Thursday, April 27, 2023

वटेश्वराचे धोडंबे

 


वटेश्वर महादेव मंदिर, धोडंबे

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे धोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल. ही दोन्ही मंदिरे फक्त २ ते ३ फूट अंतर ठेवून आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. महादेव मंदिरा बाहेर अनेक समाधी आहेत. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.

मध्ययुगीन काळात प्रचलित झालेली वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती स्थापत्य शैली. हेमाडपंत स्थापत्य जगप्रसिद्ध करणारा हेमाद्री कोण होता, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हा यादव राजा महादेव याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा रामदेवराव (१२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होते, असे म्हटले जाते. हेमाडपंताने असंख्य मंदिरे बांधली आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ मोठे योगदानही दिले. त्यामुळे दगडातील प्रत्येक मंदिराला हेमाडपंती म्हणण्याची प्रथा रूढ झाली. हेमाडपंती मंदिरशैली हेमाद्रीच्या पूर्वीही होती; मात्र हेमाद्रीने या मंदिर संस्कृतीला बळ दिल्याने सर्वच मंदिरांना हेमाद्रीवरून हेमाडपंती मंदिरे म्हंटले जावू लागले. असे असले तरी हेमाडपंती शैली वैशिष्ट्यपूर्ण असल्याने आजही ही मंदिरे डोळ्यांची पारणे फेडतात. हेमाडपंत यांनी प्रचलित चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते तर या मंदिराचे स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी साधारणतः चौरस आकारात सजलेली दिसतात. हेमाद्री कोण होता याचा शोध या मंदिराच्या सुंदरतेवरूनही लावता येतो. यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठीणच; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाद्रीने ही शैली अधिकाधिक विकसित केल्याचे दिसते. मात्र ही मंदिर शैली अन् वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्न करत नसल्याने हेमाद्री काय विचार करीत असेल, असे वाटायला लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने केलेला जीर्णोद्धार नजरेला बोचतो. मात्र ओतीव सुंदरतेने नटलेले धोडंबेचे हेमाडपंती मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले नाही तर नवलं. विशेष म्हणजे धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन मंदिरे आहेत ही देखील धोडंबेची खासियत म्हणता येईल. म्हणूनच धोडंबेचा हा प्रवास थक्क करतो अन् या इतिहासाला कौतुकाचे तोरण लावताना दिसतो.
 धोडंबे गाव लागण्यापूर्वी दोन किलोमीटरवर पेशव्यांची बाग नावाचा परिसर लागतो. ‘खरं तर ही पेशव्यांची बाग आहे’ असं काही सांगणारी पाऊलखुण आता तेथे नाही. मात्र हा परिसर आजही पेशव्यांची बाग म्हणून ओळखला जातो. रघुनाथराव पेशव्यांनी येथे आंब्याची बाग तयार केली होती. ते आरामासाठी येथे येत. एवढीच आठवण धोडंबेकर सांगतात. ‘आंब्याने बाग बहरली आहे अन् पेशवे बागेत आराम करतायेत असा’ भास मनात घेऊन धोडंबेकडे निघायचं. पेशव्यांच्या या नोंदीमुळे व चांदवडच्या एकूण सात वेशींपैकी एका वेशीला धोडंबे (धोडप) दरवाजा म्हटलं गेल्याने गावाचे महत्त्व अधोरेखित होतं. धोडंबेत प्रवेश करताना कदरू नावाची छोटी नदी लागते. नदीवरील पूल ओलांडताना डाव्या हाताला वेशीचा उरलेला अन् अर्धवट कोसळलेला एक बुरूज आपले स्वागत करतो. बुरूजापासून वरच्या चढापर्यंत दगडी कामातील वाट गावच्या समृद्धी वारशाची पाऊलवाट वाटायला लागते. आता हा रस्ता वापरात नाही. मात्र बुरूजाच्या अवतीभवती विहार करणारा मोरांचा थवा मनाला आनंद देतो. पुलावरून जाणारा रस्ता आपल्याला वेशीबाहेरच्या पारावर घेऊन जातो. डावीकडे वेस अन् समोर वटेश्वराचे हेमाडपंती मंदिर धोडंबेचे वैभव असल्याचे सांगायला लागतात. कदरू आणि विनता नदीच्या संगमाच्या त्रिकोणात धोडंबे वसले आहे. या दोन नद्यांबाबतही एक रोचक अख्यायिका प्रसिद्ध आहे. कश्यप ऋषींच्या दोन पत्नी म्हणजे कदरू आणि विनता. कश्यप यांच्या कदरू या पत्नीच्या पोटी नेहमी असंख्य साप जन्म घ्यायचे. तर विनताला मुले होत नव्हती. यामुळे दुखी असलेल्या विनतेने आपल्या पतीकडे हे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा कश्यप ऋषींनी यज्ञ केला तर पुत्रप्राप्ती होईल, असे सांगितले व यज्ञाचे आयोजन केले. वर्षभराने विनतेला अरूण आणि गरूड हे दोन मुले झाली. पुढे अरूण सूर्याचा वाहन तर गरूड विष्णूचा वाहन झाले. विनता आणि कदरू यांच्या अमृत मिळविण्यावरून वाद झाले. यात कदरूने विनताला हरविले व तिच्या मुलांसह कैदेत ठेवले. मात्र अमृत मिळविण्याची कदरूची इच्छा अपूर्ण राहिली. तेव्हापासून कदरूच्या सापांची ‌जीभेला चीरा पडल्या तेव्हापासून सापांची जीभ दुभंगलेली दिसते, अशी अख्यायिका आहे. मात्र असे असताना धोडंबे गावात कदरू आणि विनतेचे मिलन होते, यामागेही काही ना काही अख्यायिका असणार असे ग्रामस्थ सांगतात.

धोडंबे हे नाव गावाला कसे पडले, हे सांगताना धोडप किल्ल्यामुळे धोडंबे गाव वसले अन् येथे राहणारे धोडंबेकर झाले, असे सदाशिव दिवटे, दौलत उशीरे, त्र्यंबकराव काळे, डॉ. संध्या तोडकर अन् कचरू रकीबे समोरच्या धोडप किल्ल्याकडे बोट दाखवून अभिमानाने सांगतात. धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेची खरी ओळख पूर्वी पानमळ्यांसाठी होती. मात्र पाण्याअभावी आता पानमळे गेले. आता औषधालाही पान पिकत नाही. सत्तरी गाठलेले सदाशिव दिवटे हात धरून आख्खं गाव फिरवून आणतात. हा उत्साह आमचं गाव खूप सुंदर आहे हे सांगायला कमी पडत नाही.

