SS Civilization, Vedic Culture and India Today
Sarasvati-Sindhu Civilization expresses itself in 300 planned cities. These cities had 2 or 3 storied houses, giant water reservoirs, underground drainage system and they exported goods to Egypt and Mesopotamia by road and sea.
SS people required the knowledge in the areas of geometry, mathematics, navigation, construction and engineering for building the magnificent cities. But instead of books with this information, all that they left behind were some seals.
Vedic culture left behind volumes of information on geometry, mathematics, philosophy, navigation, and even aviation theories. But no proof that this knowledge was used.
SS civilization and the Vedic culture share the same space and time. Were they the same people? Following slides are the pieces of this puzzle. Try and put them together!
Saraswati River
The Rg Ved praises Sarasvati as: “Ambitame, naditame, devitame
Sarasvati”. The best of rivers, the best of mothers, the best of
Goddesses. The Vedic ashrams thrived on her banks. Maybe hence she
became the Goddess of Knowledge.(?)
With three sources in Himalayas, Saraswati was a mighty river, the
bed as vast as 10km. The river course was dotted with lakes and ponds.
She flowed between Yamuna and Sutlej nearly parallel to Sindhu. In the
very early days, she met Arabian Sea at the Rann of Kachh. After the
level of Rann increased, she crossed the Rann to join Arabian Sea at the
gulf of Cambay.

The rise of civilization on banks of Saraswati
The contemporary civilizations of Egypt, Sumer and India were each
supported by a great river system. The civilization in Egypt flourished
by the Nile, Sumer (Modern Iraq) by the rivers Euphrates and Tigirs, and
the biggest of them, developed in the region of Saraswati and Sindhu
(Indus). 80% of the sites have been found on the dry banks of river
Saraswati, and hence the name Saraswati-Sindhu.
Highlights of the Saraswati-Sindhu Civilization
- The size: 300 cities and many supporting villages covered 1,500,000 sq. km. Bigger than Western Europe.
- Cities like Mohenjo-Daro, Harappa, Rakhighari had populations of 100,000.
- Cities had giant reservoirs for water.
- Underground drainage system.
- 2 or 3 storied houses, built with bricks of uniform size.
- Standardization of measures like weight.
- The entire empire used same script.
- They exported goods to Egypt and Sumer.
- The dock in Lothal was comparable to the docks currently in Vishakhapatnam.

The decline of Saraswati
Tectonic movements pushed up the Aravalli hills, in northern Rajasthan.
It changed the drainage pattern of the Northwest drastically. Saraswati
lost her major tributaries, Yamuna and Sutlej. Sutlej turned west and
joined Beas-Sindhu system, and Yamuna migrated east to join Ganga.
Yamuna also pirated Saraswati’s sources. Eventually only flood waters
flowed through her vast channels. As late as the 16th century AD, the
floodwaters of Sutlej flowed down Saraswati. Even today, Ghaggar; a puny seasonal river, occupies some parts of Saraswati’s dry beds.
The redirection of the Sutlej into the Indus caused the Indus area to flood. On the other hand, western Rajasthan, once a green, rich expanse with extensive rainfall, gradually turned into a parched, desert land. The changing climate and scarcity of water forced people to migrate. Saraswati-Sindhu civilization did not vanish. There was a shift of population after the economy around the Sarasvati river collapsed. People moved to west giving rise to the Mittani and Kassites, who worshiped Vedic Gods. Others moved east to settle on the banks of Ganga-Yamuna. The rise of importance of Ganga is seen in this age. Still others moved to south, the ‘Saraswat’ community thrives in the south.
Dwarka: The Lost City
Sri Krishna killed Kans (his maternal uncle) and made Ugrasen (his maternal grandfather) the king of Mathura. Enraged, the father-in-law of Kans, Jarasandh (king of Magadh) with his friend Kalayavan attacked Mathura 17 times. For the safety of the people, Krishna and Yadava decided to move the capital from Mathura to Dwarka.
Land was reclaimed from the sea near the western shores of Saurashtra. A city was planned and built here. Dwarka was a planned city, on the banks of river Gomati. This beautiful city was also known as Dwaramati, Dwarawati and Kushsthali. It had well organized six sectors, residential and commercial zones, wide roads, plazas, palaces and many public utilities. A hall called “Sudharma Sabha” was build to hold public meetings. The city also boasted a good harbour.
Dwaraka is rated as one of the seven most ancient cities in the country.
Submergence of Dwaraka
After Sri Krishna left for the heavenly abode, and the major Yadava heads were killed in fights among themselves; Arjun went to Dwarka to bring Krishna’s grandsons and the Yadava wives to Hastinapur. After Arjun left Dwaraka, it was submerged in the sea. Here is the account given by Arjun, in Mahabharat:
“The sea, which had been beating against the shores, suddenly broke the boundary that was imposed on it by nature. The sea rushed into the city. It coursed through the streets of the beautiful city. The sea covered up everything in the city. I saw the beautiful buildings becoming submerged one by one. In a matter of a few moments it was all over. The sea had now become as placid as a lake. There was no trace of the city. Dwaraka was just a name; just a memory.”
Discovery of Dwaraka
The search for the lost city was going on since 1930’s. Marine Archaeology Unit (MAU) of the National Institute of Oceanography, took part in this search in 1983. This search was carried out in the coastal waters of Dwaraka in Gujarat.
Between 1983 to 1990 was discovered, the well-fortified township of Dwaraka, that extended more than half a mile from the shore. The township was built in six sectors along the banks of a river. The foundation of boulders on which the city’s walls were erected proves that the land was reclaimed from the sea.
Dwaraka extended upto Bet Dwaraka (Sankhodhara) in the north and Okhamadhi in the south. Eastward it extended upto Pindara. The general layout of the city of Dwaraka described in ancient texts agrees with that of the submerged city discovered by MAU.
Under Water Dwaraka Museum
The proposal for the Dwaraka museum, submitted by the MAU, involves laying a submarine acrylic tube through which visitors can view through glass windows the ruins of the city.
The State Goverment of Gujrat and the Travel & Tourism Department of Gujrat are working on this proposal. When and if completed, it will be the first museum to be built under the sea.
Conclusion
Hindu texts have mentioned the disapperance of river Sarawati and the submergance of the city of Dwaraka. Hindus believed in these events as facts, for centuries. Recent historians and scholars considered these events as myths. Thus Mahabharata, that mentioned these events, was regarded as epic rather than history. Kings like Sri Ram & Sri Krishna became mere figment of imagination, rather than the heroes of History.
In past few decades archeologists have proved beyond doubt that river Saraswati once flowed from Himalayas to Arabian sea. The capital of Sri Krishna, the city Dwaraka, once flourished on the west coast of India.
These findings prove the observations made by the Hindu texts. They prove the existance of Krishna. They prove that ‘Aryans’ lived in Bharat long before the ‘Aryan Invasion’ took place. These archeological findings have been the reason for the demise of the Aryan Invasion Theory.
Source: Report about the excavations done by Dr. S.R. Rao of the Marine Archaeology Unit of the National Institute of Oceanography of India. Dr. S.R. Rao served the Archaeological Survey of India for over 32 years. He is the discoverer of a large number of Harappan sites including the port city of Lothal in Gujarat.
Ancient (Puranic) Genealogy
The family tree that shows the origins of: Dev, Gandharva, Apsara, Daitya, Naga, Ikshvaku dynasty (Sri Rama), Yadu Dynasty (Sri Krishna), etc. The tree starts with the earliest known king Barhi.
Only the very important kings are noted here. The left column shows the number of generations since the earliest king. Time in the left column shows the maximum and minimum limit for the event to occur. Example: “3,100 BCE – 5,500 BCE for Mahabharat” means Mahabharat war took place earliest in 5,500 BCE and latest in 3,300 BCE. “d. A” Means A is daughter.
Source: Vastav Ramayan – Dr. P. V. Vartak
ओंकार रुपी गणेश
गणपती हा – अक्षरांचा, लिखाणाचा आणि ग्रंथांचा देव आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर गणेशाला सर्व प्रकारच्या साहित्याचा अविष्कार मानतात! ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीचा जयजयकार करतांना ज्ञानेश्वर म्हणतात –
ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा || १.१ ||
देवा तूची गणेशु | सकलमतिप्रकाशु |
म्हणे निवृत्ती दासु | अवधारिजोजी || १.२ ||
ओंकाररूपी गणेशा, तुला माझा नमस्कार असो! तुझा जयजयकार असो! गणेशा, तू बुद्धीदायक आहेस! सकल जीवांना जे काही दिसते, कळते ते तू दिलेल्या ज्ञानप्रकाशाने.
तुझी मूर्ती साक्षात शब्दब्रह्म आहे. अक्षरं ही तुझी कांती आहे. चारी वेद तुझे शरीर आहे. द्वैत – अद्वैत मते ही तुझी गंडस्थळे आहेत. मला तर असे भासते की, पूर्व आणि उत्तर मीमांसा हे तुझे विशाल कान आहेत. दहा उपनिषदे तुझ्या मुकुटातील फुले आहेत! त्या फुलांमधून पाझरणारा ज्ञानसुवास सर्वत्र दरवळत आहे.
हे षड्भूज गणेशा, सहा दर्शने म्हणजे तुझे सहा हात आहेत. सहा दर्शनांचे सहा अभिप्राय हे तुझ्या हातातील शस्त्र आहेत. तुझा खंडित दात, हे बौद्धमत आहे. तर तुझा अखंड शुभ्र दात हा उत्कृष्ट संवाद आहे. उपनिषदे, गीता, महाभारत, पुराणे आणि इतर अनेक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ यातील गुरु-शिष्य संवादाचे प्रतिक आहे.
हे गणेशा, तुझ्या हातातील रसाळ मोदक हा वेदांत आहे. मोद देणारा अर्थात आनंद देणारा मोदक. ज्या ज्ञानाने कैवाल्यानंद प्राप्त होतो, तो वेदांत ज्ञानाचा मोदक देण्यासाठीच जणू तू बसला आहेस.
अठरा पुराणे तुझे अलंकार आहेत. त्यातील तत्त्वे आणि प्रमेय ही रत्ने आहेत.
व्यासांसारखे विद्वान जे या साहित्याचा अभ्यास करतात, त्यांची बुद्धी तुझी मेखला होय!
सुंदर काव्य आणि नाटक हे तुझ्या पैंजणातील लहान लहान घुंगरू आहेत. कालिदासाची, भासाची नाटके तुझ्या पैंजणातील एक एक घुंगरू आहे. त्यांच्या मधुर नादाने सामान्य जन प्रसन्न होतात.
अकार – उकार – मकार रूप धारण करणाऱ्या गणेशा, तुला माझा नमस्कार असो. गुरुकृपेने मी तुझे हे ओमकाररूप जाणले आहे! मी तुला म्हणजेच अथांग साहित्य सागराला प्रणाम करतो!
अकार चरण युगुल | उकार उदार विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे || १.१९ ||
ज्या ओंकाररूपी गणेशाचे रूप ज्ञानदेवांनी सांगितले आहे, ते प्राचीन नाण्यांवर दिसणारे ओंकाराचे चिन्ह असेल का?
India Timeline
Share this:
अक्षय तृतीया

वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीया ही अक्षयतृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. अक्षयतृतीयेचा सर्वांत प्राचीन उल्लेख विष्णू धर्मसूत्रामध्ये आलेला दिसतो. या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, होम, स्नान (विशेषतः समुद्रस्थान) आदी कृत्यांचे फल अक्षय म्हणजे कधीही न संपणारे किंवा कधीही नाश न पावणारे असते. यामुळेच या तिथीला अक्षयतृतीया म्हणतात. मत्स्यपुराण (६.५.१.७) वैशाख महिन्यातील ही महत्त्वाची तिथी म्हणून गणली जाते.
वैशाख मासाचे प्राचीन नाव माधव असे आहे. चैत्र व वैशाख हे दोन वसंत ऋतूचे महिने मानले जातात. तथापि, वैशाखात उन्हाळा बराच असतो. त्यामुळे या मासातील व्रत-वैकल्ये उन्हाळ्याला योग्य अशीच सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, या दिवशी (वसंत) माधव या देवतेला उद्देशून ब्राह्मणाला उदकाने (पाण्याने) पूर्ण असा कुंभ दान द्यावा असे सांगितलेले आहे. हे उद कुंभाचे दान स्वतःसाठी त्याचप्रमाणे पितरांची अक्षय तृप्ती व्हावी, यासाठीही देतात. या उद कुंभदानानंतरच लोकांनी पाणी थंड करून पिण्यास सुरुवात करावी, अगोदर पाणी प्याले, तर आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. याकरिता पितरांना थंड पाणी दिल्याशिवाय आपण थंड पाणी पिऊ नये, असा निर्बंध घालून ठेवलेला आहे.
अक्षयतृतीयेला महत्त्व येण्याचे कारण या तिथीचा साडेतीन शुभमुहूर्तांमध्ये समावेश केला गेला. या दिवसाची साडेतीन शुभमुहूर्तावर गणना होण्याचे कारण हा कृतयुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. शालिवाहन शकाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवसाची या दृष्टिकोनातूनच साडेतीन मुहूर्तांत गणना केली आहे. हे साडेतीन शुभमुहूर्त स्वयंसिद्ध असल्यामुळे कोणतेही शुभकर्म करण्यास पंचांगशुद्धी किंवा दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच वास्तुशांती, विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, नामकरण, उष्टावण, भूमिपूजन, नव्या उद्योगाचा आरंभ वगैरे गोष्टी साडेतीन मुहूर्तांचे निमित्त साधून घडू लागल्या. या साडेतीन मुहूर्तांमध्ये धर्मशास्त्रीयदृष्ट्या कोणत्या गोष्टी करण्यास मुभा आहे, हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे.
सामाजिक व कौटुंबिक विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने या दिवसाला फार महत्त्व आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला झोपाळ्यावर बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. याला ‘दोलोत्सव’ असे म्हणतात. अक्षयतृतीयेला चैत्रात बसविलेल्या या गौरीचे विसर्जन करायचे असते. कोकणात या दिवशी हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनींचे व कुमारिकांचे पाय धुऊन भिजलेल्या हरभऱ्यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांच्या हातावर चंदनाचा लेप करतात आणि त्यावरून शिरा असलेली शिंप फिरवितात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. देवीची पूजा झाल्यावर आरती करताना ‘गौरीचे माहेर’ नावाचे गाणे म्हणण्याची पद्धत आहे. या गौरीच्या स्तुतीबरोबरच माहेरची माणसे, माहेरचे वातावरण, परिस्थिती यांचेही वर्णन नितांत रमणीय आणि अस्सल आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते. आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षयतृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे. म्हणून या दिवशी मिष्टान्न करून सुवासिनीला भोजन घालण्यात येते. बायका एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जातात-येतात. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देण्याचा हा कुलाचार आहे. ब्राह्मणेतर समाजातही हा उत्सव साजरा केला जातो. त्या समाजात या दिवसाला ‘आखेती’ असेही म्हणतात.
– स्नेहल आपटे
कोजागरी पौर्णिमा

इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमासाजरी केली जाते.
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी ही परंपरा आहे.
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.
बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.
– स्नेहल आपटे
मकरसंक्रांत

भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात. मकर संक्रांत हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी जोडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वर्षाचे कालमानाने 12 भाग केलेले आहेत. 12 महिने आहेत तशा 12 राशी देखील आहेत. त्या क्रमाने मेष, वृषभ इंत्यादी आहेत. आपल्याला पृथ्वीवरून सूर्य या 12 राशींच्या चक्रातून जाताना दिसतो.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून सूर्य सर्वात दक्षिणेकडे 22 डिसेंबर किंवा 1 पौष (भारतीय सौर कालगणने प्रमाणे) या दिवशी दिसतो. त्या दिवसानंतर तो उत्तरेकडे सरकताना दिसतो. 22 जून किंवा 1 आषाढ या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्तावर असतो. मग पुन्हा दक्षिणेकडे सरकायला लागतो. सहा महिन्यानंतर पुन्हा उत्तरेकडे. असे सूर्याचे आयन आपल्याला दिसते.
(खरं तर सूर्य स्थिर आहे. फिरणार्या पृथ्वीवरून आपण त्याला पाहतो म्हणून आपल्याला ‘तो’ फिरतो असे दिसते. यालाच म्हणतात – सूर्याचे भ्रमण दृगोत्तर होते.)
सूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार – ऊर्जा वाढणार – वनस्पतींना अन्न बनवायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार. आनंदाचे दिवस असले की – उत्साह वाढतो – उत्सव, सण करावासा वाटतो. पूर्वी कदाचित हाच दिवस मकर संक्रांत म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले.
ढोबळमानाने 150 वर्षात एक दिवसाचा फरक पडतो. असं कधी होईल का की मकर संक्रांत 22 जूनला येईल? सध्या मकर संक्रांत 14 जानेवारीला येत आहे. काही वर्षांनंतर ती 15 जानेवारीला येईल. भारतात – खरे तर भारतीय उपखंडातच मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत.
महाराष्ट्रात मकर संक्रांत किंवा संक्रांत म्हणतात. “तिळगूळ घ्या गोड बोला” असे म्हणत तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू यांची देवाण-घेवाण करतात.
महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकातसुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासारखाच हा सण साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. ‘एल्लु’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्याचे काप आणि बेळ म्हणजे गुळाचे खडे; यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी सक्कर अच्चू म्हणजे बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देता-घेताना ‘एल्लू बेळ तिंडु झोल्ले मातंडी‘ म्हणजे ‘तिळगूळ खा चांगलेच बोला’ असं म्हणतात.
महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिक्की करतात. या मोसमात आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयू करतात. पतंग-उडविण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गानं शर्यतच लागलेली असते – सूर्यापर्यंत पोचायची
गोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा, प. बंगाल, बिहार, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मणिपूर या सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकर संक्रांत’ साजरी केली जाते.
आंध्र प्रदेशात हा सण चार दिवस असतो – १. भोगी, २. पेट्टा पांडुगा ३. कणुमा आणि ४. मुक्कनुमा
हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये तिला ‘माघी ’ म्हणतात.
काश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात.
आसाममध्ये ‘माघी बिहु’ किंवा ‘भोगाली बिहु’ असं म्हणतात.
उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ म्हणतात.
दक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो.
तामिळनाडूत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.
केरळ प्रांतात ‘मकर विलु’ म्हणतात.
भारताबाहेर भारताजवळच्या देशांमध्येही हा सण साजरा होतो.
नेपाळमध्ये ‘तरुलोक – माघी’,
थायलंडमध्ये ‘सोंगक्रान’,
लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’,
म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’
तर कंबोडिआमध्ये ‘मोहा संक्रांत’ म्हणून हा सण साजरा होतो.
या सणाशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत
मकर राशीचा स्वामी शनि म्हंटला जातो – (शनि या शब्दाचा अर्थ हळू हळू सरकणारा) तो सूर्यापासून निर्माण झाला आणि खूप लांब गेला. वर्षातून एकदा एक महिनाभर सूर्य शनिला भेटतो, तो हा सण. (यात खगोलशास्त्रीय तथ्य किती – याचा शोध घेणार?)
या क्षणापासून देवतांचा दिवस सुरू होतो. (देव लोक वर – उत्तरेकडे राहातात असे मानतात. उत्तरीय ध्रुव प्रदेशात या क्षणानंतर सूर्य दिसायला सुरूवात होते)
या दिवशी भगीरथाने गंगा स्वर्गातून खाली आणली, विष्णूने असुरांचे निर्दालन करून त्यांना मेरू पर्वताखाली गाडले, भीष्माने देह ठेवला इत्यादी कथा प्रचलित आहेत. या कथांमधून वास्तव आणि अवास्तव यांची सरमिसळ झाली आहे.
– स्नेहल आपटे
सप्तमातृका

प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.
सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.

सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.
भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.
सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात. शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.
ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस
वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड
इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती
माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल
कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर
वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष
चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव
वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.
- घारापुरी लेणी
- वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
- वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
- भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
- पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका)
- धर्मापुरीचा किल्ला, धर्मापुरी
- औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
- दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
- जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
- राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
- टाकळी ढोकेश्वरची लेणी
संदर्भ:
- भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
- भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
– स्नेहल आपटे
वैदिक साहित्याचा आढावा
मानवाची सर्वात प्राचीन साहित्य निर्मिती म्हणजे वेद. वैदिक साहित्या बद्दल गौतम धर्म सूत्रात म्हणले आहे की – सर्व धर्माचे आणि तत्त्वज्ञानाचे मूळ वेद आहेत.
वेदोऽखिलो धर्ममूलम |
प्राचीन काळापासून, भारतीयांनी वेदवाक्यांवर परम श्रद्धा ठेवली. वेद अपौरुषेय असून ते लिहिणारे ऋषी, हे वेदांचे कर्ते नसून द्रष्टे होते असे मानले जाते.
हजारो वर्ष, अनेक पिढ्यांनी वेद कंठस्थ करूनहा प्राचीन ठेवा जतन केला. अत्यंत कठीण अशा अनेक नैसर्गिक व मनुष्य निर्मित आपत्तींना तोंड देत, वैदिक परंपरा चालू राहिली, हे महदाश्चर्य आहे.
या मौखिक परंपरेत वेदपाठांमध्ये काडीचाही बदल होऊ नये म्हणून, प्रत्येक वेदाचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून अक्षरन् अक्षर मोजून ठेवण्यात आले. वैदिक संहिता – “जटा”, “माला”, “दंड”, “रेखा”, “रथ”, “ध्वज”, “शिखा” व “घन” या अष्टविकृतींमध्ये घट्ट विणल्याने हे शक्य झाले.
पूर्वी एकच वेदिक संहिता होती. यज्ञविधीच्या अनुरोधाने व्यासांनी त्या संहितेचे चार भाग करून एकेका शिष्याकडे एक एक भाग दिला. पुढे भौगोलिक कारणाने, गुरुशिष्य परंपरेने वेदांच्या विविध शाखा अस्तित्वात आल्या. मात्र कालौघात बऱ्याचशा शाखा आता लुप्त झाल्या आहेत.

प्रत्येक वेदाचे ४ विभाग पडतात –
| संहिता | मुलमंत्र व सुक्त. प्रत्येक सुक्ताला एक देवता, एक छंद व एक ऋषी |
| ब्राह्मण | या ग्रंथात यज्ञातील विधी कसे करायचे याची माहिती मिळते.
हा यज्ञ पूर्वी कोणी केला, का केला व त्याला काय फळ मिळाले या बद्दलच्या
कथा व आख्याने देखील ब्राह्मण ग्रंथात वाचावयास मिळतात.
ब्राह्मण वाक्य १० प्रकारची आहेत – हेतू: (का करायचे), निर्वाचन (etymology), निंदा (का करायचे नाही), प्रशंसा (का करायचे), संशयो (confusion असेल तर काय करायचे), विधी (instructions), परक्रिया (आणखी कोणी केला त्याची कथा), पुराकल्प (पूर्वी कोणी केला त्याची कथा), व्यावधारणकल्पना (काळ व संख्या) व उपमान (उपमा देणे) |
| आरण्यक | अरण्यात जाऊन केलेले चिंतन, या ग्रंथात तत्वज्ञान रूपात पाहायला मिळते. इथे कर्मकांड सोडून ज्ञानकांडाकडे वाटचाल सुरु होते. काही वेदात अरण्यके दिसत नाहीत, तिथे कदाचित उपनिषदांपर्यंत जाण्यासाठी मधल्या पायरीची गरज भासली नसावी. |
| उपनिषद | हा वेदांचा अंतिम भाग असून, याला वेदांत असे देखील
म्हणतात. या मध्ये मुख्य तत्त्वज्ञान येते. गुरूंच्या जवळ, पायाशी बसून
शिकणे अपेक्षित. केवळ अविद्येत रमलेल्या मानवाला विद्येच्या रस्त्याने नेऊन
मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणे, हा उपनिषदांचा हेतू आहे. ज्याला विद्येची
तहान आहे, तोच हे शिकण्यास पात्र आहे. येथे वर्ण – जाती – स्त्री – पुरुष
असा भेदभाव नाही.
उपनिषदांची संख्या ५०० पर्यंत सांगितली जाते. पैकी १० प्रमुख आहेत – ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, मांडुक्य, तैत्तरीय, छांदोग्य, ऐतरीय, बृहदारण्यक |
ऋग्वेद
ऋग्वेदाच्या शकल, बाष्कल, शांखायन, आश्वलायन, मांडूकायन आदी २१ शाखा होत्या. त्यापैकी आता शाकल व बाष्कल या दोनच उपलब्ध आहेत. बाष्कल शाखेत शाकल शाखेपेक्षा ८ सूक्त अधिक आहेत.
ऋग्वेद संहितेचे विभाजन दोन प्रकारे केले आहे – मंडल व अष्टक. मंडल मध्ये – १० मंडल, ८५ अनुवाक व १०१७ सूक्त आहेत. तर अष्टक मध्ये – ८ अष्टक, ६४ आध्याय व २०८ वर्ग आहेत.
यजुर्वेद
वैशंपायन कडून याज्ञवाल्क्य ऋषींनी यजुर्वेद शिकला. परंतु त्यांच्यामध्ये काही वाद झाले, तेंव्हा वैशंपायनने आपली वेदविद्या परत मागितली. याज्ञवाल्क्यने यजुर्वेदाचा त्याग केला व नवीन विद्येसाठी सूर्याची उपासना केली. सूर्याने वाजी रूपाने याज्ञावाल्क्यला याजुर्वेदाची नवीन संहिता शिकवली. ही संहिता वाजसनेयी या नावाने जाणली जाते. तर वैशंपायनचे वडील बंधू तैत्तिरीय ऋषींनी जुन्या यजुर्वेदाचा प्रचार केला म्हणून ती शाखा तैत्तिरीय या नावाने ओळखली जाते.
वाजसनेय यजुर्वेदात केवळ मंत्रांचा संग्रह आहे म्हणून तो शुक्ल यजुर्वेद या नावाने देखील ओळखला जातो. तर तैत्तिरीय यजुर्वेदात संहितेत मंत्रांबरोबर ब्राह्मण भागाचे मिश्रण आहे म्हणून तो कृष्ण यजुर्वेद म्हणूनही ओळखला जातो.
सारस्वतपाठ व आर्षेयपाठ प्रचलित असून, पाठांतरासाठी प्रतीकपाठ, सकलमंत्रपाठ व अनुषंगिकपाठ वापरले जातात. शुक्ल यजुर्वेदात ४० आध्याय आहेत.
सामवेद
सामवेदात ७० / ८० मंत्र सोडता सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. सामवेदाचे अस्तित्व रुग्वेदामुळे असल्याने, ऋचा व सामन् हे माता – पुत्र समजले जातात. ऋग्वेदाच्या ८ व्या व ९ व्या मंडलातीलच रुचांचे प्रमाण अधिक आहे.
देवतांना प्रसन्न करण्यासाठी साम गायन केले जात असे. भारतीय संगीताचे मूळ साम वेदात आढळते. ७ स्वर प्रचलित होते. त्यांची नवे – कृष्ट (म), प्रथम (ग), द्वितीय (रे), तृतीय (सा), चतुर्थ (ध), मंद्र (नि), अतिस्वर्य (प) लेखनात स्वरांचा निर्देश १ ते ७ आकड्यांनी केला जातो. पैकी १ – ५ हेच अंक सर्वत्र आढळतात. ३ सप्तक – उदात्त, स्वारीत व अनुदात्त वापरले जात.
सामागायानाचे ४ प्रकार – ग्रामागेयगान, अरण्यगान, उहागान व रहस्यगान. ऋचा लयीत बसवण्यासाठी मंत्रांमध्ये बदल केले जात असत. जसे अधिक ‘ई’, कधी शब्द फोडणे, ऱ्हस्व – दीर्घात बदल, शब्द गाळणे अथवा पुन्हा घेणे किंवा नसलेला शब्द घालणे.
अथर्ववेद
ऋग्वेद काळात रचला गेला असला तरी, अथर्ववेदाला वेद म्हणून उशिरा मान्यता मिळाली. श्रौत यज्ञात विनियोग नसल्यामुळे, किंवा सामान्य लोकांशी संबंधित असल्यामुळे असावे. इतर नावे – अथर्वान्गीरस, ब्रह्मवेद, क्षात्रवेद
दोन प्रकारचे मंत्र – घोर – रोग, हिंस्र पशू, शत्रू इत्यादींना विरोध. व अघोर – कुटुंबात, गावात शांती, शत्रूशी सख्य, स्वास्थ्य, दीर्घायुष्य इत्यादी मिळवण्यासाठी.
वेदांग
वेदांचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी, व वेदांचा अर्थ नीट कळण्यासाठी, वेदांगांचा अभ्यास आवश्यक आहे. वेदांबरोबर ६ वेदांगांचे अध्ययन होत असे.
- शिक्षा – उच्चारण शास्त्र. (Phonetics and Phonology). शिक्षा ग्रंथ वेदशाखेशी जोडलेले नसून, सामान्य वर्णोच्चार शास्त्र यामध्ये येते. पाणिनीय शिक्षा, स्वरव्यंजन शिक्षा, भारद्वाज शिक्षा, नारदीय शिक्षा, याज्ञवाल्क्य शिक्षा आदि ६५ शिक्षा ग्रंथ उपलब्ध असून, त्या पैकी पाणिनीय शिक्षा सर्वात प्राचीन आहे. त्या पूर्वीचे शिक्षा ग्रंथ उपलब्ध नाहीत. शिक्षांच्या आधारावर, प्रत्येक शाखा निहाय प्रातिशाख्य ग्रंथ तयार झाले. वेदपाठच्या उच्चारणासंबधी नियम यामध्ये येतात. ऋक् प्रातिशाख्य, तैत्तरीय प्रातिशाख्य, वाजसनेय प्रातिशाख्य, अथर्व प्रातिशाख्य, शौनकीय प्रातिशाख्य आदि, त्या त्या वेदाचे उच्चारण नियम देतात.
- व्याकरण – भाषेचे नियम सांगणारे ग्रंथ. पाणिनीचा अष्टाध्यायी हा ग्रंथ ४००० सूत्रात संस्कृतचे व्याकरण सांगतो. या मध्ये आधीचे १२ ग्रंथाचे संदर्भ दिले आहेत.
- कल्प – वैदिक धर्माच्या कर्मकांडाचे उत्तम प्रकारे ज्ञान होण्यासाठी ही सूत्रे उपयुक्त आहेत. या मध्ये प्रत्येक वेदाशी निगडीत –
- गृह्यसूत्रे – घरगुती यज्ञ. संस्कारांसाठीचे होम. गृह्याग्नीवर करावयाचे छोटे यज्ञ.
- श्रौतसूत्रे – वैदिक यज्ञ, श्रौताग्नी वर करावयाचे यज्ञ.
- धर्मसूत्रे – समाजात वावरण्याचे नियम
- शुल्बसूत्रे – यज्ञकुंडांच्या बांधकामाबद्दलचे नियम. भूमितीचे fundamentals येतात.
- छंद – वेदांतील मंत्र ज्या छंदांमध्ये बद्ध केले आहेत, त्या छंदांबद्दलचे शास्त्र. वेदातील जास्तीत जास्त वापरलेलं गेलेले छंद आहेत – गायत्री, अनुष्टुप आणि त्रिष्टुप. पिंगलाचे छंदशास्त्र हा ग्रंथ छंदांची उकल करून सांगतो.
- निरुक्त – या ग्रंथामध्ये शब्दांचे मूळ (Etymology) व त्यावरून त्याचा अर्थ सांगितला आहे. यास्काचार्यांचा निरुक्त ग्रंथ.
- ज्योतिष – यज्ञ कोणत्या वेळेला करावेत हे कळण्यासाठी सूत्रे. काल, देश आणि दिशा ज्याला समजते, तोच वेद समजू शकतो. लगधाचे वेदांग ज्योतिष, अथर्वण ज्योतिष आदि ग्रंथ उपलब्ध आहेत.
संदर्भ –
- भारतीय धर्म व तत्त्वज्ञान – श्री. भा. वर्णेकर
- बालबोध संग्रह: – Study Text from Sri Kanchi Kamakoti Peetham
– दीपाली पाटवदकर
अग्निपुराण
मागच्या महिन्यात आम्ही घर बदलले. समानाची बांधाबांध त्या आधीच सुरु झाली होती. मी स्वयंघोषित ‘Organizer शिरोमणी’ आहे. त्या गुणाबद्दल चिक्कार गर्व पाळला आहे. त्याला अनुसरून, मी घर बदलण्याच्या कार्यक्रमाचा अत्यंत आखीव रेखीव plan केला. दोनच वर्षांसाठी घर बदलतोय. कशाला न्यायचे सगळं समान. अगदी जरुरी पुरतंच नेऊ. बाकी समान जुन्या घरातील खोलीवजा closet मध्ये ठेवायचे ठरले.
मग, रोजच्या वाचनात नसलेली पुस्तके काढली. त्याचा एक मोठा डोंगर closet मध्ये नीट रचून ठेवला. काचेचे dinner set काय करायचे? ते पण जुन्या घरातच ठेवायचे ठरवले. जास्तीचे अंथरुण –पांघरूण ते पण राहू देत म्हणून closet मध्ये गेले. करत करत त्या खोलीत एक लहानसा मेरू पर्वत उभा राहिला.
आता न्यायच्या सामानाची बांधाबांध. ते एकेका खोक्यात भरून, त्यावर आत काय भरलंय आणि नवीन घरात कोणत्या खोलीत ठेवायचे ते लिहीले. packing करता करता, ज्या मार्करने मी आणि शरू खोक्यावर लिहित होतो ते कोणत्या खोक्यात प्याक केलं गेलं ते देवच जाणे! पुढची खोकी निनावी राहिली.
माझे organized packing संथ गतीने चालू होते. नरेनच्याच शब्दात सांगायचे तर, “आता खाली टेम्पो येऊन उभा राहील!” अशी परिस्तिथी आली तरी बांधाबांध चालूच! शेवटी नरेनने आणखीन खोकी आणवली आणि मग आम्ही ‘दिसेल_ते_मावेल_त्या_खोक्यात’ हे धोरण अमलात आणले, आणि सुसाट वेगाने उरलेलं सामान भरत सुटलो! “Organized packing” चे आधीच बारा वाजले होते, आता पार तीन तेरा वाजले! आम्ही नवीन घरात पोचायच्या आधीच, माझ्या गर्वाने त्याचे घर खाली जात जात basement मध्ये पोचले होते!
नवीन घरात सामन लावायला सुरुवात झाली. कितीतरी दिवस ‘सुरुवात’ च चालू होती. “समान लावणे” या प्रक्रियेचा मध्य कधीतरी पार केला पण त्याचा अंत काही लागत नव्हता! स्वयंपाकघर लावतांना गॅस गळत असल्याचे लक्षात आले. झालं! गॅस बंद! एजन्सी शोधून, दुकान गाठून, कर्मचारी हजर आहे, दुकानाला सुट्टी नाही, कुठला मोर्चा नाही, बंद नाही, सगळे फोर्म बरोबर भरलेत … असे सगळे योग जुळून येण्यात एक आठवडा गेला.
दरम्यान गॅस मिळेपर्यंत, ‘आता_आपण_रोज_हॉटेल_मध्ये_मस्त_जेऊ’ चा आनंद २-३ जेवणातच संपला. जेंव्हा शरू सुद्धा घरचंच जेवण छान असते, असे म्हणाली, तेंव्हा काहीतरी उपाय करणे प्राप्त झाले. नवीन घरात काही मजाच वाटेनाशी झाली. स्वयंपाकघर तर अगदीच मलूल भासू लागले. एक चूल पेटली नव्हती, तर घराचे घरपणच हरपले होते.
अग्नी शिवाय घर म्हणजे नुसताच निवारा होता. हॉस्टेल किंवा हॉटेल नाहीतर धर्मशाळेसारखा. जोपर्यंत घरात अग्नी प्रज्वलित होत नाही, अन्न शिजत नाही, घरातला आणि घरी आलेला मनुष्य अन्न खाऊन तृप्त होत नाही, तोपर्यंत घरला ‘घरपण’ नाही हे लक्षात आले. सर्वात आधी अग्नी हवा! बाकी सगळं त्याच्या नंतर येतं. एकत्र कुटुंबातील सून जेंव्हा नवीन घर करते, तेंव्हा तिने ‘वेगळी चूल मांडली’ असे का म्हणतात ते मला या निमित्ताने नीट कळले.
वीज येण्याच्या आधीच्या काळात, अन्न शिजवायला, रात्री उजेडाला आणि थंडीत उबेला मनुष्य अग्निवरच अवलंबून होता. त्याही आधीच्या काळातला मानव प्राण्यांपासून संरक्षणासाठी सुद्धा अग्नीवरच भिस्त ठेवून होता. अशा अग्नीवर आदिमानवाने देवत्व बहाल केले त्यात नवल ते काय? वैदिक ऋषी सुद्धा अग्नीचे गुणगान करतात. ऋग्वेदाच्या पहिल्याच सूक्तात मधुच्छंदा वैश्वामित्र ऋषी अग्नीची स्तुती करतांना म्हणतो –
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवऋत्विजम् | होतारं रत्नधातरम् || १.१.१ ||
देवांचा ऋत्विज, होता असलेल्या अग्निची आम्ही नित्य स्तुती करतो. यज्ञात सर्वात पुढे असलेला अग्नी आम्हाला रत्नांनी विभूषित करो! अग्नी मनुष्याला वर्धमान करतो, धन आणि यश देतो, संरक्षण करतो आणि आम्ही दिलेली आहुती देवतांना पोचवतो! त्या अग्नीस माझा नमस्कार असो! आम्हा गृहस्थ लोकांना अग्नी प्राप्त होवो! जसे पुत्राला सहज पिता प्राप्त होतो, तसा तू आम्हास बाधारहित होऊन प्राप्त हो! पूर्वीच्या ऋषींनी तुझे गुणगान केले होते, आणि आता आधुनिक काळात देखील आम्ही तुझे गुणगान करत आहोत. हे अग्नि! तू आमच्या निकट येऊन रहा! आमच्या मध्ये वास कर!
गॅस कधी येणार आणि चूल कधी पेटणार म्हणून मी देखील, “अग्नी देवा, पाव रे बाबा! ये माझ्या घरी!” असे म्हटलेले आठवले. तेंव्हा, किती हजारो वर्ष लोटली असली, तरीही मानवाची अग्निबद्दलची भावना तशीच आहे असे वाटून गेले!
अग्निचे आगमन होईपर्यंत, माझ्या मैत्रिणी मदतीला धावून आल्या. प्रीतीने तिची Induction ची शेगडी दिली. पल्लवीने त्यावर चालणारी भांडी दिली. “काय करायचा?” म्हणून जुन्या घरातल्या closet अर्थात अडगळीच्या खोलीत मध्ये ठेवलेला rice cooker आठवला. तिथला मेरू पर्वत पोखरून rice cooker खणून काढला. नाना खटपटी करून विजेवरचा अग्नी प्रज्वलित केला. आणि ३ ऱ्या दिवशी सकाळी नवीन घरात पहिल्या चहाला आधण आले! कष्टाने प्रकट होणाऱ्या अग्निला वेदात, ‘सहस: सूनु’ का म्हटले ते त्याने आज मला पटवूनच दिले होते!
दगडावर दगड आपटून, नाहीतर दोन काटक्या एकमेकांवर घासून आदिमानव कष्टाने अग्नी निर्माण करत असे. असा अग्नी एकदा चेतवला की दिवस – रात्र पेटता ठेवणे सोयीचे होते आणि आवश्यक देखील. सतत पेटलेल्या अग्नीचे घरातील रूप म्हणजे – गार्हपत्य अग्नि. जन्मभर साथ देणारा हा अग्नी नवदांपत्याला विवाहात मिळत असे. नवरा – बायको दोघे मिळून या अग्नीची सेवा करत. या अग्नीत रोज सकाळ – संध्याकाळ आहुती देत. घरातील प्रत्येक कार्य या अग्नीच्या साक्षीने होत असे. नवीन बाळाचे बारसे असो, घरातला लहान मोठा यज्ञ असो, किंवा मुलांचा विवाह असो. सर्व संस्कार या अग्नीला नमन करून होत असत. या दांपत्यापैकी जो आधी मृत्यू पावेल, त्याच्या बरोबर हा अग्नी शेवटच्या प्रवासाला मडक्यातून जात असे. जन्मभर अग्नीची सेवा करून शेवटी आपला देह सुद्धा अग्नीला अर्पण करणे हा अंतिम संस्कार!
वैदिक ऋषींनी अग्नीला नाना रुपात पहिले. भूमीवर अग्नी म्हणून. आकाशात सूर्य म्हणून तर अंतरिक्षात वीज म्हणून पूजले. ऋग्वेदात अग्नीची स्तुती करतांना म्हणले आहे –
चत्वारि शृंगा त्रयोऽअस्य पादा द्वेशीर्षे सप्तहस्तास्योऽअस्य ।
त्रिधाबद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्यां आविवेश ॥ ४.५८.३ ||
चार शिंग, तीन पाय, दोन शीर्ष, सात हात असलेल्या अग्निला तीन ठिकाणी बांधून काबूत ठेवावे लागते. वृषभा सारखा रोरवणारा, महान देव, आम्हा मर्त्य लोकात येऊन राहो!
चार फॉर्मस्, तीन नवस, दोन अजेन्सी आणि सात वाऱ्या केल्यावर, तो महान देव मला प्रसन्न झाला! गॅस सिलेंडर आणि त्याद्वारे पेटलेल्या अग्नीला काबूत ठेवणारा रेग्युलेटर आम्हा पामरांच्या घरी आला! नवीन घरात खराखुरा अग्नी आला!
पहिल्यांदा स्वयंपाक केल्यावर अग्नीत थोडा भात टाकला, देवापर्यंत हवि पोचवणाऱ्या ‘हव्यवाहक’ अग्निला मनोमन नमस्कार केला. बऱ्याच दिवसांनी आज घरात चारी ठाव स्वयंपाक झाला होता. पाने मांडून उदरभरणाच्या यज्ञकर्माची जय्यत तयारी झाली! तूपमिश्रीत वरण-भाताची पहिली आहुती पोटात पडली आणि जठराग्नी तृप्त झाला!
– दीपाली पाटवदकर
The ‘Foreign’ Story of Indus Civilization
– Deepali Patwadkar
Discovery of IVC
Charles Masson, a British East India Company soldier, arrived at Hari-pah sometime in 1826. It was a place near Lahore with abundant grass and was surrounded by numerous Pipal trees. There he found a huge ruined brick castle and a circular mound. He was mesmerised by the ancient structures, and made sketches of the high castle. The sketches are now lost and so is the castle. These were the ruins of the ancient city we now call Harappa.
The destruction of ancient ruins started during construction of the Karachi – Lahore railway line. First the bricks from the abandoned city of Brahminabad were used for the rail track. In this process the ancient city of Sindh was reduced to rubble. Further north, near Lahore, they found another hoard of bricks, this was the ancient city of Harappa. The bricks from its structures were used to lay down a 150 km rail track. This was in the year 1857.
In 1872, Sir Alexander Cunningham excavated the site. He found a Unicorn seal with a script that was neither Brahmi nor Kharoshti. This gave rise to the possibility of a literate civilization having lived in India before the Mauryan times. But he speculated it to be of a foreign origin.
First excavations
It was not until 1921, that the Harappa got the attention it deserved. The city was excavated by Rai Bahadur Daya Ram Sahni. Soon in 1922 the ruins at Mohenjo-Daro were discovered. Mohenjo-Daro meant the Mound of Mohan. (It’s post-independence spelling Moenjo-Daro means Mound of Dead.) Soon excavations were carried out at Mohenjo-daro too. These cities brought to light a civilization that existed in India a couple of thousand years before the Greek civilization.
Foreign Influence
Long before the Indus Valley excavations, the British archaeologists were carrying out excavations at the ancient sites in Egypt and Mesopotamia. The exciting discoveries of 1922 from these areas were – The discovery of the tomb of Tutankhamun, by British archaeologist Howard Carter. The discovery of intact tomb received worldwide press coverage. The pyramids, tombs and the treasures of the Pharaohs have been more attractive than the mundane underground drainage system or the water management system of the Indus Valley Civilization (IVC). The other discovery of 1922 was the remains of two four-wheeled wagons at Ur (Mesopotamia). It credited the Mesopotamians with the invention of wheel. This excavation was also carried out by a British archaeologist Sir Leonard Woolley. Based on the findings in these ancient foreign cities, the findings of IVC were interpreted, sometimes incorrectly.
For example, the Sumerian Kings and the Royal family lived in a fortified Acropolis. They had a belief that the King was the administrator of God’s territory. Thus Sumerian town had gated acropolis, separate from the rest of the city. The acropolis consisted of palace, temples and other royal structures. This foreign concept of Acropolis was superimposed upon the sectored cities of IVC. The sectors in the cities were labelled ‘Citadel’ and ‘Lower Town’, which might or might not have been so. Same can be said of the small statute that was named ‘Priest King’. There is no evidence of palace, temples, kings or priests in the IVC. Yet the misleading name has stuck and some have used the image as a representative of IVC ‘Priest Class’.
IVC Beginnings
The IVC was concluded to have had origins in Mesopotamia. It was thought that IVC was a result of colonization of then India by the people of West. In the early years it was declared that IVC had foreign origin. Archaeologists like M. Rafique Mughal and Amalanand Ghosh studied earlier settlements and showed the gradual development of the rural culture into the urban civilization. In 1970’s it was proved that the Pre-Harappan sites were actually Early-Harappan. This proved that the IVC was an indigenous civilization built by the people of India.
IVC Decline
When it came to solving the mystery of the abandonment of IVC cities and towns, again a ‘foreign’ element was added to the picture. Based on few scattered skeletons found in Mohenjo Daro, Sir Mortimer Wheeler declared that the inhabitants were massacred, by invading Aryan tribes. These Aryan tribes, he said, were headed by the RigVedic Indra who destroyed the cities of IVC. This ‘Aryan Invaders’ drove out the IVC dwellers who fled to the South. Thereby creating a Northern Aryan and Southern Dravidian divide among Indians. The invasion and massacre theory needed a lot more than few skeletons like burned fortresses, arrowheads, weapons, pieces of armor, smashed chariots for evidence. But despite extensive excavations at Mohenjo Daro, none were ever found. In 1980s biological anthropologist K A R Kennedy, studied the skeletal remains. He found no marks of weapons or violence upon them. It was also found that those people had died at various times separated by as far as 1,000 years. Since the deaths had not occurred at the same time, the single event of ‘massacre by foreigners’ theory fell apart.
Vedic Culture
In the meantime, Max Muller, who was studying the Vedas and Upanishads, had arbitrarily assigned 200 years to five layers of four Vedas and Upanishads. Each layer he said was composed in 200 year periods before the Buddha by 6th century BCE. There are more changes in the language of the scriptures to have occurred within 200 years, but the Vedic literature had to be shown later than IVC so that it could be attributed to the Invading Aryans. Thus the date of RigVeda was set to 1200 BCE and theory was put forth that the foreign Aryans had brought with them their god Indra and the Sanskrit language. By 1990’s the geological studies had shown that the river Sarasvati had dried up before 1900 BCE. This challenged the date of 1200 BCE for RigVeda as verses of RigVeda glorifed the flowing waters of Sarasvati.
The IVC Horse
Another story of IVC was that of the foreign origin of the horse. It was claimed that the people of IVC did not know of the horse. The horse was not represented in the art, and as yet horse remains were not found. It was believed that the invading Aryans had introduced horse to India. Contrary to this, horse heads as game pieces and toy horses were found in IVC. In 1974, J. P. Joshi and A. K. Sharma identified Horse bones in Surkotada, an IVC site dating to 2100 – 1700 BCE. Thus before the arrival of the Aryans (on their horses) horse was already present in Surkotada. But it was only after 20 years, when S. Bokonyi, a Hungarian archaeologist verified the claim that the Indian community accepted horse as a part of IVC.

