वाकाटक कला (Vakatak Art)
मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

इ. स. तिसर्या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.
वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.
मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा) येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.
या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.
वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.
अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते. उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.
वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.
वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.
वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.
वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.
अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vākātakas : An Essay in Hindu Iconology, Groningen, 1997.
- Jamkhedkar, A. P. Eds., Gai, G. S. & Asher, M. ‘Narrative Sculptures from Paunar : A Reappraisal’, Indian Epigraphy ; Its Bearing on the History of Art, pp. 83-86, New Delhi, 1985.
- Sharma, A. K. & Joshi, Jagat Pati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
- Singh, H. N. & Trivedi, Preety A. Mandhal Excavation (1975-77), Nagpur, 2019.
- Soundara Rajan, K. V. Art of South India-Deccan, Delhi, 1980.
- Welankar, Vaishali, Vaishnavism : An Iconographic Study, 2 vols., Delhi, 2009.
- जामखेडकर, अ. प्र. पुरासंचय (भाग १), पुणे, २०१६.
- मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
- मेश्राम, प्र. शा.; खोब्रागडे, प्रि. आणि गणवीर, श्रीकांत, भद्रावतीचे पुरातत्त्वीय वैभव, नागपूर, २००४.
चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).
भित्तिलेपचित्रण (Fresco)
भिंतीच्या गिलाव्यावर चित्र रंगविण्याची एक तांत्रिक प्रक्रिया. थेट भिंतीवर व छतावर चित्र काढण्यासाठी वापरात आलेल्या पारंपरिक चित्रणाच्या एका प्राचीन तंत्रपद्धतीस भित्तिलेपचित्रण म्हणतात. दगडाच्या किंवा विटांच्या भिंतीवर चुन्याचा गिलावा करून त्यावर केवळ पाण्यात मिसळलेल्या रंगांनी रंगवावयाच्या चित्रणपद्धतीस ‘फ्रेस्को’ अशी संज्ञा आहे. यात चूर्ण केलेले रंगद्रव्य पाण्यात मिसळवून गिलाव्याबरोबरच भिंतीचाच भाग असल्यासारखे कायमस्वरूपी पक्के व्हावे म्हणून सुकू दिले जातात. ‘फ्रेस्को’ हा मूळ इटालियन शब्द असून त्याचा अर्थ ‘ताजा’ (फ्रेश) असा होतो. चित्र रंगविण्याच्या मुख्य पद्धती दोन होत : (१) भिंत ओली असतानाच व ओली असेपर्यंतच चित्र रंगविणे, (२) भिंत पूर्ण सुकल्यानंतर चित्र रंगविणे. पहिल्या पद्धतीस खरे (True) किंवा ‘सार्द्र भित्तिलेपचित्रण’ (Buon Fresco) असे म्हणतात आणि दुसऱ्या पद्धतीस ‘शुष्क भित्तिलेपचित्रण’ (Secco Fresco) असे म्हणतात. भित्तिलेपचित्रण ही वास्तुशास्त्रातील शैलीचाच एक भाग वाटणारी व टिकाऊ असल्याने भित्तिचित्रणातील एक तंत्र-पद्धती मानली जाते.

भित्तिलेपचित्रणपद्धती फार पुरातन आहे. चुन्याच्या गिलाव्याची पद्धती संदला-शिल्पन (stucco art) प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात असून ईजिप्शियन संस्कृतीत त्याचा अनेक प्रकारे वापर केल्याचे दिसून येते. ग्रीक कलावंतांनाही भित्तिलेपतंत्र चांगलेच अवगत होते. इ. स. पू. १५०० वर्षांपूर्वी रंगविलेली क्रीटमधील नॉससच्या राजप्रासादाच्या भिंतींवरील चित्रे ही भित्तिलेपतंत्रातील असावीत, असे काही तज्ञांचे मत आहे. रोम आणि पाँपेई येथील भित्तिलेपचित्रे शुष्क भित्तिलेपचित्रण पद्धतीची असून, त्यावर मेणाचा पातळ थर दिलेला आहे. त्यामुळेच ती चित्रे आजमितीस शाबूत आहेत. ग्रीक कलातंत्रज्ञ व्हिट्रूव्हिअस (इ.स.पू. पहिले शतक) व थोरला प्लिनी (इ. स. २४-७९) यांनी चुन्याच्या व जिप्समच्या गिलाव्याविषयी तपशीलवार माहिती नमूद करून ठेवली आहे. गिलाव्याविषयीची ही माहिती परिपूर्ण आणि महत्त्वपूर्ण समजली जाते. मध्ययुगात यूरोपमध्ये परिष्कृत चुना (Refined Lime) व दमट चुना (Hydraulic Lime) बनवण्याचे कौशल्य लोप पावले. तथापि प्रबोधनकाळात भित्तिलेपपद्धतीचे पुनरुज्जीवन झाले. लिओनार्दो दा व्हींची, जॉत्तो, मायकेलअँजेलो, रॅफेएल यांनी उत्तमोत्तम भित्तिलेपचित्रे निर्माण केली. मध्य आशिया, चीन, भारत येथील इ. स. पू. १०० वर्षांपासून ते चवथ्या-पाचव्या शतकापर्यंत रंगविण्यात आलेली भित्तिलेपचित्रे शुष्क भित्तिलेपचित्रण तंत्रातील आहेत. तथापि त्या ठिकाणी प्रमुख आधार-भिंत (supporting wall) मातीची असून त्यात भाताचे गवत, शेण इत्यादींचा वापर केलेला आढळतो.
शिल्परत्न या दक्षिण भारतीय प्राचीन संहितेमध्ये चिकणरंग चित्रणाबरोबर सार्द्र भित्तिलेपचित्रण पद्धती आणि शुष्क भित्तिलेपचित्रण पद्धती यांचाही उल्लेख केलेला दिसतो. प्राचीन भारतात इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते सातव्या-आठव्या शतकापर्यंत चित्रित करण्यात आलेली भित्तिलेपचित्रे ही प्रामुख्याने शुष्क तंत्रात केलेली आढळतात. अजिंठा, बाघ, बादामी इ. ठिकाणी पाषाणात खोदलेल्या गुहांत सरळ दगडाच्या भिंतीवरच गिलावा देण्यात आलेला दिसतो. भिंतीवर गिलावा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. गिलाव्याकरिता लागणारे प्रमुख घटक म्हणजे चुना व वाळू. तथापि ग्रीक पद्धतीत चुन्याबरोबर विटा व कौलाची भुकटी, संगमरवरी दगडाची भुकटी, वाळू, ‘पोझोलाना’ खनिज इत्यादींचा वापर करून गिलाव्याचे सहा थर देण्याची प्रथा होती. ईजिप्तमध्येही गवताचा व इतर तंतुमय वनस्पतींचा चुन्यात मिसळण्यासाठी उपयोग केला जाई. भाताच्या गवताच्या तुसांमुळे भिंतींना तडे जात नाहीत, असा अनुभव आहे. अजिंठा येथे केलेल्या भित्तिचित्रांसाठी चिकणरंग चित्रणाबरोबर इतर दोन्हीही पद्धतीचाही वापर केलेला दिसतो. या चित्रांसाठी भाताच्या गवताबरोबर माती, शेण, गूळ यांच्या परिपक्व मिश्रणाच्या गिलाव्याचा थर दगडावर देऊन त्यावर चुना व वाळू यांच्या अतिशय गुळगुळीत दिलेल्या थरावरती चित्रण केलेले दिसते.

चुना : भित्तिलेपनाकरता वापरावयाच्या चुन्याचे तीन प्रकार आहेत.
(१) कळीचा चुना किंवा तिखट चुना (Fat Lime) : शुद्ध ‘ऑक्साइड ऑफ कॅल्शियम’ असलेला कळीचा चुना भट्टीत चांगला भाजल्यानंतर हलका व पाण्यात चटकन विरघळणारा असा होतो. विशेषकरून हाच चुना सर्वत्र वापरतात. भट्टीतून काढल्यानंतर लवकरच तो पाण्यामध्ये निवळून परिपक्व करावा लागतो.
(२) विरळ चुना (Thin Lime) : विरळ चुन्यात मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. हा चुना पाण्यात फार फुगत नाही व त्याचा गिलावा फार जलद वाळत नाही. गिलाव्यानंतर जवळजवळ ५६ तासांपर्यंत चित्रकाराला त्यावर काम करता येते. ऑस्ट्रियातील प्राचीन भित्तिलेपचित्रे ह्याच चुन्याच्या गिलाव्यावरील आहेत. तथापि या चुन्यावर दूषित हवेतील कोळशाच्या धुराचा व सल्फ्युरिक ॲसिडचा परिणाम फार लवकर होतो.
(३) दमट चुना (Hydraulic Lime) : दमट चुना हा फार लवकर घट्ट होतो व काही रंग त्याच्याशी एकजीव होत नाहीत. त्यामुळे भित्तिचित्रे टिकाऊ होत नाहीत.
चुना निवळणे : चुना निवळून परिपक्व करणे हे एक तंत्र आहे. गिलावा दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीने त्यास फारच महत्त्व आहे. प्राचीन काळी हा चुना अनेक वर्षे जमिनीत गाडून ठेवीत असत. रोमन लोक निवळण्याची क्रिया जलद होण्याकरिता त्यात अम्ल मिसळत, तर भारतात त्यात ताक मिसळण्याची पद्धत होती. इटालियन कलातज्ञ लिआँ आल्बेर्ती (Leon Battista Alberti) याच्या मतानुसार चुना हळूहळू निवळावा लागतो. चुन्यात थोडे थोडे पाणी घालून तो दमट व अंधाऱ्या जागी ठेवावा. बरेच दिवस झाकून ठेवल्यानंतर तो परिपक्व होतो.
वाळू : नदीकाठची वाळू ही सर्वांत उत्तम वाळू असते. वाळू पुनःपुन्हा धुऊन घ्यावी लागते. त्यात क्षार किंवा माती यांचे प्रमाण जराही असता कामा नये. क्षार किंवा माती असल्यास भिंतीस तडे जातात.

गिलावा : (प्लास्टर). गिलावा विशेषतः विटांच्या भिंतीवर केला जातो. तथापि भारतात अजिंठा, बाघ, बादामी इ. ठिकाणी पाषाणात खोदलेल्या गुहांत सरळ दगडाच्या भिंतीवरच गिलावा देण्यात आला असून तो शेण, माती, गवत इत्यादींच्या मिश्रणाचा आहे. विटा पाणी शोषून घेतात, म्हणून गिलावा देण्यापूर्वी त्या भरपूर भिजवाव्या लागतात. साधारणपणे गिलाव्याचे तीन थर दिले जातात. त्या थरांची तांत्रिक नावे अशी : (१) जाडाभरडा थर (स्क्रॅच किंवा रफ कोट किंवा Arriciato) (२) करडा थर (ब्राउन कोट) व (३) चित्राचा थर (Intonaco). या थरांची जाडी आणि चुना व वाळू यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे : (१) जाडाभरडा थर : जाडी साधारणतः १/२ इंच (१२.७ मिमी.) किंवा ३/४ इंच (१९.०५ मिमी.) चुना व वाळू यांचे प्रमाण १ : २, (२) करडा थर : जाडी ३/४ इंच (१९.०५ मिमी.) किंवा १/४ इंच (६.३५ मिमी.) चुना-वाळू-प्रमाण १ : १, (३) चित्राचा गिलावा : जाडी जास्तीत जास्त १/४ इंच (६.३५ मिमी.) चुना-वाळू-प्रमाण २ : १. हा थर हवा तेवढा घोटून गुळगुळीत बनवता येतो. गवंड्याची थापी किंवा अकीक (ॲगेट) दगड घासून हा थर गुळगुळीत करतात. काचेची बाटली घासूनही हा थर गुळगुळीत बनवता येतो. ग्रीक तंत्रानुसार पहिल्या थरात चुन्याबरोबर विटा किंवा कौलाची भुकटी, गवताची तुसे, कापूस, धागे इ. गोष्टी मिसळलेल्या असतात. दुसऱ्या थरात चुना व वाळू याचा वापर केलेला असतो आणि तिसऱ्या थरात चुना व संगमरवराची भुकटी मिसळलेली असते. व्हिट्रूव्हिअसने गिलाव्याच्या सहा थरांची शास्त्रशुद्ध पद्धत आपल्या ग्रंथात नमूद केली आहे. भारतात राजस्थानमध्ये गिलाव्याच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती आजही प्रचलित आहेत.
चित्रणतंत्र : भित्तिलेपचित्रणास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी चित्रकार त्याचे कच्चे रेखाटन करतो. त्यास ‘कार्टून’ अशी संज्ञा आहे. ते मूळ चित्राच्याच तंतोतंत आकारात असते व ते भिंतीवर ठेवून त्यानुसार बाह्य रेषांकन केले जाते. भित्तिलेपचित्रणाच्या पहिल्या पद्धतीत (सार्द्र भित्तिलेपचित्रण) गिलावा ओला असताना व ओला असेपर्यंतच चित्र रंगवले जाते. कारण चुन्याच्या वाळण्याच्या रासायनिक क्रियेबरोबरच रंग गिलाव्याशी एकजीव होतात. त्यामुळे फार मोठे भित्तिचित्र रंगवताना एका दिवसात चित्राचा जेवढा भाग पुरा करता येईल, तेवढ्याच भिंतीवर गिलावा द्यावा लागतो. शुष्क भित्तिलेपचित्रण पद्धतीत मात्र गिलावा वाळल्यानंतरच सावकाशपणे चित्र रंगवता येते. दोन्ही पद्धतींत रंग केवळ पाण्यातच मिसळले जातात व नंतर गरजेनुसार त्यात अगदी थोड्या प्रमाणात चुन्याची स्वच्छ निवळी मिसळली जाते.
रंग : भित्तिलेपचित्रणाकरिता वापरावयाचे रंग पूर्णपणे खनिज असावे लागतात. रासायनिक रंग एकजीव होत नाहीत व कालांतराने ते नाहीसे होऊन जातात.
संदर्भ :
- Bazzi, Maria, The Artist’s Methods and Materials, London, 1960.
- Gettens, R. J. Stout, G. L. Painting Materials : A Short Encyclopaedia, New York, 1966.
- Hiler, Hilaire, Notes on the Techniques of Painting, London. 1948.
- Massey, Robert, Formulas for Artists, London, 1968
- Meiss, Millard, The Great Age of Fresco, 1968.
समीक्षण : स्मिता गीध
छायाचित्राची लिंक
http://www.mediafire.com/view/518ak8qx2z0xxkc/Dashkumar-Covers-web.jpg
मी मध्ये 'दशकुमारचरितम'चे भाषांतर करायला घेतले आणि मोठ्या कष्टाने ते पूर्णही केले, त्या पुस्तकाची ही प्रस्तावना. हे भाषांतर करताना मी श्री. जॅकॉ यांच्या इंग्रजी भाषांतराचा मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यामुळे माझी फारच तारांबळ उडाली. पण मूळ संस्कृत ग्रंथ वाचायलाच लागला. त्यात एक बरे झाले, मला संस्कृत पुस्तक वाचण्यास जरा तरी जमू लागले आहे. हा जवळजवळ एक छोटासा लेखच आहे. आपल्याला हा आवडेल अशी आशा आहे. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठही मीच तयार केले, ते वर दिसतेच आहे. या मुखपृष्ठावरील छायाचित्रे मीच अजिंठ्यामध्ये काढली आहेत.
प्रस्तावना
१९०७ साली श्री. मार्क कॉलिन्स यांनी लिपझिक विद्यापीठाला एक प्रबंध सादर केला. त्याचे नाव होते ‘रघुवंश आणि दशकुमारचरितम ज्या काळात रचले गेले, त्या काळातील भौगोलिक माहिती आणि त्यावरून या दोन्ही ग्रंथांचा काळ ठरविण्याचा प्रयत्न’. यात श्री. कॉलिन यांनी दशकुमारचरितम या कांदबरीतील आठव्या प्रकरणावरून असे अनुमान काढले आहे की या काळात नागपूर व त्याच्यावरच्या भागात एक प्रबळ राज्यसत्ता होती व त्या सत्तेचे मांडलिकही बर्यापैकी प्रबळ होते. अर्थात या मतालाही बराच विरोध झाला. उदा. कार्ल खंडालवाला, ब्रह्मानंद देशपांडे, शिला वाईनर इत्यादींनी यात ऐतिहासिक व भौगोलिक सत्य काहीही नसून याला फक्त कादंबरीचेच महत्त्व द्यावे असे आग्रहाने प्रतिपादन केले. विरोध करणारे मातबर अभ्यासक होते, त्यामुळे त्यांच्या मतांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पण महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी श्री. कॉलिनचे म्हणणे उचलून धरले आणि त्याला पुष्टी मिळाली अजिंठ्याचे अभ्यासक श्री. स्पिंक यांच्या अभ्यासाने. या सगळ्या अभ्यासकांचे म्हणणे होते की या आठव्या भागात वाकाटकांच्या उतरत्या काळाचे वर्णन मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात तसे असावे असे आता बर्याच अभ्यासकांना वाटते. महामहोपाध्याय मिराशींचे मत जर ग्राह्य धरले, तर या ग्रंथावरून त्या काळातील बरीच माहिती गोळा करता येते व त्या काळातील समाजजीवनावर थोडाफार प्रकाश आपल्याला टाकता येतो. तो प्रयत्न आपण करणार आहोत, पण त्या अगोदर आचार्य दंडी कोण होते, ते एवढे प्रसिद्ध का झाले, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आचार्य दंडींनी हा ग्रंथ पल्लवांचा आत्मसंतुष्ट राजा नरसिंहवर्मन दुसरा याला शहाणपणाचे दोन शब्द सुनविण्यासाठी रचला असावा. यथा राजा तथा प्रजा या नियमानुसार प्रजेतही बेबंदशाही माजली असावी.
त्या काळात सहाव्या किंवा सातव्या शतकात आचार्य दंडी हे पल्लवांच्या दरबारी राजकवी होते. हे पद त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आले होते. हे घराणे मूळचे विदर्भाचे. त्यांचे गोत्र होते कौशिक. हे घराणे मूळचे गुजरातमधील आनंदपूर येथील. त्यांच्या कुठल्यातरी पूर्वजांनी नाशिक्यमधील अचलापुउर येथे स्थलांतर केले. याच घराण्यात आचार्य दंडींच्या आजोबांनी - ज्यांचे नाव दामोदर होते त्यांनी - जन्म घेतला. कवी भारावी यांच्यामुळे राजा विष्णुवर्धन यांच्याशी दामोदर यांची मैत्री झाली. एकदा दामोदर राजाबरोबर जंगलात शिकारीला गेले असता, त्यांना भुकेपोटी मांसभक्षण करावे लागले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी गंगा घराण्यातील एका राजाच्या दरबारी राजकवीची नोकरी पत्करली. काव्यावरील त्यांचे प्रभुत्व पाहून त्यांना त्या दरबारातून पल्लवांचा राजा सिंहविष्णूने त्याच्या दरबारी आमंत्रण दिले. या वेळी त्यांचे वय असेल अंदाजे वीस. श्री. दामोदरांना अनेक मुलींनंतर एक मुलगा झाला, त्याचे नाव होते वीरदत्त. हा वीरदत्त व त्याची पत्नी गौरी यांच्या पोटी श्री. दंडींनी जन्म घेतला. वयाच्या सातव्या वर्षीच दंडीचे शिक्षण सुरू झाले. दुर्दैवाने चालुक्यांनी पल्लवांवर केलेल्या आक्रमणाच्या राजकीय रणधुमाळीमुळे आचार्यांना कांची सोडणे भाग पडले. त्याच काळात त्याच्या मातापित्यांचाही मृत्यू झाला असावा. पुढील बारा वर्षे तरुण दंडीला चालुक्यांनी व्यापलेल्या स्वत:च्या देशात अज्ञातवासात काढावी लागली. त्याचे हे नष्टचर्य संपले, जेव्हा परमेश्वरवर्मन पहिला याने चालुक्यांचा राजा विक्रमादित्याचा पराभव केला तेव्हा. कांचीमध्ये पल्लवांची सत्ता परत प्रस्थापित झाल्यावर आचार्य दंडींना राजकवीचे पद परत उपभोगण्यास मिळाले व ते त्यांनी परमेश्रवरवर्मन-१ व त्याचा मुलगा नरसिंहवर्मन-२ यांच्या कारकिर्दीत उपभोगले. त्या काळातील त्यांचे मित्रही चांगलेच प्रसिद्ध पावले. उदा. ललितालय जो एक श्रेष्ठ वास्तुरचनाकार, जादूगार व कवी होता, रणमल्ल जो सेनाप्रमुखांचा मुलगा होता, मातृदत्त जो वेदांचा प्रकांडपंडित व कवी होता, देवशर्मन एक बुद्धिमान ब्राह्मण होता, जयंत, नारायण, भजनानंद, रामशर्मा इ. इ.
आचार्य दंडी हे एक बुद्धिमान कवी होते व त्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र व वात्सायनाचे कामसूत्र यांचा विशेष अभ्यास केला होता. जेव्हा त्यांना कांची सोडावे लागले, तेव्हा त्यांनी उत्तरेत भरपूर प्रवास केला होता व तेथील जनपदांचा अभ्यासही केला होता, ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातही दिसते. राजदरबारात व राजगृही त्यांची ऊठबस असायची. त्यामुळे त्यांना राजदरबारातील कामकाजांची पूर्ण कल्पना होती, तसेच काळ्या कृत्यांचीही माहिती होती. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अत्यंत खेळकर होता व अडीअडचणींकडे ते त्याच दृष्टीकोनातून पाहायचे व त्यावर मात करत असणार.
याच काळात आचार्य श्री. दंडी यांनी त्यांचे तीन ग्रंथ लिहिले. म्हणजे त्यांनी जास्त लिहिले असतील, पण आज आपल्याला त्यातील तीनच माहीत आहेत. १. अवंतीसुंदरीकथा, २. दशकुमारचरितम व ३. काव्यदर्श. नावावरून दंडी एक संन्यासी वृत्तीचा माणूस वाटण्याची शक्यता आहे. पण हा माणूस भौतिक सुखांत व जगाच्या रहाटीत गुंतून पडणारा होता. दरबारात सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती व त्याचा उपभोग तो उत्तमपणे घेत असणार. अर्थात त्याची बुद्धिमत्ता अफाट होती व अनेक टीकाकारांनी ती मान्यही केली आहे. याच्या ग्रंथांमध्ये कांचीच्या प्रदेशाचे जास्त वर्णन येत नाही, उलट विदर्भाचा त्याला बराच अभिमान असावा असे वाटते. त्याला महाराष्ट्रीचेही कौतुक होते व त्याच्या काव्यदर्श या ग्रंथामध्ये त्याने विदर्भी लिखाणशैलीचेही पोटभरून कौतुक केलेले आढळते. दशकुमारचरितमच्या प्रारंभी जे श्लोक आढळतात, त्यावरून ते विष्णूचे भक्त होते हे कळते. आजही जळगाव, धुळे, नागपूर भागात श्रीविष्णूची पूजा बर्यापैकी प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते आचार्य दंडी हे कालिदासाचे समकालीन होते. अर्थात याला ऐतिहासिक लिखित पुरावा देता येत नाही. त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून अभ्यासकांनी हे मत मांडलेले आहे. काहींच्या मते तीन दंडी अस्तित्वात होते. अर्थात हे मत आता फारसे कोणी गृहीत धरत नाहीत. काहींच्या मते दशकुमारचरितमची पूर्वपीठिका कोणीतरी मागाहून घुसडली आहे. पूर्वपीठिका आणि इतर भागात ज्या विसंगती आढळतात, त्यांचाही या मतासाठी आधार घेण्यात येतो. दंडी, कालिदास, भवभूती यांच्या गद्य काव्यातील सारखेपणा ते साधारणत: एकाच काळातील असावेत यासाठी पुरावा म्हणून काही जण वापरतात, पण तो काही ऐतिहासिक पुरावा नाही. पण त्याकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. कविचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे.
एकदा साक्षात सरस्वतीने एका सुंदर युवतीचे रूप घेतले व ती अल्लडपणे एका चेंडूशी खेळू लागली. ते पाहून दंडी म्हणाले,
एकोपि त्रय इत भाति कंदुकोयं कान्ताया: करतलरागरक्तरक्त: ।
भूमौ तच्चरणनखांशुगौरगौर: खस्थ: सन्नयनमरीचिनीलनील:॥
याचा स्वैर अर्थ असा होतो : जेव्हा ती त्या चेंडूला तळहाताने मारते, तेव्हा तिच्या हातात एक चेंडू नसून तीन चेंडू आहेत असा भास होतो. तिच्या तळहाताची लाली त्या चेंडूचा रंग लाल करते. जमिनीवर पडल्यावर तिच्या चमकणार्या नखांमुळे तो पांढरा भासतो. जेव्हा तो हवेत असतो, तेव्हा तिच्या गडद निळ्याशार डोळ्यातील किरणांनी त्याचा रंग निळा निळा होतो.
आता भवभूतीची ही रचना बघा :
विदितं ननु कंदुक ते ह्रदयं प्रमदाधरसंगमलुब्ध इव।
वनिताकरतामरसाभिहत: पतित: पुनरुत्पतासि॥
अर्थ : हे कंदुका, तुझ्या ह्रदयात काय चालले आहे ते मला चांगले समजते आहे. तिच्या करकमळाच्या थपडा खात तू वारंवार जमिनीवर पडतोस, पण तिच्या अधरस्पर्शाच्या इच्छेने परत परत तिच्याकडे उसळी घेतोस.
आणि हा कालिदास :
पयोधराकारधरो हि कन्दुक: करेण रोषादभिहन्यते मुहु:।
इतीव नेत्राकृतिभीतमुत्पलं स्त्रिय: प्रसादाय पपात पादयो:॥
अर्थ : जमिनीवर आपटून परत परत वर येताना तो चेंडू तिच्या उरोजांचा आकार घेत असल्यामुळे, विस्फारलेल्या नयनांनी ती त्या चेंडूवर तिच्या करकमलांनी रागावून प्रहार करीत होती. ते पाहताच तिच्या कमलनयनांशी स्पर्धा करणारे तिच्या केसातील कमळ दचकून तिच्या पायावर पडून गयावया करू लागले.
या तिन्ही रचना पाहिल्यावर त्या एकाच काळातील असाव्यात असे कोणालाही वाटेल. म्हणजे चेंडू व त्याच्याशी खेळणारी सुंदर तरुणी यांच्यामधील नाते उलगडताना तिच्या सौंदर्याचे रसग्रहण करण्याची ही पद्धतच त्या काळात असावी. अर्थात या अर्थाची रचना आत्ताच्या काळातही कवीला सुचू शकते. मला आठवते की ही कल्पना एका इंग्लिश गाण्यातही वापरली गेली आहे. प्रो. विल्सन यांनी आचार्य दंडी यांचा काळ अकरावे शतक काही गृहीतकांवर (भोजराजाचा उल्लेख) ठरविला. पण त्यांनीच नंतर त्यांचा काळ आधीचा असावा असेही म्हटले आहे. थोडक्यात, असे काही जण सोडल्यास, सहावे शतक हा आचार्यांचा काळ असावा असे इतर सर्व जण मानतात. आपणही तेच गृहीत धरण्यास हरकत नाही. जर स्पिंक, महामहोपाध्याय मिराशी व कॉलिन्स यांचे म्हणणे खरे मानले, तर आचार्यांच्या काळाचा अभ्यास हा सहाव्या शतकातील घडामोडींचा अभ्यास ठरतो. त्यांच्या रचनेतून साहजिकच त्या काळाचे प्रतिबिंब उठले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दशकुमारचरितम हे त्या काळातील समजजीवनावर थोडा का होईना प्रकाश टाकू शकते असे वाटते, ज्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
आचार्य दंडींच्या आधी संस्कृत भाषेतील ग्रंथ हे अलंकारिक भाषेत रचले जायचे. अर्थातच त्यामुळे त्यात थोडीशी कृत्रिमताही आहेच. आचार्य दंडींनंतर हे सगळे बदलले. त्यांची भाषा रोखठोक व मूळ मुद्द्याला हात घालणारी म्हणून वाचकांना आवडू लागली. पण आपल्याला कुठल्याही साहित्यांची तुलना करायची नसल्यामुळे यात आपण शिरायला नको. आचार्य दंडी सहाव्या शतकात होऊन गेले याला आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे दशकुमारचरितममध्ये कुठेही मुसलमानी चालीरितींचा उल्लेख नाही, ना त्यांच्या आक्रमणांचा. यवनांचा उल्लेख आहे, पण ते ग्रीक किंवा भारतातीलच यवन असावेत.
महामहोपाध्याय श्री. मिराशी यांनी त्या वेळची राजकीय परिस्थिती काय होती आणि दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी वर्णन केलेली राजकीय परिस्थिती यात लक्षणीय साम्य दाखवून, नावे जरी वेगळी असली तरी दशकुमारचरितममध्ये वाकाटकांच्या सत्तेच्या अस्ताचे वर्णन केले आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी श्री. मिराशी यांचा एक लेख वाचकांनी जरूर वाचावा.
आचार्य दंडी यांचा काळ सहाव्या शतकाच्या आसपास होता, हे आपण गृहीत धरू या. अर्थात या बाबतीत अचूक सांगणे कठीणच नव्हे, अशक्य आहे.
ज्या दहा राजकुमारांची ही कथा आहे, त्यांची नावे देणेे सोईस्कर ठरेल, म्हणजे वाचतांना वाचकांचा गोंधळ उडणार नाही.
१ राजवाहन मगधाचा राजा राजहंस याचा मुलगा.
२ सोमदत्त सत्यवर्मन याचा मुलगा.
(सत्यवर्मन सुमतीचा भाऊ व राजहंसाचा वयोवृद्ध व अनुभवी मंत्री सितावर्मन याचा मुलगा.)
३ पुष्पोद्भव रत्नोद्भवाचा मुलगा.
(रत्नोद्भव हा सुश्रुतचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा. पद्मोद्भव हा आणखी एक मंत्री.)
४ अपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
५ उपहारवर्मन मिथिलेचा राजा प्रहारवर्मन याचा मुलगा. हा राजवाहनाच्या बाजूचा होता.
६ अर्थपाल कामपालाचा मुलगा,
(कामपाल हा सुमित्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा. धर्मपाल हा राजहंसाचा आणखी एक मंत्री)
७ प्रमती सुमतीचा मुलगा.
(सुमती हा सत्यवर्मनचा भाऊ व सितावर्मनचा मुलगा)
८ मित्रगुप्त सुमंत्राचा मुलगा.
(सुमंत्र हा कामपालाचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
९ मंत्रगुप्त सुमित्राचा मुलगा.
(सुमित्र हा सुमंत्राचा भाऊ व धर्मपालाचा मुलगा)
१० विश्रुत सुश्रुताचा मुलगा.
(सुश्रुत हा रत्नोद्भवाचा भाऊ व पद्मोद्भवाचा मुलगा)
श्री. मिराशी या बाबतीत काय लिहितात ते पाहू या. (कंसातील मते प्रस्तुत लेखकाची आहेत.) -
तिसर्या शतकाच्या शेवटास वाकाटकांचे साम्राज्य दख्खमध्ये चांगलेच प्रस्थापित झाले होते. वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणता येईल अशा प्रवरसेन-१ने चार अश्वमेध व इतर प्रकारचे अनेक यज्ञ केले होत. पुराणातील उल्लेखानुसार त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार मुलांत वाटले गेले. थोरल्या घराण्याची सत्ता विदर्भात प्रस्थापित झाली. यांनी प्रथम रामटेकजवळील नंदीवर्धन येथे राजधानी केली होती व नंतर प्रवरपूर येथे. श्री. मिराशींनी जेव्हा हा लेख लिहिला, तेव्हा त्यांनी त्यात असे म्हटले होते की प्रवरपूर कोठे आहे हे अजून सिद्ध व्हायचे आहे. (परंतु आता ते सिद्ध झाले आहे. जवळच असलेले मनसर हेच प्रवरपूर आहे, हे तेथे झालेल्या उत्खननातून समजले आहे.) दुसर्या म्हणजे वास्तुगुल्म शाखेने वाशिम येथून राज्य केले, तर उरलेल्या शाखांची कुठलीच माहिती उपलब्ध नाही. याच घराण्यातील पृथ्वीसेनाच्या कारकिर्दित वाकाटकांचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपर्यंत पसरले होते. या शाखेच्या नंतरच्या राजांची माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.
नाव घेण्यासारखे अनेक राजे थोरल्या शाखेत होऊन गेले, पण त्यातील सगळ्यात पराक्रमी होता प्रवरसेन दुसरा. याची आई गुप्त घराण्यातील होती व यानेच प्रसिद्ध 'सेतुबंध' नावाचा ग्रंथ प्राकृत भाषेत रचला. अजिंठ्याच्या अनेक शिलालेखांतून वास्तुगुल्म शाखेतही अनेक पराक्रमी राजे होऊन गेले हे सहज समजते. यांच्यातील शेवटचा होता हरीसेन (अंदाजे ४७५-५००) हा एक पराक्रमी व आक्रमक राजा असावा. पृथ्वीसेनानंतर त्याने उत्तर विदर्भावर स्वारी करून तो प्रदेश त्याच्या राज्याला जोडला; एवढेच नाही, तर कुंतल, अवंती, कलिंग, कोसाला, त्रिकूट, लाट व आंध्र या देशांतूनही महसूल गोळा करण्यास सुरुवात केली होती. याच राजाच्या काळात अजिंठ्यातील सर्वात सुंदर अशा तीन लेण्यांची (१६, १७, व १९) व त्याच डोंगररांगेत असणार्या घटोत्कच लेण्यांची निर्मिती झाली. अजिंठ्यातील शिलालेखातून याचे राज्य उत्तरेकडे नर्मदेपलीकडे, तर दक्षिणेकडे कृष्णा नदीपलीकडे पसरले होते. पूर्वेला अरबी समुद्रापर्यंत व पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत पसरले होते. हरीसेनानंतर बहुधा ही सत्ता मोडकळीस आली असावी, कारण त्यानंतर कुठल्याही शिलालेखात वाकाटकांच्या राजांची वंशावळ उपलब्ध नाही. हे असे का झाले असावे, याची पुराणात किंवा इतिहासात काहीही माहिती उपलब्ध नाही. परंतु दशकुमारचरितमच्या आठव्या उच्छवासाचा त्या दृष्टीकोनातून अभ्यास केला, तर काय झाले असावी याची थोडीफार कल्पना येऊ शकते.
दशकुमारचरितममध्ये विदर्भाचे राजे म्हणून पुण्यवर्मन व त्याचा मुलगा अनंतवर्मन यांचा उल्लेख आला आहे, तसेच महिस्मतीचा राजा म्हणून मित्रवर्मन याचा उल्लेख आला आहे. या प्रदेशात वर्मन या नावाचा वंश राज्य करत होता, असा कुठलाही पुसटचा उल्लेखही आपल्याला पुराणात किंवा इतर साहित्यात आढळत नाही. हे वाकाटक राजेच असले पाहिजेत. (अर्थात त्यांची नावे आचार्य दंडी यांनी का बदलली? हा संशोधनाचा विषय आहे. श्री. दंडी यांनी हा ग्रंथ लिहिला, त्या वेळी वाकाटकांचा अस्त होत आला होता. कदाचित त्या वेळच्या राजाला हे रुचले नसते, म्हणून त्यांनी तसे केले असावे. कारण आठव्या प्रकरणात वर्णन केलेले वातावरण असेच काहीसे होते.)
दशकुमारचरितममध्ये अनंतवर्मनच्या अनेक मांडलिकांचा उल्लेख आला आहे. अर्थात हे त्याच्या वडिलांचेही - म्हणजे पुण्यवर्मन याचेही मांडलिक असणार. हा पुण्यवर्मन म्हणजेच प्रत्यक्षातील हरीसेन असावा. या मांडलिकांपैकी कोण होते व प्रत्यक्षात ते कोण असावेत, याचा अंदाज खालीलप्रमाणे -
१. अश्मकांचा राजा वसंतभानू : अश्मकांचे राज्य हे सातमाळ व गोदावरी नदीच्या मध्ये पसरले होते. पांडारंगपल्ली येथे सापडलेल्या ताम्रपटावर यांचा व राष्ट्रकूट मानांक यांचा उल्लेख आढळतो. अजिंठा येथील २५ क्रमांकाच्या लेण्यामध्ये एका शिलालेखात अश्मकांच्या दोन मंत्र्यांचा उल्लेख सापडतो.
२. कुंतलदेशाचा राजा अवंतिदेव : श्री. मिराशींनी अन्यत्र म्हटले आहे की हे राजे वाकाटकांच्या समकालीन होते व यांचे राज्य कृष्णा खोर्याच्या वरच्या बाजूला होते. श्री. मिराशींच्या मते सातारा जिल्ह्यातील माणगंगेच्या किनारी मानपूर येथे त्यांची राजधानी होती. विदर्भ व कुंतल यांच्या सीमा एकमेकांस भिडलेल्या असल्यामुळे वाकाटकांच्या वास्तुगुल्म शाखेच्या राजांशी कायम चकमकी उडत. अजिंठामधील लेणी क्र. १६मध्ये एका शिलालेखात वाकाटकांनी कुंतलावर मिळवलेल्या दोन विजयांचा उल्लेख आहे. कुंतलाचे राजे वाकाटकांचे मांडलिकत्व झुगारून देण्याची संधी शोधत असणार, जी त्यांना हरीसेनानंतर मिळाली.
३. ऋशिकाचा राजा एकविरा : हे खानदेशाचे प्राचीन नाव आहे. श्री. मिराशींनी इतरत्र असे म्हटले आहे की खानदेशात सापडलेल्या काही ताम्रपटांवरून त्या काळी तेथे मनसबदार राज्य करीत होते. सध्याच्या चाळीसगावच्या आसपास त्यांची राजधानी होती असे मानण्यास जागा आहे. अजिंठामधील लेणे क्रमांक १७मध्ये, अत्यंत खराब झालेल्या एका शिलालेखात राजांची लांबलचक वंशावळ दिली आहे, ती बहुधा या वंशाची असावी. या लेखात हरीसेनाचा उल्लेख 'राजपुत्रांमधील चंद्र' असा करण्यात आला आहे, त्यावरून हे वाकाटकांचेच एक प्रबळ सरदार असावेत असे वाटते.
४. नाशिक्यचा नागपाल : त्या काळात सध्याच्या नाशिकच्या प्रदेशात राज्य करीत असलेल्या त्रैकुटकांच्या घराण्यातील हा राजा असावा. यांच्या राज्याची उत्तर सीमा दक्षिण गुजरातच्या सीमेला भिडली होती. सुरुवातीला हे अभिरांचे मांडलिक होते, पण नंतर स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यापैकी एका राजाने अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आढळतो. व्याघ्रसेन नावाच्या यांच्या एका राजाचा हरीसेनाने पराभव केला असावा. ज्या पर्वतावरून या राजघराण्याने आपले नाव घेतले होते, तो पर्वत नाशिकच्या पश्चिमेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. काही काळापूर्वी सापडलेल्या अंजनेरी ताम्रपटात पूर्व-त्रिकूट विषय असा उल्लेख आढळतो; म्हणजे त्या काळी तेथे त्रिकूट नावाचा प्रदेश असावा, हे स्पष्ट होते व त्या पर्वताने या त्रिकूटाचे दोन भाग केले आहेत.
५. कोकणचा राजा कुमारगुप्त : कोकणचा प्राचीन इतिहास आपल्याला जरासा अनभिज्ञ आहे, कारण कोणत्याच शिलालेखात त्याचा व त्यावर राज्य करणार्या राजांचा स्पष्ट उल्लेख नाही. कोकणावर शकांचे व सातवाहनांचे राज्य होते. पण त्यांच्या र्हासानंतर त्या प्रदेशावर कोण राज्य करीत होते, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण कान्हेरीच्या स्तुपात सापडलेल्या एका ताम्रपटात ४९४ साली तेथे त्रैकूटकांचे राज्य होते असा उल्लेख आढळतो. कदाचित असे झाले असेल की कोकणाचे राज्यकर्ते आधी त्रैकूटकांचे मांडलिक असावेत आणि वाकाटकांनी त्रैकूटकांचा पराभव केल्यावर ते त्यांचे मांडलिक झाले. ही एक शक्यता आहे.
६. मुरलाचा राजा वीरसेन : हा देश कुठे असावा याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. पण तो गोदावरीच्या किनारी कोठेतरी असावा असे मानण्यास जागा आहे.
वाकाटकांचे हे सर्व मांडलिक विदर्भाच्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे राज्य करीत होते. हरीसेनाने पूर्वेचे कलिंग, कोसला व आंध्र हे देश जिंकले होते. पण दशकुमारचरितममध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. या राजांनी वसंतभानूच्या कारस्थानात भाग घेतला नाही, हे यामागचे कारण असावे. यातील दोन तर वाकाटकांचे नातेवाईक होते. दशकुमारचरितममध्ये असा उल्लेख आला आहे की अनंतवर्मनची माता कोसलाची राजकन्या होती. कोसला म्हणजे दक्षिण कोसला किंवा छत्तीसगड. पृथ्वीसेनाच्या बालाघाट ताम्रपटात कोसलांनी वाकाटकांचे मांडलिकत्व स्वीकारले होते असा उल्लेख आहे. त्या वेळी बहुधा कोसलावर शरभपूर घराण्याचा राजा राज्य करत असावा. आंध्रावर त्या वेळी विष्णुकुंडीन घराण्याचे राज्य होते आणि तेही वाकाटकांशी एका विवाहाने जोडले गेले होते. वाकाटकांच्या एका राजकन्येशी या राज्याचा संस्थापकाचा विवाह झाला होता व ती हरीसेनाचीच वंशज होती.
या मांडलिक सरदारांच्या राज्याशिवाय दशकुमारचरितममध्ये आणखी तीन राज्यांचा उल्लेख आढळतो. उत्तरेकडे महिस्मती आणि माळवा, तर दक्षिणेकडे वनवासी. महिस्मतीबद्दलही कमी माहिती उपलब्ध आहे, पण बरवानी आणि ग्वाल्हेर येथे सापडलेल्या ताम्रपटांत 'येथे पाचव्या शतकात सुबंधू नावाचा राजा राज्य करीत होता' हे कळते. त्याच्या एका दानपत्रात कलचुरीच्या कालगणनेतील वर्ष १६७ असे दिले आहे, म्हणजे ४१६-१७ साल. हा काही वाकाटकांच्या कुळातील नव्हता. कदाचित वाकाटकांनी नंतरच्या काळात हे राज्य त्यांच्या राज्यास जोडले असावे.
माळव्याचा चंडवर्मन : माळव्यावर त्या काळी एक अत्यंत शक्तिमान राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते मंदसोरचा यशोधर्मन. यानेच हूण राजा किहिरकुलाचा पराभव केला होता. मंदसोरच्या विजयस्तंभावरील लेखात याचे राज्य हिमालयापासून दक्षिणेकडे महेंद्र पर्वतापर्यंत पसरले होते असा उल्लेख आहे.
वनवासीचा भानुवर्मन : वनवासी म्हणजे आत्ताचे कर्नाटकातील बनवासी. याचे पूर्वीचे नाव वैजयंतीही होते. ही कदंबांची राजधानी होती. कदंबांची खातरीशीर वंशावळ अजूनही उपलब्ध नाही, पण पाचव्या व सहाव्या शतकात कदंबांचे एक शक्तिमान राज्य तेथे होते हे निश्चित. या घराण्याचा शेवटचा राजा हरीवर्मन याच्या सांगोली येथे सापडलेल्या ताम्रपटाच्या आधारे याचा काळ ५२६ किंवा ५४५ असावा असे वाटते. याच्या वडिलांचे नाव होते रविवर्मन, जो दशकुमारचरितममधील भानुवर्मन असावा.
दशकुमारचरितममध्ये दख्खनमध्ये वाकाटकांच्या काळात जी परिस्थिती होती, याचे सविस्तर वर्णन आले आहे. तसेच हरीसेनानंतर कमकुवत, दुर्व्यसनी वारसाच्या काळात वाकाटकांच्या र्हासास सुरुवात झाली व मांडलिकांनी बंडखोरीस सुरुवात केली, याचेही वर्णन आले आहे. वाकाटकांच्या राज्यात अनागोंदी माजल्यावर अश्मकांनी भरीस घातल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी वाकाटकांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली व काही मांडलिकांनी विश्वासघाताने शत्रूशी कशी हातमिळवणी केली व वाकाटकांच्या राजास ठार मारले, हा पुढील इतिहास आहे.
वरील चर्चेत आचार्य दंडी यांनी सहाव्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थितीचे वर्णन केले आहे, हे स्पष्ट होते किंवा आचार्य दंडी त्याच काळात होऊन गेले असे म्हणता येते.
रचनाकाराला हिमालय माहीत असावा, कारण चारित्र्याला 'हिमाइतके स्वच्छ' अशी उपमा दिली आहे. विंध्य पर्वतातील जंगलात राजाने आश्रय घेतला, असा उल्लेख आहे; किंबहुना बरीचशी कहाणी विंध्य पर्वताच्या प्रदेशात घडली आहे. हा सध्याचा सातपुडा असावा. मलय पर्वताचा उल्लेख त्यात असलेल्या चंदनाच्या झाडांसहित आला आहे. या पर्वतावरून उत्तरेकडे वाहणारे सुगंधित थंडगार वारे प्रेमिकांना उत्तेजित करतात असा उल्लेख अनेकदा आला आहे. हा पर्वत मलबारमधील सह्यादी असावा. कैलास पर्वताचाही तपश्चर्येच्या बाबतीत उल्लेख आला आहे.
दशकुमारचरितमच्या लेखकाने प्रत्येक शहराबाहेर किंवा गावाबाहेर असलेल्या बागेचे वर्णन केले आहे. या बागेत एखादे देऊळ असायचे आणि ते बहुतेक शंकराचे असायचे. कोठेही बौद्ध किंवा जैन या धर्मांच्या देवळांविषयी किंवा मठांविषयी उल्लेख नाहीत. श्री. मिराशी म्हणतात त्याप्रमाणे ही कहाणी वाकाटकांचीच आहे हे जर खरे मानले, तर ज्यांनी अजिंठा बांधले किंवा खोदले, त्या बौद्ध धर्माच्या एकही स्थानाचा यात उल्लेख नाही, हे जरा विचित्र वाटते. प्रत्येकी एकच उल्लेख आहे, पण तो चांगला नाही.
सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक फुलांचाही उल्लेख आढळतो उदा. कण्हेर, जाई, जुई, कमळ, चंपक, जस्मिन, माधवी इ. इ. तुळशीच्या समिधा यज्ञात अर्पण करीत.
जायफळाची व अंजिराची झाडे बागेत लावलेली दिसतात. आंबा, तिलक व सिंदुवरा या झाडांचा उल्लेख आहे. तिलकाचा वृक्ष म्हणजे कुठला हे लक्षात येत नाही, पण या वृक्षाखाली सतराव्या तीर्थंकरांना साक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यांचे नाव होते कुंथुनाथजी. हा वृक्ष हस्तिनापूरच्या आसपास असलेल्या सहस्रमार जंगलात आढळतो, असा उल्लेख जैन पुराणात आढळतो. फाल्गुन महिन्यात अनंत व्रतात पुराणात सांगितल्याप्रमाणे ही फुले वाहून देवीची पूजा करतात. याचे सध्याचे प्रचलित नाव मालती असावे.
अशोकाच्या झाडाला संस्कृत साहित्यात शृंगाराच्या व प्रणयाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. हा अशोक म्हणजे सध्या दिसतो, सरळसोट वाढतो तो नसून इतर वृक्षांप्रमाणे वाढणारा व पसरणारा आहे. हा उन्हाळ्यात दाट सावली देतो व लाल नारंगी रंगाच्या फुलांनी बहरतो. हा बहरल्यावर जंगलाला आग लागली आहे असा भास लेखकाला होत आहे. आणखी एक समजूत आहे ती म्हणजे याला सुंदर स्त्रीचे पाय लागल्याशिवाय हा फुलत नाही. म्हणून वसंतोत्सवात समारंभपूर्वक हा कार्यक्रम केला जातो, त्याला अशोक-दोहद असे नाव आहे. दुर्दैवाने हा वृक्ष आता नामशेष झाला आहे.
बकुळीच्या झाडाचाही उल्लेख दशकुमारमध्ये झाला आहे. बकुळीचा वृक्ष विशाल, फुले लहान व नाजूक असतात. इतकी नाजूक की श्री. दंडी म्हणतात - ती मधमाशांच्या हालचालींनीही विसकटतात. याच्या फुलांच्या सुवासाचा घमघमाट सुटतो व वाळल्यावरही अनेक दिवस या फुलांचा वास येतो. कापूराचाही बर्याच वेळा उल्लेख येतो. काही वेळा तो औषध म्हणूनही आला आहे. वडांची झाडे त्यांच्या दाट सावलीसाठी मुद्दाम लावली जात असावीत, कारण ती बागेसमोर आढळतात.
चंदनाच्या झाडांचाही/जंगलांचाही उल्लेख बर्याच वेळा आहे. आपण समजतो की चंदनाच्या वाळलेल्या खोडालाच तो खास चंदनाचा सुवास येतो. पण ज्या ठिकाणी चंदनाची हजारो वृक्ष आहेत अशी जंगले आपण अनुभवलीच नाहीत. मला वाटते अशा चंदनाच्या जंगलात हिरव्या फांद्यांनाही हा सुवास येत असावा व वार्यामुळे तो घमघमाट सगळीकडे पसरत असावा.
जंगलात शबर व किराट जमातींचा उल्लेख आला आहे. ऐत्तरीय ब्राह्मणात म्हटले आहे की शबर किंवा सबर जमात ही विश्वामित्रांच्या थोरल्या पुत्राचे वंशज आहेत आणि त्यांना वाईट वागणुकीसाठी त्यांनी शाप दिला होता. अर्थात ही एक आख्यायिकाच आहे.
कडूलिंबाचा उल्लेख आहे, पण तो सांकेतिक. विड्याच्या पानांच्या/नागवेलीच्या व द्राक्षाच्या बागाही बर्याच असाव्यात.
वाकाटकांच्या काळात जमिनीवरून, तसेच समुद्रातूनही व्यापार होत असे. त्याच काळात रेशीममार्गावरील व्यापार जोरात होता व चीनवरून ग्रीसला निघालेले रेशीम मध्ये भारतातही उतरत असे. दशकुमारचरितममध्ये चिनी रेशमी वस्त्रे असा स्पष्ट उल्लेख दोनदा आला आहे व त्याच्या तलमपणाचेही वर्णन करण्यात आले आहे.
कमळाच्या देठांच्या तंतूपासूनही बहुधा तलम वस्त्रे विणायची पद्धत होती. सध्या केळीच्या बुंध्याच्या तंतूंपासून व आफ्रिकेत एक झाडाच्या तंतूंपासून धागा तयार करतात, ते पाहिल्यास हेही शक्य आहे असे वाटते. स्त्रिया कमरेवर कुठलेही वस्त्रे घालत नव्हत्या, कारण एका ठिकाणी स्त्रीच्या उरोजावर चमकणार्या अश्रूंचा उल्लेख आला आहे. स्त्रिया केसात फुले व वेण्या माळत. अजिंठाच्या चित्रातही स्त्रियांच्या केसात आपल्याला फुले (कमळाची) व वेण्या, गजरे माळलेले दिसतात. स्त्रिया सौंदर्यलेप लावीत असाही उल्लेख आहे.
बागेत तलाव असत व त्यात राजहंस, करकोचे व बदके विहार करीत असत. हत्ती विपुल असावेत, कारण जंगलात ते बर्याच ठिकाणी भेटत. माकडांचा व वाघांचाही उल्लेख आहेच. पोपट, कोकिळा, मोर यांचाही उल्लेख आहे. कुठल्याही कवीला चक्रवाक पक्षांचे फार अप्रूप. दशकुमारचरितममध्येही चक्रवाक पक्ष्याचा उपमांसाठी बर्याच वेळा उपयोग केलेला दिसतो. दोन प्रकारच्या कोंबड्यांच्या झुंजीचे वर्णन दशकुमारचरितममध्ये आले आहे. एक बलाका आणि दुसरा नारिकेल. हरणे, डुक्कर व गवे यांची शिकार करण्यात येई.
दशकुमारचरितम ज्या काळात लिहिले गेले, तेव्हा चतुर्वणाची व्यवस्था स्थिरावली होती. या व्यवस्थेबाहेरच्या जमाती जंगलात राहत. सनातन धर्माचे प्राबल्य वाढत होते व जैन आणि बौद्ध धर्मांचा बहुधा र्हास सुरू झाला होता. या दोन धर्मांना माझ्या मते राजांच्या राण्यांनी आश्रय दिला असल्यामुळे ते तगले. या धर्मांमध्ये संघर्ष होत असे, पण तो वैचारिक. धार्मिक यात्रांना जायची पद्धत असावे असे दिसते.
हळदकुंकू वाहून पूजा केली जाई व पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास होता असे दिसते. शंकराच्या पूजेचे वर्चस्व होते. सतीची प्रथा प्रचलित होती, पण बळजबरी नव्हती, हेही लक्षात येते. ज्योतिष, मुहूर्त यावर विश्वास होता व ज्योतिषींना मानही होता, असे दिसते. सीमान्तपूजनाचा उल्लेख दोन वेळा आला आहे, पण ते वेगवेगळ्या कारणांसाठी केलेले दिसते. देवीसमोर बळी देण्याची जंगली टोळ्यांमध्ये पद्धत होती असे दिसते. राजकुमारांच्या अभ्यासात कौटिल्याचे अर्थशास्त्र व कामांडकीचे नीतिशास्त्र यांचा अंतर्भाव होता. अंगणात पूजेच्या वेळी केळीचे खुंट बांधण्याची पद्धत त्या काळीही होती. तसेच विड्याची पाने आलेल्याला व निरोपाबरोबर देण्याची पद्धत होती. भारतीय मूर्तिशास्त्रात अवकाशात उडणार्या विद्याधरांच्या ज्या मूर्ती आढळतात, त्याचा प्रत्यक्ष वापर दशकुमारचरितममध्ये आचार्य दंडी यांनी केलेला दिसतो. खाली एका विद्याधराच्या मूर्तीचे चित्र दिले आहे. तसेच सुरसुंदरीचाही उल्लेख केला आहे. गणपतीची पूजा कुठल्याही कार्याच्या अगोदर करण्याची हल्लीसारखीच पद्धत होती.
विद्याधर व सुरसुंदरी : छायाचित्र (वेरूळ व कोपेश्वर मंदिर)
शहरात मदनोत्सव, वसंतोत्सव असे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येत.
जैन व बौद्ध धर्मांचा उल्लेख प्रत्येकी एकदाच आला आहे.
वाराणसीचे दुसरे नाव काशी होते व मनकर्णिका घाटावर गंगेचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ होते असा उल्लेख आहे. जरी चातुर्वण्य पद्धत असली, तरीही तिने विकृत स्वरूप धारण केलेले नव्हते. कारण ब्राह्मण कनिष्ठ जातीच्या घरांमध्ये जेवण्यास गेलेले दिसतात.
राजे-महाराजांच्या पदरी खुशमस्करे असत व आठव्या भागात अशाच एका खुशमस्कर्यामुळे झालेल्या गोंधळाचे वर्णन आहे. राजे अतिप्राचिन बृहद इंद्रजालाचाही करमणुकीसाठी वापर करीत व इंद्रजाल फेकणार्यांना दरबारात आमंत्रित करत. इंद्रजाल व मायाजाल हे साधारणत: एकाच माळेचे मणी आहेत. वशीकरणासाठी व काळ्या जादूसाठी यांचा उपयोग सुरू झाल्यामुळे ही विद्या बरीच बदनाम झाली. पण सहाशे साली ती बदनाम होती असे म्हणता येत नाही. सध्या मेस्मेरिझममध्ये किंवा भ्रम उत्पन्न करून आगगाडी गायब करणे, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा गायब करणे असे मायाजालाचे प्रयोग होतात, त्याचे मूळ येथे असावे. अर्थात हे सगळे हातचलाखीचेच प्रयोग असत व असतात हे सांगायला नकोच. जादूच्या प्रयोगाच्या वेळी डोळ्यात अंजन घालण्याचा उल्लेखही आहे.
कथाकथन हाही एक करमणुकीचा मार्ग होता असे मानण्यास जागा आहे. विशेषत: प्रवासाच्या कथा जास्त लोकप्रिय होत्या असे दिसते. माणसांना नवनवीन प्रदेशाच्या माहितीचे आकर्षण असते हेच खरे.
शहरातील गणिकांना बराच मान होता व त्या आपल्या नृत्यकलेने महाजनांची करमणूक करीत. त्यांच्या नृत्यांचा कार्यक्रम राजा आयोजित करीत. गणिकेच्या व्यवसाय बराच क्लिष्ट असावा. कारण त्या कशा तयार होत याचे सविस्तर वर्णन दशकुमारमध्ये आले आहे. एका राजकुमारीने केलेल्या कंदुकनृत्याचे सविस्तर वर्णन दशकुमारचरितममध्ये आलेले आहे, ते मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यात दोन-तीन प्रकारच्या पदन्यासाचेही ते वर्णन करतात.
वाकाटकांच्या त्या काळात व्यापार-उदीम फार महत्त्वाचा मानला जाई. दशकुमारांपैकी एका नायकाचा व्यवसाय व्यापाराचा दाखविला आहे. व्यापार्यांची संघटना असे व व्यापार्यांचे तंटे त्यांच्यासमोरच सोडविले जात. एका व्यापाराचे घर सात मजली आहे असाही उल्लेख आहे. हे व्यापारी फार श्रीमंत असत. व्यापारांना मृत्युदंडापासून मुक्तता असे व हा नियम चाणक्याने केला आहे असाही दाखला आहे. व्यापारी समुद्र ओलांडूनही व्यापार करीत. कालयवनांच्या बेटावर ते जात. ते दामलिप्त नावाच्या बंगालच्या उपसागरावर असलेल्या एका बंदरात बोटीवर चढत. दशकुमारचरितममध्ये एका यवनी दर्यासारंगाचे नाव रामेषू असे दिले आहे. याचा अर्थ व उगम श्री. मोतीचंद्र यांच्या मते सीरियात आढळतो. राम = सुंदर व इशू = येशू. दशकुमारचरितममध्ये एका यवनी व्यापार्याचे नाव खनाति असे म्हटले आहे. हे नावही सीरियामध्ये प्रसिद्ध आहे. या व्यापारादरम्यान भेटणार्या सर्व परदेशी माणसांना ते यवन याच नावाने ते ओळखत - मग ते अरबी असोत किंवा चिनी किंवा ग्रीक.
प्रत्येक मोठ्या शहरात स्थानिक व्यापार्यांबरोबर आणखी एका जमातीचा उल्लेख आहे आणि तो म्हणजे सार्थवाह. अमरकोशामध्ये याचा अर्थ ‘व्यापारांच्या तांड्याचा पुढारी किंवा मार्गदर्शक’ असा दिला आहे. पुढे अशीही माहिती दिली आहे की हे व्यापारी स्वत: त्यात गुंतवणूक करीत. हा माणूस मोठा हिकमती, हल्लीच्या भाषेत मॅनेजमेंट गुरू, अत्यंत प्रामाणिक, धीरोदत्त, न डगमगणारा, नित्यनेमाने येणार्या कटकटींना न कंटाळता सामोरे जाणारा, उदार, सर्व धर्मांची माहिती असणणारा असा असे. त्याला सर्व संस्कृतींची ओळख असे. त्याला स्वत:च्या भूमीची व त्यातील अनेक जातीजमातींची माहिती असे, एवढेच नव्हे, तर परदेशी संस्कृतींचीही ओळख असे. कारण त्यांना या प्रवासादरम्यान यवन, शक, पहल्लव, यिर्ची इ. इ. असे अनेक प्रकारचे लोक भेटत. बंगाल उपसागरातील ताम्रलिप्ती (हल्लीचे मदिनापूर जिल्ह्यातील तमलुक. हे रूपनारायण नदीवर आहे, जी बंगालच्या उपसागराला मिळते.) ते सीरियामधील अँटिऑक, जावा बेटे ते कद्दा (मलेशिया), चोलामंडल ते अलेक्झांड्रिया व आफ्रिकेतील काही बंदरे एवढ्या प्रदेशात यांचा व्यापार चाले. सार्थवाह फक्त समुद्रातूनच व्यापार्यांचे तांडे घेऊन जात असे नाही, तर जमिनीवरूनही ते बर्याच प्रदेशात व्यापारी व त्यांचा माल घेऊन जात. अफगाणिस्थानपासून विदर्भ, दक्षिण कोसला असे व्यापारी मार्ग उपलब्ध होते. या तांड्यात व्यापार्यांशिवाय संतमहंत, राजनैतिक प्रतिनिधी, साधू, संन्यासी, भिख्कू, करमणूक करणारे विदूषक, कसरती करणारे, विद्यार्थी व इतर प्रवासी त्यांच्या कुटुंबकबिल्यासह असत. या सर्वांची जबाबदारी ही सार्थवाहाची असे.
पुरोहितांचे काम अर्थातच ब्राह्मण करीत. ब्राह्मणांना मानाचे स्थान असे व त्यांच्यासाठी वेगळे नियम असत. ब्राह्मणांमध्येही काही दुर्जन जन्म घेत, पण शेवटी त्यांना पश्चात्ताप होई. जुगाराचे अड्डे - ज्याला द्यूतगृहे म्हणत असत, त्यात बहुधा स्त्रियाही जुगार खेळायला जात असत. प्राण्यांच्या शर्यती व झुंजी यांचाही उल्लेख आहे. नृत्याच्या स्पर्धाही होत असत.
दशकुमारचरितममध्ये आणखी एका महत्त्वाच्या व्यवसयाचा उल्लेख झाला आहे, तो म्हणजे गुन्हेगारीचा. हिंदू कथांमध्ये, पुराणांमध्ये आपण पाहिले आहे - बर्याच वेळा एक राजकुमार असतो व तो पराक्रम गाजविण्यासाठी घराबाहेर पडतो, मग त्याला एक नायिका भेटते. हा राजकुमार शूर, देखणा, सद्गुणांचा पुतळा असतो व शेवटी शत्रूंचा परभव करून नायिकेला जिंकतो, अशी कहाणी असते. पण दुसर्या बाजूल नीच लोक असतात. खलनायक, चोर-दरोडेखोर असतात. संतांचा बुरखा पांघरून लोकांना फसविणे, त्यांची संपत्ती लुटून त्यांना देशोधडीस लावणे हा यांचा व्यवसाय असतो. शेवटी यांचा अंत दुर्दैवी असतो. अशा करामती करणारा एक नायक/खलनायक बर्याच कथांमध्ये वर्णन केला गेला आहे. त्याचे नाव मूलदेव. याच्या स्वभावाचे वर्णन करणे तसे अवघड आहे, कारण जरी याने चौर्यकर्माबद्दल आद्य ग्रंथ लिहिला असला, तरीही हा मूलत: अत्यंत चांगल्या स्वभावाचा आहे. कदाचित हल्लीच्या काळातील रॉबीनहूडवरून याच्या स्वभावाची थोडीफार कल्पना येऊ शकेल. थोडक्यात, गुन्हेगारांमध्ये किंवा चोरांमध्ये याला आदराचे स्थान आहे. हा आणखी दोन नावांनी पुराणात ओळखला जातो -‘मूलभद्र‘ आणि ‘कलांकुर’. याला चौसष्ट कला प्राप्त असतात, कारण त्याला त्याच्या व्यवसायात या सर्व कलांचा उपयोग करणे भाग असते. हा स्वत: गणिकेचा पुत्र असल्यामुळे याला गणिकांच्या विश्वाचा चांगलाच परिचय असावा. अट्टल जुगारी, प्रसंगावधानी व जुगाराची आव्हाने पेलणार्या अशा या मूलदेवाचा दशकुमारचरितममध्ये कौतुक करण्यासाठी उल्लेख आला आहे.
स्त्री-पुरुषातील संबंध मोकळे असावेत. मुलींची लग्ने लहान वयात होत होती. एका मुलीचे लग्न तेराव्या वर्षी झाल्याचा उल्लेख आहे व त्यामुळे तिच्या नवर्याला तिच्यात रस उरला नाही असाही उल्लेख आहे. संस्कृती पुरुषप्रधान होती. पुरुष गणिकांकडे सररास जात असत. गणिकांना समाजात मानाचे स्थान असावे. चमत्कारांवर सर्वसामान्यांचा विश्वास सहज बसत असे. कारण अनेक जणांनी याचा फायदा घेतल्याचा संदर्भ आहे.
राज्यकारभाराची पद्धत सरंजामी असे व भ्रष्टाचारास भरपूर वाव असावा असे दिसते. कारण एखादे काम होण्यासाठी सररास लाच देण्याची पद्धतच होती. ध्येय गाठण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब क्षम्य होता. पण राजाला मात्र याबाबतीत ताकीद दिलेली आढळते. मद्यपान हे सर्वसंमत असावे. पुरुष घरातही स्त्रीसमवेत मद्याची मजा लुटत. पिणार्याला मद्याचे दुष्परिणाम माहीत असत, पण आजच्यासारखेच तरीही मद्यपान चालत असे.
आचार्य दंडी यांनी कथानक आणि त्याची उपकथानके यांचा सुंदर मेळ घालून जो परिणाम साधला आहे, तो आपल्याला खालील गद्य काव्य वाचूनच अनुभवता येईल. आचार्य दंडींची भाषा सरळ सुंदर व जेथे पाहिजे तेथे अलंकारिक रूप घेते. यातही निसर्गात आढळणार्या पानाफुलांचा, पर्वतांचा, सुवासांचा व इतर वस्तूंचा ते आधार घेतात, ज्यामुळे ते काव्य आपल्याला अधिकच जवळचे वाटते. काही प्रसंगाचे वर्णन करतान ते बाण व कालिदास यांच्यासारखे अलंकार वापरतात व दुसर्याच क्षणी रोखठोक भाषेचा वापर करून आपल्याला जमिनीवर आणतात. हे धक्कातंत्रच म्हणायला हवे. एका झोपलेल्या राजकन्येचे वर्णन वाचण्यासारखे आहे. हे वाचल्यावर हे काव्य आहे की गद्य असा प्रश्न कोणालाही सहज पडावा. दशकुमारचरितम लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण आहे त्यातील गोष्टी. या कहाण्या सर्वसामान्य माणसांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या असतात. उदा. जुगार, प्रेम, विवाहबाह्य संबंध, युद्धे, कपट, कारस्थाने, बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, कुरूप माणसे, सुंदर माणसे, सुंदर तरुणी, सामान्य रूपाच्या तरुणी, साधी सरळ माणसे, चोर बदमाष माणसे, देव, दानव, जन्म-पुनर्जन्म, इ.इ.
आचार्य दंडीन यांची लिहिण्याची पद्धत वेगळीच आहे. ते स्वत: एक कथा सांगतात, मग त्यातील पात्रे आत्मवृत्त कथन करतात व त्या दोन्हींचे वर्णन करताना आचार्य इतर माहिती सादर करतात. हे सर्व कथन करतान ते कोठेही रहस्य व रहस्यभेद या गोष्टींचा फायदा घेत नाहीत.
या भाषांतरात जी काही उणीव भासेल, ती माझ्या लिखाणातीलच आहे असे कबूल करून मी ही प्रस्तावना संपवितो.
वाकाटक घराणे
महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.
प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.
पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.
दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.
नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.
विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.
द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.
नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.
वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.
सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.
प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.
वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.
अजिंठा : वाकाटककालीन शिलालेख
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते. येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
- Burgess, James & Bhagwanlal, Indraji, Inscritions From The Cave -Temples Of Western India, Archaeological Survey of Western India, Bombay, 1881.
- Fergussion, James & Burgess, James, The Cave Temples Of India, London,1880.
- Lad, Bhau Daji, ‘Ajunta Inscriptionsʼ, Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society, Vol. 7, pp. 53-74, 1863.
- मिराशी, वासुदेव विष्णु, वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
पवनार (Pawnar)
राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी पवनार ही वाकाटक या राजघराण्याच्या मुख्य शाखेची राजधानी प्रवरपूर असावी, असे मत सर्वप्रथम व्यक्त केले. त्यानंतर प्राच्यविद्या संशोधक ⇨ वासुदेव विष्णु मिराशी व रावबहादूर हिरालाल यांनीही या मतास दुजोरा दिला व वाकाटकनृपती प्रवरसेन-दुसरा याची दुसरी राजधानी प्रवरपूर म्हणजेच सध्याचे पवनार असल्याचे प्रतिपादले. मात्र हरिहर ठोसर यांच्या मते, पवनार हे स्थलनाम पद्मनगरपासून उद्भवते; आणि म्हणून पवनारचे प्रवरपूर या प्राचीन नगरनामाशी साधर्म्य दर्शविता येत नाही. असे असले, तरी ठोसर यांनी राष्ट्रकूटनृपती नन्नराज युद्धासुर याच्या संगलूद दानपत्रात आढळणारे पद्मपूर सध्याचे पवनार असावे, असे अनुमान केले आहे.
१९३८ साली येथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम या आश्रमासाठीचे खोदकाम करीत असताना बरेच पूर्णाकृती शिल्पपट सापडले. यांत रामायण-कथानक कोरलेले शिल्पपट तसेच गंगाभगवती आदी शिल्पांचा समावेश आहे. ही सर्व शिल्पसंपदा आश्रमात प्रदर्शित केली आहे. या शिल्पांची शैली तसेच इतर अवशेषांवरून येथे वाकाटककाळातील ‘राम संप्रदाय’ तसेच कमीतकमी एक मोठे विष्णूचे देऊळ असावे असे एक मत आहे, तर काही विद्वानांच्या मते, ही शिल्पसंपदा विष्णुकुंडीन काळातील अथवा राष्ट्रकूटकाळातील शिल्पांचा प्रभाव असलेली आहे.

