Sunday, March 23, 2025

हनुमान, ब्रह्मदेव मुर्ती शास्त्र

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।। शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमान !  हनुमानाला मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे. हनुमानाला महादेव शिवशंकाराचा अवतार मानले जाते.श्रीहनुमान, श्रीराम भक्तांचे परमधार, रक्षक आणि श्रीराम मिलनाचे अग्रदूत आहेत. रुद्रावतार श्रीहनुमानाचे बळ, पराक्रम, उर्जा, बुद्धी, सेवा आणि भक्तीच्या अद्भुत व विलक्षण गुणांनी भरलेले चरित्र संसारिक जीवनासाठी आदर्श मानले जाते. याच कारणामुळे शास्त्रामध्ये हनुमानाला 'सकलगुणनिधान' संबोधण्यात आले आहे. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार श्रीहनुमान चिरंजीव आहेत.
     रामभक्त श्री हनुमान म्हणजे बल अर्थात शक्ती देणारी देवता. जीवनात कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्याच्या निवारणासाठी श्री हनुमानाची भक्ती करण्याचा सल्ला दिला जातो. श्री हनुमानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अमर आहेत. यामागे एक कथा आहे. त्यानुसार प्रत्येक युगात श्री हनुमान अस्तित्वात असल्याचं सांगितलं गेलं आहे. श्री हनुमान अमर असण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे?
      आपल्या भक्तांना बुद्धी, शक्ती आणि ज्ञानाचं वरदान देणारे श्री हनुमान हे अमर आहेत, श्री हनुमान हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विश्वात श्री हनुमानाच्या शाश्वत अस्तित्वाचा एक उद्देश आहे. यासाठी त्यांच्या बालपणीची एक घटना कारणीभूत मानली जाते. त्रेतायुगात श्री हनुमानाचं नाव प्रभू श्रीरामासोबत जोडलं गेलं. द्वापार युगात श्रीकृष्णासोबत श्री हनुमानाचं नाव आलं. महाभारतात युद्धावेळी श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने श्री हनुमानाकडं मदत मागितली होती. तेव्हा श्री हनुमानाने त्याला त्याच्या रथावरच्या ध्वजावर स्वार होण्याचं आश्वासन दिलं होतं. कलियुगात गोस्वामी तुळशीदास म्हणतात, 'मला प्रभू श्रीरामाचं चरित्र हे स्वतः हनुमानानं ऐकवलं, त्यामुळे मी इतकी सुंदर रचना करू शकलो.'
 
         वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही.  हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही.
 उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.

हनुमानाची विविध नावं : अंजनेय, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ.

हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.

चरित्र :

वाल्मीकी रामायणात हनुमंताचे चरित्र तीन ठिकाणी आले आहे. (कििष्कधा-कांड ६६-६७, युद्ध-कांड २८ आणि उत्तर-कांड ३५-३६).सर्वप्रथम आपण हनुमानाच्या जन्माच्या कथा जाणून घेउ. 
श्री हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनाच्या पोटातून झाला. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानाचे वडील केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते आणि ते वायुअंश आहेत असं सांगितलं गेलं आहे. तर माता अंजनी ही स्वर्गातील अप्सरा होती. तपस्वी ऋषी दुर्वास, यांच्या शापाने ती वानर राजकन्या म्हणुन जन्माला आली होती.  सोन्यापासून बनलेल्या सुमेरूमध्ये केसरीचे राज्य होते. वायुअंश केसरी हे वानरराज होते, त्यांच्या बरोबर अंजनीचा विवाह झाला. वनराज केसरी आणि अंजना यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती. आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराला प्रार्थना केली. त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न् झाले आणि त्यांना वरदान देताना माझा अंश तुमच्यापोटी जन्माला येईल असा वर दिला. या कारणास्तव हनुमानजींना भगवान शंकराचा ११ वा रुद्र अवतार म्हटले जाते.
       किष्कींधा कांडात जाम्बवानाने याचे चरित्र पुढीलप्रमाणे निवेदन केले आहे. पुंजीकस्थला नावाची एक सुंदर व श्रेष्ठ अप्सरा होती. ऋषीच्या शापामुळे ती वानर योनीत जन्माला आली. स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे सामथ्र्य तिच्या ठायी होते. महात्मा कुंजर या वानराची ती मुलगी होती आणि पुढे केसरी वानराची अंजना नामक पत्नी झाली. अंजना एकदा  स्वच्छ आंघोळ करुन आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले. सुंदर स्त्रीचे रूप धारण करून पर्वतावर हिंडत असाता वायूने तिला पाहिले आणि तो तिच्यावर आसक्त झाला. अंजनेला तो अलिंगन देत असताना गोंधळून गेलेली ती पतिव्रता म्हणाली, ‘माझे पातिव्रत्य भ्रष्ट करण्याची कोण इच्छा करत आहे?’ त्यावर वायू तिला म्हणाला,
‘‘मनसाऽस्मि गतो यत्त्वां परिष्वज्य यशस्विनि
वीर्यवान् बुद्धिसम्पन्नस्तव पुत्रो भविष्यति
महासात्त्वो महातेजा महाबलपराक्रम:
ल.न प्लवने चव भविष्यति मया सम’’
(कििष्कधा ६६.१८-१९)
अर्थ : हे यशस्विनी, तुला आिलगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपाभोगाच्या इच्छेने तुझ्या ठायी आपले तेज ठेवले आहे, त्याअर्थी तुला वीर्यवान व बुद्धिसंपन्न पुत्र होईल. तो पुत्र महाधर्यवान, महातेजस्वी, महाबलाढय़ व महापराक्रमी होऊन, मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करील.
हा वर मिळाल्यावर संतुष्ट झालेली अंजना एका गुहेमध्ये प्रसूत झाली आणि तिने हनुमंताला जन्म दिला.
       दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, त्रेतायुगात दशरथ राजाच्या तीन राण्या होत्या मात्र काही केल्या त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. मग पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी हवन करण्यात आला. हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राजा दशरथाच्या तीन राण्या कौशल्या, सुभद्रा आणि कैकेयी यांना प्रसादाच्या खीरीचं वाटप केलं. त्यावेळी सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकयी राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकयीच्या हातून तो प्रसाद घारीने पळविला. अंजनी माँ तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी एका घारीने खीरीचा एक भाग सोबत नेला. हे सर्व भगवान शिव आणि पवनदेवाच्या इच्छेनुसार घडत होते. तपश्चर्या करत असलेल्या अंजनाच्या हातात खीर आल्यावर तिने ती खीर भगवान शिवाचा प्रसाद मानून स्वीकारली. भगवान शिवांनी वायुद्वारे त्यामध्ये आपला दिव्यआत्मा ठेवला. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र झाला. या प्रसादामुळे हनुमानाचा जन्म झाला. ( ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती. ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकयीच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शाप मुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले ). तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.

पुराणे :

विष्णुपुराण, ब्रह्मपुराण अशा काही पुराणातील चरित्राचा सारांश – ब्रह्मगिरीजवळच्या अंजन पर्वतावर केसरी वानर राहत होता. त्याला अंजनी व अद्रिका नावाच्या दोन बायका होत्या. अंजना वानरमुखी असून, अद्रिका मार्जार्मुखी होती. त्या दोघीही पूर्वजन्मीच्या अप्सरा असून, इंद्राच्या शापामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. एकेदिवशी केसरी वानर तिथे नसताना अगस्त्य ऋषी तिथे आले. त्या दोघींनी त्यांचा चांगला आदरसत्कार करून बळवंत वा सर्वलोकोपापकारक अशा पुत्राच्या प्राप्तीचा वर मागितला. तसा वर त्यांना देऊन अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे निघून गेल्यावर वायूने अंजनीला आणि निर्ऋतीने अद्रिकेला पाहिले आणि ते त्यांच्याशी रममाण झाले. पुढे अंजनीला हनुमान आणि अद्रिकेला पिशाचराज झाला.

शिवपुराणात थोडी भिन्न कथा आहे – 

एकदा शिवाने विष्णूचे मोहिनीरूप पाहिले, त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले.
सप्तर्षीनी ते वीर्य पानावर घेऊन कर्णद्वारे गौतामिकांया अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला.
एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी केला. त्या वेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीची पदरात टाकला. तिने पायस भक्षण केले आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला.

जन्मतिथी :

    साऱ्या भारतभर हनुमान जयंती साजरी होत असली तरी रामायण-महाभारतात हनुमानाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाही. आनंद रामायणात (आ.रा. १.१३,१६२-१६२) चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर हनुमानाचा जन्म झाला असे म्हटले आहे. अगस्त्य संहितेत कार्तिक वद्य चतुर्दशी, मंगळवारी, स्वाती नक्षत्रावर मेष लग्नावर अंजनीच्या पोटी स्वत: शिवानेच जन्म घेतला असे म्हटले आहे. उत्सव सिंधू, व्रतरत्नाकर या ग्रंथातही हीच तिथी सांगितली आहे. सूर्य संहितेत मात्र कार्तिक वद्यातील तिथी सांगून वार शनिवार दिला आहे. याच्या जन्मातिथीबद्दल महिना, वार, तिथी वा वेळ यात मतभेद असल्यामुळे भारतात निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या दिवशी हनुमान जयंती साजरी करतात. महाराष्ट्रात  चैत्र  पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते.  हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.

जन्मस्थान :

  • कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत.
  • गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे
  • नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत
  • अंजन्धामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत.
  • पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल.
हनुमानाच्या जन्मस्थळावरून बर्याच राज्यांमध्ये वाद सुरू आहे.
      हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा दक्षिणेकडच्या दोन राज्यांनी केला. कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजेयानाद्री/अंजनाद्री टेकड्यांमध्ये झाला आहे, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं आहे की तिरुमलाच्या सात टेकड्यांमध्ये (सप्तगिरी) असलेलं अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.

डिसेंबर २०२० मध्ये तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. यात वैदिक अभ्यासक, पुरातत्व शास्त्र अभ्यासक आणि इस्रोचे वैज्ञानिक यांचा समावेश आहे.तिरुमलाच्या सात टेकड्या पुराणात आणि कहाण्यांध्ये शेषाद्री, निलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि वेंकटाद्री म्हणून ओळखल्या जातात. अंजनाद्री या टेकड्यांचा भाग आहे, ही गोष्ट अंजनेयाचा (हनुमानाचा) जन्म इथे झाला होता .
      दुसरीकडे कर्नाटकचं म्हणणं आहे की, उत्तर कर्नाटकातल्या हंपीजवळ अंजेयानाद्री डोंगरावर हनुमानाचा जन्म झालेला आहे. इथे रामाची, लक्ष्मणाची आणि हनुमानाची सीतेच्या अपहरणानंतर भेट झाली होती असा उल्लेख रामायणात आहे असं तिथे मत मांडले जाते.  रामायणात किष्किंधा नगरीचे उल्लेख येतात. ही किष्किंधा नगरी म्हणजे हंपीजवळ असलेलं किष्किंधा आहे असं कर्नाटकच्या लोकांचं म्हणणं आहे.
   किष्किंधा म्हणजे रामायणात उल्लेख असलेला प्रदेश आहे हे काही अभ्यासकांना मान्य आहे. वाली आणि सुग्रीव या भावंडांचं त्यावर राज्य होतं. पण हनुमानाचा जन्म इथे झाला हे त्यांना मान्य नाही. हनुमानाचा जन्म तिरुमला डोंगररांगेतल्या अंजनाद्री डोंगरावरच झाला. अंजनीमातेने नंतर हनुमानाला सुग्रीवाच्या सैन्यात सहभागी व्हायला पाठवलं हे खरं. ते किष्किंधेला आले होते .
       हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला हे समजून घ्यायचं असेल तर भविष्योत्तर पुराण, स्कंद पुराण आणि पराशर संहितेचा अभ्यास करायला हवा. रामायणात परिपूर्ण हनुमंत चरित्र नाहीये. त्यामुळे पराशर संहितेत पराशर ऋषींनी हनुमानाचं संपूर्ण चरित्र लिहिलं आहे. त्यातही सप्तगिरीमधल्या अंजनाद्रीचा उल्लेख हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून केला आहे. हंपीचा उल्लेख कोणत्याही पुराणात नाहीये. वाल्मिकी रामायणातल्या किष्किंधा कांडात सुग्रीव अंजनाद्रीवरूनही वानरसेना बोलवून घ्या असं म्हणतात असा उल्लेख आहे. आता हंपी म्हणजेच किष्किंधा आणि तिथेच अंजनाद्री/अंजेयानाद्री असेल तर तिथून सैन्य का बोलवायचं? सैन्य तर तिथेच असेल ना, म्हणजेच हा अंजनाद्री वेगळा आहे. हा अंजनाद्री म्हणजे सप्तगिरी (तिरुमला डोंगररांगा) मधला डोंगर. याचाच अर्थ हनुमानाचा जन्म सप्तगिरी डोंगररांगांमध्ये झाला होता. पुत्रप्राप्तीसाठी अंजनादेवीने सप्तगिरीत (तिरुमला डोंगररांगा) तप केल्याचाही पुराणात उल्लेख आहे.
       या दोन जागांव्यतिरिक्त आणखी तिसऱ्या एका जागेची भर या वादात पडली आहे. हनुमानाचा जन्म कर्नाटकच्या किनारी भागात गोकर्ण इथे झाला आहे असा काही अभ्यासकांचा दावा आहे. वाल्मिकी रामायणातल्या संदर्भांवरून लक्षात येतं की गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी होती तर हंपीजवळचं अंजेयानाद्री कर्मभूमी. वाल्मिकी रामायणात हनुमान स्वतः सीतेला माझी जन्मभूमी गोकर्ण असल्याचं सांगतो असे उल्लेख आहेत, असंही मत हे अभ्यासक मांडतात . मात्र गोकर्ण हनुमानाचं जन्मस्थळ आहे ही चुकीची धारणा आहे.  वाल्मिकी रामायणाचा उल्लेख केला आहे. सुंदरकांडात एक श्लोक आहे, ज्यात हनुमान सीतेला म्हणतो, 'अहं केसरिणः क्षेत्रे'. आता हनुमानाचे पिता केसरी गोकर्णचे होते, त्यामुळे त्या स्वामींनी या श्लोकाचा असा अर्थ काढला की हनुमानाने सीतेला सांगितलं मी केसरीच्या क्षेत्राचा आहे. हा अर्थ चुकीचा आहे.
इथे 'क्षेत्रज' या अर्थाने हा शब्द वापरला गेला आहे. आता 'क्षेत्रज म्हणजे काय तर महाभारतात कुंतीला पांडूच्या परवानगीने इतर देवतांपासून पुत्र प्राप्त झाले होते. म्हणजे पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत तर 'क्षेत्रज'. तसंच अंजनीमातेला वायुदेवापासून हनुमानासारखा पुत्र प्राप्त झाला म्हणून ते केसरीचे 'क्षेत्रज'. मग हनुमानाचा जन्म गोकर्णला झाला असण्याचा प्रश्नच येत नाही.

अंजनेरी
 
    या  शिवाय या वादात महाराष्ट्राचाही सहभाग आहेच.  राज्य, भौगोलिक प्रदेश आणि याच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंजनेरी, अंजनाद्री आणि अंजेयानाद्री तिन्ही ठिकाणांमध्ये समान धागा ! पुराणात उल्लेखलेल्या अनेक जागा या ना त्या नावाने नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली लक्ष्मणरेषाही आहे, राम-लक्ष्मण-सीता कुंडही आहेत, सीतागुंफाही आहेत आणि जटायूने प्राण सोडला ती जागा. काळाराम मंदिर आणि पंचवटीला भेट देण्यासाठी इतर राज्यातूनही भाविक इथे येत असतात. हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल स्थानिक लोकांमध्ये कालानुरूप काही मान्यता तयार होत असतात आणि त्या मान्यता त्या लोकांसाठी खऱ्याच असतात. हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबदद्ल लिखित स्वरूपात कुठे काही उपलब्ध नाही. पण महाराष्ट्रातले लोक नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला असंच मानतात.यासाठी काही तर्क सांगितले जातात. इंडोनेशियातही पंचवटी आहे, भारतात नसेल अशी रामकथा तिथल्या विमानतळावर चितारली आहे. चीनमध्ये रामायणाचे उल्लेख सापडतात. हरियाणात रामायणात उल्लेख केलेल्या जागा आहेत, गुजरातमध्ये आहेत. म्हणजे ही जी रामायणाची कथा आहे, ही प्रत्येक प्रदेशाने आपआपल्या पद्धतीने स्वीकारली आहे आणि त्याला आपआपल्या पद्धतीने नावं दिली आहेत. या कथेच्या प्रत्येक आवृत्तीत त्या त्या भागातली भौगोलिक ठिकाणं आहेत. नाशिकमध्ये किष्किंधा नावाचं एक कुंड आहे. नाशिकमध्ये जी ठिकाणं आहेत ती सगळी तुम्हाला कर्नाटक आंध्रमध्ये पण सापडतील. पुराणांमध्ये एखाद्या जागेचा उल्लेख आहे, पण त्या जागेचं नक्की लोकेशन काय, अचूक भौगोलिक स्थान काय असे उल्लेख नाहीत. त्यामुळे लोकांनी आपआपल्या भागात ठरवून टाकलं आहे की ही जागा म्हणजे पुराणात उल्लेख केलेलं हे स्थळ. एखाद्याला रामायणाची कथा भावली. त्याने आपल्या भाषेत, आपल्या अभिव्यक्तीत लिहिली आणि आपल्या समोर दिसणाऱ्या भौगोलिक गौष्टींचं वर्णन केलं इतकंच.

बालपण :

किष्कधा कांड ६६-६७ : अंजना सूर्योदयाच्या वेळी प्रसूत झाली. नंतर नुकत्याच उगवलेल्या सूर्याला पाहून, हे फळ आहे, असे हनुमान समजला व ते घेण्यासाठी त्याने उडी मारली. ते पाहून इंद्र रागावला आणि त्याने त्याला वज्र फेकून मारले. त्यामुळे त्याची डावी हनू मोडली. तेव्हापासून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या मुलावर वज्रप्रहार झाल्याचे पाहून वायू क्रुद्ध झाला आणि त्याने आपले वाहणे बंद केले. त्यामुळे सर्व देव घाबरून वायूला प्रसन्न करण्यासाठी धडपडू लागले. मग वायू प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने हनुमंताला वर दिला की युद्धात शस्त्राने तुझा वध होणार नाही. नंतर इंद्र म्हणाला की हा इच्छामरणी होईल.

27-lp-hanuman

युद्ध-कांड २८ :

 रामसन्याचा परिचय करून देताना हनुमानाचे लघुचरित्र सांगताना शुक म्हणतात-

'हनुमान' शब्दाचा संस्कृत अर्थ म्हणजे ज्या व्यक्तीचा मुख किंवा जबडा बिघडलेला. हनुमान नावाबाबत एक कथा सांगितली जाते, की इंद्रदेवाच्या वज्र प्रहारामुळे बालक हनुमानाची हनुवटी तुटली होती. यानंतर त्यांना हनुमान नाव मिळाले. प्रचलित कथेनुसार भगवान हनुमान यांच्या जन्मानंतर एका दिवशी त्यांची आई फळ आणण्यासाठी त्यांना आश्रमात सोडून गेली. जेव्हा बाल हनुमानाला भूक लागली, तेव्हा ते उगवत्या सूर्याला फळ समजून त्याला पकडण्यासाठी आकाशात उडू लागले. त्यांच्या मदतीसाठी पवनही वेगाने वाहू लागला. दुसरीकडे भगवान सूर्य नारायणाने त्यांना नादान बालक समजून सूर्य प्रकाशाने जळू दिले नाही. ज्यावेळी हनुमान सूर्याला पकडण्यासाठी उडी घेतली, त्यावेळी राहू सूर्याला ग्रहण लावू इच्छित होता. भगवान हनुमान यांनी सूर्याच्या वरच्या भागात जेव्हा राहुला स्पर्श केले तेव्हा तो घाबरुन पळून गेला. इंद्राजवळ जाऊन त्याने तक्रार केली की देवराज तुम्ही मला भूक शमवण्यासाठी सूर्य आणि चंद्र दिले होते. आज अमावस्याच्या दिवशी जेव्हा मी सूर्य गिळण्यासाठी गेलो तेव्हा पाहिले की दुसरा राहु सूर्याला पकडण्यासाठी जात आहे. राहुची हकीकत ऐकून इंद्र देव घाबरले आणि त्याला घेऊन सूर्याकडे निघाले. राहु पाहून भगवान हनुमान सूर्याला सोडून राहुला मारण्यास सुरुवात केली. राहुने इंद्राला संरक्षणासाठी आवाहन केले. त्यांनी भगवान हनुमानावर वज्रायुधाने प्रहार केला. यात हनुमान एका पर्वतावर पडले व त्यांची डावी हनुवटी तुटली. हनुमानाची ही अवस्था पाहून वायूदेवाला राग आला. त्यांनी त्याच क्षणी वाऱ्याचा वेग थांबवला. यामुळे सर्व प्राणीमात्रांना श्वास घ्यायला त्रास सुरु झाला. तेव्हा सूर, असूर, यक्ष, किन्नर आदी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्या सर्वांना घेऊन वायूदेवाकडे केले. ते हनुमानाला कुशीत घेऊन बसले होते. बह्मदेवाने त्यांना जीवित केले. त्यानंतर वायुदेवाने वायूचा संचार पुन्हा सुरु केल्याने सर्व प्राणीमात्रा पूर्ववत झाली. मग ब्रह्मदेव म्हणाले, की कोणतेही शस्त्र त्याच्या अंगाला इजा पोहोचू शकत नाही. इंद्रदेव म्हणाले, याचे शरीर वज्रापेक्षाही कठोर असेल. सूर्यदेव म्हणाले, त्याला आपला तेजाचे शतांश प्रदान करेल आणि राहस्य जाणून घेण्याचेही आशीर्वाद दिले. वरुण देव म्हणाले, पाश आणि जल आदीपासून हा बालक सदा सुरक्षित राहिल. यमदेवाने अवध्य आणि निरोगी राहण्याचे आशीर्वाद दिले. यक्षराज कुबेर, विश्वकर्मा आदी देवतांनीही वरदान दिले. या प्रसंगी सर्व देवतांनी हनुमानाला अनेक वर आणि शक्ती दिल्या. त्यात या विश्वाच्या अंतापर्यंत जिवंत राहण्याचं अर्थात अमरत्वाचं वरदानदेखील श्री हनुमानाला मिळालं.

गृहस्थ हनुमान : 

आनंदारामायण सार-कांड अध्याय ११ येथे अशी कथा आहे. लंकादहनानंतर हनुमान समुद्रात स्नान करून परत फिरला असता, त्याचा घाम एका मगरीने गिळला. त्यापासून ती गर्भवती झाली आणि तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. अहिरावण-महिरावण वधाच्या प्रसंगात हनुमानाची आणि मकरध्वजाची भेट झाली. विदेशी रामकथांमध्येही बव्हंशी हनुमान गृहस्थ म्हणून रंगवला आहे, या रामकथांचा मूलाधार भारतीय रामकथा आहे.

जैन साहित्य :

  ‘पउमचरिय’ या जैन रामकथेत हनुमंताला एक सहस्र बायका असल्याचा उल्लेख आहे. त्यात वरुणाची मुलगी सत्यवती, चन्द्रनाखाच्या अनाग्कुसुमा, नलनंदिनी, हरिमालिनी वा सुग्रीवकन्या पद्मरागा या प्रमुख होत्या. स्वयंभू देवाच्या पउमचरित हनुमानाच्या बायकांची संख्या ८००० आहे. रविषेणाच्या पद्मपुराणातही अशीच मोठी संख्या आहे.

हनुमानाचे गुणविशेष :

शौर्य /पराक्रम : रामायण आणि महाभारत यात हनुमानाच्या पराक्रमाचे गोडवे गायले आहेत. उत्तरकांड ३५.३-५ येथे हनुमानाच्या पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा करताना रामाने म्हटले आहे-
शौर्य दाक्ष्यं बलं ध्रय प्राज्ञता नायासाधानाम्
विक्रमश्च प्रभावश्च हनुमती कृतालाया:
दृष्ट्वैव सागरम वीक्ष्य सीदन्तीं कापिवाहिनीम्
समाश्वास्य महाबाहुर्योजनाना शतं प्लुत:
धश्र्यीत्वा पुरीं लङ्कां रावणान्तपुरं तदा
दृष्टा सम्भाषिता चापि सीता ह्य़ाश्वासिता तथा
या श्लोकात शौर्य, दक्षता, बल, धर्य, बुद्धिमता, राजनीती, राजकीय कृत्य शेवटाला नेण्याची हातोटी, पराक्रम वा प्रभाव या गुणांची प्रशंसा केली आहे.
महाभारतातील वनपर्वात १४७.११ येथेही हनुमंताच्या शौर्याची गाथा वर्णिली आहे.
बुद्धिमत्ता : वा.रा. उत्तरकांड ३६.१४ येथे बालपणाचे वर्णन करताना म्हटले आहे – बाल हनुमंताला आपल्या तेजाचा शंभरावा भाग देताना सूर्याने म्हटले की सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता मी याला देतो. त्यामुळे हा श्रेष्ठ वक्ता होईल. वाल्मीकी उत्तराकांडात ३६.४४-४६ येथे म्हणतात व्याकारांचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने हा उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत िहडत राहिला. व्याकारांसुत्रे, सुत्रावृत्ती, वाíतक, भाष्य आणि संग्रह या सर्वाचे अध्ययन करून इतर शास्त्रांमध्येही हा प्रवीण झाला आहे. सत्र आणि वेदार्थ निर्णय याविषयी याची बरोबरी करणारा या जगात कुणी नाही.
राजनीतिज्ञ : हनुमंताने स्वत:च मंत्र्याच्या कर्तव्याची जाणीव करून देताना सुग्रीवाला म्हटले आहे –
नियुक्र्तेमत्रिभिर्वाच्यो ‘वश्यं पार्थिवो हितम्
इत एव भयं त्यक्त्वा ब्राविम्यावाधृतम वच:
युद्धकांडातील (युद्ध. ११२) सीतेला शोधून काढण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. अयोध्येत येत असण्याची खबर भरताला सांगण्याची कामगिरी त्याच्यावर होती. (उत्तर ४०.२३) यावरून तो एक कुशल दूत होता हे लक्षात येते.
हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात (१.९), संगीत् रत्नाकार (१,१७) इ. ग्रंथांतून प्राचीन संगाचार्याबरोबर अन्जानेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.
- महाभारतात पांडू पुत्र राजकुमार भीम आपल्या ताकदीसाठी ओळखला जातो. म्हटले जाते की तो भगवान हनुमानाचा भाऊ होतं.
- हनुमानाला ब्रह्मचारी म्हटले जाते. मात्र त्यांचा एक मुलगाही आहे. त्याचे नाव 'मकरध्वज' असे सांगितले जाते. मकरध्वज भगवान हनुमान यांच्या घामातून जन्माला आला होता.
- भगवान हनुमानाला पाच भावंडे होती.
- ब्रह्मांडपुराणात म्हटले आहे, की बजरंगबली यांच्या नंतर मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान ही त्यांच्या भावंड्यांची नावे आहेत.

कार्य आणि वैशिष्ट्ये
अ. महापराक्रमी : हनुमंताने जंबू, माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ या मोठमोठ्या विरांचा नाश केला. त्याने रावणालासुद्धा बेशुद्ध केले. समुद्रावरून उड्डाण करून लंकादहन केले आणि द्रोणागिरी पर्वतही उचलून आणला. 
 आ. निस्सीम भक्त :  मारुतिराया केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे, हे त्याला ठाऊक होते. 
इ. अखंड साधना : युद्ध चालू असतांना मारुतिराया थोडावेळ बाजूला जाऊन ध्यान लावे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे
ई. बुद्धीमान : मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा ?  हनुमान शक्ती, सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसाद केल्या. वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली. वेद, उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. म्हणूनच राम-लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते. तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमाला पाठवण्यात आले होते. तसेच समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, त्यातून वायूपुत्र मारुति तेजतत्त्वाला जिंकणारा होता, हे लक्षात येते.
उ. जितेंद्रिय : मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. 
 ऊ. भाषणकलेत निपुण असणारा : मारुति उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला.
मारुतीच्या मूर्तीचा रंग शेंदरी असण्याचे आणि त्याला शेंदूर लावण्याचे कारण
१). प्रभु श्रीरामावरील निस्सीम भक्तीचे प्रतीक म्हणून सर्वांगाला शेंदूर लावणे : मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे; म्हणून मी शेंदूर लावते. मित्रांनो, मारुतिराया रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभु श्रीरामाला समजल्यावर  तो प्रसन्न झाला आणि म्हणाला, मारुतिराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे.
२)  मारुतीला शेंदूर लावणे आणि तेल वाहणे : हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.
ब्राह्मतेज व क्षात्रतेजाचे प्रतीक :- 
हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून, हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्यही आले. हनुमानामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे, असे सांगितले जाते. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.
श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला?
लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते. जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत असे तेव्हा ते त्यांना त्रास देत होते. परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. मारुतीच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई वडील देखील चिंतेत होते. त्यांनी ऋषीमुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहे तुम्ही त्यांना माफ करावे.
 परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला. या शापामुळे मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला. मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्ती बद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील शक्ती आठवत असे. 

हनुमंताच्या जीवनातील पाच महत्त्वाचा कहाण्या

     वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजीशी संबंधित शेकडो कथांचे वर्णन आढळते. त्यांच्या बालपणापासून ते कलियुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात. हनुमानजींना कलियुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे. केवळ त्याची भक्ती फलदायी असते. चला जाणून घेऊया असे कोणते 5 प्रसंग आहे जे आजही प्रचलित आहेत.
    १. चारों जुग परताप तुम्हारा : 
    लंकावर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा श्रीराम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण, सुग्रीव, अंगद इतरांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात तेव्हा हनुमानजी श्री रामाची प्रार्थना करतात.- ''यावद् रामकथा वीर चरिष्यति महीतले। तावच्छरीरे वत्स्युन्तु प्राणामम न संशय:।।''
 अर्थात : 'हे वीर श्रीराम! जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील, तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा.' यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात- 'एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशय:। चरिष्यति कथा यावदेषा लोके च मामिका तावत् ते भविता कीर्ति: शरीरे प्यवस्तथा। लोकाहि यावत्स्थास्यन्ति तावत् स्थास्यन्ति में कथा।'
    अर्थात् : 'हे कपिश्रेष्ठ, असेच घडेल, यात शंका नसावी. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे, तोपर्यंत तुझी कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील जोपर्यंत हे लोक बनले राहतील, तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील.' चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा।।
   २. संजीवनी पर्वत दोनदा उचलले : 
      बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरु बृहस्पतीच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीवनी पर्वत आणला. हे पाहून त्याची आई खूप भावूक होते. यानंतर राम-रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तीबाणाचा वापर केला तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर बेहोश झाले. जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वताकडे निघाले. वनौषधी ओळखू न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले. वाटेत त्याला कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी हा रावणाचा अनुयायी होता. कालनेमी रावणाच्या सांगण्यावरूनच हनुमानजींचा मार्ग अडवण्यासाठी गेला होता. पण रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला.
 ३. विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली :
     जेव्हा हनुमानजी सीतामातेच्या शोधात विभीषणाच्या महालात जातात. विभीषणाच्या महालावर कोरलेली रामाची खूण पाहून ते प्रसन्न होतात. तिथे विभीषण यांना भेटतात. विभीषणला परिचय विचारतात स्वत: रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतो. हनुमान आणि विभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहित पडतं की हे कामाचे व्यक्ती आहे.
यानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना, विभीषणाचा रावणाशी वाद सुरू होता, शेवटी विभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात. विभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.
सुग्रीव म्हणतात - 'हे रघुनाथजी! ऐका, रावणाच भाऊ भेटायला आला आहे' प्रभु म्हणतात - 'हे मित्र! तुम्हाला काय वाटतं ?' वानरराज सुग्रीव म्हणतात - 'हे नाथ! राक्षसांची माया कळून येत नाही. इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने आला आहे हे माहीत नाही.' अशात हनुमानजी सर्वांचे सांत्वन करतात आणि राम सुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे हे माझे व्रत आहे. अशाप्रकारे श्रीराम-विभीषणाची भेट हनुमानजींमुळेच निश्चित झाली.
    ४. सर्वप्रथम रामायण लिहिले : 
       धर्मग्रंथानुसार, विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती 'हनुमद रामायण' म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभु रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले होते आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात. तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहीत असे. अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमाचा उल्लेख करणारे 'हनुमद रामायण' रचले.
काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही 'वाल्मिकी रामायण' लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली. ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले 'हनुमद रामायण' पाहिले. हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले.
वाल्मीकिजींना निराश बघून हनुमानजींनी त्यांना निराश होण्याचे कारण विचारले तेव्हा महर्षी म्हणाले की त्यांनी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिली. पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहेस त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही. त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वत शिला एका खांद्यावर उचलून आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली. तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही. ती अजूनही समुद्रात पडून आहे.
  ५. हनुमान आणि अर्जुन : 
     आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे. एकदा रामेश्वरम तीर्थमध्ये अर्जुनाचे हनुमानांशी मिलन होतं. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला- 'अरे, राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास?'
हनुमानजी - ‘होय’, तेव्हा अर्जुन म्हणाला - ‘आपले गुरु श्री राम हे धनुष्यधारी होते, मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती? जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता, ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानर सेनेने समुद्र पार केली असती.’
यावर हनुमानजी म्हणतात - ‘अशक्य, बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता. आमचा एक ही वानर चढला असता तर तर बाणांचा पूल तुटला असता.
अर्जुन म्हणाला - ‘नाही, बघा हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पुल निर्माण करतो. आपण या पुलावरुन सहज सरोवर पार करु शकता.’
हनुमान म्हणाले - ‘अशक्य’
तेव्हा अर्जुनने म्हटले - ‘तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल.’
हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन.’
तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. सेतू निर्माण होयपर्यंत हनुमान लघु रुपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले.
रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले. पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला, दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले.
तेव्हा श्री हनुमान सेतुहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयाराला सांगितले. अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले 'थांबा!' अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला.
देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की ‘हे हनुमान, आपले तिसरे पाऊल सेतुवर पडला असताना मी कासव बनून सेतूखाली निजलेला होतो. आपल्या शक्तिमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रुपातून रक्त निघू लागले. मी कासव रुपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता’
हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली‘मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो. माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा?'' तेव्हा कृष्ण म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. काळजी करु नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे.

हनुमानाची गदा :-

हनुमानाला गदा कशी मिळाली? धार्मिक ग्रंथानुसार, एकदा बाल हनुमान सूर्याला फळ समजून खायला निघाला होता. त्यावेळी इंद्राच्या वज्रप्रहारामुळे हनुमान मूर्च्छित झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या वायुदेवाने आपली हालचाल थांबवली आणि संपूर्ण त्रैलोक्य संकटात पडला. त्यानंतर ब्रह्मदेवाने हनुमानाला जिवंत केलं आणि सर्व देवतांनी हनुमानाला काही ना काही वरदान दिले. देवतांनी त्यांच्या दैवी शस्त्रांपासून निर्भय राहण्याचे वरदानही दिले होते. त्यावेळी भगवान कुबेरांनी बाल हनुमानाला गदा दिली होती, असे मानले जाते.  हनुमानाला कुबेर देव यांनी सोन्याची गदा भेट दिली होती. जी आकाराने खूप मोठी आणि  खूप जड होती. हनुमानाला आपल्या गदेने अनेक राक्षसांना मारले असाही उल्लेख आहे. धार्मिक ग्रंथानुसार रामभक्त हनुमानाच्या गदाचे नाव कौमोदकी गदा असे आहे.  अगस्त्य ऋषी सांगतात की, हनुमानजींच्या पंचमुखी अवतारात खडग, खटवांग, पर्वत, अंकुश, त्रिशूल, पाश, मुठी, स्तंभ, गदा आणि वृक्ष आहेत. पण बजरंगबलीमध्ये अफाट सामर्थ्य होते त्यामुळे त्यांनी कधीही लोखंडी सळी, पर्वत आणि झाड याशिवाय दुसरे कोणतेही शस्त्र वापरले नाही. हनुमानाच्या मूर्तीत किंवा चित्रात डाव्या हातात गदा धरलेले पाहिले असेल. डाव्या हातात गदा धरल्यामुळे त्याला वामहस्तगदायुक्तम् असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांनुसार कुबेरांनी हनुमानाला जेव्हा गदा दिली होती, त्यावेळी त्यांनी वरदान दिले होते की, ही गदा हातात घेऊन तुम्ही कधीही युद्धात पराभूत होऊ शकत नाही. हनुमानाला भूत आणि आत्मेदेखील घाबरतात. वाल्मिकी रामायणात कोणत्या प्रकारची गदा असल्याचं वर्णन नाही. बजरंगबलीच्या मुठी, हात आणि शेपटीत अफाट शक्ती होती. त्याची शक्ती अमर्याद आणि अविश्वसनीय आहे, म्हणून हनुमानाला कधीही विशेष गदेची गरज भासली नाही.
श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला?
     लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते. जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत असे तेव्हा ते त्यांना त्रास देत होते. परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. मारुतीच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई वडील देखील चिंतेत होते. त्यांनी ऋषीमुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहे तुम्ही त्यांना माफ करावे. परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला. या शापामुळे मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला. मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्ती बद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील शक्ती आठवत असे.

श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा व कुठे झाली?

      सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह, जांबुवंत, नळ आणि  निळ या त्यांच्या मित्रांसोबत ऋष्यमुक या पर्वतावरती राहू लागले. मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितलेले होते की, “जो महापुरुष तुझी ब्रह्मकौपिन ओळखील ते तुझे सद्गुरु आहेत असे तो समज”. सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुक पर्वतावरती आले. विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले.
      सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्याने मारुतीरायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले. मारुती राम – लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वरती जाऊन बसले. त्यावेळेस श्रीराम म्हणाले “हे लक्ष्मणा! झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकौपिन असलेले दिव्यआत्मा आहे.” प्रभू श्रीरामांच्या मुखा मधून हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले.
     मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले. मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामांच्या अंगावरती फेकली. प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे मारुतीराया बेशुद्ध पडले. वायू देवतेने मारुतीरायांना प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवले आणि “याचा संभाळ करा” अशी विनंती केली. प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुतीरायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली.
श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्याचा जन्म कसा झाला?
     रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचे म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता. लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुती राय आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला. हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला. मकरध्वज पाताळलोकमध्ये राहत होता. रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकच राजा होता याने त्याचा सांभाळ केला होता. 
 
हनुमान आणि रुद्र :
       हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे. रुद्रावतारी पंचमुखी हनुमंकॅहा मंत्र असा- ॐ नमो हनुमते रुद्रावताराय पंचवदनाय पूर्वमुखे सकलशत्रुसंहारकाय रामदूताय स्वाहा.
हनुमान आणि शनी :
      हनुमत्सहस्रनाम स्तोत्रात शनी हे हनुमानाचे एक नाव सांगितले आहे. सूर्य संहितेत हनुमानाचा जन्म शनिवारी झाला असे म्हटले आहे. शनी हा रुद्र आहे. हनुमानही कुठे कुठे शनीप्रमाणे काळ्या रंगाचा असतो. त्यामुळे नकळत शनी व हनुमान यांचे साधम्र्य लोकमानसांत रुजले असावे आणि शनिवारी हनुमानाची पूजा वा शनिवारव्रतात त्याची उपासना सुरू झाली असावी. परंतु शनी व हनुमान यांच्यात भेदही आहेत.-
    शनी हा सूर्यपुत्र तर हनुमान वायुपुत्र आहे.
    शनी व सूर्य यांच्यात वितुष्ट आले तर हनुमानाने सूर्याकडून सर्व विद्या ग्रहण केल्या. सूर्याने आपल्या तेजाचा १०० वा भाग हनुमानाला दिला.
    शनी पापग्रह आहे, तर हनुमान हा लोकप्रिय देव आहे.
    दोघेही ब्रह्मचारी असले तरी शनी देवाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध तर स्त्रिया हनुमानाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करतात.
    शनिवारी तेलाची खरेदी-विक्री करू नये असा कोकणात संकेत आहे तर हनुमानाला शनिवारीच तेल वाहण्याची रुढी आहे.

