Friday, October 21, 2022

वाशाळा लेणी

 

| Discover Maharashtra


Vashala Caves | वाशाळा लेणी

वाशाळा लेणी, वाशाळा ता.मोखाडा जि.पालघर –

महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वारसामध्ये तीन प्रकारच्या वास्तू हे ठळकपणे नजरेत भरतात. लेणी,मंदिरे, आणि किल्ले. डोंगर टेकडी पर्वत खडक कोरून तयार केलेल्या गुहेला लेणी  म्हणतात. भारतात आज माहित असलेल्या सुमारे १००० लेणी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ९०%लेणी आहेत. महाराष्ट्रात लेनी खोदण्याचा इतिहास तसा दुसरे शतकं ते दहाव्या शतकापर्यंतचा आहे. म्हणजे सहाजिक ह्या लेण्याला नक्कीच हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी. वाशाळा गावातील आणि पंचक्रोशीतील माणसे लेणीला वसई म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे या  लेणीची शासकीय दप्तरी पुरातन खात्याकडे नोंद नसावी.  काळाच्या पडद्याआड अशा शेकडो अपरीचित लेण्या ह्या सह्याद्रीच्या कुशीत समावलेल्या आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी.

लेणीच महत्व ना गावकऱ्यांना ना कोणाला. हे  फक्त मोबाईल वर नेट चालवण्यासाठी पते खेळण्यासाठी व तंबाखू गुटखा खाऊन दगड रंगवण्यासाठी तर कोणी आपलं नाव लिहितो जगाला  दाखवण्यासाठी येथे मी स्वप्निल भवारी व माझे काही गवतिल मित्र महिना अखेरीस जमेल तशी स्वच्छता करतो. दिवाळीला दीप प्रजवलीत करू दीप उस्तव साजरा करतो. या गावातील मित्र सहकार्य करतात. तसी लेणी खूप सुंदर आहे. गावाला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ही प्राचीन लेणी. मी विचारलेल्या जाणकार व्यक्ती कडून मिळालेल्या माहितीनुसार ही लेणी अर्धवट आहे…पण सुरुवात अप्रतिम केलेली दिसते.दुमजली लेणं करण्याची जी पद्धत तीच इथे वापरणार होते, येथे आपण बघितल्यनंतर अस लक्षात येते की येथे तळ मजला आणि पहिला मजला अशी रचना दिसते. जिनेच काम पण अर्धवट  राहिले आहे.हे जैन लेणं आहे.आत मध्ये दोन जैन तिर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती म्हणजे प्रतिमा उभ्या स्वरुपात आहे. जैन धर्मात

एकुण चोवीस तिर्थंकार  आहेत व त्यातील दोन तीर्थकरांच्या मूर्ती असाव्यात दोन्हीही सारख्या असल्यामुळे मूर्ती  नेमकी  कुणाची असावी हे ओळखणे थोडे कठीण जाते.

सुरुवातीस दोन पायऱ्या त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. चौथरा केला असून बाजूलाच पाण्याचे कुंड खोदलेले आहे. त्यालाच लागून खडकात एक शंकराची छोटीसी पिंड कोरलेली आढळुन येते. आत्ता ही  पिंड येथे का तयार केली  असावी हे माहिती नाही . छोटेसे दर्शनी मंडप.दर्शनी भागात सुंदर दोन खांब उभे आहे.खांब अखंड नाहीत. व पाणी बाहेर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या दोन नळ्या आहेत .त्या नंतर मुख्य दरवाजावर काहीतर कोरल आहेत पण स्पष्ट दिसत नाही. तेथून आत गेले की १०बाय१५  ची गुफा आहे.

आवाज खुपच घुमतो.समोरच्या बाजूस दोन जैन  मूर्ती प्रतिमा  खडकावर कोरलेल्या आहेत.व कप्पे आहेत यात स्थल मूर्ती असावी. (स्थल मूर्ती म्हणजे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवू शकतो ) दोन तीन फुटलेली शिल्पे आहेत.एक शिवलिंग आहे हे  नंतर ठेवला असेल .चारही कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी जागा आहे. काम अर्धवट राहिल्याच्या अनेक खुणा इथे दिसतात. अर्धवट काम का सोडले या बाबत कुणालाच काही कल्पना नाही. हे एक न सुटणार कोड आहे. इथे खुप काही बघण्यासाठी नाही पण हा हजारो वर्षाचा इतिहास आहे.तो जपला पाहिजे.

या लेणी ची निर्मिती का केली असावी.

माझ्यामते नाशिक विभागात अंकाई, टकाई, इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर या भागात त्याकाळी जैन धर्मास अनकुल वातावरण होते.त्या काळात जैन लेणी व मंदिरे याची निर्मिती या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येतात .त्रिंगलवाडी ,,त्र्यंबकेश्वर जैन लेणी ,मंदिरे याचेच पुरावे देतात. त्याच काळात ही लेणी कोरली असावी. लेण्यांच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलली गोष्ट अशी की पुरातन काळी जैन तीर्थकार धर्म प्रसारासाठी फिरत असत. त्यांचा दिनचर्या पाळायचा नियम कडक असावा. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्म प्रसारासाठी फिरणाऱ्या तीर्थकार यांना ध्यानधारणा सहज करता यावी यासाठी अशा लेणी कोरून  घेत असात.

सातवाहन काळानंतर परदेशी व्यापाराशी होणाऱ्या व्यापाराला आलेले भरभराटी ही लेणी महत्वाची ठरली. प्राचीन काळी बोईसर , कळवा, तारापूर ,डहाणू, हे महत्वाचे बदरे होती. यातून उतरणारा माल वेग वेगळे मार्गे देशावर जात असात. त्यातील एक मार्ग तांदुळवाडी किल्ला, असावा किल्ले विक्रमगड, जव्हार, भोपतगड वाशाळा लेणी, भास्कर गड, त्र्यंबक गंड , अंजनेरी नाशिक बाजारपेठ कडे जातो.

लेखन – स्वप्निल भवारी

Thursday, October 20, 2022

किल्ले अंकाई-टंकाई

      नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. यातील अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. मात्र अंकाई-टंकाई नेमके सातमाळा रांगेत कि अजिंठा रांगेत असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. वास्तविक सातमाळा रांग नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपर्यात सुरु होते, ती हातगड ते थेट मनमाडपर्यंत पसरत गेली आहे. अचला-अहिवंतगडापासून सातमाळा रांग सलग असली तरी चांदवडपासून ती काहीशी तुटक-तुटक आहे.अंकाई-टंकाई हे जोड किल्ले याच सातमाळा रांगेचा शेवट करतात. याशिवाय सातमाळा रांगेत रवळ्या-जवळ्या हे जोड दुर्ग आहेत्च. अंकाई-टंकाईपाशी सातमाळ रांग संपून अजिंठा रांग सुरु होते.या अजिंठा रांगेची एक शाखा कन्नडपासून सुरु होउन बुलढाण्यापर्यंत पसरली आहे तर दुसरी शाखा देवगिरी सिंदखेडपासून ते परभणीपर्यंत पसरली आहे. या रांगांचे वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही रांगात लेण्या खोदण्यात आल्या आहेत. एका रांगेत अजिंठ्याची चित्रकला असलेली जगप्रसिध्द लेणी आहेत, तर दुसर्यात बौध्द, हिंदु आणि जैन अश्या तिन्ही लेण्याचा मिलाफ असलेली वेरूळची लेणी आहेत, तर तिसर्या रांगेत काहीशी अप्रसिध्द अंकाई-टंकाई लेणी आहेत. भौगोलिक दृष्ट्या या रांगेला 'अजिंठा-सातमाळा' रांग म्हणले जात असले तरी याला चांदोर व विंध्याद्री अशीही नावे आहेत. नाशिक परिसरात या रांगांना सातमाळा, औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा रांग तर नांदेड भागात निर्मळ डोंगररांग अशी नावे आहेत. तर हिच रांग जेव्हा आंध्रप्रदेशात किंवा तेलंगणात प्रवेश करते तेव्हा या डोंगररांगाना 'सह्याद्रीप्रभात' म्हणले जाते. 

      खरेतर नाशिक जिल्हा म्हणजे गड,किल्ल्यांची खाण म्हणता येईल. जवळपास साठपेक्षा जास्त गड असलेल्या या जिल्ह्यात साल्हेर, मुल्हेर, धोडपसारखे इतिहास प्रसिध्द आणि बलदंड किल्ले आहेत.मात्र अवशेषांनी संपन्न किल्ला बघायचा असल्यास नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेला गाळणा किल्ला बघण्याशिवाय पर्याय नाही. गाळणा किल्ल्याला अवशेषाबाबतीत स्पर्धा करु शकेल असे जोडकिल्ले म्हणजे हे अंकाई-टंकाई. एखाद्या दुर्गाचे अलंकार म्हणजे तटबंदी,जंग्या,फांजी, चर्या,बुरुज, देवडी ई.हे सर्व अवशेष नीट बघायचे असतील आणि दुर्गवैशिष्ट्य समजून घ्यायची असतील तर अंकाई-टंकाईला भेट देण्याशिवाय पर्याय नाही.
            अंकाई गडाचा खुप प्राचीन काळापासून उल्लेख आलेला दिसतो. याला धार्मिक महत्व आहे असे दिसते. हिंदू पुराणातील सप्तर्षी मधील एक अगस्ती ऋषी.अज म्हणजे पर्वत आणि अस्ति म्हणजे फेकणारा. तर पर्वत उलथून टाकण्याचे सामर्थ्य असलेले असे हे अगस्ती ऋषी.पुराणातील एक कथा आहे.काही असुरांनी समुद्रात आसरा घेतला होता आणि देवांना त्यांना शोधणे कठीण होवून बसले. तेंव्हा अगस्ती मुनींनी समस्त समुद्र पिवून टाकला आणि असुरांचा संहार केला.चांदवड येथे अगस्ती ऋषींचे वास्तव्य होते. एकदा जेवणासाठी त्यांनी चार रोडगे बनविले. त्यातील अर्धा रोडगा त्यांनी गायीला खाउ घातला आणि उरलेले साडे तीन रोडगे स्वतःसाठी ठेवले. या रोडग्यावर तुप टाकून खाण्यासाठी त्यांनी चांडवडच्या नागरिकांकडे तुपाची मागणी केली.मात्र कोणाकडूनही त्यांना तुप मिळाले नाही.यावर क्रोधीत होउन चांदवडला 'चांंडाळनगरी' असा शाप देउन ते अंकाई गडावर रहाण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांनी अंकाई डोंगरावर तपश्चर्या केली व येथेच आपला आश्रम निर्माण केला. पुढे त्रेतायुगात वनवासासाठी बाहेर पडलेले प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांनी या आश्रमात येउन अगस्ती ऋषींची भेट घेतली व पुढे दंडकारण्यात निघून गेले. यावेळी ऋषी अगस्तींनी प्रभु रामचंद्रांना हितोपदेश केला व कधीही न संपणार्या बाणाचा भाता व इतर अनेक शस्त्रे दिली. अंकाई -टंकाई परिसराला प्रत्यक्ष प्रभु रामचंद्राचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे अंकाई परिसर धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र मानला जातो. 
 या घटनेच्या आधी अगस्ती ऋषी उत्तरेतून काशी सोडून दक्षिण भारतात आले होते.याबाबतीत अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातील एका अख्यायिकेनुसार मेरु पर्वत हा सर्व पर्वतात उंच पर्वत होता. तर विंध्य पर्वताची उंची त्याच्यापेक्षा कमी होती.याचे विंध्य पर्वताला नेहमी दुख वाटत असे. तेव्हा विंध्य पर्वताने ब्रम्हदेवाची कठोर तपश्चर्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्यावर विंध्य पर्वताने ब्रम्हदेवाकडे मागणी केली कि आपल्याला सर्वात उंच पर्वत करावे. त्यानुसार ब्रम्हदेवाने विंध्य पर्वताची इच्छा पुर्ण करुन त्याला सर्वात उंच पर्वत केले. मात्र त्यामुळे पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परिभ्रमणात अडथळा येउन कालगणनेत फरक पडू लागला. तेव्हा सर्व देवांनी अगस्ती ऋषींना या समस्येवर उपाय करण्याची विनंती केली, कारण अगस्ती ऋषी हे विंध्य पर्वताचे गुरु होते. सर्व देवतांनी अगस्ती ऋषींना अशी विनंती केली कि अगस्ती ऋषींनी काशिग्राम सोडून दक्षिण दिशेला भ्रमण करावे व वाटेत आलेल्या विंध्य पर्वताला खाली वाकण्यास सांगावे. जोपर्यंत अगस्ती ऋषी दक्षिणेतून उत्तरेला परत येत नाहीत, तोपर्यंत विंध्य पर्वताने तश्याच वाकलेल्या अचस्थेत रहावे. तसेच अगस्ती ऋषींनी दक्षिणेतून उत्तरेला परत जाउच नये, म्हणजे विंध्य पर्वत तश्याच वाकलेल्या अवस्थेत राहील. अर्थातच त्याची उंची कमी राहील. देवतांच्या विनंतीला मान देउन अगस्ती ऋषी कायमचे दक्षीणेला राहिले. त्यामुळे विंध्य पर्वत कायमच वाकलेल्या अवस्थेत राहीला.
    अंकाईवर असलेला अगस्ती ऋषींचा आश्रम विशेष प्रसिध्द असून बालेकिल्ल्यातील प्रशस्त गुहेत महर्षी अगस्ती, तसेच राम्,लक्ष्मण, सीता, कृष्ण, रुक्मिणी यांच्या मुर्ती आहेत. गुहेपासून जवळच पश्चिम दिशेला अगस्ती ऋषिंचे स्नानकुंड असून या कुंडात स्नान केल्याने पाप नाश पावते अशी भाविकांची श्रध्दा आहे. श्रावण महिन्यात अंकाईच्या अगस्ती ऋषिंच्या आश्रमाला यात्रेचे रुप आलेले असते.विशेषतः श्रावण सोमवार व श्रावण शनिवारी हजारो भाविक अगस्ती ऋषींच्या दर्शनाला येतात. विशेष म्हणजे मध्ययुगीन काळात तीनशे वर्ष हा गड अहमदनगरची निजामशाही ,दिल्लीच्या मोघल राजवटीखाली होता.मुसलमानी राजवटी हिंदु धार्मिक स्थळांचा विनाश करण्यासाठी प्रसिध्द असूनही अंकाई गडावरचा हा अगस्ती ऋषिंचा आश्रम कायम राहिला आहे.
   अंकाई टंकाई गडावर असलेली ब्राम्हणी आणि जैन लेणी बघत या गडाला निश्चितच प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. अर्थात इतर अनेक गडांप्रमाणे हे जोडदुर्ग नेमके कोणी बांधले याचा इतिहास उपलब्ध नाही. मात्र प्राचीन काळी यादव सत्तेचे या परिसरावर राज्य होते, तसेच चांदवड येथे यादव सत्तेची राजधानी यावरुन अंकाई-टंकाई गडांची निर्मिती यादव सत्तेने अकराव्या शतकात केली असावी असा निश्चित निष्कर्श काढता येतो. 

