Mahuli,Maharashtra
Overview
Mahuli is a village in Khanapur taluka 16.09 km (ten miles) north of Vite on the Vite-Mayani road. It has a remarkable temple dedicated to Kadamba Devi. The temple is in the centre of the village, though not easy to find out. It is partially in a dilapidated condition.
About The Temple
The Kadamba Devi
Temple, believed to be from the late Shilahar period or the early
Hemad-Panti (Yadav) period, is in a severe state of disrepair and has
been taken up for restoration by the state archaeology department. It is
about 12.19 metres (40 ft.) long by about 6.09 metres (20 ft.) broad
and consists of a hall or Mandap with a shrine and vestibule, but
without a spire. It is built of gray trap on a platform about 3.04
metres (ten feet) above the average level of the village streets. It is
closely surrounded by mud houses and therefore seen to less advantage
than many of the old temples which are usually found in vacant spaces
and often outside the villages. It is raised on a stone plinth about
0.914 metres (three feet) high, the face of which is cut in a lozenge
pattern. The walls are different from the usual type of Hemad-panti
temples in the district being elaborately carved externally, specially
the shrine wall.
The hall or mandap is 1.85 m2 (20 ft. square) and the walls reach to the
roof not as usual left solely for support to the pillars. The line of
the front or east wall is straight and contains a square entrance but is
in bad repair, the carved work nearly defaced and everywhere blocked up
with mud and stones put in to prop it up. The side walls, which also
contain two square entrances, are as usual rather wider at the centre,
the outline slightly resembling the cruciform. The stones are pointed in
beaded and tooth work and floral decorations are faintly carved on
them. The vestibule to the shrine is about 1.52x5.79 metres (five feet
by nineteen). The shrine is star-shaped and about 4.57x6.09 metres
(15'x20') at the widest part.
At the west, north and south sides are flat faces connected by zigzags
showing five corners. These walls are carved in much the same way as the
hall or mandap walls but far more elaborately. The faces contain niches
with images of deities fairly well executed. The image in the north
niche is Mahisasur Devi riding on a buffalo and holding the child
Parasurama in her lap, the image on the west is of Narsimha, the
man-lion; and the image on the south is Ganapati and sadanana or
Kartikeya. The roof has heavy caves of carved stone but scarcely
projecting and modern brick parapet.
How To Reach Mahuli
The nearest airport is Sambre Airport, Belgaum, Karnataka. There is no railway station near to Mahuli in less than 10 km. Sangli Railway Station (near to Sangli), Madhavnagar Railway Station are the Railway stations reachable from nearby towns. Vita, Sangli, Karad are the nearby by towns to Mahuli having road connectivity to Mahuli.
Temple Address
Kadamba devi Temple,
Mahuli, Sangli District,
Maharashtra, India.
Significance
Devotees visit this temple to seek fulfillment of the following:-
- Protection from evil
- Salvation
- Destruction of ego
- Liberation
Shlokas
Sarva Mangala Maangalye Sive Sarvaardha Saadhike, Saranye Tryambake Gauri Naarayani Namosthuthe
Meaning -We offer you our salutations, Oh auspicious Naraayani, who is the good of all good, who can achieve everything and can offer refuge, Oh three-eyed Gowri.
Saranaangatha Dheenaartha Parithraana Paraayane Sarvasyaarthi Hare Devi Naaraayani Namosthuthe
Meaning -We offer salutations to you, Oh Narayani, who has the infinite power of creating, preserving and destroying. You are the basis and epitome of the 3 gunas.
Sarvaroope Sarvese Sarvasakthi Samanvithe, Bhayebhyastrahi No Devi Durge Devi Namosthuthe
Meaning -I offer my salutations to you mother Durga, who is present in all beings and has all power, save us from all our wrongdoings O mother of the universe.
Yaa Devi Sarva Bhooteshu Shakthi Roopena Samsthita Namastasyai Namastasyai Namastasyai Namo Namaha
Meaning -Salutations to the Goddess who resides as Shakti in all beings.
Timings
The temple is open from 6AM to 9PM.
