Saturday, October 24, 2020

हेरगिरीचं अज्ञात जग.

 

'राजीव शर्मा' नावाच्या फ्री-लान्स पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीस दिल्ली पोलिसांनी, भारतीय सैन्यातील हालचालींनबाबत अत्यंत गोपनीय माहिती चीन च्या गुप्तहेर संघटनेशी संलग्न लोकांना देत असल्याच्या संशयावरून काल अटक केली. थोडक्यात राजीव शर्मा हा चीन चा भारतातील " गुप्तहेर" म्हणून कार्यरत आहे किंवा त्याच्यावर पोलिसांचा तसा किमान संशय/आरोप आहे. ह्या घटनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरु होईलच. भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील अत्यंत तणावग्रस्त परिस्थिती पहाता, भारतात हेरगिरी (espionage) करणाऱ्या देशद्रोह्यांचं हे एक मोठं जाळं चीननं विणलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय. मुळांतच कोणत्याही दोन शत्रू राष्ट्रांच्या दरम्यान आकाशात युद्धाचे काळे ढग जमू लागल्यावर हेरगिरीस उधाण येणार ह्यात नवीन काहीच नाही. परंतु ह्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसाचं कुतूहल जागं करणाऱ्या "हेरगिरी" ह्या विषया संदर्भात कधी काळी वाचनात/पाहण्यात आलेल्या उपलब्ध संदर्भांतून लिहिलेला हा एक लेख.

हेरगिरी हाच मुळी जगाच्या इतिहासात अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असलेला पेशा (Profession) आहे. अगदी इसवीसना पूर्वी साडेतीनशे वर्षं आधी सुद्धा, "राजसत्तेने, परराज्यात धर्म गुरूंच्या वेषात गुप्तहेर पेरून, शत्रू राज्यातील हालचालींची इत्यंभूत माहिती जमा करणे आणि युद्धाबाबत चे निर्णय घेणे" असे कौटिल्याचं राज्यशास्त्र सांगत. गोपनीय माहिती गोळा करणे, खोट्या अफवा पसरवणे, फितुरी निर्माण करणे ही ह्या प्राचीन/इतिहास कालीन गुप्त हेरांच्या प्रमुख जवाबदाऱ्या.

आधुनिक काळात राष्ट्रा-राष्ट्रात होत असलेल्या हेरगिरी मध्ये तंत्र (आणि तंत्रज्ञान) बदललेलं असलं तरी, हेरांच्या जवाबदार्यांच्या बाबतीत बदल झालेला नाही. हेरगिरीचं संबध विश्व् हे अत्यंत जटिल, क्लिष्ट, अविश्वासार्हतेच, आणि मुख्य म्हणजे प्रचंड जोखमीचं. खरा यशस्वी हेर तोच जो कधीच प्रकाशात येत नाही! निदान त्याची मोहीम सुरु असेस्तोपर्यंत तरी. कारण तो जर मोहिमेवर असेल हेर म्हणून परकीय मुलखात, आणि तो जर प्रकाशझोतात आला तर याचाच अर्थ मोहीम फसली. उदाहरणार्थ अर्थातच "राजीव शर्मा" भारता विरुद्ध चिन्यांसाठी साठी हेरगिरी करताना पकडला गेला आणि तो प्रकाशझोतात आला पण ती मोहीम मात्र चांगलीच फसली. ही गुप्तता इतकी असावी लागते, की कित्येक वेळेस हेरांच्या निकटवर्तीयांनी सुद्धा माहिती नसते की आपला हा जवळचा नातलग परदेशी सैन्याचा किंवा सरकारचा "हेर" आहे हे.

वर करणी हे विधान कितीही सिनेमॅटिक वाटत असलं तरी ते निर्विवाद पणे सत्य आहे. हेच पहा. भारताच्या "रिसर्च अँड ऍनालिसिस विंग" ह्या गुप्तहेर संस्थेने ( भारताच्या गुप्त हेर संस्थेस बरेच लोक "रॉ" ह्या संक्षिप्त वचनाने संबोधत असले तरी ते फारसं योग्य नाही. ह्या संस्थेला सरकार दफ्तारि 'आर. अँड ए. डब्लू.' असं म्हंटल जातं कारण ही गुप्तहेर संघटना अजिबात "रॉ" नाही चांगली धूर्त आणि तयारीची आणि आपल्या दोन्ही कपटी आणि कारस्थानी शत्रुंना पुरून उरणारी आहे ). तर ह्या आर. अँड ए. डब्लू. ने पाकिस्तानात १९७५ आपला एक हेर पेरला. पुढे १९७९ साली ह्या हेराने पाकिस्तान आर्मी मध्ये "मेजर" ह्या मोक्याच्या हुद्द्यावर नबी अहंमद शाकीर ह्या नावाने शिरकाव केला. आणि पुढील चार वर्षे हा भारतीय हेर भारताला पाकिस्तान च्या सैन्यातील महत्वाच्या हालचालींची सूचना देत असे १९८३ साला पर्यंत. "त्याने पाकिस्तानात 'अमानत' नावाच्या मुलीशी विवाह सुद्धा केला". ह्या गुप्त हेरास भारतीय गुप्तहेर संस्थेनं आणि प्रशासनातील काही मंडळींनी ह्या हेराची एकंदरच अनन्य साधारण कामगिरी पाहून त्याचं ब्लॅक टायगर हे पदवी वजा टोपण नांव सुद्धा दिलं होतं. ह्या हेराचं मूळ नाव रवींद्र कौशिक. पुढे हे नाव बरंच उशिरानं प्रकाशात आलं. झालं असं की दुसऱ्याच एका भारतीय हेराच्या चुकीमुळे तो पाकिस्तानी सैनिकांच्या कैदेत सापडला गेला आणि त्या दुसऱ्या हेरानं रवींद्र कौशिक चं नावं त्याची उलट तपासणी करणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्या पुढं उघड केलं, रवींद्र कौशिक पाकिस्तान सैनिकांच्या नजरेत आला आणि त्याला पकडलं गेलं आणि ही मोहीम संपुष्टात आली. सांगण्याचा मुद्दा हा की त्यांच्या बायकोला म्हणजे अमानतला सुद्धा आपला नवरा शत्रू देशातील गुप्त हेर आहे हे माहिती नव्हतं, एवढी गुप्तता एक यशस्वी हेर आपल्या अस्तित्वा संदर्भात पाळत असतो.

आत्यंतिक गुप्ततेचं पराकोटीचं उदाहरण म्हणजे "सहमत खान" ही भारताची अशीच एक अत्यंत यशस्वी गुप्तहेर. हे अर्थातच तिचं खरं नाव नाही. तिचं खरं नाव उघडकीस येऊ दिलं गेलं नाही. परंतु सहमत खान म्हणजे Calling Sehmat ह्या पुस्तकांवर आधारित "राज़ी" ह्या गाजलेल्या चित्रपटाची नायिका. INS विक्रांत ह्या भारतीय विमानवाहू नौकेस नष्ट करण्यासाठी म्हणून बंगालच्या उपसागरात खोल समुद्रात फिरत असलेल्या पाकिस्तानच्या 'गाझी' नावाच्या पाणबुडीस भारतीय सागरी क्षेपणास्त्राने जलसमाधी दिली आणि भारताचे होणारे प्रचंड मोठे नुकसान टळले आणि १९७१ च्या भारत आणि पाकिस्तान च्या युद्धास भारताच्या बाजूने प्रचंड कलाटणी मिळाली. सेहमत खान ही काश्मीर मधून लग्न करून पाकिस्तानातील आर्मी जनरल ह्या सेनेतील अत्यंत महत्वाच्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातच ह्या आर्मी जनरल ची सून म्हणून “सासरी” लग्न करून राहिली होती. म्हणजेच तिच्या सासरच्यांनाही पत्ता नव्हता की आपल्या घरात एक शत्रू सैन्याचा गुप्त हेर आपल्या बरोबर रहात आहे. आणि ती चक्क आपली सून आहे. ह्या एका सूनेचा वेष घेतलेल्या ह्या धाडशी भारतीय हेरा मुळे पाकिस्तानची एक संबंध पाणबुडी बंगालच्या उपसागरात (शब्दश:) रसातळाला जाऊन मिळाली.

हे झालं आपल्या भारताच्या शत्रू देशातील हेरगिरीविषयी. पण पाश्चात्य देशात हेरगिरी तर प्रचंड मोठया प्रमाणात आणि त्याहून कितीतरी गुप्त रीतीने केली गेली. मग त्यात फ्रांस मध्ये हेरगिरी करणारी स्वतःच स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतलेली आणि आयुष्यभर कृत्रिम रित्या बनवलेला एक पाय बसवून घेऊन हेरगिरीच्या जगात वावरणारी Virginia Hall ही अमेरिकेची अत्यंत धाडशी महिला गुप्त हेर असो किंवा वंशाने जर्मन असूनही इतर वंशातील कैद्यांच्या छळ करण्याच्या नाझिंच्या विकृती मनोवृत्ती मुळे नाझिंच्या बद्दल निर्माण झाल्यामुळे राजकीय घृणे मुळे जर्मनीच्या शत्रू राष्ट्रांना अत्यंत गोपनीय माहिती पुरवणारा Klauss Fuchs हा जर्मन अणू शास्त्रज्ञ् असो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर युरोपात हेरांचा चौफेर सुळसुळाट होता. आणि त्याविषयी कित्येक चित्रपट सुद्धा बनले आणि गाजले.

