मृगा वर्तक
https://www.mahamtb.com/authors/Mruga_Vartak.html
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
See other blogs:
http://paithani-saree.blogspot.in/
http://uppadasarees.blogspot.in/
Web site:
www.uppada.com
www.paithani.in
www.paithanisari.in
पैठणची पैठणी इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. तेव्हाही ती परदेशांत पाठवली जात असे. सूक्ष्म कलाकुसर असलेली पैठणी तयार करणारे कुशल कारागीर आता दुर्मीळ होत चालले आहेत. पैठणींचे उत्पादन आणि विक्री यांच्यात जोवर समन्वय निर्माण होत नाही, तोवर तिच्या नशिबीची उपेक्षा संपणार नाही. महाराष्ट्राचे हे महावस्त्र देशी-विदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी पातळीवरही विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' या गाण्याला सुमारे ४८ वर्षे झाली असतील. तमाशापटांचा तो काळ. जगदीश खेबूडकरांची गीतकार म्हणून तेव्हा नुकतीच ओळख निर्माण होऊ लागलेली. आता 'गदिमां'ची गाणी मागे पडतील, अशा कंडय़ा पिकवल्या जाऊ लागलेल्या. त्या काळात 'मल्हारी मरतड' चित्रपटातील 'गदिमां'च्या या लावणीने बाईपणाच्या भावनांचा ज्या नजाकतीने ठाव घेतला, त्याचे गारुड आजही कायम आहे. 'गदिमां'च्या लावणीतील 'नाचरा मोर' पैठणी विणकरांच्या विश्वात मात्र 'बांगडीमोर', 'साखळीमोर' या नावाने ओळखला जातो. पैठणी विकत घेणाऱ्यांसाठी मोराचे नाचरेपण लोभस असले तरी हे नक्षीकाम करणाऱ्यांच्या आयुष्याची वीण मात्र उसवलेलीच दिसते. पैठणीचा भवताल म्हणजे श्रीमंती आणि गरिबी यांमध्ये हिंदूोळे घेणारा जणू लोलकच! पैठणीचे आडवे-उभे धागे मोठय़ा गुंतागुंतीचे. हा तानाबाना नक्की कसा? तर- एका पैठणीत तब्बल उभे चार हजार धागे! काठापदरावर रेशीमनक्षी आणि जरतारीची एकेक वीण करायला कधी दोन महिने लागतात, तर कधी वर्ष-सव्वा वर्षही लागते. पदरावर नाचरा मोर वर्षांच्या आत कधी चितारताच येत नाही. काही पैठणींची जरतारीएवढी अस्सल, की अंधारातही तिचा लख्ख उजेड पडावा! पैठण येथील मीराबाई शेळके यांचे सोनेरी जर आणि रेशमी धाग्यांशी नाते जडून झाली असतील वीसएक र्वष. नवऱ्याचा व्यवसाय बूटपॉलिशचा. दोन मुले. घर चालवायचे तर काम करणे अपरिहार्य. १९९० मध्ये पैठणमध्ये पुन्हा एकदा विणकामाचे प्रशिक्षण सुरू झाले. पैठणीची वीण घालायला त्या शिकल्या. दोन मुले शिकली. एक दहावीपर्यंत; तर दुसरा त्यांच्या भाषेत चौदावीला. सकाळी दहापासून संध्याकाळपर्यंत मीराबाई कितीतरी प्रकारचे काम करतात. त्या वापरत असलेल्या हातमागावरील यंत्राचे सुटे भागदेखील सहज लक्षात ठेवता येत नाहीत. प्रत्यक्ष विणकाम करण्यापूर्वी कितीतरी किचकट काम करावे लागते. सिमेंटच्या चार गट्टवर चार लोखंडी सळ्या बसवलेल्या. त्याला रेशमी धागा गुंडाळला जातो. त्याला 'धापा' म्हणतात. धाप्यावरचा धागा आसारीवर घ्यायचा. पतंगाला लागणारी आसारी जशी, तशीच ही. पण आकार जरा मोठा. त्यानंतर आसारीवरचा धागा 'तनसाळ'ला गुंडाळायचा. एका लाकडी चौकटीला खुंटय़ा ठोकलेल्या. फणीचा आकार म्हणता असे हे तनसाळ. १८० धाग्यांचा वेढ तयार केला जातो. त्याला 'गुढा' म्हणतात. असे १८ गुढे तुराईवर घ्यायचे. 'तुराई' हा हातमागाचा एक भाग. रेशमी धागा उकलून तो तुराईवर आणण्यासाठी निष्णात कारागीराला तीन दिवस लागतात. कारागीर नवखा असेल तर दहा दिवस. नव्याने प्रशिक्षण घेणाऱ्याला एवढे शिकायला किमान महिनाभराचा कालावधी तरी लागतोच. अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पैठणीची 'जोडणी' करावी लागते. ही जोडणी झटपट करून देणारे कारागीर एका हातमागासाठी ५०० रुपयांपर्यंत मानधन घेतात. मीराबाईंसारख्या कितीतरी महिला ही कलाकुसर करतात. फर्जाना शेख मीराबाईबरोबर काम करतात. त्यांचे यजमान चपलांच्या दुकानात काम करतात. त्यामुळे फर्जाना यांना काम करावे लागते. दिवसभर मान मोडून काम केल्यावर महिन्याला केवळ तीन हजार रुपये मिळतात. त्यांनी तयार केलेली पैठणी मात्र २० हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत विकली जाते. पैठणीची कमीत कमी किंमत सात हजार रुपये. जेवढी जरतारी अधिक; तेवढा त्याचा दर अधिक. जेवढे रंग अधिक; तेवढा विणकामाचा वेळ अधिक. विणकामात प्रत्येक रंगाच्या धाग्याचा एक 'काकडा.' कापडी गुंडाळीला 'काकडा' म्हटले जाते. या काकडय़ाला गुंडाळलेले नाना रंगसंगतीचे धागे. जरतार वेगळी. पैठण शहरात तारकशी करणाऱ्यांची पूर्वी एक गल्लीच होती. सोन्या-चांदीच्या धातूपासून केसांच्या आकाराची तार करणारी ही मंडळी आता नाहीतच असे म्हणायला हरकत नाही. 'पावटे' हा शब्द आपण ऐकला असेल. तार लांब करण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. धातूपासून तार करण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व जल-अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या 'दक्षिण काशी पैठण' पुस्तकात आढळतो. सोन्या-चांदीची केसासारखी बारीक तार तयार करण्याची प्रक्रिया पुन्हा गुंतागुंतीची आहे. सोनार, तारू किंवा तरकसे, पटवेकरी असे कितीतरी कारागीर या प्रक्रियेत पूर्वी असायचे. आता तो व्यवसाय करणाऱ्यांची काही आडनावे आणि काही आळीची नावे तेवढी शिल्लक आहेत. २२० यार्ड लांबीची तार ४० हजार यार्ड लांबीच्या धाग्यांमध्ये रूपांतरित केल्यानंतर जरतारी तयार होते. यार्ड आणि मीटरमध्ये ०.९० चा फरक! अलीकडे जरतारी परराज्यांतून विकत आणली जाते. पैठणीसाठी लागणारे कच्चे साहित्य कर्नाटक व गुजरातमधून आणले जाते. कर्नाटक सरकारने रेशीम उद्योगाला मोठी चालना दिली. हा कच्चा माल तसा महागडा. जरतारी ३२०० ते ३४०० रुपये किलो आणि रेशीम किमान हजार रुपये किलो. एक पैठणी करायची असेल तर किमान १६० ते ३५० ग्रॅम जरतार वापरली जाते. जरतार जेवढी अधिक, तेवढी किंमत अधिक. संसार सांभाळून हातमागावर पैठणीचे विणकाम करणारे कारागीर कमीच झाले आहेत. या व्यवसायातील अडचणी अशिक्षित असणाऱ्या फर्जाना नेमकेपणाने मांडतात. पैठणी तयार करण्यास अधिक वेळ लागतो. समजा, पैठणीसाठी लागणारी गुंतवणूक एखाद्या विणकराने केली, तरी त्याच्या विक्रीची व्यवस्था काय? कलाकुसर गुंतागुंतीची; परंतु त्यापेक्षाही श्रीमंतांच्या बाजारपेठेत गिऱ्हाईक शोधणे अधिक अवघड! त्यामुळे कायमस्वरूपी काम असणाऱ्या सरकारी केंद्रात त्या काम करतात. जगण्यात उसवलेली वीण पैठणीत शोधणाऱ्या अशा कितीतरी महिला आहेत.. सुखाच्या एका धाग्यासाठी झटणाऱ्या! मीराबाई, फर्जाना या कोणत्या कलाकाराचा वारसा जपताहेत, कुणास ठाऊक! दोन हजार वर्षांपूर्वी कुणा अनाम कारागिराने घेतलेली वीण पिढय़ान् पिढय़ा टिकली आहे. आता ती जीर्णशीर्ण झाली आहे. बदलत्या जगात त्याची किंमत तेवढीच. तसा विणकरांचा इतिहास मोहेन्जोदडो-हडप्पा संस्कृतीमध्ये असल्याचा दाखला दिला जातो. सातवाहनकालीन महाराष्ट्रात ही कला जोपासली गेली. पैठणी हे 'महावस्त्र' पैठणचे कसे? एक संगती विचार करायला लावणारी आहे. त्याची नाळ उत्तर भारताशी जोडता येईल. बनारस या गावाचा उल्लेख धार्मिक लोक 'पुण्यभूमी काशी' असा करतात. तेथे 'बनारशी' तयार होते. तसेच पैठणला 'दक्षिण काशी' म्हणतात. तसेच महावस्त्र या भागातही असावे, असा या संगतीचा धागा! अर्थात याला ऐतिहासिक पुरावे नाहीत. मात्र, ही संगती संशोधकाला विचार करायला नक्कीच भाग पाडणारी आहे. पैठणीचा सर्व इतिहास मोरवंचीकरांना मुखोद्गत आहे. सातवाहनकालीन राजवटीत या व्यवसायाला स्थैर्य मिळाले असावे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी टाकसाळ असणारा हा एकमेव राजा होता. त्यानंतर पैठणवर अनेकांची राजवट आली-गेली. तेव्हा व्यापारातील व्यवहार वस्तुविनिमयातच होत. पैठणचा उल्लेख 'सगुणक्षेत्र' असाही केला जातो. वेगवेगळय़ा उपासना पद्धतींच्या या शहरात मंगलमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून महावस्त्रे परिधान करण्याची पद्धत होती. त्यामुळे शालूंचा व्यापार बहरत गेला. पुढे त्याला 'पैठणी' असे नाव पडले. जरतारी वस्त्रांसाठी 'हिरण्यद्रपी' शब्द वापरला जाई. रेशमावर जरी आणि मोत्याचे नक्षीकाम केल्यास त्याला 'मणिचिरा' म्हटले जाई. त्या काळात रोम शहराशी पैठणचा मोठा व्यापार होता. पैठणहून पाठवलेला माल डहाणू, नालासोपारा येथील बंदरांतून समुद्रमार्गाने जात असे. पैठणी पाठवण्याची विशिष्ट अशी पद्धत होती. बांबूच्या आतील पोकळ भागात पैठणी गुंडाळून बसवायची. मेणाने त्याला सील करायचे आणि त्यावर रंग, वजन, नक्षी आदी माहिती लिहून ती परदेशी पाठवली जात असे. सातवाहनांनंतर काही विणकर पश्चिम घाटात स्थलांतरित झाले, तर काही कारागिरांना वेगवेगळय़ा राजांनी सक्तीने स्थलांतरित केले. यादव राजवटीच्या काळात अनहिलपट्टणच्या राजाने पाचशे विणकरांना सक्तीने गुजरातला नेले. पुढे रघुजी नाईक नावाच्या सरदाराने श्यामदा वालजी या गुजराती व्यापाऱ्याला बोलावून त्याच्यामार्फत काही सवलती देऊन कारागिरांना येवलावाडी (येवला) येथे नेल्याचा संदर्भ मोरवंचीकरांच्या पुस्तकात आढळतो. अशा तऱ्हेने अनेक निष्णात कारागीर पळविल्याने पैठणची पैठणी मात्र जीर्णशीर्ण झाली. इतिहासातील ही उंची साडी आपल्या कपाटात असावी असे आजही प्रत्येक महिलेला वाटते. पैठणी विकत घेता यावी म्हणून मध्यमवर्गीय महिला भिशी करतात. 'होम मिनिस्टर' या बहुचर्चित कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यामुळे 'पैठणी' नव्याने चर्चेत आली. अर्थात बांदेकर देत असलेल्या पारितोषिकस्वरूप पैठणी आणि हातमागावरील पैठणी यांत मोठे अंतर असले तरी गेल्या काही वर्षांत त्यांनी या कार्यक्रमाद्वारे पैठणीची घडवून आणलेली चर्चा या व्यवसायाला चालना देणारी ठरली आहे. नव्या जमान्यात भरजरी पैठणींची फॅशन नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. काही पैठणी फॅशन शोज्साठीही वापरता येऊ शकतील. विदेशी पाहुण्यांसमोर फॅशन शो झाल्यास पैठणीच्या विक्रीत निश्चितच वाढ होऊ शकते. पैठणीची विक्री आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसविणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचे सातत्यही टिकवण्याची गरज आहे. पैठणीवरील नक्षीकामाचे काही अभ्यासक्रम सुरू आहेत. कितीतरी प्रकारची नक्षी कालौघात अस्तंगत झाली आहे. नारळी नक्षीकाम त्यातल्या त्यात सोपे. साडीच्या काठाचा भाग बऱ्याचदा या नक्षीचा असतो. शंकरपाळी आकाराचे हे नक्षीकाम तुलनेने लवकर होते. मुनियापट्टा, आसवली, अजंता लोटस, कोयरीमोर, साखळीमोर, स्वप्नवेल, कालिचंद्रिका अशा कितीतरी प्रकारचे नक्षीकाम आज होते. ते टिकवायचे असेल तर या व्यवसायाला राजाश्रय मिळण्याची गरज आहे. विविध राज्यांतून भरणारी प्रदर्शने आणि विक्री यांचे उद्दिष्ट ठरवून महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाकडून काही प्रयत्न होतात. मात्र, ते खूपच तोकडे आहेत. 'इंचभर विणावं आणि पोटभर खावं' अशी म्हण पैठणमध्ये अनेक वर्षे होती. ती प्रत्यक्षात यावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जरतारीचा 'जडपणा' 'मल्हारी मरतड' चित्रपटातील दोन लावण्या गाजल्या. एक- 'उसाला लागंल कोल्हा' आणि दुसरी- 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' वसंत पवारांचं ठेकेबाज संगीत आणि सुलोचनाबाईंचा तसाच ठसकेबाज आवाज. पैठणीचा विषय निघावा आणि हे गाणे आठवू नये, असे सहसा घडत नाही. एवढे छान गाणे म्हणणाऱ्या सुलोचनाबाईंना मात्र जरतारीचा शौक नाही. पण पैठणीचा एक किस्सा त्या आवर्जून सांगतात. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना नवी दिल्ली येथे सुलोचनाबाईंच्या गाण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमलाताई चव्हाण आल्या होत्या. तेव्हा त्या खासदार होत्या. 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' हे गाणे म्हणून झाले. त्यानंतर मध्यंतरात प्रेमलाताईंनी सुलोचनाबाईंना आवर्जून विचारले, 'एवढे छान गाणं म्हणता.. मग साडी का अशी साधी सिल्कची नेसता?' सुलोचनाबाई म्हणाल्या, 'मला जरतार जरा जडच वाटते.' सुलोचनाबाईंचा हा साधेपणा मनाला भावणारा असला तरी जरतारीची मेहनत मात्र तो जडपणा अधोरेखित करणारी असते. 'होम मिनिस्टर' आणि पैठणी दररोज पैठणीशी संबंध येणारा एकमेव सूत्रसंचालक दूरचित्रवाणीवर हमखास दिसतो, तो म्हणजे आदेश बांदेकर. दररोज एकीच्या हातात पैठणी ठेवल्यावर त्या 'वहिनीं'च्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद टिपणारे बांदेकर सांगतात की, 'पैठणीची किंमत किती, हा प्रश्न महत्त्वाचा नसतोच. पण अशी साडी आपल्याकडे असावी असे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. 'होम मिनिस्टर'च्या यशात पैठणीचे बक्षीस हे एक मुख्य आकर्षण म्हणता येईल. कोठेही जावो, पैठणी सोबत न्यावीच लागते.'
परदेशातही खुलला पैठणीवरचा मोर...
तरुण पिढीला पैठणीकडे आकर्षित करण्यासाठी गुलाबी, मालती, जांभळा आणि मोरपंखी या पारंपरिक रंगांबरोबरच तरुण पिढीला भावेल असे रंग आणि आकर्षक डिझाईन तयार केले जात आहेत. पैठणीपासून महिलांसाठी पर्स, ओढण्या, "वॉल हॅंगिंग', "वॉल पॅनेल्स' यांसारख्या उपयुक्त वस्तू तयार करून ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे.
http://paithanisari.blogspot.com/2015/
महाराष्ट्राची वस्त्र परंपरा (महाराष्ट्र)
कापसाचा शोध मानवी जीवनातील अतिशय क्रान्तिकारी घटना होय. कारण या शोधामुळे मानवाची रानटी अवस्था संपून त्याची सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आता नखदंतावलंबी, भटके, अर्धनग्न जीवन संपून स्थिर व निश्चित जीवनास आरंभ झाला. कारण कापूस पिकविणे म्हणजे कृषीजीवन जगणे होय.आता त्याला झाळांच्या ओधड-धोबड साली नेसण्याची व मृत जनावरांची कातडी पांघरण्याची आवश्यकता नव्हती. कारण कापसापासून सहजरीतीने वस्त्रे तयार करता येत होती. तसेच ती टिकाऊ असून धुता येत होती त्यामुळे त्यांचा झपाट्यांने प्रसार झाला.
कापसापासून कापड तयार करण्याचे ज्ञान त्याला पशुपक्ष्यांपासून अवगत झाले असावे. स्त्रियांनी या क्षेत्रात कमालीची प्रगती साधली. कारण स्त्रिया वस्त्र विणन्यात प्रवीण असल्याचे अनेक संदर्भ आपणास प्राचीन वाङ्मयामध्ये सतत आढळतात.
रेशमाचा शोध ही सुद्धा मानवी जीवनातील अत्यंत सुखद घटना होय. रेशीम कापसापेक्षा मुलायम असून त्याची वस्त्रे अधिक आकर्षक व टिकाऊ असतात. तथापि भारतीयाना रेशीमतयार करण्याचे ज्ञान नव्हते असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. कारण रेशमाची पैदास करणारा चीन हा एकमेव देश असून त्याने हेज्ञान इसवी सनाच्या काही शतकांपर्यंत अत्यंत गुप्त ठेवले होते. आजही जगामध्ये भारतीय रेशमापेक्षा चिनी रेशीम अधिक लोकप्रिय आहे. तसेच प्राचीन साहित्यामध्ये रेशमाचा उल्लेख ‘चीनसुक’ अशा प्रकारे आलेला आढळतो. त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळते. त्यामुळे रेशमाचे उत्पादन व त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयाना ज्ञात नसावी असा समज पसरण्यास मदत झाली.
असे असले तरी पुरातत्व शास्त्रज्ञाना अगदी अलिकडे नवीन पुरावे उपलब्ध झाले आहेत. प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननामध्ये अगदी खालच्या थरात रेशमाचे अवशेष उपलब्द झाले आहेत. या सर्व पुरातत्वीय पुराव्यावरून येथील मानवास कापसाप्रमाणेच रेशमापासून वस्त्रे तयार करण्याची कला प्रागैतिहासिक (proto-historic) कालापासून अवगत असल्याचे स्पष्ट होते. या बरोबरच त्याला जरतारी व भरतकामाचेही ज्ञान असल्याचे समजते.
प्राचीन साहित्यामध्ये सुती, रेशमी व भरजरी कपड्यांचे उल्लेख विपुल प्रमाणात सापडतात. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून आला आहे. तर महाभारतामध्ये याचा उल्लेख मणिचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबरच माणिक-मोती व मौल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. अशा प्रकारच्य मौल्यवान रेशमी वस्त्रांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये पट्टा या नांवाने करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रातील मौल्यवान वस्त्रांचा विचार केल्यास महानुभाव साहित्यामध्ये पैठणच्या भरजरी उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतून अशा प्रकारची वस्त्रे व ही वस्त्रे निर्माण करणारी केन्द्रे सुटली नाहीत. एकंदरीत प्राचीन कालापसून भारतामध्ये अशा प्रकारची वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते.
पारंपारिक कलाकाराने निर्माण केलेली ही अमोल वस्त्रे प्रतिकूल अशा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये टिकून राहिली यामध्येच त्यांचे मोठेपण दिसून येते. वैचित्र्यपूर्ण नक्षीकाम आणि उच्च पोत (texture)यामुळे जागतिक बाजारपेठातून भारतीय वस्त्रानी एकाधिकाअ प्रस्थापित केला. आणि दोन सहस्त्रकाहून अधिक काळ हा एकाधिकार अबाधित राहिला.
सुबक वीणकाम व त्यावरील गुंतागुंतीच्या विरंजन (bleaching)आणि रंगप्रकिया (dyeing) तसेच कोणत्याच प्रकारच्या आधुनिक तंत्राचा वापर न करता हाताने किंवा मागाचे सहाय्याने त्यावर नक्षीकाम करणे, हे युगानयुगांच्य परिश्रमाचे फलित मानावे लागेल. अशा प्रकारची कला ही सर्वसामान्यपणे आनुवंशिक असते. कठोर परिश्रम करण्याची तयारी, धंद्यावरील निष्ठा आणि परस्पर सहकार्याची भावना यामधून हे नैपुण्या साध्य होत असे. कला आनुवंशिक असल्याने धंद्यातील कसब बापातूनच मुलात उतरत असे. तसेच हा धंदाही पित्याकडून पुत्राकडेच जात असल्याने धंद्यातील जीवघेणी स्पर्धा टाळण्यास त्यामुळे मदत होत असे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत लेखामध्ये महाराष्ट्राच्या शतकानुशतकातील वस्त्रांचा इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
या परैसरातील सातवाहनांच्या उदयाने सांस्कृतिक विकासाचे आगळे दालन खुले झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली येथील नागरीकरणास (urbanisation) गती प्राप्त होऊन तेर, नाशिक (गोवर्धन), भोगवर्धन, जुन्नर, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) आदि नागरी केन्द्रांचा उदय झाला. सातवाहन घराण्यांनी या परिसरावर चार शतकाहून (२३० इ.स. पूर्व व ते २३० इ,स,) अधिक काळ राज्य केले. सातवाहन काळात लाभलेले राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता नागरीकरण प्रक्रियेस पोषक ठरली. तसेच सातवाहन सम्राट व्यापाराबाबत अतिशय दक्ष होते. त्यांनी देशान्तर्गत व्यापारात सुसूत्रता प्रस्थापित करताच परदेशीय व्यापाराची (विशेषतः पाश्चिमात्य देशांशी) जोरदार आघाडी उघडली. अल्पावधीतच त्यांनी ग्रीक व रोम येथील बाजारपेठा हस्तगत केल्या.
याच सुमारास (इ. स. ४५-४६ मध्ये) हिप्पोलसने मान्सून वाऱ्याचा (मौसमी वारे) शोध लावून त्याची व्यापारासाठीची उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे सातवाहनांच्या पश्चिमी व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा सर्व व्यापार भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून होत असल्याने पश्चिम किनाऱ्याचे महत्त्व वाढले. आणि लवकरच या परिसराचे नागरीकरण होऊन तेथे भडोच, कल्याण, नालासोपारा, चौल आदि बंदरे उदयास आली. प्रस्तुत बंदरे सह्याद्री पर्वतातील घाटमार्गांनी देशावरील प्रमुख बाजारपेठाशी जोडली गेली. त्यामुळे देशभर व्यापाराचा विस्तार होण्यास मदत झाली.
पाश्चिमात्य बाजारामुळे सातवाहनांची फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. ही त्यांची समृद्धी क्षत्रप या त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना सहन झाली नाही. म्हणून कोकणपट्टीवर व सातवाहन साम्राज्यावर प्रखर हल्ले करून पाश्चिमात्य व्यापार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तथापि गौतमीपुत्र या सातवाहन सम्राटाने क्षत्रपांचे समूळ उच्चाट्टान करून परराष्ट्रीय व्यापारातील आपली पकड मजबूत केली.
मान्सून वाऱ्याचा शोध व क्षत्रपांचा पराभव यामुळे सातवाहनांचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्यांच्या वैभवात भर पडली. व्यापारामध्ये प्रामुख्याने कापडाची फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. कापडामध्ये रंगी-बेरंगी सुती व रेशमी कापड, रेशीम व तलम कापडाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. व्यापार सातवाहनांना फायदेशीर असल्याने ग्रीस व रोममधून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ दक्षिण भारताकडे येत होता. या वस्त्रानी पाश्चिमात्य जगाला वेडे केले होते. प्लिनी या समकालीन लेखकाने रोमन लोकांच्या या उधळेपणावर सडकून टीका केली आहे. हा ओघ थांबविण्यासाठी रोमन लोकसभेला या आयातीविरुद्ध प्रतिबांधात्म कायदे करावे लागले होते. आज परिस्थिती नेमकी उलटी झाली असून आपणास पाश्चिमात्य आयातीवर बंदी घालावी लागत आहे. यालाच इतिहास चक्राची उलटी गती असे म्हणावे लागेल.
या वैभवाचे पडसाद समकालीन पाश्चिमात्य लेखकांच्या प्रवासवर्णानातून ठायी उमटलेले दिसतात. या परिसरातील वस्त्रोद्योग हे या समृद्धीचे मूलभूत कारण होते. आणि महाराष्ट्राने वस्त्रोद्योगात एकाधिकार प्रस्थापित केला होता. तसेच या कालखंडात पैठण हे सातवाहनांच्न्या राजधानीचे ठिकाण असून ते वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होते. याशिवाय तेर, नेवासा, जुन्नर, नाशिक आदि केन्द्रेही वस्त्रनिर्मितीमध्ये अग्रेसर होती. आजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या दोन हजार वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते.
हालसातवाहनाच्या गाहासत्तसई या प्राकृत काव्य ग्रंथातून आपणास समकालीन वैभवाची व बस्त्रप्रावरणाची कल्पना येते. प्रस्तुत ग्रंथात सातशे शृंगारिक गाथा असून पैकी गाथा क्रमांक २५५ ते २६३ आपणास वीनकाम, रंगकाम, भरतकाम व शिवणकाम यांची तपशीलवार माहिती देतात.
सातवाहनकालीन नाशिक येथील शिलालेख या उद्योगातील समृद्धीची कल्पना येण्यास फारच उपयुक्त आहेत. याशिवाय पितळखोरा, कार्ले, भाजे, बेडसा, अजिंठा आदि लेण्यातील शिल्पावरून आपणास समकालीन वस्त्रांची कल्पना येण्यास मदत होते. भारतीय पारंपारिक पोषाखामध्ये प्रामुख्याने मागावरील तयार कपड्यांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने साडी, शेला, धोतर, शाल, फेटा लुंगी पट्टी (scarf) आदि वस्त्रे येतात. सर्वसामान्यतः ही वस्त्रे सुती असत; कारण प्राचीन कालापासून हा परिसर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय स्त्री आणि पुरुष यांच्या पोषाखाचा विचार केल्यास त्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. स्त्रिया चोळी कंचुकी वापरीत त्याऐवजी पुरुष उत्तरीय नांवाचे वस्त्र पांघरीत असत. पोषाखात एकंदरीत अधोवस्त्र, अंतर्वस्त्र आणि परिवस्त्र असे तीन घटक असत. पुरुष डोक्यावर फेटा गुंडाळीत तर स्त्रिया अंगावरुन ओढणी घेत असत.
सुती कपड्यांशिवाय रेशमी कपडे वापरण्याची प्रथा होती. रेशमी कपड्यांवर जरतारी मीनाकारी करण्याच्या कामात येथील कारागीर आरंभापासून वाकबगार होते.. सुती आणि रेशमी कपडे रंगविण्याकडे लोकांचा कल होता. अजिंठा व बाग लेण्यातील नखरेल रंगीत चित्रे हि याची साक्ष होत. तसेच तलम वस्त्रे अतैशय लोकप्रिय होती. तलम वस्त्रे विणण्यात भारतीय कलाकार एकमेवाद्वितीय होता. शिल्पांनी उपरोक्त लेण्यातील शिल्पावर हीच वस्त्रे असल्याने शिल्पे अर्धनग्न किंवा नग्न भासतात. तथापि परिधान केलीली वस्त्रे अतिशय तलम असून त्याची जाणीव केवळ वस्त्रांच्या घड्यावरून होऊ शकते. एकंदरीत वास्तवाचा आभास निर्माण करणारा शिल्पी व वास्त्वात इतकी तलम वस्त्रे निर्माण करणार दोन्ही श्रेष्ठ होत.
तुलनात्मकदृष्ट्या रेशमी कापड महाग व केवळ श्रीमंतांनाच परवडणारे होते. आजही या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला दिसता नाही. प्राचीन काळापासून स्त्रिया पोषाखाबाबत विशेष चोखंदळ वाटतात. त्यांची वस्त्रांविषयीची आवड, रंग-संगती व वस्त्र परिधान करण्याची पद्धती वाखाणण्यासारखी होती व आहे. साडी परिधान करण्याच्या अनेक पद्धती असून ते परिसरावर अवलंबून होते. सर्वसामान्यतः आठव्या शतकापर्यंत विकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर प्रथा होती. नंतरच्या कालात ती नष्ट होऊन सकच्छ साडी घालण्यास प्रतिष्ठा लाभली. आणि आजही सकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर हे महाराष्ट्रीय स्त्री -पोषाखाचे आगळे वैशिष्टय मानावे लागेल.
भारतीय पोषाखाचा विचार केल्यास ही पद्धती पारंपारिक असून त्यामध्ये बदल करण्यास फारसा वाव नाही. कारण ही वस्त्रे म्हणजे कमी अधिक लांबी रुंदीच्या मागावर तयार होणाऱ्या पट्ट्याच होत. यामध्ये शिवणकामास फारसे महत्त्व नाही. महाराष्ट्रही या पद्धतीस अपवाद नाही. तथापि भारतीयांचा जेव्हा परकीयांशी संबंध आला तेव्हा त्यांनी परकीयांचे कांही उपयुक्त वस्त्र प्रकार येथे रुढ करण्याचा प्रयत्न केला. आणि सम्राट अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्रिटिश आक्रमणापर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू असल्याचे दिसत. महाराष्ट्रात याचा आरंभ क्षत्रपांच्या आक्रमणापासून होतो. सातवाहन जेव्हा क्षत्रपांच्या संपर्कात आले तेव्हा सातवाहनानी त्यांचे कांही वस्त्रप्रकार आत्मसात केले. म्हणूनच आपणास नंतरच्या शिल्पकृतीमध्ये हा फरक जाणवतो. यामध्ये आपणास विजार, तंगविजार, शिरबंध, बंडी, झगा ( पायघोळ व अर्धा), पट्ट्यापट्ट्याची व फुलाफुलांची वस्त्रे आदि आढळतात.
सातवाहनोत्तर कालखंडातील वस्त्र प्रकारात थोड्याफार प्रमाणात बदल झाल्याचे बाणभट्ट, ह्युएनत्संग यांच्या लिखाणावरून व अजिंठा आणि बाग येथील चित्रलेण्यावरून जाणवते. आता स्त्रियांच्या अंगावर काठापदराच्या साड्या व अत्याधुनिक प्रकारची वस्त्रे आढळतात. सैनिकांनाही आता गणवेशामध्ये दाखविण्यात आले आहे. नंतरच्या शतकातही असाच पोषाख असावा असे मार्को-पोलो, इब्न-बतूता आदींच्या लिखाणावरुन वाटते.
मध्ययुगीन इस्लामी आक्रमणानी भारतीयांच्या वेशभूषेत कमालीचा बदल घडवून आणल्याचे स्पष्ट होते; कारण पोषाख विषयक त्यांच्या कल्पना भिन्न होत्या. तसेच त्यांच्या सौंदर्य-विषयक संकल्पानाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांना अतिशय तलम, जरतारी व शिवलेल्या वस्त्रांची विशेष आवड हाती.. शिवाय ते राज्यकर्ते असल्याने त्यांचा कल नटण्या-मुरडण्याकडे अधिक होता. समाजात त्यांच्या आवडी-निवडी त्वरित रुजल्या गेल्या. त्यांच्याच रंगसंगतीला प्राधान्य मिळाले. ते प्रामुख्याने मध्याआशियातून स्थलांतरित झाले असल्याने त्यांनी आपल्या समवेत आपल्या देशाच्या पद्धतीही आणल्या होत्या. दक्षिणेतील इस्लामच्या आगमनाने कपड्यांच्या शिलाई व भरतकामास वेगळीच गती प्राप्त झाली. या प्रकारच्या वस्त्रामध्ये जामा, कोट, जॅकेट, स्कर्ट, पेटीकोट आदींचा समावेश होता.
याच कालखंडात हिंदू-मुस्लिम संस्कृतीमध्ये सुसंवाद निर्माण होऊन कांही नवे वस्त्र प्रकार रूढ झाले. तसेच या परिसरातील नागरीकरण प्रक्रियेस गती प्राप्त होऊन अनेक नवे केन्द्रे उदयास आली. यामध्ये गुलशनाबाद (नाशिक), दौलताबाद (देवगिरी),औरंगाबाद (खडकी), मोमीनाबाद (अंबाजोगाई), येवला, जालनापूर, शहागड, बाळापूर, पुणे, वाई, सातारा आदि प्रमुख होत.
मोगल सत्तेनंतर या परिसरात मराठ्यांचे राज्य निर्माण झाले (इ.स. १६३० ते १८२०) मराठ्यांना पारंपारिक हिंदू पोषाखाची विशेष आवड होती. तथापि त्यांनाही प्रस्थापित लोकप्रिय इस्लामी वस्त्र प्रकारांचा स्वीकार करावा लागला. या पार्श्वभूमीवर आपण या कालखंडातील वस्त्रप्रकारांचा मागोवा घेऊ या.
वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून या नवोदित नागरी केन्द्रातूनही वस्त्रोद्योगास आरंभ झाला. आणि थोड्याच कालावधीत येथील वस्त प्रकारांना राष्ट्रीय मान्यता लाभली. उदा. देवगिरी (आता दौलताबाद) तलम वस्त्रासाठी प्रसिद्ध होत. महंमद तुघलकास या तलम वस्त्रांनी व येथील कलाकारांनी मोहित केले म्हणून त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे स्थलांतरित केली. देवगिरीचे दौलताबाद करण्यात आले (इ.स. १३२२) या स्थलांतरामुळे येथील लोकसंख्या वाढली म्हणून वस्त्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले. आणि कलाकारांस विशेष सवलती देण्यात आल्या. त्यामुळेच या परिसरातील पैठण, बीड, कंधार, नांदेड, लातूर आदि केन्द्रे पुढे येण्यास मदत झाली.
अमीर खुश्रू या समकालीन कवीने तलम वस्त्रांचे वर्णन अतिशय मार्मिक शब्दात केले आहे. त्याच्या सांगायचे झाल्यास ‘चंद्राची मुलायम त्वचा म्हणजेच तलम वस्त्र होय’. शंभर यार्ड मलमल सुईच्या नेढ्यातून सहज पार जात होती. या परिसरातील रेशीमही तेवढेच लोकप्रिय व आकर्षक होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या लुतीमध्ये रेशमी वस्त्रांचे हजारो प्रकार होते.
देवगिरीप्रमाणेच इतर नएक केन्द्रामधून वस्त्र निर्मिती होत होती. या प्रत्येक केन्द्रात निर्माण अ होणाऱ्या वस्त्रांचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या वस्त्रांस त्या केन्द्राच्या नांवाने ओळखळे जात होते. उदा. पैठणची पैठणी, शहागडची शहागडी, धनवडची धवडी. जैनाबादची जैनाबादी, कालिकातचे कॅलिको आणि मसोलची मस्लिन वगैरे.
महाराष्ट्रातील वस्त्रोत्पादन करणाऱ्या महत्वाच्या पेठा व त्यांचे वस्त्र प्रकार पुढे दिले आहेत.
| औरंगाबाद | हिमरू-मशरू |
|---|---|
| दौलताबाद | मलमल |
| बाळापूर | चंद्रकळा साडी |
| संगमनेर | चंद्रकळा साडी |
| पैठण | असावली किंवा पैठणी, पीताम्बर, किमखाब धोतरे |
| येवला | पैठणी, जामदानी, पीताम्बर |
| तेर | मलमल |
| शहागड | शहागडी (साडी), धोतरे |
| नाशिक | जरीकाठी साडी |
| नागपूर | रेशमीकाठी धोतरजोडी |
| अमरावती | पासोडी, साडी |
| सोलापूर | खण, साडी, सुती कापड |
| तुळजापूर | खण, साडी, सुती कापड |
| कोल्हापूर | खण, सुती कापड |
| अहमदनगर | सर्व प्रकारचे कापड |
| पुणे | जरतारी साडी व इतर कापडा |
| धारवाड | खण |
| पंढरपूर | घोंगडी, पासोडी, पीताम्बर |
| अकोला | पासोडी, शाल, साडी |
| बीड | पासोडी, साडी |
उपरोक्ल्त केन्द्राशिवाय कल्याण, रत्नागिरी,मालेगाव, जालना, सातारा,अ दामोळ, चांदवड, राजापूर ,वाई इत्यादि बाजार पेठातूनही सुती व रेशमी वस्त्रे तयार होत होती. या कालातील कांही महत्त्वाच्या व लोकप्रिय वस्त्रांचा आपण विचार करू या.
पैठणी
पैठणी साडी हा मध्यमयुगीन महाराष्ट्रातील लोकप्रिय साडी प्रकार होय. गर्भरेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीच्या जरीची मीनाकारी केलेल्या काठा-पदराच्या साडी प्रकारास पैठणी म्हटले जाते. रेशमा प्रमाणेच सुतावरही जरतारी काम करण्याचा प्रघात होता. तथापि रेशमाचा मलायमपणा अशा प्रकारच्या सुती साडिमध्ये येत नव्हता. तसेच सुत आणि जर यांच्यामध्ये रेशमाइतका सुसंवाद निर्माण होत नव्हता.
पैठणीची वीण अत्यंत साधी असून हात किंवा पाय चाळ्यातील नक्षीकाम हे पैठणीचे खास वैशिष्ट्य होय. हे नक्षीकाम झाला किंवा जेकार्ड सारख्या आधुनिक यंत्रप्रकारांची मदत न घेता केले जाते हे विशेष होय. केवळ ताणा-बाणा धांग्याच्या सहाय्याने नक्षीकाम करण्याचे तैत्र विकसित करण्यात आले होते. ताणा म्हणजे आडवे धागे (weft).पैठणी वरीलनक्षीकाम उभ्या धाग्याच्या अनेकरंगी लडी वापरून (Extra weft technique) करण्यात येते. नक्षी सामान्यतः पदर व काठावर काढली जाते. नक्षीवरून रांगावरून व जरतारी कामासाठी वापरलेल्या सोन्याच्या वजनावरून पैठणीला निरनिराळी नांवे मिळाल्याने स्पष्ट होते.
उत्तर पेशवाईमध्ये पैठणीस कमालीची लोकप्रियता लाभली होती. मराठा काळातील पैठणीवर ‘असावली’ च्या फुलांचे सुंद्र नक्षीकाम केलेले आढळते. म्हणून त्य साडिला असावली साडी नांवही प्रापत झाले होते. महाराष्टातील हे सर्वात किमती वस्त्र असून त्याची किंमत वापरण्यात आलेल्या सोन्याच्या वजनावरून ठरत असे भरजरी नक्षीचा पदर व उठावदार काठ ही पैठणीची खास वैशिष्टये मानावी लागतील. या पदरावर सामान्यतः असावली, अक्रोटी, गझवेल, बांगडीमोर, शिकार-खाना, अजिंठा-कमळ, ह्भा परिदा अशा प्रकारची नक्षी काढली जात असे. कांही पैठण्यावर जरतारी बुट्टी विणल्याचे आढळते. अशा साडीला बुट्टीदार पैठणी किंवा शालू म्हणत असत. गडद रंगाच्या पैठणीला शालू म्हटले जात असे. गडद हिरव्या रंगाचा व भरजारी काठा पदराचा शालू या काळात अतिशय लोकप्रिय असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या शालूची लोकप्रियता स्त्रीजगतामध्ये शिंगेस पोहोचल्याचे दिसते. स्त्रियांचे या शालू विषयीचे आकर्षण हा काव्यसृष्टीतील महत्त्वाचा विषय होता. हिरव्या शालूचे धार्मिक सभारंभात अतिशय महत्त्व होते.
पेशवे दप्तरातील अनेक पत्रांवरून पेशव्याना पैठणच्या पैठणीचे व अन्य वस्त्रांचे खास आकर्षण असल्याचे स्पष्ट होते. ७-१२-१७६८ च्या एका पत्राद्वारे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी असावली दुप्पट्टे, तसेच तांबड्या, हिरव्या, केशरी व डाळिबी रंगाची वस्त्रे मागविल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ४-१२-१७६६ पत्राद्वआरे माधवरावांनी आपणास धोतराच्या काठावर ज्या प्रकारची नक्षी हवी आहे ती नक्षी स्वहस्ते काढून पाठविली आहे.
नंतरच्या काळात हैद्राबादच्या निजामानेही पैठणी साडीच्या खरेदीसाठि अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. निलोफर या निजामाच्या सुनबाईने पैठणला भेट देऊन पैठणीमध्ये कांही सुधारणा सुचविल्या होत्या.
कालीघात पैठणी ही लग्नसभारंभात आवश्यक बाब बनली. राजापासून ते सर्वसामान्यापर्यंत सारे जण लग्न सभारंभात पैठणीसाठी हट्ट धरत असत. त्यामुळे पैठणीची मागणी वाढली. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्याच्या हेतूने अनेक केन्द्रावर पैठणी विणली जाऊ लागली. अशा केन्द्रापैकी येवले हे केन्द्र बरेच नांवारूपास आले. कोयरी पदर हे येवल्याच्या पैठणीचे वैशिष्टय होय. येवल्याशिवाय, पुणे, नाशिक, मालेगाव येथील पैठण्याही प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्र संस्कृतीचे भिन्न धागे एकत्र करण्यात पैठणीचा सहभाग मोठा आहे.
जामदानी
भारतीय कलाकारांची अत्यंत वैशिष्टयपूर्ण कलाकृती म्हणजे जामदानी होय. तसेच पाहता जामदानीची वीण अत्यंत साधी व सोपी असते. तथापि ताण्यावर (warp) नक्षी जोडण्याचे काम अत्यंत कौशल्याचे व दीर्घ मुदतीचे असते. यासाठी निष्ठा आणि चिकाटी या दोन गुणांची आवश्यकता असते. औरंगजेबास जामदानीचे खास आकर्षण होते म्हणून या वस्त्र प्रकारास नंतर औरंगजेबी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. केवळ शासनमान्य कलाकारच जामदानीचे विणकाम करू शकत असत.
हिमरू
हा मुस्लिम जगातातील लोकप्रिय वस्त्र प्रकार होय. ही भरजरी किमखाब या वस्त्राची प्रतिकृती होय. याचे मूळ नांव हमरू असून. हमरू म्हणजे प्रतिकृती. दक्षिणेमध्ये महंमद तुघलकाने सर्वप्रथम हे वस्त्र प्रचारात आणले. यामध्ये रेशीम व सूत यांचे मिश्रण परस्परात मिसळलेले असते. यापासून सर्व प्रकारची वस्त्रे बनविली जात होती. या प्रकारात रेशमाचे प्रमाण अधिक असल्याने ते मुलायम व किमती होते. म्हणून ते सर्वसामान्याना परवडणारे नव्हते. दौलताबाद, औरंगाबाद, पैठण, जालना येथे पूर्वी याची निर्मिती होत होती. आता हिमरू केवळ औरंगाबाद येथेच तयार होते.
मशरू
>ही हिमरूची सर्वमान्य प्रतिकृती होय. यामध्ये सुताचे प्रमाण अधिक असल्याने ते सर्वाना परवडणारे होते. शुद्ध रेशमी वस्त्र परिधान करून प्रार्थना करण्यास प्रेषितांनी प्रतिबंध घातल्याने मशरू या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. केवळ प्रार्थनेसाठी म्हणून हे वस्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
किमखाब
सोन्याच्या जरीची भरपूर मीनाकारी असलेले दक्षिणेतील एके काळचे लोकप्रिय सोनेरी वस्त्र होय. हे अतिशय किंमती राजेशाही वस्त्र असून त्याच्या निर्मितीस कठोर परिश्रम व बराच कालवधी लागत असे. एका पर्शियन राजदूतास हे वस्त्र प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागले होते. कारण या वस्त्राचे वीणकाम पैठणच्या हातमागावर चालू होते.
फेटा
डोक्याला गुंडाळण्याचे पुरुषांचे वस्त्र म्हणजे फेटा. फेट्याचे विविध प्रकार असून त्याला पगडी असेही म्हटले जात होते. बुट्टीदार पगडी हा पगडीचा लोकप्रिय प्रकार असून हिंदू आणि मुस्लिम याचा वापर करीत असत. जोरदार पगडी. खिडकीदार पगडी, नस्तालिक हे पगडीचे कांही लोकप्रिय प्रकार होत.
मंदिल
हा मलमली कापडाचा फेटा असून त्यामध्ये सोनेरी जर वापरला जात असे.
शंमला
हा फेट्याचा एक वेगळा प्रकार होय. बत्ती, सरबत्ती, सरबंद हे शिरोवस्त्राचेच भिन्न प्रकार होत. सर म्हणजे शिर व बंद म्हणजे बांधणे किंवा गुंडाळणे. तिवटे किंवा तिवट हा व्यापारी वर्गातील लोकप्रिय पगडी प्रकार होय.
रूमाल
हाही फेट्याचाच एक चौरस प्रकार होय. डोक्याला गुंडाळण्यासाठी याचा वापर केला जात होता.
दुपट्टा
खांद्यावर घेण्याच्या पट्टीस दुपट्टा असे म्हणतात. याच्या काठावर जरीकाम केलेले असते.
शेला
अंगावर घेण्याची एक किमती वस्त्र.
मेहमुदी
एक प्रकारचे सुती सफाईदार वस्त्र.
साडी
स्त्रियांच्या पोषाखातील प्रमुख घटक.
चंद्रकळा
एकरंगी रेशमी किंवा सुती साडी. काळी चंद्रकाळ सर्वात प्रसिद्ध होती.
खण
चोळीसाठी तयार केलेला खास वस्त्र प्रकार.
पीतांबर
पुरुषासाठी धार्मिक सोहळ्याच्या प्रसंगी परिधान करायचे रेशमी व जरतारी काठाचे महावस्त्र. याचे काट तुलनात्मक दृष्ट्या छोटे असून याला पदर नसतो. यालाच सोवळे, मुकटा म्हटले जात असे. येवले पीतांबरासाठी प्रसिद्ध होते.
कुर्ता किंवा कुडता
सैल झग्यासारख्या वस्त्र प्रकार. खमीज मुस्लिम वस्त्र प्रकार.
अंगरखा
जाम्याखाली वापरण्याचा वस्त्र प्रकार. मिना किंवा अंगी हे कुडत्यायेच भिन्न प्रकार होत.
मिरजी
डगला, कुफचा, कुबा हे अंगरख्याचे आणखी प्रकार होत.
जामा
मुस्लिम वस्त्र प्रकार.
पेशदार
रंगीत मलमलीपासून तयार करण्यात आलेले मुस्लिम परिवस्त्र.
लहंगा, कंचुकी
ही स्त्रियांची अर्न्तवस्त्रे होत.
या परिसरातील वस्त्रोद्योगास मुस्लिमानी पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी कांही लोकप्रिय वस्त्रप्रकारही रूद केले. महमुदी, जाफरखानी, औरंगजेबी, नाफरमानी इ. मुस्लिम बनली असल्याचे पेशवे दप्तरावरून स्पष्ट होते.
रंगकाम
भारतीयांना झळाळणाऱ्या रंगांचे खास आकर्षण आहे. त्यांची रंगांची आवड ही सामान्यतः परिसरावर अवलंबून आहे. कपड्यासाठी वनस्पतिज रंग वापरले जात होते. उदा. गोदावरी काठ आढळणाऱ्या लाखेपासून तांबडा रंग तयार केला जात असे. बाभळीच्या साली पासूनही रंग तयार होत होते. काळा, हिरवा, निळा हे रंग वरील रंगांत नीळ मिसळून करीत असत. सर्वसामान्यपणे पिवळा, जांभळा, नारिंगी, हिरवा, गुलाबी, विटकरी, काळा आणि तपकिरी हे रंग अधिक प्रमाणात वापरात होते.
भरतकाम
वस्त्रांना खुलविण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी वस्त्रांवर भरतकाम केले जात असे. भरतकाम सुती व रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या वस्त्रांवर केले जाई. अगदि प्राचीनकालापासून भरतकाम करण्याची कला भारतीयांनी आत्मसात् केली होती. प्राचीन साहित्यामधून भरतकामाचे अनेक संदर्भ मिळतात. पैठणी आणि जामदानी वस्त्रें त्यांच्या जरातारी मीनाकारीसाठी प्रसिद्ध होती. युरोपीय देशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्रांना फार मोठ्या प्रमाणात मागणी होती. तथापि १७०७ मध्ये ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदा करून भारतीय कापडाची आयात पूर्णतया बंद केली. त्यामुळे भारताच व्यापार बसला. आणि व्यापार बसल्याने भारताची सुबत्ता नष्ट झाली.
आता ही प्रारंपारिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता विज्ञानाने व तंत्रज्ञानाने वीणकाम, रंगकाम, भरतकाम, जरीकाम आदि अद्ययावत केले आहे. तथापि मानवाच्या अविरत श्रमातून साकार झालेल्या कलेची बरोबरी यंत्र करू शकणार नाही.
पैठणचा इतिहास माहिती
The subsequent history of Paitan is involved in the general history of the district. In 1604 the marriage of Akbar's son, prince Daniel, to the king of Bijapur's daughter, was celebrated here with great splendour. A battle was fought at Paitan in 1791 between Scindia'a troops, and a body of Rajputs under Ismail Beg, one of Scindia's Generals who had deserted to the enemy. Scindia won the day, and the brunt of the battle was borne by De Boigne's disciplined troops. In the 18th century the revenues of the talak were generally shared by the Nizam and Peshwa. In 1760, after the battle of Udgir, Paitan was ceded to the Mahrattas, and remained for some time in their possession. After the battle of Kardla in 1795, it was again included in the cessions to the Mahrattas; but a few years later it was once more restored to the Nizam. Subsequently, Paitan sutfered from the Pindharis, whose depredations continued till their power was broken in 1817; and since then, the peace of this part of the Dakhan has remained undisturbed.
The Paitan of the present day occupies but a very small portion of the ancient city, and almost all traces of the latter have disappeared. Mounds of ruins however, might still be observed to the east of Paitan, overgrown with prickly pear bushes and jungle shrub. The town contains about 2,000 houses, most of which have mud walls, and tiled or terraced roofs. About a sixth consists of brick-walled houses several storeys in height; and the richer portion of the community, such as the saukars and merchants, occupy several lofty stone buildings, that rise in a conspicuous manner above the surrounding houses. The majority however, of the better sort of buildings are of brick; but numbers of these are deserted and falling to decay. The portion that is most inhabited has a squalid appearance, particularly the eastern part of the town, where the weavers reside.
A wall, now much ruined, having nine gateways, surrounds the town, and the portion towards the river front rests upon a steep bank. Some ruins of the old fortress which rose high above the town, are seen at the south-west angle, which has a precipitous scarp of nearly 150 feet.
Outside the gate leading to Aurangabad is a suburb called Jainpura, occupied entirely by Jains, who gain a livelihood by weaving.
The principal places of interest within the town are the remains of Salivahana's palace, now converted into a mosque, and Eknath's temple.
A shrine upon the river bank, north of the city, was raised to commemorate the death of Eknath, in connection with which a large fair is held in the middle of March. [For an account of the principal buildings, see Chapter VII., Architecture; and for Eknath, see Chapter VI., Religion, &c. The local tradition makes Eknath a Brahman of great piety, who was born at Paitan on Shashti or the 6th day of the month. He became an ascetic at an early age, and having met Janardhan Swami of Daulatabad in his wanderings, became a disciple of this saint on Shashti day. This remarkable coincidence impressed Eknath; and it further appears that it was foretold by Janardhan Swami that Eknath would die on Shashti day. Accordingly Eknath, who was now celebrated for his piety, drowned himself on the appointed day (A. D. 1598). A substantial dharmasala is attached to the shrine on the river bank, and over the eastern gateway is a Balbodh inscription cut in stone, relating Eknath's merits, the works he wrote, &c.. It is believed that Vishnu attended on him under the guise of a servant called Srikhand; and the stone which Srikhand used in grinding chunam for making the lines upon the forehead is now shown in the temple as well as the large pot he daily filled with water from the river.]
The other temples are numerous. Three fine ones are dedicated to Siva; another to Sri Nath Maharaj; one to Anant Rishi; one to Indresvar Mahadev, and one to Lakshmi Narayan.
There are two masjids about the town, of which, one is called Panjabi Sahib's masjid, and the other was built by Shariar Jang Bahadur, late Suba of Aurangabad. The remaining masjids are not of any note. The shrine of Maulana Mauza, whose good offices are more particularly in request for ventures at sea, is on an eminence to the east of the town.
On the east and south sides, broad flight of stone steps lead down to the river which surrounds the town on three sides. These are used as bathing ghats, and are probably among the oldest structures of the place.
Paitan was once famous for its woven silk and cotton fabrics, but the trade has gone down very much. [See Chapter VII., Industrial Arts.] The bulk of the community are weavers, whose numbers however, are rapidly diminishing, and have been so for many years past. The town is a celebrated tirth, or place of pilgrimage, and consequently it contains a large number of Brahmans. A weekly market is held every Sunday; and a monthly bazaar, in addition to the large yearly fair, takes place at Eknath's shrine. The principal articles exposed for sale consist of grain, manufactured cotton and silk goods, cattle, sheep and goats.
Paitan is the head-quarters of the Tahsildar, and contains a post office, and two Government schools.
आषाढी वारीइतकाच रंगतदार असतो पैठणचा तीन दिवसीय एकनाथ षष्ठी सोहळा!
श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात.पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.
फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
षष्ठी - षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीने वारकरी व हरिदासी कीर्तने करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.
सप्तमी - सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमी - अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.

