Sunday, March 16, 2025

आपला वारसा ( एप्रिल महिना )

 

भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात हयग्रीव हा एक अवतार आहे... हयग्रीव म्हणजे मनुष्याचे शरीर व घोड्याचे तोंड असा हा विचित्र अवतार आहे.आतां जरी हा फारसा प्रसिद्ध नसला तरी महाभारतांप्रमाणे विष्णु, वामन, अग्नी, स्कंद, वगैरे पुराण ग्रंथात आणि लौगाक्षि सारख्या स्मृतिग्रंथांतदेखील 'हयग्रीव', 'हयशीर्ष' किंवा 'अश्वशिर' या नावांने या अवताराचे वर्णन मिळतें. या अवताराची कथा व त्याचे कार्य याबद्दल तो अप्रसिद्ध असल्यामुळें थोडक्यात माहिती देतो.
   नैमिष अरण्यात चाललेल्या महायज्ञाच्या वेळेस ऋषींनी लोमहर्षण पुत्र सौती / सुत यास या अवताराबद्दल काय घटना आहे, असे विचारले होते. ते वेद व्यास यांचे शिष्य होते. तेव्हा सुत सांगु सांगले,
    हयग्रीव हा एक पराक्रमी दैत्य होता... त्याने सरस्वती नदी किनारी घोर तपस्या करून देवी महामाया हिस प्रसन्न करून घेतले. त्याने अन्न पाणी सोडून फक्त माया भगवतीचा एकाक्षर महाबीज मंत्राचा अखंड जप सुरू केला होता. याचा प्रभाव व फलित म्हणजे त्याने आपले सर्व इंद्रिये वश केले होते. सर्व शरीरभोग देणाऱ्या भावनांचा त्याने त्याग केला होता. महामाया भगवतीने त्याला तामसी गुणात दर्शन दिले. महामाया भगवती प्रसन्न होऊन म्हणाली, वत्सा ऊठ ! आज तुझी कठोर तपस्या फळास आली आहे... मी प्रसन्न झाले आहे. तुझी काय ईच्छा आहे ते माग ! 
    महामाया भगवतीला बघून त्याच्या आनंदाला पारिवार राहिला नाही, डोळ्यांतून आनंद अश्रूच्या धारा वाहू लागल्या... तो सदगतीत होऊन म्हणाला, हे कल्याणकारी देवी भगवती ! या भक्तांचा नमस्कार स्वीकार कर. तु महामाया आहेस ! जन्म, पालनपोषण आणि संहार हे तुझी किमया आहे... तुझ्या मनात आले तर तू काही पण करू शकतेस ! या विश्वात सर्व काही तु करू शकतेस ! त्यामुळे हे महामाया मला अमरत्व वर दे....!
       यावर देवी म्हणाली हे दैत्यराज, या विश्वात ज्याचा जन्म झाला, त्याच वेळेस त्याचा मृत्यू पण निश्चित असतो. प्रकृतीच्या नियमास कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे येथे कोणीही अमर राहू शकत नाही. एवढेच नाही तर अमर असणाऱ्या देवांना पण त्यांचे पुण्य संपले की नंतर पुन्हा मृत्युलोकात जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे तू दुसरा कोणताही वर माग !
  यावर हय ग्रीव म्हणाला, ठीक आहे... तर मग आता दुसरे वरदान मागतो. ते मला दे. ते म्हणजे मला कोणाच्याच हाताने मृत्यू नाही आला पाहिजे. माझा मृत्यू हा माझ्या फक्त माझ्या हाताने म्हणजे हय ग्रीवच्या हातानेच झाला पाहिजे ! ही माझी मागणी आहे, तरी हयग्रीव शिवाय दुसऱ्याच्या हातून मला मृत्यू येणार नाही असा वर दे! 
 यावर महामाया भगवती म्हणाली, तथास्तु...! असे म्हणून महामाया भगवती अंतर्धान पावली.
  हयग्रीवला खूपच आनंद झाला... तो मोठ्या आनंदाने घरी गेला. आपल्याला कुणीच मारू शकणार नाही, या विचारानेच त्याला अहंकार झाला. हयग्रीवने देवांना सळो कि पळो करून सोडले... देव- देवता व ऋषी मुनीना त्रास द्यायला सुरुवात केली. शांततेसाठी केलेल्या यज्ञात बाधा आणू लागला. ब्रह्मदेवाकडून वेद पळवून आणले. यामुळे सर्व देव भयभीत झाले. ते विष्णूकडे गेले, तेव्हा विष्णू शांत झोपले होते. त्यांची ती योगनिद्रा होती. ब्रह्मदेवाने एक वर्मी नामक किडा तयार केला आणि तो धनुष्यावर सोडला. त्याने आपल्या दाताने धनुष्याची दोरी कुरतडली. त्यामुळे धनुष्य सरळ झाले व त्याचा धारदार फटका विष्णूच्या गळ्यावर बसला. त्यात विष्णुचे शीर कापले गेले व दूर जाऊन अदृश्य झाले. खुप मोठयाने, वीज कडाडते त्याप्रमाणे आवाज झाला.. हा प्रकार बघून सर्व देव भयभीत झाले... विष्णूचे शीर अदृश्य झाले, भगवान विष्णूचे शीर विरहीत धड बघून सर्व देव चिंतातुर झाले. देवांनी महामाया भगवतीची प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली. तिने देवांना सांगितले चिंता करू नका यावर मी तुम्हाला एक उपाय सांगते. माझे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत.. तुम्ही एका घोड्याचे शीर कापून आणा, आणि ते भगवान विष्णूच्या शरीराला जोडा. मी हयग्रीवाला त्याचा मृत्यू फक्त हयग्रीव कडून होईल, असा वर दिला आहे. तरी तुम्ही घोड्याचे शिर भगवान विष्णूच्या शरिराला जोडा, असे सांगून देवी अंतर्धान पावली. भगवतीने सांगितल्यानुसार ब्रह्मदेवाने एका घोड्याचे शीर कापून आणले... ते विष्णूच्या धडाला जोडले. घोड्याचे शीर विष्णूच्या धडाला लावताच विष्णू हयग्रीव अवतारात प्रगट झाले. नंतर त्यांनी देवी भगवतीने सांगितल्यानुसार हयग्रीवाशी युद्ध केले. त्या युद्धात देवी भगवतीने वर दिल्याप्रमाणे विष्णु भगवान यांनी दैत्तराज हयग्रीव याचा वध केला. सर्व देव आनंदी झाले विष्णूनी चारी वेदांची सुटका केली, आणि ते ब्रह्मदेवाला परत केले. सर्व ऋषी-मुनी हे आनंदी झाले. दैत्यराज हयग्रीवच्या वधाने त्यांच्या वरील संकट टळले होते.अशा प्रकारे हयग्रीव अवतार धारण करून दैत्यराज हयग्रीव याचा वध केला.
 पांचाल देशाच्या गालव नामक ऋषीनें हयग्रीवाची आराधना करून त्याकडून वेदांचा 'क्रम' मिळवला. 'वेदमात्रार्थतत्वज्ञ' होण्यांकरितां हयग्रीवाचा प्रसाद आवश्यक होय असें स्मृतिकारांचे म्हणणे आहे.
   मूर्तिशास्त्रांत हयग्रीवांचे अंकन कुषाण काळांपासूनच सुरु झाले होते. भारतकलाभवन, वाराणसी येथे संग्रहित असलेल्या मथुरेहून मिळालेल्या हयग्रीवाच्या चतुर्भुज प्रतिमेंस घोड्यांचे तोंड असून मागील हातांत गदा व चक्र अशी आयुधे आहेत. तो मांडी घालून बसला आहे व त्याचा उजवा हात पोटावर असून डाव्या हातातील लांबट वस्तू मात्र नीट ओळखतां येत नाही.गुप्तकाळातील हयग्रीवाच्या मूर्ती मोजक्याच आहेत. त्यापैकीं एक मथुरेत असून दुसरी तेथूनच मिळालेली असली तरी आज पश्चिम बर्लिन येथे आहे. ही विष्णू-नरसिंह वराह-हयग्रीवाची सर्वतोभद्र मूर्ती महत्त्वाची आहे. येथें हयग्रीवाचा अभयमुद्रेत उजवा हात खांद्यापर्यंत उचलेला असून डाव्यांत वेदांची पोथी दिसत आहे. बाकी दोन हात प्रलंबावस्थेत असून आयुधपुरुषांच्या डोक्यावर ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे गदा देवी उजवीकडे नसून डावीकडे आहे.








Fireflies Festival batches Starts from 17th May 2025
Andharban Forest
Rajmachi
Bhandardara Camping
For Bookings Call us on 8554873247,8830930876,8999549463,7758045840
 
 

 


: *🚩🚩शिव छत्रपतींचा प्रसिध्द वासोटा किल्ला ट्रेकिंग 🚩🚩🚩* 

वासोटा ट्रेक आणि मुनावळे (समर व्हेकेशन ट्रिप )
      आजकालच्या धावपळीच्या आणी ताणतनावाच्या जीवनामध्ये वर्षातून किमान दोन दिवस स्वतःसाठी तणावमुक्त जगले पाहिजे. म्हणूनच 2 दिवस निसर्गाच्या कुशीत रहा. आणी रिफ्रेश होऊन पुन्हा आपल्या कार्याला नव्या दमाने  नव्या जोमाने  सुरुवात करा. 🤝कास पठारापासून पुढे 12 किलोमीटर गेल्यावर आपण हा नैसर्गिक स्वर्ग अनुभवणार आहोत.
   शनिवार दिनांक १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण मुनावळे गावी पोहचणार आहोत.

शनिवार १० मे :-
 ☕   वेलकम चहा
💃  ग्रुप डान्सची सोय. 
 🎤 कराओके म्युझिक सिस्टीम 
 ♨️  कॅम्प फायर
 🏊‍♂️  कोयना तलावात पोहण्याचा आनंद.
 ♟️   बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.
🍽️ रात्री व्हेज / नॉनव्हेज डिनर 
?️ नदीकिनारी राहण्यासाठी प्रशस्त रुम्स / ऊबदार टेन्ट.

रविवार ११ मे:-
 ☕सकाळी चहा आणि नाष्टा
 वासोटा ट्रेकिंगसाठी जाताना वासोटा किल्ल्यावर जेवण्यासाठी चपाती - भाजी, खर्डा, लोणचे याचा टिफिन.

 वासोटा ट्रेक :-
        मुनावळे गावातून बोटीमधून साधारणत: 45 मिनिटे प्रवास करून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध *"वासोटा"* किल्ला, नयनरम्य असा दऱ्या डोंगरांनी नटलेले हे निसर्गरम्य ठिकाण. 🏜️
   रिसॉर्टमध्ये नाष्टा करुन,  वासोटा किल्ल्याचा इतिहास आणि भुगोल जाणून, कोयना जलाशयामध्ये लाँचमधून प्रवास केल्यावर वनखात्याची परवानगी घेउन आपण आपण साधारण दीड तासाचा घनदाट जंगलातून ट्रेक करुन माथ्यावर पोहचणार आहोत.

🟠वासोटा गडावरील प्रेक्षणीय स्थळे :- 🟠
१) महादेव मंदिर 
२) मारुती मंदिर आहे.
३) इंग्रजांनी तोफांच्या माऱ्यानंतर मोठ्या वाड्याचे काही अवशेष 
४) चुन्याचा घाणा आणि पाण्याचे टाके
५ ) सहयाद्री पर्वत रांगा , दरीत दिसणारा रत्नागिरी जिल्हा
६ ) काळाकाईचे ठाणे (नागेश्वरी गुहा (सुळका) दर्शन ) पॉइंट
७ ) जुना वासोटा
८ )  बाबु कडा आणि एको पॉईंट
   
ज्यांना वासोटा ट्रेक करणे शक्य नाही त्यांना बोटींगचा आनंद घेण्यासाठी बोटीने 3.00 तासाच्या बोटिंग सफरीमध्ये एकूण ४ पर्यटन स्थळे दाखवली जातात
 *1. दत्त मंदिर* 
 *2. त्रिवेणी संगम* 
 *3. वासोटा किल्ला दर्शन* 
 *4. कोयना अभयारण्य 

 ☕किल्यावरुन आल्यानंतर चहा
रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण परतीचा प्रवास सुरु करणार आहोत.



*लहान मुलांसाठी पॅकेज

5 वर्षे पर्यंत फ्री.

5 ते 10 वर्षे 70% चार्जेस 

10 वर्षे वरील मुलांसाठी पूर्ण चार्जेस* 

 **परिसरातील कोल्हापुरी चवीचे एकमेव ठिकाण ** ( कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ) चविष्ट व्हेज - नॉन व्हेज 


 

जंगल भ्रमंती ,ट्रेकींग ६ मे २०२५

नुकत्याच शाळा, कॉलेजच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होत आहेत. उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी आणि ट्रेकींगचे थ्रील अनुभवण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत, खास एक दिवसाची टूर, ज्याच्यामध्ये जंगल सफारी व ट्रेकींग असा डबल धमाका !
कोयनेच्या घनदाट जंगल, तिथले वन्यजीवन अनुभवणे, भैरवगड, दातेगडाची भटकंती, या परिसराचा इतिहास जाणून घेण्यासाठी मंगळवार ६ मे रोजी आपण ओपन जीपमधुन जंगल सफारी, गड भटकंती, वनभोजन अनुभवण्याची संधी देत आहोत.

ज्यांना थेट कोयनानगर येउन सफारी आणि ट्रिप जॉइन करायची आहे त्यांच्यासाठी ट्रिपचा खर्च १०००/- ( एक हजार फक्त ) असेल. या खर्चात सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा, तसेच वन खात्याच्या जीपचा ट्रान्स्पोर्ट आणि वनखात्याची परवानगी या सर्वांचा समावेश आहे. ट्रेक सोपा आहे आणि कोणत्याही वयाची फिट व्यक्ती या मोहिमेत सामील होउ शकते. यात वाहन खर्च धरलेला नाही. मुंबई आणि पुणे येथून पुरेसे सदस्य असतील तर या ट्रिपसाठी वाहनाची व्यवस्र्था केली जाईल. तसेच हवी असल्यास मुक्कामाची सोय केली जाईल.मात्र प्रवासखर्च आणि रहाण्याच्या खर्च ज्याने त्यामे करायचा आहे. या खर्चात प्रत्येकाचा वैयक्तीक खर्च, जादा खाणे-पिणे याचा समावेश नाही.

तेव्हा वाट कसली बघताय ? उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या जंगल सफारीचा आणि ट्रेकचा अनुभव नक्कीच घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. स्वप्निल जिरगे

मोबाईल -9960022621

 
 
 
 
 
जंगल भ्रमंती ,ट्रेकींग   ६ मे २०२५
    नुकत्याच शाळा, कॉलेजच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होत आहेत. उन्हाचा तडाखा सुसह्य करण्यासाठी आणि ट्रेकींगचे थ्रील अनुभवण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत, खास एक दिवसाची टूर, ज्याच्यामध्ये जंगल सफारी व ट्रेकींग असा डबल धमाका !
     कोयनेच्या घनदाट जंगल, तिथले वन्यजीवन अनुभवणे, भैरवगड, दातेगडाची भटकंती, या परिसराचा इतिहास जाणून घेण्यासाठी  मंगळवार ६ मे रोजी आपण ओपन जीपमधुन जंगल सफारी, गड भटकंती, वनभोजन अनुभवण्याची संधी देत आहोत.
    हि भटकंती कराड- कोयनानगर- कराड अशी आहे. या संपुर्ण ट्रिपचा खर्च १५००/- ( एक हजार पाचशे फक्त ) आहे.
या खर्चात कराड-कोयनानगर- कराड प्रायव्हेट नॉन ए.सी. बसची व्यवस्था, सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा, तसेच जीपचा ट्रान्स्पोर्ट आणि वनखात्याची परवानगी या सर्वांचा समावेश आहे. ट्रेक सोपा आहे आणि कोणत्याही वयाची फिट व्यक्ती या मोहिमेत सामील होउ शकते.
   ज्यांना थेट कोयनानगर येउन सफारी आणि ट्रिप जॉइन करायची आहे त्यांच्यासाठी ट्रिपचा खर्च १०००/- ( एक हजार फक्त ) असेल. यात वाहन खर्च धरलेला नाही. मुंबई आणि पुणे येथून पुरेसे सदस्य असतील तर या ट्रिपसाठी वाहनाची व्यवस्र्था केली जाईल. तसेच हवी असल्यास मुक्कामाची सोय केली जाईल.
मात्र प्रवासखर्च आणि रहाण्याच्या खर्च ज्याने त्यामे करायचा आहे.
  या खर्चात प्रत्येकाचा वैयक्तीक खर्च, जादा खाणे-पिणे याचा समावेश नाही. जर अचानक काही कारणाने हि सफारी आणि ट्रेक रद्द करावा लागला तर त्याच्या निर्णयाचा अधिकार आयोजकांना असेल.
   तेव्हा वाट कसली बघताय ? उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी या जंगल सफारीचा अनुभव नक्कीच घ्या.

 अधिक माहितीसाठी
श्री. स्वप्निल जिरगे
  मोबाईल -9960022621

Exclusions
Entry fee foreign nationals
Mineral water/lime water/ purchased for personal consumption
All kinds of Extra Meals / soft drinks ordered.
Any kind of personal expenses.
Any kind of cost which is not mentioned in the cost includes above.
All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like
roadblocks, bad weather.
Any medical / Emergency evacuations if required.

Highlights
2/3 liters of water (Must)
Good Torch must with extra battery
Trekking Shoes provide more grip and comfort on trek
Proper backpack (No side bag or jholas)
Some Dry fruits / Dry Snacks / Energy Bars / ready to eat food
Glucon D / ORS / Tang / Gatorade sachets
Sun Cap and Sunscreen. (Must)
Personal First aid and Personal Medicine.
Extra Clothes.
Identity Proof.
Please wear Full sleeves and Full Track Pant this will protect from Summer Sun /
Thorns / Insects / Prickles. (Must)

Cancellation Policy
75% refund if notified via phone conversation 8 or more days prior to the event
date.
50 % refund if notified via phone conversation 4 to 7 days prior to the event date.
No refund if the cancellation requested is less than 3 days prior to the event date
No show No Refund.
Event Tickets cannot be transferred to another date against cancellation.
Event Tickets cannot be transferred to another person against cancellation.


If the event gets canceled we will refund "Trek Amount" only.
If the event is canceled due to any natural calamity, political unrest or other such
reasons beyond our control the same cancellation policy will apply.
Refunds won't be issued if you cannot attend the event due to heavy rains, floods,
traffic jams, car breakdowns or a personal medical emergency.
Your booking cannot be shifted to another date if you cannot attend the event due
to heavy rains, floods, traffic jams, car breakdowns, or a personal medical
emergency.
If your area is prone to flooding, traveling from a flooded area, heavy traffic, heavy
rains, missing the train, or any other reason, if you cannot attend the event, we
won't issue a refund or shift you to another date.
Management won't be held responsible if you are stuck due to heavy rains, traffic
jams, personal emergencies or floods during the event.
If you are bringing kids, please understand the possibility of getting stuck or
delayed. You might have to stay back due to heavy rains, floods, bus breakdowns,
and rush at the trekking destination. We won't be able to refund or shift you t
another date. You will have to wait it out till the weather clears.
Due to bad weather, floods, sudden changes in government rules, and
overcrowding at the destination trek, the organizer has the right to change the
trekking destination.
During the trek , due to any circumstances seen or unseen trek leader has the right
to cancel the trek for safety reason. No refund shall be is


Treks and Trails Event Rules
Kindly carry one Identity proof, at least for the trek with your address.
We all are going for an adventurous and exciting trekking expedition; please Do Not
misinterpret it as a PICNIC or LEISURE TOUR.
The leader's decision will be final, and all the members should abide by it.
We do not destroy or dirty the archaeological, historical monuments, natural habitat
on the trek.
Swimming is not allowed in the lake or water tank on the forts. Locals use that
water for drinking.
Putting your feet in water tanks or on the canon is not allowed on our treks.

Any addiction is strictly prohibited, e.g. drinking, smoking, chewing tobacco anyone
caught doing it will have to exit the trek without a refund and travel back on own
expense.
People caught smoking or drinking alcohol will be asked to exit the event on an
immediate basis.
Please do not carry or wear any valuables, ornaments, jewellery, etc. If carried, then
we Do Not take any liability for the same.
Rock Climbing, Rappelling, Trekking, or any adventure activity is potentially risky.
For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any
accident or compensation in whatsoever manner.
We should strictly follow the code of conduct to avoid troubling our fellow trekkers
or other people from our group or outside.
Listening to music on earphones or Bluetooth speakers is not allowed while

trekking.
Bluetooth speaker not allowed inside the homestay or camping tents.
Drinking/smoking,/eating is not allowed inside the tents.
If you damage the tent, break the tent poles, you will have to pay us for the whole
new tent on MRP.
If you are late for the bus pickup and are not reachable on the phone during your
bus pickup, the trek leader will leave without you, and we will provide no refund.
Please check things to carry and wear trekking shoes on our treks.






: *🚩🚩शिव छत्रपतींचा प्रसिध्द वासोटा किल्ला ट्रेकिंग 🚩🚩🚩

वासोटा ट्रेकर्स साठी वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्ट चे स्पेशल पॅकेज 

 *_रूम स्टे :2000/- प्रत्येकी (23 तासांसाठी* )_ 
 _
 *_टेन्ट स्टे :1500/- प्रत्येकी (23 तासांसाठी_ )*_* 

🦚🦜अनुभवा मुनावळे गावातील नंदनवन 🦚🦜

आजकालच्या धावपळीच्या आणी ताणतनावाच्या जीवनामध्ये वर्षातून किमान दोन दिवस स्वतःसाठी तनावमुक्त जगले पाहिजे. 🤗

म्हणूनच 2 दिवस निसर्गाच्या कुशीत रहा. आणी रिफ्रेश होऊन पुन्हा आपल्या कार्याला नव्या दमाने  नव्या जोमाने  सुरुवात करा. 🤝

 
कास पठारापासून पुढे 12 किलोमीटर गेल्यावर हा नैसर्गिक स्वर्ग अनुभवता येतो.

 *वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट चे स्पेशल वासोटा ट्रेकिंग पॅकेज* 👇

मुनावळे गावातून बोटीमधून साधारणत: 45 मिनिटे प्रवास करून पुढे गेल्यावर नयनरम्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध *"वासोटा"* किल्ला, आणी दऱ्या डोंगरांनी नटलेले हे निसर्गरम्य ठिकाण. 🏜️
 
🟠वासोटा गडावरील प्रेक्षणीय स्थळे 🟠

🛕महादेव मंदिर 

🛕मारुती मंदिर आहे.

🏛️इंग्रजांनी तोफांच्या माऱ्यानंतर मोठ्या वाड्याचे काही अवशेष 

⛰️🏔️सहयाद्री पर्वत रांगा 

🏜️नागेश्वरी गुहा (सुळका)

सातारा जिल्ह्यातील मिनी कश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण.

वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्टच्या पर्यटकांना मिळणाऱ्या अतिरिक्त सुविधा 

 *वासोटा किल्ला ट्रेकिंग पॅकेजमध्ये समाविष्ट गोष्टी.* 



 🟢 *चेक इन टाईम* दुपारी 5.00 नंतर कधीही

🟡 *चेक आऊट टाईम* दुपारी 4.00 पर्यंत 

 ☕वेलकम चहा

💃 ग्रुप डान्सची सोय. 

 🎤कराओके म्युझिक सिस्टीम 

 ♨️कॅम्प फायर

 🏊‍♂️ कोयना तलावात पोहण्याचा आनंद.

 ♟️बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.

🍽️ रात्री व्हेज नॉनव्हेज डिनर 

?️ नदीकिनारी राहण्यासाठी प्रशस्त रुम्स / ऊबदार टेन्ट.

 ☕सकाळी चहा आणि नाष्टा

 वासोटा ट्रेकिंगसाठी जाताना वासोटा किल्ल्यावर जेवण्यासाठी चपाती - भाजी, खर्डा, लोणचे याचा टिफिन.

🚣‍♀️ वासोटा ट्रेकिंग ला जाण्यासाठी बोट ची व्यवस्था मोफत.

🏜️ वनविभाग एन्ट्री फी (फॉरेस्ट फी) रिसोर्ट मार्फत.

😎 गाईड फी रिसोर्ट मार्फत.

🚤 बोट पार्किंग फी रिसॉर्ट मार्फत 

 ☕किल्यावरुन आल्यानंतर चहा

 **परिसरातील कोल्हापुरी चवीचे एकमेव ठिकाण ** ( कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ) चविष्ट व्हेज - नॉन व्हेज 

 📝 गुगल ला रिसॉर्ट बाबात पर्यटकांचे अभिप्राय (Review) चेक करा आणी मगच बुक करा..

🙏आमची सर्व्हिस आणी जेवणाची चव पहा आणि आपणांस सेवा देण्याची संधी आम्हास द्या..



संपर्क  : 9272048884


[01/05, 11:33 am] Vasota Riverside Resort: *🚩🚩 *वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट चे स्पेशल लोकल बोटिंग पॅकेज* 👇 🚩🚩


 *_रूम स्टे : 2000 प्रत्येकी (23 तासांसाठी* )_ 
 _
 *_टेन्ट स्टे :1500प्रत्येकी (23 तासांसाठी_ )*_

*लहान मुलांसाठी पॅकेज

5 वर्षे पर्यंत फ्री.

