- ब्रम्हदेश नावाचा एक अर्थ असा निघतो की ब्राम्हणांचा प्रदेश (लँड ऑफ ब्राम्हण)
- दुसरा अर्थ असा पण निघतो की ब्रम्हदेवाचा प्रदेश (लँड ऑफ ब्रम्हा)
तसेच महाभारतामध्ये पण आपल्याला बर्माक आणि शर्माक ह्या दोन देशांच्या नावाचा संदर्भ आढळतो. ही दोन्ही नावे म्हणजे ब्रम्हदेश आणि श्यामदेश (आताचा थायलंड) ह्यांची जुनी नावे असावीत असा समज आहे. जेव्हा भीम पूर्वेकडील राज्ये काबीज करण्याच्या मोहिमेवर निघालेला तेव्हा त्याने हे दोन्ही प्रदेश काबीज केलेले.

अखिल आग्नेय आशियाच्या 'संस्कृतीकरण' प्रक्रियेमध्ये इतरांची जशी 'मलय', 'कंबोज', 'लव' ही हिंदू नावे रूढ झाली, तसे भारताशी मोठ्या सीमेने संलग्न असलेल्या या प्रदेशाचे नाव 'ब्रह्म' पडले. तेच पुढे अपभ्रंशित होऊन 'बर्मा' (Burma) झाले, ज्याचे पुढे १९६०च्या दशकापासून आलेल्या आणि सातत्याने चढत्या राहिलेल्या 'ब्रह्मीकरणा'च्या लाटेत १९८९ साली म्यानमार (Myanmar) झाले. रोमन लिपीच्या अक्षरांमुळे सदर नवीन नाव आपल्याला बरेच भिन्न भासू शकते, पण ज्यांना 'ब्रह्मी' भाषेचे जुजबी ज्ञान आहे, त्यांना कळू शकेल की वस्तुत: ते तसे नाही. या देशातील एक प्रबळ वांशिक गट, जो गेल्या एक हजार वर्षांपासून सत्ताधीश आहे, त्यांच्या 'बमा' (Bamar) किंवा 'म्यमा' (Myamah) या नावाशी या प्रदेशाचे नामसाधर्म्य आहे. तसे पाहिल्यास या देशात (बहुदा जगातील सर्वाधिक) १३५ वांशिक गट अधिकृतरीत्या नांदतात. ज्ञात इतिहासानुसार प्यू (Pyu) या वंशगटाचे प्राचीन काळी प्राबल्य असताना 'श्री क्षेत्र' या नावाची हिंदू राजसत्ता साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात उदयाला येऊन काही शतके तिथे नांदली. मधल्या काळात 'बमा' लोकांच्या टोळ्या ईशान्येकडून (तिबेट/युनान) मोठ्या प्रमाणात येऊन स्थिरावल्या. पुढे त्यांचे प्राबल्य वाढून अकराव्या शतकात 'पगान' (Pagan) साम्राज्य (ज्याचा नकाशा आजच्या म्यानमारशी बहुतांश जुळतो) 'अनिरुद्ध' (Maha Yaza Thri Aniruddha Dewa) याने स्थापन केले. प्यू-जन काळाच्या ओघात बमा-जनप्रवाहात मिसळून गेले असे सांगण्यात येते. मात्र, सध्या आपल्या मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये वास्तव्य करून असलेल्या 'ब्रू' स्थलांतरित जनजातीशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबद्दलचा निश्चित पुरावा सापडत नसला तरी सखोल संशोधनाची आवश्यकता मात्र जाणवते. विशेष म्हणजे, सदर 'ब्रू' हे आजही बहुसंखेने हिंदू (वैष्णव) धर्मीय आहेत.
अनिरुद्ध मात्र कट्टर बौद्ध-धर्मानुयायी असल्यामुळे त्याने श्रीलंका या 'धर्म'बंधूशी विशेष संबंध जुळवून त्यांच्या मदतीने आपल्या राज्यात 'तेरवाद' (ढहशीर्रींरवर) बौद्धमताला सार्वत्रिक केले. त्याच्या वंशजाच्या काळात (१२ वे शतक) राजधानीत 'आनंद' देवालय उभारण्यात आले. बहुतांश आग्नेय आशियाच्या आजच्या प्रथेनुसार ते बुद्धालय असले तरी त्याच्या शिलालेखात विद्यमान राजा विष्णूचा अवतार असल्याचे नमूद आहे. पंतप्रधान मोदींच्या सप्टेंबर २०१७ मधील म्यानमार भेटीमध्ये त्यांनी आवर्जून या देवळाला भेट देऊन त्याच्या आवारातच मांडलेल्या टेबलांवर उभय देशांच्या परस्पर सहकार्याचे अनेक करार संमत केले होते. सदर देवालय हे संपूर्ण म्यानमारमधील 'पगोडा'छाप देवळांहून भिन्न असून त्यावर भारतीय स्थापत्यशैलीचा पूर्ण ठसा आहे. बमा राजवट प्रबळ होण्याआधीपासूनच्या काळात 'मोन' वंशीयांची राज्ये दक्षिण ब्रह्मदेशात (आणि उत्तर थायलंडमध्ये) सुस्थापित होती. सदर 'मोन' हे 'बमां'पेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या बरेच अधिक पुढारलेले आणि परिसरातील 'द्वारावती' म्हणून विख्यात असलेल्या संस्कृतीचे उद्गाते होते. ब्रह्मदेशातील 'मोन' राज्याचे राजचिन्ह हे कला-सौंदर्य इत्यादीशी निगडित असलेले 'हंस' (Hongsa) होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 'प्यू' जसे पुढे वायव्येला (भारत) सरकले (असावेत), तसेच दक्षिणेतील 'मोन' हे पुढे 'आग्नेये'ला (थायलंड) सरकले आणि अधिक सन्मान-कीर्ती प्राप्त करते झाले. आपल्या नागालँडमध्ये एक 'मोन' नावाचा जिल्हा आहे. म्यानमारमध्ये अनेक वांशिक गटांची नावे चीन, कचीन, कारेन इ. ही त्यांच्या प्रांतांच्या नावे आहेत. तसेच कदाचित 'मोन' लोकांच्या बाबतीत असू शकेल. थायलंडमध्ये 'मोन' लोकांचे मूळ स्थान भारत मानले जाते, हे इथे लक्षात घ्यायला हवे. या बाबतीतही अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
काही वर्षापुर्वी या इरावती नदीच्या कुशीत पिढ्यानपिढ्या राहणार्या लोकांच्यावर एक मोठा बाका प्रसंग येऊ घातला होता. त्यामुळे हे सर्व लोक गेली काही वर्षे मोठ्या संकटाच्या व सबंध जीवनाचीच उलथापालथ होईल अशा घटना क्रमातून जात होते. यापैकी काही जणांची पिढीजात असलेली शेतजमीन, त्यांच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर काही लोकांसाठी तो एक अटळ भविष्यकाल दिसत होता. सुदैवाने या सगळ्या प्रकरणाची अखेर सुखद होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ब्रम्हदेशातील सैनिकी सरकार 2003 सालापासून या इरावती नदीवर एक महाविशाल धरण बांधण्याच्या प्रकल्पाच्या विचारात होते. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ 21 डिसेंबर 2009 ला उत्तर ब्रम्हदेशातील कचिन या राज्यातील ‘म्यिटकायना‘ (Myitkyina) या गावाजवळ करण्यात येऊन हा प्रकल्पाचा प्रारंभ अधिकृत रित्या करण्यात आला होता. या गावापासून सुमारे 43 मैलावर, माली व एनमाई या दोन नद्यांचा संगम आहे. संगम झालेल्या या दोन नद्यांच्या पुढे वाहणार्या प्रवाहालाच इरावती असे नाव आहे. या संगमापासून 3 किलोमीटर अंतरावर, हे धरण इरावती नदीवर बांधण्यात येणार होते. माली व एनमाई नद्यांच्या संगमाजवळचा हा भाग जैविक विविधतने अतिशय नटलेला म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात ब्रम्हदेशाच्या इतिहासाशी निगडित अशी अनेक प्रसिद्ध स्थाने असल्याने अनेक ब्रम्ही अभ्यासक या प्रदेशाला ब्रम्हदेशाची सांस्कृतिक जन्मभूमी म्हणून ओळखतात. हा सर्वच भाग भूकंप प्रवण म्हणूनही ओळखला जातो.
इरावती नदीवरचे हे धरण 2019 साली पूर्ण होणार होते व या धरणासाठी 3.6 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित होता. हे धरण ब्रह्मदेशातील विद्युत शक्ती मंत्रालय, ‘एशिया वर्ल्ड कंपनी‘ या नावाची एक खाजगी ब्रम्ही कंपनी आणि चिनी सरकारी कंपनी ‘ चायना पॉवर इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन मिळून बांधणार होते. या धरणामुळे तयार होणारा जलाशय 766 वर्ग किलोमीटर किंवा सिंगापूरच्या क्षेत्रफळाहूनही मोठा असणार होता. या धरणापासून तयार होणार्या 6000 मेगॅवॅट विजेपैकी 90% वीज चीन मधील ग्राहकांच्याकडे जाणार होती. या धरणाच्या प्रकल्पात भांडवल गुंतवणार्या ‘ चायना पॉवर इनव्हेस्टसमेंट कॉर्पोरेशन ‘ या चिनी सरकारच्या मालकीच्या कंपनीला या धरणाच्या प्रकल्पातून होणार्या फायद्यापैकी 70% फायदा मिळणार होता.
हा धरणाचा प्रकल्प सुरू होण्याआधी पासूनच या धरणाला ब्रम्हदेशात कमालीचा विरोध होत होता. कचिन या राज्यात सर्वात जास्त विरोध स्वाभाविकपणे होत होता. कचिन हे राज्य गेली अनेक दशके अशांत आहे. ‘ कचिन स्वातंत्र संघटना ‘ या नावाची एक चळवळ येथे असून त्यांची स्वत:ची शस्त्रधारी सेना व ब्रह्मदेशचे सैन्यदल यांच्यात नेहमीच चकमकी घडत असतात. कचिन राज्यातील ब्रह्मी लोकांना हे धरण स्थानिक कचिन नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी बांधले जाते आहे असे वाटते आहे. त्याचप्रमाणे या धरणामुळे या भागातील पर्यावरणाचा नाजुक समतोल ढळेल असेही मत येथे आहे. गेल्या दोन वर्षात या धरणामुळे काही हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे व पुढच्या काही वर्षात स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी भिती या संघटनेला वाटते आहे. ब्रह्मदेशाच्या सैनिकी सरकारने लोकांना विश्वासात घेण्यासाठी कोणतीच पावले न उचलल्याने या प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. ब्रह्मदेशाचे सैनिक व कचिन येथील गरिला सैनिक यांच्यात गेले वर्षभर चकमकी घडत असून या भागात स्थायिक झालेल्या अनेक चिनी नागरिकांना परत सरहद्द ओलांडून चीनमध्ये आश्रयास जावे लागले आहे. गेले काही महिने या भागातील लढाया आणखीनच वाढत चालल्या आहेत.
गेल्या काही वर्षात हजारो चिनी व्यापारी आणि कामगार कचिन राज्यात चीनहून स्थलांतरित झाले आहेत. या भागातला सर्व व्यापार आता या चिनी व्यापार्यांच्या हातात आहे व स्थानिक कचिन जनतेला ही गोष्ट अतिशय खुपते आहे. या धरणामुळे निर्माण होणारी बहुतांशी वीज चीनला निर्यात करण्यात येणार आहे हे समजल्यावर स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला होणारा विरोध अधिकच तीव्र झाला. ब्रह्मी लोकांची अशी भावना आहे की इरावती नदी ही ब्रह्मी संस्कृती आणि वारसा याचे चिन्ह आहे व ती त्यांची जीवनदायिनी आहे. या अशा नदीचा चीनला उपयोग करू देण्यास स्थायिकांचा तर विरोध आहेच पण देशाबाहेर असलेले व पर्यावरण आणि मानवाधिकार यांच्या साठी लढणारे ब्रह्मी नागरिक यांनीही या प्रकल्पाच्या विरोधी मत दिले आहे. यंगून आणि मंडाले येथील रहिवाशीही या प्रकल्पाला श्रीमती स्यू की यांनी विरोध दर्शविल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात गेले आहेत. चीन ब्रह्मदेशात करत असलेली गुंतवणूक अनेक ब्रह्मी नागरिकांना पसंत नाही त्यामुळे सुद्धा या प्रकल्पाला होणारा विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. श्रीमती स्यू की यांनी स्पष्टपणेच असे सांगून टाकले आहे की चीन मधली विद्युत शक्तीची मागणी पुरवून तेथील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे ब्रह्मदेशातील प्रकल्प त्वरेने भंगारात टाकून देण्यात यावेत.
काही महिन्यांपूर्वी ब्रह्मदेशात सैनिकी देखरेखीखाली निवडणूका झाल्या होत्या. या निवडणूका स्वतंत्रपणे झाल्या नाहीत असे अनेक देश म्हणत आहेत. तरीही सध्याचे ब्रह्मी सरकार निवडून आलेले असल्याने हा प्रकल्प ही त्यांच्यापुढची एक चाचणी बनली आहे. या सर्व दबावामुळे मागच्या आठवड्यात ब्रह्मी सरकारच्या प्रवक्त्याने घोषणा केली की ब्रह्मदेशचे प्रधान मंत्री श्री. थेइन सीन यांनी या प्रकल्पाला त्यांचा अधिकार काल संपेर्यंत (5 वर्षे) स्थगिती दिली आहे. माहिती मंत्रालयाच्या पब्लिक रिलेशन विभागाचे मुख्य संचालक श्री. यी हुट यांनी ही माहिती दिली होती. त्यांच्या मते श्री. थेइन सीन यांना लोकांनी निवडून दिलेले असल्याने, लोकभावनांचा आदर करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. ब्रह्मदेशात काहीतरी बदल होत आहेत याचीच एक चुणूक या स्थगन आदेशामुळे मिळाली आहे.
श्री. थांट–मिंट–यू या एका ब्रह्मी लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात ते म्हणतात की ” ब्रह्मदेशात लोकांना असे वाटते की ब्रह्मदेशातील राजकीय परिस्थितीचा चीनने आपल्या फायद्यासाठी गेली अनेक दशके उपयोग करून घेतला आहे. चिनी व्यापार व गुंतवणूक याचा ब्रह्मदेशला जरूर फायदा होईल. मात्र या साठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचा आयुष्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेणारे आणि पूर्ण पारदर्शी असलेले प्रकल्प चिनी मदतीने उभारणे आवश्यक आहे नाहीतर अशा प्रकल्पांवरचा ब्रह्मी लोकांचा रोष आणखीनच वाढेल. ” पर्यावरण तज्ञांच्या मताने, ब्रम्हदेशाच्या पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी कोणतेही जल विद्युत प्रकल्प ब्रह्मदेशात उभारले जाऊ नयेत व आधी काम चालू असलेले इरावतीवरचे व इतर ठिकाणांवरचे प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावेत. असे सांगण्यात आले आहे.
या चिनी मदतीच्या प्रकल्पाचे काम अचानकपणे थांबवण्यात आल्याने चिनी वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकक्षोभासाठी प्रकल्प बंद करणे ही संकल्पनाच चिनी सरकारला नाही. सध्या तरी चीनने, ब्रह्मी शासनाने, चिनी कंपन्यांचे आर्थिक किंवा कायदेशीर या प्रकारचे कोणतेही नुकसान होणार नाही अशी पावले उचलावी एवढेच वक्तव्य केले आहे. या महिन्यात श्री. थेइन सीन भारत भेटीसाठी येणार आहेत. या नंतर ते चीनला भेट देणार आहेत. चिनी भेटीचे अधिकृत कारण कोणतेही दिले गेलेले असले तरी आपल्या धरणाचे काम थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच ते बिजिंगला जाणार आहेत हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल.
सध्या तरी ब्रह्मी सरकार आपले शासन कसे लोकाभिमुख व लोकशाही आहे हे या धरणाचे काम थांबवण्याच्या आपल्या निर्णयावरून दिसून येते असे प्रौढीने सांगत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय का व कोणत्या कारणांनी घेतला गेला आहे याची खरी कारणे कालच सांगू शकेल.
पूर्वतयारी : एकंदर भौगोलिक आवाका लक्षात घेऊन बँकॉकला मध्यवर्ती ठिकाण बनवून सारा प्रवास आखला. भारतातून विमानेही बँकॉक साठी थेट व स्वस्त आहेत हे आणखी एक कारण. माझ्या आराखड्यानुसार थायलँडमध्ये किमान तीन वेळा येणेजाणे आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक 'ट्रिपल एन्ट्री व्हिसा' मिळविण्यास प्रयास पडले. पहिल्यांदा तर 'असा व्हिजा आम्ही करत नाही' असे सांगून वकिलातीने कागदपत्र परत पाठवून दिली. नंतर साधारण २५ दिवस सततचा पाठपुरावा, त्यांच्याच वेबसाईटचे दाखले व दिल्लीतील दूतावासाकडून मिळालेली मदत यामुळे शेवटी काम झाले. वेगवेगळ्या देशांना भेटी देत असल्याने तांत्रिकदृष्ट्या मला 'ट्रिपल एन्ट्री ट्रांझीट व्हीझा' मंजूर झाला.
(टीप : थायलँड 'ऑन अरायव्हल' सुद्धा व्हिसा देतो, परंतु त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे तीन तीन वेळा असा वेळेचा अपव्यय न करण्याचा योग्य सल्ला त्यांच्या दूतावासाकडून मिळला व तो अतिशय उपयोगी ठरला.)
ब्रह्मदेश व कंबोडिया दोन्ही देश ई-व्हिसा देतात. साधारण दोन ते पाच दिवसात ईमेल वर उत्तर येते. ब्रह्मदेशाचा ईव्हिसा मात्र केवळ मंडले व रंगून या दोन टिकाणी आगमन होणार असेल तरच मिळतो. बाकी कुठूनही देशात जाण्यासाठी रीतसर दिल्लीहून आधी व्हिसा करावा लागतो.
ब्रह्मदेश : सद्य भौगोलिक सीमांनुसार हा प्रदेश भारत व चीन यांच्या मध्ये स्थित आहे. (सांप्रत चीन व भारत यांची लांबवर समाइक सीमा हि खरी तिबेट सीमा आहे). सांस्कृतिक चीनचा भारताशी संबंध या भूमीवर आला व हा मिलाफ आजही पहावयास मिळतो. स्वतंत्र भारताची अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर व मिझोरम हि राज्ये ब्रह्मदेशास लगत आहेत. खरी छिंदविन नदी हि नैसर्गिक सीमा, परंतु नेहरूंच्या अनेक कृपाकर्तव्यांपैकी एकामुळे इथला नाग जमातींचे पूर्वापार वास्तव्य असलेला बराच भूभाग ब्रह्मदेशाच्या हद्दीत गेला. छिंदविन नदी पुढे इरावतीस जाऊन मिळते. इरावती हि ब्राह्मदेशाची जीवनरेखा. हिमालयातून उगम पावून अनेक महान संस्कृतींच्या विकासास आधार ठरणाऱ्या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र, इरावती, साल्विन, मेकॉंग, यांग्त्झी व हॉंगहे या महानद्यांपैकी पहिल्या चार भारतीय संस्कृतीच्या मातृका होत तर पुढच्या चार पौर्वात्य संस्कृतीच्या. ब्रह्मदेशाच्या बहुतांश प्राचीन राजधान्या व संपन्न शहरे ईरावतीच्या काठीच आहेत.
प्रवासाचा आराखडा:
प्रवास रूपरेखा : आधी लिहिल्याप्रमाणे, थायलँड प्रवासाचे तीन भाग केलेले होते. भारतातून प्रथम बँकॉक गाठले व त्यातील पहिला भाग 'शहरी पर्यटन / नैशाचारी पर्यटन' पूर्ण करून ब्रह्मदेशाकडे प्रस्थान ठेवले. मंडले हा प्रवासातील सर्वात उत्तरेकडचा बिंदू. तिथून सुरुवात करून क्रमाक्रमाने दक्षिणेस येत रंगून वरून पुनश्च बँकॉक, पुढे थायलँड भाग दुसरा 'ऐतिहासिक हिंदू-बौद्ध नागरी पर्यटन' तिथून पूर्वेकडे कंबोडिया प्रवास, पुनश्च थायलँड, भाग तीन, 'अतिउत्तर सीमावर्ती ग्रामीण पर्यटन' पुढे लाओस व शेवटी घरी परत असा एकंदर आराखडा…