तीन- चार नव्हे तर महाराष्ट्रातील 'या' गावात आहेत तब्बल 'इतकी' मंदिरे
पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगवेगळी मंदिर आहेत. त्यातील काही प्रसिद्ध मंदिरांना अनेकांनी भेटी दिल्या असतील. पण आपण कधी विचार केलाय का? एखाद्या छोट्याशा गावात किती मंदिरे असतील? कदाचित चार-पाच किंवा १०- १२. बरोबर ना..? पण एकाच गावात तब्बल १३० मंदिर असतील तर... आहे ना वेगळपणं! सांगली जिल्ह्यात हे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या सुमारे ५००० आहे. प्राचीन इतिहास असणाऱ्या या गावाच नाव आळसंद आहे. येथे वेगवेगळ्या देवतांची व प्राचीन मंदिरे आहेत. 'देवळांचे गाव’ म्हणूनच या गावाची ओळख निर्माण होत आहे .
आळसंद गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. प्राचीन काळात साताऱ्याच्या औंध संस्थानातील हे एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जात. येथे राजवल्ली पिर व दस्तगिर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे ही सगळी मंदिरे वेगवेगळ्या देवदेवतांची आहेत. यामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे. रामदास स्वामींनी ११ मारुतींची मंदिरे या ठिकाणी बांधली. या मंदिरात वेगवेगळया रुपातील आणि भागातील मारुतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सरस्वतीची मूर्ती या ठिकाणी शिळेवर कोरण्यात आल्याचे आढळून येते.
येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे. सुमारे ३५० वर्षाचे ते जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे पंचमुखी शिवालय आहे. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत. काही मंदिरे ही २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वतः ही बांधली आहेत. आळसंदमध्ये या सर्व मंदिरांत मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील.
आळसंद गावामध्ये जोगूबाई मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदीर, खंडोबा मंदिर, शामराज महाराज मंदिर, सिध्दनाथ मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मरिआई मंदिर, यमाईदेवी मंदिर, जोतिबा मंदिर, राम मंदिर, बिरुदेव मंदिर, ताई आई मंदिर, भवानी मंदिर, वेताळबा मंदिर, दत्त मंदिर, रेणुका मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिर यांसह जुन्या काळातील ३५ ते ४० मंदिरे गावामध्ये आढळतात. या सर्व मंदिराची पुजा अर्चा नित्यनियमाने केली जाते. आळसंद गावात देवांची मंदिरे मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांना जवळपास सर्व देवांचे दर्शन या ठिकाणी होते. त्यामुळे आळसंद गाव हे देवळांचे गाव म्हणून प्रसिध्द होऊ लागले आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात आळसंद हे गाव आहे. या गावात पांढऱ्या मातीचा साठा आहे. आळसंद गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सांगली सुमारे ६६ किलोमीटरवर आहे. आळसंद गावापासून तालुक्याचे ठिकाण खानापूर सुमारे १२ किलोमीटरवर आहे. खानापूर तालुक्यात विटा कुंदल हायवेवरून ११ किलोमीटरवर आळसंद आहे. या गावाची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास आहे. आळसंद गाव हे "देवळांचे गाव" म्हणून ओळखले जाते.
आळसंदच्या सरपंच इंदुमती जाधव म्हणाल्या, या गावात अनेक लहान मोठी देऊळ आहेत. काही गोष्टी पूर्वजांनी सांगितल्यामुळे गावात इतके देऊळ का आहेत त्याचे कारण अचूकपणे सांगता येणार नाही. गावातील इतक्या सर्व देवळांची देखरेख त्या त्या मंदिरातील ट्रस्ट आणि पुजारी करतात. वर्षातून या गावातील देवांची २४ कार्यक्रम होतात. प्रत्येक देवाची यात्रा असते. त्यावेळी अनेक भाविक दर्शनास येतात.
आळसंदचे महादेव स्वामी म्हणाले, आळसंद हे औंध संस्थानकालिन गाव आहे. ही गोसावीची पंढर आहे. मिनी पंढरपूर म्हणून ओळखले जाते. गावात १३० मंदीरे आहेत. गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. सिध्दनाथ हे गावाचे ग्रामदैवत आहे.
पत्रकार दीपक पवार म्हणाले, आळसंद हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव आहे. या गावाचा पुर्वी औंध संस्थानमध्ये समावेश होता. मुंगी पैठण (जि. औरंगाबाद) येथून येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाल्याचे जुने जाणकार लोक सांगतात. या गावात सात बुरुज व गावाभोवती संपुर्ण तटबंदी असल्याचे आढळते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात अनेक जुनी मंदिरे, महाराजांच्या समाधीही येथे पहायला मिळतात. विविध जाती- धर्माचे लोक या ठिकाणी राहत असून सर्व मंदिराची एकत्रित पुजा व धार्मिक कार्यक्रम ते उत्साहाने साजरे करत असतात.