वरील पार्श्वभूमीवर १९६७ साली धाम नदीच्या उजव्या तीरावरील पांढरीच्या टेकाडावर नागपूर विद्यापीठाने पुरातत्त्वज्ञ शांताराम भालचंद्र देव आणि मधुकर केशव ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. येथे एकूण चार कालखंडांचे सांस्कृतिक अवशेष उजेडात आले. पहिल्या कालखंडातील वस्ती इ.स.पू. पहिल्या सहस्रकाइतकी प्राचीन असून ही वस्ती कुडाच्या घरांच्या स्वरूपांत उपलब्ध झाली. काळी-आणि-तांबडी या वर्गातील मृद्भांडी ही या वस्तीची वैशिष्ट्ये. हे लोक लोखंडाची उत्कृष्ट शस्त्रे बनवीत. त्यांची कलात्मकता ते वापरीत असलेल्या रंगीत मृद्भांड्यांत दिसून येते. मासेमारी, शेती व शिकार यांवर ते गुजराण करीत. विदर्भातील हे पहिले लोहयुगीन रहिवासी होते.
दुसरी वस्ती इ.स.पू. दुसऱ्या/तिसऱ्या शतकांत झाली. पहिल्या कालखंडातील काळी-आणि-तांबडी या वर्गातील मडक्यांपेक्षा या कालखंडातील मडकी जाड असून प्रामुख्याने थाळ्या व वाडग्यांच्या स्वरूपात वापरात कायम राहिली; मात्र रंगविलेली मडकी वापरात आढळत नाहीत. घरांच्या बांधणीत आमूलाग्र सुधारणा होऊन पवनारवासी पक्क्या घरांत राहू लागले. आर्थिक व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू झाला. सातवाहन राजांची नाणी प्रचारात आली आणि पवनारला काहीसे नागरी स्वरूप आले. सांडपाण्याची शोषणकुंडे, अर्चनाकुंडे आदी अवशेष त्याची साक्ष आहेत. सातवाहनांच्या उत्तर काळात, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, येथे व्यापारी भरभराट झाली. याची परिणती उत्कृष्ट बनावटीची तांबडी चकचकीत मृद्भांडी, रोमन काचेच्या वस्तू, रोमन मद्य व मद्यकुंभ पवनार येथे आयात करण्यामध्ये झालेली दिसून येते.
तिसरी वसाहत गुप्त-वाकाटक काळातील (इ.स. तिसरे ते पाचवे शतक). पवनार येथील सातवाहन काळातील आर्थिक सुबत्ता इसवी सनाच्या पाचव्या/सहाव्या शतकापर्यंत टिकली. दानधर्म वाढला आणि तत्कालीन प्रवरसेन-दुसरा यांसारख्या राजांनी अनेक ताम्रपटांद्वारे ब्राह्मणांना देणग्या दिल्या.
चौथा कालखंड मध्ययुगीन. वाकाटक कालखंडानंतर पवनारचे वैभव लुप्त झाले, अवनती सुरू झाली. मध्ययुगात काचेच्या बांगड्यांसारखे लघुउद्योग सुरू झाले.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconography, Groningen, 1997.
- Deo, S. B. & Dhavalikar, M. K. Paunar Excavation, Nagpur, 1968.
- Spink, Walter, Ed., Williams, J.W. Ajanta’s Chronology: Politics and Patronage, in Kaladarshan , Leiden, 1981.
- जामखेडकर, अरविंद, पुरासंचय- भाग १, पुणे, २०१६.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘गंगा भगवतीचे पवनार’, दै. केसरी, १९८४.
मांढळ (Mandhal)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन वस्तू सापडल्या. या कारणास्तव नागपूर विद्यापीठाच्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) पुरातत्त्व विभागाने शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी, राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१), चाचणी खड्ड्याद्वारे येथील सांस्कृतिक क्रम शोधण्याचा प्रयत्न केला व त्यात सातवाहन काळातील अवशेष आढळले (१९७३). मात्र स्तरक्रमात हस्तक्षेप झालेला असल्याने या उत्खननाला मर्यादा होत्या. जुलै १९७४ मध्ये वनखात्यातर्फे येथे वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असताना वालुकाश्माच्या लकुलिश, सदाशिव व अष्टमुखशिव अशा तीन मूर्ती सापडल्याने हे स्थळ प्रकाशझोतात आले. पुढे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने अजय मित्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५-७६ व १९७६-७७ अशा दोन सत्रांमध्ये भोलाहुडकी (बीएचके-१), बोंगीहुडकी (बीएचके-२) व वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथे विस्तृत उत्खनन केले. त्यानंतर १९८५ व १९९२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे अरविंद जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मांढळ-२’ (वऱ्हाडी तलाव) या जागेत पुन्हा उत्खनन करण्यात आले.

राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१) झालेल्या उत्खननात सांस्कृतिक क्रम सातवाहन काळ व त्यानंतरचा आहे. सातवाहनकालीन अवशेषांमध्ये खापरी शोषणकुंड (ring-well), विविध नाणी व मणी, काळी-तांबडी खापरे, कवेलू (छपरावरील कौले) इत्यादींचा समावेश आहे.
भोलाहुडकी तसेच बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन (इ. स. २५०–५५०) मंदिराचे अवशेष आढळले. तसेच वऱ्हाडी तलाव येथे आढळलेल्या मंदिराचे अवशेष वाकाटक आणि यादवकालीन असल्याचे दिसून आले. भोलाहुडकी येथील मंदिराची उभारणी १.२० मी. उंच, १८ मी. पूर्व-पश्चिम व १०.६० मी. उत्तर-दक्षिण अशा आकाराच्या चौथऱ्यावर केली होती. चौथऱ्याच्या मध्यभागी विटांनी बांधलेल्या मंदिराचे अवशेष सापडले. मंदिराच्या इतर भागाची कल्पना करता आली नाही. या मंदिराला उत्तरेकडून सोपानमार्गाने प्रवेश होता. मंदिराच्या मुख्य वास्तूपासून काही अंतरावर प्रदक्षिणामार्ग होता. मंदिराच्या ईशान्येला विटांनी बांधलेले पाण्याचे कुंड होते. याव्यतिरिक्त पुजाऱ्यांना राहण्याकरिता मंदिराच्या वायव्येला दोन निवासस्थाने होती. याच मंदिराच्या अवशेषांमध्ये एका ठिकाणी दहा शैव-वैष्णव संप्रदायाशी निगडित शिल्पसंपदा भग्न अवस्थेत एकावर-एक पुरलेली आढळली, तर दुसऱ्या ठिकाणी पहिल्याच थरात नंदिवर्धन शाखेतील वाकाटक नृपतींचे ताम्रपटांचे तीन संच सापडले. यांतील एक प्रवरसेन दुसरा याचा सोळाव्या राज्यवर्षातील, तर इतर दोन प्रवरसेन दुसरा याचा नातू पृथ्वीषेण दुसरा याच्या दुसऱ्या व दहाव्या राज्यवर्षातील आहेत. या ताम्रपटांची लिपी पेटिकाशीर्ष पद्धतीची ब्राह्मी असून भाषा संस्कृत आहे. प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटांसोबत त्याची मोहर मांढळ येथे प्रथमच प्राप्त झाली.
बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या मंदिराच्या वाकाटककालीन अवशेषांत गर्भगृह आणि मुखमंडप असलेले मंदिर उजेडात आले. हे मंदिर १४.७० मी. लांब व ११.७० मी. रुंद आकाराच्या उंच चौथऱ्यावर कल्पिले होते. गर्भगृहाची लांबी ५.६० मी. व रुंदी ४.५० मी., तर मुखमंडपाची लांबी ४ मी. व रुंदी ३.३० मी. होती. या मंदिराची एकूणच रचना भारतातील मंदिरस्थापत्याच्या इतिहासात वेगळेपण दर्शविणारी आहे.
वऱ्हाडी तलावाच्या काठावरील जागेत (मांढळ-२) नागपूर विद्यापीठाने (१९७६-७७) तसेच महाराष्ट्र शासनाने उत्खनन केले (१९८५; १९९२). या उत्खननांत शैव-वैष्णव संपद्रायाच्या मंदिराचे अवशेष आढळले. या मंदिराचे वास्तुकाम दोन काळांमध्ये झाल्याचे दिसून आले. यात पहिला काळ वाकाटक, तर दुसरा काळ यादव असल्याचे अनुमान येथील अवशेषांवरून करता आले. मंदिराची संपूर्ण व्याप्ती पूर्व-पश्चिम ११.५ मी. लांब व उत्तर-दक्षिण १० मी. रुंद आढळली. वाकाटककालीन मंदिराच्या भिंती विटांच्या असून त्या खूप रुंद होत्या व विटांचा आकार सेंमी. मध्ये ४४ सेंमी. लांब, २३ सेंमी. रुंद व ८ सेंमी. जाड होता. यादवकालीन मंदिराच्या भिंती तासून घडविलेल्या पाषाणापासून केलेल्या होत्या. दुसऱ्या काळातील मंदिर हे पहिल्या काळातील मंदिराच्या अवशेषांवर उभारले गेले होते. पहिल्या उत्खननात रोमन बनावटीशी साम्य असलेली खापरे मिळाली. यात झारीचा (स्प्रिंकलरचा) विशेष उल्लेख करता येईल. त्यानंतर झालेल्या उत्खननात प्रामुख्याने प्रतिहार व सिंह यांच्या प्रतिमा आढळल्या. या शिल्पसंपदेव्यतिरिक्त काही स्त्री-प्रतिमांचे अवशेष निदर्शनास आले. या स्त्री-प्रतिमांची अजिंठा येथील गंगा-यमुना शिल्पांशी तुलना करता येऊ शकेल, अशा त्या आहेत. येथे सापडलेल्या शिल्पांच्या तसेच शिवलिंगाच्या आधारावर या मंदिराच्या उभारणीचा काळ चौथ्या शतकातील शेवटच्या चतुर्थकापासून ते पाचव्या शतकातील पहिल्या चतुर्थकापर्यंत असल्याचे अनुमान केले गेले.
भोलाहुडकी (बीएचके-१) येथील उत्खननात शैव/वैष्णव संप्रदायांच्या शिव, महासदाशिव (द्वादशमुख), संकर्षण, ब्रह्मा, विष्णु, नैगमेष, पार्वती, गणेश व दुर्गा या मूर्ती; तर उत्खननापूर्वी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदताना अवचित सापडलेल्या मूर्तींमध्ये अष्टमुखी शिव, सदाशिव, लकुलिश इत्यादींचा समावेश होता. या सर्व मूर्ती शैव संप्रदायाच्या पाशुपत या पंथातील असून त्या वाकाटककालीन आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ठेंगण्या यक्षमूर्तीच्या धर्तीवर घडविल्या आहेत. तौलनिक कालमापनानुसार त्यांचा काळ इ. स. ३५० ते ४०० असा निश्चित करण्यात आला आहे. वाकाटक कला व स्थापत्यविषयाचे पाश्चिमात्य अभ्यासक हन्स बाकर यांनी अष्टमुख शिवाची मूर्ती वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथील प्रमुख देवता; तर द्वादशमुख शिवाची मूर्ती ही भोलाहुडकी येथील मंदिराची प्रमुख देवता असल्याचा तर्क केला आहे. तसेच मांढळ येथे आतापर्यंत उजेडात आलेल्या वाकाटक काळातील तीन मंदिरांमधील दोन मंदिरे ही शैव संप्रदायाची असावीत, असेही अनुमान केले आहे.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconology, Groningen, The Netherlands, 1997.
- Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavationsʼ, pp. 243-245, Pune, 2013.
- Sali, Chetan, ‘Vakatakas Culture : Archaeological Perspectiveʼ, Samshodhak, March, 1998.
- देगलूरकर, गो. बं. ‘मांढळ येथील अष्टमूर्ती प्रतिमाʼ, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, २५ (१९८२) : १६६-१७१, नागपूर, १९८३.
- जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२
अजिंठा लेणी, भाग १
ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीचे काही पैलू
डॉ. राजेश कुमार सिंग
बी१-२६४, सिद्धार्थ बंगले
साम – सावली रोड, वडोदरा 390022, गुजरात, भारत
ईमेल: rksingh1970@gmail.com , +९१-९४२९९२५०३६
अजिंठा लेणी, भाग १
ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमीचे काही पैलू
सामग्री
प्राचीन इमारतींचे अज्ञात प्रमाण. ४
अजिंठा येथील वास्तुशास्त्रीय शब्दकोश.. ६
हरिषेणाच्या अधिपत्याची रूपरेषा यावर चर्चा. १४
हरिषेणानंतर: वेरूळचा सर्वात जुना टप्पा. २३
हरिषेणाच्या काळात: अजिंठा पुनरुज्जीवन.. २४
सारणी: वाकाटक कालगणना - वेगवेगळ्या आवृत्त्या. ३२
अनामिक प्राचीन नाव
प्रसिद्ध जागतिक वारसा - आणि प्राचीन बौद्ध मठ - अजिंठा (अजिंठा) किंवा अजंता (अजंता) यांनी दुसऱ्या किंवा पहिल्या शतकातील जगातील काही सर्वात जुन्या चित्रांचे नमुने जतन केले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून या विषयावर मोठ्या प्रमाणात साहित्य जमा झाले असूनही, स्मारकाची निर्मिती करणाऱ्या अजिंठा मठाची जटिल पार्श्वभूमी आणि काळाबद्दल फारशी स्पष्टता दिसून आलेली नाही. उदाहरणार्थ, प्राचीन काळात अजिंठा मठाचे नाव काय होते हे आपल्याला माहिती आहे का? उत्तर आहे, नाही. अजय मित्र शास्त्री यांनी अजिंठा या प्राचीन नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला (शास्त्री १९९१). त्यांनी योग्यरित्या ओळखले आहे की या जागेचे आधुनिक नाव देखील समस्याप्रधान आहे. सामान्यतः असे मानले जाते - आणि आपल्याला या श्रद्धेवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही - की या जागेचे नाव गुहेच्या जागेपासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या अजिंठा नावाच्या जवळच्या गावावरून ठेवण्यात आले आहे. तथापि, ते सर्वात जवळचे गाव नाही, कारण सर्वात जवळचे गाव प्रत्यक्षात लेणापुर (लेणापूर म्हणजे गुहांचे गाव) आहे, जे त्या ठिकाणापासून एक किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. लेणापूर येथे उत्खनन करण्यात आले होते ज्यामध्ये सातवाहन मातीची भांडी सापडली (घोष १९६७, १४). निःसंशयपणे, लेणापूर हे मठाशी ( संघारामा ) काही प्रकारे जोडलेले होते; कदाचित काही कामगार, किंवा पर्यवेक्षक किंवा देखरेख करणारे भिक्षू तिथे राहत असतील. तथापि, प्राचीन मठाला नाव देण्याच्या प्रयत्नात लेणापूर कसे अयशस्वी झाले हे एक गूढ आहे. कोणत्याही परिस्थितीत, अजंता ही अजिंठा नाही, किमान ध्वन्यात्मकदृष्ट्या नाही. सुरुवातीच्या अहवालांमध्ये, सरकारी फायलींमध्ये आणि पुरातत्व अभ्यासांमध्ये - अजिंठा ही शब्दलेखन पूर्णपणे ध्वन्यात्मकतेवर अवलंबून होती हे अनुमान काढण्यासाठी आपल्याला कल्पनाशक्तीची आवश्यकता नाही, कारण ब्रिटिश अधिकारी आणि युरोपियन विद्वानांनी अजिंठाला अजंठा असे उच्चारले होते. परिणामी, प्रचलित स्पेलिंग आणि उच्चार कायम राहिले आणि सुस्थापित झाले. तरीही, एक मुद्दा लक्षात घेता येईल की स्थानिक, अ-अंग्रेजीकृत महाराष्ट्रीयन आणि मराठी माध्यमे आणि साहित्य बहुतेकदा अजिंठा या शब्दाला अजिंठा असे म्हणतात. सध्याचा लेखक स्वतःला जागतिकपेक्षा स्थानिकांशी अधिक ओळखतो. म्हणूनच, एक प्रतीकात्मक संकेत म्हणून सध्याचा लेखक वाचकांच्या काही दुर्दैवी गैरसोयीच्या जोखमीसह लेखांच्या मालिकेत अजिंठा वापरणे पसंत करतो.
अनामिक प्राचीन प्रांत
आपल्याला माहिती आहे का की अजिंठा कुठे स्थित होता, म्हणजे कोणत्या प्राचीन प्रांतात किंवा देशात? याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. अजिंठा आज भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे. त्याचे कडेकोटाच्या मध्यभागी अक्षांश २०°३३'९.६२"उत्तर, रेखांश ७५°४२'०.६८"पूर्व (गुगल इंक. २०१३) आहे. [१] वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, प्राचीन काळात अजिंठा ऋषिक नावाच्या प्रांतात स्थित होते [२] (आकृती १).

आकृती १: 'वाकाटक स्थळांचा नकाशा' स्पिंक आणि यागुची (२०१४:xv) आणि वेनर (१९७७:११)
व्ही.व्ही. मिराशी यांनी ऋषिक देशाची खांडेशशी केलेली ओळख पटवण्यावर हा विश्वास आधारित आहे (मिराशी १९६३, १२३; प्लेट प). तथापि, त्या ओळखीमध्ये, मिराशींनी असे सुचवलेले नाही की अजिंठा ऋषिक देशाच्या सीमेत स्थित होता. प्रत्यक्षात, त्याबद्दल निर्णायकपणे बोलणे कठीण आहे, कारण लेण्या सहयाद्री पर्वतरांगांच्या घाटांवर (उतारांवर) आहेत ज्याच्या वर मूलक [३] किंवा अश्मक [४] देश होता आणि खाली तथाकथित ऋषिक देश होता. अजिंठा दोन्ही देशांच्या/प्रांतांच्या सीमेवर होता. सीमावर्ती घाटांचा ऋषिक किंवा मूलक किंवा अश्मक देशात समावेश होता की नाही हे निश्चित करण्यासाठी कोणताही निर्विवाद रेकॉर्ड नाही.
अज्ञात प्राचीन इमारतींचे प्रमाण
दगडात कोरलेल्या एकूण इमारतींची गणना निर्मात्यांनी किती केली होती हे आपल्याला माहिती आहे का? उत्तर पुन्हा नकारार्थीच द्यावे लागेल. येथे विशिष्ट प्रश्न उपस्थित केला जातो, कारण इंग्रजी शब्द गुहा कधीकधी समस्याप्रधान असू शकतो. उदाहरणार्थ, मूलभूत गोष्टींचा विचार करा (तपशीलात न जाता). [5] भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ३० गुहांची गणना करते, [6] आणि समान परिमाण आणि क्रमांकन नैसर्गिकरित्या या विषयावरील साहित्यात कायम आहे. तथापि, परिमाण आणि क्रमांकन प्रणाली विसंगतींपासून मुक्त नाही. चला त्यापैकी काही लक्षात घेऊया.

