नाशिक ला पूर्वी दंडाकार्याना म्हटले जायचे . पूर्वी नाशिकपासून पुढे दक्षिण भाग सूर होत असे . आणि असुरांचे देखील साम्राज्य इथूनच सूर होत असे . म्हणूनच राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्या गुरु च्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम यांनी यांनी नाशिक ची निवड केली पूर्वीचे ( दंडाकार्याना)
आणि या ठिकाणी गोदावरीच्या तीरी एक कुटी बांधून राहत असे आता आपण त्याला पंचवटी असे म्हणतो . याच ठिकाणाहून रावणाने हे सीतेच हरण केले होते. आणि याच ठिकाणी लक्षुमणानें रावणाची बहीण शुर्पनखाचे नाक कापले होते ,त्या नंतर नाशिक ला नाक कापले म्हणून नास्तिकापूर देखील म्हटले जायचे ,आणि नंतर नास्तिकापूरचे नाशिक झाले अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाशिक च्या मधोमध गोदावरी हि नदी वाहते आणि आणि हि नदी नऊ टेकड्यांच्या मधून वाहते ,आणि टेकडीचा संस्कृत अर्थ 'शिखा 'असा देखील होतो म्हणून नाशिक ला पूर्वी नवशिखा म्हणून देखील संबोदले जायचे . पूर्वीपासून नाशिक च्या आसपासचा भाग विविध नावांनी ओळखल्या जायचे . जनस्थान ,गुलशनाबाद ,त्रिकंटक ,नासिक आणि आत्ताचे नाशिक असे पाच नावांनी नाशिक पूर्वीपासून नावारूपाला आले .
देशातील महान अशा चार कुंभमेळ्यांपैकी एक कुंभमेळा नाशिक च्या गोदावरी नदी तीरी म्हणजेच पंचवटी येथे भरतो . आणि येथे अनेक शाहीस्नान देखील होते ..नाशिक पासून जवळच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्रंबकेश्वर चे ज्योतिर्लिंग असून त्या ठिकाणी देखील कुंभमेळा भरतो .
नाशिकची भौगोलिक माहिती -
नाशिक जिल्हा सह्याद्रीच्या दख्खन पठारावरील उतरत्या भागावरील जिल्हा आहे . या जिल्ह्यात पूर्ववाहिनी गोदावरीनदी आणि पश्चिमवाहिनी तापीनदी या नद्यांचे खोरे येत असल्याने या जिल्हाच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूरचनेत मोठया प्रमाणावरती बदल हे होत असतात . सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडून दक्षिण भागाकडे जाते . उत्तर भागाच्या पश्चिमेस १३००मीटरपासून पूर्वेकडे ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग आहे .त्यामधील मांगीतुंगी डोंगराची उंची १३३१ मीटर आहे . या पर्वत रांगेत पूर्वेकडे हिंदबारी खिंडी ,थेरमाळ आणि गाळण किल्ला आहे . गाळणाकिल्याच्या टापूत रस्त्यात एक खिंड आहे . दक्षिणेस घोलबारी डोंगररांग आहेत . या रांगेची उंची १६१३ मी . असून या रांगेत घोलबारी खिंड आहे . या रांगेच्या दक्षिणेस सातमाळा किव्हा चांदवडचे डोंगररांग ( अजिंठा) आहे . हि पूर्वेकडून ईशान्यपर्यंत पसरलेली आहेत . तिची उंची ११०० ते १३५० इतकी आहे . या रांगेत सप्तशृंगीगड हा १४०० मी. उंचीचा असून अचल व जावाता हे किल्ले अरुंद व सपाट आहेत . या रांगेच्या दक्षिणेकडे बाणगंगा नदी दरम्यान रामशेज डोंगर आहे . त्याच्या पूर्वेकडे चांभारलेणी हि जैनलेणी आहे . सातमाळेच्या दक्षिणेकडे भास्करगड - अंजनेरी डोंगर आहेत . भास्करगडाच्या पूर्वेस हरिहर किल्ला असून त्या ठिकाणी अजून तीन वेगवेगळ्या टेकड्या आहेत त्याला त्रिरेश्मी टेकड्या देखील म्हणतात . त्यातील एकदम पूर्वेकडील त्रिशर्थी डोंगरावरती पांडवलेणी आहे .
नाशिक मधील प्रमुख नद्या आणि धरणे
गोदावरी हि नसिक जिल्ह्याची प्रमुख नदी असून तिचा उगम हा नाशिक मधूनच होतो आणि ती थेट बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते . तसेच नाशिक ची दुसरी सर्वात मोठी नदी आहे ती म्हणजे गिरणा नदी .या व्यतिरिक्त वैतरणा ,मोसम ,दारणा ,वालदेवी, कादवा ,देव ह्या महत्वाच्या नद्या आहेत .गोदावरी व गिरणा नदीला बारा हि महिने पाणी असल्यामुळे नाशिकचे मोठया प्रमाणावरील क्षेत्र हे सुपीक झालेले आहेत .
नाशिक ला धरणांचा जिल्हा देखील म्हणता ,गोदावरीच्या पाण्यावरील गंगापूर धारण हे भारतातील एकमेव मातीचे सर्वात मोठे धरण आहे . गंगापूरचे धरणातील पाणी नाशिक ,अहमदनगर औरंगाबाद ,पेठ सुरगाणा ,येवला ,मनमाड आणि गुजरात अशा जिल्ह्याना आणि तालुक्याला पाणी पुरवते . त्याच प्रमाणे वैतरणा धरणाचे पाणी हे अर्ध्या मुंबईची तहान भागवते . या व्यतिरिक्त दारणा ,बाहुली ,अंजनेरी ,कडवा ,काश्यपी ,गिरणा ,भाम ,मुकणे ,कडवा,कानोले,केळझर,अशी अनेक छोटीमोठी ३० च्या आसपास धरणे आहेत .
नाशिक जिल्ह्याचे हवामान आणि पाऊस
नाशिक चे हवामान साधारण सर्व ऋतूंना पूरक असेच असते . मार्च च्या मध्यापासून जून पर्यंत उन्हाळा असतो तेव्हा साधारण उष्ण तापमान ३८ ते ४० सेल्सिअस पर्यंत असते . जून महिण्याच्या मध्यापासून ऑक्टोबर पर्यंत साधारण पाऊस हा २००० मी .मी इतका पडतो .त्यात सुरगाणा ,इगतपुरी ,पेठ ,ह्या भागात जास्त पाऊस पडतो . नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पर्यंत थंडी हि असते तापमान साधारण ८ ते १० सेल्सिअस इतके असते .सर्वात जास्त कमी तापमान हे निफाड तालुक्यात असते साधारण ५ ते ७ सेल्सिअस .
लोकसंख्या ग्रामीण आणि नागरी
२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हि ४९,८७,३४५ असून त्यात पुरुष २५,९१,९८० व महिला २३,९५,९३४ आहेत . लोकसंख्या वाढीचा दर हा प्रत्येकी दहा वर्ष्यानी २९. % आहे जो इतर राज्यां पेक्षा ६% जास्त आहेत .
एकूण लोकसंख्येपैकीं ६१. १७ % लोक हि खेड्यात राहतात तर एकूण शहरी लोकसंख्येपैकीं ५८. ४८% लोक नाशिक तर २३. १६% लोक मालेगाव शहरात राहतात .
नाशिक मधील तालुके
* कळवण * इगतपुरी * चांदवड * देवळा *सुरगाणा *पेठ *निफाड *दिंडोरी
*येवला *सिन्नर *नांदगाव *सटाणा *मालेगाव (ग्रामीण) *त्रंबक *नाशिक ( ग्रामीण)
नाशिक पर्यटन
त्रंबकेश्वर मंदिर ( ३०किमी नाशिक )
पांडवलेणी गुफा ( १०किमी)
रामशेज किल्ला ( १५ किमी )
RAMKUND
पंचरथी मंदिराचं देवळी कराड
नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगत असतं. कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचरथी मंदिराने नटलेलं आहे.
मानवाची मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृतीचे आध्यात्मिक अंग आणि भौतिक सृष्टी वा वास्तूरूप सृष्टी म्हणजे आधिभौतिक अंग. पहिल्यात धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य आणि कला यांचा समावेश होतो, तर दुसऱ्यात ऐहिक स्वास्थासाठी निर्माण केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. तसेच नाशिकच्या मनोमय सृष्टीतील प्राचीन कलावैभवाच्या पाऊलखुणा प्रत्येक गावांमध्ये विखुरलेल्या दिसतात. प्राचीन लेणी, किल्ले, वाडे, मंदिरे, शिल्पे, नाणी, शिलालेख, बारव, वीरगळी अशा अनेक लहानमोठ्या कलाकृतींचा अनुभव पावलोपावली घेता येतो. या सर्वांतून माणसाचं जगणही उलगडतं. समाजपुरूषाचा देह आणि त्याचा आत्मा याचे यथार्थ ज्ञान व्हायचे तर त्याची आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचना कशी आहे हे उलगडून पाहणे गरजेच ठरते. आत्माशिवाय देह जसा सचेतन असूच शकत नाही तसेच आधिभौतिक अंगाशिवाय केवळ आध्यात्मिक समृद्धीमुळे संस्कृती संपन्न ठरत नाही. संस्कृतीचा सर्वार्थाने विचार करावयाचा असेल तर या दोन्ही घटकांचा विचार आवश्यक असतो.
