Sunday, September 13, 2020

अफझल खान वध

पुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.
पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली.
१६५७ मध्ये मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).
पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. “मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”, असे त्यास कळविले. फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.

सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे.
राजे भेटीस निघाले
दुसरे दिवशी गडाखाली राजियानी सदर केली. डेरे, बिछाने व असमानगीर्या, तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या. चित्रविचित्र बडे व लोडे, गाद्या पदगाद्या टाकिल्या. सदर सिद्ध केली.
घाटमाथा लष्करसुध्धा नेताजी पालकर आणविले होते. त्यासी इशारत सांगोन पाठविले कि, ‘ उद्या खानाचे भेटीस जातो, फत्ते करितो आणि गडावरी येतो तेंव्हा एकच आवाज गडावरी करितो. तेंव्हा तुम्ही घाटाखाली उतरोन लष्करात खानच्या चालोन येऊन मारामारी करणे.’
तैसेच कोकणातून राजश्री मोरोपंत पेशवे आणविले. त्यासही गडावरील आवाजाची इशारत सांगितली. आपण निवडक लोक गडावरून उतरोन जागा जागा झाडीत ठेविले. आणि खास राजीयानी स्नान करून भोजन केले. जरीची कुडती घातली. डोईस मंदिल बांधिला. पायात चोळना घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनख चढविले आणि बराबर जिऊ महाला म्हणून मरदाना होता, त्याजवळ एक पट्टा व एक फिरंग व ढाल. तैसाच संभाजी कावजी महालदाराजवळ पट्टा व फिरंग व ढाल ऐसे दोघे माणसे मर्दानी आपणाबरोबरी भेटीस घेतली. वरकड आसपास धारकरी लोक जागा जागा जाळीत उभे केले. आणि राजियाने सिद्ध होऊन गडाखाली भेटीस जावयास उतरले.
उतावीळ खान
गोटातून भेटीस यावयास खानही सिद्ध होऊन चालले. बराबरी लष्कर हजार दीड हजार, बंदुकी मुस्ते होऊन चालिले. मोठे मोठे धारकरी लोक समागमे निघाले. इतक्यात पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला कि, ‘ इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघार गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय ! यास इतका सामान काय करावा, राजा दोघा माणसानिशी तिकडोन येईल. तुम्ही इकडोन दोघानिशी चालावे. दोघे बैसोन भेटावे. तेथे तजवीज करणे ते करा !’
असे सांगितल्यावरी अवघा जमाव दूर, बाणाचे टपियावरी उभे राहून खासा खान एक पालखी दोघे हुद्देकरी व कृष्णाजी – पंत हेजीब असे पुढे चालिले, सैदबंडा पटाईत, एक लष्करी समागमे घेतला. पंताजीपंतही बराबरी आहेत, असे सदरेत गेले.
सदर देखोन खान मनात जळाला कि, ‘ शिवाजी म्हणजे काय? शाहाजीचा लेक. वजीर यास असा जरी बिछाना नाही ! अशी मोतीलग सदर म्हणजे काय? पादशहास असा सामान नाही, येणे जातीचा त्याने सामान मेळविला ! ‘
असे बोलताच पंताजीपंत बोलिला जे, ‘ पातशाई माल पाद्शाहाचे घरी जाईल, त्याची इतकी तजवीज काय? ‘ असे बोलून सदरेस बैसले. राजियास सिताब आणवणे म्हणून जासूद, हरकारे रवाना केले.
अफझलखानाचा वध
राजे गडाचे पायी उभे होते. तेथून हळूहळू चालिले. समाचार घेता खानाबरोबर सैदबंडा मोठा धारकरी आहे हे ऐकून उभे राहिले. आणि पंताजी पंतास बोलावू पाठविले. ते आले. त्यास म्हणू लागले जे, ‘ जैसे महाराज तैसे खान. आपण खानाचा भतीजा होय. ते वडील. सैदबंडा खानाजवळ आहे. त्या करिता शंका वाटते. हा सैदबंडा इतका यातून दूर पाठवणे, ‘ म्हणोन पंताजी पंतास सांगितले.
त्यावरून पंताजी पंत याणी जाऊन कृष्णाजी पंताकडून खानास सांगोन सैदबंडाहि दूर पाठविला. खान व दोघे हुद्देकरी राहिले. तेंव्हा राजेही हिकडून जिऊ महाला व संभाजी कावजी दोघे हुद्देकरी यासहित गेले.
खानही उभा राहून पुढे सामोरा येऊन राजियास भेटला. राजियाने भेटी देता खानाने राजियाची मुंडी कवटाळून खाकेखाली धरिली. आणि हातीची जमदाड होती, तिचे मेणे टाकून कुशीत राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती. त्यावरी खरखरली. अंगास लागली नाही.
हे देखोन राजियानी डावे हाताचे वाघनख होते तो हात पोटात चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानची चरबी बाहेर आली ! दुसरा हात उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला. ऐसे दोन वार करून मुंडी आसडून चौथरियाखाली उडी घालोन निघोन गेले !
खानाने गलबला केला कि, ‘ मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा ! ‘ असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले. आणि पालखी खळे भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले ; हाती घेऊन राजियाजवळ आला.
इतकियात सैदबंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावारी चालविले. तो राजियाने जिऊ महालियाजवळ आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन, पट्टा व बिचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार औढिले ! पाचवे हाताने राजियास सैदबंडा मारावा, तो इतकियात जिऊ महाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टीयाचा हात हत्यारासमेत तोडिला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.
घोरांदर युद्ध जाहले!
गडावरी जाताच एका भांड्याचा आवाज केला. तोच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोकडून चालोन खानाचे गोटावारी आले आणि ‘ खान मारून शीर कापून राजे गडावरी गेले ‘ हि खबर कळोन कुल खानाचे बारा हजार लष्कर धास्त घेऊन अवसान खस्त जाहाले. इतकियात राजियाच्या फौजा चौतर्फा मारीत चालले. मोठे घोरांदर युद्ध जाहाले. दोन प्रहर घोरांदर युद्ध जाहले.
खानाकडील मोठमोठे वजीर व लष्करी महदीन व उजदीन पठाण, रोहिले, सुन्नी (?) व आरबी वगैरे मुसलमान आणि जातिवंत मराठे, धनगर व ब्राम्हण ; तसेच तोफांचे बैली व कर्नाटकी प्यादे बदुखी, आड हत्यारी, सांगा बरचीवाले व दुरादीवाले, कुराडीवाले (=रोचेवार व हिलगेवर) व बाजे जातचे, इटेकरी हतुलवे (?) तिरंदाज व छडीवाले व पटाईत खाकाईत व तोफखाना ऐसे एकंदर जमनिदान करून भांडण दिधले. मोठे क्षेत्र जाहले. राजियाचे लष्करी लोकांनी व मावळे लोकांनी पाय उतार होऊन मारामारी केल्या. हत्ती तोडिले, ते जागा ठार झाले. कित्येक हत्तीची पुच्छे तोडिली. कित्येक हत्तीचे दात तोडिले. कित्येक हत्तीचे पाय तोडिले. तसेच घोडे एकच वराने जीवे मारिले. तसेच खानाचे लष्करी कित्येक ठार मारिले. कित्येकाचे पाय तोडून पाडिले. कित्येकांचे दात उडविले. कित्येकांची डोचकी फोडिली. कित्येक मेले. युद्धास आले ते मारून पडून भुईस रगडिले. तसेच उंटे मारिली. मारित असता रण अपार पडले. संख्या न करवे ! रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले. ऐसे मारामारी करून हत्ती, घोडे, उंट व मालमत्ता व पालख्या वजीर पाडाव करून आणिले. –
बीतपशील
६५ हत्ती व हत्तिणी सुमार ४००० घोडे सुमार
३,००,००० जडजवाहीर १,२०० उंटे सुमार
२,००० कापड वोझी ७,००,००० नगद व मोहोरा व होन सोने रुपये.
भांडी तोफखाना सर्वही घेतले. कलम १. वजीर पाडाव जाहले : बीतपशील –
१ सरदार व वजीर मातबर. १ मंबाजी भोसले, १ अफझलखानाचे पुत्र १ नाटकशाळेचे पुत्र, १ राजेश्री झुंजारराव घाडगे, १ या खेरीज लोक कलम १ येणे प्रमाणे पाडाव केले. या खेरीजही जिन्नस मालमत्ता, गुरेढोरे, बैल, मबलग मत्त पाडाव केले. भांडते लोकांनी तोंडी तृण धरून शरण आले त्यासी व बायकामुले, भट-ब्राह्मण, गोरगरीब असे अनाथ करून सोडिले. राजा पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही. याजकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनात सोडिले. अफझलखानाचा लेक फजल हा पायी चिरगुटे बांधून झाडीत पळोन गेला. तसेच कित्येक भले लोक पळोन गेले. संख्या न करवे.
जखमी सैनिकांची विचारपूस
ऐशी फत्ते करून जय जाहला. मग राजे याणी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते, त्यास धरून आणिले. राजा खास प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफझलखानाचे लोक व त्याचे पुत्र, भांडते माणूस होते, तितकियास भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते, त्यांच्या लोकास चालविले. पुत्र नाही त्यांच्या बाय्कास निमे वेतन करून चालवावे असे केले. जखमी जाहले त्यास दोनशे होन व शंभर होन, दर आसामीस जखम पाहून दिधले. मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते, त्यास बक्षीस हत्ती, घोडे दिधले. हस्तकडी, कंठमळा, तुरे, पदके, चौकडे, मोत्यांचे तुरे, कित्येकास बक्षीस फार दिले. ऐसे देणे लोकास दिधले. कित्येकास गावमोकासे बक्षिस दिधले. लोक नावाजिले. दिलासा केला.
विजयोत्सव
मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला. असा वीरावीरास झगडा जाहाला. खासा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफझलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनच जातीने होता. आंगाचा, बळाचाही तैसाच ! आणि दुष्ट बुद्धीने तैसाच ! त्यास एकले भीमाने मारिला, त्याचप्रमाणे केले. शिवाजी राजाही भीमच ! त्यांनीच अफझल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीच होता. तरीच हे कर्म केले. यश आले, असे जाहाले. खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे, भूषणे, अश्व देऊन अनाथ करून सोडिले. त्या उपरी राजश्री पंताजीपंतासही उदंड वस्त्रे, अश्व, अलंकार दिधले. अपर द्रव्यही दिधले. खुशाली केली.
राजगडास मातुश्रीस व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली. त्यानीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे – करणे केले. भांडी मारिली. मोठी खुशाली केली. येणे रीतीने राजियाकडील वर्तमान जाहाले.
विजापुरी एकच आकांत!
त्या उपरि विजापुरास चवथे दिवशी जासूद – हरकारे यांनी खबर पाद्शाहास व पाद्शाहाजादीस जाहीर केली कि, ‘ अफझलखान खासा मारून शिर कापून नेले. कुल लष्कर लुटून फस्त केले, ‘ असे सांगताच अली अदलशाहातक्तावरोन उतरोन महालात जाऊन पलंगावरी निजला. त्याणे बहुत खेद केला. असेच पाद्शाहाजादीसखबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथेच ” अल्ला ! अल्ला ! खुदा, खुदा ! ” म्हणून अंग पलंगावरी टाकून रडत पडली. ” मुसलमानाची पादशाही खुदाने बुडविली,” ऐसा कित्येक विलाप करून बहुत शोक केला. पाद्शाहाजादीने तीन दिवस अन्न – उदक घेतले नाही. तसेच कुल मोठमोठे वजीर व लष्कर व कुल शहर दिलगीर जाहाले. म्हणू लागले कि, ‘ उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल ! ‘ ऐसे घाबरे जाहले. खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्यांसी दिली असे वाटते ‘ असे म्हणो लागले.
प्रतापगडी देवीची स्थापना
त्या उपरांत मग राजियासी स्वप्नात श्री भवानी तुळजापुरची येऊन बोलू लागली कि, ‘ आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण. तुझ्या राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पूजा – पूजन प्रकार चालविणे. ‘
त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून ; गंडकीनदीहून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नानाप्रकारे करून दिली. महाल मोकाशे देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोच्छाव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापुरच्याप्रमाणे तेथे चालती झाली. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात कि, ‘ आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे, ‘ असे देवी बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.
मोगलाईत धुंद उठवली
या नंतरि, विजापूरचा मातबर वजीर अफझलखान होत तो बुडविला, तेंव्हा पातशाही कमतर पडली, असे समजून राजीयाने विजापूरचे किल्ले तळकोकणात होते ते, सर्व घेतले. पन्नास – साथ गड घेतले. तळकोकण काबीज केले. वरघाटही घेतला. तेंव्हा लष्कर पागा सात हजार व शिलेदार आठ हजार, एकूण पंधरा हजार व हशम लोक बारा हजार ऐसी तोलदार फौज जमा जाहाली. लष्कर कुल जमाव घेऊन नेताजी प्लकर सरनोबत मोगलाईत स्वार्या करून, बालेघाट, परांडे, हवेली, कल्याण, कलबर्गे, आवसे, उदगीर, गंगातीर पावेतो मुलुख मारीत चालले. खंडण्या घेतल्या. मुलुख जप्त केला. औरंगाबादचे पुरे मारिले. मोगलांकडील फौजदार औरंगाबादेस होता तो चालून आला. त्याशी युद्ध जाहाले. हत्ती घोडे पाडाव केले. मोगलाईत धुंद उठविली. ऐसा पराक्रम करीत चालले.
संदर्भ – सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद
Summary : खानाने गलबला केला कि, ' मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा ! ' असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले. आणि पालखी खळे भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले ; हाती घेऊन राजियाजवळ आला.


शिवाजी - अफझलखान भेट

                             
                        
      
अफझलखानाची स्वराज्यावरील स्वारी, दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड येथे त्याची व शिवाजीची झालेली भेट आणि त्या भेटीत झालेला खानाचा मृत्यू इ. घटना मराठी इतिहास वाचक व अभ्यासकांच्या अतिशय परिचयाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये अफझलखान वधाची किंवा शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीची चिकित्सापुर्वक चर्चा करण्याचा हेतू आहे. वस्तुतः या विषयावर अनेकांनी अनेक अंगांनी विविध भाषेतील अव्वल, दुय्यम व तिय्यम साधनांच्या आधारे विपुल लेखन केले आहे. तेव्हा प्रस्तुत लेखक आता आणखी काय दिवे लावणार अशी वाचकांच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे ! परंतु, स्वराज्य संस्थापक शिवाजीचे चरित्र इतके अद्भुत घटनांनी भरले आहे कि कितीही निग्रह केला असता शिवाजीच्या चरित्रावर किंवा त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या काही घटनांवर निदान चार ओळी तरी खरडण्याचा  मोह सर्वांनाच होतो आणि प्रस्तुत लेखक देखील त्यास अपवाद नाही !
                  
विजापूर दरबाराने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी अफझलखानाची का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये निवड केली याची कारणे सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा त्यांची तपशीलवार चर्चा न करता त्या कारणांचा थोडक्यात येथे आढावा घेतो. स. १६५८-५९ च्या सुमारास शिवाजीचे लष्करी सामर्थ्य, विजापूरच्या तुलनेने अधिक वाढले होते किंवा त्याच्या बरोबरीचे बनले होते. शिवाजीसोबत खुल्या मैदानात टक्कर  देण्याची ताकद आता आदिलशाहीत तितकीशी राहिली  नव्हती. वर्षानुवर्षे चालणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या आणि निजामशाही, कुतुबशाही व मोगल तसेच कर्नाटकातील लहान - मोठ्या सत्ताधीशांशी वारंवार झुंजण्यात आदिलशाहीचे बरेच नुकसान झाले होते. एकेकाळी असलेला तिचा रुबाब, सामर्थ्य आता पार मोडकळीस आले होते. विजापूरच्या तुलनेने शिवाजीच्या राज्याचा विस्तार जरी लहान असला तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत शिवाजीची तयारी विजापूरकरांच्या तुलनेने अधिक होती. उदाहरणार्थ शिवाजीवरील नियोजित स्वारीत अफझलखानाचे लष्कर  घोडदळ   व पायदळ मिळून सुमारे वीस - पंचवीस हजार इतके होते तरीही आदिलशाही दरबाराने अफझलखानास शिवाजीसोबत प्रत्यक्ष लढाई न देता शक्यतो त्यास भेटीच्या निमित्ताने बोलावून दगा करण्याचा कानमंत्र दिल्याचे उल्लेख मिळतात. यावरून असे दिसून येते कि, यावेळी शिवाजीचे लष्करी सामर्थ्य बरेच वाढले होते. सभासद बखरीचा आधार घेतला असता या मोहिमेच्या वेळी खानाइतकेच सैन्य शिवाजीच्या पदरी होते. परंतु या सैन्यात गड - किल्ल्यांवर असलेल्या शिबंदीचा अंतर्भाव केला आहे कि नाही याची निश्चिती होत नाही. असे असले तरी शिवाजी आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा फरक होता व तो म्हणजे त्याचे सैन्य हे खडे सैन्य असून त्यावर प्रत्यक्ष शिवाजीची हुकुमत चाले !  त्याउलट तत्कालीन सत्ताधीशांकडे असे खडे सैन्य तुलनेने कमी असे. मोहीम किंवा युद्धप्रसंग उद्भवल्यास पदरी असलेल्या जहागीरदारांकडून लष्करात खोगीरभरती केली जात असे. या बाबतीत अफझलखानाची फौज देखील अपवाद नव्हती. शिवाजीचे राज्य लहान असल्याने व पदरी बलाढ्य लष्कर असल्यामुळे या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्याला वर्षभर शत्रूप्रदेशात मोहिमा आखाव्या लागत. सधन प्रदेशात लूटमार कारणे किंवा खंडणी गोळा करणे या दोन मार्गांनी शिवाजी आपल्या सैन्याचा बव्हंशी खर्च भागवत असे. याठिकाणी हे नमूद कारणे योग्य होईल कि, पूर्णवेळ पगारी सैन्य पदरी बाळगण्याची आर्थिक ताकद शहाजीमध्ये असल्यामुळेच शहाजीला एकाचवेळी मोगली आणि विजापुरी फौजांचा सामना करून पेमगीरीवर निजामशाहीची उभारणी करता आली होती !
                  विजापूर दरबाराने शिवाजीवरील नियोजित स्वारीसाठी अफझलखानाचीच का निवड केली असावी ? ' शककर्ते शिवराय ' या शिवचरित्राचे लेखक श्री. विजय देशमुख यांच्या मते त्यावेळी एक अफझलखान अपवाद केल्यास विजापूर दरबारी आता कोणी पराक्रमी, स्वामिनिष्ठ व शूर असा सेनानी राहिला नव्हता.
उपलब्ध साधनांतील माहिती पाहता देशमुख यांचे मत अगदीच चुकीचे नसल्याचे दिसून येते. अफझलखान विजापुरातून रवाना झाल्याची बातमी शिवाजीला त्याच्या हेरांकडून मिळाली असे म्हणता येईल. तसेच खानाच्या अंतस्थ हेतूंची कल्पना विजापूर दरबारातील शिवाजीच्या मित्रांनी कळवली असण्याची अधिक शक्यता आहे. त्याशिवाय मोहिमेची सूत्रे हाती घेताच आदिलशहाने व अफझलखानाने मावळातील देशमुख - वतनदारानंना जी काही आज्ञापत्रे पाठवली त्यातील भाषा पाहता खान शिवाजीचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे दिसून येते.
                
  इकडे अफझलखानाचा काटा कोणत्याही परिस्थिती काढण्याचा बेत शिवाजीने मनोमन पक्का केल्याचे दिसून येते. कदाचित खानाला मारून टाकण्याची योजना आरंभापासून त्याच्या मनात नसेल पण त्याचा एकदा सडकून समाचार घेण्याची / पराभव करण्याची इच्छा शिवाजीच्या मनात नसेल असे म्हणता येत नाही. अर्थात, खानाचे भोसले घराण्याशी असलेले वैर, विजापूर दरबारातील त्याचे प्रस्थ आणि त्या दरबाराचे त्याच्यावर अवलंबून असणे व शिवाजीचे तिशीच्या आतील वय लक्षात घेता शिवाजीची इच्छा त्याच्या वयानुरूप अशीच होती. 
              
शिवाजी - अफझलखान प्रकरणाचे साधार विश्लेषण श्री. विजय देशमुख यांनी आपल्या ' शककर्ते शिवराय ' या ग्रंथात केले आहे. ज्यांना या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घ्यायचे आहेत अशा जिज्ञासू वाचकांनी त्या ग्रंथाचे वाचन करावे. श्री. देशमुख यांच्या मते, खान आरंभी जावळीमध्ये उतरण्यास तयार नव्हता. उलट शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. परंतु पुढे राजकीय परिस्थती इतक्या झपाट्याने बदलली कि खानालाच जावळी प्रांतात उतरणे भाग पडले. देशमुखांनी आपल्या निष्कर्षासाठी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून त्यांचे मत यथायोग्य असल्याचे दिसून येते. कित्येक इतिहासकारांचे देखील देशमुखांप्रमाणेच मत असल्याचे दिसून येते.
                 विजय देशमुख आणि इतर इतिहासकारांचे मत काहीही असले तरी मला जी काही साधने उपलब्ध झाली, त्यांच्या अभ्यासावरून माझा निष्कर्ष हा वेगळाच आहे.
विजापुरातून खान जेव्हा बाहेर पडला तेव्हाच त्याला खुल्या मैदानात किंवा सोयीच्या ठिकाणी घेरून त्याचा नाश करण्याचा शिवाजीचा आरंभीचा बेत होता. परंतु, ' अफझलखान ' या नावाचा दरारा असा होता कि, शिवाजीच्या मुत्सद्द्यांनी, सरदारांनी शिवाजीच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. खानाशी लढाई न करता तहाच्या वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा असे शिवाजीच्या सल्लागारांचे मत होते. त्यामुळे शिवाजीने आपला मूळचा लढाईचा बेत बदलून नवीन डाव टाकला. याविषयी सभासद बखरीमधील उल्लेख मननीय आहे. या बखरीनुसार खान विजापुरातून बाहेर पडला तेव्हाच शिवाजीने त्याला जावळीमध्ये घेरण्याचे ठरवले होते परंतु त्याच्या सल्लागारांनी लढाईच्या विपरीत सल्ला दिल्याने शिवाजीने तो बेत रद्द केला. पुढे भवानीमातेचा त्याला दृष्टांत झाला व हे वर्तमान सर्व मुत्सद्द्यांना समजल्यावर त्यांना एकप्रकारे मानसिक बळ प्राप्त झाले व जावळीमध्येच खानाचा निकाल लावण्याच्या शिवाजीच्या बेतास त्यांनी संमती दिली.
                   
येथून पुढच्या घटनांची सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा आता शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीत नेमके काय झाले असावे याच्या चर्चेस आता आरंभ करतो. पण तत्पूर्वी अशी भेट घडून येण्याआधी शिवाजीने कशाप्रकारची खबरदारी घेतली होती याची थोडक्यात माहिती देतो.
               
अफझलखानास मारून टाकण्याची शिवाजीची इच्छा आरंभापासून होती किंवा नव्हती पण, जावळीमध्ये जेव्हा खानाला येण्यास भाग पाडण्याचे ठरले तेव्हाच खानाचा काटा काढण्याचे शिवाजीने नक्की केले होते. या दृष्टीने सभासद बखरीत पंताजी गोपीनाथ व शिवाजी यांचा जो संवाद आलेला आहे तो सूचक आहे. हा संवाद जसाच्या तसा घडला नसला तरी खानाचा निकाल लावण्याचे शिवाजीने आधीच नक्की केले असल्याचे यातून दिसून येते. त्याशिवाय सभासद बखरीमध्ये ज्या पद्धतीने हा संवाद आला आहे तो विकृत पद्धतीने आल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रसंगी पंताजी गोपीनाथ हा अनुभवी मुत्सद्दी असून शिवाजी हा वयाने अगदीच तरुण व काहीसा अननुभवी असा आहे. अशा परिस्थितीमध्ये पंताजीसारखा अनुभवी मुत्सद्दी शिवाजीला, खानास एकांगी करून मारण्याचा सल्ला देईल का ? उलट, खानाची प्रत्यक्ष भेट न घेता त्यास हर प्रयत्ने दगा करण्याचाच सल्ला त्याने शिवाजीस दिला असता. परंतु, सभासद बखरीत काही वेगळेच दिसून येते. माझ्या मते, तत्कालीन राजकीय व सामाजिक समजुतींचा या संवादावर प्रभाव असावा.   
                      
सुमारे बारा हजार निवडक सैन्यासह अफझलखान अखेर जावळीत उतरला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास दीड - दोन कोसांच्या अंतरावर पार गावनजीक कोयना नदीच्या काठी खानाच्या फौजेचा तळ पडला. खानाची फौज जावळीत येण्यापुर्वीच शिवाजीने आपल्या लष्कराचा पेरा केला होता. त्यानुसार कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बालाजी शिळमकर याची नेमणूक करण्यात आली होती. प्रतापगडाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराजपंत रांझेकर व त्रंबक भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी पालकर यास जावळी व वाईच्या दरम्यान घाटमाथा सांभाळण्यास सांगितले होते. प्रसंगी वाई येथील अफझलखानाच्या मुख्य छावणीवर चालून जाण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. भेटीच्या प्रसंगी खानाची फौज प्रतापगडावर जर चालून आली तर तिला रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुखांवर सोपवण्यात आली. तसेच  वेळप्रसंगी शिवाजीला मदत करण्याची जबाबदारी देखील कान्होजी जेधेवर टाकण्यात आली होती. याखेरीज भेट झाल्यावर गडावर तोफांच्या इशारतीचे आवाज करण्यात येतील. तोफेचा आवाज ऐकताच सर्वांनी  खानाच्या छावणीवर हल्ला करावा अशी आज्ञा देखील शिवाजीने आपल्या सरदारांना दिलेली होती.  शिवाजीने आपल्या लष्कराची जी काही रचना केली होती ती पाहता, कोणत्याही परिस्थितीमध्ये खानाच्या सैन्याला बचाव करण्याची संधी मिळू न देण्याची त्याने खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. एकूण, नुसता खानच नाही तर त्याच्या लष्कराला देखील बुडवण्याची त्याने पुरेपूर तयारी केली होती. खानाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचे दिसून येते.    
                    
प्रतापगडाजवळ छावणी केल्यावर खानाने शिवाजीला आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु, शिवाजीने पंताजी गोपीनाथच्या मार्फत खानालाच प्रतापगडावर येण्यास भाग पाडले. तेव्हा दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या माचीवर दुपारच्या वेळी शिवाजीच्या भेटीस जाण्यासाठी खान तयार झाला. त्यानुसार भेटीचे तपशील देखील आगाऊ ठरवण्यात आले.  भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी दोन हुद्देदार ( शस्त्रवाहक, मानकरी ) सोबत हजर असणार होते. तसेच दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून ते बाणाच्या टप्प्याइतक्या अंतरावर ते उभे असणार होते.
                       
भेटीचा सर्व तपशील ठरल्यावर आणि त्यानुसार वागण्याचे खानाने मान्य केल्यावर शिवाजी पुढील तयारीस लागला. भेटीच्या वेळी सोबत दोन हुद्देदार असणार होते पण अशा प्रसंगी सामान्य मानकरी जवळ बाळगण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. पट्टा चालवण्यात सराईत असलेल्या जिवा महाल यास त्याने आपल्या सोबत घेण्याचे नक्की केले. तसेच संभाजी कावजी याची देखील आपल्या सोबत येण्यासाठी निवड केली. संभाजी कावजी हा अंगबळाच्या बाबतीत अफझलखानाच्या तोडीचा होता असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. याशिवाय वैयक्तिक बाबतीत देखील शिवाजीने बरीच खबरदारी घेतल्याचे दिसून येते. भेटीच्या दिवशी पोशाख करताना त्याने मुद्दाम अंगामध्ये चिलखत चढवले होते.  उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा / कट्यार लपवली होती. अर्थात, खानाचा विश्वासघातकी स्वभाव शिवाजीच्या परिचयाचा असल्याने त्याने अशी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते पण ते अर्धसत्य आहे. खानाच्या छावणीभोवती शिवाजीच्या सैन्याचा पडलेला विळखा लक्षात घेता आणि खुद्द खानास त्याने प्रतापगडाच्या माचीवर भेटीस येण्यासाठी भाग पडणे याच अर्थ उघड आहे. आरंभापासूनच खानासोबत कसे वागायचे याविषयीचे धोरण शिवाजीने निश्चित केले होते.
                
भेटीच्या दिवशी अफझलखानाला प्रतापगडावर आणण्यासाठी शिवाजीने पंताजी गोपीनाथास पाठवले. पंत ज्यावेळी खानाकडे गेला तेव्हा खान तयार होऊन बसला होता. अशा राजकीय भेटींची खानाला सवय होती. अशा भेटींमध्ये दगाबाजी करण्यात आजवर तो यशस्वी झाला  असल्यामुळे अंगावर शस्त्रे लपवणे, भेटीच्या अटींची पायमल्ली करणे इ. किरकोळ बाबी त्याने त्या दिवशी देखील करण्यास आरंभ केला होता. आधी ठरल्यानुसार सोबत वकील, दोन मानकरी आणि दहा अंगरक्षक नेण्याचे अफझलखानाने मान्य केले असले तरी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दीड हजार बंदुकधारी पायदळ सोबत नेण्याची त्याने तयारी चालवली होती. परंतु, पंताजी गोपीनाथ सावध असल्यामुळे खानाचा हा बेत फसला. पुढे प्रतापगडाच्या माचीवर गेल्यावर नियोजित ठिकाणी त्याचे नऊ अंगरक्षक उभे राहिले तर दहावा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा मात्र खानाच्या सोबत भेट ठरलेल्या तंबूमध्ये घुसला. अर्थात, खानाच्या संमतीनेच हे सर्व घडले होते आणि खानाच्या बरोबर आधी निश्चित केलेल्या हुद्देदारांपेक्षा एकजण अधिक आहे हे पंताजी गोपीनाथच्या लक्षात आले नाही !  
                         
अफझलखान प्रतापगडाच्या माचीवर दाखल होताच शिवाजी गडावरून खाली आला, पण तो तडक  भेट ठरलेल्या ठिकाणी न जाता बराचसा अलीकडेच थांबला व पंताजी गोपीनाथास त्याने बोलावून घेतले. किंवा असेही म्हणता येईल कि शिवाजीला आणण्यासाठी पंताजी गोपीनाथ यावेळी तंबूतून बाहेर आला होता. असो, यावेळी शिवाजीने अफझलखानाविषयी पंताजी गोपीनाथकडे अधिक माहिती विचारले असेल किंवा पंताजी गोपीनाथने त्यास अफझलखानाच्या कारवायांची कल्पना दिली असावी.
                
एकूण, अफझलखानाने भेटीसाठी ज्या काही अटी मान्य केल्या होत्या त्यांना मोडण्यास पद्धतशीरपणे आरंभ केल्याचे शिवाजीच्या लक्षात आले व त्यामुळे तो अधिक सावध झाला. खानाच्या भेटीसाठी पुढे जाण्याआधी त्याने सहजपणे म्हणा किंवा अधिक चौकसपणे, पण पंताजीला विचारले कि, तंबूमध्ये खानासोबत आणखी कोण आहे ? यावेळी गोपीनाथला आठवण झाली कि, खानाने आपल्यासोबत एक मानकरी अधिक आणला आहे. तेव्हा शिवाजीने प्रथम खानासोबत आलेल्या अतिरिक्त हुद्देदारास बाहेर काढण्याची कामगिरी पंताजी गोपीनाथवर सोपवली. सभासद बखरीमध्ये सय्यद बंडाचा उल्लेख येत असला तरी जेधे शकावली किंवा जेधे  करीनामध्ये या सय्यद बंडाचा नामोल्लेख येत नाही. शिवाजीच्या आज्ञेनुसार पंताजी गोपीनाथ पुढे गेला व खानास  सांगून त्याने सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद यास तंबूतून बाहेर काढून ज्या ठिकाणी खानाचे उर्वरीत ९ अंगरक्षक उभे होते तिकडे पाठवून दिले. या ठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे व ते म्हणजे खानाच्या  सोबत जो वकील होता त्याचे नाव कृष्णाजी  भास्कर असल्याचा  उल्लेख जेधे शकावली, जेधे करीना मध्ये येत नाही. तसेच या भेटीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्करने शिवाजीवर शस्त्र उचलल्याचा उल्लेख जेधे शकावली मध्ये किंवा सभासद बखरीत न येता जेधे करीन्यामध्ये येतो.  पण त्यात कृष्णाजी भास्कर असे वकिलाचे नाव न येत ' हेजीब ' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. श्री. विजय देशमुख  यांनी दिलेल्या  माहितीनुसार वाईच्या यादी नाम्यात शिवाजीने कृष्णाजी भास्कर यास पट्ट्याने मारल्याचा उल्लेख येतो.
                
शिवाजी - अफझलखान यांची भेट :- सभासद बखरीमध्ये शिवाजी व अफझल यांच्या   भेटीचे जे वर्णन आलेले आहे किंवा जेधे करीन्यात उभयतांच्या भेटीची जी  माहिती  आलेली  आहे ती  सर्वांनी  जवळपास  जशीच्या तशी गृहीत धरलेली आहे. परंतु अधिक विचार केला असता असे दिसून येते कि, जेधे करीना मध्ये किंवा सभासद आणि तत्सम बखरीत जी काही या घटनेची वर्णने आलेली आहेत ती कपोलकल्पित आणि अतिरंजित अशा स्वरूपाची आहेत. वस्तुतः जेधे करीना किंवा सभासद बखर  सांगते त्यानुसार शिवाजी आणि अफझलखान यांची प्रत्यक्ष अशी गळाभेट झालीच  नाही ! 
            
शिवाजी आपल्या दहा अंगरक्षकांच्या सोबत नियोजित स्थळी आला. ठरवून दिलेली जागी त्याचे दहा अंगरक्षक उभे राहिले आणि दोन हुद्देदारांसह, म्हणजेच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांच्या संगतीने शिवाजी खानाच्या भेटीसाठी तंबूध्ये शिरला. शिवाजी तंबूध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजीने देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे  सोपवली. शिवाजी आणि अफझल यांच्याकडे जी छुपी शस्त्रे होती, कट्यार / बिचवा, त्यांचा मारा करण्यासाठी उभयतांना एकमेकांच्या निकट, निदान काही अंतरापर्यंत तरी, येणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्याने आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजीचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजीवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी मागे सरकला. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला आणि त्याबरोबर त्याचे मानकरी सावध झाले व  शिवाजीच्या दिशेने शस्त्रे उपसून धावले. परंतु, ते शिवाजीच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तंबूमध्ये हा गोंधळ सुरु होता त्यावेळी पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे काय करत होते ?
      