5 ते 10 वर्षे 70% चार्जेस 

10 वर्षे वरील मुलांसाठी पूर्ण चार्जेस* 


🦚🦜अनुभवा मुनावळे गावातील नंदनवन 🦚🦜

आजकालच्या धावपळीच्या आणी ताणतनावाच्या जीवनामध्ये वर्षातून किमान दोन दिवस स्वतःसाठी तनावमुक्त जगले पाहिजे. 🤗

म्हणूनच 2 दिवस निसर्गाच्या कुशीत रहा. आणी रिफ्रेश होऊन पुन्हा आपल्या कार्याला नव्या दमाने  नव्या जोमाने  सुरुवात करा. 🤝

 
कास पठारापासून पुढे 12 किलोमीटर गेल्यावर हा नैसर्गिक स्वर्ग अनुभवता येतो.

🚣🏿‍♀️ *लोकल बोटींग पॅकेज* -


 🟢 *चेक इन टाईम* दुपारी 5.00 नंतर कधीही

🟡 *चेक आऊट टाईम* दुपारी 4.00 पर्यंत 

 ☕वेलकम चहा

💃 ग्रुप डान्सची सोय. 

 🎤कराओके म्युझिक सिस्टीम 

 ♨️कॅम्प फायर

 🏊‍♂️ कोयना तलावात पोहण्याचा आनंद.

 ♟️बॅडमिंटन, कॅरम, चेस सारख्या गेम्स.

🍽️ रात्री व्हेज नॉनव्हेज डिनर

🏕️ नदीकिनारी राहण्यासाठी प्रशस्त रुम्स / ऊबदार टेन्ट.

 ☕सकाळी चहा आणि नाष्टा

 🚣🏿‍♀️बोटीने 3.00 तासाची बोटिंग सफर पॅकेज मध्ये समाविष्ट.

एकूण 4 पर्यटन स्थळे दाखवली जातात

 *1. दत्त मंदिर* 
 *2. त्रिवेणी संगम* 
 *3. वासोटा किल्ला दर्शन* 
 *4. कोयना अभयारण्य 
 

🍽️लोकल पॅकेज वरून आल्यावर रिसॉर्ट वर दुपारचे जेवण

☕चेक आउट करताना चहा 


 **परिसरातील कोल्हापुरी चवीचे एकमेव ठिकाण ** ( कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ) चविष्ट व्हेज - नॉन व्हेज 

 📝 गुगल ला रिसॉर्ट बाबात पर्यटकांचे अभिप्राय (Review) चेक करा आणी मगच बुक करा..

🙏आमची सर्व्हिस आणी जेवणाची चव पहा आणि आपणांस सेवा देण्याची संधी आम्हास द्या..


आपण आपले बुकिंग वेबसाईट वर करा 

संपर्क  : 9272048884






We are happily announcing one day study tor to Junglee Jaigad fort on 27 April 2025

Junglee Jaigad is a lesser-known fort located in the dense forests of the Koyna Wildlife Sanctuary in Maharashtra. It is a hidden gem for trekkers who love offbeat trails, historical sites, and untouched nature.

We will start by  privete Non A/C bus from Pune on mid night of 26 April. After reaching to Koyna Nagar , breakfast and permission from forest department , we will explore dense forest of Junglee  Jaigad, Kokankada and Ramban point, after having lunch we will start our return journey. 
    Trek fees from Pune will be 1800 /- ( One thousand eight hundred rupees only ).

If someone want to attend trek directly from Koyna Nagar, then trek fees will be 1000/-( One thousand rupees only )

Trek is through dense forest and is of  easy level , so any fit person can attend it. As Junglee Jaigad is very rarely visited fort, grab this opportunity to visit it, in this summer. 

For more details contact
Swapnil Jirage
Mobile- 9960022621

छत्रपती शिवरायांचा विजय असो... 
   🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जंगली जयगड अभ्यास सहल  
⛳ आयोजक :- "किल्ले आणि इतिहास परिवार..."
🚩 दिनांक :- २७ एप्रिल (रविवार) एक दिवसीय अभ्यास सहल.
🔱 दि. २६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पुण्यातून निघून पहाटे कोयनानगरला पोहचून नाष्टा करुन वनखात्याची परवानगी घेउन जंगली जयगड आणि कोकणकडा बघायचा आहे.  बारा वाजेपर्यंत जंगली जयगड बघून जेवण करुन  रामबाण पॉईंट बघायचा आहे आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुण्याला परत यायचे आहे. 
 (प्रवेश निश्चिती शुक्रवार  २५ एप्रिल संध्याकाळीपर्यंत )
🌸 अभ्यास सहल शुल्क :- 
      ₹. १८०० /- ( एक हजार आठशे रुपये फक्त) प्रतिव्यक्ती
  अभ्यास सहल शुल्कात खालील सर्व बाबी समाविष्ट ( कोणतेही छुपे खर्च नाहीत.)
१) पुणे ते पुणे नॉन ए.सी. बस प्रवास
२) नाष्टा,सकाळचा चहा, जेवण, वन खात्याची परवानगी, गाईड फि, संध्याकाळचा चहा
३) एक्पर्टाइज
💊 प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध

📱नाव नोंदणी संपर्क :-
श्री. स्वप्निल जिरगे
9960022621 
🔱 काही महत्वपूर्ण बाबी 🔱
🌸 दोन्ही गडावर फारशी चढाई नाही त्यामुळे कोणीही व्यक्ती ट्रेकला येउ शकते. 
🌸 कोयनेच्या घनदाट जंगलाचा अनुभव व या परिसराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे जंगली जयगड हा खुप कमी जणांनी बघीतलेला गड आहे. परवानगी मिळणे असल्यामु़ळे हा ट्रेक जरुर जॉईन करा. दुर्गभ्रमंतीबरोबर जंगलाची भटकंती आणि वन्य प्राणी दर्शन हे सर्व अनुभवण्यासाठी चला. 

 🚌 मर्यादित जागा असल्याने आपला प्रवेश त्वरित निश्चित करा...
ज्यांना खरोखरच मोहिमेला यायचे आहे, फक्त त्यांनीच ग्रुप जॉईन करावा. टाईमपाससाठी आलेल्यांना मोहीमेच्या तातडीने रिमुव्ह करण्यात येईल. कृपया मोठ्या संख्येने या अभ्यासमोहीमेत सामिल व्हावे हि विनंती. 
किल्ले आणि इतिहास दुर्गाभ्यास परिवार...
   ध्यास इतिहासाचा...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩




छत्रपती शिवरायांचा विजय असो... 
   🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भैरवगड, दातेगड अभ्यास सहल  
⛳ आयोजक :- "किल्ले आणि इतिहास परिवार..."
🚩 दिनांक :- ६ एप्रिल (रविवार) एक दिवसीय अभ्यास सहल.
🔱 दि. ५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पुण्यातून निघून पहाटे कोयनानगरला पोहचून नाष्टा करुन वनखात्याची परवानगी घेउन भैरवगड बघायचा आहे.  बारा वाजेपर्यंत भैरवगड बघून जेवण करुन पाटणजवळ्च्या दातेगडाला भेट द्यायची आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुण्याला परत यायचे आहे. 
 (प्रवेश निश्चिती शुक्रवार  ४ एप्रिल संध्याकाळीपर्यंत )
🌸 अभ्यास सहल शुल्क :- 
      ₹. २००० /- ( दोन हजार रुपये फक्त) प्रतिव्यक्ती
  अभ्यास सहल शुल्कात खालील सर्व बाबी समाविष्ट ( कोणतेही छुपे खर्च नाहीत.)
१) पुणे ते पुणे नॉन ए.सी. बस प्रवास
२) नाष्टा,सकाळचा चहा, जेवण, वन खात्याची परवानगी, भैरवगडापर्यंत जीप, संध्याकाळचा चहा
३) एक्पर्टाइज

 दिनांक ५ एप्रिल  शनिवार

  जेवण - शाकाहारी (दुपारी १२:००)
☕ चहा (संध्याकाळी ०५:००)
💊 प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध

📱नाव नोंदणी संपर्क :-
श्री. स्वप्निल जिरगे
9960022621 
🔱 काही महत्वपूर्ण बाबी 🔱
🌸 दोन्ही गडावर फारशी चढाई नाही त्यामुळे कोणीही व्यक्ती ट्रेकला येउ शकते. 
🌸 कोयनेच्या घनदाट जंगलाचा अनुभव व या परिसराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व जाणवल्यामुळे भैरवगडावर जाण्यासाठी भविष्यात परवानगी मिळेल याची खात्री नाही. कदाचित अखेरची संधी. 

 🚌 मर्यादित जागा असल्याने आपला प्रवेश त्वरित निश्चित करा...
ज्यांना खरोखरच मोहिमेला यायचे आहे, फक्त त्यांनीच ग्रुप जॉईन करावा. टाईमपाससाठी आलेल्यांना मोहीमेच्या तातडीने रिमुव्ह करण्यात येईल. कृपया मोठ्या संख्येने या अभ्यासमोहीमेत सामिल व्हावे हि विनंती. 
किल्ले आणि इतिहास दुर्गाभ्यास परिवार...
   ध्यास इतिहासाचा...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩




treksandtrails.org

Dategad Trek from Pune | Treks and Trails India


Dategad Fort 

Dategad Fort is a small fort located 75 kilometres South of Satara, in the Maharashtra state of India. This fort can be visited in a day from Satara. The nearest town is Patan. The base village is Tolewadi from where an easy trek of 45 minutes leads to the entrance of the fort.

Dategad Fort Trek Event Details 

  • Dategad Fort Type: Hill Fort
  • Dategad Height: 3425 feet
  • Grade: Medium
  • Endurance: Medium
  • Base Village: Tolewadi, Patan
  • Cost - Rs. 1299/- per person      

Dategad Fort Trek from Pune 

Day 1

04:45 am - Meet at McDonald’s, J.M. Road.

05:00 am - Departure for Dategad Fort.

05:30 am - Pick up at Navale bridge.

09:00 am - Reach at base village and Breakfast.

09:30 am - Start ascending.

10:30 am - Reach on top and explore the fort.

11:30 am - Start descending.

12:30 pm - Reach at base village and a lunch (please carry packed lunch)

01:30 pm - Start return journey.

05:00 pm - Approx. arrival at Pune.

Please note

  • Please carry sufficient water for the trek
  • Please carry packed lunch for the trek

1 Day Available on request

date & duration availability price

  • Sorry no more departures available. You could get in touch with us at highfive@treksandtrails.org if you'd like to make a booking.
  • Inclusions/Exclusions

    What we'll give/What we won't

    What is included in the tour

    • Pune to Pune travel by private non-AC vehicle
    • 1 veg breakfast 
    • Trek Leader expertise charges

    What is NOT included in the tour

    • Lunch for the trek
    • Mineral water/lime water/ purchased for personal consumption
    • All kinds of Extra Meals / soft drinks ordered.
    • Any kind of personal expenses.
    • Any kind of cost which is not mentioned in the cost includes above.
    • All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather.
    • Any medical / Emergency evacuations if required.

    Things to Carry

    Things to Carry

    • 2/3 liters of water
    • Lunch for the trek
    • Trekking Shoes provide more grip and comfort on trek
    • Good Torch must with extra battery
    • Jacket
    • Some Dry fruits / Dry Snacks / Energy Bars
    • Glucon D / ORS / Tang / Gatorade sachets
    • One Day Backpack 20 to 30 liters
    • Sun Cap and Sunscreen
    • Personal First aid and Personal Medicine
    • Identity Proof
    • Please wear Full sleeves and Full Track Pant this will protect from Summer Sun / Thorns / Insects / Prickles

    Covid Safety Guidelines

    • Before planning for any adventure activity, please improve your minimum physical fitness. Most of us have been at home for a lockdown period.
    • Please convey your real medical conditions to Treks and Trails India while enrolling for the event.
    • Kindly wear three-layered masks, N95. Carry an extra disposable mask with you. Please ensure all participants, leaders, staff, and general persons wear masks before interacting with them.
    • Carry with your hand wash, sanitizer bottle, and clean your hands before touching food and objects.
    • Cover-up wear full sleeves shirts and full pants, hiking shoes, caps, and face bandana over your mask. Covering up will help reduce exposure to the Covid19 virus.
    • Bring your food and water with necessary cutlery like utility mug, fork, and spoon. Your mug can be used for cooking, eating, and drinking water. Carry your reusable water bottles; please don’t share with others.
    • Cooperate for temperature checks, questions reading any symptoms, and oxygen level checks; these are done to help you limit the spread of the virus. All these checks will be conducted multiple times during the activities.
    • Kindly do not register for the event or travel if you have come in contact with someone who has Covid19 in the last 14 days.
    • If you have any symptoms like fever, dry cough, weakness, body aches, etc., at the time of screening. You won't be able to participate in the event. You will have to be evacuated on the medical condition and should report to the nearest healthcare center.
    • Maintain a distance of six feet or more while sleeping at night. Incase distance is not possible, try sleeping in a criss-cross manner to avoid face proximity.
    • Please bring your garbage back to the city and dispose of it in your bin.
    • Consuming any alcohol, cigarettes, pan masala, tobacco, drugs should be avoided; they induce a lot of spitting, urinating, and passive smoke, which can be harmful for the general population.
    • Avoid touching new surfaces and touching your mask and face continuously.
    • If your adventure destination is overcrowded, be prepared to change your location or wait for the crowd to reduce.
    • If any participant, trek leader test positive after returning from the event within 14 days of the Activity. They should maintain transparency and inform Treks and Trails India. It will help all others isolate themselves and get tested. Participants and Treks and Trails will cooperate to help manage the situation.
    • Carry your own personal gear.
    • Keep the conversation with unknown people to a minimum and maintain a distance of more than 6 feet while talking.
    • Avoid speaking with the general population and maintain distance to keep yourself safe in these difficult times.
    • Participant need to install the Arogya Setu app

    Cancellation Policy

    • 75% refund if notified via phone conversation 8 or more days prior to the event date.
    • 50 % refund if notified via phone conversation 4 to 7 days prior to the event date.
    • No refund if the cancellation requested is less than 3 days prior to the event date 
    • No show No Refund.
    • Event Tickets cannot be transferred to another date against cancellation.
    • Event Tickets cannot be transferred to another person against cancellation.
    • If Trek gets canceled we will refund "Trek Amount" only.
    • If the event is canceled due to any natural calamity, political unrest or other such reasons beyond our control the same cancellation policy will apply.

    Treks and Trails Event Rules

    • Kindly carry one Identity proof, at least for the trek with your address.
    • We all are going for an adventurous and exciting trekking expedition; please Do Not misinterpret it as a PICNIC or LEISURE TOUR.
    • The leader's decision will be final, and all the members should abide by it.
    • We do not destroy or dirty the archaeological, historical monuments, natural habitat on the trek.
    • Swimming is not allowed in the lake or water tank on the forts. Locals use that water for drinking.
    • Putting your feet in water tanks or on the canon is not allowed on our treks.
    • Any addiction is strictly prohibited, e.g. drinking, smoking, chewing tobacco anyone caught doing it will have to exit the trek without a refund and travel back on own expense.
    • People caught smoking or drinking alcohol will be asked to exit the event on an immediate basis.
    • Please do not carry or wear any valuables, ornaments, jewellery, etc. If carried, then we Do Not take any liability for the same.
    • Rock Climbing, Rappelling, Trekking, or any adventure activity is potentially risky. For all these events, you are at your own risk. Organizers are not responsible for any accident or compensation in whatsoever manner.
    • We should strictly follow the code of conduct to avoid troubling our fellow trekkers or other people from our group or outside.
    • Listening to music on earphones or Bluetooth speakers is not allowed while trekking.
    • Bluetooth speaker not allowed inside the homestay or camping tents.
    • Drinking/smoking,/eating is not allowed inside the tents.
    • If you damage the tent, break the tent poles, you will have to pay us for the whole new tent on MRP.
    • If you are late for the bus pickup and are not reachable on the phone during your bus pickup, the trek leader will leave without you, and we will provide no refund.
    • Please check things to carry and wear trekking shoes on our treks. 

    FAQ

    Frequently Asked Questions

    How to reach to Kamalgad Fort

    The Fort is easily approachable from Bhor or Wai in Pune. Tupenwadi the base village of the fort, which is close to Wai, about a distance of 30 km and 46 km from Bhor. Kamalgad Fort trek one way is around 6 km. Two hours of trekking one way. 

    Kamalgad Fort History

    The fort architect is not documented or unknown. During the Maratha rule, Pandavgad, Kamalgad, and different fortresses in this region controlled by a Mokasaddar, meaning the administrator from Bijapur. 
    Ancient records drafted in the Modi script of the Marathi language introduce the fortress as Kattalgad. These records or documents are being studied by experts currently. Kamalgad surrendered to the British in April 1818 following opposition to the British company headed by Major Thatcher. British utilized the Fort to execute inmates of the war. 

    Places to see Kamalgad Fort

    The single construction on the summit is a hole. Which is the remains of a well sunk directly into the rock, within the earth beneath, which yet has water? The hole is twenty feet deep. Criminals were given death sentences here after being placed on the sides of the Well wall on recesses. Criminals had two choices to starve or drown as part of their death sentence. Records indicate the hole created when quarrying local red stone known as geru available in this region.  



    One Day Trek to Dategad & Vasantgad

    August 13, 2023 @ 12:00 am - 3:30 pm

    Dategad: In the Satara area, Dategad is a little fortification close to Patan. The fort had strategic value before the arrival of the British. The entrance is a magnificent structure with a distinctive shape. Near the entryway, there are enormous statues of Lord Ganesh and Lord Hanuman. There is a step well on the plateau near the summit.
    Vasantgad is a fort close to Talbid. The tomb of SarSenapati Hambirrao Mohite is what makes Talbid famous. The history goes back to the 12th century and was largely ruled by the Maratha Empire till 1818 AD.
    The fort’s illustrious past is commemorated by the remains. The fort’s advantageous location reflects its historical significance. The Chandragiri cave, one of Samarth Raamdas’ eight, is also adjacent to the fort.
    #FactFile
    Odyssey Type: One day,
    Difficulty Level: Medium
    Endurance Level: Medium
    Route: Pune – Khed Shivapur – Satara – Umbraj – Patan – Talbid – Satara – Pune
    Distance From Pune: 190 Kms
    Region: Karad
    Altitudes: Dategad: 800 mtrs
    Gunawantgad: 750 mtrs
    Vasantgad: 500 mtrs
    Itinerary
    05:30 Reporting
    06:00 Departure towards Dategad,
    Breakfast on the way
    09:30 Arrival at base village, Briefing & Trek starts
    12:00 Descend from Dategad
    13:30 Lunch
    14:30 Departure to Vasantgad
    15:30 Explore Vasantgad
    18:00 Descend & Departure to Pune
    18:30 Tea break
    21:30 Arrive at Pune
    #Registration
    Step 1: Contact Call us on +91 9764384221 for seat availability.
    Step 2: Payment You have for options to pay us: (a) Online Transfer, (b) UPI, (c) PayTM/ GooglePe, (d) Cheque.
    Step 3: Fill the Enrolment Form Once transaction is complete, please fill the Enrolment form
    Step 4: Confirmation You will receive communication (Email/ Text/ WhatsApp) from us regarding your booking details and additional information regarding the trip.
    Online Transfer:
    Bank Name: HDFC Bank
    Branch: Hingne Khurd
    IFSC / RTGS: HDFC0000825
    A/C Name: Zenith Odysseys
    A/C Type: Current Account
    A/c Number: 50200005722253
    UPI Address: ZenithOdysseys@HDFCBank
    PayTM / GooglePe: +91 97643 84221
    Cheque: can be drawn in favour of Zenith Odysseys
    ** Participation to activity is subject to realization of cheque.
    #ThingstoCarry
    Compulsory
    1) Water 2 Liters or more
    2) Good Rucksack with rain cover
    3) Personal Medicines if any
    4) ID Proof
    Suggested
    1) Dry foods like: Chikki, Chocolates and cakes etc.
    2) Extra Pair of clothes & sleepers/ floaters
    3) Rain protection / wind cheater/ cap / scarf as per the weather.
    4) Hand Towel
    5) Sunscreen lotion / face wash
    6) Camera or Binoculars
    #Charges
    Rs. 1449 per person
    Inclusions
    1) Travel by a private non-AC bus.
    2) Breakfast, Lunch & High Tea
    3) Adventure Experts & Leaders
    4) First aid kit.
    5) Safety & Tested Equipment
    6) Government Service Tax
    7) Personal Entry, Toll & Parking etc
    Exclusions
    1) Personal orders of Tea, coffee, Cold Drinks, Mineral Water, Breakfast, Lunch, Dinner, etc.
    2) Personal expenditure of any kind.
    3) Insurance Coverage.
    4) Medical expenses other than “First aid”.
    5) Any other charges not specifically mentioned in “Fee Includes”

    https://www.facebook.com/events/270270315624204/



    Gunwantgad and Dategad and forts near Karad in the Patan region. Both these forts are offbeat destination.

     

    Height of Fort

        
    Gunwant 862 mtrs 


    Dategad 1027 mtrs


    Meeting Time and Place    


    Fergusson College Main Gate at 11.00 pm Sharp !!!


    Itinerary    


        
    Night 1 :


    > Departure from Pune at 11.15pm


    > Journey to base of Gunvantgad.


    Day 2: 


    > Early morning wake up call at 6am 


    > Fresh up, breakfast and get ready for trek 


    > Start trekking climb Gunvantgad and explore fort 


    > Back to Patan, lunch in Patan. proceed Dategad.


    > climb Dategad and explore fort. 


    > start return journey by 6 pm 


    > Back to Pune by 9.30pm


    What to bring    

    1. Luggage packed in big good trekking sack, all luggage packed in plastic bag.


    2. Complete spare set of clothes & socks


    3. Water bottle (atleast 1.5 ltr) compulsory


    4. Electral/ Glucon-d energizers and personal medication


    5. A sweater/warmwear/rainwear (as per the season)


    6. Good trekking shoes (sandles, chappals, floaters not permitted)


    7. A sleeping bag / Thermocol mat and shawl / normal satranji and shawl: (only for overnight treks)


    8. Torch with Extra pair of Batteries


    9. Camera, Binocular (Optional)

    Cost Plans :
    • Plan 1
      - 1500 INR per person :

     


    Whats Included in Fees


    > Pune to Pune transportation by private bus including toll and parking charges


    > Tea/Breakfast, evening tea/Snacks, Lunch on the Sunday 


    > Printed information brochure


    > expertise, safety equipments 


    > First aid kit


    Whats NOT included in Fees


    > Dinner on Sunday


    >Mineral water or soft drinks 


    > Anything not mentioned in the included list consider it to be out of package


    https://deccanhikersandoutdoors.com/travel/junglee-jaigad-dategad/

    Junglee Jaigad & Dategad

     


    Junglee Jaigad – Junglee Jaigad is a lesser-known fort located in the dense forests of the Koyna Wildlife Sanctuary in Maharashtra. It is a hidden gem for trekkers who love offbeat trails, historical sites, and untouched nature.

    Highlights of Junglee Jaigad:

    • Dense Forest Trail: The trek takes you through thick jungle paths filled with lush greenery and diverse flora and fauna.
    • Secluded & Untouched: Unlike popular forts, Junglee Jaigad remains peaceful and less crowded, making it perfect for explorers.
    • Scenic Views: The fort offers stunning views of the Koyna Dam backwaters and the surrounding Sahyadri hills.
    • Historical Significance: Built to guard the Koyna region, this fort has historical remains that date back to the Maratha era.

    Dategad – Dategad is a lesser-known yet historically significant fort in Maharashtra. It is located near Patan in the Satara district and offers a blend of history, adventure, and scenic beauty. The fort is relatively easy to climb, making it suitable for beginners and history enthusiasts.

    Highlights of Dategad:

    • Rock-Cut Caves & Temples – The fort has ancient rock-cut structures, including a Lord Ganesh temple.
    • Strong Fortification – The bastions and walls of the fort are still in good condition.
    • Less Crowded – Unlike famous forts in Maharashtra, Dategad offers solitude and a peaceful trekking experience.
    • Historical Significance – Dategad was part of the Maratha Empire and played a strategic role in regional defense.
    • Scenic Views – The fort provides panoramic views of the surrounding hills and valleys.

    Junglee Jaigad & Dategad Trek Highlights

     Junglee Jaigad Fort: A dense forest trek leading to a secluded fort in the Koyna Wildlife Sanctuary, offering breathtaking valley views.
     Dategad Fort: A strategically built fort with well-preserved bastions, rock-cut water cisterns, and a temple dedicated to Lord Ganesh.
     Scenic Views: Enjoy panoramic sights of the Sahyadris, Koyna backwaters, and lush green valleys.
     Thrilling Trekking Experience: A mix of easy and moderate trails through dense forests and open plateaus.
     Rich History: Both forts hold historical significance from the Maratha and Satavahana eras.
     Tranquil Atmosphere: Less crowded trails, ideal for nature lovers and peace seekers.
     Diverse Flora & Fauna: Spot unique wildlife and exotic plants in the Koyna Wildlife Sanctuary.
     Rock-Cut Structures: Explore ancient carvings, caves, and water tanks on both forts.
     Photography Paradise: Capture stunning landscapes, fort ruins, and misty surroundings.
     Perfect Weekend Adventure: A great getaway for history buffs, trekkers, and explorers.


