जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली, ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी. तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती. येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.
भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. नवलाख उंबरे हे महत्वाचे व्यापारी मार्गांवर वसलेले गाव महाराष्ट्र राज्यात, पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे च्या उत्तरेला वसलेले आहे. या गावाच्या उत्तरेला तसूबाई डोंगर रांग आहे.तसूबाई डोंगर रुंद पश्चिम-पूर्व पसरलेली आहे. तसूबाई डोंगरारांगेच्या पूर्वेकडच्या टोकाला भामचंद्र डोंगर आहे. या डोंगररांगेच्या उत्तरेस भामा नदीचे खिरे आणि दक्षिणेस इंद्रायणी नदीचे खोरे आहे. भामा नदीवरून भामचंद्र असे नाव डोंगराला पडले आहे. वसुळी, भाम्बोली आणि शिंदे गावाजवळ असलेल्या भामचंद्र डोंगरावर भामचंद्र लेणी आहेत. या भागात नानोली, इंदुरी आणि शेलारवाडी येथे हीनयान बुद्ध लेणी ( नंतरच्या काळातली ) आहेत. शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या टेकडीत लेणीसमूह आहे. या लेणीसमूहात सहा लेणी/गुहा आणि पाच पाण्याची टाकी आहेत. संत तुकाराम या ठिकाणी येत असत. संत तुकारामांनी येथे घेतलेल्या अनुभूतीचा उल्लेख त्यांच्या अभंगात केला आहे. लेणी स्थानिक लोक "भामचंद" या नावाने ओळखतात. भामचंद्र लेणी पुणे शहरापासून ४० किलोमीटर आणि तळेगाव पासून अंदाजे १८ किलोमीटर अंतरावर आहेत. लेणी जरी खेड तालुक्यात असली तरी मावळाच्या जवळ आहेत. भामा नदी च्या खोऱ्या च्या दक्षिणेला असलेल्या या डोंगराचे नाव भामा नदीवरून पडले आहे. भामचंद्र महादेवस्थानाकडे भांबोली येथे जागा आहे, असा उल्लेख आहे.

भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत. डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार. डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.
संसारात राहून, व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणार्या तुकाराम
महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे. त्याची
खंत त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे.
संसारतापे तापलो मी देवा !
करीता या सेवा कुटुंबाची!!
कसया गा मज घातिले संसारी!
चित्त पायावरी नाही तुझ्या !!
किंवा
मन माझे चपळ न राहे निश्चळ!!
घडी एक पळ स्थिर नाही !!
अशा मनाच्या अवस्थेत तुकोबारायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली.
ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर
सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा
तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या
परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना
तुकाराममहाराज दिसले. निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज
ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला
झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला
नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन
त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.
पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
विठोबा भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!
त्या पवित्र स्थळाचे
पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड
रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली.
मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.


कसे जावे :
१) पुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.
२) तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते. (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.
३) पुण्यातून स्वत:चे वाहन घेऊन येणार असाल तर सकाळी लवकर ७ पर्यंत निघून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी, चिंचवड, निगडी येथील भक्ती शक्ती शिल्पसमूहानंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड लागते. तेथून संत तुकाराममहाराज देवस्थानची स्वागत कमान लागते. तेथून देहूगाव असा मार्ग आहे. देहूगावात गेल्यावर तुकाराममहाराजांचे मंदिर व गाथा मंदिर पाहण्यास विसरू नका. सुंदर मंदिर बांधले आहे. तेथून भंडारा डोंगर दिसतो. देहूगावातून तळेगाव चाकण महामार्गावर भंडारा डोंगर आहे. आंदाजे अंतर ८ किलोमीटर भरेल. वाटेत म्हणजे देहूगाव ते तळेगाव चाकण महामार्गाचा रस्ता सध्या दुरुस्त करत असल्याने थोडासा खराब आहे. अंदाजे २ किलोमीटरचा. तेथून डावीकडे वळून भंडारा डोंगरावर वरपर्यंत गाडीने जाता येते. सुंदर रस्ता तयार केलेला आहे.स्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.
चाकणमार्गे भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.
कसे काय पहाल :
पुण्यातून प्रथम
१) देहूगावातील गाथा मंदिर
२) भंडारा डोंगर (गाडीवरपर्यंत जाते)
३) भामचंद्र डोंगर (पायी जावे लागते. अंदाजे २० ते २५ मिनिटे)
४) भामचंद्र डोंगर पाहून झाल्यावर आलेल्या मार्गाने देहूगावाकडे न जाता
तळेगाव चाकण रस्त्यावरून तळेगावला जाणे वाटेत इंदुरीची गढी आहे.
५) चाकण - तळेगावमार्गे परत तळेगावाला येऊन तेथून पुढे जुन्या पुणे-मुंबई
रस्त्याने सोमाटणे फाट्याजवळील शिरगाव (प्रती शिर्डी) पाहण्यास विसरू नका.
स्थलदर्शन :-
तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अंतर कापण्यासाठी तब्बल पाऊणतास जातो. कारण अर्थातच रस्ता. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे.
तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचायचे. डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार. डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.
झाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे.
येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे.वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत.
लेणे क्रमांक १ :
शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक १ कोरले आहे.येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. हे लेणे दक्षिण-पश्चिम मुखी आहे. सध्या तेथे महादेवाची पिंड असलेले देऊळ आहे. लेण्यात आतल्या बाजूला एक गर्भगृह आणि मंडप आहे. यात गणपती आणि इतर या देवतांच्या मूर्ती आहेत. लेण्यात एक मंडप आहे. लेण्यात कोणतेही बौद्ध नक्षीकाम नाही. हा डोंगर प्राचीन व्यापारी मार्गाजवळ आहे. संत तुकाराम या लेण्यात येत असत असे समजतात. स्थानिक लोक या लेण्याला विठ्ठल रखुमाई लेणे असे संबोधतात. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात.