Vedic Literature
Archaeologists have ignored any co-relation of the artefacts to Vedic and Puranic literature. Thus the literature of Vedic Culture and the archaeological findings from the Indus Civilization remained separate. In 1970s Dr. S. R. Rao discovered and excavated the submerged city of Dwaraka. He was asked if he was sure that it was Krishna’s Dwaraka of the Mahabharata. To which he had famously replied, “Only the name board is missing!”
Historians like B. B. Lal have studied the culture of IVC and shown its continuity into India of today. The unbroken continuity in art, craft, clothing, transport etc. challenged the foreign element story. An invasion (or migration) would have shown a break or change in the culture.
Genetics
Now science is trying to tell the story of IVC through Genetics. On 5th Sep, two related papers were published. Both used same data and shared a number of same researchers. Yet, their conclusions are far different.
- Science Magazine paper – The formation of human populations in South and Central Asia – V. Narsimhan et al.
- Cell paper – An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers – Dr Vasant Shinde et al.
The papers are based on the genome of one individual of Rakhigarhi (a female) and 11 Rakhigarhi like individuals found in East Iran and Central Asia. These 11 samples being genetically different from the Central Asian samples were assumed to be migrants from IVC to Central Asia.
V. Narasimhan’s paper summarizes his findings as – “Earlier work recorded massive population movement from the Eurasian Steppe into Europe early in the third millennium BCE, likely spreading Indo-European languages. We reveal a parallel series of events leading to the spread of Steppe ancestry to South Asia, thereby documenting movements of people that were likely conduits for the spread of Indo-European languages.” This paper supports the Aryan Migration theory, but at the same time also states that proportion of Steppe pastoralist – related ancestry in South Asia is much smaller compared with Europe. David Reich, one of the authors agrees that the single largest genetic contributor to people living in South Asia today is from IVC.
The paper published by Dr. Vasant Shinde, suggests that the gene flow was from South Asia to Steppes. It states that the Rakhigarhi genome was from a population that is the largest source of ancestry of South Asians. The Rakhigarhi genome does not have Steppe Pastoralist / Iranian Farmers / Anatolian Farmers ancestry. Thus confirming that farming in South Asia was local development and not a result of a large-scale migration from the West. Next, it states that the separation of South Asia and Iran happened before 12,000 years. And lastly, it also states that the Indo-European language found its route from Eastern Europe to South Asia from across Central Asia and not across Iran, as it was proposed earlier. This transmission, it says happened in first half of the 2nd millennium BCE. Dr. Shinde cautions that more samples are needed to further these studies, and this is only a beginning for ancient DNA study. There is yet much to be done to understand the migrations of ancient people and the spread of Indo-European languages.

Rakhigarhi in blue. Other IVC sites in red. Sites in black were in cultural contact with IVC. Gonur and Shahr-iSokhta in yellow, where genetically Rakhigarhi like 11 individuals were found. PC – Cell Paper.
Conclusion
One by one, bit by bit the castles of foreign origin of IVC and the foreign origin of Vedic Culture (VC) have fallen apart. The attempts to show the IVC and VC later and derived from the West have been falsified. The premise that the people of IVC were the Vedic people has received scientific evidence. Archaeology, geology, anthropology, linguistic studies and now genetics too reject it. Dr. Shinde’s paper shatters the foreign IVC theory, Dravidian IVC theory and the Aryan Invasion Theory. In today’s India these findings demolish the foundation of Aryan-Dravidian divide and the politics that has been played around it.
This is a complete turn of tides, not only is the Aryan Invasion disproved, but new studies suggest migrations from India into Central Asia. A study of the ancient cattle DNA has concluded migration of Zebu Bull from India to the Fertile Crescent. This movement from East to West, of humans along with cattle occurred in first half of second millennium. This study also points to a migration out of India.
Just as the Indian scriptures recorded vanishing of River Sarasvati and submerging of Dwaraka, they have also recorded the migrations of Anu, Turvasu, Amavasu tribes to the West. So far, the Sarasvati and Dwaraka story have been proved to be true. Maybe we were wrong to say that the sages wrote ‘Myths’ and not History. Maybe the records of the scriptures can help in tracing the ancient migrations. So far we have seen enough ‘foreign’ stories of India. What we now need is the ‘Inside’ story.
References –
- An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers – Dr. Vasant Shinde et. al
- The formation of human populations in South and Central Asia – Vagheesh Narsimhan et. al
- Masson, Charles (1844). Journeys in Balochistan, Afghanistan, the Panjab, & Kalat
- Press note by Dr. Vasant Shinde about the paper “An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers”
- A Short History of Archaeological Discovery at Harappa – Gregory L. Possehl
- Mohenjo-daro An Ancient Indus Valley Metropolis – J M Kenoyer
- Royal Administration and National Religion in Ancient Palestine – Gosta Werner Ahlström, Gosta Gosta Werner Ahlstrom
- Sumer and the Sumerians – Harriet Crawford, Crawford Harriet
- Harappa: An Overview of Harappan Architecture and Town Planning – by Muhammad Bin Naveed
- Genesis of the Indus Valley Civilization – M. Rafique Mughal
- The Mythical Massacre at Mohenjo-Daro – George F Dales
- The Mohenjo Daro ‘Massacre’ – Joanna Gillan
- Genome of nearly 5000-year-old woman links modern Indians to ancient civilization – Michael Price
- The Quest for the Origins of Vedic Culture: The Indo-Aryan Migration Debate – Edwin Bryant, Edwin Francis Bryant
- Indus Valley Civilisation is largest source of ancestry for South Asians: David Reich – Economic Times
- Ancient cattle DNA reveals a bullish tale – Lara Reid
मुघलांचे वंशज काय करतायत?
तिबेटच्या पठाराच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. हिमालयाच्या या उंच पठरामुळे तिबेटच्या उत्तरेला ताकलामकान आणि ईशान्येला गोबीचे वाळवंट पसरले आहे. गोबी आणि गोबीच्या पलीकडचा गवताळ प्रदेश म्हणजे मोंगोलिया. कडाक्याची थंडी, उष्ण उन्हाळे, थंडीत बर्फवर्षाव आणि उन्हाळ्यात थोडाफार पाऊस अशा हवामानाचा हा देश कृषीसाठी फारसा अनुकूल नाही. प्राचीन काळापासून येथील लोक घोडे निर्यात करून चीन कडून कापड व कृषी उत्पादने आयात करत. इथले जीवन सुकर नव्हते. जगण्यासाठी सतत संघर्ष करायला लावणाऱ्या या प्रदेशाने चिवट व क्रूर योद्ध्यांना जन्म दिला.
या मोंगोल लोकांच्या सततच्या आक्रमणांना रोखण्यासाठी चीनी सम्राटांनी चीनची ती प्रसिद्ध भिंत उभारली. या भिंतीने बरीच आक्रमणे थोपवली खरी. पण मंगोलियाच्या चेंगीझ खानने ही भिंत ओलांडून चीनवर आक्रमण केलेच. चेंगीझ खानने चीन पासून युरोप पर्यंतचा भूभाग काबीज करून जगातील सर्वात मोठे साम्राज्य स्थापन केले. मृत्युनंतर त्याचे राज्य त्याच्या चार मुलांनी वाटून घेतले.
चेंगीझ खानचा नातू कुब्लाई खान. याने १३ व्या शतकात राज्य विस्तार करत चीन, कोरिया आणि तिबेट काबीज केले. चीन मध्ये त्याने युआन (Yuan) हे राजघराणे स्थापन केले. कुब्लाई खानच्या तिबेट वरील हल्ल्याने मात्र एक वेगळेच वळण घेतले. त्याने तिबेट जिंकला खरा, पण येथील बौद्ध गुरु – ड्रोगोन चोग्याल फाग्पा यांच्या शिकवणुकीने त्याचे मन जिंकले. कुब्लाई खानने यांना आपले राजगुरू म्हणून नेमले आणि तिबेटचा राज्यकारभार बौद्ध संघावर सोपवून दिला. याच्या मृत्युनंतर चीन मोंगोलांपासून स्वतंत्र झाला, पण तिबेट मात्र बौद्ध संघाच्या छत्राखाली खाली राहिले.
या काळात, उझबेकिस्तान मधील मोंगोलांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. १४ व्या शतकात उझबेकिस्तान मध्ये तैमूरलंगचा जन्म झाला. तैमुर हा चेंगीझ खानच्या कुठल्याशा पूर्वजाचा वंशज. त्याने चेंगीझ खानचे धडे गिरवत एक एक गाव जिंकण्यास सुरुवात केली. आणि चेंगीझ प्रमाणेच, गाव जिंकले, की गावाच्या रक्षणार्थ जे उभे राहिले होते त्यांना ठार मारण्याची परंपरा कायम ठेवली. त्याने पर्शिया, इराक, सिरीया, तुर्की, जॉर्जियावर येथील शहरांवर हल्ले केले. १३९८ मध्ये त्याने दिल्लीवर हल्ला चढवला. त्यावेळी दिल्लीवर तुघलकांचे राज्य होते. तैमुरने हिरत व दिल्ली मध्ये मारलेल्या लोकांच्या कवट्यांच्या मोठमोठाल्या ढिगांचे तत्कालीन वर्णन मिळते. याने मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू, पर्शियन, असायरीयन अशा सर्व धर्माच्या लोकांना मारले. त्याने त्याच्या कार्यकाळात जगाची लोकसंख्या ५% ने कमी केली होती असा अंदाज व्यक्त केला जातो.
या क्रूरकर्मा तैमुरच्या नातवाचा नातू म्हणजे बाबर. हा उझबेकिस्तानच्या लहानशा भागात राज्य करत होता. त्याने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोधीला हरवले व मुघल घराण्याची स्थापना केली. अयोध्यायेचे रामजन्मभूमीचे मंदिर पाडायचे काम मीर बाकी या बाबरच्या सेनापतीने केले. याच्या मुलाला, हुमायूनला शेरशहा सुरीने हरवल्यावर त्याने पर्शिया मध्ये आश्रय मिळवला. १५ वर्षांनी त्याने आग्र्याचे तख्त जिंकले. त्याचा मुलगा अकबरने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हेमचंद्रला हरवल्यावर मुघल राज्य भारतात स्थिरावले.
पर्शिया मध्ये अनेक वर्ष राहिलेल्या मुघलांवर पर्शियन संस्कार झाले होते. त्यामुळे मुघल राज्यात भारतात मोंगोलियाची संस्कृती न येता पर्शियाची संस्कृती आली. अकबर पासून मुघालांवर भारतीय तत्त्वज्ञानाचे संस्कार होऊ लागले. अकबराने हिंदू, जैन, इस्लाम आदी धर्मांच्या शिकवणुकीतून दिन-ए-इलाही नावाच्या नवीन धर्माची स्थापना केली. यावरून त्याने प्रयाग क्षेत्राचे नाव बदलून ‘इलाहबाद’ असे ठेवले. त्याच्या नंतर जहांगीर व पुढे त्याचा मुलगा शहाजहान यांनी राज्य केले. शहजाहानचा मोठा मुलगा दारासुखो हा तर पूर्ण भारतीय झाला होता. याने हिंदू धर्माचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ५२ उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. खरे तर हा थोरला मुलगा असल्याने मुघल सम्राट व्हायचा, पण धाकट्या औरंगझेबने सर्व भावांची हत्या करून, वडिलांना तुरुंगात टाकून, सिंहासन हडपले. औरंगझेबने अनेक वर्ष राज्य केले, पण त्याच्या मृत्यनंतर मुघल साम्राज्य पार कोसळले. नामशेष झाले.
मुघलांच्या देशातील मूळ मुघल वंशज काय करतायत ते पाहू. कुब्लाई खानने बौद्ध धर्म स्वीकारला होता तिथपर्यंत पहिले. तिबेटच्या बौद्ध भिक्षूला त्याने आपला राजगुरूही केले होते. होता होत, तिबेट मधून मोंगोलिया मध्ये बौद्धधर्माचा प्रसार झाला आणि मोंगोलिया मध्ये बौद्ध धर्म स्थिरावला.
तिबेट मध्ये या पूर्वी भारतातून शेकडो बौद्ध ग्रंथ पोचले होते. ते सर्व संस्कृत भाषेतील होते. तसेच काही संस्कृत ग्रंथांची चीनी भाषांतरे तिबेट मध्ये उपलब्ध होती. या सर्व संस्कृत व चीनी ग्रंथांची तिबेटी भाषांतरे केली गेली होती. या ग्रंथाच्या संचांना कांजूर व तांजूर असे म्हणतात. कांजूरच्या १०८ ग्रंथांमध्ये बुद्धाची वचने आहेत, तर तांजूरच्या २२६ शास्त्रीय ग्रंथात तत्त्वज्ञान, व्याकरण, वैद्यकी, गणित, संस्कृत शब्दकोश असे अनेक विषय हाताळले आहेत.
१८ व्या शतकात या ग्रंथाच्या संचाचा मोंगोलियन भाषेत अनुवाद केला गेला. हा अनुवाद बौद्ध भिक्षु, शास्त्रज्ञ, शिक्षक, गणितज्ञ अशांनी केला. २५ वर्ष हे अनुवादाचे काम चालू होते. या कामामुळे मोंगोलियाची भाषा आणि लिपी दोन्ही मध्ये सुधारणा झाल्या. तेथील शास्त्रीय शिक्षणावर तांजूरचा प्रभाव पडला. तांजूरचा प्रत्येक ग्रंथ चीनी जाड कागदावर, उभ्या ओळींमध्ये, सुंदर लाल अक्षरात लिहिला आहे. पानापानावर सुरेख चित्रे काढली असून चंदनाच्या लाकडी पट्ट्यांमध्ये बांधला आहे. २०११ मध्ये मोंगोल तांजूरला UNESCO ने ‘जागतिक दस्तऐवज’ (UNESCO’s World Documentary Heritage) म्हणून मान्यता दिली.
आज मुघलांच्या घराघरात बुद्धाचे मंदिर दिसते. बुद्धाची वचने गायली जातात. भारतातील शास्त्र, गणित शाळेत शिकवले जाते. आज मोंगोलिया हा बौद्ध बहुल देश असून मुघलांचे खरे वंशज आपल्या बौद्ध वारशाचा सार्थ अभिमान बाळगून आहेत.
पण भारतातील जे लोक स्वत:ला ‘मुघलांचे वंशज’ समजतात ते भारतीय गोष्टींना कडाडून विरोध करण्यात धन्यता मानतात. स्वत:च्या हिंदू प्रजेवर जिझिया लादणाऱ्या, स्वत:च्या राज्यातील हिंदू – जैन मंदिरे उध्वस्त करणाऱ्या औरंगाझेबचे नाव दिल्ली मधील एका महत्वाच्या रस्त्याला होते. २०१५ मध्ये, या रस्त्याला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव दिले. तसेच २०१८ मध्ये इलाहाबादचे नाव पुन्हा होते तसे प्रयागराज केले. बाबरने पाडलेल्या रामजन्मभूमी मंदिर व औरंगझेबाने पाडलेल्या काशी – मथुरेच्या मंदिरांसाठी शेकडो वर्ष संघर्ष चालू आहे.
मुघलांचे स्वयं घोषित, बनावट वंशज, स्वत:ला दारा सुखोचे वंशज न मानता, औरंगझेब, बाबर व तैमुरचे वंशज समजतात हे त्या थोर मुघालाचे दुर्भाग्य आहे. राममंदिराला विरोध करणे हा फक्त भारताच्या नाही तर मोंगोलिया आणि पर्शियाच्या संस्कृतींचा सुद्धा पराभव आहे. स्वत:ला मुघलांचे वंशज समजणार्यांचे हे दुर्दैव आहे, की पूर्वजांच्या दुष्कृत्याचे ते समर्थन करत आहेत. स्वत:ला मुघलांचे वंशज मानणार्यांची ही शोकांतिका आहे की त्यांना त्यांच्या so called पूर्वजांचे चांगले गुण कळलेच नाहीत.