     पुढील काळात माळव्याच्या परमार सत्तेने या किल्ल्यांवर वर्चस्व प्राप्त केले मात्र सिंदन यादव याने परमार सत्तेने अंकाईवर नेमलेला किल्लेदार श्रीधर याला फितुर करुन अंकाई-टंकाई पुन्हा यादव सत्तेच्या अंमलात आणला. मात्र या घटनेविषयी ठामपणे मत मांडता येत नाही,कारण माळव्याच्या परमार सत्तेचे दीर्घकाळ दक्षिणेकडे वर्चस्व असल्याचे पुरावे मिळत नाहीत. कदाचित यादववंशातील परमदेव हा दुर्बल राजा सत्तेत असताना परमार राजा भोज याने सत्ताविस्तार केला असावा.कारण राजा भोज याने इ.स. १०२० मध्ये उत्तर कोकणची मोहिम काढून शिलाहार राजा अरिकेसरी याचा पराभव करीत उत्तर कोकणावर अल्पकाळ सत्ता प्रस्थापित केल्याचे उल्लेख मिळतात. कदाचित याच काळात अंकाई-टंकाई किल्ल्यावर परमार सत्तेचा ताबा असावा. म्हणजे परमार राजा भोज हा अंकाईवर राज्य करणारा एक सत्ताधीश होता हे नक्की. यादवकाळातील एका ताम्रपटात अंकाईचा उल्लेख 'एनकाई' असा आला आहे. म्हणजे अंकाई गड निश्चितच यादवकाळात निर्माण झाला असावा. कदाचित तो देवगिरीच्याही आधी निर्माण झाला असावा.किमान यादवकाळात अंकाईवर बरीच बांधकामे झाली.
चौदाव्या शतकात यादव सत्तेच्या र्हासानंतर दक्षिणेत प्रामुख्याने बहामनी व विजयनगर साम्राज्य उदयाला आले. त्यापैकी बहामनी सत्तेने अंकाईवर वर्चस्व प्राप्त केले. इ.स. १४९० मध्ये बहामनी सत्तेचे विघटन होउन पाच सत्ता उदयाला आल्या. यापैकी अहमदनगरच्या निजामशाहीच्या अखत्यारीत अंकाई होता. परंतु याकाळात अंकाई किल्ल्यावर कोणत्याही एतिहासिक घटना झाल्याची नोंद नाही. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. इ.स.१६३५ मधे मुघल बादशहा शहाजहानचा सरदार खानजहान यानें अलका-पलका किल्ल्यासोबत हा किल्ला लाच देऊन घेतला.या आक्रमणाच्या वेळी मोघल सैन्याने अंकाई-टंकाईवरील मंदीर्,लेणी व इतर धार्मिक स्थळांचा मोठ्या प्रमाणात विंध्वस केला. 
   गडाच्या इतिहासदृष्ट्या महत्वाच्या कालखंडात म्हणजे शिवकाळात अंकाई-टंकाई मोघलांकडेच होते. परंतु ईश्वरदास नागर याने लिहीलेल्या 'फतुहाते आलमगिरी' या औरंगजेबाच्या चरित्रात छत्रपति शिवाजी महाराजांनी अंकाई-टंकाई इ.स. १६६० च्या सुमारास मोघलांकडून हस्तगत केल्याचा उल्लेख आला आहे. परंतु इ.स.१६६० मध्ये शिवाजी महाराजांनी नाशिक, अहमदनगर भागात स्वराज्य विस्तार केल्याचा उल्लेख मिळत नाही, शिवाय या काळात स्वराज्यावर आदिलशाहचा सरदार सिद्दी जोहर व मोघल सरदार शाहिस्तेखान असे चालून आले असताना अंकाई-टंकाई मराठे घेतील हे शक्य वाटत नाही. कदाचित मराठ्यांच्या एखाद्या तुकडीने या भागात लुट केली असावी. इ.स.१६६५ मध्यें थिवेनॉट यानें सुरत व औरंगाबाद यांच्यामधील एक महत्वाचा टप्पा म्हणुन या किल्ल्यांचा उल्लेख केला आहे.
 इ.स. १६७० मध्ये मराठे व मोघल यांच्यात सातमाळ रांगेत मोठा संघर्ष झाला. या काळात मोघल सरदार दाउदखान कुरेशी याने आपल्या सैन्यासहीत अंकाई-टंकाईच्या पायथ्याशी तळ दिला होता. या काळात मराठ्यांनी सातमाळ रांगेतील मोघलांच्या ताब्यात असलेले अनेक गड जिंकून घेतले.मात्र अंकाई-टंकाई त्यांना जिंकता आले नाहीत. शिवछत्रपतींच्या निधनानंतर आणि संभाजी महाराज व औरंगजेब यांचा संघर्ष सुरु असण्याच्या कालखंडात म्हणजे इ.स. १६८२ मध्ये मराठा व मोघल सैन्यात किरकोळ लढाया झाल्या. डिसेंबर १६८२ मध्ये मराठ्यांनी अंकाई-टंकाई शेजारच्या कात्रा किल्ल्यावर हल्ला केला असता अंकाई-टंकाई गडाचा किल्लेदार अहमदखान सैन्यासहीत कात्रा किल्ल्याच्या परिसरात पोहचला. मात्र याच कालखंडात वतनाच्या अमिषाने अनेक मराठे सरदार मोघलांना फितुर झाले. यात एक होते चिमणाजी शिर्के.वास्तविक चिमणाजी शिर्के हे महाराणी येसुबाई यांचे चुलत आजोबा. चिमणाजी मोघलांना फितुर झाल्यावर त्यांना बक्षीसी मिळाली ती म्हणजे अंकाई-टंकाई गडावर अहमदखानच्या जागी किल्लेदारी मिळाली. 
  पुढे इ.स. १६९३ मध्ये मोघल सरदार सुलेमान बेग हा अंकाईचा किल्लेदार असल्याचा उल्लेख मिळतो. मात्र इ.स. १६९५ मध्ये मराठ्यांनी अंकाई-टंकाईवर किंवा या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले असावे.कारण मोघल सरदार रघोजी व मोहमद सादिक हे अंकाई-टंकाई परिसरात लुट करण्यासाठी पोहचले. त्यावेळी नाशिकचा मोघल सरदार मातबरखान त्यांना ससैन्य मनमाड परिसरात येउन मिळाला. या सैन्याने अंकाई परिसरातील गुरेढोरे व इतर संपत्तीची लुट केली. मात्र पुढेही अंकाई-टंकाईवर मोघली चांदतारा फडकत राहीला. एकुण शिवकाळात, संभाजी महाराज व रामराम महाराजांच्या धामधुमीच्या काळात अंकाई-टंकाई परिसरावर मोघलांचे वर्चस्व राहिले.
     पुढे पेशवाई मध्ये इ.स. १७२३ मध्ये मोघलांचा दक्षिणेकडील सरदार निजाम उल मुल्क याने हैद्राबाद येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले असता, आपोआपच अंकाई-टंकाईचा ताबा हैद्राबादच्या निजामाकडे गेला. पुढे इ.स. १७२८ मध्ये पहिला बाजीराव पेशवे यांनी पालखेडच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यानंतर झालेल्या मुंगी-शेगावच्या तहानुसार अंकाई किल्ला मराठ्यांना देण्याचे कबुल केले.मात्र निजामाचा तात्कालीन किल्लेदार अझीझखान याने अंकाई मराठ्यांच्या ताब्यात दिला नाही. कदाचित निजामानेच अब्दुल अझीझखान याला तसे सांगितले असावे. काही इतिहासकारांच्या मते इ.स. १७५२ मध्ये बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे व निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहानुसार अंकाई-टंकाई मराठ्यांना मिळाले. मात्र प्रत्यक्षात इ.स. १७६४ पर्यंत अंकाईवर हैद्राबादच्या निजामाचे वर्चस्व होते.
पुढे इ.स. १७६५ मध्ये अंकाई परिसरावर निजामाचा ताबा असताना गणीबेग हा इथला निजामातर्फे किल्लेदार होता. मात्र या परिसरात गुंड आणि लुटारू यांनी मोठा धुमाकुळ घातला. तेव्हा त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी या परिसरातील कमाविसदाराने पेशवे दरबारात केली. अर्थात या गुंड आणि लुटारू लोकांना गणीबेगची साथ असणार किंवा हे लोक गणीबेगचेच असावेत.या लोकांनी पेशव्यांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांची माणसे पकडून नेली. तेव्हा विंचुरकर सरदारांनी अंकाई गड ताब्यात घेण्यासाठी गडाला मोर्चे लावले. मात्र चिंचुरकर आणि गणीबेग यांच्यात फार संघर्ष न होता हे प्रकरण मिटले व गणीबेगने विंचुरकरांची माणसे सोडून दिली. 
    पेशव्यांनी खुप प्रयत्न करुनही अंकाई-टंकाई पेशव्याच्या अधिपत्याखाली येत नव्हते. पेशवे आणि निजाम यांच्यात करार होउन अंकाई-टंकाई पेशव्यांना द्यायचे ठरले.हैद्राबाद दरबाराकडून अंकाईचा किल्लेदार मुरादखान याला गड पेशव्यांना देण्यासाठी सांगण्यात आले.मात्र त्याबदल्यात पेशव्यांना त्यांच्या ताब्यातील नळदुर्ग निजामाला द्यावा लागला.अंकाई-टंकाई मिळावेत यासाठी पेशव्यांनी नळ्दुर्गसारखा बुलंद  भुईकोट निजामाला दिला, यावरुन पेशव्यांना अंकाई-टंकाई किती मह्त्वाचे हे समजून येते. 
     मात्र अंकाई-टंकाई निजामाकडून पेशव्यांना हस्तांतरीत होताना एक प्रसंग घडला. गडाचा किल्लेदार गणीबेग याने अंकाई किल्ल्याचे हिशेब सांभाळणारे अधिकारी येवलकर ठाकुर व विष्णुपंत यांच्याकडून जबरदस्तीने किल्ल्यावरील खजिना ताब्यात घेतला. हे करताना त्याने आपला वरिष्ठ अधिकारी मुरादखान याची परवानगी देखील घेतली नाही. हि बातमी पुणे दरबाराला समजल्यावर गणीबेगला अंकाई किल्ल्यावरील खजिना व महसुल आप्पाजी गणेश या मराठा अधिकार्याकडे सोपविण्यास सांगण्यात आले,तसेच यासाठी आप्पाजी गणेश व नाशिकचे मराठा सरदार दमाजी गायकवाड यांना यासाठी तगादा लावण्यास सांगण्यात आले.त्यानुसार मराठा सरदारांनी दम देउनही गणीबेग खजिना व महसुल जमा करण्यास टाळाटाळ करु लागला. मराठा सरदारांनी खजिना कोठे लपविला असल्यास त्याचा शोध घ्यायला सुरवात केली , मात्र त्यात अपयश आले.याबाबत बाळकृष्ण गोविंद हा मराठा अधिकारी पेश्गवे दरबाराला कळवितो कि किल्ल्यावर अनेज गुप्त ठिकाणे असून मुरादखानचा भाउ सरदारखान म्हणतो कि मला काही गुप्त ठिकाणे माहिती आहेत्,परंतु सरदारखानाचा किल्ल्याच्या प्रशासनात कोठेही सहभाग नव्हता. तो फक्त किल्ल्याच्या संरक्षक कामावर असावा. दरम्यान गणीबेग याला धमकावून खजिना व महसुल मिळवण्याचा विचार झाला. परंतु विंचुरकर सरदार यांच्या मतानुसार गणीबेग हातचा गेला तर सर्व खजिना व महसुलाची रक्कम हातची जाईल. या मुद्द्यावरुन पेशवे सरकारांचे अधिकारी व विंचुरकर सरदार यांची माणसे यांच्यात मतभेद झाले.अंकाई गड विंचुरकरांच्या ताब्यात असलयाने विंचुरकरांचे सरदार पेशव्यांच्या माणसांना हस्तक्षेप करु देत नव्हते.मात्र या प्रकरणाचे नेमके पुढे काय झाले ते समजत नाही. एवढे मात्र नक्की कि अंकाई-टंकाई गडावर मोठ्या प्रमाणात खजिना होता तसेच महसुलाची मोठी रक्कम जमा होत असणार. तसेच किल्ल्यावरील अधिकारी खजिना त्याच्या सोयीनुसार गुप्त ठिकाणी ठेवते असे. गड जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्यांना काय, काय मिळाले याची यादी आहे.       
        अंकाई गडावर मराठ्यांना मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळाली. त्यापैकी उच्च दर्जाचे कापड मराठा सरदार नारो कृष्ण याने पेशवे दरबाराला पाठविले होते. येवला व पैठण हे उच्च दर्जाच्या कापडनिर्मितीची केंद्रे अंकाई-टंकाईपासून जवळच असल्यामुळे या गडावर मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचे कापड असावे. तसेच हा गड सुरत ते औरंगाबाद या महत्वाच्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे किल्ल्यावरील अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात व्यापार्यांकडून खरेदी करुन ठेवले असावे. कदाचित कापडाच्या व्यापार्यांनी किल्ल्यावरील अधिकार्यांना ते भेट म्हणून दिले असावे. 
   पुढे इ.स. १७६८ साली थोरले माधवराव पेशवे व त्यांचे चुलते रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा यांच्यात धोडपच्या पायथ्याशी युध्द होउन त्यात माधवरावांचा विजय झला.या युध्दाच्या वेळी रघोबादादांच्या पक्षातील गंगोबातात्या चंद्रचुड याने पळून अंकाई किल्ल्यावर आश्रय घेतला होता. परंतु अंकाईच्या किल्लेदाराने गंगोबा तात्यास पकडून माधवरावांच्या हवाली केले. 
     इ.स. १७७० मध्ये हैदरअली विरुध्दच्या कर्नाटकातील युध्दात सरदार शिवाजी विठ्ठल विंचुरकर यांनी मोठा पराक्रम गाजवला, तसेच शत्रुच्या अनेक तोफा ताब्यात घेतल्या. त्यपैकी दोन मोठ्या तोफा माधवराव पेशव्यांनी विंचुरकर सरदारांना भेट दिल्या असता , त्यांनी या तोफा अंकाई गडावर तैनात केल्या. या तोफा पुढे इंग्रजांनी निकामी केल्या. एकंदरील सन १७६५ मध्ये अंकाई-टंकाई गड ताब्यात आल्यापासून सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर आणि घराण्याचे या गडांवर वर्चस्व होते. 
        पेशवे दरबारातील कागदपत्रामध्ये अंकाई संदर्भात आणखी एक सांस्कृतिक घटनेचा उल्लेख मिळतो. पेशवेकाळात दरबाराकडून गड्किल्ल्यावर तिळगुळ पाठविला जात असे.त्यानुसार सन १७७२ मध्ये पेशवे दरबाराकडून हरी अप्पाजी यांच्या मार्फत अंकाई किल्ल्यावर तिळगुळ व भेटवस्तु पाठविण्यात आल्या. 
   यानंतर आपण येतो ते या जोडदुर्गांच्या इतिहासाच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात इंग्रजांच्या काळात. इ.स. १८१७-१८१८ च्या तिसर्या मराठा-इंग्रज युध्दात दुसरा बाजीराव पेशवा याचा पराभव झाला. यात मराठा सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटीशांचे राज्य सुरु झाले. अर्थात असे असले तरी अद्याप मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या गड्,किल्ल्यावर भगवे निशाण फडकत होते. या गड्,किल्ल्याच्या आधारे दुर्गम भागात मराठ्यांनी बंड उभारु नये म्हणून हे गड ताब्यात घेण्याचे धोरण इंग्रजांनी आखले.
मार्च १८१८ मध्ये अहमदनगरचा इंग्रज अधिकारी कर्नल मॅकडॉवल याने त्याच्याकडील सैन्याची दोन भागात विभागणी केली. त्यानुसार एक तुकडी चांदवडचा किल्ला घेण्यासाठी तर दुसरी तुकडी अंकाई-टंकाई किल्ले ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आली. मॅकडॉवेल याने या परिसरातील वतनदरांना आवाहन करुन ब्रिटीश लष्कराला मदत करण्यास सांगितले. तसेच माल्कम हा ब्रिटीश अधिकारीही काही वतनदारांच्या भेटीगाठी घेत होता.अंकाई येथील देशमुखाला ही निरोप पाठविण्यात आला.या भागातील देशमुखांनी इंग्रजांना सहकार्य न केल्यास त्यांच्यावरही लष्करी कारवाई करण्यात येणार होती. अंकाई भागातीले एक प्रमुख देशमुख रंगो पंडीत यांच्याशीही इंग्रज अधिकार्यांनी संपर्क साधला होता. गोदावरी नदीच्या परिसरातील इंग्रज अधिकारी थॉमस हिस्टानोस याच्या हाताखालील ३०० सैनिकांची तुकडी कर्नल मॅकडॉवेलला येउन मिळाली.
  ४ एप्रिल १८१८ रोजी कर्नल मॅकडॉवेल ससैन्य अंकाई-टंकाई किल्ल्याजवळ जाउन पोहचला. त्याने किल्ल्यावर आपला प्रतिनिधी पाठवून किल्लेदाराला शरण येण्यास सांगितले. परंतु किल्लेदार शरण आला नाही,त्यामुळे ५ एप्रिल १८१८ रोजी इंग्रज लष़्कराने अंकाई-टंकाई किल्ल्यावर दोन सहापौंडी तोफांनी मारा केला .त्यामुळे भयभीत झालेला किल्लेदार मॅकडॉवेलला शरण गेला. त्याने फार प्रतिकार न करताच अंकाई-टंकाई गडांचा ताबा ब्रिटीशांना देउन टाकला. यावेळी गडावर ३०० सैनिक, ४० तोफा तसेच ४० तोफगोळे होते.हे सर्व युध्दसाहित्य तसेच १२ हजार रुपयाचा खजिना इंग्रजांना मिळाले. अश्या प्रकारे ५ एप्रिल १८१८ ला अंकाई-टकाई गड इंग्रजांच्या ताब्यात आले. गडावर इतके युध्दसाहित्य असतानाही अंकाईच्या किल्लेदराने न लढताच शरणागती पत्करली हे आश्चर्यकारक आहे.कदाचित या भागातील प्रमुख देशमुख रंगो पंडीत याने किल्लेदाराला शरण येण्यासाठी राजी केले असावे.तसेच या अगोदरच मराठा सत्ता इंग्रज सत्तेपुढे शरण आलेली असल्यामुळे लढायचे कोणासाठी ? असा संभ्रम किल्लेदार व शिबंदी यांच्यासमोर असावा. 
    अर्थात हे सर्व वर्णन नाशिक जिल्हा गॅझेटीयरमध्ये ब्रिटीशांनी दिले आहे.मात्र अंकाईवर असलेल्या तोफा, तोफगोळे, शिबंदी विचारात घेता अंकाईच्या किल्लेदाराने प्रतिकार केला असता तर कदाचित त्रिंबक, अंजनेरी,हरिहर या गडांनी देखील प्रतिकार केला असता व इंग्रजांना हा भुप्रदेश ताब्यात घेण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असती.
   अंकाई किल्ला ताब्यात आल्यावर त्याची व्यवस्र्था लावण्यासंदर्भात ब्रिटीश लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज याने वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना कळाविले. कॅप्टन जॉन ब्रिग्ज याने पुणे येथील अधिकार्यांना कळविले कि मराठा सैन्याने अंकाई किल्ला सोडताना गडावरील जलाशयामध्ये विषारी पावडर टाकलेली असून त्यामुळे या जलाशयाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या जलाशयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. दरम्यान धान्याची कोठारे व पाण्याचे स्त्रोत इत्यादीच्या दुरुस्तीबाबत कर्नल मॅकडॉबेल याने पुणे येथील अधिकार्यांना पत्र पाठवून मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. दरम्यान इंग्रज अधिकार्यांनी सातमाळ डोंगररांगेसह नाशिक जिल्ह्यातील व खानदेश भागातील सर्वच किल्ल्यांचे प्रवेशमार्ग, तटबंदी, बुरुज इत्यादी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अंकाई किल्ल्याशेजारील कात्रा किल्ल्याचा समावेश होता.मात्र इंग्रजाकडे अंकाई किल्ला नष्ट करण्याइतके पुरेसे मनुष्यबळ नव्हते. अंकाई किल्ल्याचा प्रदीर्घ प्रवेशमार्ग, प्रचंड तटबंदी, भव्य राजवाडा इत्यादी स्थापत्य नष्ट करणे सोपे नव्हते,मात्र त्यामुळेच अंकाई-टंकाईवरच्या बर्याच वास्तु आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात. 
 
 अंकाई-टंकाई परिसराचा नकाशा
 
इतिहासाचा मोठा कालखंड पाहिलेल्या या दुर्गजोडीवर जायचे तर मनमाड हे सोयीचे ठिकाण. मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरुन १ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अंकाई गाव मध्य रेल्वेवरील मनमाड स्थानकापासुन १० कि.मी.वर असुन मनमाड–औरंगाबाद रस्त्यापासुन १ कि.मी.आत आहे. अंकाई गावात जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोयीचे आहे.गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून एक वाट असुन दुसरी वाट अंकाई गावातुन आहे. या दोन्ही वाटा दोन दिशांनी व दोन वेगळ्या दरवाजांनी अंकाई-टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात. यातील अंकाई गावातुन गडावर जाणारी वाट मोठया प्रमाणात वापरात असल्याने सोयीची आहे.
 
 
 
 
 


   अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही.
 
अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. 



    यातील अंकाई गावातुन गडावर जाणारी वाट मोठया प्रमाणात वापरात असल्याने सोयीची आहे.  गावात शिरताना गावामागे असलेले अंकाई टंकाई किल्ल्याचे डोंगर व त्यामधील खिंडीत असलेले तटबंदीचे बांधकाम व त्यावरील चर्या ठळकपणे नजरेस पडतात.
अंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. 


अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फूट उंच चौकोनी वीरगळीवर खालच्या पट्टीवर चारही बाजूंना शिल्प कोरलेली आहेत. त्यात रानडुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. 


गडाच्या दिशेने जाताना आपल्याला एक ओस पडलेला दर्गा दिसतो.या दर्ग्याचे बांधकाम मध्ययुगीन असावे. मात्र हा मुळचा दर्गा नसून कदाचित मंदीर असावे, त्याचे रुपांतर दर्ग्यात केले असावे, असे येथील खांब आणी त्यावरची कलाकुसर बघताना जाणवते.
रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे.

 
 अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते. तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते. या दोन्ही वाटा अंकाई टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.
 
रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे. पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्थळ असले तरी प्रवेश फी वगैरे काही नाही. स्वच्छताही उत्तम आहे. पायर्‍यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. 
  अंकाई गावातून अंकाई-टंकाई या जोडदुर्गावर चढाई करतानाच टंकाईवरची हि लेणी दृष्टीस पडतात. जैन साधु पावसाळ्यात चार महिने एका ठिकाणी रहात असत्,त्यांच्या निवासासाठी जैन लेणी खोदण्यात आल्या. सर्वसाधारणपणे जैन लेणी डोंगरावर उंच व दुर्गम ठिकाणी कोरण्यात येतात.मात्र टंकाईवरील लेणी पायथ्याला आहेत. 
    भारतातील लेण्यांवर विपुल लेखन करणार्या बर्जेसने याठिकाणी सात लेणी असल्याचे लिहीले आहे.मात्र सन १९२९-३० साली भारतीय पुरातत्व खात्याने याठिकाणी साफसफाई आणि आणखी संशोधन केले तेव्हा वरच्या रांगेत आठ व त्याखाली दोन अशी एकुण दहा लेणी असल्याचे आढळले. या लेण्यांमध्ये आढळणारे शिलालेख, एकाशम व घडीव पाषाणांच्या मुर्ती,त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास झालेला नाही,परंतु जाणाकारांनी केलेला मुर्तीचा अभ्यास आणि शिलालेखातील अक्षरांची धाटणी यावरुन हि लेणी राष्ट्रकुट ते यादवकाळात म्हणजे इ.स. १० वे शतक ते १३ वे शतक याकाळात निर्माण झाली असावी असे मानले जाते. दख्खनच्या कास्त्यमुर्तीचे जाणकार डग्लस बॅरेट व सदाशिव गोरक्षकर यांच्या मते या मुर्ती उत्तर चालुक्य ते राष्ट्रकुटकालीन असाव्यात. या मुर्ती घडवण्यासाठी दिंगबर जैनांनी रसद पुरवली असली तरी त्यांच्या अलंकरणावर तसेच स्तंभाची रचना, द्वारशाखा, मानवी शरीराची ठेवण यावर पश्चिम भारताचा प्रभाव जाणवतो आहे. 




