्गीकरण म्हणू.

या शिवाय जैन उपास्यांचे एक दुसरेही वर्गीकरण महत्त्वाचे आहे ते खालील प्रमाणे होय".

* तीर्थंकर -

ऋषभ, अजित, संभव, अभिनंदन, सुमति

पद्मप्रभ, सुपार्श्व, चंद्रप्रभविष्ण

२४

४२८
[04/02, 9:45 pm] Swapnil Jirage: जैन प्रतिमा

४२५

मध्यकालीन तीर्थंकर प्रतिमा :

या काळांत जरी स्वतः तीर्थंकराच्या प्रतिमेत काही फरक झाला नाही, तरी प्रतिमेच्या सजावटीत मात्र कित्येक फरक झाले (चित्रे १७९-१८०). जैन ग्रंथात जागोजागी त्या अलंकरणादिकाचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ बृहत्कल्पसूत्राच्या मासकल्पप्रकृतिसूत्रांत जिनबिंबाच्या खालील अलंकरणांचा उल्लेख सापडतो.'

१) चेइयदुम (चैत्यद्रुम) : तीर्थंकराच्या मस्तकावर असलेला वृक्ष.

२) पेढ छंदग (पीठ देवच्छन्द) प्रभावळी वर असलेल्या रथिका.

३) छत्ते (छत्र): जिनांच्या मस्तकांवरील छत्र.

४) चामराओ (चामरें) : तीर्थंकराच्या आजुबाजूस उभे असलेले चामरवर यक्ष, उत्तरमध्यकाळाच्या विशेषतः दक्षिण भारतीय प्रतिमांत चामर घेतलेले यक्ष न दाखविता नुसत्याच चौऱ्या दाखवितात.

५) आसण (आसन): जिनांचे मुख्य आसन किंवा सिंहासन.

६) अन्न करणिज्जं (अन्य करणीयम्) इतर अलंकरणें जसे, दोन हरिणांच्या मधे ठेवलेले धर्मचक्र, शासन देव, नवग्रह, इत्यादि.

७) देवदुंदुभि : जिनांच्या छत्रावर एक किंवा एकाधिक देव ढोलके वाजवतांना दिसतात. कधी कधी हा देव इतका अलंकारिक असतो की त्याचे डोके व ढोलके एवढेच दिसते.

८) देव, विद्याधर वगैरे : छत्राच्या दोन्ही बाजूला हत्तीवर बसलेले इंद्रादि देव व आकाशांत माळा घेऊन उडणारे विद्याधर मध्यकाळांत बरेच दिसतात.

९) यक्ष शासनदेवी : तीर्थंकराच्या आसनाजवळ, पायशिळेवर किंवा इतरत्र त्या तीर्थंकराचा यक्ष व शासन देवी आढळते; पण हे अनिवार्य मात्र नाही.

१०) पञ्चपरमेष्ठिन् : बऱ्याचशा तीर्थंकर प्रतिमांत मुख्य जिनाच्या आजुबाजूस चार जिनासारख्या प्रतिमा दिसतात. हे पांच मिळून पंचपरमेष्ठिन् हा गट (म्हणजे अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू) तयार होतो.

११) दोन हरिणांच्या मधे असलेले धर्मचक्र: मूळचे हे बौद्ध प्रतीक बुद्धाने सारनाथ (वाराणसी) येथे केलेल्या धर्मचक्र प्रवर्तनांकडे संकेत करते. मध्य काळांत धर्मचक्राच्या साम्यामुळे जैनांनी ही ते उचलले.

१२) चतुविंशतिका किंवा चौबीसी (चित्र १८१) सर्व तीर्थकरांना एकत्र अंकितकरणारी प्रतिमा चतुर्विंशतिका या नावाने ओळखतात. हिच्या रचनेत साधारणतः आदिनाथ मधे आणि इतर तेवीस आजुबाजूला असतात. कारीतलाई (जि. जबलपूर म.प्र.) येथून कलचुरी काळांतील (सु. १०-११ वे शतक) बरीच जैन शिल्पे मिळाली आहेत. त्यांत आदिनाथाच्या ऐवजी पार्श्वनाथाला मधोमध दाखविणाऱ्या चतुविंशतिका आहेत.''

१३) लांछन : बहुतेक पायशिळेवर यांचे अंकन करतात.