गावातील काही मंदिरे...
अकरा मारुती मंदिर : हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे येथील लोक सांगतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिळेवर ११ मारुती, बारावा गणपती व तेरावी सरस्वती आदी देवांची मुर्ती कोरलेली आढळते. असे मंदिर महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याचेही सांगितले जाते. गावातील हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात.
काशिविश्वेश्वर महादेव मंदिर : हे मंदिर ४०० वर्षापासून अस्तित्वात असल्याने हे जुन्या काळातील हेमांडपंथी मंदिर असून या मंदिरातील दगडी स्तंभाभोवती कोरिव काम केलेले आढळते. या मंदिरात शिवपार्वती, पंचमुखी शिवालय, महादेवाची पिंड, गणपती, नंदी, कासव या मुर्ती आढळतात.
ओढ्यातील महादेव मंदिर : हे मंदिर ३००- ३५० वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असून गावच्या ओढ्यामध्ये हे मंदिर उभा करण्यात आले आहे. या ठिकाणी शंकराची पिंड पहावयास मिळते.
ग्रामदैवत नाथबाबा : आळसंदचे ग्रामदैवत असलेल्या नाथबाबा मंदिराची स्थापना सोळाव्या शतकात करण्यात आल्याचे येथील लोक सांगतात. सिध्दनाथांची मुर्ती असलेल्या या मंदिरात शंकराची पिंड व समोरील बाजूस नंदी व कासव यांच्या मुर्ती आहेत. हे हेमांडपंथी प्रकारातील मंदिर असून या ठिकाणचे स्तंभ व दगडावरती कोरीव काम केलेले आढळते. आळसंदमधील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.
सती स्वरुपाबाई मंदिर : हे मंदिर ३५० वर्षापासून अस्तित्वात असून या ठिकाणी स्वरुपाबाई नावाची स्री सती गेल्यामुळे हे मंदिर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणीही शंकराची पिंड व गणपतीची मुर्ती पहावयास मिळते.
गुमानगिरी, लालगिरी व मनषागिरी यांची समाधीस्थळे : सुमारे ३५० वर्षापुर्वी आळसंदमध्ये गोसावी समाजातील गुमानगिरी महाराज, लालगिरी महाराज व मनषागिरी महाराज यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जीवंत समाधी घेतल्याचे येथील लोक सांगतात. या ठिकाणी त्यांची समाधीस्थळे पहायला मिळतात. त्यामुळे पुर्वी या गावाला गोसाव्याची पांढर असेही लोक म्हणत.
ज्ञानेश्वर माऊली मंदिर : हे मंदिर २५ वर्षापुर्वी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्थापन केले आहे. या मंदिरात विठ्ठल -रुक्मिणी मंदिर, संत ज्ञानेश्वर यांच्या मुर्ती असून दरवर्षी या ठिकाणी साप्ताहिक पारायण सोहळ्याचे अयोजन केले जाते.
श्री अष्टविनायक गणेश मंदिर : या मंदिराची स्थापना सात वर्षापुर्वी गावातील दानशूर व्यक्तीमत्व गणपती जाधव (शाहीर) यांनी स्वखर्चातून केली आहे. या मंदिरात गणपती व नंदी यांच्या मुर्ती आहे. आळसंद गावची शोभा वाढवणारे हे मंदिर आहे.
मायाक्का मंदिर : या मंदिराची स्थापना धनगर समाजातील लोकांनी केली आहे. या ठिकाणी मायाक्का देवीची मुर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी संत बाळूमामा यांची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे.
लिंगेश्वर महाराज मठ : लिंगेश्वर महाराज हे लिंगदरी (सागरेश्वर अभयारण्य) येथून १९६० मध्ये आळसंद येथे आले होते. त्यावेळी गावातील श्रीपती कुलकर्णी यांनी त्यांच्या मळ्यामध्ये महारांजांना पुजा-अर्चा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या ठिकाणी गावातील बबन कुंभार (महाराज) वयाच्या १३ व्या वर्षीपासून सेवेत होते. २० मार्च १९९२ साली लिंगेश्वर महाराज यांनी समाधी घेतली. दरवर्षी लिंगेश्वर महाराज मठामध्ये वसंत पंचमी, अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, लिंगेश्वर महाराज पुण्यतिथी, बबन महाराज पुण्यतिथी, पारायण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसदाचे आयोजन केले जाते. या ठिकणी बाहेर गावाहून येणार्या भक्तांसाठी भक्तनिवास, वाचनालय आदी सोयी उपलब्ध आहेत. निसर्गरम्य असा या मठाचा परिसर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा : आळसंद गावच्या वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा दगडी चबुतर्यावरती बसविण्यात आला आहे. पाठीमागील बाजूस भव्य कमान असलेले गावचे प्रवेशद्वार व दोन्ही बाजूस बुरुज यांचे कोरीव दगडांत बांधलेले आहेत. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केलेला आहे. या गावामध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी, लेझीम व पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते.
