Saturday, March 26, 2022

इंदुरी

ब्रम्हेश्वर मंदिर व इंद्रेश्वर मंदिर
गावाचे नाव :- इंदुरी
जिल्हा :- पुणे
जवळचे मोठे गाव :- तळेगाव, चाकण, पुणे 

Bramheshwar Mandir, Induri, dist. PuneBramheshwar Mandir, Induri, dist. Pune

  तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी  आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. 

Bramheshwar Mandir, Induri, dist. PuneBramheshwar Mandir, Induri, dist. Pune
ब्रम्हेश्वर मंदिर 

इंदुरी किल्ल्याच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या काठी पुरातन ब्रम्हेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे, तर खालच्या बाजूला कोरलेले आहे. मंदिरा बाहेर जूना दगडात कोरलेला नंदी व दोन पिंडी आहेत. 

इंद्रेश्वर मंदिर

इंदुरी गावात तळेगाव चाकण रस्त्याला लागून तलावाकाठी पुरातन इंद्रेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. मंदिरा बाहेर  दगडात कोरलेला जूना नंदी व गणपती आहेत. 

Indreshwar Mandir, Induri, dist. Pune
ऋषींच्या शापाने अंगावर आलेले कोड घालवण्यासाठी इंद्राने येथे तपश्चर्या करून येथील तलावात आंघोळ केल्यावर त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले अशी या मंदिरा बद्दल दंतकथा आहे. या मंदिरासमोरील तलाव आता पाण वनस्पतींनी भरल्यामुळे दिसेनासा झालाय. जर हा तलाव साफ करून सुशोभित केला, तर या परीसराची शोभा वाढू शकते.

Indreshwar Mandir, Induri, dist. Pune

जाण्यासाठी :- 
मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो. किल्ल्या समोर उभे राहील्यावर डावीकडे एक रस्ता खाली उतरतो, त्या रस्त्यावर किल्ल्यापासून २ मिनिटाच्या चालीवर ब्रम्हेश्वर मंदिर आहे. 
इंद्रेश्वर मंदिर इंदुरी गावात आहे. 

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
१) इंदुरीचा किल्ला
२) इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.
३) राजवाडा व बनेश्वर मंदिर , तळेगाव
४) चाकणचा किल्ला
इंदुरीचा किल्ला व चाकणचा किल्ला यांची माहीती साईटवर दिलेली आहे.



Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Bramheshwar & Indreshwar Mandir , Village :- Induri, Dist :- Pune,  Nearest city :-  Talegaon, Chakan.



Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:18pm
 
 
   महाराष्ट्रातील अनेक गावांच्या नावांना एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण आडनावाची जोड असते. शिवकाळापासून पराक्रम गाजवणाऱ्या दाभाडे यांच्या वास्तव्याने मुंबई-पुणे हमरस्त्यावरील तळेगावला असाच मान मिळाला. पुणेकर आणि मुंबईकरांचं सेकंड होम म्हणून आज याच ‘तळेगाव दाभाडे’चं नाव बहुचर्चित झालं आहे. प्राचीन- ऐतिहासिक वारसा जोपासतानाच तळेगाव आणि परिसराने अनेक क्षेत्रांत मोठं योगदान दिलंय.या तळेगावात पाण्याची तळी आहेत म्हणून तळेगाव नाव पडले. कालानंतराने यालाच तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. 
     छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसबा दाभाडे यांचे पुत्र खंडेराव दाभाडे हे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज यांच्याशी निष्ठा असणारे पराक्रमी सरसेनापती. त्यांच्या पत्नी उमाबाईसाहेब याही रणरागिणी होत्या. त्यांच्यामुळेच तळेगावची ओळख दाभाड्यांचं तळेगाव अशी झाली. 
     इथं पाच पांडवांचं मंदिर आहे. इंद्रायणी, आंद्रा आणि पवना नद्यांमुळे समृद्ध झालेल्या तळेगाव आणि परिसरात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी पन्नासहून अधिक मंदिरं आहेत. पूर्वेला प्राचीन शिवालय असलेला घोरावडेश्वराचा डोंगर, तुकाराम महाराजांची कर्मभूमी अर्थातच भंडारा डोंगर हाही इथून जवळच. तळेगावच्या विठ्ठल मंदिरात तर तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं आहे.
   राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकरांनी १९०६ मध्ये तळेगावला समर्थ विद्यालयाची स्थापना केली. या दोघांसह डॉ. नानासाहेब देशमुख, वकील दाजी आबाजी खरे आणि भारताचार्य चिंतामणराव वैद्य हेही संस्थापक मंडळात होते. स्वतः लोकमान्य टिळक १२ वर्षं या संस्थेचे अध्यक्ष होते. अण्णासाहेब विजापूरकर हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे कोल्हापुरातील सहकारी होते. या शाळेसाठी कोल्हापूरच्या नारायण विष्णू आपटे यांनी आपली तळेगावातील ६४ एकर ३५ गुंठे जमीन अल्प मोबदल्यात दिली. ज. स. करंदीकर, वामन मल्हार जोशी, महर्षी कर्वेंच्या पत्नी आनंदीबाई या संस्थेत शिकवायला येत. स्वातंत्र्यलढ्याला मदत करणारी संस्था म्हणून ब्रिटिशांनी या संस्थेवर आठ वर्षं बंदी घातली होती. इथंच टिळकांनी भारतातील पहिला पैसा फंड काच कारखाना काढला. काचेच्या विविध वस्तूंच्या उत्पादनांबरोबरच इथून प्रशिक्षण घेतलेल्या मंडळींनी मुंबई, ओगलेवाडी, खानापूर आणि लोंढा (बेळगाव), मद्रास, गोंदिया, नागपूर, पंजाब इथं काचेची उत्पादनं घेणारे कारखाने सुरू केले. १९२५ मध्ये नेत्रतज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब सरदेसाईंनी (हे ‘रियासत’कार गो. स. सरदेसाई यांचे धाकटे बंधू) तळेगाव जनरल हॉस्पिटलची स्थापना केली. शीतल आणि आरोग्यवर्धक हवा असल्याने तळेगावात भारतातील पहिलं टी.बी. (क्षयरोग) सॅनिटोरियम काढण्यात आलं आहे. महात्मा गांधीजी इथं येऊन गेले होते.
    भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरापूर्वी, म्हणजे १९५४ मध्ये २५ डिसेंबरला देहूरोड इथल्या नियोजित मंदिरात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तत्पूर्वी म्हणजे १९४८ मध्ये २६ नोव्हेंबरला तळेगावात त्यांनी बंगला आणि जागा खरेदी केली होती. १९५१ मध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची बाबासाहेब आणि माईसाहेबांनी याच बंगल्यात बैठक घेतली. डॉ. आंबेडकरांबरोबर आचार्य अत्रे इथं आले होते. संत गाडगेबाबाही येऊन गेले. इतिहास संशोधक डॉ. गो. स. सरदेसाई यांच्या कामशेतच्या निवासस्थानी बाबासाहेबांनी त्यांची भेट घेतली.
    प्रख्यात दुर्गप्रेमी आणि प्रतिभावंत साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचंही दीर्घकाळ तळेगावमध्ये वास्तव्य होतं. त्यांची आणि गाडगेबाबांची भेट झाल्यानंतर दांडेकरांनी त्यांचं लिहिलेलं चरित्र बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः भेटून इथं दिलं होतं. ‘गोनीदां’ची बरीच साहित्यनिर्मिती तळेगावातलीच. शिवाय, मारुती चितमपल्ली, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह मराठी साहित्य आणि इतिहासाच्या क्षेत्रातील अनेक मंडळींचं तळेगावला दांडेकरांकडे येणं होत असे.काळाच्या ओघात नव्याने विकसित होऊ  घातलेली औद्य्ोगिक वसाहत, शैक्षणिक संकुले यामुळे जुन्या तळेगावचं रूप झपाटय़ाने पालटू लागलं आहे. एकेकाळी इतिहासात प्रसिद्ध असलेलं हे गाव आता शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करू लागलं आहे. येथील काही ठिकाणे मात्र अजूनही जुन्या काळाची साक्ष देतात.
आधी आपण तळेगाव परिसरातील महत्वाच्या ठिकाणांचा आढावा घेउया आणि मग इंदोरी भुईकोटाची सफर करुया.
 बनेश्वर मंदिर

    बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्य़ात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व सर्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. तर त्याच्या विरुद्ध असलेले अजुन एक बनेश्वर मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर ..हे खुप प्रचिन मंदिर असून  पर्यटकांपासुन वंचित राहिल्यामुळेच  त्याची सुंदरता आज पण टिकून आहे. या मंदिराचे बांधकाम  हे शुर पराक्रमी सरदार खंडेराव  दाभाडेंच्या काळातले आहे. शिव शंभोचे भक्त असल्यामुळे त्यांनी बर्‍याच ठिकाणी शिव शंकराची मंदिरे उभारली आहेत. त्यातीलच हे एक मंदिर

     मंदिराचा आजुबाजुचा परिसर हा शेती तसेच मनुष्य वस्तीचा असला तरी  मनाला शांती व  नवचैतन्य देणारा  आहे.

 

 

 

 मंदिराजवळ  प्रवेश करताना पहिल्या अनेक समाधी (वीरगळ) दिसतात तर उजव्या बाजुला भारतातील पहिल्या महिला सरसेनापती  उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची समाधी दिसते. पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाईंनी १७३२ साली खान ए खान जोरावर खान बाबी याचा गुजरातेत पराभव केला. एका महिला योद्धय़ाची ही अतुलनीय कामगिरी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाईंना सातारा येथे सोन्याचे तोडे, रत्नजडित तलवार व मानाची वस्त्रे देऊन सन्मानित केले.छोटे बांधीव तळे (काही अभ्यासक याला पुष्करणीदेखील म्हणतात) नंदीमंडप, सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे.

 

 या तळ्यावर पाणी उपसणाऱ्या मोटीसाठी जागा दिसते. तळ्यातील पाणी शेतीसाठी वापरले जात असण्याची शक्यता आहे. परंतु नंतरच्या काळात यातले पाणी वापरण्याजोगे न राहिल्याने तळ्याला ‘नासके तळे’ असेही म्हटले जाऊ लागले. तळ्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या  दिसतात. ते काही ही असेना पण ही पुष्करणी खरच मनाच्या कोपऱ्यात घर नक्की करते.