हनुमान आणि यक्ष :
        हनुमानचा यक्षोपासनेशी जवळचा संबंध आहे. वीर हनुमान हे यक्षोपासनेतूनच आला आहे. वीर मारुती युद्धाच्या पावित्र्यात असतो. वीर आणि अद्भुत हे शब्द यक्षवाची आहेत. हनुमान हा महावीर आहे. कपिलऊम्बीर या नावाने हनुमंताची बावन्न वीरात गणना केलेली आहे. महाराष्ट्रात फाल्गुन मासात अनेक ठिकाणी वीर मिरवतात. त्या वेळी हे वीर मारुतीच्या दर्शनाला चाललेले असतात. या परंपरेतून मारुतीचा वा यक्ष परंपरेचा जवळचा संबंध सूचित होतो. मथिली लोकगीतांमध्ये व ब्रज मंडलात अनेक गीतांमध्ये हनुमंतासाठी वीर हाच शब्द वापरतात. याशिवाय यक्ष संस्कृतीची अनेक लक्षणे स्पष्ट करणारे गुणविशेष हनुमंताच्या ठायी आहेत. यक्षनिवास पाण्याच्या ठायी असतो. राजस्थानातील बहुतेक गावी विहिरीजवळ हनुमंताच्या गढय़ा असतात. हरयाणात विहीर खणायला प्रारंभ करताना तिथे प्रथम मारुतीची गढी उभारतात. चुरमा हे यक्षांचे विशेष खाद्य आहे आणि राजस्थानात चुरम्याशिवाय हनुमानाचा नवेद्य होऊ शकत नाही. यक्ष हे रोग, भूतबाधा, वांझपण घालवतात अशी समजूत आहे. हनुमानाची उपासना याचसाठी केली जाते. राजस्थान, पंजाब या प्रदेशात आजारी माणसाला बरे वाटण्यासाठी हनुमानाच्या मंदिरात नेण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र, गुजरात या प्रदेशात साथीचे रोग सुरू झाले असता ते घालवण्यासाठी हनुमानाची पूजा करतात. रोगमुक्तीसाठी वीर-हनुमान मंत्राचा प्रयोग करतात. भूतबाधा झाली असता त्याला हनुमानाच्या मंदिरात नेतात किंवा हनुमान मंत्र-स्तोत्रे म्हणतात. स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. निपुत्रिक स्त्री िभतीवर सिंदुराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा करते. त्याच्यापुढे चढते-उतरते, कणकेचे दिवे लावते. शनिवारी त्याच्या गळ्यात रुईच्या पांची किंवा फुलांची माळ घालून त्याला उडीद वा मीठ अर्पण करते.

हनुमान आणि तंत्रोपासना :
       हनुमानाची तांत्रिक उपासना मनोकामना पूर्ण करणारी आणि लौकिक सिद्धी प्राप्त करून देणारी आहे, असा लोकांचा विश्वास आहे. या तांत्रिक उपासनेत द्वादाशाक्षरी मंत्राला महामंत्रराज म्हणतात –
              हौं हृस्फें हूख्फें ह्सौं हनुमते नम:
         या मंत्राचा ऋषी राम आहे. छंद जगाती असून, देवता हनुमान आहे. ह्सौं हे त्याचे बीज असून हृस्फें त्याची शक्ति आहे. या मंत्राचा यथाविधी प्रयोग केल्यावर राजभय, शत्रूभय उरत नाही. विषारी पाणी शुद्ध करण्याचे सामथ्र्य या मंत्रात आहे. तसेच जारणमारण, उच्चाटन इ. जीवघेण्या संकटातून माणूस मुक्त होऊन त्याला इच्छित प्राप्ती होते.

हनुमान आणि नाथसंप्रदाय :
       नाथसंप्रदायाचे बारा उपपंथ असून, हनुमान हा त्यातील ध्वजानाथ पंथाचा प्रवर्तक मानला जातो. या पंथाचे लोक हनुमानाचे परम उपासक आहेत. तांत्रिक मेळ्यातून मत्स्येन्द्रनाथाला गोरक्षाने सोडल्याची कथा प्रसिद्ध हे. त्या वेळी हनुमान आणि गोरक्षनाथ यांचे युद्ध होऊन हनुमानाला गोरक्षनाथांचा प्रभाव मानावा लागला. त्यातूनच हनुमंताच्या पूजेवर नाथसंप्रदायाचा प्रभाव पडला असावा आणि या सांप्रदायिकांनी वीर स्वरूपात त्याला आपलासा केला असावा.

या सर्व विवेचनावरून असे म्हणता येईल की हनुमान उपासनेचे दोन प्रमुख प्रवाह आहेत. रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.

हनुमान आणि मुर्ती शास्त्र  :-
     सीतेचा शोध लाऊन लंकेची राखरांगोळी करणारा हनुमान आज आसेतुहिमाचल प्रसिद्धी पावला आहे. दास्य भक्तीचा आचार्य, मल्लांचे उपास्य, प्रेत व पिशाच्च बार्धेपासून सोडविणारा, तांत्रिकांचे एक दैवत अशा अनेक रूपात मारुती हा भारतीयांचा कंठमणी झाला आहे. जवळ जवळ प्रत्येक गावांत एखाद्या पिंपळाखाली शेंदूर फासलेला मारुतिराय असतोच. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी हनुमंतोपासनेला समर्थांनी चांगला उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमंतोपासनेचा भरपूर प्रचार केला.
       हनुमंताचा उल्लेख रामायणांत विपुल रूपाने येत असला तरी त्याची उपासना फार जुनी असल्याची ग्वाही मूर्तिशास्त्र देत नाही. ज्याप्रमाणें गुप्तकाळांत रामाच्या स्वतंत्र प्रतिमा मिळत नाहीत त्याचप्रमाणें मारुतीच्याही मूर्तीचा अभावच दिसतो.














       मूर्तीकलेत जो हनुमान पाहायला मिळतो तो इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकानंतर मिळतो. गुप्तपूर्व काळात रामकथेतही अंकन मिळत नाही. कथा मिळते पण अंकन मिळत नाही. त्याच्या प्रतिकृतीचं वर्णन अर्जुनाच्या रथावर असल्याचं आपणास महाभारतात मिळतं. पण ती त्याची प्रतिकृती आहे. मूर्ती नाही.
गुप्त काळ आणि गुप्तनंतरच्या काळात दिसतो तो देवगड, नचनाकुठार, चौसा (बिहार) या ठिकाणी शिल्पांकित केलेल्या रामकथांमधून. पण पूजावह अशी मूर्ती आठव्या शतकात मिळते. ज्या मूर्तीची पूजा व्हायला लागली अशी मूर्ती तेव्हा प्रत्यक्षात आली. तो प्रतिहार राजांचा काळ आहे. म्हणजेच आठव्या शतकातला. अशी मूर्ती आता लखनौच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते. मारुतीची प्रतिमा सुमारे ८-९ व्या शतकांपासून मिळू लागते. अशी एक खंडित प्रतिमा लखनऊ संग्रहालयात अहे (सं.सं. ५१.८७). आज ही मूर्ती खंडित असली तरी मुळात ही फारच सुंदर असली पाहिजे. कीर्तिमुखाच्या अलंकरणाने अलंकृत केश, गळ्यातील वनमाला आणि छातीवरील श्रीवत्स चिन्ह या उल्ले‌खनीय वस्तू होत. हनुमंताच्या अभिलिखित प्रतिमांत खजुराहो (म.प्र.) येथून हर्ष संवत् ३१६-सन् ९२२ ची मिळालेली मूर्ती जुनी म्हणून महत्त्वाची आहे. दुसरे उदाहरण म्हणून हरसोद अभिलेखाचे (वि.सं. १२५५= सन् १९९८) देता येईल ज्यात एका व्यापाऱ्याने हनुमानाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. उत्तर भारतात कलचुरी आणि चन्देल राजवंशाच्च्या नाण्यांवर हनुमान दिसतो. दक्षिणेत यादव, कदंब आणि होयसाळ यांचे हनुमान हे राजचिन्ह होते. पांड्याच्या नाण्यांवर तो आढळतो . विशेष म्हणजे अर्काटचा नवाब महम्मद अली वलजा याने ही 'हनुमान' चिन्हाचा वापर केला होता. 




नाण्यावर हनुमान

उत्तर मध्ययुगीन काळातील मूर्ती ११-१२ व्या शतकात दिसून येते. त्या काळातील मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यात वनमाला आहे, क्वचित यज्ञोपवीत आहे, लांब गुंडाळलेलं शेपूट आहे आणि ही मूर्ती चपेटदान मुद्रा स्वरूपात आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या स्थितीतील मूर्ती. अशा मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो, तर काही ठिकाणी त्याच्या पायाशी राक्षसीणदेखील दिसून येते. याबद्दल असे म्हटले जाते की ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. बंगालमध्ये, पन्हाळ्याच्या पायथ्याला, बीड येथे अशा मूर्ती आहेत. या राक्षसीणीला तिथे पनवती म्हणतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगालमध्ये साडेसातीला पनवती शब्द आहे. हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे ती राक्षसीण दाखवलेली आहे असे मानले जाते. वस्तुत: शनिवार आणि मारुतीचा काहीही संबंध नाही. पण मग शनिवारी का मारुतीची पूजा करतात, तर मारुती साडेसातीला पायाखाली ठेचतो, नियंत्रण करतो म्हणून त्याची पूजा केली जाते. बंगालमध्ये अशा मूर्ती अधिक ठिकाणी पाहायला मिळतात. सुमारे बाराव्या शतकांतील हनुमंताची खंडित मूर्ती प्रयागराजच्या संग्रहालयात आहे (प्रयागराज कॅट. सं. २३४). येथें मारुतीचे तोंड पसरलेले असून डावा हात अर्धवट मूठ वळून छातीशी ठेवला आहे. याच्या कमरेत एक सुरा ही खोवलेला आहे.
वर्गीकरण :
       नंतरच्या काळांत मारुतीच्या बऱ्याच मूर्ती मिळतात. दक्षिणेंत हा आंजनेय या नावाने पूजला जातो.      भारतातच नव्हे, तर विदेशातही मारुतीची अनेक मंदिरे आहेत. त्यांमध्ये असलेल्या मारुतीच्या मूर्तींचे रंग-रूपही निरनिराळे आहे. रंग आणि रूप यांनुसार मारुतीची निरनिराळी गुणवैशिष्ट्ये आहेत.
अ ) रंगानुसार मारुती मूर्ती :-
     हनुमानाची मूर्ती क्वचित काळ्या आणि बव्हंशी तांबड्या रंगाची असते. त्याचा काळा वर्ण हा शनीच्या प्रभावाने निर्माण झाला असावा. तांबड्या रंगाचा हनुमान म्हणजे शेंदूर माखलेला. हनुमानाच्या शेंदूरप्रेमाच्या कथाही आहेत.
     कथा १) एकदा सीतेने स्नानानंतर कपाळावर शेंदुराचा टिळा लावला. हनुमानाने त्याचे कारण विचारल्यावर सीता म्हणाली, ‘‘त्यामुळे तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढते.’’ तीच गोष्ट हनुमानाने लक्षात ठेवली आणि त्याने स्वतःच्या सर्वांगाला शेंदूर फासला ! हे पाहून श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाला, ‘‘तुझ्यासारखा माझा कोणी भक्‍त नाही.’’ आणि श्रीरामाने हनुमानाला अमरत्व दिले; म्हणून तो सप्तचिरंजिवांपैकी एक आहे.
      कथा २)  हनुमान द्रोणागिरी घेऊन लंकेला जात असता भरताने त्याला बाण मारला. त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. ती जखम शेंदूर आणि तेल लावून बरी झाल्याने हनुमानाला शेंदूर आणि तेल आवडते.
रूपानुसार मारुती मूर्ती :- 
आकार आणि मुख यांनुसार हनुमानाच्या सर्वसाधारणतः पुढील प्रकारच्या मूर्ती आढळतात.

मारुतीची रूपे :-

   मारुतीची विवीध प्रकारच्या मुर्ती बघायला मिळतात. त्यांचे प्रकार आणि माहिती घेउया.
१) प्रताप मारुति : 
एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसर्‍या हातात गदा, असे याचे रूप असते. यातून मारुतीची सर्वशक्तीमानता पहायला मिळते.

२) दासमारुति : 
   हा श्रीरामापुढे हात जोडून उभा असतो. त्याचे मस्तक किंचित पुढे झुकलेले आणि पाय जुळवलेले असतात. त्या वेळी त्याची शेपटी भूमीवर रुळलेली असते. दासमारुती हा रामाशी एकरूप झालेला असल्याने त्याच्यातुन भाव आणि चैतन्य प्रक्षेपित होते.नमस्कार मुद्रेत जोडलेल्या हातातच गदाही लोंबताना दिसते. नागपूरला हा मारुती बऱ्याच ठिकाणी दिसतो.





Around 1600 years old Murti of Bhagwan Hanuman at Undavalli Caves, near Vijayawada, Andhra Pradesh.

३)  वीरमारुति :
   
वीरमारुति हा युद्धाच्या पवित्र्यात असतो. वीरमारुतीची मूर्ती वीरासन घातलेली असते. या मूर्तीच्या डाव्या हातात गदा असते. डाव्या हाताला पुढे केलेल्या डाव्या पायाच्या मांडीचा आधार देऊन ती गदा डाव्या खांद्यावर टेकवलेली असते. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला असून उजवा हात अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर उभारलेली असते. काही वेळा त्याच्या पायाखाली राक्षसाची मूर्ती असते.  नकारात्मक शक्तीमुळे जे संकट निर्माण झालेले असते, ते दूर करण्यासाठी वीर मारुतीची आराधना केली जाते.वाईट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी वीरमारुतीची उपासना करतात. वीरमारुतीमधून शक्‍ती प्रक्षेपित होत असते.
  यात तीन प्रकारची मारुतॉ शिल्प दिसतात. 
This Monolithic Hanuman ji idol is located in the premises of Ranga (Madhava) temple near Kamala Mahal Hampi, Karnataka, BHARAT (India)
 
    एका हातात गदा व दुसऱ्या हातात द्रोणागिरी घेऊन उड्डाण करणारा मारुती. मारुतीच्या प्रतिमेचा हा सर्व साधारण प्रकार आहे. यांत थोडे फार फरक ही आढळतात. कुठें याच्या पायाखाली राक्षस असतात, तर कुठे भरत खालून बाण मारीत असतो.
२) वीरमारुती (दुसरा प्रकार) डाव्या हातात गदा घेतलेल्या मारुतीने उजवा हात जणु की काय थप्पड मारण्याकरिता उगारलेला दिसतो. ( चपेटदान मुद्रा )

३) वीरहनुमान (तिसरा प्रकार) यात मारुतीच्या उजव्या हातात गदा, डाव्यात कमळ व खांद्यावर राम लक्ष्मण असतात.

५) द्रोणाचल नेत असताना भरताकडून बाण मारला जाणारा मारुती
४) . पंचमुखी मारुति :
     आपण पुष्कळ ठिकाणी पंचमुखी मारुतीच्या मूर्ती पहातो. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. पंचमुखीचा अर्थ आहे, पाच दिशांचे रक्षण करणारा. मारुति पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व या पाच दिशांचे रक्षण करतो.
 





पौराणिक मान्यतेनुसार, पंचमुखी हनुमान हे बजरंगबलीचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते. रावणाच्या मायावी शक्ती संपवण्यासाठी रावणाशी युद्ध करताना हनुमानजींनी पंचमुखी हनुमानाचा अवतार घेतला होता. त्याची आख्यायिका अशी. पौराणिक कथेनुसार, भगवान रामाशी झालेल्या युद्धादरम्यान रावणाला जाणवलं की, या युद्धात त्याचा पराभव होऊ शकतो. आपला पराभव टाळण्यासाठी त्याने मग मायावी शक्तींचा वापर सुरू केला. या युद्धात रावणाने आपला मायावी भाऊ अहिरावण याची मदत घेतली. अहिरावणाची आई भवानी यांना तंत्र-मंत्र माहीत होते. याच कारणामुळे अहिरावण हा तंत्रविद्येतही पारंगत होता. युद्धादरम्यान त्यांनी अशी माया केली की, भगवान रामाची सेना हळूहळू युद्धभूमीवर झोपू लागली. भगवान राम आणि लक्ष्मण देखील या मायावी चालीपासून वाचू शकले नाहीत आणि ते देखील झोपी गेले. भगवान राम आणि लक्ष्मण झोपी जाताच अहिरावणाने त्यांचे अपहरण करून अधोलोकात नेले. काही काळानंतर मायेचा प्रभाव ओसरला, मग सेनादल जागे झाले आणि त्यांनी पाहिले की भगवान राम आणि लक्ष्मण तिथे नाहीत. विभीषणाला ही मायावी चाल समजली आणि त्यांनी हनुमानाला राम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी अधोलोकात जाण्यास सांगितले. भक्त हनुमान अधोलोकात पोहोचताच तेथे मकरध्वजाने हनुमानाला अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हनुमानजींचे मकरध्वजाशी युद्ध झाले आणि मकरध्वजाचा पराभव करून हनुमान आतमध्ये गेले, तेथे भगवान राम आणि लक्ष्मण यांना बंधक बनवले गेले होते. हनुमानजींनी पाहिले की पाच दिशांना पाच दिवे जळत आहेत. ही तांत्रिक विद्या त्या भवानीने केली होती. हे पाच दिवे एकत्र विझवल्यावरच अहिरावण संपुष्टात येईल हे हनुमानजींना माहीत होते. त्यासाठी बजरंगबलीने पंचमुखी हनुमानाचे रूप धारण करून अहिरावणाचा वध केला. हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर पंचमुखी हनुमानाची रूप - बजरंगबलीच्या पंचमुखी रूपात उत्तरेला वराह मुख, दक्षिणेला नरसिंह मुख, पश्चिमेला गरुड मुख, पूर्वेला हनुमान मुख आणि आकाशाकडे हयग्रीव मुख आहे.
५) दक्षिणामुखी मारुती :-
 दक्षिण हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. एक म्हणजे दक्षिण दिशा आणि दुसरा म्हणजे उजवी बाजू , या मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे असते, यावरून त्याला ‘दक्षिणमुखी मारुति’ असे म्हटले जाते.
   दुसरा अर्थ म्हणजे उजवी बाजू या मारुतीचे तोंड त्याच्या उजव्या बाजूकडे वळलेले असते. या मारुतीची सूर्यनाडी चालू असते. सूर्यनाडी ही तेजस्वी आणि शक्‍तीदायक आहे.
   (गणपति आणि मारुति यांची सुषुम्नानाडी नेहमी चालू असते; पण रूप पालटल्यावर थोडा पालट होऊन त्यांची सूर्य किंवा चंद्र नाडीही थोड्या प्रमाणात चालू होते.)
   उजवीकडे पहाणारा मारुति हे उजव्या सोंडेच्या गणपतीप्रमाणेच कडक दैवत आहे. वाईट शक्‍तींच्या निवारणासाठी याची उपासना केली जाते.
६) वाममुखी मारुती :-
वाम म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा या मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असते. या मारुतीचे तोंड त्याच्या डाव्या बाजूकडे वळलेले असते. या मारुतीची चंद्रनाडी चालू असते. चंद्रनाडी ही शीतल आणि आनंददायी आहे. तसेच उत्तर दिशा ही अध्यात्माला पूरक आहे.


७) अकरामुखी मारुती :-
या मारुतीला बावीस हात आणि दोन पाय असतात. (असा मारुति सौराष्ट्रात आहे.)

टेकड्यांवरील हनुमान मंदिरे

सिमल्यापासून २ किमी. अंतरावर असलेले, जाखू टेकडी हे सिमल्यातील सर्वोच्च (२,४५४ मी.) शिखर आहे. या टेकडीच्या माथ्यावर जुने हनुमान मंदिर आहे.


अन्य मंदिरे

पैठण येथे साळी समाजाच्या साळीवाडा नावाच्या वस्तीत, साळी पंचांचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी समस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी


हनुमान मंदिरांची गावोगावची वेगवेगळी नावे

अंबाजोगाई
काळ्या मारुती,

अंमळनेर
डुबकीचा मारुती

अहमदनगर
वारुळाचा मारुती

आर्वी (धुळे जिल्हा)
रोकडोबा हनुमान

औरंगाबाद
सुपारी मारुती (गुलमंडी), भद्‌ऱ्या मारुती [५]

सोलापूरजवळील कल्लहिप्परगे गावात
चपेटदान मारुती,

खुलताबाद (औरंगाबाद जिल्हा)
भद्रा मारुती

जबलपूर
पंचमुखी मारुती

डोंबिवली
पंचमुखी मारुती

नाशिक
कानडे मारुती, दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मूर्ती. दोन्ही बाजूंना ही मूर्ती आहे.)[६], रोकडोबा मारुती

पुणे

अकरा मारुती (शिंदे आळीच्या शेवटी), अवचित मारुती, उंटाडे मारुती (केईएम हॉस्पिटल), खुन्या मारुती (पूलगेट बस स्थानकाजवळ), गंज्या मारुती , गवत्या मारुती, गावकोस मारुती(कसबा पेठ – कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) [७], जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती (काका गाडगीळ गल्लीच्या तोंडाशी), दुध्या मारुती, धक्क्या मारुती (बुधवार पेठेत इलेक्ट्रिक लेनमध्ये पासोड्या विठोबाच्या आसपास), नवश्या मारुती (पु.ल. देशपांडे उद्यानासमोर), पंचमुखी मारुती (गुरुवार पेठ), पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला), पावन मारुती (भरत नाट्यमंदिराजवळ), पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) तांबोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), बटाट्या मारुती (शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात), भांग्या मारुती (बुधवार चौकाजवळ), भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत), लकेरी मारुती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ), वीर मारुती, शकुनी मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभे राहिले की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती आहे.), शनी मारुती, सोन्या मारुती,

मुंबई
पिकेट मारुती(जीटी हॉस्पिटलसमोर), बंड्या मारुती, घंटेश्वर हनुमान (खार)

सातारा
गोळे मारुती, डोंगरावरचा मारुती, दंग्या मारुती, प्रताप मारुती, मंगल मारुती

 अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड :- 

आपल्याकडे हनुमानाची मूर्ती म्हणजे शेंदूर फासलेला दगड. अगदी देखणी कोरीव मूर्ती कुठे दिसत नाही. द्रोणागिरी पर्वत हाती घेवून उडणारा पवनपुत्र अशी मूर्ती मंदिरात आढळून येते. पण ही मूर्ती हात जोडलेली म्हणजेच अंजली मुद्रेतील आहे. या हनुमानाच्या अंगावर बारीक अशी वस्त्रे प्रावरणे आणि आभुषणे कोरली आहेत. त्याची गती दाखविण्यासाठी कोपरावरून मागे सोडलेले वस्त्राचे गोंडे जमिनीला समांतर असे उडताना दाखवले आहेत. कानातले कुंडलेही छान आहेत.
बाजूची मूर्ती गरूडाची आहे. हा गरुडही अंजली मूद्रेत आहे. त्याचे बाकदार नाक उठून दिसते.एरवी भेदक दिसणारे त्याचे नेत्र शांत दिसत आहेत. पंख पसरलेले रेखीव असे कोरले आहेत. खाली त्याच्या वस्त्राची टोकं कोरलेली आहेत. हे वस्त्रही कलाकुसरयुक्त आहे कारण गरूड विष्णुचे म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न देवतेचे वाहन आहे. याचा मुकूटही देखणा आहे.
या दोन्ही मूर्ती शेंदूरवादा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस ठेवलेल्या आहेत. विठ्ठल देवता वैष्णव देवता आहे. स्वाभाविकच गरूड तिथे असणं समजू शकतो. विठ्ठलाला विष्णुचा ९ वा अवतार मानलं जातं. पण हनुमानाची मूर्ती इथे का? याचं कोडं उलगडत नाही.  (यावर राहूल देशपांडे या मित्राने केलेला खुलासा समर्पक व समाधानकारच आहै. .. दास मारुती हा कायम भागवत पंथात आराध्य देवतेसमोर उभे असण्याचा उल्लेख आहे."गरुड हनुमंत पुढे उभे राहती..." हे वाक्य आहेच आरती मध्ये.)
मध्वमुनीश्वरांच्या काळापासूनचे (इ.स. १६६०) हे विठ्ठल मंदिर आहे. तेंव्हा या मूर्तीही ३६० वर्षांपासूनच्या आहेत. खाम नदीच्या काठी संभाजीनगरपासून अगदी जवळ ३० किमी. अंतरावर गंगापूर तालूक्यात हे गांव आहे.


 अशोक वनातील सीता- हनुमान भेटीचे शिल्प :-

     घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने लक्षात येत नाही आले. तेथील पुजार्‍याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले कि मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्षात येते. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे. मागचे अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
     जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.

प्रयागराज येथील झोपलेल्या हनुमानाचे मंदीर :-

       हनुमान हा रामाचा दूत आहे आणि तो वाऱ्यासारखा वेगवान आहे. त्याला अतुलनीय शक्ती, ज्ञान आणि संकटांपासून मुक्त करणारा (संकट) मानला जातो. मंदिरातील मूर्ती वीरमुद्रेत किंवा अंथरुणावर आहे.  हनुमानजी म्हणजे चमत्काराचे दुसरे नाव. पौराणिक काळापासून बजरंगबलीचे नाव चमत्कारांशी संबंधित आहे. छातीत असलेल्या राम-जानकीचे दर्शन असो वा लक्ष्मणजीला जिवंत करण्यासाठी संजीवनी बूटी आणायचीअसो. पौराणिक कालखंडच नव्हे तर कलियुग देखील हनुमानजींच्या चमत्कारांनी सजविला गेला आहे. आपल्या देशात हनुमानजीची प्राचीन चमत्कारी मंदिरे आहेत. यातील एक संगमच्या काठावर हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरात हनुमानाची मुर्ती उभी नाही तर ती झोपलेली आहे. शेवटी, या पहुडलेल्या हनुमानजींच्या मूर्तीचे रहस्य काय आहे. संगमच्या काठावर वसलेल्या या मंदिराबद्दल असे म्हणतात की, आंघोळीनंतर संगमच्या या मंदिराचे दर्शन घेतले नाही तर स्नान अपूर्ण मानले जाते. हनुमानजींच्या या पुतळ्याचे रहस्य काय आहे आणि या मंदिराची स्थापना कशी आहे हे जाणून घेऊया ...
       हनुमानजींची ही विचित्र मूर्ती दक्षिण मुखी आणि २० फूट उंच आहे. असे मानले जाते की ते भू-पातळीपासून कमीतकमी ६-७ फूट खाली आहे. प्रयागराज शहरात त्यांना मोठे हनुमानजी, किल्लेदार हनुमानजी, पहुडलेले हनुमानजी आणि बांधवाले हनुमानजी म्हणून ओळखले जाते. या पुतळ्याच्या डाव्या पायाखाली कामदा देवी आणि उजव्या पायाखाली अहिरावणा असल्याचे मानले जाते. त्याच्या उजव्या हातात राम-लक्ष्मण आणि डाव्या हातात गदा आहे. बजरंगबली येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात.
असे सांगितले जाते की, जेव्हा हनुमानजी लंकेवर विजय मिळवताना परत येत होते तेव्हा त्यांना वाटेत थकवा जाणवू लागला. म्हणून सीता मातेच्या सांगण्यावरून ते येथे संगमाच्या काठावर झोपले. हे लक्षात घेऊन येथे झोपलेल्या हनुमानजीचे मंदिर बांधले गेले. हे मंदिर किमान ६००-७०० वर्ष जुने असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की कन्नौजच्या राजाला मूल नव्हते. त्याच्या गुरूंनी यावर उपाय म्हणून सांगितले की, 'राम लक्ष्मणला नागाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी पाताळात गेलेल्या हनुमानजींची प्रतिमा निर्माण कर. भगवान हनुमानाचा हा पुतळा विंध्याचल पर्वतावरुन आणला गेला पाहिजे.’ जेव्हा कन्नौजच्या राजाने असे केले आणि विंध्याचल येथून बोटीने हनुमानजीची मूर्ती घेऊन आले. तेव्हा अचानक बोट तुटली आणि ही मूर्ती पाण्यात बुडाली. हे पाहून राजा फार दु:खी झाला आणि आपल्या राज्यात परतला. या घटनेनंतर कित्येक वर्षानंतर जेव्हा तिथे गंगेचा पाण्याचा प्रवाह कमी झाला तेव्हा तिथे प्रयत्न करणारे रामभक्त बाबा बालागिरी महाराज यांना हा पुतळा मिळाला. श्री बालगिरी जी महाराजांनी या मूर्तीची पूजा करण्यास सुरुवात केली. हळूहळू, हे ठिकाण "श्री लेटे हनुमान मंदिर प्रयागराज" म्हणून लोकप्रिय झाले आणि विविध ठिकाणांहून लोक येथे भेट देऊन पूजा करू लागले.त्यानंतर तेथील राजाने मंदिर बांधले.
मुघल सम्राट अकबराच्या काळात असेही म्हटले जाते की किल्ल्याच्या सीमा बांधताना अलाहाबाद किल्ला बांधण्यात आला होता. या मंदिरामुळे सीमा भिंतीत अडथळा निर्माण झाला होता. अकबरने हनुमानजींना खोदून ते वर करण्याचा प्रयत्न केला आणि ती सीमा सरळ बांधता यावी म्हणून ती दुसरीकडे कुठेतरी ठेवली, परंतु जेव्हा त्यांनी हनुमानजींना वर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते जमिनीत अधिक स्थिरावले. अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी हार मानली आणि भिंत बांधली.
नंतर औरंगजेबाच्या राजवटीत जेव्हा त्याला मंदिराबद्दल कळले तेव्हा त्याने श्री लेटे हनुमानजी प्रयागराजची मूर्ती फेकून देण्याचा आदेश दिला. याच काळात संपूर्ण देशभरातील हिंदू मंदिरे पाडण्यात आली. औरंगजेब आणि त्याचे सैनिक मोठ्या प्रयत्नांनंतरही हनुमानजींची मूर्ती उचलू शकले नाहीत. त्यांनी जितक्या वेळा हनुमानजींना उचलले तितके वेळा ते जमिनीत खाली बसले. हनुमानजींची मूर्ती जमिनीखाली ६ ते ७ फूट असल्याने हेच कारण आहे.
      प्रयागराज (अलाहाबाद) येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे आणि असेही दिसून आले आहे की दरवर्षी पुराच्या वेळी गंगा नदीची पाण्याची पातळी वाढली की ती हनुमानजींना पवित्र पाण्यात स्नान करायला लावते. लोक म्हणतात की गंगामैया येऊन हनुमानजींना स्नान घालतात आणि नंतर पाण्याची पातळी कमी करायला लागतात. याचा अर्थ हनुमानजींनी स्नान केल्यानंतर पाण्याचे थेंब कमी होऊ लागतात.
      श्री लेटे हनुमान जी (बडे हनुमान जी, बांधवा) मंदिर अलाहाबाद किल्ल्याजवळ त्रिवेणी संगम जवळ आहे. हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जिथे भगवान हनुमानाबद्दल खूप पवित्र श्रद्धा आहे. हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती झोपलेल्या स्थितीत आहे. या झोपलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे पाय दक्षिणेकडे आणि डोके उत्तरेकडे आहे. मंदिराचे व्यवस्थापन बाघंबरी गद्दी करतात. मंदिरात विशेषतः मंगळवार आणि शनिवारी भाविकांची गर्दी असते. जरी लोक इतर दिवशीही मंदिरात येतात. श्री लेटे हनुमान जी प्रयागराज सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना निशाण (बांबूने फडकवलेला ध्वज) अर्पण केले जाते.

श्री लेटे हनुमानजींना कसे पोहोचायचे

लोक रेल्वे, रस्ते किंवा हवाई मार्गाने वापरत असलेल्या कोणत्याही भूपृष्ठीय वाहतुकीद्वारे तुम्ही श्री लेटे हनुमानजींपर्यंत सहज पोहोचू शकता.
त्रिवेणी संगमला पोहोचण्यासाठी तुम्ही शेअर्ड टॅक्सी, ऑटो वापरू शकता किंवा कॅब बुक करू शकता (ऑनलाइन किंवा ऑफलाइन).

महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपासून आणि विमानतळापासून लेटे हनुमान जी पर्यंतचे अंतर:

प्रयागराज जंक्शन: अंदाजे ७-८ किमी.
प्रयागराज चेओकी: अंदाजे १० किमी.
नैनी जंक्शन: अंदाजे ८ किमी.
प्रयाग जंक्शन: अंदाजे ७-८ किमी.
प्रयागराज संगम: अंदाजे २.५ किमी.

प्रयागराज नागरी विमानतळ : अंदाजे १७ किमी.

लेटे हनुमान मंदिर वेळ:- सकाळी ५:३० ते दुपारी २, संध्याकाळी ५:०० ते रात्री ८:००

आरतीची वेळ:- संध्याकाळी ५:०० वाजता

भोग/प्रसाद:- भेटीच्या वेळेत

कष्टभंजन हनुमान मंदिर, सालंगपूर गुजरात :-
     शनी आणि हनुमानाशी संबंधित मान्यतांवर आधारित एक मंदिर गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे आहे.जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. येथील भगवान हनुमानाची पूजा ही कष्टभंजन म्हणजेच दु:खांचा विनाश करणारा भगवंत या रूपात केली जाते. या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सद्गुरु गोपालानंद स्वामींनी केली आहे.
   श्री हनुमान मंदिर हे सारंगपूर, गुजरात सारंगपूर  येथे एक हिंदू मंदिर आहे, जे स्वामीनारायण पंथाच्या वडताल गडीचे आहे. हे एकमेव स्वामीनारायण मंदिर आहे ज्यात पूजेची देवता म्हणून स्वामीनारायण किंवा कृष्णाच्या मूर्ती नाहीत. या हनुमानाला कष्टभंजन म्हणून ओळखले जाते. या मंदीराची स्थापना विक्रम संवत १९०५ साली केली गेली. अश्विन कृष्ण पंचमीला या मंदीराची उभारणी सुरु केली.
हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायातील प्रमुख मंदीरापैकी आहे. सद्गुरू गोपालानंद स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. स्वामी नारायण याच मंदीराच्या ठिकाणी उपासनेत तल्लीन होते. तेव्हा त्यांना इथेच हनुमानाचे दिव्य स्वरुपात दर्शन झाले. जेव्हा सद्गुरू गोपालानंद स्वामींनी हनुमानाची प्रतिमा स्थापित केली, तेव्हा त्यांनी त्यास लोखंडी काठीने स्पर्श केला आणि प्रतिमा जिवंत झाली आणि तीच्यात प्राण प्रतिष्ठापण होउन जणु ती जिवंत झाली. ही कथा या मंदिरात केल्या जाणाऱ्या उपचारांच्या विधींसाठी एक मार्गदर्शक बनली आहे.१८९९ मध्ये वडतालच्या कोठारी गोरधनदास यांनी मंदिराचे कामकाज सांभाळण्यासाठी शास्त्री यज्ञपुरुषांची नियुक्ती केली; त्यांच्या कार्यकाळात शास्त्री यज्ञपुरुषदास यांनी जागेचे नूतनीकरण केले, शेजारील बंगला बांधला आणि मंदीराचा जीर्णोध्द्दार करण्यासाठी अधिक जमीन संपादित केली.
    ज्योतिषमध्ये शनिदेवाला क्रूर ग्रह मानण्यात आले आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्याच्या उपायांमध्ये हनुमानाची पूजा करणे हासुद्धा एक उपाय आहे. हनुमानाची पूजा करणाऱ्या व्यक्तीचे शनी दोषापासून रक्षण होते. हनुमानाच्या पूजेमुळे शनिदेव का प्रसन्न होतात, या संदर्भात विविध पौराणिक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता... या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान शनीदेवावर क्रोधीत झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले.  शनिदेवाला हे माहिती होते की, हनुमान बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत... यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रुपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले जाते.
    मंदीरात असलेल्या हनुमानाच्या मुर्तीला अक्कडबाज मिशा आहेत, हनुमान एका सिंहासनावर विराजमान झाले असून त्यांच्या चारही बाजुला वानरसेना दाखवली आहे. हे सिंहासन बनवण्यासाठी ४५ किलो सोने आणि ९५ किलो चांदी वापरली आहे. हनुमानाच्या मुकुटात असंख्य हिरे- रत्न जडवलेली आहेत. सिंहासनाजवळ सोन्याची गदा दाखवलेली आहे. 
 
    सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा परिसर खूप मोठा आहे... हा एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसतो. हे मंदिर आपल्या पौराणिक महत्त्वासोबतच येथील सौंदर्य आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. कष्टभंजन हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असून यांना महाराजाधिराज नावानेही ओळखले जाते. हनुमानाच्या मूर्तीजवळ वानर सेना आहे.
ज्या लोकांना  साडे सातीचा त्रास सुरु आहे ते लोक या मंदीरात नारळ वाहतात,  कष्टभंजन मंदिरात भूत-प्रेत बाधा आणि इतर नकारात्मक शक्तिचा नाश होतो. जे लोक नकारात्मक शक्तींच्या प्रभावात असतात, त्यांना हनुमानाच्या मुर्तीसमोर उभे करुन गोपालानंदांनी वापरलेल्या धातुच्या छडीने मुर्तीला स्पर्श करण्यास सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असल्यास या मंदिरातील कष्टभंजन हनुमानाचे दर्शन आणि पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात असे मानले जाते... याच कारणामुळे या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी राहते.

सुचिंद्रम हनुमान मंदीर :-

   तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीजवळ असलेल्या सुचिंद्रम मंदीर हे भारतातील देवीसंदर्भात असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. इथे शक्तीमातेची नारायणी स्वरुपात पुजा केली जाते. तर भगवान शिव संघारोर संहार स्वरुपात आहेत. या पवित्र मंदीरात देवी सती अद्याप ध्यानस्थ होउन वास करते आहे असे मानले जाते. सुचिंद्रम नावातील सुचि हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शुध्द असा आहे. सुचिंद्रम मंदीरालाच  थानुमालयन किंवा स्तनुमालया मंदिर असेही म्हणले जाते. सुचिन्द्रमलाच ग्वांतानामो क्षेत्र असेही मानले जाते. ब्रह्मा, विष्णु एवं महेश यांना समर्पित अशी अनेक मंदिर आपल्या देशात आहेत. यातील काही मंदीरात या त्रिमुर्ती बघायला मिळतात. सुचिन्द्रम हे असे एकपवित्र स्थान आहे जिथे हे त्रिमूर्तिची  लिंग रूपात पुजा केली जाते.
  इतिहास :-
   या महत्वाच्या अध्यात्मिक स्थानासंबधीत काही कथा आहेत.
   पहिली पौराणिक कथा अर्थातच शक्तिपीठासंबधीत आहे. जेव्हा सतीचे शव घेउन भगवान शिव क्रोधायमान होउन पुर्ण त्रिलोकात संचार करत होते, तेव्हा त्यांच्या कोपापासून ब्रम्हांडाला वाचवण्यासाठी भगवान विष्णुंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे पुर्ण भारतीय उपखंडात  विवीध ठिकाणी पडले. याच ठिकाणांना शक्तीपीठ म्हणून ओळखले जाउ लागले. यातील सुचिंद्रम येथे सतीचा दात पडला असे मानले जाते.
     याच ठिकाणी भस्मासुराने अजरामर होण्यासाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी प्रसन्न होउन त्याला वर दिला कि कन्याकुमारी सोडून त्याचा पराभव कोणीही करु शकणार नाही. शिवापासून वरदान मिळताच भस्मासुर हिंसक बनला व त्याने सर्व त्रिलोकाला त्रास द्यायला सुरवात केली. यामुळे त्रासलेले सर्व देव भगवान विष्णुकडे गेले. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे यज्ञ केला. त्यातून प्रगट झालेल्या दुर्गेने भस्मासुराचा वध केला.
  आणखी एक कथा इंद्राशी संबधीत आहे. गौतम ऋषींनी दिलेल्या शापापासून मुक्त होण्यासाठी इथेच तपश्चर्या करुन शुध्द तुपाने स्नान करुन स्वतःला पापमुक्त केले. आणि इथेच एक पुजा करुन देवलोकात प्रस्थान केले. त्यामुळे या स्थानाचे सुचिंद्रम पडले.
         या स्थानासंबधीत आणखी एक कथा अशी आहे कि इथे ज्ञान अरण्य नावाचे अतिशय घनदाट वन होते. या ज्ञान अरण्यात महर्षी अत्री आपली पत्नी अनुसयेसहीत रहात होते. अनुसया या अतिशय पतिव्रता होत्या. त्या आपल्या पतीची पुजा करत असत. या पातिव्रत्यामुळे अनुसयेला एक दिव्य शक्ती प्राप्त झाली होती. त्यामुळे त्या कोणत्याही व्यक्तीच्या रुपाचे परीवर्तन करु शकत होत्या. ब्रम्हा, विष्णु आणि महेश या तिन्ही देवांच्या पत्नींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी अनुसयेची परिक्षा घ्यायची ठरवली. त्यांनी भगवान शिव, भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू  या त्रिमुर्तींना अनुसयेची परिक्षा घेण्यास सांगितले. तेव्हा अत्री ऋषी हिमालयात तप करण्यासाठी गेले होते. तिन्ही देव साधुवेषात अत्री ऋषींच्या आश्रमात पोहचले. त्यावेळी नेमक्या सती अनुसया स्नान करत होत्या.  जेव्हा त्रिमुर्तीना अन्न आणि पाणी देऊ केले गेले तेव्हा त्यांनी असे म्हणत नकार दिला की त्यांनी केवळ वस्त्र नसलेल्या व्यक्तीकडूनच अन्न घेण्याची प्रतिज्ञा केली आहे. पण परपुरुषासमोर स्त्रीने नग्न स्वरुपात जाणे हे पाप ठरले असते. दारी आलेल्या अतिथीला दान न देणे पाप मानले जात असल्याने, तिने त्यांना अन्न देण्याचा आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिने तिन्ही देवांवर पवित्र पाणी शिंपडले आणि त्यांचे रूपांतर बाळांमध्ये झाले; शिव दुर्वासाच्या भूमिकेत, विष्णू दत्तात्रेयाच्या भूमिकेत आणि ब्रह्मा चंद्राच्या स्वरुपात बदलले गेले.  त्यानंतर तिने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि तिन्ही बाळांना दूध पाजले. या तिन्ही देवांचे रुपांतर असे शिशु स्वरुपात बदलले गेल्यामुळे त्यांच्या पत्नी व्याकुळ झाल्या.  देवी सरस्वती, देवी पार्वती आणि देवी लक्ष्मी खाली आल्या आणि त्यांनी अत्री ऋषींच्या आश्रमात जाउन अनुसयेची क्षमा मागितली आणि त्यांच्या पतीला त्यांच्या मूळ स्वरूपात परत करण्याची विनंती केली. त्यानंतर तिन्ही देवतांना त्यांच्या मूळ स्वरूपात रूपांतरित करण्यात आले.
  सर्व तिन्ही देव आणि त्यांच्या पत्नी पुन्हा त्यांच्या लोकाकडे जाताना, अनुसयाच्या विनंतीवरून सर्व त्रिमूर्ती स्वयंभू लिंगांच्या रूपात, स्थल वृक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमलतास वृक्षाखाली प्रकट झाले, जे आता २५०० वर्षांहून अधिक जुने आहे. या पवित्र वृक्षासमोर एक लहान मंदिर बांधण्यात आले आहे.
    या मंदिराला आणि शहराला देवी कन्याकुमारी मंदिराशी संबधीत आणखी एक आख्यायिका आहे. आख्यायिकेनुसार, भगवान शिव जेव्हा देवी कन्याकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा ते सुचिंद्रममध्ये राहिले होते. रात्रीच्या शुभ मुहुर्तावर होणाऱ्या लग्नासाठी ते येथून निघाले होते. जेव्हा ते सुचिंद्रमपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या वझुक्कमपराई येथे पोहोचले तेव्हा नारद ऋषींनी कोंबड्याच्या स्वरुपात बांग दिली, त्यामुळे शिवशंकराना सकाळ झाल्याचे वाटले आणि विवाहाचा शुभ मुहुर्त निघून गेला आहे असे मानून, भगवान शिव देवीशी लग्न न करता सुचिंद्रम येथे परतले.
       सुचिंद्रम मंदिराची आणखी एक कथा मंदिरात चालणाऱ्या दशकभराच्या विधीची आहे. १८६० च्या दशकापर्यंत मंदिरात अग्निपरीक्षेची प्रथा जोपर्यंत सरकारने त्यावर बंदी घातली नाही, तोपर्यंत चालत होती,  या विधीनुसार, कोणत्याही ब्राह्मण किंवा पुजाऱ्याला कोणत्याही चुकीच्या वर्तनाचा संशय आल्यास, हा विधी करणे आवश्यक होते. यानुसार राजाच्या परवानगीने, संशयित व्यक्तीला तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या उकळत्या तुपात हात बुडवून आत ठेवलेला चांदीचा बैल बाहेर काढावा लागत असे. त्यानंतर त्याचा हात कापडाने झाकून पट्टी बांधली जात असे. जर तिसऱ्या दिवशी ब्राह्मणाचा हात सुरक्षित बाहेर आला तर तो निर्दोष असल्याचे सिद्ध होते.

