सातवाहन कुळाचे मुळ कोणते ?
सातवाहनांच्या प्रारंभकाळाबद्दल अनेक वाद आहेत, त्याचप्रमाणे हे घराणे महाराष्ट्रीय की आंध्र, वर्णाने ते ब्राह्मण, क्षत्रिय, की शूद्र, शालिवाहनशकाशी त्यांचा संबंध जोडणे कितपत युक्त आहे, या घराण्यात मातृवंशपरंपरा होती काय याबद्दलही खूप वाद आहेत. या वादामध्ये डॉ. रा. गो. भांडारकर ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन ), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ व २), डॉ. सुखटणकर (दि होम ऑफ दि सो कॉल्ड आंध्र किंग्ज, भांडारकर इन्स्टिटयूट, व्हॉ १, सुखटणकर मेमोरियल एडिशन, पृ. २५१), स. आ. जोगळेकर ( गाथासप्तशती - प्रस्तावना आणि दि होम ऑफ दि सातवाहनाज्, ॲनल्स् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, १९१७-४२, पृ. १९६ ), डॉ. के. गोपाळाचारी (अर्ली हिस्टरी ऑफ दि आंध्र कंट्री आणि कांप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १० वे ), डॉ. डी. सी. सरकार ( दि हिस्टरी अंड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड २ रा, भारतीय विद्याभवन - मुंबई, प्रकरण १३ वे ), विद्या- सागर बखले ( राजवाडे व शालिवाहन राजे, विविध ज्ञानविस्तार, मार्च व डिसें. १९२७ ), महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ( संशोधन मुक्तावली, सर १ ला व २ रा ) अशा मोठमोठ्या पंडितांनी भाग घेतला आहे.
सातवाहन घराणे मुळचे महाराष्ट्रीय होते असे मत मांडणार्या तज्ज्ञांची बाजु समजून घेउया.
महाराष्ट्रीय घराणे :-
सातवाहन हे महाराष्ट्रीय की आंध्र आणि त्यांचे मूळस्थान कोणते हा वादाचा पहिला प्रश्न आहे. पुराणात या वंशाला आंध्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे शिलालेख व नाणी यांचा शोध लागेपर्यंत हे आंध्रप्रदेशीय म्हणजे तेलंगणातले राजघराणे आहे व त्याचे मूळस्थान त्या प्रदेशातले आहे असा समज रूढ होता. पण शिलालेख व नाणी उपलब्ध झाल्यावर सर्वच चित्र पालटले. त्यावरून असे दिसून आले की कोणत्याही शिलालेखात वा नाण्यावर सातवाहन स्वतःला आंध्र म्हणवीत नाहीत. पुराणांखेरीज चुकूनसुद्धा त्यांना कोठे आंध्र म्हटलेले नाही. खारवेल, शक, कदंब यांचे हाथीगुंफा, गिरनार, तलगुंडा येथे शिलालेख आहेत. त्यांतही 'सातवाहन' असेच या वंशाला म्हटलेले आहे, आंध्र म्हटलेले नाही. दुसरे असे की सातवाहनांचे प्रारंभीचे सर्व शिलालेख नाशिक, कार्ले, नाणेघाट, कान्हेरी या महाराष्ट्रातील गावी सापडले आहेत. त्यांच्या साम्राज्याच्या अगदी उत्तर काळातील फक्त चार शिलालेख आंध्रप्रदेशात आहेत. प्रारंभीची नाणी सापडली तीही सर्व पश्चिम हिंदुस्थानातच सापडली. वसिष्ठीपुत्र पुलुमायी याचा शिलालेख व याची नाणी आंध्रप्रांतात आहेत. हा उत्तरकालीन राजा होय. यांवरून पंडितांनी असा निष्कर्ष काढला आहे की पुराणे लिहिली गेली त्या काळी सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रप्रदेशातच शिल्लक राहिली होती; तेवढ्यावरून पुराणांनी त्यांना आंध्र ठरविले असावे. वास्तविक ते मूळचे महाराष्ट्रीय होत.लीलावई(लीलावती) या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने गाथासप्तसईकार(सप्तशतीकार) हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान(पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट(मराठी) होत्या असे वर्णन केले आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत सातवाहन राजा कुंतल प्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो असा उल्लेख केला आहे. या पुराव्यांवरून सातवाहन हे महाराष्ट्रीय होते हे पटायला हरकत नाही.

कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
उत्तरकालीन सातवाहनांचे फक्त चार शिलालेख आंध्रात सापडले आहेत. याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती .
सातवाहन आंध्रभृत्य :-
आता सातवाहन हे मुळचे आंध्र प्रदेशातील होते असा तर्क मांडणार्या तज्ज्ञांची बाजु समजून घेउया.पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" (औंड्र...ओंडर...आंदर...मावळ) असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
भाषा
आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे.
सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत. या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत.
राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते. विमल सुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य “पउमचरीय’, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखा नितांतसुंदर काव्यसंग्रह, “तरंगवई”, “पउमचरीय”सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली.
कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
सातवाहन - मूळ पुरुष
सातवाहन हे कोणत्या जाती, धर्माचे होते?

सातवाहन घराण्यात एकुण तीस राजे झाले. सातवाहन हे आगम (शैव ) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की समाजात बंडाळी माजलेली असताना या वंशाने हातात तलवार घेतलेली दिसते आणि त्याचेच अनुकरण पुढे अनेक वर्षांनी मराठ्यांच्या इतिहासात झाले. असो! पण त्याकाळचा ब्राह्मण समाज हा तितका कर्मठ नव्हता हे त्यानी दुसऱ्या जातीतील केलेल्या विवाहांवरून स्पष्ट होते. नागनिका तसेच महाक्षत्रप रुद्रदमन याची कन्या या काही ब्राह्मण नव्हत्या.
आपल्या कार्यकाळात त्याने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केले. याच्या कारकिर्दीत मध्य भारत सातवाहनांच्या अधिपत्त्याखाली असल्याचे आढळते. तो वैदिक धर्माचा पोषक असून अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीतही त्याचे धोरण उदार होते. त्याने बौद्धांच्या तत्कालीन संघांना बरीच मदत केली होती. सध्या मुंबई येथील कार्ले नावाच्या बौद्ध संघाला त्याने त्यावेळी करजक नावाचे गाव दान केले होते. त्याने आपल्या कालखंडात अनेक नाणी पाडली. त्यातील बर्याचशा नाण्यांवर सत्करणीचा चेहरा मुद्रित केलेला आढळतो. त्याने जवळपास २० वर्षे शकांबरोबर संघर्ष केला. अखेर नाशिकमधील गोवर्धनजवळ त्याने शक राजा नहपान याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. या युद्धानंतर सातवाहनांचा उत्कर्ष सुरू झाला. शक राज्यकर्ता नहपानच्या पराभवानंतर सत्करणीने त्याचे सर्व शिक्के ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्याचे मुद्रण केले.

या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा एक कयास , त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही. हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो). परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे त्या शिलालेखामध्ये म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते.
दुसरे शक्यता अशी की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत नव्हती. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात. यातही असे मत मांडले जाते कि बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.

सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील शिलालेखाविषयीच्या सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत. समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
तर कही तज्ज्ञांच्या मते काही उत्तर भारतीय इतिहासकारांनी नाशिक शिलालेखाचा ज्याला नाशिक प्रशस्ती म्हटले जाते याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना ब्राह्मण घोषित तर केलेच पण क्षत्रिय विरोधी देखील घोषित केले. नाशिक प्रशस्ती मध्ये क्षत्रियांचा मानमर्दन केला असा उल्लेख आहे असं यांचं म्हणणं आहे पण जे स्वतःच क्षत्रिय आहेत ते स्वतःच्याच वर्णातील लोकांचे मानमर्दन का करतील…? आणि सातवाहनांची लढाई कुठल्या क्षत्रियांबरोबर झाली..? त्यांची लढाई तर विदेशी शकां बरोबर झाली आणि हे शक स्वतःला क्षत्रप म्हणत होते. तर त्या शिलालेखात सातवाहनांनी शकांचे म्हणजे क्षत्रपांचे मानमर्दान केले असे वर्णन आहे. तर त्याचा चुकीचा अर्थ क्षत्रप ऐवजी क्षत्रिय असा यांनी काढला.
दुसरी गोष्ट त्या शिलालेखात ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आहे तर ब्राह्मणांना भूमिदान व दान धर्म केले असा तो उल्लेख आहे याचा अर्थ त्यांनी ते स्वतः ब्राह्मण आहे असा लावला.
सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा फक्त क्षत्रिय असतो त्यामुळे सातवाहन हे क्षत्रियच होते 450 वर्ष इतक्या दीर्घकाळ राज्य करणे व विदेशी आक्रमकांपासून साम्राज्याचे रक्षण करणे हे क्षात्र तेज एका क्षत्रियातच असते.
सातवाहनांच्या इतिहासाची साधने :-
सातवाहनांच्या इतिहासाची साधने कोणती याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपल्याला सातवाहन कळणार नाहीत आणि मग या राजाचा संदर्भ कुठून आला वगैरे प्रश्न उपलब्ध होतील. जी अत्यल्प साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून मग सातवाहन यांच्याविषयी काही तर्क आपण मांडू शकतो.सातवाहनांच्या इतिहासाची साधने जर आपण पाहायला गेलो तर त्यात मुख्यत्वे, लेण्यांमध्ये असणारे ब्राह्मी लिपीतील शिलालेख, विविध सातवाहन राजांची आढळणारी नाणी, हल सातवाहन राजाने लिहिलेली गाथा सप्तशती आणि विविध पुराणातील सातवाहन राजांचा उल्लेख एवढीच काय ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. अर्थात पुराणात पण कालावधीनुसार बदल होत गेले त्यामुळे पुराणे किती ग्राह्य धरणार हा प्रश्न राहतोच .
लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-
महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत. काही बौद्ध धर्मीय आहेत, काही हिंदू आहेत तर काही जैन. या लेण्यांमध्ये भरपूर शिलालेख कोरलेले आहेत. यातील बहुतांश लेख हे बौधधर्मीयांचे आहेत. समाजातील सर्व घटकांचे लेख यात कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर हे लेख कुठे आढळतात? त्यांचे स्थान कुठे असते?- हे लेख लेण्यांमधील प्रवेशद्वारावर, आतील तसेच बाहेरील भिंतींवर, स्तुपांवर, पाण्याच्या टाक्यांवर दिसून येतात. हे लेख प्रामुख्याने दानाविषयी आहेत परंतु काही लेख जसे की नाणेघाटातील नायनिका हिचा लेख किंवा पांडवलेण्यातील बलश्रीचा लेख हे सातवाहन राजघराण्याची माहिती देतात. बौध लेखांच्या मानाने हिंदू लेख आणि जैन लेख यांची संख्या फारच कमी आहे.
या लेखाची लिपी ही ब्राह्मी असून, भाषा ही प्राकृत आहे. या लेखांमधील काही लेख हे अगदीच लहान म्हणजे एक-दोन ओळींचे आहेत तर काही लेख हे खूपच मोठे म्हणजे अगदी १०-११ ओळींचे सुद्धा आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर नाणेघाट तसेच पांडवलेण्यांतील शिलालेख. आता या लेखाचे स्वरूप कसे असते?- यातील काही लेख हे राजवंशीयांचे असतात तर काही लेख हे सामान्य लोकांचे असतात. राजघराण्यातील लोकांच्या लेखात सुरुवातीला ओम, स्वस्ति, नंतर राजाची स्तुती, पराक्रमाचे वर्णन आणि नंतर तो लेख कोरला जाण्याचे कारण हे नमूद केलेले असते. अर्थात हे सर्व ठिकाणी असेल असे नाही. सामान्य लोकांच्या लेखात, कधीतरी कालगणना, राजाचे नाव हे दिसून येते. पण मुख्यत्वे दिलेले दान आणि कुणी दिले हेच दिसून येते.
ब्राह्मी लिपी आणि तिच्या उगमाबद्दल बोलायचे झाले तर तो वेगळा विषय होईल त्यामुळे विस्तारभयास्तव या लिपीविषयी थोडक्यात जाणून घेउया.
महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा डोंगर भटकंती दरम्यान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असतो या पाऊल खुणा शोधत असताना आपल्या नजरेला बऱ्याच गोष्टी येत असतात जसे कि वीरगळ, गद्धेगाळ, कोरीव लेण्यांमध्ये असलेले महत्वाचे शिलालेख तसेच किल्यांवर आढळणारे शिलालेख हा सर्व ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो.
अश्याच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'ब्राम्ही लिपी' मधले शिलालेख हे शिलालेख आपल्याला बऱ्याचदा लेण्यांच्या भिंतीवर, लेण्याच्या टाक्यावर, लेण्याच्या विहारात किंवा खाबांवर कोरलेले आपल्याला मिळतात अश्या या ब्राम्ही लिपीच्या शिलालेखांमधून आपल्याला प्राचीन भारताची संस्कृती समजण्यास मदत होते किंवा त्या काळातील एखाद्या व्यक्तीचे नाव समजायला आपल्याला मदत होते. ही ब्राम्ही लिपी वाचण्याचा शोध कसा लागला हे समजणे देखील खूप महत्वाचे आहे.
एखाद्या लेण्यामध्ये तसेच जे कोणतेही आजच्या काळामध्ये ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले लेख सापडतात ते वाचायचे कसे किंवा त्याचा अर्थ काय या गोष्टीचा शोध हा इ.स. १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनी मध्ये धातू तपासनीस म्हणून काम करणाऱ्या 'जेम्स प्रिन्सेप' या इंग्लिश माणसाने सांगितले आहे. या ब्राम्ही लिपीचा इतिहास हा फार मजेशीर आहे.
इ.स.पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशावर ग्रीक राजे राज्य करीत होते या ग्रीक राजांनी स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली होती. या ग्रीक कोरीव नाण्यांवर या ग्रीक राजांनी आपली नावे ही ग्रीक लिपी आणि ब्राम्ही लिपी मध्ये लिहिली होती 'बॅॅसिलीऑस पॅॅन्टॅॅलिऑन' या नावाबरोबर या राजाने आपले नाव 'रजने पतलवष' असे नाव ब्राम्ही लिपी मध्ये लिहिले होते हे नाण्यावरून आढळून आले आणि ब्राम्ही लिपी वाचता यायला लागली.
या ऐतिहासिक ब्राम्ही लिपीमधून एका अरेबिक लिपिशिवाय भारतामधील सगळ्या लिपी विकसित झाल्या आहेत म्हणूनच ब्राम्ही लिपी ही संपूर्ण लिपींंची जननी आहे असे आपल्याला दिसून येते. ब्राम्ही लिपीचा महत्वाचा जुना पुरावा म्हणजे 'सम्राट अशोकाचे' प्रस्तर लेख मानले जातात. यातला एक महत्वाचा प्रस्तरलेख हा महाराष्ट्रातील मुंबई जवळील सोपारा म्हणजेच आजचे 'नाला सोपारा' येथे आढळून आला हा महत्वाचा पुरावा मुंबई मध्ये राजा शिवछत्रपती संग्रहालय येथे ठेवलेला आहे.
अशोकाने हा लेख सोपारा येथे कोरण्याचे कारण म्हणजे सोपारा हे अशोकाच्या काळापासून महत्वाचे बंदर होते हे दिसून येते. तसेच नाणेघाटाच्या गुहेमध्ये जे नागणिकेचे शिलालेख आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासातले ब्राम्ही लिपीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे पहिले शिलालेख मानले जातात. अशी ही ब्राम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीची महती करून देणारी जननी आहे. असा हा ब्राम्ही लिपीचा रंजक इतिहास आपल्याला ही महत्वपूर्ण ब्राम्ही लिपी समजून घेतल्यावर आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडायला मदत होते.
प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ठरावीक भूभागांशी संबंधित आहेत. भौगोलिक कक्षेने मर्यादित आणि समकालीन नागरी वस्त्यांनी निर्देशित अशा प्रकारची चलनव्यवस्था या मौर्योत्तर कालखंडाचे एक वैशिष्ट्य मानायला हरकत नाही; किंबहुना हा नाणकशास्त्रीय परिणाम पूर्ण भारतभर दिसून येतो.
नाण्यांच्या पुराव्यांवरून त्यांचा उदय इ. स. पू. १५० च्या सुमाराला दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणात झाला, असे दिसते. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते. सातवाहन यायच्या आधी सुद्धा महाराष्ट्रात ठसा असलेली नाणी होती. पण सातवाहन राजांनी आपल्या नावाची नाणी पडली. या राजांची तांब्याची नाणी औरंगाबाद, हैद्राबाद वगैरे ठिकाणी सापडली आहेत तर शिशाची नाणी नेवासे, कोंडापूर या ठिकाणी सापडली आहेत. तसेच चांदीचा मुखवटा असणारी नाणी सुद्धा सापडली आहेत. यात प्रत्येक राजाचे नाणे वेगळे असे आहे. प्रत्येक राजाचा लेख वेगळा तसेच त्यावरील कोरलेल्या आकृत्या वेगळ्या.
सातवाहनकालीन नाणी-
त्यांतील वासिष्ठीपुत्र सिमुक (श्रीमुख) नावाच्या राजाने पैठण-नेवासे (मराठवाडा) प्रांत व्यापून तेथून उत्तरेला नाशिक आणि दक्षिणेला वाई-कऱ्हाड या भागांत आपला अंमल बसवला आणि सातवाहन घराण्याच्या साम्राज्यवर्धनाला सुरुवात झाली. त्यांची सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी विवक्षित अशा ‘हत्ती’ प्रकारची आहेत. सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष ‘सातवाहन’ याच नावाचा राजा होता, असे मत काही नाण्यांच्या आधारे वा. वि. मिराशी यांनी मांडले होते; पण नाण्यांचा अभ्यास करता ‘सातवाहन’ असे नाव असणारी बरीच उत्तरकालीन नाणीही आता ज्ञात झाली आहेत. ती घराण्याच्या नावाला लेखात प्राधान्य देऊन काढली असावीत. दक्षिण भारतात सातवाहनांनी प्रथम राजनामांकित नाणी पाडण्यास आरंभ केला. ती तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. त्यांना ‘कार्षापणʼ ही संज्ञा असून नागनिकेच्या नाणेघाटातील लेखात विविध श्रौत यज्ञांत हजारो कार्षापणांची दाने दिल्याचा उल्लेख आहे. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे. सिमुक सातवाहन राजा- या राजाच्या नाण्यात उजवीकडे सोंड करून असलेला हत्ती दिसून येतो तर त्याच्या मागे सिरी सादवाह असा लेख कोरलेला आढळून येतो. तर काही नाण्यात उजवीकडे उभा असलेला वृषभ, त्याच्या पाठीवर तीन टेकड्यांचा पर्वत आणि त्याच्या सभोवताली ‘रञो सिरी सातवाहनस’ असा लेख दिसून येतो. या नाण्याच्या मागील बाजूस डावीकडे एक चिन्ह, उजवीकडे एक वृक्ष व टेकड्या व नदी कोरली दिसून येते.सातकर्णीच्या उत्तर काळात त्याचे नाव सातवाहन घराण्यात उपनावाप्रमाणे वापरले जाऊ लागले. कोसिकीपुत्र सातकर्णी आणि कोछीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजांची माहिती मुख्यत्वे नाण्यांमुळे ज्ञात होते. या राजांचे राज्य फक्त महाराष्ट्राच्या काही भागांपुरतेच मर्यादित होते. या दोघांची नाणी हत्ती, सिंह, तीन कमानींचा पर्वत, इत्यादी चिन्हांनी मंडित आहेत. यानंतरच्या काळात सातवाहन घराण्याला उतरती कळा लागली आणि त्यांच्या महागामिक, महासेनापती, महाभोज इत्यादी मांडलिकांनी स्वतःची नाणी प्रचारात आणली.
रोमानांशी व्यापार सुरू झाल्यानंतर त्यांच्या चांदीच्या नाण्यांच्या रूपाने भारतात व्यापार होऊ लागला. या सुमारास शक क्षत्रपांनी सातवाहनांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामतः त्याचे पडसाद सातवाहन नाण्यांत उमटलेले दिसतात. शक राजा नहपान तसेच सातवाहन राजे शिव सातकर्णी आणि गौतमीपुत्र सिरी सातकर्णी यांनी एकमेकांची नाणी पुनर्मुद्रित केली. गौतमीपुत्र सातकर्णीने पुनर्मुद्रित केलेल्या नहपानाच्या नाण्यांचा एक मोठा साठा जोगळटेंभी (नाशिक जिल्हा) येथे सापडला (१९०७). गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीपासून सातवाहन साम्राज्याची नव्याने वाढ झाली आणि त्यांच्या नाण्यांचे स्वरूपही बदलले.

डावीकडे तोंड करुन गर्जणारा सिंह भोवती ब्राह्मी लिपीतील मजकुर सिरी सातकर्णी त्याच्या खाली तीन कमानी ज्या टेकडीचे प्रतिनिधित्व करतात
वाशिष्ठीपुत्र सातकर्णी याचे नाणेगौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू
नागनिकेचे नाणे
श्री यज्ञ सातकर्णीचे नाणे
गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र सिरी पुळुमावी (कार. इ. स. १०६-१३०) याने सर्वप्रथम स्वतःची छबी असणारी चांदीची नाणी प्रचलित केली. पुळुमावीच्या कारकिर्दीत सातवाहनांचा राज्यविस्तार दक्षिण आणि पूर्वेकडे झाला. या प्रांतात त्याने सिंह, तीन किंवा सहा कमानींचा पर्वत इत्यादी प्रकारांची नाणी काढली. याशिवाय पुळुमावीची साम्राज्यात सर्वत्र चालणारी ‘हत्ती’ प्रकारची नाणीही प्रचलित होती. साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेचे ‘नाणकीय केंद्रीकरण’ करण्याच्या दृष्टीने चांदीची छबीयुक्त नाणी आणि ही ‘हत्ती’ प्रकारची नाणी या दोन मूल्यांकांचे प्रचलन महत्त्वाचे ठरते.
स्कंद सातकर्णी- ‘सिरी खद सातकणिस’ असा लेख आहे, तर वशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिरी खद (सातकणिस)’ असा लेख दिसतो, यज्ञ सातकर्णी- ‘रञो सिरी यञ [सातकणिस] असा लेख आहे, तसेच विजय सातकर्णी- ‘[ज] य सातकणिस’ हा लेख.
आणि वशिष्ठीपुत्र चंद्रस्वाती- ‘रञो वासिठीपुतस सिरीचदसातिस’ असा लेख वाचता येतो.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती. या नाण्यांचे संशोधन व प्रकाशन प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी (१८९३—१९८५) यांनी प्रथम केले.
संचयातील ६८४ नाण्यांपैकी ६८२ नाणी शिसे या धातूची तर दोन तांब्याची होती. १९३९ साली सापडलेल्या सातवाहनांच्या तऱ्हाळे नाणेसंचयानंतर (१६०० नाणी) महाराष्ट्रात सापडलेला हा सर्वांत मोठा नाणेसंचय आहे. नाणेसंचयातील सर्व नाणी गोलाकार आहेत.

जोगळटेंभी येथील नहपानाचे नाणे.
नाणेसंचयाचे स्वरूप : या संचयात सापडलेल्या १३,२५० नाण्यांपैकी ९,२७० नाणी ही नहपानाचा समकालीन सातवाहन कुळातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या स्वतःच्या चिन्हांनी पुनर्मुद्रांकित (counter-struck) केलेली होती. गौतमीपुत्र सातकर्णी हा नहपानाचा शत्रू होता. त्याचा नहपानाबरोबर दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे पर्यवसान गौतमीपुत्राने नहपानाचा व पर्यायाने त्याच्या क्षहरात वंशाचा उच्छेद करण्यात झाले, असे उल्लेख तत्कालीन अभिलेखीय व साहित्यिक नोंदींमध्ये आढळतात. उर्वरित जवळपास ४,००० नाण्यांवर मात्र अशा प्रकारचे गौतमीपुत्र सातकर्णीचे अंकन आढळत नाही. प्राप्त साठ्यापैकी एकूण २,००० नाण्यांना भोके पाडली आहेत.
नाण्यांचे वर्णन : प्राप्त सर्व नाणी चांदीची असून १.८० ते २.१० ग्रॅ. वजनाची आहेत. फक्त नहपानाचे अंकन असलेल्या नाण्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाची टोपी घातलेली अर्धप्रतिमा आहे. राजाच्या प्रतिमांमध्ये वैविध्य आढळत असून राजाच्या तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रतिमा नाण्यांवर आढळतात. प्रतिमांचे अंकन वास्तवदर्शी व कौशल्यपूर्ण आहे. दर्शनी भागावरील गोलाकार कडेवर ग्रीको-रोमन लिपीतील लेख आहे. हा लेख म्हणजे नाण्याच्या मागील बाजूवरील ब्राह्मी व खरोष्ठी लिपीतील लेखांचे लिप्यंतर आहे. बऱ्याच नाण्यांवरील ग्रीको-रोमन लिपीतील लेख अशुद्ध रूपातील आहे. नाण्यांच्या मागील बाजूस नहपानाचा पूर्वज असलेल्या भूमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूवर आढळणारी वज्र व बाण ही चिन्हे आहेत. वज्र व बाणाच्या मध्ये टिंब आहे. मागील बाजूच्या गोलाकार कडेवर ब्राह्मी लिपीतील ‘राज्ञो क्षहरातस नहपानसʼ हा व खरोष्ठी लिपीतील ‘राञो छहरतस नहपनसʼ असे लेख आहेत. नाण्यांवर वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
गौतमीपुत्र सातकर्णीने पुन्हा अंकन केलेल्या नाण्यांचे वर्णन : नहपानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने आपले छाप मारलेले आढळतात. यामध्ये सामान्यतः दर्शनी बाजूवर चैत्य व गोलाकार कडेवर ‘राञो गोतमीपुतस सिरि सातकनिसʼ हा ब्राह्मी लिपीतील लेख आढळतो. तर मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. तथापि काही वेळा पुढील व मागील बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल झालेली दिसून येते. गौतमीपुत्राने केलेले अंकन ठसठशीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यावरील चिन्हांची वैशिष्ट्ये ओळखणे शक्य होते. चैत्य व उज्जैन चिन्हांमध्ये आढळणारी वैविध्ये बघता वेगवेगळे छाप वापरल्याचे लक्षात येते. तसेच काही नाण्यांवरील लेख सुस्पष्ट व नीटनेटके असून काहींवरील अक्षरे मोठी, वेडीवाकडी व अस्पष्ट असल्याचे दिसून येते. वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
नाणेसंचयाचे महत्त्व : नहपानाच्या काही फुटकळ नाण्यांच्या प्राप्तीनंतर प्रथमच एवढा मोठा नाणेसमुच्चय नाणेसंशोधकांना अभ्यासासाठी प्राप्त झाला. या उपलब्धीमुळे तत्कालीन नाणेपद्धतीवर तर प्रकाश पडतोच; पण त्याचबरोबर पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजवंशाच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश पडतो. पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण याद्वारे करणे शक्य होते. विशेषतः गोदावरी खोऱ्यातील या दोन राजवंशांचा संघर्ष अधोरेखित होतो. याबरोबरच तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठीही या नाणेसंचयाची मदत होते. या नाण्यांवरून नहपानाच्या राज्याची भौगोलिक सीमा ठरवता येते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा उच्छेद केल्यानंतरही त्याची नाणी पुन्हा अंकन करून चलनात आणल्याचे कळते. थोडक्यात तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून या नाणेसंचयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
चंद्रपूर येथील सातवाहनकालीन नाणी :-
ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती. या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.
नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.
एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही. मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लंडन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
तऱ्हाळे येथील सातवाहनकालीन नाणी :-
विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती. तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या – ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस किंवा सिरि सातकणि हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५ ग्रेन्स दरम्यान.
चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
स्कंद सातकर्णी : नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
शक सातकर्णी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली. तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.
तांब्याची नाणी : नाणेसंचयात तांब्याची केवळ दोन नाणी सापडली आहेत. ती दुसऱ्या ठिकाणाहून आली असावीत. यांपैकी एक नाणे गंजलेले आहे. त्याच्या दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती असून त्याच्या पाठीवर तक असा लेखाचा तुटक भाग दिसतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. हे नाणे बहुधा सातकर्णी नावाने शेवट होत असलेल्या सातवाहन राजाचे असावे. दुसरे नाणे तुटलेल्या अवस्थेत आढळले.
शिशाची नाणी : शिशाच्या ६८२ नाण्यांपैकी ३६९ नाणी वाशिष्ठीपुत्र शिव श्री पुळुमावी, १९१ नाणी वासिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णीची, तर उर्वरित १२२ नाण्यांवरचे लेख अतिशय अस्पष्ट असून ओळखता येत नाहीत.
शिवश्री पुळुमावीची नाणी : मिराशी यांच्या मते, शिवश्री पुळुमावी व वाशिष्ठिपुत्र पुळुमावी हे दोन भिन्न राजे नसून एकच आहेत; तथापि या बाबतीत दोन विभिन्न मतप्रवाह आढळतात व त्याप्रमाणे इतर नाणेसंशोधक व तज्ज्ञांच्या मते हे दोन भिन्न राजे होते. नाण्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा असून नाण्याच्या गोलाकार कडेवर रञो वासिष्ठीपुतस सिव- सिरी- पुळुमाविस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून काही वेळा उज्जैन चिन्हांच्या वर्तुळांवर चंद्रकोर आढळते. नाण्यांच्या आकारामध्ये व वजनांमध्ये वैविध्य आढळते.
स्कंद सातकर्णीची नाणी : स्कंद सातकर्णीच्या नाण्यांवर दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा व रञो वसिठी- पुतस खद- सातकणिस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्यांच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून त्यावरील वर्तुळांवर काही वेळा चंद्रकोर दिसून येते.
गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच सातवाहनाची देण आहे शकांचे दमन करणारा सातवाहन गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
वजन- २.४८ gram

गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे

त्या नाण्याची पाठची बाजु.


गाथा सप्तशती :-
तिसरे महत्वाचे साधन ठरते ते हल नावाच्या सातवाहन राजाने संपूर्ण भारतातून सुमारे एक कोटी गाथा गोळा करून सुमारे सातशे गाथांचा गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. खालील श्लोकातून हे स्पष्ट होते.सत्तसआइं कइवच्छेलेण कोडीअ मज्झआरम्मि।
हालणे विरइआइं सालंकारणं गहाणं॥
बाणाने आपल्या ‘हर्षचरित’ च्या सुरुवातीला या गाथेची स्तुती केली आहे. तो म्हणतो,
अविनाशनमग्राम्यकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभी: कोश रत्नैरीव सुभाषितैः ॥
पुराणे-
याशिवाय नंतरच्या काळात लिहिलेल्या विविध पुराणात सुद्धा सातवाहन राजांचा उल्लेख आला. मागच्या लेखात आपण संख्येत कशी विसंगती होती ते पाहिलंच. अर्थात ही सर्व पुराणे नंतरच्या काळात असल्याने त्यात बदल होत गेले आणि त्यांचे प्राथमिक संदर्भाचे महत्व तितकेसे राहिले नाही. परंतु शिलालेख, नाणी यांच्या जोडीला अभ्यास म्हणून मत्स्य, भागवत, विष्णू या सर्व पुराणांचा अभ्यास जरूर करावा.तर ही होती ‘सातवाहनांच्या इतिहासाची साधने’. मध्ययुगीन काळातील इतिहास जसा सहज आढळतो तशी सातवाहन कालीन साधने आढळत नाहीत. ती खूप कष्ट घेऊन शोधावी लागतात, प्रत्येक साधनांचे अन्वयार्थ लावून नीट मांडणी करावी लागते. तेव्हा कुठे सातवाहन कळायला लागतात.
नाणेघाट
नाणेघाट येथे, खिंडमार्गात, मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे अवशेष असून त्या प्रतिमांच्या वरील बाजूंस त्यांची नावे कोरलेली आहेत. येथील सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा व दानांचा प्रदीर्घ शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झाली असली, तरी त्यातील अवशिष्ट मजकुरावरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीवर बराच प्रकाश पडतो. येथील मुख्य लेण्याच्या मंडपात दोन बाजूंस बाके कोरलेली असून मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. मागील भिंतीत सातवाहन राजवंशातील सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या अशा : सिमुक सातवाहन, देवी नागनिका, श्रीसातकर्णी, कुमार भाय, महारठी त्रनकयिर, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन. यांपैकी एका जोडपुतळ्याच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा, असे वा. वि. मिराशी म्हणतात. तर शेवटचे दोन अनुक्रमे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकाचे लहान पुत्र होते आणि हे लेणे सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह असावे, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे.
नाणेघाट लेण्यात कोरलेला नागनिकेचा वर उल्लेखिलेला शिलालेख ब्राह्मी लिपीत असून प्राकृत भाषेत आहे. शिलालेखाच्या अक्षरवटिकेवरून या शिलालेखाचा काळ योहान ब्यूलर, मिराशी यांसारख्या पुराभिलेखविद्यावंतांच्या मते साधारणतः इ.स.पू. दुसरे-पहिले शतक असावा. या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.
पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.
पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. पुढे रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन, भगवानलाल इंद्रजी, ब्यूलर, मिराशी, अजयमित्र शास्त्री, शोभना गोखले प्रभृतींनी या शिलालेखाचे वाचन करून अन्वयार्थ लावले आहेत.
हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.
हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.
सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.
महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.

नाणेघाटातील राणी नागनिकेचा शिलालेख आणि सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह यांना प्राचीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने नाणेघाटाला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.
एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.
अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.
नाशिकची त्रिरश्मी लेणी :-
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'
असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे.
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.









इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता
सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते. 'गाथा सप्तशती' हे महाराष्ट्री प्राकृत ( महाराष्ट्री ही प्राचीन भाषापैकी एक असल्याचे संदर्भ आहेत ) भाषेत संकलीत केले आहे. हा संकलनाचा काळ इ.स. पूर्व २ रे शतक ते इ.स. 2 रे शतक असा दिर्घ चारशे वर्षाचा परीघ आहे. हा ग्रंथ इंग्रजी मध्ये अल्बर्ट वेबरने १८८१ मध्ये भाषांतरीत केला आहे. याचा अर्थ मराठी मुळ असलेली ही महाराष्ट्री प्राकृत सर्वसामान्यपणे लिहली जात होती. लिहण्याचा अधिकार त्याकाळी सर्वानाच असावा. कारण हे लिखाण संस्कृत मध्ये नाही .
कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
प्राकृत भाषा :-

‘प्राकृत भाषा’ म्हणजे नेमकी कोणती भाषा?
प्राकृत भाषा म्हणजे कुठलीतरी एक भाषा, असा अनेकांचा समज आहे. पण, प्राकृत भाषा म्हणजे कोणतीही एक भाषा नाही. प्राचीन काळातील अनेक भाषांना, प्राकृत भाषा म्हणून संबोधले जाते. शौरसेनी प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, पैशाची प्राकृत आणि अर्धमागधी प्राकृत, अशा अनेक प्राकृत भाषा आहेत. प्राकृत भाषा खूप प्राचीन आहेत. पूर्वीच्या काळी या भाषा लोकांच्या बोलीभाषा होत्या. प्रादेशिक भाषा अस्तित्वात येण्यापूर्वी, प्राकृत भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जायच्या. प्राकृत या शब्दाचा उगम ‘प्रकृती’ या शब्दापासून झालेला आहे. त्याकाळी प्राकृत भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होत होती. ‘गाथासप्तशती’ सारखे अनेक प्रसिद्ध ग्रंथ सुद्धा, ‘महाराष्ट्री प्राकृत’ भाषेत लिहिला गेला आहे. प्राचीन काळचे साहित्य जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येते, साहित्यातील राजा, ब्राह्मण आणि काही पुरुष पात्रे संस्कृत भाषांमध्ये बोलतात. पण, त्या साहित्यातील स्त्रीपात्रे, लहान मुले यांची भाषा मात्र प्राकृतच असते. भास, भरतमुनी आणि कालिदास यांच्या नाटकातील स्त्री पात्रांच्या तोंडी प्राकृत भाषाच आहे. ‘शाकुंतल’ या प्रसिद्ध नाटकातही, राजा दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो. पण, शकुंतला आपल्या सख्यांशी आणि राजा दुष्यंताशीही प्राकृतातच बोलते. जैन समाजातील वाङ्मय मोठ्या प्रमाणात, प्राकृत भाषेमध्येच आहे. जैन समाजाचे अनेक धार्मिक ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये आहेत. त्यामुळे प्राकृत भाषेला जैन समाजात खूप महत्त्व आहे.
प्राकृत भाषांचा त्यांच्या उगमापासून ते ‘अभिजात’ दर्जा मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता?
मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड यांसारख्या प्रादेशिक भाषांचा उगम झाल्यानंतर, हळूहळू प्राकृत भाषा मागे पडत गेल्या. पण प्राकृत शिकणारे, प्राकृत भाषेचा अभ्यास करणारे लोक अस्तित्वात होते, ते आजही आहेत. उत्तर भारतात या भाषांचा अभ्यास अधिक प्रमाणात झाला. प्राकृत भाषा साहित्यिक, इतिहासकार अशा सगळ्यांसाठीच मार्गदर्शक आहेत. त्यामुळे या भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा म्हणून, प्रयत्न सुरू होतेच. शिवाय ‘अभिजात’ दर्जा जे निकष आहेत की, भाषा 1 हजार 500 ते दोन हजार वर्षे जुनी असावी, त्यांना समृद्ध वाङ्मयीन परंपरा असावी, त्या सगळ्या निकषांमध्येही या प्राकृत भाषा बसत होत्या. त्यामुळे या भाषांना ‘अभिजात’ दर्जा प्राप्त मिळाला आहे.
प्राकृत भाषा बोलीभाषा म्हणून व्यवहारातून का मागे पडत गेल्या?
साधारण आठव्या ते दहाव्या शतकांपर्यंत या सगळ्या प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या, या भाषांमध्ये साहित्य निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत होती. पण, जेव्हा प्रादेशिक भाषांचा उगम झाला, संस्कृत आणि प्राकृतचा अपभ्रंश होत होत जेव्हा प्रादेशिक भाषा अस्तित्वात आल्या, तेव्हा प्राकृत भाषा मागे पडल्या गेल्या. जेव्हा नवीन भाषा अस्तित्वात येतात, तेव्हा बर्याचदा जुन्या भाषा मागे पडत जातात, हे आपण आताच्या काळातही पाहतो, त्यावेळीही तेच घडले. महाराष्ट्रात मराठी, पंजाब भागात पंजाबी, बंगाल प्रदेशात बंगाली, अशा प्रत्येक प्रदेशात प्रादेशिक भाषा अस्तित्वात आल्या. त्या प्रदेशातील लोक प्राकृत भाषांऐवजी, त्यांच्या प्रादेशिक भाषा बोलू लागले. परिणामी प्राकृत भाषांचा वापर कमी होऊ लागला. प्राकृत भाषांचा अभ्यास होत होता, साहित्यनिर्मितीही काही प्रमाणात सुरू होती. पण, त्या बोलीभाषा म्हणून वापरल्या जात नव्हत्या. आताच्या काळातही प्राकृतची तीच स्थिती आहे. प्राकृत भाषांचा अभ्यास होतोय, प्राकृत भाषांमध्ये लोक शिक्षण घेत आहेत. पण, त्या तेवढ्या पुरत्याच मर्यादित आहेत. त्यांचा व्यवहारात तसा वापर होत नाही.
आताच्या काळात प्राकृत भाषांचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे?
आताच्या काळातही या भाषा खूप मार्गदर्शक आहेत. या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. हे साहित्य आपल्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप मार्गदर्शक ठरते. आपला देश, देशाची त्याकाळची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती कशी होती, या सगळ्याचे प्रतिबिंब त्याकाळी लिहिल्या गेलेल्या, प्राकृत साहित्यामध्ये उमटले आहे. त्यामुळे या साहित्याचा अभ्यास आपल्याला, इतिहासाचे अभ्यास करताना महत्त्वाचे ठरतो. इतिहासाचा सबळ पुरावा म्हणून या भाषांची मदत आपल्याला होते. सोबतच आपल्या प्रादेशिक भाषा सुद्धा संस्कृत आणि प्राकृत भाषांचा आधार घेत, अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे या भाषांचा, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुद्धा, आपल्याला प्राकृत भाषांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भाषेचा आणि साहित्याचा अभ्यास करणार्या आणि आवड असणार्या विद्यार्थ्यांना तर या प्राकृत भाषांचा अभ्यास खूप उपयोगी असतो. कारण पूर्वीच्या काळी साहित्य कसे होते, ते कसे बदलत गेले, या सगळ्याची माहिती प्राकृत भाषांमधून मिळते.
‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे प्राकृत भाषांना फायदा होईल किंवा काय फायदा होणे अपेक्षित आहे?
पूर्वी प्राकृत भाषा अनेक विद्यापिठांमध्ये शिकविल्या जायच्या. पण, नंतरच्या काळात त्या विद्यापिठांनी प्राकृत भाषा शिकविणे बंद केले. आता ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे, प्राकृत भाषांचे महत्त्व वाढेल आणि त्या विद्यापीठांमध्ये प्राकृत भाषा शिकवण्याची सोय पुन्हा केली जाईल. पण पुन्हा एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे प्राकृत भाषा फक्त विद्यापीठांमध्ये पुन्हा शिकवून उपयोग नाही. त्यामध्ये नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्या भाषांमध्ये आपले भवितव्य दिसायला पाहिजे. कारण, प्राकृत भाषांच्या बाबतीत आधीही हेच घडले होते की, त्या शिकवल्या जात होत्या. त्यांचा अभ्यास केला जात होता. पण, त्यांचा व्यवहारात वापर होत नसल्यामुळे, त्या मागे पडत गेल्या. आता पण जर फक्त शैक्षणिक पातळीवर म्हणजे शाळांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये त्या सुरू केल्या, तर फक्त इतिहासाची किंवा साहित्याची आवड असणारे विद्यार्थीच या भाषा शिकतील. या भाषांमध्ये ज्ञानार्जन होईल. काही प्रमाणात साहित्यनिर्मितीही होईल. पण, विद्यार्थी त्या दैनंदिन जीवनात बोलणार नाहीत. हल्ली विद्यार्थी किंवा त्यांचे पालक शिक्षणासाठी कोणताही विषय निवडताना, त्यात नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधी आहेत हे बघूनच निवडतात. त्यामुळे अभिजात दर्जा मिळाल्यामुळे प्राकृत भाषा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तर शिकविल्या जातीलच, तसेच त्या भाषांमध्ये नोकरीच्या संधीही निर्माण होणे खूप आवश्यक आहे.
प्राकृत भाषा पुन्हा व्यवहारात आणण्यासाठी, त्यांच्या संवर्धन आणि विकासासाठी शिक्षण क्षेत्रात काय पाऊले उचलली गेली पाहिजेत?
शिक्षण क्षेत्रात या भाषांची आवड मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी पाऊले उचलली गेली पाहिजेत. आपण आज पाहतो की, मुलांना फ्रेंच, जर्मन, जपानी अशा पाश्चिमात्य भाषांबद्दल खूप आकर्षण वाटते. मुलांना जरी त्या भाषांमध्ये नोकरी करायची नसली, तरी मुले त्या भाषा आवड म्हणून शिकतात. काही मुले तर शालेय वयापासून एखादी पाश्चिमात्य भाषा शिकत असतात, तर काही त्यात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणही घेतात. काही शाळांमध्ये तर या भाषा शिकवण्याची सोयही आहे. तशीच सोय प्राकृत भाषा शिकवण्याचीही असली पाहिजे. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या भाषा शिकवण्याची सोय केली पाहिजे. 30 मिनिटांचा का होईना, पण एखादा तरी तास प्राकृत भाषांचा असायला हवा. तरच शालेय वयापासून मुलांची या भाषांशी ओळख होईल. त्यांना भाषेबद्दल आवड निर्माण होईल आणि पुढे जाऊन मुले या भाषांमध्ये आणि भाषांसाठी काम करण्यासाठी तयार होतील. आता फक्त जैन समाजातील मुले त्यांच्या धर्मग्रंथांची भाषा असल्यामुळे, काही प्रमाणात ही भाषा शिकतात. पण, असे प्रयत्न केले तर इतर मुलेही या भाषांकडे वळतील.
सातवाहन कला आणि व्यापार :-