प्राचीन भारतीय स्थापत्याचा, शिल्पांचा आणि चित्रांचा उपयोग आधिभौतिक संस्कृती समजण्यासाठी होतो. एवढेच नव्हे तर मंदिर-स्थापत्य आणि मूर्तिशिल्पांतून त्या समाजाची आध्यात्मकि बाजूही समोर येते. ही मंदिरे इतिहासाचं अंतरंग उलगडत असतात. म्हणून हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा वारसा हरवला तर आपलं आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचनाच उलगडली जाणार नाही अन् माणसानं ही मंदिरे का बांधली याचं कोडही कधी उलगडलं जाणार नाही. म्हणूनच कळवण तालुक्यातील देवळी कराड (कऱ्हाड) हे गाव मनाला भुरळ घालतं. या गावातील महादेव मंदिर एका अनोख्या शिल्पसौंदर्याचा साक्षीदार असल्याचा पुरावा देतं. नागर शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नाही तर ग्रामस्थांच्या दृष्टीने हा एक रथ आहे. या रथाला पंचरथ अथवा पंचरथी असेही ते म्हणतात. देव एखाद्या रथावरून स्वार होण्यासाठी सज्ज झाल्याचा भास या मंदिराकडे पाहिला की होतो. मूळात रथ ही संकल्पना शिखराच्या निमुळत्या होत जात असलेल्या शैलीच्या थरावरून जरी ठरत असली तरी ग्रामस्थांच्या पंचरथ या अनोख्या संकल्पनेला दादच द्यावी लागते, म्हणूनच देवळी कराडची सफर शिल्पसौंदर्याने नटलेली ठरते.
नाशिकहून दिंडोरी मार्गे वणीत जायचे. वणीतून एक रस्ता सप्तशृंगीकडे जातो, तर दुसरा सापूताऱ्याच्या दिशेने हतगडकडे. वीस किलोमीटर गेल्यावर हतगडपूर्वी बोरगाव लागतं. बोरगावातून उजव्या हाताला खिराड गावाकडे जाणारा रस्त्याने देवळी कराड (कऱ्हाड) कडे जाता येतं. जागोजागी रस्त्याला फाटे असल्याने विचारत विचारत जाणे कधीही योग्य. देवळी कराडमध्ये शिरताना लांबून काळ्याभोर शिखरावर भगवा फडकताना पाहिला की जीव भांड्यात पडतो. योग्य ठिकाणी अखेर पोहचल्याची ही खूण मनाला दिलासा देते. गावातून उजव्या हाताच्या रस्त्याने थेट मंदिरासमोरील पिंपळाच्या बलाढ्य झाडाच्या छायेत आपण पोहचतो. धाकट्या भावाप्रमाणे हे झाड या मंदिराचा सांभाळ करीत असेल, असे त्या वृक्षाच्या विस्ताराकडे पाहिले की वाटायला लागते. नाशिक परिसरात भूमिज शैलीतील मंदिरे सर्वाधिक आहेत. मात्र नागर शैलीतील मंदिरे तशी कमीच आढळतात. त्यामुळे देवळी कराडचे नागर शैलीतील चांगल्या स्थितीतील महादेव मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हे मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोषित केले आहे. मात्र या मंदिराच्या शैलीबद्दल कोणताही फलक नसल्याने येथील ग्रामस्थ या मंदिराला हेमाडपंती मंदिर असेच म्हणतात.
नागर शैलीतील या मंदिराचे वैशिष्ट्य ‘प्रासादमंडन’ या प्राचीन संस्कृत ग्रंथातील तृतीय अध्यायात दिलेली आहेत. यातील पंचरथी मंदिराच्या संकल्पनेत हे मंदिर तंतोतंत बसते. पीठ, मध्यमपीठ, कनिष्ठ पीठ, जाड्यकुंभ, कर्णिका, ग्रासपट्टी, गजथर, नरथर, अश्वथर आदी संकल्पना स्पष्ट होतात. या मंदिरावर माजी पुरातत्त्व अधिकारी शंकर साठे यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधातही याचे हे अनोखे वर्णन प्रत्यक्ष अनुभवताना प्राचीन वास्तूशास्त्रज्ज्ञांचे नवल वाटते. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय साकारलेले मंदिर हातांनी साकारलेले असेल यावर विश्वास बसत नाही. प्रथम दर्शनीच हे मंदिर रथासारखे भासते. नागरशैलीच्या वैशिष्ट्यांमध्ये शृंग, उरशृंग किंवा अंग, प्रत्यंग, रथिका (कोनाडे), शुकनात आणि शेवटी कलशासह आमलक हे सर्वकाही देवळी कराडच्या मंदिरात पहायला मिळते. मंदिराचे छत हे संवरणा पद्धतीचे असून, ते आकाशाकडे निमुळते होत जाणारे आहे. तर गर्भगृहाचे शिखर आमलक व कलशाने आच्छादिले असल्याने हे मंदिर नागर शैलीचे असल्याचे शंकर साठे सांगतात. मात्र या मंदिरावर गुजराती शैलीचा प्रभावही दिसतो. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने हे मंदिर जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; तसेच ग्रामस्थांना देखील मंदिराचे महत्त्व समजावून सांगायला हवे, असेही ते सांगतात. गुजरात सीमेपासून जवळ हे गाव असल्याने त्यावेळी ज्या कोणी राजाने हे मंदिर बांधून घेतले असेल त्यावेळी गुजरातच्या कामगारांचा या सहभाग असेल, असे म्हणायला जागा आहे. म्हणूनच हे मंदिर पाहताना त्याच्या सर्व बारकाव्यांवर नजर टाकणे गरजेचे ठरते.
महादेव मंदिरात प्रवेश करताना चार-पाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण अर्धमंडपात येतो. अर्धमंडपात डावी-उजवीकडे कठडा आहे. वर निमुळते छत असून, चौकोनी स्तंभ त्याला आधार देत उभे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डावी उजवीकडे शैवद्वारपाल आपले स्वागत करतात. मंदिराला एकूण तीन द्वारशाखा आहेत. पैकी एक स्तंभनक्षीची आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी असून, त्यावर अस्पष्ट झालेली गणेश प्रतिमा आहे. मंदिराचे सभामंडप गूढमंडप म्हणजे बंदिस्त आहे. अगदी साध्या स्वरूपाचे सभामंडप असून, शिल्पांनी नटलेले खांबांवर ते आधारलेले आहे. स्तभांवर कीर्तिमुख, घटपल्लव कोरलेली आहेत तर किचकाने स्तंभाला आधार देत छत पेलले आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळ म्हणजे सभामंडप व गर्भगृह (गाभारा) यांच्यामधली जागा. प्रामुख्याने अंतराळ हे छत विरहित असते. मात्र येथे छत असून, त्यावर शुकनास आहे. अंतराळाच्या वर गर्भगृहाला जोडून पोपटाच्या शुकाच्या चोचीसारखे जे बांधकाम असते त्याला शुकनास असे म्हणतात. नागर शैलीचे हे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे शंकर साठे सांगतात.
अंतराळाच्या दोन्ही बाजूंना मूर्तीविरहीत कोनाडे आहेत. अंतराळाचा गुंग करणारा सोहळा अनुभवून गर्भगृहात प्रवेश करायला. गर्भगृहात जाण्यासाठी तीन-चार पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपींड तर समोरच्या देवळीवजा कोनाड्यात गणपती व उमामहेश्वराच्या मूर्ती आहेत. उमामहेश्वरांची मूर्ती सुंदर आहे. गर्भगृहात पूर्वी विहरिीसारखा खोल खड्डा होता, असे दशरथ गांगुर्डे व महेंद्र चौथरी सांगतात. हा खड्डा नंतर बुजविण्यात आला. येथून जाण्यासाठी बोगदाही होता, असेही ग्रामस्थ सांगतात. मात्र आता ना बोगदा आहे नाही पाणी. महादेव मंदिर आतून जेवढे सुंदर तेवढेच बाहेरूनही आहे. पीठ, उपपीठ, पद्मपट्ट, अधोजाड्यकुंभ, कणी, कीर्तिमुख व मिथुन शिल्प अनुभवायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रामुख्याने मूर्ती असतात; मात्र या मंदिराला भौमेतिक नक्षी आहे. मंदिर पाहून पिंपळाच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवायचा. या पिंपळाची मुळे गावभर पसरलेली आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. झाडाखाली काही मूर्ती व एक वीरगळ पहायला मिळेल. या वीरगळीकडे जरा निरखून पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज शिवपिंडीसमोर हात जोडून एक गुडघा जमिनीला टेकवून बसल्याचे पहायला मिळते.