गेल्या वर्षी उन्हाळ्यात ईशान्य भारतात प्रवास केला होता तेव्हा मणिपूर च्या सीमेवर ब्रह्मदेशाची प्रथम ओळख झाली. तेथे भारत-ब्रह्मदेश मैत्री करारानुसार १६ मैलांपर्यंत दोन्ही बाजूंच्या नागरिकांना एकमेकांच्या हद्दीत मुक्त प्रवेश आहे. मी आसाम, त्रिपुरा, नगालँड, मणिपूर असा भटकत सीमेवरच्या 'मोरे' गावातून तिथल्या अधिकाऱ्याचे सही-शिक्क्याचे पत्र घेऊन 'तामू' या ब्रह्मदेशाच्या हद्दीतल्या गावास भेट देऊन आलो. या देशाविषयी कुतूहल निर्माण झाले ते तेव्हा. तोही प्रवास अत्यंत रोमांचक होता, त्याविषयी पुन्हा कधी…
तर मग, ब्रह्मदेशात प्रवेशास तयार?
बँकॉकहून सकाळचे थेट विमान घेऊन मंडले येथे उतरलो. ईव्हिसा होताच, इमिग्रेशन, स्थानिक चलन व सिमकार्ड असे प्राथमिक सोपस्कार पार पाडून एअर एशिया च्या शटलने शहराकडे प्रस्थान. विमानतळ नवीन असल्याने बराच लांब आहे, परंतु एअर एशिया त्यांच्या प्रवाशांशाठी मोफत शटल चालवते. एक उत्तम एकल-प्रवासी / बॅकपॅकर होस्टेल आरक्षित केलेलं होतं तिथे समान टाकून जुन्या शहराकडे कूच केली. (उत्तम अशासाठी : शहराच्या मध्यवर्ती भागात, भोवती खायची प्यायची उत्तम सोय, स्वस्त मिक्स डॉर्म, भाड्याने सायकल, कपडे धुवायची फुकट सोय (वॉशिंग मशीन), गरम पाणी, न्याहरी फुकट व उत्तम कर्मचारी. दोस्तही खूप चांगले मिळाले, बहुतांश 'कल्चरल शॉक' पचवत असलेले युरोपीय… (एकल प्रवाशांसाठी; राहण्याची जागा मी अशी निवडतो. डॉर्म स्वस्त व नवे मित्र बनविण्यास उत्तम, TripAdvisor व Agoda ही उत्तम माध्यमे) )
ब्रह्मदेशातील बहुतांश जुनी शहरे चौरसाकृती असून उंच संरक्षक भिंती व खोल खंदकांनी संरक्षित असत. मंडलेही असेच एक. आता शहरीकरण वाढल्याने या चौरसाच्या बाहेरही दहा पट विस्तार झालेला आहे पण जुन्या शहराच्या कवचामुळे त्याचा वेगळेपणा टिकून आहे. तटबंदीच्या आत जुना राजवाडा अलीकडेच पुन्हा बांधून काढण्यात आला. ब्रह्मदेशाची ही शेवटची राजधानी. ब्रिटीशांनी राज्य खालसा केल्यानंतर इथल्या 'थिबा' राजाला नजरकैदेत रत्नागिरीला ठेवण्यात आले, तेव्हापासून इथली राजेशाही खंडित झाली. उत्कृष्ठ प्रकारचे सागवानी बांधकाम इथे पहावयास मिळते. तिथेच एका इतिहासप्रेमी स्थानिक तरुणाशी ओळख झाली, पुढे त्याच्या दुचाकीवर आम्ही गावभर हिंडलो. जुन्या शहरातला मुळ राजवाडा दुसऱ्या महायुद्धात जपानच्या स्फोटकांमुळे उद्ध्वस्त झाला. याच परिसरात मंडलेचा तुरुंगही होता.
पुढे महामुनी बुद्धाच्या दर्शनाला गेलो. मंडले मधील सर्वात प्रसिद्ध धर्मक्षेत्र. इथे बहुतांश मोठ्या बौद्ध मंदिरांत मूर्तीला सोन्याच्या तलम पत्र्यान्द्वारे मुलामा देण्याची प्रथा आहे. हे स्थान विशेष प्रसिद्ध असल्याने अनेक शतकांमध्ये अशा अर्पण केलेल्या सोन्यामुळे मूळ मूर्तीचा आकार सर्व बाजूंनी किमान सहा इंच वाढला आहे. मूळ मूर्ती बुद्ध काळातील असून वजन कैक टनांमध्ये आहे.
या मंदिराव्यतिरिक्त 'चुकवू नये असे काही' म्हणजे कुथोडाव पॅगोडा, इथे संपूर्ण त्रिपिटक ग्रंथ ४-५ फुटी ७२९ शिलपट्टिकांवर कोरून मुख्य स्तुपाभोवती छोट्या छोट्या घुमट्यांमध्ये स्थापन केला आहे. 'जगातील सर्वात मोठे पुस्तक' म्हणून याची ओळख आहे.
दुसरे स्थान म्हणजे 'श्वेनंदाव विहार', मूळ राजवाड्याचे काही भाग वापरून बांधलेली हि इमारत आज प्राचीन ब्राह्मदेशाच्या स्थापत्य वैभवाचा एकमात्र शिल्लक नमुना आहे. उत्कृष्ठ सागवानी बांधकाम व सुंदर कलाकुसर यासाठी हि इमारत प्रसिद्ध आहे. तासंतास बघत राहावे असे शिल्पवैभव! फोटो फार न्याय देऊ शकणार नाहीत, परंतु झलक सुद्धा मुग्ध करणारी आहे.
तिसरे म्हणजे मंडले हिल, उत्तरेकडे असलेली हि पर्वती सारखी छोटी टेकडी. इथून शहराचे दृश्य फार सुंदर दिसते. शिखरावर काही बौद्ध मंदिरेही आहेत.
चित्र दालन :
मंडले चा नकाशा आवर्जून पाहण्यासारखा, खंदकासहित जपलेले जुने नगर उत्तरेकडे, सुनियोजित विस्तार, समांतर रस्ते, सर्व रस्त्यांना क्रमांक ई. विशेष, आशियायी जुन्या शहरात दुर्मिळ…

जुने मंडले


राजप्रासाद (पुनर्रचित)