 मंदीराची वास्तुकला :-
     मंदीराच्या प्रदीर्घकाळ चाललेल्या निर्मितीत चोल, चेरा, नायक, वेनाडू अश्या विवीध राजघराण्यानी आपला वाटा उचलला आहे. या मंदीराला पेरुमल मंदीर म्हणतात. या मंदीर प्राकारात ३० मंदीरे आहेत. मुख्य मंदीरातील देवता श्री स्थानुमलयन आहे. यातील स्थानु अर्थात भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करतात, मल भगवान विष्णुचे प्रतीक आहे  आणि अया भगवान ब्रह्माचे प्रतीक आहे. याच मंदीराची आणखी एक ओळख म्हणजे या मंदिराला सुचिन्द्रम भगवान अंजनेयर मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. या मंदीर परिसरात आणखी ३० मंदीरे आहेत. मंदीर परिसर दोन एकरात पसरला आहे. 
 
 
 मंदीरावर केलेले कोरीवकाम अद्भुत आहे. या मंदिरात सात मजली पांढरे गोपुर आहे ज्याच्या द्वारमंडपात विविध देवतांच्या बारीक कोरीवकाम केलेल्या प्रतिमा आहेत. १३४ फूट उंच असलेले हे गोपुरम प्रकाश किरणांवर पडताच देखणे दिसते, हे गोपुर दक्षिण भारतीय मंदिरांच्या स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. गोपुराच्या आतील बाजुला नैसर्गिक रंगाने नटवलेली चित्र आहेत.  मंदिराच्या उजव्या बाजूला, एक विशाल पुष्करणी आहे; येथून येणारे पाणी मंदिरातील विवीध उपचारांसाठी वापरले जाते.





  या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे अलंकार मंडपात असलेले १८ फूट उंचीचे चार संगीतमय खांब. हे खांब एकाच ग्रॅनाइट दगडातून कोरलेले आहेत. अलंकार मंडपमच्या परिसरातील या खांबावर मारल्यावर विविध संगीतमय स्वर निर्माण होतात, जे वास्तुकलेचे हे अद्भुत उदाहरण आहेत. यातून मृदंग, सतार, जलतरंग अश्या निरनिराळ्या वाद्याचे ध्वनी निर्माण होता.  मंदिरात एक नृत्यकक्ष देखील आहे ज्यामध्ये सुमारे १०३५  सुंदर कोरीवकाम केलेले खांब आहेत. याशिवाय मंदीरात चुन्यापासून निर्माण केलेले नंदीचे शिल्प आहे. १३ फुट उंच आणि २१ फुट लांब अशी हि नंदीची मुर्ती देशातील सर्वात मोठ्या नंदीच्या मुर्तीपैकी एक आहे. नंदीजवळ नवग्रहाच्या मुर्ती एका मंडपाच्या छतावर लावल्या आहेत.


       मंदिराच्या गर्भगृहात प्रमुख देवता, स्थानू (भगवान शिव), माल (भगवान विष्णू) आणि अया (भगवान ब्रह्मा) आहेत. याचा अर्थ शिव, विष्णु आणि ब्रह्म यांना एक रूपात दाखवले गेले आहे. हे तिन्ही देव एका लिंग स्वरुपात शीर्षस्थानी शिव, मध्यभागी विष्णु आणि आधारस्थानी ब्रम्हा दाखवलेले आहेत. गर्भगृहाच्या बाजूला, भगवान विष्णूचे मंदिर आहे; आठ वेगवेगळ्या प्रकारच्या धातू एकत्र करून भगवानची मूर्ती बनवण्यात आली आहे. उजव्या बाजूला भगवान राम आणि देवी सीतेचे मंदिर आहे, तर डाव्या बाजूला भगवान ( उदय मार्तंड विनायक ) गणेशाचे मंदिर आहे. समोर नवग्रह मंडप आहे. या मंदिरात सुमारे ३० मंदिरे आहेत ज्यात कैलासनाथर, नाटक शाला, वडक्केडम, कैलासत्तु महादेव, पंच पांडवर, कोंटाई आदि, गुरु दक्षिणामूर्ती, चेरवासल संस्था, भगवान मुरुग, गरुड, सुब्रमण्यम स्वामी आणि इतर अनेक मंदिरे आहेत. याशिवाय चिधंबरसवरा, इंद्र विनायका, बाला सुब्रमण्यम, चित्रा शाभा - नटराज, वल्लभ विनायका, धर्म समवर्द्धिनि, कला बैरावार, कनाका दुर्गा, महादेव, श्री राम, साक्षी विनायका, दत्तात्रेय अशी मंदीरे आहेत. मुळ मंदीर उभारताना फक्त मुख्य देवतेचे म्हणजे स्थानुमालयर  यांचे मंदीर उभारले गेले. काळ जसजसा पुढे सरकला तशी नवीन मंदीराची भर पडली. सहाजिकच या मंदीराचा प्रदक्षिणामार्ग खुप मोठा झाला.
हनुमानाची भव्य मुर्ती :-
    या मंदीराचे विशेष आकर्षण म्हणजे २२ फुट उंचीची हनुमानाची मुर्ती ! हि विश्वरुप दर्शवणार्या हनुमानाची आहे. भगवान हनुमानाची भव्य मूर्ती येथील प्रत्येक भक्ताला नक्कीच आकर्षित करेल अशीच आहे. भारतातील सर्वात मोठ्या मुर्तीपैकी एक असलेल्या भगवान हनुमानाची ही मुर्ती एकाच ग्रॅनाइट खडकापासून कोरलेली आहे. 
 
 
 
 
 
 इथे मुर्तीला विश्वरुप हनुमान म्हणतात. रामायणात या विश्वरुप हनुमानाची कथा अशी आहे. जेव्हा हनुमान सीतामातेला भेटण्यासाठी अशोक वनात गेले होते, तेव्हा सीतामाता खुप दुखात होत्या. त्यावेळी हनुमानाने त्यांना सांगितले कि त्यांचे सर्व दुख लवकरच नष्ट होइल. त्यांनी सीतामातेला विनंती केली कि त्या त्यांच्या पाठीवर बसल्यास हनुमान समुद्र उंल्लघून त्यांना भगवान श्रीरामापाशी पोहचवतील. मात्र हनुमानाचे शरीर बघून सीतामातेला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. हनुमानाचा आकार एखाद्या सामान्य कपीसारखा होता, त्यामुळे ते हे कार्य करु शकणार नाहीत असे सीतामातेला वाटले, हनुमानांना हा आपला अपमान वाटला. त्यांनी सीतामातेला आपण स्वताच्या शरीराचा आकार कितीही वाढवू शकतो ह्रे दाखवून द्यायचे ठरवले. झाडावरून खाली उतरुन हनुमानानी आपले शरीर असे काही वाढवले कि जणु ते मेरु, मंदार पर्वतासम भासु लागले. एखाद्या आग्नीप्रमाणे त्यांचे शरीर चमकत होते.
[मेरु मन्दार सम्काशो बभौ दीप्त अनल प्रभः |
अग्रतो व्यवतस्थे च सीताया वानर ऋषभः || वा.रा. ५-३७-३५ ]
        या घटनेचे वर्णन रामायणातील सुंदर कांडात केले आहे. हनुमान केवळ इथेच विश्वरुपात आहेत असे मानले जाते.
   या मुर्ती संदर्भात दोन कथा आहेत.
  एका कथेनुसार सन १७४० मध्ये टिपू सुलतानच्या हल्ल्याची भीती असल्याने मंदिरात लपवून ठेवण्यात आली होती. जवळपास २०० वर्ष हि मुर्ती भुमीगत होती. शेवटी १९३० साली  तत्कालीन त्रावणकोरचे महाराज श्री चित्र थिरुनाळ ( १९२४-१९४९ ) यांच्याकडे नोकरीला असणारे देवसवम बोर्डचे तत्कालीन सचिव श्री एम.के. नीलखण्ड अय्यर मंदीराला प्रदक्षिणा घालत होते, तेव्हा एके ठिकाणी घसरुन पडले. तेव्हा हे का घडले असावे, याची कारणमीमांसा करण्यासाठी प्रश्न ज्योतिष्याच्या माध्यमातून सविस्तर अभ्यास करुन कारण शोधले गेले. तेव्हा या ठिकाणी एखादी मुर्ती पुरली असावी असा निष्कर्ष काढला गेल. उत्खनन करुन हनुमानाच्या मुर्तीला जमीनीतून बाहेर काढले गेले आणि मंदीराच्या उत्तर-पुर्व कोपर्यात तिवी प्रतिष्ठापणा करण्यात आली.
       दुसरी कथा अशी आहे कि सुरवातीला या मंदीरावर कोणतेही गोपुर नव्हते, फक्त गोपुराचा पायाच काय तो घातलेला होता. त्रावणकोरचे महाराज श्री मुला थिरुनाळ [१८८५-१९२४ ] यांनी पिपईराई या सरोवराची निर्मिती केली. त्याआधी त्यांनी सुचिंद्रम मंदीराला गोपुर उभे करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गोपुरासाठी खोदकाम सुरु झाले तेव्हा जमीनीतून हि हनुमानाची मुर्ती प्राप्त झाली आणि या मुर्तीची स्थापना इशान्य कोपर्यात करण्यात आली. 

 
सुचिंद्रम मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव  :-  
सुचिंद्रम मंदिरात दोन महत्वाचे उत्सव साजरे केले जातात. एक तामिळ महिना मरकजी ( डिसेंबर / जानेवारी ) आणि दुसरा महोत्सव तामिळ नहिना चिठ्ठीरई ( एप्रिल / मे ) महिन्यात असतो. मरकजी उत्सवा १० दिवसांचा असून नवव्या दिवशी कार उत्सव असतो. यामध्ये देवतांना रथात बसवून त्यांची नगर प्रदक्षिणा केली जाते. मंदिरातील इतर प्रमुख उत्सव म्हणजे ऑगस्ट महिन्यात अवनी उत्सव, एप्रिल महिन्यात चित्राई उत्सव आणि मासी उत्सव. याशिवाय मंदीरात साजरा केले जाणारे प्रमुख उत्सव आहेत, रथ यात्रा, नवरात्रि, शिवरात्रि, अशोकाष्टमी, दुर्गा पूजा, सुचिन्द्रम मार्गाज़ी उत्सव, चैत्र पौर्णिमा, आषाढ़ आणि अश्विन अमावस्या, मेष संक्रांति आणि राजा परबा (मिथुन संक्रांति)।
सुचिन्द्रम मंदिराची दर्शनाची वेळ:
सुचिन्द्रम मंदिरामध्ये दर्शबाची वेळ पहाटे ४.३० ते ११.३० पर्यंत असते. मंदिर पुन्हा संध्याकाळी ५ वाजता उघडते ते रात्री ८.३० ला बंद होते. 
सुचिंद्रम परिसरातील इतर पर्यटन स्थळे :-
१)    विवेकानंद रॉक मेमोरियल
२)  आवर लेडी ऑफ रैनसम चर्च, कन्याकुमारी
३)  महात्मा गांधी मंडपम
४)  कन्याकुमारी समुद्र किनारा
५)  सर्वाणी शक्ति पीठ श्री भगवती मंदिर
६)  तिरुवल्लुवर प्रतिमा
७ )  सनसेट पॉइंट, कन्याकुमारी, कोवलम
८ )  वट्टकोट्टई किला
जावे कसे ?
१ )सुचिन्द्रम मंदिर कन्याकुमारीपासून ११ किमी  दूर आहे आणि रस्त्याने इथे जाणे सोयीचे आहे. हे स्थान नागरकोइलपासून ७ किमी दूर आहे. कन्याकुमारीबरोबरच तिरुनेलवेली आणि त्रिवेंद्रमपासून सुचिन्द्रमसाठी नियमित बसें सेवा आहे. पर्यटक टॅक्सी भाड्याने घेउन कन्याकुमारीपासून या मंदिराकडे येउ शकतात.
२ ) सुचिन्द्रम मंदिराला जाण्यासाठी कन्याकुमारी रेलवे स्टेशन हे जवळचे स्टेशन आहे.
३ ) त्रिवेंद्रम अंतर्राष्ट्रीय विमानतःळ या मंदिरापासून 90.6 किमी दूर आहे.

सालासर बालाजी :-

   देशात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे भक्त भगवान हनुमान यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत, काही मंदीरे त्यांच्या गूढ गोष्टीमुळे खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये सालासर बालाजी मंदिराचाही समावेश आहे. या मंदिराची पूजा आणि दर्शन घेतल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि व्यक्तीला सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा परिस्थितीत, या मंदिराबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात हनुमानजींचे सालासर बालाजी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक हनुमानजींची पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी येतात. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानजी गोल चेहरा, दाढी आणि मिशा घेऊन विराजमान आहेत. यामागे एक रंजक कथा आहे. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात जयपुर -बिकनेर राज्यमार्गावर हे मंदीर आहे. इथे हनुमानाची एकमेव मुर्ती आहे जीला दाढी आणि मिश्या आहेत. यामागे कथा अशी कि संत शिरोमणी, सिध्दपुरुष श्री मोहनदास जी महाराज यांच्या असीम भक्तीवर प्रसन्न होउन, रामदुत हनुमान इथे प्रगट झाले. तो दिवस होता, विक्रम संवत् १८११ (सन् १७५५) श्रावण शुक्ल नवमी शनिवार. या दिवशी असोटा या गावी हनुमानाने प्रसन्न होउन मोहनदास महाराजांच्यावर कृपा केली. म्हणून या ठिकाणी उदयराम यांनी या मंदीराची निर्मिती केली. म्हणून उदयराम आणि त्यांच्या वंशजाकडे या मंदीराची पुजा-अर्चा आणि देखभाल सोपवून श्री मोहनदास समाधीस्र्थ झाले.
 याची सविस्त्र कथा अशी .
      सीकरच्या रुल्याणी गावचे रहिवासी असलेले लच्छिरामजी पटोडिया पंडितांचे धाकटे पुत्र मोहनदास हे बालपणापासूनच आध्यात्मिक ओढा असलेले होते. सुरुवातीपासूनच त्यांना धार्मिक सतसंग आणि उपासनेत रस होता. त्याच्या जन्माच्या वेळी, ज्योतिषांनी भाकीत केले होते की हे मूल नंतर एक तेजस्वी संत होईल आणि जगात प्रसिद्ध होईल. मोहनदासची बहीण कान्ही हिचे लग्न सालासर गावात झाले होते. तिचा एकुलता एक मुलगा उदयच्या जन्मानंतर ती लगेचच विधवा झाली. आपल्या बहिणी आणि पुतण्याला आधार देण्यासाठी, मोहनदासजी सालासरला आले आणि त्यांच्यासोबत राहू लागले. त्याच्या कठोर परिश्रमामुळे, कान्हीच्या शेतातून जणु सोने ऊगवू लागले. गरिबीचे काळे ढग दूर झाले आणि दारावर प्रत्येक साधकाला त्याच्या घरात आश्रय मिळू लागला. पुतण्या उदयही मोठा झाला होता आणि त्याचे लग्न करुन दिले. 
एके दिवशी, काका आणि पुतण्या शेतात काम करत असताना, कोणीतरी मोहनदासच्या हातातून खुरपे हिसकावून घेतली आणि फेकून दिली. मोहनदासने पुन्हा खुरपे उचलले आणि कामाला सुरुवात केली, पण पुन्हा एकदा कोणीतरी ते हिसकावून फेकून दिले. हे अनेक वेळा घडले. उदय दुरून सगळं पाहत होता, तो जवळ आला आणि काकांना थोडा वेळ आराम करण्याचा सल्ला दिला, पण मोहनदासजी म्हणाले की कोणीतरी त्याच्या हातातून खुरपे जबरदस्तीने हिसकावून घेऊन फेकून देत आहे. संध्याकाळी उदयने त्याची आई कान्हीशी याबद्दल चर्चा केली. कान्हीने विचार केला की चला तिच्या भावाचे लग्न करूया, मग सर्व काही ठीक होईल. जेव्हा मोहनदासला हे कळले तेव्हा तो म्हणाला की ज्या मुलीशी तू माझ्या लग्नाबद्दल बोलशील ती मरेल. आणि नेमके तेच घडले. ज्या मुलीसोबत मोहनदासच्या लग्नाची चर्चा सुरू होती, ती अचानक मरण पावली. यानंतर कान्हीने तिच्या भावावर लग्नासाठी दबाव आणला नाही. मोहनदासजींनी ब्रह्मचर्य व्रत घेतले आणि भजन आणि कीर्तन गाण्यात वेळ घालवू लागले.
एके दिवशी, कान्ही तिच्या भावाला आणि मुलाला जेवू घालत असताना, एक भिकारी तिच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला. कान्ही निघायला थोडा उशीर झाला होता. ती तिथे पोहोचली तेव्हा तिला फक्त एक सावली दिसली. मोहनदासजीही त्यांच्या मागे धावत आले, त्यांना सत्य माहित होते की ते स्वतः बालाजी होते. कान्हीला त्याच्या उशीराबद्दल खूप वाईट वाटले. तिने मोहनदासजींना बालाजीचे दर्शन दाखवण्याची विनंती करायला सुरुवात केली. मोहनदासजींनी त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला.
    सुमारे दीड ते दोन महिन्यांनंतर, दासाशी आलेल्या एका साधुने पुन्हा नारायण हरी, नारायण हरी असा जप केला, तो ऐकून कान्ही त्या साधुविषयी सांगण्यासाठी मोहनदासजींकडे धावकी. जेव्हा मोहनदास दारापाशी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की ते साधुच्या वेशात बालाजी होते. मोहनदास पटकन त्याणच्या मागे धावला आणि त्याच्या पाया पडला आणि उशीराबद्दल माफी मागितली. मग बालाजी त्याच्या खऱ्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले - मी मोहनदासला ओळखतो, तू नेहमीच खऱ्या मनाने माझे नाव जपतोस. तुमच्या अढळ भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन, मला सांगा.
    मोहदनासजींनी नम्रपणे सांगितले- कृपया माझी बहीण कान्ही हिला दर्शन द्या. भक्त वत्सल बालाजी यांनी विनंती स्वीकारली आणि म्हणाले - मी पवित्र आसनावर बसून खीर आणि चुरमा आणि साखरेच्या प्रसादाचा स्वीकार करेन. भक्त शिरोमणी मोहनदास यांनी बालाजीला प्रेमाने त्यांच्या घरी आणले आणि भाऊ आणि बहिणीने त्यांना त्यांचे आवडते जेवण मोठ्या आदराने आणि कृतज्ञतेने वाढले. सुंदर आणि स्वच्छ पलंगावर विश्रांती घेतल्यानंतर, बालाजी भाऊ आणि बहिणीच्या निस्वार्थ भक्तीने प्रसन्न झाले आणि म्हणाले की  भक्तीने जे काही अर्पण केले जाईल ते मी प्रेमाने स्वीकारेन आणि माझ्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि या सालासर ठिकाणी कायमचे राहीन. असे म्हणत बालाजी अदृश्य झाले आणि भक्त बंधूभगिनींना त्यांचा जन्म सार्थकी झाला असे वाटले.
    यानंतर, मोहनदासजी शमीच्या झाडाखाली एकांतात बसले. त्यांनी मौन व्रत पाळले. लोक त्याला वेडा समजत होते आणि त्याला बावला म्हणू लागले. एके दिवशी, मोहनदास शमीच्या झाडाखाली बसून अग्नीसमोर ध्यान करत होते, तेव्हा अचानक झाड फळांनी भरले. जेव्हा एका जाटचा मुलगा फळे तोडण्यासाठी त्याच शमीच्या झाडावर चढला तेव्हा वरून काही फळे मोहनदासजींवर पडली. मोहनदासना वाटले की झाडावरून पडून एखादा पक्षी जखमी झाला असेल, पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला जाटचा मुलगा झाडावर चढलेला दिसला. जाटचा मुलगा भीतीने थरथर कापू लागला. मोहनदासजींनी त्याला धीर दिला आणि खाली येण्यास सांगितले.
खाली येताना, जाटच्या मुलाने सांगितले की त्याच्या आईने त्याला झाडावर चढण्यासाठी नकार देऊनही, त्याच्या वडिलांनी त्याला शमीची फळ आणण्याचा आदेश दिला आणि सांगितले की झाडाखालचा बावला म्हणजे मोहनदास त्याला खाणार नाही. मग बाबा मोहनदासजी त्या मुलाला म्हणाले की तुझ्या वडिलांना सांगा की जो ही फळे खातो तो जगू शकत नाही. पण जाटांने मोहनदास बाबांच्या सांगण्याची थट्टा केली. फळ खाल्ल्यानंतर जाट लगेचच मरण पावला. तेव्हापासून, बाबा मोहनदासांप्रती लोकांच्या हृदयात भक्ती आणि आदर वाढला.
एकदा पुतण्या उदयने पाहिले की बाबांच्या शरीरावर मोठ्या नखांच्या खुणा आहेत. जेव्हा त्याने विचारले तेव्हा बाबांनी त्याचे कारण सांगण्याचे टाळले. नंतर कारण कळले की बाबा मोहनदास आणि बालाजी अनेकदा कुस्ती खेळायचे आणि इतर प्रकारचे खेळ खेळायचे आणि बालाजीची सावली नेहमीच बाबा मोहनदासजींवर राहिली. अशा घटनांमुळे, बाबा मोहनदासांची कीर्ती दूरच्या आणि जवळच्या गावांमध्ये पसरली. लोक त्याना भेटायला येऊ लागले.
तत्कालीन सालासर हे बिकानेर राज्याच्या अंतर्गत होते. त्या काळात गावांचा कारभार ठाकूरांच्या हाती होता. सालासर आणि त्याच्या आसपासच्या अनेक गावांची देखभाल करण्याची जबाबदारी शोभासरचे ठाकूर धीरज सिंह यांच्याकडे होती. एके दिवशी त्याला बातमी मिळाली की दरोडेखोरांचा एक मोठा गट लुटमारीसाठी त्या दिशेने जात आहे. त्याच्याकडे बिकानेरकडून लष्करी मदत घेण्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. शेवटी, सालासरचे ठाकूर सलाम सिंह यांच्या सल्ल्यानुसार, दोघांनीही बाबा मोहनदासांकडे आश्रय घेतला आणि मदत मागितली.बाबांनी त्यांना आश्वासन दिले आणि सांगितले की त्यांनी बालाजीच्या नावा घेउन डाकूंचा झेंडा उडवावा. ठाकुराने तसेच केले, बालाजीचे नाव घेउन डाकुंचा झेंडा उडवला. कोणंत्याही सेनेचे मनोधैर्य विजय पताकेवर अवलंबून असते. त्यामुळे घाबरुन डाकु शरण आला. या घटनेमुळे मोहनदासांचे महत्व आणखी वाढले. बाबा मोहनदासांनी त्याचक्षणी बालाजीचे भव्य मंदीर उभारण्याचा निश्चय केला. सालमसिंगने मंदीर बनवाण्यासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचे कबुल केले. व आसोटातील त्याचे सासरे चंपावत यांना बालाजीची भव्य मुर्ती बनवण्यास सांगितले. हि घटना १७४५ ला घडली.
इकडे, असोटा गावात, एक शेतकरी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आपले शेत नांगरत होता. अचानक फाळ कशाला तरी आदळला. त्याने खोदकाम केले आणि तिथे एक मुर्ती सापडली. त्याने मूर्ती बाहेर काढली आणि बाजूला ठेवली  मात्र आनंदाच्या भरात त्या मुर्तीकडे नीट लक्ष दिले नाही. तो पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला. अचानक त्याच्या पोटात तीव्र वेदना जाणवल्या आणि तो खाली पडला आणि वेदनेने तडफडू लागला. त्याची बायको धावत आली. वेदनेने कण्हणाऱ्या शेतकऱ्याने दगडी मुर्ती बाहेर काढल्यानंतर त्याच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याबद्दल सांगितले. शेतकऱ्याची पत्नी हुशार होती. ती मुर्तीजवळ आली आणि तिच्या पदराने आदरपुर्वक नमस्कार करुन त्यावरील घाण साफ केली आणि तिथे तिला राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जाणाऱ्या शूर हनुमानाचे दिव्य दृश्य दिसले. शेतकर्याने ती काळ्या दगडाची मूर्ती एका झाडाजवळ स्थापित केली आणि आपल्या कुवतीनुसार प्रसाद अर्पण केल्यानंतर, आपल्या गुन्ह्याची क्षमा मिळावी म्हणून प्रार्थना केली. मग जणू काही चमत्कार घडला, शेतकरी पुन्हा ठणठणीत झाला.
      या चमत्काराची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. असोटा येथील ठाकूर चंपावत देखील भेटायला आले आणि त्यांनी मूर्ती आपल्या हवेलीत नेली. त्याच रात्री बालाजी ठाकूरच्या स्वप्नात आला आणि त्याने मूर्ती सालासरला घेऊन जाण्याची आज्ञा केली. सकाळी, ठाकूर चंपावत यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाखाली, एका सजवलेल्या बैलगाडीतून भजन मंडळासह मूर्ती सालासरकडे रवाना केली. त्याच रात्री, बालाजी भक्त शिरोमणी मोहनदासजींना दर्शन देऊन म्हणाले की मी माझे वचन पूर्ण करण्यासाठी काळ्या दगडाच्या मूर्तीच्या रूपात येत आहे. सकाळी, ठाकूर सलाम सिंह आणि अनेक ग्रामस्थांनी बाबा मोहनदास जी यांच्यासह मूर्तीचे स्वागत केले आणि १७५४ मध्ये शुक्ल नवमी (शनिवारी) रोजी, हनुमान जीची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित करण्यात आली.
त्यादिवशी मंगळवारी श्रावण द्वादशीला, भक्त शिरोमणी मोहनदासजी भागवत भजनात इतके मग्न झाले की त्यांनी मूर्ती पूर्णपणे तूप आणि सिंदूरने सजवली. त्यावेळी, बालाजीचे पूर्वीचे दिसलेले रूप, ज्यामध्ये ते श्रीराम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन जात होते, ते कधी अदृश्य झाले, त्यांना ते कळलेही नाही.त्याच्या जागी, दाढी-मिशा, कपाळावर टिळा, उग्र भुवया, सुंदर डोळे, पर्वतावर गदा धरलेले एक अद्भुत रूप दिसू लागले. यानंतर, मंदिराचे विकास काम हळूहळू प्रगतीच्या मार्गावर गेले.
तेव्हापासून आजतागायत श्री बालाजी महाराजांना बाजरीचा चुरमा अर्पण केला जातो. भगवान बालाजीच्या आगमनाची बातमी असोटा गावात लगेच पसरली. असोटाच्या ठाकूरलाही ही बातमी कळली. बालाजी त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला ही मूर्ती चुरु जिल्ह्यातील सालासर येथे पाठवण्याचा आदेश दिला. त्याच रात्री सालासर येथील हनुमानाचे भक्त मोहन दासजी महाराज यांना स्वप्नात हनुमान म्हणजेच बालाजी दिसले. भगवान बालाजीने त्याला असोताच्या मूर्तीबद्दल सांगितले. त्याने लगेच असोटाच्या ठाकूरांना निरोप पाठवला. जेव्हा ठाकूर यांना कळले की मोहन दासजींना असोटा येथे न येताही याबद्दल माहिती होती, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. निश्चितच, हे सर्व सर्वशक्तिमान भगवान बालाजीच्या कृपेने घडत होते. येथे, त्यांच्या देवतेच्या कृपेमुळे, मोहनदासजींना हे सर्व कळले, म्हणून त्यांनी त्यांच्या देवाचे स्वागत करण्यासाठी सालासर सोडले. मूर्ती आदराने आणण्यात आली. महात्मा मोहनदासजींनी सूचना दिली की "जिथे बैल थांबतील तिथे मूर्तीची स्थापना केली जाईल". काही वेळाने, बैल वाळूच्या ढिगाऱ्यावर थांबले आणि त्याच पवित्र ठिकाणी शनिवारी, विक्रम संवत १८११, श्रावण शुक्ल नवमी (१७५५) रोजी श्री बालाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली. ती मूर्ती सालासरला पाठवण्यात आली आणि आज हे ठिकाण सालासर धाम म्हणून ओळखले जाते.सालासर धामाची स्थापना सुमारे २६८ वर्षांपूर्वी झाली. संत मोहन दासजी महाराजांनी बालाजीला अर्पण केलेल्या पाच रुपयांनी मंदिर बांधले होते. मंदिर बांधण्यामागील उद्देश देखील श्रद्धेशी संबधीत आहे. बालाजी महाराजांची मूर्ती शनिवारी, श्रावण शुक्ल नवमी, संवत १८११ रोजी स्थापित करण्यात आली. त्यानंतर संत मोहन दासजींनी मंदिर बांधण्यासाठी फतेहपूर येथील नूर मोहम्मद आणि दौजी नावाच्या कारागिरांना बोलावले. संवत १८१५ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर विक्रम संवत १८१५ (१७५९) मध्ये बांधले होते. हे सांप्रदायिक सलोखा आणि बंधुत्वाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. सध्या मंदिर संकुल मोठ्या क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्यात सर्व सुविधा आहेत. 
    मूर्ती स्वरूपात त्यांची पूजनीय देवता सापडल्यानंतर, श्री मोहनदासजींनी त्यांचे शिष्य/पुतणे उदयराम यांना त्यांचा पुजार्याचा वेष घालून आणि त्यांची पूजा करून दीक्षा दिली. त्यानंतर तोच पोषाख आसन म्हणून स्थापित करण्यात आला. श्री हनुमानजींच्या मूर्तीला दाढी आणि मिशा देण्यात आल्या कारण सालासरला येण्यापूर्वी श्री हनुमानजींनी श्री मोहनदासजींना स्वप्नात याच स्वरूपात दर्शन दिले होते. मंदिराच्या अंगणात एक दिवा लावण्यात आला होता जो विक्रम संवत १८११ (१७५५) पासून आजपर्यंत सतत तेवत आहे. भक्त शिरोमणी मोहनदास जी महाराज यांनी  विक्रम संवत १८५० (वर्ष १७९४) वैशाख शुक्ल त्रयोदशीला सकाळी जिवंत समाधी घेतली आणि ब्रह्मामध्ये विलीन झाले.

    देशभरात सालासर धामची एक वेगळी ओळख आहे. अनेक राज्यांमधून भाविक येथे भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येतात.सालासर बालाजी मंदिरात “श्री मोहनदास जी महाराजांचा श्राद्ध दिवस (श्राद्ध पक्षातील त्रयोदशी) आणि “श्री बालाजी महाराजांचा प्रकट दिन” (श्रावण शुक्ल नवमी) हे दोन प्रमुख सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात ज्यात हजारो बाबांचे उत्कट भक्त आणि अनुयायी सहभागी होतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमेला मोठे मेळे भरतात. सिद्धपुरुष महात्मा मोहनदास जी महाराजांच्या म्हणण्यानुसार, भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, श्री बालाजी महाराजांचे ध्यान करून "मनोती" (इच्छा) चा नारळ बांधला जातो. येथे भगवान भक्तांनी बांधलेल्या "मनोती" नारळांबद्दल खूप आदर आहे, म्हणून ते इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जात नाहीत.असे मानले जाते की देव नारळाचा नैवेद्य स्वीकारून लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. दरवर्षी मंदिरात सुमारे २५ लाख नारळ अर्पण केले जातात. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे नवस म्हणून अर्पण केलेले हे नारळ पुन्हा वापरले जात नाहीत. शेतात खड्डा खोदून त्यांना पुरले जाते.
गेल्या २०० वर्षांपासून, भाविक या ठिकाणी भेट देत आहेत आणि मंदिराच्या परिसरात असलेल्या खेजरीच्या झाडावर लाल कापडात गुंडाळलेला नारळ ठेवत आहेत. हे नारळ फेकले जात नाहीत. ते जाळले जात नाही किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरले जात नाही. यामागेही एक रंजक कथा आहे. सालासर बालाजी मंदिरापासून सुमारे ११ किमी अंतरावर असलेल्या मुरदाकिया गावाजवळ सुमारे २५० बिघा जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात नारळ गाडले आहेत. सुरुवातीच्या काळात हे नारळ अगरबत्तीमध्ये टाकून जाळले जात होते. पण तिसऱ्या पिढीतील पुजारी कुटुंबाच्या प्रमुखाचे एक स्वप्न पडले होते. या स्वप्नात पुजाऱ्याने पाहिले की नारळांसोबतच भक्तांच्या नवसही जळत होते. पुजाऱ्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र केले आणि त्यांना हे सांगितले. यानंतर, नवसाचे हे नारळ सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इथे येण्यासाठी खालील मार्ग आहेत.
दिल्लीहून: 1.) नवी दिल्ली -> गुरुग्राम (गुडगाव) -> रेवाडी -> नारनौल -> चिदावा -> झुंझुनू -> मुकुंदगड -> लक्ष्मणगड -> सालासर बालाजी (३२८ किमी)
(तुम्हाला रेवाडी रोडवरून राष्ट्रीय महामार्ग-८ सोडावा लागेल आणि रेवाडीहून झुनझुनूला जाण्याचा मार्ग पकडावा लागेल) (सर्वात लहान मार्ग आणि सर्वोत्तम मार्ग)
२.) नवी दिल्ली -> गुडगाव -> बेहरोर -> नारनौल -> चिदावा -> झुंझुनू -> मुकुंदगड -> लक्ष्मणगड -> सालासर बालाजी (335 किमी)
(वर उल्लेख केलेल्या मार्गापेक्षा हा मार्ग चांगला आहे, तुम्हाला बेहरोर येथून राष्ट्रीय महामार्ग-८ सोडावे लागेल, हा देखील एक कमी अंतराचा आणि खूप चांगला मार्ग आहे)
३.) नवी दिल्ली -> गुडगाव -> बेहरोर -> कोटपुतली -> नीमकाठाणा -> उदयपूरवती -> सिकर -> सालासर बालाजी (३३५ किमी) (तुम्हाला कोटपुतलीहून राष्ट्रीय महामार्ग-८ सोडावे लागेल)
४.) नवी दिल्ली -> गुरुग्राम -> बेहरोर -> कोटपुतली-> शाहपुरा-> अजितगड -> सामोडे -> चोमू -> सीकर -> सालासर बालाजी (२९२ किमी) (आपल्याला शाहपुराहून NH-8 सोडावे लागेल) याला सामोडे मार्ग असेही म्हणतात.
५.) नवी दिल्ली -> गुरुग्राम -> बेहरोर -> कोटपुतली-> शाहपुरा -> चांदवाजी -> चोमू -> सीकर -> सालासर बालाजी (३९९ किमी) (तुम्हाला शाहपुराहून NH-8 सोडावे लागेल) याला चांदवाजी मार्ग असेही म्हणतात. जरी हा मार्ग लांब असला तरी, सुमारे २२५ किमी लांबीचा असला तरी, राष्ट्रीय महामार्ग-८ एक्सप्रेसवेवरून गाडी चालवून सहज प्रवास करता येतो.
६.) नवी दिल्ली -> बहादूरगड -> झज्जर -> चरखी दादरी -> लोहारू -> चिडीवा -> झुंझुनू -> मुकुंदगड -> लक्ष्मणगड -> सालासर बालाजी (३०२ किमी) हा एक नवीन मार्ग आहे जो फार कमी भाविकांना माहीत आहे.
७.) नवी दिल्ली -> रोहतक -> हिस्सार -> राजगड -> चुरू -> फतेहपूर -> सालासर बालाजी (382 किमी)

हनुमानाचे विवाहीत स्वरुपात मुर्ती :-

हनुमान ब्रह्मचारी आहेत, हे सर्वांना माहिती आहे. पण एक मंदीर असे आहे जिथे  हनुमानाची विवाहित स्वरुपात पुजा होते. आंध्र प्रदेशातील खम्मम भागात, हनुमानाचे पत्नींसमवेत एक मंदिर आहे. येथे हनुमान त्यांच्या ब्रह्मचारी रूपात नसून त्यांच्या पत्नी, सुवर्णचला देवी यांच्यासोबत गृहस्थ स्वरूपात दाखवले आहेत. मात्र हनुमान आणि त्यांची पत्नी निपुत्रिक व विवाहीत असून ब्रह्मचारी आहेत.हे भगवान हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला देवी यांचे जगातील एकमेव मंदीर आहे. हनुमानाच्या या अवताराचे वर्णन वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानस या दोन्ही ग्रंथांमध्ये केले आहे. पराशर संहितेत एका ठिकाणी हनुमानाच्या लग्नाचा उल्लेख आहे.पराशर संहितेत हनुमानजींच्या लग्नाचे वर्णन देखील केले आहे.तथापि, उत्तर भारतीय लोकांसाठी हि आश्चर्यचकित करणारी बाब आहे. कारण हनुमान हे बाल ब्रह्मचारी मानले जातात.  हे मंदिर आपल्याला एका कथेशी जोडते ज्यामध्ये या रामदूताला नाईलाजाने लग्न करावे लागले. पण याचा अर्थ असा नाही की भगवान हनुमान बाल ब्रह्मचारी नव्हते. पवनपुत्र हनुमान विवाहित होते आणि ते बाल ब्रह्मचारी देखील होते.     काही विशेष परिस्थितींमुळे बजरंगबलीला सुवर्चलाशी लग्न करावे लागले. याची कथा जाणून घेउया. 
हनुमान पत्नी

खरंतर हनुमानजींनी भगवान सूर्याला आपले गुरु बनवले होते. हनुमान सूर्याकडून शिक्षण घेत होते. मात्र सृष्टीचे चक्र सुरळीत रहाण्यासाठी सूर्य कुठेही थांबू शकत नव्हता, म्हणून हनुमानजींना दिवसभर भगवान सूर्याच्या रथासोबत उड्डाण करावे लागत असे आणि भगवान सूर्य त्यांना विविध प्रकारच्या शिक्षणाचे ज्ञान देत असत. पण हनुमानजींना ज्ञान देत असताना, एके दिवशी सूर्यासमोर धार्मिक संकट निर्माण झाले. सूर्य देव यांना ९ दिव्य विद्येचे ज्ञान होते. या सर्व विद्याचे ज्ञान मिळवण्याची बजरंगला इच्छा होती. सूर्यदेव यांनी हनुमानजींना या ९ पैकी ५ विद्येचे ज्ञान दिले, परंतु उर्वरित ४ विद्यासाठी सूर्यासमोर संकट उभे राहिले. उर्वरित ४ विद्याचे ज्ञान केवळ विवाहित असलेल्या शिष्यांनाच दिले जाऊ शकते. हनुमानजी एक ब्रह्मचारी होते, म्हणून सूर्य देव त्यांना उर्वरित चार शाखांचे ज्ञान देऊ शकले नाही.हनुमानजींनी तर पूर्ण शिक्षण घेण्याची प्रतिज्ञा केली होती आणि सर्व विद्या प्राप्त करण्यासाठी ते काहीही स्वीकारण्यास तयार होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सूर्यदेवाने हनुमानाला लग्न करण्याविषयी सांगितले. सुरुवातीला हनुमानजी लग्नास सहमत नव्हते, परंतु उर्वरित ४ शाखांचे ज्ञान त्यांना घ्यायचे होते. यामुळे हनुमान लग्नाला हो म्हणून म्हणाले.
     अशा परिस्थितीत सूर्यदेवाने हनुमानजींना लग्न करण्याचा सल्ला दिला. आणि त्यांचे व्रत पूर्ण करण्यासाठी, हनुमानजी लग्नानंतर शिक्षण घेण्याची तयारीही करू लागले. पण सर्वांना काळजी होती की हनुमानजींची वधू कोण असेल आणि ती कुठून आणेल ? हनुमानाची संमती मिळाल्यानंतर सूर्य देवाच्या तेजाने एक मुलगी जन्माला आली. तीचे नाव होते सुवर्चला. सूर्य देव हनुमानास सुवर्चला लग्न करण्यास सांगतात.  सूर्यदेवांनी त्यांची परम तपस्वी आणि सुंदर कन्या सुवर्चला हिला हनुमानजींशी लग्नासाठी तयार केले.  सूर्य देव यांनी हे देखील सांगितले की सुवर्तला लग्न करूनही  हनुमाम नेहमीच बाल ब्रह्मचारी व्हाल, कारण लग्नानंतर सुवर्चला पुन्हा तपस्यामध्ये लीन होईल. हिंदू मान्यतेनुसार सुवर्चाचा जन्म कोणत्याही गर्भाशयातून झाला नाही, म्हणून तिच्याशी लग्न करूनही हनुमानाच्या ब्रह्मचर्यात कोणताही अडथळा नव्हता. आणि बजरंग बली यांना नेहमीच ब्रह्मचारी म्हटले जाते.यानंतर हनुमानजींनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि सुवर्चला कायमची त्यांच्या तपश्चर्येत मग्न झाली. पराशर संहितेत असे लिहिले आहे की सूर्यदेवांनी स्वतः या लग्नाबद्दल म्हटले होते - हे लग्न केवळ विश्वाच्या कल्याणासाठी केले गेले होते आणि त्यामुळे हनुमानजींच्या ब्रह्मचर्येवर कोणताही परिणाम झाला नाही.
तेलंगाना येथील खम्मम जिल्ह्यात छोटे परंतु एक प्राचीन मंदिर आहें. या मंदिरात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांची मूर्ती विराजमान आहे. स्थानिक लोक ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानजींचा विवाह साजरा करतात.  येथील मान्यतेनुसार, जो व्यक्ती हनुमान आणि त्यांच्या पत्नीचे दर्शन घेतो त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन दाम्पत्य जीवन सुखी होते. खम्मम जिल्हा हैदराबादपासून २२० किलोमीटरवर आहे. येथे पोहोचण्यासाठी हैदराबाद येथून सहजतेने वाहन उपलब्ध होतात.