आकृती २: अजिंठा: गुहा २६-संकुल

आकृती ३: गुहा २६-संकुल (सममितीय योजना): स्पिंक आणि अजित राव यांचे काल्पनिक पुनर्बांधणी (अजित राव आणि नितीन वेतुरकर यांचे कलाकृती; वॉल्टर एम. स्पिंक आणि संस्कार यांच्या सौजन्याने)
भिक्षू बुद्धभद्र यांनी बांधलेल्या इमारतीचे उदाहरण घ्या (आकृती ७). जरी बुद्धभद्र हे गुहा २६ [७] चे सुप्रसिद्ध संरक्षक असले तरी, आज सामान्यतः अशी धारणा स्थापित केली जाते की भिक्षूने गुहा २६ फक्त निर्माण केली. शिलालेखात ' सुगतालय ' (सुगताचे म्हणजेच बुद्धाचे निवासस्थान) नावाच्या इमारतीत एक स्तूप मंदिर आणि अंगणासमोरील दोन खालच्या बाजू आहेत असे गृहीत धरले जाते. अलिकडच्या दशकात, स्पिंकच्या संशोधनातून, ज्यानंतर सध्याचे लेखक आहेत, असे दिसून येते की मंदिरात प्रत्यक्षात दोन्ही बाजूंना चार बाजू आहेत [8] (आकृती ११). जोड्यांमध्ये गुहा २५, २७ आणि खालच्या पंखांची जोडी आहे (आकृती ९). पूर्वी, गुहा २५ आणि २७ ला जोड्य म्हणून ओळखले जात नव्हते; त्यांना स्वतंत्र इमारती, स्वतंत्र गुहा म्हणून ओळखले जात असे . तथापि, संरक्षक बुद्धभद्र आणि इतर भिक्षूंसाठी, चार जोड्यांसह मंदिर (गुहा २६) हे स्पष्टपणे एक शैलग्रीह म्हणून ओळखले गेले असते , तर आपण त्यांना तीन म्हणून मोजतो: गुहा २५, २६ आणि २७. समस्या केवळ क्रमांकनाची नाही. ती संरक्षकाच्या 'कीर्ति' [9] ( कीर्ति ) ची मूळ स्थापत्य रचना समजून घेण्याबद्दल आहे; मंदिर आणि स्मारकासाठी हा शब्द वापरला गेला होता - बुद्धभद्रच्या दान शिलालेखात, जो त्याच मंदिराच्या ओसरीत आहे.

आकृती ६: अजिंठा: गुहा २६-कॉम्प्लेक्स, सुमारे ४८० इ.स., काल्पनिक त्रिमितीय मॉडेल, तपशील वगळून, (सिंग २०१२अ:६१) वरून.
आणखी एक उदाहरण घेऊया. एक धारणा प्रसिद्ध आहे की दुमजली गुहा ६ ही एकच इमारत आहे [10] (आकृती 7). दोन मजल्यांना फक्त एकच क्रमांक देण्यात आला आहे यावरून हे देखील स्पष्ट होते. तथापि, नवीनतम संशोधनात, दोन्ही मजले दोन वेगळ्या इमारती म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासाठी नवीन नावे जुळवून घ्यावी लागली, म्हणजे गुहा वरची 6 आणि गुहा खालची 6. दोन्ही मजल्यांच्या मजल्यांच्या योजना खूप वेगळ्या आहेत (आकृती 10), आयकॉनोग्राफिक योजना आणि डिझाइन. त्यांच्यात फारसे साम्य नाही. खालच्या मजल्याचे काम सुरू असताना वरचा मजला नियोजित नव्हता हे स्पष्टपणे दिसून येते. [11]