बाराबलुतेदारांचे धोडंबे गाव विंचूरकरांच्या जहागिरीतील एक गाव होते. गावात पूर्वी सरकारवाडा होता. मात्र तो काळानुरुप तो नामशेष झाल्याने आता पहायला मिळत नाही. गावाला दोन वेशी अन् गावाभवती कोटही होता. कोटाचेही आता अवशेष दिसत नाहीत; मात्र कदरू नदीशेजारील पूर्व वेस थोडी शिल्लक आहे तर गावाला पश्चिम वेशी अजूनही सुस्थ‌ितीत आहे. गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व विष्णू मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. देवीच्या मंदिरात अखंड लाकडातील १८ भुजा असलेली देवीची सुंदर मूर्ती आहे. दत्त मंदिर, गोरक्षनाथांचे मंदिर, भैरवनाथ मंदिर, देवीची मंदिरे, गणपती, हनुमान, जलालनाथ मंदिर, विठ्ठल, राम मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावात दत्त जयंतीला वटेश्वराची यात्रा भरते. धोडंबेचा हा प्रवास वटेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

धोडंबेतील वैष्णव मंदिर यादवकालीन हेमाडपंत प्रकारातील असले तरी त्यावर नागर शैलीचा प्रभावही पहायला मिळतो. या मंदिरातील नागर प्रकारातील प्रासाद मंत्रमुग्ध करतो. कितीही वेळा हा प्रासाद पाहिला तरी मन भरत नाही. नागर प्रासादाचे यादवकालीन महाराष्ट्राला वावडे नव्हते. म्हणजेच जे काही चांगले आहे ते हेमाद्रीने स्वीकारल्याने हेमाडपंतीची भुरळ सर्वसामान्यांच्या मनावरही इतकी रूजली की दगडाचे मंदिर दिसले की हे हेमाडपंती मंदिर असल्याचे मानले जाते. अशीच नागर प्रासादाची शैली गोंदेश्वराचे पंचायतन मंदिर, अंजनेरीतील जैन मंदिरे व रत्नागिरीतील संगमेश्वर मंदिरांनी स्वीकारल्याचे दिसते. 









     धोडंबेतील मंदिर प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. या वैष्णव मंदीराचे मंडप, अंतराळ आणि गर्भगृह इतकेच भाग शिल्लक आहेत. ज्याला अर्धमंडप म्हणता येईल असा मुखमंडप पुर्वी होता, पण आता तो शिल्लक नाही. मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारील दोन खांबांच्यावर यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुबक रीतीने कोरलेल्या पहायला मिळतात. 







 मंदीराच्या जोत्यावर किंवा पीठावर थर दिसतात. खुर, जाडंब आणि कणी असे पीठाचे थर आहेत. त्यावर मंडोवर असून त्यावर जंघा, उदगम भरणी आणि छाद्य असे घटक आहेत.त्यानंतर त्यावर शिखर येते. 
    हे मंदीर मध्यम आकाराचे असल्यामुळे मंडप आठ अर्धस्तंभावर उभा आहे. म्हणजे मंडपात एकही मोकळा स्तंभ नाही.एका अर्थाने हे मंदिर बिनखांबी आहे. 




वैष्णव मंदिरात सभामंडपाचे छत नक्षी कामांचा अनोखा नमूना आहे. मंदिराच्या भिंतीतल्या तरंगांवर श्रीकृष्णाच्या बालक्रीडांनी अनोखा साज चढविण्यात आल्याने एखादी रांगोळीच काढल्याचा भास होतो.अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह व सभामंडप दोन्ही ही तारकाकृती आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाह्यअंगावर क्षिप्त-उक्षिप्त भाग तयार झाले असून त्यावरील मूर्ती, नक्षीकाम बघण्यात वेगळाच आनंद मिळतो. 







  गर्भगृहाचा तलविन्यास चौरस असून पंचरथ प्रकारचा आहे. तीन भद्रामधील तीन गवाक्षांनध्ये विष्णुची तीन रुपे दाखवली आहेत. तर कर्णरेषेत प्रत्येकी एक असे चार कर्णावर आठ दिक्पाल दाखवले आहेत. प्रतिरथावरील जंघेवर सुरसुंदरीची रुपे दाखवली आहेत. या सुंदर शिल्पाइतकीच खांबाची रचना अन् भिंतीवरील नक्षीकाम अन् मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार थक्क करतात. त्यामुळे या सौंदर्यावरून नजर हटत नाही. येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील अप्सरा ह्या विविध प्रकारच्या प्राण्यांवर आरूढ झालेल्या असून सोबत सेविका देखील आहेत.


    

  






  
मंदिराचा वरचा भाग नव्याने बांधलेला असला तरी त्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. गर्भगृहावरील शिखराचा काही भाग शिल्लक आहे. नागर शैलीचे शिखर असलेले विमान ( गर्भगृह + शिखर ) बहुधा पंचवीस अंडाचे असावे.त्यामुळे या मंदीराला "पंचविशत्यंडक प्रासाद" म्हणतात. शिखराच्या मुलमंजिरीच्या सभोवताली कोपर्यावर आणि प्रतिरथावर विमानाच्या प्रतिकृती ( शृंगे ) असून त्याच्या भद्रावर दोन उरशॄंगे आहेत.मुलमंजिरीवर विमानाच्या पंचवीस प्रतिकृती किंवा अंड आहेत. पण सभोवताचलच्या शृंगावर फक्त नउ अंड आहेत. आणि म्हणून त्याचे स्वरुप नवांडक आहे. सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकरणांनी भरगच्च सुशोभित झालेले पाहताना हे मंदिर बांधायला किती मेहनत लागली असेल याची कल्पना येते. स्थापत्याच्या आणि शिल्पाच्या शैलीवरुन हे मंदीर इ.स. ११ व्या शतकात बांधले गेले असावे असे दिसते. 