हनुमान मंदिरात नंदी :- 

      महादेवाचं मंदिर म्हटलं की मंदिरातील शिवलिंगासमोर नंदी हमखास असतोच. मात्र अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या महिमापूर या गावात चक्क हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीच्या अगदी समोर नंदी विराजमान आहे. एकाच दगडात सुबक कलाकृतीद्वारे घडवण्यात आलेला हा नंदी सुमारे ९०० वर्षांपूर्वी महिमापूर इथं बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पाय विहिरीत गावकऱ्यांना खोदकामादरम्यान सापडला. गावातील अतिशय जुन्या अशा हनुमान मंदिरात अगदी हनुमंताच्या गाभाऱ्यासमोर हा चार फूट लांब आणि तीन फूट उंच असा भला मोठा नंदी ठेवण्यात करण्यात आला. हनुमानाच्या मंदिरात चक्क नंदी असणारं कदाचित महिमापूरचं हे हनुमान मंदिर एकमेव असावं. 
महिमापूर या गावाच्या मध्यभागात भलीमोठी पाय विहीर आहे. ही पाय विहीर यादवकालीन किंवा बहामणीकालीन असावी, असे दोन मतप्रवाह आहेत. या विहिरीचं संपूर्ण बांधकाम हे तांबूस रंगाच्या दगडात आहे. चौकोनी आकाराची ही विहीर 80 फूट खोल असून विहिरीची रुंदी 400 मीटर इतकी आहे. तळघरात जसा किल्ला बांधला असावा, असा थाट या विहिरीचा पाहायला मिळतो. तळघरात अनेक मजले या विहिरीला आहेत. विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या असून या पायऱ्या उतरताना एखाद्या किल्ल्यात आपण प्रवेश करत आहोत, असा अनुभव येतो. विहिरीच्या प्रवेशद्वारांवर दगडात कोरलेली दोन फुलं ही सर्वांचं लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे दिले आहेत. या विहिरीत चारही बाजूनं फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. या ऐतिहासिक विहिरीतून शिवलिंग सापडलं. एकाच दगडात घडवण्यात आलेला भला मोठा नंदी देखील याच पाय विहीरमधून बाहेर काढण्यात आला. महिमापूर इथल्या ऐतिहासिक विहिरीत आढळलेली नंदी बैलाची मूर्ती जेव्हा बाहेर काढण्यात आली, त्यावेळी एकाच काळ्या दगडात घडवण्यात आलेल्या नंदीचं तोंड, शिंग आणि शेपूट खंडित केलं असल्याचं आढळून आलं. ग्रामस्थांनी या नंदीचं तोंड शिंग आणि शेपूट पुन्हा व्यवस्थित केलं. त्यावेळी मंदिराच्या अगदी शेजारीच हनुमानाच्या जुन्या मंदिरात या नंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या नंदीबैलाचं वैशिष्ट्य म्हणजे पोळ्याला ज्याप्रमाणे बैलाला सजवलं जातं, अगदी तसंच या नंदीला विविध आभूषणांनी सजवण्यात आलं आहे. अगदी खरा जिवंत नंदी असा भास हनुमानाच्या मंदिरातील या नंदीला पाहून होतो. काळ्या दगडात घडवण्यात आलेल्या या नंदीला ग्रामस्थांनी रंगरंगोटी केली. हनुमानाच्या मंदिरात असणारा हा नंदी पाहण्यासाठी अनेकजण येतात," अशी माहिती महिमापूर येथील रहिवासी तुळशीदास काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या ठिकाणी विहिरीत छोट्या आकाराची पिंड देखील सापडली, ती मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आली, 
चोळ काळातला नंदी असल्याचा अंदाज : "इ. स. दहाव्या शतकात भारताच्या दक्षिणेकडं चोळांचं राज्य होतं. चोळांच्या राज्यात शिवलिंग पूजेचं महत्त्व वाढलं आणि अनेक भागात शिवालय उभारण्यात आली. शिवलिंगासमोर नंदीची स्थापना देखील प्रत्येक शिवालयात करण्यात आली. महिमापूर या ठिकाणी देखील चोळांनी असंच शिव मंदिर उभारलं. पुढं यादवांच्या काळात देखील हे मंदिर सुरक्षित होतं. चौदाव्या शतकात बहामनी साम्राज्यात देखील हिंदूंच्या मंदिरांचं नुकसान झालं नाही. मात्र चौदाव्या शतकानंतर उत्तरेकडून मुस्लिमांचं आक्रमण वाढलं आणि या काळात अनेक मंदिरं नष्ट करण्यात आली. त्याच काळात महिमापूरच्या शिवालयातील शिवलिंग आणि नंदी या ऐतिहासिक विहिरीमध्ये विसर्जित करण्यात आले, किंवा लपवण्यात आले असावे. महिमापूर इथं खोदकाम करण्यात आलं, तर या भागात अनेक ऐतिहासिक वस्तू, मूर्ती आढळून येतील अशी शक्यता आहे. 
  महिमापूर इथल्या ऐतिहासिक पाय विहिरीची भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीनं डागडुजी केली जात आहे. ही पाय विहीर आता दोन वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या विहिरीचं ज्या प्रकारे बांधकाम आहे, अगदी त्याच स्वरूपात तिचं जतन व्हावं, या दृष्टीनं पुरातत्व विभागाच्या वतीनं खबरदारी घेतली जात आहे. या पाय विहिरीच्या डागडुजीसाठी पाय विहिरीला पूर्वी असणाऱ्या विशिष्ट विटा आणि दगड मध्यप्रदेशातून आणण्यात आले आहेत.

हनुमानाची उलटी मुर्ती :-                .      

     भारतात भगवान हनुमान यांची खुप आणि सर्वत्र मंदिरे आहेत पण भगवान हनुमानाचे एक खास मंदिर आहे,जो सावेर नावाच्या ठिकाणी आहे. या हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानजीची उलटी मूर्ती स्थापित केलेली आहे आणि या कारणास्तव हे मंदिर मालवा प्रदेशात उलटा हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे.येथे हनुमान मंदिरातील स्थापित मूर्तीच्या अगदी खाली पाताळ लोकाकडे जाण्याचा मार्ग आहे असे सांगितले जाते. येथील हनुमानजी स्थापित केलेल्या मूर्तीचे मुख हे जमिनीकडे आणि पाय आकाशासारखे आहेत. तसेच या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती रामायण काळातील आहे. इंदूर शहरापासून 30 किमी अंतरावर सावेर गावात हे अद्भुत हनुमान मंदिर आहे. या प्राचीन मंदिरातील हनुमानजीची मूर्ती जगातील एकमेव उलटी मुर्ती आहे आणि ती लोकांमध्ये श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानली जाते. येथील लोकांच्या मते, जर एखादी व्यक्ती या मंदिरात बजरंगबलीच्या दर्शनासाठी 3 ते 5 मंगळवार सतत येत असेल तर त्याचे सर्व दु: ख दूर होतात.तसेच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.रामायण काळात जेव्हा भगवान श्री राम आणि रावण यांच्यात यु-द्ध सुरु होते, तेव्हा राक्षसांचा राजा रावणाने एक युक्ती करून स्वत: चे रूप बदलुन भगवान रामाच्या सै-न्यात सामील झाला. मग यानंतर, जेव्हा रात्रीच्या वेळी सर्वजण झोपल्यानंतर रावणाने श्री राम आणि लक्ष्मण यांना आपल्या सामर्थ्याने बेशुद्ध केले आणि त्यांचे अपहरण केले आणि आपल्या बरोबर त्यांना पाताळ लोकात घेऊन गेला. जेव्हा ही गोष्ट वानर सै-न्याला कळली तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. परंतु हनुमानजी भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकामधून शोधून काढले आणि तेथे अहिरावणांचा पराभव करून त्याचा व-ध केला. मग पाताळ लोकातून भगवान राम आणि लक्ष्मण जी यांना परत आणले.असे म्हणतात की हनुमान सावेर या ठिकाणाहून पाताळ लोक मध्ये गेले होते. त्यावेळी, हनुमान जीचे पाय आकाशाकडे, मुख जमीनीच्या दिशेने होते, त्या कारणास्तव त्यांच्या उलट्या मूर्तीचे पूजन अजूनही या ठिकाणी केले जाते.
आजही या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच काही रिसर्च नुसार ही मूर्ती रामायण काळातील आहे हे सिद्ध देखील झाले आहे.


गुजरातमधील कष्टभंजन मंदिर आहे अत्यंत खास, येथे हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रूपात बसले आहेत शनिदेव.
ज्योतिषमध्ये शनिदेवाला क्रूर ग्रह मानण्यात आले आहे... शनिदेवाला प्रसन्न करण्याच्या उपायांमध्ये हनुमानाची पूजा करणे हासुद्धा एक उपाय आहे. हनुमानाची पूजा करणाऱ्या व्यक्तीचे शनी दोषापासून रक्षण होते. हनुमानाच्या पूजेमुळे शनिदेव का प्रसन्न होतात, या संदर्भात विविध पौराणिक कथा प्रचलित आहेत.....
शनी आणि हनुमानाशी संबंधित मान्यतांवर आधारित एक मंदिर गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे आहे.जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत.एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे.
 का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव.?
     पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान शनीदेवावर क्रोधीत झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले.
       शनिदेवाला हे माहिती होते की, हनुमान बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत... यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रुपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले जाते.
एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे मंदिराचा परिसर.
       सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा परिसर खूप मोठा आहे... हा एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसतो. हे मंदिर आपल्या पौराणिक महत्त्वासोबतच येथील सौंदर्य आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. कष्टभंजन हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असून यांना महाराजाधिराज नावानेही ओळखले जाते. हनुमानाच्या मूर्तीजवळ वानर सेना आहे.
    येथे दूर होतात सर्व शनि दोष.
       एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असल्यास या मंदिरातील कष्टभंजन हनुमानाचे दर्शन आणि पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात असे मानले जाते... याच कारणामुळे या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी राहते.

स्त्री रुपात होते हनुमान  :- 

       भारतात असंख्य मंदिरं आहेत. काही मंदिरांच्या आख्यायिका इतक्या प्रसिद्ध आहेत की लोक दुरून दर्शनाला जातात. या मंदिरात दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे समजले जाते. भारतात धर्म आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मंदिरांमध्ये विविध देवदेवतांची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. यापैकी एक अनोख्या मंदिरात हनुमानजींची स्त्री रूपात पूजा केली जाते.
     हे अद्भुत मंदिर छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात आहे. या मंदिराचे नाव गिरजाबंध हनुमान मंदिर आहे. हे मंदिर आपल्या अनोख्या स्थापत्य कला आणि भगवान हनुमानाच्या मूर्तीमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरात हनुमानाची मूर्ती स्त्री रूपात आहे. मूर्तीमध्ये हनुमानाला चार हात आहेत. त्याच्या दोन हातात चक्र आणि गदा आहे, तर इतर दोन हातात कमळ आणि वरदान मुद्रा आहे. मूर्तीची मुद्रा अतिशय शांत आणि आकर्षक आहे.
     मंदिराचा इतिहास
      या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. असं मानलं जातं की हे मंदिर १० हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आलं होतं. राजा कुष्ठरोगाने ग्रस्त होता, एके रात्री हनुमानजी त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला मंदिर बांधण्याचे आदेश दिले. राजाने ताबडतोब मंदिराचे बांधकाम सुरू केले. मंदिर जवळपास बांधून झाल्यावर राजाला पुन्हा हनुमानजींचे दर्शन झाले. यावेळी हनुमानजींनी राजाला मंदिराजवळ असलेल्या एका रहस्यमय कुंंडाबद्दल सांगितलं. त्यांनी राजाला या तलावातून मूर्ती काढून मंदिरात स्थापना करण्यास सांगितलं. हनुमानाने सांगितल्याप्रमाणे राजाने तलावातून मूर्ती बाहेर काढली, पण ती मूर्ती पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण हनुमानजी एका सुंदर स्त्रीच्या रूपात मूर्तीमध्ये प्रकट झाले होते. राजाने ही अद्भूत मूर्ती विधीपूर्वक मंदिरात स्थापन केली. या मंदिरात दर्शन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. भगवान हनुमान इथे येणाऱ्या सर्व भक्तांचे रक्षण करतात, असं ते समजतात. मंदिरात येणारे भाविक इथे पूजा करून नैवेद्य चढवतात. हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक इथे दर्शनाला येतात. मंदिराच्या आजूबाजूला अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जे पर्यटकांना सुविधा पुरवतात.

मोठा मारुती (चुंबकीय हनुमान) :

   उल्कापातामुळे लोणार येथे निर्माण झालेले विवर आणि त्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. पण त्याच सोबत लोणार येथे बरेच कमी प्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर्ण स्थळे आहेत. त्या उल्केचा छोटा तुकडा लोणार सरोवरापासून सातशे मीटरवर पडला आहे. तेथेही एक छोटे सरोवर तयार झाले आहे. त्या जवळ हनुमान मंदिर आहे.  मूळ उल्केच्या पाषाणातून ही मारुतीची मूर्ती केलेली असावी. मंदिरातील हनुमानाची मूर्ती ज्या दगडाची बनली आहे, तिच्यात चुंबकत्व आहे. त्या सरोवराला छोटे लोणार किंवा अंबर तीर्थ या नावाने ओळखले जाते. झोपलेला मारोती हा जमिनीवर आडवा पडलेला दिसतो म्हणून त्याला झोपलेला असे म्हणतात. मारोतीची मूर्ती साधारणतः वीर किंवा दास मारोती ह्या रुपात असते, त्यांत झोपलेले आडवा असलेला हा मारुती विशेषच. अश्या प्रकारचा झोपलेला हनुमान खुलताबादला ( भद्रा मारुती ) आहे.  

  मूळ मूर्ती किती जुनी असावी, ह्याबद्दल विविध श्रद्धा आहेत. आज आपण बघतो ते मंदिर श्री कानिटकर ह्यांच्या वाहिवाटीचे आहे आणि ते भाविकांना खुले असते.   अंदाज १८४१ साली येथे कानिटकर घराण्याचे संत पुरुष आले. ते रामभक्त होते. त्यांना पालापाचोळ्यात झोपलेली मारोतीची मूर्ती सापडली. या मूर्ती पहिले झोपलेला हनुमान असे म्हणत. हनुमानाची मूर्ती ९ फुट ३ इंच लांबीची ४ फूट रुंदीची आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे ती मूर्ती चुंबकीय तत्त्वावर असून तरंगती आहे. जमिनीला वा भिंतींना ती जोडलेली वा टेकलेली नाही असे स्थानिक लोक सांगतात.
 ह्या मूर्तीवर आधी शेंदुराचा जाड असा थर होता त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नव्हते. परंतु २०१३ साली विधी करून शास्त्रीय पद्धतीने शेंदूर हटवला. आज आपण मारुतीची सुंदर मूर्ती बघू शकतो ते ह्यामुळेच. इथे गदायुक्त हनुमान आणि त्याच्या पायाखाली शनी किंवा पनवती म्हणतात ती दिसते. मारुती भक्ती मूळे शनीच्या साडे सातीची बाधा होत नाही, ह्या मान्यतेमुळे ह्याला शनी म्हटले असले तरी मारुतीच्या पायाखालील हा माणूस रावणाचा किशोरवयीन मुलगा अक्षय कुमार आहे. ज्याला मारुतीने मारले होते, अशी आख्यायिका आहे.या वास्तूत एक भुयारी रस्ता आहे. तो पापहारेश्वरापर्यंत आहे असे स्थानिक सांगतात. 

Motha Maruti Temple, Lonar








लोणार येथील मोठा मारूतीचे आधी आणि नंतरचे रूप

भद्रा मारुती मंदिर :-

   भद्रा मारुती मंदिर हे पवित्र स्थळ , श्रीरामभक्त श्रीहनुमानांचे प्राचीन मंदिर आहे. हे पवित्र स्थळ महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे स्थित आहे. तसेच हे पवित्र प्राचीन मंदिर, वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व लेण्यांपासून जवळच काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे. भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.
       खरं तर खुल्ताबादचं मूळ नाव भद्रावती. रत्नापूर म्हणून देखील खुल्ताबादला ओळखलं जात होतं. येथे असलेलं हे हनुमानाचे प्राचीन मंदीर. शयनावस्थेत असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदीर. वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे मंदीर आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि नवसाला पावणारा मारूती म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे.
 भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. आणि ते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी भव्य योगमुद्रा धारण केली त्यालाच 'भावसमाधी' म्हणतात. राजा भद्रसेनाने त्याचे गाणे संपवले तेव्हा तो हनुमानाची मुर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. राजाने हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांना कायम तेथे वास्तव्य करण्याची मागणी केली तेव्हापासून हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे. तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखलं जाऊ लागलं अशी आख्यायिका आहे.




 तसं बघितलं तर हनुमान जयंती चैत्र पोर्णिमेच्या दिवशी भद्रा मारुतीची जत्रा असते.  हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि राम नवमी अशा शुभ प्रसंगी भद्रा मारुती मंदिर येथे श्रीहनुमानांची आणि श्रीरामांची , भक्ती करणारे लाखोंच्या संख्येने भक्त /भाविक , दर्शनासाठी या पवित्र मंदिरात येतात. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
छ्त्रपती संभाजीनगर शहरापासून खुल्ताबादपर्यंत भाविक या यात्रेसाठी पायी रांगा लागलेल्या असतात. भद्रा मारुती म्हणजे हनुमान भक्तांसाठी शहराजवळ असलेलं मोठं मंदीर. तसं बघितलं तर खुल्ताबाद औरंगाबादमधून २५ किमी अंतरावर असेल पण हनुमान जयंतीच्या वेळी भाविक तेवढं अंतर चालत जातात. भद्रा मारुती संस्थान म्हणून आजही खुल्ताबादची ओळख प्रसिद्ध आहे.
    खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. मूळ भद्रावती नाव असलेल्या या गावात मध्ययुगात मुघलांचं शासन होतं. औरंगजेबाने दख्खनमध्ये आल्यावर तो खडकी (सध्याचे औरंगाबाद) येथे वास्तव्याला होता. स्वराज्यावर डोळा ठेवून असलेल्या औरंगजोबाला मराठ्यांनी याच मातीत गाडले. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. आजही त्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देतातहे गाव छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला ‘रत्‍नापूर’नावाने देखील ओळखले जाते. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.

भारतातील १० प्रसिद्ध हनुमान मंदिरांची माहिती जाणून घेऊयात.
१ ) हनुमान गढी, अयोध्या
हनुमान गढी हे अयोध्येतील दहाव्या शतकातील मंदिर आहे. असे मानले जाते की हनुमानजी येथे एका गुहेत राहत होते आणि त्यांनी रामजन्मभूमी किंवा रामकोटचे रक्षण केले होते. मुख्य मंदिरात माँ अंजनीच्या मांडीवर बसलेली बाल हनुमानाची सुंदर मूर्ती आहे. 
२ ) प्राचीन हनुमान मंदिर, दिल्ली
कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे हे एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. कौरवांशी युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी हे मंदिर बांधले होते, असे मानले जाते. येथील हनुमान मुर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेली आहे. बाल हनुमानाचे मुख दक्षिण दिशेला दिसते. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. 
३ ) मारघाट हनुमान मंदिर, दिल्ली
मारघाट हनुमान मंदिर हे दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे जमना बाजार हनुमान मंदिर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान हनुमान यांनी लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी जात असताना येथे काही काळ विश्रांती घेतली होती. असे मानले जाते की दरवर्षी यमुना नदी येथे हनुमानाच्या दर्शनासाठी येते. 
४ ) संकट मोचन हनुमान मंदिर, वाराणसी
मंदिराच्या आत माकडांचा वावर असल्यामुळे हे मंदिर माकड मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली. या मंदिराचे दर्शन घेणाऱ्याची सर्व समस्या दूर होतात अशी अख्यायीका आहे. या मंदिरात रामाच्या मूर्तीसमोर हनुमानाची मूर्ती आहे. 
५ ) बडे हनुमान जी मंदिर, प्रयागराज :- 
बडे हनुमानजी मंदिर प्रयागराजमध्ये आहे. जगातील ही एकमेव मूर्ती आहे जी शयनावस्थेत आहे. हनुमानाच्या मूर्तीची एक बाजू गंगा नदीच्या पाण्यात अर्धी विसर्जित केलेली आहे. ही मूर्ती २० फूट लांब आणि ८ फूट रुंद असून ती सुमारे ६००-७०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. 
६ ) मेहेंदीपूर बालाजी, राजस्थान  :-
मेहेंदीपूर बालाजी मंदिर हे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात आहे. हे मंदिर विशेषतः उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. असे मानले जाते की जे लोक काळ्या जादू आणि दुष्ट आत्म्याने प्रभावित आहेत ते या मंदिराच्या दर्शनाने बरे होतात. 
७ ) सालासर हनुमान मंदिर
सालासर धाम हे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात वसलेले एक महत्त्वाचे मंदिर आहे. दाढी आणि मिशा असलेले हे भारतातील एकमेव हनुमान मंदिर आहे. ही अनोखी हनुमानाची मूर्ती एका शेतकऱ्याला सापडली असल्याचे मानले जाते. येथील मूर्ती आता सोन्याच्या सिंहासनावर ठेवण्यात आली आहे. 
८ )  श्री बाला हनुमान मंदिर, जामनगर
बाला हनुमान मंदिर हे श्री बालहनुमान संकीर्तन मंदिर म्हणूनही ओळखले जाते, जे जामनगरमधील रणमल तलावाच्या-लखोटा तलाव दक्षिण-पूर्व बाजूला आहे. भगवान हनुमानाच्या या मंदिराची स्थापना देखील १५४० मध्ये झाली आणि १९६४ पासून येथे राम धुनीचे सतत गायन केले जाते. 
९ ) कष्टभंजन हनुमान मंदिर, सालंगपूर गुजरात
येथील भगवान हनुमानाची पूजा ही कष्टभंजन म्हणजेच दु:खांचा विनाश करणारा भगवंत या रूपात केली जाते. या मंदिरात भगवान शनिदेव देखील भगवान हनुमानाच्या चरणी ‘पनोती देवी’या एका स्त्री प्रतिकाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सद्गुरु गोपालानंद स्वामींनी केली आहे. 
१० ) जाखू मंदिर, हिमाचल प्रदेश
जाखू मंदिर हे भगवान हनुमानाला समर्पित प्राचीन मंदिर आहे. ते समुद्रसपाटीपासून ८ हजार ५४ फूट उंचीवर आहे. येथे टेकडीवर हनुमानाच्या पावलांचे ठसे आहेत. हे मंदिर यक्ष ऋषींनी बांधले होते. हनुमानाच्या दर्शनासाठी येथेही मोठ्या संख्येने भाविक येतात. 


ब्रह्मदेव :-

हिंदूधर्मातील त्रिदेवांपैकी एक देव ब्रह्मा. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. एका काळी विष्णू व शिव यांच्या प्रमाणे ब्रह्मदेवाचाही मान होता व त्याची पूजा होत असे. आनैसर्गिक बीज आणि विष्णुरूप योनी त्यांच्या संयोगाने एक सोन्याचे अंडे (हिरण्यांड) प्रगट झाले व त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली अशी एक कथा आहे.
ब्रह्मदेवांना हिरण्यगर्भ असेही म्हणले जाते. त्यांची उत्पत्ती ब्रह्म-अण्ड (ब्रम्हांड) पासून झाली असे मानले जाते. सर्व स्रुष्टीचे त्यांना परमपिता मानले जाते. वास्तचिक वेद आणि पुराणानुसार ब्रह्मदेवाचे महत्व विष्णु आणि शिव यांच्यापेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाही. आणि हे तिन्ही देव एकमेकांना पुरक आणि सारख्याच शक्तीचे मानले आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती मात्र शिव आणि विष्णु यांच्यानंतर झाली. मात्र काही ग्रंथात सदाशिवाचे साकार रुप रुद्र हे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले असे मानले जाते. विष्णु अणि ब्रह्मानंतर सदाशिव हे रुप (परब्रह्म किंवा शिवाचे निराकार रूप) निर्माण झाल्यावर त्रिदेव हे संकल्पना मुर्त स्वरुपात आली. तसेच निर्मिती आणि रक्षण यांच्यानंतर संहार करण्याची क्षमता असणारी शक्ती म्हणून रुद्र उत्पन्न झाला असे मानले आहे. 
ब्रम्हदेवाच्या उत्पत्तीच्या आणखी काही कथा आहेत. उदाहरणार्थ कूर्म पुराणांतील कथा पहा. एकार्णवस्थितींत विष्णू झोपलेला असता त्याच्या नाभीतून विशाल कमल उत्पन्न झाले. त्यावेळी ब्रह्मदेवही तेथे आला व विष्णू आणि ब्रह्मा यांनी एकामेकांस तू कोण? असा प्रश्न केला. बोलणे वाढत गेले आणि विष्णूने ब्रह्मदेवाचे पोटांत प्रवेश केला. तेथे त्याला 'सदेवासुरमानुषम्' असे त्रैलोक्य पाहून आश्चर्य वाटले व तो ब्रह्मदेवाच्या तोंडातून बाहेर पडला. त्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णूचे उदरांत प्रवेश केला. त्यालाही तेथे अनेक लोक दिसले व आदि अन्ताचा पत्ता लागला नाही. त्या बरोबरच बाहेर निघावयाचे सारे मार्गही अवरुद्ध झालेले आढळले. शेवटी तो विष्णूच्या नाभिद्वारांतून बाहेर पडला व तेथून उगवलेल्या कमळांतून प्रगट झाला.
ब्रिटीश म्युझीयममधील पहिल्या शतकातील ब्रम्हदेवाची मुर्ती

  कूर्मपुराणातील दुसऱ्या एका कथेप्रमाणे तो जल आणि आकाश तत्त्वापासून वराहरूपाने प्रगट झाला.' पुढे त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतीनी सृष्टी निर्माण केली म्हणून ब्रह्मदेव साहाजिकच जगाचा आजोबा झाला. यामुळेच त्याला 'पितामह' अशी संज्ञा प्राप्त आहे. धाता, प्रजापती, विधाता, कमलासन, चतुर्मुख विरिञ्चि, वगैरे त्याची इतर नांवे आहेत. कूर्मपुराणांत त्याला पहिला 'शरीरी' म्हटले आहे.'' व परामूर्ती प्रजापती, हिरण्यगर्भ, वेदार्थवेदी भगवान् व रजोगुणमय अशी त्यांची चार रूपें सांगितली आहेत.
 सृष्टी, स्थिती आणि लय या तीन कार्यात प्रथम कार्याची जबाबदारी ब्रह्मदेवाकडे आहे हा रजोगुणांचा प्रतीक आहे, उत्पादन करणे याचे मुख्य कार्य असल्यामुळे याने कुणाशी युद्ध करून संहार केल्याचे फारसे ऐकिवात नाही. देव आणि असुर या दोघांनाही हा वंदनीय होता. कित्येक राक्षस, असुर व दैत्य यांनी ब्रह्मदेवांची खडतर आराधना करून उत्तमोत्तम वर मिळविले होते. जवळ जवळ हा पौराणिक कथांचा क्रमच दिसतो की ब्रह्मदेवाने वर द्यायचे,या वरामुळे असुर उन्मत्त व्हावयाचे व मग त्या वरातून पळवाट काढून विष्णूने व कधी शंकराने असुरांचा नाश करून देवांना त्यांची समृद्धि परत मिळवून द्यायची.
     त्याचबरोबर त्रिपुरासुराबरोबरच्या युध्दात ब्रह्माने शंकराच्या रथाचे सारथ्य केले, तसेच शिव-पार्वती यांच्या विवाहात त्याने पुरोहिताची भूमिका पार पाडली होती. विष्णु आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, कन्यासक्ती इ. कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. ललितविस्तार आणि दिव्यावदान या बौध्द ग्रंथात ब्रह्मदेवाचा उपास्य देवता म्हणून उल्लेख आलेला आहे. लिंगोद्भव मूर्तीच्या कथेमधे तो शिवाचा शोध घेत वरच्या दिशेन गेला. शिवाय या कथेत तो खोटेही बोलताना दिसतो कि शिवाचे वरचे टोक मी पाहिले. यातून तो भगवान शिवापेक्षा कनिष्ठ असलेला दाखवला आहे.
सहाव्या शताकातील आयहोळ येथील ब्रम्हदेवाची मुर्ती

    दुसऱ्या एका कथेप्रमाणें ब्रह्मदेवाला पांच डोकी होती व शिवाशी त्यांचा विरोध झाल्यामुळे शंकराने त्याचे पांचवे डोके तोडले. ती कथा अशी :
     मेरूवर बसलेल्या ब्रह्मदेवाला एकदा 'मी लोककर्ता' म्हणून गर्व झाला. वेदांनी शंकराचा महिमा सांगितला पण ब्रह्मदेवाला ते पटेना. तेव्हा तेथे एका महाज्योती प्रगट झाली व तिच्या ज्योतिमंडळांत एक नीललोहित पुरुष बाहेर आला. ब्रम्हदेव त्याला म्हणाला की 'माझ्या ललाटापासून तू उत्पन्न झाला आहेस, तेव्हां तू मला शरण ये.' ब्रह्मदेवाचे ते घमेण्डखोर बोलणे ऐकून तो पुरुष म्हणजे शंकर चिडला व त्याने ब्रह्मदेवाला योग्य धडा देण्यांकरिता भैरवाला पाठविले भैरवाने ब्रह्मदेवाचे पांचवे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शंकराचे स्तवन केले व शंकर प्रसन्न झाला. भैरव ते कपाल घेऊन ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त म्हणून भिक्षा मागण्या करिता निघून गेला. पुढे वाराणसीला गेल्यावर भैरवाच्या हाताला चिकटलेले ते ब्रम्हदेवाचे पाचवे मस्तक गळून पडले. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.
        तिसरी एक कथा असे सांगते की यज्ञांचे वेळी ब्रह्मदेवाने आपल्या पत्नीस सावित्रीस पाचारण केले, पण काही कारणामुळे ती लवकर येऊ शकली नाही तेव्हा त्याने रागावून दुसरी बायको गायत्री तेथे आणून बसविली व यज्ञकार्य चालू केले. साहाजिकच सावित्रीस राग आला व तिने ब्रह्मदेवाला 'अपूज्य होशील' म्हणून शाप दिला. याहीपेक्षा वरचढ कथा म्हणजे ब्रह्मदेवांपासूनच एका मुलीचा उद्भव दाखवून पुढें तो तिच्यावरच म्हणजे आपल्या मुलीवरच म्हणजे सरस्वतीवर आसक्त झाला म्हणूनच तो अपूज्य ठरला!
        ब्रह्माला स्वयंभू मानले जाते ज्याचा अर्थ तो स्वतःहून निर्माण झालेला आहे. जेव्हा जगात काहीही नव्हते, फक्त अंधार होता, तेव्हा विश्वाच्या अंडाचे विभाजन करून, पाच डोकी आणि चार हात असलेला ब्रह्मा अनंत प्रकाशाच्या रूपात जन्माला आला जो कमळावर बसला होता. त्याच्या जन्माने आश्चर्यचकित झालेल्या ब्रह्मदेवाने कमळाचा देठ धरून त्याच्या उत्पत्तीचे कारण शोधण्यास सुरुवात केली परंतु १००० वर्षे सतत चालल्यानंतरही तो त्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटी, पराभूत झाल्यानंतर, तो त्याच कमळाकडे परतला आणि त्याच्या जन्माचे कारण विचारात घेऊ लागला. मग त्याला "तपस... तपस..." असा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तो तपश्चर्येत मग्न झाला. या तपश्चर्येला सृष्टीतील पहिले तपश्चर्येचा मान आहे आणि त्याला "आदि-तपस्या" असेही म्हणतात. अनंतकाळ तपश्चर्या केल्यानंतर (काही ठिकाणी ते १००० वर्षे म्हणून उल्लेखित आहे), त्याने अनंत क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर नारायणाला पडलेले पाहिले.