आकृती ७: वरच्या ६ ( वर ) आणि खालच्या ६ ( खाली ) गुहा, (बर्गेस १८८०, प्लेट XXXII) पासून
तिसरे उदाहरण सांगायचे झाले तर, गुहा १८ (आकृती ४) नावाच्या दगडात कोरलेल्या टाक्याला एक संख्या दिली आहे, तर वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी इतर अनेक टाक्या आहेत ज्या अनामिक आहेत; त्यांना अजिबात संख्या नाही; त्यांना लेणी म्हणून ओळखले आणि मोजले गेले नाही . तिथेच समस्या आहे. समस्या गुहा या इंग्रजी शब्दाची आहे . ती मूळ रचनेला मागे टाकते. फक्त एका अखंड संदर्भात खोदलेल्या कोणत्याही गोष्टीला गुहा म्हणून मानले जाते . हा शब्द टाकी, कोठडी, हॉल, मंदिर, मंदिर किंवा अनेक संलग्न युनिट्स असलेल्या विस्तीर्ण संकुलात फरक करत नाही. जर आधुनिक विद्यार्थ्यांनी अजिंठा बनवणाऱ्यांनी वापरलेले शब्दकोश स्वीकारले तर अशा कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. अजिंठा शिलालेखांमध्ये अनेक वास्तुशास्त्रीय शब्दकोश आढळतात. सामान्य ते विशिष्ट संज्ञांपर्यंत त्यांची विविधता आहे.
अजिंठा येथील स्थापत्यशास्त्रीय शब्दकोश
खालील अजिंठा शिलालेखांमध्ये दिसणाऱ्या काही वास्तुशास्त्रीय संज्ञांचा अपूर्ण शब्दकोष आहे [१२] : शैलगृहम् [१३] शैलगृहम् = रॉक-कट आर्किटेक्चर; कन्दरा कंदारा [१४] = नैसर्गिक किंवा खडक कापलेली गुहा; लयन [१५] लयन / एकाश्मकम् [१६] ekāśmakam = monolithic architecture; उपासय उपासय [१७] (प्राकृत) = उपाश्रय उपाश्रय (Snk.) = a monastic dwelling made of any material; वेश्म [18] veśma = dwelling; नागेन्द्रवेश्म [१९] नागेंद्रवेश्म = नागेंद्र मंदिर; उवरक [२०] उवरक (प्राकृत) = अपवरक ( Snk.) = a monk's cell; मंडप [२१] maṅḍapa = शब्दशः, एक मंडप, परंतु दिलेल्या संदर्भांमध्ये ते बुद्ध मंदिराला सूचित करते; पसादा [२२] पसादा (प्राकृत) = प्रासाद प्रासाद (Snk.) = राजवाडा, मोठे मंदिर; विहार [२३] विहार = एक मठ, पण मठांच्या निवासस्थानाशिवाय किंवा त्याशिवाय मंदिर; मुनिराजचैत्यम् [२४] मुनिराजचैत्यम् / सुगतालयम् [२५] सुगतालयम् / चैत्यमन्दिरम् [२६] चैत्यमंदिरम् / स्तूपविहार [२७] स्तुपविहार / गन्धकुटी [२८] गंधकुटी = बुद्ध मंदिर किंवा बुद्ध मंदिर किंवा दोन्ही प्रतिमा, स्तुप किंवा मंदिर; कीर्ति [२९] कीर्ति = शाब्दिक, कीर्ती, पण प्रसिद्ध स्मारक किंवा प्रसिद्धीचे स्मारक, धार्मिक संदर्भात ते मंदिराला सूचित करते; गवाक्ष [३०] गवाक्ष = पिपळाच्या पानाच्या आकाराची खिडकी (फिकस रिलिजिओसा); निर्य्यूह [३१] निर्य्यूह = गेटवे, प्रवेशद्वार, दरवाजा किंवा गावक्ष यांचे शिखर किंवा शिखर ; सुवीथी [३२] सुविथी = चित्र गॅलरी [३३] ; वेदिका [३४] वेदिका = मंडप, सभामंडप, फेरफार किंवा देवस्थान [३५] ; स्तम्भ [३६] स्तंभ = स्तंभ; विभंग [३७] vibhaṅga = सामान्यतः एक जिना, परंतु गुहा 16 च्या संदर्भात, ते सध्याच्या बोगद्याच्या पायऱ्या दर्शवितात; घरमुख [३८] घरमुख = दर्शनी भाग; भित्ति [३९] भित्ति = भिंत.
लेण्यांचे वय
चला आपण दुसऱ्या एका मूलभूत प्रश्नाकडे वळूया. लेणी कधी बांधल्या गेल्या? दुर्दैवाने, हा प्रश्न अजूनही तपासला जात आहे आणि त्यावर वादविवाद सुरू आहेत. जवळजवळ दोन शतकांच्या अभ्यासानंतरही, कोणतीही अचूक स्पष्टता नाही. आपल्याकडे जे आहे ते वेगवेगळे आहे. काही प्रमुख मते येथे वस्तुनिष्ठपणे मांडली आहेत. कोणालाही स्पष्ट कल्पना दिसत नाही. तिसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत अनेक टप्पे आणि शतके सांगितल्यानंतर, [40] तज्ञांनी अजिंठा दोन वेगवेगळ्या कालखंडातून विकसित झाली यावर सहमती दर्शविली. पारंपारिकपणे, दोन्ही कालखंडांना हीनयान आणि महायान म्हटले जाते. या प्रकारचे वर्गीकरण, कालखंड आणि नामकरण आता समस्याप्रधान असल्याचे आढळून आले आहे, कारण दोन्ही संज्ञांचे अचूक अर्थ गहन पुनरावलोकनाखाली आले आहेत. [41] वादविवाद मिटल्याशिवाय, काही विद्वानांना 'पूर्वीचा' टप्पा आणि 'नंतरचा' टप्पा या संज्ञा वापरणे अधिक सुरक्षित वाटते. [42] दोन्ही टप्प्यांचा कालावधी काय आहे? हे देखील पूर्णपणे स्पष्ट नाही.
आधीचा टप्पा
अलिकडेपर्यंत, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यासाठी सुमारे दोन ते तीन शतके मानली होती: तिसरे शतक ईसापूर्व ते पहिले शतक ईसापूर्व. [43] तथापि, सध्याच्या संशोधनात असे मत निर्माण होत आहे की पूर्वीच्या गटातील पाच इमारती, म्हणजेच लेणी 9, 10, 12, 13 आणि 15A [44] (आकृती 5), पहिल्या शतक ईसापूर्व मध्ये ठेवल्या पाहिजेत. [45] एमके ढवळीकर यांनी सध्या असा विचार व्यक्त केला आहे की 'अजिंठा लेण्यांचा प्रारंभिक गट (हीनयान) कदाचित पहिल्या शतक ईसापूर्वच्या उत्तरार्धात सातकर्णी II च्या कारकिर्दीत कोरला गेला असावा' (ढवळीकर 2003, 4). गुहा 10 च्या खडकात कोरलेल्या दर्शनी भागावरील छेदन केलेल्या शिलालेखात 'वासितीचा मुलगा' याने लाकडी दर्शनी भाग दान केल्याची नोंद आहे. [46] सांची येथेही याच नावाचा एक देणगीदार सापडतो: 'दक्षिणेकडील प्रवेशद्वारावरील एक शिलालेख, जो सर्वात प्रभावी आहे, तो नोंदवतो की "हे राजा सिरी-सतकर्णीच्या कारागिरांचा प्रमुख ( अवेशानिन ) वासिथी (वसिष्ठी, स्कॉर्लंड) यांचा मुलगा आनंद यांची देणगी होती" (धवळीकर २००३, ४). दोन्ही शिलालेख एकाच व्यक्तीकडे निर्देश करतात की नाही हे आम्हाला माहित नाही, परंतु जर ते असतील तर अजिंठा आणि सांची प्रवेशद्वारांचा समकालीन काळ मानला पाहिजे. कला, शैली आणि प्रतिमाशास्त्र (झिन २००३) यासारख्या अतिरिक्त स्त्रोतांच्या आधारे मोनिका झिन देखील या डेटिंगचे समर्थन करण्यास इच्छुक आहेत. डायटर श्लिंगलॉफ यांनी दाखवून दिले आहे की दुसऱ्या शतकात भरहुत, अमरावती, नागार्जुनीकोंडा [47] , सांची, मथुरा, गांधार आणि अजिंठा (श्लिंगलॉफ २०१३, खंड II, ४-१३) यांच्यामध्ये कथा आणि प्रतिमाशास्त्रीय संग्रहाचा एक समान संच होता. मूर्तीशास्त्रीय संगतींच्या आधारे, श्लिंगलॉफ यांनी अजिंठाचा प्रारंभिक टप्पा दुसऱ्या शतकातील ईसापूर्व आहे (श्लिंगलॉफ २०१३, खंड II, ३).
यावेळी, अजिंठा प्रदेश सातवाहन शासकांच्या अधिपत्याखाली आला. त्यांची राजधानी प्रतिष्ठान (आधुनिक पैठण) येथे होती, जी अजिंठापासून जवळजवळ १६० किमी अंतरावर आहे. प्राचीन महामार्ग बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांना जोडत होते. अजिंठा उत्तरापथ आणि दक्षिणापथ यांच्या भेटीच्या ठिकाणी होता. [48] अशाप्रकारे, व्यापारी, सैन्य आणि लोकांचे प्रवासी काफिले अशा ठिकाणी थांबत असत जिथे नयनरम्य धबधबे असलेल्या महामार्गांजवळ होते.
सातवाहन शासक कला आणि संस्कृतीचे महान संरक्षक होते. त्यांनी हिंदू स्मारकांइतकेच बौद्ध स्मारकांनाही संरक्षण दिले. तथापि, अजिंठा निर्मितीत सातवाहनांचा थेट सहभाग होता असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. शिलालेखातील नोंदी दर्शवितात की अजिंठा पहिल्या टप्प्याचा विकास सामूहिक संरक्षणाच्या सद्गुणाने झाला. अनेक गुहांमध्ये कातडी आणि रंगीत शिलालेख आढळतात जे दर्शवितात की वेगवेगळ्या देणगीदारांनी इमारतींच्या वेगवेगळ्या भागांसाठी पैसे दिले. अशाप्रकारे, अजिंठा पहिल्या टप्प्यात कोणतेही शाही संरक्षण नव्हते. हे सर्व व्यापारी, व्यापारी, सामान्य लोक, उपासक (सामान्य लोक) आणि स्वतः भिक्षूंनी केले.
राजेशाही सहभागाचा कोणताही संदर्भ सापडत नसल्याने, अजिंठाच्या पहिल्या टप्प्यातील राजकीय पार्श्वभूमी किंवा कोणत्याही राजवंशाबद्दल बोलणे अनावश्यक ठरेल. म्हणून, आपण अजिंठाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया.
नंतरचा टप्पा
दुसऱ्या गटातील लेण्यांचे वय कमी समस्याप्रधान नाही. आपण अगदी सैल शब्दात मोजू शकतो की नंतरच्या टप्प्यात सुमारे २५ लेणी उत्खनन करण्यात आली होती. सुरुवातीला, तिसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत अनेक शतके सांगितली गेली. [49] ही तारीख इतकी खोलवर रुजलेली आहे की अजिंठा लेण्यांवरील युनेस्कोच्या वेबपेजवर अजूनही जुनी तारीख आहे: 'अजिंठा येथील पहिले बौद्ध गुहा स्मारके इ.स.पू. दुसऱ्या आणि पहिल्या शतकातील आहेत. गुप्त काळात (इ.स.चे पाचवे आणि सहावे शतक ), मूळ गटात अनेक समृद्ध सजवलेल्या लेण्या जोडल्या गेल्या' (युनेस्को १९९२-२०१५). भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची वेबसाइट अधिक कल्पक आहे: 'लेणी वेगवेगळ्या काळात (इ.स.पू.चे दुसरे शतक ते इ.स.चे सहावे शतक) उत्खनन करण्यात आली . . . . चित्रांचा दुसरा टप्पा इ.स.च्या पाचव्या ते सहाव्या शतकापर्यंत सुरू झाला आणि पुढील दोन शतकांपर्यंत चालू राहिला. . . . वाकाटक काळातील या अनुकरणीय चित्रांचा नमुना गुहा क्रमांक १, २, १६ आणि १७ मध्ये दिसून येतो (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण २०११). दुसऱ्या शब्दांत, एएसआय असा विश्वास ठेवते किंवा लोकांना असे मानावे असे वाटते की वाकाटकांनी आठव्या शतकापर्यंत राज्य केले!
आजकाल बरेच विद्वान पाचव्या शतकातील किंवा पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील काळ हे वय मानतात. [50] तथापि, ए.पी. जामखेडकर यांचे डेटिंग एक प्रकारचे आहे: 'अजिंठा दगडात कोरलेल्या लेण्या सुमारे ७०० वर्षांच्या निर्मिती आहेत, अंदाजे २०० ईसापूर्व ते इ.स. ५२५ पर्यंत' (२००९). वॉल्टर एम. स्पिंक यांनी या वयाचे श्रेय विशिष्ट शब्दांत दिले आहे. ते म्हणतात की नंतरच्या काळातील सर्व लेण्या सुमारे ४६२ ते ४८० ईसापूर्व दरम्यान विकसित केल्या गेल्या. तथापि, ते स्पष्ट करतात की 'सोप्यासाठी, मी विशिष्ट तारखा वापरल्या आहेत, जरी वाचकाने एक किंवा दोन वर्षांच्या त्रुटीचा फरक सोडावा - कदाचित प्रत्येक असाइनमेंटसाठी जास्त नाही' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, xi). पुढे, '... अजिंठाच्या प्रत्येक वैशिष्ट्यासाठी आपण ज्या "विशिष्ट" तारखा लागू केल्या आहेत त्या कधीही पूर्णपणे अचूक असल्याचा दावा करू शकत नाहीत, कारण संपूर्ण दिनांकित क्रम विशिष्ट दिनांकित टर्मिनीवर अवलंबून आहे जो अजंठाच्या संरक्षणाच्या कालावधीपेक्षा किंचित पूर्वीचा आणि थोडासा नंतरचा आहे. म्हणून या बाह्य मर्यादांच्या संदर्भात अजंठाच्या विकासाचे क्रम लावले पाहिजे' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, २). स्पिंकचा 'लघु कालक्रम' त्याच्या बहुतेक प्रकाशनांमध्ये आढळू शकतो. त्याचा नवीनतम सुधारित कालक्रम चार्ट (स्पिंक आणि यागुची २०१४, xii) मध्ये आढळू शकतो. सुरुवातीला त्याच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. [५१] तथापि, काही लेखकांनी अलीकडेच त्याच्या तारखेचा स्वीकार केला आहे ज्यात हान्स बेकर, [५२] नाओमिची यागुची (Sahapedia.org २०१५) आणि सध्याचे लेखक [५३] यांचा समावेश आहे . स्पिंकने असा प्रस्ताव मांडला आहे की पाचव्या शतकातील सर्व लेण्या एकाच राजाच्या कारकिर्दीत सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या ज्याच्या अधिपत्याखाली अजिंठा हे ठिकाण आले. राजाचे नाव हरिषेण (हरिषेण) होते. भारताच्या इतिहासाच्या अगदी जवळ या राजाला स्थान आहे. [54] परंतु स्पिंकसाठी: 'प्राचीन विदर्भात (पूर्व महाराष्ट्रात) केंद्रित असलेली हरिषेण निश्चितच भारतातील आणि कदाचित त्या वेळी संपूर्ण जगात सर्वात महान होती. त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस, त्याचे वर्चस्व पश्चिमेकडून पूर्वेकडील समुद्रापर्यंत संपूर्ण मध्य भारतावर पसरले होते' (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ७). वाकाटक साम्राज्याचा स्पिंकचा नकाशा आकृती ३ मध्ये येथे पुनरुत्पादित केला आहे.
अजिंठा येथील दोन शिलालेख, एक गुलवाडा येथील घटोत्कच गुंफेतील आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यात सापडलेल्या थाळनेर अनुदानात हरिषाच्या राजवटीचा उल्लेख आहे. अजिंठा गुहा 16 शिलालेख, वि. 17: हरिरामहरस्मरेन्दुकान्तिर्हरिषेणो हरिविक्रमप्रतापः, हरिरामहरस्मरेन्दुकान्तिर्हरिषेणो हरिविक्रमप्रतापः , 'त्यानंतर त्याचा मुलगा राजा झाला [. . .] हरिषेण, जो, प्रेमात, इंद्र, राम, हर, कामदेव आणि चंद्रासारखा दिसत होता आणि जो सिंहासारखा शूर आणि उत्साही होता' (मिराशी, वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकारम मालिका 1963, 108)108, घटोत्कच गुंफा शिलालेख, वि. १३: अथ देवराजसूनुर्हरिषेणो […] हस्तिभोज, ' अथ देवराजसूनुर्हरीसेनो [. . .] हस्तिभोज , त्यानंतर देवराजाचा पुत्र हरिषेण आहे [...] हस्तिभोज' (मिराशी १९६३, ११७, ११९). गुहा 17 शिलालेख, वि. 21: … वदनारविन्दचंद्रे [।*] परिपालयति क्षितीन्द्रे हरिषेणे हितकारिणी प्रजानाम् [२१ ॥*], … वदनारविंदचंद्रे [|*] परिपालयति क्षितींद्रचंद्रे हरिष्टिकृत प्रजानां , 'राजकन्यांमध्ये तो चंद्र असताना, हरिषेण, ज्याचा चेहरा कमळ आणि चंद्रासारखा आहे आणि जो (त्याच्या) प्रजेसाठी हितकर असे करतो. . .] पृथ्वीचे रक्षण करत आहे' (मिराशी, वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडिकेरम सिरीज 1963, 126, 129). हरिषेणाच्या कारकिर्दीबद्दल, बर्गेस यांनी लिहिले: 'पंडित भगवानलाल कदाचित असे गृहीत धरतात की २१ व्या ओळीत उल्लेख केलेला हरिषेण हा वाकाटक राजपुत्र आहे ज्याचे नाव अजिंठा [शिलालेख] क्रमांक ३ मध्ये आढळते आणि वाकाटक हे सर्वोच्च अधिपती होते ज्यांचे पालन या राज्यकर्त्यांनी केले [राजा उपेंद्रगुप्त दुसरा किंवा धाराधिप, गुहे १७ चे दाता]' (बर्गेस १८८३, १२८).
महाराज हरिषेण [55]
सुमारे ४६० इसवी सन होता जेव्हा महाराज [५६] हरिषेण (महाराज हरिषेण) पश्चिम वाकाटक साम्राज्याच्या [५७] सिंहासनावर आले . [५८] हरिषेण हा किमान वाकाटक राजवंशाचा (तुलनात्मक कालगणनेसाठी, तक्ता १ पहा) सर्वात महान शासक बनला असे दिसते. राजवंशाची सुरुवात सामान्य होती. तथापि, हरिषेण महत्त्वाकांक्षी होता. सत्तेवर आल्यानंतर एक-दोन वर्षातच त्याने विविध दिशांना अनेक देशांवर हल्ला करून विजयी मोहीम सुरू केली. त्याचे वारसा मिळालेले राज्य मध्य दख्खनच्या एका भागात मर्यादित होते ज्याची अचूक रूपरेषा निश्चितपणे निश्चित करता येत नाही. त्याच्या कारकिर्दीत, वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेने नंदीवर्धन शाखेवर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या शाखेचे शासक असलेले राजा नरेंद्रसेन आणि राजा पृथ्वीसेन दुसरा यांना संपवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही, कारण ते दायद (सामान्य वंशाचे लोक) होते. महाराजा हरिषेण यांचे 'सचिव' (सचिव), ज्यांना काही लेखकांनी पंतप्रधान असे टोपणनाव दिले आहे, ते वराहदेव होते ज्यांनी गुलवाडा येथील अजिंठा गुहा १६ आणि घटोटकच गुहा मंदिरे विकसित केली आणि ती बौद्ध संघाला दान केली . [59] त्यांनी सुंदर गुहा मंदिरांच्या बाह्य आणि पोर्च भिंतींवर लांबलचक छाटलेले शिलालेख सोडले आहेत जे त्यांच्या देणग्या घोषित करतात. [60] एकत्रितपणे ते वराहदेव आणि महाराजा हरिषेण यांची वंशावळ प्रदान करतात. गुहा १६ दान शिलालेखांमध्ये प्रथाप्रमाणे हरिषेणाची प्रशस्ती (स्तवन) प्रदान करते. ते काव्यात्मक श्लोकांमध्ये रचलेले आहेत.
हरिषेण महत्त्वाचे आहेत कारण ते स्पष्टपणे बौद्ध धर्माचे समर्थक होते. स्पिंकच्या मते, ते अजिंठा येथील संरक्षण कार्यात थेट सहभागी होते. ते असे मानतात की 'गुहा १ ला स्वतः महान वाकाटक सम्राट हरिषेण यांनी प्रायोजित केले होते' (डब्ल्यूएम स्पिंक २००७, ७).
हरिसेनाच्या अधिपत्याची रूपरेषा यावर चर्चा
अजिंठा येथील वराहदेवाच्या देणगीदार शिलालेखातील १८ व्या श्लोकात अनेक प्राचीन देशांची किंवा प्रांतांची नावे आहेत: 'तो [हरिषेण] (जिंकला), कुंतल, अवंती, कलिंग, कोशल, त्रिकूट, लाट, आंध्र[परांट]... जे शौर्यासाठी खूप प्रसिद्ध असले तरी...' [61] ठिकाणांची नावे ओळखली गेली आहेत [62] (आकृती २). तथापि, गहाळ किंवा अस्पष्ट शब्दांमुळे वेगवेगळी मते निर्माण झाली आहेत. त्याचा थोडक्यात आढावा खाली दिला आहे.
या श्लोकात नामांकित देशांबद्दल एक मुद्दा मांडण्याचा हेतू आहे. परंतु क्रियापद गहाळ आहे. बुहलर आणि मिराशी यांनी असा अंदाज लावला की हरवलेल्या क्रियापदाचा अर्थ विजय असा होतो आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की हरिषेणाने नामांकित प्रांत जिंकले असावेत. नंतरच्या संशोधनात, स्पिंकने या अनुमानाला तथ्य म्हणून स्वीकारले. ते म्हणतात की हरिषेण 'पाचव्या शतकाच्या मध्यातील सर्वात महान शासक होता; त्याच्या संक्षिप्त कारकिर्दीच्या अखेरीस ( सुमारे ४६०-४७७ इ.स.), मध्य भारतातील त्याचे राज्य समुद्रापासून समुद्रापर्यंत पसरले होते' [(स्पिंक आणि यागुची २०१४, १) (डब्ल्यूएम स्पिंक २००९, आकृती १)]. स्पिंकसाठी, शिलालेखाच्या दाव्यावर शंका घेण्यास जागा नाही. परंतु, डीसी सिरकरसाठी: 'हा एक अस्पष्ट दावा आहे, जो त्या देशांशी वाकाटक राजाचे काही प्रकारचे शत्रुत्वपूर्ण संबंध दर्शवू शकतो. हरिषेणाने देश पूर्णपणे ताब्यात घेतले होते असे मानणे अशक्य आहे (सरकार १९६५, अंक २). स्पिंक यांना वाकाटक शिलालेखकार ए.एम. शास्त्री यांचे मत पटत नाही, जे काही प्रमाणात सिरकर यांच्या मताचे प्रतिध्वनी करतात:
हे शक्य आहे की त्याने [हरिषेणाने] यापैकी काही प्रदेशांवर घाईघाईने छापे टाकले, ज्यांचे रूपांतर कवीने पूर्ण विजयांमध्ये केले आणि त्यात काही इतर प्रदेश जोडले जिथे त्याचे संबंध होते किंवा ज्यांच्याशी त्याचा लष्करीदृष्ट्या काहीही संबंध नव्हता. म्हणूनच, दरबारी कवीच्या अन्यथा अप्रमाणित विधानाच्या आधारे असे म्हणणे चुकीचे ठरेल की 'उत्तरेला माळवा ते दक्षिणेला कुंतला आणि पश्चिमेला अरबी समुद्रापासून पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत संपूर्ण दख्खनमध्ये हरिशेणाचे वर्चस्व मान्य होते' [63] किंवा पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात 'तो जगातील सर्वात महान शासक होता' [64] असे म्हणणे चुकीचे ठरेल. आपण अधिक तर्कसंगतपणे असे म्हणू शकतो की त्याने त्याच्या वडिलांनी सुरू केलेल्या प्रक्रियेला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवले, वाकाटकांच्या दुसऱ्या शाखेच्या प्रदेशावर आपला अधिकार स्थापित करून, पृथ्वी शेण दुसरा, त्याचा शेवटचा ज्ञात सदस्य, किंवा त्याचा उत्तराधिकारी, जर असेल तर, किंवा वारसाच्या अपयशामुळे जास्त प्रतिकार न करता आपोआपच त्याला पदच्युत करून. आपण असाही निष्कर्ष काढू शकतो की काही काळासाठी, तो कितीही कमी काळ असला तरी, तो एक असा राजा होता ज्याला त्याच्या महान लष्करी सामर्थ्याबरोबरच त्याच्या मानवी गुणांमुळे त्याच्या समकालीन लोकांमध्ये खूप उच्च आदर होता. [(शास्त्री १९९७, २०५)]
चला हंस बेकर यांचे मत देखील पाहूया ज्यांचे विचार सरकार आणि शास्त्री यांच्याशी सुसंगत आहेत:
हरिषेणाच्या संदर्भात उपलब्ध असलेल्या स्त्रोतांमध्ये किंवा त्याच्या कथित विरोधकांच्या स्त्रोतांमध्ये, आपल्याला या कथित असाधारण लष्करी कामगिरीची पुष्टी कुठेही आढळत नाही, जी ऐतिहासिक वास्तवात कधीही घडली असण्याची शक्यता कमी आहे. या श्लोकातून असे सूचित होते की वाकाटक राजा आजूबाजूच्या सर्व राजांना मागे टाकत होता किंवा त्यांना लाजवत होता. [65] [ (बेकर 1997, 34-35)]
हरिषेणाच्या अधिपत्याबद्दल बेकरची कल्पना खालील टिपण्णीतून स्पष्ट होते:
जरी हरिषेणाच्या साम्राज्यवादी कारनाम्यांना पुरेसा शिलालेखीय आधार नसला तरी, हा श्लोक त्याच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला अधोरेखित करतो आणि त्याचे पहिले बळी त्याचे पूर्वेकडील नातेवाईक नरेंद्रसेन असू शकतात... [श्लोक] त्या प्रदेशांचा उल्लेख करत नाही ज्यांच्यासाठी आपल्याला काही सकारात्मक पुरावे आहेत की ते हरिषेणाच्या अधिपत्याखाली आले होते, म्हणजेच अश्मक आणि पूर्वेकडील वाकाटक राज्य. हरिषेण किंवा त्याच्या जागी त्याच्या मंत्र्याने त्यांचा उल्लेख केला नाही, सर्वप्रथम कारण शिलालेख कदाचित त्याच्या विजयांचा संदर्भ देत नाही, जसे आपण आत्ताच युक्तिवाद केला आहे. पुढे, त्यांना असे म्हणून निर्दिष्ट करणे लाजिरवाणे वाटले असेल, कारण त्यामुळे वत्सगुल्मच्या राज्याचा एक स्पष्ट भाग असल्याचा दावा संशयास्पद वाटला असेल. [(बकर १९९७, ३५)]
स्पिंकच्या विरोधकांना अंत नाही. आणखी एक वाकाटक शिलालेखकार, ब्रह्मानंद देशपांडे यांनी स्पिंकच्या रचनांचा गाभा नाकारला आहे. [66]
तथापि, काही अभ्यास स्पिंकच्या व्यापक निष्कर्षांना पुष्टी देतात. काही उद्धृत करायचे झाले तर, शोभना गोखले यांनी हरिषेणाच्या विस्तारवादाच्या पुराव्यांचा अभ्यास केला आहे (गोखले १९९२). शास्त्री (१९९७), एलएस निगम (२००४) आणि डोनाल्ड एम. स्टॅडटनर (२००४) यांचा असा विश्वास आहे की हरिषेण किंवा त्यांच्या समकालीनांनी, जरी थोडक्यात असले तरी, दक्षिण कोशल (छत्तीसगड) या प्राचीन देशावर हल्ला केला होता. जर हरिषेणाच्या कान्हेरी आणि दक्षिण कोशलवरील विजयाचे सिद्धांत स्वीकारले गेले तर त्याच शिलालेखात दावा केल्याप्रमाणे इतर प्रदेशांचे विजय देखील स्वीकारले पाहिजेत. आणखी एक संबंधित मुद्दा बेकर यांनी मांडला आहे. तो म्हणतो की हरिषेणला कदाचित आधीच अश्मक, ऋषिक आणि मूलक प्रांत वारशाने मिळाले असतील, त्यामुळे छापा टाकलेल्या देशांच्या यादीत त्यांचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. आपण येथे सर्व तपशीलांमध्ये जाऊ शकत नाही. अलीकडेच, स्पिंकने सर्व स्त्रोतांचे तपशीलवार विश्लेषण केले आहे आणि विशेषतः वाकाटक युगाच्या समाप्तीदरम्यान राजकीय पार्श्वभूमीच्या संभाव्य चित्राचा व्यापक आढावा दिला आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ११९-१६२).
ऋषिक आणि अश्मक संबंध
अजिंठा शिलालेखांमध्ये दोन विशिष्ट प्रांतांचा उल्लेख आहे: ऋषिक (ऋषिक) आणि अश्मक (अश्मक). गुहा १७ [६७] आणि गुहा २० [६८] मधील देणगी शिलालेखांवरून कळते की, ऋषिकाच्या राजाने कदाचित लेण्या १७-२० (आकृती ६) दान केल्या असतील. ऋषिक देशाचे आराखडे मुख्यतः खांडेश प्रदेशात होते आणि अजिंठा हे ठिकाण ऋषिक आणि घाटांच्या वरच्या शेजारच्या देशाच्या सीमेवर होते , म्हणजेच औरंगाबाद प्रदेश ज्याला मिराशी (मिराशी १९६३, प्लेट पाच) यांनी मूलक आणि स्पिंक यांनी अश्मक म्हटले आहे. गोदावरीच्या दक्षिणेकडील प्रदेश ज्यामध्ये अहमदनगर आणि भीर जिल्ह्यांचा समावेश आहे, मिराशी (1963, 123, 124) आणि शास्त्री (1997, 48) यांनी अस्माका म्हणून ओळखले आहे, परंतु स्पिंकसाठी ते मूलका आहे. केवळ पुढील संशोधन यापैकी कोणती ओळख वैध आहे याची पुष्टी करेल. 17, 18, 19 आणि 20 लेण्यांचे दान देणाऱ्या आणि 'पृथ्वीला स्तूप आणि विहारांनी सजवणाऱ्या' शिषिक देशाच्या राजाच्या नावाचा विविध अर्थ लावण्यात आला आहे. गुहा 17 शिलालेख, श्लोक 9 मध्ये उल्लेख आहे: 'धराधिपारख्यां प्रथमो बभार दध्रे द्वितीयो [र*]विसाम्ब संज्ञाम ॥ [९ ॥*], धाराधिपाराख्यां प्रथमो बाबर दध्रे द्वितीयो [र*]विसाम्ब संजाम || [९||*], त्यापैकी थोरल्याला ( त्यापैकी ) राजाची पदवी होती, तर दुसऱ्याला रविसंबा' (मिराशी १९६३, १२५, १२८) असे नाव होते. मिराशी (मिराशी १९६३, १२२), थोरल्याचे, म्हणजेच दात्याचे नाव हरवले आहे. मिराशीच्या नाव-हरवलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवून आणि गुहा २० च्या शिलालेखाशी संबंध जोडून, स्पिंकने असा अंदाज लावला आहे की मोठ्या भावाचे नाव उपेंद्रगुप्त आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५, २०३ ff.). तथापि, शास्त्री हे नाव धाराधिप असल्याचे ओळखतात. त्यांनी दात्याची एक वेगळी वंशावळ चार्ट तयार केली आहे (शास्त्री १९९७, ४७) ज्यामध्ये खालील स्पष्टीकरण दिले आहे:
मिराशी म्हणतात की रविसंबा यांच्या मोठ्या भावाचे नाव, जे कुटुंबातील शेवटचे ज्ञात सदस्य होते, जतन केलेले नाही, जरी त्यांना 'राजाची पदवी होती.' पहिल्या राजपुत्राच्या ( कुमार ) संबंधात वापरले जाणारे धाराधीप-आख्यम हे वाक्य 'धाराधीप नावाचा' असे दर्शवते, अगदी त्याचप्रमाणे रविसंबा-संज्ञाम दुसऱ्या मुलासाठी वापरला जातो आणि 'रविसंबा' असे नाव धारण करतो असा योग्य अर्थ घेतला जातो. 'पृथ्वीचा स्वामी', 'धराधीप' हे नाव असामान्य मानले जाऊ नये कारण नरेंद्र, 'माणसांचा स्वामी' आणि भूपती किंवा अवनींद्र, 'पृथ्वीचा स्वामी' अशी नावे व्यक्तींनी धारण केली आहेत. रविसंबा यांच्या अकाली निधनाने अत्यंत दुःखी झालेल्या, [] मोठा भाऊ धाराधीप यांना सांसारिक सुख आणि संपत्तीबद्दल तीव्र तिटकारा निर्माण झाला आणि त्यांनी बौद्ध धर्माला समर्पित धार्मिक जीवन जगले. त्याने आपले राज्य स्तूप आणि विहारांनी व्यापले आणि दात्यांना दानधर्म केले. [ (शास्त्री १९९७, ४७-४८)]
बेकर (बेकर १९९७, ३६) देखील त्याला धाराधिप म्हणतो: 'मोठ्या भावाचे "नाव" विचित्र आहे: धाराधिप (म्हणजे "पृथ्वीचा स्वामी," किंवा "राजा"). बेकर खालील कारणांमुळे स्पिंकचे वाचन नाकारतात:
गुहेच्या XVII मधील शिलालेखाची हाताळणी करताना, स्पिंक मिराशीपेक्षा एक पाऊल पुढे जातो जेव्हा तो 'राजा' नावाच्या मोठ्या भावाची ओळख XX गुहेच्या दात्याशी करतो. नंतरच्या गुहेत एक अतिशय तुकडा देणगीदार शिलालेख सापडतो [(छब्रा १९५२, ११३)] ज्यामध्ये उपेंद्र हे नाव असल्याचे दिसते, जो कदाचित एका माणसाचा मुलगा आहे ज्याचे नाव कृष्णाने सुरू झाले असावे. रविसंबा आणि त्याच्या अनामिक भावाच्या वंशातील पूर्वजांपैकी एकाचे (पणजोबा) उपेंद्रगुप्त असे नाव आहे; म्हणून स्पिंक असा अंदाज लावतो की मोठ्या भावाचे नाव त्याच्या नावावरून ठेवले गेले असावे, अशा परिस्थितीत गुहेच्या XX च्या शिलालेखातील वडिलांचे नाव, ज्याचे नाव 'कृष्ण' ने सुरू झाले असावे, ते 'कृष्णदास' असे वाचले पाहिजे. तथापि, गुहेच्या XX मधील शिलालेख इतका वाईट स्थितीत आहे की त्यावरून कोणतीही विश्वसनीय माहिती मिळवता येत नाही; शिवाय, गुहा XX ही गुहा XVII किंवा गुहा XIX नाही. म्हणून स्पिंकच्या सिद्धांताला केवळ कल्पक अनुमान म्हणून मानणे कठीण आहे. [(बेकर 1997, 38)]
प्राचीन महामार्गांनी ऋषिक, अश्मक आणि मूलक यांना उर्वरित भारताशी जोडले होते. भिक्षू बुद्धभद्र यांनी दान केलेल्या गुहेच्या २६ व्या शिलालेखात अश्मक प्रांताचे नाव नमूद केले आहे. खरं तर, दात्याने अश्मकराजाचे मंत्री भवविराज यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारले होते, जसे आपल्याला श्लोक ९-१३ मध्ये सांगितले आहे:
अनेकजन्मान्तरबद्धसौहृदम् स्थिरम् कृतज्ञं सुधियम् विपश्चितम [|*] सुरासुराचार्यमतेषु कोविदम् महानुभावाश्मकराजामन्त्रीण || [९ ||*] . . . तम भव्विराजम उद्दिश्य मातापितरामेव च [|*] भिक्षुणा बुद्धभद्रेण कारितः सुगतालयम् [१३।*] [६९]
' अनेक-जन्म-अत्ता(नता)र-बध्द-सौह्रदम स्थिरम कृतजंम सुधीयांम विपश्चितम् [|*] सुर-आसुर-आचार्य (र्य) -मातेषु कोविदंश-महानुभमान-काव्यम् || [९ ||*] . . . तम् भवविराजम् उद्दिश्य माता-पितरम-एव च [|*] भिक्षुणा बुद्धभद्रेणा करित: सुगत-आ[लयं] [१३ ||*]
भिक्षू बुद्धभद्र यांनी सुगताचे हे मंदिर त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ आणि (त्या) भावविराजाच्या सन्मानार्थ बांधले आहे ज्यांनी अश्माकाच्या पराक्रमी राजाची सेवा केली होती आणि अनेक जन्मांपासून त्यांच्याशी मैत्रीने जोडलेले होते...' [ (छब्रा १९५२, ११५-११६, ११८)]
वर पाहिल्याप्रमाणे, भिक्षू बुद्धभद्र पुढे नोंदवतात की ते सलग अनेक जन्मांतून मंत्र्याशी संलग्न होते. कदाचित, बुद्धभद्र अश्मक देशाचे होते किंवा तिथून आले होते. अशाप्रकारे, अजिंठामध्ये ऋषिक आणि अश्मक प्रांतांची भूमिका होती याचा थेट पुरावा आहे.
इतर प्रांतांच्या किंवा इतर प्रांतातील लोकांच्या सहभागाबद्दल, असा कोणताही थेट पुरावा नाही. कारण इतर प्रमुख देणगीदारांची नावे ज्ञात नाहीत. तथापि, आपल्याला गुहा ४ [७०] च्या मंदिर बुद्ध प्रतिमेच्या शिलालेखात एका माथुर (माथुर) चे नाव मिळते , परंतु त्याने फक्त मंदिराचा भाग दान केला की संपूर्ण इमारत हे दान केले हे अनिश्चित आहे. असामान्य स्थान आणि देणगीदार शिलालेखासाठी असामान्यपणे कमी लांबीमुळे शंका आहे. माथुर हे भारतात खूप लोकप्रिय आडनाव आहे, परंतु येथे ते पहिले नाव आहे. बहुतेकदा, भारतातील अनेक लोकांची नावे अजूनही मूळ ठिकाणांशी जोडली जातात. आम्हाला आश्चर्य वाटते की माथुर हे मथुरा येथील होते का. उर्वरित लेण्यांसाठी, आपण केवळ शैलीत्मक, प्रतिमाशास्त्रीय आणि तीर्थयात्रेच्या मार्गांवरून असा अंदाज लावू शकतो की इतर देणगीदार आर्यवर्त [71] , बृहत्तर मगध [72] , अनुप, कोशल, अवंती, लाट, मूलक, विदर्भ, कुंतल, अपरांत, आंध्र आणि कलिंग यासारख्या दूरवरच्या प्रदेशातून आले असतील.
'सुवर्णकाळ'
पाचव्या शतकातील भारतातील संरक्षण क्रियाकलापांची खरी व्याप्ती आणि विविधता यांचे आरेखन करणे शक्य झालेले नाही. कला आणि संस्कृतीला गुप्त संरक्षणाची कहाणी तुलनेने सर्वज्ञात आहे. तथापि, वाकाटक संरक्षणाचे काही काम प्रगतीपथावर आहे. आता वाकाटक इतिहासकारांना हे चांगलेच समजले आहे की भारताचा 'सुवर्णयुग' गुप्तांच्या अधिपत्यापलीकडे पसरलेला होता. विशेषतः पाचव्या शतकातील अजिंठा काळात, गुप्त उत्तर भारतापुरते मर्यादित होते आणि मध्य भारत आणि दख्खनमधील त्यांच्या पूर्वीच्या अधिपत्याचा मोठा भाग वाकाटकांच्या दोन शाखांच्या नियंत्रणाखाली होता. विशेषतः, हरिषेण काळात, वाकाटकांचा मोठा विस्तारवाद होता जो केवळ काही काळ टिकला, दोन दशकांपेक्षा कमी काळ टिकला. एकूणच, पाचव्या शतकातील वाकाटक मोठ्या प्रमाणात संरक्षण क्रियाकलाप निर्माण करू शकले किंवा त्यांना परवानगी दिली. अजिंठा हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे. विद्यमान पुरातत्व, शिलालेख, अंकशास्त्र, [73] आणि कला ऐतिहासिक संग्रह हे सूचित करण्यासाठी पुरेसे आहेत की वाकाटकांच्या दोन्ही शाखांमधील संरक्षण बरेच विपुल आणि सुसंगत होते. बौद्ध तसेच ब्राह्मणीय [74] संरक्षणात सुसंगतता समान आहे. सध्याच्या विद्वत्तेतही, अजिंठा आणि हरिषेण यांनी सर्व प्रकाशझोतात आणले आहे हे केवळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.
वाकाटकांच्या दोन्ही शाखांच्या विविध ज्ञात संरक्षण कार्यांचा आढावा घेणे येथे शक्य नाही. परंतु, अजिंठा यांचे मूल्यांकन नंदीवर्धन शाखेच्या संरक्षणाच्या कला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संग्रहाशी तुलना केल्याशिवाय करता येणार नाही. हंस बकर यांनी मानसर, रामागिरी, नगरधन, मंडल आणि प्रवरापुराच्या तुलनेने कमी ज्ञात कला इतिहासाचे विस्तृत सर्वेक्षण केले आहे. [75] बकर यांनी वाकाटकांच्या ब्राह्मणीय वारशावर प्रकाश टाकला आहे. कला आणि पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आज आपल्याकडे जे आहे ते कधीही पूर्ण चित्र नसते, कारण मोठा, मोठा भाग नष्ट झाला आहे किंवा काही भविष्यात प्रकाशात येण्याची वाट पाहत असतील. माध्यम आणि साहित्याच्या बाबतीत आणखी एक निश्चितता आहे. विद्यमान आणि ज्ञात कला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संग्रहाचा मोठा भाग साहित्याच्या आधारे आपल्याकडे आला आहे: दगड किंवा खडक, जसे की परिस्थिती असू शकते. पण, हे एकमेव माध्यम नव्हते. खरं तर, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की हे कधीही सर्वात प्रचलित माध्यम नव्हते, कारण दगड किंवा दगडातील कलाकृती इतर माध्यमांपेक्षा आणि साहित्यांपेक्षा जास्त महाग आणि मागणी असलेली असते. कदाचित, लाकूड, विटा आणि इतर नाशवंत माध्यमांमधील मोठा संग्रह कायमचा नष्ट झाला आहे. म्हणूनच, कला ऐतिहासिक नकाशा अपुरा, अपूर्ण आणि अपूर्ण राहणे नशिबात आहे. म्हणून, उपलब्ध संग्रह केवळ मोठ्या, अधिक व्यापक परिस्थितीचे सूचक म्हणून मानले पाहिजे. उदाहरणार्थ, गुहा १७, अजिंठा, श्लोक २२ मधील शिलालेख घ्या, ज्यामध्ये म्हटले आहे: 'त्याने [दात्याने] ... स्तूप आणि विहारांनी पृथ्वी सजवली ... . ' [७६] संपूर्ण शिलालेखातील मजकुराचा विचार करता, तो खोटा दावा वाटत नाही, जरी तो स्पष्टपणे अतिशयोक्ती असला तरी. म्हणून, आम्हाला आश्चर्य वाटते की ते स्तूप कुठे आहेत. [77] अजिंठा शिलालेखांमध्ये दगडात कोरलेल्या मठांना ' एकश्म', ' लयना' किंवा ' शैलगृह' असे म्हटले आहे.
हरिसेनाच्या आधी
आधी सांगितल्याप्रमाणे, हरिषेण काळात बौद्धांना पुन्हा एकदा आश्रय मिळाला. या स्थळांमध्ये अजिंठा, घटोटकच, औरंगाबाद, बानोटी, बाग आणि कान्हेरी यांचा समावेश होता. हरिषेणपूर्व काळात परिस्थिती कशी होती? संशोधनातील प्रगतीवरून असे दिसून येते की हरिषेण हा त्याच्या कुळातील इतरांपेक्षा वेगळा वाकाटक होता. त्याच्या कारकिर्दीपूर्वी ( सुमारे ४६०-४७७ इ.स.), मोठ्या बौद्ध आश्रयाच्या बाबतीत एक शांतता होती. शांततेच्या काळात, भारताच्या दक्षिणेकडील आणि मध्य राज्यांमध्ये ब्राह्मणवादी लाट पसरली असावी. या शांततेवरून असे दिसून येते की बौद्धांनी संदर्भातील प्रदेशांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक नकाशात मागे घेतले होते. खरंच, दख्खन, पूर्व आणि पश्चिम भारतातील बौद्ध पुरातत्वशास्त्रात तिसऱ्या ते पाचव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नवीन आणि मोठ्या मठांच्या स्थापनेचा कोणताही मोठा उपक्रम दिसून येत नाही. या काळात, विद्यमान बौद्ध स्थळांमध्ये वापर, पूजा किंवा वस्तीचे फारसे चिन्ह दिसून येत नाही. तथापि, काही जुन्या मठांनी कसे तरी कार्यरत राहणे सुरू ठेवले असेल परंतु प्रश्नातील काळात ताज्या आणि विस्तृत विकासाचे प्रमाण फारसे दिसून येत नाही. एमके धवळीकर यांनी ' लेट हिनयान केव्हज ऑफ वेस्टर्न इंडिया ' (१९८४) या पुस्तकात पश्चिम भारतातील अनेक कमी ज्ञात आणि नव्याने शोधलेल्या स्थळांचे दस्तऐवजीकरण केले आहे ज्याचे श्रेय ते तिसऱ्या ते मध्य पाचव्या शतकाच्या 'अंतराल काळ'ला देतात. ही स्थळे पिटलखोरा, नासिक, जुन्नर, कराड, पोहाळे, वाई, नाडसूर, नेनावली, शिरवाळ, कुडा, महाड, शेलारवाडी, खेड आणि कान्हेरी आहेत. यापैकी कोणत्याही स्थळांची तुलना अजिंठा, वेरूळ, सांची, अमरावती, नालंदा इत्यादींच्या भव्यतेशी करता येत नाही. असे दिसून येते की, ढवळीकरांच्या उत्तरार्धातील हीनयान लेणी वैयक्तिक भिक्षूंसाठी किंवा भिक्षूंच्या लहान गटांसाठी होती. या स्थळांवर बौद्ध संघाच्या अस्तित्वाचा फारसा आवाका नाही .
हरिसेनानंतर : वेरूळचा सर्वात जुना काळ
हरिषेणोत्तर काळात, चित्र खूपच वाईट आहे. सहाव्या शतकातील बौद्ध भारतात आपल्याला कोणतीही लक्षणीय हालचाल दिसून येत नाही. वेरूळच्या सुरुवातीच्या लेण्यांचा काळ अजूनही निश्चित झालेला नाही या वस्तुस्थितीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. विशेषतः, वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा काळ हा एक कठीण काळ होता. पाचव्या ते आठव्या शतकापर्यंतच्या विविध तारखा सांगितल्या गेल्या आहेत. [78] कला, स्थापत्य आणि प्रतिकात्मक आधारावर, वेरूळच्या बौद्ध मंदिरांचे वय अजिंठा येथील हरिषेण-काळातील लेण्यांशी बरोबरीचे ठरवता येत नाही. स्पष्टपणे, वेरूळ अजिंठा येथील कला आणि स्थापत्य वारशाचे धागे उचलतो आणि ते पुढील स्तरावर घेऊन जातो; ते समकालीन नाहीत, कारण वेरूळचे काहीही अजंठा येथे अद्याप दृश्यमान नाही. स्पष्टपणे, अजिंठा आणि वाकाटकांच्या पतनानंतर वेरूळची सुरुवात झाली. केवळ कला, स्थापत्य आणि प्रतिमाशास्त्रीय आधारच असा निष्कर्ष काढत नाहीत तर राजकीय आणि समाजशास्त्रीय भूगोल देखील हेच दर्शवितो. वेरूळवरील काही निरीक्षणे संदर्भात असू शकतात.
वेरूळचा पहिला बौद्ध काळ सहाव्या शतकाच्या मध्यापूर्वीचा आहे असे म्हणता येत नाही. इ.स. ४७७ मध्ये हरिषेणाच्या मृत्युनंतर अनेक दशके उलटून गेल्यानंतर तो कधीच सुरू झाला नसता . आपल्याला हरिषेणाचा फक्त एकच उत्तराधिकारी माहित आहे, त्याचा मुलगा सर्वसेन तिसरा, ज्याने फार काळ राज्य केले नाही (तक्ता १). त्याच्यानंतर, आपल्याला पश्चिमेकडील वाकाटकांबद्दल काहीही ऐकायला मिळत नाही. [७९] सर्वसेन तिसरा यांचा समकालीन, पूर्वेकडील वाकाटक राज्याचा पृथ्वीसेन दुसरा यांच्या बाबतीतही असेच आहे. पाचव्या शतकाच्या अखेरीस ते राज्य विस्मृतीत गेले. अनेक प्रादेशिक शक्ती वाकाटक राज्यांवर नियंत्रण मिळवतात. सहाव्या शतकात महिष्मतीच्या सुरुवातीच्या कालचुर्यांनी वेरूळ प्रदेशावर नियंत्रण मिळवले. वेरूळमध्ये सुरुवातीच्या कालचुर्यांनी काय भूमिका बजावली हे स्पष्ट नाही. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही शिलालेख नाही. प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांना प्रायोजित करण्यास सुरुवात केली अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरेल. जर हरिषेणाच्या राज्याच्या पतनाचे मोठे कारण ब्राह्मणवादी आंदोलन आणि समाजशास्त्रीय उलथापालथ असेल - हा मुद्दा इतरत्र चर्चा केलेला आहे [80] - तर लहान तात्काळ उत्तराधिकारी हरिषेणाने केलेल्या पाखंडी मताचे पालन करतील अशी अपेक्षा कोणीही करू शकत नाही . सुरुवातीच्या कालचुर्यांनी जे केले ते ब्राह्मणवादी संरक्षणाचे समर्थन करणे होते. स्पिंकचा असा विश्वास आहे की मुंबई प्रदेशातील एलिफंटा आणि जोगेश्वरी सारख्या दगडात कोरलेल्या गुहा या काळात (सा.यु. सहाव्या शतकाच्या मध्यात) उत्खनन करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, काही ब्राह्मणवादी लेण्या देखील वेरूळ येथे सुरू झाल्या होत्या ज्या घृषेणेश्वर ज्योतिर्लिंगामुळे आधीच तीर्थ होत्या . पहिली गुहा मंदिरे धबधब्याच्या जवळील २७ ते १७ गुहांमधील होती, सर्व ब्राह्मणवादी. [81]
त्यांच्या राजवटीच्या जवळजवळ अर्धशतकाच्या शेवटी, सुरुवातीच्या कालचुरींची जागा बदामीच्या सुरुवातीच्या चालुक्यांनी घेतली. या राजवंशाने आधीच बदामीच्या दगडी कोरीव लेण्यांना आश्रय दिला होता असे ज्ञात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, वेरूळच्या अनेक लेण्यांनी सुरुवातीच्या कालुक्य कला आणि स्थापत्यकलेशी शैलीत्मक आणि प्रतिकात्मक संबंध उत्तम प्रकारे प्रदर्शित केले आहेत. अशा प्रकारे, हे अधिक वाजवी दिसते की सुरुवातीच्या चालुक्यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांच्या मालिकेचे उद्घाटन केले. [82]
हरिषेणाच्या काळात : अजिंठाचे पुनरुज्जीवन
हरिषेणाच्या अधिपत्याखालील अनेक दगडी कोरीव मठांमध्ये (आणि कदाचित लाकूड किंवा विटांच्या नाशवंत माध्यमांमध्ये) नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या संरक्षक क्रियाकलाप त्याच्या सिंहासनावर आल्यानंतर लगेचच घडले. सध्याच्या संशोधनावर आधारित ही वस्तुस्थिती आपल्याला परिस्थितीचे मूल्यांकन करण्यास उद्युक्त करते. हे कसे घडले यावर प्रकाश टाकण्यासाठी आवश्यक पुरावे नसताना तर्क आणि अनुमान हेच एकमेव पर्याय आहेत. जवळजवळ तीन शतकांचा दीर्घकाळचा 'विराम' हरिषेणाच्या राज्याभिषेकाच्या काही काळापूर्वीच कसा खंडित झाला? हरिषेणाची धोरणे कोणाला कशी कळली असती, जर ती स्वतः हरिषेणाने जाहीर केली नसती तर? नवीन मठांच्या स्थापनेसाठी किंवा अजिंठा या जुन्या मठाच्या पुनर्जागरणाचे नियोजन करण्यासाठी इतके संरक्षक एकत्र कसे आले? समाज आणि प्रशासनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आश्रयदाते, काही राजदरबारातील, तर काही मंत्र्यांशी, राजांशी आणि श्रीमंत व्यापाऱ्यांशी मैत्री असलेले महायाजक होते तेव्हा आश्रयदात्यांमध्ये संवाद कसा होत असे? तुम्हाला माहिती आहेच की, सर्व आश्रयदाते भिक्षू नव्हते, किमान बुद्धभद्रइतके श्रीमंत किंवा साधनसंपन्न भिक्षू नव्हते. खरं तर, बहुतेक देणगीदार भिक्षू नसलेल्या समुदायाचे होते. बौद्ध जगात दोन व्यापक विभाग होते. एक, भिक्षूंचा आणि दुसरा सामान्य लोकांचा. सामान्य लोक मोठ्या संख्येने आश्रयदाते होते; हे हरिषेण काळातही खरे होते.
काही मोठ्या किंवा लहान संघांचे विविध प्रतिनिधी किंवा अनुयायी , जे प्रामुख्याने मूलसर्वास्तिवाद निकालाचे होते, त्यांच्या एकत्र येण्याने अजिंठा येथील संघरामाची ताकद किंवा नूतनीकरण वाढले असते . महाराजा हरिषेण यांच्या उघड किंवा गुप्त पाठिंब्याशिवाय हे घडू शकले नसते. भिक्षू एका मठातून दुसऱ्या मठात प्रवास करत असत ज्यामुळे कल्पनांची वाहतूक होऊ शकत असे. अशा शक्यतांना अजिंठा येथील कला, वास्तुकला आणि प्रतिमाशास्त्राच्या विविध वाक्प्रचार आणि शैलींद्वारे पुष्टी मिळते. इतर ठिकाणी चित्रकला टिकून राहिलेली नाही. म्हणून आवश्यक तुलना करता येत नाही. परंतु अजिंठा येथील कल्पना विविध प्रदेशांमधून आल्या आहेत हे दाखवण्यासाठी पुरेसा पुरातत्वीय, शिल्पकला, स्थापत्य, शिलालेख आणि प्रतिमाशास्त्रीय साहित्य आहे. उत्खनन वर्षानुवर्षे पुढे जात असताना तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास वेळ लागला. सुरुवातीच्या काळात काम परिपूर्ण नव्हते हे दाखवणारी असंख्य उदाहरणे आहेत. काही गंभीर चुका देखील झाल्या. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ भिक्षूंना कला आणि स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांमध्ये आणि पद्धतींमध्ये पारंगतता आली असती, परंतु बहुतेक कामगारांमध्ये असे लोक होते जे अनुभवी नव्हते; असेही काही लोक असतील ज्यांनी यापूर्वी कधीही खडक खोदला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे मागील दशकांमध्ये किंवा शतकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दगडी उत्खनन आढळत नाही. काम कसे आयोजित केले गेले याबद्दल, रोमिला थापर यांनी सुमारे २०० ईसापूर्व - इ.स. ३०० मध्ये काढलेले चित्र हरिषेण काळातील अजिंठा येथील उदाहरणासाठी देखील योग्य ठरू शकते:
या काळात [सुमारे २०० ईसापूर्व - ३०० ईसापूर्व] बहुतेक क्रियाकलापांच्या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्म होता, ज्याला श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांचाही पाठिंबा होता. मिलिंदपन्हा , महावस्तु आणि सद्धर्म-पुंडरिका यांसारखे बौद्ध ग्रंथ व्यापारी समुदायाने निर्माण केलेल्या नीतिमत्तेचे समर्थन करत होते. म्हणूनच, मठ समृद्ध होते, मोठे स्तूप बांधले जात होते किंवा लहान स्तूपांचे नूतनीकरण केले जात होते आणि बौद्ध संघ श्रीमंत आणि आदरणीय बनला हे आश्चर्यकारक नाही. काही मठांमध्ये मोठ्या प्रमाणात देणग्या होत्या, गुलाम आणि मजूर जमिनीवर काम करण्यासाठी आणि इतर उद्योगांवर काम करण्यासाठी नियुक्त केले जात होते. या संरचनांचे डोंगराळ भागात उत्खनन करणे किंवा स्वतंत्रपणे उभे राहणाऱ्या इमारती बांधण्यासाठी भिक्षूंना विविध प्रकारच्या व्यवस्थापन कौशल्यांमध्ये, देणग्या गोळा करणे, तांत्रिक कौशल्य मोजणे, कामगारांवर नियंत्रण ठेवणे, हिशेब ठेवणे, बांधकाम देखरेख करणे, कमीत कमी सांगायचे तर, प्रवीण असणे आवश्यक होते. काहींना हे काम करण्यासाठी विशेष पदनाम देण्यात आले होते, परंतु बहुतेक, अप्रशिक्षित असल्याने, फक्त श्रमांचे पर्यवेक्षण करायचे. त्यांना या व्यवसायातील सामान्य अनुयायांनी नक्कीच मदत केली असती. जेव्हा बौद्ध भिक्षू पूर्णपणे सकाळी गोळा केलेल्या भिक्षेवर जगायचे ते दिवस मोठ्या आणि श्रीमंत मठांमधील मठांच्या रेफेक्टरीजमध्ये नियमित जेवण करणाऱ्यांसाठी एक दूरची आठवण बनले. [(थापर २००३, २७०)]
काही निकाले
जसे आपण लक्षात घेतले आहे की, हरिषेण काळातील अजिंठा हे त्या काळातील प्रसिद्ध लोक जसे की महापुरूष, श्रीमंत व्यापारी, राजे, मंत्री आणि महाराज हरिषेण यांचे सचिव (' सचिव ') यांनी समक्रमितपणे आयोजित केले होते. आपल्याला ज्ञात असलेले सर्वात उत्कृष्ट भिक्षू म्हणजे भिक्षू बुद्धभद्र होते ज्यांच्याकडे इतका पैसा आणि राजकीय प्रभाव होता की त्यांनी अभूतपूर्व अशा अनेक महत्त्वाकांक्षी इमारती दान केल्या. त्यांच्या श्रेयाचे श्रेय आपण गुहा २१, २३, २४, २५ आणि २७ (आकृती ७) चे देतो. भिक्षू बुद्धभद्र यांनी गुहा २६ च्या ओसरीच्या भिंतीवर एक दान शिलालेख सोडला आहे. शेजारच्या गुहांमध्ये असे कोणतेही समर्पित शिलालेख आढळत नाहीत. लेण्यांच्या क्रमिक विकासाचा आणि संरचनात्मक परस्परसंबंधांचा स्पिंकचा सविस्तर अभ्यास (डब्ल्यूएम स्पिंक २००७) दर्शवितो की शेजारच्या लेण्या (गुहा २२ वगळता) त्याच आश्रयदात्याने आश्रयदाता म्हणून वापरल्या होत्या ज्याने गुहा २६ ला आश्रय दिला होता. म्हणूनच, भिक्षू बुद्धभद्र यांनी केवळ गुहा २६च नव्हे तर लगतच्या गुहा २१, २३, २४, २५, २७ आणि कदाचित कड्याच्या सर्वात पश्चिम टोकावरील अत्यंत अपूर्ण गुहा २८ ला देखील आश्रयदाता म्हणून वापरल्या. त्यांच्या देणगीदार शिलालेखाचे काळजीपूर्वक वाचन केल्याने असे दिसून येते की ते कदाचित अश्मक देशात असलेल्या संघरामाचे मुख्य पुजारी असावेत . बर्गेस यांनी प्रथम हा मुद्दा काढला होता:
बुद्धभद्र हे सामान्य भिक्षू नव्हते असे दिसते (वचन ७)... ' अभिजानोपन्न ' (वचन १६) हे उपाधी, ज्याचा अर्थ असा होतो की ते कुलीन कुटुंबातील होते, ते देखील सूचित करते की ते केवळ एक सामान्य भिक्षू होते. कदाचित, जर आपण असे गृहीत धरले की ते जैन श्रीपूजकांच्या पदासारखे होते आणि काही बौद्ध पंथाचे आध्यात्मिक प्रमुख होते, तर आपण चूक करणार नाही. त्यांनी 'लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील' (वचन १६) आणि 'लोकांची काळजी स्वतःवर घेतली' असा उल्लेख केला आहे, ही वस्तुस्थिती या मताच्या समर्थनार्थ जोडली जाऊ शकते. [(बर्गेस १८८३, १३३)]
भिक्षू बुद्धभद्र यांचे अश्मक देशाशी एक गूढ पण भौतिकदृष्ट्या शक्तिशाली संबंध होते. अश्मकराजाचे मंत्री भवविराज यांच्याशी त्यांची मैत्री अनेक पूर्वीच्या अस्तित्वांपासून चालू होती, जसे आपल्याला गुहा २६, श्लोक ९-१० मधील त्यांच्या दान शिलालेखात सांगितले आहे:
भिक्षू बुद्धभद्र यांनी सुगताचे हे मंदिर त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ तसेच अश्माकाच्या पराक्रमी राजाची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या भवविराजाच्या सन्मानार्थ बांधले आहे, जो सलग अनेक जन्मांपासून त्याच्याशी (भिक्षूशी) मैत्रीने जोडलेला होता...' [ (यजदानी १९५२, ११८)]
बुद्धभद्र कदाचित बौद्ध निकायांपैकी एकाचे प्रादेशिक प्रमुखही असावेत . ते बहुश्रुतीय होते [83] की मूलसर्वास्तिवादीन? रंगवलेल्या भित्तीचित्रांच्या थीम ओळखण्याच्या प्रयत्नांवरील अलीकडील अद्यतनांवरून असे दिसून येते की अजिंठा येथील बहुतेक रंगवलेल्या थीम मूलसर्वास्तिवाद विनयाच्या विद्यमान स्त्रोतांशी जवळून संबंधित आहेत. [84] पाचव्या शतकातील चित्रांवर, श्लिंगलॉफ लिहितात:
बहुतेक कथात्मक चित्रे मूलसर्वास्तिवादिन [85] च्या विनयावर, आर्यशुर [86] आणि अश्वघोष [87] च्या कवितांवर आधारित आहेत . चित्रांशी संबंधित सर्व साहित्यकृती हीनयानशी संबंधित आहेत आणि त्यानुसार, आणि त्यानुसार, विशेषतः महायानी विषयांचे चित्रण केले गेले नाही, अवलोकितेश्वर भक्ती चित्रांचा अपवाद वगळता (श्लिंगलॉफ 1987, 175-80). नंतरच्या लेण्यांसाठी 'महायान-लेणी' हा शब्द, जो चित्रांची साहित्यिक पार्श्वभूमी अद्याप अज्ञात होती त्या काळापासून उद्भवला आहे, म्हणून केवळ लेबल म्हणून वापरला जाऊ शकतो; या संज्ञेच्या आधारे चित्रांमागील विचारसरणीबद्दल निष्कर्ष काढणे चूक होईल. [(श्लिंगलॉफ, अजंता: हँडबुक ऑफ द पेंटिंग्ज 2013, खंड I, 75)]
तथापि, गुहा २२ च्या सप्तमानुषीबुद्ध भित्तिचित्रात, एका रंगीत शिलालेखात असे नोंदवले आहे की देणगीदार एकतर अपारशैल किंवा महायानाचा अनुयायी होता. कोहेनची आवृत्ती ' सफलता! हे शाक्यभिक्षु अपारशैलचे धार्मिक दान आहे...' [88] (२००६, ३३१) आहे. टीप ३ मध्ये, संपादक निरीक्षण करतात, 'कदाचित, ते शाक्यभिक्षो म अपारशैलनिकायस्य असे लिहिले असेल.' [89] तथापि, एन.पी. चक्रवर्ती यांच्या आवृत्तीत शेवटचा अर्धशतक 'यश! हे महान वाहनाचे अनुयायी शाक्य भिक्षूची गुणवान देणगी आहे...' असा होता [90] (१९५२, ११२) . दोन्ही आवृत्त्यांपैकी, कोहेनच्या सुचवलेल्या वाचनात कदाचित गुरुकिल्ली आहे. परंतु, गुहा १० च्या आतील भागात असलेल्या एका शिलालेखावरून त्या ठिकाणी आणखी एक निकाल असल्याचे सूचित होते , तो म्हणजे चेतिकाचा: ' विपश्विन, पूर्ण आणि परिपूर्ण बुद्ध. चेतिक रिकाशी संबंधित' [91] (कोहेन २००६, ३०४). कोहेन उपसंयुक्त नोट्समध्ये तपशीलवार सांगतात :
या नोंदीमध्ये चेतिका या शब्दाचा समावेश हा सध्याचा देणगीदार महासांघिकाच्या उप-पंथ असलेल्या चेतिका निकालाचा सदस्य होता हे दर्शविणारा एक संकेत म्हणून मोठ्या प्रमाणात वाचला जातो . वसुमित्राच्या मते, या पंथाचे नाव या वस्तुस्थितीवरून आले आहे की त्याचे संस्थापक अमरावतीजवळील कैत्य-टेकडीवर राहत होते आणि पंथाच्या सैद्धांतिक भूमिकेबद्दल काहीही सूचित करत नाही (जिर्यो मासुदो. “ओरिजिन अँड डॉक्ट्रिन्स ऑफ अर्ली बुद्धिस्ट स्कूल्स: अ ट्रान्सलेशन ऑफ द ह्सुआन-च्वांग व्हर्जन ऑफ वसुमित्राच्या ग्रंथ,” एशिया मेजर . २ [१९२५]: १५). खरं तर, वसुमित्र असे नमूद करतात की चेतिका निकालाच्या वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांतांपैकी एक म्हणजे, “जरी कोणी स्तूपाला अर्पण केले तरी त्याला उत्तम फळे मिळत नाहीत” (मसुद: ३८). हे शिलालेख चेतिक निकालाचा संदर्भ घेते असे गृहीत धरले तर , हे लक्षात घेण्यासारखे आहे की अजंठा येथे उल्लेख केलेला एकमेव दुसरा निकाल , शिलालेख क्रमांक ९० मधील अपरशैल, हा देखील महासांघिकाचा एक उप-पंथ होता, जो मूळचा अमरावती प्रदेशातील होता. [ (कोहेन २००६, ३०४)]
वरीलवरून असा निष्कर्ष काढता येत नाही की अजिंठाचे मुख्य संरक्षक विविध निकालांमधून आले होते , कारण वर उल्लेख केलेल्या शिलालेखांचा काळ चुकवू नये. दोन्ही घटनांमध्ये, भित्तीचित्रे आणि शिलालेख विघटनाच्या काळातील आहेत, सुमारे ४७८-४८० CE. हा काळ होता जेव्हा मूळ संरक्षकांनी हे ठिकाण सोडून दिले होते आणि अनेक सामान्य भिक्षू आणि उपासकांनी रिकाम्या जागांचा वापर काही रंगवलेले आणि कोरीव बुद्ध आणि स्तूप दान करण्यासाठी केला होता. हे सोडून दिलेल्या लेण्यांच्या रिकाम्या आणि प्रमुख ठिकाणी ठेवण्यात आले होते. स्पिंक त्यांना 'अनाहूत' प्रतिमा म्हणतात कारण त्या मूळ मांडणी आणि योजनेत घुसखोरी करतात आणि त्यांचे उल्लंघन करतात. [92] अशा प्रकारे, दोन्ही घटनांमध्ये, नवीन देणगीदार होते - जे इमारतींचे मालक किंवा मूळ संरक्षक नव्हते - जे महायान किंवा अपरशैल आणि चेतिका निकालांचे होते . अशाप्रकारे, वरील पुरावे देखील आपल्याला मूळ संरक्षक कोणत्या शाळांचे आहेत हे शोधण्यास मदत करत नाहीत. जेव्हा शिलालेख आणि प्रश्नातील भित्तीचित्रे मदत करत नाहीत, तेव्हा आपण श्लिंगलॉफ (२०१३) आणि झिन (२००३) यांनी उघड केलेल्या स्त्रोतांवर फायदेशीरपणे अवलंबून राहू शकतो. रंगवलेल्या थीम्सच्या अचूक ओळखीवरील त्यांच्या संशोधनातून स्पष्टपणे दिसून येते की बहुतेक आयकॉनोग्राफिक स्रोत मूलसर्वास्तिवाद विनयातून घेतले गेले होते.
त्याग