त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपआपल्या पध्दतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.
उत्सवाचा इतिहास - फाल्गुन वद्य षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
माहिती स्रोत : शांतीब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन, भ्रमणध्वनी : ९४२१४१११३५
https://santeknath.org/
श्री क्षेत्र पैठण
स्थान: श्री क्षेत्र पैठण
कोठे आहे: औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र राज्य
सत्पुरूष संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
कसे याल
औरंगाबाद हून अनेक वाहने उपलब्ध आहेत. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.
थोडे एकनाथ महाराजांविषयी
संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.
शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक,महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे *संत एकनाथ*.आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.
एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.
एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
नाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेले काही महत्वपुर्ण चमत्कार
ईश्वर हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो त्यामुळेच् संताच्या जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पहायला मिळतात. त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
१) पितरांस श्राद्धान्न
एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.*
२) एकच नाथ दोन ठिकाणी
पैठणास राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.
३) नाथांकडे अनेक परीस
पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले. नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, "तुझा परीस यातुन निवडून घे." त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.
४) पत्रावळी खाली पत्रावळी
नाथांचे पुत्र हरिपंडीत हे विद्वान; परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात सांगणे त्यांना आवडत नसे. यास कंटाळुन ते काशीस निघून गेले. काही वर्षांनी नाथांनी त्यांची समजुत काढुन त्यांस पैठणास आणले. हरिपंडीत नाथांऐवजी प्रवचन करु लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्यारोज कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणुन त्यांचा अभिमान कमी होऊ लागला. परंतु तो संपूर्ण निरभिमान व्हावा असे नाथांना वाटे.
एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता. परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नव्हता. तो पूर्ण व्हावा असे त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एकवाक्य ऐकले कि, एक ब्रह्मवेत्ता जेवू घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते. तिने नाथांनाच जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथांची पत्रावळ मांडली, त्यांना पोटभर जेवू घातले. नाथ जेवण करुन उठले, ’पत्रावळ तूच उचल’ असे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने पत्रावळ उचलली, परत येवून पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली तिसरी आली तिसरी उचलली चौथी आली, अशा हजार पत्रावळी हरिपंडीताने उचलल्या. त्या स्त्रीस सहस्त्रब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडीतासही आपल्या वडीलांची महती कळली, अभिमान नष्ट झाला. पुढे हरिपंडीतांनी नाथांप्रमाणेच पारमार्थिक आचरण ठेवले.
मूकं करोति वाचालं
गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणुन रोज दे, असा आईजवळ हटट् करीतअसत. रोज पुरणपोळी देणेआईला परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने त्यास नाथांकडे पाठविले. हरिपंडीताप्रमाणे गावोबासही सांभाळावे असे नाथांनी गिरिजाबाईस सांगितले. गावोबास नाथांघरी रोज पुरणपोळी मिळु लागली. तो तिथे पडेल ते काम करीत असत. तो थोडा वेडसर होता तरीही नाथांच्या कीर्तनप्रवचनात बसत. त्यास गायत्रीमंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देवू केला तेव्हां "एकनाथ" याशब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने नाथांस सांगितले.
नाथांचा भावार्थरामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यन्त आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले. श्रोत्यांना वाईट वाटले. श्रीकृष्णदास लोळे नावाचा रामायणकर्ता एकदा नाथांकडे आला होता तेव्हां त्यास युद्धकांडाचे लिखाण संपविण्यासाठी अकरा दिवस हवे होते. तेव्हां नाथांनी त्याचे मरण अकरा दिवस पुढे ढकलले होते याची आठवण करुण देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करुन जावे असे विनविले. परंतु नाथांनी सांगितले ’मी जरी गेलो तरी राहीलेले रामायण गावोबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असे समजुन लोक हसू लागले. परंतु नाथ जे बोलतात ते खरे होणारच नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य गावोबाने नाथांसमोर ४५ वा अध्याय लिहून काढला. नाथनिर्याणानंतर तो ग्रंथ गावोबानेच तडीस नेला नाथांचे लिखाण कोणते व गावोबाचे कोणते हा फरक लक्षात येत नाही एवढी नाथकृपा गावोबावर झाली.
कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती.यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता.भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरती "त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण" प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते.दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
श्री क्षेत्र पैठण, श्री एकनाथ महाराज व श्री एकनाथषष्ठी विशेष महत्व.
श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.
फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.
षष्ठी - षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.
सप्तमी - सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमी - अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.
त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपआपल्या पध्दतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.
उत्सवाचा इतिहास
फा. व. ६ ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.
पंचपर्व
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
४) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
५) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी
paithan - तीर्थक्षेत्र पैठण - sant sahitya
paithan information marathi
पैठण(paithan) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण(paithan) तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कसे याल– औरंगाबाद हून अनेक वाहने उपलब्ध आहेत.
इतिहास – (paithan history)
साडीप्रकाराचे पैठणी(paithan) हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष (ही वर्षे कुठून मॊजायची?) स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव “प्रतिष्ठान”) ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असॆ गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.
संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान

संत एकनाथ महाराजणांचा वाडा
सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण(paithan dam) जवळच आहे.

- जांभुळ बाग
- संत ज्ञानेश्वर उद्यान

- नागघाट
- लद्दू सावकाराचा वाडा
- जामा मशीद
- तीर्थ खांब
- मौलाना साहब दर्गा
- जैन मंदिर पैठण
- सातबंगला पैठणी साडी केंद्र
- वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
- नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
- छत्रपती शिवाजी महाराज चौक
- मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन (?))
फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काठावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.
नाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेले काही महत्वपुर्ण चमत्कार
ईश्वर हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो त्यामुळेच् संताच्या जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पहायला मिळतात. त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
१) पितरांस श्राद्धान्न
एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ(paithan) ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.*
२) एकच नाथ दोन ठिकाणी
पैठणास(paithan) राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.
३) नाथांकडे अनेक परीस
पैठणास(paithan) एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले.
नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, “तुझा परीस यातुन निवडून घे.” त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.
पैठणची दुरवस्था...... !
पैठणला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पैठण एकेकाळचे सातवाहनांचे राजधानीचे शहर. ज्ञानेश्वरांचे जन्म स्थळ आपेगाव पैठण पासून १६ किमी अंतरावर आहे.
नाथमहाराजांची कर्मभूमी पैठण. संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या पैठण्यांचे शहर पैठण.
आज मात्र पैठणला उतरती कळा लागली आहे. एकेकाळचे ऐश्वर्यसंपन्न शहर आज रस्त्यावरच्या फुफाट्यात आणि कचऱ्याच्या साम्राज्यात सापडले आहे.
सुधारणेच्या नावाखाली कॉक्रीटीकरण झालेल्या अनेक वास्तु शहरात पाहायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास सातवाहनकालीन नागघाट. याच घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले. या घाटाचे महत्व सांगणारा याहून दुसरा दाखाला देण्याची गरज नसावी. घाटाचे कॉक्रीटीकरण हि सुधारणा नसून जाणूनबुजून घातलेला हातोडाच नव्हे का.
नागघाटाच्या आसपास अनेक जुने वाडे व मठांचे अवशेष व निर्मनुष्य इमारती दिसून येतात. गावातच तीर्थाचा खांब व ज्ञानेश्वर उद्यान आहे.
शेतीच्या आणि तत्सम उद्योगधंद्यात पैठण प्रगतीपथावर असले तरी मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रस्त्यांचा अभाव घाणीचे साम्राज्य यामुळे पर्यटक पाठ फिरवतात.
दक्षिण काशीचे आजचे हे रूप बदलणे गरजेचे आहे.
मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी....
बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो. एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्म भूमी म्हणून हे गाव खूप प्रसिद्ध आहे.

एकनाथ महाराजांचा वाडा अजूनही तितक्याच सुस्थितीत आहे...


समोरच गोदावरी नदी वाहत होती(बहुदा.. पक्का माहित नाही.. जाणकारांनी प्रकाश टाकावा )..... तिच्याच काठावर थोडे विसावलो...आज नेमका मी कॅमेरा हॉटेल वर विसरलो होतो.... नशीब मोबिल होता....


तिथून मग "पैठण्यांच्या दुकानात" मजबूत shopping सुरु झाली...
जाता जाता जायकवाडी धरण बघायचं ठरलं... मला वाटलं असेल साधं एखादं धरण असतं तसं..
आत्तापर्यंत मी "बारवी आणि चिखलोली" हि दोनच धरण बघितलेली होती....
म्हणून इतका काही उत्साही नव्हतो...
हळू हळू सूर्यास्त होत होता...

जायकवाडी धरणावर चढलो.... आणि समोरचं दृश्य बघून तोंडाचा "ऑ" तसाच्या तसाच राहिला....... बास...... स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात तो हाच.....
समोर पाण्याचा अफाट जलाशय......... समुद्राचा भास व्हावा एवढा...... त्यात "आकाश आणि पाणी" हि दोन तत्व अशी काही बेमालूम पणे मिसळून गेली होती कि बास.....
केवळ " अस्ताला जाणाऱ्या नारायणामुळे दोघांमधला फरक कळत होता....
सगळेच शांत झाले होते.. एवढी गर्दी असून सुद्धा...... त्या निसर्गाने सगळ्यांची जणू वाचाच हिरावून घेतली होती...





