१) अदिती, २) अपोदेवी ३) ईडा ४) उषा ५) गायत्री ६) निष्ट्रीगी ७) पृथ्वी ८) योगमाया ९) भगवती १०) लक्ष्मी ११) वेदवती १२) सरस्वती १३) संध्या १४) इंद्राणी १५) उर्वशी १६) श्री १७) गोधा १८) घोषा १९) जुहू २०) दिती २१) दक्षिणा २२) मेधा २३) यमी २४) रोमषा २५) शत्री २६) लक्ष्या २७) लोपामुद्रा २८) विश्ववारा २९) वाक ३०) नारी ३१) शाश्वती ३२) सरमा ३३) श्रद्धा ३४) सर्वराज्ञानीं ३५) सूर्या ३६) सावित्री
शैव संप्रदायाच्या प्राचीनतेसंबंधी विवेचन करताना संशोधकांनी शिवाची उपासना सिंधू संस्कृतीइतकी प्राचीन असल्याचे मत व्यक्त केले आहे. महाभारतात शैव व शाक्त पंथांचे अस्तित्व सूचित करणारे उल्लेख आढळतात. ८४ सिद्धांपैकी मत्स्येन्द्रनाथ किंवा ⇨मच्छिंद्रनाथ (सुमारे दहावे शतक) हे नाथपंथाचे तसेच कौलतंत्राचे प्रवर्तक मानले जातात.[→ नाथ संप्रदाय]. कौलमार्ग हा शाक्तांमधील एक उपपंथ आहे. कुब्जिकामत, कुब्जिकोपनिषद, मतोत्तर, चिद्गगनचंद्रिका इ. ग्रंथ शाक्त परंपरेचे आधारभूज ग्रंथ आहेत.
शाक्त पंथात शक्ती ही उपास्य देवता असून तिची परमतत्त्व या स्वरूपात उपासना केली जाते. ही संवित्स्वरूपा भगवती आपल्या अंतर्गत असलेल्या सृष्टीस बाह्य स्वरूपात प्रकट करते. ह्या शाक्त पंथामध्ये ⇨काली व त्रिपुरा असे त्या त्या देवतांचे संप्रदाय आहेत. ह्या पंथामध्ये शक्ती व शक्तिमान ह्यांची एकात्मता (अद्वैत) प्रस्थापित केलेली आहे. शुद्ध परब्रह्म ते आदिवर्ण अकार रूपात प्रकट होते. या अकारास शाक्त पंथात ‘अनुत्तर अकार’ असे म्हणतात. ह्या अकाराच्या चार कला असून जया, विजया, अजिता आणि अपराजिता अशा परब्रह्माच्या चार शक्ती त्या चार कलांच्या रूपात प्रकट होतात. परब्रह्माच्या चार परा शक्ती, चार परापरा शक्ती व चार अपरा शक्ती मानल्या आहेत. जया इ. चार गुह्य शक्ती ह्या चार अपरा शक्ती होत. योगवासिष्ठात ह्या चार शक्तींसमवेत सिद्धा, रक्ता, अलम्बुषा व उत्पला अशी आणखी चार शक्तींची नावे येतात. ह्या आठ शक्ती मातृकांमध्ये श्रेष्ठ असून त्यांचा स्वभाव रौद्र आहे. त्या तुंबरू नामक रुद्राच्या आश्रित आहेत. नित्या नामक शाक्त संप्रदायात त्या शक्तीचे नाव नित्या असे आहे. नित्या, त्रिक, क्रम, कुल इ. शाक्त पंथ हे अद्वैतवादी असून त्यांमध्ये शक्ती ही परम शक्ती मानली जाते. शिवादी सर्व तत्त्वांची उत्पत्ती भगवती अंबेपासून झाली आहे. सर्व विश्व हे मूलत: शक्तीमध्ये आस्थित असून ती त्यास बाह्य स्वरूपात प्रकट करते. ह्या सिद्धांतास शक्तिपारम्यवाद असे नाव आहे. पुढील काळात शैव व शाक्त दर्शन मिळून ‘शांभव दर्शन’ निर्माण झाले. त्यामध्ये शिव व शक्ती यांची समानता प्रस्थापित केली गेली.
काश्मीरमध्ये प्रस्थापित झालेला क्रम संप्रदाय हा ह्या शक्तिपारम्यवादाचा प्रमुख पुरस्कर्ता आहे. त्या संप्रदायाच्या मतानुसार काली पाच प्रकारची कृत्ये करते. क्षेप, ज्ञान, प्रसंख्यान, गती आणि नाद ही ती पाच कृत्ये होत. स्वात्म्याचे भेदन म्हणजे क्षेप. त्याची निर्विकल्प स्थिती म्हणजे ज्ञान, सविकल्प रूप हे प्रसंख्यान, प्रतिबिंबाच्या रूपात प्रकट होणे ही गती आणि आत्मस्वरूपात पुन्हा विलीन होणे हा नाद. अशा प्रकारे ही पाच कृत्ये करणारी – कलनांना करणारी – देवी काली होय. सृष्टी, स्थिती, संहार व अनाख्या असा चार तत्त्वांचा क्रम मानणारा संप्रदाय क्रम या नावाने प्रसिद्ध आहे. काही आचार्य भासा हे पाचवे तत्त्वही मानतात. महेश्वरानंदविरचित महार्थमंजरी व त्या ग्रंथातील परिमल टीका क्रमदर्शनाचे विस्ताराने विवेचन करतात.
त्रिपुरा हाही संप्रदाय क्रमदर्शनाप्रमाणेच कौल संप्रदायाचे अनुकरण करतो. त्रिपुरा संप्रदायात तीन शक्ती, तीन चक्रे तीन धाम, तीन बीजे, तीन तत्त्वे इ. तीन पदार्थांची जननी ‘त्रिपुरा’ आहे, असे मानले जाते. शिव, शक्ती व नर या तीन स्वरूपांचे विशेष विवेचन या संप्रदायात आढळते. अशा व इतर कारणांमुळे यास ‘त्रिक दर्शन’ असे म्हणतात. त्रिपुरा दर्शनाचा प्रसार काश्मीरमध्ये झाला. राजा ⇨अवंतिवर्मन् (कार. इ.स. ८५५–८३) हा राज्य करीत असताना कौल आणि क्रम हे संप्रदाय प्रतिष्ठित झालेले होते. त्रिपुरा दर्शनाचा प्रसार ह्या सुमारास होऊ लागला. ह्या दर्शनाचा काश्मीरप्रमाणे बंगाल व केरळातही प्रसार झालेला दिसतो.
त्रिपुरा संप्रदायात वामकेश्वर दर्शन हे एक महत्त्वाचे शास्त्र आहे. त्या मतानुसार परमतत्त्वास संविच्छक्ती म्हणतात. तिच्यापासूनच सर्व सृष्टी निर्माण होते. शिव व शक्ती अशी दोन तत्त्वेही तिच्यापासून निर्माण होतात. हीस महात्रिपुरसुंदरी असेही नाव आहे. तिच्या उपासनेचे अंतर्याग व बहिर्याग असे दोन प्रकार आहेत. या प्रकारे उपासना करणाऱ्या साधकास भोग आणि मोक्ष ह्या दोहोंचीही प्राप्ती होते. या संप्रदायातील ग्रंथांमध्ये मातृका (= वर्ण), मंत्र व मुद्रा ह्यांच्या साह्याने केल्या जाणाऱ्या उपासनेचे विस्ताराने वर्णन आढळते. नित्याषोडशिकार्णव अथवा वामकेश्वर तंत्र हा संप्रदायातील एक प्रमुख ग्रंथ होय. सौंदर्यलहरी हे प्रसिद्ध स्तोत्रही या संप्रदायाचे प्रतिपादन करते.
त्रिपुरसुंदरी हे परमोच्च शक्तीचेच स्वरूप आहे. ती सुंदर युवतीच्या रूपात प्रकट होते. तिच्या संप्रदायास सौभाग्यसंप्रदाय असे नाव आहे. श्रीचक्र आणि श्रीविद्या ह्यांची उपासना ह्या संप्रदायाची महत्त्वाची अंगे आहेत. श्रीचक्र किंवा श्रीयंत्र ही नऊ त्रिकोणांनी बनलेली रेखाकृती आहे. श्रीविद्या ही १५ संस्कृत वर्णांची मालिका असून लौकिक भाषेच्या दृष्टिकोणातून अर्थहीन आहे. ती वाग्भव, कामराज व शक्ती अशा तीन विभागांनी युक्त आहे. अमृतानंद, शिवानंद, लक्ष्मीधर, भास्करराव इ. आचार्यांनी नित्याषोडशिकार्णव, योगिनीहृदय इ. ग्रंथांवर लिहिलेल्या टीकांमध्ये या संप्रदायाचे तत्त्वज्ञान विस्तृत स्वरूपात सापडते.
शाक्त संप्रदायातील ग्रंथ संस्कृतप्रमाणे बंगाली, मैथिली, हिंदी, राजस्थानी, ब्रज, पंजाबी अशा भाषांमधूनही निर्माण झाले. या संप्रदायातील चंडीमंगल, कालिकामंगल इ. गीते व स्तोत्रे या भाषांमध्ये रचली गेली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या ह्या संप्रदायाने अठराव्या शतकात नवे स्वरूप धारण केले. शक्तीची उपासना व भक्तिसंप्रदायाचे मिश्रण असलेल्या ह्या संप्रदायातील महान साधक ⇨रामकृष्ण परमहंस हे होत. त्यांच्या उपदेशात ह्या नवशाक्त पंथाचे सार सापडते.
ताम्रपाषाण युग या नांवाने ओळखल्या आणाऱ्या काळांत सिंधुनदीच्या खोऱ्यापासून नील नदी आणि तिच्या पुढच्या भागांपर्यंत शक्ती उपासनेचे धागे दोरे पसरले होते. भारतात मातृदेवीच्या मूर्ती विशेषतः इ.स.पूर्व २५०० ते इ.स. पूर्व तिसऱ्या शतकांपर्यंत मिळतात. (रे. चि. तीस १-७ एकतीस ८) पुढे त्याचे रूप पालटते व नवीन परिवर्तनें दिसू लागतात आणि प्रतिमांचा आकार ही जास्त सुंदर होतो. फार प्राचीन काळांतील या मातीच्या तयार केलेल्या मातृदेवी प्रतिमांची खालील वैशिष्ट्ये आहेत
पाल शिल्प कलेतील मातृ भावना...

अदिती हि सर्व देवतांची माता मानली जाते. साध्या डोळ्यांनी पृथ्वी, आकाश, अगर त्या पलीकडचे आपण जे काही पाहू शकतो ते सर्वकष म्हणजे अदिती, अदिती स्वर्ग आहे, अदिती अंतरीक्ष आहे, जगन्माता, पिता. पुत्र, देव, पंचमहाभुते म्हणजेच अदिती होय. भूमी प्रकृती सर्वांचे पालन पोषण करते व तीच सर्वांची जन्मदात्री अशी हि आदि व अंत अशी शाश्वत माता, आदिशक्ती. अत्यंत विस्तीर्ण अनेक शुभकार्य करणारी, यज्ञ, पालक, अनेक संकटातुन पार करणारी कधी वार्धक्य न पावणारी, अत्यंत गमनशील, जगातील प्राणीमात्रांची जन्मदात्री आश्रयदात्री असे अदितीचे वर्णन शुक्ल यजुर्वेदात केले आहे.
दुर्गा :-

महिषासुराचा वध केलेल्या मुद्रेत असलेली हि दुर्गेची मुर्ती.
चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती यांच्यातील लढाई ही अनादी काळापासूनच आहे. देवांना दानवांचा पराभव करणे अशक्य असल्याने देवांनी एकत्रितपणे विचार केला. त्यांची संयुक्त ऊर्जा देवी दुर्गेच्या रूपाने उदयास आली. प्रत्येक देवाने तिला आपली शस्त्रे दिली. अशाप्रकारे दुर्गामाता अतुलनीय सौंदर्याने, शस्त्रांनी सुसज्ज, शक्ती रुपाने अवतरली.
तिने असुरांना आव्हान दिले. तिच्याशी लढणारे सर्व राक्षस तिच्या चरणाशी मरून गेले. तिने विजय मिळवला असला तरी ती उग्ररुपात न दिसता शांत आणि प्रसन्न स्वरुपात दिसते. तीला आपल्या कर्तूत्वाचा कोणताही अहंकार किंवा केलेल्या कार्याविषयी कोणताही अहंकार नाही. ती तिच्या कार्यापासून अलिप्त आहे. ती चांगल्याचे रक्षण करते, ती वाईटाचा नाश करते. पण ती तिच्या स्वतःच्या कार्यापासून अलिप्त आहे. अश्या मुर्ती आपल्याला अलिप्तपणाचे, आत्मनिरीक्षणाचे आणि शांततेचे महत्त्व शिकवतात.
निरनिराळी रूपें घेऊन आदिशक्तीने चण्ड, मुण्ड, शुंभ, निशुंभ, वगैरे राक्षसाचा संहार केला. त्यात महिषासुरांचा संहार करणारी जी देवी तिला दुर्गा असें म्हणतात. रंभ नावाच्या असुराला महिषीपासून अग्नीच्या प्रसादाने झालेला मुलगा महिषासुर याने ब्रह्मदेवाची आराधना केली. त्याच्या इच्छेप्रमाणें त्याला अमरत्व तर मिळाले नाही पण एवढी सूट मिळाली की, त्याचे मरण स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून होणार नाही. स्त्री ही अबला असल्यामुळे आपणास कोणतीही भीती असणार नाही, असे समजून महिषाने पराक्रम गाजविण्यास सुरवात केली आणि देवांना सगळी- कडून हुसकवून लावले. इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरून इत्यादी देवतांचे अधिकार स्वतः उपभोगू लागला. स्वर्गावर नियंत्रण प्रस्थापित केले. ब्रम्हा, विष्णु व शंकराच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी आपापल्या सम्मिलित तेजाने एक स्त्री उत्पन्न केली. (शिव तेजाने देवीचे मुख, यमाच्या तेजाने केश, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्रमाच्या तेजाने वक्ष:स्थल, इंद्राच्या तेजाने कटीप्रदेश, वरूनाच्या तेजाने जंघा आणि मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. अशाच प्रकारे ब्रम्हाच्या तेजाने चरण तथा सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, कुबेराच्या तेजाने नासिका, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तीन नेत्र, संध्याच्या तेजाने बाहू तथा वायूच्या तेजाने कान निर्माण झाले. हीच महाशक्ति होय. हिचेच निरनिराळ्या रूपाने वर्णन मिळते.
थोडक्यात सांगायचे झालं तर राज्य,राजवट कुठलीही असो...
चौल-चालुक्य असो की होयसळ...
चंदेल असो की परमार...
राष्ट्रकूट असो की यादव....
देवीचं महिषासुरमर्दिनी स्वरूप हे प्रचंड लोकप्रिय होतं...
म्हणूनच आजही त्या त्या राजवटीच्या अस्तित्वातच्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी च देखणं रूप शिल्प/मूर्ती रुपात आपल्याला दर्शन देते म्हणजे देतेच! आपल्या देशातलं कुठलंही म्युझियम महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती शिवाय अपूर्णच म्हणावं लागेल! तर काही ठिकाणी पूर्णपणे झीज झालेल्या मूर्ती ही दिसतील, बरं ह्या ओळखन ही अगदी सोपं आहे ४ ते १० हात, प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेच,
शिव-शक्ती दुर्गा (दुर्गा-वैरोचनी) चा सर्वात प्राचीन संदर्भ तैत्तिरीय अरण्यकमध्ये उपलब्ध आहे. येथे रुद्राचे वर्णन दुर्गा वैरोचनी असे केले आहे, जे त्याच्या पत्नी अंबिकेच्या अनेक नावांपैकी एक आहे. बौधायन गृह्य सूत्रात दुर्गेच्या उपासनेच्या पद्धतीचे वर्णन केले आहे, परंतु पौराणिक कालखंडात आढळणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आजपर्यंत समोर आले नव्हते. उदाहरणार्थ, या काळात दुर्गेशी संबंधित सिंहाची कल्पना अजून आली नव्हती. गृह्यसूत्रांच्या काळापर्यंत सिंहाच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाची कल्पना जन्माला आली होती. महाभारतातील दुर्गास्तोत्रानेही याची पुष्टी केली आहे.
पौराणिक कालखंडात दुर्गेच्या अनेक पैलूंची तपशीलवार कल्पना केलेली दिसते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामध्ये संध्या, सरस्वती, चंडिका, गौरी, महालक्ष्मी, ललिता इत्यादी दुर्गेची अनेक नावे काल्पनिक वयाच्या आधारे देण्यात आली आहेत. एक वर्षाची मुलगी संध्या, दोन वर्षांची सरस्वती, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊवर्षाची दुर्गा, दहा वर्षांची गौरी, तेरा वर्षांची महालक्ष्मी आणि सोळा वर्षांची ललिता अशी त्यांची नावे आहेत.
दुर्गेस गृह्यसूत्रांमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून वर्णन केले आहे आणि महाभारतातील सर्वोच्च अस्तित्व म्हणून स्वीकारले गेले आहे. पुराण आणि आगम साहित्यात नऊ प्रकारच्या दुर्गा (नवदुर्गा) सांगितल्या आहेत. या नवदुर्गा मूर्तींची नावे मार्कंडेयपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण आणि आगमामध्येही उपलब्ध आहेत. पुराण आणि आगमाच्या वरील वर्णनांप्रमाणेच, इतर वास्तुशास्त्रातही दुर्गा (नवदुर्गा) च्या नऊ मूर्तींचे वर्णन केले आहे, परंतु वरील शास्त्रांच्या नवदुर्गा-सूचीचे कोणत्याही सूचीशी पूर्ण साम्य नाही, फक्त क्षेमंकरी आणि हरसिद्धी हे दोन नाव आगमाच्या यादीतून घेतलेले दिसतात. अपराजितपृच्छ आणि देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सर्व नऊ मूर्तींचे वर्णन आहे आणि रूपमंडनमध्ये फक्त तीन मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छात नमूद केलेल्या नव दुर्गा मूर्ती म्हणजे महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी. देवमूर्तीप्रकरणातही याच दुर्गेच्या मूर्तींचे वर्णन आहे, फक्त दोन नावांमध्ये काही बदल झाले आहेत. येथे शिवदूतीला सर्वती आणि भ्रमरीला भ्रमणी असे म्हणतात. रूपमंडनमध्ये महालक्ष्मी, क्षेमांकरी आणि हरसिद्धी या तीन दुर्गा मूर्तींचा उल्लेख आहे. अपराजितपृच्छ आणि रूपमंडनमध्ये या दुर्गा मूर्तींचे वाहन सिंह असे वर्णन केले आहे. इतर प्राचीन धर्मग्रंथांपैकी अग्निपुराण आणि गरुडपुराणातही दुर्गेच्या सिंह वाहनाचे वर्णन आढळते. उल्लेख केलेल्या सर्व दुर्गा मूर्ती चतुर्भुज आहेत. त्यांचे वेगवेगळे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
मार्कंडेयपुराणामध्ये वर्णन केलेल्या नवदुर्गा मूर्ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशा सांगितल्या आहेत. तर अग्निपुराण नुसार रूद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतीचंडा आणि उग्रचंडा ही नावे येतात तर आगम ग्रंथानुसार नीलकंठी, क्षेमंकरी, हरसिद्धी, रुद्राक्षदुर्गा, वनदुर्गा, अग्निदुर्गा, जयदुर्गा, विद्यावासिनी आणि रिपुमर्दिनीदुर्गा सांगितले आहे. तसेच अपराजितपृच्छा नुसार महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महारंडा, भ्रमरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धी असे वर्णन उपलब्ध होते. दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मंडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नवदुर्गांचा उल्लेख आहे.
भारतातील अनेक भागांत शक्तीची उपासना करण्यासाठी देवीच्या दुर्गा या रूपाची पूजा केली जाते. महिषासुरमर्दनिी, भवानी, कात्यायनी इत्यादी नावांनी लोकप्रिय असलेल्या या देवतेच्या मूर्तीच्या उगमाचा आणि विकासाचा पुरातत्त्वीय पुरावे, प्राचीन साहित्य, नाणी, शिलालेख आणि मूर्तीशास्त्र यांच्या आधारे घेतलेला हा वेध.
प्रागतिहासिक काळापासून मानव विविध रूपातील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची, स्त्रीरूपातील देवतांची पूजा करायला सुरुवात केली असावी. जगभर मिळणाऱ्या प्रागतिहासिक काळातील मातृदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मूर्ती याची साक्ष देतात. ऑस्ट्रिया आणि चेक रिपब्लिक येथे सापडलेल्या मातीच्या व दगडी प्रतिमा तीस ते अठ्ठावीस हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या प्रतिमांना आता व्हीनस म्हणून ओळखले जाते. शताल हुउक (तुर्कस्थान), टेपे सरब (इराण), टेपे गवरा (इराक), मुंडिगाक (अफगाणिस्तान) इत्यादी ठिकाणांबरोबरच भारत व विद्यमान पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीच्या स्थळांमध्ये मातृदेवतांच्या मातीच्या भाजलेल्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. या मूर्ती साधारणपणे आठ ते चार हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. अर्थातच या मूर्ती वरील प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणत्या नावाने ओळखल्या जात होत्या हे सांगणे शक्य नाही. पण संशोधक त्यांना मातृदेवता असे संबोधतात. दक्षिण भारतात आदिचन्नलूर येथे लोहयुग संस्कृतीतील मातृदेवतेची तांब्याची मूर्ती सापडली आहे. पुणे जिल्ह्यतील इनामगाव येथे झालेल्या उत्खननात एका मातीच्या छोटय़ा पेटीसारख्या आवरणात ठेवलेली स्त्रीदेवतेची मूर्ती सापडली होती. सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या मातृदेवतांच्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मौर्य, शुंग, कुशाण राजांच्या काळात इसवी सनापूर्वी तिसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक विविध अलंकारांनी सजलेल्या अशा देखण्या बनवल्या जाऊ लागल्या. याच काळातील स्थानिक स्त्रीदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या यक्षींच्या दगडी मूर्ती विदिशा, बारहूत, मथुरा, सांची येथे आढळल्या आहेत.
भारतात कुशाण राजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर देवतांच्या पाषाणाच्या प्रतिमा निर्माण होऊ लागल्या होत्या. सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या ब्रह्मा, विष्णू, आणि महेशाशी संबंधित देवतांच्या प्राचीन प्रतिमा उत्तरभारतात सर्वत्र आढळतात. विशेषत शैव आणि शाक्त पंथाशी संबंधित दुर्गा या देवीच्या अनेकविध प्रतिमा सापडतात. आगमग्रंथांनुसार तिची नऊ रूपे आहेत. त्याव्यतिरिक्त देवीचे महिषासुरमर्दनिी हे रूप भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. या दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीचा उदय आणि आतापर्यंत झालेला प्रवास जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न.

प्राचीन संस्कृत साहित्यातील संदर्भ :-
या दुर्गादेवीचे लिखित पुराव्यातील प्राचीनत्व शोधण्यासाठी भारतातील सर्वात प्राचीन वैदिक साहित्याचा संदर्भ तपासावा लागतो. ऋग्वेद व अथर्ववेद संहितांतील देवतांमध्ये इंद्र, मित्र, वरुण, अग्नि इत्यादी पुरुषदेवतांचे प्राबल्य आहे. याशिवाय अदिती, पृथ्वी, वाक्, श्री, यमी, उषा इत्यादी स्त्रीदेवता वेदांमध्ये आढळतात. परंतु कात्यायनी, पार्वती, उमा याची नावे या वेदांमध्ये येत नाहीत. कृष्ण यजुर्वेदाच्या तत्तिरीय आरण्यकात रुद्राच्या पत्नी म्हणून अंबिका आणि उमा यांचा उल्लेख येतो. याच तत्तिरीय आरण्यकात कात्यायनी, कन्याकुमारी, दुर्गी यांना एकाच देवीची नावे म्हणून संबोधले आहे. तसेच वरदा, वेदमाता इत्यादी स्त्रीदेवतांचाही उल्लेख केला आहे. परंतु या स्त्रीदेवतांचे महत्त्व काय होते हे सांगता येत नाही.
केनोपनिषदात रुद्रपत्नी उमेचा उल्लेख हैमवती म्हणजे हिमवत पर्वतातील मुलगी असा आढळतो. रुद्र या पर्वताशी संबंधित देव असल्यामुळे त्याची पत्नी हिमवत पर्वताशी संबंधित असणे साहजिकच आहे. उत्तर वैद्री काळातील हिरण्यकेशी गृह्य़सूत्र या ग्रंथामध्ये भवानी, दुर्गा, भद्रकाली या देवींची नावे येतात. तर बौधायन गृह्य़सुत्रात दुर्गाकल्पच आढळते. पारस्कर गृह्य़सूत्रातील ‘शूलगव’ यज्ञाच्या विधीत आहुती देताना शर्वाणी, भवानी इत्यादी देवशक्तींना आहुती द्यावी, असे वर्णन आढळते.
इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनी याने रचलेल्या अष्टाध्यायी या ग्रंथात भवानी, शर्वाणी, रुद्राणी आणि मृडाणी यांचा उल्लेख आहे. शिवाच्या भव, शर्व, रुद्र आणि मृड या चार रूपांच्या शक्ती म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात या काळात त्यांचे किती महत्त्व होते ते मात्र कळत नाही.
इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नगराच्या मध्यभागी इतर देवतांबरोबरच मदिरा नावाच्या देवीचे मंदिर उभारावे असे सांगितले आहे. काही संशोधकांच्या मते मदिरा ही कृषीदेवता होती, तर काहींच्या मते ही दुर्गा असावी. या अर्थशास्त्र ग्रंथातच एके ठिकाणी तळघरांच्या दाराच्या चौकटीवर देवी प्रतिमा काढावी असे सांगितले आहे.
रामायणामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमेच्या काही उल्लेखांव्यतिरिक्त शक्तीपूजनाचे संदर्भ आढळत नाहीत. महाभारताच्या विराट आणि भीष्म पर्वात देवीचे स्तवन सापडते. महाभारतात ती विन्ध्यवासिनीच्या स्वरूपात येते.
‘हर्षचरित’ या बाणाभट्ट लिखित गद्यपद्यमिश्रित संस्कृत काव्यात हर्षांच्या दरबारात जाताना वाटेतील एका मल्लकूट गावाच्या बाहेर ‘चंडी कानन’ म्हणजे चंडीचे अरण्य असल्याचा उल्लेख येतो. या अरण्यातील झाडांवर कात्यायनी देवीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या व वाटसरू या प्रतिमांना वंदन करत असे वर्णन बाणाभट्ट याने केले आहे. बाण याने लिहिलेल्या ‘कादंबरी’ या संस्कृत ग्रंथात एक चंडीचे देऊळ असल्याचा व तेथे एक द्रविड पुजारी असल्याचा उल्लेख आहे. याच ग्रंथात राणी अपत्यप्राप्तीसाठी चंडिकेची उपासतापास करून आराधना करते असे दर्शविले आहे.
याशिवाय विविध पुराणातून दुग्रेची तसेच महिषासुरमर्दनिीची महती वर्णिलेली आहे. वामन पुराणात महिषासुराची वधाची कथा येते. या कथेनुसार महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला. अर्थात नंतरच्या काही पुराणातून ही कथा बरीच बदललेली दिसते. पण या कथेचे शुंभनिशुंभ वधकथेशी खूप साम्य आहे. त्यावरून पुराणनिर्मितीच्या काळात शुंभनिशुंभांचा वध करणारी विंध्यवासिनी कौशिकी देवी आणि महिषासुर मर्दनिी यांचे एकीकरण करण्यात आले असावे कारण त्यानंतर महिषासुरमर्दिनीला देखील विन्ध्यवासिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. या प्राचीन साहित्यिक उल्लेखांवरून दुर्गा महिषासुरमर्दिनीचा नुसता उल्लेख ते तिच्या पराक्रम कथा यांचा आलेख मिळतो.
भारतात सापडणाऱ्या कोरीव लेखांतून विविध प्रकारची तत्कालीन माहिती आपल्याला मिळते. अर्थातच त्यातून भारताच्या वेगवेगळ्या भागातील धार्मिक माहितीदेखील मिळते. देवीपुजेच्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या काही शिलालेखांचा उल्लेख इथे केला पाहिजे राजस्थानातील ‘होटी सादडी’ या गावातील भवरमाता मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर इसवीसनाच्या सहाव्या शतकातील एक शिलालेख आहे. त्यात आरंभी तीक्ष्ण शूल हातात घेऊन असुराचा वध करणाऱ्या देवीला नमन केले आहे. ही देवी उग्र सिंहांच्या रथात बसलेली असून ती भक्तांचे कल्याण करते, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. येथे देवीचे वर्णन करताना ती शिवाची अर्धागी असल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वर्णनावरून येथे सिंहवाहिनी दुर्गा अपेक्षित असावी यात शंकाच नाही. या शिलालेखाचा उद्देश राजाने देवीचा उत्तम प्रासाद (मंदिर) बांधला होता हे नोंदवण्याचा होता.
बसंतगढ (राजस्थान) येथील खिमेलमाता मंदिरापाशी सापडलेला इसवीसनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलालेख या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाच्या आरंभी दुर्गा आणि क्षेमकरी क्षेमार्या यांना आवाहन केले आहे. तसेच या लेखात स्थानिक लोकांनी एकत्र येऊन मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. त्यात श्रीमातेच्या एका गणिकेचे नावही नमूद केले आहे. विविध आगमग्रंथानुसार नवदुर्गामध्ये गणले जाणारे क्षेमंकरी हे दुग्रेचेच कल्याणकारी रूप आहे. येथील देवीचे सध्याचे खिमेलमाता हे नाव क्षेमार्या या संस्कृत नावाचा स्थानिक भाषेतील अपभ्रंश आहे.


प्रतापगढ (राजस्थान) येथे सापडलेल्या दहाव्या शतकातील दानलेखाच्या आरंभी महिषासुराला मारणाऱ्या दुग्रेचे स्तवन केले आहे. याच लेखात कात्यायनी देवीचाही उल्लेख येतो.
या सर्व पुराव्यान्संदर्भात अमरकोश या संस्कृत कोशात येणारी दुग्रेची नावे बघणे आवश्यक ठरते. अमरकोशात तिची खालील नावे दिलेली आहेत.
उमा कात्यायनी गौरी काली हैमवतीश्वरी॥
शिवा भवानी रुद्राणी शर्वाणी सर्वमंगला।
अपर्णा पार्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका॥
आर्या दाक्षायणी चव गिरिजा मेनकात्मजा।
आत्तापर्यंत आपण बघितलेली विविध ग्रंथातील व कोरीव लेखांतील नावे म्हणजे शैव अगर शाक्त पंथातील दुग्रेची विविध रूपे मानली जात होती हे अमरकोशातील या नोंदीवरून स्पष्ट होते.
याच ‘र्मकडेय पुराणा’त असलेल्या ‘भद्रकाली माहात्म्य’ किंवा ‘दारिका वधम्’ या भागात दारिकासुराचा वध करण्यासाठी देवीने भद्रकालीचे रूप घेतल्याची कथा आहे. त्यावर आधारित चित्रात देवी दारिकासुराचा वध करून त्याच्या पाठीवर उभी राहिलेली दिसते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिचे गुणगान करताना दिसतात. १६६०-७०च्या दरम्यानचे हे चित्र बासोहली शैलीतील आहे.

प्राचीन अफगाणिस्तानात नना या नावाची इराणी देवता प्रसिद्ध होती. कुशाण राजांच्या नाण्यावर ती आपल्याला दिसते. ही नना सिंहावर बसलेली दाखवली जाते. कुशाण राजांच्या कंदाहार ते पटनापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात त्यांनी अनेक स्थानिक देवदेवतांना नाण्यावर स्थान दिले होते. अफगाणिस्तानातील रोबाटक या ठिकाणी सापडलेल्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील कुशाण राजांच्या अधिकाऱ्याच्या शिलालेखात इतर देवतांबरोबर याच नना आणि उमा यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख केला आहे. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा हुविष्क याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी नना व सिंहवाहिनी उमादेखील दिसते. हेच ननाचे व उमेचे सिंहवाहिनी रूप नंतर दुग्रेला प्राप्त होते.
प्राचीन शिल्पातील दुर्गा महिषासुरमर्दनी :-
तामलुक (पश्चिम बंगाल) येथे सापडलेली शुंग काळातील एक छोटय़ा उठावातील मृण्मूर्ती उल्लेखनीय आहे. ही स्त्री मूर्ती सालंकृत असून तिचा केशसंभारही फार मोठा दाखवलेला आहे. तिच्या केशसंभारात पाच छोटी आयुधे दागिन्यांसारखी दाखवण्यात आलेली आहेत. ही आयुधे म्हणजे अंकुश, त्रिशूळ, परशु, वज्र आणि ध्वज ही आयुधे नंतरच्या काळात देवीच्या मूर्तीमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे काही संशोधक या मृण्मूर्तीला दुग्रेची आद्य प्रतिमा मानतात अर्थातच ही आयुधे शौर्य आणि राजवैभव दर्शवत असल्यामुळे ही स्त्रीदेवता महत्त्वाची असणार हे नक्की.
कुशाण काळात (इसवीसनाचे पहिले ते तिसरे शतक) या काळातील काही महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. ही चतुर्भुज देवीची मूर्ती दोन हातांनी एका महिषाला पकडून मारते आहे. अशा आविर्भावातील आहे. देवीचे मागचे दोन्ही हात आता दिसत नाहीत. तिने कानात जड कुंडले घातली आहेत. कुशाण काळातील अशा काही मूर्ती उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सापडल्या आहेत.
गुप्तकालात (इसवीसनाचे चौथे ते पाचवे शतक) ज्याप्रमाणे अनेक देवीदेवतांच्या मूर्तीची मानके बनली तशीच ती दुर्गा महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीचीही बनली. उदयगिरी मध्य प्रदेश येथील लेण्यामध्ये गुप्त काळातील एक सुंदर द्वादशभुजांची महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. तिने हातामध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, भाला, घंटा इत्यादी घेतले आहे. तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर हातातील त्रिशुळाने त्याचा वध करते आहे.
वर उल्लेख केलेल्या भारमोर हिमाचल प्रदेश येथील शिलालेखात उल्लेखलेली लक्षणादेवी ही देखील महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. जवजवळ चार फूट उंचीची ही पितळी मूर्ती सातव्या शतकातील आहे. या चतुर्भुजी देवीच्या हातात त्रिशूळ खड्ग आणि घंटा आहे. एका हाताने तिने जमिनीवर पडलेल्या महिषाची शेपटी पकडली आहे आणि हातातील त्रिशुळाने ती महिषाचा वध करीत आहे.


महाराष्ट्रात वेरुळ येथील लेण्यामधेही महिषासुरमर्दनिीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. वेरुळ येथील कैलास मंदिरात सिंहावर आरूढ झालेली देवी महिषासुराचा वध करते आहे असे चित्रण केले आहे. पल्लवराजांच्या काळात निर्माण झालेल्या महाबलीपुरम येथील एका रथमंदिरात सिंहावर आरूढ झालेल्या देवीचे अंकन आहे. येथे देवी तिच्या सेनेसह महिषासुराशी युद्ध करताना दाखवली आहे. इथे महिषासुर मानवी रूपात दाखवलेला असून त्याचे मुख मात्र महिषाचे आहे.



भारताबाहेरही अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जावा, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती सापडतात. अफगाणिस्तानातील गझनी येथील टेपे सरदार या ठिकाणी एक महिषासुरमर्दिनीची भंगलेली भव्य मूर्ती मिळाली आहे ती काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती.
नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तूं साकार
घेऊनि दहा अवतार, करिसी दुष्टांचा संहार
दार उघड, बया दार उघड
अशा आळवणीनंतर म्लेंच्छांचा संहार करण्यासाठी तिची प्रार्थना केली होती.
Chhatrapati Shivaji Sangrahalay (Museum)
in Kala Ghoda Fort, Mumbai Maharashtra

१२ व्या शतकातील पाल काळातील महिषासुरमर्दिनीची माहिती
महिषासुरमर्दिनीच्या या शिल्पातून दृढनिश्चय, अविचल भाव, स्थिरता, धैर्य, शौर्य, चातुर्य या सर्वांचा मिलाफ दिसतो आहे. या युद्ध वीर रसातील महिषासुरमर्दिनीचे देवी शिल्प म्हणजे स्त्री शक्तीचे साकार दर्शन घडवणारे आहे.
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी
नमानि त्वां
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलाम् सुफलाम् मातरम्॥
अशा रीतीने आदिशक्तीच्या दशभुजा दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही रूपांत मातृभूमीचे वर्णन करून बंकिमचन्द्रांनी प्राचीन भारतीय परंपरेशी आपली नाळ जोडली.
महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे, वेरूळ ( महिषासुरमर्दिनी, कैलास लेणे वेरूळ, येथे महिष राक्षस स्वरूपात दाखवलाय तर त्याचे महिष असणे हे डोक्यावरील दोन शिंगांद्वारे सूचित केलेय. )




सर्वात सुंदर आणि नाजुक कोरीव काम होयसाळ शिल्पकारांनी केले आहे. साबणासारख्या मऊ असलेल्या दगडावर काम केल्याने ते दगडात बारीक तपशील कोरू शकतात. देवीच्या बारकाईने कोरलेले दागिने आपण बघु शकतो.
प्रतिमा शास्त्रानुसार देवीच्या हातांच्या संख्येचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी, नंदा, क्षेमंकरी, शिवदुती, महाचंडा, भ्रमरी सर्वमंगला, रेवती, हरसिद्धी या चतुर्भुज तर कात्यायनी दशभुजा, भद्रकाली अष्टादशभुजा (१८), दुर्गा षोडशभुजा किंवा अष्टादशभुजा (१६/१८), चामुंडा चतुर्भुज किंवा अष्टभुजा (४/८) असाव्यात.
देवी शिल्पात विविध भुजाधारिनी कोरलेली पहावयास मिळते. देवीच्या मूर्तीतील वरील हातात कधी कधी एखादी दोर किंवा साप सदृश्य वस्तू दाखविण्यात येते. त्यास काही अभ्यासक केसांच्या जटा किंवा केसात माळण्यासाठी असलेली माला संबोधतात. परंतु वामन पुराणानुसार, 'रुरू नावांच्या असुराने कालीवर आक्रमण केले. तिने आपल्या खट्वांगाने त्याला मारले व असुराचे कानापासून पायापर्यंतचे कातडे काढून त्याने आपल्या जटा बांधल्या. एक अवखळ जटा बांधली जात नाही असे पाहून तिने तिला उपटून जमिनीवर रागाने आपटले. भूमिवर पडलेल्या त्या जटेपासून चण्डमारीची उत्पत्ति झाली.' अशी कथा येते. याच कथेवर आधारित एक मूर्ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील बाह्यांगवर पहायला मिळते.
महालक्ष्मी -
या दुर्गेच्या मूर्तीचे वर्णन तिन्ही शास्त्रांमध्ये आहे. या शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या निळ्या गळ्यात नाग धारण केलेला असावा आणि तिचा एक हात वरद मुद्रेमध्ये आणि उरलेले तीन हात त्रिशूल, खेटक आणि पानपात्र सोबत असावेत. शिल्पकलेतील दुर्गेच्या महालक्ष्मी-स्वरूपाचे चित्रण दुर्मिळ आहे. वर सांगितलेली शास्त्रवर्णनाशी तंतोतंत जुळणारे महालक्ष्मीचे एकमेव शिल्प चित्तौडगड-विजय स्तंभवरील 'नवदुर्गा समूहा'मध्ये आढळते.
नंदा:
या मूर्तीचे वर्णन केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात केले आहे, रूपमंडन मध्ये उपलब्ध नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणावरून असे ज्ञात होते की, देवी नंदाच्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, खड्ग, खेटक आणि पानपात्र असावे.
क्षेमंकरी-
क्षेमंकरीची प्रतिमा-लक्षणे तिन्ही शास्त्रांमध्ये आहेत, परंतु यातील रूपमंडनाचे वर्णन इतर दोन ग्रंथांतील वर्णनांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरणानुसार क्षेमंकरीचा एक हात वरद मुद्रेमध्ये असावा आणि उरलेल्या तीन हातात अनुक्रमे त्रिशूळ, कमळ आणि पानपात्र असावे. रूपमंडनमध्ये क्षेमंकरीच्या हातात अनुक्रमे वरद मुद्रा, त्रिशूल, खेटक आणि पानपात्र असे वर्णन केले आहे. त्यामुळे देवीच्या तिसर्या हातातील कमळाऐवजी खेटकाचा उल्लेख बदलून महालक्ष्मी व क्षेमंकरी यांच्या हातातील शस्त्रे एकच असल्याचे सांगितले जाते.
शिवदूती किंवा सर्वती-
दुर्गेच्या चौथ्या मूर्तीला अपराजितपृच्छा मध्ये शिवदूती आणि देवतामूर्तीप्रकरणात सर्वती असे म्हटले जाते, परंतु दोन्ही शास्त्रात उपलब्ध या मूर्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. रूपमंडन मध्ये या मूर्तीचा उल्लेख नाही. इतर दोन शास्त्रांनुसार, दुर्गेची ही मूर्ती कमंडलू, चक्र, खेटक आणि पानपात्राने सुसज्ज असावी. शिल्पकलेमध्ये महालक्ष्मी आणि नंदाप्रमाणे दुर्गेच्या शिवदुती किंवा सर्वती स्वरूपाचे दुर्मिळ चित्रण आढळते.
महारंडा –
महारंडाचा उल्लेख रूपमंडनमध्ये नाही आणि या मूर्तीची वैशिष्ट्ये इतर दोन शास्त्रांमध्ये काही वेगळ्या प्रकारे दिली आहेत. अपराजितपृच्छा नुसार महारंडाची मूर्ती खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि खेटक यांनी सज्ज असावी, तर देवतामूर्तीप्रकरणात महारंडा अनुक्रमे खड्ग, त्रिशूळ, घंटा आणि पानपात्र या लांच्छणाने सुसज्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवतामूर्तीप्रकरणात देवीच्या शेवटच्या हातातील पात्राचा उल्लेख खेटकाऐवजी बदलला आहे. शिल्पकलेमध्ये क्षेमंकारीप्रमाणेच महारंडाचे सामूहिक आणि स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात चित्रण करण्यात आले होते.
भ्रमरी किंवा भ्रमणी- महारांडाप्रमाणेच या दुर्गेच्या मूर्तीचा उल्लेखही रूपमंडनमध्ये नाही आणि इतर दोन ग्रंथांमध्येही देवीचे नाव आणि तिच्या शेवटच्या हातातील शस्त्र बदलले आहे. अपराजितपृच्छात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीला भ्रमरी असे म्हणतात आणि तिच्या हातात अनुक्रमे खड्ग, डमरू, खेटक आणि पानपात्र असल्याचे वर्णन केले आहे, तर देवतामूर्तीप्रकरणात दुर्गेच्या सहाव्या मूर्तीचे नाव भ्रमणी आणि शेवटच्या हातात पानपात्र ऐवजी पाश असल्याचा उल्लेख आहे आणि इतर तीन हातांची शस्त्रे निश्चितपणे खड्ग, डमरू आणि खेटक आहेत. शिल्पकले मध्ये भ्रमरी किंवा भ्रमणी यांच्या वरील वर्णनांशी साधर्म्य असलेली मूर्ती दुर्मिळ आहेत.
सर्वमंगला-
सर्वमंगलाचा उल्लेख केवळ अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरणात आहे, रूपमंडनमध्ये नाही. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तीप्रकरण नुसार, सर्वमंगला आपल्या हातात अनुक्रमे अक्षसूत्र, वज्र, घंटा आणि पात्र धारण करते.
रेवती-
सर्वमंगलाप्रमाणे रेवतीचा उल्लेख रूपमंडन मध्ये नाही आणि इतर दोन शास्त्रांमध्ये वर्णन केलेली या देवीची हातातील शस्त्रे सारखीच आहेत. अपराजितपृच्छा आणि देवतामूर्तिप्रकरण या दोन शास्त्रांनुसार, रेवतीच्या हातात अनुक्रमे दंड, त्रिशूळ, खटवांग आणि पानपात्र असले पाहिजेत.
हरसिद्धी-
हरसिद्धीचे मूर्ती लक्षण तीनही शास्त्रांमध्ये आढळते. या शास्त्रानुसार हरसिद्धीने आपल्या हातात अनुक्रमे कमंडलू, खड्ग, डमरू आणि पानपात्र धारण केले पाहिजे.
सामुहिक चित्रणांमध्ये वरील प्रमाणे उल्लेखित मूर्ती या केवळ चित्तोडगड-विजय स्तंभाच्या नवदुर्गा-समूहात कोरलेल्या आढळून येतात.
भारतीय मूर्ती कलेचा इतिहास समजून घेण्यासाठी पुराणाचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. कारण देवी-देवतांच्या नाना विधिरूपे पुराणानीच बहाल केलेली आहेत. त्यातीलच काही रुपे धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरावर पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरीच्या मंदिरावर असलेल्या एका देवी शिल्पास मोहिनीचे शिल्प असे अभ्यासकांचे म्हणणे असून हे मोहिनीचे शिल्प नसून कालीचे शिल्प आहे.
शिल्पकलेच्या दृष्टीने प्रस्तुत शिल्प निर्माण करणे ही कलाकाराच्या कलेची कसोटी होती असे म्हणावे लागेल. कारण या शिल्पात चेहऱ्यावरून सोलून काढली त्वचा दाखविण्याचे कसब सामान्य शिल्पीचे नक्कीच नाही. धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिरास भेट दिल्यास नक्कीच हे शिल्प आपले लक्ष वेधून घेणारे असणार आहे हे निश्चित. नेहमी देवतेच्या रूपा वरून राक्षस शोधत असतो पण इथे राक्षसा वरून देवतेची ओळख पटली हे विशेष आहे. रुरू सिद्ध झाल्या वरच काली पूर्ण झाली असे म्हणावे लागेल.
अष्टादंड भुजा प्रचंड सरळा
विक्राळ दाढा सुळा
रक्त श्रीबुबूळा प्रताप आगळा
ब्रम्हांड माळा गळा
जिव्हा ऊर स्थळा रूळे लळलळा
कालांत कल्पांतके
साष्टांगे करीतो प्रणाम तुजला
जय जय महाकालीके
देवी शिल्पामध्ये अश्याच क्रोधात्मक रौद्ररूपाचे दर्शन होते, ते तिच्या काली या स्वरूपात. देवीचे काली स्वरूपातील शिल्प आणि त्यातील रौद्र रस अनुभवण्यापूर्वी तिचे स्वरूप आणि उद्भव बघणे अधिक संयुक्तिक ठरेल. देवी कालीचे स्वरूप मार्कंडेय पुराण, लिंगपुराण, देवी भागवत यांसारख्या पुराणांमधून तर तंत्र साहित्यातून अधिक स्पष्ट होते. पार्वतीचे उग्र स्वरूप म्हणजे काली. काळावर तिचे अधिराज्य आहे म्हणून तिला काली म्हणतात.
कालसङ्कलनात् काली सर्वेषामादि रूपिणी |
कालत्वादादिभूतत्वादाद्या कालीति गीयते ||
म्हणजेच काली देवी, तिच्या ठायी काळाचे संकलन करते. तिच अंत आणि तीच आरंभ स्वरूपिणी आहे. कालत्व अर्थात ज्या गुणांचा स्वीकार करून काल उत्पन्न होतो, तो गुण तिच म्हणजे काली. काळाचा प्रारंभही तिच्यापासून होतो त्यामुळे तिला आद्या असेही म्हणतात.
काली उत्पत्तीच्या विविध कथा आहेत. देवीचे दशम महाविद्या स्वरूपात ही पूजन होते. परंतु देवी कालीचा रौद्र हा स्थायीभाव, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात वर्णिला आहे.
ततः कोपं चकारोच्चैरम्बिका तानरीन्प्रति |
कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा ||
भृकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकाद्द्रुतम् |
काली कराल वदना विनिष्कानतासिपाशिनी ||
चण्ड-मुण्ड यांच्या असुरी सेना देवीवर धनुष्य ताणून उभी आहे, हे बघून अंबिकेचा चेहरा रागाने काळा पडतो, तिच्या भुवया क्रोधाने चढतात आणि त्यातून साक्षात कालीचा उद्भव होतो. तिचा चेहरा काळा आणि हातामध्ये खड्ग आणि खट्वांगं धारण केलेले असे उग्र रूपात ती असुरांपुढे येते.