महामुनी बुद्ध मंदिर





सुवर्णलेपित बुद्ध मूर्ती
कुथोडाव पॅगोडा


श्वेनंदाव विहार
प्रवेशद्वार




सागवानी कोरीवकाम

सागवानी कोरीवकाम व स्थानिक पर्यटक
मंडले हिल
[अवांतर १ : मंडलेशी मराठी मनाचं नातं आहे ते टिळकांच्या या शहराशी संबंधित कार्यामुळे. अंदमान प्रमाणे 'तीर्थक्षेत्र' ही माझी वैयक्तिक भावना! ६ वर्षे टिळक येथे कारागृहात होते. येथेच त्यांनी 'गीता रहस्य' हा महान मराठी ग्रंथ लिहिला. गेल्या वर्षी या ग्रंथाच्या प्रकाशनाचे शतकी वर्ष होते, त्यामुळे या ठिकाणी जाण्याचे एक वेगळे महत्वही होते. येथील भारतीय दूतावासाकडे टिळकांच्या स्मृती येथे कुठल्याही स्वरुपात जपल्या आहेत का? अशी विचारणा केली असता, पहिले 'कोण तुम्ही?' असा उद्दाम प्रतिसाद, परंतु नंतर सविस्तर ईपत्र देवघेविनंतर सध्यातरी असे कोणतेहि स्मारक अथवा स्मृतीदर्शक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्यासाठी आपला तेथील प्रमुख दूतावास, आपले परराष्ट्र खाते या सगळ्यांनाही आमच्या ईपत्र संभाषणात बोलवावे लागले... हेतू हाच, की भविष्यात तरी किमान हे प्रत्यक्षात यावे. विशेषतः आपण ज्या प्रकारे थिबा राजाचा निवास जपलेला आहे, ते लक्षात घेता… टिळकांनंतर सुभाषचंद्र बोस देखील मंडलेशी काही काळ निगडीत होते.
अवांतर २ : नगराचे नाव संस्कृतोद्भव, 'मंडल' वरून स्थानिक भाषेत मंडले/मंदले/मंटले असेच आहे (बोली प्रमाणे उच्चार भिन्नता). ‘मंडाले’ हा सांप्रत भारतीय रूढ उच्चार अयोग्य आहे. गीता रहस्याच्या प्रस्तावनेतही टिळक ' मन्दले' असेच लिहितात. पुढे कधीतरी याचे अपभ्रष्ट रूप रूढ झाले ते कायमचेच.]
लेख आणि छायाचित्रे आवडली
टिळकांनंतर, सुभाषचंद्र बोस
माझ्या आंजा वरील माहितीनुसार जपानी आक्रमण मयन्मारच्या लोकांना आवडलेले नव्हते, सुभाषचंद्र बोसयांचा उल्लेख त्यांना कितपत खटकू शकतो याची कल्पना नाही. शिवाय बर्मात राहणारे भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू व्यापार्यांनी स्वातंत्र्यपुर्व काळा पर्यंत केलेले व्याज व्यवहारामुळे स्थानिक जनतेत भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू बद्दल नाराजी असावी. शिवाय आपले रास्वसंघाच्या काही अंखडभारत नकाशात बर्मा सहीत पुर्व आशीयाचा भाग दाखवला जात असावा आणि त्यावरुन चीन आणि पाकिस्तानी डिप्लोमॅट्स भारताविरुद्ध वातावरण निर्मिती करत असावेत. (चुभूदेघे)
बाकी इमेल चर्चेतून टिळकांच्या मन्डले निवासाचा काही पत्ता लागला का ? मला वाटते बहादूर शहा जफर थिबा प्रमाणे मंडलेत राहीला होता.
* शेवटी आपल्या लेखात जे दोन उल्लेख आले आहेत त्या अनुषंगाने आमची धागा जाहीरात
**"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?
** लोकमान्य टिळकांचे साहित्य विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे
१. जपानचे पूर्व भारतावरील आक्रमण : महायुद्ध काळात कोण कोणाविरुद्ध आणि कोणासाठी लढले यात आपल्याकडे देखील कुठे स्पष्टता आहे… ईशान्य भारतात सुभाष बाबू व जपान्यांविरुद्ध लढणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या स्मृती अगदी उत्तम मोठमोठ्या कबरस्तानात जपल्या आहेत आणि खुद्द नेतजींसह अनेक सैनिकांचे काय झाले कोणाला माहितीही नाही… कोहिमा व इम्फाळ (कोमिल्ला सुद्धा) येथील वर्ल्ड वॉर सिमेटरि बघताना फार दु:ख वाटले. काही मराठी नावेही दिसली याद्यांमध्ये, अर्थात ब्रिटीशांकडून लढ्लेल्यांची… असो, ब्रह्मदेशाचा पारंपारिक शत्रू थायलंड जपान्यांबरोबर असल्याने व इतरही कारणांनी ते त्यांना म्हणता तसे आवडले नाही हे सत्य
२. म्यानमार जनतेची पश्चिम-भारतीयांविषयी भावना : एके काळी रंगूनची अर्धी अधिक लोकसंख्या पश्चिम-दक्षिण भारतीय होती, महायुद्ध काळात बरेच परत आले. पुढे साठच्या दशकात सैन्यसत्ता आल्यानंतर वंशवाद पुन्हा उफाळून आला व मोठ्या संख्येने लोकांनी स्थानांतर केले. आजही मणिपुरच्या सीमेवर कैक हजार तमिळ भाषिक स्थायिक आहेत, ब्रह्मदेशातून पायी पश्चिमेकडे यायला निघालेले… (असा प्रांतवाद आजच्या महाराष्ट्रालाही नवीन नाही, त्यामुळे त्यांनाही नावे का ठेवा… आपलेच बंधू ते…(वैषम्य)) सध्या २ टक्के लोक पश्चिम भारतीय वंशाचे आहेत.
३. रास्वसंघ, अंखडभारत इ. : संघाचे विस्तृत कार्य या देशात आहे. आपल्याकडेच संघाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या लोकांची कमी नाही त्यामुळे तिथेही काही लोक असतील तर त्यात नवल नाही, त्यासाठी चीन/पाकिस्तान यांना काही वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील असे वाटत नाही (स्वल्प उपहास, क्षमस्व).
४. टिळकांचा मन्डले निवास : जुन्या शहरातील कारागृह तर संपूर्ण नष्ट झालेला आहे, तसेच त्यांना ज्या स्वतंत्र निवास स्थानात ठेवले होते तोही कालौघात नाश पावला. पूर्वी तेथे एक फलक असे पण आता तोही नाही.
५. बहादुरशाह : बहादुरशाह झफ़र हा रंगून मध्ये नजरकैदेत होता व तिथेच त्याचे निधन झाले. अलीकडे त्याची कबर 'मिळाल्यानंतर' त्यावर दर्गा वगैरे बांधण्यात आला पण त्याचीच ही कबर याबद्दलची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.
मंडलेहून छोट्या बसने साधारण ४ तासांच्या अंतरावरील ह्या पुरातन राजधानीच्या ठिकाणी मुक्काम हलवला. हा या लेखमालेचा मुख्य गाभा होय. या स्थानाविषयी लेखन करायची इच्छा होती म्हणून हा प्रपंच. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेलही, परंतु बव्हंशी हे स्थान अपरिचित आहे. आणि इतके आफाट सुंदर असूनही अपरिचित असावे ही आश्चर्यभावना या लेखाची जननी होय. असो…
संक्षिप्त इतिहास : मूळ पुरातन नाव 'अरिमर्दनपुरं', पाऴी भाषेत 'अरिमद्दन', स्थानिक भाषेत 'पुगं' आणि आंग्ल 'बगान'. या स्थानाचा भरभराटीचा काल हा साधारण नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत. उर्वरित जगात मंगोल हैदोस घालू लागले तेव्हा भारत तुलनेत जवळ असूनही अनेक कारणांनी त्यांच्या आक्रमणापासून सुरक्षित राहिला. परंतु त्याच सुमारास बगान चे राज्य कमजोर होत गेले व अतिपुर्वेकडे ब्रह्मदेशात मंगोल घुसले. ते बगान पर्यंत कधीच पोहोचले नाहीत, तरीही सततच्या युद्धाने राज्य खिळखिळे होत शेवटी या शहराचे महत्व कमी होत एका पुरातन तीर्थस्थानाइतकेच उरले. (पुढे कायमच उत्तर व दक्षिण ब्रह्मदेशात वेगवेगळी सत्तास्थाने निर्माण झाली, पण बगान नंतर तितके शक्तिशाली राज्य पुढे तीन शतके झाले नाही. पुढे 'हंसवती' साम्राज्याने पुन्हा सर्व भूभागाचे एकत्रीकरण केले ज्यात त्यांनी थायलँड चे 'अयुत्थया' राज्य बुडविले व उत्तरेकडे मणिपूर सुद्धा जिंकले.)
इरावतीच्या काठी वसलेले हे महानगर निश्चये जागतिक स्थापत्य आश्चर्यांपैकी एक! १०० चौकिमी पेक्षाही अधिक विस्तृत भूभागावर हे महानगर पसरलेले होते. इथल्या संपन्न जनतेने अनेक मंदिरे व स्तूप या ठिकाणी बांधले, १०,००० हूनही जास्त संख्येने असलेली ही पूजास्थाने या शहराची संपन्नता व सौंदर्य यांची कीर्ती दूरवर पसरवत असतील यात शंका नाही. शतकांनंतर आज सुमारे २२०० बांधकामे शिल्लक आहेत, परंतु तेवढीही मूळ वैभवाची कहाणी समर्थपणे सांगत दिमाखात उभी आहेत. आज हा संपूर्ण भूभाग संरक्षित करण्यात आलेला आहे. येथे अनेक हिंदू मंदिरेही होती परंतु आता निश्चित ओळखण्यासारखे एकच विष्णूमंदिर शिल्लक आहे. लहानमोठ्या आकाराची विविध शैलीतली अशी शेकडो मंदिरे क्षितिजापर्यंत पसरलेली पाहणे हा अनोखा अनुभव. पुरातत्वशास्त्र प्रेमींसाठी तर मेजवानी, स्थापत्य उत्क्रांती विशेष अभ्यासनीय! मूळ अमरावती-नागार्जुन (आं.प्र.) स्तुपावर आधारित बौद्ध शैली व नागरी हिंदू मंदिर स्थापत्य दोन्हीचा ब्राह्मी पद्धतीने समांतर विकास तर कुठे मिलाफ पहावयास मिळतो. विविध काळातील मंदिरे कमी अंतरावर पहावयास मिळत असल्याने असा तौलनिक अभ्यास सोपा व फार मजेदार आहे.
हि सर्व मंदिरे मातीच्या विटांनी बांधलेली आहेत त्यामुळे नैसर्गिक लाल रंग हिरवाईत उठून दिसतो. सूर्योदय व सूर्यास्ताचे रंग अजूनच सौंदर्य खुलवतात. काही महत्वाची मंदिरे पांढऱ्या रंगात रंगवलेली आहेत तर काही सोन्याने मढवलेली आहेत, वेगवेगळ्या कोनातून मंदिरसमुच्चयाची येथील दृश्ये खासच! आधुनिक काळात पर्यटन विभागाने हॉट एअर बलून सेवा सुरु केली आहे, त्यामुळे एका वेगळ्या अनुभवाचा आनंद पर्यटकांना घेत येतो. एका खासगी हॉटेल ने एक उंच मनोरा बांधून अजून एक सोय केली आहे. दूरवर पसरलेला ईरावतीचा प्रवाह, व नजर जाईल तिथवर पसरलेली सुंदर कलात्मक मंदिरे असे किती साठवू नि किती नको असे करून सोडणारे दृश्य!
आता पर्यटन वेगाने वाढत आहे, सोयी सुद्धा आता जागतिक दर्जाच्या उपलब्ध आहेत. सवयीप्रमाणे येथेही एका हॉस्टेलवर राहिलो, तेथेच मंडलेला भेटलेला स्वीडिश मुलगा परत भेटला, आम्ही दोघे व अन्य एक-दोन असे ई-बाईक भाड्याने घेऊन रोज नव्या दिशेने जात असू. हजारो मंदिरे असल्याने कोठे काय बघायचे हा अभ्यास करून जाणे फायद्याचे ठरते. काही मंदिरे भव्यतेसाठी, तर काही कलाकुसरीसाठी विशेष. काही मंदिरांमध्ये भित्तिचित्रेही आहेत तर काही मंदिरांमधून सभोवतीचे दृश्य अतिशय मनोहर दिसते. त्यामुळे कुठले मंदिर सुर्योदयास पहायचे, कुठून सूर्यास्त चांगला दिसतो, कुठे गर्दी अधिक असते इत्यादी गोष्टींचा अभ्यास असला तर वेळ वाया न घालवता सर्वोत्तम ते पाहता येते. वैयक्तिक अनुभवात साधारण दोन महिने या चारही देशांच्या अभ्यासासाठी दिले, त्यातील निम्मा वेळ बगान व अंगकोरलाच लागला. परंतु 'याची देही याची डोळा' पाहण्याच्या गोष्टींच्या यादीतील एक, अतिशय मनसोक्त आनंद घेऊन यादीतून वजा केली. असो… शब्दांना मर्यादा घालतो चित्रेच अधिक बोलतील…
हि चित्रे म्हणजे केवळ एक झरोका

लाल विटांची मंदिरे, अनेकविध शैलीतील मंदिरे असली तरी चित्रातील मंदिर हे खास बगान शैलीतील म्हणता येईल. बहुतांश मंदिरे पुढे यासारखी बांधण्यात आली

काही प्रमुख मंदिरे

आनंद मंदिर : बौद्धमतानुसार एकुण २८ पैकी सध्याच्या युगात ४ बुद्ध होऊन गेले. काश्यप, काकुसंध, कोणागमन व गौतम या चारही बुद्धांच्या सुवर्णलेपित भव्य मूर्ती या मंदिरात आहेत. मंदिराचे बांधकाम सममित व भव्य आहे.

बुद्धमूर्ती: अनुक्रमे गौतम, काकुसंध, कोणागमन व काश्यप
महाबोधी मंदिर : भारतातील महाबोधी मंदिराची प्रतिकृती.
महाबोधी मंदिर
धम्मयंग्यी मंदिर : ब्राह्मी पिरॅमिड म्हणता येईल अशी रचना, येथील सर्वात मोठे मंदिर
गोन पागोडा : संपूर्ण सोन्याने मढविलेला पागोडा, बुद्धाचा दात व अस्थीखंड येथे जतन केला असल्याने अतिशय महत्वाचे तीर्थस्थान.
विविध काळातील स्तूप
सुरुवातीच्या काळातील मंदिर, हिंदू मंदिराचा साचा
सुलामनी मंदिर : विकसित ब्राह्मी शैली
हिंदू मंदिरातील आदिनारायण मूर्ती
हिंदू देवता
धम्मजायिका स्तूप
सुर्योदयाचे रंग
सुंदर व नेटके मंदिर समूह
दूरवर पसरलेल्या या पुरातन मंदिरनगरीची काही मनोहर दृश्ये
राजप्रासाद (अर्वाचीन)
बौद्ध विहार
ई-बाईक त्रयी, हॉलंड चा हम्झा, स्वीडिश जॉन व मी. येथे भटकण्याचे उत्तम व स्वस्त साधन
इरावतीचे विशाल पात्र
इरावतीच्या काठी सूर्यास्त
शेवटी, काही विशेष चित्रे. तंत्रसहाय्य, नेमकी वेळ व नेमके ठिकाण या सर्वांचा समन्वय झाल्याने विशेष. खास छपाई साठी असल्याने रॉ रंग गडद करण्यात आले आहेत. मोठ्या आकारात खरी मजा
अवांतर १ : बगान येथील मंदिरे पाहण्याचा उत्तम मार्ग हॉट एअर बलून असला तरी तो प्रचंड महाग आहे. ३००$ एका फेरीसाठी लागतात. अर्थात, उगा विमानातून कुठेतरी उडी मारायलासुद्धा इतकेच पैसे मोजावे लागतात, त्यापेक्षा हा अनुभव नक्कीच कैक पटींनी सुंदर व वसूल आहे.
अवांतर २ : बरीच चित्रे मोठ्या आकारात बघण्यात मजा आहे, विशेषतः "सुंदर व नेटके मंदिर समूह" या विभागातील. तेव्हा अशा चित्रांवर राईट क्लिक द्वारे प्रॉपर्टिझ मधून लिंक घ्या व नवीन ब्राउझर मध्ये वेळ असला तर आवर्जून पहा.
मंडलेहून चालू झालेला ब्रह्मदेश प्रवास इरावतीच्या काठाने दक्षिणेकडे ग्रामीण भागातून बगानमार्गे आता अंतिम टप्प्यात आला. बगानहून रंगून रात्रभराचा प्रवास आहे, बस व रेल्वे दोन्ही मार्ग उपलब्ध असले तरी बस अधिक आरामदायक व वेगवान माध्यम.
रंगून किंवा यांगॉन ब्रह्मदेशातले सध्याचे सर्वात मोठे व महत्वाचे शहर. दशकभरापूर्वीपर्यंत देशाची राजधानी; २००६ मध्ये ती नेयपीटाव येथे हलविण्यात आली. तसे तुलनेत आधुनिक शहर. ब्रिटीश काळात मुंबई कलकत्त्याप्रमाणे याही शहराचा नियोजित विकास झाला व त्या काळातील अनेक इमारती आजही दिमाखात उभ्या आहेत. काही भागात तर अगदी मुंबईत असल्यासारखेच वाटते. स्थानिक बमार व मॉन तसेच पश्चिम भारतीय, चीनी, थाई अशा अनेकविध रंगांत रंगलेले महानगर म्हणजे रंगून!
देशाच्या दक्षिण मध्य भागात इरावतीच्या मुखाजवळ वसलेल्या या शहराचे महत्व वाढले ते उपयुक्त व संरक्षित बंदर म्हणून. ब्रिटीश काळात अधिक विस्तार झाला, पण त्याआधी जवळील बागो (जुने नाव हंसवती), मंडले व अमरापूर यांना अधिक महत्व होते. तसा स्थानिक इतिहास बुद्ध काळापर्यंत मागे जातो, विशेषतः येथील धर्मस्थळांचा इतिहास समृद्ध आहे. श्वेडगॉन हे देशातील सर्वात महत्वाचे धार्मिक स्थान हा रंगून चा केंद्रबिंदू. पूर्वोद्धृत चार बुद्धांच्या जीवनाशी निगडीत काही वस्तू (रेलीक्स) येथे जतन करण्यात आल्या आहेत त्यामुळे या स्थानाला बौद्ध धर्मात अतिशय महत्व आहे. त्याविषयी अधिक लेखन चित्रांसमवेत… विपश्यना अध्यात्मपद्धतीचे आधुनिक प्रवर्तक सत्यनारायण गोएंका यांनी रंगून येथेच त्यांच्या कार्याची सुरुवात केली व पुढे भारतात व नंतर जगभर कार्यविस्तार केला.
द्रविडभाषिक अनेक दक्षिण भारतीय मूळाचे लोक रंगून मध्ये राहतात. कालिकेचे एक सुंदर मंदिरही जुन्या भागात आहे. एके काळी रंगूनची अर्धी अधिक जनता परप्रांतीय, विशेष करून पश्चिम व दक्षिण भारतीय होती. साठच्या दशकात सैन्यसत्ता आल्यानंतर बरेच लोक विस्थापित झाले तर काही करण्यात आले. आज काही भागात व काही वर्गात या लोकांचे प्राबल्य आहे.
देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून रंगून चे महत्व आहे. उत्कृष्ठ प्रतीचा चहा, सागवानी लाकूड व त्यावरील कोरीवकाम तसेच उच्च प्रतीच्या माणिक, जेड व अन्य रत्नांसाठी ब्रह्मदेश प्रसिद्ध आहे. बहुतांश उत्पादन स्त्रोत व खाणी या उत्तर व पूर्व भागात असल्या तरी बाजारपेठ रंगून मध्ये आहे. येथील रत्नसंग्रहालय जरूर भेट देण्यासारखे आहे, खरेदीसाठीही विश्वसनीय आहे.
पुढील भागात ब्राह्मी लोकजीवनाची धावती ओळख!
* या भागात एका छोट्या 'रत्नजडीत' विभागासाठी देवस्थानाच्या आंतरजालावरील चित्रांचा वापर करण्यात आला आहे.
रंगून शहर, ठळक उठुन दिसणारा श्वेदगॉन स्तूप
रंगून महापालिका भवन
रंगून स्वातंत्र्य स्मारक

रंगून स्वातंत्र्य स्मारक
रंगून न्यायपालिका

ब्रह्मदेशाच्या राजमुद्रेवरील सिंह
श्वेडगॉन पॅगोडा : पूर्व द्वार प्रथम दर्शन
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप हा छोट्या टेकडीवजा उंचवट्यावर असून चारही दिशेने असे प्रशस्त जिने बांधण्यात आले आहेत
रचना : मुख्य स्तूप हा छोट्या ६४ स्तूपांनी वेढलेला आहे. त्याही बाहेर चार दिशांना चार स्तूप आहेत. एकंदर रचना ही मंडल यंत्रा प्रमाणे आहे.
रचना : स्तूपाचे तीन मुख्य भाग. एकूण उंची ९९ मीटर
श्वेडगॉन पॅगोडा : मुख्य स्तूप
प्रदक्षिणा मार्ग
प्रदक्षिणा मार्ग, डाव्या बाजूस बोधीवृक्ष
प्रदक्षिणा मार्ग
दैनंदिन पूजा परंपरा : प्रत्येक वारासाठी एक अशा मूर्ती येथे स्थापन केलेल्या आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या मूर्तीवर अभिषेक करण्याची पद्धत आहे. (सोनटक्क्याच्या फुलांचे हार… अहाहा काय दरवळ!)
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
श्वेडगॉन पॅगोडा : भित्तिचित्र
श्वेडगॉन पॅगोडा : परिसरातील मंदिर
छतावरील नक्षीकाम
श्वेडगॉन पॅगोडा : रात्रीचे दृश्य

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील छत्र, ध्वज व शिखा

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णध्वज ५ फुट लांबीचा आहे. त्यावरील अत्यंत नाजूक व मनोहारी रत्नजडीत नक्षी