   नारायण त्याला म्हणाले, "हे आदिपुरुष! तू अनंत तप करून सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त केले आहेस. तू बुद्धिमत्ता, शक्ती आणि तेजात माझ्या बरोबरीचा आहेस. मला पाहून तू सृष्टीची शक्ती प्राप्त केली आहेस, म्हणून हे देवा, आता तुझ्या मानसिक शक्तीने हे जग निर्माण कर." भगवान विष्णूकडून एक प्रकारची प्रेरणा मिळाल्यानंतर, ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करण्याचा संकल्प केला. आपल्या भाषणशक्तीच्या बळावर, त्याने प्रथम आपल्या चार मुखातून चार वेद निर्माण केले आणि ते आपल्या चारही हातात धरले.
         यानंतर, त्याने आपल्या मानसिक शक्तीने विश्व निर्माण करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. हे पाहून त्याने पुन्हा एकदा नारायणाचे ध्यान केले आणि त्यांची मदत मागितली. ब्रह्मदेवाची व्यथा ऐकून भगवान विष्णूने त्यांना लैंगिक जग निर्माण करण्याचा सल्ला दिला.
      त्यानंतर त्याने आपल्या पहिल्या १६ मानस पुत्रांना जन्म दिला ज्यांना प्रजापती म्हटले गेले. यापैकी पहिल्या सात ऋषींना सप्तर्षि म्हटले जात असे. याशिवाय, त्याने शतरूपा नावाच्या मुलीलाही जन्म दिला.
 हे सप्तर्षि आणि प्रजापती आहेत -
१ ) तोंडातून अंगिरस
२ ) डोळ्यातून अत्री
३ ) कर्णापासून पुलस्त्य
४ ) नाभीतून पुलह
५ ) हाताने क्रतु
६ ) प्राणापासून वसिष्ठ
७ ) मनातून मारिची
८) अंगठ्यापासून दक्ष
९ ) मांडीतून नारद
१० ) सावलीतून कर्दम
११ ) इच्छेपासून सनक
१२ ) इच्छेपासून सनातन
१४) इच्छेपासून सनंदन
१५) इच्छापत्रानुसार सनत्कुमार
१६ ) शरीराच्या उजव्या बाजूने स्वयंभू मनु आणि डाव्या बाजूने शतरूप
१७) ध्यानापासून चित्रगुप्त
      सर्वप्रथम, त्यांनी सनत्कुमारांना लैंगिक संभोगाद्वारे मुले जन्माला घालण्याचा आदेश दिला, परंतु नारदांनी त्यांना त्याग शिकवून सनतकुमाराना वैराग्याची दिक्षा दिली. यामुळे क्रोधित होऊन ब्रह्मदेवाने नारदांना कायमचे भटकण्याचा शाप दिला.
   त्यानंतर त्यानी विश्वाची निर्मिती पुन्हा सुरू केली. त्यांना समजले की विश्वाचा विस्तार केवळ स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातूनच होऊ शकतो. या कारणास्तव त्याने मनु आणि शतरूपाला लग्न करण्याची आणि मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. आपण त्यांच्या लैंगिक मिलनातून जन्मलो आहोत आणि आपल्याला मनुच्या नावाने मानव म्हटले जाते. याशिवाय, दक्षाच्या कन्या आणि कर्दम ऋषींच्या मुलांमुळे जगाचा विस्तार अनंत झाला.
       ब्रह्मा हे संपूर्ण विश्वाचे पिता आहेत आणि म्हणूनच त्यांना सर्वजण आदर देतात. म्हणूनच सर्व देव आणि दानव त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे येतात. सावित्री, सरस्वती आणि वेदमाता गायत्री या ब्रह्माच्या पत्नी मानल्या जातात. त्याचे वाहन हंस आहे.
चन्नकेशव मंदीरातील बाराव्या शतकातील ब्रम्हदेवाची मुर्ती

      वेदांमध्ये असे म्हटले आहे की जे दुसरे कोणीही देऊ शकत नाही ते फक्त त्रिदेवांकडूनच मिळू शकते. ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्याप्रमाणे सर्व प्रकारचे वरदान देण्यास सक्षम आहे. हेच कारण आहे की अनेक राक्षस त्याच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळविण्यासाठी उत्सुक होते परंतु त्याने कधीही कोणालाही अमरत्वाचे वरदान दिले नाही. ब्रह्मा हेच वेळोवेळी भगवान विष्णूंना पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतार घेण्याची प्रेरणा देतात.
     जरी ब्रह्मा भगवान विष्णू आणि भगवान शिवाप्रमाणे अवतार घेत नाहीत, तरीही त्यांच्या काही अवतारांचे वर्णन केले आहे. श्री हरीच्या दहा अवतारांप्रमाणेच ब्रह्मदेवाचे सात अवतार प्रसिद्ध आहेत, ज्यांना ब्रह्म अवतार असेही म्हणतात. हे आहेत -

१ ) वाल्मिकी अवतार
२ ) कश्यप अवतार
३ ) दत्तात्रेय अवतार
४ ) लक्ष्मण अवतार
५ ) व्यास अवतार
६ ) बलराम अवतार
७ ) कालिदास अवतार
ब्रह्मदेवाचे युग :-
ब्रह्मदेवाचे वय हे हिंदू धर्मातील सर्वात मनोरंजक कथापैकी एक आहे. येथे फक्त त्याचा सारांश आहे:
  मानवांचे ३६० वर्षे म्हणजे देव आणि दानवांसाठी १ वर्ष, ज्याला "दैवी वर्ष" म्हणतात.
 १२००० दिव्य वर्षांचा एक चतुर्युग आहे ज्याला महायुग असेही म्हणतात.
         सत्ययुग ४८०० दिव्य वर्षे असते.
         त्रेतायुग ३६०० दिव्य वर्षे असते.
         द्वापरयुग २४०० दिव्य वर्षे असते.
         कलियुग १२०० दिव्य वर्षे असते.
७१ महायुगाचे एक मन्वंतरा होते ज्यामध्ये एक मनू राज्य करतो.
१४ मन्वंतर किंवा १००० महायुगांचा १ कल्प होतो, ज्याला ब्रह्माचा दिवस म्हणतात. त्याचप्रमाणे, एका कल्पाची ब्रह्मदेवाची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या अर्ध्या दिवसात (१ कल्प)  १४ मनू  राज्य करतात.
७२० कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे एक वर्ष ज्याला ब्रह्मवर्ष म्हणतात.
५० ब्रह्म वर्षांचा एक परार्ध असतो.
२ परार्ध किंवा ब्रह्मदेवाच्या १०० वर्षांना महाकल्प म्हणतात.
ब्रह्मदेवाचे १००० दिवस भगवान विष्णूच्या १ घटीच्या बरोबरीचे असतात.
श्री हरीच्या १२,००,००० घटी भगवान शिवाच्या अर्धकला होते. 
महादेवाचे 1000000000 अर्ध कलांचे एक ब्रह्माक्ष होते. 
      आपण सध्या ब्रह्माच्या ५१ व्या वर्षात आहोत, सातव्या (वैवस्वत) मनूच्या राजवटीत, श्वेतावराह कल्पाच्या उत्तरार्धात, विक्रम संवत २०७६ मध्ये अठ्ठावीसव्या कलियुगाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आहोत. अशाप्रकारे आतापर्यंत १५५५२१९७१९६१६३२ (पंधरा नील  पंचावन्न खर्व एकवीस अब्ज सत्तावन्न कोटी एकोणीस लाख एकसष्ट हजार सहाशे बावीस वर्षे) सध्याच्या ब्रह्माची निर्मिती झाल्यापासून झाली आहेत.
प्रभजंन जावा येथील ब्रम्हदेवाची मुर्ती

ब्रह्मदेवाची शस्त्रे
ब्रह्मदेवाची तीन सर्वात महत्त्वाची शस्त्रे मानली जातात:
ब्रह्मास्त्र: 
     हे सर्वात प्रसिद्ध शस्त्र मानले जाते. हे ब्रह्माचे एक मुख दर्शवते. प्राचीन काळी ब्रह्मास्त्र असलेले अनेक योद्धे होते. ज्यांच्याकडे ब्रह्मास्त्र होते ते थेट महारथींच्या श्रेणीत आले. त्याचे प्रतिरूप शस्त्र म्हणजे भगवान विष्णूचे वैष्णव अस्त्र आणि भगवान शंकराचे रुद्रास्त्र. ब्रह्मास्त्र फक्त ब्रह्मास्त्रानेच थांबवता येते, पण जिथे दोन ब्रह्मास्त्रे एकमेकांवर आदळली तिथे १२ वर्षे भयंकर दुष्काळ पडतो. असाच एक प्रसंग आला जेव्हा अर्जुन आणि अश्वत्थामा यांनी त्यांचे ब्रह्मास्त्र सोडले. महर्षी वेद व्यास आणि देवऋषी नारद यांनी त्यांना टक्कर होण्यापासून वाचवले. 
ब्रह्मशिर:
     हे ब्रह्मास्त्रापेक्षा ४ पट जास्त शक्तिशाली शस्त्र होते जे ब्रह्माच्या चार मुखांचे प्रतिनिधित्व करते. इतिहासात असे काही निवडक योद्धे होते ज्यांच्याकडे हे शस्त्र होते. परशुराम त्यापैकी एक होता. काही ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की द्रोण, अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्याकडे ब्रह्मशिर अस्त्र होते परंतु हे खरे नाही. त्याच्याकडे ब्रह्मास्त्र होते, ब्रह्मशिर नाही. भगवान विष्णूचे नारायणशास्त्र आणि महादेवाचे पशुपतस्त्र हे ब्रह्मशिरापूर्वीचे महाशास्त्र होते. ज्या ठिकाणी दोन ब्रह्मशिर शस्त्रे एकमेकांवर आदळली, त्या ठिकाणी १२ दिव्य वर्षे (४३२० मानवी वर्षे) पाऊस पडला नाही असे वर्णन आहे.
ब्रह्मांड अस्त्र: 
   हे ब्रह्मास्त्रापेक्षा ५ पट जास्त शक्तिशाली शस्त्र आहे जे ब्रह्माच्या ५ मुखांचे प्रतिनिधित्व करते. इतिहासात असे म्हटले आहे की हे शस्त्र फक्त महर्षी वशिष्ठांकडेच होते. या शस्त्रामुळे वसिष्ठाने विश्वामित्राचे ब्रह्मास्त्र प्यायले होते. भगवान विष्णूचे विष्णुज्वर आणि महादेवाचे महेश्वरज्वर (शिवज्वर) ही त्याच्या समतुल्य दिव्य शस्त्रे आहेत.
 ब्रह्मदेवाचे पाचवे मुख आणि ब्रह्माच्या उपासनेवर घातलेला बहिष्कार :-
ब्रह्माला पाच डोकी असल्याचे वर्णन केले असले तरी, त्याचे चार मस्तके असलेले रूप सर्वात प्रसिद्ध आहे. याशिवाय, विष्णू आणि शिव यांच्या तुलनेत त्यांची पूजा खूपच कमी केली जाते. तसेच त्यांचा वैष्णव किंवा शैवसारखा स्वतःचा पंथ नाही. तथापि, भगवान ब्रह्मदेवाच्या उपासनेचा एक विशिष्ट पंथ देखील आहे, जो वैखानस पंथाच्या नावाने प्रसिद्ध आहे. हा वैखानस पंथ सर्व पंथांमध्ये ओळखला जातो. तो सर्व प्राचीन धर्मग्रंथांचा मूळ वक्ता मानला जातो. भारतातील त्यांचे एकमेव मंदिर राजस्थानमधील पुष्कर येथे आहे. यामागे अनेक कथा आहेत.
    प्रभजंन जावा येथील ब्रम्हदेवाची मुर्ती

  १ )  मनूच्या निर्मितीनंतर, जेव्हा त्याने शतरूपाला आपली पत्नी म्हणून निर्माण केले, तेव्हा तो तिच्या सौंदर्याने मोहित झाला. शतरूपा त्याच्या नजरेतून सुटण्यासाठी इकडे तिकडे पळू लागली पण ती जिथे जिथे जायची तिथे ब्रह्मा तिच्या चारही डोक्यांवरून तिला पाहत राहिला. मग शतरूपा आकाशाकडे गेली ज्यामुळे ब्रह्मदेवाने आकाशाकडे दुसरे डोके निर्माण केले ज्यामुळे शतरूपाला लपून राहणे अशक्य झाले. जेव्हा महादेवाने ब्रह्मदेवाला आपल्या कन्येवर वाईट नजर टाकताना पाहिले तेव्हा त्याने त्याचे पाचवे डोके कापून त्याला शिक्षा केली.
       २ ) दुसऱ्या एका कथेनुसार, ब्रह्मदेवाच्या पाच डोक्यांपैकी चार डोक्यांनी महादेवाची स्तुती केली होती परंतु एक डोके त्यांची टीका करत असे, त्यामुळे महादेवाने ते डोके कापून टाकले. यामुळे ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष महादेवाचा कट्टर विरोधक बनला आणि त्याच्या द्वेषामुळे त्याची कन्या दक्षा किंवा सतीला आपले प्राण द्यावे लागले.
      ३) आणखी एका आख्यायिकेनुसार, एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ट आहे यावरून वाद झाला. मग त्यांच्यामध्ये एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले आणि आकाशातून एक वाणी आली की ज्याला त्याचा शेवट मिळेल त्याला महान म्हटले जाईल. ब्रह्मा हंसाच्या रूपात वर गेले आणि विष्णू वराहाच्या रूपात खाली गेले पण हजारो वर्षांनंतरही विष्णुंना त्या शिवलिंगाचा शेवट सापडला नाही. पराभूत होऊन, विष्णूने सांगितले की त्याला शेवट सापडत नाही परंतु ब्रह्मदेवाने खोटे बोलले की त्याला वरचा शेवट सापडला आहे. त्याला त्याच्या चार तोंडाने खोटे बोलायला लाज वाटली, म्हणूनच त्याने त्याच्या पाचव्या मुखाने खोटे बोलले. मग महादेवाने खोटे बोलल्याबद्दल त्याचे डोके कापले आणि त्याची पूजा करू नये असा शाप दिला.
     ४ ) एकदा कामदेवाने ब्रह्मदेवाने दिलेल्या प्रेमाचे बाण त्याच्यावर सोडले ज्यामुळे तो त्याची स्वतःची मुलगी सरस्वतीवर मोहित झाला. मग शिवाने त्याला शाप दिला की या कृत्यासाठी त्याची पूजा केली जाणार नाही. जाणीव झाल्यावर ब्रह्मदेवानेही कामदेवाला महादेवाने जाळून राख करण्याचा शाप दिला.
    ५ )  एका आख्यायिकेनुसार, ब्रह्मा स्वतः ब्राह्मणाच्या वेषात भगवान शिव आणि पार्वतीचे लग्न आयोजित करत होते. पार्वतीने तिचा चेहरा वस्त्राने झाकला होता पण ब्रह्मदेवाला तिचा चेहरा पहायचा होता. या कारणास्तव, त्याने हवनकुंडात ओले लाकूड ठेवले ज्यामुळे धूर निघत होता आणि देवी पार्वतीने तिचे मुखवस्त्र उचलले. ब्रह्मा तिच्या सौंदर्याकडे पाहत राहिला. हे पाहून शिवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची पूजा केली जाणार नाही.
     ६) एकदा ब्रह्मा पुष्करमध्ये यज्ञ करत होते ज्यामध्ये सरस्वती वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. पत्नीशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नव्हता म्हणून ब्रह्मदेवाने गायत्रीची निर्मिती केली आणि तिच्याशी लग्न केले. जेव्हा सरस्वती यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली आणि तिथे गायत्री बसलेली पाहून रागाच्या भरात तिने ब्रह्मदेवाला शाप दिला की या स्थानाशिवाय इतरत्र त्याची पूजा होणार नाही.
       ७)  दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, एकदा भगवान विष्णू ब्रह्माच्या रूपाकडे आकर्षित झाले आणि मोहिनीच्या रूपात त्यांच्याकडे आले. मोहिनीने ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येत अडथळा आणला आणि तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाने भगवान हरीची आठवण काढायला सुरुवात केली. मग सप्तर्षी तिथे आले आणि त्यांनी विचारले की ही मुलगी इथे का बसली आहे? मग ब्रह्मा म्हणाले की ती नाचून थकली आहे आणि माझ्या जवळ मुलीसारखी बसली आहे. तेव्हा मोहिनी रागावली आणि तिने त्याला शाप दिला की त्याची इतर कुठेही पूजा केली जाणार नाही.
        ८ )  दुसरी एक कथा सांगते जेव्हा ब्रह्मदेवाच्या पाचव्या डोक्याने भैरवासमोर महादेवाचा अपमान केला. तेव्हा भैरवाला राग आला आणि त्याने आपल्या करंगळीच्या नखेने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले.       
      पौराणिक वाङ्मयांतील या आणि अशाच प्रकारच्या निरनिराळ्या कथा स्पष्टपणे दाखवितात की ब्रह्मदेव आपल्या वरच्या स्थानापासून ढळला आणि अतुरास प्रोत्साहन, असत्य भाषण आणि कन्यासक्ती यामुळे तो लोकांच्या देव्हाऱ्यातून बाहेर पडला. आज शिव, विष्णू, शक्ती, गणपती व सूर्य यांचे आहेत तसा केवळ ब्रह्मदेवाचेच पोवाडे गाणारा कोणताही संप्रदाय नाही. पुष्कर (राजस्थान) खेडब्रह्म (गुजरात) वगैरे ठिकाणी ब्रह्मदेवाची मंदिरें आहेत. पण अशा स्थानाची संख्या फारच तुरळक आहे.
         पूर्वी ही स्थिती नव्हती. रामायण महाभारताच्या वेळी ब्रह्मदेवाची उपासना होती. तशीच ती नंतरही होती. ललितविस्तर आणि दिव्यावदान' या बौद्ध ग्रंथात उपास्य देवताच्या ज्या याद्या मिळतात, त्यात ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे. पण एवढे मात्र खरे की पुढे ही उपासना फोफावली नाही व मध्यकाळांपर्यंतही बरीचशी अस्तंगत झाली. उत्तरेंत ब्रह्मदेवाचे स्थान शिव, शक्ती व विष्णू यांच्या प्रभावांत लुप्त झाले तर दक्षिणेंत ते कित्येक ठिकाणी ते 'ब्रह्मशास्त्या' नें म्हणाजे स्कंदाने घेतले.
ब्रम्हदेव, लोणार

     पूजेमध्ये असलेले ब्रह्मदेवाचे स्वतंत्र राजस्थानामधील पुष्करतीर्थ येथे एक देऊळ आहे. मुळ देवळाचा जीर्णोद्धार झाल्यामुळे आज तेथे थोड्या नवीन धाटणीचेच मंदिर दिसते. मूळ मंदीर इ.स. १८०२ मध्ये बांधले होते. (बॅनर्जी : १९४१) हा अपवाद सोडल्यास प्राचीन मंदिरांमध्ये ब्रह्मदेव मंदिरे दुधही आणि खजुराहो (म.प्र.), खेड ब्रह्मा (इडर, गुजराथ), वसंतगड (राजस्थान), उन्का (हुबळीजवळ, कर्नाटक) आणि गौड (माल्डा, बंगाल)  येथे आहेत. यातील खजुराहोचे मंदिर, ब्रह्माचे नसून शिवाचे आहे. गर्भागृहामध्ये असलेल्या चतुर्मुखी लिंगामुळे त्या मंदिराला ब्रह्मा मंदिर हे नाव दिले गेले. सर्व मंदिरांमध्ये ब्रह्मदेवाचे शिल्प मात्र आढळते. साधारणतः सर्व ठिकाणी तीन तोंडाची ही पुरुषाची मूर्ती बसलेली किंवा उभी असते. चौथे तोंड हे मागच्या बाजूला असल्याने दर्शकाने ते असल्याचे गृहीत धरायचे असते. मधल्या मुखाला लांब दाढी असते आणि ही मूर्ती कमळावर बसलेली असते. डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत व काही शिल्पांमध्ये मृगाजिन असते. या मूर्तीला चार हात असतात आणि उजव्या खालच्या हातामध्ये अक्षमाला, उजव्या वरच्या हातामध्ये स्रुवा, डाव्या खालच्या हातामध्ये कमंडलू असते आणि डाव्या वरच्या हातामध्ये पुस्तक (पोथी). काही मूर्तीमध्ये खालचा उजवा हात अभय किंवा वरद मुद्रेतही असतो. त्याचे वाहन हंस असते आणि त्याच्याबरोबर एक स्त्री (सावित्री) किंवा दोन स्त्रिया (सावित्री आणि गायत्री किंवा सावित्री आणि सरस्वती) असतात.
ब्रह्मदेव हा ब्राह्मण, वेदांचा स्रोत आणि यज्ञाचा पुरस्कार करणारा आहे. त्याने आपल्या चार तोंडांनी चार वेदांना प्रकट केले. संहाराशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्याच्या हातात शस्त्र दिसत नाही. त्याचे पोट किंचित सुटलेले व शरीर थोडे स्थूल दाखवतात. चार मुखे ही चार वेदांचे प्रतीक मानली जातात. काही प्रतिमांमध्ये त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दाखवल्या जातात, जे चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात. ब्रह्मदेवाचे शिल्पांकन काही संयुक्त प्रतिमांमध्येही दिसते. यामध्ये हरी-हर-सुर्य-पितामह किंवा ब्रम्हेशानजनार्दनार्क, (ब्रम्हदेव, ईशान (शिव), जनार्दन ( विष्णु ) अर्क ( सुर्य ) या प्रकारच्या मूर्तीमध्ये चार मुखांची आणि आठ हातांची देव प्रतिमा असते ज्यामध्ये दोन कमले, खट्‌वांग, त्रिशूल, शंख व कमंडलू -माला अशी आयुधे दिसतात. विष्णु, शंकर, सूर्य आणि ब्रह्मदेवाचे एकत्रित शिल्पांकन असते. याशिवाय लिंगोद्भव शिव या मूर्तीतही ब्रह्मदेवाचे शिल्पांकन असते. शेषशायी विष्णू या शिल्पांमध्ये विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर बसलेली ब्रह्मदेवाची छोटी प्रतिमा दिसते. तसेच वामन त्रिविक्रम या शिल्पातही विष्णूने स्वर्ग व्यापायला उचललेल्या पायाशी ब्रह्मदेवाची मुर्ती दिसते. 
      ब्रह्म देवाची चार मुखे ही चार वेद, चार उपवेद (आयुर्वेद, धर्नुवेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद) चार युगे, चार ऋत्विज (होता, उद्‌गाता, अद्वर्यु आणि ब्रह्मा स्वतः), चार धर्म (विद्या, दान, तप आणि सत्य), चार आश्रम, चार यज्ञद्वय (षोडशी आणि उक्थ, चयन आणि अग्निस्तोम, आप्तोर्याम आणि ऐतरात्र, वाजपेय आणि गोसव), चार दिशा अशा अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. (भागवत पुराण ३,१२,३४-४१)
उत्तरभारतांतील ब्रह्मदेवाच्या प्रतिमा : 
       ब्रम्हदेवाची आद्य मुर्ती म्ह़णजे संग्रहालयातील एक मूती (सं. सं. १४.३८२) होय असे काही जुन्या विद्वानांचे मत होते, पण ते आतां तितकेसे ग्राह्य नाही. महन मिळालेल्या गुप्तकालीन ब्रह्मदेवाच्या दोन प्रतिमा कलकत्ता व वाराणसी (भा.क.भ.स. ६६) या संग्रहालयांत आहेत. दुर्दैवानें दोन्ही बऱ्याच खंडित असल्याकारणानें त्यांच्या हात व आयुधांविषयी काहीच सांगता येत नाही. समोरून मुखें मात्र तीन दिसतात, मस्तकांवर जटाजूट आहे व गळ्यांत जानवेही आहे. दाढी दिसत नाही. दुसरा गुप्तकालीन ब्रह्मदेव देवगढच्या शेषशायी विष्णुप्रतिमेंत कमळावर बसलेला दिसतो. वरील प्रतिमांशी याचे साम्य आहे. हात फक्त दोनच असून एकात घट व दुसरा अभयमुद्रेत असावा असे दिसते.
         बंगाल व उत्तर भारताच्या इतर भागांत चतुर्भुज ब्रह्मदेवाच्या प्रतिमा जास्त दिसतात. 'आजोबा' म्हणून अंकित ब्रह्मदेव मोठ्या पोटाचा व स्थूल शरीराचा दाखवतात तसेंच मधल्या मुखांस साधी किंवा गाठ मारलेली दाढी असते. आयुधांत माळा व कमंडलू तर आहेच. त्याबरोबरच सुक् आणि सुवा किंवा पुस्तक असते. आजूबाजूस दोन स्त्रिया दिसतात त्यांना गायत्री व सावित्री असें म्हणता येईल. बंगालच्या काही प्रतिमांत एक स्त्री वीणा घेतलेली दिसते. ही सरस्वती असू शकेल. ब्रह्मदेवाचा हंस मात्र त्याचे पायाजवळ नक्कीच दिसतो.

ब्रह्मा, वेदांसह :-
      कश्मीरमध्ये मिळालेल्या ७व्या शतकातील एका सुंदर प्रतिमेत (तूर्त बर्लिन संग्रहालय) एकमुखी चार हाताचा ब्रह्मदेव उभा आहे. हातात माळा, अभयमुद्रा, दंड आणि कमंडलू आहे. विशेष म्हणजे त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दिसतात. त्यापैकी एकाच तोंड घोड्याचे आहे, हा सामवेद आहे. उरलेले तीन ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद आहेत.

ब्रम्हदेव, पाटण
ब्रह्मा सावित्री :
          या दोघांचे एकत्र उमामहेश्वराप्रमाणे अंकन करणाऱ्या दोन प्रतिमा झाशी, उ.प्र. च्या राणीमहाल संग्रहालयात आहेत (सुमारे १०-११वे शतक) त्रिमुख ब्रह्मा (चौथे मुख पाठीकडे असल्यामुळे अदृश्य) हंसावर सावित्रीसह आलिंगन मुद्रेत बसला आहे. एका प्रतिमेत देवाच्या डावीकडे यज्ञपात्र (सुक्/सुवा) घेतलेले व उजवीकडे काही तरी लांब वस्तू (पोथी?) घेतलेले पुरुष आढळतात. हे ब्रह्मदेवाचे आयुध पुरुष असू शकतील.
ब्रम्हदेव सरस्वतीसह, देवगड
ब्रह्मा-सावित्री-सरस्वती :-
    आसाममधील दोन प्रतिमात ब्रह्मदेवाबरोबर दोन स्रिया दिसतात. या अनुक्रमे सावित्री व सरस्वती असणे शक्य आहे. सावित्री व सरस्वतीचे ब्रह्मदेवाच्या डावीकडे अंकन मत्स्यपुराणांत मान्य आहे. (मत्स्य. २५९.४०-४५) दुसरे म्हणजे तेजपुर जिल्ह्यातून आलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीत पादपीठावर सात हंस दाखवले आहेत. लेखिकेच्या मताप्रमाणे आसामचा ब्रह्मदेव कालिकापुराणाच्या आधारावर आकारलेला आहे.
 
कोटा वस्तुसंग्रहालयातील १० व्या शतकातील मुर्ती
इथे ब्रह्मदेवा बरोबर त्याच्या पत्नी सरस्वती आणि गायत्री दाखविल्या आहेत 
कोटा वस्तुसंग्रहालयातील १०-११ व्या शतकातील मुर्ती

बहुतेकदा विष्णु आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती अलिंगन मुद्रेत दाखविल्या असतात. मात्र सरस्वती हि शुध्द देवता असल्यामुळे सहसा अश्या अलिंगन मुद्रेतील ब्रह्मदेव आणि सरस्वती यांची शिल्प बघायला मिळत नाहीत. पण इथे असे शिल्प बघायला मिळते.
खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदीरावरील ब्रम्हदेव, गायत्री, सावित्री यांचे शिल्प
हरियाणा व बिहार येथून मिळालेल्या काही शिल्पांत दर्शनी भागावर ब्रह्मा, व पाठीमागे विष्णू, स्कंद अथवा गरुडाचेही दर्शन होते.

अंबरनाथ येथील शिवमंदीरावर असलेली ब्रम्हदेव व सरस्वतीची मुर्ती

     सरस्वती-ब्रह्मा यांची आलिंगन प्रतिमा कमी दिसते पण अप्राप्य आहे असें मात्र नाही. उदाहरणार्थ राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे अशी एक मूर्ती आहे . दुसरी मूर्ती वाराणसीच्या 'मिसिरपोखरा' तलावाच काठी आहे. ही मध्यकालीन असून बरीच खंडित आहे."
    स्वतंत्र रूपांशिवाय ब्रह्मदेव वैष्णव व शैव प्रतिमाच्या रथिकाबिंबाचे रूपांत, विष्णूंच्या अनंतशायी मूर्तीत तसेच शिवाच्या कल्याणसुंदर मूर्तीत आढळतो .

ब्रह्मदेवाच्या दक्षिण भारतीय मूर्ती :

         दक्षिणेंत मंदिराच्या उत्तरी भागांवर ब्रह्मदेवाच्या मूर्ती आढळतात. अशी आख्यायिका आहे कीं मेरुपर्वतावर असलेल्या ब्रह्मदेवाचा कमंडलू पुरांत सापडला व तो दक्षिणेंत ज्या ठिकाणी अडकून पडला ती जागा म्हणजे कावेरीच्या तटावर असलेले कुम्भकोणम् हे स्थान होय. दक्षिणेशी ब्रह्मदेवाचा संबंध दाखविणारी दुसरी कथा अशी आहे की कंडियूर (तिरुकण्डियू, तंजावरपासून ७ मैल) येथे ब्रह्मदेवाला सरस्वतीवर आसक्त झालेला पाहून शंकराने त्याचे पांचवे मस्तक तोडले."
      दक्षिण भारतांतही ब्रह्मदेव प्रथम पूज्य होता, पुढे त्याला अपूज्यत्व आले. श्री. पी. आर. श्रीनिवासन यांच्या मते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या सुमारांस ब्रह्मदेवाची पूजा लुप्त होऊन तिचे स्थान सुब्रह्मण्याने घेतले. प्रारंभिक चोळ काळांत निर्माण झालेल्या नर्तमल्लई आणि तिरुकत्तलईच्या मंदिरात ब्रह्मदेवाला स्वतंत्र अस्तित्व होते.
     ब्रह्मदेवाच्या मूर्ती बदामी आणि एहोळेच्या कलेपासून मिळू लागतात. मुंबईच्या संग्रहालयांत असलेला बदामीचा विशाल ब्रह्मदेव चतुर्भुज असून त्याचे हातांत प्रदक्षिणाक्रमानें माळा, सुक् व घट अशा वस्तू असून डावा वरदमुद्रेत आहे. हा कमलासनावर बसला असून जवळ हंस आहे व ऋषी स्तुती करीत आहेत. एहोळेच्या प्रतिमेंत पाश किंवा मौजीबंधन हे सुकेच्या जागी दिसते. इतर आयुधं तशीच आहेत. एहोळची दुसरी प्रतिमा हंसारूढ आहे व येथें एक नवी वस्तू म्हणजे 'कूर्च' दिसते. बरेचसे ऋषी स्तवन करतांना दाखविले आहेत.
   धारवाड, सोपारा, वगैरे भागांकडे मिळणाऱ्या ब्रह्मदेवाना दाढ्या दिसतात, पण साधारणपणें दक्षिणेंत दाढीचा प्रघात फारच कमी दिसतो. आणि काही ठिकाण पायापाशी हंस देखील नसतो.
 
 चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह ( पाटेश्वर लेणी )

अंबरनाथ मंदीरातील ब्रह्मदेवाची मुर्ती
 
१५ व्या शतकातील चेर राजवटीतील तिरुअनंतपुरम वस्तु संग्रहालयातील ब्रह्मदेवाची मुर्ती
 
     सुदूर दक्षिणेंत मिळणाऱ्या ब्रह्मदेवाच्या स्थानक व आसन प्रतिमांचा डॉ. अश्विन लिप्पी यांनी बारीक अभ्यास केला आहे. त्यांनी यांना दोन वर्गात वाटले आहे.' प्रथम वर्गातील मूर्तीना दृश्यमान अशी तीनच तोंडे असून त्याचा उजवा हात अभयमुद्रेत व डावा कट्यवलंबी किंवा मांडीवर ठेवलेला असतो. मागील हातात माळा व घट दिसतात. या वर्गात स्थानक मूर्ती जास्त आहेत. दुसऱ्या वर्गातील प्रतिमा चित्र पद्धतीच्या (carved in round) असून त्यांत ब्रह्मदेवाचे चौथे तोंडाशी पाठीकडे दाखविले आहे. पाठीमागचा उजवा अभयमुदेत आहे. पाठीमागच्या डाव्यात माळा आहे व सामान्य डावा मांडीवर उताणा ठेवला आहे. या वर्गात अलंकाराचेही बाहुल्य आहे. ब्रह्मदेवाचे साधे जानवे मुक्ता यज्ञोपवीत म्हणून झळकते व त्याच्या पायांतही अलंकार दिसतात. प्रथम वगपिक्षा दुसऱ्या वर्गाच्या प्रतिमा नक्कीच नंतरच्या आहेत. पण या कोणत्याही गटांत ब्रह्मदेवाला दाढी दिसत नाही व त्याचा हंसही आढळत नाही. या प्रतिमा ९-१० व्या शतकातल्या आहेत.
लेपाक्षी , आंध्र प्रदेश येथील विजयनगर साम्राज्यातील १६ व्या शतकातील ब्रह्मदेवाची मुर्ती :-
         ब्रह्मदेवाच्या कथेप्रमाणे सुरवातीला ब्रह्मदेवाला पाच शिर होती. यातील चार मुख चार दिशेला आणि पाचवे मुख आकाशाकडे बघायचे. मात्र ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या स्वतःच्याच पुत्रीचा त्याला मोह पडला. म्हणून क्रोधीत होउन शंकराने त्याचे मुख नखाने कापले. त्यानंतर ब्रह्मदेवाला चारच मुख राहीली. पाचवे मुख म्हणजे ब्रह्मदेवाचा अहंकार गळून पडला.  याचा अर्थ निर्मात्याने स्वतः निर्माण केलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडु नये असा होतो. निर्मिती क्षेत्रात अहंकार हा हानिकारक असतो आणि ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखासारखाच तो नष्ट झाला पाहिजे असे हि कथा सांगते. 
 
 ब्रह्मदेवाची चार मुखे वस्तुस्थिती आणि बहु कौशल्ये अंगी असण्याचे प्रतिनिधीत्व करतात. याचाच अर्थ एखाद्य गोष्टीकडे अनेक दृष्टिकोणातून पहता यायला हवे असा होतो.
   या शिल्पात ब्रह्मदेव मृदंग वाजवताना दाखविला आहे. मृदंग हे काळाचे प्रतिक आहे. आणि त्याचा ताल म्हणजे सर्जनशीलतेचे समयचक्र आणि बोल म्हणजे समाजाची भाषा. यामुळेच ब्रह्मदेव इथे मृदंगम वाजवताना दाखविला आहे .
संयुक्त प्रतिमा, त्रिमूर्ती, दत्तात्रेयी :
    एकटा ब्रह्मदेव जरी अपूज्य झाला असला तरी इतरांबरोबर त्याला पूजेचा हक्क मिळत होताच. या रूपांत प्रथम त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू व शिव यांचा विचार करू. उत्तर भारतात अशा प्रकारचे पट्ट मिळतात. येथे एका ओळीत हे तिन्ही देव कोरलेले असतात (ल.सं.सं.जी ५७ ). खजुराहो कलेत ही अशा प्रकारचे अंकन पहावयास मिळते. यांत बहुतेक मधोमध विष्णू असून आजुबाजूला ब्रह्मदेव व शंकर आपापल्या वाहनांबरोबर असतात.
 खजुराहो येथील त्रिमुर्ती शिल्प :-
    या शिल्पात विश्वाचा निर्माता, रक्षणकर्ता आणि विनाशक एकत्र दाखविले आहेत. विश्वाचे एकुण चलनवलन यात एकत्र दाखविले आहे. भगवान विष्णूचे शिल्प मधोमध आणि मोठ्या आकाराचे दाखविले आहे,याचा अर्थ विश्वाचा रक्षणकर्ता जास्त महत्वाचा आहे हे दर्शविले अहे. शिल्पपटाच्या खालच्या बाजुला स्त्री-पुरुष दाखविले आहेत. यातून गृहस्थाश्रमाचे महत्व अधोरेखीत केले आहे. एखादे कुटुंब हे समाजाचा खुप छोटा भाग असला तरीही त्याच्यामुळेच समाज टिकुन रहायला मदत होत असल्यामुळे समाजाचे रक्षण करणारे भगवान विष्णु महत्वाचे दाखविले आहेत. 
हरि-हर-सूर्य-पितामह :
   हरि म्हणजे विष्णु, हर म्हणजे महादेव तर पितामह म्हणजे ब्रम्हा. आधी सांगितलेल्या तीन देवता व सूर्य या चारही देवता एकाच मूर्तीत दिसतात. सूर्य, ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे चारही देव प्रसिद्ध असून ते इतर देवतांद्वारा पूजनीय आहेत. सृष्टीची उत्पत्ती आणि तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ही चारही तत्वे या एकाच मूर्तीत पाहायला मिळतात. हिंदु मान्यतेनुसार ब्रह्म, विष्णु आणि महेश हे तिन देव महत्वाचे मानले जातात. चौथा देव अर्थातच सुर्य देव. या चारही महत्वाच्या देवांचे चित्रण या स्तंभावर केले आहे. हा स्तंभ प्रचंड उंचीचा आहे. मंदीराच्या मुखमंडपा इतके स्तंभ महत्वाचे नसले तरी मंदीराच्या बांधणीत स्तंभ महत्वाचे असतात. ग्रीक मंदीर स्थापत्यात आपल्याला चार प्रकारचे स्तंभ बघायला मिळतात, तर भारतील मंदीरात कमीतकमी चाळीस प्रकारचे स्तंभ बघायला मिळतात. यावरुन भारतील स्थापत्यकार आणि शिल्पीची कल्पकता आणि कौशल्य याची ओळख होते.
मध्य काळात हरि-हर-ब्रह्मदेव या बरोबरच सूर्यासही गुंफून हरि-हर-पितामह या नांवाने प्रतिमा घडविल्या जात. खजुराहोच्या कलेत अशा प्रतिमा दिसतात.  काही प्रतिमात फक्त ब्रह्मदेव, सूर्य व शंकर दाखवितात . येथे सूर्य व नारायण यांचे एकत्व कल्पिले आहे.
अर्थात निर्मिती आणि विनाश ही तितकाच महत्वाचा असल्यामुळे त्यांनाही मुर्ती स्वरुपात चित्रीत केले आहे.
ब्रम्हेशजनार्दनार्क, देलमाल
 
१० व्या शतकातील प्रतिहार कालखंडातील अजमेर वस्तु संग्रहालयातील मुर्ती

देवतमुर्तीप्रकरण मध्ये आलेला एक श्लोक पाहून या मूर्तीची कल्पना आपण करू शकतो.
चतुर्वक्त्रमष्टबाहुं चतुष्कैकनिवासिनम्
ऋद्धा मुखगतः कार्यः पद्महस्तो दिवाकरः ॥
खट्वाङ्ग त्रिशूलहस्तो रुद्रो दक्षिणतः शुभ: ।
कमण्डलुश्चाक्षसूत्रमपरस्थः पितामहः ॥
शङ्खचक्रधरो हरिर्वामे चैव तु संस्थितः ।
एवं विधोऽयं कर्त्तव्यः सर्वकामफलप्रदः ॥
        वरील श्लोकाप्रमाणे ही मूर्ती एकच आसन आणि एकच शरीर धारण करणारी दाखवावी. ही मूर्ती आठ हातांची तर चार मुखांची असावी. हातात कमळ घेऊन समोर मुख असणारा सुर्य तर उजवीकडे खट्वांग आणि त्रिशूल धारण केलेला शिव असावा. पाठीमागे चेहरा असलेला व हातात कमंडलू आणि अक्षमाला घेतलेला ब्रम्हा दाखवावा.
डावीकडे शंख आणि चक्र घेऊन विष्णु असतो. अशा तऱ्हेने बनविलेली मूर्ती सर्व मनोकामना पूर्ण करणारी असते. असाच काहीसा उल्लेख अपराजितपृच्छा मध्ये मिळतो. पण इथे या मूर्तीला हरिहर हिरण्यगर्भ असे म्हटले आहे.

हरो हिरण्यगर्भश्च हरिर्दिनकरोऽपि च ।
एते देवाः समाख्याता देवनामपि पूजिताः ॥
पृथक्त्वेन च कर्तव्या एकरूपसमन्विताः।
अष्टबाहुचतुर्वक्त्रः कुण्डली मुकुटोज्ज्वलः ॥
हारकेयूरसंयुक्तो रत्नमालोपशोभितः ।
ऋष्यागतपुरः कार्य: पद्महस्तो दिवाकरः ॥
शङ्खचक्रधरो देवो वामे च मधुसूदनः ।
कण्ठाभरणसंयुक्तो मूर्धा च मुकुटोज्ज्वलः ॥
ब्रह्मा पश्चिमतः कार्यों बृहज्जठरमण्डलः ।
कुण्डिकामक्षसूत्रं च दधत् कूर्चविभूषितः ॥

या मूर्तीला ब्रह्मेशानजनार्दनार्क हे नाव रुपावतार मध्ये दिलेले आहे पण इतर लांच्छन आणि क्रम वरीलप्रमाणेच आहे.
      सदरची मूर्ती गुजरात राज्यातील, चंपानेर जवळ असणाऱ्या लकुलिश शिव मंदिरातील आहे.  ही मूर्ती तंतोतंत वरील उल्लेखाप्रमाणे नाही म्हणजेच हातातील वस्तू थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जिथं ब्रम्हाच्या हातात कमंडलू सांगितला आहे तिथे या मूर्तीत पुस्तक आहे. कमंडलू आणि पुस्तक दोन्ही ब्रह्माचे लांच्छन असल्याने ओळख पटणे सोपे जाते.
       आज जितक्या मोठ्या प्रमाणात महादेव आणि विष्णूची पूजा होते तितक्याच मोठ्या प्रमाणात सूर्याची देखील होत होती.
विभ्राड् बृहत्पिबतु सोम्यं मध्वायुर्दधद्यज्ञपतावविहुतम् |
वातजूतो यो अभिरक्षति त्मना प्रजाः पिपर्ति बहुधा वि राजति ||
        शैव आणि वैष्णव यांच्या प्रमाणे पूर्वी सौर संप्रदाय देखील अस्तित्वात होता. दरम्यान फक्त सूर्याची अनेक मंदिर बांधली गेली पण कालच्या ओघात सूर्योपासना कमी झाली आणि शैव, वैष्णव संप्रदाय भरभराटीस आला. सूर्य पंचायतन मध्ये शिव आणि विष्णु यांचा समावेश असतो.
सदरच्या मूर्तीत समोर फक्त सूर्याचाच चेहरा आहे. सूर्यातच  ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत अशी कल्पना इथे केलेली दिसते.
 