तर शिवपिंडीवर चंद्र व सूर्य कोरण्यात आले आहेत. वीरगळीच्या दुसऱ्या बाजूला शिवधनुष्य पेललेला सैनिक व समोर शत्रू असे कोरण्यात आले आहे. तर तिसऱ्या बाजूला आडवा पडलेला मनुष्य दाखविण्यात आला आहे. छत्रपतींसारखी दिसणारी प्रतिमा आणि कळवणचा काय संबंध असाही प्रश्न पडतो अन् हतगड किल्ल्यामुळे हा प्रश्न सुटतोही. छत्रपतींनी सुरत लुटी दरम्यान या मार्गाने ये-जा केल्याने त्यांच्या सैनिकाची ही वीरगळ असावी, असे त्यावरील चित्रांवरून वाटते. देवळी कराड असे गावचे नाव का पडले असेल याचे उत्तर महादेव कोळी व कोकणा आदिवासींकडे नाही. हा समाज नंतरच्या काळात येथे स्थलांतरीत होऊन आला असणार; मात्र कराडला देवळी हे नाव मंदिरावरून पडले असेल, हे स्पष्टच आहे. देवळी कराडकरांचा महाशिवरात्री हा मुख्य उत्सव. या उत्सवात बोहाडा साजरा केला जातो. यासाठी जवळच्याच अस्तमाळ या गावातून सोंगं आणली जातात. ही परंपरा अजूनही कराडकरांनी जपली आहे. आगारीचा पाडवा म्हणजेच अक्षय्यतृतीयेला आदिवासी मंडळी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पूजापाठ करतात. यावेळी शिजविलेल्या भाताचे शिंतोडे घरावर व चुलीत टाकण्याची परंपरा आहे. तसेच डोंगरी देवाचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात मिरवणूक काढली जाते. गावातील चावडी ते धानीपर्यंत पालखी खांद्यावर काढली जाते. गावात मारूती मंदिरही आहे. पूर्वमुखी महादेव मंदिरासमोर व उजव्या हाताला देवळी कराड वसलं आहे. मातीची लहान लहान घरे, घरासमोर बैलगाडी अन् शेतीचे अवजारे लक्ष वेधून घेतात. देवळी कराडचं मुख्य आकर्षण महादेव मंदिर असल्याने ‘आमच्या कडं देवाशिवाय काय बी नाय’ असे ग्रामस्थ सांगतात.
मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्या वीरगळींचा समूह सोहळा अनुभवणे हा देखील अनोखा अनुभव ठरतो. त्यावरील सैनिकांची शिल्पे आपल्याला युद्धभूमीची आठवण करून देतात. वीरगळींच्या शेजारीदेखील दगडी बांधणीचे मोठे मंदिर असेल, असे आजूबाजूला पडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून लक्षात येते.
देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात.
डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/veshiwarchya-paulkhuna/pacharathi-temple/
खंडोबाची टेकडी

मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...

..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.

गाभार्यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.
अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ( महाराष्ट्राचे भरतपूर )
माफक शुल्कात शासनाने पार्किंग व निरीक्षण मनोऱ्यांची सोय केलेली आहे. त्यापैकी १-२ मनोरे काही दिवस पूर्णपणे पाण्यात असतात. गाईडची मदत घेऊन पक्ष्यांच्या जवळ जावून निरीक्षण करता येते. शासनाने खरेतर मोफत दुर्बिणींची सोय केली आहे मात्र त्या पैसे मोजून वापरण्यासाठी घ्याव्या लागतात. करकोचे, विविध प्रकारचे बगळे, खंड्या, पाणकावळे, बदके, कोतवाल, rice field pipit, टीटव्या, भारद्वाज इत्यादी देशी तसेच रोहित सारखे अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. पक्ष्यांबरोबरच पाणवनस्पती व कमळांच्याहि अनेक प्रजाती येथे पाहायला मिळतात.
गावातील काही हॉटेलांमध्ये चिकन म्हणून अभयारण्यातील बदकांच्या वापर केला जातो असे जेव्हा गुरख्यांकडून जेव्हा कळले तेव्हा वाईट वाटले. शासनाचे पर्यावरण विषयक अशामुळेच तर मागे पडत नसेल. शासनाचे सर्वच प्रयत्न व्यर्थ नाहीत का ? अनेक पक्षिमित्र या भागाला भेट देतात. येथील गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे. पक्षी मुळातच भित्रे त्यात मोटारींच्या वर्दळीमुळे आणि गोंगाटामुळे भविष्यात येथील पक्ष्यांची संख्याही जर कमी झाली तर यात आश्चर्य करण्याचे कारण नाही.
काळाराम मंदिर
रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.
पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
समस्या
- नाशिकमधील काळाराम मंदिरा बाहेर वाहनांनी आणि किरकोळ विक्रितेच्या दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे .यामुळे मंदिराचे सौंदर्य नाहीसे होत आहे .दर्शनासाठी होणारी भविकाची गर्दीला यामुळे अड़चन होते आणि आणखी कोंडी वाढती.
काळाराम मंदिराच्या परिसरात भुरटया चोरांचा सुळसुळाट झाला आहे .यांचा त्रास भाविकांना होतो.
राम मंदिरात गर्दीचे योग्य नियोजन नाही .यामुळे नेहमी मंदिराबाहेर गर्दी असते.
.jpg)
उपाय
मंदिरासाठी वेगळे वाहन तळ बनवले पाहिजे .जेणेकरून मंदिराबाहेर वाहने लावली जाणार नाही .आणि मंदिराचा परिसर मोकळ राहिल .
जे किरकोळ विक्रेते आहे त्यांना दुकानांसाठी वेगळी जागा दयावी .
रिक्षाचे वेगळे स्टैंड बनवावे .
.jpg)
· वाहनानसाठी बांधलेल्या तळसाठी माफक शुल्क असावे.
· मंदिराच्या परिसरात पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवावा जेणे करून चोरीचे प्रमाण कमी होईल. मंदिराची सुरक्षिता वाढेल.
· जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरा बसवावे .
· मंदिरात गर्दीचे योग्य नियोजन करावे.लोखंडाच्या रांगा बनवाव्या जेणे करून येणारे भविक हे रांगेतच मंदिरात जाऊन दर्शन घेतील.

काळाराम मंदिर हे फक्त नाशिककरांची श्रध्दस्थान नसून ते पूर्ण महाराष्ट्र आहे.काळाराम मंदिर पाहण्यासाठी विदेशातून लोक येतात.हे मंदिर नाशिकचा मान आहे त्याची प्रतिष्ठा राखणे आपले ही काम आहे.मनपाच्य उपाय योजना बरोबर आपणही मंदिराची स्वच्छता राखणे आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे.
आपलं नांदुरा
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा हे एक महत्त्वाचे शहर वसलेले आहे. १९३१ मध्ये ब्रिटीशांच्या काळात नांदुरा नगरपालिका स्थापन झाली.
सुरगाणा' संस्थान
इ.स. १७०० सालापासूनचा इतिहास आढळतो. एकेकाळी 'सुरगाणा' हे एक संस्थान होते. या संस्थानाच्या सरहद्दीपासून ५ ते ६ कि. मी. अंतरावर भदर हे आणखी एक छोटे संस्थान होते. तेही सुरगाणा संस्थानच्या अधिपत्याखाली होते.
धार संस्थानच्या परमार घराण्यातील राजे श्रीमंत रविराव, शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि शेवटचे राजे श्रीमंत धैर्यशिलराव पवार हे सुरगाणा संस्थानचे राजे होऊन गेले आहेत, तर देशमुख घराण्यातील श्रीमंत माधवराव खंडेराव देशमुख, यशवंतराव देशमुख, आनंदराव देशमुख, आणि शेवटचे राजे नारायणराव देशमुख हे भदर संस्थानचे राजे होऊन गेले आहेत.
सुरगाणा संस्थानचा 'मोतीबाग राजवाडा' अजूनही अस्तित्वात आहे. या राजवाड्याआधी दुसरा एक मोठा राजवाडा होता. मात्र फार पूर्वी तो जळून खाक झाल्याने हा मोतीबागेतील राजवाडा बांधण्यात आला होता.
प्रतापराव देशमुख यांच्या दरबारात एकदा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी एका गायकाने एक गाणे अतिशय सुरात गायले. गाणे ऐकून त्यावेळचे राजे प्रतापराव बेहद्द खुश झाले. छान सुरात गायलांस म्हणून गायकाचे कौतुक केले आणि “निंबारघोडी” ऐवजी “सुरगाणा” अशी संस्थानची नवी ओळख निर्माण केली.
सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये "हतगड" किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम हा "हतगड " किल्ल्यावर होता ,अशी आख्यायिका आहे.
'पवार' घराणे हे राजपुत. राजस्थानातील माउंट अबू हे त्यांचं मुळ स्थान. सुरवातीला पारमार या नावाने ते ओळखले जायचे. या घराण्याचे राजे भोज, राजे विक्रमादित्य यांची कारकीर्द गाजलेली. महाराष्ट्रातील सुरगाणा संस्थानाचे ते राजे. त्यांनी कोणत्याही साम्राज्यासमोर हार मानली नाही म्हणुन त्यांना 'बंदे मुल्क' म्हटलं जायचं.
सुरगाणा प्रांतांच्या भौगोलिक स्थितीमुळे शत्रुला लढाई अवघड जात असे. दोन्ही बाजुंनी डोंगर असल्याने सुरगाणा जिंकणे कठिण होते. इतकेच काय तर व्यापार किंवा इतर कारणासाठी गुजरात प्रांतात जाण्यासाठी किंवा तिकडुन येण्यासाठी सुरगाण्यातून जावे लागे. त्यावेळी इतरांना हा मार्ग वापरण्यासाठी कर द्यावा लागत असे.