श्वेडगॉन पॅगोडा : शिखरावरील सुवर्णशिखा एकूण १४१ किलो सोने, ४५०० हिरे व अन्य मौल्यवान रत्ने जडवून बनवलेली आहे. मध्यभागातील सर्वात मोठा हिरा ७६ कराट वजनाचा आहे
सुंदर कांडॉग्यी सरोवर
कांडॉग्यी सरोवर व पुरातन राजप्रासाद
राजनौका प्रतिकृती
ब्रह्मदेशाविषयी काही विशेष माहिती या भागात. एकंदर फिरण्यासाठी हा देश सुंदर आहेच त्याचप्रमाणे सामान्य जीवनातील सांस्कृतिक पैलूही विशेष अनुभवण्यासारखे आहेत. लेखमालेचे नाव 'बृहन्भारत' असण्याचे हे कारण, या सर्व प्रदेशाचा भारताशी असलेला अतूट संबंध अशा अनुभवात अधोरेखित होतो. भौगोलिक सीमा या सतत बदलतच असतात परंतु सीमांपलिकडे जगातील एका महान संस्कृतीच्या प्रभावळीने सजलेल्या लोकजीवनाचे हे सहज परंतु शक्य तितक्या वेगवेगळ्या बाजूंनी दर्शन.
धर्म : हिंदू-बौद्ध संस्कृतीचा जिवंत मिलाफ म्हणजे ब्रह्मदेश. बौद्ध धर्माचे प्रमुख तीन पंथ, महायान सर्वात मोठा व इराण च्या पूर्वेकडे सर्वत्र कमी अधिक प्रमाणात टिकून आहे. वज्रयान उत्तरेकडे तिबेट मंगोलिया चीन कोरिया येथे विकास पावला. तिसरा हीनयान भारतात दक्षिणेत प्रसार होत श्रीलंकेत पोहोचला व तेथून राजकीय संबंधातून याची बीजे ब्रह्मदेशात पोहोचली. इथे तो चांगलाच फोफावला व जतनहि करण्यात आला. इथूनच तो पूर्वेकडे पसरला. यालाच थेरवाद असेही म्हणतात. आजही मोठ्या प्रमाणात बौद्ध भिख्खुंचे जीवन येथे बालक-युवक आजीवन व्रतासाठी स्वीकारतात. त्यांचा समाजात मानही खूप मोठा असतो. जीवनशैलीत कालसापेक्ष खूप कमी बदल केलेले हे भिख्खू सकाळी भिक्षेसाठी जाताना भल्या मोठ्या रंगांमध्ये नित्य दिसतात. कुठेही बौद्ध भिख्खू समोर आले तर प्रत्येक नागरिक दोन्ही हात जोडून आदर दर्शवतो.
मंदिराबाहेरील ओळखीची फुले… ओळखीचा दरवळ …
फुले विकणारी एक विक्रेती
मंडले येथील महामुनी मंदिराबाहेरील एक दृश्य
समाजकारण : बऱ्याच प्रमाणात अल्पसंतुष्ट, तुलनेत गरीब, धार्मिक व आत्ममग्न असे काहीसे ब्राह्मी समाजाचे वर्णन करता येईल. बौद्ध संन्याशांचाही सक्रिय समाजकारणात सहभाग. सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता, इच्छाशक्ती व कार्यशक्ती याचा अलीकडेच घडविलेला प्रयोग हे आधुनिक समाजाचे विशेष. सामान्यतः शांत परंतु वेळ आल्यास पश्चिमेकडच्या धर्मांध मुस्लिमांना त्यांच्याच भाषेत सुस्पष्ट उत्तर देऊन त्यांची बौद्ध देशातील जागा दाखवून देणारा सजग, सक्षम समाज. पूर्वेकडे अधिक कल राहिल्याने डावीकडे झुकणारी मानसिकता. पूर्वापार चालत आलेली राजेशाही ब्रिटिशांनी संपवली तरीही त्या सवयीतून न सावरलेला समाज, त्यामुळे 'सत्तेच्या हाती सेना' नसून 'सेनेच्या हाती सत्ता' हे वास्तव. तथाकथित लोकशाही असली तरीही सेनेच्या २५% जागा दोन्ही सभागृहात राखीव असतात. अलीकडच्या अर्थव्यवस्थेतील बदलांनंतर स्वतःच्या सांस्कृतिक व प्राकृतिक संपन्नतेचे जगातील मूल्य लक्षात घेऊन हळूहळू पर्यटन व औद्योगिकीकरण यातून विकास साधण्याचा प्रयत्न गती पकडत आहे.
अन्न : मांसाहार व भात हे प्रमुख खाद्य. चीन व भारत यांचा खाद्यसंस्कृती वर प्रभाव आहे. पौर्वात्य प्रभाव मांसाहारात अधिक, लहान चिमण्या, त्यांची अंडी, मोठे कीटक इत्यादी सर्रास सगळीकडे आवडीने खाल्ले जाते. डाळ, भाज्या यांवर भारतीय प्रभाव अधिक. तमिळ, मलबार, उडुपी, आंध्र या प्रत्येक प्रदेशात जशी सांबार ची पाकृ व चव वेगळी असते त्याप्रमाणे रंगून सांबार ही अजून निराळी चव चाखायला मिळाली. बगान मध्ये एका ठिकाणी चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी विशेष उल्लेखनीय.
चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी
पौर्वात्य प्रकारचे शहरी खाद्य पदार्थ
ग्रामीण भागातील शाकाहारी खाद्य: भात, भेंडीची भाजी, बॉकचॉय किंवा चीनी कोबी, खारवलेला बांबू
भात व काही व्यंजने
चिमणी-फ्राय व भाजक्या शेंगांप्रमाणे किरकोळ विक्रीस असलेली उकडलेली अंडी
रंगून मध्ये काही जुने प्रसिद्ध कॅफे आहेत. उत्तम प्रतीचा चहा हे ब्रह्मदेशाच्या निर्यातमालापैकी एक. अशाच दोन ठिकाणाची सहजचित्रे
वेशभूषा : स्त्रिया व पुरुष दोघेही गोल 'लॉंघ्यी' वापरतात. रंग नक्षी जरा वेगवेगळी, कपड्याने डोके झाकण्याची प्रथा काही लोकांमध्ये आहे. थंडाव्यासाठी व सनस्क्रीन म्हणून चेहऱ्यावर चंदनासम एका लाकडाचा उगळलेला लेप 'तनुका' लावतात.
बौद्ध भिक्षु तपकिरी रंगाची तर भिक्षुणी फिकट गुलाबी वस्त्रे वापरतात. भिक्षूंची वस्त्रे पूर्वी कमळाच्या देठा पासून बनलेल्या धाग्यापासून बनवलेली असत.
दोन ठिकाणी देवदर्शनास आलेली नुकतेच लग्न झालेली जोडपी भेटली त्यांचे हे फोटो. त्यांच्या कडून लग्न पद्धती विषयी मजेदार माहिती मिळाली, नवरा व बायको यांना प्रत्येकी पाच नियम पाळावे लागतात, यातील काही नियम विशेष! लग्ना नंतरही मुली माहेरची जबाबदारीही पाहतात असे दिसते. ५ नियम :
१. आपल्या पत्नीस ओरडून न बोलणे २. सर्व उत्पन्न आपल्या पत्नीच्या स्वाधीन करणे ३. पत्नीशी एकनिष्ठ राहणे ४. पत्नीस ऐपत/समाजातील स्थानास अनुसरून वस्त्रालंकार करणे ५. प्रेमाविष्कार
१. पतीच्या घरची व्यवस्था पाहणे २. काटकसरी असणे ३. पतीशी एकनिष्ठ राहणे ४. माहेर व सासर दोन्हीमध्ये भेदभाव न करणे (आर्थिक जबाबदारी तसेच भेटवस्तू दोन्हीकडे समान) ५. आळशी नसणे
भाषा व लिपी : बामाऽ भासा किंवा बर्मीझ भारतीय भाषांप्रमाणेच संस्कृत व पाऴी-प्राकृत प्रभावित आहे. मूळ पौर्वात्य असून तोही रंगही टिकवून आहे. नमस्ते किंवा हेल्लो समांतर 'मिन्गलाबाS' 'मंगल भव' या पाऴी शब्दावरून आले. बरेच तद्भव शब्द ओळखण्याइतपत स्पष्ट आहेत.
'अख्खार' लिपी अत्यंत सुंदर कलात्मक व समृद्ध आहे. सिंहलि नंतर माझी हि सर्वात आवडती लिपी. अनेकविध पौर्वात्य उच्चारांसाठी विशेष अक्षरे आहेत. भारतीय भाषांत आताशा फारशी प्रचलित नसलेली कठिण अक्षरेही नित्य वापरात असतात, उदा. ञुञू हे मुलाचे नाव, ञोङ्यू (Nyaung-U) हे शहराचे नाव ई. लिपी उदाहरण : မြန်မာအက္ခရာ
या प्रदेशात फिरताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग झाला, विशेषतः भाषा ॲप
हस्तकला : लाकूड व कागद वापरून बनवलेल्या रंगीत ब्राह्मी छत्र्या विशेष. सागवानी लाकडावरील काम आधीच्या काही भागात पहिलेच आहे. रंगीत कठपुतळीच्या बाहुल्या अजून एक विशेष.
कठपुतळीबगान ची एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे, काळ्या शाईने प्रथम चित्र साकारून त्यात रंगीत वाळू पासून बनवलेले आकर्षक रंग भरण्यात येतात. एक विशेष अनुभव येथे नमूद करण्यासारखा आहे. एका स्थानिक कलाकाराबरोबर या वेगळ्या शैलीचे प्राथमिक धडे गिरवले. खरे सांगायचे तर वाळूचे रंग इतके आकर्षक असतात हेच माहिती नव्हते त्यामुळे चित्र बनताना पाहण्याची उत्सुकता होती, त्यात मोडके इंग्रजी बोलणारी त्या कलाकाराची मुलगी हा संभाषणातील दुवा बनली व छोटी छोटी काही चित्रे आम्ही गिरवली. पारंपारिक पद्धत वापरून काही आधुनिक शैलीतील चित्रेही आज हे कुटुंब काढते. अशा प्रकारे लोकांच्या आठवणी साठवण्यात खरी प्रवासाची कृतकृत्यता…