     हे तळे पाहून झाले की मग येतो नंदीमंडप. चार खांबांवर उभा असलेला हा मंडप संपूर्ण दगडात उभारला आहे. मुख्य मंदिराला न जोडता काही अंतरावर उभारला आहे. यातील नंदीची मूर्ती तर मंडपाहूनही देखणी. रिवाजाप्रमाणे नंदीवर माथा टेकवून पूर्वाभिमुख बनेश्वर मंदिराच्या सभा मंडपात जावे. संपूर्ण दगडात उभारलेल्या या मंदिराची स्थापत्य रचना खूपच आकर्षक आहे. सभामंडपात एकूण १६ खांब आहेत. खांबावर विशेष नक्षीकाम नसले तरी त्यांचे चौकोनी आणि गोल आकार मात्र पाहण्यासारखे आहेत. सभामंडपासमोरील छोटय़ाशा प्रवेशद्वारातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. आतमध्ये खूपच सुंदर शिवपिंड आहे. गाभाऱ्यातील धीरगंभीर वातावरण व गारवा आवर्जून अनुभवावा असाच आहे.


 
बनेश्वर मंदिराची रचना  ही १६ खांबावर केलेली आहे . संपुर्ण दगडात  उभारलेली मंदिराची रचना व त्यावर केलेले रंग काम तुम्हाला मोहात पाडायला मजबुर करते .यातील कोणत्याच खांबावर नक्षी काम नाही पण त्याची रचना बघण्या सारखी आहे. छोट्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डाव्याबाजुला कोनाड्यात देवीची व उजव्या बाजुच्या कोनाड्यात श्री  गणेशाची मुर्ती दिसते .तर मंदाराच्या सभामंडपात एक नगारा देखिल आहे.  हे सगळे बघुन  जेव्हा  आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा नवचैतन्याची अनुभती येते .मग या धीरगंभीर वातावरणात आपण कधी हरवुन जातो ते कळतच नाही. ह्या सगळ्यातुन बाहेर पडावे असे वाटतच नाही .प्रत्येकाने एकदा तरी ही अनुभवाची शिदोरी अनुभवा असेच हे मंदिर आहे.
 
 याच मंदिराला लागुन सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांची समाधी आहे .ती सुध्दा  पाहण्यासारखी आहे .कधी तरी  वेळ काढुन  या ठिकाणी भेट द्यावी असेच हे ठिकाण एक नवचैतन्याची अनुभुती तर एका बाजुला पराक्रमाची उम्मीद देणार्‍या वीराची समाधी.

 





 आगळं-वेगळं पाच पांडव मंदिर

पाच पांडव मंदिर हे पांडवांचे संपूर्ण भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर  आहे. तळेगावला आलो की थेट चावडी चौक गाठायचा. या चावडीच्या मागेच नागरीवस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडतं. पहिल्या खोलीत साधारण साडेचार फूट उंचीच्या पांडवांच्या बैठय़ा मूर्ती एकमेकांशेजारी ओळीत आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशा क्रमाने मूर्ती मांडलेल्या आहेत. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मूर्तीच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते. याच खिडकीतून द्रौपदीचे दर्शन घडते. पण ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते. आत गेलो की, एका छोटय़ाशा चौथऱ्यावर द्रोपदी एका कुशीवर निजलेल्या स्थितीत दिसते.

घुमटाची विहीर

पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.

 

 









बामणडोह

शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात.

गोनीदांचं घर

ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर तळेगावमधील ज्या घरात वास्तव्यास होते त्या घराविषयी..
पुण्यातील तळेगाव दाभाडे.. एक ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेलं गाव. या गावात सरसेनापती खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे यांच्यासारखे लढवय्ये शूरवीर, अण्णासाहेब विजापूरकर यांच्यासारखे शिक्षणतज्ज्ञ, तर वसुधा माने, गो. नी. दांडेकर यांच्यासारखे साहित्यिक आपल्या कार्याने अजरामर होऊन गेले. तळेगावातील गाव भागात असलेल्या शाळा चौकातील विठ्ठल मंदिराशेजारी माडीवर ते राहत. हे विठ्ठल मंदिर सुमारे ३५० वर्षे पुरातन असून या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होत असे. तसेच विनायक नारायण जोशी ऊर्फ (दादा महाराज) साखरे महाराज यांचे याच वास्तूत सुमारे ५० वर्षे वास्तव्य होते. गंगाधरपंत मवाळ, संताजी महाराज जगनाडे  यांच्या पदस्पर्शाने मंदिर पावन झाले आहे. सन १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मण समाजातील लोकांच्या घराची जाळपोळ झाली. त्यात गोनीदा राहत असलेल्या सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शेजारचा वाडा जाळला गेला. त्यामुळे प्रकृतीला मानवणाऱ्या तळेगाव दाभाडे या गावात वास्तव्याचा निश्चय केला. तसेच मावळ पसिरातील ऐतिहासिक लेणी, संत तुकारामांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर, राजमाचीचा किल्ला अशा धार्मिक – सांस्कृतिक वातावरणांशी एकरूप होता यावं यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे या गावाची निवड करून १९४८ मध्ये ते या गावात रहाण्यास आले. पहिल्या मजल्यावर साधारण दोन खोल्या आणि लहान बाल्कनी असलेलं त्यांचं घर म्हणजे साहित्यिक चळवळीचं एक केंद्रच बनलं होतं. घरात गेल्यावर घरातील जिन्याच्या समोर त्यांची खुर्ची असायची. त्यांच्या आवडीचे एखादे किल्ल्याचे चित्र किंवा निसर्ग चित्र भिंतीवर लावलेले असायचे. जिना आणि गॅलरीच्या मध्ये भिंतीत एक खोल मजबूत कपाट असून, उजवीकडे भिंतीत पुस्तकाचे शेल्फ असून, तेथे त्यांचे लिखाणाचे साहित्य असे. साधारण १० x १५ ची खोली, ३ x १२ ची बाल्कनी आणि १० x १० चे स्वयंपाकघर अशी घराची रचना आहे. बुधगांवच्या पटवर्धनांच्या घरातील ऐतिहासिक तलवार तेथील भिंतीवरील खुंटीवर आजही टांगलेली दिसते. भिंतीवर खुंटी आहे. त्यांच्या घरातून एका बाजूने विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेले पितळी कासव सहज दृष्टीस पडे. तसेच घराच्या गॅलरीतून सुपत्तीचा डोंगर दिसतो. स्वयंपाकघरात गेल्यावर स्वयंपाकाचा ओटा, उजव्या बाजूला भिंतीत शेल्फ, डाव्या बाजूला छोटी मोरी, कोनाडे आजही दृष्टीस पडतात. तेथील जमीन मातीनं सारवलेली आहे. बाहेरची खोली कोबा केलेली असून पूर्वी तिथे ‘मॅटिंग’ केलेलं होतं. या घरात गोनीदांसह त्यांच्या मातोश्री अंबिकाबाई, पत्नी नीराताई आणि कन्या वीणा यांचे वास्तव्य होते. घराच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांच्या मातोश्री मुलांना प्रार्थना, श्लोक, गोष्टी सांगून संस्कार वर्ग घेत असत. गोनीदांनी या वास्तूत दर्जेदार साहित्यनिर्मिती केली. सागराशी झुंज (नाटक), मृण्मयी, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएवढा, मोगरा फुलला, माचीवरला बुधा, शितू, पडघवली, आईची देणगी अशा अनेक कादंबऱ्यांचे लिखाण याच वास्तूत झाल्याची साक्ष घराशेजारील वृद्धमंडळी देतात. साधारण १९४८-१९८८ अशी ४० वर्षे त्यांचे या वास्तूत वास्तव्य होते. लता मंगेशकर, रमेश देव, यशवंतराव चव्हाण, केशवराव कोठावळे, श्रीनिवास कुलकर्णी, आशा भोसले आणि दुर्ग भ्रमण करताना भेटलेले इतिहासप्रेमी अशा अनेक व्यक्ती त्यांच्या घरी भेटीला येत असत. दुर्गभ्रमण करून येताना दांडेकर तेथील ऐतिहासिक दगडधोंडे, वस्तू घरी आणत आणि शेजाऱ्यांना बोलवून त्या दाखवत असत. तळेगाव येथील शामराव दाभाडे हे त्यांच्यासोबत सदैव असायचे. एक मोठा साहित्यिक आपल्या गावात राहतो याचा अभिमान तळेगावकरांना होता. सर्वाशी प्रेमाची वागणूक, विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन ऐकण्यास सहभाग, घरात सतत वाचन, लेखन करणे आणि रात्री जेवण झाल्यावर फिरणे असा गोनिदांचा दिनक्रम होता. त्यांनी तळेगाव येथील रेव्हेन्यू कॉलनीत स्वत:चा बंगला बांधला होता, पण त्या बंगल्यात न राहता तो भाडय़ाने दिला होता.
अशा या दर्जेदार साहित्यनिर्मिती करणाऱ्या प्रतिभावंत साहित्यिकाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावे. 
      तळेगावची हि भटकंती संपवून आता आपण इंदोरीचा भुईकोट बघायला जाउया.
पेशव्यांच्या दफ्तरात तसंच त्यापूर्वीच्या इ.स. १५१० च्या दुर्मीळ कागदपत्रांनुसार पराक्रमी दाभाड्यांचा इतिहास जाणता येतो. छत्रपतींनी त्यांना १३९५ गावं बक्षीस दिली होती. त्यातल्याच इंदोरी गावात इंद्रायणीकाठी पेशवाईत १७२० मध्ये खंडेराव दाभाडेंनी नऊ बुरुजांचा भुईकोट बांधला. त्याचं एकूण क्षेत्रफळ १५ एकर आहे.
     इ. स. १७७९ मध्ये पेशवाई बुडवण्यासाठी आणि पुणे गिळंकृत करण्यासाठी ब्रिटिशांनी मुंबईहून सर्वसज्जतेने आगेकूच सुरू केली. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने तळेगावाजवळ ब्रिटिश फौजेला कापून काढलं. तिथल्या तलावात ब्रिटिशांनी आपल्या तोफा बुडवून महादजी आणि नाना फडणीसांसमोर लेखी शरणागती पत्करली. या विजयाची आठवण म्हणून तळेगावजवळच्या खिंडीत विजय मारुती मंदिर उभारण्यात आलं.
      ब्रिटिशांचा पराभूत सेनापती कॅप्टन स्टुअर्ट याला इथली मंडळी इष्टुर फाकडा म्हणत. ब्रिटिश हरलेली ही लढाई त्याच्या नावानं ओळखली जाते. पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटरवरील तळेगावचा हा परिसर रामायणकाळात श्रीरामांच्या, तसंच महाभारताच्या काळात अज्ञातवासात असताना पांडव, द्रौपदी, कुंतीमातेच्या पदस्पर्शाने पुनीत झाल्याचं मानलं जातं.