     Tour Details

    • Fort type: Hill Forts
    • Region: Koyana
    • Duration: 1 nights/ 1 days
    • Difficulty level: Medium to High
    • Pickups from Pune


    What is included in the tour

    • Travel by private Non-Ac vehicle
    • 1 Breakfast and 1 Lunch
    • Toll Charges, Permit Charges, Tax
    • Tour leader
    • Tickets
    • First Aid

    What is NOT included in the tour

    • Meals while travelling
    • Dinner
    • Additional activities charges
    • Any Activity which are not included in the package
    • Mineral water/lime water/ purchased for personal consumption
    • All kinds of Extra Meals / soft drinks ordered
    • Any kind of personal expenses
    • Any kind of cost which is not mentioned in the cost includes above
    • All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather
    • Any medical / Emergency evacuations if required


    Things to Carry
    • 2/3 Liters of water
    • Identity Proof
    • Neck pillow
    • Cap/Hats
    • Sunscreen, moisturizer
    • Powerbank and Charger
    • Camera (optional)
    • Torch with extra batteries
    • Glares
    • Pair of clothes, Towel
    • Winter clothes
    • Beachwear (optional)
    • Casual shoes and flip-flops
    • Sanitary Kit
    • Please avoid wearing Gold and other costly jewellery (at your own risk)
    • Personal medicines (if any)


    Important Notes

    • Scheduled pickup times are subject to change depending on actual start time and Traffic conditions.
    • If there is any delay in the pickup, organizers are not be blamed at all because we don’t intentionally make it Late and we are bound by external factors.
    • Pickup will happen at highways and specific locations only, no after-requests will be entertained to make a pickup at specific locations.
    • Live Location of the vehicle will be shared with the group and you can leave your place according to the live location of the bus.
    • Bus/vehicle will not wait more than 10 minutes at any specific pickup point for travelers, you will be asked to come to the next boarding point at your own cost.
    • Organizers have the right to alter or change the itinerary and their decision will be final.
    • Bus seats preference is given according to booking sequence.
    • Please be humble and respectful towards the organizers any nuiscance caused on the trip will not be entertained and may result in expulsion from the trip without any refund.
    • Sightseeing mentioned depends on time constraints, and if any spot is skipped we are not responsible.
    • You need to follow the timelines given by organizers in order to ensure smooth functioning of the trip.
    • Suitcase are Strictly not allowed, only rucksacks and backpacks are allowed
    • Tour may get cancelled if enough bookings are not received (full refund or seat in another trip/ voucher of trip amount will be provided that can be redeemed anytime within 365 days)





     हनुमान मुर्ती शास्त्र :-
       एप्रिल महिन्यात हनुमान जयंती येत आहे. यानिमीत्ताने आपण हनुमानासंबधीत अधिक जाणून घेणार आहोत. या महिन्यात आपण बर्याच मुर्तींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.
    १) हनुमानाच्या पौराणीक कथा, मुर्तीचे प्रकार, भारतातील हनुमानाच्या मुर्ती
    २) ब्रम्हदेवाची पुजा का होत नाही, आणि इतर समजुती, ब्रम्हदेवाच्या मुर्ती नेमक्या कोठे आहेत
    ३) नाग, वीरगळ, शरभ, व्याल, गध्देगाळ
    ४ ) अष्टदिकपाल, नवग्रह यांची माहिती आणि मुर्तींची माहिती, त्याची वैशिष्ट्य.
    ५ )  मंदीरामध्ये आढळणारी विवीध प्रकारची शिल्पे, कुटशिल्प


    Trek through dense forests to explore the Bhairavgad Fort

    Wonder in to the Chandoli Wildlife Sanctuary in search of the ancient Bhairavgad Fort . A thrilling trek that rewards you with unmatched panoramic vistas

    Trek Includes

    Ex. Pune Travel | Meals | Forest Entry & Guide | Trek Leaders

    inclusions

    what's included?
    • Private Travel: Ex. PuneTravel by comfortable vehicle depending on the respective trek group size
    • Breakfast, Lunch, Evening TeaServed veg. meals as per itinerary only
    • Entry PermitsKalsubai - Harishchandragad Wildlife Sanctuary
    • An Experienced Trek LeadsTeam of certified mountaineers & outdoor experts
    • First Aid Assistance, if needed
    • GSTWith all applicable taxes

    exclusions

    what's not included?
    • Meals / BeveragesAny meals/beverages during transit or not included in itinerary
    • Travel Insurance & Medical ExpensesAny kind of travel or accident insurance, medical treatments during the trip
    • Anything not specifically mentioned in the “Inclusions” section
    जंगली जयगड ट्रेक ( २७ एप्रिल २०२५):
         कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेला, इतिहासाच्या पानात हरवून गेलेला आणि आतातर वनखात्याची परवानगी नसल्यामुळे दुर्गभटक्यांनाही पारखा झालेल्या जंगलॉ जयगडाला भेट देण्याचे नियोजन केले आणि मुंबई, पुणे, सातारा, पाटण आणि कराड अशा विवीध भागातून जमा झालेले दुर्गभटके कोयनानगर जवळच्या नवजा गावी पहाटे सहा वाजता एकत्र जमले. अगदी तीन वर्षाच्या चिमुरडीपासून ते जेष्ट नागरीक असलेल्या, पण अजूनही गडभ्रमंतीची हौस असलेल्या नवजवान उत्साही चमुला चक्क एप्रिलच्या उन्हात थंडी आणि धुके अनुभवयाला मिळाले. पुण्यातून निघताना झालेली चुकामुक आणि ड्रायव्हरने घातलेला घोळ आणि झालेला मनस्ताप हे सर्व मनातून बाजुला गड बघायची उत्सुकता लागली. सकाळचा नाष्टा, चहा ( ट्रेक म्हणले कि अर्थातच पोहे ) उरकून वनखात्याचा गाईड आणि परवानगी घेउन पार सुकलेल्या ओझर्डे धबधब्याचे वाटेत दर्शन घेउन पंचधारा भुयाराच्या बोगद्यापाशी गाडी थांबली. जंगली जयगडावर जाण्याची सध्या परवानगी मिळत नाही. मात्र प्रयत्नाने ती मिळवून, गडाचा इतिहास, भुगोल, कोयनानगरच्या परिसरात उभा केलेल्या वीज निर्मिती प्रकल्प याची माहिती घेउन घनदाट जंगलाच्या वाटेने चढाई सुरु झाली. 
        दुर्ग आणि वन पर्यटन म्हणून याचा विकास करण्याचे नियोजन असल्यामुळे इथे थोड्याफार सुधारणा झालेल्या आहेत. वाटेत घोडेतळे लागले. गडाच्या भेटीला आले कि याच ठिकाणी इंग्रज अधीकारी घोडे बांधून ठेवत म्हणून हे घोडे तळे. इथे मचाण ही लावलेले दिसले. तासा-दिड तासाच्या चढाईने गडमाथा जवळ आला. अचानक पायर्या आणि जांभ्या दगडात बांधून काढलेला बुरुज दिसला. त्यावर ध्वज लावायची सोय आहे, मात्र आता ध्वज नाही. पुर्वी इथे तटबंदी होती, मात्र १९६७ च्या कोयनानगरच्या भुकंपात गडावरील अवशेषाचे मोठे नुकसान झाले. घनदाट झाडीतून पुढे गेले कि वनखात्याने रेलिंग लावून एक पॉईंट तयार केलेला आहे. इथून गडाच्या मुख्य रांगेपासून पुढे आलेल्या डोगरसोंडेचे आणि माथ्याचे दर्शन होते. डौलाने फडकणारा भगवा ध्वज इथून स्पष्ट दिसतो. पुढची वाट थोडी खडतर आणि घसार्याची असल्यामुळे ज्यांना पुढे येणे शक्य नाही , त्यांनी इथेच विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. 
    ज्यांना शक्य आहे ते सर्वजण गडाच्या अगदी टोकाशी जाउन आले. गडावर तसे तुरळक अवशेष आहेत. थोडी तटबंदी, पाण्याची बुजलेली विहीर, दगडी दीपमाळ, देवीचे मंदीर आणि इतर तुरळक अवशेष सोडले तर फार काही नाही. मात्र इथून दिसणारा नजारा भन्नाट आहे. गडावरुन जव़ळपास तीनशे अंशात त़ळाशी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका दिसतो. पायथ्याची पोफळी, शिरगाव, अलोरे, कोळकेवाडी धरण आणि अस्सल दुर्गभटक्यांना अज्ञात असणारा कोळकेवाडी दुर्ग, दक्षिणेला वाहनांची वर्दळ असणारा कुंभार्ली घाट, उत्तरेला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असणारे वासोटा, महिमंडणगड् आणि खोगीराच्या आकाराचा मधुमकरंदगड हा सर्व पॅनोरमा दिसतो. या सर्वांवर नजर ठेवणे हेच याचे काम. १३ एप्रिलच्या भैरवगड भेटीत जंगली जयगड तिथूम दिसला होता. तो परिसर टोकावरुन दिसतो. 
       गडफेरी उरकून राहिलेले दोन पॉईंट म्हणजे कोकणकडा आणि रामबाण ! मी जंगली जयगडाला भेट दिली होती ती २००१ साली. त्यावेळी हे दोन्ही पॉईंट अज्ञात होते. आता ते नव्याने दाखवले जातात. मला ही ते बघायची उत्सुकता होती. गाईडने त्या दिशेन वाटचाल सुरु केली. मात्र अपेक्षेपेक्षा हे दोन्ही पॉईंट खुपच लांब अंतरावर निघाले, बरेच जण पहिल्यांदाच गडभ्रमंतीला आलेले असल्यामुळे त्यांचे खुप हाल झाले. तसेच जंगली जयगडावर आता पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे जवळचे पाणीही संपले. कसाबसा कोकणकडा पॉईंट बघून आम्ही उतरायला सुरवात केली. वाटेत एक भन्नाट जागा बघायला मिळाली, 'विंडो पॉईंट'. दोन उताराच्या मधोमध हा पॉईंट आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजुच्या टेकड्यावर बिलकुल वारा लागत नसताना इथेच एका छोट्या खिंडीत सुखद झुळका येत असतात. इथे रेलिंगचीही सोय केली आहे. शेवटी एकदाचे पायर्याच्या वाटेने आम्ही नवजा -पंचधारा बोगदा वाटेवर पोहचलो. नवजा गावात जेवण घ्यायला जवळपास चार वाजले. ड्रायव्हरने इथेही असहकार आंदोलन केले. एकंदरीत हा ट्रेक बरेच काही शिकवून गेला.ड्रायव्हरचा वाईट अनुभव, गाईडने व्यवहारीक विचार न करता दाखवलेला अनावश्यक उत्साह. असो. डोंगराची शिकवणी म्हणतात, ती हीच !
       तर मंडळी तुम्हालाही अश्या भटकंतीचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्याबरोबर जरुर चला. येत्या शनिवारी, रविवारी म्हणजे १०, ११ मे २०२५ ला आपण वासोटा ट्रेक आणि कोयना बॅ़क वॉटर ट्रिप आयोजित करत आहोत. ज्यांना यामध्ये सामील व्हायचे आहे, त्यांनी जरुर संपर्क करा. 

    श्री. स्वप्निल जिरगे
    मोबाईल :- 9960022621

    शिवनेरी

     अग्नि व प़थ्वी यांच्या  मिलनातून सहयाद्रीचा जन्म झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकातून सहयाद्री निर्माण झाला. सह्याद्रीतील या गड किल्यांचे महात्म्य हे तिर्थक्षेत्रापेक्षाही जास्त आहे. हे दुर्ग म्हणजे स्वातंत्राची धगधगती अग्निकुंड आहेत.   स्वातंत्र, स्वाभिमान, समता, राष्टप्रेम यांची शिकवण देणारी तिर्थक्षेत्रे आहेत. आयुष्य जाणण्यासाठी, जागवण्यासाठी, पेटवण्यासाठी, आपल्यातील आपल्यालाच ओळखण्यासाठी, राष्टीय चारित्र निर्माण करणे व ते टिकवणे या दृष्टीने दुर्गाचे महत्व फार आहे.
           सह्याद्रीतील या दुर्गमालिकेतील एक महत्वाचा दुर्ग म्हणजे 'शिवनेरी'.शिवनेरी गड हा प्राचीन असून नाणेघाटाच्या ओळात व भिमाशंकराच्या जटात वसलेला आहे.किल्ले शिवनेरी माहीत नसलेला व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे दुर्मिळच! महाराष्ट्राचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थान. यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. शिवनेरी हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला समुद्रसपाटीपासून ३,५०० फूट उंचीवर आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरातील नाणेघाट डोंगररांगेत हा किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. हा किल्ला अनेक वेगवेगळ्या राजवटींच्या आधिपत्याखाली होता. 





     अनादी काळापासून शिवनेरी व्यापारी व्यापारी व जकातीचे केंद्र होते.दुर्ग शिवनेरी ज्या जुन्नए परिसरात वसला आहे त्या जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. शिवनेरीचे निर्माण कार्य कोणी केले या बाबत इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला कोळी राजांनी निर्माण केला.सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट,शिलाहार्,यादव या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.
                त्यानंतर या दुर्गावर शिलाहार, राष्टकुट, वाकाटाक, यादव राजांनी राज्य केल्याचे दिसून येते. इ.स.१३४७ पासून दिल्लीच्या सुलतानशाहीत सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यात हसन - गंगु - बहामनी याने आपले स्वत:चे राज्य स्थापन केले. हेच बहामनी राज्य होय.नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला.इ.स. १४७० मध्ये ऑर्थरशिअस निकीतान हा रशियन प्रवासी जुन्नर येथे आला होता.तो लिहीतो 'हे शहर एका खडकावर वसले असून सृष्टीकर्त्यानेच हे निर्माण केले कि काय, असे वाटते'. पुढे दौलताबादचा सुभेदार मलिक उतेजार होता.  इ.स.अ १४८५ मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक अहंमद जुन्नरला आला. त्यावेळी शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार किल्ला त्याच्या हवाली करेना. पण मलिक अहमदशी संघर्ष करण्याची तयारी करु लागला.पण मलिक अहमदने गडाभोवती वेढा आवळला आणि नाकेबंदी केली. त्यावेळी पाच वर्षाची महसुलाची वसुली किल्ल्यात होती.तसेच विपुल अन्नधान्याचा साठा होता.गड ताब्यात आल्यावर जुन्नरची संपुर्ण बाजारपेठ व नाणेघाटाचा वाहता व्यापार हे सर्व मलिक अहमदच्या ध्यानात आले.या पैशाच्या जीवावर त्याने किल्ल्यावर जास्तीचा फौजफाटा ठेवला च आसपासचा मुलुख ताब्यात घेतला.आता त्याला वेध लागले संपुर्ण सत्ता ताब्यात घेण्याचे.पण हि संधी त्याला लगेच पुडह्च्याच वर्षी चालून आली.इ.स.१४८६ मध्ये मलिक उत्तेजारचा खुन झाला.तेव्हा मलिक अहमद जंजिरा प्रांतात राजापुरी बंदरात होता.तो लगेच जुन्नर येथे आला व 'निजाम उल मुल्क बहिरी' अशी पदवी धारण करुन स्वतंत्र कारभार करु लागला.दुसरा बहामनी महमंदशहा याने चाकणचा सुभेदार युसुफ आदिलखान याला त्याचे पारिपत्य करण्यासाठी पाठवून दिले.मलिक अहम्दने आपले कुटुंब शिवनेरी गडावर हलविले आणि आदिलखानच्या फौजेचा सामना करण्यासाठी तो निघाला.प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला व नंतर बहामनी फौजेचा पराभव करुन जुन्नर येथे परत आला.नंतर त्याने आपल्या सत्तेतील राज्याचे परिस्थिती सुधारण्यात वेळ घालवला.इ.स.१४९४ मध्ये या मलिक अहमदने नवीन शहर वसविले व त्याला स्वतःचे नाव देउन तिथे आपल्या सत्तेची स्थापना केली.हे शहर म्हणजेच अहमदनगर. इ.स.१५२९ मध्ये निजामशाहीचा दुसरा सुलतान बुर्हाण निजामशहा (इ.स.१५०८-५३) याचा गुजरातचा सुभेदार सरदार बहादुरखान ( इ.स.१५२५-३५) याने पराभव केला. त्यामुळे बुर्हाण निजामशहा जुन्नरला पळून आला.इ.स. १५६५ मध्ये निजामशाहीचा तिसरा सुलतान हुसेन अली निजामशहा (इ.स.१५५३-६५) याचा विजयनगरचा रामराजा ( इ.स.१५४१-६५) व विजापुरचा बादशहा अलि आदिलशहा ( १५५७-१५८०) यांनी पाठलाग केल्यामुळे तो आपल्या सैन्यासह जुन्नरच्या डोंगरात पळून गेला.त्याने जुन्नरपासून ते पंढरपुरपर्यंतचा प्रदेश बेचिराख करुन टाकला.  इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये दुसरा बहादुर निजामधहा ( इ.स.१५९५- १६०५ )याने पुणे व सुपे हे प्रांत व शिवनेरॉ आणि चाकण हे किल्ले शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. 

         






       पुढे अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार म्हणून शहाजीराजे भोसले काम पाहत होते. त्यांच्याकडे पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या परगण्यांची जहागिरी होती. शहाजीराजे निजामशाही  सोडून आदिलशाहीने गेले. याचवेळी शहाजीराजांच्या पाठलागावर निजामशाही फौजा लागल्या. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. अश कठिण प्रसंगी जिजाबाईंना शहाजीराजांनी शिवनेरी किल्यावर ठेवले. यावेळी किल्लेदार म्हणून त्यांचे व्याही म्हणजे थोरले संभाजीराजांचे सासरे विश्वासराव हे होते.  जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. फाल्गुन वैदय तृतीया म्हणजे दिनांक १९ फेबुवारी १६३० रोजी दुर्ग शिवनेरीवर राजमाता जिजाऊ व शहाजी राजांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. पुत्र महाराष्टाला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शतकानुशतके पारतंत्राच्या अंधारात चाचपडणा-या महाराष्टात शिवसुर्याचा उदय झाला.   शिवाजी राजांच्या जन्मामुळे शिवनेरी गड पावन झाला. महाराष्टाचा भाग्यसुर्य या दिवशी शिवनेरीवर उदयास आला. या शिवसुयाने महाराष्टाचे  व भारताचे भविष्यच बदलून टाकले सहयाद्रीच्या साहयाने आपली मातृभूमी सुलतानी सत्तांच्या जोखडा खालून मुक्त करणा-या शिवरायांच्या जन्मासाठी नियतीने सहयाद्रीतीतील हा शिवनेरी किल्ला निवडावा हा एक शुभयोगच होता.शिवरायांचे बालपण, शिक्षण येथेच झाले. असे म्हणतात, की नुकतेच जन्माला आलेले बाळ हे ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असते. हा गोळा आपण देऊ तसा आकार घेतो. योग्य पद्धतीने घडवून संस्कारित केले, की त्यातून एक उत्तम व्यक्तिमत्त्व आकारास येते. महाराजांच्या बाबतीतही हे खरे ठरले आणि याची सुरवात शिवनेरीच्या साक्षीने झाली. लहान मुलं जीव धरत असताना शारीरिक आणि मानसिक सिंचन या दोघांची आवश्यकता असते. जिजाऊसाहेबांनी बाळराजेंना चालायला तर शिकवलेच, पण ते नुसते नाही, तर सत्य आणि स्वत्त्वाच्या मार्गावर! तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे व्यायाम आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले. सोबतच रामायण आणि महाभारताच्या गोष्टी होत्याच, ज्यांनी त्यांचे मनही संस्कारित केले. या संस्कारांचे बीज जिजाऊसाहेबांनी शिवनेरी किल्ल्याच्या साक्षीने रुजविले. शिवनेरीच्या साक्षीने झालेल्या या संस्कारांचा उपयोग महाराजांना स्वराज्य उभारणीत आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात झाला. तसेच, हे संस्कार पुढे जाऊन स्वराज्याचे संस्कार म्हणूनही उदयास आले, असे म्हटले तरी ते योग्यच ठरेल.गडावर एकानंतर एक असे सात दरवाजे लागतात. हे दरवाजे पार करूनच आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करतो. अंतिम ध्येयापर्यंत पोचण्यासाठीसुद्धा कामाची योग्य विभागणी आवश्यक असते. म्हणूनच हे सात दरवाजे ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या कार्यविभाजनाच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. इतिहासात डोकावून पाहताना महाराजांच्या अनेक मोहिमांत देखील हाच दृष्टिकोन दिसतो.  
                  शिवरायांच्या बाळपणचे वर्णन शिवभारत ग्रंथात करतांना कविंद्र परमानंद नेवासकर म्हण्तात, "शिवाजी राजांना ते रांगत असताना घराचा उंबरा ओलांडायलाही अडचण येत असे.  पूर्वी घराचे उंबरे फार मोठे होते. भिंतीवर पडलेलं सुर्याच कवडसे पाहून बाल शिवाजी दासीकडे ते आणून देण्याचा अटहास करत असत, वेगवेगळे आजाज काढून तो दासींना भेडसावत असत. छोटा शिवाजीराजा शिवनेरीवरची माती देखील खात असे. थोडे मोठे झाल्यावर शिवाजीराजे सोबत्यांना घेऊन तेथे दगड-मातीचे किल्ले बनवत व म्हणत असे हे 'दुर्ग माझे मी जिंकून घेणार' अशा अनेक बाललिला कविंद्रानी वर्णन केल्या आहेत. बालपणी उंबरा न ओलांडता येणा-या शिवाजीराजांनी पुढे दिल्ली, आग्रा ते जिंजी तंजावर पर्यंद घोडदौड केली, ते सुर्याचे कवडसे मागणा-या शिवरायांनी पुढे प्रतिपचंद्र ही मुद्रा शिरावर धरली, बालपणी दाईंना भेडसावणा-या शिवाजीराजांनी  पुढे औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना केली. शिवनेरीची माती खाणा-या शिवाजी महाराजांनी आठ पातशाहयांना धूळ  चारली, आणि ते छोटे गडकोट बांधणा-या राजांनी पुढे ३५० दुर्गांची श्रृंखला बांधून आपले स्वराज्य बळकट व  बलवान करून टाकले. सन १६३० साली निजामशाहीचा अस्त झाला. किल्ला मोंगलाकडे गेला. जिजाऊ व शिवबा पुण्यास राहू लागले.शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला.
        १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला.मोघलांनी हजारो लोकांची कत्तल केली व हजारो लोकांना किल्ल्यात कैद केले.कैदी लोकांची डोकी शिवनेरी किल्ल्यात उडवली व जिथे त्यांना मारले तिथे एक चौथरा बांधला.त्या चौथर्याला 'कोळी चौथरा' म्हणत्गात.इ.स. १६५७ मध्ये शिवाजी राजंनी जुन्नरवर स्वारी करुन ११ लाख रुपयांची लुट केली. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी माळा लावून किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले.अनेक वेळा प्रयत्न  करून देखील हे शिवजन्म स्थान स्वराज्यात येऊ शकले नाही. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मोगलांकडून जिंकला व मराठेशाहीत आणला आणि आपल्या आजोबांची इच्छा पुर्ण केली. इ.स.१७६२ मध्ये मोगलांच्या सैन्याने पेशव्यांचा सैन्याचा पुणे व नगर यांच्या दरम्यान पराभव केला.त्यावेळी राघोबादादाने शिवनेरी किल्ला मोगलांना दिला.इ.स.१७७७ मध्ये नाना फडणवीसांचा मेहुणा बळवंतराव बढे याने फरारी झालेल्या पाच फरारी झालेल्या कोळी लोकांना जुन्नर येथे पकडुन मारले.परंतु ते त्याच्या मागे पिश्चाच रुपाने लागले.तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांच्या नावाने पाच लिंगे स्थापन करुन त्यावर एक देवालय बांधले.त्याला आज 'पंचलिंगाचे स्थान' म्हणतात.
      पुढे इ.स. १७९३ मध्ये नाना फडणवीसानी राघोबादादांचे पुत्र बाजीराव व चिमणाजी यांना जुन्नरच्या गढीत कैद करुन ठेवले होते. इ.स. १७९५ मध्ये सवाई माधवराव कैलासवासी झाल्यावर परशुराम पटवर्धन जुन्नरास गेले व हातात गाईचे शेपुट धरुन दुसर्‍या बाजीरावजवळ शपथ वाहीली 'आपणास पेशवाईचा अधिकार मिळाला आहे'.दुसरे बाजीराव त्यांच्याबरोबर पुण्यास येउन पेशवाई पदी आरुढ झाले.इ.स. १८१८ मध्ये मेजर एल्ड्रीन बाजीरावाचा पाठलाग करत जुन्नर येथे आले व २१ मे १८१८ ला त्याने शिवनेरी किल्ला घेतला.शिवनेरीवरचा किल्लेदार आण्णासाहेब रत्तीकर हडसर गडावर पळून गेला,परंतु पुढे त्याना इंग्रजांनी ताब्यात घेतले. पुढे १८४१ मध्ये इंग्रजांनी चिनी लोकांना शिवनेरीवर कैदेत आणुन ठेवले.त्यांनी किल्ल्यात भाजीपाला व फळफळावळ यांची लागवड केली.आजही गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सागाचे वृक्ष दिसतात.त्याची लागवड याच चिनी लोकांनी केली. इ.स. १८४५ मध्ये राघोजी भांग्रे यांनी बंड केले.त्यावेळी इंग्रजांनी आपली एक तुकडी या किल्ल्यात आणून ठेवली होती. इतका इतिहासाचा कालखंड पाहीलेला हा गड अद्यापही सुस्थितीत आहे.  