   
 









 
         धोडंबेतील हेमाडपंती महादेव मंदिरांचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना, आखणी, प्रवेशद्वार, गाभारा, सभामंडप यात समतोल साधलेला पहायला मिळतो. महादेव मंदिरात तांब्याचा अन् लाखेचा असे दोन मुखवटे असल्याचे दिवटे सांगतात. महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. मंदिराबाहेर अनेक समाधी आहेत. मंदिरामागे विनता नदी वाहते. महादेव मंदिराच्या उजव्या हाताला मशीद व काही समाधी आहेत. हेमाडपंती मंदिराचा अनोखा सोहळा पाहून गावाच्या वेशीतून आत शिरले की उजव्या हाताला ग्रामपंचायत कार्यालय तर डाव्या हाताला तोडकरांचा वाडा आहे. या चौकातून लिंगायत गल्ली, ब्राह्मण गल्ली, मारूती गल्लीत जाणारे रस्ते अन् जुन्या घरांनी सजलेले धोडंबे अनुभवायला मिळते. ब्राह्मण गल्ली चौकातील राम मंदिर नव्याने साकारण्यात आले असल्याचे प्रकाश उशीर व अरूण दाणी सांगतात.
          धोडंबे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते तसेच संताची भूमी म्हणूनही त्याची ओळख आहे. वडांगळी मठाचे मठाधिपती व संत गंगाधर स्वामी यांचे शिष्य बाळा बुवा कबाडी यांचा जन्म भीमाबाई काशीनाथ दांपत्याच्या पोटी १८ व्या शतकात उत्तरार्धात झाला. काही दिवस ते पिंपळदठान व धोडंबे येथे वास्तव्यास होते. पत्नी व मुलंबाळांच्या निधनानंतर ते विरक्त जीवन जगू लागले. त्यांनी त्यांचे चरित्र ४८ अभंगात उलगडले आहे. कबाडी बाबांनी १९०५ मध्ये धोडंबे येथे विनता नदी काठी समाधी घेतली. त्यापूर्वी गुरू गंगाधर स्वामीचे चरित्र लिहून ते गुरू ऋणातून मुक्त झाले. वडांगळी पीठावर आलेले पंडिताराध्य गुरू गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी २४ फेब्रुवारी १९८९ पासून बाळा बुवा कबाडी यांच्या पुण्यतिथीस प्रारंभ केला. त्यांचे दुर्मिळ छायाचित्र धोडंबेत उपलब्ध आहे. कबाडी महाराजांनी रचलेल्या १५०८ अभंगाचे ‘बाळकृत गाथा’ १९१२ मध्ये मल्ल‌िर्जुनप्पा तुकाप्पा गाडगाळे यांनी प्रकाशित केली. हा एक मोठा ठेवा धोडंबे आणि वडांगळीसाठी लाभल्याचे लिंगायत समाजाच्या अभ्यासिका डॉ. संध्या तोडकर सांगतात. ग्रामीण भागातील हा साहित्यसार उजेडात आणला पाहिजे, अशीही अपेक्षा त्या व्यक्त करतात.
          धोडंबे बाजारपेठेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध होतो. पानमळे अन् खवा ही धोडंबेची खासियत. खव्यामुळे आजही टिकून आहे. गावातून दररोज शंभर किलो खवा शहरात जातो. दामोदर रकीबे यांच्या सामाजिक कार्याची आठवण अजूनही गावाने ठेवली आहे. मात्र विंचूरकरांचा सरकारवाडा, पानमळे हरविल्याची खंतही वाटते. कालांतराने बदल होणार असे सांगताना ग्रामस्थ नव्या आशेने विकासाकडे प्रवास करताना दिसतात. गावाचा दुर्मिळ वारसा असलेले हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाने जपावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना दिसतात. गावातून बाहेर पडताना अधिर होऊ गावाकडे पाहत असलेला धोडप, मावळत्या सूर्याच्या किरणांनी सोनेरी झालेला विखारा डोंगर वटेश्वराच्या धोडंबेचा वारसा जपायला हवा, असे सांगताना अनुभवता येते.

संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३)  http://narendralakhan7.blogspot.com/2019/03/dhodap-fort.html हा ब्लॉग
४)  वेशीवरच्या पाऊलखुणा -  रमेश पडवळ 
५) माहिती आभार : सुशांत लोणकर


सातमाळेतील भुलेश्वर - श्री वटेश्वर महादेव मंदिर 🪷

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात.
     मध्ययुगीन काळात प्रचलित झालेली वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती स्थापत्य शैली. हेमाडपंत स्थापत्य जगप्रसिद्ध करणारा हेमाद्री कोण होता, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हा यादव राजा महादेव याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा रामदेवराव (१२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होते, असे म्हटले जाते. हेमाडपंताने असंख्य मंदिरे बांधली आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ मोठे योगदानही दिले. त्यामुळे दगडातील प्रत्येक मंदिराला हेमाडपंती म्हणण्याची प्रथा रूढ झाली. हेमाडपंती मंदिरशैली हेमाद्रीच्या पूर्वीही होती; मात्र हेमाद्रीने या मंदिर संस्कृतीला बळ दिल्याने सर्वच मंदिरांना हेमाद्रीवरून हेमाडपंती मंदिरे म्हंटले जावू लागले. असे असले तरी हेमाडपंती शैली वैशिष्ट्यपूर्ण असल्याने आजही ही मंदिरे डोळ्यांची पारणे फेडतात. हेमाडपंत यांनी प्रचलित चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते तर या मंदिराचे स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी साधारणतः चौरस आकारात सजलेली दिसतात. हेमाद्री कोण होता याचा शोध या मंदिराच्या सुंदरतेवरूनही लावता येतो. यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठीणच; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाद्रीने ही शैली अधिकाधिक विकसित केल्याचे दिसते.
   गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व शेजारी विष्णू मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे फक्त २ ते ३ फूट अंतर ठेवून आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. महादेव मंदिरा बाहेर अनेक समाधी आहेत. मंदिर १२व्या शतकातील असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह व सभामंडप दोन्ही ही तारकाकृती आहेत. (उर्वरित कॉमेंट मद्ये) यामुळे मंदिराच्या बाह्यअंगावर क्षिप्त-उक्षिप्त भाग तयार झाले असून त्यावरील मूर्ती, नक्षीकाम बघण्यात वेगळाच आनंद मिळतो. येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील अप्सरा ह्या विविध प्रकारच्या प्राण्यांवर आरूढ झालेल्या असून सोबत सेविका देखील आहेत.
     महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.






















http://narendralakhan7.blogspot.com/2019/03/dhodap-fort.html


 https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/veshiwarchya-paulkhuna/dhodambe-vateshwar/

     वेशीवरच्या पाऊलखुणा | भाषा-संस्कृतीspiritual

काखेत कळसा अन् गावाला वळसा… अशी स्थिती अनेक गावांची असते. मात्र चांदवड तालुक्यातील धोडंबे आपल्या कलागुणांना उराशी बाळगून आहे. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.