शिल्पकाराने देवी कालीची अनेक रौद्र रूपे शिल्पांमधून अभिव्यक्त केली आहेत. युद्धभूमीवर तिच्या रौद्र रूपाने थैमान घातले आहे. त्यामुळे तिचा युद्धभूमीवरील हा रौद्र तांडव नृत्यशिल्पांतून अभिव्यक्त होतो. कर्नाटक, हळेबिड येथील होयसाळेश्वर मंदिरावर रौद्ररुपिणी कालीचे शिल्प बघायला मिळते. हे शैव मंदिर इ.स. 12 शतकात होयसळ राजवंशातील विष्णूवर्धन याने बांधले आहे. होयसळ शैलीतील या शिल्पामध्ये षड्भुजा काली नृत्य करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला तिचे सेवक, गण आहेत. खड्ग, सर्प, डमरू, त्रिशूळ, कपाल आणि नरमुण्ड तिच्या हातांमध्ये तिने धारण केले आहे. सालंकृत कालीच्या गळ्यातील रुण्डमाळा रुळत आहे. क्रोधाने तिचे डोळे विस्फारलेले आहेत. एकूणच चेहऱ्यावरील रौद्र भाव सहज टिपता येत आहे. त्यामुळे रौद्र रसातील तिच्या या शिल्पातून उत्साह, आवेग, चपळता, उग्रता यांचे दर्शन होत आहे.
करालवदना काली

देवी शिल्पामध्ये भय रसाचा उद्भव देवीच्या काली विग्रहातून निर्माण होतो. कालीचे स्वरूप रौद्र रस बघताना जाणून घेतलेच आहे. त्यामुळे तिच्या शिल्पातील भयानक रसाचे रसग्रहण करू. इ.स. सातव्या – आठव्या शतकातील ही मूर्ती सध्या दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात आहे. मध्यप्रदेश येथून ही मूर्ती सापडलेली आहे.
चतुर्भुजा करालवदना देवी समपाद स्थानक म्हणाजे तिच्या दोनही पायांवर समान भार देऊन उभी आहे. तिची देहयष्टी स्थूल आहे. चेहऱ्यावर उग्र भाव आहेत. मिटलेले मोठे डोळे, प्रमाणापेक्षा जाड ओठ आणि मोठे नाक यांमुळे तिच्या रूपामध्ये भयानकता वाढली आहे. केशरचना बघितली तर जटांचा केशसंभार कवट्यांनी सुशोभित केला आहे. तिच्या गळ्यामध्ये एखाद्या पुष्पमाळेप्रमाणे रुळावा तसा नाग रुळत आहे. या फणा काढलेल्या नागाचे तोंड तिने तिच्या उजव्या हातामध्ये पकडले आहे. या फणा काढलेल्या नागाचे तोंड तिने तिच्या उजव्या हातामध्ये पकडले आहे. तिच्या पुढच्या दोनही हातांमध्ये मानवाची मुंडकी आहेत. मागच्या उजव्या हाताने सर्प पकडला आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे. या दोनही हातांच्या खोबणीत उजवीकडे त्रिशूळ आहे आणि डावीकडे दण्ड. देवीच्या हातातील नरमुंडाचे रक्त प्यायला जंबुक दोन पायावर उभे आहेत. देवीच्या पायाशी दोनही बाजूला वाघ सदृश्य प्राण्यांचे अंकन केले आहे. एकूणच ह्या शिल्पामधून देवीच्या भयप्रद मूर्तीचे दर्शन होत आहे.
पार्वती :-
सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली, आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रम्हदेवांकडे याची वाच्यता केली, तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, ही आद्य देवीची शक्ती आहे म्हणजे ही आदी शक्ती देवी असल्यामुळे, हिचा विवाह आद्य देवता शंकर यांच्याशी होणे उचित होईल. सतीने तपस्वी असलेल्या शंकराशी लग्न करण्याचे ठरविले. शंकर हे सदैव ध्यान करीत असलेले तपस्वी देव होते; पण सतीने हार मानली नाही. शंकराचे प्रेम प्राप्त करण्यासाठी तिला शंकराप्रमाणेच कठोर तपस्या करावी लागली. सती ही दक्ष राजा आणी मेना या जोडप्याची राजकन्या असल्याने तीच्या विवाहाच्या वेळी सर्व मोठ-मोठ्या असामींना निमंत्रण होते – राजे रजवाडे आणि त्यांच्या राण्या, देव देवता सर्व नटून थटून अले होते. विवाह प्रसंगी वर म्हणुन शिव सजून आले – उग्र, जटाधारी केशसंभार, संपूर्ण अंगाला राख फसलेली, नुकत्याच मेलेल्या हत्तीचं रक्ताळलेलं कातडं त्यांनी परिधान केलं होतं. शिव पूर्णपणे नशेत धुंद, पूर्णपणे परमानंदात दंग अवस्थेत आला. त्यांच्या वरातीत भूत पिशाच्च होती. नवऱ्या मुलाला पाहताच पार्वतीची आई, मेना, चक्कर येऊन पडली! शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की, त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. “तुम्ही जसे आहात तसे मला आवडता. मला फक्त तुम्ही हवे आहात. पण कृपया माझ्या आईकरता तरी तुम्ही जरा दिसण्यात सभ्यपणा आणा ना.” पार्वतीने शिवाजवळ आर्जव केले.
आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती, आणि राजा दक्ष जन्मदाता, असे मनात आल्याने ती थांबली. या अपमानाचा बदला म्हणून, तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर , त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिव यांचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले.सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एकावन्न जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायानी नावाने म्हणतात.
या कृत्याचा विष्णुंना पश्चाताप झाला आणि भगवान शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन, मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिव-शंकरांना वचन दिले, की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरीजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल.
यानंतरची कथा अशी आहे की, मानवांमध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला "मागणी" घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे - उमा - पार्वती !. ते पुढील कथा मधून त समजून घेऊ !
श्री विष्णु भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या! ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली! तर कुणाच्या?अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या! त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी! पण, पार्वती काही बाधली नाही.
तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. ती हिमालयाची कन्या होती; पण तिने तिच्या राजवाड्यातील सर्व सुख-सोईंचा त्याग केलाफक्त पाने खाऊन उपवास केले. पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले, तेव्हा तिला 'अपर्णा' हे पण नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. तिच्या कठोर तपश्चर्येचे वर्णन कुमार संभवाच्या पाचव्या सर्गात विस्ताराने आले आहे. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वत: पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच !
ईकडे पार्वती तप करत असताना तिन्ही लोकात एक वेगळीच घडामोड होत होती.
शिवपुराणानुसार एकदा वज्रांगाचा पुत्र तारकासुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. त्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले तारकासुराने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले की ब्रम्हदेवाने जगात निर्माण केलेली कोणतीही गोष्ट त्याच्यापेक्षा बलवान असू नये, दुसरे वरदान म्हणजे तो सदैव अमर रहावा. ब्रम्हदेवांनी तारकासुराला इच्छित वरदान दिले.
तारकासुरला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळताच त्याने संपूर्ण जगात दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याने स्वर्गातील देवतांना तसेच पृथ्वीवरील मानव आणि ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली. तारकासुराने देवराज इंद्राला हरवले आणि त्याचे वाहन ऐरावत हत्ती, खजिना आणि नऊ पांढरे घोडे हिसकावून घेतले. भीतीपोटी ऋषींनी तारकासुराला कामधेनू गायही दिली. मात्र त्यानंतरही त्याची दहशत वाढतच होती. तिन्ही जगावर ताबा मिळवल्यानंतर तारकासुराने देवतांना स्वर्गातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व देव ब्रह्मदेवांकडे पोहोचले आणि त्यांनी तारकासुरापासून रक्षण करण्याची विनंती केली. ब्रह्मानी देवांना सांगितले की या परिस्थितीत ते काहीही करू शकत नाहीत. कारण तारकासुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला वरदान दिले होते. देवांना दुःखी पाहून ब्रह्मदेवाने त्यांना उपाय सांगितला की तारकासुराचा नाश भगवान शिवाच्या मुलांमुळेच होईल. हे ऐकून सर्व देवांना आश्चर्य वाटले कारण माता सतीने आपले शरीर यज्ञाच्या अग्नीत नष्ट केले होते. मग हे कसे शक्य होईल? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की सती पुन्हा पार्वतीच्या रूपात जन्म घेईल. त्यानंतर तीचा विवाह भगवान शिवाशी होणार आहे. त्यानंतर शिव आणि पार्वतीच्या भावी मुलाकडून तारकासुराचा वध होईल.
शंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना या कशाचाच पत्ता नाही! इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार!
पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, " शंकराला ध्यानातून जागे कर". तुझ्या मदनबाणाने त्यांना घायाळ कर! म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल!"
कामदेवाने शंकरावर मदन बाणांचा वर्षाव केला. शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले !. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले! कामदेवची पत्नी रती आपल्या पतीला जाळून मारलेले पाहून दु:खी झाली. त्यानंतर रतीने माता पार्वतीला सांगितले की, माझे पती कामदेव देवांच्या आणि इंद्राच्या आज्ञेवरुन शिवशंकराच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी आले आहेत. तुझ्यामुळे मी माझा नवरा तर गमावलाच पण आई होण्याचा आनंदही गमावला. त्यानंतर रतीने आपल्या पतीची अस्थिकलश हातात घेतली आणि पार्वतीला शाप दिला की ज्याप्रमाणे मी आई होण्याचे सुख गमावले आहे, त्याचप्रमाणे मी पार्वतीला शाप देते की ती आपल्या गर्भातून कधीही मुलाला जन्म देऊ शकणार नाही. नंतर जेव्हा भगवान शिवाचा राग शांत झाला आणि सर्व देवतांनी तारकासुराला दिलेल्या वरदानाची माहिती दिली. त्यामुळे कामदेवाची पत्नी रती हिने कामदेवाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान शिवाने कामदेवला पुन्हा जिवंत केले. पण त्याला शरीर नव्हते. तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल, असे सांगितले.
आत्ता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. "तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल! त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का!" शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला! त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला!
फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे! वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले.
आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत, तर आजही 'तत्वज्ञान' लागु पडते. त्यातील धडे आजही गरजेचे आहेत.
शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई-वडील आलेत. विवाहाला स्वत: ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगल वाद्ये वाजत आहेत. वधू-वर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्या ऐवजी, चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे! प्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिव-पार्वतीने घालून दिले आहेत.
माता पार्वतीचे भगवान शंकरावर अपार प्रेम होते. एका आदर्श पत्नीप्रमाणे, माता पार्वती भगवान शिवाच्या सर्व वचनांचे पालन करत असे आणि जेव्हाही भगवान शिव काही बोलायचे तेव्हा ती त्यांचे पूर्ण लक्ष देऊन ऐकत असे. एकदा भगवान शिव माता पार्वतीला ब्रह्माचे ज्ञान देण्यासाठी सृष्टीची कथा सांगत होते. कथा ऐकत असताना आई पार्वती वेगळ्याच विचारात गढून गेली. माता पार्वती त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही हे भगवान शिवाच्या लक्षात येताच त्यांनी माता पार्वतीला विचारले की ती कथा ऐकत आहे का? पण माता पार्वती कुठेतरी हरवली होती, म्हणून तिने भगवान शिवाच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. काही काळानंतर, जेव्हा माता पार्वती आपल्या विचारांपासून विचलित झाली आणि पुन्हा भानावर आली तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि माता पार्वतीला म्हणाले की तू ब्रह्मदेवाच्या ज्ञानाचा अनादर केला आहेस. जेव्हा कोणाकडून शिक्षण किंवा ज्ञान घेतले जाते तेव्हा विचलित होऊ नये आणि असे झाल्यास ते दंडनीय आहे. यानंतर शिक्षा म्हणून भगवान शिवाने माता पार्वतीला शाप दिला की आता तुझा जन्म कोळी कुटुंबात होईल.
पार्वतीला तिची चूक कळली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि भगवान शिवाने तिला शाप दिला होता. आता शोकात बुडालेली पार्वती कोळी बांधवांच्या गावात पोहोचली. या गावच्या प्रमुखाला मूलबाळ नव्हते. एके दिवशी तो मासेमारीसाठी तलावात जात असताना वाटेत एका झाडाखाली त्याला एक मुलगी बसलेली दिसली, जी साक्षात मुलीच्या रूपात माता पार्वती होती. ती लहान मुलगी तिथे एकटी होती, तिच्यासोबत कोणीही नव्हते. मग मच्छीमाराने ही घटना देवाची कृपा मानली आणि त्या चिमुरडीला आपल्या घरी आणले. आई पार्वती मुलगी म्हणून त्याच घरात राहू लागली. अशाप्रकारे भगवान शिवाच्या शापामुळे माता पार्वतीला आपला एक जन्म कोळ्याच्या घरात घालवावा लागला.
देवी बागवता पुराणात पार्वती ही इतर सर्व देवींची पूर्वज आहे. तिची अनेक रूपे आणि नावांनी एक म्हणून पूजा केली जाते. तिचे रूप किंवा अवतार तिच्या मूडवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ:
दुर्गा हे पार्वतीचे राक्षसाशी लढणारे रूप आहे आणि काही ग्रंथ असे सूचित करतात की पार्वतीने दुर्गामासुर या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेचे रूप धारण केले होते.
काली हे पार्वतीचे आणखी एक उग्र रूप आहे, काळ आणि परिवर्तनाची देवी म्हणून, पौराणिक उत्पत्ती देवता निर्ृतीत आहे.
चंडी हे पार्वतीचे सामर्थ्य मानले जाणारे दुर्गेचे विशेषण आहे; ती काळ्या रंगाची आहे आणि महिषासुराचा वध करणाऱ्या सिंहावर स्वार आहे.
दहा महाविद्या ही शक्तीची दहा रूपे आहेत. तंत्रामध्ये, सर्वांचे महत्त्व आहे आणि सर्व पार्वतीचे विविध पैलू आहेत.
52 शक्तीपीठे सूचित करतात की सर्व देवी देवी पार्वतीच्या विस्तार आहेत.
पार्वतीची नवदुर्गा नऊ रूपे
मीनाक्षी , माशासारखे डोळे असलेली देवी.
कामाक्षी , प्रेम आणि भक्तीची देवी.
ललिता , विश्वाची चंचल देवी, ती देवी पार्वतीचे एक रूप आहे.
अखिलंडेश्वरी , भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते, ही पाण्याशी संबंधित देवी आहे.
अन्नपूर्णा हे सर्व पूर्ण आणि अन्नाचे प्रतिनिधित्व करते.
(स्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Parvati )
लंकेची पार्वती
सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...
मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.
रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?
जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.
कैलासावर रहाणार्या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.
पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.
पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.
मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.
विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.
शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.
तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.
शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.
ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.
हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.
वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.
डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !
*वरील लिखाण एका हिन्दी काव्यावर आधारीत आहे.
लज्जागौरी :-
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुसूत्री आपल्या शास्त्रात प्राचीन काळापासून सांगितली आहे. भारतातली आणि भारताबाहेरील काही निवडक मंदिरं पाहताना तुम्हाला ही चतुसूत्री आवर्जून पाहायला मिळेल. देवळांच्या बाह्य भिंती म्हणजेच मंडोवरावर धर्म, अर्थ आणि काम ह्या संदर्भात अनेक शिल्प आढळतात. धर्म सांगण्यासाठी रामायण महाभारत आणि पुराणातल्या इतर अनेक कथांचा वापर करून विविध शिल्प घडवलेली दिसतात. तर पूर्वीच्या काळात अर्थकारण कसं चालायचं याचा दृष्टांत म्हणून शेतीकाम, पशुपालन इत्यादी अनेक शिल्प बाह्य भिंतीवर आढळतात( जी लोकांनी हेतू पुरस्करपणे नेहमी दुर्लक्षित ठेवली). काम शिल्प ही केवळ खजूराहो मंदिरात आहेत असा अनेकांचा गैरसमज आहे मात्र ते तसे नसून काम शिल्प बऱ्याचशा मंदिरांच्या मंडोवरावर आढळतात. मुळातच, एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू ज्ञात नसल्यास त्याबद्दल वावड्या उठणं अत्यंत स्वाभाविक ! धर्म, अर्थ, काम हे बाहेर बाह्य भिंतींवर कारण मोक्ष मिळण्याआधी हे सर्व करणे गरजेचे असे शास्त्रकारांनी सांगितले. आधी प्रपंच करावा नेटका ! हे सर्व जगून देवळाबाहेरच ठेवून देवळाच्या आत मोक्ष मिळावा म्हणून प्रवेश करावा ही इतकी साधी सोपी शास्त्रकारांची योजना !
काम शिल्पांसोबतच त्याच धाटणीतली परंतु एक आगळी वेगळी मूर्ती मंदिरांच्या बाह्य भिंतीवर आढळते ती म्हणजे लज्जागौरी ! लज्जागौरी म्हणजेच स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन. लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. आपल्याला ज्या स्त्रीने जन्म दिला ती स्त्री म्हणजे निसर्गाची एक किमयाच ! अगदी पूर्वापार मनुष्य प्राण्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा जेव्हा जेव्हा तो त्या गोष्टीला पूर्णतः वश करू शकला नाही तेव्हा तेव्हा त्याने त्या गोष्टीचं पूजन केलं. उदाहरणादाखल पर्जन्य, अग्नी, वायू आकाशातले तारे जसे की सूर्य, चंद्र इत्यादी गोष्टी एक तर भयामुळे किंवा मनुष्याची त्यांच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेमुळे पूजनीय झाल्या. तसंच मातृत्व ही सुद्धा इतक्या सहस्त्र वर्षांनंतरही अनाकलनीय आणि अचाट संकल्पना आहे ! वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. लज्जा गौरीच्या मातीच्या , काष्ठ म्हणजे लाकडावर कोरलेल्या आणि दगडात कोरलेल्या मूर्ती अगदी मोहेंजोदारो काळापासून आढळतात.
आता लज्जा गौरीची प्रतिमा ओळखायची कशी ? सर्वप्रथम लज्जा गौरी म्हणजे स्त्रीची नग्न प्रतिमा ! इथेच सर्वसामान्य मनुष्य गोंधळून जातो की पूजनच करायचं तर नग्न प्रतिमेचे कारणच काय ? आता हे समजून घ्या की मातृत्वाचे पूजन म्हणजे जन्म होण्यापूर्वी योनीद्वारे गर्भधारणा, गर्भात असताना आपण आईशी नाळेने जोडलेलो असतो म्हणून बेंबी, योनी द्वारे स्त्री प्रसूती करते म्हणून पुन्हा योनी, आणि जन्मानंतर अपत्याचे स्तनांद्वारे पालनपोषण आई करते म्हणून हे अवयव अतिशय महत्वाचे ! त्यामुळे हे सर्व अवयव ठसठसशीत पणे दिसावेत म्हणूनच नग्न प्रतिमेची योजना, अन्य दुसरे कारण नाही. त्यातही योनीचा भाग जास्त ठळकपणे दिसावा म्हणून मांड्यांची रचना इंग्रजी अक्षर ( M ) प्रमाणे केलेली दिसते. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले.
हिच्या योनीतून दोन सर्प बाहेर आले असून ते पुरुष शक्तीचे प्रतिक आहेत.
वेरूळमधली रामेश्वर लेण्यातील (लेणी. क्र. २१ ) येथील नंदीपीठाच्या मागील बाजूस कोरलेली आहे. इ.स. ७ / ८ शतक.
लज्जा गौरीच्या अनेक मूर्ती भारतभर आढळतात त्यात तीन वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार म्हणजेच या मूर्तीला स्त्रीचा चेहरा आढळून येतोआणि त्यासोबतच वर उल्लेख केल्याप्रमाणे मातृत्व निर्देशक अवयव ठळकपणे दर्शवलेले असतात. ह्या मधला दुसरा आणि तिसरा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण ह ह्यासाठी की शास्त्रकारांनी हे वेळेवरच जाणले की लज्जा गौरीचे नग्न शिल्प जर चेहऱ्यासकट दर्शवलं तर मनुष्य चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि मातृत्व पूजन होण्याऐवजी वासनेची निर्मिती होऊ शकते. हे टाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकतर चेहऱ्याऐवजी कमळ दर्शवलं आहे किंवा धडाखालचा भागच शिल्पांकित केला गेला. अशा पद्धतीने मूळ हेतुला फाटा न देता मातृत्व पूजनावर शास्त्रकारांनी भर दिला. लज्जा गौरीचं स्वतंत्र शिल्प असलेली देवळही आढळतात आणि त्यांचे पूजनही केलं जातं आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांच्या बाह्य भिंतीवरही लज्जा गौरी आढळते मात्र ती शोधावी लागते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे. जसे लज्जागौरी हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे.
आज आपण भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे असं जरी म्हणत असलो तरीसुद्धा जन्म हा स्त्रीच देऊ शकते पुरुष केवळ निमित्त मात्र ! जुन्या काळामध्ये ही वीर पुरुष हे स्वतःच्या आईच्या नावाने किंवा आईच्या कुळाने ओळखले. देवकीनंदन कृष्ण, कौशल्या पुत्र राम हे पुराणातले संदर्भ, तर थोडंसं मागे गेलो तर 2200 वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन सत्तेत गौतमीपुत्र सातकर्णी हा बलाढ्य राजा स्वतःच्या आईचे नाव लावत असे. शहाजीराजांचे पुत्र असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात जिजाऊ मातेमुळेच ! पण असो कालाय तस्मै नमः ।
लज्जा गौरी या शिल्पाला इतरही अनेक पैलू आहेत जे सर्व समावेशक लेखांमध्ये देता येत नाही
लज्जागौरी
लज्जागौरी हे देवीचे विचित्र नाव वाटते त्याच पद्धतीने तिच्या प्रतिमा हि विचित्रच वाटतात, भारताच्या विविधभागातील मंदिरातून तर काही ठिकाणी स्वतंत्र मंदिरातून या प्रतिमा विराजमान आहेत, उत्खननामधुन मिळालेल्या तिच्या काही दगडी व मातीच्या मुर्ती विविध संग्रहलया मधुन ठेवल्या आहेत, या मुर्ती नग्न व उताण्या निजलेल्या अवस्थेतील आहेत, यांच्या हातात कमळ असुन काही प्रतिमा शिरोविहीन आहेत, तर काही प्रतिमा मधे शिराचे जागी कमळ पुष्प आहे, देवी विषयक धार्मिक प्रतिष्टित ग्रंथात याचा उल्लेख आढळत नाही, देवता विषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचे मते या प्रतिमा वैदिकदेवी अदितीच्या आहेत, ज्या मंदिरामध्ये या पुजेत आहेत त्या ठिकाणी त्यांना भूदेवी, रेणुका म्हणुन संबोधले जाते
ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता ‘श्री’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिक्लीत ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसूक्तात निर्दिष्ट आहेत.
श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे. ती विष्णुमनोनुकूला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय. धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपांतही ती पूजनीय मानली जाते. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इ. लक्ष्मीचीच रूपे आहेत. ऋग्वेदातील ज्ञानसूक्तात ‘भद्रैषां लक्ष्मीर्निहताSधि वाचि’ (१०.७१.२) इ. मंत्रांत एक प्रकारे वाग्लक्ष्मीचाच निर्देश केलेला दिसतो. वाणीचे भद्र सौंदर्य हीसुद्धा लक्ष्मीच. भागवत पुराणात विष्णूची शोभा, कांती म्हणजेच लक्ष्मी, असा निर्देश केलेला दिसतो. वाजसनेयिसंहितेतील (३१.२२) पुरुषसूक्ताच्या शेवटच्या मंत्रात मात्र ‘श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ’ असा निर्देश आला आहे. त्यावरून ‘पुरुष’ रूपी विष्णूच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत्या, असा संदर्भ मिळतो. म्हणजेच श्री आणि लक्ष्मी यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या येथे निर्वाळा मिळतो. तैत्तिरीय उपनिषदात (१.४) वस्त्र, गोधन, अन्न आणि पेय यांचा श्री म्हणजे लक्ष्मी असा निर्देश केला आहे.
ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.
या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.
ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतो त्या त्या वेळी लक्ष्मीसुद्धा विष्णुची सहचरी होण्यासाठी अवतार घेते. वामनावतारात तिने पद्मेचा अवतार घेतला. परशुरामाच्या अवतारात तिने धरणीचे रूप घेतले. रामावतारात ती सीता बनली आणि कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली.
इंद्रैश्वर्यरूपी लक्ष्मीबाबत पुढीलप्रमाणे कथा प्रचलित दिसते : दुर्वासाच्या शापाने इंद्र हा लक्ष्मीपासून भ्रष्ट झाला. त्यामुळे स्वर्गलक्ष्मी वैकुंठात येऊन महालक्ष्मीत विलीन झाली. नंतर नारायणाच्या आज्ञेने स्वर्गलक्ष्मीच्या रूपातील लक्ष्मी क्षीरसागराची कन्या म्हणून जन्मास आली. देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशायी विष्णूला वरमाला अर्पण केली.
इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दु:शील आणि अस्वच्छ व्यक्तींचा त्याग करते. जेथे हरिपूजा आणि हरिकिर्तन होत नाही, त्या स्थानाचा ती त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मीच्या नित्य सांनिध्यात असतात.
1. प्रकृती
2. विकृती
3. विद्या
4. सर्वभूतहितप्रदा
5. श्रद्धा
6. विभूति
7. सुरभि
8. परमात्मिका
9. वाचि
10. पद्मलया
11. पद्मा
12. शुचि
13. स्वाहा
14. स्वधा
15. सुधा
16. धन्या
17. हिरण्मयी
18. लक्ष्मी
19. नित्यपुष्टा
20. विभा
21. आदित्य
22. दित्य
23. दीपायै
24. वसुधा
25. वसुधारिणी
26. कमलसम्भवा
27. कान्ता
28. कामाक्षी
29. क्ष्रीरोधसंभवा, क्रोधसंभवा
30. अनुग्रहप्रदा
31. बुध्दि
32. अनघा
33. हरिवल्लभि
34. अशोका
35. अमृता
36. दीप्ता
37. लोकशोकविनाशि
38. धर्मनिलया
39. करुणा
40. लोकमात्रि
41. पद्मप्रिया
42. पद्महस्ता
43. पद्माक्ष्या
44. पद्मसुन्दरी
45. पद्मोद्भवा
46. पद्ममुखी
47. पद्मनाभाप्रिया
48. रमा
49. पद्ममालाधरा
50. देवी
51. पद्मिनी
52. पद्मगन्धिनी
53. पुण्यगन्धा
54. सुप्रसन्ना
55. प्रसादाभिमुखी
56. प्रभा
57. चन्द्रवदना
58. चन्द्रा
59. चन्द्रसहोदरी
60. चतुर्भुजा
61. चन्द्ररूपा
62. इन्दिरा
63. इन्दुशीतला
64. आह्लादजननी
65. पुष्टि
66. शिवा
67. शिवकरी
68. सत्या
69. विमला
70. विश्वजननी
71. तुष्टि
72. दारिद्र्यनाशिनी
73. प्रीतिपुष्करिणी
74. शान्ता
75. शुक्लमाल्यांबरा
76. श्री
77. भस्करि
78. बिल्वनिलया
79. वरारोहा
80. यशस्विनी
81. वसुन्धरा
82. उदारांगा
83. हरिणी
84. हेममालिनी
85. धनधान्यकी
86. सिध्दि
87. स्त्रैणसौम्या
88. शुभप्रदा
89. नृपवेश्मगतानन्दा
90. वरलक्ष्मी
91. वसुप्रदा
92. शुभा
93. हिरण्यप्राकारा
94. समुद्रतनया
95. जया
96. मंगला देवी
97. विष्णुवक्षस्स्थलस्थिता
98. विष्णुपत्नी
99. प्रसन्नाक्षी
100. नारायणसमाश्रिता
101. दारिद्र्यध्वंसिनी
102. देवी
103. सर्वोपद्रव वारिणी
104. नवदुर्गा
105. महाकाली
106. ब्रह्माविष्णुशिवात्मिका
107. त्रिकालज्ञानसम्पन्ना
108. भुवनेश्वरी
समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म
दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मीविहीन झाला. स्वर्गलोकाचे ऐश्वर्य नष्ट झाल्याने दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले. या युद्धात देवतांचा पराभव झाला. कारण दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवतांच्या शक्ती नष्ट झाल्या होत्या. इंद्र देवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेली होती. इंद्र देव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे आले.
ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. तसं पाहिलं तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नाहीत पण समुद्रमंथनासाठी दोघांमध्ये समेट झाली. समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रुपात लक्ष्मीचा जन्म झाला. या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाते. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे.
भृगु ऋषी आणि ख्याती यांची कन्या
धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहिण देखील आहे. ऋषी भृगू राजा दक्षचे भाऊ आणि सप्तर्षि आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीणसुद्धा आहे.
माता लक्ष्मीचा विवाह
माता लक्ष्मीचे अवतार :-
लक्ष्मी कमळाच्या फुलावर का विराजमान आहे?
![]()
महालक्ष्मीच्या प्रतिमा, चित्र आणि मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील तर प्रामुख्याने आपल्याला काय दिसते, कमळाच्या फुलावर विराजमान झालेली लक्ष्मीमाता. यामागे धार्मिक कारण तर आहे. महालक्ष्मी धनाची देवी आहे. धनासंबंधित सांगितले जाते की, याचा नाश सर्वाधिक दुष्प्रभाव देणारा आहे. धन मोह-मायेमध्ये टाकणारा घटक आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन शिरजोर होते, तेव्हा तो व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो. धनाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे. दुसरीकडे कमळाचे फुल आपली सुंदरता, निर्मळता आणि गुणांसाठी ओळखले जाते. कमळाचे फुल चिखलात उगवते परंतु कमळाला चिखलाची दुर्गंधी कधीच येत नाही. कमळावर विराजमान असलेली लक्ष्मी हाच संदेश आपल्याला देते की, ती त्याच व्यक्तीवर कृपादृष्टी ठेवते, जो चिखलासारख्या वाईट समाजामध्येही कमळाप्रमाणे नि:स्पृह, निष्पाप राहतो आणि स्वतःवर वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ देत नाही. ज्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे, त्याने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गोष्टींपासून दूर राहावे. कमळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असल्याने तिला अंहकार स्पर्श होत नाही. अशाचप्रकारे धनवान व्यक्तीने संयमी, सत्यवचनी आणि साधे-सरळ रहावे. अशा व्यक्तीवर लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. म्हणून कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो असं सांगितलं जातं.
जिथे विष्णूचे वास्तव्य, तिथे लक्ष्मीचा निवास
![]()
लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू आणि भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले, त्यावेळी विविध रत्नांबरोबर सागरातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी भूतलावर अवतार घेतात, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतरली होती. देवी लक्ष्मी रामावतारात सीता बनली तर कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार असून, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर येणार असे सांगितले जाते. म्हणूनच जिथे विष्णूचे वास्तव्य आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतो.
जिथे शंख तिथे लक्ष्मी
![]()
प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंखाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक वैदिक कार्यात शंख महत्त्वाचा मानला गेलाय. एवढंच नव्हे तर असंही मानलं जातं की, शंख ज्या ठिकाणी असतो तिथे सुख-शांती, धन वैभव याचा वास असतो. जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मक उर्जा असते. शंख हे भगवान विष्णूचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं. शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख महत्त्वाचे मानले जातात. शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही म्हणतात. हेच कारण आहे की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. त्यामुळे जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच.
हस्तरेखांमध्ये वसे लक्ष्मी
आपल्या हस्तरेखांमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून रोज सकाळी उठल्यावर
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।
असं म्हटलं जातं. याचा अर्थ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेत वरील मंत्र उच्चारून मग हात एकमेकांवर घासून ते चेहऱ्यावरून फिरवल्याने जी उर्जा मिळते ती दिवसभराच्या कामांच्या रगाड्यात आपल्या चेहऱ्यावर झळकत राहते असे म्हणतात. आपले जीवन आपल्या हातांवर अवलंबून असते. हात शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतात. या हातांनी दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा, चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली, की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शन महत्त्वाचे असून आपल्या हाती लक्ष्मी वसे असे म्हटले जाते.
जिथे स्वच्छता तिथे वसे लक्ष्मी
![]()
जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी नांदते म्हणून घरात स्वच्छता ठेवावी असं म्हटलं जातं. साधा विचार करा तुम्ही तुमची खोली छान आवरून घेतली तिथे स्वच्छता केली तर तुम्हाला कसं वाटतं...खूप छान किंवा एक प्रकारची सकारात्मकता त्यात जाणवते. म्हणूनच स्वच्छता ज्या घरात आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच. कचरा, जाळीजळमटे साफ केली की नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. ज्या वास्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते; त्या वास्तूमध्ये लक्ष्मी निवास करते. त्याचप्रमाणे चारित्र्यवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव्य करणे तिला आवडते. म्हणूनच आपले घर स्वच्छ, प्रसन्न ठेवणे, घरातील सर्व माणसे सदाचारी, उद्योगप्रिय, शांत, समाधानी, संयमी आणि चारित्र्यवान असतील तर त्या घरात लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने वास्तव्य करते.
लक्ष्मी म्हणजे स्वकष्टातून मिळालेले समाधान
![]()
लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि ऐश्वर्य जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळविलेल्या समाधानात आहे, संतुष्टतेत आहे म्हणूनच लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटले जाते.
नमस्ते सर्वदेवांना वरदासि हरे: प्रिया।
या गति: त्वत् प्रसन्नांना सा मे स्यात् तव दर्शनात्॥
‘‘सर्व देवांना वर देणाऱ्या, भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या हे देवी लक्ष्मी तुला माझा नमस्कार असो. तू प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते, ते मलासुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.’’

जीवनात समृद्धी आणणाऱ्या अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांबद्दल
१) आदिलक्ष्मी हे रूप म्हणजे आपल्या मूळ स्त्रोताचे स्मरण होय. जेंव्हा आपण हे विसरतो कि आपण या समस्त ब्रम्हांडाचे अंश आहोत तेंव्हा आपण स्वतःला लहान आणि असुरक्षित समजतो. आदि लक्ष्मी हे रूप आपणास आपल्या मूळ स्त्रोताशी स्मरण करुन देते ज्यामुळे आपल्या मनात सामर्थ्याची जाणीव होते.आपल्या मूळ स्त्रोताचे ज्ञान होणे, हीच ‘आदि लक्ष्मी’ होय. मग नारायण आपल्या नजीक असतात. ज्याला आपल्या स्त्रोताचे ज्ञान होते तो सर्व भयापासून, भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष, आनंद प्राप्त करतो. हि आदि लक्ष्मी होय. आदि लक्ष्मी निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ आदि लक्ष्मी असते समजा कि त्याला ज्ञान प्राप्त झालेय. या देवीला मूळलक्ष्मी, महालक्ष्मी असेही म्हणतात. श्रीमद् देवी भागवत पुराणानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली. तिच्यातूनच त्रिदेव आणि महाकाली, लक्ष्मी आणि महासरस्वती प्रकट झाल्या. या जगाचे पालन आणि संचालनासाठी तिने विष्णूशी लग्न केले. महालक्ष्मी जीवन निर्माण करते. सुख आणि समृद्धी देते.
२) धैर्यलक्ष्मी हि लक्ष्मी शौर्य आणि निर्भयता या रुपामध्ये प्रकट होते. या देवीला वीरलक्ष्मी असेही म्हणतात. भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतील अडथळे ही दूर करते. ती अकाली मृत्यूपासून वाचवतात. तिला महिषासुराचा वध करणाऱ्या आई कात्यायनीचे रूपही मानले जाते. धैर्यलक्ष्मी युद्धामध्ये विजय मिळवून देते. ती वीरांचे रक्षण करते.
घरी सर्व काही आहे-धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे पण आपण भित्रे आहोत. श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेकवेळा भित्री असतात. हिम्मत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमी आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकाऱ्यांना विचारतो कि तुम्हाला कसा सहाय्यक आवडेल – तुमच्या समोर नेहमी घाबरलेला कि धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल? जो सतत तुमच्या समोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटे बोलत राहील, खोट्या गोष्टी, सबबी सांगत राहील. अश्या व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा सहाय्यक पसंत कराल जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे लोक कां घाबरतात अधिकाऱ्यांसोबत? कां? कारण आपला आपल्या जीवनाशी संपर्क झालेला नाही आहे. आपल्या आंतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे जी सतत आपल्या सोबत असते. हि धैर्य लक्ष्मी होय. धैर्य लक्ष्मी असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात धैर्य लक्ष्मी असेल त्या प्रमाणातच प्रगती होईल. व्यापार असो कि नोकरी, धैर्य लक्ष्मीची आवश्यकता असतेच.
३) संतानलक्ष्मी हे रूप प्रजनन क्षमता, सर्जनशीलता आणि निर्मिती क्षमतेमध्ये प्रकट होत असते. ज्या व्यक्ती सर्जनशील आणि कला – कौशल्य यांनी परिपूर्ण असतात त्यांच्यावर लक्ष्मीच्या या रुपाची कृपा असते. या रूपातील देवीची स्कंदमातेच्या रूपातही पूजा केली जाते. काही स्वरूपांत तिला चार हात, तर काहींमध्ये आठ हात दाखवले आहेत. त्यापैकी एक अभय व एक वरद मुद्रेत राहतो. ती गुणवान व निरोगी अपत्याचा आशीर्वाद देते. संतानलक्ष्मी हे मुलाबद्दलच्या स्नेहाचे प्रतीक आहे. ती वडिलांना कर्तव्य व आईला सुख प्रदान करते. ज्या मुलांमुळे ताण तणाव येत नाही किंवा ताण कमी होतो ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय. आणि ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पिडा होईल ती संतान लक्ष्मी नव्हे.
४) विद्यालक्ष्मी हे ज्ञान, उपजत कला आणि कौशल्य यांचे रूप आहे. ही शिक्षण, ज्ञान आणि विवेकाची देवी आहे. ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते. विद्यालक्ष्मी आत्म-शंका आणि असुरक्षितता दूर करते, आत्मविश्वास देते. विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करावे. ही आध्यात्मिक जीवन जगण्यासही मदत करते. विद्यालक्ष्मी व्यक्तीची क्षमता आणि प्रतिभा उजळते. देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले कि लक्षात येईल कि लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते. पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मी देखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. मात्र विद्या लक्ष्मी सरस्वती पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेंव्हा जीवनात स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतो. शिकणे हा एकमेव उद्देश्य असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेंव्हा ती विद्या लक्ष्मी होईल.
५) धान्यलक्ष्मी हे रूप अन्न धान्याच्या रुपामध्ये प्रकट होते. लक्ष्मीचे हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे. ती समानतेची शिकवण देते, कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे. अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही. धान्य लक्ष्मीला ८ हात आहेत, त्यात कृषी उत्पादनेही असतात. हे अन्नपूर्णेचे रूप आहे. धान्यलक्ष्मी ही धान्य व पोषणाची देवी आहे. तिंच्या कृपेने घरात धान्य टिकून राहते. धन लक्ष्मी जवळ असली तरी धान्य लक्ष्मी ‘आहे’ असे म्हणू शकत नाही. धन आहे परंतु धन काही खाऊ शकत नाही. याचाच अर्थ धन लक्ष्मी आहे पण धान्य लक्ष्मीचा अभाव आहे. ग्रामीण भागात मुबलक धान्य असते. तेथील लोक दोन चार दिवस कोणालाही खायला-प्यायला घालायला हयगय करत नाहीत. येथे धन नसले तरी धान्य आहे. तेथील लोक छानपैकी खातात पण आणि खायला घालतात पण. शहरी लोकांच्या तुलनेत तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण देखील जास्त असते. त्यांची पचन क्षमता देखील चांगली असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्य लक्ष्मी. जगात सर्वत्र सर्वांना भोजन गरजेचे आहे. भोजन खराब करू नका, वाया घालवू नका. बहुतेकवेळा जेवढे भोजन बनते तेवढेच वाया जात असते, फेकून दिले जाते. इतरांना देत पण नाहीत. असे कदापि करू नका. भोजनाचा सन्मान करणे हीच धान्य लक्ष्मी होय.
६) गजलक्ष्मी ही जमिनीच्या सुपीकतेची देवी आहे. या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करतात. कमळावर विराजमान गजलक्ष्मीला चार हात आहेत, त्यात तिने कमळ फूल, अमृत कलश, बेल व शंख धारण केला आहे. ही पशुधन देणारी देवी आहे. गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते. ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे.
राज लक्ष्मी म्हणा किंवा भाग्य लक्ष्मी म्हणा दोन्ही एकच आहेत – सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला लागला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बऱ्याच कार्यालयात देखील असे दिसते. मालकाचे कोणीही ऐकत नाही पण क्लार्कचे ऐकतात. त्याचा हुकुम चालतो. एका ट्रेड युनियनच्या प्रमुखाजवळ जितकी राज लक्ष्मी असते तेवढी शहरातील मिल मालकाकडे नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे राज लक्ष्मी.
७) विजयलक्ष्मी हि लक्ष्मी जय, विजय या रुपामध्ये प्रकट होते. या देवीला जयलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. तिला आठ हात आहेत, ते अभय देतात. कोर्ट-कचेरीच्या चिंतेपासून मुक्ती आणि विजयासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते. विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते. हिंमत देते.
काही व्यक्तींच्या कडे सर्व साधन सुविधा असतात तरीदेखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडले म्हणून समजा, काम होणारच नाही. म्हणजे विजय लक्ष्मीची कमी आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणार नाही, रिक्षात बसतील तर रिक्षा बिघडेल, टॅक्सीने बाजारात पोहोचले तर दुकाने बंद झाली असतील. तुम्हाला असे वाटेल कि मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरे झाले असते. अगदी छोटे काम देखील करू शकणार नाहीत. येथे विजय लक्ष्मी कमी असते. परिस्थिती तरी विपरीत असेल किंवा काही बहाणे तरी सांगतील. कोणत्याही कामात सफलता न मिळणे म्हणजे विजय लक्ष्मीची कमतरता.
८) धनलक्ष्मी हे भौतिक समृद्धीचे रूप आहे भगवान व्यंकटेश (विष्णू) यांनी कुबेराकडून कर्ज घेतले तेव्हा लक्ष्मीने कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केले होते. कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाची पूजा केली जाते. तिला सहा हात आहेत. धनलक्ष्मी पैसा, सोने, संपत्तीसह इच्छाशक्ती, धैर्य, दृढनिश्चय, उत्साहसुद्धा देते.
धन लक्ष्मी सर्वाना माहिती आहेच, धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. परंतु डोळे उघडून पहात नाहीत कि आपल्याजवळ काय आहे. जोर जबरदस्तीने धन लक्ष्मी येत नाही, आली तरी सुख, आनंद देत नाही तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसे गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशामुळे हे घडते-ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा, मग धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी चंचल असते, म्हणजे ती सतत चालत राहते. चालत राहिली तरच तिचे मुल्य आहे नां. बंद राहिली तर तिचे काहीही मुल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान आणि सदुपयोग करा.
https://news18marathi.com/religion/goddess-laxmi-vahan-how-did-goddess-laxmi-get-owl-as-vehicle-interesting-story-in-purana-mhpj-1171030.html
भगवान विष्णू व लक्ष्मीदेवीची उपासना अनेक जण करतात; मात्र माता लक्ष्मीच्या वाहनाची माहिती फारशा लोकांना नसते. घुबड हे लक्ष्मीदेवीचं वाहन आहे. शुक्रवारी लक्ष्मीदेवीची प्रार्थना केली जाते. ज्या घरी लक्ष्मीदेवीचा वास असतो, त्या घरी आर्थिक सुबत्ता असते. लक्ष्मीदेवीची प्रार्थना जिथे केली जाते, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. त्या घरी सुख-समृद्धी नांदते. भारतीय पुराणातल्या कथांनुसार प्रत्येक देवी-देवतांकडे स्वतःचं वाहन आहे. त्यामुळे त्या वाहनांना अर्थात त्या प्राणी व पक्ष्यांना आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. भगवान शंकरांचं वाहन नंदी, गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिकेयांचं वाहन मोर, भगवान विष्णूंचं वाहन गरुड हे सर्वांना माहीत आहे. तसंच लक्ष्मीदेवीचं वाहन घुबड हे आहे. लक्ष्मीदेवीला हे वाहन कसं मिळालं यामागे एक रंजक कथा आहे.
पौराणिक कथांनुसार, प्राण्यांचं जग निर्माण झाल्यावर स्वर्गातल्या देवी व देव स्वतःसाठी वाहन म्हणून प्राण्यांची निवड करत होते. लक्ष्मीदेवीही त्यांचं वाहन निवडण्यासाठी पृथ्वीवर आल्या. सगळ्याच प्राणी-पक्ष्यांनी आपली निवड करावी म्हणून लक्ष्मीदेवींकडे आग्रह धरला. यावर लक्ष्मीदेवींनी सर्वांना शांत केलं व सांगितलं, की कार्तिक महिन्यातल्या अमावास्येला मी पृथ्वीवर येते. तेव्हा जो प्राणी किंवा पक्षी सर्वांत आधी माझ्याजवळ येईल त्यालाच माझं वाहन बनण्याचा मान मिळेल. लक्ष्मीदेवींनी सांगितल्यानुसार कार्तिक महिन्याची अमावास्या तिथी आली. अमावास्या असल्यामुळे सगळीकडे गडद अंधार होता. त्यामुळे सगळे प्राणी व पक्ष्यांना अंधूक दिसत होतं. सामान्यपणे इतर प्राणी व पक्ष्यांना रात्रीच्या गडद काळोखात स्पष्ट दिसत नाही; मात्र घुबडाला रात्री स्पष्ट दिसतं. त्यामुळे लक्ष्मीदेवी पृथ्वीवर आल्या, तेव्हा सगळ्यात आधी घुबड त्यांच्यापाशी पोहोचलं. माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाल्या व त्यांनी घुबडाला आपलं वाहन होण्याचा मान दिला.
घुबड दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. विशेषतः दिवाळीच्या दिवशी घुबडाचं दर्शन झालं, तर ते शुभ समजलं जातं. घुबड आर्थिक समृद्धीचं प्रतीक असतं. असं म्हणतात, की घुबडाला भूतकाळाबाबत आणि भविष्याविषयी सगळ्यात आधी समजतं. अनेक शुभ प्रतीकांमध्ये घुबडाचा वापर केला जातो. लक्ष्मीदेवीचं वाहन असल्यानं घुबडालाही सुबत्ता व समृद्धीचं प्रतीक समजलं जातं.

एकदा नारदमुनी श्रीविष्णूंची भेट घ्यायला पोहोतले तेव्हा श्रीविष्णूंना निद्रावस्थेत पाहून त्यांनी श्री विष्णूंची निद्रा होईपर्यंत आपण तिथेच त्यांची वाट पाहायची असं ठरवलं. त्यांनी पाहिलं की माता लक्ष्मी श्रीविष्णूंचा पायाशी बसल्या आहेत आणि त्या श्रीविष्णूंचे पाय चेपत आहेत. तेव्हाच नारदांना हा प्रश्न पडला की माता लक्ष्मी श्रीविष्णूंचे पाय का चेपत आहेत. त्यांना हा प्रश्न पडलेला पाहून माता लक्ष्मींनी नारदांना त्यावर उत्तर दिले, ' देव गुरु बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतात आणि राक्षस गुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायात वास करतात. सहाजिकच श्रीविष्णूंचे पाय चेपल्याने शुभ संकेत पसरतात, याशिवाय धनप्राप्तीही मिळते. याच कारणामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळच बसत नाही तर हाताने त्यांचे पाय दाबतातही.
लक्ष्मी – चौदा रत्नाचे श्लोक
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
रत्नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलम् ॥
लक्ष्मी – इतिहास :-
ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली; बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते.आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठडय़ावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात.
त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता.
अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे.
परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते.
ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळाचे फुल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळाचे फुल आहेत असे कोरीवकाम दिसून येते.
पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती कमळावर उभी आहे. कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे.
पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात.आणखी एक वेगळय़ा प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाटय़ातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते.
जैन, बौद्ध,शिल्पात अभिषेक किंवा गजलक्ष्मी दिसून येते. दोन हातांत दोन कमळे घेऊन उभी व बसलेली असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखवातात.
सिरीमा इथेही एक लक्ष्मीची प्राचीन मुर्ती सापडली आहे. श्रीसुक्तात ज्याप्रमाणे वर्णन आहे, त्याचप्रमाणे हि मुर्ती आहे. इथे देवीचा एक हात उचलेल्या मुद्रेत असला तरी तो भंग पावला आहे. या हातात कदाचित कमळ असावे. दुसरा हात वरद मुद्रेत आहे, देवीच्या मस्तकावर पदर, कपाळावर ललाटीका, कानात कुंडल आणि गळ्यात कंठा आहे. तसेच कमरेवर मेखला, पायात नृपुर म्हणून कंकण आहेत, जे मोहंज्प्दडो इथे सापडलेल्या मुर्तीसारखाच आहे.

मेघडंबरी असणाऱ्या प्रतिमांची खालील वैशिष्ठ्यें लक्षांत ठेवण्यासारखी आहेत :
१) ही मेघडंबरी फक्त स्त्री प्रतिमेंतच आढळते.
२) ही मस्तकांस आवृत्त करीत दोन्हीं खांद्यावर टेकल्या सारखी दिसते व हिचा बाहेरचा काठ व आंतला भाग विशेष रूपानें अलंकृत केलेला असतो.
३) मेघडंबरी असलेली स्त्रीमूर्ती जर उकिडवी बसलेली असली, तर तिचे दोन्हीं पाय अनैसर्गिक प्रकारांने आसनांच्या आत शिरलेले दिसतात व त्यांची बोटें आसनांच्या खालून बाहेर डोकवतांना आढळतात.
-४) अशा प्रतिमांच्या आसनांचाही एक विशिष्ट प्रकार आहे. टेबलांसारखा दिसणाऱ्या या आसनांचे पुरोभागांवर गुणाकाराच्या चिह्नांसारखे एक मोठें अलंकरण काढलेले असतें.
या मेघडंबरीची खरी ओळख करून देणारा कोणताही प्रकाश किरण आज तरी वाङ्मयांत आढळलेला नाही. कुषाणकाळानंतर ही मेघडंबरी लुप्त होते.
कुषाणकाळांतील काही देवी प्रतिमांचे एक दुसरेंही वैशिष्ट्य नजरेंत भरते व ते म्हणजें त्यांच्या पृष्ठभागांवर झालेले वृक्षांचे अंकन होय. देव प्रतिमांच्या या वैशिष्ट्यांचा आपण मागे विचार केला आहे. स्त्रीमूर्तीत विशेषतः यक्षिणींचा झाडाशी जवळचा संबंध आहे व कित्येक यक्षिणींचे ध्यानच असे आहे कीं शालभंजिकेच्या रूपात ती कोणत्या तरी वृक्षाची फांदी हातांत धरून तिजखाली उभी असते." शुंग व कुषाण काळांत हा अभिप्राय फारच लोकप्रिय होता.
मथुरेच्या कुषाण कालीन कलेंत ज्या देवीची ओळख पटली आहे. त्यापैकी ठळक म्हणजे लक्ष्मी व तिची रूपें, वसुधारा, एकानंशा, मातृदेवी किंवा माता, षष्ठी, पार्वती, सिंह वाहिनी, महिषमर्दिनी दुर्गा, सरस्वती, वगैरे होत. गुप्तकलेत वसुधारा माता, वगैरे काही लुप्तप्राय झाल्या पण स्कंदमाता, सप्तमातृका वगैरे सारख्या नव्यांचा उदय ही झाला. या निरनिराळ्या देवीप्रतिमांवर आतां आपण स्वतंत्र विचार करू.
आज सामान्यतः आपण गजलक्ष्मी, व पद्महस्ता लक्ष्मी यांना पर्यायवाची समजतो, पण शुंगकाळांत 'पद्मा' किंवा 'श्री' या नांवाने मुख्यत्वे करून गजलक्ष्मीचा बोध होत असे. हत्तीकडून लक्ष्मीचे स्नान हे काहींच्या मते एक प्रतीक आहे. लक्ष्मी हे पृथ्वीचे रूप असून हत्ती हे मेघ होत. या प्रमाणें मेघांनी पृथ्वीला घातलेले स्नान हे पावसाचे सूचक आहे व अन्न, औषधि आणि इतर सर्व प्रकारच्या समृद्धीचे पर्यायवाची आहे. एकूण वैभव, ऐश्वर्य व सगळ्या त-हेच्या संपत्तीची देवी या रूपांत लक्ष्मीचे स्थान फार वरचे आहे. राज्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, कैवल्यलक्ष्मी, या विविध रूपांत तिची आराधना होत आलेली आहे. तिच्या या सर्वव्यापी व सर्वजन प्रिय स्वरूपांमुळे लक्ष्मी ही धर्म किंवा संप्रदाय विशेषाची देवी राहिली नाही. ती आर्य व राक्षस दोघासही समान रूपानें मान्य होती. रामायणांतील उल्लेखांप्रमाणे रावणाच्या पुष्पक विमानांच्या दारांवर गजलक्ष्मी काढलेली होती. कलेच्या जगांत बौद्ध, ब्राह्मण आणि जैन तिन्ही मतांत तिचा आदर होत असे. भरहूत आणि साँची येथील बौद्धस्तूप, उडीसातील खंडगिरीच्या जैनगुफा व मथुरेच्या कित्येक कलाकृती लक्ष्मीने सुशोभित केल्या आहेत.
सुरुवातीच्या काळांतील लक्ष्मीप्रतिमात ती कमळ घेतलेली (धृतपङ्कजा) दिसते. तिचे लांब देठ असलेले व पूर्ण उमललेले कमळ समोर मुख केलेले तरी असते किंवा तिच्याकडे अशाप्रकारे वळलेले असते (रे.चि. चौतीस २४) जणु की काय देवी कमळानें वारा घेत आहे. हा अभिप्राय गुप्त काळांतही लोक प्रिय होता. कालिदासाने तिचे वर्णन कौस्तुभ धारण केलेली व कमळाचा पंखा (पद्मव्यजन) घेतलेली असे केले आहे." शुंगकाळांत मात्र जास्त करून ती गजलक्ष्मी किंवा पुष्करिणींत उभी असलेल्या देवीच्या रूपांत दिसते. बनरसिया (जुनें देवदह, उ.प्र.) येथून मिळालेल्या गजलक्ष्मीच्या मृण्मूर्तीत देवीने दोन्ही कटिविन्यस्त हातांत कमलवेली धरल्या असून प्रत्येक खांद्यावर उमललेल्या कमळाचे फुलांवर घागर घेतलेला हत्ती आहे. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पायांजवळ दोन्हींकडे शेपटी वर केलेला प्रत्येकी एक सिंह उभा आहे (राहुल सांकृत्यायन संस्थान, गोरखपूर सं. सं. ७८). ही मूर्ती पाहिली म्हणजे सिंहवाहिनी देवी आणि गजलक्ष्मी यांची सांगड शुंग काळापासूनच घातली गेली असावी असे वाटते. कुषाणकाळांत तिची खालील रूपें पाहता येतात :
१) उभी देवी. उजवा हात अभयमुद्रेत व डाव्या हातांत सनाल उमललेले कमळ .
२) बसलेली, आजुबाजूला सेवक, हाताची स्थिती वरील सारखी.
३) वरील प्रमाणें बसलेली, पण जवळ पास इतर लहान प्रतिमा.
४) एक पाय लोंबवून ललितासनांत बसलेली जवळ छत्र घेतलेला सेवक .
५) 'माते'च्या रूपांत मूल आणि कमळ घेऊन आसनांवर बसलेली
६) 'माते'च्या रूपात धनाचा देव कुबेर याचे बरोबर बसलेली. कुबेर व लक्ष्मीचा फार जवळचा संबंध असणें लक्रमप्राप्तच आहे. गुप्तकाळांतील मातीच्या ठशांवर लक्ष्मी आणि धन देणारे यक्ष हे जवळ जवळ दिसतात. कुबेर लक्ष्मी आणि त्यांच्या जोडीला गणपती अशा प्रतिमा मध्यकाळांतही मिळतात. उत्तर भारतांत दीपावलीच्या वेळी या तिघांचे पूजन करण्यांची पद्धत आजही आहे.
७) कुबेर व हारिती किंवा भद्रा यांचेबरोबर बसलेली लक्ष्मी. येथे तिच्याजवळ मूल दिसत नाही.
८) मूल आणि दारूचा पेला घेतलेल्या मातांच्या बरोबर लक्ष्मी,
९) पद्मवनांत पूर्णकुंभावर उभी राहून स्वतःच्या स्तनांला स्पर्श करणारी, एकूण मातृत्वाकडे संकेत करणारी, लक्ष्मी .
लक्ष्मीचे सर्वपरिचीत स्वरूप हणजे गजान्तलक्ष्मी. सरोवरातील कमळपुष्पावर आरूढ लक्ष्मीला दोन गजांकडून जलाभिषेक होत आहे हे तिचे स्वरूप.
गजान्तलक्ष्मीचे सर्वात सुंदर रूप वेरूळ येथे शिल्पांकित केलेले आहे.
गजान्तलक्ष्मी, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
गजलक्ष्मी, रावण की खाई (लेणी क्र. १५)
लक्ष्मी, यज्ञशाळा, कैलास लेणे, वेरूळ
आज कर्नाटकात लक्ष्मीची पूजा केली जाते. ती मातृ देवी आहे जी सर्व प्रकारची संपत्ती देते: अन्न, पैसा, मुले, राजकीय शक्ती, विजय. संपत्तीची देवी म्हणून, ती विश्वाच्या देखरेखीच्या मागे 'शक्ती' (शक्ती) म्हणून उभी आहे. , ती विश्वाचे पालनकर्ते भगवान विष्णूची पत्नी आहे.
पण संपत्तीप्रमाणेच लक्ष्मी देवी खूप चंचल आहे. आज इथे, उद्या तिथे. तिला मिळवण्यासाठी, एखाद्याला बुध्दीमत्ता असणे आवश्यक आहे (म्हणूनच तिला देवी स्वरस्वती सोबत दाखवले किंवा गणपतीसोबत दाखवले जाते ).
लक्ष्मी असेल तर कुलक्ष्मीही आहे. ती दुष्काळ, दुष्काळ आणि गरिबीची देवी आहे. जर आपण लक्ष्मीला कैद केले, तिचा आदर केला नाही किंवा अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केले तर आपण स्वतःला गरिबीकडे नेतो. अशा प्रकारे, काळा पैसा मजबूत अर्थव्यवस्थेचा विरोधी आहे. सशक्त अर्थव्यवस्था आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण पैशाच्या मुक्त अभिसरणाचा आदर आणि प्रचार केला पाहिजे.
देवी भागवतात एक वर्णन आहे-
‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती
नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’
हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.
हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)
लक्ष्मी
भारतातला प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या तरी देवतेशी
निगडीत आहे. मग अगदी साधा अग्नी प्रज्वलित करून त्याला “होलिकामाता” म्हणणे
असो किंवा मग अगदी राम नवमी आणि गोकुळाष्टमी सारखे सण. दीवाळीचा तसा वरवर
पाहता कुठल्या देवतेशी संबंध लक्षात येत नाही. पण दीवाळीचा संपूर्ण सण हा
वृद्धी आणि समृद्धीशी अर्थात लक्ष्मीशी निगडीत आहे. लक्ष्मी ही देवता
आपल्याला इतकी परिचयाची आहे की थोडी “अतिपरीचयामुळे अवज्ञा” म्हणतात तसं
काहीसं या लक्ष्मी च झालेलं आहे.
लक्ष्मी ही देवता खरं म्हणजे वैदीक देवता. वैदीक काळातल्या
बहुतेक देवता आता सर्वसामान्य माणसाच्या विस्मरणात गेल्या असल्या तरी
लक्ष्मी राहिली. विस्मरणात गेलेले विष्णू आणि शिव यांनी त्यांचं “कमबॅक”
पौराणिक धर्मात केलं असलं तरी लक्ष्मी एवढी विस्मरणात कधी गेलीच नाही.
त्यामुळे खऱ्याअर्थी भारतातली सर्वात जुनी देवता असे
लक्ष्मीला म्हणायला हरकत नाही. जुनी म्हणजे किती? तर लक्ष्मीचा पहिला
उल्लेख हा ऋग्वेदाच्या काही सुक्तांमध्ये येतो किंबहुना लक्ष्मीच्या नावे
एक संपूर्ण सूक्तच ऋग्वेदात आहे – “श्री सुक्त”
लक्ष्मीचं वेदातलं नाव म्हणजे “श्री” आणि ‘लक्ष्म’ म्हणजे
शब्दशः “brand” – पूर्वीच्या पशुपालन करणाऱ्या लोकांसाठी हा brand खूप
महत्वाचा होता. आपले गाय-बैल-घोडा आणि लोकांचे गाय-बैल-घोडा यातला फरक करता
यावा म्हणून या प्राण्यांवर तापलेल्या लोखंडाने खूण करायची पद्धत अजूनही
बरेच ठिकाणी वापरतात. या खुणेलाच “लक्ष्म” म्हणतात. कुठल्याही देवतेची गरज
नसेल तर तिची उत्क्रांती किंबहुना उत्पत्तीच होत नाही म्हणूनच सर्वप्रथम
आपण हे लक्षात घ्यायला हवे की या लक्ष्माची किंवा लक्ष्मीची या वैदीक
लोकांना मोठ्या प्रमाणात गरज होती कारण त्यांचं संपूर्ण आयुष्यच पशुपालनाशी
संबंधित आणि विसंबून देखील होतं.
तर ह्या brand चे आणि ओघाने branded वस्तूंविषयीचे आकर्षण हे
खूप आधीपासून आहे असं आपल्या लक्षात येईल. आता लक्ष्मीचं ऋग्वेदातलं स्वरूप
बघूया श्री सूक्तामध्ये तिचे अतिशय उत्तम प्रकारचे वर्णन आपल्याला आढळते
ज्या ज्या म्हणून काही उत्तम गोष्टी आहेत त्या लक्ष्मीला दिल्या आहेत. या
ऋचांचा/मंत्रांचा उच्चार करत यज्ञविधीमध्ये लक्ष्मीला सोम, तूप देऊन आवाहन
करणे आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मागणे हा यामागचा मुख्य हेतू:
लक्ष्मी ला “हिरण्यवर्णा हरिणी” म्हणजेच
सोन्याच्या/सोन्यासारख्या वर्णाची (चमकणारी) आणि हरिणी म्हणजेच हरण करणारी
किंवा आकर्षित करणारी असे म्हणले आहे. तिच्या हातातून “सुवर्णरजतस्त्रजाम”
अर्थात सोनं-चांदी जणू झिरपत आहे. ती अश्व ओढत असलेल्या रथात मध्यभागी
बसलेली आहे आणि तिच्या सर्व बाजूनी हत्ती ओरडत/चित्कारत तिची पूजा करत
आहेत. चंद्रासारखी प्रभा तिला आहे आणि ती आदित्यवर्णा म्हणजे सूर्यासारख्या
रंगाची आहे. माझ्या अंतर्बाह्या मध्ये जी अलक्ष्मी आहे अर्थात जे अज्ञान
आहे त्याचे तुझ्या अस्तित्वामुळे पतन होवो आणि तू मला “किर्तीमृद्धीम ददातु
मे” अर्थात कीर्ती आणि वृद्धी दे अशी मागणी तिला केली आहे. ज्या कमळावर तू
आसनस्थ असतेस ते कमळ कर्दमात अर्थात चिखलात येते तेव्हा नुसती तू नकोस तर
त्या चिखलाची देखील माझ्या मनाला प्राप्ती व्हावी. तुझी तर प्राप्ती
व्हावीच पण तू ज्यात उद्भवतेस तो “चीक्लीत वस मे गृहे” अर्थात चिखल माझ्या
घरी असावा (थोडक्यात सोन्याचं अंडं असण्यापेक्षा ते अंडं देणारी कोंबडी
हवी) अशी तू जिच्यामुळे मला अनेक गाईंवर (पशूंवर), दासांवर म्हणजेच
नोकर-चाकरांवर, अश्वांवर, आणि पुरुषांवर मालकी मिळावी.
असे हे लक्ष्मीचे स्वरूप पुढे पौराणिक धर्माच्या काळात तसेच
राहिले. पुढे तिचा विष्णूशी संबंध आला आणि दंतकथेनुसार समुद्रमंथनामध्ये जी
रत्ने बाहेर पडली त्यापैकी एक म्हणून तिला गणले गेले. आणि “विष्णूपत्नी”
चे तिचे स्थान पुराणकाळात (पाचव्या-सहाव्या शतकांत) अजूनच अढळ झाले.