राजवल्ली पिर व दस्तगीर पिर : राजवल्ली पिर व दस्तगीर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात.
https://www.esakal.com/maharashtra/aalsand-village-maharashtra-famous-temple-village-323304
छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapati Shivaji Maharaj
माहिती साभार - मराठेशाही: प्रवीण भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवर अनेक मंदिरे बांधली. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मंदिर, रायगडावरील जगदीश्वर मंदिर, पुरंदरावरील केदारेश्वर मंदिर, रांगणा किल्ल्यावरील रांगणाई मंदिर, वज्रगडावरील मारुती मंदिर, राजगडावरील पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिर ही काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाराजांनी अनेक मंदिरे बांधली आणि दुरुस्त देखील केली. हनुमान, भवानी माता, गणेश हे काही मुख्य देवता त्या काळी गडकिल्ल्यांवर होत्या.
आपल्याकडे देवाला सोडता अलौकिक कर्तृत्वाने एखाद्या व्यक्तीला देवत्व हे त्याच्या मृत्यूनंतर दिले जाते. आपल्याला अनेक देवाचे अवतार माहीत आहेत मात्र हे अवतार जेव्हा त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेतात तेव्हाच त्यांना देवत्व प्राप्त होते. मात्र छत्रपती शिवरायांचे दैवत्व हे काहीसे वेगळे आणि अलौकीकच ठरले. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू असतानाचा त्यांना देवत्व प्राप्त झाले होते. फक्त महाराजांचे हयात असताना मंदिरच बांधले गेले नाही तर त्यांची मूर्ती त्या मंदिरात स्थापन करून त्याची पूजा देखील सुरू करण्यात आलेला असल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मंदिरे आपण आज बघतो आहे. आज आपण शिवराय जिवंत असताना बांधले गेलेले मंदिर कोणते? शिवरायांच्या मृत्यूनंतर मात्र शिवकाळातच बांधली गेलेली महाराजांची मंदिरे कोणती? आणि आधुनिक काळात छत्रपती शिवरायांची बांधली गेलेली मंदिरे कोणती? याविषयी सविस्तर आणि इतिहासाला साक्षी ठेवूनच माहिती जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवरायांचे हयातीत असताना बांधले गेलेले पहिले मंदिर
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराक हयात असताना बांधले गेलेले त्यांचे पहिले मंदिरे हे महाराष्ट्रात नसून कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकातील धारवाड जवळ असलेल्या यादवाड गावात हे मंदिर आहे.
मंदिराच्या स्थापनेचा इतिहास
दक्षिण भारताच्या दिग्विजय मोहिमेत म्हणजेच 1678 साली शिवरायांच्या सैन्याला कडवा विरोध करणाऱ्या बेलवाडी येथील मल्लमाँदेवी यांचा पराभव करण्यात आला. छत्रपती शिवरायांनी मल्लमाँ या स्त्री असून देखील शौर्याने लढल्या म्हणून त्यांना माफी दिली. त्यांना त्यांचा मुलुख परत करण्यात आला. मल्लमाँ यांनी दिलेला लढा आणि त्यांच्या पराभवानंतर शिवरायांनी त्यांचा केलेला सन्मान ही कथा आपण नक्की एखाद्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
छत्रपती शिवरायांच्या उपकारांची परतफेड म्हणून मल्लमाँ यांनी बेलवाडी जवळच असणाऱ्या यादवाड येथे एक सुबक आणि देखणी मूर्ती एका घुमटीत स्थापन केली. त्या मूर्तीची नित्यपूजा देखील सुरू करण्यात आली. मंदिराची स्थापना 1678 साली करण्यात आली.