पंचरथी मंदिराचं देवळीकराड
नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगत असतं. कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचरथी मंदिराने नटलेलं आहे.
गर्भगृहात जाण्यासाठी तीन-चार पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपींड तर समोरच्या देवळीवजा कोनाड्यात गणपती व उमामहेश्वराच्या मूर्ती आहेत. उमामहेश्वरांची मूर्ती सुंदर आहे. गर्भगृहात पूर्वी विहिरीसारखा खोल खड्डा होता, खड्डा नंतर बुजविण्यात आला. येथून जाण्यासाठी बोगदाही होता, असेही ग्रामस्थ सांगतात. मात्र आता ना बोगदा आहे नाही पाणी. महादेव मंदिर आतून जेवढे सुंदर तेवढेच बाहेरूनही आहे. पीठ, उपपीठ, पद्मपट्ट, अधोजाड्यकुंभ, कणी, कीर्तिमुख व मिथुन शिल्प अनुभवायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रामुख्याने मूर्ती असतात; मात्र या मंदिराला भौमेतिक नक्षी आहे. मंदिर पाहून पिंपळाच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवायचा. या पिंपळाची मुळे गावभर पसरलेली आहेत.देवळी कराड असे गावचे नाव का पडले असेल याचे उत्तर महादेव कोळी व कोकणा आदिवासींकडे नाही. हा समाज नंतरच्या काळात येथे स्थलांतरीत होऊन आला असणार; मात्र कराडला देवळी हे नाव मंदिरावरून पडले असेल, हे स्पष्टच आहे. देवळी कराडकरांचा महाशिवरात्री हा मुख्य उत्सव.
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदिला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदिला आपलं गुरु मानलं आहे. चला तर जाणून घेऊया या मागची आख्यायिका….अशी आहे या मागची आख्यायिका…
एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… या पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.
ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.
रामकुंडात विसावला नंदी
कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.
महाशिवरात्रीला होते मोठी गर्दी
आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पूजाविधी केले जातात. याशिवाय कपालेश्वर मंदिरात दर सोमवारी व श्रावणी सोमवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.
घोरपडे घाट व जुने त्र्यंबकेश्वर मंदिर
१९ व्या शतकातील घोरपडे घाट हा पेशवेकालीन घाट आहे. १८३१ साली तो बांधण्यात आला.
शिवाजी पुलाजवळ मुठा नदीच्या डाव्या काठावर बांधलेली ही पायऱ्या असलेली व किल्ल्यासारखी दिसणारी छोटेखानी दगडी वास्तू आहे. दैनंदिन विधी करण्यासाठी नदीच्या काठावर बांधलेल्या या घाटाच्या मागे मंदिराचे अवशेष दिसतात. पूर्वीच्या भांबुर्डा गावात असलेला हा घाट फेब्रुवारी १८३१ मध्ये पेशवे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज दौलतराव घोरपडे यांनी बांधला. चार बुरुज, एक भक्कम भिंत, नगारखाना आणि नदीच्या दिशेने उतरून जायला पायर्या अशा स्वरुपाचे या घाटाचे बांधकाम होते. तटबंदीच्या भिंतीला दोन खोल्याही जोडलेल्या आहेत. इतिहासकार दत्तो वामन पोतदर यांनी या घाटाला भेट दिल्याविषयी आणि तिथे १० फेब्रुवारी १८३१ असे कोरलेल्या दगडाविषयी लिहून ठेवले आहे.
१९६१ च्या पुरात या वास्तूचा काही भाग वाहून गेले आणि शिलालेखही उद्ध्वस्त झाले. ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली असली, तरी त्या ठिकाणी दोन मंदिरांचा पाया दिसतो. यापैकी एक मंदिर महादेवाचे असल्याची खात्री पटली आहे, पण दुसरे मंदिर अद्याप समजू शकलेले नाही. १७७३ ते १८१० या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये घोरपडे घाटावरील भांबुर्डा गावातील त्र्यंबकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. येथे मंदिरचे अवशेष असण्याची खूप शक्यता आहे. भांबुर्डा गावात पेशवाईच्या काळातील वरुडेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही दोनच शिवमंदिरे असल्याची नोंद आहे. भांबुर्डा येथील काही वृद्ध रहिवाशांना त्र्यंबकेश्वर मंदिर अस्पष्ट आठवते आणि जुन्या काळात नागबळी पूजेसाठी त्याचा गाभारा उपयोगात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अज्ञात पायाचे संकेत मिळाले असले, तरी या गृहीतकाला पुष्टी देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.
पुणे तहसीलच्या नगर विकास नकाशात काही छत्र्या (स्मारके) दाखविण्यात आल्या आहेत, पण त्या कोणाच्या असाव्यात याबद्दल फारशी माहिती नाही. एक विश्वास असा आहे की, एक छत्री दौलतरावांच्या आई बयाबाई घोरपडे यांच्या सन्मानार्थ होते.

शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन रोडवरून बसस्टॉपच्या मागे असलेल्या नदीपात्राकडे जाणार्या मातीच्या रस्त्यावरून या घाटावर पोहोचता येते. दुर्दैवाने योग्य देखभालीअभावी या घाटावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बांधकामाच्या कपारींमधून झाडे उगवल्याने हे बांधकाम मोडकळीस आले आहे. सुलभ शौचालयाशेजारच्या शिवाजी पुलावरून घाटापर्यंत पोहोचण्यास अडथळा आहे. इतिहासकार मंदार लवाटे यांच्या संग्रहातील एका जुन्या छायाचित्रात सर जॉर्ज लॉईड ब्रिजच्या उभारणीदरम्यान एका छोट्या मनोर्याचेही अस्तित्व दाखवण्यात आले आहे. नंतर लॉईड पूलाला शिवाजी पूल असे नाव देण्यात आले.
सौजन्य: टाटा टेक्नॉलॉजीस्.
नाशकात हवं 'म्युझियम कल्चर'
Read my Travel Blog On Statue of Unity here
About Nashik
Nashik city is situated at the Bank of Godavari River. It is 4th largest city in Maharashtra. As per Ramayana, Laxman cut the nose of Shurpanakha (Sister of Ravana) and thus the city was named Nashik. The city is famous for Kumbha Mela which held every 12 years. Nashik is also known as the wine capital of India.
![]() |
| Nashik |
23 December 2019: Nashik Local sightseen
Our first destination was Nashik caves which are famous by name Pandav Leni. Pandav Leni name is nothing to do with Mahabharata’s characters Pandavas. I tried searching reason behind the name and found that earlier Caves name was Pundru Caves (In Pali language). After decades, people started calling Pandu and then word change (Term in Sanskrit apa-bhraṃśá/अपभ्रंश and in English corrupted form of a word by locals while passing name from 1 generation to another) to Pandav Caves. To visit Nashik Caves, you have to climb around 200 steps (around 20-25 min Hike). There is a total of 24 caves, one cave is chaitya (Cave number 18) and rest all are Viharas. Vihara means monastery for Buddhist whereas chaitya refers to Shrine or prayer Hall. These Caves carved between 1st Century BC and 3rd/4th century AD.
![]() |
| Steps to Nashik Cave |
Cave numbers start from rightmost cave starting with number 1 to Number 24 until the Left most point of Cave. Cave 1 and 2 are small in size Vihara cave. Cave 1 looks incomplete whereas Cave 2 have sitting and standing Buddha carved on the wall. You can see water trenches just besides cave 2. Cave 3 is known as Gautamiputra Vihara. It is the largest cave of the Nashik cave complex. Queen Gotami, the mother of Gautamiputra Satakarni (Satavahana Empire), built it and dedicated to Buddhist Samgha. Total of 18 cells is present in the cave. The entrance has six pillars carved with the story. You can see Bodhi tree, Stupa, Chakra and Dvarapal (Gatekeeper) over the entrance. There is a script available at the entrance of the cave, which describes the glory life of Queen Gautami mother of glorious king Gautamiputra.
| Cave No 3 at Nashik Caves |
| Inside Cave No 3 |
Caves 4 and 5 are destroyed and no script available on the wall of caves. These caves are small and you can see the few Monks Cells. Merchant dedicated cave 6 to Monks. Ascetic named Tapasini and Fisherman respectively dedicates caves 7 and 8 to monks. Cave 9 is small and no information is available.
| Cave No 4 at Nashik Cave |
| Cave No 8 |
Cave 10 is Nahapana Vihara and it is second largest Cave from Nashik Cave complex. Nahapana was the Ruler of the Western Kshatrapas emperor. Total of 16 cells is present in the cave. Pillars and walls are carving are beautiful whereas carving on pillars is similar to Karla Caves from Pune. Carved script is available in Cave 10, which describes that Cave donated to monks along with 3000 gold coin and food after defeating Satavahana Empire in year 106 CE.
| Cave No 10 at Nashik Cave |
Cave 11 is Jain Cave and it has idol figure of goddess Ambika and Lord Indra. Cave 12, 13 and 14 are next to each other and small in size. You can see carved Buddha inside Caves and No script available in the caves. Cave 17 is Yavana Vihara and built-in 120 CE. It is close to the Chaitya Cave, which is Cave number 18. Cave 18 has Stupa and Pillars to complete Parikrama around Stupa.
| Cave No 15 |
| Cave No 18 |
| Stupa from Nashik Cave |
Cave 19 is Sri Yajan Vihara and it contained a total of 21 cells. Hall in the cave is large and Shrine at the end of the wall. Shrine area has two cells. Shrine has 10 feet high Buddha seated on feet on a lotus. Carving style of Inner and outer part of caves are different which denoted that is carved in two different ages. Cave 23 and 24 have different figures of Buddha and Bodhisattvas.
| Budhha Statue inside Cave Number 19 |
You need around 2 to 3 hours to explore Caves properly. All Caves are facing east hence; morning will be the best time to visit the caves. After exploring caves, we visited the Dadasaheb Phalke memorial. He was the father of Indian cinema and made first Indian Film. Memorial has information on Dadasaheb Phalke’s films and on Indian cinema journey.