सांची येथील लक्ष्मी
लक्ष्मीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर धर्मातील तिचे स्थान.
फार आधीपासून ते अगदी आजपर्यंत बहुतेक मुख्य प्राचीन भारतीय धर्मात (जैन,
बौद्ध, हिंदू) लक्ष्मीचे स्थान अढळ आहे. “धंदे से बडा कोई धर्म नही होता”
या न्यायाने समृद्धी आणि धनाचे प्रतिक किंवा “Brand” असलेल्या या देवीपुढे
कोणताही धर्म मोठा नाही. मुळातच धन किंवा समृद्धी या basic गोष्टींशी संबंध
असल्यामुळे ती सर्व धर्मात आपोआपच स्वीकारली गेली आणि आज त्याच रुपात
प्रचलित देखील आहे.

अगथोकल्स या इंडो-ग्रीक राजाच्या नाण्यावरील लक्ष्मी
भारताबाहेरच्या राजांनी आपली स्थानिक धर्माविषयी सद्भावना
दाखवताना कृष्ण, बलराम यांसकट लक्ष्मीलाही आपल्या नाण्यांवर महत्त्वाचे
स्थान दीले. पुढे कला आणि स्थापत्याच्या प्रगतीनंतर तिची अनेक रूपे बघायला
मिळाली जसे कमळावर बसलेली लक्ष्मी, विष्णू किंवा नरसिंह यांच्याबरोबर
लक्ष्मी. गजलक्ष्मी ची संकल्पना म्हणजे पृथ्विरूपी लक्ष्मीवर मेघरूपी हत्ती
अभिषेक घालत आहेत जे पुन्हा सृजनतेचे आणि समृद्धीचे प्रतिक आहे.

भारुथ येथील लक्ष्मी

गुप्त राजा दुसरा चंद्रगुप्त याच्या नाण्यावरील लक्ष्मी
लक्ष्मीचे वैशिष्ट्य असं की तिचे हे रूप आजतागायत बदललेले
नाही. इंद्र अग्नी सारख्या देवांचे महत्त्व कमी झाल्यावर शिव आणि विष्णू हे
वैदीक काळातील प्राथमिक देव पुढे पौराणिक धर्मात मुख्य देव म्हणून प्रचलित
झाले पण विष्णू हा वैदीक धर्मात आदित्यमंडळात होता अर्थात तो सूर्याचे एक
रूप म्हणून पुजला जात नंतर मात्र तो एक स्वतंत्र देव म्हणून उदयाला आला.
तसेच काही प्रमाणात शिवाचे. तसे लक्ष्मीचे झाले नाही. ती आजही आपल्याला
तितकीच प्रिय आहे आणि म्हणूनच भारतातल्या आणि जगातल्या काही प्राचीन
देवतांमध्ये तिचा समावेश होतो. पाच हजार वर्षांपूर्वीच्या वेदापासून ते
अगदी दीवाळीत उडवल्या जाणाऱ्या लक्ष्मी बॉम्बवर ती “हस्तीनाद्प्रबोधीनीम”
याच रुपात दिसते.
.. हां फक्त “पहिल्यांदा घरात तिची पूजा करून नंतर तिची प्रतिमा असलेल्या फटक्याच्या चिंध्या करायच्या का?” हा ज्याचा त्याचा प्रश्न!
वेदकाळा नंतर पौराणिक पुराणांच्या रचनांचा काळ सुरु झाला. यज्ञ यागाबरोबर देवतांची मंदिरे निर्माण होवू लागली, मंदिरामधुन मुर्ती पुजा होवू लागल्या त्यांची पुराणे निर्माण झाली, अशा विविध पुराणामधुन या शक्तीदेवतांचा उल्लेख विविध ठिकाणी आढळतो
१) श्रीदेवी २) अंबिका ३) अभ्यंबा ४) अलक्ष्मी ५) आनंदनायकी ६) उनाई ७) उमा ८) काळरात्री ९) कुंडिका १०) कुलकुल्या ११) कौशिकी १२) कंकाळी १३) गजांतलक्ष्मी १६) गौरी १७) चंद्रवदनी १८) चंद्रघन्टा १९) कुष्माडीनी २०) ब्रह्माचारिणी २१) महागौरी २२) सिद्धीदात्री २३) स्कंदमाता २४) शैल्यपुत्री २५) चक्रपदी २६) जगदात्री २७) दुर्गा २८) निलसरस्वती २९) पद्मावती ३०) प्रांत्यगीरा ३१) पार्वती ३२) चंपावती ३३) बगलामुखी ३४) बळातिबळा ३५) भुवनेश्वरी ३६) महिषासुरमर्दिनी ३७) महाकाली ३८) महासरस्वती ३९) माखानदेवी ४०) मुकांबिका ४१) योगेश्वरी ४२) रासईदेवी ४३) वृंदा ४४) विद्यादेवी ४५) वैष्णवी ४६) शताक्षी ४७) वत्स्तलादेवी ४८) शिवदूती ४९) सहस्त्रकाळमाया ५०) संज्ञा ५१) हुंकारेश्वरी
मातृशक्ती

विश्वनिर्मिती नंतर प्रथम मातृशक्तीची निर्मिती झाली, त्या शक्तीने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना निर्माण केले. या मातृशक्तीच्या धडापासून सरस्वती, शिरापासून लक्ष्मी व पाया पासुन महेशी निर्माण झाली. व त्या ब्रह्मा, विष्णु, महेश, यांच्या पत्नी झाल्या अशा आशयाची कथा देवी भागवतात आहे. श्री देव्याथर्वशीर्षम मधे हि आदिशक्ती मी ब्रह्मस्वरूप आहे, माझ्या प्रकृती पासुन परुषात्मक सत असत उत्पन झाले, ब्रह्म, वेद, रूद्र, वसु, पूषा, विष्णु सर्व मीच आहे, मी ब्रह्मशक्ती सरस्वती रूपाने निर्मिती करते, विष्णुशक्ती लक्ष्मी रूपाने पालन करते व रूद्रशक्ती रूपाने संहार करते असे तिचे रूप ती देवतांना सांगत आहे. अशी हि सर्व व्यापक मातृशक्ती या जीवित विश्वाची आद्यमातृशक्ती होय,

आज सर्वत्र पुजनीय सर्व देवता या तीन देवतांची विविध रूपे मानली जातात
किंवा वीणा वरददमंडितकरा, किंवा श्वेत पद्मासन.
सरस्वती हा सरस (सरस्) चा संस्कृत संलयन शब्द आहे ज्याचा अर्थ "पाणी जमा करणे" आहे, परंतु काहीवेळा "भाषण" म्हणून देखील अनुवादित केले जाते; आणि वती (वती), याचा अर्थ "जिच्याजवळ आहे ती". मूलतः नदी किंवा सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्यांशी संबंधित, या संयोगाचा अर्थ, "ती जिच्याकडे तलाव, तलाव आणि साठलेले पाणी आहे" किंवा कधीकधी "ज्याला बोलण्याची क्षमता आहे" असा होतो. हा सरसु-अति (सरसु+अति) चा संस्कृत संमिश्र शब्द देखील आहे ज्याचा अर्थ "भरपूर पाणी असलेला" असा होतो.

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.
वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

सरस्वती देवी
आर्य आणि सरस्वती :-
आर्य हे निषाद, साबर आणि पुलिंदर ह्या सरस्वतीच्या तीरांवरील वनवासी अनार्यांशी लढत असत. विष्णूच्या विनंतीवरून सरस्वती जमिनीवरून अदृश्य झाली आणि दूर राजस्थानात पुन्हा प्रकट झाली. अशा रीतीने वनवासी लोकांना जीवरक्षक जलापासून वंचित व्हावे लागले आणि त्यापायी ते क्षेत्रच सोडून जावे लागले. सरस्वतीच्या तीरावर आर्य लोक राहत असतांना त्यांच्या सुरूवातीच्या विकासात सरस्वतीने कळीची भूमिका बजावली. त्यामुळेच सरस्वती ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली.
अमरता आणि सरस्वती :-

कालीदास आणि सरस्वती :-


हे सरस्वती, हत्ती ज्याप्रमाणे सहज कमळे उपटतो त्याप्रमाणे तू तुझ्या वेगवान लहरींनी रस्त्यात येणार्या पर्वतांचा चुरा करतेस! कुठेही न थांबणारा तुझा गर्जना करत वाहणारा वेगवान प्रवाह आम्हाला युद्धात यश देवो! हे नदी देवते, देवांची निंदा करणार्यांना तू पळवून लाव! दुष्ट व कपटी लोकांचा नाश कर! सज्जनांचे रक्षण कर! सज्जनांच्या हितासाठी सुपीक भूमी दे! आमच्या बुद्धीचे रक्षण करून, तू आम्हाला सुरक्षा दे! सप्तनद्यांमध्ये तू आम्हाला सर्वात प्रिय आहेस! तू आमच्या मैत्रीचा स्वीकार कर! आम्हाला कधीही तुझ्यापासून दूर करू नकोस! - बार्हस्पत्यो भरद्वाज ऋषी, ऋग्वेद 6.61
जैन धर्मातसुद्धा सरस्वतीला सर्व विद्यांचे स्रोत मानले जाते. तिला ‘श्रुतदेवी’, ‘शारदा’ आणि ‘वागेश्वरी’ या नावांनी पण ओळखले जाते. जैन शिल्पांमध्ये सरस्वती देवीची मूर्ती सहसा उभी असते. ती चतुर्भुज असून तिच्या एका हातात पुस्तक, एका हातात जपमाळ, कधी समोरील दोन हातात वीणा, तर कधी एका हातात कमंडलू व एका हातात पद्म धारण केले असते.
जैनांनी अनेक स्तोत्रांमधून सरस्वतीला वंदन केले आहे. त्यापैकी हे एक सरस्वतीची नावे सांगणारे स्तोत्र-
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती।
तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसगामिनी॥पञ्चमं विदुषां माता षष्ठं वागीश्वरी तथा।कुमारी सप्तमं प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी॥नवमं च जगन्माता, दशमं ब्राह्मिणी तथा।एकादशं तु ब्रह्माणी, द्वादशं वरदा भवेत्॥वाणी त्रयोदशं नाम, भाषा चैव चतुर्दशं।
पञ्चदशं श्रुतदेवी, षोडशं गौर्निगद्यते ॥
सरस्वतीचे पहिले नाव भारती, दुसरे सरस्वती, तिसरे शारदा, चौथे हंसगामिनी, पाचवे विदुषी, सहावे वागेश्वरी, सातवे कुमारी, आठवे ब्रह्मचारिणी, नववे जगन्माता, दहावे नाव ब्राह्मिणी, अकरावे ब्रह्माणी, बारावे नाव वरदा, तेरावे वाणी, चौदावे भाषा, पंधरावे नाव श्रुतदेवी आणि सोळावे नाव गौ आहे. अशा प्रकारे सरस्वती देवीची सोळा नावे आहेत.
प्राचीन काळातील हिंदू, जैन व बौद्ध धर्मातील ऋषी, मुनी, साधू, व भिक्षूंनी सरस्वतीचे गुणगान केले. त्यानंतर मध्य युगात ज्ञानेश्वरांपासून शेख महंमदापर्यंत सर्व जाती-धर्मातील संतानी सरस्वती देवीला वंदन केले आहे.
ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानदेव म्हणतात-
आतां अभिनव वाग्विलासिनी।
जे चातुर्यार्थकलाकामिनी।ते शारदा विश्वमोहिनी। नमिली मियां॥तर एकनाथी भागवतात, संत एकनाथ म्हणतात-आतां नमूं सरस्वती। जे सारासारविवेकमूर्तीं।चेतनारूपें इंद्रियवृत्ती। जे चाळीती सर्वदा॥दासबोधाच्या सुरवातीला रामदास स्वामी म्हणतात -आतां वंदीन वेदमाता। श्रीशारदा ब्रह्मसुता।शब्दमूल वाग्देवता। माहं माया॥तर तुकाराम महाराज हरिपाठात म्हणतात-नमिला गणपति माउली सारजा।आतां गुरुराजा दंडवत ॥1॥संत तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेत म्हणतात-गणेश,शारदा आणि सदगुरू।आपणचि भक्तकामकल्पतरू।देवदेवता नारद तुंबरू। आपणचि जाहला॥तर कवयत्री बहिणाबाई म्हणतात -माझी माय सरसोती माले शिकवते बोलीलेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली॥संत शेख महंमद म्हणतात -हरि तुं कागद नि वरि अक्षरें।
पंडित विचारे मी वागेश्वरी॥
विजापूरचा इब्राहिम आदिलशाह दुसरा त्याच्या किताब ई नवरस मध्ये लिहितो-
सारदा गनेस माता पिता तुम मानो निर्मल
इबराहीम गुप्त घेसो अपनवाज
प्रगट कीनो धन्य मेरो रास
सर्व जातीच्या हिंदूंनी, जैन व बौद्धांनी सरस्वतीची उपासना केली आहे. भारतीय मुसलमानांनीसुद्धा सरस्वतीची उपासना केली आहे. 19 व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत, पाठशालांमध्ये सर्व जाती-धर्माची मुले-मुली एकत्र शिकत असत. या पाठशालांमध्ये सरस्वतीची उपासना होत असे. बिटिश शिक्षण पद्धती आल्यावर ही प्रथा इंग्रजी शाळांमधून हळूहळू बंद झाली. तरीही अजूनही अनेक शाळांमधून सरस्वती देवीची पूजा केली जाते. तात्त्पर्य, सर्व जाती-धर्माच्या संतानी, गुरूंनी आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना केली आहे.



कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हय़ात धारवाडच्या पूर्वेस सुमारे ६७ कि.मी.वर गदग हे व्यापारी शहर वसले आहे. या शहराचा प्राचीन कन्नड व संस्कृत साहित्यांतून तसेच काही शिलालेखांतून क्रतुक, क्रतुपूर, कर्डुगू, गलडुगू, गडुगू इत्यादी भिन्न नावांनी उल्लेख आढळतो. शहरात वीरनारायण, सोमेश्वर, त्रिकुटेश्वर आणि सरस्वती ही चार प्रमुख व प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी त्रिकुटेश्वर व सरस्वती ही दोन मंदिरे गदगच्या दक्षिण भागात एकाच प्रांगणात बांधलेली आहेत. सरस्वतीचे मंदिर त्रिकुटेश्वर मंदिरापेक्षा आकाराने लहान असून ते त्रिकुटेश्वराच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख बांधले आहे; तथापि आकाराने लहान असूनसुद्धा कलाकुसरीचा नाजूकपणा आणि अलंकरण यांमुळे ते उठून दिसते. मंदिराचे वास्तुविधान चतुरस्र असून उघडा मुखमंडप अणि गर्भगृह एवढाच मंदिराचा भाग अवशिष्ट आहे व शिखर पडले आहे. प्रांगणात सापडलेल्या पश्चिम चालुक्य राजा दुसरा आहवमल्लदेव (कार, १०६८- १०७६) याच्या कोरीव लेखत सरस्वती मंदिराच्या देखभालीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे, त्यावरून हे मंदिर तत्पूर्वी केव्हा तरी चालुक्य राजांनी बहुधा आहवमल्लदेवाचे पिताजी सोमेश्वर आहवमल्ल यांनी बांधले असावे. मुखमंडपातील अठरा स्तंभांवर नाजूक अलंकरण असून चालुक्य शिल्पकलेचा आविष्कार त्यांतून दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले दोन स्तंभ विशेष कलात्मक आहेत. स्तंभांवरील अलंकरणात लहान देवळ्या, छोटे स्तंभ, देवदेवतांच्या छोटय़ा प्रतिमा, त्यांचे सेवक, सिंह, शरभादी व्याल व इतर भौमितिक आकृतिबंध आहेत. हे शिल्पांकन उठावात असून यांतील देवदेवतांनी विविध प्रकारची आभूषणे घातली आहेत. मुखमंडपाचे आयताकार छत साधे असून त्याच्या मध्यभागी कमळकलिकात उत्फुल्ल कमळ कोरले आहे. सरस्वतीच्या अवशिष्ट प्राचीन मंदिरांत सुस्थितीत असलेले कदाचित हे एकमेव मंदिर असावे.
कुथनूर, तमिळनाडू :-
चोल वंशातील विक्रम चोल (कार. १११८-११३५) राजाच्या पदरी ओत्तकुठर नावाचा एक विद्वान कवी होता. तो सरस्वतीचा मोठा भक्त; त्याला आपली प्रतिभा व बुद्धी ही सरस्वतीची कृपा व देणगी आहे, असे मनोमन वाटे, तो ‘वरकवी’ (श्रेष्ठकवी) म्हणून दरबारात ख्यातनाम होता. त्याने राजाचा मुलगा दुसरा कुलोत्तुंग (कार. ११३३-११५०) आणि त्याचा मुलगा दुसरा राजराजा यांना शिकविले होते. अशा प्रकारे तीन पिढय़ांचा तो राजगुरू होता. सरस्वतीची निरंतर सेवा घडावी म्हणून त्याने अरसिलर नदीकाठी सरस्वतीचे मंदिर बांधण्याची इच्छा चोल राजाकडे केली. चोल राजाने त्याच्या विनंतीचा मान राखून सरस्वतीचे एक मंदिर तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम- करईक्कल रस्त्यावरील मथिलदुथुरई गावाजवळ कुथनूर या ठिकाणी अरसिलर नदीकाठी बांधले. कुथनूरला अम्बपुरी असेही म्हणतात. चोल राजांच्या बाराव्या शतकातील एका शिलालेखात ओत्तकुठरने मंदिर बांधल्याचा उल्लेख असून ओत्तकुठरला त्याच्या सेवेसाठी अग्रहार दिल्याची नोंद त्यात आहे. त्याच्या ‘तक्कयगपरणी’ या तमिळ भाषेतील काव्यात सरस्वतीचा उल्लेख त्याने पुढील शब्दांत ‘अयंगरई सोल किलयी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला असून त्याचा भावार्थ ‘जी नदीकाठी वास करते’ असा आहे. यावरून कुथनूरच्या मंदिरासंबंधीच तो बोलत असावा हे निश्चित. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील इ. स. १४९२ च्या कोरीव लेखात कोणा पुरुषोत्तम नावाच्या सधन गृहस्थाने मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

कसे जाता येईल?
मुंबईहून मनमाड-नांदेडमार्गे येणे सोयीस्कर असून, बासर हे रेल्वेस्टेशन मनमाड-काचीगुडा रेल्वेमार्गावर आहे. त्यामुळे मनमाडमार्गे बासरपर्यंत थेट रेल्वेगाड्या आहेत. मुंबई किंवा पुण्याहून येताना कोणार्क एक्स्प्रेसने वारंगळ येथे उतरून, तेथून निजामाबादमार्गे जाता येते.
विमानाने जायचे असल्यास हैदराबादमध्ये येऊन तेथून रस्त्याने २०० किलोमीटर अंतरावर बासर आहे.
राहण्याच्या व्यवस्थेसाठी बासरमध्ये साधारण दर्जाची हॉटेल्स आहेत आणि निर्मलमध्येही काही हॉटेल्स, धर्मशाळा आहेत. त्यामुळे तेथे सोय होऊ शकते.
राजस्थानात पुष्कर (अजमीर जिल्हा) या क्षेत्री ब्रह्मदेवाने कार्तिक शुद्ध ११ ला यज्ञ केला होता, असे ‘पद्मपुराणा’तील कथेतून आढळते. पुष्कर तीर्थ अजमीरच्या वायव्येस सुमारे ११ किमीवर असून एकमेव ब्रह्मावतार ठिकाण आहे. येथे जुन्या मंदिराच्या ठिकाणी इ. स. १८०२ मध्ये नवीन मंदिर बांधल्याचे कर्नल जेम्स टॉड याने आपल्या राजस्थानवरील ‘अॅनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान’ (annals and antiquities of rajasthan) या ग्रंथात लिहिले आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळ गायत्री व सावित्री या त्याच्या पत्नींची गर्भगृहवजा दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय या ठिकाणी आणखी सरस्वती, बद्रीनारायण व वराह यांची मंदिरे आहेत. ही सरस्वतीची स्वतंत्र मंदिराव्यतिरिक्त छोटी गर्भगृहसदृश मंदिरे होत.
सिक्कीम येथे एक रुमटेक मठ आहे. त्या मठातील सरस्वतीच्या अप्रतिम शिल्पामुळे तो सरस्वती मठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी देवी उत्फुल्ल कमळावर वीरासनात बसली असून कमळाची द्विदल पाकळ्यांची नक्षी फारच छान आहे. सरस्वतीची प्रभावळ कलात्मक असून त्यांतील कमळांची वर्तुळे व त्यांवरील अधरेन्मिलित कमळकलिकांचा रचनाबंध व त्या मधोमध खोदलेले कीर्तिमुख इत्यादी सर्व कलाकारी नजर रोखून धरते. देवी द्विभुज असून तिने डाव्या हातात कमळकलिका (त्याचा देठ तिच्या हातात आहे.) व उजवा अभयमुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे. तिने मोजके अलंकार ल्याले असून त्यांतील कंकणे, मोत्यांचा कंठा व कर्णफुले स्पष्ट दिसतात. तिचा पद्ममुकुट व त्याच्या मोत्यांच्या माळा दोन्ही बाजूला कानावर पडल्या आहेत आणि माथ्यावर मधोमध कमळ आहे. तिने साडी नेसलेली असून तिच्या डाव्या स्तनावरून डाव्या बाहूवर लपेटलेला पदर इत्यादींतून साडीच्या चुण्या स्पष्ट दिसतात. तिच्या दोन्ही बाजूला सेवक आहेत. त्यांच्या माथ्यावर पगडीसदृश शिरस्त्राण आहे. परस्पराकडे चोची केलेले दोन हंस तिच्या मांडीखाली खोदले आहेत. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून स्मितहास्य आहे. तिचे डोळेसुद्धा या ठिकाणी बोलके वाटतात. कपाळावर मध्यभागी कुंकवाचा टिळा आहे. इ. स. १६ व्या शतकातील हे एक अत्यंत प्रमाणबद्ध, सडपातळ बांध्याचे लोभस शिल्प आहे.
तमिळनाडूतील तंजावर येथे दुसरा सरफोजी भोसले (इ. स. कार. १७९८-१८३२) या कलाभिज्ञ व ग्रंथप्रेमी राजांनी ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ स्थापन केले. ते सरस्वती मंदिरसम असून यातील चित्रसंग्रहात सरस्वतीचे एक अप्रतिम रंगीत चित्र आहे. या ठिकाणी सरस्वती उत्फुल्ल पद्मासनावर सव्य ललितासनात उजवा पाय खाली सोडून डावी मांडी घालून लोडाला टेकून बसली आहे. ती चतुर्भुज असून वरचा उजवा हात ज्ञानमुद्रेत अभय देत आहे. आणि खालचा उजवा वीणेच्या तारा छेडण्यात मग्न आहे. वरचा उजवा सुरांचा ताल नियंत्रित करण्यासाठी वीणेच्या दुसऱ्या टोकास खांद्याच्या वर आहे. खालच्या डाव्या हातात पोथी आहे. या ठिकाणी तिचे वाहन कोठेच नाही. तिने करंडमुकुट घातला असून तिच्या अंगावर दागिन्यांची रेलचेल आहे. तिच्या कानात कर्णफुले, गळ्यात मोत्यांचा कंठा, चंद्राहार, हातात दोन दोन तोडे, पायात तोडे व पैंजण इत्यादी अलंकार आहेत. तिच्या गळ्यातील फुलांचा हार दोन्ही स्तनांच्या बाजूने खाली लोंबताना दिसतो. देवीने नऊवारी साडी नेसली असून तांबडे पोलके घातले आहे. कपाळावर उभे कुंकू आहे. देवीच्या मागे प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आणि वरच्या बाजूच्या दोन कोपऱ्यांत आलीढ आसनातील गरुडांच्या प्रतिमा आहेत. ही तंजावर मराठा चित्रशैलीतील १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील सुमारे इ. स. १८२८ मधील एक अप्रतिम कलाकृती होय.
तंजावर जिल्ह्यत अचलेश्वर म्हणून एक छोटे गाव आहे. तिथे सरस्वतीचे एक चोलकालीन सरस्वती मंदिर असल्याचे ‘विद्यादेवी सरस्वती’ या प्र. रा. आहिरराव यांच्या पुस्तकात म्हटले आहे. हे साधे पण सुंदर बांधकाम असलेले मंदिर आहे, असे ते लिहितात.
महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यत काटोळ या गावी एका जुन्या किल्ल्याचे अवशेष असून त्यात सरस्वती व चंडिका अशा दोन मध्ययुगीन शक्तिदेवतांची मंदिरे आहेत. मात्र अन्य शिवमंदिर यादवकालीन आहे. काटोळ चेन्नई- दिल्ली मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. ते नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ५७ किमीवर वसले आहे. येथील सरस्वती स्थानिक लोकांत शारदा या नावाने प्रसिद्ध असून या शारदा मंदिराच्या गर्भगृहात तांदळाच्या रूपातील दोन ओबडधोबड प्रतिमा आहेत. अलीकडे तिथे संगमरवरी पाषाणात घडविलेली सुबक देवीची मूर्ती प्रतिष्ठित केली असून मंदिराचे आधुनिक पद्धतीने बांधकाम केले आहे. माघ शुक्ल पंचमीस (वसंत पंचमी) येथे शारदोत्सव होतो.
कमलारूढ सरस्वती
येथे सरस्वती देवीला संगीताची देवता म्हणून दाखवले आहे. या शिल्पपटात तीन देवता वाद्ये वाजवत आहेत तर चौथी देवी नृत्यमग्न आहे. संगीत आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे.संगीत हे केवळ आपले मन किंवा आत्माच नाही तर सर्वत्र अस्तित्वात आहे. गुप्त काळातील शिल्पे हि त्यांच्या साधेपणा आणि सुरेखपणा आणि सौंदर्यासाठी ओळखली जातात. या सर्व मुर्ती शिल्पशास्त्रानुसार कोरलेल्या कलाकृती आहेत.
अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात) हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.
ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.
सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात. ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्य मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती मणी असलेला कंठा अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे. पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.

नाडोळ गावातून मिळवलेली सरस्वती देवीची मूर्ती. पाली संग्रहालय
जैन सरस्वती पुतळा लाडनू, नागौर :-
नागौर जिल्ह्यातील या ऐतिहासिक नगरातील दिगंबर जैन बडा मंदिरात पांढऱ्या मकराना संगमरवरी बनवलेली सुमारे साडेतीन फूट उंचीची अभूतपूर्व सौंदर्याची सरस्वतीची मूर्ती आहे. या त्रिभंग आसनातील कमलासनावर उभ्या असलेल्या या मूर्तीवर कोरलेले शिलालेख पुढीलप्रमाणे आहेत, “संवत १२१९ वैशाख सुदी ३ शुक्र.. श्री माथुरसंघे. आचार्य श्री अनंतकीर्ती भक्ती श्रेष्ठी बहुदेव पत्नी आशादेवी सकुटुंब सरस्वतीम प्रणामति । शुभमस्त.” हि मुर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून संशोधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे.

लाडणू जैन मंदिरात देवी सरस्वतीची मूर्ती आहे.
जैन धर्मात सरस्वतीची वाग्देवी म्हणून श्रद्धा खूप प्राचीन आहे. देवी सरस्वतीला आध्यात्मिक ज्ञानाची जननी मानले जाते. त्रिभंग मुद्रा, अनोखी देहयष्टी आणि सुशोभित प्रभामंडल असलेली ही मूर्ती अतिशय आकर्षक आहे. याशिवाय सुंदर दागिने, गळ्यातीला कंठ हार , मोत्यांचा मेखला , सजवलेला कमरपट्टा आणि झालर लावलेली वस्त्रे हे सर्व या मुर्तीला परमोच्च सौंदर्य देतो. ही मूर्ती कलात्मकता, भव्यता, सौम्यता इत्यादी गुणांनी मुक्त आहे. निःसंशयपणे ही एक अद्वितीय आणि उत्कृष्ट कलाकृती आहे. या मुर्तीच्या वरच्या बाजूला अनेक जैन मूर्ती कोरलेल्या आहेत. मस्तकावरील मुकुट, कानातल्या कुड्या, मोत्याचा हार आणि संपूर्ण मूर्ती दागिन्यांनी सजलेली असून, चार हातांमध्ये अनुक्रमे फुले, शास्त्र, हार आणि कमंडलु आहे. हा चार हात असलेली मुर्ती चार वेदांचे प्रतीक आहे. बाराव्या शतकातील हा मुर्ती मोहक अदा आणि अप्रतिम कला यांचा मिलाफ आहे.
या मंदिरात सरस्वती मुर्तीजवळ आणखी दोन प्राचीन दगडी पटल आहेत. एका पटलावर जैन परंपरेतील सोळा विद्या देवी कोरलेल्या आहेत. आचार्य बप्पभट्ट सूरी यांनी लिहिलेल्या चतुर्विषातिकेनुसार त्यांची नावे रोहिणी, प्रज्ञाप्ती, वज्रशृंख, वज्रकुशा, जांबुंदा, पुरुषदत्त, काली, महाकाली, गौरी, गांधारी, ज्वाला मालिनी, मानवी, वैरोती, अच्युता, मानसी आणि महामानसी अशी आहेत. त्यांच्या निर्मितीचा काळ बारावे शतक मानला जातो. दुसऱ्या दगडावर आराधिकाची खडगासन मूर्ती आहे, या मुर्तीच्या प्रभावळीमध्ये पंधरा ध्यानस्थ जिन मूर्तींनी सजलेला आहे. भावनिक मुद्रा आणि अतुलनीय स्त्री सौंदर्याने सजलेल्या या सुंदर मूर्तीवर संवत १२२६ चा एक शिलालेखही कोरलेला आहे.

पल्लू, हनुमानगडचे जैन सरस्वती
हनुमानगड जिल्ह्यातील पल्लू गावात अकराव्या शतकातील दोन जैन सरस्वती मूर्ती एका इटालियन तज्ञाने शोधून काढल्या. त्यापैकी एक राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली आणि दुसरे गंगा सरकारी संग्रहालय बिकानेरचे मध्ये आहे. बिकानेर मधील वस्तुसंग्रहालयातील हि मुर्ती मकराणाच्या पांढऱ्या दगडापासून बनवलेली आहे. हे शिल्प शिल्पकलेचा एक अनोखा नमुना आहे.

बिकानेर संग्रहालयातील सरस्वती मुर्ती

श्री बावन जिनालय, सेवेडी, पाली जिल्हा
भगवान महावीर स्वामींना समर्पित या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती स्थापित आहेत. येथील देवी सरस्वतीची मूर्ती अकराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. चौकोनी आकाराच्या या मूर्तीच्या एका हातात रुद्राक्षाची जपमाळ, दुसऱ्या हातात कमळ आणि हंसाची जोडी, तिसऱ्या हातात पुस्तकांचा समूह आणि चौथ्या हातात कमंडल आहे.
‘‘कुंदिंदु गोक्खीरतुसारवन्ना, सरोजहत्था कमले निसन्नाः वाअेसिरी पुत्थयवग्गहत्था, सुहाय सा अम्ह सया प्रसत्या।।’’
अशा प्रकारे, राजस्थान राज्यात अनेक जैन सरस्वती मूर्ती बघायला मिळतात

सरस्वती, वसंतोत्सवाची देवी
हिंदु धर्मग्रंथानुसार देवीला श्री म्हणतात व बसंत पंचमी हा तिचा प्रकट दिन मानला जतो आणि त्यामुळे तिला श्री पंचमी देखील म्हणतात. श्रीमद्भागवतानुसार भगवती ब्रह्मदेवाच्या मुखातून निघाली होती. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार श्रीकृष्णाच्या मुखातून वीणा व ग्रंथ घेऊन शुक्ल वर्णाची देवी प्रगटली होती. माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाचा प्रारंभ श्रीकृष्णानेच केला. यानंतरच अनेक देव आणि मानवांनी सरस्वतीची पूजा सुरु केली. अशा प्रकारे वसंत पंचमीच्या दिवशी पूजाविधी सुरू झाला. या पंचमीपासून सुरू होणाऱ्या वसंत ऋतूमध्ये सत्त्वगुणाचे प्राबल्य असते, त्यामुळे प्राचीन काळात प्रचलित असलेल्या सोळा (सोळा) संस्कारांपैकी एक विद्यारंभ संस्कार या दिवशी केला जातो, जो पुढे सरस्वती पूजा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. मारवाडमध्ये या दिवशी सर्वजण पिवळे वस्त्र परिधान करतात आणि आपल्या पगडीवर गव्हाची फांदी लावून देवीची पूजा करतात. स्त्रिया बांगड्यांवर गव्हाची लोंबी लावून पूजा करतात.
अन्नपूर्णा सहस्त्रनाम या स्तोत्रामध्ये अन्नपूर्णेच्या १००० नावांचा उल्लेख आहे आणि अन्नपूर्णा शतनाम स्तोत्रामध्ये तिच्या १०८ नावांचा उल्लेख आहे. आदि शंकराचार्य लिखित अन्नपूर्णा स्तोत्रात अन्नपूर्णेचे वर्णन करण्यात आले आहे.
अन्नपूर्णेची इतर नावे अशी आहेत.
विशालाक्षी - मोठी डोळे असणारी
विश्वशक्ती - विश्वाची ताकद
विश्वमाता - जगाची माता
सृष्टीहेतुकावरदानी - सर्व जगाला वर देणारी
भुवनेश्वरी - पृथ्वीची देवी
अन्नदा - अन्नदान करणारी
अन्नपूर्णा हा शब्द संस्कृत भाषेतून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ अन्न आणि पोषण देणारी. हिमालयातील अन्नपूर्णा या शिखराला हे नाव अन्नपूर्णा देवीच्या नावावरून देण्यात आले असे मानले जाते. पर्वतांचा राजा हिमावत याच्या अनेक कन्यांपैकी अन्नपूर्णा ही एक कन्या असल्याचेसुद्धा मानले जाते.
दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥
भावार्थ : स्वतः ज्याला पाच मुखे आहेत असा शंकर; गजमुख विनायक आणि सहा मुख असणारा स्कंद, हे त्याचे दोन मुलगे; अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी साक्षात अन्नपूर्णा (पार्वती) आहे.

जिवाची प्रवृत्ती ऐहिक असो वा आध्यात्मिक, स्वार्थी असो वा परोपकारी, अन्न ही त्याची प्राथमिक आणि अपरिहार्य आवश्यकता आहे. अशा या जीवनहेतू अन्नाची अधिष्ठात्री देवता म्हणजेच अन्नपूर्णा. घरोघरीच्या देवतायनांत प्रतिष्ठित झालेली ही देवी, कधी चैत्र-वैशाखात झोपाळ्यावर बसून झोके घेते, तर कधी नवरात्राच्या घटात विराजमान होते. अन्नपूर्णा हे शिवपत्नी गौरीचेच रूप असल्याचे मानले जाते. दैवतशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सावित्री, सरस्वती, लक्ष्मी आणि भूमी या देवीरूपांशीही ते संबंधित असल्याचे जाणवते. लोकपरंपरा आणि तंत्रागमांमध्ये महत्त्वपूर्ण अशा या देवतेविषयीचे कथानुबंध पुराणेतिहासांमध्ये मात्र फारच अस्पष्ट आहेत. त्रिगुणात्मक आदिशक्तीच्या अन्नपूर्णारूपाच्या प्रचलित कथांचा परामर्श आपण येथे घेणार आहोत.
गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी ही भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सर्व असत्य.
पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ?
शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे.
पार्वती :- विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???
शिव :- ते हि असत्य
पार्वती :- बर मग आपण खातो ते अन्न तरी ?
शिव :- तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!
झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले.
शिवाना वाटले हरकत नाही.या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात संपुर्ण विश्वातील देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले, "थांबा तुम्हाला थोडे ब्रह्मज्ञान देतो." पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.
ओम भवति भिक्षां देही|
आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??
महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती. तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती. मोजकेच दागिने घातले होते. ती एका सिंहासनावर बसली होती मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.
शिव म्हणाले ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच भिक्षा दे !!!
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।
पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले. त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णेने शिवाला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि त्याच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू शकला असला तरीही त्याचे भक्त तसे करू शकले नाहीत.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.
काही वर्णनांमध्ये, शंकर भिक्षेचा वाडगा घेऊन अन्नपूर्णेच्या उजवीकडे उभा आहे असा उल्लेख आहे. तो तिच्याकडे भिक्षेची याचना करत आहे. अन्नपूर्णेच्या हातात पोथी आहे, अक्षमाला आहे, आणि तिच्या हातामध्ये भांडे आणि पळीच्याऐवजी मोक्षाच्या द्वाराची किल्ली आहे. याद्वारे असे दर्शवले आहे की शंकराने केलेली अन्नपूर्णा देवीची प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि ती केवळ अन्नासाठी केलेली याचना नाही.
मार्कंडेयपुराण (९१/४६), देवीभागवत (७/२८) या ग्रंथांमध्ये आदिशक्तीच्या 'शाकंभरी' अवताराची कथा येते. एकदा पृथ्वीवर सतत शंभर वर्षे दुष्काळ पडला, तेव्हा जीवसृष्टीचे रक्षण व्हावे यासाठी ऋषिमुनींनी जगन्मातेला साकडे घातले; त्यावेळी आदिशक्तीने सगुणरूप धारण केले. या रूपात तिला शंभर नेत्र होते. आपल्या नेत्रांद्वारे सर्व जीवांवर कृपाकटाक्ष टाकून तिने जलधारांची वृष्टी केली; तसेच आपल्या देहातून अनेक प्रकारच्या 'शाका' म्हणजेच भाज्या उत्पन्न केल्या. त्यांद्वारे जीवांचे भरण पोषण केले. त्यावरूनच हा देवीचा अवतार शताक्षी आणि शाकंभरी या नावांनी ओळखला जातो. याच अवतारात देवीने दुर्गामासुराचा वध केला, म्हणून तिला दुर्गा या नावानेही संबोधिले जाते. प्रस्तुत कथासंदर्भात देवी शाकंभरीने अपक्व, म्हणजेच न शिजवलेल्या स्वरूपातील अन्न पुरविल्याचा उल्लेख आढळतो.

लक्ष्मीनारायणसंहितेमध्ये (१/५०९) ब्रह्मदेवाने केलेल्या अग्निष्टोमाचे आख्यान येते. ब्रह्मदेवाने हाटकेश्वरक्षेत्री सप्तसोमसंस्थांपैकी अग्निष्टोमयज्ञाचे अनुष्ठान केले. या यज्ञात याचकांना अखंड अन्नदान केले जात होते. अचानक त्या यज्ञमंडपाबाहेर एक अतिमार्गी याचक येऊन उभा राहिला. समाजातील धर्मसंमत आचारसरणीच्या विरोधी वर्तन असणाऱ्या व्यक्तीला त्याकाळी अतिमार्गी म्हणत. अशा त्या अतिमार्गी याचकाने आपल्याकडील मातीचे खापर यज्ञमंडपात टाकले आणि त्यामध्ये भिक्षा घालण्यासाठी तो विनवू लागला; मात्र खापर हे अमंगल, अपवित्र मानले असल्यामुळे, यज्ञातील ऋत्विजांनी ते तत्काळ यज्ञमंडपाबाहेर टाकण्याची आज्ञा केली. तातडीने तेथील परिचारकांनी ते खापर यज्ञमंडपाबाहेर भिरकावले. त्या अतिमार्गी याचकालाही तिथून हुसकावून लावण्यात आले; मात्र चमत्कार असा झाला, की एक खापर बाहेर भिरकावल्यावर त्या जागी तसेच दुसरे खापर प्रकट होऊ लागले. वारंवार उत्पन्न होणारी खापरे टाकल्यामुळे, आजूबाजूचा सर्व परिसर त्यानेच भरून गेला. यज्ञासाठी जमलेली सर्व मंडळी हे अघटित पाहून अवाक् झाली. अखेर या सगळ्याचे मूळ कारण ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. यज्ञामध्ये रुद्रासाठीचा हविर्भाग द्यायचा राहून गेला होता; त्यामुळे हे आकस्मिक विघ्न आले होते. तेव्हा ब्रह्मदेवांनी रुद्रासाठी प्रत्येक यज्ञामध्ये शतरुद्रीयमंत्रांद्वारे पुरोडाश देण्याचे मान्य केले. त्या याचकालाही पुन्हा बोलावून, त्याला सन्मानाने भिक्षा वाढली गेली. त्याक्षणी यज्ञमंडपामध्ये पडलेल्या खापराच्या जागी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली. जेवढी खापरे इतस्ततः पसरली होती, तेवढी सगळी अन्नपूर्णेचीच रूपे असल्याचा साक्षात्कार यज्ञकर्त्यांना झाला. अन्नदान करीत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये, अन्य सर्व दानांमध्ये याचकाची पात्रापात्रता विचारात घ्यायची असते; मात्र अन्नदान करीत असता भुकेलेल्या याचकाची पात्रता आणि त्याचे पात्र यांचा विचार करायचा नसतो. आलेल्या प्रत्येक भुकेल्या जीवाचे पात्र भरून अन्न देत राहणे, त्याला तृप्त करीत राहणे यातच खरी अन्नपूर्णा दडलेली आहे. अन्नदान करीत राहा, अन्नपूर्णा प्रसन्न राहील, हा नैतिकतेचा संदेशही या कथेतून ध्वनित होतो.
कूर्मपुराण (२.३१) आणि स्कंदपुराण (३.१.२४) यांतील संदर्भांनुसार ब्रह्मदेवाचे गर्वहरण करण्यासाठी शंकराच्या अंशाने कालभैरवाचा अवतार झाला. त्याने ब्रह्मदेवाची चार मस्तके राखून, केवळ पाचवे मस्तक कापले. ब्रह्मा गर्वमुक्त झाला; मात्र त्याचे कापलेले मस्तक भैरवाच्या हाताला चिकटून राहिले. हातून घडलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे ते प्रतीक होते. या पातकातून मुक्त होण्यासाठी, शंकराच्या निर्देशानुसार भैरव त्याच ब्रह्मकपालामध्ये भिक्षा मागत तीर्थाटन करू लागला. संपूर्ण ब्रह्मांडभराची भिक्षा घेऊनही भैरवाचे ते कपालपात्र कधी पूर्ण भरले नाही. फिरता फिरता कालभैरव अखेर काशीक्षेत्री आला. तेथे विशालाक्षीरूपात विराजमान असणाऱ्या पार्वतीने त्याला भिक्षा वाढली आणि त्याचे पात्र पूर्ण भरले. भैरव त्या दिव्य भिक्षान्नाने तृप्त झाला. त्याच्या तळहातावर चिकटलेले ते ब्रह्मकपाल काशीक्षेत्रीच गळून पडले व पाताकाचेही निरसन झाले. या कथेत उल्लेखिलेली देवी विशालाक्षी अन्नपूर्णेचेच एक रूप आहे. आजही काशीक्षेत्राची स्वामिनी म्हणून देवी पार्वतीची, विशालाक्षी व अन्नपूर्णा याच दोन रूपांत पूजा होते. याविषयी अजून एक लोककथा आढळते. वैराग्यमूर्ती शंकराच्या मनी सर्व ऐहिक गोष्टींविषयी नेहमीच औदासिन्य असे. त्याला ऐहिक विश्वाचे, लोकव्यवहाराचे महत्त्व दाखविण्यासाठी, नित्य शिवासमवेत राहणारी आदिशक्ती एकदा अंतर्धान पावली. शक्तीच्या अभावी शिव आणि सर्व विश्व क्षीण होऊ लागले. विश्वातील नवनिर्माणाची प्रक्रिया थांबली. सर्व सृष्टीवर अन्नान्नदशा ओढवली. शिवालाही आता अखंड भिक्षाटन करण्याची वेळ आली; पण कोठे भिक्षाही मिळेना. सरतेशेवटी शंकराची भिक्षायात्रा आनंदवन काशीमध्ये आली. तेव्हा एका भवनातून स्वतः देवी भुवनेश्वरी सुंदर सुस्वरूप गृहिणीच्या रूपात प्रकट झाली. तिच्या एका हातामध्ये पवित्र आणि स्वादिष्ट अशा अन्नपदार्थांनी भरलेले सोन्याचे पात्र होते. दुसऱ्या हातातील रत्नखचित पळीने ती ते सिद्धान्न शिवाच्या भिक्षापात्रामध्ये वाढू लागली. या प्रसंगी शिव आणि शक्तीची जी नजरभेट झाली, त्यातून प्रपंचावाचून परमार्थ, अनुरक्तीवीण विरक्ती, प्रवृत्तीशिवाय निवृत्ती आणि शक्तीविरहित शिव हे अपूर्णच असतात, या तत्त्वाचा पूर्णबोध शिवाला झाला. जिने वाढलेल्या भिक्षान्नामुळे स्वतः शिव आणि त्याचा विश्वसंसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा याच नावाने प्रसिद्ध झाली.
काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्रह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले. व त्याने शंकराची तपश्चर्या करावयाला सुरुवात केली. तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ 'अन्नपूर्णा, अन्नपूर्णा', अन्नपूर्णा,' असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणुन त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टान्त दिला, "मुला, तू पूर्व दिशेला जा. तुझे मनोरथ पूर्ण होतील." दुसर्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना विचारले. "हे तुम्ही काय करता?" अप्सरा म्हणाल्या, "आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो.२१ दिवसांसाठी २१ गाठी असलेला दोरा घ्यावा. एकवीस दिवस उपास करावा. एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हेसुद्धा शक्य नसेल, तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही, तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर-पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास दुसर्या दिवशी परत उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये. खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जीजी इच्छा धरून हे व्रत करील त्याची तीती इच्छा पूर्ण होते." ब्राह्मण म्हणाला, "बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय?" अप्सरा म्हणाल्या, "देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये. त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत."
धनंजयाने मग हे व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून २१ पायर्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पाहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, 'वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करील. तुला काही कमी पडणार नाही.' देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशीविश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला, सर्व हकिकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख, दारिद्र्य दूर झाले. त्याच्या मानसन्मान वाढल्या. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवर्याला म्हणाली, " महाराज, आपल्याशी माझे एकच मागणे आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये." तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते. ती आपल्या नवर्याची वाट पाहत बसली. एक दिवस झाला, दोन झाले. असे १८ दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की, आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे, तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर सामानासुमानासकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की, हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली.
सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, "थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे. तो अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे," नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दरोरज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे. व्रत केले आहे. तिला सर्वगुणसंपन्न असा मुलगा होईल."
प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, "बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला." ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांदले. मोठ्या सामांरभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायकोमुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसर्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले.तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नान्नदशेची हकिकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले. न्हाऊमाखू घालून चांगले कपडे दिले, आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो.
तात्पर्य हेच की, आपण जशी करणी करतो, तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्रय, नाना तर्हेच्या व्याधिउपाधींनी भोगावे लागते.
या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.
स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।
दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥
पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.
शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन !
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।
तिसऱ्या आणि चौथ्या शतकात लिहील्या गेलेल्या देवी भागवतामध्ये अन्नपूर्णा देवीचा उल्लेख कांचीपुरमची देवी आणि विशालाक्षीचा उल्लेख वाराणसीची देवी असा केला आहे. सातव्या शतकात लिहील्या गेलेल्या स्कंद पुराणात एका शापामुळे महर्षी व्यास वाराणसीमध्ये आले आणि अन्नपूर्णा एक गृहिणी म्हणून आली आणि तिने त्यांना अन्न दिले, असा उल्लेख आहे. पार्वतीने केलेल्या चमत्कारामुळे जगात कोठेही अन्न मिळाले नाही, म्हणून आपल्या मुलांसाठी शंकर अन्नाची याचना करत होता. पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात बाहेर आली आणि तिने शंकराला अन्न दिले, असा उल्लेख आहे.
१) अन्नपूर्णा देवी मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश – अन्नपूर्णा वाराणसी शहराची अधिष्ठात्री देवता आहे. या मंदिरात दुपारी देवीला दाखवलेला नैवेद्य दररोज वृद्ध आणि अपंग लोकांना वाटला जातो. शरद ऋतूतील नवरात्रात मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते.
२) पश्चिम बंगालमध्ये बराकपोर येथे अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना राणी रासमणी यांची कन्या जगदंबा यांनी केली.
३) मध्य प्रदेशात एक अन्नपूर्णा मंदिर इंदौरमध्ये लाल बाग किल्ल्याजवळ आहे.
४) चिक्कमंगळूरू कर्नाटकातील होरानाडू येथे अन्नपूर्णेश्वरी मंदिर आहे. येथे भक्तांना जेवण दिल्यावर दुपारी आणि संध्याकाळी आरती केली जाते.
५ ) केरळातील चलापल्ली येथे कुन्नम अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर नावाचे मंदिर आहे.
६ ) चेरुकुन्नू, कन्नूर, केरळ येथे अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर आहे.
७ ) केरळातील पुदुकोडे येथे अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
८ ) महाराष्ट्रात भंडारा आणि अकोला येथे अन्नपूर्णा देवीची मंदिरे आहेत. खिद्रापूरच्या मंदिरात अंतराळाच्या भिंतीत अन्नपूर्णेची पळी हातात घेतलेली एक सुरेख मूर्ती आहे.
९ ) गुजरातमध्येसुद्धा अन्नपूर्णा देवीची मंदिरे आहेत. उंझा, गुजरात येथे तिची पूजा उमिया माता म्हणून केली जाते.
१० ) गुजरात आणि राजस्थानमध्ये आशापुरा माता हीसुद्धा अन्नपूर्णा मातेचा अवतार मानली जाते. चित्तोड गडावर अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. हे महाराणा हमीर सिंग यांची बांधलेले आहे.

माँ भंडारी देवीच्या मंदिराच्या खाली ही गुहा आहे. या गुहेला अंत नाही. हे देखील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. पूर्वी माँ भंडारी देवीच्या गुहेजवळ शेतकरी शेतीसाठी धान्य घेऊन जात असत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची कापणी केल्यावर ते परत गुहेजवळ सोडायचे. कालांतराने ही प्रथा संपुष्टात आली असली, तरी भक्तांची देवी मातेवर श्रद्धा आहे. येथे दर्शन घेतल्याने भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आईला अन्नपूर्णेचे रूप म्हणतात. येथे दर्शन घेतल्यावर भक्तांचे रिकामे भांडेही भरतात
गंगा नदी :-


गंगेची इतर काही नावे
१) ब्रह्मद्रवा :- ब्रह्मदेवाने गंगेला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. त्यामुळे तिला ‘ब्रह्मद्रवा’ असे म्हणतात.२ ) विष्णुपदी किंवा विष्णुप्रिया :- गंगा विष्णुपदाला स्पर्शून भूलोकी आल्याने तिला ‘विष्णुपदी’ किंवा ‘विष्णुप्रिया’ हे नाव मिळाले.
३ ) भागीरथी :- राजा भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली; म्हणून तिला ‘भागीरथी (भगीरथाची कन्या)’ असे म्हणतात.
४) जान्हवी :- ‘हिमालयातून खाली उतरतांना गंगेने राजर्षी आणि तपोनिष्ठ अशा जन्हुऋषींची यज्ञभूमी वाहून नेली. या गोष्टीचा राग आल्याने जन्हुऋषींनी तिचा सगळा प्रवाहच पिऊन टाकला. मग भगीरथाने जन्हुऋषींना प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गंगेचा प्रवाह स्वतःच्या एका कानातून बाहेर सोडला. त्यावरून तिला ‘जान्हवी (जन्हुऋषींची कन्या)’ हे नाव मिळाले.’ (वायुपुराण, अध्याय ९१, श्लोक ५४ ते ५८)
५ ) त्रिपथगा :- ‘भूतलावर अवतरित झाल्यानंतर गंगेची धारा शिवाने जटेत अडवली. त्या वेळी तिचे तीन प्रवाह झाले. या प्रवाहांपैकी पहिला स्वर्गात केला, दुसरा भूतलावर राहिला आणि तिसरा पाताळात वहात गेला; म्हणून तिला ‘त्रिपथगा’ किंवा ‘त्रिपथगामिनी’ असे म्हणतात.’
६ ) त्रिलोकांतील नावे :- गंगेला स्वर्गात ‘मंदाकिनी’, पृथ्वीवर ‘भागीरथी’ आणि पाताळात ‘भोगावती’ म्हणतात.
७ ) ‘गँजेस्’ – पाश्चात्त्यांनी दिलेले विकृत नाव
ग्रीक, इंग्रजी आदी युरोपीय भाषांमध्ये गंगेचा उच्चार ‘गँजेस्’ असा विकृतपणे केला जातो. इंग्रजाळलेले भारतीयही तिला याच नावाने उच्चारतात.
गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे मानवीकरण या शिल्पांद्वारे करण्यात आले. शृंग काळामध्ये (इ.स.पू २ ते १ शतक) याच्या भोवती असणाऱ्या तोरणाखाली शालभंजिकांचे शिल्पांकन आढळते. झाडाच्या फांदीला एका हाताने धरून देहुड्यापावली उभ्या असणाऱ्या शालभंजिकांची त्या काळची अनेक शिल्पे दिसतात. गुप्त काळामध्ये या शालभंजिकां- प्रमाणे गंगा आणि यमुना यांचे शिल्पाकंन इाले. उदयगिरी (म.प्र.) मधील लेण्याच्या गृहाबाहेरील द्वारशाखेवर या तुळईच्या बहेरील कोपऱ्याशेजारी या दोन्ही कोरलेल्या दिसतात. त्याच लेणीमध्ये बाहेरच्या भिंतीवर असणाऱ्या वराहाच्या भव्य शिल्पाशेजारी न्टपणे दिसतात. यामध्ये यांची वाहनेही दाखवलेली आहेत. गंगेचे वाहन मकर आणि यमुनेचे वाहन कासव असते. ते यांच्या पायाखाली कोरलेले आहे. कालांतराने सातव्या शतकानंतर या द्वारशाखेवरच परंतु खालच्या बाजूला कोरल्या जाऊ लागल्या. मंदिरात प्रवेश करताना आपल्या डावीकडे असते ती मकर बाहिनी गंगा आणि उजवीकडे असते ती कच्छपवाहिनी यमुना. वेरुळमध्ये एवं अप्रतिम शिल्पांकन पाहायला मिळते. रामेश्वर लेणे (लेणी क्र. २१) याच्या बाहेर असलेली यमुना आज भग्न अवस्थेत आहेत. परंतु तेथील गंगेचे शिल्प हे भारतातील सर्वश्रेष्ठ शिल्पापैकी एक म्हणावे लागेल.. कवी कालिदासाच्या मेघदूतातील केलेल्या कल्पनेतील स्त्रीसौंदर्याची व्याख्या इथे प्रत्यक्षात साकारलेली आहे.
यमुना माता :-
यमुना नदीशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणे आणि वास्तू
क्र. ऐतिहासिक ठिकाणे राज्ये
१ स्मृती अशोक स्तंभ उत्तराखंड
२ राजा रतन अमोल सिंह किल्ला, यमुना नगर हरियाणा
३ हातिनी कुंड हरियाणा
४ पानिपत युद्धक्षेत्र हरियाणा
५ कुडस्या घाट दिल्ली
६ लाल किल्ला दिल्ली
७ जुना किल्ला दिल्ली
८ शेरशाह किल्ला, शेर गड मथुरा उत्तर प्रदेश
९ ताजमहाल आग्रा उत्तर प्रदेश
१० बरेह किल्ला, इटावा उत्तर प्रदेश
"पुष्टीमार्ग" हा हिंदू धर्माचा ५०० वर्ष जुना संप्रदाय आहे, ज्याची स्थापना हिंदू धर्मातील पाच मुख्य आचार्यांपैकी एक श्री वल्लभाचार्य यांनी केली आहे. पुष्टीमार्ग हा पुष्टी आणि मार्ग या दोन शब्दांपासून बनला आहे. मार्ग म्हणजे रस्ता, इथे त्याचा अर्थ भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग. भक्ती चळवळ या कल्पनेवर आधारित आहे. कृष्ण हे पंथाचे प्रमुख दैवत आहे. यमुना तिची चौथी पत्नी ( चतुर्थ पटराणी ) म्हणून पूजली जाते आणि ती देवी आहे जिने श्री वल्लभाचार्यांना तिच्या किनाऱ्याजवळ श्रीमद भागवत पठण करण्याचा आदेश दिला होता. हे यमुनेसाठी रचलेले स्त्रोत आहे, वल्लभाचार्यांनी श्री यमुनाष्टकम् रचले आहे . पुष्टीमार्गमध्ये यमुना नदीची तीन रूपे आहेत: आध्यात्मिक, भौतिक आणि देवीची आणि यमुना नदीशिवाय पूजा विधी अपूर्ण मानले जातात.
दरवर्षी उन्हाळी नवरात्राच्या सहाव्या दिवशी यमुनेचा जन्मदिवस मथुरेत साजरा केला जातो. भैय्या दूजचा सण देखील यमराज आणि यमुना नदीच्या प्रेमाला समर्पित आहे. याशिवाय हजारो लोक दर महिन्याला पौर्णिमा आणि चंद्राशिवाय रात्री आणि रविवार आणि शनिवारी यमुना नदीत अनेक ठिकाणी स्नान करून पाप आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळवतात.