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर ही शकांची राजधानी तसेच प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्यावर सातवाहनांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले स्वकीय साम्राज्य होते. कल्याण, सोपारा (नालासोपारा), भोगवर्धन (भोकरदन), तगेर (तेर), करहाटत (कर्हाड), नेवासा ही शहरे सातवाहनांच्या काळात समृद्ध झाली. या शहरांतील उत्खननातून सातवाहनांचा इतिहास जगासमोर आला. सातवाहन राजकुमारांना ’कुमार’ असे संबोधिले जात असे. सरकारी खजिन्याचे प्रमुख स्त्रोत हे भूमिकर, मिठावरील कर तसेच न्यायशुल्क हे होते. सातवाहनांचे महारथी, महासेनापती, महाभोज असे तीन प्रकारचे सामंत असत. व्यापार्यांना ’नैगम’ म्हटले जात असे. व्यापारी समूहाच्या प्रमुखाला ’सार्थवाह’ संबोधले जात असे.
या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.
शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.

सातवाहनकालीन गुंफा पुणे जिल्ह्यातील कार्ले, कान्हेरी, भाजे येथे आढळून आली आहेत. सातवाहनांची नगररचना सर्व सोईंनी युक्त अशी होती. विविध नमुन्यांच्या पक्क्या भाजलेल्या विटा, छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार योजना, कोरीव नक्षीकाम अशी सुसज्ज अशी नगररचना यांच्या काळात विकसित होती.

त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले. ब्राह्मणांना भूमिदान अथवा जहागिरी देण्याची प्रथा सर्वप्रथम सातवाहनांनी सुरू केली.पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेउल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे. त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे. उद्योग-व्यवसायाला व विदेश व्यापाराला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही.


सिंधूक अत्य्हवा सिमुख सातवाहनाने काण्वांचे राज्यपालपद धुडकावत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही.
सातवाहनकालीन जाते :-
सातवाहनकालीन स्त्रिया
सातवाहन वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. नागनिकेने विवाहपश्चात सासरचा धर्म अंगीकारला आणि तो जोपासलाही. खरेतर या काळात श्रौतधर्म मागे पडून यज्ञ, याग करण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना नागनिकेने अश्वमेध, गवामयन, दाशरात्रसारखे मोठे यज्ञ केल्याची नोंद सापडते. याशिवाय सातकर्णी आणि नागनिका या दोघांनी मिळून राजसूय, अग्न्याध्येय, अन्वारंभणीय, अंगारिक भगल, अंगिरसामयन, त्रयोदशरात्र, अप्तोर्याम, गर्गत्रिरात्र, शततिरात्र, छंदोपवमानत्रिरात्र असे अनेक यज्ञ केले. नागनिका स्वतः यज्ञदीक्षादिकात निष्णात होती आणि तिने या सर्व यागांमध्ये उत्साहाने भाग घेतला होता. या सर्व यज्ञांत विद्वान ब्राह्मणांना हत्ती, घोडे, रथ, सोन्याचांदीचे अलंकार, कार्षापण (चांदीची नाणी) आणि गायी दान केल्याचे अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ कोकणात उतरणाऱ्या प्राचीन नाणेघाटात काही सातवाहनकालीन गुंफा आहेत. एका गुंफेत असलेली नागनिकेने कोरवून घेतलेली शिल्पे आणि मोठा शिलालेख प्रसिद्ध आहे. तो अनेक मुद्द्यांसाठी विचारात घ्यावा लागतो. राजकीय व धार्मिकदृष्ट्या तर तो महत्त्वाचा ठरतोच, पण तत्पूर्वी त्या शिलालेखावरून नागनिकेला लाभलेले अग्रस्थान, राजघराण्यातील एक ज्येष्ठ स्त्री म्हणून तिचे महत्त्व स्पष्ट होते. वास्तविक पाहता स्त्रीचा उल्लेख तिच्या पतीनंतर केला जात असे. पण नाणेघाटातल्या गुंफेतील शिलालेखात नागनिकेचा उल्लेख तिच्या पतीपूर्वी केला आहे, हे विशेष. तसेच नागनिकेच्या वर्णनपर लेखातूनसुद्धा तिचे राजमान्य व्यक्तिमत्त्व समोर येते. सातवाहनांनी वैदिक धर्मास उदार आश्रय दिला, हे नागनिकेच्या लेखातून स्पष्ट होते. नाणेघाटामध्ये आढळणाऱ्या शिल्पांमध्ये सिमुक राजानंतर प्रथम नागनिकेचा पुतळा दिसतो. शेजारी तिचा पती सातकर्णीचा पुतळा आहे. या घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा सिमुकानंतर कोरण्यात आली आहे. सातकर्णीनंतर त्याच्या दोन मुलांचे पुतळे आणि मग तिच्या वडिलांचा पुतळा आढळतो. सातवाहन कुळात आपल्या पित्याचा पुतळा कोरणारी नागनिका ही पहिली राणी असावी. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीने आपले व नागनिकेचे असे चांदीचे जोडनाणे प्रचारात आणले होते. त्यावरून त्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो. सातवाहनकाळात स्त्रियांचे राजकीय स्थान काय होते हे समजून घेताना सर्वात पुढे नाव येते ते नागनिकेचेच.
सातवाहन घराण्यात मातृवंशपद्धती होती, मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, असे एक मत आहे. डॉ. केतकर व इतिहासाचार्य राजवाडे या मताचे पुरस्कर्ते आहेत. या घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुमायी अशी मातेचा निर्देश करणारी नावे दिसतात. यावरून या कुळात मातृवंशपद्धत होती असे राजवाडे म्हणतात. (राधामाधवविलासचंपू, पृ. १८० ) त्यांच्या मते मगधातून आलेल्या महाराष्ट्रिकांनी महाराष्ट्र बसविला. त्यांच्यात ही पद्धत नव्हती. यावरून सातवाहन हे. त्यांच्यात मातृवंशपद्धती असल्यामुळे, महाराष्ट्रीय नव्हत असेही राजवाडे म्हणतात डॉ. केतकरांनी गौतमीपुत्र, वसिष्ठीपुत्र इ. नावांचा आधार घेतलाच आहे. शिवाय भावाच्या घरी राहात असलेल्या एका ब्राह्मणविधवेला शेषापासून सातवाहन हा मुलगा झाला या दंतकथेचाही आधार त्यांनी घेतला आहे. शिवाय कोचीन, मलबार या प्रदेशांत स्त्री माहेरीच भावाजवळ राहाते, पती वरचेवर बदलते, पतीच्या घरी जात नाही अशी जी रुढी आहे, तिचा निर्देश केला आहे. सर्वात आश्रर्याची गोष्ट म्हणजे या दोघाही थोर पंडितांनी प्रत्यक्ष सातवाहनांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. पुराणे व कोरीव लेख यांच्या आधारे त्यांचा जो इतिहास दिसतो त्यावरून असे दिसते की प्रत्येक ठिकाणी पित्यामागून पुत्रच गादीवर आला आहे. चुकूनमुद्धा याउलट दिसत नाही. नागनिका, गौतमीवलश्री या स्त्रिया आपल्या पतीच्या घरीच रहात होत्या. आपले पती, पुत्र, नातू यांच्याशी असलेले नातेच त्या अभिमानाने सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर तापसीव्रताने जन्मक्षेप करतात. अशा स्थितीत या घराण्यात मातृकन्यापरंपरा होती, मातृ सत्ताककुटुंबपद्धती होती, ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र भाग २ रा, पृ. ५१ ) अशी विधाने करणे युक्त नाही.
डॉ. गोपाळाचारी यांनी आपल्या प्रबंधात विस्तृत विचार केला आहे. ते म्हणतात, सातवाहन घराण्यात ही मातेवरून निर्देश करण्याची पद्धत गौतमीपुत्रापूर्वी नव्हती. पुढे ती त्यांच्या घराण्यात दिसून येते. तशीच महारष्ट्रातील महारथी महाभोज या घराण्यातही दिसून येते. वेदकाळातील कौशिकीपुत्र, आलंबीपुत्र अशी मातृनिर्देश करणारी नावे आढळतात. बौद्धवाङमयातही वैदेहीपुत, मोगलीपुत अशी नावे ठेवण्याची पद्धत दिसते. माळव्यातल्या अनेक शिलालेखांत असा मातेवरून केलेला पुत्राचा निर्देश दिसतो. बुल्हरच्या मते आजही रजपुतांत अशी चाल आहे. कदाचित राजाला अनेक राण्या असतात, त्यामुळे पुत्राचा निर्देश करताना मातेचा निर्देश करण्याची पद्धत पडली असेल; पण त्यावरून त्या घराण्यात मातृसत्ताकपद्धती किं मातृवंशपद्धती होती असे म्हणण्याला अर्थ नाही.
प्रारंभकाळ
सलग साडेचारशे वर्ष या भूमीवर राज्य करणारा असा हा महापराक्रमी वंश. याधी किंवा या नंतर असा कोणताही राजा झाला नाही की त्याने किंवा त्याच्या वंशाने साडेचारशे वर्ष सलग राज्य केले. बरे, नुसते राज्यच केले नाही तर त्या राज्यात संपन्नता आणली, व्यापार वाढवला, कला व स्थापत्य यात भरीव कामगिरी करून पुढच्या पिढीला राज्य कसे करावे याबद्दल प्रेरणा दिली. सातवाहन राजाच्या यशाचे गमक तिथे आहे की त्याच्या राज्यातील जनता ही सुखी होती.