सुरवातीला लागणारी लेणी

  गुंफासमुहापैकी पहिल्या चार गुंफा रेखीव व तलविन्यास घडण उत्तम आहे. पहिल्या दोन गुंफा दोन मजली तर बाकीच्या एक मजली आहेत. येथील कातळ चांगल्या पोताचा नसल्यामुळे लेण्याची फार झीज झाली आहे.आज लेण्यातील बर्याच मुर्तींची झीज आणि मोडतोड झाली आहे.मोघल बादशहा शहाजहानचा सरदार खानी-खानान याने १६३५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाकडून अंकाई-टंकाई किल्ले घेतले तेव्हा त्याने या जैन लेण्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली.


लेणी दोन स्तरांवर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्‍या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १० ते १५ पायर्‍या चढुन गेल्यावर ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. 
लेणे क्रमांक १:-
  हे लेणे दोन मजली दक्षिणाभिमुख आहे. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे गुबगुबीत चेहर्याचे चर्तुभुज यक्ष कोरलेले आहेत. छतावर तीन पदरी पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. वरच्या मजल्यावर मूर्ती वगैरे काही नाहीत.

या लेण्याच्या दरवाज्याच्या चौकटीचे वैशिष्ट्य म्हणजे चौकट नउ शाखांची बनलेली असून त्यावर १) मरकर मणीक्य व पद्मकलिका २) पद्मलता ३) मालाघर ४) सुरसुंदरी ५) देवताप्रतिमा ६) व्याल ७) पद्मपत्रे आणि कलिका यांचे चित्रण केले आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजुला एका कक्षाची सोय असून ती भिक्षुक किंवा पुजार्यांसाठी असावी. 

Ankai Leni.. At Base of Ankai Fort
लेणे क्रमांक २:-
   हे लेणेही क्रमांक १ च्या लेण्यासारखे दुमजली असून त्याची रचना क्रमांक १ सारखीच आहे. दुसर्‍या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला हत्तीवर स्वार ईंद्राची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. काही अभ्यासकांच्या मते हि शिल्प वेरुळ येथील जैन गुंफाप्रमाणे कर्पर्दी यक्ष आणि सिंहारुढ अंबिका यांच्या प्रतिमा आहेत. 


   इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. हीच अंकाई देवीची अतिशय सुंदर मूर्ती. देवी साडी वगैरे शृंगारांनी सजवलेली आहे.  
     या मुर्तीच्या मांडीवर श्री गणेशाची मुर्ती आहे.त्यावरुन या डोंगराला व गावाला अंकाई ( अंक म्हणजे मांडी ) नाव मिळाले असे मानले जाते. अर्थात या तर्कात काहीही तथ्य वाटत नाही.कारण हि लेणी दहाव्या शतकात कोरलेली आहेत.मग या आधी या डोंगराचे नाव काय होते ? याचा उल्लेख मिळत नाही.





          लेण्याचा सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. हि उत्तर चालुक्यकालीन शैली मानली जाते. पश्चिम भारतात अश्या प्रकारचे शिल्प कोणत्याच लेण्यात आढळत नाही, ते येथे दिसते. सिंह हे जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचे प्रतिक चिन्ह आहे. तेव्हा हे लेणे भगवान महावीर यांच्यासाठी कोरले असावे किंवा यात भगवान नहावीरांची प्रतिमा असावी असे वाटते. 
लेणी क्रमांक ३:-
 या लेण्याचा तलविन्यासही आधीच्या दोन गुंफाप्रमाणे दर्शनी भागात ओवरी, मग सभामंडप आणि शेवटी गाभारा असा आहे. या लेण्याच्या आतील दालनात जाताना असलेल्या अर्धस्तंभाच्या शीर्षावर चर्तुभुज यक्ष आहेत. त्यांच्या बैठकीच्या चौकटीत मगर वा माणुस यांचा मिलाफ आहे.

 दुसर्या लेण्याप्रमाणेच तिसर्‍या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. अंबिकेचे काही सेवक दाखवले आहेत. त्यातील एक सेवक एका अज्ञात पशुवर आरुढ झालेला दाखवला आहेत तसेच त्याच्या हातात गदा आहे. दुसरे शिल्प एखाद्या साधुचे असावे.कारण त्याच्या डोक्यावर छत्र व आंब्याच्या पानांची तोरमाळ दाखवली आहे. 

सभामंडपाच्या मागील भिंतीवर शांतिनाथ व पार्श्वनाथ यांच्या मुर्ती आहेत. मुर्तीच्या दोन बाजुंना एकेक भक्त असून मधल्या चक्राच्या बाजुला सिंह व हत्ती आणी त्याच्याखाली शांतिनाथांचे वाहन मृग आहे. तीर्थंकराच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह असून दोन्ही हात सरळ रेषेत शरीराल चिकटून दाखविण्यात आलेले आहेत. तसेच हाताची बोटे जमीनीकडे असून बाजुला धोतरवजा वस्त्र ल्यालेला भक्तगण उभा आहे. मुर्तीच्या वर सोंड उभे करुन उभे असलेले हत्ती असून सोंडेच्या मध्यभागात श्रींची प्रतिमा आहे. जवळ चार  भक्तगण दान देताना दिसतात.
 शांतिनाथांच्या दोन्ही बाजुंना पार्श्वनाथांच्या मुर्ती आहेत. पार्श्वनाथांच्या मस्तकावर पंचफणाधारी नाग आहे. डावीकडे अर्ध्य अर्पण करणारी स्त्रीमुर्ती आहे. तर उजवीकडे टोकदार टोपी घातलेला माणुस दिसून येतो. येथील एका छोट्या शिल्पात पार्श्वनाथांच्या हातात हात घालून एक माणूस किंवा भक्त उभा आहे. 

   गाभार्याची चौकट साधी असून शिल्पाच्या मागच्या उजव्या हाताला एक भुयार वाटावे अशी लहान खोली कोरण्यात आली आहे. त्यात एक जीन मुर्ती फेकण्यात आली आहे.यावरुन हे भुयार परकीय काळात कोरण्यात आले असावे असे बर्जेसचे मत आहे.
लेणे क्रमांक ४:-
  इतर लेण्याप्रमाणेच या लेण्याचा तलविन्यास ओवरी, सभामंडप आणि गाभारा असा आहे. मंडपाचा दरवाजा क्रमांक एकच्या गुंफेप्रमाणेच कोरीवकाम केलेला आहे. सभागृहाच्या मागील भिंतीला लागून कट्टा आहे.  या लेण्याच्या पटांगणात तीस फुट उंचीचे दोन खांब आहेत. ओसरीच्या डाव्या खांबावर देवनागरी शिलालेख असून अक्षरांच्या धाटणीवरुन तो ११-१२ व्या शतकातील असावा.मात्र या शिलालेखाचे वाचन झालेले नाही. मात्र येथे मंदीरे व दरवाज्यावर कोरीवकामात आसनस्थ तीर्थंकर दिसतात.

पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.पार्श्वनाथाची ध्यानस्थ मूर्ती आहे.. आणि आजूबाजूला त्यांच्या शिष्यांच्या मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या चौकटी.. चौकटीतून शिष्य गायब झाले होते.. जणू अंतर्धान पावले होते.. बऱ्याच मूर्ती या भग्न चेहऱ्यांच्या असल्याने.. त्यांना नाव नाही. पण जे काही होतं ते सुंदर नक्कीच आहे. तिसऱ्या गुहेत पाहिलं तर इथे गुंफेच्या बाहेर पायथ्याला एका रांगेत गजराजांची शिल्पे आहेत.
सहा क्रमांकाच्या लेण्यात पाच मुर्तींचा समुह आहे.लेण्याच्या मध्यभागी एक हात उंचीची जैन मुर्ती आहे. त्यावरील लेख 'सिल प्रगत प्रठामति नित्य' असा आहे.

 


क्रमांक सहाच्या बाहेरच्या बाजुला असलेली गजशिल्पपट्टी लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे या हत्तीच्या सोंडा इस्लामिक आक्रमणात सुरक्षित राहिल्या आहेत. नाहीतर सिन्नरच्या गोंदेश्वरापासून कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापुर मंदीरातील गजथरातील हत्तीच्या शिल्पाच्या सोंडा इस्लामिक आक्रमकांनी तोडलेल्या दिसतात. हत्तीचे टवकारल्यासारखे पुढे आलेले कान,सोंडेला भिडवलेली सोंड, हि इतर वैशिष्ट्ये आहेत. 

लेणे क्रमांक ७,८ रिकामी आहेत. तर लेणी क्रमांक ९ व १० अपुर्ण अवस्थेतील लेणी आहेत. 







Goddess at Ankai Fort

एक संस्कृती  

लेण्या मधला एक दरवाजा 

सर्व लेण्यांना जाळीचे दरवाजे लाऊन कुलूप लावून बंदिस्त केलेले आहे. नीट निगा राखलेली ही लेणी म्हणजे जैन-हिंदू संस्कृतीचा सुंदर मिलाफ आहे. हि लेणी अंकाईची लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत, वास्तविक ती टंकाई किल्ल्यात कोरलेली आहेत.
लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. 
अंकाईच्या वाटेवर ...

ओबडढोबड पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. 
 
अंकाई गडाचा नकाशा
 
ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit: re-thinkingthefuture
 

 
 
 प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत. 
 
 
अंकाई गडाचे मुख्य प्रवेशद्वार



ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
अंकाई गडाचा पहिला दरवाजा

दोन मोठया बुरुजाच्या आत लपवलेल्या या दरवाजासमोर जिभी (आडवी भिंत) बांधुन रणमंडळाची रचना केलेली आहे. किल्ल्यात आपला प्रवेश पुर्वेकडून होत असला तरी आत आल्यावर उजवीकडे वळुन दक्षिणाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाची तुटलेली दारे या देवडीत ठेवली आहेत.



अंकाई किल्ल्याचा प्रवेशद्वार किवा महादरवाजा 


 

 

\


 
  पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून येणारा दुसरा दरवाजा म्हण्जे वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.

  या दरवाजाने पश्चिमेकडुन प्रवेश होत असला तरी उजवीकडे वळुन उत्तराभिमुख दरवाजानेच आपण किल्ल्यात शिरतो. या दरवाजांची रचना देखील पहिल्या दरवाजासारखीच असुन तिहेरी वळणाच्या या दरवाजाबाहेरील एक बुरुज गोलाकार तर दुसरा बुरुज चौकोनी आहे. दरवाजाच्या आतील एका बाजुस देवडी असुन दुसऱ्या बाजुने किल्ल्यात शिरण्याचा मार्ग आहे. दरवाजासमोर असलेली जिभी मात्र मोठया प्रमाणात ढासळली आहे. या दिशेची तटबंदी देखील दोन्ही किल्ल्यांच्या डोंगरांना भिडली आहे. 
   अंकाईची उंची टंकाईच्या पेक्षा कितीतरी जास्त असून किल्ल्याला सात पदरी तटबंदीचे कवच घातले आहे. एखाद्या गडावर जाण्याचा मार्ग किती दुर्गम करता येतो, याचा अभ्यास करायचा असेल तर अंकाईला यासाठी नक्कीच भेट दिली पाहिजे. अर्थात यामुळे अंकाई अजिंक्य झाला आहे.याला सरळ युध्दात जिंकणे केवळ अशक्य, सहाजिकच भेद म्हणजेच फितुरीचा मार्ग शिल्लक रहातो.  
  नाशिक जिल्हा गॅझेटीयरमध्ये अंकाईचा उल्लेख आला आहे, तो असा, 'इथला प्रवेश मार्ग इतका अवघड आहे कि नुसती वीस,पंचवीस माणसे निशस्त्र असून निव्वळ दगड,धोंडे घेउन वरती बसली तर खालून येणार्या मोठ्या सशस्त्र सैन्याला तसुभरही वर सरकणे मुश्किल करुन सोडतील. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील गाळणा सोडला तर इतकी भक्कम तटबंदी क्वचितच दुसर्या किल्ल्याला आढळेल.'
टान्काई  किल्ल्याची भिंत .. अंकाई वरून काढलेला 
या किल्याच्या तटबंदीच्या बांधकामात वेगळेपण म्हणजे गडावरील तोफांचे झरोके व तोफा या नेहमी फांजीवरील भागात असतात पण या तटबंदीत तोफांच्या जागा या फांजीखाली व बुरुजाखालील तटात असुन त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. या भटकंतीत अंकाई किल्ला आपले उद्दीष्ट असल्याने त्या किल्ल्याच्या अनुषंगानेच पुढील वर्णन केलेले आहे. अंकाई गावाकडील दरवाजातून आत आल्यावर उजवीकडील डोंगराचा भाग हा टंकाई किल्ल्याचा तर डावीकडील डोंगराचा भाग हा अंकाई किल्ल्याचा आहे.



अंकाई किल्ल्याच्या गडफेरीस सुरवात केल्यावर थेट वरील दरवाजाकडे न जाता सर्वप्रथम खिंडीतील डाव्या बाजुला म्हणजेच अंकाई गावाच्या दिशेने असलेल्या दरवाजाकडे यावे. या दरवाजाकडून अंकाई किल्ल्याच्या डोंगराकडे पहिले असता समोर डोंगराच्या पोटात एकावर एक खोदलेल्या दोन मोठया गुहा दिसतात तर डावीकडे कातळकड्याला लागुन असलेल्या तटबंदी जवळ एक लहान गुहा दिसते. 
 
 

दरवाजाजवळुन कातळात असलेल्या लहानशा पायवाटेने या गुहापर्यंत जाता येते. तळातील गुहा लहान आकाराची असुन दोन खांबावर तोललेली आहे तर वरील बाजुस असलेली गुहा आकाराने मोठी असुन त्यात ५०-६० माणसे सहजपणे राहू शकतात. या गुहेत तीन दालने असुन हि गुहा म्हणजे एखादे अपुर्ण लेणे असावे. कडयाच्या तटबंदीजवळ असलेली तिसरी लहान गुहा म्हणजे पाण्याचे खांबटाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


या गुहा पाहुन झाल्यावर तटावरील चर्या,मारगीरीच्या जंग्या, पहारेकऱ्याच्या देवड्या पहात कातळावर डावीकडे असलेल्या अंकाई किल्ल्याच्या दरवाजाकडे निघावे. या वाटेच्या सुरवातीस एका चौथऱ्यावर तीन बाजुच्या भिंती शिल्लक असलेली एक वास्तुं दिसते. हि वास्तु म्हणजे किल्ल्याच्या दैनंदिन कारभाराची सदर असावी.किल्ल्यावर जाण्याचा परवाना इथे दिला जात असावा. इतर कामांसाठी आलेल्यांना किल्ल्यावर न जाउ देता इथुनच परत पाठवले जात असावे.

येथुन कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण अष्टकोनी आकाराच्या दोन बुरुजात बांधलेल्या किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन पुढे दुसरा दरवाजा आहे.

गडाचा दुसरा दरवाजा देखील संकुलातच बांधलेला आहे. यात एकूण दोन कमानयुक्त दरवाजे व मध्यभागी फक्त एक कमान अशी रचना आहे. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून या दरवाजाचे संकुल म्हणजे एक छोटा बोगदा आहे. तीव्र उतारावर हा दरवाजा बांधलेला आहे. 


लेण्यामधील हरवलेली एक मस्त संस्कृती 




 दुसऱ्या दरवाजाच्या पुढील भागात समोरच कातळात कोरलेले गर्भगृह असलेले एक ब्राम्हणी लेणे आहे. लेण्याच्या आत गर्भगृह कोरलेल आहे.  लेण्याच्या गर्भगृहात झीज झालेली सदाशिवाची मुर्ती असुन बाहेरील भिंतीवर जय विजय कोरलेले आहेत.हे त्रिमूर्ती शिल्प आहे .एकदम एलिफंटा लेण्यांची आठवण होते, त्याच्याशी साधर्म्य असणारे हे शिल्प फारच अफलातून आहे. या शिवाय भिंतीवर अजुन काही शिल्प दिसुन येतात. लेण्यासमोरच एक लहान टाक असुन समोरील तटबंदीत झरोका असलेली पहाऱ्याची मोठी देवडी आहे.या लेण्याच्यावर चढुन गेल्यावर एक मोठ पाण्याच खांब टाक आहे. त्याच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत, पण त्यात झाड झाडोरा वाढल्यामुळे ती पटकन दिसत नाहीत.  येथुन काही पायऱ्या चढुन आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजा शेजारी टेहळणीसाठी लहान बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावरून अंकाईच्या खालील बाजुस कडयाला बिलगलेली तटबंदी व उतारावर कातळात खोदलेले टाके पहायला मिळते.




दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर कातळात खोदलेल्या (८० अंशाच्या कोनात) पायर्‍यांनी आपल्याला उभा चढ चढावा लागतो. काही पायर्‍या चढुन गेल्यावर तिसरे प्रवेशव्दार येते. त्यापुढे चौथे प्रवेशव्दार येते.यांपैकी बाहेरील दरवाजा आयताकृती आकाराचा आहे. आतील दोन्ही बाजूंस बसण्यासाठी ओटे आहेत.
 
या दरवाजातुन गडावर जाणारा मार्ग उभ्या कातळात कोरलेला असुन एका बाजुस कडा तर दुसऱ्या बाजुस तटबंदीने बंदीस्त आहे. पुढे एक कमानयुक्त दरवाजातून बाहेर पडून किल्ल्याच्या दिशेने जावे लागते. दोन दरवाजांचे हे संकुलसुद्धा एक छोटा बोगदा आहे. येथून पुढे कातळातून खोदलेल्या मार्गाने गेल्यावर गडाचा शेवटचा भक्कम बांधणीचा कमानयुक्त दरवाजा लागतो.






 ही तीनही प्रवेशव्दारे एका पुढे एक सरळ रेषेत आहेत. या तीन प्रवेशव्दारांमधे दरीच्या बाजुला उंच तटबंदी आणि दुसर्‍या बाजुला उंच कातळकडा आहे. हा कातळ कोरुनच पायर्‍या बनवलेल्या आहेत.असलेल्या या मार्गावर एका रेषेत तीन दरवाजे आहे. यातील मधल्या दरवाजाची लाकडी चौकट आजही शिल्लक आहे.

 चौथ्या प्रवेशव्दारा पर्यंत येइ पर्यंत आपली दमछाक झालेली असते. या प्रवेशव्दारा नंतर जीना काटकोनात वळतो.याठिकाणी थोडा उघडा भाग आहे. तिथुन समोरचा टंकाई किल्ला पूर्ण दिसतो. त्याच्या अर्ध्या उंचीवर असणार्‍या गुहा आणि टाक इथुन स्पष्ट दिसतात. टंकाई चढताना या टाक्यांचा अंदाज येत नाही.
 शेवटचा दरवाजा पार करून आपण मोकळ्या भागात येतो. येथुन वर पाहिले असता गडाचा उभ्या कड्यावर बांधलेला सहावा दरवाजा व त्याखालील पायऱ्या दिसतात. 

हा दरवाजा पार केल्यावर वाटेत एका लहान घुमटीत ठेवलेली मुंजादेवीची मुर्ती दिसते.




या वाटेने गडाच्या शेवटच्या सातव्या दरवाजातुन आपण गडावर प्रवेश करतो. या दरवाजाच्या दगडांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. दरवाजातून आत शिल्यावर समोरच घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन या चौथऱ्याच्या पायऱ्या चढुन आपण गडावर प्रवेश करतो. 

येथे डावीकडे हमामखान्याची इमारत असुन या इमारतीमागे काही अंतरावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. 
मुख्य वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेवर अजुन एक निवडुंगात लपलेले पाण्याचे टाके आहे. यापैकी ३ भरलेली तर एक कोरडे आहे.टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर आपण एका लेण्यापाशी पोहोचतो. हि लेणी दोन भागात विभागली असुन एका भागात गडावरील गुरे बांधली जातात पण दुसरी गुहा मात्र सुंदर व रहाण्यायोग्य आहे. 
 