    प्राचीन भारत अर्थात हिंदुस्थानाला अनेक परकीय प्रवासांनी भेटी दिल्या.त्यांनी त्यांचे निरिक्षण आणि अनुभव लिहून ठेवले.त्यामुळे आज आपल्याला त्याकाळच्या अनेक गोष्टींची कल्पना येते.या परकीय प्रवाशांपैकी एक म्हणजे 'जॉन फ्रायर'.( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर याचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. येथून तो पेमब्रोक कॉलेजमध्ये गेला (२३ जुलै १६७१). तेथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याने ‘बॅचलर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली (१६७२).फ्रायरची शल्यविशारद म्हणून सुरतेतील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत नेमणूक झाली (१६७२). १३ डिसेंबर १६७२ रोजी तो इंग्लंडहून सुरतेला जाण्यासाठी ‘युनिटी’ या जहाजातून निघाला. त्याच्या ताफ्यातील मुख्य जहाजाचे नाव ‘लंडन’ असे होते. ९ फेब्रुवारी १६७३ रोजी तो केप व्हर्दे येथे पोहोचला. पुढे ३ एप्रिल १६७३ रोजी फ्रायरचे जहाज भरकटले. मार्गावर परत येत त्यांनी मालदीव गाठले. १६ जून १६७३ ला त्यांना सिलोन म्हणजे सध्याचा श्रीलंकेचा किनारा दिसला. त्यांना पाँडिचेरीच्या पुढे एका इंग्लिश वखारीवर डच झेंडा फडकताना दिसला. तेथील डच लोकांनी त्या परिसराची नाकेबंदी केलेली होती. पुढे फ्रायर मछलीपट्टनमच्या किनाऱ्यावर उतरला. तेथे त्याने गोवळकोंडा येथील राज्य कारभाराची, तसेच दक्षिणेतील राजकारणाची माहिती मिळवली. त्याने आपल्या लेखनात मछलीपट्टनम मधील इमारती, बागा, ब्रिटिश आणि पोर्तुगीज वसाहती, तेथे असणारे राजपूत, मुरीश म्हणजे मुस्लिम, फ्रेंच, डच व स्थानिक लोक यांचे वर्णन केले आहे. तेथील स्त्री पुरुषांच्या वेशभूषेबद्दल तो माहिती देतो, तसेच राजाच्या राजधानीचे गोवळकोंडा हे शहर मछलीपट्टनम पासून १५ दिवसांच्या अंतरावर असल्याचे नमूद करून राजाचे उत्पन्नाचे मोठे साधन म्हणजे या राज्यात असणाऱ्या हिऱ्यांच्या खाणी अशी माहिती त्याने दिली आहे. गोवळकोंड्याच्या राजाजवळ १ लाखाचे सैन्य आणि २०० हत्ती असल्याचे तो लिहितो. फ्रायरने तेथील चलनाबद्दल त्रोटक माहिती दिलेली आहे.
              फ्रायर ३० जुलै १६७३ रोजी मद्रासला व पुढे प्रवास करत तो १६७३ च्या डिसेंबरमध्ये मुंबईला पोहोचला. त्याने मुंबईला जाताना वाटेत गोव्याच्या किनाऱ्यावरील किल्ल्यांबद्दल व गोव्यातील इमारती, सेंट झेविअर चर्च, त्यातील सेंट झेविअरचा सांगाडा, बागा, दफनभूमी, इतर लहान मोठी चर्च यांबद्दल लिहले आहे. तो गोव्यात असताना दक्षिणेकडील अंकोल्याला गेला होता. तो तेथे पोहोचण्यापूर्वी काही काळ छ. शिवाजी महाराजांनी अंकोला लुटून उद्ध्वस्त केल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. परतीच्या प्रवासात तो गोकर्ण महाबळेश्वरला भेट देऊन गोव्यातील मिरजन किल्ल्यापाशी आला. मिरजन हा किल्ला उंच टेकडीवर असून किल्ल्याला दुहेरी तटबंदी असल्याचे आणि भोवती खंदक असल्याचे, तसेच बुरजांवर तोफा पाहिल्याचे तो लिहितो. छ. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर गेल्याचे तो नमूद करतो. पुढे तो वेंगुर्ल्यातील डच वखारीत गेला व तिचे वर्णन त्याने केले आहे. वेंगुर्ल्यात फिरताना त्याने सती जाण्याचा प्रसंग बघितल्याचे व सतीच्या स्मृतीसाठी काही बांधकामे (सतीशीळा) केलेली असल्याचे तो म्हणतो. याला तो विरगळ म्हणून संबोधतो. मुंबईला जाताना ‘सेरापटनं’ म्हणजे ‘श्रीवर्धन’ जवळ राजापूर येथे छ. शिवाजी महाराजांचा मजबूत किल्ला असल्याचे आणि खाडीत महाराजांचे ३० छोट्या बोटींचे आरमार सज्ज असल्याचे तो लिहतो. यावेळी विजापूरचा कारभार खवासखानाच्या हातात असल्याचे तो नमूद करतो.
               फ्रायरने आपल्या लेखनात छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची नोंद केली आहे. या शिवाय ‘रायरी’ हे महाराजांचे मुख्य स्थान असल्याचे तो लिहितो. प्रवास करत तो मुंबईला पोहोचला. मुंबईची बेटे, ठाणे आणि तेथील किल्ले यांची त्याने वर्णने केली आहेत. तेथून तो वसईला गेला. वसईच्या किल्ल्याच्या वर्णनात तो या किल्ल्याला मजबूत तटबंदी असून दोन दरवाजे आहेत, किल्ल्यावर ४२ तोफा असून किल्ल्यात ६ चर्च, ४ कॉन्व्हेंट, २ विद्यालये असल्याचे लिहितो. येथील लोक नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात अशीही माहिती तो देतो. यापुढे त्याने हेन्री ऑक्झिंडेनबरोबर राज्याभिषेक समयी रायगडला दिलेल्या भेटीचे वर्णन केलेले आहे. या वर्णनात तो लिहितो, ‘आम्ही रात्री ९ वाजता चौलला पोहोचलो. किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले असल्यामुळे आम्ही रात्र सेंट सेबॅस्टीयन या छोट्या चर्चमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता आम्हाला छ. शिवाजी महाराज चिपळूणवरून रायरीला पोहोचल्याचे समजले. आम्ही चौल शहरापासून २ मैल अंतरावरील राजाच्या प्रदेशात वरच्या चौलमध्ये गेलो. तेथे महाराजांच्या सुभेदाराला भेटलो. त्याने आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्या दिवशी आम्ही बोटीतून ‘अष्टमी’ या गावात पोहोचलो. तेथून आम्ही प्रवास करत निजामपूर, गंगावली मार्गे रात्री ९ वाजता पाचाड येथे पोहोचलो. तेथे आम्हाला महाराज ‘प्रतापगडला’ भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे समजले. ते परत येईपर्यंत आम्ही पाचाडातच मुक्काम केला.’ तेथे त्याने निराजी पंडितला भेटल्याचे, तसेच राजा व इतर मंत्र्यांना भेटवस्तू दिल्याचे लिहिले आहे. दोन दिवसांनी त्याला किल्ल्यावर येण्याची परवानगी मिळाली. त्याने रायगडचे वर्णन करून ठेवले आहे. पुढे त्याने इंग्रजांच्या वतीने मांडलेल्या तहाबद्दल लिहून ठेवले आहे. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यास हा उपस्थित असल्यामुळे त्याने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून ठेवलेले आहे. पाऊस थांबल्यावर फ्रायर रायगडावरून सुरतेकडे परतला.
         काही काळ सुरतेत वास्तव्य केल्यावर फ्रायर एप्रिल १६७५ मध्ये मुंबईस आला. तेथून त्याला जुन्नरच्या मोगल सरदाराकडे पाठवण्यात आले. जॉन फ्रायर मुंबईवरुन कल्याण्,टिटवाळा,मुरबाड्,धसई मार्गे निघाला.इथे हवालदाराची परवानगी घेउन तो पालखीत बसून घाट चढू लागला.त्याने घाटाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी धसई परिसराचा विचार केला तर हा बहुधा अहुपे घाट असणार.कारण या परिसरातून चढणारे दार्या, त्रिगुणधारा वगैरे घाट अवघड आहेत.कारण त्याच्या सोबत त्याचे सामान वाहण्यासाठी बैल आणि माणसे होती.घाट चढून गेल्यावर याठिकाणी घाटाच्या वर असणार्‍या चौकीतील सैनिकांनी त्याला हटकले व घाट चढण्यासाठी असलेला कर भरल्याची पावती अधिकारी तपासत नाही तोपर्यंत तिथेच थांबण्यास सांगितले.एकदा परवानगी मिळाल्यावर फ्रायर घोड नदीच्या किनार्‍याने रात्री उशीरा आंबेगाव येथे पोहचला.
    ती रात्र आंबेगाव येथे काढून फ्रायर दुसर्‍या दिवशी जुन्नरकडे निघाला. यावेळी बहुधा वरसुबाईची डोंगररांग ओलांडून तो कुसुरच्या दक्षिणेला असलेल्या मीना नदीच्या किनार्‍यावरील बेलसर या खेड्यात पोहचला.हे अंतर जवळपास पन्नास मैल म्हणजेच पंचाहत्तर किलो मीटर आहे.त्याकाळचा विचार केला तर हि मोठी मजल ठरते. यावेळी त्याला कच्ची अंजीर सोडली तर फारसे काही खायला मिळाले नाही.त्यानंतर त्याने जुन्नरकडे प्रयाण केले.त्याच्या ग्रंथात जुन्नरचे नाव तो Jeneah असे लिहीतो. मात्र फ्रायर सुर्यास्तापर्यंत जुन्नरला पोहचु शकणार नाही असा निरोप जुन्नरच्या सुभेदाराला देतो.सुभेदाराने त्याची व्यवस्था एका राजवाड्यासारख्या इमारतीत केली असे फ्रायर लिहीतो.हा बहुधा सध्याचा हबशी महाल असणार.याच्या भोवती झाडे आहेत असे वर्णन मुळ ग्रंथात आहे. १ मे रोजी जुन्नरच्या सुभेदाराने फ्रायरला बोलावून घेतले. सुभेदार जुन्नरच्या कोटात बंदोबस्तात रहात होता.शत्रु म्हणजे अर्थातच शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून सतत भिती होती. 
       पुढे रोगी तपासण्यासाठी एक योग्य दिवस मुक्रर करुन फ्रायरला पुन्हा सुभेदाराच्या घरी नेण्यात आले.इथे रोगी तपायचे होते.सुभेदाराच्या बेगमाना तपासण्याआधी फ्रायरची परिक्षा घेण्यासाठी एका सामान्य नोकराची नाडी तपासण्यास सांगितली.फ्रायरने त्याची नस बघून त्याला काहीही झालेले नाही असे सांगितले.मग सुभेदाराची बेगम पडद्या आड बसुन फ्रायरने तिची नाडी बघीतली.जुन्नरच्या या मुक्कामात फ्रायरने काही आजुबाजुची ठिकाणे देखील पाहिली.यात त्याने गणेश लेणी बघीतल्याचा उल्लेख सापडतो.मात्र त्यावेळी लेण्यात वटवाघळे आणि मधमाश्या असल्याचे त्याने लिहीले आहे.याचा अर्थ त्यावेळी लेण्याद्री गणपतीची मुर्ती लेण्यात होती कि नव्हती ते समजत नाही. या लेण्याचे त्याला मुंबई मुक्कामात पाहिलेल्या कान्हेरी लेण्याशी साधर्म्य वाटते.
              आठवडाभराचा मुक्काम उरकून फ्रायरने मुंबईला परत जाण्याचे ठरविले.त्यावर सुभेदाराने त्याला शिवनेरी गडावर येण्याचे किंवा गडाच्या पायथ्याशी जुन्नर गावातील बागेत भेटण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावर फ्रायर गडावर जाण्यास तयार झाला. सुभेदराने फ्रायरला आणण्यासाठी आपल्या भावाला व एका नातेवाईकाला चार पालख्या घेउन फ्रायरकडे पाठविले..साधार्ण तीन मैल चालल्यानंतर आपण त्या तटबंदीयुक्त गडाच्या पायथ्याशी पोहचलो असे फ्रायर लिहीतो. यानंतर फ्रायरने शिवनेरी गडाचे विस्तृत वर्णन केले आहे. शिवनेरीगडावर अनेक चौक्या असून सुमारे पाच हजार युध्दसज्ज फौज येथे आहे.तसेच गरज पडल्यास उंट सुध्दा आहेत.शिवाजी महाराजांनी हे स्थळ जिंकून घेण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु एकापाठॉ पाठ एक असलेले सात दरवाजे आणि बळकट तटबंदी इथे प्रवेश करणे अशक्य आहे.
               असे भक्कम लष्करी स्थान मी पुन्हा पाहिले नाही असे फ्रायरचे मत झाले.मात्र शिवनेरीच्या पायर्‍यावरुन पालखीत बसून चढताना त्याला त्रास झाला.अश्या प्रकारे पालखीत बसून पायर्‍यावरुन जाण्यासाठी तुमची पाठ भक्कम पाहीजे असे मजेने तो म्हणतो. यानंतर शंभर पायर्‍या चढून आम्ही सपाटीवर पोहचलो.इथे आधीच्या नबाबांची थडगी असून इथल्या सपाटीवर सैनिकांना प्रक्षिशण दिले जाते.इथेच एक मशिद असल्याचा तो उल्लेख करतो.सध्या तरी गडावर शिवकुंजाजवळ एकमेव मशिद आहे.त्यामुळे फ्रायर उल्लेख करतो ती मशिद कोणती? हे आज समजत नाही. पुढे फ्रायर गडावरची घरे हलक्या दर्जाची असून हि घरे सामान्य प्रतीची,पावसात्,उन्हात तग धरतील असे वाटत नाही असे म्हणतो. गडाच्या पुर्वेकडच्या सपाटीवर लोक रहातात.मोठी घरे बांधण्यापेक्षा छोटी घरे बांधून हे लोक रहातात.
    किल्लेदारचे घर मात्र तुलनेने उत्तम बांधले आहे.या घराला कुंपण म्हणुन झाडे लावली आहे.असे कुंपण गडाच्या गडावरच्या इतर घरांना नाही.पुढे तो शिवनेरीच्या किल्लेदाराचे वर्णन करतो. इथला किल्लेदार इतर मोघल सरदारांप्रमाणे आळशी नाही.त्याला अरेबिक व पार्शियन भाषा येतात.इथे येणार्‍या युरोपियन प्रवाशांकडून त्याने अनेक गोष्टी माहिती करुन घेतल्या आहेत.मी गडावर पोहचलो तेव्हा किल्लेदाराने स्वतः येउन स्वागत केले.तसेच माझी व्यवस्था स्वतःच्या घरात केली. तसेच माझे मनोरंजन व्हावे म्हणून नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला.रात्री मेजवानी आयोजित करुन स्वतःच्या हाताने मला वाढले.तसेच जेवण संपल्यावर सरबत दिले.
       यानंतर फ्रायरने वर्णन केलेला प्रसंग मनोरंजक आहे.रात्री झोपताना मोघल दिव्सभर वापरलेल्या कपड्यात झोपत असत.त्यामुळे फ्रायर काय करणार ? या कुतुहलातून निजाम बेगने त्याच्या नोकराला विचारले कि 'हे रात्री याच कपड्यात झोपणार काय ?".
    इंग्रज सैनिक वापरतात ती रेपियर तलवार

        किल्लेदाराने त्याला आणखी काही प्रश्न विचारले.बेगला फ्रायरच्या तलवारीविषयी काही शंका होत्या.कार्ण इंग्रज लोक रेपियर प्रकारची तलवार वापरत.तसेच युरोपियन सैनिकांची शिस्त याविषयीही किल्लेदाराला आकर्षण होते.गप्पा झाल्यावर खुष होउन किल्लेदाराने फ्रायरला स्वतःच्या बोटातील अगंठी भेट दिली.याला नंतर किल्लेदाराने किल्ला फिरुन बघायची परवानगी दिली.यानंतर फ्रायर शिवनेरी गडाचे वर्णन करतो.'मी सर्वप्रथम शिवाजी राजांचे लोक ज्या किल्ल्यावरुन गडावर चढून आले त्या कड्याजवळ गेलो.खरतर हा कडा अतिशय ताशीव आहे.तरीही कसे काय कोण जाणे ,शिवाजी महाराजांची दोन माणसे हा कडा चढून वर आली.मात्र नेमक्या त्याच वेळी वरुन दगड पडल्यामुळे त्यांचे प्रयत्न वाया गेले.' फ्रायर ज्यावेळी गड फिरत होता त्यावेळी गडावर किल्लेदार आणि त्याची बायका पोरे सोडली तर कोणीही नव्हते.गडावरचे सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी गडाखाली गेले होते.गडावर धान्य साठविण्यासाठी मोठी कोठारे बांधले असून अनेक टाक्यात तुप साठविले आहे.( हे तुप युध्दात झालेल्या जखमांवर लावण्यासाठी वापरले जात असे )
    गडावर पाण्याची मोठ्या संख्येने टाकी असून पाण्याचा रंग कधी हिरवा,अक्धी पिवळा तर कधी लाल दिसतो.पाण्याचे सारखे बाष्पीभवन होत असते.किल्ल्यावरच्या पाण्याची चव अतिशय खराब असल्यामुळे गडावरचे लोक कांद्याने हे पाणी शुध्द करुन पितात.'
      शिवनेरी गडाच्या सज्जतेबध्दल तो लिहीतो 'गडावर एक हजार कुतूंबियांना सात वर्ष पुरेल इतके धान्य आहे.गडावर फारसा तोफखाना नाही.नाही म्हणायला इथे दोन मध्यम आकाराच्या तोफा आहेत. या तोफा पितळी असून २२ फुट लांबीच्या आहेत.त्यामुळे गडाच्या संरक्षणासाठी इथे मोठ्या प्रमाणात दगड जमवून ठेवले आहेत.'
    किल्ल्याचा फेरफटका मारुन फ्रायर पुन्हा किल्लेदाराकडे परत आला.त्याचे आभार मानून गडउतार झाला.
        पुढे फ्रायर जुन्नर परिसराचेही वर्णन करतो,' या परिसरात आपल्या देवतांसाठी काही शतकापुर्वी कारागिरांनी इतकी लेणी आणि गुहा खोदलेल्या आहेत.मात्र त्यांना आज कोणी वाली नाही,तसेच तिथे जाणे देखील जाणे देखील कठीण झाले आहे.हा पर्वत ( म्हणजे शिवनेरी गड ) स्रवांपासून बाजुला असला तरी शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या गडांनी वेढला आहे. ( चावंड्,हडसर शिवाजी माहराजांच्या ताब्यात होते ) या सर्व किल्लावरुन सतत युध्दघोषणा एकायला येतात.शिअव्नेरी गडाचे रक्षण जवळपास १००० सैनिक करतात.हा बळकट किल्ला मोघलांच्या ताब्यात असल्यामुळे शिवाजी महारांजाजी महाराजांची घोडदौड एकप्रकारे रोखली गेली आहे.पुर्वी या गडावर मुळचा ब्राम्हण पण नंतर बाटल्यामुळे मुसलमान झालेला हाफिझखान नावाचा किल्लेदार होता, किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याला सोन्याचे अमिष दाखविले.त्यावर हाफिझखानाने ७००० घोडे पाठविण्यास सांगितले आणि बहादुरखानाला मागून हल्ला करण्यास सांगितले. बहादुरखानाला हा फितुरीचा मनसुबा हाफिझखानाने आधीच सांगून ठेवला होता.या प्रकारामुळे शिवाजी महाराजांना येथे मोठा पराभव पत्करावा लागला.शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचे इतके प्रयत्न करण्याचे कारण म्हणजे हा किल्ला पाच पातशाह्यांच्या काळात निजामशाहीचे महत्वाचे केंद्र होता,त्याची व्यवस्था शहाजी राजे बघत होते.तसेच हाच गड शिवाजी महाराजांचे जन्मस्थान होता.शिवनेरीच्या गडाच्या उत्तरेला परिसरातील सर्व किल्ले असल्यामुळे हा किल्ला जणु त्यांचे नेतृत्व करत आहे असे वाटते'.
       फ्रायरने केलेले हे  शिवनेरीचे वर्णन अतिशय सखोल आणि सुंदर आहे.त्यामुळे त्याकाळातील जुन्नर्,शिवनेरी व परिसर कसा होता? हे आपल्याला आज समजते.जुन्नरला काही दिवस राहून त्याने २२ मे १६७५ रोजी जुन्नर सोडले व नाणेघाटात दुपारच्या वेळेला तो येउन पोहचला.या प्रवासाचे देखील फ्रायरने वर्णन केले आहे. 
    'जुन्नरवरुन निघाल्यावर वाटेत आम्ही शिवाजी महाराजांचे दोन किल्ले सोडले ( हे चावंड व हडसर असणार ) पण नाणेघाटाजवळ पोहचल्यावर जुन्नरच्या किल्ल्याप्रमाणे अस्णार्‍या किल्ल्यावरुन ( म्हणजे जीवधन ) आम्हाला रोखले गेले.मात्र त्यांना उत्तर देउन मी तसाच घाटाकडे निघालो.मात्र त्याच वेळी पाठीवर मीठ लादून तीनशे बैल कोकणातून घाट चढून नाणेघाटाच्या माथ्यावर आले होते,मात्र तासभर थांबून देखील ते निघेणात.त्यामुळे माझ्याबरोबरच्या माणसाला पुढे पाठवून घाट मोकळा असल्याची खात्री करुन घेतली.शेवटी घाट उतरुन फ्रायर खाली असणार्‍या ( वैशाखरे) येथील्ह वालदाराला भेटला.पुढे तो मुरबाड मार्गे तो मुंबईला परतला. सह्याद्री, त्यावरील किल्ले, किल्ल्यांचा कारभार याबद्दल त्याने विस्तृत लेखन केलेले आढळते. यात प्रामुख्याने रायगड व शिवनेरी या दोन वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांची वर्णने विशेष आहेत. पुढे फ्रायरने गोवा, कारवार, परत सुरत असा प्रवास करत १६७९ मध्ये भारताचा निरोप घेतला व पर्शियामध्ये काही वर्षे घालवून १६८२ मध्ये तो मायदेशी परतला. मायदेशात परत आल्यावर त्याने १६८३ मध्ये ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी मिळवली. त्याच्या भारत व पर्शिया भेटीचा पत्ररूपी वृत्तांत अ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया अँड पर्शिया बिइंग नाइन यिअर ट्रॅव्हल्स १६७२-१६८१  या ग्रंथात प्रसिद्ध आहे.पुढे लंडन येथे त्याचे निधन झाले.
    असा हा शिवनेरीचा विस्तृत इतिहासाचा पट.आता आपण या महत्वाच्या दुर्गाची प्रत्यक्ष भटकंती करुया.
     अश्या या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या आणि इतिहास प्रसिध्द गडाला पर्यटक्,दुर्गप्रेमी,शिवप्रेमी मोठ्या संख्येने जातात.इथे जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे हि सोयीची शहरे आहेत. शिवनेरी किल्ला पुण्यापासून १०३ किमी अंतरावर आहे. पुण्यातून पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-जुन्नर असे जाता येते.मुंबईवरुन शिवनेरीला जायचे तर दोन पर्याय आहेत. मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर असा रस्ता असून हे अंतर ११३ कि.मी.आहे.या मार्गे अडीच तास लागतात.तर मुंबई -लोणावळा-चाकण-नारायणगाव-मंचर हे अंतर २०० कि.मी.असून यामार्गे चार ते पाच तास लागतात..जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेशा खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पुर्ण बघून परत जाण्यास एक दिवस लागतो. जुन्नर गावापासुन ४ किमी अंतरावर शिवनेरी गड आहे.

     जुन्नर शहरात शिरल्यावर समोरच हा किल्ला नजरेस पडतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२०० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट असुन गड दक्षिणोत्तर दीड किमी पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती असुन उत्तरेकडे निमुळता होत जाणारा आहे.  शिवनेरी किल्ल्याचा आकार शिव-पिंडाप्रमाणे दिसतो. शिवनेरी फार उंच नसला तरी त्याला सर्व बाजुने १०० ते १२५ फुट उंचीचे कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभल्याने काही ठिकाणीच तटबंदी बांधलेली नजरेस पडते. गडाच्या पोटात असणाऱ्या अनेक लेण्यामुळे हा किल्ला लांबुनही सहज ओळखु येतो. त्यातील काही गुहांमध्ये सहजपणे तर काही गुहांत थोडयाफार परिश्रमाने जाता येते. गडावर जायला दोन मार्ग असुन पहिला डांबरी रस्त्याने मुख्य दरवाज्याने वर जाणारा आहे तर दुसरा मार्ग त्या मानाने जरा अवघड असा साखळीची वाट आहे.



          शिवनेरी हा किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.   हा किल्ला पाहण्यासाठी २ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. हा किल्ला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी उघडा असतो.या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणि उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गेपाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.

    Sakhaldand.jpg
    शिवनेरी साखळदंडाच्या मार्गाने
    Sakhaldand_1.jpg
    साखळदंडाची वाट:
    साखळीची वाट :-
        गडावर येणारे बहुतेक पर्यटक पायर्‍यांच्या सात दरवाजामार्गे येतात. साखळीची वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरातील शिवपुतळ्या कडून डाव्या बाजुस जाणा-या रस्त्याने साधारण एक किमी गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे. या मंदिरासमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या कातळभिंतीपाशी घेऊन जाते. पुर्वेकडून असलेली ही वाट गडाच्या लांबीच्या साधारण मध्यावरून सुरू होते व कातळ कड्यातील गुहांच्या दिशेने वर जाते. इथे कातळात खोदलेल्या निमुळत्या पायऱ्यांवरून काही अंतर कापावे लागते. हा भाग थोडा धोक्याचा आहे. भिंतीला लावलेल्या तारेच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या सहाय्याने येथुन वर जाता येते. इथे आधारासाठी पुर्वी साखळ्या लावल्या होत्या त्यामुळे ह्या वाटेला साखळीची वाट असे नाव पडले आहे. संकटकाळी वर किंवा खाली जाण्यासाठी ही वाट उपयुक्त असुन आक्रमणाच्या वेळी पळून जाण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे.