संदर्भ –
- The Mongols: From Genghis Khan to Tamerlane By W. B. Bartlett
- Archives of the Memory of the World Program
परीकथेतील राजकुमार
(आई, आई, एक गोष्ट सांग न!
बर. पण एकच गोष्ट सांगेन, मग झोपायचं!)
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
(आई, Twentieth century मधली गोष्ट का ग?
नाही,
त्याही पेक्षा पूर्वीची. आता अगदी सालच सांगायचं झालं, तर इस पूर्व २०००
ते इस पूर्व १८०० च्या मधल्या काळातली ही गोष्ट आहे. ऐक – )
काय झालं? एक उंचपुरा, घारागोरा, नाकेला, देखणा, राजबिंडा, तरुण असा राजकुमार होता. थंड गवताळ प्रदेशात तो राहत होता. एके दिवशी तो एका शुभ्र वगैरे घोड्याच्या रथात बसून वायुवेगाने दक्षिणेकडे निघाला. गवताळ प्रदेश मागे टाकत हिंदूकुशच्या डोंगराळ भागात पोचला. मग रस्ता काढत काढत, त्याने खैबर खिंड ओलांडली. आणि समोर पाहतो तर काय? इथल्या राज्यात अनेक सुंदर आटपाट नगरी होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी टुमदार घरे होती, रस्त्याने बैलगाड्यांची, पाठीवर समान लादलेल्या खेचरांची लगबग होती, जो तो आपापल्या कामात गुंतला होता. कोणी मडकी घडवत आहे, कोणी मणी करत आहे, कोणी दागिने करत आहे, कोणी शेती करत आहे, कोणी कापड विणत आहे, कोणी कापड रंगवत आहे, कोणी जहाज बांधत करत आहे, कोणी व्यापारी जहाजात माल भरत आहे … सगळं कसं छान होतं! पण …
(पण? पण काय झालं आई?)
अरे, हे सगळे लोक बसक्या नाकाचे आणि काळेकुट्ट होते.
(आई, very bad! आम्हाला टीचर न सांगितलंय की याला body shaming म्हणतात. असं नसतं बोलायचं.
शू SSS! त्या राजकुमाराला हे कोणी शिकवलं नव्हतं. ऐक पुढे – )
त्या mannerless राजकुमाराला असे वाटलं की ही सगळी – कुठलीतरी द्राविडी भाषा बोलणारी, शिव, मातृदेवता आणि निसर्गाची उपासना करणारी काळी लोकं अगदीच मागास होते.
(मागास? पण ते तर industrious होते!
त्या गोऱ्याला काय वाटलं ते सांगतेय मी. ऐक बरे!)
त्या मागास लोकांकडे ना रथ होते, ना घोडे!! काहीही करून ही परिस्तिथी सुधारणे राजकुमाराला भाग होते.
इतक्यात राजकुमाराची नजर इथल्या ‘संस्कृती’ वर पडली. आणि राजकुमार तिच्या प्रेमातच पडला! काळी-सावळी असली तरी ती हुशार, मनमिळावू, प्रेमळ, क्षमाशील, समंजस, सहिष्णू वगैरे होती. राजकुमाराने तिच्याशी विवाह केला. कोण आनंद झाला सगळ्यांना! रथ असलेला, घोडे असलेला जावई मिळाला! संस्कृतीने तर लग्नात घेतलेल्या उखाण्यात पण रथ आणला होता –
घोड्यावर घोडे, चार घोडे
घोड्यांनी ओढला रथ,
रथात रथ, स्पोक्ड रथ
हलका सुसाट रथ,
रथात चाबूक, चाबकाला गोंडा
गोंड्याच्या रंगाचा ध्वज,
ध्वजधारी ‘आर्य’राव आले रथातून
रथ पाहून मी बाई गेले भारावून!
(आई, म्हणजे, त्या संस्कृतीला राजकुमारच्या गोऱ्या रंगापेक्षा त्याचा रथ आणि घोडेच जास्त आवडले होते!
हं!)
तर त्या राजकुमाराचे नाव ‘आर्य’ होते! तर हा आर्य पडला PIE भाषिक. आणि आपल्या संस्कृतीची भाषा द्राविडी! पण यांच्या बाबतीत ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ वगैरे गोंधळ अजिबात उडाला नाही! त्यांनी आपापसात ठरवलं तुझंही नाही आणि माझंही नाही. आपण नवीन भाषा तयार करून मुलांना शिकवायची!
(आई! हे सगळं त्यांनी कोणत्या भाषेत ठरवलं?
गप रे! ऐक पुढे – )
त्यांनी PIE भाषेतून संस्कृत नावाची नवीन भाषा तयार केली. आणि मुलांना PIE नाही, द्राविडी नाही, सरळ संस्कृतच शिकवायची ठरवली. तस्मात, द्राविडी आईच्या मुलांची ‘मातृ’भाषा ‘संस्कृत’ झाली बरं का!
(आई, आई! तू आम्हाला रागावतेस तेंव्हा – ‘गधड्या’, ‘कार्टे’, ‘गीळ मेल्या’ वगैरे म्हणतेस. तसे तिने काय म्हटले?
उगीच
काहीतरी विचारू नकोस! तिने मुलांना धपाटे घालतांना चुकूनही द्राविडी
भाषेतून त्यांना ‘रट्टे खाशील’ वगैरे म्हटले नाही! पोरांनी तिची भाषा उचलली
असती तर? शांतम् पापम्!)
पुढे ऐक – दुसरं काय होतं? राजकुमार आर्य हा इंद्र, अग्नी आणि विष्णूची उपासना करायचा. तर संस्कृती ही शिव आणि शक्तीची. पण, अगदी समजूतदारपणे कसलीही भांडणे वगैरे न होता, यांची मुले दोन्हीकडच्या देवांची पूजा करायला लागली!
(आई, आई! म्हणजे हे आर्य पितृसत्ताक नव्हतेच तर!
या बाबतीत ते पितृसत्ताक नव्हते! OK? पुढे सांगू? )
तर एकूणच यांचा गोड असा गंगा-जमना संगम झाला. इकडे संस्कृती मुलांना वाढवत होती, त्या दरम्यान आर्यने संस्कृतीच्या माहेरच्यांना सुधारण्याचे काम हाती घेतले. पहिले तर त्याने काही काळ्या लोकांची हत्या केली. मग त्यांच्या आटपाट नगरी उध्वस्त करून टाकल्या. ते पाहून बरेचसे भूमिपुत्र भयाने दक्षिणेला पळून गेले. जे कोणी मागे राहिले त्यांना या आर्यने दास करून घेतले. हे सगळं केलं, तेंव्हा कुठे सिंधू खोऱ्यात शांतता प्रस्थापित झाली.
(म्हणजे स्मशान शांतता का ग?
हंम्म! तशीच.)
हे महान कार्य उरकल्यावर, सगळी गावे ओस पडल्याने ‘राहायचं कुठे?’ हा प्रश्न आला. त्यात सगळे न्हावी दक्षिणेला पळून गेल्याने आर्यच्या दाढी जटा वाढल्या. मग त्याने हातात जपाची माळ घेतली आणि सरस्वती नदीच्या काठावर जाऊन अनुष्ठान केले. मग हातोहात वेद, उपनिषदे, वेदांगे, रामायण, महाभारत वगैरे रचून टाकले. फावल्या वेळात आश्रम व्यवस्था प्रस्थापित केली. दुसरीकडे वर्ण व्यवस्था पण लावून दिली. लगोलग मनुस्मृती पण खरडून काढली.
माहेरच्यांना हाकल्यामुळे संस्कृतीने आधी थोडी कुरबुर केली. पण मग ती सुद्धा सेटल झाली. हे सगळं करता करता १,००० वर्ष गेली कशी गेली ते कळलच नाही! इसपूर्वचे ५ वे शतक उगवले. आता दोघे मिळून छान पशुबळी देत, यज्ञ करत आनंदात दिवस घालवत होते. सगळे जण अशा प्रकारे सुखाने राहणार तोच …
(सांग ना, पुढे काय झाले?
ते आता उद्या सांगते हं! झोप आता!
पण आई, या परीकथेचे नाव काय आहे?
बाळा, ही परीकथा नाही. हा AIT चा सिद्धांत आहे.
कैतरीकाय?!
खोटे वाटत असेल तर इतिहासाच्या पुस्तकात वाच. आणि आता मुकाट्याने झोप बरे!
आई, ती PIE म्हणजे PIZZA ची बहिण असते का?
PIE
म्हणजे Proto-Indo-European भाषा. काय झालं? भारतीय आणि युरोपियन
भाषांमध्ये कशामुळे साम्य आहे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी युरोपियन
अभ्यासकांनी असे गृहीत धरले की एक प्राचीन PIE भाषा होती. ती सगळ्या उत्तर
भारतीय व युरोपियन भाषांची जननी होती. विविध भाषेतील शब्दांच्या मूळ
धातुंवरून जुन्या PIE भाषेची पुनर्रचना केली.
आई, ही PIE भाषा कोण बोलते?
जगभरात
ही भाषा बोलणारी एकही जमात अस्तित्वात नाही. पूर्वी अस्तित्वात असल्याच्या
खुणा नाहीत. या भाषेत लिहिलेले एकही अक्षर उपलब्ध नाही. या भाषेत रचलेले
मौखिक साहित्य उपलब्ध नाही. PIE ही एक काल्पनिक भाषा आहे.
पण, मग तो आजच्या गोष्टीतला आर्य? तो PIE बोलायचा ना?
कुर्गन हायपोथेसिस प्रमाणे, ही काल्पनिक भाषा बोलणाऱ्या लोकांचे नाव ‘आर्य’ असे होते.
म्हणजे आर्य पण काल्पनिक होते?
झोप बरे! आता!
म्हणजे त्यांचे रथ आणि घोडे आणि त्याचं द्राविडी भाषा बोलणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या लोकांना हाकलणे … सगळंच काल्पनिक का ग? सांग ना!
ते तुझं तू ठरव. गुड नाईट! )
अजिंठाचे उपासक
आज अजिंठा लेण्यांचा अभ्यास करायचा झाल्यास डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनाचा आधार घेतल्याशिवाय सुरुवात आणि शेवट सुद्धा होऊ शकत नाही. मुळचे अमेरिकेन असलेले डॉ स्पिंक यांनी तब्बल ६० वर्ष अजिंठा लेण्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाने अजिंठा, अजिंठा कोरवून घेणारा राजा हरीषेण आणि त्याचे वाकाटक घराणे यांच्या विषयीची माहिती प्रकाशात आली. नुसतीच नवीन माहिती मिळाली असे नाही, तर भारतीय इतिहासातील सुवर्ण युग समजला जाणाऱ्या गुप्त काळाचे नाव – “गुप्त-वाकाटक काळ” असायला हवे, हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध केले!
नव्वदीच्या घरातील स्पिंक, गेली २० वर्ष अजिंठा येथे कार्यशाळा घेतात. ही कार्यशाळा केवळ अजिंठाच्या अभ्यासकांसाठी असते. त्यांच्या अफाट कार्याविषयीची इथे अगदी थोडक्यात माहिती.
वॉल्टर यांचा जन्म १९२८ मध्ये बोस्टन येथे झाला. ३ भावंडात ते एक. लहान असतांना एका धरणामुळे स्पिंक कुटुंब विस्थापित झाले. त्यावेळी गाव सोडून ते शहरात येऊन राहिले. वॉल्टर आता शहरातील शाळेत शिकू लागला.
शालेय जीवनात वॉल्टरला प्राण्यांची फार आवड होती. काही काळ त्याने प्राणीसंग्रहालयात देखील काम केले. त्या आवडीपायी त्याने पुढे जीवशास्त्राचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याकरिता महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा परंतु प्राण्यांचा अभ्यास म्हणजे त्यांचे शवविच्छेदन करणे हे काही रुचले नाही. त्या नंतर वॉल्टरने Art History च्या अभ्यासाकडे मोर्चा वळवला व त्यामध्ये पदवी घेतली.
त्यांचा सुरुवातीचा अभ्यास हा अर्थातच पाश्चिमात्य कलांचा होता. १९५० मध्ये त्यांनी PhD साठी भारतीय कला हा विषय घेतला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्याच वर्षी ते भारतात येऊन दाखल झाले. त्यांनी मंदिरांचा, शिल्पांचा अभ्यास करायचे ठरवले आणि त्यांच्या अभ्यासाची सुरुवात झाली उदयगिरी खंडगिरी येथील जैन लेण्यांपासून.
या अभ्यासात त्यांच्या लक्षात आले की या लेण्यांची कालनिश्चिती बरोबर झाली नव्हती. त्या लेण्यांना ज्या कालखंडात बसवले होते त्याच्या आधीच त्याची निर्मिती झाली होती, हे त्यांनी ताडले. या विषयावरच त्यांनी आपले संशोधन केले.
विविध लेण्यांचा अभ्यास करत ते अजिंठाला पोचले. आणि त्या लेण्यांशी आपले मागच्या जन्मातील नाते आहे असे वाटू लागले. या लेण्यांचा त्यांनी अनेक अंगांनी अभ्यास केला. चित्रांचा आशय, चित्रांची शैली, शिलालेख, साहित्य, इतिहास अशा सर्वांचा अभ्यास केला. श्री. स्पिंक यांनी अजिंठातील चित्रांचा इतका अभ्यास केला आहे, की ते चित्रातील कुंचल्याचा फटकारा पाहून कोणत्या कलाकाराने कोणकोणती चित्रे काढली आहेत ते सांगू शकतील!
उदयगिरी खंडगिरी या लेण्यांची कालनिश्चिती केल्यावर त्यांना लेण्यांच्या काळाचा अभ्यास करायची आवडच जडली. त्यांनी जेंव्हा अजिंठाचा अभ्यास सुरु केला, तेंव्हा या लेण्या बद्दल मान्य असलेली माहिती होती जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्गेस यांच्या संशोधनातून आलेली. हे दोन्ही ‘gems’ ब्रिटन मधले. फर्ग्युसन यांनी काही वर्ष कोलकोता येथे इंडिगोचा व्यवसाय केला. नंतर मात्र ते सोडून देऊन ते लंडनला स्थाईक झाले. पुढील काळात त्यांनी भारताच्या अनेक वाऱ्या केल्या. त्यांनी भारतीय स्थापत्याबरोबरच मध्य आशियातील व पश्चिम आशियातील स्थापत्याचा अभ्यास केला. त्यांनी भारतीय मंदिर व लेण्यांच्या स्थापत्याचा सखोल अभ्यास केला. त्यांनी भारतीय लेण्या व स्थापत्य याविषयी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या नंतर जेम्स बर्गेस यांनी त्या संशोधनात भर घातली. जेम्स बर्गेस हे ब्रिटीश नागरिक होते व ASI (Archaeological Survey of India) चे General Director. कामानिमित्त बर्गेस भारतात भरपूर फिरले होते. त्या मधून त्यांनी मिळवलेली माहिती व त्यांच्या निष्कर्षांची भर फर्ग्युसन यांच्या कामत घातली. या दोघांचे “Cave Temples of India” हे पुस्तक १८८० मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकातून त्यांनी प्राचीन भारतीय स्थापत्य, स्थापत्याची प्रगती, आणि स्थापत्य शैलीवरून लेण्यांचा काळ पद्धतशीरपणे ठरवला. भारतातील लेण्यांवर हे कदाचित पहिलेच काम असावे. या संशोधनातून लेण्यांची झालेली कालनिश्चिती आजही वापरली जाते इतकी ती तर्कशुद्ध रीतीने मांडली आहे.
तर, या दोघांनी अजिंठा लेण्या दोन कालखंडात कोरल्या गेल्या होत्या हे सिद्ध केले होते. या बौद्ध लेण्यांचा पहिला टप्पा कोरला गेला होता सातवाहन राजांच्या काळात, इस पूर्व १ ले शतक ते इस १ ले शतक या दोनशे वर्षातला. या काळात कोरलेल्या लेण्या होत्या – ९, १०, १२, १३ व १५ अ. दुसऱ्या टप्प्यात कोरलेल्या उर्वरित लेण्या ५ व्या ते ७ व्या शतकातील दीडशे वर्षातल्या होत्या असा त्यांचा निष्कर्ष होता.

श्री स्पिंक यांनी अजिंठाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तेंव्हा मान्य असलेली ही कालनिश्चिती होती. स्पिंक यांनी अभ्यास सुरु केल्यावर, त्यांना पाहिलं कोडं घातलं लेणी क्रमांक १ ने. या लेणीतील एका चित्राने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते चित्र होते – चालुक्य राजाच्या दरबारात दाखल झालेल्या पर्शियन राजाच्या दूताचे. या निष्कर्षावरून या लेण्या चालुक्य राजाच्या नंतरच्या म्हणून ७ व्या शतकातल्या होत्या असे अनुमान होते. पण स्पिंक यांना प्रश्न पडला की दक्षिणेतील राजाच्या दरबाराचे चित्र अजिंठा मध्ये का काढले असावे?

हे कोडे उलगडले अजिंठाच्या आणखी एका गाढ्या अभ्यासकाने Dieter Schlingloff यांनी. त्यांनी ते चित्र जातक कथेतील आहे हे शोधले. पण त्या कथेकडे जायच्या आधी थोडेसे श्री. श्लींग्लोफ यांच्याबद्दल. या जर्मन अभ्यासकाचा जन्म १९२८ चा. बौद्ध संस्कृत ग्रंथ आणि भारतीय कला हे त्यांचे अभ्यासाचे विषय. तर, अजिंठाची चित्रे आणि त्या चित्रांचा आशय हे त्यांच्या संशोधनाचे विषय. बौद्ध धर्म, योगाचार, बौद्ध स्तोत्र यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. बौद्ध धर्माच्या अभ्यासावर आधारित अजिंठाच्या चित्रांच्या आशयाचा त्यांनी अर्थ लावला. बौद्ध साहित्याची जाण असल्याने त्यांना अजिंठातील चित्रांची भाषा कळायला लागली. त्यांनी चित्रांची सांगड बौद्ध कथांशी लावली. भिंतीचे टवके उडाल्याने, रंग गेल्याने, चित्र खराब झाली आहेत. अशा अर्धवट दिसणाऱ्या चित्रातून पूर्ण चित्र कल्पनेने उभे करावे लागते. श्लींग्लोफ यांनी जातककथांवर आधारित असलेल्या अनेक चित्रांचा कथेशी धागा जोडला. काही चित्रात त्यांना अश्वघोषाच्या सौन्दारानंद मधील दृश्य दिसली. लेणी १ मधील, कोड्यात टाकणारे चित्र महासुदर्शन राजाची जातक कथा होती हे त्यांनी सिद्ध केले. या कथेत गौतम बुद्ध पूर्व जन्मातील महासुदर्शन राजा होता.
श्लींग्लोफ यांनी हा अर्थ सांगितल्यावर या लेण्या ७ व्या शतकात कोरल्या असण्याची गरज राहिली नाही. मग श्री. स्पिंक यांनी अजिंठाच्या काळाचा अभ्यास मुळापासून करण्यास सुरुवात केली. इथे त्यांना उपयोग झाला अजिंठा पासून जवळ असलेल्या घटोत्कच लेण्यांचा. या लेण्या करवून घेतल्या होत्या – वराहदेवाने. वराहदेव हा राजा हरीषेणाचा मंत्री. त्याने लिहिलेल्या घटोत्कच लेण्यातील शिलालेखातुन, व अजिंठा मधील त्याने लिहिलेल्या शिलालेखातुन, स्पिंक यांना अजिंठाचे अंतरंग उलगडू लागले. त्यांनी अजिंठाची निर्मिती १५० वर्षात नाही, तर केवळ १४ ते १५ वर्षात झाली हे दाखवून दिले. आणि ही पूर्ण निर्मिती वाकाटक राजा हरीषेणाच्या काळातली झाल्याचे सिद्ध केले. काही लेण्या मंडलिक राजा उपेन्द्रगुप्त याने, तर काही अश्मक राजाने कोरावली होती. हरीषेणाच्या मृत्युनंतर मात्र अजिंठाचे काम थांबले.
वाकाटक घराण्याच्या ऱ्हासाची माहिती दंडीने दशकुमारचरित मध्ये लिहिली आहे. ती सुद्धा एका राजकुमाराची कथा म्हणून आली आहे. नावे बदलून लिहिलेली हि कथा वाकाटकांची, हरीषेणची आणि वराहदेवाची आहे हे स्पिंक यांनी सप्रमाण दाखवले. आणि मग या कथा साहित्याचा आधार घेत, इतर ऐतिहासिक माहिती गोळा करत, वाकाटकांचा इतिहास जोडला.
श्री. स्पिंक यांच्या संशोधनातून – अजिंठाच्या निर्मितीचा काळ, त्यासाठी लागलेला वेळ, लेण्या खोदायाच्या व चित्र काढायच्या पद्धती या सर्वाबद्दल माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर इतिहासाच्या वनात हरवून गेलेल्या वाकाटक घराण्याची माहिती सुद्धा मिळाली. वाकाटकांचे राज्य, वैभव, उतरता काळ आणि त्यांचा शेवट सुद्धा स्पिंक यांच्या अभ्यासातून कळला. भारत ज्याला विसरला होता, त्या एका मोठ्या राजघराण्याची ओळख स्पिंक यांनी आपल्याला करून दिली. हे घराणे इतके मोठे होते की भारताच्या एका वैभवशाली काळाला वाकाटकांचे नाव असणे आवश्यक आहे हे देखील श्री स्पिंक यांनी दाखवून दिले.
अजिंठा लेण्यांचा काळ ७ व्या शतकातून ५ व्या शतकात आल्यामुळे त्याचे पडसाद इतरत्रही उमटले. घारापुरी लेण्यांचा काळ आधी ८ व्या शतकातला मनाला जात होता. त्यांचा कालखंड २०० वर्ष मागे गेला. घारापुरी लेण्या व ते करवून घेणाऱ्या राजघराण्याबद्दल सुद्धा अधिक माहिती मिळण्यास श्री स्पिंक यांच्या कामचा उपयोग झाला.
६० वर्ष, एकाच ध्यासाने, अक्षरशः वेड लागल्या सारखे श्री स्पिंक यांनी अजिंठाचा अभ्यास केलाय. करत आहेत. त्यांना मिळालेले ज्ञान वाटत आहेत. आणि तरीही त्यांना असे वाटते की काम अजून शिल्लक आहे.
वॉल्टर स्पिंक असोत, श्लींग्लोफ असोत, जेम्स फर्ग्युसन असो किंवा जेम्स बर्गेस असो. या सर्वांनी झोकून देऊन लेण्यांचा अभ्यास केला. भारताचा, भारतातील साहित्याचा, कलेचा, शिल्पांचा, चित्रांचा, चित्र निर्मितीचा, चित्रशैलींचा, स्थापत्याचा, धर्मांचा, धार्मिक ग्रंथांचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या या सर्व ऋषींना मानाचा मुजरा!
अभ्यास कसा करावा, किती करावा, किती अंगांनी करावा, किती खोल करावा, आपल्या विषयाचे चिंतन कसे करावे हे या ऋषींकडून शिकायला हवे. संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे तर –
विठ्ठल गीती गावा | विठ्ठल चित्ती ध्यावा | विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ||
आपल्या अभ्यासाचा विषय डोळ्यासमोर साक्षात मूर्तिमंत होऊन उभा राहावा इतकं त्याचे ध्यान केले पाहिजे!
संदर्भ –
- The Startling Story of Ajanta – Shubha Khandekar
- इतिहासावर प्रकाशझोत – विनायक परब, लोकसत्ता मधील श्री स्पिंक यांची मुलाखत, जॅनेवारी २०१५.
- The Life and Times of Walter Spink – Bonnie Brereton
- Indian Archaeology from Jones to Marshall – Sourindranath Roy
हा लेख प्रसाद दिवाळी अंक, २०१९ मध्ये पूर्व प्रकाशित झाला आहे.
Tattvamasi
Narrator: Here is a conversation between a father Sage Uddalaka Aruni (उद्दालक अरुणी) and his son Shwetaketu (श्वेतकेतू). This dialogue appears in the Chhandogya Upanishad (छांदोग्य उपनिषद) of the Samaveda (सामवेद). It is a part of the Brahman Book (ब्राह्मण ग्रंथ) called Chhandogya Brahman (छांदोग्य ब्राह्मण). Like other Upanishads, Chhandogya too was compiled long before the time of Gautam Buddha. Behold! The students are singing this Upanishada’s Shanti Mantra (शांतीमंत्र) –
Chorus
ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
Om, May we all be protected!
May we all be well nourished!
May we all work together with great energy!
May our study be glorious!
Let there be no enimity between us!
Om! Let there be peace (in me), peace (in nature) and peace (in universe)!
Shwetaketu: At the age of 12, I was sent to the hermitage to learn the Veda and the Vedanga. In 12 years, I mastered the 4 Vedas and the sciences of phonetics, etymology, grammar and astronomy as well. I also completed the studies of the Shastras. And by the way, I might as well mention that I was the brightest student at the hermitage.
Narrator: Shwetaketu knew he was a brilliant student. And soon after returning home from his studies, he developed a great sense of pride and arrogance which became evident from his manners. The father was worried by his behavior. So he decides to do something about it. He summons Shwetaketu.
Aruni: Shwetaketu, my learned boy, did you learn from your Guru about the ultimate knowledge, by which everything becomes known?
Shwetaketu: No Father! I don’t think my Guru knew about such a thing. Otherwise he would have taught me.
Aruni: Dear Son, did you ask him for this knowledge?
Shwetaketu: Does such a knowledge exist?
Aruni: Yes, indeed.
Shwetaketu: I must admit that I never asked my Guru to teach me about it. Please do tell me about this knowledge by which everything else becomes known.
Aruni: Shwetaketu, it is knowledge of the Brahma! The ultimate truth! It is from the Brahma that this whole world came into being. Thus by knowing it, everything else comes to be known.
Shwetaketu: How can the world that is made up of so many different things, come from one Brahma?
Aruni: Son, see this pot, a pan and a toy cart? They are different products. But they are all made out of clay. Or see the ornaments of your mother. The earrings, the bangles and the necklace. Though they are different, they are all made of gold. Or take a look at this nail cutter made of iron. If you understand the properties of iron, you will understand the properties of the nail cutter and everything else that is made of iron. Similarly If you understand the properties of clay you will understand the properties of all the pots, pans and clay toy carts.
Shwetaketu: Father, this is something that I did not learn at the hermitage. Please tell me more about the Brahma.
Aruni: In the beginning, there was only Sat (सत्)! From which – various forms of energy like heat, light etc were created. Then Water was created. Then Food was created. From the Food three forms of life – Andaj (अंडज), Jaraj (जारज), and Udbhij (उद्भीज) were created. Andaj are the life forms born from egg. Jaraj are the life form born from womb that is the mammals and Udbhij are life forms born from the Earth like the plants. The Brahma lives in all these life forms as Jeev or Atma (जीव / आत्मा).
Just as the pots and pans of clay have different Naam-Rupa (names and forms); the Brahma appears as various life forms with different names and forms. When the Naam-Rupa is lost, the essence of the pots and pans; that is the clay is revealed. Similarly when one looks beyond the names and forms of objects, the Brahma is revealed.
Shwetaketu: Father, I do not understand how from one microscopic (सूक्ष्म) Brahma the entire world is created. Please explain to me this again.
Aruni: Well then! Go, bring me one fruit of that Banyan tree.
Shwetaketu: Here it is father.
Aruni: What do you see in it?
Shwetaketu: I see very tiny seeds in it.
Aruni: Well then break open one seed. What do you see?
Shwetaketu: I see nothing at all inside it.
Aruni: Can a huge banyan tree come out of nothing? Of course not! It is just that you are not able to see the subtle essence in the seed from which this banyan tree came into being. The Bramha is that subtle essence in every being. It is the Brahma that resides in everything as Atma.
Chorus:
स य एषो S णीमै तदात्म्यम् इदं सर्वं
तत् सत्यं स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो
इति भूय एव मा भगवान् विज्ञापयत्वीति
तथा सोम्येति होवाच || छां. ६.१२.३ ||
That which I have described so far
That which is smaller than an atom
That which is the reason of every being
That is the Atma, Shwetaketu!
You too are that Atma!
तत्त्वमसि! तत्त्वमसि!! तत्त्वमसि!!!
Shwetaketu: How is it that this Atma is present everywhere, but it cannot be seen?
Aruni: Bring me a glass of water and few crystals of salt.
Shwetaketu: Here it is.
Aruni: Put those crystals in the glass of water.
Shwetaketu: Yes Father!
Aruni: Now tell the taste the water from the left edge of the glass.
Shwetaketu: It is salty, Sir!
Aruni: Now tell the taste the water from the right edge of the glass.
Shwetaketu: It is salty, Sir!
Aruni: Now tell the taste the water that is at the bottom of the glass.
Shwetaketu: This too is salty to taste, Sir!
Aruni: The salt is present everywhere but it cannot be seen. To find it, one has to examine the water, taste it. Similarly to realize the Atma that resides in everything one has to carry out an examination.
Chorus:
स य एषो S णीमै तदात्म्यम् इदं सर्वं
तत् सत्यं स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो
इति भूय एव मा भगवान् विज्ञापयत्वीति
तथा सोम्येति होवाच || छां. ६.१३.३ ||
That which I have described so far
That which is smaller than an atom
That which resides everywhere
That is the Atma, Shwetaketu!
You too are that Atma!
तत्त्वमसि! तत्त्वमसि!! तत्त्वमसि!!!
Aruni: The Brahma is beyond all names and forms. No form or name can describe it. Hence while describing the Brahma, the Vedas say “न इति, न इति”, its neither likes, nor like that! Just as by knowing clay, the material cause, all kinds of pots and pans can be understood. By knowing the Brahma, all of is forms can be known. The Brahma is primary, and everything else is secondary.
Chorus:
|| ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या ||
The Brahma is the ultimate truth.
The Jagat that is created from it is an illusion.
Aruni: Dear child, all the rivers flow into the ocean and become a part of it. The rivers lose their names and forms once they have emptied into the ocean. Similarly, once a being merges with the Brahma, they lose their name and form, to become the Brahma. Then there is no coming back. Shwetaketu, know that the name and form are not permanant, but the Atma is. The Atma is immortal. And that immortal being is you Shwetaketu!
Chorus:
तत्त्वमसि श्वेतकेतो
तत्त्वमसि! तत्त्वमसि!! तत्त्वमसि!!!
Shwetaketu: Father, now I understand. Every Being comes from the Brahma. Every being acquires a name and a form. And after giving up name and form every being merges into Brahma. But, how does one find the Bramha?
Aruni: Son, Say a person is left in an unknown place, far away from his home. What will he do? He will inquire about how to reach his city. Right? He will then follow the instructions to reach home. Similarly a person can know how to reach the Brahma from a Guru. A Brahmanishtha and Shrotriya Guru will guide you Shwetaketu.
Narrator: Thus the father explained the Brahma, and the son learnt humility too! Like all the Upanishadas, this one too is in the form of dialogue. Question and Answer. Student asks a question, and the Guru gives an answer or directs the student to find the answer. It reminds one of the Socratic method of learning. We end this retelling of the Upanishad, by reciting its Shantipath शांतीपाठ. Let us all say it together!
Chorus:
ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
शिवपार्वती
इतक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ किंवा खरेतर ‘व्हॅलेंटाईन सप्ताह’ संपन्न की काय तो झाला! तरुणाईकरिता अगदी गजबजलेला आठवडा. ‘रोझ डे’, ‘टेडी डे’, ‘चॉकलेट डे’ वगैरे कसले कसले ‘डेज्’ झाले. ‘रोझ डे’ला गडद लाल रंगांचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करायचे. ‘प्रॉमिस डे’ हा प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. ‘प्रोपोज डे’ आपल्या प्रेमाची कबुली देऊन, लग्नाची मागणी घालायची. प्रेमी युगुलांसाठी हा एक सणच म्हणा. प्रेम करणे, प्रपोज करणे नवीन का आहे? मानव पृथ्वीवर अवतरण्याच्या आधीपासून ‘प्रपोज डे’ आहे.
मानवांमध्ये, देवांमध्ये मात्र मनपसंत जोडीदाराला ‘प्रोपोज’ करणाऱ्यांमध्ये आद्य प्रेमिका आहे – उमा! हिमवान् पर्वताची कन्या पार्वती. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या! ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली! कुणाच्या? तर अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या! त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी! पण, पार्वती काही बधली नाही. तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले. पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले, तेव्हा तिला ‘अपर्णा’ नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वत: पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती आदर्शच म्हणायला हवी.
शंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना या कशाचाच पत्ता नाही! इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार! पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, “जा रे, तू तरी शंकराला ध्यानातून जागे कर. तुझ्या मदनबाणाने त्याला घायाळ कर! म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला उत्सुक होईल!” कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले! (शंकराचा राग उतरल्यावर, कामदेवाच्या पत्नीने रतीने, शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत केले. कामदेवाला जिथे पुन्हा शरीर प्राप्त झाले, नवीन रूप मिळाले तो प्रांत ‘कामरूप’ या नावाने प्रसिद्ध झाला. जो आज आपण ‘आसाम’ म्हणून ओळखतो.)

आत्ता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. “तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल! त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का!” शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला! त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला!
फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे! वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले. अगदी इतक्यात घडलेली दोन-तीन जळीतकांड वाचत आहोत. ‘प्रपोज’ केल्यावर ‘नाही’ म्हटले म्हणून किंवा उपभोग घेऊन स्त्रीला जाळले गेले. अशा घटना वाचून सांगावेसे वाटते की, स्त्रीला नाही, कामवासनेला जाळायचे असते. स्वत:च्या ‘Lust’ ला जाळायचे असते. पण, हे शिकवणार कोण? शिवपुराणातील ही शंकराची कथा हे शिकवण्यासाठीच लिहिली आहे. लहानपणापासून पुराणातील या गोष्टी सांगितल्या-ऐकल्या तर संस्कार होतील आणि याचसाठी आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत, तर आजही ‘रिलेव्हन्ट’ आहेत. त्यातील धडे आजही गरजेचे आहेत.
शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई-वडील आलेत. विवाहाला स्वत: ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगल वाद्ये वाजत आहेत. वधू-वर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वरच्या हातात द्यायच्या ऐवजी, चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे! चुकलं का काही पुरोहिताचे? की पार्वतीने लग्नात शंकराचा हात मागितला असे सुचवायचे आहे?
प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिव-पार्वतीने घालून दिले आहेत. शंकर उगीच फोनमध्ये किंवा पेपरमध्ये डोके खुपसून बसणारा किंवा लग्नाच्या आधी गणांसोबत रमायचा तसे तासन्तास त्यांच्यात रमणारा नवरा नाहीये. पार्वती पण आपल्या माहेरच्या वैभवाचे गुणगान करणारी बायको नाही. दोघे एकमेकांना वेळ देतात. गप्पागोष्टी करतात. आपल्या मनातील गुज सांगतात. एकत्र फिरायला जातात. कित्येक कहाण्यांची सुरुवात ही ‘एकदा काय झालं? शंकर पार्वती विमानातून जात होते’ अशी होते. इतकंच काय, दोघे मिळून सारीपाटाचा डावसुद्धा खेळतात. एकदा सारीपाट खेळताना शंकर सारखा जिंकला, तेव्हा पार्वती खट्टू झाली. मग शंकर एक डाव मुद्दाम हरला, त्या डावात पार्वतीने त्याचा नंदी जिंकून घेतला आणि आपल्या सख्यांकडून तिने नंदी आणवून घेतला!

लक्षात घेण्यासारखे आहे बरे, पार्वती कधीच एकटी नसते. तिच्याबरोबर कायम तिची सखी असते. सखी-पार्वती अशी जोडगोळीच आहे. तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणी असतात. ‘माझे मूड, माझ्या स्त्रीमनातील तरल संवेदना’ वगैरे नवऱ्याने समजून घेतल्याच पाहिजेत, असा तिचा आग्रह नाही. शॉपिंगला नवऱ्याने आलेच पाहिजे, अशी तिची अपेक्षा नाही. अशा तिच्या गरजा पण नाहीत. कारण, तिला मैत्रिणी आहेत. जीवाभावाच्या, साथ देणाऱ्या, तिच्या तक्रारी ऐकून घेणाऱ्या, उपाय सुचवणाऱ्या आणि तिची चूक असेल तर ती चूक दाखवून देणाऱ्यासुद्धा.
आता संसार म्हटला की, भांडणे आलीच! शंकर-पार्वती असले म्हणून काय झालं? एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला. पण द्वारपालांनी त्याला अडवले. ‘अंदर की बात’ अशी की, शंकर-पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती. रागावून, तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, “मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो!” रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी, यक्ष-गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो!

शिव-पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार पण आलेत. आता हा गंगावतरणाचाच प्रसंग पाहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय, या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, “अगं, जाऊ नकोस. तू समजतेस असे काही नाही! या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच!”
शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. ‘ऑफिसचा स्ट्रेस’ घरी आणून बॉसचा राग तो बायकोवर काढत नाही. घरी तो अतिशय शांत, सुस्वभावी, प्रेमळ आणि भोळा नवरा आहे. संसारात, मुलाबाळात रमणारा गृहस्थ आहे. एखाद्या रविवारी सकाळी जर पार्वतीने “अहो! किती रद्दी साठली आहे, तेवढी टाकून येता का?” असे म्हटले तर तो शांतपणे, “येताना भाजी आणायची का?” असे विचारून रद्दीची पिशवी घेऊन जाईल! शंकर-पार्वती आणि त्यांची दोन मुले हे चौकोनी कुटुंब आहे. अशा कुटुंबवत्सल शंकराचे वर्णन करताना संत कृष्णसुत म्हणतात-
गणूबाळ खेळे लडिवाळ,
धरुनी मृदू गाल, चुंबना घेई
ते कौतुक पाहुनी हासे अंबाबाई
श्रीसांब जगादिस्तंभ, गौरी हेरंभ जयाच्या अंकी
उद्धार करा मी, रुतलो या भवपंकी
या दैवी जोडप्याच्या संसारात, पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे, समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव! तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला. तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पट्कन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळानिळा झाला. कर्पुरासारख्या गौरवर्णीय शंकराला ‘नीलकंठ’ नाव मिळाले. शंकर-पार्वतीचा संवाद तर दैवी आहे!
कधी पार्वतीने म्हणावे, “मला किनई आज अगदी बोअर झालंय गडे! एखादी गोष्ट सांगा ना!” की लगेच शंकराने तिला विद्याधर राजांच्या सात भल्यामोठ्या रोमांचकारी कहाण्या सांगाव्यात. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात, ते गीतातत्त्व आहे तरी काय? तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, “देवी, तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही. तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे, तर रोज नवीनच आहे असे दिसते!”
तेथ हरू म्हणे नेणीजे ।
देवी जैसे का स्वरूप तुझे ।
तैसे हे नित्य नूतन देखिजे ।
गीतातत्त्व ॥ ज्ञा. १.७१ ॥
त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले, तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे, ‘गिरिजापती’, ‘उमाकांत’, ‘पर्वतीपती.’ पण, पार्वतीची मात्र स्वत:ची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा! ती कधी स्वत:ची ओळख, ‘मी शंकराची भार्या’ अशी करून देत नाही. पहा तर या शिल्पात शंकरदेखील हेच सुचवत आहे – शक्तीशिवाय मी अचेतन शव आहे! पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे!
सहजच भारतातील ‘व्हॅलेंटाईन डे’ हा शिव-पार्वतीच्या स्मरणाने होतो. लग्नाच्या आधी वधू गौरीहराची पूजा करते ते याकरिता की, माझा संसार शिव-पार्वतीच्या संसारासारखा होवो! लग्नानंतर पहिली पाच वर्षे नवरी श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करते. ते देखील यासाठी की, गौरीने प्रसन्न होऊन माझा प्रपंच नेटका करावा! पार्वती जशी शंकराच्या गळ्यातील ताईत झाली, तालिका झाली तसे पत्नीने नवऱ्याच्या गळ्यातील ताईत व्हावे, म्हणून विवाहिता दर वर्षी हरतालिकेची पूजा करते. हे सगळे आपल्याकडचे प्रेम साजरं करायचे ‘डेज’ आहेत. सेंट व्हॅलेंटाईनच्या कित्येक शतके आधीपासून आपल्याकडे प्रेमाचे ‘डेज्’ साजरे केले जात आहेत. या ‘डेज्’ ना शिव-पार्वतीच्या कथेची पार्श्वभूमी लाभली आहे.
शिव-पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक, प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे. शिव-पार्वती नुसतेच ‘प्रपोज’ करायला शिकवत नाहीत, तर ‘प्रपोज’ करणाऱ्याची/करणारीची परीक्षा घ्यायला शिकवतात. ‘प्रपोज’ करणारा/करणारी परीक्षेत पास झाली तरच ‘हो’ म्हणायचे हे शिकवतात. नुसतेच ‘एकमेकांवर प्रेम करत फिरा,’ असे शिकवत नाहीत, तर ते विमानातून फिरताना कोणी दु:खी कष्टी दिसले, तर तिथे थांबून त्याची चौकशी करून त्याला मदत करायला शिकवतात. नुसतेच लग्न करायला शिकवत नाहीत तर ते निभवायला शिकवतात. नवरा – बायकोची बरोबरी शिकावात. “गप गं! तुला काय कळते यातले!” असे न म्हणता बायकोचे ऐकायला शिकवतात आणि नवरा-बायकोचे अद्वैत शिकवताना दोघांना पुरुष-प्रकृतीच्या पातळीवर घेऊन जातात.
- दीपाली पाटवदकर
सरस्वती-सिंधू – खेळ आणि खेळणी
सरस्वती-सिंधू संस्कृतीची वैशिष्ठ्ये अशी– आखणी करून बांधलेली नगरे, नगरांना असलेली तटबंदी, त्यामधील काटकोनातील रस्ते, दोन किंवा तीन मजली घरे, घराघरात संडासची सोय, सांड पाण्याचा भुयारी मार्गाने निचरा करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी वेगळी भुयारी व्यवस्था, पाणी साठवण्यासाठी मोठे हौद, विहिरी, बांधीव तळी, पुष्करणी, काही घरात मिळालेली यज्ञकुंड, दूर देशांशी चाललेला व्यापार, समुद्र मार्गाने व्यापार, जहाज बांधणी व दुरुस्ती करण्याची सोय, हस्तिदंताच्या वस्तू, दगडांपासून मणी व मण्यांपासून दागिने तयार करणारे कारखाने, नक्षीदार मातीची भांडी आणि लहान मुलांचे खेळ!
येथे केलेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून, येथील मुले कोणते खेळ खेळायचे, त्यांची खेळणी काय होती, मोठी माणसे सुद्धा काही खेळायची का, आदि गोष्टींचा मागोवा घेऊ. आपण पाहणार आहोत तो प्रदेश आहे – हरयाणा, पंजाब, राजस्थान, सिंध आणि गुजरातचा, आणि काळ आहे साधारण सामान्य युग पूर्व ७,५०० (7,500 BCE) ते सामान्य युग पूर्व १,५०० (1,500 BCE) दरम्यानचा. मुख्यत्वेकरून हे खेळ आहेत ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे.
अगदी लहान मुलांसाठी असलेले खेळ प्रथम पाहू. लोथल येथे दोन सुबकशी मातीची भांडी मिळाली. त्या भांड्यांवर काळ्या रंगाच्या शाईने सुंदर चित्र काढले आहे. एक चित्र आहे – तहानलेल्या कावळ्याच्या गोष्टीचे. तळाशी पाणी गेलेल्या मडक्यात कावळा दगड टाकतो, आणि पाणी वर आल्यावर पाणी पिऊन तहान भागवतो. तर दुसरे चित्र आहे – चोचीत पुरी धरून झाडावर बसलेल्या कावळ्याचे. झाडाखाली एक लबाड लांडगा पुरीकडे आशाळभूतपणे पाहत आहे. आता तो लांडगा कावळ्याच्या गाण्याची स्तुती करणार, आणि कावळ्याने गाणे म्हणायला चोच उघडताच पुरी खाली पडली, की ती घेऊन तो पळून जाणार! ही भांडी पाहून वाटते की, अरे! हे लहान मुलांसाठी केलेले चित्रांचे गोष्टीचे पुस्तक तर नाही! कोणा गुड्डी आणि बंटीची ही ठरलेली वाडगी होती का? दुपारच्या वेळी आई त्यांना त्यांच्या ठरलेल्या वाडग्यातून खाऊ देत असे. मग गुड्डी आणि बंटी पायरीवर बसून खाऊ खातांना आपापल्या वाडग्यावरच्या चित्रातली गोष्ट एकमेकांना सांगत असतील का?