तत्कालीन प्रघातानुसार राजकीय बोलाचालींसाठी वकील म्हणून जाणारी व्यक्ती जवळ शस्त्र बाळगत असली तरी ती शस्त्र चालवण्यात कुशल असतेच असे नाही. शिवाजी व अफझलखानाच्या भेटीच्या प्रसंगी पंताजी गोपीनाथ आणि  कृष्णाजी भास्कर हे दोघे,  दोन दरबाराचे वकील म्हणून हजर होते. यापैकी कृष्णाजी भास्कर याने या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण त्यात त्याचे नाव न येत वकील या अर्थी हेजीब या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. अर्थात, देशमुख यांनी आपल्या ग्रंथात दिलेल्या महितीनुसार कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा  जो उल्लेख आहे तो खरा न मानण्याचे  काही कारण दिसत  नाही. कृष्णाजी भास्करने आपल्या जवळील कट्यार सदृश्य शस्त्राने किंवा तलवारीने शिवाजीवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ शिवाजीने त्यावर  हत्यार  चालवले असे उपलब्ध माहितीवरून  म्हणता येते. पंताजी गोपिनाथने  देखील या संघर्षात थोडाफार सहभाग घेतला असावा. कारण तो जखमी झाल्याचा  उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण सभासद बखर व जेधे शकावली याविषयी मौन बाळगून आहेत. यावरून निश्चित असे काही सांगणे अवघड असले तरी  ज्याअर्थी कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा अस्सल साधनात उल्लेख आहे त्याअर्थी पंताजी गोपीनाथने या संघर्षात थोडाफार सक्रीय सहभाग घेतला होता असे म्हणता येते.
              
इकडे शिवाजीने खानास जखमी केले त्यावेळी खान शिवाजीला धक्का  देऊन किंवा शिवाजी दूर झाल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तंबूतून बाहेर पडला. जखमी अवस्थेत खानाला तंबूतून बाहेर  पडताना पाहताच त्याचे अंगरक्षक तंबूच्या दिशेने धावून गेले. त्याच वेळी शिवाजीचे अंगरक्षक देखील खानाच्या अंगरक्षकांच्या रोखाने चालून गेले व तंबूच्या बाहेर त्यांची झुंज सुरु झाली. बाहेर हातघाईची लढाई सुरु झाली असताना आतमध्ये देखील जोरदार धुमश्चक्री चालू होती. खानाचा वकील शिवाजीवर चालून आला तेव्हा पंताजी गोपीनाथ त्याच्या मदतीस गेला. दरम्यान जिवा महाल व संभाजी कावजीने खानाच्या हुद्देदारांचा पुरता निकाल लावला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजीला वाचवण्याच्या प्रयत्नात पंताजी गोपीनाथ जखमी झाला. तेव्हा शिवाजीने हाती असलेल्या कट्यारीच्या सहाय्याने किंवा जिवा महालकडून पट्टा घेऊन कृष्णाजी भास्करला कापून काढले.  खानाचे सर्व साथीदार मारले गेल्यावर शिवाजी पंताजी गोपीनाथ, जिवा महाल व संभाजी कावजी यांच्यासह तंबूतून बाहेर पडला आणि गडाच्या दिशेने निघून गेला. दरम्यानच्या काळात खानाचे दहा अंगरक्षक शिवाजीच्या सैनिकांकडून मारले गेले किंवा जखमी अवस्थेत पळून गेले. इकडे खान जेव्हा जखमी अवस्थेत बाहेर पडला तेव्हा काही अंतरावरच त्याची पालखी उभी होती. जखमी खानाचा पालखीत बसून छावणीकडे  जाण्याचा विचार होता. परंतु, शिवाजीच्या सैनिकांनी पालखीच्या भोयांवर हल्ला चढवल्यामुळे किंवा शिवाजी आणि अफझलखानाच्या अंगरक्षकांची हातघाईची लढाई सुरु झाल्यामुळे ते उधळले गेले. अफझलखान जखमी अवस्थेत तिथेच पडून राहिला.  अफझलखानाचे मस्तक संभाजी कावजीने कापल्याचा उल्लेख जेधे शकावली किंवा करीन्या मध्ये येत नाही. माझ्या मते शिवाजीच्या सैनिकांनी खानाचे शीर कापून गडावर नेले असावे. कारण, संभाजी कावजी अशा प्रसंगी शिवाजीला एकटा सोडून खानाचे मुंडके मारण्यासाठी वेड्यासारखा बाहेर धावेल हे संभवत नाही. पुढे शिवाजी गडावर पोहोचल्यावर तोफांची इशारत झाली आणि पाठोपाठ खानच्या कोयनेकाठच्या बेसावध छावणीवर मराठी फौज चारी बाजूंनी तुटून पडली.
                        
संदर्भ ग्रंथ :-
(१) जेधे शकावली
(२) जेधे करीना
(३) शिव छत्रपतींचे चरित्र ( सभासद बखर ) :- कृष्णाजी अनंत सभासद
(४) श्री शिव छत्रपती ९१ कलमी बखर
(५) श्री शिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र :- मल्हार रामराव चिटणीस
(६) शककर्ते शिवराय :- विजय देशमुख 
 छत्रपती शिवाजी विरुद्ध अफझल खानः प्रतापगड, 1659

शिवाजी सभेत अली आदिल शहा यांच्या सर्वसाधारण माणसाला ठार मारण्यापेक्षा प्रतापगड ही मोहीम जास्त आहे. एकोणतीस वर्षाचे शिवाजीचे नेतृत्व कौशल्य आणि मानसिक दुर्बळता समोर येते.
या सामायिकरण बटणे जोडा
फेसबुक वर सामायिक करा
ट्विटरशेअरवर प्रिंटशेअरवर ईमेलशेअरवर अधिक सामायिक करा
3.2 के

ag@gmail.if 'अनीश गोखले @authoraneesh
इंडोलॉजी | 29-01-2020

छत्रपती शिवाजींना एक महान व्यक्तिमत्त्व का मानले गेले आहे याची कल्पना करुन आणि समजून घेण्याची एखादी घटना असेल तर ती अफझलखानची हत्या ठरेल. शिवाजी सभेत अली आदिल शहा यांच्या सर्वसाधारण माणसाला ठार मारण्यापेक्षा प्रतापगड ही मोहीम जास्त आहे. एकोणतीस वर्षाचे शिवाजीचे नेतृत्व कौशल्य आणि मानसिक दुर्बळता समोर येते. गुप्तहेर, हेर, विघटन मोहीम आणि गनिमी युद्धाची शस्त्रे शिवाजी यांनी लहान कारकीर्दीत परिपूर्ण केल्या. महत्वाची माहिती जसे - अफझलखानाला भेटण्यासाठी योग्य किल्ला निवडला जावा, त्या किल्ल्याचे अचूक स्थान / जागा (जंगलाजवळ, सुटकेचे मार्ग इत्यादी), गडावर त्या वेळी भरती करायची अशी रक्षक) मिनिटांच्या निर्णयामागे यामागील तर्कसंगत तर्क असते. आणि शिवाजी केवळ अफझलखानाला बेदखल करण्यावर थांबत नाहीत - आदिल शहा यांचा नकारात्मक निकाल लागला आहे याची त्यांना खात्री आहे. स्थितीचे दिवस छत्रपती शिवाजींनी संपवले.

1659 - मोहिमेपर्यंत पुढाकार घ्या

शिवाजी महाराज विजापूरच्या आदिल शहाच्या नजरेपासून दूर सह्याद्रीत सतत बल मिळवत होते. त्याच्या वडिलांना, शहाजी राजे, पुण्याचे जागीर यांना पाठवले; राजगड आणि तोरणा या परिसरातील अनेक मजबूत डोंगर किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. आदिल शहाकडून त्याच्या हेतूंबद्दल विचारपूस केल्यावर त्याने उत्तर दिले की हे किल्ले फक्त त्या भागात आदिल शहाचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत! विजापूर येथे, शहाजींनी आपल्या मुलाच्या क्रियाकलापांना एका लहान मुलाच्या दमदार पळापळ म्हणून फेटाळून लावले परंतु शिवाजीच्या मदतीसाठी सावधगिरीने सल्लागार आणि अनुभवी योद्धा पाठवले!

त्यावेळी विजापूर दरबारात अंतर्गत अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्यात डेक्कनी मुस्लिमांनी अफगाण-तुर्क सदस्यांशी भांडण लावले होते. मग काळजी घेण्यासाठी मुघल आक्रमण झाले - त्या सर्वांनी स्वतःचा प्रभाव पुढे करण्यासाठी शिवाजी महाराजांचा चांगला प्रभाव पडला.

शेवटी, १. 167 मध्ये मोगलांशी युद्ध संपले आणि अली आदिल शाह किंवा त्याऐवजी त्याची आई, एजंट बेगम साहिबा यांनी शिवाजीला एकदाच चिरडण्याचा निर्णय घेतला. यासाठी, अफझलखान यांची नेमणूक केली गेली - एका लढाईमुळे कठोर सेनापती बनले ज्याने संपूर्ण दक्षिण भारतातील सैन्यांचे नेतृत्व केले.

अफजलखानाची सुरुवात विजापूर येथून होते
IMG_256

अफजलखान एप्रिलच्या उत्तरार्धात विजापूर येथून निघाला आणि पंढरपूर, मालवडी आणि रहिमतपूर मार्गे प्रतापगडजवळ वाईकडे निघाला. वाटेत पंढरपूर येथील मंदिराची त्याने अपमान केली. पंढरपूरहून जवळपास तीन हजार सैन्याच्या पथकाने पुण्याला जाण्यासाठी मार्गक्रमण केला. या प्रवासात त्यांनी शिवाजीसाठी बनविलेले एक लाकडी पिंजरा देखील ठेवला आणि तुळजापूर आणि रावळनाथ मंदिरांतून मोठ्या प्रमाणात खंडणी घेतली.

१59 59 of च्या उन्हाळ्याच्या दरम्यान किंवा अफझलखाना वाई गाठला. पुण्याला सैन्य दलात तेथे दाखल झाले आणि त्यांनी लवकरच पुणे - शिरवळ आणि सुपे भागातील मोठ्या भूभाग ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी त्यावेळी राजगड येथे होते.

अफजलखानची योजना शिवाजीला टेकड्यांमधून बाहेर काढणे आणि मैदानावर जेथे त्याच्या तोफखान्यात आणि घोडदळांनी नंतरच्या भागात विनाश कोसळू शकते, अशी मोहक ठेवण्याची योजना आखली होती. त्याच वेळी अफझलखान यांनी विविध वटदारांना त्यांना आपल्यात सामील होण्यास प्रवृत्त केले किंवा धमकी दिली.

संबंधित प्रदेशाचा एक छोटा नकाशा:
IMG_257

शिवाजी आमिष घेत नाहीत

छत्रपती शिवाजीच्या गुप्तचर नेटवर्कला, जिवे मारण्याच्या हेतूने विजापूरहून निघाले होते यासह परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. पंढरपूर आणि इतर ठिकाणी मंदिराच्या विटंबनाचा त्याचा परिणाम नक्कीच झाला असावा, परंतु त्यांनी चिडचिडीचा निर्णय घेण्याऐवजी त्याचा राग वाढविला नाही. शिवाजी शांतपणे मैदानावरून मागे हटला आणि राजगडच्या डोंगराळ किल्ल्यातच राहिला.

शिवाजीच्या घोडदळाच्या मोठ्या पथकाचे नेतृत्व करणारे नेताजी पालकर यांनी, पुण्याभोवती फिरणार्‍या तीन हजार विचित्र सैनिकांना घालवून देण्याची परवानगी मागितली. पण शिवाजीला अफजलखानाच्या मनात अशी भावना निर्माण करायची होती की तो एक सामर्थ्यवान सेनापती होता. अशा प्रकारे त्याने पुणे आणि सुपे भागात व्यापलेल्या सैनिकांवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली. त्यानंतर त्याने एक डिसइन्फॉर्मेशन मोहीम सुरू केली आणि अफझलखानाचे आकाशाचे गुणगान केले आणि तो (शिवाजी) त्याला भयानक कसा घाबरला हे स्पष्ट केले.

अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजीला त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. शिवाजीला पकडले गेले किंवा ठार मारले गेले. पण परिस्थितीची तीव्र धारणा शिवाजींनी रोखली. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी राजगड येथे राहिले. काही आठवड्यांनंतर मुसळधार पावसाळा सुरू झाला, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सैन्याच्या हालचाली अशक्य झाल्या. आता अफझल खानला काही नवीन सुरुवात करण्यापूर्वी चार महिने थांबावे लागेल.

परंतु शिवाजीने केवळ एक डोकेदुखी काढून टाकली होती - उघड्यावर अफझल खानचा सामना करणे.
 परंतु शिवाजीने केवळ एक डोकेदुखी काढून टाकली होती - उघड्यावर अफझल खानचा सामना करणे. आणखी एक समस्या कायम राहिली ती म्हणजे - अफजल खानच्या गाजर आणि काठीच्या धोरणामुळे या प्रदेशातील वटदार आणि मराठा सरदारांची भुरळ पडली.

शिवाजीला स्वराज्याच्या उंच स्वप्नाशिवाय इतर काही नव्हते. त्याच्याकडे पैसे देण्याकरिता जागीर नव्हता किंवा वाटण्यासाठी सोनं नव्हतं. त्याचे छोटेखानी राज्य मुख्यत्वे काही आदिल शाही किल्ल्यांचे नियंत्रण गृहीत धरुन बांधले गेले होते या बहाण्याने ते त्यांची अधिक चांगल्याप्रकारे देखभाल करण्यासाठी हे करीत होते. त्याने सैन्यदृष्ट्या काही चाचण्यांना सामोरे गेले होते, परंतु अफझल खान पूर्णपणे वेगळ्या जातीचे होते. मे 1659 मध्ये जर संभाव्यतेचे वजन केले गेले असेल तर शिवाजी सुरक्षित पैजापेक्षा फार दूर होते. तो एक कठीण काळ होता. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, चरणबद्ध कान्होजी जेधे.

कान्होजी जेधे

कान्होजी जेधे यांना स्वत: शहाजींनी प्रतिनियुक्त केले होते की ते शिवाजींना काही इजा होऊ नये म्हणून. आता त्याला एक गंभीर निर्णयाला सामोरे जावे लागले. तो एक आदरणीय व्यक्ती होता आणि त्याने अफझलखानचा मित्रत्वाचा स्वीकार केल्याने शिवाजीविरूद्ध संतुलन ढकलले जाऊ शकते. पण कान्होजी जेधे यांनी शिवाजी ज्या आदर्शात लढा देत होता त्यावर पूर्ण विश्वास ठेवला. हा एक शक्तिशाली आदर्श होता, त्याबद्दल त्या देशात सुमारे तीनशे वर्षे कोणीही बोलले नव्हते. स्वराज्य स्थापनेच्या गरजेबद्दल खात्री असलेल्या व्यक्तीला जमीन व पैशाचे अनुदान देऊन रोखता येणार नाही.

कान्होजी जेधे अफझलखानकडून मिळालेल्या फर्मांसमवेत राजगडला गेले आणि त्यांनी जाहीरपणे जाहीर केले की ते आपली जमीन आणि त्यांची कमाई शिवाजींकडे सोडून देतील पण अफझलखानामध्ये सामील होणार नाहीत. शौर्य आणि दूरदर्शितेच्या या साध्या कृत्याचा विद्युत् प्रभाव पडला: कान्होजी जेधे यांच्या अनुभवाने आणि ज्येष्ठतेने एखाद्याने शिवाजीला पाठिंबा दर्शविला म्हणजे स्वराज्य ही त्यांची कल्पना होती ज्यासाठी त्यांनी संघर्ष केला पाहिजे. अफझलखानाकडे असलेले सर्व विलंब त्वरित थांबले.

माझ्या दृष्टीने जेधे यांची ही कृती संपूर्ण मोहिमेची आठवण ठेवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अफझलखानची खरी हत्या त्यापेक्षा जास्त.

मोगलांनी आत प्रवेश केला

एप्रिलच्या तीव्र उन्हात अफझल खानने ही मोहीम उघडली त्यामागील एक कारण म्हणजे औरंगजेब दिल्लीच्या गादीसाठी आपल्या भावांशी लढायला व्यस्त होता. औरंगजेब दख्खनच्या दिशेने आपले लक्ष वळवण्यापूर्वी शिवाजीला संपवण्याची त्वरित झडप होती, अशी त्यांची अपेक्षा होती. पण पुण्यात आमिष न बाळगता शिवाजींनी ही योजना पूर्णपणे नाकारली होती.

जूनपर्यंत, कान्होजी जेधे यांच्या कृतीतून शिवाजीने दुसरा विजय मिळविला - हा विफलपणा होता. पण त्या महिन्याच्या शेवटी उत्तरेतील तंटे मिटताना पाहिल्या आणि नव्याने मुकुट असलेल्या आलमगीर औरंगजेबने आपली नजर डेक्कनकडे वळविली. त्याने स्वत: चे शिवाजी महाराजांसाठी खिल्लट लावून स्वतःचे मामा - शास्ते खान यांना पाठवले!

शिवाजी आणि अफझल खान यांना पुण्याच्या दिशेने जाणा honor्या मानाच्या वस्त्राची माहिती मिळाली. यामुळे परिस्थिती पूर्णपणे भडकली. औरंगजेब एक चतुर आणि धूर्त राजकारणी होता. शिवाय, त्याच्याकडे मोठी सेना होती. खिल्लट म्हणजे काय? औरंगजेबशी आदिल शहाविरूद्ध युती? पुढे काय होते? त्याऐवजी आदिल शहा औरंगजेबमध्ये सामील झाले तर? दोन सैन्याविरूद्ध एकत्र शिवाजी एक अतिशय कठीण जागी असत. शिवाजी आणि अफझल खान हे दोघेही औरंगजेबाच्या विरोधात वैयक्तिकरित्या कमकुवत होते. मुगल हा चीनच्या दुकानातला बैल होता जो मनोरंजन करण्यासही तयार नव्हता. फक्त एक गोष्ट निश्चित होती - तृतीय पक्षाच्या म्हणजेच मोगलांचा सहभाग घेण्यापूर्वी हा विषय निकाली काढायचा होता. जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी वाईपासून तीस मैलांच्या अंतरावर प्रतापगड येथे गेले. परिसरात जाण्यासाठी इतर किल्लेही होते, परंतु प्रतापगड निवडण्यामागे काही ठोस कारणे होती जी आपण योग्य वेळी पाहू.

वाई येथील अफजल खान

अफझल खानला दोन धक्के बसले होते, परंतु तरीही ते मजबूत स्थानावर आहेत. स्थानिक पातळीवर भरती करून आणि युती करून त्याने आपले सैन्य वाढवले ​​होते. त्यांनी शिवाजींनाच वाईकडे येण्यास प्राधान्य दिले असते, परंतु आता जवळच्या प्रतापगड येथे त्यांचा सामना करावा लागला होता. अफझलखानच्या सैन्याने किल्ल्याभोवती मोठे जाळे टाकले की शिवाजी सर्व बाजूंनी वेढला गेला. केट, पांढरे आणि सिद्दी हिलाल यांनी पुणे भागात फिरणा and्या आणि शिवाजीच्या ब troops्याच सैन्यांना आपल्या टेकड्यांच्या किल्ल्यांमध्ये बांधून ठेवलेल्या 000००० विचित्र सैन्यांची कमांड दिली. दक्षिणेस, सर्वार्खने वसोटा येथे दक्षिणेकडील मार्गांचे रक्षण केले. पश्चिमेला किनारपट्टी, जंजिराचा सिद्दी अफझलखानचा मित्र होता. या विशिष्ट तपशिलामुळे अफझलखानाला आणखी एक लक्झरी मिळाली, ती म्हणजे समुद्रामार्गे सैन्य आणि स्टोअर्स मिळणे आणि घाटातून कोकणात जाणा the्या छोट्या नद्या. खरंच असा विश्वास आहे की अफझल खानने कमीतकमी काही सैनिक आणि स्टोअर मिळवण्यासाठी समुद्री मार्गाचा उपयोग केला होता. विजापूर येथून त्याची पुरवठा लाईन तोडल्यास त्यांच्याकडे पर्याय होता. किनारपट्टीवरील दाभोल येथे त्यांनी सुमारे पाच हजार सैन्य ठेवले होते.

त्याचे उर्वरित सैन्य वाई येथे होते, ते प्रतापगडच्या सभोवतालच्या डोंगरावर आणि नाल्यांमध्ये होते.
IMG_258 छत्रपति शिवाजी राजगड येथे घेरले

एकूणच अफझलखानकडे जवळजवळ ,000०,००० सैनिक होते, तसेच मोकळ्या मैदानातील लढाईसाठी चांगले तोफखाना आणि घोडदळांचा फायदा
एकूणच अफझलखानकडे जवळजवळ ,000०,००० सैनिक होते, तसेच खुल्या मैदानातील लढाईसाठी चांगले तोफखान्या आणि घोडदळांचा फायदा आणि त्याला वेटिंग गेम खेळायचा असेल तर अखंड पुरवठा करण्याच्या मार्गाचा फायदा.

शिवाजी प्रतापगडला गेले:

१59 59 of च्या पावसाळ्यात छत्रपती शिवाजी राजगड सोडून साताara्याच्या जावली भागात दाखल झाले.

म्हणूनच शिवाजीने आपल्या चांगल्या साठा आणि शक्तिशाली किल्ले - सिंहगड, पुरंदर, राजगड आणि तोरणा यांची सुरक्षा सोडली आणि तुलनेने नवीन प्रतापगड किल्ल्यावर तळ ठोकला. प्रतापगड जवळील किल्ल्यांना आता महत्त्व प्राप्त झाले. रोहिडा, मकरंदगड, वासोटा आणि इतर. पण प्रतापगड निवडण्याचे स्वतःचे फायदे होते - त्याची बांधकामे नवीन होती - मोरोपंत पिंगळे यांनी १556 मध्ये बांधली होती, त्यामुळे अफझलखानाच्या छावणीतील एखाद्याला पूर्वीच्या भेटीतून त्याच्या लेआउटविषयी माहिती असण्याची शक्यता कमी होती. हा किल्ला त्याच्या डोमेनच्या सीमेवरही वसलेला होता, म्हणजे जर एखादी लढाई व्हायची असेल तर तो येथे किंवा आदिल शहाच्या प्रदेशात घडून येईल. राजगड बरेच आत होते. हे जंगलांनी सर्व बाजूंनी व्यापलेले होते. एक रणनीतिक फायदा होण्यासाठी शिवाजी राजगडच्या सोईची पूर्वसूचना करण्यास तयार होता.

प्रतापगडाच्या भोवताल शिवाजीने आपले सैन्यही चांगले पांगवले होते. कोकणातील प्रतापगड आणि मोरोपंत पिंगळे यांच्या आसपास नेता घोडचूकत नेताजी पालकर हे आपल्या घोडदळ सैन्याच्या कान्होजी जेधे आणि इतरांसह महाबळेश्वर पठारावर होते. पण शिवाजीला समुद्र किना on्यावर आधार मिळाला नाही आणि पुण्याचा संपूर्ण प्रदेश - सुपे अफझलखानाने ताब्यात घेतला होता. एक अफलातून खान शिवाजीचे किल्ले वेगळी करू शकेल असा धोका होता. नक्कीच, ते संपूर्ण पावसाळ्या टिकू शकतात, परंतु अन्न आणि स्टोअरचा साठा अनंत नव्हता! तर आता छत्रपती शिवाजींवर दबाव दुप्पट होता - शास्तेखान दक्षिणेकडे सरकला होता आणि एक गतिरोधक, एका क्षणापलीकडेच, अपरिहार्य होण्यास विलंब करेल हे ज्ञान होते. दुसरीकडे, अफझल खान लांब पल्ल्याची तयारी करत होता.

वाटाघाटी उघडली

कृष्णाजी भास्कर आणि पंतजी गोपीनाथ हे वाटाघाटी करण्यासाठी अफझलखान आणि छत्रपती शिवाजीच्या बाजूने पाठविलेले दोन दूत होते. पंतजी गोपीनाथ हे इक्का मुत्सद्दी होते आणि त्यांनी अफजलखानावर पूर्णपणे प्रभावित केले की छत्रपती शिवाजी कशा प्रकारे घाबरले आणि ते केवळ विजापूर सरकारचे सेवक होते. कृष्णाजी भास्कर यांनी अफझलखान यांचे प्रतिनिधित्व केले आणि बैठकीसाठी वेळ व तारीख यावर बोलणी केली. यात ऑक्टोबर १ 16 59 passed चा महिना पार पडला. कृष्णा भास्करने भेटीची जागा दर्शविली आणि व्यवस्थेसंदर्भात स्वत: ला समाधानी केले या वाटाघाटीचा निकाल लागला.

पण या गतिरोधकाच्या काळात छत्रपती शिवाजीच्या वैयक्तिक आघाडीवर एक शोकांतिका दिसली - त्यांची पहिली पत्नी साईबाई राजगड येथे मरण पावली. शिवाजींनी हे देखील त्याच्या चरणात घेतले आणि कमी व्यक्ती निराश झाली असेल तेथे डगमगू नका.

संमेलनाचा दिवस

छत्रपती शिवाजींनी संमेलनाचे व त्यासाठीचे छोटके नियोजन केले होते. त्यांना आणि त्यांचे सल्लागार दोघांनाही प्रतापगडच्या मांडणीचे उत्कृष्ट ज्ञान होते. किल्ल्याच्या पायथ्याजवळ एक शामियाना उभारला गेला आणि त्यातही सामर्थ्यपूर्ण विचार व विचार मांडण्यात आला. ही रचना काही यादृच्छिक मैदानावर नुकतीच उभी केलेली नव्हती परंतु येथून जवळच्या बुरुजावरुन पाहिले जाऊ शकते अशा ठिकाणी. त्याच वेळी बुरुजावरील सैन्य शमियानापासून अफझलखानाच्या दृष्टीकोनातून लपलेले असत! शिवाजींनी शरीररक्षकांना सभेच्या जागेपासून काही अंतरावर आणि सैन्याच्या तुकडी आणखी दूर ठेवण्याची विनंती केली - बाण सोडण्यापेक्षा नेमकेपणाने पुढे. दिवसाच्या तीक्ष्ण नेमबाजांनी त्याचा फटका बसण्याची शक्यता याने लगेच टाळली. शमीनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अफजलखानाला आत्मसात करण्यासाठी फक्त एकच अरुंद मार्ग ठेवण्यात आला होता, शिवाजीने त्यांना भेटीसाठी दोन दिवस आधी स्वतःची व्यवस्था तपासण्यासाठी माणसे पाठविण्याची परवानगी दिली!

प्रतापगडच्या आसपास सैन्याचे वितरण हे त्यांच्या कामातील हुशार मनाचे आणखी एक उदाहरण आहे. एक दिवस बाकी असताना, कान्होजी जेधे यांनी ap००० सैन्याने प्रतापगडच्या आसपासचे तळे फिरवले आणि अफझलखानाच्या १00०० हब्शी सैनिकांचा थेट विरोध केला ज्यांना छत्रपती शिवाजी जखमी झाल्यास किंवा जिवंत पकडल्या गेल्यास त्याच्या ताब्यात घेण्यात आले होते. हबशी सैनिक प्रामुख्याने मुसलमान होते. मोरोपंत पिंगळे 5000 सैन्यासह पार घाटावर दाखल झाले. बांदल आणि शिलीमकर देशमुख यांनी आसपासच्या बोचे घाली येथे सुमारे 2000 सैन्याच्या तुकड्यांची बांधणी केली. वाईचा दक्षिणेकडील मार्ग जोर खो valley्यातून होता - बाबाजी भोसले आणि रघुनाथ बल्लाळ यांनी या मार्गावर सुमारे guard००० सैन्य ठेवले होते. त्र्यंबक भास्कर दुधोशी नावाच्या गावात होता. शिवाय विश्वासराव नानाजी दिघे यांनी अफजलखानाच्या छावणीला भटकंती म्हणून काम केले होते आणि शिवाजीसाठी आपल्या सैन्याविषयी माहिती गोळा केली होती!
 
महाबळेश्वर (पाचगणी) च्या पठारावर काही अंतरावर नेताजी पालकर वाई येथे अफजलखानाच्या सैन्यावर शिवाजीच्या घोडेस्वारांना बाहेर काढण्याच्या सिग्नलची वाट पहात होते.
दूरच्या पठारावरील नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे पार घाटाजवळील का? बोचे घाली येथील बांदल देशमुख आणि कन्होजी जेधे प्रतापगड येथे हबशी सैन्याच्या तोंडी का? या प्रत्येक लहान तपशीलामध्ये ध्वनी तर्क आहे, एकही दल जागेचा किंवा मनमानी पद्धतीने ठेवलेला नाही.

मोरोपंत पिंगळे हे प्रामुख्याने पायदळ सैन्याचे नेतृत्व करीत होते. ते प्रतापगडच्या पायथ्यावरील खोल नाल्या आणि जंगलांसाठी योग्य होते. शिवाय, मोरोपंतने स्वतः प्रतापगड बांधण्यात सक्रिय पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच त्यांना किल्ल्याची व त्याभोवतीची सखोल माहिती होती. नेताजी पालकर यांची घोडदळ वाईच्या वेगाने प्रगती करण्यासाठी आणि तिथे ठेवलेल्या अफझलखानाच्या तळावर आणि तोफखान्यांवर हल्ला करण्यासाठी योग्य होती. शिवाय, "शिवाजी स्मारिका" मध्ये कॅप्टन मोडक यांनी डोळेझाक केल्यामुळे - अफजलखानच्या सैनिकांच्या जवळ असलेल्या झुडुपामध्ये घोडदळ ठेवणे आणि प्रतापगड येथे ठेवणे इतकी चांगली कल्पना असू शकत नाही. मराठ्यांनी असा विचार केला असावा की घोड्यांच्या नाचण्याने हा खेळ सुटेल! बांदल देशमुख हे रोहिडा भागातील देशमुख होते आणि म्हणूनच बोचेघाली आणि पार घाट या अरुंद ठिकाणी गनिमी युद्धाला परिपूर्ण होते. त्याच बॅंडल्स काही महिन्यांनंतर पावनखिंड येथे त्यांची कौशल्य सिद्ध करतील. शेवटी, कान्होजी जेधे यांना हब्शी सैन्याचा सामना करण्याचे सर्वात कठीण काम सोपविण्यात आले होते ज्यांच्या ताब्यात छत्रपती शिवाजी होते. शमियानात घडल्या त्याप्रमाणं त्या घटनांचे आकलन करण्याची आणि त्यानंतर स्वत: च्या अनुभवावर आणि निर्णयावर आधारित संपूर्णपणे विभाजन करण्याचे दुसरे निर्णय घेण्याची त्याच्या कामाची गरज होती. छत्रपती शिवाजीला वाचवण्यासाठी हब्शी सैन्यावर पूर्णपणे हल्ला करायचा की काळजीपूर्वक कूच करणे, हा त्यांनी घेतलेला त्वरित निर्णय होता. तो प्रभारी द्वितीय प्रभारीइतकाच चांगला होता आणि त्या दिवशी मैदानातील सर्व योद्धांपैकी सर्वात अनुभवी आणि सक्षम म्हणून छत्रपती शिवाजींनी त्याला हुशारीने निवडले होते.

अफझलखानची हत्या

प्रसिद्ध संमेलनाचा दिवस - 10 नोव्हेंबर 1659 अखेर उजाडला. अफजलखाना नव्याने बनवलेल्या रस्ता सभेसाठी उभारलेल्या मंडपाकडे आला, शिवाजी त्याला भेटायला किल्ल्यावरुन खाली उतरला. अनुक्रमे अफजलखान आणि छत्रपती शिवाजी यांच्याबरोबर सयाद बांदा आणि जीवा महाला हे दोन प्रख्यात तलवारी होते. अफझलखानचे कृष्णाजी भास्कर आणि शिवाजीचे पंतजी गोपीनाथ हे दोन ब्राह्मण दूतही मंडपात होते. अफजलखानाकडे आधीपासूनच लोकांना बोलवण्यासाठी आणि त्यांना ठार मारण्याचा ट्रॅक रेकॉर्ड होता - उदाहरणार्थ कस्तुरी रंगा, सेराचा राजा. शिवाय, त्यांचा असा विश्वास होता की शिवाजीचा मोठा भाऊ, संभाजीचा, कानकगिरीच्या सीजमध्ये सर्वात जास्त आवश्यक असतांना त्याच्या मदतीला न जाताच त्याने मृत्यू ओढवला होता (१ 1658)

पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. शिवाजी आणि सय्यद बांदा यांनी अफवाल खानला जीव महालाने ठार मारले. दोघेही दूत यांना वाचविण्यात आले. यानंतर, सर्व नरक सैल झाला. प्रतापगडच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजीच्या विजयाचा संकेत म्हणून बंदुकीचा आवाज सुरू होताच तंबूच्या शेजारी असलेले दहा अंगरक्षक पहिल्यांदा भिडले. संभाजी कावजी या दहा अंगरक्षकांपैकी एकाने अफझलखानाचे शिरच्छेद केले आणि ट्रॉफी म्हणून त्याचे डोके दूर नेले.

आता प्रतापगडची लढाई झाली!

“पराभवाचा नाश आणि विजयाची स्थिती” हे प्रा. नरहर कुरुंदकर यांनी शिवाजींशी तुलना करतांना हिंदूंच्या बलाढ्य शक्तींचे वर्णन केले. लढाई जिंकणे किंवा पराभूत करणे, ही हिंदू सत्ता असेल ज्याचा प्रदेश अशुद्ध झाला.

शिवाजीने अफजलखानाचा वध करताना पराभव पत्करला होता. त्याची बडबड सैन्याने मिशनचा त्याग केला असता आणि विजापूरकडे परत आला असता आणि शिवाजींचे वर्चस्व प्रतापगड येथेच राहिले असते. थोडक्यात अफझलखानाच्या मृत्यूखेरीज विजापूरला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पण त्याऐवजी विजापूर सैन्यावर छत्रपती शिवाजीने एक फोडफोड हल्ला सुरू केला!

प्रथम, मंडपाजवळ कान्होजी जेधे हब्शी सैन्यावर पडले आणि त्यांची कत्तल केली किंवा त्यांना पळवून नेले. पार घाटाच्या खाली मोरोपंत पिंगळे यांच्या soldiers००० सैनिकांनी, इतरांपैकी एका तानाजी मालुसरे यांच्या मार्गदर्शनाने, अफझलखानच्या माघार घेणार्‍या सैन्याचे छोटेसे काम केले. वाईकडे पळ काढणार्‍या सैन्याने रघुनाथ बल्लाळ आणि बाबाजी भोसले यांनी स्वत: ला काबूत ठेवले. त्यानंतर झालेल्या मेहेममध्ये अफझलखानाचे 3000 हून अधिक सैनिक मारले गेले आणि तितकीच संख्या जखमी किंवा पकडली गेली. शिवाजी साठी, संख्या अंदाजे अर्धा होते. दुर्दैवाने या युद्धात शिवाजींनी बाबाजी भोसले यांचा पराभव केला.