      


    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    किल्ल्याची मजबुत तटबंदी

    सात दरवाज्यांची वाट :-
    डांबरी रस्त्याने गडाच्या उंचीच्या साधारण मध्यापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते. इथून पुढे काही पायऱ्यां चढुन आपल्याला गडाचा माथा गाठता येतो. ह्या वाटेने किल्ल्यावर जाण्यास एका मागोमाग एक असे सात दरवाजे ओलांडावे लागतात. गडावर जात असताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक आणि सातवा कुलाबकर दरवाजा.  
    या प्रत्येक ठिकाणी त्याच्या नावाचे फलक लावलेले आहेत. सगळ्यांना काही माहीत असते असे नाही त्या दृष्टीने हे सोयीस्कर ठरते.  
    महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. तो आपल्याला शिवनेरी किल्ल्यावरच्या परवानगी दरवाजावरही दिसतो. त्या दरवाजावरील द्वारशिल्पात शरभाने आपल्या पुढच्या पायात गंडभेरुंड पकडलेला आहे असे दिसते तर, मागच्या दोन्ही पायांत दोन हत्ती पकडलेले आहेत असे दाखवलेले आहेत.  
    पुरातत्वविभाग आणि वनविभागाने किल्ला स्वच्छ आणि डागडुजी करून नीटनेटका ठेवला आहे.हि त्यांची केलेली कामगिरी खरंच उल्लेखनीय आहे.


    पहिला महादरवाजा 
    महादरवाजा
       

    Shivneri_1.jpg

    Shivneri_1_1.jpg

    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    महादरवाजा
    त्यातला पहिला दरवाजा महादरवाजा. या दरवाज्याकडे जाणार्या पायर्‍या आणि नक्षीदार दरवाजा देखणा आहे.मात्र या दरवाज्यावर कोणतेही द्वारशिल्प किंवा चर्या नाहीत.
      
     
     
     
    Shivneri_2.jpg
    गणेश दरवाजा

     दुसरा दरवाजा गणेश दरवाजा किंवा परवानही दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाच्या वरील भागात दोन मिनार असुन दरवाजाच्या कमानीवर शरभ या सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची दोन शिल्पे आहेत. डाव्या बाजुच्या शरभाच्या पुढील उजव्या पंजात एक कुत्रा कोरलेला असुन उजव्या बाजुच्या शरभाने दोन हत्ती व एक गंडभेरुंड पंजात धरलेला दाखवला आहे. गंडभेरुंडही एक काल्पनिक दुतोंडी गरुडासारखा दिसणारा पक्षी आहे.
     काही शरभ शिल्पे पाहिल्यास त्यामध्ये शरभाच्या पायाखाली तसेच शेपटीमागे हत्ती किंवा गंडभेरुंड हे  शिल्पान्कृत केलेले दिसतात. जणू काही शरभ हा त्या हत्तींना पायाने दाबत आहे  किंवा शेपटीने भिरकावून देत आहे!
     शिवनेरीच्या प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प
    शिवनेरी किल्ल्याच्या द्वारावरील शरभशिल्प(ह्याच्या मागील दोन पायांखाली हत्ती आहेत आणि पुढील पायाखाली गंडभेरुंड आहे) :
    शिवनेरी किल्ल्यावरील शरभाच्या पायाशी असलेले गंडभेरुंड:



    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    वाटेच्या पुढील भागात दोन दरवाजांचा चौक असुन या चौकातील पहिला दरवाजा ढासळलेला आहे या ढासळलेल्या दरवाजावर डावीकडे शरभ कोरलेला आहे. या शरभाच्या उजव्या बाजुला घोरपड किंवा इग्वानासारखा प्राणी कोरला आहे. ढासळलेला हा तिसरा दरवाजा पीर दरवाजा म्हणुन ओळखला जातो.


    Shivneri_3.jpg
    पिराचा दरवाजा
     


    Shivneri_4.jpg

    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    हत्ती दरवाजा

     चौकाच्या पुढील चौथा दरवाजा हत्ती दरवाजा म्हणुन ओळखला जातो. ह्यावर काही विशेष चिन्हे किंवा शिल्पे दिसत नाहीत. हत्ती दरवाजा ओलांडल्यावर आपल्याला गडाचे अवशेष मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरवात होते. येथुन पुढे जाण्यास बांधीव पायरी मार्ग तसेच खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. 
     

    Shivneri_5.jpg
    शिवाई देवी दरवाजा

    या वाटेने आपण पाचव्या दरवाजासमोर अभे राहतो. या दरवाजाचे नाव आहे शिपाई दरवाजा. या दरवाजाचे मूळ लाकडी दार आजही शिल्लक असुन या दारांवर अणकुचीदार लोखंडी खिळे बसविण्यात आली आहे.
     
     



        पाचव्या दरवाजाची संरक्षण रचना अभ्यासनीय असुन हा गडाचा प्राचीन मुख्य दरवाजा असावा असे वाटते. ह्या दरवाजाच्या चौकटीवर हाताचे पंजे कोरलेले दिसून येतात. शिपाई दरवाजातुन आत गेल्यावर डाव्या बाजुस गेल्यावर खडकात कोरलेली दोन लेणी व पाण्याची आठ-दहा टाकी दिसुन येतात तर उजवीकडची वाट शिवाई मंदिराकडे जाते.
     
    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    खांबांचे कोरिव नक्षिकाम

    शिवाई मंदिराकडे जाताना वाटेत पाण्याची दोन खडकात खोदलेली टाकी असुन प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक कोरीव काम केलेला आकर्षक लहानसा कमानी दरवाजा ओलांडावा लागतो. हा दरवाजादेखील अलीकडील काळातील असावा. या दरवाज्यातुन वाट शिवाई देवीच्या मंदीरात जाते. 
     




     
     

    शिवाईचे मुळ मंदिर एका कोरलेल्या गुहेत असुन त्यात देवीचा मूळ स्वरूपातील तांदळा आहे. नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन आज त्याला बांधीव मंदिराचे स्वरुप आलेले आहे.महाराजांचे शिवाजी हे नाव ह्या शिवाई देवीवरुन ठेवण्यात आले असे मानले जाते.




    मंदिरावरून सरळ पुढे गेले की डाव्या हाताच्या कातळात ६ ते ७ बौद्ध लेणी लागतात. यातील दोन लेण्यांच्या दारावर डाव्या हाताला एक शिलालेख आहे. 
     


    काही गुहांच्या समोर कातळकड्यात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. ह्या गुहा ख्रिस्तपूर्व दोनशे वर्ष इतक्या जुन्या आहेत. नाणे घाटाचा व्यापारी मार्ग इथून जवळ असल्याने व्यापारी व भिक्षुंसाठी हे विश्रांतीचे स्थान असावे. 

    Shivneri_6.jpg
    मेणा दरवाजा
    मेणाचा दरवाजा आतून

    शिवाई मंदिर व परिसर पाहुन परत मुळ वाटेवर येऊन सरळ गेले तर आपण फाटक किंवा मेणा दरवाज्याकडे जातो.
     
     
    Shivneri_7.jpg
    कुलुप दरवाजा

    या प्रत्येक दरवाज्याची बांधकामाची शैली पुर्णपणे वेगळी आहे.याचा अर्थ हे दरवाजे गरज पडेल तसे निरनिराळ्या कालखंडात बांधले गेले असावेत.
    Amberkhana.jpg

    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos

    – –
    ‘अंबारखाना’च्या आतून


    अंबरखाना 
    अंबरखान्यातील आतील भाग

      शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गड वापरात असताना या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात होता. एखाद्या किल्ल्याला जेव्हा ६-७ महिने वेढा घातला जायचा तेव्हा किल्ल्यावरील लोकांना एवढे महिने पुरेल इतकी रसद कशी साठवली जात असेल हे त्याच्याकडे पाहून आपल्याला अंदाज येतो. अंबरखान्याच्या छताला झरोके आहेत. अंबरखान्याच्या छतावर चढून गेल्यास शिवनेरीच्या पश्चिम बाजुचे दृष्य दिसते.आजमितीस अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
    पर्यटकांच्या सोयीसाठी बाकांची व्यवस्था केली आहे.
    अंबरखान्याजवळच एक महाराष्ट्राचा उठावाचा नकाशा करुन त्यावर विवीध किल्ले दाखविले आहेत.

    अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते
     
     
    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
    किल्ल्यावरील भलेमोठ्ठे जाते 
     
     
    आधी आपण कोळी चौथरा पाहु आणि मग गडच्या उत्तर टोकाकडच्या वास्तु पाहु.अंबरखान्यासमोरुन एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे.आधी आपण कोळी चौथर्‍यासंबधीत काही दुर्गकथा पाहुया.  

    या कोळी चौथर्याबाबत परंपरेने असे सांगितले जाते कि निजामशाही अस्तानंतर आदिलशाही आणि मोगल यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले याचा फायदा घेऊन  शिवनेरी येथील कोळी सरदारांनी मोठे बंड पुकारले होते.हे बंड मोडण्यासाठी मोठा फौजफाटा पाठविला गेला.अनेक कोळ्यांना कैद करुन बंड मोडून काढले आणि बंडखोर कोळ्याना कैद करुन शिवनेरीवर आणण्यात आले.इथे त्यांना ठार मारुन ज्या जागेवर त्यांची हत्या करण्यात आली तिथे एक फरस बांधण्यात आला. यालाच लोक कोळी चौथरा म्हणू लागले. या चौथऱ्याच्या पुढील बाजुस इदगाह नजरेस येतो.
      याविषयी पहिली दंतकथा अशी सांगतात कि बाळाजी जर्नादन भानु उर्फ नाना फडणवीस यांचा मेहुणा बळवंतराव मुंढे यांनी कोळ्यांचे बंड मोडून काढले तेव्हा यात सामिल असलेले पाच कोळी पळून गेले.बळवंतरावांनी शिपाई पाठवून त्यांना कैद करुन शिवनेरीवर आणले व त्यांना ठार मारले.परंतु मृत्युनंतर कोळ्यांना सदगती प्राप्त न होता त्यांची भुत झाली.आणि त्या भुतांनी आपल्यावरचा अन्यायाचा बदला म्हणून बळवंतरावाला छळायला सुरवात केली.त्यावर उपाय म्हणून बळवंतरावांनी अनेक पंचाक्षरी ( म्हणजे मांत्रिक) बोलावून दानधर्म केले.पुजा,अनुष्ठाण केली.पण भुतबाधेतून सुटला होईना.म्हणून अखेर शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या नावाची पाच लिंगे स्थापन करुन देवालय बांधले. यानंतर त्या भुतांनी बळवंतरावांचा पिच्छा सोडला.

    दुसर्‍या एका दंतकथेनुसार मुसलमानी आमदनीत जुन्नर येथे कोणी ब्राम्हण सुभेदार होता.पुढे काही कारणामुळे बादशहाची त्याच्यावर इतराजी झाली.त्याने जुन्नरच्या सुभेदाराला दरबारात बोलावून घेतले आणि त्याला आरोपी ठरवून कैदेत टाकले. तेव्हा त्या ब्राम्हणाने देवाला नवस केला, 'मी या संकटातून मुक्त होउन आलो तर पंचलिंगाचे मंदीर बांधीन' नंतर चौकशी अंती तो निर्दोष होता हे सिध्द झाले.मग बादशहाने कैदेतून त्याची सुटका केली.केवळ देवाची कृपा म्हणून आपली सुटका झाली असे त्या ब्राम्हणाला वाटले.जुन्नरला परत आल्यावर त्या सुभेदाराने शिवनेरीच्या पायथ्याशी पंचलिंग मंदीर बांधले आणि बोललेला नवस फेडला.   
        या दुसर्‍या कथेत थोडे तथ्य निश्चितच आहे.कारण सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात शिवनेर व चास तालुक्यात कोळ्यांनी बंड केले होते.यावेळी जुन्नरचे सुभेदार होते बाळाजी महादेव नावाचे ब्राम्हण गृहस्थ. कोळ्यांच्या बंडाचे पारिपत्य होउन बंदोबस्त झाला कि श्रींचे देवालय बांधीन म्हणुन त्यांनी नवस केला होता.जेव्हा कोळ्यांचा पुंडावा मोडून शांतता प्रस्थापित झाली तेव्हा पेशव्यांनी २० मार्च १७८७ रोजी सनद पाठवून दोन हजार रुपयात मंदीर बांधावे अशी आज्ञा केली. याविषयीची तपशीलवार सनद सवाई मधावराव पेशवे यांच्या रोजनिशीत १०३७ ( ९४३) पृष्ट क्रमांक २०२ वर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
       कोळी चौथरा आणि हा इदगाह असलेला परिसर हा गडावरील सर्वात उंच भाग असुन येथुन जीवधन, भैरवगड, चावंड , हडसर अन् नारायणगड या किल्ल्यांचे दर्शन होते.



    Ganga_Jamuna_Take.jpg

    Ganga_Jamuna_Take_1.jpg 

    गंगा जमुना टाके

    अंबरखान्याच्या मागील बाजुस गेल्यास गडाची खालपासुन वर आलेली तटबंदी व अभेद्य बुरुज यांचे दर्शन होते. अंबरखान्यापासून समोर जाणारा मार्ग शिवकुंजाकडे जातो. या मार्गाने जात असताना वाटेत गडाच्या उतारावर डाव्या बाजुला पाण्याची अनेक टाकी दिसतात. तर उजव्या बाजुस गंगा जमुना हि शिवनेरीवरील पाण्याची प्रसिद्ध टाकी दिसतात. या टाक्यांमध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध असते. गंगा जमुना हि टाकी सातवाहन काळातील बांधकामाचा उत्तम नमुना आहे.
    शिवजन्मस्थान :-


    Shiv_Janma_Sthan_2.jpgShiv_Janma_Sthan_3.jpg
     



    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos

    शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos







    Shiv_Janma_Sthan_1.jpg
     


     

     

     Shiv_Janma_Sthan_4.jpg








     
     
    Badami_Take.jpg
    शिवजन्म स्थान वास्तु :-
             यानंतर आपण जाउया केवळ शिवनेरी नव्हे तर अखंड महाराष्ट्र भुमीच्या आणि अखंड भारतभुमीच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या असणार्‍या पवित्र स्थळाकडे, 'शिवजन्मस्थानाकडे'.गंगा-जमुना टाक्याच्या पुढेच शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.  दुमजली असणाऱ्या ह्या वास्तूत तळ  मजल्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती व पाळणा आहे.कदाचित याच ठिकाणी महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखातून अंगाई गायली असेल त्याला झोका देत असताना.इथे आपल्याला शिवकल्याण राजा मधील ४ ओळी आठवतात.
                                              "गुणिबाळ असा जागसि का रे वाया । निज रे निज शिवराया ।"
    वरती पायर्‍या चढून गेले की आपला थेट इतिहासात प्रवेश होतो.कदाचित मुळ वास्तुला अशीच खिडकी असावी आणि इथूनच बाल शिवबाने पहिले सुर्यदर्शन घेतले असावे. हे बांधकामच तसे एकदम भक्कम नि सुस्थितीत आहे. इथे पाच खिडक्यांचा सज्जा आहे. सहाजिकच इथे पर्यटकांची स्वतःचा फोटो काढुन घेण्याची धडपड सुरु असते.  त्यामुळे बाहेरुन या वास्तूचा फोटो घेताना अडचण येते. या वास्तुला मोठ्या प्रमाणात शिवभक्त भेट देत असल्यामुळे आत जाण्यासाठी बहुतेक वेळा मोठी रांग असते.

     
        या जन्मस्थान परिसरातच हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा तसेच पाण्याचे हौद बघता येतात.इथे मोठ्या संख्येने इमारती असणार, पण आज त्या उध्वस्त अवस्थेत आहेत. 

     

    कोण्या एकेकाळी शिवजन्मस्थानाची हि वास्तु उध्वस्त अवस्थेत होती.मात्र शिवजन्मस्थानाचा जिर्णोध्दार राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी सत्यशोधक भास्करराव जाधव व सहकारी यांनी केला होता. या शिवभक्तांनी त्यावेळी वर्तमानपत्रामधुन केलेले मदतीचे आवाहन.
       "शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी झाला ती जागा महाराष्ट्रीय लोकांच्या ऐतिहासिक स्थलाच्या बाबतीत दिसुन येणाऱ्या उदासिनतेमुळे हल्ली अतिशय वाईट स्थितीत आहे. शिवनेरी सारख्या ऐतिहासिक स्थलाची वाताहात होऊ न देता त्याची योग्य व्यवस्था ठेवणे हे ख-या शिवभक्ताचे आद्य कर्तव्य आहे. याबद्दल नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 'शिवनेरी जिणोंद्वार' नांवाची कमिटी स्थापन करण्यांत आली. जिर्णोद्धार कमिटी पुराणवस्तु संरक्षक खात्याचे मुख्य अधिकारी मे. जी. सी. चंद्रा साहेब यांच्या सहाय्याने काम करीत आहे. किल्ल्यावरील जुन्या वाड्याचे जे अवशेष कमिटीच्या पैशाने आतापर्यंत उकरून काढले आहेत. त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चाचे ३६५० रु. चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्या कामाला सुरवात होईल. पुतळ्याचे काम हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हात्रे यांच्याकडे दिले आहे. धर्मशाळेच्या कामाचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्रक तयार होत असुन त्या कामालाही सुरुवात होईल. कमिटीने आखलेल्या जिर्णेद्वाराच्या योजनेस अदमासे रु. चाळीस हजर लागतील असा अंदाज आहे. तरी कार्याचे महत्व जाणुन शिवभक्त ह्या पवित्र कार्यास सढळ हाताने मदत करतील अशी आशा आहे."
           सर्वांचा नम्र,
     शं. शा. मोरे वकील,
    जॉ. से. शिवनेरी जिर्णोद्धार कमिटी,
    पुणे.
           दुर्गम ठिकाणी आसणा-या शिवजन्मस्थानाचे जिर्णोद्धार कार्य या सत्यशोधकांनी १९२९ सालातच पूर्ण केले होते.

    Jijau_aani_Raaje.jpg

    बाल शिवाजीला हिंदवी स्वराज्याचे बाळकडू देताना वीरमाता जिजाऊ




     शिवकुंज:  -

            हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उदघाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा अविर्भावातील मायलेकरांचा पुतळा शिवकुंजा मध्ये बसविला आहे.
    | निर्धारची जाईन केला । अन शिकविला बाळ शिवबाला ।
    | क्षत्रियाचा बाणा शिकविला । एक विचार दोघांनी केला ।
    १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य घोषित करण्यात आला ते ठिकाण म्हणजे किल्ले शिवनेरीवरील शिवकुंज इमारत .
          किल्ले शिवनेरी वरील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे आकर्षक स्मारक असलेले प्रेरणास्थळ 'शिवकुंज स्मारक ' अवघ्या दुर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेते. याच शिवस्मारक उभारणीला नुकतीच ६२ वर्ष पूर्ण झाली. १ मे १९६० महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पुर्व संध्येला, २७ एप्रिल १९६० रोजीच्या शिवजयंती दिनी महाराष्ट्र राज्याच्या अमृतकलश पुजणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते.
    घडीव दगडी बांधणीतील, जुन्या वास्तूशास्रांच्या आधारे बनवलेली आकर्षक कमानीची ही वास्तू महाराष्ट्राचे प्रेरणास्थाण बनली आहे. शिवकुंज स्मारकातील राजमाता जिजाऊ व बाळराजे शिवराय यांचे पंचधातुतील आकर्षक शिल्प प्रख्यात शिल्पकार व्ही. जी. सहस्रबुध्दे यांनी बनवलेले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या औचित्याने किल्ले शिवनेरीवर शिवरायांचे आकर्षक स्मारक उभारण्याची संकल्पना शिवछत्रपती स्मारक समितीने महाराष्ट्र शासनाकडे मांडली होती. मुंबई राज्याचे बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई हे या समितीचे अध्यक्ष होते.शिवकुंज स्मारकाचे बांधकाम १९५८ मध्ये सुरू करण्यात आले होते. हाजी युसूफ बनेमीयाॅ तिरंदाज यांनी या कामाचा ठेका घेतला होता.

    किल्ले शिवनेरी वरील शिवकुंज इमारतीचे काम चालू असतानाचे ६२ वर्षे जुने दुर्मिळ छायाचित्र. विशेष म्हणजे ही इमारत म्हणजे याच ठिकाणाहून नवनिर्मित महाराष्ट्र राज्य उदयास आल्याची घोषणा १ मे १९६० साली देण्यात आली.

    स्मारकासाठी घडीव दगड, शिवनेरीच्या पायथ्यापासून टोणग्यांच्या पाठीवर लादून किल्याच्या चढणीच्या मार्गाने नेले जात.तर, किल्ल्यावरील सपाटीच्या मार्गापासून बांधकाम स्थळापर्यंत बैलगाडीत दगडांची वाहतूक केली होती.स्मारकाचे उभे खांब सिमेंट काँक्रिटचे असून त्यावर स्टोन क्रीट फिनिशिंग केल्याने हुबेहुब दगडाचेच वाटतात. स्मारकाच्या लाकडी कमानीसाठी साताऱ्यावरून दांडेली टिकवूड मागविण्यात आले होते.
    बांधकामासाठी लाकडी तुळ्या मजुरांना डोक्यावर उचलून घेऊन जावे लागले होते. स्थानिक कामगारांनी या स्मारकाच्या कामाला न्याय दिला होता. एकूण ७,१०० रुपये खर्च स्मारकासाठी करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने केलेल्या अडथळ्यावर बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांनी मध्यस्ती केली होती.
    सन १९६० च्या दशकातील महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री दौलतराव श्रीपतराव ऊर्फ बाळासाहेब देसाई यांच्या कालखंडात सचिवालय, जे.जे हाॅस्पीटलची पुनर्बाधणी, विविध सरकारी कामे पुर्णत्वास आली होती. शिवछत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने शिवकुंज स्मारक प्रत्यक्षात त्यांच्या देखरेखीखाली निर्माण करण्यात आले होते.

    Shivneri_patra.jpg
    शिवरायांचे आज्ञापत्र
     
    शिवकुंजात राजमाता जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या बाल शिवाजीची हातात तलवार घेतलेली पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजाच्या मागील बाजूस असणा-या व-हांडयामध्ये १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.
     



    शिवकुंजासमोर राजवाड्याच्या आधी उजव्या हाताला एक मोठी पांढरी कमान आहे व त्याच्या पाठीमागे सातवाहनकालीन पाण्याचे मोठे टाके आहे. ह्या टाक्याला कमानी टाके म्हणतात. ही कमान बऱ्यापैकी मोठी आहे व गडाखालूनही सहज ओळखता येते.या कमानीखालील इमारतीवर घुमट असुन त्यावर फारसी भाषेत कोरलेले दोन शिलालेख आहेत. एकेकाळी या मशिदीच्या दोनपैकी एक मिनार पडला होता.परंतु पुरातत्वखात्याने त्याची पुनर्बांधणी करुन मुळ रुप परत दिले आहे.या इमारतीच्या कमानीवर बसून मुस्लिम धर्मोपदेशक इथे प्रवचन द्यायचा. 
       या मशीदीच्या समोरुनच एक वाट उतरुन साखळी वाटेने खाली शिवनेरी पुर्व लेणी समुहाकडे जाते.तिथूनच थेट उतरुन आपण जुन्नर गावात जाउ शकतो. या वाटेवर देखील एक भुमीगत पाण्याचे टाके दिसते.मात्र त्यात मोठ्या संख्येने वटवाघळे असल्यामुळे पाणी अर्थातच खराब झालेले आहे. 

     Badami_Take_2.jpg
    शिवजन्म इमारतीकडून कडेलोट टोकाकडे जाताना वाटेत एक दगडी बांधकामाचे बांधीव तळे दिसते हे तळे बदामी टाके म्हणुन ओळखले जाते. या तळ्यात समोरील बाजुस दगडाचे खोलीवजा बांधकाम केलेले आहे. याला बदामी टाके असे नाव का पडले हे समजत नाही.



    बदामी टाक्यापासुन पुढे जाणारा रस्ता किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोकाकडे जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीच्या या सरळसोट कडयाचा उपयोग हा गुन्हेगारांना कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी केला जात असे. या बाजुला संरक्षण म्हणून एक तटभिंत बांधली आहे.एकेकाळी हि भिंतीचीही पडझड झाली होती.मात्र तिची हि आता डागडुजी करण्यात आली आहे. 
     