उत्खननातून वितभर किंवा त्याहून लहान मातीच्या पुतळ्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना मातृदेवता म्हणतात. कोणी शोभेच्या वस्तू म्हणतात. त्या लहान मुलींच्या खेळण्यातील बाहुल्या असतील का? आणखी मिळाली आहेत, छोटी छोटी भांडीकुंडी. पिटुकली वाटी, इत्कुसं ताट, लहानसा माठ, बारीकसा झाकणाचा सट आणिक काय काय. कुणा छकुलीने मैत्रिणींबरोबर ओसरीवर भातुकलीचा खेळ मांडला असेल का? पिटुकल्या वाटीतून खोटी-खोटी आमटी पितांना छकुलीने मैत्रिणीला फू-फू करून प्यायला सांगितले असेल?
आणि कोणा बंड्याने कधी “आता मी काय करू?” असे म्हणून फार कटकट केली, तर त्याची आई त्याला हा चक्रव्यूहाचा खेळ काढून देत असावी. मग थोडा वेळ एकट्याने बसून बंड्या हा खेळ खेळला असेल. मातीचे पिटुकले चेंडू चक्रव्यूहातून फिरवत फिरवत, खाली न पडता बरोब्बर मध्यभागी घेऊन जायचे!
लहान मुलांसाठी तयार केलेल्या सुंदरशा, पक्ष्यांच्या आकारातील अनेक शिट्ट्या मिळाल्या आहेत. अशा शिट्ट्या पाकिस्तान आणि भारतातील ग्रामीण भागात अजूनही मिळतात. एखाद्या सुस्त दुपारी, कुणा उनाड पोरांनी, या शिट्ट्या वाजवून वाजवून खूप आवाज केला असेल का?

खेळण्यातले मातीचे प्राणी आणि पक्षी देखील मिळाले आहेत. बैल, म्हैस, बकऱ्या, मेंढ्या, डुक्कर, वाघ, घोडा, गेंडा, माकड, कबुतर वगैरे प्राण्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती. कदाचित लहान मुले आपापली चित्रे घेऊन एकमेकांकडे खेळायला जात असतील. त्यांच्या मेंढ्या एकमेकांना खोटी खोटी टक्कर देऊन शक्ती दाखवत असतील. किंवा सगळ्या गुरांना घेऊन चिंटी पिंटी पोरं, शेजारच्या अंगणात चरायला नेत असतील.
काही प्राण्यांना पायाशी फिरणारी चाके आहेत. त्यांना धरून ‘गाडी – गाडी’ करत फिरवले असेल. नुकतंच चालायला लागलेली ठकी अशा प्राण्याची दोर हातात धरून त्याला घेऊन घरभर फिरली असेल. काही प्राण्यांची डोकी दोरीने पाठीला बांधली आहेत. मागून दोरी ओढली की तो प्राणी मान वर-खाली करतो. खेळायला आलेल्या पिंटूने मान डोलवणारा बैल असलेल्या चिंटूला, विचारले असेल – “सांग सांग भोलानाथ! पाऊस पडेल काय?” मग चिंटूने त्याच्या नंदीबैलाची मान वर खाली करून “हो! पाउस पडणार!!” असा संकेत दिला असेल! काय सांगावे?

थोड्या मोठ्या मुलांच्या खेळातल्या चकत्या सापडल्या आहेत. भाजलेल्या माती पासून केलेल्या एकापेक्षा एक लहान चकत्या, एकमेकांवर रचून ठेवताच मनात आरोळी उठते “ल S गो S री S S !” चिंध्यांचा चेंडू करून आज सुद्धा हा खेळ पाकिस्तान आणि भारतातील मुले खेळतात. तसेच मातीपासून तयार केलेल्या गोट्या आणि भोवरे मिळाले आहेत.
दोरीने हलवता येणाऱ्या प्राण्यांच्या व स्त्री पुरुषांच्या बाहुलीचे कठपुतलीचे खेळ केले असावेत. काही मातीचे मुखवटे सापडले आहेत त्या वरून असा अंदाज व्यक्त केला जातो की वेगवेगळे मुखवटे लावून कलाकार नाटकांचे खेळ सदर करत असावेत. धोलाविरा येथे एका रंगमंचाचे अवशेष सापडले आहेत. त्यावरून मनोरंजनासाठी असे खेळ करत असावेत असे वाटते.
या गावांतील उत्खननातून अनेक लहान गाड्या सापडल्या आहेत. या छोट्या हातगडीत भाजी ठेवून, कोणी बिट्टू “भाजी घ्या भाजी! ताजी ताजी भाजी!” म्हणत फिरला असेल. या सुबकशा बैलगाडीत भोलुने एक छोटासा गाडीवान बसवला असेल, अन् गाडीत गवताच्या लहान लहान पेंढ्या, नाहीतर भांडी भरून, वडिलांसारखं दुसऱ्या गावी समान विकायला घेऊन चालला असेल! आपली गाडी पळवत तो म्हणाला असेल, “ए! सरका सरका! बाजूला व्हा! माझ्या सर्जा राजाची गाडी चालली रे चालली! हुर्रर्रर्र!!”

काही बैठे खेळ सापडले आहेत जसे – बुद्धिबळासारखा वेगवेगळ्या प्रकारच्या सोंगट्या असलेला पट सापडला आहे. हा बुद्धिबळाचा प्राचीन प्रकार असावा असे मानले जाते. तसेच दगड, माती व हाडापासून तयार केलेले विविध प्रकारचे dice मिळाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आखीव रेखीव पट सुद्धा मिळाले आहेत. लहान खळगे असलेला एक पट मिळाला आहे. त्यावर चिंचोके वापरून खेळले असावेत असे वाटते.

खेळांमध्ये व्यायाम धरायचा असेल, तर असे वाटते की सिंधू संस्कृतीच्या लोकांना योगासने माहित होती. योगासनाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील मातीच्या कैक बाहुल्या मिळाल्या आहेत. कदाचित शोभेच्या बाहुल्या म्हणून त्या तयार केल्या असाव्यात. किंवा त्यांचा वापर योगासने शिकवण्यासाठी सुद्धा केला गेला असेल. कोण जाणे! हे लोक कुस्ती सारखे काही खेळ खेळायचे का? कोंबड्यांची किंवा मेंढ्यांची झुंज लावायचे का? एखादा पैलवान प्राण्याला झुंज द्यायचा का? असे प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहेत.
या प्राचीन काळातल्या, मातीत गढलेल्या वसाहतींमधले काय टिकले आहे, तर दगडाच्या, तांब्याच्या आणि मातीच्या वस्तू. बाकी कापडाच्या, लोकरीच्या, चामड्याच्या किंवा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला मिळतात ती फक्त मातीची आणि दगडाची खेळणी. लहान मुलींसाठी कापडाच्या बाहुल्या केल्या असतील तर ते कसे कळणार? किंवा रंगीत कापडाचे चौकाड्यांचे पट केले असतील तर कोणास ठाउक? किंवा विटीदांडू सारखा लाकडी वस्तूंनी खेळलेला खेळ असेल तर काय जाणो? या खेळांबद्दल जर कुठे लिहून ठेवले असेल तर एक मार्ग आहे. पण ते भूर्जपत्रावर लिहून ठेवले असेल तर काय उपयोग? तो लेख दगडावर नाहीतर मातीच्या फळ्यावर कोरला असता तर ठीकय. अर्थात, या लोकांनी लिहिलेले अजून वाचता येत नाही तो प्रश्न वेगळाच. असो. कसे कळावेत त्यांचे सगळे खेळ? शिवाय इतर खेळ जे कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात, जसे – सूरपारंब्या, पकडापकडी किंवा लपाछपी हे चित्रित करून ठेवले असतील तरच कळणार. ते सुद्धा दगडावर किंवा मातीच्या खापरावर चित्रित / मुद्रित केले असतील तरच.
अशा अनेक जर-तर मधून मिळणारे धागेदोरे अगदी थोडे आहेत. त्या सर्व पुराव्यांना धरून बांधता येतात ते केवळ अंदाज. आणि त्यामधून उमटते ते एक पुसटसे चित्र. जे पूर्ण दिसत नसल्याने अधिक आकर्षक होते. जे अस्पष्ट असल्याने बारकाईने पाहायला लावते. आणि उत्तरे देण्यापेक्षा आपल्यालाच प्रश्नांवर प्रश्न विचारते, “ओळख पाहू, हा खेळ कोणता असेल! असा खेळ तुझ्या लहानपणी होता का? आणि सांग बरे, चित केल्यावर आम्ही काय म्हणून चित्कार करायचो? सांग! सांग!! सुटतंय का कोडं? की हरलास?”
शोधयात्रा भारताची #७ – आर्य कोण होते?
सरस्वतीच्या कथा #१ – चतुर काक:

एकाच पुस्तकातली कथा आणि त्या कथेसाठी काढलेले चित्र वाटते ना? पण कथा आहे ‘पंचतंत्र’ या प्राचीन संस्कृत कथासंग्रहातील. आणि चित्र आहे ४,५०० ते ५,००० वर्षांपूर्वीचे! गुजरात मधील लोथल येथील एका कुंभावर काढलेले.
सरस्वती-सिंधू मधील चित्र आणि संस्कृत साहित्यातील कथा एकच आहे. मग, चित्र काढणारे आणि कथा लिहिणारे एकच लोक होते का? कथांच्या माध्यमातून, पशुपक्ष्यांच्या गोष्टीतून नीतीचे धडे देणारे पंचतंत्र सांगते – या कथा पंडित विष्णुशर्माने राजपुत्रांना सांगितल्या होत्या. तर लोथलचे कुंभ सांगते – एका सामान्य कुंभाराने त्या कथेचे रेखाटन केले होते. तो कुंभ विकत घेणारा पण सामान्य नागरिक असणार. आणि दोघांनाही ती कथा माहित असणार.
ही चतुर कावळ्याची कथा त्या कुंभाराला माहित होती, तशीच आपणही लहान असतांना ऐकलेली आहे. या कथा ५,००० वर्षांपूर्वी लोकप्रिय होत्या, आजही आहेत. आणि या पुढेही राहणार!
ब्रह्माक्षरे
चौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये पोचला. जपान मध्ये पोचलेल्या बौद्ध धर्मात हिंदू देवी देवता पण होत्या. या देवता जपान मध्ये जे स्थिरावल्या ते आजतगायत. आज जपान मध्ये – सरस्वती, गणपती, इंद्र, ब्रह्म, ईशान, वायू, सूर्य, चंद्र, चित्रगुप्त आदि अनेक देव मंदिरांतून दिसतात. अर्थात त्यांची इथली नावे मात्र वेगळी आहेत. बेन्झतेन म्हणजे सरस्वती. बोनतेन म्हणजे ब्रह्म. तैशाकुतेन म्हणजे इंद्र. इत्यादी. या सगळ्या नावातील ‘तेन’ म्हणजे ‘देव’. जपानी बोन-तेन म्हणजे आपला ब्रह्म-देव! वरील छायाचित्रे आहेत जपान मधील बोनतेनच्या जुन्या मूर्तींची – चतुरानन, हंसवाहन ब्रह्मदेवाची मूर्ती.
भारतीय विश्वात ब्रह्मदेव हा सृष्टीकर्ता असल्याने तो अनेक गोष्टींचा कर्ता मनाला जातो. त्यापैकी एक आहे अक्षरे किंवा लिपी. भारतातील प्राचीन लिपीला या आद्य कर्त्याचे नाव मिळाले – ब्राह्मी. देशकालानुरूप ब्राह्मी लिपीमध्ये बदल होत गेले, व त्यामधून तयार झाल्या उत्तरेत – गुप्त ब्राह्मी लिपी आणि दक्षिणेत ग्रंथ लिपी. साधारण ६ व्या शतकात गुप्त लिपीतून सिद्धम किंवा सिद्धमातृका ही लिपी तयार झाली. आपण आज वापरतो ती देवनागरी लिपी सिद्धम् मधून तयार झाली.

भारतात शेकडो बौद्ध ग्रंथ संस्कृत भाषेत व सिद्धम लिपीत लिहिले गेले. बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्षुंच्या बरोबर हजारो बौद्ध ग्रंथ चीन मध्ये पोचले. हे ग्रंथ सिद्धम लिपीत लिहिले होते. त्यावेळी चीन मधील बौद्ध संस्कृत भाषा व सिद्धम् लिपी शिकत असत. जपान मध्ये ८ व्या बौद्ध भिक्षू होऊन गेला – कूकइ. हा संस्कृत व सिद्धम् शिकण्यासाठी चीन मध्ये गेला. याने सिद्धम् लिपी जपानला नेली. त्याने जपान मध्ये शिंगोन नावाचा एक बौद्ध पंथ स्थापन केला. या पंथात गायली जाणारी सर्व मंत्रे संस्कृत भाषेत असून ते लिहिण्या करिता, आजही सिद्धम् लिपी वापरली जाते. जपान मधील शेकडो मंदिरातून सकाळ संध्याकाळ गोम (होम) केला जातो. या विधीत अग्नीमध्ये आहुती देत हे मंत्र गायले जातात. देवतेचे चित्र काढण्यापेक्षा अक्षरे लिहिणे सोपे, म्हणून त्या देवतेच्या बीजमंत्राच्या पहिल्या अक्षराचे चित्र काढायची पद्धत जपान मध्ये आहे. या चित्रांना शु-जी मंदर (बीज-अक्षर मंडळ) म्हटले जाते.
जपान मधील मंत्रांचे पठण करण्याच्या रूढीमुळे तेथील बौद्ध आजही सिद्धम् लिपी शिकतात व शिकवतात. फक्त, जपान मधील बौद्ध लोक, सिद्धम् लिपीला तिच्या जुन्या भारतीय नावाने ओळखतात – बोन्जी! बोन-तेनची अक्षरे. ब्रह्म-देवाची अक्षरे! अर्थात ‘ब्राह्मी लिपी’.
- Sanskrit Beyond Text: The Use of Bonji (Siddham) in Mandala and Other Imagery in Ancient and Medieval Japan – Susan Dine
- This Unique 6th Century Script Vanished From India But Is Still Preserved in Japan! – TANVI PATEL
दगड कधीच खोटे बोलत नाही
कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…
पण ही कथा सुरु होते ग्रीस मध्ये. १८७० च्या दशकात.
ग्रीक कवी होमरचे अजरामर महाकाव्य आहे इलियाड. या कथेच्या सुरुवातीला ट्रोयचा राजपुत्र पॅरीस हा मेनेलीयसची पत्नी हेलेनचे अपहरण करतो. त्यावर ग्रीक राजा मेनेलीयस ट्रोयवर हल्ला करतो. हे युद्ध १० वर्ष चालते. शेवटी एका बनावट घोड्यात सैन्य लपवून पाठवले जाते व ट्रोयचा पडाव होतो. होमरची कथा ‘काल्पनिक’ आहे असे इतिहासकारांचे मत होते. मात्र ग्रीक लोकांत अशी मान्यता होती की, होमरने एक प्राचीन ऐतिहासिक घटना, जी मौखिक परंपरांनी जपली होती ती लिहून काढली. १८७० मध्ये हेन्री श्लीमन (Henry Schliemann) यांनी होमरने वर्णन केलेली ट्रोय कुठे असेल याचा शोध घेतला. तुर्कीस्तानच्या पश्चिमेला त्या नगरीचे अवशेष त्यांना सापडले. एका खाली एक असे इस पूर्व ३००० पर्यंत जाणारे ९ थर मिळाले. या उत्खननाच्या नंतर होमरने वर्णन केलेले युद्ध कदाचित इस पूर्व १३०० च्या आसपासचे घडले असावे असे आता मानले जाते.
ट्रोयच्या यशा पाठोपाठ बायबल मध्ये वर्णन केलेल्या गावांचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. या उत्खननातून इजिप्त, जोर्डन, इस्राईल, इराक, तुर्कस्तान आदि भागात उत्खनन केले गेले. या मधून अनेक प्राचीन गावे, राजे, साम्राज्ये समोर आली. या मधून बायबल मधील काही कथांना दुजोरा मिळाला, तर काही खोडल्या गेल्या.
अशा प्रकारे २० व्या शतकाच्या आधी, प्राचीन साहित्यावर आधारित असे उत्खनन युरोपीयन लोकांनी केले होते. त्या मधून साहित्याला पूरक असे काही पुरावे मिळाले होते. इसपुर्व ७ व्या / ८ व्या शतकातील होमरने, मौखिक परंपरेने जपलेली कथा लिहिली. पण जेंव्हा उत्खनन करून त्या कथेत वर्णन केलेले नगर मिळाले, तेंव्हा त्या साहित्याला आणि त्या आधीच्या मौखिक परंपरेला आधार मिळाला. या उत्खाननांमुळे युरोपियन लोकांचा प्रवास “प्राचीन साहित्य एक मिथक असते” इथपासून “प्राचीन साहित्यात थोडेफार तथ्य असू शकते” इथ पर्यंत झाला.
इंग्रजांचा हा प्रवास होईतो २० व्या शतकाच्या मध्यावर भारत स्वतंत्र झाला. मात्र या वेळेपर्यंत इंग्रजांनी रामायण, महाभारत व पुराणे ही केवळ ‘मिथक’ आहेत, ‘कथा’ आहेत, ‘कल्पनाविलास’ आहे असा शिक्कामोर्तब केला होता. स्वतंत्र्य मिळालेल्या नवयुवा भारताला अनेक प्रश्न भेडसावत होते. त्यात एक प्रश्न होता स्वत:च्या मुळांचा. स्वत:च्या इतिहासाचा. स्वत:च्या identity चा. रामायण – महाभारत घडले होते का? अयोध्या खरेच रामाची जन्मभूमी होती का? वाल्मिकी रामायण आणि व्यासकृत महाभारत महाकाव्ये आहेत की इतिहास? राम – कृष्ण खरे होते की निव्वळ कविकल्पना?
या प्रश्नांची उत्तरे साहित्यात मिळतात. स्वत: व्यास महाभारतात सांगतात की, “मी इतिहास लिहित आहे”. तसेच महाभारतात मागे होऊन गेलेला मोठा राजा म्हणून रामाची गोष्ट येते. म्हणजे रामाची कथा सुद्धा इतिहास म्हणून येते. किंवा ११ व्या शतकातील स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्य या अध्यायात अयोध्या, शरयू, रामजन्मभूमी या बद्दल सविस्तर माहिती आली आहे. हे ग्रंथ इतिहास आणि भूगोल सांगत आहेत हे ते स्वत: सांगतात.
भारतीय ग्रंथांशिवाय, अयोध्येत आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी लिहून ठेवलेली काही प्रवासवर्णने आहेत. रामजन्मभूमीच्या बाबतीत उपलब्ध असलेली प्रवासवर्णनात – १६३१ मध्ये Joannes De Laet हा डच प्रवासी काही काळ अयोध्येत राहिला होता. त्याने शरयू नदीत स्नान करून रामाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांबद्दल तपशीलवार लिहिले आहे. १६३४ मध्ये आलेल्या Thomas Herbert ने रामनवमीला रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या गर्दी बद्दल लिहिले आहे. १६६७ मध्ये आलेल्या Joseph Tieffenthaler याने राम मंदिरात जाणाऱ्या शेकडो लोकांबद्दल लिहिले आहे.
… परंतु, साहित्याला जो पर्यंत पुरातत्त्व शास्त्राची जोड मिळत नाही, तोपर्यंत सगळा खेळ हा “बोलाची कढी आणि बोलाचा भात” असा मनाला जातो. १९५५ मध्ये ASI ने रामायण व महाभारताशी संबंधित काही प्रकल्प हाती घेतले. श्री. बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापुर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत, आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इस पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या. जसे बाणांचे अग्र, भाल्यांचे अग्र आदि. हाडांपासून तयार केलेले द्यूतात वापरले जाणारे फासे सुद्धा मिळाले. १९६० मध्ये ASI च्या डॉ. एस. आर. राव यांनी समुद्रात बुडलेली द्वारका नगरी शोधली. या ठिकाणी केलेल्या उत्खननातून त्या नगरीचे प्राचीन अवशेष मिळाले. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे, द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती हे या शोधातून पुढे आले. व महाभारत ही कविकल्पना नसून त्यामध्ये थोडेफार तरी तथ्य आहे हे मान्य केले गेले.
१९७५ मध्ये श्री. बी. बी. लाल यांनी रामायणाशी संलग्न असलेल्या गावांचे उत्खनन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या वेळी – अयोध्या, नंदीग्राम, शृंगवेरपूर, भारद्वाज आश्रम व चित्रकुट या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात उत्खनन केले गेले. राम वनवासात असतांना भरत नंदीग्राम येथे राहिला होता. तिथे उत्खनन केले. शृंगवेरपूर येथे रामाने वनवासात जातांना गंगा नदी ओलांडली होती. इथे निषादराज गुहाने त्यांना आपल्या होडीतून गंगापार नेले होते. इथून पुढे राम, लक्ष्मण व सीता भारद्वाज आश्रमात गेले होते. भारद्वाज मुनींनी त्यांना चित्रकुटची माहिती दिली व तिथे जाण्याचा रस्ता सांगितला होता. आणि नंतर राम, लक्ष्मण व सीता मंदाकिनी नदीच्या तीरावर असलेल्या चित्रकुट येथे गेले होते.

या सर्व ठिकाणी इस पूर्व २ ऱ्या सहस्रकातील मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले. विशेष उल्लेखनीय आहे शृंगवेरपूर येथे पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. गंगा नदीच्या काठावर शृंगवेरपूर वसलेले आहे. गंगेच्या पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी येथे ११ मीटर रुंद व ५ मीटर खोल इतका मोठा कॅनाल मिळाला. या मधून वेगवेगळ्या बांधीव टाक्यांमध्ये गाळ साचू देत स्वच्छ पाणी एका मोठ्या हौदाकडे वळवले आहे. २० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेला हा हौद आहे.

बी बी लाल यांनी अयोध्ये मध्ये १४ ठिकाणी उत्खनन केले. जन्मभूमी जवळच असलेल्या हनुमान गढी येथे देखील उत्खनन केले गेले. बाबरी ढॉंचाच्या आतमधून देखील पाहणी केली गेली. या उत्खननाची माहिती पुढील प्रमाणे –
- मशिदीला लागून दक्षिणेला व पश्चिमेला उत्खनन केले गेले.
- या मध्ये अनेक थर मिळाले – सर्वात वरचा मध्य युगातला साधारण इस १५०० च्या आसपासचा. त्या खाली गुप्त कालीन थर. त्याच्या खाली कुशाण काळातील थर. त्याच्याही खाली शुंग काळातील थर. त्या खाली मौर्य काळातील थर. व त्या खाली NBPW (Northern Black Polished Ware) संस्कृतीचा थर.
- इस १५०० चा थर हा मंदिर तोडलेल्या काळातला आहे.
- इथे १४ स्तंभांच्या पायाचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व विटांनी बांधलेले होते.
- यावर मंदिराचे पाषाणाचे स्तंभ उभे केले गेले असावेत.

- कसौटी पाषाणाचे १२ स्तंभ बाबरी ढॉंचात वापरले होते. व २ स्तंभ जवळच असलेल्या एका मकबऱ्यात वापरले आहेत. या स्तंभांवर पूर्ण कलशाचे शिल्प कोरले आहे.
- पूर्णकलश (पाण्याचा कलश व त्यामधून बाहेर येणारी पाने) हे अष्टमंगलचिन्हांपैकी एक आहे. कोणत्याही पूजेसाठी कलशाची स्थापना केली जाते. पूर्वी कुणाचे स्वागत करतांना कलश दिला जात असे. राम जेंव्हा वनवासातून परत आला तेंव्हा त्याचे स्वागत कलश देऊन केले होते असा उल्लेख रामायणात आहे. असे पूर्णकलशाचे शिल्प असलेले स्तंभ ढॉंच्यात होते.

- दोन स्तंभांवर हातात त्रिशूल घेतलेल्या द्वारपालांचे शिल्प आहे. या स्तंभांमधील अंतर व उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायांमधील अंतर एकच आहे. पाषाणाच्या स्तंभाचा पाया उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायाच्या आकारापेक्षा थोडा लहान आहे. या वरून मंदिराचे स्तंभ या पायांवरच उभे होते हे कळते.
- या स्तंभांवरील नक्षीकाम ११ व्या शतकातील कलेशी मिळते जुळते आहे हे दिसते.
- हे सर्व स्तंभ उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दिशेने काटेकोरपणे बांधले आहेत.
- या मंदिराचे मुख पूर्व दिशेला होते.
- ढॉंचाच्या मागे साधारण ४० फुट खोल असा चॅनेल आहे. हा शरयू नदीचा प्राचीन चॅनेल असावा.
१९७५ मध्ये सुरु केलेल्या पहिल्या उत्खननातून अगदी स्पष्टपणे प्राचीन राम मंदिराचे पुरावे समोर आले होते. या पुराव्यांवरून १९८० च्या दशकात रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला असता. पण काही इतिहासकारांनी समोर असलेले धडधडीत पुरावे मान्य केले नाहीत. त्यातून हा प्रश्न चिघळला आणि त्याचा शेवट १९९२ मध्ये ढॉंचा पाडण्यात झाला.
त्या नंतर २००३ मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI ला जन्मभूमी स्थानावर उत्खनन करायचे आदेश दिले. हे आदेश होते – उत्खननाच्या प्रत्येक दिवशी Babari Mashid Action Committee चा एक सदस्य आणि रामजन्मभूमी गटाचा एक सदस्य तिथे उपस्थित असायला हवा. रोज उत्खननात ज्या ज्या वस्तू मिळतील त्याची एन्ट्री एका रेजिस्टर मध्ये केली जावी. व त्यावर दोन्ही गटाच्या सदस्यांनी सही करावी. असे आदेश दिले होते.
अशा प्रकारे दुसरे उत्खनन मशिदीच्या खाली सुरु झाले. या वेळी ASI चे श्री. बी. आर. मणी यांनी उत्खनन केले. या वेळी मिळालेल्या वस्तू अशा –
- इस पूर्व दुसऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले.
- हे अवशेष घरांचे / रस्त्यांचे नसून प्रत्येक थरातील अवशेष हे एका पूजनीय स्थानाचे होते.
- गुप्तोत्तर काळात याच ठिकाणी एक गोलाकार मंदिर होते.
- अभिषेकाचे पाणी वाहून नेण्याकरता बांधलेली मकरप्रणाली येथे मिळाली. अशी वस्तू केवळ मंदिरातच असल्याने प्राचीन मंदिराचे अस्तित्व अधोरेखित झाले.
- १० व्या शतकात येथे एक मंदिर होते. मात्र ते मंदिर फार काळ टिकले नव्हते. कदाचित ते मंदिर तुर्कांनी पाडले असावे. (११ व्या शतकाच्या सुरुवातीला महंमद गझनीने सोमनाथ पाडले होते. तसेच मथुरेवर स्वारी करून तेथील मंदिरांवर हल्ला केला होता.)
- १२ व्या शतकात याच ठिकाणी पुन्हा एक भव्य मंदिर बांधले होते. (सोमनाथचे मंदिर सुद्धा वेळोवेळी पुनश्च बांधले गेले होते.)
- १२ व्या शतकातील मंदिराच्या ५० स्तंभांचा पाया मिळाला आहे.
- मंदिरांच्या शिखरावर असलेले ‘अमलक’ मिळाले आहेत. (नागर मंदिरांच्या शिखरावर अवळ्यासारखा दिसणारा चपटा गोल decorative दगड.)
- अनेक मातीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्यामध्ये मानवी आकृती आहेत. प्राण्यांच्या आकृती आहेत. या मातीच्या मूर्ती – शुंग व गुप्त काळातील आहेत. मातीच्या मूर्तीची पूजा करणे व नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करणे आजही हिंदू धर्मात पाहतोच.
- बाबरी मशिदीला पाया वेगळा खणला नव्हता. जुन्या मंदिराच्या भिंतींवर नवीन भिंती बांधल्या होत्या.
- सर्वात
महत्वाचा असा एक शिलालेख मिळाला. ५ फुट रुंद व २ फुट उंच असा मोठा शिलालेख
बाबरी मशीद पाडली त्या ढिगाऱ्यात मिळाला. बाबरी मशिदीच्या एका भिंतीत ती
शीला वापरली गेली होती, जी भिंत पडल्यावर बाहेर आली. हा लेख ‘विष्णू-हरि
लेख’ या नावाने ओळखला जातो. सुरुवातीला मार्क्सिस्ट इतिहासकारांनी “ही शीला
नव्याने कोरून इथे ठेवली आहे” असा निराधार आरोप केला. नंतर पवित्रा बदलून
“ती शीला लखनौ संग्रहालयातून चोरून आणून इथे ठेवली आहे” असा ही आरोप केला.
मात्र लखनौ संग्रहालयाने त्यांच्या कडे असलेला त्रेता-के-ठाकूर येथील
शिलालेख त्यांच्याकडेच असल्याचा निर्वाळा दिला. एकूण हा शिलेख
अग्निदिव्यातून पार पडून शुद्ध असल्याचे सिद्ध झाले. हा लेख २० ओळींचा असून
त्यावर लिहिले आहे –
- “नम: शिवाय” या मंत्राने शंकराला नमन करून लेखाची सुरुवात होते.
- गढवाल राजा गोविंदचंद्र याचा अंकित असलेल्या अनयचंद्र राजाने हे मंदिर बांधले आहे.
- विष्णू-हरिचे हे मंदिर आहे. ज्याने अप्रतिम-विक्रम केला त्या (रामा) चे हे मंदिर आहे. ज्याने दहा शीर असलेल्या राक्षसाला मारले त्याचे हे मंदिर आहे.
- या मंदिराला सोन्याचा कळस बांधला आहे.
- विष्णूच्या अवतारांची स्तुती व अनयचंद्राच्या आधीच्या राजांची प्रशस्ती व नंतरचा राजा आयुषचंद्र याची प्रशस्ती येते.