काही सैन्य प्रतापगड येथील पराभवापासून वाचण्यात यशस्वी झाले आणि वाईपर्यंत पोहोचले. अफजलखानची तोफखाना आणि उर्वरित सैनिकांनी तातडीने जागा रिकामी केली आणि संपूर्ण छावणी व तिचे सर्व सामान आणि पैसा छत्रपती शिवाजींच्या ताब्यात सोडला!

अफझलखानाच्या तीन अधिका्यांनी पुण्याला पाठविले - काटे, पांढरे आणि सिद्दी हिलाल तातडीने शिवाजीमध्ये सामील झाले आणि अशाप्रकारे त्यांना पुणे विभागातून हाकलून लावण्याची समस्याच सुटली. खंडोजी खोपडे याने अफजलखानाकडे दुर्लक्ष केले होते. त्याला एक हात व एक पाय कापून शिक्षा देण्यात आली. युद्धात अफजलखानाचे दोन मुलगे पकडले गेले.
याचदरम्यान नेताजी पालकर वाई गाठले आणि आदळशहाच्या हद्दीत घुसखोरी केली. आदिल शाहच्या सैन्याने पन्हाळा व विशाळगड पर्यंत संपूर्ण प्रदेशातून निर्वासित केले. त्यानंतर ते हुजळी, धारवाड आणि गडाग येथे जवळजवळ विजापूरला जाण्यापूर्वी गेले. येथून परत पन्हाळ्यात परतले.

मोरोपंत पिंगळे पार घाटातून कोकणात परतले आणि दाभोळ व इतर भागात स्वारी करणारे सैन्य बाहेर काढले. अफझलखानाच्या निराश सैनिकांनी समुद्रामार्गे घाईघाईने माघार घेतली.
त्याच्या बाजूने, शिवाजी देखील प्रतापगडहून दक्षिणेकडे सरकले, त्याने जोखमीची पर्वा न करता पुन्हा एकदा लढाईत उतार होण्याचे वैशिष्ट्य दर्शविले. कान्होजी जेधे यांना आधी सांगितल्याप्रमाणे सर्वार्खानं ताब्यात घेतलेल्या वासोटाला वेढा घालण्यासाठी पाठवलं होतं.

शिवाजी स्वत: कोल्हापूरच्या दिशेने निघाले आणि पन्हाळा पोहोचण्यापूर्वी खेलना, वसंतगड आणि इतर काही किल्ल्या ताब्यात घेतल्या.

१ 16 59 By डिसेंबरच्या मध्यभागी शिवाजीच्या अधिपत्याने कृष्णा नदीला स्पर्श केला! अगदी एक महिना अगोदर, तो नीरा आणि भीम होता, आता भीमा आणि कृष्णा यांनी सीमा चिन्हांकित केल्या आहेत. शिवाजीने केवळ अफजलखानालाच पराभूत केले नाही तर त्यानंतरच्या काळात त्याने स्वत: चे क्षेत्र दुप्पट केले!

परिणाम:

    छत्रपती शिवाजींनी दख्खनवर त्याच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले.
    वीसहून अधिक किल्ले आणि स्वराज्यासाठी युद्ध करण्यासाठी हजारो सैनिक मिळवून त्याचे प्रांत दुप्पट झाले. अधिक पैसे आवश्यक.
    विजापूरला हा मोठा धक्का होता

संदर्भ:

    प्रतापगड मोहीम - मेजर मुकुंद जोशी
    शिवाजी स्मारिका - सरदेसाई
    शिव भारत - कविंद्र परमानंद
    मराठ्यांचा इतिहास - कुलकर्णी आणि खरे
  

अफजलखानाचा वध  (लेखक - गणेश पावले)


शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.
आता शिवाजीला रोखलाच पाहिजे यासठी बेगम ने दरबार भरवला आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि कोण रोखेल त्या शिवाजीला " कोणीच तयार होत न्हवते…. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा ! सर्व दरबार सुन्न झाला अफलखानाने विडा उचलला आणि तो मोठ्या सैन्यानिशी मराठी स्वराज्यावर चाल करून आला.
☼ विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजल्या वाईकडे यावयास निघाला.- वाईतून मग जावळी प्रांतात आला.
☼ शिवरायांचा या आधीचा पराक्रम आणि कोणी अवलियाने (फकिराने) तुझे अनिष्ठ होयील अस सांगताच खान आधीच खचला होता. आपण माघार घ्यायची नाही व बडी बेगमला दिलेला शब्द पाळायचा असा निर्वाणीचा विचार करून त्याने आपल्या त्रेसष्ठ पत्नींना ठार मारले.(क्यारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या ग्रंथात त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेख केला आहे)
☼ अफजल खानाचा मार्ग - डोण नदीला डावे घालून पंढरपूर - माणकेश्वर - करंकभोस - शंभूमहादेव - मलवडी - रहमतपूर मार्गे वाई (तुळजापूर - पंढरपूर येथे तुळजाभवानी व पांडुरंगाच्या देवस्थानाचा उपद्रव केला)
☼ वाई येथे अफजलखानशी दोन हात करण्यास कठीण जायील खान जावळीस यावा यासाठी शिवाजी महाराजांनी खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्यावतीने खानास निरोप पाठविला " राजा कचदिल आहे, वाईस येवून भेट घेण्यास भितो"
☼ हाती आला ससा । तो जावू कसा द्यावा" असा विचार करून खान जावळीस यायला तयार झाला (माशाला गळाचे आमिष नीट लागले)
☼ शिवाजी राजांनीही आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या मार्फत पत्र पाठविले त्यात लिहिले " जैशे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचा भतीजा होय" असा पत्रव्यवहार करून दोघेही एकमेकांना शब्दांचा, पत्रांचा व्यवहार करून खेळवत होते. पण, इकडे शिवाजी महाराज आपली योजना आखत होते तर खान गुर्मीत शिवाजीला कसा ठार मारू याचा विचार करत होता.
☼भेटीचा दिवस निश्चित करण्यासाठी महाराजांकडे वकील आला त्या दिवशी मार्गशीष शुद्ध पंचमी होती "खानाचे वकील राजीयास जावून भेटले. लौकिक बोलणे जे बोलायचे ते बोलले, एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले कि आपण बोलल्या प्रमाणे खानास घेवून आलो. आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे खासे यांची करवितो. तुम्ही हरीफी करून कार्यभाग करणे तो करावा. म्हणोन सांगितले, भेटीस एक दिवस आड करून दुसऱ्यादिवशी दिवशी भेटावे असे केले. राजे गडावरून उतरावे, खानाशी गोठांतून पुढे यावे, उभयतांनी दरम्यान देरे देवून खासे खासे भेटावे" खानास वर्तमान सांगितले व खानानेही ते मान्य केले. { संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर } -
► खलबताच्या वेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला. त्याचे कारण -
१. दुसरे दिवशी चंपाष्टी होती.
२. अफजलखान अजूनही वाई प्रांतात होता त्याला जावळीस यायला वेळ मिळावा. शिवाय अफजलखान व शिवाजी महाराज भेट होणार याची खबर इतर सरदारांत, मुलखांत पोहोचावी, व आपल्या मावळ्यानकडून गुप्त तयारी करून घेण्यास वेळ मिळावा.
☼अफजलखान भेटीची शिवरायांनी केलेली तयारी -
गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करणेस शिवाजी महाराजांनी "अंबाजी रंगनाथ मलकरे यांना पाठवले (काही ठिकाणी मळेकर, माळेकर असा उल्लेख आहे) [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
सैन्य दूर ठेवले होते ते जवळ आणून सरदारांस ठिकाणे नेमुंन दिली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक जमवून ठेवले कारण हि जागा अशी आहे कि येथून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि येथे सैन्य घेवून जाणे खूपच अवघड आहे. अशा प्रकारे इतर उंच उंच ठिकाणी नाकेबंदी केली.
आपले सैन्य दिसणार नाही असा झाडी झुडपातून दबा धरून मावळे तयार ठेवले व गडावरून तोफेचा आवाज होताच खानच्या सैन्याची धूळधाण उडवावी असा हुकुम दिला.
शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील.
अफजल खान शामियाना बघूनच भूलेल अशा शाही थाटात सदर उभारली. डेऱ्यास सोन्याचे चंदाराई कळस लावला (चंदाराई कळस- चंद्रराव मोऱ्यांचा आणलेला) बाजूने मखमली झालर व पडदे लावले.[संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
तंबूत एक चौथरा बांधला. हा चौथरा ३३ फुट रुंद आणि ४० फुट लाब असा होता. त्याचे कारण असे कि सदरेच्या परिसरात खानाने पुष्कळ लोक आणायचे ठरविले तर अशक्य होते. व दोन्ही बाजूला तुटलेले कडे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक चौथरा बांधला होता.
मुसलमान बैमान आहे…. कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी " हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत.
शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. [ संदर्भ - शिवद्विग्विजय १६५]
भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले
शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली.
स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले.
राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानच्या भेटीला.
☼ भेटीचा प्रसंग -
अफजलखान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे दिसताच शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानकडे निरोप पाठविला कि "भेटीसाठी इतके लोक कशाला, राजे आपणाला घाबरतात. इतका जमाव पाहून राजे घाबरून माघारी जातील. व आपली भेट होणार नाही. आपण सोबत एक अंगरक्षक घेवून यावा व बाकीचे लोक परत पाठवावे. खानाला हे पटले व तो पालखीसोबत दोन हुद्देकरी सशत्र, कृष्णाजी पंत, व बरोबर सय्यद बंडा नावाचा पटाईत सरदार होता.
खान सदरेजवळ येतोय हे शिवरायांना वरून दिसत होते. खानच्या मनात दगा आहे हे शिवराय जाणून होते त्यांनी तसा सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला होता.
प्रतापगडाच्या पलीकडे नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेवून सज्ज होते. तोफेचा आवाज होताच हे खानवर तुटून पडणार होते. [ संदर्भ - कृष्णाजी अनंत सभासद बखर]
गडाच्या भोवती रानभर मावळे पेरले होते. सदरेच्या बाहेर एक रणशिंग घेवून मावळा उभा केला होता. "भेट घडताना माझे काहीही होवूदे पण तू शिंग वाजवून सैन्यास इशारा दे" अस शिवरायांनी त्याला सूचना केली होती. शिंगवाल्याचा इशारा होताच गडावरील तोफ डागावी व तोफेच्या इशाऱ्याने सैन्याने शत्रूवर तुटून पडावे अशी योजना होती.
अफजलखान सदरेजवळ येताच शामियाना पाहून थक्क झाला. खानाने राजांना लवकर भेटावयास असा निरोप पाठवला. राजे गड उतरून आलेच होते. राजेंच्या सोबत विश्वासू जीवा महाला (यांचे उपनाव सकपाळ. जावळी प्रांतात मौजे कोंडवली येथे राहणारे जीवा महाले ) होता. तर खानासोबत त्याचा अंगरक्षक सय्यदबंडा उभा होता. मनासारखे सर्व जुळून आले होते जीवामहाला व संभाजी कावजी राजेंसोबत शामियानाच्या दिशेने निघाले.
शिवाजी महाराज शामियाना जवळ येताच त्यांनी सय्यद बंडाला दूर करा. आम्हाला त्याची भीती वाटते खानाने हसत हसत त्याला दूर केला खान मनात खूप खुश होता कि माझ्या अंगरक्षकाला शिवाजी इतका घाबरला तर मला किती घाबरला असेल. खान गुर्मीत शिवाजी राजांकडे पाहत होता. खान म्हणाला हाच का शिवाजी. तेंव्हा राजेंनी हि हा खानच असल्याची खात्री करून घेतली
खानाने राजीयांची मुंडी कवटाळून बगलेखाली धरली - [संदर्भ - सभासद बखर व शिवदिग्विजय]
राजांना थोडे घेरी आल्यासारखे झाले, यावेळी राजेंच्या मनास रामदास स्वामींची आठवण झाली. महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेत भली मोठी जमदाड होती. तिचे म्यान टाकून खानाने ती राजीयाच्या कुशीत चालविली. पण राजीयाच्या अंगावर जरीची कुडती होती. त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही. खानाने दगा केला हे पाहून, मोठ्या हिमतीने सर्व ताकत एकटवून डावे हाती बिचवा होता तो राजांनी खानाच्या हृदयाखाली पोटी मारला. व 'एकांगी करून खानावर तडाख्याचा वार केला. त्या जोरावर एकाच तडाख्यानिशी खानची आतडी बाहेर आली. - [संदर्भ - हनुमंत स्वामींची बखर व रायगडची बखर ]
खान ओरडला "दगा दगा दगा…। इतक्यात खानाचे कृष्णाजी पंत तिथे आले त्यांनी राजांवर वार केला. परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही. इतक्यात राजांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानवर केला त्याच बरोबर खानची आतडी बाहेर आली. खान पुरा झाला खाली पडला. कृष्णाजी पंतांनी राजांशी पुन्हा लगट केली पण राजेंनी त्यास दूर होण्यास सांगितले. कृष्णाजी पंत निघून न जात भोयांस आत बोलावले व खानाला पालखीत बसवू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी व जीवा महाला तिथे होते. संभाजी कावजींनी भोयांचे पाय तोडले व खानाची पालखी अडवली. त्यांनी खानाचे मुंडके कापले. इकडे खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजेंवर चाल करून आला. वर्मी घाव मारणार इतक्यात जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला व राजीयास वाचविले "यावरून एक म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा" [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
[ टीप - अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज यांच्या हातून मारला गेल्याचा हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय या समकालीन साहित्यात कोणताच पुरावा नाही ]
खान पडला वार्ता सगळीकडे पसरली, रणशिंग वाजताच तोफेचा आवाज झाला. आणि एकच कापाकापी उडाली. मराठ्यांचे सैन्य खानच्या सैन्यावर तुटून पडले तुफान युद्ध झाले. खानाचे सीने जीव तोडून पळत होते. या घनघोर युद्धात शिवरायांचे दोन सरदार शामराज पद्मनामी व त्रिंबक भास्कर कामी आले [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
अफजलखानाचा मुलगा फाजलखान कोयना काठाने निसटून जात असता खंडोजी काकडे(खोपडे) या सरदाराचे हाती सापडला. पण खंडोजीने धनाच्या मोहास पडून त्यास सोडून दिले. हि वार्ता राजांस कळताच तात्काळ खंडोजीला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच.
अशी हि अफजलखान वधाची गोष्ट शके १५८१ विकारी नाम संवछरी मार्गशीष सप्तमी गुरवारी घडली.
☼ प्रतापगडाचे युध्द झाल्यावर युद्धात कमी आलेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्वांना महाराजांनी बक्षिसे आणि मदत दिली. काही दिवसांनी अफजलखानाचा मदतगार खंडोजी खोपडा पकडला गेला राजांनी त्याचे शीर कलम केले.
☼ थोड्याच दिवसांनी शिवाजी राजेंनी प्रतापगडावर मोठा उत्साह साजरा केला. आई भवानीने आम्हाला यश दिले म्हणून राजेंनी आपली ती कुलस्वामिनी तिचे दर्शन वारंवार घडावे याकरता गंडकी शिळा आणून एक हुशार कारागीर तुळजापूरास पाठवून तेथील देवीच्या ध्यानाप्रमाणे मूर्ती घडवून घेतली. व तिची प्रतापगडावर मंदिर बांधून राजेश्री मोरोपंत पिंगळे यांच्या पत्नीच्या हस्ते प्रतापगडी स्थापना केली [संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे]
मराठ्याच्या पोराने पादशाही सरदाराला सबंध गिळून टाकला हि वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वत्र कीर्तिवंत राजा अशी ख्याती झाली. डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाउन टाकला म्हणून बेगम खूपच हताश झाली. विजापूरचे सिंहासन डळमळू लागले.
बखरकार सांगतात, अफजलखान मारला गेला हि बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला… बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली. पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही.
इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना. शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला कि, चारी दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौकुर उधळला. आणि यशवंत राजा, कीर्तिवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला.
लेखक / कवी - गणेश पावले
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान.
[टीप - वरील लेख हा अफजलखानाचा वध . वि. ल. भावे यांच्या पुस्तकावरून हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय इत्यादींचा आधार घेवून लिहिलेला आहे. ]

Strategic Movements in the Afzhal campaign

 प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी एकट्याने अफझलखानचा नाश केल्याची कथा आणि मराठा साम्राज्याला काही पट वाढविणाया विजापूर प्रांतावर पुढील प्रतिकार हल्ला याची आपल्याला चांगली माहिती आहे. मी जास्त तपशीलांवर लक्ष देत नाही- परंतु युद्धाच्या रणनीती - बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी आणि सैन्याची गतिशीलता या पैलूंचा स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

इस्लामचा प्रसार करणे कठीण झाल्याने शिवाजी महाराजांनी कोकण प्रदेशात प्रवेश केला आणि तेथे राजकीय आणि धार्मिक दोन्ही ठिकाणी विध्वंस केला. या उपक्रमांना आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकारे इस्लामचा प्रसार रोखण्यासाठी विजापूर सुलतानाने अफझलखानाला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी नियुक्त केले होते. अफझल जेव्हा त्याने एक प्रचंड सैन्य बढाया मारण्यास सुरुवात केली तेव्हा. प्रचारात जाताना इतर अनेक नेतेही त्यांच्यात सामील होणार होते. अफझल विजापूर येथून निघाला, पण शिवाजी महाराजांचा मुख्य जहागीर असलेल्या पुण्यात येण्याऐवजी त्याने तुळजापूर, पंढरपूर इत्यादी ठिकाणी हल्ला करुन तेथील मंदिरे नष्ट केली. शिवाजींना डोंगरावरून मोकळ्या मैदानावर खेचणे हा त्याचा हेतू होता, जिथे मराठ्यांचा पराभव करणे सोपे होईल. त्याचा मार्ग, हा थोडा हास्यास्पद वाटतो. प्रयत्न करणे ही एक चांगली रणनीती होती, परंतु मराठ्यांना त्यांची शक्ती आणि कमकुवतपणा यांचे उत्कृष्ट ज्ञान होते आणि म्हणूनच त्यांनी बाहेर येण्यास नकार दिला. शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी येथे नोंद करावी. अफझलला विनाश थांबवण्यासाठी पत्र पाठविण्याची तसदीही घेतली नाही. अफझलला अशा प्रकारे ती योजना सोडावी लागली.
अफझलला जावळी आणि मराठा बचावाकडे आकर्षित करण्यासाठी मराठा मुत्सद्देगिरी.

शिवाजी महाराजांना सह्याद्रीचा भूभाग आतूनच ठाऊक होता, आणि त्यांनी अफझलला जावलीच्या जंगलात अडकविण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे ते राजगडहून प्रतापगडकडे जावळीच्या जंगलातील मध्यभागी वसले. अफझलने मध्यंतरी पंढरपूर ते फलटण या वाईकडे जायला सुरुवात केली. फलटण येथे त्यांनी शिवाजीस मेहुण्याला तुरूंगात टाकले, जो अफझलच्या बाजूने विचित्रपणे लढत होता आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, पुन्हा धूर्त अक्षरे वापरुन शिवाजीने आपला मेहुणी मेल्याची सुटका करुन घेतली. कान्होजी जेधे यांच्या अवाढव्य मदतीने शिवाजींनी भगव्या बॅनरखाली मावळातील देशमुखांना एकत्रित करण्यास आणि स्वराज्याच्या कारणासाठी लढा देण्यास यश मिळवले- याला अपवाद वगळता खंडोजी खोपडे असा होता.
अफझलने आपला पुढचा खेळ वाई येथे बसून, पर्वताजवळ पुरेसे, परंतु अजूनही मैदानावरच खेळण्याचा निर्णय घेतला होता, आणि शिवाजीला जावळीच्या जंगलातून वाईत फेकून देण्याची आणि नंतर त्याला ठार मारण्याची किंवा पकडण्याचा विचार केला होता. जेव्हा त्यांनी वाईला पोहोचले तेव्हा त्याने पुणे, शिरवळ, सासवड आणि सुपे ही महत्त्वाची 4 ठिकाणे हस्तगत केली. सुल्तानने असे आदेश दिल्यामुळे बरेच सरदार विजापुरी किल्ल्यांमधून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य अफझल सैन्यात सामील झाले होते. किल्ल्याची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मोजक्या सैनिकांना मारेदाराने ठेवले व उर्वरित सैन्य अफझलखानमध्ये सामील होण्यासाठी पाठवले. त्याव्यतिरिक्त, सुल्तानने 3 जहाज जहाजाने पुरविलेल्या राजापुरीच्या खाडीला पाठवले होते, जर अफझलने ही मोहीम कोकणात ठेवली पाहिजे.
शिवाजीला अफझलच्या हेतूंबद्दल माहिती होती. अफझल छावणीत घुसखोरी करणा या त्याच्या भव्य जासूस नेटवर्कच्या माध्यमातून. त्याउलट, कूटनीती, स्पष्ट खोटेपणा आणि अशा शक्तिशाली नेत्याला भेटायला घाबरण्याचे भव्य नाट्य याद्वारे शिवाजींनी अफझलच्या मनात अहंकार आणि अति आत्मविश्वासाचे बी पेरले. त्याच्या वाकिलने अफझलला विश्वास दिला की शिवाजी अफझलखानला येऊन भेटायला खरोखर घाबरत होते आणि म्हणूनच त्यांनी त्याला प्रतापगडावरुन घेऊन जाण्याची विनंती केली. अफझलच्या मनात पेरलेल्या अहंकाराचे बीज फळ देण्यास सुरवात झाली आणि शिवाजी खरोखर घाबरले या विचारातून वाई येथून प्रथम महाबळेश्वर व नंतर प्रतापगड येथे जाण्याचा निर्णय घेतला. सैन्य, तोफखाना, आपला घोडदळ महाबळेश्वरच्या उंच पठाराकडे जाण्यासाठी आणि जावळीच्या जंगलात सर्वकाही खाली येण्यास त्रास होण्याने त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्यादरम्यान शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली होती जेणेकरून त्यापैकी निम्मे म्हणजे अफजालने जेथे कब्जा केला होता तेथून 9 मैलांच्या अंतरावर महाबळेश्वर पठारावर नेताजी पालकर यांच्याकडे होते आणि अर्धा भाग प्रतापगडच्या किल्ल्यावर राहतो. महाबळेश्वर, प्रतापगड आणि जावलीच्या जंगलात लपून बसले.
 
 शिवाजी खरोखर घाबरला याची खात्री असल्यामुळे अफझलने जावलीत जाण्याची चूक केली. येथे, त्याच्यासाठी दोन गोष्टी चुकीच्या ठरल्या. पहिली- त्याचे सैन्य दोन भागात विभागले गेले- त्यापैकी निम्मी प्रवाशगडाच्या पायथ्याशी जवळीच्या पायथ्याशी उतरले आणि दुसरे पार येथील जंगलात उतरले. द्वितीय- सर्वोच्च अहंकार, अहंकार आणि सावधतेच्या अभावामुळे आणि अफझल सैन्यास अज्ञात स्काऊटच्या वृत्तामुळे, ते आता मराठा सैन्याभोवती घेरले गेले होते, जंगलात व टेकड्यांमध्ये लपून बसले होते, जे फक्त आदेशाच्या प्रतीक्षेत होते. हल्ला. यामुळे मराठा मानसिक सामर्थ्याला बरीच बळकटी मिळाली, कारण अफझलने जरी शिवाजीला फसव्याने मारले असले तरी मराठ्यांच्या हातून पराभव पत्करावा लागेल ही वस्तुस्थिती कायम आहे.
शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात झालेल्या भेटीचा तपशील मी घेणार नाही. ही एक अफाट कथा आहे जी स्वतंत्रपणे हाताळण्याची गरज आहे. ही आणखी एक कहाणी आहे आणि सैन्याच्या हालचालीच्या मुख्य अजेंडापासून दूर आहे. वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे, अफझल आणि अज्ञात शिवाजी महाराज यांच्यात अफझल आणि अज्ञात यांच्यात झालेल्या बैठकीच्या दिवशी त्याचे सैन्य घेरले होते आणि त्यांना सैन्याने पळवून नेले होते. १० नोव्हेंबर रोजी ही बैठक झाली आणि आमच्या सुदैवाने केवळ शिवाजी महाराजांनी अफझलच्या वाईट हेतूपासून बचावले नाही, तर त्यांना सरळ ठार मारले आणि पुढे जाणा m्या मनोवृत्तीला चालना दिली.
मराठा काउंटर आक्षेपार्ह आणि कोल्हापूरचा ताबा:

प्रतापगड येथे झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुणे, शिरवळ सासवड आणि सुपे ही स्थानके मराठा हल्ल्यांसाठी तयार नसतील. राजापुरीच्या शिखरावर अशी तीन शाही जहाज होती. शिवाजीने अफझलला यशस्वीरित्या ठार केल्यानंतर, जावली येथे त्याच्या सैन्यावर सर्वत्र हल्ला करण्यासाठी सिग्नल पाठविला गेला. अफझल सैन्य चालविण्यात आले आणि बर्‍याच नामांकित सरदारांना पकडले गेले किंवा ठार मारण्यात आले. दरम्यानच्या काळात पुणे, सासवड, शिरवळ आणि सुपा या चार स्थानकांचा ताबा घेण्यात आला आणि विजापूरच्या शाही नौदलाचे एक जहाज ताब्यात घेण्यात आले, बाकीचे लोक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
अफझल सैन्याचा एक मोठा समूह वाईतील राखीव दलाकडे मागे हटू लागला. परंतु तेथे पोहोचण्याआधी वाई येथील साठा कृतीत आणण्यापूर्वी मराठ्यांनी रात्री वाईवर हल्ला केला आणि तिथे तैनात असलेल्या सैन्यावर विजय मिळविला. अफझलखानची सेना विजापूरच्या दिशेने पळ काढू लागली आणि मराठ्यांनी त्यांचा जोरदार पाठलाग केला. वाटेवरील शहरे, किल्ले आणि सैन्य चौकी जवळजवळ रिकामीच होती आणि मराठ्यांना सहज पकडल्यामुळे पडले. ते चळवळ इतकी वेगवान होती की आजच्या काळात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील किल्ले लवकरच संपू शकले. अफझलला 10 नोव्हेंबरला राउट करण्यात आले होते. त्याच रात्री आणि 11 नोव्हेंबरला सकाळी वाईला पकडण्यात आले. अवघ्या १ दिवसातच शिवाजी महाराजांनी वाई ते कोल्हापूरपर्यंतचा सर्व परिसर, गावे व किल्ले ताब्यात घेतले आणि २  नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिंकला. २ दिवसांनंतर दक्षिणेकडील - पन्हाळ्याची किल्ली मराठ्यांनी आक्रमण केली आणि २ नोव्हेंबर रोजी ती ताब्यात घेण्यात आली. या कृती इतक्या वेगवान होत्या की, विजापूर येथील सुलतानी कोर्टाला प्रथम पन्हाळा मराठ्यांनी ताब्यात घेतल्याची बातमी दिली आणि त्यानंतर अफजलखान ठार झाल्याची बातमी आली. सुलतानला हे हातोडीचे वार होते. इतक्यात नेताजी पालकर आणि त्याच्या अधिपत्याखालील मराठा घोडदळ्यांनी विजापूर शहरावरच हल्ला केला! मराठा वेगवानपणाचा हा प्रकार होता.
दक्षिणेस शिवाजीला निर्विवाद नेते म्हणून प्रस्थापित करण्यासाठी हे युद्ध सर्वात महत्त्वाचे युद्ध होते कारण त्यामुळे दिल्लीच्या कोर्टाचेही लक्ष वेधले गेले. या नंतर पन्हाळा येथे विजापूरच्या सुलतानाने शिवाजीला पकडण्याचा अखेरचा प्रयत्न केला, परंतु शिवाजी तेथेच त्याला थोपवून बसू शकला आणि वेढा घालून पळाला. तथापि, या संपूर्ण अफझल भागामुळे सैन्य आणि सर्वसामान्यांना दोघांनाही आवश्यक मनोबल वाढवून देण्यात आले की स्वराज याची कल्पना खरोखर न्याय्य व टिकाव आहे. यातून इतर असंख्य विजयांना प्रेरणा मिळाली. याने मराठा बचावात्मक-आक्षेपार्ह-राजकारण-धूर्ततेचा एक ब्लू प्रिंट तयार केला - सर्व एकाच युद्धाच्या रणनीतीनुसार येणा या अनेक वर्षांपासून. ही होती आमची गणिमी कावा, किंवा शिवनेती. पर्यंत हा आमचा डीएनए होता, जेव्हा इंग्रजांनी त्यात बदल करण्याचे काम केले. तो आत्मा जरी आपल्यात अजूनही कमकुवत आहे.
विचार:
आज सुलतानांसारखे महाराष्ट्रातील राजकारणी शिवाजी महाराजांनी दिलेल्या महान राज्य आणि विचारधारे नष्ट करीत आहेत. जातीवर आधारित घाणेरडे राजकारण, अधर्म, स्वार्थासाठी पैशाचे विचलन हे सर्वत्र सर्रास घडत आहे. शेवटच्या वेळी ही समस्या बनली तेव्हा भगवान नरसिंवह सह्याद्री नावाच्या स्तंभातून उठले आणि त्या दिवसाचे हिरण्यकश्यपू खाली उतरवले - अफझल खान. आजचे हिरण्यकश्यपस दुर्दैवाने आपले स्वतःचे लोक आहेत - परंतु असे असले तरी ते हिरण्यकश्यपस आहेत. ते सह्याद्री, समुद्र, मराठी मनु आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित सर्व काही त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाथा मारत आहेत. आपण आपल्या शरीरात, मनाने आणि आत्म्यात झोपी गेलेल्या भगवान नरसिंहांना जागृत करतो, या आधुनिक हिरण्यकश्यपचा नाश केला आणि पुन्हा एकदा मजबूत, एकसंध, सुसंस्कृत आणि कायदेशीर महाराष्ट्राची पुनर्बांधणी केली. प्रेरणा तेथे आहे, इतकेच की आम्हाला आपल्यापासून ते प्रज्वलित करावे लागेल
 
 हर हर हर महादेव!

( डॉ बाबासाहेब पुरंदरे यांनी कथन वापरून नकाशे आणि निनादराव बेडेकर यांचे काही लेख आधारित केले आहेत. हे अचूक मार्ग दर्शविण्याची आवश्यकता नाही, परंतु कथेवर आधारित आहेत)

काही आवश्यक बदलांचा उल्लेख केल्याबद्दल आशुतोष गवळी यांचे आभार.