संगीत : भारतीय संगीताचा खोलवर प्रभाव. वाद्ये पौर्वात्य असली तरी सुरावटी भारतीय रागांवर आधारित असतात. बगान जवळ एका खेड्यात काही मुले सराव करत असतानाचा एक छान अनुभव मिळाला, साधारण 'तिलक कामोद' ची सुरावट आहे.
शास्त्रीय नृत्यप्रकार 'किन्नय-किन्नयी' (मूळ शब्द सहज समजतो) आपल्याकडील नृत्य प्रकारासारखाच मुद्राप्रधान.
क्रीडा : उल्लेखनीय असा खेळ म्हणजे 'चीन्लोन'. वेतापासून बनविलेल्या पोकळ चेंडूनी हा खेळ खेळतात. विशेष असे की या खेळात स्पर्धाभाव नसून नृत्यासम कलात्मकता आणण्याचा प्रयत्न असतो. रंगूनच्या एका गल्लीत टिपलेली ही खेळाची काही क्षणचित्रे.
असे हे ब्रह्मदेशाचे विविध रंग. आग्नेय-आशियामध्ये कमी माहिती असलेल्या या प्रदेशाची हि चित्रयात्रा.
History of Brahmadesh(Burma)-by Herbert Thirkell White-1923 - Advocatetanmoy Law Library
Legends and myths, unprofitable to relate, fill the early chronicles of Burma. In times of which there are no authentic records, the Burmese, issuing from the highlands of central Asia, drove into Lower Burma the Talaings, the first inhabitants of whom we have any knowledge, and occupied Upper Burma. They are said to have established a kingdom with its capital at Tagaung in the 9th century, B.C.[1]. Early in our era, Shans invaded and overspread the north of Burma and founded a dominion which endured for hundreds of years. The Burmans retreated to Pagan, below Myingyan, said to have been built in the 2nd century, A.D.[2]. Thus, for many centuries, in a welter of conflict, Shans dominated the north and east; Burmans held the middle country; Talaings the south, part of which however belonged to Siam. Arakan was independent. These are merely approximate and to some extent conjectural generalizations. It would be vain to assign limits to these kingdoms or dates to events; idle to record the names and exploits of kings celebrated in native chronicles and accumulated legends. Of the Pyu there is nothing definite to record except that they had their capital at Prome up to the time of Anawrata. A few Pyu inscriptions remain.
The five kings worth remembering are Anawrata, Tabin Shweti, Bayin Naung, Alaungpaya and Mindôn Min. Serious history dawns with the reign of Anawrata who ruled at Pagan for over forty years (1010—52). This great king extended his sway over the greater part of Burma. In the north he broke the Shan dominion, which had already disintegrated into many independent States, and subjugated the country as far as Bhamo[3]. Thatôn and Pegu were taken and the Talaings reduced to subjection. Arakan, which had been invaded and for a few years held by Shans, became tributary. For some two centuries the Pagan kingdom flourished. Marco Polo (1272—90) mentions the King of Mien (Burma) as “a very puissant Prince, with much territory, treasure, and people.” But the traveller saw these glories fade, this strength diminish. He describes a battle at Yungchang between the Burmese and Kublai Khan’s army. The elephants on which the Burmese chiefly relied were thrown into confusion and put to flight by Tartar bowmen and the troops of the Great Khan won a signal victory. Somewhat later (1284), Pagan itself was taken and sacked and the Burmese kingdom was broken to pieces. The next half century witnessed the rise and fall of two Shan kingdoms, with capitals at Panya and Sagaing respectively, extending as far south as Prome.
In 1364 Burmese supremacy was restored by Thadomin who claimed descent from the ancient kings of Tagaung. He erected his capital at Ava and he and his successors conquered much of the country formerly ruled from Pagan, as far south as Prome but not including Pegu. Ava was perpetually embroiled with the Shans who still dominated the north; and for a time Shan kings from Mo-hnyin occupied the throne.
Meanwhile Pegu, after regaining its independence, was overrun by Wareru who had set up a new Talaing kingdom at Martaban which eventually tore Tavoy and Tenasserim from Siam. Later, in 1323, the capital was moved to Pegu. In the latter part of the 14th and first part of the 15th century Ava and Pegu were seldom at peace with each other.
Since the downfall of Pagan (1284), the small territory of Toungoo, peopled by Burmans, had been practically uncontrolled. But it was not till 1470, nearly two centuries later, that its independence was formally asserted. The first notable event in its history is the accession (1530) of one of the most conspicuous figures in Burmese annals, Tabin Shweti (1530—50), who claimed descent from Anawrata. Extending his rule successively over Pegu (1538—39), whither he transferred his capital; Martaban; and Prome (1541—42); he defeated the Shan king of Ava (1544) and occupied his territory as far as Pagan. After his death, for a short time, the power of Pegu declined. It was restored and enhanced by Tabin Shweti’s famous general, Bayin Naung (1551—81), who, after a short interval, became king. This great soldier and ruler subjugated Ava (1554); finally and effectively broke the Shan dominion (1557—58), as relics whereof in Burma proper only isolated States survived; reduced all the Shan country as far north as China and Assam, as far east as Chieng mai[4]; and ruled over the whole of Burma except Arakan and presumably the remote hill tracts. Siam was twice invaded, Ayuthia taken (1563—64), and three white elephants, the ostensible object of the first expedition, carried off (1568—69). Bayin Naung’s tempestuous glorious reign ended as he was planning operations against Arakan (1581). This was the brightest epoch of Burmese civilization. Cæsar Frederick, whose description of Pegu (1569) is given elsewhere[5], writes of Bayin Naung:
There is not a King on the earth that has more power or strength than the King of Pegu, because he has twenty and six Kings at his command. He can make in his camp a million and a half of men of warre in the field against his enemies….This King of Pegu hath not any army or power by sea, but in the land, for people, dominions, gold and silver, he far exceeds the power of the great Turke in treasure and strength….Also he is Lord of the Mines of Rubies, Sapphires, and Spinels[6].
Doubtless this report inspired Butler’s reference to the Burmese king[7].
After Bayin Naung the glory waned. Siam became independent. Pegu was taken and destroyed by invaders from Toungoo and Arakan (1599), and a Talaing king was set up at Martaban. By degrees the empire was partly restored and a king again ruled in Pegu (1634). Some years later the capital was transferred to Ava. In the next hundred years, under feeble rulers, outlying districts were lost and disastrous wars were waged with China and with Manipur. Finally, assisted by Shans settled in Pegu (called by the Burmese Gwè Shans), the Talaings rebelled (1740). They occupied Toungoo and Prome and, after some years of desultory fighting, captured and burnt Ava and put an end to the dynasty of Bayin Naung (1752).
The ascendancy of the Talaings was of brief duration. Immediately after the fall of Ava, revolt was initiated by a petty official, afterwards known as Aungzeya, the Victorious, and even more widely renowned as Alaungpaya. His rise was more swift and miraculous than Napoleon’s. Early in 1752 he was a village headman. Before the end of 1753 he was proclaimed king, received the submission of the northern Shan chiefs, established his capital at his native village, Shwebo, and occupied the royal city of Ava. Continuing the war with the Talaings, Alaungpaya advanced as far as the Shwe Dagôn pagoda (1755), near which he laid out a new city and called it Rangoon; took Syriam, the port of Pegu and seat of European trade (1756); and in the year of the battle of Plassey occupied Pegu (1757). By this time his rule extended over the whole of Burma except Arakan. Siam was next invaded (1760) and Ayuthia invested. But sickness forced Alaungpaya to retreat, and before he reached the Salween the great conqueror was dead. A contemporary account[8] describes him as of impressive personality and overweening arrogance. Beyond doubt his name is notable in the world’s history.
Ten kings of Alaungpaya’s race succeeded him:
| 1. Alaungpaya (1752—60) | |||||||||||||||||||||||
| 3. Sinbyuyin Mintayagyi (1763—76) |
6. Bodawpaya (1781—1819) |
2. Naungdaw Mintayagyi (1760—63) |
|||||||||||||||||||||
| 4. Singu Mintayagyi (1776—81) |
Einshemin (died before his father) |
Paungga Min (reigned seven days in 1781) |
|||||||||||||||||||||
| 7. Bagyidawpaya (1819—38) |
8. Shwebo Min (King Tharrawaddy) (1838—46) |
||||||||||||||||||||||
| 9. Pagan Min (1846—52) |
10. Mindôn Min (1852—78) |
||||||||||||||||||||||
| 11. Thebaw Min (1878—85) |
|||||||||||||||||||||||
Sinbyuyin successfully repelled two formidable Chinese invasions, annexed Manipur, and in war with Siam once more destroyed Ayuthia. Bodawpaya conquered Arakan (1784) and brought across the hills the famous statue of Gaudama Buddha, which still stands at Mandalay in the Arakan pagoda[9]. His successor, Bagyidaw, annexed Assam (1821). This year saw the height of Burmese prosperity under the House of Alaungpaya.
Soon afterwards, Burmese incursions into Chittagong brought about a conflict with the Indian Government and caused the First Burmese War (1824). The Burmans put up a stout resistance. Rangoon was occupied by General Sir Archibald Campbell about the middle of 1824. Later in the year a large force under Maha Bandula made a determined but unsuccessful attack on the town and suburbs. Next year (1825), two British columns moved up the river and Bandula was defeated and slain at Danubyu. The war was ended by a Treaty concluded at Yandabo, not far below Ava, by which Assam, Manipur, Arakan and Tenasserim were ceded by the Burmese (1826). A quarter of a century later Burmese oppression of English traders occasioned the Second War (1852). The resistance offered by the Burmese was far less strenuous than in the First War; and General Godwin occupied Pegu and all the country as far as Myedè before the close of the year[10]. By proclamation of the Governor-General, all the territory south of a line drawn east and west, six miles north of Myedè was annexed. Stone pillars marking the boundary were erected, those on the banks of the Irrawaddy under the personal supervision of Lord Dalhousie. Mindôn Min declined to sign away any part of his kingdom and no treaty was concluded. But British occupation was not challenged.
Friendly relations were maintained throughout the reign of Mindôn Min, an astute and in some ways enlightened monarch, of whom Sir Henry Yule wrote[11]:
The King is, without doubt, a remarkable man for a Burman; but rather in moral than in intellectual character, though his intelligence, also, is above the average….The Sovereign of Burma is just and mild in temper, easy of access, hears or seeks to hear everything for himself, is heartily desirous that his subjects shall not be oppressed, and strives to secure their happiness….As long as he lives and reigns, peace will probably be maintained.
This prediction was fulfilled. But in the nerveless hands of Mindôn Min’s successor authority slackened and anarchy supervened. After the massacre of many members of the Royal Family, for seven years King Thebaw and his Ministers allowed Upper Burma to become the prey of dacoits and corrupt officials. Finally misrule, oppression of British traders, and attempts at intrigues with European powers, forced on the Third War (1885). King Thebaw had no standing army, no munitions of war, no money in his Treasury. With unprecedented celerity, a small but well-equipped force of 10,000 men under General Sir Harry Prendergast, V.C., crossed the frontier on 14th November; and after one not very serious encounter at Minhla, occupied Mandalay within a fortnight. The king and queen surrendered and were sent to India where they remained till Thebaw’s death, a few years ago. The remnant of the Burmese kingdom was annexed and Burma once more became an undivided nation.
The pacification[12] occupied the next four or five years. At the outset Upper Burma was in a state of anarchy. Dacoit[13] bands infested the country-side. Chinese brigands penetrated as far as Bhamo. The Shan States were in revolt. Hill men raided the plains and levied toll on caravans. Gradually order was established in the plains (1890). The Shan country was more easily brought to submission (1887), most of the chiefs accepting office and continuing in charge of their States. The names associated with the settlement of the Shans are those of Mr A. H. Hildebrand and Sir George Scott. Eastern Karenni was subdued (1889); its turbulent chief, Sawlapaw, fled and was replaced by his nephew Sawlawi, who proved a capable and loyal ruler. The Chin Hills were not finally dominated till after operations lasting for four years (1888—91). For nearly six years (1888—93) fighting continued in the Kachin Hills. The Chins gave some trouble recently; but order has been restored.
Of the distinguished men who took part in the conquest and pacification of Upper Burma may be mentioned, besides Sir Harry Prendergast, Lord Durferin, who, as Governor-General, visited Mandalay and decreed the annexation; Lord Roberts, who, as Commander-in-Chief, spent some time in Burma directing military operations; Sir Charles Bernard, Chief Commissioner 1885—87; Sir Charles Crosthwaite, from 1887—90; Sir Herbert Macpherson, Commander-in-Chief of the Madras army, who died in Burma; and Sir Charles Arbuthnot who succeeded him; Sir George White[14] who commanded the forces for several years; Sir William Penn Symons who did admirable work in the plains and also in the Chin Hills; Sir Edward Stedman, organizer of the military police; Sir James Willcocks who spent in the Province some months of his early service.