स्पिंक यांनी असा प्रस्ताव मांडला आहे की अजिंठाच्या नंतरच्या काळाचा इतिहास आणि वाकाटकांचा, विशेषतः हरिषेणाचा, अविभाज्यपणे जोडलेला आहे. हरिषेणाच्या मृत्यूने मठाचा मृत्यू झाला. पाचव्या शतकाचा शेवटचा तिमाही वाकाटकांच्या दोन्ही शाखांसाठी तसेच अजिंठासाठी घातक ठरला. केवळ अजिंठासाठीच नाही तर इतर बौद्ध मठांसाठी देखील जिथे संरक्षणात्मक क्रियाकलाप चालू होते. पूर्व आणि पश्चिम दोन्ही वाकाटक एकत्र कसे कोसळले? सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कदंब, प्रारंभिक कालचुरी, विष्णुकुंडीन, नल, मुंडपुत्र आणि कुंभकर्ण या सलग शासकांच्या नियंत्रणात वाकाटकांचे अधिपत्य दिसून येते. [93] त्यांना नष्ट करण्याचे कोणते घटक होते? यात काही स्पष्टता नाही. अजिंठा, बानोटी, बाग, औरंगाबाद आणि घटोटकच येथे जतन केलेले पुरातत्वीय, कला ऐतिहासिक आणि शिलालेखीय पुरावे गूढतेत भर घालतात जे एकत्रितपणे सूचित करतात की हरिषेणाच्या अधिपत्याखालील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये असलेल्या या सर्व मठांमधील विकास अचानक संपला. कामाच्या घाईघाईने आणि तात्काळ सोडून देण्याचे जागेवरील पुरावे निर्विवाद आहेत परंतु इतके तपशीलवार आहेत की त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अनेक खंडांची आवश्यकता असेल. [94] ते सातत्याने सूचित करतात की मूळ संरक्षकांनी केलेले काम अनपेक्षितपणे आणि वेगाने बंद झाले होते. काही ठिकाणी, कामे रात्रभर सोडून देण्यात आली आहेत असे दिसते, जे कधीही पुन्हा सुरू करता आले नाही. असे संकेत आहेत की एखाद्या विशिष्ट तारखेला अचानक आपत्ती आली होती. स्पिंकने वर्षाचा अंदाज इ.स. ४७७ (स्पिंक आणि यागुची २०१४, आकृती xii) असा दिला आहे . स्पिंक म्हणतात की ही तारीख परिपूर्ण नाही परंतु बहुतेक लेण्यांच्या समकालिक आणि अधूनमधून विकास समजून घेण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी पुनर्बांधणी केली आहे. तो मान्य करतो की अजिंठा विकासाचा प्रस्तावित कालखंड पुढील संशोधनाच्या आधारे काही वर्षे पुढे किंवा मागे हलवता येईल. साइटवरील पुराव्यांचे तपशीलवार परीक्षण केल्यास असे दिसून येईल की स्पिंकचे सूत्रीकरण बरेच अनुमानात्मक आहे. हे देखील स्पष्ट होईल की अनुमानित किंवा अंदाजे तारीख निश्चित करणे उत्खनन आणि चित्रकला क्रियाकलापांच्या कालक्रमानुसार क्रम समजून घेण्यास मदत करते. अजिंठा औरंगाबाद, बानोटी, घटोटकचा, बाग आणि कान्हेरीशी कसा जवळचा संबंध आहे आणि काही कल्पना सांची, सारनाथ, कान्हेरी, नाशिक, मथुरा, नालंदा आणि उत्तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील इतर मोठ्या मठ संस्थांमधून कशा आल्या हे जाणून घेण्यास मदत करते.
हरिषेण काळातील पाच मठांचा अनपेक्षित आणि एकाच वेळी त्याग हे स्पष्टीकरण देण्यास पात्र आहे. हे मठ वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी पसरलेले असल्याने, सर्व हरिषेणाच्या राज्यात असल्याने, त्यागाचे श्रेय एका मोठ्या आणि सामान्य घटकाला द्यावे लागेल; असे दिसते की अचानक हरिषेणाच्या राज्यावर आपत्ती किंवा आपत्ती आली होती. त्याहूनही भयानक म्हणजे; पूर्वेकडील वाकाटकांच्या राज्यालाही या परिस्थितीने ग्रासले आहे असे दिसते, कारण पाचव्या शतकाच्या अखेरीस त्यांचाही ऱ्हास तितक्याच वेगाने झाला. म्हणून, हा घटक एका विशिष्ट संरक्षकाच्या इमारतीपेक्षा मोठा होता; तो एका विशिष्ट मठ स्थापनेपेक्षा मोठा होता; तो ऋषिक किंवा अश्मकच्या राज्यापेक्षा मोठा होता; तो हरिषेणाच्या राज्यापेक्षाही मोठा होता. काही दशकांतच, संपूर्ण वाकाटक राजवंशावर पडदा पडला असे दिसते. तो घटक काय होता? याचे उत्तर समाजशास्त्राशी संबंधित असू शकते. परंतु, दंडीनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या अध्यायातील काही मजकुरांवरून तसेच इतर संबंधित निर्देशांवरून, स्पिंक असा युक्तिवाद करतात की वाकाटकांचा पतन हा अश्मकांचा हात होता ज्यांनी काही असंतुष्ट राजांचा संघ निर्माण केला होता आणि साम्राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला होता. स्पिंकचा पहिला खंड पूर्णपणे या थीमवर समर्पित आहे (डब्ल्यूएम स्पिंक २००५). त्यांच्या सिद्धांतात, हे केवळ राजकीय क्षेत्र आहे जिथे अशांतता आणि बंडाचे नाट्य रंगवले जाते. तर सध्याच्या लेखकाच्या मते ते प्रामुख्याने समाजशास्त्रीय क्षेत्र आहे जिथे संभाव्य वांशिक संघर्षाचे नाट्य रंगवले जाते ज्यामुळे राजकीय अस्थिरता आणि अराजकता निर्माण होते.
मग आपण विचारू का: काही समाजशास्त्रीय गोंधळ झाला होता का? अजिंठा आणि घटोत्कच शिलालेखांमध्ये हरिषेणाची स्तुती करण्यात आली आहे, [95] हे स्पष्ट आहे की तो बौद्धांना पाठिंबा देत होता. [96] कदाचित त्याच कारणासाठी त्याची हत्या झाली असेल का? व्यापक सामाजिक उलथापालथीमुळे बौद्धांना हाकलून लावण्यात आले होते का? भविष्यातील संशोधनच या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल.
सारणी: वकाटक कालगणना - वेगवेगळ्या आवृत्त्या
शास्त्री (१९९७, २१२) | बेकर (१९९७, १६९-७१) | स्पिंक (२००५, १६६) | |
अविभाजित राजवंश | |||
विंध्यशक्ती १ | २५०-२७५ इ.स. | - | - |
प्रवीरा उर्फ प्रवरसेन पहिला | २७५-३३५ इ.स. | २७५-३३५ इ.स. | - |
नंदीवर्धन शाखा | |||
गौतमीपुत्र पहिला | - | - | - |
रुद्रसेन पहिला | ३३५-३५५ इ.स. | ३३५-३६० इ.स. | - |
पृथ्वीसेना पहिला | ३५५-३८५ इ.स. | ३६०-३९५ इ.स. | - |
रुद्रसेन दुसरा | ३८५-३९५ इ.स. | ३९५-४०५ इ.स. | ३८५-३९०, वर्ष ५ च्या वाढीस परवानगी देते. |
कार्यवाहक सम्राट प्रभावतीगुप्त | ४०५-४१९ इ.स. | ३९०-४०५, अंदाजे १५ वर्षांचा रीजन्सी | |
युवराज दिवाकरसेन | ३९५-४१० इ.स. | - | |
दामोदरसेन | ४१०-४२० इ.स. | ४१९-४२२ इ.स. | ४०५-४१०, कारण भावाचे राज्य दीर्घ होते |
प्रवरसेन दुसरा | ४२०-४५५ इ.स. | ४२२-४५७ इ.स. | ४१०-४४५, वर्ष ३२ साठी परवानगी देते. |
नरेंद्रसेना | ४५५-४८० इ.स. | ४५७-४६१ इ.स. | ४४५-४५५, लांबीचा कोणताही पुरावा नाही. |
पृथ्वीसेन दुसरा | ४८०-५००/५०५ इ.स. | ४७५-४७७ इ.स., वत्सगुल्माच्या अधीनस्थ | ४५५-४७५, वर्ष १७ च्या वाढीस परवानगी देते. |
४७८-४९५, स्वतंत्र | |||
वत्सगुल्मा शाखा | |||
सर्वसेन पहिला | ३२५-३५५ इ.स. | - | - |
विंध्यशक्ती दुसरा उर्फ विंध्यसेन | ३५५-४०० इ.स. | ३६०-४०० इ.स. | - |
प्रवरसेन दुसरा | ४००-४२५ इ.स. | 400-450 CE, नंदीवर्धनाच्या अधीनस्थ | - |
सर्वसेन दुसरा | ४२५-४५५ इ.स. | - | |
देवसेना | ४५५-४८० इ.स. | ४५०-४६० इ.स. | - |
हरिसेना | ४८०-५१० इ.स. | ४६०-४७८ इ.स. | ४६०-४७७, देवसेना ४५८ वर राज्य करत आहे. |
सर्वसेन तिसरा | - | - | ४७८-४८३, ४८६ पूर्वी मृत्यू झाला |
संकलन: आर.के. सिंग. तारखा अंदाजे आहेत.
आकृत्यांसाठी मथळे
आकृती १ 'वाकाटक स्थळांचा नकाशा' (स्पिंक आणि यागुची २०१४, xv) आणि (वेनर १९७७, ११) वरून
आकृती २ 'वाकाटक शिलालेख आणि नाण्यांचे वितरण' (शास्त्री १९९७, नकाशा) वरून
आकृती ३ 'गुप्त आणि वाकाटकांच्या काळातील भारत', (डब्ल्यूएम स्पिंक २००९, आकृती १), (श्वार्ट्झबर्ग १९९२, प्लेट III.D.1) वरून रूपांतरित.
आकृती ४ अजिंठा: गुहा १८, समोरचे दृश्य
आकृती 5 अजिंठा: श्रावकायन लेणी
आकृती ६ अजिंठा: लेणी १७-२०
आकृती ७ अजिंठा: गुहा २६-संकुल
आकृती ८ अजिंठा: गुहा २६अ ( गुहा २६ च्या खाली ), २०१२ मध्ये पुन्हा शोधला गेला.
आकृती ९ अजिंठा: गुहा २६-कॉम्प्लेक्स, इ.स. ४८० मध्ये , काल्पनिक ३D मॉडेल, तपशील वगळून, (सिंग २०१२अ, ६१) वरून.
आकृती १० गुहा वरच्या ६ ( वर ) आणि खालच्या ६ ( खाली ), (बर्गेस १८८०, प्लेट XXXII) पासून
आकृती ११ गुहा २६-कॉम्प्लेक्स (आयसोमेट्रिक प्लॅन): स्पिंक आणि अजित राव यांचे काल्पनिक पुनर्बांधणी (अजित राव आणि नितीन वेतुरकर यांचे कलाकृती; वॉल्टर एम. स्पिंक आणि संस्कार यांच्या सौजन्याने)
उद्धृत कामे
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. २०११. "जागतिक वारसा स्थळे - अजिंठा लेणी." भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. ९ नोव्हेंबर २०१५ रोजी पाहिले. http://asi.nic.in/asi_monu_whs_ajanta.asp.
बेकर, हंस टी., एड. 2004. वाकाटक हेरिटेज: क्रॉसरोड्सवर भारतीय संस्कृती. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
—. 1997. द वाकाटक: हिंदू आयकॉनॉलॉजीमधील निबंध. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
ब्रोंखोर्स्ट, जोहान्स. २००७. ग्रेटर मगध: स्टडीज इन द कल्चर ऑफ अर्ली इंडिया, एचडीओ सिरीज. लीडेन आणि बोस्टन: ब्रिल.
बर्गेस, जेम्स. १८८३. बौद्ध गुहा मंदिरे आणि त्यांचे शिलालेख, पश्चिम भारताचे पुरातत्व सर्वेक्षण मालिका. खंड ४. लंडन: ट्रबनर अँड कंपनी.
बर्गेस, जेम्स. १८८०. "वेस्टर्न इंडियाची गुहा मंदिरे." द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया मध्ये , जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस, १६५-५२४ द्वारे. लंडन: डब्ल्यूएच ऍलन.
बर्गेस, जेम्स आणि पंडित भगवानलाल इंद्रजी. १८८१. पश्चिम भारतातील गुहा मंदिरांमधील शिलालेख, पश्चिम भारतातील पुरातत्व सर्वेक्षण मालिका. मुंबई: सरकारी केंद्रीय प्रेस.
चक्रवर्ती, एनपी १९५२. द पेंटेड इन्स्क्रिप्शन्स. खंड ४, अजिंठा: मोनोक्रोम रिप्रोडक्शन्स ऑफ द अजंता फ्रेस्कोज बेस्ड ऑन फोटोग्राफी , जी. यजदानी, १११-११२. लंडन: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
छाब्रा, बी. अध्याय १९५२. द इंकिसाइज्ड इन्स्क्रिप्शन्स. खंड ४, अजिंठा: मोनोक्रोम रिप्रोडक्शन्स ऑफ द अजंता फ्रेस्को बेस्ड ऑन फोटोग्राफी , संपादित गुलाम यजदानी, ११४-११८. लंडन: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
कोहेन, रिचर्ड स्कॉट. २००६. परिशिष्ट: अजिंठाचे शिलालेख. खंड II, अजिंठा बद्दलच्या युक्तिवादांमध्ये: अजिंठा, इतिहास आणि विकास -- हँडबुक डेर ओरिएंटॅलिस्टिक (एचडीओ) मालिका , वॉल्टर एम. स्पिंक द्वारे, जे. ब्रोंखोर्स्ट द्वारे संपादित, २७३-३३९. लीडेन: ब्रिल.
कॉलिन्स, मार्क. १९०७. "रघुवंश आणि दशकुमारचरिताचा भौगोलिक डेटा." अप्रकाशित डॉक्टरेट प्रबंध, तत्वज्ञान संकाय, लाइपझिग विद्यापीठ, लाइपझिग.
डीकॅरोली, रॉबर्ट. १९९५. "दंडिनच्या दशकुमाराचरिताचे विश्लेषण आणि वाकाटक आणि पल्लव न्यायालयांसाठी त्याचे परिणाम." जर्नल ऑफ द अमेरिकन ओरिएंटल सोसायटी , ६७१-६७८.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002c. दशकुमारचरित आणि अजिंठा लेण्यांची तारीख. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , ८०-९१. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
—. १९९२. "वाकाटक अधोगतीच्या संदर्भात अजिंठा लेण्यांची तारीख." महाराष्ट्र पथिक , जुलै: ८-१४.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002 ब. खानदेशातील वाकाटक राजवट. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , ६५-७९. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
देशपांडे, ब्रह्मानंद. 2002a. वाकाटक-त्रैकुटक संबंध. खंड. मी, ब्रह्मानंद देशपांडे लिखित एपिग्राफीच्या अभ्यासात , 54-64. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
देशपांडे, ब्रह्मानंद. 1996. वाकाटक नृपती हरिसेना: एक पुनर्मुल्यांकना. खंड. II, शोधमुद्रा मध्ये , ब्रह्मानंद देशपांडे, 29-41. औरंगाबाद : कैलास पब्लिकेशन्स.
ढवळीकर, एमके १९८४. पश्चिम भारतातील लेट हीनयान लेणी. पूना: डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट.
—. २००३. सांची, मोन्युमेंटल लेगेसी मालिका. नवी दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
दत्त, एन., संपादन १९४७-५०. [मुलासर्वास्तिवाद-विनय] गिलगिट हस्तलिखिते, द काश्मीर सिरीज ऑफ टेक्स्ट्स अँड स्टडीज, ७१. संस्कृत आवृत्ती. खंड ३. खंड ४. श्रीनगर.
फर्ग्युसन, जेम्स आणि जेम्स बर्गेस. १८८०. भारतातील गुहा मंदिरे. लंडन: डब्ल्यूएच ऍलन.
घोष, ए. १९६७. अजिंठा भित्तीचित्रे: रंगीत पंच्याऐंशी पुनरुत्पादनांचा अल्बम. प्रतिपादन १९८७, २००४. ए. घोष यांनी संपादित केले. नवी दिल्ली: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण.
ग्नोली, रानीरो, संपादन १९७७-७८. [मुलासर्वास्तिवाद-विनय] संघभेदावस्तुच्या गिलगिट हस्तलिखिते, मूलसर्वास्तिवादिनच्या विनयाचा १७ वा आणि शेवटचा भाग असल्याने, सेरी ओरिएंटेल ४९. दुसरा खंड. रोमा: आयएसआयएओ.
गोखले, शोभना. १९९२. "कान्हेरीवरून हरिषेणाच्या विजयावरील उपसंहारात्मक पुरावा." अजय मित्र शास्त्री, २६९-२७८ द्वारे लिहिलेले, द एज ऑफ द वाकाटकांमध्ये . नवी दिल्ली: हरमन पब्लिशिंग हाऊस.
गुगल इंक. २०१३. अक्षांश २०°३३'९.६२"उत्तर, रेखांश ७५°४२'०.६८"पूर्व. आवृत्ती ७.१.२.२०४१. ७ ऑक्टोबर. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी पाहिले.
गोयल, शंकर. २०१२. "वाकाटक अर्थव्यवस्थेच्या सामंती स्वरूपाची चौकशी: एपिग्राफिक पुराव्याचा अभ्यास." अध्यक्षीय भाषण: एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडियाची XXXVII वार्षिक काँग्रेस (२४-२६ फेब्रुवारी २०१२). बडोदा: एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि पुरातत्व आणि प्राचीन इतिहास विभाग, एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा. १-३१.
इंद्रजी, पंडित भगवानलाल. १८८१. वर्णनात्मक नोट्ससह पश्चिम भारतातील गुहा-मंदिरांमधील शिलालेख, आणि. भारतीय भारताचे प्रतिपादन, दिल्ली, १९७६. मुंबई: पश्चिम भारतातील पुरातत्व सर्वेक्षण, सरकारी मध्यवर्ती प्रेसमध्ये छापलेले.
जामखेडकर, एपी २००९. अजिंठा: स्मारकीय वारसा मालिका. नवी दिल्ली: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
—. १९९१. "अजिंठा येथील प्राध्यापक स्पिंकच्या कालक्रमानुसार काही विचार." महाराष्ट्र पथिक , एप्रिल.
जॉन्स्टन, ईएच, संपादन १९२८. द सौंदरानंद ऑफ अश्वघोष, पंजाब युनिव्हर्सिटी ओरिएंटल पब्लिकेशन्स मालिका. ईएच जॉन्स्टन यांनी अनुवादित. खंड चौदावा. लाहोर: द युनिव्हर्सिटी ऑफ द पंजाब. रिप्र. टोकियो १९७२, मोतीलाल बनारसीदास १९७५.
कन्नल, दीपक एच. १९९६. वेरूळ: शिल्पकलेच्या शैलीतील एक रहस्य. नवी दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
केर्न, हेंड्रिक जे., संपादन १८९१. जातक-माला, हार्वर्ड ओरिएंटल मालिका. रिप्र. केंब्रिज, मास. १९१४. खंड १. बोस्टन: हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
खंडाळवाला, कार्ल. 1990. “अजिंठ्याच्या महायान लेण्यांचा इतिहास आणि डेटिंग.” महाराष्ट्र पथिक , सप्टेंबर: 18-21.
खंडाळवाला, कार्ल. 1991. अजिंठा येथील लेणी 16, 17, 19, 26, 1 आणि 2 आणि घटोत्कच लेणीचा कालक्रम. खंड. मी, द आर्ट ऑफ अजंता: न्यू पर्स्पेक्टिव्हज मध्ये , रतन परिमू, दीपक कन्नाल, शिवाजी पणिककर आणि जयराम पोडुवाल यांनी संपादित, 105-129. दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
खोरोचे, पीटर, ट्रान्स. १९८९. एकदा बुद्ध एक वानर होते: आर्यसुराची जातकमला. शिकागो-लंडन: द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस.
कुल्के, हरमन. २००४. "पूर्वेकडील वाकाटकांखाली राज्य आणि राज्य निर्मितीवरील काही विचार." हान्स टी. बेकर, १-९ द्वारे लिहिलेल्या द वाकाटक हेरिटेज: इंडियन कल्चर अॅट द क्रॉसरोड्स मध्ये . ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टेन.
मालंद्रा, गेरी एच. १९९३. मांडला उलगडणे: वेरूळ येथील बौद्ध गुहा मंदिरे. न्यू यॉर्क: स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क.
मिराशी, VV 1960. दांडिनच्या दशकुमारचरितामधील ऐतिहासिक डेटा. खंड. मी, स्टडीज इन इंडॉलॉजी , व्ही. मिराशी यांनी संपादित, १६५-१७७. नागपूर : विदर्भ संशोधन मंडळ.
मिराशी, वि.वि., एड. 1963. वाकाटकांचे शिलालेख, कॉर्पस इंस्क्रिप्शनम इंडीकेरम सिरीज. खंड. व्ही. ओटाकमुंड: भारतासाठी सरकारी एपिग्राफिस्ट.
मित्रा, देबाला. १९९६. अजिंठा. ११ वा. नवी दिल्ली: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण.
नागराजू, एस. 1981. एस. बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया, सी. 250 बीसी - इ.स. AD 300. दिल्ली: आगम कला प्रकाशन.
निगम, एल एस. 2004. "छत्तीसगड (दक्षिणा कोसला) मधील वाकाटक कलेचा प्रभाव आणि विस्तार." इन द वाकाटक हेरिटेज: इंडियन कल्चर ॲट द क्रॉसरोड्स , हंस टी बाकर, 143-156. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टन.
रेवेन, एलेन एम. २००४. “किंग्ज इन कॉपर.” द वाकाटाका हेरिटेज: इंडियन कल्चर अॅट द क्रॉसरोड्स मध्ये , हंस टी बेकर, १९-३१. ग्रोनिंगेन: एग्बर्ट फोर्स्टेन.
रुएग, डेव्हिड सेफोर्ट. २००४. "(पूर्वीच्या) भारतीय महायानाच्या तपासाचे पैलू." जर्नल ऑफ द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज XXVII (१): ३-६२.
Sahapedia.org. 2015. अजिंठा लेणी: डॉ. राजेश कुमार सिंग प्रा. नाओमिची यागुची यांच्याशी संभाषणात. व्हिडिओ. फणी दमारा यांनी संपादित केले. Sahapedia.org. पुणे, २५ सप्टेंबर. आगामी.
शिफनर, अँटोन. १८७६-१८७८. "[मुलसर्वस्वाद-विनया] इंडिशे एर्झाहलुंगेन." बुलेटिन डी l'Académie impériale des Sciences de St.-Pétersbourg. खंड. XXI-XXIV. XXI: 433-93; XXII: 123-38; XXIII: 1-70, 529-65; XXIV: 449-508. प्रतिनिधी Übersetzungen aus dem tibetischen Kanjur, Sinologica Coloniensia series, XXV, Otto Harrassowitz Verlag, Weisbaden, 2007.
—. १८८२. [मुलासर्वास्तिवाद-विनय] भारतीय स्त्रोतांमधून घेतलेल्या तिबेटी कथा, ए. शिफनर यांच्या कहग्युरच्या, ट्रुबनरच्या ओरिएंटल मालिकेतील. डब्ल्यू. रॅल्स्टन यांनी अनुवादित. बोस्टन: जेम्स आर. ओसगुड अँड कंपनी रिप्र. १९२५, १९९०.
श्लिंगलोफ, डायटर. २०१३. अजिंठा: हँडबुक ऑफ द पेंटिंग्ज. तिसरा खंड. नवी दिल्ली: आयजीएनसीए आणि आर्यन बुक्स इंटरनॅशनल.
—. १९८७. अजिंठा चित्रांमधील अभ्यास: ओळख आणि व्याख्या. दिल्ली: अजिंठा प्रकाशने.
श्वार्ट्झबर्ग, जोसेफ ई., संपादन १९९२. दक्षिण आशियाचा ऐतिहासिक नकाशा. दुसरा. ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
शास्त्री, अजय मित्र. १९९१. अजंठाची नावे: आधुनिक आणि प्राचीन - पुनर्मूल्यांकन. खंड १, द आर्ट ऑफ अजंता: न्यू पर्स्पेक्टिव्हज मध्ये , रतन परिमू, दीपक कन्नल, शिवाजी पणिक्कर, जयराम पोडुवल आणि इंद्रमोहन शर्मा यांनी संपादित केलेले, ६७-७०. नवी दिल्ली: पुस्तके आणि पुस्तके.
—. १९९७. वाकाटक: स्रोत आणि इतिहास, भारतीय इतिहासाचे महान युग मालिका. नवी दिल्ली: आर्यन बुक्स इंटरनॅशनल.
सिंग, राजेश कुमार. २०१४. “अजिंठ्याचे पुरातन काळ: इतिहास, शिलालेख आणि प्रारंभिक कालक्रमानुसार विकासाशी संबंधित स्रोत आणि समस्या.” पीएचडी प्रबंध, कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र विभाग, ललित कला विद्याशाखा, एमएस विद्यापीठ बडोदा, बडोदा.
—. २०१२ब. अजिंठा लेण्यांचा परिचय: सहा लेण्यांच्या उदाहरणांसह. पहिला, पेपरबॅक. बडोदा: हरी सेना प्रेस.
—. २००९. "अजिंठा येथील शैलगृहांची गणना." जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई , १२२-१२६.
सिंग, राजेश कुमार. २००९. "अजिंठा लेण्यांच्या वाकाटक टप्प्याची तारीख निश्चित करण्यात काही राखाडी क्षेत्रे." आरडी चौधरी यांनी संपादित केले. कला: द जर्नल ऑफ द इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस, २००८-२००९ (इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस आणि शारदा पब्लिशिंग हाऊस) XIV: ६९-८५.
—. २०१२अ. "अजिंठा येथील गुहा २६-संकुलाचा प्रारंभिक विकास." दक्षिण आशियाई अभ्यास , ३७-६८.
—. २०१५c. “अजिंठा काळ - मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय पार्श्वभूमीचे पैलू.” Sahapedia.org. आगामी.
सिरकर, डीसी १९६५. क्रमांक ६३--हरिषेणाच्या काळातील अजिंठा गुहा शिलालेख. खंड १, निवडक शिलालेखांमध्ये , डीसी सिरकर, ४४९-४५५. कलकत्ता: कलकत्ता विद्यापीठ.
स्पेयर, जे. १८९५. जातकमल: बुद्धांच्या जन्मकथांचा हार, बौद्ध धर्मातील पवित्र पुस्तके मालिका. खंड १. लंडन: हेन्री फ्राउड. प्रतिपादन दिल्ली १९७१, १९९०.
स्पिंक, वॉल्टर एम. २००५-२०१४. अजिंठा: इतिहास आणि विकास मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केली. सातवा खंड. लिडेन: ब्रिल.
स्पिंक, वॉल्टर एम. २००६. अजिंठा बद्दल युक्तिवाद, अजिंठा: इतिहास आणि विकास मालिका - हँडबुच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केली. खंड II. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
—. 2007. गुहा बाय केव्ह: अजंता, इतिहास आणि विकास मालिका - हँडबच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. J. Bronkhorst द्वारे संपादित. खंड. V. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
—. २००९. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला वर्षानुसार: अजिंठा, इतिहास आणि विकास मालिका - हँडबुच डेर ओरिएंटलिस्टिक (एचडीओ) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केले. खंड. पाचवा. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
स्पिंक, वॉल्टर एम. १९९२. "अजिंठाचे यश." द एज ऑफ द वाकाटकस मध्ये , अजय मित्र शास्त्री यांनी संपादित केलेले, १७७-२०२. दिल्ली: हरमन.
—. २००५. सुवर्णयुगाचा शेवट: अजिंठा, इतिहास आणि विकास -- हँडबुक डर ओरिएंटलिस्टिक (HDO) मालिका. जे. ब्रोंखोर्स्ट यांनी संपादित केले. खंड १. आठवा खंड. लीडेन: ब्रिल.
Spink, Walter M., and Naomi Yaguchi. 2014. Defining Features, Ajanta: History and Development series. Edited by J. Bronkhorst. Vol. VI. VIII vols. Lieden: Brill.
Stadtner, Donald M. 2004. “Vidarbha and Kosala.” In The Vakataka Heritage: Indian Culture at the Crossroads, by Hans T Bakker, 157-165. Groningen: Egbert Forsten.
Stietencron, Heinrich von. 2004. “Questions Addressed to Walter Spink.” Chap. 8 in The Vakataka Heritage: Indian Culture at the Crossroads, edited by Hans T. Bakker, 107-108. Groningen: Egbert Forsten.
Suzuki, T., ed. 1955-61. [Mūlasarvāstivāda-Vinaya] The Tibetan Tripitaka, Peking Edition. Tibetan trans. Vols. XLI-XLIV. Tokyo-Kyoto.
Thapar, Romila. 2003. The Penguin History of Early India from the Origins to AD 1300. New Delhi: Penguin Books India.
UNESCO. 1992-2015. “Ajanta Caves.” UNESCO: World Heritage Convention. Accessed November 9, 2015. http://whc.unesco.org/en/list/242.
Vaidya, P. L. 1959. Buddhist Sanskrit Texts. 2nd ed. 1999. Vol. XXI. Darbhanga: The Mithila Institute.
Weiner, Sheila L. 1977. Ajanta: Its Place in Buddhist Art. Berkeley: University of California Press.
Yazdani, Gulam. 1952. Ajanta: Monochrome Reproductions of the Ajanta Frescoes Based on Photography, with an Explanatory Text by G. Yazdani and Appendices on the Painted and Incised Inscriptions by N.P. Chakravarti and B.Ch. Chhabra. Vol. IV. IV vols. London: Oxford University Press.
Zin, Monika. 2003. A Guide to the Ajanta Paintings: Devotional and Ornamental Paintings. Vol. II. II vols. Delhi: Munshiram Manoharlal Pvt. Ltd.
—. 2003. Ajanta: Handbook der Malereien - Devotional and Ornamental Malereien. Vol. I. II vols. Wiesbaden: Harrassowitz Verlag.
Zin, Monika, and Dieter Schlingloff. 2007. Samsaracakra: Das Rad der Wiedergeburten in der Indischen Uberlieferung. Dusseldorf: Ludicium Verlag.
Notes
[1] Archaeological Survey of India’s coordinates are slightly imprecise in the official guidebook, “Lat. 20°32’N and Long. 75°45’E” (Mitra 1996, 1), and quite incorrect on the official webpage that provides “75°40’N; 20°30’E” (Archaeological Survey of India 2011).
[2] Spink writes, ‘. . . like the ancient province of Asmaka just to the south, and Anupa to the north, ancient Risika, in which Ajanta was included, was already part of the extensive domains that Harisena inherited when he came to the power’ (W. M. Spink 2005, 7).
[3] Mirashi identifies the Aurangabad region as Mūlaka (Mirashi 1963, 124).
[४] मिराशीसाठी, 'मुलकाच्या दक्षिणेस अस्माका (आधुनिक अहमदनगर आणि भीर जिल्हे)' (मिराशी १९६३, १२४).
[5] तपशीलांसाठी, पहा (सिंग २००९).
[6] उदाहरणार्थ, पहा (मित्र १९९६, ५).
[७] भिक्षु बुद्धभद्र यांच्या दानशिलालेखासाठी पहा (छाबरा १९५२, ११४-१८).
[8] स्पिंकच्या काल्पनिक रेषा रेखांकनासाठी, पहा (सिंग २०१२अ, आकृती २६) आणि सिंगच्या ३डी स्केचसाठी, पहा (सिंग २०१२अ, आकृती ३५-३७).
[9] गुहा २६ शिलालेख, श्लोक ७-८ (छबरा १९५२, ११५).
[10] मित्रा लिहितात: 'ही [गुहा 6] एक दुमजली मठ आहे' (मित्र 1996, 36). हे तिर्यक सध्याच्या लेखकाने दिले आहे.
[11] सविस्तर अभ्यासासाठी, पहा (WM Spink 2007, 83-113) आणि (Singh 2014, खंड I, 330-48).
[12] इंग्रजी भाषांतरे दिलेल्या संदर्भांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दकोशांबद्दल वर्तमान लेखकाची समज दर्शवतात.
[13] गुहा २६ शिलालेख, विरुद्ध ६ (छबरा १९५२, ११५).
[१४] गुहा १६ शिलालेख, वि. २७ (मिराशी १९६३, १०९).
[१५] गुहा 16 शिलालेख, श्लोक 29, 32 (मिराशी 1963, 109).
[१६] गुहा १७ शिलालेख, वि. २४ (मिराशी १९६३, १२७).
[17] गुहा १२ शिलालेख, ओळ ३ (इंद्रजी १८८१, ६८) आणि (बर्गेस १८८३, ११६). फक्त उपा.... जतन केले आहे आणि शेवटचे अक्षर (अक्षरे) वाचता येत नाहीत. इंद्रजींचे उपासय (सं. उपाश्रय ) म्हणून वाचन नंतरच्या संपादकांनी स्वीकारले आहे.
[18] लेण्यांमधील शिलालेख १६, विरुद्ध २२ (मिराशी १९६३, १०९) आणि लेणी २६, श्लोक १४, १९ (छबरा १९५२, ११६).
[१९] गुहा 16 शिलालेख, वि. 25 (मिराशी 1963, 109).
[20] गुहा १२ शिलालेख, ओळ ३ (बर्गेस १८८३, ११६).
[२१] गुहा 17, श्लोक 24, 29 (मिराशी 1963, 127) आणि गुहा 16, वि. 31 (मिराशी 1963, 109) मधील शिलालेख.
[२२] गुहा 10 शिलालेख, ओळ 2. पूर्ण शिलालेख: धमदेवस . . . नस [।१] पसादा द[हा]नम् पवजितस [॥२], ' धमदेवसा . . . नस . . त्याग करणाऱ्यांसाठी' (कोहेन 2006, 296). लेखकाने पसादा पसादा असे शब्दलेखन केले आहे, जी संस्कृतमध्ये प्रासादची प्राकृत आहे . कोहेन यांनी जोडलेल्या नोट्समध्ये दाता धमदेवाच्या दाव्यातील अडचण ओळखली आहे की त्याने पसादा दान केला आहे . हा दावा खरा असू शकत नाही, कारण त्याच मंदिरात इतर देणगीदारांनी मंदिराचा काही भाग दान केल्याचे शिलालेख आहेत. त्यामुळे, धामदेवाने संपूर्ण पासदा दान केला असेल हे अकल्पनीय आहे .
[२३] गुहा 4, ओळ 1 (कोहेन 2006, 284) आणि गुहा 17, वि. 1 (मिराशी 1963, 124) मधील शिलालेख.
[२४] गुहा 17 शिलालेख, वि. 24 (मिराशी 1963, 127).
[25] गुहा 26 शिलालेख, विरुद्ध 13 (छबरा 1952, 116).
[26] गुहा १६ शिलालेख, विरुद्ध २४ (इंद्रजी १८८१, ७१) आणि (मिराशी १९६३, १०९). त्याच पानाच्या टीप ९ मध्ये, बर्गेस पुढे म्हणाले: 'हे [चैत्य-मंदिर] आता सापडत नाही: ते कदाचित संरचनात्मक आणि बाह्य असावे.' ही टिप्पणी आधुनिक इतिहासकारांच्या गैरसमजाचे प्रतिनिधित्व करते की चैत्य किंवा स्तूप या शब्दाचा अर्थ केवळ बुद्धाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे, मानववंशीय नाही. गुहा १७ शिलालेखातही, ' मुनिराजचैत्यम्' आणि ' स्तूपविहार' या शब्दांचा वापर स्पष्टपणे तेथे असलेल्या प्रतिमा मंदिराचा संदर्भ देतो. हे स्पष्ट आहे की अजिंठा बनवणाऱ्या लेखकांसाठी आणि प्रतीक (म्हणजेच तथाकथित स्तूप) आणि प्रतिमेमध्ये कोणताही भेदभाव, ध्रुवीयता किंवा प्रतिरूप नव्हता. प्रतीकात्मकदृष्ट्या देखील ही वस्तुस्थिती सर्वात स्पष्टपणे सिद्ध होते, कारण १९ आणि २६ गुहांमध्ये स्तूप आणि प्रतिमा एकाच कृत्रिम ऐक्यात एकत्र उभे आहेत.
[२७] गुहा 17 शिलालेख, वि. 22 (मिराशी 1963, 126).
[२८] गुहा 17 शिलालेख, वि. 27 (मिराशी 1963, 127).
[29] गुहा 26 शिलालेख, श्लोक 7-8 (छबरा 1952, 115, 117 पृ.7).
[३०] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३१] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३२] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[33] सुविथी या शब्दाचा अर्थ लांब पोर्च, रस्ता असाही होतो. दिलेल्या संदर्भात, मिराशीचे वर दिलेले भाषांतर सर्वात योग्य आहे.
[३४] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[35] वेदिका म्हणजे संदर्भानुसार अनेक गोष्टींचा अर्थ होतो: पवित्र वेदी, मंदिराच्या अंगणातील चतुर्भुज जागा, भिंतींनी झाकलेला इमारतीचा भाग, रेल, कठडा, कठडा इ. मिराशी त्याचे भाषांतर कठडा असे करतात (१९६३, १११). गुहेत दिसण्यासाठी कोणताही कठडा किंवा कठडा नाही. पोर्चच्या बाहेरील ओहोटीचा अर्थ देखील कठडा किंवा वेदिका असा करता येत नाही . म्हणून, संदर्भाचा अर्थ वर दिलेल्याप्रमाणेच असावा.
[३६] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[३७] गुहा 16 शिलालेख, ओळ 19, वि. 24 (मिराशी 1963, 109).
[38] गुहा १० शिलालेख (बर्गेस १८८३, ११६).
[39] गुहा १० शिलालेख (कोहेन २००६, २९६-९७).
[40] पूर्वीच्या फारशा संशोधनावर अवलंबून नसल्यामुळे, जेम्स बर्गेस लेण्यांशी डेटिंग करताना त्यांचे दुःख लपवू शकले नाहीत, ही डेटिंग अनेक दशकांपर्यंत टिकून राहणार होती: 'जर आपण लेण्या I, II, XVI, XVII, इत्यादींमधील चित्रांची सामान्यता सहाव्या शतकाशी जोडली तर आपण कदाचित फारसे चुकीचे ठरणार नाही, जे आपण काही रंगवलेल्या शिलालेखांमध्ये आणि व्यक्तिरेखांच्या नावांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वर्णमाला अक्षरांच्या शैलीवरून मिळवू शकतो. नंतरची चित्रे नंतर सातव्या शतकाची असू शकतात आणि लेण्या IX आणि XV मधील सुरुवातीची चित्रे कदाचित दुसऱ्या शतकाचीही असू शकतात - आंध्रभृत्य राजांच्या काळात, आमच्या काळातील पहिल्या तीन शतकांमध्ये बौद्ध धर्माचे महान संरक्षक' (बर्गेस 1880, 285).
[41] अलीकडील आढावासाठी, पहा (रुएग 2004, 5-18, 28-31).
[42] गेल्या काही दशकांमधील अनेक प्रकाशने अशा डेटिंग शैलीचे अनुसरण करतात. त्यांचा उल्लेख करणे इतके जास्त आहे.
[43] नागराजू यांनी सुरुवातीचा टप्पा सुमारे 220 BCE ते 100 BCE पर्यंत दिला आहे (नागराजू 1981, चार्ट v). यजदानी यांनी दुसऱ्या शतकातील सर्वात जुने काम असे वर्गीकृत केले आहे: 'अजिंठा येथील गुहेत चित्रकलेचे असे नमुने आहेत ज्यात शिलालेख आहेत जे तज्ञ शिलालेखकारांच्या मते एकमताने दुसऱ्या शतकाच्या मध्यात नियुक्त केले गेले आहेत. या सुरुवातीच्या उदाहरणांमध्येही चित्रकला बऱ्यापैकी विकसित झाली आहे आणि शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेचे सराव आणि सातत्य दर्शवते.' [(यजदानी 1952, 2)] ढवळीकर यांनी एकदा म्हटले होते की, 'सामान्यतः असे गृहीत धरले जाते की पश्चिम भारतातील हीनयान क्रियाकलाप दुसऱ्या शतकाच्या अखेरीस थांबला आणि 5 व्या शतकाच्या उत्तरार्धात महायानवाद्यांनी पुन्हा सुरू केला, जर आपण वॉल्टर एम. स्पिंक यांनी प्रस्तावित केलेल्या अजिंठा येथील लेण्यांच्या नंतरच्या गटासाठी कालक्रम स्वीकारला तर. सुमारे तीन शतकांच्या अंतरादरम्यान काय घडले हे माहित नाही.' [ (ढवळीकर १९८४, १)] श्लिंगलॉफच्या अजंठ्यावरील त्यांच्या महान कादंबरीच्या दोन विभागांच्या शीर्षकांवरून त्यांचे डेटिंग स्पष्ट होते : '१. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील चित्रे. २. इ.स.च्या पाचव्या शतकातील चित्रे' [ (श्ल्लिंगलॉफ २०१३, ३-४)]
[44] यापैकी काही पूर्वीच्या लेण्या पाचव्या शतकाच्या काळात तथाकथित 'अनाहूत' चित्रे, स्ल्टप्युअर्स, शिलालेख इत्यादी वापरून पुन्हा तयार करण्यात आल्या. यावरील तपशीलांसाठी, पहा (WM Spink 2006, 199-271).
[45] यापैकी, लेणी 9 आणि 10 मंदिरे आहेत आणि उर्वरित (लेणी 12, 13 आणि 15A) मठवासी निवासस्थाने आहेत. 2012 मध्ये आणखी एक गुहा अलीकडेच उघडकीस आली आहे. ही एक साधी गुहा आहे ज्यामध्ये कोणतेही चित्र, शिलालेख किंवा कोरीवकाम नाही. ही एक कोठडी आहे जी गुहा 26 च्या खाली नदीच्या पात्राजवळ ढिगाऱ्यात गाडली गेली होती (आकृती 9). ती प्रथम पीएचडी प्रबंधात समाविष्ट करण्यात आली होती (सिंग 2014, खंड II, आकृती 212-13), आणि तीच येथे प्रथमच प्रकाशित होत आहे. ती कोणत्या टप्प्याशी संबंधित आहे हे आम्हाला माहित नाही. प्रथमदर्शनी, ती आधीच्या टप्प्याशी संबंधित दिसते.
[४६] 'वासिठिपुतस कट हादिनो घरमुख दानम्' (बर्गेस १८८३, ११६); लाकडी दर्शनी भाग हे वशिथीच्या मुलाचे दान आहे (लेखकाचे भाषांतर).
[47] अमरावती आणि नागार्जुनीकोंडा व्यतिरिक्त, प्राचीन आंध्रदेशातील इतर अनेक कमी ज्ञात किंवा नव्याने शोधलेली बौद्ध स्थळे आहेत जी वेगवेगळ्या काळातील आहेत. अपुर्या अभ्यासामुळे, अजिंठा आणि या स्थळांचा संबंध सांगणे कठीण आहे. त्यापैकी काही आहेत अल्लुरु, अलुगुडू, बाविकोंडा, भाटीप्रौडू, चिन्नागंजम, चंदावरम, डौपडू, दहुडकाटा, वारिकामटा, गरिकामटा. Neḷakōṇḍapaḷḷī, Gudīvāḍā, Gajurabanda, Fanigiri, Uppuguṇḍuru, Pedoganjam, Rama Tirtham, Sankram, Salihundam, and तोलाकोंडा.
[48]उत्तर भारत आणि उत्तरेकडील महामार्गांना उत्तरापथ म्हणून ओळखले जात असे. दक्षिण भारत आणि दक्षिणेकडील महामार्गांना दक्षिणापथ म्हणून ओळखले जात असे.
[49] यजदानीला वाटले की अजिंठा येथील विकास हा एक सततचा व्यवहार होता: 'इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून ते इ.स.पू. पाचव्या शतकापर्यंतच्या तंत्राच्या विकासाची सततची कहाणी सांगणाऱ्या नवव्या आणि दहाव्या लेण्यांमध्ये नमुने आहेत.... चौथ्या किंवा पाचव्या शतकापर्यंत अजंठ्यात निळ्या रंगाचा पूर्णपणे अभाव आहे' [(यजदानी १९५२, २)] '.... हे चित्र [गुहा दहावा, षडदंत जातक] कदाचित तिसऱ्या शतकातील आहे.... [श्याम जातक] हे तिसर्या शतकातील इसवी सनाच्या शेवटच्या तिमाहीपासून ते चौथ्या शतकाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत, म्हणजेच वाकाटकांच्या सार्वभौमत्वाच्या अगदी आधीच्या काळापर्यंतच्या काळातले असू शकते...' [(यजदानी १९५२, ३)] तारीख पुन्हा पृष्ठावर आढळते. १, 'चौथ्या आणि पाचव्या शतकात, वाकाटक राजांच्या प्रबुद्ध संरक्षणाखाली, अजिंठा बौद्ध धर्म आणि कलांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले...' [(यजदानी १९५२, १)] पृष्ठ २ वर, यजदानी सहाव्या शतकातील विकासाबद्दल बोलतात, परंतु सातव्या शतकातील कोणत्याही विकासाला नकार देतात: 'शाही संरक्षणाच्या अभावामुळे, सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अजिंठा येथील कला वेगाने कमी होऊ लागली आणि अजिंठा येथे कोणताही विहार किंवा चैत्य नाही , जो निश्चितपणे सातव्या शतकातील आहे असे म्हणता येईल' [(यजदानी १९५२, २)]
[50] उदाहरणार्थ, पहा (श्लिंगलॉफ २०१३, ३-४). मोनिका झिन लिहितात, 'अजिंठा येथील मठांचे संकुल, जे इ.स.पू. पहिल्या शतकात आणि इ.स.च्या पाचव्या शतकात बांधले गेले होते , ते आज आपल्यासाठी खूप वेगळे वाटते...' (झिन २००३, १).
[51] स्पिंकच्या कल्पनांवरील प्रश्न आणि टीकांसाठी, खंडाळावाला [(1990), (1991)], देशपांडे [(1992), (1996), (2002a), (2002b), (2002c)], जामखेडकर (1991), शास्त्री (1997, xii, 209), बेकर (1997, 37 क्रमांक 127), आणि स्टीटेनक्रॉन (2004) पहा. त्यापैकी बरेच स्पिंकच्या उत्तरांसह (WM स्पिंक 2005) मध्ये पुनरुत्पादित केले आहेत.
[52] पहा (बेकर 1997, 34).
[53] पहा, सिंग [(2009), (2012a, 37), (2012b, 28), (2014, 25)].
[54] सुरुवातीच्या भारतीय इतिहासावरील एका प्रमुख पुस्तकात (थापर २००३) हरिषेणाचा उल्लेख नाही.
[55] सध्याचा लेख हा पाचव्या शतकातील अजिंठा काळातील राजकीय परिस्थितीचा केवळ एक आराखडा आहे. त्यातील मजकूर सध्याच्या संशोधनावर आधारित आहे ज्यामध्ये शिलालेखनाचा नवीनतम संग्रह, जागेवरील पुरातत्वीय पुरावे, नाणेशास्त्र, प्रतिमाशास्त्र, साहित्यिक आणि मजकूर स्रोत, इतिहासलेखन आणि संबंधित ऐतिहासिक साहित्याचा अनुमानात्मक शोध यांचा समावेश आहे. जर लेखकाच्या लक्षात कोणतीही महत्त्वपूर्ण चूक आली तर तो लागू असेल तेथे ती चूक पुन्हा तपासण्यास आणि दुरुस्त करण्यास तयार आहे.
[56] हरिषेणाच्या थाळनेर ग्रँटनुसार, राजाला 'महाराज' ही पदवी होती (शास्त्री १९९७, ११२). उल्लेखनीय म्हणजे, वंध्यशक्ती प्रथमला सम्राट आणि धर्म-महाराज ही पदवी होती; प्रवरशेण प्रथमला धर्म-महाराज आणि हरितीपुत्र ही पदवी होती. हरिषेणसह उर्वरित राजांना फक्त महाराज असे संबोधले जाते.
[57] वॉल्टर एम. स्पिंक यांच्या मते, हरिषेणाने सुमारे इसवी सन ४६० ते सुमारे ४७७ पर्यंत राज्य केले ( (डब्ल्यूएम स्पिंक २००६); (डब्ल्यूएम स्पिंक २००५-२०१४)). हान्स टी. बेकर यांनी याला मान्यता दिली आहे: 'आम्ही स्पिंक यांच्याकडून असे गृहीत धरतो की देवसेनाचा मुलगा हरिषेण सुमारे इ.स. ४६० मध्ये वत्सगुल्मच्या सिंहासनावर बसला' (बेकर १९९७, ३४). यजदानी आणि मिराशी यांनी थोड्या वेगळ्या तारखेचा प्रस्ताव मांडला होता: 'प्रसिद्ध इतिहासकारांच्या मते राजा हरिषेण (व्हीव्ही मिराशी, हैदराबाद पुरातत्व मालिका , क्रमांक १५, पृष्ठ ३), इ.स. ४७५-५०० या काळात भरभराटीला आला' (यजदानी १९५२, १).
[58] ग्रोनिंगेन ओरिएंटल स्टडीज कोलोक्वियम ऑन द वाकाटक (ग्रोनिंगेन ६-८ जून २००२) मध्ये, असे समेट करण्यात आला की वाकाटकांच्या दोन शाखांना सोयीस्करपणे पूर्व वाकाटक आणि पश्चिम वाकाटक असे संबोधले जाऊ शकते, जिथे वाकाटकांची राजधानी नंदीवर्धन (नागर्धन, तालुका रामटेक , जिल्हा नागपूर) येथे होती आणि नंतरची राजधानी वत्सगुल्मा (जिल्हा वाशिम) येथे होती. पहा (कुलके २००४, ३).
[59] अजिंठा येथील काही दान शिलालेखांमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की देणग्या संघासाठी होत्या . परंतु बहुतेक दान शिलालेखांमध्ये देय धर्मो देय धर्ममो (धर्माला दान) हा वाक्यांश वापरला आहे. संघ आणि धर्म हे त्रिरत्नाचे भाग आहेत , म्हणजेच बौद्ध त्रिमूर्ती: बुद्ध, धर्म आणि संघ. बौद्ध कला आणि पुरातत्वशास्त्रात त्रिरत्नाची प्रतिमा पद्धतशीरपणे दर्शविली गेली आहे, अजिंठा याला अपवाद नाही. शिलालेख आणि प्रतिकात्मक चित्रण असे दर्शविते की अजिंठा येथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संघाची उपस्थिती असावी, हा मुद्दा विद्वत्तामध्ये दुर्लक्षित केला जातो. हा मुद्दा एका प्रश्नाकडे नेतो. जर तेथे संघ असता तर मठाच्या विकासात आणि कार्यात त्याची भूमिका काय होती?
[६०] वराहदेवाच्या शिलालेखांसाठी पहा (मिराशी १९६३, १०३-११९).
[61] स कुन्तलावन्तिकलिङ्गकोसलत्रिकूटलाटान्ध्र[परान्त] जानिमान [।] U - U - - U U शौर्यविश्रुतानपि स्वनिर्देशगुणाति - U – [18 ||]; sa kuntalāvantikaliṉgakōsalatrikūṭalāṭāndhra[parānta] jānimān [|] U – U — U - U śauryaviśrutānapi svanirdeśaguṉāti – U – [18||] [ (Mirashi 1963, 108)]. Sircar reads शौर्यविश्रुतान् as –U नैरधृतान् (1965, 453); परान्त parānta is supplied by Gokhale (Gokhale 1992).
[62] Kuntala = Kannada country, district round Banavāsi. Avanti = western Mālwā, capital Ujjain. Kalinga = the country between Mahānadī and Godāvarī; in the narrow sense = Purī-Ganjam region of Orissā. Kōsala = South Kosala = modern Chattisgaḍh and adjoining parts of Orissa, including Rājpur-Sambalpur-Bilāspur region. Trikūṭa = country to the west of Nāsik. Lāṭa = central and southern Gujarāt, between Mahi and Tāpi; Nausāri-Bharuch region. Āndhra = the Telugu speaking country to the south of Godāvarī. Aparānta = the northern Koṇkan. [ (Sircar 1965, 453, n. 2) and (Mirashi 1963, 107)]
[63] V. V. Mirashi in CHI, III, Part I, p. 144. See also CII, V, p. xxxi. Vide for a somewhat exaggerated account, Vākāṭaka Nṛipati āni Tyānchā Kāla, p. 59. [Note in original.]
[64] Walter M. Spink, “The Achievements of Ajanta”, AV, p. 117. [= (W. M. Spink 1992, 117); note in original.]
[65] On the subject of the disputed verse 18 of Varāhadeva’s donative inscription, Bakker offers a reconostructive or conjectural reading for supplying a sense for the missing words: ‘He [i.e. Hariṣeṇa], [stands above] these foreign kings of Kuntala, Avantī, Kalinga, Kōśala, Trikūṭa, Lāṭa, and Āndhra, renowned fro their valour and courage, their own names […]’. [ (Bakker 1997, 35)]
[66] See Deshpande [ (Deshpande 1992), (Deshpande 1996), (Deshpande 2002c), and (Deshpande 2002b)].
[67] For the donative inscription of Cave 17, see (Mirashi 1963, 120-129).
[68] For the donative inscription of Cave 20, see [ (Indraji 1881, 76-77), (Burgess 1883, 132)].
[69] Author’s transliteration in Devanāgarī.
[70] For the Cave 4 inscription, see (Cohen 2006, 284).
[71] For the changing contours of Āryāvarta and Greater Magadha, see (Bronkhorst 2007).
[72] For the contours of Greater Magadha, see (Bronkhorst 2007, 1-9).
[73] वाकाटकांनी नाणी काढली की नाही यावर वाद आहे. १९९७ मध्ये, शास्त्रींनी नाण्यांचा एक संग्रह प्रकाशित केला (१९९७, १३६-१४६) जो त्यांनी वाकाटकांचा म्हणून ओळखला. एलेन एम. रेवेन (२००४) यांनी या संग्रहाचा अधिक अभ्यास केला. तथापि, शंकर गोयल मानतात की हा संग्रह बनावट आहे (२०१२, ४, ७-१४). गोयल असा युक्तिवाद करतात की वाकाटकांमध्ये मोठ्या शहरीकरणाशिवाय सामंतवादी समाजशास्त्रीय व्यवस्था होती. ते पूर्वसुरी आणि समकालीनांच्या गायी किंवा स्वस्त धातूच्या नाण्यांचा वापर करत होते.
[74] ब्राह्मणवाद हा शब्द हिंदू धर्माइतकाच समस्याप्रधान आहे. पहिला शब्द रिडक्शनिझमपासून उद्भवतो; तो पारंपारिक वर्ण -आधारित भारतीय समाजशास्त्र बनवणाऱ्या चार वर्णांपैकी एकाचा 'वाद' दर्शवतो ; तो इतर तीन अनिर्दिष्ट ठेवतो. तर नंतरचा शब्द कालबाह्य आहे. रोमिला थापर अधिक चांगल्या प्रकारे सांगतात: 'या टप्प्यावर [प्रारंभिक भारत] हिंदू धर्म हा सामान्य शब्द वापरणे ऐतिहासिकदृष्ट्या एक कालबाह्य आहे. इसवी सनाच्या पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीस "हिंदू" हा शब्द वापरला जात नव्हता आणि आज आपण ज्याला 'हिंदू' पंथ म्हणतो त्याचे समर्थक होते त्यांनी त्यांचा धर्म ओळखण्यासाठी त्यांच्या सांप्रदायिक लेबल्सचा वापर केला. म्हणून, त्यांनी स्वतःला वैष्णव आणि शैवांच्या व्यापक लेबल्स किंवा त्यांच्यामध्ये, भागवत, पशुपत इत्यादींच्या संकुचित लेबल्सने ओळखले. धार्मिक ओळखीची जाणीव पंथाची होती, प्रत्येक पंथाचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक धर्माची नव्हती.' [(थापर २००३, २७५)]
[७५] पहा (बेकर १९९७) आणि (बेकर २००४).
[७६] पूर्ण श्लोक असा आहे: '. . . . नत्यद्भुतपुण्यराशिः [|*] चक्रे भुव स्तूपविहारभूषां दानोदयैश्चार्थिजनप्रमोदम् || [२२||*]; . . . natyadbhutapuṇyarāsih [|*] चक्रे भुव स्तुपविहारभूषाम दानोदयेशाचाार्थिजनप्रमोदम् || [२२||*]; . . . ज्याच्याकडे गुणवत्तेचे अद्भूत भांडार आहे. . . . स्तूप आणि विहारांनी पृथ्वी सुशोभित केली आणि (त्यावर) भेटवस्तू देऊन विनवणी करणाऱ्यांचा आनंद दिला.' [ (मिराशी १९६३, १२६, १२९)]
[77] नदीच्या पलीकडे अजिंठा येथेच एक विटांचा मठ होता. २०१२ मध्ये, वर्तमान लेखकाने अजिंठा लेण्यांपासून काही किमी अंतरावर असलेल्या फर्दापूरला लागून असलेल्या ठाणा गावात एका प्राचीन विटांच्या बांधकामाचा पाया पाहिला. ही सूचना आम्हाला गुंफा १२ च्या शिलालेखाशी ठणा गावाचा संबंध जोडण्यास सक्षम करते: 'थानको देयधम्मम घनामदस वणिजस सौवरको सौपा [सथो], ठणको देयधामम घनामददमदम, सौव्रसौप्य [सौव] सौवांची भेट . घनामदडा [ टहानाचा ] व्यापारी [ (बर्गेस आणि इंद्रजी 1881, 68) ; (बर्गेस 1883, 116)]. घाटकच येथे मला पाचव्या शतकातील विटा घाटाच्या वरच्या शेतात विखुरलेल्या आढळल्या आहेत . तिथेही एक विटांचे मठ असावे, जे नष्ट झाले आहे. वेरूळ येथे विटांच्या इमारती होत्या; त्यापैकी काही आजही दिसतात. त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशाप्रकारे, लाकूड, दगड आणि विटांनी बनवलेले अनेक मठ होते जे नष्ट झाले आहेत. असे म्हणता येणार नाही की दगडात कोरलेले मठ एकमेव प्रकारचे होते. फा-हियान आणि झुआनझांग यांनी भेट दिलेल्या प्रत्येक प्रदेशात अनेक मठांचा उल्लेख केला आहे.
[78] १८८० मध्ये, जेम्स बर्गेस यांनी वेरूळच्या बौद्ध लेण्यांचे वय ३५०-५५० CE (फर्ग्युसन आणि बर्गेस १८८०, ३६८) असे सांगितले. १८८३ मध्ये, त्यांनी त्या ४५०-७०० CE (बर्गेस १८८३, ४) च्या असल्याचे सांगितले. यजदानी यांनी ते सातव्या शतकातील असल्याचे सांगितले: 'सातव्या शतकात उत्खनन केलेल्या वेरूळच्या बौद्ध मंदिरांवर दक्षिण भारतातील ब्राह्मणी स्थापत्यकलेचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो...' [(यजदानी १९५२, २)] गेरी एच. मलांद्रा यांनी यजदानीच्या तारखेचे बारकाईने पालन केले: 'हे स्थळ [वेरूळ] तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विकसित झाले, एक प्रारंभिक ब्राह्मणकालीन टप्पा ( सुमारे ५५० ते ६००), एक बौद्ध टप्पा ( सुमारे ६०० ते ७३०), आणि शेवटचा टप्पा ( सुमारे ७३० ते ९५०), ज्यामध्ये वेरूळचे एकमेव ज्ञात प्राचीन संरक्षक राष्टकूट राजवंशाने प्रायोजित केलेले ब्राह्मण आणि जैन उत्खनन दोन्ही समाविष्ट होते.' [(मलांद्रा १९९३, ५)] तथापि, दीपक कन्नल यांनी ते सहाव्या शतकातील असल्याचे सांगितले आहे (कन्नल १९९६, १३०). वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा इतिहास सातव्या शतकातील असल्याचे सांगताना स्पिंक बर्गेस, यझदानी आणि मलांद्राच्या जवळ आहे (स्पिंक, वैयक्तिक संवाद).
[79] दंडीनच्या दशकुमारचरिताच्या आठव्या अध्यायाला विश्रुतचरित म्हणतात. दंडीनच्या इतर कामांप्रमाणे हा अध्यायही काल्पनिक शैलीत लिहिलेला आहे. तथापि, या काल्पनिक कथेचे कथानक काही प्रमाणात वास्तविक ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचे दिसून येते. या घटना वाकाटक राजवंशाच्या हळूहळू पतनाच्या होत्या. दंडीनने ऐतिहासिक व्यक्तिरेखांची नावे बदलली आहेत आणि त्याव्यतिरिक्त चरिताच्या ( अलंकृत चरित्र) उद्दिष्टांना अनुकूल असे अनेक नाट्यमय आणि काल्पनिक घटक सादर केले आहेत. तरीही, विवेकी नजरेला, संबंधित ऐतिहासिक आणि भौगोलिक डेटा सापडू शकतो, विशेषतः अजिंठा आणि वाकाटकांशी संबंधित इतर ऐतिहासिक स्त्रोतांच्या पुरातत्वीय पुराव्यांसह अभ्यासल्यास. या मताच्या बाजूने असलेले इतिहासकार कॉलिन्स (१९०७), मिराशी [(१९६०), (१९६३)], (डब्ल्यूएम स्पिंक २००५, ११९-१६२, १६९-१७८, ३९३-४११), आणि (डीकॅरोली १९९५) आहेत. हा विषय वादग्रस्त आहे. वादाच्या आढावासाठी, पहा (सिंग २००९, ७२-७६).
[80] पहा (सिंग २०१५c).
[81] (स्पिंक, वैयक्तिक संवाद) आणि (मालंद्र 1993, 123) यांनी सुचविले.
[82] यजदानी यांनी असे निरीक्षण केले की 'सहाव्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत दख्खनच्या सार्वभौमत्वात वाकाटकांनंतर आलेले चालुक्य कदाचित त्यांच्या पूर्वसुरींइतके बौद्ध धर्माला अनुकूल नव्हते, जरी चालुक्यांनी त्यांच्या राजधानी बदामी येथे बांधलेली तीर्थक्षेत्रे मोठ्या प्रमाणात बौद्ध विहारांमधून कॉपी केलेली आहेत . ' [ (यजदानी १९५२, २)]
[८३] बहुश्रुतः हा शब्द बुद्धभद्राच्या समर्पित शिलालेखात आढळतो. आम्हाला आश्चर्य वाटते की ते मुख्य प्रवाहातील बौद्ध धर्मातील अठरा निकायांपैकी एकाशी संबंधित आहे का . छाबरा यांनी त्यांच्या श्लोकाच्या भाषांतरातून हा शब्द सोडला आहे असे दिसते: 'यो बुद्धशासनिम् समबुद्ध्य) भिक्षुर्व्ययसभिनवेभिजनोपपन्नः [। [१६ ॥*], 'यो बुद्धशासनगतं समबुद्ध्य जातो भिक्षुर्व्य(र्व्वा)यस्यभिनवेभिजनोपपन्न[ह |*] बहुश्रुत: श(ई)लविशुद्धचेता (लोकास्य मोक्षया कृ)ताधिकारः || (१६ ||*), जो एका कुलीन कुटुंबात जन्मला होता, ज्याचे मन धार्मिक आचरणाने शुद्ध झाले होते ( लोकांना मुक्तीच्या मार्गावर नेण्यास सक्षम होते ), बुद्धांच्या शिकवणींचा मार्ग पूर्णपणे आत्मसात करून, तो त्याच्या लहानपणीच भिक्षू बनला.' [(छब्र १९५२, ११६, ११८, वि. १६)]
[८४] पहा (श्लिंगलॉफ 2013) आणि (झिन आणि श्लिंगलॉफ 2007).
[८५] मूलसर्वास्तिवाद-विनयासाठी , श्लिंगलॉफ यांनी जर्मन आवृत्ती उद्धृत केली. (Schiefner 1876-1878) = इंजि. ट्रान्स. (Schiefner 1882), Snk. एड (दत्त 1947-50), टिब. एड (सुझुकी 1955-61), इंजि. एड (ग्नोली 1977-78).
[८६] आर्याशुराच्या जातकमालासाठी , श्लिंगलॉफ इतर गोष्टींसह (केर्न १८९१), (स्पेयर १८९५), (वैद्य १९५९), (खोरोचे १९८९) उद्धृत करतात.
[८७] अश्वघोषाच्या सौंदरानंदसाठी , श्लिंगलॉफ इतर गोष्टींबरोबर (जॉन्स्टन १९२८) उद्धृत करतात.
[८८] 'सिद्धम् देयधर्ममो यम शाक्यभिक्षो म अपरशैल… नियस्य मातापितृ…, सिद्धम देयधर्ममो-यम शाक्यभिक्षो म अपारशैला.i… न्यास्य मातापित्रि...' [३६]
[८९] 'शाक्यभिक्षो म अपरशैलनिकायस्य' [(कोहेन २००६, ३३१)]
[९०] 'शाक्यभिक्षो[र]-म[हा]यान… [नियस्य मातापितृ]…, शाक्यभिक्षो[आर*]-मा[हा]यान [नियास्य माता-पितृ]… ' [ (चक्रवर्ती १९५२, ११२)]
[९१] 'विपश्वी सम्यकसम्बुद्ध चेतिक[…]रिकस्य [|*], vi(pa)śv(i) samya(k)saṁbu(ddhaḥ) cetika.rikasya. ' [(कोहेन 2006, 304)]
[92] अजिंठा येथील तथाकथित 'अनाहूत' प्रतिमांच्या तपशीलवार अभ्यासासाठी, पहा (WM Spink 2006, 116 ff.).
[93] शास्त्री (१९९७, २०९-२१०).
[94] स्पिंकचे खंड पहा (डब्ल्यूएम स्पिंक २००५-२०१४). लेणी १, २, १६ आणि १७ शी संबंधित काही अतिरिक्त पुराव्यांसाठी, पहा (सिंग २०१२ब); लेणी २६ साठी, पहा (सिंग २०१२अ).
[९५] अजिंठा गुहा १६ शिलालेख, वि. १७, पहा (मिराशी १९६३, १०८, ११०)]. घटोत्कच गुंफा शिलालेख, वि. १३, पहा (मिराशी १९६३, ११७, ११९). अजिंठा लेणी 17 शिलालेख, विरुद्ध 21, पहा (मिराशी 1963, 126, 129). तसेच, पहा (बर्गेस 1883, 128).
[96] यजदानीलाही असे वाटले की वाकाटक बौद्धांचे समर्थन करतात; तेव्हा त्याला हे फारसे माहित नव्हते की बौद्धांना संरक्षण देणारे केवळ हरिषेण होते, संपूर्ण वाकाटक राजवंश नाही. यजदानीच्या शब्दात सांगायचे तर: 'बौद्ध श्रद्धा आणि कलेच्या प्रसाराला वाकाटक राजांनी दिलेला पाठिंबा हस्तीभोज आणि त्याचा मुलगा वराहदेव यांच्या धार्मिक उत्साहामुळे मिळाला असावा, राजवंशातील शेवटचे दोन राजे, देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि ज्यांची नावे अजिंठा येथील गुहेतील XVI आणि परिसरातील घटोटकाच येथील विहारातील शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत (सं. ३: व्ही. मिराशी, हैद्राबाद पुरातत्व मालिका, क्रमांक १४, पृष्ठ २, आणि घटोटकाच शिलालेख , पृष्ठ ८-१७).' [ (यजदानी १९५२, १)]
वाकाटक घराणे : महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा पण सन २५०च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.
प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.
पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता. दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत. नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली. विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंधनामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.
द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावलेआणि आपली सत्ता मध्यभारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.
वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजयनामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ च्या सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.
सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते पण प्रभावती – गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्याठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे. वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.