यादवाड गावातील मारुती मंदिराच्या बाजूलाच ही छोटीशी घुमटी आहे. मूर्तीमध्ये आपल्याला जे शिवराय दिसतात ते घोड्यावर स्वार झालेले आहेत. डोक्यावर एक छत्र धरलेला अब्दागिरी घेतलेला सेवक देखील आहे. छत्र आणि शेजारी अब्दागिरी ही राजचिन्हे महाराज छत्रपती झालेले असल्यामुळे आहेत. मूर्तीच्या खालील भागात शिवरायांनी एका लहान मुलाला मांडीवर घेतलेले आहे. त्या मुलाला ते दूध पाजत आहेत असे काहीसे शिल्प आहे. शेजारी एक स्त्री आहे आणि तोच मल्लमाँ आहे. मांडीवर असलेले मुल हे मल्लमाँ यांचे आहे. ज्यावेळी मूर्ती स्थापन केली गेली तेव्हा मंदिराप्रमाणे एका छोट्याश्या घुमटीत स्थापून त्याला लाकडी फळ्यांचा दरवाजा बसविला होता. वरच्या बाजूस कळस देखील होता. लाकडी फळ्यांचा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाल्याने आता तिथे जाळीचा दरवाजा बसविण्यात आला.
घुमटीत असलेली शिवरायांची मूर्ती नित्य पूजेत ठेवल्याने हा ठिकाणाला शिवरायांचे पहिले छोटेखानी का असेना पण मंदिर म्हणायला हवे. 1678 साली हे मंदिर बांधले गेले आणि त्यामुळे महाराजांचे भारतातील सर्वात पहिले मंदिर आहे. मधल्या काळात हे मंदिर जीर्णोद्धार साठी काढले गेले. मूर्तीला त्यावेळी काळजीपूर्वक बाहेर काढली गेली आणि आता पुन्हा तिची प्रतिष्ठापना देखील करण्यात आली.
इतिहासातील संदर्भ आणि साहित्य
जेष्ठ इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे यांनी स्वतः यादवाड ला जाऊन स्वतः ही मूर्ती पाहून त्याची माहिती 1956 साली शिवचरित्र वृत्त संग्रहात प्रकाशित केली होती. त्यावेळी या शिल्पाचे छायाचित्र मात्र प्रकाशित केले नव्हते. त्यांचा हाच लेख 1979 च्या बेलवाडी मल्लमाँ यांच्या त्रिशतक स्मरणीकेत कन्नड भाषेत प्रकाशित झाला होता.
2002 साली कोल्हापूरच्या डॉ वसंतराव मोरे यांच्या छ शिवाजी की साहित्यिक प्रतिमा या हिंदी पुस्तकात शिल्पाचा फोटो आणि माहिती दिली गेली.
शिवराजेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला
यादवाड मधील शिवरायांच्या या पहिल्या मंदिरानंतर जवळपास 17 वर्षांनी म्हणजेच 1695 साली छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात श्री शिवराजेश्वर मंदिर बांधले. म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर 15 वर्षांनी हे मंदिर बांधले गेले. हे शिवराजेश्वर मंदिर बांधल्यानंतर त्यात शिवरायांची मूर्ती स्थापन करून तिची विधिवत पूजा सुरू केली. या मंदिराला आपण महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्वात पहिले मंदिर म्हणून ओळखतो.
खुद्द महाराजांचे पुत्र असलेल्या राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलेले असल्याने याला महत्व आहे. मंदिराचा पुढील सभामंडप कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1906 मध्ये बांधला होता.
मंदिरातील शिवरायांची मूर्ती एक वेगळ्या रुपात आहे. मंदिर स्थापनेवेळी सुरू केलेली पूजाअर्चा आजतागायत अखंड पणे सुरू आहे. या मूर्तीविषयी अधिक माहिती लवकरच देत आहोत.
आधुनिक काळातील छत्रपती शिवरायांची मंदिरे
कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवरायांची 2 मंदिरे बांधली. एक मंदिर पन्हाळगडावर बांधले तर दूसरे मंदिर नर्सरी बागेत बांधलेले आहे. 1908 साली बांधलेली मंदिरे ही महाराष्ट्रातील शिवरायांची आधुनिक काळातील पहिली मंदिरे आहेत.
पन्हाळगडावर असलेले मंदिर छोटेखानी असून त्यात शिवरायांची संगमरवरी अश्वारूढ मूर्ती आहे.
एखाद्या गावाने मिळून बांधलेले शिवरायांचे पहिले मंदिर म्हणजे रांजनी (तालुका कौठे महांकाळ, जिल्हा सांगली) गावातील आहे. 1976 आणि 77 या काळात हे मंदिर बांधले आहे.
छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम मल्लिकार्जुन
श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन मंदिराच्या उत्तरेला काही अंतरावर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र बांधलेले आहे. आधुनिक काळात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. 1974 च्या सुमारास ही वास्तू बांधण्यास सुरुवात करण्यात आली. आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र शासन दोघांनी मिळून ही इमारत बांधलेली आहे. मंदिरात छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा आहे. मंदिरात ऐतिहासिक माहितीचे फलक देखील आहेत. शिवछत्रपतींचे हे आंध्रप्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध स्मारक आहे.
कधी तुम्ही श्रीशैलम येथे गेला तर हे स्मारक नक्की बघा.
या सर्व महत्वाच्या मंदिरांव्यतिरिक्त अनेक शिवरायांची मंदिरे स्वतंत्र पणे उभारली जात आहेत. अनेक मंदिरांच्या शिखरांवर देवांसोबत छत्रपती शिवरायांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळते. शिवरायांना देव म्हणावे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो मात्र याचे उत्तर अगदी सोपे आहे, ज्या मनुष्याला जिवंतपणीच दैवत्व प्राप्त झाले होते त्याचे दैवत्व नाकारणारे आपण कोण? एकवेळ एखादा नास्तिक देवाचे अस्तित्व नाकारेल परंतु ज्याने संपूर्ण देशाला एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून परकीय लुटीतून जाचातून मुक्त केले त्याला तर नास्तिक देखील देवच म्हणेल.
https://www.garvanemarathi.com/2022/02/Shivaji-maharaj-temples-marathi.html
निवृत्त वायुसैनिक आणि वस्तु सेवा कर अधिकारी12 फेब्रु
महर्षी अगस्ती (नामभेद: अगस्त्य, मैत्रावरुणी, अगस्ति;) हे वेद वाङ्मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे वसिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
‘अगस्त्य’ हे भगवान परमशिवांचेदेखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिळमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. ऋग्वेदामध्ये (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत काशीक्षेत्रातील त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड,रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर, महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर, आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिळनाडू , चेन्नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.
अगस्ती ऋषींचे एक दुर्मिळ आणि पिंपळाच्या मुळ्यांनी वेढलेले एक लहानसे पण अदभूत मंदिर सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील तामखेडी या गावात आहे. तसे हे मंदिर गावात नसुन गावाच्या शिवारात असल्याने, दुसऱ्या आडसरवाडी या गावाकडून पण जवळ आहे.
या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी सांगितली जाते की, जेव्हा अगस्ती ऋषी काशीहून दक्षिणेकडे प्रवास करीत होते, तेव्हा काही काळासाठी त्यांनी येथे आश्रम उभारून वास्तव्य केले होते. त्याच वेळेस प्रभु रामचंद्र सुद्धा या ठिकाणी आले. त्यावेळी अगस्ती ऋषी प्रभु रामचंद्र यांना बाणांचा भाता दिला, त्या भात्यातील बाण कधीच संपणार नाही, असे वरदान दिले. येथेच अमोघ अस्त्र पण प्रभु रामचंद्राला दिले होते.
येथून अग्रणी नावाची नदी उगम पावते. या मंदिराबद्दल पंचक्रोशीतील नागरिक सोडले तर हे मंदिर तसे अपरिचित आहे. गत काळात काही समाज माध्यमात कार्यरत असल्याने हे मंदिर प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिरामुळेच ऊस कारखान्याचे अगस्ती कारखाना असे नामकरण झाले आहे.
मंदिराला जायला मुख्य रस्ता म्हटले तर विजापूर हम रस्ता जवळ आहे. हे मंदिर एका शेतात आहे. आडसरवाडी किंवा तामखेडीपासुन मंदिराकडे जायला कच्चा रस्ता सुद्धा नाही. आपण ज्याला गाडीवाट म्हणतो, असा लाल मातीचा रस्ता आहे. मोटर सायकल पण शेताच्या बांधावर उभी करावी लागते. दूरवरून पिंपळाचे झाड आणि त्याखाली असलेले मंदिर दृष्टीस पडले की आत्मिक समाधान मिळते. त्यानंतर पाच ते दहा मिनिटे शेतातून चालत मंदिराजवळ पोहचता येते.