We had our lunch and decided to explore the Panchvati area. According to Ramayana, Lord Rama along with wife Seeta and brother Laxman was sent to exile (Vanvas in Sanskrit meaning residence in Forest) for 14 years. After completing 10 years, they can on the northern bank of Godavari River near Nashik and lived for 2.5 years. This place is known as Panchvati. Our first destination was the Kalaram Temple. Kalaram temple name derives cos of the black status of Lord Rama. Temple was built in the year 1766 and Sardar Rangarao odhekar had a dream that statue of Rama is in River. He took that Statue and built the temple. Temple is an old and most important temple from Nashik city. Architecture and Carving on the temple are beautiful. A kilometre from Kalaram temple, there is another temple as Goraram temple. Statue of Rama in this temple is in White Color. Temple is old and carved in wood.
| Kalaram Temple |
We went to see Seeta Gufaa. Photography is strictly not allowed here and you have to pass through the narrow cave. People with Asthma, Heart disease and obesity are not supposed to visit the Gufaa. It is believed that Lord Rama and Seeta use to worship Lord Shiva during their exile. Shivalinga is present inside Cave. Outside Cave area, there are five old Banyan trees. Due to which this area is called as Panchvati (Panch means Five and Vati means Banyan tree). Many Temples are located in this area, which linked with Ramayana.
![]() |
| Panchvati |
We explored the Panchvati area and then went to Ganga Ghat. It is one of the main Ghat on Godavari River in Nashik. A Lot of old temples are present on Ghat along with holy Rama Kund. Water is considered as Holy water and devotees come here for holy bath. Water is not clean at Ghat. This place hosts the Kumbha Mela (Gathering of Sandhu and Devotees) which happens once in 12 years. Last Kumbha Mela in Nashik was in the year 2015 and next will be in the year 2027. It is mainly known as Simhastha Kumbha Mela. When Jupiter and Sun enter in Sinha Rashi (Leo Zodiac BUT as per Hindu calendar) and when the lunar phase of the new moon (Amavasya) comes at that time Kumbha Mela begins.
![]() |
| Ganga Ghat, Nashik |
According to Hindu Mythology, when Amrit (immortality drink) Kumbha (Pot) appeared from Samudra-Manthan (churning of the ocean to find Treasures between God and Evil), Lord Indra asked lord Jayant (son of Indra) to take it away from evil. While carrying Amrit Kumbha, some drops of nectar fall at four places on earth as Haridwar, Prayagraj (old name Allahabad), Ujjain and Trimbak (Nashik). A Kumbha Mela is celebrated at these four places every twelve years for this reason. People believe that after bathing there during the Kumbha Mela, one can attain moksha (spiritual freedom). We went home after a visit to a holy place.
![]() |
| Ganga Ghat Nashik |
Expenses:
- Pandav caves entry: INR 75/- for 3 person
- Phalke museums entry: INR 30/- for 3 person
- Car parking at Phalke museums: INR 10/-
- Lunch at Sayali mutton: INR 680/- (chicken, Mutton plate, egg Burji n Rotis)
- Snacks: ₹320 (2 Pani Puri, sandwich, 2 coffee)
![]() |
| Sadhana Chulivarchi Missal |
After Breakfast, we went to Saptashrungi gad. It is around 55-60 km from Nashik city. Saptashrungi temple is dedicated to Goddess Saptashrungi. This place is considered a half Shakti Peetha from Three and a half Shakti Peetha of Maharashtra. There are 51 or 108 Shakti Peetha (Number varies in India based on different mythology account/Book) spread across the Indian subcontinent. The story behind Shakti Peetha is based on the death of Goddess Sati (Wife of Lord Shiva). When Lord Shiva got to know the death of Sati, he carried her body and roamed around it. Her Body parts fell on earth to become holy places known as Shakti Peetha.
| Saptashrungi Gad |
There is enough parking space available at the base. Many shops on road allowed you to park your vehicle without any parking fees but the catch is you have to buy Saadi and other Pooja stuff from the shop owner, which will cost you starting from INR600 and above. We parked our car in the parking area and took the funicular trolley to reach on top. Another option to reach on top is by climbing 510 steps. Trolley area is well maintained and the waiting area has shops to buy Pooja material for Goddess. Once you reach the top, you have to be a queue for Darshan. Time to take goddess Darshan depends on the date and time of your visit. It is believed that Goddess Saptashrungi took rest after defeating demon Mahishaasura.
| Funicular Trolley |
After Visit to Saptashrungi visit, we went back to Nashik. Our evening destination was Vineyard. Though we do not drink Wine or any alcohol base drink, we visited the place to understand the process. We visited Sula Vineyard where you can take a tour to understand the Winemaking process. Overall, the vineyard was well decorated and maintained. They also have a tasting tour (Not sure but you can taste a couple of wine by paying some charges) and restaurant. We went to York winery which is a few kilometres from Sula. They also have some facilities like Winemaking tour, Wine tasting, and shop to buy Wine and restaurant. We got to know that food is good at York winery. We had a good dinner before our day ends.
![]() |
| Sula Vineyard |
- Car petrol: INR 2100/-
- Missal: INR 398/- (3 Missal, Jilabi in Sweet, water bottle)
- Entry fee at Saptsrungi: INR 30/-
- Ropeway ticket: INR 270/- for 3 people
- Parking at Saptsurngi: INR 50/-
- Dinner at York: INR 1500/- (Soups, 1 veg and 1 Non-veg Starter, Veg Pulav, Chicken Biryani and Cold drink)
We woke up at 8AM and left Nashik after breakfast. We decided to visit places like artillery museum (Deolali), Veer Savarkar smarak at Bhagur (Birthplace of freedom fighter Veer Savarkar), Gargoti mineral museum, Sinnar and Gondeshwar Temple at Sinnar. Our first destination was the artillery museum. Due to national holiday, the Museum was closed but they allow us to see the artillery, which is kept for display in open ground. The museum is located in Army camp from Deolali. There are old artillery weapons, Tanks, canons and Aircraft displayed in open ground. The museum building was closed due to holiday. Detailed information is available for each artillery.
![]() |
| Artillery Museum, Deolali |
![]() |
| Artillery Museum, Deolali |
![]() |
| Artillery Museum, Deolali |
Post artillery museum visit, we went to Veer Savarkar smarak. It is the birthplace of great freedom fighter Veer Savarkar. House has resorted and now converted into a museum. You are allowed to roam in the house. Volunteer/Caretaker of property explains to us about the place. We spend some time inside the house for meditation. There are books on Veer Savarkar available for sell.
![]() |
| Veer Savarkar Smarak |
Our journey begins towards Pune. We took a small detour to Sinnar for Gargoti Museum. It is one of the biggest private mineral collection. This museum has a collection of beautiful natural mineral and gem found in India. The museum has two-floor, which divides the collection into Deccan plateau collection and Prestige Gallery. Deccan plateau gallery displays mineral and crystals collected from Maharashtra and nearby Maharashtra state. Prestige gallery contains a collection of exclusive and rare collection from India and around the world. They have rocks from Moon and Mars as well as fossils. A guide from Museum gives you detail information about the huge collection. There is one shop where you can buy a few crystal, Gems and ornaments. It required more than an hour to see the entire museum.
मंत्रभूमी..यंत्रभूमी... (भाग-१)
प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि सुखद हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक शहर मुंबई, पुणे, औंरगाबाद या महानगरांच्या केंद्रस्थानी आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख लोहमार्गावरचे हे एक प्रमुख स्टेशन असलेले नाशिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. नाशिक सध्या चर्चेत आहे ते जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे.
दर बारा वर्षांनी येणारा हा भव्य सांस्कृतिक सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक नाशिकला येतात. विशेष पर्वणीच्यावेळी होणारे शाहीस्नान हा अत्यंत भव्य सोहळा असतो. देशातील साधु-संत या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. पर्यटकांसाठी ही एकादृष्टीने पर्वणीच असते.कुंभमेळ्यास उपस्थित राहण्यासोबतच नाशिक परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे हादेखील आनंदानुभव असतो. अनेक प्राचीन मंदिराबरोबरच विविध प्रेक्षणीय स्थळे या परिसरात आहेत. त्यातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती येथे देण्यात येत आहे.श्री सुंदर नारायण मंदिर गोदावरी तटावर सुंदर नारायण मंदिर आहे. मंदिराची बांधणी 1756 मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी केली. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वती देवीच्या मूर्ती आहेत. सदरचे मंदिर हे गोदावरी तिरावर आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी अंतरावर आहे.