मध्यकाळातील जैनोपासनेची इतर प्रतीकें :

काही जैनप्रतीकांची चर्चा मागे केलीच आहे. मध्यकाळांतील इतर उल्लेखनीय प्रतीकें खालील होत :

जैन प्रतिमा

४३९

चतुर्भुजध्यानासाठी पहा रूपमण्डन ६. १९, पान २०८; पृ. १०१ टीप ५.

२६

Shah 9 p. 13

२७

Shah 4

२८

Shah U.P. Ksetrapala in Jain Iconography, श्री महावीर स्मृतिग्रंथ (भाग १) १९४८-४९, आगरा पृ. २२१-२६

२९

शास्त्रांच्या अशा याद्या वस्त्रांवर किंवा धातूंच्या तुकड्यांवर लिहून ठेवण्यांची पद्धत जैनांत आहे. प्रो. क्लास ब्रून यांनी लेखकाला ६ मार्च १९७४ रोजी लिहिलेल्या पत्रांत ललितपुर (उ.प्र.) येथील मंदिरात संभवतः क्षेत्रपाल मंदिरात असलेल्या अशा याद्याची नोंद केली आहे.

या शिळाखण्डावर डॉ. उमाकांत शहा यांचे मत नक्कीच हा जैन श्रुतस्कंध यंत्राचा तुकडा आहे. त्याच्यावर श्रुतदेवता (सरस्वतीचें चित्र) आहे. तूर्त हे सांगता येणार नाही की हे शिल्प दिगंबर परंपरेला अनुसरून आहे अथवा श्वेतांबर - लेखकाला लिहिलेले डॉ. शहाचे इंग्रजी पत्र. JISOA/181 दि. ५ नोव्हेंबर १९७४

***
[04/02, 9:43 pm] Swapnil Jirage: ४३८

भारतीय मूर्तिशास्त्र

टिपा आणि संदर्भ

जैन प्रतिमा

१ Shah 1, pp. 4-5; Shah 9

२ Joshi 25

३ उदाहरणार्थ Shah 1, PI. XXXVI. Fig. 88; ल.सं.सं. J 105 या साधूंच्या पोटाकडे वळवलेल्या डाव्या हातांवर वस्त्राची एक अरुंद पट्टी अशा खुबीने टाकलेली असते की साधूची नग्नता सहज तिच्या आड लपून जाते.

४ उदाहरणार्थ Shah 9, Fig. 3

५ Shah 1, PI. VII, Fig. 18

६ Shah 9 p 6

७Joshi 27, p. 183

८ कंकाली टीला, मथुरा येथून मिळालेल्या कुषाण कालीन जैन कलाकृतीचा बराच मोठा संग्रह लखनऊ येथील राज्य संग्रहालयांत व थोडा मथुरेच्या संग्रहालयांत आहे.

९ Shah 1, pp. 65-76

१० Shah 1, p. 61

११ Gupte 1, pp. 177-78

१२ बृहत्कल्पसूत्र, मासकल्पे प्रकृतिसूत्र, १, ११, ८० भावनगर, १९३६, पान ३६६; Joshi N.P. Some Interesting Passages from Brhatkalpasutra, BMA., 8 December 1971 pp. 55 56

Shah 9, pp. 8-9 १३

बालचंद्र जैन, कारीतलाई की जैन कलाकृतियाँ, पहा जोशी २९ १३

१४ Shah 1, pp. 109-112

१५ तेच पान १११

१६ तेच पार्ने १०५-११२

१७तेच पार्ने ९७-१०३

१८ तेच पार्ने ८५-९५

१९ त्रिषष्ठोशलाका पुरुष चरित्र Oriental Institute, Baroda, 1962; Shah 9 p 10

१९ डॉ. हीरालाल जैन, भारतीय संस्कृति में जैनधर्म का योगदान, भोपाल, १९७२ पृ. १०

२० Bihler 1, pp. 72-74

२१ Bhattacharya 1, pp. 178-81

२२ Gupta 1, pp. 179-80

२३ तेच पाने १८१-८२

२४ Shah 6

२५ Shah 9, p. 12 अपराजितपृच्छा, २२१.३६ पान ५६८ येथे फक्त द्विभुज अम्बिकेचा उल्लेख आहे.


























आहे.








































































































































































































१८. सुरसुंदरी (भाग १)










No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...