अशोकाच्या मृत्युच्या सुमारास सातवाहननामक पुरुषाने महाराष्ट्रातील प्रतिष्ठान या नगरीत सातवाहनसत्तेची स्थापना केली. मौर्य साम्राज्य दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. अर्थात महाराष्ट्राचा त्यात अंतर्भाव असलाच पाहिजे असे काही तज्ज्ञाना वाटते. अपरान्त म्हणजे उत्तर कोकण यावर मोर्यसत्ता होती याबद्दल वाद नाही. पण अशोकाचे शिलालेख महाराष्ट्रात नाहीत यावरून त्याची सत्ता महाराष्ट्रावर नसावी, असे डॉ. केतकर म्हणतात. मात्र त्यांचे धर्मप्रसारक महाराष्ट्रात पोचले होते हे त्यांना मान्य आहे. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, प्रकरण ४४ वे.) पण याविषयी निश्चित असे काही सांगणे कठीण आहे. सातवाहन हे मौर्याचे मांडलीक होते, असेही एक मत आहे. पुराणात त्यांना कोठे आंध्र म्हटले आहे, कोठे आंध्रभृत्यही म्हटले आहे. आंध्रभृत्य हा समास कर्मधारय करून तो आंध्र हेच भृत्य, असा काही तज्ज्ञ सोडवितात. आणि सातवाहन हे मूळचे आंध्र होते व ते मौर्यांचे भृत्य होते म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटले असावे, असे अनुमान करतात; पण यालाही निश्चित असा पुरावा काही नाही. सातवाहन या राजाने अशोकाच्या अखेरीच्या काळात आपले स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन केले एवढेच. त्याची जी नाणी अलीकडे सापडली आहेत त्यांच्या आधारे, आपणास आज म्हणता येते. हे राज्य स्थापिताना त्याला मौर्यसत्तेशी लढावे लागले असा कोठेही उल्लेख नाही. असा काही लढा झाला नाही यावरून मौर्यांचे साम्राज्य महाराष्ट्रात नसावे किंवा असल्यास या वेळी ती सत्ता अगदी दुर्बळ झाली असावी असे अनुमान करावे लागते.
यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातवाहनांच्या प्रारंभकाळाचा. अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. स. पूर्व २३६ च्या आसपास सातवाहन सत्तेला प्रारंभ झाला असे म. म. मिराशी यांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण डॉ रा. गो. भांडारकर यांच्या मते हा काळ इ. स. पू. ७३ असा आहे आणि डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते तो इ. स. पूर्व ३० पर्यंत अलीकडे येतो. डॉ. गोपाळाचारी यांनी ' सातवाहन साम्राज्य ' या आपल्या लेखात इ. पू. २३५ हा काळ निश्चित केला आहे तो मला ग्राह्य वाटतो. शकक्षत्रप रुद्रदामा याचा गिरनार येथील शिलालेख हा इ. स. १५० या वर्षांचा आहे हे बहुमान्य झाले आहे. त्यात त्याने दक्षिणापथपती शातकर्णी याचा उल्लेख केला आहे. हा शातकर्णी सातवाहन म्हणजे शिवश्री पुलुमायी होय, हेही आज बहुमान्य झाले आहे. सातवाहन वंशात एकंदर ३२ राजे होऊन गेले. त्यात शिवश्री पुलुमयी हा सव्विसावा राजा होय. पुराणात त्याच्या आधीच्या राजांच्या राजसत्तेची गणना दिली आहे; तीवरून हिशेब करता इ. स. १५० च्या मागे आपणांस इ. स. पूर्व २३५ या वर्षापर्यंत जावे लागते. जुन्नर जवळील नाणेघाटात सातवाहनांचे जे शिलालेख उपलब्ध झाले आहेत ते त्यांतील लिपीवरून (अक्षरांच्या ठेवणीवरून ) इ. स. पूर्व २०० ते २५० या काळातील असले पाहिजेत असे व्यूलर या पंडिताचे मत आहे. आणि बहुतेक संशोधकांना ते मान्य आहे, असे डॉ. केतकर म्हणतात. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला पृ. ४०८ व ४०९ ) वर उल्लेखिलेल्या 'काँप्रिहेनसिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथात डॉ. जे. एन. बॅनर्जी यांनी 'उत्तर व पश्चिम भारतातील क्षत्रपसत्ता' हे प्रकरण लिहिले असून त्यात त्यांनी डॉ. के. गोपळाचारी यांच्याच मताला पुष्टी दिली आहे. सातवाहनसत्तेच्या अखेरीविषयी फारसे मतभेद नाहीत. तेव्हा इ. स. पूर्व २३५ ते इ. स. २२५ हा सातवाहन राजवंशाचा सत्ताकाळ होय, हे डॉ. के. गोपाळाचारी यांचे मत मान्य होईल असे वाटते. मूळ कुळपुरुष सातवाहन हा अर्थातच इ. पू. २३५ पूर्वीचा होय.
तर इथून झाली सातवाहन नावाच्या एका अध्यायाला सुरुवात. सातवाहन कुळातील राजांची वंशावळ खाली दिलेली आहे. ही वंशावळ मिराशी यांच्या पुस्तकातील आहे तसेच श्री. जोगळेकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली वंशावळ सुद्धा सोबत देत आहे.
ही वंशावळ ही मिराशी यांनी त्यांच्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख’ या पुस्तकात दिली आहे.
आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:
सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
कृष्ण(भात) १०
श्रीशातकर्णी(श्रीमल्लकर्णी) १०
पूर्णोत्संग(पौर्णमास ) १८
स्कंधस्तंभ १८
शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
लंबोदर १८
आपीतक(आपीलक, दिविलक) १२
मेघस्वाति १८
स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
स्कंदस्वाति ७
मृगेंद्रस्वातिकर्ण ३
कुंतलस्वातिकर्ण ८
स्वातिवर्ण १
पुलोमावी ३६
अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
हाल ५
मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
पुरिकषेण(प्रविल्लसेन, पुरीषभीरु) २१
सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
चकोरशातकर्णी ६ महिने
शिवस्वाति २८
गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
पुलोमत् २८
शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
शिवश्री ७
शिवस्कंध ३
यज्ञश्री शातकर्णी २९
विजय ६
चंडश्री १०
पुलोमत् ७.
सातवाहन राजांची पुर्ण पार्श्वभुमी जाणून घेतल्यानंतर एकेक सातवाहन राजांची सविस्तर माहिती घेउया.
राजा सिमुक :-
सिमुक सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून सार्वभौम राज्यकारभार चालू केल्यानंतर प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याच्या पैठण ला मुख्य राजधानी बनवले व जीर्णनगर म्हणजे सध्याच्या जुन्नर ला उपराजधानी बनवले.
कृष्ण सातवाहन :-
राजा सातकर्णी :-
कलिंगराज खारवेल
या वेळी खारवेल हा एक अत्यंत प्रबळ राजा कलिंगाधिपती झाला होता. अशोकाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी चेदीवंशातील महामेघवाहन या पुरुषाने मौर्य साम्राज्याचे जू झुगारून देऊन कलिंग प्रदेश स्वतंत्र केला होता. खारखेल हा त्याचाच पुत्र किंवा नातू होय.
महाराष्ट्रावर स्वारी
खारवेल हा मोठा प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुष होता. मगधाची लूट केल्यानंतर त्याने आपली दृष्टी सातवाहन साम्राज्याकडे वळविली आणि मूषिकनगरापर्यंत एक प्रचंड सेना धाडली. हे नगर कोणाच्या मते वैनगंगेच्या तर कोणाच्या मते कृष्णेच्या तीरी आहे. याच वेळी खारवेलाला फार मोठा जय मिळाला असे हाथीगुंफेच्या लेखात वर्णन आहे. पण पंडितांच्या मते तसे काही झाल्याचे दिसत नाही.तेव्हा पौनी परिसरात मोठे युद्ध होऊन सातकर्णीने खारवेलचा पराभव केला असे काही तज्ज्ञ मत मांडतात. पुढील वर्षी वऱ्हाड, खानदेश व अहमदनगर या प्रदेशांवर खारवेलाने स्वारी केली, तेव्हा मात्र त्यास मोठा जय मिळाला हे सर्वमान्य आहे. दुसऱ्या स्वारीच्या वेळी प्रत्यक्षात खारवेलाने सातकर्णीशी युद्ध टाळून त्याच्या रठीक व भोजिक या मांडलिकांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला. मात्र दोन्ही आक्रमणात त्याला सातकर्णीचा पराभव करता आला नाही. खारवेल हा जैनधर्मी होता. पण एकतर तो धर्मसहिष्णू होता आणि दुसरे म्हणजे त्या धर्मातील अहिंसा तत्त्व त्याने राजकारणापासून दूर ठेविले होते; म्हणूनच त्याला एवढे पराक्रम करून यवन आक्रमणाला पायबंद घालता आला.

अश्वमेधकर्ता
श्री सातकर्णीच्या साम्राज्यावर खारवेलाचे दोनदा आक्रमण झाले तरी त्याने ते तत्काळ मोडून काढले, असे दिसते. कारण त्याने आपल्या अकरा वर्षांच्या लहानशा कारकीदींत ( इ. पू. १९४ ते इ. पू. १८५ ) राज्यावर आल्यावर दक्षिणापथाचे बरेच भाग जिंकून घेतले आणि या दिग्विजयार्थ नंतर दोन अश्वमेध यज्ञ देखील केले. या सोबतच एक राजसूय यज्ञ आणि अनेक श्रौतयाग करून हजारो गाई, अनेक अश्व, गज, वस्त्रे, कार्षपण ( नाणी) आणि धान्याच्या राशी यज्ञातील ब्राह्मणांना व यज्ञ सेवकांना दान दिल्याचे नाणेघाट येथील शिलालेखात म्हटले आहे. दोनदा अश्वमेध यज्ञ केला आणि एकदा राजसूय यज्ञ केला. हे यज्ञ व अग्न्याधेय, अन्वारंभणीय, गवामयन, आप्तोर्याम, अंगिरसामयन, छंदोग - पवमान, अतिरात्र, दशरात्र, त्रयोदशरात्र इ. त्याने जे इतर अनेक यज्ञ केले, त्यांवरून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार करूनच त्याने साम्राज्य–विस्तार केला हे उघड आहे. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून त्याने आपले व त्याची पत्नी असलेल्या नागनिकेचे चांदीचे जोड नाणे चलनात आणले होते. त्यावर अश्वमेधाच्या आश्र्वाची प्रतिमा आहे. या सोबतच त्याची इतरही अनेक नाणी चलनात होती. त्यात चांदी, तांबे, शिसे, पोटिन या धातूंचा वापर केला गेलेला होता. या नाण्यांवर अश्व, गज, वृषभ आणि शार्दुल आदींच्या आकृत्या होत्या.
नायनिका :-
सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वेदश्री तथा सतश्री (अथवा शक्ति श्री) हा गादीवर आला मात्र तो अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनिका हीच राज्यकारभार बघत होती असे दिसते. अनेक विद्वानांच्या मते मात्र वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’असे केले आहे.अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीचे व नागनिकेचे जोड नाणे चलनात होते. त्याच्या एकाबाजूला ' रजो सिरी सतकनिस ' तर दुसऱ्या बाजूला ‘नागनिका’ अशी नावे स्पष्ट कोरलेली आहेत.
तिचा पुत्र वेदश्री राज्यकारभार करण्यालायक झाल्यावर तिने आपले आयुष्य व्रतवैकाल्यांना वाहून घेतल्याचे व एका तपस्वीनी सारखे जीवन जगल्याचे दिसते. तिला पतीनिधनासमावेत पुत्र निधनाचे दुःख सुद्धा सहन करावे लागले. कारण तिचा जेष्ठपुत्र भायल व कनिष्ठ पुत्र सातवाहन हे अल्पयीन असतानाच मरण पावले होते. तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल.
सम्राट श्री सातकर्णी इ. पू. १८५ या वर्षी मृत्यू पावला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४ साली मगधात राज्यक्रान्ती झाली. अशोकानंतरचे राजे दुबळे व प्रतिकारशून्य असल्याने साम्राज्याची वाताहात होत होती आणि सर्वत्र बजबज माजून प्रजेत अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. यावनी आक्रमणाची भीती तर सारखी वाढतच होती. अशा वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो मौर्यसम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. एकदा संचलनाचे वेळी उठावणी करून त्याने बृहद्रथाला ठार मारले व आपण सम्राटपद धारण करून आपल्या शुंगवंशाची स्थापना केली. या पुष्यमित्राने खुद्द पाटलीपुत्रातच अश्वमेध केला व दुबळ्या, निवृत्तिप्रधान बौद्धधर्माला बाजूस सारून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. या शुंगवंशाने इ. पू. १८४ ते इ. पू. ७२ असे ११२ वर्षे राज्य केले.