सीता गुंफा
राम वनवासात असताना सीतेचे वास्तव्य ज्या ठिकाणी होते ते स्थान ‘सीता गुंफा’ म्हणून ओळखले जाते. सीता गुंफेजवळच पाच वटवृक्ष आहेत. प्रभूरामचंद्र पंचवटीत आले असतांना तेथील पाच वटवृक्षाजवळ जाताच पाच ऋषि कुमारांचा उद्धार झाला. परंतु ते वटवृक्ष मात्र आजही कायम आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काळाराम मंदिराजवळ हे ठिकाण आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर आहे.सोमेश्वर मंदिर
नाशिक बसस्थानकापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी सोमेश्वर हे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथे स्वयंभू सोमेश्वर भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराखालून एक गुप्त गंगा वाहत असून जवळच एका झाडाखालून तिचा प्रवाह प्रकट होऊन अव्याहत चालू असतो. अतिशय रमणीय व नयन मनोहर असलेला हा परिसर यात्रेकरूंना व चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांना नेहमीच आकृष्ट करतो.
सप्तश्रृंगी गड
चांदवडच्या डोंगररांगेत नाशिकच्या उत्तरेस दिंडोरी तालुक्यात सुमारे 70 कि.मी अंतरावर सप्तश्रृंगी गड आहे. या गडावर सप्तश्रृंग निवासी देवीचे मंदिर आहे. भारतात देवीची 51 पिठे आहेत. त्यापैकी सप्तशृंगी देवी ही महालक्ष्मी असून तीच महाकाली व महासरस्वती आहे. महिषासूराचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. गड नाशिकरोड रेल्वेस्टेशन पासून 90 किमी. तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 80 कि.मी. अंतरावर आहे. गडावर संस्थानच्या खोल्या निवासासाठी उपलब्ध आहेत.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसले आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक प्रख्यात ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वरचे मंदिर म्हणजे जुन्या व मनोहर अशा शिल्पाकृतीचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर झाला. गोदावरीचा मूळ उगम या पर्वतावर होऊन ती गंगाद्वारात उतरते. त्र्यंबकराज मूर्ती तळगाभाऱ्यात असून वालुकामय पिंडीतील तीन खाचा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक समजल्या जातात. मंदिरावर सुवर्ण कलशासह अप्रतिम कलाकृतीचे कोरीव काम केलेले आहे.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे वडीलबंधु संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली असल्याने त्र्यंबकेश्वर हे संत, वारकरी आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परीसर, पुरातन मंदिरे आणि पौराणिक महत्त्व यामुळेच त्र्यंबकेश्वर हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकरोड रेल्वे स्टेशन पासून 36 कि.मी. अंतरावर तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 28 कि.मी. अंतरावर असुन नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून एस.टी. बसेसची जाण्यासाठी व्यवस्था आहे.
पंचवटी धार्मिक क्षेत्र
वनवास काळात प्रभू रामचंद्राचे वास्तव्य पंचवटीमध्ये होते. साहजिकच हा परिसर पवित्र असून सर्व तीर्थक्षेत्रे येथे आहेत. गोदावरीच्या पात्रामध्ये स्नानाच्या बऱ्याच जागा असून त्यास तीर्थ व धार्मिक कुंडे म्हणतात. ही तीर्थे पुढीलप्रमाणे आहेत. पीतृ तीर्थ, गालवतीर्थ, ब्रह्मतीर्थ, ऋणमोचन तीर्थ, कण्वतीर्थ, पापनाशक तीर्थ, विश्वतीर्थ, श्रोततीर्थ, कोटीतीर्थ, अग्नीतीर्थ, शुक्लतीर्थ, अस्थिवलाय तीर्थ तसेच रामगया तीर्थ, अरुणा, सूर्य, चक्र, आश्विनी, रुद्रयोगी विष्णू, योगी, आदी तीर्थही आहेत. पंचवटीमध्ये अनेक पवित्र मंदिर असून बहुतेक प्राचीन आहेत.
काळाराम मंदिर
प्रभु रामचंद्राच्या वास्तव्याचे जागेवरील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात सर्व आजूबाजूंनी ओऱ्या असून मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणाच्या सुरेख मूर्ती आहेत. पूर्वेस नगारखाना असून पश्चिमेभिमुख मारुतीरायाची मुर्ती आहे. सरदार ओढेकरांनी हे मंदिर 1782 मध्ये बांधल्याचे सांगतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस येथे मोठा उत्सव चालतो. रामनवमीस रामजन्म थाटात साजरा होतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात याच ठिकाणी मंदिर प्रवेशाचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता.नारोशंकर मंदिर
गोदावरी तीरावर प्रभु रामेश्वराचे हे मंदिर नारोशंकर राजेबहादुर यांनी 1747 मध्ये बांधले. 18 व्या शतकातील उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराची ओळख आहे. मंदिराच्या दर्शनी प्रवेशद्वारावर मोठी घंटा टांगलेली आहे. ही घंटा पोर्तुगिजांवरील विजयाचे प्रतिक आहे.मुक्तीधाम
नाशिक पासून 8 कि.मी अंतरावर नाशिकरोड येथे मुक्तीधाम हे कै.जयरामभाई बिटको यांनी बांधलेले मंदिर असून येथे सर्व प्रमुख देवांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात गीतेचे 18 अध्याय कोरण्यात आले आहेत. भाविकांच्या निवासाची व भोजनाचीही सोय आहे.
पांडवलेणी
नाशिकच्या नैऋत्येस आग्रारोड अंजनगिरी पर्वताच्या रांगेत वर निमूळते होत गेलेले शंखाच्या आकाराचे तीन पिरॅमिडच्या आकाराचे डोंगर आहेत. लांबून ते डोंगर अग्नि ज्वालाप्रमाणे दिसतात. यावरुन त्यांना त्रिरश्यमी असे नांव पडले आहे. मध्यभागीच्या डोंगरावर पांडव लेणी आहेत. या लेणी जैन राजांनी बनविल्या असून 2000 वर्षे प्राचीन आहेत. यामध्ये 29 गूंफा आहेत. आतील भगवान गौतम बुद्धाच्या आणि बोधीसत्वाच्यामूर्ती प्रेक्षणीय आहे. पांडवलेणी नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर तर मध्यवर्ती बसस्थानकापासून 9 कि.मी. अंतरावर आहेत.
चांभार लेणी
नाशिकच्या उत्तरेस पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला हल्ली चांभारलेणी असे नाव प्राप्त झाले आहे. गजंपथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी 1942 साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी 11 व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थांपैकी मानली जातात. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.टाकेद तीर्थ
नाशिकपासून 71 कि.मी. व इगतपुरी पासून 26.3 कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गांव या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायुशी युद्ध झाले ते ठिकाण आहे.
दरवर्षी टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.
कपिलधारा तीर्थ
इगतपुरीपासून जवळच कावनाई येथे कपिलधारा तीर्थ आहे. कपिलमुनीने अनेक वर्षे येथे तपश्वर्या केली आहे. तसेच शेगांवच्या गजानन महाराजांनी याच ठिकाणी एक वर्ष तपश्चर्या केली आहे. येथे कामाक्षी देवीचे मंदिर असून चैत्र शुद्ध पौर्णिमेस यात्रा भरते. नाशिकपासून हे अंतर 40 किमी आहे.नाशिक जिल्हा
जिल्ह्याबद्द्ल
नाशिक जिल्हा तर तसा सर्वांच्याच परिचयाचा आहे .कारण नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्ह्यामधील एक जिल्हा असुन .नाशिक जिल्ह्याने अनेक वेगवेगळ्या कारणाने पूर्वीपासून आपली ओळख निर्माण केलेली आहे . प्रभू श्रीरामचंद्र ज्या वेळेस १४ वर्षे वनवासाला होते .त्यावेळेस त्यांनी आपल्या वनवासाचे शेवटचे दिवस व्यथित करण्यासाठी नाशिक ची निवड केली होती .त्यावेळेस नाशिक ला दंडाकार्याना म्हटले जायचे.
नाशिक नावाचा उगम आणि नाशिक चे ऐतिहासिक महत्व -
नाशिक ला पूर्वी दंडाकार्याना म्हटले जायचे . पूर्वी नाशिकपासून पुढे दक्षिण भाग सूर होत असे . आणि असुरांचे देखील साम्राज्य इथूनच सूर होत असे . म्हणूनच राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्या गुरु च्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम यांनी यांनी नाशिक ची निवड केली पूर्वीचे ( दंडाकार्याना)
आणि या ठिकाणी गोदावरीच्या तीरी एक कुटी बांधून राहत असे आता आपण त्याला पंचवटी असे म्हणतो . याच ठिकाणाहून रावणाने हे सीतेच हरण केले होते. आणि याच ठिकाणी लक्षुमणानें रावणाची बहीण शुर्पनखाचे नाक कापले होते ,त्या नंतर नाशिक ला नाक कापले म्हणून नास्तिकापूर देखील म्हटले जायचे ,आणि नंतर नास्तिकापूरचे नाशिक झाले अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाशिक च्या मधोमध गोदावरी हि नदी वाहते आणि आणि हि नदी नऊ टेकड्यांच्या मधून वाहते ,आणि टेकडीचा संस्कृत अर्थ 'शिखा 'असा देखील होतो म्हणून नाशिक ला पूर्वी नवशिखा म्हणून देखील संबोदले जायचे . पूर्वीपासून नाशिक च्या आसपासचा भाग विविध नावांनी ओळखल्या जायचे . जनस्थान ,गुलशनाबाद ,त्रिकंटक ,नासिक आणि आत्ताचे नाशिक असे पाच नावांनी नाशिक पूर्वीपासून नावारूपाला आले .