प्रतापगडाचे मंत्रयुद्ध

सर्वप्रथम मंत्रयुद्ध म्हणजे काय??? “कपटी अन धूर्त शत्रूला चर्चा अन वादविवाद करून वश करणे अन त्याची कुटनीती शत्रूवरच उलटवणे.” या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे खाली दिल्याच आहेत.
जावळी, एक दुर्गम अन बेलाग प्रदेश, घनदाट जंगल अन डोंगर दऱ्या. शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्टय़ाही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरचा डोंगर अशा खाचेत वसलेला असा हा जावळीचा प्रदेश. कृष्णाजी बाजीच्या ‘चंद्रराव’ पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून अली आदिलशाहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशाहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी ऊर्फ चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६, शालिवाहन शके १५७७, पौष ला राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक व आर्थिकदृष्टय़ा समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणाऱ्या चंद्ररावाला ऑगस्ट महिन्यात ठार केले आणि खऱ्या अर्थाने जावळी स्वराज्यात आली.
शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजी राजांना रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता. अन अली आदिलशहाची आई बडी बेगम संतापली. आणि तिने व अली आदिलशहाने यासाठी दरबार बोलावण्याचा निर्णय घेतला.
आणि त्याबाबतची आदिलशहाच्या सही शिक्क्यांची फर्मान सुटली. सर्व सरदार विशिष्ट हिजरी सनावळीला विजापूर दरबारी एकत्र आले. आता ज्यावेळी दरबार भरवण्यासाठी फर्मान पाठवले जाते, त्यावेळी त्यात दरबार भरवण्याचे कारण नमूद केलेले असते, पण यावेळी मात्र त्या फर्मानात एकत्र येण्याच्या कारणाचा उल्लेख नव्हता. जमलेले सर्व सरदार आश्चर्यचकित झाले. त्यांना नक्की दरबार भरवण्याचे प्रयोजन समजेना. हा दरबार साधारणतः १६५७ ते १६५८ दरम्यान भरला असावा.
तत्पूर्वी १६४६ ते १६५७ या ११ वर्षाच्या काळात शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार बऱ्यापैकी केला होता. त्यावेळी स्वराज्यात तळकोकणातील ३००० ताली, २४ बंदरे, २१ किल्ले होते. किल्ल्यांची संख्या अजुन जास्त असती पण १६५४ ला अफझलखानाने शहाजीराजांना अटक केली, आणि त्यांच्या सुटकेसाठी शिवरायांनी आदिलशाहीला ८ किल्ले सोडले. आणि चाकण, पुणे व सुपे या प्रांतात स्वराज्याचा बऱ्यापैकी विस्तार केला.
त्या काळात म्हणजे १६५७ साली, आदिलशाही ही तत्कालीन स्वराज्याच्या जवळपास २१ पट होती. अन मुघलसाम्राज्य हे विजारपूरच्या आदिलशाहीच्या जवळपास ३३ पट होते, म्हणजेच हिंदुस्थानच्या दोन तृतीयांश एवढा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली होता. यावरुन आपल्याला मुघल सामर्थ्याची कल्पना येईल.
आणि इकडे विजापूरला दरबार भरला, आदिलशहाचे आगमन दरबारात झाले, व अल्काब च्या आरोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी दरबारात अनेक मातब्बर सरदार हजर होते जसे की रणदुल्ला खान, मुस्तफा खान, मुसेखान, अंकुश खान, पैलवान खान. तसेच काही मराठा सरदार मंबाजी भोसले म्हणजे शिवरायांचे चुलत बंध हे त्यावेळी दरबारी उपस्थित होते. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे दरबारात उपस्थित नव्हते. अन दरबार भरला, कोणत्याही सरदाराला दरबाराचे प्रयोजन ठाऊक नव्हते. नुसती कुजबुज चालू होती सगळीकडे. बडी बेगम ही आदिलशहाच्या डाव्या बाजूला बसली होती. आणि त्यात मागे एका तबकात एक विडा ठेवला, तो सर्वांना दिसला अन मग सरदारांना कळले की कोणतीतरी मोहीम असावी.
बडी बेगम साहिबा संतापून बोलली, “हमने ये दरबार क्यू बुलाया है जानकारी है किसीको?” सर्वांनी नकारार्थी माना डोलवल्या, “उस नाचीज सीवा को गिरफतार करना है, जिंदा या मुर्दा. है ऐसा कोई मर्द सरदार जो इस मूहिम को फतेह कर सके?” अन सगळा दरबार एकदम शांत झाला. सगळे सरदार घाबरले, कारण सर्वजण शिवरायांकडून कधी न कधी पराभूत झाले होते. सर्व आदिलशाही सरदारांचा असा समज होता की शिवाजी म्हणजे भूत. कधी येतो, कुठून येतो, मारतो, कुठे जातो, कोणालाही ठाऊक नव्हते. कोणीही त्यांना पाहिले नव्हते. शिवाजी म्हणजे एक अदृश्य माणूस अशी नोंद तत्कालीन सलातीन मध्ये आढळते. अन या सर्व कारणांमुळे कोणीही विडा उचलायला तयार होईना. बडी बेगम खवळली.
तेवढ्यात मागच्या रांगेतून एक सरदार उठला, अंगाने धिप्पाड, साडेसहा फूट उंच, जणू काही हत्तीचं. त्याच नाव होतं, खान ए मोहम्मद अफजलखान. तो पूढे चालू लागला अन चालताना त्याच्या जडावांचा कररर कररर असा आवाज येऊ लागला. सगळीकडे एकच कुजबुज सुरू झाली, अफझलखान, अफझलखान…. खानाने विडा उचलला, कानाला खोचला. आणि त्याने शपथ घेतली. खान म्हणाला “ये सिवा सिवा क्या लगा रखा है. कोण है ये सिवा, पहाड का चुहा.” सगळा दरबार खुश झाला, बडी बेगम खुश झाली. अन तेव्हा खानाला त्या दरबारात खिल्लत दिल्याची नोंद आहे, अन सोबतच आदिलशहाची रत्नजडित कट्यार अन एक लुगडं. लुगडं म्हणजे आपल्याकडे असत ते नाही, लुगडं हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, सत्कार करताना आपण शाल वगैरे देतो ना त्याप्रकारे एक तलम रेशमी वस्त्र असते त्याला तिकडे लुगडं म्हणतात.
अन खानाने मोहिमेची तयारी चालू केली. त्यावेळी साधारणतः मार्च १६५९ चा काळ होता. खानाने सैन्याची जमवाजमव केली. तोफा, घोडदळ, पायदळ, सांडनीस्वार अशी एकूण ७७००० ची फौज खानाकडे होती. त्यानंतर सात दिवसांनी खान विजापुरातून बाहेर पडला. खानाचा पहिला मुक्काम विजापूर वेशीवर पडला. तेव्हा खान युद्धाचे डावपेच आखत होता. अन तेवढ्यात त्याला एक खबर मिळाली की त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर नावाचा हत्ती मरण पावला. खानाला जबर धक्का बसला. अपशकुन झाला. त्यात खानाचा गुरु, काझी त्याला बोलला माझ्या स्वप्नात दोन दिवस झालं तुझं मुंडक नसलेलं धड येतंय, तू मोहिमेवर जाऊ नये, तुला धोका आहे. खान रागावला अन खानाने काझीला मारले. खान अशा गोष्टी मानत नव्हताच मुळी.
पराक्रमी खान.
त्यावेळी दिल्लीचा बादशहा शाहजहान होता, अन त्याचा शहजादा औरंगजेब हा कर्नाटक, बिदर येथे खानसोबत लढत होता. अफजलखानाने मुघल सैन्याची एवढी बेक्कार कोंडी केली की मुघल शहजादा औरंगजेब ला जवळपास कैद केले. पण औरंगजेबाने रात्री विजापुरी वजीराला घाबरवलं, त्याला पत्र लिहल, अन वजीराने रात्रीचं त्याला सोडून दिल, ही गोष्ट जेव्हा खानाला समजली तेव्हा खानाच्या लोकांनी विजापुरी त्या वजीराचे बत्तीस तुकडे केले.
हाच खान पुढे शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यस कारणीभूत ठरला, कर्नाटक मध्ये संभाजीराजे आदिलशहकडून लढत असताना त्यांना कुमक कमी पडली, आदिलशहाने खानाला कुमक घेऊन जाण्यास सांगितले पण खान गेला नाही, अन त्यामुळे संभाजीराजे पडले.
एकदा रणदुल्ला खान अन कस्तुरीरंगन राजाचे तुंबळ युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले होते अन शेवटी त्यांच्यात तह करायचा ठरला. रणदुल्ला खानाकडून अफजलखान तहाला बसला. अन कपटाने खानाने कस्तुरीरंगन चे मुंडके तलवारीने उडवले व बाहेर नेऊन सैन्याला दाखवले अन सैन्य शरण आले. असा हा खान महाकपटी अन कावेबाज होता. त्याची खूपच दहशत होती. त्यामुळे खानाला भयंकर अहंकार होता. त्यामुळे त्याने स्वतःचाच एक वेगळा शिक्का तयार करवून घेतला होता.
त्याने शिक्क्यावर लिहिले होते –
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल। अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल।।। म्हणजेच उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.
त्यामुळे आदिलशहाने स्वतःचा हत्ती खानाकडे पाठवला जेणेकरून खान ठरलेल्या गोष्टीत बदल करणार नाही. त्यावेळी साधारणपणे मार्च चा तिसरा आठवडा सुरू होता. एक ते दीड महिन्यात ही मोहीम संपवून पावसाळ्याच्या अगोदर पून्हा विजापुरी यायचं अस नियोजन खानाने केलं. खानाने विचार केला की शिवरायांना उघड्या मैदानात आणलं तर त्यांना पकडणं, मारणे सोपे होईल. म्हणून त्याने जालीम उपाय शोधला की हिंदू धर्माची अस्मिता असलेली देवळे फोडायची, म्हणजे शिवाजी संतापून आपल्यावर चालून येईल व आपण त्याला पकडू. त्यावेळी महाराज हे पोर्तुगीजांसोबत गोव्याच्या सीमेवर लढत होते, त्यांना याची कल्पना नव्हती.
अन खानाने सर्वप्रथम तुळजापूर ला जायचं ठरवलं. खान सात दिवसात तुळजापूरला पोचला, येताना वाटेत दिसेल ते मंदिर त्याने फोडले, गावे जाळली, दहशत पसरवत खान तुळजापूर ला आला. आणि त्या तुळजा भवानी च्या मूर्तीसमोर उभा राहून खान म्हणतो कसा, “ए भवानी, बताओ तुम्हारी करामत, या हम हमारी करामत बताये.” अन खानाने हातोड्याने ती भवानीची मूर्ती फोडली.
महाराज राजगडी आले होते, त्यांना ही खबर मिळाली. अन हे ऐकताच राजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राजे संतापले. राजांना वाटले की लगोलग खानावर चालून जावे. पण राजे सावरले. त्यांनी संयम ठेवला. अत्याधिक जोश हा घात करू शकतो. त्यामुळे राजे सावरले. इकडे राजगड चिंतेत पडला. इकडे खान जवळपास ६ दिवस तुळजापुरात राजांची वाट पाहत होता, पण राजे काय आले नाहीत. मग खान पंढरपुरी रवाना झाला.
तोपर्यंत महाराजांनी शांतपणे विचार करून निर्णय घेतला तो म्हणजे खानासोबत लढायचं, पण ते वेगळ्या पद्धतीने. आता लढायचं मंत्रयुद्धाने.
आणि मंत्रयुद्धाचा पहिला भाग चालू झाला.
महाराजांना ठाऊक होते की खान पंढरपूरला जाणार, म्हणूनच की काय महाराजांनी आपले मावळे रात्रीचे पंढरपूरला पाठवले, बडव्यांच्या दिंडीत. त्यांनी रातोरात विठ्ठलाची मूर्ती तेथून हलवली, मंदिर ते कृष्णदेवराय बडवे यांच्या घरापर्यंत एक भुयार खोदल, मूर्ती त्यास भुयारातुन बडव्यांच्या घरी नेली अन ते भुयार लिंपले. याचा पुरावा म्हणजे वारीला गेल्यावर मंदिराच्या महाद्वाराच्या डाव्या बाजूला नामदेव पायरी आहे, तिथून डाव्या हाताला तिसरं घर हे बडव्यांच आहे. तिथे आत गेल्यावर एक मोठी जाळी आहे, तिथं कोणालाही विचारलं तरी सांगतात इथून सरळ रस्ता विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत जातो. खान पंढरपूरला आला, तो तडक मंदिरात आला. त्याने आत जाऊन चौथऱ्याकडे पाहिलं तर चौथरा रिकामा. खान भयंकर खुश झाला. “भगवान भी हमसे डरके भाग गया.” अन त्यावेळी खानाने त्या मंदिरात ११२ गाईंची कत्तल केली, त्या गाईंच्या रक्ताच्या चिखलात खान नाचला. ही वार्ता ऐकून लोक घाबरले.
प्रजा घाबरलेली असेल तर युद्ध जिंकणं अवघड. म्हणून राजांनी ठरवलं, प्रजेची मानसिकता बदलायची. अन येथे सुरू होतो मंत्रयुद्धाचा दुसरा भाग.
मंदिरात रक्ताचा चिखल साचला होता. अन त्यादिवशी पहाटे पहाटे एक साधू काळी कपडे घालून त्या मंदिरात आला अन त्या सभामंडपाची सफाई करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांना ही खबर लागताच घाबरत घाबरत दोन चार लोक मंदिरात आले अन त्यांनी मिळून ते मंदिर पुन्हा स्वच्छ केले. लोकांनी साधूला विचारले आपण कोण, इकडे कसे आलात, त्यावर तो साधू उत्तरला, “मै बहुत दूर से हिमालय से आया हु. मेरे सपने मे एक काली मुरत आई थी जो कमर पर हात टेक कर खडी थी, उसने मुझसे कहा की माझ्याकडे ये, मी राहतो ती जागा खराब झाली आहे, ती स्वच्छ कर, मला पुन्हा यायचंय. मै ऐसें ही यहा से गुजर रहा था, मैने ये मंदिर देखा, मुझे लगा यही होगी वो जगह, और मैने साफ करना चालू किया.” तेव्हा तेथील लोक बोलली की अरे आमचा विठ्ठल तुझ्या स्वप्नात आलेला, म्हणजे विठ्ठल घाबरला नाही, आपला देव परत येणार. आणि लोकांच्या मनावर थोडा सकारात्मक परिणाम झाला. त्यानंतर दोन दिवस त्या साधूने त्या मंदिरात हिंदीमध्ये प्रवचन केले अन साधू निघून गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती परत जागेवर आली म्हणजेच मावळ्यांनी ती पुन्हा मंदिरात आणून बसवली. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांच्या मनात पून्हा एकदा विश्वास निर्माण झाला की देव अजूनही शिवाजी राजांसोबत आहे. आणि अशाप्रकारे शिवरायांनी लोकांची मानसिकता बदलली. आता तो साधू कोण होता, तर तो साधू म्हणजे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. त्यांनी प्रजा पुन्हा एकदा राजांसोबत आणून आपल काम चोखपणे पार पाडल.
इकडे खान पंढरपूरहून साताऱ्यामार्गे माणकेश्वर ला निघाला. अन खानाने वेगळा विचार केला. २५ दिवस झाले तरी शिवाजी शरण येत नाही हे बघून खानाने शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांनाच अटक केलं. कारण बजाजींना ठार करण्याची धमकी देऊन राजांना शरण बोलवायचं असा खानाने मनसुबा आखला. जेव्हा ही गोष्ट राजांना समजली तेव्हा राजे खूप चिंतेत पडले. कारण बजाजी हे महाराणी सईबाईंचे सख्खे बंधू . अन त्यात सईबाईंची प्रकृती ही खूपच खालावलेली होती, अन अशात जर त्यांना ही खबर कळली तर त्यांची प्रकृती अजूनच बिघडेल. राजे चिंतेत होते. इकडे खानाच्या फौजेत नाईकजी पांढरे नावाचे एक ज्येष्ठ मराठा सरदार होते. शिवरायांनी त्यांना खाजगीत एक पत्र लिहले, पत्र असे की ” नाईकजी तुम्ही खानाला असे समजवा की जर खानाने बजाजींना ठार केले तर बाकीचे मराठा सरदार फुटण्याचा धोका आहे. अन कितीही चाकरी केली तरी आदिलशाही दरबारी त्याची किंमत नाही.” पांढरेनी खानाला हे समजावून सांगितले, खानालाही पटले अन एक करार करून खानाने बाजाजींची सुटका केली
आता पावसाळा जवळ येत चालला होता, शिवरायांच्या मनासारख्या गोष्टी घडत होत्या. मधल्या काळात औरंगजेब ने कपटाने आपल्या बापाला विष देऊन मारले अन भाऊ दाराशीकोह ची सुद्धा हत्या केली व स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. अन त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला साडेतीन लाख फौजेसह दक्षिणेत पाठवलं. राजांनी लगेच आपला वकील शाहिस्तेखानाकडे वस्त्र घेऊन पाठवला अन त्यामुळे सुरुवातीला खान शांत बसला व लाल महालात त्याने ठाण मांडले. इकडे शिवरायांचा वकील शाहिस्तेखान कडे गेला हे अफजलखानाला समजले अन खान घाबरला. त्याने विचार केला की जर मुघल अन मराठे एकत्र आले तर आदिलशाहीची खैर नाही. आणि अफजलखान रहिमतपूर मार्गे वाईला आला. तोपर्यंत पावसाळा सुरू झाला होता. अन वाईचा मुलुख खानाला चांगला परिचयाचा होता. खान वाईचा सुभेदार म्हणून बरीच वर्षे होता. आणि दोन्ही बाजुंनी स्थिरयुद्ध चालू झाले. स्थिरयुद्ध म्हणजे दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूनी फक्त मनसुबे रचायचे. वाईमध्ये खान कुठे होता हे नक्की ठाऊक नाही पण खान वाईच्या औरंगपुऱ्यात वास्तव्यास असावा असा अंदाज. त्यावेळी जावळीच्या त्या घनदाट जंगलात तुफान पाऊस पडायचा.
इकडे राजगडावर ५ सप्टेंबर १६५९ ला स्वराज्याच्या महाराणी सईबाईसाहेबांचे निधन झाले. शिवरायांसाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण शंभूराजे जेमतेम सव्वादोन वर्षांचे होते, सईबाईंचे दुःख अन त्यात हा राक्षस स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी तातडीने सदर बोलावली. त्यावेळी सदरेवर बहिर्जी, नेताजी, मोरोपंत पिंगळे इत्यादी मातब्बर आसामी होत्या. महाराजांनी सर्वांना विचारले काय करावे. आमच्या मनात एक कल्पना आहे की खानाला भोरप्याच्या डोंगरावर बोलवावे. भोरप्याचा डोंगर हा १६५६ साली राजांनी चंद्रराव मोरेकडून जिंकला व मोरोपंतांनी त्या डोंगरावर प्रतापगड साकारला. प्रतापगड हा अत्यंत दुर्गम व सुंदर होता. दोन पसरलेल्या सोंडा, रेडका बुरुज, राजपहारा बुरुज, केदार बुरुज तसेच अब्दुल्ला बुरुज. त्यावेळी गडावर भवानी मातेचे मंदिर नव्हते, भवानी मातेचे मंदिर महाराजांनी १६६१ साली बांधले असावे. आज जर आपण कधी प्रतापगडावर गेलो तर आता जिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे एक तुटलेला चौकोन म्हणजे एक चौथरा आहे. त्याला ना दार ना खिडकी. तसेच गडावर दोन सुंदर तळी होती. राजांनी ठरवलं खानाशी मुकाबला प्रतापगडावरच करायचा. कारण सावित्री नदीचे घनदाट खोरे, जावळीचे घनदाट जंगल, आताच एवढे घनदाट आहे तर साडेतीनशे वर्षांपूर्वी कसलं असेल. त्या जावळीच्या जंगलबद्दल पूर्वी म्हणायचे की एकवेळ अस्वलाच्या केसातील उ सापडेल परंतु जावळीच्या जंगलात हरवलेला एखादा हत्ती सुद्धा १० दिवस तरी सापडणार नाही, एवढं घनदाट जंगल होत.
बघता बघता दिवाळी तोंडावर आलेली. इकडे खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर कुळकर्णी याला राजगडी पाठवले. कृष्णाजी भास्कर हा मूळचा भोरचा हवालदार होता. वकील कसा असावा तर सभ्य लबाड, तसाच होता कृष्णाजी भास्कर कुळकर्णी. अन खानाने त्याला पत्र घेऊन राजगडी पाठवले. वकील राजगडी आला.
आणि महाराज इथे मंत्रयुद्धाचा सगळ्यात महत्वाचा भाग खेळले.
कृष्णाजी भास्कर राजगडी राजांची भेट घ्यायला आला पण राजे भेटच देईनात. त्याने मोरोपंत पिंगळे याना विचारलं काय भानगड, तेव्हा पंत बोलले, “खान आला हे ऐकून महाराजांनी भयंकर धसका घेतलाय, ते खूप आजारी पडलेत, जाम घाबरलेत, अशक्तपणा आलाय त्यांना, त्यांनी अन्नपाणी सोडलंय हो. काल तर चक्कर येऊन पडले, ताप सुद्धा खूप भरलाय.” कृष्णाजी दोन दिवस राजगडावर होता पण महाराज काय त्याला भेटले नाहीत. गडावर सारखी धावपळ सुरू होती, राजांच्या महालाकडे सारखा लोकांचा अन राजवैद्यांचा राबता सुरू होता. आणि तिसऱ्या दिवशी राजे कृष्णाजी ला भेटले, ते ही अंगावर जाड कांबळ घेऊन, तिघा चौघांनी राजांना धरलं होत. कृष्णाजी ने राजांना खानाच पत्र दिल. ते पत्र उघडताच त्यात “बेमुरर्वत, दगाबाज, धोकेबाज, गलती की है सिवा तुने, शरण आ” अशा शिव्याच जणू खानाने दिल्या होत्या. कृष्णाजी ने राजांना पत्राचे उत्तर विचारले, राजे बोलले आम्ही आमचा वकीक पाठवू. पण कृष्णाजी भास्कर ची जवळपास खात्री पटली की राजे भयंकर घाबरलेत. अन हा डाव राजांच्या मनाप्रमाणे पडला. इकडे कृष्णाजी भास्कर वाईला आला, अन शिवरायांची ही अशी अवस्था पाहून त्याला अतिआत्मविश्वास झाला असावा. तो खानाला बोलला की शिवाजी राजे तर भयंकर घाबरलेत, आपण एवढी रणनीती अशा घाबरट माणसासाठी का आखतोय. पण खानाला विश्वास वाटला नाही.
इकडे राजगडावर महाराजांनी सदर बोलावली आपला वकील निवडण्यासाठी. त्यावेळी राजांकडे तीन वकील असावेत असा अंदाज आहे. नारायण शेणवी, सप्रे अन क्षीरसागर. या तिघांना सगळ्या भाषा यायच्या. परंतु राजांनी यातील कोणालाच वकील म्हणून खानाकडे पाठवले नाही. राजांनी वकील म्हणून निवड केली ती पंताजी गोपीनाथ बोकील. खूप अनुभवी माणूस. पंताजी हे मूळचे कारीचे. पण त्यांचे पूर्वज सिंदखेडराजा येथे स्थायिक झाले. पंताजी बोकील हे चौरस नावाच्या सोंगट्याच्या खेळात खूप हुशार होते. अन अशा माणसाची निवड राजांनी या मोहिमेपुरती वकील म्हणून केली.
आणि पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईस आले. त्या पत्रात अस लिहल होत की “आम्ही अपराधी आहोत, आम्ही माफी मागतो, आम्ही बगावत केली, आमचे सगळे गुन्हे आम्हाला मान्य आहेत. आम्ही तुम्हाला खूप घाबरून आहोत. आपण आमच्या थोरल्या महाराज साहेबांचे दोस्त, म्हणजे आपण आम्हास चाचासमान आहात. आपण येऊन आम्हाला विजापुरी घेऊन जावं.” खान पंतांना बोलला की आम्ही यावर विचार करू. अन हा निरोप घेऊन पंताजी काका पुन्हा राजगडी आले.
त्यावेळी साधारणतः ऑक्टोबर चा दुसरा आठवडा सुरू होता. इकडे भोरच्या जवळील कारी येथे शहाजीराजांचे मित्र अन स्वराज्याचे मातब्बर सरदार कान्होजी जेधे नाईक होते. त्यांनाही आदिलशहाच फर्मान मिळालेलं. कारी येथे जेधेंचा पाच एकरांचा प्रशस्त वाडा होता. नाईकांनी आपली पाचही मुलांना सोबत घेतलं अन राजगडच्या खोऱ्यात शिवदडी येथे ते महाराजांच्या भेटीस आले, त्यांनी राजांना फर्मान दाखवलं. राजे बोलले “कान्होजी काका तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. चंद्रराव मोरे गेले, खंडोजी खोपडे गेले, तुम्हीही जावं खानाकडे, वतन मिळेल.” अन राजांचे हे करारी शब्द कान्होजींच्या काळजाला लागले. मागेच ओसरीवर ठेवलेला पाण्याचा तांब्या त्यांनी हातात घेतला, अंगठ्यावर तो रिकामा केला व सगळं पाणी आपल्या पाचही मुलांवर शिंपडल. अन कान्होजी कडाडले, ” राज वतनाची गुडी न्हाई अमास्नी, रक्तात हरामखोरी न्हाई आमच्या. एकदा सबुद दिला की मागे हटणारी जात न्हाई या म्हाताऱ्याची. परीक्षा बघतोस व्हय र पोरा ह्या म्हाताऱ्याची.” अन असे म्हणताच राजांनी कान्होजींना कडकडून मिठी मारली. कान्होजी जेधे हे शहाजीराजांचा उजवा हात होते. बारा मावळांत त्यांचा शब्द मोडायची कोणाच्यात हिंमत नव्हती. अन राजांनी त्यांना जबाबदारी दिली की मावळातील सर्व मराठा सरदारांना एक करून स्वराज्यात आणायची. अन कान्होजींनी सर्व सरदारांना एकत्र आणले, त्यात हैबतराव शिळीमकर, मोरे, काटके, बेचकर असेच अनेक सरदार होते.
इकडे महाराज जिजाऊ मासाहेबांचा आशिर्वाद घेऊन भोरप्याच्या डोंगरावर निघाले. अन प्रतापगडी येताच राजांनी पुन्हा एकदा पंताजी काकांना वाईला पाठवलं.
पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईला आले, अन खानाला बोलले, “खानसाहेब राजे तुम्हाला खूप घाबरलेत हो. राजे लपून बसलेत. भितात खूप तुम्हाला. कृपया तुम्ही जावळीत यावं अन राजांना अटक करून विजापुरी घेऊन जावं.”
अन हे ऐकून खान अस्वस्थ झाला, जावळी म्हणजे भयानक जागा हे त्याला ठाऊक होतं अन तो पंताजींना म्हणाला. “पंत जी, नही नही, मै जावली कदापि नही जाऊंगा. बडी कदीम जगह है जावली. हम इस बारेमे सोचेंगे.” तेवढ्यात पंताजी काका बोलले, “आपण आपली सगळी फौज घेऊन या, आम्ही आपणास यायला रस्ता करून देऊ.” अन पंताजी प्रतापगडी आले. परंतु दोन दिवसांतच राजांनी पंताजींना पून्हा वाईला पाठवले.
मंत्रयुद्ध: यावरून शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीची कल्पना आपण करू शकतो, शत्रूच्या डोक्यात घुसून त्याला आपल्या मनाजोगत पाऊल उचलण्यासाठी भाग कस पाडायचे अन त्यासाठी वकिलामार्फत वारंवार निरोप पाठवून जवळपास त्याचा विचारच बंद करायचा. अन पंताजींनी तसच केलं. ते पुन्हा वाईला आले अन खानाला म्हणाले: “खानसाहाब आप बेवजह सोच रहे है, चंद्रराव मोरे आपके साथ है, वो तो इस इलाके का चप्पा चप्पा जनता है.” हे ऐकून मोरेची सुद्धा छाती फुगली, तो खानाला बोलला, जी हुजूर, मै हु ना आपके साथ. अन नाही नाही म्हणत सरतेशेवटी खान तयार झाला. हा शिवरायांचा सगळ्यात मोठा विजय होता, की खान जावळीत येतोय.
इकडे खानाच्या फौजेसाठी रस्ते बनवायचं काम चालू झालं, वाई ते सावित्री चे खोरे असा रस्ता बनवला गेला. पण रस्ता अशाप्रकारे बनवला की प्रत्येक डोंगर उतारावर दर तीन फुटांवर एक झाड कापून वळण बनवलं होत. त्यामुळे हत्ती व घोडे नीट येणारच नाहीत. असा अवघड रस्ता असल्यामुळे तोफा आणता येणार नाहीत. फार फार तर सुतरनळ्या म्हणजे लहान तोफा फक्त आणता आल्या असत्या. तत्कालीन सलातीन मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे खान २५००० एवढी फौज घेऊन जावळीला निघाला. त्याचे खूप सारे हत्ती, घोडे जखमी झाले. खानाला ते सर्व डोंगर उतरत यायला जवळपास ७ दिवस लागले. म्हणजे जवळपास ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात खान जावळीत आला. अन वाईहून जावळीला येत असताना खानाचे १९७ लोक ठार झाले.
इकडे खान सावित्रीच्या खोऱ्यात आला. मागे महाबळेश्वर, सूर्य मावळताना डोळ्यावर सूर्य येतो अन वरच काही दिसत नाही पण वरून सगळं दिसत अशा जागी महाराजांनी खानाची छावणी बसवायला जागा करून दिली. पण इथे सुद्धा राजांनी एक मेख मारली. खानाच्या छावणी साठी जी झाडे तोडली गेली व त्या झाडांचे ओंडके हे तेथील घाटवाटांवर टाकले वर सगळे रस्ते बंद करून टाकले, जवळपास पोलादपूर घाट, रणतोंडी घाट, पारचा घाट, बोचेघळ आणि बाकी घाटवाटा बंद केल्यामुळे खानाला जी रसद येऊ शकणार होती ती राजांनी बंद केली. खानाला अंदाज आला की शिवाजीराजा आपल्या फसवतोय.
आता मंत्रयुध्दात हेरखाते सगळ्यात महत्वाचे. खानाच्या भटारखान्यात राजांनी आपले विश्वासू विश्वासराव नानाजी दिघे यांना पाठवलं. महाराजांना बहिर्जी नाईक अन आबाजी सोनदेव हे महत्वाच्या खबरा देत होतेच पण विश्वासरावांकडे राजांनी वेगळी जबाबदारी दिलेली ती म्हणजे खान कसा आहे ते सांगणे, त्याच्या शरीराची रचना, वजन, उंची, त्याच वर्णन आम्हाला सांगणे.
आता नोव्हेंबर चा पहिला आठवडा चालू झालेला अन राजांनी खानाला ठार करायचं हे नक्की केले. राजांच्या फौजेत सिद्धी इब्राहिम नावाचा बाटलेला लोहार होता, तो हत्यारे बनवायचा. त्याने राजांना जांबिया चालवायचं शिक्षण दिल, जिथे शिक्षण दिले ती जागा म्हणजे लेखात सुरुवातीला एका पडक्या चौथऱ्याचा उल्लेख केला होता ना ती. मंदिरामागे एक खोली, जिला दरवाजा किंवा खिडकी नव्हती. दोर टाकून आत उतरायच. विश्वासरावांकडून समजलेल्या खानाच्या वर्णनानुसार राजांनी एका पोत्यात समुद्राची रेती व लाकडाचा ओला भुस्सा भरून खानाच्या पोटाची प्रतिकृती तयार केलेली. व खानाच्या पोटात कसा वार करायचा याचा सराव राजे १० दिवस करत होते. त्यासाठी राजांनी जांबिया म्हणजे बिछवा हे शस्त्र वापरले. जांबिया असा होता की एका बाजूला दातेरी व एका बाजूने धार. आत घुसताना सरळ व बाहेर काढताना दाताने आतडी बाहेर काढेल असा.
इकडे राजांनी पुन्हा एकदा पंताजी काकांना खाली छावणीत राजांचा निरोप घेऊन पाठवलं, निरोप असा की “खानाच्या एवढ्या सैन्याला पाहून राजे घाबरलेत, राजे काही गडावरून खाली यायला तयार नाहीत, तरी आपण वरती यावं.” खानाचा पंताजींवर विश्वास नव्हता, मग पंताजी काकांनी खानाला कृष्णाजी भास्कर याला विचसरण्यास सांगितलं व कृष्णाजीने पंताजींच्या बोलण्यास दुजोरा दिला. खानाने नकार दिला, पण पंताजीनी गोड बोलून खानाला कसबस पटवल. खान अर्ध्यात यायला तयार झाला. भेटीची तयारी सुरू झाली. भेटीसाठी शामियाना हा राजांनी उभारायचा अस ठरलं. राजांनी भेटीसाठी दोन मसुदे तयार केले.
पहिला मसुदा असा की दोघांच्या बरोबर १० हत्यारबंद लोक राहतील अन ती भेटीच्या शामियान्यापासून एका बाणाच्या म्हणजेच ४० फूट अंतरावर थांबतील. भेटीवेळी सोबत दोन्ही बाजूंचे वकील तसेच दोघांचेही अंगरक्षक असे एकूण ६ जण राहतील
दुसरा मसुदा: खान खालून सकाळी अकरा वाजता वर यायला निघणार. खान निघाला की तुताऱ्या, नगारे वाजवून इशारत होणार. राजे निघाले की परत तुताऱ्या, नगारे वाजणार, अन राजे शरण गेले की तुताऱ्या व नंतर तोफ उडणार व राजे शरण आल्याची खबर सैन्याला समजणार. या मसुद्यातील इशाऱ्यांचा बरोबर दुसरा अर्थ राजांनी आपल्या सैन्यासाठी सांगितला होता. राजांची व खानाची भेट ही कुठे झाली नक्की ठाऊक नाही पण भौगोलिक परिस्थिती पाहता अब्दुल्ला बुरुजावर माचीवर भेट झाली असावी. त्या अब्दुल्ला बुरूजाच्या खालच्या बाजूला एक घळ आहे, त्याच घळीत राजांनी कान्होजी जेधे याना अडीचशे मावळ्यांसह लपण्यास सांगितलं. भेट झाली की तुताऱ्या म्हणजे मावळे सावध होतील. तसेच तोफ उडाली की खान मेला असे समजून जोरदार हल्ला चढवायचा. झाली खानाच्या छावणीच्या भोवती चे गवत राजांनी मधून कापले व त्यात ढोल्या बनवून ३००० शस्त्रबंद मावळे तिथे लपवले.
इकडे पंताजी काकांनी खानाची मस्त खातीरदारी चालू केली. खानाकडून हिरे जवाहिर विकत घेऊन त्यालाच भेट दिले. खानाला वाटलं आपला डबल फायदा होईल, आपले धन आपल्याला मिळेल अन सोबत पैसा सुद्धा मिळेल. ते सर्व धन घेऊन अन जवाहिराना घेऊन पंताजी काका गडावर आले. ते जवाहिर मोरोपंतांकडे पैसे मागायला गेले, तर पंत त्यांना बोलले आता पैसे नाहीत, आम्ही सावकारांच्या नावाच्या हुंड्या लिहून देतो, त्या महिनाभरात वठतील. आणि राजे असेही शरण येणार आहेत, मग हा सर्व मुलुख खानाचच होणार, तुम्हाला त्यावेळी पैसेही मिळतील तूमचे.
आता मंत्रयुद्धाचा सगळ्यात महत्वाचा भाग
खान हा शरीराने धिप्पाड होता, जणू काही राक्षसच. त्यात तो महाकपटी म्हणून राजांनी स्वरक्षणाची तयारी केली. त्यांनी एक चिलखत बनवून घेतलं त्याला आतील बाजूस साखळी होती त्यात फक्त चाकूचे टोक घुसू शकेल अशा प्रकारचं. राजांना ठाऊक होतं की खानाकडे कट्यार आहे, तो डोक्यावर वार करू शकतो म्हणून राजांनी खबरदारी म्हणून जिरेटोपाच्या आतून एक लोखंडी पट्टी बसवून घेतली, वाघनख बनवून घेतली व सोबत जांबिया म्हणजेच बिछवा. राजांचा आत्मविश्वास जबरदस्त होता त्यावेळी.
राजांनी सैन्याची पेरणी सुद्धा चहुबाजूंनी केली. राजांनी नेताजी पालकर यांना कोकण दिशेला पाठवले. मोरोपंतांना ५००० सैन्य देऊन पुण्याच्या दिशेने पाठवलं. कान्होजी जेधे २५० मावळ्यांसह घळीत दडून बसलेले तसेच खानाच्या छावणी भोवती गवतात ३००० सैनिक पेरलेले व गडावर ४००० सैन्य होते.
राजांनी खानाच्या भेटीसाठी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ चा दिवस नक्की केला. आता मार्गशीर्ष का?? तर मार्गशीर्ष च्या वेळी सूर्यकिरणे लांब पडतात उत्तरायण असल्यामुळे.. त्यामुळे सावल्या मोठ्या दिसतात. आणि छावणीवर मागच्या डोंगराची सावली होती त्यामुळे खालच्या लोकांना वरच काही दिसणार नव्हतं पण गडावरून राजे खालचं सगळं बघू शकणार होते.
शामियान्याची रचना कशी होती?? शामियान्यात राजांनी खानासाठी मुद्दाम एक तख्त बनवलेले, जेणेकरून राजांना खानाने अंगात चिलखत घातले आहे की नाही ते समजेल. जेव्हा खान तख्तावरून उतरून राजांकडे येईल तेव्हा पायऱ्या उतरताना खान वजनदार माणूस असल्याने त्याच्या अंगरख्याला जर सरळ घडी पडली तर चिलखत आहे, अन जर का वेडीवाकडी घडी पडलेली दिसली तर चिलखत घातले नाही हे समजण्यासाठी हे सगळे. तसेच शामियान्यात सगळीकडे कस्तुरी उधळली होती जेणेकरून खानाला झिंग येईल. तसेच खानाला शरबत ए आझम पाजायचा जो की गुलाबापासून बनवलेला असेन अन त्यात सब्जा घातलेला असेल. इतका बारीक विचार त्यावेळी राजांनी केलेला जेणेकरून खानाला मारणं सोपं जाईल. त्यावेळी राजांसोबत कोण कोण होत तर जिवाजी महाले, येसाजी कंक, संभाजी कावजी, सुरजी काटके.
भेटीच्या आदल्या दिवशी राजांनी सर्व पाहणी केली, सगळी व्यवस्था पून्हा एकदा पडताळून बघितली. तेव्हा बहिर्जी राजांना भेटले अन राजांनी बहिर्जी काकांना विचारलं की सगळं काही ठीक, बहिर्जी बोलले “राज समद ठरल्याप्रमाणे मनाजोगत घडतंय पण आपल्या समद्या मावळ्यासनी वाटतय की राजांच काय खर नाही, दगा होईल, तुम्ही भेटीला जाऊ नये असं समद्याना वाटतय.” अन राजे कडाडले, राजे बोलले तुम्ही हेरखात्याचे प्रमुख अन तुम्हाला गडावर घडलेल्या गोष्टी ठाऊक नाहीत. बहिर्जी नाईकांना काहीच समजेना की राजे कशाबद्दल बोलत आहेत. त्यांनी राजांना विचारलं महाराज काय झालं म्हणून.
आणि महाराज इथे मंत्रयुद्धाचा अजून एक महत्वाचा डाव खेळले. राजांना ठाऊक होतं लढाई जर जिंकायची असेल तर सैन्याला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत सैन्याचा तुमच्यावर विश्वास नसतो तोपर्यंत कोणताही राजा युद्ध जिंकू शकत नाही.
राजे बहिर्जी नाईकांना बोलले, “काल दुपारी आराम करत असताना आमचा अचानक डोळा लागला. अन आम्हाला अचानक आई भवानीने दर्शन दिले. भवानी आम्हाला बोलली की शिवबा मी तुझ्या तलवारीत प्रवेश करत आहे, मला त्या बत्तीस दातांच्या बोकडाचा बळी हवाय. अन आई भवानी विजेचा लोळ होऊन आमच्या तलवारीत शिरली.” राजांनी ही आवई उठवली ती फक्त एवढ्यासाठी की जेणेकरून आपल्या मावळ्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि झालेही तसेच, बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मावळ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सगळ्या मावळ्यांमध्ये मोठा जोश संचारला. साक्षात आई भवानी महाराजांसोबत आहे, आता खान वाचत नाही. आणि सैन्याच्या या सकारात्मक मानसिकतेसह सगळे झोपी गेले.
१० नोव्हेंबर १६५९, गुरुवार, भेटीचा दिवस उजाडला.
त्यादिवशी पहाटे उठून महाराजांनी गडावरील महादेवाचं दर्शन घेतल. साधा अंगरखा, चिलखत चढवलं, बाराबंदी अंगरखा अंगात घातला, हातामध्ये वाघनखे लपवली, जांबिया म्हणजेच बिछवा लपवला. आई भवानीचे अन मासाहेबांचे स्मरण केले व राजे भेटीला तयार झाले. भेटीदिवशी सकाळी राजांनी खानाच्या सैन्याला मोठी मेजवानी दिली, राजांनी खानाच्या सैन्यात असणाऱ्या मराठा सैन्यासाठी १८ बोकड कापले जेणेकरून पोटभर जेवून हे सुस्तावतील व लढाई सोपी होईल.
राजांनी पंताजी काकांच्या कानात काहीतरी बोलले अन काकांना निरोप दिला की काका, तुम्ही खानाकडे जा व त्याला गडावर घेऊन या, त्या खानाचा काही भरवसा नाही. अन बोकील काका गडावरून खानाच्या छावणीत आले. खान चकित झाला की आता हे का आले असावेत, तेव्हा तुम्हाला अदबीने घेऊन जाण्यास आलो असे पंतांनी सांगितले व खान मेण्यात बसला. त्यावेळी खानाने आपल्यासोबत ७५० सशस्त्र हशम आपल्या सोबत घेऊन गड चढायला सुरुवात केली. गड चढताना त्या घळीजवळ आल्यानंतर वळून येताच पंत थांबले. खान म्हणाला “अब क्या हुआ पंत?” तेव्हा पंताजी बोलले की हे शस्त्रबंद सैन्य पाहून राजे घाबरले, ते येणार नाहीत. अन नाईलाजाने खानाला हे ७५० सैन्य पहिल्या टप्प्यावर थांबवून पुढे जावे लागले. त्या ७५० सैन्याचा अन खानाचा संपर्क तुटला.
बघता बघता खान शामियान्यात पोहचला. त्यावेळी खानासोबत शामियान्यात बडा सय्यद नावाचा एक पराक्रमी हशम होता. बडा सय्यद हा एकाच वेळी छोटी तलवार अन दांडपट्टा चालवण्यात तरबेज होत. एकाच वेळी तलवार अन दांडपट्टा चालवणे हे खूप जिकरीचे कसब, त्यात स्वतःचे मस्तक तुटण्याचा धोका असतो, परंतु बडा यात निपुण होता. सोबतच कृष्णाजी भास्कर कुळकर्णी हा खानाचा ब्राह्मण वकील होता.खान शामियान्यात पोचला अन त्याला राजांनी तयार केलेलं तख्त दिसलं. खान बेहद खुश झाला. तेथील जडजवाहीर बघून खान खुश झाला अन बोलला “सचमूच सिवा के पास इतनी बडी दौलत है?” तो सरबत प्यायला अन राजांची वाट बघत तख्तावर बसला.
इथेच महाराजांनी मंत्रयुद्धातील अजून एक चाल खेळली.
आपल्याकडे जर एखादा माणूस आपल्याला टाळत असेल अन आपण त्याला भेटायला बैचेन असू, अन भेटीची वेळ ठरवून आपण त्याला भेटायला गेलो अन तो तिथे आलाच नाही तर…. मानसिकता कशी होईल आपली.
राजांनी नेमकी हीच चाल खेळली. राजे काही ठरलेल्या वेळेत आले नाहीत. त्यामुळे खान बैचेन झाला, खान राजांची खूप दिवस वाट बघत होता. कधी एकदा राजे भेटतील अन तो राजांना घेऊन आदिलशहाकडे जाईल असा खानाला वाटत होतं. अन त्यामुळे राजांनी ठरलेल्या वेळेपेक्षा निघायला दोन प्रहर उशीर केल्यामुळे खानाची मानसिकता बिघडू लागली, खान विचलित झाला. तो अस्वस्थ झाला अन त्याने पंताजी ना विचारले, “अब क्या गडबड है??” अन पंताजी बोलले की खानसाहेब महाराज लय घाबरलेत हो त्यामुळेच उशीर होतोय अन हे ऐकून खानाला अतिआत्मविश्वास झाला.
इकडे जवळपास तीनच्या प्रहरास राजे वरून निघाले. राजे खाली आले. तो भेटीचा शामियाना कुठे होता त्या जागेची नक्की नोंद कुठे नाही, परंतु अब्दुल्ला बुरुजाकडे जाताना ज्या जागेवर चार तुटलेल्या पायऱ्या आहेत तिथे कुठेतरी तो शामियाना असावा असा अंदाज येतो.
इकडे राजे शामियान्याच्या बाहेर आले, त्यांना सावलीत नंगी तलवार दिसली जी बडा सय्यद च्या हातात होती राजांनी कृष्णाजीला सांगितले, आम्हाला भीती वाटते, ती तलवार म्यानबंद करा, नाहीतर आम्ही परत जातो. अन ती तलवार म्यानबंद केली. अन महाराज विजेच्या चपळाईने शामियान्यात गेले अन थेट खानासमोर जाऊन त्याच्या डोळ्याला डोळे भिडवून उभे राहिले. जणू काही सिंह आणि हत्तीच एकमेकांसमोर उभे होते. खान चमकला, एवढे दिवस इतका घाबरलेला माणूस अस कस काय वागू शकतो. वकिलांनी खानाला अन राजांना एकमेकांची ओळख करून दिली अन खानाने बडबड करायलाच सुरुवात केली. “दगाबाज, धोकेबाज, बेमुरर्वत सिवा.” अन हे ऐकून राजांनी परत घाबरल्याच नाटक केलं. खान पून्हा ओरडायला लागला अन गप्प झाला.
राजे पून्हा एकदा ताठ झाले अन खानाच्या डोळ्याला डोळे भिडवून कडाडले, “आम्ही जे केलं ते आमच्या रयतेच्या सुखासाठी अन आमच्या स्वराज्याच्या विस्तारासाठी केले. त्याचा आम्हाला काही पछतावा किंवा गम वाटत नाही.” अन राजांचे हे करारी शब्द ऐकून खान आश्चर्यचकित झाला. त्याने वकील कृष्णाजीकडे पाहिलं. कृष्णाजीने मान खाली घातली. खानाने ओळखलं की आपली फसवणूक झालीय, इतके दिवस जे चालू होत ते सगळं एक नाटक होत. खान राजांना बोलला, “ये सब ठीक है सिवा, लेकीन जैसे खत मे लिखा था वैसे हमे अपना चाचा तो मानते हो ना तुम. या वो भी एक नाटक था.?” राजांनी मान हलवून हो असा इशारा दिला.
अन खान बोलला, “बेटे सिवा, अपने चाचाजान के गले नही मिलोगे. आव हमारे गले लग जाओ.” राजांनी मान डोलावली अन राजांना आलिंगन देण्यासाठी खान तख्तावरून खाली उतरायला लागला. राजांचे लक्ष एकदम खानाच्या अंगरख्याकडे होते. खानाने पहिल्या पायरीवरून जसा मधल्या पायरीवर पाय ठेवला तशी खानाच्या अंगरख्याची घडी वाकडी पडलेली राजांना दिसली अन राजे मनातल्या मनात खुश झाले. घडी वाकडी पडली म्हणजे चिलखत घातलं नव्हत खानाने.
दोघेही समोरासमोर आले,दोघांनी तीनदा एकमेकांना डाव्या उजव्या बाजूला आलिंगन दिले. तिसऱ्या वेळी आलिंगन देताना अचानक खानाने राजांना ओढलं व राजांचा तोल गेला. खानाने राजांची मान डाव्या बगलेत दाबली व आदिलशहाने दिलेल्या रत्नजडित कट्यारीने राजांवरती वार केला. त्या वारामुळे राजांचा अंगरखा फाटला अन कट्यार चिलखताला घासल्याने खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज झाला. चिलखत असल्यामुळे राजे बचावले, खान दुसरा वार करणार त्याआधी राजांनी आपली मान खानाच्या बगलेतून सोडवली. खानाने राजांवर दुसरा वार केला तो डोक्यावर. तो वार जिरेटोप फाडून आतील लोखंडाची पट्टी चिरून आत गेला, अन त्याचवेळी खानाच्या पोटाला वाघनखांचा पहिला फटका बसला. व खानाच पोट फाटलं. यावरून खानाच्या प्रचंड ताकदीचा अंदाज आपल्याला येतो. खान तिसरा वार करणार तेवढ्यात राजांनी खानाच्या पोटात जांबिया घुसवला, अन तो बाहेर काढताना खानाच्या पोटातील आतडी बाहेर आली. रक्ताचा धबधबा कोसळू लागला.तेवढ्यात खान ओरडला, “या अल्लाह, दगा दगा, खून खून.” अन आपली आतडी तशीच हातात धरून शामियान्याच्या मागच्या दरवाजाने खान पळाला.
तेवढ्यात गडावर ठरल्याप्रमाणे तुताऱ्या वाजू लागल्या. खानाच्या फौजेला वाटले राजे शरण आले. खानाला पळताना पाहून सय्यद बडा पुढं आला अन राजांवर वार करणार एवढ्यात जिवा महालेंनी उलटा वार करत बडा सय्यद चा हात दांडपट्ट्यासहित उडवला अन दुसऱ्या वारात त्याच मुंडक उडवलं. तेवढ्यात राजांवर कृष्णाजी भास्करने तलवारीने वार केला, राजांनी तो अडवला अन राजे त्याला बोलले “आम्ही वकीलावर शस्त्र उगारत नाही, बाजूला हो.” तरीही भास्करने पुन्हा राजांवर वार केला अन राजे कडाडले”ब्राह्मण म्हणून कोण तुझा मुलाहिजा राखतो.” अन असे म्हणत राजांनी कृष्णाजी च मस्तक धडावेगळे केले. अन राजे परत गडावर निघाले.
जाताना महाराज आपल्या दहा सैनिकांना म्हणाले खान पळाला, त्याला पकडा, त्याला मारा. इकडे खान मेण्याकडे गेला अन मेण्यात पडला, भोई घाबरले अन मेणा घेऊन पळू लागले. तेवढ्यात तिथे संभाजी कावजी अन काटके आले, त्यांनी भोयांचे पाय काटकोनात तोडले व खानाचे मुंडके छाटले. त्याचवेळी गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. इशारतीच्या योफ ऐकून घळीत लपलेल्या सैन्याने इथे थांबलेल्या ७५० शत्रू सैन्याची जागेवर कत्तल केली.
इकडे खानाच्या छावणीभोवती असणाऱ्या ३००० सैन्याने सुस्तावलेल्या खानाच्या फौजेवर अचानक हल्ला चढवला. सुस्तावलेल्या सैन्याने सुद्धा जवळपास अडीच तास लढाई केली. पण खानाच्या फौजेने पांढरे निशाण दाखवत शरणागती पत्करली.
त्या लढाईत महाराजांचे एकूण १७४२ मावळे ठार झाले अन ५५० मावळे जायबंदी झाले. तसेच खानाचे ३००० सैन्य ठार झाले अन ३००० हशम कायमचे जायबंदी झाले. तसेच खानाचे जवळपास तीन ते चार हजार लोक कैद झाले. बाकीचे सैन्य पळून गेले. खानाचा मुलगा फाजलखान चंद्रराव मोरेसोबत कोकणात गेला व नंतर तिथून विजापुरास गेला.
या युद्धाने राजांना काय मिळालं??
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात हाहाकार माजला. बडी बेगम तर चक्कर येऊन पडली असे म्हणतात.
तर बादशहा औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडलेले.
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले.
तर या लढाईत राजांना ३००० गाठी कापड, वर मिळालेले जडजवाहीर, खाली छावणीत सात लक्ष रुपये रोकड, ९० उंट, १४०० घोडी, ४० हत्ती तसेच तोफा ह्या गोष्टी राजांनी जप्त केल्या.
आता खान मेला म्हणून राजे शांत बसले नाहीत, राजांना माहीत होतं, लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारला तर कमी ताकदीत जास्त फायदा होतो. राजांनी खानाला मारलं ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या हिंदुस्थानात पसरली. अन अनेक प्रतिस्पर्धी शाह्यांनी राजांच्या नावाचा धसका घेतला.
इकडे नेताजींनी १५ दिवसात बराच कोकण प्रांत काबीज केला, राजांनी स्वतः कराडवर हल्ला चढवला, स्वराज्याची सीमा जवळपास पन्हाळ्याजवळ नेला. सगळीकडे महाराजांची दहशत निर्माण झाली. त्या १५ दिवसात राजांनी कृष्णा, वेण्णा, वारणा नद्या ते कर्नाटक पर्यंतचा मुलुख काबीज केला, कराडजवळील वसंतगड अन वर्धनगड स्वराज्यात सामील करून घेतले, म्हणजे मूळ स्वराज्याच्या जवळपास अडीच पट मुलुख राजांनी त्यानंतरच्या पंधरा दिवसात स्वराज्याला जोडला.
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
या अनुषंगाने कवी परमानंद यांनी लिहलेले काव्य आठवले.
[इंद्र जिमि जम्भ पर] जसा इंद्र जम्भासुरावर (माझलेल्या हथ्थी रूपात),
[बाड़व सुअम्ब पर] जस वादळ आकाशावर
[रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं] जसा राम माझलेल्या दिडशहाण्या रावाणावर ||१||
[पौन बरिवाह पर] जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
[संभु रतिनाह पर] जसा शंभू रतीच्या पतीवर (मदनावर)
[ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं] जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर ||२||
[दावा द्रुम दंड पर] जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
[चीता मृग झुंड पर] जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
[भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं] जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो ||३||
[तेज तमअंस पर] जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
[कान्ह जिमि कंस पर] कृष्ण कंसाचा नाश करतो,
[त्योम म्ल्लेंछ बंस पर सेर सिवराज हैं ] तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी (मोघल, आदिलशाह, निजामशाह, सिद्धि, हब्शी, पोर्तुगीज) यांचा नाश करणारा वाघ आहेस.
संदर्भ.
अणूपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).– आसावरी बापट
(संदर्भ : दैनिक लोकसत्ता – १७ एप्रिल २०१५)
http://www.loksatta.com/lokprabha/kautilya-and-shivray-1092917/लक्ष्यवेध – (कादंबरी, लेखक रणजित देसाई
Pratapgad Campaign लेखक मे. मुकुंद जोशी
जावळी १६५९ (दिग्दर्शक प्रवीण तरडे)
खूपशा नोंदी- तत्कालीन मु. सलातीन
जदुनाथ सरकार (१९९२). शिवाजी अ‍ॅण्ड हीज टाइम्स. ओरिएन्ट ब्लॅकस्वान. pp. ४७–५२. आय.एस.बी.एन. 978-81-250-1347-1.
^ जे. नाझरेथ (२००८). क्रिएटिव्ह थिंकिंग इन वॉरफेअर(सचित्र आवृत्ती.). लान्सर. pp. १७४–१७६. आय.एस.बी.एन. 978-81-7062-035-8.
^ आर. एम. बेथम (१९०८). मराठाज अ‍ॅण्ड दखनी मुसलमान्स. एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेस. pp. १३६. आय.एस.बी.एन. 978-81-206-1204-4
^ स्टीव्हर्ट गॉर्डन (१९९३). द मराठाज् १६००-१८१८, पार्ट २, व्हॉल्यूम ४ (इलस्ट्रेटेड आवृत्ती.). केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. पान क्रमांक ६७. आय.एस.बी.एन. 978-0-521-26883-
धन्यवाद 
सोनू बालगुडे पाटील