पौराणिक कथेनुसार भाऊबीजची कथा यमराज आणि त्यांची बहिण यमुनेशी संबंधित आहे.
भगवान सूर्याची पत्नी छाया यांनी यमराज आणि यमुना यांना जन्म दिला. सूर्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे होते. छाया आपल्या पती सूर्याची किरण सहन करु शकत नसल्यामुळे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवात सावली बनून राहू लागली. उत्तर ध्रुवात वस्ती केल्यानंतर छायाचे यमराज आणि यमुना यांच्यासोबत संबंधात अंतर येऊ लागले. यामुळे व्यथित होऊन यमाने आपले वास्तव्य यमपुरीत केले. यमपुरीत आपला भाऊ पापी लोकांना यातना देतो हे यमुनाला बघवत नसल्यामुळे ती दुसरीकडे निघून गेली.

नंतर एकेदिवशी यमाला यमुनाची आठवण आली आणि तो बहिणीला भेटायला गेला. त्यादिवशी त्याने नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. यमराज म्हणाला मी तर सर्वांचे प्राण घेतो. म्हणूनच मला कोणी माझ्या घरी बोलवत नाही. परंतु माझी बहिण यमुना मला एवढ्या प्रेमाने बोलवत आहे. त्यामुळे तिला खूश करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून ते यमुनेच्या घरी जातात. यमराजला पाहून यमुना खूप खूश होते. तिने यादिवशी यमराजसाठी पंचपक्वान्न तयार केले. त्यांचा आदर सत्कार केला. त्याला पंचारतिने ओवाळलं. तसेच प्रत्येक वर्षी याचं दिवशी घरी येण्याचे वचन यमराज कडून घेतले. त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. भावाने खूश होऊन वरदान मागायला सांगितले तेव्हा तिने म्हटले की प्रतिवर्ष या दिवशी बहिण आपल्या भावाला जेवू घालून त्याला ओवळेल त्या भावाला यमाची भीति राहणार नाही. यावर यमराज तथास्तू म्हणून यमलोकाकडे निघून गेले. तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयला आपल्या भावाचा सत्कार करुन त्यांना ओवाळून बहिण भावासाठी जी प्रार्थना करते ती भावाला लाभते. तेव्हापासून हिंदू धर्मात भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
मोहीनी शिल्प :-
सर्वमंगला
वस्त्रालंकार संयुक्ता सुरूपा म्हणजेच वस्त्र आणि अलंकारांनी जिचे स्वरूप अतिशय सुंदर दिसत आहे. सुप्रसन्न्ना म्हणजेच जी स्वतः प्रसन्न वदना आहे. सुतेजाक्षा म्हणजे जी स्वतः तेजाने परिपूर्ण आहे ,अशी ती देवी म्हणजे सर्वमंगला.

कारुण्यरूपा त्रिपुरा

त्रिपुरा देवी
शीतला देवी :-
स्कन्द पुराणातील भगवान शिव रचित शितलाष्टका नुसार, “गाढवावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू अथवा कलश धरण करणारी, सुप अलंकृत मस्तकवाली, भगवती शितलास मी वंदन करतो.” असे पहिल्या चरणात म्हटले आहे. सदर मूर्ती ही दिगंबरा असून हाती झाडू, सूप, कपाळ पात्र आणि सुरा आहे. स्कन्द पुराणातील वर्णना प्रमाणे हाती कलश नसून सुरा दाखवण्यात आलेला आहे. कारण ही मूर्ती संहार मूर्ती असून ती ज्वरासूर अर्थात ज्वर दैत्याचा अंत करीत आहे. बाकी सारी लक्षणे शीतला देवींचीच आहेत. त्यासोबतच गळ्यात असलेली मुंड माला ही लक्षणे ही शिवाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे किरीट मुकुटावर ही एक मुंड कोरण्यात आलेला आहे. स्कंद पुराणानुसार, शीतला देवी ही चेचक नामक रोगाची देवी आहे, त्यामुळेच शीतला मातेला शीतला अष्टमीच्या दिवशी आमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घे, त्यांच्या आरोग्याचं रक्षण कर, अशी प्रार्थना भाविक शीतला मातेला करतात. शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेला प्रसन्न कसं करावं यासाठी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

आयुर्वेदिक उपचार सर्वसामान्य माणसाला समजावेत, त्याचा सहज अर्थबोध व्हावा यासाठी संबंधित आजार आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने काही देवता आणि त्यांच्या पौराणिक कथा निर्माण झाल्या आहेत. या देवता आजच्या आधुनिक युगातही आपले वैज्ञानिकत्व टिकून आहे. भारतीय पौराणिक कथेमध्ये ज्या अनेक देवी देवता आहेत. त्यातीलच एक देवी म्हणजे चामुंडा, ही प्रेतासनावर विराजमान असते. हिचे वाहन प्रेत दाखवण्या पाठीमागे कदाचित असे कारण असावे की, चामुंडा ही संहार देवी असून तिच्या भयंकर संहार सत्रा नंतर असेच संक्रमित आजार पसरत असावेत आणि असे संक्रमित आजार जेव्हा निर्माण होतात. तेव्हाचा चामुंडेच्या पायाखाली असलेल्या प्रेताप्रमाणे निपचित पडून राहावे. अन्यथा मानव समूहाला कायमचे निपचित व्हावे लागेल. हाच जणू संदेश त्या मूर्तीतून दिला गेला असावा. चामुंडा देवी प्रमाणेच संक्रमित आजाराच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षितता तसेच स्वच्छते संदर्भाने संदेश देणारी एक देवी म्हणजे ती माता शीतला होय.
स्कंद पुराणात शीतला मातेशी संबंधित एका पौराणिक कथेचे वर्णन आहे, ज्यामध्ये शीतला देवीचा जन्म ब्रह्मादेवापासून झाल्याचे सांगितले आहे. शीतला माता हे शक्तीचे रूप मानले जाते, भगवान शिवाचे अर्धांगिनी आहे. पौराणिक कथेनुसार, शितलादेवी देवलोकातून आपल्या हातात डाळ घेऊन भगवान शंकराच्या घामाने उत्पन्न झालेल्या ज्वरासूरसह देवलोकातून राजा विराटच्या राज्यात राहण्यासाठी आली होती. पण, राजा विराटने देवी शितलाला राज्यात राहू देण्यास नकार दिला.
राजाच्या या वागण्याने शीतला देवी संतप्त झाली. शीतला मातेच्या क्रोधाच्या आगीमुळे राजाच्या प्रजेच्या त्वचेवर लाल पुरळ उठले. उष्णतेने लोकांची त्वचा जळू लागली. त्यानंतर राजा विराटने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. यानंतर राजाने शीतला देवीला कच्चे दूध आणि थंड लस्सी अर्पण केली, त्यानंतर माता शीतलाचा राग शांत झाला. तेव्हापासून मातेला थंड पदार्थ अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे.
स्कंद पुराणानुसार देवी शीतलाचे रूप अद्वितीय आहे. शीतला देवीचे वाहन गाढव आहे. शीतला देवी आपल्या हाताच्या भांड्यात थंड पेय, डाळ आणि जंतुनाशक पाणी ठेवते, तर दुसऱ्या हातात झाडू आणि कडुलिंबाची पाने घेतली असतात. चौसष्ट रोगांची देवता, घंटाकर्ण हा चर्मरोगाचा देव, संसर्गाची देवता आणि ज्वरासूर हा तापाचा राक्षस हे तीचे साथीदार आहेत. स्कंदपुराणानुसार, शीतलाष्टक, शीतला देवीचे उपासना स्तोत्र, भगवान शिवानी स्वतः रचले होते.
आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याने एक गाव वसवलं गावाजवळ तळे बांधले, पण त्या तळ्याला काही केल्या पाणी लागेना, जलदेवतेची प्रार्थना केली,जलदेवता प्रसन्न झाली, आणि म्हणाली राजा राजा तुझ्या सुनेचा मुलगा बळी दे पाणी लागेल, हे राजाने ऐकले,घरी आला. मनी विचार केला, फार दु:खी झाला. नंतर विचार केला पुष्कळ लोकांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडेल कशी, सूनेला कसे समजवावे. त्याने एक युक्ती केली. तोड काढली. सूनेला माहेरी पाठवलं. मुलाला आपल्याकडे ठेऊन घेतलं. सासऱ्याने आज्ञा केली सून माहेरी गेली. इकडे राजाने चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातले. जेवू घातले, दागदागिने अंगावर चढवले. एका पलंगावर निजवलं. तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला भरपूर पाणी लागले.
पुढे राजाची सून माहेराहून भावाला बरोबर घेऊन येऊ लागली. मामंजीने बांधलेले तळे आले. तळे पाण्याने भरलेले पाहिले. तिथे तिला श्रावण शुध्द सप्तमी लागली, वशाची आठवण झाली. तो वसा काय ? तळ्यात जावे, पूजा करावी, काकडीचे पान घ्यावे दहीभात घालावे, लोणचे घालावे, एक सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतेची प्रार्थना करावी. जय देवी आमचे वंशज पाण्यात बुडाले असेल तर ते आम्हाला मिळोत. अशी प्रार्थना केल्यावर तळ्यात बळी दिलेला मुलगा पाय खेचू लागला, पाय कोण ओढतं हे पाहू लागली तर तोच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिने कडेवर घेतला आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळले. सून मुलाला घेऊन आली राजालाही आश्चर्य वाटले. त्याने सूनेचे पाय धरले घडला वृत्तांत सांगितला, तो परत कसा मिळाला विचारणा केली. सूनेने घडली हकीकत सांगितली. शिळासप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिले जलदेवतेची प्रार्थना केली मून पुढे आलं. मुलाला कडेवर उचलून घरी आणलं. राजाला फार आनंद झाला, तिजवर आणखी ममता करू लागला. जसा तिला जलदेवता प्राप्त झाल्या तसा तुम्हांस आम्हांस होवोत. ही कहाणी सफळ संपूर्ण.
या दिवशी काय करतात?
घरातील चूल, शेगडी, आधुनिक युगात गॅस, स्टोव्ह व इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शीतला देवीची पूजा करतात. षष्टीच्या दिवशी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले जातात आणि सप्तमीला या पदार्थांचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी जलाशयांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. या पूजेने मुलांना आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट दूर होतात, अशी धारणा आहे.
शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेला प्रसन्न कसं करावं यासाठी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेला जल अर्पण करा. जल अर्पण करताना त्या तांब्यातलं थोडं पाणी वाचवून ठेवा आणि ते घरात शिंपडा. असं केल्यास घरात सुख शांती राहाते. शीतला अष्टमीच्या दिवशी पूजा करताना मातेला कुंकू, अक्षता आणि लाल रंगाची फुले अर्पण करा, यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
शीतला मातेची पूजा करताना खालील मंत्राचा जप अवश्य करावा.
शीतले त्वं जगन्माता शीतले त्वं जगत्पिता। नमो नमः ते शीतले त्वं जगद्धात्री शीतलाय..” ओम ह्रीं श्री शीतलयै नमः” धायामी शीतलां देवी, रसस्थान दिगंबरम्।, मर्जानी-कल्शोपेता शूर्पालंकृत-मस्तकम्।
अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघरात दिवा लावा आणि हातात फुले, अक्षता, जल आणि दक्षिणा घेऊन व्रत करा. माता शीतलाला शिळे अन्न अत्यंत प्रिय असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. गोड भात, रबडी, पुरी, हलवा, इत्यादी पदार्थ शीतला अष्टमीच्या एक दिवस आधी तयार केले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त शिळे अन्न देवीला अर्पण केले जाते आणि ते प्रसाद म्हणून खाल्ले जाते.
शीतलाष्टकामध्ये तुम्हाला या दिवसाचे महत्त्व समजते. भगवान शंकरांनी लोककल्याणासाठी त्याची रचना केली होती असे म्हणतात. यामध्ये शीतला देवीचा महिमा सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तीने दररोज हे पाठ केले तर त्याच्यावर माता शीतलाची कृपा कायम राहते अशी मान्यता आहे.
या दिवस या मंत्राचा जप केला जातो
शीतलाष्टक स्तोत्र ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री शीतलाय नमः म्हणत या स्तोत्राची सुरुवात करा.
विनियोग ओम अस्य सृष्टितला स्तोत्रस्य महादेव ऋषियः, अनुष्टुप छंदः, शीतली देवता, लक्ष्मी बीजम, भवानी शक्तीः, सर्व विस्फोटक निवृत्तये जप विनियोगः
मंत्र ओम ह्रीं श्री शीतलाय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करा.
वंदे आहं शीतलन देवी रासस्थान दिगंबरम मर्जानी कलशोपेता शूरपालम लिखित मस्तकम
वंदेहम् शीतलन देवी सर्व रोग भयपहं यमसद्य निवर्तेत स्फोटक भैय्या महत्
शीतले शीतले चेति यो ब्रुयाद्दार बळीः स्फोटकं घोरं क्षिप्राण तस्य प्राणस्यति
यथावमुदक मधे तू धृत्वा पूजयते नरः स्फोटकभयं घोर घये तस्य न जायते
शीतलज्वर दग्धस्य पुट्टीगंड्युतस्य च प्रस्थाचक्षुषाः पुसत्वमहुर्जीवनौषधा
शीतले तनुजन रोगन्नरणम् हरसी धूस्त्यजन विस्फोटक विदिर्णनम् त्वमेका अमृत वर्षांणी
गलगंडग्रह रोग ये चान्ये दारुण नृणं त्वदानु ध्यान मात्रेन शीतले यांति संक्षयाम्
न मंत्र नौसाधम् तस्य पापरोगस्य विद्याते त्वमेका शीतले धात्रिम नान्यम् पश्यमि देवताम्
फल-श्रुति मृणालतन्तु सद्दशीं नाभिहृन्मध्य संस्थिताम् यस्त्वां संचिन्तये द्देवि तस्य मृत्युर्न जायते
अष्टकं शीतला देव्या यो नरः प्रपठेत्सदा विस्फोटकभयं घोरं गृहे तस्य न जायते
श्रोतव्यं पठितव्यं च श्रद्धा भक्ति समन्वितैः उपसर्ग विनाशाय परं स्वस्त्ययनं महत्
शीतले त्वं जगन्माता शीतले त्वं जगत्पिता शीतले त्वं जगद्धात्री शीतलायै नमो नमः
रासभो गर्दभश्चैव खरो वैशाख नन्दनः शीतला वाहनश्चैव दूर्वाकन्दनिकृन्तनः
एतानि खर नामानि शीतलाग्रे तु यः पठेत् तस्य गेहे शिशूनां च शीतला रूङ् न जायते
शीतला अष्टकमेवेदं न देयं यस्य कस्यचित् दातव्यं च सदा तस्मै श्रद्धा भक्ति युताय वै
श्रीस्कन्दपुराणे शीतलाअष्टक स्तोत्रं

मंदिरासमोर प्राचीन दगडी पुष्करिणी आहेच, तरीही मंदिरात जाताना पाय धुवून जावे. शुचिर्भूत होऊन प्रवेश करावा, यासाठी संपूर्ण मंदिराभोवती पाण्याची पोहळी तयार केलेली आहे. प्रवेश करताना त्यातूनच जावे लागते.

केळव्याची स्वयंभू शितलादेवी :-
केळवे-माहीम गावी समुद्रालगत असलेली, ही शीतलादेवी ही त्यापैकीच एक. या देवीचे मंदिर हे तेथील स्थानिक वाडवळ समाजाचे कुलदैवत. हा समाज किनारी मार्गाने पसरत गेला, केळवे हे बंदर होते इसवी सन ११९३ सालात महीकावती ही बिंबराजाची राजधानी असताना या बंदरावरून राजधानीचे संपूर्ण व्यापार उद्दीम चालायचा. मराठ्यांच्या राजवटीत तीन किल्ले बांधले असून त्यातील एक किल्ला केळवे बंदरात प्रवेश करतानाच लागतो. त्या काळात जकात नाका म्हणून त्या किल्ल्यास संबोधले जात असे. राजधानी माहिकावतीच्या संरक्षणाची जबाबदारी केळवा आणि माहीम इथल्या किल्ल्यावर होती. इ.स. ११४० ते इसवी सन १७४० या कालावधीत हीच राजधानी होती. या संपूर्ण प्रदेशाचे राज्यकारभार इथूनच चालायचा अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हे केळवे गाव शीतलादेवीच्या वास्तवाने पुनित झाले आहे.
शीतलादेवी देवस्थानाच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची बागायतीवाडी आहे. शीतलादेवीचा गुप्त स्वरूपात वास होता. कारण त्यांनी गावातील एका शेतकऱ्याचे स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला, ही बातमी येथील गोपाळपंथीय लोकांना समजताच त्यांनी देवीचा शोध घेतला. देवीच्या निश्चित ठावठिकाण माहीत नसतानाही ते नेमके ज्या विवरात देवी होती तिथे गेले आणि तिकडे त्यांनी खणून आईची मूर्ती बाहेर काढली. सध्या देवी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तिची विधीपूर्वक स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. गोपाळ पंथी नानांनी पुढाकार घेऊन लोकांच्या मदतीने लहानसे मंदिर बांधले, पुढे सोळाव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत या देवळाचा जीर्णोद्धार केला. होम कुंडात बकऱ्याचा व कोंबड्याचा बळी देऊन त्याचा प्रसाद साऱ्या गावभर ढोल- ताशे बडवीत देवीचा जयजयकार करीत वाटला जाई. परंतु ही प्रथा सन १९६५ पासून गावातील नागरिकांनी बंद केली. तेव्हापासून या दिवशी कोहळ्याचा बळी दिला जाऊन उस्तवाची सांगता केली जाते.
पहिल्या रात्री शितलादेवी पुढे सुंदर आरास केली जाते नऊ प्रकारची धान्य देवी समोर पेरली जाऊन नऊ घट देवीसमोर रामकुंडातील पाण्याने भरून स्थापले जातात. झेंडूच्या दोन माळा दोन दिशेने एक-एक अशा प्रमाणे नऊ रात्रीत १८ माळा देवीसमोर टांगून चांगली आरास केली जाते. चार रात्री गेल्यावर देवी समोर पेरलेल्या धान्यांना मोड येऊन त्याची वाढ होते. पाचव्या रात्री विविध वस्त्रांनी देवीला सजवून गळ्यात हार घालून देवीची आद्य पूजा केली जाते. सहाव्या रात्री हातात दिवे घेऊन भक्त देवीसमोर नाचतो व देवीला जागे करतो. सातव्या रात्री बेल, पिंपळ, तुळस आदींसह नऊ पवित्र झाडाच्या फांद्या घेऊन त्याच्याभोवती फुलांची विविध प्रकारची आरास केली जाते. सप्तशती जप होमहवने व बळी देऊन गावकरी रात्रभर प्रसाद घेऊन फिरतात. सध्या बळी देण्याची प्रथा बंद केल्यामुळे गावभर आरोळी मारीत फिरणे बंद झाले आहे. दहाव्या दिवशी सीमोल्लंघनसाठी देवी गावाबाहेर निघते, असा विश्वास आहे. धनधान्य, फळे, फुले त्याचे सागरात विसर्जन केले जाते. नवरात्रीच्या उत्सवात देवी देवतांबरोबर युद्धात गुंतलेली असल्यामुळे देवतेला स्नान न करता तिचे पाय धुतले जातात. विजयादशमीला देवीला आंघोळ घालतात, कारण ती दैत्याला मारून शांत झालेली असते, अशी प्रथा आजतागायत सुरू आहे.
शीतलादेवी मंदिरासमोर रामकुंड आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या बाणाने हे रामकुंड निर्माण केल्याची आख्यायिका आहे. राम-रावणाचे युद्ध जरी लंकेत चालू होते तरी रावणाचे कित्येक रक्षक फार दूरवर पसरले होते. रावणाच्या मदतीसाठी महिकावतीनगरीचे अधिपती रावण बंधू अहिरावण आणि महिरावण हे लंकेत गेले असता त्यांनी राम-लक्ष्मणाला महिकावती नगरीत पळवून आणून महिकावती देवीस बळी देण्याचा घाट रचला होता. रात्रीच्या वेळी राम-लक्ष्मण हे हनुमंताच्या संरक्षणात मोठ्या शिळेवर निद्रिस्त अवस्थेत असता अही आणि मही यांनी राम-लक्ष्मणांना भुयारमार्गे महिकावतीनगरीत पळून आणण्यात यश आले. परंतु ही गोष्ट हनुमानाच्या ध्यानात येताच महीकावती नगरीत त्वरित दाखल झाला. महिकावती देवीला लाथ मारून आडवे पडून तिच्या जागेवर स्वतः बसून राम-लक्ष्मणाचा बचाव केला. राम-लक्ष्मणांनी हनुमंताच्या साह्याने अहिरावण आणि महिरावणाचा निपात करून लंकेत प्रयाण करण्यापूर्वी ते कदलिवह म्हणजे आजचे केळवे या गावी सागर किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबले. श्रीरामांनी बाण जमिनीवर मारताच तिथे एक सुंदर तलाव निर्माण झाला. त्यालाच आज रामकुंड म्हणून ओळखले जाते. अशी आख्यायिका या रामकुंडाची आहे. प्रभू रामचंद्र त्या तिथे कुंडाच्या समोर ध्यानस्थ झाले, त्या त्यांच्या तपश्चर्येतून हळूहळू शिवलिंग वाळूतून गंगेसह पृथ्वीवर उतरले.
वाळूतून निर्माण झालेले हे स्वयंभू शिवलिंग फक्त भारतात एकच आहे. म्हणून त्यास भवानी शंकर वाळूकेश्वर ही संज्ञा प्राप्त झाली. या शिवलिंगावर अभिषेक करून प्रभू रामचंद्र ने त्याची शास्त्रोक्त पूजा केली. त्यानंतर त्यांनी लक्ष्मणासह पवनसुताच्या साह्याने लंकेकडे गमन केले अशी आख्यायिका या वाळूकेश्वर शिवलिंगा बाबत आहे. शीतलादेवी हे जागृत देवस्थान आहे. नवरात्रीमध्ये गुजरात, मुंबईसह कोकणातील भक्तगण दर्शनासाठी येतात.

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रसिद्ध शीतला देवीचे मंदिर आहे. हा चौक तयार होण्यापूर्वी या भागाची शीतला देवी ही भौगोलिक खूण (लँडमार्क) होते व आजही आहे. शीतला देवी मंदिर हे १५० वर्षे जुने आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून याठिकाणी शीतला देवीची पूजाअर्चा केली जाते.
गोविंद गणपत पानेरकर (कुंभार) हे या देवीची सुरुवातीला उपासना आणि पूजा करीत होते. ते घेसर येथील असले तरी ते कल्याणच्या मुख्य बाजारपेठ परिसरात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पूजा करण्याचा मान त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर पानेरकर यांच्याकडे आला. नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला अभिषेक केला जातो. नऊ दिवस देवीचे पाठ वाचले जातात. नवमीला नवचंडिका होम असतो. मंदिरात शीतला देवीच्या मूर्ती शेजारी गावदेवीची मूर्ती आहे. कल्याणची गावदेवी अर्थात ग्रामदैवत शीतला देवीच्या सोबत पुजली जाते.

शीतला देवी ही स्वयंभू आहे. देवीच्या बाबतीत एक आख्यायिका आहे. देवी जेव्हा तहान-भुकेली होती तेव्हा तिला कुंभारांनी दही, दूध, भात आणि पाणी दिले होते. त्यावेळी शीतला देवी प्रसन्न झाली. तिची सेवा कुंभारांकडून केली जाईल, असे त्याच वेळी तिने जाहीर केले. गुरुनाथ पानेरकर हे मूळचे कुंभार. आता त्यांचा व्यवसाय कुंभारवाड्यात मातीचे काम करणे नसला तरी ते सध्या मंदिराच्या शेजारीच हार-फूल विक्रीचा व्यवसाय करतात. मंदिराचा मालकी हक्क हा गुरुनाथ पानेकर यांच्याकडेच आहे. लहान मुलांना कांजण्या, गोवर आला तर अनेक भक्त देवीची ९ ते ११ दिवस उपासना करतात. त्यांच्या मुलांचा कांजण्या, गोवर बरा होतो, अशी भाविकांची धारणा आहे.
कल्याणमधील शीतला देवी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने अनेक चाकरमानी कामावर जाण्यापूर्वी देवीचे दर्शन घेऊन मुंबईची वाट धरतात. जागृत देवस्थान असल्याने बहुतांश भाविक देवीची खणा नारळाने ओटी भरतात.
मुखेड, नांदेड जिल्हा शीतला देवी :-
माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते.नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर आहे. मंदिर दशरथेश्वेर या नावाने ओळखले जाते. दशरथ यांचा ईश्वर म्हणजे दशरथेश्वेर असा अर्थ होतो. विशेषतः ईश्वर हा शब्द केवळ शिवा सोबतच जोडला जातो. जसे गुप्तेश्वर, केदारेश्वर, काळेश्वर, घृषणेश्वेर, सोमेश्वेर ई. मुखेडचे मंदिर एक तर दशरथ नावाच्या कोणीतरी दाणी व्यक्तीने निर्माण कार्यात सहकार्य केले असावे असेही म्हणता येईल. परंतु प्राचीन भारतीयांची मानसिकता पाहता असे घडले नसावे.मात्र एक निष्कर्ष असा आहे की, राम पिता दशरथ यांचे दैवत / ईश्वर या अर्थाने दशरथेश्वर असे नामाभिधान मिळाले असावे.मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पांकन असून त्यात नृत्य मग्न सप्तमातृका ही आहेत. जे की इतर कुठल्याही मंदिरावर आढळून येत नाहीत. याच बाह्य भागावरील मूर्तीत उत्तरेकडील शिल्पपटात पश्चिमाभिमुख एक मूर्ती असून ही मूर्ती शितला देवीची आहे. या मूर्तीस अनेक अभ्यासकांनी ज्येष्ठा देवी असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ही मूर्ती असून ही देवी स्थानक आणि चतुर्भुज आहे. तिने उजव्या खालील हातात सुरा, उजव्या वरील हातात केरसुणी, डाव्या वरील हातात सूप आणि डाव्या खालील हातात कपाल पत्र घेतले आहे. ही सारी लक्षणे मूर्ती शास्त्रा नुसार शितला देवीची ठरतात. परंतु काही अभ्यासक ही मूर्ती लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
देवीने डोक्यावर मुकुट घातला असून त्यावर एक असुर मुंड आहे. कानात कुंडले आणि डाव्या खांद्यावरून मुंडमाला धारण केलेली आहे. देवीची प्रतिमा नग्न असून पादपिठावर तिचे वाहन गाढव कोरण्यात आलेले आहे. स्कन्द पुराणातील शितलाष्टकानुसार सदर देवीचे वर्णन पाहता ही मूर्ती शितला देवीची मूर्ती ठरावी. या अनुषंगाने आपण काही बाबींचा मागोवा घेऊयात.
देवीच्या बाजूला तिचे गण वेताळ आणि पिशाच्य दाखविलेली आहेत. सदरील मूर्ती आकाराने १०६ ७२ cm आहे. मूर्तीतील प्रत्येक आयुधांचा आपण प्रथमतः विचार करु. सुरा अथवा छुरीका हे संहार शास्त्र आहे. या मूर्ती मध्ये कलश नसून ती ज्वर दैत्याचा नाश करीत असल्याने सुरा दाखविलेला आहे. तर झाडू हे स्वच्छता दर्शक लक्षण आहे. तर सूप हे थंड हवा देण्यासाठी वापरण्यात येते. कपाल पात्र हे दैत्य रक्त प्राशन करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ही देवी वैज्ञानिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दाहज्वर, पीतज्वर, कांजण्या, दुर्गंधी युक्त फोडे, नेत्र विकार हे रोग दूर करणारी देवता म्हणून शितला देवी ओळखली जाते. सदरील देवी जवळ लिंबाचे डहाले ठेवली जातात कारण त्या मुळे शीतलता निर्माण होते. हाती असलेला झाडू हे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास प्रेरणा देणारे आहे.
ऋतू परिवर्तनाणे वातावरणात अनेक बदल होतात. त्या साठी सफाई वर भर दिला गेला पाहिजे. कांजण्या झाल्यावर शरीर दाह कमी करण्यासाठी सुपाने वारे देऊन रोग्याला आराम मिळून देता येते. तर गाढव हे वाहन दाखविण्यामागे ही वैज्ञानिक करणे आहे. गाढवाची लिद रोग्याच्या अंगास लावल्याने त्याचा शरीरा वरील फोडचे डाग कमी होतात. कांजण्या झाल्यामुळे अंगावरील फोडे फोडण्याचे काम झाडूने अथवा फडा घेऊन करता येते. लिंबाची पाने ही फोडे सडू नयेत किंवा त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी उपयोगी येतात. अशा रोग्यांना थंड पाणी प्यावे असे वाटत असल्याने, शितला देवीच्या हाती कलश दाखविला जातो. कांजण्या हा आजार खूप जुना असून ग्रीक मध्ये इसवी सन पूर्व बाराशे मधील एका ममीचा मृत्यू कांजण्या आजाराने झाल्याचे मानले जाते.
सदरील मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत प्रमाणे डाव्या खांद्यावरून रुळणारी मुंडमाला ज्यामध्ये एकूण १८ मुंडांची माळ स्पष्ट दिसून येते. ही मुंड माला पाहता शिव परिवारातील देवता शितलादेवी असल्याचेच सिद्ध होते. ज्येष्ठा ही विष्णू परिवारातील देवता असल्याने तिच्या गळ्यात मुंड माला येणे आणि कपाल पात्र धारण करणे कदापी ही शक्य नाही. पूर्वाश्रमीच्या अभ्यासकांकडे असलेली अपुरी साधने, संशोधकांची मर्यादा आणि ही शीतला माता असू शकते असे कदाचित वाटलीच नसावे. त्यामुळे या शीतला देवीच्या मूर्तीस अनावधानाने अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असे संबोधले असावे. असेही पौराणिक कथेनुसार अलक्ष्मी ही संहार रूपात दाखविली जात नाही. म्हणूनच मुखेड स्थित दशरथेश्वर मंदिरावरील मूर्ती ही ज्येष्ठा किंवा अलक्ष्मी ची नसून ती शीतला मातेची मूर्ती असल्याचे ठामपणे म्हणता येईल. माता शितलादेवी स्वच्छतेची जाणीव करून देते. देवी शीतला ही संक्रमना पासून बचाव करण्याची शिकवण देणारी वैज्ञानिक देवी आहे.
“वन्देऽहंशीतलांदेवीं रासभस्थांदिगम्बराम्।।
मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्।।
अर्थात, गाढवावर विराजमान, दिगम्बरा, हातात झाडू आणि कलश धारण करणारी, मस्तकावर सूपाचे अलंकार घालणाऱ्या शीतला देवीला मी वंदन करत आहे.
उत्तरप्रदेशात चैत्र महिन्याच्या कृष्णाष्टमीपासून शीतळादेवीच्या पूजेस प्रारंभ होतो. साधारणपणे आषाढ महिन्यापर्यंत येणारी प्रत्येक कृष्णाष्टमी देवीचा पूजा दिवस असतो. या दिवशी शीतला देवीची पूजा आणि बासोडा म्हणजेच शीळे जेवण करण्याची पद्धत आहे. देवीचे प्रमुख आयुध खूर आणि वाहन गाढव आहे. काही ठिकाणी अक्षमाला, कलश, धनुष्य, बाण, ढाल, त्रिशूल, डमरू, केरसुणी यांसारखी आयुधेही पहायला मिळतात. यांतील गाढव हे वाहन व हाती केरसुणी ही रचना अक्कादेवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठा या देवतेशी साम्य दर्शवणारी आहे. गोवर, कांजिण्या, देवी वगैरे रोगांशी संबंधित असलेल्या या देवता. या रोगांचा संसर्ग झाल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी शीतलादेवीची पूजा करण्याची व देवीची गाणी म्हणजेच बायांची गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही काही भागांत आहे. या सर्व कृतीतून रोग बरा होण्याची भावना या श्रद्धाळूंमध्ये असते.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे प्रतिसाद देणे हे तसे सर्व सजीवांचे वैशिष्ट्य. या सजीवांपैकीच एक असणाऱ्या मनुष्यप्राण्याचा इतिहास लाखो वर्षांचा. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे आपल्या एका पुस्तकात म्हणतात, “एखादा गूढ आवाज आला तरी तो कुठून आला हे कल्पनेने शोधण्याच्या प्रयत्नात मनुष्याने अदृश्य प्राणी निर्माण केले. नाना तर्क करून त्याने भुते, यक्ष, देव, दानव, अप्सरा, गंधर्व, वेताळ, पिशाच इत्यादी बाबी कल्पिल्या; नंतर त्यांच्या राहण्याच्या जागा, स्थळे, प्रदेश व लोक निर्माण केले, आणि शेवटी त्यांच्या गुणाप्रमाणे रूपे निर्माण केली. इतकेच करून मनुष्य थांबला नाही, तर हे अदृश्य प्राणी रागावले तर पूजा, नैवेद्य व बळी देऊन त्यांची मर्जी संपादण्याचे मार्ग ठरवले. माणूस दचकला, आजारी पडला, आजाराचे स्पष्ट कारण कळेना यातून भूताची कल्पना केली. सुष्ट व दुष्ट भुते निर्माण झाली. वीज पडून मनुष्य मेला म्हणजे इंद्राने आपल्या वज्राने मारिला व पटकीने मेला म्हणजे मरीदेवीने मारला अशी भ्रांत समज असायची.”
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील भयंकर रोगांच्या साथी व हतबल झालेले लोक पाहता, जुन्या काळातील रोगांच्या साथींना तत्कालीन समाजाने दैवी प्रकोप मानणे स्वाभाविकच होते.
काळ बदलला असला तरी भाविकांची आपल्या श्रद्धेयाप्रती असणारी भावना कालातीत आहे. शीतलादेवी ही स्वच्छतेचे अधिष्ठान असलेली देवता आहे. तिच्या हातात असलेली केरसुणी व माथ्यावरील सूप स्वच्छतेचे आवाहन करणारी आहे. या देवतेला प्रसन्न करणे म्हणजेच आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखणे हाच अर्थ सद्य:काळात उपयुक्त ठरणारा आहे.
शीतला माता मंदिर, गुरुग्राम:
भारताची भूमी ही चमत्कारांची आणि इतिहासाची भूमी मानली जाते, येथे अनेक वेळा भक्त आणि देव यांच्यात श्रद्धा आणि श्रद्धा यांचे अनोखे नाते पाहायला मिळाले आहे. शीतला मातेचे असेच एक मंदिर गुरुग्राम, हरियाणात आहे, हे मातेचे मंदिर सुमारे चारशे वर्षे जुने आहे. येथील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की सुमारे अडीच ते तीनशे वर्षांपूर्वी शीतला मातेने गुरगावच्या सिंगा जाट नावाच्या व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले होते आणि त्यांना येथे मंदिर (शीतला माता मंदिर, गुरुग्राम) बांधण्यास सांगितले होते. देवीच्या इच्छेनुसार सिंगला नैवेद्याचा अर्धा भाग मिळाला. येथे देवी मातेचा वास असल्याचे मानले जाते. एवढेच नाही तर या मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्याने चेचक, गोवर आणि डोळ्यांचे आजार दूर होतात.या जगप्रसिद्ध मंदिराचा इतिहास महाभारत काळाशी संबंधित आहे. येथेच आचार्य द्रोणाचार्य यांनी कौरव आणि पांडवांना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. स्कंद पुराणात वर्णन केलेल्या एका कथेनुसार, सृष्टीचा निर्माता भगवान ब्रह्मदेवाने शीतला मातेवर विश्व निरोगी ठेवण्याची जबाबदारी दिली होती. शीतला मातेची यथासांग पूजा केल्याने गोवर, चेचक आणि डोळ्यांच्या विकारांपासून आराम मिळतो, असे मानले जाते.



कसे पोहोचायचे :-
इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली विमानतळ ते शितला माता मंदिराचे अंतर सुमारे १६.८ किलोमीटर आहे, तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी थेट कॅब मिळेल.
कार्ला आणि व्यापारी मार्गावरील मातृदेवता
पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्या नजिकच्या एकविरा आईच्या दर्शनाला जाणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होते. इथले वातावरण, भाविकांच्या भावना आणि तरूणाईचा जोश या सर्वांच्या परिपाकातून इथली गर्दी निरंतरच असते.
आई एकविरेचे सुप्रसिद्ध मंदिर वेहेरगांव जवळील कार्ले डोंगरात वसले आहे. स्तूपाच्या बाजूला एका लहानश्या गुहेत आईची तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. या देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे.
Vajreshwari and Hingula Devi story in Marathi
हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले.
हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.
वज्रेश्वरी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची देवी. या देवीचे स्थान पालघर जिल्ह्य़ामधील वसई येथील वडवली या गावात आहे. हा परिसर वज्रेश्वरी या नावानेच प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर उल्हास नदीच्या तीरावरच्या टेकडीवर आहे. या देवतेस वज्रेश्वरी नाव कसे प्राप्त झाले यासंबंधी कथा दिगंबर स्वामी रचित ‘वज्रेश्वरी माहात्म्य’ या पोथीत सापडते.
पोथीनुसार प्राचीनकाळी वज्रेश्वरी भागात घनदाट जंगल होते. त्या वेळी तानसा नदीच्या भागात उग्रसुर नावे एक दैत्य राज्य करीत होता. या दैत्यास सिंहमार आणि कलिकाळ हे पराक्रमी पुत्र होते. शक्तीने धुंद झालेले हे असुर सर्वत्र धुमाकूळ घालू लागले आणि त्यामुळे ऋषीमुनींच्या यज्ञयागादी कर्मात त्यांचा त्रास होऊ लागला. वारंवार विघ्न आणणाऱ्या या दैत्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी या ऋषीमुनींनी देवीची कृपा संपादन करण्याचे ठरवले. त्यांनी यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचे ऋत्विज वशिष्ठमुनी होते. यज्ञ समारंभात विविध देव-देवतांचे मंत्रोच्चारांनी आवाहन करण्यात आले. सर्व देवतांना हविर्भाग मिळाला. मात्र इंद्रास आवाहन करण्याचे राहून गेले. वशिष्ठांनी हे हेतुत: परस्पर केले असे समजून क्रोधित झालेल्या इंद्राने त्यांच्यावर वज्र प्रहार केला.
इंद्र झाला कोपायमान
मम नामें का न दिले हवन?
आतां निश्चये मी विंध्वसीन
हा त्रिचांडी याग
वसिष्ठावरी सोडिता वज्र
पार्वतीने गिळिले समग्र
म्हणोनि वज्रेश्वरी नाम
पार्वतीही पावली
वसिष्ठांवर फेकलेले वज्र पार्वतीने गिळले म्हणून तीस ‘वज्रेश्वरी’ हे नाम प्राप्त झाले. वज्रेश्वरीचे सांप्रत असलेले मंदिर पेशवेकालीन असून पोर्तुगीजांवर जय मिळवल्यावर चिमाजी अप्पा यांनी सुभेदार शंकराजी केशव यांच्यातर्फे जीर्णोद्धार केला. वरील माहात्म्यामधील कथा पाहिल्यावर मुंबादेवी माहात्म्याची आठवण होते. येथे ही देवी दैत्याचा नाश करण्याच्या हेतूने पृथ्वीतलावर येते आणि त्याचा नाश करते. वज्रेश्वरीमाहात्म्य हे पेशवेकाळात वसईच्या मोहिमेनंतर कधीतरी लिहिले गेले असावे. वज्रेश्वरी ही दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, सूर्यवंशी क्षत्रिय इत्यादी ज्ञातींची कुलस्वामिनी आहे.
नवनाथांच्या पोथीमधील आठव्या अध्यायात वज्रेश्वरी आणि हिंगुळजा या देवींचे उल्लेख आढळतात. या पोथीनुसार गोरक्षनाथ आणि या दोन्ही देवींमध्ये युद्ध झालेले दिसते. या युद्धात गोरक्षनाथांचा जय होतो आणि हरलेल्या या दोन्ही देवींना गोरक्षनाथ येथेच कायम राहण्याचा आदेश देतत. हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. येथील देवी अष्टभुजा असावी, असे अनुमान अनेक संशोधक आणि तज्ज्ञांचा आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.
हिंगुळा पुराणात या देवीची माहिती दिली आहे. रावणावर विजय मिळवून आल्यावर तो या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्या वेळी देवीच्या दूतांबरोबर रामाचे युद्ध झाले व त्यास माघार घ्यावी लागली. मग त्याने देवीची प्रार्थना केली आणि मग देवीने त्यास दर्शन दिले. राम ज्या मार्गाने या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला, त्या मार्गावर अनेक तीर्थे उत्पन्न झाली. या देवीचे भारतात बरेच भक्त आहेत. मुसलमान बंधू हिला नानीबिबी म्हणून भजतात.
चौल येथील हिंगुळा देवी ही बौद्ध विहारात पाहायला मिळते. बौद्ध विहारात एका हिंदू देवतेचे स्थान कसे असू शकते? कोणत्याही धर्माचे पवित्र ठिकाण असो, त्या ठिकाणी इतर दैवतांची स्थापना केल्याने त्या दैवताचे पावित्र्य काही कमी होत नाही. ते ठिकाण सदैव पवित्र असते. याचे उदाहरण म्हणजे कार्ले येथील एकवीरा देवी होय. कार्ले येथे बौद्ध विहार व भारतामधील सर्वात मोठा चैत्य आहे. या लेणींसमोर या देवीचे एक लहानसे मंदिर पाहावयास मिळते. सह्य़ाद्रीखंडानुसार अदितीने तप केल्यावर शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल असे म्हटले. तसेच तुझे मूळ नाव रेणुका असे असेल व तू भूतलावर एकवीरा या नावाने प्रसिद्ध होऊन तुला पाच पुत्र होतील, हेदेखील सांगितले. दुसऱ्या एका समजुतीप्रमाणे रेणुकेच्या पोटी परशुराम हा एकच वीरपुत्र जन्म पावला म्हणून तिला एकवीरा म्हणतात. ही देवी कोळी, कासार, पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, इत्यादी ज्ञातीमात्रांची देवी आहे.
या देवीचा अग्रपूजेचा मान कोळी समाजाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक रामोशी कोळी यांनी आपले मूळ गाव सोडले आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी येथे येऊन हातभार लावला. या कोळी समाजाच्या स्थलांतरामुळे या देवीचेही स्थलांतर झाले असावे.
येथील अंबादेवी मंदिराला पुरातन इतिहास आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणी हरणाशी जोडला जातो. राज्यातीलच नव्हे तर, इतर प्रांतातील भक्तांची मांदियाळी नवरात्रोत्सवात पहायला मिळते. या मंदिराजवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांना आता नवा साज चढला आहे.
या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीचे असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. अंबामातेचे प्राचीन मंदिराचा कळस उंचावर होता तेव्हा तो स्पष्ट दिसायचा. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वऱ्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदू मंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यात अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अनेक वर्षे हे मंदिर लहानशा ओटय़ावर चार लाकडी खांबाचा आधार घेऊन उभे होते. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहल्यादेवी होळकरांनीही या मंदिराच्या उभारणीत योगदान दिल्याचे पुरावे मिळतात. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मुर्तीवर सुवर्णखचित दागिने चढवले जातात. मुखवटा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगडय़ा आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.
अंबादेवी मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा अलीकडेच विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मंदिराचा कळस सुवर्णाचा असून शिखरही कलाकुसरीचे अप्रतिम दर्शन घडवते. एकवीरादेवीचे मंदिर जनार्दनस्वामी यांनी उभारल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. एकवीरा देवीच्या गाभारा कोरीव व दगडाने बांधलेला आहे. पुरातन नमुना यात स्पष्ट दिसून येतो. देवालय लाकडी चौकटीवर बांधलेले आहे. एकवीरा व अंबादेवीच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मंदिरात जाऊन सहज दर्शन घेता येते.
Vidarbhateel devichi Mandire
आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.
अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.
श्री अंबादेवी संस्थान
अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.
श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५ मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.
श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.
श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.
श्री एकवीरा देवी, अमरावती
श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.
श्री महाकाली देवी, चंद्रपूर
कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.
या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.
इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।
त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच
कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥
भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.
त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७ मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.
चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.
श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.
गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.
श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.
हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.
या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.
गोरजाई मंदिर, वैरागड
गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.
गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.
श्री रेणुकामाता मंदिर, चिखली
चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.
पारशिवनीची महालक्ष्मी
येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-
‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती
नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’
हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.
नेरिपगळाई देवी (अमरावती)
सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे
नागपूरपासून आंभोरा मार्गावर मांढळपासून तीन किमी दूर असलेल्या नवेगावातील गंगादेवी मंदिर जागृत स्थान समजले असून या मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यात होणाऱ्या देवीच्या नवरात्रात या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिराच्या इतिहासाबाबत बोलताना मंदिराचे प्रमुख कृष्णा कढव यांनी सांगितले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो पूर्वी भोसलेकालीन परिसर होता. तेथे फक्त देवीची मूर्ती होती. मूर्तीवर कुठलेही शेड नव्हते. मात्र, ७५ वर्षांपूवी त्या भागात पडझड झाली होती त्यामुळे त्या भागातील घरे आणि मंदिर उध्वस्त झाली मंदिर जसेच्या तसे राहिले. नंतर मंदिराची डागडुजी करून भाविकांसाठी सोय करण्यात आली. श्रीमंत राजे भोसले या मंदिरात येत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ब्रिटीशांच्या काळात भिवानी भगत देवीच्या मंदिराची पूजा व तेथील व्यवस्था पहात होते. भिवानी भगत हे सिद्ध पुरूष होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. रातोरात दैवीशक्तीने उमरेडच्या जेलमधून ते बाहेर आले आणि देवीच्या मंदिरात जाऊन बसले, अशी आख्यायिका आहे. मध्यंतरीच्या काळात मंदिरात पडझड झाली होती. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे प्रकार या भागात मोठय़ा प्रमाणात वाढू लागले होते.
१२ ऑक्टोबर १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. गंगादेवीची मूर्ती स्वयंभू आहे की त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली याचा उल्लेख मात्र कुठेच नाही. चारशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास या देवी मंदिराला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला त्यावेळी कोणाकडून आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम होत गेले आणि आज या ठिकाणी प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर कलश आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी महालक्ष्मी याग आयोजित करण्यात आला होता. मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून देवी भागवत सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जिल्ह्य़ातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे २००८ मध्ये शतचंडी याग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील ५० हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. नवरात्र उत्सवात मंदिरात दररोज भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. सकाळी ७ वाजेपासून कुही, मांढळ, आंभोरा या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात गेल्या अकरा वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मंदिरात बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजारावर त्याचा लाभ घेतला आहे. ह.भ.प. बारई महाराज या मंदिरात विविध उपक्रम राबवत असतात. या शिवाय अमृत दिवाण गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले जातात. नुकतेच गो-ग्राम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात येणाऱ्या काळात धर्मशाळा, गो शाळा आणि संस्कार शिबिरासाठी सभागृह बांधण्याचा मानस असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.
गणोजा येथील महालक्ष्मी स्वयंभू असून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दुसरे रूप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोजा (देवी) येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणोजा येथील गणू भट हे महाराष्ट्रातील शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्रात गणू भट कोल्हापूरला अनवाणी जात असत. दर्शनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. वृध्दावस्थेला आल्यानंतर गणू भट यांनी देवीला विनवणी केली की, यापुढे मी तुझ्या दर्शनाकरिता कोल्हापूरला येऊ शकरणार नाही. त्यावेळी महालक्ष्मीने गणू यांना दर्शन देऊन सांगितले की, आता मीच तुझ्या गावी येणार आहे. तू येथून निघाल्यावर मागे वळून पाहू नको, असे म्हणून देवी अदृष्य झाली. गणू गावी पोहोचत असताना त्यांनी गणोजानजीकच्या नदीजवळ मागे वळून बघितले. त्याचवेळी चमत्कार झाला आणि मागे येणारी महालक्ष्मी त्या नदीच्या काठावर अंतर्धान पावली, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या गावाला सुद्धा गणोजा देवी नाव पडले.
पाचशे वर्षांपीर्वी नदीपात्राच्या उत्खननात काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे सांगितले जाते. या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले असून नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसले तरी गणोजा येथे गेल्यास महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे समाधान होते, असे भक्त सांगतात.
गणोजा येथील या मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अडीच फूट उंचीची ही मूर्ती चतूर्भूज आणि सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या एका हाती त्रिशूल आहे. दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती गदा आणि चौथ्या हाती पद्म आहे. डोक्यावर मुकूट आहे.
पेढी नदीच्या किनाऱ्यावरच पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरातच राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.
यात्रेच्या काळात या ठिकाणी तीर्थस्थापना, अखंड वीणा वादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, हरीपाठ, भारूड, भागवत कथा, दहीहांडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. नवरात्रात देवीचा सोन्याचा मुखवटा विलोभनीय दिसतो. दागिन्यांनी सजलेले देवीचे रूप भक्तांना वेगळीच अनुभूती देत असते. संस्थानचे अध्यक्ष रा.ना. गणोरकर, उपाध्यक्ष प्र.ग. केवले व त्यांचे सहकारी मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.
भंडारा जिल्ह्य़ात भंडारा-तुमसर राजमार्गावरील मोहाडी या तालुक्याच्या गावी माँ चौंडेश्वरीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असल्याची लोकश्रद्धा आहे. मोहाडी परिसराचे हे आराध्यदैवत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नवरात्र महोत्सव होत असून केवळ विदर्भच नाही तर, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील भाविक महोत्सवात माँ चौंडेश्वरीच्या दर्शनाला येतात. मुख्य घटाव्यतिरिक्त मंदिर परिसरात यावर्षी ९३२ घटांची स्थापना झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७७८ होती. विजयादशमीला महाप्रसाद होतो. परिसरातील ३०-३५ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. व्यवस्थापन मंदिर-समिती तसेच, नवदुर्गा विद्यार्थी युवक मंडळाकडे असते. नवरात्रात येथे यात्रेचे स्वरूप येते. यात्रेत चांगलाच बाजार भरतो. मोहाडीच्या पश्चिमेला माँ चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या परिसराला टेकडी म्हटले जाते. टेकडी परिसराला तीर्थक्षेत्र गायमुखवरून निघालेल्या गायमुख नंदीने विळखा घातला असून परिसर वनराईसदृश्य झाडाझुडुपांनी निसर्गरम्य केला आहे. नवरात्रीतील रोषणाईने तो आणखीच उजळून दिसतो.
प्राचीन काळी गायमुख नदी व दाट वनराई असलेल्या या तपोवनात महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञाच्या आवर्तनासाठी दूरदुरून ऋणीमुनी आले होते. यज्ञसामुग्री संपली. ठराविक मंत्रोच्चारही संपले. ऋणीमुनींनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. चारही वेदांनी केलेले स्तवन ऐकून हवनकुंडातून गर्जना करत महाचंडीचा चेहरा बाहेर आला. साधना करणाऱ्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वचन तिने दिले. चारही वेदांनी केलेल्या स्तवनाने देवी प्रसन्न झाली म्हणून तिला ‘चौवेदेश्वरी’ हे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘चौंडेश्वरी’ झाले. याच कथेचे अन्य कथानक म्हणजे, यज्ञसाहित्य संपल्यामुळे ऋषिमुनींनी बाजूला ठेवलेल्या ग्रंथरूपातील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्व वेदाताचे एकेक पान हवनकुंडात टाकले आणि प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली.
कनोज प्रदेशातील रेणू राजाची कामेष्टीय यज्ञाच्या अग्नीतून निघालेली कन्या रेणुका हिने जसे अपत्य वात्सल्यातून भूगर्भातून मस्तक वर काढून पुत्र परशुरामाला दर्शन दिले अशाच शक्तीरूप देवता महाराष्ट्रात डोंगर पहाडावर प्रकटल्या. त्यांना कुठे रेणुका, कुठे योगेश्वरी, कुठे महालक्ष्मी, कुठे दुर्गा नाव मिळाले. अशीच कथा माँ चौंडेश्वरीची आहे. माँ चौंडेश्वरीचा फक्त भव्य चेहरा जमिनीवर आहे. तिचे डोळे, नाक, कान, मुख दिसते.
टेकडी परिसरात माँ चौंडेश्वरीची मूर्ती उघडय़ावर होती. संत नारायण स्वामी नावाचे भक्त पूजाअर्चा करत. पुढे स्वामी कुटुंबात कोणी उरले नाही. ब्रिटीश काळात लहानसे मंदिर उभारले गेले. त्यानंतर आधुनिक काळात भक्तांनी देवस्थान मोठे केले. उत्पन्न येत गेले. देवस्थानाचा विस्तार होत गेला. सुंदर बगीचा, धर्मशाळा, सभोवताल भिंत, उंच जागेचे सपाटीकरण झाले. देवदेवतांचे विस्तारीकरणही झाले. सोबतीला शिरडीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ, गणेशाची स्थापना झाली. एका लहान मंदिरात नारायण स्वामींच्या पादुका ठेवण्यात आल्या. विविध स्पर्धानाही आता प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या उत्पन्नातून धर्मार्थ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, असे विविध सामाजिक उपक्रमही पुढे राबवले जाऊ शकतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे आदिमाया किंवा जगदंबा. तिचेच एक रूप म्हणजे माँ चौंडेश्वरी. अलंकारांनी मढवलेल्या देवीचे आकर्षक डोळे नागपूर शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला तज्ज्ञ तसेच, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सन्मानित प्रा. प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. त्यामुळे माँ चौंडेश्वरीचे गोजरे विलोभनीय रूप अधिक आकर्षक झाले आहे.
विदर्भात जागृत शक्तीस्थानांमध्ये जी काही देवीची स्थान आहे त्यात पारडीतील भवानी मंदिराचे नाव घेतले जाते. नागपूर जिल्ह्य़ात भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरातील भवानी देवीच्या मंदिराला अडिचशे वर्षांचा इतिहास असून देवीची मूर्ती स्वयंभू असल्याने हे मंदिर जागृत असल्याचे या भागातील नागरिक सांगतात.
भार्गव परशुरामपिता ऋषी जमदग्नी यांची कामधेनू नृपती कार्मविर्य सहस्त्रार्जुनाने (महिष्पती महेश्वर इ.स. पूर्व १९६०) पळविली. त्यांच्या सेनापतीने जमदग्नीचा वध केला. माता रेणुका पतीच्या शवाबरोबर सती गेली. महातेजस्वी परशुरामांना हे कळले पण तुर्त त्यांनी राग आवळला. माता पित्याच्या देहाला कावडीमध्ये ठेवून ते माहुरक्षेत्री आले. पुढे शोकाकुल परशुरामांना रेणुका मातेने पृथ्वीच्या गर्भातून केवळ मानेपर्यंत वर येऊन दर्शन दिले तेव्हा अशा मुखवटय़ांना तांदळादेवी म्हटल्या जात होते. महाराष्ट्रात असा प्रकारच्या प्रतिमा अंबेजागाई, माहुर , पारडी अमरावती, बाळापूर व सोलापूर याथे आढलेल्या आहेत असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. भंडारा मार्गावर असलेले पारडी हे गाव पूर्वी गाव असले तरी आज ते शहारत समाविष्ट करण्यात आले. पारडी परिसरातील पुनापूर छोटय़ा गावातील शेतात ही देवीची मूर्ती आढळली असल्याचा उल्लेख आहे.
भवानी मातेच्या मूर्तीला २५० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. ही मूर्ती भोसलेकालिन असावी असे पुरातत्व विभागाचे मत असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव दिवाकर धोपटे यांनी दिली. ही मूर्ती जमिनीतून फक्त मानेपर्यंत वर आली असून स्वयंभू असल्याचे बोलले जाते. त्यावेळी मुन्ना महाराज नावाचे एक गृहस्थ भवानी मातेची पूजा करीत असत. एकदा माता त्यांच्या स्वप्नात आली आणि वर काढ मला असा तिने आवाज दिला. हे ऐकून मुन्ना घाबरले पण त्यांनी हिंमत करून परिसरातील पाच सहा जणांना ही गोष्ट सांगितली. त्यामुळे सगळ्यांनी त्या भागात खोदकाम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खोदकाम सुरू असताना मातेचा मुखवटा दिसून आला. मानेपासून वर मुखवटा असलेली २ ते अडीच फुटाची असलेली करंड पद्धतीचा मुकूट धारण केलेला मुखवटा दिसून आला अशी या देवीची कथा आहे. माहुरच्या देवीची प्रतिकृती मानल्या जाणाऱ्या भवानी मातेच्या अतिशय देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पारडी भागातील पुनापूरमध्ये छोटय़ाशा जागेत असलेल्या या मंदिराचे लालचंद मालू या भाविकांच्या मदतीने जिर्णोद्धरा करण्यात आला असून त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याक आले आहे. २००६ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यानंतर भवानी मता सेवा समिती स्थापन करून ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या भागात भव्य उभारण्यात आले असून मंदिराच्या परिसरात भक्तासाठी सभागृह आणि खोल्या बांधण्यात आल्या आहेत.
नवरात्र उत्सवात कोराडीप्रमाणे भवानी देवीच्या दर्शनाला नागपूरातील नाही तर विदर्भ , छत्तीसगड, मध्यप्रदेशमधील भाविक मोठय़ा प्रमाणात येत असतात. मंदिराच्या आजूहाजूचा परिसराचे शुशोभिकरण करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात सात आठ आठ लोक दर्शनासाठी येत असतात. सकाळी ५ वाजता भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागतात. मंदिर परिसरात हॉस्पिटल बांधण्यात आले असून त्यामध्ये गोरगरीब लोकांना विविध सुविधा दिल्या जातात. येणाऱ्या काळात १०० बेडचे अत्याधुनिक साधन असलेले हॉस्पिटल बांधण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा विचार आहे. परिसरात धर्मशाळा असून अनेक कार्यक्रम त्यात होत असतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय मंदिरातर्फे केली जाते. नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवात होमहवन, जागरण आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. महाप्रसादाचा लाभ एक ते दीड लाख भाविक घेत असतात.
Chandrapur Mahakali story in Marathi
![]() |
| Chandrapur Mahakali Photo |
देवी पार्वती 28 दिवस रक्तस्त्राव