    शिवनेरीवरुन दिसणारा लेण्याद्रीचा डोंगर
      
      शिवनेरी किल्ल्याचे फोटो | Shivneri Fort Photos
      किल्ल्यावरून दिसणारी शेती
     
     जुन्नर शहराचा नजारा
     
    येथे आपली गडफेरी पूर्ण होते.संपुर्ण गड डोळसपणे फिरण्यास पाच तास तरी हवेत. गडाचे हे सर्वात उत्तर टोक. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर,वडूज धरणाचा जलाशय तसेच नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. तसेच पायथ्याच्या जुन्नरचे मनोहारी दृष्य दिसते. या कडेलोट टोकावर पायथ्यापासून आरोहण करण्याचा यशस्वी प्रयत्न याच भुमीतील सुपुत्रांनी केला आहे. अवघड श्रेणीतील हि चढाई 
    इथेच आपली हि पुण्यभुमी शिवनेरीची दुर्गयात्रा पुर्ण होते. महाराष्ट्रातील एका महत्वाच्या दुर्गभेटीचे समाधान पदरी बांधून आणि नवी आपण आपल्या आयुष्यातील संघर्षाना यश्स्वी तोंड देण्यासाठी परतीची वाट धरायची.
    अद्भुत भुयारी मार्ग की अंतर्गत खोदलेला जलश्रोत?
    जुन्नर तालुक्यातील काही गोष्टी खरोखरच विचार करायला लावणा-या आहेत त्यापैकी हा भुयारी मार्ग होय. किल्ले शिवनेरीच्या पश्चिम पायथ्याशी हा वारसा आपणास पहावयास मिळतो. या ठिकाणी बांधण्यात आलेला हमामखाना वजा वास्तू पाहुन तर आश्चर्याचा धक्काच बसतो. यामध्ये टाकलेली खापरी पाइपलाइन विशेष लक्ष आकर्षित करते. याच वास्तुच्या बाजुला असलेले जुन्या घरांचे अवशेष येथील वेगळाच ऐतिहासिक वारसा असल्याचे दाखले देतात. जेव्हा या जवळपास ३० फुट खोल भुयारात मी प्रवेश केला तेव्हा पुर्वेकडे याचा विस्तार असलेला पहायला मिळाला.तोंडाशी निमुळते असलेले हे भुयार पुढे उभे राहुन चालत जाता येते एवढे आहे. जवळपास १०० फुट पुढे चालत गेल्यावर त्यापुढे काय? असे प्रश्न पडतात. पावसाळ्यात हे पाण्याने भरलेले असते तर मे महिन्याच्या शेवटाला हे कोरडे पडलेले पहायला मिळते. १०० फुट पुढे गेल्यावर त्यापुढे जायचे धाडस होत नाही. विशेष म्हणजे हे भुयार फक्त आणि फक्त मुरमात कोरले असुन अंडरग्राऊंड समपातळीत कसे कोरले असावे हा प्रश्न विचार करण्याची ताकद देतो. सुरवातीला तोंडाशी बांधकाम केलेले हे भुयार मात्र बांधकाम नसुनही सुव्यवस्थित पहायला मिळते.
    याबाबत कुठेही काही वाचायला मिळत नाही त्यामुळे हे नक्की काय असावे? याचा वापर कशासाठी असावा? या गोष्टी विचार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. खरोखरच हा अद्भुत भुयारी खजाना काळाच्या ओघात पडद्याआड गेला असल्याने याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होणं गरजेचं वाटते कारण जुन्नर तालुक्याला कदाचित यामुळे अजून एक ऐतिहासिक नवीन ओळख नक्कीच मिळेल. 🙏🙏
    लेख/ छायाचित्र - रमेश खरमाळे, माजी सैनिक
    ८३९०००८३७०







    संदर्भ :-
    १) पुणे जिल्हा गॅझेटीयर
    २) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
    ३) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा -सतिश अक्कलकोट
    ४) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
    ५) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
    ६) श्री. रमेश खैरमाळे, हर्षद खंदारे, इंद्रजित सावंत, कोल्हापुर यांचे लिखाण

    समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती

    ‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरश: भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा भ्रमंती, देशाटन चालूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. 'संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच', म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.
    भारतभ्रमण केल्यावर त्यांच्या मनातली देशप्रेमाची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. सह्यद्रीची ओढ अनावर होतीच. सह्यद्री आहेच असा.. माणूस एकदा त्याच्या प्रेमात पडला की त्याच्या रौद्र, राकट सौंदर्याची भूल माणसावर पडतेच. दऱ्याखोरी, गुहा, लेणी आणि गडकोट किल्ले ही सह्यद्रीची संपत्ती माणसाला मोहवून टाकते. समर्थदेखील अशाच तीव्रतेने सह्यद्रीकडे ओढले गेले. याच सह्यद्रीला साथीला घ्यायचे आणि त्याच्याच कुशीत आपला पंथ स्थापन करायचा. संघटना बांधायची, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासानेचे! आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तीरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा. नेमके त्याच वेळी सह्यद्रीच्याच साथीने शिवराय आणि त्यांच्या जिवलगांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. स्वराज्य निर्मितीची भावना जनमनात रुजवली होती. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. यावेळी समर्थ आले महाबळेश्वरी. उंच जागा, रम्य ठिकाण. पाच नद्यांचा उगम होतो इथून. गर्द राई, असंख्य वनस्पती. पुरातन देवालय आणि नीरव शांतता. इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या पाचही नद्या महाराष्ट्रभर पोचवतील. आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकायला हवी. सह्यद्रीने स्फूर्ती दिली. महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थानी गर्जना केली,
    ‘मराठा तितुका मेळवावा ।
    महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’
    ‘‘जय जय रघुवीर समर्थ’’
    साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थानी आपले कार्य सुरू केले. जरंडेश्वरच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले.
    रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती
    जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती
    दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी
    वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।
    बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात समर्थानी करताना तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली.
    समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!
    सर्मथांनी अनेक मारुती स्थापन केले, परंतु इ.स. १६४४ ते इ.स. १६४८ पर्यंत त्यांनी दहा गावांमध्ये स्थापन केलेल्या अकरा मारुतीचीच सुप्रसिद्ध म्हणून गणना केली जाते. सर्मथांना अकरा ह्या आकड्याचे विलक्षण आकर्षण होते. त्याचे रहस्य मारुतीच्या उपासनेमध्येच आहे. मारुती हा अकरावा 'रुद्र' आहे. प्रसिद्ध अकरा मारुतींची गावे त्या काळी राजकारणास उपयुक्त होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांना'स्वराज्य स्थापनेच्या काळी' त्यांना विशेष महत्त्व आले होते.
    'समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती' म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :
    शहापूर येथे १ (स्थापना शके १५६६)
    मसूर येथे १ (स्थापना शके १५६७)
    चाफळ येथे २ (स्थापना शके १५७०)
    शिंगणवाडी येथे १ (स्थापना शके १५७१)
    उंब्रज येथे १ (स्थापना शके १५७१)
    माजगाव येथे १ (स्थापना शके १५७१)
    बहे-बोरगाव येथे १ (स्थापना शके १५७३)
    मनपाडळे येथे १ (स्थापना शके १५७३)
    पारगाव येथे १ (स्थापना शके १५७४)
    शिरोळे येथे १ (स्थापना शके १५७६)
    हया अकरा मारूतीच्या स्थापनेचा जो काळ येथे दिला आहे त्याबद्यल मतभेद आहेत. परंतु शहापूरचा मारूती हया 'अकरा मारूतीत' पहिला याबाबत मात्र मतभेद नाहीत.
    वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश 'अकरा मारूतीत' नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. 'कृष्णातीरी जगदुध्दार कर' हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.
    समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-
    चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
    पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
    सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
    बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
    वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥

    समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
    समाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिरांची स्थापना केली. हनुमानच का तर तो शक्तीचं प्रतीक आहे !
    एका दिवसात किंवा दोन दिवसांत या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो. आता रस्ते आणि वाहनांची सुविधा चांगली असल्यामुळे इथे जाणे तुलनेने सोयीचे झालेले आहे. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे असे काहीही नाही. मुळात समर्थानी असे कोणतेही अवडंबर कधीच माजवले नाही. त्या त्या ठिकाणी त्यांनी बलोपासनेसाठी मारुतींची स्थापना केलेली दिसते. तरीसुद्धा भटकंतीसाठी भौगोलिकदृष्टय़ा त्यांचा जिल्हावार असा विचार करता येईल.
    मुक्काम करुन हे अकरा मारुतींचे दर्शन घ्यायचे असेल तर कराङ हे सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे रहाण्यासाठी उत्तम दर्जाची हॉटेल्स आणि चविष्ट जेवणाची चांगली सोय आहे.
    सातारा जिल्हा :चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माजगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर, शहापूर.
    सांगली जिल्हा : शिराळे, बहे बोरगाव.
    कोल्हापूर जिल्हा : मनपाडळे, पारगाव

    चाफळचा वीर मारुती
    Akra Maruti1
    सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उंब्रजवरून जेमतेम ११ किमी वर चाफळ आहे. शके १५५९ म्हणजेच इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थानी चाफळ इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इस १६४९मध्ये समर्थानी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. जणू काही प्रभूरामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले जाते.
    प्रताप मारुती/भीम मारुती/वीर मारुती
    Akra Maruti2
    चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे १०० मीटर चालत जावे. तिथे रामदासस्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आजही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडिले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणताहेत, नेटका, सडपातळ, डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो आहे अशा रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे.
    दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केलेली दिसते.
    माजगावचा मारुती
    Akra Maruti3
    चाफळपासून फक्त तीन किमी अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्टय़ आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे १०० चौरस फूट लांबी-रुंदीचे, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळा भरते.
    शिंगणवाडीचा मारुती
    Akra Maruti4
    यालाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थाची ध्यान करण्याची जागा असलेली रामघळ आहे. याच ठिकाणी शके १५७१ अर्थात इ.स. १६५० मध्ये समर्थानी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत म्हणजे उगारलेल्या स्थितीत आहे.
    Akra Maruti5
    सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर ११ मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही परंतु आजूबाजूला दाट वृक्ष मात्र आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठीसुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबडय़ा रंगाने रंगवलेला असल्याने लांबूनसुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थाचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. या टेकडीवर जाण्यासाठी चारचाकी वाहन जाईल ईतका रस्ता केला आहे. मात्र रस्ता विलक्षण कच्चा असल्याने स्वतःचे कारसारखे वाहन असेल न नेणेच योग्य होईल.
    Akra Maruti6

    Akra Maruti7
    एखाद्या स्थानाशी निगडित कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते. त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीबद्दलसुद्धा काहीसे असेच आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगतात. जवळच सडा दाढोली गावाजवळ रामघळ आहे. हि शिवसमर्थ भेटीच्या ठिकाणापासून साधारण पंधरा कि.मी वर डोंगरात आहे. ईथे जाण्याचा रस्ता कच्चा आहे हे ध्यानी घेउन त्याप्रमाणे नियोजन करावे.याच रामघळीजवळ शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थानी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला, त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असे नाव मिळालेय.
    उंब्रजचा मारुती/ मठातील मारुती
    Akra Maruti8
    चाफळचे दोन आणि माजगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उंब्रज इथे येतो. इथेच जवळ आता तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. इथल्या मारुतीमंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानालासुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उंब्रज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. त्याच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे. अशी इथली एक आख्यायिका.
    समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० साली समर्थानी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदासस्वामींनी कीर्तन गेले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले.
    हा मारुती उंब्रज गावात पुर्वबाजुला बाजारपेठेत आहे. पुण्याच्या दिशेने तोंड असेल तर उजव्या हाताला उंब्रज गावाची मुख्य बाजारपेठ आहे. इथेच समर्थ स्थापित हनुमानाचे मंदिर आहे. इथे जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने शक्यतो चारचाकी वाहन असेल तर हायवे शेजारी पार्क करुन चालत जाणे बरे पडेल.
    मसूरचा मारुती
    Akra Maruti9
    उंब्रजपासून जेमतेम दहा किमी वर असलेल्या मसूर इथे समर्थानी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडित एक कथा आहे. आणि ती कथा आहे कल्याणस्वामी या समर्थाच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थाना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थाचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी. चार वर्षे मसूर इथे समर्थानी रामनवमीचा उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्रीरामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थानी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंडय़ावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले! अंबाजीने काहीही न विचारता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, ‘अंबाजी कल्याण आहे ना?’ विहिरीतून प्रत्युत्तर आले, ‘सर्व कल्याण आहे स्वामी.’ तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले.
    पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके १५६८ अर्थात इ.स. १६४६ साली याची स्थापना समर्थानी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरीत्या रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थाचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारीच नारायणमहाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे आहे.
    या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पहिलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थानी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मनी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थानी इथेच यथेच्छ बदडून काढले होते, असे सांगितले जाते.
    शहापूरचा मारुती
    Akra Maruti 10
    कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर आणि मसूरपासून तीन कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त एक कि.मी.वर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके १५६६ म्हणजेच इ.स. १६४५ साली समर्थानी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंडय़ाची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयेला दोन कि.मी.वर रांजणखिंड आहे. इथे दोन मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे.
    शहापूर.. समर्थ.. बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूरजवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तिथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला.. असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दु:खी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजीपंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून विजापूरला घेऊन गेले होते.
    आजपासून पाच दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थानी सईबाईंना दिला. दासोपंत (म्हणजे समर्थच) विजापुरी जाऊन हिशेब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी परत आले!! त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती-पत्नींनी तीन दिवस कडकडीत उपास केले. चौथ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थदर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर आठ दिवस उपास घडला. त्यावेळी हे दांपत्य समर्थाना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थाना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थानी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनवधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय.. त्यांचे डोळेच दिपले. समर्थाच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला, असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थानी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे.
    बहे बोरगावचा मारुती
    Akra Maruti 11
    सांगली जिल्ह्य़ातल्या वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे हे गाव आहे. कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम बारा कि.मी. वर हे ठिकाण आहे. शेजारच्या बोरगावमुळे त्याचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. याठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी निगडित आहे. रावणाचे निर्दालन करून अयोध्येला परत जाताना प्रभू रामचंद्र कृष्णा नदीच्या काठी असलेल्या बोरगावला थांबले होते. तिथे कृष्णेच्या वाळवंटात प्रभू रामचंद्र स्नानसंध्या करायला गेले असताना कृष्णा नदीला उचंबळून आले, आणि त्यामुळे तिला अकस्मात पूर आला. मारुतीरायाने नदीपात्रात मधोमध बसून आपले दोन बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला त्यामुळे मध्ये एक बेट तयार झाले. हनुमंताने दोन बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे/ बाहे/ बहुक्षेत्र असे नाव या स्थानाला प्राप्त झाले, असे मानले जाते.
    या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थानी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली. या मूर्तीकडे पाहताच समर्थाना एक रचना सुचली..
    हनुमंत पाहावयालागी आलो,
    दिसेना सखा थोर विस्मीत जालो।
    तयावीण देवालये ती उदासे,
    जळातूनी बोभाइला दास दासे।।
    ही गोष्ट शके १५७३ अर्थात इ.स. १६५२ सालची. प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढय़ात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीचे दोन हात पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांडय़ांच्या बाजूला धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती. इथे जाण्यासाठी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर मात्र ही वाट बंद होते. त्यावेळी इथे जाता येत नाही.
    शिराळ्याचा मारुती
    Akra Maruti 12
    जागा लक्ष्मीची शिराळे,
    तेथे निघती नागकुळे ।
    श्रावणमासी मुलेबाळे,
    खेळविती।।
    सांगली जिल्ह्यतले नागांसाठी प्रसिद्ध असलेले हे शिराळे गाव. इथे समर्थानी स्थापिलेल्या मारुतीमुळेसुद्धा प्रसिद्ध आहे. एस.टी. स्टँडजवळच हे मंदिर आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. शके १५७६ म्हणजे इ.स. १६५५ साली समर्थानी इथे मारुतीची स्थापना केली. सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच आहे. कंबरपट्टय़ामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याचा गोंडासुद्धा खूप सुंदर आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक दार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य म्हणून प्रसिद्ध होते.
    मनपाडळेचा मारुती
    Akra Maruti 15
    मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्य़ात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. पन्हाळगड म्हणजे जणू दक्खनचा दरवाजाच होता. विजापूरच्या आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थानी या ठिकाणी ही दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ कि.मी. आहे. तर वडगाव वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ कि.मी. आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थानी शके १५७७/इ.स.१६५२ मध्ये केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. आसपास झाडी असलेल्या ओढय़ाकाठी एक सुंदर कौलारू मंदिर आहे. सात फूट औरसचौरस गाभारा असलेल्या या मंदिराचा नवीन बांधकाम केलेला सभामंडप चांगला मोठा आहे.
    वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी नावाचे एक गाव आहे. इथेही एक मारुतीची मूर्ती आहे. कोल्हापूरपासून जेमतेम २० कि.मी.वर ज्योतिबाच्या ऐन पायथ्याशी मनपाडळे हे गाव वसलेले आहे. इथून जवळच सात कि.मी.वर असलेल्या पारगावला अजून एक समर्थ स्थापित मारुती आहे.
    पारगावचा मारुती
    Akra Maruti 14
    यालाच बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे. त्याच्या उत्तरेला जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावात हे मारुती मंदिर आहे. शके १५७४ म्हणजे इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेला आहे. इथली मूर्ती सपाट दगडावर कोरलेली जेमतेम दीड फूट उंचीची आहे. यावर शेंदूर नाही. मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे. आठ फूट लांबी-रुंदीचा मूळ गाभारा. १९७२ मध्ये इथे ४० फूट लांब आणि १६ फूट रुंदीचा सभामंडप बांधला. मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच कि.मी. पण सरळ रस्ता नाहीये. वळसा घेऊन इथे यावे लागते.
    या अकरा मारुतींशिवाय समर्थानी गोदावरी काठी टाकळी इथे गोमयाचा मारुती स्थापन केला. शिवाय सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि अगदी हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रिनाथाच्या मंदिरातसुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे. विपरीत काळ आलेला असतानासुद्धा ‘धीर धरा धीर धरा तकवा..हडबडू गडबडू नका।।’ असा संदेश देणाऱ्या समर्थानी तरुणाईमध्ये बलोपासनेचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी सह्य़ाद्रीच्या कुशीत हे अकरा मारुती स्थापन केले.
    इ.स. १६४५ ते १६५५ अशा दहा वर्षांच्या काळात समर्थानी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. तात्कालीन देशपरिस्थिती, समाजस्थिती यांचे योग्य आकलन करून समर्थानी प्रजेपुढे शक्तीचे, तेजाचे प्रतीक असलेले हे मारुती उभे केले. त्यांच्यायोगे बलोपासना आणि कोणत्याही संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा समर्थानी लोकांना दिली. दळणवळणाची साधने अगदी तुटपुंजी असलेल्या त्या कालखंडात कदाचित संपर्ककेंद्रे म्हणून सुद्धा या समर्थ स्थापित मारुती स्थानांचा उपयोग होत असावा. संपर्काचे एक जाळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते. आजघडीलासुद्धा या ठिकाणांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. आपल्या भटकंतीमध्ये ही वेगळ्या उद्देशाने केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय ठरेल. सह्य़ाद्रीच्या कुशीत असलेल्या या ११ मारुतींना कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावी. सरत्या पावसाळ्यात गेले तर सर्वात उत्तम. या वेगळ्या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. दोन घटका इथे शांत बसावे. इतिहासाची आठवण ठेवावी. हनुमंताची प्रभूरामाप्रति असलेली अनन्यसाधारण निष्ठा आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आल्यावर मिळावी.. आपली भटकंती समृद्ध व्हावी..!!!
    Akra Maruti 16

    Akra Maruti 17

    Akra Maruti 18
    यात्रेचे नियोजनः-
    चाफळचे दोन, खडीचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रजचा मारुती पाहून मसुरला जाणे सोयीचे पडते. उंब्रजवरुन कराडच्या दिशेने निघाल्यास एस आकाराचे वळण घेउन उत्तर मांड नदीवरचा पुल ओलांडला कि एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याने मसुरचा व शहापुरचा मारुती पाहून कराडला जाता येईल. पुढे तासगाव रस्त्याने रेठरेमार्गे कोळे नरसिंगपुर व बहे मारुती पहाता येईल. इथून थेट ईस्लामपुर गाठून बत्तीस शिराळ्याचा मारुती आणि शेवटी वारणानगर मार्गे मनपाडळे व पारगावचा मारुती पाहून हि यात्रा सुफळ संपुर्ण करता येईल.
    Akra Maruti 19

    Akra Maruti 20

    तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
    ब्लॉगचा पत्ता:
    भटकंती गड-कोटांची

    संदर्भग्रंथः-
    १ ) आडवाटेवरचा महाराष्ट्रः- प्र.के. घाणेकर
    २ ) http://www.marathiworld.com हि वेबसाईट
    ३ )दै. लोकसत्तामधील "समर्थ स्थापित अकरा मारुती", या विषयावरील लेख.
    ४ ) https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/ हि वेबसाईट

     समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. श्री मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला. समर्थांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. समर्थांनी या आध्यात्मिक ग्रंथाचे लेखन निबीड अरण्यातील शिवथरघळ सुंदर मठात निसर्गाच्या सान्निध्यात केले आहे. समर्थांच्या ‘दासबोध’ आणि जुन्या ‘दासबोधा’त त्यांच्या या निसर्ग प्रेमाची प्रचीती येते. समर्थांनी लोकजागरणांसाठी सामाजिक प्रबोधन केले. देशभरात अकराशे मठांची स्थापना करून श्रीरामाच्या उपासनेचा पंथ विस्तारित केला. समर्थ संन्यासी होते, निर्मोही होते. लोककल्याण हेच त्यांचे जीवनध्येय होते. पण सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी झालेल्या समर्थांना निसर्गलावण्याची प्रचंड ओढ होती. दासबोधाचे लेखन करतानाही ते एकरूप, समरूप झाले होते.

    चाफळच्या खोऱ्यात असताना त्यांचे वास्तव्य बहुतांश काळ जंगलात, झाडाझुडपात असे. डेरवणच्या डोंगरघळीत, वाघापूरच्या सड्यावर, भैरवगडच्या घळीत, चंद्रपूरच्या डोंगरावर आणि कळंब्याच्या घळीत ते एकांतवासात चिंतन करीत. एकांतवास प्रिय असलेल्या समर्थांनी चाफळला श्रीराममंदिराची बांधणी स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतली. अकरा मारुतींची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या मठांत रामनवमी, हनुमान जयंती असे उत्सव होत, पण समर्थ मात्र ‘दास डोंगरी राहतो’ असे सांगत. निर्जन घळी आपला बहुतेक काळ वास्तव्य करीत. समर्थ म्हणतात –

    ‘अखंड एकांत सेवावा। अभ्यासची करीत जावा

    काळ सार्थकची करावा । जनासहित ।।

    दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ।

    देव भक्तासवे जातो । ध्यान रूपें ।।

    पुढे समर्थांनी शिवथर घळीत राहून दासबोधाचे लेखन केले. हा निसर्गरम्य, वनसृष्टीने लपेटलेला परिसर त्यांना विशेष आवडत असे. या घळीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात –

    ‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालिली बळें ।

    धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळें ।

    गर्जती मेघ तो सिंधू। ध्वनिकल्लोळ उठीला ।

    कड्याशी आडळे धारा । वात आर्क्त होतसे ।

    तुशार उठती रेणू । दुसरे रज मातले ।

    वात मिश्रीत ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ।।

    निसर्गाचे ते पूजक होते. निसर्गाचे हे रूप म्हणजे त्यांना मूर्तरूप वाटत असे. पक्ष्यांची सुमधूर गीते, वादळ संगीत, कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, हिरवीगार वनराई, यात त्यांना संगीताची प्रचीती येत असे.

    समर्थ रामदासांनी हिंदुस्थानच्या केलेल्या परिक्रमेत अनेक निबीड जंगल पाहिली. त्यांना जंगलातल्या वृक्ष, वेली आणि फुलांचे औषधी गुणही माहिती होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार त्यांनी परळीच्या किल्ल्यावर वास्तव्य केले. तोच हा सज्जनगड. समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र झाले. सज्जनगडावर मठाची स्थापना केल्यावर उद्यान, बाग त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार करून घेतली. सुंदर मंदिरे आणि मंदिराचा परिसर कसा असावा हे सांगणाऱ्या समर्थांनी बागेच्या रचनेचा सांगितलेला तपशील वाचल्यावर त्यांच्या  निसर्गप्रेमाची प्रचीती येते. जुन्या ‘दासबोधा’त असलेल्या ‘बागप्रकरण’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेल्या अठ्ठावीस ओव्या म्हणजे फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, भाज्या या साऱ्या वनस्पतीच्या गुणांची साक्षच होय.

    प्रसन्न निघाला स्वभावे। बागेमध्ये काय लावावे।

    म्हणूनी घेतली नावे । काही एक ।

    असा प्रारंभ करीत समर्थांनी बागेत लावावयाच्या फळा-फुलांची नावे सांगितली आहेत. ही झाडे कशी कुठे लावावीत हेही त्यांनी सांगितल्याने बागसंवर्धन आणि बागसंरक्षण या व्यवस्थापनाचेही सूत्र त्यांनी ‘बनकटी प्रकरणात’ सांगितले आहे. भुईचाफा, नागचाफा, मोगरा, बट मोगरा, जाई-जुई, शेवंती-मालती बकुळी, मखमल, दवणा, विविध रंगांची जास्वंद, विविध रंगांची कमळे याबरोबरच तुळस, बेलफळ या देवपूजेसाठी लागणाऱ्या झाडांचाही समावेश बागेसाठीच केला आहे. तळबं, गोरक्षचिंच, फणस, चिंच, पपई, वड-पिंपळ, उंबर, आंबा, लिंबू, साखरलिंबू, डाळिंब, केळी, नारळ, पोफळी, जांभूळ, आवळा ही फळे देणारी झाडे बागेत असायला हवीत असे ते सांगतात. वेत, कळकी, शिवारी, पानवेल, गुळवेल अशा वेलींचाही उल्लेख ते करतात. बागेच्या भोवती निवडुंग, कावेटी, काटेशिवरी, पांगेरा, निर्गुडी, करवंदीची झाडे लावावीत. म्हणजे बागेतल्या वृक्षसंपदेचे जतन करता येते असं समर्थांचे म्हणणे आहे. इतक्या उपयुक्त वनस्पतींची माहिती सांगून शेवटी समर्थ सांगतात

    अठराभार वनस्पती । नामें सांगवि किती ।

    अल्प बोललो श्रोती । क्षमा केली पाहिजे ।।

    समर्थ लोककल्याणकारी संत होतेच, पण ते थोर निसर्गप्रेमी, निसर्गपूजक आणि निसर्गाच्या सौंदर्यात आनंद, समाधान मानणारेही होते. निसर्ग हाच त्यांचा देव आणि गुरूही होता.