AFZAL KHAN CAMPAIGN AND BATTLE OF JAVALI



"By playing on the psychological weaknesses of the opponent, by maneuvering him into precarious positions, by inducing feelings of frustration and confusion, a strategist can get the other side to break down mentally before surrendering physically. In this way victory can be had at a much lower cost. And the state that wins wars with few lives lost and resources squandered is the state that can thrive over great periods of time".

                                  Sun- tzu, author of the ancient Chinese classic - the Art of War.

BACKGROUND OF THE CAMPAIGN

By the year 1657-58 Shivaji had successfully captured the Nizamshah's territory under the rule of Vijapur Henceforth referred as Adilshahi) and by taking advantage of the political uncertainty prevailing at that time. Due to internal chaos Mughal invasion, Adilshahi was not able to pay sufficient attention to Shivaji's revolt. However, by the end of the year 1658 Adilshahi had stabilized and Aurangzeb had left for Agra (February 5th, 1658) for the ultimate battle for Kingship against his brother Dara Shikoh .   It was then the Ali Adilshah II called upon Afzal Khan to crush the revolt of Shivaji. The following extract from Tariq – E – Ali – History of Ali Adilshah II does indicate that Afzal Khan was ordered to Kill Shivaji.

When Mohammed Adilshah was ill, the deceitful and Kafir Siva Bhosale looted the Tal Konkan region and captured the fort of Rairi. Further, after the death of Mohammed Adilshah, Shivaji went ahead and captured many other forts and harassed the Muslims. After hearing such news Ali Adilshah II ordered Afzal Khan to take an army of ten thousand and uproot Shivaji. He was also instructed not to fall prey to any of his deceitful letters and request but only to put end to his life.

AFZAL  KHAN'S ARMY

Different Historical documents give different information on the total strength of Azfal Khan's army. However, the information given in Tariq-E-Ali is considered to be reliable and authentic as it was written in the era of Ali Adilshah II. According to Shivbharat, Muslim noblemen like Amber Khan, Yakut Khan, Musa Khan, Hasan Khan Pathan, Ankhush Khan, and Siddhi Hillal were part of this campaign along with Afzal Khan. Hindu noblemen; Ghorpade, Naikji Pandhre, Naikji Kharade, Kalyanji Yadav (Jadhav), Mumbaji Bhosale, Rajaji Ghatge, Kate also accompanied him.

VIEWS ON NUISANCES TO THE TEMPLES AT TULJAPUR AND PANDHARPUR

Afzal Khan left Vijapur in May 1659.As per Sabasad Bakhar, Shivkavya and Agnyadas Powada, Afzal Khan demolished the idol of Goddess Tulja Bhavani at Tuljapaur on his way to Wai from VijapurVijapur during the invasion against Shivaji. Shivbharat also records some nuisances committed by Azfal Khan to the Temple at Tuljapur. However, the document does not say that Afzal Khan had specifically committed the act of demolishing the idol of Goddess Tulja Bhavani. Shivbharat also does not record the nuisances to the temple was during the invasion against Shivaji. This account is also supported by Ekanavy kalmi Bakhar. Since, Historians consider Shivbharat to be an authentic document; thus the information given in Shivbharat is considered to be more reliable. In all possibilities Afzal Khan did some harm to the temple when he was Subhedar of Wai.

As per Sabhasad Bakhar, Shivkavya, and Aganydas Powada, Afzal Khan after July 01, 1659 had caused some inconvenience to Pandharpur. However, the document does not specify whether the inconvenience was to the temple or to the village. 

AFZAL KHAN'S BASE AT WAI

Other than Shivbharat no other historical document has given a reason as to why Afzal Khan chooses his base at Wai. The extract from Shivbharat suggests

Shivaji captured Javali on 15th January 1656 and couple of months later killed Chandrarao More and his son Krishnaji. Prataprao brother of Chandrarao went to Vijapur and offered his services to Adilshah. Adilshah, satisfied with services of Prataprao More promised him to give back Javali. Accordingly, Afzal Khan was instructed to capture Javali. Prataprao accompanied AfzalKhan and ushered him to Wai. 

Afzal Khan was also the Subhedar of Wai since 1649 and knew the area well. This also could be one of the reasons for him to choose Wai as his base camp against Shivaji. No historical documents give the exact date of Afzal Khan's arrival at Wai. As per Jedhe Shakavali Shivaji came to Javali on 12th July 1659. Thus in all probabilities Afzal Khan may have to Wai before Shivaji’s arrival.

INITIAL STRATEGICAL MOVEMENTS

Ali Adilshah had sent letters (farmans) to Shivaji's noblemen ordering them to join Afzal Khan's army. After receiving these farmans few of Shivaji's noblemen like Khandoji Khopade and Kedarji Khopade joined Afzal Khan's army. Similar farman was sent to Kanhoji Jedhe. Kanohji Jedhe was one of the respected courtier and close ally of Shivaji. Kanhoji Jedhe without responding to farman meets Shivaji at Rajgad along with his five sons and swore for loyalty. He offered his unconditional services and baron to Shivaji. Kanhoji Jedhe also persuaded other noblemen and baronage to stay and support Shivaji. This is considered as one of the most significant contributions of Kanhoji Jedhe in the campaign against Afzal Khan.

NEGOTIATIONS

In October 1659 Afzal Khan sent his representative, Krishnaji Bhaskar to Shivaji at Pratapgad. The representative was instructed to convince Shivaji for a meeting at Wai. Shivbharat gives the details of the message sent by Afzal Khan to Shivaji through his representative. The extract suggests

Afzal Khan strongly conveyed that Ali Adilshah II was upset with Shivaji on capturing Nizamshi territory. Shivaji without any inhibition opened a military campaign against Sidhi of Danda Rajapoure and trouble him. He also captured Kalyan and Bhiwandi, troubled the Muslims, and demolished mosques. Shivaji has become a self-proclaimed king who is not willing to obey Adilshah. Hence, Adilshah has sent him (Afzal Khan) to teach a lesson to Shivaji. Afzal Khan stated that though my noblemen and army is keen to fight and destroy you. I am willing to give you a chance to surrender handover you forts and baronage to Adilshah II.

To the above Shivaji replied

I am awed with prowess of Afzal Khan especially against Moughals and all the Kings in Karnataka. Afzal Khan should come to Javali and experience e the wonder of nature. His visit will also help him (Shivaji) to shed his fears he has against the mighty Afzal Khan. Further, Afzal Khan’s visit to Javali will enhance Shivaji’s reputation. Come safely. I am all set to hand you my forts and Javali. I will surrender to you. Let forces also experience the deep and dense forest of Javali.

Shivaji choose Pantaji Gopinath as his representative to carry this message to Afzal Khan. He was also entrusted with the responsibility of convincing Afzal Khan to come to Javali.

After series of discussions between both the representatives it was agreed upon that all the territory acquired so far by Shivaji would be given to him as baronage. Shivaji should come to Wai and meet Afzal Khan. This was turn down by Shivaji stating that he feared Afzal Khan. Afzal Khan was requested to come to Javali which he finally accepted. Noblemen in Afzal Khan's army tried persuading him from going  to Javali. They were of the opinion that ideally Shivaji should come to Wai. Since, Shivaji is asking him to come down to Javali, he may have a very bold and deceitful plot against Afzal Khan. Considering the overall difficulty and natural hurdles at Javali, Afzal khan should not go to Javali. However, Afzal Khan did not listen to any of his Noblemen and decided to go ahead with his plan.

In the meanwhile Shivaji ordered all his Noblemen and Chieftains to gather at Pratapgad. They were instructed that they should stop any such movements of their army which will arouse any suspicion in the mind of Afzal Khan. They were asked to stay alert in the dense Jungle of Javali. Shivaji also ordered his Commander –in –Chief Netoji Palkar to stay alert with his army and wait till the meeting with Afzal Khan. Shivbharat does not mention where Netoji Palkar was stationed.

According to Shivbharat Afzal Khan reached Javali with great difficulty and inconvenience. Few of the army men died on the way while some of them expressed the desire of going back to base at Wai. A camp was erected at Par village on the banks of Koyana river.  Shivaji expressed his desire to gift costly presents to courtiers, and noblemen accompanying Afzal Khan. Afzal Khan granted his request and allowed his traders to go to Pratpgad. Extract from Shivbharat is as below:

The traders showed all the precious pearls and diamonds they were carrying. Shivaji kept all those valuables with him and requested the traders to stay at Pratapgad and enjoy the hospitality. Those greedy and foolish traders accepted the invitation without realizing that they were actually trapped at Pratapgad.

In the meanwhile both the representative decided the terms conditions of the meeting between Shivaji and Afzal Khan. The extract of terms and conditions as per Shivbharat is as below:

AfzalKhan should be armed, and come in a palkhi along with his two personal assistants. He should wait for Shivaji in the Shamianya specifically constructed for the meeting at the base of Pratapgad. Shivaji will also come armed and welcome the guest. There were will be 10 loyal and brave bodyguards from both the sides standing one arrow shot distance away for security purpose. They will be standing at a distance from the Shamiyana. In the meeting they should talk on the confidential matters.

Shivaji had given specific instructions to his courtiers, Bandal and Silimkar. The extract from Jedhe Shakavali indicates:

Shivaji and Kanohji Jedhe planned that Bandal's along with their army should be in the Jungle of Javali and near the Par village. Irrespective of who succeeds the Bandals to attack Afzal Khan's army at Par village. Incase Shivaji succeeds then the Cannons will be fired from Pratapgad.  Haiybatrao and Balaji naik Silimkar who will be stationed at BocheGholi Ghat should attack the enemy in that area.

From the above it appears that the Bandals were given the specific responsibility of blocking the area between Par village and Pratapgad. It was for them to ensure that Afzal Khan does not get any help from his army once he reaches the base at Pratapgad. Once the Bandals gets the signal from Pratapgad they were also to attack the Afzal khan's army at Par village. Similarly silimkar were instructed to block the entire BochecGholi Ghat.

Afzal Khan Vadh  (Thursday, 10 November 1659)

Different historical documents have given different views on Afzal Khan's assassination. However, Shivbharat,Jedhe Shakavali, are the most contemporary documents. Out of which the information in Jedhe Shakavali is very concise. Detailed information is given in Shivbharat. The extract of the same is as follows:

Shivaji with sword in hand entered the Shamiyana. Seeing Shivaji Afzal Khan handed his sword to one of his assistant and said "Shivaji you do not accept the authority of Adilshah, kutubshah as well as the Mughals. I have come here to punish you. Give me all your forts. I will personally take you to Vijapur, will make you bow your head in front of Ali Adilshah II. I will request Ali Adilshah II to forgive you and give lot wealth and baronage. Come son of Shahji, leave your ego and embrace me".

When Shivaji embraced Afzal Khan, he drew his dagger and stabbed him. Shivaji was very agile; he immediately backed off, attacked Afzal Khan by sword and disembowels him. Afzal Khan lost control on himself and screamed "he has killed me, kill him". Listening to this one of his Bramhin representative attacked Shivaji. Shivaji warned him saying that he did not wish to kill a bramhin. In the meanwhile Afzal khan's army men entered the Shamiyana and attacked Shivaji. He defended himself by using Patta by one hand and beheaded Afzal Khan by using the sword by another hand.

Abdul Sayeed, Bada Sayed , Rahim Khan, Pahilwan Khan, Pillaji Mohite and Shankarji  Mohite, and four other Muslim Courtier attacked Shivaji. Shivaji defended himself by using Patta. In the meanwhile Shivaji's courtiers ; Sambhaji Kavji, Kataji Ingle, Kondaji Kank, Yesaji Kank, Krishnaji Gaikwad, Suryaji Kakde, Jiva Mahal, Visaji Murambak, and Siddhi Ibrahim protected Shivaji. Jiva Mahal Killed Bada Sayed when he attacked Shivaji.

Battle of Javali (November 10, 1659)

Once Afzal Khan was killed, the cannons were fired from Pratapgad. Hearing the Signal , with an army of one thousand each, Kamloji Salunkhe, Yesaji Kank, Tanaji Malusare, Kondaji Vadkhal, and Ramji Pangore attacked Adilshahi army.  The news of Afzal Khan's death spread across his army. The army got confused and started deserting. Musa Khan tried to control the situation. Hasan Khan, Yakut Khan, Ankush Khan, and other courtiers followed Musa Khan. However, Shivaji's army defeated them. 

Chandrarao More brother of Prataprao More helped few of Afzal Khan Courtiers to come out Javali. Shahaji's cousin Mambaji Bhosale got killed. Randula Khan,Amber Khan, Rajaji Ghatge, two younger sons of Afzal Khan and other courtiers were arrested by Shivaji's men. Shivaji got lot of enemy's wealth which helped him for future expansion.

References

Shree Raja Shiv Chatrapati (Vol 1&2) – Gajanan Bhaskar Mehendale, Second Edition, 15.09.2008, Diamond Publications, Pune.

Shivbharat – Kavi Parmanad, Edited by Sadashiv Divekar, Second Edition, November 1998, Shabdvedh Publication, Pune.

Raja Shiv Chatrapati (Vol 1) – Babasheb Purandare, Sixteen Edition, April 02, 2008, Purandare Publications, Pune

Vedh Mahanavcha –Dr.Shrinivas Samant, Fourth Edition, 2009, Deshmukh and Company Pvt. Ltd. Pune

The 33 Strategies of War – Robert Greene, 2009, Viva Books.

Chhatrapati Shivaji vs Afzal Khan: Pratapgad,1659

The Pratapgad campaign is much more than just Shivaji killing Ali Adil Shah’s general at a meeting. Shivaji’s leadership acumen and mental fortitude as a twenty nine year old comes to the fore.

If there is a single episode that one can imagine and understand as to why Chhatrapati Shivaji is considered such a great persona, then it would be the killing of Afzal Khan. The Pratapgad campaign is much more than just Shivaji killing Ali Adil Shah’s general at a meeting. Shivaji’s leadership acumen and mental fortitude as a twenty nine year old comes to the fore. Intelligence, spies, disinformation campaigns and other weapons of guerilla warfare had been honed to perfection by Shivaji in his short career. Important details like – the proper fort to be selected for meeting Afzal Khan , the exact location/spot on that fort (near to the forest, escape routes etc.), the guard to be recruited at that time on the fort – each and every minute decision has a sound reasoning behind it. And Shivaji does not merely stop at evicting Afzal Khan – he ensures that Adil Shah has a net negative outcome. The days of status quo are finished by Chhatrapati Shivaji.
1659 – Lead up to the campaign
Shivaji Maharaj had been steadily gaining strength in the Sahyadris, away from the gaze of Bijapur’s Adil Shah. Sent to his father’s , Shahaji Raje’s, jagir of Pune; he gained possession of several strong hill forts in the vicinity – Rajgad and Torna among others. On being questioned by Adil Shah regarding his intentions, he replied that these forts are been taken under his control only to make Adil Shah’s rule stronger in those parts! Away at Bijapur, Shahaji dismissed his son’s activities as energetic escapades of a young boy but discreetly sent advisors and experienced warriors to help Shivaji!
The Bijapur court at the time was rife with internal problems , with the Deccani Muslims in it locked in quarrels with its Afghan – Turkic members. Then there was a Mughal invasion to bother about – all of which Shivaji Maharaj used to good effect to further his own influence.
Finally, the war with the Mughals ended in 1657 and Ali Adil Shah or rather his mother, the regent Begum Sahiba decided to crush Shivaji once and for all. For this , Afzal Khan was appointed – a battle hardened general who had led armies all over south India.
Afzal Khan starts from Bijapur












IMG_256
Afzal Khan started from Bijapur in late April and made his way to Wai near Pratapgad via Pandharpur, Malavadi and Rahimatpur. He desecrated the temple at Pandharpur on the way. From Pandharpur, a contingent of around three thousand troops made its way to Pune. On this journey he also had a large wooden cage made for Shivaji and extracted large amounts of tribute from Tuljapur and Ravalnath temples.
Afzal Khan reached Wai during or just after the summer of 1659. His troops deputed to Pune reached there earlier, and soon occupied the large tracts of land in the Pune – Shirval and Supe areas. Chhatrapati Shivaji at the time was at Rajgad.
Afzal Khan’s plan was to entice Shivaji out of the hills and onto the plains where his artillery and cavalry could wreak havoc on the latter. At the same time, Afzal Khan sent letters to various watandars enticing or threatening them into joining him.
A small map of the relevant region :












IMG_257
Shivaji doesn’t take the bait
Chhatrapati Shivaji’s intelligence network was fully aware of the situation including the fact that he had started off from Bijapur with a motive to kill him. The temple desecration at Pandharpur and other places must have affected him, but he did not let anger get the better of him into making a rash decision. Shivaji calmly retreated from the plains and stayed put in the hill fortress at Rajgad.
Netaji Palkar, leading a large contingent of Shivaji’s cavalry requested his permission to evict the three thousand odd soldiers roving around Pune. But Shivaji wanted to create an impression in Afzal Khan’s mind that he was weak and scared of the mighty general. He, thus, forbade any action against the soldiers occupying Pune and Supe areas. He further started a disinformation campaign, praising Afzal Khan to the skies and explaining how he (Shivaji) was mortally scared of him.
Afzal Khan aimed to draw out Shivaji for one quick battle near Pune in the month of May, which would end with Shivaji being captured or killed. But Shivaji’s sharp sense of the situation prevented this. The month of June started and Shivaji remained at Rajgad. A couple of weeks later, the torrential monsoons started, making any kind of large troop movements impossible. Now Afzal Khan would have to wait four months before starting anything new.
But Shivaji had staved off only one headache – that of facing Afzal Khan in the open. Another pressing problem remained – that of watandars and Maratha sardars in the region being lured by Afzal Khan’s carrot and stick policy.
Shivaji had little to offer other than the lofty dream of a Swarajya. He had no jagirs to confer or gold to distribute. His small kingdom had been built mainly out of assuming control of some Adil Shahi fortresses under the pretext he was doing this to look after them in a better way. He had faced a few tests militarily, but Afzal Khan was a different breed altogether. If probability was to be weighed in May 1659, Shivaji was far from a safe bet. It was a critical time. At this crucial juncture, in stepped Kanhoji Jedhe.
Kanhoji Jedhe
Kanhoji Jedhe had been deputed by Shahaji himself to see to it that no harm came to Shivaji. Now he was faced with a critical decision. He was a respected person and his accepting of Afzal Khan’s hand of friendship could well have tilted the balance against Shivaji. But Kanhoji Jedhe fully believed in the ideal that Shivaji was fighting for. It was a powerful ideal, one that none had spoken about in that land for three hundred years. A person convinced about the need to establish Swarajya could not be swayed with grants of land and money.
Kanhoji Jedhe went to Rajgad with the firmans received from Afzal Khan and publicly declared that he would relinquish his lands and his earnings to Shivaji but not join Afzal Khan. This simple act of bravery and farsightedness had an electrifying effect : that someone with the experience and seniority of Kanhoji Jedhe was supporting Shivaji meant that Swarajya was an idea they could and should fight for. All defections to Afzal Khan immediately stopped.
To me, this act of Jedhe is the most important thing to remember out of the whole campaign. More perhaps than the actual killing of Afzal Khan.
The Mughals wade in
One of the reasons that Afzal Khan opened this campaign in the sweltering heat of April was that Aurangzeb was busy fighting his brothers for the throne of Delhi. He expected a quick skirmish to finish Shivaji before Aurangzeb could turn his attention towards the Deccan. But by not taking the bait at Pune, Shivaji had completely foiled this plan.
By June, through the actions of Kanhoji Jedhe, Shivaji had scored his second victory – that of stemming defections. But the end of that month saw the settlement of the disputes in the north and the newly crowned Alamgir Aurangzeb turned his gaze towards the Deccan. He dispatched his own maternal uncle – Shaiste Khan, with a khillat meant for Shivaji Maharaj himself!
Both, Shivaji and Afzal Khan, came to know of the robe of honour headed for Pune. This totally piqued the situation. Aurangzeb was an astute and cunning politician. Plus, he had huge armies at his disposal. What was the khillat supposed to mean? An alliance with Aurangzeb against Adil Shah? What happens next? What if Adil Shah joined Aurangzeb instead? Against the two armies together, Shivaji would be in a very difficult spot. Both, Shivaji and Afzal Khan, were individually weak against Aurangzeb. The Mughal was the bull in the China shop that neither was willing to entertain. Only one thing was certain – the issue had to be settled before the third party i.e Mughals were involved. In the month of July, Chhatrapati Shivaji moved to Pratapgad – around thirty miles from Wai. There were other forts to move to in the vicinity , but there were sound reasons behind choosing Pratapgad as we shall see in due course.
Afzal Khan at Wai 
Afzal Khan had received two setbacks, but was still holding a strong position. He had augmented his army by recruiting locally and forming alliances. He would have preferred Shivaji come to Wai itself , but now had to grapple with facing him at nearby Pratapgad. Afzal Khan’s forces moved to throw a large net around the fort such that Shivaji was hemmed in from all sides. Kate, Pandhare and Siddi Hilal commanded the 3000 odd troops which roamed the Pune area and kept many of Shivaji’s troops tied down in his hill forts. To the south, Sarvarkhan guarded the routes south at Vasota. On the west the seaboard, was in the hands of Afzal Khan’s ally, the Siddi of Janjira. This particular detail afforded Afzal Khan another luxury – that of receiving troops and stores via the sea and up the small rivers with led from the ghats to the Konkan. Indeed, it is believed that Afzal Khan did actually use the sea route to receive at least some of his soldiers and stores. In the event of his supply line from Bijapur being cut , he had an alternative. At Dabhol on the coastline , he held around five thousand troops.
His remaining troops were at Wai, positioned in the hills and ravines around Pratapgad.