अजिंठ्याच्या क्रमांक सोळा, सतरा, व एकोणीस या गुहात स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने असून गुहा क्रमांकसोळा या लेण्यातील अवशिष्ट लेखात, हे लेणे वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याने आपल्या मातापित्यांच्या पुण्योपचयाकरिता खोदविले आणि शिल्पचित्रांनी सुशोभित करून ते बौद्ध भिक्षुंना दान केले, असा मजकूर आहे. या लेखात वत्सगुल्मच्या वाकाटकांची पूर्ण वंशावळ आली आहे. या लेण्यातील सर्व भित्तींवर गौतम बुद्धाच्या जन्मातील अनेक प्रसंगांची चित्रे काढली होती. त्यांतील काही कालौघात खराब झाली असली, तरी अनेक सुस्थितीत आहेत.
या लेण्यातील प्रलंबपाद आसनातील बुद्धाची भव्य मूर्ती, मकरवाहन, गंगेची मूर्ती, गंधर्व-अप्सरांची मिथुन शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण असून गौतम बुद्धाच्या चरित्रातील घटनांना अनुलक्षून क्रमाने ती काढली आहेत. चित्रांतील गौतमाची ज्ञानप्राप्ती, अवकाशगामी अप्सरा,नंदाचा धर्मप्रवेश इ. चित्रे लक्षणीय असून त्यांची स्तुती अनेक कलाकोविदांनी मुक्त कंठाने केली आहे. बुद्धाचा मावसभाऊ नंद याने भिक्षू होण्याचे ठरविल्यावर त्याचा सेवक त्याचा मुकुट घेऊन त्याची पत्नी सुंदरी हिच्याकडे येतो. तेव्हा सुंदरी हताश होऊन मरणोन्मुख होते. या ग्लानी येऊन मूर्च्छित झालेल्या सुंदरीचे चित्र कला इतिहासातील एक अप्रतिम कलाकृती आहे. याशिवाय येथे हस्तिजातक, महाउग्मगजातकादी कथांतील प्रसंग चित्रित केलेले आहेत. स्त्रियांच्या गळ्यांतील अलंकार, बोटांतील अंगठ्या, हातांतील बांगड्या आणि केशरचनेचे विविध प्रकार ह्यांतून तत्कालीन दागिन्यांचे नमुने आणि सौंदर्यप्रसाधनांची साधने दृग्गोचर होतात.