देशातील महान अशा चार कुंभमेळ्यांपैकी एक कुंभमेळा नाशिक च्या गोदावरी नदी तीरी म्हणजेच पंचवटी येथे भरतो . आणि येथे अनेक शाहीस्नान देखील होते ..नाशिक पासून जवळच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्रंबकेश्वर चे ज्योतिर्लिंग असून त्या ठिकाणी देखील कुंभमेळा भरतो .
नाशिकची भौगोलिक माहिती -
नाशिक जिल्हा सह्याद्रीच्या दख्खन पठारावरील उतरत्या भागावरील जिल्हा आहे . या जिल्ह्यात पूर्ववाहिनी गोदावरीनदी आणि पश्चिमवाहिनी तापीनदी या नद्यांचे खोरे येत असल्याने या जिल्हाच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूरचनेत मोठया प्रमाणावरती बदल हे होत असतात . सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडून दक्षिण भागाकडे जाते . उत्तर भागाच्या पश्चिमेस १३००मीटरपासून पूर्वेकडे ६५० मी. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग आहे .त्यामधील मांगीतुंगी डोंगराची उंची १३३१ मीटर आहे . या पर्वत रांगेत पूर्वेकडे हिंदबारी खिंडी ,थेरमाळ आणि गाळण किल्ला आहे . गाळणाकिल्याच्या टापूत रस्त्यात एक खिंड आहे . दक्षिणेस घोलबारी डोंगररांग आहेत . या रांगेची उंची १६१३ मी . असून या रांगेत घोलबारी खिंड आहे . या रांगेच्या दक्षिणेस सातमाळा किव्हा चांदवडचे डोंगररांग ( अजिंठा) आहे . हि पूर्वेकडून ईशान्यपर्यंत पसरलेली आहेत . तिची उंची ११०० ते १३५० इतकी आहे . या रांगेत सप्तशृंगीगड हा १४०० मी. उंचीचा असून अचल व जावाता हे किल्ले अरुंद व सपाट आहेत . या रांगेच्या दक्षिणेकडे बाणगंगा नदी दरम्यान रामशेज डोंगर आहे . त्याच्या पूर्वेकडे चांभारलेणी हि जैनलेणी आहे . सातमाळेच्या दक्षिणेकडे भास्करगड - अंजनेरी डोंगर आहेत . भास्करगडाच्या पूर्वेस हरिहर किल्ला असून त्या ठिकाणी अजून तीन वेगवेगळ्या टेकड्या आहेत त्याला त्रिरेश्मी टेकड्या देखील म्हणतात . त्यातील एकदम पूर्वेकडील त्रिशर्थी डोंगरावरती पांडवलेणी आहे .
नाशिक मधील प्रमुख नद्या आणि धरणे
गोदावरी हि नसिक जिल्ह्याची प्रमुख नदी असून तिचा उगम हा नाशिक मधूनच होतो आणि ती थेट बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते . तसेच नाशिक ची दुसरी सर्वात मोठी नदी आहे ती म्हणजे गिरणा नदी .या व्यतिरिक्त वैतरणा ,मोसम ,दारणा ,वालदेवी, कादवा ,देव ह्या महत्वाच्या नद्या आहेत .गोदावरी व गिरणा नदीला बारा हि महिने पाणी असल्यामुळे नाशिकचे मोठया प्रमाणावरील क्षेत्र हे सुपीक झालेले आहेत .
नाशिक ला धरणांचा जिल्हा देखील म्हणता ,गोदावरीच्या पाण्यावरील गंगापूर धारण हे भारतातील एकमेव मातीचे सर्वात मोठे धरण आहे . गंगापूरचे धरणातील पाणी नाशिक ,अहमदनगर औरंगाबाद ,पेठ सुरगाणा ,येवला ,मनमाड आणि गुजरात अशा जिल्ह्याना आणि तालुक्याला पाणी पुरवते . त्याच प्रमाणे वैतरणा धरणाचे पाणी हे अर्ध्या मुंबईची तहान भागवते . या व्यतिरिक्त दारणा ,बाहुली ,अंजनेरी ,कडवा ,काश्यपी ,गिरणा ,भाम ,मुकणे ,कडवा,कानोले,केळझर,अशी अनेक छोटीमोठी ३० च्या आसपास धरणे आहेत .
नाशिक जिल्ह्याचे हवामान आणि पाऊस
नाशिक चे हवामान साधारण सर्व ऋतूंना पूरक असेच असते . मार्च च्या मध्यापासून जून पर्यंत उन्हाळा असतो तेव्हा साधारण उष्ण तापमान ३८ ते ४० सेल्सिअस पर्यंत असते . जून महिण्याच्या मध्यापासून ऑक्टोबर पर्यंत साधारण पाऊस हा २००० मी .मी इतका पडतो .त्यात सुरगाणा ,इगतपुरी ,पेठ ,ह्या भागात जास्त पाऊस पडतो . नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पर्यंत थंडी हि असते तापमान साधारण ८ ते १० सेल्सिअस इतके असते .सर्वात जास्त कमी तापमान हे निफाड तालुक्यात असते साधारण ५ ते ७ सेल्सिअस .
लोकसंख्या ग्रामीण आणि नागरी
२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हि ४९,८७,३४५ असून त्यात पुरुष २५,९१,९८० व महिला २३,९५,९३४ आहेत . लोकसंख्या वाढीचा दर हा प्रत्येकी दहा वर्ष्यानी २९. % आहे जो इतर राज्यां पेक्षा ६% जास्त आहेत .
एकूण लोकसंख्येपैकीं ६१. १७ % लोक हि खेड्यात राहतात तर एकूण शहरी लोकसंख्येपैकीं ५८. ४८% लोक नाशिक तर २३. १६% लोक मालेगाव शहरात राहतात .
नाशिक मधील तालुके
* कळवण * इगतपुरी * चांदवड * देवळा *सुरगाणा *पेठ *निफाड *दिंडोरी
*येवला *सिन्नर *नांदगाव *सटाणा *मालेगाव (ग्रामीण) *त्रंबक *नाशिक ( ग्रामीण)
नाशिक पर्यटन
त्रंबकेश्वर मंदिर ( ३०किमी नाशिक )
पांडवलेणी गुफा ( १०किमी)
रामशेज किल्ला ( १५ किमी )
RAMKUND
सप्तशृंगी देवी
रामसेज, वाघेरा, खैराई
नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ)
गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'
अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्वरला यायचं. त्र्यंबकेश्वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.
मधुकर धुरी
युथ हॉस्टेल, मा
फ्लोवर पार्क , नाशिक. Flower Park, Nashik
नाशिक मधल्या प्रेक्षणीय स्थळा पैकी एक अतिशय सुंदर आसे फ्लॉवर🌺🌻🌹🌷 पार्क.
नाशिक शहरापासून अवघ्या २० किलोमीटर नाशिक- त्रंबकेश्वर हायवे रस्त्यावर असलेले अंजनेरी गावालगत फ्लोवर पार्क हे साधारण १० एकर जागेत तयार केले गेलेले आहेत.साधारण ५० लाख फुलं वापरून तयार केलेले पार्क आहे . पण आपल्याला हे फ्लोवर पार्क या जागेवर फक्त आगस्ट ते सप्टेंबर महिन्यातच बघायला मिळू शकते. एरवी या ठिकाणी वॉटर पार्क ( waterpark ) हे नियोजित असते .
घोरपडे घाट व जुने त्र्यंबकेश्वर मंदिर
१९ व्या शतकातील घोरपडे घाट हा पेशवेकालीन घाट आहे. १८३१ साली तो बांधण्यात आला.
शिवाजी पुलाजवळ मुठा नदीच्या डाव्या काठावर बांधलेली ही पायऱ्या असलेली व किल्ल्यासारखी दिसणारी छोटेखानी दगडी वास्तू आहे. दैनंदिन विधी करण्यासाठी नदीच्या काठावर बांधलेल्या या घाटाच्या मागे मंदिराचे अवशेष दिसतात. पूर्वीच्या भांबुर्डा गावात असलेला हा घाट फेब्रुवारी १८३१ मध्ये पेशवे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज दौलतराव घोरपडे यांनी बांधला. चार बुरुज, एक भक्कम भिंत, नगारखाना आणि नदीच्या दिशेने उतरून जायला पायर्या अशा स्वरुपाचे या घाटाचे बांधकाम होते. तटबंदीच्या भिंतीला दोन खोल्याही जोडलेल्या आहेत. इतिहासकार दत्तो वामन पोतदर यांनी या घाटाला भेट दिल्याविषयी आणि तिथे १० फेब्रुवारी १८३१ असे कोरलेल्या दगडाविषयी लिहून ठेवले आहे.