मध्ययुगीन काळात प्रचलित झालेली वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती स्थापत्य शैली. हेमाडपंत स्थापत्य जगप्रसिद्ध करणारा हेमाद्री कोण होता, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हा यादव राजा महादेव याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा रामदेवराव (१२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होते, असे म्हटले जाते. हेमाडपंताने असंख्य मंदिरे बांधली आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ मोठे योगदानही दिले. त्यामुळे दगडातील प्रत्येक मंदिराला हेमाडपंती म्हणण्याची प्रथा रूढ झाली. हेमाडपंती मंदिरशैली हेमाद्रीच्या पूर्वीही होती; मात्र हेमाद्रीने या मंदिर संस्कृतीला बळ दिल्याने सर्वच मंदिरांना हेमाद्रीवरून हेमाडपंती मंदिरे म्हंटले जावू लागले. असे असले तरी हेमाडपंती शैली वैशिष्ट्यपूर्ण असल्याने आजही ही मंदिरे डोळ्यांची पारणे फेडतात. हेमाडपंत यांनी प्रचलित चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते तर या मंदिराचे स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी साधारणतः चौरस आकारात सजलेली दिसतात. हेमाद्री कोण होता याचा शोध या मंदिराच्या सुंदरतेवरूनही लावता येतो. यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठीणच; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाद्रीने ही शैली अधिकाधिक विकसित केल्याचे दिसते. मात्र ही मंदिर शैली अन् वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्न करत नसल्याने हेमाद्री काय विचार करीत असेल, असे वाटायला लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने केलेला जीर्णोद्धार नजरेला बोचतो. मात्र ओतीव सुंदरतेने नटलेले धोडंबेचे हेमाडपंती मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले नाही तर नवलं. विशेष म्हणजे धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन मंदिरे आहेत ही देखील धोडंबेची खासियत म्हणता येईल. म्हणूनच धोडंबेचा हा प्रवास थक्क करतो अन् या इतिहासाला कौतुकाचे तोरण लावताना दिसतो.

नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० किलोमीटरवर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे (ता. चांदवड) जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ किलोमीटर आहे. धोडंबे गाव लागण्यापूर्वी दोन किलोमीटरवर पेशव्यांची बाग नावाचा परिसर लागतो. ‘खरं तर ही पेशव्यांची बाग आहे’ असं काही सांगणारी पाऊलखुण आता तेथे नाही. मात्र हा परिसर आजही पेशव्यांची बाग म्हणून ओळखला जातो. रघुनाथराव पेशव्यांनी येथे आंब्याची बाग तयार केली होती. ते आरामासाठी येथे येत. एवढीच आठवण धोडंबेकर सांगतात. ‘आंब्याने बाग बहरली आहे अन् पेशवे बागेत आराम करतायेत असा’ भास मनात घेऊन धोडंबेकडे निघायचं. पेशव्यांच्या या नोंदीमुळे व चांदवडच्या एकूण सात वेशींपैकी एका वेशीला धोडंबे (धोडप) दरवाजा म्हटलं गेल्याने गावाचे महत्त्व अधोरेखित होतं. धोडंबेत प्रवेश करताना कदरू नावाची छोटी नदी लागते. नदीवरील पूल ओलांडताना डाव्या हाताला वेशीचा उरलेला अन् अर्धवट कोसळलेला एक बुरूज आपले स्वागत करतो. बुरूजापासून वरच्या चढापर्यंत दगडी कामातील वाट गावच्या समृद्धी वारशाची पाऊलवाट वाटायला लागते. आता हा रस्ता वापरात नाही. मात्र बुरूजाच्या अवतीभवती विहार करणारा मोरांचा थवा मनाला आनंद देतो. पुलावरून जाणारा रस्ता आपल्याला वेशीबाहेरच्या पारावर घेऊन जातो. डावीकडे वेस अन् समोर वटेश्वराचे हेमाडपंती मंदिर धोडंबेचे वैभव असल्याचे सांगायला लागतात. कदरू आणि विनता नदीच्या संगमाच्या त्रिकोणात धोडंबे वसले आहे. या दोन नद्यांबाबतही एक रोचक अख्यायिका प्रसिद्ध आहे. कश्यप ऋषींच्या दोन पत्नी म्हणजे कदरू आणि विनता. कश्यप यांच्या कदरू या पत्नीच्या पोटी नेहमी असंख्य साप जन्म घ्यायचे. तर विनताला मुले होत नव्हती. यामुळे दुखी असलेल्या विनतेने आपल्या पतीकडे हे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा कश्यप ऋषींनी यज्ञ केला तर पुत्रप्राप्ती होईल, असे सांगितले व यज्ञाचे आयोजन केले. वर्षभराने विनतेला अरूण आणि गरूड हे दोन मुले झाली. पुढे अरूण सूर्याचा वाहन तर गरूड विष्णूचा वाहन झाले. विनता आणि कदरू यांच्या अमृत मिळविण्यावरून वाद झाले. यात कदरूने विनताला हरविले व तिच्या मुलांसह कैदेत ठेवले. मात्र अमृत मिळविण्याची कदरूची इच्छा अपूर्ण राहिली. तेव्हापासून कदरूच्या सापांची ‌जीभेला चीरा पडल्या तेव्हापासून सापांची जीभ दुभंगलेली दिसते, अशी अख्यायिका आहे. मात्र असे असताना धोडंबे गावात कदरू आणि विनतेचे मिलन होते, यामागेही काही ना काही अख्यायिका असणार असे ग्रामस्थ सांगतात.

