कसे जायचे :
पुणे कडून :-
१) संगमनेरमार्गे :-
पुणे-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजुर-रंधा धबधबा ( पावसाळा संपताना ) -रतनवाडी फाटा- शेंडी- इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). जर रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्यास रतनवाडीच्या मार्गाने जावे.
किंवा भंडारदरा-पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( पहिला मार्ग ) ( एकुण अंतर -२४८ कि.मी.)
२) बोटामार्गे :-
पुण्यातून शिवाजीनगर, खडकी, नारायणगाव, आळेफाटा-बोटा-ब्राम्हणवाडा-कोतुळ-कोतुळ फाटा-राजुर-रंधा धबधबा-रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -२०० कि.मी.)
३) ओतुरमार्गे :-
पुण्यातून शिवाजीनगर, खडकी, नारायणगाव, आळेफाटा-ओतुर-ब्राम्हणवाडा-कोतुळ-कोतुळ फाटा-राजुर-रंधा धबधबा-रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -२०० कि.मी.)
अर्थात दोन आणि तीन क्रमांकाच्या मार्गाने शक्यतो दिवसा प्रवास करणे योग्य.हा रस्ता एकेरी असून विशेष सोयी नाहीत.मात्र हे दोन्ही मार्ग जवळचे आहेत.
मुंबई वरुन :-
मुंबईमधून स्वतःच्या गाडीने जायचे झाल्यास मुंबई भिवंडी, ईगतपुरी, भंडारदरा मार्गे सामराद गावी पोहचून सांधन दरीला जाता येते. येथे यायचे झाल्यास खाजगी गाडीनेच येणे सोयीस्कर आहे, नाहीतर बर्याच गाड्या बदलून बदलून येण्यातच वेळ जाईल.
१) इगतपुरी,बाहुलीमार्गे :-
कल्याण- शहापुर-कसारा-इगतपुरी-भावली-आंबेवाडी-वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -१८१ कि.मी.)
२) घोटी-भंडारदरा मार्गे :-
कल्याण- शहापुर-कसारा-इगतपुरी-घोटी ( घोटी-भंडारदरा रोड ) वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -१९९ कि.मी.)
नाशिककडून :-
नाशिक-वाडीविर्हे- घोटी ( घोटी-भंडारदरा रोड ) वासाली फाटा-वारघुशी फाटा- शेंडी-भंडारदरा- पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद ( एकुण अंतर -९३ कि.मी.)
जर सर्व परिसर फिरायचा असेल तर वर्तुळाकार मार्गे असा आहे.
रतनवाडी फाटा-शेंडी-भंडारदरा -पांझरे-उडदवणे-घाटघर-साम्रद -रतनवाडी-रतनवाडी फाटा- शेंडी-भंडारदरा-
शनिवारी सकाळी मुंबई-पुण्याहून निघून इगतपुरी गाठायचं. तिथून शेंडी या गावाला जायला थेट जीप किंवा रिक्षा मिळतात. तिथून पुढे सामरदला जायलाही तशीच सोय तिथून होते.
प्रवास करत दुपारी सामरदला पोहोचलात की गावातल्या एखाद्या घरात तुमची जेवणाची व्यवस्था सहज होऊ शकते. चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट जेवण पोटात गेलं की आत्मा शांत होतो. थोडा वेळ आराम करून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायचं. सांधण दरीचा सुरक्षितपणे आनंद घ्यायचा तर एखादा गाईड सोबत हवाच. तो तुम्हाला गावात मिळू शकेल. तुमच्या जेवण्या-खाण्याची, रात्री झोपण्यासाठी तंबूची आणि साहसी उपक्रमांसाठी आवश्यक त्या साहित्याची सोय तो तुम्हाला हमखास करू देऊ शकतो. अर्थात त्यासाठी थोडा खिसा मोकळा करण्याची तयारी हवी. दरी गावाला खेटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही. पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो.
अलंग,कुलंग्,मदन्,साकिरा,किर्डा आणि महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शैल कळसुबाईची देख्णी रांग
घाटघर धरण
घाटघर् धरण.इथे दोन धरणे बांधली आहेत.एका धरणातून पाणी दुसर्या धरणात सोडले जाते आणि त्यावर वीज निर्मिती केली जाते.