         याच तळेगावजवळ मावळ तालुक्यातल्या इंदोरी या गावात इंद्रायणी नदीकाठी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१ मध्ये भुईकोट किल्ला बांधला. इंदोरी गाव दाभाडे घराण्याकडे केव्हा आणि कसं आलं याची पार्श्वभूमी मात्र फारच कमी लोकांना माहीत आहे. पुण्याहून एका दिवसात निवांत पाहून होणारा हा गड वेळ देऊन पाहायला हवा.तळेगाव दाभाडेपासून पूर्वेस ५ कि.मी. अंतरावर चाकण-तळेगाव मार्गावर इंदोरी गाव आहे. येथे इंदोरीचा हा भुईकोट किल्ला आहे. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या भुईकोट किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. सध्या किल्ल्यामध्ये कडजाई देवीचे मंदिर असून हे देवस्थान जागृत असल्याचे मानले जाते. पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने गाव सैन्यासह तटबंदीच्या आत किल्ल्यात वसलेले होते. कालांतराने गाव किल्ल्याबाहेर आले.
आधी आपण या भुईकोटाचा इतिहास बघुया.   
  छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात होता. अहोरात्र मराठी साम्राज्यातले किल्ले ताब्यात घेण्यासाठी तो झटत होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर बादशहानं दुर्ग रायगडाला वेढा घालण्यासाठी इतिकादखान याला पाठवलं. त्यावेळी राजाराम महाराज रायगडाहून निसटून प्रतापगड, तिथून पन्हाळा आणि नंतर कर्नाटकात जिंजीला गेले. जिंजी ही स्वराज्याची राजधानी झाली.ज्याप्रमाणे शिवाजी महाराज पन्हाळगड ते विशाळगड निसटून गेले होते त्याप्रमाणे राजाराम महाराज रायगडावरून निसटून जिंजीस गेले. त्यामागे महाराष्ट्रातील युद्धपरिस्थिती कमी व्हावी व जिंजीकडे औरंगजेब बादशहाचे सैन्य झुलते ठेवावे तसेच स्वराज्यातील रयतेस मोकळा श्वास घेता यावा असा उद्देश होता. दरम्यान राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी जिंजीस केले होते. तामिळनाडू राज्यातअसणार्‍या जिंजी किल्ल्यास औरंगजेबाने पुन्हा किल्ले हस्तगत करण्यात पटाईतअसलेल्या इतिकादखान उर्फ जुल्फीकारखानयास पाठविले. त्याने जिंजीच्या किल्ल्यास वेढा दिला. जिंजीच्या वेढ्यात असताना राजाराम महाराजांना पुत्र झाला.
    पुत्रोत्सवार्थ स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या दाभाडे घराण्यातील येसजी बिन बजाजी दाभाडे यांना ८ जानेवारी १६९७ (शक १६१८ पौष वद्य ११ ) रोजी राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव इनाम दिला. पुढे खंडाराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद दिलं. इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं होतं. पुन्हा शाहू महाराजांकडूनही इंदोरी गाव दाभाडे घराण्यास वतनात मिळालं. त्यानंतर इंदोरी गावात नऊ बुरूजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला. दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात  झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. 

 इंदोरे गढीचा नकाशा
 
    किल्ल्याच्या आतील अनेक ऐतिहासिक वास्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड झाल्या असल्या, तरी तटबंदीसह भव्य प्रवेशद्वार अजून अभिमानाने उभे आहे.  जागोजागी तटबंदीची पडझड झालेली आहे. इंदोरीहून १५ किलोमीटरवर असलेल्या चाकणचा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे या किल्ल्याला संरक्षणदृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले. तटबंदीच्या आतील क्षेत्र अंदाजे ६ एकर असे विस्तृत क्षेत्र आहे. सध्या किल्ल्यात थेट मंदिरापर्यंत वाहन जाते.
 
 

 
 
कडजाईमाता मंदीर

कडजाईमातेची मुर्ती
 

 आतमध्ये जागृत ग्रामदैवत कडजाई मातेचे मंदिर, बापुजीबुवांचे मंदिर व बंद पडलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या दुरवस्था झालेली इमारत आहे. वैशाख महिन्यात अक्षयतृतीयेनंतर येणाºया मंगळवारी कडजाई मातेचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. 

      इंदोरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधलेली आहे. त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एकसलग काटकोनात दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारात दिसतो. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गसंपन्न भुईकोट म्हणून इंदोरीची गणना करता येते.
   या गडाचं बांधकाम पाहून पहिले बाजीराव पेशवे यांनी १७३० मध्ये पुण्यात मुठा नदीकाठी शनिवारवाडा बांधून घेतल्याचे दाखले ऐतिहासिक कागदपत्रांत मिळतात. इंदोरी गड पश्चिम बाजूनं जलदुर्ग, तर पूर्वदिशेनं बलाढ्य भुईकोट असल्याचं दिसतं. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि ऊमाबाईसाहेब दाभाडे यांचे काही काळ वास्तव्य या गडात होते.
 
 

 

 
 
 
 
  पूर्व दिशेला असलेले किल्ल्याचे दुमजली भव्य प्रवेशद्वार आहे. कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. या प्रकारातील शिल्पकला सेनापती घराण्याच्या प्रवेशद्वारांवर आढळून येते. सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या काळात ज्या वास्तू बांधल्या गेल्या आहेत अशा वास्तूंवर द्वारशिल्पं आढळून येतात.  प्रवेशद्वाराच्या मध्यावर देवीची कोरीव मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बुरुजांसह एकूण चौदा बुरूज आहेत. प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरूज घडीव दगडात बांधलेले आहेत. दरवाज्याच्या कमानींमध्ये दोन्ही बाजूस दोन ओवºया असून, पहारेकºयांसाठी दोन दोन देवड्या आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना होता. तिथे हत्तीचे दगडी चित्र कोरलेले आहे. तटबंदी सुमारे ५ फूट रुंदीची आहे. शत्रूने हल्ला केल्यास जागोजागी तोफा व बंदुकांसाठी  मोठमोठी छिद्रे शत्रूचा ठाव घेण्यास सज्ज आहेत. किल्ल्यात मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकामअतिशय दर्जेदार केलेले आढळून येते. मुख्यप्रवेशद्वारावर मोठा नगारखाना बांधलेलाआहे. मुख्य प्रवेशद्वाराची उंची 20 फूट वरुंदी 13 फूट आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्हीकवाडांची दगडी कुसं सुस्थितीत आहेत.1970 साली दाभाडे राजघराण्याकडूनघेण्यात आलेल्या छायाचित्रात ही कवाडं 1970 पर्यंत उपलब्ध होती असे दिसून येते.प्रवेशद्वाराची पहिली कवाडं उपलब्ध होती.मात्र त्यामागील द्वितीय प्रवेशद्वाराची कवाडंछायाचित्रात स्पष्ट दिसत नाहीत. किल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणाºया इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
   गडाचं मुख्य प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुहेरी संरक्षणाचा दरवाजा गडात प्रवेश करताना निदर्शनास येतो. पहिले प्रवेशद्वार शत्रूनं फोडले वा हस्तगत केलं, तरी दुसरा दरवाजा असल्यानं गडाचं संरक्षण करता येतं. तसंच, दुसरा दरवाजाही शत्रूनं ताब्यात घेण्याची चिन्ह निर्माण झाली, तर पश्चिम तटबंदीकडून बाहेर पडून राजकुटुंबीयांना नदीमार्गे होडीतून निसटता यावं, अशी रचना नदीच्या बाजूला पायऱ्या ठेवून केली आहे. 

गडाच्या पश्चिम बाजूला नदीचा खोल डोह असल्याने तो नैसर्गिक खंदकच ठरला आहे. गडातील लोक आणि सैन्याला आवश्यक असणारा पाणीपुरवठा या बारमाही नदीतून होत असे. याच गोष्टीमुळे हा गड नदीच्या बाजूला बांधण्यात आला.नदीच्या शेजारी किल्ला बांधण्याचामोठा फायदा म्हणजे सैन्यास भरपूर प्रमाणातलागणारे पाणी नदीतून उपलब्ध होत असे.याशिवाय शत्रुसैन्याचा वेढा किल्ल्यास पडतनसे. तसेच पाण्याच्या मोठ्या विहिरी, हौद, तलाव मोठ्या प्रमाणावर खर्च करून बांधण्याची आवश्यकता नसे.



 
 





 
 

   गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कामही अतिशय दर्जेदार पद्धतीनं केलेलं आहे. प्रवेशद्वारावर मोठा नगारखाना बांधण्यात आला आहे. १९७० पर्यंत मुख्य प्रवेशद्वाराची कवाडं शिल्लक होती. त्यांची उंची २० फूट आणि रूंदी सहा फूट होती. असा हा इतिहासाचा वारसा सांगणारा भक्कम दुर्ग आवर्जून पाहावा असाच आहे. 
 


 इंदोरेजवळच्या इंद्रायणीच्या नदीपात्रात ब्रम्हेश्वर मंदीर बांधलेले आहे.गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात हे मंदीर नदीच्या पुरात बुडते.

कसे जाल : 

इंदुरीचा भुईकोट बघण्यासाठी पुण्यातून दोन पर्याय आहेत.पुणे-लोणावळा लोकलने तळेगावला उतरणे किंवा पुण्यातून तळेगाव दाभाडेसाठी थेट पि.एम.टी.ची बस सेवा आहे. आपल्या वहानाने देखील थेट तळेगावला जाता येईल. तळेगाववरुन इंदूरीला जाण्यासाठी सहा आसनी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे.तळेगाव दाभाडेमधून चाकणकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटरवर इंद्रायणीनदीवर दोन पुल उभारलेले आहे. यातून छोट्या पुलाने इंदोरीच्या या भुईकोट किल्ल पाहता येतो.