या लेण्यांच्या गर्भगृहात चार कोपऱ्यात चार अर्धे खांब आहेत. गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. गर्भगृहात जाण्यास असलेल्या दरवाजाची चौकट दगडी बांधीव आहे. हि चौकट मूळ लेण्यांचा भाग नाही. जोडकाम स्पष्ट दिसते. चौकटीवर गणपती, कीर्तिमुख, द्वारपाल आणि इतर आकृत्या कोरल्या आहेत. मंडपात चार खांब आहेत. दोन बाजूला दोन देवकोष्ट आहेत. लेण्यांची त्रिमिती बेढब आहे. भिंती समांतर नाहीत. खांब वाकडे आहेत. एका खांबावर गणपती अर्धवट कोरला आहे. लेणे तेलरंगात रंगवल्यामुळे आणि शिल्प शेंदूर फासल्यामुळे , त्यांचे मूळ सुंदर रूप झाकोळले आहे असे वाटते.
लेण्यांच्या मंडपाचा दर्शनी भाग बांधीव आहे. बाहेर एक पाण्याचे टाके आहे.
लेणे क्रमांक २ :
शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक २ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पश्चिम मुखी आहे. हे लेणे लेणे क्रमांक १ च्या उत्तरेला आहे. काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात. येथे पूर्वी एक लहान कोरलेली गुहा होती. आता तेथे मोठी गुहा बनविण्यात आली आहे. अंदाजे १० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद अशी हि आधुनिक गुहा वारकरी संप्रदायाचे अनुयायी वापरतात. एका बाजूला जुन्या मूळ गुहेच्या खुणा छतावर आढळतात.
लेणे क्रमांक ३ :शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ३ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे लेणे क्रमांक २ च्या उत्तरेला आहे.
जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायर्या खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायर्या चढून वर गेलो कि तेथेही एक छोटी गुहा आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे.
आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. संत तुकारामांचे साधे पण प्रभावी भित्ती शिल्प येथे आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.भामचंद्र डोंगरावराचा तुकारामांच्या अनुभूतीचा उल्लेल्ख असलेला त्यांचा अभंग येथे वाचावयास मिळतो. दाराबाहेर कोंदणात मारुती आहे.
गुहेत शिरल्यावर गुहेतल्या शांततेने आपल्यावर गारूड होते. तुकाराम महाराजांच्या मुर्ती समोर बसून अलगद डोळे मिटून घ्यावे आणि ध्यान धरावे. सभोवतालच्या नितांत शांततेमुळे मनही स्थिर होत जाते. याठिकाणी कित्येक साधक साधना करुन गेले असावेत. अशा पवित्र ठिकाणी ५ मिनिटे का होईना आपल्याला शांतपणे बसता येणे , अंतर्मुख होता आले तर तो अनुभव कायमस्वरुपी लक्षात राहील असा असतो.
तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे.
गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे. मुख्य गुहेतून खाली आलो कि लेणे क्रमांक २ ची गुहा दिसते. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.
लेणे क्रमांक ४ :
शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ४ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे क्रमांक ३ च्या बाजूला आहे. . हि एक मूळ नैसर्गिक गुहा आहे.
लेणे क्रमांक ५ : शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ५ आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे क्रमांक ३ च्या पश्चिमेला आहे. येथे वारकरी संप्रदायाचे अनुयायी राहतात. हि एक मूळ नैसर्गिक गुहा आहे. आत पाणी येऊ नये म्हणून लेण्यांच्या बाह्य भागावर वरच्या बाजूला चर कोरले आहेत.
लेणे क्रमांक ६ : मुख्य लेणीसमूहाच्या पश्चिमेस कड्यात एक लहान गुहा आहे. हि एक नैसर्गिक गुहा आहे. गुहेच्या पुढच्या बाजूस एका बाजूला दगडी भिंत बांधली आहे. गुहा अंदाजे २ मीटर बाय २ मीटर आहे.