    सहाजिकच दाट जंगलात अवघद जागी असणार्‍या घळी त्यांना विशेष प्रिय होत्या. 

         कडे,कपाटे,दुर्कुटे | पाहो जाता भयचि वाटे |

          अशा या घळीत समर्थ सुखाने जाउन रहात.आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे वास्तव्य शिवछत्रपतींच्या विनंतीवरुन परळीच्या किल्ल्यावर झाले,त्याचाच झाला सज्जनगड.

         जागा सुंदर गहन | तेथे सुखावले मन |

       तेथे जावया संतोष | वाटतसे ||

    या सर्व घळी पुढे रामघळी म्हणून प्रसिध्द झाल्या.निसर्गसानिध्यात जे रमतात्,त्यांनी एक परिक्रमा करुन या सर्व घळींना भेट देता येईल. अर्थात बहुतेक घळीपर्यंत जाण्यासाठी आसपास अंतरापर्यंत रस्ते जातात.थोडा पदभ्रमणाचा आनंद घेउन या घळींना भेट देता येईल.

    समर्थ रामदासांनी वास्तव्य केलेल्या घळी

      चाफळची खऱ्या अर्थाने ओळख म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले श्री राम मंदिर आणि समर्थ स्थापीत अकरा मारुतीपैकी आणखी दोन मारुती. समर्थ रामदासांच्या जीवन-कार्यात चाफळचे महत्व फार मोठे आहे. चाफळचे प्रसिध्द राममंदिर समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गांवकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभु रामचंद्रानी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातली रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची हया देवळात प्रतिष्ठापना केली.

    चाफळच्या राम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार
    राम मंदिराचे मागील प्रवेशद्वार

    चाफळ गाव चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेले आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरी मंदिराची रचना फार आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गाभ्यारात राम, लक्ष्मण, सीता आणि समोर हनुमानाची काळ्या पाषाणातील छोटी मूर्ती आहे. मुख्य मंदिर व गाभाऱ्यात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिर आवारात मुख्य मंदिराच्या अगदी समोर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “दासमारूती” चे मंदिर आहे. हा मारुती श्रीरामाच्या समोर 'दोन्ही कर जोडोनि' उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहीजे म्हणून समर्थांनी सुदंर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारूतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे ६ फूट उंचीची असून चेह-यावर अत्यंत विनम्र भाव आणि समोर असलेल्या प्रभु श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे.

    मुख्य मंदिरा जवळच समर्थांची “ध्यानगुंफा” आहे. हि ध्यानगुंफा म्हणजे जमिनीत खोदलेले एक दालन. या ध्यानगुंफेचे प्रवेशद्वार आणि पहिलीच भली मोठी पायरी बघून धडकी भरते आणि आत उतरण्याचे धाडसच होत नाही. समर्थ ध्यानधारणेसाठी अशा एकांत जागी जाऊन बसत. समर्थ व शिवाजी महाराजांच्या अनेक गुप्त मसलती याच गुंफेत होत असत. मंदिर आवारात तानाजी मालुसरे सभागृह असून देवस्थाना तर्फे ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही २० मिनिटांची चित्रफीत माफक दरात या सभागृहात भाविकांना दाखवली जाते.

    श्रीराम मंदिराच्या पाठीमागे सुमारे २०० मीटर अंतरावर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “प्रताप मारुती” चे मंदिर आहे. ह्या मारुतीला प्रताप मारुती, भीम मारुती किंवा विर मारुती अशी ३ नावे आहेत. हे मंदिर समर्थांनी जसे बांधले त्याच स्थितीत आजही उभे आहे. या मंदिराला ५० फुट उंचीचे शिखर आहे. गाभाऱ्यातील मारुतीची उंची ७ फुट असून मूर्ती खूप भव्य व रेखीव आहे.

    शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक. हि दोन्ही ठिकाणे चाफळ गावापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आणि एकाच रस्त्यावर आहेत . त्यानुसार चाफळच्या नैऋत्येस असणाऱ्या टेकडीकडे म्हणजे शिंगणवाडी परिसरात काही ठिकाणे आहेत.. शिंगणवाडीच्या या डोंगराजवळ असणाऱ्या एका प्रशस्थ गुहेत (रामघळीत) समर्थ संध्या करावयास जात असत. म्हणून आपल्या दैवताची म्हणजेच मारुतीची मूर्ती त्यांनी येथे शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये स्थापन केली. या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब व रुंद असणा-या गाभा-यात साडेतीन फूट उंचीची छोटी मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. हे मंदिर अकरा मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ राममंदिरातून बाहेर पडल्यानंतर अर्ध्याच किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो. याला शिंगणवाडी फाटा म्हणतात. या रस्त्यावर शिंगणवाडीकडे डावीकडे वळल्यानंतर पुन्हा अर्धा किलोमीटर पुढे जायचे की डाव्याबाजूला एक कच्चा गाडी रस्ता दिसतो. हा रस्ता थेट हनुमंतांच्या मंदिरा समीप घेऊन जातो. मात्र हा शेवटचा १ किलोमीटरचा रस्ता बराचसा खराब, कच्चा व थोड्या खड्या चढणीचा आहे. कारसारखे वाहन मंदिरापर्यंत नेता येत असले तरी गाडी अत्यंत जपून चालवावी लागते अन्यथा हे अंतर पायीच चढून गेलेले बरे.

    समर्थ स्थापित "खडीचा मारुती"

    शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घ्यावे आणि डोंगर उताराचा कच्चा रस्ता उतरून चाफळकडे जाणाऱ्या रस्त्याला न वळता डावीकडे वळण घेऊन तसेच पुढे शिवसमर्थ स्मारकाजवळ पोहोचावे. हे स्मारक म्हणजे शिवाजी महाराज व समर्थ रामदास या दोन महान विभूती ज्या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रथम भेटल्या ते ठिकाण. या मठालगतच्या एका शेवरीच्या झाडाखाली समर्थानी शिवरायांना अनुग्रह दिला. येथे समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या सुंदर मुर्त्या असून आजूबाजूचा परिसर सुंदर फुलझाडे लाऊन सुशोभित केलेला आहे. या स्मारकाचे उद्घाटन २६ एप्रिल १९९० साली शरद पवार यांच्या हस्ते झाले.
    शिव-समर्थ स्मारक 
    शिव-समर्थ स्मारकाचा सुंदर परिसर

    स्मारक बघून झाले कि पुढे सडा दाढोली परिसरात असणारी रामघळ बघावी.शिंगणवाडीच्या पश्चिमेला एक कातळ टोपी घातलेल्या डोंगर दिसतो.याच डोंगरात रामघळ हि अफलातून जागा आहे. चाफळपासून एक-दोन डोंगर ओलांडून साधारण दोन तासाच्या पायपिटीने चालत रामघळीत जाता येते.म्हणजे हा तर झाला एक छोटा ट्रेकच. अर्थात पायी जायचे नसल्यास रामघळीपर्यंत जाण्यासाठी कच्चा गाडी रस्ता आहे. रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या पठारावर पवनचक्क्या बसवलेल्या आहे. या पवनचक्क्यामुळे एक कच्चा गाडी रस्ता थेट रामघळीच्या वर असणाऱ्या पठारावर गेलेला आहे. डोंगरावर जाऊन गाडी लावली की फक्त १०० पायऱ्या उतरून रामघळीत पोहोचता येते. 
    कुबडीतीर्थ रामघळ येथील पठार

    चाफळ राममंदिराजवळून जाणारा मुख्य रस्ता पुढे पाटणला जातो आणि कराड-चिपळूण रस्त्याला जोडतो.  रामघळीला जाण्यासाठी चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर यावे आणि चाफळकडे न वळता डावीकडे पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त १.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण ==> मधलीवाडी ==> वाघजाईवाडी ==> दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ, सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसतो आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची खात्री पटते. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत. थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला आणि दुपारच्या कडक उन्हात सुद्धा पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आमचं स्वागत होते. पठारावर सगळीकडे लांबच लांब पवनचक्क्यांचे राज्य आहे. येथेच डोंगरकड्यालगत लांबून काही रेलिंग लावलेले दिसले आणि त्याच्या जवळच दिसते रामघळीची स्वागत कमान.
    रामघळीचे प्रवेशद्वार
    “रामघळ प्रवेशद्वार” असे लिहलेल्या कमानीतून घळीमधे उतरणाऱ्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या सुरु होतात. ह्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत आहे. परिसरात माकड, वाघ, हरीण अशा प्राण्यांचे अनेक प्रतीकात्मक पुतळे ठेवलेले आहेत. साधारण १० पायऱ्या उतरल्यानंतर डोंगरकड्याला लाकडी रेलिंग लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. हा सर्व परिसर न्याहाळत जसं जसे आपण पायऱ्या उतरु लागतो तसा अचानकच हवेतला थंडपणा जाणवायला लागतो. बाजूच्या कातळाला आधारासाठी थोडा जरी स्पर्श केला तरी तो नुकताच फ्रीज मधून काढून तिथे ठेवल्यासारखा थंड लागतो. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.
    सुशोभीकरणासाठी लावलेले लाकडी रेलिंग
     

    रामघळीत उतरणार्‍या पायर्‍या

    डोंगरामध्ये राहणाऱ्या रामदासांना एकांत प्रिय होता. त्यामुळे महाराष्ट्रात समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक घळी व गुहा आहेत. त्यापैकीच एक हि चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ. समर्थांचे हे अत्यंत आवडते ठिकाण. त्यांचे बरेचसे लेखन याच घळीत झाले. चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर ही घळ आहे. ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग करण्याची इच्छा देखील होत नाही.
        घळीच्या समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारच्या उन्हात सुद्धा घळ इतकी थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागत. घळीमधे प्रवेश करण्याआधी चपला काढव्यात. तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे सणक डोक्यात जाते. घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप सुंदर दिसतो.

    या रामघळी संदर्भात एक कथा सांगितली जाते. सदाशिवशास्त्री येवलेकर नावाचे विद्वान दिवसा मशाली लावून अन जानव्यास सुरी बांधून फिरत होते. आपल्या पांडित्याच्या जोरावर समोर आलेल्या विद्वानाचा पराभव करित त्यांचे भारतभ्रमण सुरु होते.जर वादविवादात पराभव झाला तर मशाल विझवून जानव्याला बांधलेली सुरीने जीभ कापून घ्यायची त्यांची तयारी होती. पण विद्वत्तेच्या अभिमानाचे रुपांतर घमेंडीत झाले. फिरत फिरत हे शास्त्रीबुवा चाफळला आले. त्यांना समर्थ रामदास स्वामींविषयी समजले.मात्र समर्थ चाफळला नव्हते.ते या शिंगणवाडीच्या घळीत होते. म्हणून शास्त्रीबुवा शिंगणवाडीचा डोंगर चढून आले तो शिळा असलेल्या जागी त्यांची भेट समर्थांशी झाली.शास्त्रीबुवांनी तिथेच समर्थांना वादविवादाचे आवाहन दिले.समर्थांनी सुरवातीला नकार दिला.मात्र सदाशिवशास्त्री आग्रह सोडेनात.मग जवळून जाणार्‍या मोळीविक्याला त्यांनी हाक मारली.समर्थांनी त्याच्या वाटेत काठीने तीन रेघा आखल्या. त्या ओलांडून आलेल्या मोळीविक्याने वादविवादात सदाशिवशास्त्रींचा पराभव केला. पराभव मान्य केलेल्या सदाशिवशास्त्रींना समर्थांनी आपल्या संपद्रायात सामिल करुन घेतले.शिरवळजवळील कणेरी मठात त्यांना मठपती केले.
       याच घळीजवळ भैरववाडी लागते.एकदा समर्थांसाठी विड्याची पाने आणायला चाफळला गेलेल्या कल्याणस्वामीना सर्पदंश झाला. तेव्हा समर्थांनी भैरववाडीतील भैरवाला साकडे घातले.
      याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्‍याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.

    रामघळीचे हे फोटो पाहून भविष्यात या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्यास मदत करावी. 

    मोरबागची मोरघळ : -

       जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्‍या सज्जनगड उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी दोन छोटी धरणे पहायला मिळतात.
    sjn21
    वाटेत उजव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.
    sjn22
    हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.
    sjn23
    बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.
    sjn24
    ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्‍याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबलो.
    sjn25
    उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.
    sjn28

    sjn26
    डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.
    sjn27
    रामघळीच्या बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले. शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.

    हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-
    कोयनानगर हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे .कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.


    Bhairavgad 7

    एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
    Bhairavgad 8
    आत पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी  प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. 
    Bhairavgad 9
    हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
    Bhairavgad 10
    रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.

    चंद्रगिरीची घळ

    चंद्रगिरीचा डोंगर। त्यात गुप्त येक विवर।
    तेथे राहे योगेश्वर। निरंजन।।१।।
    रे नवल त्या निरंजनाचे। शिखर पाहो आकाशाचे।
    ऐसे पृथ्वीमध्ये कैचे। पाहो जाता।।२।।
    जागा सुंदर गहन। तेथे सुखावले मन ।
    वरी पाहता गगन। साठविले।।३।।
    तेथे अखंड नाही वात। म्हणउनी जागा तो निर्वात।
    शीतकाळी घुमघुमीत। वस्त्र न लगे।।४।।
    कृष्णा कोन्या दोहीकडे। मध्ये पर्वताचे कडे।
    मंडळ पाहता चहुकडे। समाधान।।५।।
    तळी असती शेते भाते। तया फिरताती आउते।
    नानापरीची मार्गस्थे। येति जाति ।।६।।
    वरती सेरढे मेंढरे। गुरेसी गुरेवासरे।
    ठाई ठाई गुराखी पोरे। क्रीडा करिती।।७।।
    भोवती डोंगराची धाटे। दिसती कडे आणि कपाटे।
    सवेचि येताती।धुकटे। झाकोळती।।८।।
    तळी पाहता आकाश। दिसे दुसरे कैलास।
    तेथे जावया संतोष।वाटतसे।।९।।
    तया खालती आहे माण। वरते आहे तळकोकण।
    क-हाड दंतागिरि पट्टण। पंचक्रोशी ।।१०।।
    राया रघुनाथाचे देणे । जाले हनुमंताकारणे।
    देव पाहावया पारणे।डोळ्याचे।।११।।
    रामदासाचा विसावा। ऱूद्र जाहाला अक्रांवा।
    भक्तजन वेगी धावा। दर्शनासी।।१२।।
          खुद्द श्रीसमर्थानी या अद्भूत निसर्गरम्य घळीचे असे सुंदर वर्णन केले आहे. हे वर्णन वाचल्यावर माझे निसर्गवेडे मन या चंद्र गिरीच्या घळीच्या दर्शनासाठी आतुरले. भोवताली गिरिशिखरे, द-याखो-या, गुहा, तळात दिसणारे आकाश, दोन्ही बाजूला अखंड अवखळपणे वाहणा-या कृष्णा व कोयना आणि घळीत जाताना आपण ढगांच्या वर जातो, ढग खालीच राहतात जणू आपण अशा स्वर्गात जात आहोत जेथून परतही येता येते अशा स्वर्गात असे वाटत राहते. असे हे अद्भूत स्वर्गसुख अनुभवावे असे कोणाला वाटणार नाही आणि ते पण “ भक्तजन वेगी धावा। दर्शनासी।। “ या शब्दात खुद्द समर्थ बोलावत असताना! मग चला तर, नव्हे सत्वर धावा........!
             ह्या घळीचे वर्णन काव्यबध्द करण्याएवढी हीचे महत्व समर्थाना का वाटत होते ते पाहाण्यासाठी थोडी तत्कालिन परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. १२ वर्षे तीर्थाटण म्हणजे भारतभ्रमण करून समर्थ (वयाच्या३६ व्या वर्षी) कृष्णातीरी आले. तेव्हा धर्मावरील प्राणांतिक संकटाची त्याना कल्पना आली. ही स्थिती लवकर पालटली नहीतर धर्म काही टिकत नाही ह्या चिंतेत समर्थ काय करायचे ते पुढील शब्दात समर्थप्रताप मध्ये आहे-
    श्रीगुरूसमर्थ येकांती बैसती। प्रांतीचे लोक दर्शनासी येती ।
    सकळ प्रांतीचा स्वामी परामर्श घेती। चिंता करिती विश्वाची।।
         शक १५६६-६७चा तो काळ. त्या भागात शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा बाळगून त्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरवात केली होती. आधी क-हाड, सातारा,महाबळेश्वर, चाफळ, करवीर जरंडा, इ. ठिकाणी भ्रमण झाल्यावर समर्थानी अखेरीस साता-याजवळचे मसुर येथे तळ दिला. कारण मसुरची पाटिलकी शहाजीमहाराजांकडे होती. या प्रांतात संचार करीत असता समर्थांचे आरंभीचे वागणे वागणे मुद्दामच पिसाटासारखे असायचे. पिसाट रामदास म्हणूनच ते सर्वत्र ओळखले जात. ते निर्भयपणे परिस्थितीचे निरीक्षण करत एकांतात, रानावनात, डोंगरात , घळीतून राहात जेथे एकांतातील चिंतन ध्यान याबरोबरच राजकारणाच्या तजवीजांवर सुध्दा चर्चा चालत असे. ह्या सर्वदृष्टीने चंद्रगिरीची घळ त्यानी निवडली होती.
         ह्या घळीत जाण्यासाठी चाफळ फाट्यावर उतरून चरेगावच्या दिशेने निघावे. वाटेवरचे मोठमोठाले उंचच उंच वृक्ष, पक्षी आपली सोबत करीत असतात. पुढे चाफळच्या रामाचे पदप्रक्षालन करणारी मांड नदी सामोरी येते..मग आपण चरेगावात पोहचतो. पुढची वाटचाल निर्मनुष्य परिसरातून असल्यामुळे ईथेच वाटाड्या सोबत घ्यावा. माळरानाचा चढ दमछाक करणारा आहे. ट्रेक शूज घालून हि खडी वाट चढताना, समर्थ लाकडी खडावा घालून कसा प्रवास करत असतील? हा प्रश्न मनात येतो. बेघर वस्तीमागच्या माळावरील ज्योतिबाच्या छोट्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर जवळची खिंड उजवीकडे ठेवून आपण चंद्रगिरी चढू लागतो हिरव्याकच्च कमरेपेक्षा जास्त उंचीच्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या झाडांतून डोकावणा-या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यातून मधूनच सरपटणा-यां मित्रांचे दर्शन घेत पाऊल मावेल एवढ्याच रूंदीची पाऊलवाट शोधत पुढे पाउले टाकत असताना समोर काळाभिन्न भलामोठा उंचच उंच कातळ दिसतो. कातळापर्यंतची सरळ उभी अवघड चढण पार करून वर पोहोचल्यावर सहज लक्ष वेधून घेणारे चिंचेचे डेरेदार झाड आहे.त्याच्या वरच्या बाजूला सहजासहजी न दिसणारे भले मोठे विवर आहे. हेच चंद्रगिरीच्या घळीचे प्रवेशद्वार. “चंद्रगिरीचा डोंगर। त्यात गुप्त येक विवर। “हे सुरवातीस लिहिलेले समर्थानी का म्हटले ते तेथे पोचल्यावर कळले. डोंगरउतारावरील झाडझाडो-यात हे “गुप्त” विवर इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहे की झाडाखालून पाहिल्यास येथे विवर असेल याची कल्पनासुध्दा येत नाही. विवरापर्यंत कसेतरी सर्कस करीत पोहोचल्यावर सर्वत्र नाग-सापानी टाकलेल्या कातीचा खच पडलेला दिसतो. त्या लटकणा-या कातीमुळे सगळीकडे नैसर्गिक रित्या झिरमिळ्यांची आरास तयार झाली होती.”जय जय रघुवीर समर्थ “ची गर्जना करीत निर्भिडपणे विवरात प्रवेश केला. समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या घळीतील धुळ मस्तकी लावली तेव्हा मन समर्थमय होते.
    या घळीला तीन दालने आहेत. बाहेरचे दालन पडवीसारखे छोटे, दुसरे मुख्य घळ आणि तिसरा भाग विवरे. प्रवेशद्वाराजवळ विश्रांतीसाठी लहान ओसरी आहे. येथे मुख्य घळीत जाण्यासाठी साधरण तीन साडेतीन फूट उंच दरवाजा आहे.. हे इथले वैशिष्ठ्य. इतर कोणत्याही घळीला अशी दरवाज्याची दगड रचून केलेली कृत्रिम चौकट नाही. मुख्य घळ समर्थांचे देवतार्चन करण्याचे दालन असावे कारण आतून दिसणारा घळीचा हा वरचा भाग मंदिराच्या कळसा प्रमाणे आतून निमुळता आहे. मुख्य घळीत सर्वत्र छोटीछोटी विवरे आहेत. ही एकांतवासासाठी वापरली जात असावीत कारण एक माणूस बसू शकेल एवढी ही छोटी आहेत. येथे थंडीच्या दिवसात उबदार वातावरण असते हे स्वत: समर्थानी अनुभवले आहे
    “ तेथे अखंड नाही वात। म्हणऊनी जागा ती निर्वात।
    शीतकाळी धुमधुमीत। वस्त्र न लगे।।“
    या स्थानाचे भौगोलीक वर्णनही समर्थानी पुढील प्रमाणे केले आहे.
    तया खालती आहे माण। वरती आहे तळकोकण।
    क-हाड, दंतगिरी, पट्टण। पंचक्रोशी।।
    या घळीत समर्थ ऱाहण्यास येण्यापूर्वी एक वाघ राहात असे. त्यास त्यानी हुसकून देऊन दुसरीकडे जाण्यास सांगीतले आणि आपण स्वत: त्या घळीत राहू लागले (पहा समर्थप्रताप ३-६१).
    ओसरीवर बाहेर पहात विश्रांती घेताना खाली नजर टाकली तर छोटीछोटी गावे, कौलारू घरे, शेती, मुंगीएवढे दिसणारे शेतातील कष्टकरी, डोंगरउतारावर चरत असलेली गुरे, उनाडक्या करत असलेली गुराख्याची पोरे, तळबीड गावानजिकच्या वसंतगड, लांबवर दोन्ही तीरावर हिरवेगार वृक्ष संभाळत डौलात वहाणारी कोयना, दूर क्षितीजावर चाफळच्या मागचा आकाशात डोके खुपसून बसलेला शिंगणवाडीचा डोंगर हे सर्व न्याहाळणे म्हणजे अवर्णनीय सुख... समर्थांच्याच शब्दात..“जागा सुंदर गहन। तेथे सुखावले मन “।
    या घळीबद्दल मौन बाळगणारा इतिहास आणि घळीची दुरावस्था ही समर्थप्रेमींसाठी खेदजनक गोष्ट आहे. एकेकाळी पुष्पमाला, धूपचंदन सुगंधाने दरवळणारी ही घळ पशुपक्ष्यांच्या घाणीने कुबट दुर्गंधीमय झाली आहे.



    हनुमंताला अकरावा रूद्र समजतात.म्हणजे मारूती हा शंकराचा अवतार होय. या रूद्रावतारात स्वत: कैलासनाथाना रामरायाच्या सेवेचे भाग्य लाभले आणि समर्थ स्वत: तर राम-हनुमंताचे दास, दासांचे भक्तांचे कोडकौतुक पुरविणे हे परमेश्वराचे आवडते कार्य म्हणूनच समर्थ या चंद्रगिरीच्या घळीत आल्यावर “ समर्थे चंद्रगिरी निवास केले । पंचाननेसी समर्थ भांडले।। कैलासनाथ प्रकट झाले। श्रीरघुनाथस्थापना करावया।।“ अशा रीतीने स्वये श्रीकैलासनाथानी समर्थाना चंद्रगिरीत प्रतिकैलास निर्माण करून दिला आणि ते स्वत: हनुमंताच्या रूपाने घळीत वास्तव्य करून राहीले..... “रामदासाचा विसावा। रूद्र जाहला आक्रावा।।.”... आणि म्हणूनच समर्थानी “भक्तजन वेगी धावा। दर्शनासी।। “असे आपल्याला आमंत्रण दिले आहे.  याच चंद्रगिरी घळीत वसंतगडाव वरुन देखील जाता येते.

    तोंडोशीची रामघळ :- 

    रामघळ हे प्रसन्नतेची आत्यंतिक अनुभूती देणारे हे ठिकाण आहे. एरवी प्राचीन घळी म्हंटल्या, की आपल्या नजरेसमोर शिवथर (जि. रायगड) घळ उतरते. साता-यानजीक पाटेश्वर डोंगरावरही काही घळी आहेत. ठोसेघर परिसरातही प्रसिद्ध मोरघळ आहे.

    तोंडोशीला जाण्यासाठी नागठाणे मार्ग सोईचा आहे. नागठाण्याच्या पश्चिमेस प्रथम गणेशवाडी लागते. इथले गणेश मंदीर प्रसिद्ध आहे. तिथे बाजूलाच शिवकालीन तलाव आहे. त्याला ‘बारव’ असेही संबोधतात. ती स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना मानली जाते.