IMG_258
CHHATRAPATI SHIVAJI SURROUNDED AT RAJGAD
All in all, Afzal Khan had around 40,000 soldiers with him, plus the advantage of better artillery and cavalry for an open field battle and of unbroken supply lines in case he had to play the waiting game.
Shivaji moves to Pratapgad : 
In the monsoon of 1659, Chhatrapati Shivaji left Rajgad and arrived in the Javli region of Satara.
Shivaji, hence, left the safety of his well stocked and powerful forts – Sinhagad, Purandar, Rajgad and Torna and camped on the relatively new fort of Pratapgad. The forts near Pratapgad now assumed importance. Rohida , Makarandgad , Vasota and others. But selecting Pratapgad had its own advantages – its constructions were new – built by Moropant Pingale in 1656, so the chance of someone in Afzal Khan’s camp having knowledge of its layout from some previous visit was low. The fort was also situated on the border of his domains, so that if a battle was to happen then it would happen here or inside Adil Shah’s territories. Rajgad was much inside. It was also covered on all sides by forests. Shivaji was willing to forego the comfort of Rajgad in order to gain a strategic advantage.
Shivaji also had his troops well dispersed around Pratapgad. Netaji Palkar was at the Mahabaleshwar plateau with his cavalry contingent, Kanhoji Jedhe and others in the vicinity of Pratapgad and Moropant Pingale in the Konkan. But Shivaji did not enjoy support on the seaboard and the entire region of Pune – Supe had been occupied by Afzal Khan. There was a very real danger that Afzal Khan could cut off supply lines and isolate Shivaji’s forts. Of course, they could last the entire monsoons, but the stock of food and stores was not infinite! So now, the pressure on Chhatrapati Shivaji was double – that of Shaiste Khan moving south and the knowledge that a stalemate, beyond a point, would only delay the inevitable. On the other hand , Afzal Khan had come well prepared for the long haul.
Negotiations open
Krishnaji Bhaskar and Pantaji Gopinath were the two envoys deputed from Afzal Khan and Chhatrapati Shivaji’s side, respectively, to carry out negotiations. Pantaji Gopinath was an ace diplomat and fully impressed on Afzal Khan how Chhatrapati Shivaji was mortally scared of him and was merely a servant of the Bijapur government. Krishnaji Bhaskar represented Afzal Khan and negotiated a time and date for the meet.In this passed the month of October 1659. The negotiations concluded with Krishna Bhaskar being shown the place of meeting and satisfying himself regarding the arrangements.
But this period of a stalemate saw a tragedy on the personal front for Chhatrapati Shivaji – his first wife Saibai died at Rajgad. Shivaji took this also in his stride and did not waver where a lesser person would have despaired.
The day of the meet
Chhatrapati Shivaji had done meticulous planning of and for the meet. Both, he and his, advisers had an excellent knowledge of the layout of Pratapgad. A shamiana was erected near the base of the fort , and even in this there was strategic sense and thought put in. The structure wasnt just erected on some random plain ground but at a location from where it could be observed from a nearby bastion. At the same time, the troops on the bastion would be hidden from the sights of Afzal Khan from the shamiana! Shivaji requested that bodyguards be placed some distance away from the meeting place, and contingents of soldiers even further away – further than an arrow shot to be precise. This immediately precluded the possibility of being hit by the sharp shooters of the day. Further more, only one narrow tract had been kept for reaching the shamiana and to further lull Afzal Khan into complacency, Shivaji allowed him to send men to check the arrangements for themselves a good two days before the meet!
The troop distribution around Pratapgad is another example of his brilliant mind at work. With the meet only a day away, Kanhoji Jedhe roved the ravines around Pratapgad with 3000 troops, directly opposing the 1800 Habshi soldiers of Afzal Khan who were most likely to gain custody of Chhatrapati Shivaji in the event of him being injured or captured alive. The Habshi soldiers were mainly musketeers. Moropant Pingale arrived at Par ghat with 5000 troops. Bandal and Shilimkar Deshmukhs built pickets of around 2000 troops at Boche ghali in the vicinity . The route south to Wai was via the Jor valley – Babaji Bhosale and Raghunath Ballal guarded this route with about 3000 troops between them. Trimbak Bhaskar was at a nearby village called Dudhoshi. Plus , Vishwasrao Nanaji Dighe had made visits to Afzal Khan’s camp as a wandering minstrel and gathered information about his troops for Shivaji !












IMG_259
TROOPS AT PRATAPGAD
At some distance on the Mahabaleshwar (Panchgani) plateau, Netaji Palkar waited for Shivaji’s signal to unleash his cavalry on Afzal Khan’s troops at Wai.












IMG_260
CUTTING OFF THE RETREAT TO WAI
Why Netaji Palkar at the far away plateau and Moropant Pingale closer to Par ghat? Why the Bandal Deshmukhs at Boche ghali and Kanhoji Jedhe facing the Habshi troops at Pratapgad ? Each of these small details had sound logic going into it, not one contingent was out of place or arbitrarily placed.
Moropant Pingale was mainly leading infantry troops which were well suited for the deep ravines and forests at the base of Pratapgad. Plus, Moropant had taken an active lead in building Pratapgad itself and, thus, had an intimate knowledge of the fort and its surroundings. Netaji Palkar’s cavalry was well suited to rapidly progress on Wai and attack Afzal Khan’s base and artillery placed there. Moreover, as Capt Modak surmises in “Shivaji Souvenir” – placing the cavalry in the bushes close to Afzal Khan’s soldiers at Pratapgad may not have been such a good idea. The Marathas must have reckoned that the neighing of the horses would give the game away! The Bandal Deshmukhs were Deshmukhs of the Rohida area and, thus, well versed to guerilla warfare in narrow places like Bocheghali and Par ghat. The same Bandals would prove their mettle few months later at Pavankhind. Lastly, Kanhoji Jedhe was given the most critical task of facing the Habshi troops into whose custody Chhatrapati Shivaji was to land. His job required him to assess the events exactly as they happened in the shamiana and then take split second decisions based entirely on his own experience and judgement. Whether to outright attack the Habshi troops or trod carefully to rescue Chhatrapati Shivaji was the quick decision he had to make. He was as good as the second in charge and Chhatrapati Shivaji had chosen him wisely – as the most experienced and capable of all the warriors on the field that day.
The killing of Afzal Khan
The day of the famous meet – 10 Nov 1659, finally dawned. Afzal Khan came up the newly made road to the tent set up for the meet , Shivaji descended the fort to meet him. Sayad Banda and Jiva Mahala were the two renowned swordsmen accompanying Afzal Khan and Chhatrapati Shivaji respectively. The two Brahmin envoys – Afzal Khan’s Krishnaji Bhaskar and Shivaji’s Pantaji Gopinath were also in the tent. Afzal Khan already had a track record of calling people for a meet and killing them – for example Kasturi Ranga , Raja of Sera. Moreover , he was widely believed to have caused Shivaji’s elder brother , Sambhaji’s , death by not going to his aid when he required it the most at the seige of Kanakgiri (1658)
What happened next is well known. Afzal Khan was killed by Shivaji and Sayyad Banda by Jiva Mahala. Both the envoys, being envoys, were spared. After this, all hell broke loose. The ten bodyguards closest to the tent clashed first just as the guns sounded on the fort of Pratapgad signalling Chhatrapati Shivaji’s victory. Sambhaji Kavji, one of the ten bodyguards, beheaded Afzal Khan and carried away his head as a trophy.
Now ensued the Battle of Pratapgad!
Annihilation in defeat and status quo in victory” is how Prof Narhar Kurundkar described Hindu powers of yore when contrasting them with Shivaji. Whether winning battles or losing, it would be the Hindu power whose territory was defiled.
Shivaji had staved off defeat in killing Afzal Khan. His rudderless army would have aborted the mission and retreated back to Bijapur and Shivaji’s dominions would have remained fixed at Pratapgad. In short, apart from the death of Afzal Khan, there would be no costs imposed on Bijapur.
But Chhatrapati Shivaji commenced a blistering attack on the Bijapur army instead!
First off, near the mandap, Kanhoji Jedhe fell upon the Habshi troops and slaughtered them or put them to flight. Below at the Par Ghat, Moropant Pingale’s 5000 soldiers, guided by one Tanaji Malusare among others, made short work of Afzal Khan’s retreating army. Troops retreating towards Wai found themselves cut off by Raghunath Ballal and Babaji Bhosale. In the mayhem that ensued, over 3000 of Afzal Khan’s soldiers were killed and an equal number injured or captured. For Shivaji, the numbers were roughly half. Unfortunately, Shivaji lost Babaji Bhosale in this battle.
Some of the troops managed to escape the debacle at Pratapgad and reached Wai. Afzal Khan’s artillery and remaining soldiers promptly evacuated the place, leaving the entire camp and all its stores and money in the hands of Chhatrapati Shivaji!
The three officers of Afzal Khan sent to Pune – Kate , Pandhare and Siddi Hilal, immediately joined Shivaji and, thus, the problem of evicting them from the Pune region solved itself. Khandoji Khopde , who had defected to Afzal Khan , was punished by chopping off one arm and one leg. Two sons of Afzal Khan were captured in the battle.
Netaji Palkar meanwhile reached Wai and galloped with his cavalry deep into Adil Shah’s territory. Adil Shah’s troops were evicted from the entire region, all the way to Panhala and Vishalgad. He then proceeded to Hubali , Dharwad and Gadag before nearly reaching Bijapur itself. From here to returned to Panhala.
Moropant Pingale returned from Par ghat to the Konkan and drove out the troops swarming Dabhol and other areas. The demoralised soldiers of Afzal Khan beat a hasty retreat via the sea.












IMG_261
VICTORY OVER AFZAL KHAN
On his part, Shivaji, too, moved south from Pratapgad, once again displaying his trait of being in the thick of battle irrespective of the risks involved. Kanhoji Jedhe was sent to besiege Vasota, then held by Sarvarkhan as mentioned earlier.
Shivaji himself proceeded towards Kolhapur and obtained possession of the forts of Khelna, Vasantgad and few other places before reaching Panhala.
By the middle of December 1659, Shivaji’s dominions touched the Krishna river! Just a month prior, it had been the Neera and the Bhima, now the borders were marked by the Bhima and the Krishna. Not only had Shivaji defeated Afzal Khan, but in its aftermath had doubled his own territory!
EFFECTS:
  1. Chhatrapati Shivaji stamped his authority on the Deccan as a power to be reckoned with.
  2. His territories doubled , with the gain of over twenty forts and thousands of soldiers to fight for Swarajya. Plus much needed money.
  3. It was a huge setback for Bijapur
References:
  1. Pratapgad Campaign – Maj Mukund Joshi
  2. Shivaji Souvenir – Sardesai
  3. Shiv Bharat – Kavindra Parmananda
  4. Marathyancha Itihas – Kulkarni and Khare

पराक्रमाचा सूर्योदय – प्रतापगड



​शिवरायांचा प्रताप दर्शवणारा व शिवरायांनी स्वराज्यात पायापासून बांधलेला डोंगरातील एकमेव गड म्हणजे प्रतापगड ! १६५६ साली शिवाजी महाराजांनी जेव्हा मोरेंकडून जावळी जिंकली तेव्हा हा ढोपऱ्या (भोरप्या) डोंगर महाराजांनी हेरला. खरंच ! आजही महाराजांच्या या दूरदृष्टीला वंदन करावेसे वाटते, ते यासाठीच ! कारण आजही तो डोंगर चढताना गुडघे टेकायची वेळ येते आणि वाहनांची सुद्धा प्रचंड दमछाक होते. जावळीतील या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे चाहुबाजुंनी हा डोंगर कुठेही एकसंध नाही म्हणजे कोणतीही डोंगररांग या डोंगराला जोडलेली दिसत नाही. हेच शिवरायांनी हेरले आणि विचार केला कि, शत्रूला लपूनछपून आक्रमण करता येणार नाही. हि भौगोलिक दृष्टी महाराजांकडे होती, त्याचा हा निव्वळ पुरावाच !
प्रतापगड पाहण्याचा योग तसा माझा बराचवेळा आला. दरवेळी त्यातील विविध नाविन्यता जाणवत गेली. अधिक अभ्यास करून एक जाणवले कि, जसे दुर्गसंवर्धनामुळे किल्ला जगतो तसे अभ्यास दौऱ्यामुळे किल्ला बोलतो. असाच एक अभ्यासदौरा किल्ले प्रतापगडावर केला. विविध अंगांचा अभ्यास करून प्रतापगड दाखवताना प्रत्येकजण भारावून गेला होता.
शिवरायांनी स्थापन केलेले हिंदूंचे स्वराज्य कलेकलेने वाढत होते. हिंदूधर्म वाचावा आणि टिकावा यासाठी शिवरायांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना आता बळ येत होते आणि त्यात आदिलशाहीचा विजापूरच्या दरबारात शिवरायांना मारण्याचा विडा उचलला गेला. विडा उचलणारा बलाढ्य सरदार होता, अब्दुलाखान भटारी म्हणजेच अफजलखान ! हा अफजल जेवण बनवणाऱ्या बाईचा मुलगा आणि त्यात तो बडी बेगमच्या मर्जीतला ! अफजल हे नाव नसून ती एक पदवी आहे. या अफजलचा आत्मविश्वासाकडून अतिआत्मविश्वासाकडे प्रवास सुरु झाला. मराठ्यांचा देव, देश आणि धर्म बाटवणारा हा अफजल वेगाने स्वराज्यात येत होता. हे आपल्या स्वराज्यावर आलेले पहिले बलाढ्य आक्रमण ! मजल दरमजल करत मंदिरांना नेस्तनाबूत करत, हिंदूंना बाटवत व स्त्रियांची अब्रु लुटत हि वावटळ स्वराज्यात आली आणि इतकेच काय तर शिवरायांच्या अप्रतिम राजकारणामुळे जावळीत दाखल झाली. फार आधी स्वतः सुभेदार असलेला ह्या अफजलला जावळी ओळखता आली नाही, तितक्या तत्परतेने हि जावळी शिवरायांनी ओळखली. सह्याद्रीत फक्त वारा, पाणी आणि मराठेच वावरू शकतात तसेच सह्याद्री मराठ्यांशी बोलतो, सह्याद्रीने मराठा ओळखले, मराठ्यांनी सह्याद्री ओळखली, ते उगाच नव्हे. जावळी त्याचाच एक भाग ! इतकी महत्वाची दूरदृष्टी ठेवून शिवरायांनी तेथे बेलाग दुर्ग बांधून काढला. त्यावेळी प्रतापगडाचे नामकरणसुद्धा झाले नव्हते पण फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ ला व तिथीनुसार विकारीनाम संवस्तर शके १५८१ ला ह्या बलाढ्य व अतिआत्मविश्वासाने भरलेल्या अफजलचा शिवरायांनी कोथळा बाहेर काढला आणि हे आक्रमण संपूर्णतः थोपवले. हिंदूंच्या सेनाधिपतीने केलेला पराक्रम जागतिक किर्तीचा झाला. धर्म वाचला, देवळं वाचली आणि देवही वाचला. मावळ्यांना आत्मविश्वास मिळाला, दहशतवाद कसा संपवायचा ह्याचे सूत्र महाराजांनी आपल्याला साडे तीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिले, स्वराज्याला ऊर्जा मिळाली आणि किल्ल्याचे नामकरण झाले “प्रतापगड” !
इतका मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे, पण आज या किल्ल्यावर काही लोक सहल करायला येतात. खरं तर हा गड स्फूर्तिस्थान आहे. शिवरायांच्या पहिल्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. हिंदूंच्या कर्तृत्वाचा आलेख इथूनच तर वाढत गेला, याची जाण मनांत ठेवून तो किल्ला पाहणे गरजेचे आहे. जसे “जय भवानी, जय शिवराय” बोलतांना अंगावर रोमांच उभे राहतात तसे अफजल बुरुजावरुन ती कबर पाहताना तो रोमांचा क्षण आपल्याला अनुभवता येतो पण दुर्दैव या गोष्टीचे वाटते कि, तिथे सुद्धा बरेच लोक सेल्फी मारताना आढळतात. आजही त्या बुरुजावरुन व शेजारच्या तटावरून ती जावळी पाहताना कापाकापीच्या तलावारींचा आवाज कानात घुमतो पण तेव्हा काही पर्यटक फोटोग्राफीमध्ये दंग असतात. किल्ल्यावर तशी दिवसभर काही प्रमाणात वर्दळ असते परंतु महाबळेश्वरला चाललो आहोत म्हणून प्रतापगड वाटेतच बघून जाऊ. या दृष्टिकोनातून काही लोक तिथे फेरफटका मारायला येतात. दिवसभरातील गर्दीपेक्षा संध्याकाळी तिथे जास्त गर्दी होते. कारण काय, तर सनसेट म्हणजेच सूर्यास्त पाहण्यासाठी ! कठीण आहे हे सर्व ! ज्या किल्ल्यावर कधीही न मावळणाऱ्या पराक्रमाचा सूर्योदय झाला तिथे या समाजातील लोक सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात. इतिहासाची जाण मनात असेल तर भविष्यात प्रगतीचे सुर्योदय होतच असतात पण खंतेची बाब हि आहे कि, किल्ला नाही तर सूर्यास्त बघायला जास्त गर्दी होते आहे. संध्याकाळी या किल्ल्यावर जास्तीत जास्त लोक पश्चिमेकडे डोळे लावून बसतात. आज हा किल्ला पराक्रमाची निशाणी जपत असताना, काही लोक फक्त पर्यटन करण्यास येत आहेत. ज्या किल्ल्यावर एका बलाढ्य आक्रमणाला मूठभर मावळ्यांनी आणि शिवरायांनी नेस्तानाबुत केले, त्याचा विसर पडत चालला आहे. फार वाईट वाटते कि, आपलेच लोक इतिहास विसरत आहेत.
किल्ला स्वच्छ राहावा म्हणून आज जागोजागी कचराकुंड्या लावल्या आहेत परंतु समाजातील काही पर्यटक किल्ल्याच्या पिछाडीच्या तटावरून प्लास्टीक बाटल्या फेकतात का, तर हवेच्या दाबाने ती पुन्हा बुमरँगसारखी आपल्या हातात येईल. काही वेळा येते तर काही वेळा ती बाटली दरीत जाते. माझ्या मते, इतिहासातील घटनेची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा इतिहास वाचला जाईल आणि हा बालिशपणाचा खेळ थांबेल पण वेळ मिळाला तर इतिहास वाचणारी मंडळी आज आजूबाजूला फिरत आहे. हिच लोक कॉलर ताठ करून सांगत फिरतात कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास विविध देश करत आहेत आणि तुम्ही कधी करणार ? असे, आम्ही विचारल्यावर ती निरुत्तर होतात.
हिंदवी स्वराज्य संस्थापक व मराठ्यांचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू धर्म टिकला, हे नाकारता येणार नाहीत. त्यामुळे त्यांचे गडकिल्ले आपल्यासाठी तिर्थक्षेत्रासारखी आहेत व त्यांचा योग्य तो मान आपण सर्वांनी ठेवायलाच पाहिजे. हि बाब आपल्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. आज असा जाणता राजा पुन्हा होणे नाही. तरी सुद्धा कोणालाही आताच्या काळात राजकारणात “जाणता राजा” हि उपाधी लावण्यात येते. एखाद्या आगाऊ शेमड्या मुलाला आज आपल्याकडे छत्रपती म्हणून हाक मारतात तेव्हा खूप वाईट वाटते जेव्हा अशी नावे माझ्या कानावर पडतात. जागतिक कीर्तीचा प्रजाहितदक्ष राजा, हिंदू धर्माचा सेनाधिपती, मराठ्यांचे पहिले छत्रपती आज आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, हे आपले भाग्य आहे, हे कुठेतरी विसरले जात आहे.
इतिहासातुन बऱ्याच गोष्टी शिकता येतात फक्त डोळसवृत्ती वापरणे गरजेचे आहे. या राजाचा उदो उदो जितका करू तितका कमी आहे. इतिहासात रमताना आज वर्तमानात जगताना भविष्याचा वेध घेता येतो. फक्त तो मनापासून वाचायला पाहिजे. इथल्या मातीला मराठ्यांच्या रक्ताचा गंध आहे, इथल्या सह्याद्रीत मराठ्यांचा मावळ्यांचा वास आहे. हे ओळखणे म्हणजेच शिवरायांना वंदन आहे.
हा माझा लेख दिनांक ७ मार्च २०१७ ला पहिल्यांदा तरुण भारत व दिनांक १५ जुलै २०१७ ला गोव्यातील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र गोवन वार्ता या वर्तमानपत्रात आला. इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले आक्रमण ज्या गडावर यशस्वीरित्या थोपवले. देव, देश आणि धर्म वाचला तिथे आज पर्यटन म्हणून जायचे कि तीर्थक्षेत्र म्हणून जायचे ? हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, म्हणून हा लेख प्रपंच !

स. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.

    या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा --- यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा --- मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंग घेत असल्याचे दिसून येते. असो.

    औरंगने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी - आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल - आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजीचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा --- विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचं झगडा जुंपणे अपरिहार्य होते.

    इथे एक महत्त्वाची बाब मी नमूद करू इच्छितो व ती म्हणजे शिवाजीचं राज्य मूळ आदिलशाहीत मोडणाऱ्या भूप्रदेशाचं मिळून बनलेलं, अशा आशयाच्या सिद्धांताचा पुरस्कार आजवर इतिहासकारांनी केला आहे, तो पुराव्यांनी साफ चुकीचा असल्याचे दिसून येते.

    स.१६३६ पर्यंत शहाजीने निजामशाही उभारण्याकरता जो भूप्रदेश ताब्यात घेतला --- ज्यातील बव्हंशी मूळ निजामशाहीचाच भाग होता --- तोच प्रदेश शिवाजीने फिरून जिंकण्याची खटपट आरंभली होती. मात्र, शहाजी - शिवाजीच्या भूमिकांतील फरकामुळे दोघांच्या योजनांना वेगवेगळे फळ प्राप्त झाले. शहाजीने सर्व उद्योग निजामशहाच्या नावाने केला. परंतु शिवाजीने प्रथमपासूनच स्वतंत्र वर्तनाचा मार्ग स्वीकारला होता. ज्यामुळे त्याच्या पदरी असणाऱ्यांच्या वृत्तीला एक वेगळे वळण लाभले, त्याचप्रमाणे त्यांस आपल्या स्वतंत्र भूमिका, वर्तनाचा फायदाही झाला. तसेच शिवाजीने आपला राज्यविस्तार करताना संरक्षण व आक्रमण या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच पद्धतशीरपणे मोहीम आखल्याचे दिसून येते. परंतु या सर्वांची चर्चा करण्यापूर्वी आणखी एका मुद्द्याची आपण संक्षिप्त चर्चा करू.

    शिवाजीने निर्मिलेलं राज्य निजामशाही प्रदेशात असलं तरी त्यांस इतकं यश, तेही अल्पावधीत कसं काय लाभलं असावं ? स. १६३६ मध्ये जीवाचं रान करून आदिल - मोगल या संयुक्त आघाडीने निजामशाही खालसा केली खरी, परंतु निजामशाहीच्या प्रदेशावर पूर्णतः ताबा बसवणे त्यांना शक्य झालं नाही. उदाहरणार्थ, जंजिरेकर सिद्दी स. १६४२ पर्यंत विजापूरकरांना जुमानत नव्हता. आदिलशहाने महत्प्रयासाने त्यांस आपली चाकरी बजावण्यास भाग पाडले. स. १६४६ पर्यंत कुडाळकर सावंतही विजपुरकरांकडे सामील झालेला नसल्याचा तर्क बांधता येतो. म्हणजेच कोकणात विजापूरकरांचा तितकासा जोर दिसत नव्हता. या प्रदेशातील मुळचे संस्थानिक नाममात्र मांडलिकत्व स्वीकारत होते व त्यावरच निजाम, आदिल वा मोगलांसारखे सत्ताधीश खुश होत असत. असो.

    शिवाजीने जावळी पालथी घालताच कोकणात उतरून तिकडून आदिलशाहीस चाप लावत आपल्या राज्यविस्तारास आरंभ केला. तेव्हा शिवाजीचा बंदोबस्त करण्याच्या हेतुस्तव आदिलशहाने स. १६५८ मध्ये रुस्तमेजमानला कुडाळवर स्वारी करण्यास पाठवले. रुस्तमने कुडाळकरांना चांगलेच रगडून काढले खरे, परंतु त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजीला होऊन पुढच्याच वर्षी --- म्हणजे स. १६५९ मध्ये कुडाळकर सावंताने शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारणारा पुढील तह पदरात पाडून घेतला :-

ले. १ ]                       [ श. १५८० फा. व. ७ 

(४११) ]                       [ ता. ५ मार्च १६५९

                     श्री

सन १०६८ फसली                   फेरीस्त नंबर

       तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे.                  कलम १

किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे.      कलम १

स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे.  कलम १

प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे.            कलम १

प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे.   कलम १

शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "

( संदर्भ ग्रंथ :- काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रें यादी वगैरे लेख

संपादक :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर. )       

    उपरोक्त तहाची चर्चा करण्यापूर्वी स. १६५६ च्या एका संदिग्ध पत्राचा येथे विचार होणे अत्यावश्यक आहे. पत्रसार संग्रह ले. क्र. ( २३२० = ७२० अ ) नुसार महंमद आदिलशहा खेम सावंतास लिहितो कि, " तुम्ही वडिलार्जित चाकरीवर आला, ठीक केले. कोणते तऱ्हेने राजा संभाजीशी ममता राखून मोगल याजबरोबर मैत्री न ठेवावी. बादशाही मुलखाची आबादानी करून कुमकेकरितां हुजूर फौजेत येणे. एक हुशार मनुष्य पाठवणे. " या पत्रातील राजा संभाजी कोण, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. कदाचित शिवाजी ऐवजी संभाजी असेही वाचन झाल्याची शक्यता आहे. परंतु यावर पुराव्याअभावी अधिक काथ्याकुट करता येत नाही. दुसरे असे कि, उपरोक्त पत्रान्वये स. १६५६ मध्ये सावंतही आदिलशहाला पूर्णतः रुजू नसल्याचे दिसून येते. बहुधा यामुळेच स. १६५८ च्या पूर्वार्धात विजापूरकरांनी कुडाळवर स्वारी पाठवली असावी. असो.

    यास्थळी हे देखील नमूद करणे योग्य ठरेल व ते म्हणजे स. १६५८ च्या ऑक्टोबर मध्ये शिवाजी कर्नाटक स्वारीत होता. परंतु त्याची मोहीम नेमकी कोणत्या भागात चालली होती याची स्पष्टता होत नाही. असो. आता आपण शिवाजी - कुडाळकरांमधील तहाची चर्चा करू. 

    या तहाच्या संदर्भात ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुखांनी अशा आशयाचं विधान केलंय कि, प्रस्तुत तह शिवाजीच्या स. १६६४ च्या कुडाळ स्वारी वेळी बनला असावा. परंतु आपल्या मताच्या पुष्टीकरता त्यांनी संदर्भ वा पुरावे दिले नाहीत. प्रस्तुत तहनाम्यावरील हा आक्षेप लक्षात घेऊन खरे जंत्री नुसार यांच्या तारखांचा तपास केला असता तारखांचा घोळ नसल्याचेही स्पष्ट होते. तेव्हा सदर तहनामा हा स. १६५९ चाच असल्याचे सिद्ध होत असले तरी काही बाबी निश्चितच संशयास्पद आहेत, ज्यांचे निरसन करण्यास आवश्यक ते पुरावे उपलब्ध झाले नाहीत.

    या तहातील एका कलमात बेद्नुर संस्थानच्या खंडणी वसुलीचा उल्लेख आहे. त्यावरून स. १६५९ मध्ये बेद्नुरकर शिवाजीचा मांडलिक असल्याचे दिसून येते. परंतु याला प्रत्यंतर पुराव्याची जोड, मला मिळाली नाही. त्याचप्रमाणे फोंड्याबाबतही तीच स्थिती आहे.

कुडाळकरांना आपल्या अंकित करून शिवाजीने कोकणात जशी आपली सत्ता विस्ताराली त्याचप्रमाणे कोकणातून कोल्हापूर - पन्हाळ्यावर झडप घालण्यासाठी त्याला एक सोयीस्कर मार्गही खुला झाला. पन्हाळ्याचा मजबूत किल्ला विजापूरच्या सरहद्दीच्या रक्षणाची मोठी भूमिका बजावत असल्याने पन्हाळा जिंकून विजापूरच्या उरात भाला खुपसण्याची इच्छा यावेळी कदाचित शिवाजीच्या मनी असल्याने त्याने या अनुषंगानेही कुडाळकरांना आपल्या पंखाखाली घेतले असावे. तसेच शिवाजी याच समयी आपलं नौदल उभारत असल्याने किनाऱ्यावरील चौल, वसई, गोव्यासारखी स्थळे व्यापणाऱ्या पोर्तुगीजांसारख्या प्रबळ युरोपियन सत्तेला धाकात ठेवण्यासाठीही कोकण किनारा, शक्य तितक्या सलग प्रमाणात त्यांस ताब्यात ठेवणे अत्यावश्यक होते. मिळून या स्वारीमुळे शिवाजीचे एकाहून अधिक हेतू साध्य होणार होते.

    या स्थळी एक प्रश्न उद्भवतो कि, यासमयी रुस्तमेजमान व विजापूरकर काय करत होते ? इतिहासकारांच्या मते रुस्तम व शिवाजीचा पूर्वापार मैत्रीसंबंध होता. त्याचा बाप रणदुल्लाखान हा शहाजीचा मित्र असून मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीतही चलला असल्याने रुस्तमने शिवाजीच्या कोकणातील प्रवेशाकडे सहेतुक दुर्लक्ष केले तर आदिलशाही दरबार यावेळी डचांकडून पैसा उकळून पोर्तुगीजांवर स्वारी करण्याच्या प्रयत्नांत होता. वस्तुतः अशी स्वारी होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी एक लक्षाचा नजराणा दरबारात भरला होता. परंतु डचांनी याहून अधिक मोठा नजराणा देऊ केल्याने आदिलशहाने हा सौदा स्वीकारला. याचं फलित म्हणजे मडगावजवळ त्याला मार खाऊन परत यावं लागलं. ( स. १६५९ ) असो.

    कुडाळकरांनी जरी शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारलं असलं तरी ते फार काळ त्यांस रुजू राहिले नाहीत. विजापूरकरांनी अफझलखानाची रवानगी शिवाजीवर करताच कुडाळकरांनीही लगेच रंग बदलला असा पसासं ले. क्र. ( २३२१ = ७७१ अ ) स. १६५८ - ५९ मधील " घाटाचे पायाखालील तमाम परगणे इनाम दिले. जमाबंदी करणे. वाजवी वसूल घेणे. आदलखान अमलांत हिंदवीत लिहिल्याप्रमाणे मसुरा वगैरे १३ गावे हक्कासह इनाम दिली. घाटावरून फौजा येतील तेव्हा हजर राहणे. रहदारीस हरकत न होईसा बंदोबस्त करणे. " या मजकुरावरून तर्क करता येतो. परंतु सदर पत्राची निश्चित तारीख उपलब्ध नसल्याने यावर अधिक चर्चा अशक्य आहे.