ब्रह्मदेवाची मंदीरे :-

असे मानले जाते की संपूर्ण जगात पुष्करमध्ये फक्त ब्रह्माचे मंदिर आहे परंतु हे खरे नाही. पुष्कर हे निश्चितच ब्रह्माचे सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचे मंदिर आहे, परंतु याशिवाय, राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील असोतरा गावात ब्रह्माचे एक मंदिर आहे, ज्याला खेतेश्‍वर ब्रह्मधाम तीर्थ म्हणतात. केरळमधील उथमार कोवळी नावाच्या ठिकाणी, ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते, ज्याला त्रिपया त्रिमूर्ती मंदिर म्हणतात.
      ब्रह्माचे ब्रह्मपुरीेश्वर मंदिर तामिळनाडूतील कुंभकोणम गावात आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्ती नावाच्या ठिकाणी ब्रह्मा मंदिर आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातील चेब्रोलू नावाच्या ठिकाणी ब्रह्माचे चतुर्मुख मंदिर आहे. गोव्यात कंरंबोलिम नावाच्या ठिकाणी ब्रह्माचे एक मंदिर आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावात आणि मुंबईजवळील नाला सोपारा येथेही ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापित आहे. याशिवाय गुजरातमधील खेडब्रह्मा येथे ब्रह्मदेवाची, कानपूरमधील ब्रह्मा कुटीर मंदिर, हिमाचल प्रदेशातील खोखन, आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि तामिळनाडूमधील होसूर ही उल्लेखनीय मंदिरे आहेत. एवढेच नाही तर परदेशातही ब्रह्मदेवाची मंदिरे आहेत.
     कंबोडियातील जगातील सर्वात मोठ्या मंदिर, अंगकोर वाट मंदिरात ब्रह्मदेवाच्या मूर्ती आहेत. इंडोनेशियातील प्रम्बानन मंदिर हे ब्रह्माच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. बँकॉक (थायलंड) येथील एरावन तीर्थक्षेत्रात ब्रह्माचे एक भव्य मंदिर आहे. थायलंडमध्ये ब्रह्माला "फ्रा-फ्रॉम" म्हणतात. म्यानमार, ज्याचे जुने नाव बर्मा होते, त्याचे नाव ब्रह्मा यांच्या नावावरून ठेवण्यात आले, ज्याचे प्राचीन नाव ब्रह्मदेश होते. इतकेच नाही तर ब्रह्माचे वर्णन चीनच्या लोककथांमध्ये देखील केले आहे जिथे त्यांना "सिमीएनसेन" म्हटले जाते आणि त्यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत.
ठाण्यातील ब्रह्मदेवाची मुर्ती : – 
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि ठाण्याचा वारसा असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती काही वर्षांपूर्वी सिध्देश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्तीचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी मूर्ती साधारणपणे ८००-१००० वर्ष जुनी आहे. या संपूर्ण परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. एवढी सुंदर मूर्ती कोणत्याही राजाश्रयाशिवाय निर्माण करणे शक्यच नाही. त्यामुळे ही मूर्ती शिलाहारकालीन आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. शिलाहार राजघराण्याची पहिली राजधानी पुरी आणि दुसरी राजधानी श्रीस्थानक म्हणजे सध्याचे ठाणे.
    उत्तरकोकण वर राज्य करणारे शिलाहार राजे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक होते. कान्हेरी लेण्यात उत्तर शिलाहारांचा पहिला ज्ञात शिलालेख आहे. शके ७८५ मधील या लेखात पुल्लशक्तीने महासामंत हे बिरूद लावलेले आहे. तसेच आपले वडील कपर्दिन यांना महासामंत आणि कोकणवल्लभ ही बिरुदे राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्यामुळे प्राप्त झाली असे सांगतो.
    शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळीजवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शके ९८२ मधील सुप्रसिद्ध शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले हे निश्चितपणे सांगता येते. तसेच शिलाहारांच्या शिलालेखातूनसुध्दा अनेक मंदिराचे उल्लेख वाचायला मिळतात (उदा. व्योमेश्वर, षोंपेश्वर). त्याचबरोबर आटगाव येथील भग्नशिवमंदिर पण शिलाहारकालातील असावे असे त्याच्या स्थापत्यशैलीवरून वाटते.
    सिध्देश्वर राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत आणि कमळावर उभी आहे. समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी आणि शरीराला कोठेही बाक नसणारी मूर्ती. मूर्तिशास्त्रात मूर्तीच्या उभे राहण्याच्या स्थितीवरून समभंग, अभंग, त्रिभंग आणि अतिभंग असे चार प्रकार असतात.
     मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे कोणत्या हातात काय धारण केले असावे हे सांगता येत नाही.मूर्तिशास्त्राप्रमाणे हातात अक्षमाला, वेद, कमंडलू व यज्ञपात्रे किंवा वेद, यज्ञपात्रे व दोन हात वरदअभय मुद्रावस्थेत असावेत. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मागच्या बाजूला आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर कोरीवकाम केलेला जटामुकुट आहे. कानात कुंडले, यज्ञोपवीत आणि कटीसूत्र धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीला कोरलेल्या भुवया नाजूक आणि एकमेकांना जोडलेल्या आहेत. मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोटथोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी मूर्ती तयार करताना ह्या गोष्टीला छेद दिलाआहे.
    मुर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या बहुदा सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ असून तिच्यावर किर्तीमुखे कोरलेली आहेत.
      सिध्देश्वर तलाव परिसरात ब्रह्मदेवाचे मंदिर असावे. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्ती वाचवण्यासाठी मंदिराजवळ असलेल्या तलावात (आताच्या सिध्देश्वर तलावात) लपवून ठेवली असावी. परंतु ही मूर्ती कोणत्या राजवटीच्या काळात तलावात लपवून ठेवली आणि महाराष्ट्रात ब्रह्मदेवाची पूजा कधी बंद झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही . नालासोपारा येथील चक्रेश्वर मंदिरात असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची स्थानिकांकडून अजूनही नित्य पूजा केली जाते ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
    ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या समोर असलेल्या राममंदिराच्या मागे ३-४ मूर्तींचे अवशेष पडलेले आहेत. पण त्या मूर्ती कोणाच्या आहेत हे काही कळून येत नाही. एका मूर्तीच्या गळ्यात कोरलेला हार अप्रतिम आहे. दुसऱ्या एका मूर्तीच्या आजूबाजूला जैन तीर्थंकरसदृश्य मुर्त्या कोरलेल्या आहेत. दुर्दैवाने ती मूर्ती कोणाची आहे हे समजून येत नाही. 
   सद्यस्थितीत ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या मूर्तीला संवर्धनाची गरज आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे खंडित झालेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. परंतु अजूनही काही भाविक ह्या मूर्तीची पूजा करतात. या मूर्तीला शेंदूर, फुले, हळदकुंकू इ. घटकांमुळे हानी पोचत आहे. त्यामुळे मूर्तीला आणि इतर अवशेषांना संग्रहालयात हलवणे ही काळाची गरज आहे किंवा सध्याच्या जागी त्यांचे योग्य संवर्धन करणे.

नालासोपार्याची ब्रम्हदेवाची मुर्ती :-

  नालासोपारा येथील चक्रेश्वर मंदिरात सर्वात सुंदर मुर्ती ब्रह्मदेवाची आहे.  महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात ठाणे (पूर्वीचे श्रीस्थानक), सोपारा (चक्रेश्वर मंदिर), या ठिकाणी ब्रम्हदेवाच्या मुर्ती सापडलेल्या आहेत, त्यामुळे या भागात त्याकाळी ब्रह्मदेवाची मंदिरे होती हे दिसुन येते. ठाणे परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. श्रीस्थानक ही त्यांची राजधानी होती. शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळी जवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले. नालासोपारा आणि ठाणे येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या सुंदर आणि भव्य मूर्ती आणि मंदिरे याच काळात राजाश्रयाने निर्माण झाली असावीत. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात ब्रह्मदेवाची मंदिरे नष्ट झाली.
पुस्तक,  यज्ञपात्र
सावित्री व गायत्री / गायत्री व सरस्वती 
घट (कमंडलू), हंस 

मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते.
वरदअभय मुद्रा

राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत (समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी) उभी आहे. मूर्तीला दर्शनी भागात तीन डोकी असून, डोक्यावर कोरीवकाम केलेला मुकुट आहे. मूर्तीला कोरलेल्या भुवया एकमेकांना जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाला दाढी आणि मिशी दाखवली आहे. कानात कुंडले, गळ्यात हार, यज्ञोपवीत (जानवे) आणि कटीसूत्र धारण केलेले आहे. अंगावर बाजूबंद, हातात कडं, कमरपट्टा इत्यादी वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीचे चारी हातात अनुक्रमे माळा व घट (कमंडलू), वेद, यज्ञपात्र आहेत, एक हात वरद मुद्रेत आहे. मुर्तीच्या पायाच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. पायाच्या डाव्या बाजूला हंस हे ब्रह्माचे वाहन कोरलेले आहे. तर उजव्या पायाजवळ ब्राम्हण कोरलेला आहे. मूर्ति शास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोट थोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी ही मूर्ती तयार करताना ब्रह्माला एकदम "फ़िट" दाखवलेला आहे.

ब्रह्मा मंदिर, पुष्कर :-

आपल्या देशात भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची अनेक मंदिरे आहेत. पण, संपूर्ण भारतात ब्रह्माचे फक्त एकच मंदिर मानले आहे.  ( प्रत्यक्षात ब्रह्मदेवाची आणखी काही मंदीरे आहेत )  ब्रह्माचे हे मंदिर राजस्थानमधील पुष्कर येथे आहे, जे ब्रह्मा मंदिर म्हणून ओळखले जाते.  शेवटी संपूर्ण भारतात ब्रह्माजींचे हे एकमेव मंदिर का आहे आणि त्यामागील कथा काय आहे?
पुष्कर मंदिराची कहाणी
    पद्मपुराणानुसार, एकेकाळी वज्रनाश नावाचा एक राक्षस पृथ्वीवर उपद्रव करत होता. त्याचे अत्याचार इतके वाढले होते की ब्रह्मदेव त्याच्यावर चिडले आणि त्यांना त्याला कमळाच्या फुलानॉ मारले. जेव्हा ते त्याला मारत होते तेव्हा ब्रह्मदेवाच्या हातातून पृथ्वीवर तीन ठिकाणी कमळाच्या पाकळ्या पडल्या. जिथे जिथे तीन कमळाच्या पाकळ्या पडल्या तिथे तिथे तीन तलाव तयार झाले. त्यापैकी एका ठिकाणाचे नाव पुष्कर होते. मग जगाच्या कल्याणासाठी ब्रह्माजींनी येथे यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. ब्रह्माजी यज्ञ करण्यासाठी पुष्करला पोहोचले. या यज्ञात पत्नीला उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु सावित्री तिथे पोहोचण्यास उशिरा आली. पूजेचा शुभ मुहुर्त निघून जात होता. सर्व देव-देवता एक-एक करून यज्ञस्थळी पोहोचले. पण सावित्रीचा काही पत्ता नव्हता.
    जेव्हा शुभ मुहुर्त टळून जाऊ लागला, तेव्हा दुसरा कोणताही उपाय नसल्याने ब्रह्मदेवाने नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट केली आणि तिच्याशी लग्न करून आपला यज्ञ पूर्ण केला. दुसरीकडे, जेव्हा सावित्री यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा गायत्रीला ब्रह्माजवळ बसलेले पाहून ती रागावली आणि तिने ब्रह्माला शाप दिला. एवढ्यावरच सावित्रीचा राग शांत झाला नाही. त्याने लग्न करणाऱ्या ब्राह्मणाला शाप दिला की त्याला कितीही दान मिळाले तरी तो ब्राह्मण कधीही समाधानी होणार नाही. कलियुगात गायीला घाण खाण्याचा शाप देण्यात आला होता आणि नारदांना आयुष्यभर अविवाहित राहण्याचा शाप देण्यात आला होता. सावित्रीच्या क्रोधापासून अग्निदेवही वाचू शकले नाहीत. कलियुगात त्याला अपमानित होण्याचा शापही मिळाला.
सर्वांनी सावित्रीला हा शाप परत घेण्याची विनंती केली. पण तीने तो घेतला नाही. जेव्हा तीचा राग शांत झाला तेव्हा सावित्री म्हणाली की या पृथ्वीवर तुमची पूजा फक्त पुष्करमध्येच होईल. जर दुसऱ्या कोणी तुमचे मंदिर बांधले तर ते मंदिर नष्ट होईल. या कामात विष्णूजींनीही ब्रह्माजींना मदत केली. यामुळे देवी सरस्वतीने भगवान विष्णूंना शाप दिला की त्यांना त्यांच्या पत्नीपासून वियोगाचे दुःख सहन करावे लागेल. या कारणास्तव, भगवान विष्णूने श्रीरामाचा अवतार घेतला आणि १४ वर्षांच्या वनवासात त्यांना त्यांच्या पत्नीपासून दूर राहावे लागले.
जगपिता ब्रह्मा मंदिर
 पुष्कर मंदिराची स्थापत्यकला
अरवली पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले पुष्कर अजमेर शहरापासून १५ किमी अंतरावर आहे. पुष्कर मंदिर हे संपूर्ण भारतातील ब्रह्माजींचे सर्वात महत्चाचे मंदिर आहे. ब्रह्माजींचे हे मंदिर २००० वर्षे जुने असल्याचे मानले जाते. अशीही एक मान्यता आहे की मंदिराजवळील पुष्कर तलाव भगवान ब्रह्मदेवाने बांधला होता ज्यामध्ये सध्या लोक स्नान करतात. हे मंदिर पवित्र पुष्कर तलावाच्या काठावर वसलेले आहे आणि दरवर्षी येथे उत्साही आणि पवित्र पुष्कर उंट मेळा भरतो.प्राचीन ग्रंथांमध्ये, पुष्कर सरोवराला "तीर्थ-राज" असे संबोधले जाते, ज्याचा अर्थ पवित्र जलस्रोतांचा राजा असा होतो. त्याच्या सभोवताली यात्रेकरूंसाठी ५२ स्नानघाट आहेत. असे म्हटले जाते की पुष्कर तलाव भगवान ब्रह्मदेवाच्या कमळाच्या पाकळीपासून तयार झाला होता,
 मंदिराची रचना पौराणिक ऋषी विश्वामित्र यांनी निर्माण केली असे मानले जाते. आदि शंकराचार्य यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि रतलामचे महाराजा जावत राज यांनी सध्याच्या रचनेत सुधारणा केली. ब्रह्मा मंदिराचे 'गर्भगृह' संगमरवरी दगडापासून बनलेले -१४ व्या शतकातील आहे.मंदिरात लाल रंगाचा शिखर आहे ज्यावर हंसाचे आकर्षक रूप आहे.

  मंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती संगमरवरी आहे. इथे चार मस्तके असलेली (चार वेदांचे प्रतीक) मुर्ती आहे, जो पायांनी बसलेला आहे. या मूर्तीमध्ये त्याची पत्नी गायत्री, (सरस्वती नाही) वेदांची देवी देखील आहे.
पुष्करमध्ये ५०० हून अधिक मंदिरे आहेत, ज्यात ८० मोठी मंदिरे आणि इतर असंख्य मंदिरे आहेत (मुघल सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीत नष्ट झालेल्या मंदिरांपासून पुनर्बांधणी केलेली).
ब्रह्मा मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्यातील महिने, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि पर्यटनासाठी आदर्श असते. हा काळ पुष्कर उंट मेळ्याशी देखील जुळतो -पुष्कर येथील ब्रह्मा मंदिरात कार्तिक पौर्णिमेला एक भव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात भाविकांचा मोठा सहभाग असतो आणि दरवर्षी जगभरातून हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात.
ब्रह्मा मंदिर, पुष्कर येथील दर्शन वेळा
दर्शन प्रकार सकाळी                                                        संध्याकाळी
सामान्य दर्शन सकाळी ५.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत दुपारी ३.०० वा ते रात्री ९.०० वाजेपर्यंत
मंगल आरती सूर्योदयाच्या आधी पहाटे ५.३० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत
संध्या आरती सूर्यास्तानंतर  संध्याकाळी ६.३० वाजता ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत
विशेष पूजा सकाळी ७.०० ते ९.००                            संध्याकाळी ७.०० ते ८.००





todkaronkar.blogspot.com

सूर्य-हरिहर-पितामह: सृष्टीच्या उत्पतीचे मुळ असणारी चारही तत्वे एकाच मूर्तीत

OK_GRAPHY

हरि म्हणजे विष्णु, हर म्हणजे महादेव तर पितामह म्हणजे ब्रम्हा. आधी सांगितलेल्या तीन देवता व सूर्य या चारही देवता एकाच मूर्तीत दिसतात.
सूर्य, ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे चारही देव प्रसिद्ध असून ते इतर देवतांद्वारा पूजनीय आहेत. सृष्टीची उत्पत्ती आणि तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ही चारही तत्वे या एकाच मूर्तीत पाहायला मिळतात.


सूर्य हरिहर पितामह


देवतमुर्तीप्रकरण मध्ये आलेला एक श्लोक पाहून या मूर्तीची कल्पना आपण करू शकतो.

चतुर्वक्त्रमष्टबाहुं चतुष्कैकनिवासिनम्

ऋद्धा मुखगतः कार्यः पद्महस्तो दिवाकरः ॥

खट्वाङ्ग त्रिशूलहस्तो रुद्रो दक्षिणतः शुभ: ।

कमण्डलुश्चाक्षसूत्रमपरस्थः पितामहः ॥

शङ्खचक्रधरो हरिर्वामे चैव तु संस्थितः ।

एवं विधोऽयं कर्त्तव्यः सर्वकामफलप्रदः ॥

वरील श्लोकाप्रमाणे ही मूर्ती एकच आसन आणि एकच शरीर धारण करणारी दाखवावी. ही मूर्ती आठ हातांची तर चार मुखांची असावी. हातात कमळ घेऊन समोर मुख असणारा सुर्य तर उजवीकडे खट्वांग आणि त्रिशूल धारण केलेला शिव असावा. पाठीमागे चेहरा असलेला व हातात कमंडलू आणि अक्षमाला घेतलेला ब्रम्हा दाखवावा.
डावीकडे शंख आणि चक्र घेऊन विष्णु असतो. अशा तऱ्हेने बनविलेली मूर्ती सर्व मनोकामना पूर्ण करणारी असते.
असाच काहीसा उल्लेख अपराजितपृच्छा मध्ये मिळतो. पण इथे या मूर्तीला हरिहर हिरण्यगर्भ असे म्हटले आहे.

हरो हिरण्यगर्भश्च हरिर्दिनकरोऽपि च ।

एते देवाः समाख्याता देवनामपि पूजिताः ॥

पृथक्त्वेन च कर्तव्या एकरूपसमन्विताः।

अष्टबाहुचतुर्वक्त्रः कुण्डली मुकुटोज्ज्वलः ॥

हारकेयूरसंयुक्तो रत्नमालोपशोभितः ।

ऋष्यागतपुरः कार्य: पद्महस्तो दिवाकरः ॥

शङ्खचक्रधरो देवो वामे च मधुसूदनः ।

कण्ठाभरणसंयुक्तो मूर्धा च मुकुटोज्ज्वलः ॥

ब्रह्मा पश्चिमतः कार्यों बृहज्जठरमण्डलः ।

कुण्डिकामक्षसूत्रं च दधत् कूर्चविभूषितः ॥

या मूर्तीला ब्रह्मेशानजनार्दनार्क हे नाव रुपावतार मध्ये दिलेले आहे पण इतर लांच्छन आणि क्रम वरीलप्रमाणेच आहे.

सदरची मूर्ती गुजरात राज्यातील, चंपानेर जवळ असणाऱ्या लकुलिश शिव मंदिरातील आहे. आमचे परममित्र तुषार कोडोलीकर यांनी हे छायाचित्र काढले आहे. ही मूर्ती तंतोतंत वरील उल्लेखाप्रमाणे नाही म्हणजेच हातातील वस्तू थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जिथं ब्रम्हाच्या हातात कमंडलू सांगितला आहे तिथे या मूर्तीत पुस्तक आहे. कमंडलू आणि पुस्तक दोन्ही ब्रह्माचे लांच्छन असल्याने ओळख पटणे सोपे जाते.

आज जितक्या मोठ्या प्रमाणात महादेव आणि विष्णूची पूजा होते तितक्याच मोठ्या प्रमाणात सूर्याची देखील होत होती.


विभ्राड् बृहत्पिबतु सोम्यं मध्वायुर्दधद्यज्ञपतावविहुतम् |

वातजूतो यो अभिरक्षति त्मना प्रजाः पिपर्ति बहुधा वि राजति ||


शैव आणि वैष्णव यांच्या प्रमाणे पूर्वी सौर संप्रदाय देखील अस्तित्वात होता. दरम्यान फक्त सूर्याची अनेक मंदिर बांधली गेली पण कालच्या ओघात सूर्योपासना कमी झाली आणि शैव, वैष्णव संप्रदाय भरभराटीस आला. सूर्य पंचायतन मध्ये शिव आणि विष्णु यांचा समावेश असतो.
सदरच्या मूर्तीत समोर फक्त सूर्याचाच चेहरा आहे. सूर्यातच  ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत अशी कल्पना इथे केलेली दिसते.
























abplive.com

छत्तीसगढ़ के इस जिले में भगवान ब्रह्मा का इकलौता प्राचीन मंदिर, साल में एक बार लगता है भव्य मेला

अशोक नायडू, बस्तर

छत्तीसगढ़ के इस जिले में भगवान ब्रह्मा का इकलौता प्राचीन मंदिर, साल में एक बार लगता है भव्य मेला

बीजापुर के भैरमगढ़ तहसील के मिरतुर ग्राम में मौजूद इस मंदिर को आदिकाल में राजा महाराजाओं ने बनाया था. यहां ब्रह्मा, विष्णु, महेश की प्राचीन मूर्ति स्थापित है. सैकड़ों की संख्या में श्रद्धालु पूजा करने आते हैं.

छत्तीसगढ़ (Chhattisgarh) के बस्तर को देवताओं का धाम कहा जाता है. बस्तर के रहवासी देवी  उपासना के साथ सदियों से भगवान विष्णु महेश और ब्रह्मा की पूजा करते आ रहे हैं. वहीं जगत पिता ब्रह्मा भगवान के भी बस्तर (Bastar) के आदिवासी आदिकाल से पूजा करते आ रहे हैं और यही वजह है कि छत्तीसगढ़ राज्य में एकमात्र ब्रह्मा जी का मंदिर बीजापुर (Bijapur) जिले के मिरतुर नामक गांव में मौजूद है. यहां हर साल मेला लगता है, जहां तेलंगाना, उड़ीसा, आंध्र प्रदेश और छत्तीसगढ़ के कोने-कोने से ब्रह्मदेव की पूजा करने श्रद्धालु पहुंचते हैं.

10वीं-11वीं सदी में बना होगा
दरअसल धराशाई हो चुके मंदिर के अवशेष और मूर्तियों की खोज कुछ साल पहले यहां के तहसीलदार ने की थी. यहां ब्रह्मा, विष्णु, महेश की प्राचीन मूर्ति स्थापित है और सैकड़ों की संख्या में श्रद्धालु पूजा पाठ करने आते हैं. ब्रह्मा जी की मूर्ति के साथ विष्णु महेश और गणेश, सूर्य देव की मूर्तियां दक्षिण भारतीय शैली में बनाई गई हैं. इस मंदिर को देखने पर ऐसा लगता है कि मंदिर तत्कालीन छिंदक नागवंशी राजाओं द्वारा 10वीं या 11वीं सदी में बनाया गया होगा.


छत्तीसगढ़ के इस जिले में भगवान ब्रह्मा का इकलौता प्राचीन मंदिर, साल में एक बार लगता है भव्य मेला

Ambikapur News: सरगुजा के वैज्ञानिक प्रशांत शर्मा की मेहनत रंग लाई, तालाब के गंदे पानी को बनाया पीने योग्य

देखरेख के अभाव में धराशाई
बीजापुर जिले के भैरमगढ़ तहसील के मिरतुर नामक ग्राम में मौजूद इस मंदिर को आदिकाल में राजा महाराजाओं ने बनाया था, लेकिन यह मंदिर देख रेख के अभाव में धराशाई हो चुका था. भैरमगढ़ के तहसीलदार रहे विजय शर्मा ने इस धराशाई हो चुके मंदिर के अवशेष और मूर्तियों की खोज की और ग्राम वासियों के सहयोग से बिखरी पड़ी ब्रह्मा, विष्णु, महेश और सूर्य देव की मूर्तियों को विशाल बरगद के पेड़ के नीचे चबूतरा बनाकर स्थापित किया.

साल में एकबार लगता है मेला
ग्राम वासियों ने बताया कि साल में एक बार यहां मेला लगता है और सैकड़ों की संख्या में श्रद्धालु चारों राज्यों से भगवान ब्रह्मा के दर्शन के लिए आते हैं. हेमंत कश्यप ने बताया कि राज्य और केंद्र के पुरातत्व विभाग को इस जगह का संरक्षण और संवर्धन का दायित्व लेना चाहिए  क्योंकि भारत  में राजस्थान राज्य के पुष्कर को छोड़कर ब्रह्मा जी का मंदिर कहीं भी नहीं है और यह गौरव की बात है कि छत्तीसगढ़ के बस्तर में मिरतुर ग्राम में ब्रह्मा जी का यह सदियों पुराना मंदिर है.

संरक्षित करने की जरूरत
लोगों का यह भी कहना है कि इसे संरक्षित कर प्रचार प्रसार करना चाहिए और मूलभूत सुविधाओं को विकसित करना चाहिए जिससे पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा. पर्यटकों के आने से क्षेत्र के लोग भी व्यापार कर सकेंगे. कालांतर में देखरेख के अभाव में धराशाई हुए इस मंदिर और वैभवशाली मूर्तियों को पुरातत्व विभाग द्वारा संरक्षित किए जाने की आवश्यकता है. ब्रह्मदेव के मंदिर से पर्यटक विश्व प्रसिद्ध ढोलकाल शिखर में स्थापित गणेश जी सहित बैलाडीला की पर्वत श्रृंखलाओं का सौंदर्य भी निहार सकते हैं.

मंत्री ने क्या कहा
इधर हाल ही में बस्तर दौरे पर पहुंचे केंद्रीय राज्य संस्कृति मंत्री अर्जुन राम मेघवाल ने कहा कि बस्तर के अधिकारियों से मीटिंग के दौरान उन्हें ब्रह्मा जी के मंदिर की जानकारी मिली है जिसे संरक्षित करने के लिए और इस मंदिर को ब्रह्मा जी का भव्य मंदिर बनाने के लिए पुरातत्व विभाग के अधिकारियों से बात की जाएगी.




itsgoa-com.translate.goog

The Great Brahma Temple That's Been Revered Since The 12th Century

Renata Fernandes

राजस्थान के पुष्कर में भगवान ब्रह्मा को समर्पित मंदिर में साल भर में सैकड़ों, यदि हजारों नहीं, आते हैं।

दुनिया भर में कुछ से भी कम मंदिर पूरी तरह से वर्तमान हिंदू सृष्टि के देवता को समर्पित हैं , जिसके परिणामस्वरूप पुष्कर में इस स्थान के प्रति आकर्षण पैदा होता है।

लेकिन केवल कुछ भक्तों, या शायद आकस्मिक रूप से जिज्ञासु लोगों को यह याद रखना चाहिए कि यदि वे पुष्कर से भारत के पश्चिमी क्षेत्र में एक सीधी रेखा में चलते हैं, तो वे गोवा में एक और ब्रह्मा मंदिर के स्थान पर पहुँचेंगे।

गोवा-में-ब्रह्मा-मंदिर-कहाँ-है
छवि क्रेडिट – इयरहोटल्स

उत्तरी गोवा में सत्तारी तालुका के अंदरूनी हिस्से में, नागरगाओ गांव के पास, प्रकृति की आवाज़ों में डूबा हुआ, श्री ब्रह्मदेव का घर, ब्रह्मा-करमाली के गांव में स्थित है।

गर्भगृह के अंदर एक तीखे चेहरे वाले दाढ़ी वाले व्यक्ति की मूर्ति है, जिसे कदंब युग की कला के विशिष्ट विवरणों से सजाया गया है। किंवदंती है कि हिंदू पवित्र त्रिमूर्ति के निर्माता ब्रह्मा का राजस्थान के पुष्कर में केवल एक मंदिर था।

हालाँकि, बहुत कम लोगों को पता है कि एक और ब्रह्मा मंदिर है, यह गोवा के वालपोई में नागरगाओ के एक सुदूर गांव में छिपा हुआ है।

"इस मंदिर में ब्रह्मा की मूर्ति ऊंची और स्टाइलिश है। भगवान ब्रह्मा की मूर्ति उन सभी को आशीर्वाद देती है जो उनसे मिलने आते हैं। ब्रह्मा की खूबसूरती से गढ़ी गई मूर्ति कदंब काल की है और 12 वीं शताब्दी की है।

ब्रह्मा-मंदिर-तथ्य
छवि क्रेडिट – ट्रांसइंडियाट्रैवल

इस मंदिर और ब्रह्मा की मूर्ति का महत्व इस अकाट्य तथ्य में निहित है कि यह कदंब काल के दौरान काले पत्थर से तराशी गई पहली मूर्ति है।

मंदिर के अंदर भगवान ब्रह्मा की मूर्ति बीच में खड़ी है और दाढ़ी पहने हुए है। ब्रह्मा को त्रिमूर्ति रूप में दिखाया गया है जो ब्रह्मा - विष्णु - महेश की त्रिमूर्ति है।

गोवा के इतिहासकारों के अनुसार, यह 16 वीं शताब्दी की बात है जब पुर्तगालियों ने तिस्वाड़ी द्वीप पर कब्जा कर लिया था और मंदिर के नष्ट होने का भय था।

इसलिए 1541 में ब्रह्मा के भक्तों ने पुराने गोवा के करमाली गांव से देवता की मूर्ति की तस्करी की और गुप्त तरीके से उसे सत्तारी तालुका ले गए, जो उस समय पुर्तगाली शासन के अधीन नहीं था।

सत्तारी तालुका 1781 के अंत तक पुर्तगाली शासन के अधीन आ गया। उसके बाद भक्तगण मूर्ति को वालपोई गांव ले गए और वहां से नागरगांव के घने जंगल वाले इलाके में ले गए और एक नदी के किनारे एक छोटे से मंदिर

में मूर्ति स्थापित कर दी । बाद में इस छोटे से गांव को भगवान ब्रह्मा के नाम से जाना जाने लगा और इसलिए इसका मूल गांव करमाली (तिस्वाड़ी तालुका में) पड़ा और इसलिए इसका नाम ब्रह्मा करमाली पड़ा।


amritvichar.com

यहां मौजूद है 3260 मीटर ऊंची चोटी पर भारत का दूसरा ब्रह्मा मंदिर

By Amrit Vichar

यहां मौजूद है 3260 मीटर ऊंची चोटी पर भारत का दूसरा ब्रह्मा मंदिर

नैनीताल, अमृत विचार। नैनीताल जनपद के पंगोट विनायक कुंजाखड़क मार्ग पर ब्रह्मदेव का मंदिर है। राजस्थान पुष्कर के बाद यह ब्रह्मा का दूसरा मंदिर है जहां लोग पूजा के लिए आते हैं। हालांकि इस मंदिर के विषय में कम लोगों को ही जानकारी है। 3260 मीटर ऊंची चोटी पर स्थित ब्रह्मा स्थली में 13वीं शताब्दी …

नैनीताल, अमृत विचार। नैनीताल जनपद के पंगोट विनायक कुंजाखड़क मार्ग पर ब्रह्मदेव का मंदिर है। राजस्थान पुष्कर के बाद यह ब्रह्मा का दूसरा मंदिर है जहां लोग पूजा के लिए आते हैं। हालांकि इस मंदिर के विषय में कम लोगों को ही जानकारी है। 3260 मीटर ऊंची चोटी पर स्थित ब्रह्मा स्थली में 13वीं शताब्दी में गर्ग ऋषि द्वारा तपस्या की गई थी, और उनके द्वारा इसी स्थान पर भगवान ब्रह्मा का मंदिर भी स्थापित किया गया।

नैनीताल में मौजूद ब्रह्मा जी का मंदिर

मंदिर के बाबा माधव मुनि ने बताया कि यह भारत में पुष्कर राजस्थान के बाद दूसरा भगवान ब्रह्मा का मंदिर है। जिसकी स्थापना 13वीं शताब्दी में की गई थी। बताया कि जब गांवों में ग्रामीणों की गाय भैंस गर्भवती नहीं हो पाती थी तो यहां पर मन्नत मांगने से गाय भैंस गर्भवती हो जाती है और बाद में उनका दूध यहां पर बने कुंड में चढ़ाया जाता है।

बाबा ने बताया कि मंदिर निर्माण के लिए जब इस तपोवनी में खुदाई की गई थी तो उस दौरान धरती से चांदी का छत्र,सिक्के व कई प्राचीनकाल के अद्भुत पत्थर निकले थे।

जिला मुख्यालय नैनीताल से पंगोट मार्ग होते हुए
विनायक कुंजाखड़क मार्ग के बीच से करीब तीन किमी की खड़ी चढ़ाई चढ़ कर ब्रह्मा स्थली तक पहुँचा जाता है, काफी संख्या में ट्रैकर और श्रद्धालु भी यहां हर रोज पहुँचते है।

ब्रह्म स्थली का चमत्कार यही है कि तीन किमी खड़ी चढ़ाई के बाद तपोवनी में पहुँचते ही सारी थकान अपने आप गयाब हो जाती है। हालांकि व्यापक प्रचार प्रसार नहीं होने के चलते इस पवित्र स्थान की जानकारी स्थानीय लोगों के सिवा काफी कम लोगों को ही है। लेकिन अब ट्रैकर काफी संख्या में यहाँ पहुँचने लगे हैं।



हनुमानाची पत्नी

 

http://mr.upakram.org/node/1996

मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय? तेव्हा मी त्याला सांगितलं की "हो, गणपतीच्या दोन बायका आहेत असे मानतात. 'ऋद्धी' आणि 'सिद्धी 'ही त्यांची नावे आहेत. "

इथवर सगळं ठीक आहे. पण पुढचा प्रश्न त्याने विचारलं की हनुमानाच्या बायकोचे नाव काय??!! या प्रश्नाने मला आश्चर्याचा धक्का बसला की एखादा हिंदू माणूस असा प्रश्न कसा विचारू शकतो. मी त्याला अगदी ठामपणे सांगितलं हनुमान हा बालब्रह्मचारी आहे. त्याचा विवाह झालेला नाही. बऱ्याचशा हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई असते हे देखील आणखी पाठिंबा म्हणून सांगितलं. हा प्रश्न जरा खटकलाच होता मला...
(मकरध्वज हा जरी त्याचा मुलगा असला तरी हनुमानाचा मकरध्वजाच्या आईसोबत विवाह झालेला नव्हता किंवा आणखी काहीही संबंध नव्हता; ती कथा वेगळी आहे. )

आज मात्र त्या सहकाऱ्याने मला हनुमानाचे लग्न झाले होते हे त्याच्या पत्नीच्या नावासकट सांगितले!! 'सुवरचला' असे तिचे नाव आहे. संदर्भासाठी त्याने ३-४ दुवे सुद्धा दिलेत. त्या दुव्यांवरून असे वाटते की दक्षिण भारतात हनुमान-सुवरचला यांना पती-पत्नी मानतात. (हनुमानाचे 'पंचमुखी' रूप सुद्धा त्यात आहे. )

हा म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या धार्मिक विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. मी आजवर हेच मानत होते की हनुमान 'बालब्रह्मचारी' आहे.

आता माझा प्रश्न असा आहे की माझा विश्वास चुकीचा होता की दाक्षिणात्य धार्मिक कथा, विश्वास वेगळे आहेत?
जाणकारांनी आपले मत मांडावे.

ते संदर्भ दुवे येथे देत आहे:
http://panchamukhi.com/tn_31.aspx
http://www.jayahanuman.org/jayahanuman/history.htm
http://www.telugubloggers.com/2007/01/08/this-one-is-a-photo-of-suvarcha...
http://kuttipriya.blogspot.com/2006/07/did-hanuman-ever-get-married.html

COMMENTS

आणखी काही सुवर्चला

सुवर्चला(१): देवल ऋषीची कन्या. ही ब्रह्मचारिणी होती. पित्याने रचलेल्या स्वयंवरात हिने (वैवाहिक नीतिनियम पहिल्याप्रथम बनवणार्‍या)श्वेतकेतूला पसंत केले. त्या स्वयंवराच्या वेळी हिने श्वेतकेतूशी जी चर्चा केली ती 'श्वेतकेतु-सुवर्चला संवाद' या नावाने महाभारतातील शांतिपर्वात आली आहे.
सुवर्चला(२)(३): भागवतात दिल्याप्रमाणे परमेष्ठिन्‌ राजाची पत्‍नी आणि प्रतीहाची आई. प्रतीहाच्या बायकोचे नावही सुवर्चला होते. या दुसर्‍या सुवर्चलेला तीन मुलगे होते.
सुवर्चला(४): महाभारत(अनुशासनपर्व) आणि विष्णुपुराणानुसार सूर्याची पत्‍नी.
या चौघींपैकी कुणीही हनुमानाशी लग्न केलेले दिसत नाही. त्यामुळे दक्षिणी भारतात जिला मारुतीची पत्‍नी म्हणतात तो मारुती कदाचित वेगळा असावा.
दक्षिणेला कार्तिकेयाच्या देवळात स्त्रियांना प्रवेश असतो, महाराष्ट्रात स्त्रिया त्याचे दर्शन घेत नाहीत्त. अशीच काहीतरी वेगळी गोष्ट हनुमानपत्‍नीसंबंधी असावी. -वाचक्‍नवी

दाक्षिणात्य कन्‍नडिगा?

कानडी म्हणा, कन्‍नड म्हणा, फारतर कन्‍नडिग म्हणा. पण कन्‍नडिगा? हे, हे जरा जास्तच बेंगळूरुरी वाटते आहे!--वाचक्‍नवी

रामायणाप्रमाणे

रामायणाप्रमाणे हनुमानाचे लग्न झालेले नाही. तो ब्रह्मचारीच आहे. परंतु,

भक्त देवाला आपल्या मनाप्रमाणे रुप देतात. हा खालील फोटो बघा -


गणपती बाप्पा क्रिकेट खेळत असत का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येणे स्वाभाविक आहे. हनुमानाचेही याचप्रकारे झाले असावे. एखाद्या भक्ताला त्याने स्वप्नात येऊन मी तुझ्या गावात वास करणार आहे, लग्न करणार आहे, मुले-बाळे जन्माला घालून संसार करणार आहे असा दृष्टांत दिला की झाली एक कथा तयार आणि एक मंदिरही.

कार्तिकेयाचेही असेच दक्षिणेत लग्न करून दिलेले आहे.

तसे, एखाद्याचे लग्न झाले किंवा नाही झाले त्याने काय मोठा फरक पडतो?

फरक

एखाद्याचे लग्न झाले किंवा नाही झाले त्याने काय मोठा फरक पडतो?

छे छे... हनुमानाचे लग्न झाल्याने विशेष काही फरक पडतोय असं नाही. पण काही लोक मारुतीच्या ब्रह्मचर्यामुळे त्याची उपासना करतात...
ही कथा अगदी वेगळी निघाली; म्हणजे अगदी उलटच! त्यामुळे पटवून घ्यायला जरा वेळ लागतोय.

बाकी तुम्ही चिटकवलेला फोटो फारच गोड आहे. :)

लग्न

कदाचित त्याने दक्षिण भारतात जाऊन गुप्तपणे लग्न केले असेल
चन्द्रशेखर

मुळात तो दाक्षिणात्यच होता..

मारुती मूळचा दक्षिणी भारतातला. रावणवधानंतर अयोध्येला गेला. रामाच्या मृत्यूपर्यंत तिथेच असावा. नंतर महाभारतात त्याने भीमाला आपली शेपटी उचलून दाखवण्याचे आव्हान दिले. पुढे युद्धाच्यावेळी अर्जुनाच्या रथावर बसकण ठोकली. हल्लीहल्ली तो तुलसीदासाला काशीत भेटला होता. त्याला मूल तर समुद्र उल्लंघनाच्या वेळीच झाले होते. मग उगाच गुपचुप लग्‍न करण्यासाठी दक्षिणेला जाण्याची काय गरज? आणि गेलाच असेल तर कधी गेला?--वाचक्‍नवी

चिरंजीव मारुती

मारुती चिरंजीव मानला जातो. आता इतकी हजारो वर्षे (करा गणित रामायणाच्या काळाचे) ब्रह्मचारी राहणे ही कठिण गोष्ट आहे. शेवटी, जेवण करायला, घर सांभाळायला (तत्कालीन बायका नोकरी करत नसत असे मानते.) सुख-दु:खाची सोबती असावी असे कोणत्यातरी काळात त्याला वाटले असणे शक्य आहे.

असो. मारुतीचे लग्न झाले असल्यास ही माझ्यामते आनंदाची गोष्ट आहे. ;-)

वेडिंग ऍनिव्हर्सरी

लग्नाची तिथी समजली असती तर बरे झाले असते. तुळशीच्या लग्नाप्रमाणेच मारुतीच्या लग्‍नाचा वाढदिवसही दरवर्षी आम्ही आनंदाने आणि धूमधडाक्यात साजरा केला असता.--वाचक्‍नवी

सुख-दु:खाची सोबतीण?

अशी चिरंजीवी पत्‍नी कुठून मिळणार? एकूण चिरंजीव सातच, फारतर मार्कण्डेय धरून आठ. आणि त्यांतून सर्व पुरुष. तेव्हा मारुतीसाठी एक सोबतीण असून भागणार नाही. दर ६०-७० वर्षांनी दुसरी करावी लागणार. त्यातलीच एक सुवर्चला असणार!--वाचक्‍नवी

देवतांची लग्ने - प्रादेशिक फरक

देवतांची लग्ने - यात प्रादेशिक फरक आहेत.

शिवाचा आणखी एक पुत्र षडानन - याचा वैवाहिक स्थितीबाबत वेगवेगळ्या प्रादेशिक कथा आहेत, असे वाटते.

देवतांच्या नातेसंबंधाच्या कथा पौराणिक आहेत, आणि वेगवेगळ्या पुराणांमधील कथा वेगवेगळ्या अहेत. पुराणलेखकांनी एकमेकांशी सुसंगती साधली असेलच असे नाही. आणि एकदा का एक विसंगती आली, पुढच्या कुठल्याही लेखकाला दोहोंशी सुसंगती साधणे अशक्य!

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल. "पुराणकथा वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिल्या" असे समजल्यास विश्वासाला तडा वगैरे जाणार नाही.

महत्वाचे

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल. "पुराणकथा वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या काळात लिहिल्या" असे समजल्यास विश्वासाला तडा वगैरे जाणार नाही.

हे महत्वाचे आहे असे वाटते. सहमत आहे.

----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है"

बरोबर

जोवर "सर्व पुराणे एकसंध सुसंगत तथ्यकथा आहेत" अशी काही कल्पना आहे, तोवर "धार्मिक विश्वासाला धक्का" बसेल.

हे पटलं. कारण माझा आतापर्यंत असाच समज होता की रामायण हे संपूर्ण भारतभर सारखेच असेल. खरं तर आधी असाही समज होता की हिंदु धर्मातील रुढी-परंपरा, देव-देवता, सण-वार सगळीकडे सारखे असावे. त्याबाबतीत तर फरक बघतेच आहे.