 पुणे – सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे गावठाण.
पुणे ते तळेगाव दाभाडे अंतर ४५ किलोमीटर.

तळेगावजवळची इंदोरीच्या गढीबरोबरच आवर्जून बघावे असे  एतिहासिक ठिकाण म्हणजे वडगावच्या लढाईचे स्मारक. आधी या लढाईची माहिती घेउया आणि मग स्मारकाला भेट देउया. 

 वडगावची लढाई :-

     मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणून सुद्धा ओळखले जाते मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले... मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन क‍रून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला.. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले...
   जसे मराठी जगतात साडे तीन मुहूर्त, साडेतीन शहाणे, साडेतीन शक्तीपीठे तसे साडेतीन फाकडे.स्टुअर्ट या इंग्रजी साहेबाच्या नावाचा गावठी अपभ्रंश आहे! तो हुशार व तल्लख होता म्हणून फाकडा. फाकडा हा मराठी मधील अति वापरच शब्द जो काळाच्या पडद्या आड गेला.आज 99% मराठी लोकांना फाकडा या शब्दाचा अर्थ माहित नाही. पण काही दशकांपूर्वी सर्वात जास्त वापरणा-या शब्दांपैकी हा शब्द होता. फाकाडा म्हणजे देखणा हुशार शुर माणूस. स्टुअर्ट हा शब्द मराठी लोकांना म्हणायला यायचा नाही म्हणून त्याला इष्टुर असे बोलायचे. या साडेतीन फाकड्यांपैकी अर्धा फाकडा असलेल्या Captain James Stewart उर्फ 'इष्टुर फाकडा' याचे वडगांव मावळ येथे त्याचे थडगे आहे
बाकीचे तीन फाकडा म्हणजे.
1. कन्हेरराव त्रिंबक एकबोटे:-
   नानासाहेब पेशव्यांच्या काळात साधारण शिपाई म्हणून नोकरीस आलेला एकबोटेने निजामाचा १७५१ मध्ये झालेल्या लढाईत फाकड म्हणून ओळखला जाऊ लागला. तळेगाव ढमढेेरे मध्ये मराठा लोक हिंदू सन साजरे करत असताना निझाम ना हल्ला केला. डी बुसी हा फ्रेंच आधिकारी निझामाच्या कवायती सेना पाहत होता. जेंव्हा त्यांचा तोफा मराठा क्या दिशेने हल्ला करत होत्या त्यावेळी एकबोटेनी समोर येऊन त्या तोफा निकामी केल्या.
2.मानाजी शिंदे
    महादजी शिंदेच्या भावकी मध्ये असलेल्या शिंदे कुटुंबाचा हा देखणा आणि शुर मात्र रघुनाथ पेशव्यांचा पाठीराखा होता. बरभाईच्या काळात त्याने नाना फडणवीसची बाजू घेतली. उलट्या काळजाचा म्हणून प्रसिद्ध असलेला शिंदेच सरदार च तोंडावर शंभर तरी जखमेच्या व्रण होतें अनेक युद्धात पराक्रम गाजवलेल्या मानाजी शिंदे घाशीराम कोतवालने केलेल्या अनेक तेलांगी ब्राम्हणी ची हत्या जगासमोर आणली. अनेक इंग्रजी पत्रातून या शिंदेंच्या फाकड्याची कौतुके थांबत नाही.
3. कोन्हेरराव पटवर्धन
    हत्ती माणूस म्हणून हा प्रसिद्ध होता कारण मोठे शरीर. १७७७ साली हैदर च्या युद्धात कोन्हेरराव पटवर्धन ४००० सैनिकांचे नेतृत्व करत होते . पण अचानक त्या युद्धात हैदर ची सरशी झाली आणि अनेक मराठा सैनिक पळू लागले. पण कोन्हेरराव पटवर्धन मात्र एकटे लढू लागले. जेंव्हा त्यांचे शरीर सापडले तेंव्हा धड एका बाजूला पडले होते . तोंडावर अनेक जखमा होत्या.
     हे तीन मराठी फाकडे आता विस्मृतीत गेले असले तरी इंग्रज असलेला अर्धा फाकडा आज लोकांच्या स्मृतीत आजही जिवंत आहे.....सी ए Kincaid यांच्या मते फकडा या शब्दाचे इंग्लिश रुपतरण अशक्य आहे. ज्याप्रमाणे शुर आणि धाडसी लोकांना फ्रेंच मध्ये preux आणि इटली मध्ये Galannteumo असा पदवी आहे तशीच ही पदवी देखण्या शुर हुशार माणसाला दिली आहे असे या थोर इतिहासकारांचे म्हणणे आहे . 
  वडगावच्या या प्रसिध्द लढाईचा इतिहास असा.    
साल होतं १७७८. पेशवाईच्या गृहकलाहाचा काळ. नारायणराव पेशव्याचा खून घडवून आणणाऱ्या रघुनाथराव पेशव्याने बंड पुकारलं होतं. तो पेशवाईची गादी आपल्याला मिळावी म्हणून इंग्रजांना जाऊन मिळाला.  या भाऊबंदकीचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा विनाश करायचा इंग्रजांनी बेत केला होता. प्रचंड मोठं इंग्लिश सैन्य पुण्यावर चाल करून आलं.
  अटकेपार झेंडा लावणारा पराक्रमी राघोबादादाचा अनुभवी मार्गदर्शनाचा वापर करून पुणे सहज जिंकता येईल असं इंग्रजांना वाटत होत. मात्र त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये एक माणूस उभा होता.
महादजी शिंदे.
    बारभाईचा कारभार पाहणाऱ्या नाना फडणवीसांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवत होळकर, शिंदे, नागपूरकर भोसले या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या गेल्या. हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर वगैरे  सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. महादजी शिंदे त्यांचं नेतृत्व करत होते.
    इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे होते, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते.जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार कुशल योद्धा होता. त्याला मुंबईहून पुण्यापर्यंतच्या सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊन मुंबईवरुन निघाल्यापासून तीन दिवसात बोरघाट चढून वर येऊन पोहोचला.
मराठ्यांनी पुणे मुंबई मधील बोर घाटाचा पुण्याकडील भाग रोखून धरला होता. मराठ्यांना हा मोठा धक्का होता. कारण तीन दिवसात मराठ्यांचा गनिमी कसा मोडत खंडाळा लोणावळा पार केला.बोरघाट चढून इंग्रज फौजा वर येताच त्यांना घेरण्याचा मराठी सरदारांनी डाव रचला. ता. २५ डिसेंबर रोजी ब्रिटीश सैन्य खंडाळ्यास आले.त्यानी खंडाळयाच्या उंच टेकडीवर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे निशाण फडकवले.
    पहिल्या इंग्रज-मराठा युद्धास प्रारंभ झाला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाले होते. मराठयांच्या तोफखान्याचा मुख्य सेनापती होता भिवराव पानसे.
   मराठा तुकडीमध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. शिवाय महादजी शिंदेंच्या खास तुकड्यानी गनिमी काव्याने घाटातील जंगलात  ब्रिटीशांना हैराण करून सोडले होते.
एवढे असूनही कॅप्टन स्टुअर्ट याने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व मराठा तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली.मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजातील गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये कॅप्टन स्टुअर्टच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. या कॅप्टन स्टुअर्टचा उल्लेख इष्ठूर म्हणून केला जायचा. सेनापती महादजी शिंदेना देखील त्याच्या युद्धचातुर्याचे कौतुक होते. त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं विशेष लक्ष होत.
      मुंबईची ( इंग्रजांची)फौज चालून येत असल्याचे समजताच शिंदे - होळकरांसह बव्हंशी मराठी सरदार पुण्याच्या बचावासाठी तळेगाव पर्यंत येऊन थडकले. कामशेत जवळ त्यांना पानसेंचा तोफखाना गाठ पडला.मराठ्यांचा कडवा विरोध ईश्टुर फाकडा उर्फ जेम्स स्टुअर्टने तोडला . त्याच्या झंझावात पुढे मराठा तुकडी कोलमडली. त्याचा पराक्रम पाहून अनेक जुने जाणते मराठा सैनिक बोलले शाब्बास स्टुअर्ट . ४ जानेवारी १७७९ रोजी अशाच एका निकराच्या चकमकीमध्ये स्टुअर्टला तोफेचा गोळा लागला. यात त्याचे धड एकीकडे आणि मस्तक एकीकडे जाऊन पडले. त्याच्या वीरमरणाची बातमी कळताच महादजींच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,
    “इष्टुर फांकडया शाबास !! ”
फाकडे म्हणजे पराक्रमी. कॅप्टन स्टुअर्टला तेव्हा पासून पेशवाईतील साडे तीन फाकड्यापैकी एक म्हणून ओळखल जाऊ लागला.  मराठ्यांचा पत्रात सुद्धा त्याचे कौतुकच केले.इष्टुर फाकडा उर्फ स्टुअर्ड विल्यम्स एकदा एका पत्रात लिहला आहे. माणसाच्या आयुष्याची दिशा चुकली कि त्याची कशी केविलवाणी अवस्था होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रघुनाथराव आहेत. या माणसाने एकेकाळी मराठा फौजांच्या सह लढताना मोठा पराक्रम गाजवला आहे. सुदूर उत्तरेत त्याने मराठ्यांच्या साठी मोठ्या लढाया जिंकल्या आहेत. आज एक गोळी मस्तकाजवळून गेली आणि तो भीतीने थरथरला. त्यांची आजची अवस्था पाहून हा एकेकाळी इतका प्रसिद्ध योद्धा होता यावर विश्वास ठेवणे जड जाते.”
 त्याचे अंत्यसंस्कार मराठ्यांनी खूप मान सन्मानाने केले.जवळजवळ स्टुअर्ट ने मराठा फौजांना दहा दिवस झुंजविले पण माघार घेतली नाहीं इंग्रजांच्या मानाने मराठवगौज कैक पटीने मोठी होती.१२ जानेवारी १७७९च्या रात्री महादजी शिंदेनी वडगाव मावळच्या लढाईत ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. कंपनी सरकार सोबतच रघुनाथराव पेशव्यांनासुद्धा मराठी सत्तेने चांगलाच धडा शिकवला होता. त्याला महादजी शिंदेनी आपल्या ताब्यात घेतले.ता. ९ जानेवारीस इंग्रज तळेगावला पोहोचले तेव्हा त्यांना आसपासचा सर्व प्रदेश उजाड केल्याचे दिसले.
     आपल्या शत्रूचाही सन्मान करावा ही छत्रपती शिवरायांचा वारसा महादजी शिंदेनी देखील सांभाळला होता. त्यांनी इष्ठूर फाकड्याच्या शौर्याची आठवण म्हणून  इष्टुर फाकड्याच्या धडाची एक अन् शिराची एक अशा दोन समाध्या वडगावात बांधल्या. धडाची समाधी एका शेतात आहे तर शिराची समाधी ही वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या आवारात आहे. तिचे आता आतून दर्शन नाही घेता येत कारण कैद्यांच्या बराकी लागूनच आहेत. मध्यंतरीच्या काळात इष्ठूर फाकड्याच्या समाधीला गावात तो फक्कडबाबा म्हणून ओळखल जाऊ लागलं.बाहेरूनच ‘ फक्कडबाबा’ चे दर्शन घेता येते. महत्वाचे म्हणजे याची पूजा रोज पोलिसांतर्फेच केली जाते आणि नाताळच्या दिवशी विशेष पूजा करावी लागते.तो ख्रिस्त होता . त्याची जन्मतारीख माहीत नसावी म्हणुन 25 डिसेंबर हा फक्कड बाबाचा उरूस दिवस असतो.आज पण वडगाव मावळ भागात या पीरबाबांचा उरूस लागतो.
त्याच्याबद्दल अनेक दंतकथा पसरल्या. त्याचे भूत रात्री-अपरात्री वाटसरूनां छळते अशी अफवा पसरली. त्याची पूजाअर्चा होऊ लागली. काही अडाणी नवस देखील बोलू लागले.
   मात्र मागच्या काही वर्षात काही संशोधकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे कमी झालेले दिसते. याच्या ऐवजी वडगावात पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाचा विजयदिन साजरा केला जातो. या गावात महादजी शिंदे यांचा पुतळा व विजय स्तंभदेखील उभा केला आहे. इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.
 
वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे  यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.
युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.
युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.
महादजी शिंदे यांचा वीरासनातील पुतळा 
पुतळा आणि विजयस्तंभ
महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.

काही वर्षापूर्वी द लव्हर्स या हॉलीवूडच्या इंग्रजी चित्रपटात या इष्ठूर फाकड्याच्या कथेचा उल्लेख केला गेलेला आहे. या सिनेमात बिपाशा बसू व अतुल कुलकर्णी यांनी अभिनय केला आहे.

संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) https://punetrekss.blogspot.com/2019/02/induri-fort.html
३) https://www.discovermh.com/baneshwar-temple-talegaon-dabhade/
४) http://travelzunlimited.blogspot.com/2010/12/talegaon-dabhade-photo-feature.html
५ ) श्री. अमेय गुप्ते यांचे लिखाण https://www.loksatta.com/kutumbkatta/historical-talegaon-in-the-pune-district-1769658/
६) छत्रपतींच्या सरसेनापतींचं गाव !-  डॉ. सागर देशपांडे
७) https://e-abhivyakti.com
८) https://bolbhidu.com/ishtur-fakda-vadgaon-maval-anglo-maratha-war/
९)  https://www.loksatta.com/vasturang/vastu-lekh/gopal-nilkanth-dandekar-house-pune-1601190/


रघुनाथराव पेशवेची आठवण

पेशवे पदासाठी रघुनाथ राव स्वराज्याला सोडून इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजी मराठा पहिले युद्ध झाले . एका लढाईत एक गोळी राघोबादादांच्या डोक्याजवळून जाते आणि राघोबा दादा भीतीने थरथर कापतात.

 



1) Ishtur Phakde a gallant Englishman and other studies : Kincaid, C. A. (Charles Augustus), 1870-1954 : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

2)Marathe Shahitil Vechak Vedhak (A collection of essays on the outstanding

and unknown facts of the Maratha Empire) – Y.N.Kelkar

३) Ishtur Phakde, a gallant Englishman and other studies”- C.A.Kincaid

Ishtur Phakde a gallant Englishman and other studies : Kincaid, C. A. (Charles Augustus), 1870-1954 : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

४) Battles of the honourable East India Company: Making of the Raj-

M.S.Naravane

५)http://defenceforumindia.com/forum/threads/capt-james-stewart-died-

karla-maharashtra-state-india-04-jan-1779-first-anglo-mahra.19135/


Friday, March 25, 2022

एतिहासिक पोस्ट

 औरंगजेबाचा_हिसाब_धरीत_नाही
       प्रस्तुत खालील पत्र हे जिंजीवरुन छत्रपती राजाराम महाराजांच्या तर्फे कदाचित खंडो बल्लाळ किंवा प्रल्हाद निराजी यांनी पाठवलेले असावे, हे पत्र लिहीलय महापराक्रमी बाजी सर्जेराव जेधे यांना, बाजी सर्जेराव जेधे हे शिवछत्रपतींच्या बहुतेक सर्व मोहिमांमध्ये आपल्याला आढळून येतात, तथापि शंभू छत्रपतींच्या काळात हे काहीकाळ मोगलाईत गेलेले होते व नंतर परत स्वगृही परत आल्यावर हे पत्र शंभू छत्रपतींच्या पश्चात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्य सोडून जिंजीला जावे लागले. </p><p> औरंगजेबाच्या फौजांना पांगविण्यासाठी हा उपाय योजावा लागला, खालील पत्रात रत्नोजी शिंदे आणि शंकराजी ढगे यांनी बाजी सर्जेराव जेधे यांच्या एकनिष्ठपणाची बाजू छत्रपती राजाराम महाराजांना सांगितल्यावर महाराज असे म्हटतायत की ते स्वतः जिंजीला गेल्यानंतर लाखाच्या वर मराठ्यांची फौज जमा झाली असून दक्षिणेतील पाळेगार व देसाई मंडळी पण मराठ्यांना सामिल होत आहेत,  तशात केसो त्रिमळ पिंगळे यांना जिंजीवरुन स्वराज्यात एक लाख होन घेऊन ( खजिना ) पाठवले आहे, तसेच त्यांना आणायला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांना रवाना केलय, म्हणजे त्यांच्या फौजेचा जमाव व इकडील लाखावर जमा झालेली फौज एकत्र येऊन औरंगजेबाच्या मोगल फौजेचा फडशा पाडू, असा या पत्राचा भाव आहे. यामध्ये बाजी सर्जेराव जेधे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी सहा गावांचे मोकासे आणि १००० होनांची तैनात बहाल केलेली आहे.  तसेच औरंगजेबाच्या जवळील काही मराठ्यांना त्याने पुन्हा मुसलमान केल्याचे तसेच काही ब्राह्मणांना बाटवल्याचे पण या पत्रात आलेलं आहे (नेताजी राजे म्हणजे हा नेताजी पालकर असावा?, साबाजी घाटगे, जानोजी निंबाळकर?) काही मराठे वीर मोगलाईत गेलेले होते ते परत स्वगृही आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे ह्यात हणमंतराव निंबाळकर आणि सटवोजी निंबाळकर ही नावं येतायत.  या पत्रात महत्त्वाची वाक्ये..
या_राज्याची_पोटतिडीक_धरता
संदर्भ - राजवाडे खंड १५ ( लेखांक ३४७ )
~अतुल तळाशिकर
 टीप : विस्तारभयास्तव पूर्ण पत्र येथे देता येत नाही. इच्छुकांनी वरील दिलेला संदर्भ तपासावा.







 

 *मराठ्यांच्या ६ हजार घोडदळाने कुत्बशाहाच्या राजवाड्याला गराडा घातला, पण माशीने पंख हलवले असते तरी ऐकू आले असते इतक्या शांतपणे !
गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुत्बशाहाच्या भेटीची. एक अनामिक डच माणूस या भेटीचा साक्षीदार होता आणि त्यानेच हे प्रत्यक्षदर्शी वर्णन लिहून ठेवले आहे. पुढची हकीगत त्याच्याच शब्दात, राजा शिवाजी एका दरवाजातून आत आला. ज्या लोकांना भेटी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी होती ते दुसऱ्या एका दरवाजाने आत आले. शत्रूचा विध्वंस करणाऱ्या त्या भयंकर शिवाजीला राजाची (कुत्बशाहाची) भेट घेण्याची खूण केली गेली , तेव्हा तो त्याला दाखवून दिलेल्या  एका दरवाजातून आत आला, आणि कुत्बशाहा दुसऱ्या एका दरवाजाने तिथे उपस्थित झाला. त्यानंतर दोघेही आसनस्थ झाले आणि बोलणी सुरू झाली. त्यांची बोलणी चालू असतानाच, मराठ्यांच्या सहा हजार घोडदळाने कुत्बशाहाच्या राजवाड्याला गराडा घातला. हे घोडदळ इतक्या बेमालूमपणे आत आले की त्यावेळी एखाद्या माशीने जरी आपले पंख हलवले असते, तरी तो आवाज ऐकू आला असता ! ही गोष्ट मी ऐकीव माहिती वरुन सांगत नाहीये, कारण मी हे सर्व प्रत्यक्ष पाहिले आहे. एका खिडकीतून मला हे सर्व दिसत होते. हा शिवाजी म्हणजे दुसरा मँसँनिलोच (इटलीतील नेपल्स मधला एक लोकनेता) होता आणि मँसँनिलो प्रमाणेच शिवाजीच्या प्रजेला देखील त्याच्या विषयी अतिशय प्रेम आणि आदर वाटत असे.
 ~ English Records on Shivaji,
 सत्येन सुभाष वेलणकर