    शिवाजीची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार --- अफझलखान याकामी नेमला.

    अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाही सरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !

    शिवाजीवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा --- विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजीचं अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजीवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंग तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश देऊ केल्याने --- जो सध्या शिवाजीच्या ताब्यात होता --- तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल - शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी - आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.

    विजापूरकरांनी शिवाजीवरील स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजीकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक - अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.

    उदाहरणार्थ, अफझलखानाची शिवाजीवरील मोहिमेसाठी नियुक्ती जरी एप्रिल - मे मध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात तो स्वारीकरता विजापुरातून सप्टेंबर मध्ये बाहेर पडला. परंतु तत्पूर्वीच शिवाजीला त्याच्या हालचालींची आगाऊ वार्ता लागली होती. इतिहासकार सांगतात, समजतात त्याप्रमाणे शिवाजीच्या अनुरोधाने खानाच्या हालचाली होऊन तो जावळीत शिरला. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. जावळीकर मोऱ्यांचा एक वंशज -- प्रतापराव मोरे विजापूरच्या आश्रयास असून विजापूरकरांच्या सहाय्याने त्यांस आपलं गमावलेलं राज्य मिळवण्याची मोठी आशा वाटत होती. प्रतापराव व त्याचे सैन्य त्या प्रांताचे माहितीगार असल्याने, तो प्रांत नुकताच शिवाजीकडे नुकताच आल्याने व वाईकडचा सरसुभेदार म्हणून खानाची नियुक्ती झालेली असल्याने अफझलखानाच्या स्वारीचा मुख्य रोख जावळी प्रांताकडेच असल्याचे शिवाजीने ताडले होते व अफझलही जवळपास याच आराखड्यांनी चालला होता. ( मूळ सिद्धांत शिवचरित्र निबंधावलीत असून शब्दांकन माझे असल्याची नोंद घ्यावी. )

    खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजीने दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजीने जशी बचावाची सिद्धता चळवळी --- ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ' मोहनगड ' असे नामांतर करून तो वसवण्याची त्याने तजवीज केली --- त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात -- तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजीच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.

    या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजीने या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला --- म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजीच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजीला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.

    वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजीच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजीचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास खानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवाजीने काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने --- विशेषतः आदिलशहाने शिवाजी विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिव्जीला सामील झालेल्या व त्याच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !

    वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय - लष्करी मोहीम शिवाजीविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजीने शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजीच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती. तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजीने तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली.

    खानाच्या हेतूंची शिवाजीस कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य -- म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी --- यांची त्याने खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी व त्याचे सहाय्यक जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे न यावा अशी शिवाजीचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजीने स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.

    त्याने प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजीने पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची त्याने भूमिका त्याने स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्याने आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !    

    शिवाजीच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.

    वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.

ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजीने चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्याचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्याने विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजीला पुरेपूर जाणीव होती.

    इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीस जाताना बरोबर जी माणसे सोबत घेण्याची मर्यादा होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मनुष्यबळ त्याच्या समवेत होतं. त्यात बंदुकधारी पथकाचाही समावेश होता.

    शिवाजी - खानाच्या या ज्या काही चाल्चाली होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजीची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजीच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता - पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजीने माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच तो मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजीचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजीचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजीची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?

 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वस्त होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजीला पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजीचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजीनेही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.

    उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजीने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले.  

    खानाचा काटा काढल्यावर शिवाजी गडावर परतला व इशारतीची खुण होताच त्याच्या सरदारांनी खानाच्या छावणीवर हल्ला चढवला. आरंभी बेसावध असलेली खानाची छावणी नंतर सावरून लढू लागली तरी सेनापतीच्या मृत्यूची बातमी व शत्रूचा हल्ला, दोन्ही लागोपाठ आल्याने त्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम होऊन काही वेळाने शरणागती स्वीकारत त्यांनी आपला बचाव केला.

    प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजीचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्याच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजीची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्याच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू - मित्रांवर त्याचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू --- आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजीने आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्याची पथके चंदन - वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टीच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा मोठा आघात होता ! 

शिवाजी - अफझलखान भेट

                             
                        
      
अफझलखानाची स्वराज्यावरील स्वारी, दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड येथे त्याची व शिवाजीची झालेली भेट आणि त्या भेटीत झालेला खानाचा मृत्यू इ. घटना मराठी इतिहास वाचक व अभ्यासकांच्या अतिशय परिचयाच्या आहेत. प्रस्तुत लेखामध्ये अफझलखान वधाची किंवा शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीची चिकित्सापुर्वक चर्चा करण्याचा हेतू आहे. वस्तुतः या विषयावर अनेकांनी अनेक अंगांनी विविध भाषेतील अव्वल, दुय्यम व तिय्यम साधनांच्या आधारे विपुल लेखन केले आहे. तेव्हा प्रस्तुत लेखक आता आणखी काय दिवे लावणार अशी वाचकांच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे ! परंतु, स्वराज्य संस्थापक शिवाजीचे चरित्र इतके अद्भुत घटनांनी भरले आहे कि कितीही निग्रह केला असता शिवाजीच्या चरित्रावर किंवा त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या काही घटनांवर निदान चार ओळी तरी खरडण्याचा  मोह सर्वांनाच होतो आणि प्रस्तुत लेखक देखील त्यास अपवाद नाही !
                  
विजापूर दरबाराने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी अफझलखानाची का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये निवड केली याची कारणे सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा त्यांची तपशीलवार चर्चा न करता त्या कारणांचा थोडक्यात येथे आढावा घेतो. स. १६५८-५९ च्या सुमारास शिवाजीचे लष्करी सामर्थ्य, विजापूरच्या तुलनेने अधिक वाढले होते किंवा त्याच्या बरोबरीचे बनले होते. शिवाजीसोबत खुल्या मैदानात टक्कर  देण्याची ताकद आता आदिलशाहीत तितकीशी राहिली  नव्हती. वर्षानुवर्षे चालणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या आणि निजामशाही, कुतुबशाही व मोगल तसेच कर्नाटकातील लहान - मोठ्या सत्ताधीशांशी वारंवार झुंजण्यात आदिलशाहीचे बरेच नुकसान झाले होते. एकेकाळी असलेला तिचा रुबाब, सामर्थ्य आता पार मोडकळीस आले होते. विजापूरच्या तुलनेने शिवाजीच्या राज्याचा विस्तार जरी लहान असला तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत शिवाजीची तयारी विजापूरकरांच्या तुलनेने अधिक होती. उदाहरणार्थ शिवाजीवरील नियोजित स्वारीत अफझलखानाचे लष्कर  घोडदळ   व पायदळ मिळून सुमारे वीस - पंचवीस हजार इतके होते तरीही आदिलशाही दरबाराने अफझलखानास शिवाजीसोबत प्रत्यक्ष लढाई न देता शक्यतो त्यास भेटीच्या निमित्ताने बोलावून दगा करण्याचा कानमंत्र दिल्याचे उल्लेख मिळतात. यावरून असे दिसून येते कि, यावेळी शिवाजीचे लष्करी सामर्थ्य बरेच वाढले होते. सभासद बखरीचा आधार घेतला असता या मोहिमेच्या वेळी खानाइतकेच सैन्य शिवाजीच्या पदरी होते. परंतु या सैन्यात गड - किल्ल्यांवर असलेल्या शिबंदीचा अंतर्भाव केला आहे कि नाही याची निश्चिती होत नाही. असे असले तरी शिवाजी आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा फरक होता व तो म्हणजे त्याचे सैन्य हे खडे सैन्य असून त्यावर प्रत्यक्ष शिवाजीची हुकुमत चाले !  त्याउलट तत्कालीन सत्ताधीशांकडे असे खडे सैन्य तुलनेने कमी असे. मोहीम किंवा युद्धप्रसंग उद्भवल्यास पदरी असलेल्या जहागीरदारांकडून लष्करात खोगीरभरती केली जात असे. या बाबतीत अफझलखानाची फौज देखील अपवाद नव्हती. शिवाजीचे राज्य लहान असल्याने व पदरी बलाढ्य लष्कर असल्यामुळे या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्याला वर्षभर शत्रूप्रदेशात मोहिमा आखाव्या लागत. सधन प्रदेशात लूटमार कारणे किंवा खंडणी गोळा करणे या दोन मार्गांनी शिवाजी आपल्या सैन्याचा बव्हंशी खर्च भागवत असे. याठिकाणी हे नमूद कारणे योग्य होईल कि, पूर्णवेळ पगारी सैन्य पदरी बाळगण्याची आर्थिक ताकद शहाजीमध्ये असल्यामुळेच शहाजीला एकाचवेळी मोगली आणि विजापुरी फौजांचा सामना करून पेमगीरीवर निजामशाहीची उभारणी करता आली होती !
                  विजापूर दरबाराने शिवाजीवरील नियोजित स्वारीसाठी अफझलखानाचीच का निवड केली असावी ? ' शककर्ते शिवराय ' या शिवचरित्राचे लेखक श्री. विजय देशमुख यांच्या मते त्यावेळी एक अफझलखान अपवाद केल्यास विजापूर दरबारी आता कोणी पराक्रमी, स्वामिनिष्ठ व शूर असा सेनानी राहिला नव्हता.
उपलब्ध साधनांतील माहिती पाहता देशमुख यांचे मत अगदीच चुकीचे नसल्याचे दिसून येते. अफझलखान विजापुरातून रवाना झाल्याची बातमी शिवाजीला त्याच्या हेरांकडून मिळाली असे म्हणता येईल. तसेच खानाच्या अंतस्थ हेतूंची कल्पना विजापूर दरबारातील शिवाजीच्या मित्रांनी कळवली असण्याची अधिक शक्यता आहे. त्याशिवाय मोहिमेची सूत्रे हाती घेताच आदिलशहाने व अफझलखानाने मावळातील देशमुख - वतनदारानंना जी काही आज्ञापत्रे पाठवली त्यातील भाषा पाहता खान शिवाजीचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे दिसून येते.
                
  इकडे अफझलखानाचा काटा कोणत्याही परिस्थिती काढण्याचा बेत शिवाजीने मनोमन पक्का केल्याचे दिसून येते. कदाचित खानाला मारून टाकण्याची योजना आरंभापासून त्याच्या मनात नसेल पण त्याचा एकदा सडकून समाचार घेण्याची / पराभव करण्याची इच्छा शिवाजीच्या मनात नसेल असे म्हणता येत नाही. अर्थात, खानाचे भोसले घराण्याशी असलेले वैर, विजापूर दरबारातील त्याचे प्रस्थ आणि त्या दरबाराचे त्याच्यावर अवलंबून असणे व शिवाजीचे तिशीच्या आतील वय लक्षात घेता शिवाजीची इच्छा त्याच्या वयानुरूप अशीच होती. 
              
शिवाजी - अफझलखान प्रकरणाचे साधार विश्लेषण श्री. विजय देशमुख यांनी आपल्या ' शककर्ते शिवराय ' या ग्रंथात केले आहे. ज्यांना या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घ्यायचे आहेत अशा जिज्ञासू वाचकांनी त्या ग्रंथाचे वाचन करावे. श्री. देशमुख यांच्या मते, खान आरंभी जावळीमध्ये उतरण्यास तयार नव्हता. उलट शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. परंतु पुढे राजकीय परिस्थती इतक्या झपाट्याने बदलली कि खानालाच जावळी प्रांतात उतरणे भाग पडले. देशमुखांनी आपल्या निष्कर्षासाठी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून त्यांचे मत यथायोग्य असल्याचे दिसून येते. कित्येक इतिहासकारांचे देखील देशमुखांप्रमाणेच मत असल्याचे दिसून येते.
                 विजय देशमुख आणि इतर इतिहासकारांचे मत काहीही असले तरी मला जी काही साधने उपलब्ध झाली, त्यांच्या अभ्यासावरून माझा निष्कर्ष हा वेगळाच आहे.
विजापुरातून खान जेव्हा बाहेर पडला तेव्हाच त्याला खुल्या मैदानात किंवा सोयीच्या ठिकाणी घेरून त्याचा नाश करण्याचा शिवाजीचा आरंभीचा बेत होता. परंतु, ' अफझलखान ' या नावाचा दरारा असा होता कि, शिवाजीच्या मुत्सद्द्यांनी, सरदारांनी शिवाजीच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. खानाशी लढाई न करता तहाच्या वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा असे शिवाजीच्या सल्लागारांचे मत होते. त्यामुळे शिवाजीने आपला मूळचा लढाईचा बेत बदलून नवीन डाव टाकला. याविषयी सभासद बखरीमधील उल्लेख मननीय आहे. या बखरीनुसार खान विजापुरातून बाहेर पडला तेव्हाच शिवाजीने त्याला जावळीमध्ये घेरण्याचे ठरवले होते परंतु त्याच्या सल्लागारांनी लढाईच्या विपरीत सल्ला दिल्याने शिवाजीने तो बेत रद्द केला. पुढे भवानीमातेचा त्याला दृष्टांत झाला व हे वर्तमान सर्व मुत्सद्द्यांना समजल्यावर त्यांना एकप्रकारे मानसिक बळ प्राप्त झाले व जावळीमध्येच खानाचा निकाल लावण्याच्या शिवाजीच्या बेतास त्यांनी संमती दिली.
                   
येथून पुढच्या घटनांची सर्वांनाच माहिती आहे. तेव्हा आता शिवाजी - अफझलखान यांच्या भेटीत नेमके काय झाले असावे याच्या चर्चेस आता आरंभ करतो. पण तत्पूर्वी अशी भेट घडून येण्याआधी शिवाजीने कशाप्रकारची खबरदारी घेतली होती याची थोडक्यात माहिती देतो.
               
अफझलखानास मारून टाकण्याची शिवाजीची इच्छा आरंभापासून होती किंवा नव्हती पण, जावळीमध्ये जेव्हा खानाला येण्यास भाग पाडण्याचे ठरले तेव्हाच खानाचा काटा काढण्याचे शिवाजीने नक्की केले होते. या दृष्टीने सभासद बखरीत पंताजी गोपीनाथ व शिवाजी यांचा जो संवाद आलेला आहे तो सूचक आहे. हा संवाद जसाच्या तसा घडला नसला तरी खानाचा निकाल लावण्याचे शिवाजीने आधीच नक्की केले असल्याचे यातून दिसून येते. त्याशिवाय सभासद बखरीमध्ये ज्या पद्धतीने हा संवाद आला आहे तो विकृत पद्धतीने आल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रसंगी पंताजी गोपीनाथ हा अनुभवी मुत्सद्दी असून शिवाजी हा वयाने अगदीच तरुण व काहीसा अननुभवी असा आहे. अशा परिस्थितीमध्ये पंताजीसारखा अनुभवी मुत्सद्दी शिवाजीला, खानास एकांगी करून मारण्याचा सल्ला देईल का ? उलट, खानाची प्रत्यक्ष भेट न घेता त्यास हर प्रयत्ने दगा करण्याचाच सल्ला त्याने शिवाजीस दिला असता. परंतु, सभासद बखरीत काही वेगळेच दिसून येते. माझ्या मते, तत्कालीन राजकीय व सामाजिक समजुतींचा या संवादावर प्रभाव असावा.   
                      
सुमारे बारा हजार निवडक सैन्यासह अफझलखान अखेर जावळीत उतरला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास दीड - दोन कोसांच्या अंतरावर पार गावनजीक कोयना नदीच्या काठी खानाच्या फौजेचा तळ पडला. खानाची फौज जावळीत येण्यापुर्वीच शिवाजीने आपल्या लष्कराचा पेरा केला होता. त्यानुसार कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बालाजी शिळमकर याची नेमणूक करण्यात आली होती. प्रतापगडाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराजपंत रांझेकर व त्रंबक भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी पालकर यास जावळी व वाईच्या दरम्यान घाटमाथा सांभाळण्यास सांगितले होते. प्रसंगी वाई येथील अफझलखानाच्या मुख्य छावणीवर चालून जाण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. भेटीच्या प्रसंगी खानाची फौज प्रतापगडावर जर चालून आली तर तिला रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुखांवर सोपवण्यात आली. तसेच  वेळप्रसंगी शिवाजीला मदत करण्याची जबाबदारी देखील कान्होजी जेधेवर टाकण्यात आली होती. याखेरीज भेट झाल्यावर गडावर तोफांच्या इशारतीचे आवाज करण्यात येतील. तोफेचा आवाज ऐकताच सर्वांनी  खानाच्या छावणीवर हल्ला करावा अशी आज्ञा देखील शिवाजीने आपल्या सरदारांना दिलेली होती.  शिवाजीने आपल्या लष्कराची जी काही रचना केली होती ती पाहता, कोणत्याही परिस्थितीमध्ये खानाच्या सैन्याला बचाव करण्याची संधी मिळू न देण्याची त्याने खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. एकूण, नुसता खानच नाही तर त्याच्या लष्कराला देखील बुडवण्याची त्याने पुरेपूर तयारी केली होती. खानाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचे दिसून येते.    
                    
प्रतापगडाजवळ छावणी केल्यावर खानाने शिवाजीला आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु, शिवाजीने पंताजी गोपीनाथच्या मार्फत खानालाच प्रतापगडावर येण्यास भाग पाडले. तेव्हा दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या माचीवर दुपारच्या वेळी शिवाजीच्या भेटीस जाण्यासाठी खान तयार झाला. त्यानुसार भेटीचे तपशील देखील आगाऊ ठरवण्यात आले.  भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी दोन हुद्देदार ( शस्त्रवाहक, मानकरी ) सोबत हजर असणार होते. तसेच दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून ते बाणाच्या टप्प्याइतक्या अंतरावर ते उभे असणार होते.
                       
भेटीचा सर्व तपशील ठरल्यावर आणि त्यानुसार वागण्याचे खानाने मान्य केल्यावर शिवाजी पुढील तयारीस लागला. भेटीच्या वेळी सोबत दोन हुद्देदार असणार होते पण अशा प्रसंगी सामान्य मानकरी जवळ बाळगण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. पट्टा चालवण्यात सराईत असलेल्या जिवा महाल यास त्याने आपल्या सोबत घेण्याचे नक्की केले. तसेच संभाजी कावजी याची देखील आपल्या सोबत येण्यासाठी निवड केली. संभाजी कावजी हा अंगबळाच्या बाबतीत अफझलखानाच्या तोडीचा होता असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. याशिवाय वैयक्तिक बाबतीत देखील शिवाजीने बरीच खबरदारी घेतल्याचे दिसून येते. भेटीच्या दिवशी पोशाख करताना त्याने मुद्दाम अंगामध्ये चिलखत चढवले होते.  उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा / कट्यार लपवली होती. अर्थात, खानाचा विश्वासघातकी स्वभाव शिवाजीच्या परिचयाचा असल्याने त्याने अशी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते पण ते अर्धसत्य आहे. खानाच्या छावणीभोवती शिवाजीच्या सैन्याचा पडलेला विळखा लक्षात घेता आणि खुद्द खानास त्याने प्रतापगडाच्या माचीवर भेटीस येण्यासाठी भाग पडणे याच अर्थ उघड आहे. आरंभापासूनच खानासोबत कसे वागायचे याविषयीचे धोरण शिवाजीने निश्चित केले होते.
                
भेटीच्या दिवशी अफझलखानाला प्रतापगडावर आणण्यासाठी शिवाजीने पंताजी गोपीनाथास पाठवले. पंत ज्यावेळी खानाकडे गेला तेव्हा खान तयार होऊन बसला होता. अशा राजकीय भेटींची खानाला सवय होती. अशा भेटींमध्ये दगाबाजी करण्यात आजवर तो यशस्वी झाला  असल्यामुळे अंगावर शस्त्रे लपवणे, भेटीच्या अटींची पायमल्ली करणे इ. किरकोळ बाबी त्याने त्या दिवशी देखील करण्यास आरंभ केला होता. आधी ठरल्यानुसार सोबत वकील, दोन मानकरी आणि दहा अंगरक्षक नेण्याचे अफझलखानाने मान्य केले असले तरी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दीड हजार बंदुकधारी पायदळ सोबत नेण्याची त्याने तयारी चालवली होती. परंतु, पंताजी गोपीनाथ सावध असल्यामुळे खानाचा हा बेत फसला. पुढे प्रतापगडाच्या माचीवर गेल्यावर नियोजित ठिकाणी त्याचे नऊ अंगरक्षक उभे राहिले तर दहावा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा मात्र खानाच्या सोबत भेट ठरलेल्या तंबूमध्ये घुसला. अर्थात, खानाच्या संमतीनेच हे सर्व घडले होते आणि खानाच्या बरोबर आधी निश्चित केलेल्या हुद्देदारांपेक्षा एकजण अधिक आहे हे पंताजी गोपीनाथच्या लक्षात आले नाही !  
                         
अफझलखान प्रतापगडाच्या माचीवर दाखल होताच शिवाजी गडावरून खाली आला, पण तो तडक  भेट ठरलेल्या ठिकाणी न जाता बराचसा अलीकडेच थांबला व पंताजी गोपीनाथास त्याने बोलावून घेतले. किंवा असेही म्हणता येईल कि शिवाजीला आणण्यासाठी पंताजी गोपीनाथ यावेळी तंबूतून बाहेर आला होता. असो, यावेळी शिवाजीने अफझलखानाविषयी पंताजी गोपीनाथकडे अधिक माहिती विचारले असेल किंवा पंताजी गोपीनाथने त्यास अफझलखानाच्या कारवायांची कल्पना दिली असावी.
                
एकूण, अफझलखानाने भेटीसाठी ज्या काही अटी मान्य केल्या होत्या त्यांना मोडण्यास पद्धतशीरपणे आरंभ केल्याचे शिवाजीच्या लक्षात आले व त्यामुळे तो अधिक सावध झाला. खानाच्या भेटीसाठी पुढे जाण्याआधी त्याने सहजपणे म्हणा किंवा अधिक चौकसपणे, पण पंताजीला विचारले कि, तंबूमध्ये खानासोबत आणखी कोण आहे ? यावेळी गोपीनाथला आठवण झाली कि, खानाने आपल्यासोबत एक मानकरी अधिक आणला आहे. तेव्हा शिवाजीने प्रथम खानासोबत आलेल्या अतिरिक्त हुद्देदारास बाहेर काढण्याची कामगिरी पंताजी गोपीनाथवर सोपवली. सभासद बखरीमध्ये सय्यद बंडाचा उल्लेख येत असला तरी जेधे शकावली किंवा जेधे  करीनामध्ये या सय्यद बंडाचा नामोल्लेख येत नाही. शिवाजीच्या आज्ञेनुसार पंताजी गोपीनाथ पुढे गेला व खानास  सांगून त्याने सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद यास तंबूतून बाहेर काढून ज्या ठिकाणी खानाचे उर्वरीत ९ अंगरक्षक उभे होते तिकडे पाठवून दिले. या ठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे व ते म्हणजे खानाच्या  सोबत जो वकील होता त्याचे नाव कृष्णाजी  भास्कर असल्याचा  उल्लेख जेधे शकावली, जेधे करीना मध्ये येत नाही. तसेच या भेटीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्करने शिवाजीवर शस्त्र उचलल्याचा उल्लेख जेधे शकावली मध्ये किंवा सभासद बखरीत न येता जेधे करीन्यामध्ये येतो.  पण त्यात कृष्णाजी भास्कर असे वकिलाचे नाव न येत ' हेजीब ' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. श्री. विजय देशमुख  यांनी दिलेल्या  माहितीनुसार वाईच्या यादी नाम्यात शिवाजीने कृष्णाजी भास्कर यास पट्ट्याने मारल्याचा उल्लेख येतो.
                
शिवाजी - अफझलखान यांची भेट :- सभासद बखरीमध्ये शिवाजी व अफझल यांच्या   भेटीचे जे वर्णन आलेले आहे किंवा जेधे करीन्यात उभयतांच्या भेटीची जी  माहिती  आलेली  आहे ती  सर्वांनी  जवळपास  जशीच्या तशी गृहीत धरलेली आहे. परंतु अधिक विचार केला असता असे दिसून येते कि, जेधे करीना मध्ये किंवा सभासद आणि तत्सम बखरीत जी काही या घटनेची वर्णने आलेली आहेत ती कपोलकल्पित आणि अतिरंजित अशा स्वरूपाची आहेत. वस्तुतः जेधे करीना किंवा सभासद बखर  सांगते त्यानुसार शिवाजी आणि अफझलखान यांची प्रत्यक्ष अशी गळाभेट झालीच  नाही ! 
            
शिवाजी आपल्या दहा अंगरक्षकांच्या सोबत नियोजित स्थळी आला. ठरवून दिलेली जागी त्याचे दहा अंगरक्षक उभे राहिले आणि दोन हुद्देदारांसह, म्हणजेच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांच्या संगतीने शिवाजी खानाच्या भेटीसाठी तंबूध्ये शिरला. शिवाजी तंबूध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजीने देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे  सोपवली. शिवाजी आणि अफझल यांच्याकडे जी छुपी शस्त्रे होती, कट्यार / बिचवा, त्यांचा मारा करण्यासाठी उभयतांना एकमेकांच्या निकट, निदान काही अंतरापर्यंत तरी, येणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्याने आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजीचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजीवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी मागे सरकला. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला आणि त्याबरोबर त्याचे मानकरी सावध झाले व  शिवाजीच्या दिशेने शस्त्रे उपसून धावले. परंतु, ते शिवाजीच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तंबूमध्ये हा गोंधळ सुरु होता त्यावेळी पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे काय करत होते ?
      
तत्कालीन प्रघातानुसार राजकीय बोलाचालींसाठी वकील म्हणून जाणारी व्यक्ती जवळ शस्त्र बाळगत असली तरी ती शस्त्र चालवण्यात कुशल असतेच असे नाही. शिवाजी व अफझलखानाच्या भेटीच्या प्रसंगी पंताजी गोपीनाथ आणि  कृष्णाजी भास्कर हे दोघे,  दोन दरबाराचे वकील म्हणून हजर होते. यापैकी कृष्णाजी भास्कर याने या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण त्यात त्याचे नाव न येत वकील या अर्थी हेजीब या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. अर्थात, देशमुख यांनी आपल्या ग्रंथात दिलेल्या महितीनुसार कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा  जो उल्लेख आहे तो खरा न मानण्याचे  काही कारण दिसत  नाही. कृष्णाजी भास्करने आपल्या जवळील कट्यार सदृश्य शस्त्राने किंवा तलवारीने शिवाजीवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ शिवाजीने त्यावर  हत्यार  चालवले असे उपलब्ध माहितीवरून  म्हणता येते. पंताजी गोपिनाथने  देखील या संघर्षात थोडाफार सहभाग घेतला असावा. कारण तो जखमी झाल्याचा  उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण सभासद बखर व जेधे शकावली याविषयी मौन बाळगून आहेत. यावरून निश्चित असे काही सांगणे अवघड असले तरी  ज्याअर्थी कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून मारला गेल्याचा अस्सल साधनात उल्लेख आहे त्याअर्थी पंताजी गोपीनाथने या संघर्षात थोडाफार सक्रीय सहभाग घेतला होता असे म्हणता येते.
              
इकडे शिवाजीने खानास जखमी केले त्यावेळी खान शिवाजीला धक्का  देऊन किंवा शिवाजी दूर झाल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन तंबूतून बाहेर पडला. जखमी अवस्थेत खानाला तंबूतून बाहेर  पडताना पाहताच त्याचे अंगरक्षक तंबूच्या दिशेने धावून गेले. त्याच वेळी शिवाजीचे अंगरक्षक देखील खानाच्या अंगरक्षकांच्या रोखाने चालून गेले व तंबूच्या बाहेर त्यांची झुंज सुरु झाली. बाहेर हातघाईची लढाई सुरु झाली असताना आतमध्ये देखील जोरदार धुमश्चक्री चालू होती. खानाचा वकील शिवाजीवर चालून आला तेव्हा पंताजी गोपीनाथ त्याच्या मदतीस गेला. दरम्यान जिवा महाल व संभाजी कावजीने खानाच्या हुद्देदारांचा पुरता निकाल लावला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजीला वाचवण्याच्या प्रयत्नात पंताजी गोपीनाथ जखमी झाला. तेव्हा शिवाजीने हाती असलेल्या कट्यारीच्या सहाय्याने किंवा जिवा महालकडून पट्टा घेऊन कृष्णाजी भास्करला कापून काढले.  खानाचे सर्व साथीदार मारले गेल्यावर शिवाजी पंताजी गोपीनाथ, जिवा महाल व संभाजी कावजी यांच्यासह तंबूतून बाहेर पडला आणि गडाच्या दिशेने निघून गेला. दरम्यानच्या काळात खानाचे दहा अंगरक्षक शिवाजीच्या सैनिकांकडून मारले गेले किंवा जखमी अवस्थेत पळून गेले. इकडे खान जेव्हा जखमी अवस्थेत बाहेर पडला तेव्हा काही अंतरावरच त्याची पालखी उभी होती. जखमी खानाचा पालखीत बसून छावणीकडे  जाण्याचा विचार होता. परंतु, शिवाजीच्या सैनिकांनी पालखीच्या भोयांवर हल्ला चढवल्यामुळे किंवा शिवाजी आणि अफझलखानाच्या अंगरक्षकांची हातघाईची लढाई सुरु झाल्यामुळे ते उधळले गेले. अफझलखान जखमी अवस्थेत तिथेच पडून राहिला.  अफझलखानाचे मस्तक संभाजी कावजीने कापल्याचा उल्लेख जेधे शकावली किंवा करीन्या मध्ये येत नाही. माझ्या मते शिवाजीच्या सैनिकांनी खानाचे शीर कापून गडावर नेले असावे. कारण, संभाजी कावजी अशा प्रसंगी शिवाजीला एकटा सोडून खानाचे मुंडके मारण्यासाठी वेड्यासारखा बाहेर धावेल हे संभवत नाही. पुढे शिवाजी गडावर पोहोचल्यावर तोफांची इशारत झाली आणि पाठोपाठ खानच्या कोयनेकाठच्या बेसावध छावणीवर मराठी फौज चारी बाजूंनी तुटून पडली.
                        
संदर्भ ग्रंथ :-
(१) जेधे शकावली
(२) जेधे करीना
(३) शिव छत्रपतींचे चरित्र ( सभासद बखर ) :- कृष्णाजी अनंत सभासद
(४) श्री शिव छत्रपती ९१ कलमी बखर
(५) श्री शिव छत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र :- मल्हार रामराव चिटणीस
(६) शककर्ते शिवराय :- विजय देशमुख 



 स. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.
    या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा --- यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा --- मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंग घेत असल्याचे दिसून येते. असो.
    औरंगने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी - आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल - आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजीचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा --- विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचं झगडा जुंपणे अपरिहार्य होते.

शिवाजीची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार --- अफझलखान याकामी नेमला.
    अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाही सरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !
    शिवाजीवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा --- विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजीचं अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजीवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंग तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश देऊ केल्याने --- जो सध्या शिवाजीच्या ताब्यात होता --- तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल - शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी - आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.
    विजापूरकरांनी शिवाजीवरील स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजीकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक - अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.
    उदाहरणार्थ, अफझलखानाची शिवाजीवरील मोहिमेसाठी नियुक्ती जरी एप्रिल - मे मध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात तो स्वारीकरता विजापुरातून सप्टेंबर मध्ये बाहेर पडला. परंतु तत्पूर्वीच शिवाजीला त्याच्या हालचालींची आगाऊ वार्ता लागली होती. इतिहासकार सांगतात, समजतात त्याप्रमाणे शिवाजीच्या अनुरोधाने खानाच्या हालचाली होऊन तो जावळीत शिरला. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. जावळीकर मोऱ्यांचा एक वंशज -- प्रतापराव मोरे विजापूरच्या आश्रयास असून विजापूरकरांच्या सहाय्याने त्यांस आपलं गमावलेलं राज्य मिळवण्याची मोठी आशा वाटत होती. प्रतापराव व त्याचे सैन्य त्या प्रांताचे माहितीगार असल्याने, तो प्रांत नुकताच शिवाजीकडे नुकताच आल्याने व वाईकडचा सरसुभेदार म्हणून खानाची नियुक्ती झालेली असल्याने अफझलखानाच्या स्वारीचा मुख्य रोख जावळी प्रांताकडेच असल्याचे शिवाजीने ताडले होते व अफझलही जवळपास याच आराखड्यांनी चालला होता. ( मूळ सिद्धांत शिवचरित्र निबंधावलीत असून शब्दांकन माझे असल्याची नोंद घ्यावी. )
    खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजीने दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजीने जशी बचावाची सिद्धता चळवळी --- ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ' मोहनगड ' असे नामांतर करून तो वसवण्याची त्याने तजवीज केली --- त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात -- तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजीच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.
    या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजीने या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला --- म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजीच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजीला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.
    वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजीच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजीचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास खानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवाजीने काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने --- विशेषतः आदिलशहाने शिवाजी विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिव्जीला सामील झालेल्या व त्याच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !
    वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय - लष्करी मोहीम शिवाजीविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजीने शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजीच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती. तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजीने तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली.
    खानाच्या हेतूंची शिवाजीस कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य -- म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी --- यांची त्याने खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी व त्याचे सहाय्यक जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे न यावा अशी शिवाजीचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजीने स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.
    त्याने प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजीने पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची त्याने भूमिका त्याने स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्याने आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !   
    शिवाजीच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.
    वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.
ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजीने चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्याचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्याने विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजीला पुरेपूर जाणीव होती.
    इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीस जाताना बरोबर जी माणसे सोबत घेण्याची मर्यादा होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मनुष्यबळ त्याच्या समवेत होतं. त्यात बंदुकधारी पथकाचाही समावेश होता.
    शिवाजी - खानाच्या या ज्या काही चाल्चाली होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजीची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजीच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता - पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजीने माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच तो मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजीचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजीचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजीची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?
 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वस्त होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजीला पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजीचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजीनेही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.
    उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजीने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले. 
    खानाचा काटा काढल्यावर शिवाजी गडावर परतला व इशारतीची खुण होताच त्याच्या सरदारांनी खानाच्या छावणीवर हल्ला चढवला. आरंभी बेसावध असलेली खानाची छावणी नंतर सावरून लढू लागली तरी सेनापतीच्या मृत्यूची बातमी व शत्रूचा हल्ला, दोन्ही लागोपाठ आल्याने त्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम होऊन काही वेळाने शरणागती स्वीकारत त्यांनी आपला बचाव केला.
    प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजीचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्याच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजीची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्याच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू - मित्रांवर त्याचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू --- आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजीने आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्याची पथके चंदन - वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टीच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा मोठा आघात होता ! 
 