मुळात ह्या गुप्त हेरांची "हेर" म्हणून नेमणूक कशी केली जाते हे एक कधीच न उलगडणारं कोडं असतं. पण साधारण पणे हेरांची भरती आणि नेमणूक दोन वेगवेगळ्या प्रकारे आणि विविध स्तरांमध्ये केली जाते. मुळात कुणा धड धाकट व्यक्तीला "हेर बनायला म्हणून तयार करणं" हे वाटतं तितकं सोपं नाही. हेर म्हणून काम करणं आणि ते सुद्धा शत्रू देशात जाऊन आणि वेषांतर करून वर्षानुवर्षं तिथं राहून तिथली गुप्त माहिती आपल्या देशात पाठवणं हे (जेम्स बॉंड च्या ) सिनेमात दाखवतात तितकं सोपं मुळीच नाही. तो विस्तवाशी आणि जीवाशी खेळ असतो. पकडले गेले की शत्रूकडून ज्या क्रूर पद्धतीने ह्या हेरांचा मनोशारीरिक छळ केला जातो ते पाहता हेर म्हणून काम "करण्यास" एखाद्या व्यक्तीचा होकार मिळवणे ही तितकी सरळ साधी सोपी गोष्ट नाहीये.

इथे दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. हेर म्हणून काम करण्यास काही जण केवळ पैश्याच्या प्रलोभनाने होकार देतात. कारण हेर परदेशात शत्रू राज्यात एकाकी जरी काम करत असला तरी सुद्धा ती एक भूमिगत मानवी साखळी असते. आणि त्या साखळीत सर्व पातळ्यांवरचे ( शिक्षण, बौद्धिक क्षमता वगैरे ) उमेदवार असावे लागतात. अगदी साधे निरोप इकडून तिकडे करणारे इसम (कुरिअर) ते प्रचंड बौद्धिक कौशल्य / स्मरण शक्ती / दुसऱ्यावर छाप पाडणायची कला वगैरे असलेले लिंच पिन एजेंट्स.

पण मग हे हेर, ह्या गुप्त हेर संघटना शोधून आणतात कुठून? आता जर तुम्हाला निरोप आणि महत्वाच्या वस्तू (पासपोर्ट, हत्यारं, इलेक्ट्रॉनिक कंमूनिकेशन डिव्हायसेस वगैरे ) इकडून तिकडे नेणारे ऍजेंट्स हवे असतील तर कधी अगदी तुरुंगात जन्मठेप भोगत सडत पडलेल्या कैद्यांपासून ते बेरोजगार तरुणांपर्यंत, ज्यांना केवळ पैसे हे साधन पुरते अश्या लोकांना गाठले तरी काम भागते. पण जर तुम्हाला एखाद्या मोहिमेवर नजर आणि त्या संदर्भातील इत्यंभूत आणि ठोस माहिती गोळा करून ती त्याच्या हँडलर्स कडे पाठवणारा विश्वासू एजेंट नेमायचा असेल तर मग मात्र "आपल्या विचारसरणी (ideology) करिता" आणि "जाज्वल्य देशभक्ती" करीता हेरगिरी करणाऱ्या प्राण पणास लावणारे देशभक्त गाठावे लागतात (आणि कधी कधी देश भक्ती प्रमाणे "धर्मं" सुद्धा इथे मोठी भूमिका वठवू शकतो ). अर्थात दुसऱ्या प्रकारचे “हेर” म्हणजे देशभक्तीसाठी "हेरगिरी" करणारे हेर हे नक्कीच आदरास आणि सन्मानास प्राप्त आहेत. पण केवळ पैश्याच्या मोबदल्यात हेरगिरी करण्यास मान्य झालेल्या हेरां मध्ये आणि ideology किंवा देशभक्ती साठी हेरगिरी करणाऱ्या हेरांमध्ये जीवन/मरणाच्या जोखीमीचे प्रमाण मात्र अजिबात कमीजास्त नसते. फरक एवढाच राहतो की पैश्यांच्या प्रलोभनासाठी परकीय मुलुखात जाऊन आयुष्य पणाला लावण्यास तयार झालेले हेर जर पकडले गेले तर किंवा नाही जरी पकडले गेले तरी ( "विचार-सरणी" किंवा देशभक्ती च्या अभावी ) केवळ पैश्याच्या प्रलोभनामुळे हेरगिरीच्या पेशा स्वीकारल्या मुळे दोन्ही कडची माहिती गुप्त पणे दोन्ही राष्ट्रांना देऊन शत्रू साठी सुद्धा काम करायला तयार होण्याचा धोका असतो. अश्या हेरांना "डबल एजंट" असं संबोधलं जातं. देशभक्त आणि तत्वनिष्ठे साठी हेरगिरी करण्यास तयार असलेल्या गुप्तहेरां मध्ये हा धोका नसतो. (किंवा नगण्य असतो). प्रत्येकी एका classified information करिता चायनीज हँडलर्स कडून ५०० ते १००० अमेरिकन डॉलर घेणारा हा काल दिल्ली पोलिसांनी पकडला गेलेला राजीव शर्मा अश्याच केवळ पैश्याच्या प्रलोभनापोटी शत्रू देशा साठी काम एक करणारा देशद्रोही हेर. त्याला आयडियॉलॉजि किंवा विचार सरणी ह्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. आणि असलाच संबंध त्याचा "चायनीज communism च्या आयडियॉलॉजि शी तरी त्यामुळे त्याचा हा देशद्रोहाचा गुन्हा (आणि मुख्य म्हणजे जन्म भूमीशी प्रतारणा केल्याचं पाप) यत्किंचितही कमी होत नाही.

"केम्ब्रिज स्पाय रिंग" हा असाच १९३० साला पासून ते दुसरं महयुद्ध संपून पुढे १९५० सालापर्यंत, ब्रिटन मध्ये कार्यरत असलेला सोव्हियेतच्या के जी बी ह्या गुप्तहेर संघटने साठी हेरगिरीचं काम करत असणारा एक पाच हेरांचा समूह. डोनाल्ड मॅक्लीन, गाय बर्जेस, अँथनी ब्लांट, हेरॉल्ड किम फिल्बी आणि जॉन केर्नक्रॉस हे ते पांच चाणाक्ष हेर. ह्या पाचही जणांचा "जगाच्या कल्याणासाठी सोव्हियेत कम्युनिझम, मार्क्सवाद हेच विचारप्रवाह योग्य आहेत" असा ठाम विश्वास होता. दुसऱ्या महायुद्धात ह्या संघटित हेरांनी प्रचंड माहिती सोवियेत च्या KGB ला दिली. त्यातील हेरॉल्ड किम फिलबी हा डबल एजन्ट होता असं नंतर बरेच उशिरा उघडकीस आलं.

हेरगिरी हा वर म्हंटल्या प्रमाणे जसा ऐतिहासिक आणि प्राचीन असा पेशा आहे तसाच तो पुढील हजारो वर्षे सुरूच राहणार. हेरांमुळे कित्येक युद्धाची पारडी पलटली तर कित्येक युद्धे टळली सुद्धा, आणि पर्यायाने जीवितहानी सुद्धा. फक्त ह्या हेरगिरीचा चेहरा मात्र झपाट्याने बदलतोय. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता वापरून हेरगिरी जशी इतके वर्षं सुरूच आहे तशीच आता कृतरीम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वापरून हेरगिरी केली जाणार, किंबहुना ती सुरु झालेली आहे/असावी, अति प्रगत राष्ट्रांच्या कडून. मग त्यात कॉम्पुटर प्रोग्रामिंग करून शत्रू देशातील classified इन्फॉर्मशन संकलित करून त्याचं पृथथकरण करणं आलं किंवा उपग्रह आणि Unmanned Aerial Vehicles (UAVs) म्हणजेच ड्रोन चा वापर करून शत्रुदेशात सीमेवर हेरगिरी किंवा टेहळणी करणं आलं. हे कितीही खरं असलं तरी सुद्धा नैसर्गिक मनुष्य बुद्धीची हेरगिरीसाठी लागणारी गरज मात्र कायमच राहणार.

एकंदरच, भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करण्यात धन्यता मानणारी पाकिस्तानची कुख्यात आय.एस.आय. असो अथवा जर्मनीतील म्युनिक मधील ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशातील निरपराध खेळाडूंना ओलीस धरून ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांना, परदेशात जाऊन पुढे तीस वर्षं सतत शोधून टिपून टिपून ठार मारणाऱ्या इस्त्रायल ची जगतविख्यात मोसाद ही गुप्तचर संघटना असो. झालंच तर ज्या अमेरिकेच्या सी. आय. ए. ने सोविएत विरुद्ध उभा केलेला लादेन नावाचा राक्षस, शेवटी अमेरिकेच्याच जीवावर उठल्यावर मात्र त्याला पाकिस्तानच्या आबोटाबाद मधून शोधून काढणारी गुप्तचर संस्था सुद्धा सी. आय. ए. च होती. आधुनिक जगाच्या इतिहासात गुप्तहेरांचे काम हे अनन्यसाधारण महत्वाचे राहणार हे निश्चित. आणि त्यातले बरेचसे गुप्तहेर हे कधीच प्रकाशात न येता अज्ञात खोल अंधाऱ्या कृष्णविवरात काळाच्या अलिखित इतिहासाच्या पडद्याआड दडून राहणार - हे ही एक शाश्वत सत्य.

चारुदत्त रामतीर्थकर
२० सप्टें. २०२० (पुणे)

 हेराला तो जिथे हेरगिरी करतो आहे तिथे सापडल्यास तुरुंगात कश्या प्रकारे ट्रीट करावे,करू नये,शारीरिक छळावर मर्यादा याचे काही नियम आहेत का? <<<<

हेरगिरी करण्यासाठी शत्रू देशात पाठवलेले हेर पकडले गेल्यावर, त्यांच्यावर 'त्या' 'त्या' देशातील न्यायालयीन प्रक्रिये प्रमाणे आणि तेथील कायद्याप्रमाणे खटला चालतो. पकडल्या गेलेल्या परदेशी नागरिकांवर जागतिक मानवाधिकार परिषदे च्या मूल्यांना अनुसरून आणि आंतरराष्ट्रीय करारांनुसारच सर्व कायदेशीर प्रक्रिया केली गेली पाहिजेअसे नियम आहेत , परंतु बहुतेक वेळेस ते फक्त कागदावरच उरतात प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. हेर आणि डिप्लोमॅट किंवा राजदूत ह्यांच्यात मूलभूत फरक असा की राजदूत हे नेहमी सरकारी नोकर असतात. परंतु हेर हा बहुदा सरकारी नोकर नसतो तो फक्त एक "एजेंट" असतो. त्यामुळे त्याला ज्या देशाच्या गुप्तहेर संघटनेनं पाठवलं आहे त्या गुप्त हेर संघटनेने त्या हेराशी "आपला काहीच संबंध नाही!" असा का एकदा पवित्रा घेतला ( Denial Strategy ) तर मात्र हेर त्या देशात एकाकी पडतो.