 भोर चा पत्ररूपी इतिहास:-
 मौजे किकवी मध्ययुगात वैयक्तिक, राजकीय, आर्थिक कारणांनी पाटीलकीच्या वतनाचे व्यवहार होत असत. तसाच एक चूकीचा म्हणजे पाटीलकीचा घोटाळा असे म्हणता येईल अशी घटना पुढीलप्रमाणे. शिवकाळात मौजे किकवी हे गाव परगणे  शिरवळ (पूर्वीचे सिरवल) मध्ये होते, येथील पाटीलकी &quot;मंडाजी निगडे पाटील यांचेकडे होती. ती शके १५९७ म्हणजे इ. स. १६७५  मध्ये मलारजी मल्हारजी निगडे देशमुख; यांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर (ज्यांनी राजधानी किल्ले रायगड बांधला) यांना परस्पर विकली, त्याची तक्रार मंडाजी निगडे पाटील यांनी शिवछत्रपतींकडे केली. त्यावर निर्णय देताना महाराजांनी हे पत्र बालाजी कुकाजी प्रभू हवालदार व कारकून परगणे सिरवल  यांना ०९ सप्टेंबर १६७५ रोजी लिहिले आहे. जुना व्यवहार रद्द करून नवीन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे महाराज आदेश देतात. महाराज हा व्यवहार रद्द करून मंडाजी निगडे पाटील यांना त्यांची पाटीलकी व हिरोजी इंदुलकरांनी पाटीलकी साठी मल्हारजी निगडे देशमुख यास दिलेली रक्कम परत मिळवून दिली, तसेच  मल्हारजीची चूक माफ करून त्यावर मेहेरबानी करून त्यांची देशमुखी देखील त्यांच्याकडे कायम केली. महाराजांना जाणता राजा का म्हणतात हे समजते. यातून तत्कालीन स्थानिक प्रशासकीय स्तरावरील अपहार आणि शिवछत्रपतींचे आदर्श न्यायधोरण व उत्कृष्ट प्रशासनव्यवस्था स्पष्ट होते.
 संदर्भ:-
१. शिवछत्रपतींची पत्रे- खंड 2   
२. खरे जंत्री

 खुप सुंदर ऐतिहासीक माहिती वाचणास मिळाली.असे बरेच वतनाचे तंटे व त्याचे निवाडे मजहर इतिहास संशोधकांनी आभ्यासून अप्रगट इतिहास प्रगट करावा.बारा मावळ पेक्षा निरथडीत वतनाचे वाद तेव्हापासून आजपर्यंत चालूच आहेत.


 हिरडस मावळच्या सरनोबतांचे बलिदान
    विजापूरच्या अफजलखानाचा मारून विजय साजरा न करता  राजे थेट करवीर पर्यंत धडकले, बापाचा सूड घेण्यायासाठी फाजलखान सोबत सिद्दी जोहर ला घेऊन आला, स्वराज्यावर पुन्हा संकट नको म्हणून महाराज मिरज चा वेढा सोडून पन्हाळ्यावर त्यांना अडवायला थांबले.  चार महिने मुसळधार पावसात कडा पहारा पन्हाळ्यावर लागला होता, वेढा फोडण्याचे नेतोजीरावांचे प्रयत्न यश देत नव्हते, महाराज वेढ्यात पुरते अडकले. आता जास्त काळ वाट पाहून शक्य नव्हतं म्हणून एक धाडसी योजनेतून &quot;शके १५८२ शार्वरीनाम संवत्सर आषाढ शुद्ध चतुर्थी&quot; ला रात्री महाराज पन्हाळ्यातून ऐन रात्री हिरडस मावळतल्या बांदलांच्या निवडक 600 (काही साधनात हा आकडा १००० ते २००० आहे) मावळ्यांसह बाहेर पडले. मुसळधार पाऊस, चिखल, पाठीवर शत्रू आणि स्वराज्याच्या धनी घेऊन सारे उर फुटस्तोवर पळत होते.  १२-१५ तास पळून कसेबसे &quot;आषाढ  कृष्ण एकादशीला&quot; खेळणा म्हणजे विशाळगडावर पोहोचले. पण मागे सिद्दी जवळ आला, आता परत वेढा नको म्हणून महाराजांनी रायाजी बांदल देशमुखांना जोहरशी  झुंजायाची आज्ञा केली पण बाजीप्रभू सरनोबत यांनी मध्यस्ती करुन ही ती जबाबाबदरी स्वतःवर घेतली, कारण रायाजी तेव्हा कोवळ्या वयात होते, लग्न- संसार झाला नव्हता. हिरडस मावळचे भविष्य असं रणांगणात खर्ची पडू नये म्हणून ते स्वतः पुढे निघाले, जातानाराजांना  म्हंटले, आम्ही गेलो तरी मागे कुटुंब  आणि रायाजी यांना पहावे, रायाजींना महाराजांच्या हाती देऊन, दर्शन घेऊन बाजी गडउतार झाले. इथे बाजींचा त्याग दिसून येतो.गडापासून  चार मैलावर असलेल्या गजापूरचा खिंडीत जोराची  झुंज झाली, बाजीप्रभू सरनोबत व इतर ५३ गावचे मावळेलोक मृत्यू पावले. पुढे रायजींनी महाराजांच्या परवानगीने त्या सर्वांवर अंत्यविधी केले. तसेच महाराजांनी पिसावरे येथे येऊन दिपाआवा बांदल  देशमुख व रायाजी नाईक बांदल देशमुख यांचे सांत्वन केले, कारण कडवी फौज, आणि पराक्रमी सरनोबत त्यांनी गमावला होता. महाराज लगोलग शिंद येथे बाजींच्या घरी जाऊन त्यांच्या बायकामुले व भाऊबंदाचेही सांत्वन केले व कुटुंबियांची जबाबदारी घेतली. आणि महाराज राजगडावर दाखल झाले. बावाजी बाजीप्रभू या मुलास सेनापती जमेनिशी वतन व बापूजी बाजी प्रभू याना किले विशाळगड येथील करखानिशी दिली.  राजगडावर भरलेल्या दरबारात जेधेंकडील मानाचे पहिले  तलवारीचे पान बांदलांकडे आले ते रायाजींनी स्वीकारले.
 १.या लढाईत कुठेही बाजी बांदल यांचा उल्लेख येत नाही कारण ते हयात नव्हते बाजीप्रभूंचा उल्लेख जेधे शकावलीत येतो तसा बाजी बांदल यांचा येत नाही.
 २. अस्सल साधनात शिवा काशीद यांचाही उल्लेख येत नाही.
 ३. तसेच जे लोक म्हणतात की या युद्धातकान्होजी जेधेंचे जेष्ठ पुत्र बाजी सर्जेराव जेधे सामील होते तर तसा उल्लेख खुद्द जेधेंकडील  जेधे शकवली मध्ये  आढळत नाही.एक प्रसिद्ध कादंबरीमुळे गजापूर खिंडीतील हा संग्राम व एकूणच बांदल सेनेचा, बांदल देशमुखांचा इतिहास चुकीच्या लिखाणामुळे उपेक्षित  राहिला. तसेच  सध्या उगाच बाजीप्रभूंच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले  जातात व बाजी बांदल यांचे नाव पुढे केले जाते, हे चुकीचे आहे.  यासाठी समस्त बांदल व हिरडस मावळातील लोकांनी जागृत राहणे  तसेच यावर शक्य तितके संशोधन व अभ्यास करणे गरजेचे आहे. बाजीप्रभू व हिरडस मावळतल्या सर्व अज्ञात वीरांना ऐतिहासिक भोर कडून भावपूर्ण श्रद्धांजली..



  पत्रासारसंग्रह मधल्या ह्या ब्रिटिशांच्या पत्रातून खालील गोष्टींचे वर्णन येतं -
- दरबारात महाराजांना मिळालेली अपमानास्पद वागणूक
- ह्या वागणुकीचे महाराजांनी दिलेले तडफदार उत्तर
- महाराजांना नजरकैद
- महाराज व शंभूराजे पेटाऱ्यातून निसटल्याची नोंद
२ गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या - एक म्हणजे राजे मनसबीच्या वचनांना भुलून, फसून औरंग्याच्या भेटीला गेले हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन आणि तो साफ चुकीचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
  दुसरे म्हणजे गनिमाला महाराजांची किती दहशत वाटत होती बघा - "शिवाजीपासून आपली मुक्तता झाली" ही नोंद आणि महाराज निसटून गेल्यावर गनिमाच्या प्रदेशात पसरलेले "भीती आणि संशय" ह्याचे वातावरण - ह्या २ नोंदी ह्याचाच पुरावा होय !!

★भोरचा पत्ररूपी इतिहास★
स्वराज्यावरील पहिले संकट म्हणजे फतेहखानाही स्वारी.
खळद बेलसर येथे ऑक्टोबर १६४८ ला झालेली लढाई. या लढाईसाठी विजापूरच्या मुहम्मद आदिलशहाने रोहिड खोऱ्यातील उत्रौली तर्फेचे केदारजी खोपडे… More देशमुखांना आजच्याच दिवशी म्हणजे ८ऑगस्ट १६४८ ला एक फर्मान धाडलं होतं. यात फतेहखानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. अशी फर्माने बऱ्याच देशमुखांना पोहोचली होती.
हिंदवी स्वराज्याची सेवा केल्याबद्दल तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी शंकराजी नारायण यांना "मदार -उल- महाम" हा किताब देऊन इमान दिला. भोरच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना काही मित्रांनी व प्रेक्षकांनी भोर… More संस्थांनच्या झेंड्याविषयी व राजचिन्हविषयी चौकशी केली, त्यात महत्वाचे म्हणजे झेंड्याच्या रंगाबद्दल बराच गोंधळ समोर आला. विकिपीडिया वर तो केसरी(भगवा) व हिरवा असा दोन रंगात दाखवला आहे तर काही जाणकारांनी भगवा रंग असल्याचे वाचनात आले असे सांगितले. मग बरेच दिवस याचा शोध सुरू होता. हिंदवी स्वराज्याच्या महत्वाच्या मंत्र्याच्या भागातील ध्वजामध्ये द्विरंग असण्याचे काहीच कारण नाही. अखेर संस्थानकलीन छायाचित्रांमध्ये भोरच्या पंतसचिव वाड्याचेदर्शनी भागातील छायाचित्र मिळाले त्याखाली स्पष्टपणे लिहिलेले… More

★ हिरडस मावळच्या सरनोबतांचे बलिदान
विजापूरच्या अफजलखानाचा मारून विजय साजरा न करता राजे थेट करवीर पर्यंत धडकले, बापाचा सूड घेण्यायासाठी फाजलखान सोबत सिद्दी जोहर ला घेऊन आला, स्वराज्यावर पुन्हा संकट नको म्हणून… More महाराज मिरज चा वेढा सोडून पन्हाळ्यावर त्यांना अडवायला थांबले. चार महिने मुसळधार पावसात कडा पहारा पन्हाळ्यावर लागला होता, वेढा फोडण्याचे नेतोजीरावांचे प्रयत्न यश देत नव्हते, महाराज वेढ्यात पुरते अडकले. आता जास्त काळ वाट पाहून शक्य नव्हतं म्हणून एक धाडसी योजनेतून "शके १५८२ शार्वरीनाम संवत्सर आषाढ शुद्ध चतुर्थी" ला रात्री महाराज पन्हाळ्यातून ऐन रात्री हिरडस मावळतल्या बांदलांच्या निवडक 600 (काही साधनात हा आकडा १००० ते २००० आहे) मावळ्यांसह बाहेर पडले. मुसळधार पाऊस, चिखल, पाठीवर शत्रू आणि…

• • • • • •
#बिंदू_माधव_मंदिर_आणि_धर्मांध_औरंगजेब

"ब-मुजीब निविश्ता रफीउल अमीन दिवान बनारस ब-अर्ज रसीद के बुतखाना बिंदमहादव मिस्मार नमूदा दर बाब अहदाश नमूदन. मस्जिद हर चे अम्र… More शवद. हुक्म शूद के तय्यार नूमायद"

बनारस येथील दिवाण रफीउलअमीन याच्या लिहिल्यावरुन समजले की, बिंदु माधवाचे देऊळ पाडून टाकले. मशिदीच्या उभारण्याबाबत हुकूम व्हावा. हुकूम झाला की उभारावी.