    पुढे काही अंतरावरच तारळे आहे. या गावालाही इतिहासात मोठे महत्व आहे. शिवरायांची थोरली मुलगी अंबिकाबाई या येथील राजे महाडीक घराण्याच्या  सूनबाई. गावात काही जुने वाडेही आहेत.

    तारळेतून पुढे पश्चिमेस तोंडोशीला जाणारा रस्ता आहे. त्या परिसरातच जोतिबा जळव अन् कळंबे ही स्थाने आहेत. कळंबेत गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.

    बांबवडे गावातून जाणारी कच्ची वाट तोंडोशीला पोहचते. अर्थात प्रवास थोडा जपूनच करावा लागतो.

    तोंडोशी हे छोटे खेडे. तिथं आपली वाहने लावून पायी जावे लागते. वाटेत थोडी चढण आहे. अवतीभवती हिरवी सृष्टी पसरलेली दिसते!

    रामघळ विलोभनीय आहे. पावसाळ्यात इथले सौंदर्य विलक्षण ठरते. सुमारे ५० मीटर लांबीची ही घळ आहे. राम- लक्ष्मण- सीतेच्या मूर्ती इथे आहेत. घळीच्या वरच्या बाजूने पडणारे पाणी म्हणजेच धबधबा. त्याचा प्रवाह वेगाने येतो. या धबधब्याचे तीन प्रवाह आहेत्,मात्र हे खाली एका कुंडात एकत्र येतात.

    ही ठिकाणे पाहून आपण पुन्हा तोंडोशीत येतो. गावाच्या वरच्या बाजूला तारळी धरण आहे. परिसरातला निसर्ग अवर्णनीय आहे. खूप दूरवर पसरलेले अथांग पाणी आहे.

    तोंडोशीला जाण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. तारळेत न जाता मुरूड मार्गानेही आपण तिथे पोहचू शकतो.

    तारळेतून आणखी एक प्रेक्षणीय ठिकाण आपणास गवसते. ते म्हणजे सडा वाघापूर. तिथे पोहोचण्यासाठी मोठा घाट ओलांडावा लागतो. तिथले फोटो आपण पाहिले असतीलच. तेथील ‘रिव्हर्स फॉल’ प्रसिद्ध आहे. हाच रस्ता पाटणला जातो. त्या मार्गावरही आणखी एक घळ आहे.

    तारळेतून पाल हे तीर्थक्षेत्र अगदी नजीकच आहे. येथील खंडोबाचे हेमाडपंथी मंदीर  भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शिवराय आपल्या अष्टप्रधान मंडळासह 1 फेब्रुवारी 1676 मध्ये येथे येऊन गेल्याची नोंद मिळते. पालीहून काशीळमार्गे आपणास पुन्हा महामार्गावर येता येते. ही सैर एक दिवसात पूर्ण होणारी आहे

    जरंडेश्वरची घळः-

    सातारा शहराच्या पुर्व बाजुला नजर टाकली कि एक उत्तुंग डोंगर दिसतो.सपाट माथ्याचा हा डोंगर म्हणजे जरंडेश्वर.नाव जरी जरंडेश्वर असले तरी ईथे हनुमानाचे मंदिर आहे. जवळपास सहा फुटाची भव्य बलभीम हनुमानाच्या मुर्त्तीचे येथे दर्शन होते.याच्याच मागे श्रीरामाचे मंदिर आहे.मात्र मुख्य हनुमानाच्या मुर्तीची पाठ श्रीरामाकडे असल्यामुळे राममुर्तीसमोर आणखी एक दास मारुती आहे.
        या डोंगरासंदर्भात एक मनोरंजक कथा सांगितली जाते.जरंडेश्वराचा हा डोंगर म्हणजे जेव्हा हनुमान हिमालयातील द्रोणागिरी पर्वत श्रीलंकेत नेत होते तेव्हा त्याचा पडलेला तुकडा अशी समजुत आहे.म्हणून या डोंगरावर मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात. माथ्यावर सपाटी आणि चारही बाजुने कठीण उतार असणार्‍या या डोंगराचे एखाद्या किल्ल्यात कसे रुपांतर झाले नाही याचे आश्चर्य वाटते.

        जरंडेश्वराच्या एका बाजुला संगम माहुली आणि क्षेत्र माहुली आहेत, जिथे महाबळेश्वरी उगम पावलेल्या कृष्णा आणि वेण्णा नदी यांचा संगम होतो तर एका बाजुने वसना नदी वहाते. इ.स. १६४५ सुमारास साधारण पत्तीस वर्षाच रामदास स्वामी या जरंडेश्वराच्या घळीत बसून तपसाधना करीत असत. स्नानासाठी ते जरंडेश्वरावरुन माहुलीला जात. जरंडेश्वरावरची घळ राममंदिराच्या मागच्या बाजुला काही पायर्‍या उतरुन गेल्यावर आहे. साधारण एखादी व्यक्ती बसु शकेल इतपतच ही मोठी आहे. आतमध्ये पादुकांची स्थापना केली आहे. रामदासांनी साधना केलेल्या इतर घळींच्या तुलनेत हि घळ छोटी आहे.

    सज्जनगड जवळची रामघळ

     

    आयुष्याच्या उत्तरार्धात शिवछत्रपतींच्या विनंतीवरुन समर्थ रामदास स्वामींनी परळीचा किल्ला निवासासाठी निवडला. ६ जानेवारी १६७४ रोजी समर्थ रामदास इथे आले आणि या प्राचीन अश्वलायनगड उर्फ अस्वलगडाचा झाला सज्जनगड.समर्थ भक्तांची ईथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.सहाजिकच पुर्वी पायर्‍यांचे वाटेने परळी गावाच्या वाटेने गडावर जावे लागे,त्याएवजी गजवडीकडून गडाच्या बर्‍याच वरपर्यंत जाणारा डांबरी रस्ता झाला आणि ईथे भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली.सज्जनगड चढायला सुरवात केली की गायमारुतीचे मंदिर लागते.याठिकाणी रामघळीकडे जाणारी वाट आहे.उजवीकडे दरी आणि डाव्या हाताला कडा ठेवून मुरमाड वाटेने जपून गेले कि सज्जनगडाच्या उत्तर बाजुच्या बुरुजाच्या खाली कड्यात खोदलेल्या पायर्‍यांनी रामघळीपाशी येतो. जेमतेम एक मीटर व्यासाचे मुख असणार्‍या या घळीत रांगत जावे लागते. साधारण बारा ते पंधरा फुट गेल्यावर हि गुहा उजवीकडे वळते.इथे दोन खोल पायर्‍या आहेत.अंधाराला डोळे सरावले कि आतील विवर दिसते. साधारण पाच-सहा फुट रुंद भुयारात शांतपणे ध्यान करता येईल अशी हि जागा आहे.अर्थात वावर कमी असल्यामुळे ईथे वटवाघळांची वस्ती आहे आणि त्यामुळे ईथे कुबट वास येतो.शिवाय या परिसरात बिबट्यासारख्या वन्य श्वापदाचा वावर वाढल्याने जपून जाणे आवश्यक आहे.

     संदर्भः-

    १) सातारा जिल्हा गॅझेटीयर

    २) आडवाटेचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर

    ३) सुनिल शेंडगे यांचे लिखाण

    ४) श्री. शैलेश करंदीकर यांचे लिखाण

    ५) www.daasbodh.com हि वेबसाईट






    रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )

    बहुतेक पर्यटक गोव्याला गेले कि आग्वादला भेट देतात, मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रिस मागोला मात्र क्वचितच भेट दिली जाते.  रीस मागोस किंवा रेईस मागोस हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.

    मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे. रीस मागोस आणि गास्पर डायस हे किल्ले आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजानी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी ‘व्ही’ अक्षरा सारखे बांधलेले चौरस बूरुज हे पोर्तुगीज दुर्गबांधणीचे एक वैशिष्ट्य, गडाची बांधणीही चौरस. पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखीही उदाहरणे आहेत. अलिबाग जवळील रेवदंडाचा सातखणी महाल, रेल्वेच्या डब्यासासारख्या बांधलेल्या तटबंदीचा कोर्लई किल्ला. याशिवाय मोटी दमन-नानी दमन हे किल्ले,  मुंबईजवळ केळवेचा पाचूच्या वनात दडलेला भूईकोट किल्ला आणि वसई किल्ला’ हे पोर्तुगीज बांधणीची छाप असलेले आणखी काही किल्ले. रेईस मागो हा आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजांवर करडी नजर ठेवणारा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे.
      पणजी शहर, मांडवी नदी आणि खाडी रक्षण करण्यासाठी उभारलेले तीन किल्ले
           या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास, रेइश मागुश हे किल्ल्याला पोर्तुगीजांनी दिलेले नाव असले तरी गोव्यात पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वी याच ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी एक गढी होती. पोर्तुगीजांच्याही आधी गोमंतकावर इ. स. १४७२ साली बहामनी राज्याचा प्रधान महमुद गवाण याने आक्रमण करून गोवा जिंकून घेतल. तेव्हा त्याच्याबरोबर युसुफ आदिलशहा होता, पण तेव्हा तो एक साधा सरदार होता. इ. स. १४८२ साली बहामनी सुलतान महमद शहा मरण पावल्यावर बहामनी राज्याचे तुकडे होण्यास सुरुवात झाली. त्यातच युसुफ आदिलशहाने विजापुरात स्वातंत्र्य घोषित केले. इ. स. १४८९ साली त्याने गोमंतक जिंकून घेतले व जुने गोवे येथे राजधानी करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याने येथे अनेक राजवाडे, मशिदी व इमारती गोव्याच्या भूमीत बांधल्या. याच काळात राजधानीच्या रक्षणार्थ मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील टेकडीवर छोटासा टेहळणी किल्ला बांधून मांडवी नदी आणि संपूर्ण बारदेश आपल्या हुकमतीखाली आणला.
    १६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० मधे अल्फासो दि अल्बुकर्क याचे मांडवी नदी मार्गे गोव्याच्या भूमीत आगमन झाले. त्यावेळी गोव्याचा बराचसा प्रदेश विजापूरच्या युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात होता. पण अल्फान्सो द अल्बुकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोव्याचा बराचसा प्रदेश जिंकला. बार्देशचा प्रदेश ताब्यात येताच पोर्तुगीज गव्हर्नर डॉन अल्फान्सो डी नोरोन्हा ह्याने १५५१ मधे गोव्याच्या तत्कालीन राजधानीला संरक्षण देण्यासाठी व मांडवी नदीच्या खाडीच्या तोंडावरील अरुंद रस्ता रोखण्यासाठी १५५१ मध्ये येथे किल्ला बांधला. पुढे डॉन फ्रान्सिस्को द गामा याने या किल्ल्याच्या बांधकामात वेगवेगळ्या काळात बरेच बदल आणि विस्तार केला. किल्ल्यात एकूण सात तळघरे असून ती किल्ल्याच्या तटबंदीतून एकमेकांशी जोडली आहेत. इ. स. १५८८-८९ साली गव्हर्नर जनरल मॅन्युअल डिसुझा कुटिन्हो याने ही तळघरे खास बांधून घेतली.

    दक्षिणेकडे म्हणजे मांडवी नदीकिनारी गलबतांसाठी धक्का (बंदर), उंच तटबंदी, बुरूज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली. बुरूज आणि तटबंदीवर त्याकाळी एकूण ३३ तोफा होत्या, त्यापैकी नऊ तोफा अद्यापही किल्ल्यात पाहता येतात. इ. स. १७०४ साली केटेनो दे मेलो इ-कॅस्ट्रो हा व्हाईसरॉय असताना त्याच जागी जवळपास नवा किल्ला बांधला व तसा शिलालेख तेथील दारावर बसवला . त्याकाळी ह्या किल्ल्यात लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हायसरॉय व इतर महत्वाच्या व्यक्तींना राहाण्याची सोय केली जात असे. सुरवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हायसऱॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता पण नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर झाले. पुढे नाव घ्यावा असा समरप्रसंग इ.स. १६८३- ८४ साली गोव्यातील फिरंगाणाचे उच्चाटन करण्यासाठी संभाजी राजे गोव्यात शिरले. साष्टी व बारदेश तालुके जिंकून पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवला. त्याने २५ नोव्हेंबर १६८३ रोजी व्हॉईसरायची भेट घेतली. खंडणी देउन शांतता विकत घेण्याची पोर्तुगीजांची तयारी नव्हती. यावेळी निकोलाय मनुची हा ईटालियन प्रवासी हजर होता. शंभुराजांनी चार हजार सैन्य पाठ्वून कुंभारजुव्याचा किल्ला उर्फ सेंट एस्टोव्हचा किल्ला ताब्यात घेतला. पण नेमके त्याचवेळी मोगल सरदार शाह आलम ४० हजाराचे सैन्य घेउन गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. त्याने मराठ्यांनी पादाक्रांत केलेला प्रदेश व किल्ले जिंकले. नाईलाजाने शंभुराजांना कुंभारजुव्याचा ताबा सोडावा लागला. अर्थात हाव वाढलेल्या शाह आलमला आता गोवा ताब्यात घेण्याचे वेध लागले, त्याने पणजीसमोरच्या मांडवी खाडीतुन मोगली जहाजे आत आणण्याची परवानगी पोर्तुगीज व्हॉईसरॉयकडे मागितली. मात्र भविष्यातील धोका ओळखून व्हॉईसरॉयने ती नाकारली, आणि मांडवी खाडी एवजी बारदेशच्या खाडीतुन जहाजे आत आणण्याची परवानगी दिली. पण शहा आलमने लष्करी बळावर जहाजे मांडवीच्या खाडीत घुसवलीच, त्यात अग्वादच्या किल्लेदाराने वेळीच प्रतिकार न केल्याने मोगली जहाजे रेईस मागोजवळ पोहचली. रेईस मागोवर पोर्तुगीज नौदलाचा अधिकारी डिकास्टा याने रेईस मागोवरील तीन तोफांनी हल्ला करायचा आदेश दिला. त्याचवेळी मागून अग्वादच्या किल्ल्यावरुन तोफांचा मारा झाल्याने, शाह आलमने आपली जहाजे रेईस मागोच्या मागील बाजुला असणार्‍या नदीत म्हणजे नेरूळ खाडीत नेली आणि जहाजे तिथेच अडकून बसली. शेवटी पोर्तुगीजांच्या सर्व अटी मान्य करुन आपली जहाजे सोडवून घेतली.
       बारदेश तालुक्यातील हा किल्ला गोव्याचे राजधानीचे शहर पणजीपासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो तर इतर दिवशी किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित आहे. या वेळातील बदल तसेच किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी www.reismagosfort.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पणजीवरून मांडवी नदीवरचा पुल ओलांडून मुंबई हायवेला लागले कि उजवीकडे नवीन विधानसभेची इमारत दिसते, तर डावीकडे एक रस्ता पुलावरुन खाली उतरुन बेतीम बीचकडे जाणारा रस्ता पकडावा. डाव्या हाताला मांडवी नदीचे पात्र आणि त्यात बोटींची वर्दळ पहात, बघता बघता आपण बेतीम बीच मागे टाकून रेइस मागोच्या पुढ्यात येतो.
            पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर माथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या पण आता तेथे रस्ता केला आहे. प्रत्येकी ५० रुपयांचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा असला तरी एकुण राखलेला हा किल्ला बघताना ते सार्थकी लागतात.
     
     वास्तविक आधी लष्करी ठाणे, मग तुरुंग आणि शेवटी हॉस्पिटल असा प्रवास केल्यानंतर हा किल्ला १९९३ साली पार मोडकळीला आला होता. मात्र या किल्ल्याचे एतिहासिक महत्व जाणून "द हेलेन हॅम्लीन ट्रस्ट" यांनी पुर्नबांधणी केली आणि ५ जुन २०१२ साली पर्यटकांसाठी हा गड खुला झाला.
         गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वटवृक्ष आहे.. हा महाकाय वटवृक्ष एका नारळाच्या झाडावर परावलंबी (Parasite) होवून वाढला.. पुढे हे मूळ नारळाचे झाड कोसळले आणि हा वृक्ष उन्मळण्याच्या बेतात होता, पण याची २००८ सालामध्ये दुरुस्त करण्यात आली.. झाडाच्या खोडात सिमेंट कॉन्क्रीट (Concrete) चा कॉलम भरून त्याला स्थैर्य देण्यात आले.. झाडाच्या फांद्या स्टीलच्या तारांनी ओढून धरल्या आणि अखेर हा वृक्ष तगला.. इकडे गोव्यात एका झाडाला वाचवण्यासाठीही ही वणवण तर तिकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘कॉन्क्रीट (Concrete) जोडो टेकडी फोडो’ अभियान केवढा हा विरोधाभास.
        कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या पण अत्यंत टिकाऊ अश्या जांभ्या दगडात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
     
     किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील कोट ऑफ आर्म

     
     माहितीफलक
     
    किल्ल्याच्या भिंती, उंच व भव्य तर आहेतच पण त्याचबरोबर किल्ल्याला असणारे पोर्तुगिजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरूज देखील बघण्यासारखे आहेत.  

     

     



     
    किल्ल्याच्या तटबंदीमधे लाईट लावलेले आहेत.

      

     





     







     बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात.


     
    गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातून असाच आहे. किल्ला अत्यंत स्वच्छ ठेवलेला असून किल्ल्यातील जुन्या निवासस्थानांचा अत्यंत खूबीने चित्रप्रदर्शन मांडण्यासाठी उपयोग केलेला आहे.


     





    किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या वीरांची चित्रे हिरिरीने मांडून ठेवलेली दिसतात. या सर्व चित्रात एक चित्र खूप खास आहे. शिवाजी महाराज घोड्यावर बसले असून त्यांच्या आजूबाजूला त्यावेळची गोमंतकीय जनता आपली पोर्तुगीजांच्या अन्यायापासून सुटका करण्याची विनवणी करत आहेत असे दाखवले आहे.
     
    येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले दिसतात.
     
     चित्रप्रदर्शन पहात वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीत एक मोठे भोक दिसते व त्यासमोर डेथ होल (Death Hole) असे लिहलेले आहे.हे म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच. पूर्वी या भोकातून खालच्या मजल्यावर (तळघरात) ठेवलेल्या कैद्यांच्या अंगावर उकळते तेल अथवा गरम पाणी वगैरे टाकण्याची भयंकर शिक्षा दिली जात असावी.


     


    किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.
       गोव्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असा हा देखणा किल्ला गोव्यात जाऊन न पाहणे म्हणजे दुर्भाग्यच म्हणायला हवे. त्यामुळे पुढच्या गोवा भेटीत जेव्हा जवळच असणाऱ्या प्रसिद्ध अश्या कलंगुट बीचला भेट द्याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून हा रेइश मागुश किल्ला आवर्जून पहावा.

     गॅस्पर दियश ( gaspar dias ) 

     गोव्यात जाउन पणजीला मुक्काम असेल तर एक संध्याकाळ घालवायचे ठिकाण म्हणजे, "मीरामार बीच".पणजीपासून अगदी चालायच्या अंतरावर असलेला आणि समोर उत्तरेला अग्वादचे दीपगृह, एका बाजुला मांडवीचा प्रवाह, त्यातील बोटींची ये-जा,  खाद्य स्टॉल्स, पाम वृक्ष , वाळूच्या मस्त पुळण आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे स्मारक अशी अनेक आकर्षण असणारा ह्या बीचला बहुतेक जण भेट देतातच. मात्र या किनार्‍याचे मुळ नाव मीरामार बीच" नव्हते, हे किती जणांना माहिती असते ? ह्या बीचचे मुळचे नाव  "गॅस्पर डायस बीच" म्हणून ओळखले जात असे. एक पोर्तुगीज किल्ला एकदा 16 व्या शतकाच्या शेवटी, समुद्रकिनार्‍याजवळ उभा होता. या ठिकाणाचे हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या परिसरात गॅस्पर डायस या जमीनदाराच्या नावावर बराचसा भुप्रदेश होता. इ.स. १५९८ मध्ये पोर्तुगीज व्हॉईसरॉय डोम फ्रान्सिस्को दे गामा, काउंट ऑफ विदिगुएर (हा वास्को दा गामाचा नातू म्हणूनही ओळखला जातो) च्या कारकीर्दीत सध्या अस्तित्त्वात नसलेल्या या किल्ल्याची उभारणी झाली. नदीच्या उत्तर बाजुला रेईस मागो तर दक्षीण तीरावर गास्पर दियश अशी रचना झाली. अर्थात मांडवी नदीच्या प्रवाहात झालेले बदल विचारात घेता, हा किल्ला नदीच्या किनार्यावर असावा. अर्थातच अग्वादप्रमाणेच या किल्ल्याच्या उभारणीचे कारण डचांनी गोव्यावर केलेला हल्ला हेच होते. सुरवातीला या किल्ल्याचे नाव या परिसरावरुनच ठेवले गेले, "फोर्ते दा पोंटे दी गास्पर दियश" ( Forte da ponte de Gaspar Dias ). पुढे ब्रिटीशांनी इ.स. १७९७ -९८ व १८०२-१४ असा दोन वेळा या परिसरावर ताबा मिळवला होता. अर्थात पुढे राजकीय परिस्थिती बदलली, फक्त किनारपट्टीचा आश्रय घेणार्‍या पोर्तुगीजांनी आजुबाजुच्या प्रदेशावर कब्जा केला. त्यात संभाजी महाराजांनी आक्रमण केल्यानंतर ते अधिक सावध झाले व पोर्तुगीजांनीच हा गॅस्पर दियश पाडण्याचा हुकुम केला, मात्र त्यावेळी त्याची अंमलबजावणी होउ शकली नाही. 
          नंतर १८३५ साली पणजीमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या रेजिमेंटने गोव्यात पोर्तुगीज अधिकार्‍यांविरूद्ध बंड केले. बंडखोरी लवकरच चिरडली गेली. मात्र यामध्ये किल्ल्याला पेटविले गेले. पण यामुळे   गॅस्पर डियश किल्ल्याचे बरेच नुकसान झाले व पुढे जवळजवळ सात वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पुढे १८४२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला. इ.स. १८६९ मध्ये एका समितीने केलेल्या पहाणीनंतर असे सुचविण्यात आले होते की जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी हा किल्ला वापरला जाऊ शकतो. या समितीने गॅस्पर डियश किल्ला आता कोणत्याही युद्धासाठी उपयोगी नसल्याचे सुचविले. नंतर 1878 मध्ये सुचविलेल्या उद्देशाने याचा वापर जखमी सैनिकांसाठी हॉस्पिटल म्हणून केला जाउ लागला. पुढे ईतिहासाबरोबरच या परिसराचा भुगोलदेखील बदलला. पणजी हे केवळ बेटांचा समुह न रहाता, त्यात भर टाकली गेली, शिवाय मांडवी नदीचे खाडीकिनारी असलेले मुख विस्तारले, सहाजिकच बदलत्या परिस्थितीत या किल्ल्याचे महत्व उणावले आणि केवळ दोन शतकापुर्वी अस्तित्वात असणारा हा किल्ला कायमचा पुसला गेला.

          
      आज या किल्ल्याच्या कोणत्याही स्मृती या परिसरात राहिलेल्या नाहीत. मीरामार जंक्शन येथील ट्रॅफिक बेटावर दाखविण्यात आलेली तोफ म्हणजे आज किल्ल्याचे अवशेष आहेत.असे मानले जाते की मिरामार येथील किल्ला सध्याच्या क्लब कंपाऊंडच्या उत्तरेकडील भिंतीपासून सध्याच्या मारुती मंदिरापर्यंत पसरलेला होता आणि साळगावकर लॉ कॉलेजच्या मागील टोंका येथे राज्य कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारील रोड जंक्शनपर्यंत विस्तार असावा.


     मीरामार बीचला भेट देताना एक आठवण म्हणून पर्यटक येथील तोफेजवळ फोटो काढतात, पण ईथे असा काही किल्ला होता हे कोणालाही माहिती असणे शक्यच नाही.

    सध्या नाही म्हणायला "गास्पर दियश"ची एकमेव आठवण म्हणजे त्याच जागी उभारलेला, "क्लब टेनिस डी गास्पर डायस". नाही म्हणायला मुळ किल्ल्याचे १८७६ मधील एक चित्र उपलब्ध आहे.

      गास्पर दियशचे मुळ चित्र

         हँड्स-ऑन हिस्टोरियन्स या ग्रुपचे श्री. संजीव सरदेसाई गोवाभरातील संस्थांमधील व्याख्यानांच्या माध्यमातून मीरामारच्या या अल्प-ज्ञात इतिहासाबद्दल जागरूकता वाढवतात. गास्पर डायस कसा दुर्लक्षित होउन बेवसाउ झाला आणि नंतर हा भाग दफनभूमी आणि स्मशानभूमी म्हणून वापरला गेला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आता एकच प्रश्न उरतो, 'या परिसराला "मीरामार" हे नाव कसे पडले?'. जेव्हा या भागात बसेस धावू लागल्या तेव्हा बस कंडक्टरने हॉटेल मिरामारचा उपयोग प्रवाशांना स्टॉप समजावा म्हणून केला. अखेरीस ते ‘हॉटेल’ मिटले आणि फक्त ‘मीरामार’ हा शब्द उरला. आणि म्हणूनच या परिसराला मीरामार हे नाव पडले.
    मीरामारचा अर्थ आहे "Mirage of the Sea", समुद्रातील दृष्टीभ्रम !
    संदर्भः-
    १) जलदुर्गांच्या सहवासात- प्र.के.घाणेकर
    २ ) माझ्या या गोव्यात- मिलींद गुणाजी
    ३)   हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
    ४) ईंटरनेटवरील माहिती






    No comments:

    Post a Comment

    मनसर

     प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...