या सर्वातून निष्कर्ष असे निघतात की – बाबरी मशीद ही जुन्या मंदिरावर बांधली होती. आधीचे मंदिर, १२ व्या शतकात बांधले होते. ते मंदिर पूर्वाभिमुख होते. राम हा सूर्यवंशी देव असल्याने, त्याचे मंदिर सूर्य मंदिराप्रमाणे पूर्वमुखी असणे योग्यच आहे. कदाचित वर्षातील काही ठराविक दिवशी, उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील मूर्तीवर पडत असावित. हे मंदिर भव्य होते. त्याला उंच शिखर असून त्याला सोन्याचा कळस होता. मंदिराच्या बाजूने परिक्रमा मार्ग होता. शरयू नदीच्या काठावर हे मंदिर होते. येथे आलेले भाविक, शरयू मध्ये स्नान करून रामाच्या दर्शनाला जात असत. रामनवमी व कार्तिक पौर्णिमेला येथे मोठा उत्सव होत असे व भक्तांची गर्दी होत असे.
१२ व्या शतकातील मंदिर त्या आधीच्या १० व्या शतकातील मंदिराच्या स्थानावर उभे होते. आणि त्या आधी, या ठिकाणी, गुप्तोत्तर काळात एक गोलाकार मंदिर होते. इस पूर्व २ ऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी एक धार्मिक स्थळ होते. उत्खननातील पुराव्यांवरून निश्चितपणे हे लक्षात येते की हिंदू भाविकांनी सातत्याने या ठिकाणी रामाची पूजा केली आहे.
पाश्चिमात्य इतिहास शास्त्र असे आहे की – मौखिक परंपरेने जपलेले काव्य शेकडो लोकांनी जसेच्या तसे म्हणून दाखवले तरी त्याला ‘ऐतिहासिक’ता मिळत नाही. पण तेच जर दोन – चारशे वर्षांपूर्वीच्या कुठल्या कागदावर लिहिलेले सापडले, तर तो कागद ‘ऐतिहासिक’ दस्तावेज होतो. आणि जर तेच काव्य एक – दोन हजार वर्षांपूर्वीच्या राजाने शिळेवर कोरून ठेवलेले मिळाले, तर तो त्या काव्याच्या प्राचीनतेचा सर्वाधिक विश्वसनीय पुरावा! म्हणूनच दगडात कोरलेली कथा, शिल्प किंवा मंदिर यांना इतिहास शास्त्रात अतिशय महत्वाचे स्थान आहे. दगडात लिहिलेला लेख खोडायचा जरी प्रयत्न केला, तरी खाडाखोड दिसते. दगडातून मूर्ती कोरतांना जर चूक झाली, तर ती लपवता येत नाही. यामुळेच एखादी गोष्ट किती पक्की आहे हे सांगतांना “काळ्या दगडावरची रेघ” असे म्हटले जाते. अशा दगडातील पुराव्यामुळेच रामाला त्याची जन्मभूमी परत मिळाली. कारण … दगड कधीच खोटे बोलत नाही …
संदर्भ –
- मीनाक्षी जैन, बी बी लाल व के के मुहम्मद यांनी दिलेल्या मुलाखती.
देवानाम् पिय असोक
डियर समराट असोक,
शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष.
वळखलत ना सर, मला? म्या सोपोऱ्याचा दामू! तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न? माझी मागची पत्रे मिळाली असतीला. तुमच्या उत्तराची अमी दोघे लई दिसापासून वाट पहात हाय. पन स्वर्गात तुमी बीजी असाल असे बायडी म्हनाली. माझी. तसे पाहयलं तर तुमच्या पत्रांना आमी उत्तर दोन हजार वरसांनी उत्तर पाठीवलं. तर मग तुमी आमाच्या पत्अरालेजुन दोन महिन्यांनी उत्तर पाठीवलं तरी चालल. अमी काय रागावणार नाय. तुमी काळजी करू नगसा.
तर, आज तुमाले पत्र लीवायचं कारण असं हाय, की माझ्या बायकूने माझ्या संगट पैज लावलीया. ती माझ्या संग सारखी पैजा लावती. परत्येक येळी तीच जिंकती. या खेपेस मात्र म्याच जिंकणार असे वाटतंया. पण त्यासाठी तुमी माझ्या पत्राले उत्तर द्यायले पायजेल. स्वर्गात तेव्हढ येक रायटर शोधून मले ताबडतोप उत्तर पाठवा. अशी तुमास्नी इनंती हाय.
ते काय हाय, की तुमी तुमच्या समद्या ओपन लेटर्स मंदी लीव्हलंय की तुमी “देवानां पीय” हायसा. ते बद्दल आमच्या मनात काय बी डाउट नाय. इतकं चांगलं काम करनारा राजा, प्रजेच्या प्रश्नात लक्ष घालणारा राजा. जागोजागी दवाखाने काढनारा अन् जंगलातील प्रान्यांची सुदिक काळजी घेनारा राजा द्येवाले प्रियच असनार. असनार म्हंजी काय असनारच! नक्कीच असनार. (तुमास्नी म्हाईत नसल म्हनून सांगतो, आजकाल असे येकच वाक्य दोनदोनदा, तीनतीनदा लीव्हायची फ्याशन हाय.) तर प्रश्न तो न्हाय. प्रश्न असा हाय की तुमी कोनच्या देवाला प्रिय व्हता? तुमच्या द्येवाचे नाव काय?
म्हंजी तुमच्या काळात इंद्र देव लई पावरफुल व्हते. आनी इष्णू भगवान तर लईच पोपुलर व्हते. अन् महादेव तर समद्यामंदी ग्रेट व्हते. म्या म्हनतो, की तुमचा देव इंद्र तरी असनार नाईतर इष्णू तरी असनार. पन माझ्या बायडीला ते पटत नाय. तसे तिला माझं काईच पटत नाय. पन ते जौंद्या. माझी बायडी काय म्हन्ती? ती म्हनती की, “देवांना पीय म्हन्जी खूप देवांना पीय असलेला राजा. असा देवावानी कामे करनारा राजा येकाच देवाला का म्हनून प्रिय असल? त्यो राजा समद्या देवांना प्रिय असनार. ‘देवांना पीय’ म्हंजी समद्या तेत्तीस कोटी देवांना पीय, असा अर्थ असतोय!”
मला काय तुमच्या द्येवांमधील पोपुलारीटी बद्दल अजिबात म्हंजी अजिबात डाउट नाय. पण मले असे वाटते की तुमी येका द्येवाचे भक्त असनार. अन् म्हनून तुमी “देवांना पीय” जे लिव्हलंय ते तुमच्या देवाला आदराने लिव्हल असणार.
तर प्रश्न असा हाय की तुमचा देव कोन्चा? तुमी कोन्च्या द्येवाचा लाडके व्हता? या प्रश्नावर स्वर्गातून तेव्हढ जरा परकाश टाका. तुमी जर येक इंद्र किंवा इष्णू द्येव व्हता असे म्हनला, तर म्या पैज जिंकेन! अन् मले बायडी मुर्गा करून द्येईल. नायतर ती मले मुर्गा करून हूबं करील.
यवढी एक पैज जिंकून द्या राजं! मंग मी आयुक्षात पुन्हा कदीच कोंबड खानार नाय. द्येवाची आन घेऊन सांगतो!
तुमच्या पत्राची वाट पाहनारा,
अन् तुमच्या आदनेत ऱ्हानारा,
दामू.
सोपारा.
ता. क. – मागं आमी दोघांनी ब्रामी लीव्ह्याला अन् वाचायला शिकल्यावर तुमची पत्र वाचली व्हती न? हां, तवापासून, म्हंजी बगा आता एक वरिस झालं असल, तवापासून आमी फकस्त दोन येळा कोंबडी अन् यकदा पापलेट खाले. देवाशप्पत!
रामायण, महाभारत व वेदातील सरस्वती नदी
श्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि‘The Historic Rama – Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.
जगात अनेक ठिकाणी असे दिसून येते की कैक नद्यांचे पात्र कालौघात बदलले. कित्येक नद्या ज्या पूर्वी खूप मोठ्या होत्या त्यांच्या ठिकाणी आता लहानसा झरा सुद्धा राहिला नाही. भूशास्त्रज्ञ अशा प्राचीन नद्यांच्या वाळलेल्या पात्रांतील मातीचा अभ्यास करून जुन्या नदीची किंवा नदीच्या जुन्या प्रवाहाची माहिती शोधू शकतात. भारतात अशी लुप्त झालेली नदी म्हणजे सरस्वती. लोकस्मृती मध्ये तिचे जमिनीत गुप्त होणे लक्षात आहेच. पण त्याहून विशेष असे आहे की साहित्यातून सरस्वतीच्या त्या त्या काळातील प्रवाहाची माहिती देखील मिळते. जगातील हे एकमेव उदाहरण असेल जिथे नदीच्या भूशास्त्रीय अभ्यासाला प्राचीन काळातील साक्ष मिळाली आहे.
भूशास्त्रीय अभ्यासातील सरस्वती
विविध भूशास्त्रीय अभ्यासातून जसे की – Mary Courty 1986, Frankfort 1992, Khonde 2007, Bhadra 2009, Clift 2012, Sarkar 2016, Singh 2017, Dave 2018 आणि इतर अनेकांनी सरस्वती नदी बद्दल सातत्याने एकच सांगितले आहे –
पहिला टप्पा – सरस्वती नदी हिमालयात उंच पर्वतांमध्ये उगम पावून, दक्षिणेकडे वाहात सिंध सागराला मिळत होती. या काळात यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. या दोन मोठ्या उपनद्यांमुळे सरस्वती ही एक ‘महा’ नदी होती.
दुसरा टप्पा – कालांतराने दोन्ही उपनद्यांची दिशा बदलली. सरस्वतीला मिळणारे उपनद्यांचे पाणी कमी झाले. सरस्वतीला उंच पर्वतातील मिळणारे पाणी सुद्धा कमी होत गेले. पण त्याचवेळी पावसाचे प्रमाण वाढल्याने ते पाणी सरस्वतीला मिळू लागले व सरस्वती वाहती नदी राहिली. पण सरस्वती आता महान नदी न राहता लहान नदी झाली होती.
तिसरा टप्पा – त्या नंतरच्या काळात जसे पावसाचे प्रमाण कमी होत गेले, तसे यथावकाश नदी पूर्ण कोरडी पडली.
ऋग्वेदातील सरस्वती
श्री श्रीकांत तळेगीरी यांनी ऋग्वेदाच्या १० मंडळातील भाषेचा अभ्यास करून त्यांच्या रचनेची क्रमवारी सांगितली आहे. त्यांच्या नुसार – मंडळ ६, ३ व ७ ही सर्वात प्राचीन आहेत. त्यानंतर मंडळ ४ व २ रचले गेले. त्यानंतर मंडळ ५, ८ व ९ ची रचना करण्यात आली. आणि सगळ्यात शेवटी १० वे मंडळ रचले गेले. पहिल्या मंडळात मात्र सुरवातीपासून शेवटच्या काळापर्यंत सूक्तांची रचना करणे चालू होते.
ऋग्वेदातील सर्वात प्राचीन मंडळातील सूक्त सरस्वती नदीचे भरभरून वर्णन करतात. जसे –
अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति || २.४१.१६ ||
सर्वोत्तम माता, सर्वोत्तम नदी, सर्वोत्तम देवी सरस्वती! अशी तिची स्तुती आहे. वेदातील सरस्वती नदी ही वाणी, वाचा, शब्द, भाषा, संगीत, गायन, काव्य, वेद … एकूणच जे श्रोत्याकडून वक्त्याकडे वाहते अशा विद्येची देवता आहे. तसेच ही नदी हिमालयापासून सिंधुसागर पर्यंत वाहते असे वर्णन येते. खासच ही सूक्ते पहिल्या टप्प्यात लिहिली असणार.
ऋग्वेदाच्या १० व्या मंडळातील नदी सूक्तात (१०.७५) गंगा, यमुना, सरस्वती आदि नद्यांची नावे येतात. पण इथे सरस्वतीचा केवळ नाम्मोलेख येतो. स्तुती येत नाही. उलट सरस्वती पेक्षा अधिक महत्व सिंधू नदीला दिलेले दिसते. त्यावरून हे सूक्त नंतरच्या टप्प्यात लिहिले गेले असणार असे कळते.
ऋग्वेदातच सरस्वती नदीच्या प्रवासाची झलक दिसते. ऋग्वेदाच्या सुरुवातील असलेली ‘महा’नदी ऋग्वेदाच्या शेवटच्या काळात एक लहानशी नदी झाली आहे.
रामायणातील सरस्वती
रामायणात दशरथाच्या मृत्यूच्या वेळी भरत व शत्रुघ्न आजोळी होते. त्यांना अयोध्येतून आलेल्या दूतांकडून निरोप मिळताच ते आजोळहून म्हणजे केकय इथून अयोध्येला परत निघाले. हा परतीचा प्रवास भरताने एकसारखा ८ दिवस केला. वाल्मिकी रामायण सांगते की या प्रवासात त्याने सतलज, सरस्वती, यमुना, गंगा व गोमती नदी ओलांडली. या वर्णानातून सरस्वती नदीचे ठिकाण कळते (यमुना व सतलजच्या मध्ये). तसेच सतलज नदी पश्चिमेला वाहत होती हे देखील कळते.
महाभारतातील सरस्वती
रामायणाच्या नंतर घडलेल्या महाभारतात, सरस्वतीचे त्या नंतरचे रूप कळते. महाभारतात १०० हून अधिक ठिकाणी सरस्वतीचे उल्लेख व माहिती आली आहे. तिच्या प्रवाहात अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती झाली होती. काही ठिकाणी नदीला पुष्कळ पाणी होते. तर काही ठिकाणी ती वाळूच्या खाली अदृश्य झाली होती. विनाशन या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती असा उल्लेख येतो. तसेच कुरुक्षेत्र हे सरस्वती व दृषद्वती या नद्यांच्या मध्ये होते हे देखील सांगितले आहे. सरस्वतीच्या काठाने अनेक तीर्थक्षेत्र असून महाभारताच्या वेळी सुद्धा या तीर्थक्षेत्रांशी अनेक पौराणिक कथा जडल्या होत्या. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सरस्वतीच्या काठावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती देतात. तर लोमश ऋषी असे सांगतात की तिच्या प्रवाहात सरस्वती नदी अनेक ठिकाणी लुप्त होते व अनेक ठिकाणी प्रगट होते.
महाभारतीय युद्धाच्या दरम्यान बलराम तीर्थयात्रेला गेला होता. त्याने सरस्वती नदीच्या काठाने हा प्रवास केला. तो सांगतो – उदापना या ठिकाणी सरस्वती लुप्त झाली होती, मात्र मातीतील ओलाव्याने सरस्वतीचे तेथील अस्तित्व कळत होते. तर आणखी एका ठिकाणी सरस्वतीचे पाण्याने भरलेले मोठे पात्र पाहून आश्चर्यचकित झाल्याचे नमूद केले आहे.
सहजच कळते की महाभारताच्या आधी सरस्वती एक महान नदी होती. तिच्या भोवती अनेक पौराणिक कथा गुंफल्या गेल्या होत्या. महाभारत काळात ती काही ठिकाणी लुप्त झाली असली तरी इतर ठिकाणी वाहती नदी होती.
निष्कर्ष
भूशास्त्रीय अभ्यास नुसार – फार पूर्वी यमुना व सतलज नदी सरस्वती नदीला मिळत होत्या. इस पूर्व ४७,००० (आजपासून साधारण ५० हजार वर्षांपूर्वी) यमुना नदीचा प्रवाह पूर्वेला सरकू लागला. कालांतराने यमुना गंगेला मिळाली. तसेच १५ हजार वर्षांपूर्वी सतलज नदी सुद्धा पश्चिमेला वळून सिंधू नदीला मिळाली. सरस्वतीच्या या दोन उपनद्या तिला सोडून गेल्यावर सरस्वती ‘महा’ नदी नाही राहिली. ऋग्वेदात प्राचीन ‘महा’सरस्वती चे वर्णन आले आहे. रामायणात सतलज पश्चिमेला वळली आहे. यमुना गंगेला मिळाली आहे. आणि महाभारतात सरस्वती ठिकठिकाणी गुप्त झाली आहे. भूशास्त्रीय अभ्यास व साहित्यिक टिपणी एकत्र करून ऋग्वेद, रामायण व महाभारताच्या काळाचा अंदाज बांधता येतो.
- ७० हजार वर्षांपूर्वी – महा सरस्वती
- ५० हजार वर्षांपूर्वी – यमुना गंगेकडे वळते
- २४ हजार वर्षांपूर्वी – सरस्वती ‘लहान’ नदी होते
- १५ हजार वर्षांपूर्वी – सतलज सिंधुकडे वळते
- ४ हजार वर्षांपूर्वी – सरस्वती लुप्त होते
मी रामायण व महाभारतातील खगोलशास्त्रीय निरीक्षणांवरून काल काढला आहे. हा काल नदीच्या भूशास्त्रीय निष्कर्षांशी मिळता जुळता आहे –
- २४ हजार वर्षांपूर्वी – च्या आधी ऋग्वेदाच्या रचनेला सुरुवात.
- १४ हजार वर्षांपूर्वी – रामायण
७.५ हजार वर्षांपूर्वी – महाभारत आपण खरोखर भाग्यशाली आहोत की भारतीय संस्कृतीची खोलवर पोचलेली मुळे आपण प्राचीन साहित्यातून शोधू शकतो. प्राचीन भारतीय साहित्यातून मिळणारी माहिती केवळ नदीच्या प्रवाहाशी संबंधित नाही, तर इतरही अनेक अंगांची माहिती देते. जसे – जलविज्ञान, खगोलशास्त्र, कृषीविद्या, अनुवंशशास्त्र, भाषाशास्त्र, औषधशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान… आदि विस्तार आहे.
सूर्या सूक्त
हा लेख आहे अमी गणात्रा यांनी लिहिलेला. अमी गणात्रा यांनी अहमदाबादच्या आयआयएम मधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी ब्राझील, अमेरिका, इंग्लंड, होंगकोंग आदि देशांमध्ये काम केले आहे. त्या व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असून, योग प्रशिक्षक आहेत तसेच संस्कृत शिक्षिका पण आहेत. त्यांनी लिहिलेल्या सुंदर लेखाचा हा अनुवाद.
धर्म शास्त्राच्या ग्रंथातून “काय करावे व काय करु नये” यावर विस्ताराने लिहिले असते. पण वेदांनी यापेक्षा अगदी वेगळेच विषय हाताळले आहेत. त्यामध्ये निसर्ग, ब्रह्मांड, देवत्व, मन, जीवसृष्टी, संस्कार या सह अनेक विषय आहेत. तसेच सुखी जीवनाचा मार्ग, प्राचीन राजे आणि राज्यांच्या कथा देखील वेदांमध्ये समाविष्ट आहेत. वेदांतील सूक्त लिहिणारे ऋषी व ऋषिकांपैकी एक आहे सूर्या सावित्री. या ऋषिकेने एका सूक्तातून लग्नाची कथा सांगितली आहे. तिने लिहिलेले हे सुक्त “विवाह सूक्त” म्हणून ओळखले जाते. हे सुक्त ऋग्वेद (१०.८५) व अथर्व वेद (कांड १४) मध्ये समाविष्ट आहे. आजही या सूक्तातील श्लोक विवाहातील पाणिग्रहण सोहोळ्यात गायले जातात. ‘पाणी’ग्रहण अर्थात – वधूचा हात (पाणी) हातात घेऊन वर तिच्याकडून जन्मभरासाठी सोबत चालायचे वाचन मागतो. या सूक्तातील वर आणि वधू यांच्या एकत्र येण्यातील शुचिता आणि पावित्र्य मोहक आहे.
या सुक्ताची सुरुवात सूर्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या सोमच्या स्तुतीने होते. सूर्याला सुद्धा सोम मनोमन आवडत असतो. सूर्य-देव हा सूर्याचा पिता आहे, विवाहातील गायली जाणारी मंगल गाणी तिच्या सख्या आहेत. अश्विनी कुमारांनी तिच्या वतीने सोमाकडे सूर्याच्या लग्नाचा प्रस्ताव नेला आहे.
कन्या सासरी निघाल्यावर वडिलांचे कंठ दाटून येतो, तशी सूर्यदेवाची अवस्था झाली आहे. नवीन घरटे बांधण्यासाठी पिता तिला जड अंत:करणाने निरोप देतो. नवीन संसारासाठी तिला प्रेमाने अनेक आशीर्वाद देतो. नवीन घराची ती गृहस्वामिनी होवो अशी कामना करतो. तसेच नवीन घरात सर्वांशी आदरपूर्वक वाग, आपल्या कर्तव्यांविषयी जागरूक रहा असा उपदेश करायला तो विसरत नाही.
कॉर्पोरेट जगताप्रमाणेच प्रमाणेच, घरी सुद्धा, आदर आणि अधिकार मिळविण्यासाठी आपल्याला दिलेली भूमिका नेमेकेपणे आणि प्रभावीपणे पार पाडणे गरजेचे आहे. अधिकार हे जबाबदारी घेऊनच येतात. वधूचे वडील तिला सांगतात –
प्रेतो मुञ्चामि नामुतः सुबध्दाममुतस्करम् । यथेयममिन्द्र मीढ्वः सुपुत्रा सुभगासति॥१.१८॥ पित्याच्या प्रेमाची बंधने सैल सोडत मी तुझी पाठवणी करतो. जा मुली, नवऱ्यासोबत तुझ्या घरी प्रेमाने रहा! इंद्राच्या कृपेने तुला चांगली मुले होवोत! तुला सौभाग्य लाभो! भगदेव तुला रथाकडे घेऊन जावोत. अश्विनी कुमार तुला वराच्या घरी सोडून येवोत!
भगस्त्वेतो नयतु हस्तगृह्याश्विना त्वा प्र वहतां रथेन । गृहान् गच्छ गृहपत्नी यथासो वशिनी त्वं विदथमा वदासि ॥२०॥ सूर्या! तुझ्या पतीच्या घराची तू स्वामिनी होवोस. घरातील कर्ती स्त्री होऊन तू सर्वांशी प्रेमाने वाग, कटू बोलून कुणाचे अंत:करण दुखवू नकोस.
इह प्रियं प्रजायै ते समृध्यतामस्मिन् गृहे गार्हपत्याय जागृहि । एना पत्या तन्वं सं स्पृशस्वाथ जिर्विर्विदथमा वदासि ॥१.२१॥ अपत्यांसोबत तू आनंदी व समृद्ध जीवन जग. घरातील कर्तव्याबद्दल नेहमी जागरूक रहा. पतीशी एकरूप हो! तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो! तुमचे शब्द इतरांना प्रेरणा दायक होवोत!
आशासाना सौमनसं प्रजां सौभाग्यं रयिम् । पत्युरनुव्रता भूत्वा सं नह्यस्वामृताय कम् ॥४२॥ सम्राज्ञ्येधि श्वशुरेषु सम्राज्ञ्युत देवृषु । ननान्दुः सम्राज्ञ्येधि सम्राज्ञ्युत श्वश्र्वाः ॥१.४४॥ तुझ्यावर ज्या काही जबाबदाऱ्या पडतील त्या नीट पार पाड. नवऱ्याचा विश्वास तू संपादन कर. तुला सुख, समाधान व सौभाग्य लाभो! अमृत्त्वाच्या पथाने तुझी वाटचाल होवो. अशा प्रकारे वागल्याने तू नवीन घरातील सम्राज्ञी होशील!
हा उपदेश फक्त वधू साठी नाही, तर वरासाठी पण आहे. वराने वधूला अनुकूल असेच वागावे. ज्या प्रमाणे वधूला प्रेमाने सौजन्याने वागण्यास सांगितले आहे, तसेच वराने सुद्धा पत्नीला मान्य असेल अशा प्रकारे वागणे अपेक्षित आहे.
युवं भगं सं भरतं समृद्धमृतं वदन्तावृतोद्येषु । ब्रह्मणस्पते पतिमस्यै रोचय चारु संभलो वदतु वाचमेताम् ॥ १.३१॥ तुम्ही दोघेही मृदूभाषी व्हा! चांगले वागा! तुम्हाला भरपूर समृद्धी प्राप्त होवो! हे बृहस्पती! हा नवरा वधूशी प्रेमाने वागणारा व गोड बोलणारा होवो! तो तिच्याशी सहमत असणारा होवो!
जीवं रुदन्ति वि नयन्त्यध्वरं दीर्घामनु प्रसितिं दीध्युर्नरः । वामं पितृभ्यो य इदं समीरिरे मयः पतिभ्यो जनये परिष्वजे ॥१.४६॥) जे पती आपल्या पत्नीची काळजी घेतात, त्यांना धार्मिक कार्यात स्वत:बरोबर सामील करून घेतात, मुलांनी समृद्ध करतात, त्यांच्या बायका देखील त्यांना अनुकूल होतात.
आता वराने आपले विचार प्रदर्शित करण्याची वेळ येते. नवऱ्याची भूमिका तो उत्तम प्रकारे व उत्साहाने पार पाडेल असे वचन देतो. पाणीग्रहण सोहोळ्याच्या वेळी, वर म्हणतो –
येनाग्निरस्या भूम्या हस्तं जग्राह दक्षिणम् । तेन गृह्णामि ते हस्तं मा व्यथिष्ठा मया सह प्रजया च धनेन च ॥१.४८॥ अग्नीने ज्या धर्माच्या सहाय्याने पृथ्वीचा हात हातात धरला होता, तसे मी तुझा हात माझ्या हातात घेतो. माझ्या सोबत उभी रहा. आपण दोघे मिळून आपले घर उभे करूया.
गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं मया पत्या जरदष्टिर्थासः। भगो अर्यमा सविता पुरंधिर्मह्यं त्वादुर्गार्हपत्याय देवाः ॥१.५०|| माझ्या सौभाग्याने मी तुझा हात धरला आहे! मला आयुष्यभर साथ दे! मी गृहस्थ धर्माची कर्तव्ये पार पाडावीत म्हणून देवाने मला तुझी साथ दिली, हे माझ्ये भाग्य आहे!
ममेयमस्तु पोष्या मह्यं त्वादाद्बृहस्पतिः । मया पत्या प्रजावति सं जीव शरदः शतम् ॥१५२॥ त्वष्टा वासो व्यदधाच्छुभे कं बृहस्पतेः प्रशिषा कवीनाम् । तेनेमां नारीं सविता भगश्च सूर्यामिव परि धत्तां प्रजया ॥१.५३॥ तू आणि मी मिळून अर्थ (आरोग्य व धनसंपदा) मिळवू. बृहस्पतीने माझ्यावर कृपा केली आहे की मला तू जोडीदार मिळालीस. आपल्यला चांगली मुले होवोत. तू व मी मिळून शंभर शरद ऋतू पाहू! सर्व देवता माझ्या वधूचे मंगल करोत!
अमोऽहमस्मि सा त्वं सामाहमस्म्यृक्त्वं द्यौरहं पृथिवी त्वम् । ताविह सं भवाव प्रजामा जनयावहै ॥२.७१॥ मी पुरुष तत्व तर तू प्रकृती आहेस! मी सामवेद तर तू ऋग्वेद आहेस! मी आकाश आणि तू माझी पृथ्वी आहेस! तू शब्द तर मी गीत आहे! आपण दोघे एकत्र येऊन सृजन करू.
सं पितरावृत्विये सृजेथां माता पिता च रेतसो भवाथः । मर्य इव योषामधि रोहयैनां प्रजां कृण्वाथामिह पुष्यतं रयिम् ॥२.३७॥) तुम्ही दोघे योग्य वेळी एकत्र या. ज्या योगे तुम्ही एका नवीन अंकुराचे माता-पिता व्हाल. तुम्हा दोघांना उत्तम संतती लाभो! तुमचा उत्कर्ष होवो!
भारतीय दृष्टीने स्त्री पुरुषाचे मिलन एक पवित्र व शुद्ध कार्य मानले आहे. उत्तम संतती तयार करणे हे धर्मकार्य मानले आहे. वधू वराचे मिलन हे पुरुष व प्रकृती, शिव व शक्ती यांच्या मिलनाप्रमाणे दैवी आहे. आपल्या अध्यात्मिक देवता पण पहा, सीता-राम, विष्णू-लक्ष्मी, शंकर-पार्वती अशा जोडीनेच येतात. स्त्री व पुरुष दोघेही या मिलनाचे समान भागीदार आहेत. त्यांची भूमिका भिन्न असली तरी अधिकार किंवा जबाबदारी समान आहे.
इहेमाविन्द्र सं नुद चक्रवाकेव दंपती । प्रजयैनौ स्वस्तकौ विश्वमायुर्व्यश्नुताम् ॥२.६४॥ हे इंद्र देवा! या दोघांना विवाह बंधनात बांध! मग ते चक्रवाक पक्ष्यांप्रमाणे सदैव सोबत राहतील. त्यांना आनंदाने सुखा समाधानाने जगू दे!
काळानुरूप पद्धती बदलतात आणि बदलत राहतील. पण वैदिक साहित्यातील ही विवाह गाथा व त्यामधील वधू वरच्या आणाभाका निश्चित मौल्यवान आहेत. त्या आणाभाका शाश्वत असल्यामुळेच अजूनही वापरत आहेत!
श॒तहि॑माः ऋग्वेदातील शीतल काळाची आठवण
रूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत. त्यांच्या अभ्यासाचा विषय भारतीय साहित्यातील खगोलशास्त्रीय माहिती व त्यावरून त्यातील घटनांच्या काळाचा तर्क लावणे असा आहे. त्यांच्या लेखाचा हा अनुवाद …
वेद म्हणजे असंख्य, अगणित, अमित आणि अमुल्य माहितीचा खजिना आहे. ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ शोधताना आपल्याला अजून कदाचित फक्त वरवरची माहिती कळली असेल. त्या मधून आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, परंतु तरीही ऋग्वेद हे प्राचीन काळातील भौतिक माहितीचे सुद्धा उगमस्थान आहे यात शंका नाही. ऋग्वेदातील माहिती शुद्ध स्वरूपात जतन केली गेली आहे त्यामुळे तिला अधिकच महत्व प्राप्त होते. या लेखातून, ऋग्वेदात कोणती संभाव्य माहिती असू शकते याचा अंदाज येईल.
मी इथे विषय घेत आहे – श॒तहि॑माः अर्थात “शंभर वर्षांचा हिम किंवा शंभर वर्षांचे बर्फाळ वातावरण”. ऋग्वेदातील अशा प्रकारच्या माहितीला इतिहास किंवा विज्ञानाच्या अभ्यासात योग्य स्थान मिळणार नाही. पण मंत्रांमधून आपल्याला वैदिक लोकांनी थंड वातावरणाचा असामान्य (नेहेमीपेक्षा वेगळा) अनुभव घेतला होता याची साक्ष मिळते.
ऋग्वेदाच्या ६ व्या मंडळातील ७ ऋचांचे शेवटचे चरण “श॒तहि॑माः सु॒वीरा॑: ॥” असे आहे. ऋग्वेदाचे ६ वे मंडळ भारद्वाज कुळातील ऋषींचे आहे. आणि “श॒तहि॑माः” मंत्र अग्नी किंवा इंद्राला उद्देशून रचले आहेत.
| मंत्र | देवता | ऋषी | छंद |
| ऋग्वेद ६.४.८ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | पङ्क्तिः |
| ऋग्वेद ६.१०.७ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | प्राजापत्याबृहती |
| ऋग्वेद ६.१२.६ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | निचृत्पङ्क्ति |
| ऋग्वेद ६.१३.६ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | निचृत्त्रिष्टुप् |
| ऋग्वेद ६.१७.१५ | इन्द्र: | भरद्वाजो बार्हस्पत्यः | आर्च्युष्णिक् |
| ऋग्वेद ६.२४.१० | इन्द्र: | भरद्वाजो बार्हस्पत्यः | विराट्त्रिष्टुप् |
“छन्दांसि छादनात्” अर्थात “मंत्रांच्या अर्थाला आच्छादतो तो छंद” असे म्हटले आहे. वैदिक छंदांमध्ये पङ्क्तिः छंद हा हैमंती अर्थात थंडीशी जोडलेला आहे (यजुर्वेद १३/५४-५८). “पङ्क्तिः स्वर: पंचमः” अर्थात पाचवा ऋतू पङ्क्तिः छंदाचा आहे असे म्हटले आहे. आपल्याला असेही दिसते की निचृत्पङ्क्ति हा सदोष पङ्क्तिः छंद देखील वापरला आहे. त्या अर्थी हिवाळ्याच्या शेवटी त्याचे पठण केले जात असावे. ऋतू प्रमाणे छंदांच्या गायनाची पद्धत काळाच्या ओघात कदाचित नष्ट झाले असेल. त्याच प्रमाणे त्रिष्टुभ छंद ग्रैष्मी मनाला आहे. हा छंद ग्रीष्म ऋतूसाठी किंवा उन्हाळ्याशी संबंधित आहे. आर्च्युष्णिक् छंद उष्णीसाठी म्हणजेच उष्णतेशी संबंधित आहे. आणि प्राजापत्याबृहती छंद प्रजापती आणि वर्षाशी संबंधित आहे.
आपल्याला माहितच आहे की ऋग्वेदात अग्नि आणि इंद्र वर्षाचे चक्र चालवणारे मुख्य प्रसारक आहेत. प्रत्येक मंडळात आधी अग्नीचे सुक्त येते त्यानंतर इंद्राचे सुक्त येते. तरीही इंद्राची – जवळपास २५० सुक्त व अग्नीची २०० सुक्त मिळतात. यावरून असे वाटते की वैदिक लोकांसाठी इंद्राची शक्ती अग्नीच्या शक्ती पेक्षा अधिक महत्वाची होती. थंडी मध्ये अग्नी आणि उन्हाळ्यानंतर पाऊस आणणारा इंद्र असे हे देव होत. त्या मध्ये पावसाचा देव कदाचित अधिक महत्वाचा होता का?
ऋग्वेदात अनेक देवता आहेत – आदित्य (सूर्य), सोम (चंद्र), अग्नी, इंद्र (पाऊस), वायू (पावसाचे वारे), वरुण (पाणी), पृथ्वी, सरस्वती (नदी), अरण्यानी (अरण्य) इत्यादी. पण या मध्ये ‘हिम’ देव मात्र नाही. का नसेल बरे?
यात काही शंका नाही की भारद्वाज कुळातील ऋषी अनेक वर्षांपासून हवामानातील संक्रमणाकडे लक्ष देत होते. “श॒तहि॑माः सु॒वीरा॑:” या वाक्यांमधून हे अगदी सहज समजते. लवकरच हिमवृष्टीची परिस्थिती बदलणार होती. तिचे रूपांतरण होणार होते – ऋग्वेदातील ६.६१ मध्ये वर्णन केलेल्या वृत्रासुरात. या वृत्रासुराने पाणी अडवून ठेवले होते. मग इंद्राने वृत्रासुराचा अंत करून पाण्याचे प्रवाह मोकळे केले. इंद्राच्या पराक्रमाने कदाचित पर्वताच्या गुहांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागले असतील. किंवा इंद्राने ढगांमध्ये साठलेल्या पाण्याची सुटका केली असेल.
शंभर वर्षाची बर्फाळ परिस्थिती मधून लवकरच इंद्र-वृत्र कथेचा जन्म होणार होता. ऋग्वेदाच्या ६.६१ सूक्तात वृत्र व इंद्राचे युद्ध सांगितले आहे. ऋग्वेदातील नंतरच्या अनेक इंद्र सूक्तात इंद्र-वृत्र उपाख्यान येते.
आता आपल्याला दिसते की वर्षाच्या सर्वात मोठ्या दिवसानंतर, पावसाला सुरुवात होते. तसेच एलजीएम काळापूर्वी पावसाचे प्रमाण आजच्या निम्मे होते. मानवी स्वभाव असा आहे की जे कमी असते त्या गोष्टींचे खूप अप्रूप वाटते. त्यामुळे या काळात – हिम मुबलक प्रमाणात होते आणि पाउस कमी प्रमाणात. म्हणून पाऊस, पर्जन्य, इंद्र यांची स्तुती केली गेली असावी. आणि त्याच कारणाने हिमाला देवत्व मिळाले नसावे. ऋग्वेदातला वर्णन केलेला हा वातावरणातील परिवर्तनाचा काळ late Pleistocene मध्ये जाऊ शकतो.
श्री. श्रीकांत तळेगीरी यांच्या संशोधनानुसार ६वे मंडळ सर्वात जुने आहे. माझ्या मते अगस्तींची जन्म कथा ही ऋग्वेदातील सर्वात जुनी आठवण असावी. पण ईथे ६वे मंडळ सर्वात जुने असे धरून चालू. तर ६व्या मंडळाचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की त्यामध्ये सिंहाचा उल्लेख अजिबात नाही. दुसऱ्या एका अभ्यासातून कळते की सिंह हा प्राणी late Pleistocene काळात भारतभर होता, त्या आधी नाही. त्या वरून सुद्धा ६वे मंडळ १२०,००० वर्षांपूर्वी रचले गेले असावे असे म्हणू शकतो. त्या मधूनच ऋग्वेद रचनेच्या सुरवातीचा काळ इतक्या मागे जाऊ शकतो.
भारतीय भौतिकशास्त्र
पद्मश्री सुभाष काक हे वैज्ञानिक असून Oklahoma State University–Stillwater येथे संगणक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांनी विज्ञान, गणित, खगोलशास्त्र यांच्या इतिहासावर शोधनिबंध लिहिले आहेत. Archaeoastronomy – The Astronomical Code of the Rigveda व In Search of the Cradle of Civilization ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांचे हिंदी कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. आज त्यांनी लिहिलेल्या वैशेषिक सूत्रांची ओळख करून देणाऱ्या लेखाचा अनुवाद.
विविध क्षेत्रांमध्ये विशेषत: साहित्य, नाटक, इतिहास, गणित, विज्ञान, तत्वज्ञान आणि कला या क्षेत्रात ग्रीसने जागतिक संस्कृतीवर खोलवर परिणाम केला आहे. परंतु येथे मी फक्त भौतिकशास्त्राविषयी बोलू इच्छितो, जिथे दुर्दैवाने ग्रीस चुकले. यातील अग्रगण्य व्यक्ती म्हणजे अरिस्टॉटल (ईसापूर्व ३८४ – ३२२). त्याने पहिल्यांदा “Physics” हा शब्द वापरला. त्यांनी गतीच्या व्याख्या सांगितली व कारण मीमांसा न सांगता चार प्रकारच्या बदलांची उदाहरणे दिली ती होती – पदार्थात, गुणवत्तेत, प्रमाणात किंवा ठिकाणात बदल.
पाश्चात्य आणि इस्लामिक जगात अरिस्टॉटल जवळजवळ २,००० वर्षे अत्यंत प्रभावशाली होता. ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांतील रूढीवाद्यांनी त्याला स्वीकारले होते. त्याच्या विचारांचा पाश्चात्य विज्ञानावर खोलवर परिणाम झाला होता. अरिस्टॉटलच्या मते, सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे एकेका पारदर्शक गोलात बसवलेले असून ते पारदर्शक गोल त्यातील ग्रह अथवा ताऱ्यासह पृथ्वी भोवती ठराविक अंतरावरून ठराविक वेगाने फिरतात. आकाशातील सर्व ग्रह – तारे हे ‘इथर’ पासून तयार झाले असून, हे इथर त्यांना समान गतीने फिरण्यास सहाय्यक ठरते.
त्याने पार्थिव वस्तू चार घटकांपासून तयार झाल्या असे प्रतिपादित केले. पृथ्वी (सर्वात वजनदार घटक) आणि पाणी हे दोन्ही खाली ओढले जातात व म्हणून ते विश्वाच्या मध्यभागी असतात. अर्थात म्हणून पृथ्वी आणि समुद्र हे घटक विश्वाच्या मध्यभागी असलेला आपला ग्रह आहे. हवा आणि अग्नी हे घटक हलके असल्याने ते वरती उफाळतात.
ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर, युरोप त्याच्या मूर्तिपूजक व निसर्गपूजक भूतकाळापासून वेगळा झाला. सहजच सर्व ग्रीक ज्ञान ते गमावून बसले. काही ठिकाणी युरोपियन लोकांनी ते समजून न घेता केवळ भाषांतरित करून ठेवले. मध्य युगात अरबांनी प्राचीन ग्रीक व लटिन भाषेतील ग्रंथांचा अभ्यास करून त्यांचे अरेबिक मध्ये भाषांतर करून ठेवले. आणि बाराव्या शतकात, म्हणजे लिहून झाल्यावर जवळजवळ दीड हजार वर्षांनी, अरिस्टॉल्सचे Physica and De Caelo (On the Heavens) पुस्तक अरबी भाषेतून लॅटिनमध्ये भाषांतर केले गेले. त्यावर ते युरोप मध्ये अभ्यासले गेले.
इसविसन १६०० मध्ये, जिओर्दानो ब्रुनो (Giordano Bruno) पृथ्वी भोवती सर्व विश्व फिरते, या भू-मध्यवर्ती मॉडेलच्या विरोधी मत मांडले. चर्चला मान्य असलेल्या मतापेक्षा विरोधी मत मांडल्याने त्याला पाखंडी ठरवून चर्चने त्याला मृत्यूदंड दिला. पुढे गॅलीलियोने पण सूर्य-मध्यवर्ती सांगणारे मॉडेल प्रतिपादित केले. तेंव्हा चर्चने त्याच्यावर पण खटला चालवला. या पायी गॅलीलियोवर ‘असली’ पुस्तके न लिहिणे, चर्चला मान्य नसलेले कुणाला न शिकवणे अशी बंदी घालण्यात आली. तसेच त्याला उर्वरित आयुष्य नजरकैदेत घालवावे लागले.
भौतिकशास्त्रात उल्लेखनीय काम करणारे इतरही ग्रीक शास्त्रज्ञ होते, जसे आर्किमिडीज (ईसापूर्व २८७ – २१२). त्याने भूमितीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले पण त्याचे भौतिकशास्त्र वस्तूंच्या गती बद्दल काही बोलत नाही.
कणादचे भौतिकशास्त्र
आता आपण उलूकपुत्र कणाद या प्राचीन भारतीय भौतिकशास्त्रज्ञाचे काम पाहू. त्याने वस्तूंच्या गती संबंधी नियमांचे आडाखे बांधले होते. तसेच त्याने एक प्रणाली (formal system) तयार केली ज्यात अवकाश, काळ, पदार्थ आणि निरीक्षक या सर्वांचा समावेश केला आहे. कणाद यांनी ही सर्व माहिती सूत्र रूपाने ‘वैशेषिक सूत्र’ या ग्रंथातून लिहिली. हा काल इ.स.पू. ६०० च्या आसपासचा असावा असे मानले जाते.
वैशेषिक सूत्र हे मुख्याकारून तत्त्ववेत्तांनी अभ्यासले आहेत. पण भौतिकशास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी Matter and Mind: The Vaiśeṣika Sūtra of Kaṇāda या माझ्या पुस्तकातून मी वैज्ञानिक दृष्टीने वैशेषिक सूत्रांचा विषय मांडला. भौतिकशास्त्रात उल्लेखनीय असे एक सूत्र कणाद सांगतो – जे जे काही जाणण्यासारखे आहे, ते ते गतिमान आहे.
संदर्भासाठी, म्हणून आपण न्यूटनचे तीन नियम पाहू: १. कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर कोणतीही वस्तू स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते. २. बल = वस्तुमान x त्वरण. ३. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
न्यूटनने अवकाश आणि काळ निरपेक्ष मानले. कणादांनी दिलेली सूत्रे अधिक उत्तम आहेत कारण त्यामध्ये गृहितके कमी आहेत. कणादाच्या वैशेषिक सूत्रात १० अध्याय असून एकूण ३७० सूत्र आहे. प्रत्येक अध्यायात दोन विभाग आहेत. यामधून कणादाने वस्तूंचे कर्म, कार्य, पदार्थ, त्याचे गुण, कशापासून तयार झाले आहे या गोष्टींचा उहापोह केला आहे. इथे न्यूटनच्या नियमांसारख्या कणादाने दिलेली गतीची काही सूत्रे पाहू –
१. संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् ॥५।१।७॥ संयोगाच्या अनुपस्थितीत, गुरुत्व [वस्तूंना] खाली पाडण्यास कारणीभूत ठरते.
२अ. नोदनविशेषाभावान्नोर्ध्वं न तिर्य्यग्गमनम् ॥५।१।८॥ बाह्य बल नसल्यास कोणत्याही प्रकारची गती (वर उसळणे किंवा आजूबाजूला हालचाल करणे) होऊ शकत नाही.
२ब. नोदनादाद्यमिषोः कर्म तत्कर्मकारिताच्च संस्कारादुत्तरं तथोत्तरमुत्तरञच् ॥५।१।१७॥ [धनुष्यावर] आधी दिलेला ताणाचे परिवर्तन बाणाच्या गतीमध्ये होते; त्या गतीमधून चालना (momentum) मिळते; त्यामुळे बाण पुढे जातो; आणि या पद्धतीने तसाच पुढे पुढे जात राहतो.
३. कार्य्यविरोधि कर्म ॥१।१।१४॥ क्रियेला (action) विरोधी कर्म (reaction) घडते.
वैशेषिक मतानुसार –कोणतीही वस्तू दृश्य असो किंवा अणु सारखी अदृश्य, ती ६ पदार्थांनी युक्त असते असे कणाद सांगतो. ते पदार्थ आहेत – द्रव्य, गुण, कर्म (गती, हालचाल), सामान्य (general), विशेष (वेगळेपण) आणि समवाय (inherited). या सहा पैकी एक (द्रव्य) हे त्या वस्तूशी संबंधित आहे. तर इतर ५ पाहणाऱ्याशी सुद्धा संबंधित आहेत. म्हणून या पद्धतीत निरीक्षक हा अविभाज्य भाग होतो. जर विश्वामध्ये संवेदशील प्राणी नसते तर उर्वरित श्रेणींची आवश्यकता नसली असती.
पुढे कणाद ९ प्रकारचे गुण सांगतो – आकाश, दिक्, काळ; चार प्रकारचे अणु – पृथ्वी, जल, तेजस, वायू; आत्मा आणि मन. त्यामध्ये कणाद चार प्रकारचे अणु सांगतो – पृथ्वी (P), आप(Ap), तेज (T) आणि वायू (V). चारच प्रकारचे का? तर उदाहरण म्हणून सोने घेऊ. सोन्याच्या घन स्वरूपात त्याचा विचार करा, सोन्याचा आकार व वजन (mass) P अणूंच्या कडून येते. गरम केल्यावर सोने वितळते. म्हणूनच सोन्यात आधीपासून द्रव रूप धारण करण्यासाठी Ap प्रकारचा अणु असणार. आणखी गरम केले असते ते पेटते, तेंव्हा त्यामध्ये T प्रकारचे अणु प्रकट होतात. तसेच अजून गरम केले असता V प्रकारचे अणु वायुरूपाने निघून जातात.
अणूंचे शाश्वतपण केवळ सामान्य परिस्थितीत दिसते. सृष्टिच्या उत्पत्ती आणि नाशाच्या दरम्यान ही प्रक्रिया – V –> T –> Ap –> P अशी उलट अथवा सुलट होते. आकाशापासून सुरु होऊन परत आकाशात विलीन होऊ शकते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की P, Ap यांना अधिक mass असते. तर V, T मध्ये अधिक energy असते. आणि हे एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात. इथे भौतिकशास्त्रातून रसायनशास्त्राच्या उदयाची पूर्वस्थिती दिसते.
कणादची वैशेषिक सूत्रे भारतीय भौतिकशास्त्रच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या आधुनिक विज्ञानाच्या उदयावर परिणाम केला. इतिहासाच्या आणि भौतिकशास्त्रच्या पुस्तकांतून एक तळटीप म्हणून ‘कणादांनी अणूची कल्पना मांडली’ असे एका ओळीत आटपले असते. आज शाळांमधून, कॉलेज मधून कणादच्या वैशेषिक सूत्रांतून प्रतिपादित केलेले भौतिकशास्त्र शिकवणे आवश्यक आहे.
शूर्पणखा – दंडकारण्याची स्वामिनी की नरभक्षक राक्षसी?
डॉ. मंजुश्री गोखले यांनी मटा मध्ये ‘रामायणातील दुर्लक्षित नायिका’ म्हणून लेखमाला लिहिली. त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याचे खंडन करणारा हा लेख. त्यांच्या लेखातील सर्व मुद्दे येथे घेतले नाहीत, थोडे घेतले आहेत.
डॉ. गोखले लिहितात – “शुर्पणखा ही दंडकारण्याची स्वामिनी होती. दंडकारण्य रावणाच्या मालकीचे होते.रावणाच्या राज्यात होते.”
“स्वामिनी” म्हणजे काय? “स्वामी”चे कर्तव्य काय? कुणाला राजा म्हणायचे? तर, वाल्मिकी रामायणातच चित्रकुट येथे भेटायला आलेल्या भरताला राम विचारतो – राज्यातील जनतेचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तू प्रजेचे रक्षण करत आहेस न? राज्यातील स्त्रियांना सुरक्षा देत आहेस न? तुझ्या राज्यातील कृषी करणारे, पशुपालन करणारे, वेदाभ्यास करणारे आणि प्राण्यांचे सुद्धा रक्षण तू करत आहेस न?
“स्वामिनी” म्हणून हीच कर्तव्य ओघाने शुर्पणखेकडे येतात. यातील कोणते कर्तव्य शूर्पणखा पार पाडले ते पुढे पाहू.
डॉ गोखले लिहितात – “राम-लक्ष्मण दंडकारण्यात रावणाची परवानगी न घेता आले. शुर्पणखेला सुद्धा त्यांनी परवानगी विचारली नाही.”
“परवानगी न घेता” म्हणजे? रावणाने दंडकारण्याला लंकेप्रमाणे तटबंदी केली होती का? की प्रत्येक द्वारावर त्याने आत जाण्याचे परवाने देण्यासाठी सुविधा केंद्र उघडले होते?
आपल्या राज्यातून घालवून दिला गेलेला राम एक आश्रित म्हणून, एक refugee म्हणून दंडकारण्यात आला होता. तिथे राहणाऱ्या ऋषींनी रामाला विनंती केली की येथील नरभक्षक राक्षसांपासून आमचे संरक्षण कर. शूर्पणखा तेथील ‘स्वामिनी’ असून सुद्धा त्या ऋषीमुनींना रामाकडे का धाव घ्यावी लागली? शूर्पणखा जर स्वामिनी होती, तर तिने तिच्या वनात ऋषी सुरक्षित का नव्हते? आपल्या वनात आलेल्या तीन लोकांना तिने आश्रय का दिला नाही? तिच्याकडे दोन सेनापती बंधू होते, त्यांचे मोठे सैन्य होते, असे असतांना तिने या पर्णकुटीत राहणाऱ्या तीन मामुली लोकांना “मी तुमचे रक्षण करीन तुम्ही तुमचा वनवास संपेपर्यंत खुशाल इथे रहा!” असे आश्वासन का दिले नाही? [वर दिलेली स्वामीची कर्तव्ये पहाणे.]
उलट तिने या निराधार लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. तिने आधी रामाला आणि त्याने नाही म्हटल्यावर मग लक्ष्मणाला लग्नाची मागणी घातली. दोघांनी नकार दिल्यावर ती सीतेच्या जीवावर उठली तेंव्हा लक्ष्मणाने तिचे नाक-कान कापले. तिला नकार पचवता आला नाही म्हणून खर व दूषणला सैन्यासह तिने रामावर हल्ला करण्यास पाठवले. हेच जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला केले असते तर डॉ. गोखलेंनी निराधार अबलेवर हल्ला करणाऱ्या व एका स्त्रीचा नकार पचवू न शकणाऱ्या पुरुषाची बाजू घेतली असती का? नकार देण्याचा अधिकार फक्त स्त्रीला असतो का? पुरुषाला नकाराधिकार नाही का?
डॉ. गोखले म्हणतात – “रावणासारखा बंधू नाही. प्रत्येक स्त्रीला आपल्याला रावणासारखा भाऊ असावा असे वाटते. रावण हा बहिणींसाठी आदर्श बंधू होता.”
रावणासारखा भाऊ हवा असेल तर शूर्पणखेसारखी बहिण होण्याची तयारी आहे का? वाल्मिकी रामायणातून कळते ती शूर्पणखा अशी आहे – सुपासारखी नखे असलेली, ढेरपोटी व बेडकासारखे वटारलेले डोळे असलेली. तिला आपले प्रेम धड कुणावर आहे ते कळत नाही. क्षणात रामावर तर क्षणात लक्ष्मणावर ती भाळते. तिला कोणीही नवरा म्हणून चालणार आहे. रामाचा नकार पचवू न शकल्याने ती सीतेला खायला निघते. लक्ष्मणाला सुद्धा खाऊन टाकीन म्हणते. अशी ती नरभक्षक राक्षसी आहे. रामाने लग्नाला नकार दिल्यावर ती आपल्या बंधूंना सैन्य घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यास सांगते. ते प्रयत्न निष्फळ झाल्यावर ती रावणाकडे जाऊन तक्रार सांगते. पण रावणाला काही तिचे नाक-कान कापल्याचा सूड घ्यावा असे वाटत नाही. तेंव्हा ती रावणाला सांगते –“अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. जा तिला बळजबरीने पळवून आण. तिच्याशी तिची इच्छा असो नसो, लग्न कर.”
जी स्त्री आपल्या भावाला दुष्कर्म करायला सांगते, जी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अन्याय घडवून आणते, जी स्त्री नकार देणाऱ्या पुरुषाला जीवे मारायला उठते, जी स्त्री भावाच्या नाशाला कारण होते, जी स्त्री राज्याच्या नाशास कारण होते, जी स्त्री क्षणात एकाशी तर क्षणात दुसऱ्याशी लगट करू शकते … अशाच स्त्रीला रावण हा भाऊ म्हणून शोभतो. जर कुणाला रावणासारखा भाऊ असावा असे वाटत असेल, तर आधी शुर्पणखेसारखे व्हावे लागेल. शेजारणीने तिच्या ‘रावणासारख्या’ भावाकडे तुमच्या नवऱ्याची काही खरी-खोटी तक्रार केली, तर त्याचा बदला म्हणून त्याने जर तुम्हाला त्रास दिला तर चालणार आहे का? शेजारणीच्या रावणासारख्या भावाचे कौतुक कराल का?
आणि एक लक्षात घ्यायला हवे, रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे. तर केवळ स्वत:ला सुंदर बायको मिळवण्यासाठी.
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा – रावणाने शूर्पणखेच्या नवऱ्याला विद्युत जिह्वाला मारले होते. दंडकारण्यात विनाकारण फिरणारी, परपुरुषावर आसक्त होणारी, दुसऱ्या स्त्रीचा नवरा बळजबरीने घेऊ पाहणारी शूर्पणखा – नवऱ्याला मारल्यामुळे असे वागत होती का? खरच का रावण फार चांगला बंधू होता? बहिणीची काळजी वाहणारा?
बंधू म्हणून तो भावांशी कसे वागला हे देखील पाहण्यासारखे आहे – मोठ्या भावाकडून त्याने लंकेचे राज्य काबीज केले व त्याला लंकेतून घालवून टाकले. धाकट्या भावाला विभिषणाला राज्यातून हकलून लावले. आणि तिसऱ्या भावाला, कुंभकर्णाला मृत्युच्या खाईत लोटले. एकूण तो ना बहिणीचा ना भावांचा “आदर्श बंधू” शोभला.
डॉ. गोखले पुढे लिहितात – “लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान विश्रावाने रावणाला दिले.”
हे त्या कशाच्या आधारावर लिहितात काही कळत नाही. कारण स्वत: रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –
मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः || ३-४८-५
मी माझ्या मोठ्या भावाला सळो की पळो करून सोडले. त्याच्या कडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असे पराक्रम करणारा मी शक्तिशाली दशानन आहे!
एकीकडे रामाने स्वत:ला मिळालेले राज्य धाकट्या भावाला सहज देऊन टाकले. तर दुसरीकडे रावणाने मोठ्या भावाचे राज्य त्याच्याकडून ओरबाडून घेतले. पण तरीही रावण “चांगला भाऊ” होता हे कसे काय लिहू शकतात?
डॉ गोखले म्हणतात – “वाल्मिकींनी उर्मिलेकडे दुर्लक्ष केले. लक्षमणाने तिला आपल्या सोबत अरण्यात का नेले नाही? किंवा लक्ष्मणाने रामाबरोबर वनवासात न जाता, उर्मिलेबरोबर अयोध्येत राहून तिला पतीसेवेची संधी का दिली नाही?”
एक नक्की ठरवले पाहिजे – वाल्मिकींना दोष द्यायचा आहे की लक्ष्मणाला? वाल्मिकींना दोष दिला तर लक्ष्मण ही त्यांनी तयार केलेली व्यक्तिरेखा आहे. ती व्यक्तीरेखा लेखक चालवेल तशी चालणार. आणि लक्ष्मण जर स्वत:च्या मर्जीने वागत असेल, तर तिथे वाल्मिकींना दोष देता येणार नाही, कारण त्यांनी जे घडलंय ते लिहिले आहे. एकाच वेळी दोघांना दोष देता येत नाही.
दुसरी गोष्ट अशी, की सीता हट्टाने रामाच्या मागोमाग वनवासात गेली. उर्मिलेने तसे केले नाही. तिने जर वनवासातील त्रासापेक्षा राजगृहातील सुख तिने निवडले असेल तर? देऊ की तिला पण सुखाने राजवाड्यात राहण्याचे स्वातंत्र्य!
डॉ. गोखले लिहितात -“रामकथा ही केवळ रामाची कथा आहे. सीतेची कथा नाही.”
रामायणातील बालकांडात वाल्मिकी म्हणतात –
काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् | पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः || १-४-७
या काव्याचे नाव – रामायण किंवा सीताचरीत्र किंवा रावणवध असे आहे.