विदिशेपर्यंत
पहिल्या सातकर्णीनंतर तेवढाच पराक्रमी सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी हा होय. त्याने इ. स. १६६ पासून इ. पू. १११ पर्यंत म्हणजे ५६ वर्षे राज्य केले; आणि सातवाहन साम्राज्याला दृढता व स्थैर्य प्राप्त करून दिले. पहिल्या सातकर्णीने पश्चिम माळवा जिंकला होता. याने पूर्व माळवाही जिंकला. विदिशेला (भिलसा ) एका शिलालेखात सातकर्णीचा उल्लेख आहे तो याचाच असावा असे पंडितांचे मत आहे. साची येथील महाद्वारावर सातकर्णीच्या पदरी असलेला शिल्पकार वसिष्ठीपुत्र आनंद याचा दानविषयक एक लेख कोरलेला आहे. त्यावरून तेथपर्यंत सातवाहनसत्ता स्थिर झाली होती असे दिसून येईल. डॉ. केतकरांच्या मते, प्रयागजवळच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रा- शिक्के- या सातवाहनांच्या व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. तसे असले तर सातवाहनसाम्राज्य तेथपर्यंत पोचले होते असा अर्थ होईल. पण त्या मुद्रा वाकाटकांच्या आहेत असे डॉ. जयस्वाल यांचे मत आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, डॉ. केतकर, पृ. ३९९.)
वीर विक्रम ?
कालकाचार्यांच्या कथेतला वीर विक्रम म्हणजे हा दुसरा सातकर्णीच होय असे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांचे मत आहे. कालक हे जैन आचार्य. ते धर्मप्रसारार्थ उज्जयिनीस आले असता तेथील राजा गर्दभिल्ल तथा गंधर्वसेन याने त्यांची बहीण सरस्वती हिचे हरण केले. तिची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर आचार्यांनी शकराजांना उज्जयिनीवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिले. ( भारतीयांनी हीच परंपरा आजपर्यंत अखंडपणे चालविली आहे. ) त्याप्रमाणे बोलनघाटातून येऊन शक उज्जयिनीवर कोसळून पडले, त्यांनी गंधर्वसेनाचा नाश करून सरस्वतीची सुटका केली. पण काम झाल्यावर ते परत जाईनात. त्यांनी माळव्याचे राज्य बळकावले व प्रजेवर ते अनन्वित अत्याचार करू लागले. कालकाचार्यांचीही ते अप्रतिष्ठा करू लागले. तेव्हा त्यांचा उच्छेद करण्याच्या हेतूने सातवाहन राजाची मदत मागण्यासाठी आचार्य प्रतिष्ठानास आले. सातवाहन राजाने त्यांची मागणी मान्य केली व सेना घेऊन तो माळव्यात गेला व त्याने मालवगणांच्या मदतीने शकांना पिटाळून लावले. हा सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी होय, असे जोगळेकर म्हणतात. त्यांच्या मते मूळ कथेतला वीर विक्रम तो हाच होय. मात्र संवतकर्ता जो विक्रमादित्य त्याच्याशी ते याचा संबंध जोडीत नाहीत.
सातकर्णीने कालकाचार्यांच्या विनंतीवरून माळव्यात जाऊन शकांचा उच्छेद केला या घटनेला थोडा विश्वसनीय पुरावा सध्या उपलब्ध झाला आहे. जैनांचे पर्युषणपर्व श्रावणात असे ते कालकाचार्यांनी बदलून भाद्रपदात आणले असा इतिहास आहे. 'युग प्रधानस्वरूप ' या जैन ग्रंथाप्रमाणे हे कालकाचार्य इ. स. पू. १७१च्या सुमारास होऊन गेले. दुसऱ्या सातकर्णीचा हाच काळ आहे. आणि जैन कालकाचार्यकथेप्रमाणे हेच आचार्य प्रतिष्ठानला सातवाहन राजाकडे आले होते. यामुळे जोगळेकरांचे अनुमान खरे असावे असे वाटते.
पहिल्या सातकर्णीविषयीही जोगळेकरांनी थोडी निराळी माहिती दिली आहे. त्यांच्या मते पुष्यमित्राने मिनँडर - मिलिंद - या बौद्धधर्मी ग्रीक राजाचा पराभव केला व त्याला सीमापार केले, त्या वेळी त्याला या सातकर्णनि साह्य केले होते. पहिल्या सातकर्णीचा मृत्यू इ. पू. १८५ या साली झाला असे वर दिले आहे. पुष्यमित्राचा उदय त्यानंतर एक वर्षाने म्हणजे इ. पू. १८४ साली झाला व त्याने मिनेडरचा उच्छेद इ. पू. १७५ साली केला असे एक मत आहे. तेथपर्यंत सातकर्णी जिवंत होता असे जोगळेकर मानतात.
कुलव्रत
जोगळेकरांचे मत मान्य केले तर परकी आक्रमकांचा उच्छेद करणे हे सातवाहन कुलाचे प्रारंभापासूनच व्रत होते असे दिसून येईल. पहिल्या सातकर्णीने वर सांगितल्याप्रमाणे माळव्यात जाऊन शकांचे निर्दाळण केले आणि इ. सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने महाराष्ट्रातील शकसत्ता नाश करून टाकिली हे तर सर्वमान्यच आहे. सातवाहनकुलाचे हे वैभव अपूर्व होय यात शंका नाही.
राजा हाल सातवाहन

राजा हाल याचे आजपर्यंत एकही नाणे अथवा शिलालेख उपलब्ध झालेला नाही. मात्र त्याच्या शृंगारप्रधान काव्यामुळे तो साहित्य क्षेत्रात अजरामर झालेला दिसतो. पुरणाशिवाय त्याचा उल्लेख आपल्याला लीलावई, देशिनामाला, सरस्वतीकंठाभरण अश्या अनेक नंतर लिहिल्या गेलेल्या ग्रंथात आढळतो. या ग्रंथांमध्ये हाल चे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतात पसरल्याचे म्हंटले आहे मात्र आजपर्यंत हे सिद्ध करणारा पुरावा मिळालेला नाही. सोबतच हे सर्व ग्रंथ समकालीन नसल्याने व अनेक ग्रंथ हे दंतकथांवर आधारित असल्याने त्यांना इतिहास म्हणून स्थान देता येत नाही.
गाथासप्तशती सोबतच धवल नावाचा काव्यसंग्रहही यानेच रचला असे समजले जाते. या ग्रंथांमधून त्याला ' प्रतिष्ठान ' चा राजा असे म्हटले आहे. त्याची कारकीर्द, त्याच्या लढाया, राज्यशासन या इतर गोष्टींची जास्त माहिती आज उपलब्ध नाही. त्यामुळे राजा हाल सातवाहनाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व अद्यापही स्पश्ट झालेले नाही.
गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य
हाल सातवाहनांच्या नंतरचा काल :-
पुराणांप्रमाणे हालानंतर मंटलक, पुरींद्रसेन, सुंदर सातकर्णी, चकोर सातकर्णी व शिवस्वाती या राजांची नावे येतात. मात्र हालाप्रमाणेच याही राजांबद्दल पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने त्यांचे ऐतिहासिकत्त्व सिद्ध करणे अवघड आहे. शिवस्वाती हा सातवाहन राजघराण्यातील सर्वात महत्वाचा राजा असणाऱ्या गौतमीपुत्र सातकर्णीचा पिता व गौतमी बलश्री हीचा पती असावा. शिवस्वातीच्या कालखंडात सातवाहन घराण्याची फार वाताहत झाली. शकांनी आक्रमण करून महाराष्ट्रावर ताबा मिळवला. त्यामुळे भारताचा पश्चिम भाग सातवाहनांच्या हातातून निसटला व त्यांचे सामर्थ्यही कमी झाले. असे असले तरी शकांचे पूर्वे कडील संभाव्य आक्रमण रोखण्यात मात्र ते यशस्वी झाले. महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या शक राजवांशाचे नाव क्षहरात असे होते. त्यांचा व सातवाहनांचा सतत संघर्ष होत राहिला. तथापि कालौघात सातवाहनांना आपल्या सत्तेचे केंद्र आंध्रात स्थलांतरित करावे लागलेस्कंदस्वातिनंतर मंहेद्र सातकर्णी हा राजा बनला. पेरीप्लस ऑफ एरीथ्रियन सी’ या ग्रंथात ग्रीक लेखकाने त्याला मंबर असे म्हणले आहे. या ग्रंथात भरुकच्छ बंदर म्हणजे सध्याचे भडोच याचा तसेच मंबर राज्य करत असलेल्या आर्य देशाचा उल्लेख मिळतो.
महेंद्र सातकर्णीनंतर कुंतल सातकर्णी सातवाहन शासनकर्ता झाला. याचा कार्यकाळ इ.स. ७३ ते इ.स. ८३ असा मानला जातो. कुंतल सातकर्णीने गुणाढ्यचा आश्रयकर्ता होता, ज्याने बृहत्कथा नावाचा प्राकृत भाषेत ग्रंथ लिहीला. गुणाढ्यकृत बृहत्कथा हा ग्रंथ उपलब्ध नाही परंतु सोमदेवने लिहीलेली ‘कथासरित्सागर’ व क्षेमेंद्रने लिहीलेली ‘बृहत्कथामंजरी’ या ग्रंथातून त्याची माहिती मिळते. दक्षिण भारतात बृहत्कथा ग्रंथाचा अनुभव उपलब्ध आहे. सातवाहन साम्राज्याच्या वैभवाचा परिणाम म्हणून बृहत्कथा ग्रंथाची कीर्ति सार्या भारतात पसरली होती.
बहुतेक सातवाहन राजे प्राकृत तरी कुंतल सातकर्णीची राणी मलयवतीची भाषा मात्र संस्कृत होती. म्हणून राजाला संस्कृत शिकवण्यासाठी त्याचा अमात्य सर्ववर्माने ‘कातंत्र व्याकरण या ग्रंथाची रचना केली. यामुळे कुंतल सातकर्णी इतका खुष झाला कि त्याने भरुकच्छ प्रदेशाचे शासन सर्ववर्माला दिले.
याच कुंतल सातकर्णीच्या कारकीर्दित परकीय आक्रमणे सुरु झाली. मात्र कुंतल सातकर्णीने त्या आक्रमणांना यशस्वीपणे परतून लावले. कथासरित्सागर या ग्रंथामध्ये त्याचे साम्राज्य दक्षीण भारत, मध्य प्रदेश , वंग, अंग आणि कलिंग प्रदेशात पसरले होते. उत्तर भारतातील काही राजे त्याचे मांडलीक होते, त्यांनी शक , हुण व कुषाण यांना प्रतिकार केला. उत्तर भारतातील आक्रमक पळून हिंदुकुश पर्वताच्या पश्चिमेला प्राचीन काळच्या कंबोज जनपदात वसले. तिथे पुर्वीच असलेल्या यवन सत्तेमुळे ( ग्रीक लोकांमुळे ) त्यांच्या वागण्यात बदल होउन सभ्य मार्गाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली.
गौतमीपुत्र सातकर्णी
हाल सातवाहनानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचे चरित्र सांगावयाचे. ज्याचे यशोवर्णन करताना कवींना स्फूर्ती यावी, इतिहासकारांना अभिमान वाटावा व या भूमीला कृतज्ञतेने ज्याचे स्मरण राहावे असा हा सम्राट होता. सातवाहन कुलातील हा सर्वश्रेष्ठ राजा होय. मुस्लीम आक्रमणापासून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव जितक्या आदराने व भक्तिभावाने आपण घेतो तितक्या आदराने व भक्तिभावाने ज्याचे नाव घ्यावे असा महाराज, राजराज गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा राजा होऊन गेला. शकपल्हव यांनी केवळ भारतावरच नव्हे, तर पाश्चात्य जगावरही आक्रमण केले होते, आणि देशचे देश बेचिराख केले होते. सातवाहनांच्या साम्राज्यावरही इ. सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शकांची टोळधाड कोसळली. त्यांची धडक एवढी प्रचंड होती की काही काल हे बलशाली साम्राज्यही मूळापासून हादरले. पण गौतमीपुत्राचा उदय झाला व त्याने या शकांचे निर्दाळण केले.कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःचे राज्य स्थापन केले.
त्याचवेळी उत्तर भारतात परकीय सत्तांचे आक्रमण सुरु झाले. यवन, शक, कुशाण ( युएची ) व हूण या चार जमाती इ. स. चौथ्या शतकापासून इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मधूनमधून आक्रमणे करीत होत्या. यांतील यवन हे ग्रीक होत. ते सुसंस्कृत होते. पण बाकीच्या तीन जमाती या रानटी होत्या. ग्रीक यवनांची जी भारतावर आक्रमणे झाली त्यांचा चंद्रगुप्त मौर्य, खारवेल व पुष्यमित्र शुंग यांनी निःपात केला.
भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर एकापलीकडे एक थेट चीन देशापर्यंत शक- कुशाणांची वसतिस्थाने होती. भूगर्भात असलेल्या लाव्हारसासारखीच यांची स्थिती होती. मधूनमधून यांच्यातील अंतराची आग भडकत असे आणि मग यांच्या पाशवी शक्तीचे उद्रेक होऊन जग कंपायमान होई. इ. स. पूर्व पहिल्या शतकात हूणांची टोळधाड कुशाणांवर व त्यांची शकांवर कोसळून शक हे लाव्हाच्या लोंढ्यासारखे भारतात घुसले. त्यांच्या मागोमाग कुशाण हेही आत लोटले . शकांच्या टोळधाडी भारतावर येऊ लागल्या. त्यानंतर युएची अथवा कुशान या रानटांचे आक्रमण झाले. त्यांनी तर दीर्घकालपर्यंत उत्तर भारतावर साम्राज्य स्थापिले होते. ते संपुष्टात आल्यावर हूणांच्या टोळधाडी येऊ लागल्या. पण भारतातले लोक त्या काळी समर्थ व पराक्रमी होते. त्यामुळे ही आक्रमणे त्यांनी निर्दाळून त्या आक्रमकांचा निःपात केला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक विजय मिळवून भारतीय समाजात व संस्कृतीत त्यांना संपूर्णपणे विलीन करून टाकले. शक लोक अशा क्रूर, रानटी जमातींपैकीच होते. उत्तरेत शुंगांनंतर समर्थ अशी राजसत्ता न राहिल्यामुळे त्यांना तेथे भराभर जय मिळाले व तेथे आपली राज्ये स्थापन केली.
सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले. शकांना साम्रज्यस्थापनेची ऐपत नव्हती. ते भारतात आधी आले, पण कुशाणांचे ते क्षत्रप–सरदार, सुभेदार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत. मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागात मध्य आणि पश्चिम आशियातील लोकांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व इ.स. १८० ते इ.स. ५५ या काळात इंडोग्रीक यांचे राज्य या भागात होते. ख्रिस्तपूर्व १ल्या शतकात इंडो स्किथीयन अर्थात शकांनी या भागावर ताबा मिळवला आणि शक साम्राज्याची सुरुवात झाली.
क्षत्रपराजा नहपान

नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. शक,कुशाणांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. यांना स्वतःची अशी संस्कृती व धर्म नव्हता. त्यामुळे भारतात येताच ते बौद्ध व वैदिक धर्माचे अनुयायी होत. कुशाणसम्राट कनिष्क हा बौद्ध होता व त्याचा नातू वासुदेव हा परमभागवत म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. नहपानाचा जावई याने ऋषभदत्त है हिंदू नाव स्वीकारले होते व तो पौराणिक हिंदुधर्माचा कट्टा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक गावे ब्राह्मणांना दान दिली, लक्ष भोजने घातली, पुष्करतीर्थात स्नान करून गोप्रदाने दिली, असे उल्लेख त्याच्या शिलालेखांत आहेत. बौद्धांनाही त्याने अशाच उदार देणग्या दिल्या होत्या. यामुळे त्याची सत्ता जास्तच दृढ झाली. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा काल उल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.
क्षत्रपराजा रुद्रदामन


गुढीपाडव्याचे सत्य :-
सातवाहन साम्राज्याची माहिती घेताना एका अपरिहार्य आणि वादग्रस्त विषयाची चर्चा करावी लागते ती म्हणजे एक महत्वाचा हिंदु सण गुढीपाडवा ! यासंदर्भात वादाच्या दोन्ही बाजु समजून घेउया.चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. ही घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारल्या जातात. कलियुगाची ३,१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरूवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली असाही समज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे.

विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया
मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्नोति’पासून निष्पन्न झाला. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.
पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
२००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमणं व्हायची. याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा त्यावेळी सत्तेवर होता. गौतमीपुत्र असं नाव लावणारे राजे त्या वेळच्या मातृसत्ताक पद्धतीचे अनुकरण करणारे असल्याचेही काही अभ्यासक मानतात.
गौतमी ही शकांबरोबरच्या एका युद्धात हरलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या राजाची पत्नी होती . ती रानावनात अत्यंत हालाखीत रहात होती. सातवाहनाने मातीचे घोडे व शिपाई करून त्यांच्याकरवी शकांचा पराभव केला, अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा अर्थ मी असा करतो – “शक लोकांचा अंमल महाराष्ट्रावर दोन हजार वर्षांपूर्वी जुन्नर वगैरे स्थळी राज्ये स्थापून जेव्हा झाला, तेव्हा महाराष्ट्रातील लोक मातीप्रमाणे निर्वीर्य व हतप्रभ झाले होते. तिने आपल्या मुलात शौर्याचे स्फुल्लिंग जागवून सामान्य - वनवासी लोकांतून सैन्य निर्माण केले, शकांचा पराभव करवला अशा लोकांना उत्तेजन देऊन पैठणच्या सातवाहन राजाने शकांचा उच्छेद केला.आणि त्याला पुन्हा राजा बनवले. ज्या दिवशी त्याने विजयी योद्धा म्हणून पैठणच्या राजधानीत प्रवेश केला त्या दिवशी तेथील प्रजेने गुढ्या-तोरणे उभी करून त्याचे स्वागत केले. हीच प्रथा आपण गुढीपाडव्याला पाळतो. तेंव्हापासून "शालिवाहन शके"(शक पराभव संवत्सर) अस्तित्वात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या करवी जसा मोगलांचा पराभव केला तसा. शकांच्या या पराभवाला उद्देशून या कालगणना पद्धतीस “शालिवाहनकृत शकपराभवकाल’ असे त्या वेळी लोक म्हणू लागले व “शालिवाहन शककाले’ असा प्रयोग होऊ लागला. “शालिवाहनशक’ या सामासिक शब्दाचे “शालिवाहन शक’ असे विशेषण होते. नंतर कालांतराने या लांबलचक सामासिक शब्दाचा संक्षेप “शककाले’, “शकवर्षे’, “शके’ असा उत्तरोत्तर होत गेला – तेव्हा शालिवाहन शककाल आपणा मराठ्यांचा मोठ्या अभिमानाचे द्योतक आहे.” असे एके ठिकाणी प्राख्यात इतिहासकार राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.
सातवाहन कि शालिवाहन ? : -
शकांपासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य. या स्वातंत्र्योत्सवाचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरु केले.शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असे म्हटले आहे. त्याचे संस्कृतीकरण जेव्हा झाले, तेव्हा ते शालीवाहन झाले," असे शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना उल्लेख केला होता.
तर प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले.
शक संवत्सर, गुढी, आणि नववर्ष यांचा संबंध कसा आला असावा याविषयी: -
शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे ( शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शकासारखं ) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
![]() |
| नाशिक येथील गौतमीपुत्र सातकर्णी याचा लेख असलेली गुहा |
![]() |
| नाशिक येथील नहपानाचा जावई उषवदात याचा लेख असलेली गुहा |
![]() |
| गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू |
वासिष्ठीपुत्र पुळुमावी :-
इ. स. ७२ ते इ. स. ९५ या आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शकआक्रमणाचा निःपात करून व सातवाहन साम्राज्यसत्ता पुन्हा दृढ व समर्थ करून गौतमीपुत्र मृत्यू पावला. त्याच्या मागून त्याचा पुत्र वसिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमायी हा गादीवर आला. तोही पित्यासारखाच पराक्रमी होता. गौतमीपुत्रानंतर इ.स. १३२ मध्ये त्याचा ज्येष्ठ पुत्र पुळूमावी हा राजगादीवर आला. त्याच्या आईचे गोत्र वासिष्ठी असल्याने त्याला वाशिष्ठीपुत्र म्हणले गेले आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ' शिवश्री पुळूमावी ' असाही येतो. त्याने जवळपास २८ वर्षे राज्य केले. सातवाहनांच्या विशाल साम्राज्यावर एकछत्री अंमल करणारा पुळूमावी हा अखेरचा सम्राट.
यज्ञश्री सातकर्णी :-

सातवाहन साम्राज्याची अखेर :-
संदर्भ :-
तऱ्हाळे नाणेसंचय (Tarhala Coin Hoard)
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती. तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या – ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस किंवा सिरि सातकणि हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५ ग्रेन्स दरम्यान.
चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
स्कंद सातकर्णी : नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
शक सातकर्णी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली. तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.
संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी, सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी, स्कंद सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी, कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी, पुळुहामवी, विदर्भ
संदर्भ :
- Mirashi, V. V. ‘Studies in Indology’, Vol. 3, (Ancient Indian Coins), Vidarbha Samshodhan Mandal, pp.34-48, Nagpur, 1962.
- Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade – Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
- पाठक, अरुणचंद्र संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड :१), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
चांदा नाणेसंचय (Chanda Coin Hoard)
महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती. या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.
नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.
एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही. मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लंडन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.
संदर्भ :
- Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
समीक्षक : पद्माकर प्रभुणे
जोगळटेंभी नाणेसंचय (Jogaltembhi Coin Hoard)
जोगळटेंभी नाणेसंचय : जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत नोंद आढळत असली, तरी प्रत्यक्षात या नाण्यांची संख्या १४,००० ते १५,००० असावी, असे नोंदवले आहे. हा नाणेसंचय प्रथम रेव्ह. एच. आर. स्कॉट यांनी प्रसिद्ध केला (१९०८).