भंडारदर्यावरुन दिसणारा रतनगडाच्या मागचा सुर्यास्त
कधी जायचे :
सांधण व्हॅलीला जाण्यासाठी जुनचा मघ्य ते सप्टेंबर हा पुर्णपणे अयोग्य काळ. या काळात सांदण व्हॅलीत मोठ्या प्रमाणात पाणी वहात असते.त्यामुळे दरीत प्रवेश शक्य नसतो.काहीवेळा या काळातही पर्यटक इथे येतात्,मात्र दरीच्या सुरवातीच्या भागात पाण्यात स्नानाचा आनंद घेतात.मात्र या भागात पडणारा पाउस आणि पाण्याला असलेली ओढ विचारात घेता हे प्राणघातक ठरु शकते.मात्र या काळात येण्याचा एक फायदा म्हणजे इथे असणारे मोठ्या प्रमाणात धबधबे आणि दरीतून येणार्या जोराच्या वार्यामुळे उलट उडणारे पाण्याचे तुषार्,हे पहाण्याचा आनंद घेता येतो.
पुढेही ऑक्टोबर महिन्यात पाणी वेगाने वहात असते,त्याकाळातही परिस्थिती बघून निर्णय घेणे योग्य. शक्यतो टाळलेले चांगले. नोव्हेंबर ते मार्च हा काळ तुलनेने थोडासा कठीण म्हणता येईल.नोव्हेंबर आणि डिसेंबर याकाळात पाण्याची पातळी एका डबक्यात २ ते ३ फुट असते तर दुसर्या डबक्यात जवळपास ४ ते ६ फुट असते. तर जानेवारी ते फेब्रुवारी या काळात हिच पातळी १ ते २ फुटाने खाली जाते.
मार्च ते मे :-
सांदण दरीत जाण्यासाठी हाच सर्वाधिक योग्य काळ.या काळात पाण्याची पातळी अगदी आरामात पार करता येईल इतकी कमी असते.
सांदण आणि करोली घाट ट्रेक :-
जर केवळ सांदण दरी न बघता रॅपलींग करुन खाली उतरुन करोली घाटमार्गे ट्रेक पुर्ण करायचा असेल तर अर्थातच जुन ते ऑक्टोबर हा काळ पुर्णपणे अयोग्य. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात हा पुर्ण ट्रेक केलेला चांगला.
सांदण दरीची थरारक वाटचाल :-
सामरद गावाच्या पुढे साधारण १५.२० मि. चालल कि एक वाडी लागते
इथल्या पठारावर गाड्या पार्क केल्या जातात.वाडीहुन आणखी १० मि पुढे गेलो कि सांधण घळीच्या मुख्य वाटेला लागतो.साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात.

साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)
साम्रद या आदिवासी पाड्यापासून साधारणपणे 10- 15 मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने आपण घळीच्या तोंडापाशी येतो.अगदी एका ओढ्यात आपण उतरावे एवढा सोपा मार्ग या दरीच्या तोंडाशी दिसून येतो. दरी अशी वरून दिसुन येत नाही कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली आहे. त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसते. या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य आहे. दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आपण दरीच्या मुखाशी येऊन उभे ठाकतो. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा.
काही क्षणातच घळीजवळ दाखल होतो
इथे हौशी पर्यट्कांनी घळीच्या तोंडाशीच गर्दी केलेली दिसते
सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. दरीच्या सुरुवातीला दोन ओढे एकत्र मिळतात व याच ओढ्यावर जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त झालेला असल्यामुळे झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे हे पाणी या उतरत्या ठिकाणी वाहत जाते.झऱ्याचे पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते.अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून उल्हासित होउन पुढे निघायचे.
हि गर्दी बाजुला ठेवून सांदण दरीच्या मुखातून आत शिरायचे.
ह्या झऱ्याच्या पुढे असलेला सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी 15 - 20 फूट आहे, तर काही ठिकाणी अगदीच 2-3 फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे. या उंचीमुळे एन उन्हाळ्यातही इथले वातावरण थंडगार असते. दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांधण दरी साधारण चारशे फुट खोल आणि सुमारे २ कि.मी. लांब आहे. दरीचा प्रवास एकदम खडतर असा खडकाळ आहे. थेडे पुढे गेल्यावर दोन पाण्याचे पडाव लागतात त्यातील पहिला पडावात पाणी दोन ते चार फुट खोल तर दुसर्या पडावात साधारण ४ ते ६ फुट खोल पाणी असते. येथे यायचे झाले तर शक्यतो एप्रिल, मे महिण्यात यावे जेणेकरून येथील पाण्याची पातळी कमी झालेली असते. जरी उन्हाळा असला तरी येथील वातावरण थंडच असते. दरी पार करताना काही ठिकाणी ३ फुट इतकी निमुळती वाट होते. कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीवर पोचतसुध्दा नाही, त्यामुळे येथे चढ आणि उतर सांभाळून करा.
आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.
पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठा आपला मार्ग अडवतो. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने मार्ग काडून पलीकडे जायचे.
सुरुवातीच्या पॅचच्या वेळी मोठ मोठे दगड दिसू लागतात त्यांच्यावरुन चालताना थोडी गंमत वाटते. पण जसं जसा व्हॅलीमध्ये प्रवेश होतो.त्यानंतर फक्त मोठंमोठे दगड दिसू लागतात. साधारण १५ मिनिटं चालल्यानंतर पहिला कातळटप्पा पार केल्यानंतर पहिला पाण्याचा पॅच येतो. पाणी स्वच्छ असले तरी तळ फारसा दिसत नाही. १४-१५ फूट लांब आणि ३ ते ४ फूट खोल पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर शेवाळ जमलेले असते, त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते.
हे कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते. दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाट भाग कुठेच आढळुन येत नाही.
.
अजूनही आपला नाळेतूनच प्रवास सुरु असतो. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.
शेवटी आपण नाळेच्या टोकाशी पोहचतो. इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसतो. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात सर्वसामान्य पर्यटक त्याच्या वाटेला जात नाही.

नाळ १.५ किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी ५०-५५ मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी, दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे नभ या पलिकडे दुसरे काहीही नजरेस पडत नाही.
नळीच्या टोकाला पोचल्यानंतर सह्याद्रीचे घडणारे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष येथे अप्सराच अवतरली की काय? असा भास होतो. शेकडो फूट खोल सरळ तुटलेले कडे पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट पुढे करोली घाटातून डेहणे गांवात जाते. परतीच्या मार्गाला पुन्हा साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरत दगडांच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करत आणि सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढून याव लागते.
या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथे एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे. जिथे नजर जाईल तेथे कातळच कातळ आहे. येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत. सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे.
शेवटी आपण रॅपलींग स्पॉटला आलो. 
४० फुटी रॅपलिंगची सुरवात
प्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे शक्य होत, अन्यथा करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करुन पुर्ण दरी पार करण्यासाठी ८ ते ९ तास लागतात. या प्रवासात तीन पॅचमध्ये तुम्हाला रॅपलिंग (Rapling) करावे लागते. पहिली रॅपलिंग ही साधारण 30 फूट खोल आहे. त्यानंतर पुढे पुढे त्या कमी होत जातात. पण रॅपलिंगचा जर पहिला अनुभव असेल तर थोडा त्रास होतो. कारण शरीराचा संपूर्ण भार पायांवर झेलावा लागतो. जे करताना खूप दमछाक होते.
ही सगळी व्हॅली पार केल्यानंतर तुम्हाला लगेच गाव लागत नाही किंवा खाण्याची काहीही सोय नसते. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी सोबत ठेवणे फारच गरजेचे आहे. पाण्याच्या बाटल्या, एनर्जी पावडर, केक, बिस्कीट अशा गोष्टी सोबत ठेवल्या तर त्याचा आधार मिळतो. दरी एका दमात पार करता येत नाही. त्यासाठी थोडा थोडा ब्रेक घ्यावाच लागतो. पण एकट्याने ही दरी उतरायला जाऊ नका. एखाद्या ग्रुपसोबत जाल तर जास्त फायदा होतो.
अजून थोडे पुढे गेल्यावर दरीच्या शेवटाकडे जाताना दोनदा रॅपलिंगच्या सहाय्याने खाली उतरावे लागते. तेथेच एक पठार सदृश्य जागेवर शिबिराची किंवा रात्री वास्तव्याची सोय असते.
पावसाळ्यातील सांदण दरी :-
सांदण दरीतील जायंट स्विंग :-
सांदण परिसरातील इतर आकर्षण :-
https://marathi.popxo.com/article/sanadan-valley-trek-information-in-marathi/
http://www.misalpav.com/node/12184
https://ratanwadi.blogspot.com/p/blog-page_81.html
https://www.khabarbat.in/2019/12/tourist-attraction.html?m=0
ता.क. : श्री. निवॄत्ती - सामरद गाव - संपर्क - ०९५५२०६२१८४
Happy Journey.

















































_p.jpg)












































.jpg)