अर्थात रामायण ही कथा जितकी रामाची आहे तितकीच ती सीतेची पण कथा आहे असे वाल्मिकी स्वत: म्हणत असतांना डॉ. गोखलेंच्या मताला काय अर्थ आहे?
डॉ गोखले म्हणतात – उर्मिला, शूर्पणखा वगैरे दुर्लक्षित नायिका आहेत.
रामाच्या आणि सीतेच्या कथेत प्रत्येक पात्र कसे काय तितक्याच महत्वाचे असेल? राम-सीतेच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या, त्या घटनांमध्ये ज्या व्यक्ती आल्या त्यांचाच आणि तितकाच उल्लेख रामायणात येणार. उर्मिलेची भूमिका जर छोटी असेल, तर तिचा उल्लेख तितकाच येणार. हे म्हणजे कोणत्याही चित्रपटात सगळेच नायक व नायिका असाव्यात, चरित्र अभिनेते असूच नयेत असे म्हणण्यासारखे आहे.
दुसऱ्या एका लेखात डॉ गोखले लिहितात – “रामाला पराक्रमी दाखवण्यासाठी राक्षसवध आले. देखणं दाखवण्यासाठी स्वयंवर आले. नायक दाखवण्यासाठी खलनायक हवा म्हणून रावण आला. रावणाशी संबध यायला हवा म्हणून त्याच्याकडून सीताहरण करवले…”
उद्या सिंड्रेलाची गोष्ट वाचून – “सिंड्रेला दु:खी दाखवायची म्हणून तिला त्रास देणारी, तिचा छळ करणारी सावत्र आई आली. तो त्रास कमी पडेल म्हणून एक सोडून दोन सावत्र बहिणी आल्या. सिंड्रेला मनाने चांगली होती हे दाखवण्यासाठी या बहिणी दुष्ट दाखवल्या.” असे म्हणण्यापैकी झाले.
डॉ गोखलेंच्या मते सगळंच जर ‘दाखवण्यासाठी’ असेल तर रामायण ही ‘कथा’ आहे असे म्हणा आणि सिंड्रेलाची गोष्ट वाचता तशी रामाची गोष्ट वाचून सोडून द्या! आणि ‘कथा’ नाही असे म्हणायचे असेल तर, रामाचे अस्तित्व मान्य करा. मग पुढे बोलता येईल.
एकीकडे रामाचे अस्तिव मानायचे नाही, पण दुसरीकडे रावणाचे अस्तित्व निश्चित मानायचे. एकीकडे रामाने बांधलेला सेतू खोटा म्हणायचा. पण रामाने केलेले ‘अन्याय’ मात्र अगदी शतप्रतिशत खरे होते हे ठसवायचं. एकीकडे राम देव-माणूस नव्हता हे ठामपणे सांगायचे, पण रावण मात्र वनवासींचा देव होता ही भावना रुजवायची. अशा विसंगती सध्याचे ‘विचारवंत’ निर्माण करत आहेत. या ‘विचारवंतांना’ रावणासारखे परस्त्रीयांना पळवून आणणारे पुरुष समाजात घडवायचे आहेत की शूर्पणखेसारख्या परपुरुषांवर भाळणाऱ्या स्त्रिया तयार करायच्या आहेत? असो. ही लेखमाला त्याच प्रकारातील असून त्याचा सत्याशी संबंध नसून केवळ मिथ्यावर्णन केले आहे.
रावणासारखा भाऊ हवाय?
हजारो वर्ष देश विदेशातील लोक रामायण वाचत आहेत. जगभरातील लोक रामाला अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचले आहेत. या हजारो वर्षातील, हजारो पिढ्यांमधील कुणा विद्वानाने “रावण एक आदर्श भाऊ होता” असा प्रचार केला नाही. पण सध्या काही विद्वान मात्र – “रावणासारखा चांगला बंधू या जगात नाही! प्रत्येक स्त्रीला आपल्याला रावणासारखा भाऊ असावा असे वाटते.” असा प्रचार करतांना दिसतात. खरोखरच रावण हा एक चांगला बंधू होता का? पाहूया, वाल्मिकी रामायण काय सांगते ते –
रावणाला ‘चांगला’ भाऊ म्हणायचे मुख्य (आणि कदाचित एकमेव) कारण आहे – शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याचा सूड घेण्यासाठी रावणाने सीतेला पळवून आणले. रावणाच्या या कृतीमध्ये किती बंधुप्रेम आहे ते तपासू …
सुपासारखी नखे असलेल्या शूर्पणखेने अरण्यात संचार करतांना राम – लक्ष्मणाला त्यांच्या कुटी जवळ पहिले. रामाचे रूप पाहून ती त्याच्या सौंदर्यावर भाळली. शूर्पणखा म्हणते –
दीर्घबाहुः विशालाक्षः चीर कृष्ण अजिन अम्बरः ||
हा दाशरथी राम पिळदार बाहूंचा, मोठ्या डोळ्यांचा, काळे मृगार्जीन धारण केलेला, साक्षात मदनाचा पुतळा आहे!
कन्दर्प सम रूपः च रामो दशरथ आत्मजः | ३-३४
अशा रामाला तिने लग्नाची मागणी घातली. रामाने आपले एकपत्नीव्रत सांगितले. मग तिने लक्ष्मणाला लग्नाची मागणी घातली. त्याने देखील नकार दिला. तेंव्हा ती सीतेच्या जीवावर उठली. एखाद्या मनुष्यावर हल्ला करून, आपल्या तीक्ष्ण व मोठ्या नखांनी त्याला फाडून खाऊ शकणारी ती नरभक्षक राक्षसी आहे. लक्ष्मणाने तत्काळ तिचे नाक-कान कापले. लग्नाला नकार देणाऱ्या राम-लक्ष्मणावर हल्ला करायला तिने आपल्या बंधूंना खर व दूषणाला ससैन्य पाठवले. पण त्यांचे राम-लक्ष्मणा समोर काही चालले नाही.
मग शूर्पणखा रावणाकडे आपली तक्रार घेऊन गेली. रावणाला काही तिचे नाक-कान कापल्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. रावण हा “पर दार अभिमर्शनम्” परस्त्रीकडे आकर्षित होणारा, त्यांचा विनयभंग करणारा होता, हे तिला माहित होते. मग तिने आपला पवित्रा बदलला व रावणाला सांगितले, “अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. जा तिला बळजबरीने पळवून आण. तिची इच्छा असो नसो, तिच्याशी लग्न कर. तुझ्या सारख्या बलाढ्य राजाकडे अशी सुंदर राणी असायलाच हवी.
”शूर्पणखेने केलेल्या सीतेच्या वर्णनावर रावण भाळला. स्वत:साठी सुंदर बायको मिळवी म्हणून सीतेला पळवायचा त्याला मोह झाला. तस्मात् त्याने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे. तर स्वत:च्या मोहासाठी. सीतेला पळवून न्यायला आलेला रावण “शुर्पणखेचे नाक कापले म्हणून मी तुला पळवायला आलो!” असे म्हणत नाही. तो म्हणतो, “हे सुंदरी! तुझ्यावर माझे मन बसले आहे. माझी लंकानगरी अतिशय सुंदर आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सुखात ठेवीन. इथे रामाबरोबर कुटीत राहून तुला काय मिळणार आहे?
सर्व राक्षस भर्तारम् कामय – कामात् – स्वयम् आगतम् |
सर्व राक्षसांचा राजा असेलेला मी, मदनाच्या बाणांनी घायाळ होऊन स्वत:हून तुझ्याकडे चालत आलो आहे. माझ्या प्रस्तावाला नकार देऊ नकोस!”
न मन्मथ शर आविष्टम् प्रति आख्यातुम् त्वम् अर्हसि || ३-४८-१७
शुर्पणखेच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा असा – रावणाने शूर्पणखेच्या नवऱ्याला विद्युत जिह्वाला या पूर्वीच मारले होते. परपुरुषावर आसक्त होणारी, दुसऱ्या स्त्रीचा नवरा बळजबरीने घेऊ पाहणारी शूर्पणखा – नवऱ्याला मारल्यामुळे असे वागत होती का? तिच्या भावाच्या या कर्तृत्वामुळेच पुढचं सगळं ओढवलं होतं का?
‘बंधू’ म्हणून रावण त्याच्या भावांशी कसे वागला हे देखील पाहण्यासारखे आहे. कुबेर, रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण हे चौघे भाऊ.
लंकेवर मोठा भाऊ कुबेर राज्य करत होता. काही कारणाने चिडलेल्या रावणाने आपल्या मोठ्या भावाशी, कुबेराशी द्वंद्व केले व त्याच्याकडून लंका बळकावून घेतली. भिक्षा मागायला आलेला रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –
येन वैश्रवणो भ्राता वैमात्रः कारणांतरे |
कुबेराकडून मी लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. त्याला सळो की पळो करून सोडले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असा मी पराक्रमी शक्तिशाली दशानन आहे!
द्वन्द्वम् आसादितः क्रोधात् रणे विक्रम्य निर्जितः || ३-४८-४
मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः || ३-४८-३
रावणाने कुबेराकडून त्याचे राज्य, विमान, संपत्ती सगळे लुटले तरी त्याचे समाधान झाले नाही. रावणाने कुबेराची पुत्रवधू, म्हणजे आपल्या पुतण्याची, नलकुबेराची बायको नासवली. ते कळल्यावर नलकुबेराने रावणाला शाप दिला – “पुन्हा कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती केलीस तर तुझा मृत्यू होईल!” आजच्या भाषेत सांगायचे तर त्याने बायकोवर अत्याचार करणाऱ्या स्वत:च्या काकाला धमकी दिली, “If you rape another woman, I will personally come to Lanka and kill you.” हा रावणाचा मोठ्या भावाशी व्यवहार.
आता त्याने धाकट्या भावांशी केलेला व्यवहार पाहू. विभीषणाने रावणाला कळकळीने सांगितले, “सीतेला पळवून आणलेस ते तू बरे केले नाहीस. सीतेला रामाला देऊन टाक नाहीतर लंकेचा सत्यानाश होईल.” कटू परंतु सत्य बोल सांगणाऱ्या विभिषणाला रावण म्हणतो –
योऽन्यस्त्वेवम्विधम् ब्रूयाद् वाक्यमेतन्निशाचर |
अरे निशाचर राक्षसा! हे दुसऱ्या कुणी म्हटले असते तर मी त्याचे मस्तक उडवून टाकले असते. तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला मी मारत नाही. कुलनाशका! धिक्कार असो तुझा! तुला शाप लागो!
अस्मिन् मुहूर्ते न भवेत् त्वाम् तु धिक् कुलपांसनम् || ६-१६-१६
हृदयाला टोचणारे शब्द ऐकून विभीषणाने लंका सोडली व तो रामाला जाऊन मिळाला.
तीन भावांपैकी एकच भाऊ रावणाच्या बाजूने लढायला उभा राहिला – तो म्हणजे कुंभकर्ण. त्याने सुद्धा रावणाची कान उघडणी केली, विभिषणाने सांगितल्याप्रमाणे सीतेला परत का केले नाहीस असे विचारले. व रावणाच्या क्रोधाच्या भयाने कुंभकर्ण लढायला तयार झाला. रामाशी लढायला जाणे हे मृत्युला सामोरे जाण्यासारखेच होते. रावणाने या भावाला मृत्युच्या खाईत लोटले.
तात्त्पर्य, रावण ‘आदर्श बंधू’ म्हणून शोभत नाही. तरीही ज्यांना रावणासारखा भाऊ हवाय, त्यांची शूर्पणखेसारखी बहिण होण्याची तयारी आहे का?
जी स्त्री आपल्या भावाला दुष्कर्म करायला सांगते, जी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अन्याय घडवून आणते, जी स्त्री लग्नाला नकार देणाऱ्या पुरुषाला जीवे मारायला उठते, जी स्त्री भावाच्या नाशाला कारणीभूत होते, जी स्त्री परपुरुषावर आकृष्ट होते, जी स्त्री क्षणात एकाशी तर क्षणात दुसऱ्याशी लगट करू शकते … अशाच स्त्रीला रावण हा भाऊ म्हणून शोभतो. ज्या स्त्रीला रावणासारखा भाऊ हवासा वाटत असेल, तिने आपण शुर्पणखेसारख्या वागत आहोत का हे तपासणे नितांत गरजेचे आहे.
जर कुणाला रावणासारखा भाऊ हवासा वाटत असेल, तर हा देखील विचार करावा – तुमच्या पतीला त्या रावणासारख्या भावाने (मारायचं राहिलं दूर) मानपानात जरी काही कमी केलं तर चालते का? किंवा शेजारणीने तिच्या रावणासारख्या भावाला तुमच्या पतीविषयी खरी – खोटी कागाळी केली, आणि तिच्या म्हणण्या खातर त्याने तुम्हाला (पळवून नेणे वगैरे राहिलं दूर) पण चार अपमानकारक शब्द जरी बोलले तर तुम्ही तिच्या ‘रावणासारख्या’ भावाचे कौतुक कराल का? तुमचा ‘रावणासारखा भाऊ’ ठीक आहे, पण गावभर असल्या रावणासारख्या भावांच्या टोळ्या फिरायला लागल्या तर काय कराल? तुम्ही घराबाहेर पडाल का? मुलींना घराबाहेर पाठवाल का?
श्रीराम FAQ
सिंड्रेलाची गोष्ट ऐकून कोणी असे विचारात नाही की बुवा सिंड्रेलाने मुळात अन्याय सोसलाच का? किंवा “युरोप मधील समाज बालकामगारांना राबवून घेणारा होता.” किंवा “सिंड्रेलाने कुणाची मदत का घेतली नाही?” किंवा “ती सावत्रआई काही वाईट नव्हती! नवरा मेल्यावर सुद्धा तिने सिंड्रेलाचा सांभाळ केला न? तिला हाकलून तर दिले नाही न घरातून? मारहाण तर नाही न केली तिला? विद्रूप तर नाही न केलं तिला? मग? चांगलीच होती ती!” हे प्रश्न विचारले जात नाहीत कारण ती गोष्ट आहे हे मानले असते वाचकाने.
पण रामायणाच्या बाबतीत तसे नाही. रामायणाबद्दल व त्यामधील पात्रांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याचा अर्थच असा की रामायण ही ‘कथा’ म्हणून प्रश्नकर्त्याने वाचली नाही. प्रश्नकर्ता मान्य करतो की रामायण घडले आहे, राम हा एक मानव होता आणि कधी काळी तो अस्तित्वात होता.
याच प्रश्नाकार्त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे आणि (गैर)समजांचे निराकरण.
काय सांगता?! उत्तर रामायण वाल्मिकींनी लिहिले नव्हते? ते मागाहून लिहिले गेले होते? कशावरून?
अभ्यासकांचे या बाबतीत एकमत आहे, रामरायाच्या राज्याभिषेकाने समाप्त होणारे वाल्मिकींचे रामायण सुखांत होते. उत्तर कांड किंवा उत्तर रामायण हे मागाहून कुणीतरी लिहिले. या निष्कर्षाप्रत पोचण्याचे करणे पुढील प्रमाणे आहेत –
- वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला
नारदमुनींनी वाल्मिकींना सांगितलेली रामाची कथा आली आहे. ही संक्षिप्त कथा
रामराज्याभिषेकाने संपते. वाल्मिकींना तेवढीच कथा माहित होती. नारदांच्या
कथेत ना सीतेच्या त्यागाचा उल्लेख येतो, ना लव-कुशाच्या जन्माचा, ना
लव-कुशाने रामायण गाण्याचा.
- वाल्मिकी रामायणातील युद्ध कांडाच्या शेवटच्या सर्गात वाल्मिकी लिहितात – रावणाचा वध केल्यावर राम-लक्ष्मण-सीता अयोध्येला परत आले. त्यावेळी भरत त्यांचे स्वागत करायला नंदीग्राम येथे आला. आणि त्याने तिथेच रामाला राज्याभिषेक करवला. राज्याभिषेक झाल्यानंतर रामाने अनेक वर्ष उत्तम राज्य केले आणि सगळे आनंदात, सुखात राहिले.” त्यानंतर रामायण ऐकल्याने काय फळ मिळते ते सांगितले आहे. अर्थात इथे फलश्रुती आली आहे. सुग्रास पोटभर जेवण झाल्यावर तांबुल खावा तसे रसपूर्ण कथा ऐकून त्याची फलश्रुती ऐकावी. तांबुल खाल्यावर कोणी पुन्हा वरण भाताने परत जेवायला सुरुवात करत नाही, तसे फलश्रुतीने वाल्मिकी रामायण संपते.
- उत्तरकांड या शब्दाचा अर्थच – नंतरचे कांड. मग हे वाल्मिकींनीच नंतर लिहिले नाही कशावरून? वाल्मिकींना जर उत्तरकांड लिहायचे असते तर तसे असते तर त्यांनी युद्ध कांडला फलश्रुती लिहिली नसती. त्या अर्थी दुसऱ्या कोणीतरी उत्तर कांड नंतरहून लिहिले असणार.
- सीतेला सोडवल्यावर, सीतेच्या अग्निपरिक्षेनंतर रामाने अग्नीला वचन दिले आहे –
- विशुद्धा त्रिषु लोकेषु मैथिली जनकात्मजा |
- न विहातुं मया शक्या कीर्तिरात्मवता यथा || ६-११८-२० ||
- तिन्ही लोकात अत्यंत शुद्ध असलेली जनकात्मजा मैथिलीला मी कधीही अंतर देणार नाही! जसे मनुष्य आपली कीर्ती आपल्यापासून दूर करू शकत नाही, तशी सीता नित्य मजसोबत असेल!
- ज्या इक्ष्वाकू घराण्यातील दशरथाने आपले वचन पाळण्यासाठी प्राण दिले, रामाने वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करला, भरताने दिलेल्या शब्दासाठी आयते मिळालेले राज्य परत केले, रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य व पत्नी मिळवून दिली … तो राम अग्नीला दिलेले वचन विसरून उत्तरकांडात सीतेचा त्याग कसा करेल?
- युद्धकांड, सर्ग १२८ मध्ये सांगितले आहे – रामाने नंतर ‘शताश्वमेध’, शंभर अश्वमेध यज्ञ केले. हे यज्ञ त्याने सीतेसोबतच केले. सीतेचा सोन्याचा पुतळा ठेवून नाही केले. कोणताही यज्ञ करतांना यजमान पत्नीला विशिष्ठ कर्तव्य असत. तिने पुतळ्या सारखं बसून हाताला हात लावून ‘मम’ म्हणणे इतकचं काम नसते. त्यामुळे रामाने सीतेचा त्याग केल्यावर शेजारी सीतेची सोन्याची मूर्ती ठेवून यज्ञ केला हे अशक्य आहे.
- वाल्मिकींनी त्यांच्या महाकाव्यासाठी ३ नावे सुचवली आहेत – रामायण (रामाचा प्रवास), सीताचरित (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावणाचा वध). वाल्मिकी रामायण युद्धकांड मध्ये रामाच्या प्रवासाने, सीतेच्या (अपहरणाच्या) कथेने आणि रावणाच्या वधाने संपते. यानंतर जर उत्तरकांड पहिले तर त्यामध्ये वेगळीच कथा आहे. जिचे नाव – रामाचा प्रवास, सीतेची (अपहरणाची) कथा किंवा रावणाचा वध या नावांना अनुसरून नाही.
- रामायणाच्या नंतर शेकडो वर्षांनी महाभारत घडले. महाभारताच्या वनपर्वातील रामोपाख्यान मध्ये रामाची कथा आली आहे. मार्कण्डेय ऋषींनी युधिष्ठिराचे मनोबल वाढवण्यासाठी रामाची कथा ऐकवली. ती कथा सुद्धा रामराज्याभिषेकाने संपते. म्हणजे निदान महाभारत काळापर्यंत रामायणात सीता त्यागाची कथा प्रचलित नव्हती. अभ्यासकांच्या मते महाभारताच्या नंतर उत्तरकांडची रचना झाली असावी.
वरील आणि इतरही अनेक कारणांमुळे या बाबतीत एकमत आहे कि उत्तरकांड वाल्मिकींनी लिहिलेले नसून, ते मूळ रामायणात नव्हते.
शुर्पणखा दंडकारण्याची स्वामिनी असतांना रामाने तिच्या अरण्यात जाऊन राक्षसांशी वैर का घ्यावं?
“स्वामिनी” म्हणजे काय? “स्वामी”चे कर्तव्य काय? कुणाला राजा म्हणायचे? याचे उत्तर वाल्मिकी रामायणातच मिळते. चित्रकुटमध्ये भेटायला आलेल्या भरताला राम विचारतो – “भरता! राज्यातील जनतेचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तू तो धर्म पळत आहेस न? तू प्रजेचे रक्षण करत आहेस न? राज्यातील स्त्रियांना संरक्षण देत आहेस न? तुझ्या राज्यातील कृषी करणारे, पशुपालन करणारे, वेदाभ्यास करणारे यांचे रक्षण करत आहेस न? अयोध्येतील प्राण्यांचे आणि चौरस्त्यावरील वृक्षांचे सुद्धा रक्षण तू करत आहेस न?”
‘स्वामिनी’ म्हणून हीच कर्तव्य ओघाने शुर्पणखेकडे येतात. पण, दंडकारण्यात वास करणाऱ्या ऋषींनी रामाला विनंती केली की येथील नरभक्षक राक्षसांपासून आमचे संरक्षण कर. शूर्पणखा तेथील ‘स्वामिनी’ असून सुद्धा त्या ऋषीमुनींना रामाकडे का धाव घ्यावी लागली? शूर्पणखा त्यांचे रक्षण करत नव्हती हे उघड आहे! तसेच त्या ऋषींना तिच्या पासूनच भय होते हे देखील उघड आहे.
ऋषींचे अर्थात सज्जनांचे, अबलांचे रक्षण करण्यासाठी रामाला दंडकारण्यातील राक्षसांशी वैर घ्यावे लागले.
शुर्पणखेला रामाने व लक्ष्मणाने नकार का दिला?
शूर्पणखा सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली व तिने रामाला लग्नासाठी मागणी घातली. मात्र रामाने एकपत्नीव्रत असल्याचे कारण सांगून शुर्पणखेला नकार दिला. नको असलेल्या मागणीला नकार देण्याचा अधिकार फक्त स्त्रीला असतो का? पुरुषाला नकार देण्याचा अधिकार नाही का? स्त्री-पुरुष समानता मानणारे निश्चित रामाचा नकाराधिकार मनातील.
शुर्पणखेने साधी लग्नाची मागणी घातली होती, तर लक्ष्मणाने तिचे नाक का कापले?
शूर्पणखा क्षणात रामावर तर क्षणात लक्ष्मणावर भाळली होती. तिचे काही रामावर उदात्त प्रेम वगैरे नव्हते. तिला दोघांपैकी कोणीपण नवरा म्हणून चालणार होता. रामाने आणि लक्ष्मणाने तिला नकार दिला, पण ती तो पचवू शकली नाही. तेंव्हा ती नरभक्षक राक्षसी रामाला म्हणाली – “मी या लक्ष्मणाला खाऊन टाकते. तुझ्या बायकोला पण माझ्या तीक्ष्ण नखांनी फाडून तुझ्या देखत आताच्या आत्ता खाऊन टाकते. मग तू आणि मी या दोघांच्या कटकटीतुन मुक्त होऊन आनंदाने या अरण्यात राहू!” असे म्हणत ती सीतेच्या अंगावर धावून गेली. म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक कापले.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत नाक कापणे ही एक सर्वसाधारण शिक्षा होती. उदाहरणच घ्यायचे तर, १८व्या शतकातील टिपू सुलतानने कित्येक सैनिकांचे नाक कापल्याचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे. ‘एखाद्याचे नाक कापणे’ / ‘नाक कटवा देना’ असे वाक्प्रचार भारतीय भाषांमध्ये अजूनही दिसतात. तस्मात्, शूर्पणखेचे नाक कापणे ही त्या काळातील एक सामान्य शिक्षा होती.
रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी.
रामाने लग्नाला नकार दिल्यावर शूर्पणखेने आपले बंधू खर व दूषण यांना सैन्य घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला पाठवले. पण रामाने त्यांना हरवले. मग तिने आपली तक्रार रावणाला सांगितली. पण रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा असे वाटत नाही. तेंव्हा तीने रावणाला सांगितले –“अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तुझ्यासारख्या बलाढ्य राजाला ती राणी म्हणून शोभेल. जा तिला बळजबरीने पळवून आण. आणि तिची इच्छा असो नसो, तिच्याशी लग्न कर.”
रावणाने सोन्याची लंका उभारली, त्याच्याकडे पुष्पकविमान होते. तो महान राजा होता.
लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान हे दोन्ही रावणाने आपल्या भावाकडून ओरबाडून घेतले होते. स्वत: रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –
मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः ||
मी माझ्या मोठ्या भावाला कुबेराला, सळो की पळो करून सोडले. त्याच्या कडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असे पराक्रम करणारा मी शक्तिशाली दशानन आहे!
लक्षमणाने उर्मिलेला आपल्या सोबत अरण्यात का नेले नाही?
सीता हट्टाने रामाच्या मागोमाग वनवासात गेली. तिला या निर्णयापासून रामाने परावृत्त केले, तरीही ती तिच्या मर्जीने वनवासात गेली. उर्मिलेने तसे केले नाही. तिने जर स्वेच्छेने वनवासातील त्रासापेक्षा राजगृहातील सुख तिने निवडले असेल तर? सीतेप्रमाणे तिला देखील वनवास निवडण्याचे स्वातंत्र्य होते, पण तिने स्वत:हून सुखाने राजवाड्यात राहण्याचे ऑप्शन निवडले. लक्ष्मणाने सुद्धा तिला जबरदस्तीने अरण्यात नेले नाही. मग तिला का बरे जबरदस्ती १२ वर्ष वनवासात पाठवावे?
उर्मिला दुर्लक्षित राहिली, उपेक्षित राहिली. तिचा उल्लेख का येत नाही?
रामायण ही – रामाच्या प्रवासाची, सीतेच्या चरित्राची व रावणाच्या वधाची कथा आहे. या महत्वाच्या घटनांभोवतीचे तपशील वाल्मिकींनी दिले आहेत. या १४ वर्षांच्या काळात भरत, शत्रुघ्न, सुमंत, वशिष्ठ, विश्वामित्र, जनक, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, कैकेयी, कौसल्या इत्यादींच्या बद्दल कोणतेच तपशील दिले नाहीत. परंतु जटायू, संपाती, नल, नील, जांबुवंत आदींच्या लहानसहान गोष्टींचा उल्लेख रामायणात आला आहे. कारण त्यांचा वनवासी राम-लक्ष्मण व सीतेशी संबध आला होता. उर्मिला किंवा वरील इतर कोणाचा वनवासातील घटनांशी संबध आला असता तर त्यांचा सुद्धा तपशील आला असता.
रामायण ही केवळ रामाची कथा आहे. सीतेची कथा नाही.
रामायणातील बालकांडात वाल्मिकी म्हणतात – मी लिहित असलेल्या काव्याचे नाव – रामायण (रामाचा प्रवास) किंवा सीताचरीत्र (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावण वध) आहे.
काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् |
वाल्मिकी रामायण, बालकांड, सर्ग ४
पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ||
त्यामुळे, रामायण ही कथा जितकी रामाची आहे तितकीच ती सीतेची पण कथा आहे असे वाल्मिकी स्वत: लिहितात.
रावण एक चांगला भाऊ होता. सगळ्या स्त्रियांना रावणासारखा भाऊ हवा असे वाटते.
शूर्पणखा रावणाकडे आपले नाक कापल्याची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही त्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. रावण हा “पर दार अभिमर्शनम्” अर्थात परस्त्रीकडे आकर्षित होणारा, त्यांचा विनयभंग करणारा होता, हे शुर्पणखेला माहित होते. म्हणून तिने आपला पवित्रा बदलून त्याच्याकडे सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले. त्यावर रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या मोहासाठी. सीतेला पळवून न्यायला आलेला रावण “शुर्पणखेचे नाक कापले म्हणून मी तुला पळवायला आलो!” असे म्हणाला नाही. तो म्हणाला, “हे सुंदरी! तुझ्यावर माझे मन बसले आहे. माझी लंकानगरी अतिशय सुंदर आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सुखात ठेवीन. इथे रामाबरोबर कुटीत राहून तुला काय मिळणार आहे?
सर्व राक्षस भर्तारम् कामय – कामात् – स्वयम् आगतम् |
वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८
न मन्मथ शर आविष्टम् प्रति आख्यातुम् त्वम् अर्हसि ||
सर्व राक्षसांचा राजा असेलेला मी, मदनाच्या बाणांनी घायाळ होऊन स्वत:हून तुझ्याकडे चालत आलो आहे. माझ्या प्रस्तावाला नकार देऊ नकोस!”
रावणाने सीतेला पळवले पण त्याने तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही. म्हणून तो महान होता!
रावणाने तपस्व्याचा वेश घेऊन सीतेला फसवून घराबाहेर बोलावून घेतले. तसेच आधी तिच्या नवऱ्याला व दिराला युक्तीने दूर पाठवले. अर्थात सीतेला पळवण्याचा त्याचा कट पूर्व नियोजित होता. त्यावर सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध, खांद्यावर उचलून घेऊन आपल्या विमानात बसवून बळजबरीने लंकेला नेले. तिथे तिला अशोकवनात कैदेत ठेवले. तिच्या भोवती दिवसरात्र राक्षसिंचा पहारा ठेवला. आणि तिला धमकी दिली, “एक वर्षाच्या आता माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला मारून टाकेन.”
भारतीय संविधानात स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेणाऱ्याला दंड सांगितला आहे. Section 366 – if a person kidnaps or abducts a woman against her wish so as to marry her, shall be punished with fine and rigorous or simple imprisonment for up to 10 years. Section 368 – Wrongfully concealing or keeping in confinement, kidnapped or abducted person shall be punished in the same way. त्याशिवाय इतरही कलम आहेत.
म्हणजेच एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेल्यास, १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाऊ शकते. असा कायदा असलेल्या देशात व त्यामुळे सुरक्षा प्राप्त असलेल्या स्त्रिया जेंव्हा “रावणाने सीतेला फक्त पळवून नेले, तिच्या अंगाला हात लावला नाही.” म्हणत रावणावर स्तुतीसुमने उधळतात, तेंव्हा त्यांची कीव येते.
सीतेच्या अंगाला हात न लावण्याचे कारण वेगळे होते. रावणाने पूर्वी कुबेराकडून त्याचे राज्य, विमान, संपत्ती सगळे लुटले. त्यावर रावणाने कुबेराची पुत्रवधू, म्हणजे आपल्या पुतण्याची, नलकुबेराची बायको नासवली. ते कळल्यावर नलकुबेराने रावणाला शाप दिला – “पुन्हा कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती केलीस तर तुझा मृत्यू होईल!” आजच्या भाषेत सांगायचे तर नलकुबेराने बायकोवर अत्याचार करणाऱ्या स्वत:च्या काकाला धमकी दिली, “If you rape another woman, I will personally come to Lanka and kill you.”
रावणाने त्याच्या चांगुलपणामुळे नाही तर या धमकीला भिऊन सीतेला स्पर्श केला नाही.
रावण आपल्या प्रजेची काळजी घेणारा एक चांगला राजा होता.
रावणाने स्वत:साठी दुसऱ्याची बायको पळवून आणली. त्यामुळे त्याच्या राज्याचे व त्याच्या प्रजेचे प्रचंड नुकसान झाले. आधी हनुमंताने लंका पेटवून दिली. त्यानंतर रावणाने बऱ्या बोलाने सीतेला परत करायचे सोडून युद्धाचा पर्याय निवडला. हे युद्ध रावणाने स्वत:च्या वासनेपायी प्रजेवर युद्ध लादले.
सीतेची अग्निपरीक्षा
राम आणि सीतेचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते, त्यांचा एकमेकांवर सार्थ विश्वास होता. जसे रामाने सुंदर रूप धारण करून आलेल्या शुर्पणखेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला, तसेच सीतेने सुद्धा बलाढ्य रावणाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. अगदी जीवे मारण्याची धमकी दिली, तरीसुद्धा सीता तिच्या निर्नायार ठाम राहिली. राम आणि सीता एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हते.
असे असून सुद्धा, रामाने सीतेला सोडवून आणल्यावर कोरडेपणाने “तू हवी तिथे जाण्यास मुक्त आहेस” असे सांगितले. हे तिला सांगत असता, रामाची अवस्था कशी होती, त्याबद्दल वाल्मिकी सांगतात –
पश्यतस्तां तु रामस्य समीपे हृदयप्रियाम् |
वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११५
जनवादभयाद्राज्ञो बभूव हृदयं द्विधा ||
रामाने हृदयप्रिया सीतेला समीप पहिले खरे, पण जनवादाच्या भयाने त्याचे हृदय विदीर्ण झाले.
रामाच्या शब्दांनी घायाळ झालेल्या सीतेने अग्निप्रवेश करायचा ठरवला. तिने लक्ष्मणाला अग्नी प्रदीप्त करण्यास सांगितले. सीतेने रामाला प्रदक्षिणा घातली, अग्नीला प्रदक्षिणा घातली व, “मी कायेने, वाचेने व मानाने केवळ रामाचाच विचार केला असेन तर अग्नीने माझे रक्षण करावे!” अशी प्रार्थना केली. तिथे जमलेले वानर, राक्षस सर्वजण हळहळले व “सीता पवित्र आहे! सीता पवित्र आहे!” असे म्हणू लागले. जनतेनेच असा निर्वाळा दिल्याने लोकापवाद टाळला! या वेळी रामाचे नेत्र अश्रूंनी भरून आले, व तो म्हणाला,
बालिशो बत कामात्म रामो दशरथात्मजः |
वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११८
इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि ||
लोकांच्या समक्ष सीता शुद्ध असल्याची ग्वाही मिळणे आवश्यक होते. कारण ही पुष्कळ दिवस लंकेत राहिली होती. हिची शुद्धी न करता जर मी तिचा स्वीकार केला असता तर लोकांनी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला असता व दशरथपुत्र राम विषयलंपट आहे असे म्हणाले असते. आम्हा दोघांवरचा लोकापवाद टाळण्यासाठी हे दिव्य करणे प्राप्त होते.
सीतात्याग. गर्भवती सीतेला सोडून देणे.
सीतात्याग प्रसंग उत्तरकांड मध्ये येतो. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. वाल्मिकी रामायणात रामाने सीतेला अग्नीपरीक्षेनंतर स्वीकारणे योग्य होते. कदाचित नंतरच्या काळातील लोकांनी रामाने सीतेचा स्वीकार कसा काय केला म्हणून आक्षेप घेतला असावा. त्या प्रश्नांना उत्तर म्हणून कुणी उत्तरकांड लिहून त्यात सीतात्याग प्रसंग लिहिला असावा. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.
तरीही, या विषयावरील माझे मत असे की – उत्तरकांडात राजारामने प्रजेसाठी अत्यंत प्रिय अशा आपल्या पत्नीचा त्याग केला. धृताराष्ट्राप्रमाणे आपल्या पत्नीसाठी, मुलासाठी प्रजेला वेठीस धरणाऱ्या नेत्यांना रामाने घालून दिलेला हा धडा आहे.
रामाला राष्ट्रपुरुष का मानायचे?
सुकुमार रामाला युवराज केले, तेंव्हा तो योगवशिष्ठचा अधिकारी झाला! षोडशवर्षीय रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवले तेंव्हा त्याने त्राटिकेचा वध करून यज्ञाचे रक्षण केले! मिथिला पाहायला नेले तर त्याने शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकला! वनवासात पाठवले तर तिथे त्याने दुष्टांचे मर्दन करून सुष्टांचे रक्षण केले! भार्या पळवली तर हनुमंतासारख्या दूताकरवी समुद्रापार तिचा शोध घेतला! वनात राहणाऱ्या, वल्कले धारण करणाऱ्या, जटाधारी धनुर्धर रामने सुग्रीवासारखा राजा मित्र म्हणून मिळवला! एकटा दुकटा वनात राहणारा राम सैन्य काय जमवतो, समुद्रावर सेतू काय बांधतो, शत्रूची मर्मस्थळे फोडतो आणि युद्धाला उभा काय राहतो! बलाढ्य अशा लंकाधिपती रावणाला युद्धात हरवतो! वनात राहणारा एक साधा मनुष्य, जो प्रस्थापितांविरुद्ध लढतो, अन्यायाविरुद्ध लढतो आणि युद्ध करून जिंकतो! पुढे रामाला राज्याभिषेक केल्यावर त्याने आदर्श असे रामराज्य निमार्ण केले! असे काम केवळ एक समर्थच करू शकतो.
“How to live a powerful life” – यावर अनेक मॉडर्न गुरु बोलतात. त्या Powerful Life चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम! म्हणूनच – श्रीराम समर्थ आहे. असा समर्थच राष्ट्रपुरुष होण्यास योग्य आहे!
वाल्मिकी रामायणात अगदी सुरुवातीला रामाचे गुण सांगितले आहेत, ते असे – महावीर, पराक्रमी, शत्रूनाशक, यशस्वी, बुद्धिमान, नीतिमान, श्रीमान, स्मृतिमान, प्रतिभानवान, विचक्षण, सज्जन, प्रभावी वक्तृत्व असलेला, ज्ञानसंपन्न, सावध, धर्मज्ञ, वेद व वेदांगांचा तज्ञ, धनुर्वेदाचा तज्ञ सर्वशास्त्रे जाणणारा, प्रजाहितदक्ष, स्वजानांचे रक्षण करणारा आणि सर्वलोकप्रिय असा राजाराम!
समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव ||
वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग १.
विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः |
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ||
धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः |
श्रीराम हा गांभीर्यात समुद्रा सारखा, धैर्यात हिमालयासारखा आणि शौर्यात विष्णूसारखा आहे! तो दिसायला चंद्रासारखा प्रियदर्शी आहे, क्षमा करण्यात पृथ्वीसारखा आहे, दान करण्यात कुबेरासारखा आहे आणि त्याचा क्रोध कालाग्नीसारखा आहे!
सीता हनुमंताच्या बरोबर लंकेतून रामाकडे का गेली नाही?
हनुमान सीतेला शोधात लंकेत आला. सीतेला रामाची मुद्रा देऊन, रामाचा निरोप दिला. निघते वेळी हनुमान सीतामाईला म्हणाला, “सीतामाई, तुम्ही जर माझ्या पाठीवर बसलात तर मी तुम्हाला थेट रामाकडे घेऊन जाऊ शकतो. मी पर्वतच काय लंका सुद्धा उचलून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही निर्धास्तपणे माझ्या सोबत चला. मी तुम्हाला रामाकडे घेऊन गेलो की विरह दु:ख संपून जाईल!”
सीता एक राजकन्या होती. क्षत्रिय होती. तिला युद्धतंत्राची जाण होती. राजकारण कळत होतं. रामाशी राजकारणाविषयी ती चर्चा करत असे. अशी जाणती राणी सीता उत्तरली, “हनुमंता! तू मला रामाकडे समर्थपणे घेऊन जाशील यात शंका नाही. पण, तू मला घेऊन जात असता राक्षस पाहतील आणि ते तुझ्यावर हल्ला करतील. ते संख्येने अधिक आहेत. त्यांनी तुला धरले तर? त्या धडपडीत मी जर तुझ्या पाठीवरून खाली पडले, तर माझा मृत्यू निश्चित आहे. मी जर जिवंत राहिले आणि राक्षसांच्या तावडीत सापडले तर ते मला आणखीन कुठल्या दुर्गम ठिकाणी ठेवतील. तसे झाले तर माझा शोध राम कसा लावेल? किंवा या हल्ल्यात जर चुकून तुझा मृत्यू झाला तर राम जे मला सोडवण्यासाठी योजना आखत आहे ती कशी पूर्ण होईल?
“म्हणून मी सांगते की तू रामाला जाऊन माझा ठावठिकाणा सांग. तो येऊन आपले शौर्य गाजवून, रावणाला हरवून निश्चित माझी येथून सुटका करेल.”
रामाने वालीचा वध कपटाने केला.
भारताने पाकिस्तानला न सांगता रात्रीतून strike केला. हे कपट होते का? किंवा १९६२ मध्ये चीनने भारताला काहीही कल्पना न देता भारतावर हल्ला केला होता, हे कपट होते का? तसेच रामाने शत्रूला न कळत त्याच्यावर वार केला होता. हे अर्थातच वालीला रुचले नाही. त्याने रामाला अशा प्रकारे त्याच्यावर बाण का सोडला हे विचारले. आणि वाल्मिकींना सुद्धा रामाने काय उत्तर दिले हे लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.
रामाने सुग्रीवाशी मैत्री केली होती. दोघांनी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांना त्यांची पत्नी मिळवून देण्यासाठी मदत करायची शपथ घेतली होती. वालीचा वध करून, रामाने सुग्रीवाची पत्नी रुमा त्याला परत मिळवून दिली.
रामाने मृत्यु समीप आलेल्या वालीला म्हटले आहे, “मोठ्या भावाने लहान भावाशी पित्याप्रमाणे वागले पाहिजे. पण तू तर तुझ्या लहान भावाची बायकोच पळवलीस! हा मोठा गुन्हा केलास. या लोकात समाजाविरुद्ध जो वागतो त्याला शिक्षा करणे प्राप्त आहे. मी इथे राजा भरताचा प्रतिनिधी म्हणून तुला शिक्षा करत आहे. गुन्हेगाराचा वध करणे पाप नाही. म्हणूनच तुझा वध करून मी काही गैर केले नाही.”
रामाने शंबूकाला मारून मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला?
शंबूक वधाची कथा उत्तरकांड मध्ये आली आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.
तरीही यावरील मत असे – रामाने योगिनी शबरीसाठी “तपोधने, चारुभाषिणी, तापसी” अशी आदरयुक्त विशेषणे वापरली आहेत. तपश्चर्या करणाऱ्या या मातंग ऋषींच्या आश्रमातील या सेविकेबद्दल रामाने नितांत आदर व्यक्त केला आहे. (प्रश्नकर्त्यांच्या मते शबरी ही ‘दलित’ आहे.) किंवा निषादराज गुहा हा रामाचा प्रिय मित्र आहे. (जो प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचा’ आहे.) सुग्रीव, हनुमान, जांबुवंत, जटायू यांची ‘जात’ रामायणाने काढली नाही. (हे सर्व प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचे आहेत.) रामायणातून निश्चितपणे असे दिसते की रामाने जातीचा विचार न करता सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार केला आहे. ‘ब्राह्मण आहे’ म्हणून रावणाला क्षमा नाही, तसेच ‘ब्राह्मण नाही’ म्हणून शबरीला शिक्षा नाही. जातीवरून भेदभाव नाही. गुण कर्मानुसार प्रत्येकाशी व्यवहार केला आहे.
राम ब्राम्हणवादी होता का?
भरत जेंव्हा रामाला भेटायला चित्रकुट येथे आला, तेंव्हा रामाने त्याचाकडे अयोध्येची व राज्यकारभाराची विचारपूस केली. या संवादात राजाने कसे वागावे, राज्य कसे करावे, राजाची कर्तव्य काय आहेत हे रामाने सविस्तरपणे सांगितले. त्यामध्ये ब्राह्मणांविषयी राम म्हणतो –
“बंधो! तू असा अचानक वनात का आलास? आपले पिता व माता सुखरूप आहेत ना? मला खात्री आहे की तू आपल्या विनयशील व असूया नसलेल्या पुरोहितांचा सत्कार करत असशील. आपल्या वडिलांच्या वयाच्या निष्णात वैद्यांचा व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांचा तू योग्य मान राखत आहेस ना? ज्यांनी तुला धनुर्विद्या व अर्थशास्त्र शिकवले त्या तुझ्या गुरुजनांशी तू आदराने वागतोस ना? सर्व शिक्षकांचा, वृद्धजनांचा, ऋषी-मुनींचा, अतिथींचा, ब्राह्मणांचा सत्कार करत जा! मात्र धनसंचय करणाऱ्या ब्राह्मणांचा तू सन्मान करू नकोस. काही ब्राह्मण स्वत:ला विद्वान म्हणवून लोकांना अर्थशून्य उपदेश देतात. त्यांचा सत्कार करू नकोस.”
याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?
रावण हा पुलत्स्य ऋषींचा नातू होता. अगस्त्य ऋषी त्याचे चुलत आजोबा. आणि विश्रवा या योगींचा तो पुत्र होता. अर्थात ब्राह्मण होता. रावणाने परस्त्रीचे अपहरण केले, पण रामाने रावणाला ‘ब्राह्मण’ होता म्हणून क्षमा केली नाही. दान दिले नाही. सत्कार केला नाही. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला.
याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?
रामचरित्र कालबाह्य आहे.
“आईं वडिलांचे ऐकावे.”, “भावंडांवर प्रेम करावे.”, “संकट कोसळले असता खचून न जाता त्याचा सामना करावा.”, “आपला प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला किंवा प्रस्थापित राजा असला तरी सुद्धा त्याच्याशी दोन हात करायला घाबरू नये.”, “राजाने व राणीने प्रजेसाठी स्वत:च्या सुखांचा त्याग करावा.”, “राजा एकपत्नीव्रती असावा.”, “बायकोला शोधण्यासाठी पायपीट करावी लागली, युद्ध पुकारावे लागले तरी बेहेत्तर!”, ही शिकवण जर कालबाह्य झाली असेल तर रामायण कालबाह्य वाटू शकते.
ज्यांना आई-वडीलांना काही विचारू नये, बायको असतांना सुद्धा गर्लफ्रेंड असावी, राजकीय नेत्याने मुलासाठी प्रजेला वेठीस धरले, किंवा रामाराज्य नको, भ्रष्टराज्य हवे असे वाटत असेल त्यांना रामचरित्र कालबाह्य वाटू शकते.
रामाने लक्ष्मणावर अन्याय केला आहे.
रामायण ही रामाची कथा आहे. त्यामुळे त्या मध्ये लक्ष्मणावर फोकस नाही.
रामाचे लक्ष्मणावर जीवापाड प्रेम होते. लक्ष्मण युद्धात जखमी होऊन पडल्यावर, हतबल झालेल्या रामाला शोक अनावर झाला होता. त्रायावेळी म म्हणला, “लक्ष्मण मला माझ्या प्राणांहून अधिक प्रिय आहे. देशोदेशी अनेक पतिव्रता पाहायला मिळतील, पण लक्ष्मणासारखा भाऊ शोधून सुद्धा सापडणार नाही. त्याच्या शिवाय मला विजयश्री नको. आणि पुन्हा अयोध्येला जाणे पण नको. लक्ष्मण जसा माझ्या मागोमाग अरण्यात आला, तसे आता मी त्याच्या मागोमाग यमलोकात जाईन.”
रामाने शरयू नदीत आत्महत्या का केली?
रामाचा देहत्याग उत्तरकांड मध्ये लिहिला आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.
परंतु, या विषयावरील माझे मत असे की – “जगावे कसे” हे सांगणारे तत्त्वज्ञान “मरावे कसे” हे देखील सांगते. भारतातील पंथ विविध प्रकारे प्राण कसा सोडावा हे सांगतात. जसे जैन पंथात ‘संथारा’, ‘सल्लेखना’, ‘प्रायोपवेशन’ आदि प्रकार सांगितले आहेत. अशा प्रकारे देहाचा त्याग करण्याला ‘आत्महत्या’ म्हणत नाहीत. आत्महत्या ही जीवनात हरल्यावर इहलोकीची यात्रा संपवण्यासाठी केली असते. तर जीवनकार्य पूर्ण झाल्यावर देहाचा त्याग करणे याला समाधी म्हणतात.
विश्वमोहिनी सरस्वती
ऋग्वेदाने सरस्वती नदीची स्तुती ठिकठिकाणी केली आहे. सरस्वतीला सर्वोत्तम देवी, सर्वोत्तम नदी व सर्वोत्तम आई म्हटले आहे [ऋग्वेद २.४१.१६]. हिमालयापासून समुद्रापर्यंत गर्जना करत अखंड वाहणारी, वेगवान लहरींनी वाटेतील पर्वतांचा चुरा करणारी नदी अशी तिची स्तुती केली आहे [ऋग्वेद ६.६१]. ती जीवन देणारी नदी आहे. सुपीक भूमी व त्याद्वारे अन्न देऊन पोषण करणारी माता आहे. आणि ज्ञान देणारी देवी आहे! ती आवाज करत वाहणारी शब्दाची देवता आहे. पाणी जसे नदीतून वाहते तसे ज्ञान शब्दातून, भाषेतून वाहते! पाणी जसे वरून खाली वाहते तसे गुरुमुखातून शिष्याच्या हृदयाकडे वाहणारा ज्ञानाचा प्रवाह म्हणजे सरस्वती आहे. सरस्वती देवी शब्दाची जननी आहे! ती भाषेत वसते! गायनातून प्रकटते! वादनातून व्यक्त होते! आणि अक्षर रूपाने अमरत्व पावते!
ऋग्वेदात, मैत्रावरुणिर्वसिष्ठ ऋषी सरस्वतीची स्तुती करतांना म्हणतात –
हे शुभ्रवर्णा सरस्वती, तू आम्हाला दोन्ही प्रकारचे (लौकिक आणि पारलौकिक) अन्न प्रदान करणारी आहेस. हे कल्याणी, आम्ही तुझी प्रशंसा करतो तुझ्या स्तुतीचे गीत गातो! समुद्र, मेघ व ज्ञानी हे तिघे सरस्वान् होत! सरस्वती नदीचे पाणी समुद्राला मिळते म्हणून समुद्र सरस्वान् आहे. सरस्वतीचे पाणी शोषून मेघ तयार होतो, म्हणून मेघ सरस्वान् आहे! तसेच विद्येची नदी ज्याच्या हृदयसागरात येऊन मिळते तो महाज्ञानी मनुष्य पण सरस्वान् होय! अशा सरस्वानला ज्ञानामृताचा पाझर फुटो! सरस्वान् आम्हावर अमृतजलाचा वर्षाव करो! ज्ञानाचा पान्हा पिऊन आम्ही धुष्टपुष्ट होऊ! [१]
ऋग्वेद ७.९६
सरस्वती ही भाषेची देवी. शब्दांची देवी. तिचा प्रवास भाषेतून युरोप पर्यंत पोचला. सरस्वती ही वाक् देवता (वाग्देवता) आहे. ‘वाक्’ या शब्दातून आलेले आपल्या माहितीतले शब्द आहेत – वाक्य, वाक्पटू, वक्ता, अनुवाक, चार्वाक, एकवाक्यता इत्यादी. तसेच ‘वाक्’ या शब्दातून आलेले युरोपियन भाषेतील शब्द आहेत – vocal (English), voice (English), vowel (English), voix (French), vocem (Latin), आवाझ (Persian) इत्यादी. इंग्लिश मध्ये Vowel म्हणजे स्वरतंतू (vocal chord) मधून काढता येणारे आवाज – a, e, i, o, u हे वोवेल आहेत. वोवेल हा शब्द वाक् मधून उगम पावला आहे. इंग्लिश मधील advocate हा शब्द पहा. याचा उगम पण ‘वाक्’ मध्ये आहे. जो दुसऱ्यासाठी बोलतो, जो दुसऱ्याची वाचा होतो, तो अड्व्होकेट. किंवा vouch हा शब्द ‘दुसऱ्यासाठी वचन देणारा’ या अर्थाने येतो. किंवा पदवीदानाच्या समारंभाला convocation म्हटले जाते. याचा अर्थ आहे academic assembly, एकत्र (con) येण्यासाठी दिलेली हाक (voko / वाक्). [२]
सरस्वती ही गायनाची, स्वरांची व वादनाची पण देवी आहे. ‘स्वर’ हे गायनात तर आहेतच तसेच वर्णमालेत सुद्धा आहेत. ‘गायन’ साठी संस्कृत शब्द आहे ‘स्वन्’. ‘स्वन्’चा अर्थ होतो गायन करणे, गाणे म्हणणे, गुणगुणणे. यावरून आलेले इंग्लिश शब्द आहेत – sing, song, singer, sonnet, sonate इत्यादी. सरस्वतीचे वाहन असलेल्या हंसाला इंग्लिश मध्ये Swan म्हटले जाते. त्या Swan चा अर्थ आहे ‘गाणे गाणारा (पक्षी)’. Swan या शब्दाचा उगम ‘स्वन्’ मध्ये आहे. जसा हा गाण्यात येतो, तसाच हा स्वन् इंग्रजी वर्णमालेत पण येतो! इंग्लिश मधील consonant (वर्णमालेतील व्यंजन) या शब्दाचा अर्थ आहे स्वराच्या (sound) बरोबर (co) काढलेला आवाज. [२]
स्वरात्मिका वाग्देवी आज voice, vocal, vowel, consonant आणि song या अशा अनेक इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन, डच, फार्सी शब्दात सुद्धा नांदते.
सरस्वती ही स्वरांची देवी असल्याने तिच्या हातात वीणा असते, वाचेची देवी असल्याने हातात अक्षमाला असते, विद्येची देवी असल्याने हातात पुस्तक व नदीची देवी असल्याने हातात शुद्ध पाण्याने भरलेला कमंडलू दाखवला जातो. सरस्वती नदीत हंस असल्याने या देवीचे वाहन हंस आहे. जो कवी असतो अर्थात जो ज्ञानी असतो तो सरस्वतीचा वाहक होतो, अशा महाज्ञानीला ‘परमहंस’ म्हटले जाते. या कलांच्या व विद्येच्या देवतेने अखिल विश्वाला मोहिनी नाही घातली तरच नवल.
हॉलंड येथील एक डच कलाकार आहेत पीटर वेल्तेवेर्डे (Pieter Weltevrede) यांनी अनेक वेळा भारताची वारी केली आहे. कुंभमेळा व बनारस मध्ये अनेक साधुसंतांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने सरस्वती देवीची अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत [३]. त्यातील ही काही चित्रे –