धोडंबे हे नाव गावाला कसे पडले, हे सांगताना धोडप किल्ल्यामुळे धोडंबे गाव वसले अन् येथे राहणारे धोडंबेकर झाले, असे सदाशिव दिवटे, दौलत उशीरे, त्र्यंबकराव काळे, डॉ. संध्या तोडकर अन् कचरू रकीबे समोरच्या धोडप किल्ल्याकडे बोट दाखवून अभिमानाने सांगतात. धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेची खरी ओळख पूर्वी पानमळ्यांसाठी होती. मात्र पाण्याअभावी आता पानमळे गेले. आता औषधालाही पान पिकत नाही. सत्तरी गाठलेले सदाशिव दिवटे हात धरून आख्खं गाव फिरवून आणतात. हा उत्साह आमचं गाव खूप सुंदर आहे हे सांगायला कमी पडत नाही.

बाराबलुतेदारांचे धोडंबे गाव विंचूरकरांच्या जहागिरीतील एक गाव होते. गावात पूर्वी सरकारवाडा होता. मात्र तो काळानुरुप तो नामशेष झाल्याने आता पहायला मिळत नाही. गावाला दोन वेशी अन् गावाभवती कोटही होता. कोटाचेही आता अवशेष दिसत नाहीत; मात्र कदरू नदीशेजारील पूर्व वेस थोडी शिल्लक आहे तर गावाला पश्चिम वेशी अजूनही सुस्थ‌ितीत आहे. गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व विष्णू मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. देवीच्या मंदिरात अखंड लाकडातील १८ भुजा असलेली देवीची सुंदर मूर्ती आहे. दत्त मंदिर, गोरक्षनाथांचे मंदिर, भैरवनाथ मंदिर, देवीची मंदिरे, गणपती, हनुमान, जलालनाथ मंदिर, विठ्ठल, राम मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावात दत्त जयंतीला वटेश्वराची यात्रा भरते. धोडंबेचा हा प्रवास वटेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

धोडंबेतील हेमाडपंती महादेव मंदिरांचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना, आखणी, प्रवेशद्वार, गाभारा, सभामंडप यात समतोल साधलेला पहायला मिळतो. धोडंबेतील वैष्णव मंदिर यादवकालीन हेमाडपंत प्रकारातील असले तरी त्यावर नागर शैलीचा प्रभावही पहायला मिळतो. या मंदिरातील नागर प्रकारातील प्रासाद मंत्रमुग्ध करतो. कितीही वेळा हा प्रासाद पाहिला तरी मन भरत नाही. नागर प्रासादाचे यादवकालीन महाराष्ट्राला वावडे नव्हते. म्हणजेच जे काही चांगले आहे ते हेमाद्रीने स्वीकारल्याने हेमाडपंतीची भुरळ सर्वसामान्यांच्या मनावरही इतकी रूजली की दगडाचे मंदिर दिसले की हे हेमाडपंती मंदिर असल्याचे मानले जाते. अशीच नागर प्रासादाची शैली गोंदेश्वराचे पंचायतन मंदिर, अंजनेरीतील जैन मंदिरे व रत्नागिरीतील संगमेश्वर मंदिरांनी स्वीकारल्याचे दिसते. धोडंबेतील मंदिर प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारील दोन खांबांच्यावर यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुबक रीतीने कोरलेल्या पहायला मिळतात. या सुंदर शिल्पाइतकीच खांबाची रचना अन् भिंतीवरील नक्षीकाम अन् मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार थक्क करतात. त्यामुळे या सौंदर्यावरून नजर हटत नाही. मंदिराचा वरचा भाग नव्याने बांधलेला असला तरी त्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकरणांनी भरगच्च सुशोभित झालेले पाहताना हे मंदिर बांधायला किती मेहनत लागली असेल याची कल्पना येते.

वैष्णव मंदिरात सभामंडपाचे छत नक्षी कामांचा अनोखा नमूना आहे. मंदिराच्या भिंतीतल्या तरंगांवर श्रीकृष्णाच्या बालक्रीडांनी अनोखा साज चढविण्यात आल्याने एखादी रांगोळीच काढल्याचा भास होतो. महादेव मंदिरात तांब्याचा अन् लाखेचा असे दोन मुखवटे असल्याचे दिवटे सांगतात. महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. मंदिराबाहेर अनेक समाधी आहेत. मंदिरामागे विनता नदी वाहते. महादेव मंदिराच्या उजव्या हाताला मशीद व काही समाधी आहेत. हेमाडपंती मंदिराचा अनोखा सोहळा पाहून गावाच्या वेशीतून आत शिरले की उजव्या हाताला ग्रामपंचायत कार्यालय तर डाव्या हाताला तोडकरांचा वाडा आहे. या चौकातून लिंगायत गल्ली, ब्राह्मण गल्ली, मारूती गल्लीत जाणारे रस्ते अन् जुन्या घरांनी सजलेले धोडंबे अनुभवायला मिळते. ब्राह्मण गल्ली चौकातील राम मंदिर नव्याने साकारण्यात आले असल्याचे प्रकाश उशीर व अरूण दाणी सांगतात.