चेंगन्नूर, केरळ येथे स्थित चेंगन्नूर महादेवाचे मंदिर, भगवान शिव आणि देवी भद्रकाली, सती किंवा पार्वतीचा अवतार आणि राज्याची देवी यांना समर्पित आहे. मासिक पाळी उत्सव साजरा करण्यासाठी हे देशभर प्रसिद्ध आहे ज्यामध्ये मंदिर तीन दिवस बंद असते.
देवीला अनियमित मासिक पाळी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. एका पौराणिक कथेनुसार, लोक मानतात की देवी पार्वती भगवान शिवाशी विवाह केल्यानंतर हिमालयातून येथे आली होती. तिला येथे मासिक पाळी आली, जी सुमारे 28 दिवस गेली.
दुसरी कथा अगस्त्य ऋषीची आहे. काही कारणास्तव, तो भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह होताना पाहू शकला नाही. त्यामुळे या जोडप्याने ऋषींचे दर्शन घेण्याचे ठरवले. असे मानले जाते की देवी पार्वती अगस्त्य ऋषींना भेटण्यासाठी जात असताना तिला मासिक पाळी आली. म्हणून, तिने ऋषीसमोर येऊन आशीर्वाद देण्यापूर्वी मंदिराच्या ठिकाणी 28 दिवस वाट पाहिली.
केरळमध्ये कोणत्या देवीला मासिक पाळी येते?
हा एक लोकप्रिय प्रश्न आहे जो लोक इंटरनेटवर शोधतात आणि त्याचे उत्तर चेंगन्नूर महादेवाच्या मंदिराच्या भिंतींमध्ये आहे. स्थानिक लोककथेनुसार, लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा भगवान शिव सतीचे शरीर घेऊन पृथ्वीभोवती फिरत होते, तेव्हा तिचा एक भाग मंदिराच्या जागेवर पडला होता.
एके दिवशी पुजारी पुतळ्याची साफसफाई करत असताना त्याला रक्ताचे डाग दिसले आणि त्याने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेशी संपर्क साधला तेव्हा तिने पुष्टी केली की देवीला रक्तस्त्राव होत आहे. तेव्हापासून शहरात तीन दिवस मंदिर बंद ठेवून मूर्ती मंदिराच्या दुसऱ्या भागात नेण्याचा विधी सुरू आहे. चौथ्या दिवशी, मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये देवीची मूर्ती हत्तीवर बसविली जाते आणि संगीतकार मित्रा नदीवर विधी स्नानासाठी जातात.
भगवान शिवाची मूर्ती असलेली दुसरी हत्ती देवी पार्वतीच्या स्नानानंतर येण्यासाठी मंदिरासमोर थांबते. एक भव्य समारंभ होतो ज्यामध्ये दोन मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवल्या जातात आणि भक्त देवीच्या डागलेल्या पोशाखाला प्रार्थना करतात.
देवीला दर महिन्याला मासिक पाळी येत असे, असे लोक आज मानतात, पण आता असे प्रकार दुर्मिळ झाले आहेत. तथापि, पुजारी अजूनही त्याच्या घरातील सर्वात ज्येष्ठ महिलेसह याची पुष्टी करण्याचा विधी पाळतो.
चुकवू नका: गंगा: पौराणिक कथा आणि अभ्यास ज्या पवित्र नदीच्या उगमाचे अनावरण करतात
कोणत्या मंदिरात देवीला पूर्णविराम मिळतो?

हा लेख ज्येष्ठा गौरी अथवा महालक्ष्मी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गौरी (निःसंदिग्धीकरण).

गौरीपूजन वा जेष्ठा गौरी पूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.[१] गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास जेष्ठागौरीपजन असेही म्हणतात.[२]
गौरी आणि ज्येष्ठा शब्दांचे अर्थ
[संपादन]
हिंदू परंपरेने नुसार पार्वती उमा अर्पणा अंबाबाई म्हणजे 'गौरी' संस्कृत शब्द उत्पत्ती प्रमाणे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गोरी, ( हिमालय कन् उ म्हणजे हिमालयपर्वत भागातील(पार्वती) उज्जल गौर वर्णाची गौरी ..भारतभर गौरी म्हणजे पार्वती ( शंकर पत्नी) भारतभर देवीची जी शक्तीपीठे आहेत , ती आदिशक्ती उमा पार्वतीची स्थाने आहेत .भारतीय संस्कृतीचे वर्णन ज्या दोन शब्दात केली जाते ते म्हणजे शिव शक्ती .शक्तीची विविध रूपे लोक देवता आणि शक्ती पीठे म्हणून भारतभर आहेत तिला अनेक नावे आहेत .
.[३]गौरी पार्वतीचे एक नाव महालक्ष्मी आहे. गावगडयात लक्ष्मीआई म्हणून सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात हेनाव पूर्वापार वापरला जाते. लक्ष्मीआईचे वाहन नंदी आहे. गजांतलक्ष्मी हे भगवती पार्वतीच एक रूप आहे. लोकदेवता लक्ष्मीआई व व्यापारी लोकांची पनीदेवता यातून त्यासम इतर देवतांचे धार्मिक जीवनात स्थान निर्माण झाले.
ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर वर्णाची. तर ज्येष्ठा गौरीपूजन असा उल्लेख का केला जातो तर ती भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन तर ज्येष्ठ नक्षत्राला गौरी पूजन होते
शेतीचा शोध स्त्रीयांनीलावला .शेती संबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पावर्ती गौरी व शिव महादेवाचे मोठे योगदान आहे . शेतीच्या आधीची .रानटी अवस्था अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धन धान्यानं संपन्न कांतीमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे पार्वती गौरीनेविकसित केलेली कृषी संस्कृती. हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबांत ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात. पूर्वी ताटात मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतिक आहे.
भाद्रपद महिन्यात हरतालिका व्रत (पार्वतीचे महादेव प्राप्तीसाठी केलेले अपर्णाव्रत त्यानंतर गणेश आगमन[१]शुद्ध पक्षात व त्यानंतर .गणेश मातेचे अनुराधा नक्षत्रावर आगमन आपापल्या कुलाचाराप्रमाणे प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात. गौरीलादवी ला भारतभर असंख्य नावे आहेत त्यापैकी गावगाड्यात तिला लक्ष्मी आई वा महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.[४]

हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.[५] अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.[६]
महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.[७]

गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
[संपादन]
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.[८] सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात.[९] किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात.[६]
गौरी आवाहन (दिवस पहिला)
[संपादन]
आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.[१०]पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे.[११] या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो.[१२]नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.[११] महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.[११](धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.[६]
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.
भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.[६]
महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कोळी समाजगटातील ,महिला या दिवशी तेरड्याची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच भाजी भाकरीचा सुद्धा नेवैद्य दाखवला जातो. [१३]

लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत -
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. [७]
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली [७]
ललित साहित्यातील आणि दृक्श्राव्यमाध्यमातील उल्लेख
[संपादन]
- गवराय आली गवराय आली
कोणत्या पावलानं ?
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या
- रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा)
- गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही 'घागर घुमू दे' अशा शब्दांनी होते. अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात. अशीच एक माहेरवाशीण हे गाणे गाते आहे. ती म्हणते,'पाखरा माझ्या माहेरी जा. तिथे माझी गवराबाई आली असेल तिचे स्वागत कर.'
- रुणझुणत्या पाखरा, तू जा माझ्या माहेरा (कवी - ग.दि. माडगुळकर, संगीत - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
- करवा चौथ
- केदार गौरी व्रत -तामीळनाडू
- चैत्र गौरी
- जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गुजराथेतील व्रत
- नवरात्र
- मगळा गौरी
- ज्येष्ठागौरीची कहाणी (विकिस्रोत बंधुप्रकल्पात)
- लज्जा गौरी
- ललिता गौरी
- सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश
- स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक)
- हरितालिका व्रत (महाराष्ट्र)
सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे
*विवीध गौरी आणि त्यांची व्रते:
**ज्येष्ठा गौरी
**करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा
**जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी
**स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी
**चैत्र गौरी - अधिक माहिती हवी
**सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी
**मंगळा गौरी - अधिक माहिती हवी
**केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी
**ललिता गौरी - अधिक माहिती हवी
**लज्जा गौरी -
१ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते;
१ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ?
१ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत
१ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ?
तिहास समृद्ध केला आहे.
गावोगावची देवीस्थाने
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता या शक्तिपीठांच्या पलीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तांमध्ये लोकप्रिय असलेली देवी मंदिरं आहेत. त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, प्रथा-परंपरा, स्थानमाहात्म्य यातही प्रचंड सांस्कृतिक वैविध्य आहे.
कोल्हापूरची भुजाईदेवी
कोल्हापूर नैसर्गिक आणि धार्मिकदृष्टय़ा संपन्न आहे. अनेक ऐतिहासिक मंदिरे, त्यांच्या प्रथा-परंपरा, यात्रा-उत्सव यांची एक वेगळी खासियत इथे पाहायला मिळते. येथील देवीच्या वैशिष्टय़पूर्ण मंदिरांच्या यादीमध्ये ‘टिक्केवाडीची भुजाईदेवी’ या मंदिराचा समावेश होतो. कोल्हापूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. घनदाट झाडी, वळणावळणाचे रस्ते, डोंगरदऱ्या आणि सभोवताली पसरलेली हिरवाई प्रवास आनंददायी करते. चारही बाजूंनी असलेल्या डोंगरांमध्ये भुजाईदेवीचे मंदिर आहे. भुजाईदेवीची आख्यायिका, प्रथा-परंपरा, यात्रा, नैवेद्य आणि कौल देण्याची विशिष्ट पद्धत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात दोन दीपमाळा आणि दोन तुळशी वृंदावनं आहेत. मंदिराच्या आवारात काही मूर्तींचे भग्नावशेष ठेवलेले दिसतात.
मंदिराबद्दल पुजारी अनिल गुरव सांगतात, असे सांगितले जाते की पूर्वी देवी डोंगरावर रहात होती. एक धनगर डोंगरावर जाऊन दररोज देवीची पूजाअर्चा करत असे. मात्र, वृद्ध झाल्यानंतर डोंगरावर जाऊन देवीची सेवा करणे त्याला जमेना. तेव्हा त्याने देवीला विनंती केली की, मला डोंगरावर येऊन पूजा करणे अवघड जात आहे. तेव्हा तूच पायथ्याशी येऊन राहा. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि सांगितले की, तू पुढे चालत राहा, मी तुझ्या मागून येते; पण मागे वळून पाहू नको. देवीने शेळीचे रूप धारण केले आणि पुजाऱ्याच्या मागे चालू लागली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पुजाऱ्याने मागे वळून पाहिले. तेव्हा देवीने त्याच ठिकाणी ठाण मांडले. तेव्हापासून देवीचे मंदिर डोंगराच्या मध्ये आहे. या भुजाईदेवीची मूर्ती किंवा त्या मूर्तीचे छायाचित्र संपूर्ण गावात कुठेच दिसत नाही. कोणाच्याही घरात देवीची मूर्तीही नाही. कारण देवीचे छायाचित्र काढले तर ते काढणाऱ्याला त्रास होतो असे मानले जाते.
पूर्वीचे मंदिर कायम ठेवून त्याच्याच भोवती १९९५ साली मोठे मंदिर उभारण्यात आले. देवीची त्यापूर्वीची मूूर्ती कायम आहे. दसरा तसंच माघ पौर्णिमेला देवीचा उत्सव साजरा केला जातो. यात्रेत देवीला दागिन्यांनी सजविले जाते. सनई-चौघडय़ांच्या गजरात, चांदीच्या रथातून देवीची मिरवणूक काढली जाते. यात्रेमध्ये सासणकाठय़ा नाचविल्या जातात. त्यामध्ये वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावतात. हलगीच्या तालावर तो झेंडा नाचविला जातो. लेझीम, दांडपट्टा अशा मैदानी खेळांमधून गावातील युवक शक्तीप्रदर्शन करतात.
नवरात्रीमध्ये गावात प्रत्येक घरात किमान एक किंवा दोघे जण नऊ दिवस उपवास करतात. हे उपवासकर्ते नऊ दिवस मंदिरातच राहतात. या उपवासात फक्त फलाहार घेतला जातो. अशा कडक उपवासातून देवीची शक्ती आपल्याला मिळते, असा लोकांचा समज आहे. मंदिराच्या बाजूलाच भोंगिराचा डोंगर प्रसिद्ध आहे. तेथील गुहांमध्ये महादेवाची पिंडी आहे. नवरात्रीमध्ये उपवास करणारे भक्त या पिंडीच्या दर्शनासाठी सातव्या दिवशी हा डोंगर चढतात. मंदिराच्या बाजूला जमिनीवर अंगठय़ाच्या आकाराचा मोठा ठसा उमटलेला आहे. त्याला ‘भीमाचा अंगठा’ असे म्हटले जाते. त्या संदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की, पांडव येथील डोंगरदऱ्यांमधून जात होते तेव्हा भीमाने त्याचा अंगठा कापून इथे टाकला. खरे तर डोंगराची एक उंच बाजू अंगठय़ासारखी वरच्या दिशेला उचलली गेली आहे. या मंदिरातील मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तांदळाचे दाणे चिकटवून कौल लावला जातो. मूर्तीच्या डाव्या बाजूचे दाणे खाली पडले तर कौल नकारात्मक आणि उजव्या बाजूचे दाणे पडले तर सकारात्मक असे समजले जाते. गावातील मुलगी लग्न करून सासरी गेली की, मुलीच्या नवऱ्याला तीन वर्षांतून एकदा भुजाई देवीला बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागतो, अशी परंपरा आहे. गावातील कोणतेही लग्न देवीला कौल लावल्याशिवाय होत नाही. गावचे पोलीस पाटील आणि मंदिराचे पुजारी नेताजी गुरव सांगतात, भुजाईदेवी इथले ग्रामदैवत आहे. टिक्केवाडीचे ग्रामस्थ दर तीन वर्षांनी ‘गुळं’ काढतात. त्या काळात कुणीही घरामध्ये नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे. धनगरांप्रमाणे भटकंती करायची. पशुपक्ष्यांची लहान मुलांना ओळख करून द्यायची. वनौषधींचा शोध घ्यायचा, असे हेतू या प्रथेमागे आहेत. माघवारीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. या प्रथेच्या निमित्ताने सर्वाचे एकत्र राहणे होते. आपापसातील वाद निवळतात. लोककलांच्या माध्यमातून मनोरंजन होते.
या प्रथेमध्ये देवीच्या नावाचा जयघोष करत गावकऱ्यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्यालाही मंडळी ‘गुळं’ म्हणतात. सारवलेली जमीन.. दगडाच्या चुलीतील विस्तवावर रटरट फुगणारी भाकरी.. कढईमध्ये शिजणाऱ्या भाजीचा खमंग गंध आणि शिंकाळ्यावर झुलत असलेली दह्य़ाची हंडी हे चित्र प्रत्येक पालामध्ये पाहायला मिळते. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पाहुणे-नातेवाईक एक-दोन दिवस गुळात राहण्यासाठी आवर्जून येतात. देवीला कौल लावून गावकरी ‘गुळं’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की, आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचा वाडा, बसुदेवाचा वाडा, हंडय़ाचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे शेतशिवारात राहण्याची प्रथा अवलंबली जात आहे. या प्रथेदम्यान घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे-जेवण करणे, दिवा पेटवणे आणि घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वज्र्य मानल्या जातात. तरीही या काळात चोरी अजिबात होत नाही. शिवारात २५-३० कुटुंबांसाठी एकच पाल उभारले जाते. पालातील सगळे लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेतात. अशा या भुजाईदेवीच्या दर्शनासाठी गावाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.
खान्देशी कानबाई
कानबाई चालनी गंगेवरी व माय
साखर पेरत चालनी..
कानबाई चालनी गंगेवरी
कानबाई बैसली चौरंगवरी व माय
हिरवी पैठणी नेसली..
हिरव्या बांगडय़ा हाती व माय
गई सोन्याची बचट.. कानबाई चालनी गंगेवरी
हे अहिराणी भाषेतील गाणं सध्या यू-टय़ूबवर खूप गाजत आहे. अशा गाण्यांच्या माध्यमातून खान्देशातील ‘कानबाई’ देवीची महती महाराष्ट्रभर पसरली आहे. ही ‘कानुबाई किंवा कानबाई’ संपूर्ण खान्देशाचे आराध्यदैवत मानले जाते. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या सणाला या देवीचा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो.
स्थानिक नागरिक असे सांगतात की, कानबाई येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी, पडदे, अंथरूण-पांघरूण धुतले जाते. कामानिमित्त बाहेर असेलेले लोक आवर्जून गावी येतात. एखाद्या घरात भांडण होऊन दुरावलेले नातेवाईकदेखील एकत्र येतात. कानबाईचा देश म्हणजेच खानदेश अशी व्युत्पत्ती सांगून कानबाईच्या नावावरूनच खान्देश हे नाव पडले, असेही सांगितले जाते. खान्देशी लोक श्रीकृष्णाला मानतात. त्याच्या कान्हा या नावावरून कानबाई हे नाव घेतले असावे, अशीही शक्यता वर्तवली जाते. खरे तर ही देवी निसर्गदेवता म्हणून प्रचलित आहे. या देवीचे वैशिष्टय़ म्हणजे इतर देवींप्रमाणे कानबाई देवी कोणत्या पाषाणात किंवा मूर्तीमध्ये दिसत नाही, तर नारळाच्या म्हणजेच श्रीफळाच्या रूपात प्रत्येक घरात विराजमान होते. एका कलशामध्ये नारळ ठेवून त्याला पिवळा, लाल आणि गुलाबी पितांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा अशा दागिन्यांनी सजवून आंब्याची पानांनी, रानफुलांच्या माळांनी तयार केलेल्या देव्हाऱ्यात कानबाईची स्थापना केली जाते, तर कुठे केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर स्थापना केली जाते. रात्रभर देवीपुढील समई तेवत ठेवली जाते. आणि देवीसमोर अहिरणी भाषेतील कानबाईच्या प्रेमाची गीते गायली जातात. महिला देवीची गाणी गात, नृत्य करत, फुगडय़ा खेळत जागरण करतात. कानबाईच्या नावाने उपवास केला जातो. या काळात वातावरणात उत्साह भरून राहतो.
कानबाईला ‘रोट’चा प्रसाद केला जातो. हे रोट गव्हाचे किंवा तांदळाचे असतात. त्याबरोबर गोड खिरीचा नैवेद्य असतो. रोटांसाठी दळलेले जाडेभरडे पीठ संपेपर्यंत घरामध्ये दुसरा पदार्थ केला जात नाही. साधारणपणे दोन-तीन दिवस हा रोटचा नैवेद्य घरातील लोक खात असतात. एकत्र कुटुंब असेल, तर रोट तयार करण्यासाठी घरातील लहानमोठय़ा सर्व सदस्यांची संख्या मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजेच गहू आणि चण्याची डाळ घेऊन जाडीभरडे दळून आणले जाते. त्यापासून रोट तयार केले जातात. या रोटांसोबत ‘आलन-कालन’ नावाची वेगवेगळ्या पालेभाज्यांची भाजी केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. सकाळी आणि संध्याकाळी केल्या जाणाऱ्या रोटांना वेगवेगळी नावे आहेत. सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. हे रोट तयार करण्यासाठी घरातील स्त्रीला भल्या पहाटे उठावे लागते. कारण, सूर्य उगविण्यापूर्वी रोट तयार करावे, असा संकेत आहे. हे रोट कुणीही खाऊ शकतो. या रोटांवर पुरणाचे दिवे पेटवून देवीची पूजा केली जाते. मात्र, सकाळचे रोट हे दिवसभरात संपवायचे, अशी प्रथा आहे. संध्याकाळी केलेले रोट फक्त कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनीच खावे, असाही संकेत आहे. ‘रोट’ ही प्रथा सुरू राहण्यासाठी घरात पुत्रप्राप्ती होणं आवश्यक मानलं जातं.
पूर्वी गावचे पाटील आमंत्रणं पाठवत. ज्यांना कापलेले नाही, भाजलेले नाही, अंगावर एकही डाग नाही, अशाच स्त्रियांची त्यातून निवड केली जात असे. स्त्रियांना विविध दागिन्यांनी सजवून त्यांची पूजा केली जात असे. पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखविला जात असे. बैलगाडी भरून भात केला जात असे. हा सर्व स्वयंपाक नदीवरून पाणी आणून केला जात असे. पुजेसाठी निवडलेल्या सुवासिनींनी स्पर्श केलेला नारळ पूजेत वापरला जात असे. कानबाई नव्याने बसवायची आहे, असे लोक चाळीसगावला कानबाईच्या मंदिरात नारळ घेऊन जातात आणि तो तेथील मूर्तीला वाहून परत आणतात. ‘कानबाई’ देवी खरे तर एकच दिवस घरामध्ये असते. दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मिरवणुकीत स्त्रिया आपल्या डोक्यावर कानबाईचा चौरंग घेतात. कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी गात नृत्य करतात. त्यामध्ये पुरुषदेखील आवर्जून सहभागी होतात. रस्त्यावरून ही मिरवणूक निघत असताना घरातील स्त्रिया कानबाईला ओवाळतात. कानबाईच्या विसर्जनानंतर घरामध्ये उरलेले रोट, खीर, पुरणपोळी हा नैवेद्य किंवा प्रसाद पौर्णिमेपर्यंत संपवावा, असा संकेत आहे.
सात वाहनांवरील माढेश्वरी देवी
सोलापूरमध्ये माढय़ाचा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे बुरूज आजही दणकट आहेत. मात्र, किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. मात्र, सुमारे ३०० मीटर अंतरावर माढेश्वरीचे मंदिर आहे. माढेश्वरी गावचे ग्रामदैवत असल्याने तालुक्याला माढा असे नाव मिळाले, असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मंदिराला चारही बाजूंनी मोठी तटबंदी आहे. मोठमोठय़ा दगडी शिळांचे मंदिर उभे केलेले आहे. मंदिराच्या तटबंदीच्या आतील बाजूस छोटय़ा-छोटय़ा कमानी असलेल्या दगडी खोल्या आहेत. त्याही भक्कम बांधलेल्या आहेत. मंदिराच्या आसपास मारुती, गणेश, राम आदी देवांची मंदिरे उभारलेली आहे. कोरीव दगडात ही मंदिरे उंच उभी आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजासमोर रावराजे निंबाळकरांची समाधी आहे. तसेच दक्षिण दिशेला दोन पुजाऱ्यांची समाधी आहे. मात्र, या समाधी अलीकडील काळात बांधलेल्या आहेत, अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.
मंदिराला तीन शिखरे आहेत. उजव्या सोंडेचा चिंतामणी नावाचा गणपतीदेखील या परिसरात पाहायला मिळतो. तसेच काही दुर्मीळ वीरगळही येथे आढळतात. माढेश्वरी देवीची पूजाअर्चा करणारे बाळू पुजारी सांगतात की, माढेश्वरीचे मंदिर १६६७ साली रावराजे निंबाळकर यांनी बांधले. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील हे मंदिर आहे. महाराष्ट्रावर चाल करून आलेला अफजल खान रावराजे निंबाळकरांचा पाठलाग करत होता. रावराजे एका छोटय़ाशा मंदिरात लपून बसलेले होते. त्या मंदिरातील देवीला त्यांनी साकडे घातले की, मला या संकटातून वाचव. मी तुझे मंदिर बांधेन. पुढे रावराजे अफजल खानाच्या संकटातून सुखरूप बाहेर पडले. मग त्यांनी माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले. पूर्वीचे मंदिर छोटे होते. मंदिराच्या बाजूला कल्लोळ (विहीर) आहे. त्यातून देवी प्रकटली आहे. माढय़ाच्या किल्ल्यातून मंदिराकडे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग होता. तो फक्त स्त्रियांसाठी उपयोगात असे. आता ते भुयार बंद करण्यात आले आहे.
या देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, फार वर्षांपूर्वी माढा गावातील शेतकरी रोज नियमितपणे तुळजापूरच्या भवानी देवीला नैवेद्य घेऊन जात असे. अनेक वर्षे त्याने असे केले. मग तो देवीला म्हणाला की, आता खूप थकलो. इथपर्यंत येऊन तुझी सेवा करणे मला जमणार नाही. देवी प्रकट झाली अन् म्हणाली, आता मीच तुझ्याबरोबर येते. तू चालायला सुरुवात कर; पण मागे वळून पाहू नकोस. शेतकरी ज्या रस्त्याने प्रवास करत होता त्या मार्गात मनकर्णिका नावाची नदी होती. तो शेतकरी चालून-चालून थकल्यामुळे नदीत उतरला. त्याने थंड पाण्याने तोंड, हात-पाय धुतले आणि मग त्याने मागे वळून पाहिले. देवीने घातलेली अट शेतकऱ्याकडून मोडली गेली. तेव्हा देवी अदृश्य झाली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुजाऱ्याने देवीचे मंदिर बांधले. तेव्हापासून देवी या ठिकाणी वास्तव्य करून गावाचे संरक्षण करत आहे, असे गावकरी सांगतात.
यात्रेची माहिती देताना परमेश्वर पुजारी सांगतात की, कोजागरी पौर्णिमेला माढेश्वरी देवीची यात्रा भरते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. माढेश्वरीची घोडा, हत्ती, सिंह, नंदी, हरीण, मोर, काळवीट अशी सात वाहने आहेत. ही सगळी वाहनं फायबर, भुसा आणि लाकडांपासून तयार केलेली आहेत. रात्री १२ वाजता या वाहनांवरून देवीचा छबिना (मिरवणूक) काढला जातो. प्रत्येक वाहनाचा मान हा विशिष्ट समाजाला दिलेला आहे. त्यामध्ये हत्तीचा मान माळी समाजाला, घोडा, मोर, काळवीटाचा मान मराठा समाजाला, सिंह, नंदी आणि हरिण याचा मान धनगर समाजाला देण्यात आला आहे. हे सर्व जण आपापल्या वाहनात देवीचे प्रतिरूप घेऊन वाजतगाजत, नाचत मातंगाई मंदिरात जातात. माढेश्वरी देवीच्या मंदिराच्या समोरच उत्तरेला शेतामध्ये मातंगाई देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथे असलेल्या मातंगाई देवीच्या मूर्तीला देवीला हिरवी साडी नेसवलेली असते. मातंगाई देवी महार-मांग समाजाची देवी आहे. पूर्वी या समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता. या संदर्भात असे सांगितले जाते की, तरीही मातंगाई देवी ही माढेश्वरी देवीला भेटायला जात असे. म्हणून मुख्य मंदिरासमोरच मातंगाई देवीचे मंदिर उभे केलेले आहे. त्यामुळे देवीचा छबिना मातंगाईच्या मंदिरात जाऊन परत येतो. नवरात्रामध्ये देवीची पूजाअर्चा केली जाते. भोगी (देवीची विशिष्ट पूजा) झाल्याशिवाय कोणतेही शुभकार्य किंवा लग्न केले जात नाही. देवीसमोर होमहवन करण्यासाठी कुंड आहे. देवीचे कपडे धुणे, मंदिराची साफसफाई आणि इतर कामे रत्ना लिंगाप्पा पवार आणि शंकर पंढरीनाथ रणपिसे करतात. त्यांना देवीची सेवा केल्याबद्दल महिन्याला १०० पगार दिला जातो. देवीच्या सेवेबद्दल त्यांना मंदिरात आलेले भक्त बाजरी, ज्वारीचे पीठ, तांदूळ आणि फळे त्यांच्यासमोर असलेल्या परडीत टाकतात. हे त्यांचे वंशपरंपरागत काम आहे.
रत्नाबाईंना सांगतात की, मंगळवारी आणि शुक्रवारी इथे भरपूर भक्त येतात. त्यांच्याकडून जे मिळते, तेच आम्ही खातो. देवीची सेवा करायला मिळते, हे आमचे भाग्य आहे. माझ्यानंतर माझा थोरला मुलगा देवीची सेवा करणार आहे. हे काम वंशपरंपरेनुसार पुढे चालत राहणार आहे.
मंदिराच्या मागील बाजूला दगडावर देवीची पाऊलखूण आहे. यापूर्वी अनेक संशोधकांनी मंदिर, परिसरातील वीरगळ आणि किल्ला पाहण्यासाठी भेटी दिलेल्या आहेत. वेळ काढून माढेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आणि आसपासची मंदिरे, विशेष म्हणजे माढय़ाचा किल्ला पाहण्यासाठी भेट जरूर द्यावी.
तांबव्याची वज्रेश्वरी देवी
दूरवर पसरलेले माळरान, काटेरी झुडपे, मध्येच कुठेतरी उसाची शेती आणि बाजूलाच वाहणारी निरा नदी पाहत पाहत आपण तांबवे गावात प्रवेश करतो. माळशिरस तालुक्यातील अकलूजपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव साधारणपणे अडीच-तीन हजार लोकसंख्येचे आहे. गावात प्रवेश करताना लक्षात येते की, वाटेत जी छोटी वस्ती लागते, त्या वस्तीमध्ये प्रत्येक घरासमोर देवीचे छोटेसे मंदिर आहे. लाल, पिवळा, हिरवा, केशरी अशा रंगांनी रंगविलेली मंदिरे चटकन प्रवाशांच्या नजरेत भरतात. साधारणपणे सहा फूट उंच आणि सहा फूट लांब असणाऱ्या या मंदिरांमध्ये रेणुकामाता, लक्ष्मीआई, मरीआई आदी देवींच्या मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्ती दगडाच्या आहेत. यल्लमा, लक्ष्मी, पद्मावती आदी देवींची छायाचित्रे इथे लावलेली दिसून येतात. मूर्तीला हिरवी साडी नेसवलेली असते. तिचा मळवट (कपाळ) कुंकवाने लेपलेला दिसतो. त्रिशूळ, डमरू आदी गोष्टीही त्या मंदिरात दिसून येतात. या वस्तीतून उजवीकडे वळण घेतले की, ५०० मीटर अंतरावर आपल्याला निरा नदीचे मोठे पात्र आणि नदीला लागूनच हेमाडपंथी शैलीतील वज्रेश्वरी देवीचे दगडी मंदिर दिसू लागते.
मंदिराचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे आपल्या देशात वज्रेश्वरी देवीचे मंदिर केवळ दोनच ठिकाणी आढळते. त्यातील एक मुंबईजवळ असणाऱ्या वसईमध्ये तर, दुसरे सोलापूरमधील तांबवे गावात. तांबव्यातील वज्रेश्वरी देवीचे मुख पूर्व दिशेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर अखंड मोठय़ा दगडात कोरलेले खांब आहेत. त्या खांबांच्या बाजूने देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात गाईच्या चेहऱ्यासारखी देवीची केशरी रंगाची मूर्ती निदर्शनास येते. मंदिराचे पुजारी बबन कोंडिबा नारायण-निंबाळकर देवीची आख्यायिका सांगतात की, देवीची एक गाय होती. ती दररोज एका शेतकऱ्याच्या शेतात चरायला जात असे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत होते. एकदा तो शेतकरी गाईच्या मागून कुंडापर्यंत आला. तिच्यामागोमाग त्या कुंडामध्ये उतरला, तेव्हा देवी प्रकट झाली. देवीने शेतकऱ्याला इथे येण्याचे कारण विचारले असता शेतकऱ्याने सांगितले की, गाईमुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. तेव्हा देवीने गाईचे शेण घेऊन जाण्यास सांगितले. कुंडाच्या बाहेर येताना त्याच्या हातून थोडे शेण खाली पडले. जेवढे शेण त्याच्या हातात शिल्लक होते तेवढय़ा शेणाचे सोने झाले. तो कुंड आजही निरा नदीच्या मध्यभागी आहे.
गावकरी असे मानतात की, या कुंडात अंघोळ करून भिजलेले केस देवीने झाडले की जे पाणी दगडावर पडायचे, त्याच्यामुळे दगडावर काळे डाग पडलेले आहेत. कडक उन्हाळ्यात निरा नदीतील पाणी आटले तरी कुंडातील पाणी अजिबात आटत नाही. नदीतील दगडांवर बैल, गाय, घोडा, मासा, उंट आणि हत्ती आदी प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळतात. मंदिराच्या मागील बाजूस भिंतीवर दगडामध्येच माशाची आकृती कोरलेली आहे. याबद्दल गावकरी सांगतात की, देवीच्या कुंडात हत्ती आणि उंटाएवढे मासे होते. त्यांच्या नाकामध्ये बैलगाडीच्या चाकाएवढी नथ होती. ही देवी बैलाच्या रूपात गावात आली आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक दगडी ताट आहे. या ताटाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, पूर्वी हे ताट सोन्याचे होते. त्यामध्ये स्त्रिया एकत्र जेवत. आजही मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सात, अकरा, एकवीस अशा स्त्रिया देवीच्या ताटात एकत्र जेवतात. तर, पूर्वी या सोन्याच्या ताटात जेवताना एका स्त्रीने त्या ताटाचा एक तुकडा चोरला, तेव्हापासून ते ताट कायमचेच दगडाचे झाले.
खरेतर एका मोठय़ा चौथऱ्यावर हे वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधलेले आहे. त्याला एक कमान आणि दगडी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावरून खाली उतरले की, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक छोटे छोटे शेंदूर फासलेले दगड पाहायला मिळतात. संतोष कुदळे या दगडांची आख्यायिका सांगतात की, वज्रेश्वरी देवी आणि दैत्य (राक्षक) यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामध्ये देवीने राक्षसांचा पराभव केला. राक्षस देवीला शरण आले. त्यांनी एका रात्रीत तांबवे गावात हे देवीचे मंदिर बांधले तेव्हा देवी या गावात वसली. मंदिरासमोरचे शेंदूर फासलेले दगड या दैत्यांचे प्रतीक आहेत. या दगडांच्या गर्दीत चार मोठे दगडी खांब उभे करून त्यावर दगडाचेच छत असलेला आणखी एक छोटा चौथरा तयार केला आहे. त्यात दगडी पादुका आहेत. त्या पादुका वज्रेश्वरी देवीच्या आहेत. मंदिराच्या बाजूलाच फिरते शिवलिंग आहे. देवीचे भक्त शिवलिंगावर कौल लावतात. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला एक नाणे ठेवून शिवलिंग फिरविले जाते. नाणे उजव्या दिशेला पडले की, तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार आणि नाणे डाव्या बाजूला पडले तर तुमचे काम अयशस्वी होणार नाही, असे मानले जाते.
वज्रेश्वरी देवीची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणांहून भक्त दर्शनाला येतात. इथे एक वेगळी प्रथा आहे. त्यानुसार निपुत्रिक भक्त ‘मला पहिला मुलगा झाला तर त्याला सज्जावरून खाली टाकेन,’ असा देवीला नवस बोलतात. त्यानुसार मंदिराच्या दगडी छतावरून मुलाला खाली टाकले जाते. आणि खाली चादरीमध्ये झेलले जाते. यालाच सज्जावरून टाकणे म्हणतात. मध्यंतरी या प्रथेवरून वाद निर्माण झाला होता.
यात्रेमध्ये भूषण राजकुमार इनामदार यांना देवीच्या नैवेद्याचा मान मिळाला आहे. तर, शेजारीच असणाऱ्या सपाटणे गावाला देवीची पालखी बनविण्याचा मान मिळालेला आहे. यात्रेमध्ये देवीच्या समोर असलेल्या पाषाणरूपी दैत्यांना बोकडाचा नैवेद्य दिला जातो. मात्र, तो मांसाहारी नैवेद्य देवीसमोर आणला जात नाही. तिच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्याचबरोबर शेतात पिके चांगली आली, तर देवीच्या कुंडात भात, भाकरी, भाजी, पुरणपोळी टाकतात.
पाटणची लक्ष्मीदेवी
‘कोयनेची सहल’ काढली तर, आपल्याला वाटेत धरणं, धबधबे, हिरवीगार शेती, अखंडपणे वाहणारे पाणी, मोठमोठे डोंगर, गडकिल्ले, वळणावळणाचे रस्ते लागतील. पाटण शहरात वसलेला कोयना हा तालुका आणि पाटण हे शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. समर्थ रामदासांचा अधिवास असलेले चाफळचे राम मंदिर, सरदार पाटणकरांच्या वाडय़ातील राम मंदिर, नागोजीराव पाटणकर ग्रंथालय, निनाईदेवीचे मंदिर, धारेश्वर दिवशी, समर्थाचा मठ, दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर, अशा किती तरी धार्मिक स्थळांनी पाटण समृद्ध आहे. अशाच धार्मिक स्थळांमध्ये पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीआईचा समावेश होतो.
पाटणच्या उत्तरेला निसर्गरम्य परिसरात पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस डोंगररांगांतून वेडीवाकडी वळणे घेत केरा नदी वाहते, तर दक्षिणेला कोयना नदी आहे. नेमक्या याच ठिकाणी एका छोटय़ाशा टेकडीवर लक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात मोठी कोरीव दीपमाळ आहे. शेजारीच छोटेसे शिवलिंग आणि नंदी आहे. नागाचे छोटेसे दगडी मंदिरदेखील उभे करण्यात आलेले आहे. लक्ष्मीदेवी या पार्वतीच्या रूपाची पाटण शहरावर कृपादृष्टी आहे, ती गावाचे रक्षण करते. सगळ्यांचे मंगल करते. तिच्या कृपेने पाऊस पडतो. शेती पिकते, अशा येथील नागरिकांची श्रद्धा आहेत.
मंदिरातील मूळ मूर्ती पाषाणाची असून त्यात राक्षसाला पायदळी तुडविल्याचे दिसून येते. कराड, सातारा, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, पुणे, मुंबईतून लोक लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुखी ठेव, अशी प्रार्थना करतात आणि मंदिराच्या उंबरठय़ावर माथा टेकवतात. लक्ष्मीदेवी पाटणची ग्रामदेवता असली तरी पहिली पूजा तिची बहीण निनाईदेवीची केली जाते. या निनाईदेवीचे मंदिर लक्ष्मीआईच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा लागते. भक्त पहिल्यांदा तिचे दर्शन घेतात आणि नंतर लक्ष्मीदेवीच्या दर्शनाला जातात. निनाईदेवीला भैरवनाथ नावाचा भाऊ आहे. त्याची अशी कथा सांगितली जाते की, पूर्वी हा भैरवनाथ पाटणच्या मुख्य पेठेत होता. मात्र, लोक त्या ठिकाणी कचरा टाकीत होते. त्यामुळे रागाने पाटण शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या दातेगडाच्या पायथ्याशी म्हणजेच टोळेवाडी या गावात त्याने आपले बस्तान बसविले. तरीही त्याच्या मूळ ठिकाणी भैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे. लक्ष्मीच्या दर्शनाला जाताना भक्त क्षणभर उभे राहून भैरवनाथाचे दर्शन घेतात आणि टोळेवाडीकडे चेहरा करून त्याला नमस्कार करतात.
लक्ष्मीदेवीची यात्रा पाटण तालुक्यातील त्या वर्षांतील शेवटची यात्रा असते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आखाडे रंगतात. विविध वस्तूंची दुकाने सजतात. लोकनाटय़ तमाशा भरविला जातो. असे मानले जाते की, देवीची यात्रा झाल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस चांगला व्हावा आणि पिकेही भरभरून यावी, अशी प्रार्थना पाटण शहरातील लोक करतात. यात्रेत देवीचा छबिना शहरात निघतो. त्या वेळी टोळेवाडीहून भैरवनाथाची पालखी देवीच्या भेटीला येते. परंपरेनुसार शेटे (देशमुख) टोळेवाडीकरांना निमंत्रणाचा नारळ दिला जातो. भैरवनाथाची पालखी पाटणच्या वेशीवर आल्यावर देवस्थानचे प्रमुख आणि गावकरी तिचे स्वागत करतात. भैरवनाथाची पालखी मंदिरात आल्यानंतर लक्ष्मीदेवीची पालखी आणि भैरवनाथाची पालखी या दोन पालख्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही पालखी मुख्य मंदिरापासून निनाई मंदिर, ब्राह्मणपुरी, लायब्ररी चौक, भैरवनाथ मंदिर, राजवाडा अशी जाते.
या पालखी मिरवणुकीत बारा बलुतेदारांचा समावेश असतो. पुजारी म्हणून गुरव, पालखीचे वाहक म्हणून भोई, पालखीवर छायाछत्र देण्यासाठी माळी, भंडारा-धूर-अगरबत्तीसाठी आत्तार, आंबीलघुगऱ्यासाठी शेटे, अबदागीरसाठी नाभिक, पाणीपुरवठय़ासाठी कोळी, चवरीसाठी चौधरी, गोंधळासाठी कुंभार, सामाधकाठीसाठी मुजुमले, धूप-आरतीसाठी ठाकर, दिवटीसाठी चर्मकार आणि संरक्षणासाठी मातंग यांचा देवीच्या जत्रेत पालखी सोहळ्यात सहभाग असतो. गावाबाहेर स्थलांतरित झालेला वर्ग देवीवरच्या श्रद्धेपोटी जत्रेला आवर्जून जातो.
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. देवीने महाशक्तीचे रूप धारण करून प्रबळ झालेल्या पापी प्रवृत्तींचा विनाश केला आणि लोकांना अभय दिले अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. त्यातून निर्माण झालेल्या स्थानमाहात्म्यातून ठिकठिकाणच्या देवीमंदिरांना महत्त्व आलं आहे. देशभरातली विविध देवी मंदिरे, त्यांचे स्थानमाहात्म्य यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा, आख्यायिका यांचा आढावा-
वैष्णोदेवी (जम्मू-काश्मीर)
वैष्णोदेवीचे उत्तरेकडील प्रचलित नाव मातारानी असे आहे. वैष्णोदेवी हा दुर्गादेवीचाच एक अवतार समजला जातो. हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर लोकप्रिय आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट पर्वतरांगेमधील या मंदिराला दरवर्षी जवळपास एक कोटी भाविक भेट देतात. वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा गावापासून घाट पायी चढावा लागतो. वर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यात्रेकरू कटरा गावाजवळच्या बालगंगा नावाच्या झऱ्यात स्नान करतात आणि मग डोंगर चढू लागतात. वाटेत अदकनवारी हे स्थान लागते. अदकनवारी म्हणजे आदिकुमारी देवी होय. तिथून पुढे भरवघाटी लागते. तिथे भरवाचे लहानसे मंदिर आहे. त्यापुढील घनदाट जंगलाला ‘माता का बाग’ असे म्हणतात. वैष्णोदेवी ही एका गुहेत आहे. गुहेबाहेरच्या एका चबुतऱ्याला विष्णू दरबार म्हणतात. यात्रेकरू त्यावर होम करतात. हा सगळा घाट चढून जाणे शक्य नसते त्यांच्यासाठी घोडी भाडय़ाने मिळतात. वैष्णोदेवी एवढय़ा दुर्गम भागात जाऊन का राहिली, याविषयी एक आख्यायिका आहे. ती अशी की, भरव नावाच्या दैत्याच्या मनात वैष्णोदेवीशी लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण देवीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. भरव बलप्रयोगाने आपला हेतू साध्य करील अशी देवीला भीती वाटली. त्याला चुकवण्यासाठी म्हणून ती डोंगरात पळून गेली आणि अदकनवारी या ठिकाणी लपून बसली. भरव तिचा शोध घेत तिथे पोहोचला. ते पाहून ती डोंगरावर उंच उंच चढत राहिली. अखेरीस एका गुहेजवळ भरवाने तिला गाठलेच. मग मात्र वैष्णोदेवीने आपले उग्र रूप प्रकट केले. भरवाशी झुंज देऊन त्याला ठार मारले. त्यानंतर ती गुहेत शिरून कायमची तिथेच राहिली. वैष्णोदेवीची यात्रा केल्यावर यात्रेकरूला खाली उतरून कटरा गावातील भुवनेश्वरीची पूजा करावी लागते. ती केल्यानंतरच यात्रा सुफल होते, असे मानतात. आणखी एका दंतकथेनुसार आदिशक्तीने आपल्या त्रिशुळाच्या प्रहाराने ही गुंफा तयार केली. या गुहेत महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मीच्या मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्तीच्या पायापासून पाणी वाहत असते. त्यास बाणगंगा म्हणतात. वैष्णोदेवीबरोबरच या तीन देवतांनाही या ठिकाणी महत्त्व आहे.
बासरदेवी (तेलंगणा)
नांदेड-निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर बासर हे रेल्वे स्टेशन आहे. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्य़ात हे गाव होते. पुढे ते आंध्र प्रांतात गेले. सध्या ते तेलंगणा राज्यात आहे. या परिसराचे प्राचीनत्व महाभारतपूर्व काळापर्यंत मानले जाते. महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ‘महाभारता’सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले, असे मानतात. व्यासांचे येथे वास्तव्य झाले, त्यावरून गावाचे नाव वासर पडले, त्याचेच पुढे बासर झाले असे सांगितले जाते. नांदेडजवळ असणाऱ्या या मंदिरात महाराष्ट्रातील अनेक भाविक दरवर्षी जातात. तर काही मतांनुसार मुळात या भागात असणाऱ्या मराठी भाषेच्या प्रभावामुळेच या गावाचे नामकरण वासरवरून बासर असे झाले आहे.
व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात, अनुष्ठाने करतात. महासरस्वतीचे मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती तीन फूट उंचीची आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अध्र्या भागात देवघर, गाभारा तर अध्र्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पादुका देवीपासून थोडय़ा अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचे शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठय़ा श्रद्धेने ते प्राशन करतात. मंदिरासमोरच्या टेकडीवर जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे.
याच मंदिराशी निगडित एका कथेनुसार कुरुक्षेत्रावरील युद्ध संपल्यानंतर व्यासमुनी, त्यांचे काही अनुयायी निवांतपणे काही दिवस घालवावे म्हणून दंडकारण्यात गेले. तिथे व्यासमुनींनी देवपूजा आणि सरस्वती देवीची आराधना केली. नंतर नंदागिरीचा राजा बिजिअलुदु याने हे सरस्वती मंदिर बांधले. ‘दुग्रे दुर्गट भारी’ या आरतीचा कर्ता नरहरी मालू, श्री शंकराचार्य आणि अनेक योगीजनांनी इथे अनुष्ठान केले होते. तसेच वाल्मीकी ऋषींनी येथेच ‘रामायण’ लिहायला सुरुवात केली, अशीही आख्यायिका आहे. इथे थोडय़ा दूर अंतरावर दत्त मंदिर आहे. असे सांगतात की, ही दोन्ही मंदिरे भुयाराने जोडली गेली होती. राजे-महाराजे या भुयारी मार्गाने येऊन देवांची पूजा करत असत. येथे व्यास महर्षीचे मंदिर आहे, तसेच वाल्मीकींची संगमरवरी समाधीही आहे. सरस्वती मंदिरात एक दगडी स्तंभ असून त्यावर हाताने प्रहार केला तर संगीताचे सप्तसूर ऐकू येतात. त्याला म्युझिक पिलर असे म्हटले जाते.
नवरात्रात हा परिसर भाविकांनी फुललेला असतो. देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण निनादत असते. दसऱ्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून मिरवणूक निघते. रस्ते झाडून, सडा िशपडून गावात सुंदर रांगोळ्या रेखाटलेल्या असतात. तर अनेक जणी आपापल्या दारासमोर पंचारती घेऊन उभ्या असतात. औक्षण अन् फुले उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्याची प्रथा आहे. या सरस्वती मंदिरात अनेक पालक मुलांना शिक्षण सुरू करण्यापूर्वी घेऊन येतात, त्याला अक्षराभिषेक असे म्हणतात. येथे प्रसादात मुलांना हळद खायला दिली जाते आणि पाटीवर अक्षरे लिहिण्याची संथा दिली जाते. दसरा, वसंत पंचमी, राखी पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमा हे दिवस त्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळेच असेल कदाचित, पण मंदिराजवळ हार-प्रसादाऐवजी स्टेशनरीची दुकाने अधिक आहेत.
ज्वालादेवी (हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशातील कांगडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध माँ ज्वालामुखी मंदिर आहे. ज्वालादेवी मंदिर पांडवांनी शोधून काढले अशी कथा प्रचलित आहे. या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डय़ाच्या आतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणी डाव्या आणि मधल्या खडकांतून अशाच तऱ्हेच्या ज्वाला बाहेर पडताना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसरातील या ज्वाळा माँ महाकाली, अन्नपूर्णा, चंडी, िहगलाज, िवध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजीदेवीचे प्रतीक मानल्या जातात. हिमाचल प्रदेशातील नादौन गावातील ध्यानू भगत नावाचा भक्त ज्वालादेवीच्या दर्शनाला चालला होता. त्या वेळी मुघल बादशहा अकबरचा अंमल त्या भागावर होता. हजारो लोकांसमवेत जात असलेल्या ध्यानू भगतचा अकबराच्या सनिकांना ्नराग आला. त्याला अटक करून अकबरासमोर आणण्यात आले. अकबराने त्याला इतक्या लोकांना घेऊन कुठे चाललास, असे विचारले. त्याने सांगितले की, माता ज्वालादेवीच्या दर्शनाला जात आहे. अकबराने विचारले की, कोण आहे ही ज्वालादेवी? ध्यानूने सांगितले ज्वालामाई सर्व जगाचे पालन करते. देवळातील ज्योती तेल, बत्तीशिवाय सदैव जळत असते. अकबराला आश्चर्य वाटले. ती ज्योत बघण्यासाठी तो स्वत: देवळात गेला. त्याचा विश्वास बसेना. त्याने आपल्या सनिकांना मंदिराचा परिसर पाण्याने भरण्याची आज्ञा दिली. आश्चर्य म्हणजे ज्वालांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. प्रायश्चित्त म्हणून अकबराने ५० किलो सोन्याचा मुकुट देवीस अर्पण केला. परंतु प्रत्येक वेळी तो मुकुट खाली पडत असे. देवीने तो सोन्याचा मुकुट स्वीकारला नाही, असे आख्यायिका सांगते.
राजा प्रजापती दक्ष यांच्याकडून यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वाना आमंत्रित करण्यात आले होते. वडिलांच्या वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वत:ला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दु:ख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तिपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका आहे. मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. सर्वात वर शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. इथले गोरख डिब्बी कुंड हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. या कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. गोरखनाथांच्या तपश्चय्रेने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एकदा गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले आणि स्वत: भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवीमाता आजही त्यांची वाट पाहते आहे, अशी आख्यायिका आहे.
कन्याकुमारी देवी (तमिळनाडू)
पूर्वेला बंगालची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला िहदी महासागर अशा स्थानी वसलेले कन्याकुमारी. इथे समुद्रतटावर सूर्योदय दिसतो तसाच सूर्यास्तही. किनारपट्टीवर असा योग अन्यत्र कुठेही दिसत नाही. किनारा खडकाळ असून मोठमोठे खडक आहेत. तिन्ही समुद्रपाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येतात. त्यामुळे समुद्रावरची रेतीही तीन रंगांत आढळते. या संगमाजवळच कन्याकुमारीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असले तरी भाविकांना प्रवेश उत्तरदारातूनच करावा लागतो. गोपुरातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडी कोरीव खांबांच्या लांबच लांब रांगा दिसतात. हे मंदिर पांडय़ राजाच्या काळात बांधले गेले असे सांगतात. ही त्यांची कुलदेवता. तर पुराणातील कथेनुसार, वाणासुर हा राक्षस उपासना करून बलाढय़ झाला होता. त्याने देवांकडून अनेक वर मिळविले. तो सर्वानाच छळू लागला; तेव्हा सर्व जण विष्णूला शरण गेले. मात्र विष्णूने वाणासुराचा अंत देवीच करू शकेल असे सांगितले. वाणासुराला अमरत्वासाठी अनेक वर प्राप्त असले तरी त्याचे मरण कुमरिकेच्या हाती होते. तेव्हा पार्वतीदेवी कुमारीच्या रूपात इथे अवतरली आणि तिने वाणासुराचा अंत केला. आपल्या नियोजित वराची वाट पाहात ती इथेच उभी राहिली. मात्र तिचा वर आलाच नाही. असेही सांगतात की, वाणासुरानेच तिला मागणी घातली. त्यामुळे चिडून युद्धासाठी आव्हान देत हातातील चक्राने तिने वाणासुराला ठार केले. विविध अलंकारांनी युक्त आणि अतिशय सौष्ठवपूर्ण अशी ही मूर्ती आहे. तिच्या नाकातील हिरा इतका तेजस्वी आहे की, समईच्या प्रकाशातही त्याची आभा मोहून टाकते. पूर्वेतील दारातून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे हा हिरा इतका चकाकतो की मूर्ती दिसणे अशक्य होते; म्हणून हे दार बंद ठेवण्यात येते.
मनसादेवी (उत्तराखंड)
देवीचे हे मंदिर हरिद्वारजवळील बिल्व पर्वतावर आहे. हे ठिकाण शिवालिक पर्वतरांगांमध्ये आहे. ही हिमालयाची दक्षिणेकडील सर्वात शेवटची रांग आहे. बिल्व पर्वताच्या समोर असलेल्या नील पर्वतावर चंडीदेवीचे मंदिर आहे. असे मानले गेले आहे की, देवी मनसा आणि चंडी ही पार्वतीचीच दोन रूपे आहेत अन् ती नेहमी एकमेकांजवळच राहतात; म्हणून त्यांची स्थाने जवळ जवळ आहेत. त्या दोन्ही ठिकाणी रोपवेने जायची सोय आहे. मनसादेवी शिवाच्या मनातून उत्पन्न झालेली शक्ती आहे. मनसा म्हणजे इच्छा. ती मनोकामना पूर्ण करते. ती वासुकी नागाची बहीण आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर दमलेल्या देवीने इथे विश्रांती घेतली, अशी गोष्ट सांगितली जाते. गाभाऱ्यात एकूण तीन मूर्ती आहेत. सर्वात मोठी असलेली मूर्ती गायत्रीदेवीची आहे. तिच्या चरणांजवळ आपल्या डाव्या हाताला काळी मूर्ती महिषासुराची आहे आणि उजव्या बाजूला केशरी रंगाचा जो तांदळा आहे, ती म्हणजे मनसादेवी.
नयनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश)
हे मंदिर हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यत आहे. मंदिरात प्रवेश करताच हनुमानाची उंच मूर्ती आहे. या भागात मंगळवार हनुमानाचा वार म्हणून पाळला जातो. डावीकडे माता नयनादेवीचे मंदिर आहे. तिथे कालिमाता, नयनादेवी आणि गणेशाची मूर्ती आहे. मंदिराचा परिसर आटोपशीर आहे. नयनादेवीसोबत भगवान शंकर, नवग्रह आणि शनिदेवाचे मंदिर परिसरात पाहायला मिळते. १८८० च्या भूस्खलनात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, त्यानंतर त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. ननी तळ्याकाठी शक्तिपीठांच्या गोष्टीनुसार देवी सतीचे डोळे पडले होते. त्यामुळे डोळे म्हणजे नयन आणि त्यावरून नयनादेवी असे नामकरण होऊन देवीचे वास्तव्य आणि तलाव यावरून ननिताल नाव तयार होऊन हे मंदिर स्थापन करण्यात आले. इथे अनेक र्वष जुना िपपळ वृक्ष पाहायला मिळतो. इथे दोन्ही नवरात्र (चत्र व अश्विन महिना) मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात.
जीणमाता (राजस्थान)
जीणमाता मंदिर राजस्थानातील सिकर गावात आहे. जयंती या नावानेही जीणमातेला ओळखले जाते. जीणमाता दुर्गादेवीचा अवतार आहे. सिकर जिल्हा राजस्थानातील घनघोर जंगल म्हणून ओळखला जातो. तीन पहाडांमध्ये जीणमातेचे मंदिर आहे. तिच्या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. त्यानुसार मुघल बादशहा औरंगजेबाला जीणमातेसमोर नतमस्तक व्हावे लागले होते. जीणमातेचे मंदिर तोडण्याचा आदेश औरंगजेबाने आपल्या सनिकांना दिला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. भक्तांनी देवीला साकडे घातले आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भक्तांचा पुकारा ऐकून देवीने एक चमत्कार केला. लाखो मधमाश्यांचा थवा देवळाच्या दिशेने आला आणि त्यांनी मुघल सनिकांचा कडाडून चावा घेतला. त्यात औरंगजेबही होता. त्याच्या वैद्यांनी त्याला मातेची माफी मागण्याचा सल्ला दिला. त्या बदल्यात देवीला अखंड नंदादीपासाठी तेलाची व्यवस्था करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर औरंगजेबाची प्रकृती सुधारली, असे सांगितले जाते. खूप काळ दिल्लीहून दर महिन्याला सव्वा मण तेल औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही येत असे. जीणमातेच्या सुंदर प्रतिमेबरोबर शिविलग आणि नंदी विराजमान आहेत. नवरात्रात जीणमातेच्या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात.
मणीबंध शक्तिपीठ, पुष्कर (राजस्थान)
राजस्थानातील ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्करपासून काही किलोमीटर अंतरावर मणीबंध नावाचे गाव आहे. या गावातील गायत्री टेकडीवर गायत्रीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. पुराणातील कथेनुसार, राजा प्रजापती दक्षाच्या घरात पार्वतीने (सती) जन्म घेतला. तिचे लग्न शिवाशी झाले. राजा दक्षाने एका यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्याने सर्व देवतांना आमंत्रण दिले, पण आपल्या जावयाला आणि मुलीला बोलावले नाही. त्यामुळे रागावलेली सती आपल्या पित्याकडे जाब विचारायला गेली. तेव्हा त्याने शिवाची यथेच्छ िनदा केली. या अपमानाने क्रोधित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी मारून प्राणत्याग केला. ही गोष्ट शिवाला कळल्यावर त्याने तिसरे नेत्र उघडले आणि प्रचंड संहार सुरू केला. सतीचे पाíथव उचलून त्याने भारत भ्रमणाला सुरुवात केली. शिवाचे हे रूप पाहून सर्वजण विष्णूला शरण गेले. विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते भारतात ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तिपीठे तयार झाली. वेगवेगळ्या पुराणांत शक्तिपीठांची संख्या वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी मनगट पडले होते, त्या ठिकाणी मणीबंध हे शक्तिपीठ तयार झाले. दुर्गादेवीच्या इथल्या रूपाला गायत्री या नावाने ओळखले जाते. गायत्री मंत्राचा जप करून या शक्तीची उपासना केली जाते. मंदिर साधेच असून गाभाऱ्यात सती, गायत्री आणि कुंडलिनीमाता अशा तीन मूर्ती आहेत.
दक्षिणेश्वर काली मंदिर (कोलकाता)
दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकात्याच्या दक्षिणेश्वर भागात असलेले एक मोठे मंदिर आहे. हुगळी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या या मंदिरामध्ये काली देवीचे प्रमुख मंदिर तसेच शंकर व इतर देवतांचीही मंदिरे आहेत. इ.स. १८५५ मध्ये बांधलेल्या या मंदिरामध्ये प्रसिद्ध भारतीय योगी रामकृष्ण परमहंस यांनी अनेक काळ पौरोहित्य आणि कालीपूजन केले होते. इथे त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले, असे म्हटले जाते. मंदिराच्या आवारात परमहंस यांच्या स्मृतींचे जतन करण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना राणी रासमणी यांनी केली. लहान वयात पतीचे निधन झालेल्या राणी रासमणी यांनी त्यांच्या यजमानांमागे जमीनदारीची जबाबदारी चांगल्या रीतीने निभावली. िहदू पुराणकथांतील उल्लेखानुसार काली म्हणजे शिवपत्नी, आदिशक्ती, पार्वतीचा एक उग्र अवतार. काली या नावाबाबत तसेच तिने शुंभ-निशुंभ, शंखचूड, दारूकासुर, महिषासुर इत्यादी दैत्यांना मारल्याबाबतच्या विविध कथा पुराणांतून आहेत. काल म्हणजे शंकर, त्याची पत्नी म्हणून काली. जन्मत: तिचा वर्ण काळा होता म्हणून काली. शंकराच्या कंठातील विषातून तिची उत्पत्ती झाली म्हणून काली. पार्वतीने स्वत:च्या शरीरापासून कोश टाकला, तो कोश म्हणजेच काली; तिलाच कौशिकी असेही म्हणतात. अशा तिच्या नावाबाबतच्या कथा आहेत. कालीतंत्रात शवारूढ, चतुर्भुज, नरमुंडमालाधारी, स्मशानवासिनी अशी तिची रूपे वर्णिली गेली आहेत.
चामुंडादेवी (कर्नाटक)
पुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज म्हैसूर शहर वसलेले आहे, त्याच जागी होती असे म्हटले जाते. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुद्धा दिवसेंदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्यांचा उन्माद चढला. त्याच्या जुलमाने संत्रस्त झालेले प्रजाजन आणि देवही जगन्मातेला शरण गेले. आपले संरक्षण करण्यासाठी त्यांनी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला. त्यानंतर भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. म्हैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असे नाव आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्वाचे स्थान अशा त्रिवेणी संगमामुळे इथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. मंदिराचे आवारात जवळपास २०-२५ फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा उभा आहे. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देवदेवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्ती त्यावर आहेत.
विदर्भातील देवीची मंदिरे
प्रवीण योगी
महाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-
आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.
अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.
श्री अंबादेवी संस्थान
अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.
श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५ मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.
श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.
श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.
श्री एकवीरा देवी, अमरावती
श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.
श्री महाकाली देवी, चंद्रपूर
कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.
या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.
इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।
त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच
कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥
भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.
त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७ मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.
चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.
श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.
गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.
श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.
हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.
या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.
गोरजाई मंदिर, वैरागड
गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.
गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.
श्री रेणुकामाता मंदिर, चिखली
चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.
पारशिवनीची महालक्ष्मी
येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-
‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती
नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’
हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.
नेरिपगळाई देवी (अमरावती)
सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे
आशीष वेदक
खोकलादेवी हे नावच थोडे विचित्र वाटते. खोकल्यासारखा एखाद्या सामान्य रोगाच्या नावावरून देवीचे नाव कसे असू शकते, हे अतक्र्य आहे. त्याहीपेक्षा अतक्र्य तर मुंबईसारख्या महानगरात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असताना विविध जातींमधील, विविध आर्थिक, सामाजिक, वैचारिक स्तरांतील लोकांचा डॉक्टरी उपायांनीही बरा न झालेला खोकला बरा करणारी देवी म्हणून खोकलादेवीवर श्रद्धा असते. ही गोष्टच खोकलादेवीबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. त्यातही खोकलादेवी इतर देवतांपेक्षा वेगळी वाटते. कारण तिची कोणत्याच प्रकारची विशिष्ट पूजापद्धती नाही, कर्मकांड नाहीत, तिला कोणत्याही प्रकारचे पशुबळी (कोंबडे, बकरे इत्यादी) दिले जात नाहीत. इतर देवतांसारखे तिचे जत्रोत्सव, सण साजरे होत नाहीत. तिचा कोणत्याही प्रकारचा भक्तसंप्रदाय नाही. फक्त पीठ आणि मीठ यावरच देवी संतुष्ट होऊन ती खोकला बरा करते ही लोकांची श्रद्धा आजही कायम आहे. एकूणच खोकलादेवीचे अस्तित्व हे लोकांची धार्मिक वृत्ती, धर्मावरील श्रद्धा या भक्कम पायावर उभे आहे, मग प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, धर्म म्हणजे तरी काय?
धर्म एक संकल्पना
धर्म हा भारतीय समाजरचनेचा अविभाज्य घटक आहे. आदिम अवस्थेतून आजच्या विकसनशील अवस्थेत धर्म या संकल्पनेचा विकास होत आला आहे, ती एक निरंतर विकास प्रक्रिया आहे. धर्माला विविध आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय पलूदेखील आहेत. मुळातच ती एक क्लिष्ट, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीजन्य, समाजाच्या सोयीसाठी, विकासासाठी श्रद्धेच्या पायावर उभी असलेली एक उत्तम व्यवस्था आहे.
भारतीय समाजात चातुर्वण्र्य व्यवस्थेनंतर निर्माण झालेल्या जातिव्यवस्थेमध्ये समाजाच्या भौतिक, दैविक, आध्यात्मिक आणि मोक्षप्राप्तीच्या गरजा, संकल्पना बदलल्या, वैदिक काळातील यज्ञहवन यांचे महत्त्व थोडे कमी झाले. ईश्वरप्राप्ती, रोगनिवृत्ती, सर्वागीण प्रगतीसाठी तसेच चतुर्विध पुरुषार्थप्राप्तीसाठी १) परापूजा २) मानसपूजा ३) मूर्तिपूजा अशा तीन पूजनपद्धती निर्माण झाल्या असाव्यात. यातील परापूजा आध्यत्मिकदृष्टय़ा प्रगत व्यक्तीला उपयुक्त तर मूर्तिपूजा सर्वसामान्य लोकांना उपयुक्त आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु वैदिक काळापासून ते आजही विविध देवतांचे महत्त्व कमी झाले नाही.
कालखंडानुसार वर्गीकरण
ढोबळ मानाने वैदिक काळापासून आजच्या काळातील देवतांचे वर्गीकरण
१) वैदिक देवता (वेदात उल्लेख असलेल्या देवता किंवा वैदिक काळातील देवता)
२) पौराणिक देवता (विविध पुराणांतील देवता)
३) लोकदेवता (वेद, पुराण यात नसलेल्या परंतु विविध जाती, जमाती, आदिवासी द्वारे पूजनीय देवता)
यात वैजनाथ, सूर्य, धन्वंतरी, आश्विनीकुमार, खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई, प्लेगम्मा इत्यादीसारख्या लोकदेवता या रोगनिवारण करणाऱ्या देवता म्हणून ओळखल्या जातात. या सर्व देवतांच्या विविध चमत्कारिक शक्ती, सामर्थ्य, रोगनिवारण क्षमता, धान्य, धन, संतती इत्यादी तसेच इतर आधिभौतिक आधिदैविक, आध्यात्मिक गोष्टी देण्याची क्षमता ही लोकांचा आणि समाजाचा त्यांच्याप्रति असलेला विश्वास आणि श्रद्धा यांवर अवलंबून आहे, असे माझे मत आहे.
मध्ययुगीन मुंबईचा इतिहास, साधारणपणे ११व्या-१२व्या शतकाच्या आसपास सुरू होतो. गेल्याच वर्षी मुंबईत तुभ्रे येथे भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर परिसरात सापडलेला शिलालेख याची पुष्टीही करतो. महिकावतीच्या बखरीतूनही काही प्रमाणात मध्ययुगीन मुंबईची माहिती कळते, त्याचबरोबर ‘मुंबईचे दर्शन’, ‘मुंबई वृत्तांत’ यांसारख्या काही पुस्तकांतून जुन्या मुंबईचे दर्शन घडते. पूर्वी मुंबईचे वातावरण दमट, काहीसे कोंदट होते, सात बेटांच्या मुंबईत तर ओहोटीच्या वेळी खूप चिखल, दलदल होत असे. त्यामुळे डासांची पदास, त्यामुळे होणारे विविध प्रकारचे साथीचे रोग तसेच दमट हवामानामुळे नेहमी सर्दी, खोकला, कफ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी आणि सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) समाजातील लोकांना, तसेच इतर जाती, धर्मातील लोकांना याचा आरोग्यविषयक त्रास नक्कीच झाला असेल.
पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईचे ब्रिटिशांनी जेव्हा विस्तार, विकासकार्य सुरू केले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय कामगारांनी तर मुंबईच्या हवामानास, भौगोलिक परिस्थितीस विविध दूषणे दिली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तर मुंबईला नरकाची उपमा दिली आहे. एकदा मुंबईत आलेला मनुष्य जिवंत आपल्या मायदेशी जाऊ शकत नाही अशी मते त्यांनी नोंदवली आहेत. या तसेच अशाच विविध विधानांवरून मुंबई कशी राहण्यास अयोग्य, रोगट हवामानाची होती हे समजते.
त्या काळात तर प्लेग, मलेरिया, देवी, पटकी इत्यादी विविध साथीचे रोग मुंबईच्या पाचवीलाच पुजले होते. दमट हवामानात सर्दी, खोकला, कफ हे सामान्य विकार मुंबईकरांना नेहमीच होत असावेत, त्यासोबतच आपल्या संस्कृतीतील जातिव्यवस्था, (अंध) श्रद्धा, बिकट आर्थिक परिस्थिती, अस्वच्छता, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, अनास्था या सर्व गोष्टी खोकलादेवी, शीतलादेवी, मरीआई आणि तत्सम रोगनिवारक देवतांच्या उगम आणि विकासास कारणीभूत झाल्या असाव्यात. (याबाबत इतर तज्ज्ञ, संशोधकांचे वेगळे मत असू शकते). मुंबईसारख्या महानगरात आजही काही समुदायांमध्ये पूजनीय असलेल्या खोकल्यासारख्या सामान्य वाटणाऱ्या रोगास बरे करणाऱ्या ‘खोकलादेवी’ या देवतेविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.
खोकलादेवी नेमकी कोण?
कोणत्याही प्रकारचा खोकला बरे करणारी देवी म्हणजे खोकलादेवी होय. साधा खोकला, ओला खोकला, डांग्या खोकला, दम्याचा खोकला हे सर्व खोकलादेवी बरी करते अशी लोकांची श्रद्धा आजही दृढ आहे. डॉक्टरी इलाजांनी बरा न झालेला खोकला, खोकलादेवी बरा करू शकते असा लोकांना आजही विश्वास वाटतो. महाराष्ट्रात तिला खोकलादेवी, दक्षिण भारतात खोकलम्मा तर गुजरात राज्यात तिला रुकडादेवी असे म्हणतात.
याचबरोबर वसई येथेदेखील खोकलादेवीचे मंदिर आहे, तर बाबुलनाथजवळ एक रुकडादेवीचे मंदिर आहे.आपण इथे मुंबईतील खोकलादेवीबद्दल जाणून घेणार आहोत.
केदारेश्वर मंदिर (वरळी ) सन १८३२ साली सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजातील श्री त्रिंबक भिवजी म्हात्रे यांनी बांधले. मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहान पण स्वतंत्र मंदिर आहे. तसेच केदारेश्वर, गणपती, हनुमान, शीतलादेवी यांचीदेखील मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीस चार हात असून देवीच्या हातात कमळ, गदा, पुस्तक असून एक हात वरद मुद्रेत आहे. येथील नित्य पूजा करणाऱ्या केळकर गुरुजींच्या मतानुसार हे देवीचे सात्त्विक रूप असून, सरस्वतीच्या रूपाशी मिळतेजुळते आहे, आणि खोकलादेवीची मूर्ती ही पुरातन आहे
नीलकंठेश्वर मंदिरातील खोकलादेवी एक देवकोष्ठात असून देवी द्विभुज आहे, तिच्या एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात अक्षमाळ (किंवा पात्र) आहे. मंदिर आवारात एक जीर्ण गधेगळ आहे. त्यावरील मजकूर संपूर्ण नष्ट झाला आहे, परंतु मंदिर पुरातन काळापासून असावे असे सिद्ध करते. मंदिराचे ट्रस्टी, उदय मंत्री यांच्यानुसार सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार सन १९११ ला केला गेला. खोकलादेवीसोबत येथे, नीलकंठेश्वर, दत्त, हनुमान, ब्रह्मा, सूर्य, राधा कृष्ण, विठ्ठल रुख्मिणी यांचीदेखील मंदिरे, मूर्ती आहेत.
प्रभादेवी मंदिर मध्ययुगीन काळातील असावे असे विविध तज्ज्ञांचं मत आहे, तसा एक शिलालेख तेथे उपलब्ध आहे, सध्याचे मंदिर कीर्तिकर फॅमिली ट्रस्टचे असून येथे प्रभादेवी, चंडिका, कालिका, लक्ष्मीनारायण, शीतलादेवी, हनुमान आणि खोकलादेवी यांची मंदिरे आहेत. येथील खोकलादेवीला चार हात असून दोन हातात कमळे, तर दोन हात अभयमुद्रेत आहेत, आणि खोकलादेवीच्या गळ्यात साधा परंतु मोठा हार आहे. येथील पुजारी जयवंत जोशी यांनी सांगितले की पूर्वी श्रावण महिन्यात शुक्ल आणि कृष्ण चतुर्दशीला दोन वेगळ्या समाजातील तेलगु भाषिक लोक (कदाचित साळी /पदमशाली समाजातील) शीतलादेवी आणि खोकलादेवीच्या दर्शनास येत, आणि देवीस जेवणाचा नवेद्य दाखवत, परंतु सध्या काही कारणास्तव ते लोक श्रावणातील कोणत्याही रविवारी, त्यांच्या सोईनुसार देवीच्या दर्शनासाठी येतात.
माटुंगा येथील सातीआसरा मनमाला देवी मंदिरात असलेलं खोकलादेवी मंदिर माधुरी साळवी यांचे पणजोबा सावंत यांनी बांधले आहे.
माहीम येथील गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या शीतलादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचे लहानसेच संगमरवरी पण घरासारखे दिसणारे मंदिर आहे, येथे शीतलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या भमिनी म्हात्रे यांनी सांगितल्याप्रमाणे आजही लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे. येथील खोकलादेवीची मूर्ती ध्यानधारणा करण्यात मग्न असल्यासारखी दिसते. (कदाचित सध्याची मूर्ती ही अलीकडच्या काळातील असावी असे वाटते) मुंबई दर्शन (१८६३) आणि मुंबई वृत्तांत (१८८९) यांसारख्या १९ व्या शतकात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मुंबईतील फक्त याच खोकलादेवीचा उल्लेख आढळतो तो असा ‘माहिमास खोकलादेवी आहे. तिची खोकला बंद करण्यावर प्रसिद्धी आहे’ यावरून येथील खोकलादेवी कदाचित मुंबईतील प्राचीन असावी.
मालाड, सोमवारी बाजार परिसरात असलेल्या पाटलादेवी मंदिरात, पाटलादेवी, खोकलादेवी आणि शीतलादेवीच्या मूर्ती आहेत, हे मंदिर पाचकळशी समाजाचे असून, सन १९११ मध्ये गणपत महंत यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिरातील देवीचे भोपे अशोक नलावडे यांनी सांगितल्याप्रमाणे मालाड परिसरातील कोळी, कुंभार तसेच गुजराती भाषक काठियावाडी लोक, तसेच सफाई काम करणाऱ्या समुदायाचे लोक खोकलादेवीच्या दर्शनास येतात. कोळी, कुंभार लोक सुंठोडा देवीच्या नावाने प्रसाद म्हणून वाटतात. तर काठियावाडी लोक देवीस फरसाण अर्पण करतात.
एरंगळ गावातील खोकलादेवी मंदिर गावाच्या वेशीवर आहे. मुख्य म्हणजे देवीस चार हात आहेत आणि देवीच्या मागील हातात शूल आणि त्रिशूळ आहे आणि दोन हात मांडीवर आहेत. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक मंदिरातील खोकलादेवीच्या मूर्ती एकमेकींपेक्षा पूर्णत वेगळ्या आहेत. तसेच खोकलादेवीस कोणताच प्राणी वाहन म्हणून दिसत नाही.
मूर्तीलक्षणशास्त्रानुसार (Iconography) कोणत्याही देवतेची बाह्य़लक्षणे, शस्त्र, वाहन, इत्यादी ही वैदिक किंवा पौराणिक काळातील ठोकताळ्यानुसार निश्चित असतात, कालपरत्वे, स्थानपरत्वे बाह्य़ सजावटीत थोडा बदल केला जाऊ शकतो, परंतु कोणत्याही देवतेच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांच्या मुख्य लक्षणात समानता राखण्यात येते. (याला काही मोजके अपवाद असूही शकतात)
परंतु खोकलादेवीच्या बाबतीत मात्र मूर्तीलक्षणशास्त्रानुसार कोणत्याच प्रकारचा विशिष्ट नियम किंवा साम्य दिसून येत नाही. तर खोकलादेवी ही कोणताही वैदिक, पौराणिक उल्लेख नसलेली परंतु विविध जाती-समुदायांत आजही (अल्पप्रमाणात) पूजनीय अशी लोकदेवता आहे. काही ठिकाणी तिला चार हात आहेत, काही ठिकाणी दोन, कधी तिच्या हातात कमळ आहे. अक्षमाळा पुस्तक, पानपात्र, गदा तर काही ठिकाणी कोणा पुरुषसमान दिसणाऱ्या मूर्तीस, किंवा मंदिराच्या स्तंभास देवत्व प्राप्त करून दिले आहे.
तरीदेखील वरील सात मंदिरांपैकी दोन मंदिरांतील खोकलादेवीच्या हातात कमळ पुष्प आहे, भारतीय संस्कृतीत कमळास उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते, त्याच बरोबर आयुर्वेदातील पुष्पौषधी या शाखेनुसार विविध प्रकारच्या फुलांचा औषध म्हणून किंवा औषधांबरोबर वापर करतात त्यात कमळपुष्पात औषध घालून रोग्यास दिले जाते. त्यामुळे खोकलादेवी आणि कमळपुष्प यांचा रोगनिवारण पद्धतीत संबंध असू शकतो का ते शोधणे महत्त्वाचे आहे.
खोकलादेवीच्या संबंधित कथा :
खोकलादवी लोकदेवता असल्यामुळे कोणत्याही महत्त्वपूर्ण वेद, पुराण, उपनिषद यात तिच्या कथा नाहीत, परंतु तरीही खोकलादेवीच्या काही मनोरंजक, तिची महती सांगणाऱ्या गोष्टी खोकलादेवीच्या काही मंदिरात मौखिक परंपरेने पिढय़ान्पिढय़ा ऐकायला मिळाल्यात त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे-
एरंगळ गावात कशी आली?
एरंगळ गावातील खोकलादेवीच्या नित्य पूजा करणाऱ्या रतन पाटील यांनी खोकलादेवी एरंगळ गावात कशी आली त्याची एक कथा सांगितली. या कथेनुसार खोकलादेवी देवी आणि तिच्या सहा बहिणी आणि भाऊ (हरबादेवी, हिरडादेवी, हिरादेवी, हिंगलादेवी, शीतलादेवी, मोतमाऊली आणि भाऊ वेताळ) बोटीने समुद्रप्रवास करत असताना त्याची बोट एरंगळजवळच्या किनाऱ्याजवळ फुटली आणि ही भावंडे एकमेकांपासून दूर झाली आणि वेगवेगळ्या गावांत पोहोचली. त्यांचा भाऊ वेताळ खांदेरी बेटावर पोहोचला आणि एक बहीण वांद्रे येथे मोतमाऊली (माऊंट मेरी) झाली, बाकी सगळ्या बहिणी एरंगळ आणि आजूबाजूच्या गावांत पोहोचल्या आणि लोकांनी त्यांची तिथेच स्थापना केली. तसेच एरंगळ गावातील रहिवासी विल्सन कोळी, दर्शन निळा यांनी यावर असे सांगितले की, आजही आश्विन नवरात्रात खोकलादेवीची बहीण हरबादेवीकडून खोकलादेवीला मानाची ओटी येते.
लोकांचे प्रश्न कसे सोडवते?
माहीम येथील शीतलादेवी मंदिरातील शीतलादेवीची नित्य पूजा करणाऱ्या भामिनी म्हात्रे यांनी, एरंगळ येथील खोकलादेवीची एक लहान गोष्ट सांगितली.
आश्विन नवरात्रमध्ये एखादी व्यक्ती कुठूनही गर्दीतून वाट काढत, परंतु जोरजोरात खोकत धावत खोकलादेवीच्या मूर्तीजवळ येते आणि उपस्थित लोकांच्या समस्या सोडवते, असे मानले जाते.
सातीआसरा मनमालादेवी मंदिराच्या देखरेख करणाऱ्या माधुरी साळवी यांनी त्याच्या आजीने त्यांना खोकलादेवीची सांगितलेली कथा सांगितली. या कथेनुसार, मनमालादेवी आणि खोकलादेवीसहित एकूण सात बहिणी आहेत (मनमालादेवी, खोकलादेवी, जरीमरी, केवडादेवी, चम्पावतीदेवी, शीतलादेवी, गावदेवी) या सर्व देवी पूर्वी मध्यरात्री मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत स्नान करत. त्याचबरोबर माधुरी स्वत नऊ-दहा वर्षांच्या असताना त्यांना खोकला झाला. तो बरा झाल्यावर त्यांच्या आईने खोकलादेवीला मीठ आणि पीठ वाहिले होते असे त्यांनी सांगितले. साळवी यांच्याशी बोलत असताना माटुंगा परिसरात राहणाऱ्या विभा आपटे यांनीदेखील खोकलादेवीच्या कृपेने खोकला बरा होऊ शकतो अशी श्रद्धा असल्याचे सांगितले.
मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी, सोमवंशी क्षत्रिय पाठारे (चौकळशी/ पाचकळशी) ज्ञातीतील लोक खोकलादेवीची विशेषत पूजा करताना आढळतात. वरीलपैकी चार मंदिरांची मालकी सोमवंशी क्षत्रिय पाठारे, (चौकळशी/ पाचकळशी) पाठारे प्रभू समाजातील कुटुंब किंवा ट्रस्टची आहे, तर उरलेली तीन मंदिरे प्रत्येकी गौड सारस्वत ब्राह्मण, ९६ कुळी मराठा, तसेच शेषवंशी भंडारी समाजाच्या खासगी किंवा ज्ञातीच्या ट्रस्टच्या मालकीची आहेत. परंतु असे असूनही विविध जातीतील आणि विविध भाषा बोलणाऱ्या लोकांची खोकलादेवीवर श्रद्धा आहे, असे दिसून येते. या भाविकांमध्ये ब्राह्मण, मराठा, चौकळशी, पाचकळशी, कोळी, भंडारी, कुंभार, इत्यादी मराठी भाषक लोक, तेलगू भाषक पद्मशाली (साळी) समाजातील लोक, त्याचबरोबर गुजराती भाषक कुंभार, कठियावाडी सफाई काम करणारे अशा वेगवेगळ्या जातींतील लोकांचा समावेश आहे. हे लोक खोकलादेवीची पूजा करतात.
(वरील सर्व निरीक्षणे काही लोकांच्या प्रत्यक्ष भेटी आणि मुलाखती दरम्यानची आहेत)
खोकलादेवीला पीठ-मीठ!
लोक खोकलादेवीला पीठ आणि मीठ वाहतात. त्यापैकी पीठ हे तांदूळ, गहू, ज्वारी, किंवा बाजरी यापैकी कशाचेही असू शकते, त्यासोबत साधं मीठ अर्पण करतात. त्याशिवाय लोक श्रद्धेने देवीची खणानारळाने ओटी भरतात. इतर वस्तू अर्पणही करतात, देवीमुळे खोकला बरा झाला अशी श्रद्धा असते, तेव्हा मात्र फक्त पीठ आणि मीठच वाहतात. त्याशिवाय काही ठिकाणी (कोळी, कुंभार समाजातील लोक) सुंठोडा (सुंठ + साखर/गूळ) देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो.
परंतु इतर गुजराती भाषक लोक, खोकलादेवीला फरसाण, शेव, गाठिया, चणे, गुळ वाहतात. तसेच ज्यामुळे खोकला होऊ शकतो असे विविध प्रकारचे तेलकट पदार्थ देवीला वाहतात. त्यामागे त्यांची अशी श्रद्धा आहे की खोकला होणारे पदार्थ अर्पण केल्याने देवी खोकला दूर करते, तर तेलगू भाषक लोक तिला जेवणाचा नवेद्य दाखवतात. परंतु पीठ आणि मीठ देवीला अर्पण करण्याचा सर्वत्र प्रघात आहे. यातील सुंठवडा हा तर खोकला बरा व्हावा म्हणून केला जाणारा सामान्य, सर्वज्ञात आयुर्वेदिक उपचार आहे तर पीठ आणि मीठ यातील मीठ तर घसा खवखवत असेल तर गुळण्या करण्यासाठी वापरले जाते.
लोकांच्या श्रद्धेनुसार अर्पण करण्यात आलेले पीठ आणि मीठ रुग्णाचा खोकला सोबतच घेऊन जाते, त्यामुळे काही मंदिरातील पुजारी ते पीठ आणि मीठ समुद्रात किंवा खाडीत विसर्जति करत असत, परंतु आजकाल काही मंदिरातील पुजारी लोक ते पीठ आणि मीठ गरजू गरीब लोकांना देतात.
व्यवसाय आणि खोकलादेवी
आज समाजात वैद्यकीय प्रगती झाली आहे. त्याचबरोबर खोकला हा तसा सामान्य रोगप्रकार वाटत असल्यामुळेच कदाचित खोकलादेवीच्या भक्तांची संख्या घटली असेल, त्यामुळेच लोक खोकलादेवीला अल्प प्रमाणात पुजत असतील. तरीसुद्धा खोकलादेवीचा आणि काही जातींच्या परंपरागत व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचे साधन, कामाची ठिकाणे यात नक्कीच विशेष संबंध आहे. कोळी बांधव नेहमीच मासेमारीसाठी समुद्राच्या, खाडीच्या जवळपास वस्ती करून राहतात. त्यामुळे समुद्राच्या खारट, दमट हवामानामुळे त्यांना सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त. त्याचबरोबर कुंभार समाजातील लोक तसेच साळी (विणकर) लोकांचा माती आणि सुताच्या सूक्ष्म कण किंवा धाग्यांशी नेहमीच संबंध येतो. त्याचबरोबर सफाई कामगारांचा नेहमी कचरा आणि धूळ यांच्याशी संपर्क येतोच. त्यामुळे खोकला, दमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र त्याची पुष्टीही करते.
खोकल्याद्वारे पसरणारे इतर रोग कोणते ते पाहू या. यात देवी, (मोठय़ा बाया) गालगुंड, गोवर, इन्फ्लुएन्झा- बी, डांग्या खोकला हे काही रोग साध्या खोकल्यामुळे पसरू शकतात असे आजचे वैद्यकीयशास्त्र म्हणते. त्यामुळेदेखील लोकांच्या दृष्टीने खोकलादेवी महत्वाची ठरते.
खोकलादेवीचे भविष्य
एकूणच मुंबईतील सध्या अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिरांना फार तर ३००-३५० वर्षांचा इतिहास असेल. खोकलादेवीच्या मूर्ती या मूर्तिविज्ञानशास्त्राप्रमाणे प्राचीन नसतीलही, तसेच आजच्या वैद्यकीयदृष्टय़ा विकसित समाजात खोकलादेवीसारखी देवी केवळ लोकांची श्रद्धा आणि मौखिक इतिहासाद्वारेच येणाऱ्या पिढय़ांना ज्ञात आहे. उद्या कदाचित तिचा धार्मिक, सामाजिक संदर्भदेखील बदलू शकतो, तसेच इतर काही देवतांसारखी ती विस्मृतीतदेखील जाईल. तरीदेखील मुंबईसारख्या महानगरात, मुंबईच्या जडणघडणीत खोकलादेवीचे स्थान आणि अजूनही अल्प प्रमाणात का असेना, तिचे लोकांच्या स्मृतीत असलेले अस्तित्व हे मुंबईच्या भूतकाळाचे आणि इतिहासाचे, धार्मिक जीवनाचे, सामाजिक रचनेचे यथार्थ दर्शन घडवते. त्यामुळेच खोकलादेवी मुंबईसाठी महत्त्वाची ठरते. अजून एक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, सात बेटांच्या मुंबईत (पूर्वीच्या) फक्त माहीम आणि वरळी बेटांवर खोकलादेवीची पाच मंदिरे आहेत. आणि हे दोनही विभाग पूर्वीच्या गिरणगावालगतचेच आहेत. त्यामुळे पूर्वीच्या कापड गिरण्या, मिल कामगार, त्यांच्या श्रद्धा, समजुती आणि खोकलादेवी यांचा काही संबंध आहे का, यावर संशोधन सुरू आहे. दरम्यान, खोकलादेवीच्या या शोधादरम्यान असे लक्षात आले की काही ठिकाणी मंदिराचा स्तंभ तर काही ठिकाणी बुद्धप्रतिमेची पूजादेखील खोकलादेवी म्हणून केली जाते.
Mahashivratri 2024: उत्तराखंड के इस मंदिर में हुआ था शिव-पार्वती का विवाह, जानिए कहां है भोले का ससुराल
आज महाशिवरात्रि है। शिवभक्त आज के दिन भगवान शिव और पार्वती जी की पूजा अर्चना करते हैं। मान्यता है कि आज के दिन ही शिव पार्वती का विवाह हुआ था। पौराणिक मान्यता के अनुसार शिव पार्वती का विवाह स्थल उत्तराखंड के रुद्रप्रयाग जिले में त्रिजुगीनारायण (त्रियुगीनारायण) मंदिर है। जहां लोग दर्शन करने के साथ ही अपने शादीशुदा जिदंंगी की सुख शांति की कामना के लिए जरुर पहुंचते हैं।