अवर्णनीय सोहळा होता .. साला नेमका आजच कॅमेरा कसा काय विसरलो ? जाम शिव्या घातल्या स्वताला....
तरी जमतील तेवढे फोटू काढले......
हळू हळू "नारायणराव' पाण्यात विलीन झाले आणि आम्ही सुद्धा जड पावलांनी माघारी फिरलो.....
कधी पैठण ला जाल.. तर सूर्यास्त जायकवाडी धरणावरच बघा.....
क्रमश:
शिवाय पैठण करायचच असेल तर नुसतं पैठण करण्यापेक्षा जवळचीच दोन-तीन\ ठिकाणं केलित तर खरे मजा आहे.
अगदि अनवट असा,थोडासा धीर गंभीर पण अत्यंत प्रसन्न, शांत अगदि किलबिलाटही सुखद बनवणारा असा डोंगर.
त्याचं नाव शूल भंजन. इथं एकनाथ समाधी करायला जाय्चे( असं म्हणतात).
तिथं एक दत्त मंदिर आहे. एक जादुइ शिळा आहे. तिच्यावर नाणं/धातु आपटला की मस्त सप्त सूर येतात.( सगळं सप्तक येतं की नाही माहित नाही, पण आवाज कसा गोड, घंटा वाजवल्यासारखा येतो. ).
इथं उभं राहुनरोह्ज एकनाथ आपल्या गुरुचं दर्शन घेउन ध्यानाला बसायचे. जनार्दन स्वामी त्या वेळेस देवगिरीचे किल्लेदार होते. इथुन तो किल्ला सहज दिसतो..
आता मूळ पैठण बद्दल लिहिण्याचीश्क्षमता माझी नाही.तरीही काही briefings:
१. तिथं दोन ठिकाणं आहेत "नाथाची घरं" म्हणून. एक गावात, एक गावाबाहेर.
२.संत ज्ञानेश्वर उद्यान्,धरण जायक्वाडी, नदी गोदामाता
३.अति प्राचीन नगरी. त्याच्या जवळच "कायगाव टोक" हे ठिकाण. "टोक" ह्यासाठी म्हणतात की रामाअयणात मारिच राक्षसाचा वध केल्यावर त्याच्या धडाचं टोक्/शीर्/गर्दन उडुन इथे पडली आणि गंगेत मिळाली
४. केवळ महराष्त्र किंवा भारत नव्हे, तर जागतिक दृष्त्तीनं एक प्राचीन, तत्कालीन प्रगत आणि समृद्ध शहर.
निम्म्या भारतावर राज्य करणार्या , अरबे समुद्रमहार्साद महासागरपादाकक्रांत करणार्या शक कर्त्या शालिवाहनांची ४००हून अधिक वर्षेराज्स्धानी.
५. ह्याचे अवषेशव्गावाबाहेर "पालथी नगरी" भाग आहे, तिथं उत्खननात मिळताहेत.
६.बहुतांश आधुनिक भाअरतिय भाषांचं मिश्रण्,संगोपन इथच झालं. )कानडी, मराठी आणि तामिळ ह्यांच्यात कॉमन असलेली तेव्हाची "प्राकृत" इथच भरभराटीला आली. )
७.नाथाच्या घरी एक छोटासा हौद आहे. नाथ षष्टीला कित्येकदा टॅम्करच्या टॅकर भरुन त्यात पाणी ओतले तरी भरतनाअही, अशी काहितरी आख्यायिका आहे.
कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत.
इतिहास
साडीप्रकाराचे पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.[१]
उद्योगधंदे
तालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे.
पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल.
पैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोय व्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्न करतात.
प्रेक्षणीय स्थळे
संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर - एकनाथांची पैठण येथे दोन मंदिरे आहेत. एक त्यांचे देवघर कि ज्यास हल्ली गावातील नाथ मंदिर म्हणून ओळखण्यात येते. तसेच दुसरे मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. भव्य अशा कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजून निरनिराळ्या वस्तूंच्या दुकान आहेत. त्यावरच भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा आवार भव्यदिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते. मंदिरास चारी दिशांनी दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे, पश्चिमेस गोदावरी द्वार, उत्तरेस दत्त द्वार तर दक्षिणेस जनार्दनस्वामी द्वार आहे. महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्याहातास अजानवृक्षाचे झाड असून ते शेवटची घटक मोजत आहे. एकनाथ महाराजांच्या समाधीमागे उद्धवांची समाधी आहे. हे उद्धव एकनाथ महाराजांच्या भावकीतील असून नाथांच्या लग्नाचे वेळी पैठणास आले व नंतर नाथांचे शिष्य बनले. नाथ समाधीच्या उत्तरेस नाथ शिष्य गावोबा यांची समाधी असून हे गावोबा नाथांच्या अनेक प्रमुख शिष्यांपैकी एक होत. गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या असून मोठी घंटा लावण्यात आलेली आहे. मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंचच उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेतात तसेच लाकडाची नक्षीदार सिलिंग आकर्षक दिसते. मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारावर संत एकनाथांचे ११ वे वंशज संस्थांनाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो लावण्यात आला आहे. हे मंदिर एकनाथांच्या वंशजांनी बांधले आहे. आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास शेंदूर लावलेल्या दक्षिण मुखी मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूस काही पादुकायुक्त समाध्या आहेत. डावीकडे तीन तर उजवीकडे दोन समाध्या आहेत. समाधीकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची पहिली समाधी ही नाथांचे मोठे नातू प्रल्हाद यांची असून त्याच्या नंतर लहान नातू राघोबा यांची तेथे समाधी आहे. त्यापुढील छोटी मंदिरसदृश्य समाधी ही एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण महाराज यांची आहे. उजव्या बाजूस नाथ समाधीपेक्षा थोडी छोटी मंदिर सदृश समाधी ही एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज यांची आहे. हरिपंडित यांनी सुरुवातीच्या काळात नाथांच्या सर्वसामावेशकतेचा विरोध केला व परिवारासह काशीस निघून गेले, नाथांच्या आज्ञेवरून पुन्हा ते सपरिवार पैठणास आले. पुढे काही घटना घडल्या व त्यांना नाथांचा अधिकार कळाला व ते नाथांचे शिष्य बनले. नाथांनी जलसमाधी घेतल्यानंतर यांनीच नाथसमाधीस्थित पादुकांची स्थापना केली आहे. उजवीकडील शेवटची समाधी ही नाथांचे दुसरे नातू मेघश्याम यांची आहे. मंदिर पहाटे ५ वाजता उघडते. पहाटे साडेपाचला काकडआरती होते. त्यानंतर आरती होते. दुपारी नैवेद्य तर संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथसमाधीची पूजा करण्यात येते. यास स्थानिक लोक भागीरथी असे संबोधतात. रात्री शेजारती होऊन १० वाजता मंदिर बंद होते. प्रति शुद्ध एकादशीस लाखो भाविक नाथसमाधीचे दर्शन घेतात. एकनाथ षष्ठी हा येथील महत्वाचा उत्सव असून ही वारी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून सुपरिचित आहे. संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले कि, दररोज येथे सुमारे पाच ते सहा हजार भाविक विविध ठिकाणावरून नाथ दर्शनासाठी येतात.
संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे.
सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
जांभुळ बाग
संत ज्ञानेश्वर उद्यान
नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरुण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो.
लद्दू सावकाराचा वाडा
जामा मशीद
तीर्थ खांब
मौलाना साहब दर्गा
जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात.
आचार्य आर्यनंदी महाराज यांचा जन्म ढोरकिन गावत झाला, ढोरकीनला आर्यनंदीनगर असही म्हणतात, पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, ते भारतात महान मूनी म्हणुन ओखले जायचे. सैतवाल समाजाचे एकमेव जैन आचार्य राहिले आहेत
सातबंगला पैठणी साडी केंद्र
वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक
महाराणा प्रताप चौक
मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन)
सातवाहन कालीन वस्तुंचे बाळासहेब पाटील संग्रहालय
प्रसिद्ध व्यक्ती
१. संत भानुदास महाराज
२. संत एकनाथ महाराज
३. संत गावबा महाराज
४. कृष्णदयार्णव महाराज
५. कवी अमृतराय महाराज
६. शंकरराव चव्हाण
७. भय्यासाहेब महाराज गोसावी (नाथवंशज)
८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक)
९. योगीराज महाराज गोसावी, (नाथवंशज)
संदर्भ आणि नोंदी
"पैठण". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
http://santeknath.org/paithan.html
महाराष्ट्र गॅझेटियर - पैठण
पैठण : महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध प्राचीन व पवित्र नगर. लोकसंख्या १४,५२६(१९७१). हे औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या दक्षिणेस सु. ५५ किमी.वर गोदावरी नदीकाठी वसले आहे. पैठणमध्ये अनेक प्रचीन वास्तूंचे अवशेष आढळतात. प्राचीन कोरीव लेख व हिंदू, बौद्ध आणि जैन वाङ्मय तसेच टॉलेमी (इ.स. ९०–१६९), मार्को पोलो (१२५४–१३२४), इब्न बतूता (१३०४–७८) वगैरे परकीय प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतून यासंबंधी विस्तृत माहिती मिळते. याचे प्रतिष्ठान, पोतली, पइठ्ठान, पट्टण, पोयणपुर इ. नामोल्लेख प्राचीन साहित्यांत आढळतात. अशोकाचा शिलालेख व सांचिस्तूप यांत येथील रहिवाशांचा अनुक्रमे पेतनिक व पैठणिक म्हणून उल्लेख केला आहे. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथातही पैठणच्या सुबत्तेविषयी तसेच व्यापारासंबंधी अनेक उल्लेख आढळतात. सातवाहनकाली ही सातवाहन राजांची राजधानी होती. सु. तिसऱ्या शतकापर्यंत हे नगर फार भरभराटले होते विद्या व कला यांना राजाश्रय लाभला होता. या काळात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापारउदीम असावा, एवढा पुरावा उत्खननांत उपलब्ध झाला आहे. मात्र पुढे वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट या वंशांच्या काळात पैठणकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर यादवकालात या नगराचे महत्त्व धर्मपीठ म्हणून वाढले. दक्षिण काशी म्हणूनही त्याचा उल्लेख पुढे होऊ लागला. यादवांनंतर पैठणवर बहमनी, मोगल, निजामशाही, मराठे व पुन्हा निजामशाही यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश अंमलात ते हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.
सद्यःस्थितीतील पैठण हे एक आधुनिक नगर आहे. या शहराची स्वच्छता व पाणीपुरवठा १९४३ मध्ये स्थापन झालेल्या नगरपरिषदेतर्फे करण्यात येतो. यांशिवाय नागरी रुग्णालय, तीन माध्यमिक विद्यालये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह, प्रतिष्ठान कला व वाणिज्य महाविद्यालय आणि शासकीय मूलभूत प्रशिक्षण महाविद्यालय, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, संगीत विद्यालय, ज्ञानेश्वर उद्यान इ. संस्था शहराचे आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा पुरवितात. शहरात औरंगाबाद पेपर मिल, नाथ पेपर मिल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोस्ट, न्यायालय, मध्यवर्ती खुले कारगृह, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना इ. शासकीय कार्यालये व संस्था आहेत. दरवर्षी फाल्गुनषष्ठीला येथे मोठी जत्रा भरते व असंख्य भाविक जमतात.
पैठणला प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा, इतिहास व व्यापारी केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथे हैदराबाद संस्थानच्या पुरातत्त्वविभागाने १९४३ मध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने १९ ६६–६७ मध्ये उत्खनने केली. या उत्खननांत अश्मयुगीन हत्यारे व जनावरांची अश्मीभूत हाडे सापडली. त्यामुळे अश्मयुगापासून येथे मानवी वस्ती असावी, असा पुरातत्त्ववेत्यांचा कयास आहे. नंतरच्या काही अवशेषांवरून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इ. स. पू. १५०० दरम्यान नांदत असावी तथापि सातवाहन कालापासून पैठणचा जेवढा इतिहास ज्ञात आहे, तेवढा तत्पूर्वीच्या काळाविषयी नाही. रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशांशी पैठणचा व्यापारी संपर्क होता, हे येथे सापडलेल्या रोमन मद्यकुंभांवरून स्पष्ट होते. त्यामुळे तेर,जुन्नर, भोकरदन या शहरांप्रमाणेच पैठणचा व्यापार भरभराटला होता. मद्यकुंभांव्यतिरिक्त सातवाहनकालीन आहत नाणी, मणी, खेळणी, देव-देवतांच्या मृण्मूर्ती, घरांचे अवशेष, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था इ. पैठणचे प्राचीन वैभव दर्शवितात. या अवशेषांतील काही नाणी कापडात बांधून ठेवल्यामुळे त्यावर उमटलेला कापडाचा ठसा आढळून आला. पहिल्या वस्तीचे अवशेष सु. ७ मी. खोलीत मिळाले. ही वस्ती पुराने नष्ट केल्याचा पुरावा आढळला. यानंतरची वस्ती तुघलक-बहमनी काळात झाली. हीही पुराने नष्ट झाली. या काळातील वास्तू मिळाल्या नाहीत मात्र मोगल-ब्रिटिश काळातील नाणी मिळाली.
विविध तीर्थकल्पातील या संबंधीच्या प्रकरणात पैठणमधील उत्तुंग मंदिरे, प्रासाद, रेखीव रस्ते आणि व्यापारपेठ यांचे वर्णन आढळते. जरतारी कापड व विणकाम यांत पैठण अग्रेसर होते, तसेच अनेक संत व कवी पैठणमध्ये वास्तव्य करून होते. त्यांपैकी चक्रधर, एकनाथ, भानुदास, मुक्तेश्वर, बहेरा जातदेव, चिमणा पंडित इ. प्रसिद्ध आहेत. जायकवाडी प्रकल्पाने पैठणच्या आसपास असलेल्या दुष्काळी भागास सिंचन सुविधा उपलब्ध झाली असली. तरीसुद्धा या प्रकल्पात काही तीर्थस्थाने पाण्याखाली गेली आहेत. एकनाथांचे एक मंदिर शहराच्या उत्तरेस नदीकाठी असून त्याच्यासमोरच त्यांची समाधी आहे. या समाधीच्या दोहो बाजूंस हरिपंडित व चक्रपाणी यांच्या समाध्या आहेत. येथील नदीचे घाट सुरेख असून त्यांना नागघाट म्हणतात. यांपैकी एका घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतला, अशी आख्यायिका आहे. घाटाशेजारी सिद्धेश्वर मंदिर असून गावात अनंतऋषी, शिव, इंद्रेश्वर महादेव, लक्ष्मी-नारायण इ. मंदिरे आहेत. यांशिवाय रेणुकादेवीच्या प्राचीन मंदिराच्या जागी उभारलेला मौलाना साहेबांचा दर्गा. तिरात मशीद इ. मुसलमानवास्तू आहेत. पैठणमध्ये चांगले काष्ठकामही होत असे. जेम्स बर्जेसने अशा काष्ठकामाची सु. १५ छायाचित्रे आपल्या अर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या तिसऱ्या खंडात दिली आहेत. श्री. बाळासाहेब पाटील यांनी सातवाहनकालातील वस्तूंचा केलेला व्यक्तिगत संग्रह (ऐतिहासिक वस्तु संग्रहालय) सुरेख असून यात मणी बनविण्याचे दगडी साचे, दुर्मिळ नाणी, खेळणी, केओलीनच्या मनोवेधक यक्षमूर्ती इ. वस्तू आहेत.
संदर्भ : जोशी, सु. ग. संपा. मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक, १९७५, पुणे, १९७५.
देशपांडे, सु. र. देव, शां, भा.
पैठण
प्रकार : मध्ययुगीन एकनाथ मंदीर / तीर्थस्थळ
जिल्हा : औरंगाबाद
पैठण शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून औरंगाबादेपासून ५० कि.मी.अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. पूर्वी सातवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. याचे मूळ नाव "प्रतिष्ठान" होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. त्या काळापासून अगदी आत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पैठणपासून जवळच असणारे मुंगी हे गाव निंबार्कस्वामींचे जन्मगाव. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्नेर दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेचश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६व्या शतकातील संत एकनाथ महाराज यांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. गावातील नाथमंदिर हे श्री एकनाथ महाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत. श्रीखंड्यासने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते.एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौद आजही या वाड्यात आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथ यांच्यामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असुन प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी आहे. येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. प्रत्येक एकादशीस येथे महापूजा करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात. येथे महाराष्ट्र शासनाने संतपीठाची उभारणी केली आहे. मंदिर परिसरात नाथ वंशीयांची घरे आहेत. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. पुरातत्त्वीय दृष्टीने पैठणमध्ये प्रागैतिहासिक तसेच इतिहासपूर्व कालीन अवशेष सापडलेले आहेत. सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात. ऐतिहासिक काळाचा विचार करता सातवाहन कालापासून यादव कालापर्यंतच्या पुरातत्त्वीय नोंदी पैठणसंदर्भात सापडतात. आजदेखील विविध काळातील अवशेष जुन्या शहराच्या टेकाडावर (पालथी नगरी) पहायला मिळतात. जसे की, भव्य वाडे, कोरीव खांब, तीर्थस्तंभ वगैरे. इथे सापडलेले विविध तऱ्हेचे मणी, भाजक्या मातीच्या वस्तू बांगड्या आणि सातवाहन कालीन नाणी ज्ञानेश्वर उद्यानातील बाळासाहेब पाटील पुरातन वस्तुसंग्रहालयात पहायला मिळतात. काही नाणी ही सातवाहन काळापेक्षा जुनी आहेत. इथे सापडलेली विदेशी नाणी पाश्चात्य जगताचा संबंध दाखवून देतात. जायकवाडी धरण- जायकवाडी धरण पैठण शहराजवळच आहे. जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. त्याची लांबी१०किमी आहे. या धरणाला पाण्याच्या विसर्गासाठी एकूण २७दरवाजे आहेत.हे धरण पसरट स्वरूपाचे आहे.जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाचे नाथ सागर असे नाव आहे. गोदावरी आणि प्रवरा नद्यांचे पाणी यात येते. हे जलाशय ५५किमी लांब व २७किमी रुंद आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर १२मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेले एक जलविद्युत केंद्र आहे. वीजनिर्मितीसाठी वापरले पाणी पंप वापरून मुख्य जलाशयात परत टाकले जाते. ज्यामुळे त्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी पुनर्वापर करता येतो.पैठण हे नाथ सागर जलाशय आणि ज्ञानेश्वर उद्यान या लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. नाथ सागर जलाशयात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांना पाहण्यासाठी अनेक पक्षिअभ्यासक या ठिकाणी येतात. ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाप्रमाणे असल्यामुळे हे पर्यटकांचे अतिशय लाडके स्थळ आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान- ज्ञानेश्वर उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. जे म्हैसूर वृंदावन गार्डनसदृश आहे. १२५हेक्टर पसरलेले हे उद्यान जायकवाडी धरणाच्या शेजारीच आहे. जिथे संगीतावर नाचणारे कारंजे एक स्वर्गीय अनुभव देतात. जायकवाडी पक्षी अभयारण्य- नाथ सागर जलाशयात उथळ पाण्यामध्ये विविध आकारांची ३०बेटे निर्माण होतात. या बेटांवरील झाडे स्थलांतरित पक्षांना एक आदर्श निवारा पुरवतात. या धरणाच्या परिसरात पक्षी अभयारण्य तयार केले गेले आहे.ज्यामुळे अनेक रहिवासी आणि स्थलांतरित पक्षांच्या प्रजातींना इथे निवारा मिळतो. जवळजवळ २००तऱ्हेचे पक्षी इथे आढळतात, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या ७०हून अधिक प्रजाती आहेत. यापैकी ४५ प्रमुख प्रजाती विदेशातून स्थलांतर करून येतात. जैन तीर्थ पैठण- पैठण हे एक प्रसिद्ध दिगंबर जैन अतिशय क्षेत्र देखील आहे. येथील मंदिरात २०वे जैन तीर्थंकर भगवान मुनिसुव्रतनाथ यांची एक सुंदर काळ्या रंगाची वाळूची मूर्ती आहे. पैठण शहरात व जवळच असलेल्या औरंगाबाद येथे राहण्याची सोय उपलब्ध आहे.
© Suresh Nimbalkar
पैठणचे व्यापारी संबंध रोमपर्यंत...
Updated on:
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
आपल्या राज्याच्या प्राचीन इतिहासाला वैभवशाली करण्यामागं पैठण शहरानं अनन्यसाधारण भूमिका निभावली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आद्य सम्राट म्हणून गणलं जाणारे सातवाहन सम्राट पैठण नगरीशी आपली जवळीक दर्शवतात. पैठणला ‘दक्षिणेची काशी’ असं संबोधलं गेल्यामुळं त्याचं सांस्कृतिक तसंच धार्मिक महत्त्वही अधोरेखित होतं.
भारताचे त्या काळातील रोमसोबत सुरू असलेल्या तत्कालीन व्यापारी मार्गावरील पैठण हे एक महत्त्वाचं ठिकाण होतं. ‘सुत्तनिपात’ या ग्रंथामध्ये आलेल्या उल्लेखानुसार, बावरी नामक उत्तर भारतातील एक तपस्वी अश्मक देशात येऊन वास्तव्य करू लागला. हा प्रदेश गोदावरी नदीच्या किनारी होता. जेव्हा हा तपस्वी उत्तर भारतात परतीसाठी निघाला, तेव्हा त्यानं मुक्काम केलेलं पहिलं ठिकाण म्हणजे ‘ प्रतिष्ठान ’ म्हणजे आजचं पैठण.
म्हणजे महाजनपदांच्या कालखंडापासून पैठणचं अस्तित्व आणि महत्त्व आपल्याला लिखित स्वरूपात दिसून येतं. हा प्रदेश अतिशय संपन्न आणि महत्त्वाचा होता, असे उल्लेख या ग्रंथामधल्या वर्णनांमधून आढळून येतात. जैन साधनांमध्ये सुद्धा पैठणचे वारंवार उल्लेख दिसतात. बृहत् कल्पभाष्य, वसुदेवहिंडी, पिंडनिर्युक्ति, गच्छाचारवृत्ती, कल्पसूत्र अशा इसवी सन पूर्व दुसरे ते इसवी सनाचे चौथे पाचवे शतक या काळात रचण्यात आलेल्या जैन ग्रंथांमध्ये पैठणचा उल्लेख आलेला आहे.
सातवाहन कालखंडात पैठण नगरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. भडोच, तेर, उज्जयिनी यांसारख्या व्यापारी ठिकाणांना पैठण राजमार्गाने जोडलं गेलेलं होतं. विविध प्रकारचे व्यापारधंदे, कलाकुसर करणाऱ्या कारागिरांमुळे पैठणच्या सुबत्तेत भर पडली होती. रोमसोबत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं सातवाहन राज्यात रोममध्ये तयार होत असलेलं मद्य उपलब्ध होत होतं. अशा मद्यकुंभाचे पुरावे पैठण येथील उत्खननात सापडले आहेत.
परकीय प्रवाशांच्या वृत्तामध्ये सातवाहन राज्यातील बरीच शहरं ही तटबंदीयुक्त होती. त्यापैकी एक पैठण असायला हवं, असा वासुदेव मिराशी आदी अभ्यासकांचा अंदाज आहे. पैठण इथं झालेल्या उत्खननात सातवाहन राजांची नाणी, मणी, विविध प्रकारची खेळणी, घरांचे अवशेष, सांडपाणी निचरा करण्यासाठी निर्माण केलेली उत्कृष्ट व्यवस्था अशा बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या.
सातवाहन राजांनंतर पैठण शहराला यादवांच्या काळात वैभवशाली दिवस पाहायला मिळाले. कलचुरी, राष्ट्रकूट वगैरे राजांच्या काळात पैठणचं अस्तित्व होतं, पण त्या शहराला सर्वच क्षेत्रात पुढारलेपण प्राप्त झालं यादव कालखंडात. धार्मिकदृष्ट्या पैठणला दक्षिण काशीचं महत्त्व प्राप्त झाले, तर कलेमध्ये पैठण येथील कारागिरांनी देशामध्ये लौकिक मिळवला. रेशीम आणि जरीपासून निर्माण करण्यात येणाऱ्या वस्त्रांची अफाट विक्री होण्यास सुरुवात झाली.
इब्न बतूता, मार्को पोलो यांसारख्या प्रवाशांनी सुद्धा पैठणच्या वीणकामाची मुक्तकंठाने स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. या कारागिरांची ख्याती अगदी गुजरात आणि तिथल्या अणहिल्लपट्टनच्या राजानं पैठण शहरावर स्वारी केली, शहर लुटले आणि परत जाताना शहरातील रेशीम काम करणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबाला आपल्यासोबत गुजरातला नेलं, शेती - संपत्ती वगैरे देऊन तिथंच स्थायिक केले.
विद्याक्षेत्रात पैठण येथील शास्त्रीमंडळी ख्यातनाम झाली होती. सर्वच बाबतीत पैठण अग्रेसर ठरलं.
सातवाहन राजांची साडेचारशे वर्षांची देदीप्यमान कामगिरी संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक अशा समृद्ध वारशास अधिक तेजस्वी करणारं इतिहासातील सोनेरी पान म्हणावे लागेल ! सातवाहन राजांनी महाराष्ट्राला केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर नेले.
याच राजवटीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचं नाव दालन उघडलं गेलं आणि महाराष्ट्राला स्थैर्य देऊन त्यांनी आर्थिक सुबत्तेचं गौरीशिखर गाठलं सातवाहनांनी दिलेल्या राजकीय स्थैर्यामुळं, संरक्षणामुळं या काळात तेर नि पैठण या परिसरात शेतीचं उत्पादन प्रचंड वाढले.
त्यातून व्यापार आणि उद्योग वाढून या व्यापारातून रोम, अथेन्स, कैरो, इस्तंबूल सारख्या प्राचीन शहरांशी-बाजारपेठांशी संपर्क निर्माण झाला. सुती आणि रेशमी कपड्याच्या निर्यातीतून प्राचीन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा प्रचंड दबदबा निर्माण झाला आणि या वस्त्रांच्या निर्यातीतून अगणित परकीय संपत्ती भारतात त्या वेळी मिळू लागली. तेव्हापासून आजही पैठणची पैठणी जगातील अनेकांना भुरळ पाडत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
सातवाहन काळात तेर आणि पैठण इथे हीनयान पंथीय बौद्ध धर्मीयांची संख्या प्रचंड मोठी होती आणि राष्ट्रातील बहुसंख्य व्यापार हा बौद्धांच्या हाती होता. या बौद्ध व कांही जैन व्यापाऱ्यांच्या दान आणि सेवा कार्यातून व्यापारी मार्गावर महाराष्ट्रात अनेक बौद्ध स्तूप, चैत्यगृहं आणि विहार बांधण्यात आले. तेर येथील त्रिविक्रम मंदिर म्हणजे सातवाहनकालीन बौद्ध धर्मीयांच्या विटाच्या बांधकामातील चैत्यगृहाचे रूप म्हणावे लागेल. शिवाय पैठण परिसरात देखील अनेक स्तूप आणि चैत्यगृह या काळात बांधण्यात आली, ज्याचे अवशेष आज उद्ध्वस्त रूपात आढळून येतात.
महाराष्ट्राच्या इतिहासात पैठणने अनन्यसाधारण भर घातली आहे. सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या उत्खननामधून पैठण परिसरात ताम्रपाषाण युगापासून मानवी वस्ती असावी, असा अंदाज होता. काही ठिकाणी अश्मयुगीन कालखंडाशी नातं दर्शवणारी दगडी हत्यारं सुद्धा उपलब्ध झाली आहेत. पैठणच्या प्राचीन इतिहासाशी नातं सांगणाऱ्या पांढऱ्या मातीच्या काही टेकड्यांमध्ये हे उत्खनन करण्यात आलं.
सर्वप्रथम उत्खनन करण्यासाठी निजामाच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्त्व खात्यानं पुढाकार घेतला. या उत्खननात चौथ्या-पाचव्या शतकात विटांपासून निर्माण करण्यात आलेल्या मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. मोरेश्वर दीक्षित, रामचंद्र मोरवंचीकर, डॉ. अरविंद जामखेडकर, के. व्ही. कावडकर यांसारख्या पुरातत्त्व अभ्यासकांनी पैठण नगरीत उत्खनन केले.
पैठण येथे नदीकिनारी असलेली काळी माती तपासली असता, अभ्यासकांना त्यामध्ये जोर्वे संस्कृतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या मातीच्या भांड्याचे अवशेष प्राप्त झाले. पैठणच्या उत्तरेला गुळगुळीत अशा दगडी कुऱ्हाड प्राप्त झाल्या. यावरून ताम्रपाषाण कालखंडाशी पैठणचा असलेला संबंध स्पष्ट झाल्याचा युक्तिवाद अभ्यासकांनी केला आहे.
ते काहीही असलं, तरीही संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शानं, संत एकनाथ आणि चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पैठणच्या वैभवात भर घालण्याची मोलाची कामगिरी आधी सातवाहन कालखंडात आणि नंतर यादव कालखंडात झाली, यात शंका नाही.
ऐतिहासिक महत्त्व: प्रसिद्ध तीर्थखांबाचा जागतिक वारसास्थळात समावेश करण्यासाठी पैठण नगर परिषदेची शिफारस
पैठण येथील शालिवाहनकालीन तीर्थखांबाचा जागतिक पर्यटन स्थळात (युनेस्को) समावेश करण्यासाठी केंद्र व राज्य शासनास नगर परिषदेच्या वतीने ठराव घेऊन शिफारस करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
.
या संदर्भात मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले की, पैठण शहर हे शककर्ता सम्राट शालिवाहन या राजाचे ४६० वर्षे राजधानीचे शहर राहिले आहे. त्यांनी विक्रमादित्य राजाचा पराभव करून मिळवलेल्या अद्भुत विजयाबद्दल विजयाचं प्रतीक म्हणून पैठण येथील पालथीनगरीत उभारलेला एक विजयस्तंभ आहे. तोच पुढे तीर्थखांब म्हणून प्रसिद्ध झाला. पैठणच्या गतवैभवाची व तेथील शिल्पकलेच्या अजोड सौंदर्याची साक्ष देते. अशा प्रकारचा कलापूर्ण स्तंभ पैठणशिवाय फक्त रांचीमध्ये (झारखंड) आहे.
या खांबाला दगडी जोड देऊन एकत्रित केले आहे. यासह दगडी जोडस्तंभावर स्वर्ग, मृत्यू, पाताळ या कल्पना चित्रांकित केलेल्या आहेत. तळाशी मातृका मंडळ व भैरवाचे शिल्प कोरलेले अाहे. गळ्यात भैरवाच्या मुंडमाळा व त्यातून ठिबकणारे रक्त चाटणारं श्वान अतिशय हुबेहूब चितारले आहे. खांबाच्या मधल्या भागात श्रृंगारशिल्पे कोरलेली आहेत. मध्य भागातील मकर मुखाचे अष्टकोनी गोल वर्तुळ विशेष देखणे आहे. अशा या विविध पैलूंनी घडवलेला तीर्थखांब (विजयस्तंभ) २५०० (अडीच हजार) वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे.
पर्यटक वाढून राेजगार निर्मिती हाेईल
पैठण शहरातील तीर्थखांबाचा जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीत (युनेस्को) समावेश करण्यासाठी केंद्र व राज्य शासनास शिफारस करण्यात आली आहे. तसा ठराव घेण्यात आला आहे. या अशा देखण्या वास्तूला जागतिक प्रसिद्धी मिळावी, जेणेकरून देश-विदेशातील पर्यटक पैठण शहराला आवर्जुन भेट देतील. त्यामुळे शहराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असे मुख्याधिकारी आगळे म्हणाले. तसेच येथे जायकवाडी धरण, उद्यान , संत एकनाथ महाराजांचे दर्शन घ्यायलाही भाविक येतात. त्यामुळे पर्यटन वाढले.
प्राचीन तीर्थस्तंभ –
पैठण येथील समृद्ध राजवटीचे प्रतीक असलेला प्राचीन तीर्थस्तंभ शेवटचा घटका मोजत आहे. राज्य पुरातत्व विभागाने रासायनिक लेप प्रक्रिया करून अनेक वर्षे उलटली आहेत. सध्या स्तंभाचे पापुद्रे निघत असून, सुंदर नक्षीकामाला इजा पोचली आहे.बाराव्या शतकातील नितांतसुंदर वास्तू नामशेष होण्याच्या स्थितीत आहे.
प्राचीन प्रतिष्ठान नगरीचे वैभव दाखवणाऱ्या शेकडो वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या. समृद्धी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठानचे वर्चस्व सिद्ध करणारा तीर्थस्तंभ बाराव्या शतकात उभारण्यात आला. पैठणच्या या तीर्थस्तंभाचे वेगळेपण देशभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करते, मात्र ‘पिकतं तिथं विकत नाही’ या म्हणीप्रमाणे तीर्थस्तंभाची दशा झाली आहे. स्तंभाचे ठिकठिकाणी पापुद्रे निघाले असून तातडीने रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज आहे. पायथ्याचा काही भाग तुटल्याने चक्क सिमेंटने डागडुजी करण्यात आली होती. या कामाचेही आता तुकडे पडत आहेत. चार टप्प्यात उभारलेल्या स्तंभावर आकर्षक नक्षीकाम आहे. वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊन नक्षीकाम पुसट होत आहे.
नगर परिषदेने तीर्थस्तंभ परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. पण, कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नसल्यामुळे सौंदर्यीकरणाची दुर्दशा झाली. दिवे, लोखंडी जाळ्या गायब झाल्या असून कारंजे बंद आहेत. स्तंभाच्या सभोवती गाजरगवत आणि कचरा पसरला आहे. मोकाट जनावरांचा मुक्त वावर असलेल्या स्तंभ परिसरात पर्यटकांची निराशा होते. चार भागातील स्तंभ ६.३७ मीटर उंच आहे. स्तंभावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ सूचित केले आहे. तसेच सप्तमातृका, नृत्यरत गणपती, श्रीदेवी-भूदेवी, शिव व इंद्र, भैरव यांची शिल्पे आहेत. स्थापत्य शैलीचा अजोड नमुना असलेल्या स्तंभाचे तातडीने जतन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
इ. स. पूर्व बाराव्या शतकातील तीर्थस्तंभ पैठणला ‘दक्षिणकाशी’ सिद्ध करणारा भक्कम पुरावा आहे. काळाच्या ओघात स्तंभात स्थित्यंतरे झाली आहेत. हा ठेवा जतन करणे आवश्यक आहे. या स्तंभावरील शिल्प अभ्यासकांना प्रेरित करतात.
शककर्ता शालिवाहन सम्राटांनी दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर त्या विजयाचे प्रतीक म्हणून तत्कालीन राजधानीचे शहर पैठणनगरीत भव्यदिव्य तीर्थखांब उभा केला होता. आजही ‘शालिवाहन’ इतिहासाची साक्ष देत हा तीर्थखांब (विजयस्तंभ) दिमाखात उभा आहे.
प्राचीन पैठणनगरीच्या गतसंपन्नतेचा साक्षीदार असलेला हा तीर्थस्तंभ पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. सातवाहन घराण्याच्या मराठी साम्राज्याचा हा दीपस्तंभ संपूर्णपणे दगडात बनविण्यात आला आहे. यादवकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना असलेले हे शिल्प ४ स्वतंत्र कप्प्यांद्वारे उभारण्यात आलेले आहे. स्वर्ग, नरक व पाताळ, अशी रचना ३ टप्प्यांत कोरलेली आहे. दक्षिण काशीचा मान व एकेकाळी धर्मपीठाचा अधिकार गाजवणाऱ्या पैठण येथील गोदावरी नदीत दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे. प्रतिष्ठाननगरी ही मोक्षधाम म्हणूनही ओळखली जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री स्वर्गाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला असावा, अशीही आख्यायिका आहे.
शहराच्या सर्वात उंच असलेल्या भूभागावर स्तंभ उभारला असून, त्याची उंची ५० फूट आहे. दगडी खांब व टोकदार कमानी तत्कालीन शिल्पकलेची उंची व दर्जा यावर शिक्कामोर्तब करतात. तळावरच्या मातृकामंडळाचे कोरीवकाम करताना शिल्पकाराने संपूर्ण कसब पणाला लावले आहे. भैरवनाथ व त्याच्या गळ्यातील मुंडमाळ, त्यातून स्रवणारे रक्त अन् ते चाटणारा कुत्रा यांचे बारकावे व गूढ संकेत अभ्यासकांना मोलाचे ठरत आले आहेत. स्तंभाच्या मध्यभागी मृत्युलोक आहे. तेथे कोरलेली मैथुनशिल्पे दिसून येतात. मकरमुखाचे अष्टकोनी वर्तुळ व मूर्तीवर कमालीच्या कलाकुसरी आता अंधुक झाल्या आहेत. स्तंभाच्या वरचा भागही शिल्पकलेच्या उच्च दर्जेदारीवर शिक्कामोर्तब करणारा आहे.
श्रीदेवी, भूदेवी, गणेश व सप्तमातृका यांच्या दुर्मिळ शैलीतील या नितांत सुंदर मूर्ती येथे बघावयास मिळतात. मात्र, काळाच्या ओघात व दुर्लक्षामुळे तीर्थस्तंभाची झीज होत आहे. विशेष, म्हणजे हा इतिहासाचा साक्षीदार असलेला तीर्थस्तंभ राज्य संरक्षित स्मारक असल्याचे घोषित केले
ज्ञानेश्वर
उद्यान
ऐतिहासिक पैठण नगरीतील वाडे…
पैठणच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर हाती मशाल घेऊन काळगुहेत शिरावे लागेल आणि सोनेरी प्रकाशात हा इतिहास पाहावा लागेल. तेव्हा ही नगरी तुमच्याशी बोलू लागेल. आपल्या मनातील कढ ही नगरी तुम्हाला सांगू लागेल. पैठणच्या इतिहासाची संगतवार मांडणी तशी एका अर्थाने सातवाहन काळापासूनच करावी लागेल आणि मग आपल्याला बघावे लागतील, इथले दगड, इथले बांधकामे, मूर्ती, शिल्पे, विविध प्रकारचे स्थापत्य आणि इथले भव्य – दिव्य असे पुरातन पैठण नगरीतील वाडे!
पैठण शहरातील पुरातन वाडे हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे. इथले वाडे, त्यांचे बांधकाम, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, कोरीव काम, प्रसिद्ध पैठणी दरवाजे, विशेष प्रकारच्या खिडक्या, मोठ्या विटा, पाण्यावर तरंगणाNया विटा, त्यातील नक्षीकाम असं सगळच वेगळं असं वाड्याबद्दल सांगता येईल. पैठणला आज जे वाडे वापरात आहेत. त्यातील काही वाडे चक्क ३०० ते ४०० वर्षे जुने आहेत आणि एवढ्या कालावधीनंतरही त्यांची प्रकृती अतिशय ठणठणीत आहे.
सातवाहनाचा राजवाडा
पैठण शहरात आज जे काही अवशेष आहेत, त्यात सगळ्यात जुना असा सातवाहन राजाचा राजवाडा होय. अर्थात दोन हजार वर्षांपूर्वीच्या बांधकामाचे काही पुरावे आज उपलब्ध नसले तरी लोकप्रवादाने, श्रद्धेने आजच्या गुफा मशिदीलाच सातवाहनांचा राजवाडा संबोधले जाते. एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखा असणाNया या भल्या मोठ्या परिघाच्या या राजवाड्यात काय नव्हते? पुष्करणी, कारंजे, दालने अर्थात तो होताच राजवाडा! पैठणमधील जे बहुसंख्य वाडे दिसतात, ते मात्र पेशवाई काळचे. त्याहीपेक्षा जुने असणारे, मात्र अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत. पैठणला धार्मिक महत्त्व होतेच; पण मोगल, मराठे व पेशवाई काळात विशेष महत्त्व आले ते तलम वस्त्राच्या व्यापारामुळे. या व्यापारातून आलेल्या सुबत्तेतून सावकार निर्माण झाले. मग या सावकारांचे टोलेजंग ऐश्वर्यसंपन्न असे वाडे निर्माण झाले.
वाड्यांची रचना
शहरातील बहुतांश वाड्यांचे आरेखन (डिझाईन) सारखेच आहे. मुख्यद्वार, मग कोठा, नंतर मोठा चौक, चौकाच्या तिन्ही बाजूस ओसरी, बैठका, महाले घर (खोली), स्वयंपाकघर, मागे परसदार व याच पद्धतीने वरचा मजला. सर्वसाधारण असे आरेखन या सगळ्या वाड्यांचे आहे. वाड्याच्या बांधकामात चांगल्या दगडांच्या घडीव चिरा-चुन्याचे बांधकाम करून लावण्यात आल्या आहे. समोरचा संपूर्ण भाग म्हणजे वाड्याच्या बाहेरील भिंती या अध्र्या दगडात व विटांमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. सगळ्या वाड्यांच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या ठिकाणी पाणी साठवणुकीचे मोठे घडीव, जमिनीत भिंतीत असणारे मोठमोठे हौद आहेत. प्रवेश दरवाजांच्या वर एका माणसाला ऐसपैस बसता येईल असा कोनाडा आहे. जी रक्षकाची लपण्याची जागा असे. वरच्या कोनाड्यात बसून दरवाजातून येणाNया हल्लेखोर चोरट्यावर वार करता येण्यासाठीची ही जागा.
कोनाड्यातून तळघरात
येथील काही सावकारांच्या वाड्यात तर कल्पकतेची कमाल असे. सावकारी कामकाज करताना आलेली सोन्याची मोड एक प्रतिष्ठित सावकार काम करत करत ती मोड सहजपणे न बघता मागे पेâवूâन देत असे. ती मागे पेâकलेली मोड एका देवळीत कोनाड्यातून खाली पडून खालच्या बळदात (तळघरात) जाऊन पडत असे. पैठणमध्ये उभ्या असलेल्या वाड्यांची तळघरे, बळदे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या घडीला अशी अनेक बळदे अनेक गूढ गुपिते आपल्या मिट्ट काळोखात सांभाळत आपले अस्तित्व राखून आहेत.
लाकडं नदीतून वाहणारी जमात
संपूर्ण वाडा मात्र शंभरनंबरी अशा सागवान लाकडांनी बनवलेला. या सागवान खांबांची उंची नि लांबी बघूनच आजही छाती दडपून जाते. इथल्या सगळ्या वाड्यात भरपूर सागवान वापरले आहे. आणि गंमत म्हणजे पैठणच्या २०० कि.मी. परिसरात मुळी सागवानाचे जंगलच नाही. मग येणारे सागवान हे गुजरातमधील डांगच्या जंगलातून नाशिकला यायचे व तेथून गोदावरीच्या पात्रातून प्रवाहाबरोबर पैठणला येत असत. ही सागवानाची लाकडं वाहून नेणारी एक विशिष्ट जमात आजही पैठणमध्ये आहेच. केवळ गोदावरी किनाNयावरच ही जमात सापडते.
लाकडांवरचे कोरिव काम
पैठणला या आलेल्या सागवानावर इथल्या कुशल कारागिरांची हत्यारे काम करू लागत. मग ही काष्ठे जिवंत होऊ लागत. पैठणला प्रत्येक वाड्यात सागवानावरचे कोरीव काम दृष्ट लागावे असेच आहे. अनेक प्रकारच्या महिरपी, घट पल्लव, देवदेविका, मोरबांगडी, वेलबुट्टी, प्राणी, देवामध्ये विशेष उल्लेखनीय. गजलक्ष्मी, हत्ती, मोर, िंसह, पोपट इ. शुभ पशूपक्षी झाडांच्या महिरपी, सलदार खांब त्याच्यावर तेवढीच नजर लागावी अशी नक्षी. तेवढीच त्यावरची लकाकी. तळ्याच्या वरच्या मजल्यावरचे विशेष जाळीच्या पक्ष्यांचे कठडे, वैशिष्ट्यपूर्ण नक्षी, लाकडाचे दिवे, लामणदिवा, सागाची सबंध साखळी असे कितीतरी कोरीव काम या लाकडात होत असे. पैठणी दरवाजा व खिडक्या हा एक प्रसिद्ध प्रकार जगातील अनेक संग्रहालयात आजही आहेत. अत्यंत सुंदर लाकडी देवघर ही एक पैठणी वाड्याची ओळख.
वाड्यांची भव्यता
संपूर्ण वाडा आखीव रेखीव आहे. इथल्या वाड्यांची ऐसपैस चौक ही एक वेगळी ओळख. नऊचौक, चारचौक, आठ ते पस्तीस चौक असे विविध वाड्यांचे प्रकार इतिहासात होते. बत्तीस चौकांचा वानोळे सावकाराचा वाडा प्रसिद्ध आहे. आजही यातील चार चौकी वाडे पैठणला आहेत. (पाटीलवाडा) पूर्वी तीन एकर परिसरात उभा असलेला धोंडीनाथ महाराज संस्थानचा वाडा आजही जुन्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवत उभा आहे. या वाड्यात चुंबकीय तत्त्वावर चालणारे चौकातील पाण्याचे कारंजे तेव्हाच्या तंत्रज्ञानाची साक्षच देतात.
पाण्यावर तरंगणाNया वीटा
पाण्यावर तरंगणाNया काळ्या रंगाच्या विटांचे गुपितही असेच आहे. या विटेला खंगर म्हणत व ती नक्षीकामासाठी वापरली जात असे. अशी अनेक वैशिष्ट्ये इथल्या भरभक्कम वाड्यांची आहेत, जी जाणून घेताना आश्चर्यचकित होण्याची वेळ येते. सगळ्या वाड्यांचं दर्शन घडवणे विंâवा त्यांच्याबद्दल लिहिणे हा एका लेखाचा विषय नाही. अनेक शतकापासून आपल्या अनोख्या स्थापत्य वैशिष्ट्यांच्या साह्याने उभे असणारे व इतिहासाची काही पाने आपल्यासमोर खुले करणारे पैठण नगरीतील वाडे असेच राहतील… अगदी चिरंतन!र्
बद्रीनाथ खंडागळे
जयवंत पाटील
पैठण
450 वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण
शालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव व्यक्त करतात. ते सांगतात, "या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. 1200 पैकी 900 लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरं होती. तिथे मोठी शहरं उदयास आली."