लेणे क्रमांक सतरा हे ॠषिक राजाने आपल्या भावाच्या स्मरणार्थ खोदले असावे, असे एक मत आहे. हे लेणे प्रामुख्याने बौद्ध भिक्षुंच्या निवासासाठी खोदलेला विहार असून हरिषेणाच्या एका मांडलिकाने ते दान केल्याची माहिती या लेण्यातील लेख सांगतो. या लेण्यात मुख्यत्वे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या जातककथांतील सुंदर चित्रे आहेत. त्यात मानवी सद्गुणांच्या कथांवर अधिकतर भर दिला असून ओवरीच्या छतांवर पुष्पालंकाररचना चितारलेल्या आहेत. ओवरीच्या मागील बाजूस भिंतीवर विश्वंतर जातकातील कथा चित्रित केली आहे. या ठिकाणी विश्वंतर भिक्षा देत असून ती स्वीकारण्यासाठी अनेक याचकांनी गर्दी केली आहे, असे दाखवून चित्रकाराने त्याचे व त्याच्या पत्नीचे वनवासगमन, आकाशातून उडत येणारा इंद्र व त्याच्या अप्सरा यांची अत्यंत मनोवेधक चित्रे चितारलेली आहेत. पडवीच्या प्रवेशद्वाराजवळ छद्दंत जातककथेतील चित्रे असून त्यांत कोचावरील राणी, तिच्या दास-दासी, जवळचे प्रशांत सरोवर, सहा दातांचा हत्ती, व त्याच्या पाठीवरील लांडगा इ. चित्रे आहेत. या लेण्यात महाकपी, हंस, विश्वंतर, सुत्तसोम इ. जातककथांतील प्रसंग चित्रित केले आहेत. बुद्धाचे महाबोधी प्राप्तीनंतरचे चित्र त्यांतील शांत, तेजस्वी भावांमुळे उठून दिसते, तर बुद्धाचे स्वागत करणारी पत्नीयशोधरा व मुलगा राहुल हे चित्र त्यांतील करूणरसांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
गुहा क्रमांक एकोणीस ही येथील चार चैत्यलेण्यांपैकी एक चैत्य असून तेथे प्रामुख्याने कोरीवकाम आढळते. या गंधकुटीतील स्तूपात दोन स्तंभांवरील कमानींत बुद्धाची उभी मूर्ती खोदली आहे. या चैत्यात दोन लहान मंदिरे असून उजव्या गर्भगृहात वर्तुळाकार स्तंभ असेल, तरी त्यांची स्तंभशीर्षे चौकोनी आहेत. मंदिराच्या मागील भिंतीवर प्रलंबपाद आसनातील एक बुद्धाची मूर्ती आहे. चैत्यगवाक्षाच्या दोन्ही बाजूंस यक्षमूर्ती खोदल्या असून भिंतींवर बुद्ध प्रतिमा रंगविल्या आहेत. येथे अनेक मिथुन मूर्तीही आहेत. क्रमांक सतराप्रमाणेच येथे बुद्ध, यशोधरा व राहुल यांची चित्रे आहेत. त्याच्या उजवीकडे भिक्षा मागणारा बुद्ध, नागराज, त्याची राणी इत्यादींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. स्तूपाचा आकार अर्धअंडाकृती आहे. यातील सर्व कोरीवकाम दगडात आहे. तज्ञांच्या मते हे लेणे भारतातील बौद्ध कलेचा सर्वागपूर्ण असा अत्युत्कृष्ट आविष्कार आहे.
अजिंठ्याच्या पश्चिमेस सु. सोळा किमी. वर जंजाल गावाजवळ घटोत्कच या नावाने प्रसिद्ध असलेली तीन विहार-लेणी होती. त्यांपैकी दोन अवशिष्ट आहेत. हरिषेणाचा मंत्री वराहदेव याने ती खोदून घेतली, असे तेथील लेखात म्हटले आहे. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला एक खंडित लेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवातीपासूनची वंशावळ दिली आहे. मोठ्या लेण्याच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आहे. तीत उभ्या बुद्धमूर्ती, मिथुने कोरलेली असून छावणीच्या उंचीवर दोन्ही बाजूस एक-एक देवता आहे. आतील मंडपात चैत्य मंदिर आहे. अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ‘ये धर्मा हेतुप्रभवः’ असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही.
वरील लेण्यांव्यतिरिक्त वाकाटकांनी काही मंदिरे बांधली. त्यांपैकी रामटेक येथील श्रीरामचंद्राचे, प्रवरसेनाने बांधलेले प्रवरेश्वराचे, अश्वत्थखेटकातील विष्णूचे आणि दुसऱ्या प्रवरसेनाने बांधलेले श्रीरामचंद्राचे उत्तुंग मंदिर ही प्रसिद्ध आहेत. ही बहुतेक सर्व मंदिरे अभिलेखशेष झाली आहेत मात्र त्यांचे भग्न अवशेष आढळतात. या अवशेषांत रामटेक येथील वराह दरवाज्याच्या ईशान्येस एक भग्न अवस्थेत मंदिर आहे. तेथे फक्त जीर्ण लहान मंडप असून त्याचे छत सपाट आहे. त्याला सहा स्तंभ असून चारांवर पद्मबंधक खोदलेले आहेत. त्याच्या शेजारी चतुर्भुज त्रिविक्रमाची सुंदर मूर्ती भग्नावस्थेत आहे. तिच्या शिरावर किरीटमुकूट असून सभोवती तेजोवलय दाखविले आहे. कानात कुंडले आणि गळ्यात पदकासहीत मुक्ताहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दाखवली असून अधोवस्त्र रशनेने बांधले आहे. त्रिविक्रमाची उभी राहण्याची ढब आणि त्याच्या मुद्रेवरील निश्चय यांतून या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होते.
प्रवरपुर (पवनार) येथील भग्नावशेष विनोबाजींच्या आश्रमाच्या आवारात एका झोपडीत (भरतभेट) ठेवले असून त्यांमध्ये रामजन्म, वनवासगमन, भरतभेट, सुग्रीव-वालियुद्ध, वालिवध असे रामायणातील कथाप्रसंग विशद करणारे काही शिल्पपट्ट आहे. यांशिवाय येथे एक अतिशय गतिमान अंधकासुर वध मूर्तीचा शिल्पपट्ट आहे. भरतभेट या शिल्पपट्टात राम-सीता, लक्ष्मण, भरत यांच्या लक्षणीय मूर्ती असून त्यांच्या चेहऱ्यांवरील भाव प्रसंगानुरूप दर्शविले आहेत. रामाची मुद्रा गंभीर असून लक्ष्मणाने मात्र उदासीन होऊन तोंड फिरविले आहे. वालिवध या दुसऱ्या शिल्पपट्टात रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली रक्तस्त्रावाने व्याकुळ झाला आहे. राम प्रत्यालीढ आसनात उभा आहे. त्याच्या मुद्रेवर तिरस्कारयुक्त अभिमान दिसतो.

यांव्यतिरिक्त वाकाटकांची अन्य मंदिरे वा अवशेष आज अस्तित्वात नाहीत परंतु त्यांच्या मांडलिकांच्या प्रदेशातील एक-दोन मंदिरे अद्यापि विद्यमान आहेत. पहिले कंकाळी देवीचे मंदिर जबलपूर जिल्ह्यात बाहूरिबंदजवळ तिगवा या गावी आहे. हा प्रदेश वाकाटकांचे मांडलिक पांडववंशी राजे यांच्या राज्यात मोडत असावा. हे राजे इ. स. पाचव्या शतकात प्रबळ होते, असे बहमनी ताम्रपटावरून दिसते. पांडववंशी भरतबल आपल्या ताम्रपटात वाकाटक नृपती नरेंद्रसेनाची प्रच्छन्न स्तुती करताना दिसतो. त्यांवरून वाकाटकांचे स्वामित्व त्यांनी मान्य केले होते, असे अनुमान करता येते. त्यामुळेच हे मंदिर वाकाटककालीन स्थापत्य शैलीचा नमुना समजण्यास हरकत नाही, असे मत वा. वि. मिराशी मांडतात. कंकाली देवीचे मंदिर वाकाटक-गुप्तशैलीप्रमाणे सपाट छपराचे व चौरस असून त्यातील गर्भगृह अडीच मीटर लांबी-रुंदीचे चौरसच आहे. द्वारशाखा पाकळ्यांमध्ये कोरलेल्या सिताफळांच्या आकृत्यांनी सुशोभित केली आहे. गणेशपट्टीच्या दोन्ही बाजू वाढवून तिच्या खाली डावीकडे गंगा व उजवीकडे यमुना या नदीदेवतांचे सुंदर शिल्पपट्ट बसविले आहेत. गंगा-यमुनांच्या मूर्ती हे गुप्तकालीन मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गंगादेवी एका मकरावर त्रिभंगात उभी आहे. तिच्या डाव्या बाजूस एक स्त्री व उजव्या बाजूस चामरधारी सेवक उभा आहे. मूर्तीच्या वरील भागात सीताफळाच्या झाडाची कमान आहे. गंगा उजव्या हाताने सीताफळ तोडीत आहे. गंगेने बहुविध अलंकार धारण केलेले असून तिच्या केशपाशात मुक्तायुक्त ललाटीका, कानात वर्तुळाकार कुंडले, गळ्यात मुक्ताफलकहार, बाहूंवर केयूर, मणिबंधात वलये, कमरेला रशना व पायात नूपुर आहेत. शिवाय गळ्यातील वैजयंतीमाला गुडघ्यापर्यंत लोंबकळत आहे. तिची त्रिभंग अवस्था आणि मुखावरील प्रसन्नता यांमुळे हे शिल्प लक्षणीय ठरले आहे. यमुनेची मूर्तीही अशाच प्रकारची आहे. यमुना कुर्मावर त्रिभंगात आम्रवृक्षाखाली उभी असून डाव्या हातानी तिने वृक्षाची फांदी धरली आहे.
दुसरे मंदिर विंध्यप्रदेशात नाचना कुठारा या गावी आहे. येथे वाकाटक नृपती दुसरा पृथिवीषेण याचा मांडलिक उच्चकल्पवंशी व्याघ्रदेव याचा शिलालेख मिळाला. त्यावरून तो भाग वाकाटकांच्या आधिपत्याखाली होता, असे अनुमान वा. वि मिराशी काढतात. साहजिकच येथील पार्वतीचे मंदिर वाकाटककालीन असावे. त्याप्रमाणे हेही मंदिर सपाट छपराचे असून गर्भगृहद्वाराच्या चौकटीच्या आतील पट्टीवर नक्षीकाम असून बाहेरील शिल्पपट्टात दंपतिशिल्पे आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूंस तिगव्याप्रमाणेच गंगा-यमुनांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणापथाच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूंस सिंह, अस्वल, हरिणे, मोर,माकडे इ. पशु-पक्षी आणि यक्षगण, सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती खोदल्या आहेत. एका ठिकाणी गोवर्धन पर्वत-उद्धाराचा शिल्पपट्ट दिसतो. मागील भिंतींवर नाग-नागी आणि नाग बालक यांच्या मूर्ती आहेत.तिगवा व नाचना कुठारा येथील मंदिरे ही प्रामुख्याने उत्तरेकडील वाकाटक-गुप्तकालीन वास्तुशैलीतील वाकाटक साम्राज्याबाहेरील मंदिरे आहेत मात्र बाकाटकांच्या कलेचे वस्तुनिष्ठ दर्शन अजिंठ्याच्या गुहा क्र. सोळा, सतरा व एकोणीस तसेच विदर्भातील अवशिष्ट भग्न अवशेषांतुन घडते.
संस्कृत व प्राकृत वाङ्मयाला वाकाटकांच्या काळी अतिशय बहर आला होता. तत्कालीन संस्कृत काव्यांवरून वैदर्भीनामक विशिष्ट रीती किंवा शैली प्रसिद्धीस आली. दंडी, वामन वगैरे आलंकारिकांनी तिची सर्वगुणयुक्त अशी प्रशंसा केली आहे. तिच्या गुणांमुळे कालिदासादी अन्य देशीय कवींनीही त्याच शैलीत आपली काव्ये रचली. कालिदासाचे मेघदूत हे सुधामधुर काव्य या काळात विदर्भात रचले गेले. स्वतः वाकाटक नृपतींनी प्राकृतात उत्कृष्ट काव्यरचना केली. दुसऱ्या प्रवरसेनाचे सेतुबंध हे काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचलेले अद्यापी उपलब्ध आहे. त्यात सेतुबंधापासून रावणवधापर्यंतचे रामचरित पंधरा आश्वासांत (सर्गांत) वर्णिले आहे. या काव्याची बाणभट्ट, दंडी, आनंदवर्धन इत्यादिकांनी अत्यंत स्तुती केली आहे. या काव्याच्या रचनेत महाराजाधिराज विक्रमादित्याच्या आज्ञेने कालिदासाने प्रवरसेनास मदत केली, अशी आख्यायिका एका प्राचीन टीकाकाराने उल्लेखिली आहे. ती अंतस्थ पुराव्यावरून खरी वाटते. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने हरिविजय नामक उत्कृष्ट काव्य माहाराष्ट्री प्राकृतात रचले होते, असे संस्कृत काव्यालंकार ग्रंथातील अनेक उल्लेखांवरून आता ज्ञात झाले आहे. त्यामध्ये कृष्णाच्या पारिजातहरणाचे कथानक घेतले होते. याचीही अनेक आलंकारिकांनी स्तुती केली आहे. याशिवाय प्रवरसेन, सर्वसेन इ. वाकाटक नृपतींनी कित्येक सुंदर प्राकृत सुभाषिते रचली होती. त्यांपैकी काही नंतर गाथासप्तशतीत घालण्यात आली.
पहा : अजिंठा गुप्तकाल प्रभावती-गुप्ता.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.
2. Yazdani, Gulam, Ed, TheEarly History of the Deccan, London, 1960.
३. मिराशी, वा. वि. वाकाटक नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५७.
४. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. महाराष्ट्रातील पुरातत्त्व, मुंबई, १९७६.
मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.
सातवाहन सत्ता इसवी सनाच्या तिसर्या शतकापासून क्षीण होण्यास सुरुवात झाली होती.
त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित करणार्यांमध्ये वाकाटक घराणे महत्त्वाचे होते.
राजसत्तेच्या संस्थापकाचे नाव ‘विंध्यशक्ती’ असे होते.
विंध्यशक्तिनंतर ‘प्रवरसेन‘ हा राजा गादीवर आला. त्याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेस माळवा आणि गुजरातपासून दक्षिणेस कोल्हापूर, कर्नूल (आंध्र प्रदेश) पर्यंत केला होता.
कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल‘ असे होते.
प्रवरसेनाने चार अश्वमेघ यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली.
प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या.
त्यांतील एका शाखेची राजधानी’नंदीवर्धन’ ( नगरधन-रामटेक, जिल्हा नागपूर) येथे होती.
दुसर्या शाखेची राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे होती.
गुप्त सम्राट, दुसरा चद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रूद्रसेन याच्याशी झाला होता.
याचा उल्लेख यापूर्वी आला आहे.
भारताचा सुवर्णकालखंड...
लोकप्रभा , विनायक परब
Published: Friday, February 6, 2015
अजिंठा लेणींचा अभ्यास करता करता भारतीय इतिहासाचे आयाम बदलून टाकणाऱ्या डॉ. वॉल्टर स्पिंक या अमेरिकी संशोधकाची खास मुलाखत-
प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक असे शब्द उच्चारले तरी जगभरातील अनेक तज्ज्ञांच्या डोक्यात अजिंठा आणि वेरुळच्या लेणींचे चित्र उमटते.. म्हणूनच तर कदाचित विकीपीडियालाही अजिंठा- वेरुळची नोंद करताना चौथ्या- पाचव्या ओळीमध्येच वॉल्टर स्पिंक यांची व त्यांच्या अतिमहत्त्वाच्या
गेली ६० वर्षे हा ८६ वर्षांचा अमेरिकन संशोधक अजिंठय़ाशी एवढा एकरूप झाला आहे की, अजिंठा परिसरातील कोणत्याही एका रेस्तरांमध्ये चक्क लुंगीवर फ्रंक सिनात्राचे गाणे ऐकत- गात त्यावर नाचतानाही नजरेस पडू शकतो. भारतावर प्रेम करणारी किंवा आपण भारताच्या जवळचे आहोत, असे भासवणारी अमेरिकन मंडळी इथे आल्यावर आपल्यालाच भारतीय भाषेत नमस्कार असे शब्द उच्चारून चकित करतात. पण गेली ६० वर्षे सातत्याने महाराष्ट्रात येणारे वॉल्टर स्पिंक आपल्याला दोन- तीन मराठी वाक्यं आणि अनेक मराठी शब्द सहज ऐकवून जातात. आताशा त्यांना मराठीही कळू लागले आहे. मांसाहारी असलेले स्पिंक गप्पांच्या ओघात म्हणतात, मी युनायटेड चिकन्स ऑफ महाराष्ट्राचा संस्थापक आहे. म्हणूनच तर अजिंठय़ाच्या ५०० किलोमीटर्स परिसरात तुम्हाला एकही कोंबडी सापडणार नाही, कारण ती मीच फस्त केलेली असते.. आता वयोमानानुसार काहीसे बारीक झालेले डोळे हे सांगताना मिश्कील मिचकावतातही. आपण मांसाहारी असल्याचा त्यांना कोण अभिमान.
१६ फेब्रुवारी १९२८ रोजी अमेरिकेत जन्मलेले वॉल्टर स्पिंक तीन भावंडांमध्ये बरोबर मधले. सध्या बोस्टन शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणावर पर्यवेक्षक अभियंता म्हणून त्यांच्या वडिलांनी काम पाहिले. याच धरण प्रकल्पामुळे त्यांनाही बाजूच्या लहानशा गावातून विस्थापित व्हावे लागले. तेव्हा शाळेत असलेल्या वॉल्टरला त्या विस्थापित होण्याचा आणि नंतर शहरी जीवन जगण्याचा तसा त्रासच झाला आणि मग त्या त्रासाला कवितेच्या रूपाने शब्दरूपही मिळाले. ती वॉल्टर स्पिंक यांनी त्यांच्या आयुष्यात लिहिलेली पहिली कविता. त्या कवितेचे गावातही कौतुक झाले. आज ८६ व्या वर्षीही ते कविता करतात. जगभरात कुठेही गेले तरी कवितेचे पुस्तक सोबत असतेच असते.
आजवरचे त्यांचे जीवन हे अनेक कलाटण्यांनी समृद्ध झाले आहे. आयुष्याला कलाटणी मिळाली की, अनेकदा माणूस अस्वस्थ होतो पण स्पिंक म्हणतात, आयुष्यात अस्वस्थतेने टोक गाठले की, कलाटणी आपोआप मिळते. स्वत:च्या जीवनाचे असे एक वेगळेच तत्त्वज्ञान असणाऱ्या स्पिंक यांनी आता भारतीय इतिहासाला एक कलाटणी देणारे संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन म्हणजे भारतीय इतिहासावरचा नवा प्रकाशझोतच आहे. त्यामुळे आता भारतीय इतिहासाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय इतिहासामध्ये एक प्रश्न गाळलेल्या जागा भरण्यासाठी किंवा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी अवश्य विचारला जातो; तो म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ कोणता? डोळे झाकून आपण पाठ केलेले उत्तर त्या वेळेस लिहिलेले असते ते म्हणजे गुप्त राजवंशाचा कालखंड. मात्र आता वॉल्टर स्पिंक यांनी केलेल्या संशोधनानंतर भविष्यात भारतीय इतिहासात बदल झाले आणि या प्रश्नाचे उत्तर बदलून त्या जागी वाकाटक राजवंशाचा कालखंड असे उत्तर आले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
भारतीय इतिहासाला अशा प्रकारे नवीन कलाटणी देणाऱ्या या जगद्विख्यात संशोधकाचा प्रवास जीवशास्त्रापासू
४ अजिंठय़ावरील या संशोधनाला सुरुवात केव्हा व कशी झाली?
- खरेतर महाविद्यलयात असताना मी जीवशास्त्राचा विद्यार्थी होतो. मला प्राणी अतिशय आवडायचे. शाळेत असतानाच मला अमेरिकेतील प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानंतर प्राणिसंग्रहालय
४ युरोपिअन किंवा पाश्चत्त्य कलेतिहासाकडून मग भारताकडे वळण्याचे कारण नेमके काय होते?
- १९४९ साली मी हॉवर्ड विद्यापीठात पी.एचडी.साठी प्रवेश घेतला. तिथे बेंजामिन रोलँड यांच्याशी भेट झाली, ते भारतीय कला या विषयातील तज्ज्ञ होते. ओरिसा येथील लिंगराज मंदिरावर संशोधन सादरीकरण करण्यासाठी म्हणून पत्नीसह भुवनेश्वरला पोहोचलो १९५२ साली. इथे पोहोचलो त्या वेळेस कल्पना नव्हती की, येथील मंदिरांमध्ये विदेशी व्यक्तींना प्रवेशबंदी होती. दुसऱ्या दिवशी चक्क धोतर नेसून पोहोचलो तेव्हाही प्रवेश नाकारण्यात आला. कारण कपडे बदलून काही मी भारतीय झालो नव्हतो. अखेरीस मी सादरीकरणाचा विषय बदलला. आता जिथे आपल्याला प्रवेशबंदी होणार नाही, असा विषय निवडण्याचे ठरवले. मग मी व पत्नी दोघांनाही लक्षात आले की, भारताला दगडामध्ये खोदलेल्या लेणींची समृद्ध परंपरा आहे. त्या लेणींमध्ये कुणालाही प्रवेशबंदी नाही. मग अखेरीस दोघेही खंदगिरी- उदयगिरी या जैन लेणींकडे पोहोचलो. तिथे संशोधन करताना लक्षात आले की, त्या लेणींचा कालखंड निश्चित करताना काहीतरी घोटाळा झाला होता, निश्चित केलेल्या कालखंडापूर्वीची
४ लेणींच्या कालखंड निश्चितीचे तेव्हापासून लागलेले हेच वेड मग नंतर अजिंठय़ाचा कालखंडही बदलण्यापर्यंत पोहोचले..
अजिंठय़ाचे झाले असे की, जेव्हा आयुष्यात इथे प्रथम पोहोचलो तेव्हाच या लेणींशी आपले काही जुने नाते असावे, असे वाटले. कारण माहीत नव्हते. खरे तर अजिंठा असे म्हटले की, लोकांना येथील जगप्रसिद्ध चित्रांची आठवण येते. अर्थात ही सारी चित्रे जगभरातील कुणीही प्रेमात पडावे, अशीच आहेत. पण माझे लक्ष मात्र सर्वप्रथम गेले ते येथील रचनेकडे. म्हणजे तेथे लेणींमध्ये खोदण्यात आलेले विहार, चैत्य यांच्या रचनेकडे. ती रचना पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालू लागले. त्यावर मग मी काम सुरू केले. मला त्या चित्रांपेक्षाही
४ लेणीच आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वाटण्यातूनच मग तुमच्या 'कलेतिहासाला असलेले मानवी अंग' या प्रसिद्ध सिद्धान्ताचा जन्म झाला का?
- हो, तसे म्हणू शकता हवे तर. गेली सुमारे ६० वर्षे मी भारतीय कलेवर संशोधन करतो आहे. त्यातही खासकरून अजिंठय़ावर. माझ्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, येथील रचना नीट पाहिली. तिचा व्यवस्थित अभ्यास केला तर कालखंड निश्चितीसाठी तिचा फायदाच होतो. कारण ती रचना सुरुवातीस कशी होती. मग कोणती व कशी गरज निर्माण झाली. मग ती गरज भागविण्यासाठी त्या उपलब्ध वास्तूमध्ये कसे बदल करण्यात आले, या सर्व गोष्टी आपल्याला सहज कळत जातात. खासकरून लेणींमध्ये तर हे सहज लक्षात येते, कारण एखादी रचना ही लेणी खोदतानाच कलावंत किंवा वास्तुशिल्पीच्य
४ पण मग त्यावरून कालखंड निश्चिती कशी काय करणार? कालखंड निश्चित करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात?
- कालखंड निश्चित करताना या लेणींमध्ये असलेले शिलालेख आपल्याला मदत करतात. काही शिलालेखांमध्ये लेणी खोदलेल्या वर्षांचा थेट उल्लेख असतो. तर काही ठिकाणी हा उल्लेख अप्रत्यक्षपणे आलेला असतो. म्हणजेच अजिंठय़ाच्या बाबतीत बोलायचे तर हिरशेण राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी असा उल्लेख एका ठिकाणी आहे. राजाचा राज्याभिषेक केव्हा झाला, त्याचे वर्ष काढले की, लेणीच्या खोदकामाचे वर्ष सहज कळू शकते. दरखेपेस त्या त्या ठिकाणी असलेले शिलालेखच तुम्हाला मदत करतात, असेही नाही. इतरत्र असलेल्या शिलालेखांमधील संदर्भही अनेकदा मदत करतात. त्याशिवाय काही वेळेस तुम्हाला लिखित स्वरूपातील काही नोंदीही मदतीच्या ठरतात.
४ अजिंठाची कालनिश्चिती तुम्ही इसवी सन ४६२ ते ४७७ अशी केली आहे. हे करताना कोणते पुरावे ग्रा धरले, त्यांची मदत कशी काय झाली?
- डॉ. वासुदेव विष्णू मिराशी या विद्वान प्राध्यापकांनी भारतीय शिलालेखांच्या संदर्भात प्रचंड महत्त्वाचे काम केले आहे. त्यांनी विविध लेणींमधील विविध भाषा आणि लिपींमधील शिलालेख वाचले व त्यांचे अर्थही लावले. त्यांनी केलेले ते अतिमहत्त्वपूर्ण
४ अजिंठाचा इतिहासही तेवढाच रोचक असल्याचे आपण नेहमी सांगता, त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासातील हाच तो सुवर्णकालखंड असल्याचे मतही आपण संशोधनातून सातत्याने मांडत आला आहात, त्यामागची कारणे काय आहेत?
- अजिंठा हे जगातील एक विलक्षण ठिकाण आहे, असे मला नेहमीच वाटत आले. केवळ मला वाटते म्हणून नाही तर उपलब्ध पुराव्यांनुसार इथला इतिहास तपासून पाहिला तर हे कुणाच्याही लक्षात येईल. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात इथे खोदकामाला सुरुवात झाली. येथील लेणींचे दोन कालखंडात विभाजन करता येते. त्यानंतरचे महत्त्वाचे काम हे पाचव्या शतकात त्यातही पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच हरिशेण राजाच्या कालखंडात झाले आहे. हरिषेणाचा पंतप्रधान वराहदेव याचा शिलालेख इथे कोरलेला आहे. या लेणी विलक्षण आहेत असे म्हणण्याचे कारण म्हणजे एकाच वेळेस इथे अश्मक, स्वत: वराहदेव आणि स्थानिक राजा उपेंद्रगुप्त यांचे लेणींचे खोदकाम सुरू होते. उपेंद्रगुप्त व अश्मक हे हरिषेणाचे मांडलिक राजे होते. सुरुवातीस सुरू असलेले अश्मकांचे लेणींचे खोदकाम हे उपेंद्रगुप्ताने
४ वाकाटकांचा सर्वोत्तम राजा असलेल्या हरिषेणावर भारतीय इतिहास संशोधकांनी अन्यायच केल्याचा आरोप आपण सातत्याने करत आहात..
- खरेच आहे ते भारतीय इतिहास संशोधकांनी वाकाटक राजघराण्यावर आणि हरिषेणावर अन्यायच केला आहे. प्रसिद्ध इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी तर गुप्त कालखंडानंतर आलेल्या वाकाटकांची आणि हरिषेणाची योग्य दखलही घेतलेली नाही. त्याला अनुल्लेखानेच मारले आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. ज्याला भारतीय इतिहास संशोधक गुप्तोत्तर कालखंड म्हणतात तो खरेतर वाकाटकांचा कालखंड होता. उपलब्ध लेखी नोंदी आणि शिलालेखांमधील संदर्भच पुराव्यादाखल पाहायचे तर संपूर्ण मध्य भारतावर त्या वेळेस वाकाटकांचे राज्य होते. त्यांच्या दोन शाखा होत्या. त्या हरिषेणाच्याच कालखंडात एकत्र आल्या व वाकाटकांचा एकछत्री अंमल सुरू झाला. तत्कालीन वत्सगुल्म आणि आजचे वाशीम ही त्यांची राजधानी होती. पश्चिम किनारपट्टीपासून
४ वाकाटकांकडे भारतीय इतिहास संशोधकांनी दुर्लक्ष केले हे खरे असले तरी अजिंठय़ाचा किंवा वाकाटकांचा कालखंड हा भारतीय इतिहासातील सुवर्ण कालखंड कसा काय ठरतो? त्याचे पुरावे कोणते?
- इतिहासातील सुवर्णयुगाचा महत्त्वाचा निकष त्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या कलेशी आणि कलाकृतीशी असतो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदत असतानाच सर्वोत्तम कला जन्म घेते असे आजवर जागतिक इतिहासात लक्षात आले आहे आणि सिद्धही झाले आहे. हाच महत्त्वाचा निकष लावायचा तर भारतातील सर्वोत्तम कलेचा आविष्कार म्हणजे अजिंठा. केवळ सुंदर चित्र आहेत म्हणून नव्हे तर त्या चित्रांतील ऐतिहासिक संदर्भच त्यांचे महत्त्व व सर्वोत्तम कालखंडातील त्यांचा जन्म स्पष्ट करतात. अजिंठय़ामध्ये काम करणारे कलावंत हे देशातील अतिकुशल असे कलावंत होते, हे तर कुणीच नाकारणार नाही. आपल्या आजूबाजूला जे घडत असते, दिसते त्याचेच प्रतिबिंब कलाकृतीमध्ये पडत असते. अजिंठय़ाच्या कलाकृतीमध्ये दिसणाऱ्या सर्वोत्तम वास्तुरचना त्यापूर्वीच्या कोणत्याही कलाकृतीमध्ये संपूर्ण भारतात पाहायला मिळत नाहीत. तसेच अजिंठय़ाच्या चित्रांतील दागिने, राजमुकुट हे सारे काही वेगळे होते. प्रत्यक्षात त्यासारख्या गोष्टी अस्तित्वात असल्याशिवाय त्याचे प्रतिबिंब लेणींमध्ये येत नाही, किंवा समकालीन चित्र-शिल्पांमध
४ या नव्या संशोधनामुळे इतिहासात नेमका कोणता बदल होणे अपेक्षित आहे?
- अजिंठय़ाचा कालखंड निश्चित झाल्याचा सर्वात मोठा परिणाम मुंबईजवळच्या अप्रतिम अशा घारापुरी लेणींच्या कालखंडावर झाला आहे. पूर्वी असे मानले जायचे की, त्यांची निर्मिती ही आठव्या शतकात झाली आहे. मात्र आता ऐतिहासिक सत्य व पुरावे असे सांगतात की, त्यांची निर्मिती ही अजिंठय़ानंतर सहाव्या शतकात झाली आहे. त्यांचा कालखंड आता २०० वर्षांनी अलीकडे आला आहे. ज्या कलावंतांनी अजिंठय़ाची निर्मिती केली, त्यांच्याच पुढच्या पिढीतील कलावंतांनी घारापुरीच्या लेणींचेही काम केले आहे, हे शैलीशास्त्रानुस
नोंदी एकमेकांशी ताडून पाहिल्या आहेत त्यानंतरच कालखंडाची मांडणी केली.
४ भारतीय इतिहास संशोधकांनी आता यापुढे काय करण्याची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
- ऐतिहासिक कालखंड निश्चित करताना केवळ उपलब्ध नोंदींवर जाऊ नका तर पुरातत्त्वीय पुरावेही ग्रा धरा. शिलालेखांचे अर्थ नव्याने लावता येत आहेत का, त्याचा शोध घ्या आणि नंतर सर्व प्रकारचे पुरावे एकत्र करून कालखंड निश्चिती करा. मग त्यातील त्रुटी आणि उणिवा कमीतकमी असतील व त्यात अचूकता अधिक असेल असे वाटते.
४ गेली ६० वर्षे अजिंठय़ावर काम केल्यानंतर अद्याप काही करावयाचे राहिले आहे, असे वाटते का?
- होय, अजिंठय़ावर मी आठ मोठे संशोधन खंड प्रकाशित केले आहेत. नवव्या खंडाचे काम सुरू आहे. पण अजिंठय़ाची व्याप्तीच एवढी जबरदस्त आहे की, अद्याप खूप काम बाकी आहे. आज वय ८६ च्या घरात आहे. तरीही अखेरच्या श्वसापर्यंत अजिंठय़ावरील संशोधनाचे काम सुरूच राहील, असे दिसते आहे.
http://
वाकाटकांच्या सुवर्णकाळातील काम
Updated on:
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
रॉबर्ट गिल आणि त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी याआधीच्या लेखात आपण माहिती घेतली होती. आता थोडं इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न करू या. अजिंठ्याच्या निर्मितीचे दोन मुख्य टप्पे आहेत. एक आहे हीनयान काळातील, इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन पहिले शतक. तर दुसरा आहे थेट पाचव्या शतकातील वाकाटक राजा हरिषेनच्या काळातील.
पहिल्या टप्प्यात लेणी क्र. ९, १०, १२, १३ आणि १५-अ यांची निर्मिती झाली. अभ्यासकांच्या मते, ही लेणी सामूहिक कार्यातून तयार झाली असावी. या काळात लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरळीत चालू होती. पण पुढील तीनशे -चारशे वर्ष ही प्रक्रिया मंदावली, थांबली. पण लोकांचं, उपासकांचं येणं-जाणं सुरूच होतं.
चिनी प्रवासी ‘फा हिआन’नं त्याच्या भारत दौऱ्यात अजिंठ्याच्या लेणींना भेट दिली होती. त्यानं नोंदवून ठेवलंय, की इथं अजूनही लोकं येतात, वास्तव्य करतात. त्यानंतर सुरू झाला अजिंठ्याचा सुवर्णकाळ. वाकाटक सम्राट हरिषेनचं लक्ष या भागाकडं गेलं. त्यानं आपल्या सढळ हातांनी हे अद्भुत विश्व निर्माण करण्यास प्रोत्साहन दिलं.
ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा दक्षिण भाग आणि काहीसा कर्नाटकाचा भाग त्याच्या अधिपत्याखाली होता. हरिषेन बलाढ्य होता, संपन्न होता. अजिंठ्यासारख्या ठिकाणी लेणीनिर्मितीचा निर्णय त्यानं घेतला, पण त्याला काही अडचणींचा सामना करावा लागणार होता. त्या परिसरात राज्य करणारा ऋषीक प्रदेशाचा राजा उपेंद्रगुप्त आणि अश्मक राज्याचा राजा त्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नक्कीच अडथळा आणणार होते.
लेणी क्र. १७, १८, १९, २० या उपेंद्रगुप्तच्या प्रोत्साहनामुळं निर्माण झाल्या. २६ क्रमांकाची लेणी अश्मकांमुळं निर्माण झाली. चौथ्या क्रमांकाची लेणी एका धनाढ्य व्यापाऱ्यामुळं निर्माण झाली. हीनयान काळात पाच लेणी आधीच निर्माण झाल्या होत्या.
इसवी सन ४६० च्या आसपास हरिषेन गादीवर आला. तो काळच वेगळा होता. वाकाटक तेव्हा आपल्या वैभवाच्या शिखरावर होते. गुप्त साम्राज्यासोबत वाकाटकांच्या एका शाखेचे वैवाहिक संबंध होते. गुप्त साम्राज्याला भारताचा सुवर्णकाळ म्हणतात. पण, वाकाटकांचा काळ हाच ''सुवर्णकाळ’ होता अशी मांडणी करणारे अनेक अभ्यासक आहेत. या विधानाला समर्थन देण्यासाठी अजिंठा फार कारणीभूत ठरलं. कारण वाकाटकांच्या सत्तेला उतरती कळा लागली आणि भारताचे हे सुवर्णयुग लोप पावले.
डॉ. स्पिंकच्या मते, हरिषेनाचा मंत्री वराहदेव आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह अजिंठ्याला उतरला आणि आजूबाजूचे राज्यकर्ते अस्वस्थ झाले. राजसत्ता एकमेकांना भिडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. उपेंद्रगुप्तनं हरिषेनासोबत राजकीय युती केली. दोघांनी मिळून अजिंठ्याला लेणींची निर्मिती करायला सुरुवात केली. फार जोमानं काम सुरू होतं. पण अचानक बाजूच्याच प्रदेशात असलेले अश्मक आक्रमक झाले. त्यांचं आणि वाकाटकांचं युद्ध झालं.
इसवी सन ४७२ साली या प्रदेशात झालेल्या मोठ्या युद्धामुळं अजिंठ्याचे कलाकार प्रदेश सोडून निघून गेले. लेणींचं काम थांबलं. त्या सर्व कारागिरांना, कलाकारांना हरिषेनानं आपल्या प्रतिनिधीच्या प्रदेशात पाठवले. तिथं बागच्या लेणींचं काम सुरू होतं. वर्ष-दीड वर्ष ते कलाकार तिथे राहिले. अजिंठ्याची परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत... पण कालांतराने ते परत आले एका अद्भुत गोष्टीची निर्मिती करण्यासाठी.
अजिंठ्याला भिंती रंगवण्यात येऊ लागल्या, अविश्वसनीय चित्रे काढल्या जाऊ लागली. अजिंठा नैसर्गिक रंगांनी सजू लागलं. दुसरीकडं अश्मकांनी लेणी क्र. २६ ची निर्मिती करण्याची सुरुवात केली. पण लवकरच हरिषेनाचं दुर्दैवी निधन झाले. अजिंठ्याच्या निर्मितीचा वेग मंदावला. त्याचा मुलगा गादीवर आला. पण अश्मकांनी त्याचं वर्चस्व झुगारून दिले. स्वतःचं प्राबल्य वाढवलं. पण या राजकीय संघर्षामुळं अजिंठ्याचं महत्त्व लोप पावू लागलं.
काही बौद्ध भिक्खू, व्यापारी वगैरे लोक अजूनही अजिंठ्याच्या छायेत मुक्काम करत होते. लेणी निर्मिती व्हावी, म्हणून शक्य असेल तेवढ्या धनानं त्यांनी मदत केली. पण हा प्रयत्न फार काळ टिकला नाही. त्यानंतर अजिंठ्याला कोणत्याही बुद्धप्रतिमेची निर्मिती झाली नाही.
अजिंठ्याच्या शिला लेखांमधून सुद्धा आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थितीची आणि लेणीच्या निर्मितीची गोष्ट लक्षात येते. लेणी क्र. १६ मध्ये असलेला वराहदेवाचा शिलालेख महत्त्वाचा आहे. या लेणीचा मुख्य देणगीदार तो होता. वराहदेव सम्राट हरिषेनाचा प्रधान होता. त्या शिलालेखात विंध्यशक्ती, प्रवरसेन, रुद्र (?) सेन, देवसेन यांसारख्या राजकीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आहे. सोबतच हरिषेनाचे अतिशय सुंदर वर्णन आले आहे.
लेखात लिहिले आहे, “हरिषेन, ज्याचे डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत, दुःखाचे नाश करणारा, कामासारखा सुंदर, कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लता, आंध्र यांसारख्या प्रदेशावर राज्य करणारा...” सोबतच, या विहाराविषयी शिलालेखात लिहिलं आहे, ‘‘राजा आणि प्रजेचा प्रिय असलेला, त्याने आपल्या प्रसिद्धीच्या, धार्मिकतेच्या, गुणवत्तेच्या आणि सद्गुणांच्या किरणांनी तेजस्वीपणे प्रदेशाचा कारभार सांभाळला.
आयुष्य, तारुण्य, संपत्ती हे क्षणभंगुर आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्याने उत्तम तपस्वींनी राहावे म्हणून हे भव्य निवासस्थान तयार केले. इंद्राच्या मुकुटाप्रमाणे तेज धारण केलेला, सर्व ऋतूंमध्ये सुप्रसिद्ध सुखसोयींचा आनंद घेणारा आणि जोवर सूर्याची किरणे या पृथ्वीवर येतात तोवर ही गुहा निष्कलंक आहे. असो, आनंद घ्या...’’
हे विहार फार सुंदर आहे, भव्य आहे. हरिषेनाच्या मृत्यूनंतर वराहदेव अस्वस्थ झाला. आपली, आपल्या परिवाराची सुरक्षा लक्षात घेता त्याने आपला संपूर्ण परिवार महिष्मती साम्राज्यात पाठवून दिला. लेणी क्र. १७ मधील उपेंद्रगुप्तचा लेखसुद्धा महत्त्वाचा आहे. शिलालेखात लिहिलं आहे, ‘‘संपूर्ण पृथ्वीला स्तूप आणि विहारांनी सुशोभित केले आहे.
विपुल प्रमाणात संपत्ती खर्च केल्यामुळे (कोणत्याही मोजमापाशिवाय) कोणत्याही माणसाला कल्पना करता येणार नाही अशी लेणी निर्माण करण्यात आली. स्नेहभावाने भरलेल्या सभागृहात, जोपर्यंत सूर्य आपल्या किरणांनी अंधार दूर करतो, तोपर्यंत सद्गुणी लोकांची प्राप्ती करत राहा...’’
ह्या लेखांमुळं लेणींच्या आश्रयदात्यांची, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाची माहिती आपल्याला मिळते. वाकाटक सम्राट हरिषेन, त्याचा मंत्री वराहदेव, अजिंठ्याचा स्थानिक शासक उपेंद्रगुप्त, शेजारी असलेले अश्मक यांच्या सढळ देणगीतून आणि महत्त्वाकांक्षेमुळं हे अविश्वसनीय विश्व निर्माण झालं. आता अजिंठ्याच्या लेणींची क्रमवार माहिती पुढच्या भागात.
चांदा नाणेसंचय (Chanda Coin Hoard)
महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती. या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.
नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.
एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही. मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लंडन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.
संदर्भ :
- Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
समीक्षक : पद्माकर प्रभुणे
वाकाटक काळातील वेशभूषा – TVAM Foundation
वाकाटक काळातील वेशभूषा1 min read
Reading Time: 5 minutes
प्राचीन महाराष्ट्रातील वाकाटक राजवंश हा भारतातील प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध राजवंश असून वाकाटकांच्या कालखंडाला ‘सुवर्णयुग’ असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे कारण या कालखंडामध्ये हिंदुधर्म, संस्कृत आणि प्राकृत वाड.मय(literature), तसेच शिल्प आणि स्थापत्य व चित्रकला यांचा वाकाटकांच्या कालखंडात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला आपल्याला पहावयास मिळतो. याच वाकाटकांच्या कालखंडात परदेशी व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि या व्यापार वाढीमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार हा जगभरात झालेला आपल्याला तत्कालीन परिस्थिती वरून समजण्यास मदत होते. सगळ्या जगात प्रसिद्ध असलेली आणि आज युनेस्को वर्ल्ड हेरीटेज साईट असलेली अजिंठ्याची लेणी हि वाकाटक राजांच्या कालखंडात निर्माण झाली त्यामुळे वाकाटक राजवंशाचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. अश्या या महत्वाच्या वाकाटक राजघराण्याच्या कालखंडात वेशभूषा कश्या पद्धतीची होती हे देखील समजून घेणे आपल्याला कुतूहलाची बाब ठरते.
महाराष्ट्रातील म्हणजेच मुख्यत्वे करून विदर्भातील असलेल्या वाकाटक राजघराण्याचे आजपर्यंत बरेच शिलालेख(Inscription) देखील मोठ्या प्रमाणात सापडलेले आपल्याला पहावयास मिळतात परंतु या शिलालेखांच्या मध्यामातून आपल्याला तत्कालीन लोकांची राहणीमान पद्धत, त्यांचे वस्त्र आणि अलंकार, केश रचना, शिरोभूषणे, शस्त्रे, घरे, भांडी, तत्कालीन वाद्ये यांची कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही यासाठी आपल्याला वाकाटकांच्या कालखंडातील वाड.मय(literature), शिल्पे आणि चित्रे यांचा अभ्यास करावा लागतो. वाकाटकांच्या कालखंडामध्ये विदर्भात विविध काव्ये रचली गेली परंतु त्यातील कालिदासाचे मेघदूत हे संस्कृत काव्य आणि प्रवरसेनाचे सेतुबंध हे प्राकृत काव्य सध्या उपलब्ध आहेत.