औरंगजेबाच्या दरबारचा अखबार, १३ सप्टेंबर १६८२

✒️ सत्येन सुभाष वेलणकर

हिंदूंच्या पाठशाळा आणि देवळे पाडून टाका , हिंदू धर्म सार्वजनिक रित्या पाळण्यावर ताबडतोब बंदी आणा - औरंगजेबाची राजाज्ञा **

**Demolish Hindu Schools and Temples,… More Prohibit Hindus from professing their faith publicly - Royal order of Mughal emperor Aurangzeb**

औरंगजेबाने दिलेली ही 'राजाज्ञा' ९ एप्रिल १६६९ ची असून, ती औरंगजेबाचे अधिकृत दरबारी चरित्र असलेल्या मआसिर ए आलमगिरी मध्ये दिली आहे. या आज्ञेचा मूळ फार्सी पाठ पुढील प्रमाणे :-

Aurangzeb issued the following order on 9th April 1669. The persian text of the order as given in Aurangzeb's official history, the Maasir-i-Alamgiri is as follows

**फार्सी पाठ ( Persian Text)**

ब-अर्ज ए ख़ुदावंद ए दीन परवर… More

 जेधे देशमुखांच्या कौटुंबिक वादासंदर्भात शिवछत्रपतींचे बाजी सर्जाराऊ जेधे यांना पत्र
शके १५८४ आषाढ वद्य १
इ.स. ४ जुलै १६६९

स्वराज्याचे खंदे आधारस्तंभ म्हणून सरदार जेधे देशमुखांचा… More लौकिक मोठा. सरदार धाकले कान्होजी जेधे देशमुख यांच्या इ. स. १६६० मधील निंधनानंतर त्यांच्या बाजी, शिवाजी, संभाजी, चांदजी, नाईकजी आणि रायाजी या सहा मुलांमध्ये वाटणी झाली होती. ती पुन्हा इ. स. १६६८ मध्ये दुसऱ्यांदा झाली. पण थोरले बंधू बाजी जेधे आणि धाकटे बंधू शिवाजी जेधे या भावांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले. ठरवून दिलेल्या कलमाप्रमाणे अंलबजावनी होत नाही, शिवाजी जेधे बाजींच्या वाटणीतील शेती कसत होते म्हणून बाजी (सर्जाराऊ)जेधे यांनी महाराजांकडे तक्रार केली. तेव्हा," झालेल्या निवड्याप्रमाणे… More

 शाहिस्तेखान स्वारी इ. स. १६६२

◆ काल एक दिनविशेष चुकीच्या माहितीसह समाजमध्यामांवर प्रसारीत होत होता त्यासंदर्भाने ही पोस्ट आहे.
★ पत्रात कुठेही महाराज बाजींचे कौतुक करीत नाहीत.… More
पत्राबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
इ. स. १६६२ मध्ये जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख बाजी सर्जाराऊ बीन कान्होजी जेधे यांना लिहिलेल्या काही पत्रांपैकी हे अस्सल मोडी पत्र व सोबत देवनागरी लिप्यांतर.
शाहिस्तेखान पुण्यात राहून स्वराज्यातील मुलुख खराब करीत होता. त्यातच काही खाजगी कारणास्तव बाजी सर्जाराऊ जेधे हे आपल्या वतनावर करी गावी रजेवर आले होते, बरेच दिवस ते कारील होते, ते रजा संपवून राजगडी दाखल होत नव्हते म्हणून लवकर… More

 रायगडाबद्दलचा (पण रायगडावर नसलेला!) एक हरवलेला शिलालेख!
=======================

दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो. पायरीवरचा ‘सेवेसी… More तत्पर हिरोजी इंदुलकर’ हा शिलालेख आपण वाचलेला असतो. आज जाणून घेऊयात अजून एका शिलालेखाबद्दल - जो फारसी भाषेत आहे पण ज्याबद्दल फारशी कुणास माहीती नाही - जो रायगडाबद्दलचा आहे आणि जो रायगडावर बसवायचा होता - पण ते झालं नाही. काय लिहीलं आहे त्या शिलालेखात? हे समजून घ्यायच्या आधी त्यावेळचा घटनाक्रम बघूयात.

औरंगजेबाची दख्खन दिग्विजय मोहीम जोरात सुरु होती. २५ मार्च १६८९ रोजी इतिकदखानाचा वेढा रायगडाभोवती पडायला सुरुवात झाली. सुमारे सात-सव्वासात महिने किल्लेदार चांगोजी काटकर आणि सोबत येसाजी… More

शिवरायांप्रमाणेच शंभुराजांचेही भोरशी दृढ नाते होते.

युद्धनीती, राजनीती, धर्मनीती, काव्यपंडित, धर्मपंडित, उत्तमप्रशासक, बहुभाषिक, कल्याणकारी शासक, अजिंक्ययोद्धा आशा किती तरी क्षेत्रात अवघ्या हिंदुस्थानात त्यांना टक्कर देईल असा कोणी नव्हता. वयाच्या ९ व्या वर्षांपासून ते ३२ व्या वर्षापर्यंत अव्याहत स्वराज्याचा विचार, प्रसार आणि सेवा शंभूराजांनी केली.

यवनांचे शासन आणि धर्म समूळ नष्ट करण्याचा मानस… More

छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञात समकालीन चित्र?

छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रतिम असे इस्लामी आमदनीतील चित्रशैलीत काढले गेलेले चित्र...

छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समकालीन अस्सल चित्रे सांगण्यात येतात… More त्यात हे चित्र कधी बघण्यात आले नाही. मात्र अशाच शैलीतील छत्रपती शिवाजी महाराजांची इतर काही चित्रे आहेत. मात्र हे थोडंसं वेगळं. चित्रावर उर्दू/पर्शियन मध्ये ‘सिवा’/‘शिवा’ असे लिहिलेले असून चित्रात महाराजांनी एका हातात फूल धरले आहे तर दुसरा हात कमरेच्या दांडपट्टयावर आहे. चित्राचा काळ १६८० असा नोंदवला आहे.

(शक्यतो महाराजांच्या हातात तलवार/दांडपट्टा दाखवले जाते मात्र या चित्रात दांडपट्टा बाजूने हातात धरलेला दर्शवला आहे)

 छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे हिंदूनृपती पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माविषयी नोंदी :

१) वैशाख वैद्य ७ दुदूंभी नाम संवत्सरे… More शके १६०४ गुरुवारी संभाजीराजे यांसी पुत्र जाला सिवाजीराजे नाव ठेविले

२) राजश्री संभाजीराजे यांस गंगोलीस पुत्र जाला शके १६०४ दुदूंभी नाम संवत्सरी वद्य सप्तमी जन्म झाला, नाव शिवाजीराजे ठेविले.

- संदर्भ : जेधे शकावली, करीना, खरे जंत्री

शाहूराजांविषयी चे बालपणातील अधिक विस्तृतपणे संदर्भ आढळून येत नाही, इ.स. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड शत्रूच्या ताब्यात गेला, स्वराज्यावर अतिशय बाका प्रसंग ओढवला होता अशाही परिस्थितीत महाराणी येसूबाईसाहेब यांनी प्रसंगावधान राखत अतिशय… More

★ भोरचा पत्ररूपी इतिहास

इ. स. १६६२ मध्ये जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख बाजी सर्जाराऊ बीन कान्होजी जेधे यांना लिहिलेले हे अस्सल पत्र. सदर… More पत्रात जावळीचा उल्लेख आहे पण सर्जाराऊ जावळीस का निघाले हे कळत नाही. पत्रात उल्लेख केलेले दत्ताजी कंक याना महाराजांनी कौल दिला असे लिहिले आहे. पण हा कौल कशासाठी याचा उलगडा होत नाही.
(जाणकारांनी यावर भाष्य करावे.)
हे दत्ताजी कंक जेधेंच्याच जमावतील असावेत. आजही कारी येथे कंक यांचे एक घर आहे.
पत्राची सुरुवात *मसरुल अनाम* अशी आहे. वर महाराजांची मुद्रा, तिसऱ्या ओळीत "शिवनरपती हर्षनिदान महादेव मतिमत प्रधान" अशी एक प्रधान मुद्रा आहे.
जेव्हा मत्तबर , वरच्या दर्जाच्या सरदारास पत्र जात असे… More

छत्रपती शिवरायांनी जेव्हा अफजलखानाचा सामना करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी मावळतल्या सर्व देशमुखांना एकत्र करण्याची कामगिरी स्वतःच्या वतनावर पाणी सोडणाऱ्या रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख सरदार कान्होजी जेधे यांना… More दिली .त्यांनी हिरडस मावळचे बांदल देशमुख , गुंजन मावळचे सिलिंबकर देशमुख (शिळीमकर), वेळवंड खोऱ्याचे डोहर धुमाळ देशमुख , मोसे खोऱ्याचे पासलकर देशमुख, मुठे खोऱ्याचे मारणे देशमुख, पौड खोऱ्याचे ढमाळे देशमुख , कानद खोऱ्याचे मरळ देशमुख या सर्वांसमोर " मऱ्हाष्ट्र राज्याची" संकल्पना मांडली आणि त्यांना महाराजांकडे वळवले. पुढे एकत्र झालेले मराठे अदिलशहा, कुतुबशहा, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी या सर्वांना पुरून उरले. आणि स्वराज्य निर्माण झाले..