 
 
दुसऱ्या गुहेच्या मध्यभागी काही प्रमाणात कोरीव काम केलेले गर्भगृह असुन या गुहेच्या भिंतीत चार विहार कोरले आहेत.
 गुरे बांधलेल्या गुहेत पाण्याचे एक टाके असुन दुसऱ्या गुहेच्या बाहेरील बाजुस अजुन एक टाके आहे पण या दोन्ही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेच्या डावीकडे गेले असता थोडे उंचावर कातळात कोरलेले अजुन एक टाके आहे. हे टाके पाहुन तसेच पुढे गेल्यावर आपण सीता गुंफा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लेण्यापाशी पोहोचतो. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन कोरीव खांब असुन दरवाजाने बंद केलेल्या या गुहेत राहण्याची चांगली सोय आहे. राहण्याच्या दोन्ही गुहेत विजेची सोय केली आहे. सीता गुंफा पाहुन मागे फिरावे व आपल्या पुढील भटकंतीस सुरवात करावी. सुरवातीस पाहिलेल्या दोन गुहांच्या पुढील भागात एका मोठया वाड्याचे अवशेष दिसुन येतात. येथुन पुढे आल्यावर डावीकडील कातळात साधारण ६-७ फुट उंचावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. गडावर पिण्यासाठी याच टाक्याचे पाणी वापरले जाते. 
 
 


टाक्याच्या पुढील भागात एक मोठी गुहा असुन या गुहेला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. गुहेत असलेल्या तीन दालनात अगस्ती ऋषी व इतर देवदेवतांच्या संगमरवरी मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गुहेत काही साधू राहायला असतात. राहणाऱ्या बाबांचे पोथी-पुस्तके असे गीता वगैरे साहित्य इथेच आहे. तर लहान मंदिरांच्या मागेही त्यांचे गॅस सिलेंडर, चादरी वगैरे सगळे समान खोल्या-खोल्यात आहे.
 मंदिराच्या आवारात नव्याने स्थापन केलेला मारुती आहे. गुहा परिसरात पेढे, हार आणि पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात.

गुहेबाहेर समोरच झाडाला पार बांधून काढलेला आहे आणि बसायला बाकडेही आहेत. पारावर हनुमान आणि शंकराचे मंदिर आहे. 
इथे माकडे बिनधास्त फिरताना दिसतात. गाऱ्हाणं सांगायला आलेले गावकरी बसलेले दिसतात. 
 गुहेच्या पुढील बाजुस कातळात कोरलेला २X३ फुट आकाराचा लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या आत २०X२०X १५ फुट आकाराचे खांब टाके आहे. हा दरवाजा सहजपणे नजरेस पडत नाही.  येथुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. गडाचा परिसर साधारण २०-२२ एकरवर पसरलेला आहे. 
काशीकुंड आणि अगस्ती ऋषींची समाधी

 
 
इथे एक कातळात कोरलेले एक मोठे टाके असुन या टाक्याच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर असलेली समाधी अगस्ती ऋषींची असल्याचे मानले जाते. स्थानिक लोक या कातळ कोरीव टाक्यास काशी तळे म्हणतात.स्थानिक लोक या तलावात आंघोळ करुन अगस्तींच्या आश्रमात जातात. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे अस मानतात.


या टाक्याच्या काठावर अजुन तीन समाधी आहेत. या टाक्याकडून गडाच्या पश्चिम टोकावर असलेली भलीमोठी वास्तु व तिचा दरवाजा नजरेस पडतो. या वास्तूकडे जाताना उजव्या बाजुस कातळात कोरलेला व काही प्रमाणात बांधीव असलेला मोठा तलाव पहायला मिळतो. तलावाच्या काठावर कातळात दोन टाकी व एक शिवलिंग कोरलेले आहे. तलावाकडून पुढे जाताना वाटेत काही चौथरे असुन टोकावरील इमारतीच्या दरवाजा अलीकडे कातळात कोरलेले लांबलचक टाके आहे. गडाच्या पश्चिम टोकावर असलेली प्रचंड मोठी इमारत म्हणजे गडावरील चौसोपी राजवाडा अथवा दरबार असावा.तसे पाहिलं तर  हा भव्य प्रासाद अजूनही एखाद्या साधकासारखा निर्विकार बसला आहे. गतकाळच्या वैभवाची जागा आता अवकळेने घेतली तरी रुबाब कायम आहे.

राजवाडा




अंकाई  किल्ल्यावर ... राजवाडा आणि त्याच्या भिंती 




पुर्वाभिमुख दरवाजा असलेल्या या वास्तुचा आकार २०० X २०० फुट असुन वास्तुच्या आतील भिंतीत चारही बाजुस नक्षीदार कमानी आहेत. वाडयाची खालील भिंत घडीव दगडात बांधलेली असुन वरील बाजुस विटांचे बांधकाम आहे. वाडयाच्या मध्यभागी असलेल्या चौकात जमा होणारे पाणी बाहेर नेण्यासाठी दगडी नालीची योजना आहे. वाडयाची दरवाजाची पुर्व बाजु वगळता दक्षिण भिंतीला एक व पश्चिम भिंतीला दोन असे तीन चौकोनी बुरुजासारखे सज्जे असुन त्यावर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. 
यातील पश्चिमेच्या एका सज्जावर पिराची स्थापना झाली आहे.अंकाई किल्ल्यावर पीर बाबाच्या दर्ग्याजवळ अनेक वर्षा पासूनचे एक पुरातन वटवृक्ष असून या ठिकाणी येणारे भाविक श्रध्देपोटी आपली मनोकामना पुर्ण व्हावी म्हणून येथिल वटवृक्षाच्या खोडावर पैसे ठोकतात. ज्यामुळे या वटवृक्षाचे खोड जिर्ण झाले असले तरी त्याला पालवी फुटलेली आहे. मात्र, अंधश्रध्देपोटी या वटवृक्षाचे मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षां पासून येणारे ट्रॅकर्स पर्यावरण प्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे अंधश्रध्देपोटी एका पुरातन वृक्षाचा ऱ्हास होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 वाडयाबाहेर जाण्यासाठी पुर्वेचा मुख्य दरवाजा वगळता दक्षिणेला दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा पालखी दरवाजा तर दुसरा नोकरचाकरांसाठी असावा. आता गडावरील भटकंतीमधील राहिलेले एकमेव ठिकाण म्हणजे गडावरची टेकडी. वाडा पाहुन अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. 
टेकडी चढताना उजव्या बाजुस उतारावर गडावरील प्रचंड मोठा घडीव दगडात बांधलेला तलाव नजरेस पडतो.
 टेकडीवर ध्वजस्तंभ वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची ३०१० फुट आहे. 





गडावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन संपुर्ण गडपठार तसेच मनमाड शहर. पूर्वेला टंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ला इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. खाली हायवे, डावीकडे अंकाईकिल्ला रेल्वे स्टेशन तर उजवीकडे मनमाड स्टेशन दिसते. बरोबर मागे टंकाई किल्ला, विस्तीर्ण पठार आणि एकाकी महादेवाच्या मंदिरासकट सुंदर दिसतो. सोय असेल तर ३६० अंशातून Panorama फोटो जरूर घ्यावा.टेकडीच्या दुसऱ्या बाजुने खाली उतरल्यास आपण अगस्ती गुहेच्या पुढील भागात येतो. येथुन दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास २ तास पुरेसे होतात

टंकाई :-

  अंकाईची गडफेरी उरकून आता आपण जाउया टंकाईकडे. 
 
अंकाई गावाकडील दरवाजातून आत आल्यावर डावीकडील डोंगराचा भाग हा अंकाई किल्ल्याचा तर उजवीकडील भाग हा टंकाई किल्ल्याचा आहे. टंकाईवर जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. 
 ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trekImageCredit: ravivaidya
 
जिथे कातळ खोदण शक्य नाही तिथे पायर्‍या बांधुन काढलेल्या आहेत.उजवीकडील बाजूने टंकाई किल्ल्याच्या गडफेरीस सुरवात केल्यावर तटावरील चर्या, मारगीरीच्या जंग्या, पहारेकऱ्याच्या देवड्या पहात आपण वाटेच्या सुरवातीस असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी एकाखाली एक कोरलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो.
 
 
 
 
 या कातळकोरीव पायर्‍यांनी किल्ला चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजुला एक छोट टाक दिसत त्याच्या पुढे एक मोठ टाक आहे. या टाक्यात पाणी आणण्यासाठी वर पासुन या टाक्यापर्यंत कातळात पन्हाळी खोदलेली दिसते. 
 
थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर डाव्या बाजुला पाण्याची तीन मोठी टाकी एकापुढे एक आहेत. त्यातील दोन खांब टाकी आहे. या टाक्यात जाण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग पहाता हे टाके नसुन बहुदा कोठार असावे असे वाटते. या टाक्याच्या माथ्यावर कातळात कोरलेले अजुन एक पाण्याचे टाके असुन तेथे जाण्याचा मार्ग मात्र वरील बाजुने आहे. सर्व टाकी कोरडी असुन त्यात झाड झाडोरा माजलेला असल्यामुळे पटकन दिसत नाहीत. 

 खांबटाके पाहुन परत सुरवातीच्या कातळात कोरलेल्या पायऱ्याकडे यावे.या पायऱ्यांनी पुढे किल्ल्याकडे निघाल्यावर उजव्या बाजुस कातळात अर्धवट कोरलेला कातळ नजरेस पडतो. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुस सहजपणे नजरेस न येणारी कडयाच्या कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी असुन यातील दोन टाकी खांबटाकी आहे. टाकी पहाण्यासाठी वाट सोडुन डावीकडील कातळाच्या धारेवरुन जावे लागते.  कातळ टप्पा चढुन जाउन हे टाक पाहाता येत. कातळ टप्पा चढणे शक्य नसल्यास परत पायर्‍यांपाशी येउन कातळात कोरलेल्या पायर्‍या संपुन जिथे बांधीव पायर्‍या चालु होतात तिथे पर्यंत जाउन डावीकडील कातळ धारेवरुन जाणार्‍या मार्गाने ५ मिनिटात टाक्यापाशी पोहोचता येते.
टाकी पाहुन परत आल्यावर कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या चढुन आपण बांधीव पायऱ्यापाशी पोहोचतो. या पायऱ्या चढण्यापुर्वी डोंगराला चिटकून उजवीकडील बाजुने कड्याला वळसा पुढे आल्यावर आपण सुरवातीस पाहिलेल्या खांबटाक्याच्या वरील बाजुस असलेल्या टाक्याकडे पोहोचतो. गुहा आणि हे टाक आपल्याला टंकाई किल्ला चढतान दिसत नाही. त्यामुळे ते कुठे आहे याचा नक्की अंदाज येत नाही. याठिकाणी जाणारी वाट सुध्दा मळलेली नाही. अंकाई किल्ला चढताना चौथ्या दरवाजाच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेतून ही टाकी आणि गुहा दिसते.

  टाके पाहुन परत आल्यावर आपण बांधीव पायऱ्यांच्या वाटेने आपण खिंडीतील तटबंदी टंकाईला मिळते त्याच्या अलीकडे असलेल्या बुरुजावर पोहोचतो.पुढे परत कातळकोरीव पायर्‍या आहेत. या बुरुजावरून कडा डावीकडे ठेवत ५ मिनिटे चालल्यावर पुन्हा उजवीकडे वळुन टंकाई किल्ल्याच्या दरवाजाखाली उतरलेली उभी सोंड चढत आपण टंकाई किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजासमोरील या सोंडेवर असलेल्या पायऱ्या मोठया प्रमाणात ढासळलेल्या आहेत. दरवाजाची कमान व लाकडी दाराची चौकट आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजातुन दिसणारे तटबंदीचे व अंकाई किल्ल्याचे बांधकाम (दुर्गरचना) काही काळ आपल्याला इथे थांबण्यास भाग पाडते. अंकाई गावातून या दरवाजात येण्यास पाऊण तास लागतो. 
दरवाजातुन आत आल्यावर देवडीला लागुन वाटेवरच असलेल्या एका खोलीत कबर बांधलेली आहे. हि कबर ओलांडुन आपण डावीकडे असलेल्या किल्ल्याच्या प्रशस्त पठारावर पोहोचतो. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुच्या टेकडीवर किल्ल्याच प्रशस्त पठार आहे.टेकडीच्या उजव्या बाजूला उतार आणि त्याच्या पुढे दरी आहे.
किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर ५० एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २९३० फुट उंचीवर आहे.अंकाईच्या मानाने टंकाईची उंची काही प्रमाणात कमी आहे. पठाराच्या सुरवातीस दरवाजाच्या डावीकडील भागात एका मोठया वाड्याचे अवशेष असुन वाडयाच्या डावीकडे उतारावर पाण्यासाठी खडकात खोदलेले जोडटाके आहे. 

या टाक्याच्या डावीकडील बाजुस कडयाच्या काठावर बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या चारही बाजुस ताशीव कातळकडे असल्यामुळे चार बाजुचे कोपरे वगळता इतरत्र कोठेही तटबंदी दिसुन येत नाही. 

टाक्याकडून पठार तुडवत सरळ निघाल्यावर वाटेत कोरीवकाम केलेले प्राचीन शिवमंदिर व त्यापुढे समाधीचा एक चौथरा पहायला मिळतो. या हेमाडपंथी मंदिराचे छत कोसळलेले आहे. पण उर्वरीत अवशेषांवरुन मंदिरावरील कोरीवकामाची आणि त्याच्या सौंदर्‍याची कल्पना येते.
एकाकी महादेवाचे मंदिर


 
मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंड व सभामंडपातील नंदी आजही शिल्लक आहे. मंदिरापुढे कातळात कोरून काठावर बांधकाम केलेले दोन मोठे तलाव आहेत. तलावांना उजवीकडे ठेवुन वळसा घालत गेल्यावर डोंगर उतारावर असलेली पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात.
 
 टाक्यांच्या उजवीकडे निमुळती होत गेलेल्या डोंगरसोंडेवर एका वास्तुचे अवशेष असुन सोंडेच्या टोकावर बुरुज व आसपास काही प्रमाणात तटबंदी आहे. हा बुरुज पाहुन दरी डावीकडे व पठार उजवीकडे ठेवुन दरीकाठाने परतीचा प्रवास सुरु करावा. 
Dry Water Tank 
पाच मिनिटे चालल्यावर उजवीकडे पठाराच्या दिशेने एक शिंदीचे झाड दिसते. हे झाड एका बुजलेल्या टाक्यात उगवलेले असुन या टाक्याच्या आसपास कातळात कोरलेली शेवाळलेल्या पाण्याने भरलेली अजून चार टाकी पहायला मिळतात. 
 
 
 
   या टाक्यांच्या वरील बाजुस अजून एक अर्धवट कोरलेले व मातीने बुजलेले टाके आहे.  त्या टाक्याच्या बाजूला आणखी ४ टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
     टंकाईच्या पुर्व टोकाला उतारावर सुस्थितीत असलेली तटबंदी, पाण्याची दोन खोदीव टाकी असून त्या टाक्याच्या समोरच एक इमारत आहे.या इमारतॉच्या भिंतीवर दगडावर एक फारसी शिलालेख कोरला आहे. मात्र हा शिलालेख झीजला असल्यामुळे त्याचे वाचन करता येत नाही. मह्त्वाचे म्हणजे हि इमारत व पाण्याची टाकी अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत.त्यामुळे बहुतेक दुर्गारोहींचे हे अवशेष बघायचे राहून जातात. याशिवाय टंकाईच्या पठारावर आग्नेय टोकाला असलेली चार ते पाच पाण्याची टाकी दिसून येतात. 
     किल्ल्याच्या पठारावरून फिरताना भुईसपाट झालेल्या अनेक वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. हे सर्व पाहुन दरवाजाकडे परत आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास २ तास पुरेसे होतात.
 
 गडमाथ्यावरून मनमाड शहर, दक्षिणेला गोरखगड, पश्चिमेला अंकाई, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ला नजरेस पडतो.
 
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) दुर्गभ्रमंती नाशिक जिल्ह्याची - अमित बोरोले
५) साद चाकोरीबाहेरील किल्ल्याची -पांडूरंग पाटणकर
६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
७)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
८)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
९) https://vishwakosh.marathi.gov.in/26815/
 https://www.prahaar.in/, http://vatadya.blogspot.com/, https://merwynsrucksack.blogspot.com, https://www.navarashtra.com/, https://chawlaaashish.blogspot.com/p/contact.html
   या वेबसाईट






































































 



 






















 
 
 
 





नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात. अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते.

अंकाई टंकाई किल्ले, नाशिक.

अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते. तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते. या दोन्ही वाटा अंकाई टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.

अष्टकोनी बुरूज, अंकाई.

गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्त्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात. थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो. एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहेत. या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे. येथील एका लेण्यात देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते.

प्राचीन हिंदू लेणी, अंकाई

या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एक संकुल आहे. बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत. आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकोन करून उभा आहे. हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. या दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळया आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापि दिसून येतात. या दरवाजातून आत गेल्यावर अंकाई टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत प्रवेश होतो.

अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगराना उत्तम ताशीव कातळ कडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही; परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे. तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चर्या बांधलेल्या दिसतात. अंकाई किल्ल्याचे दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावच्या दिशेला कातळाममध्ये तीन लेण्या आहेत. यांपैकी दोन गुहा पाहता येतात; परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे.


हमामखाना, अंकाई.

खिंडीतून थोडे चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. हा दरवाजा देखील दोन दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस दोन भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरूज आहेत. यांपैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा असून आत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत. पुढे आणखी एक कमानयुक्त दरवाजा आहे. पुढे उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आहेत. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.

जैन लेणी समूह, अंकाई.

गडाचा दुसरा दरवाजा देखील संकुलातच बांधलेला आहे. यात एकूण दोन कमानयुक्त दरवाजे व मध्यभागी फक्त एक कमान अशी रचना आहे. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून या दरवाजाचे संकुल म्हणजे एक छोटा बोगदा आहे. तीव्र उतारावर हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजा पार करून खड्या कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर परत दोन दरवाजांचे मिळून एकत्र असे एक संकुल लागते. यांपैकी बाहेरील दरवाजा आयताकृती आकाराचा आहे. आतील दोन्ही बाजूंस बसण्यासाठी ओटे आहेत. पुढे एक कमानयुक्त दरवाजातून बाहेर पडून किल्ल्याच्या दिशेने जावे लागते. दोन दरवाजांचे हे संकुलसुद्धा एक छोटा बोगदा आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा आणखी एक भग्न दरवाजा दिसतो. येथून पुढे कातळातून खोदलेल्या मार्गाने गेल्यावर गडाचा शेवटचा भक्कम बांधणीचा कमानयुक्त दरवाजा लागतो.

गडावर प्रवेश केल्यावर दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. भौगोलिकदृष्ट्या गडाचे बालेकिल्ला आणि माची असे दोन भाग पडतात. माचीच्या सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर एक छोटी टेकडी आहे, त्याला बालेकिल्ला म्हणता येईल. माचीवर प्रवेश केल्यावर तीन घुमट असलेली एक वास्तू दिसते, ती म्हणजे हमामखाना. याच्या मागील बाजूस पाण्याचे टाके असून पुढे दोन लेण्या आहेत. या लेण्यांना सीता गुंफा असे संबोधले जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेण्या खोदलेल्या आहेत. सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्ती ऋषि यांची गुहा. या गुहेत अगस्ती ऋषिचे मंदिर असुन हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास बारमाही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथून पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते. या पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे. या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे. हि अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात. या तळ्यास काशीतळे असे नाव आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते, अशी आख्यायिका आहे.

तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला पिराचे एक ठिकाण आहे; परंतु मूळ वास्तूशी संबंधित नाही. अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बालेकिल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडी असा परिसर दिसतो.


यादवकालीन मंदिर, टंकाई.