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
"याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवानं आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचं साम्राज्य मोठं होतं. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो."
"आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्वास्थ्य या काळात लाभलं आहे. या काळात दक्षिण भारतातल्या समुद्र किनाऱ्यावरून आपले व्यापारी आग्नेय आशियात जात असत. तिथून मसाल्याचे पदार्थ भरून आणत," देव सांगतात.
"भारतातील पैठणचं कापड, रेशीम, हस्तिदंताच्या वस्तू, चंदन, मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात. युरोपात पैठण आणि तगरपूरच्या (तेर) कापडाला मोठी मागणी होती. गुजरातमधल्या भ्रुभू कच्छसह (भडोच) महाराष्ट्रातील कलीना (कल्याण), सुरपारक (सोपारा), स्थानक (ठाणे), दाभोळ, जयगड, देवगड, मालवण अशा सगळ्या बंदरांवरून समुद्री व्यापार चालत असे," असं देव यांनी सांगितलं.
कशी होती सातवाहनकालीन महाराष्ट्राची राजधानी?
डॉ. मोरवंचीकर यांनी सातवाहन काळाचं वर्णन केलं. ते म्हणाले, "या सातवाहनांची पैठण ही राजधानी होती. त्या वेळी पैठणला प्रतिष्ठान नगरी म्हटलं जायचं."
"त्याकाळात पैठण एवढं मोठं शहर दुसरं नव्हतं. ते जगातल्या त्या काळच्या सर्व मोठ्या बाजारपेठांशी जोडलेलं होतं. पैठणमधून रोमशी थेट व्यापार चालायचा आणि याचे पुरावे इतिहासतज्ज्ञांना मिळालेले आहेत. पैठणजवळच्या उत्खननात रोमन नाणी मिळाली आहे," ते सांगतात.

फोटो स्रोत, AMEY PATHAK/BBC
"तत्कालीन भारतात व्यापार मार्गांना सार्थवाह पथ असं म्हणायचे. हे सर्व सार्थवाह पथ पैठणमधून जात होते. पैठण हा त्याकाळी मोठा व्यापारी थांबा होता. बहूतांश व्यापारी हे महिनोंमहिने मुक्कामी राहत असतं. याचं वर्णन हाल सातवाहन याच्या गाथेमध्ये केलं आहे. त्यातील सातशे पदांपैकी चारशे पदं ही व्यापारावर आहेत."

फोटो स्रोत, AMEY PATHAK/BBC
पैठण
पैठण
प्रकार : मध्ययुगीन एकनाथ मंदीर / तीर्थस्थळ
जिल्हा : औरंगाबाद
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
भाग ३७
वैभवशाली प्रतिष्ठाणनगरी अर्थात आपलं पैठण
पोस्तसांभार :: रोहित पेरे पाटील
प्रतिष्ठाण नगरी अर्थात आपलं पैठण. पैठणचा उल्लेख इ.स.पू. ४०० च्या सुमारास बौद्ध धर्मग्रंथातून आढळतात. सुप्तनिपात, अगुत्तरानुकाय, चुल्लकलिंग जातक इत्यादी ग्रंथांवरून अश्मक व मूलकांचा देश म्हणजे आजकालचे नगर, बीड आणि औरंगाबाद हे जिल्हे एकमेकालगत पैठण हे राजधानीचे शहर होते.अशोकाच्या शिलालेखात (इ.स.पू. २७) पेतनिकाचा उल्लेख आढळतात. कन्नड तालुक्यात पितळ खोऱ्यातील बौद्ध लेण्यातून (इ.स.पू. २००) गंधित कुळातील मित्रदेवाने आणि संगत नावाच्या इसमाने दान दिल्याचे उल्लेख आहेत. सोयीच्या स्तुपातूनही प्रतिष्ठाणच्या रहिवासाचे उल्लेख आहेत.इ.स.पू. ६० च्या सुमारास परिप्लस या इजिप्त मधील ग्रीक प्रवाशाने पैठण हे भरभराटीचे शहर भडाचहून २० दिवसांच्या टप्प्यावर असून येथे विविध प्रकारचे कापड तयार होतात असं नमूद करून ठेवलंय. पैठणचा प्राचीन उल्लेख प्रज्ञपुराणात येतो.प्रतिष्ठाण नगरीला म्हणजेच पैठणला सुवर्णकाळ लाभला तो सातवाहनांच्या काळात, पैठण ही तत्कालीन सातवाहनांची राजधानी होती. त्या काळी सातवाहनांचा परकीय देशांशी व्यापार चालत होता हे सातवाहनांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते.कला, संस्कृती, पांडित्य, साहित्य, व्यापार या क्षेत्रात पैठणची भरभराट सातवाहनांच्या काळात झाली.सातवाहन कुळातील गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात शालिवाहन हा सर्वात कर्तबगार राजा या भूमीत होऊन गेला.आशियातील शक राजा नहुप याने जेव्हा सातवाहनांवर आक्रमण केलं तेव्हा नाशिक जवळ मोठं युद्ध झालं, या युद्धात शालिवाहन राजाने शकांचा मोठा पराभव केला, ते साल होतं इसवी सन ७८. या दिवशी शालिवाहन राजाने त्याच्या नावाचा शक सुरू करून (चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्री नृप शालिवाहन शके १) या विजयाप्रित्यर्थ पैठण येथे एक तिर्थखांब उभारला जो आजही सातवाहन राजवटीच्या गतवैभवाची साक्ष देत उभा आहे.शालिवाहन राजांसंबंधी अनेक दंतकथा स्थानिकांमध्ये प्रचलित आहेत.पैठणच्या इतिहासाचा सर्वांगीण आढावा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सध्याचं पैठण शहर हे जरी गजबजलेलं असलं तरी जुनं पैठण अजूनही त्यामानाने शांत आणि निवांत आहे. तिथं वाहतूक आणि गर्दीचा गोंगाट नाही, आहे ती फक्त निरव शांतता. जुन्या पैठणपासून अजून थोडं उंचावर जाऊ लागलं की वाटेत गर्द झाडी, पुरातन भग्न वाडे लागतात. त्या भागाला पालथीनगरी असं म्हणतात, स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या एका दंतकथेप्रमाणे सध्याची पालथीनगरी ही शालिवाहन राजाची राजधानी होती म्हणजे शालिवाहन राजाचा राजवाडा आणि मुख्य राजधानीचं ते ठिकाण असल्याचं बोललं जातं, विजयस्तंभ/ तिर्थखांब देखील याच ठिकाणी आहे. पालथीनगरी यासाठी म्हणतात की काही शेकडो वर्षांपूर्वी इथं भूकंप झाला असल्याने भव्य वाडे आणि अवशेष जमिनीखाली गाडल्या गेलेत. काही लोकांनी द्रव्याच्या लोभापायी येथे खोदकाम देखील केले होते तेव्हापासून सरकारने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलाय.लिलाचे प्रस्थान या पोथीवरून १३ व्या शतकातील पैठणची कल्पना येते. पैठणचा उल्लेख अनेक ठिकाणी पोटनगर, पोतनगर, प्रतिष्ठान, प्रत्यस्थान असा येतो.संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवून घेतले तो अतिप्राचीन नागघाट, शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज, त्यांचा वाडा,धन्यवाद !लेखन : रोहित पेरे पाटील© इतिहासवेड
Nag Ghat Paithan City, Paithan, Dist. Chhatrapati Sambhajinagar – Pilgrim Data Services
नाग घाट
पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

पैठण हे अतिप्राचीन शहर असून या नगरीत प्राचीन काळी नागांची वस्ती होती. नागांची वस्ती याचा अर्थ नाग हे देवक असलेल्या वा नागवंशीय लोकांची वस्ती असा होतो. याबाबतचे उल्लेख आजही अनेक लोकगीतांमधून आढळतात. एका लोकगीतामध्ये असे म्हटले आहे, ‘पैठण वस्ती अजब, दिसती वस्ती नागाची। कैक वर्षांची वस्ती होती शालू शंखाची, राजा शालिवाहनाची।।’ याचेच अस्तित्व आज पैठण येथे असलेल्या नाग घाटावरून येते.
पालथी नगरी म्हणतात त्या भागातून गोदावरी नदीकडे जाताना हा नाग घाट लागतो. येथील सातवाहनकालीन प्राचीन टेकड्यांवर पैठणची जुनी वसाहत होती. तिला कालौघात पालथी नगरी असे नाव पडले.
शनिमंदिर ते नाग घाट या दरम्यानच्या सुमारे ४० एकर क्षेत्रावरील या परिसरास पालथी नगरी म्हणण्याचे कारण असे की तेथील जुनी घरे रस्त्याच्या खाली असून आजचे रस्ते या घरांवरून जातात. येथे १९३७ साली करण्यात आलेल्या उत्खननात सातवाहनकालीन प्राचीन घरांचे अवशेष सापडले होते. येथून जवळच हा नाग घाट आहे. याच घाटावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविण्याचा चमत्कार घडविला होता. या गोष्टीमुळे हा घाट पैठणमध्ये येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनला आहे. औरंगाबाद गॅझेटियरनुसार, रघुनाथराव पेशवे यांचे पुत्र आनंद राव यांनी इ.स. १७३४ मध्ये येथील प्राचीन घाटाचा जीर्णोद्धार केला होता.
सातवाहनकालापासून अस्तित्वात असलेल्या तसेच महानुभाव वाङ्मयात याची नागडोह म्हणून नोंद आहे. या नाग घाट परिसराचे आता सुशोभीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावरून खाली उतारावर बांधलेल्या अत्यंत रुंद अशा पायऱ्या उतरल्यावर नाग घाटाच्या परिसरात प्रवेश होतो. येथेच एका बाजूस लहानसे पावन हनुमान मंदिर आहे. मंदिरात एका दगडी चबुतऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूस शालिवाहनाचा पिता शेषनाग याचे छोटेसे देवळीसदृश मंदिर आहे. या मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या नागाची फणा काढलेली मूर्ती आहे. याबाबत ‘प्रबंध चिंतामणी’ या ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार, पैठण नगरीमध्ये एक ब्राह्मणकन्या आपल्या दोन बंधूंसह राहत होती. ती लावण्यवती होती. एकदा पाणी आणण्यासाठी ती नागडोहावर गेली असता शेषराजाने तिला पाहिले. तो तिच्या सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याने तत्काळ तिचे पाणिग्रहण केले. लवकरच ती गर्भवती झाली. तेव्हा तिच्या वर्तनाचा तिच्या भावांना राग येऊन ते तिला तेथेच सोडून निघून गेले. नंतर ती पैठण येथील कुंभारवाड्यात राहू लागली. तेथे तिने शालिवाहनास जन्म दिला.
या शेषनाग मंदिरापासून खाली घाटाकडे जाताना मार्गावर दोन बाजूला नंदीच्या पाषाणमूर्ती बसवण्यात आल्या आहेत. पुढे येताच दगडी आवारभिंतीत बसवलेले नाग घाटाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. एखाद्या मोठ्या वाड्याचे प्रवेशद्वार असावे, तसे हे द्वार असून त्यास भक्कम लाकडी चौकटही आहे. वरच्या बाजूस नागदेवतेची मोठी प्रतिमा चितारण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जाताच समोर मोठी मोकळी जागा दिसते. त्यास रेलिंग लावण्यात आले आहे. येथून गोदावरी नदीचे दर्शन होते.
प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने घाटाखाली नदीच्या दिशेने उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी एका बाजूस नागमंदिरातील नागाच्या मूर्तीची छोटीशी प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. तेथून खाली उतरून आल्यानंतर बाजूला थोड्या उंचीवर सिद्ध वरुण गणपती मंदिर आहे. हे मंदिर पेशव्यांच्या काळात उभारण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या मंदिराची रचना चौकोनी असून त्यास शिखर नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर गरुड व हनुमानाची चित्रे रंगविण्यात आलेली आहेत.
आत मोठ्या संगमरवरी महिरपी देव्हाऱ्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूस रेड्याची छोटी दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती गोदाभिमुख असून मूर्तीवर छोटासा मंडप बांधलेला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील चमत्कारकथेनुसार, विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांना मुंजीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून सनातन्यांनी सांगितलेले देहान्त प्रायश्चित्त घेतले होते. त्यानंतरही आळंदीतील सनातन्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना शुद्धिपत्र देण्यास नकार दिला. त्यांनी पैठणला जावे व तेथील ब्रह्मवृंदाकडून निकाल आणावा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते मजल दरमजल करीत पैठणला आले. येथील घाटावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ते उतरले. त्यानंतर त्यांनी येथील ब्रह्मवृंदाकडे जाऊन शुद्धिपत्र देण्याची विनंती केली. त्याचा निर्णय घेण्यासाठी नाग घाटावर ब्रह्मसभा बोलावण्यात आली होती.
ब्राह्मण पंडित तेथे शास्त्रार्थ करीत होते. त्याच वेळी त्या घाटाच्या बाजूने एक व्यक्ती त्याच्या रेड्याला घेऊन चालला होता. तो रेडा हलत नसल्याने तो त्याला जोरजोराने मारत होता. ते पाहून संत ज्ञानेश्वरांचे हृदय कळवळले. त्यांनी त्या व्यक्तीस रेड्यास मारू नको, असे सांगितले. त्यावर सनातनी मंडळी चिडली व आम्ही येथे चर्चा करीत असताना या पोराला रेडा महत्त्वाचा वाटतो, असे म्हणू लागली. त्यावर ज्ञानदेव म्हणाले की परमेश्वर सर्वांभूती आहे. त्या रेड्याच्या आणि आपल्या देहातही एकच परमात्मा वास करीत आहे. हे ऐकून सनातन्यांनी ज्ञानदेवांना धारेवर धरले. आमच्या व रेड्याच्या शरीरात एकच परमात्मा वास करीत असेल तर आम्ही ज्या प्रमाणे वेद म्हणतो, त्या प्रमाणे तो रेडाही वेद म्हणू शकेल का? असा प्रश्न केला. तेव्हा ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या जवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्यांचा दिव्य स्पर्श होताच त्या रेड्याच्या तोंडातून वेदांतील ऋचा बाहेर पडू लागल्या. हा चमत्कार इ.स. १२८७ च्या माघ शुद्ध वसंत पंचमीस शुक्रवारी घडला. नाग घाटावर घडलेल्या या घटनेच्या स्मरणार्थ नंतर तेथे ही रेड्याची मूर्ती बसवण्यात आली. येथेच भिंतीवर तो प्रसंगही चितारण्यात आला आहे.
रेड्याची मूर्ती व सिद्ध वरुण गणेश मंदिर येथून आणखी खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूस उत्तराभिमुख नागेश्वर शिवालय आहे. या मंदिराचा आकार आयताकृती आहे व ते दगडी चौथऱ्यावर दगडातच बांधलेले आहे. या मंदिरावरही शिखर नसून याचे छत सपाट आहे. मंदिराच्या गर्भगृहात संगमरवरी फरशांमध्ये बसवलेली दगडी शिवपिंडी आहे.
नाग घाटावरून गोदावरी नदीकडे जाताना एक प्रचंड आकाराची शिळेची पायरी आहे. या पायरीवर सप्तमातृका कोरण्यात आल्या आहेत. ही पायरी यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. या घाटाजवळच इंद्रेश्वर महादेव मंदिरही आहे. इंद्रेश्वर महादेव मंदिराची रचना चौकोनी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भालदार–चोपदारांच्या प्रतिमा रंगवण्यात आल्या आहेत. तेथून प्रवेश करताच आत ओवरीसारखी रचना दिसते. तीन पायऱ्या चढून ओवरीत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीत जाळीदार खिडकी बसवण्यात आली आहे. येथून आतील शिवलिंगाचे दर्शन होते. तेथून डावीकडे असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर एक छोटीसी खोली लागते. या खोलीस अत्यंत छोटा दरवाजा आहे. येथून खाली वाकूनच गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृह जमिनीपासून खालच्या पातळीवर आहे. येथे असलेल्या शिवपिंडीवर पितळी मुखवटा व त्यासमोर नंदीची लहानशी मूर्ती आहे. हे मंदिर मध्ययुगीन काळातील असल्याचे सांगितले जाते.
पैठण येथील हा नाग घाट वारकरी व नाथपंथीयांचे श्रद्धास्थान आहे. येथे नागपंचमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी या परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. नाथषष्ठीला पैठणमध्ये येणाऱ्या अनेक दिंड्यांचे हे विसावा केंद्रही आहे.
उपयुक्त माहिती:
- पैठण बसस्थानकापासून १.५ किमी,
- तर छत्रपती संभाजीनगरपासून ५१ किमी अंतरावर
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- Marathi News
- National
- Marathi Calendar Start In Paithan
पैठणनगरीत झाला मराठी कॅलेंडरचा जन्म
चैत्र
प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यास मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जसे इंग्रजी कॅलेंडर आपण मानतो तसेच मराठी कॅलेंडर आहे. या कालगणनेची
सुरुवात आपल्या पैठणनगरीतून झाली हे नव्या पिढीला माहीत नाही. मराठी
कालगणना पैठणच्या म्हणजेच प्रतिष्ठाननगरीच्या एका सातवाहन सम्राटाने केली.
आजपासून शके 1934 सुरू होत आहे. त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. 1934
वर्षांपूर्वी दक्षिण भारतात सातवाहन घराण्यातील एका मराठी राजाने स्वतंत्र व
सार्वभौम राज्य निर्माण करण्याचा पराक्रम केला. शक-क्षत्रप राजांचा पराभव
करून स्वतंत्र राज्याची पहिली गुढी पैठण शहरात उभारली आणि शालिवाहन शक
नावाची कालगणना सातवाहन राजाने सुरू केली. सातवाहन आणि शालिवाहन एकच.
सातवाहन हे प्राकृत, तर शालिवाहन हे संस्कृत नाव आहे. सातवाहन
साम्राज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची पताका
फडकावली. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच
गुढीपाडवा हा शालिवाहन शक
कालगणनेतील पहिला दिवस. हा दिवस शालिवाहन राजाच्या पराक्रमाची आठवण करून
देणारा दिवस आहे. या दिवसाला धार्मिक महत्त्वही आहे. प्रभू श्रीराम जन्माचे
नवरात्र याच दिवसापासून सुरू होते. वनवासातून ते अयोध्यानगरीत याच दिवशी
परत आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अशा अनेक दृष्टीने हा दिवस
महत्त्वाचा मानला जातो.
तीर्थस्तंभ आहे साक्षीदार -
पैठणमध्ये आजही जुना तीर्थस्तंभ त्या वैभवशाली काळाची साक्ष देत उभा आहे.
हा दगडी कोरीव स्तंभ इसवी सन 1100 च्या काळातला म्हणजेच यादवकालीन आहे.
जुन्या काळातल्या वैभवाची साक्ष देत तो आजही दिमाखात उभा आहे. आजही
पैठणनगरीत गुढीपाडव्याचा भव्य उत्सव होतो. सातवाहन साम्राज्याची आठवण
म्हणून गुढीपाडव्याला पैठणनगरीतून भव्य मिरवणूक निघते. तिचा समारोप या
ऐतिहासिक तीर्थस्तंभाजवळ होतो.
सुवर्णयुगाचा प्रारंभ पैठणमधून
- मराठी कालगणनेची सुरुवात पैठणमधून झाली. या कालगणनेवरच आजचे मराठी
पंचांग आधारलेले आहे. एकेकाळी पैठण शहरातून सोन्याचा धूर निघत होता, असे
म्हटले जाते. कारण पैठण शहराला इ.स.पूर्व 230 ते इ.स. 230 असा तब्बल 450
वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास आहे. इतकी वर्षे सातवाहन साम्राज्य तेथे
होते. त्यामुळे पैठणनगरीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली होती. त्याकाळी
येथून पैठणी विदेशात निर्यात व्हायची. त्यामुळे हे नगर देशाची आर्थिक,
सामाजिक चळवळ आणि पुढे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराजांच्या कार्यामुळे
धार्मिक चळवळीचे केंद्र बनले. पैठणचा उल्लेख मोठ्या सन्मानाने दक्षिण काशी
म्हणून केला जातो. जगभर मराठी शककर्त्या शालिवाहन घराण्याची कीर्ती पसरली
होती. त्याच्याविषयी अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत. त्याकाळी मातीचे सैन्य
करून त्यावर अमृतजल शिंपडून राजाने युद्ध जिंकल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे.
गोदावरी नदीला अनेकवेळा पूर येतो. त्यामुळे ही नगरी अनेक वेळा पाण्याखाली
गेली. त्यामुळेच पालथी नगरी म्हणूनही पैठणची ओळख आहे. आजही उत्खननात तेथे
मातीचे हत्ती, घोडे, उंट व सैनिकही सापडतात. आगपेटीच्या आकारात पैठणीची घडी
व्हायची इतकी ती तलम होती. त्याकाळी पैठणचे कारागीर रोमपर्यंत
व्यापाराच्या निमित्ताने जाऊन आल्याचेही दाखले सापडतात.
सातवाहनांवरील माहितीपट दुर्लक्षित
- पैठणनगरीतील वैभवाची परंपरा येणा-या भाविकांना, पर्यटकांना माहीत व्हावी
या उद्देशाने सातवाहन घराण्याची माहिती देणारा माहितीपट काही वर्षांपूर्वी
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर यांनी तयार केला होता. पैठणच्या
संत ज्ञानेश्वर उद्यानात संगीत कारंजाच्या सोबत हा माहितीपटही दाखवण्याचा
प्रस्ताव होता. या माहितीपटाची संहिता स्वत: डॉ. मोरवंचीकरांनी लिहिली
होती, पण उद्यानाचे खासगीकरण होताच ही कल्पना मागे पडली. त्यामुळे नव्या
पिढीला पैठणच्या प्राचीन इतिहासाची माहिती आता मिळत नाही.
फाल्गुन वद्य षष्ठी हा नाथांचा जन्म दिवस.;धन्य महाराज जन्मले संसारी, ते ध्याती अंतरी नारायणहे नामदेवांच्या अभंगातील वचन येथे सार्थ ठरते. नाथांचा जन्म झाला, मात्र त्यांना फार काळ आईवडिलांचा सहवास लाभला नाही. आजी-आजोबा यांनी त्यांचा सांभाळ केला. प्रेमाने हे दोघेजण त्यांना ;एका; या नावाने हाक मारत. त्यांचे कुळ श्रेष्ठ ऋग्वेदी ब्राह्मण असल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्यावर ;मौंजीबंधानाचे संस्करण करण्यात आले. गोदावरीच्या साक्षात्काराने सद्गुरू कृपेची नाथांना ओढ लागली व दौलताबाद किल्ल्यावरील सद्गुरू जनार्दन स्वामींची एकनाथांनी भेट घेतली. तेथे बारा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी सद्गुरूंची अनेकप्रकारे सेवा केली.
बहिरभूमी स्थळ शुद्ध करी हस्ते
म्हणजे स्वामी ज्या ठिकाणी प्रातर्विधीला जात ती जागा नाथ महाराज स्वतःच्या हाताने शेणाने सारवून घेत असत. याच काळात ;सूर्यप्रभंजन आताचे ;शुलिभंजन या पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केली. जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे तिथे त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रयाचे दर्शन झाले. शेष भगवंतानेही त्यांचे रक्षण केले व मूळ रुपात दर्शन दिले,
लहानपणापासूचं अध्यात्म व हरिकीर्तनची आवड नाथांना असल्यामुळे हे गुण स्वामींनी ओळखले होते. त्यांना परत पैठणला जाऊन ;तू आता आजी-आजोबा (सरस्वतीबाई व चक्रपाणी महाराज) यांचा सांभाळ करून भागवत संप्रदायाचा आधार हो! अशी आज्ञा दिली.
जनार्दने एकनाथ । खांब दिला भागवत
आत्मबोध, पूर्णगुरुकृपा आणि दत्तात्रयाचे दर्शन यामुळे नाथांचे जीवन धन्य झाले. याच काळात नाथांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यांच्याकडून वेदान्त, अध्यात्म, योग, भक्तियोग ह्यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान धारणा, वेद अध्ययनात गेल्यामुळे नाथ पूर्ण पुरुषोत्तम झाले होते.
नाथांनी एक सद्गुणी व सुलक्षणी असलेल्या वैजापूरच्या गिरीजाबाईंशी विवाह केला. नाथांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा मुलगा हरीपंडित पुढे अतिशय महान पंडित काशीक्षेत्री जाऊन वेदाध्ययन करून पुन्हा पैठणात परत आला. तो परंपरेचा फारच अभिमानी होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर जवळपास २५० वर्षांनंतर नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा तो काळ. विजयनगरच्या राजाचे राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज दिशाहीन, कर्तव्यापासून दूर झाला. स्वधर्म, स्वराज्य, स्वराष्ट्र या विषयी सर्वत्र अज्ञान होते. सगळीकडे अंधश्रद्धा अंध:कार होता. मंदिरे उद्ध्वस्त होत होती, स्त्रियांवर अत्याचार होत होते, धर्मावर अन्याय होत होता. अशा कठीण परिस्थिती नाथांनी आई जगदंबेला साद घातली
बये दार उघड
म्हणून जोगवा मागितला कारण समाज सुधारणा करावयाची होती. नाथांनी भारूड, गवळण, जोगवा, अभंग, ओव्या, रूपके लिहीत जनजागृती केली. नाथ हे संत कवी होते. रंजन व प्रबोधन करीत अधःपतीत असणारा समाज त्यांनी सन्मार्गावर आणला. महाराष्ट्रांमध्ये त्यांनी पुरुषार्थ गाजवला व स्वतःच्या नावाने नाममुद्रा तयार केली ती म्हणजे ;एका जनार्दनी
अनेक रचना, गवळण, अभंग, भारूड यांसोबत ;एकनाथी भागवत; हा ;श्रीमद भागवत या ग्रंथावरील एकादश स्कंधाची टीका नाथांनी अठरा हजार ओव्यांमध्ये पूर्ण केली व एकात्मता साधली.
एकात्मता जाणुनी भाव एका। एकदशाची करी शुद्ध टीका।
हे वचन कृष्णदयार्णव महाराजांनी आपल्या स्तोत्रात घेतले आहे. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर या सारख्या रंजक व भावपूर्ण ग्रंथांची रचना करून समाजाच्या भावनेला हात घालून त्यांचा भगवंतावर असलेला भाव प्रकट केला.
ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाची शुद्धप्रत समाजासमोर, जगासमोर आणली. नाथांच्या या षष्ठी उत्सव निमित्ताने ; या दिवशी निर्याणदिंडी, सप्तमीच्या रात्री छबिना व अष्टमीला काल्याची दहीहंडी फोडून सांगत होते. या तीन दिवसामध्ये लाखो भाविक सहभागी होऊन आनंदात रंगतात.
;अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता। चरणी जगन्नाथा चित्त ठेले||
पैठणमध्ये आजही जुना तीर्थस्तंभ त्या वैभवशाली काळाची साक्ष देत उभा आहे.हा दगडी कोरीव स्तंभ इसवी सन 1100 च्या काळातला म्हणजेच यादवकालीन आहे.जुन्या काळातल्या वैभवाची साक्ष देत तो आजही दिमाखात उभा आहे.
आजही पैठणनगरीत गुढीपाडव्याचा भव्य उत्सव होतो.सातवाहन साम्राज्याची आठवण म्हणून गुढीपाडव्याला पैठणनगरीतून भव्य मिरवणूक निघते.तिचा समारोप या ऐतिहासिक तीर्थस्तंभाजवळ होतो.
सुवर्णयुगाचा प्रारंभ पैठणमधून-
मराठी कालगणनेची सुरुवात पैठणमधून झाली.या कालगणनेवरच आजचे मराठी पंचांग आधारलेले आहे.एकेकाळी पैठण शहरातून सोन्याचा धूर निघत होता,असे म्हटले जाते.कारण पैठण शहराला इ.स.पूर्व 230 ते इ.स.230 असा तब्बल 450 वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास आहे.
इतकी वर्षे सातवाहन साम्राज्य तेथे होते.त्यामुळे पैठणनगरीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली होती.त्याकाळी येथून पैठणी विदेशात निर्यात व्हायची.त्यामुळे हे नगर देशाची आर्थिक,सामाजिक चळवळ आणि पुढे संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ महाराजांच्या कार्यामुळे धार्मिक चळवळीचे केंद्र बनले.पैठणचा उल्लेख मोठ्या सन्मानाने दक्षिण काशी म्हणून केला जातो.
जगभर मराठी शककर्त्या शालिवाहन घराण्याची कीर्ती पसरली होती.त्याच्याविषयी अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत.त्याकाळी मातीचे सैन्य करून त्यावर अमृतजल शिंपडून राजाने युद्ध जिंकल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे.
गोदावरी नदीला अनेकवेळा पूर येतो.त्यामुळे ही नगरी अनेक वेळा पाण्याखाली गेली.त्यामुळेच पालथी नगरी म्हणूनही पैठणची ओळख आहे.आजही उत्खननात तेथे मातीचे हत्ती,घोडे,उंट व सैनिकही सापडतात.
आगपेटीच्या आकारात पैठणीची घडी व्हायची इतकी ती तलम होती.त्याकाळी पैठणचे कारागीर रोमपर्यंत व्यापाराच्या निमित्ताने जाऊन आल्याचेही दाखले सापडतात.
*आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त तिर्थस्तंभ पैठण*
नाथ नगरी म्हणून चिरपरिचित ओळख असलेल्या पैठण शहराच्या प्राचीन बलवान स्थळांची सुधारणा होऊन हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याची असताना या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांकडे दुर्लक्ष होत असल्याने ही स्थळे नष्ट होतील की काय ? अशी भिती इतिहास प्रेमींनी व्यक्त केली आहे.
येथील तीर्थखांब आंतरराष्ट्रीय ख्यातीचा असल्यामुळे या तीर्थखांबाला गेल्या पन्नास वर्षात पंचवीस लाखांहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्याचे स्थानिक इतिहास सांगतात. .
शालिवाहन वाहन राजाने दक्षिण भारतावर विजय मिळविल्यानंतर तीर्थस्तंभ उभारल्याची शेकडो वर्षांपासून लोकभावना आहे,
तर इतिहासाचे अभ्यासक हा तीर्थस्थंभ यादवकालीन असल्याचे मत व्यक्त करतात.
हिंदु कालगणनेप्रमाणे शालिवाहन शके प्रारंभ उत्सव प्रत्येक वर्षी मार्च / एप्रिल महिन्यात येणार्या गुढीपाडव्याला तीर्थखांबावर ध्वजारोहण तथा गुढी उभारून पैठणकर गेल्या काही वर्षांपासून नववर्षाचे स्वागत करतात. यावर्षी शालिवाहन शके 1939चा प्रारंभ झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने या तीर्थस्तंभाला राज्य संरक्षित स्तंभ 20 एप्रिल 1998 ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून स्तंभाची उंची 637 मीटर एवढी आहे.
स्तंभाच्या शिल्पावरून विविध चौकोनी साचा तथा भागामध्ये स्वर्ग, मृत्यु व पाताळ यांची कल्पना मांडल्याचे स्पष्ट होते.
देशातील व देशाबाहेरील पर्यटकांना या दगडी स्तंभावरील दुर्मीळ घडविलेल्या देवदेवतांच्या मुर्त्यांना पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या स्तंभाची झिज होत असून हा स्तंभ केंव्हाही कोसळेल अशा अवस्थेत येवुन पोहोचला आहे. हा स्तंभ नगर परीषदेच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या स्तंभावर रासायनिक प्रक्रिया करुन हा स्तंभ जतन करण्याचा प्रयत्न नगर परीषदेने चालविला आहे
पण इच्छाशक्तीअभावी अद्याप प्रलंबित आहे. .
तीर्थस्तंभ उद्यानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचा पैठण- आपेगाव विकास प्राधिकरणात समावेश करण्यात आल्यानंतरही गेल्या चार - पाच वर्षापासून तीर्थस्तंभावर रासायनिक प्रक्रिया करण्याचा विसर मात्र प्राधिकरण समीतीला पडला आहे.
एवढे मात्र खरे.तीर्थस्तंभावर तात्काळ रासायनिक प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी इतिहास प्रेमींनी केलीय.
२३० इसवी के शककर्ता शालिवाहन राजा ने दक्षिण हिंदुस्तान (दखन ) पर जीत पाने की ख़ुशी मैं पैठण के पालथी नगरी इलाके मैं विजय स्थम बनवाया था | शालिवाहन राजा ने कुल ४५० साल तक राज किया और मन जाता है के पैठण उन्ही राजधानी थी |
सम्राट शालिवाहन ने ४५० साल पहले बने इस विजय स्थम्ब शालिवाहन राजा के वैभवशाली इथिहस का गवाह एक दीप स्थम्ब है | हर साल आज भी गुडी पड्वे के दिन शाहिवाहन राजा ने शुरवात की हुई शक गणना का उत्सव पैठण के नागरिक धूम धाम से मानते है | जलसे की शुरवात इस्सी विजय स्थम्ब से होती है | यहाँ नए साल की गुडी लगायी जाती है |
!!!!! संतांच्या भुमीचे वैभव……….पैठण येथील
१) समाधी मंदिर – शांतिब्रम्हं संत एकनाथांमुळे पैठण नगरी
लौकिकास आली महाराजांनी फाल्गुन वद्य शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स.
१६००) याच दिवशी गोदामाई च्या कुशीत समाधी घेतली , नाथांच नित्य स्मरण
राखण्यासाठी हे भव्य समाधी मंदिर उभारले गेलं . तेव्हापासून नाथ
षष्टी सोहळ्यास महाराष्ट्रातील अखंड वारकरी संप्रदाय दिंड्यात पताका घेऊन
याच समाधी मंदिरात नाथचरणी नतमस्तक होतात
. २) पालखी नागरी – पुरातन प्रतिष्ठान
नगरी आपल्या पैठण नगरीला अतिशय पुरातन वलय लाभलेलं आहे
. पूर्वी पैठण हे प्रतिष्ठान या नावाने लौकिक होत गोदाकाठी वसलेलं शहर
शककत्या शालिवाहनाची राजधानी होती . दक्षिण काशी म्हणून आजही या शहराची
ख्याती आहे . धर्म , पंथ , ज्ञान , विद्या , कला , निसर्ग यांच्या
सर्वांग सुंदर वैभवाने नटलेल्या या प्रतिष्ठान नगरीत आजही पालखी नागरी या
भव्य राजवाड्याचा उलटलेल्या भाग ऐतिहासिक प्रतिष्ठानची साक्ष देत ऊभा
आहे , ३) नागघाट – पैठण च्या गात वैभवाची परम्म्पारांचीउत्तुंग
साक्ष देणारा हा नागघाट संत ज्ञानेश्वरादी भारतीय भावंडाना जेव्हा पैठण
ला यावे लागले तेव्हा याच नागघाट वर हि भांवडे आली . ज्ञानेश्वरांनी याच
घाटावर रेड्यामुखी वेद बोलविल्याची आख्यायिका आहे . जुन्या शिळांनी
काठावर बांधलेल्या नागघाट गोदामाईच्या काठावर उभा आहे . नाग पंचमी या
सणाला याच घाटावर नाग देवताची पूजा करण्यासाठी भाविक जमतात ४)
मौलाना सादात दरगा – सय्यद सादात दग्याच्या पूर्वेच्या प्राचीन टेकडीवर एक
विस्तीर्ण किल्यासारखी भव्य वस्तू पर्यटकांचे लक्ष वेधुन घेते . हि
वस्तू म्हणजेच मौलाना दरगा होय. मौलाना साहेब हे अरबस्थानचे (दहाव्या
शतकातील ) एक प्रचलित व्यापारी होत धर्म कार्यासाठी पैठण ला जावे असा
त्यांना आदेश प्राप्त होताच ते पैठण ला आले . त्यांनी अनेक वर्ष धर्म
कार्य केल्यानंतर येथेच देह ठेवला त्यांनीच हि वस्तू उभारली
. ५) नाथसागर – आवघ्या मराठवाड्याची जलधारा म्हणून
जायकवाडी धरण अर्थात नाथ सागरचे अनन्य साधारण महत्त्व आहे .
मराठवाड्यातील चार जिल्हे याच धरणाच्या पाण्यावर जगतात . याचे वैशिष्ट्य
म्हणजे मातीने बनवलेले महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असुन सपाट
जमिनीवर निर्माण केलेले हे आशिया खंडातील केवळ दुसरे धरण होय.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाणाच्या प्रयत्नातुन १९६५
साली धरणाच्या बांधकामस प्रारंभ झाला . धरणाची उंची ४१.३० च् लांबी
९९९८m. याची क्षमता २ ,९०९ ,००० ,००० m२ एवढी
आहे.
६) तीर्थखांब – शक करत्या सम्राटान दक्षिण हिंदुस्थानावर प्राप्त
केलेल्या विजयाच प्रतिक म्हणजे हा पालथी नगरीतील विजय स्थंभ तीर्थ खांब
पैठण नगरीच्या गात वैभवाची शिल्प कलेच्या अप्रतिम सौंदर्यची साक्ष देत
सांस्कृतिक दीप स्थंभ मानून उभा आहे . अतिशय कलात्म कतेन स्वतंत्र दगडी
खांब एकञित करून त्याला जोड देऊन उभारलेल्या या स्थंभावर पातळ पातळ ,
मृत्यू स्वर्ग या हिंदू संकल्पना चितारलेल्या दिसतात . तळाशी मातृका
मांडलम भैरवाच्या गळ्यातील गुंडमाळा इथे ठिबकणारा रक्त चाटणार कुञ अशी
बोलकी आगळी वेगळी दृश्येही आहेत .
७) क्षेत्र आपेगाव – वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून अखंड
मानव जातीला जगण्याचा आणि आस्तित्वाचा अर्थ सांगणारे संत ज्ञानेश्वर
महाराज याचं जन्मस्थळ क्षेत्र पैठण तालुक्यातील आपेगाव होय. इ. स. १२७५
च्या दरम्यान ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावी झाला . संत , कवी , भागवत
संप्रदायाचे प्रवर्तक पैठण तालुक्यातील आपेगावी जन्मलेल्या या थोर संताचा
मराठी संस्कृतीवर विशेष प्रभाव आहे .
८) शंकरराव जी चव्हाण स्मारक – पैठण शहराने महाराष्ट्राला शंकरराव जी
चव्हाण यांच्या रूपाने एक उमद् व्यक्तिमत्त्व दिल . जे स्वकर्तुत्वाने
महाराष्ट्र भर गाजले. १४ जुलै १९२० रोजी पैठण येथे शंकर राव जन्माला आले .
१४ मार्च १९६६ रोजी पैठण चा हा सुपुञ महाराष्ट्र राज्याच्या
मुख्यमंत्री झाला . यांनीच ( नाथसागर) जायकवाडी प्रकल्पाची निर्मिती करून
मराठवाड्याला जल संजीवनी प्राप्त करून दिली
. ९)
पैठणी साडी – अनादी काळापासून पैठण ला कलासौख्य लाभले आहे. पैठण ची पैठणी
हा त्याचाच एक भाग,किंबहुना महाराष्ट्राचे ते महावस्ञ आहे . गेली दोन
हजार वर्षे पैठण ने या कलेची निस्सिम सेवा करत आहे . गर्भ रेशमी संपूर्ण
जरीचा पदर आणि रूंद व ठसठषित वेलबुट्टीचे काठ हि पैठणीची ठळक वैशिष्ट्ये
आहेत.
१०) संत ज्ञानेश्वर उद्यान – पैठण शहराच्या सौंदर्य र्यात भर घालण्यात
संत ज्ञानेश्वर उद्यानाचा मोठा वाटा आहे . हिरव्या झाडा झूंडपांनी बहरलेला
परिसर व सांयकाळचे संगित कांरजे हे या उद्यानाची खास वैशिष्ट्य .
राजस्थांन येथील म्हैसूर उद्यानाची हि प्रतिकृती आहे . तिला अथांग
नाथसागराची भिंत व गोदामातेचे वलय डोळ्यांचे पारणे फेडणारे असे पैठण मधिल
निवांत ठिकाण आहे ..
प्रतिष्ठाननगरीची महतीच न्यारी
Updated on:
गजानन आवारे पाटील
ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक व आधुनिक पर्यटन केंद्र असलेल्या पैठणमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. असे म्हणतात की, पैठणच्या प्रत्येक कोपऱ्यातच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ दिसतात.
एकेकाळी सातवाहनांची राजधानी राहिलेल्या पैठणला यादव कालखंडात ‘दक्षिण काशी’चा बहुमान मिळाला. म्हणूनच प्रागैतिहासिक कालखंड ते यादवांच्या काळाचा अभ्यास करण्यासाठी इथे अभ्यासक आवर्जून येतात.
चीन प्रतिष्ठाननगरी ही शालिवाहनांची राजधानी. सुमारे ३० राजांनी ४५० वर्षे पैठण या राजधानीच्या शहरातून राज्य केले. आजही २००० वर्षांपूर्वीच्या खुणा इथल्या पालथीनगरी या परिसरामध्ये सापडतात. ऐतिहासिक ८०० ते १००० वर्षे जुना तीर्थस्तंभ बघण्यासाठी इतिहासप्रेमी येतात. अद्वितीय शिल्पकलेचा नमुना असलेला हा तीर्थखांब अभ्यासकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.
सातवाहन काळातील अनेक वस्तू (कै.)बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयात जतन केलेल्या आहेत. यातील मातीच्या मूर्ती, जुने अडकित्ते, नाणी, तत्कालीन दिवे, वस्त्र, सातवाहनकालीन दागिने, हस्तीदंत, विविध शस्त्रे आदी विपुल संपदा बघायला मिळते. सातवाहनकालीन जकात व्यवस्थेचे दगडी रांजण, राजस्थानी शैलीतील कृष्णदयार्णव मठातील श्रीकृष्ण मूर्ती, सुबक कालभैरवाची मूर्ती, नृसिंह मूर्ती, शेषशयनी विष्णू मूर्ती, पेशवेकालीन गणपती, शनी गणपती मूर्ती बघण्यासाठी व दर्शनासाठी देशभरातून भाविक पैठणला आवर्जून येतात.
श्री संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी व जन्मभूमी राहिलेल्या पैठणमध्ये नाथवाड्यातील विजयी पांडुरंग तसेच नाथ समाधी मंदिर या ठिकाणी एकादशी व षष्ठीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येतात. पैठणचे घाट पर्यटकांचे खास आकर्षण. कृष्णकमल तीर्थ, मोक्ष घाट, नागघाट, सिद्धेश्वर घाट, पिंपळेश्वर घाटांवर धार्मिक विधी व पवित्र स्नानासाठी भाविक येतात. महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी यांचेही पैठणमध्ये अधिक काळ वास्तव्य राहिल्याने श्री चक्रधर स्वामी मठामध्ये देशभरातून भाविक येतात.
वाळूपासून बनलेल्या देशातील एकमेव असलेल्या मुनिसुव्रतनाथ या जैनधर्मीयांच्या मंदिरात शनि अमावास्या व एरवीही लाखो भक्त येतात. आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असलेले जायकवाडी धरण व नाथसागर जलाशय, देशविदेशातील हजारो पक्ष्यांचे वास्तव्य असलेले जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि ३१० एकरांवर वृंदावन, शालीमार गार्डनच्या धर्तीवर असलेले श्री संत ज्ञानेश्वर उद्यान या आधुनिक पर्यटनस्थळांवर पर्यटक आवर्जून येतात. येथील पैठणी तर विश्वविख्यात झालेली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ होण्याची क्षमता असलेले पैठण सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. पैठणला पायाभूत सुविधांचा विकासास प्राधिकरणातील लेझर शो, गोदावरी नदीतील बोटीने वाहतूक व संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास झाल्यास पैठण शहर हे पर्यटन नकाशावर नवीन झळाळी प्राप्त करेल.
- प्रा. संतोष गव्हाणे, इतिहास व पर्यटनप्रेमी
अजिंठा-वेरूळ या ठिकाणी येणारे देश-विदेशातील पर्यटक पैठणला भेट देतात. अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे व लवकरच काम सुरू होईल.
- संदीपान पाटील भुमरे, खासदार
गोदावरी नदीकाठावरील जिजाऊ घाट पूर्ण झाल्यास तेथे जॉगिंग पार्क, ॲम्पी थिएटर आदींमुळे हा घाट पर्यटनाचे आकर्षण ठरेल.
- राजेंद्र बोरकर पाटील, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
इथल्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयामध्ये दुसऱ्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हस्तलिखित, सातवाहनकालीन नाणे, शृंगारपेटीसह विविध कालखंडातील दगडी मूर्ती शिल्प, काचेवरील चित्र, दुसऱ्या शतकातील शाडूच्या मातीची स्त्रीशिल्प, शस्त्रात्रे, वाघनखे, पानपुडे बघता येतात.
- सुनील गायकवाड (नाईक), बाळासाहेब पाटील शासकीय वस्तू पुरातत्त्व विभाग, पैठण
श्री क्षेत्र पैठण | Paithan » पंढरीची वारी
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण (Paithan) हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या या शहराचे पूर्वीचे नाव “प्रतिष्ठान“असे होते आणि ही पूर्वी सातवाहन राजाची राजधानी होती तर ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानात मोडत होते. तसेच पैठण हे संस्कृत भाषेचे व्यासपीठ होते.
त्या काळापासून ते आत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा निर्णय मानला जातो. सोळाव्या शतकातील शांतीब्रह्म, संत पदाला पोहोचलेले, उच्च कोटी समाज सुधारक,संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या पैठण या गावी आणि जवळच असलेल्या शेवगाव तालुक्यातील मुंगी पैठण या गावी अनेक संत महापुरुष, महान पंडित,राजे महाराजे, आणि जहागीरदार होऊन गेले.
जसे की महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. निम्बार्क सांप्रदायाचे संस्थापक श्री निम्बार्क यांचे पैठण हे जन्मस्थान आहे. पैठण प्रसिद्ध प्राचीन दिगंबर जैन अतिशय क्षेत्र( चमत्काराचे तीर्थस्थान ) आहे. तसेच पैठणी साडीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे सख्खे बंधू विठोजीराजे भोसले हे मुंगी पैठण येथे राहत होते.एवढेच नाही तर संत भानुदास, संत गावबा, कृष्ण दयार्णव महाराज, शंकरराव चव्हाण ( महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री), भैय्यासाहेब महाराज गोसावी ( नाथ वंशज ) बाळासाहेब पाटील( इतिहास संशोधक), कवी अमृतराय महाराज, कमलाकरराव वातोळे ( पेशव्यांचे राहूकार आबाजी नाईक यांचे वंशज ) योगीराज महाराज गोसावी ( नाथ वंशज ) अशा महान व्यक्तींचे वास्तव्य या पैठण शहरात होत
संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या येथील समाधीमुळे हे गाव पुढे फारच नावारूपास आले. पैठण येथे राहूनच नाथांनी अपार विठ्ठल भक्ती केली. तसेच त्यांच्या 64 वर्षांच्या आयुष्यात अनेक अभंग, ग्रंथ, पुस्तके, कविता, भारुडे आणि गवळणी सुद्धा लिहिल्या. त्यांचे अपूर्ण लिखाण हे त्यांचे एकनिष्ठ शिष्य गावबा महाराज यांनी केले. त्यांच्या या लिखाणातून आणि कीर्तनातून समाजास त्यांनी अनेक वर्ष प्रबोधन केले. संत एकनाथ महाराजांनी पहिला ग्रंथ “चतुर्रर्श्लोकी भागवत “ हा त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूर्ण केला.
त्यानंतर त्यांच्या एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी अभंग गाथा, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर, शूकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंद लहरी अशा अनेक ग्रंथ आणि कादंबरिंचे लिखाण त्यांनी केले.त्याचे वाचन आजही अनेक भक्तगण करत असतात. एवढेच नव्हे तर संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ 75 हजार कवितांचे लेखन केलेले आहे.आपल्याला त्यांचे पंजोबा भानुदास महाराजांच्या साहित्यात देखील एकनाथ महाराजांसारखेच अभंगांपासून ते गवळणी पर्यंत सर्व प्रकारचे लिखाण पहावयास मिळते. तसेच त्यांच्यामुळेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे सांगितले जाते.
तसेच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणालाच सापडत नव्हती त्या समाधीचा शोध एकनाथ महाराजांनीच लावल्याचे सांगितले जाते. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा जन्म इ.स.1533 मध्ये पैठण येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी होते. परंतु आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथ महाराज लहान असताना त्यांचे आई-वडील अनंतात विलीन झाले. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळेच त्यांचे आई-वडील लवकरच मरण पावले अशी खंत नाथांच्या मनात कायम असायची आणि तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे.
आई-वडिलांनंतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनी म्हणजेच भानुदास महाराजांनी केले. पुढे त्यांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना गुरु मानले. गुरु जनार्दन स्वामींचा जन्म 1479 मध्ये चाळीसगाव येथे झाला होता. देवगिरीच्या किल्ल्याचे ते किल्लेदार होते तसेच महान दत्तभक्तही होते. त्यांचेही एकूण 33 अभंग आपणास पहावयास मिळतात नंतर त्यांनी पैठण जवळील वैजापूरच्या गिरीजाबाईशी लग्न केले. त्यांना गोदा आणि लीला नावाच्या दोन मुली आणि हरी पंडित नावाचा एक मुलगा होता. पुढे मुलगा हरीपंडित यांनी नाथांचे शिष्यत्व पत्करले. इ.स.सन 1599 मध्ये फाल्गुन वैद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यावर हरी पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पैठणला संत एकनाथ महाराज ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्याचे रूपांतर मंदिरात करण्यात आले.
त्यांच्या या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भावीक दर एकादशीला पायी वारी करतात तसेच फाल्गुन वैद्य षष्ठीला म्हणजेच नाथ षष्ठीला पैठणच्या यात्रेला महाराष्ट्रसह अनेक प्रांतातून भाविक दर्शनासाठी येतात. यावेळेस येथे सहा दिवसांसाठी मोठी यात्रा भरते. मंदिराच्या गाभाऱ्यात संत एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवलेला आहे.येथील या समाधी मंदिराला आत ले नाथ मंदिर म्हणतात.आणि गावाबाहेरील गोदावरी नदीच्या काठाला असलेल्या मंदिराला बाहेरचे नाथ मंदिर असे म्हणतात संत एकनाथ महाराजांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की, साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने कावडीने पाणी नाथांच्या घरी आणत.
तो पाण्याचा हौद अजूनही या वाड्यात आहे. तसेच गोदावरीच्या काठावर नागघाट नावाचे ठिकाण आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वाधवले होते. येथे एक रेड्याची मूर्तीही आहे. पैठण हे प्राचीन काळापासूनच अनेक संत महापुरुषांचे अध्यात्मिक ठिकाण असल्यामुळे येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासह अनेक देवांची मंदिरे आहेत. त्यामुळे येथे आलेले भाविक अगदी जवळच असलेल्या दत्त मंदिर, नाथ घाट, श्री ढोलेश्वर महादेव मंदिर, मोठी वारकरी संस्था असलेले गीता मंदिर, गाढेश्वर महादेव मंदिर, गंगेश्वर व गिरीजा माता मंदिर, जैन मंदिर, एकनाथ महाराज पालखी स्थळ, सातवाहन राजाने विजय मिळवल्यानंतर उभारलेला विजयस्तंभ ( तीर्थ खांब ), इंद्रेश्वर महादेव मंदिर, नवनाथ गुफा मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, आनंद भुवन (श्रीकृष्ण मंदिर ) आणि औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांना जातात.
तसेच काही भाविक पैठण आणि औरंगाबाद शहराजवळ असलेल्या प्रख्यात पर्यटन स्थळानाही भेट देतात.जसे की पैठण मध्येच असलेले पैठणी साडी केंद्र म्हणजे पैठणी साडी ( Paithani Sadi ) तयार करणारा कारखाना, तसेच प्राचीन प्रतिष्ठान नगरीतील भव्य दिव्य बांधकाम असलेले जुने वाडे,पैठण पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे आणि मातीचे धरण “ जायकवाडी धरण”, सातमाळा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच “सोनेरी महल “. पैठण पासून जवळच औरंगाबाद शहर आहे .
औरंगाबाद शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले प्रख्यात “डॉ.सलीम अली सरोवर “, दोन किलोमीटर अंतरावर असलेला “बीबी का मकबरा “ पाच किलोमीटर अंतरावर असलेले “सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय” , चार किलोमीटर अंतरावर असलेले “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय “ औरंगाबाद पासून 39 किलोमीटर अंतरावर असलेले 1667 मीटर उंचीचे थंड हवेचे ठिकाण” म्हैसमाळ “ साठ किलोमीटर अंतरावर असलेले प्रख्यात “ गौताळा अभयारण्य “ वाघुर नदीच्या आसपास असलेल्या आणि औरंगाबाद पासून 30 किलोमीटर असलेल्या अजंठा वेरूळच्या बौद्ध लेण्या, तसेच भारतातील सर्वात जुन्या पितळखोऱ्यातील लेण्या. भाविक अशा अनेक पर्यटन स्थळांनाही भेट देतात.