पाण्याच्या टाकी क्रमांक १: लेणे क्रमांक १ च्या बाहेर दक्षिणेला जवळच १ पाण्याचे मोठे टाके आहेत. यात पाणी नाही. कातळात थोडे उंचावर कोरलेले हे थोडे झाकलेले टाके भामा खोर्यातल्या इतर लेण्यांमधील टाक्यांशी मिळते जुळते आहे. या पाण्याच्या टाक्यात अंदाजे २४००० लिटर पाणी मावते. स्थानिक लोक या पाण्याच्या टाक्याला सीतेची न्हाणी असे म्हणतात.

पाण्याच्या टाकी क्रमांक २: लेणे क्रमांक १ च्या बाहेर लगतच जवळच हे पाण्याचे लहान टाके आहेत. यात पाणी आहे. या पाण्याच्या टाक्यात अंदाजे ११४०० लिटर पाणी मावते.
पाण्याच्या टाकी क्रमांक ३: लेणे क्रमांक २ च्या बाहेर लगतच जवळच हे पाण्याचे मोठे उघडे टाके आहे. यात पाणी आहे. हे टाके पुरातन नाही. वारकरी संप्रदायाने हे टाके बनविले आहे.
पाण्याच्या टाकी क्रमांक ४: लेणे क्रमांक ३ कडे जाणार्या पायऱ्याच्या पश्चिमेला कातळात हे पाण्याचे मोठे उघडे टाके आहे. यात पाणी नाही.
पाण्याच्या टाकी क्रमांक ५: लेणे क्रमांक ६ च्या जवळ हे टाके आहे.
डोंगराच्या पश्चिम पायथ्याला एक हनुमान मंदिर आहे. जवळच एक जुनी दगडी विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम रोकडोबा नावाच्या वारकऱ्याने अंदाजे १०० वर्षांपूर्वी केले असे सांगितले जाते.
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) श्री विवेक काळे यांचे लिखाण
३) https://samantfort.blogspot.com/2013/06/blog-post.html,
http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post_20.html,
https://travfoodie.com/bhamchandra-caves-excited-bhamchandra-hill-trek/
https://kevinstandagephotography.wordpress.com/2019/03/10/bhamchandra-caves-bhamboli/
https://www.whatshot.in/pune/these-isolated-caves-near-pune-look-like-theyre-straight-out-of-ali-baba-40-thieves-film-c-30591
हे ब्लॉग
These Isolated Caves Near Pune Look Like They’re Straight Out Of Ali Baba 40 Thieves’ Film!
Updated On Jul 2, 2021, 5:47 PM
Pune
has many beautiful forts in its periphery which have been attracting
history buffs for years. And while you must be proud that you have
explored all of them (or atleast most of them), we bet you wouldn’t have
even heard about this bunch of caves that have been hiding in plain
sight. Don’t believe us? Read on.

Just 40 kms north from Pune lies the lesser known Bhamchandra caves.
The place has six natural caves in total and even though the caves are
still isolated from the world, the area surrounding it is sprawling with
massive constructions mostly by the automotive industry. The trek to
these caves is moderate to hard and one has to climb a steep hill to
reach. The trek is definitely not for beginners or those who are trying
their hands at trekking for the first time.
Also Read: We’ve Got You The List Of What’s Hot In Pune From The 29th April To 1st May Weekend

Now coming to the caves, the first cave you will come across will be
on your right. It is quite easy to identify this cave as it has a small
bricked door for an entrance. Inside the cave lies small shrines to many
deities including Lord Ganesh, Lord Shiva and others. The interior of
the temple, even though in shambles, is quite colourful. Besides this,
the temple also has many sculptures of females and floral carvings in
the walls.

As you move on, you will find the second cave just a few meters from
the first cave. This cave has been enlarged to be converted into a hall
for the monks who live here. Reaching the other caves is relatively
tricky as there is barely a clear path to walk on. However, there is an
iron railing to support you if you wish to go ahead. Even though other
caves are smaller than the first and the second cave but do have
beautiful murals of Sant Tukaram in meditative pose here.
A visit
here is nothing short of an adventure especially for those who love to
explore hidden spots. . So all you explorers out there, put on your
shoes, get those maps out and embark upon the adventure, already!
Note: Don’t forget to carry a water bottle with you.
| y and Society, Problems of Interpretation, by D. D. Kosambi |