ये मंदिर अब वेडिंग डेस्टिनेशन के रूप में भी फेमस हो गया है। भगवान विष्णु को समर्पित होने के बावजूद मंदिर शिव पार्वती के विवाह और वेडिंग डेस्टिनेशन के रूप में प्रसिद्ध है।त्रियुगीनारायण मंदिर उत्तराखंड के रुद्रप्रयाग जिले में है।
धार्मिक मान्यता है कि भगवान शिव ने हिमालय के मंदाकिनी क्षेत्र के त्रियुगीनारायण में माता पार्वती से विवाह किया था। यह मंदिर भगवान विष्णु और देवी लक्ष्मी का है। यहां जलने वाली अग्नि की ज्योति, जो त्रेतायुग से अब तक निरंतर जल रही है। पौराणिक मान्यता है कि इस हवन कुंड की अग्नि को साक्षी मान कर भगवान शिव ने माता पार्वती से विवाह किया था।
हिंदू पौराणिक कथाओं के अनुसार, माता पार्वती, पर्वतराज हिमावन की पुत्री थी। पार्वती के रूप में मां सती का पुनर्जन्म हुआ था। अपने इस जन्म में माता पार्वती ने कठिन ध्यान और साधना से भगवान शिव का वरण किया था। जिस स्थान पर मां पार्वती ने शिव जी को पाने के लिए कठोर साधना की, उस स्थान को गौरी कुंड कहते हैं। बताते हैं कि भगवान शिव जी ने गुप्त काशी में माता पार्वती के सामने विवाह का प्रस्ताव रखा था।
भगवान विष्णु ने पार्वती के भाई की भूमिका निभाई थी। जबकि ब्रह्माजी पुरोहित बने थे। मंदिर की संरचना बिल्कुल केदारनाथ मंदिर के समान ही है। तीन युगों से इस अग्नि का अस्तित्व है, यही कारण है कि मंदिर त्रियुगीनारायण कहलाता है।
त्रियुगीनारायण मंदिर को उत्तराखंड सरकार ने साल 2018 में वेडिंग डेस्टिनेशन के रूप में शुरूआत की। जिसके बाद यहां देश विदेश सेकई हस्तियां शादी करने पहुंच चुकी हैं। मंदिर में शादी कराने के लिए रजिस्ट्रेशन करवाना जरूरी होता है। जिसकी फीस निर्धारित है। इसके साथ ही विजयादशमी और महाशिवरात्रि पर यहां सबसे ज्यादा भक्त पहुंचते हैं।
Her importance grows in the later Vedas composed after the Rigveda as well as in the later Brahmana texts, and the word evolves in its meaning from "waters that purify", to "that which purifies", to "vach (speech) that purifies", to "knowledge that purifies", and ultimately into a spiritual concept of a goddess that embodies knowledge, arts, music, melody, muse, language, rhetoric, eloquence, creative work and anything whose flow purifies the essence and self of a person.[19][20]
Names and epithets
Sarasvati (Sanskrit: Sarasvatī) is known by many names. Some examples of synonyms for Sarasvati include Sharada (bestower of essence or knowledge),[1] Brahmani (power of Brahma), Brahmi (goddess of sciences),[21] Bharadi (goddess of history), Vani and Vachi (both referring to the flow of music/song, melodious speech, eloquent speaking respectively), Varnesvari (goddess of letters), Kavijihvagravasini (one who dwells on the tongue of poets).[22][1]
Other names include: Ambika, Bharati, Chandrika, Devi, Gomati, Hamsasana, Saudamini, Shvetambara, Subhadra, Vaishnavi, Vasudha, Vidya, Vidyarupa, and Vindhyavasini.[23]
In the Tiruvalluva Maalai, a collection of fifty-five Tamil verses praising the Kural literature and its author Valluvar, she is referred to as Nāmagal and is believed to have composed the second verse.[24][25]
Outside Nepal and India, she is known in Burmese as Thurathadi (သူရဿတီ, pronounced [θùja̰ðədì] or [θùɹa̰ðədì]) or Tipitaka Medaw (တိပိဋကမယ်တော်, pronounced [tḭpḭtəka̰ mɛ̀dɔ̀]), in Chinese as Biàncáitiān (辯才天), in Japanese as Benzaiten (弁才天/弁財天) and in Thai as Suratsawadi (สุรัสวดี) or Saratsawadi (สรัสวดี).[26]
Literature
In Hinduism, Sarasvati has retained her significance as an important goddess, from the Vedic age up to the present day.[27] She is praised in the Vedas as a water goddess of purification, while in the Dharmashastras, Sarasvati is invoked to remind the reader to meditate on virtue, and on the meaning (artha) of one's actions (karma).
In Vedic literature
Rigveda
Sarasvati first appears in the Rigveda, the most ancient source of the Vedic religion. Sarawsati holds significant religious and symbolic value in the Rigveda, as a deified entity embodying attributes of abundance and power. Primarily linked with the celestial domain of Waters (Apas) and the formidable Storm Gods (Maruts), this deity forms an integral triadic association alongside the sacrificial goddesses Ila and Bharati within the pantheon.[28]
Sarasvati is described as a loud and powerful flood who roars like a bull and cannot be controlled.[29] According to Witzel, she was associated with the Milky Way, indicating that she was seen as descending from heaven to earth.[30]
The goddess is mentioned in many Rigvedic hymns, and has three hymns dedicated to her (6:61 exclusively, and 7:95-96 which she shares with her male counterpart, Sarasvant).[28] In Rigveda 2.41.16 she is called: "Best of mothers, the best of rivers, best of goddesses".[31]
As part of the Apas (water deities), Sarasvati is associated with wealth, abundance, health, purity and healing.[32] In Book 10 (10.17) of the Rigveda, Sarasvati is celebrated as a deity of healing and purifying water.[33] In the Atharva Veda, her role as a healer and giver of life is also emphasized.[34] In various sources, including the Yajur Veda, she is described as having healed Indra after he drank too much Soma.[35]
Sarasvati also governs dhī (Rigveda 1:3:12c.).[36] Dhī is the inspired thought (especially that of the rishis), it is intuition or intelligence – especially that associated with poetry and religion. Sarasvati is seen as a deity that can grant dhī (Rigveda 6:49:7c.) if prayed to.[28] Since speech requires inspired thought, she is also inextricably linked with speech and with the goddess of speech, Vāc, as well as with cows and motherhood.[37] Vedic seers compare her to a cow and a mother, and saw themselves as children sucking the milk of dhī from her.[38] In Book 10 of the Rigveda, she is declared to be the "possessor of knowledge".[39] In later sources, like the Yajur Veda, Sarasvati is directly identified with Vāc, becoming a deity called Sarasvatī-Vāc.[40]
In the Brahmanas, Sarasvati-Vac's role expands, becoming clearly identified with knowledge (which is what is communicated through speech) and as such, she is "the mother of the Vedas" as well as the Vedas themselves.[41] The Shatapatha Brahmana states that "as all waters meet in the ocean...so all sciences (vidya) unite (ekayanam) in Vāc" (14:5:4:11).[42] The Shatapatha Brahmana also presents Vāc as a secondary creator deity, having been the first deity created by the creator god Prajapati. She is the very instrument by which he created the world, flowing forth from him "like a continuous stream of water" according to the scripture.[42] This is the basis for the Puranic stories about the relationship between Brahma (identified with Prajapati) and Sarasvati (identified with Vāc).[43]
In other Rigvedic passages, Sarasvati is praised as a mighty and unconquerable protector deity. She is offered praises and compared to a sheltering tree in Rigveda 7.95.5, while in 6:49:7 cd she is said to provide "protection which is difficult to assail."[44][45] In some passages she even takes a fiercesome appearance and is called a "slayer of strangers" who is called on to "guard her devotees against slander".[46] Her association with the combative storm gods called Maruts is related to her fierce fighting aspect and they are said to be her companions (at Rigveda 7:96:2c.).[47]
Like Indra, Sarasvati is also called a slayer of Vritra, the snake like demon of drought who blocks rivers and as such is associated with destruction of enemies and removal of obstacles.[48] The Yajur Veda sees her as being both the mother of Indra (having granted him rebirth through healing) and also as his consort.[49]
The Yajur Veda also contains a popular alternative version of the Gayatri Mantra focused on Sarasvati:[50][51]
Om. May we know Sarasvati. May we meditate on the daughter of Brahma. May the Goddess illuminate us.
In Book 2 of Taittiriya Brahmana, Sarasvati is called "the mother of eloquent speech and melodious music".[22]
Epic literature
In the Hindu epic Mahabharata, "Sarasvati appears above all as a sacred river, along which pilgrimages are made. She is also represented as goddess of speech and knowledge."[52] She is called "the best of rivers and greatest of streams", and with calm and tranquil waters, in contrast to the mighty torrential Vedic Sarasvati.[52] Her banks are filled with priests and sages (rishis) who practice asceticism and sacrifices on her banks.[53] There are numerous depictions of people making pilgrimages to the river to perform sacrifices and bathe in her waters and she often appears in her human form to great seers like Vasishtha.[54]
The Mahabharata also commonly presents her as a goddess of knowledge in her own right and sees Vac as merely a feature of hers.[55] She is called the mother of the Vedas in the Shanti Parva Book of the epic.[19] Her beauty is also widely commented on by numerous passages and in one passage, the goddess herself states that her knowledge and her beauty arise from gifts made in the sacrifice.[56] The Mahabharata also describes her as the daughter of the creator god Brahma.[57] Later she is described as the celestial creative symphony who appeared when Brahma created the universe.[19]
In the epic Ramayana, when the rakshasa brothers Ravana, Vibhishana and Kumbhakarna, performed a penance in order to propitiate Brahma, the creator deity offered each a boon. The devas pleaded with Brahma to not grant Kumbhakarna his boon. Brahma called upon his consort Sarasvati, and instructed her to utter that which the devas desired. She acquiesced, and when the rakshasa spoke to invoke his boon, she entered his mouth, causing him to say, "To sleep for innumerable years, O Lord of Lords, this is my desire!". She then left his form, causing him to reflect upon his misfortune.[58]
Puranic literature
Sarasvati remains an important figure in the later medieval Puranic literature, where she appears in various myths and stories. Many Puranas relate the myth of her creation by the creator god Brahma and then describe how she became his consort. Sources which describe this myth include Markandeya Purana, Matsya Purana (which contains the most extensive account), Vayu Purana and Brahmanda Purana.[59] Other Puranas give her slightly different roles and see her as the consort of other gods, such as Vishnu. In various Puranas, rites for her worship are given, and she is mainly worshiped for her command over speech, knowledge, and music.[60]
Puranas like the Matsya also contain iconographic descriptions of Sarasvati, which provide the basis for her classic four armed form holding a book (representing the Vedas), mala, veena, and a water pot while being mounted on a swan (hamsa).[61]
Association with Brahma
According to the Matsya Purana, Brahma generated Sarasvati, here also called by other names like Shatarupa, Savitri, Gayatri and Brahmani, out of himself for the purpose of creation.[62]
The Matsya Purana then describes how Brahma begins to desire her intensely and cannot stop looking at her. Noticing his amorous glances, she begins circumambulating him. Not wishing to keep turning his face to see her, Brahma produced faces on the sides and back of his head. Sarasvati then leapt into the sky and a fifth face emerged from Brahma, looking upwards. Unable to escape, Sarasvati marries him and they make love for one hundred years.[63][64] Brahma felt shame and due to his incestuous act, the god loses his ascetic power (tapas) and his sons are left to create the world.[65]
The birth of Sarasvati from the mind of Brahma is also described in the Brahmanda Purana (chapter 43). Sarasvati is tasked to reside on tip of the tongue of all beings, a river on the earth and as a part of Brahma.[64]
In the Bhagavata Purana
A legend in the Bhagavata Purana describes Sarasvati as originally being one of the three wives of Vishnu, along with Lakshmi and Ganga. In the midst of a conversation, Sarasvati observed that Ganga playfully kept glancing at Vishnu, behind Lakshmi and her back. Frustrated, Sarasvati launched a furious tirade against Ganga, accusing her of stealing Vishnu's love away from her. When Ganga appealed to her husband to help her, he opted to remain neutral, not wishing to participate in a quarrel between his three wives, whom he loved equally. When Lakshmi attempted to soothe Sarasvati's anger by reasoning with her, the jealous goddess grew angry with her as well, accusing her of disloyalty towards her. She cursed Lakshmi to be born as the Tulasi plant upon the earth. Ganga, now enraged that Lakshmi had been cursed because she had defended her, cursed Sarasvati that she would be incarnated as a river on earth. Sarasvati issued the same curse against Ganga, informing her that sinful men would cleanse themselves of their sins with her water. As a result, Vishnu proclaimed that one part of Sarasvati would remain with him, that another would exist as a river on earth, and that another would later become the spouse of Brahma.[66][67]
Puranic Narratives of Sarasvati’s River Aspect
In the Rigveda, Sarasvati is primarily depicted as a river goddess, embodying fertility and purity, and is revered as the personification of the Sarasvati River. Her role as the nurturing, life-giving force of the river is celebrated in hymns, where she is described as "the best of mothers, of rivers, and of goddesses."[68] A Rigvedic prayer also describes her as 'the best of mothers, of rivers and of goddesses'.[68] However, as Sarasvati’s association with knowledge, speech, and culture grew in prominence through the later Hindu texts, her direct connection with the physical river diminished. Despite this, the Puranas sustain Sarasvati's riverine character by incorporating new narratives that preserve her role as a cosmic river in addition to her expanded identity.[1]
The story of Sarasvati becoming a river is introduced in the Srishti Khanda of Padma Purana as well as in Skanda Purana. In the Skanda Purana, after the events of the Tarakamaya War, the devas deposited their arsenal of weapons at the hermitage of Dadhichi. When they sought the return of these weapons, the sage informed them that he had imbibed all of their power with his penance, and offered his own bones instead, which could serve as the source of new weapons. Despite the objections of the deities, the sage sacrificed himself, and his bones were employed in the manufacture of new arms by Vishvakarma. The sage's son, Pippalada, upon hearing these events, sought to wreak his vengeance on the devas by performing a penance. A mare emerged from his right thigh, which in turn gave birth to a fiery man, Vadava, who threatened to be the doom of all of creation. Vishnu convinced Vadava that his best course of action would be to swallow the devas one by one, and that he should begin by consuming the primordial water of creation, which was the foremost of both the devas and the asuras. Vadava wished to be accompanied to the source of these waters by a virgin, and so Sarasvati was dispatched for his purpose, despite her reluctance. She took him to Varuna, the god of the ocean, who then consumed the being. For good measure, Sarasvati transformed into a divine river, flowing with five channels into the sea, making the waters sacred.[69]
In the Padma Purana, it is stated that there was a terrible battle between the Bhargavas (a group of Brahmanas) and the Hehayas (a group of Kshatriyas). From this, an all-consuming fire called Vadavagni was born, which threatened to destroy the whole world. In some versions, a sage named Auva created it. Indra, Vishnu, and the devas visited Sarasvati, requesting her to deposit the fire in the western ocean, in order to protect the universe.[70][71] Sarasvati told Vishnu that she would only agree to assist them if her consort, Brahma, told her to do so. Brahma ordered her to deposit the Vadavagni in the western ocean. Sarasvati agreed, and accompanied by Ganga, she left Brahmaloka, and arrived at Sage Uttanka's ashrama. There, she met Shiva, who had decided to carry Ganga. He gave the Vadavagni in a pot to Sarasvati, and told her to originate from the plaksha tree. Sarasvati merged with the tree, and transformed into a river. From there, she flowed towards Pushkara. Sarasvati continued her journey towards the ocean, and stopped once at Pushkarini, where she redeemed humans from their sins. At last, she reached the end of her journey, and immersed the fire into the ocean.[72][73]
Shakta texts
Sarasvati is a key figure in the Indian goddess centered traditions which are today known as Shaktism. Sarasvati appears in the Puranic Devi Mahatmya (Glory of the Goddess), a central text for Shaktism which was appended to the Markandeya Purana during the 6th century CE.[74] In this text, she is part of the "triple goddess" (Tridevi) along with Mahakali, and Mahalakshmi.[9] In Shaktism, this trinity (the Shakta response to the male trimurti of the other Hindu sects) is a manifestation of Mahadevi, the supreme goddess (and the highest deity out of which all deities, male or female, are born), which is also known by other names like Adi Parashakti ("Primordial Supreme Power").[75][76]
According to the Devi Mahatmya, this supreme goddess is the primordial creator which is supreme formless (nirguna) consciousness (i.e. parabrahman, absolute reality) and the tridevi are her main saguna ("with form", manifest, incarnated) emanations.[77] MahaSarasvati is said to be creative and active principle (which is Rajasic, energetic and active), while Mahalakshmi is the sustainer (sattvic, "goodness") and Mahakali is the destroyer (tamasic, "darkness").[77]
In other influential Shakta texts, such as the Devi Bhagavata Purana and the Devi Upanishad, Sarasvati (along with all Hindu goddesses) is also said to be a manifestation of the supreme Mahadevi.[8]
In Tantric Shakta sources, Sarasvati takes many forms. A key tantric form is Matangi, a deity considered to be the "Tantric Sarasvati". Mātaṅgī retains many attributes of Sarasvati, like music and learning, but is also associated with defeating enemies, disease, pollution/impurity, and outcasts (chandalas).[78] She is often offered half eaten or leftover food and is green in color. Matangi is also part of the Shakta set of goddesses known as the ten Mahavidyas.
Matangi is important in Shri Vidya Shaktism, where she is also known as the dark blue Shyamala ("dark in complexion") and is a manifestation of Lalita Tripurasundari's Jñana Shakti (wisdom power), having arisen out of Lalita's sugarcane bow.[79] She is celebrated in the holiday Syamala Navaratri and is seen as Lalita's prime minister. There are various chants and odes (stotras) to this deity, perhaps the most important being the Śrī Śyāmalā Daṇḍakam by the great Indian Sanskrit poet Kalidasa.[80][81]
Symbolism and iconography
The goddess Sarasvati is often depicted as a beautiful woman dressed in pure white, often seated on a white lotus, which symbolizes light, knowledge and truth.[82] She not only embodies knowledge but also the experience of the highest reality. Her iconography is typically in white themes from dress to flowers to swan – the colour symbolizing Sattwa Guna or purity, discrimination for true knowledge, insight and wisdom.[1][83]
Her dhyana mantra describes her to be as white as the moon, clad in a white dress, bedecked in white ornaments, radiating with beauty, holding a book and a pen in her hands (the book represents knowledge).[84]
She is generally shown to have four arms, but sometimes just two. When shown with four hands, those hands symbolically mirror her husband Brahma's four heads, representing manas (mind, sense), buddhi (intellect, reasoning), citta (imagination, creativity), and ahamkāra (self consciousness, ego).[85][86] Brahma represents the abstract, while she represents action and reality.
- The variations in iconography of Sarasvati with various musical instruments
-
-
-
-
-
-
The four hands hold items with symbolic meaning – a pustaka (book or script), a mālā (rosary, garland), a water pot and a musical instrument (vīnā).[1] The book she holds symbolizes the Vedas representing the universal, divine, eternal, and true knowledge as well as all forms of learning. A mālā of crystals, representing the power of meditation, inner reflection, and spirituality. A pot of water represents the purifying power to separate right from wrong, the clean from the unclean, and essence from the inessential. In some texts, the pot of water is symbolism for soma – the drink that liberates and leads to knowledge.[1] The most famous feature on Sarasvati is a musical instrument called a veena, represents all creative arts and sciences,[85] and her holding it symbolizes expressing knowledge that creates harmony.[1][87] Sarasvati is also associated with anurāga, the love for and rhythm of music, which represents all emotions and feelings expressed in speech or music.
A hamsa – either a swan or a goose – is often shown near her feet. In Hindu mythology, the hamsa is a sacred bird, which if offered a mixture of milk and water, is said to have a unique ability to separate and drink the milk alone, and leave the water behind. This characteristic of the bird serves as a metaphor for the pursuit of wisdom amidst the complexities of life, the ability to discriminate between good and evil, truth from untruth, essence from the outward show, and the eternal from the evanescent.[85] Due to her association with the swan, Sarasvati is also referred to as Hamsavāhini, which means "she who has a hamsa as her vehicle". The swan is also a symbolism for spiritual perfection, transcendence and moksha.[83][88]
Sometimes a citramekhala (also called mayura, peacock) is shown beside the goddess. The peacock symbolizes colorful splendor, the celebration of dance, and – as the devourer of snakes – the alchemical ability to transmute the serpent poison of self into the radiant plumage of enlightenment.[89]
Forms and avatars
Many different avatars and forms of Sarasvati have been attested in scriptures.
She is venerated as MahaSarasvati in the Kashmir Shakti Peetha, as Vidhya Sarasvati in Basara and Vargal, and as Sharadamba in Sringeri. In some regions, she is known by her twin identities, Savitri and Gayatri.
In Shaktism, she takes her Matrika (mother goddess) avatar as Brahmani. Sarasvati is not just the goddess of knowledge and wisdom, but also the Brahmavidya herself, the goddess of the wisdom of ultimate truth. Her Mahavidya form is Matangi.
- Vidhya, she is the formless concept of wisdom and knowledge in all of its aspects.
- Gayatri, she is the personification of the Vedas
- Savitri, She is the personification of purity, the consort of Brahma
Maha Sarasvati
In some regions of India, such as Vindhya, Odisha, West Bengal and Assam, as well as east Nepal, Sarasvati is part of the Devi Mahatmya Shakta mythology, in the Tridevi of Mahakali, Mahalakshmi and MahaSarasvati.[9][90] This is one of many different Hindu legends that attempt to explain how the Hindu trimurti of gods (Brahma, Vishnu and Shiva) and goddesses (Sarasvati, Lakshmi and Parvati) came into being. Various Purana texts offer alternate legends for Maha Sarasvati.[91]
Maha Sarasvati is depicted as eight-armed and is often portrayed holding a Veena whilst sitting on a white lotus flower.
Her meditation verse given at the beginning of the fifth chapter the Devi Mahatmya is:
Wielding in her lotus-hands the bell, trident, ploughshare, conch, pestle, discus, bow, and arrow, her lustre is like that of a moon shining in the autumn sky. She is born from the body of Gauri and is the sustaining base of the three worlds. That MahaSarasvati I worship here who destroyed Sumbha and other asuras.[92]
MahaSarasvati is also part of another legend, the Navshaktis (not to be confused with Navdurgas), or nine forms of Shakti, namely Brahmi, Vaishnavi, Maheshwari, Kaumari, Varahi, Narsimhi, Aindri, Shivdooti, and Chamunda, revered as powerful and dangerous goddesses in eastern India. They have special significance on Navaratri in these regions. All of these are seen ultimately as aspects of a single great Hindu goddess, Durga, with Maha Sarasvati as one of those nine.[93]
Mahavidya Nila Sarasvati
In Tibet and parts of India, NilaSarasvati is sometimes considered as a form of Mahavidya Tara. Nila Sarasvati is not much a different deity from traditional Sarasvati, who subsumes her knowledge and creative energy in tantric literature. Though the traditional form of Sarasvati is of calm, compassionate, and peaceful one: Nila Sarasvati is the ugra (angry, violent, destructive) manifestation in one school of Hinduism, while the more common Sarasvati is the saumya (calm, compassionate, productive) manifestation found in most others. In tantric literature of the former, NilaSarasvati has 100 names. There are separate dhyana shlokas and mantras for her worship in Tantrasara.[27] She is worshipped in parts of India as an incarnate or incarnation of Goddess Tara but mostly outside India. She is not only worshipped but also been manifested as a form of Goddess Sarasvati.[clarification needed][citation needed]
Sharada avatar in Kashmir
The earliest known shrine dedicated to goddess worship in Kashmir is Sharada Peeth (6th–12th centuries CE), dedicated to the goddess Sharada. It is a ruined Hindu temple and ancient centre of learning located in present-day Azad Kashmir. The goddess Sharada worshipped in Sharada Peeth is a tripartite embodiment of the goddess Shakti: Sharada (goddess of learning), Sarasvati (goddess of knowledge), and Vagdevi (goddess of speech, which articulates power).[94] Kashmiri Pandits believe the shrine to be the abode of the goddess.[12] In line with the Kashmiri Pandit belief that springs which are the abode of goddesses should not be looked at directly, the shrine contains a stone slab concealing the spring underneath, which they believe to be the spring in which the goddess Sharada revealed herself to the rishi Shandilya. It advanced the importance of knowledge and education in Kashmiri Pandit culture, which persisted well after Kashmiri Pandits became a minority group in Kashmir.[95]
As one of the Maha Shakti Peethas, Hindus believe that it represents the spiritual location of the goddess Sati's fallen right hand. Sharada Peeth is one of the three holiest sites of pilgrimage for Kashmiri Pandits, alongside the Martand Sun Temple and the Amarnath Temple.
Worship
Temples
Saraswati temple at Pilani in North Indian style (above), and South Indian style (below). Her temples, like her iconography, often resonate in white themes.
There are many Hindu temples dedicated to Sarasvati around the world. Some notable temples include the Gnana Sarasvati Temple in Basar on the banks of the River Godavari, the Wargal Sarasvati and Shri Sarasvati Kshetramu temples in Medak, Telangana. In Karnataka, one of many Sarasvati/Sharada pilgrimage spots is Shringeri Sharadamba Temple. In Ernakulam district of Kerala, there is a famous Sarasvati temple in North Paravur, namely, Dakshina Mookambika Temple North Paravur. In Tamil Nadu, Koothanur hosts a Sarasvati temple. In her identity as Brahmani, additional Sarasvati temples can be found throughout Gujarat, Himachal Pradesh, Rajasthan, and Uttar Pradesh. Jnaneshwari Peeth in Karki village of coastal Karnataka also houses a temple dedicated to Sarasvati, where she is known as Jnaneshwari.[citation needed]
Festivals and pujas
One of the most famous festivals associated with Goddess Sarasvati is the Hindu festival of Vasant Panchami. Celebrated on the 5th day in the Hindu calendar month of Magha, it is also known as Sarasvati Puja and Sarasvati Jayanti in India.
In south India
In Kerala and Tamil Nadu, the last three days of the Navaratri festival, i.e., Ashtami, Navami, and Dashami, are celebrated as Sarasvati Puja.[96]
The celebrations start with the Puja Vypu (Placing for Worship). It consists of placing the books for puja on the Ashtami day. It may be in one's own house, in the local nursery school run by traditional teachers, or in the local temple. The books are taken out for reading, after worship, only on the morning of the third day (Vijaya Dashami). It is called Puja Eduppu (Taking [from] Puja). On the Vijaya Dashami day, Kerala and Tamil Nadu celebrate the Eḻuthiniruthu or "Initiation of writing" for children, before they are admitted to nursery schools. This is also called Vidyarambham. The child is often ritually taught to write for the first time on rice spread in a plate with their index finger, guided by an elder of the family, or by a teacher.[97]
In east and northeast India
In Assam, Odisha, West Bengal and Tripura, Goddess Sarasvati is worshipped on Vasant Panchami, a Hindu festival celebrated every year on the 5th day in the Hindu calendar month of Magha (about February). Hindus celebrate this festival in temples, homes and educational institutes alike.[98][99]
In north, west, and central India
In Bihar and Jharkhand, Vasant Panchami is commonly known as Sarasvati Puja. On this day, Goddess Sarasvati is worshipped in schools, colleges, educational institutes as well as in institutes associated with music and dance. Cultural programmes are also organised in schools and institutes on this day. People especially students worship Goddess Sarasvati also in pandals (a tent made up of colourful clothes, decorated with lights and other decorative items). In these states, on the occasion of Sarasvati Puja, Goddess Sarasvati is worshipped in the form of idol, made up of soil. On Sarasvati Puja, the idol is worshipped by people and prasad is distributed among the devotees after puja. Prasad mainly consists of boondi (motichoor), pieces of carrot, peas and Indian plum (ber). On the next day or any day depending on religious condition, the idol is immersed in a pond (known as Murti Visarjan or Pratima Visarjan) after performing a Havana (immolation), with full joy and fun, playing with abir and gulal. After Pratima Visarjan, members involved in the organisation of puja ceremony eat khichdi together.[citation needed]
In Goa, Sarasvati Puja starts with Sarasvati Avahan on Maha Saptami and ends on Vijayadashami with Sarasvati Udasan or Visarjan.[100]
In 2018, the Haryana government launched and sponsored the annual National Sarasvati Mahotsav in its state named after Sarasvati.[101]
In Indonesia
Watugunung, the last day of the pawukon calendar, is devoted to Sarasvati, goddess of learning. Although it is devoted to books, reading is not allowed. The fourth day of the year is called Pagerwesi, meaning "iron fence". It commemorates a battle between good and evil.[102]
Sarasvati is an important goddess in Balinese Hinduism. She shares the same attributes and iconography as Sarasvati in Hindu literature of India – in both places, she is the goddess of knowledge, creative arts, wisdom, language, learning and purity. In Bali, she is celebrated on Sarasvati day, one of the main festivals for Hindus in Indonesia.[103][104] The day marks the close of 210 day year in the Pawukon calendar.[105]
On Sarasvati day, people make offerings in the form of flowers in temples and to sacred texts. The day after Sarasvati day, is Banyu Pinaruh, a day of cleansing. On this day, Hindus of Bali go to the sea, sacred waterfalls or river spots, offer prayers to Sarasvati, and then rinse themselves in that water in the morning. Then they prepare a feast, such as the traditional bebek betutu and nasi kuning, that they share.[106]
The Sarasvati Day festival has a long history in Bali.[107] It has become more widespread in Hindu community of Indonesia in recent decades, and it is celebrated with theatre and dance performance.[105]
Southeast Asia
Sarasvati was honoured with invocations among the Hindus of Angkorian Cambodia.[108] She and Brahma are referred to in Cambodian epigraphy from the 7th century onwards, and she is praised by Khmer poets for being the goddess of eloquence, writing, and music. More offerings were made to her than to her husband Brahma. She is also referred to as Vagisvari and Bharati in the Khmer literature of the era of Yasovarman, Hindu king of the Khmer Empire.[108]
In Buddhism
In Buddhism, Sarasvati became a prominent deity which retained many of her Vedic associations, such as speech, texts, knowledge, healing and protection. She also became known as the consort of Manjushri, the bodhisattva of wisdom (prajña). According to Miranda Shaw's Buddhist Goddesses of India:
Sarasvati's association with the intellectual sphere assured that she would find favor among Buddhists, who highly value wisdom and its servants: mental clarity, reasoning ability, memorization, and oratorical skill. Sarasvati thus has an affinity with Prajñaparamita, the goddess of perfect wisdom. They may be in voked by the same mantra, reflecting the kinship between the wisdom goddess and the patroness of learning.[109]
Shaw lists various epithets for Sarasvati used by Buddhist source including: "Emanation of Vishnu," "Gandharva Maiden," "Swan Child," "Daughter of Brahma", "Lady of the Lake", "Sister of the Moon", "Goddess of Speech", "Divine Lady Who Empowers Enlightened Speech", "Goddess Rich with the Power of Adamantine Speech", "Bestower of Understanding", "Goddess of Knowledge", and "Wisdom Goddess."[109] According to Shaw, Buddhist depictions of Sarasvati are influenced by Hindu ones. A popular depiction is called "Lady of the Adamantine Lute" (Vajravina) which is described by Shaw as.
a white, two-armed epiphany in which she plays her supernal lute, or vina. The instrument is made of lapis lazuli and has a thousand strings capable of eliciting every musical note. Sarasvati's melodies pervade the universe and delight all types of beings in accordance with whatever is most pleasing to their ears. She sits with ankles crossed and knees raised in a distinctive posture suitable for balancing a musical instrument.[110]
According to Catherine Ludvik, Sarasvati's earliest appearance in a Buddhist text is in the 1st century CE Mahayana Golden Light Sutra (of which there are different versions / translations). This text is first attested in a Chinese translation in 417 CE and includes an entire chapter devoted to the goddess, which is our best source for the earliest Buddhist depictions of Sarasvati.[111]
In the Golden Light Sutra
In the Golden Light Sutra (Suvarṇaprabhāsa Sūtra), Sarasvati appears and pays homage to the Buddha. As Shaw writes, she then "promises that she will grace the preachers of the scripture with eloquence, oratorical power, perfect memory, inconceivable knowledge, penetrating wisdom, illumination, skill in liberating others, scholarly expertise in every field, proficiency in all the arts, merit, prosperity, and long life."[112]
Sarasvati's chapter in the Golden Light Sutra presents three main aspects of the goddess. First, it presents her as a goddess of eloquence and speech, then it presents her as a healing goddess who teaches a ritual which includes a medicinal bath, finally it presents Sarasvati as a goddess of protection and war.[113] Ludvik mentions that the earliest version of the Golden Light Sutra (the translation by Dharmaksema) actually only includes the first depiction.[113] The early Chinese Buddhist translators chose to translate her name as "great eloquence deity" (大辯天) the later translations by Yijing use "Eloquence Talent Goddess" (Biancai tiannu), though phonetic translations were also applied (e.g. Yijing's "mohetipi suoluosuobodi").[113]
In the Golden Light Sutra, Sarasvati is closely associated with eloquence, as well as with the closely connected virtues of memory and knowledge.[114] Sarasvati is also said to help monks memorize the Buddhist sutras and to guide them so they will not make mistakes in memorizing them or forget them later. She will also help those who have incomplete manuscripts to regain the lost letters or words. She also teaches a dharani (a long mantra-like recitation) to improve memory.[115] The Golden Light goes as far as to claim that Sarasvati can provide the wisdom to understand all the Buddhist teachings and skillful means (upaya) so that one may swiftly attain Buddhahood.[116]
In some versions of the Golden Light Sutra, such as Yijing's, the goddess then teaches an apotropaic ritual that can combat disease, bad dreams, war, calamities and all sorts of negative things. It includes bathing in a bath with numerous herbs that has been infused with a dharani spell. This passage contains much information on ancient materia medica and herbology.[117] Ludvik adds that this may be connected to her role as healer of Indra in the Yajur Veda and to ancient Indian bathing rites.[118]
In the latter part of the Golden Light's Sarasvati chapter, she is praised as a protector goddess by the Brahman Kaundinya. This section also teaches a dharani and a ritual to invoke the goddess and receive her blessings in order to obtain knowledge.[119] In latter sections of Kaundinya's praise, she is described as an eight armed goddess and compared to a lion. The text also states that is some recites these praises, "one obtains all desires, wealth and grain, and one gains splendid, noble success."[120] The poem describes Sarasvati as one who "has sovereignty in the world", and states that she fights in battlefields and is always victorious.[121] The hymn then describes Sarasvati's warlike eight-armed form. She carries eight weapons in each hand – a bow, arrow, sword, spear, axe, vajra, iron wheel, and noose.[122]
Kaudinya's hymn to Sarasvati in Yijing's translation is derived from the Āryāstava ("praise of she who is noble"), a hymn uttered by Vishnu to the goddess Nidra (lit. "Sleep", one of the names applied to Durga) found in the Harivamsha.[123] As the Golden Light Sutra is often concerned with the protection of the state, it is not surprising that the fierce, weapon-wielding Durga, who was widely worshiped by rulers and warriors alike for success in battle, provides the model for the appearance assumed by Sarasvati, characterized as a protectress of the Buddhist Dharma.[124] Bernard Faure argues that the emergence of a martial Sarasvatī may have been influenced by the fact that "Vāc, the Vedic goddess of speech, had already displayed martial characteristics. [...] Already in the Vedas, it is said that she destroys the enemies of the gods, the asuras. Admittedly, later sources seem to omit or downplay that aspect of her powers, but this does not mean that its importance in religious practice was lost."[125]
Other Indian Mahayana sources
In some later Mahayana Buddhist sources like the Sādhanamālā (a 5th-century collection of ritual texts), Sarasvati is symbolically represented in a way which is similar to Hindu iconography.[16] The description of the deity (here called Mahāsarasvatī) is as follows:
The worshipper should think himself as goddess Mahāsarasvatī, who is resplendent like the autumn moon, rests on the moon over the white lotus, shows the varada-mudrā in her right hand, and carries in the left the white lotus with its stem. She has a smiling countenance, is extremely compassionate, wears garments decorated with white sandal-flowers. Her bosom is decorated with the pearl-necklace, and she is decked in many ornaments; she appears a maiden of twelve years, and her bosom is uneven with half-developed breasts like flower-buds; she illumines the three worlds with the immeasurable light that radiates from her body.[126]
In the Sādhanamālā, the mantra of Sarasvati is: oṃ hrīḥ mahāmāyāṅge mahāsarasvatyai namaḥ
The Sādhanamālā also depicts other forms of Sarasvati, including Vajravīṇā Sarasvatī (similar to Mahāsarasvatī except she carries a veena), Vajraśāradā Sarasvatī (who has three eyes, sits on a white lotus, her head is decorated by a crescent and holds a book and a lotus), Vajrasarasvatī (has six hands and three heads with brown hair rising upwards), and Āryasarasvatī (sixteen-year-old girl carrying the Prajñapramita sutra and a lotus).[127]
According to the Kāraṇḍavyūha Sūtra (c. 4th century – 5th century CE), Sarasvati was born from the eyetooth of Avalokiteshvara.[112]
Sarasvati is also briefly mentioned in the esoteric Vairochanabhisambodhi Sutra as one of the divinities of the western quarter of the Outer Vajra section of the Womb Realm Mandala along with Prithvi, Vishnu (Narayana), Skanda (Kumara), Vayu, Chandra, and their retinue. The text later also describes the veena as Sarasvati's symbol.[128][129] The Chinese translation of this sutra renders her name variously as 辯才 (Ch. Biàncái; Jp. Benzai, lit. "eloquence"),[130] 美音天 (Ch. Měiyīntiān; Jp. Bionten, "goddess of beautiful sounds"),[131] and 妙音天 (Ch. Miàoyīntiān; Jp. Myōonten, "goddess of wonderful sounds"[132]).[133] Here, Sarasvati is portrayed with two arms holding a veena and situated between Narayana's consort Narayani and Skanda (shown riding on a peacock).
Sarasvati was initially depicted as a single goddess without consort. Her association with the bodhisattva of wisdom Manjusri is drawn from later tantric sources such as the Kṛṣṇayamāri tantra, where she is depicted as red skinned (known as "Red Sarasvati").[134]
In various Indian tantric sadhanas to Sarasvati (which only survive in Tibetan translation), her bija (seed) mantra is Hrīḥ.[135]
Nepalese Buddhism
Sarasvati is worshiped in Nepalese Buddhism, where she is a popular deity, especially for students. She is celebrated in an annual festival called Vasant Pañcami and children first learn the alphabet during a Sarasvati ritual.[136] In Nepalese Buddhism, her worship is often combined with that of Manjusri and many sites for the worship of Manjusri are also used to worship Sarasvati, including Svayambhu Hill.[136]
In East Asian Buddhism
Veneration of Sarasvati migrated from the Indian subcontinent to China with the spread of Buddhism, where she in known as Biàncáitiān (辯才天), meaning "Eloquent Devī", as well as Miàoyīntiān (妙音天), meaning "Devī of Wonderful Sounds".[137]
She is commonly enshrined in Chinese Buddhist monasteries as one of the Twenty-Four Devas, a group of protective deities who are regarded as protectors of the Buddhist dharma. Her Chinese iconography is based on her description in the Golden Light Sutra, where she is portrayed as having eight arms, one holding a bow, one holding arrows, one holding a knife, one holding a lance, one holding an axe, one holding a pestle, one holding an iron wheel, and one holding ropes. In another popular Buddhist iconographic form, she is portrayed as sitting down and playing a pipa, a Chinese lute-like instrument.[138] The concept of Sarasvati migrated from India, through China to Japan, where she appears as Benzaiten (弁財天, lit. "goddess of eloquence").[139] Worship of Benzaiten arrived in Japan during the 6th through 8th centuries. She is often depicted holding a biwa, a traditional Japanese lute musical instrument. She is enshrined on numerous locations throughout Japan such as the Kamakura's Zeniarai Benzaiten Ugafuku Shrine or Nagoya's Kawahara Shrine;[140] the three biggest shrines in Japan in her honour are at the Enoshima Island in Sagami Bay, the Chikubu Island in Lake Biwa, and the Itsukushima Island in Seto Inland Sea.
In Japanese esoteric Buddhism (mikkyo), the main mantra for this deity is:
Oṃ Sarasvatyai svāhā (Sino-Japanese: On Sarasabatei-ei Sowaka).[141][142]
In Indo-Tibetan Buddhism
In the Indo-Tibetan Buddhism of the Himalayan regions, Sarasvati is known as Yangchenma (Tibetan: དབྱངས་ཅན་མ, Wylie: dbyangs can ma, THL: yang chen ma),[143] which means '"Goddess of Melodious Voice". She is also called the Tara of Music (Tibetan: དབྱངས་ཅན་སྒྲོལ་མ, Wylie: dbyangs can sgrol ma, THL: yang chen dröl ma) as one of the 21 Taras. She is also considered the consort of Manjushri, bodhisattva of Wisdom.[144][145] Sarasvati is the divine embodiment & bestower of enlightened eloquence & inspiration. For all those engaged in creative endeavours in Tibetan Buddhism she is a patroness of the arts, sciences, music, language, literature, history, poetry & philosophy.
Sarasvati also became associated with the Tibetan deity Palden Lhamo (Glorious Goddess) who is a fierce protector deity in the Gelugpa tradition known as Magzor Gyalmo (the Queen who Repels Armies).[146] Sarasvati was the yidam (principal personal meditational deity) of 14th century Tibetan monk Je Tsongkhapa, who composed a devotional poem to her.[147][148]
Tibetan Buddhism teaches numerous mantras of Sarasvati. Her seed syllable is often Hrīṃ.[149] In a sadhana (ritual text) revealed by the great Tibetan female lama Sera Khandro, her mantra is presented as:[150]
Oṃ hrīṃ devi prajñā vārdhani ye svāhā
In South East Asian Buddhism
In Burmese Buddhism, Sarasvati is worshipped as Thurathadi (Burmese: သူရဿတီ), an important nat (Burmese deity) and is a guardian of the Buddhist scriptures (Tipitaka), scholars, students and writers.[151][152][153][154][155] Students in Myanmar often pray for her blessings before their exams.[154]: 327 She is an important deity to the esoteric weizzas (Buddhist wizards) of Burma.[156][157]
In ancient Thai literature, Sarasvati (Thai: สุรัสวดี; RTGS: Suratsawadi) is the goddess of speech and learning, and consort of Brahma.[158] Over time, Hindu and Buddhist concepts merged in Thailand. Icons of Sarasvati with other deities of India are found in old Thai wats.[159] Amulets with Sarasvati and a peacock are also found in Thailand.
In Jainism
Sarasvati is also revered in Jainism as the goddess of knowledge and is regarded as the source of all learning. She is known as Srutadevata, Sarada, and Vagisvari.[160] Sarasvati is depicted in a standing posture with four arms, one holding a text, another holding a rosary and the remaining two holding the Veena. Sarasvati is seated on a lotus with the peacock as her vehicle. Sarasvati is also regarded as responsible for dissemination of tirthankars sermon.[17] The earliest sculpture of Sarasvati in any religious tradition is the Mathura Jain Sarasvati from Kankali Tila dating from 132 CE.[161]
यह मंदिर श्री कांची कामकोटि पीठम के मार्गदर्शन में चलाया जाता है । यह वर्गल गाँव में हैदराबाद से लगभग 48 किलोमीटर की दूरी पर है। यह सचित्र पृष्ठभूमि पर स्थित है, जिसमें एक अनोखी चट्टान है और इस पहाड़ी के चारों ओर एक घाटी है। वर्गल की पहाड़ी पर एक ही पहाड़ी पर कई मंदिर हैं।
श्री विद्या सरस्वती मंदिर
भगवान शनीश्वर मंदिर
भगवान शिव मंदिर
कुछ विष्णु मंदिर अब बिना किसी मोला विग्रह के पूरी तरह से क्षतिग्रस्त हो गए हैं।
यह मंदिर परिसर श्री यायावरम चंद्र शेखर शर्मा के मस्तिष्क , जो देवी सरस्वती ज्योतिषी और एक विशाल विशेषज्ञ के अनुयायी थे। 1998 में उपरोक्त मंदिर के लिए भवन निर्माण की प्रक्रिया उस समूह के तहत शुरू की गई, जिसने खुद को सत्य संयम सेवा के नाम से पुकारा। इस समिति ने वरगल की पहाड़ी पर शोध किया और चुना, जो 400 साल पुराने शंभू देव मंदिर का घर है। यह मंदिर जमीनी स्तर से 2 फीट नीचे है और मुख्य शिव लिंगम तक पहुँचने के लिए कुछ ज़मीनों पर से रेंगते हुए गुजरना पड़ता है।
Subscribe our Vedism YouTube channel https://youtu.be/9HMiXKd-3Ys
श्री सरस्वती गीत
देवी सरस्वती कला, संगीत, ज्ञान और ज्ञान की देवी हैं। सरस्वती को हिंदू धर्म के अनुसार, ब्रह्मांड के निर्माता भगवान ब्रह्मा का दिव्य संघ माना जाता है। सरस्वती को अराजकता और भ्रम का नाश करने वाला माना जाता है। सरस्वती पर बने स्लोगन देवी को अर्पित की जाने वाली प्रार्थनाओं का हिस्सा हैं। सरस्वती स्लोकस / श्लोक इस प्रकार हैं:
“यं देवी स्तुते नित्यं विभुहिरवेदपरागैः |
समान वसु जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती ”||
अर्थ: ज्ञान की देवी सरस्वती की प्रशंसा बुद्धिमानों ने की है जिन्होंने शास्त्र (शास्त्रों) में महारत हासिल की है। वह निर्माता की पत्नी है। क्या वह मेरी जुबान पर रह सकती है
Subscribe our Vedism YouTube channel https://youtu.be/9HMiXKd-3Ys
त्वाम अहम् प्रर्थेन देवि विद्यादानम् च देहि मे ”||
अर्थ: मैं देवी सरस्वती को नमन करता हूं, जो भक्तों की इच्छाओं को पूरा करती हैं। मैं उससे प्रार्थना करता हूं कि वह मुझे ज्ञान प्रदान करे।
“सरस्वती नमस्तुभ्यम्, वरदे कामरूपिणी |
विद्यारम्भम् करिश्यामि, सिद्धिर् भवतु मे सदा ”||
भावार्थ: सरस्वती वरदानों की प्रदाता हैं और वह है, जो हमारी सभी इच्छाओं को पूरा करती है। जैसे ही मैं अपनी पढ़ाई शुरू करता हूं, मैं देवी को नमन करता हूं ताकि मैं इसे फलदायी बनाने में मदद कर सकूं और अपने सभी प्रयासों में सफल हो सकूं।
Subscribe our Vedism YouTube channel https://youtu.be/9HMiXKd-3Ys
यं कुन्देंदु तुषारं हर-धवलं, यं शुभ्र-विस्त्रव'व्रता
यं वीणा-वर-दण्ड-मंडितकारा, यं श्वेता पद्मासन
Ya यं ब्रह्म’च्युत शंकरा प्रभातीर्भिर देवै-सदा वन्दिता
सा माँ पातु सरस्वती भगवते निहर्षे जयाद्यापहा।
शुक्लम् ब्रह्मविचारं सर्व परमात्मा अहद्यम् जगदव्यपिनम्,
वीणा पुष्का धारिणीम् अभयदम् जद्य’अन्धकार’पहाम्
हस्ते स्फटिका मल्लिकम् विदधतेम्
पद्मासने संस्थिताम्
वन्दे ताम् परमेश्वरमे भगवतेम बुद्धिप्रदम् शारदाम्।
सरस्वती नमस्तुभ्यम् ।।
Subscribe our Vedism YouTube channel https://youtu.be/9HMiXKd-3Ys
शुक्रवार देवी की आराधना का दिन: विद्या और बुद्धि की देवी माता सरस्वती का वाहन हंस क्यों है? क्यों हंस को मा...
- Hindi News
- Jeevan mantra
- Dharm
- Why Is Hans The Vehicle Of Mother Saraswati, Goddess Of Learning And Wisdom? Why Is Swan Considered The Most Intelligent And Loyal Bird?
शुक्रवार देवी की आराधना का दिन:विद्या और बुद्धि की देवी माता सरस्वती का वाहन हंस क्यों है? क्यों हंस को माना गया है सबसे बुद्धिमान और निष्ठावान पक्षी?
- सरस्वती का पहला नाम भारती, दूसरा सरस्वती, तीसरा शारदा और चौथा हंसवाहिनी है
सरस्वती को विद्या और बुद्धि की देवी माना गया है। जिस तरह भगवान शंकर का वाहन नंदी, विष्णु का गरुड़, कार्तिकेय का मोर, दुर्गा का सिंह और श्रीगणेश का वाहन चूहा है, उसी तरह सरस्वती का वाहन हंस है। यहां जानिए देवी सरस्वती का वाहन हंस क्यों है?
देवी की द्वादश नामावली में इस बात का उल्लेख मिलता है-
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती। तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसवाहिनी॥ अर्थात सरस्वती का पहला नाम भारती, दूसरा सरस्वती, तीसरा शारदा और चौथा हंसवाहिनी है। यानी हंस उनका वाहन है।
सहज ही यह जिज्ञासा होती है कि आखिर हंस सरस्वती का वाहन क्यों है? सबसे पहले तो यह बात समझना होगी कि यहां वाहन का अर्थ यह नहीं है कि देवी उस पर विराजमान होकर आवागमन करती हैं। यह एक संदेश है, जिसे हम आत्मसात कर अपने जीवन को श्रेष्ठता की ओर ले जा सकते हैं। हंस को विवेक का प्रतीक कहा गया है। संस्कृत साहित्य में नीर-क्षीर विवेक का उल्लेख है। इसका अर्थ होता है- दूध का दूध और पानी का पानी करना। यह क्षमता हंस में विद्यमान होती है -
नीरक्षीरविवेके हंसालस्यं त्वमेव तनुषे चेत्। - भामिनीविलास 1/13 इसका अर्थ है कि हंस में ऐसा विवेक होता है कि वह दूध और पानी पहचान लेता है।
हंस का रंग शुभ्र (सफेद) होता है। यह रंग पवित्रता और शांति का प्रतीक है। शिक्षा प्राप्ति के लिए पवित्रता आवश्यक है। पवित्रता से श्रद्धा और एकाग्रता आती है। शिक्षा की परिणति ज्ञान है। ज्ञान से हमें सही और गलत या शुद्ध और अशुद्ध की पहचान होती है। यही विवेक कहलाता है। मानव जीवन के विकास के लिए शिक्षा बहुत जरूरी है, इसलिए सनातन परम्परा में जीवन का पहला चरण शिक्षा प्राप्ति का है, जिसे ब्रह्मचर्य आश्रम कहा गया है।
जो पवित्रता और श्रद्धा से ज्ञान की प्राप्ति करेगा, उसी पर सरस्वती की कृपा होगी। सरस्वती की पूजा-उपासना का फल ही हमारे अंत:करण में विवेक के रूप में प्रकाशित होता है। हंस के इस गुण को हम अपनी जिंदगी में अपना लें तो कभी असफल नहीं हो सकते। सच्ची विद्या वही है जिससे आत्मिक शांति प्राप्त हो।
सरस्वती का वाहन हंस हमें यही संदेश देता है कि हम पवित्र और श्रद्धावान बन कर ज्ञान प्राप्त करें और अपने जीवन को सफल बनाएं।
भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर
सरस्वती | |
|
| |
| अन्य नाम | वाणी, वाग्देवी, भारती, शारदा, वागेश्वरी |
| जन्म विवरण | सरस्वती का जन्म ब्रह्मा के मुँह से हुआ था। |
| वाहन | हंस |
| रंग-रूप | श्वेत पुष्प व मोती इनके आभूषण हैं, तथा श्वेत कमल गुच्छ पर ये विराजमान हैं। |
| वाद्य | वीणा |
| संबंधित लेख | सरस्वती प्रार्थना, सरस्वती माता की आरती, सरस्वती चालीसा |
| विशेष | सरस्वती का पौराणिक इतिहास इन्हें उन धार्मिक कृत्यों से जोड़ता है, जो इन्हीं के नाम वाग्देवी के रूप में की जाती है तथा इनका संबंध बोलने व लिखने, शब्द की उत्पत्ति, दिव्यश्लोक विन्यास तथा संगीत से भी है। |
| अन्य जानकारी | सरस्वती विद्या की देवी हैं। यह देवी मनुष्य समाज को महानतम सम्पत्ति-ज्ञानसम्पदा प्रदान करती है। |
सरस्वती हिन्दू धर्म की प्रमुख देवियों में से एक हैं। सरस्वती का जन्म ब्रह्मा के मुँह से हुआ था। वह वाणी की अधिष्ठात्री देवी है। इनका नामांतर 'शतरूपा' भी है। इसके अन्य पर्याय हैं, वाणी, वाग्देवी, भारती, शारदा, वागेश्वरी इत्यादि। ये शुक्लवर्ण, श्वेत वस्त्रधारिणी, वीणावादनतत्परा तथा श्वेतपद्मासना कही गई हैं। इनकी उपासना करने से मूर्ख भी विद्वान् बन सकता है। माघ शुक्ल पंचमी को इनकी पूजा की परिपाटी चली आ रही है।
धार्मिक मान्यताएँ
- ऐसा माना जाता है कि ब्रह्मा अपनी पुत्री सरस्वती पर ही आसक्त हो गये। वे उसके पास गमन के लिए तत्पर हुए। सभी प्रजापतियों ने अपने पिता ब्रह्मा को न केवल समझाया, अपितु उनके विचार की हीनता की ओर भी संकेत किया। ब्रह्मा ने लज्जावश वह शरीर त्याग दिया, जो कुहरा अथवा अंधकार के रूप में दिशाओं में व्याप्त हो गया।[1]
- वेदज्ञ पुरूरवा ने ब्रह्मा के निकट हास करती हुई सरस्वती को देखा। उर्वशी के द्वारा उसने सरस्वती को अपने पास बुलाया। तदनंतर दोनों परस्पर मिलते रहे। सरस्वती ने ‘सरस्वान्’ नामक पुत्र को जन्म दिया। कालांतर में ब्रह्मा को पता चला तो उन्होंने सरस्वती को महानदी होने का शाप दिया। भयभीता सरस्वती गंगा माँ की शरण में जा पहुँची। गंगा के कहने पर ब्रह्मा ने सरस्वती को शाप-मुक्त कर दिया। शापवश ही वह मृत्युलोक में कहीं दृश्य और कहीं अदृश्य रूप में रहने लगी।
सोम तथा सरस्वती की कथा
सोम की प्राप्ति पहले गंधर्वों को हुई। देवताओं ने जाना तो सोम प्राप्त करने के उपाय सोचने लगे। सरस्वती ने कहा- “गंधर्व स्त्री-प्रेमी हैं, उनसे मेरे विनिमय में सोम ले लो। मैं फिर चतुराई से तुम्हारे पास आ जाऊँगी।’’ देवगिरि पर यज्ञ करके देवताओं ने वैसा ही किया। गंधर्वों के पास न तो सोम ही रहा, न सरस्वती।[2]
सरस्वती पूजन
श्री कृष्ण ने भारतवर्ष में सर्वप्रथम सरस्वती की पूजा का प्रसार किया। सरस्वती ने राधा के जिव्ह्याग्र भाग से आविर्भूत होकर कामवश श्री कृष्ण को पति बनाना चाहा। कृष्ण ने सरस्वती से कहा—“मेरे अंश से उत्पन्न चतुर्भुज नारायण मेरे ही समान हैं’’-- वे नारी के हृदय की विलक्षण वासना से परिचित हैं, अत: तुम उनके पास वैकुंठ में जाओ। मैं सर्वशक्ति सम्पन्न होते हुए भी राधा के बिना कुछ नहीं हूँ। राधा के साथ-साथ तुम्हें रखना मेरे लिए संभव नहीं। नारायण लक्ष्मी के साथ तुम्हें भी रख पायेंगे। लक्ष्मी और तुम समान सुंदर तथा ईर्ष्या के भाव से मुक्त हो। माघ मास की शुक्ल पंचमी पर तुम्हारा पूजन चिरंतन काल तक होता रहेगा तथा वह विद्यारम्भ का दिवस माना जायेगा। वाल्मीकि, बृहस्पति, भृगु इत्यादि को क्रमश: नारायण, मरीचि तथा ब्रह्मा आदि ने सरस्वती-पूजन का बीजमन्त्र दिया था।
- हिन्दूधर्म में ज्ञान की देवी हैं- माँ सरस्वती
सरस्वती विद्या की देवी हैं। यह देवी मनुष्य समाज को महानतम सम्पत्ति-ज्ञानसम्पदा प्रदान करती है। वेदों में सरस्वती का वर्णन श्वेत वस्त्रा (जो श्वेत परिधान से आवरित है) के रूप में किया गया है। श्वेत पुष्प व मोती इनके आभूषण हैं, तथा श्वेत कमल गुच्छ पर ये विराजमान हैं। इनके हाथ में वीणा (सितार से मिलता-जुलता तारयुक्त वाद्य) शोभित है। वेद इन्हें जलदेवी के रूप में महत्ता देते हैं, एक नदी का नाम भी सरस्वती है। सरस्वती का पौराणिक इतिहास इन्हें उन धार्मिक कृत्यों से जोड़ता है, जो इन्हीं के नाम वाग्देवी के रूप में की जाती है तथा इनका संबंध बोलने व लिखने, शब्द की उत्पत्ति, दिव्यश्लोक विन्यास तथा संगीत से भी है।
सरस्वती द्वारा दिया गया शाप
लक्ष्मी, सरस्वती और गंगा नारायण के निकट निवास करती थीं। एक बार गंगा ने नारायण के प्रति अनेक कटाक्ष किये। नारायण तो बाहर चले गये किन्तु इससे सरस्वती रुष्ट हो गयी। सरस्वती को लगता था कि नारायण गंगा और लक्ष्मी से अधिक प्रेम करते हैं। लक्ष्मी ने दोनों का बीच-बचाव करने का प्रयत्न किया। सरस्वती ने लक्ष्मी को निर्विकार जड़वत् मौन देखा तो जड़ वृक्ष अथवा सरिता होने का शाप दिया। सरस्वती को गंगा की निर्लज्जता तथा लक्ष्मी के मौन रहने पर क्रोध था। उसने गंगा को पापी जगत का पाप समेटने वाली नदी बनने का शाप दिया। गंगा ने भी सरस्वती को मृत्युलोक में नदी बनकर जनसमुदाय का पाप प्राक्षालन करने का शाप दिया। तभी नारायण भी वापस आ पहुँचे। उन्होंने सरस्वती का आर्लिगन कर उसे शांत किया तथा कहा—“एक पुरुष अनेक नारियों के साथ निर्वाह नहीं कर सकता। परस्पर शाप के कारण तीनों को अंश रूप में वृक्ष अथवा सरिता बनकर मृत्युलोक में प्रकट होना पड़ेगा। लक्ष्मी! तुम एक अंश से पृथ्वी पर धर्म-ध्वज राजा के घर अयोनिसंभवा कन्या का रूप धारण करोगी, भाग्य-दोष से तुम्हें वृक्षत्व की प्राप्ति होगी। मेरे अंश से जन्मे असुरेंद्र शंखचूड़ से तुम्हारा पाणिग्रहण होगा। भारत में तुम ‘तुलसी’ नामक पौधे तथा पदमावती नामक नदी के रूप में अवतरित होगी। किन्तु पुन: यहाँ आकर मेरी ही पत्नी रहोगी। गंगा, तुम सरस्वती के शाप से भारतवासियों का पाप नाश करने वाली नदी का रूप धारण करके अंश रूप से अवतरित होगी। तुम्हारे अवतरण के मूल में भागीरथ की तपस्या होगी, अत: तुम भागीरथी कहलाओगी। मेरे अंश से उत्पन्न राजा शांतनु तुम्हारे पति होंगे। अब तुम पूर्ण रूप से शिव के समीप जाओ। तुम उन्हीं की पत्नी होगी। सरस्वती, तुम भी पापनाशिनी सरिता के रूप में पृथ्वी पर अवतरित होगी। तुम्हारा पूर्ण रूप ब्रह्मा की पत्नी के रूप में रहेगा। तुम उन्हीं के पास जाओ।’’ उन तीनों ने अपने कृत्य पर क्षोभ प्रकट करते हुए शाप की अवधि जाननी चाही। कृष्ण ने कहा—“कलि के दस हज़ार वर्ष बीतने के उपरान्त ही तुम सब शाप-मुक्त हो सकोगी।’’ सरस्वती ब्रह्मा की प्रिया होने के कारण ब्राह्मी नाम से विख्यात हुई।[3]
मत्स्य पुराण के अनुसार
ब्रह्मा ने लोक-रचना करने क्र निमित्त सावित्री का ध्यान कर तपस्या आरंभ की। ब्रह्मा का शरीर दो भागों में विभक्त हो गया-
- आधा पुरुष-रूप (मनु) तथा
- आधा स्त्री-रूप (शतरूपा सरस्वती)।
कालांतर में ब्रह्मा अपनी देहजा सरस्वती पर आसक्त हो गये। देवताओं के मना करने पर भी उनकी आसक्ति समाप्त नहीं हुई। सरस्वती ‘पिता’ को प्रमाण करके उनकी प्रदक्षिणा कर रही थी। ब्रह्मा के मुख के दाहिनी ओर दूसरा लज्जा से पीतवर्ण वाला मुख प्रादुर्भूत हुआ, फिर पीछे की ओर तीसरा और बायीं ओर चौथा मुख आविर्भूत हुआ। सरस्वती स्वर्ग की ओर जाने के लिए उद्यत हुई तो ब्रह्मा के सिर पर पांचवां मुख भी उत्पन्न हुआ जो कि जटाओं से ढका रहता है। ब्रह्मा ने मनु को सृष्टि-रचना के लिए पृथ्वी पर भेजकर शतरूपा (सरस्वती) से पाणि-ग्रहण किया, फिर समुद्र में विहार करते रहे। ब्रह्मा को इस कुकृत्य का दोष नहीं लगा, क्योंकि सरस्वती उनका अपना अंग थी। वेदों में ब्रह्मा और सरस्वती का अमूर्त निवास रहता है। दोनों की सर्वत्र अमूर्त उपस्थिति की अनिवार्यता पर ध्यान देकर तथा यह देखकर कि वह ब्रह्मा का अनिवार्य अंग है, ब्रह्मा को दोषी नहीं ठहराया गया।[4]
- श्वेत पद्म पर आसीना, शुभ्र हंसवाहिनी, तुषार धवल कान्ति, शुभ्रवसना, स्फटिक माला धारिणी, वीणा मण्डित करा, श्रुति हस्ता वे भगवती भारती प्रसन्न हों, जिनकी कृपा मनुष्य में कला, विद्या, ज्ञान तथा प्रतिभा का प्रकाश करती है। वही समस्त विद्याओं की अधिष्ठात्री हैं। यश उन्हीं की धवल अंग ज्योत्स्ना है। वे सत्त्वरूपा, श्रुतिरूपा, आनन्दरूपा हैं। विश्व में सुख, सौन्दर्य का वही सृजन करती हैं।