५व्या शतकात भारतातून जपान मध्ये पोचलेल्या बौद्ध मुनींनी अनेक हिंदू देवता त्यांच्या बरोबर जपानला नेल्या. त्या मध्ये – ब्रह्म, अग्नी, वायू, सूर्य, चित्रगुप्त, इंद्र अशा कैक देवता आहेत. त्या मध्ये एक आहे सरस्वती. सरस्वती या लोकप्रिय देवीचे तेथील नाव आहे बेंझाईतेन. बेंझाईतेन ही विद्येची, पाण्याची आणि शिक्षणाची देवता! तिच्या हातात बिवा नावाचे विणेसारखे दिसणारे तंतुवाद्य असते. या जपान मधील सरस्वतीच्या लोभासवण्या मूर्ती आहेत –

सरस्वतीची उपासना इंडोनेशिया तसेच कंबोडिया, थैलंड, म्यानमार व तिबेट मध्ये पण केली जाते. इंडोनेशिया मध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. शाळेतून, महाविद्यालातून सरस्वतीची पूजा केली जाते. अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष बराक ओबामा लहानपणी इंडोनेशियाच्या शाळेत शिकले होते. इंडोनेशिया मध्ये शिकलेला हा मुलगा जेंव्हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला, तेंव्हा इंडोनेशियाने एक सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. ही मूर्ती वॉशिंग्टन मध्ये इंडोनेशियाच्या दूतावासाच्या समोर उभी केली आहे. सोनेरी नक्षीकाम असलेली ही शुभ्र मूर्ती १६ फुट उंच आहे. हंसवाहिनी सरस्वती देवी कमळात उभी असून तीन विद्यार्थी तिच्या पायाशी बसून अभ्यास करत आहेत. त्यामध्ये एक मुलगा आहे – बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष आणि धर्माने ख्रिश्चन. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह आहे – विश्वाला मोहून टाकणारी विद्येची, ज्ञानाची, वाचेची, संगीताची देवी सरस्वती! [४]