रवींद्र कौशिक शी आपला काहीच संबंध नाही असा पवित्रा भारतानं घेतला ( कारणं वेगवेगळी असू शकतील - ते योग्य की अयोग्य आणि नैतिक की अनैतिक हा वादाचा आणि आणि चर्चेचा मुद्दा निश्चितच आहे ). परंतु अलीकडेच भूषण जाधव ह्यांची पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपांखाली धरपकड झाली तेंव्हा मात्र भारत सरकारने हा खटला आंतर राष्ट्रीय न्यायालयीन पातळीवर लढवत भूषण जाधव ह्यांचा हेरगिरीशी काही संबंध नाही आणि त्यांच्यावर ठेवलेलं आरोप चुकीचे आहेत अशी ठोस भूमिका घेतली आहे. पुढे हा खटला न्यायालयीन पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय वळण घेतो हे पाहणं नक्कीच चित्तवेधक असेल.

सरबजीत सिंग ह्याच्या बाबतीत सुद्धा ( तो हेर होता की नाही , हा पुन्हा वादाचा विषय ) तो तुरुंगात पाकिस्तानच्या शिक्षा भोगत असताना आजारी पडला आणि आणि उपचाराविना अक्षरश: खितपत पडलेला असताना, त्याच्या विषयी कणव असलेल्या भारतीय (सरकारी / गैर-सरकारी) संस्थांनी, अंतर-राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या मदतीने त्याच्यावर उपचार व्हावा म्हणून औषधे पोचवण्याचा प्रयत्न केला पण ती औषधे त्याच्या पर्यंत पोचली का नाही हे शेवट पर्यंत कुणालाच माहिती नाही.

तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात, "नाही"! मानवाधिकार संघटनेनं दिलेल्या संरक्षणा व्यतिरिक्त ( आणि त्याचं पदोपदी उल्लंघन होत असल्यामुळे , त्याला काहीच अर्थ नसल्यामुळे ) डिप्लोमॅट्स किंवा युद्धकैदी ( प्रिझनर ऑफ वॉर्स ) ह्या सरकारी नोकरांना ज्या प्रमाणे जिनेव्हा कराराच्या अंतर्गत "डिप्लोमॅटिक इम्युनिटी" असते तशी कोणतेही विशेष "न्यायालयीन संरक्षण" हेरांना पकडले गेल्यावर मिळत नाही. त्या त्या भूमीच्या संविधान आणि कायद्याप्रमाणे ( आणि मुख्यत्वे राजकीय संस्कृती प्रमाणे ) त्यांना वागणूक दिली जाते. (दुर्दैवाने बहुदा अमानुषच).

मला वाटतं की, मी माझ्या परीने तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण मा.बो. वर कुणी ह्या विषयाचे अंतर-राष्ट्रीय कायद्याचा अभ्यास असलेले वाचक असतील तर ते ह्या तुमच्या प्रश्नावर अधिक समर्पक आणि सखोल तसेच कायदेशीर भाषेत उत्तर देऊ शकतील.

लेख चांगला आहे. जगातील आजवरच्या गाजलेल्या गुप्तहेरांबाबत माहिती दिली आहे. गुप्तहेरांबाबत आणि त्यांनी केलेल्या अथवा त्यांच्याबाबत होणाऱ्या गोष्टी एकंदरच कितपत नैतिक/अनैतिक हा वादाचा आणि आणि चर्चेचा मुद्दा होईल. कारण ते क्षेत्रच तसे आहे.

नोव्हेंबर २००६ मध्ये अलेक्झांडर लीत्वीनेन्को नावाच्या KGB/FSB या रशियन गुप्तचर संस्थांमधल्या माजी अधिकाऱ्याच्या ब्रिटन मध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने खून झाला होता व त्यामुळे ती घटना जगभर गाजली होती. लीत्वीनेन्को हा रशियामध्ये पूतीन यांच्या कट्टर राजकीय विरोधकांसाठी काम करत होता. पुतीन सत्तेत आल्यावर त्याने पळून जाऊन ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. काही वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर २००६ मध्ये रशियातून आलेल्या दोन व्यक्तींनी पोलोनियम२१० या अत्यंत घातकी विषारी किरणोत्सर्गी पदार्थाचा अत्यंत सूक्ष्म कण चहाच्या कपात टाकून त्याची हत्या केली होती. (पोलोनियम२१० हे सायनाईडच्या २५० अब्ज पटीने विषारी असते. एक ग्रॅम पोलोनियम२१० मुळे पाच कोटी लोक मरू शकतात व तितकेच आजारी पडू शकतात) हा कण इतका सूक्ष्म होता कि या दोन व्यक्ती पुन्हा रशियाला परत निघून गेल्या व त्यानंतर कित्येक दिवसांनी लीत्वीनेन्को आजारी पडून वेदनादायक अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.

लीत्वीनेन्को ने पूर्वी KGB/FSB साठी काम केल्याने त्याच्याकडे बरीच महत्वाची माहिती होती. व तो ती ब्रिटीश गुप्तचर संस्थाना पुरवत असल्याच्या पुतीन यांना संशय होता. त्यातून पुतीन यांनीच या दोन व्यक्तींना ब्रिटन मध्ये पाठवून त्याची हत्या करवली असल्याचा दाट संशय व आरोप स्वत: लीत्वीनेन्कोने मृत्युशय्येवर असताना केला होता.

 atulpatil : तुम्ही दिलेली बरीचशी माहिती मी वर दिलेल्या लिंक्स मधून wikipedia वर वाचतोय , खूपंच धक्कादायक तरीही रोचक आहे.

पोलोनियम बद्दल मात्र खरं आहे, खूप कमी प्रमाणात हे विष प्रचंड बाधक आणि जीवघेणं असल्यामुळे ह्याचा वापर सायनाईड पेक्षाही घातक आहे. पोलोनियम बद्दल प्रथम कळलं ते "सुनंदा पुष्कर" च्या केस मुळे , सुनंदा पुष्कर चा खून पोलोनियमचा वापर करून विषप्रयोग केल्यामुळे झाला असा एक संशय आहे त्या खुनाचा तपास करणाऱ्यांना , अर्थात ह्याचा हेरगिरीच्या विषयाशी संबंध नाही , पण पोलोनियम किंवा सायनाईड सारखे विष मात्र हे फक्त "हायप्रोफाईल" लोकांनाच हस्तगत करता येते हे ही तितकेच सत्य.

 भारताने बाहेरदेशी केलेल्या हेरगिरी सारखे इतर देशांनी भारतात केलेली हेरगिरी सुध्दा बघा.
मद्रास केफे मूवी मधे बालकृष्णन हे केरेक्टर के व्ही उन्नीकृष्णन या खऱ्या रॉ ऑफिसर वर घेतले आहे. त्याला सी आय ए ने सुंदर स्त्रीचा वापर करून जाळ्यात पकडले. त्याचा वापर करून घेतला. नंतर तो पकडला गेला.
रविंदर सिंग हा सुध्दा रॉ मधे सी आय ए साठी हेरगिरी करत होता. त्याच्यावर संशय येऊन आय बी ने पाळत ठेवली तेव्हा रातोरात सी आय ए ने त्याला अमेरिकेत पळवून नेले. हे सगळे घडुन सुध्दा तेव्हाच्या भारत सरकारने याचा मोठा इश्यू का केला नाही याची कारणे आहेत. एक म्हणजे तेव्हाचे परराष्ट्र राजकारण. काँडी राईस यांच्या भारत फेरीच्या जस्ट आधी हे प्रकरण झाले. सरकारला त्या व्हिजिट वर कुठले मळभ नको होते. अजुन एक संभावित कारण म्हणजे रॉ ला तो नको असणे कारण त्याला पाळतीची टीप कोणी दिली हे कळेल आणि त्यातुन अजुन भानगडी निघतील.
रवी नायर या रॉ ऑफिसरला चीनने जाळ्यात पकडले - मेथड सुंदर स्त्री. सेम गोष्ट मनमोहन शर्माची. त्याला त्याच्या चायनीज भाषा शिकवणाऱ्या शिक्षिकेने हनी ट्रॅप केले. रतन सहगल या आय बी च्या काउंटर इंटेलिजन्स च्या खुद्द बॉसलाच एका स्त्री सी आय ए हेराने जाळ्यात पकडले. त्याना तर पालम विमानतळाच्या रन वे जवळ पार्क केलेल्या गाडीतून खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो अवस्थेत पकडले. अमेरिकेन डिप्लोमॅट रेबेका मिंच्यु हिने भारताच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल च्या एका ऑफिसरला जाळ्यात घेतले. तो पकडला गेला.
रॉ च्या अधिकाऱ्यांना फितवण्याचा एक ओब्व्हीयस पॅटर्न दिसतोय

 

 

 

 

Monday, September 14, 2020

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील दख्खन पठारावरील व गोदावरी नदीखोऱ्यातील एक जिल्हा. क्षेत्रफल १२,४८९ चौ. किमी. विस्तार १८° ५८’ उ. ते २०° २’ उ. व ७६° ४’ पू. ते ७७° ४२’ पू. याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा (सु. १६०·९३ किमी.) व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी (सु. ६४·३७ किमी.) या नद्या वाहतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे.
Parbhani District Information in Marathi

 जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो.
 
शासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे सेलू (सै़लू) व हिंगोली असे दोन विभाग केले आहेत. सेलूमध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी आणि परतुर हे तालुके व हिंगोलीमध्ये हिंगोली, वसमत (बसमथ), कळमनुरी व जिंतूर हे तालुके येतात. परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. परभणी जिल्हयाच्या पुर्वेला अजिंठा पर्वतरांगा (जिंतुर तालुक्यातुन जातात) आणि दक्षिणेकडे बालाघाटच्या पर्वतरांगा दिसुन येतात.
     गोदावरी ही जिल्‍ह्यातील  प्रमुख नदी आहे. ती पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी, गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्‍यातून पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे नांदेड जिल्‍ह्यात प्रवेश करते. जिल्‍ह्याच्‍या वायव्‍येकडील मध्‍य भागातून पूर्णा नदी व तिच्‍या उपनद्या करपरा, दुधना वाहत जातात. सेलू व जिंतूर तालुक्‍याचा काही भाग दुधना नदीच्‍या खो-यात येतो. जिल्‍ह्यातील लोकांचा प्रमुख व्‍यवसाय शेती आहे.
     परभणी हा जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानच्‍या मराठवाडा विभागातील  पाच जिल्‍हयांपैकी एक जिल्‍हा होता. या जिल्‍ह्याचा उल्‍लेख  'प्रभावती' ह्या नावानेही केल्‍याचे आढळून येते. मराठवाड्याच्‍या इतिहासात परभणीची परंपरा फार जुनी असून ती अश्‍म युगापर्यंत पोहोचते. प्राचीन भारताच्‍या इतिहासात अश्‍मयुगात गोदावरीच्‍या खो-यातील प्रदेशाची फार भरभराट झाली असावी, असा संशोधकांचा तर्क आहे. अशोकाच्‍या दक्षिणेतील स्‍वारीने परभणीच्‍या विकासाला साह्य केले. हा भाग काही वर्षे देवगिरी येथील यादवांच्‍या अधिपत्‍याखाली होता. चौदाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीस अल्‍लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केल्‍यानंतर परभणीचा परिसर त्‍याच्‍या ताब्‍यात गेला. महंमद तघलकाच्‍या मृत्‍यूनंतर  हैद्राबादचे स्‍वतंत्र राज्‍य अस्‍तित्‍वात येईपर्यंत परभणी हे मोगल साम्राज्‍याचे अंग होते.
        इसवी सनापूर्वी सातवाहनांच्‍या काळात गोदातीरी  महाराष्‍ट्र सारस्‍वत आणि संस्‍कृती यांचा जो उद्गम झाला, त्‍याचा वारसा परभणी जिल्‍हयाला लाभला होता. महर्षी अगस्‍तीच्‍या दक्षिण दिग्‍विजयाने या जिल्‍ह्यात विविध तीर्थे  निर्माण केली आहेत. पौगंड, पोलस्‍व यासारखे  तपोधन, गोरख, गैबी आणि गहिनीनाथ यासारख्‍या श्रेष्‍ठ नाथपंथियांनी जिल्‍हयात वास्‍तव्‍य व साधना केल्‍याचे उल्‍लेख धर्मग्रंथात आहेत. परभणी जिल्‍हा संत-महंताची भूमी आहे. जिल्‍ह्यात बरीच धार्मिक स्‍थळे आहेत. जिल्‍ह्याला प्रदीर्घ परंपरा असल्‍याने अनेक ऐतिहासिक स्‍थळेही आहेत.
PARBHANI DIVISION bus stand depot contact number
Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
Office
20 Divisional Controller Parbhani, 02452 223127/ 234148 dcstparbhani@gmail.com
1 Divisional.Traffic Officer Parbhani Division, 02452 220422
2 Divisional. Accounts Officer Parbhani Division 02452 220482
3 Divisional. Personnel Officer Parbhani Division 02452 220460
4 Labour Officer Parbhani Division 02452 220460
1 Depot Manager Parbhani bus stand depot contact number 02452 223337
2 Depot Manager Jintur bus stand depot contact number 02457 220036
3 Depot Manager Kalmanuri bus stand depot contact number 02455 220049
4 Depot Manager Hingoli bus stand depot contact number 02456 221784
5 Depot Manager Gangakhed bus stand depot contact number 02453 222322
6 Depot Manager Pathari bus stand depot contact number 02451 255346
7 Depot Manager Basmat bus stand depot contact number 02454 220159

 परभणी जिल्हा पर्यटन:-

    प्रभावती नगरी अर्थात परभणी जिल्हा म्हणजे संत परंपरा, पौराणिक देऊळे आणि गोदावारीच्या तिरावरचा निसर्गरम्य परिसर या अनोख्या भ्रमंतीची परवणीच! शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे. तर संत नामदेव महाराज (नर्सी) आणि संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील! येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ आहे. शेतीविषयी निरनिराळी संशोधने व प्रयोग येथे केले जातात. १८ मे १९७२ रोजी या कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. येथे आकाशवाणी केंद्र आहे. दूरदर्शनचे प्रक्षेपण केंद्र आहे. दूध डेअरी, सूतगिरणी, तेल गिरणी आहे. सय्यद शहा तुराबुल हक्क हा दर्गा असून त्याचा उरूसही येथे मोठ्या उत्साहात भरतो. त्याचबरोबर खंडोबाची यात्राही येथे भरते. येथील पारदेश्वर मंदिर भव्य व प्रेक्षणीय आहे. शुभ्र अशा पाऱ्यापासून निर्मीत शिवलिंग दर्शनासाठी भाविक पारदेश्वराला मोठ्या भक्तिभावाने भेट देतात! महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजनासाठी अगदी प्रातःकालापासूनच भक्त मोठ्या संखेने उपस्थित असतात.
 
जिल्‍ह्यातील पाथरी हे शिर्डीचे साईबाबा यांचे जन्‍मस्‍थान आहे. पाथरीचे ऐतिहासिक श्रेष्‍ठत्‍व सिध्‍द करणारा ताम्रपटही प्रसिध्‍द आहे. राक्षसभुवनच्‍या समरप्रसंगी  गोदावरीच्‍या किनारी  निजामाचा पराभव केल्‍यानंतर त्‍याचा समूळ नायनाट करण्‍यासाठी थोरले माधवराव पेशवे हे त्‍याच्‍या मागे लागले होते. त्‍यावेळी त्‍यांनी पाथरीस तळ दिला होता.
             पाथरीपासून 24 कि.मी. अंतरावर गोदावरीच्‍या काठी मुदगल हे तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री मुदगलेश्‍वरांचे मंदिर व स्‍वामी ऋषिकेशानंद महाराज यांची समाधी आहे.
                  संत जनाबाई ह्या संत नामदेवाच्‍या परमभक्‍त होत्‍या. संत जनाबाईंचे जन्‍मगाव गंगाखेड असून येथील राजेंद्र पेठेत त्‍यांचा जन्‍म झाला. गंगाखेड येथे संत जनाबाईंचे स्‍मारक बांधण्‍यात आले आहे. अठराव्‍या शतकाच्‍या उत्‍तरार्धात आंनदराज स्‍वामी महाराज यांनी गोदावरी नदीच्‍या दक्षिण किना-यास येथे बालाजी मंदिर बांधले आहे. गंगाखेड पासून 18 कि.मी. अंतरावर राणीसावरगाव येथे रेणुकादेवीचे भव्‍य हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून मूळ पीठाची स्‍थापना भगवान परशुराम यांनी केली असावी, अशी आख्‍यायिका आहे. मुख्‍य  गाभा-यात रेणुकादेवीची सुमारे 4 फूट उंचीची मूर्ती आहे. देवीच्‍या उजव्‍या बाजूस परशुरामाचे स्‍थान आहे. राणीसावरगाव येथे रेणुकादेवीच्‍या मुख्‍य मंदिरात नवरात्रात 10 दिवस व चैत्र पौर्णिमेनंतर 10 दिवस मोठे उत्‍सव साजरे केले जातात. 
            परभणीपासून 12 कि.मी. अंतरावर पूर्वेस श्रीक्षेत्र त्रिधारा वसलेले आहे. 3 नद्यांच्‍या संगमामुळे या क्षेत्रास त्रिधारा क्षेत्र असे म्‍हणतात. नद्यांच्‍या संगमावर ओंकारेश्‍वर, दत्‍तात्रेय, दुर्गाभागवती देवी आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. देवीजवळ एक सुंदर गोमुख बांधण्‍यात आलेले आहे. जवळच नदीकाठी उंबराच्‍या झाडाखाली दत्‍तात्रेयाची मूर्ती स्‍थापन केली आहे. गावात मारुतीचे दक्षिणाभिमुख  एक देऊळ आहे.
            परभणीपासून दक्षिणेस 19 कि.मी. अंतरावर पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर आहे. या मंदिरात डाव्‍या बाजूस तीन फूट ऊंचीची नृसिंहाची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचे आवरण घातलेले आहे तसेच चांदीचे नक्षीकाम केलेली  प्रभावळ आहे. मंदिराच्‍या मूळ गाभा-याचा जीर्णोद्वार करण्‍यात आला आहे. वैशाख शुध्‍द पौर्णिमेला नृसिंहाची यात्रा भरते.
            जिंतूरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले चारठाणा अथवा चारुक्षेत्र हे गाव  ऐतिहासिकदृष्‍ट्या अतिशय महत्‍त्‍वाचे आहे. चारठाणा या संपूर्ण दगडी बांधणीच्‍या यादवकालीन शिल्‍पकलेने नटलेल्‍या गावास हेमाडपंथी स्‍थापत्‍यकलेच्‍या दृष्‍टीने अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. येथील झुलता स्‍तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. हा स्‍तंभ गावाचे वैभव आहे.
जिंतूर या नावाने ओळखले जाणारे गाव हे पूर्वीचे जैनपूर होय. हे गाव एक प्रकारे जैनांच्‍या गत इतिहासाची साक्षच होय. येथील कोरीव गुंफा अतिशय अप्रतिम व प्रेक्षणीय आहेत.  जिंतूरजवळ डोंगरावर नेमगिरी क्षेत्र आहे. येथील डोंगरावर सात गुंफा असून मध्‍यभागी दिगंबर जैन सांप्रदायाचे 22 वे तीर्थंकर श्री भगवान नेमिनाथ यांची अति प्राचीन व भव्‍य मूर्ती जैन मंदिरात पद्मासनात आहे. त्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूस भगवान शांतीनाथ आणि भगवान पार्श्‍वनाथ यांच्‍या सहाफूट उंचीच्‍या प्रतिमा आहेत. बाकी इतर गुंफामधून भगवान आदिनाथ, बाहुबली व नंदीश्‍वरांच्‍या प्रतिमा विराजमान आहेत. दरवर्षी येथे यात्रा भरते  व रथोत्‍सव साजरा केला जातो.
पालम तालुक्‍यात गोदावरीच्‍या पात्रात जांभूळ बेट आहे.  तेथे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे­. बेटावर जांभळाची मोठ्या प्रमाणावर झाडे असल्‍याने त्‍यास जांभूळबेट  असे नाव पडले.
    जिंतूरपासून उत्‍तरेस 15 कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्‍या काठावर येलदरी हे गाव असून तेथे मातीचे मोठे धरण बांधण्‍यात आले आहे. या धरणावर जलविद्युत प्रकल्‍प उभारण्‍यात आला आहे.
 श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर – Shri Mrityunjay Pardeshwar Mahadev Temple                                                      
     परभणी येथे भारतातील सर्वात मोठे श्रीमृत्‍युंजय पारदेश्‍वर महादेव शिवलिंग मंदीर आहे. हे पारदेश्‍वर मंदिर परमपूज्‍य सद्गुरु महामंडलेश्‍वर श्री सच्‍चिदानंद सरस्‍वती महाराज यांनी  उभे केले आहे. हे शिवलिंग 250 किलो पा-याचे आहे.परभणी शहरात पारदेश्वर या 80 फुट उंचीच्या भव्य मंदिराचे आपण दर्शन घेउ शकतो.
श्री पारदेश्वर मंदीर परभणी
श्री मृत्युंजय पारदेश्वर मंदीर परभणी

