येथे घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अंबरनाथ हे नेहमीच मुंबई-महाराष्ट्रात सतत चर्चिले जाणारे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे.
बर्याचदा विकेंडचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच एक ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शैवपंथीय शिलाहारांच्या सत्ताकाळात बांधले गेले. आपल्या राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली त्यातील अंबरनाथचे शिवमंदिर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. मंदिरात विविध प्रकारच्या लहानमोठय़ा अशा हजारो मूर्ती असून शिल्पकला आणि वास्तुकला यांचा सुरेख संगम या मंदिरात पहायला मिळतो. मंदिरातील शिवलिंग अंबरेश्वर म्हणुन ओळखले जाते आणि या नावावरून या शहराला अंबरनाथ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.


कसे पोहचाल :-
अजूनही अनेक मुंबईकरांना तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुसटशीही माहिती नाहीये, असं दिसून येतं. इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. अंबरनाथ हे मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन आहे कल्याण सोडल्यावर कर्जत च्या दिशेने ३ रे स्थानक अंबरनाथ हे आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून ६० किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.





अंबरनाथचे शिवमंदिर हे सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या, हे एका मध्य ठिकाणी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा त्यावर प्रभाव पडला आहे. त्या सगळ्या राजांचा यावर प्रभाव पडला आहे.धारच्या भोज राजाच्या काळातील 'समरांगणसूत्रोध्दार' या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीज मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे. "काही लोक या मंदिराला हेमाडपंथी म्हणतात. पण हे चुकीचं आहे. भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू. हे असं एकच भूमिज मंदिर, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलेलं आहे."
पुरातत्त्व विभागाची सुरुवात
भारतीय पुरात्त्व विभागाचा आणि अंबरनाथचा अगदी जवळचा संबंध आहे. ब्रिटिश अधिकारी सर कनिंगहम यांना इतिहासाची आवड होती. भारतभर फिरताना सर्वत्र विखुरलेल्या मोडकळीस आलेल्या वास्तूंचे अवशेष त्यांनी पाहिले होते. १८६१ मध्ये सर कनिंगहम यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे."भारताच्या ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रदेशातून, कोणत्याही प्रांतातून, हिंडताना प्राचीन वारशाबद्दलची उदासीनता जाणवते. अत्यंत रेखीव आणि कलात्मक असूनसुध्दा प्राचीन वास्तूंची, स्मारकांची हेळसांड खिन्न करणारी आहे. जागोजागी पुरातन भारतीय संस्कृतीचे सुंदर अवशेष अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात. दुर्लक्षित' हा शब्द दुरुस्ती, डागडुजी, ह्याला उद्देशून नाही, इतक्या अवशेषांना दुरुस्त करणे, ही खर्चाच्या आणि परिश्रमाच्या दृष्टीने कोणत्याही सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यांची साधी नोंदसुध्दा नसावी, ही फार खेदाची बाब आहे.
माझ्या मते सरकारकडून ह्या महत्त्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या कर्तव्याचं पालन अगदी कमी खर्चात करता येण्यासारखं आहे. सर्वत्र विखुरलेल्या या अवशेषांची पाहणी करून, शोध घेऊन, व्यवस्थित नोंद करून ठेवली तर भावी पिढ्यांना ती उद्बोधक ठरेल. एरवी पुढच्या पिढ्यांना स्वतःचा इतिहास समजणार कसा?
जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल मेडोज टेलर, यांच्याकडून पत्रांद्वारे अशाच प्रकारचे अभिप्राय मिळाल्यानंतर एका विचारमंथनाअंती आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा पुरातत्त्व विभागाचं (ASI) बीज रोवलं गेलं.
इ.स. १८६८ साली प्रथम भारताच्या चार दिशांकडील चार स्मारकं प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासायचं ठरलं. या सर्व्हेअंतर्गत फोटो, ड्रॉईंग्ज, नकाशे, मॉडेल्स आणि ठसे कशा तऱ्हेने घ्यावेत, याच्या सूचना बारीक तपशिलासह नोंदवण्यात आल्या. या चार स्मारकांपैकी पश्चिम भागातून निवडलं गेलं बॉम्बे प्रांतातलं अंबरनाथाचं मंदिर. सुदैवाने त्याच सुमारास म्हणजे १८५३ मध्ये मुंबई-कल्याण रेल्वे सुरू झाली आणि मुंबईतच 'स्कूल ऑफ आर्ट' होतं. या कामासाठी सरकारकडून १३ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं. आणि १८ नोव्हेंबर १८६८ रोजी एक टीम अंबरनाथमध्ये दाखल झाली. यात स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक G. W. टेरी, एक हेड मोल्डर, एक ड्राफ्टमन आणि आठ विद्यार्थ्यांच्या समावेश होता. त्यावेळी अंबरनाथची लोकसंख्या ३०० च्या आसपास होती. तब्बल वर्षभर काम करून १०,७१४ रुपये ३ आणे आणि १ पै खर्च करून २४ आराखडे,३५ फोटो आणि ७६ साचे अंबरनाथ मंदिराचे तयार करण्यात आले.
शिलाहार राजवंश -
याच ठिकाणी शिलाहारांबद्दल थोडीफार माहिती दिली, तर ती अस्थानी होणार नाही. मूळच्या प्रबळ अशा शिलाहारांच्या पुढे तीन शाखा झाल्या.सुवर्ण गरुडध्वजधारी उत्तर कोकणचे शिलाहार बहुदा राष्ट्रकूट व चालुक्यांचे सामंत असावेत. अमरनाथ (आम्रनाथ?) मंदिर उभारणारा मुम्मुणी शिलाहार हा चालुक्य राजवंशातील पहिल्या सोमेश्वराचा समकालीन व मांडलिक असावा. या शिलाहारांना "तगरपुर परमेश्वर" असा किताब होता. उरलेल्या शिलाहारांचे राज्य दक्षिण कोकण व कराड-कोल्हापूर भागात होते. शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली तर काही मंदिरे आजही त्यांचं अस्थित्व टिकवून आहेत. अंबरनाथ चे मंदिर त्या पैकीच एक,शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली.शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
मंदीराचे स्थापत्य :-
खडकात भव्य प्राकार खोदून त्या प्राकारात जमिनीच्या पातळीवर हे मंदिर उभारले आहे. मंदिराभोवतालची प्राकार भिंत कालौघात नष्ट झाले असुन मंदिर परीसरात कोसळलेल्या भागांचे अवशेष दिसुन येतात.