संदर्भ –
- ऋग्वेद का सुबोध भाष्य – पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर
- Wiktionary, the free dictionary, https://en.wiktionary.org
- पीटर वेल्टेवर्ड – www.sanatansociety.com
- Goddess Saraswati Statue With Barack Obama Symbolizes Relationship Between Indonesia and the U.S. – Mike Ghouse, Huffpost, June 2013
राम आणि रावण नेतृत्व चिकित्सा
दैनिक सकाळच्या ‘अयोध्या पर्व’ या १२ एप्रिल २०२१ मध्ये पूर्व प्रसिद्ध लेख
नेतृत्व आणि नेता
नेतृत्व करणे म्हणजे मार्ग दाखवणे. दिग्दर्शन करणे. संकटाचा सामना करायला अग्रणी असणे. समाजाचे नेतृत्व कोण करू शकतो? तर जो अधिकाधिक लोकांना आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने प्रभावित करू शकतो तो. जो उत्तम योजना तयार करू शकतो, योजना उत्तम रीतीने व शीघ्र गतीने राबवू शकतो, तज्ञांचे मत विचारात घेतो, कुशल लोकांवर काम सोपवतो आणि सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवतो तो. जो आपल्या अनुयायांशी सम्मानपूर्वक व्यवहार करतो, अनुयायांचे म्हणणे ऐकतो, जो आपल्या अनुयायांच्या मनात उत्साह व बल निर्माण करून त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे वाटत असणाऱ्या गोष्टी करवून घेऊ शकतो तो. जो नीतीने वागतो, जो सामर्थ्यवान असतो, जो रागाच्या भरात निर्णय घेत नाही (responds not reacts), जो चारित्र्यवान असतो, ज्याने स्वार्थाचा त्याग केला असतो, जो बोलतो तसा चालतो, जो डगमगत नाही, जो लोकापवादाला घाबरतो तो. जो येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो, जो लोकांना संघटीत करतो, असा मनुष्य समाजाचे नेतृत्व करू शकतो. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काढलेले उद्गार एका उत्तम नेत्याचे गुण दर्शवतात –
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥
धीर, उदार, गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥
एका उत्तम नेत्याचे ठिकाणी, वरील पैकी बरेच गुण कमी अधिक प्रमाणात आढळतात. यातील काही नेतृत्वगुणांचा विचार राम व रावण यांच्या बाबतीत वाल्मिकी रामायणाच्या आधारे करूया.
|| सुशीळ ||
माणसाच्या चारित्र्याला किंवा शीलाला अनेक पैलू आहेत. जसे सत्यवचन, नीति, स्थिरबुद्धी, निर्मोहिता, सदाचरण, शिस्तप्रियता, संयम इत्यादी. अशा गुणांनी संपन्न असलेली व्यक्ती वाहवत जात नाही, क्षणिक मोहाला बळी पडत नाही, कोणत्याही प्रसंगी चांगलंच वागेल याविषयी इतरांच्या मनात खात्री असते. म्हणूनच २१व्या शतकात, अमेरिकेसारख्या प्रगत पाश्चिमात्य देशातील जनतेला सुद्धा शुद्ध चारित्र्याचाच राष्ट्रपती हवा असतो. राम आणि रावण यांच्या चारित्र्याचा एक पैलू – परस्त्रीशी व्यवहार, हा रामकथेतून कसा उलगडतो ते पाहू.
रावणाविषयी त्याची बहिण शूर्पणखा म्हणते, “रावण हा परदार अभिमर्शनम् आहे”. अर्थात दुसऱ्यांच्या पत्नींकडे आकर्षित होणारा, परस्त्रीयांचा विनयभंग करायला मागे पुढे न पाहणारा होता. हे जाणूनच ती रावणाला सांगते, “बंधो! त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तू तिला बळजबरीने पळवून आणून तिच्याशी लग्न कर. तुझ्या सारख्या बलाढ्य राजाला अशी सुंदर राणी असायलाच हवी.” मंदोदरी सह अनेक स्त्रिया असलेल्या रावणाने आणखी एका सुंदरीची अभिलाषा मनात धरून सीतेचे अपहरण केले. तिला अशोकवाटिकेत राक्षसींच्या कडक पहाऱ्यात ठेवले आणि ताकीद दिली –
ऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां भर्तारम् मामनिच्चतीम् | मम त्वां प्रातराशार्थमालभन्ते महानसे || ५-२२-९
जर एका वर्षाच्या आत माझ्याशी विवाह केला नाहीस तर तुला मारून, सकाळच्या न्याहारीला मी तुला खाईन.
त्याच काळातील रामाने मात्र एकपत्नीव्रत (One woman man) धारण केले होते. दंडकारण्यात असतांना त्याच्या मदनासारख्या रूपावर भाळून शूर्पणखा एका लावण्यवतीचे रूप घेऊन आली. तिने रामाला लग्नाची मागणी घातली. पण राम तिच्या रुपाच्या मोहात अडकला नाही. तो त्याच्या व्रतापासून ढळला नाही. त्याने शूर्पणखेला आपण एकपत्नीव्रत धारण केले असल्याचे सांगून तिच्या प्रस्तावाला नकार दिला. राम म्हणाला –
कृत दारो अस्मि भवति भार्या इयम् दयिता मम | त्वत् विधानाम् तु नारीणाम् सुदुःखा ससपत्नता || ३-१८-२
ही पहा, ही माझी प्रिय भार्या सीता. तुला का बरे माझ्याशी विवाह करून सवतीचे जिणे जगायचं आहे? ( नकोच ते! तू माझ्याशी लग्न करायचा विचार मनातून काढून टाक! )
राम आणि रावण या दोघांच्या आपल्या पत्नीशी व इतर स्त्रियांशी वर्तनातील हा फरकच राम-रावण युद्धाचे बीज ठरले हा एक भाग झाला. दुसरा असा की शुद्ध चारित्र्यामुळे, राजा नसून सुद्धा, रामाला केवळ अयोध्येतील नागरिकांनीच नाही तर वनवासींनी सुद्धा आपला नेता मानले. राम वनवासात जाणार म्हटल्यावर कित्येक अयोध्यावासी त्याच्या बरोबर जाण्यास निघाले. वनवासात असतांना कित्येक वनवासी आपल्या तक्रारी रामाकडे घेऊन आले. जटायू, शबरी, अगस्ती यांसारखे रामाशी काही संबंध नसलेले लोक स्वत:हून रामाच्या मदतीला आले.
रावणाला त्याच्या अनुयायांकडून असे उत्स्फूर्त प्रेम मिळाले नाही. मारीच आणि कुंभकर्ण हे त्याचे नातलग असून सुद्धा त्यांची मदत मिळवण्यासाठी रावणाला त्यांना धमकी द्यावी लागली होती. मारीचाने सीताहरणासाठी मदत करायला नकार दिला, तेंव्हा रावण म्हणाला –
मृत्युर् ध्रुवो हि अद्य मया विरुध्यतः| ३-४०-२७
माझ्या सांगण्याच्या विरुद्ध गेलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे हे जाण!
अनुयायांनी ऐकावे यासाठी रावणाला त्याचा अधिकार वापरावा लागला. राम आणि रावण दोघेही नेतेच पण एकाचे नेतृत्व पुढाऱ्या सारखे तर दुसऱ्याचे मालकासारखे होते. (Leader & Boss)
|| बहुत जनांसी आधारू ||
राम – लक्ष्मण – सीता वनवासाच्या काळात दंडकारण्यात आले, तेंव्हा ते शरभंग ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे अनेक ऋषीमुनींनी रामाला तेथील दुर्दैवी परिस्तिथी सांगितली. अरण्यातील जनतेवर राक्षस सारखा हल्ला करत त्या विषयी सांगितले. त्यांनी रामाला पंपा नदी काठी राक्षसांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ऋषींच्या अस्थींचे ढीग दाखवले व म्हणाले आमचे या राक्षसांपासून रक्षण कर! रामाने त्यांचे आर्जव आज्ञेप्रमाण मानले व दुष्ट राक्षसांपासून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले. बोलल्याप्रमाणे रामाने दंडकारण्यात असतांना अनेक नरभक्षक राक्षसांना यमसदनी पाठवले.
रामाने अनेकांना आधार दिला होता. रामायणाच्या सुरुवातीला विश्वामित्रांना देखील त्राटिकेच्या त्रासापासून सोडवण्यासाठी रामाची मदत मागितली होती. सुग्रीव आणि बिभीषणाला पण रामच आपल्याला आधार देऊ शकतो असे वाटले होते. आणि त्यांचा भाव रामाने सार्थ ठरवला होता.
रावणाच्या बाबतीत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला होता किंवा इतरंना त्याचा आधार वाटला होता असे दिसत नाही. उदाहरणार्थ – शूर्पणखा जेंव्हा रावणाकडे लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा किंवा त्रिशिर, खर, दुषणाला मारल्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. पण शूर्पणखेने जेंव्हा “तुला सीतेसारखी सुंदर बायको असायला हवी” असे आमिष दाखवले तेंव्हा त्याने राम – लक्ष्मणाला फसवून दूर पाठवले व सीतेचे अपहरण केले.
|| धीर, उदार, गंभीर ||
रामाचे वर्णन करतांना नारद मुनी वाल्मिकींना सांगतात –
स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः | समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव || १-१-१७
कौसल्येचा आनंद वाढवणारा राम सर्वगुणसंपन्न आहे. गांभीर्यात तो समुद्राप्रमाणे अथांग आहे, धैर्यात तो हिमालयासारखा अचल आहे आणि दानात तो कुबेरासमान आहे.
रावणाच्या शौर्याचे, धैर्याचे वर्णन सुद्धा रामायणात पदोपदी आले आहे. रावणाच्या मुलांचा आणि भावांचा युद्धात मृत्यू झाला तरीही रावणाने युद्धातून माघार घेतली नाही. तो धीराने रामाशी लढायला रणांगणात उतरला. महाभारतीय युद्धाच्या शेवटच्या दिवशी, दुर्योधन रणांगणातून पळून गेला व नदीत लपून बसला होता, हे लक्षात घेतले असता रावणाचे धैर्य कळते.
|| कित्येक दुष्ट संहारीले ||
रामाने संहार केला आहे तो दुष्टांचा, समाज कंटाकांचा. विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या त्राटिकेचा. जनस्थानातील नरभक्षक राक्षसांचा. भावाच्या पत्नीचे हरण करणाऱ्या वालीचा. आणि शेवटी सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा.
रावणाने आधी केलेले एक युद्ध रामायणात येते ते कुबेराच्या विरुद्धचे. रावणाने स्वत:च्या मोठ्या भावाशी संघर्ष केला तो लंकेचे राज्य व पुष्पक विमान मिळवण्यासाठी. हा रावणाने केलेला संहार काही ‘दुष्टा’च्या विरुद्ध नव्हता. त्यामुळे रावणाच्या नेतृत्वाला हे विशेषण देता येत नाही.
|| कित्येकांस आश्रयो जाले||
राम वनवासात निघाला तेंव्हा लक्ष्मण आणि सीतेने राजवाड्यातील सुखांना तिलांजली दिली व ते रामाबरोबर वनात गेले. भरत सुद्धा रामाबरोबर वनात जाऊन राहण्यास तयार होता. इतकेच काय, विभीषण सुद्धा आपला महाल सोडून रामाकडे आला. सुग्रीवाला पण रामाने आश्रय दिला.
रावणाकडे आश्रय घेतला होता तो मारीचाने. विश्वामित्रांच्या यज्ञात दगडांचा वर्षाव करून विघ्न आणणाऱ्या त्राटिकेला रामाने मारले त्यावेळी मारीच तिथून निसटला आणि त्याने रावणाकडे आश्रय घेतला होता.
|| सामर्थ्यवंत ||
रामाचे सामर्थ्य मंदोदरीच्या शब्दातून सहज प्रकट झाले आहे –
कथन् त्रैलोक्यमाक्रम्य श्रिया वीर्येण चान्वितम् | अविषह्यन् जघान त्वं मानुषो वनगोचरः || ६-१११-६
मंदोदरी रावणाच्या पार्थिवा जवळ बसून म्हणते, “तुझ्यासारख्या त्रैलोक्यावर राज्य करणाऱ्या राजाला, वनात संचार करणाऱ्या एका य:कश्चित माणसाने युद्धात कसे काय हरवलं? अविश्वसनीय आहे ही घटना!”
हेच रामाचे ‘समर्थ’पण आहे. जटा वाढवून, वल्कले धारण करून, वनवासी जीवन जगणारा एक साधा माणूस. तो एका महाबलाढ्य प्रस्थापित राजाच्या विरुद्ध लढायला उभा राहतो. त्यासाठी मित्र मिळवतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो आणि लढून जिंकतो सुद्धा! हे अचाट काम एक समर्थच करू शकतो.
|| सावधानता ||
सावधानता बाळगणारा नेता येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो. सावधानता बाळगली नसता, काय होते ते रावणाच्या व्यवहारातून दिसते. हनुमान समुद्र उल्लंघून लंकेत येऊन सीतेला रामाचा निरोप देऊन जाता जाता लंका दहन करून गेला. तरीही रावणाला हे लक्षात आले नाही की त्याचा शत्रू सैन्यासह समुद्र ओलांडून त्याच्यावर हल्ला करू शकतो. रावण सुग्रीवाला निरोप धाडतांना म्हणतो –
न हीयम् हरिभिर्लङ्का प्राप्तुम् शक्या कथम् चन | देवैरपि सगन्धर्वैः किम् पुनर्नरवानरैः || ६-२०-१२
लंकेपर्यंत पोचता येणे केवळ अशक्य आहे. गंधर्वांना सुद्धा इथे पोचणे शक्य नाही, तिथे मानवांची आणि वानरांची की कथा?
रावण अशा भ्रमात राहिला आणि राम सेतू बांधून सैन्यासह लंकेत पोचला सुद्धा. लंकेत पोचल्यावर जिथे खायला भरपूर कंद-मूळ-फळ होती अशा ठिकाणी तळ ठोकला. आणि सैन्याच्या तुकड्या पाडून प्रत्येक तुकडीवर एक एक प्रमुख नेमून दिला!
|| श्रवण ||
भरत आणि राम, लक्ष्मण आणि राम, सीता आणि राम यांचे अनेक संवाद रामायणात आले आहेत. कसलीही भीड किंवा भीती न बाळगता त्यांनी आपले परखड मत रामाला स्पष्टपणे सांगितले आहे. अशा संवादातून त्यांच्यात होणारी विचारांची देवघेव वाचकाला सुद्धा समृद्ध करून जाते. या संवादातून राम किती लक्ष देऊन ऐकतो आणि त्यावर विचार करून शास्त्रांच्या आधाराने बोलतो हे लक्षात येते.
किंवा रामाचा अजून एक संवाद आहे विभीषणा बरोबर. युद्धाच्या आधी विभीषणाने रामाला रावणाची बलस्थाने सांगितली. त्याच्या कडच्या सैन्याची, हत्ती, रथ, पायदळाची संख्या सांगितली. कोणत्या प्रकारची शस्त्रे घेऊन कोणते वीर लंकेचे रक्षण करत आहेत हे सांगितले. रावण – कुबेर युद्धात रावणाचे सैन्य किती मोठे होते, त्याने कसा पराक्रम गाजवला हे रामाला सांगितले. हे ऐकून रामाने त्यावर विचार केला व त्यानुसार कोणत्या वानर वीराने लंकेवर कोणत्या बाजूने हल्ला करायचा याची योजना बांधली.
रावणाची बाबतीत मात्र अशी ऐकून घेण्याची वृत्ती दिसत नाही. जसेशुक आणि सारण हे रावणाचे दूत रावणाच्या सांगण्यावरून रामाच्या सैन्याची पाहणी करून येतात. आल्यावर ते रावणाला शत्रूची माहिती देतात. किती सैन्य आहे, कोण कोण सरदार आहेत, प्रत्येकाची नावे, त्यांच्याकडील शक्ती कोणती, रामाने आत्तापर्यंत मारलेल्या राक्षसांची जंत्री, रामाच्या प्रचंड मोठ्या सैन्याची माहिती, रामाच्या बरोबरचे इतर योद्धे जसे – लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद यांची माहिती ते दोघेजण रावणाला सांगतात.
त्यांचा वृत्तांत ऐकून रावण संतापतो! आणि म्हणतो, “रामाने खर, दूषण आदी राक्षसांना मारले असेल, पण त्याने अजून माझे शौर्य पहिले नाही! माझ्या सारखा योद्धा संपूर्ण विश्वात नाही! ते असो, मी त्याला युद्धभूमीत पाहून घेईन. पण तुम्हा दोघांकडे मी आत्ताच पाहून घेतो!
न तावत् सदृशम् नाम सचिवैर् उपजीविभिः | विप्रियम् नृपतेर् वक्तुम् निग्रह प्रग्रहे विभोः || २-२९-७
तुमची उपजीविका माझ्यावर अवलंबून आहे, मी तुमचा राजा आहे, प्रभू आहे. असे असून तुम्ही माझ्याशी अशी कटू वाक्य बोलता?
माझ्या समोर येऊन शत्रूची स्तुती करताय हे तुम्हाला शोभते का? धिक्कार आहे तुमचा! माझ्याशी असे बोलायला तुमची जीभ रेटतेच कशी? तुम्हाला हे बोलतांना मृत्युचं भय नाही वाटलं? तुम्ही आत्तापर्यंत केले काम आठवून मी तुम्हाला मृत्युदंड देत नाही. चालते व्हा इथून, पुन्हा मला तुमच तोंड दाखवू नका!”
या आणि अशा अनेक प्रसंगातून नेता म्हणून रावणाची ऐकण्याची क्षमता कमी पडते असे दिसते. रावणाच्या मृत्यूनंतर रणांगणात आलेली मंदोदरी रावणाच्या पार्थिवाजवळ बसून म्हणते – मी तुला किती वेळा सांगितले की रामाशी वैर ओढवून घेऊ नकोस! सीतेला रामाकडे परत पाठव! पण तू ऐकले नाहीस! आज सीता रामाबरोबर आनंदात आहे, आणि तुझ्या (न ऐकण्या) मुळे आम्ही सगळ्या (रावणाच्या पत्नी) मात्र दु:खसागरात लोटल्या गेल्या आहोत.
मारीचकुम्भकर्णाभ्यां वाक्यं मम पितुस्तथा | न श्रुतं वीर्यमत्तेन तस्येदं फलमीदृशम् || ६-१११-८०
रावणा! मारीच, कुंभकर्ण, विभीषण, माझे वडील आणि मी सुद्धा तुला सीतेला परत पाठवण्याबद्दल वारंवार उपदेश केला. पण तूला तुझ्या शक्तीचा अवास्तव गर्व नडला. तू कुणाचेही ऐकले नाहीस, आणि हाय आज आम्हावर शोक प्रसंग कोसळला!
ज्या रावणाने बायकोला पळवून नेले, ज्याच्याशी लढतांना लक्ष्मण मरता मरता वाचला होता, अनेक सैनिक धारातीर्थी पडले होते, अशा रावणाच्या मृत्यूनंतर मात्र राम – “मरणान्तानि वैराणि” असे सांगून बिभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करायला सांगतो. एका नेत्याचे असे उदात्त विचार संपूर्ण समाजावर दीर्घकाळ संस्कार करणारे ठरले.
नेतृत्व कसे नसावे
चांगल्या नेत्याचे जसे गुण सांगितले आहेत तसेच वाईट नेत्याचे गुण पण रामायणात सांगितले आहेत. शूर्पणखा रावणाला राम-लक्ष्मणाच्या जनस्थानातील कर्तृत्वा बद्दल सांगते तेंव्हा ती म्हणते –
अतिमानिनम् अग्राह्यम् आत्म संभावितम् नरम् | क्रोधिनम् व्यसने हन्ति स्व जनो अपि नराधिपम् || ३-३३-१६
जो राजा अति मानी असतो, ज्याच्याशी संपर्क साधणे संवाद साधणे कठीण असते, जो स्वत:मध्ये रमलेला असतो, जो संतापी असतो, तो राजा संकट कोसळले असता स्वत:च्याच नाही तर स्वजनांच्या नाशास सुद्धा कारणीभूत ठरतो.
हे भविष्य रावणाने अखेर खरे करून दाखवले. युद्धात जसे राक्षसांचे एक एक वीर मारले जाऊ लागले, रावणाची मुले मारली गेली, तेंव्हा रावणाने कुंभकर्णाला बोलावून घेतले आणि सांगितले –
सर्वक्षपितकोशम् च स त्वमभ्युपपद्य माम् |त्रायस्वेमाम् पुरीम् लङ्काम् बालवृद्धावशेषिताम् || ६-६२-१९
आता तू एकटाच मला वाचवू शकतोस कुंभकर्णा! राज्याचा कोश रिकामा झाला आहे. युवा पिढी युद्धात धारातीर्थी पडली आहे. लंकेत आता फक्त बालकं आणि वृध्द राहिले आहेत. अशा परिस्तिथीत आता तूच लंकेचे रक्षण कर!
रावणाच्या नेतृत्वाने लंकेवर अशी परिस्तिथी ओढवली.
रामाच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या अयोध्येतील चित्र या विरुद्ध आहे. राम-रावण युद्ध अयोध्येपासून, किष्किंधेपासून दूर घडले आहे. त्यामुळे या दोन्ही नगरींना युद्धाची झळ लागली नाही. अयोध्येचा तर एकही सैनिक या युद्धात लढला नाही. अयोध्येला कसलीही तोशीस न लागता रामाने शेजारील राज्य असलेल्या किष्किंधा व लंकेत मित्र राजे स्थापन करून दोन देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले.
संदर्भ –
- वाल्मिकी रामायण – English Translation from valmikiramayan.net
- The Practical Sanskrit-English Dictionary – V S Apte
- Two Special Leadership Qualities: Integrity & Fidelity – Darlene Richard
ऐंशी खांबांची सभा
डियर समराट असोक,
शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष.
मी तुमास्नी पत्र पाठवली … त्ये वाचून तुमी मले सपनात भेटायला आलता … कसं झ्याक वाटलं बगा! मला लई आनंद झाला! तुमच्या सवे गप्पा मारता मारता पहाटच झाली की! मंग उठल्यावर म्या बायाडीला सांगितलं तुमी सपनात आला व्हता म्हनून. तिले वाटलं म्या खोटच बोलतुया! म्हनली आदी तुमी तोंडावर पानी मारून या जावा, झोपेत काईतरी बडबडायलाय! पाह्यलत? अश्शी वागीती माज्याशी. पन जाऊंदे! तिचं न ऐकून सांगतो कुणाला? म्या गुमान हातपाय तोंड धुवून आलो. तर बायाडीने चहाचा कप दिला हातात अन् म्हनली, “कसे दिसत व्हते राजे?”
म्या तिला एकदम डिटेलवार सांगितलं. तुमचा जरीचा फेटा, कपाळावरच गंध, धारदार नजर, तरतरीत नाक, झुबकेदार मिशा, खांद्यावरचा भरजरी शेला, तलम धोतर, कमरेला तलवार, अन् सोन्या मोत्यांचे दागदागिने! कसं एकदम रुबाबदार अन् रांगड रूपड व्हतं माझ्या राजाचं!
“व्हय? काय म्हनलं राजे?” बायाडीने आणखी इचारलं.
“म्या त्याचं कौतुक करायलोय तर त्यो त्याच्या आजाचं सांगू लागला. म्हनला माह्या आजानं (म्हंजी चंदरगुप्त मौर्याने बरे का ग) शून्यातून संमद राज्य हूबं केलं. त्यांचे आधी ते नंद नावाचे कोणतरी राजे व्हते. लई माजले व्हते. मंग गुरु चाणक्यच्या मदतीने चंदरगुप्तने त्यांला हरवले. तवा चंदरगुप्त राजे झाले.”
“असं व्हय? चंदरगुप्त राजानं काय केले नंतर?” बायाडी आता मले खोदुखोदु इचारू लागली बगा.
“चंदरगुप्त लई हुश्शार राजा व्हता. त्याने काय केलं? आपल्या राजधानी भोवती मोट्टी भिंत बांधली पह्यलं. एकदम कडेकोट बंदोबस्त केला. राज्य वाढीवलं. सगळा कारभार चोख केला. सैन्य मजबूत केलं. नवीन तलवारी, अंबाऱ्या, हत्ती घोड्यांची ऑर्डर दिली. आनी काय केलं माहित्ये? आदीच्या नंद राजाच्या काळातली एक सभा व्हती. ती पार जुनी व्हती. म्हनून नवीन मोठी सभा बांधवली. दूर देशातून कारागीर बोलिविले. ८० खांब असलेली वर्ल्ड क्लास सभा बांधली.
“अन् तुले माहितेय? चंदरगुप्तच्या दरबारात यक यवन राजदूत व्हता. मेगास्तेनस की फेनेस काईतरी नाव सांगितलं बॉ राजानं. त्या यवनाने भारतावर पुस्तक लिव्हलं इंडिका नावाचं. त्यामंदी त्याने या सभेबद्दल लिव्हलंय की – चंदरगुप्त राजाची ८० खांबा असलेली सभा लई भव्य हाय. एकदम पारसी राजाच्या सभेवानी मोठी हाय.”
“ऑस्सं? यवनाला पण ती सभा भावली, तर मंग संमद्या परजेला पन आवडली असल, नाई का? किती त्यांला अप्रूप वाटलं असल आपल्या राजधानीत जगात भारी सभा हाय म्हनून!”
“तर तर! त्याच्या परजेला कितीतरी अभिमान व्हता राजाचा! पन संमदी लोकं काय तशी नव्हती! आदीच्या नंद राजाची काई जुनी मंत्री व्हते. त्यांचे पोटात दुखाया लागलं, चंदरगुप्तची कीर्ती त्यांला बघवेना. त्यांनी मोर्चे काढले, धरणं धरली, “सभा नको, झोपडी बांधा” अशा घोषणा दिल्या. पन चंदरगुप्तने मात्र कुण्णाकडं लक्ष दिलं न्हाय. त्यो आपलं काम करत राहिला.”
“अग बया बया! कसली बेक्कार लोकं व्हती ती, चांगल्या कामात इघ्न आणणारी. अशा लोकास्नी चांगलं झालेले काई बघवतच नाय! हे पन त्या राजदूताने लिऊन ठेवलंय होय?”
“हो तर! हे सगळ त्या यवनाने इंडिका मंदी लिव्हलं. पन ती “सभा नको, झोपडी बांधा” ची पाने, आणि चंदरगुप्तला बदनाम करण्यासाठी लिव्हलेल्या प्लॅनची पाने हरवली हायती.”
“मी काय म्हन्ते, ती सभा हाय काय अजून?” बायडीने इचारलं मला.
“येडी की काय तू? हज्जार हज्जार वर्स झाली त्याले. कशी राहील सभा? काई पण इचारती! सभा नाय, पन त्या सभेचे अवशेष मात्र हायती. अजुनी कुमरहारले गेले ना, तर तिथं त्या सभेचं खांब बीम पाह्यले मिळतात. एवढ लॉकडाऊन उठलं न, की तू आनी मी दोघं मिळून जाऊ पाह्यले! लई दूरदुरून लोकं येतात ते पाह्यला. पाटण्या जवळ हाय हे गाव. मुंबईहून थेट पाटण्याला जाऊ आनि आपल्या राजाची सभा बघून येऊ. काय?”
“व्हय, व्हय! जाऊयात की! पन तुमाले एक इचारायचं राहिलं! राजे असे अचानक कसं काय आलत तुमच्या सपनात? आणि आजाच्या सभेची आठवणी का सांगितल्या? ते दिल्ली मंदी नवीन सभा बंधायलेत त्याची परगती इचारायला आलते का? की सभेला ईरोध करनारे अजून परीस हायती ते पाहायला आलते?” बायाडीने इचारले.
“तुला बरे कळले राजांच्या मनात काय व्हत ते! त्यांनी माझ्याकडे दिल्लीच्या नवीन सभेचा प्लान मागवलाय. अन् सभा पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो पन पाठवायला सांगितलाय!”
“वाटलंच मला.” असे बोलून बायडी सैपाकाला लागली आनी म्या पत्र लिव्हायला घेतलं. तुमी म्हनला व्हता ना, आपल्या झालेलं बोलण लिहून पाठिव? म्हनूनशान तुमास्नी पाठवत हाय. सोबत प्लान पन जोडलाय.
राजे! आमाला अजून बी तुमच्या आजाचा म्हंजी चंदरगुप्तचा लई अभिमान वाटतुया! त्याने राज्य मोठं केलं. जगात भारतचं नाव मोठ केलं. सोताला जगाचा राजा म्हनवणाऱ्या सिकंदरच्या गावाचं राजदूत येऊन चंदरगुप्तचं कौतुक करून गेलं. त्याच्या राजधानीचं, तटबंदीचं, सभेचं गुणगान लिहून ठेवलं ते बर झालं! गोऱ्या वितिहासकाराने लिव्हलं की इथल्या लोकांना पटतच बगा लगेच.
तुमच्या आदनेत ऱ्हानारा,
दामू.
सोपारा.
The Sanskrit Roots of English
English belongs to the Indo-European language family, of which Sanskrit is the oldest existing language. Here we will take a look at some English words and prefixes that are very similar to Sanskrit.
Words Related to Me and Mine
| Sanskrit | English |
| ma | me |
| swa | self |
| tva | thou, you |
| matru | mother |
| pitru | fater (pater) |
| bhraatra | brother |
| swasar | sister |
| suunu | son |
| duhiter | daughter |
| karsharpan / karsha (coin) | cash |
Words Related to Mind and Body:
| Sanskrit | English |
| manav | man, men |
| yuva | youth, young |
| manas | mind, mental |
| mukh (face) | Mouth (old english muth) |
| kapal (head) | as in per “capita”, captain, capital |
| bhru | brow |
| akshi (eye) | occipital, occular |
| nasika | nose, nostril, nasal |
| danta (tooth) | dental, denture |
| hrid | heart |
| janu | knee (french genou) |
| pad (feet) | pedicure, pedestrian, centipede |
| sweda | sweat |
Geometry …
| Sanskrit | English |
| kon (angle) | octa-gon, penta-gon (8 angled, 5 angled etc.) |
| miti (measure) | metric, meter, measure (latin metiri) |
| tri-kona-miti | trignometry |
| gouh (earth) | geometry, geography (greek geos) |
| lok (place) | location, locus, locale |
| tatra | there |
Numbers …
| Sanskrit | English |
| ek (one or same) | equal |
| dvi (two) | duet, dual, double, duo |
| tri (three) | three, triple |
| chatur (four) | quarter, quarternary, quadrate |
| panch (five) | pentagon |
| sapta (seven) | septulets, septagon |
| ashta (eight) | eight, octagon |
| nav | nine |
| dasha (ten) | decagon, decade |
| shatam (hundred) | century, centipede (latin centum) |
Actions …
| Sasnkrit | English |
| asti | ist, is (greek esti) |
| bandha (bind) | bind, bandage |
| ga | go |
| gam | come |
| hanta (kill) | hunt |
| hara (destroy) | harass |
| iccha, isha (to wish) | wish |
| jan (produce offspring, born) | generate, genocide |
| kath (say, talk) | quote |
Some More …
| Sanskrit | English |
| antar | inter-national, interior |
| madhya | middle, mediocre, moderate |
| ant | end |
| dama (home) | domicile, domestic |
| dana | donate |
| dev (god) | divine |
| dwar | door |
| gow | cow |
| kaal (time) | calendar (latin kalendae) |
| maas (month) | month |
| mooshak | mouse |
| mruta (death) | mortal, murder, mortuary (latin mortalis) |
| na | no |
| nawa | new |
| path | path |
| raaj (king, rule) | rich, regal, regulate |
| sama | same |
| sarpa | serpent |
| sharkara | saccharin, sucrose, sugar |
| smit | smile |
| swadu | sweet |
| taru | tree |
| tat | that |
| vak, vaacha | voice, vocal |
| vastra (clothing) | vestura |
| veda, vidya (from vid) (knowledge) | wit, wise (from vid) |
Prefixes and postfixes:
The postfix ‘er’ in words indicates the occupation / action of a
person or a thing. Same postfix is seen in English: teacher, farmer,
worker, computer, looker, reader, cooker etc. indicate the occupation /
action of the person or the thing.
Prefixes similar to Sanskrit
are seen in English too. Example in Sanskrit, the prefix ‘a’ creates
antonym as in mruta-amruta, karma-akarma, swacha-aswacha. In English too
such prefix is seen as in – political – apolitical, theist – atheist,
sexual – asexual etc.
Pronunciation Rules
The basic set of consonants common to most Indian languages have been categorized according to the source of those sounds (throat, palate, teeth, lips etc.) The 5 Varga (groups) are: क, ख, ग, घ, (ka, kha ga, gha, gn); च, छ, ज, झ, (ch, cha, ja, jha, yn); ट, ठ, ड, ढ, ण (T, Th, D, Dh, N); त, ठ, द, ध, न (t, th, d, dh, n); and प, फ, ब, भ, म (p, ph, b, bh, m). In each वर्ग (Varga) the last consonant is nasal. When an अनुस्वार (Anuswar) precedes a consonant, it represents the nasal sound of its Varga.
Thus the words: अंग (anga), संचित (sunchit), संथ (santha), अंड (aNDa), अंबा (amba).
Similar pronunciation is seen in English: anguish, puncture, anthropology, aND, ambiguity.
Nasal sound before hard D, T is pronounced as hard N: as in aNDrew, saiNT, saND, waND.
Nasal sound before soft d, t is pronounced as soft n: as in synthesis.
Nasal sound before before g is pronounced as: song, single, swing, anger.
Nasal sound before b, p is pronounced as m: as in amplify, symbiosys, simple.
Does English have its Roots in Sanskrit?
It has been hypothesized that the language of the ancestors of Indo-Europeans was a language older than Sanskrit; and it was the mother of all the Indian and European languages. This language was called Proto-Indo-European or PIE for short. This language was constructed based on the now existing languages. Thus the words in the Indian and the European languages have a root word in PIE. Sanskrit is an ancient Indo-European language and it is also nearest to PIE, thus we see the similarities between English and Sanskrit.
So what is PIE? Who spoke PIE? What literature was created in PIE? What oral traditions from PIE exist today? What songs from PIE are known? What inscription of PIE has been found? More on this in a later blog.

No comments:
Post a Comment