धोडंबे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते तसेच संताची भूमी म्हणूनही त्याची ओळख आहे. वडांगळी मठाचे मठाधिपती व संत गंगाधर स्वामी यांचे शिष्य बाळा बुवा कबाडी यांचा जन्म भीमाबाई काशीनाथ दांपत्याच्या पोटी १८ व्या शतकात उत्तरार्धात झाला. काही दिवस ते पिंपळदठान व धोडंबे येथे वास्तव्यास होते. पत्नी व मुलंबाळांच्या निधनानंतर ते विरक्त जीवन जगू लागले. त्यांनी त्यांचे चरित्र ४८ अभंगात उलगडले आहे. कबाडी बाबांनी १९०५ मध्ये धोडंबे येथे विनता नदी काठी समाधी घेतली. त्यापूर्वी गुरू गंगाधर स्वामीचे चरित्र लिहून ते गुरू ऋणातून मुक्त झाले. वडांगळी पीठावर आलेले पंडिताराध्य गुरू गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी २४ फेब्रुवारी १९८९ पासून बाळा बुवा कबाडी यांच्या पुण्यतिथीस प्रारंभ केला. त्यांचे दुर्मिळ छायाचित्र धोडंबेत उपलब्ध आहे. कबाडी महाराजांनी रचलेल्या १५०८ अभंगाचे ‘बाळकृत गाथा’ १९१२ मध्ये मल्ल‌िर्जुनप्पा तुकाप्पा गाडगाळे यांनी प्रकाशित केली. हा एक मोठा ठेवा धोडंबे आणि वडांगळीसाठी लाभल्याचे लिंगायत समाजाच्या अभ्यासिका डॉ. संध्या तोडकर सांगतात. ग्रामीण भागातील हा साहित्यसार उजेडात आणला पाहिजे, अशीही अपेक्षा त्या व्यक्त करतात.

धोडंबे बाजारपेठेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध होतो. पानमळे अन् खवा ही धोडंबेची खासियत. खव्यामुळे आजही टिकून आहे. गावातून दररोज शंभर किलो खवा शहरात जातो. दामोदर रकीबे यांच्या सामाजिक कार्याची आठवण अजूनही गावाने ठेवली आहे. मात्र विंचूरकरांचा सरकारवाडा, पानमळे हरविल्याची खंतही वाटते. कालांतराने बदल होणार असे सांगताना ग्रामस्थ नव्या आशेने विकासाकडे प्रवास करताना दिसतात. गावाचा दुर्मिळ वारसा असलेले हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाने जपावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना दिसतात. गावातून बाहेर पडताना अधिर होऊ गावाकडे पाहत असलेला धोडप, मावळत्या सूर्याच्या किरणांनी सोनेरी झालेला विखारा डोंगर वटेश्वराच्या धोडंबेचा वारसा जपायला हवा, असे सांगताना अनुभवता येते.























वेशीवरच्या पाऊलखुणा : वटेश्वराचे धोडंबे

काखेत कळसा अन् गावाला वळसा… अशी स्थिती अनेक गावांची असते. मात्र चांदवड तालुक्यातील धोडंबे आपल्या कलागुणांना उराशी बाळगून आहे. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.

मध्ययुगीन काळात प्रचलित झालेली वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती स्थापत्य शैली. हेमाडपंत स्थापत्य जगप्रसिद्ध करणारा हेमाद्री कोण होता, याबद्दल अनेक प्रवाद आहेत. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हा यादव राजा महादेव याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा रामदेवराव (१२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होते, असे म्हटले जाते. हेमाडपंताने असंख्य मंदिरे बांधली आणि हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ मोठे योगदानही दिले. त्यामुळे दगडातील प्रत्येक मंदिराला हेमाडपंती म्हणण्याची प्रथा रूढ झाली. हेमाडपंती मंदिरशैली हेमाद्रीच्या पूर्वीही होती; मात्र हेमाद्रीने या मंदिर संस्कृतीला बळ दिल्याने सर्वच मंदिरांना हेमाद्रीवरून हेमाडपंती मंदिरे म्हंटले जावू लागले. असे असले तरी हेमाडपंती शैली वैशिष्ट्यपूर्ण असल्याने आजही ही मंदिरे डोळ्यांची पारणे फेडतात. हेमाडपंत यांनी प्रचलित चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते तर या मंदिराचे स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी साधारणतः चौरस आकारात सजलेली दिसतात. हेमाद्री कोण होता याचा शोध या मंदिराच्या सुंदरतेवरूनही लावता येतो. यादवांच्याच काळात घडीव दगडांची देवळे उभारण्याचे तंत्र कसे किंवा का आले हे आज तरी सांगता येणे कठीणच; पण यादव सम्राटांनी, विशेषतः त्यांचा प्रधान अमात्य हेमाद्रीने ही शैली अधिकाधिक विकसित केल्याचे दिसते. मात्र ही मंदिर शैली अन् वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्न करत नसल्याने हेमाद्री काय विचार करीत असेल, असे वाटायला लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने केलेला जीर्णोद्धार नजरेला बोचतो. मात्र ओतीव सुंदरतेने नटलेले धोडंबेचे हेमाडपंती मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले नाही तर नवलं. विशेष म्हणजे धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन मंदिरे आहेत ही देखील धोडंबेची खासियत म्हणता येईल. म्हणूनच धोडंबेचा हा प्रवास थक्क करतो अन् या इतिहासाला कौतुकाचे तोरण लावताना दिसतो.

कसे पोचाल ?

नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० किलोमीटरवर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे (ता. चांदवड) जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ किलोमीटर आहे.