 स. १६५९ च्या अफझल प्रकरणानंतर शिवाजीने आदिलशाही प्रदेशात चढाईचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सैन्याचे दोन भाग करत एक मोठी तुकडी घेऊन तो पन्हाळ्यास निघून गेला तर दुसरी कोकणातून खाली दक्षिणेला राजापूरपर्यंत गेली. या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या नाव जरी मिळत नसले तरी दोरोजी म्हणून एक अधिकारी या मोहिमेत सहभागी असून त्याने राजापूर पर्यंत धडक मारल्याचे स्पष्ट होते. कोकणातील या स्वारीचे मुख्य प्रयोजन म्हणजे अफझलच्या आगमनामुळे दक्षिण कोकणातील शिवाजीचे जे अंकित संस्थानिक विजापूरकरांना पुन्हा एकदा रुजू झाले होते, त्यांना नरम करणं हे होय. घाटावर पसरलेल्या इतर तुकड्यांच्या मानाने कोकणातील सैन्य जरी फार मोठं नसलं तरी या मोहिमेत शिवाजीच्या एका राजकीय मुत्सद्देगिरीची, राजकारणाव्यतिरिक्त मैत्रीचीही एक बाजू होती. विजापुरी सरदार रुस्तमजमान हा शिवाजीचा मित्र. त्याच्या हुकेरीच्या जहागिरीला लागूनच बांदा, कुडाळ, वाडी व देवगड तसेच आचरे हि स्थळे असून कुडाळ, वाडी प्रांत देसाई लखम सावंताचा होता. नजीकचे वेंगुर्ला बंदर विजापुरी सरदार खवासखानाच्या अंमलाखाली होते. आचरे हे संस्थान विजापूरचे मांडील होते. म्हणजे उत्तरेतून येणारे शिवाजीचे सैन्य व राजापूरपर्यंतचा प्रदेश जहागिरीदाखल कमवून बसलेला रुस्तम यांच्या एकप्रकारे चिमट्यात विजापुरी मांडलिक, बंदरे अडकली होती.
    शिवाजीच्या कोकणातील हालचालींकडे शक्य तो दुर्लक्ष करणे हा रुस्तमचा वर्तनक्रम म्हणा वा त्याच्या धोरणाचा भाग असल्याने शिवाजीनेही आपल्या सरदारांना रुस्तमच्या प्रदेशास उपद्रव न देण्याची ताकीद दिली होती. याचा परिणाम म्हणजे शिवाजीचं सैन्य कुडाळ पर्यंत येऊन धडकलं व तो भाग त्यांनी ताब्यात घेण्यास आरंभ केला. लखम सावंताने यावेळी इतर लहान मोठ्या संस्थानिकांची मदत घेऊन शिवाजीच्या सैन्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शिवाजीच्या पथक्यांनी कुडाळचा किल्ला जिंकून घेतला. परंतु शत्रूचा फिरून प्रतिहल्ला आल्याने व जवळचे युद्धोपयोगी सामान संपत आल्याने तसेच शिवाजीही पन्हाळ्यावर अडकून पडल्यामुळे कुमकेची आशा खुंटून त्यांनी किल्ला सोडून दिला. हाच प्रकार थोड्या फार फरकाने आचऱ्यास घडून तेथील राजाने शिवाजीच्या लोकांना पिटाळून लावले. मात्र याच सुमारास रुस्तमने कोकणात स्वारी काढून फोंडा व कुडाळ ताब्यात घेत विजापुरास कळवले की, कोकांतील शिवाजीच्या सैन्याचा पराभव माझ्या मदतीने व हुकमाने झाला आहे. रुस्तमचे यावेळचे धोरण, वर्तन शिवाजीला अनुकूल असेच होते. त्याने कुडाळकराला मदत करण्याऐवजी त्यालाच रगडून काढण्यास आरंभ केला. कोकणातील या वृत्तांताचा मुख्य आधार पसासं मधील ले. क्र. ८१२ असून स. १६६० च्या एप्रिल मधील या डच पत्रात मराठी साधनांच्या तुलनेने शिवाजीच्या हालचालींची बरीच तपशीलवार माहिती आली आहे.
आता याच काळातील शिवाजीच्या हालचालींची आपण थोडक्यात माहिती पाहू. शिवाजीने पन्हाळा घेताच आदिलशहाने अफझलपुत्र फाझलखान व रुस्तमजमानच्या नेतृत्वाखाली मोडलेली फौज पुन्हा उभी करून पन्हाळ्यावरून शिवाजीला हाकलून लावण्यासाठी पाठवले खरे परंतु शिवाजीने त्यांच्याशी खुल्या मैदानात जुंज देत त्यांनाच पिटाळून लावले. यावेळी शक्य असतानाही मित्रसंबंधांमुळे शिवाजीने रुस्तमला कैद वा ठार न करता सुखरूप जाऊ दिले. ( दि. २८ डिसेंबर १६५९ )
    फाजल व रुस्तमची फौज उधळून लावल्यावर शिवाजीने आपल्या सैन्याचे दोन भाग करत तो स्वतः पन्हाळ्यास राहिला तर नेताजी पालकरकडे एक तुकडी देऊन त्यांस विजापूरच्या रोखाने रवाना केले. यावेळी नेताजी बोरगाव, कुंडल वगैरे ठिकाणे घेत मिरजेला येऊन धडकला. इथल्या भुईकोट किल्ल्याने झुंजण्याची हिंमत बांधल्याने त्यांस पुढे सरकता येईना. तेव्हा खासा शिवाजी मिरजेस आला व वेढ्याचे काम आपल्या हाती घेत त्याने नेताजीस पुढे पाठविले. नेताजी तसाच पुढे सांगलीवरून रायबाग, अथणी, तेलसंग करत तिकोट्यास येऊन ठेपला.
    शिवाजीच्या फौजा झपाट्याने मुलूख व किल्ले काबीज करू लागल्याने आदिलशाही दरबारात चिंतेचे वातावरण पसरले. अफझल व रुस्तमच्या लागोपाठ दोन सैन्यदलांचा शिवाजीने अल्पावधीत पराभव केल्याने आता नव्या स्वारीकरता पाठवण्यास सरदार व सैन्य, दोन्हींची त्यांना कमतरता भासत होती. किंबहुना शिवाजीच्या झपाट्यापुढे राज्याचा, राजधानीचा बचाव कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला असता सिद्दी जौहर त्यांच्या मदतीस आला.
    सिद्दी जौहर हा कर्नूलचा जहागीरदार तसेच सरदार असून अलीकडे बंडखोरीमुळे तो आदिलशहाच्या मर्जीतून उतरला होता. परंतु याचवेळी त्याने आपल्या सेवेची पेशकश देऊ केल्याने आदिलशहानेही उदार, दिलदार मनाचा आव आणत त्यांस मागील कृत्यांबद्दल माफी देत शिवाजीवरील मोहीम त्याच्या हाती सोपवली. जौहरवरील आपली कृपा दर्शवण्यासाठी आदिलने त्यांस सलाबतखान किताब तसेच वाई परगण्याचा दिवाण, खटाव परगण्याचा लष्कर सर हवालदार इ. पदे शिवाय अफझल प्रमाणेच याच्याही जवळ शाही सहीशिक्का असलेले फार्मानाचे कोरे कागद देण्यात आले. जेणेकरून विरुद्ध पक्षीयांना प्रलोभनं देत फोडता यावे. खेरीज शक्य तितके दरबारी सरदार व मांडलिकांनाही जौहरच्या कुमकेस जाण्याचे आदेश देण्यात आले. सर्व तयारी होताच सलाबतखान सिद्दी जौहर मोठ्या उमेदीनं शिवाजीच्या बंदोबस्तासाठी निघाला.
    सिद्दी जौहरकडे यावेळी त्याचे स्वतःचे सैन्य अपवाद केल्यास इतर सरदार व मांडलिकांचे मिळून सुमारे वीस ते तीस हजार सैन्य असावं असा अंदाज करता येतो. उपलब्ध साधनांत अर्ध्या पाउण लाखाच्या भरतीचे आकडे आहेत खरे पण त्यात बुनगे व लढाऊ मनुष्य अशी विभागणी न केल्याने हा आकडा ग्राह्य धरणे इष्ट वाटत नाही. उलट साठ ते सत्तरचा मध्य म्हणून वीस ते तीस हजार वा जास्तीत जास्त पस्तीस हजार हि संख्या योग्य वाटते. असो.
    सिद्दी जौहर आपल्यावर चालून येत असल्याचे समजताच शिवाजीने मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याचा आश्रय घेतला. यावेळी उभयपक्षांची बहुधा एखाद दुसरी चकमक उडाली असावी असं मराठी रियासत खंड १ मध्ये दिलेल्या एका आदिलशाही फर्मानाच्या आधारे म्हणता येते परंतु त्याची तारीख पाहता तसेच या गोष्टीस प्रत्यंतर पुरावा नसल्याने यासंदर्भात अधिक काही लिहिणे शक्य नाही.
    मिरजेचा वेढा उठवून शिवाजी ज्यावेळी पन्हाळ्यास आला त्यावेळी त्याच्यासोबत आठ हजार पायदळ व साठ घोडेस्वार असल्याचे पसासं ले. क्र. ८२६ मध्ये नमूद आहे. शिवाजीने पन्हाळ्याचा आश्रय घेताच जौहरनेही त्या किल्ल्यास वेढा घालून मोर्चेबंदी केली व पन्हाळा जेरीस आणण्याकरता इंग्रजांकडे तोफा व दारूगोळ्याची मागणी केली. यावेळी राजापूरकर इंग्रजांनी आर्थिक नफ्याची संधी सोडली नाही. त्यांनी जौहरला शक्य तितका तोफखाना व दारुगोळा तर उपलब्ध करून दिलाच परंतु वर तोफ डागण्याकरता प्रशिक्षित गोलंदाजही सोबत दिला. ( स. १६६०, मार्च - एप्रिल )
    पन्हाळ्याचा वेढा, त्यातील समर प्रसंग वगैरेंची तपशीलवार चर्चा इतरांनी पुष्कळ केलेली असल्याने त्याविषयी अधिक खोलात न जाता शिवाजीच्या या काळातील राजकारणाची येथे मी चर्चा करणे आवश्यक समजतो.
    अफझलचा निकाल लावण्यापूर्वीच शिवाजीने विजापूर स्वारीची योजना आखली होती. अफझलच्या पराभवामुळे त्या योजनेस अकल्पित यश लाभले असावे असे याक्षणी तरी माझे मत आहे. कारण पसासं ले. क्र. ७९१ नुसार स. १६५९ च्या डिसेंबर अखेर वा स. १६६० च्या जानेवारी पर्यंत कर्नाटकातून शहाजीने ससैन्य पुढे चालून येणं अपेक्षित होतं. परंतु शहाजी यावेळी विजापूर वा पन्हाळ्यास शिवाजी सोबत हातमिळवणी करण्यासाठी आल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कर्नाटकातील त्याच्या हालचालींचीही माहिती मिळत नाही. पन्हाळा ताब्यात घेऊन शिवाजीने प्रथम किल्ल्याचा बंदोबस्त केला. त्यानंतर फाजल व रुस्तमच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या फौजांचा फडशा पाडला. यानंतर त्याने आपल्या सैन्याचे दोन भाग करून विजापूरचा घास गिळण्यास आरंभ केला. परंतु याच ठिकाणी त्याच्या राजकीय धोरणास अकल्पित तसेच काहीशा अतिआत्मविश्वासपूर्वक हालचालींचा फटका बसला.
    लागोपाठ मिळणाऱ्या विजयांमुळे आपण ताब्यात राखू तेवढाच प्रदेश जिंकण्याचे भान त्यांस न राहता त्याने आपली आगेकूच कायम ठेवली. अर्थात त्याच्या या निर्णयाचा चांगला परिणाम म्हणजे विजापुरी प्रदेशाची धुळदाण उडून त्यांची आर्थिक स्थिती थोडीफार खालावली. परंतु अशा मोहिमांत सैन्य विखुरलं जाण्याचा जो धोका असतो, तो यावेळी शिवाजीने बहुधा दुर्लक्षिला असावा. त्याचप्रमाणे दैवाने विजापूरकरांना हात देत सिद्दी जौहर त्यांना अनुकूल झाला. हि बाब तशी अकल्पित असल्याने जौहरचे रणभूमीवरील आगमन शिवाजीच्या आगाऊ आखलेल्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. परंतु याच वेळी मोगलांनी शिवाजीवर चढाई करण्यास आरंभ केली, याकडे शिवाजीचा एक फसलेला राजकीय डाव अथवा मोगलांच्या मैत्रीवरील विश्वास अथवा त्याचा अतिआत्मविश्वास असेही म्हणता येईल. यास्थळी आपण शिवाजी - मोगल संबंधांची थोडक्यात माहिती घेऊ.   
    स. १६५९ मध्ये औरंग बादशहा बनला त्यावेळी शिवाजीचा वकील दरबारात हजर झाला असता औरंगने एक पत्र व पोशाख शिवाजीकरता देऊन त्याची बोळवण केली. या पत्रान्वये मोगलांच्या दख्खन सुभेदाराच्या हाताखाली, हुकुमाखाली राहून शिवाजीने आपली सेवा बजवायची होती. अर्थात मांडलिकी नात्याने. परंतु अशी ताबेदारी शिवाजीने कधीच स्वीकारली नाही. आदिलशाही विरोधात त्याची मोहीम स्वतंत्र पद्धतीनेच चालली होती. यावेळी दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम होता कि त्याच्या बदली नियुक्ती झालेला शाहिस्तेखान मार्गात होता याविषयी माहिती मिळू शकली नाही. परंतु औरंग मुअज्जमच्या कामगिरीवर खुश नव्हता हे उघड आहे. वारसायुद्धापूर्वीच्या विजापूर स्वारीत त्या सत्तेचा पोकळपणा औरंगच्या लक्षात चांगलाच आल्याने त्या सत्तेला व सोबत इतरांनाही नामशेष करून मोगली साम्राज्य वृद्धिंगत व्हावं यासाठी शहजाद्याने आवश्यक ते प्रयत्न करावेत अशीच औरंगची इच्छा असणार व याबाबतीत मोगलांच्या दक्षिणेतील हालचाली पाहता मुअज्जमने असा दगदगीचा उपक्रम स्वीकारल्याचे दिसून येत नाही. माझ्या मते, मुअज्जमची हि निष्क्रियता जमेस धरूनच शिवाजीने विजापूर स्वारीची आखणी केली होती. परंतु तिकडे विजापूरच्या मदतीस सिद्दी जौहर व मोगलांचे राजकीय धोरण बदलण्यास शाहिस्तेखान अशी दोन अकल्पित संकटं उद्भवली. पैकी, जौहरचा वृत्तांत आपण पाहिला आहेच. शाहिस्तेखान दक्षिणेत कधी आला हे समजायला मार्ग नसला तरी दि. २८ जानेवारी १६६० रोजी तो औरंगाबादेतून नगरला जायला निघाला व तेथून दि. १६ एप्रिल रोजी शिरवळला दाखल झाला. या दरम्यान केव्हातरी मोगलांनी शिवाजी सोबतचा तह बाजूला ठेवून युद्ध पुकारलं.
    मोगलांनी शिवाजीसोबत युद्ध नेमकं याचवेळी का पुकारलं असावं ? शिवभारतनुसार आदिलशहाच्या विनंतीमुळे औरंगने शाहिस्तेखानास शिवाजीवर चालून जाण्याचा आदेश दिला. परंतु शिवभारत व्यतिरिक्त इतर समकालीन राजकीय पत्रांत याची स्पष्टता झाल्याचे मला आढळून आले नाही. तार्किकदृष्ट्या पाहिले असता बद्धमूल विजापुरी सत्तेपेक्षा नव्याने उदयास येणारी शिवाजीची सत्ता मागाहून चिरडणे मोगलांना शक्य होते. परंतु तसे न करता प्रदेश सानिध्य व विजापूर - शिवाजीच्या बलाबलाचा योग्य अंदाज असल्याने औरंगने शिवाजीचा काटा काढण्यास प्राधान्य दिलं.
    शाहिस्तेखानासोबत असलेल्या लष्कराचे विश्वसनीय आकडे जरी मिळाले नसले तरी जी काही अवाढव्य सैन्यसंख्या मराठी साधनांत दिली आहे त्यावरून त्याची फौज जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार इतकी असावी असा माझा अंदाज आहे. कारण याच काळात मोगलांच्या आसम, कुचबिहार प्रदेशात मोठ्या मोहिमा सुरु होत्या. तसेच चंपतराय बुंदेल्याचा बंडावाही सुरु होता. शिवाय शहाजहानपुत्र सुजावर चालून गेलेल्या फौजाही बंगालमध्येच अडकून पडलेल्या होत्या. तसेच प्रचंड प्रमाणात नरसंहार घडवून आणणारी वारसायुद्धे याच काळात झाल्याचेही लक्षात घ्यावे लागते. याशिवाय प्रांतिक प्रशासन, सरहद्दींवरील ठाण्यांत तैनात असलेलं सैन्यबळ लक्षात घेता औरंगजेब याहून अधिक सैन्य या स्वारीत ओतू शकत नव्हता. असो.
    शिवाजीच्या अनुपस्थितीत खान त्याच्या राज्यात घुसला खरा व शक्य तितका मोगली मोगली सरहद्दीला लागून असलेला पुण्याचा प्रदेशही त्याने आपल्या ताब्यात घेतला. परंतु मैदानी मुलखाच्या रक्षण व वर्चस्वाकरता किल्ल्यांची आवश्यकता होती व बव्हंशी किल्ले शिवाजीच्या ताब्यात होते. त्यांपैकी मार्गात असल्यामुळे शाहिस्तेखानाने जूनच्या उत्तरार्धात चाकणला वेढा घातला. चाकणचा किल्ला भुईकोट असला तरी खानास तो अपेक्षेप्रमाणे सहजासहजी जिंकता आला नाही. तब्बल दीड दोन महिने मोगलांना झुंजवून अखेर निरुपाय जाणून आतील मराठी शिबंदीने शरणागती स्वीकारली. ( दि. १५ ऑगस्ट १६६० ) तोपर्यंत शिवाजी पन्हाळ्यावरून निसटून राजगडला येऊन दाखल झाला होता. असो.
 



युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम: शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले.
चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले.
पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले.
नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले.
"तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही "
असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा".
बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.

या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर
(भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा.

नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला.
तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.
अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या !

या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे
दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !
कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !
जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला.
"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"
खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.
खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.



जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले
यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये "
महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले.
तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन
जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली.
अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल "
पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले.
"खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही "
बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली.
जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते.

अफझल खान
अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे.
मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला.
बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले,
येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.
सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता).
तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .
बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली
व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.
"जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला)
त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.
दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले.
मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला
(उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र)
त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात
"तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" .
इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले.
खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले .
इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले.
(जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे.
संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला )
प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते.
खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली.
दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले.
खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही.
वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला
(एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे)
या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला.
कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले.

इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात.
(बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे )
खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली.
कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही.
सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले.
"कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.
'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार
पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खान्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले.
कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.
राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.
पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,
रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.
पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.
देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.
(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले,
खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :P ,
सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.
वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. )

अफझल बुरुज
प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले
आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली.

श्री भवानी आई
(देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली)
जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले !
"शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला "

खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !
(शहाबाग,विजापूर )

अली आदिलशहा

प्रतापगड नकाशा
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली
तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते !
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या !
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !


गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण
“प्रतापगड युध्द”
श्री. अरूण ठाकूर

‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं!
शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही. विररसाने ओतप्रोत भरलेले स्वधर्म आणि स्वदेशाभिमान, तसेच स्वातंत्र्य प्रेरणेने प्रेरित होऊन, शीर हातावर घेऊन प्राणपणाने लढणारे लढवय्ये, तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून जास्तीत जास्त पराक्रम करून प्रचंड मोठा विजय मिळविणे हे चमत्कार ठायी ठायी पहावयास मिळतात.
या चरित्रातील सर्वच प्रसंग असे आहेत की, त्या प्रत्येक प्रसंगावर स्वतंत्र विचार व्हावा. परंतु त्यातील दोन प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे मला वाटते. एक म्हणजे आ याहून सुटका, व दुसरा अफजलखान स्वारीचे प्रतापगड युध्द. या दोन्ही ठिकाणी श्रीशिवछत्रपतींच्या कुशल राजकारणाचा अत्यंत भेदक असा प्रभावी पैलू दिसून येतो. केवळ अंदाज बांधण एकवेळ सोप असेल, परंतु विचारपूर्वक अंदाज बांधून त्याची योग्य आखणी करणे, आणि ते सारं आपला जीव धोक्यात घालून बेमालूमपणे प्रत्यक्षात उतरवणे व त्यात विजयी होणे, आणि परत आनंदी मनाने स्वराज्याच्या पुढील कामास लागणे. इथे मन कुंठीत होते आणि मग हे सारंच अजब वाटू लागत.
श्री भवानीदेवीच्या तेजस्वी प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवाजीमहाराज आणि त्यांचे मावळे साकार करीत होते. त्या स्वातंत्र्याचा घास घ्यावयास, तो स्वातंत्र्याचा प्रयत्न पायाच्या टाचेखाली चिरडून टाकावयाच्या गर्जना करीत एक महाभयंकर झंझावात प्रचंड शक्तिनिशी चालून आला. त्याची कर्तबगारीही तेवढीच प्रचंड होती. त्याच्या समशेरीचा दरारा असा होता की, सारी दख्खन आणि लंका त्याच्या धाकाने थरकापत होती. औरंगजेबासारख्या महापाताळयंत्री कर्दनकाळालाही बीदर कल्याणीच्या मोहिमेत त्याने आपल्या लष्करी करामतीचा तडाखा दिला होता.
अशा या अफजलखानाचा फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्ही शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने वध करून, त्याच्या प्रचंड फौजेचा आपल्या क्षुल्लक मावळी फौजनीशी धुव्वा उडविला, आणि प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या राजनितीला, गनिमी युध्दनितीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही.
युध्द शास्त्राच्या दृष्टीने जगातील पांच महत्त्वपूर्ण युध्दात शिवचरित्रातील अत्यंत कठिण अशा समरप्रसंगाचा प्रतापगड युध्दाचा समावेश आहे. ‘गनिमीकावा’ या पध्दतीने खेळले गेलेले हे युध्द जगातील एकमेव व पहिलेच उदाहरण आहे.
शिवछत्रपतिंची युध्दनिती हा जगभरातील युध्दशास्त्राच्या संशोधकांच्या संशोधनाचा विषय आहे.
शिवाजीमहाराज त्यावेळी एका विशेष प्रकारच्या युध्दपध्दतीचे जनक होते. ते शास्त्र म्हणजे ‘गनिमीकावा’ होय. सावशीच्या लढाईचे वर्तमान ऐकल्यानंतर पुण्याहून पटवर्धनांच्या वकिलाने मिरजेस जे पत्र लिहिले त्यात गनिमी लढाईचा अर्थ आला आहे. तो असा - “शत्रूचे सामान भारी असल्यास बुनगे एकिकडे लावून द्यावे आणि सडी फौज करून आज या ठाण्याजवळ, उद्या दुसऱ्या ठाण्याजवळ याप्रमाणे गनिमाई करावी.”
समर्थांनी वर्णिलेल्या महाराष्ट्रधर्मात गनिमी युध्दास ‘वृकयुध्द’ (लांडगेतोड) असे नाव दिले आहे. या युध्दात थोडया सैन्यानिशी मोठया सैन्याला तोंड देऊन त्याचा नाश करता येतो. शिवाय अशा युध्दास डोंगराळ प्रदेश असल्यास त्याची युध्द करणाऱ्यास चांगली मदत होते.
ज्या प्रदेशात युध्द करावयाचे असेल तेथील खडान् खडा माहिती सेनापतिस असावी लागते. ती माहिती महाराजांस जितकी होती. तितकी खानाला नव्हती. कारण स्वतः खान हा महाराजांइतका त्या प्रांतातून युध्दशास्त्रातील तजविजींच्या व हालचालींच्या दृष्टीने विचार करित फिरलेला नव्हता. दुसऱ्याने दिलेल्या माहितीवर विसंबून त्याला आपल्या मोहिमेच्या तजविजी व हालचाली ठरविणे भाग पडले होते. दहा वर्षे या भागात राहिल्यामुळे इथली थोडीफार माहिती त्याला होती. पण लढाईच्या वेळी खास प्रसंगी उपयोगी पडेल अशी या प्रांताची पहाणी त्याने केली नसावी.
महाराज लढाईशिवाय इतर वेळीही असल्या प्रदेशाच्या सर्व भागातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलांतून, घाटांतून फिरून वेळप्रसंगी कोणत्या जागेचे काय महत्त्व आहे व तिचा पुढे काय उपयोग होईल याचा आपल्या आरंभिलेल्या कार्यक्रमावर दृष्टी देऊन विचार करित असत. फौजा लपविण्यासाठी जागा कोठे आहेत, लहान लहान टोळयांनी रहाण्यामध्ये जंगलांचा व झाडीचा किती फायदा होतो, रात्रीचा व अंधाराचा फायदा घेऊन शत्रूचे पहारे व चौक्या लुटता येणे व चुकविणे कसे शक्य असते, त्या चुकवून त्याच्या छावणीमध्ये सडया टोळयांनी आंत घुसून त्याची नासधूस कशी करता येते, त्यामुळे शत्रूचा गोंधळ होऊन त्या धावपळीत अंधारामुळे त्याच्याच गोळागोळीने त्याचीच माणसें कशी जायबंदी होतात, अशा अचानक हल्ल्याने धाडशी सेनापतिचा वचक शत्रूवर कसा बसतो, यामुळे शत्रूचा जोम व हिम्मत कशी कमी होते, त्याच्या गोळागोळीने झालेली त्याचीच हानी ही स्वतःच्याच माऱ्यामुळे झाली हे न कळून प्रतिपक्षाच्या छाप्यामुळे झाली असे वाटून हल्ला करणाऱ्या सैन्याचा दरारा व भय त्याला कसे वाटते, ह्या कारणांमुळे हल्लेवाल्या छोटेखानी सैन्याचा जोम कसा वाढतो वगैरे सर्व गोष्टी व युध्दातील खाचाखोचा महाराजांना पूर्णपणे स्वानुभवाने माहित होत्या. अशा रितीने भौगोलिक माहितीचा फायदा घेऊन महाराजांनी आपला हेतू तडीस नेऊन खानाची कशी दुर्दशा केली हे या प्रतापगड युध्दामुळे लक्षात येते.
(आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे.)
आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी (च् ङॠ कक्र ) किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालक्षेप करणें हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत.
विजापूर दरबारने ‘आम्ही तुमच्यावर मोहिम करतो वा तुमचे बरोबर युध्द करतो’ असे महाराजांस कळविले नव्हते. महाराजांचा कोणीही वकिल विजापूर दरबारात नव्हता. तरीसुध्दा त्यांचे हेर खाते इतक्या श्रेष्ठ प्रतीचे होते की, शत्रूच्या दरबारात ठरलेली प्रत्येक गोष्ट त्यांना तात्काळ कळत असे. विजापूर दरबारने आपल्या विरूध्द युध्द पुकारल्याची बातमी महाराजांना त्यांच्या हेरखात्याकडून समजली. आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी महाराजांनी सुरू केली. महाराजांचे सर्व मिळून सैन्य १० हजार होते.
आदि अदिलशहाच्या विजापूर दरबारात अफजलखानाने शिवाजी महाराजांना ठार मारून वा जिवंत पकडून आणण्यासाठी ठेवलेला पैजेचा विडा उचलला. १२ हजार घोडदळ, १० हजार पायदळ, ८०-९० मोठया तोफा, ३००-४०० लहान तोफा, मोठया तोफांवरील हजार बाराशे खलाशी, लहान तोफखान्याकडील ४॥ हजार खलाशी इत्यादी सैन्यासह खान एप्रिल १६५९ अखेरीस निघाला. वाटेतील हिंदू देवळांवर हल्ले करून मूर्ती फोडत तुळजापूर पंढरपूर मार्गे जूनमध्ये वाई येथे पोहोचला. येताना वाटेत त्याने नविन सैन्य उभारण्याचा सपाटा लावला. वाई येथे आल्यावर त्याने तेथील डोंगराळ मुलखाची सवय व त्या मुलखाची माहिती असलेले ३ हजार मावळे आपल्या पायदळात भरती केले. ३५ हजाराच्या जवळपास सर्व सैन्य होते.
विजापूरहून खान निघाल्याची बातमी समर्थ शिष्यांकडून समर्थांकडे आली व ती त्यांनी ओवी बध्द पत्ररूपाने महाराजांकडे पाठविली. ते पुढीलप्रमाणें -
विवेके करावे कार्य साधन।
जाणार नरतनु हे जाणोन।
पुढील भविष्यार्थी मन।
रहाटोची नये ॥१॥
चालोनये असन्मार्गी।
ºÉत्यता बाणल्या अंगी।
रघुवीर कृपा ते प्रसंगी।
दास महात्म वाढवी॥२॥
रजनीनाथ आणि दिवाकर।
नित्यनेमे करिती संचार।
घालीताती येरझार।
लाविले भ्रमण जगदिशे॥३॥
+Éदिमाया मूळ भवानी।
हेची जगताची स्वामिनी।
एकांती विवेके धरूनी।
इष्ट योजना करावी॥४॥
ह्या ओव्या नेहमीप्रमाणे वाचल्या तर त्यात विशेष असे कांहीच नाही. त्यात गुप्त बातमी सांगितल्याची शंका सुध्दा येणार नाही. परंतु प्रत्येक ओळीतील पहिले अक्षर घेऊन ती सर्व अक्षरे एकापुढे एक मांडली तर ती एक महत्त्वाची बातमी दिसून येईल. ती बातमी म्हणजे ‘विजापूरचा सरदार निघाला आहे!’ ही होय. शेवटच्या दोन ओळीत ‘विवेकाने योग्य योजना करावी’ असा उपदेशही आहे.
प्रतापगडाच्या लढाईत बचावाच्या धोरणाच्या दृष्टीने महाराज्यांना पारघाटाचा व प्रतापगडसारख्या तटबंदीच्या जागेचा अतिशय उपयोग झाला. या युध्दाचा जास्त बारकाईने अभ्यास व विचार करायचा असेल, तर गडाच्या पूर्वेच्या २४ मैलांच्या व उत्तर दक्षिणेकडील ८/१० मैलांच्या सर्व टापूतील प्रदेशाची सूक्ष्म दृष्टीने पहाणी करावी लागेल.
पहाडांच्या सोंडांचा, किल्ल्याचा, नद्यांचा, घाटांचा व खोऱ्यांचा युध्दकौशल्याच्या दृष्टीने किंवा स्थानिक डावपेचांचा विचार करण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होतो हे युध्दात दिसून येते.
महाराजांचे दोन सेनापती शामराजपंत पद्मनाभी व त्रिंबकपंत युध्दात पडले असतानाही त्यांच्या फौजांनी घाबरून जाऊन पळून न जाता शत्रूला तोंड देत आपली कामगिरी फत्ते केली. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेळच्या मानाने कौतुकास्पद आहे. शिवाजीमहाराजांनी आपल्या सैनिकांची मानसिक ताकद अशी वाढविली होती. शिवकालातच या अशा गोष्टी घडू शकल्या. पूर्वी व त्यावेळीही इतर सैन्यांमध्ये सेनापति वा सरदार पडला तर सैनिक पळून जात अशी परंपरा होती.
नंतरच्या काळातही व पुढेही १८०३ पासून १८४३ पर्यंत मराठयांची इंग्रजांबरोबर जी युध्दे झाली त्यातील कांही युध्दात मराठयांचा जय झाला. परंतु त्याचा यथायोग्य फायदा न घेता व माघार घेतल्यामुळे इंग्रजांना यश मिळून मराठयांचा मोड झाला. असे इतिहास सांगतो.
अशा प्रकारच्या घोडचुका महाराजांच्या शिस्तीखाली तयार झालेल्या सेनापतिनी व फौजांनी न केल्यामुळे व आपल्यावर सोपविलेली कामगिरी उत्कृष्ट रीतीने तंतोतंत पार पाडल्यामुळे आपल्याहून दुप्पट-तिप्पटीन असलेल्या शत्रूवरही महाराजांना विजय मिळविता आला.
“हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!” असा कानमंत्र सामान्य माणसांना देऊन आपल्या नेतृत्वाने त्याच सामान्य माणसांकडून असामान्य इतिहास घडविणारे छत्रपति हे महान राष्ट्रपुरूष होत.
त्यांचे चरित्र म्हणजे सावध राजकारणाची, पार्थ पराक्रमाची, पुरोगामी विचारसरणीची, नव-नवोन्मेषशालिनी प्रतिभेची, भगिरथ उद्योगाची, उदात्त चारित्र्याची, दक्ष व निष्कलंक राज्यकारभाराची, अतुल शौर्याची, असीम त्यागाची, समतेची, ममतेची व निस्वार्थी लोकसेवेची गाथाच!
“युध्दशास्त्राचे अध्ययन हा राष्ट्रीय अग्रक्रमाचा विषय असावा!” आधार: “प्रतापगडचा रणसंग्राम” (ले. कॅ. मोडक)

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ...
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||
वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||
खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||
तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||
श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||
सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||
केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला


युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम: शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले.
चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले.
पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले.
नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले.
"तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही "
असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा".
बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.

या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर
(भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा.

नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला.
तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.
अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या !

या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे
दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !
कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !
जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला.
"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"
खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.
खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.



जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले
यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये "
महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले.
तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन
जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली.
अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल "
पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले.
"खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही "
बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली.
जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते.

अफझल खान
अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे.
मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला.
बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले,
येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.
सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता).
तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .
बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली
व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.
"जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला)
त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.
दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले.
मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला
(उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र)
त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात
"तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" .
इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले.
खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले .
इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले.
(जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे.
संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला )
प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते.
खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली.
दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले.
खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही.
वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला
(एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे)
या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला.
कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले.

इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात.
(बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे )
खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली.
कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही.
सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले.
"कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.
'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार
पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खान्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले.
कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.
राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.
पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,
रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.
पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.
देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.
(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले,
खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :P ,
सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.
वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. )

अफझल बुरुज
प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले
आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली.

श्री भवानी आई
(देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली)
जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले !
"शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला "

खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !
(शहाबाग,विजापूर )

अली आदिलशहा

प्रतापगड नकाशा
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली
तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते !
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या !
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...