Early travellers. After Marco Polo (1272—90), who may possibly have visited Burma, the earliest known European in the country was Nicolo di Conti, a Venetian, who travelled in Arakan and Ava (1430). Some years later (1496), Hieronymo da Santo Stephano, a Genoese, and Ludovico Bartlema of Bologna, came to Pegu. The first Portuguese was Ruy Nunez d’Acunha, early in the 16th century. Next came the reputed liar[15], Fernan Mendez Pinto, who says he was at sieges of Martaban and Prome and mentions the well-known names of Dalla (opposite Rangoon), Dagôn (the great pagoda), Danubyu, Henzada, and Myedè. Later in the 16th century, Cæsar Frederick, a Venetian merchant (1569), and Ralph Fitch (1586), the first Englishman in Burma, came to Pegu and have left valuable records of their journeys.
Relations with European countries. The Portuguese, the earliest European settlers, established factories at Martaban and Syriam. Later (1519), Dutch settlements were founded at Syriam, Negrais and even as far north as Bhamo. Early in the 17th century, the British East India Company began to trade regularly with Burma and in process of time set up agencies at Syriam, Prome, Ava and Bhamo. British merchants settled also at Mergui, then a Siamese port. In the first years of the 17th century the Portuguese were expelled and somewhat later all other foreigners were driven out. The Portuguese and Dutch did not return. But at the close of the century British factories were again established at Syriam, Bassein and Negrais. The French also had an agency at Syriam till they were evicted by Alaungpaya. The British factory at Negrais was destroyed in 1759; but was rebuilt two years later. From that time, the East India Company maintained uninterrupted commercial relations with Burma.
When first annexed (1826) the Divisions of Arakan and Tenasserim were administered by Commissioners. The Pegu Division was constituted after the Second War (1853). Some years later (1862) these three Divisions were amalgamated into the Province of British Burma, the first Chief Commissioner being Sir Arthur Phayre, one of the most distinguished of British administrators. After the Third War the whole of Burma was formed into a Province (1886); and in 1897, Sir Frederic Fryer became the first Lieutenant-Governor.
Many towns have been mentioned as capitals of the whole kingdom or of various parts. The House of Alaungpaya adopted the custom of moving the capital whenever the throne was occupied except by regular succession. The capitals of the several kings of that dynasty were:
Those kings who did not change their capital were all deposed.
https://advocatetanmoy.com/2021/06/23/history-of-brahmadeshburma-by-herbert-thirkell-white-1923/
मटा ५० वर्षापूर्वी - टिळकांचे ब्रम्हसूत्र रद्दीत
टिळकांचे ब्रम्हसूत्र रद्दीत
पुणे - मंडाले ब्रम्हदेश येथील तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी ब्रम्हसूत्रावर जे भाष्य लिहिले होते, त्याची मूळ प्रत पुण्यात उपलब्ध झाली आहे. गीतारहस्यांच्या लेखनापूर्वी टिळकांनी अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्या संदर्भातच ब्रम्हसूत्राचाही अभ्यास केला होता. ही प्रत पुण्यातील जिज्ञासू संशोधकाला रद्दीत सापडली. त्यातील प्रत्येक पानामागे कोरे पान असून कोठेही खाडाखोड केलेली नाही, असे त्याने सांगितले.
तारकेश्वरी लेखाचा गोंधळ
नवी दिल्ली - राष्ट्रपती निवडणुकीबाबत विचार करण्यासाठी आज सायंकाळी भरलेली काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक फार गोंधळात संपली. काँग्रेस उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांना निवडून आणण्यासाठी पक्षात सुरू असलेल्या प्रयत्नांना या बैठकीमुळे नवे वळण लागले आहे. पक्षाच्या बैठकीत गोंधळ सुरू होण्याचे कारण श्रीमती तारकेश्वरी सिंह यांनी बिहारमधील एका वृत्तपत्रात लिहिलेला लेख होते. या लेखावर बैठकीत चर्चा करण्यास श्रीमती सिन्हा यांनी आक्षेप घेतला व स्पष्टीकरण करण्याची परवानगी मागितली. अध्यक्ष श्रीमती गांधी यांनी त्याची चर्चा करावयास व बैठकीत वाचन करावयास परवानगी दिली, त्यानंतर गोंधळ सुरू झाला.
मुंबईत अस्पृश्यता
मुंबई - या भारताच्या अग्रगण्य नगरीच्या महापालिकेवर अजूनही महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मनुस्मृतीचा प्रभाव अधिक असल्याचे आढळते. त्यामुळेच महापालिकेच्या इतर खात्यात तर सोडाच पण स्मशानभूमीतही अजून स्पृश्य-अस्पृश्य पाळला जात असल्याचे अनुभवास येते. सदाशिव मारुती सोनवणे या विलेपार्ले येथील एका हरिजन समाज कार्यकर्त्याचा दहा महिन्यांच्या मुलाला पुरण्यासाठी स्मशानभूमीत दिलेली जागा ही जातीनुसार विभागलेली आहे, असे सांगून अ रांग व ब रांग अशी विभागणी केली असल्याचे पत्र महापालिकेने त्यांना दिले आहे.
संथ वाहते इरावती माई!
काही काही गाणी अशी काही जमून येतात की कितीही वर्षे लोटली तरी त्या गाण्यांची आठवण मनात अगदी ताजी राहते. ‘ संथ वाहते कृष्णा माई ‘ हे असेच एक गाणे आहे. राजा परांजपे यांच्या चित्रपटासाठी, गदिमांनी लिहिलेले व सुधीर फडके यांनी गायलेले! संगीत होते दत्ता डावजेकर यांचे!. या गाण्याची दुसरी ओळ तर मला नेहमीच खूप भावते. ती ओळ अशी आहे ” तीरावरच्या सुख दु:खांची जाणीव तिजला नाही ” नदी वाहतेच आहे, काठावर घडत असलेल्या व मानवांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या घटना, नदी किंवा एकूणच निसर्गाच्या दृष्टीने दखल घेण्यासारख्या सुद्धा नसतात हे सत्य या काव्यात गदिमांनी मोठे सुंदर रित्या सांगितले आहे.
आज या गाण्याची आठवण मला होते आहे ती ब्रम्हदेशातल्या इरावती नदी संबंधातली एक बातमी वाचनात आल्यामुळे! आपण सर्वांनी शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात या इरावती नदी बद्दल वाचलेले असतेच. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करत बसत नाही. पण या नदीच्या कुशीत पिढ्यानपिढ्या राहणार्या लोकांच्यावर एक मोठा बाका प्रसंग येऊ घातला होता. त्यामुळे हे सर्व लोक गेली काही वर्षे मोठ्या संकटाच्या व सबंध जीवनाचीच उलथापालथ होईल अशा घटना क्रमातून जात होते. यापैकी काही जणांची पिढीजात असलेली शेतजमीन, त्यांच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर काही लोकांसाठी तो एक अटळ भविष्यकाल दिसत होता. सुदैवाने या सगळ्या प्रकरणाची अखेर सुखद होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ब्रम्हदेशातील सैनिकी सरकार 2003 सालापासून या इरावती नदीवर एक महाविशाल धरण बांधण्याच्या प्रकल्पाच्या विचारात होते. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ 21 डिसेंबर 2009 ला उत्तर ब्रम्हदेशातील कचिन या राज्यातील ‘म्यिटकायना‘ (Myitkyina) या गावाजवळ करण्यात येऊन हा प्रकल्पाचा प्रारंभ अधिकृत रित्या करण्यात आला होता. या गावापासून सुमारे 43 मैलावर, माली व एनमाई या दोन नद्यांचा संगम आहे. संगम झालेल्या या दोन नद्यांच्या पुढे वाहणार्या प्रवाहालाच इरावती असे नाव आहे. या संगमापासून 3 किलोमीटर अंतरावर, हे धरण इरावती नदीवर बांधण्यात येणार होते. माली व एनमाई नद्यांच्या संगमाजवळचा हा भाग जैविक विविधतने अतिशय नटलेला म्हणून प्रसिद्ध आहे. या
भागात ब्रम्हदेशाच्या इतिहासाशी निगडित अशी अनेक प्रसिद्ध स्थाने असल्याने
अनेक ब्रम्ही अभ्यासक या प्रदेशाला ब्रम्हदेशाची सांस्कृतिक जन्मभूमी
म्हणून ओळखतात. हा सर्वच भाग भूकंप प्रवण म्हणूनही ओळखला जातो.
इरावती नदीवरचे हे धरण 2019 साली पूर्ण होणार होते व या धरणासाठी 3.6 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित होता. हे धरण ब्रह्मदेशातील विद्युत शक्ती मंत्रालय, ‘एशिया वर्ल्ड कंपनी‘ या नावाची एक खाजगी ब्रम्ही कंपनी आणि चिनी सरकारी कंपनी ‘ चायना पॉवर इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन मिळून बांधणार होते. या धरणामुळे तयार होणारा जलाशय 766 वर्ग किलोमीटर किंवा सिंगापूरच्या क्षेत्रफळाहूनही मोठा असणार होता. या धरणापासून तयार होणार्या 6000 मेगॅवॅट विजेपैकी 90% वीज चीन मधील ग्राहकांच्याकडे जाणार होती. या धरणाच्या प्रकल्पात भांडवल गुंतवणार्या ‘ चायना पॉवर इनव्हेस्टसमेंट कॉर्पोरेशन ‘ या चिनी सरकारच्या मालकीच्या कंपनीला या धरणाच्या प्रकल्पातून होणार्या फायद्यापैकी 70% फायदा मिळणार होता.
हा धरणाचा प्रकल्प सुरू होण्याआधी पासूनच या धरणाला ब्रम्हदेशात कमालीचा विरोध होत होता. कचिन या राज्यात सर्वात जास्त विरोध स्वाभाविकपणे होत होता. कचिन हे राज्य गेली अनेक दशके अशांत आहे. ‘ कचिन स्वातंत्र संघटना ‘ या नावाची एक चळवळ येथे असून त्यांची स्वत:ची शस्त्रधारी सेना व ब्रह्मदेशचे सैन्यदल यांच्यात नेहमीच चकमकी घडत असतात. कचिन राज्यातील ब्रह्मी लोकांना हे धरण स्थानिक कचिन नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी बांधले जाते आहे असे वाटते आहे. त्याचप्रमाणे या धरणामुळे या भागातील पर्यावरणाचा नाजुक समतोल ढळेल असेही मत येथे आहे. गेल्या
दोन वर्षात या धरणामुळे काही हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे व
पुढच्या काही वर्षात स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी भिती या
संघटनेला वाटते आहे. ब्रह्मदेशाच्या
सैनिकी सरकारने लोकांना विश्वासात घेण्यासाठी कोणतीच पावले न उचलल्याने या
प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. ब्रह्मदेशाचे
सैनिक व कचिन येथील गरिला सैनिक यांच्यात गेले वर्षभर चकमकी घडत असून या
भागात स्थायिक झालेल्या अनेक चिनी नागरिकांना परत सरहद्द ओलांडून चीनमध्ये
आश्रयास जावे लागले आहे. गेले काही महिने या भागातील लढाया आणखीनच वाढत चालल्या आहेत.
गेल्या काही वर्षात हजारो चिनी व्यापारी आणि कामगार कचिन राज्यात चीनहून स्थलांतरित झाले आहेत. या भागातला सर्व व्यापार आता या चिनी व्यापार्यांच्या हातात आहे व स्थानिक कचिन जनतेला ही गोष्ट अतिशय खुपते आहे. या धरणामुळे निर्माण होणारी बहुतांशी वीज चीनला निर्यात करण्यात येणार आहे हे समजल्यावर स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला होणारा विरोध अधिकच तीव्र झाला. ब्रह्मी लोकांची अशी भावना आहे की इरावती नदी ही ब्रह्मी संस्कृती आणि वारसा याचे चिन्ह आहे व ती त्यांची जीवनदायिनी आहे. या अशा नदीचा चीनला उपयोग करू देण्यास स्थायिकांचा तर विरोध आहेच पण देशाबाहेर असलेले व पर्यावरण आणि मानवाधिकार यांच्या साठी लढणारे ब्रह्मी नागरिक यांनीही या प्रकल्पाच्या विरोधी मत दिले आहे. यंगून आणि मंडाले येथील रहिवाशीही या प्रकल्पाला श्रीमती स्यू की यांनी विरोध दर्शविल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात गेले आहेत. चीन ब्रह्मदेशात करत असलेली गुंतवणूक अनेक ब्रह्मी नागरिकांना पसंत नाही त्यामुळे सुद्धा या प्रकल्पाला होणारा विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. श्रीमती स्यू की यांनी स्पष्टपणेच असे सांगून टाकले आहे की चीन मधली विद्युत शक्तीची मागणी पुरवून तेथील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे ब्रह्मदेशातील प्रकल्प त्वरेने भंगारात टाकून देण्यात यावेत.
काही महिन्यांपूर्वी ब्रह्मदेशात सैनिकी देखरेखीखाली निवडणूका झाल्या होत्या. या निवडणूका स्वतंत्रपणे झाल्या नाहीत असे अनेक देश म्हणत आहेत. तरीही सध्याचे ब्रह्मी सरकार निवडून आलेले असल्याने हा प्रकल्प ही त्यांच्यापुढची एक चाचणी बनली आहे. या सर्व दबावामुळे मागच्या आठवड्यात ब्रह्मी सरकारच्या प्रवक्त्याने घोषणा केली की ब्रह्मदेशचे प्रधान मंत्री श्री. थेइन सीन यांनी या प्रकल्पाला त्यांचा अधिकार काल संपेर्यंत (5 वर्षे) स्थगिती दिली आहे. माहिती मंत्रालयाच्या पब्लिक रिलेशन विभागाचे मुख्य संचालक श्री. यी हुट यांनी ही माहिती दिली होती. त्यांच्या मते श्री. थेइन सीन यांना लोकांनी निवडून दिलेले असल्याने, लोकभावनांचा आदर करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. ब्रह्मदेशात काहीतरी बदल होत आहेत याचीच एक चुणूक या स्थगन आदेशामुळे मिळाली आहे.
श्री. थांट–मिंट–यू या एका ब्रह्मी लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात ते म्हणतात की ” ब्रह्मदेशात लोकांना असे वाटते की ब्रह्मदेशातील राजकीय परिस्थितीचा चीनने आपल्या फायद्यासाठी गेली अनेक दशके उपयोग करून घेतला आहे. चिनी व्यापार व गुंतवणूक याचा ब्रह्मदेशला जरूर फायदा होईल. मात्र या साठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचा आयुष्यावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेणारे आणि पूर्ण पारदर्शी असलेले प्रकल्प चिनी मदतीने उभारणे आवश्यक आहे नाहीतर अशा प्रकल्पांवरचा ब्रह्मी लोकांचा रोष आणखीनच वाढेल. ” पर्यावरण तज्ञांच्या मताने, ब्रम्हदेशाच्या पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी कोणतेही जल विद्युत प्रकल्प ब्रह्मदेशात उभारले जाऊ नयेत व आधी काम चालू असलेले इरावतीवरचे व इतर ठिकाणांवरचे प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावेत. असे सांगण्यात आले आहे.
या चिनी मदतीच्या प्रकल्पाचे काम अचानकपणे थांबवण्यात आल्याने चिनी वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकक्षोभासाठी प्रकल्प बंद करणे ही संकल्पनाच चिनी सरकारला नाही. सध्या तरी चीनने, ब्रह्मी शासनाने, चिनी कंपन्यांचे आर्थिक किंवा कायदेशीर या प्रकारचे कोणतेही नुकसान होणार नाही अशी पावले उचलावी एवढेच वक्तव्य केले आहे. या महिन्यात श्री. थेइन सीन भारत भेटीसाठी येणार आहेत. या नंतर ते चीनला भेट देणार आहेत. चिनी भेटीचे अधिकृत कारण कोणतेही दिले गेलेले असले तरी आपल्या धरणाचे काम थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच ते बिजिंगला जाणार आहेत हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल.
सध्या तरी ब्रह्मी सरकार आपले शासन कसे लोकाभिमुख व लोकशाही आहे हे या धरणाचे काम थांबवण्याच्या आपल्या निर्णयावरून दिसून येते असे प्रौढीने सांगत आहे. परंतु त्यांचा हा निर्णय का व कोणत्या कारणांनी घेतला गेला आहे याची खरी कारणे कालच सांगू शकेल.
इरावती मात्र परत एकदा, निदान सध्यातरी, संथपणे वाहू लागली आहे. तीरावरची सगळी सुखदु:खे, खळबळ मागे टाकून!
10 ऑक्टोबर 2011
https://chandrashekhara.wordpress.com/2011/10/10/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a5-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88/
महापियेन – श्री गणेश – ब्रम्हदेश – Marathisrushti Articles
ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
ब्रम्हदेशातील इतर गणेश मूर्ती ओबड धोबड स्वरूप आढळतात. परंतू ही मूर्ती मात्र रेखीव ( ताठ बसलेली ) असून कंबोडिया गणपती प्रमाणे महाराजा लीला मुद्रा आहे. उंच आसनावर स्थानापन्न झालेल्या ह्या मूर्तीचा उजवा पाय उंच वर केलेला व डावा पाय आसनावर बसण्यासाठी दुमडलेल्या अवस्थेत आहे. मस्तक व सोंड फार रेखीव असून डोळे गोल व एकटक लावून पाहणारे, मस्तकावर करंड मुकुट, पूढील भाग किरीटासारखा व मागे चक्राकार उंच व निमुळता टोकदार आहे. एक हात कोपरापर्यंत व नंतर दोन हात हे गणेशाचे वैशिष्टय. दंडात व पायात दागिने व दोन संपूर्ण सुळे हे ह्या गणेशाचे दुसरे वैशिष्टय. गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत व मुद्रेच्या अवस्थेत ठेवलेला डावा हात हे बौद्ध पंथाचा प्रभाव दाखवितो. यावरून भारतीय, ब्राम्ही, कोम्बोडीयन बौद्ध कलेचा व संस्कृतीचा संगम झालेला दिसून येतो.
आज पर्यंत परदेशातील श्रीगणेश मूर्तीत गणेश वाहन म्हणून उंदीर आढळलेला नाही किंवा संशोधकांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही. परंतू या मूर्तीच्या उजव्या बाजूला उंदीर दाखविण्यात आळा आहे. हे एक आश्यर्यकारक वाटते. येथे भारतीय संस्कृतीचा जास्त प्रभाव असावा असे वाटते.
— जगदीश पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.
भारताचा 'मर्म'देश अर्थात ब्रह्मदेश!
@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