धोडंबे गाव लागण्यापूर्वी दोन किलोमीटरवर पेशव्यांची बाग नावाचा परिसर लागतो. ‘खरं तर ही पेशव्यांची बाग आहे’ असं काही सांगणारी पाऊलखुण आता तेथे नाही. मात्र हा परिसर आजही पेशव्यांची बाग म्हणून ओळखला जातो. रघुनाथराव पेशव्यांनी येथे आंब्याची बाग तयार केली होती. ते आरामासाठी येथे येत. एवढीच आठवण धोडंबेकर सांगतात. ‘आंब्याने बाग बहरली आहे अन् पेशवे बागेत आराम करतायेत असा’ भास मनात घेऊन धोडंबेकडे निघायचं. पेशव्यांच्या या नोंदीमुळे व चांदवडच्या एकूण सात वेशींपैकी एका वेशीला धोडंबे (धोडप) दरवाजा म्हटलं गेल्याने गावाचे महत्त्व अधोरेखित होतं. धोडंबेत प्रवेश करताना कदरू नावाची छोटी नदी लागते. नदीवरील पूल ओलांडताना डाव्या हाताला वेशीचा उरलेला अन् अर्धवट कोसळलेला एक बुरूज आपले स्वागत करतो. बुरूजापासून वरच्या चढापर्यंत दगडी कामातील वाट गावच्या समृद्धी वारशाची पाऊलवाट वाटायला लागते. आता हा रस्ता वापरात नाही. मात्र बुरूजाच्या अवतीभवती विहार करणारा मोरांचा थवा मनाला आनंद देतो. पुलावरून जाणारा रस्ता आपल्याला वेशीबाहेरच्या पारावर घेऊन जातो. डावीकडे वेस अन् समोर वटेश्वराचे हेमाडपंती मंदिर धोडंबेचे वैभव असल्याचे सांगायला लागतात. कदरू आणि विनता नदीच्या संगमाच्या त्रिकोणात धोडंबे वसले आहे. या दोन नद्यांबाबतही एक रोचक अख्यायिका प्रसिद्ध आहे. कश्यप ऋषींच्या दोन पत्नी म्हणजे कदरू आणि विनता. कश्यप यांच्या कदरू या पत्नीच्या पोटी नेहमी असंख्य साप जन्म घ्यायचे. तर विनताला मुले होत नव्हती. यामुळे दुखी असलेल्या विनतेने आपल्या पतीकडे हे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा कश्यप ऋषींनी यज्ञ केला तर पुत्रप्राप्ती होईल, असे सांगितले व यज्ञाचे आयोजन केले. वर्षभराने विनतेला अरूण आणि गरूड हे दोन मुले झाली. पुढे अरूण सूर्याचा वाहन तर गरूड विष्णूचा वाहन झाले. विनता आणि कदरू यांच्या अमृत मिळविण्यावरून वाद झाले. यात कदरूने विनताला हरविले व तिच्या मुलांसह कैदेत ठेवले. मात्र अमृत मिळविण्याची कदरूची इच्छा अपूर्ण राहिली. तेव्हापासून कदरूच्या सापांची ‌जीभेला चीरा पडल्या तेव्हापासून सापांची जीभ दुभंगलेली दिसते, अशी अख्यायिका आहे. मात्र असे असताना धोडंबे गावात कदरू आणि विनतेचे मिलन होते, यामागेही काही ना काही अख्यायिका असणार असे ग्रामस्थ सांगतात.

धोडंबे गावचे सौंदर्य

धोडंबे हे नाव गावाला कसे पडले, हे सांगताना धोडप किल्ल्यामुळे धोडंबे गाव वसले अन् येथे राहणारे धोडंबेकर झाले, असे सदाशिव दिवटे, दौलत उशीरे, त्र्यंबकराव काळे, डॉ. संध्या तोडकर अन् कचरू रकीबे समोरच्या धोडप किल्ल्याकडे बोट दाखवून अभिमानाने सांगतात. धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेची खरी ओळख पूर्वी पानमळ्यांसाठी होती. मात्र पाण्याअभावी आता पानमळे गेले. आता औषधालाही पान पिकत नाही. सत्तरी गाठलेले सदाशिव दिवटे हात धरून आख्खं गाव फिरवून आणतात. हा उत्साह आमचं गाव खूप सुंदर आहे हे सांगायला कमी पडत नाही.
बाराबलुतेदारांचे धोडंबे गाव विंचूरकरांच्या जहागिरीतील एक गाव होते. गावात पूर्वी सरकारवाडा होता. मात्र तो काळानुरुप तो नामशेष झाल्याने आता पहायला मिळत नाही. गावाला दोन वेशी अन् गावाभवती कोटही होता. कोटाचेही आता अवशेष दिसत नाहीत; मात्र कदरू नदीशेजारील पूर्व वेस थोडी शिल्लक आहे तर गावाला पश्चिम वेशी अजूनही सुस्थ‌ितीत आहे. गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व विष्णू मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. देवीच्या मंदिरात अखंड लाकडातील १८ भुजा असलेली देवीची सुंदर मूर्ती आहे. दत्त मंदिर, गोरक्षनाथांचे मंदिर, भैरवनाथ मंदिर, देवीची मंदिरे, गणपती, हनुमान, जलालनाथ मंदिर, विठ्ठल, राम मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावात दत्त जयंतीला वटेश्वराची यात्रा भरते. धोडंबेचा हा प्रवास वटेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

धोडंबेतील हेमाडपंती महादेव मंदिर

धोडंबेतील हेमाडपंती महादेव मंदिरांचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना, आखणी, प्रवेशद्वार, गाभारा, सभामंडप यात समतोल साधलेला पहायला मिळतो. धोडंबेतील वैष्णव मंदिर यादवकालीन हेमाडपंत प्रकारातील असले तरी त्यावर नागर शैलीचा प्रभावही पहायला मिळतो. या मंदिरातील नागर प्रकारातील प्रासाद मंत्रमुग्ध करतो. कितीही वेळा हा प्रासाद पाहिला तरी मन भरत नाही. नागर प्रासादाचे यादवकालीन महाराष्ट्राला वावडे नव्हते. म्हणजेच जे काही चांगले आहे ते हेमाद्रीने स्वीकारल्याने हेमाडपंतीची भुरळ सर्वसामान्यांच्या मनावरही इतकी रूजली की दगडाचे मंदिर दिसले की हे हेमाडपंती मंदिर असल्याचे मानले जाते. अशीच नागर प्रासादाची शैली गोंदेश्वराचे पंचायतन मंदिर, अंजनेरीतील जैन मंदिरे व रत्नागिरीतील संगमेश्वर मंदिरांनी स्वीकारल्याचे दिसते. धोडंबेतील मंदिर प्राचीनतेमुळेच नव्हे तर शैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारील दोन खांबांच्यावर यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवत सुबक रीतीने कोरलेल्या पहायला मिळतात. या सुंदर शिल्पाइतकीच खांबाची रचना अन् भिंतीवरील नक्षीकाम अन् मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार थक्क करतात. त्यामुळे या सौंदर्यावरून नजर हटत नाही. मंदिराचा वरचा भाग नव्याने बांधलेला असला तरी त्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. सभामंडपातील खांब शिल्प व इतर अलंकरणांनी भरगच्च सुशोभित झालेले पाहताना हे मंदिर बांधायला किती मेहनत लागली असेल याची कल्पना येते.