अशा या पैठण ठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातूनही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पैठण औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून 48 किलोमीटर आणि औरंगाबाद विमानतळापासून 58 किलोमीटर आहे तसेच रेल्वे स्टेशन पासून आणि विमानतळापासून पैठणला जाण्यासाठी अनेक वाहने उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद एसटी बस स्टँड पासून पैठणला जाण्यासाठी एसटी बसेस ही उपलब्ध आहेत एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमधून औरंगाबादला तसेच डायरेक्ट पैठणला जाण्यासाठीसुद्धा एसटी बसेस उपलब्ध असतात. तसेच पैठणला भक्तांना मुक्कामी राहण्यासाठी माहेश्वरी भक्त निवास आहे.
या ठिकाणी दोन बेडच्या स्वच्छ आणि प्रशस्त रूम्स आहेत. अगदी अल्प दरात भक्तांना राहण्यासाठी येथे सोय आहे. येथे भक्तांना सकाळी 8:00 ते 10:00 लास्ट ची सोय केली जाते, दुपारी 12:00 ते 2:00 वाजेपर्यंत दुपारचे जेवण मिळते तसेच रात्री 8:00 ते 10:00 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण मिळते येथे रूम बुक करण्यासाठी yatraDham.org या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाइन बुकिंग सुद्धा करू शकतो.त्याचप्रमाणे पैठणला बरेच प्रायव्हेट लॉज सुद्धा आहेत तेथेही भक्तांची चांगली सोय केली जाते. तसेच काही भक्त जवळच असलेल्या औरंगाबाद येथील चांगली व्यवस्था असलेल्या भक्त निवासात किंवा प्रायव्हेट लॉजवर मुक्कामी राहतात.
मुंगी पैठण – Mungi Paithan
हजारो
वर्षाचा ऐतिहासिक वारसा असणारे गाव मुंगी पैठण हे पैठण या ऐतिहासिक
शहरापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंगी या गावाचा फार प्राचीन
इतिहास आहे. पूर्वीच्या काळी या गावाला पैठण या शहरासारखेच महत्त्व होते.
शेवगाव तालुक्यात असणाऱ्या या गावात मुंगादेवी ही ग्रामदेवता आहे. येथे
दरवर्षी या देवीची यात्रा भरते. यात्रेला कोकणातूनही अनेक भाविक येतात.
प्राचीन काळी या गावाला पीपिलिका असे म्हणायचे. कारण या ठिकाणी दधीची ऋषी
यांचा मुलगा पिप्यलाद याने येथे पीपीलिकेश्वर महादेवाची स्थापना केली
होती. त्यानंतर या गावाला पीपीलिकेश्वर नाव पडले. यासंबंधीचा उल्लेख
काशीखंड कथासार या ग्रंथांमध्ये केलेला आढळून येतो. पैठण या शहरापासून हे
गाव जवळच असल्यामुळे या गावाचा उल्लेख मुंगी पैठण असा केला जातो.
हे मुंगी पैठण गाव अनेक संत, महापुरुष, आणि विद्वान यांचे जन्मगाव आहे. येथे 1863 मध्ये संशोधकांना अश्मयुगीन मानवाने बनवलेले अनेक दगडी हत्यारे सापडली. त्याचबरोबर जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रातही काही प्राचीन अवशेषही सापडले. त्यावरून हे गाव अश्मयुगातदेखील मानवी वस्तीचे केंद्र होते असे मानले जाते. आणि तसे अनेक पुरावे संशोधकांना मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या अश्मयुगीन लेखनाला सुरुवात याच गावात सापडलेल्या पुराव्यांनी झालेली आहे असे म्हणतात. निंबार्क समाजाचे प्रवर्तक श्री निंम्बार्क महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झालेला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे सख्खे बंधू विठोजीराजे भोसले यांच्याकडे काही काळ मुंगी गावाची जहागिरी होती.
तसेच पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे लढाई झाली होती. या लढाईत पराभूत झालेल्या निजामाने या गावातच तह स्वीकारला होता. तो तह मुंगी – शेवगाव तह म्हणून ओळखला जातो. तसेच मुंगी या गावात विणकर लोकांची फार मोठी वस्ती होती. हे विनकर लोक पैठणी साडी विणण्याचे काम करायचे. तसेच पैठणीला लागणारा कच्चा माल मुंगी गावातूनच पुरवला जायचा. अशा या ऐतिहासिक गावाला भेट देण्यासाठी सुद्धा पैठणला आलेले भाविक जातात.
ganpati siddhavarun
eknath maharaj mandir
jain murti paithan
sant dyaneshwar maharaj
sai ganpati murti
godavari snan
shalivahan raja
vijay pandhurang paithan
नेवासा :
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.
छत्रपती शिवरायांचे पाय लागले तो मुंगी पैठणचा राजे भोसलेंचा वाडा | Discover Maharashtra