श्री पारदेश्वर मंदीर प्रवेशद्वार
पारदेश्वर मंदीर प्रवेशद्वार

श्री पारदेश्वर मंदीर अंतर्गत दृश्य
श्री पारदेश्वर मंदीर मधे
     भारतातील मोठया शिवलिंगांपैकी हे एक शिवलिंग असुन हजारो भाविक या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता येतात. या शिवलिंगाला ’तेजोलिंग’ देखील म्हणतात आणि याला 12 ज्योर्तिलिंगा इतकेच महत्वाचे मानले जाते. 
मुद्गलेश्वर महादेव मंदिर – Mudgaleshwar Temple                                                           
   
परभणी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणजे भगवान मुदगलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक मंदिर आहे. गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध महादेवाचे मंदिर उभारले आहे. अहिल्यादेवी होळकरांनी 250 वर्षांपुर्वी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या मंदिराविषयी माहिती घेत असतांना हे मंदिर सुमारे 900 वर्षापुर्वीचे असल्याचे या ठिकाणी असलेल्या शिलालेखावरून लक्षात येते. या परिसरात तीन मुख्य मंदिर आहेत. तीन मंदिरांपैकी भगवान नरसिंहाचे मंदीर नदीच्या किनार्‍यावर आहे. गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे भगवान नरसिंह (मुदगलेश्वर) आणि इतर एक म्हणजे भगवान गणेशाचे (मुदगल गणेश) आहे. लोक गोदावरी नदीत स्नान करतात. मुगळेश्वर दर्शनसाठी प्रत्येक महाशिवरात्रीला बरेच भक्त येतात. मंदिरात साजरा केला जाणारा आरती भोवतालच्या आणि सभोवतालच्या परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारी आहे
पावसाळयात तर हे मंदिर काही महिने पाण्याखालीच असते, या ठिकाणी नारायण नागबळी आणि सुखशांती करता पुजाअर्चा देखील केल्या जातात.
मुख्य प्रवेश
मुद्गल पुराणात या ठिकाणचा उल्लेख सापडतो याला देवभुमी देखील म्हंटल्या गेले आहे. या ठिकाणी दर्शनाकरता येण्याचा योग्य कालावधी एप्रील ते जुन हा आहे. भगवान शंकरा व्यतिरीक्त नृसिंहाचे आणि श्री गणेशाचे देखील मंदिर या ठिकाणी आहे.

सय्यद शाह तुराबुल हक दर्गा :-

 उरुस किंवा जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर चित्रं उभं राहतं आकर्षक रोषणाई, गगनचुंबी आकाशपाळणे, मौत का कुवाँ या सारख्या मनोरंजक घटकांचं!  हजरत सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) यांचा अनेक वर्षांची परंपरा असणारा  उरुस 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होतो. असंख्य भाविक आत्मिक शांती आणि मनोबल प्राप्तीसाठी सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना श्रध्देनं तुरतपीर बाबा म्हणूनही ओळखतात.  तुरतपीर म्हणजे भक्तांचं दु:ख तात्काळ, तुरंत दूर करणारे पीर! सय्यद शाह तुराबुल हक (रहे.) हे सुफी पंथाचे मुस्लीम साधू  समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होते. समर्थांच्या जांब या जन्मगावी जात असतांना त्यांचं इथं देहावसान झालं.  सय्यद शाह तुराबुल हक यांनी समर्थ रामदास स्वामींच्यादासबोधया ग्रंथाचं उर्दूत भाषांतर  केलं आहे.  मनाच्या श्लोकांना उर्दूत  मनसमझावनअसं नांव देण्यात आलं आहे. राज्यातूनच नव्हे तर  इतर राज्यातूनही सय्यद शाह तुराबुल हक यांच्या  दर्शनासाठी नियमितपणं येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  उरसाच्या आयोजनात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तिंचा सहभाग असतो.  विशेष म्हणजे जिल्हाधिकारी संदलची थाळी डोक्यावर घेऊन उरसाचं प्रतीकात्मक उद्घाटन करतात.  जिल्हा प्रशासनाच्यावतीनं  दरवर्षी उरसानिमित्त 2 फेब्रुवारीस स्थानिक सुट्टीही जाहीर केली जाते.या दग्र्याची लोकप्रीयता एवढी आहे की याला महाराष्ट्रातील अजमेर शरीफ देखील म्हंटल्या जातं.
मशीदचे प्रवेशद्वार
            राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि सर्वधर्म समभाव जपणा-या या उरसात सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धांचंही आयोजन मोठ्या उत्साहात होतं.    उरसानिमित्त सर्कस, गगनचुंबी आकाशपाळणे, चक्रीपाळणे, टोराटोरा, नावाट्वीस्टर, ड्रॅगन रेल्वे, जादूचे प्रयोग, भूतबंगला, मौत का कुव्वा या मनोरंजक बाबींसह विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आलेले असतात. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या मीनाबाजारमध्ये  संसारोपयोगी साहित्य, खेळणी आणि सौदर्य प्रसाधनांची रेलचेल असते.
श्रीक्षेत्र त्रिधारा
परभणीहून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेले त्रिधारा हे एक निसर्गरम्य क्षेत्र असून येथील गोदावरी, नर्मदा आणि पूर्णा या तीन नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणास त्रिधारा हे नाव पडले आहे. खडकांमधून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट, रंगीबेरंगी वैविध्यपूर्ण पक्षांचा किलबिलाट आणि हिरव्या गर्द झाडीतून दिनकराचा उदयास्त परभणीची सहल अधिक विहंगम करते!
नवागड
त्रिधारेपासून उखळदकडे जातानाचे जैन अतिशयक्षेत्र नवागड तेथील निसर्गरम्य परिसर आणि भव्य, शांत आणि निरामय मंदिरासाठी ओळखले जाते.
श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदीर नवागढ हे भगवान नेमिनाथच्या प्राचीन आणि कलात्मक मूर्तीने प्रसिद्ध आहे.पुर्वी हे ठिकाण उखळद गावात वसलेले होते, जे पूर्णा नदीच्या काठावरुन सुमारे 2 किमी अंतरावर आहे. १९३१ साली नवागढ येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिरासाठी 10 एकर जमीन निजाम सरकारने ताबडतोब दिली.
नवागढचे मंदिर अतिशय कलात्मक, विशाल आणि अतिशय उच्च शिखराचे आहे. या मंदिरातील भगवान देवगिरीची मुख्य देवता पद्मासनात असुन, अत्यंत सुंदर 3.5 फूट उंच काळ्या रंगाची आणि चमत्कारी मुर्ती आहे.मंदिराचा आतील भागा आरश्याने झाकलेला आहे आणि ते अतिशय सुंदर आहे.
नवागढ मंदीर
 नवागढ येथील मंदीर
येथील विद्यार्थ्यांकरिता गुरुकुल शिक्षण व्यवस्था लाभलेली आचार्य आर्यनंदी शिक्षण संस्था सुसंस्कारित शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
गंगाखेड
दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी  सावरगाव हे ठिकाण श्रीरेणुका मातेचे जागृत देवस्थान मानले जाते.  पाथ्री तालुक्यात गोदावरीच्या तीरावर गुंज या ठिकाणी श्री योगानंद महाराज यांनी  स्थापन केलेले देवस्थान आहे. येथे भव्य मंदिर असून श्री योगानंद महाराजांनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली.
गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवाची परमभक्त ही गंगाखेडची समाजातील दमा व करुंड या विठ्ठल भक्त दाम्प्त्याचे नवसाचे अपत्य. तिने नामदेवाविषयीचा आदरभाव, दयावान विठ्ठलाला आहावन, ज्ञानदेवाची पुजा, चोखामेळाविषयी भाव अभंगातून व्यक्त केला आहे.
वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना हे सारे काही संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येते. गंगाखेड येथे संत जनाबाई यांची समाधी आहे.
सेलू
वाल्मिकी ऋषींच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या वालूर अर्थात सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. त्यामुळे या ठिकाणास विशेष महत्त्व लाभले आहे.
पूर्णा
पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वेस्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो. पूर्णा जंक्शनला गाडी थांबली की दाळ वडा आणि सोबत खमंग कढीचा घमघमाट तोंडाला पाणी सोडतो.
पोखर्णी
नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir         
                                                    
परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.
श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे.मंदिरासमोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशद्वार मन मोहून घेते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आणखी एका प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो.  मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.या द्वारामधून एकावेळी एकाच व्यक्तीला खाली बसून प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ १०-१२ व्यक्तीचे दर्शन घेऊ शकतात.
हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.
राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.
    श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची रोद्ररूप धारण केलेली वालुकाष्म पाषाणाची असून सुमारे ४ फुट इंचीची मूर्ती आहे. मुर्ती चतुर्भूज असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असून उर्वरित दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. ही मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे. श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असून त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे. मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.
मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरणे कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असून घंटानाद दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे.याला पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठ्या देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत,ज्यांना देवकोष्ट म्हणतात.
    नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.
नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.
श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जा तसेच धार्मिक पर्यटक ‘ब’ दर्जा मिळालेला आहे.
पाथरी-
पाच पांडवांपैकी पार्थ अर्थात अर्जुनाने वसविलेले पार्थपूर म्हणजेच सद्यस्थित पाथरी. जगविख्यात शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. पाथरी तालुक्यातील गोदावरीच्या तिरावर वसलेले मुद्गलेश्वर हे ऐतिहासिक मंदिर फार रमणीय आहे. पुरातन काळी हे मंदिर 'देवभूमी' म्हणून ओळखले जायचे. मंदिर परिसरात एकूण तीन देऊळ आहेत ज्यापैकी नदीतिरावरील एक मंदिर शिवाचे आहे. नदीपात्रात भगवान नरसिंह (मुद्गलेश्वर) आणि मुद्गल गणेशाचे मंदिर आहे. राज्याची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदा नदीच्या पाण्यात भाविक पवित्र स्नान करून मंदिरांचे दर्शन घेतात. दरवर्षी महाशिवरात्रीला भक्त येथे मोठ्या संख्येने येतात. टाळ आणि मृदुंगाच्या संगीतमय आरतीने परिसर अधिक मनोरम होतो.
 श्री साईबाबा मंदिर पाथरी – Sri Sai Janmasthan Temple, Pathri                                                      
    श्री साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्हयातील पाथरी असुन या ठिकाणी साई बाबांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येथे साई बाबांची सिंहासनाधिष्ठीत मोठी मुर्ती असुन त्यांचे जन्मस्थान, त्यांचे मुळ घर, त्यांच्या घरातील भांडी, चमत्कारीक उदी, या सर्व गोष्टी या जागी अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवल्या आहेत.
श्री साईबाबा

 श्री साई स्मारक समितीने मंदिराकरता जागा घेउन तेथे भव्य असे मंदिर बांधले आहे, साधारण 1994 ला मंदिराची निर्मीती सुरू झाली आणि 1999 ला मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आले.
    श्री स्वामी साई शरणानंदाची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली असुन त्यांना प्रत्यक्ष साई बाबांचा सहवास लाभला असल्याने त्यांनीच साईबाबांचा जन्म पाथरी या गावातला असल्याचे सांगितले त्यामुळेच ऐवढे पवित्र ठिकाण समजु शकल्याने त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी लिहीली आहे.
त्यांच्या शेजारीच श्री बल्बबाबा यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीची माहिती येथे लिहीली असुन त्यांनीच पाथरीला साईबाबांचे भव्य मंदिर तयार होईल अशी भविष्यवाणी केली होती.

जिंतुर
प्राचिन काळचे जैनपूर म्हणजेच आजचे जिंतूर. जैनपूर नावाप्रमाणेच जवळच गुहांमध्ये कोरलेल्या जैनशिल्पांमुळे जिंतुर विशेष प्रसिद्धीस आले आहे. नेमगिरी म्हणून ओळखले जाणाऱ्या या क्षेत्री शहरालगतच्या डोंगरात एकूण सहा लेण्या आहेत. त्या प्रामुख्याने अदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शकुट व बाहुबली अशा आहेत. घुमटाची बांधणी चार स्तंभांच्या सहाय्याने केली आहे. हे मंदिर विशेत्वाने ख्यातनाम आहे ते तेथील भगवान पार्श्वनाथांच्या अधांतरी मूर्तिमुळे! जैनांच्या या पवित्र स्थळी भाविक मनोमन विसावतो. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे.
 नेमगिरी
श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान, जिंतुर
हे क्षेत्र जिंतूरपासून 3 किमी अंतरावर परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या सह्याद्री पर्वतांच्या उप-टेकड्यांत वसलेले आहे. नेमागिरि नामक दोन टेकड्या आहेत आणि चंद्रगिरी ही प्राचीन ज्योतिर्लिंग आणि चमत्कारिक जैन गुहा मंदिर व चैत्यलय्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत.
 नेमगिरी च्या टेकड्या
प्राचीन काळी हे क्षेत्र जैनपुर या नावाने प्रसिद्ध होते, हा राष्ट्रकूट कुटुंबातील सम्राट अमोघ वर्षाच्या काळात विकसित झाला. नंतर भारतीय इतिहासाच्या मधल्या काळात, हे आक्रमणकर्ते करून नष्ट केले गेले आणि त्याचे नाव बदलले ते जिंतूर, सध्याचे नाव. त्या वेळी 300 जैन कुटुंबे आणि 14 जैन मंदिर येथे होते. आज त्यातील केवळ दोन मंदिरे पहायला मिळतात.
 नेमगिरी स्मारके
         हे तीर्थक्षेत्र पर्यटकांमध्येही फार लोकप्रिय आहे. राज्यातीलच नाहीतर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून पर्यटक तर येतातच शिवाय परदेशातल्या पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली तर इथं नित्यनेमानं येतच असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

नेमगिरीचे वैशिष्ट्य

या मं‍दिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णत: जमिनीमध्ये दबलेले होते.
१००८ पार्श्वनाथ भगवान
 सुमारे ९००० किलो वजनाची श्री १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्यच आहे.

इतिहास

सैदुल कादरी हा अफगाणिस्तानातून दिल्लीला आला. तो दिल्लीहून अजमेरला ख्वाजा साहबच्या दरबारात पोहचला. दरबारात त्याला असा आदेश देण्यात आला की, जैनपूर (जिंतूर) ला जाऊन तिथं असणाऱ्या मजबूत किल्ल्यामधल्या जैन धर्मियांची संस्कृती नष्ट करुन त्यांच्या मंदिराची नासधूस करून आपला झेंडा फडकावयाचा. आदेशानुसार कादरी अजमेरहून खुलताबाद, दौलताबादमार्गे जैनपूरला आला. तेव्हा जैनपूरमध्ये यमराज आणि नेमीराज नावाचे भाऊ राज्य करत असत. कादरीने गुलबर्ग्याच्या राजा आलमगीरच्या फौजेच्या सहाय्याने हा प्रदेश कब्ज्यात घेतला आणि मंदिर आणि मुर्त्यांचे तोडफोड केली. ही घटना हिजरी सन ६३१ ची आहे.
नंतर १६ व्या शतकामध्ये नांदगांव येथून श्री. वीर संघवी त्यांची पत्नी “घालावी”, मुले नेमा संघवी, सांतु संघवी, अंतु संघवी आणि ३ सुनांसह जिंतूर येथे आले. त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडा-झुडपांनी वेढलेली होती पण मंदिराचे शिखर दिसत होते. तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करायचा संकल्प केला. त्यांनी १६१० साली नेमगिरी आणि चंद्रगिरी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोध्दार केला. याची आठवण म्हणूनच गुफा क्रमांक ४ मध्ये असलेल्या मूलनायक श्री नेमीनाथजी यांच्या प्रतिमेच्या खाली या कुटूंबियांचे शिल्प रेखाटलेले आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य

    गेली २० वर्षे विश्वस्त मंडळामध्ये उपाध्यक्ष असलेले श्री. बबनराव तात्याराव बेंडसुरे यांनी मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हे मंदिर पुर्वी पूर्णपणे डोंगराखाली दबलेले होते. या मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती देताना ते म्हणाले की, गुफा नं.१- पहिल्या गुफामध्ये महावीर स्वामींची साडे तीन फुट उंचीची अत्यंत प्राचीन मुर्ती आहे. या गुफेमध्ये आचार्य भद्रबाहू, आचार्य शांतिसागरजी यांचे पद कमळ हे या गुफेचे वैशिष्ट्य आहे.
     गुफा नं .२- दुसऱ्या गुफामध्ये श्री १००८ आदिनाथ स्वामींची महान प्रतिमा आहे. ध्यान करण्यात मग्न असणारी ही प्रतिमा पाहताक्षणी मनाला मोहिणी घालते. गुफा नं.३- तिसऱ्या गुफामध्ये दर्शन होते ते सकलविघ्नोपशाकमक, परमशांतिदायक, देवाधिदेव श्री. १००८ शांतिनाथ स्वामी यांच्या पद्मासनामध्ये विराजमान मुर्तीचे. सहा फुट उंच या मुर्तीचे दर्शन घेताच भक्तांना दु:खाचा पूर्णपणे विसर पडतो आणि तो ध्यानात मग्न होतो. गुफा नं.४- चौथ्या गुफामध्ये मूलनायक श्री १००८ नेमीनाथ स्वामींची भव्य मूर्ती विराजमान आहे. पाहताक्षणी मन मोहून टकाणारी काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान आहे.गुफा नं.५- पाचव्या गुफामध्ये सर्वांचंच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी श्री १००८ अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामींची पद्मासनातली मूर्ती आहे.
       सुमारे ९००० किलो वजनाची श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्य आहे. या मूर्तिच्या मागे सर्प आहे,त्या सर्पात ओम तयार होते. या मुर्तीचं दर्शन घेताच भक्तांचे दु:ख कमी होतात.
गुफा नं.६- सहाव्या गुफामध्ये साडेचार फुट उंचीची आणि एखाद्या स्तंभासारखी दिसणारी नंदिश्वराची मूर्ती आहे. गुफा नं.७- सातव्या गुफामध्ये भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न अशी ही मूर्ती आहे. मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यावर नागांचे वास्तव्य आणि मांडीमध्ये भुंग्याने केलेले छीद्र यावरून या मूर्तीची तपश्चर्येतील मग्नता दिसून येते.
    नेमगिरीपासून थोड्या अंतरावर चंद्रगिरी नावाचे धार्मिक स्थळ आहे. या चंद्रगिरीचे दर्शन केल्याशिवाय नेमगिरीची यात्रा पूर्ण होत नसल्याची अख्यायिका आहे. चंद्रगिरीकडे जाताना रस्त्यातच युगल चारणऋध्दीधारी मुनिंची पादुका आहेत.