टंकाई किल्ला पाहाण्यासाठी अंकाई किल्ला उतरून दोन्ही किल्ल्यांमधील खिंडीत परत यावे लागते. खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तर दिशेला असलेला दरवाजा पाहता येतो. हा उत्तराभिमुख दरवाजा भक्कम बांधणीचा असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे. टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी दिसून येतात. थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाची चौकट आणि कमान पुरातत्त्व विभागाने दुरुस्त केली असून (२०१९) बाजूच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे. मूळ बांधकामात हा पीर त्या जागेवर नसावा. टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे. या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात. पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे. मंदिराच्या भिंती शाबूत असून छत मात्र नाही. गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरूज असून गडावर काही इमारतींचे अवशेष आढळून येतात.


पाण्याची टाकी, टंकाई.

अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात आहेत. अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. अंकाई हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. शके ९७४ साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो. मोगल बादशाह शाहजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खानेखानान याने हा किल्ला जिंकून घेतला (१६३५). त्या आधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशाहीच्या ताब्यात होता. फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता. मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता. पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला (१७५२). या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतर (१८१८) इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने गडावर तोफांचा मारा केला, तेव्हा गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि अंकाई टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.

संदर्भ :

  • Verma O. P. The Yadavas & their Times, Vidarbh Sanshodhan Mandal, Nagpur, 1970.
  • पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०११.
  • महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, इतिहास प्राचीन काळ, खंड १, भाग २, स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, २००८.   



पुण्याकडून शिर्डी-कोपरगाववरून मनमाडकडे जाताना उजव्या बाजूला
किल्ले अंकाई-टंकाई - I

जिल्हा: नाशिक
प्रकार: गिरिदुर्ग
श्रेणी: सोपी
डोंगररांग: सातमाळ
पुण्याकडून शिर्डी-कोपरगाववरून मनमाडकडे जाताना उजव्या बाजूला हे जोडकिल्ले आहेत. माझी सासुरवाडी कोपरगावपासून अवघ्या ३५ किमी अंतरावर हे किल्ले आणि लेणी आहेत, हे कळल्यानंतरही जाण्याचा योग मात्र येत नव्हता. तसे हे आडवाटेचे किंवा दुर्गम वगैरे किल्ले नाहीत. व्यवस्थित सर्वांना माहिती असणारे, पुरातत्व खात्याने संरक्षित करून लेण्यांपर्यंत पायऱ्या वगैरे बांधलेले हे ठिकाण आहे.
यावेळी मात्र योग (डाव किंवा संधीही म्हणा हवं तर) संधी साधली. दुचाकीवरून सकाळी ७ च्या आधीच निघालो. रस्त्यावर व्यवस्थित फलक लावलेले आहेत. हायवेपासून २ किमीवरच पायथा आहे. गांव केव्हाच जागं झालं होतं. पण किल्ल्यांवर कोणी दिसत नव्हतं. अर्थात स्थानिकांना काय गरज म्हणा सकाळच तिकडे फिरायची. निवांत एकटाच पायथ्याला गाडी लावून निघालो. अवघ्या ५-१० मिनिटांतच लेणी आहेत. पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्थळ असले तरी प्रवेश फी वगैरे काही नाही. स्वच्छताही उत्तम आहे. छोटी २ खोल्यांची लेणी लगेच आहेत, ह्या लेण्यांत कोरीवकाम किंवा मूर्ती नाहीत. लगेचच १० पायऱ्या चढल्या कि लेण्यांची साखळी आहे. ह्यातील पहिल्या लेण्यांच्या समोर पाण्याचं टाकं आहे, पाणी पिण्यायोग्य उत्तम आहे. ही लेणी दुमजली आहे. मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर आहे. खांबांच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. ह्यातील कोरीव पायऱ्याही सुंदर आहेत. जागाही अडचणीची नाही. वरच्या मजल्यावर मूर्ती वगैरे काही नाहीत. खोल्या आणि खांब आहेत. 
दुमजली लेणी
खाली परत येऊन दुसऱ्या लेेणीकडे गेलो, बाहेरच मूर्ती आहेत. डाव्या बाजूला यक्षाची मूर्ती, तर उजव्या बाजूला इंद्राणीची मूर्ती आहे. हीच अंकाई देवीची अतिशय सुंदर मूर्ती. देवी साडी वगैरे शृंगारांनी सजवलेली आहे. पुढच्या लेणीमध्ये डाव्या बाजुला किचकाची आणि उजव्या बाजुला अंबिका देवीची मूर्ती कोरलेली आहे. अजूनही लेणी आहेत आणि त्यात भगवान महावीर, जैन तीर्थंकर वगैरे सुंदर मूर्ती आहेत. सर्व लेण्यांना जाळीचे दरवाजे लाऊन कुलूप लावून बंदिस्त केलेले आहे. नीट निगा राखलेली ही लेणी म्हणजे जैन-हिंदू संस्कृतीचा सुंदर मिलाफ आहे. हि लेणी अंकाईची लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत, वास्तविक ती टंकाई किल्ल्यात कोरलेली आहेत.
अंकाई देवीची अतिशय सुंदर मूर्ती
लेण्यांच्या डावीकडूनच किल्ल्यांकडे जायला पायऱ्या आहेत, मात्र ह्या सरकारी बांधलेल्या पायऱ्या लगेच संपतात आणि जुनी वाट किल्ल्यांच्या खिंडीत घेऊन जाते. वाटेवरूनच खिंडीच्या तटबंदीचे दर्शन मन मोहून टाकते. जोडकील्ल्यांची इतकी सुंदर तटबंदी महाराष्ट्रात आणखी कुठेही नाही. (हि माहिती वाचीव आहे, आपण कुठे सगळे किल्ले फिरलोय!) खिंडीच्या दरवाजातून वर गेल्यावर डाव्या बाजूचा किल्ला अंकाई, तर उजव्या बाजूचा टंकाई आहे. 
जोडकील्ल्यांची सुंदर तटबंदी
मी उजवीकडे टंकाई किल्ल्याकडे मोर्चा वळवला (भगवान चिले यांनी पुस्तकांत म्हटलेय कि आधी टंकाई बघावा म्हणून टंकाई, उगाच चर्चा नाही ;)) इथे किल्ल्यांच्या डागडुजीचे काम करण्यासाठी आणून ठेवलेली यंत्रसामुग्री दिसली. कामगार अजून आले नव्हते. किल्ल्याकडे जाणारी तटबंदी थोड्या अंतरापर्यंत शिल्लक आहे, हळू हळू ती ढासळत गेलेली दिसते. कातळ कोरीव पायऱ्यानंतर बांधीव पायऱ्या आहेत, इथे डाव्या बाजूला खाली २ लंबूळकी टाकी आहेत. एकात पाणी होते, ते पिण्यायोग्य आहे. ढासळत चाललेली तटबंदी इथे पायऱ्यांना येऊन मिळते. इथून पुढे वाट उजवीकडे जाते, पायऱ्यांवर वरून पडलेली दरड आहे त्यामुळे पायऱ्या अरुंद राहिल्या आहेत. नागमोडी वाट परत डावीकडे वळताना उजवीकडे अंकाई किल्ला छान दिसतो. पूर्वेकडून सूर्य आपल्या प्रकाशकिरणांनी त्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होता. एकटाच असलो तरी इथे दगडावर कॅमेरा ठेऊन स्वतःचा फोटो काढायचा मोह मी आवरला नाही. अंकाईच्या मागे उजवीकडे गोरखगड किल्ला (कि कात्रा?) आणि अजून उजवीकडे हडबीची शेंडी दिसते. खाली रेल्वेचा रस्ता डावीकडून अंकाई किल्ला रेल्वेस्टेशन कडून येऊन २ फाटे फुटून मनमाडकडे गेलेले दिसतात. हायवेवरून पवनचक्कीची प्रचंड मोठी पाती घेऊन जाणारी अवजड वाहनेही दिसत होती.
टंकाई
वरच्या महादेवाच्या मंदिरात पूजा करून परतणारा गावकरी भेटला. मी एकटाच, कॅमेरा वगैरे घेऊन वर निघालेला दिसल्याने त्याला प्रचंड आश्चर्य वाटले. एक तर बहुतेक लोक अंकाईवर जाऊन परततात. टंकाई वर (ट्रेकर/किल्ले प्रेमी सोडल्यास) फारसे लोक येत नाहीत त्यामुळे त्याला जास्तच कौतुक वाटत होते, माझे नाही, त्याच्या गावाला लाभलेल्या किल्ल्यांचे! या गडावर काळ्या तोंडाची माकडे खूप आहेत, एकटे बघून खाणं मिळेल म्हणून ती कदाचित अंगावर येतील म्हणून मला त्याने सावध केले. तशी ती माकडं मला खिंडीतच भेटली होती. पण येतानाच वाटेतून मी एक लहानशी काठी बरोबर ठेवली होती, जराशी भीती दाखवण्यासाठी, त्यामुळे कदाचित ती फिरकली नाहीत माझ्याजवळ. तसेही खायलाही फक्त उपमा होता तो सॅकमध्ये ठेवलेला होता. हातातला कॅमेरा त्यांच्यासाठी अतिशय निरुपयोगी वस्तू असल्याचे त्यांना कदाचित माहित असावे.
टंकाई च्या दरवाजातच डावीकडे २ थडगी आहेत. दरवाजावर चढून मागचा अंकाईचा सुंदर view मिळणारा फोटो काढायचा मोह मी आवरला आणि वरच्या दिशेने महादेवाचे दर्शन घ्यायला निघालो. डाव्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तर समोर कातळावर गोल आकारात छोटे छोटे गोल गोल खड्डे खोदलेले आहेत. समोरच विस्तीर्ण पठारावर एकाकी असे महादेवाचे मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि त्यावर नक्षीही कोरलेली आहे. नंदी आणि शंकराची पिंडही आहे. मंदिराच्या समोर एक दगडी कट्टा आहे आणि लागुनच कोरडा पडलेला तलाव आहे. या गडावर अजून काही अवशेष शिल्लक नाहीत. आता मात्र स्वतःला आवरले नाही, परतीच्या मार्गावर दरवाजावर चढून समोरच्या अंकाईकिल्ल्याला गोरखगड आणि हडबीच्या शेंडीबरोबर कॅमेरात कैद केले. स्वतःचे फोटो मात्र हवे तसे काढता आले नाहीत. दरवाजावरील दगड हळूहळू ढासळत चालले आहेत. खिंडीकडे परत निघालो, तिथली यंत्र आता चालू झाली होती. कामगार निवांत तंबाखू मळत फेसबुकवरच्या कुठल्याश्या फोटोविषयी चर्चा करत होते. माकडं मात्र तिथून आता गायब झालेली होती.
अंकाई
अंकाईकडे जाताना वाटेत एका खोलीचे अवशेष शिल्लक आहेत, तिच्या मागूनच कातळ कोरीव पायऱ्यांची वाट पहिल्या दरवाजाकडे घेऊन जाते. त्याच्या मागे लगेच दुसरे प्रवेशद्वार आहे. पाहरेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या प्रशस्त आहेत. डावीकडे तटबंदी आहे तर समोर झाडांनी वेढलेली २ टाकी आहेत. उजवीकडे भग्न लेणी आहेत. ह्या लेण्यांना ब्राह्मणी लेणी म्हणून ओळखतात, गर्भगृह सुस्थितीत आहे, प्रवेशद्वारावर जय-विजय अश्या मूर्ती आहेत आणि अजूनही काही भग्न मूर्ती आहेत. आतमध्ये दरवाजाएवढीच मोठी मूर्ती असून इथे भरपूर वटवाघळे आहेत. नागमोडी वाट पुढच्या दरवाजापाशी जाते. व्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. एकामागून एक ३ दरवाजे ह्या चढवाटेवर आहेत. पायऱ्या सुस्थितीत आहेत. त्यावर चढून गेल्यावर मागे वळून बघितल्यावर टंकाई किल्ला पूर्णपणे खिंडीपासून मुख्य दरवाजापर्यंत छान दिसतो. अजून २ दरवाजे ओलांडल्यावर समोरच मुंजा महाराज म्हणून रंगवलेली मूर्ती आहे. डाव्या बाजूला एक वाडा आहे, पुढे डाव्या बाजूला २ आणि उजव्या बाजूला २ अशी निवडुंगात लपलेली पाण्याची टाकी आहेत. त्यातली ३ भरलेली तर एक कोरडे होते. 
ब्राह्मणी लेणी
अजून काही पायऱ्या चढल्यावर समोरच गुहा आहे, हिला सीता गुहा म्हणतात. त्याच्या बाहेरच पाण्याचे टाके आहे तर आतमध्येहि खांब असलेले पाण्याचे टाके आहे. दरवाजे जाळीच्या दरवाजाने कुलूप लावून बंद केलेले आहेत. हि वाट उजवीकडून पुढे अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे जाते. आधी डावीकडेच उंचावर पाण्याचे टाके आहे आणि खोलीही आहे. ह्या आश्रमात एक बाबा आणि त्यांचे शिष्य राहतात. आतमध्ये अगस्ती ऋषी, राम-सीता, विठ्ठल-रुक्मिणी, शिव-पार्वती अशी संगमरवरी बांधलेली मंदिरे आहेत. राहणाऱ्या बाबांचे पोथी-पुस्तके असे गीता वगैरे साहित्य इथेच आहे. तर लहान मंदिरांच्या मागेही त्यांचे गॅस सिलेंडर, चादरी वगैरे सगळे समान खोल्या-खोल्यात आहे. गुहेबाहेर समोरच झाडाला पार बांधून काढलेला आहे आणि बसायला बाकडेही आहेत. पारावर हनुमान आणि शंकराचे मंदिर आहे. इथे खिंडीतून आलेली माकडे बिनधास्त हिंडत होती. गाऱ्हाणं सांगत गावकरी बसले होते. चढायला सुरुवात केल्यापासून आता पहिल्यांदा पाणी प्यालो. आता मागच्या बाजूला निघालो तर डावीकडेच छोटेसे भुयार दिसले, वर निवडुंग होते आणि माकडेही किचकीच करत निघून गेली. ३*३ च्या छोट्याश्या भुयारात, आतमध्ये मात्र ३ एकशे पान सहज उठेल असे मोठे सभागृह आहे. ४-५ खांबी पाण्याचे टाकेही आहे.  आत न घुसता गडाच्या मागच्या बाजूला निघालो. समोरच काशीकुंड नावाचे पाण्याचे तळे आहे. तळ्यात बरोबर मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे. तिथे जाण्यासाठी दगडी मार्गही आहे. तळ्याच्या आधी डावीकडे ४ छोटी मंदिरे/समाधी आहेत. इथे स्वतःचा फोटो काढलाच. काशीकुंड ओलांडून पुढे गेल्यावर एक गढूळ पाण्याचा तलाव लागला. पुढे अजून एक बांधीव तलाव आहे. पाणी पिण्यायोग्य नाही. समोरच जुना गढी छाप राजवाडा अशी वास्तू आहे, त्याचे छप्पर पूर्णपणे नाहीसे झालेले असून आतमध्ये २ खोल्या आहेत. हि वास्तू म्हणजे गडाच्या ह्या टोकाचा शेवट आहे.चारही बाजूंनी मजबून तटबंदी आहे तर आतील बाजून ३५ एक कमानी आहेत. आतमध्ये खूप खोल्या असाव्यात. बरोबर मध्ये एक कोरडा पडलेला तलाव आहे. डावीकडे शाबूत असलेल्या खोलीवरती पीराचे स्थान आहे. बाहेर एक थडगेही आहे. डावीकडच्या पडक्या दरवाजाने बाहेर पडताना पूर्ण राजवाडा कॅमेरात टिपून घेतला. 

तलावाजवळून आश्रमाकडे निघालो. वाटेत माकडांची टोळी बसलेली होतीच. दोघेही एकमेकांना घाबरत होतो. हातातली काठी कोणावरही न उगारता नुसती समोर धरून सुरक्षितरित्या टोळ्यातून बाहेर पडलो. आश्रमाच्या वरती टेकडी आहे, पायवाट त्यावर घेऊन जाते. वाटेत उजवीकडे कोरडे पडलेले तळे दिसते तर जवळच ३*३ चे भुयार आणि आतमध्ये आधीच्यासारखीच खोली आणि दगडी खांब असलेले टाके आहे. गडाच्या ह्या सर्वोच्च माथ्यावर फक्त एक ध्वज आणि दगडी कट्टा आहे,. पूर्वी इथे कदाचित मंदिर असावे. इथून अगस्ती समाधी, मागे २ तळी, राजवाडा दिसतो. पलीकडे गोरखगड, कात्रा, उजवीकडे हडबीची शेंडी दिसते. खाली हायवे, डावीकडे अंकाईकिल्ला रेल्वे स्टेशन तर उजवीकडे मनमाड स्टेशन दिसते. बरोबर मागे टंकाई किल्ला, विस्तीर्ण पठार आणि एकाकी महादेवाच्या मंदिरासकट सुंदर दिसतो. सोय असेल तर ३६० अंशातून Panorama फोटो जरूर घ्यावा. दुसऱ्याच एका वाटेने आश्रम ओलांडून पलीकडे असलेल्या आधीच्या गुहेकडे खाली उतरलो. गड पाहून झाला होता. खिंडीकडे निघालो. गड संपला वाटत असतानाच उतरताना दरवाजाच्या उजवीकडे अजून एक गुहा दिसली, जवळ गेलो तर डावीकडे अजून २ मोठ्या गुहा दिसल्या. अश्या राहण्यायोग्य जागा गडावर खूप आहेत.
कामगारांची कामं जोरात सुरु होती. खालून येणाऱ्या वाटेवर ते बिनधास्त दगड ढकलून देत होते. हाक मारून त्यांना थांबायला सांगितले. २-३ मिनिटातच खाली मुख्य लेण्यांजवळ येऊन पोचलो. लेण्यांची देखरेख करायला ठेवलेला सरकारी माणूस येऊन बसलेला होता. त्याने काही दरवाजे उघडून मला आतमधून लेणी पाहू दिली. स्वताहून मूर्ती दाखवत होता आणि चक्क वरच्या मजल्यावर जायची भुयारी वाटही दाखवलीन. तिथून वरही घेऊन गेला, मनसोक्त फोटो काढू दिलेन. सगळे दरवाजे उघडून पूर्ण लेणी बघू दिलीन. घरातून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या होत्या, त्या सरळ ओतून टाकल्या. काढणं होतंच, त्याने पाणी काढले. "इथल्या पाण्याने सर्दी होईल, खाली गावात जाऊन चांगले पाणी प्या" ह्याकडे दुर्लक्ष केलं. मेलं कोंबडं आगीला थोडंच भीतं? मी भरल्या नाकानेच तिथे पोचलेला होतो. बिनधास्त पाणी प्यालो, बाटलीही भरून घेतली.
अवघ्या ३ तासांत दोन्ही गड मनसोक्त भटकून निवांत फोटोही काढले होते. २ वेळा लेणीही बघून खाली आलो होतो. गाडीवर टांग टाकून परत हायवेला लागलो.
दोनच दिवसांपूर्वी शेगावला जाताना वाटेतच बहादरपूर किल्ला अनपेक्षितरित्या बघायला मिळाला होताच. हायवेवरूनच लळिंग, कात्रा आणि गोरखगडचेही दर्शन घडले होते. हि यात्रा सुफळ-संपूर्ण झाली होती.