मी "धार्मिक विश्वासाला धक्का" असा शब्दप्रयोग केला खरा, पण तो धार्मिक विश्वासाला धक्का असण्यापेक्षा 'हनुमान ब्रह्मचारी आहे' हे मनावर इतकं पक्कं बिंबवलं गेलंय की त्याची पत्नी असणे हे पचायला जरा त्रास झाला.
असो. आता पुराणकथांमधे सुद्धा तफावत असण्याचीही मानसिक तयारी करून घेते.

अवांतरः षडानन म्हणजेच कार्तिकेय असेल तर माझ्या मते महाराष्ट्रात तसेच दक्षिणेतही त्याला ब्रह्मचारी मानतात. पण दक्षिणेबद्दल खात्री नाही...

दाक्षिणात्य षडानन

कार्तिकेय(सहा कृत्तिका त्याच्या माता!) किंवा षडानन हा मूळचा उत्तर भारतीय शंकराचा पुत्र. महाराष्ट्रात असेपर्यंत तो ब्रम्हचारी होता. पण तो जेव्हा दक्षिणेला गेला तेव्हा त्याला मृगेश-मुरुगन-सुब्रह्मण्य-शर्वणभव-षण्‌मातुर-षण्मुख-शक्तिधर-तारकारि-कुमार(कुमारसंभव आठवा!)-सनत्‌कुमार-स्कंद-क्रौंचभेत्ता-क्रौंचदारण ही नावे मिळाली. शिवाय गुह,गांगेय,उमासुत, स्वामिनाथ वगैरे वगैरे सुमारे तीसएक नावे आहेतच. गणपतीला जशी चतुर्थी प्रिय तशी कार्तिकेयाला षष्टी. त्याला दोन दाक्षिणात्य बायका आहेत. वल्ली आणि देवसेना. देवसेना इंद्राची मुलगी, तर वल्ली ऊर्फ़ वल्लिअम्मा ही शेती आणि सुतारकाम करणार्‍या एका वन्य जमातीच्या मुखियाची बेटी.
गणपती ज्याप्रमाणे आग्नेय आशिया, चीन, जपान आणि अफ़गाणिस्तानापर्यंत पोचला तसा हा नाही. इसवी सनाच्या पहिल्या पाच शतकांपर्यंत उत्तरी भारतात सर्वज्ञात असलेला कार्तिकेय, त्यानंतरच्या काळात दक्षिणेत स्थिरावला.--वाचक्‍नवी

एक शंका

पण तो जेव्हा दक्षिणेला गेला तेव्हा त्याला मृगेश-मुरुगन-सुब्रह्मण्य-शर्वणभव-षण्‌मातुर-षण्मुख-शक्तिधर-तारकारि-कुमार(कुमारसंभव आठवा!)-सनत्‌कुमार-स्कंद-क्रौंचभेत्ता-क्रौंचदारण ही नावे मिळाली.

यावरून 'मुरुगन' हे नाव तमिळोद्भव नसून मृगेश-मृगन-मुरुगन असा प्रवास करत गेलेले (अपभ्रष्ट?) संस्कृतोद्भव नाव असावे असे वाटते. हा अंदाज बरोबर आहे काय?

(तमिळनाडूमधील 'आर्य' मूळ असल्याचे समजल्या गेलेल्या समाजांत 'षण्मुगन' हे नाव प्रचलित आहे, तर 'द्रविड' - पक्षी: 'अनार्य' - मूळ असल्याचे समजल्या गेलेल्या समाजांत त्याऐवजी 'मुरुगन' हे नाव प्रचलित आहे, या ऐकीव माहितीची या बाबीशी सांगड घालण्याचा प्रयत्न करीत आहे.)


"You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time." -Abraham Lincoln?????
"Fool me once, shame on you. Fool me twice, shame on me!" - An English Proverb.

मुरुगन

यावरून 'मुरुगन' हे नाव तमिळोद्भव नसून मृगेश-मृगन-मुरुगन असा प्रवास करत गेलेले (अपभ्रष्ट?) संस्कृतोद्भव नाव असावे असे वाटते. हा अंदाज बरोबर आहे काय?

रा. पर्स्पेक्टिव यांचा वरील अंदाज चुकीचा आहे. कार्तिकेय या देवाचा मुरुक्कु हा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले आणि पुढे मुरुगन असा त्याचा अपभ्रंश झाला.

उदा. लक्ष्मीचे नाव जसे हरिप्रिया पडले तसेच हेही.

मुरुक्कुः


अवांतरः महाराष्ट्रातील कार्तिकेयापेक्षा खंडोबा हा दाक्षिणात्य कार्तिकेयाला जास्त जवळचा आहे असे श्री. ढेरे यांचे मत आहे. कार्तिकेय = स्कंद. त्यावरुन स्कंदोबा-खंडोबा असा संबंध.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुरवणी

त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले

खरे म्हणजे मुरुक्कु हा कार्तिकेयाचा अतिशय आवडता पदार्थ असला तरी मुरुक्कुच्या मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने 'मुरुक्कु नको' असे म्हणावयास सुरुवात केली. (तमिळ आणि मराठी संस्कृतीचा संबंध तेव्हापासून). मात्र हे पाहून इतर देवांनी त्याला 'मुरुक्कु नको' 'मुरुक्कु नको' असे चिडवण्यास सुरुवात केली आणि यथावकाश 'को'चा लोप होऊन मुरुक्कुनको ऐवजी मुरुक्कुन असे नाव पडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुरुक्कु!!??

कार्तिकेय या देवाचा मुरुक्कु हा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे त्या देवाचे मुरुक्कुन असे नाव पडले आणि पुढे मुरुगन असा त्याचा अपभ्रंश झाला.

अं!!!! हे खरंच असं आहे की तुम्ही विनोद केलाय??

अवांतरः मुरुक्कु (गोल न केलेली चकलीच) मला पण आवडते :)

मोदक/मुरुक्कु

गणपतीला मोदक आवडतात मग मला मुरुक्कु का आवडू नये असा प्रश्न कार्तिकेयाने पार्वतीला केला होता असे नंदीचे मत आहे.

(ऐकीव माहिती)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गनपावडर

आपला अंदाज बहुधा बरोबर असावा. ही व्युत्पत्तीसुद्धा ऐकलेली होती, परंतु विस्मरणात गेलेली होती.

त्यापुढे जाऊन मुरुक्कु आवडणारा तो मुरुक्कुन, मुरुक्कुनचा अपभ्रंश मुरुगन आणि मुरुगनला आवडते ती पूड म्हणजे गनपावडर या व्युत्पत्तीबद्दलही कल्पना आहे.

अभिनंदन! :)

हा म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या धार्मिक विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. मी आजवर हेच मानत होते की हनुमान 'बालब्रह्मचारी' आहे.

अच्छा, म्हणजे आमच्या मारोतरायाचं लगीन झालं आहे तर! चांगलंच आहे की मग! :)

मला तर बॉ ही बातमी वाचून आनंद वाटला. मी हनुमानाचे मनोमन अभिनंदन करतो!

बजरंगबली की जय!

आपला,
(हनुमानभक्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बालब्रम्हचारी

बालब्रम्हचारी म्हणजे काय हो? बालपणी ब्रम्हचारी का बालपणापासून ब्रम्हचारी

अर्थ काहीही असला तरी बालपणी सगळेच ब्रम्हचारी असतात तेँव्हा ते परत सांगण्याची काय आवश्यकता?

चन्द्रशेखर

बाल म्हणजे मिनी

बालब्रह्मचारी म्हणजे बहुतेक छोटा ब्रह्मचारी असावा. मारुतीचे वय वाढत नसेल तर तो सदैव बालच राहणार.
अवांतर: वसंतराव गाडगिळांना मिनि शंकराचार्य म्हणतात.--वाचक्‍नवी

बालब्रह्मचारी

बालब्रह्मचारी म्हणजे नक्की काय हा प्रश्न मलासुद्धा होता.
काही लोकांना विचारले असता सगळ्यांनी सांगितलेला अर्थ जवळपास सारखाच होता.
'बालब्रह्मचारी = बालपणी जसे ब्रह्मचर्याचे पालन केले जाते त्याच भावनेने आयुष्यभर वागणारा.' म्हणजे बालपणात ज्याप्रकारे विषयांबद्दल अनास्था असते तशीच पुढे तारुण्यात(आणि आयुष्यभर)देखील असणे.
उदा. जसे एखादे बालक कोणत्याही स्त्रीला 'माता-भगिनी' या दृष्टीने बघते, तशीच दृष्टी आयुष्यभर ठेवणे/असणे.

अर्थात ही ऐकीव माहिती आहे. खरा अर्थ वेगळा असू शकतो. किंवा 'बालब्रह्मचारी' हे 'पिवळा पितांबर' सारखे रूप असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बालक्रीडा

ही व्युत्पत्ती आत्तापर्यंत माहीत असलेल्या आणि सुचलेल्या सर्व व्युत्पत्त्यांमध्ये सरस आहे. बालबुद्धी म्हणजे जर बाळ शोभेल अशी बुद्धी (असलेला माणूस), तर बालब्रह्मचारी म्हणजे लहान मूल शोभेल असा ब्रह्मचारी, असा अर्थ का असू नये?
पिवळा पितांबर सारखी इथे शब्दाची द्विरुक्ती झालेली दिसत नाही.--वाचक्‍नवी

मारुति ..... चांग भलं

मला हि गोष्ट पतलि ...

हनुमानने लग्न केला ह्याबद्दल् मला जास्त् वाद् घालायचा नाहि ... पन् लहाणापासुन् माज्या मनात् हा प्रश्ना होताच् ... कि सप्तर्शि -- सगळे लग्न का नाहि केले ...
हनुमान् सोडुन् बाकि सगलळ्याच्या बायका अस्लेले माहित् आहे .. मग् हनुमानासोबत् हा अन्याय् का?

मला वाटत् , हनुमान् जेव्हा सुग्रिवासोबत् होता( ह्यात् सुग्रिव् बाइलवेडा अस्लेला सगळ्याना माहित् असेल् अशि कल्प्ना करतो) तेव्हा अस कहि तरि झालं अस्न्याचि शक्यता वाट्ते.

विनय आगसे.
हैद्राबाद्. आंन्ध्रप्रदेश. भारत

हं

सध्या जुने धागे उकरून् काढून वाचतो आहे. कालच एका वेगळ्या संदर्भात सुवर्चला हे नांव् वाचण्यात आले होते, अन् ती सूर्यकन्या आहे इतके समजले. या नावाचा जालावर शोध घेता ती मारूतीची बायको आहे असे समजले. मग हा असा माहितीचा तुकडा उपक्रमावर् धागा म्हणून लिहावा असे मनात ठरवून झोपी गेलो. सकाळी हा धागा सापडला. तर,

suvarchala

व्याकरण(!?) हे वेदांङ् शिकायला म्हणून मारुतिराया सूर्यदेवाकडे गेले, तेव्हा हे फक्त गृहस्थाला शिकवता येते, असे म्हणून सूर्यदेवाने नकार दिला. तेंव्हा मारूतीस लग्न करण्यासाठी म्हणून सूर्याच्या तेजातून एक कन्या उत्पन्न केली गेली, ती सुवर्चला.

another

हे असं पराशर संहितेत आहे असे जालावरही दिलेले सापडले. गम्मत म्हणजे ही सुवर्चला स्वतः आजन्म ब्रह्मचारिणी आहे.
लग्न् झाले तरी 'मॅरेज कन्झ्युमेट्' न झाल्याने मारूती ब्रह्मचारीच आहे असेही सापडले.
फोटो जालावरून साभार.

प्रगत भारत

ह्यावरून आजच्या तुलनेत प्राचीन भारत हा अधिक प्रगत समाज होता असे दिसते. आज आन्तरजातीय विवाहाला काहीजण खळखळ करतात. प्राचीन भारतात मात्र वानर आणि माणूस अशाहि विवाहाला मान्यता होती.

तरीच काहीजण म्हणतात की प्राचीन भारतात सर्व काही होते.

खतरनाक!!!

जबरा माहिती. उपक्रमावर फिरत असताना काय हाताला लागेल ते सांगता येत नाही!!






dharmsansar.com

ब्रह्मा


ब्रह्मा

ब्रह्मा हिन्दू धर्म के त्रिदेवों में से एक हैं। ये सृष्टिकर्ता हैं जो पालनहार नारायण एवं संहारक शिव के साथ त्रिमूर्ति को पूर्ण करते हैं। इन्हे हिरण्यगर्भ कहा जाता है क्यूँकि इनकी उत्पत्ति ब्रह्म-अण्ड (ब्रम्हांड) से मानी जाती है। समस्त सृष्टि का सृजन करने के लिए इन्हे परमपिता भी कहा जाता है। हालाँकि ये त्रिदेवों में एक हैं लेकिन आधुनिक युग में इन्हे अन्य दो देवों विष्णु एवं शिव के जितना महत्त्व और सम्मान नहीं दिया जाता जो कि बिलकुल भी सही नहीं है। रही सही कसर आज कल के फालतू धार्मिक टीवी शोज ने पूरी कर दी है।

वास्तविकता ये है कि वेदों एवं पुराणों में ब्रह्मा का महत्त्व विष्णु एवं शिव से किसी भी मामले में कम नहीं है और इन तीनों को एक दुसरे का पूरक और समकक्ष माना जाता है। हालाँकि इनकी उत्पत्ति निर्विवाद रूप से शिव और विष्णु के बाद मानी गयी है लेकिन कहीं कहीं सदाशिव के साकार रूप रूद्र को ब्रह्मा से उत्पन्न माना गया है। ऐसी मान्यता है कि सदाशिव (परब्रह्म अथवा शिव का निराकार रूप) ने विष्णु और ब्रह्मा की उत्पत्ति के बाद स्वयं त्रिदेवों को पूर्ण करने के लिए एवं संहार का उत्तरदायित्व सँभालने के लिए रूद्र के रूप में उत्पन्न हुए।

ब्रह्मा को स्वयंभू माना गया है जिसका अर्थ है स्वयं उत्त्पन्न होने वाला। जब जगत में कुछ नहीं था, केवल अंधकार था तो ब्रम्हाण्ड रुपी अंडे को चीर कर एक अनंत प्रकाश रुपी पाँच सर एवं चार भुजाओं वाले ब्रह्मा का जन्म हुआ जो एक कमल पर विराजमान थे। अपने जन्म से आश्चर्यचकित ब्रह्मा ने अपने उत्पत्ति का कारण जानने के लिए उस कमल-दण्ड को पकड़ कर नीचे आरम्भ किया किन्तु १००० वर्षों तक लगातार चलने के बाद भी वे उसके अंत तक नहीं पहुँच सके। अंततः हार कर वे वापस उसी कमल पर अपने जन्म के कारण पर चिंतन करने लगे। 

तभी उन्हें एक स्वर सुनाई दिया "तपस... तपस..." उस स्वर से प्रभावित हो वे तपस्या में लीन हो गए। इस तपस्या को सृष्टि की पहली तपस्या का सम्मान प्राप्त है और इसे "आदि-तप" भी कहा गया है। अनंत काल तक (कहीं-कहीं १००० वर्षों का वर्णन है) तपस्या करने के पश्चात उन्हें अनंत क्षीरसागर में शेषनाग की शैय्या पर लेटे नारायण के दर्शन हुए।

नारायण ने उनसे कहा कि "हे आदिपुरुष! आपने अनंत तप कर समस्त प्रकार के ज्ञान को प्राप्त किया है। बुद्धि, बल और तेज में आप स्वयं मेरे समान ही हैं। मेरे दर्शन से आपमें सृजन की शक्ति आ गयी है अतः हे देव अब आप अपने मानस शक्ति से इस जगत की रचना करें।" भगवान विष्णु से एक प्रकार की प्रेरणा पाकर ब्रह्मा ने सृष्टि की रचना का संकल्प लिया। अपनी वाक्-शक्ति से उन्होंने सबसे पहले अपने चारो मुख से चार वेदों को उत्पन्न किया और अपने चार हाथों में स्वयं उसे धारण किया। 

उन्होंने इसके बाद कई बार अपने मानस शक्ति से ब्रम्हाण्ड की रचना करने का प्रयास किया किन्तु असफल रहे। ये देख कर उन्होंने एक बार फिर नारायण का ध्यान किया और उनसे सहायता माँगी। ब्रह्मदेव की व्यथा सुन कर भगवान विष्णु ने उन्हें मैथुनी सृष्टि बनाने का सुझाव दिया।

तब उन्होंने अपने प्रथम १६ मानस पुत्रों को उत्पन्न किया जो प्रजापति कहलाये। इनमे से सात प्रथम ऋषि सप्तर्षि कहलाये। इसके अतिरिक्त उन्होंने एक कन्या शतरूपा की भी उत्पत्ति की। ये हैं - 

  1. मुख से अंगिरस
  2. नेत्र से अत्रि
  3. कर्ण से पुलस्त्य
  4. नाभि से पुलह
  5. हाथ से क्रतु
  6. प्राण से वशिष्ठ
  7. मन से मरीचि
  8. अंगूठे से दक्ष
  9. गोद से नारद
  10. छाया से कर्दम
  11. इच्छा से सनक 
  12. इच्छा से सनन्दन 
  13. इच्छा से सनातन 
  14. इच्छा से सनत्कुमार
  15. शरीर के दाहिने भाग से स्वयंभू मनु एवं वाम भाग से शतरूपा 
  16. ध्यान से चित्रगुप्त

सबसे पहले उन्होंने सनत्कुमारों को मैथुनी सृष्टि कर संतान उत्पत्ति करने की आज्ञा दी किन्तु नारद ने सनत्कुमारों को वैराग्य की शिक्षा देकर विरक्त कर दिया। इससे क्रोधित हो ब्रह्मा ने उन्होंने नारद को सदैव भटकते रहने का श्राप दे दिया। 

उन्होंने फिर से सृष्टि के निर्माण आरम्भ किया। वे ये समझ गए कि पुरुष और नारी के संयोग से ही सृष्टि का विस्तार हो सकता है। इसी कारण उन्होंने मनु और शतरूपा को विवाह कर संतानोत्पत्ति करने की आज्ञा दी। इन्ही की मैथुनी सृष्टि से हमारा जन्म हुआ और मनु के नाम पर ही हम मानव कहलाते हैं। इसके अतिरिक्त दक्ष की पुत्रियों और कर्दम ऋषि की संतानों से संसार का अनंत विस्तार हुआ। 

ब्रह्मा पूरे जगत के पिता हैं अतः वे सभी के लिए सम्माननीय हैं। इसी कारण देव-दैत्य सभी अपनी समस्याओं के निदान हेतु उन्ही के पास आते हैं। सावित्री, सरस्वती और वेदमाता गायत्री को ब्रह्मा की पत्नी माना गया है। इनका वाहन हंस है। 

वेदों में कहा गया है कि जो कोई और नहीं दे सकता वो केवल त्रिदेवों से प्राप्त हो सकता है। ब्रह्मा, भगवान विष्णु एवं भगवान शंकर के समान हर प्रकार वरदान देने में सक्षम हैं। यही कारण है कि कई दैत्य भी इनसे अमरता का वरदान पाने को लालायित रहते थे किन्तु उन्होंने कभी किसी को अमरता का वरदान नहीं दिया। ब्रह्मा ही समय-समय पर भगवान विष्णु को पृथ्वी के उद्धार के लिए अवतार लेने के लिया प्रेरित करते हैं।

हालाँकि भगवान विष्णु और भगवान शंकर की तरह ब्रह्मदेव अवतार नहीं लेते किन्तु फिर भी उनके कुछ अवतारों का वर्णन है। श्रीहरि के दशावतार की तरह ही ब्रह्मा के सप्तवतार प्रसिद्ध हैं, जिन्हे ब्रह्मवातार भी कहते हैं। ये हैं -

  1. वाल्मीकि अवतार
  2. कश्यप अवतार
  3. दत्तात्रेय अवतार
  4. लक्ष्मण अवतार
  5. व्यास अवतार
  6. बलराम अवतार
  7. कालिदास अवतार

ब्रह्मा का पाँचवा मस्तक और पूजा अधिकार से बहिष्कार

वैसे तो ब्रह्मा के पाँच सर का वर्णन आता है किन्तु उनका चार सर वाला स्वरुप ही प्रसिद्ध है। इसके अतिरिक्त विष्णु एवं शिव की अपेक्षा उनकी पूजा बहुत कम की जाती है। ना ही वैष्णव अथवा शैव की तरह उनका कोई अपना संप्रदाय है। हालाँकि ब्रह्मा जी की उपासना का भी एक विशिष्ट सम्प्रदाय है, जो वैखानस सम्प्रदाय के नाम से प्रसिद्ध है। इस वैखानस सम्प्रदाय की सभी सम्प्रदायों में मान्यता है। पुराणादि सभी शास्त्रों के ये ही आदि वक्ता माने गये हैं। भारत में उनका एकमात्र मंदिर राजस्थान के पुष्कर में है। इसके पीछे कई कथा का वर्णन आता है।

  • कहा जाता है कि मनु की उत्पत्ति के बाद जब उन्होंने उसकी पत्नी के रूप में शतरूपा की रचना की तो उसकी सुंदरता पर मुग्ध हो गए। शतरूपा उनकी दृष्टि से बचने के इधर-उधर भागने लगी किन्तु वे जहाँ भी जाती ब्रह्मा अपने चारों सिरों से उसे देखते रहते। तब शतरूपा आकाश की ओर चली गयी जिस कारण ब्रह्मा ने आकाश की ओर अपना एक और सर उत्पन्न कर लिया जिस कारण शतरूपा का छिपा रहना असंभव हो गया। जब महादेव ने ब्रह्मा को अपनी पुत्री पर कुदृष्टि डालते देखा तो उन्होंने दण्ड-स्वरुप उनका पाँचवा सर काट दिया।
  • एक और वर्णन के अनुसार ब्रह्मा के पाँच सरों में से चार महादेव की स्तुति करते थे किन्तु एक सर उनकी निंदा करता था जिस कारण महादेव ने वो सर काट दिया। इस कारण ब्रह्मा का पुत्र दक्ष महादेव का घोर विरोधी हो गया और उसके द्वेष के कारण सती को अपने प्राण त्यागने पड़े।
  • एक कथा के अनुसार एक बार ब्रह्मा एवं विष्णु में उनकी महानता को लेकर विवाद हो गया। तभी उनके बीच एक ज्योतिर्लिंग प्रकट हुआ और आकाशवाणी हुई की जो भी इसका छोर ढूढ़ लेगा वो महान कहलायेगा। ब्रह्मा हंस के रूप में ऊपर तथा विष्णु वराह के रूप में नीचे गए किन्तु हजारों वर्षों के बाद भी उन्हें उस शिवलिंग का छोर ना मिला। हारकर विष्णु ने कहा कि मैं छोर धुंध नहीं पाया किन्तु ब्रह्मा ने झूठ कह दिया कि उन्हें ऊपरी छोर मिल गया। उन्हें अपने मुख से असत्य कहते लज्जा आई इसी कारण उन्होंने अपना पाँचवा सर से झूठ बोला। तब महादेव ने असत्य वचन बोलने के कारण उनका वह मस्तक काट दिया और पूजित ना होने का श्राप दिया।
  • एक बार कामदेव ने ब्रह्मा द्वारा दिए काम-बाण उन्ही पर चला दिए जिससे वे अपनी पुत्री सरस्वती पर ही मुग्ध हो गए। तब शिव ने इस कृत्य के लिए उन्हें पूजित ना होने का श्राप दिया। चेतन होने पर ब्रह्मा ने भी कामदेव को महादेव के द्वारा भस्म होने का श्राप दे दिया।
  • एक कथा के अनुसार भगवान शिव और पार्वती के विवाह में ब्रह्मा ही ब्राम्हण रूप में विवाह करवा रहे थे। पार्वती ने अपना मुख घूँघट में ढका हुआ था किन्तु ब्रह्मा उनका मुख देखना चाहते थे। इस कारण उन्होंने हवनकुण्ड में गीली लकड़ी डाल दी जिससे धुआँ हुआ और देवी पार्वती ने अपना घूँघट उठा दिया। ब्रह्मा उनके सौंदर्य को देखते ही रह गए। जब शिव ने ऐसा देखा तो उन्होंने ब्रह्मदेव की पूजा ना होने का श्राप दे दिया।
  • एक बार ब्रह्मा पुष्कर में एक यज्ञ कर रहे थे जिसमे सरस्वती समय पर नहीं पहुँच पायी। बिना पत्नी के यज्ञ पूर्ण नहीं हो सकता था इसीलिए ब्रह्मा ने गायत्री की रचना की और उनसे विवाह किया। जब सरस्वती यज्ञ-स्थल पहुँची और वहाँ गायत्री को बैठे देखा तो क्रोध में उन्होंने ब्रह्मा को श्राप दे दिया कि इस स्थान के अतिरिक्त आपकी पूजा और कही नहीं होगी।
  • एक और कथा के अनुसार एक बार भगवान विष्णु ब्रह्मा के रूप पर आसक्त हो गए और मोहिनी रूप लेकर उनके आये। मोहिनी ने ब्रह्मा की तपस्या भंग कर दी और उससे बचने के लिए ब्रह्मा श्रीहरि को याद करने लगे। तभी वहां सप्तर्षि आये और उन्होंने पूछा कि ये कन्या क्यों यहाँ बैठी है? तब ब्रह्मा ने कहा कि ये नृत्य करते हुए थक गयी है और पुत्री भाव से मेरे पास बैठी है। तब मोहिनी ने क्रुद्ध होकर उन्हें श्राप दिया कि उनकी पूजा कही और नहीं होगी।
  • एक और कथा का वर्णन आता है जब ब्रह्मा के पांचवें सर ने भैरव के सामने महादेव का अपमान कर दिया। तब इससे क्रुद्ध होकर भैरव ने अपनी छोटी अंगुली के नाख़ून से ब्रह्मा का पांचवां सर काट दिया। 

ब्रह्मा की आयु

ब्रह्मा की आयु हिन्दू धर्म के सबसे रोचक तथ्यों में से एक है। यहाँ बस उसका सार दिया जा रहा है:

  • मनुष्यों के ३६० वर्षों का देवों और दैत्यों का १ वर्ष होता है जिसे "दिव्य वर्ष" कहते हैं।
  • १२००० दिव्य वर्षों का १ चतुर्युग होता है जिसे महायुग भी कहते हैं।
    • ४८०० दिव्य वर्षों का सतयुग होता है।
    • ३६०० दिव्य वर्षों का त्रेतायुग होता है।
    • २४०० दिव्य वर्षों का द्वापरयुग होता है।
    • १२०० दिव्य वर्षों का कलियुग होता है।
  • ७१ महायुग का १ मन्वन्तर होता है जिसमें एक मनु शासन करते हैं। 
  • १४ मन्वन्तरों या १००० महायुगों का १ कल्प होता है जो ब्रह्मा का दिन कहलाता है। इसी प्रकार १ कल्प की ब्रह्मा की रात्रि होती है। ब्रह्मा के आधे दिन (१ कल्प) में १४ मनु शासन करते हैं।
  • ७२० कल्पों का ब्रह्मा जी का १ वर्ष होता है जिसे ब्रह्मवर्ष कहते हैं। 
  • ५० ब्रह्मवर्षों का १ परार्ध होता है। 
  • २ परार्ध अथवा ब्रह्मा के १०० वर्ष को महाकल्प कहा जाता है। 
  • ब्रह्मा के १००० दिनों का विष्णु जी की १ घटी होती है। 
  • श्रीहरि के १२००००० घटियों का भगवान शिव की अर्धकला होती है। 
  • महादेव के १००००००००० अर्धकलाओं का एक ब्रह्माक्ष होता है।
  • हम अभी ब्रह्मा के ५१ वें वर्ष में, सातवें (वैवस्वत) मनु के शासन में, श्वेतवाराह कल्प के द्वितीय परार्ध में, अठ्ठाईसवें कलियुग के प्रथम वर्ष के प्रथम दिवस में विक्रम संवत २०७६ में हैं। इस प्रकार अब तक १५५५२१९७१९६१६३२ (पंद्रह नील पचपन खरब इक्कीस अरब सत्तानवे करोड़ उन्नीस लाख इकसठ हजार छः सौ बाइस वर्ष वर्तमान ब्रह्मा को सृजित हुए हो गये हैं।

ब्रह्मा के अस्त्र

ब्रह्मा के तीन सबसे प्रमुख अस्त्र माने जाते हैं:
  1. ब्रह्मास्त्र: ये सर्वाधिक प्रसिद्ध अस्त्र माना जाता है। ये ब्रह्मा के १ मुख का प्रतिनिधित्व करता है। प्राचीन काल में कई योद्धा ऐसे थे जिनके पास ब्रह्मास्त्र था। जिनके पास ब्रह्मास्त्र होता था वे सीधे महारथी की श्रेणी में आ जाते थे। इसका समकक्ष अस्त्र भगवान विष्णु का वैष्णव अस्त्र और भगवान शंकर का रुद्रास्त्र है। ब्रह्मास्त्र को केवल ब्रह्मास्त्र से ही रोका जा सकता था किन्तु जहाँ दो ब्रह्मास्त्र टकराते थे वहां १२ वर्षों तक भयानक दुर्भिक्ष पड़ता था। ऐसा ही एक मौका आया था जब अर्जुन और अश्वत्थामा ने अपने अपने ब्रह्मास्त्र छोड़ दिए थे। महर्षि वेदव्यास और देवर्षि नारद ने उन्हें टकराने से बचाया। इस विषय में विस्तार से यहाँ पढ़ें। 
  2. ब्रह्मशिरा: ये ब्रह्मास्त्र से ४ गुणा अधिक शक्तिशाली अस्त्र था जो ब्रह्मा के ४ मुखों का प्रतिनिधित्व करता था। इतिहास में कुछ चुनिंदा योद्धा ही थे जिनके पास ये अस्त्र था। परशुराम उन्ही में से एक थे। कुछ ग्रंथों में द्रोण, अर्जुन और अश्वत्थामा के पास ब्रह्मशिरा होना बताया गया है किन्तु ये सत्य नहीं है। उनके पास ब्रह्मास्त्र थे, ब्रह्मशिरा नहीं। भगवान विष्णु का नारायणास्त्र और महादेव का पाशुपतास्त्र ब्रह्मशिरा के समक्ष महास्त्र थे। ऐसा वर्णित है कि जिस स्थान पर दो ब्रह्मशिरा अस्त्र टकराते हैं वहां १२ दिव्य वर्षों (४३२० मानव वर्षों) तक वर्षा नहीं होती थी।
  3. ब्रह्माण्ड अस्त्र: ये ब्रह्मास्त्र से ५ गुणा अधिक शक्तिशाली अस्त्र था जो ब्रह्मा के ५ मुखों का प्रतिनिधित्व करता है। इतिहास ने केवल महर्षि वशिष्ठ ही थे जिनके पास ये अस्त्र था। इसी अस्त्र से वसिष्ठ ने विश्वामित्र के ब्रह्मास्त्र को पी लिया था। भगवान विष्णु का विष्णुज्वर एवं महादेव का माहेश्वरज्वर (शिवज्वर) इसके समकक्ष दिव्यास्त्र हैं।

ऐसा माना जाता है कि पूरे विश्व में केवल पुष्कर में ब्रह्मा का मंदिर है किन्तु ये सत्य नहीं है। पुष्कर निश्चित रूप से ब्रह्मा का सर्वाधिक प्रसिद्ध एवं महत्वपूर्ण मंदिर है किन्तु इसके अतिरिक्त भी राजस्थान में ही बारमेर जिले के आसोतरा गांव में ब्रह्मा का एक मंदिर है जिसे खेतेश्वर ब्रह्मधाम तीर्थ कहते हैं। केरला के उथमार कोवली नमक जगह में ब्रह्मा, विष्णु एवं शिव के साथ त्रिमूर्ति रूप में पूजे जाते हैं जिसे थ्रिपया त्रिमूर्ति मंदिर कहते हैं। 

तमिलनाडु के कुंबकोणम गांव में ब्रह्मा का ब्रह्मापुरीईश्वर मंदिर है। आंध्र प्रदेश के श्रीकालाहस्ती नामक स्थान पर ब्रह्ममंदिर है। इसके अतिरिक्त आंध्रप्रदेश के ही चेब्रोलू नमक जगह पर ब्रह्मा का चतुर्मुख मंदिर है। गोवा के करम्बोलिम नामक स्थान पर ब्रह्मा का एक तीर्थ है। महाराष्ट्र के सोलापुर जिले के मंगलवेढा गांव में तथा मुंबई के निकट नाला सुपारा में भी ब्रह्मा की मूर्ति स्थापित है। इसके अतिरिक्त गुजरात के खेड़ब्रह्म, कानपुर में ब्रह्म कुटीर मंदिर, हिमाचल प्रदेश के खोखन, आँध्रप्रदेश के अनंतपुर एवं तमिलनाडु के होसुर में भी ब्रह्मदेव के उल्लेखनीय मंदिर हैं। यही नहीं विदेश में भी ब्रह्मा के मंदिर हैं। 

संसार के सबसे बड़े मंदिर कम्बोडिया के अंगकोरवाट मंदिर में ब्रह्मा की प्रतिमाएं हैं। इंडोनेशिया का प्रम्बानन मंदिर ब्रह्मा के सबसे प्रसिद्ध मंदिरों में से एक है। बैंकाक (थाईलैंड) के इरावन तीर्थ में ब्रह्मा का भव्य मंदिर है। थाईलैंड में ब्रह्मा को "फ्रा-फ्रॉम" के नाम से बुलाया जाता है। म्यानमार जिसका पुराना नाम बर्मा था वो ब्रह्मा के नाम पर ही रखा गया था जिसका प्राचीन नाम ब्रह्मदेश था। यही नहीं चीन के लोक-कथाओं में भी ब्रह्मा का वर्णन आता है जहाँ उन्हें "सिमीएनसेन" कहा जाता है और उनके कई मंदिर हैं।

।। जय ब्रह्मदेव ।।






Pushkar Mandir

हमारे देश में विष्णु जी और शिव जी के कई सारे मंदिर हैं. लेकिन, क्या आप जानते हैं कि ब्रह्मा जी का पूरे भारत में केवल एक ही मंदिर है. ब्रह्मा जी का यह मंदिर राजस्थान के पुष्कर में स्थित है, जिसको ब्रह्मा मंदिर के नाम से जाना जाता है. ब्रह्मा जी को सृष्टि के रचयिता के रूप में जाना जाता है. तो चलिए जानते हैं कि आखिर क्यों पूरे भारत में यह ब्रह्मा जी का एक मात्र मंदिर है और क्या है इसके पीछे की कहानी. 

पुष्कर मंदिर की कहानी

पद्म पुराण के मुताबिक, एक बार धरती पर वज्रनाश नामक राक्षस ने उत्पात मचा रखा था. उसके अत्याचार इतने बढ़ गए थे कि ब्रह्मा जी को तंग आकर उसका वध करना पड़ा. जब वो उसका वध कर रहे थे, तब ब्रह्मा जी के हाथों से धरती की तीन जगहों पर कमल का पुष्प गिरा. जहां-जहां तीन कमल गिरे, वहां पर तीन झीलें बन गईं. उनमें से एक स्थान का नाम पुष्कर पड़ा. फिर संसार की भलाई के लिए ब्रह्मा जी ने यहीं पर यज्ञ करने का फैसला किया.

यज्ञ करने के लिए ब्रह्मा जी पुष्कर पहुंच गए. इस यज्ञ में पत्नी का बैठना जरूरी था, लेकिन सावित्री को पहुंचने में देरी हो गई. पूजा का शुभ मुहूर्त बीतता जा रहा था. सभी देवी-देवता एक-एक करके यज्ञ स्थली पर पहुंचते गए. लेकिन सावित्री का कोई अता-पता नहीं था.

कहते हैं कि जब शुभ मुहूर्त निकलने लगा, तब कोई उपाय न देखकर ब्रह्मा ने नंदिनी गाय के मुख से गायत्री को प्रकट किया और उनसे विवाह कर अपना यज्ञ पूरा किया. उधर सावित्री जब यज्ञस्थली पहुंचीं, तो वहां ब्रह्मा के बगल में गायत्री को बैठे देख क्रोधित हो गईं और उन्होंने ब्रह्मा को श्राप दे दिया. सावित्री का गुस्सा इतने में ही शांत नहीं हुआ. उन्होंने विवाह कराने वाले ब्राह्मण को भी श्राप दिया कि चाहे जितना दान मिले, ब्राह्मण कभी संतुष्ट नहीं होंगे. गाय को कलियुग में गंदगी खाने और नारद को आजीवन कुंवारा रहने का श्राप दिया. अग्निदेव भी सावित्री के कोप से बच नहीं पाए. उन्हें भी कलियुग में अपमानित होने का श्राप मिला.

सभी ने माता सावित्री से विनती की कि वो इस श्राप को वापस ले लें. लेकिन उन्होंने नहीं लिया. जब उनका गुस्सा शांत हुआ तो सावित्री ने कहा कि इस धरती पर सिर्फ पुष्कर में आपकी पूजा होगी. अगर कोई दूसरा व्यक्ति आपका मंदिर बनाएगा तो उस मंदिर का विनाश हो जाएगा. इस कार्य में विष्णु जी ने भी ब्रह्मा जी की मदद की थी. इसी के चलते देवी सरस्वती ने भी विष्णु जी को श्राप दिया कि उन्हें पत्नी से विरह का कष्ट सहन करना पड़ेगा. इसी कारण विष्णु जी ने श्री राम का अवतार लिया और 14 साल के वनवास के दौरान उन्हें पत्नी से अलग रहना पड़ा था.

पुष्कर मंदिर की वास्तुकला

पूरे भारत में पुष्कर मंदिर ब्रह्मा जी का एकमात्र मंदिर है. ब्रह्मा जी का यह मंदिर 2000 साल पुराना माना गया है. ऐसी मान्यता भी है कि मंदिर निकट स्थित पुष्कर झील ब्रह्मा जी द्वारा बनाई गई थी जिसमें लोग स्नान करते हैं.