नेमगिरी तीर्थक्षेत्रांचे अन्य उपक्रम

गोशाळा

आचार्य विद्यासागरजी यांचे शिष्य जैनमुनीश्री समाधीसागरजी यांनी गोशाळा असावी अशी सूचना केली आणि सन २००० पासून इथं गोशाळा चालविण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी १५० गायी आहेत.

सोयी-सुविधा

इथं राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयाची आणि भोजनाची देखील उत्तम व्यवस्था आहे.

पोहचण्यासाठी

जवळचे रेल्वेस्टेशन- परभणी अंतर- ४५ कि.मी.
जवळचे बस स्थानक - जिंतूर अंतर - ४ किमी.जिंतूर हे ठिकाण जालना (४० कि.मी.) आणि परभणी (४० कि.मी.) या शहरांशी रोडद्वारे जोडलेले आहे. राज्य रस्ता नागपूर ते औरंगाबाद तसेच राज्य रस्ता नांदेड ते मुंबई (औरंगाबाद मार्गे) या रस्त्यावर जिंतूर आहे.
जवळचे विमानतळ - औरंगाबाद अंतर - १६५ कि.मी.विमानाने
जिंतूर पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून जिंतूर ११० कि.मी अंतरावर आहे.
संपर्क- श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान,
जिंतूर- ४३१ ५०९, जि. परभणी
फोन- ०२४५७- २१९२०८
Email- nemgiri@gmail.com
website- www.nemgiri.org
लेखक - जयश्री श्रीवास्तव

चारठाणा

चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे. (आपली तर हे ऐकून फाटली आणि आपली खाट आपण बाहेर अंगणात लावली. जन्म काढला तरी मला अंगावर वरून साप पडण्याची सवय होणार नाही... असो.)
तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६वे ते ९वे शतक)राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात ...असो
गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता. आमच्या सासुबाइन्च्या काकांनी- भाऊ काकानी ( माझे चुलत आजे सासरे- वय वर्षे ८५ )सांगितल्याप्रमाणे मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले( मी चूक असल्यास जाणकारांनी चूक सांगावी )पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात फरक जाणवतो.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
स्तम्भावरचे अप्रतिम कोरीव काम
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
सासरेबुवांच्या घराबाहेर कडूनिम्बाच्या झाडावर करकोच्यानी केलेलं घरटे. करकोचे माणसाच्या वस्तीच्या इतके जवळ घरटे करून राहतात हे माहितीच नव्हते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवी ची मूर्ती
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा.
मंदिराचे छत
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
जबरदस्त दृष्टीभ्रम होतो कि नाही! छताला तडे गेलेत त्यामुळे खाली उभे रहायला भीतीच वाटते .
ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर ( म्हणून बहुधा जोड महादेव)
सर्वसाधारण पणे पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे. की मी चूक आहे? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
आणि हे नक्की काय होते कुणास ठावूक बहुधा जुनी दीपमाळ असावी.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
पुष्कारणीतले कोरीव काम
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो खाली टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले. पुढच्या वेळी जाईन
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो पण हा मात्र मूषक आहे. कानावरून तसे वाटते. जाणकारांनी सांगावे
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
मंदिराचे जोते
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही. Simple, Free Image and File Hosting at MediaFire
गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.
पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)
गावात रहायची काहीही सोय नाही.
पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा ( हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)
लेखनः- आदित्य कोरडे
 
आर्किऑलॉजी खात्याकडे कारभार सोपवल्यानंतर या मंदिराच्या बाबतीत सकारात्मक काही होईल असे वाटत नाही. मुळात मराठवाडा औरंगाबाद सोडला तर पर्यटन दृष्ट्या मागासलेला आहे. आवर्जुन या परिसरात कोणी जात नाही. अपवाद फक्त औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई यांचाच. ईतका मोठा मंदिर समुह असताना यांची काहीच माहिती असू नये हे खेदजनक आहे. वास्तविक दक्षिणेकडच्या राज्यात जरी हे ठिकाण असते तरी याचा बराच विकास होउ शकला असता.
पहिला स्तंभ हा किर्ती स्तंभ असावा असे वाटते आहे. असाच स्तंभ मी सज्जनगडाजवळच्या शिवमंदिरात पाहिला आहे. बाकीच्या फोटोतील मंदिरे अप्रतिम आहेत. यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तुम्ही जे उंदराचे शिल्प दाखविले आहे ते यज्ञवराह असेल असा अंदाज आहे. अर्थात प्रत्यक्ष पाहिले पाहिजे. असेच यज्ञवराह मोरगावजवळच्या लोणी-भापकर व चाकणच्या किल्ल्याजवळ आहे.
खुराच्या देवीच्या मंदिरावरचा तो मातीचा ढीग तातडीने हलविणे गरजेचे आहे, अन्यथा मंदिराला नुकसानच होईल. मंदिरातील देवीची मुर्ती मुळ मुर्ती नक्कीच नसावी.अर्थात या परिसरात बहामनी कालखंडापासून आक्रमणे होत असल्याने मुळ मुर्ती कोठे असेल हे सांगणे कठीण आहे. छतावरवे खुरासारखे नक्षीकाम नक्कीच अनोखे आहे, अक्षी नक्षी पहाण्यात नाही. सध्याची देवीची मुर्ती कदाचित माहुरच्या रेणुकेपासून स्फुर्ती घेउन तयार केली असावी.
तुम्ही दिपमाळ म्हणून जो फोटो दिला आहे, तो एखाद्या बुरुजासारखा वाटतो आहे. इतके मंदिर वैभव असणार्‍या गावाभोवती काहीतरी संरक्षक तटबंदी असावी असे वाटते ( जशी गोंदेश्वर व एश्वर्येश्वर हि मंदिरे असणार्या सिन्नर शहराभोवती होती).
पुरातत्व खात्याने दम देणारी निळी पाटी लावण्याचे सोडले तर दुसरे काही केलेले दिसत नाही, अर्थात त्यांच्याकडून अपेक्षाही नाही, म्हणूनच राज्यातले किल्ले त्यांच्या ताब्यातून काढून घेण्याची वेळ आली.
तुमच्या धाग्यावरून अजून बरेच प्राचीन शिल्प वैभव आजुबाजुला असणार, त्याचा शोध घ्यायला हवा. बाकी मंदिराविषयी वल्लीदा सविस्तर लिहितीलच या अपेक्षेने थांबतो.
बाकी काही सुचना, धाग्यात काही शुध्दलेखनाच्या चुका आहेत, त्या दुरुस्त व्हाव्यात. शिवाय चारठाण या गावी जाण्यासाठी बसची सोय नेमकी कशी आहे? जवळ रहाण्याची सोय काय होउ शकते ? ( छतावरून साप पडताहेत म्हणल्यावर गावात रहायची भिती वाटती आहे. ;-) ) मंठा गावात मुक्काम करणे सोयीचे होईल कि जालन्यालाच रहावे लागेल ?चारठाण गावात या सर्व ठिकांणाची माहिती देणारे कोणी आहे का ? त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध होईल का?
तुमच्या धाग्यानंतर या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतुरजवळचा नेमीनाथगड व परळी जवलचा धर्मापुरीचा भुईकोट आणि तेथील मंदिरे ईतकेच पहायचे राहिले आहे. आता मराठवाड्यातील किल्ल्यावर लिहीणार आहेच, त्यापुर्वी शक्य झाल्यास वरील ठिकाणे पहायची आहेत. जमल्यास चारठाणलाही भेट देता येईल. तेव्हा शक्य झाल्यास वरील माहिती धाग्यातच टाकता येती का ते पहा.
आपण सांगितल्या प्रमाणे तो यज्ञ वराहच असावा पण कानाच्या आणि डोक्याच्या एकंदरीत आकारावरून मला उंदीर वाटला म्हणून मी ही तशीच शंका उपस्थित केली आहे.
मला जी जुनी दीपमाल वाटली ती एखाद्या तटाचा/ कोटाचा किंवा बुरुजाचा भागही असू शकते किंवा त्यात देखील एखादे शिल्प दडवलेले असू शकते. कुणी सांगावे!
बसची सोय म्हणाल तर नांदेडला जाणारी प्रत्येक लाल एस टी तिथे फाट्याजवळ थांबते. आत मात्र बस जात नाही. गावात जीप सुमो वगैरे आहेत ते ही सोय करतात.आपण आपली गाडी घेऊन जाणे सगळ्यात उत्तम रस्ते बरे आहेत पण राहण्याची मात्र काही सोय नाही. उत्तम उपाय म्हणजे मंठा किंवा जिंतूर ला मुक्काम करून तिथून ये जा करणे बरे. खाण्याचे म्हणाल तर टपरी वजा हॉटेल्स आहेत गावात. बाटली बंद पाणी ही मिळते पण जास्त करून सगळे लोकल ब्रान्ड असतात.
गावात दीप माळ बघायची आहे , उकंडेश्वर मंदीर बघायचे आहे , पुष्करणी बघायची आहे म्हटले तर कुणीही रस्ता दाखवते.माहिती ही देते.गावातले लोक सौजन्यशीलच आहेत.फारसा गजबजाट नसल्याने शांतपणे मंदीर बघणे फोटो काढणे. करता येते.पायपीट खूप करावी लागते. जुने नवे अशी दोन गावे आहेत. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे. सध्या हवामान चांगले आहे बघायला जायला. उन्हाळ्यात फार त्रास होतो.
पहिला स्तंभ हा किर्तीस्तंभ किंवा विजयस्तंभच. असे एकूटवाण्या स्तंभांची (ओबेलिस्क) परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इजिप्तच्या प्राचीन मंदिरांतही ते दिसतात. असेच स्तंभ महाराष्ट्रात सज्जनगड, पैठण, मस्तानीचे पाबळ ह्या ठिकाणी आहेत.
मस्तानीचे पाबळ येथील किर्तीस्तंभ
a
मंदिरातली मुर्ती यज्ञवराहाचीच आहे. त्याच्या झुलीवर लहान लहान विष्णूमुर्ती कोरल्या आहेत. चाकण, लोणी भापकर ह्याव्यतिरिक्त रांजणगवाजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरातही एक भग्न यज्ञवराह आहे.
आणि हे नक्की काय होते कुणास ठावूक बहुधा जुनी दीपमाळ असावी.
दिपमाळ नसून हे दुर्गविहारी म्हणतात तसे बुरुजवजा बांधकाम असावे. कदाचित पाणी शेंदायची मोटही असावी. अशीच पाण्याची एक मोट बहादुरगडात आहे.
बहादूरगडातली पाण्याची मोट
a
पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे
शाळुंखा सर्वसाधारणपणे उजवीकडेच असते. पण काही ठिकाणी त्या शाळुंखा डावीकडेही असतात. पाटेश्वर येथील बहुतेक शाळुंखा ह्या अशाच डाव्या बाजूस आहेत. त्या बहुधा शाक्त पंथीयांच्या असाव्यात.
a
दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात हिंडलो होतो त्यातील काही फोटो येथे टाकत आहे. अर्थात श्री कोरडे यांची परवानगी गृहीत धरली आहे. नसल्यास क्षमस्व.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
मला वाटते या प्रकारच्या छताला गंडस्थळ रचना असे म्हणतात. हत्तीच्या गंडस्थळासारखे दिसतात म्हणून. पण एका तज्ञाला विचारुन खात्री करुन घेतो
रेणूका माता
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ही मूर्ती मला फार आवडली. तेथे गाभार्‍यात फारच गुढ भासली मला.

पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी

सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात. हे पुस्तक येत्या २/३ महिन्यात पूर्ण होउन वाचकांना उपलब्ध होइल. डॉ. गो.बं. देगलूरकर सरांचा पहिल्यांदा हे पुस्तक इंग्लिश मधुन व नंतर मराठी मधुन प्रकाशित करण्याचा विचार आहे.
या पुस्तकासाठी मी अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व विदर्भातील काही मंदिरांची प्रकाशचित्रे घेण्यासाठी भटकंती केली. या भटकंतीत मला गावोगावात अनेक प्राचीन मंदिरे दिसली. यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची प्रकाशचित्रे आपल्या समोर मांडावी या हेतुने मी हा प्रयत्न करत आहे. मी मंदिरांची त्रोटक माहिती व जास्त प्रकाशचित्रे जास्त देणार आहे कारण मंदिरांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आपल्याला डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. मात्र वाचकांना विनंती की पुढील मंदिरांची माहिती या मंदिराला मिळणा-या प्रतिसादावर अवलंबुन आहे.
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे तर दुस-या एका गर्भग्रुहात आज एका गणपतीची मूर्ती आहे तर तिस-या गर्भग्रुहाची खोली सध्या सामान ठेवण्याची खोली म्हणुन वापरली जाते. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात.
अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.
धन्यवाद !
मंदिराचा दर्शनी भाग
मंदिराचा दर्शनी भाग
.
मंदिर व समोरील पुष्करणी

.
मंदिर व समोरील पुष्करणी

.
मंदिर व समोरील पुष्करणी

.
पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती

.
नरसिंहाची भग्न मूर्ती

.
मंदिराची उत्तरेकडील बाजू

.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू

.
मंदिराचा सभामंडप व खांब

.
मंदिराच्या मुख्य गर्भग्रुहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा

.
मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब

.
लेखन- पराग पुरंदरे
 
 
It was not a planned visit to this lovely village filled with history that dates back to 9th century when King Amoghavarsha ruled lands of India. Then a developed city but now a small village, lost its charm and fame to time.
Charthana (चारठाणा) was earlier also known as Charukshetra, charu meaning beautiful, a true description of the place. The city has almost 360 temples in the area but most of them fallen or buried. But the ones that can be seen now definitely makes a statement. And not just temple but other ancient structure also mark their presence and catch attention of visitors to the village.
Even being a remote village of Maharashtra, efforts are being taken by history lovers and Directorate of Archaeology and Museums, Maharashtra to preserve what is left for the future generations.  There are six different sites that are protected under archaeology department and many more are preserved.

jain-mandir
Jain Mandir
jain-murti
Clockwise – Lord Aadinath (Top two), Lord Neminath and Lord Parshwanath (Standing Posture)
jain-vedi
Jain Mandir Vedi
Jain temple in the village was on top in our list. A temple with torn out façade and small entrance was what we could see at first glance. At the centre group of idols can be seen which are worshiped in daily practice and then on the internal periphery some ancient statues can be seen. Some of these statues dates back to 1200 years. Namely statues of Lord Aadinath, Lord Parshwanath and Lord Neminath can be seen along with some other idols. After taking a bow at the temple discussion soon kicked off with locals and they equipped us with the rich history of locality and informed us about leaning or swinging tower near to temple. We moved our parade to the site.

gadhi
Beautiful facade of Old Mansions
On the way we could see multiple palaces and old crafted lanes. Beautifully designed galleries and elegantly decorated arches. Diwali festival was just over and decorations simulated how magnificent sight it would have been in the past.
After negotiating by lanes of the village, we reached Vijay Stambha, a dreadful sight was lying in front of our eyes. Filth was making its presence felt all over the area, shrubs grown in chaotic manner and pigs were taking mud bath …… a very sad and depressing scene, but Vijay stambha was still standing tall amongst all this ordeal. Soon locals joined us and informed that cleaning and restoration of the place is underway and changes will be seen soon, some good thing to hear in all this bad conditions 🙂

vijay-stambh
Vijay Stambha or Jhulata Manora (As called by locals meaning Leaning Tower)
Among the locals was a person namely Mr. Santosh Dukandar, a caretaker or keeper of the village appointed by archaeology department. He is fighting against all odds and against all negativity in the village and protecting remains of monuments in the village. Lack of funds and lack of manpower is big issue here. Even it is difficult for Mr Santosh to make his ends meet sometimes he is doing expenses from his pocket to spray pesticides and insecticides on the pests that grow up in the area.
He informed us that there are 6 prominent archaeological sites namely Jod Mahadev (जोड महादेव), Renuka Devi (रेणुका देवी), Gokuleshwar (गोकुळेश्वर), Ukandeshwar (उकंडेश्वर), Narasi Teerth (नरसी तीर्थ) and Vijay Stambh (विजय स्तंभ) out of which we have been to Vijay Stambha and played a glance at Renuka Mandir on the way to Vijay Stambh. Santosh also informed us that Narasi Teerth is outside village boundaries and Jod Mahadev shares the same temple complex as of Renuka Devi.
He offered us a detailed tour of all the places. The first place on the tour was Ukandeshwar temple which is in the same by lane of Vijay Stambh. This temple is dedicated to lord Shiva and one of the most prominent sculpture here is of “Sapta – Matruka”, 7 different Goddesses are depicted with 7 different vahana, a transportation medium used by Gods.

ukandeshwar
Ukandeshwar
sapta-matruka
Sapta – Matruka
Small path from the Ukandeshwar temple took us to main road and we were again at the junction which lead us to Renuka Devi temple, an old Hemdripanthi (Hemadpanthi as it is commonly called) structure catches eye of a visitor and one cannot miss it once we step in the village. It is said that peak of temple is made from light weight bricks that float on water… amazing isn’t it? All the temples are of the same structure style and can be dated back to 9th or 10th century. Inside Renuka devi temple one can see some amazing carvings of stone and statues. Santosh then guided us to Jod Mahadev temple, the name is so because there are two linga of Shiva in one temple. A gomukh is also seen in one of the inner sanctum of main linga.

renuka-devi
Renuka Devi Temple
jod-mahadev
Entrance of Jod Mahadev Temple
gomukh
“Gomukh” inside Jod Mahadev Temple
We were running short of time and were sad that we could not spend much time at this temple. Adding one more stop to itinerary Santosh advised to visit Golukeshwar temple. A small walk resulted in big surprise, this was the best temple out of all we had seen till now and comparatively maintained best out of the set and the best part was not the cleanliness but was the Pushkarani behind the temple. A huge water body with clean water made our last stop refreshing. This year’s monsoon had abundantly poured water into the Pushkarani.

gokuleshwar
Gokuleshwar
stone-work
Beautiful Stonework on pillars of temple
pushkarni
“Pushkarani”
My phone started to buzz and it was call from home. We had to wind up our “Temple Run”, making promise to myself that many more visits will happen again to this pretty village to unfold its untold history.
Virag
Date: 03-Nov-2016
Place: Charthana
Corodinates: N19.626245, E76.540328
Route: Pune – Aurangabad – Jalana – Mantha – Charthana
Distance: 380km
Travel Mode: Car
 
 
 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...