म्यानमारची प्रदीर्घ लष्करी राजवट सुरुवातीपासून बराच काळ चीनच्या धोरण-प्रभावाखाली होती. त्या अनुभवातून काही धडे शिकल्यामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सदर प्रभावाखालून बाहेर येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भारताने ते अचूक ओळखून त्यांच्या सदर प्रयत्नांना प्रतिसाद दिला, ज्याची फळे दिसू लागली आहेत.
अखिल आग्नेय आशियाच्या 'संस्कृतीकरण' प्रक्रियेमध्ये इतरांची जशी 'मलय', 'कंबोज', 'लव' ही हिंदू नावे रूढ झाली, तसे भारताशी मोठ्या सीमेने संलग्न असलेल्या या प्रदेशाचे नाव 'ब्रह्म' पडले. तेच पुढे अपभ्रंशित होऊन 'बर्मा' (Burma) झाले, ज्याचे पुढे १९६०च्या दशकापासून आलेल्या आणि सातत्याने चढत्या राहिलेल्या 'ब्रह्मीकरणा'च्या लाटेत १९८९ साली म्यानमार (Myanmar) झाले. रोमन लिपीच्या अक्षरांमुळे सदर नवीन नाव आपल्याला बरेच भिन्न भासू शकते, पण ज्यांना 'ब्रह्मी' भाषेचे जुजबी ज्ञान आहे, त्यांना कळू शकेल की वस्तुत: ते तसे नाही. या देशातील एक प्रबळ वांशिक गट, जो गेल्या एक हजार वर्षांपासून सत्ताधीश आहे, त्यांच्या 'बमा' (Bamar) किंवा 'म्यमा' (Myamah) या नावाशी या प्रदेशाचे नामसाधर्म्य आहे. तसे पाहिल्यास या देशात (बहुदा जगातील सर्वाधिक) १३५ वांशिक गट अधिकृतरीत्या नांदतात. ज्ञात इतिहासानुसार प्यू (Pyu) या वंशगटाचे प्राचीन काळी प्राबल्य असताना 'श्री क्षेत्र' या नावाची हिंदू राजसत्ता साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात उदयाला येऊन काही शतके तिथे नांदली. मधल्या काळात 'बमा' लोकांच्या टोळ्या ईशान्येकडून (तिबेट/युनान) मोठ्या प्रमाणात येऊन स्थिरावल्या. पुढे त्यांचे प्राबल्य वाढून अकराव्या शतकात 'पगान' (Pagan) साम्राज्य (ज्याचा नकाशा आजच्या म्यानमारशी बहुतांश जुळतो) 'अनिरुद्ध' (Maha Yaza Thri Aniruddha Dewa) याने स्थापन केले. प्यू-जन काळाच्या ओघात बमा-जनप्रवाहात मिसळून गेले असे सांगण्यात येते. मात्र, सध्या आपल्या मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये वास्तव्य करून असलेल्या 'ब्रू' स्थलांतरित जनजातीशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबद्दलचा निश्चित पुरावा सापडत नसला तरी सखोल संशोधनाची आवश्यकता मात्र जाणवते. विशेष म्हणजे, सदर 'ब्रू' हे आजही बहुसंखेने हिंदू (वैष्णव) धर्मीय आहेत.
अनिरुद्ध मात्र कट्टर बौद्ध-धर्मानुयायी असल्यामुळे त्याने श्रीलंका या 'धर्म'बंधूशी विशेष संबंध जुळवून त्यांच्या मदतीने आपल्या राज्यात 'तेरवाद' (ढहशीर्रींरवर) बौद्धमताला सार्वत्रिक केले. त्याच्या वंशजाच्या काळात (१२ वे शतक) राजधानीत 'आनंद' देवालय उभारण्यात आले. बहुतांश आग्नेय आशियाच्या आजच्या प्रथेनुसार ते बुद्धालय असले तरी त्याच्या शिलालेखात विद्यमान राजा विष्णूचा अवतार असल्याचे नमूद आहे. पंतप्रधान मोदींच्या सप्टेंबर २०१७ मधील म्यानमार भेटीमध्ये त्यांनी आवर्जून या देवळाला भेट देऊन त्याच्या आवारातच मांडलेल्या टेबलांवर उभय देशांच्या परस्पर सहकार्याचे अनेक करार संमत केले होते. सदर देवालय हे संपूर्ण म्यानमारमधील 'पगोडा'छाप देवळांहून भिन्न असून त्यावर भारतीय स्थापत्यशैलीचा पूर्ण ठसा आहे. बमा राजवट प्रबळ होण्याआधीपासूनच्या काळात 'मोन' वंशीयांची राज्ये दक्षिण ब्रह्मदेशात (आणि उत्तर थायलंडमध्ये) सुस्थापित होती. सदर 'मोन' हे 'बमां'पेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या बरेच अधिक पुढारलेले आणि परिसरातील 'द्वारावती' म्हणून विख्यात असलेल्या संस्कृतीचे उद्गाते होते. ब्रह्मदेशातील 'मोन' राज्याचे राजचिन्ह हे कला-सौंदर्य इत्यादीशी निगडित असलेले 'हंस' (Hongsa) होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 'प्यू' जसे पुढे वायव्येला (भारत) सरकले (असावेत), तसेच दक्षिणेतील 'मोन' हे पुढे 'आग्नेये'ला (थायलंड) सरकले आणि अधिक सन्मान-कीर्ती प्राप्त करते झाले. आपल्या नागालँडमध्ये एक 'मोन' नावाचा जिल्हा आहे. म्यानमारमध्ये अनेक वांशिक गटांची नावे चीन, कचीन, कारेन इ. ही त्यांच्या प्रांतांच्या नावे आहेत. तसेच कदाचित 'मोन' लोकांच्या बाबतीत असू शकेल. थायलंडमध्ये 'मोन' लोकांचे मूळ स्थान भारत मानले जाते, हे इथे लक्षात घ्यायला हवे. या बाबतीतही अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
संपूर्ण आग्नेय आशियाच्या संदर्भात (उत्तर व्हिएतनाम सोडल्यास) एक गोष्ट आपल्या लक्षात येते की, इतर प्रदेशांत सरासरीने जशी संस्कृतोद्भव शब्दांची रेलचेल जीवनविषयक अनेक बाबींमध्ये दिसते तशी ती ब्रह्मदेशात दिसत नाही. किंबहुना, आपले 'वेगळे'पण ठसवण्यासाठी त्यांनी इतर गोष्टींबरोबर 'इरावती'सारख्या (Irrawaddy) प्रसिद्ध नदीचे नावही अलीकडे ' Ayeyarwady' करून टाकले. राजकीयदृष्ट्या पाहता, त्यांच्या शेवटच्या 'कोनबोंग' राजवटीने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आजचा ईशान्य भारत व्यापला होता. त्या भागातील स्थानिक राजकीय तंटे सोडवण्यासाठी ब्रह्मी दरबारी धाव घ्यावी लागत असे. अशाच एका मोठ्या बखेड्याच्या गोंधळात ब्रिटिशांनी डाव साधला आणि तोपर्यंत त्यांना अप्राप्य असलेला ईशान्य भारत बळकावला आणि ब्रह्मदेशात चंचूप्रवेश केला. पुढे यथावकाश दोन अधिक युद्धांनंतर तोही ब्रिटिश वसाहतींच्या नकाशावर आला. या नव्या वसाहतीत ब्रिटिश राज्ययंत्रणेचे प्रमुख वाहक म्हणून (तोपर्यंत इंग्रजी शिक्षणाच्या 'वाघिणी'चे दूध पिऊन आणि 'साहेबा'च्या प्रशासनिक तालमीत तयार होऊन कारभार हाकण्यास सक्षम झालेली) भारतीय मंडळी होती, मोठ्या संख्येने ती सैनिक, कारकून, व्यापारी, सावकार इ. विविध पेशांमध्ये काम करण्यासाठी ती तिकडे स्थलांतर करती झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण ब्रह्मदेशाच्या लोकसंख्येच्या १५ टक्के, तर एकट्या राजधानी 'रंगून'मध्ये ५० टक्के या संख्येने भारतीय लोक तिथे राहत होते. अशा प्रकारे ब्रिटिश साम्राज्याचा चेहरा बनून राहिलेली मंडळी स्वातंत्र्योत्तर काळात स्थानिक जनतेच्या रोषाची धनी न बनती तरच नवल. लाभलेल्या साधारण १०० वर्षांच्या काळात ब्रिटिशांनी विपुल वनसंपत्तीने आणि खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या या प्रदेशाची भरपूर लूटमार केली होती. युद्धकाळात पूर्व आघाडीवर जपान्यांशी लढताना जेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली, तेव्हा शत्रूच्या हाती लागू नये म्हणून देशात तोपर्यंत उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत त्यांनी दग्धभू धोरण स्वीकारले. परिणामत: १९४८ साली स्वतंत्र, परंतु गरिबीच्या खाईत लोटला गेलेला 'बर्मा' जगाच्या नकाशावर उभा राहिला.
शासकीय पातळीवर विदेशी (भारतीय) लोकसमूहविषयक धोरणाला आकार यायला अजून दीड दशक जावे लागले. सदर धोरणांतर्गत सन १८२३ नंतर देशात प्रविष्ट झालेल्या लोकांचे आणि त्यांच्या संततीचे नागरिकत्व हिरावून घेण्यात आले. १९६२ साली उदयाला आलेल्या लष्करी राजवटीमध्ये सर्व उद्योगांचे सरसकट राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यामुळे सुस्थापित भारतीयांचे व्यापार-धंदे बुडाले. तीन लाख भारतीयांना १९६४ साली अधिकृतरीत्या हाकलण्यात आले. याच कालखंडात तोपर्यंत बऱ्यापैकी एकोप्याने राहत असलेल्या भारतीयांमध्ये भारताच्या झालेल्या फाळणीच्या अनुषंगाने हिंदू आणि मुस्लीम असे दोन तट पडले होते. त्यापुढच्या काळात हिंदूंनी स्थानिक बौद्ध ब्रह्मींशी उत्तम जुळवून घेतले; बुद्धाला विष्णूचा दहावा अवतार मानण्याच्या पडलेल्या पद्धतीनुसार त्यांना ते सोपे गेले असावे. मुसलमानांना मात्र ते स्वाभाविकपणे अशक्य होते. त्यामुळे तोपर्यंत देशात उभ्या राहत असलेल्या विविध वांशिक फुटीर चळवळींना समर्थन देण्यापर्यंत मुसलमानांनी मजल मारली. त्याचे पर्यवसान ब्रह्मींशी त्यांचे कायमचे वाकडे होण्यात झाले. गेल्या दशकात उग्र स्वरूप धारण केलेल्या रोहिंग्या प्रश्नाची मुळे सदर इतिहासात सापडू शकतात. उपरोल्लेखित १३५ वंश-गटांच्या यादीत रोहिंग्यांचा समावेश नाही याची नोंद इथे घ्यावी लागेल. म्यानमारच्या अधिकृत भूमिकेनुसार रोहिंग्या हे देशाचे नागरिक नसून बंगाली (म्हणजे बांगलादेशी) घुसखोर आहेत. म्यानमार हा आपला सर्वात मोठा शेजारी (आणि भू-बहुल आग्नेय आशियातील आकाराने सर्वात मोठा) असूनसुद्धा, पाकिस्तान-चीन-बांगलादेश त्रिकुटाच्या (कु)प्रभावामुळे सर्वसामान्य भारतीयाच्या मनोव्यापाराचा भाग कधीच नव्हता. आपली परस्पर ओळख (तीही ब्रिटिशांमुळे) फक्त लो. टिळकांचा 'मंडाले'मधील तुरुंगवास आणि त्यांच्या 'शिबा' (थिबा नव्हे) राजाचा आपल्या रत्नागिरीतील तुरुंगवास इतकी मर्यादित होती. आपल्या मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश या चार राज्यांना भिडणाऱ्या १६५० किमी भू-सीमेव्यतिरिक्त १९५० किमी सागरी सीमेने जोडल्या गेलेल्या या शेजाऱ्याची योग्य ती दखल आपण घेण्यासाठी एकविसावे शतक उजाडावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा ईशान्य भाग बराच काळ धगधगत होता. याचे कारण आपण त्या भागाच्या (ब्रह्मी)सीमेशी निगडित धाग्यादोऱ्यांची उकल करण्यात कमी पडलो आणि बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टींबाबत मलमपट्टी करण्यावर समाधान मानले. नागालँडला लागून असलेल्या म्यानमारच्या सीमावर्ती भागात त्याच वंशाचा लोकसमूह वस्ती करून असल्यामुळे नागा बंडखोरांनी तिथे आपले तळ उभारले होते, जिथून त्यांच्या दहशतवादी कारवायांचे सूत्रसंचालन होत असे. त्या तळाच्या आश्रयाला आसामी उल्फा (ULFA) आणि मणिपुरी दहशतवादी गटही येऊन राहिले होते. भारताने म्यानमार लष्कराचे सहकार्य मिळवून २०१५ च्या जूनमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' घडवला आणि नागा अतिरेक्यांचे कंबरडे मोडले. तसेच त्याच्या दुसऱ्या पर्वात २०१९च्या सुरुवातीला 'उल्फा'च्या तळाची दाणादाण उडवून अनेक दहशतवाद्यांना शस्त्रसंभारासह अटक केली. सदर सहकार्य मिळवताना भारताला ज्या महत्वाच्या गोष्टी कराव्या लागल्या, त्यापैकी एक म्हणजे म्यानमार सरकारविरुद्ध काही विशिष्ट गटांनी मानवाधिकारांच्या (रोहिंग्या वगैरे) संदर्भात जे रान उठवले होते, तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे. तसे करून विशिष्ट विचारसरणीच्या दबावाला बळी न पडता आपण राष्ट्रहित साधले हे सरकारचे कर्तृत्व.
रोहिंग्या प्रश्नाशी निगडित भारत आणि म्यानमारवर जो एक संयुक्त आंतरराष्ट्रीय (कमी-जास्त) दबाव आहे, त्याच्यावर उपाय म्हणून भारत सरकारने गेल्या वर्षी अडीच कोटी डॉलर्सचे साहाय्य राखाईन प्रांताच्या विकासासाठी म्यानमारला दिले आहे, ज्यामुळे पुढे-मागे रोहिंग्यांचे पुनर्वसन होऊ शकते. भारताने ' Act East' धोरणांतर्गत आपल्या ईशान्य भागाला (पर्यायाने म्यानमारला) आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार घोषित केले आहे. त्याचबरोबर मिझोराममधून सीमेपलीकडे वाहणाऱ्या कलादान नदीच्या मुखावर म्यानमारमधील 'सितवे' हे बंदर आपण व्यापारी जलवाहतुकीसाठी २०१६ साली विकसित केले आहे. म्यानमारची प्रदीर्घ लष्करी राजवट सुरुवातीपासून बराच काळ चीनच्या धोरण-प्रभावाखाली होती. त्या अनुभवातून काही धडे शिकल्यामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सदर प्रभावाखालून बाहेर येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भारताने ते अचूक ओळखून त्यांच्या सदर प्रयत्नांना प्रतिसाद दिला, ज्याची फळे दिसू लागली आहेत. ती उत्तरोत्तर अधिकाधिक दृग्गोचर होवोत आणि फलदायी ठरोत अशी आपण 'ब्रह्मा'कडे प्रार्थना करू या.
- पुलिंद सामंत
https://www.mahamtb.com/Encyc/2020/4/11/Article-on-India-Myanmar-and-china.html#/google_vignette
ब्रह्मदेश किंवा म्यानमार भूगोल - बर्मा किंवा म्यानमार बद्दल जाणून घ्या
बर्मा किंवा म्यानमारच्या दक्षिण-पूर्व देशांविषयी माहिती जाणून घ्या
लोकसंख्या: 53,414,374 (जुलै 2010 अंदाज)
कॅपिटल: रंगून (यांगून)
सीमावर्ती देश: बांग्लादेश, चीन , भारत , लाओस आणि थायलंड
जमीन क्षेत्र: 261,228 चौरस मैल (676,578 चौरस किमी)
समुद्रकिनारा: 1,19 9 मैल (1,930 किमी)
सर्वोच्च बिंदू: हक्काका राज़ी 1 9, 2 9 5 फूट (5,881 मी)
बर्मा, अधिकृतपणे बर्मा युनियन म्हणतात, दक्षिण पूर्व आशिया मध्ये स्थित भागात सर्वात मोठा देश आहे. बर्माला म्यानमार म्हणूनही ओळखले जाते. बर्मा ब्रह्मदेश शब्द "बामार" मधून येतो जो म्यानमारसाठी स्थानिक शब्द आहे.
दोन्ही शब्द बर्मन असल्याने बहुतेक लोकसंख्या पहा ब्रिटिश वसाहती काळापासून, बर्मा म्हणून इंग्रजी ओळखला जात असला तरी, 1 9 8 9 मध्ये, देशातील लष्करी सरकाराने बर्याच इंग्रजी अनुवाद बदलून त्याचे नाव बदलून म्यानमार केले. आज, देश आणि जागतिक संघटनांनी आपल्या स्वतःच्या नावाचा निर्णय घेतला आहे जे देशासाठी वापरणार आहे. उदाहरणार्थ युनायटेड नेशन्स , याला म्यानमार म्हणतात, तर बर्याच इंग्लिश बोलणा-या देशांना बर्मा म्हणतात.
ब्रह्मांडचा इतिहास
बर्माचा प्रारंभिक इतिहास बऱ्याच वेगवेगळ्या बर्मन राजवंशांचा सलग नियम आहे. इ.स. 1044 साली देश एकत्र करणे हे बागान राजवंश होते. त्यांच्या नियमात, थेरवडा बौद्ध धर्म बर्मा येथे वाढला आणि पगोडांसह एक मोठे शहर आणि बौद्ध मठ इरावडी नदीवर बांधले गेले. 1287 मध्ये, मंगोलांनी शहराचा नाश केला आणि क्षेत्राचा ताबा घेतला.
15 व्या शतकात, आणखी बर्मन राजवंशाने तामगो राजवंश, बर्मावर नियंत्रण मिळविले आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटनुसार, एक बहुविध जातीय साम्राज्याची स्थापना केली जी विस्तार आणि मंगोल प्रदेशाच्या विजयावर केंद्रित होती.
Taungoo राजवंश 1486 पासून 1752 पर्यंत खेळलेला.
1752 मध्ये, तान्गोगो राजवंश, तिसरा आणि अंतिम बर्मन राजवंश Konbaung, करून बदलले होते कोंबोंग राजवटीत, बर्माने अनेक युद्धे केली आणि ब्रिटिशांनी चार वेळा आक्रमण केले आणि तीन वेळा ब्रिटिशांनी हल्ला केला. 1824 मध्ये, ब्रिटीशांनी बर्माची औपचारिक विजय मिळविण्यास सुरवात केली आणि 1885 मध्ये त्यांना ब्रिटीश भारतीयांसह ब्रह्मांडवर पूर्ण नियंत्रण प्राप्त केले.
द्वितीय विश्वयुद्धादरम्यान, "30 कॉम्रेड," बर्मा राष्ट्रातील एक गटाने इंग्रजांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु 1 9 45 मध्ये जपानच्या बाहेर पडायला बर्ण कारणाने बर्मा आर्मी ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्यात सामील झाले. दुसर्या महायुद्धानंतर, बर्मा पुन्हा पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देत आणि 1 9 47 मध्ये एक संविधान पूर्ण झाला आणि 1 9 48 मध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्या.
1 9 48 ते 1 9 62 पर्यंत बर्माची लोकशाही सरकार होती परंतु देशभरात व्यापक राजकीय अस्थिरता होती. 1 9 62 साली, एक लष्करी बंडा ने बर्मावर अधिकार गाजवला आणि सैन्यदलाची स्थापना केली. 1 9 60 च्या दशकात आणि 1 9 70 आणि 1 9 80 च्या दशकात, बर्मा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अस्थिर होता. 1990 मध्ये, संसदीय निवडणुका झाल्या होत्या परंतु लष्करी शासनाने परिणाम स्वीकारण्यास नकार दिला.