 किल्ले अंकाई आणि टंकाई 

All the photographs in this article are taken by Upendra Kshirsagar.. An Expert Photographer
पहाटे पाचाला टीम सन्मान शुचिर्भूत होवून सज्ज झाली .. अंकाई-टंकाई चा सामना करायला.. आज या बागलाण भटकंतीचा शेवटचा दिवस होता.. उद्धव महाराजांच्या पायावर डोकं ठेवून निरोप घ्यावा म्हणून मंदिराकडे निघालो.. या मठाच्या मध्यभागी लक्ष्मी नारायण मंदिर, मंदिरात उद्धव महाराजांची समाधी.. मंदिराशेजारी डावीकडे अश्वथ वृक्ष.. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक विहीर आणि एकूणच माहोल.. शांत भावभक्ती ने पुरेपूर भारलेला.. जणू अंतर्मुख करणारा.. मंदिरात पोहोचलो.. लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतले .. तेवढ्यात तिथे पुजारीबुवा पूजेसाठी प्रगटले.. पूजा उरकताच त्यांनी मग माहिती देण्यास सुरुवात केली..
पुजारीबुवा: ही लक्ष्मी नारायणाची मूर्ती फार पुरातन कालची आहे आणि ज्या दगडातून ती घडवली तो काही साधा दगड नाही.. फार मौल्यवान दगड आहे.. हा.. अजूनही एक फोन केला कि पोलिसांची टीम ताबडतोब दाखल होते या मूर्तीच्या रक्षणाकरिता.. आता पुजारीबुवांनी या प्रात:कालीन सभेचा अघोषित ताबा घेतला होता.. ते माहिती सांगू लागले

पुजारीबुवा: दरवर्षी गोकुळ अष्टमीला इथे रासक्रीडेचा जंगी कार्यक्रम असतो.. आणि इथे कृष्ण जन्माचे गोडवे गाण्यासाठी भारतभरातून प्रसिध्द गायक हजेरी लावतात.. अवधी.. गायकी घराण्यातले.. शास्त्रीय निम्शास्त्रीय गायक.. सगळे झाडून हजर असतात या सोहळ्याला.. दरवर्षी पावसाळ्यात उद्धव महाराजांच्या पायाशी पाण्याचा निर्झर उगम पावतो.. आहे कि नाही आश्चर्य.. ‘हम्म’.. काही दिवटे शास्त्रज्ञ आले होते या पाण्याचा गुणधर्म तपासायला.. तर नर्मदेच्या पाण्याशी याचे गुणधर्म जुळले.. साक्षात नर्मदेश्वरी गंगा उद्धव महाराच्या पायाशी झुळझुळ वाहते.. अशी जुजबी माहिती पुजारी बुवा पुरवत होते.. त्याचा निरोप घेतला उगाच पुढच्या मोहिमेला उशीर नको म्हणून मठातून प्रस्थान केले..

गाडी धुराळा उडवत निघाली.. ताहीराबाद-सटाणा-चांदवड-आणि मनमाड असा प्रवास सुरु झाला.. आग्र महामार्गा वर टोळ वर पोहोचलो तोवर पूर्वेची मंद चाहूल लागली.. चांदवड किल्ला हा असा उजवीकडे पण अंधुकसा दिसू लागला.. पुढे निघालो.. आणि अर्ध्या तासांतच सूर्यदेव डोंगराडून फुटभर वर आले.. कप्तान उपेंद्र ने गाडी बाजूला घ्यायला लावली.. सूर्योदयाचे हे आणखी एक मनोहारी दर्शया पहायला मिळाले..

बागलाण सफारीतला हा चौथा मनोहारी सूर्योदय.. सह्याद्रीच्या कुशीतून जन्मलेला.. जागृत आणि तितकाच प्रगल्भ.. आठवणीत कायमचा कोरून .. मनमाड गाठले.. यष्टी स्थानकावरून पुढे निघालो.. अंकाई रेल्वे स्टेशनच्या रस्त्याने.. चार-पाच कि.मी. भर पुढे जाताच अंकाई आणि टंकाई ही जोड गोळी दिसू लागली.. पुढे अंकाई च्या टेकाडाला वळसा मारून पायथ्याच्या गावी पोहोचलो.. इथवर पोहोचलो तोवर चांगलंच फटफटलं होतं.. गावातल्या चौकात एका टपरीजवळ गाडी थांबली.. तिथे आजींकडे चं मिळेल का म्हणून चौकशी केली.. पण आजी नम्रपणे नाही म्हणाल्या.. ‘आज पाण्याचा दिवस आहे.. चहा मिळणार नाही’.. या भागात पाण्याचा बारमाही दुष्काळ असल्याचे कळले.. पाणी येतं पण १५ दिवसातून एकदा मग हा दिवस चुकवून कसं भागणार होतं आजींचं.. शेवटी आजींनी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आणि चहा स्टोव्ह वर ठेवला.. आज ‘चहा मिळणार होता’.. म्हणून कप-बशी कधी पुढ्यात येते याची वाट पाहू लागलो..


तिकडे सर्पमित्राने हळूच एका शेपूट लावणाऱ्या कुत्र्याला गोंजारायला सुरुवात केली.. लाडात आलेलं ते कुकुड कुत्रं.. सगळ्यांच्याच पायाला चाटू लागलं... तसं सर्पमित्राला त्याचं हे प्राणीप्रेम आवरतं घ्यायला सांगितलं..

गरमागरम चहाचा घोट घेवूनच गडावर निघालो.. आजूबाजूला पाहिलं तर.. पाण्याच्या हंड्यांचा खणखणाट आणि पक्ष्यांचा चिवचिवाट शिगेला पोहोचला होता.. पुढे निघालो.. विरळ बाभळीच्या रानातून वाट काढून दोन गडांच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्यांकडे निघालो.. येडा राघू,, बुलबुल, मैना.. चिमण्या झाडून बाभळीच्या शेंगांवर ताव मारत होत्या.. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोतवाल पक्षी ही होता..

टंकाईच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्या समोरील झाडाखाली पोहोचलो.. समोर पाहिलं तर चार दुमजली गुंफा नजरेस पडल्या.. कुठून सुरुवात करावी असं विचार करू लागलो.. बरं .. सुरुवात से सुरुवात करते है.. म्हणून चौथ्या गुहेतून सुरुवात केली.. इथे शंकर भगवान अवतरले होते आडबाजूला ध्यानस्थ बसले होते.. आणि सोबतीला काही भक्त.. तिसऱ्या गुहेत पाहिलं तर इथे पार्श्वनाथाची ध्यानस्थ मूर्ती आहे.. आणि आजूबाजूला त्यांच्या शिष्यांच्या मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या चौकटी.. चौकटीतून शिष्य गायब झाले होते.. जणू अंतर्धान पावले होते.. बऱ्याच मूर्ती या भग्न चेहऱ्यांच्या असल्याने.. त्यांना नाव नव्हते.. पण जे काही होतं ते सुंदर नक्कीच होतं.. गुंफेच्या बाहेर पायथ्याला एका रांगेत गजराजांची शिल्पे आहेत..
डाविकडून दुसऱ्या गुहेत.. चार कोरीव खांब आणि रिकामा गाभारा.. या गाभाऱ्यात कुठल्या देवाचा अधिवास होता हे मूर्ती चोरच  सांगू शकेल.. पण छतावर कमलपुष्पाचे सुंदर नक्षीकाम आहे.. अफलातून.. गुहेला खिडक्या देखील आहेत.. एकदम कोरीव.. कडक.. बाहेर प्रवेशद्वाराशी वर दोन शेपूट उंचावलेल्या सिंहांचे मोठे शिल्प कोरले आहे अगदी मुक्तहस्त चित्र सारखे.. असा हा डेंजर सिंघम अन्ना पाहून.. पहिल्या गुहेकडे निघालो.. यात काय दडलंय याची उत्सुकता वाटू लागली.. कोरीव दरवाजाच्या चौकटीतून आत आलो.. तर उजवीकडे वाघावर स्वार होवून साक्षात देवी प्रगट झाली होती.. सिरवा चुडा.. तांबडा मळवट आणि करारी नजर.. आणि प्रगल्भ अवतार.. माहूरच्या देवी सारखा आवेश.. जणू रणांगण गाजवून आलेल्या विजेतीचा थाट या देवीच्या आवेशात दिसू लागला.. नतमस्तक झालो.. दर्शन घेवून गडाव निघालो..

लेण्याच्या डावीकडील पायऱ्यांनी जाताच.. दोन गडांना जोडणाऱ्या खिडीत बांधलेल्या मुख्य प्रवेशद्वार दिसले... उजवीकडे आत दडवलेला दरवाजा.. आणि समोर भिंत.. गडाचा दरवाजा चटकन दिसत नाही.. पायऱ्या चढताना भिंत दिसते.. दरवाजा आत दडून वाट पाहत असतो..  

दरवाजा अजून सुस्थितीत असल्याचे पाहून बरे वाटले.. प्रवेश द्वारातून आत शिरलो.. डावीकडे कातळावर चढून अंकाईचे प्रवेशद्वार दिसले.. मागे टंकाई किल्ल्याच्या पायऱ्या आणि वर दरवाजा स्पष्ट दिसू लागला.. दोन रांगडे षटकोनी बूरुज आणि भरभक्कम दरवाजा असे या अंकाई च्या मुख्य द्वाराचे वर्णन करावे लागेल.. आत आलो तर समोर पुन्हा एक गुंफा आणि उजवीकडे काटली जीना.. या गुहेत काही लेणी कोरल्याचे दिसून आले.. इथे .. एका गुहेत मध्यभागी मंदिराचा गाभारा आणि आत त्रिमूर्ती शिल्प आहे .. एकदम एलिफंटा ची आठवण झाली .. त्याशी साधर्म्य असणारे हे शिल्प फारच अफलातून आहे.. लेण्याची कारीगरी पाहून जीना गाठला.. इथे डोंगराच्या नाकाडावर.. दुहेरी तटबंदी आणि संरक्षक दरवाजे बांधल्याचे दिसले.. पुढे जायला एक भुयारी मार्ग.. भुयारी पायऱ्यांचा माग काढत वर आलो तर वनदेवीचे मंदिर दिसले.. आणि पुख एक स्पायरल कातळ जीना.. वर जाताना ह्या जिन्याच्या पायऱ्या मधोमध दुभंगल्याचे दिसले.. जीना चढून वर आलो तर माथ्यावर अजून एक टेकाड वाट पाहत होते.. सह्याद्री ची हीच खरी कसोटी आहे.. एका मागून एक टेकाड .. असे पायवाटांचे घाट चालताना अवचित सामोरे येतात आणि पायथ्याला साधारण वाटणारे हे किल्ले .. वर पोहोचताना खरे कळतात.. वर नाकाडा च्या टोकाला अंकाई वरचा शेवटचा दरवाजा वाट पाहत होता ..

समोर टेकाडावर चढून गेलो तर.. वर कातळाच्या पोटात असलेली अगस्ती ऋषींची गुहा नजरेस पडली.. हिंदू पुराणातील सप्तर्षी मधील एक अगस्ती ऋषी.. अज म्हणजे पर्वत आणि अस्ति म्हणजे फेकणारा.. तर पर्वत उलथून टाकण्याचे सामर्थ्य असलेले असे हे अगस्ती ऋषी.. या डोंगरावर अगस्ती ऋषी नी साधना केल्याचे सांगतात.. पुराणातील एक कथा आहे.. काही असुरांनी समुद्रात आसरा घेतला होता आणि देवांना त्यांना शोधणे कठीण होवून बसले.. तेंव्हा अगस्ती मुनींनी समस्त समुद्र पिवून टाकला आणि असुरांचा संहार केला..

अगस्ती ऋषींच्या गुहेपासून पुढे निघालो.. पुढे एक विस्तीर्ण पठार नजरेस आणि दूर एकां राजवाड्याचे अवशेष.. तिकडे निघालो.. वाटेत एक कुंड आहे आणि त्याच्या मध्यभागी शिवमंदिर.. एका ४ बाय ४ फुटी बेटावर बांधलेले.. समस्त शिष्यगण इकडे प्रात:स्नानसंध्या करीत होते.. पुढे गेलो तर उजवीकडे तटाला खेटून आणखी एक हिरव्या पाण्याचं टाकं असल्याचे दिसले.. राजवाड्याच्या उजवीकडे मच्छिंद्रगडाचा सुळका लक्ष वेधून घेत होता.. समोर राजवाड्याकडे निघालो.. पाहिलं तर  हा भव्य प्रासाद अजूनही ठाण मांडून बसला आहे एखाद्या साधकासारखा.. गतकाळच्या वैभवाची जागा आता अवकळेने घेतली तरी रुबाब कायम होता.. आत आलो तर या भव्य वाड्यात मध्यभागी चौरस खळगा आणि बाजूला खोल्यांचे बांधकाम दिसले.. समोर डावीकडच्या कोपऱ्यात.. एका झाडाखाली कुण्या पिराची कबर.. आतून फेरफटका मारून डावीकडच्या तुटक्या दरवाजातून बाहेर पडलो.. आणि पुन्हा अगस्ती मुनीच्या गुहेच्या टेकाडावर नजर टाकली.. इकडे उजवीकडे.. ताशीव कडा आणि नागमोडी तटबंदी नजरेस पडते.. मग पुन्हा मुख्य द्वाराशी येवून गुहेकडे निघालो.. ह्या अगस्ती मुनींच्या गुहेसमोर एक पिंपळाचे झाड आहे आणि सावलीत मारुतीरायाचे मंदिर.. इथे पारावर एक वयस्क मुनिवर चेहऱ्यावर तेज घेवून सकाळचे कोवळे उन खात बसल्याचे दिसले.. त्यांना म्हटलं बाबा एक फोटो घेवू का तुमचा .. मुनिवर उत्तरले ..”मेरा फोटो लेके क्या करेगा रे बाबा”.. म्हटलं.. “संकट समय में आपको याद करूंगा बाबा”.. बाबांनी तंद्री लावली.. आणि बाबांची ही मुद्रा Camera मध्ये बंदिस्त करून.. अगस्ती ऋषींच्या गुहेत शिरलो.. इकडं पाहिलं तर एक जटाधारी बाबा.. म्हटलं बाबा फोटो.. बाबा नाही म्हटले.. तेवढ्यात बाबांना एक अर्जेंट फोन आला आणि बाबा मोबाईलवर बिझी झाले.. रामाचे दर्शन घेवून बाहेर पडलो.. आणि टंकाई कडे निघालो.. 

पुन्हा भुयारी दरवाजातून बाहेर पडलो आणि खिंडीतून वर जात टंकाई किल्ल्याच्या पायऱ्या चढू लागलो.. वाटेत डावीकडे पाण्याचं टाके दिसले.. वर निघालो साधारण दो-एकशे पायऱ्या चढून टंकाई च्या मुख्य द्वाराशी पोहोचलो.. अंकाई किल्ल्याच्या मानाने टंकाई धाकटा.. त्यामुळे मगाशी दिसणारी भव्यता इकडे हरवली होती पण.. रांगडेपणा तोच.. आणि तोरा म्हणाल तर.. टीचभरही कमी नाही.. बऱ्याच किल्ल्यांचे जोड-किल्ले हे त्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बांधले जायचे.. किल्ल्यालगतच्या टेकाडावरून शत्रू येवून नये म्हणून.. हे उप-किल्ले बांधले जायचे.. मुल्हेरचा उप-किल्ला मोरा.. पुरंदरचा वज्रगड.. वंदनगडाचा उप-किल्ला चंदन गड हे असेच काही जोड-किल्ले.. रामाच्या रक्षेला लक्ष्मण जसा तसे हे उप-किल्ले.. रक्षणासाठी सदैव तत्पर..

लंगडत्या पायांनी दरवाजात पाऊल ठेवले आणि जोरदार घोषणा दिली “जय भवानी.. जय शिवाजी.. जय सह्याद्री”.. इथून मागे वळून पाहताना अंकाई एखाद्या महादेवाच्या पिंडीसारखा वाटतो.. अंकाई ची उजवी आणि डावी डोंगर धार तर फार सुरेख दिसते इथून.. उजव्या धारेच्या शेवटाला मच्छिंद्र गड.. आणि त्याच्या उजवीकडे दूर .. ध्यानस्थ आणि उत्तुंग अशी हडबीची शेंडी सुळका.. जणू थम्स अप सुळका.. सह्याद्री च्या वारकऱ्यांना शुभेच्छा देणारा थम्स अप.. सुळका
दरवाजातून आत गेलो तर हिरव्या शालीखाली चिरनिद्रा घेतलेल्या पिराची एक कबर दिसली.. डावीकडे महादेवाचं मंदिर आणि पाण्याचं टाकं आहे.. पुढे जाताच एक मोठं पठार आणि अधून मधून डोकावणारे काही भग्न वाड्यांचे अवशेष.. बाकीच्या मंडळीना म्हटलं तुम्ही जा पुढे .. मी आणि माझा दुखरा गुडघा इथेच बसतो.. हे मस्तवाल वारं खात.. आज खऱ्या अर्थाने या मोहिमेची सांगता झाली.. रान रान भटकून आज शेवटचा टप्पा गाठला किल्ले टंकाई.. चार दिवस सरले.. कि आठवणीत विरले .. हे नाही सांगता यायचं.. ही भटकंती आहे कि खूळ आहे हे मला माहिती नाही पण हे सह्याद्रीच्या कडे कापर्यात भटकायचं व्यसन सुटणे आता अशक्य.. काय काय नाही पाहिलं या चार दिवसात.. एखाद्या जीराफासारखा उंच न्हावी गड.. आरस्पानी मुल्हेर-मोरा-हरगड.. उत्तुंग साल्हेर आणि कणखर सालोटा.. तीन सहस्त्र पायऱ्यांचे.. मांगी-तुंगी सुळके.. प्रजासत्ताक दिनी सुरु झालेली ही सफर आज पूर्णत्वास आली होती.. आणि बरच काही शिकवून गेली.. काही आठवणी.. काही रमणीय सूर्यास्त.. गाठीशी बांधून घरट्याकडे निघालो.. मित्रहो .. शेवटी आयुष्यात दोनच गोष्टी महत्वाच्या.. एक म्हणजे ‘किल्ला’ आणि दुसरी म्हणजे ‘पायवाट’ .. या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्हीच सांगा.. या जगण्यास.. काही अर्थ आहे का !

माधव कुलकर्णी















 Ankai Station:

I am calling it a station because I saw a station master and a Lantern guy( Horror filmwala).The daylight was yet to breakout so we were careful while crossing the railway trek.We asked the Station Master for direction but to our dismay he dropped a bomb on us Arre asli wala nahi ..I mean literally when he said aap log galat station per utar gaye ho ..you guys should have got down at Ankai Quila and not Ankai.
There was pin drop silence ,Sab ke chehre dekhne wale the, I could feel the WTF feeling because at this wee hours stranded at an unknown station...Bas sab ke maan me ek hi sawaal tha...... ab kya. But let me tell you we trekkers thrive on these kind of situation because they serve our taste(Travel) buds. We then spoke to that Lantern Guy , he said that we will have to walk atleast 4 kms to reach Ankai Village , Now this was a good news ..4 kms we said thank you chalne hi toh aaye hai and saying this we all started walking back toward the Manmad side with the Ankai Fort perched on the right hand side of the treks.

Walking along the railway line with Ankai-tankai Towering on our right side
 We kept walking along the railway treks and just before we reached a small bridge we diverted towards the right side ,towards the Ankai Village. In 15 -20 mins we were at the Base of ankai-Tankai Fort.
The Village Well and Ankai Fort on left and Tankai Fort on the right side can be see.

It’s a small village.There was shop in the village where one can buy chips etc. We filled up our bottles with water from the Village well and started our trek. One can clearly see the Jain caves from the well , a little walk further towards the right side will lead you to the steps of this Twin Fort.


Just when you start trek we can clearly see the Jain caves

The Trek Begins:
 Once taking the right  from the village well we come across stone stairs which actually is the start point of this trek. We took the steps and on our way passed a deserted dargah 
Deserted Dargah on the way

 Walking further for hardly 5 mins we were at the jain caves. These caves were two storied ( I am seeing this kind of caves for the first time). The caves had some excellent carvings , statues etc 
but honestly didn’t looked like maintained.( though there was a placard of archaeological department) Villagers were washing clothes at the water tank. Inside the caves also one can see litters thrown around.


Jain Caves
 In it’s full glory these caves must be a marvel. How I wish we can save our heritage. We rested for a while here and small photo session 
Mini Photo session
 From these Caves we took further steps toward the Ankai Fort. 
The Stone steps continues from the Jain Caves to the Fort Gate
This trek is very good for a beginner because there are these stone stairs through the trek which makes climbing very easy. As we kept walking on the steps shown above we could see the Giant gate of the fort from below.