ध्यासपर्व-रंगो बापूजी गुप्ते.

मावळभूमी...वीरांची,लढवय्यांची आणि निष्ठावंतांची .मावळची भौगोलिक सुरवात होते ती रोहिडखोर्यातून .रोहिडखोर्याच्या पुरातन काळापासून दोन तर्फा पडतात उत्रौली तर्फे रोहिडखोरे आणि भोर… More तर्फे रोहिडखोरे.शिवचरित्राची सुरवात ज्या कालखंडापासून होते त्या कालखंडात ह्या रोहिडखोर्याच्या देशपांडे वतनदाराचे नाव दादजी नरसप्रभू गुप्ते असे येते."हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा "ह्या सुप्रसिद्ध आशयाचे पत्र महाराजांनी त्यांनाच लिहले.गुप्ते हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे.शिवपूर्वकाळात मावळात अनेक प्रभू घराणी स्थायिक झाली.बाजीप्रभू देशपांडे हि प्रभूच.ह्या प्रभू घराण्यांनी शेवटपर्यंत छत्रपतींच्या घराण्याचा ज्वाज्वल्य अभिमान धरला.प्रभू एकंदर तलवारीला तिखट .कलमदानाच्या… More

 शिवराय प्रचंड बलाढ्य कुठे वाटतात माहितीये?

कृष्णाजी अनंत सभासद शिवरायांचे चरित्र लिहीत असतो.. सुरतेच्या
स्वारीनंतर केलेली कांचनबारीची लढाई तो स्वतःच्या नजरेसमोर उभी
करतो.. अंगात असणाऱ्या पूर्ण… More ताकदीनिशी लेखणी उचलतो.. आणि
कांचनबारीच्या युद्धाची सुरुवात करताना जोशात कागदावर अक्षरे
उमटू लागतात..

"राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून
मालमत्ता घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार
स्वारांनिशी सडे सडे राउत उभे राहीले.."

दोन्ही हातात शस्त्र घेऊन आपला नेता, आपला सेनापती, आपला
राजा समोर उभा आहे.. शत्रूला तोंड देण्यासाठी एकटाच समर्थ आहे..
हे दृश्य पाहून त्या दहा हजार सैन्यामध्ये काय ऊर्जा सामावली असेल?
शिवराय 'महाबली' भासतात ते इथे..

असे अनेक प्रसंग… More

 शाहजी महाराज "स्वराज्य संकल्पक" च....

रियासतकार गो .स सरदेसाई ह्यांनी मराठा रियासतीचे जेव्हा सलग खंड लिहिले त्यात पहिल्या खंडातल्या पहिल्या भागाचे नामकरण "स्वराज्य संकल्पक शाहजी" असे ठेवले .स्वराज्य… More निर्मितीचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांचे .पण ह्या वटवृक्षाचे बीज हे शहाजी महाराजांनीच लावले होते.रियासतकरांच्या प्रदिर्घ व्यासंगाला आणि अभ्यासाला दाद द्यायलाच हवी.स्वराज हि प्रदिर्घ प्रक्रिया आहे.अचानक ठिणगी पडली आणि वणवा लागला असे नैमित्तिक स्वरुप त्याचे नाही...भोसले घराण्याच्या एकूण तीन शाखा भोसले ,घोरपडे ,सावंत सोळाव्या शतकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत.मोगलाई,आदिलशाही,निजामशाही ह्या मुसलमानी सत्तांमधून त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला होता.....

अफजलवध आणि शिवरायांनी आयुधे

शके १५८१ विकारी संवत्सर मार्गशीर्ष षष्ठीसह सप्तमी गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ दुपारी प्रतापगड युद्धावेळी शिवछत्रपतींनी कोणत्या हत्याराने अफजलखान मारला याबद्दल बरेच वादविवाद आहेत.… More
खाली कोणत्या ग्रंथात कोणत्या हत्याराचा उल्लेख आहे याची यादी देत आहे.

१. सभासद- वाघनख व बिचवा.
२. चिटणीस- वाघनख व तलवार.
३. जेधे करीना-वाघनख व तलवार
४.९१ कलमी बखर- बिचवा व तलवार,
५. शिव दिग्विजय- बाघनख व पट्टा.
६. रायरी बखर-कठ्यार.
७. तरीख-इ-शिवाजी- वाघनख व कट्यार
८. इंग्रजीपत्र- पोटाजवळ लपवून ठेवलेली कट्यार,
९. फायर- अस्तनीत लपवून ठेवलेला जंब्या (Stiletto).
१०. खाफीखान- कट्यार.
११. मनुक्की -भाल्याच्या आकृतीचे छोटें आखूड दुधारी हत्यार.
१२.जेधे शकावलि - हत्याराचें नांव नाही.
" भेटीचे… More

 शंभूछत्रपती आणि भोर◆

बहराला आलेल्या मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याला नजर लागली आणि थोरले महाराज वयाच्या ५० व्या वर्षी गगन मंडळ भेदून दिगंत प्रवासाला निघून गेले. आधी महाराजसाहेब, जिजाऊ मासाहेब आणि आता स्वतः थोरले स्वामी स्वराज्याला पोरकं पोरकं करून गेले. भविष्य अनेक थरारक घटनांची चाहूल देत होतं, यातही अनेक लोकांनी युवराज शंभूराजांना गादीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले पण ते या कटात यशस्वी झाले नाहीत. जड अंतकरणाने आणि जबाबदारीच्या जाणिवेने शंभूराजे सिंहासनाधीश्वर झाले. लागलीच बुऱ्हाणपुरची मोहित फत्ते केली, पुढे मुघल युवराज अकबर, पोर्तुगीज, चिक्कदेवराय, फ्रेंच, इंग्रज, सिद्धी , अंतर्गत शत्रू ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत औरंग्याशी सलग ९ वर्ष झुंजले. डाव अर्धव असताना कैद झाली आणि काळाशी गाठ पडली पण त्यांच्या या बलिदानाने पुढे मराठ्यांनी मुघलशाही खिळखिळी केली, औरंग्याला खडकीत गाडला. महाराणी येसूबाई, छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू थोरले(दुसरे शिवाजीराजे ) यांनी पराक्रमाने स्वराज्याला मराठ्यांचे साम्राज्य बनवून पुनःस्थापित केलं.

★ सईबाई राणीसाहेबांच्या निधनांनातर कापूरहोळच्या धाराऊ गाडे पाटील यांनी बाळ शंभूराजांची दुधाई म्हणून जबाबदारी घेतली, आणि भोरशी त्याचं नातं लहान वयातच दृढ झालं.

★ फोंड्याच्या लढाईत सरसेनापती येसाजी कंकांचे पुत्र कृष्णाजी कंक खस्त झाले, शंभूराजांनी कंक घराण्याची स्वराज्याप्रति सेवा पाहून दरवर्षी १ शेर सोन्याची मोईन करून दिली आणि राजाचं कर्तव्य पाडलं.

★औरंग्यानं मावळात हैदोस घातलेला असतानाच घरगुती कारणांनी वाट चुकून शिरवळ ठाण्यात दाखल झालेले रोहिड खोऱ्याच्या भोर तर्फेचे बाजी (सर्जेराव) बीन कान्होजी जेधे देशमुख यांना त्यांच्या जबाबदारीची आणि चुकीची जाणीव अगदी कडक शब्दात शंभूराजे करून देतात.

★ उत्कृष्ठ सेनापती, राजा, राजकारणी, अनेक भाषांचे जाणकार असणारे ब्रीजभाषा आणि संस्कृतपंडित असणारे शंभूराजे-नृपशंभु आपल्या काव्यातून बांदल सेनेच्या पराक्रमाचं बोटभर कौतुक करतात ते असं:-

"भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ""
अर्थ- "हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत.”

 

शिवकालीन खाद्यसंस्कृतीबद्दल कायमचे कुतूहल मनात घर करून होत माझ्या .... काय बरं खात असतील ... कसे एवढे गड किल्ले चढत उतरत असतील? मावळे आणि महाराज आपल्यासारखे गव्हाच्या चपात्या खात असतील की भाकर्या? भाज्या कोणत्या खात असतील? ..... एका पुस्तकाने The Golden history of maraths बरीच शंका दूर केली
१) गहू पिकात नव्हता आपल्याकडे... त्या मुळे पोळ्या तर खाणे शक्य नाही.....
२) मुख्य अन्न खिचडी . तांदूळ आणि डाळ तांदूळ पण एक अंबे मोहर घांसाळ आणि जेरे साळ आणि डाळी मसूर, तूर , मूग, चणा, उडीद, हरभरा इत्यादी. ... भाकरी तर ज्वारी, नाचणी , बाजरी...... भाकरी सोबत ताक लोणी आणि दूध..... लोणचे, ठेचा... चटणी दही कडी काही भाज्या... इत्यादी
३) बटाटा त्या वेळी नव्हता.. हो बटाटा? मुळात हा प्रकार म्हणजे पोर्तुगीज लोकांची जगाला देणगी आहे. दक्षिण अमेरिकेतून त्यांनी बटाटा आणला आणि जगाला दिला. त्यामुळे कमीत कमी इ.स. १६०० पर्यंत तरी भारतात बटाट्याचे उत्पादन घेतले जात नसे....
४) अंबाडी, तांदळी, पालक इत्यादी या १७ व्या शतकातील महाराष्ट्रात होत्याच. पालकाबद्दल असे म्हटले जाते की इराण मधून अरब व्यापार्यांनी तो भारतात आणला, त्यामुळे कमीतकमी इ.स. १००० नंतर तरी भारतात पालक पिकवला जाऊ लागला हे निर्विवाद.... त्या काळी पालक अंबाडी तांदुळजा ह्या भाज्ज्या होत्या
५)आमटी.... तर त्या काळी होतीच.......
६)बाकी खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मोगलाई आणि पेशवाई जास्त इंटरेस्टिंग आहेत....
तर सांगण्याचे प्रयोजन असं की आपण ही हेच पदार्थ खायला पाहिजेत ... शिवशाही परत येईल ..

श्रीकांत थोरात

 

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...