मंदिर पूर्णपणे पिंपळाच्या मुळ्यांनी वेढले गेले आहे. दरवाजा सुद्धा चारही बाजूंनी मुळ्यांनी वेढला असला तरी अडथळा नाही.
असे हे एक दुर्मीळ मंदिर आहे.
https://mr.quora.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0
स्तंभेश्वर महादेव मंदिर :-
भारतातील मंदिरे जगभर प्रसिद्ध आहेत. मंदिरांची सजावट, त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा आणि मूर्तींची रचना भक्तांना आश्चर्यचकित करण्याची संधी सोडत नाही. आतापर्यंत आपण अनेक प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित कथा ऐकल्या असतील. काही मंदिरे प्राचीन काळातील काही रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. गुजरातचे असेच एक खास मंदिर त्याच्या रहस्यमय चमत्कारासाठी खूप प्रसिद्ध आहे. आपण त्या मंदिराची माहिती बघू या;
छायाचित्र : गुगल
याला भगवान शिव - शंकराचे चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखले जाते.
भारतात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. गुजरातचे स्तंभेश्वर महादेव मंदिर आपल्या रहस्यमय चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वास्तविक रहस्य म्हणजे , हे भगवान शंकराचे मंदिर दिवसातून दोनदा आपल्या भक्तांना दर्शन दिल्यानंतर समुद्राच्या कुशीत निद्रिस्त होते.
हे असे अदभुत मंदिर गुजरातच्या कावी-कंबोई गावात आहे. हे गाव अरबी समुद्राच्या मध्यभागी कळंबेच्या किनाऱ्यावर आहे. हे रहस्यमय मंदिर दिवसातून फक्त दोन वेळा, सकाळ आणि संध्याकाळ दिसते.
शिवभक्तांना दर्शन दिल्यानंतर हे मंदिर समुद्रात नाहीसे होते. असे म्हणतात की हे मंदिर कोणाच्यातरी प्रायश्चिताचे फळ आहे, याचा उल्लेख शिवपुराणातही आहे आणि याच कारणामुळे ते नाहीसे होते.
मंदिराची माहिती :-
शिवपुराणानुसार, तारकासुर नावाच्या एका शिवभक्ताने, असुराने आपल्या तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न केले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या बदल्यात त्याला इच्छित वरदान दिले. ते वरदान असे होते की त्या असुराचा वध फक्त भगवान शंकर यांचा पुत्रच करू शकतो, आणि त्या पुत्राचे फक्त सहा दिवस असेल. भगवान शंकराला तर पुत्र नव्हता. त्यामुळे तारकासुर स्वतःला चिरंजीवी समजु लागला.
तारकासुराला वरदान मिळाल्याने शिवपुत्र सोडून कोणीही त्या राक्षसाचा वध करू शकत नव्हते. हे वरदान मिळाल्यावर तारकासुरने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला. यामुळे व्यथित होऊन सर्व देव आणि ऋषींनी भगवान शंकराला तारकासुराचा वध करण्यासाठी प्रार्थना केली. देवांच्या प्रार्थनेचा स्वीकार केल्यानंतर, पांढर्या पर्वत तलावातून 6 दिवसांच्या कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेयाने त्याचा वध केला होता, पण नंतर तो असुर निस्सीम शिवभक्त असल्याची माहिती मिळाल्यावर कार्तिकेयला खूप पश्चाताप झाला.
मंदिर हे प्रायश्चिताचे फळ आहे …!
जेव्हा कार्तिकेयाला त्याचा पश्चाताप झाला तेव्हा त्याने भगवान विष्णूला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग विचारला. यावर भगवान विष्णूंनी त्यांना रोज क्षमा मागावी लागेल अशा ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्याचा उपाय सुचवला. अशा प्रकारे त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. तेच पुढे स्तंभेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
छायाचित्र : गुगल
हे मंदिर दररोज समुद्रात बुडते आणि नंतर परत वरती येते. आपल्या कृत्याची क्षमा कार्तिकेय मागायचा आणि मंदिर समुद्रात डूबयाचे. आज देखील तसेच घडत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक महाशिवरात्री व अमावस्येला स्तंभेश्वर महादेव येथे मोठी यात्रा भरते. या मंदिराला भेट देण्यासाठी पूर्ण दिवसाची वेळ निश्चित करावी, जेणेकरून हा अदभुत चमत्कार पाहता येईल.


























