छत्रपती शिवरायांचे पाय लागले तो मुंगी पैठणचा राजे भोसलेंचा वाडा
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजेंचे इंदापूरच्या युद्धात अकाली निधन झाल्यानंतर बाल शहाजीराजेंची सर्व जबाबदारी मालोजीराजेंचे बंधु विठोजीराजेंनी आपल्या अंगावर घेतली. आणि शहाजीराजेंना घडवून मोठे केले. शहाजी आणि जिजाऊ साहेबांच्यारूपाने छत्रपती शिवराय या विश्वाला लाभले. तर अशा या मूळ असणार्या विठोजी राजेंविषयीचा फार काही इतिहास जगाला माहीत नाही.
आपल्या थोर पुर्वजांचा वारसा जपत छञपती शिवरायांनी मात्र आपला धर्म पाळत सर्वांचा आदर केल्याचे दिसून येते. मालोजी राजेंना पुणे सुपे बारामती इत्यादी ठिकाणची जहागिरी होती. त्याचवेळी विठोजी राजेंना मुंगी. पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, भांबोरा, वावी या गावांची जहागीर होती.
मालोजी राजेंना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले झाली. तर विठोजी राजें व पत्नी रेखाऊ यांना एकूण 8 मुले झाली. संभाजी, खेळोजी, मालबा (मालोजी), मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी आणि काकजी (मकाजी). शके 1544 च्या फाल्गुन महिन्यात खंडगळेच्या हत्ती प्रकरणात लखोजी जाधवराव आणि शहाजी राजे भोसले यांच्यात मोठा संघर्ष घडून त्यात जाधवरावांकडून संभाजी राजे भोसले मारले गेले.
भोसले घराण्यात सुरुवातीच्या काळात आपापसात किती प्रेम होते पहा. मालोजी राजेंचे निधन झाले म्हणून त्यांचे बंधु विठोजीराजेनी आपल्या एका मुलाचे नाव मालोजी ठेवले. तर आता विठोजी राजेंचा मुलगा संभाजी ठार झाले तेव्हा शहाजी राजेंनी आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. पुढे कारकीर्द वाढत गेली तसे शहाजीराजे आदिलशाहीच्या दरबारी कर्नाटकात गेले.
विठोजी राजेंचे बहुतेक वारस हे मोगल किंवा आदिलशाहकडे चाकरीस राहिले. ईकडे विठोजीच्या मुलांची परिस्थितीही सधन असल्याचे त्यांच्यातील वाटणी पत्रावरून दिसून येते. त्यात 108 तोळे सोने आणि 2100 होनाचा उल्लेख आलेला आहे. प्रत्येकाला विविध गावची जहागीरही मिळाली होती. पैकी मुंगी ची जहागीरही नागोजीरावांना मिळाली. मुंगी हे गाव पैठणपासून 15- 16 किमी दूर आहे. तेथे ते आपली पत्नी राणूबाई सह मुक्कामाला असून हजारो एकर जमीन आणि गोदावरी काठावर भव्य स्वरुपातील गढी बांधून मुंगी गावाला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले होते. नागोजीराजे आणि राणूबाईना मुलबाळ झाले नाही. तेव्हा त्यांनी वळसे ( ता. अकोले जि. नगर ) येथील आपल्याच घराण्यातील एक वारस मालोजीला दत्तक घेऊन मुंगीला आणले. पुढे नागोजी राजेंचेही निधन झाले आणि राणूबाईही खूप थकल्यातरी नामस्मरण करत गोदावरीकाठी शांततेचे जीवन जगत होत्या.
ईकडे शहाजी राजे कर्नाटकात राहिले असलेतरी त्यांचे पुत्र छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा डाव मांडून तो पुढे नेत असता 10 ऑक्टोबर 1657 ला आदिलशाही सरदार अफजलखानाने त्यांच्यावर जीवघेणी स्वारी केली. या स्वारीचे वेगळे दुर्भाग्य म्हणजे विठोजी राजेंचे एक पुत्र मंबाजी भोसले हे खांनाकडून लढत होते. या स्वारीत शिवरायांना विजय प्राप्ती झाला. त्यात अफजलखानासह मंबाजी भोसले मारले गेले. राजेंच्या आयुष्यात असले अनेक प्रसंग आले तरी ते नेटाने पुढे चालत राहिले. त्यानंतर पन्हाळ्याचा वेढा, शाहीस्तेखान प्रकरण आटोपल्यावर औरंगजेबाचा सेनापति मिर्झाराजे जयसिंहाने पुरंदरचा तह करण्यास भाग पाडले. त्यातूनच छत्रपती शिवरायांना आग्र्याला जाणे भाग पडले. त्यानुसार फाल्गुन शुद्ध नवमी वार सोमवार दिनांक 5 मार्च 1666 ला शिवरायांनी राजगडावरून आग्र्याच्यादिशेने प्रस्थान केले.
रस्त्यात जात असताना राजे पैठणला गेले. तेव्हा मुंगीस आपल्या काकी राणूबाईसाहेब मुक्कामाला असल्याचे समजताच राजे तसेच तडक सडेस्वारनिशी मुंगीस काकीसाहेबांच्या दर्शनास गेले.
महाराजांनी काकीसाहेबांना आदरपूर्वक विनंती केली की, “ जिंतीस ( ता. करमाळा, जि. सोलापूर ) चलावे.” काकींना गंगातिरीच (गोदावरी काठी ) राहण्याची ईच्छ्या होती. तेव्हा महाराज उतरले की, “ आपले आशिर्वादेकरून संस्थान हातास आलियास कसबे मजकूराचे चौथाईची सनद करून पाठवितो.” याच मुक्कामात राजेंनी आंबेजोगाईच्या दासोपंताना एक आभार पत्र लिहिलेले आहे.
काळ पुढे सरकत गेला. राणूबाईच्या वारसाची चार मुख्य घरे शिल्लक राहिली. सुभाणजी, उमाजी, महादजी आणि संभाजी. त्यांची पुढे 16 घरे आणि शेकडो वंशज तयार झाले. गढी आणि जमीन तेवढीच. त्यामुळे त्याचे तुकडे पडले. माणसाला नदीची वाळू आणि मातीही पुरत नाही ही म्हण इथही लागू पडली. गढी भुईसपाट झाली. राजेंचे वारसदार अल्पभूधारक झाले. तरीपण गोदावरी काठ असल्याने काहींची परिस्थिति बरीय. बाकी दुरावस्थाच….
कधीकाळी बारा बलुतेदारांना वाटली तेवढी जमीन आता दात्यांच्या वारसाकडे नाही. “ राजेंचे वारसदार परिस्थितीमुळे भलेही छोटे झाले असतील परंतु त्यांच्या मनाचे मोठेपण कुण्या चोंग्या सोंग्याला येणार नाही ” परवा दिनांक 8 जूनला आम्ही मुंगीला गेलो तेव्हा बाहेरून राजे भोसलेंची चौकशी केली तर एकच उत्तर.. आता त्यांचे सर्वकाही संपलेले आहे.. वगैरे उत्तर.. भिकारचोट पुढारांच्या मागे पळणारांना राजेंचे मोठेपण काय कळणार ? राजेंचे पाय लागले त्या मातीत पाय ठेवला. उमाजीच्या बेटातील 70- 75 वयाचे श्रीमान प्रभाकर राजे भोसले आराम करत होते. घर लहान पण बाज तोच. त्यातही झोपाळा म्हटलं की सारंकाही आलाच. भरदुपारची वेळ आणि तशाही वेळी आपल्या धर्मपत्नीला आवाज देवून सांगत होते. “ दुरून आलेत जेवायला वाढ.” ही असते दानत… आणि हे असतात खरे वारस… जेवायला वेळ नव्हता. तेवढ्यातही त्यांनी त्यांच्याकडील एक रंगीत वंशावळ दाखवली. बाकी इतर काही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. तरीपण खूप खूप समाधान याचेच की, “ मुंगीत राजेंचा जिथं पदस्पर्श झाला, त्या प्रसंगाला आपल्या कल्पनेतून साकारता आले एव्हढेच.” जय शिवराय ssss …..
माहिती साभार – Dr. Satish Kadam
HISTORY-HINDU PERIOD
[The Hindu Period has been chiefly compiled from Talboys Wheelr's History of India, Vols. I., II. and III., and from the Journals of the Bombay Branch of the Royal Asiatic Society, especially the contributions of Doctors Wilson, Stevenson, and Bhau Daji.]
The early history of this part of India is of the usual mythical character, interwoven with tradition and fable, but more authentic materials are not entirely wanting, and the small remnants of prehistoric races still found in hill and jungle, preserve something of their ancient religion, while the wonderful cave-monuments are the silent memorials of great revolutions. The presence of cromlech, and other strange Druidical remains at Nagpur and in various parts of the Dakhan, can be traced to an early Skythian race from the northwest, whose immigrations were of a periodical character; but the bleak downs of the western portion of the table-land, seem to have been little suited to their nomadic habits, and the vestiges of their colonies are only found in open spaces in jungles near the larger rivers.
The result of modern research has clearly shown, that from a remote antiquity, successive waves of Vedic Aryans poured into India through the passes of the north-west; and prior even to their invasions, several Turanian races surmounted the Himalayas or entered by the valley of the Brahmaputra. The traditions of the Nagas, point to the existence of an ancient Kolarian empire in the Dakhan, having its capital at Nagpur, and it is probable that its rulers exercised an imperial sway over India. The Kolarians strongly opposed the immigrations of the Vedic Aryans, but by alternate wars and alliances, the latter drove them from the open country into the hills and jungles. [The Nagas, Bhils, Kols, &c. go by the general name of Kolarians, and belong to the Eastern Turanian races. See Mr. Brandreth's Languages of India.] The Dravidians, also of Turanian affinities, entered by the lower Indus, and were gradually forced into the Dakhan and Southern, India by the succeeding Aryans. They had some skill in music, and the Puranas state that when Havana held universal sway, he gave the great forest of Dandakarania, extending from the Narbada to Cape Comorin, to the musicians. Ferishita also mentions, that music and the science of music were originally introduced into Hindustan, from the Dravidian kingdom of Telingana.
The Kshattriyas were the first arrivals in the new tide of conquest, and according to the Vedas, their god Indra was lord paramount of India, and a succession of Indras followed him. The earliest versions of their great epics, the Maha Bharata and the Ramayana, were written before the fifth century preceding the Christian era; and the historical events which they celebrate, occurred in the fourteenth and thirteenth centuries before Christ. They relate respectively to a Lunar and a Solar dynasty; and the distinction between these two, seems to have originated in the antagonism between the Indo-Chinese and Indo-Aryan races, and subsequently between the Buddhist monk and the Brahman priest. The first epic refers to an early period of Vedic Aryan colonisation of the Panjab, and the second to a later period when the Aryans had advanced into the valleys of the Ganges and Jamna, but there is scarcely a place in India that does not now claim to be associated in some way with these remarkable events. [According to Mr. Fergusson, the first Aryans probably entered India about the commencement of the Kali Yug in B.C. 3101, and a thousand years later, the Aryans were established in -Ayodhya, where the events were transacted which are described in the Ramayana. After another eight hundred years or about B.C. 1200, the events were transacted which are described in the more ancient epic, the Maha Bharata. The former relates to a Solar family which was of tolerably pure Aryan blood; and the latter to a Lunar dynasty in which the Aryans had degenerated by intermixture with the inhabitants of the country.-See History of Eastern Architecture.] Thus when Yudisthra, the hero of the Maha Bharata, resolved to perform the royal sacrifice called " Rajasuya," he sent an expedition to each of the cardinal points, and the one to the south was commanded by Sahadeva, who subdued the inhabitants of the Sahyadri hills and of peninsular India. After the great gambling match was lost, the Pandavas went into exile, and among other places, they are said to have wandered into the Aurangabad district, and to have constructed the massive hill fortifications of Devgarh, &c. Then when the exile was over, and Yudisthra undertook to perform the great " Aswamheda" or horse sacrifice, his brother Arjuna was appointed to command the escort that guarded the horse, and the suzerainty of the Pandavas was proclaimed all over India.
Rama or Ramachandra, the hero of the Ramayana, is said to have entered the all-embracing forest of Dandakarania, where he visited the hermitages of the old Vedic Rishis, who are represented as Brahmans, but who must have flourished before the latter. Rama was a Kshattriya, but was made obedient to the Brahmans, and so the true hero of the Ramayana, appears to be connected with a Rama of the Dakhan and the Brahmanical revival of the 6th and 7th centuries of the present era. The Daityas of the Bharata, and the Rakshasas of the Ramayana, are probably the Buddhists, who are mixed up with races which opposed the southward progress of the Aryans, such as the Dasyas, Asuras, and Nagas. The portion of the Ramayana which refers to the Dakhan, is almost local in its interest, and deserves to be related. During Rama's stay at Panchavati or Nasik, a Rakshasa named Surpa-nakha fell in love with him, and in a jealous fit, attempted to devour Sita, when Lakshmana cut off her ears and nose. Surpa-nakha's brothers Khara and Dushana, attacked Rama, but were routed and slain; and the tidings of the defeat were carried to the third brother Havana, king of Lanka or Ceylon, which led to the abduction of Sita. Then followed Rama's invasion of Lanka for the rescue of Sita, and the destruction of the Rakshasas. The Sur-panath hill near Kanhar, in the Aurungabad district, is pointed out as having been the residence of Surpa-nakha: and the Ajanta and other ranges are remarkable for the excavations of the Buddhists, and for having been the strongholds of the Bhils and other predatory tribes. The name of Jambavat can also be traced to a place Jamkhed in the Ambad taluk, where a cave is worshipped as having been the residence of the Bear king; while the monkey god Hanuman is a common deity of the Dakhan and Southern India.
The origin of the Brahmans as a hereditary and exclusive caste of holy men is very obscure. The first cause or germ is the most mystic and ancient of their pantheon, and it has been ascertained, that the caste system of both Egypt and India originated with the worship of the phallus. The Brahmans claim to have been created out of the mouth of Brahma, and it is probable that they were formerly the priests of a phallic deity of the same name. They must have entered India some time after the Kshattriyas, as the Rishis or Vedic priests from whom they claim to have been descended, were not Brahmanical. [According to Brahmanical traditions, the Rishis were the children of Manu, the offspring of the Brahmadica, who were the sons of Brahma.] At first they were either known as sages and philosophers, or they officiated as sacrificers to the Kshattriyas; but in course of time, the early priests or Rishis were absorbed, and the Brahmans became identified with the conquering Aryans. With each new conquest, the Brahmans accommodated themselves as priests and sacrificers to the conquered as well; and by degrees, they established a sacerdotal sway over both Aryans and Turanians. [The Brahmans now worshipped the Trimurti, consisting of Brahma, Vishnu, and Siva. Brahma the creator, was their own peculiar deity; and Vishnu or Hari was a Vedic conception of the Aryans, which was more or less associated with the old worship of the Sun; while Siva or Mahadeva was a mystic deity of Turanian origin, associated with ideas of death and reproduction. The Greek legend of the conquest of India by Herakles and Dionysos, had thus a religious origin, and referred to the worship of the Sun as Vishnu or Hari, and to the worship of Siva or Mahadeva.-See Talboys Wheeler's Histories, Vols. I. and II.] The Kshattriyas and Brahmans exercised the usual superiority of conquerors over the subject Turanians, till a struggle for ascendancy commenced between them, which led to a practical extermination of the Kshattriyas, and the establishment of a dominant hierarchy by the Brahmans. This seems to have taken place in comparatively modern times, when Buddhism was expelled during the Brahmanical revival; and the Kshattriyas who identified themselves with it, were said to have been exterminated by Parasu Rama, but they were afterwards resuscitated by the aid of the Brahmans, on submission to Brahmanical ascendancy. It is not known when the Brahmans found their way into the Dakhan. In the time of Manu, the whole country south of the Vindhya mountains and the Narbada river was inhabited by people, among whom the great lawgiver advised that no Brahman should reside.
The system of Buddhism gained prominence during a lull in the Brahmanical world. The people grew weary of the teachings of the Brahmans, and of the doctrine, that the moral law of the universe could be set aside by a ritual of prayers and worship; nor did they sympathise with the austerities and asceticism of sages and philosophers. They were much perturbed by new doctrines, and several sects arose, the most remarkable of which were the Buddhists and the Jains. Gautama, of the family of the Sakyas, is generally called the founder of Buddhism; but it would appear that mendicant monks existed in India long before him, and he is believed to have been the last out of seven Buddhas. [Buddha was of the Sakya family of Kapilavastu, and he was born under a Naga dynasty. His reputation as a great apostle of humanity, rests upon his having been the teacher of the religion of the heart which springs from the affections, rather than upon his having been the founder of a monastic order. Unfortunately, the religion of the heart or " Dharma," known as the " Little Vehicle," was only preached to the multitude, while the " Great Vehicle " and " Vanaya" or monastic discipline, crushed out the affections themselves in the belief that all was vanity. This lifeless indifference was one of the causes which led to the decline of Buddhism, facilitated by the adaptation of the more popular points into the ritual of the Brahmans, by whom even-Buddha was introduced into the Brahmanical pantheon, as the ninth avatar of Vishnu.] According to the Singhalese era, Gautama Buddha died in B.C. 543 at the age of eighty, but there are considerable doubts about the correctness of this date, which might with probability be thrown back another hundred or a thousand years. He is said to have been descended from a long line of ancestors of the Surya-vansa or " children of the sun," who reigned as lords paramount of India from time immemorial. The Brahmans were mostly indifferent to the now teaching; hut the Jains were excited by its success, and exhibited some hostility.
No record has been kept of the revolution which was effected by the Jains in Western India. They were originally a sect of Buddhists, and their doctrine was not unlike that of Sakya Muni's. The Jains worship twenty-four Tirthankaras or saints who had effected their deliverance from the universe, and the names of the latter, commencing with Adinath and ending with Parasnath and Mahavira, are held in the profoundest veneration. The chief saint Parasnath, flourished in B.C. 200, and Mahavira the last of the Tirthankaras, was not anterior to A.D. 1100. [It would appear from the Kalpa Sutra, the most sacred book of the Jains, that there was a regular succession of teachers up to B.C. 569. The last of these. Yardhamana, styled Mahavira (the great hero), died in B.C. 569, and Parasnath preceded him by 250 years. The Jain account of Rishoba, who must have lived about 4,000 years ago, is " that he was the first king, the first mendicant, and the first Tirthankara; " and according to the same authority, Gautama Indrabhuti, destiued to become the famous Buddha, was the chief disciple of Vardhamana. The system of Kapila, who deduced everything from nature, is the essential element of Buddhism and Jainism. Both the Jains and the Buddhists ignore deity, but while the former observe caste and admit the authority of the Brahmans, the latter resist both.-Jour. R. A. Soc, Bom. Br., Vol. V.]
The Mahawanso has an account of three Buddhist convocations, the last of which was held at Pataliputra, in the thirteenth year of the reign of Asoka, the reputed grandson of Chandragupta. [The Mahawanso contains the Buddhist chronicles, and gives certain details of successive rajas of Maghada, from the death of Gautama in B.C. 543, to the end of the reign of Asoka in B.C. 288; and although the chronology is not quite correct, the period may be regarded as the dawn of Indian history. Mention is also made in the Maha Bharata, that Sahadeva of the Lunar dynasty was king of Maghada, and according to the Puranic genealogies, Gautama preached in the reign of Ajatu Satru, the thirty-fourth or thirty-fifth in succession from Sahadeva. The sixth king from Ajatu Satru was Nanda, and there were ten Nandas who reigned for about a hundred years, from the fourth century before Christ to the invasion of the Panjab by the Greeks under Alexander in B.C. 327. After Alexander's death, the Greeks were expelled by Chandragupta or Sandrakottus. The date of Chandragupta, as given by Greek writers, is the sheet-anchor of Indian chronology; and the notices of his life are of considerable interest, as he was known to Greek history, Hindu tradition, the Buddhist chronicles, and the Sanskrit drama. He visited the Greek camp on the Hyphasis in B.C. 325, and in B.C. 315 he usurped the throne of Maghada on the death of the last Nanda. Chandragupta was probably a convert to Buddhism, as he threw off the trammels of caste and married a Greek princess, the daughter of Seleukos Nikator, who succeeded to this part of the Grecian empire on the death of Alexander. Seleukos left an ambassador named Megasthenes at the court of Chandragupta, who noticed that there were a hundred and twenty kingdoms in India, and that in the Hindu system, the kingdom and village were permanent institutions, and that each was independent and self-contained. Asoka, the next known king, reigned either from B.C. 272 to B.C. 236, or from B.C. 260 to B.C. 224; but many persons consider that he and Chandragupta were one and the same individual. Asoka avowed himself a convert to Buddhism, and the rock and pillar edicts of the raja Priyadarsi or Asoka, written seven centuries before the Mahawanso, are the most authentic annals of Buddhist India. The edicts were promulgated in the third century before Christ, and the caves of Western India supply further materials, but it is evident that none of these latter can be older than the arrival of the first Buddhist missionaries in Maharashtra. The more remarkable excavations of Ajanta and Ellora, may be attributed to the second and first centuries preceding the Christian era, but the majority are of much later date.] A great deal of myth is introduced about Asoka, and he is said to have gone into exile into the Dakhan, and even to Ceylon like another Rama. At the conclusion of the third convocation in B.C. 246, several Sthaviras or Buddhist missionaries were despatched to various countries, for the purpose of establishing the religion of Buddha, and among them, Mahadarmaraxita was sent to Maharashtra. This is the first time that Maharashtra is mentioned in Indian history, and it is probable that it only comprehended the narrow seat to the north of the Godavari, which obtained its name and received a distinctive language, from the existence of a Mahratta dynasty at some period not recorded in history. [Grant Duff places the ancient Maharashtra north of the Ajanta hills, somewhere about Kandesh; but according to Ferishta, Maharashtra was to the south of these hills, and included Paitan, Daulatabad, Bhir, and Junar.]
In the second century before Christ, the Greek sovereigns of Bactria were driven further south by the Skythians; and the great leading facts of this and the few centuries following, relate to the Andhra [In the earlier inscriptions, the name used is Andhrabhritya, which means the servant of Andhra. This is supposed to show, that before the Andhra-bhrityas became independent, they were subject to the sovereigns of Patali-putra.-Trans. Sec. Inter. Cong.] emperors, the Indo-Parthian kingdom, and the Valabhi sovereigns.
According to the Katha Sarit Sagara, a king named Satavahana ruled at Paithana about B.C. 325, when Nanda reigned at Pataliputra. An inscription at Nanaghat, which is about a hundred and fifty years later than the edicts of Asoka, notices a Kumaro Satavahano, who evidently ruled in the neighbourhood of Paithana. Ptolemy also mentions Plithana and Tagara among the several marts which were frequented by the maritime Greeks. [The expedition of Alexander made the Greeks acquainted with India, and they soon found their way by sea into that country. In these early times, the Dakhan was under great vassals (Mahamandalesvars), and hereditary landholders (Poligars), under the control of the overlords of Tagara and Plithans. -See Kandesh Gazetteer.
Ptolemy Philadelphus king of Egypt, sent Dionysius into the southern parts of India about B.C. 268, and it was then that Tagara became known to the Greeks. It is also mentioned by Arrian, that on the arrival of the Greeks in the Dakhan, Tagara was the metropolis of a large district called Ariaca, and that Tagara and Plithana were the principal marts in Dachanabades. All kinds of merchandise throughout the Dakhan were brought to Tagara, and from thence conveyed on carts to Barygaza or Baroch. Ptolemy agrees with Arrian in placing Tagara and Plithana to the north of the Godavari, but the position of Tagara has not yet been identified, although attempts have been made to fix it near Daulatabad (Devgarh), Bhir, Junagar, and Gulbarga. Plithana is evidently Paitan on the Godavari, as it is about twenty days' journey or 230 miles south of Broach; and if Ptolemy's latitude and longitude be correct, Tagara should be 87 miles north-east of Paitan, or near Maiker in Berar. The more general statements of Arrian and Ptolemy however, place Tagara ten days' journey east of Paitan, which would bring it near Nander on the Godavari. The remark in the Periplus that coarse dangaris, and very much fine linen, and muslins of sorts, and mallow-coloured stuffs, and other merchandise were taken to Tagara from " parts along the coast," would seem to show that Tagara was in connection with the Bay of Bengal; and it is known that even as early as the time of Sakya Muni, Kalinga on the east coast was noted for the manufacture of fine muslins.] Tagara was under a Rajput prince, one of whose titles was "chief of chiefs; "and the city was known to Egyptian merchants two centuries before Christ. Plithana or Paitan on the Godavari was a place of some importance as early as the 3rd century before Christ. It was the capital of Salivahana, who is said to have conquered the surrounding country, and to have introduced the Saka era (A.D. 78) south of the Narbada. There are various traditions regarding Salivahana, and of his having defeated Vikramaditya, the reputed founder of the Samvat era (B.C. 56). The latter is said to have conquered Panjab and Kabul, and his era dates from a victory over the Skythians in the Panjab. According to Tod's Annals of Rajasthan, Salivahana belonged to the Rajput Takshak family, and his era in Southern India succeeded that of the Tuar family to which Vikramaditya belonged. It is further stated, that Salivahana annexed Assir from a Rajput prince who was descended from Sissoday of the Solar race; and that his territory included the whole or the greater portion of the Dakhan, and part of Malwa. It is now generally accepted that Kanishka, the great Buddhist king of the north, was the real founder of the Saka era; and that it was apparently introduced into the Dakhan during the reign of Satakarni II of the Andhrabhritya dynasty, who was the chief of the Satavahana or Salivahana family. [The Yuechi and other cognate Turanian tribes, overthrew the Bactrian kingdom about B.C. 120, and established themselves firmly on the Indus. Their great king Kanishka held the fourth Buddhist convocation in the north-west of India, and a new doctrine known as the Mahayana was introduced by Nagarjuna. Nahapana was probably the viceroy of Kanishka.-See Fergusson, Jeur. R. As. Soc. Bo., Vol. VII.] Satakarni II. reigned from A.D. 61 to A.D. 120, and the era was established from the 14th March A.D. 78, which was the installation day of the Saka king upon the throne. The Vikramaditya era also was probably introduced by the Buddhists, and it nearly corresponds with the victory gained by Mithridates over the Roman general Crassus in B.C. 53. It is further thought that Kadphises as Sipraka or Sikrapa was the founder of the Andhrabhritya dynasty, and it is well known that the Andhrabhrityas possessed considerable power during the first and second centuries. [Shiprak, Sinduk, or Shisduk lived before the close of the 3rd century B.C. Krishna, the second of the Andhrabhrityas, is mentioned in one of the Nasik caves, and may be placed in the 2nd century B.C. The capital of the Andhrabhrityas was Dhanakat, but they were ruling at Nasik when Nahapan of the Sha or Kshaharat dinasty drove them from there, and also from Paitan.- Kandesh Gazetteer.
According to different Puranas, the dynasty known by the various names of Andhra, Satavahana, Vrispala, Andhrajatiya, and Andhrabhritya ruled for 453�, 456 or 460 years. Krishna, the second Andhra king, was probably contemporary with the earlier Sungas. It appears certain that about B.C. 150, the Andhras held the Nasik district; but at a later date,-in the time of Nahapana and Usabhadata,-both the Nasik district and the country to the south were in possession of the Kshaharatas. Soon after this again,-probably in the first half of the second century after Christ,-Satakarni Gautamiputra recovered the whole. The history of the Andhra dynasty, and its relation to the Kshatrapas, and of the latter to Usabhadata and Nahapana, await further elucidation. See Burgess, Arch. Surv. Reports of W. India, Vols. III. and IV.
The names of the Andhra kings are as follows:-
Sipraka, Sinduka, or Sisuka. | Aristakarni, Ganrakrishna, Gorakabauavasri |
Krishnaraja his brother. | Hala or Haleya. |
Satakarni I. | Patala or Mandalaka. |
Purnotsanga or Pauramasa. | Pravilasena or Purindrasena. |
Skandasthambi or Srivasvami- | Sundara Satakarni. |
Satakarni II. | Chakora Satakarni or Rajadasvati. |
Lambodara. | Sivasvati. |
Ivilaka. | Gautamiputra Satakarni. |
Sangha or Meghasvti. | Pulimat, Pulomavit, Pudumayi Satakarni. |
Satakarni III. or Svati. | Sivasri Satakarni or Avi |
Skandasvati. | Sivaskanda Satakarni or Skandasvati. |
Mrigendra or Mabendra Satakarni. | Yajnasri or Yajna Satakarni Gautamiputra. |
Kuntala or Svatikarna. | Vijaya. |
Svatikarna. | Chandrasti Satakarni, Vadasri. |
Patumat, Patumavi Pulomavi. | Pulomarchis or Pulomavi. |
] -Pliny flourished from A.D. 23 to 72, and his knowledge of the Andrae must have been derived, either from the Alexandrian writings of his own times, or from the writings of Megasthenes and Dionysius. He states that the Andhra king possessed thirty walled towns, and could bring into the field 100,000 foot, 10,000 horse, and 1000 elephants; but the Andhras could not have ruled over Maghada, as the Prasii of Palibothra had six times their strength. Later on, Ptolemy in his writings mentions Padumavi, the Andrae king who succeeded Satakarni. He also notices Cashtana the Parthian sovereign of Gujarat, so that Padumavi and Cashtana were contemporaries of Ptolemy, and flourished between A.D. 130 and 150. In the history of the Arsacidse, Pacorus is said to have ascended the throne in A.D. 77; and soon afterwards Kshaharata Nahapana entered upon his conquest of India, and became independent of Pacorus. It is recorded at Nasik, that Ushavadata, the son-in-law of Kshaharata Nahapana, conducted an expedition through the Dakhan to Malabar, which shows that the princes of Paitan could not have been very powerful. The Satavahana dynasty was at this time probably displaced or destroyed, and Padumavi the Andhra king, advanced from the south-east, and occupied Paitan. [Native traditions point to some ancient city near Nander and Dharmapuri on the Godavari, as the first capital of the country; and it is well known that in the middle of the first century, raja Salivahana removed the seat of his government from Tagara to Paitan. Probably, this was a matter of convenience, to enable the king to be better able to stem the tide of invasion from the north, by the Parthian satraps of Gujarat. Several leaden coins of Gautamiputra and of other princes of the Satakarni dynasty of Andbras, were found by Colonel McKenzie when excavating the ruins of Dharanikotta or Amravatti, near the mouth of the Kistna. This Gautamiputra probably founded the stupa at Amravatti about A.D. 90, and it was finished by Yadra Sri Satakarni, who ascended the throne in A.D. 142. The recent discovery of a Buddhist stupa at Batavole, on the frontier of H. H. the Nizam's dominions towards Bazwara, will doubtless throw more light on the history of this early period.] His son Gautamiputra, who flourished about the end of the second century, made still further conquests towards the north, where he defeated the Sakas, Yavanas, and Pahlavas. He is called in inscriptions, the destroyer of the family of Kshaharata, and the establisher of the glory of the family of Satavahana, but he was afterwards successfully opposed by Rudra Dama, the grandson of Cashtana, who twice defeated Gautamiputra or Satakarni, the lord of Dakshinapatha. One or two other names appear after Gautamipura, such as Vasishtiputra and Madhariputra or Sirisena, but the Andhra dynasty ends within fifty years of Padumavi's death, brought about, no doubt, by the rising power of the Sah kings. [The foregoing was Dr. Bhan Daji's view in Jour. R. As. Soc, Bom. Br., Vol. VIII. According to Mr. Burgess, the Sah kings seem to have ruled in the Dakhan for only 40 or 50 years, and the Satavahana dynasty was restored by Gautamiputra about A.D. 124 to 135. Padumavi, the contemporary of Ptolemy, is here said to have been the successor of Gautami-putra. In the Girnar inscription, Rudra Dama states that although he twice conquered Satakarni Gautamiputra, yet from their near relation he did not destroy him, so that Rudra Dama probably did not conquer any part of the Dakhan.-Ind. Ant., Vol. XII.
According to the Vishnu Purana, the Andhrabhrityas continued to rule for 97 years after the close of Gautamiputra's reign.
Vasishtiputra was another name for Padumavi, but Madhariputra or Sirisena probably succeeded Padumavi. -Jour. It. As. Soc.,Bom. Br., Vol. XII.
Very little is known of the kings of the Dakhan from the time of Gautamiputra to the arrival of the Chainkyas, but there was much confusion and overturning of petty dynasties. Nandgaon, for example, was the seat of a sovereignty in an early century of our era; and there can be no doubt that there were other small kingdoms of the same kind. They had but a short lease of existence, as the country was overrun by several warlike hordes, such as the Haihayas, Sakas, Yavanas, Kambojas, Paradas, and Pahlavas. The Haihayas and Pahlavas were of Skythian origin; while the Sakas were a Hamitic-Skythian race that furnished the types of the Buddhist images. The Yavanas were probably the Ionians or Asiatic Greeks, connected with the Graeco-Bactrian or Parthian kingdom of Anagundi, and they appeared in Central and Southern India as the heralds of the Buddhist religion. Subsequently, when Buddhism merged into Jainism, the Yavanas became equally identified with the Jain faith.]
The Parthian or Sah kings of Gujarat, made Nasik their local seat of government, and probably succeeded to the dominions of the Satakarni dynasty, as several of their coins were found about the hills of Indurti, 25 miles west of Nalgonda, in H. H. the Nizam's dominions. There were eighteen kings after Kudra Dama, and it would appear that these sovereigns exercised a kind of suzerainty till A.D. 240 or 250, when they were overcome by the Guptas; but some think that this dynasty continued to last, at least in Gujarat, till Saka 240 or 250 (A.D. 318 or 328). [Mr. Newton observes that the inscriptions at Nasik, Karli, and Junar, establish that Kshaharata or Nahapana was a foreigner, probably a Parthian, and that his daughter had a Hindu name, and was married to a Hindu,- Ushavadata. Further, that his daughter, son-in-law, and minister were Buddhists.-Jour. R. As. Soc, Bom. Br., Vol. IX.
The Parthian or Sah dynasty was as follows:-Kshaharata Nahapana; Ushavadata; Swami (?) Tika; Swami Cashtana (contemporary of Ptolemy Claudius) (A.D. 130 to 150?); Gaya Dama; Rudra Dama A.D. 170 ? Rudra Sinha A.D. 190 ? Rudra Sah; Yasa Dama; Damajata Shri; Visva Sinha; Atri Dama; Visva Sah; Rudra Sinha; A'sa Dama; Swami Rudra Sah; Swami Rudra Sab. It appears that in the confusion that took place in the beginning of the 4th century, the sacred tooth-relic of Buddha was removed from Dhara-nikotta or Amravatti about A.D. 313, and was conveyed to Ceylon, lest it should fall into the hands of barbarians] The Gupta dynasty contains only three names, Kumara Gupta, Skanda Gupta, and Bhani Gupta, and in A.D. 319 was followed by the Valabhis of the Solar line.
The Valabhis trace their origin to Rama, one of whose descendants was Kanak Sena, the ancestor of the lianas of Udipur, who emigrated to Dvarika in the second century, and wrested dominion from the Prumaras of the Lunar line. Four generations later, Vijaya Sena founded Vijayapura, Vidarbha and Valabhi. Vidarbha was the ancient Berar, which extended from Kandesh to Bidar. The last Valabhi prince was Siladitya, who gave audience to the Chinese traveller Hiouen Thsang, and who must have reigned more than 300 years after the Valabhi era, or some time after A. D. 619. [The Valabhi line (A.D. 311 to 619?) was as follows:-Bhattarka; Dhara Sena I.; Drona Sinba; Dhruva Sinba; Dhara Pattah; Guba Sena; Dhara Sena II.; Siladitya; Isvara Graha; Dhara Sena III.; Dhruva Sena; Valaditya; Dhara'Sena IV.; Dhruva Sena Dharmaditya.
According to another account, Valabhadra was invaded in A.D. 524 by the Mlechas, supposed by some to have been Skythic or Bactro-Indians, and by others Sassanians. All fell, except a daughter of Praimara, whose son Goha became king of the Bhils, and from him was descended Bappa, the next hero of the Valabhi line. The dynasty was soon afterwards transferred to Mewar, and was succeeded by a branch of the great Chalukyas, who made Anhalwara Patan their capital.]
According to the inscriptions at Ajanta, there was a Vakataka dynasty contempo- rary with the Valabhi, and was either feudatory to the latter, or was allied to it. With the help of the genealogy on the Sconi copperplates, the following pedigree of the Vakatakas, is made out, in Vol. IV., Arch. Surv. Report of W. India:-Vindyasakti, probably A.D. 285-310: Pravarasena (son ?) 310-345; Gautamiputra, son, married the daughter of the great king Bhavanaga of Bharasiva; Rudrasena I., son, 345-355; Prithivisena, son, married Prabhavati-gupta, daughter of the great king of kings Devagupta, and conquered Kuntala, 355-400; Rudrasena II., son, 400-410; Pravarasena II., son, 410-440; , son, 440-470; Devasena, son, 470-500; Harisena, son, 500-520, conquered Kuntala, Avanti (Ujain), Kalinga, Kosala (Cbatisgarh?), Trikuta (Kanheri?), Lata (Broach), and Andhra. [The Vishnu and other Puranas, mention a Vindyasakti who was the chief of the Kailakila Yavanas; and the late Dr. Bhau Daji thought it was not too much to suppose, that the Kailakila Yavanas came from Ghul Ghuleh, near the Bamian in Afghanistan, and that they brought with them the art of adorning caves with sculpture and painting.-See Jour. R. As. Soc, Bom. Br., Vol. VII.] Another inscription gives the names of the following five chiefs of Ashmaka:-Dhritarashtra, Hari Samba, Kshitipala Sauri Samba, Upendra Gupta, and Skacha. They seem to have been local chiefs of the sixth century of whom nothing is known. The names of Devaraja and his father Bhaviraja, the ministers of the Ashmaka chief, are also mentioned.
The Ahirs or Abhiras came from the north-west along with the Skythian hordes, and according to the Puranas, their country extended from Devgarh to the Tapti. They still form an important element in the population of these parts, and a tradition states, that the capital of the Gauli or cowherd kings was formerly at Anjanniri, about 5 miles from Trimbakeswar. An inscription has also been found, which shows that an Ahir king named Virsen governed Nasik in A.D. 419; and it is probable that the Abhira sovereigns were connected with the Gauli rajas. Their independence is said to have lasted only 67 years, but the chiefs were of considerable importance, as they long held the leading hill-forts.
The Chalukyas were a Skythian race, and derived their origin from one of the four classes of Buddhist followers called Chailaka. [The Chalukyas claimed their descent from Manu through Hariti, and were known as Agniknlas, from their devotion to the worship of fire. They were included in the thirty-six races of the Kshattrlyas, and belonged to the Lunar family. According to tradition, they had fifty-nine predecessors on the throne of Ayodhya before they arrived in Southern India. Their signet of Varaha or Boar, which was used by the Yalabhis as well, was adopted after their conversion to Brahmanism; and their insignia also included a peacock-fan, an elephant-goad, a golden sceptre, and other symbols. On entering the Dakhan, they overcame the Kalachuryas, the Bathas, and the Kadambas. The first were the hereditary chiefs of Kalliani near Gulbarga; and the Bathas seem to have been the Yadus, a branch of the Ghalnkyas, who preceded the latter in Western India. The Kadambas were reduced to feudatories by Kirtti "Varmma, who died in A.D. 566; but a subsequent Kadamba king, Maura Varmma, rescued the wife of raja Valabha of Kalliani, and received a large accession of territory. The Pahlavas were another powerful race, and flourished in the Dakban anterior to the Chalukyas. Their dynasty is said to have been founded in A.D. 200 by Mukunt Pahlava, a descendant of Salivahana. The Pahlavas were at first successful against the Chalukyas, and Jaya Simha, the Chalukya king, was defeated and slain, but they were reduced by the succeeding prince.
"Kuntala Desa stretched from the Narbada on the north to somewhere about the Tungabhadra on the south, having the Arabian Sea for its border on the west, while it reached to the Godavari river and the Eastern Ghats on the N.B. and S.E. The territories of the Chalukyas must have marched with those of Gujarat on the N. W.; Malwa on the N.; Andhra and Kalinga on the E.; and Chola, Ballala, and Chera on the S. In the southern portion of this area the Kanarese language is spoken, and the country is designated in later inscriptions, also as Karnataka Desa.-Arch. Surv. W. India, Vol. III.] They ruled over Kuntala Desa and Karnata Desa, and their capital was Kalliani. The former included Maharashtra, and the latter comprised much of the Chola and Ballala kingdoms. The power of the Chalukyas was at its highest in the sixth century, from the reign of Pulakesi to the reign of Vikramaditya. Pulakesi is said to have conquered Ghera, Chola, and Pandya, and to have performed the Aswamheda or horse sacrifice, by which he proclaimed his suzerainty from the Ganges (Go-davari?) to Ceylon. Perhaps this refers to Satyasraja the second Pulakesi, who is known to have defeated Harsha Vardhana, the king of Kanoj, and the most powerful monarch in Northern India. [Hiouen Thsang left China in A. D. 629, and after travelling through India, returned in A. D. 645. He noticed that there were seventy kingdoms in India Proper, and that Siladitya, who ruled over Maghada, was at the head of eighteen feudatory princes. This sovereign was a type of the Buddhist emperor Asoka, and was known as Harsha Yardhana before he assumed the name of Siladitya. His son-in-law Dhrava-patu, king of Yalabhi and lord of all the Western Dakhan, acknowledged his suzerainty; and when Siladitya celebrated " the field of happiness" at Prayaga, Dhrava-patu was foremost among the tributary kings. Hiouen Thsang passed through the Western Dakhan and entered Maharashtra, when he observed that the people bore a close resemblance to the Rajputs and were considered unconquerable. The king, Pulakesi, who ruled over them, was a true Kshattriya, and repeatedly defeated Vishnu Vardhana or Siladitya of Maghada. Mr. Talboys Wheeler thinks " it is difficult to avoid the conclusion, that the struggle between Delhi and Kanoj, which weakened the Hindus and invited the invasion of the Mahomedans, was a relic of the old antagonism between the Rajputs of Maharashtra and Siladitya of Kanoj and Maghada."] The Ajanta caves contain several figures of foreigners, such as Persians and Bactrians, but the most interesting group is in a painting in cave I., which represents the Iranian embassy from Koshru II. king of Persia (A.D. 591-628), to Pulakesi II. (A.D. 609-640) of Maharashtra. Tabari, the Arab historian, gives clear evidence of the close relation between the two kings. The date would be about A.D. 625. [See Kandesh Gazetteer. Pulakesi's capital was probably Badami in Kaladgi, and Ajanta lay in his territory. The drinking scones are copies of a picture by native artists of the same Koshru 11. and his famous queen Shirin.-Fergusson, Jour. R. As. Soc, Vol. XI.
Cave XVII. at Ajanta has a painting which represents the embassy of the Persian king Baharam Gaur (A.D. 420-440) to the king of Malwa.
The researches connected with the numismatic art of ancient India, have brought to light various interesting facts. It is observed for example, that the earliest coins have the designs punched into the metal, and that these were followed by certain small coins bearing Buddhist figures stuck on the metal with a die. After them came the beautiful Kshatrapa or Sah coins; then the Gupta and Gadhia coins; and lastly the Mahomedan coins. It has long been understood, that those ancient Hindu coins which have Greek characters stamped on them, derived their superiority from Greek artists; and that the conquests made by the Greek sovereigns of Bactria, the Seleucidaes, the Parthians, and the Sassanian kings of Persia, introduced into Indo-Skythia a variety of coins, distinguished by mythological devices and bilingual inscriptions. A coin found at Girnar with a Sah inscription, shows that the reigning sovereign was Rudra Dama, and that his son's coin was struck at a time, when Greek art had but lately essayed the numismatic application of the cave character. The coins of the succeeding sovereigns, Vijaya Sah, Damajata Shri, and the great Rudra Sah, which might be taken as the perfect type of the angular adaptation, belonged to a later period, when they were still able to command the services of Bactrian and Greek artists, or of others little inferior. The application of Greek art was at its best on the coins of the Sah kings, but there is a marked deterioration in the coins of the succeeding Gupta dynasty. In regard to the Sassanian character of the Gadhia coins, there is evidence both from traditions and from the paintings in the Ajanta and Bagh caves, that the Sassanians were well known in India in the 5th and 6th centuries, and their currency appears to have been adapted for the Gadhia coins.-Jour. R. As. Soc, Bom. Br., Vol. XII.
Several coins were ploughed up at Nandgaon, some of which belonged to the Sah kings. Others were found in the Nasik district, and an inscription on one of them furnishes the name of Manasa, probably a king of the Dakhan towards the end of the 4th century. Two or three gold Huns were obtained near Kanhar. A few ancient Roman coins have also been found in parts of Maharashtra.] In the 7th century the Chalukyas separated into two branches, of which the Western Chalukyas ruled from Kalliani. [The following is a list of the Ohalukya princes that ruled at Kalliani previous to their overthrow in A.D. 783:-Jaya Simha; Baddha Varmma; Vijaya raja 472; Pulakesi Valabha 490; Kirtti Varmma Valabha 566; Sat-yasraja Pulakesi; Vikramaditya; Vinayaditya; Vijayaditya 705; Vikrama - ditya II.; Vishnu Vardhan 733; Jaya Simha. The fugitive prince Jaya Simha repaired to the court of Bhoja raja, the last of the Chauras in Raj-, putana. His son Mulraj married Bhoja's daughter, and succeeded Bhoja in A.D. 931. Mulraj ruled Anhalwara for 58 years, and his descendants reigned till A.D. 1145.] The successors of Pulakesi, Vikramaditya and Vinayaditya fought successfully against the Pahlavas; but the line soon afterwards began to decline, and towards the end of the following century, the power of the Chalukyas was curtailed if not annihilated, at least for a time, by the Rathors or Yadus.
An old grant of the Yadus or Rathors begins with Danti Durga, whose mother was descended from the Chalukyas. Their country was called Rashtra Kuta, and the capital was at first near Nasik, but was afterwards transferred to Mandya Kheta, supposed by some to be Malkhaid, in H. H. the Nizam's dominions. Danti Durga was the predecessor of Krishna raj'a, who wrested the sovereign power from the Chalukyas in A.D. 783. [According to a Telugu manuscript, the Pratapa Charitra, giving the history of Warangal, in the same year that Krishna raja overthrew the Chalukyas (A.D. 783), a new king Yaruku Deva, ascended the throne at Hanamkonda. He was a minor for nine years, and after attaining his majority, went to Devgarh and married the daughter of the king of that place.] After the Rathor kings had ruled for nearly two centuries, the whole of peninsular India was convulsed by the invasions of the Cholas, who set out on a conquering expedition to the north. The leader, Rajendra Chola, experienced a check in A.D. 917; but his son Deva raja Chola was more successful, and remained for several years in the newly conquered districts, returning to his kingdom in A.D. 986. In the confusion that followed the southern irruption, the Rathors were overthrown; and the Chalukyas under Tailapa recovered their ascendancy in A.D. 973. [The following is a list of the Rathor princes:-Danti Durga 753; Krishna raja 783; Govind raja; Niru Pama; Jagat Tung; Amogha Varsha; Akala Varsha; Jagat Rudra; Indra Nripa; Govind raja 933; Baddiga: Krishna raja; Khotika; Kakala 973.]
The Chalukyas regained their power, but their tenure was not a peaceful one, and for the next hundred years, they were constantly engaged in wars with the Cholas, their most formidable opponents in the south. [Of the seven Chalukya princes who reigned from A.D. 1018 to 1182, Ahavamalla or Somesvara (1040-1069), and his con Tribhuvanamalla or Vikramaditya (1076-1127), are known from their extensive conquests. The former more than once vanquished the Chola king; and Vikramaditya, after having dethroned his brother by the assistance of the Kadambas, rewarded the latter with a great part of their ancestral dominions. Vikramaditya overthrew the power of the Cholas, the Pahlavas, the lords of Gunga Kunda, and the Hoysalas. He set aside the Saka era, and established the Chalukya Vikrama era, which continued to be in use as long as the dynasty lasted. At the Swayamvara of Chandala Devi, daughter of the Silahara prince of Karahata, Vikramaditya, who was probably the most powerful present, was chosen from the Urge gathering of princes that had assembled on the occasion from all parts of India. In A.D. 1088 he undertook an expedition to the north of the Narbada; and daring his absence, Bitta Deva or Vishnu Vardhana of the Hoysala Ballalas, invaded his kingdom, but was driven back by his general Achyngi Devi.
An inscription at the great temple of Hanamkonda dated A.D. 1162, commenoes with an allusion to " Tribhuvanamalla, a chief among kings and the frontal ornament of the Kakatyas." His son Potraju or Proli raja " bound Srimat Tailapadeva, the head ornament of the Chalukyas." "He also bound down Govinda raja, and gave his kingdom to king Udaya," "He attacked Gudhaha, the shameless lord of the great Mantra-kuta city," and " resisted Jagadeva, who, accompanied by many Mandalika lords, laid siege nnsuccessfully to Hanamkonds." The inscription farther alludes to Proli raja's son and successor, Rudra Deva, who defeated Doma, Srimat Meligadeva ruler of Sripalavasa, Chodadaya raja, Tailapa, and the latter's son Bhima.] Vikramaditya usurped the throne in A.D. 1076, and during his reign, the power of the Chalukyas was at its highest; but his successors were weak, and the Ballala king Vishnu Vardhana was more successful in his invasions. About this time, the Pramaras of Malwa played an important part in the history of India. They were a branch of the Chalukyas, and prince Kumarapala, who ruled in A.D. 1174, is sometimes styled a Chalukya. The Narbada was no limit to their power, and Ram Pramar held his court in Telingana. The Chalukya kingdom was much disturbed, and Paitan on the Godavari is mentioned among the cities that were conquered by the Pramaras. Some alliances we're formed by the Chalukyas, probably to strengthen their power, and Permma's daughter Mailala Devi was given in marriage to Vijceyarda, the ruling Kadamba prince, but this did not prevent the threatened revolution. In Tailapa's reign, a noble of the Kalachurya race named Bijjala rebelled, and established himself at Kalliani from 1157 to 1182. Soon afterwards the Chalukya kingdom was divided between the Hoysala Ballalas and the Yadavas of Devgarh. [The Hoysala Ballalas established their empire in the middle of the 11th century, on the ruins of the Cheras of Southern India. Their country was called Dwara Samudra.
The following is a list of the Chalukya kings after their ascendancy was re-established in A.D. 973:-Tailapa 973-97; Satyasraya 997-1008; Vikramaditya 1008-18; Jaya Simha 1018-40; Somesvara 1040 69; Somesvara 1069-76; Vikramaditya 1076-1127; Somesvara 1127 38; Permma 1138-40; Tailapa 1150-82; Somesvara 1182-89.]
Nothing definite is known regarding the origin of Ballam, the founder of the Yadava line. It is conjectured that he was either a member of the Hoysala Ballala family, or that he was some petty local chief who suddenly rose into power and assumed the Ballala titles. [Tradition identifies the Yadavas with the Gauli or cowherd kings, and the standard of the Yadavas bore the device of a golden Garudla.] After having defeated the Kalachuryas, Ballam had several struggles with the Hoysala Ballalas for the Chalukya kingdom. In A.D. 1188, he established the Yadava dynasty at Devgarh, which lasted until the appearance of the Mahomedans under Alau-d-din Khilji. In A.D. 1191 Ballam was defeated in a great battle at Lakkundi in Dharwar by Vira Ballala; and evidently this is referred to when it is stated in inscriptions that Ballam invaded Karnataka. [The Pratapa Charitra before alluded to, mentions a king Maha Deva raja who usurped the throne at Hanamkonda in A.D. 1176, and was slain in a battle against the raja of Devgarh in A.D. 1179. His successor Ganapati Rudra Deva (A.D. 1179-1227), renewed the war, and with such success that he compelled the Yadava king to give him his daughter Rudramma Devi in marriage.] Ballam died in 1193, after having reigned five years; and was succeeded by Jayatuga Deva, who despatched an immense army, commanded by his general Soma, into Dwara Samudra; but this was likewise defeated by Vira Ballala, and was pursued as far as the Kistna. Jayatuga died in A.D. 1210, and was succeeded by his son Simhana. Vira Ballala also died shortly afterwards; and the Yadavas were more successful in their struggles with the Hoysalas, and became masters of all the Western Dakhan. They did not extend their dominion beyond the Kistna on the south, but made extensive conquests towards Marwar and the Vindhya mountains. Simhana was succeeded in 1248 by Kandara. An inscription at Monoii describes Kandara as the conqueror of Malwa, the terrifier of the Gujarat kings, the great enemy of the Kovian rajas, the emperor of Chouldesh, and the restorer of the Telinga or Vernatkal kingdom, which was then under the regency of his relative Rudramma Devi (A.D. 1227-65). Kandara was followed by Mahadeva in 1260; and the latter was succeeded by Ramchandar in 1271. Ramchandar is generally known under the name of Ramdev; and his minister Hemad Pant was the author of several books on Hindu law, &c, and founded numerous temples and wells in various parts of the Dakhan. [The temples and wells are locally known as Hemad Panti, and are attributed by the inhabitants to the Gauli raj.] The Mahomedans arrived in A.D. 1295, and Ramdev was defeated; but he continued to rule under them till 1310, when he was succeeded by Shankara, who rebelled against the Mahomedans, and was defeated and put to death in A.D. 1312.
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य या प्राचीन ग्रंथात ‘नासिक्यʼ असा उल्लेख आढळून येतो, तेच गाव म्हणजे नासिक होय. तदनंतर अनेक जैन, बौद्ध आणि हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये नासिकचा उल्लेख शहर, देश अथवा जनपद असा येतो. येथील कुंभारवाडा किंवा मातीची गढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात १९५०-५१ साली ह. धी. सांकलिया यांनी डेक्कन कॉलेज, पुणे ह्यांच्यामार्फत उत्खनन काम हाती घेतले. उत्खननाच्या आधी भगवानलाल इंद्रजी आणि एच. कझिन्स ह्यांनी सदर ठिकाणाचे गवेषण केले होते. शहरापासून १५ किमी. दक्षिण पश्चिमेस गंगावाडी येथे दगडी हत्यारे आढळून आली होती. त्याशिवाय उत्खननात एकूण पाच स्तरातून विविध कालखंडाचे पुरावे सापडले. पहिला कालखंड पुराश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, इंडो-रोमन कालखंड आणि मोगल-मराठा कालखंड. नासिकमध्ये झालेल्या उत्खननात जोर्वे संस्कृतीचे अवशेष ऐतिहासिक युगाच्या आधीच्या स्तरात सापडल्याने त्याचा कालखंड काढणे सोपे झाले आणि ही ताम्रापाषणयुगीन संस्कृती नव्याने उजेडात आली. ताम्रापाषाणयुगीन संस्कृती बरोबरच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्थळ आहे.