Pushkar Brahma Temple: A Unique Temple for the Lord of Creation

V Subhadra

जगतपिता ब्रह्मा मंदिर , जिसे आमतौर पर ब्रह्मा मंदिर के नाम से जाना जाता है , राजस्थान के पुष्कर शहर में स्थित एक प्रसिद्ध हिंदू मंदिर है । इसे दुर्लभ माना जाता है क्योंकि यह भगवान ब्रह्मा, हिंदू सृष्टि के देवता को समर्पित बहुत कम मंदिरों में से एक है। अरावली पहाड़ियों की गोद में स्थित पुष्कर अजमेर शहर से 15 किलोमीटर दूर है।

यह मंदिर पवित्र पुष्कर झील के तट पर स्थित है और हर साल होने वाले जीवंत और पवित्र पुष्कर ऊंट मेले की मेज़बानी करता है । माना जाता है कि देवता और मंदिर की संरचना पौराणिक ऋषि विश्वामित्र द्वारा बनाई गई थी। आप सवारी के साथ पुष्कर में कार किराए पर लेकर इस मंदिर में जा सकते हैं और एक सुखद सवारी का आनंद ले सकते हैं। ब्रह्मा मंदिर, पुष्कर में करने के लिए चीजों के बारे में यह गाइड आपको इस पवित्र स्थान की यात्रा की योजना बनाने के लिए सभी आवश्यक जानकारी और विवरण प्रदान करेगी।


विषयसूची

  1. ब्रह्मा मंदिर, पुष्कर के बारे में
  2. ब्रह्मा मंदिर, पुष्कर में करने योग्य गतिविधियाँ
  3. ब्रह्मा मंदिर, पुष्कर में उत्सव
  4. ब्रह्मा मंदिर, पुष्कर के निकट घूमने योग्य स्थान
  5. ब्रह्मा मंदिर, पुष्कर के पास खाने की जगहें
  6. ब्रह्मा मंदिर, पुष्कर की यात्रा की योजना कैसे बनाएं?
  7. ब्रह्मा मंदिर, पुष्कर तक कैसे पहुंचें?
  8. ब्रह्मा मंदिर, पुष्कर में होटल और रिसॉर्ट
  9. ब्रह्मा मंदिर, पुष्कर से ली गई सबसे ऊंची सड़क यात्राएं
  10. उपयोगी कड़ियां

ब्रह्मा मंदिर, पुष्कर के बारे में


जगपिता ब्रह्मा मंदिर, पुष्कर

पुष्कर में ब्रह्मा मंदिर लगभग 2000 साल पुराना माना जाता है। पवित्र पुष्कर झील के साथ, यह “राजस्थान का गुलाब उद्यान” है। यह शहर अपने सर्वोत्कृष्ट राजस्थानी दृश्यों और वाइब्स के लिए जाना जाता है, मंदिरों और बाजारों से लेकर झीलों और विरासत स्थलों तक। 

पुष्कर का ब्रह्मा मंदिर: इतिहास

पुष्कर में 500 से ज़्यादा मंदिर हैं, जिनमें 80 बड़े मंदिर और कई धार्मिक स्थल (मुगल बादशाह औरंगज़ेब के शासन के दौरान नष्ट किए गए मंदिरों से फिर से बनाए गए) शामिल हैं। केंद्रीय ब्रह्मा मंदिर का ' गर्भगृह ' - पत्थर और संगमरमर के स्लैब से बना है - 14वीं सदी का है। माना जाता है कि इस संरचना का निर्माण महान ऋषि विश्वामित्र ने किया था। आदि शंकराचार्य ने इसका जीर्णोद्धार किया और रतलाम के महाराजा जावत राज ने वर्तमान संरचना को संशोधित किया। 

मंदिर में लाल रंग से रंगा हुआ शिखर (या पतला मंदिर का शीर्ष) है जिस पर हंस (हंस) की आकर्षक आकृति बनी हुई है। पुष्कर झील और ब्रह्मा मंदिर दुनिया भर में दस सबसे धार्मिक स्थलों में से एक हैं और हिंदुओं के पाँच पवित्र तीर्थ स्थलों में से एक हैं।

ब्रह्मा मंदिर, पुष्कर के देवता


ब्रह्मा मंदिर देवता

पुष्कर में ब्रह्मा मंदिर भगवान ब्रह्मा को समर्पित है, जो हिंदू पौराणिक कथाओं के अनुसार ब्रह्मांड के निर्माता हैं। ब्रह्मा हिंदू देवताओं में पवित्र त्रिदेवों में से एक हैं - विष्णु, संरक्षक, और शिव, संहारक के साथ। 

मंदिर की ब्रह्मा की मूर्ति संगमरमर से बनी है। इसमें चार सिर वाले देवता (चार वेदों का प्रतीक) को दर्शाया गया है, जो एक पैर पर पैर रखकर बैठे हैं। मूर्ति में उनकी पत्नी गायत्री भी शामिल हैं, जो वेदों की देवी हैं। 

यात्रा पत्रिका: भारत अनमैप्ड

ब्रह्मा मंदिर, पुष्कर की यात्रा के लिए सर्वोत्तम समय

ब्रह्मा मंदिर में जाने का सबसे अच्छा समय नवंबर से फरवरी तक सर्दियों के महीनों के दौरान होता है, जब मौसम सुहावना और दर्शनीय स्थलों की यात्रा के लिए आदर्श होता है। यह अवधि पुष्कर ऊंट मेले के साथ भी मेल खाती है - जो इसे यात्रा के लिए एक रोमांचक समय बनाती है।

पुष्कर की गर्मियाँ बहुत गर्म होती हैं, अक्सर 40 डिग्री सेल्सियस से ज़्यादा; उन्हें हर कीमत पर टाला जाना चाहिए। जुलाई से सितंबर तक मानसून के मौसम में मध्यम बारिश होती है, लेकिन शहर में भीड़ कम रहती है - जो एक शांतिपूर्ण अनुभव प्रदान करता है।

ब्रह्मा मंदिर, पुष्कर के बारे में कम ज्ञात तथ्य

राजस्थान के पुष्कर में ब्रह्मा मंदिर के बारे में कुछ कम ज्ञात तथ्य हैं:

  • ऐसा कहा जाता है कि पुष्कर झील भगवान ब्रह्मा के कमल की एक पंखुड़ी से बनी है, जो इसे मंदिर से अमिट रूप से जोड़ती है।
  • प्राचीन ग्रंथों में पुष्कर झील को “तीर्थ-राज” कहा गया है, जिसका अर्थ है पवित्र जल निकायों का राजा। इसके चारों ओर तीर्थयात्रियों के लिए 52 स्नान घाट हैं।
  • ब्रह्मा मंदिर के गर्भगृह में भगवान ब्रह्मा और उनकी पत्नी देवी गायत्री (सरस्वती नहीं) की छवि है। ब्रह्मा मंदिरों के लिए यह असामान्य बात है।
  • पुष्कर के ब्रह्मा मंदिर में कार्तिक पूर्णिमा पर भव्य उत्सव मनाया जाता है। इस उत्सव में सन्यासियों की बड़ी भागीदारी होती है और हर साल दुनिया भर से हज़ारों श्रद्धालु इसमें शामिल होते हैं।
  • पुष्कर झील और ब्रह्मा मंदिर को विश्व के दस सर्वाधिक धार्मिक स्थलों में से एक तथा पांच पवित्र हिंदू तीर्थ स्थलों में से एक माना जाता है। 

ब्रह्मा मंदिर, पुष्कर में दर्शन का समय

ब्रह्मा मंदिर में दर्शन के समय को जानने से आपको मंदिर के आध्यात्मिक माहौल को इसके सबसे पवित्र क्षणों में अनुभव करने में मदद मिलती है। मंदिर का कार्यक्रम आगंतुकों को आरती, दर्शन आदि में भाग लेने और आशीर्वाद लेने के कई अवसर प्रदान करता है।

दर्शन प्रकार सुबह का समय शाम का समय
सामान्य दर्शन सुबह 5:30 बजे से दोपहर 1:30 बजे तक दोपहर 3:00 बजे से रात 9:00 बजे तक
मंगल आरती सूर्योदय से पहले सुबह 5:30 बजे से सुबह 6:00 बजे तक
संध्या आरती सूर्यास्त के बाद शाम 6:30 बजे से शाम 7:30 बजे तक
विशेष पूजा 7:00 AM–9:00 AM 7:00 PM–8:00 PM

Things to Do in Brahma Temple, Pushkar

पुष्कर झील
Pushkar Lake

There are several things that tourists or devotees can do in Brahma Temple:

  • Attend the Aarti: Devotees can attend the daily aarti (prayer ceremony) at the famous Brahma Temple. It’s a peaceful and spiritual experience with rituals that uplift the mood and the soul.
    • Entry Fee: Nil
    • Timings: 6 AM–9 PM (Summers) and 6:30 AM– 9:30 PM (Winters)
    • Open Days: 7 days a week
  • Explore Pushkar Lake: Devotees visiting the Jagatpati Mandir should take a dip in the Pushkar Lake. This activity is believed to cleanse sins and bring good fortune, and it is a must for pilgrims and visitors.
    • Entry Fee: Nil
    • Timings: 9 AM–6 PM
    • Open Days: 7 days a week
  • Take a Temple Tour: Devotees should also visit temples like the Savitri Temple, the Varaha Temple, and the Pap Mochani Temple. Each has a unique history and significance, enriching one’s spiritual journey.
  • Go for a Camel Safari: Take a camel safari in the surrounding desert. This unique adventure offers stunning views of the Thar Desert and is a fun way to explore the beauty and simplicity of Rajasthan.
    • Price: INR 800/person (1 hour). Prices may vary.
    • Timings: Open 24×7
    • Open Days: 7 days a week
  • Participate in Festivals: Visit the Pushkar Camel Fair to enjoy vibrant festivities. The livestock and cultural festival mostly overlaps the months of October and November. Experience cultural performances and exciting competitions. Explore lively market stalls filled with unique items.
    • Entry Fee: Nil
    • Pushkar Camel Fair 2024 (Date): 9/11/2024–15/11/2024 
    • Timings: 9 AM–5 PM 

Brahma Temple, Pushkar: Dresscode

Even though there is no specific dress code for visiting the Brahma Temple, Pushkar, it’s essential to respect the sanctity of the temple and its customs. Here are some pointers to help you adhere to the dress code and make your visit comfortable:

  1. Wear a traditional uutfit: It is advisable to wear traditional Indian attire when visiting the Brahma Temple. Men can wear a kurta-pajama or dhoti, while women can choose sarees or salwar kameez.
  2. Avoid western wear: Avoid any kind of Western clothing, as it may not be appropriate for an Indian place of worship.
  3. Remove footwear: It’s customary to remove your shoes before entering the temple premises. You can store them in designated areas near the entrance.

Poojas and Sevas at Brahma Temple, Pushkar

The Brahma Temple is a spiritual hub where devotees connect with the deity through a series of unique poojas and sevas, including:

Pooja/Seva Name Significance Timings
Mangala Aarti Early morning prayers to seek Lord Brahma’s blessings, symbolizing the beginning of a new day and invoking divine grace. Morning: 5:00 AM–6:00 AM
Sandhya Aarti Evening prayers with lamps and incense, offering gratitude and seeking protection and blessings as the day ends. Evening: 6:30 PM–7:30 PM
Abhishekam Ritual bathing of the deity with sacred bathing ingredients, symbolizing purification and the removal of negativity. Morning: 7:00 AM–9:00 AM
Brahma Havan The fire ritual seeks prosperity, spiritual awakening, and the destruction of negative energies through the power of the sacred fire. Morning: 9:00 AM–10:00 AM
Purnahuti The culmination of rituals, marking the completion of specific sevas as well as symbolizing the fulfilment of vows and the attainment of blessings. Morning: After Brahma Havan
Shodashopachara Detailed worship with 16 offerings to Lord Brahma, encompassing all aspects of devotion and honor. Morning: 10:00 AM–11:30 AM
Annadanam Offering food to devotees and the needy, thereby promoting charity, compassion, and the importance of serving humanity. Daily from 12:00 PM onwards

Brahma Temple, Pushkar: Entry Fees and Pooja Charges

The Brahma Temple welcomes pilgrims and visitors—offering various rituals and poojas. Here’s a detailed breakdown of the costs:

Entry Fees:

  • General Entry: Free for all.
  • VIP Entry: Specific fees may be applicable for quicker access or special services.

Pooja Charges:

  • Mangala Aarti: A morning ritual, costing approximately INR 100.
  • Sandhya Aarti: An evening ritual, costing approximately INR 100.
  • Abhishekam: Ceremonial bathing of the deity, costing approximately INR 200.
  • Brahma Havan: Fire ritual dedicated to Lord Brahma, costing approximately INR 500.
  • Shodashopachara: Ritual involving sixteen steps, costing approximately INR 300.
  • Annadanam: Free food distribution, promoting charity and community welfare. Donations are voluntary.
  • Prasadam Distribution: No specific charge; voluntary donations are encouraged.

Please note that these costs are approximate and may vary over time. Confirm the current charges before your visit to ensure a seamless experience.

Festivals at Brahma Temple, Pushkar

The Brahma Temple is a popular hub for festivals, attracting pilgrims and visitors from around the globe. Infusing the temple town with culture, devotion, and tradition, these celebrations include:

  • Kartik Purnima (November): Celebrated during the full moon night of Kartik, the festival marks Lord Brahma performing a yajna at Pushkar. Pilgrims take a holy dip in Pushkar Lake and offer prayers at the temple.
  • Navratri (September/October): The nine-night festival dedicated to Goddess Durga. The devotional festivities are also accompanied by cultural programs.
  • Diwali (October/November): Diwali, the festival of lights, is celebrated here as lavishly as the rest of India. Devotees light lamps, perform special poojas, and participate in cultural programs.
  • Holi (March): Rajasthani Holis are legendary and, resultantly, the festival of colors at Pushkar is celebrated on a grand scale. Devotees play with colors and participate in special rituals.
  • Makar Sankranti (14th January): Celebrated with kite flying and special rituals, the Makar Sankranti festival marks the sun’s transition into the Tropic of Capricorn. 

These festivals offer a chance to witness the rich tapestry of Indian culture and spirituality. Visiting the Brahma Temple during these festivals provides a unique and vibrant experience (besides great photo walks and street food) that reflects the deep-rooted traditions of Rajasthan.

Places to Visit Near Brahma Temple, Pushkar

Exploring the surrounding areas of Pushkar can enhance your trip, offering a deeper insight into Rajasthan’s cultural and historical richness. Here are some of the places to visit near Brahma Temple, Pushkar:

Pushkar Lake 

Considered one of the most sacred lakes in India, Pushkar Lake is surrounded by 52 ghats (stone staircases). Pilgrims take a holy dip in the lake, believing it cleanses sins and brings good fortune. The lake is also a hub of activity during the Pushkar Camel Fair. This annual camel-trading festival is a cultural extravaganza. Devotees and tourists attend the festival to enjoy folk music and dance performances, camel race activities, and more. The fair also attracts visitors by hosting handicraft, textile, and jewelry shops. 

  • Timings: 9 AM–6 PM

Savitri Temple

सावित्री मंदिर

Located on a hilltop, the Savitri Temple is dedicated to Lord Brahma’s wife, Goddess Savitri. A trek up the hill provides panoramic views of Pushkar and the surrounding desert. 

  • Timings: 5 AM–12 PM and 4 PM–9 PM

Varaha Temple

This ancient temple is dedicated to Lord Vishnu’s avatar, Varaha (the boar). It is one of the oldest temples in Pushkar and is known for its intricate carvings and serene atmosphere.

  • Timings: 6 AM–12:30 PM and 4 PM–8 PM

Pap Mochani Temple

Dedicated to Ekadashi Mata, this temple is believed to absolve sins with blessings. It is located on a hill and offers a peaceful retreat from the bustling town below.

  • Timings: 6 AM–7 PM

Rangji Temple

This temple is unique for its blend of South Indian, Mughal, and Rajput architectural styles. It is dedicated to Lord Rangji, who is considered to be an incarnation of Lord Vishnu.

  • Timings: All day long

Ajmer Sharif Dargah 

अजमेर शरीफ दरगाह

Located about 15 km from Pushkar, the Ajmer Sharif Dargah is a famous Sufi shrine dedicated to Khwaja Moinuddin Chishti and one of the most popular places to see in Ajmer. It attracts pilgrims of all faiths from across the world. 

  • Entry Fee: Nil
  • Timings: Open 24×7
  • Open Days: 7 days a week

Ana Sagar Lake

Ana Sagar Lake is an artificial lake in Ajmer, popular for boating and picnics. The nearby Daulat Bagh gardens offer a pleasant place for a stroll.

  • Entry Fee: Nil
  • Timings: Open  8 AM–8 PM
  • Open Days: 7 days a week

Taragarh Fort

तारागढ़ किला

This ancient fort in Ajmer offers a glimpse into Rajasthan’s rich history. The fort provides panoramic views of Ajmer city and is known for its impressive architecture.

  • Entry Fee: INR 100
  • Timings: Open 24×7
  • Open Days: 7 days a week

Merta City

About 50 km from Pushkar, Merta City is known for its historical and religious significance. It houses the Meera Bai Temple, which is dedicated to the famous bhakti poet and saint Meera Bai. She was a devotee of Lord Krishna, and her kirtans are extremely famous.

Places to Eat Near Brahma Temple, Pushkar

राजस्थानी व्यंजन
Authentic Rajasthani Thali

Pushkar’s culinary scene is diverse and caters to all tastes and budgets. Here are some of the popular places to eat in Pushkar:

  • Raju Terrace Garden Restaurant, Main Market Road: Known for its traditional Rajasthani thali, this restaurant offers a cozy garden setting and a relaxed atmosphere.
  • Honey & Spice, Laxmi Market : This cafe is popular for its healthy and delicious vegetarian dishes. It’s a favorite among travelers looking for nutritious meals and a welcoming ambiance.
  • Sunset Cafe, Choti Basti: Located by Pushkar Lake, this cafe offers stunning views and a variety of dishes, including Indian, Italian, and Continental options. It’s a perfect spot for a meal with a view.
  • Out of the Blue, Brahm Chowk: Known for its eclectic menu and laid-back atmosphere, this restaurant is a great place to relax and enjoy a meal. The menu includes Indian, Continental, and Israeli dishes.

How to Plan a Trip to Brahma Temple, Pushkar

Planning a trip to Brahma Temple, Pushkar, involves a few key steps. Book your accommodation in advance, especially during the Pushkar Camel Fair. You can choose from several accommodation options ranging from budget hotels to luxury resorts. Create an itinerary that includes temple visits, exploring local markets, and sojourning through nearby attractions while leaving free time to relax.

Plan your transportation well. Enjoy local Rajasthani cuisine at popular eateries, and take care to include spiritual, cultural, and adventurous activities like the temple aarti, camel safaris, and yoga sessions into your trip for an immersive and unforgettable experience.

How to Reach Brahma Temple, Pushkar

Pushkar is easily accessible via different transportation modes: 

By Train

The nearest railway station to Pushkar is Ajmer Junction, which is well-connected to major cities like Delhi, Mumbai, and Jaipur. From Ajmer, Pushkar is a 30-minute drive, and you can easily hire a taxi service from Ajmer to Pushkar with Savaari. Trains like the Shatabdi Express and the Rajdhani Express connect Ajmer to major cities, making it a convenient option for travelers.

By Road

Pushkar is well-connected by road to various cities in Rajasthan and beyond. Regular buses operate from Jaipur, Ajmer, and other nearby towns. If you prefer to drive, Pushkar is about 150 km from Jaipur and 400 km from Delhi. Book a comfortable cab service from Jaipur to Pushkar with Savaari Car Rentals or from nearby cities like Delhi, Jodhpur, etc., for a comfortable experience. The roads are well-maintained, and the drive offers scenic views of the Rajasthani countryside.

By Flight

The nearest airport to Pushkar is the Jaipur International Airport, about 150 km away. From the airport, you can hire an airport taxi in Jaipur with Savaari to reach Pushkar. Jaipur has good connectivity with major cities across India, with regular flights being operated by various airlines.

Hotels and Resorts in Brahma Temple, Pushkar

Pushkar offers a range of accommodation options, from hotels to resorts, that suit all budgets and preferences. Here are some of the best hotels and resorts in Pushkar:

Hotel Name Address Phone Number
The Pushkar Bagh Railway Station, Motisar Link Road, Ghanehera, Pushkar – 302055 94140 30669
Hotel Brahma Horizon Panch Kund Road, Pushkar – 305022 81070 44285
Ananta Spa & Resorts Leela Sevri Village, Dev Nagar, Pushkar Road, Pushkar – 305022 0141 354 0500
Green Park Resort Bus Station, Vaam Dev Road Pushkar – 305022 97993 47220
Hotel Pushkar Palace Near Pushkar  Lake, Choti Basti, Pushkar – 305022 98280 60601

A  visit to the Brahma Temple in Pushkar is a journey of spirituality, culture, and natural beauty. Whether you are a devotee seeking blessings, a traveler exploring new places, or an adventurer looking for unique experiences, Pushkar offers something for everyone. This travel guide to Pushkar provides all the information you need to plan and enjoy a memorable trip to this enchanting town.

Highest Road Trips Taken from Brahma Temple, Pushkar

Even though Pushkar is a city that is worth exploring on its own, it does offer travel enthusiasts an opportunity to explore some nearby and famous places in Rajasthan. Some of the popular destinations that you can travel to from Brahma Temple, Pushkar, are:

Destination Distance by Road (approx.)
Brahma Temple to Jaipur 141 km
Brahma Temple to Jodhpur 180 km
Brahma Temple to Udaipur 278 km
Brahma Temple to Mount Abu 378 km
Brahma Temple to Jaisalmer 460 km

Download the Savaari mobile app to explore the best routes and get the best deals on cabs and rentals for a road trip from Pushkar.

Last Updated on December 16, 2024 by

A quick summary

ब्रह्मा मंदिर, पुष्कर में करने योग्य कार्य: एक सम्पूर्ण यात्रा गाइड

Article Name

Things to do in Brahma Temple, Pushkar: A complete travel guide

Description

Plan a journey to the revered Pushkar Brahma Temple, a rare place of worship dedicated to the Lord of Creation - Brahma. Learn about the lore and legends of this famous temple and the top things to do in Brahma Temple via this detailed travel guide.











ब्रह्मदेवाच्या मूर्ती शिवाय मंदिरात आणि मंदिर परिसरात इतर अनेक मूर्ती आहेत. त्यातील महत्वाची मूर्ती मेंढ्यावर बसलेल्या अग्निची आहे. अष्ट दिक्पालांपैकी आग्नेय दिशेचा देव अग्नी हा वेदकाळात पूजनीय होता. त्याच्या स्वाहा आणि स्वधा या दोन बायका आहेत. मूर्तीशास्त्राप्रमाणे अग्नीला दोन किंवा चार हात असतात तो मेंढ्यावर (मेषावर) बसलेला दाखवतात. त्याच्या हातात पंखा आणि तुपाचे भांडे दाखवतात. अग्नीची मुख्य खूण म्हणजे त्याच्या मागे असलेला ज्वालांचा पसारा. याशिवाय येथे सूर्याची सात घोडे असलेली मुर्ती, हरिहर , गणपती, महिषासूर मर्दीनी, उमा - महेश्वर , जैन अंबिका, गजलक्ष्मी, नंदी, सुरसुंदरी वेगवेगळ्या प्रकारचे वीरगळ/ समाधीचे दगड/ स्मृतीशिळा येथे पाहायला मिळातात.  यात साधूची आणि बौध्द दांपत्याची स्मृतीशिळा पाहायला मिळतात.











herzindagi.com

क्या आप जानते हैं पुष्कर के ब्रह्मा मंदिर से जुड़े ये रोचक तथ्य, ब्रह्म देव का सबसे पुराना मंदिर

Samvida Tiwari

हमारा देश भारत कई विविधताओं का संग्रह है। यहां कई अलग देवी देवताओं की पूजा की जाती है और विभिन्न धर्मों के लोग रहते हैं। हिन्दुओं के प्रमुख देवताओं में से हैं ब्रह्मा ,विष्णु और महेश यानी शिव। वैसे तो मुख्य रूप से विष्णु और शिव की पूजा करने का विधान है। लेकिन कभी आपने सोचा है कि सृष्टि के रचयिता ब्रह्म देव की पूजा क्यों नहीं की जाती है?

ब्रह्म देव के नाम पर पूरे विश्व में कुछ ही मंदिरों का निर्माण किया गया है। जिनमें से सबसे पुराना मंदिर है पुष्कर का ब्रह्मा मंदिर। आइए जानें इस मंदिर से जुड़ी कुछ ख़ास बातों और ब्रह्मा की पूजा न करने के कारणों के बारे में।

टॉप स्टोरीज़

कब हुआ था मंदिर निर्माण

brahma temple pushkar

भगवान ब्रह्मा को समर्पित कुछ मंदिरों में से एक, इस पुष्कर मंदिर का निर्माण 14 वीं शताब्दी में किया गया था। इसमें एक सुंदर नक्काशीदार चांदी का कछुआ है, जो विभिन्न आगंतुकों द्वारा दान किए गए चांदी के सिक्कों के साथ संगमरमर के फर्श पर स्थापित किया गया है। मंदिर के गर्भगृह में उनकी दुल्हन, गायत्री के साथ ब्रह्मा जी की चार मुखी मूर्ति है। पुष्कर में कई मंदिर हैं जो अन्य देवताओं को समर्पित हैं। वराह मंदिर एक जंगली सूअर (वराह) के अवतार में विष्णु को समर्पित है। आप्टेश्वर मंदिर एक भूमिगत शिव मंदिर है जिसमें एक लिंगम है। अंत में, ब्रह्मा की पत्नी सावित्री को समर्पित सावित्री मंदिर, ब्रह्मा मंदिर के पीछे एक पहाड़ी पर स्थित है, और झील के सुंदर दृश्य प्रस्तुत करता है।

इसे जरूर पढ़ें:क्या आप जानते हैं उत्तराखंड के जागेश्वर धाम से जुड़ी ये ख़ास बातें

मंदिर की पौराणिक कथा

brahma dev temple

एक पौराणिक कथा के अनुसार एक बार ब्रह्मा जी ने पृथ्वी पर भक्तों की भलाई के लिए यज्ञ का विचार किया। यज्ञ की जगह का चुनाव करने के लिए उन्होंने अपने एक कमल को पृथ्वी लोक भेजा और जिस स्थान पर कमल गिरा उसी जगह को ब्रह्मा ने यज्ञ के लिए चुना। ये जगह राजस्थान का पुष्कर शहर था, जहां उस पुष्प का एक अंश गिरने से तालाब बन गया था। उसके बाद ब्रह्मा जी ने यज्ञ करने के लिए पुश्कर पहुंचे, लेकिन उनकी पत्नी सावित्री ठीक पर नहीं पहुंची। यज्ञ का शुभ मुहूर्त बीतता जा रहा था, लेकिन सावित्री का कुछ पता नहीं था। सभी देवी-देवता यज्ञ स्थल पर पहुंच चुके थे। ऐसे में ब्रह्मा जी ने नंदिनी गाय के मुख से गायत्री को प्रकट किया और उनसे विवाह कर अपना यज्ञ शुभ समय पर शुरू किया। कुछ देर बाद सावित्री यज्ञ स्थल पर पहुंची और ब्रह्मा जी के बगल में किसी और स्त्री को देख क्रोधित हो गई। सावित्री ने ब्रह्मा जी को श्राप दिया कि इस पृथ्वी लोक में आपकी कहीं पूजा नहीं होगी। इस श्राप को देखते हुए सभी देवी -देवताओं ने जब सावित्री से आग्रह किया तब उन्होंने श्राप वापस लिया और कहा कि, धरती पर सिर्फ पुष्कर में ही ब्रह्मा जी की पूजा होगी। तब से इस मंदिर का निर्माण किया गया।

पुष्कर झील के किनारे स्थित

oushkar lake

यह मंदिर पुष्कर लेक के किनारे स्थित है और ब्रह्म देव के सबसे पुराने मंदिरों में से एक है। यह मंदिर हर साल पर्यटकों और श्रद्धालुओं को अपनी ओर आकर्षित करता है। कहा जाता है कि पुष्कर की खूबसूरती देखते हुए ब्रह्म देव ने स्वयं ही इस मंदिर को चुना था। प्राचीन ग्रंथों के मुताबिक, पुष्कर दुनिया की इकलौती जगह है, जहां ब्रह्मा का मंदिर स्थापित है और इस जगह को हिंदुओं के पवित्र स्थानों के राजा के रूप में वर्णित किया गया है।

इसे जरूर पढ़ें:चलिए जानते हैं गुजरात में मौजूद द्वारकाधीश मंदिर से जुड़े कुछ रोचक तथ्य

कैसी है मंदिर की संरचना

temple inside view

पुराणों के अनुसार इस मंदिर का निर्माण करीबन 2000 वर्ष पूर्व सम्पन्न हुआ था । लेकिन मंदिर की मौजूदा वास्तुकला के मुताबिक इस मंदिर का निर्माण 14वीं शताब्दी में हुआ माना जाता है। पुष्कर को मंदिर की नगरी भी कहा जाता है, लेकिन औरंगजेब के शासन के दौरान यहां अमूमन हिन्दू मन्दिरों को नष्ट कर दिया गया, लेकिन आज भी पुष्कर झील के किनारे ब्रह्मा मंदिर और अन्य मन्दिर ज्यों के त्यों स्थित हैं। ऐसा माना जाता है कि पुष्कर झील ब्रह्मा जी के कमल की एक पत्ती से बनी है, जो हिन्दुओं के लिए अत्यंत पवित्र झील है।

कई विशेषताओं को अपने आप में समेटे हुए ये मंदिर वास्तव में बेहद खूबसूरत है और आप सभी को इस मंदिर के दर्शन हेतु अवश्य जाना चाहिए।


bhaskar.com

माता सावित्री के श्राप के कारण नहीं की जाती ब्रह्मा जी की पूजा, पुष्कर में है एक मात्र मंदिर

दैनिक भास्कर

माता सावित्री के श्राप के कारण नहीं की जाती ब्रह्मा जी की पूजा, पुष्कर में है एक मात्र मंदिर

धर्म डेस्क. हिंदू ग्रंथों और पुराणों के अनुसार ब्रह्मा, विष्णु और महेश को सृष्टि का निर्माता, पालनकर्ता और संहारक माना जाता हैं। लेकिन आप के मन में ये सवाल कई बार आता होगा कि विष्णु और महेश (शिव जी) के तो दुनियाभर में कई मंदिर हैं और लोग घर में भी इनकी स्थापना कर इनकी पूजा करते हैं। लेकिन ब्रह्मा की पूजा कभी नहीं की जाती। और उनका केवल एक ही मंदिर है, जो पुष्कर में है। ब्रह्माजी की पूजा करना वर्जित क्यों माना गया है‌? दरअसल देवी सावित्री के श्राप के कारण ही ब्रह्माजी की पूजा वर्जित मानी गई है।

देवी सावित्री ने दिया था श्राप - पुराणों के अनुसार एक बार ब्रह्मा जी हाथ में कमल का फूल लिए हुए अपने वाहन हंस पर सवार होकर अग्नि यज्ञ के लिए उचित स्थान की तलाश कर रहे थे। - तभी एक जगह पर उनके हाथ से कमल का फूल गिर गया। फूल के धरती पर गिरते ही धरती पर एक झरना बन गया और उस झरने से 3 सरोवर बन गए।  - जिन जगहों पर वो तीन झरने बने उन्हें ब्रह्म पुष्कर, विष्णु पुष्कर और शिव पुष्कर के नाम से जाना जाता है। यह देखकर ब्रह्मा जी ने इसी जगह यज्ञ करने का निर्णय लिया।

कर लिया था दूसरा विवाह - यज्ञ में ब्रह्मा जी के साथ उनकी पत्नी का होना जरुरी था। भगवान ब्रह्मा की पत्नी सावित्री वहां नहीं थी और शुभ मुहूर्त निकला जा रहा था।  - इस कारण ब्रह्मा जी ने उसी समय वहां मौजूद एक सुदंर स्त्री के विवाह करके उसके साथ यज्ञ संपन्न कर लिया।  - जब यह बात देवी सावित्री को पता चली। इससे नाराज होकर उन्होंने ब्रह्मा जी को यह श्राप दे दिया कि जिसने सृष्टि की रचना की पूरी सृष्टि में उसी की कहीं पूजा नहीं की जाएगी।  - पुष्कर को छोड़ कर पूरे विश्व में भगवान ब्रह्मा का कहीं मंदिर नहीं होगा। इसी श्राप की वजह से ब्रह्मा जी का एकमात्र मंदिर पुष्कर में है।

ब्रह्मा जी ने यहीं रचा था ब्रह्माण - पद्म पुराण के अनुसार ब्रह्माजी पुष्कर के इस स्थान पर दस हजार सालों तक रहे थे। इस दौरान उन्होंने सृष्टि की रचना की।  - इसके बाद उन्होंने पांच दिनों तक यज्ञ किया था। उसी यज्ञ के दौरान सावित्री पहुंच गई थीं। आज भी श्रद्धालु केवल दूर से ही ब्रह्मा जी से करते हैं। 

देवी सावित्री हैं विराजमान - पुराण के अनुसार गुस्सा कम होने के बाद सावित्री पुष्कर के पास मौजूद पहाड़ियों पर जाकर तपस्या करने चलीं गईं थीं।  - मान्यताओं के अनुसार सावित्री देवी मंदिर में रहकर भक्तों का कल्याण करती हैं।



hindi.astroyogi.com

Pushkar - पुष्कर है भगवान ब्रह्मा का एकमात्र मंदिर


गुलाबी शहर जयपुर से कुछ ही घंटों की दूरी पर पुष्कर शहर स्थित है। पुष्कर (Pushkar) हिंदूओं में इसलिए प्रसिद्ध है कि यहां विश्व का एक मात्र जगत पिता ब्रह्मा का मंदिर है। इसके अलावा यहां लगने वाला मेला भी पर्यटकों का ध्यान आकर्षित करता है। आगे हम पुष्कर के पौराणिक महत्व और दर्शनीय स्थानों के बारे में जानेंगे।

पुष्कर का पौराणिक महत्व

पौराणिक रूप से पुष्कर (Pushkar) नगर के उद्भव का वर्णन हिंदू धर्म के पौराणिक ग्रंथ पद्मपुराण में मिलता है। मान्यता है कि, पुष्कर आकर ब्रह्मा जी ने यज्ञ किया था। हिंदुओं के प्रमुख तीर्थस्थानों में पुष्कर को भी गिना जाता है। क्योंकि यहां एक ऐसी जगह है जहां ब्रह्मा जी का प्राचीन मंदिर स्थापित है। यहीं ब्रह्मा जी का एक मात्र मंदिर क्यों है, इसके पीछे भी एक प्रचलित कथा है, कथा के अनुसार एक बार भगवान ब्रह्मा ने यज्ञ करने का निश्चय किया। यह यज्ञ जगत पिता सबसे शुभ समय पर करना चाहते थे। परंतु उनकी पत्नी सरस्वती, जिनका यज्ञ के समय उपस्थित रहना अत्यंत आवश्यक था, उन्हें ब्रह्मदेव को इंतजार करने लिए कहा। जिससे क्रोधित होकर ब्रह्मा जी ने गायत्री नाम की एक ग्वालिन से विवाह कर लिया और उन्हें यज्ञ में बैठा दिया। भगवान ब्रह्मा ने पुष्कर के दक्षिण में मध्यवर्ती क्षेत्र को यज्ञवेदी बनाया। इस यज्ञवेदी में उन्होंने ज्येष्ठ पुष्कर, मध्यम पुष्कर, तथा कनिष्ठ पुष्कर नामक तीन पुष्कर तीर्थ की रचना की। ब्रह्मा जी के यज्ञ में सभी देवता तथा ऋषि पहुंचे। ऋषियों ने यज्ञ स्थल से कुछ ही दूरी पर अपने आश्रम बनाए। भगवान शंकर भी कपालधारी बनकर पधारे। यज्ञ में सरस्वती जी ने जब अपने स्थान पर किसी और को देखा तो वे क्रोध से भर गयी और उन्होंने ब्रह्मा जी को शाप दे दिया। शाप यह था कि पृथ्वी के लोग ब्रह्मदेव को भूल जाएंगे और इनकी पूजा कभी नहीं करेंगे। किन्तु अन्य देवताओं की प्रार्थना पर वो पिघल गयी और कहा कि ब्रह्मा जी केवल पुष्कर में ही पूजे जाएंगे। इसी कारण यहां के अलावा और कहीं भी ब्रह्मा जी का मंदिर नहीं है।

पुष्कर के दर्शनीय स्थल

पुष्कर (Pushkar) के प्राचीन मंदिरों को मुगल सम्राट औरंगजेब ने नष्ट कर दिया था। ब्रह्मा के मंदिर के अतिरिक्त यहां पुष्कर झील, पुष्कर मेला और ऊटों की दौड़ देखने योग्य हैं। पुष्कर में स्थित झील के तट पर कई जगह पक्के घाट बने हैं। इन घाटों का निर्माण राजपूताना रियासतों के धनी व्यक्तियों द्वारा करवाया गया है।

ब्रह्मा मंदिर

पुष्कर नगर धार्मिक मिथों और विश्वासों से भरा है। यहां के आकर्षण का केंद्र ब्रह्मा का मंदिर है। ब्रह्मा मंदिर का निर्माण संगमरमर के पत्थर से किया गया है तथा इसे चांदी के सिक्कों से सजाया गया है। इन चांदी के सिक्कों पर दानदाताओं के नाम उकेरे गए हैं। इसके अलावा मंदिर के दीवारों पर भी दानदाताओं के नाम अंकित हैं। यहां मंदिर के फर्श पर एक सोने का कछुआ है। मंदिर में गायत्री देवी की एक छोटी प्रतिमा और किनारे पर ब्रह्माजी की चार मुखों वाली प्रतिमा स्थापित है जिसे चौमूर्ति कहा जाता है। मंदिर का प्रवेश द्वार संगमरमर का बना है और दरवाजा चांदी का बना है।

पुष्कर झील

पुष्कर झील अपनी पवित्रता और सुंदरता के लिए पूरे विश्व में प्रसिद्ध है। मान्यता है कि पुष्कर झील उतना ही पुराना है जितना कि सृष्टि। तीर्थयात्रा के रूप में यह प्राचीन काल से जाना जाता है। इस झील में नहाने के लिए के लिए 52 घाट बने हुए हैं। जहां श्रद्धालु आस्था की डुबकी लगाते हैं।

पुष्कर मेला

हिंदू धर्म की मान्यता के अनुसार कार्तिक महीने के अष्टमी के दिन मेला शुरू होता है जो पूर्णिमा तक चलता है। मेले में पशुओं के व्यापार पर जोर रहता है। इस मेले में पशुओं तथा महिलाओं के श्रृंगार के सभी सामान एक ही जगह पर बिकते हैं।

ऊटों की दौड़

पुष्कर में आयोजित होने वाली ऊटों की दौड़ पशु प्रमियों में खूब लोकप्रिय है। प्रत्येक शाम को यहां राजस्थानी लोक नृत्य और संगीत का आयोजन किया जाता है। जिसमें खूब भीड़ जुटती है।

पुष्कर कैसे पहुंचे

पुष्कर सड़क, रेल एवं वायु मार्ग से पहुंचा जा सकता है।

वायु मार्ग

हवाई मार्ग से यहां आने पर आपको जयपुर हवाई अड्डे पर उतरना होगा। यही एयरपोर्ट पुष्कर से सबसे करीब है। इसके अलावा आप घूंघरा जो कि अजमेर में है और  देवनगर जो पुष्कर में स्थित है इन दोनों ही स्थानों पर हैलीपैड बने हुए हैं। जहां हेलीकॉप्टर से आने पर आप उतर सकते हैं।

रेल मार्ग

यहां का सबसे नजदीकी रेलवे स्टेशन पुष्कर ही है लेकिन यहां आने के लिए सबसे उपयुक्त होगा की आप अजमेर जंकशन पर उतरे। यह स्टेशन देश के प्रमुख शहरों से जुड़ा हुआ है। यहां से आप आसानी से पुष्कर पहुंच सकते हैं।

सड़क मार्ग

जयपुर तथा अजमेर से टैक्सी या बस से आप पुष्कर पहुंच सकते हैं। राजस्थान के विभिन्न भागों से पुष्कर के लिए बस व टैक्सी चलती हैं। आप इस सुविधा का भी लाभ उठा सकते हैं। पुष्कर देश के चारों महानगरों से सड़क मार्ग के जरिए जुड़ा हुआ है।




etvbharat.com

Puskar snan 2022 पुष्कर स्नान का महत्व और धार्मिक मान्यता

ETV Bharat

रायपुर : राजस्थान में एक छोटा सा कस्बा है पुष्कर यहां दुनिया का इकलौता ब्रह्मा जी का मंदिर पुष्कर स्थापित है. इस मंदिर की गिनती भारत के प्रमुख तीर्थ स्थलों में होती है.अरावली की पहाड़ियों से घिरा पुष्कर बेहद खूबसूरत और प्राकृतिक सौंदर्य से भरा हुआ है. पुराणों में इस मंदिर के निर्माण से जुड़ी कई कथाएं मौजूद हैं, लेकिन पद्म पुराण के अनुसार एक बार ब्रह्मा जी ने धरती पर यज्ञ करना चाहा लेकिन उस वक्त पूरी धरती वज्रनाभ नामक राक्षस के आतंक से ग्रसित थी.Puskar snan 2022

ब्रह्मा ने किया राक्षस का वध : तब ब्रह्मा जी ने अपने प्रिय पुष्प कमल के एक वार से ही इस असुर का वध कर दिया था. जब ब्रह्मा जी द्वारा चलाया गया कमल का पुष्प उस राक्षस का वध कर धरती पर तीन जगह गिरा तो इन तीनों ही जगहों से पृथ्वी का सीना चीर कर जल की धारा बहने लगी और वहीं तीन झील बन गई. जिसमें पहले झील का नाम जेष्ठ पुष्कर, दूसरे झील का नाम मध्य पुष्कर और तीसरे झील का नाम कनिष्ठ पुष्कर रखा गया. इन्हीं में से जेष्ठ पुष्कर में ब्रह्मा जी ने यज्ञ किया था जिसे एक तीर्थ स्थल होने का गौरव प्राप्त हुआ. Importance and religious beliefs of Pushkar Snan

क्यों है पुष्कर की मान्यता : ऐसा माना जाता है कि ब्रह्मा जी ने इस सरोवर में कार्तिक एकादशी से पूर्णिमा तक यज्ञ किया था इसीलिए यहां हर साल 5 दिनों तक एक धार्मिक मेला का आयोजन होता है जिसमें स्वर्ग से सभी देवी-देवता उतर कर शामिल होते हैं. माना जाता है कि इन 5 दिनों यानी कार्तिक एकादशी से पूर्णिमा तक इस झील में स्नान करने वाले भक्तों को विशेष फल मिलता है उन्हें साल भर का पुण्य एक साथ ही इस झील में डुबकी लगाने मात्र से ही मिल जाता है.

पुष्कर में ही ब्रह्मा का इकलौता मंदिर :इस सृष्टि के निर्माता ब्रह्म देव की पूजा इस पृथ्वी पर केवल एक ही जगह हो यह अपने आप में ही एक अद्भुत सवाल है. दरअसल, एक बार ब्रह्मा जी पृथ्वी पर यज्ञ करना चाहते थे और उन्होंने अपनी पत्नी सरस्वती जी को अपने साथ यज्ञ में बैठने के लिए कहा, सरस्वती जी ने ब्रह्मा जी से कुछ देर इंतजार करने को कहा. ब्रह्मा जी सरस्वती जी का इंतजार कर रहे थे लेकिन जब कुछ वक्त तक सरस्वती जी पृथ्वी पर नहीं पहुंची तब ब्रह्मा जी ने वहीं एक ग्वालन से यज्ञ के लिए शादी कर ली. जब सरस्वती जी यज्ञ में बैठने पहुंची और अपनी जगह किसी और को देखा तो वह क्रोधित हो गईं और ब्रह्मा जी को यह श्राप दिया कि आज के बाद इस पृथ्वी पर तुम्हारी कहीं पूजा नहीं होगी.हालांकि, जब सभी देवी देवताओं ने उनसे विनती की और उनका मन शांत हुआ तब उन्होंने कहा कि हे ब्रह्मदेव आपकी पूजा इस समग्र संसार में केवल एक ही जगह होगी और वह है पुष्कर.


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...