अधिक लोकशाही सरकारच्या बाजूने उलथापालथी आणि निषेध करण्याच्या अनेक प्रयत्नांच्या आधारे 2000 च्या सुरुवातीच्या काळात लष्करी शासन बर्मावर नियंत्रण ठेवण्यात आले. 13 ऑगस्ट 2010 रोजी लष्करी सरकारने घोषणा केली की लोकसभा निवडणूक 7 नोव्हेंबर 2010 रोजी होणार आहे.
बर्मा सरकार
आज बर्मा सरकार अजूनही एक सैन्य शासन आहे ज्यामध्ये सात प्रशासकीय विभाग आणि सात राज्ये आहेत. त्याची कार्यकारी शाखा राज्य आणि प्रमुख एक प्रमुख बनलेले आहे, तर त्याच्या कायदेशीर शाखा एक संघटना पीपल्स विधानसभा आहे.
1 99 0 मध्ये ते निवडून आले, परंतु लष्करी शासनाने ते बसू न देण्याची परवानगी दिली. बर्माची न्यायिक शाखा ब्रिटिश वसाहत काळातील अवशेषांचा समावेश आहे परंतु देशाच्या नागरिकांना त्यांच्यासाठी सुयोग्य न्यायालयीन हमी नाही.
अर्थशास्त्र आणि ब्रह्मदेशात जमीन वापर
कडक सरकारी नियंत्रणामुळे बर्माची अर्थव्यवस्था अस्थिर आहे आणि बहुतेक लोकसंख्या दारिद्र्यात राहते. तथापि, बर्मा नैसर्गिक संसाधनांमध्ये समृद्ध आहे आणि देशातील काही उद्योग आहे. जसे की, यापैकी बहुतांश उद्योग कृषीवर आधारित आहे आणि त्याच्या खनिजे आणि इतर संसाधनांवर प्रक्रिया आहे. उद्योगात कृषी प्रक्रिया, लाकूड व लाकूड उत्पादने, तांबे, कथील, टंगस्टन, लोह, सिमेंट, बांधकाम साहित्य, फार्मास्युटिकल्स, खत, तेल आणि नैसर्गिक वायू, कपडे, जड आणि रत्ने यांचा समावेश आहे. कृषी उत्पादने तांदूळ, डाळी, सोयाबीन, तीळ, भुईमूग, ऊस, हार्डवुड, मासे आणि मासे उत्पादने आहेत.
ब्रह्मदेशातील भूगोल आणि हवामान
अंदमान समुद्रातील बंगाम आणि बंगालच्या उपसागरास ब्रह्मदेश आहे. त्याची स्थलांतरावर केंद्रीय लोअर डेल्स आहेत ज्या मोठ्या, खडतर किनार्यावरील पर्वत बर्मामधील सर्वोच्च बिंदू म्हणजे हक्काबा राज़ी 1 9, 2 9 5 फूट (5,881 मी) आहे. बर्माचे हवामान उष्णदेशीय मान्सून मानले जाते आणि जसजसे गरम ते दमट उन्हाळ्याच्या जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस आणि डिसेंबर ते एप्रिल दरम्यान कोरडे सौम्य हिवाळ आहे. बर्मा हेही घातक हवामानाप्रमाणे असतात जसे चक्रीवादळे उदाहरणार्थ मे 2008 मध्ये, चक्रीवादळ नर्गिसने देशाच्या इरॉबैडी आणि रंगून प्रभागांना धक्का दिला, संपूर्ण गावांचा नाश केला आणि 138,000 लोक मृत किंवा बेपत्ता सोडून गेले.
बर्माबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, या वेबसाइटच्या बर्मा किंवा म्यानमार मॅप्सला भेट द्या.
संदर्भ
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (3 ऑगस्ट 2010). सीआयए - द वर्ल्ड फॅक्टबुक - बर्मा येथून पुनर्प्राप्त: https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/bm.html
Infoplease.com (एन डी). म्यानमार: इतिहास, भूगोल, सरकार आणि संस्कृती- इन्फपलसे.कॉम . येथून पुनर्प्राप्त: http://www.infoplease.com/ipa/A0107808.html#axzz0wnnr8CKB
युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ स्टेट. (28 जुलै 2010). बर्मा येथून पुनर्प्राप्त: http://www.state.gov/r/pa/ei/bgn/35910.htm
विकिपीडिया. Com (16 ऑगस्ट 2010). बर्मा - विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून येथून पुनर्प्राप्त: http://en.wikipedia.org/wiki/Burma
https://mr.eferrit.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE/
ब्रह्मदेश : आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. १०० ते
२८० ३०’ उ. आक्षांश न ९२० ते १०१० पू. रेखांश यांदरम्यान पसरलेल्या या
देशाची दक्षिणोत्तर कमाल लांबी १,९२० किमी, व पूर्वपश्चिम कमाल रुंदी ९२०
किमी. असून क्षेत्रफळ ६,७६,५५२ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ३,५६,८४,००० (१९८२
अंदाज). ब्रह्मदेशाच्या पश्चिमेस बंगालचा उपसागर व बांगला देश, वायव्येस
भारत, उत्तरेस व ईशान्येस चीन, पूर्वेस लाओस, आग्नेयीस व दक्षिणेस थायलंड
हे देश व अंदमान समुद्र आहे. रंगून (लोकसंख्या ३१,८८,७८३-१९७९) ही देशाची
राजधानी आहे. किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात असलेली रामरी व चेदूबा ही
बेटे व अंदमान समुद्रातील मग्वीं द्वीपसमूहाचाही या देशातच समावेश होतो.
खनिजे : प्रामुख्याने कथिल, जस्त, शिसे, टंगस्टन,
चांदी यांची खनिजे येथे सापडत असून खनिज तेलसाठेही आहेत. खनिज तेलाला अधिक
महत्त्व असून बहुतेक तेलखाणी ईशान्य पर्वतभागात व तेनासरीम किनाऱ्यावर
आढळतात. येनान जाऊंग, चौक व सिंगू ही इरावतीच्या खोऱ्यातील महत्त्वाची
तेलक्षेत्रे आहेत. कथिल आणि टंगस्टनच्या खाणी शान, काश्या व कारेन राज्यांत
आणि तेनासरीमच्या किनारी भागात आढळतात. लॅश्योच्या वायव्येस ४८ किमी.
अंतरावरील बॉडविन खाणक्षेत्रात उच्च प्रतीचा चांदी-शिसे-जस्त यांचा साठा
आढळतो. त्याशिवाय कोबाल्ट, तांबे, निकेल यांची खनिजेही येथे सापडतात.
इंद्रनील, पाचू, माणिक, नीलाश्म इ. मौल्यवान खनिजांचे साठेही देशात असून
मोगांक हे त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
सम्राट अशोकाने (इ. स, पू, ३०३ ?-२३२) या प्रदेशात
बौद्ध भिक्षूंना धर्मप्रसाराकरिता पाठविले. त्यामुळे मॉन व इतर ब्रह्मी
जमातींना भारतीय संस्कृतीची ओळख झाली. मॉन लोकांनी आपल्या पारंपरिक
संस्कृतीबरोबर भारतीय धर्म व संस्कृती आत्मसात केली. राजा, कला,
काष्ठशिल्पे, स्तूपबांधणी यांसंबंधीच्या भारतीय संकल्पना त्यांनी
स्वीकारल्या. स्तूप आणि मंदिरांची निर्मिती केली. यानंतर अल्प काळातच मॉन
जमात प्रगत आणि आक्रमक म्हणून आग्नेय आशियात मान्यता पावली.
स्वातंत्र्योत्तर ब्रह्मदेश : सततची युद्धपरिस्थिती,
राजकीय अस्थैर्य, अंतर्गत कटकारस्थाने, आर्थिक अडचणी इ. संकटांवर मात
करण्यासाठी ब्रह्मदेशाला शांतता हवी होती. म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
अलिप्तावादी धोरणाचा ब्रह्मी नेत्यांनी पुरस्कार केला आणि साम्यवादी चीनला
मान्यता दिली.
संरक्षणव्यवस्था : ब्रह्मदेशाला स्वतंत्र सैनिकी व
संरक्षणविषयक परंपरा आहे. ब्रह्मी राजांनी राज्यविस्तारासाठी केलेल्या
लष्करी मोहिमा आणि चिनी व मंगोल आक्रमाणांना त्यांनी केलेला विरोध यांतून
एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंतची ब्रह्मी क्षात्रपरंपरा दिसून येते.
एकोणिसाव्या शतकात देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी
झालेली युद्धे व तत्कालीन बंदुलासारखे सेनापती यांच्या शौर्याचा व
देशप्रेमाचा वारसा त्या परंपरेला लाभलेला आहे. भारताप्रमाणेच सैनिकी
विज्ञान व युद्धतंत्र यांत कालोचित प्रगती न केल्याने ब्रिटिशांनी
ब्रह्मदेशाचा पराभव केला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रह्मी स्वातंत्र्य
चळवळीचे नेते जनरल आँग सान व त्याचे २९ सहकारी यांनी ब्रिटिशांविरूद्ध
जपानला सैनिकी साहाय्य केले होते. ब्रह्मदेशाची विद्यामन संरक्षणव्यवस्था
आणि सेना यांची घडण या परंपरेतून झालेली आहे. ब्रिटिश राजवटीत ब्रह्मी
लोकांना लढाऊ सेना व सैनिकी पोलीस संघटनेत अगदी अल्पसंख्येने भरती केले
जाई. भारतीय व गुरखा तसेच देशातील अल्पसंख्याक गट–उदा., कारेन, कोपीन इ. –
यांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाई.
आर्थिक स्थिती : ब्रह्मदेशाची
अर्थव्यवस्था शेतीप्रधान असून तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून त्याची
ख्याती आहे. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ३.६ % हिस्सा शेतीतून मिळतो. देशातील
प्रमुख उत्पादन तांदूळ असून ते परकीय चलनप्राप्तीचे व रोजगाराचे एक प्रमुख
साधन आहे. १९७८ मध्ये ब्रह्मदेशातील दरडोई उत्पन्न ९५ डॉलर (१०००.५ कीयाट)
होते. हे उत्पन्न म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थांतील नीचांक समजला जातो.
खनिजे : कथिल, टंगस्टन, शिसे,
चांदी, इंद्रनील मणी, पाचू इत्यादींच्या खनिजांचे साठे देशात आहेत. खनिज
तेलाचे उत्पादन १८८७ पासून सुरू झाले असून याबाबतीत हा देश स्वयंपूर्ण
झालेला आहे. १९७० मध्ये एका अमेरिकन तेल कंपनीच्या सहकार्याने रंगूनजवळच्या
सागरतळाखालील तेलाच्या साठ्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. विविध
प्रकारच्या खनिज उत्पादनांसाठी चार महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. एका
जपानी उद्योगसंस्थेच्या सहकार्याने सिरीअँम येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा
अभिकल्प तयार करण्यात आला. १९७९-८० मधील खनिज उत्पादन पुढीलप्रमाणे होते :
पेट्रोल ७१० लक्ष गॅलन अशुद्ध तेल ११६.७ लक्ष पिंपे रॉकेल ३४७ लक्ष गॅलन
कोळसा ३८,६०० लाँग टन शिसे ५,५८२ लाँग टन नैसर्गिक वायु ३६,३७,४७,३६६ घ.
मी. अँटिमनी १२५ लाँग टन जस्त ६,००० लाँग टन कथिल १,३७२ लाँग टन टंगस्टन
३६८ टन शुद्ध चांदी ४.१ लक्ष टन. मौल्यवान माणके व रत्ने यांचे उत्पादन
अल्प प्रमाणावर होत आहे.
ब्रह्मदेशात सर्व राज्ये जोडणारे महामार्ग बांधण्याचे धोरण स्वीकारण्यात
आले आहे. १९६३ मध्ये रस्ता वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण कऱण्यात येऊन राज्य
वाहतूक निगम स्थापण्यात आला. १९७५ मध्ये ४,०२३ किमी. लांबीचे हमरस्ते व
९,६५६ किमी. लांबीचे मुख्य मार्ग होते. १९७८ मध्ये बारमाही मोटार लस्ते
३७,०२५ किमी. लांबीचे होते. १९७९-८० मध्ये प्रवासी बसगाड्या १,५५०, खाजगी
मोटारगाड्या ५२,७००, ट्रक व व्यापारी वाहने ३२,७१४ व मोटारसायकली १०,२००
अशी वाहने होती. १९७८-७९ मध्ये १६,८२१ कोटी प्रवासी व १८.४४ लक्ष टना
मालाची वाहतूक केली गेली. खाजगी मालकीच्या वाहनांद्वारेही वाहतूक होते.
जुन्या मोटारगाड्या, सुट्या भागांची कमतरता व रस्त्यांची दुःस्थिती ह्या
रस्ता-वाहतूक सेवेतील प्रमुख अडचणी आहेत.
फरांदे, वि. दा.
ब्रह्मी लोकांची घरे बांबूची असून ती जमिनीपासून १ ते १.५ मी. उंचीवर
बांधलेली असतात. घराभोवती मोकळी जागा असते. सधन लोकांची घरे सागवानी
लाकडाची असतात. अलीकडे सिमेंटचा वापर केलेली आधुनिक पद्धतीची घरे, विशेषतः
शहरांतून दिसून येतात. शासकीय गृहनिर्माण मंडळांमार्फत गृहबांधणीचा
कार्यक्रमही देशात राबविण्यात येत आहे.
भाषा-साहित्य : ब्रह्मी ही सिनो-तिबेटी कुटुंबाच्या तिबेटो-ब्रह्मी शाखेची भाषा असून ती ब्रह्मदेशाची प्रमुख भाषा आहे. या भाषेतील वाङ्मयाची लक्षणीय परंपरा पंधराव्या शतकाच्या मध्यापासूनची असून ह्या शतकात महाकाव्य, सार्वजनिक प्रसंगांवरील काव्ये इ. प्रकारची काव्यरचना झाल्याचे दिसते. बौद्ध धर्मीय देशांचा इतिहासही लिहिला गेला. सोळाव्या शतकात रोमान्ससदृश असे काही लेखन झाले. अठराव्या शतकाच्या आरंभी ब्रह्मदेशाचा इतिहास लिहिला गेला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी अखेरीस ब्रह्मदेशात मुद्रणालये निघाल्यामुळे साहित्यनिर्मिती आणि साहित्यप्रसार ह्या दोन्ही प्रक्रियांना वेग आला. कथा, नाटक, कादंबऱ्या असे साहित्य निर्माण झाले. विसाव्या शतकारंभी रंगून विद्यापीठाची स्थापना झाल्यामुळेही वाङ्मयनिर्मितीत आणखी चालना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात ‘बर्मा ट्रॅन्स्लेशन सोसायटी’ कडून वाङ्मयनिर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. [⟶ब्रह्मी भाषा ब्रह्मी साहित्य].
जाधव, रा. ग. सावंत, प्र. रा.
2. Ferguson, John, Sangha and State in Burma, Ithaca (N.Y), 1975.
3. Headrich, D. R. The Tools of Empire, Oxford, 1981.
4. Johnstone, W. C. Burma’s Foreign Policy : A study in Neutralism, Cambridge (Mass), 1963.
5. Keegan, John, Ed. World Armies, London, 1979.
6. Moscotti, Albert, D. Burma’s Constitution and the Elections of 1974, Singapore, 1977.
7. Silverstein, Josef, Burma : Military Rule and the Politics of Stagnation, Ithaca (N. Y), 1977.
8. Smith, D. E. Religion and Politics in Burma, Princeton (N. J.), 1965.
9. Spiro, Melford E. Buddhism and Society : A Great Tradition and its Burmese Vecessitudes, London, 1971.
10. Trager, F. N. Burma : From Kingdom to Independence, London, 1966.
11. Walinsky, Louis, Economic Development in Burma 1951-1960, New York, 1962. 12. Woodman, Dorothy, The Makong of Burma, London, 19
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
“
https://vishwakosh.marathi.gov.in/29796/
हो संबंध आहे (आणि नाही पण!). ब्रम्हदेश नावाच्या उगमाबद्दल इतिहासकारांमध्ये भिन्न भिन्न मतप्रवाह दिसून येतात. भारतामध्ये म्यानमार ह्या देशाला ब्रम्हदेश म्हणून ओळखले जाते. अन्यत्र ह्या देशाला बर्मा म्हणून ओळखले जायचे (अजून पण काही देशांत हेच नाव प्रचलित आहे).
- ब्रम्हदेश नावाचा एक अर्थ असा निघतो की ब्राम्हणांचा प्रदेश (लँड ऑफ ब्राम्हण)
- दुसरा अर्थ असा पण निघतो की ब्रम्हदेवाचा प्रदेश (लँड ऑफ ब्रम्हा)
अनेक भारतीय इतिहासकार जसे की निहार रंजन रे, कालिदास नाग, इ. ह्या मताचे आहेत की ब्रम्हदेश ह्या नावाचा संस्कृत भाषेशी संबंध आहे. रे ह्यांनी त्यांच्या 'ब्राह्मणीकल गॉड्स इन बर्मा' ह्या पुस्तकामध्ये असे नमुद केले आहे की ब्रम्हदेशातील अनेक जागांची नावे ही संस्कृत मधून घेतलेली आहेत. तसेच स्थानिक मोन लोकांच्या शिलालेखांत ब्रम्हदेशातील ब्राम्हण आणि ब्राम्हण संस्कृतीबद्दल उल्लेख केलेला आढळतो असे पण त्यांचे म्हणणे आहे.
तसेच महाभारतामध्ये पण आपल्याला बर्माक आणि शर्माक ह्या दोन देशांच्या नावाचा संदर्भ आढळतो. ही दोन्ही नावे म्हणजे ब्रम्हदेश आणि श्यामदेश (आताचा थायलंड) ह्यांची जुनी नावे असावीत असा समज आहे. जेव्हा भीम पूर्वेकडील राज्ये काबीज करण्याच्या मोहिमेवर निघालेला तेव्हा त्याने हे दोन्ही प्रदेश काबीज केलेले.
फोटो स्रोत - गूगल
असे जरी असले तरी ह्या देशाचा जुना इतिहास सापडत नाही. साधारणतः १२ व्या शतकापासूनचा इतिहास उपलब्ध आहे.
म्यानमारमधील बहुतेक इतिहासकार हे ब्रम्हदेश नाव आणि संस्कृत ह्यांचे कनेक्शन असल्याचे मान्य करतात.
ह्या देशाला सुवर्णभूमी म्हणून पण ओळखले जायचे.
मे १९८९ मध्ये ह्या देशातील लष्करी अधिपत्याखाली असणाऱ्या सरकारने प्रचलित असलेले बर्मा हे नाव बदलून म्यानमार असे केले. तसेच अनेक शहरांची नावे पण बदलली जसे की रंगूनचे नवीन नाव यांगून करण्यात आले.
तळटीपा
भारतीय संस्कृतीशी जुळणाऱ्या प्रभागांची नावे भारतीयांनी पूर्वी ठेवलेली आहेत . ती म्हणजे श्रीलंका, अरुणाचल प्रदेश, त्रिविष्टप ( तिबेट ), ब्रह्मदेश व चीन .
भारतात सर्वात आधी दिवसाची सुरवात ब्रह्म मुहूर्ताची होते. त्यावेळी ज्या प्रभागात सूर्य उगवतो त्यास ब्रह्मदेश म्हटले, इंग्रजांनी ब्रह्मदेशाचा अपभ्रंश बर्मा असा केला.
भारतात ज्यावेळी अरुण उगवतो ( अरुण म्हणजे सूर्याचा सारथी, गरुडाचा मोठा भाऊ व जटायू आणि संपातीचा पिता ) त्यावेळी अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताच्या प्रथम भागात सूर्याचा उदय होतो तो भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश. ( सूर्योदया आधी अरुण उगवतो.)
त्याचप्रमाणे तिबेट ( त्रिविष्टप, त्रिविष्टप हे भगवान शंकराचे एक नाव आहे.) व चीन हे सुद्धा भारतीयांनीच नावे ठेवली आहेत. ( चीनला चिनी लोक QIN किंवा QING असे म्हणतात.




.jpg)






























No comments:
Post a Comment