प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे मिळालेले अवशेष हे दोन काळातील होते. एक कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ५०, तर दुसरा इंडो-रोमन कालखंड इ. स. ५० ते इ.स. २००. पहिला कालखंड सुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला होता. पहिल्या कालखंडामध्ये पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारचे विविध मृद्भांड्यांचे पुरावे मिळाले. त्या काळातील घरे ही मातीची बांधलेली होती, ज्यांची जमीन ही हिरव्या रंगाच्या मुरुमाचा वापर करून सारवलेली होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. घराचे छत सुद्धा लाकडाचे बनलेले होते. मोठ्या आकारचे खिळे सदर उत्खननातून समोर आले. पहिल्याच कालखंडाच्या दुसऱ्या भागात साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी लेखरहित तांब्याची टंकित नाणी सुद्धा आढळली आहेत. ह्याच बरोबर शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, गळ्यातले दागिने आढळून आले.
ह्या कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन व्यापार काळातील महत्त्वाचे पुरावे होते. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथील लोकांच्या वापरात आलेल्या आढळून आल्या. त्यामधे अर्चनाकुंडे आणि अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली. यामध्ये लाल तकाकीयुक्त (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली, मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी ज्यांत प्रामुख्याने थाळ्या आणि वाडगे आढळून आले. ह्या काळातील घरे ही पक्क्या भाजलेल्या विटांची, लाकडी छप्पर असलेली असावीत. विटांचा आकारही मोठा होता. पश्चिमी क्षत्रप राजा नहपान आणि सातवाहन कालखंडाशी जुळणारा हा कालखंड असावा, असा अंदाज सांकलिया ह्यांनी मांडला. काही मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आढळून आली. नासिक शहरात असलेली पांडव लेणी ही सातवाहन काळाशी निगडित असल्याचे पुरावे लेणीमध्ये असलेल्या लेखांमुळे समोर आलेले आहेत.
ह्या दोन्ही कालखंडांत लोह आणि तांबे ह्या धातूंचा वापर विविध प्रकारची हत्यारे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. हत्यारे, मृद्भांडी ह्यांच्याबरोबरच मातीची खेळणी, काही आकृत्या, तसेच काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध अलंकार आढळून आले. ह्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.
संदर्भ :
- Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
- Sankalia, H. D. & Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe (1950-51), Deccan college, Pune, 1955.
- देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
जुन्नर (Junnar)
पुणे जिल्ह्यातील एक पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ. महाराष्ट्रातील प्राचीन राजवंश सातवाहन यांच्या काळातील एक मुख्य ठिकाण, तसेच छ. शिवाजी महाराज यांचे जुन्नरजवळील शिवनेरी येथील जन्मस्थळ यांमुळे जुन्नर हे स्थळ प्रसिद्ध आहे. मानवी वास्तव्याचे पुरावे या परिसरात अश्मयुगापासून (बोरी) प्राप्त होतात. जुन्नर परिसरातील अग्निजन्य खडकात इ. स. पू. पहिल्या शतकात खोदलेली हीनयान पंथाची साधारणतः २५० बौद्ध चैत्यगृहे, विहार आणि लेणी आहेत. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही आणि आदिलशाही, मराठा आणि पेशवे काळापर्यंत जुन्नर हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते.

जुन्नर हे भारतीय-रोमन व्यापारी काळात कोकण आणि देश यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून कल्याण-पैठण-तेर आणि भृगुकच्छ-पैठण-तेर या मुख्य व्यापारी मार्गावर स्थित होते. सातवाहन काळात पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईजवळील सोपारा या बंदरांत येत असून या मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीतून जुन्नर मार्गे देशावर होत असे. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा आणि सोपा मार्ग होता.
भौगोलिक दृष्ट्या जुन्नर हे सपाट विस्तीर्ण क्षेत्र असून सह्यादी पर्वतरांगेपासून २५ किमी. पूर्वेस आहे. कुकडी, मीना आणि पुषावती या तीन प्रमुख नद्या असून पांढरीचे टेकाड कुकडी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. जुन्नर येथील पांढरीचे टेकाड क्षेत्र साधारणतः २० हेक्टर क्षेत्रांत पसरलेले आहे. या प्राचीन स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन महाराष्ट्र शासनाच्या, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने १९८४ मध्ये करण्यात आले. तदनंतर २००५ ते २००८ या तीन सत्रांत डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे येथील पुरातत्त्वज्ञांनी उत्खनन केले.
या उत्खननामध्ये सर्वांत खाली सातवाहन-पूर्व काळात वस्ती असल्याचे संकेत मिळाले आहेत. जुन्नर या स्थळाचा सर्वांगीण विकास सातवाहन काळातील स्तरामध्ये दिसून येतो. या कालखंडाला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे. जुन्नरच्या वरच्या स्तरांत मध्ययुगीन ते मराठा काळाचे पुरावे मिळाले आहेत. परंतु वर्तमान काळातील मानवी वस्ती आणि इतर खोदकामांमुळे या स्तरांचे अवशेष जवळपास नष्ट झाले आहेत.
जुन्नरच्या इतिहासात सातवाहन कालखंड विशेष महत्त्वाचा असून पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट भाजणीची काळ्या-आणि-तांबड्या रंगाची, लाल लेप असलेली आणि उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे मिळाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सातवाहन काळाची वैशिष्ट्यपूर्ण लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त, काळी चकाकीयुक्त, राखाडी रंगाची यांशिवाय हिरव्या रंगाची चकाकी असलेली खापरे आणि अंफोरा प्रकारची मृद्भांडी मिळाली आहेत. पुरावशेषांमध्ये अर्धमौल्यवान दगडी, मृण्मय, शंख आणि विविध धातूंचे मणी, मातीचे शिल्पावशेष, बांगड्या, कर्ण-कुंडले, पदके, काचेचे मणी आणि बांगड्या, लोखंडी अवजारे, पाटे-वरवंटे प्रमुख आहेत. काही मृण्मय शिल्पांमध्ये रोमन प्रभाव दृष्टीगोचर होतो. उत्खननामध्ये ऐतिहासिक काळातील सातवाहन आणि क्षत्रपांची नाणी, मध्ययुगातील बहमनी, गुजरातच्या सुलतानाची, निजामशाही, मराठा कालखंडातील शिवराई आणि ब्रिटिश काळातील इ. नाणी प्राप्त झाली. सातवाहन काळात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर इ. पाळीव प्राणी आणि काळवीट, मृग, ससा आणि डुक्कर इ. जंगली प्राण्याची हाडे मिळाली असून धान्यांमध्ये गहू, तांदूळ, मूग, मसूर, उडीद डाळ, चना इ. पुरावे प्राप्त झाले आहेत.
उत्खननात सातवाहन काळातील घरांचे आणि वर्तुळाकार विहिरींचे अवशेष मिळाले आहेत. घरबांधणीकरिता भाजल्या विटांच्या उपयोग होत असून भिंतीवर मातीचा गिलावा केला जात असे. घराच्या आतील जमीन चुना आणि मातीने सारवून तयार केल्या जात असत. सातवाहन काळातील खापरे आणि पुरावशेषांच्या आधारे हा कालखंड इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक इतका निर्धारित केला आहे. उत्खननात प्राप्त अंफोरा प्रकारची, हिरव्या रंगाची चकाकी असलेली आणि चिनी खापरांवरून जुन्नरचे यूरोपातील रोम, फारसचे आखात आणि चीनसोबत व्यापारिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
संदर्भ :
- Jhadhav, S. S. ‘A Preliminary Report of Excavations at Satvahana Site of Junnar, District Pune, Maharashtraʼ, Man and Environment, XXXI (1), pp. 108-113, 2006.
- Shinde, Vasant; Jhadhav, Shreekant; Shirvalkar, Prabodh; Kulkarni, Amol; Dandekar, Abhijit; Ganvir, Shrikant; Joglekar, P. P.; Mandke, Girish; Deshpande-Mukherjee, Arti; Deo, Shushma G.; Rajguru, S. N.; Kajale, M. D. & Naik, Satish, ‘A Report on the Recent Archaeological Investigations at Junnar, Maharashtraʼ, Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Vol. 66/67, pp. 113-159, 2006-07.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
भोकरदन

| ?भोकरदन महाराष्ट्र • भारत | |
| — तालुका — | |
![]() |
|
| |
|
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| मोठे शहर | औरंगाबाद |
| विभाग | औरंगाबाद |
| लोकसंख्या • शहर |
७०,४१६ (2018) • 70000 |
| भाषा | मराठी आणी हिंदी |
| तहसील | भोकरदन |
| पंचायत समिती | भोकरदन |
| कोड • पिन कोड |
• 431114 |
भोकरदन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. आणि हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहेत, प्राचीन श्रीकृष्ण(तुकाई) लेणी आणि बौद्ध लेणी आणि लाल गडी ,गौस्पक दर्गा, रामेश्वर मंदिर आणि भोकरदन किल्ला जो आज तहसील म्हणून ओळखला जातो.
इतिहास
उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते.[१]
इ.स. १९७३-७४ साली येथे उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे अवशेष आढळले. या शहराचे प्राचीन नाव भोग्वर्धन आहे असा इतिहासात उल्लेख आढळतो.भोग्वर्धन हे नाव .भोग्वर्धन या राज्यामुळे पडले. या राजामुळे भोकरदन(भोग्वर्धन)या गावाचा व्यापारी गाव म्हणून त्या काळात प्रसिद्ध झाले होते. व युरोपात माल जाई. येथे एक प्रसिद्ध अशी लेणी आहे. जेव्हा अजिंठा व वेरूळ या लेणाचे काम पूर्ण झाले तेव्हा जाताना ही छोटी लेणी व महादेवाचे मंदिर बांधून गेले व या मंदिर व लेण्यांना स्थानिक भाषेत रामेश्वरचे मंदिर असेही म्हणतात.भोकरदन हे शहर अत्यंत निसर्गरम्य शहर आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व जाईचा देव ह्या ठिकाणी डोंगराळ भाग तसेच जंगल क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
धार्मिक स्थळे
राजुरचा गणपती
राजूरचे गणेश मंदिर,ता.भोकरदन हे जालना शहरापासून उत्तरेला २५ किमी अंतरावर आहे प्रत्येक चतुर्थीला अनेक भाविक देवतेची प्रार्थना करण्यासाठी येतात. अंगारिका चतुर्थीला मंदिरात मोठ्या प्रमाणात मेळा भरतो.
राजूर हे गणेश पुराणातील गणपतीचे पूर्ण पिठ मानले गेले आहे. इतर पीठ मोरगाव, चिंचवड (पुणे) येथे आहेत. उर्वरित अर्धा पिठ पद्मालय आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून ते पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.
रामेश्वर-सिद्धेश्वर मंदिर
उलगडला तेराव्या शतकातील महाराष्ट्र
यादवकालीन महाराष्ट्रात बाजाराला ‘हाटवटी’, पुलाला ‘खांडी’, धर्मशाळेला ‘पटीशाळा’, पाटाला ‘पाणीबार’ म्हटले जायचे. आजचे पैठण, भोकरधन, नाशिक, नेवासा ही गावे तेव्हापासून अस्तित्वात होती तर देवगाव, नांदेड, राहेर ही गावे यादवांच्या काळात विकसित झाली. अशा महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे तेराव्या शतकातील महाराष्ट्र उलगडणारा ‘स्थानपोथीः एक पुरातत्वीय अभ्यास’ हा ग्रंथ नुकताच मराठीत प्रकाशित झाला आहे.
यादवकालीन महाराष्ट्राचे यथार्थ चित्रण
मनिषा नित्सुरे-जोशी, मुंबई
यादवकालीन महाराष्ट्रात बाजाराला ‘हाटवटी’, पुलाला ‘खांडी’, धर्मशाळेला ‘पटीशाळा’, पाटाला ‘पाणीबार’ म्हटले जायचे. आजचे पैठण, भोकरधन, नाशिक, नेवासा ही गावे तेव्हापासून अस्तित्वात होती तर देवगाव, नांदेड, राहेर ही गावे यादवांच्या काळात विकसित झाली. अशा महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे तेराव्या शतकातील महाराष्ट्र उलगडणारा ‘स्थानपोथीः एक पुरातत्वीय अभ्यास’ हा ग्रंथ नुकताच मराठीत प्रकाशित झाला आहे.
‘स्थानपोथी’ म्हणजे महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी जिथे जिथे फिरले त्या त्या ठिकाणांची आणि तत्कालीन भौतिक संस्कृतीची नोंद असलेला ग्रंथ. महाराष्ट्रातील इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक ग्रंथ म्हणून ओळखली जाणारी ‘स्थानपोथी’ आता मराठीत वाचायला मिळणार आहे. श्रीचक्रधरस्वामी यांच्या आठशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा ग्रंथ नुकताच प्रकाशित करण्यात आला असून, राज्य सरकारच्या गॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी तो लिहला आहे. तेराव्या शतकातील महाराष्ट्राचे समाजजीवन, लोकजीवन, अर्थव्यवस्था, चलन, विविध वास्तू, नगररचना, गृहरचना यांची नोंद श्रीचक्रधरांच्या स्थानपोथीमध्ये एकत्रितपणे मिळते. पण तेव्हाच्या सांकेतिक भाषेत लिहिल्या गेलेल्या या स्थानपोथीतील नोंदी आज आठशे वर्षानंतर अस्तित्वात आहेत का, हे शोधून त्यांची आजची स्थिती काय आहे यावर डॉ. पाठक यांनी प्रकाश टाकला आहे. नव्या ग्रंथाने सांकेतिक भाषा उलगडून सांगण्याबरोबरच कालौघात नष्ट झालेल्या संस्कृतीचीही ओळखही वाचकांना करून दिली आहे. मूळ ग्रंथातील नोंदींच्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणांची पाहणी करून डॉ. पाठक यांनी हा नवा ग्रंथ लिहिला असून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित केला आहे. मूळ ग्रंथात असलेले मराठी शब्द आज अस्तित्वात नसले तरी त्या शब्दांना आजच्या काळात काय म्हटले जाते याची अनेक उदाहरणे देण्यात आली असून, अनेक जुन्या मराठी शब्दांची ओळखही पटवून देण्यात आली आहे.
भोकरदन : महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. हे औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे एक ठिकाण आहे. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. लोकसंख्या ९,६८० (१९८१). ते खेळणा नदीकाठी सिल्लोड-जाफराबाद रस्त्यावर सिल्लोडच्या पूर्वेस सु. २० किमी.वर वसले आहे. हे ठिकाण उज्जयिनी (उज्जैन) ते पैठण या व्यापारी मार्गावर दण्डक अरण्यात वसले होते, असा प्राचीन वाङ्मयात तसेच मार्कण्डेयादी पुराणांत व अनेक उत्कीर्ण लेखांत याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा (प्रांताचा) दर्जा प्राप्त झाला. येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील अभिलेखांत आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख ५९७ च्या लेखात आहे. इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास खेळणा नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे तथापि त्यानंतरचा या गावाचा इतिहास ज्ञात नाही. उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. भोकरदनच्या सभोवती प्राचीन तटबंदीचे अवशेष असून जुन्या किल्ल्यात तहसील कार्यालय आहे. गावात जुनी आठ लहान मंदिरे असून त्यांपैकी खंडोबाचे मंदिर मोठे आहे. तेथे प्रतिवर्षी यात्रा भरते. याशिवाय नदीकाठी एक महानुभव पंथाचे प्राचीन मंदिर आहे. दर शनिवारी येथे बाजार भरतो. भोकरदन कांबळी व खंडसरी साखरेसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
शां. भा. देव आणि र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १९७३-७४ साली उत्खनन करण्यात आले. त्यांत पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे बहुविध अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. या समृद्धीमुळे कलाकौशल्याचे हे केंद्र बनले. उत्खननात कारागिरांची अनेक घरे आढळली असून ती गुळगुळीत जमिनीची व कबेलूंनी शाकारलेल्या छतांची आहेत. पाटा-वरवंटा, जाते, पळ्या, थाळ्या, डाव, झाकण्या, मडकी इ. हरतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू येथील घरांत मिळाल्या, या घरांतील सांडपाणी वाहून जाण्याचीही सोय चांगली होती. उत्खननांत घरांच्या अवशेषांशिवाय काही नाणी, मृण्मूर्ती आणि दागिने सापडले. नाण्यांचे प्रकार आणि आकार भिन्न असून नाण्यांमध्ये काही आहत नाणी तसेच सातवाहन-क्षत्रप-कार्दमक आणि गुप्त राजे यांची तांब्याची, मिश्रधातूंची आणि सोन्याचा मुलामा दिलेली नाणी आढळली. येथे मिळालेल्या अनेक प्रकारच्या व आकारांच्या मण्यांत अफीक, प्रवाळ, रक्ताश्म, इंद्रनील, स्फटिक इ. मूल्यवान खडे आहेत. उत्खननात उपलब्ध झालेल्या बांगड्या हस्तिदंती, शंखाच्या आणि विशेषत्वे तांब्याच्या आहेत.
येथील अवशेषांत सु. सातशे पक्वमृदा वस्तू मिळाल्या. त्यांपैकी मानवप्राणी व पशू यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर वस्तूंत कर्णभूषणे, पूजेची अर्चनाकुंडे व घरगुती वापरातील हस्तिदंती कंगवे, कज्जलशलाका (काजळाच्या डब्या), सोंगट्या, थाळ्या इत्यादींचा समावेश होतो. कर्णभूषणे डाळिंबीच्या फुलांसारखी कलाकुसर केलेली असून भारतात अन्यत्र उपलब्ध न झालेले किन्नरी-पात्र, शिवाय एका झाकणावरील तीन स्त्रियांच्या उर्ध्वांगाची मूठ इ. अवशेष लक्षणीय आहेत.
येथील मानवी शिल्पांतील दोन स्त्री-प्रतिमांपैकी एक इटलीमधील पाँपेई या ठिकाणी १९३०-३१ साली झालेल्या उत्खननात मिळालेल्या स्त्री-प्रतिमेसदृश आहे. दोन दासींच्या मधोमध उभी असलेली ही स्त्री सडपातळ व बांधेसूद आहे. हिचा काळ इ. स. पू. पहिले ते इसवी सनाचे पहिले शतक असावा. सातवाहन काळात भोकरदन हे हस्तिदंती कलावस्तूंचे केंद्र असावे आणि येथील वस्तूंची व्यापारानिमित्त देवाण-घेवाण होत असावी, असे अनुमान केले जाते. त्यामुळे पाँपेई येथे उपलब्ध झालेली स्त्री-प्रतिमा मूळची याच भागातली असावी, असेही म्हणता येईल. यांशिवाय येथील उत्खननात मातृकादेवींच्या दोन शिलामूर्ती मिळाल्या. त्या दोन्ही मूर्ती विशीर्ष असून योनिस्तनयुक्त उत्तानपाद मूर्ती आहेत. त्यांपैकी एका मूर्तीच्या दोन्ही बाजूंस कमळे कोरलेली आहेत. तज्ञांच्या मते त्या इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत खोदल्या असाव्यात.
सातवाहन सत्तेच्या अवनतीनंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगात या नगरीला थोडे महत्त्व लाभले होते.
संदर्भ : Deo, S. B. Gupte, R. S. Excavations at Bhokardan, Nagpur, 1974.
देगलूरकर, गो. बं.
भोगवर्धन से भोकरदन तक एक व्यापारिक शहर की बहुआयामी कहानी
- 17 मई, 2025
रिया प्रधान द्वारा
व्यापार
हमेशा से ही प्रगति के द्वार खोलने वाली कुंजी रहा है, जो सीमाओं के पार
संस्कृतियों, अर्थव्यवस्थाओं और इतिहास को जोड़ता है। चहल-पहल वाले
व्यापारिक शहरों ने आर्थिक विकास की नींव रखी। भारत ने ऐसे कई शहरों की
कहानियाँ देखी हैं जो समय के साथ लुप्त हो गए हैं। ऐसा ही एक शहर है
भोकरदन, जो कभी सातवाहन शासन के प्रमुख व्यापारिक केंद्रों में से एक था,
आज महाराष्ट्र के जालना जिले का एक छोटा सा भूला-बिसरा शहर है। यह उस जटिल
वाणिज्य संरचना की एक महत्वपूर्ण कड़ी था जो दक्कन के गढ़ को दूर-दराज के
स्थानों से जोड़ती थी। हालाँकि, कई
प्राचीन शहरों की तरह, यह भी गुमनामी में खो गया और अपने
जीवंत अतीत के अवशेष पीछे छोड़ गया जो पुनः खोजे जाने का इंतज़ार कर रहे
हैं।
पूर्व में भोगवर्धन के नाम से प्रसिद्ध यह शहर मध्य भारत के उज्जैनी से सातवाहनों (300 ईसा पूर्व से 400 ईस्वी) की राजधानी पैठण तक के व्यापार मार्ग में एक महत्वपूर्ण स्थान रखता था। 1958 में एम.एस. देशपांडे ने भोकरदन का दौरा किया और उन्हें इसके ऐतिहासिक महत्व का तुरंत एहसास हुआ। 1972 से 1974 तक प्रो. एस.बी.देव और डॉ. आर.एस. गुप्ते के नेतृत्व में नागपुर विश्वविद्यालय की एक टीम ने छत्रपति संभाजी नगर (जिसे पहले औरंगाबाद कहा जाता था) से 64 किमी दूर भोकरदन की खुदाई की।
सदियों से कई ग्रंथों में भोगवर्धन का उल्लेख मिलता है। सबसे पुराना उल्लेख मार्कंडेय पुराण में मिलता है, जो इस शहर को एक व्यापारिक केंद्र बताता है। 597 ईस्वी में "महिष्मती" के कटच्छुरि वंश के राजा शंकरगण द्वारा जारी एक ताम्रपत्र अनुदान (जो नासिक जिले के कालवन तहसील के अभोना गाँव में खोजा गया था) में "भोगवर्धन" का उल्लेख एक ऐसे प्रांत के रूप में किया गया है जहाँ वल्लिसिका नामक एक गाँव मौजूद था। इसके अलावा, बहरुत और साँची के स्तूपों के अभिलेखों में भी भोगवर्धन के लोगों से दान प्राप्त करने का उल्लेख है। साँची स्तूप के एक विशेष शिलालेख में उल्लेख है कि भोगवर्धन के लोहारों ने अफ़गानिस्तान के बेग्राम हाथीदांत कारीगरों की शैली में हाथीदांत से एक यक्षी बनाई थी।
जुड़वाँ बहनों की कहानी
1939 की बात है, इतालवी पुरातत्वविद् अमेदिओ मैउरी पुराने
पोम्पेई के अवशेषों में कलाकृतियों की तलाश में थे, जिनके बारे में माना
जाता है कि वे 79 ई. में माउंट वेसुवियस पर एक ज्वालामुखी विस्फोट से नष्ट
हो गए थे। खंडहरों में, क्षेत्र I के द्वीप IX में वाया डेल अबहोंडांज़ा के
सामने स्थित एक भव्य निजी घर में, उन्हें एक छोटी हाथीदांत की मूर्ति
मिली, जिसकी लंबाई मात्र 24 सेमी थी। यह कलाकृति, जो एक लकड़ी की अलमारी
में रखे एक लकड़ी के बक्से में थी, बहुत खराब हालत में थी।
पहली नज़र में, वह यह सुनिश्चित करने में सक्षम था कि मूर्ति निश्चित रूप से भारतीय मूल की थी। अमेदिओ और भारतीय पुरातत्वविद् मोती चंद्र दोनों ने भारी अलंकरण, कमल के फूल के लटकन और आधार पर त्रिशूल के निशान के कारण मूर्ति को देवी लक्ष्मी का बताया। लेकिन वोगेल, रोलैंड और एसके सरस्वती जैसे अधिकांश पुरातत्वविदों ने इस आधार पर इसे अस्वीकार कर दिया कि देवी-देवताओं की छवियों को व्यावहारिक उपयोग की वस्तुओं जैसे हाथ में पकड़े जाने वाले दर्पणों पर बहुत कम ही चित्रित किया जाता है। वे मानते हैं कि छवि एक यक्षिणी या वेश्या की है। भारत में वास्तविक स्थान के बारे में बहुत सारी अटकलें लगाई गईं, जहां कला का यह आश्चर्यजनक नमूना बनाया जा सकता था। यह माना जाता था कि कलाकृति मथुरा, उज्जैन या विदिशा से उत्पन्न हुई थी, जहां माना जाता था कि पहली शताब्दी ईसा पूर्व में हाथीदांत तराशने वालों का एक संघ था।
ऐसा
माना जाता था कि यह मूर्ति महाराष्ट्र के टेर क्षेत्र की है लेकिन टेर के
अवशेषों से तुलना के बाद यह धारणा त्याग दी गई। जब भोकरधन की खुदाई की गई
तो सबसे दिलचस्प खोज एक महिला मूर्ति का निचला आधा हिस्सा था, जिसे हाथी
दांत से दो महिला परिचारिकाओं के साथ उकेरा गया था। पोम्पेई में मिली एक
मूर्ति से भोकरधन हाथी दांत की मूर्ति की तुलना करते हुए, प्रोफसर जीबी
देगलुरकर कहते हैं कि भोकरधन और पोम्पेई हाथी दांत दोनों न केवल समान
गुणवत्ता मानक के हैं, हालांकि पोम्पेई गुणवत्ता वाले में से एक का रखरखाव
बेहतर है। वे एक ही स्टूडियो
या कार्यशाला में भी बनाए गए थे। इस तर्क को इसके अगले स्तर
पर ले जाते हुए, हम कह सकते हैं कि दोनों मूर्तियाँ एक ही हाथी दांत के
शिल्पकार द्वारा बनाई गई थीं या दूसरे शब्दों में, पोम्पेई और भोकरधन
सुंदरियां, हाथी दांत की मूर्तियाँ, जुड़वां बहनें कही जा सकती हैं।
पुरातात्विक साक्ष्य
इस स्थल पर खुदाई करते समय पता चला कि यह शहर न केवल एक
महत्वपूर्ण सातवाहन व्यापारिक केंद्र था बल्कि इसका इतिहास अपेक्षा से कहीं
अधिक पुराना है। भोकरदन के पूर्व-सातवाहन युग में सघन मिट्टी और चूने का
फर्श है। भोकरदन में इस समय के उल्लेखनीय तत्वों में एक "स्नानघर" जैसी
इमारत है जो पत्थर की पट्टियों को एक साथ रखकर बनाई गई है और
पानी की निकासी के लिए एक खाई से जुड़ी हुई है। कई स्थानों से प्राप्त
साक्ष्यों के अनुसार, मौर्य पूर्व और मौर्य युग के दौरान निर्माण में ईंटों
और टाइलों का अक्सर उपयोग नहीं किया जाता था। इन स्थानों पर प्रारंभिक चरण
आर्थिक विकास के एक बुनियादी चरण को दर्शाता है। ईंट और टाइल निर्माण जैसी
औद्योगिक गतिविधि अपने शुरुआती चरण में थी। हालांकि, भोकरदन के प्रारंभिक
ऐतिहासिक युग में, मिट्टी के छल्ले और घड़ों से सोखने के कुएं बनाने जैसी
नागरिक गतिविधियां धीरे-धीरे विकसित हुईं। इस स्थल पर मनके बनाने के लिए
कार्नेलियन, एगेट और कैल्सेडनी जैसे अर्ध-कीमती पत्थरों का इस्तेमाल किया
गया था। ये सामग्रियाँ दक्कन ट्रैप में आसानी से उपलब्ध हैं। हालाँकि,
गैर-स्थानीय सामग्री जैसे लैपिस लाजुली भी मिली है। घरेलू मुर्गों की
हड्डियाँ, घरेलू बकरियों की हड्डियाँ, मवेशियों की हड्डियाँ, भेड़ों की
हड्डियाँ, घरेलू सूअर, भैंस आदि की हड्डियाँ प्रचुर मात्रा में पाई गईं।
इनके साथ ही, इस स्थल से मछलियों, दलदली हिरणों और हाथियों की हड्डियाँ भी
प्राप्त हुईं।
रोजमर्रा के उपयोग की अधिकांश वस्तुएं जैसे पत्थर की चक्की, सीढ़ी, प्लेट, चम्मच, ढक्कन, मिट्टी के बर्तन आदि खोजे गए। घरों में बड़े करीने से डिजाइन किए गए अपशिष्ट जल निकासी प्रणालियों से सुसज्जित थे। सिक्के जो अलग-अलग आकार के थे और तांबे, मिश्र धातु, सोने की परत से बने थे, विभिन्न राजाओं के शासनकाल के थे जैसे सातवाहन - शक - कर्दमक और गुप्त राजा। कांच, शंख और फ़ाइनेस (कांची) मोतियों की कई किस्में और कुछ अर्ध-कीमती पत्थर जैसे कार्नेलियन, क्रिस्टल, अगेट, कैल्सेडनी, जैस्पर, हाथी दांत, ओपल आदि विभिन्न प्रकारों और आकारों में खोजे गए थे। हाथी दांत, शंख और विशेष रूप से तांबे की चूड़ियों को टुकड़ों में खोजा गया था। प्रोफ़ेसर देव की रिपोर्ट में भोकरदन खंडहरों से हाथी दांत की वस्तुओं की प्रचुरता, दोनों तैयार और अधूरी, और हाथी दांत के टुकड़ों की वसूली के बारे में भी बताया गया है।
भोकरदन
में पुरातात्विक उत्खनन से सातवाहन काल की जीवनशैली और आर्थिक प्रथाओं को
दर्शाने वाले उपकरणों का एक संग्रह सामने आया है। इन महत्वपूर्ण खोजों में,
लोहे के उपकरण भी शामिल हैं जो कृषि कार्यों और शिल्पकला में उपयोग के लिए
आवश्यक थे। इन औजारों
के संग्रह में हल के फाल, दरांती और कुदालें भी हैं, जो इस
क्षेत्र की अर्थव्यवस्था में कृषि को एक महत्वपूर्ण गतिविधि के रूप में
उजागर करते हैं। लोहे की कुल्हाड़ियों और कुल्हाड़ी का होना इस बात का
संकेत है कि लकड़ी का काम भी एक महत्वपूर्ण गतिविधि थी जिससे संरचनाओं और
इमारतों के निर्माण में मदद मिली। पीसने वाले पत्थर और मूसल
जैसे पत्थर के औजार भी मिले हैं जो अनाज और अन्य खाद्य पदार्थों को पीसने
की प्रक्रिया का संकेत देते हैं। ये औजार उस समय के तकनीकी विकास को उजागर
करने के अलावा, भोकरदन के लोगों की संसाधनशीलता और आत्मनिर्भरता का भी
संकेत देते हैं। इन औजारों की विविधता और उपयोगिता, कृषि और लकड़ी के काम
से लेकर खाद्य प्रसंस्करण और शिल्पकला तक, शहर की आर्थिक गतिविधियों की
विस्तृत श्रृंखला को दर्शाती है। एक महत्वपूर्ण खोज पत्ती के आकार का तीर
का सिरा, त्रिकोणीय अनुप्रस्थ काट वाले हेलिकॉप्टर और लोहे के तार से बने
मछली के काँटे हैं। भोकरदान ने दो प्रकार की छेनी का उत्पादन किया - एक
वर्गाकार, शंक्वाकार, फैले हुए और बेवल वाले किनारे वाली, तथा दूसरी बिना
सिर वाली।
आर्थिक गतिविधियाँ:
कस्बे की अर्थव्यवस्था विविध थी, जिसमें व्यापार, कृषि और
विशिष्ट कारीगरी गतिविधियाँ अग्रणी थीं। कृषि भोकरदन की अर्थव्यवस्था की
रीढ़ थी। आसपास की उपजाऊ भूमि चावल, गेहूँ और बाजरा जैसी विविध प्रकार की
फसलों की खेती के लिए उपयुक्त थी। सातवाहन शासकों ने
कृषि उत्पादकता बढ़ाने के लिए तालाबों और नहरों जैसी उन्नत
सिंचाई प्रणालियों का उपयोग किया। इससे खाद्य सुरक्षा और कस्बे की
अर्थव्यवस्था, दोनों में सुधार हुआ, जिसके परिणामस्वरूप स्थिरता आई। जले
हुए गेहूँ के दाने, फलियाँ और चावल के अवशेष गेहूँ की खेती के अस्तित्व का
संकेत देते हैं। यह कस्बा दक्कन क्षेत्र को रोमन साम्राज्य से जोड़ने वाले
एक प्रमुख व्यापारिक केंद्र के रूप में कार्य करता था। इस क्षेत्र में रोमन
सिक्कों और वस्तुओं की खोज से कस्बे की विदेशी व्यापार में भागीदारी की
पुष्टि होती है। यह अपने सूती कपड़ों के लिए विशेष रूप से प्रसिद्ध था,
जिनकी रोमन बाजारों में उच्च मांग थी। जहाजों को दर्शाने वाले सिक्कों की
खोज से भी उस समय समुद्री व्यापार के महत्व पर प्रकाश पड़ता है। वस्तुओं और
सेवाओं के सुचारू आदान-प्रदान को सुगम बनाने के लिए इन वाणिज्यिक
गतिविधियों को नियंत्रित और विनियमित करने में व्यापारिक संघों की
महत्वपूर्ण भूमिका थी। भोकरदन विशिष्ट कारीगरी गतिविधियों का भी केंद्र था।
उत्खनन में कारीगरों के कई घर मिले हैं, जिनमें से कुछ में चिकनी छतें थीं
और कुछ में छतें थीं। टेराकोटा की मूर्तियाँ, मिट्टी के बर्तन और अन्य
वस्तुएँ एक सुविकसित कारीगरी उद्योग के प्रमाण हैं। ये वस्तुएँ स्थानीय
कारीगरों के कौशल और कलात्मकता को दर्शाती हैं, जो स्थानीय उपभोग के
साथ-साथ व्यापार के लिए भी वस्तुएँ बनाते थे। शहर के कारीगर अपनी विस्तृत
डिज़ाइन और उत्कृष्ट शिल्प कौशल के लिए प्रसिद्ध थे, जिनकी क्षेत्रीय
बाज़ारों में काफ़ी माँग थी।
संस्कृति और धार्मिक गतिविधियाँ
भोकरदन में पुरातात्विक अवशेष, जैसे सिक्के, मिट्टी के बर्तन
और टेराकोटा मूर्तियाँ, शहर की सांस्कृतिक और धार्मिक गतिविधियों का स्पष्ट
विचार देते हैं। बौद्ध स्तूपों और विहारों की उपस्थिति और टेराकोटा
मूर्तियों और मिट्टी के बर्तनों की उपलब्धता एक धार्मिक और सांस्कृतिक
केंद्र के रूप में शहर के महत्व का सुझाव देती है।
अजंता और एलोरा की गुफाओं की तरह, भोकरदन गुफाएँ धार्मिक और
सांस्कृतिक केंद्र थीं जहाँ भिक्षु और विद्वान दर्शन और धार्मिक ग्रंथों पर
बहस करने के लिए मिलते थे। ये खोजें बौद्ध शिक्षाओं के प्रसार में शहर के
महत्व और सातवाहन युग के सांस्कृतिक और धार्मिक परिदृश्य में इसके योगदान
को उजागर करती हैं। भोकरदन के भीतर विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक प्रथाओं
का अभिसरण विचारों और परंपराओं के एक पिघलने वाले बर्तन के रूप में शहर की
भूमिका को रेखांकित करता है, जिसने समृद्ध और विविध सांस्कृतिक विरासत को
बढ़ावा दिया है।
सातवाहन काल में भोकरदन एक विविध आर्थिक और सांस्कृतिक केंद्र था, जहाँ इसकी भौगोलिक स्थिति, कृषि उपजाऊपन और कुशल कारीगरों ने इसकी समृद्धि और ऐतिहासिक महत्व में महत्वपूर्ण भूमिका निभाई। वाणिज्य में इस शहर की भूमिका, विशेष रूप से रोमन साम्राज्य के साथ, और धार्मिक महत्व भी इसे दक्कन क्षेत्र के इतिहास में एक महत्वपूर्ण स्थान प्रदान करते हैं।
संदर्भ:
ठकुरिया, टी. और इतिहास और पुरातत्व विभाग, नॉर्थ ईस्टर्न हिल
यूनिवर्सिटी, तुरा कैंपस, मेघालय - 794002, भारत (2017) 'महाराष्ट्र में
प्रारंभिक ऐतिहासिक काल के दौरान समाज और अर्थव्यवस्था: एक पुरातात्विक
परिप्रेक्ष्य,' हेरिटेज: पुरातत्व में बहुविषयक अध्ययन जर्नल, 5, पृष्ठ
169-190।
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (1979) भारतीय पुरातत्व 1973-74 - एक समीक्षा।
बी.के. थापर द्वारा संपादित।
"यक्षं पूजितं धनं - आरवी वी.70.4 पर सायं, 'प्रकटीकरण'; पोम्पेई यक्षी, भोकरदन (महाराष्ट्र) से हाथीदांत में कुबेरपत्नी (कोई तारीख नहीं) (एक्सेस: 22 फरवरी, 2025)
पोम्पेई लक्ष्मी और भोकरदन से जुड़वां बहन (कोई तारीख नहीं)।
http://www.akshardhool.com/2018/04/pompeii-laxmi-and-twin-sister-from.html
कल्याणरमन, एस. (2024) 'भोकरदन महाराष्ट्र या भोगवर्धन जनपद जहां पोम्पेई यक्सी प्रतिमा लोहारों द्वारा बनाई गई थी,' डीसीपुणे [प्रीप्रिंट]।
चंद्रा, कविकोंडाला (2009). भोकरदन और पौनार में उत्खनन से प्राप्त भौतिक संस्कृति का तुलनात्मक अध्ययन.
डेगलुरकर, जी.बी. डेक्कन कॉलेज रिसर्च इंस्टीट्यूट का बुलेटिन, खंड 53, 1993, पृष्ठ 423-28. जेएसटीओआर,
http://www.jstor.org/stable/42936464.
भोकरदन Bhokardan (Bhogvardhan)
भोकरदन हे ठिकाण जालना जिल्ह्यातील केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. हे स्थल औरंगाबादपासून ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा मार्गावर आहे. सातवाहन काळात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८-५९ मध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले. हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण केंद्रांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी केंद्रांशी जोडले गेले होते. मध्य प्रदेशातील सांची व भारहूत येथील शिलालेखांत या केंद्राचा येथील दानकर्त्यांच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे मार्कंडेय पुराणातही भोगवर्धनचा उल्लेख येतो. येथे बौद्धधर्मीयांचे अनुयायी मोठ्या संख्येने राहत असावेत, असेही अनुमान केले गेले आहे. प्राचीन भोगवर्धन हे सध्याचे भोकरदन असल्याची खात्री होण्यासाठी, तसेच तत्कालीन भोगवर्धनचे महत्त्व जाणून घेण्याकरिता येथे १९७३-७४ या कालावधीत उत्खनन केले गेले. नदीच्या डाव्या भागाला, आलापूर या गावाच्या हद्दीत असलेल्या दोन पांढरीच्या टेकाडांचे पुरातत्त्वज्ञ शांताराम देव व रमेश गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे विस्तृत उत्खनन करण्यात आले.
उत्खननात दोन कालखंड आढळले. पहिल्या कालखंडात सातवाहनांचा आद्य व उत्तर काळ; तर दुसऱ्या कालखंडात क्षत्रपांच्या उत्तर काळाचे पुरावशेष निदर्शनास आले. पहिल्या आद्य सातवाहन काळातील वास्तूअवशेषांनुसार यांची घरे आकाराने लहान, भिंती मातीच्या तर लाकडी खांबांच्या आधारावर कवेलू आच्छादित छप्पर होते. संपूर्ण घराची योजना कशी होती, याची कल्पना करता आली नाही; मात्र सातवाहनांच्या उत्तर काळातील अवशेष अधिक बोलके असून त्यांनुसार तत्कालीन समृद्ध भोगवर्धनच्या वैभवाची कल्पना करता येते. या काळातील घरे आकाराने मोठी, विटांच्या भिंतींची व योजनापूर्वक पायाभरणी केलेली आढळतात. या घरांची छपरे कवेलू आच्छादित होती. प्रत्येक कवेलू लाकडी वाशांवर घट्ट टिकून राहाण्याकरिता कवेलूंना दोन जागी भोक असे; जेणेकरून ती तारांनी लाकडी वाशांना बांधता येत. ही छपरे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्वसाधारण घर पडवी, बैठकखोली व स्वयंपाकघर अशा तीन भागांत विभागले होते. स्वयंपाकघरात धान्य व इतर काही वस्तू वा पाणी यांची साठवणूक करण्याकरिता मोठाली कुंडे होती. तसेच स्वयंपाकघरातील वापरलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरिता दोन प्रकारच्या शोषणकुंडांची व्यवस्था दिसून आली. पहिल्या प्रकारामध्ये भाजलेल्या मातीच्या कड्या एकावर एक ठेवून विहिरसदृश आकार दिलेला होता; तर दुसऱ्या प्रकारामध्ये मातीच्या कड्यांच्या जागी विटांचा वापर करून विहिरसदृश रचना केलेली होती. अशा स्वरूपाच्या रचनांमुळे सांडपाणी जमिनीत शोषून घेतले जाई. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे सांडपाणी परिसरात न पसरता जमिनीमध्ये त्याचा निचरा होई. वसाहतीचा विस्तार मात्र योजनापूर्वक आढळत नाही. पाच घरांचा समूह तसेच सभोवताली अरुंद रस्ते अशी वसाहतरचना होती.
सातवाहनांच्या भरभराटीच्या काळात मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार आढळतात. रोमन मद्यकुंभ, रेड पॉलिश वेअर व मेगॅरियन वेअरसारख्या भांड्यांचे अवशेष रोम देशाशी असलेले सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधोरेखित करतात. विविध धातूंची सु. ४०० नाणी, निम-मौल्यवान पाषाणांपासून घडवलेले १००० मणी, असंख्य अर्चनाकुंडे, कानातील अलंकार, शंखाच्या बांगड्या, बौद्धधर्माशी निगडित प्रतीके असलेले दगडी पाटे मिळतात. यांव्यतिरिक्त काही धान्यांचे नमुने आढळले आहेत. यावरून तत्कालीन आर्थिक परिस्थितीची कल्पना करता येते.
भोकरदन उत्खननातील सर्वांत उल्लेखनीय वस्तू म्हणजे अप्रतिम हस्तिदंताची स्त्री-प्रतिमा कोरलेली आरशाची मूठ. ही प्रसाधन या वर्गात मोडणारी वस्तू प्रथमच स्तरनिबद्ध संदर्भासह अवगत झाल्याने तिचा काळ निश्चितपणे सांगता आला. त्याचप्रमाणे भोकरदन हे हस्तिदंतकलेचे एक केंद्र होते, असे अनुमानही करता आले. पाँपेई (इटली) व तेर (महाराष्ट्र, भारत) येथे सापडलेल्या हस्तिदंती प्रतिमांचे साधर्म्यही नोंद घेण्यासारखे आहे.
सातवाहन काळात भोकरदन विविध कलाकुसरीचे तसेच विविध उद्योगधंद्यांचे केंद्र होते, मात्र सातवाहनांच्या अस्तानंतर येथील वैभव लयास गेले. इसवी सनाच्या आठव्या शतकात येथे शैवपंथीयाचा प्रभाव होता, असे शेजारी असलेल्या शैलगृहावरून सांगता येते. मध्ययुगीन काळात येथे पुन्हा वसाहत झाली.
संदर्भ :
- Deo, S.B. & Gupte, R.S. Excavations at Bhokardan (Bhogvardhan): 1973, Nagpur University, Nagpur, 1974.
- Deotate, B.C., Joshi, P.S. & Parchure, C.N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
समीक्षक – अरुणचंद्र पाठक
Share this:
भोकरदन
भोकरदन
प्रकार : गढी
जिल्हा : जालना
उंची : 0
© Suresh Nimbalkar
रोमच्या इतिहासात मराठवाड्यातील पैठण, तेर, भोकरदन अशा गावांचा उल्लेख आहे...
रोमच्या इतिहासात मराठवाड्यातील पैठण, तेर, भोकरदन अशा गावांचा उल्लेख आहे…
मराठवाडा. दगडा धोंड्याचा प्रदेश. या भागावर दुष्काळाच्या अस्मानी संकटाचं सावट तर कायम असतंच पण शिवाय निजामाच्या सुलतानी राजवटीने देखील या प्रदेशाला हजारो वर्षे मागे नेलं. मराठवाड्याची ओळख एक मागास भाग अशी बनली.
पण एक काळ असा होता मराठवाड्याचा युरोपशी व्यापार चालायचा.
साधारण दोन हजार वर्षापूर्वी भारतात आलेल्या एका ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाच्या ग्रंथात हा उल्लेख केला आहे. तो म्हणतो
आणखी शोधा
रोम
आपण सारे अर्जुन
व्हिडीओ
कॅलेंडर
द डिसीव्हर्स
व्हिडिओ
video
“दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. भडोचपासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर.
हे तगर म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे गाव. या दोन शहरासोबत केळना नदी तीरावरील भोगवर्धन म्हणजेच भोकरदन हे देखील प्रमुख व्यापारी केंद्र होते असा उल्लेख आढळतो.
मराठवाड्याला महत्व आले ते सातवाहन वंशाच्या कारकीर्दीत.
दक्षिणेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या राजकुलाने मराठवाड्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत स्थान मिळवून दिले, तसेच साहित्यात आणि कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यास प्रवृत्त केले.
पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली.
अनेक व्यापारी मार्ग या शहरांवरून जात असत. इथल्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, मराठवाड्यातील कापड युरोपमध्ये निर्यात व्हायचे.
ही तीन शहरे महानगरे ( आजच्या भाषेत मेट्रोपोलिटन सिटी) म्हणून ओळखली जात होती.
या शहरांचा उल्लेख टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो.
१९५८ साली नागपूर विद्यापीठाने भोकरदन येथे केलेल्या उत्खननात सातवाहन कालीन अवशेष तर मिळालेच पण तत्कालीन नाणी, धातूच्या वस्तू, शंखाच्या बांगड्या, हस्तिदंती वस्तू सापडल्या.
यामध्येच एक हस्तिदंती स्त्रीमुर्ती सापडली ज्याची हुबेहूब प्रतिकृती युरोपात रोम मधील पॉम्पेई या शहरात सापडली.
ही मूर्ती जगभरात पॉम्पेई लक्ष्मी म्हणून प्रसिध्द आहे.
१९३८ साली इटली मध्ये पॉम्पेई लक्ष्मी एका लाकडी संदुकात सापडली. ही रहस्यमयी हिंदू मूर्ती हजारो किमी दूर इटली मध्ये कशी हा प्रश्न पडला व त्यातूनच पुढे अभ्यासकांना मराठवाड्याचा इटली रोमशी व्यापार पहिल्या शतकापासून सुरू होता हे लक्षात आले.
संत गोरोबा कुंभार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेरमध्ये रोमन लोकांची वसाहत होती अस सांगितलं जातं. तिथे आढळणारे रोमन भांडी याचा पुरावा आहेत.
सातवाहन काळातच दक्षिमापथ व रोमन व्यापारी मार्गावर लेण्यांची निर्मिती झाली.
अजिंठा येथील पहिल्या गटातील व पितळखोरे येथील लेणी याच काळातील होत.
आजही मराठवाड्यातील अनेक ठिकाणी उत्खनन केल्यावर मौर्यकालाच्याही आधीची आखीव रेखीव बांधलेली घरे, रस्ते, मंदिरे आढळून येतात. रोमन बनावटीची नाणी सापडतात.
याचाच अर्थ त्याकाळात मराठवाड्यात एक प्रगल्भ व्यापारी व नागरी संस्कृती नांदत होती.
ही शहरे भारतातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक होते.
मध्ययुगात अनेक पर्यावरणीय बदल घडून आले त्यातच हैद्राबादच्या निजामाने या भागाकडे दुर्लक्ष केले, इथल्या शेतकऱ्यांवर, कारागिरांवर जुलूम केला आणि मराठवाडा मागे पडत गेला.
आज मात्र मराठवाडा आपल्या मेहनतीने परत पायावर उभा राहत आहे असे चित्र दिसत आहे.
औरंगाबाद सारखे शहर औद्योगिक क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले नाव मिळवत आहे.
लातूर नांदेड जालना या शहरांनी देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठवाड्याचे गतवैभव परत येतील यात शंका नाही.
हे ही वाच भिडू.
प्राचीन भोगवर्धन येथील यादवकालीन रामेश्वर मंदिर
- साईली कौ. पलांडे-दातार
प्राचीन भोकरदनची वस्ती केळना नदीच्या काठी होती. १९५८ साली तत्कालीन मराठवाडा आणि नागपूर विद्यापीठाने तेथे उत्खनन पार पाडले. सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष तर मिळालेच सोबत आहत नाणी, मृण्मूर्ती, विविध मणी, धातूच्या वस्तू, शंखाच्या बांगड्या, बौद्ध धर्मातील पूजेच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू असा मोठा खजिना मिळाला. पण, सर्वात महत्त्वाची वस्तू होती एक सुबक हस्तिदंती स्त्रीमूर्ती जी दरवाजाची कडी म्हणून वापरात असावी. या मूर्तीसारखी दुसरी प्रतिकृती रोममधील पॉम्पि शहरात मिळाली. पॉम्पि शहर वेसुवियस ज्वालामुखीच्या उद्रेकात खाक झाले होते. या विलक्षण संबंधांवरून सातवाहनकालीन भारत-रोम व्यापारी देवघेवीची पुरेपूर कल्पना येते. उत्तर सातवाहन काळात येथे लज्जागौरी, शिवलिंग व नरसिंहाचे अंकन असलेल्या मृण्मुद्रा सापडल्या आहेत. सहाव्या शतकात, शंकरगण ह्या महिष्मतीस्थित कलचुरीवंशी राजाने भोकरदन भागातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख अभोणा ताम्रपटात मिळतो. ह्याच काळातील एक सुरेख वैष्णव खोदीव लेणं आजही केळणा नदीकाठी आहे. चालुक्य जयसिंह दुसरा याचा मांडलिक राष्ट्रकुट राजा कान्हारदेव याच्या ताम्रपटातील ‘विषय’ प्रत्ययावरून भोकरदन हे जिल्हास्तरीय ठिकाण होते, असे म्हणता येते.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
दंडकारण्य क्षेत्रातील उज्जैनच्या मार्गावरचे भोकरदन हे समृद्ध शहर होते, असे मार्कंडेय पुराणात उल्लेख सापडतात. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. केळनेतीरीच्या खोदीव लेण्यापासून, मुख्य वस्तीपासून काही अंतरावर यादवकालीन रामेश्वर मंदिर आहे. आज तिथे चक्रधर स्वामींचा ओटा आहे म्हणून महानुभाव मठ आहे व श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात यादवकालीन अवशेष विखुरले आहेत. मंदिर पूजेत असल्यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली आहे व जागेत बदल केल्यामुळे मूळचे स्वरूप समजणे जरा कठीण झाले आहे. मंदिर उंच पिठावर बांधले आहे. पायऱ्यांवर मध्ययुगीन नक्षीकाम आहे. दर्शनी भागी दोन ते तीन फूट उंचीची भिंत आज शिल्लक आहे.
मंदिराची मुख्य द्वारशाखा आकर्षक असल्यामुळे लक्ष वेधून घेते. पंचशाखा द्वारशाखेवर रत्न व स्तंभ शाखा ठळक असून, इतर शाखा साध्या आहेत. मंदिराला ललाटबिंब व वरचे शिल्पकाम शिल्लक नाही. सभामंडप बंद होता की अर्धखुला, याची आज कल्पना करता येत नाही. शिखराचा कुठलाच भाग आज शिल्लक नाही. सभामंडप चौकोनी असून पंचरथ आहे. खुर, कणी, कुंभ असे नक्षीविरहित थर आहेत. त्यातील कुंभ भागावर रत्नांची पट्टी सर्व मंदिराभोवती फिरते. सभामंडपाच्या भिंती आधुनिक असल्या तरी मधल्या जागेतील चतुष्की अजून अबाधित आहे. मधला स्तंभ मध्यावर आणि स्तंभांच्या तळाशी अप्रतिम शिल्प केले आहे. नागशीर्ष असलेले स्तंभ वरपासून वर्तुळाकार, चौरस, अष्टकोनी, चौरस अशा विविध आकाराच्या आडव्या छेदाचे आहेत. स्तंभ तळावरील मूर्तींमध्ये विविध सूरसुंदरी व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बहुतांशी मूर्तींच्या हातात म्हाळुंग दिसते.
महिषासुरमर्दिनी रेड्याचे शीर कापून बाहेर पडणाऱ्या महिषासुर दैत्याशी भाल्याने लढताना दाखविली आहे. एका स्तंभावर चामुंडा व खटवांग त्रिशूळ घेतलेला भैरव नृत्य मुद्रेत दाखवले आहेत. वाली सुग्रीवाच्या द्वंद्वाचे प्रभावी शिल्पांकन दोन तीन स्तंभ चौकटीत केले आहे. तर बाजूच्या चौकटीत राम लक्ष्मणाबरोबर उभा असून, बाण मारताना दाखवला आहे. काही दृश्यांमध्ये वानरांचे राक्षसाशी युद्ध दाखवले आहे. राम व लक्ष्मणाच्या हातात पुरुषभर उंचीचे धनुष्य कोरले आहेत व हातात बाणांचा जुडगा दिसतो. रामायणातील रामाद्वारे सुवर्णमृग रूपातील मारिच वधाचे अंकन ही प्रभावी आहे. नृत्यमग्न सुंदरी, वादक, वानर सभा अशी आणखी काही दृश्ये कोरली आहेत. बलशाली भीम, एका हाताने हत्तीचा पाय धरून भिरकावतानाचे महाभारतातील प्रसंग इथे कोरला आहे. विविध केशभूषा असलेल्या मनुष्यांची ढाल, तलवार व भाल्यांची लढाई उत्कृष्ट कोरली आहे. सभामंडपात चक्रधर स्वामींचा ओटा आहे व गाभाऱ्याच्या जागेत स्वामींचे पाषाण आणि श्रीकृष्णाची आधुनिक मूर्ती पूजल्या आहेत.
भोकरदनला दुसऱ्या तिसऱ्या
शतकापासून वैष्णव देवता, तसेच लज्जागौरी स्वरुपातील देवीची पूजा प्रचलित
होती, असे दिसते. तसेच, सहाव्या शतकातील वैष्णव लेण्यामध्ये, शेषशायी
विष्णू, मदन, बलरामांची शिल्पे कोरलेली आढळतात. तेराव्या शतकातील रामेश्वर
मंदिरातही द्वारपाल वैष्णव आहेत. तसेच मंदिरावर रामायण महाभारतातील प्रसंग
कोरले आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचा ह्या भागात
खूप संचार असे व ते बऱ्याचदा अशा मंदिरांमध्ये आसरा घेताना दिसतात. वैष्णव
मंदिरात मुक्काम करणे तर अधिकच संयुक्तिक वाटते. मधल्या संक्रमणाच्या काळात
मूळ मंदिराचा विध्वंस झालेला आहे. किंबहुना ह्या भागाचे आधीचे नाव बेचिराग
आहे, असे ऐतिहासिक नोंदींवरून समजते. ह्या धामधुमीच्या काळातही इथल्या
कृष्णासंबंधित पौराणिक संदर्भ जिवंत राहिले, तसेच महानुभाव संप्रदायाने
चक्रधर स्वामींचे ठिकाण ओळखून त्याचा जीर्णोद्धार केला. एकापरीने अनेक
स्थित्यंतरांमधूनही वैष्णव केंद्र असलेल्या भोगवर्धनाचे ऐतिहासिक आणि
धार्मिक महत्त्व ढळले नाही, ही विलक्षण गोष्ट आहे. आज मात्र, भोगवर्धनाच्या
गतवैभवाची नव्याने ओळख करून त्याच्या संवर्धनासाठी आवश्यकता आहे!
( sailikdatar@gmail.com )
राजुरेश्वराला ' अ' दर्जा; भोकरदन तालुक्याच्या वैभवात भर: 157 गावांचा भोकरदन तालुका जिल्ह्यात मोठा
भोकरदन तालुक्यात १५७ गावे असून िजल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याला इतिहासाची व सांस्कृतीक वारसाची परंपरा लाभलेली आहे. तालुक्यात प्राचीन देवस्थाने, तुकाई लेणी, हेमाडपंती मंदीर असा प्राचीन वारसा भोकरदन तालुक्याला लाभलेला आहे. तालुक्याच्या