One gets the clear view of Fortification from the stairs

 There is lots of Fortification still left . There is a large Door through which we make an entry into the fort , thereafter there are series of doors ( must be 6-7 in numbers) and spiraling stairs. 

Upon entering the fort we come across a plateau within the Fort .we see a fort wall with shelter space.
From this place, one can either take left turn and continue walking within the Ankai fort or can take right turn and move toward the Tankai Plateau. We opted to finish with the Ankai Fort.There are rock cut steps which leads to the next level of fort

Caves  with lots of carved deities,( How I wish they could restored)


Carved Idols in the fort's Caves

Carved Idols in the fort's Caves
Walking from here and climbing further we come across a small temple( I never understood what God it was)

A little climb further take us to the Top gate from where we reach a section which has a mosque kind of construction.
 Standing at the top we can see the Gigantic plateau of Tankai. This whole exploration hardly took 45mins and we were on our way back.
View of Tankai Plateau from Ankai Fort.
 As everyone was very hungry so we decided to have our lunch on the stairs of the fort as the Arc above it provided shade.


Lunch under the shade of this Arc
Food and Jitters on the staircase of Ankai Fort: 
Nothing can beat the trek lunch because every person who has come to the trek has something unique to offer.Cramming ourselves with parathas,bread butter and what not we were ready to get up but at just the same moment a huge Monkey descended on us. 

We were are very terrified and just stood as statues along the inner wall of fort. Pura scene me comedy bhi thi aur tragedy bhi thi , Tragedy is liye kyo ki hum ko laga ab kuch bhi ho sakta hai boss, because we were aware that monkeys here are very notorious so either he can attack us to get the food or scare us. Lekin uske baad ka scene yaad karta hut oh soch kar bhi hasi aati hai. Ek Raja ke darbar me jaise sipahi puri attention me khade hote hai waise hi hum log stairs ki dono aur bina saans liye full concentration se khade the, andhar full tension  aur udhar se monkey sahib steps se neeche ek Raje ki tarah utarte hai ,give a dirty stare to each of us and slowly step by step walks down without a care in the world. Aur stairs ki end me jakar he turns back, we all froze again in tension,( Pin drop silence) The monkey watches us all for a second and coolly walks off. Boss kuch der ke liye sab hil gaye the baad me toh we kept laughing like as if there is no tomorrow.After getting down we again reach a common section and from here there are stone cut stairs which leads to the Tankai Plateau.

 On reaching the top there was not much to explore except a small structure which turned out to be shiva temple.
Shiva Temple on the Tankai Plateau
and few water tanks. 
However the view from the top is mesmerizing specially the ankai top, and the mountain range behind it Goraknath Fort and Hadbi chi shendi.
Ankai fort, Goraknath and far behind Hadbi chi shendi as seen from Tankai Top
One can see lovely fields and the highway running across, even the train passing through this vast expanse of land looks very beautiful.As we had started the trek very early therefore we managed to finish it quickly and reached the base village at our targeted time of 11.30 am, because we wanted to catch afternoon train from Manmad.
We had to walk around 1 or 2 kms to reach the Highway from Ankai Village ,enroute one can see the other side of this fort along with the gorakgad fort.
Side view of Ankai enroute to highway


Hiking in Manmad Region -- Part 3 (Ankai-Tankai Forts)



Part 1: Katra to Shambhu Mahadev Range
Part 2: Gorakshanath Fort

Embarking on the third hike inside two days was so much exhilarating. As Manmad region is very far from Pune where we stay, we knew we would not visit this area too soon and wanted to make the most of our time in this area. Strong fortification of the fort caught our immediate attention as soon as we reached to the base of Ankai-Tankai forts. It was near to 10 am when we reached to the base. Weather was neither too harsh nor too pleasant when we started our hike.

Tankai Fort with Jain Caves at the bottom:


Approach to these twin forts has been made very easy by constructing the concrete steps at the start. These steps lead you to Jain caves.



There are some remnants of Dargah as you start your ascent.



We decided to visit Jain caves later as we had to cover two forts before it became too hot. So we proceeded towards the col. Approaching to col was also easy.

Monkeys are the troublemakers in trekker's life. Some of the monkeys are aggressive and can attack you for food. Particularly, monkeys which are fed by humans lose the fear for human and look upon humans as source for food and if not given, they can attack. A battalion of monkeys greeted us at the base of Tankai and we immediately changed the plan of visiting Tankai first and proceeded to Ankai.



Ankai, also known as mountains of Agasthi Rishi is a very ancient fort.
Fortification of this fort is in great shape and you pass through seven gates.



Different gates:


Along the way there are more caves with nice carvings. These are not well maintained as compared to Jain caves at the base. Bats rule inside the caves and you just cannot enter the caves.

As we ascended further, we came across a cave named "Seeta Gumpha". Currently it is used to shelter a cow. Though previously, it was used for staying but because of the cow-dung, it is no more suitable for halting at night.


Temple of Agasthi Rishi is in good condition. It is probably renovated recently and has marble flooring. As soon as entering the temple, serenity prevailed and immediately a spell of 5-10 minutes of meditation refreshed the mind.


After resting in the temple, we started exploring the western part of the fort. By that time, Sameer and Tushar were far ahead of us and out of sight.
A small temple was standing proudly inside a pond and its reflection was looking enchanting.


Different water cisterns in the fort.

There were few small birds near the water cisterns. A bird caught my attention which was walking and flying very near to ground. It was camouflaged with the color of the ground. I tried to capture few photos but because of its continuous movements, soon I gave up and proceeded further.
There is a large dilapidated structure probably the mansion on the fort.


There were no signs of Tushar and Sameer. As I was about to shout for their names, I spotted them perching on the rocks and munching on the snack.Soon, we all joined them one by one and we munched on the snacks.
Soon, we were done with the exploration of different structures of the fort except Citadel. As there was nothing to explore on the citadel, we decided to skip it and quickly descended to the col between Ankai and Tankai.
As it was becoming hotter and hotter and Tankai top was still looking distant, I gave the option to Amol who seemed visibly tired to rest at the base of Tankai till we returned from Tankai. Amol readily accepted the offer but Tushar thought otherwise and asked Amol to continue so as not to regret of visiting Tankai later. After some deliberation, Amol, too, agreed and we all started hiking on Tankai. There was no trace of monkeys which were abundant during morning. Probably they had gone to some shade to protect themselves from the heat of unrelenting sun.
Steps of Tankai:

After visiting Eastern part, we proceeded towards Southern part as Tushar and Amol were perching on the ground. They asked us to visit few more water cisterns on the Southern side. Again, these water tanks were not visible from the large plateau.

Amol (in white) and Tushar (in green) resting on the backdrop of massive Ankai Fort:


Water tanks on the Southern side

Soon, we were back to Jain caves carved at the base of Tankai Fort. These caves are well maintained and particularly well protected from the bats. There are stunning sculptures inside the caves that leave you spellbound. Unfortunately, we did not have much time to explore as we had to travel back 250kms to Pune, Therefore we quickly checked 3-4 caves and skipped the rest and proceeded towards the base.

Jain Caves at the base of Tankai Fort:


Glimpses of the beautiful carvings: You can easily spend hours if you want to explore all the caves in detail.

We started our journey back to Pune around 1.15 pm, had a lunch at a restaurant along the way and reached to Pune around 7pm marking the end of remarkable two days spent in the wilderness.

There was a sense of utter joy as finally the forts in Manmad region were finally conquered. As I am penning this, fluttering of peacocks in the temple near Katra is still ringing in the ears. Thrill of adventurous and impromptu decision to cover the whole Katra-Shambhu Mahadev region with a difficult rock patch still sends goosebumps in the stomach. A night spent in the temple at the base of Gorakshanath Fort with many sadhus is still vivid in the memory and the massiveness of twin forts of Ankai-Tankai seems to be imprinted in the memory forever.

Special thanks to my cousin - Mr. Sanjay Amrutkar (a well-known trekker, photographer and writer on the subject of trekking in Sahyadri) for helping to plan this hike.

Tips for the hikers:
  • More about the history can be found here.
  • In 2 days, you can easily cover 4 forts - Ankai, Tankai, Gorakshagad and Katra.
  • If you have more time, you can also visit Chandvad region forts.
  • Stay can be made at the base of Gorakshagad or Agasthi Rishi Temple on top of Ankai Fort.
  • Guide is recommended to hike on Katra Fort.









नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध जोड किल्ले. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. हे गाव मनमाड शहरापासून ८ किमी. अंतरावर, मनमाड-नगर रस्त्यावर आहे. किल्ला अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात. अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात. सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते, तेथे अंकाई टंकाई किल्ले आहेत. हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत. अंकाई गावातून या जोडकिल्ल्यांकडे पाहिले असता डाव्या बाजूचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे अंकाई किल्ला, तर उजव्या बाजूचा सपाट माथा असलेला डोंगर म्हणजे टंकाई किल्ला होय. अंकाई किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३१५२ फूट, तर टंकाई किल्ल्याची उंची २८०२ फूट आहे. या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट मळलेली आहे. मनमाड शहरातून कोणत्याही खासगी वाहनाने अंकाई गावात सहज पोहचता येते.

अंकाई टंकाई किल्ले, नाशिक.

अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी सर्व प्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावर मात्र या दोन किल्ल्यांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. खिंडीत जाण्यासाठी दोन रस्ते असून पहिली व प्रचलित वाट ही या किल्ल्यांच्या दक्षिणेकडील असलेल्या अंकाई गावातून येते. तर दुसरी वाट उत्तरेकडून मनमाड शहराच्या बाजूला असलेल्या दरवाजातून येते. या दोन्ही वाटा अंकाई टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात आणि तिथून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी वाटा विभक्त होतात.

अष्टकोनी बुरूज, अंकाई.

गड चढाईला प्रारंभ होताना पुरातत्त्व विभागाने तेथे बांधलेल्या पायऱ्या दिसून येतात. थोड्या चढाईनंतर टंकाई किल्ल्याच्या डोंगराच्या पोटात असलेला जैन लेणी समूह दिसतो. एकूण दहा लेण्यांचा समूह असून ही लेणी दोन स्तरात खोदलेली आहेत. या लेण्यांचा कालखंड हा दहावे ते बारावे शतक असा आहे. येथील एका लेण्यात देवनागरी शिलालेख असून काही लेण्यांमध्ये कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा अशी शिल्पकला आढळून येते.

प्राचीन हिंदू लेणी, अंकाई

या लेण्यांपासून पुढे गडाचा पहिला दरवाजा दिसतो. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून हे दोन दरवाजांचे मिळून असलेले एक संकुल आहे. बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत. आतला दुसरा दरवाजा हा पहिल्या दरवाजाशी काटकोन करून उभा आहे. हा दरवाजा दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. या दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकामातील लाकडी तुळया आणि दरवाजाच्या फळ्यांचे अवशेष अद्यापि दिसून येतात. या दरवाजातून आत गेल्यावर अंकाई टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत प्रवेश होतो.

अंकाई टंकाई किल्ल्याच्या डोंगराना उत्तम ताशीव कातळ कडे लाभलेले असल्यामुळे तटबंदीची फारशी गरज भासलेली नाही; परंतु या दोन्ही डोंगरांना जोडणारी खिंड मात्र सर्व बाजूंनी अतिशय उत्तम तटबंदी बांधून नीट संरक्षित केलेली आहे. तटबंदीवर संरक्षणात्मक दृष्टीने चर्या बांधलेल्या दिसतात. अंकाई किल्ल्याचे दिशेने थोडे वर चढून गेल्यावर अंकाई गावच्या दिशेला कातळाममध्ये तीन लेण्या आहेत. यांपैकी दोन गुहा पाहता येतात; परंतु तिसरी गुहा गाळाने भरलेली आहे.

हमामखाना, अंकाई.

खिंडीतून थोडे चढून गेल्यावर गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. हा दरवाजा देखील दोन दरवाजांचे मिळून एक संकुल आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस दोन भक्कम बांधणीचे अष्टकोनी बुरूज आहेत. यांपैकी पहिला दरवाजा हा आयताकृती चौकट आणि वरच्या बाजूस कमान अशा प्रकारचा असून आत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत. पुढे आणखी एक कमानयुक्त दरवाजा आहे. पुढे उजवीकडे कातळात प्राचीन हिंदू लेणी आहेत. यांतील मुख्य लेण्यात व्हरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणे असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपाल कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्रीशिल्पे असून यांपैकी एक शिल्प हे गंगेचे आहे. गाभाऱ्यामध्ये घारापूरी येथे असलेल्या त्रिमूर्तीसदृश सदाशिवाचे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, या लेण्याचा कालखंड हा इ. स. नववे ते दहावे शतक असा आहे.

जैन लेणी समूह, अंकाई.

गडाचा दुसरा दरवाजा देखील संकुलातच बांधलेला आहे. यात एकूण दोन कमानयुक्त दरवाजे व मध्यभागी फक्त एक कमान अशी रचना आहे. हा दरवाजा पुर्वाभिमुख असून या दरवाजाचे संकुल म्हणजे एक छोटा बोगदा आहे. तीव्र उतारावर हा दरवाजा बांधलेला आहे. दरवाजा पार करून खड्या कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर परत दोन दरवाजांचे मिळून एकत्र असे एक संकुल लागते. यांपैकी बाहेरील दरवाजा आयताकृती आकाराचा आहे. आतील दोन्ही बाजूंस बसण्यासाठी ओटे आहेत. पुढे एक कमानयुक्त दरवाजातून बाहेर पडून किल्ल्याच्या दिशेने जावे लागते. दोन दरवाजांचे हे संकुलसुद्धा एक छोटा बोगदा आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा आणखी एक भग्न दरवाजा दिसतो. येथून पुढे कातळातून खोदलेल्या मार्गाने गेल्यावर गडाचा शेवटचा भक्कम बांधणीचा कमानयुक्त दरवाजा लागतो.

गडावर प्रवेश केल्यावर दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. भौगोलिकदृष्ट्या गडाचे बालेकिल्ला आणि माची असे दोन भाग पडतात. माचीच्या सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर एक छोटी टेकडी आहे, त्याला बालेकिल्ला म्हणता येईल. माचीवर प्रवेश केल्यावर तीन घुमट असलेली एक वास्तू दिसते, ती म्हणजे हमामखाना. याच्या मागील बाजूस पाण्याचे टाके असून पुढे दोन लेण्या आहेत. या लेण्यांना सीता गुंफा असे संबोधले जाते. बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या पोटात लेण्या खोदलेल्या आहेत. सध्या जास्त वापरली जाणारी लेणी म्हणजे अगस्ती ऋषि यांची गुहा. या गुहेत अगस्ती ऋषिचे मंदिर असुन हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. या गुहेच्या शेजारी थोड्या वरच्या बाजूस कड्याच्या पोटात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यास बारमाही पाणी असते व हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथून पुढे गेल्यावर अंकाई किल्ल्याचे विस्तृत पठार किंवा माची दिसते. या पठाराच्या मध्यभागी एक खडकात खोदलेले पाण्याचे तळे आहे. या तळ्याच्या मध्यभागी एक छोटी घुमटीवजा वास्तू आहे. हि अगस्ती ऋषी यांची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात. या तळ्यास काशीतळे असे नाव आहे. रामायण काळात अगस्ती ऋषी हे अंकाई डोंगरावर वास्तव्यास होते, अशी आख्यायिका आहे.

तलावापासून पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. आज या वास्तूच्या भिंती, कोनाडे, कमानी अवशेष रूपाने शिल्लक आहेत. या वाड्याच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौकोनी कोरडा हौद आढळून येतो. पूर्वी हा एक मोठा महाल असण्याची शक्यता आहे. याच वास्तूमध्ये एका टोकाला पिराचे एक ठिकाण आहे; परंतु मूळ वास्तूशी संबंधित नाही. अंकाई किल्ल्यावर पाण्याचे तीन तलाव असून काही ठिकाणी खडकात पाण्याची टाकी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या टेकडीवर म्हणजे बालेकिल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळून येत नाहीत. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हदबीची शेंडी असा परिसर दिसतो.

यादवकालीन मंदिर, टंकाई.

टंकाई किल्ला पाहाण्यासाठी अंकाई किल्ला उतरून दोन्ही किल्ल्यांमधील खिंडीत परत यावे लागते. खिंडीत आल्यावर मनमाड शहराच्या बाजूला उत्तर दिशेला असलेला दरवाजा पाहता येतो. हा उत्तराभिमुख दरवाजा भक्कम बांधणीचा असून बुरुजाचा आडोसा घेऊन बांधण्यात आला आहे. टंकाई किल्ल्याच्या वाटेवर सुरुवातीला कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि काही पाण्याची टाकी दिसून येतात. थोड्या चढाईनंतर किल्ल्याचा पश्चिमाभिमुख मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाची चौकट आणि कमान पुरातत्त्व विभागाने दुरुस्त केली असून (२०१९) बाजूच्या तटबंदीची पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत डावीकडे एक पिराचे ठिकाण आहे. मूळ बांधकामात हा पीर त्या जागेवर नसावा. टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेले आहे. या पठारावर एक तलाव असून समूहामध्ये खोदीव पाण्याची टाकी आढळून येतात. पठाराच्या मध्यावर एक यादवकालीन भग्न शिवमंदिर आहे. मंदिराच्या भिंती शाबूत असून छत मात्र नाही. गडाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व टोकावर प्रत्येकी एक बुरूज असून गडावर काही इमारतींचे अवशेष आढळून येतात.

पाण्याची टाकी, टंकाई.

अंकाई टंकाई हे जोड किल्ले शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात आहेत. अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो. अंकाई हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. शके ९७४ साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता, अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाई दुर्ग असा येतो. मोगल बादशाह शाहजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खानेखानान याने हा किल्ला जिंकून घेतला (१६३५). त्या आधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशाहीच्या ताब्यात होता. फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इ. स. १६६५ साली अंकाई किल्ला हा सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता. मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे सामान साठवणुकीसाठी केला जात होता. पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला (१७५२). या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतर (१८१८) इंग्रज अधिकारी मैकडोवेल याने गडावर तोफांचा मारा केला, तेव्हा गडावरील शिबंदीही इंग्रजाना शरण गेली आणि अंकाई टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले.

संदर्भ :

  • Verma O. P. The Yadavas & their Times, Vidarbh Sanshodhan Mandal, Nagpur, 1970.
  • पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०११.
  • महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, इतिहास प्राचीन काळ, खंड १, भाग २, स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, २००८. 
https://marathivishwakosh.org/50098/

In the Satmala Range highlands in western India, there is a historic site called Ankai Fort. It is situated in the Maharashtra state’s Yeola Taluka in the Nashik district. Yadava of Devgiri constructed the fort. The location is close to Manmad. Two distinct forts on nearby hills are the Ankai fort and the Tankai fort. They build a common fortification to protect both.

The Ankai fort is situated on a hill with perpendicular scarps on all but the eastern side, which has a narrow snout.

The Ankai-Tankai Fort’s past

ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit: thetoptours

General Khan Khanan of the famous Mughal Emperor Shah Jahan, who constructed the magnificent historical monument of India, the Taj Mahal, seized the Ankai-Tankai forts. Following the fort’s capture by British forces led by Lieutenant-Colonel McDowell on April 5, 1818. He managed to take Ankai-Tankai without a fight or any casualties.

Ankai fort

In the region between Nashik and Manmad, this fort is situated. Seven rings of defenses surround the Hindu temple carved out of solid rock in the Ankai fort. The curving steps were important because they would offer excellent defense against enemies who would assault them. In the last section of the steps, the breadth is so narrow that only one or two men could even foot on it, and the fort’s defenders could throw stones at the enemies.

ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit:

An effective method of defense was to keep firewood near the door, and when the adversaries arrived, they would light the wood, keeping them away from the fire.
A mysterious domed structure with a treasure chamber is claimed to have been located behind the final doorway. In the center of Ankai’s square water tank is an old sculpture. Buildings once stood atop the fort, but they were destroyed, leaving just remains.