तसेच बाकीची काव्ये हि काळानुसार नष्ट झाली असल्यामुळे कालिदास आणि प्रवरसेन यांची काव्ये खूप महत्वाची ठरतात. वाकाटक काळातील सामाजिक परिस्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीमधील सोळा, सतरा आणि एकोणीस क्रमांकाची लेणी फार महत्वाची ठरतात. हि लेणी वाकाटक काळामध्येच कोरली होती आणि त्यामधील चित्रे देखील वाकाटक काळामध्ये काढली असल्याने आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थिती समजण्यासाठी मदत होते.
सुदैवाने आजही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील हि चित्रे अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील शिल्पे आणि चित्रे यांच्यावरून आपल्याला वाकाटक काळातील स्त्री-पुरुषांच्या वस्त्रालंकरांची व्यवस्थित कल्पना करता येते. यामध्ये आपल्याला बहुतेक स्त्री पुरुष हे आखूड अन्तरीयक म्हणजेच अधोवस्त्र नेसलेले दाखवलेले आहेत. हे नेसलेले वस्त्र गुडघ्याच्या वर असल्यामुळे याला अर्धोरुक अशी संज्ञा आहे. बाणाने आपल्या हर्षचरित या वस्त्राचे वर्णन ‘प्रकटितोरुत्रिभाग’ म्हणजेच ज्याच्यामध्ये मांडीचा तृतीयांश भाग उघडा आहे असे केलेले दिसते. हे वस्त्र वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्याचे असे.
पवनार याठिकाणी एक शिल्पपट सापडलेला आहे त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, यांची वस्त्रे देखील याच प्रकारची आडव्या पट्ट्यांची दाखवलेली आहेत परंतु हि वस्त्रे जास्त रुंद म्हणजेच जवळपास घोट्या पर्यंत आलेली आपल्याला पहावयास मिळतात. तसेच या वस्त्राचा एक शेवट डाव्या मांडीवरून जाऊन त्याचा मागे क्च्छ म्हणजेच कासोटा होत असे. दुसरा शेवट दोन्ही मांड्याना मागून पुढून वेष्टून नंतर मागच्या बाजूला खोवून खाली शेपूट असल्यासारखा लोंबत असे. याच प्रकारच्या परिधान पद्धतीमध्ये पुढच्या भागामध्ये निऱ्या दिसत नसत परंतु पाठीमागे मात्र अधोवस्त्राचा शेवट शेपटासारखा लोंबत असे.
तसे पहायला गेले तर उत्तर भारतामध्ये अन्तरीयक नेसण्याची पद्धत हि उलटी होती. या अन्तरीयकाच्या निऱ्याचे सोगे पुढे सुटलेले असत याची उदाहरणे आपल्याला सांची आणि भरहूत येथील शिल्पांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. तसे पहायला गेले तर अजिंठा लेणीच्या वाकाटक काळातील लेण्यामध्ये अश्या पद्धती मधल्या पुढील निऱ्या कुठेही आपल्याला पहायला मिळत नाहीत. परंतु मागील शेपूट असल्यासारखे सोगे मात्र आपल्याला खूप ठिकाणी आढळून येतात. दक्षिणात्य लोकांच्या या परिधानपद्धतीचे गंमतीशीर वर्णन हे ‘राजतरंगिणी’ (काश्मीरचा इतिहास) लिहिणाऱ्या कल्हणाने ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्येच केलेले आपल्याला पहायला मिळते. ‘राजतरंगिणी’ याच्यामधील वर्णन पुढीलप्रमाणे:-
क्षितीभृद्दाक्षिणात्यानां तिर्यक्त्वज्ञापनाय स: |
पुच्छं महातलस्पर्शि चक्रे कौपीनवाससि ||
अर्थ:-
दाक्षिणात्य लोक पशु आहेत हे दाखविण्याकरिता त्या काश्मीरच्या राजाने त्यांना आपल्या लुंगीचा शेवट जमिनीला स्पर्श होईल इतका लांब ठेवणे भाग पाडले.
स्त्रियांची देखील अधोवस्त्र नेसण्याची पद्धत याच तऱ्हेची होती हे आपल्याला काही चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. काही चित्रांच्यामध्ये या स्त्रिया पाठमोऱ्या बसलेल्या किंवा उभ्या आहेत अश्या चित्रांच्या माध्यमातून खाली लोंबणाऱ्या कासोट्यावरून समजण्यास मदत होते. तसेच काही स्त्रिया या अधोवस्त्र कच्छरहित पद्धतीने नेसत असत.हे देखील आपल्याला अजिंठ्याच्या लेणीतील चित्रांच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. तसेच काही पुरुष हे सध्याच्या हाफ पँट सारखा मांड चोळणा घालीत असत आणि कटी बंधाने तो कंबरेला बंधित असे. या हाफ पँट सारख्या मांड चोळण्याला ‘चंडातक’ असे म्हणत असत. अजिंठा लेणी मधील सतरा क्रमांकाच्या लेण्यामध्ये आपल्याला उजव्या भिंतीच्या जवळ असलेल्या खांबाच्या वरील यक्ष असा ‘चंडातक’ नेसलेला आढळून येतो.
बाणाच्या हर्षचरितामधील वर्णनामधून आपल्याला तत्कालीन स्त्रिया देखील अश्या ‘चंडातक’ नेसून त्याच्यावर पायघोळ कंचुक किंवा झगा घालत असत असे दिसते. पुरुष घोड्यावर अथवा शिकारीला गेले असताना तुमान घालून त्याच्यावर पूर्ण बाह्यांचा गुडघ्यापर्यंत खाली आलेला कोट घालत असत असे आपल्याला पहावयास मिळते. अजिंठा लेणीमधील सतराव्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये मृगजातक कथेत शिकारीला गेलेल्या राजाचा पोषाख आपल्याला वरच्या वर्णनाप्रमाणे पहावयास मिळतो. तसेच असाच पोषाख हा गुप्त राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला आढळतो. तसेच काही चित्रांमध्ये नोकरांनी देखील पूर्ण बाह्यांचे अंगरखे घातलेले आढळतात.
तत्कालीन पुरुष सामन्यत: उत्तरीय वापरीत असत असे दिसते. हे उत्तरीय जानव्याप्रमाणे डाव्या खांद्यावरून आणि उजव्या काखेखालून जात असे त्यामुळे उजवा हाट पूर्णपणे मोकळा राहत असे. काही चित्रांच्यामध्ये आपल्याला हे उत्तरीय पुन: दुमडून डाव्या खांद्यावर टाकलेले आपल्याला दिसते. तसेच तत्कालीन काही लोक उत्तरीयाची पट्टी करून वैकक्षकासारखे वापरीत असत. तसेच काही लोक हे कमरेला बांधून बद्धपरिकर होत.
म्हैसूरच्या राजदरबारात असलेल्या सर्व सेवकांनी अश्या रीतीने बद्धपरिकर होऊन राहिले पाहिजे असा नियम आजही आहे. तसेच काही लोक एकच लांब वस्त्र नेसून त्याचाच नंतर उत्तरीया सारखा उपयोग करीत असत असे चित्रांच्या वरून समजण्यास मदत होते. तसेच काही तत्कालीन पुरुष हे पूर्ण बाह्यांचा अंगरखा घालून वर उत्तरीय पांघरीत असत. अजिंठ्याच्या लेण्यातील सतरावे लेणे जर आपण नीट पाहिले तर आपल्याला लेण्यामध्ये हंस जातक कथा पहायला मिळते यामध्ये प्रधानाचा पोषाख हा वरील वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला पहावयास मिळतो.
अजिंठ्याच्या लेण्यामध्ये आपल्याला चित्रांच्यामध्ये अनेक राजा आणि राणी तसेच तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या शरीरांचा वरचा भाग हा अनावृत्त दाखविला आहे असेच वाटते तसेच या राजा आणि राणींच्या किंवा तत्कालीन श्रीमंत स्त्रीपुरुषांच्या दासदासी मात्र वस्त्रावृत्त पहायला मिळतात. यामध्ये समजातील वरच्या वर्गातील स्त्रीपुरुषांनी तलम वस्त्रे वापरलेली आहेत हे दाखविण्याचा हा उद्देश आहे असे समजते. संस्कृत कवींच्या काव्यांच्यामध्ये यांची वर्णने हि ‘नि:श्वासहार्य’ म्हणजेच केवळ श्वासानेही उडून जाणारी ‘निर्मोकलघुत्तर’ म्हणजेच सापाच्या कातीपेक्षा देखील तलम होती असे वर्णन आढळून येते. तसेच हि वस्त्रे वापरली असता आतमधील कूचमंडल, मांड्या, अंगाला लावलेले चंदन, वापरलेले अलंकार इत्यादी स्पष्ट दिसत असे असे वर्णन विविध काव्यांच्यामधून आढळून येते.
हाच प्रकार आपल्याला अजिंठ्याच्या चित्रांच्यामध्ये पहायला मिळतो. काही स्त्रिया आपल्या छातीवर रुंद पट्टी बांधत असत या पट्टीला ‘पयोधरपट’ असे म्हणतात. अजिंठा लेणीमधील मरणोन्मुख सुंदरीच्या चित्रामध्ये तिला पंख्याने वारा घालणाऱ्या स्त्रीने अश्या पद्धतीचा ‘पयोधरपट’ वापरलेला आपल्याला पहायला मिळतो. तसेच विश्वंतर जातकाच्या कथेमध्ये राजाच्या शेजारी जी राणी बसलेली आहे तिने देखील असाच ‘पयोधरपट’ घातलेला दाखवलेला आहे. तसेच अजिंठा लेणीच्या सोळा क्रमांकाच्या गुहेमध्ये असलेल्या चित्रात मायादेवी शुद्धोदन राजाला आपले स्वप्न सांगत आहे त्याठिकाणी एक स्त्री आपल्याला पहावयास मिळते त्या स्त्रीने चोळी घातलेली आपल्याला चित्रात पहावयास मिळते. तसेच सतराव्या लेण्यामध्ये असलेल्या विश्वांतर जातकामध्ये दान मागण्यासाठी बरेच याचक जमलेले आहेत असे दृश्य दाखवलेले आहे त्या चित्रामध्ये कडेवर मुल असलेल्या एका स्त्रीने वर रंगीत फुले असलेली चोळी किंवा अर्धबाह्यांचे जॅकीट घातलेले आपल्याला पहावयास मिळते.
याच लेण्यामध्ये आपल्याला सिंहलावदानात हल्लीच्या महाराष्ट्रातील स्त्रिया ज्याप्रमाणे खणांची हिरवी चोळी घालतात तशी चोळी घातलेली एक स्त्री देखील पहावयास मिळते. परदेशी शक तसेच कुशाण जातीच्या स्त्रिया चोळीच्या ऐवजी अर्धबाह्यांचे जॅकीट घालत असत असे चित्र आपल्याला पहावयास मिळते. मुलांची वस्त्रे नेसण्याची पद्धत हि पुरुषांच्या सारखीच असे हे सिद्धार्थ याच्या लहानपणाच्या चित्रांच्यावरून आपणास समजायला मदत होते. यामध्ये काही लहान मुलांच्या अन्तरीयाचे शेपूट आपल्याला स्पष्टपणे पहावयास मिळतात. तसेच काही मुलांनी उत्तरीयासारखा स्कार्फ आपल्या खांद्यावर टाकल्यासारखा पहावयास मिळतो.
सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा शाळेत शिकत असे तेव्हा त्याने पूर्ण बाह्या असलेला अंगरखा घातलेला चित्रामध्ये दाखवलेला आहे तसेच त्याच्या काही मित्रांच्या कमरेचा वरचा भाग उघडा आहे हे देखील चित्रामध्ये आपल्याला पहावयास मिळते. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध तीन वस्त्रे वापरीत असे १) अन्तरवासक या वस्त्राला प्रसिद्ध चिनी प्रवासी युआन श्वांग निवासन असे म्हणतो तसेच हे अधोवस्त्र हे कमरेत पट्ट्याने बांधले असे. २) उत्तरासंग याचे दुसरे नाव संकक्षिका असे होते या वस्त्राचा उल्लेख बाणाने देखील केलेला आहे याचा वापर हा उत्तरीयासारखा पांघरण्यासाठी केला जात असे. ३) संघाटी किंवा लांब अंगरखा अजिंठा लेणीमध्ये आपल्याला काही ठिकाणी गौतम बुद्धाने उत्तरासंग पांघरले असल्याचे पहायला मिळते. तसेच काही ठिकाणी आपल्याला पायघोळ अंगरखा घातलेला आहे असे आपल्याला पहावयास मिळते.
अश्या प्रकारे वाकाटक कालखंडामध्ये चित्रांच्या वरून वस्त्र रचना समजण्यास अधिक मदत होते तसेच तत्कालीन कालखंडात कोणती वस्त्रे वापरली जात असत हे देखील आपल्याला तत्कालीन वाड.मय(literature) याच्यावरून समजण्यास आपल्याला मदत होते. अशीच वस्त्रपरंपरा आपल्याला काही अंशात महाराष्ट्राच्या काही भागात आजही पहायला मिळते. फक्त त्या वस्त्र परंप्रेचे स्वरूप मात्र बदलेले आपल्याला दिसते.
संदर्भग्रंथ:-
१) राजतरंगिणी (काश्मीरचा इतिहास):- कल्हण
२) अजंठा:- गुलाम याझदानी, हैद्राबाद संस्थान
३) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ:- डॉ. वा. वि. मिराशी.
अजिंठा आणि वाकाटक
वाकाटकांच्या स्थापत्य शिल्प व चित्रकलेच्या अभ्यासाला अजिंठ्यापासूनच सुरुवात होते. याअगोदर पूर्व विदर्भातील वाकाटकांच्या वारशाचा आपण आढावा घेतला. त्यात मुख्यत्वे मांढळ येथील विटांची देवालये, शैव, वैष्णव आणि मातृदेवतांच्या मूर्ती, त्यापाठोपाठ मनसर येथील राजवाडा, हिडिंबा टेकडीवरील देवालये, आणि या दोन मुख्य बांधकामांच्या व्यतिरिक्त वाटेतील अष्टकोनी शिवदेवालय आणि इतर स्थापत्याचा विचार केला. मांढळ येथील सहा दगडी मंदिरे, त्यातील महत्त्वाची शिल्पे म्हणजे केवल नरसिंह, रुद्र नरसिंह, त्रिविक्रमाची मूर्ती, मंडपातील वराह आणि गुप्तरामच्या गुहेजवळील विष्णू. हे सर्व बांधीव स्थापत्य व शिल्प आपापल्या परीने अजोड आहे.
हिडिंबा टेकडीवरील प्रवरेश्वराचे विटांत बांधलेले देवालय हे गुप्त-वाकाटक काळातील स्थापत्याचा एक अद्वितीय नमुनाच म्हणावे लागेल. मनसर येथील राजवाडा नुसता भव्यच नाही तर आजूबाजूच्या बराकीच्या व्यापामुळे स्तिमितच करून सोडतो. अष्टकोनी शिवदेवालय हा तर एक वेगळाच स्थापत्यप्रकार त्या काळात समोर आलेला दिसतो. या व वाशिम येथील विटांच्या देवालयांनी नंतरच्या काळातील मध्य प्रदेशातील स्थापत्यावर आपली निश्चितच वेगळी छाप टाकलेली आहे. यापूर्वी दाखवून दिल्याप्रमाणे मांढळ येथील व हिडिंबा टेकडीवरील शिल्पे ही सारनाथ, प्रयाग, मथुरा येथील गुप्त शिल्पांचे नमुने आणि अजिंठा येथील परिपक्च शिल्प यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. अशा रीतीने विदर्भातील स्थापत्य शिल्प परंपरा कलेतिहासाच्या पुनः रचनेच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी अजिंठा येथील ठेव्याचे मोठेपण त्यामुळे मुळीच कमी होत नाही.
क्रमांक एकच्या गुंफेचा दर्शनी भाग
यापूर्वीही अभ्यासकांनी अजिंठा येथील स्थापत्य आणि शिल्पकलेचे निरनिराळ्या अंगांनी वर्णन केले आहे, एवढेच नाही तर त्याचे महत्त्वसुद्धा गायलेले आहे. अजिंठा येथील चित्रकलेचे नमुने यासाठी महत्त्वाचे आहेत की बाघ (मध्य प्रदेश) येथील गुंफा सोडल्यास इतकी प्राचीन इतिहासकाळातील चित्रे भारतात इतस्त्र कोठेही आढळत नाहीत. गुंफा क्रमांक ९ आणि १० च्या भिंतीवर इ.स. पूर्व पहिल्या शतकातील सर्वोत्तम कथनात्मक चित्रे आहेत. आणि ज्या कौशल्याने ती भिंतीवर चितारलेली आहेत त्याला संपूर्ण बौद्ध विश्वात जोड नाही. पण निष्ठुर निसर्ग आणि माणसाची बेपर्वाई त्यांमुळे त्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. एरवी त्या काळातील चैत्यगृहाच्या भिंतीवर चितारलेले छद्दत जातक अथवा शाम जातक हे अत्यंत प्रभावी अशा कथनात्मक चित्राचे नमुने आहेत.
वाकाटक काळातील चित्रांविषयी बोलायचे झाल्यास गुंफा क्रमांक १७मध्ये बुद्धचरित आणि सिंहलावदान या दोन कथांचे विस्तृतपणे चित्रण केले आहे. गुंफा क्रमांक एकमधील चित्रे प्रा. वॉल्टर स्पिक म्हणतात त्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या पूर्वीच्या जन्मातील राजसपणावर आणि राजा म्हणून मोठेपणावर भर देतात, तर गुंफा क्रमांक दोनमधील चित्रांचा भर मातृत्व आणि मातृदेवता यांवर आहे. वॉल्टर स्पिक यांना असे वाटते की गुंफा क्रमांक एक ही स्वतः हरिषेणाच्या प्रेरणेतून कोरली गेली असेल तर गुंफा क्रमांक दोनचे कर्तृत्व त्याच्या महाराणीकडे द्यावे लागेल. क्रमांक १६ मधील समोरच्या व्हरांड्यातील कुवलयपीडाला आपल्या मैत्री भावनेने आपलेसे करून नतमस्तक करायला लावणारे चित्र अपूर्वच म्हटले पाहिजे. तीच गोष्ट कालचक्राबद्दलही म्हणता येईल. या सर्व चित्रित गुंफांचे छत हा एक वेगळ्या अभ्यासाचाच विषय होईल. वॉल्टर स्पिक असे म्हणतात की, या सर्व उत्तरकालीन गुंफांचे चितारी हे वाशिम आणि इतर सामंतांच्या राजधानीतूनच आले असावेत. ते राजचितारीच होते.
कमळे दिसतात. या चित्रणांचे वैशिष्ट्य असे की या कमळाच्या ताटव्याभोवती दोन चक्रवाक पक्षी आरव करणारे दाखवले आहेत. या पाठीमागली काव्यात्म कल्पना अशी की रात्रीच्या वेळी जोडीतील नर आणि मादी एकमेकांना साद घालत ताटव्याभोवती फिरत राहतात. पण ते रातांधळे असल्याने त्यांची कधीच भेट होत नाही. ही संस्कृत काव्यातील कविकल्पना मराठीमध्ये अजून चकवा या शब्दाच्या रूपाने रेंगाळली आहे. मंडपातले मुख्य खांब जरी खरे दगडाचे असले, तरी छतावरील तुळ्या आणि त्यांना छेदणाऱ्या बलया (रॅफ्टर्स) चितारलेल्या आहेत. त्या सगळ्यामध्ये असलेले चौकोन हे निरनिराळ्या लौकिक प्रसंगांनी भरलेले आहेत. नेहमीचे पशू म्हणजे घोडा, रेडा, बैल, हरणे, हत्ती किंवा त्यांची दिव्य स्वरूपे म्हणजे पंख असलेले प्राणी अथवा जलचर ज्यांचा व्याल म्हणून संस्कृत वाङ्मयात उल्लेख केला जातो, यांची चित्रणे तर आहेतच पण त्याचबरोबर कोबड्यांची झुंज, निरनिराळ्या आविर्भावात असलेले विदूषक, मद्यपानात मग्न असलेली मिथुने अशा प्रकारचे प्रसंगही चितारलेले दिसतात. वॉल्टर स्पिक यांच्यामते येथील सर्व गुफांची छते सारखी आणि सुंदर असल्यामुळे वाशिम येथील दरबारातील आणि सामंतांच्या राजधानीतील चिताऱ्यांनाच सभागृहाच्या मध्यभागी असलेल्या कमळांच्या मेडालियन (छतावर चितारलेली तबके) पाहिल्यानंतर तर प्रेक्षक अवाक होऊन जातो. चित्रे रंगवण्यापूर्वी जो मातीचा गिलावा देऊन त्यावर चुनखडीचा हात दिला आहे तो इतका बेमालूमपणे की छत हे कापडी असून वाऱ्याच्या झुळुकीने त्यावर लहरी उमटल्या आहेत असेच वाटते. या मेडालियनच्या मध्यवर्ती गोलात पूर्णपणाने फुललेले कमळ दाखवलेले असून त्याभोवतीच्या गोल कड्यांमध्ये अनुक्रमे एकापाठोपाठ उसळणाऱ्या लहरी आणि कमळाच्या वेली दाखवलेल्या आहेत. उरलेल्या चार त्रिकोणात पस्त मध्यभागी पूर्णपणाने फुललेले कमळ, चार दिशांना पाच पाकळ्यांची फुले आणि उपदिशांना बाजूने दिसणारी लवलेली
▲ १९ क्रमांकाच्या गुहेचा दर्शनी भाग
▲ गुंफा क्रमांक १७ मधील सिंहलावदानचे चित्रण
या गुहा रंगवण्यासाठी बोलावले असावे. अनेक वेळा काही नवख्या युरोपियन पर्यटकांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी. आतमध्ये व बाहेर कक्ष असलेल्या गुंफा या भिक्षूच्या निवासासाठी आहेत. असे - असता त्यातील दिवाणखाने हे अशा प्रकारच्या लौकिक चित्रांनी का Π सजवले हे समजत नाही. विचार केला तर असे वाटते की, बौद्ध भिक्षु हे सर्वसंग परित्याग करून अध्यात्म जीवन घालवत असतात. तेव्हा राजवाड्याला शोभणारी अशी विलासी चित्रणे बौद्ध गुंफात का? मधुकर केशव ढवळीकर यांनी अजंठा येथील कथनात्मक चित्रावली म्हणजे नॅरेटिव्ह पेटिंग्ज व इतर सर्व अलंकारांचा अभ्यास करून समकालीन जीवन कसे असेल याचे मोठे सुंदर वर्णन त्यांच्या 'कल्चरल हिस्ट्री फ्रॉम द पेटिंग्ज ऑफ अजंठा' या ग्रंथात केले आहे. त्यांच्या मते गुप्त-वाकाटक काळ हे भारतातले सुर्वणयुग मानल्यास तत्कालीन समृद्ध जीवनाचा यात प्रत्यय येतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकात तर त्या ठिकाणी जे प्रसंग कोरलेले आहेत त्यांमध्ये जीवनातल्या कुठल्याही पैलूला स्पर्श केला नाही असे म्हणण्यास जागाच नाही, असे मत व्यक्त केले आहे. तेथील गुंफा क्रमांक ९, १० यातील सातवाहनकालीन चित्रे, गुंफा क्रमाक १, २, १६, १७ इ. मधील वाकाटककालीन चित्रे व त्यातील लौकिक जीवनातील फरक दाखवताना इ.स.च्या दुसऱ्या शतकातून पाचव्या शतकात जाताना घरातील फर्निचर, अंगावर ल्यायलेली भूषणे आणि वस्त्र प्रावरणे, यांच्यात पडलेला फरक लक्षात आणून देऊन वाकाटककालीन जीवन हे अधिक समृद्ध होते हे अधिक स्पष्ट करून दाखवले आहे. हॉलंड येथील संशोधक बाक्कर यांच्यामते ही अशा प्रकारची विलासी चित्रणे हेच स्पष्ट करतात की हरिषेणाच्या व नंतरच्या काळात भोगवादी संस्कृतीचा प्रभाव पडल्याने व विलासी जीवनाचा अतिरेक झाल्याने, सामाजिक नैतिक जीवनाला अधोगती आली. यांच्यामते या सर्वाचा परिणाम वाकाटक साम्राज्याच्या विनाशात झाला. वेगळ्या दृष्टीने पाहिले तर वाकाटक कालामध्ये देवाधिदेव हा एखाद्या प्रतिमागृहात अथवा सौधात राहात नसल्यामुळे, किंबहुना तो नुसता मुनी नसून मुनींद्र म्हणजे मुनीमधील देवराज असल्यामुळे भगवान बुद्धाची गंधकुटी ही एखाद्या प्रासादासारखी दिसते.
आणि अशा प्रकारच्या प्रासाद गर्भगृहात भगवान बुद्ध असल्यामुळे राजवाड्यावर शोभेशी चित्र गर्भगृहाच्या छतावर आढळली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याअगोदर उल्लेख केल्याप्रमाणे क्रमांक १, २, १६, १७ या गुंफातील भिंतीवर चितारलेली जातके, म्हणजे भगवान बुद्धाच्या जन्मजन्मांतरीच्या कथा इतक्या सुंदर रीतीने चित्रित केलेली आहेत, की पाहणारा स्तिमित होऊन जातो. उदाहरणार्थ मृगजातकात उपकार केलेला माणूस किती कृतघ्न होऊ शकतो हे लक्षात येते तर कपी जातक आणि हंस जातकामध्ये माकड किंवा हंस यासारखे पशू-पक्षी आपल्या सहकाऱ्यांविषयी काळजी दाखवताना आणि त्यांचे रक्षण करताना स्वतःच्या प्राणाचीसुद्धा पर्वा करत नाहीत हेसुद्धा लक्षात येते. काही जातक कथा महत्त्वाच्या एखाद्या प्रसंगावरूनच चित्रित केल्या जातात. उदाहरणार्थ मत्स्य जातक, तर सिंहलावदान व विश्वंतर जातक ही दोन जातककथा सभागृहाच्या एका पूर्ण भिंतीवर चितारलेल्या आढळून येतात. ही चितारताना पहिला प्रसंग व त्यानंतरचा दुसरा प्रसंग अशा कालक्रमानुसार न
चितारता काही प्रसंग भिंतीच्या वरच्या भागात तर काही तळाशी तर मुख्य प्रसंग मध्यभागी अशा वेगळ्याच शैलीने चितारलेली आहेत,
▲ अत्यंत भाविकपणे आणि रसिकतेने चितारलेली सौदरनंद.
बुद्धचरित्र आणि सौदरनंद ही तर अत्यंत भाविकपणे आणि रसिकतेने चितारलेली आहेत. बुद्ध चरित्र हे बुद्धाच्या अगदी जन्मापासून किंबहुना स्वर्गात तो बोधिसत्व म्हणून आपल्या अवताराची वाट पाहात असतानापासून ते धर्मचक्र प्रवर्तनापर्यंतचे प्रसंग मोठ्या प्रभावीपणे चितारले आहेत. तर सुंदरी नावाच्या राजकन्येशी नुकत्याच विवाहित झालेल्या बुद्धाच्या भावाची नंदाची कथा असून, भगवान बुद्ध निग्रहपूर्वक संन्यास दीक्षा देऊन त्याची कशी परीक्षा पाहतात त्याचे प्रत्यंतर नंद कथेच्या चित्रणात येते. त्याच्या मनाविरुद्ध दिक्षा दिल्याने नंद आपल्या बायकोची आठवण काढत झुरत असतो, आणि हळूहळू भगवान बुद्ध संन्यस्त जीवनाकडे त्याला कसे घेऊन जातात याचे प्रत्ययकारी चित्रण या ठिकाणी आहे.
अजिंठा येथील कला ही तेथील चित्रकलेमुळे इतकी प्रभावित झाली आहे की शिल्पाकडे प्रेक्षकांचे लक्ष त्या मानाने कमी जाते. असेही म्हटले जाते की गुप्तांच्या आश्रयाखाली मथुरा, प्रयाग आणि सारनाथ येथील कला केंद्रात ज्या प्रकारची शिल्पकला बहरली तिला इतरत्र कुठेही तोड नाही. अजिंठा येथे प्रसिद्ध कलेतिहासतज्ज्ञ डग्लस बॅरट यांच्यामते सारनाथ येथील उभ्या, बैठ्या अथवा निपन्न (पहुडलेल्या) बुद्धमूर्तीच्या रेखामधील जो मधाळपणा, सहज लावण्य आणि नाजूकपणा आहे, तो अजिंठा येथील जडशीळ (पॉण्डरस) मूर्तीत नाही. परंतु अजिंठा येथील मूर्ती या सारनाथ येथील बुद्धमूर्ती इतक्या सुबक व नाजूक नसल्या तरी, त्यातून ज्या प्रकारे शांतस्स व्यक्त होतो त्याचा रसिकाच्या मनावर खोल ठसा उमटतो तो वेगळाच आहे. गुंफा क्रमांक १९ च्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेले बुद्धचरित्रातील दोन प्रसंग त्यातील भावांच्या अभिव्यक्तीमुळे अतुलनीयच आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दीपंकर बुद्धाच्या समोर बुद्धाचे पाय चिखलाने माखू नयेत म्हणून आपला केशपाश ज्याने पसरून ठेवलेला असा सुमेध, त्याच्या पाठीमागे हातात फुले घेऊन उभी असलेली माळीण, हे त्या प्रसंगाचे गांभीर्य आणि वेगळेपण दाखवतात. तर दरवाजाच्या डाव्या बाजूला भगवान बुद्ध, यशोधरा आणि राहुल यांचे चित्रण आहे. शब्दशः उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या हातात भिक्षापात्र घेऊन ठाकलेल्या बुद्धासमोर यशोधरा आणि राहुल मोठ्या विस्मय आणि आदराने बघतायत. बुद्धाकडून आपला वारसा घे असे राहुलला त्याच्या मातेने निक्षून सांगितलेले असल्यामुळे ते भिक्षापात्र हेच आपले सर्वस्व आहे म्हणून ते स्वीकारणारा राहुल हाही प्रसंग तितकाच भावरम्य आहे. बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनातले हे दोन टोकाचे प्रसंग असल्यामुळे आणि
▲ गुंफा क्रमांक चारमधील अवलोकितेश्वराचे शिल्प
▲ गुंफा क्रमांक १९ मधील स्तूप
त्यातून वर कोरलेल्या मुकुटामुळे बुद्धाचे चक्रवर्तित्व सूचित केले असल्यामुळे आध्यात्मिक व काव्यात्म दृष्टीने हे दोन्ही प्रसंग फार महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच ते अनेक ठिकाणी शिल्पांच्या रूपाने वारंवार चित्रित केलेले आढळतात. १९ क्रमांकाच्या या गंधकुटीच्या वरच्या गवाक्षाच्या दोन बाजूस असलेले यक्ष हे शिल्पदृष्ट्या अप्रतिम आहेत. त्यांची मोजकीच पण सुंदर आभरणे (अलंकार) तसेच वस्त्रप्रावरणे आणि मस्तकाच्या एका बाजूला रुळणाऱ्या कुरळ्या केसांचा भार याव्यतिरिक्त त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे अप्रतिम आहेत. त्या मूर्ती निश्चितपणाने रंगवलेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांचे अर्धवट मिटलेले डोळे पूर्णपणे त्यातले भाव व्यक्त करत नसले तरी रंगवल्यानंतर या प्रतिमा समकालीन शिल्पात अप्रतिम होत्या यात शंका नाही. अष्टभय-त्राण (आठ संकटातून मुक्त करणारा) अवलोकितेश्वराची सर्वात प्राचीन चित्रणे कदाचित अजिंठा येथीलच असतील. गुंफा क्रमांक पंचवीसमधले चित्रण, तेथील दगड चांगल्या पोताचा नसल्यामुळे आकर्षक वाटत नसले तरी त्याची उणीव कदाचित रंगांनी पूर्ण केली असेल. पण क्रमांक चारमधील वहांड्यात असलेले तसेच चित्रण हे अपूर्व आहे असे म्हणता येईल. क्रमांक २६ च्या गुंफेत श्रावस्ती येथील चमत्काराची शिल्पे, चैत्यगृहाच्या आतील भिंतीवर अनेक वेळा कोरलेली आहेत, पण मारविजय आणि महापरिनिर्वाण ही चैत्यगृहाच्या डाव्या भिंतीवर कोरलेली दोन शिल्पे ही शांत रसाच्या आविष्काराची वेगळ्या प्रकारची चित्रणे समकालात अजोड आहेत हे स्पष्ट आहे.
अजंठा येथील चित्रकलेविषयी आपली मतं निरनिराळ्या प्रकारच्या आणि निरनिराळ्या खंडातील चित्ररसिकांनी वेगवेगळ्या वेळी व्यक्त केली आहेत. शिवराम मूर्ती यांच्यामते विष्णुधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रामध्ये अपेक्षित असलेली प्रमाणबद्धता आणि अष्टरसांची अभिव्यक्ती अजिंठापेक्षा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी इतक्या उत्कटपणे व्यक्त झालेली नाही. प्रसिद्ध कलामर्मज्ञ वासुदेवशरणजी अग्रवाल यांच्या मते कालिदासाला अभिप्रेत असलेली अभिजात सौदर्याची 'पुण्य' अभिव्यक्ती अजिंठा येथेच सापडेल. त्यासाठी प्रमाण म्हणून 'यदुच्यते पार्वति पापवृत्तये न रुपमित्यव्यभिचारि तद्वचः' या कालिदासाच्या वचनात अभिप्रेत असलेला सौदर्य आणि पावित्र्य यांच्या अप्रतिम संगमाचा प्रत्यय या ठिकाणी ठायी ठायी येतो. लडाखमधील आल्ची येथील बुद्धविहारातील विशाल भित्तीचित्रे पाहिल्यानंतर गुंफा स्थापत्य कलेचे मर्मज्ञ म. न. देशपांडे यांच्या तोडातून सहज उद्गार बाहेर पडले "अरे अजिंठ्याची चित्रकला इथपर्यंत येऊन पोहोचली तर!" मध्य आशिया, चीनमधील गुंग कांक, दुन हुवांग,
▲ २६ क्रमांकाच्या गुंफेतील श्रावस्ती मिरॅकल
येथील शिल्पे आणि चित्रे डोळे भरून पाहतानासुद्धा हेच जाणवते की भारताच्या सुवर्णयुगातील शिल्पकला आणि चित्रकला एका आगळ्या रूपात मोठ्या दिमाखाने मध्य आशिया, चीन आणि अतिपूर्वेच्या देशांत अजून वावरत आहे.
अजिंठा येथील शिल्पकला आणि चित्रकला हे भारतीयच काय पण जागतिक कलेच्या इतिहासातील एक सोनेरी पान असेल तर येथील स्थापत्यकलेतसुद्धा स्वतःची अशी एक धाटणी आणि आकर्षकपणा आहे. अजिंठा येथे वाकाटक काळातील महत्त्वाची चैत्यगृहे दोनच आहेत. तिसरे एक भव्य चैत्यगृह ऋषिकराजाने अजिंठ्याच्या डोंगरात वरच्या बाजूस कोरावयास सुरुवात केली होती, ते कदाचित गुंफा क्रमांक १९ आणि २६ यांच्यापेक्षाही जास्त रमणीय झाले असते. पण स्थूल आराखडा कोरण्यापलीकडे काम गेलेच नाही. ते अचानक बंद पडले. क्रमांक १९ चे चैत्यगृह हे ऋषिक देशाचा स्थानिक राजा उपेंद्रगुप्त याने कोरविले आहे. विस्ताराने ते क्रमांक २६ पेक्षा बरेच लहान आहे. परंतु या मोठ्या चैत्यगृहापेक्षा ते अधिक देखणे आणि सुंदर आहे. प्रशस्तीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मुनींद्रासाठी कोरलेली ती डौलदार गंधकुटी आहे. पुढे असलेला अर्धमंडप आणि पाठीमागे असलेले गवाक्ष व त्यावरील हर्रम्यांच्या (हवेली) पंक्ती बघितल्यानंतर तो राजप्रासाद आहे याची खात्री पटते, गवाक्षाच्या भोवती समृद्धीचे प्रतीक असलेले शंखनिधी आणि पद्मनिधी मोठ्या डौलात बाजूला उभे आहेत. अगोदर वर्णन केल्याप्रमाणे मुख्य द्वाराच्या बाजूला भगवान बुद्धाच्या आयुष्यातील दोन प्रसंग शिल्परूपाने दाखवले आहेत. पाठीमागल्या बाजूने गोलाकार असलेल्या या चैत्यगृहाच्या पूजास्थानी एक स्तूप असून त्याच्या अंडभागासमोर भगवान बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. स्तूपावरील हर्मिकेच्यावर एकावर एक अशी तीन छत्रे असून ती भगवंताच्या वैराग्य, करुणा व ज्ञानाची प्रतीके आहेत. गंधकुटीच्या कमानीवर कोरलेले छत सभागृहातील खांबावर विराजमान आहे. खांबांच्या वरच्या भागात, म्हणजेच स्तंभशीर्षांवर, कार्ला व कान्हेरी येथील गंधकुटीप्रमाणे निरनिराळ्या वाहनांवर बसलेले यक्ष, गंधर्व, मुनी जणू भगवंताच्या दर्शनासाठीच येत आहेत असे दाखवलेले आहे. पण स्तूपाजवळच्या खांबाच्या ब्रेकेट्स (हस्त) वर निरनिराळी वाद्य वाजवण्यात, स्तोत्र गायनात आणि नृत्याविष्कारात मग्न असलेले भक्तगण दिसतात. या शिल्पांच्या वरून, प्रशस्तीमधल्या मुनींद्र या बुद्धाच्या वर्णानावरून हे चैत्यगृह आता प्रासादात रूपांतरित झालेले आहे असे स्पष्ट दिसते. आणि त्यामुळे महायान प्रथेत अभिप्रेत असलेली, आचार्य असंग याच्या महायानसूत्रालंकारात वर्णन केलेली पूजापद्धती येथील शिल्पांतून व्यक्त झालेली दिसते. क्रमांक २९ ची गुंफा ही ऋषीक राजाचा प्रतिस्पर्धी असलेल्या अश्मकरराजाच्या आचार्याने, स्वतः आणि अश्मक राजा दोघांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून निर्मिली आहे. त्या भव्य कुटीच्या मुखदर्शनावर (फसाड) शंखपद्मनिधीच्या ऐवजी भीमकाय बुद्धमूर्ती आहेत. या चैत्यगृहाचे अंतरंग हे तितकेच भव्य आणि मनावर छाप पाडणारे आहे. प्रदक्षिणापथाच्या भिंतीला लागून परिनिर्वाण, मारविजय आणि मोठ्या संख्येने श्रावस्ती चमत्काराची शिल्पे आहेत. त्यातील परिनिर्वाण बुद्ध आणि श्रावस्तीचा चमत्कार या शिल्पांना एक वेगळा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झालेला दिसतो. कारण उत्तरलीन मध्य आशियाई व चीनमधील गुंफामधून अशा प्रकारच्या बुद्धाचे चित्रण बऱ्याच वेळा मुद्दाम केल्यासारखे वाटते. तर श्रावस्ती चमत्काराचे शिल्प इतर समकालीन महायान गुंफांच्या मध्ये महाराष्ट्रात निरपवादपणे कोरलेले आढळते. अशा रीतीने महायान परंपरेतील गुंफांना अजिंठा येथील चैत्यगृहे आणि विहार हे आदर्शवत असल्याचे दिसतात. गर्भगृहातील स्तूपाच्या समोर गुंफा क्रमांक १९ प्रमाणेच बुद्धप्रतिमा आहे. पण स्तूपाभोवती अनेक उभ्या बुद्धमूर्तीचे चित्रण केले आहे. स्तूपाचा वरील गोलाकार भाग एरवीच उंचावर आहे, पण त्याच्या मध्यावर हंस विहरत असल्याचे दाखवल्यामुळे तो जणू काही हिमालयापेक्षाही उंच आहे असे सुचवले आहे. या व पहाडपूर (बांगलादेश) येथील स्तूपामध्ये, मला स्वतःला स्तूप विश्वरूप झाल्याची चाहूल लागलेली दिसते.
अजिंठा येथील गुंफांच्या कालक्रमाविषयी थोडेसे विवेचन करणे प्रस्तुत होईल. क्रमांक ९, १०, १२, १३, आणि १५ अ येथील विहार आणि चैत्यगृहस्थापत्य, त्याच्या धाटणीवरून, खांबांच्या घडणीवरून सातवाहन काळातले आहे यात शंका नाही. आणि त्यामुळे उरलेल्या २५ विहार चैत्यगृहांच्या गुंफा नंतरच्या काळातील आहेत याविषयी इतिहासकारांना शंका नव्हती. फर्ग्युसन आणि बर्गिस यांच्या मते तथाकथित हीनयान आणि महायान स्थापत्य यांच्या उभारणीत बराच काळ (हियाटस) गेला होता. तो १५० वर्षांचा असावा अशी त्या दोघांची कल्पना होती. सातवाहनांच्या कारकीर्दीचा शेवट त्या काळच्या समजुतीप्रमाणे इ.स. ४०० मध्ये झाला. त्यामुळे या गुंफा कोरण्यास इ. स. ५५० मध्ये सुरुवात झाली असे फर्ग्यूसनला वाटणे साहजिक होते. आज आपणास माहीत आहे की, सातवाहनांचा शेवटचा राजा तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस होऊन गेला. त्यात गुंफा क्रमांक एकच्या दरवाजाच्या आतील बाजूस पुलकेशी द्वितीय याला नजराणे घेऊन आलेले इराणमधील राजदूत अशा प्रसंगाचे चित्रण असावे असे काही अभ्यासकांना वाटले. त्यातच वाकाटकांचे व अजिंठा येथील शिलालेख ज्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीत मत झाले होते. नंदिवर्धन येथून राज्य करणारा प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१० ते ४४०) याचा आज्याचा देवगुप्त असा उल्लेख असल्यामुळे व या नावाचा सातव्या शतकात एक गुप्त राजा होऊन गेल्याने अजिंठा येथील कलाकृती या सातव्या शतकातल्या असाव्यात असेही काही इतिहासकारांचे मत झाले. या सर्वांवर पडदा पडला तो वा. वि. मिराशी यांच्या संशोधनामुळे. अजिंठ्याला लागूनच असलेल्या जिंजाळा येथील घटोत्कच गुंफा आणि अजिंठा येथील १७ क्रमांकाची गुंफा यांचा आश्रयदाता एकच आहे हे त्यांनी अभिलेखातील पुराव्याद्वारे सिद्ध केले. त्यामुळे अजिंठा येथील क्रमांक १७च्या गुंफेपासून सुरू होणारा स्थापत्यकलेचा पसारा हा १५० वर्षांत संपन्न झाला या मताला मोठा धक्का बसला. असे सिद्ध झाले की अजिंठा व जिंजाळा येथील सर्व गुंफांचे काम एका पिढीतच म्हणजे जवळपास २० वर्षांत पूर्ण झाले. वॉल्टर स्पिक यांनी आपल्या प्रतिभासंपन्न व अपूर्व अशा संशोधनाच्या आधारे इ.स. ४६० ते ४८० या वीस वर्षांत सर्व २५ गुंफा कोरल्या गेल्या असे ठामपणाने मांडले आहे. दशकुमारचरितातील संदर्भाच्या साहायाने या मतामध्ये त्यांनी आणखीन रंग भरले आहेत. एकूण स्थापत्य शिल्प आणि चित्रकला यांचा अजिंठा येथील विकास आणि परस्पर संबंध लक्षात घेता, गुंफा कोरण्याचे काम इ.स. ४६२ ते ४६८ या पाच वर्षांतच पूर्ण झाले. इ.स. ४६९ पासून ४७७ पर्यंत गर्भगृहातील बुद्ध प्रतिमा आणि विहार स्थापत्यामधील रंगकाम पूर्ण झाले असावे. दरवाजांच्या चौकटी आणि त्या चौकटीसाठी असलेल्या दगडी उखळी यांच्या विश्लेषणात्मक अभ्यासावरून व बाघ (धार, मध्य प्रदेश) गुंफांच्या स्थापत्य चित्रकलेच्या तुलनात्मक अध्ययनावरून ते अशाही निष्कर्षाला आले की इ.स. ४७२ ते ४७४ या काळात अजिंठा येथील कामामध्ये खंड पडला आणि येथील कलाकार हरिषेणाच्याच राज्याचा भाग असलेल्या माळव्यात स्थलांतरित झाले व त्यांनीच बाघ येथील गुंफांना आकार दिला; आणि चित्रांनी सजवले. इ.स. ४७७ मध्ये हरिषेणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुर्बळ मुलाला सारून अश्मकांनी वाकाटक वंश संपुष्टात आणला. आणि अशा रीतीने या बौद्ध कला परंपरेला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला, नंतर फक्त पन्हाळेकाजी व वेरूळ अशा ठिकाणीच बौद्ध कलेचा आविष्कार दिसतो.
स्पिक यांची ही कालक्रम ठखण्याची पद्धती अनेक अभ्यासकांना मान्य नाही. पण त्यात बराच तथ्यांश असून तिचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे हे त्यांच्या इंटूझिव फिगर्स (अप्रस्तुत असलेल्या कलाकृती) च्या विवेचनावरून स्पष्ट दिसते. अशा प्रकारच्या पाहुण्या शिल्पकृती कान्हेरी, महाकाली, कोकणातील अनेक गुंफा व नाशिक येथील गुंफांच्या मध्ये प्रकर्षाने व नियमितपणे सापडतात. स्पिक म्हणतात त्याप्रमाणे हरिषेण, त्याचे सामंत : अश्मकराज व हृषीकराज उपेंद्रगुप्त, माथुरक श्रेष्टी यासारख्या प्रतिष्ठित आणि धनवान आश्रयदात्यांचा लोप झाल्यानंतर ही पाहुणी शिल्पे ठिकठिकाणी कोरलेली आढळून येतात. ती काही वेळा भिक्षूनी अथवा साध्यासुध्या उपासकांनीच केल्याचे दिसते. एकूण असे म्हणता येईल की, हरिषेणाच्या अत्यंत उमेदीच्या काळात (इ.स. ४६२ ते ४७७) बौद्ध धर्माला समाजातील अभिजनांचा उदार आश्रय होता. तो हरिषेणाबरोबरच संपुष्टात आला. याचे कारण आर्थिक व राजकीयही असावे. कारण अहिच्छत्र म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशाच्या बरेली येथील ५०० महाजन (आर्य) हे कर्नाटकात आय्यावोळे (आत्ताचे आय्याहोळे जि. धारवाड) या ठिकाणी स्थलांतरित झाले. व बदामी येथील चालुक्यांचा त्यांच्याबरोबरच उत्कर्ष झाला. ते त्रि-महाराष्ट्रकाचे (म्हणजे कुंतल अथवा उत्तर कर्नाटक, विदर्भआणि अश्मक अथवा पश्चिम महाराष्ट्र) यात पसरलेल्या ९६ हजार खेड्यांचे मालक झाले. पाचव्या ते आठव्या शतकादरम्यानचे महत्त्वाचे कलाविष्कार मोठ्या संख्येने कर्नाटक व आंध्रात आढळतात. वाकाटकांच्या बरोबरच बौद्ध कलेचा हजारभर आयुष्य असलेला महाराष्ट्रतला कलासंसार अजिंठ्याबरोबर संपुष्टात आला.
(सर्व छायाचित्रे : विजय राव, मंजिरी भालेराव)
response.lokprabha@expressindia.com
लिहिले गेले तिचा काळ इ.स. आठवे शतक असावा असे काही विद्वानांचे
अजंठा येथील कथनात्मक चित्रे
अजिंठा येथील कलेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य यापूर्वी अधोरेखित करण्यात आलेले आहेच. हे असे ठिकाण आहे की जेथे स्थापत्य, शिल्प आणि चित्रकला यांचा अभूतपूर्व संगम झालेला आढळतो. शिल्प आणि चित्रकला यांचा या ठिकाणी इतका सुंदर मेळ आहे की सारनाथच्या तुलनेने येथील शिल्पामधील काही उणेपणा दाखवल्यास असे उत्तर देता येईल की येथील मूर्ती नुसत्या पाषाणमूर्ती म्हणून बघण्याच्या नाहीत. आपण ज्याप्रमाणे दरवर्षी गणपती रंगवतो त्याप्रमाणे या रंगवलेल्या होत्या. त्यामुळे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्यांचे पूर्ण मूल्यांकन होऊ शकत नाही.
चेहऱ्यावरचे भाव हे चित्रकलेतील काही अंगभूत पैलूंमुळे अधिक प्रभावीसुद्धा होऊ शकतात. एवढे मात्र ध्यानात ठेवले पाहिजे की गुंफा क्रमांक २६ येथे चित्रापेक्षा निखळ शिल्पावर जास्त भर देण्यात आला आहे. आणि हे अजंठा येथील वैशिष्ट्य वेरुळमध्ये प्रभावीपणे वापरण्यात आले असे फर्ग्यूसन यांचे मत आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिशिल्पांच्या बरोबर अलंकरणात्मक शिल्पालासुद्धा अधिक महत्त्व दिल्याचे वेरुळ येथे आढळते, असे त्यांचे मत आहे. चित्रकलेचा आस्वाद कसा घ्यावा याविषयीचे विवरण कामसूत्रावरील टीकेमध्ये आले आहे ते असे.
रुपभेदाः प्रमाणानि भावलावण्ययोजनम्
सादृश्यमं वर्णिका भम्गः षड्विधंम चित्रलक्षणम्
▲ प्रत्येक विहाराच्या बाहेर हारिती या यक्षीचे चित्रण असावे असा संकेत आहे.
एखाद्या चित्राचा निकष म्हणून हे सहा घटक सांगितलेले आहेत. चित्राचा विषय असलेल्या प्राण्यांचा किंवा वस्तूंचा बांधा, प्रमाणबद्धता, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, त्या वस्तूचे अंगभूत सौदर्य दाखवण्याचे कौशल्य, ती वस्तू आणि चितारलेली वस्तू यामध्ये असलेले साम्य आणि छाया-प्रकाश यांचा खेळ मांडण्यासाठी रंगाचा वापर हे ते सहा घटक होत. डॉ. शिवराम मूर्ती, कृष्ण देव आणि म. न. देशपांडे यांनी अजंठा येथील चित्रकलेची ही सहा लक्षणे लक्षात घेऊन बारकाईने अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आले की अजंठा येथील चित्रकाराने प्राचीन चित्रकलेचे तंत्र पूर्णपणे आत्मसात केले होते व त्या कसोटीला ते उतरले होते असे दिसते. यापूर्वीसुद्धा छतावरील निरनिराळ्या प्रकाराची प्रयोजने (मोटीफ) उदा. मदिरापानात दंग असलेली मिथुने, निरनिराळ्या प्रकारचे व्याल, शंखपद्मस्वस्तिकासारखी शुभचिन्हे यांचा वापर येथील चित्रकारांनी फार सुंदर रीतीने केलेला आहे. त्याचबरोबर पद्मपाणि आणि वज्रपाणि, प्रवचनात दंग असलेले भगवान बुद्ध, छद्दन्त जातकामधील सुप्रसिद्ध मरणोन्मुख राणी (डाइंग प्रिन्सेस), गुंफा क्रमांक १६ च्या व्हरांड्याच्या भिंतीवरील इंद्र आणि आकाशातून स्वैर विहार करणारे गंधर्व आणि अप्सरा, वलयापीड हत्ती व भगवान बुद्ध या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि सभोवतालच्या त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचे भाव, विश्वंतर जातकामध्ये विश्वतर आणि त्याची पत्नी आपल्या मुलासमवेत नगर सोडून जात असतानाचे नागरिकांच्या चेहऱ्यावरचे शोकाकुल भाव आणि एकूणच वातावरण, सिंहलअवदानातील राक्षसीने मारून टाकल्यानंतर जमा झालेली गिधाडे व तिथे दाटलेली भीषणता, त्याचप्रमाणे महिष जातकामध्ये कधी माकडांशी प्रेमाने खेळणारा तर कधी रागाने उसळलेला रेडा आणि घाबरलेले माकड, तसेच शिबी जातकामध्ये राजाने आपले मांस कापण्यासाठी खड़ग हातात घेतले असता त्याची विनवणी करणारी राणी हे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणजे येथील कलाकारांनी कौशल्याची कुठली परिसीमा गाठली होती हे सहज लक्षात येते. आणि त्यामुळेच भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलेल्या शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत या सर्व रसांचे समर्पकपणे चित्रण झाल्याचा प्रत्यय भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येतो. या सर्व रसांच्या पलीकडे असलेला व त्या सर्वांचा राजा म्हणून ज्याचे वर्णन करण्यात येते त्या शांत रसाचा प्रत्यय निरनिराळ्या जातकामधून येतो. उदा. कपि जातक, हंस जातक, विदुर पंडित जातक, मैत्रीबल जातक यामध्ये असलेले उपदेशपर प्रवचन रेखाटणारे प्रसंग. ज्यांचे बौद्ध परिभाषेमध्ये समाज असे वर्णन केले जाते. या बुद्धप्रवचन प्रसंगातसुद्धा याच शांत रसाचा प्रत्यय येतो. शांत रसाचा कळस ज्याला म्हणता येईल अशा मारधर्षण प्रसंगाच्या क्रमांक २६ या गुंफेतील शिल्पात त्याचप्रमाणे इतरत्र चितारलेल्या या प्रसंगात परिपूर्णपणे रेखाटलेला दिसतो.
एका दृष्टीने पाहिले तर जातक कथा या बुद्धाच्या समकाळातील सामाजिक जीवनाच्या प्रतिबिंबासारख्या असल्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात घडलेले प्रसंग त्यामध्ये वर्णिले आहेत. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यात असलेल्या रागद्वेषाचे प्रसंग, त्यातून उत्पन्न होणारे संघर्ष, अथवा मानवी जीवनाला स्वाभाविक असलेल्या स्नेह, आकर्षण, प्रेम, शृंगार किंवा करुणा या स्थायी भावांचा किंवा रसांचा त्यात प्रत्यय आला असल्यास त्यामध्ये अनैसर्गिक काही आहे असे वाटत नाही. परंतु या सर्व आठ रसांच्या कल्लोळात सहसा न सापडणारा आणि आध्यात्मिकदृष्ट्या मानवी जीवनातील व्यर्थता लक्षात आल्यानंतर पस्तत्त्वाची ओढ दाखवणारा, संवेग, शम आणि वैराग्य हे ज्याचा पाया आहे अशा शांत रसाचे चित्रण अजंठा येथील चित्रकलेत प्रकर्षाने आढळून येते, आणि ते अपेक्षितही आहे. येथील चित्रित केलेले प्रसंग हे फक्त एखाद्या सहृदयाच्या रसास्वादनासाठीच नसून यांच्या परिपोषातून शांत रसाचा मार्ग दाखवणाऱ्या प्रसंगाच्या चित्रणात आहे. ही चित्रे एखाद्या आर्ट गॅलरीत मांडण्यात आलेली चित्रे नसून या चित्रांच्या दर्शनाने भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचे अनुसरण उपासक आणि भिक्षूच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे होऊ शकेल या हेतूने केलेले आहे. भगवान बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचा तीन महत्त्वाच्या तत्त्वांमध्ये सारांश सांगावयाचा झाल्यास तो प्रज्ञा, शील आणि समाधी असा सांगता येईल. हा सारांश वेगळ्या रीतीनेसुद्धा इतर धर्मविचारातून प्रकट झालेला असतो. सम्यक् दर्शन, सम्यक् चारित्र्य आणि सम्यक् ज्ञान या रीतीने जैन पंथात सांगितला आहे. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गावर पूर्ण श्रद्धा, अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशीलाबरोबरच सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम आणि सम्यक् स्मृती यांच्या साह्याने शीलयुक्त आचरण, व सर्वोच्च ज्ञानस्वरूप असलेली प्रज्ञा, ती मिळवण्यासाठी समाधी म्हणजे मनाची एकाग्रता असे ढोबळपणे या उपदेशाचे वर्णन करता येईल. ज्या साधक व्यक्तीने मला सम्यकसंबुद्धाच्या म्हणजे परिपूर्ण ज्ञान झालेल्या बुद्धाच्या मार्गाने जायचे असा निश्चय केलेला असतो, तिला स्वतःच्या ठिकाणी दहा सद्गुण अंगी बाणवावे लागतात. हे गुण आपल्याकडे असावेत म्हणजे पुरे झाले अशी त्यात कल्पना नाही. या गुणांची पराकाष्ठा म्हणजे पारमी किंवा पारमीता मिळवावी अशी त्यात अपेक्षा आहे. सुमेध तापस म्हणून या त्याच्या पूर्वजन्मात शाक्य मुनीने बुद्ध दीपंकराचे दर्शन झाल्यानंतर, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन मलाही अशाच प्रकारची स्थिती अनुभवयाची आहे अशी मनाशी खूणगाठ बांधली त्यावेळेपासून साधक म्हणून तो बोधिसत्व झाला. बोधिवृक्षाखाली बसल्यानंतर माराच्या (मदनाच्या) हल्ल्याची पर्वा न करता तो बोधिज्ञान मिळवतो. सुमेध तापसापासून शाक्य बुद्धापर्यंतचा हा आध्यात्मिक मार्ग पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कल्पे (युगे) घालवावी लागली.
▲ गुंफा क्रमांक १७ मध्ये मंडपाच्या एका संपूर्ण भिंतीवर चित्रित केलेले विश्वंतर जातक.
▲ सिंहल अवदानाच्या कथेला बौद्ध परंपरेमध्ये वेगवेगळ्या रीतीने महत्त्व आहे.
मधल्या काळात अनेक बुद्ध होऊन गेले. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा शाक्य मुनीने जन्मजन्मांतरी भोगलेली संकटे, कष्ट, मानपमान, दुःख यांनी खडतर झाला होता. पण या सर्व जन्मांच्या शृंखलांना जोडणारा दुवा म्हणजे दहा सद्गुणांचा प्रकर्ष आहे. त्याने भोगलेली सर्व दुःखे ही हे गुण बाणवण्यासाठी दिलेली किंमत आहे. या असंख्य जन्मापैकी फक्त ५४४ जन्मांच्या कथा या चुल्ल वग्गामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्यांचाच उल्लेख नेहमी जातक कथा म्हणून केला जातो. जातक म्हणजे जन्म, म्हणजे त्या त्या विशिष्ट जन्माच्या या कथा आहेत. या कथा भगवान बुद्धाने त्यांच्या शिष्यांनी किंवा इतरांनी प्रश्न विचारले असता सांगितलेल्या आहेत. यातील एका दृष्टीने मौजेची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथांमधील महत्त्वाची पात्रे ही सिद्धार्थ गौतम म्हणजेच शाक्य बुद्ध याच्या जीवनात आलेल्या व्यक्तीच होत. उदाहरणार्थ सिद्धार्थ गौतम आणि त्याची पत्नी यशोधरा, त्याचे प्रसिद्ध शिष्य सारीपुत्र आणि मौद्गलायन, सावत्र भाऊ आनंद, चुलत भाऊ देवदत्त हीच पात्रे त्यात दिसतात. या कथांचा विशेष असा की हे एखाद्या सदगुणाचे परिपालन करीत असताना सिद्धार्थ गौतमाने त्या जन्मात दाखवलेला धीरोदात्तपणा व त्याच्या विरुद्ध प्रकर्षाने दिसून येणारा देवदत्ताचा दुर्गुण किंवा दुष्टपणा यातील विरोध स्पष्टपणे दिसावा असे चित्रण असते. हंस जातकाचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास हंसांचा राजा जर सिद्धार्थ गौतम असेल तर त्याचा प्रधान हा त्याचा आवडता भाऊ असतो. आणि त्या दोघांना पकडून राजासमोर सादर करणारा कोळी हा देवदत्त असतो. एका बाजूला भगवान बुद्ध हा त्याच्या उत्तरोत्तर जन्मात आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होऊन बुद्धपदाला पोहोचतो. त्याला साथ देणारे आनंद, सारीपुत्र हे त्याच्याबरोबर राहिल्याने किंवा त्याच्या मार्गाचे अनुसरण केल्यामुळे अर्हत् पद प्राप्ती करून घेतात, तर त्याला विरोध करणारा त्याचा मत्सर करणारा, त्याच्या लौकिक आणि आध्यात्मिक मार्गात अडथळे आणणारा देवदत्त हा सरतेशेवटी सर्वात भयंकर अशा सातव्या नरकात जाणार याची या जातक कथा पुनः पुनः श्रोत्यांना आणि दर्शकांना आठवण करून देत असतात.
त्रिपिटकामधील चर्यापिटकात,
(सर्व छायाचित्रे : विजय राव, आशुतोष बापट, सायली पलांडे दातार)
दहापैकी सात पारमीचा उल्लेख असून त्या स्पष्ट करणाऱ्या २० ते ३० कथा थोडक्यात सांगितल्या आहेत. तर जातक कथांच्या मध्ये बऱ्याच वेळा दहापैकी कुठल्या पारमीचे किंवा पारमीतेचे पालन त्या त्या जन्मात केले याचे विवरण जातकट्ठकथा या त्यावरील टीकेमध्ये आढळते. जातकट्ठकथेच्या उपोद्घातामध्येच हे स्पष्ट करण्यात आले आहे की एका जन्मामध्ये एखाद्याच सद्गुणाचे, पारमीतेचे पालन बोधिसत्वाने केले असे नाही. त्याच्या त्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावरून एक किंवा त्याहून जास्त पारमीतांचे पालन करण्याचा किंवा त्या सद्गुणांचे परिपोष करण्याचा त्याने प्रयत्न केला असेल. क्रमांक एक आणि दोन गुंफामधील जातक कथांच्या चित्रांचा अभ्यास केल्यानंतर वॉल्टर स्पिक आणि त्यांची शिष्या डॉ. लीला वूड यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या मते क्रमांक एकचे लेणे हे महाराज हरिषेणानेच कोरविले असावे, तर क्रमांक दोनचे लेणे हे हरिषेणाच्या पत्नीने म्हणजे महाराणीने कोरलेले असावे. असा निष्कर्ष काढण्यामागे त्यांनी दिलेले कारण असे आहे की, क्रमांक एकच्या गुंफेत ज्या जातक कथा कोरल्या आहेत, त्या बहुतांश सिद्धार्थ गौतम हा जेव्हा एखाद्या त्यांच्या या निरीक्षणाला परिपोषक राजघराण्यात युवराज म्हणून जन्माला येतो किंवा राजा म्हणून राज्य करतो अशा विषयावर आधारलेल्या आहेत. दुसरेही असे कारण सांगता येईल की सभामंडपातून अंतराळात ज्या दोन खांबांवरून बौद्ध उपासक गर्भगृहात जातो त्या दोन खांबांच्या सर्वात वरच्या भागात, दुसऱ्या कोणत्याही गुंफेत न आढळणारे चित्रण, म्हणजे त्या खांबांभोवती सर्वत्र राजमुकुटच कोरलेले आहेत. त्या उलट गुफा क्रमांक दोनमध्ये ज्या जातक कथा चितारण्यात आलेल्या आहेत त्यातील स्त्री पात्रांची उदात्तता अधिक दाखवण्यात येईल असे प्रसंग निवडण्यात आले. दुसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे एरवीसुद्धा प्रत्येक विहाराच्या बाहेर हारिती या यक्षीचे चित्रण असावे असा संकेत आहे. यापाठीमागचे कारण असे की नवजात किंवा मृत अर्भकांचे मांस चाखण्याची लालसा असलेली हारिती भगवान बुद्धांच्या उपदेशामुळे आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावामुळे हे मांस खाण्याची प्रवृत्ती आपण टाकून देत आहोत असा निश्चय जाहीर करते. आणि म्हणून भगवान बुद्ध तिला, उपाशीपोटी राहावे लागू नये म्हणून, असा वर देतात की विहारात राहणारे भिक्षु आपली भिक्षा गोळा केल्यानंतर अथवा कोणी दाता विहारामध्ये त्यांच्यासाठी आहार आणत असेल तर तो खाण्यापूर्वी आपल्या भिक्षेचा काही भाग हारितीला अर्पण करतात. वरील संकेताप्रमाण क्रमांक दोनच्या गुंफेमध्ये बाहेरच्या व्हरांड्यात हारितीचे आणि तिचा पती पांचिक याचे चित्रण आढळते. पण विहार क्रमांक दोनचे वैशिष्ट्य असे की गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या देवळीत यक्षरूप असलेल्या शंखपद्मनिधींच्या मूर्ती आहेत. तर डाव्या अंगाच्या देवळीत हारिती आणि पांचिक यांच्या मूर्ती बरोबरच हरिती आणि भगवान बुद्ध या दोघांच्यामध्ये घडून आलेल्या प्रसंगांचे प्रभावी चित्रण आहे.
धम्मपदावरील टीकेमध्ये दहा पारमी कोणत्या याची गणना केली आहे. त्या दहा अशा, १. दान २. शील ३. नेक्खम्म ४. पञ्ञा ५. विरिय ६. खंती ७. सच्च ८. अधिट्ठाण ९. मेत्ता आणि १० उपेखा पारमी. यातील दान, शील, नेक्खम्म, खेती, सच्च या त्यातल्या त्यात अधिक लोकप्रिय असून, दानपारमीला एक वेगळेच महत्त्व आहे. दानपारमीच्या चटकन समोर येणाऱ्या कथा म्हणजे शशजातक, व्याघ्रीजातक, हस्तिजातक आणि विश्वंतरजातक. शश जातकामधील कथा अशी की बोधिसत्व शश आणि इतर प्राणी एका मुनीला आपल्याकडे भोजनासाठी निमंत्रण देतात. प्रत्येकजण आपापल्या रीतीने तयारी करतो, पण मुनीला देण्यासाठी आपल्याकडे फारसे काही नाही याची सशाला जाणीव होते. म्हणून मुनी आल्यावर पेटवलेल्या अग्नीमध्ये स्वतःचीच आहुती देऊन ते मांस मुनीला मिळेल अशी व्यवस्था तो करतो. तर व्याघ्री जातकामध्ये प्रसूतीनंतर एका वाघिणीला प्रचंड भूक लागते आणि शेवटी भूक अनावर होऊन पिलांपैकी एखाद्याला ती खाणार अशी शंका आल्याने बोधिसत्व स्वतःचे शरीर तिला खायला देतो. तर हस्ति जातकामध्ये एका वैराण प्रदेशातून प्रवास करणारे सार्थातले (तांड्यातले) लोक भुकेने आणि तहानेने व्याकूळ होतात. ते हत्तीला विचारतात की आम्ही अत्यंत व्याकूळ झालेलो आहोत, तर आम्हाला अन्नपाणी कुठे मिळेल का ? ते जवळपास कुठेही मिळणार नाही व त्यामुळे तांड्यातील या प्रवाशांना मृत्युमुखी पडावे लागेल याची खात्री झाल्यानंतर हत्ती म्हणून जन्माला आलेला बोधिसत्व त्यांना असे म्हणतो की समोर दिसणारी जी टेकडी आहे तिला वळसा घालून गेल्यास तुम्हाला एक मेलेले सावज दिसेल. त्यातून मिळालेल्या मांसरसाने तुमच्या तहानभुकेचे शमन होईल. ते प्रवासी सांगितलेल्या ठिकाणी पोहचण्याच्या अगोदरच बोधिसत्त्व हत्ती जवळच्या वाटेने त्या टेकडीवर जातो आणि त्या कड्यावरून स्वतःला खाली झोकून देतो व मरण पत्करतो. स्वतःचे प्राण झोकून देऊन आपला देह दुसऱ्याच्या स्वास्थ्यासाठी अर्पण करणे ही दानपारमीमधली पराकोटीची अवस्था समजली जाते. त्यामुळेच शशजातकाचे मोठे प्रभावी चित्रण अजंठा येथील क्रमांक दहाच्या हीनयान चित्रणामध्ये आढळून येते. तर हस्तिजातकाचे चित्रण क्रमांक १७येथील लेणीमध्ये मोठ्या प्रभावीपणे केले आहे. वाकाटककालीन चित्रणे ही आर्यशूराच्या जातक-मालेवर आधारित असल्यामुळे प्रवाशांच्या विषयी वाटणाऱ्या करुणेपोटी स्वतःचा जीव देऊन आपला देह त्यांच्या स्वाधीन करणाऱ्या हत्तीचे मनोगत बोधिसत्वाच्या मनाची ओळख करून देतात. हे मनोगत धर्मराज युधिष्ठर ज्याप्रमाणे महाभारतात व्यक्त करतो तशाच आशयाचे आहे. युधिष्ठिर म्हणतो :
नत्वहमं कामये राज्यंम नस्वर्गम नापुनर्भवम्
कामये दुःखतप्तानां प्राणिना मार्तिनाशनम्
दानपास्मीतेचे सर्वोक्तृष्ट उदाहरण गुंफा क्रमांक १७ मध्ये मंडपाच्या एका संपूर्ण भिंतीवर चित्रित केलेले विश्वंतर जातक होय. विश्वंतराची कथा अशी आहे, विश्वंतर हा युवराज. महाभारतातील उदाहरण द्यावयाचे झाल्यास तो कर्णाप्रमाणेच दानशूर. समोर आलेल्या याचकाला कधी विन्मुख होऊन परत जाण्याची कधीच पाळी आलेली नव्हती. पण त्याचा हा गुण राज्यातील जनतेला मात्र शापासारखा झाला.
▲ गुंफा क्रमांक दहा तसेच वाकाटककालीन गुंफा क्रमांक १६ मध्येही चित्रित केलेले छद्दन्त जातक
राजवाड्यात असा एक हत्ती होता की ज्याच्या पुण्याईने प्रजेला कधीही अवर्षणाच्या संकटाला सामोरे जावे लागले नाही. शेजारच्या राज्यातील काही ब्राह्मण तेथे पडलेल्या दुष्काळामुळे त्याच्याकडे येतात व मोठ्या करुणेने विश्वंतर तो हत्ती त्यांना देऊन टाकतो. आता शेजारचे संकट आपल्यावर कोसळणार या भीतीने प्रजाजन व दरबारी विश्वंतराला वनवासाची शिक्षा देण्यासाठी राजाला भाग पाडतात. एका घोडे जोडलेल्या रथानिशी विश्वंतर नगराबाहेर एका टेकडीवर राहण्यासाठी निघतो. वाटेत एक याचक त्याला घोडे मागतो म्हणून तो घोडे देऊन टाकतो, त्यानंतर रथसुद्धा. पुढे वाटचाल करता जूजक नावाचा लोभी ब्राह्मण त्याच्याकडे घरच्या कामात नोकर म्हणून उपयोगी व्हावेत यासाठी दोघा मुलांची मागणी करतो. आपली पत्नी वनात फळं तोडण्यास गेली आहे याचा फायदा घेऊन विश्वंतर ती मुलेही त्याला देऊन टाकतो. त्याच्या दानशूरपणाचा लौकिक स्वर्गात इंद्राच्या दरबारात पोहचल्यानंतर, त्याच्या परिक्षेसाठी इंद्र येतो. विश्वंतरसुद्धा आपल्या पत्नीचेसुद्धा दान करायला तयार होतो. विस्मयचकित झालेला इंद आपल्या रूपात प्रकटून त्याची वाहवा करतो आणि तुझा वनवास संपेल असा वर देतो. इकडे विश्वंतर वनवासात असताना, त्याची मुलेदेखील दान म्हणून दिली गेली आहेत हे कळल्यावर त्यांचा आजा जूजकाला सोन्याच्या मोहरा देऊन त्यांचा ताबा मिळवतो. नंतर विश्वंतर वनवासातून परत येऊन पत्नीसह युवराजपदावर आरूढ होतो. गुंफा क्रमांक १७ मध्ये विश्वंतराच्या कथेला एवढे मोठे महत्त्व का दिले याच्याविषयी विद्वानांनी चर्चा केली आहे ती अशी. विश्वंतराच्या पाठोपाठ बोधिसत्वाचा जन्म सिद्धार्थ गौतम म्हणूनच होतो. आणि त्यामुळे दानपारमीला शाक्य बुद्धाच्या आयुष्यामध्ये केवढे मोठे स्थान आहे
हे लेखकांना आणि कलाकारांना सुचवायचे आहे असे विद्वानांना वाटते. १७ व्या लेणीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनासुद्धा असेच वाटते की अप्रत्यक्षपणे ऋषीक देशाचा राजा उपेद्रगुप्त याचीसुद्धा पुढल्या जन्मात आपल्याला बुद्धपद नाही तरी कमीत कमी अर्हततपद मिळावे अशी मनोमन इच्छा असली पाहिजे. दानपारमीला जसे वर वर्णिलेल्या तीन-चार जातककथांमधून आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे, त्याचप्रमाणे लौकिक दृष्टीने विहारसंस्था व्यवस्थित रीतीने चालावी म्हणून देखील दानपारमीचा उपयोग आहे. वैदिक व हिंदू धर्मामध्ये कुठलेही धार्मिक कार्य केल्यानंतर पुरोहिताला दक्षिणा रूपाने दान दिल्याशिवाय ते कर्म फलप्रद होत नाही अशी धारणा आहे. तसेच ब्राह्मण वर्गाला, त्याच्या ज्ञानामुळे व धार्मिक कार्यात साहाय्य करण्याचा अधिकार असल्यामुळे, तसेच यजमानाने दिलेल्या दानामुळेच त्याची उपजीविका होत असल्यामुळे त्याला दान स्वीकारण्याचा म्हणजेच प्रतिग्रहाचा अधिकार दिला आहे. लौकिक पातळीवर ब्राह्मणांच्यासारखेच ज्ञानदान आणि धार्मिक कार्यात साहाय्य अशी भूमिका असल्यामुळे, दानपारमीच्या रूपाने श्रमणसंस्थेला व विहाराला हा दान स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे असे दिसते. दानपारमीला या प्रकारचे महत्त्व दिल्यामुळे महाभारतातल्या शिबी राजाची कथासुद्धा शिबीजातकाच्या रूपाने आली आहे.
या संदर्भात सिंहलावदानाच्या कथेचासुद्धा उल्लेख करणे आवश्यक आहे. या अवदानाचे विश्वतराइतकेच मोठे चित्रण क्रमांक १६ या गुंफेत करण्यात आले आहे. या कथेला बौद्ध परंपरेमध्ये वेगवेगळ्या रीतीने महत्त्व आहे. जातक हे जर शाक्य बुद्धाच्या जन्मजन्मीच्या कथांचे वर्णन असेल तर अवदान हे तितकेच आश्चर्यकारक पण बुद्धाऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी महात्म्याचे चरित्र असते. थेरवादी (स्थविरवादी) बौद्ध परंपरेप्रमाणे सिंहल हा भगवान बुद्धाचा समकालीन. त्याचे नाव विजय, हा एक सार्थवाह होता. समुद्रावर व्यापार करण्याच्या हेतूने तो रत्नद्वीप या बेटावर म्हणजे आजच्या श्रीलंकेला पोहोचतो. या बेटाची अशी ख्याती होती की जहाजं बुडाल्यानंतर वाचलेल्या प्रवाशांना तेथे राज्य करणाऱ्या यक्षीणी आश्रय देत, त्यांचा आदरसत्कार करीत. त्यांना आपल्या पत्नीचीसुद्धा उणीव भासू देत नसत. परंतु अशीच वाताहत झालेली नवीन माणसे किनाऱ्याला लागली की पूर्वीच्या प्रवाशांना बंदी करून यक्षीणी त्यांचे मांस खात असत. सिंहल असाच बंदीवासात जातो.
▲ हस्तिजातकाचे चित्रण क्रमांक १७
येथील लेणीमध्ये केले आहे. तो चोरून असा तपास लावतो की या बेटावर जशा मनुष्यभक्षी यक्षीणी आहेत तसाच एक वलहस्स नावाचा आकाशात भरारी घेणाऱ्य अश्वाचे रूप असलेला, यक्षदेखील आहे. आणि उडत असताना पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणीच्या मोहाला बळी न पडलेल्या संकटग्रस्त बंदीना तो आपल्या पाठीवरून समुद्रापलीकडे नेतो. पण अशा अटीवर की, आपले सावज सुटू नये म्हणून सुंदर स्त्रियांचे रूप घेऊन पाठोपाठ येणाऱ्या यक्षिणीच्या मोहाला बंदी बळी पडले नाहीत तर. सिंहल या यक्षाच्या मदतीने घरी आल्यानंतर तो राजदरबारात रुजू होतो. यक्षीणीची राणी मात्र असा निश्चय करते की काही झाले तरी सिंहलाला परत आणायचेच. म्हणून ती राजदरबारात उपस्थित होते आणि राजाला सांगते की सिंहल माझा पती आहे. माझ्याबरोबर जे बाळ आहे ते त्याचेच मूल आहे. तो माझा स्वीकार करत नाही. सिंहल राजाला समजवाण्याचा प्रयत्न करतो की ही मनुष्यभक्षी राक्षसीण आहे. हिला तुम्ही थारा देऊ नका, राजा तिच्या सौदर्याच्या मोहात पडून तिला अंतःपुरात पाठवतो. राजवाड्यावर दुसऱ्या दिवशी झेप घालणाऱ्या गिधाडांमुळे लोकांच्या लक्षात येते की यक्षीणीने राजाचे सर्व कुटुंबच फस्त केले आहे. प्रजानन सिंहलाला राजा म्हणून निवडतात. सिंहल मोठ्या सैन्यानिशी आणि गलबतातून प्रवास करून रत्नद्वीप जिंकतो, आणि तिथले प्रजानन पहिला राजा म्हणून त्याला अभिषेक करतात. येथून पुढे रत्नद्वीपाचे नाव सिंहल असे होते आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रसार होतो. हिच कथा थोड्या फरकाने दिव्यावदानात येते. पण त्यात मात्र सिंहल हा दुसरा कोणी नसून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमच आहे किंवा शाक्य बुद्ध आहे असे प्रतिपादन येते. ही कथा श्रीलंकेमध्ये इतकी लोकप्रिय झाली की द्वीपवंश या श्रीलंकेच्या इतिहास सांगणाऱ्या काव्यात त्याचे वर्णन तर आढळतेच, पण युएन शेंगच्या प्रवासवर्णनातदेखील आहे. धर्माच्या तुलनात्मक अध्ययनामध्ये या कथेला असे महत्त्व आहे की, नायाधम्मकःओ (ज्ञाता धर्म कथाः) या श्वेतांबर जैनांच्या नवव्या अंग ग्रंथामध्ये मांकंदिक पुत्र आख्यानामध्ये हीच कथा येते.
▲ विश्वंतर जातक
शिबिजातक आणि मांकंदिकपुत्र आख्यानामधून सहज लक्षात येते की महाभारत-रामायणात व पुराणात, जैन व बौद्ध आगम वाङ्मयात आढळणाऱ्या या कथांचे मूळ कुठल्याही एका धर्म परंपरेत नसून इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात भारताच्या निरनिराळ्या प्रांतात प्रचलित असलेल्या लोककथांच्यामध्ये आहे. बौद्ध, जैन व पौराणिक परंपरांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी थोडेफार फरक करून त्या काव्यरूपाने आणल्या व त्यांना अजरामर केले आहे.
अजिंठा येथील एक, दोन, १६, १७ या गुंफांच्या भिंतीवर आर्यशूराच्या जातकमालेत समाविष्ट असलेल्या ३२ जातक कथा, तसेच हरिभट्टाच्या जातकमालेतील तसेच विषय असलेल्या जातक कथा फार सुंदर रीतीने चित्रित करण्यात आलेल्या आहेत. अगोदरच्या संशोधकांच्या पिढीत, त्रिपिटकामधील पाली भाषेत लिहिलेल्या जातक कथांच्या आधाराने गुंफात चितारलेल्या प्रसंगांची उकल करण्याची प्रथा होती. आणि त्यामुळेच या महायानाशी संबंधित कथा नसून हिनयानी कथा असे समजले जात होते. अजिंठा येथील दोन क्रमांकाच्या गुंफेतील रंगवलेल्या अभिलेखांच्या साहाय्याने हे लक्षात आले होते की संस्कृत भाषेत लिहिलेल्या जातकमालेतील या कथा असल्यामुळे ही चित्रणे खऱ्या अर्थाने स्थविरवादी नव्हती. म्युनिक विद्यापीठामधील प्राध्यापक शिंलगलोफ यांच्या सखोल अध्ययनामुळे असेही लक्षात आले की गांधार आणि उड्डियान भागात मूळ धरणाऱ्या संस्कृत भाषा माध्यम असलेल्या सर्वास्तिवादी निकायाशी जवळचा संबंध असलेल्या, नवीन बौद्ध विचारांशी ही चित्रणे जास्त सुसंगत आहेत. आणि त्यामुळे गुंफा क्रमांक नऊ आणि दहामध्ये चित्रित केलेल्या पाली भाषेतील जातकांपेक्षा ही चित्रणे वेगळा संदेश देतात. छद्दन्त जातक हे हीनयानी गुंफा क्रमांक दहा व त्याचप्रमाणे वाकाटककालीन गुंफा क्रमांक १६ मध्येही चित्रित केलेले आहे. परंतु यातील मुख्य पात्रे म्हणजे छद्दन्त हत्ती, बनारस्सची राणी म्हणून जन्माला आलेली त्याची प्रिय पत्नी हीच होत. ती सवती मत्सरापोटी
छ्द्दन्ताला मारण्याचा घाट घालते. परंतु या कथेतील मुख्य विषयाची मांडणी आणि त्यातून जाणारा संदेश वेगळा आहे. पाली कथेत छद्द पारध्याला क्षमा करतो एवढेच नाही तर त्याला आपले दात कापू देतो, तर जातक मालेत तो ते स्वतः कापतो असे म्हटले आहे. पाली कथेत तो मरण पावतो, तर जातक मालेच्या कथेत तो स्वतः मरत नाही. आणि बनारसच्या मरणोन्मुख राणीला तो मरत नाही हे शुभवर्तमान देऊन प्राण तिचे वाचवतो. या वाकाटककालीन चित्रणांचे महत्त्व असे की ते बौद्ध धर्माचे हिनयानाकडून महायानाकडे होणारे स्थित्यंतर स्पष्टपणे दाखवतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, सिल्क रुटवरील मध्य अशियातील बौद्ध विहारांच्या जातक चित्रणांवर आपला स्पष्ट ठसा ती उमवटतात. आणि अशा रीतीने गुप्त-वाकाटककाळातील चित्रशैलीचा परिणाम आजच्या लडाख, कझागिस्तान आणि चीनमधील सहाव्या-सातव्या चित्रकलेवर झालेला दिसून येतो. आणि या अर्थाने वाकाटक कला ही वैश्विक पातळीवर पोहोचते.
अजिंठा : वाकाटककालीन शिलालेख
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते. येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
- Burgess, James & Bhagwanlal, Indraji, Inscritions From The Cave -Temples Of Western India, Archaeological Survey of Western India, Bombay, 1881.
- Fergussion, James & Burgess, James, The Cave Temples Of India, London,1880.
- Lad, Bhau Daji, ‘Ajunta Inscriptionsʼ, Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society, Vol. 7, pp. 53-74, 1863.
- मिराशी, वासुदेव विष्णु, वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
















No comments:
Post a Comment