नाणेसंचयाचे स्वरूप : या संचयात सापडलेल्या १३,२५० नाण्यांपैकी ९,२७० नाणी ही नहपानाचा समकालीन सातवाहन कुळातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या स्वतःच्या चिन्हांनी पुनर्मुद्रांकित (counter-struck) केलेली होती. गौतमीपुत्र सातकर्णी हा नहपानाचा शत्रू होता. त्याचा नहपानाबरोबर दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे पर्यवसान गौतमीपुत्राने नहपानाचा व पर्यायाने त्याच्या क्षहरात वंशाचा उच्छेद करण्यात झाले, असे उल्लेख तत्कालीन अभिलेखीय व साहित्यिक नोंदींमध्ये आढळतात. उर्वरित जवळपास ४,००० नाण्यांवर मात्र अशा प्रकारचे गौतमीपुत्र सातकर्णीचे अंकन आढळत नाही. प्राप्त साठ्यापैकी एकूण २,००० नाण्यांना भोके पाडली आहेत.
नाण्यांचे वर्णन : प्राप्त सर्व नाणी चांदीची असून १.८० ते २.१० ग्रॅ. वजनाची आहेत. फक्त नहपानाचे अंकन असलेल्या नाण्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाची टोपी घातलेली अर्धप्रतिमा आहे. राजाच्या प्रतिमांमध्ये वैविध्य आढळत असून राजाच्या तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रतिमा नाण्यांवर आढळतात. प्रतिमांचे अंकन वास्तवदर्शी व कौशल्यपूर्ण आहे. दर्शनी भागावरील गोलाकार कडेवर ग्रीको-रोमन लिपीतील लेख आहे. हा लेख म्हणजे नाण्याच्या मागील बाजूवरील ब्राह्मी व खरोष्ठी लिपीतील लेखांचे लिप्यंतर आहे. बऱ्याच नाण्यांवरील ग्रीको-रोमन लिपीतील लेख अशुद्ध रूपातील आहे. नाण्यांच्या मागील बाजूस नहपानाचा पूर्वज असलेल्या भूमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूवर आढळणारी वज्र व बाण ही चिन्हे आहेत. वज्र व बाणाच्या मध्ये टिंब आहे. मागील बाजूच्या गोलाकार कडेवर ब्राह्मी लिपीतील ‘राज्ञो क्षहरातस नहपानसʼ हा व खरोष्ठी लिपीतील ‘राञो छहरतस नहपनसʼ असे लेख आहेत. नाण्यांवर वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
गौतमीपुत्र सातकर्णीने पुन्हा अंकन केलेल्या नाण्यांचे वर्णन : नहपानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने आपले छाप मारलेले आढळतात. यामध्ये सामान्यतः दर्शनी बाजूवर चैत्य व गोलाकार कडेवर ‘राञो गोतमीपुतस सिरि सातकनिसʼ हा ब्राह्मी लिपीतील लेख आढळतो. तर मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. तथापि काही वेळा पुढील व मागील बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल झालेली दिसून येते. गौतमीपुत्राने केलेले अंकन ठसठशीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यावरील चिन्हांची वैशिष्ट्ये ओळखणे शक्य होते. चैत्य व उज्जैन चिन्हांमध्ये आढळणारी वैविध्ये बघता वेगवेगळे छाप वापरल्याचे लक्षात येते. तसेच काही नाण्यांवरील लेख सुस्पष्ट व नीटनेटके असून काहींवरील अक्षरे मोठी, वेडीवाकडी व अस्पष्ट असल्याचे दिसून येते. वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
नाणेसंचयाचे महत्त्व : नहपानाच्या काही फुटकळ नाण्यांच्या प्राप्तीनंतर प्रथमच एवढा मोठा नाणेसमुच्चय नाणेसंशोधकांना अभ्यासासाठी प्राप्त झाला. या उपलब्धीमुळे तत्कालीन नाणेपद्धतीवर तर प्रकाश पडतोच; पण त्याचबरोबर पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजवंशाच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश पडतो. पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण याद्वारे करणे शक्य होते. विशेषतः गोदावरी खोऱ्यातील या दोन राजवंशांचा संघर्ष अधोरेखित होतो. याबरोबरच तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठीही या नाणेसंचयाची मदत होते. या नाण्यांवरून नहपानाच्या राज्याची भौगोलिक सीमा ठरवता येते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा उच्छेद केल्यानंतरही त्याची नाणी पुन्हा अंकन करून चलनात आणल्याचे कळते. थोडक्यात तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून या नाणेसंचयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
संदर्भ :
- Jha, Amiteshwar & Rajgor, Dilip, Studies in the Coinage of the Western Kshatrapas, Indian Institute of Research in Numismatic Studies, Anjaneri, 1992.
- Scott, H. R. ‘The Nasik (Jogaltembhi) Hoard of Nahapan’s Coinsʼ, The Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society, Vol. XII, pp. 223- 244, Bombay, 1908, Reprint-1969.
- Shastri, A. M. The Satvahanas and The Western Kshatrapas, Nagpur, 1998.
- पाठक, अ. शं. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
समीक्षक : अरुणचंद्र पाठक ; मंजिरी भालेराव
हिंदू नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.
पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया 
मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्नोति’पासून निष्पन्न झाला. 
प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.
पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
चष्टन राजाने सुरू केला शक?
पुण्यातील इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा वेगळी माहिती दिली. त्यांनी म्हटलं होतं की, "सातवाहन राजाने शकांना हरवलं आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे. शक हे इराणधून - तिथल्या सिथिया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा होत्या. शहरांपैकी नहपान याचं गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक इथंही राज्य करत होता. त्याच्या संदर्भातील शिलालेख पांडव लेण्यात सापडतात. नाशिकजवळ गोवर्धन इथं गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि क्षहरातांचा निर्वंश केला. त्यानंतर सातवाहन राजांनी नाशिक जवळील नहपानाचं राज्य आपल्या अखत्यारीत घेतलं." असे इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार म्हणतात. 
"गुजरातधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन ७८मध्ये चष्टनने स्वतःचे राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने काढलेल्या नाण्यांवर शकाचा पहिला उल्लेख आढळतो. तो त्याच्या वंशातल्या राजांनी ३०० वर्षं वापरला. पुढे वाकाटक राजा देवसेन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्या लेखातही आपल्याला शकाचा (शालिवाहन शक नव्हे) उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात शालिवाहन हे त्याला जोडलं गेलं आहे."
जुन्नरच्या लेण्यांध्येही शिलालेख
"जुन्नर आणि परिसरातल्या लेण्यांमध्ये या काळाशी संबधित शिलालेख मिळाले आहेत. रोमच्या व्यापारावर आपलं वर्चस्व असावं यासाठी त्याकाळी लढाया व्हायच्या. गौतमीपुत्राने नहपानावर वर्चस्व मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक नाण्यावर आपले शिक्के मारले", असं सायली पलांडे दातार म्हणाल्या. जर्मनीचे डॉ. हॅरी फाल्क हे इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवीन माहिती समोर आल्याचं सायली यांनी सांगितलं होतं.
शालिवाहन शके आणि मराठी नववर्ष
सातवाहनकालीन दरबारी पंडित गुणाढ्य यांनी ‘बृहत्कथा’ लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.
प्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ दिले.त्यांनी म्हटले होते की, "पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचे वर्णन केले आहे."
"पैठणचा उल्लेख तो ‘पैतान’ असे करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथे गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही २००० वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरे होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची," देव सांगतात.
४५० वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण
शालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव यांनी व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं होतं, या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. १२०० पैकी ९०० लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती. तिथे मोठी शहरे उदयास आली. याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवाने आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचे साम्राज्य मोठे होते. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो.
चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक - डॉ. मंजिरी भालेराव
आता शक संवत्सर, गुढी, आणि नववर्ष यांचा संबंध कसा आला असावा याविषयी:
मुळात वैदिक विचारांनुसार चैत्र हा पहिला महिना नाहीच..मार्गशीर्ष हा आहे. मग चैत्र हा महिना पहिला कसा झाला असावा?
दिनांक २० मार्च २०१७ ला म्हणजेच एक आठवड्यापूर्वी “विषुवदिन” साजरा झाला म्हणजेच या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्ताला ९० अंशामध्ये होता आणि तेव्हापासून आपल्याकडचा प्रसिद्ध वसंत ऋतू सुरु होतो आणि हा ऋतू नेहमीच सर्व ऋतुंमध्ये पहिला येतो (ऋतुगणनेची सुरुवात वसंत ऋतू पासून होते) अगदी कालिदासाच्या ऋतुसंहार मध्ये सुद्धा! भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण म्हणतो “मासानां मार्गाशिर्षोsहमृतुनां कुसुमाकरः” – सर्व महिन्यांत मार्गशीर्ष (श्रेष्ठ) मी आहे..आणि सर्व ऋतूंत वसंत (श्रेष्ठ ऋतू) मी आहे!
मला असं वाटतं, की या वसंत ऋतूचा आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या “Creation” किंवा “नवनिर्मिती” या ideasचं Contribution हे चैत्र महिना पहीला होण्यामागे असावं. असो. यावर माझं अजून काम सुरु आहे..
आता गुढीबद्दल:
ज्याप्रमाणे कुठल्याही धार्मिक विधीला Practical जगामध्ये शून्य अर्थ असतो तसंच या गुढीचं सुद्धा आहे..
या गुढीची पूजा एकेकाळी इंद्रध्वज म्हणून करत असावेत, हे आपण वर पाहिलं, किंवा याला स्वागत करण्यासाठी आजकालच्या फ्लेक्स, पोस्टर्स सारखं याचं स्वरूप असावं असाही एक निष्कर्ष अयोध्येच्या उभारलेल्या “Welcome गुढयांवरून” निघू शकेल.
मला असं वाटतं गुढीपाडवा हा “हिंदूंचा” एकमेव असा सण असेल जो इतक्या उत्साहाने समाजातील सर्व घटक साजरे करतात, ज्यामध्ये विधीसाठी लागणाऱ्या बऱ्यापैकी वस्तू लागतात (हार, वस्त्र, गढू वगरे) आणि तरीदेखील ज्याला भटजी, गुरुजी, ब्राह्मण, पुरोहीत यांची गरज नाही!
हां आता दिवाळीतले भाऊबीज, लक्ष्मीपुजन असे सण आहेत पण तो घरातल्या घरात आटपायचा विधी आहे त्याचा गुढीसारखं प्रदर्शन होत नाही..
याचं कारण म्हणजे हा सण किंवा विधी हा एवढी वर्षं झाली तरी (ब्राह्मण, आणि पुरोहीतांची involvement नसल्यामुळेच!) “RIGID” किंवा “STRICT” नाही! यामध्ये बाकी कुठल्याही पूजेसाठी लागणारे असले कडक नियम नाहीत दक्षिणा वगरे तत्सम प्रकार नाहीत उगाच गावजेवण नाही तर हा एक freestyle प्रकारचा हा सण आहे..
ज्याला जसं वाटतंय, जेवढी ऐपत आहे, जेवढी इच्छा आहे, तेवढं त्यानी करावं…आणि त्यामुळेच हा विधी एवढा बदलून सुद्धा केवळ लोकमान्यतेमुळे टिकून आहे!
तर..
मातीचा कुंभ असो असो किंवा चांदीचा गढू..
एखादं साधं वस्त्र असो किंवा पैठणी..
खारीक आणि खोबरं असो किंवा साखरेच्या गाठी..
गुढीचं स्थान युगानुयुगे किंवा “संवात्सरानुसंवत्सरे” अढळ राहील यात शंका नाही…!
|| शालिवाहन शक उर्फ शक-संवताचे उपाख्यान ||
मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मायबोलीवर कुणीतरी शालिवाहन-कुंभार-शकनिर्दालन-शालिवाहन शक या दंतकथेवर एक धागा काढला होता. तिथे मी त्या दंतकथेचे ऐतिहासिक वास्तव काय आहे यावर एक प्रतिसाद तपशीलात लिहिला होता. मग पुढची एक दोन वर्षे दर गुढीपाडव्याला फेसबुक किंवा इथेच परत त्या मजकुराचे पुनर्लेखन, दुवे देऊन रिक्षा फिरवणे असे उद्योग केले. गेल्या वर्षी ही रिक्षा फिरवायला जरा संकोचच वाटत होता, पण सध्याच्या वाढत्या ' एकमात्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छांच्या' फेसबुकीय आणि वॉट्सॅपीय उन्मादामुळे आवर्जून तपशीलात सोशल मीडियावर लिहिलेच, शिवाय लोकांशी वादविवादही केले. आता बास की! असं माझं मलाच वाटलं आणि तो मुद्दा मागेच पडला डोक्यातून.. पण एकुणात लक्षात आलं आहे की दरवर्षी नेमेचि येणार्या पावसाळ्याप्रमाणे अगदी नेमेचि येणारा हिंदू नववर्षाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा पूर काही थांबणारा नाही. तेव्हा निदान या संबंधीची ऐतिहासिक माहिती काय आहे हे सर्वांसमोर परत एकदा यायलाच हवी म्हणून. माझे गेल्या वर्षीचे प्रतिसाद, उत्तरं, टिपणं असं सगळं एकत्र संकलित करून इथे देते आहे. त्यात मधे मधे जर पुनरावृत्ती झाली किंवा वेगवेगळे परिच्छेद एकत्र केल्याने थोडेसे विस्कळित वाटले तर तेवढं गोड मानून घ्या अशी विनंती...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती. तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४) आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे...... साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली त्याला शिवराज्याभिषेक शक म्हणतो
साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.
आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला......
पुरावे एवढंच सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली असोसिएशन नंतरची आहे.)
आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल.... भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.
हो, आणि शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....
गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...
|| इत्यलम् ||
चष्टनाची प्रतिमा असेलेले त्याने पाडलेले नाणे
सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं.
औरंगाबाद, हैद्राबाद, अकोला येथे जमिनीवर आणि कोंडापूर, नेवासे येथे उत्खननात सातवाहन नामक राजाची नाणी सापडली आहेत. त्यावर पुढील बाजूस हत्ती आणि सभोवती 'रञो सिरि सादवाहनस' (राजा श्री सातवाहन) आणि मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष असावा कारण ह्याचेच नाव पुढे कुलाला पडलेले दिसते.
शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे
चष्टनाने स्वतःचे राज्यगणना वर्ष सुरु केले हे काहीसे असंभवनीय वाटते कारण चष्टन हा स्वतंत्र राजा नसून क्षत्रप होता. अर्थात क्षत्रपाचा स्वामी सामर्थ्यशाली राजा नसल्याने तो स्वतंत्र झाला होता. अर्थात कोणत्याच प्राचीन संवतांचे (शक्/विक्रम)उल्लेख संस्थापकाच्या नावाने येत नाहीत, तर ते कालांतराने प्रचलित होतात. ह्याच वेळी त्याचा समकालीन असलेल्या नहपानाच्या लेखातही संवताचा उल्लेख आहे ह्याचाच अर्थ चष्टन किंवा नहपान यांचा अधिपती असलेल्या कुणा प्रभावी राजाने हा संवत सुरु केला असला पाहिजे. तो म्हणजे कुशाण वंशीय कनिष्क. कनिष्क हा संवताचा संस्थापक असावा हे मत फर्ग्युसनने मांडले. कनिष्काने आपल्या विशाल भूभागाच्या शासनार्थ विविध क्षत्रपांची नेमणूक केली. कार्दमक, क्षहरात, भूमक ही क्षत्रपांची कुळेच. कनिष्काने आपला संवत सुरु केला होता व हुविष्क्, वासुदेव इत्यादी त्याच्या वंशजांनी तो सुरु ठेवला होता व त्याच्या क्षत्रपांनी देखील त्याचे निष्ठेने पालन केले. कुशाण कमजोर झाल्यावर क्षत्रप स्वतंत्र झाले, मात्र त्यांनी हेच संवत पुढे प्रचलित ठेवल्याने शक हे नामाधिमान त्याला चिकटले असावे असे मानता यावे.
शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे
हे संवतही माळवा, राजपुताना आदी भागातील शकांनी प्रचलित ठेवले, पुढे शेकडो वर्षांनी चंड्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्य ह्याने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व माळवा तसेच उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या ह्या पराक्रमामुळेच अॅझेसने सुरु केलेल्या संवताला विक्रम हे नाव चिकटले असावे.
१. या सगळ्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध? वेगवेगळ्या संवतांमध्ये नववर्षाची सुरुवात एकाच दिवशी कशी? (काही पंचांगे वेगळी आहेत म्हणा, पण तो वेगळा मुद्दा). की फक्त वर्षगणना राज्याभिषेकानुसार होत असे आणि नवीन वर्ष = चैत्र प्रतिपदा हे आधीपासूनच पक्के गृहीतक आहे?
२. उत्तरेत दिवाळी पाडव्याला राम आयोध्येत आला असे मानतात, आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला... ह्या गोष्टी कशा रूढ झाल्या?
३. चैत्र प्रतिपदा हे नववर्ष सर्वप्रथम कुणी मानले? का?
४. सुरुवातीलाच तुम्ही म्हणता की शालीवाहन नावाचा कुणी राजा नव्हता. आणि त्याच लेखात पुढे 'शालिवाहनाने मातीचे पुतळे ...' आणि '१२व्या शतकापासून ..... उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो' असे लिहिले आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी ब्रिटीश गॅझेटियर्स आणि परमार राजे यांनी लिहिलेल्या जरी असल्या, तरी ते नक्की कुणाला 'शालिवाहन' म्हणतात? आणि असे नाव का वापरले गेले?
डोंगरवेडा -
१. सातवाहन हे त्या कुलाचं नाव आहे. राजाचं नाव सिरि किंवा श्री आहे. सातवाहन राजाचा मूळपुरुष सिमुक नामक एक राजा होता. सातवाहनांना आंध्रभृत्य असे म्हणले जात असले तरी त्यांचे सुरुवातीचे पुरावे पश्चिम दख्खनमध्येच सापडले आहेत. या विषयात रस असेल तर डॉ शैलेन्द्र भंडारे यांच्या पीएचडीचा प्रबंध वाचा. त्यात त्यांनी नाण्याच्या पुराव्यांचं अतिशय सुरेख विश्लेषण केलेले आहे. हा प्रबंध अॅकेडेमिया.एज्यु वर उपलब्ध होता, अजूनही असावा
२. कनिष्काने शक संवत सुरू केला हे जुनं मत आहे. हे मत आता विश्वसनीयरीत्या मोडीत निघाले आहे. हॅरी फाल्क यांनी आता कनिष्काच्या राज्यारोहणाचे वर्ष इ स १२७ असावे असे मत मांडले आहे आणि ते बहुतांशीरीत्या मान्य झालेले आहे. ज्यांचे याविषयी मतभेद आहेत तेही कनिष्काने शक संवत सुरू केला हे आता म्हणत नाहीत.
शंतनू
१. चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं.
२. रामाची गोष्ट कुठे कशी रूढ झाली किम्वा याच्याशी जोडली गेली यावर माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी कुणाला तरी जेठा मारून बसून नव्याने काम करावं लागेल बहुदा
३. शालिवाहन असा राजा नसला तरी सातवाहन या नावाचे प्राकृत रूप शालिवाहन किंवा सालाहण हे आपल्याला ७व्या ८व्या शतकापासून दिसू लागते. शालिवाहन राजा प्रतिष्ठान नगरीत राज्य करत असताना अशी अगदी टिपिकल सुरुवात करून बर्याच दंतकथा/मिथककथा नंतरच्या साहित्यात आपल्याला दिसून येतात. त्या सातवाहन कुलाची ती सांस्कृतिक आठवण मिथककथेमधे एका राजाच्या रूपात साठवली गेली आहे असे आपण म्हणू शकतो
हिम्सकूल -
वेदकाळापासून आपल्याला महिन्याची आणि तिथीची गणना होत असे दिसून येते. वेदातल्या उल्लेखानुसार फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या दिवसाला नवे वर्ष सुरू होत असे म्हणे. ही चांद्रमासीय कालगणना होती आणि पाच वर्षांच्या कालावधीत दोनवेळा अधिकमास मिळवला जात असे. मात्र कशा पद्धतीने त्याचे तपशील आपल्याकडे नाहीत.
जाता जाता - अवांतर वेदाच्या भाषेत युग म्हणजे पाच वर्षांचा काळ (इथेही वर्षाला संवत्सर म्हणले जात असे)
माझ्या हाताशी आत्ता सर्व संदर्भ ग्रंथ नाहीत तेव्हा जशी आठवेल तशी माहिती इथे लिहिली आहे. किंचित कुठे चुभू असू शकते, पण माझ्या स्मृतीप्रमाणे तपशील बरोबर आहे.
शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.
अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.
सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी
गौतमीपुत्र सातकर्णी
सातवाहन वंशाच्या ३० राजांची यादी उपलब्ध असली, तरी त्यांच्यापैकी सर्वांत कर्तृत्ववान आणि श्रेष्ठ राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. सातकर्णी हे तर आधीपासूनच उपनाम म्हणून वापरलेले आहे. आणि हा वंश मातृसत्ताक असावा, असे दिसते. राजाच्या आईचे नाव ‘गौतमी बलश्री’. त्यामुळे तो स्वत: ‘गौतमीपुत्र!’ आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो.
‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला आणि याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.
म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!





































































































.jpeg)
























.jpg)





No comments:
Post a Comment