१९६१ च्या पुरात या वास्तूचा काही भाग वाहून गेले आणि शिलालेखही उद्ध्वस्त झाले. ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली असली, तरी त्या ठिकाणी दोन मंदिरांचा पाया दिसतो. यापैकी एक मंदिर महादेवाचे असल्याची खात्री पटली आहे, पण दुसरे मंदिर अद्याप समजू शकलेले नाही. १७७३ ते १८१० या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये घोरपडे घाटावरील भांबुर्डा गावातील त्र्यंबकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. येथे मंदिरचे अवशेष असण्याची खूप शक्यता आहे. भांबुर्डा गावात पेशवाईच्या काळातील वरुडेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही दोनच शिवमंदिरे असल्याची नोंद आहे. भांबुर्डा येथील काही वृद्ध रहिवाशांना त्र्यंबकेश्वर मंदिर अस्पष्ट आठवते आणि जुन्या काळात नागबळी पूजेसाठी त्याचा गाभारा उपयोगात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अज्ञात पायाचे संकेत मिळाले असले, तरी या गृहीतकाला पुष्टी देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.
पुणे तहसीलच्या नगर विकास नकाशात काही छत्र्या (स्मारके) दाखविण्यात आल्या आहेत, पण त्या कोणाच्या असाव्यात याबद्दल फारशी माहिती नाही. एक विश्वास असा आहे की, एक छत्री दौलतरावांच्या आई बयाबाई घोरपडे यांच्या सन्मानार्थ होते.

शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन रोडवरून बसस्टॉपच्या मागे असलेल्या नदीपात्राकडे जाणार्या मातीच्या रस्त्यावरून या घाटावर पोहोचता येते. दुर्दैवाने योग्य देखभालीअभावी या घाटावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बांधकामाच्या कपारींमधून झाडे उगवल्याने हे बांधकाम मोडकळीस आले आहे. सुलभ शौचालयाशेजारच्या शिवाजी पुलावरून घाटापर्यंत पोहोचण्यास अडथळा आहे. इतिहासकार मंदार लवाटे यांच्या संग्रहातील एका जुन्या छायाचित्रात सर जॉर्ज लॉईड ब्रिजच्या उभारणीदरम्यान एका छोट्या मनोर्याचेही अस्तित्व दाखवण्यात आले आहे. नंतर लॉईड पूलाला शिवाजी पूल असे नाव देण्यात आले.
सौजन्य: टाटा टेक्नॉलॉजीस्.
https://map.sahapedia.org/article/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%20%E0%A4%B5%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/5606
लोणजाई टेकडी
| रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी पायथा |
| लोणजाई टेकडी वरून |
| निफाडच्या शेतीचे दृश्य |
| अन्य रांगा |
| लोणजाई मंदीर |
| लोणजाई देवी |
| लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत |
Few days back there was this news in Times of India newspaper which I came across and which set the ball rolling for my next exploration.
The news was that in the village of Chandori, few temples which has got submerged under the Godavari waters have resurfaced again and that too after 34 years!, The reason behind the resurfacing of these temples were the drought like conditions in the state of Maharashtra which has lead to drying of the Godavari river bed.
| Dry river bed of Godavari river |
| Submerged Legacy |
It is not everyday that you get an opportunity to witness something which is lying submerged for past 34 years under the flowing waters of Godavari river.
| Past glory |
Now the next step was to see how I can reach this place, luckily for me my friend Shashi called me and asked can I join him for the visit to Chandori Temples. Well now this is what I call Law of attraction at its best and without blinking my eyelids I said I was in.
We all left on Saturday night taking a last fast Kasara local train and by the time we reached Kasara Station it was 1.30 am. From Kasara we had booked Jeep to take us to the base Village. Following the google map we reached the Chandori Village.Upon reaching the Chandori Village we took a right turn from the highway to enter the village, as it was 3;45 am so asking for direction was itself a task as not a soul could be seem. Anyways a little drive into the village and we were near this Temple.
| Temple from where the path from right side leads to the Godavari river |
It was quite dark when we reached here luckily for us we found one villager who informed us that we were on right way and the Godavari river is just behind this temple but one has to take a little walk to the right side from the side of this temple.One thing that was very surprising was the coolness in the weather and the breeze flowing in the village.It was decided that we would go down the river side in the morning and check out the temples as it was dark but then wanderers are wanderers so few of us started to walk to have a sneak preview of the temples.
| Sneak preview |
| Exploration under full moon |
I simply cannot describe you the beauty of the place, especially when you are able to see only deserted ruins drenched in the milky moonlight of full moon and with cool breeze humoring you. Well it was a sight to die for. How I wish I could capture that real moment on camera but my camera is not so efficient to do so still here I am.
| Deserted temples drenched in the milky moonlight of full moon |
We again came back to the temple and decided to catch little sleep, hence we slept on the floor of the temple till the day break.Most of us were not able to sleep as the breeze was blowing very furiously and it was too chilly, mind you all this during the times when average climate in Maharashra is 40 degree furnace hot.
| Caught napping |
Oh ! I simply loved this place. As I was not carrying any bed sheet so for me the sleeping proved to be quite challenging.
Sun was yet to come out, and we were all eager now to go and explore the Chandori Temples Legacy, so we all regrouped and started our walk all over. Moving from the right and a little walk of 2 minutes we come across a this bridge.
| River bridge and temples behind it |
Walking little further from the temple we come across this bridge which joins the Chandori to Saykheda village and behind this bridge one can see a series of small temples on the river bed and the on the other side of the river the sun was rising in all its glory, painting the scenery all around in golden sheet.
The golden sunlight lit these temples in such a manner that one could feel the magic of bygone era.These temple are in a row one after the other but at little distance.
| Temples in a row |
| Temples standing as on today |
Few of our friends had visited this place 3 weeks back and they found these temple partially submerged in water hence they had little difficulty to check out from inside. I am sharing the pictures they clicked 3 weeks earlier.
![]() |
| Partially submerged temples clicked 3 weeks earlier ( PC:Vinay Y Jadhav) |
The interesting thing about all these temples was that each of them had a shivling. In a way we can say that each of the temple is Shiva temple.
| Innumerable shivlings |
| Shivling here |
| Shivling there |
| Shivlings everywhere |
Not much information is available about these temples on the internet and neither the locals could give us any useful information. No doubt they have cleaned the temples from inside and offered prayers too.At some places people who had visited had put flowers and garlands on the deities.
| Garlanded Idols |
| Another garlanded Idol |
I could not find much history about this place on the net, matter of fact even the Archaeological Survey of India(ASI) has no record of these temples except for the fact that the villagers last saw these temples in the year 1982. According to one of the reports that I read on net was that during the year 1907 Nandur Madyameshwar dam was built (Reference Nashik Gazetteer) resultant to that the water's course went over these temples and they got submerged under the waters.Since last 100 years only twice these temples could be seen this been the 3 time, otherwise mostly their top domes were visible.
![]() |
| 3 weeks earlier picture (PC: Vinay Y Jadhav) |
It was now time for us to start our exploration. Moving down from the bridge we checked out the temple nearest to the bridge.
| Visit to our first temple |
The front portion of the this temple is under debris perhaps due to this reason one can see only the head of the Nandi idol rest of the body buried under the stones.
| Sunken idol of Nandi |
| Ganpati carved on outer side |
The carving on the temples are quite exquisite
![]() |
| Exquisite carvings on the temple (PC: Vinay Y Jadhav) |
![]() |
| Exquisite carvings on the temple (PC: Vinay Y Jadhav) |
I am sharing pictures of my friend Vinay Jadhav who had visited this place 3 weeks earlier because that will help you understand how different the whole complex looked with water still being there.
![]() |
| Pic taken on 1st may 2016 |
From here we moved on to the next temple. most of the temples were of similar pattern except for the last which is of Indra god.Few temples has this kind of embankment.
| Embankment around the temple |
| Ghats been used for bathing |
We relaxed here for a bit of a time and then moved on to the last temple which is also know as Indra temple.
![]() |
| Indra temple with 2 real snakes ( PC: Vinay y Jadhav) |
Watching all this neglected historical legacy of temples and idols scattered around like some waste garbage. I was not only pained and hurt but felt helpless and frustrated as to why nothing can be done to protect and salvage such beautiful architecture.
| History or garbage |
| Is this the way to treat the national treasures |
| Utter Filth |
Seeing all this I want to make a humble request to, then be it Govt of India or some NGO to come forward and adopt this site. Reconstruction can be done of these temples especially with the modern technology available.The local Sarpanch should make an effort to bring their village on map as a popular tourism spot.
Now that these temples have emerged and can be seen. Every effort must be made to see that this wonderful piece of history don't dissolves away into oblivion and remains only as news that these temples were seen third time during the year 2016.
With heavy heart and lots of questions in my mind I left from Chandori Village to explore a new destination Kugaon Killa aka Inamdarancha wada( Click here to read out our new journey) because I believe the journey of Weekend Wanderer is ever ongoing !!
Links:
Shashikant Dumbre Picture set of Chandori
Chandori Temples Journey video ( Click here for the video Film)
Special Thanks to Shri Vinay Jadhav for allowing few of his pictures for this blog.




















































No comments:
Post a Comment