ImageCredit: re-thinkingthefuture

Fort plateau includes 7-8 water tanks on the top and 15 m-deep, rock-cut granaries. On the fort’s western side, a palace can be seen with a pond in front of it. At the base of the plateau are Hindu rock-cut shrines with hermits that are still in good shape today.

Also, Read 10 fantastic horror films of 2022

Fort Tankai

ImageCredit: ravivaidya

Compared to the Ankai fort, the Tankai fort is less tall and more level. The plateau is covered in grass, and horses that are constantly buffeted by the wind graze there. On the fort, there is no available shelter, although there is a Shiva temple that has partially fallen.
The Shiva temple is made of enormous stone blocks decorated with stone sculptures, and Nandi stands in front of the time gazing at the Shiva linga shrine.
Fort contains fortifications on each of its four corners and a relic of a guard house on its eastern side. The Tankai fort served primarily as a big supply of storage space.

How to get to Ankai-Tankai Fort from Mumbai

Bus from Mumbai to Ankai-Tankai

There are ST (State Transport) buses and Volvo buses that travel from Mumbai to Manmad; the distance between the two cities is 250 km. From Manmad, local transportation is accessible to Ankai (the base village); the distance between the two cities is about 8 km.

ImageCredit: durgbharari

Train from Mumbai to Ankai-Tankai

Trains are available from Mumbai to Manmad; the distance between the two cities is around 207 km. From Manmad, local transportation is available to Ankai (the base village); the distance between the two cities is approximately 8 km.

Nearby places

The Manmad City

ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit: railwayrecruitment

On the road connecting Malegaon and Pune is Manmad town. It was a significant location where the Peshwa of Pune transacted business. The Peshwas used Manmad City as a major commerce route to reach northern India; Chandwad and Nandgaon were also viable options to Delhi. Massive amounts of agricultural, petroleum, food grains, and cement are produced in Manmad City.

Shendi Hadbichi

ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit: deshdoot

Hadbichi Shendi is a pinnacle that is simple to access from the base but difficult to climb due to its unstable rocks. Some intrepid people and climbers have scaled the Hadbichi Shendi. In the village of Katarna, the route begins along the “Dattamandir road.”

Gurudwara

It is the main draw for visitors to Manmad. Gurudwara was located beside a thick forest. Balarao and Rustumrao, two inmates from the Satara fort, were brought by Guru Gobind Singh Ji. People helped to build the gurdwara by removing the thick forest during the Sant Baba Nidhan Singh Ji-initiated karseva.

ankai tankai fort, ankai trek india, trek india manali, trek in india, an indian tribe, india trek tours, india treks in december, india trek, indian trek
ImageCredit: discoversikhism

A buried bauli was discovered during the gurudwara’s construction. The gurudwara was then given the name Gurudwara Guptsar Sahib since it is said that the water from the well is heavenly and pleasant.

https://voices.shortpedia.com/society/ankai-tankai-fort-blog-information/

It had been 15 days in the New Year, and I haven't been for a trek. This feeling was killing me from inside. All the plans I was making were getting cancelled and I was annoyed with the same.

Hatia Lokmanya Tilak Terminus



I met up with Shilpa and decided to make a foolproof plan to visit Kohoj, that didn't workout, we then settled to visit Wai for an overnight trip. That didn't workout either. Finally we decided to visit Ankai and Tankai Fort.

General Unreserved compartment

As decided we meet up at Lokmaniya Tilak Terminus (LTT) to board the Hatia Lokmaniya Tilak Express. The superfast express train departs from LTT at 00:15 AM. We were to alight at Manmad Junction at 04:27 AM.  

Shilpa and Me at Manmad Station

I took a unreserved train ticket at Andheri station (Western Line). Point to be noted here is. We can get a unreserved train ticket from the start station till the end station. But you need to let the ticket vendor know whether the train you are travelling by is a super fast train or a passenger train as the ticket costs differ. The train ticket to Manmad Station cost me Rs. 110.

Shilpa and Me at Ankai Killa station

The train journey from Andheri to Dadar (Western Line) was smooth. I boarded the 10:31 PM train. It was empty and to top it, it was a fast train so I reached Dadar at 10:47 PM. Crossed over to the other side i.e Dadar of Central Railway. Platform No.1 was packed with people. I understood that either the train is either cancelled or delayed. It was both. I left the first train as it was packed. I then boarded the Thane local at 10:57 PM which had a lesser crowd. I alighted at Kurla station at 11:07 PM.

Goods Train, we crossed

Now I had to move over to the harbour line as the train to Tilak Nagar is from there. Tilak Nagar is a station on the harbour line. 

Group Selfie, backdrop is Ankai Fort

I had to change platforms to board the harbour line train. Again I was greeted with packed crowd at the station. What I learnt on the platform is that the previous train was cancelled and the current train is delayed by 10 minutes. Finally the train arrived at 11:40 PM. I managed to get in the train irrespective of the crowd on the platform, else I would be late to board the super fast train at LTT.

Sunrise

Tilak Nagar is the next stop after Kurla. LTT is located at a distance of 15 minutes (walking) from Tilak Nagar station. I managed to reach LTT at 11:57 PM. 

Shilpa told me that in the night males are not allowed in the ladies unreserved compartment, but they are allowed in the day provided they can prove that they are related to the women in the boogie. Now what logic is this. 

The train reached Manmad at 04:55 AM. Now we had to board a connecting train to take us to Ankai Killa station.

Tankai Jain Caves and Tankai Fort

As we exited the train and the platform, the Ticket Checker (TC) asked us for our tickets. We both had tickets with us. Only difference was mine had super fast printed on it. The TC wanted to make a quick buck and so stated that Shilpa didn't have the right ticket. To this she informed him that the ticket vendor should let us know about it. She was not informed when we booked the tickets. Sad to say that after paying him 100 bucks he let us go. We asked him, what time the train to Ankai is. He informed that he was not aware about it and that we need to ask at the ticket counter. 



We walked to the ticket counter to find out that the connecting train had already gone. He suggested that we should go the State Transport depot and board a State Transport (ST) bus and we did just that.

Group Selfie

We boarded a share a rickshaw at a cost of Rs.10 each, we were dropped at the Manmad ST bus stand. We inquired there and were informed that there is no direct bus to Ankai fort. But the highway is near the Ankai Killa railway station, which is near the fort and that we would be dropped there. We need to go walking from there.

That's Me
Highway is State Highway 10 also known as the Malegaon-Manmad road. 

Now the bus departs at 06:30 AM and so we had to kill time. We then decided to sip on some hot tea at a tea stall outside the ST bus stand. But as the weather was cold the hot tea grew cold in a matter of a minute or two. 

The bus started on time and by 06:45 AM, from platform no. 1 at Manmad ST bus stand and were alighted at the Ankai Killa Railway Station. Cost of tickets was Rs.9 each. The bus driver guided us with instructions from there to visit the fort. So board any bus plying to Malegaon. 

Tankai Jain Caves

Now there was a goods train parked near the railway line. We inquired with the station master about the same, he informed us to cross from below the line. This is very dangerous and one should not be doing it. Though we did cross this way under the guidance of the station master.



Now there are two sets of railway lines that need to be crossed one with a set of three tracks and the other with just one track, after that you will reach a tiny tar road. There is a temple near by a yellow top (kalash). You just can't miss it. Keep walking straight on the tar road next to the temple, the fort is now on your left hand side. In 30 minutes time we were finally at the Ankai Village. It is the base village for the fort. 

Temple in Tankai Jain Caves

From the village one can see the caves and then the fortification of both Ankai and Tankai Fort. 

Note: there are no signboards here.

Sculptured stone outside Tankai Jain Caves

A series of steps will lead you to the caves. These steps were built recently as they looked new plus there is construction material located at the start of the steps. 

There are a couple of old structures near the base village and also near the caves. Not sure as to what it is.


The were 7 to 8 caves here carved from the rock. The carvings on them were beautiful. Some of the caves were converted into temples. Good to see that people have taken up the work or restoring caves and forts seriously. The view was hazy but we could see farms, trees and houses in a distance. We could see the railway line and also the highway from here. 

View from Tankai Jain Caves

The time was now 09:00 AM on my watch when we breaked for breakfast. 

After having breakfast we decided to climb up the stairs leading to the fort. 

First you need to cross the bastion, from here is the main entrance to both the forts.



The fortification is not all around of the fort but just a few portions of the fort. The meeting point of both hills i.e Ankai Fort and Tankai Fort is well fortified. The walls are redone but they still have a charm of their own. This place offers a wonderful view of the surrounding. 

Three Sparrow at Tankai Jain Caves

Now there are monkeys here. Point to remember here is. If you don't want to be harassed by monkeys, then don't harass them. Please keep food items in the bag, as they get attracted to it. 

Fortification of Ankai Fort

We decided to trek Ankai Fort first. The way up the fort is very similar to Lohgad fort near Lonavala. One has to cross a series of doors or Darwaza and steep steps to reach the top. These steps reminded Shilpa of Harihar Fort in Nasik. This part of the fort is still intact. Note that it will put pressure on your knew joints. 

Finally at 11:00 AM we were atop the fort. Now the reason why it took us so long is, we were taking selfies all the way up and were enjoying the view around. 

The weather was nice and cool, gusty winds blowing so we didn't break a sweat. We decided to do this fort in entirety. We first decided to walk around the edge of the fort so get a good view of the hillside and valleys and then trek to the top most point of the fort, where the orange flag sways in the wind.

Shilpa and Me at one of the Fort Darwaza

The fort is basically a plateau. The fortification is only at the entrance of the fort. The entire plateau is not fortified.We kept walking around the edge of the plateau just to get a 360 degree view of the surrounding. Which was amazing. The hill ranges in a distance, the fields below, the tiny houses amongst them and the barren land. The railway line which circles the fort. We could see Manmad packed with houses in a distance. 
View from the common entrance of Ankai and Tankai Fort

The plateau is mostly barren. I has huge cactus bushes on it. What we found strange is that most of the cactus bushes were covered with clothes belonging to men, women and children. We did ask a couple of locals who were on the fort about it. They gave us a lame reason that the clothes flew and came all the way up here. 



We then walked to the other end of the fort and located another square shaped fort like structure. A fort in a fort, no this is new. I was eager to go in and check it out. But Shilpa decided to spend some time near the pond outside it. 

Again no signboard to inform as to what the structure is. It was way different from the inside. It houses a dargah in the inside and a few windows on one side of it. There was also a banyan tree which has a couple of sacred threads around it. Also there was a dried square shaped pond in its premises, which had steps leading to it. Again it was isolated.  
Group Selfie

Coming to ponds, let me inform you that there are a couple of water bodies up here, some are ponds, others are carved in rock and have dirty water accumulated in it.  

There are a couple of temples and caves in its premises. The temples are open to pubic but not the caves as it is under lock and key. 
Playing cards in a water tank atp Ankai Fort

We then decided to climb up to the top most point of the fort. There is no proper route to take you to the top. You need to make your own. As the saffron flags are there, Shilpa said that there has to be a way to climb up this place. We took a difficult and steep route up which took its toll on me. It was a 80 degree angle climb. I was the weakling here and so it took us time to reach the top. Finally after 35 minutes of struggle we were on top. Standing tall on the highest point of the fort. The view from here was amazing. we could see what was there on Ankai plateau and also on Tankai plateau. Remember Tankai is smaller in height in comparison to Ankai. 
Another monumnet on Ankai Fort

Strong winds were blowing here. It was midday but we were not feeling the heat due to the strong winds. We had snacks here and started discussing personal and work life experiences. Now I had this scary thought in my mind. It was a pain to climb up, no way I am going down the same way. We then located another way to descend. Now we saw four ways that came up. We had to make a choice on the easiest way down. 
Inside the monument premises on Ankai Fort

The time was now 01:10 PM. We went as per our instincts and took up another way down, and this was the easiest way, both for climbing and descending. Why did it not occur to us earlier. Aaaaahhhhhhh.   

From the Ankai Fort the Tankai Fort is clearly visible. Again it has a fortification and is only till the main entrance of the fort. And that is the one only entrance or door or Darwaza to the fort. Again Tankai Fort is also a plateau and is mostly barren. There are just two house like structures atop it along with a pond full of water. 


We then decided to descend the fort. Descending was equally difficult as it put extreme pressure on our thighs, knee and calves. Though there were steps, they were huge. 


We finally came to the meeting point of Ankai and Tankai fort. we dropped the plan of climbing Tankai fort as it was clearly visible from Ankai fort and headed back to the village.

Now the descend had started taking it's toll on our legs but we still managed to get down to the base village at 03:00 PM. 
Caves on Ankai Fort

Had refreshments here. Note there are couple of shops in the village which serve snacks and cold drinks. We then headed to the highway. As we needed to hitch hike to Manmad Station. 

After waiting for 15 minutes we got a shared rickshaw to take us to Manmad at a cost of Rs. 10 each. The distance from Manmad Station to Ankai Killa Station is around 8 KM.
View of Tankai Fort from Ankai Fort

We were hungry, had lunch in the form of chicken lollipop at a local roadside eatery and then headed off to Manmad station to book tickets for a super fast train to Mumbai.

Now the time was 04:20 PM on my watch. There are a couple of trains plying to Mumbai from here and we had to get on one of the trains to reach Mumbai. We started checking for train info to check as to which train would get us to Mumbai in the shortest possible time.   



We first boarded the RBL-PBH-LTT Express, as it arrived the moment we stepped on the platform. Later at Igatpuri we swapped trains. We boarded the Geetanjali Express. 

Now at Igatpuri station, additional engines are attached to trains so that they move smoothly across the ghats. Funny part is, both trains took off at the same time. Is this a race? We were hoping that we made the right decision to swap trains. Lucky stars. The Geetanjali Express was the first to cross the finishing line. 

We were again travelling in the unreserved compartment. The general was full and there was no place to stand, so we boarded the ladies unreserved compartment. There were many men there along with their families. Then we switched over to the disabled unreserved compartment in the Geetanjali Express. But what was worth seeing is that even though it is a coach meant for the disabled, it had a upper berth, it had abled people travelling in it and to top it, it had a huge toilet. A toilet that big I have not seen in the Rajdhani either. On our way back we travelled standees and sitting too.  
Me, Tankai Fort in the backdrop
  
We finally reached Dadar at 09:30 PM.


Geetanjali Express

It was a good trek as there were stairs all the way up and the climb was not difficult, except for the last bit. We did manage to conquer the Ankai fort and see the Tankai fort from it. Road transport and Rail transport were easy to find. We didn't end up wasting a lot of time on waiting for the mode of transport. Also we had taken ample food and water supply with us. Great company always makes the journey fun. Thanks Shilpa.

Shilpa and Me on the railway tracks

A big thankyou to Aashish too, gave me guidance for this trip on call and also via his blog. 

Happy Trekking :)

https://merwynsrucksack.blogspot.com/2015/01/ankai-and-tankai-forts-and-jain-caves.html?m=0

नाशिकच्या अंकाई किल्ल्यावर पैशाचं झाड; मनोकामना पुर्ण व्हावी यासाठी झाडाला ठोकतात पैसे | Navarashtra (नवराष्ट्र)

Navarashtra

Published: Jan 22, 2022 11:58 AM

Money tree on Ankai fort in Nashik; Money hits the tree to fulfill a wish

तुम्ही कधी पैशाचं झाड पाहिल आहे का? नाही ना आणि पैशाचा झाड असतं असं ऐकून नवलच वाटेल. मात्र हो येवला तालुक्यातील अंकाई  किल्ल्याच्या माथ्यावर एक पैशाचं झाड आहे. अंकाई किल्ल्यावर अनेक वर्षा पासूनचे एक पुरातन वडाचे वटवृक्ष असून या ठिकाणी येणारे भाविक श्रध्देपोटी या झाडाच्या आत आपली मनोकामना पुर्ण व्हावी म्हणून पैसे ठोकत असतात. मात्र, अंधश्रध्देपोटी या वटवृक्षाचे मोठ नुकसान झाल आहे(Money tree on Ankai fort in Nashik; Money hits the tree to fulfill a wish).

    नाशिक :  तुम्ही कधी पैशाचं झाड पाहिल आहे का? नाही ना आणि पैशाचा झाड असतं असं ऐकून नवलच वाटेल. मात्र हो येवला तालुक्यातील अंकाई  किल्ल्याच्या माथ्यावर एक पैशाचं झाड आहे. अंकाई किल्ल्यावर अनेक वर्षा पासूनचे एक पुरातन वडाचे वटवृक्ष असून या ठिकाणी येणारे भाविक श्रध्देपोटी या झाडाच्या आत आपली मनोकामना पुर्ण व्हावी म्हणून पैसे ठोकत असतात. मात्र, अंधश्रध्देपोटी या वटवृक्षाचे मोठ नुकसान झाल आहे(Money tree on Ankai fort in Nashik; Money hits the tree to fulfill a wish).

    त्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षां पासून येणारे ट्रॅकर्स पर्यावरण प्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारे अंधश्रध्देपोटी एका पुरातन वृक्षाचा ऱ्हास होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

    प्रभु श्रीरामचंद्र यांना चौदा वर्षाचा वनवास झाल्यानंतर ते या ठिकाणी अगस्तीमुनीच्या दर्शनासाठी आले होते. त्यामुळे अनकाई किल्ला हा पुर्वी पासून प्रसिध्द आहे. त्यामुळे श्रावणा व्यतिरिक्त या ठिकाणी अनेक भाविक दर्शनाला येत असतात.

    यावेळी पीर बाबाच्या दर्ग्याजवळील या वटवृक्षाला भेट देऊन आपली मनोकामना पुर्ण व्हावी म्हणून येथिल वटवृक्षाच्या खोडावर पैसे ठोकतात. ज्यामुळे या वटवृक्षाचे खोड जिर्ण झाले असले तरी त्याला पालवी फुटलेली आहे. मात्र, अंधश्रध्देपायी या वटवृक्ष नामशेष होतो की काय अशी भिती व्यक्त होत आहे.

    https://www.navarashtra.com/maharashtra/khandesh/nashik/money-tree-on-ankai-fort-in-nashik-money-hits-the-tree-to-fulfill-a-wish-nrvk-226113/




     Ankai Tankai Fort, Manmad

    मनमाड पासून अगदीच हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला.  चढायला अगदी सोपा आणि नयनरम्य देखावा असलेला ठिकाण.  किल्ल्याच नाव घेतल्यावर ब्यागा भरणारे आपले मित्र शकिल , सुरेश आणि राजेश. ठरवल होत एकदा जायचं हा किल्ला पाहायला आणि तो योग आलाच तोहि  १४ एप्रिल आणि १५ एप्रिल २०१२ ला.   किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी वर चढेपर्यंत पायरया आहेत. किल्ल्यावर पाहण्यासाठी एक मंदिर अगत्य्स ऋषींच, गुफा आहेत  आणि काही पाण्याची टाकी सुद्धा आहेत. एक राजवाडा सुद्धा आहे पडक्या अवस्थेतला . पायथ्याजवळ लेणी आहेत.   छान हवेशीर ठिकाण आहे एकदा   जाऊनच  या तुमिसुद्धा.

    अंकाई किल्ला ... एक छान दृश ... पायथ्यापासून  

    From Left Suresh, Shakeel and Rajesh.. Started climb


    किल्ल्याची भिंत किवा तटबंदी 


    मुख्य दरवाज्याजवळ  ... शकील 


    मी आणि सुरेश ... एका दरवाज्यात 

    किल्ल्यावर ...

    Tankai....


    अंकाई  किल्ल्यावर 


    राजवाड्यात शकील आणि राजेश 


    प्यायला पाणी काढताना मी 

    एक दरवाजा अंकाईचा ...


    अंकाई किल्ला पायथ्यापासून 

    शकील आणि राजेश ... आणि मागे उभा असलेला अंकाई किल्ला 




    सुरेश .. अंकाई किल्ल्याचा प्रवेशद्वारा जवळ 

    http://ranveda.blogspot.com/2012/04/ankai-tankai-fort-manmad.html



    मनसर

     प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...