राजुरेश्वराच्या मंदीर परिसरात िवविध विकास कामे सुरू आहे. भोकरदन तालुक्यात अनेक मोठी गावे, बाजारपेठा आहे. भोकरदन शहर हे केळणा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे प्राचीन काळातील भोगवर्धन चे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजू असलेल्या टेकड्याच्या रूपाने दृष्टीस पडतात. सातवाहन काळामध्ये भोकरदन हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८ मध्ये पुरातत्त्वज्ञ अभ्यासक मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावरते होते. श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वराच्या दर्शनासाठी पहिले बाजीराव पेशवे यांनी सन १७२२ मध्ये आले होते. आणि १०० किलो वजनाची पंचधातूने बनवीलेली घंटा मंदीरास भेट म्हणून िदलेली आहे. अनेक इतिहासीक दाखले राजूरशी सलग्न आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात गेल्या दशकामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग तयार झालेले आहेत. भोकरदन तालुक्यातील कुंभारी हसनाबाद ,जवखेडा खुर्द, चांदई एक्को, राजूर, अकोला देव, देऊळगाव राजा हा राष्ट्रीय महामार्ग ३१८ कोटी रुपये निधी खर्च करुन तयार करण्यात आला आहे. माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून िवकासाला चालना िमळत आहे. राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भावीक पर्यटकांसाठी दीड कोटी रूपयांच्या िनधीतून टॉय ट्रेन सुरू होत आहे. तसेच १० कोटी रूपयातून रत्नालय तलाव व परीसराचा िवकास साधला जाणार आहे. बाणेगाव मध्यम प्रकल्प व चांदर्इ एक्को मध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या पाण्यावर भोकरदन तालुक्यातील १०० गावांची तहान भागत आहे.
राजूरसह तालुक्याचा सर्वांगीण िवकास ^श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वरासह इतर धार्मिक स्थळे जागृत देवस्थान आहेत. जिल्ह्याचे आराध्य दैवत राजुरेश्वराचा सर्वांगिण विकास साधला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या िवशेष प्रयत्नातून तर आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळत आहे. -प्रतिभाताई भुजंग, सरपंच, राजूर
लेणीतील मौल्यवान शिल्पे नष्ट
भोकरदन
- शहराजवळील ऐतिहासिक लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पूर्ण
लेणी कित्येक वर्षांपासून दर पावसाळ्यात गळत असल्याने लेणीमधील सर्व
मौल्यवान शिल्प नष्ट झाली आहेत.
जोरदार पावसाने लेणीतील अनेक शिल्प
पाण्याखाली आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी नवीन माहितीचे फलक लावले आहे
त्यात सात खोल्याऐवजी सहाखोल्यांचा उल्लेख करण्यात आल्याने पुरातत्व विभाग
या लेणी संदर्भात किती दक्ष आहे हे सिद्ध होते.
शहराजवळील ऐतिहासिक लेणी
हे स्मारक महाराष्टÑ प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व
अवशेष अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले
आहे.
गेल्या काही वर्षांपासून या स्मारकाकडे पुरातत्व विभागाचे
दुर्लक्ष झाल्याने या लेणी मधील अप्रतिम व मौल्यवान शिल्पे सततच्या पावसाने
व दुर्लक्षित झाले आहे. किंबहुना पावसाच्या पाण्याने या लेणीमधील नवव्या
शतकातील शिलालेखही गायब झाला आहे. भोकरदनची ही लेणी केळणानदीच्या डाव्या
तीरावर वसलेली आहे. भोकरदन पूर्वी प्राचीन काळात भोगवर्धन म्हणून परिचित
असले तरी भोगवर्धनचा उल्लेख सुरवातीच्या काही प्राचीन ब्राम्ही
शिलालेखांमध्ये आढळतो. त्यानुसार येथील रहिवासी धार्मिक प्रवृत्तीचे,
दानकर्ते व तत्त्वज्ञानी असल्याचे सिद्ध होते. दुहेरी दालनाच्या या लेणी
असून त्यामागे सात खोल्या आहेत. लेणीमधील मंडपातील स्तंभ सपाट असून ते
भक्कम होते, परंतु गेल्या काही वर्षात या स्तंभावरील मौल्यवान शिल्पे नष्ट
झाली आहेत. उजव्या व डाव्या भिंतीवरील पूर्ण व जुन्या काळातील शिल्पकाम
खराब झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. दरम्यान लेणीमधील सर्व शिल्पकला ज्या
पद्धतीने जोपासली व काळजीने जपायला पाहिजे होती, त्या पद्धतीच्या उलट
दुर्लक्ष झाल्याने ही लेणी होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली
आहे. लेणीमधील सर्वच भिंतीवरील शिल्प सततच्या पावसाने जीर्ण झाले असून ते
खराब झाले आहे.
सध्या लेणीमधील सात खोल्या पावसाने गळत असून त्यात
मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. लेणीसमोरील भागात मोठ्या प्रमाणावर पाणी
असून शेवाळ तयार झाले आहे. एकू णच या ऐतिहासिक लेणीचा विचार केला तर ही
लेणी आता केवळ कागदावर लेणी दिसत असून या संदर्भात पुरातत्व विभागाने
तातडीने लक्ष घालून हा ऐतिहासिक ठेवा जपावा, अशी मागणी होत आहे
कागदी घोडे
- भोकरदनच्या लेणीमध्ये पाणी साचत असल्याचा अहवाल तेथील कर्मचा-याने दिला
आहे. लेणीमधील शिल्पाचे पाण्या पासून सरंक्षण करणे, लेणीच्या परिसरात
साचलेले पाणी काढणे आदी कामांसदर्भातचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मुंबर्र
येथील पुरातत्व विभागाकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर येथील कामे
करण्यात येतील.’’ - एस. ए. शेख, पुरातत्व विभाग, औरंगाबाद
भोकरदनची शान गेली
- भोकरदनची ऐतिहासिक लेणी म्हणजे जिल्ह्याची ख-या अर्थाने शान होती. काही
वर्षांपासून या लेणीकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केल्याने
पर्यटकांनीदेखील याकडे पाठ फिरवली आहे. जुन्या इतिहासात, पुरातत्व
खात्याकडे या लेणीची नोंंद असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा
प्रश्न या अनुषंगाने निर्माण झाला आहे. ही लेणी आता पूर्णत: नष्ट
झाल्यासारखी असल्याने भोकरदनचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर
आहे.’’ - रमेश बिरसोने, नागरिक, भोकरदन
टाकळी भोकरदन
प्रकार : गढी
जिल्हा : जालना
स्वतंत्रपुर्व काळात मराठवाडा निजामाच्या शासनाखाली असल्याने तेथील प्रशासन
व्यवस्था पुर्णपणे वेगळी होती. या भागात महसुल गोळा करण्यासाठी असलेले
केंद्र हे गढी स्वरूपात होते. याशिवाय काही मातब्बर सरदारांनी तसेच
जमीनदारांनी देखील स्वतःच्या संरक्षणासाठी वाड्याभोवती गढीवजा कोट बांधले
होते. यामुळे मराठवाड्याची भटकंती करताना आपल्याला मराठवाड्यात असंख्य
गढीवजा कोट पहायला मिळतात. भोकरदन जवळील टाकळी या गावात केळणा नदीकाठी
असलेल्या लहानशा टेकडीवर आपल्याला अशीच एक उध्वस्त गढी पहायला मिळते.
काळाच्या ओघात या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरी काही भिंती व
दोन बुरुज आजही आपले अस्तित्व राखून आहेत. स्थानिक लोक येथील दगड माती आपली
घरे बांधण्यासाठी वापरात असल्याने हे अवशेष देखील काळाचेच सोबती आहेत.
महाराष्ट्रात टाकळी नावाची अनेक गावे असुन जालना जिल्ह्यात भोकरदन
तालुक्यात एक व जाफराबाद तालुक्यात एक अशी दोन गावे आहेत. महत्वाचे म्हणजे
हि दोन्ही गावे केळणा नदीच्या काठावर भोकरदन –जाफराबाद या वाटेवर आहेत. आपण
आता भेट देत आहोत ते गाव भोकरदन तालुक्यात असल्याने टाकळी भोकरदन म्हणुन
ओळखले जाते.
टाकळी भोकरदन हे गाव भोकरदन या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५ कि.मी. अंतरावर
तर जाफराबाद येथुन २५ कि.मी.अंतरावर आहे. हे गाव भोकरदन –जाफराबाद
महामार्गावरील सिपोरा बाजार या फाट्यावरून साधारण ५ कि.मी. आतील बाजुस आहे.
मध्ययुगीन काळात जाफराबाद व भोकरदन हि दोन्ही महत्वाची शहरे असल्याने या
दोन्ही शहरात व्यापार उदीम असणे साहजिकच होते. मराठवाड्यातील पाण्याची
कमतरता पहाता या दोन्ही शहरामध्ये होणारा व्यापारी तसेच सैन्य प्रवास हा
केळणा नदीच्या काठाने होत होता. त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी
केळणा नदीच्या काठावर एक संरक्षित ठाणे म्हणुन या गढीची बांधणी झाली असावी.
नदी पार करून टाकळी गावात प्रवेश केल्यावर एक लहान रस्ता जुन्या टाकळी
गावात जातो. या वाटेवरच डाव्या बाजुला नदीकाठी एका टेकाडावर गढीचे अवशेष
पहायला मिळतात. या टेकडावर आज एकही बुरुज दिसत नसला तरी खाली उतारावर
पांढऱ्या मातीचे दोन बुरुज व तटबंदीच्या भिंती पहायला मिळतात. या बांधकामात
असलेले दगड गढीच्या आसपास असलेली घरे बांधण्यासाठी वापरले आहेत. गढीपासुन
काही अंतरावर घडीव दगडात बांधलेल्या चार समाधी आहेत. या समाधी गोसावी
समाजाच्या असुन गिरी घराण्यातील असल्याचे स्थानिक सांगतात पण गढीबद्दल
त्यांना काहीच माहीती सांगता येत नाही. मराठवाड्याचा हा भाग निजामाच्या
ताब्यात असल्याने व गढीचा वापर निजामकाळातच बंद झाल्याने गढीचा इतिहास
ज्ञात नाही. गढीचे फारसे अवशेष शिल्लक नसल्याने गढी व समाधी पहाण्यासाठी १५
मिनिटे पुरेसी होतात.
© Suresh Nimbalkar
भोकरदन (भोगवर्धन)
https://tinyurl.com/y4wf9twv
This is an addendum to: “यक्षं पूजितं धनं -- सायण on RV V.70.4, 'manifestation'; Pompeii yakṣi, कुबेरपत्नी in ivory from Bhokardan (Maharashtra) https://tinyurl.com/y63csavu
--Bhokardan is a town and a municipal council in Jalna district in the state of Maharashtra, India. Bhokardan has been identified by the modern historians as a capital city of an ancient Janapada Bhogavardhana. "One of the earliest references of Bhokardan is found in Markandeya Purana, where it is described as a prosperous trading city in Dandakaranya area, located on the trade route from Ujjayini, in central India to Pratiṣṭhāna, then capital city of Sātavāhanas. Similar, references were also found in various other ancient literature. In earlier period Bhokardan was a Janapada, which later got status of an independent region. Bhokardan was the third richest city in Sātavāhana period after Prathishthana and Ter. The inscription records at stupas of Bharhut and Sanchi, mention receiving donations from inhabitants of this city for their construction. There is a reference in an article from 593 AD that, the king of Mahishmati, Rājā Śankargaṇ, of Kālācūri dynasty, has donated some land to a Brahmin in Bhogvardan region."(Degulkar, G.B. "भोकरदन". मराठी विश्वकोश (Marathi encyclopedia). Mumbai: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. https://en.wikipedia.org/wiki/Bhokardan)
--Bhoi 'village accountant', vyokāra 'blacksmith', bhōhkāra 'rule of address'
Bogra or Bhokardan literally means, 'the village of blacksmiths'. Bho is a traditional, respectful salutation.
There is an inscription in Sanchi which signifies that dantakāra 'ivory workers' made a donation at Sanchi stupa temple. These are ivory workers from Begram (Afghanistan) who created the splendid monuments at Sanchi (Besnagara).I submit that the blacksmiths of Bhokardan produced the ivory statuette of Pompeii yakṣi, in the tradition of Begram ivory artisans.
I suggest that the name of the village Bhokardan (Maharashtra) is significant and explains ancient history of Bhāratam Janam. The cognate expressions are vyokāra-sthāna 'blacksmith place'; bhōhkāra 'rule of address'.
abhi-vāda m. reverential salutation, Mn. ii, 120 ; Gaut.(Monier Williams)
अभिवादनम्
Abhivadaye (Sanskrit: अभिवादये abhivādaye) is a religious practice among Hindu men to introduce themselves to others especially the elders. It is practiced even today widely among the Brahmins. A traditional method of introducing oneself and performing namaskaram to a guest is to announce one's name together with name of pravara, gotra, author one follows, branch of Veda versed in; a typical abhivādaye (salutation) is expressed as in the following example:
Abhivādaye Kauśika or Harita gotra, Trayārṣeya (Pravara), āpasthambha Sūtrah (Sutra)
R̥k or Yajuh-śākhādhyāyī (Veda)
Śrī Rāma śarmā nāma aham asmi (Name)
Bhoh (Salutations)
Translation: I am saluting, having three Pravara Rishis Viśvāmitra, Aghamarṣaṇa and Kauśika, of Kauśika or Harita Gotra, following the rules or manual of āpasthambha, learning the branch of Veda called Yajur or R̥k. I am Śrī Rāma śarmā by name. Your Honour.
ଭୋଃ— Bhoḥ ସଂ. ଅ—(ସମ୍ବୋଧନ)— ଭୋ (ଦେଖ) Bho (See)
vyo-kāra m. (prob.) ‘making the sound vyo’, a blacksmith, Hcar. (Monier-Williams)





































.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)











.jpg)




















































No comments:
Post a Comment