वैष्णव मंदिरात सभामंडपाचे छत नक्षी कामांचा अनोखा नमूना आहे. मंदिराच्या भिंतीतल्या तरंगांवर श्रीकृष्णाच्या बालक्रीडांनी अनोखा साज चढविण्यात आल्याने एखादी रांगोळीच काढल्याचा भास होतो. महादेव मंदिरात तांब्याचा अन् लाखेचा असे दोन मुखवटे असल्याचे दिवटे सांगतात. महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. मंदिराबाहेर अनेक समाधी आहेत. मंदिरामागे विनता नदी वाहते. महादेव मंदिराच्या उजव्या हाताला मशीद व काही समाधी आहेत. हेमाडपंती मंदिराचा अनोखा सोहळा पाहून गावाच्या वेशीतून आत शिरले की उजव्या हाताला ग्रामपंचायत कार्यालय तर डाव्या हाताला तोडकरांचा वाडा आहे. या चौकातून लिंगायत गल्ली, ब्राह्मण गल्ली, मारूती गल्लीत जाणारे रस्ते अन् जुन्या घरांनी सजलेले धोडंबे अनुभवायला मिळते. ब्राह्मण गल्ली चौकातील राम मंदिर नव्याने साकारण्यात आले असल्याचे प्रकाश उशीर व अरूण दाणी सांगतात.

स्वातंत्र्यसैनिकांचे गाव

धोडंबे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते तसेच संताची भूमी म्हणूनही त्याची ओळख आहे. वडांगळी मठाचे मठाधिपती व संत गंगाधर स्वामी यांचे शिष्य बाळा बुवा कबाडी यांचा जन्म भीमाबाई काशीनाथ दांपत्याच्या पोटी १८ व्या शतकात उत्तरार्धात झाला. काही दिवस ते पिंपळदठान व धोडंबे येथे वास्तव्यास होते. पत्नी व मुलंबाळांच्या निधनानंतर ते विरक्त जीवन जगू लागले. त्यांनी त्यांचे चरित्र ४८ अभंगात उलगडले आहे. कबाडी बाबांनी १९०५ मध्ये धोडंबे येथे विनता नदी काठी समाधी घेतली. त्यापूर्वी गुरू गंगाधर स्वामीचे चरित्र लिहून ते गुरू ऋणातून मुक्त झाले. वडांगळी पीठावर आलेले पंडिताराध्य गुरू गंगाधर शिवाचार्य स्वामी यांनी २४ फेब्रुवारी १९८९ पासून बाळा बुवा कबाडी यांच्या पुण्यतिथीस प्रारंभ केला. त्यांचे दुर्मिळ छायाचित्र धोडंबेत उपलब्ध आहे. कबाडी महाराजांनी रचलेल्या १५०८ अभंगाचे ‘बाळकृत गाथा’ १९१२ मध्ये मल्ल‌िर्जुनप्पा तुकाप्पा गाडगाळे यांनी प्रकाशित केली. हा एक मोठा ठेवा धोडंबे आणि वडांगळीसाठी लाभल्याचे लिंगायत समाजाच्या अभ्यासिका डॉ. संध्या तोडकर सांगतात. ग्रामीण भागातील हा साहित्यसार उजेडात आणला पाहिजे, अशीही अपेक्षा त्या व्यक्त करतात.

धोडंबे बाजारपेठ

धोडंबे बाजारपेठेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध होतो. पानमळे अन् खवा ही धोडंबेची खासियत. खव्यामुळे आजही टिकून आहे. गावातून दररोज शंभर किलो खवा शहरात जातो. दामोदर रकीबे यांच्या सामाजिक कार्याची आठवण अजूनही गावाने ठेवली आहे. मात्र विंचूरकरांचा सरकारवाडा, पानमळे हरविल्याची खंतही वाटते. कालांतराने बदल होणार असे सांगताना ग्रामस्थ नव्या आशेने विकासाकडे प्रवास करताना दिसतात. गावाचा दुर्मिळ वारसा असलेले हेमाडपंती मंदिर पुरातत्त्व विभागाने जपावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना दिसतात. गावातून बाहेर पडताना अधिर होऊ गावाकडे पाहत असलेला धोडप, मावळत्या सूर्याच्या किरणांनी सोनेरी झालेला विखारा डोंगर वटेश्वराच्या धोडंबेचा वारसा जपायला हवा, असे सांगताना अनुभवता येते.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

 

वटेश्वर महादेव मंदिर, धोडंबे
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे धोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल.
गावात हेमाडपंती वटेश्वर हे महादेव व शेजारी विष्णू मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे फक्त २ ते ३ फूट अंतर ठेवून आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. महादेव मंदिरा बाहेर अनेक समाधी आहेत. मंदिर १२व्या शतकातील असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह व सभामंडप दोन्ही ही तारकाकृती आहेत. त्यामुळे मंदिराच्या बाह्यअंगावर क्षिप्त-उक्षिप्त भाग तयार झाले असून त्यावरील मूर्ती, नक्षीकाम बघण्यात वेगळाच आनंद मिळतो. येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील अप्सरा ह्या विविध प्रकारच्या प्राण्यांवर आरूढ झालेल्या असून सोबत सेविका देखील आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारील दोन खांबांच्यावर यक्ष मंदिराला आधार देत असल्याचे दिसते तर प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींव्यतिरिक्त इतरही पौराणिक देवता सुबक रीतीने कोरलेल्या पहायला मिळतात. या सुंदर शिल्पां इतकीच खांबाची रचना अन् भिंतीवरील नक्षीकाम अन् मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार थक्क करतात. मंदिराचा वरचा भाग नव्याने बांधलेला असला तरी त्याचे अलंकरण साधे पण आकर्षक आहे. मंदिराच्या मागे विनिता नदी वाहते.
महादेव मंदिरात काही वर्षांपूर्वी दरोडेखोरांनी चांदीचा मुकुट व पंचधातूची नागाची मूर्ती असा सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरला होता. यावेळी मंदिरात झोपलेल्या एका वृद्धाला दरोडेखोरांनी ठार केले होते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडूनच मंदिराची विशेष काळजी घेतली जाते. दगडातील अप्रतिम नक्षीकाम पाहताना थक्क करणारे हेमाडपंती शैलीतील प्राचीन वटेश्वर मंदिर अन् खव्यासाठी प्रसिद्ध असलेले धोडंबे आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे.
संदर्भ: 'वारसायन', श्री. रमेश पडवळ

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...