- वे अनादि शक्ति भगवान ब्रह्मा के कार्य की सहयोगिनी हैं। उन्हीं की कृपा से प्राणी कार्य के लिये ज्ञान प्राप्त करता है। उनका कलात्मक स्पर्श कुरुप को परम सुन्दर कर देता है। वे हंसवाहिनी हैं। सदसद्विवेक ही उनका वास्तविक प्रसाद है। भारत में उनकी उपासना सदा होती आयी है। महाकवि कालिदास ने उन्हें प्रसन्न किया था। प्रत्येक कवि उनके पावन पदों का स्मरण करके ही अपना काव्यकर्म प्रारम्भ करता था, यह यहाँ की सनातन परम्परा थी।
- प्रतिभा की उन अधिष्ठात्री के चरित तो सर्वत्र प्रत्यक्ष हैं। समस्त वाड्मय, सम्पूर्ण कला और पूरा विज्ञान उन्हीं का वरदान है। मनुष्य उन जगन्माता की अहैतु की दया से प्राप्त शक्ति का दुरुपयोग करके अपना नाश कर लेता है और उनको भी दुखी करता है। ज्ञान-प्रतिमा भगवती सरस्वती के वरदान का सदुपयोग है अपने ज्ञान, प्रतिभा और विचार को भगवान में लगा देना। वह वरदान सफल हो जाता है। मनुष्य कृतार्थ हो जाता है। भगवती प्रसन्न होती हैं।
- 'भारतीय प्राचीन कला प्राय: मन्दिरों में व्यक्त हुई है।' पाश्चात्य विद्वानों के ये आक्षेप ठीक ही हैं। भारत ने नश्वर मनुष्य और उसके नश्वर अर्थहीन कृत्यों को व्यर्थ स्थायी करने का प्रयत्न नहीं किया। भारत पर भगवती भारती की सदा समुज्ज्वल कृपा रही। मानव-अमृतपुत्र मानव को उन्होंने नित्य अमरत्व का मार्ग दिखाया। मानव ने अपनी क्रिया का आधार उस नित्यतत्त्व को बनाया, जहाँ क्रिया नष्ट होकर भी शाश्वत हो जाती है। कला उस चिरन्तन ज्योतिर्मय से एक होकर धन्य हो गयी। वह स्थूल जगत में भले नित्य न हो, अपने उद्गम को नित्य जगत में पहुँचाने में सफल हुई।
- भगवती सरस्वती के दिव्य रूप को न समझकर उनके मंजु प्रकाश के क्षुद्रांश में भ्रान्त मनुष्य उस प्रकाश का दुरुपयोग करने लगा है। अन्धकार के गर्त में गिरता तो कदाचित कहीं अटकता भी; पर वह तो प्रकाश में कूद रहा है नीचे घोर अतल अन्धकार में।
- भगवती शारदा के मन्दिर हैं, उपासना-पद्धति है, उनकी उपासना से सिद्ध महाकवि एवं विद्वानों के इतिहास में चारू चरित हैं। यह सब होकर भी उनकी कृपा और उपासना का फल केवल यश नहीं। यश तो उनकी कृपा का उच्छिष्ट है। फल तो है परमतत्त्व को प्राप्त कर लेना। इसी फल के लिये श्रुतियाँ उन वाग्देवी की स्तुति करती हैं।
बिल्कुल सही प्रश्न है।
उत्तर- माँ सरस्वती किसी की भी पुत्री नहीं हैं। समाज में सनातन धर्म को बदनाम करने के लिए ये भ्रम फैलाया गया है कि सरस्वती जी ब्रह्मा जी की पुत्री हैं लेकिन ये झूठ हैं, महाझूठ है क्योंकि बेटी तो तब कहलाती जब उनकी कोई माँ होती, लेकिन ऐसा नहीं है। दरअसल पुराणों के अनुसार ब्रह्मा जी ने सृष्टि की रचना करते समय ये सोचा कि जब तक जीवों में बुद्धि नहीं होगी, ज्ञान नहीं होगा तो उनके द्वारा सृष्टि बनाने का कोई अर्थ नहीं होगा, इसलिए उन्हें ये विचार किया कि वे सृष्टि रचना करते समय अपनी शक्ति का प्रयोग, ताकि उनके द्वारा बनाए गए प्राणियों में बुद्धि हो, क्योंकि उसके बिना सब व्यर्थ है। इसलिए ब्रह्मा जी ने अपनी शक्ति का प्रयोग किया और सरस्वती जी उनके द्वारा प्रकट हुईं, सरस्वती जी के प्रकट होने का मकसद सभी प्राणियों को ज्ञान प्रदान करना था, सरस्वती ब्रह्मा जी की शक्ति हैं जो स्त्री रूप में प्रकट हुईं, अर्थात ब्रह्मा और सरस्वती दो नहीं, वास्तव में एक ही महाशक्ति के दो रूप हैं लीला के लिए।
जब ब्रह्मा जी ने सरस्वती जी को प्रकट किया तो इसका मकसद था 'ज्ञान के साथ रचना'। सरस्वती जी केवल ज्ञान प्रदान करने वाली शक्ति ही नहीं बल्कि अत्यंत पवित्र और सुंदर स्वरूप वाली देवी के रूप में प्रकट हुईं, उनकी सुंदरता को देखकर स्वयं ब्रह्मा जी भी मोहित हो गए, उन्होंने ये सोचा कि उनकी शक्ति तो अद्भुत है जो इतने सुंदर रूप में प्रकट हुई है, ब्रह्मा जी ने सरस्वती जी से विवाह करना चाहा, सरस्वती जी नहीं मानी लेकिन अंत में उन्होंने ब्रह्मा जी की बात मान ली।
अब इस कहानी का लोग उल्टा सीधा अर्थ निकाल लेते हैं, यहाँ सरस्वती जी की महिमा गाई गई है और कलियुग के नकारात्मक सोच वाले पापी ब्रह्मा जी का अपमान करने में लग जाते हैं। इसमें सरस्वती जी की महिमा बताई गई है कि वे अत्यंत सुंदर भी हैं और ज्ञान की परम स्त्रोत हैं अर्थात पूजनीय हैं। इसका ये अर्थ नहीं कि ब्रह्मा जी खराब मानसिकता के हैं। ब्रह्मा जी ने केवल सरस्वती जी को प्रकट किया, जन्म नहीं दिया.. सरस्वती जी का कोई जन्म या मरण नहीं हैं वे अनंत हैं। पुराणों में ये कथा भी आती है कि भगवान शिव एक बार एक बालक के रूप में प्रकट हुए जब ब्रह्मा जी क्रोध में थे.. तो क्या आदि अनंत परमात्मा देवादिदेव महादेव ब्रह्मा जी के पुत्र हो गए, जिनका जन्म ही नहीं हुआ। शिव महापुराण में कथा आती है कि भगवान विष्णु भगवान शिव के अग्निस्तंभ से प्रकट हुए तो क्या आदि अनंत परमात्मा श्री हरि भगवान शंकर के पुत्र हो गए? जिनका जन्म ही नहीं हुआ, उसी प्रकार ब्रह्मा जी कभी भगवान विष्णु की नाभि कमल से तो भगवान शिव के लिंग रूपी अग्निस्तंभ से प्रकट होते हैं विभिन्न कल्पों में.. तो ब्रह्मा जी विष्णु जी या शिव जी के पुत्र हो गए क्या? ये केवल लीला है उस एक परमात्मा की जो अनेकों रूपों में विराजमान हैं तथा अलग अलग रूप धारण करके लीला रचाते हैं जिसको कई लोग समझ नहीं पाते।
तो माँ सरस्वती किसी की पुत्री नहीं हैं, वे अनंत हैं।
जय माँ सरस्वती 🙏
पुराणों में सरस्वती के बारे में भिन्न भिन्न मत मिलते हैं। एक मान्यता अनुसार ब्रह्मा ने उन्हें अपने मुख से प्रकट किया था। एक अन्य पौराणिक उल्लेख अनुसार देवी महालक्ष्मी (लक्ष्मी नहीं) से जो उनका सत्व प्रधान रूप उत्पन्न हुआ, देवी का वही रूप सरस्वती कहलाया। देवी सरस्वती का वर्ण श्वेत है। ब्रह्मा के कई पुत्र और पुत्रियां थे। सरस्वती देवी को शारदा, शतरूपा, वाणी, वाग्देवी, वागेश्वरी और भारती भी कहा जाता है।
सरस्वती उत्पत्ति कथा सरस्वती पुराण अनुसार : हिन्दू धर्म के दो ग्रंथों ‘सरस्वती पुराण’ और ‘मत्स्य पुराण’ में सृष्टि के रचयिता ब्रह्मा का अपनी ही बेटी सरस्वती से विवाह करने का प्रसंग है जिसके फलस्वरूप इस धरती के प्रथम मानव ‘मनु’ का जन्म हुआ।
सरस्वती पुराण के अनुसार सृष्टि की रचना करते समय ब्रह्मा ने सीधे अपने वीर्य से सरस्वती को जन्म दिया था। इसलिए ऐसा कहा जाता है कि सरस्वती की कोई मां नहीं केवल पिता, ब्रह्मा थे। स्वयं ब्रह्मा भी सरस्वती के आकर्षण से खुद को बचाकर नहीं रख पाए और उन्हें अपनी अर्धांगिनी बनाने पर विचार करने लगे। सरस्वती ने अपने पिता की इस मनोभावना को भांपकर उनसे बचने के लिए चारो दिशाओं में छिपने का प्रयत्न किया लेकिन उनका हर प्रयत्न बेकार साबित हुआ। इसलिए विवश होकर उन्हें अपने पिता के साथ विवाह करना पड़ा। ब्रह्मा और सरस्वती करीब 100 वर्षों तक एक जंगल में पति-पत्नी की तरह रहे। इन दोनों का एक पुत्र भी हुआ जिसका नाम रखा गया था स्वयंभु मनु।
सरस्वती उत्पत्ति कथा मत्स्य पुराण अनुसार : मत्स्य पुराण में यह कथा थोड़ी सी भिन्न है। मत्स्य पुराण अनुसार ब्रह्मा के पांच सिर थे। कालांतर में उनका पांचवां सिर काल भैरव ने काट दिया था। कहा जाता है जब ब्रह्मा ने सृष्टि की रचना की तो वह इस समस्त ब्रह्मांड में अकेले थे। ऐसे में उन्होंने अपने मुख से सरस्वती, सान्ध्य, ब्राह्मी को उत्पन्न किया। ब्रह्मा अपनी ही बनाई हुई रचना, सरवस्ती के प्रति आकर्षित होने लगे और लगातार उन पर अपनी दृष्टि डाले रखते थे। ब्रह्मा की दृष्टि से बचने के लिए सरस्वती चारों दिशाओं में छिपती रहीं लेकिन वह उनसे नहीं बच पाईं। इसलिए सरस्वती आकाश में जाकर छिप गईं, लेकिन अपने पांचवें सिर से ब्रह्मा ने उन्हें आकाश में भी खोज निकाला और उनसे सृष्टि की रचना में सहयोग करने का निवेदन किया। सरस्वती से विवाह करने के पश्चात सर्वप्रथम स्वयंभु मनु को जन्म दिया। ब्रह्मा और सरस्वती की यह संतान मनु को पृथ्वी पर जन्म लेने वाला पहला मानव कहा जाता है।
वसंत पंचमी कथा : सृष्टि के प्रारंभिक काल में भगवान विष्णु की आज्ञा से ब्रह्माजी ने मनुष्य योनि की रचना की, परंतु वह अपनी सर्जना से संतुष्ट नहीं थे, तब उन्होंने विष्णु जी से आज्ञा लेकर अपने कमंडल से जल को पृथ्वी पर छिड़क दिया, जिससे पृथ्वी पर कंपन होने लगा और एक अद्भुत शक्ति के रूप में चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट हुई। जिनके एक हाथ में वीणा एवं दूसरा हाथ वर मुद्रा में था। वहीं अन्य दोनों हाथों में पुस्तक एवं माला थी। जब इस देवी ने वीणा का मधुर नाद किया तो संसार के समस्त जीव-जंतुओं को वाणी प्राप्त हो गई, तब ब्रह्माजी ने उस देवी को वाणी की देवी सरस्वती कहा।
सरस्वती को बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी और वाग्देवी सहित अनेक नामों से पूजा जाता है। संगीत की उत्पत्ति करने के कारण वह संगीत की देवी भी हैं। वसंत पंचमी के दिन को इनके जन्मोत्सव के रूप में भी मनाते हैं।
लंडन (इंग्लंड) मधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात धार (धारानगरी, मध्य प्रदेश) येथील परमार भोज (इ. स. १०००-१०५५) याने घडवून घेतलेली अभिलिखित वाग्देवी सरस्वतीची एक सुरेख मूर्ती आहे. भोज राजाने धारानगरीत अनेक मंदिरे बांधली. त्यांपैकी विद्यादेवी सरस्वतीचे मंदिर आणि भोजनशाळा (विद्यामंदिर)प्रसिद्ध होते. यातील सरस्वतीच्या मूर्तीच्या पादपीठावर पुढील मजकूर खोदला होता –
‘‘श्रीमद् भोज नरेन्दचन्द्रनगरी विद्याधरी..
वाग्देवी प्रतिमाम् विधाय जननी यस्या जितानाम् त्रयी..
फलाधिकाम् धरसरिन् मूर्ती सुभां निर्ममे इति शुभं..
सूमधार सहिर सुत मनथलेन घटितं विटिक शिवदेवेन लिखितं इति संवत १०९१’’
त्याचा थोडक्यात अर्थ असा – भोजाच्या धारानगरीत, कामना पूर्ण करणारी फलाधिकाम अशा वाग्देवीची पवित्र मूर्ती सहिर या प्रसिद्ध शिल्पीचा मुलगा मनथल याने घडविली असून त्या मूर्तीच्या पादपीठावरील लेख शिवदेव याने संवत १०९१ मध्ये कोरला आहे. म्हणजे ही मूर्ती इ. स. १०३५ मध्ये भोज राजाच्या कारकिर्दीत घडविली आहे. ही वाग्देवी चतुर्भुज असून पादपीठावर त्रिभंग आसनात ती उभी आहे. तिचे वरचे हात सुस्थितीत असून खालचे कोपरापासून तुटले आहेत. तिच्या करंडमुकुटाच्या दोन्ही बाजूंस आकाशगामी विद्याधारांच्या मूर्ती असून पायाजवळ एक सेवकाची मूर्ती आहे; तसेच एक कुंभधारी बटूची मूर्ती आहे. तिने मोजकेच अलंकार घातले असून तिच्या कानातील झुमक्याप्रमाणे लोंबणारी नाजूक कुंडले तिच्या भरगच्च अंबाडय़ाच्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसतात. तिच्या गळ्यात कंठा, मोत्याचा हार दोन्ही स्तनांमधून खाली बेंबीवर आला आहे. तिचे अधोवस्त्र नक्षीदार तीन साखळ्यांच्या कमरपट्टय़ाने बांधले आहे. आणि कमरपट्टय़ाच्या अन्य साखळ्या तिच्या भरदार पुष्ट मांडय़ांवर रुळल्या आहेत. तिने पायात चार तोडे व मासळ्या घातल्या आहेत. तिच्या मुखावर शांत भाव दिसत असून विद्वत्तेचे तेज आहे. या ठिकाणी सिंह हे तिचे वाहन आहे. सांप्रत या मंदिराचे फक्त पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. आणि मूर्ती तर लंडनमधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. मूर्तीच्या पादपीठावरील शिलालेखामुळे या मध्यमयुगीन वाग्देवी मंदिराची स्मृती जागृत आहे.
लक्ष्मी माता संपूर्ण माहिती मराठी - sant sahitya - charitra mahiti abhang gatha granth rachana - lakshmi
ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णुची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णु व भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिनी देवी यांची कन्या. ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णु)सहित रामावतारात ती सीता बनली , कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.
लक्ष्मी – इतिहास
ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली; बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते.आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठडय़ावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात.
त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता.
अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे.
परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते.
ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळाचे फुल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळाचे फुल आहेत असे कोरीवकाम दिसून येते.
पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती कमळावर उभी आहे. कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे.
पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात.आणखी एक वेगळय़ा प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाटय़ातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते.
Azilises चे नाणेवर गज लक्ष्मी कमळावर उभी असल्याचे दर्शवते १ शतक इ.स.पू.
जैन, बौद्ध,शिल्पात अभिषेक किंवा गजलक्ष्मी दिसून येते.
दोन हातांत दोन कमळे घेऊन उभी व बसलेली असलेल्या
लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखवातात.
अष्टलक्ष्मी कोविल – आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू,
सण-उत्सव
दिवाळी लक्ष्मीपूजन
दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीपूजन करतात.
या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी
प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात.
दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात.
उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावतात. घराबाहेर विविधरंगी रांगोळी काढतात.
स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, पूर्णचन्द्राचीचे कला (पौर्णिमा), लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत.
ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवतात.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात.
त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात.
धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात.
कोजागरी पौर्णिमा
शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतीलआश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ही पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते.
कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्विन महिन्यामध्ये ‘आश्विनी पौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति‘ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरीपौर्णिमा’ म्हणतात.
तुळशी विवाह
तुळशीवनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्णयांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.https://www.santsahitya.in/avatar/lakshmi/
देवी लक्ष्मीशी संबंधीत रहस्य तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या रंजक माहिती
मुंबई : शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीचा (Laxmi) जन्म समुद्रमंथनाच्या वेळी झाला होता. तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या (Bhagwan Vishnu) सेवेत मग्न आहेत. असे म्हणतात की देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे, ती एका स्थानी जास्त काळ स्थिरावत नाही. पण, ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे धन-वैभवची कमतरता नसते.समुद्रमंथनाच्या (Samudramanthan) वेळी जन्मलेल्या लक्ष्मीच्या हातात सोन्याचा कलश आहे, असेकाही लोक मानतातया कलशातून लक्ष्मीजी संपत्तीचा वर्षाव करत असतात. पण खर्या अर्थाने जे श्री हरींच्या पत्नी आहेत, त्या लक्ष्मींचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला . ती भृगु ऋषी आणि आई ख्याती यांची कन्या आहे. तिला महालक्ष्मी म्हणतात.महालक्ष्मीजींना चार हात आहेत. जे दूरदृष्टी, दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि व्यवस्था शक्तीचे प्रतीक आहेत. माता महालक्ष्मी नेहमी आपल्या हातांनी भक्तांवर आशीर्वाद देतात. हे शुक्रवारी देवी लक्ष्मीला समर्पित केला आहे. चला मग देवी लक्ष्मीसंबंधी गोष्टी जाणून घेऊयात रहस्यमयी गोष्टी
- काही मान्यतेनुसार , भगवान विष्णूंसोबत वैकुंठामध्ये वास्तव्य करणाऱ्या महालक्ष्मीची आठ रूपे आहेत. स्वर्गलक्ष्मी, स्वर्गात राहणारी, राधाजी, गोलोकात वास करणारी, दक्षिणा, यज्ञात राहणारी, गृहलक्ष्मी, घरात राहणारी, शोभा, सर्वस्वात वास करणारी,
- समुद्रमंथनातून जन्मलेल्या लक्ष्मीचा विष्णूची पत्नी महालक्ष्मीशी थेट संबंध नाही. समुद्रमंथनातून जन्मलेल्या लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात. देवराज इंद्र आणि कुबेर यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. इंद्र हा देवांचा आणि स्वर्गाचा राजा आहे आणि कुबेर हा देवांच्या खजिन्याचा रक्षक आहे. इंद्र आणि कुबेर यांना एवढे वैभव आणि राजसत्ता केवळ धनदेवतेच्या कृपेने प्राप्त झाली आहे.
- जरी काही लोक आई लक्ष्मीला महालक्ष्मी आणि विष्णुप्रिया म्हणतात आणि तिची आठ रूपे सांगितली जातात. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. ही अष्टलक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी महालक्ष्मीचे रूप आहे असे ते मानतात.
- समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीचा अर्थ लक्ष्मीला कमला म्हणून संबोधतात आणि देवी मानतात.
https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/do-you-know-the-secrets-related-to-goddess-lakshmi-learn-interesting-information-630424.html
https://marathi.indiatimes.com/astro/religion-festival-news/birth-story-of-mata-laxmi-katha-in-marathi-who-is-goddess-lakshmi-mother-father-astro-news/articleshow/112679452.cms
लक्ष्मी’ म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती धन, संपत्ती आणि सगळेजण धनसंपत्ती मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. आपले संपूर्ण आयुष्य पैसा जोडण्यात आणि संग्रही करण्यात खर्च होते. तरी वेळ प्रसंगी कधी पैसे कमी पडतात, तर कधी उसने घ्यावे लागतात. अशा वेळी वाटते, लक्ष्मी आपल्याकडे का थांबत नाही? लक्ष्मी चंचल आहे पण काही ठिकाणे आहे जिते लक्ष्मी कायम राहते, ती ठिकाणे कोणती आहेत? जाणून घेवूया.

विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून

कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई
[संपादन]
महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ॥ मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् ॥ तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥ या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.
पुराणग्रंथ आणि शिलालेख
[संपादन]
पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महालक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव्य आहे परंतु करवीरात शिव व महालक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट अशा विविध पुराव्यांवरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतकापासून सापडतात (शके ७९३, इ.स. ८७१) ठाणे जिल्ह्यात सापडलेला ताम्रपट तसेच गोमंतक प्रदेशात फोंडा येथे सापडलेल्या ताम्रपटात कदंब वंशीय राजा पहिला षष्ठ याने कोल्हापुरात येऊन श्री महालक्ष्मीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. हा काळ शके ९६० व इ.स. १०३८ असा आहे. या स्थानावर सत्ता असणारा व महालक्ष्मीवर श्रद्धा असणारा राजा म्हणजे शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महालक्ष्मीचा वरदहस्त आहे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीरक्षेत्रावर शके ९८० (इ.स. १०५८) पासून शके १११३ (इ.स. ११९१) इतका प्रदीर्घ होता. याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मिरज येथे आहे यात शिलाहार नृपती ने स्वतःच्या राजवंशाचा उल्लेख करताना "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसादादि "असा उल्लेख केला आहे. मारसिंह,बल्लाळ,गंडरादित्य विजयादित्य व व्दितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मीचा साक्षात श्रद्धा भाव आढळून येतो. देवगिरीच्या यादव वंशातील राजा सिंघन देव याने ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली. इ.स. १२१३ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महालक्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती खिद्रापूरच्या अमृतेश्वराला भरभरून दान देत असतानाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला ही आपल्या सेवका तर्फे तोरण बांधले अनेक जेष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील महाद्वार होय. याची नोंद असणारा शिलालेख महाद्वाराच्या शेजारीच असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपतीच्या मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता ८ व्या ते ९ व्या शतका पर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते. आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे.
श्री दुर्गा सप्तशतीची सर्वस्याद्या महालक्ष्मी
[संपादन]
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्यात तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे मातृलिंग गदा खेट पानपात्र विभ्रती ॥ नागलिंगच योनि बिभ्रती नृप मुर्धनी ॥ त्याच प्रमाणे नित्य कर्म संग्रहात तिचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. धृत्वा श्री मातुः लिंगं तदुपरीच गदा खेटकं पानपात्रम ॥ नागलिंगच योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा ॥ अर्थात महालक्ष्मी ही त्रिगुणी परमेश्वरी व मुळ आदिमाया भगवती पराशक्ती आहे. ती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती आहे. ह्या तिघींनी मिळून त्रिदेव-देवी आणि सर्व देवतांची निर्मिती केली.
मुळ प्रकृती - महालक्ष्मी तमोगुणी - महाकाली सत्वगुणी - महासरस्वती
त्रिदेवांची निर्मिती :
चतुर्भुज महाकाली - शंकर, सरस्वती चतुर्भुज महालक्ष्मी - ब्रम्हा, लक्ष्मी चतुर्भुज महासरस्वती - विष्णू, गौरी
महालक्ष्मी ने अनेक अवतार घेऊन असुराचां वध केला. महिषासुरमर्दिनी बनून महिषासुराचा तर करवीरची जगदंबा कोल्हासुरमर्दिनी बनून कोलासुराचा वध केला आणि दुर्गा बनून दुर्गमासुराचा वध केला.
महालक्ष्मी देवीची मूर्ती
[संपादन]
महालक्ष्मी मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुंग) आहे. श्रींच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्त्व व पुरुष तत्त्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून ही मूर्ती उजेडात आणली असे म्हणले जाते आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हणले जाते. ज्याप्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे या मार्गाच्या मध्य भागी म्हणजेच सर्वोच्च बिंदू स्थानावर तिची मूर्ती उभी आहे संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाड पंथी असे एकमेव दोन मजली मंदिर असावे महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महालक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरूपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. महालक्ष्मीच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणे वरच्या मजल्या वरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यास वायू विजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत.
मातृमंडलपीठस्था मातृमंडलपूजिता
श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मी ची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदूळाची रास, सुपारी, शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहीत करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते.(उदा. सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर). या प्रमाणे साक्षात जगदंबे च म्हणजे आईचं लिंग रूप ते मातृलिंग. यामुळे च शिवलिंगाला असलेल्या सोमसुत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. (तीथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते)
मातृलिंग स्थापनेचे कारण :
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णूपत्नी. ती साक्षात त्रिदेव-देवी व सर्व देवतांची आई आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तीला लिंगत्रयातीत म्हणले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. परंतु या सिद्ध स्थानाची उर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या (शेजघर, भांडारघर, स्नान घर ) व बाहेरून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे.
हिंदू कथांनुसार दैवतांना पुजण्याचे पाच प्रमुख मार्ग आहेत. 1) शक्ती 2) शिव 3) सूर्य 4) विष्णू 5) गणपती प्रत्येक मार्गाच्या त्याच्या स्वतःच्या सर्वोच्च देवता आहेत. 1. शक्ती : देव शक्ती उपासना 2. शिव: उपासना देव शिव, 3. सूर्यः देव रवि, 4. वैष्णव: उपासना देव विष्णू आणि 5. गणपती : देव गणेश. यापैकी, दीर्घ काळापासून शक्ती पूजा एक जाते. शक्ति देवी महालक्ष्मी असा याचा अर्थ आहे.
कोल्हापूरची आई अंबाबाई
[संपादन]
कोल्हापूरची देवी महालक्ष्मी ही बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखली जाते. अंबा म्हणजे माता आणि बाई हे आदरातिथ्य. अर्थात जगाची माता अंबाबाई. योग शास्त्र मते, यात् मानवी शरीरातिल् त्यात 'सात' चक्रे आणि विश्व समाविष्टीत आहे. 'मूलाधारचक्र' त्याची देवी महालक्ष्मी आहे.
बालाजीची पत्नी आणि करवीरची माहेरवाशीण
[संपादन]
श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) ही साक्षात प्रधान प्रकृती. तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप. त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्व:तत्वातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट केले. हीच लक्ष्मी महासरस्वती पुत्र विष्णूंची अर्धांगिनी होय. लक्ष्मी विष्णूंच्या अनेक अवतारात सोबत असे. राम अवतारात सिता, कृष्ण अवतारात रूक्मिणी आणि बालाजी अवतारात पद्मावती.
भृगू ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. आपल्या स्थानाचा अपमान केला तरी पतींनी ऋषींना शासन केले नाही. ह्या रागाने श्री लक्ष्मी देवी आपल्या माहेरी करवीर नगरी आपल्या आई महालक्ष्मीकडे आली. आणि इथेच राहिली. कडक तपश्चर्या केल्याने विष्णूंना श्री लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली. आणि म्हणूनच शारदीय नवरात्रीत दरवर्षी तिरूपती बालाजीवरून आई ह्या नात्याने करवीर महालक्ष्मीसाठी मानाचा सोन्याने मढलेला भरजरी शालू येतो. अनेकांना वाटते करवीरची महालक्ष्मी (अंबाबाई) ही बालाजीची पत्नी आहे. पण तसे नाही बालाजी हे महालक्ष्मी (अंबाबाई) चे जावई आहे. तर महालक्ष्मी ही लक्ष्मीची आई असल्याने बालाजी यांची सासूबाई आहे.
महालक्ष्मीची महाराष्ट्रातील अन्य देवळे
[संपादन]
- मुंबईची महालक्ष्मी
- पुणे शहरातल्या सारसबागेसमोरची महालक्ष्मी
- पश्चिम रेल्वेवर मुंबई जवळच्या सफाळे रेल्वे स्थानकपासून चौदा किलोमीटरवरील उसरणी गावात असेच एक तीन मूर्ती असलेले देऊळ आहे.
- एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेली अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. उदा. पुणे जिल्ह्यातील उंब्रज गावात अशा तीन देवी असलेली तीन मंदिरे आहेत. येडगाव या गावातही असे एक देऊळ आहे, बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थानात या तीन देवींचे एक प्राचीन मंदिर आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड येथे सुधा महाकाली, महालक्ष्मी आणि महासस्वती यांची मूर्ती असलेले मंदिर आहे. नवरात्रात येथे नऊ दिवस यात्रोत्सव भरतो. नऊ दिवस घटि बसण्याची येथे प्रथा आहे. नवसाला पावणारी जगदंबा म्हणून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तसेच पौष पौर्णिमेला वानखेड गावाची यात्रा असते आणि देवीची भव्य मिवणूक निघते.
- कोटमगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथेही एकाच देवळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची मूर्ती असलेले स्वयंभू श्री जगदंबा माता मंदिर आहे. नवरात्रात येथे नऊ दिवस यात्रोत्सव भरतो.नऊ दिवस घटि बसण्याची येथे प्रथा आहे. नवसाला पावणारी जगदंबा म्हणून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
लक्ष्मी
लक्ष्मी : ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता ‘श्री’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी
श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे. ती विष्णुमनोनुकूला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय. धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपांतही ती पूजनीय मानली जाते. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इ. लक्ष्मीचीच रूपे आहेत. ऋग्वेदातील ज्ञानसूक्तात ‘भद्रैषां लक्ष्मीर्निहताSधि वाचि’ (१०.७१.२) इ. मंत्रांत एक प्रकारे वाग्लक्ष्मीचाच निर्देश केलेला दिसतो. वाणीचे भद्र सौंदर्य हीसुद्धा लक्ष्मीच. भागवत पुराणात विष्णूची शोभा, कांती म्हणजेच लक्ष्मी, असा निर्देश केलेला दिसतो. वाजसनेयिसंहितेतील (३१.२२) पुरुषसूक्ताच्या शेवटच्या मंत्रात मात्र ‘श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ’ असा निर्देश आला आहे. त्यावरून ‘पुरुष’ रूपी विष्णूच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत्या, असा संदर्भ मिळतो. म्हणजेच श्री आणि लक्ष्मी यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या येथे निर्वाळा मिळतो. तैत्तिरीय उपनिषदात (१.४) वस्त्र, गोधन, अन्न आणि पेय यांचा श्री म्हणजे लक्ष्मी असा निर्देश केला आहे.
ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.
या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.
ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतो त्या त्या वेळी लक्ष्मीसुद्धा विष्णुची सहचरी होण्यासाठी अवतार घेते. वामनावतारात तिने पद्मेचा अवतार घेतला. परशुरामाच्या अवतारात तिने धरणीचे रूप घेतले. रामावतारात ती सीता बनली आणि कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली.
इंद्रैश्वर्यरूपी लक्ष्मीबाबत पुढीलप्रमाणे कथा प्रचलित दिसते : दुर्वासाच्या शापाने इंद्र हा लक्ष्मीपासून भ्रष्ट झाला. त्यामुळे स्वर्गलक्ष्मी वैकुंठात येऊन महालक्ष्मीत विलीन झाली. नंतर नारायणाच्या आज्ञेने स्वर्गलक्ष्मीच्या रूपातील लक्ष्मी क्षीरसागराची कन्या म्हणून जन्मास आली. देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशायी विष्णूला वरमाला अर्पण केली.
इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दु:शील आणि अस्वच्छ व्यक्तींचा त्याग करते. जेथे हरिपूजा आणि हरिकिर्तन होत नाही, त्या स्थानाचा ती त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मीच्या नित्य सांनिध्यात असतात.
या लक्ष्मीची पूजा स्त्रि यांनी चैत्र, भाद्रपद व पौष मासांत विशेषतः करावी. दीपावलीतील [⟶ दिवाळी] अमावस्येस लक्ष्मीपूजेचा विशेष विधी पुराणांत उल्लेखिलेला दिसतो. या दिवशी विशेषतः प्रदोषकाली लक्ष्मीची पूजा करावी. (पहा : मराठी विश्वकोश : खंड ९, चित्रपत्र ५१).
पहा : महालक्ष्मी.
संदर्भ : प्रभुदेसाई, प्र.कृ. आदिशक्तीचे विश्वरूप अर्थात देवीकोश, ४ खंड, पुणे, १९६७-७२.
धर्माधिकारी, त्रि. ना.
https://vishwakosh.marathi.gov.in/31766/
महालक्ष्मी

भारतीय परंपरेत ⇨ लक्ष्मी हे विष्णुपत्नीचे नाव आहे परंतु ‘महा’ हे विशेषण लावून बनलेला ‘महालक्ष्मी’ हा शब्द मात्र कधी विष्णुपत्नी या अर्थाने, तर कधी शिवपत्नी या अर्थाने वापरला असल्याचे आढळते. हे दोन अर्थ वर उल्लेखिलेल्या अर्थापेक्षा काहीसे वेगळे आहेत. वाचस्पत्य या संस्कृत शब्दकोशात हे दोन्ही अर्थ दिले आहेत. ‘लक्ष्म’ या शब्दाचा ‘चिन्ह’ असा अर्थ असल्यामुळे ‘लक्ष्मी’ या शब्दाचा ‘शुभ चिन्हे असलेली’ म्हणजे पर्यायाने ‘कल्याणकारक’ असा अर्थ होतो. या दृष्टीने पाहता महालक्ष्मी हे विशेषण विष्णुपत्नी व शिवपत्नी या दोघींच्याही बाबतीत अन्वर्थक ठरते. कारण, त्या दोघीही कल्याणकारक देवता असल्याची त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे.
ऋग्वेदातील ‘ खिलसूक्तां ’पैकी श्रीसूक्तात महालक्ष्मी ही विष्णुपत्नी मानल्याचे आढळते. पुराणांतूनही विष्णुपत्नीचा महालक्ष्मी म्हणून निर्देश येतो. कोल्हापूरखेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णुपत्नी आहे, असे मानून त्यानुसार मूर्ती बनवली जाते, असे देवीकोशात म्हटले आहे.
याउलट, महालक्ष्मी म्हणजे ⇨ दुर्गा असल्याचे निर्देशही आढळतात. उदा., महिषासुरमर्दिनी चंडीलाच महालक्ष्मी मानण्यात आले आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे स्थान हे एक ⇨ शक्तिपीठ असल्यामुळे स्वाभाविकच तेथील देवी ही दुर्गा ठरते. [⟶ कोल्हापूर शहर].
स्त्रियांना छळणाऱ्या कोलासुर नावाच्या दैत्याचा महालक्ष्मीने नाश केला या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचे आगमन होते, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा होते व मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन होते. आश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मीव्रत नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कोल्हापूर, मुंबई, झांशी, गोव्यातील बांदिवडे इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत.
संदर्भ : 1. Agrawala, Vasudeva Sharan, Ed. Devl-Mahatmyam, Varanasi, 1968. २. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), ३ खंड, पुणे, १९६७–६८.
साळुंखे, आ. ह.
अष्ट लक्ष्मी | Ashtalakshmi | Ashta lakshmi
https://www.artofliving.org/in-mr/wisdom/ashtalakshmi
माता लक्ष्मी नेहमी श्रीविष्णूंच्या पायाशीच बसलेली का असते?
मराठी बातम्या / धर्म / Mythological Story : माता लक्ष्मी नेहमी श्रीविष्णूंच्या पायाशीच बसलेली का असते?
May 06, 2023 08:22 AM IST
Truth Behind Mata Lakshmi Sit In Feet Of Lord Vishnu :
श्रीपुरम धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिर वेल्लूर(तामिळनाडू)मध्ये स्थित आहे. हे मंदिर वेल्लूर शहरातील दक्षिण भागात आहेत. या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास 15,000 किलोग्रॅम विशुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी 300 कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे.
मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी असते.
100 एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चोहीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना वृत्ताकार आहे. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून 'सर्व तीर्थम' नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे.
कसे पोहोचाल...
देशातील
कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा
उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन काटपाडी असून
येथून महालक्ष्मी मंदिर फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. काटपाडी स्टेशन
वेल्लूर शहरातीलच एक भाग आहे.
लक्ष्मीची रूपे: अष्टलक्ष्मी : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सुख-समृद्धीची 8 रूपे; जीवनात अशाप्रकारे उत्साह...
- Marathi News
- Jeevan mantra
- Dharm
- Ashtalakshmi: 8 Forms Of Happiness And Prosperity In Every Sphere Of Life
https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/ashtalakshmi-8-forms-of-happiness-and-prosperity-in-every-sphere-of-life-129089150.html
लक्ष्मी पूजन – मराठी गोष्टी
Skip to content
लक्ष्मी पूजन
दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करण्यामागे वेगवेगळी करणे सांगितली जातात.
विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत पोहोचले. श्रीरामाचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला. तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवुन उत्सव साजरा केला.
तेव्हापासून वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणुन दिवाळी साजरी करण्याची पद्धत पडली. रामाने अयोध्येत गेल्यावर, राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये, राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी.
रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालु ठेवली.
दिवाळी पासुन व्यापारी वर्ग आपले नवे वर्ष सुरु करतात. नव्या चोपड्यांची (हिशोब आणि कारभाराच्या वह्या) पूजा करून त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरु करतात. तेही गणपतीने ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी अशी पूजा करतात.
हीच पद्धत बाकी वर्गात सुद्धा रूढ झाली.
गणपती हा प्रथमेश म्हणजे पुजण्याचा पहिला मान असलेला देव मानला जातो. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या पूजेची सुरुवात गणपतीच्या पुजेनेच होते. त्याशिवाय लक्ष्मीपूजनात गणेश असण्याची एक खास कथा हि आहे:
माणसाला जगात बरीचशी सुखे उपभोगायला पैसा हा लागतोच. त्यामुळे माणुस आयुष्यभर पैशामागे पळत असतो, तो मिळावा आणि आणखी मिळावा अशी नेहमीच त्याची इच्छा असते.
लक्ष्मी हि धन, समृद्धी, संपत्ती याची देवी आहे. सर्व जण सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना करत असतात. लक्ष्मी ही सदैव उत्तमोत्तम दागदागिने यांनी नटलेली असते. ती आणि तिचे पती विष्णु नेहमी ऐश्वर्य संपन्न असत.
याउलट शंकर पार्वतीची जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साधा पेहराव असलेली. शंकराच्या गळ्यात तर दागिन्यांच्या जागी रुद्राक्षाच्या माळा आणि नाग असे.
यामुळेच एकदा देवी लक्ष्मीला थोडा गर्व झाला. ती भगवान विष्णूशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करायला लागली. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्वाची आहे, मी किती पूजनीय आहे असे म्हणायला लागली. विष्णुने त्यामागचा अहंकार ओळखला.
तिचे गर्वहरण करायला म्हणुन ते म्हणाले “बरोबर आहे लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच. तुझ्या कृपेशिवाय आनंदी राहता येणं अवघड आहे. पण तु पार्वतीसारखं अजुन मातृत्वाचा आनंद मात्र घेतलाच नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशी करता येणार नाही.”
लक्ष्मीला स्वतःस अपत्य नव्हते. पार्वतीला कार्तिकेय आणि गणपती हे दोन पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणुन ती पार्वतीकडे गेली. पार्वतीला तिच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र मला दत्तक दे अशी विनंती केली.
पार्वतीने विचारले “मी माझ्या धाकट्या गणेशाला तुला दत्तक दिलेही असते. पण तू काही एका ठिकाणी राहत नाहीस. मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील?”
लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही याचा अर्थ: घरी पैसे समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानतात. लक्ष्मी हि चंचल स्वभावाची असते असे म्हणतात. म्हणुन तिला घरी प्रसन्न ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते. तिची पूजा करावी लागते. ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघुन जाते. ती विष्णुवर एकदा नाराज होऊन गेली तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते अशी कथा आहे.थोडक्यात, लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण मेहनत करत राहावी असा यामागचा संदेश आहे.
लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्याच रूपात मानुन आदर दिला पाहिजे असे सांगतात तेही याच अर्थाने. जिथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होत जाते. ती खुश नसेल तर घरात आनंद येऊ शकत नाही.
लक्ष्मीने तिला आश्वस्त केले. “मी गणेशाची पूर्ण काळजी घेईन. तू निश्चिन्त रहा. माझे सगळे ऐश्वर्य, संपत्ती हे गणेशाचेच आहे असे समज.
माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पुजणार नाहीत अशा ठिकाणी मीही राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत पुजेल अशाच भक्तांना मी प्रसन्न होईन.”
पार्वतीचे समाधान झाले. तिने गणेशाला पार्वतीला दत्तक दिले. लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला, गणेशाला आणखी एक आई मिळाली.
तेव्हापासुन लक्ष्मी आणि गणेशाची सोबतच पूजा होते.
काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगळ्या मूर्तीची पूजा करतात, तर काही जण लक्ष्मी सरस्वती आणि गणेश यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात.
यामागचा प्रतीकात्मक अर्थ असा:
लक्ष्मी संपत्तीची देवता, गणपती बुद्धीची देवता, सरस्वती ज्ञानाची देवता.
बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते. ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते. संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते. नाहीतर आहे ती संपत्ती नष्ट होते.
बुद्धी, ज्ञान, संपत्ती या तिन्हीमधे भर पडावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपण आहे तेवढ्यातच संतुष्ट राहिलो तर एक दिवस बुद्धीचा प्रभाव कमी होतो, ज्ञान कालबाह्य होते, संपत्ती संपुन जाते.
त्यामुळे या सर्वात देवांची कृपा असावी म्हणुन हि पूजा. हे एका दिवसापुरते प्रतीक आहे, त्यासाठी मेहनत नेहमी करायची आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
आपण फक्त परंपरा, कर्मकांड याच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यामागच्या गाभ्याकडे दुर्लक्ष करतो.
ह्यासाठी एक उदाहरण देतो. अनेक कंपन्यांमध्ये वर्धापन दिन साजरा करतात. २५वा, ५०वा अशा विशेष प्रसंगी तर भला मोठा समारंभ असतो. मग अशा कार्यक्रमात आकर्षक सजावट असते, मुख्य व्यवस्थापकांचा, उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो, सर्वांना मेजवानी असते, आनंदी वातावरण असते.
ह्या कंपन्यांमध्ये वर्षभर अविरत काम चालु असते, त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होते, तेव्हा कुठे वर्षानुवर्षे हा दिवस साजरा होतो. जर कंपनीचा कारभार नीट नसेल, प्रगती होत नसेल, तर अशा सोहळ्यांना काही अर्थ नसतो.
सोहळे आहेत म्हणून कंपनी नसते उलट कंपनी चांगली चालु असते म्हणुन सोहळे असतात.
तसेच फक्त अमुक पूजा केल्यामुळे लक्ष्मी किंवा कुठलेही प्रसन्न होते असे न समजता वर्षभर आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी मेहनत करावी, आणि या कामात देवांची कृपा असल्याबद्दल आभार मानायला आणि अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन असे सण साजरे करावेत.
https://marathigoshti.com/lakhsmi-pujan-diwali-laxmi-pujan/#google_vignette
https://mr.quora.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80
पुराणिक कथात कधी कधी ह्या देवतांना दुययम स्थान दिलेले असते ते हेच मानून की ह्या सर्व देवता एकाच परमेश्वराची वेगवेगळी रुप आहेत! जर उपासनेच्या अंती सर्वच ब्रह्म रूप होतात तर अनादी देवता तरी गौण कश्या असतील! माझे उपास्य दैवत हेच मोठे आणि इतर देव छोटे असे हे अज्ञ लोकांचे मत आहे!
काही उदाहरणे देतो …
मुस्लिम पंथ , जैन पंथ इत्यादी हेच मानतात की हा पंथ अनादीच आहे जरी इतिहासात तशी स्थिती दिसत नाही!
पौराणिक देवता आणि वैदिक देवतांना अनादी मानले गेले आहे! तरी ह्या सर्व देवता सर्व काळी अस्तित्वात होत्याच ही मान्यता आहे!
भगवान शिवजी मोठे की विष्णू ह्यावर चर्चा अनेक करतात ! हे समजायला हे दोन उतारेपहा..
इथे विष्णू भगवान शिवजी ची उपासना केल्याचं दाखवलं आहे!! तेच भागवतात कथा आहे की भस्मासुर ने त्रास दिला तेंव्हा विष्णूचे महत्व अधिक आहे हे दाखवलं आहे! खरे ते एकच आहेत!
हे रामचरित मानसात येते शिवद्रोहीला विष्णू भक्ती मिळत नाही आणि याच्या उलट पण आहे।
आता सरस्वती बद्दल बघू
जेंव्हा रामाचा युवराज्याभिषेक ठरला तेंव्हा देव घाबरले जर रामजी जर अयोध्ये चे राज्य करत बसले तर रावणाला कोण मारेल म्हणून सरस्वती ला मंथरेची बुद्धी फेरण
फेरणे हे काम दिले आणि तिने केले !
पण हीच सरस्वती पुढे म्हणते श्रीरामाच्या इच्छेविरुद्ध भरताची बुद्धी मी बिघडवू शकत नाही हे म्हणून रामाचे श्रेष्ठत्व ती मानते जी रामाचा राज्याभिषेक थांबवू शकते तीच पुढे जाऊन ..
सारांश:
आता समजून घ्या सर्व देवी देवता एकाच अनंत परमेश्वराची वेगवेगळी रूप आहेत ! काही जीव हिंदू धर्माला अनेक देवताची पूजा करतात असे म्हणतात ते अज्ञ आहेत खरे तर हिंदू लोक एकाच निर्गुण निराकार ईश्वराची अनेक रुपात पूजा करतात!
https://www.misalpav.com/node/30130
उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!
वसंतपंचमी हा सण माघ शुक्ल पंचमीस येत असतो. ह्या दिवशी सरस्वतीदेवीचा प्रकटदिन असतो. ह्या दिवसास श्री-पंचमी म्हणूनही ओळखले जाते. भारतातील सर्व भागांत ह्या दिवशी शाळांतून “सरस्वती पूजन” केले जाते. खालील श्लोकाने तिचे स्तवनही केले जाते.
या कुंदेंदुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना ॥
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती निःषेश जाड्यापहा ॥
कुंदाचंद्रतुषारहारसमशा वस्त्री रमे श्वेतशा ।
वीणा वादन जी स्वये करतसे पद्मातही श्वेतशा ॥
जी पूज्या विधि-विष्णु-शंकर अशा देवांसही तत्त्वता ।
रक्षो ती मज शारदा हरवु दे निर्बुद्धता पूर्णतः ॥
- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०१२६
वरील ठिपक्यांच्या रांगोळीतून सरस्वती व्यक्त होते अशी पारंपारिक धारणा आहे.
त्यामुळे ह्या रांगोळीचे पूजन करूनच नव-विद्यार्थ्याचे शिक्षणास आरंभ करण्याची प्रथा आहे.
आज, २०१५ सालच्या २६ जानेवारीस ज्यांना ’भारतरत्न’ प्रदान केले जात आहे त्या पंडित मदनमोहन मालवीय ह्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना वसंतपंचमीचेच मुहूर्तावर १९१६ साली केली होती.
नववर्षाची सुगी येत असते. वसंत ऋतूचे आगमन होत असते. म्हणून सर्व सृष्टी सुंदर लतापल्लवांनी आणि पुष्प-बहरांनी सजू लागते म्हणून ह्या दिवसांत देशभर वसंतोत्सव साजरा करण्यात येत असतो. पुण्यात तर कालांतरापासून “वसंत व्याख्यानमालाही” आयोजित केली जात असते.
लोकप्रिय समजानुसार वसंतपंचमीच्या सणाचे मूळ आर्यांच्या काळापर्यंत पोहोचते. खैबर खिंडीतून, इतर नद्यांसोबतच सरस्वती नदीही ओलांडून आर्य भारतात आले. त्या बाल्यावस्थेतील संस्कृतीचा बव्हंशी विकास सरस्वती नदीच्या तीरांवरच झाला. म्हणून सरस्वतीचा संबंध सुपीकतेशी आणि ज्ञानाशी जोडला गेला. तेव्हापासूनच हा सण साजरा करण्याची प्रथा पडली.
वसंत ऋतूच्या आगमनार्थ शेतकरी हा सण साजरा करत असतात. हा सण बव्हंशी उत्तर भारतात साजरा केला जातो. ब्राम्हणांना दान दिले जाते, सरस्वती पूजन केले जाते. ह्या सणाशी जोडला गेलेला रंग पिवळा आहे. कारण पंजाब, हरियाणात ह्या काळात सर्वदूर होत असणार्या मोहोरीच्या शेताचा रंग तिच्या पुलांच्या बहारीने पिवळापिवळा दिसू लागलेला असतो. प्रख्यात सूफी संत अमीर खुसरो ह्यांची एक सुरेख रचना ह्या सुगीचे सुरेख वर्णन करते.
सकल बन फूल रही सरसों -अमीर ख़ुसरो
सगन बिन फूल रही सरसों, सगन बिन फूल रही सरसो
अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
और गोरी करत सिंगार, मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,
सगन बिन फूल रही सरसों, सगन बिन फूल रही सरसों
तरह तरह के फूल खिलाए, ले गेंदवा हाथन में आए
निजामुदीन के दरवज़्ज़े पर, आवन कह गए आशिक रंग,
और बीत गए बरसों, सगन बिन फूल रही सरसों
टेसू = पळस
सरसों = मोहरी
मलनियाँ = मालन

मोहरली वनी मोहरी फुले, मोहरली वनी मोहरी फुले
आम्रमंजिरीचे झुलती तुरे, वनीवनी रक्तपळस बहरे,
कोकीळही कूजती हर्षभरे, शृंगारत यौवन युवती पुरे,
फुलराणी रचते शत झेले, मोहरली वनी मोहरी फुले
असंख्य सजवून रानफुले, घेऊन पुष्पगुच्छ ते गेले,
दारी अवलियाच्या आले, रंगबहार गंधही परिमळे,
असे किती ऋतू आलेगेले, मोहरली वनी मोहरी फुले
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०१२६
ह्या सणाच्या निमित्ताने पतंग उडविले जातात. मुक्तता आणि आनंद साजरा करण्यासाठी मुले आणि मोठी माणसे पतंग उडवतात. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरूवात ह्या दिवशी करावी अशी परंपरा आहे. म्हणून लहान मुलांच्या शिक्षणास ह्याच दिवशी सुरूवात केली जाते. पिवळसर रंगाची मिष्टान्ने वाटली जातात. गरीबांना पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटले जाते.
वेदांमध्ये सरस्वतीला जलदेवता मानले जाई. ती शुद्धतेचे, सुपीकतेचे आणि सुबत्तेचे प्रतीक होती. सरस्वती नदीच्या तीरावरील पवित्र प्रथांसोबत मग ती जोडली गेली. सर्व भाषांची, ग्रंथांची, साहित्याची आणि शिष्यवृत्तींची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा शोध तिनेच लावला असेही मानले जाते. तिनेच सोमरसाचा अथवा अमृताचा शोध लावला असेही मानले जाते.
मत्स्य पुराणानुसार सरस्वती ब्रम्हदेवाच्या मुखातून प्रकट झाली. मग तिच्या सौंदर्यावर आणि शालीनतेवर ब्रम्हदेवच मोहित झाले. ती सैरावैरा पळू लागली तेव्हा प्रत्येक दिशेला तिला एक मुख दिसू लागले. त्यामुळेच ब्रम्हदेवाला पाच मुखे असल्याचा समज दृढ झाला. सरस्वती ब्रम्हदेवाची सर्वात अनुपम निर्मिती होती. तिच्या निरंतर स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणूनच तिचा संबंध चंद्र आणि कमळ ह्यांचेशी जोडला जात असतो.
काही ठिकाणी, सरस्वतीस सूर्यकन्या मानले जाते. पश्चिम भारतात लोक सरस्वतीचा संबंध सिंहाशी किंवा मोराशी जोडतांना दिसतात कारण तिचे कार्तिकेयाशी लग्न झालेले होते. पूर्व भारतात, विशेषतः ओडिशा आणि बंगालात, सरस्वतीचे पार्वतीची मुलगी म्हणून पूजन केले जाते. असेही म्हटले जाते की, भगवान विष्णूंच्या तीन पत्नी आहेत. सरस्वती, गंगा आणि लक्ष्मी.
आर्य आणि सरस्वती
आर्य हे निषाद, साबर आणि पुलिंदर ह्या सरस्वतीच्या तीरांवरील वनवासी अनार्यांशी लढत असत. विष्णूच्या विनंतीवरून सरस्वती जमिनीवरून अदृश्य झाली आणि दूर राजस्थानात पुन्हा प्रकट झाली. अशा रीतीने वनवासी लोकांना जीवरक्षक जलापासून वंचित व्हावे लागले आणि त्यापायी ते क्षेत्रच सोडून जावे लागले. सरस्वतीच्या तीरावर आर्य लोक राहत असतांना त्यांच्या सुरूवातीच्या विकासात सरस्वतीने कळीची भूमिका बजावली. त्यामुळेच सरस्वती ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली.
अमरता आणि सरस्वती
सरस्वतीशी संबंधित अनेक पौराणिक कथांना सुरस सामाजिक स्पष्टीकरणे आहेत. देव आणि दानव ह्यांनी परस्पर सहमतीने अमृतासाठी सागरमंथन करण्याचे ठरवले. मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाचा दोर करण्यात आला. जेव्हा लक्ष्मी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाली तेव्हा दोघांनाही अमृत हवे झाले. सरस्वतीने आपल्या सौंदर्याने असुरांना आकर्षित करून घेतले. तेवढ्यात देवांनी अमृत पिऊन टाकले. ते अमृत पित असतांना राहू आणि केतू ह्या दोन्ही असुरांनी त्यांना पाहिले आणि ते देवांत मिसळून गेले. विष्णूने त्यांना अमृतपान करत असता पकडले. अमृतपान केल्यास ते अमर झाले असते. म्हणून विष्णूने ताबडतोब त्यांची मुंडकीच छाटून टाकली. त्यावर चिडून त्या असुरांनी सूर्य आणि चंद्र ह्यांनाच गिळून टाकले. मात्र त्यामुळे त्यांचे गळेच फाटून गेले. हिंदू पुराणांनुसार ह्याच कारणाने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणे होत असतात.
सरस्वतीशी संबंधित इतरही अनेक कथा आहेत. एकदा वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी परस्परांशी त्वेषाने भांडत होते. विश्वामित्रांनी सरस्वतीला (नदीला) सांगितले की तिने वसिष्ठांना त्यांच्या सर्व सामानानिशी वाहून घेऊन जावे. पण सरस्वतीने ह्यास नकार दिला. म्हणून सरस्वतीला शिक्षा करण्यासाठी त्यांनी सरस्वतीचे पाणी रक्तमय करून टाकले. नंतर शिवाचे विनंतीवरून दोन्ही ऋषींत सामंजस्य घडून आले आणि सरस्वती पूर्ववत शुद्ध झाली.
कालीदास आणि सरस्वती
लोककथांनुसार वसंतपंचमीचा संबंध महाकवी कालिदासासोबतही जोडला जातो. एका सुंदर राजकन्येशी त्याचा विवाह झाला होता. त्या राजकन्येने स्वतःहून बुद्धिमान नाहीत म्हणून असंख्य स्थळे धुडकावून लावलेली होती. त्या विवाहेच्छू पंडितांनी मग तिचे लग्न एका मूर्खाशी लावून देण्याचा घाट घातला आणि कालिदासाशी तिचे लग्न लावण्यात ते यशस्वीही झाले. त्यांना जंगलात एका झाडाच्या फांदीवर बसून ती फांदीच कुर्हाडीने तोडत असणारा एक माणूस दिसला. तो कालिदास होता. हाच माणूस तिच्याशी लग्न करण्यास निवडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कालिदासाला महान पंडित म्हणून दरबारात आणण्यात आले. असेही सांगण्यात आले की तो केवळ खुणांचे आधारेच बोलतो. त्याच्या त्या खुणांचा अर्थ मग त्या पंडितांनीच तिला आपापल्या परीने समजावून सांगितला. त्यावर प्रसन्न होऊन राजकन्येने त्याचेशी विवाह केला. मात्र नंतर तो मूर्ख असल्याचे आढळून आले तेव्हा राजकन्येने त्याला हाकलून दिले. त्यावर कालिदास आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. सरस्वती नदीवर गेला. मात्र सरस्वती स्वतः पाण्यातून प्रकट झाली. तिने कालिदासास त्या पवित्र पाण्यात स्नान करण्यास सांगितले. बाहेर आला तेव्हा कालिदास सूज्ञ झालेला होता. तो कविता लिहू लागला. तो दिवस वसंतपंचमीचा होता. त्यानिमित्ताने मग विद्यादेवी सरस्वतीचे पूजन होऊ लागले. वसंतपंचमीचा सण साजरा होऊ लागला.
महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.
वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.
वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.
सरस्वती देवी
अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.
बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!
सेयं शारदा सर्वदा सर्व+दा वर+दा सार+दा स्यात्।
डॉ. गौरी माहुलीकर – response.lokprabha@expressindia.com
प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना
ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना
ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता
Maa Saraswati Devi Mandire Story in Marathi
देवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं. सरस्वतीचा दुसरा संदर्भ आहे लुप्त झालेल्या नदीचा. याशिवाय देवी सरस्वतीबद्दल प्राचीन साहित्यात कोणकोणते संदर्भ आले आहेत, याची चर्चा-
अप्रशस्ता इव स्मसि
प्रशस्तिमम्ब नस्कृधि।
आम्ही अज्ञात आहोत,
आम्हास विख्यात कर हे सरस्वति!
‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या प्रार्थनेचे सूर प्रत्येक भारतीयाला परिचित असतात. अगदी लहानपणापासून सरस्वतीचे रूप सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असते. राजा रविवर्मा या प्रख्यात चित्रकाराने रेखाटलेली, हाती वीणा घेतलेली, शुभ्रधवल हंसावर आरूढ, शुभ्रवसना, सात्त्विक वदनाची ही देवी भारतीय परंपरेत विद्यादायिनी व कलोपासकांना मार्गदर्शन करणारी देवी म्हणून सुपरिचित आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्राची धामधूम सुरू होईल. नऊ दिवसांत मातृशक्तीचा उदो उदो होईल, महालक्ष्मी, दुर्गा, काली यांच्या बरोबरीने महासरस्वतीचाही जागर होईल; म्हणून सरस्वती प्राचीन काळापासून याच रूपात होती का, विश्वातील प्राचीनतम ग्रंथात ऋग्वेदातही ही अशीच होती का, तिचे पूजन कसे करतात, या नावाची एक नदीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यांची उत्तरे शोधण्याचा हा स्वल्प प्रयास! सरस्वतीची त्रिविध रूपे ऋग्वेदापासून दिसतात; महानदी, वाग्देवी आणि देवी. या तीनही रूपांचा परामर्श घेऊ.
महानदी सरस्वती
सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला. ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो. एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला. तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत.
14-sarsvati-lp
सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते. पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली. सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.
वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.
वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.
15-sarsvati-lp
बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.
सरस्वती देवी
अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.
बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!
अन्नपूर्णेश्वरी देवीची नावे
अन्नपूर्णा देवी ही हिंदू पौष्टिक देवी आहे. संस्कृतमध्ये 'अण्णा' म्हणजे अन्न आणि 'पूर्ण' म्हणजे पूर्ण; अन्नपूर्णा या शब्दाचा अर्थ अन्नपूर्णतेने पोषण करणे होय. अन्नपूर्णा देवी तिच्या उजव्या हातात अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलेले सोन्याचे लाडू आणि डाव्या हातात स्वादिष्ट लापशीने भरलेले भांडे धारण केलेले आहे. ती हिंदू देवी पार्वतीचा अवतार आहे, भगवान शिवाची पत्नी. हिंदू घरांमध्ये लोकांनी अन्नाची नासाडी केली तर अन्नपूर्णा देवींना राग येतो असे म्हटले जाते.अन्नपूर्णा हिला प्रजनन आणि शेतीची देवी म्हणून देखील संबोधले जाते ज्यामुळे भारतातील खेड्यापाड्यात या देवतेची प्रचंड लोकप्रियता होते. अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा या अन्न आणि कापणीच्या देवतेला समर्पित स्वतंत्र मंदिरांसह दक्षिण भारतात देखील वाजवी लोकप्रिय आहे.
अन्नपूर्णेश्वरी देवीची 108 नावे
देवी अन्नपूर्णेश्वरी स्तोत्रम्
- नित्यानंदकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी
निर्धुतखिलाघोरपावनकरी प्रत्यक्षमहेश्वरी
प्रलेयाचलवंशपवनकारी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकरी मतनपूर्णेश्वरी - नानरत्नविचित्रभूषणकारी हेमंबरदंबरी
मुक्ताहारविलांबमना विलासथ वक्सोजकुंभंतरी
काश्मीरगरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकारी मातनापूर्णेश्वरी - योगानंदकरी रिपुक्षयकारी धर्मार्थनिष्ठकारी
चंद्रार्कनालभासमनालहरी त्रैलोक्यरक्षकरी
सर्वैश्वर्यसमस्तवजन्चितकारी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देही कृपावलंबनकारी मातनापूर्णेश्वरी - कैलासचलकंदरालयकारी गौरी उमा शंकरी
कौमरी निगमार्थगोचरकारी ओंकारबिजक्षरी
मोक्षद्वराकापटपटनाकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकरी मातनपूर्णेश्वरी - दृष्टीदृष्टि विभूतिवाहनकारी ब्रह्मांडभांडोदरी
लीलानाटकसूत्रभेदनकारी विज्ञानदीपंकुरी
श्रीविश्वेशमणः प्रसादनाकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकारी मातनापूर्णेश्वरी - उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातनापूर्णेश्वरी
वेणीनिलसमनाकुंतलधारी नित्यानादनेश्वरी
सर्वानंदकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकरी मातनापूर्णेश्वरी - आदिशांतसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रीभवकारी काश्मिरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यंकुरा शर्वरी
कामकंक्षकरी जनोदयकारी काशीपुराधीश्वरी
भिक्षाम् देही कृपावलंबनकारी मातनपूर्णेश्वरी - अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थम् भिक्षां देही च पार्वती - माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः
बंधनः शिवभक्तश्च स्वदेशो भुवनत्रयम्
अन्नपूर्णेश्वरी देवी
- बरंबर प्रणाम म्या, बारंबर प्रणाम
जो दयावे तुमही अंबिके, कहा उपयोग विश्राम - अन्नपूर्णा देवी नाम तुम्हारो, होते सब काम परले युगांतर
और जन्मांतर, कलंतर तब नाम - सूर सूरो को रचना करते, कहा कृष्ण कहा राम
चुंहू चरण चमहू चतुरान, चारु चक्रधर श्याम - चंद्र-चूड चंद्रनन चकार, शोभा लाखी सलाम
देवी देव दिनी दशा माय, दया दया तव जामा - त्राही-त्राही शारंगत वत्सल, शरणरूप तव धमा
श्री ही श्रद्धा जी ए विद्या, श्री काली कमला काम - क्रांती भारतमयी क्रांती शांति सायोवर देतु
संदर्भ : 1. Chaturvedi, B. K. Saraswati, Delhi, 1996.
2. Nandkumar,Prema, Mahasaraswati, Chennai, 2003.
३. देशपांडे, सु.र., सरस्वती-दर्शन,पुणे, २००२.
देशपांडे, सु.र.
https://hindi.news18.com/news/dharm/sheetla-mata-mythology-of-chicken-pox-devi-sheetla-birth-story-know-about-sheetla-mata-interesting-facts-5143605.html
https://hindi.webdunia.com/sheetala-ashtami/sheetla-mata-story-120031300062_1.html
https://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/bhaidooj-stroy-in-marathi-118110600015_1.html
https://www.mymahanagar.com/festival/why-is-bhaubij-celebrated-what-is-the-story-of-yamraj-and-yamuna/495589/#goog_rewarded
https://www-nriol-com.translate.goog/indianparents/goddess-annapoorni.asp?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/annapurna-jayanti-2021-date-significance-puja-vidhi-and-katha-in-marathi-know-more-596048.html
https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/annapoornechi-kahani-marathi-122042700048_1.html
https://marathi.indiatimes.com/astro/religion-festival-news/ganga-birth-and-marriage-story-in-marathi/articleshow/82738289.cms
https://www.jagran.com/spiritual/religion-ganga-ki-katha-history-and-pauranik-katha-ved-purana-23425858.html
https://heydeva.com/ganga-river-in-marathi/
https://web.bookstruck.in/book/chapter/39019
https://www.sanatan.org/mr/a/861.html
https://www.jagran.com/sakhi/miscellaneous-festival-of-april2014-S8260SK.html
https://www.timesnowhindi.com/spirituality/article/sheetla-mata-mandir-gurugram-history-story-timings-contact-number-address-images-photos/395300
https://www.discovermh.com/sheetla-devi-mukhed/
https://www.lokmat.com/mumbai/mahim-ancient-sheetala-devi-temple-soon-to-be-renovated-a-grand-temple-complex-on-the-lines-of-goa-a-a681/
https://www.lokmat.com/kalyan-dombivli/sheetla-devi-in-kalyan-has-a-tradition-of-almost-150-years-the-worship-has-been-done-for-three-generations-a-a607/
https://www.navarashtra.com/blogs/swayambhu-shitladevi-of-kelva-nrvb-329397.html
https://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/birth-story-of-goddess-saraswati-121101400015_1.html
en-m-wikipedia-org.translate.goog



























































































_(6843511981).jpg)




























.jpg)
.jpg)













.jpg)
.jpg)


