पीठाच्या वर मंडोवर असून यात तवंगानी अलंकृत केलेला कुंभ भागाचा मधूनमधून देवमूर्ती असलेला पट्ट, अतरपत्र, कपोताली इत्यादी भाग आहे. त्यावर जंघा, उद्गम, भरणी, शिरावटी, मंचिका, कपोताली आणि छादय आहेत. त्यावर गर्भगृहावरील शिखराला सुरुवात होते.

मंदिराला तलविन्यास आधीच नमूद केल्याप्रमाणे तारकाकृती आहे. त्याची परिणती गर्भगृह आणि मंडपाच्या बाह्यांगावर अंगे आणि सलीलांतरे येण्यात झाली आहे. परिणामी पुढे आलेल्या स्तंभाच्या दोन उपलब्ध बाजूंवर मूर्तीची जोडी आहे आणि गर्भगृहाच्या तीन मुख्य भद्रांवर रथिका आहेत. भूमिज मंदिरांमध्ये सर्वच भद्र आणि अंगभागावर मूळ शिखराची प्रतिकृती असलेली लघुशिखरे असतात. त्यामुळे कपोतालीवर अशा लघुशिखरांची एक ओळच निर्माण होते आणि त्यातून प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर आविष्कार तयार होतो. या मंदिरावरही अर्थातच ह्या छायाप्रकाशलीलेचे सुखद दर्शन घडते. हे शिवमंदिर असल्याने ह्या मंदिराच्या स्तंभाच्या बाह्यांगावरील मुख्य देव शिवपरिवारातीलच आहेत. अंतराळाच्या बाह्यांगावर गणेश आणि कार्तिकेय आहेत. गर्भगृहाच्या बाजूच्या दोन मद्रांवर महाकाली आणि गजासुरसंहारमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील बाजूच्या मद्रावर हरि-हर-पितामहार्क आहे.







मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. (आता सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी खांब व बीम ने त्यांना support दिला आहे ) मंदिराच्या मंडपात चौरस रंगशिला असून त्यावर चतुष्की आहे. ज्यावर एकेकाळी नंदी असू शकतो, असे वाटते. या चार स्तंभांवर घुमटाकार छत पेलले आहे. या छताच्या खालच्या भागापासून उत्तरोत्तर लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. सर्वात वर कमळाचा आकार कोरला आहे. त्यामुळे हे घुमटाकार छत उलटया कमलपुष्पासारखे भासते. मात्र चतुष्कीच्या चार बाजूंच्या चार भागांवर मात्र बाह्य भागाकडे निमुळती होत जाणारी छते आहेत. ही छते रंगशिलेवरील छताच्या तुलनेत कमी अलंकृत आहेत.
बाजूला सभामंडपाचे चार-चार खांबांच्या रांगा दोन बाजूला असून संपूर्ण सभामंडप त्यावर तोललेला आहे. मंदिराच्या सभामंडपात कोरलेले खांब म्हणजे अतिशय आकर्षक ठेवा आहे. अबूच्या विमलसा मंदिरातील स्तंभांचीच त्यामुळे आठवण होते. याशिवाय पश्चिम व दक्षिणेच्या दारांजवळच्या मुखमंडपांजवळ दुसऱ्या तन्हेचे अन् उतरेच्या मुखमंडपाजवळ तिसऱ्या तन्हेचे स्तंभ आहेत. खरं तर पूर्वी हे सारखेच असावेत कारण शेजारच्या अर्ध स्तंभांप्रमाणे रचना असणारे मूळ खांब असावेत. नंतर काही कारणाने बदलते वेळी चौकोनातून गोलाकारात रुपांतर होणाऱ्या खांबांऐवजी पूर्ण चौकोनी असणारे खांब बसविले गेले असावेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत सुंदर अशा प्रतिमा कोरल्या आहेत. त्यांची संख्या ७०च्या आसपास आहे. विविध मुद्रांमधील शंकर-पार्वतीच्या मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख कामदेवाची अष्टभुजा मूर्ती आहे. कामदेवाच्या मुर्तीची एकूणच कमनीयता, अलंकार स्पष्ट आणि नाजुकतेने कोरले आहेत. मंदिरात तीन तोंडे असणारी एक त्रिमुखी मूर्ती आहे. हे बहुधा शंकर पार्वतीचे शिल्प असावे कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे.

ह्या मंडपाचे छत समतलवितान आहे म्हणजेच सपाट आहेत. भारवाहक यक्ष इथे मात्र लक्ष वेधून घेतात. संपूर्ण स्तंभ चहू बाजूंनी शिल्पांनी सजलेले आहेत. त्यावर काही ठिकाणी मैथुनशिल्पसुद्धा आढळतात. स्तंभावर विष्णू, शिव व पार्वती, गणराय तर काही ठिकाणी योगी कोरलेले दिसून येतात. सभामंडपात असलेला परंतु तिथे नंदी नसलेला हा मंडप अंतराळाला चिकटून उभा आहे. हा संपूर्ण मंडप बंदिस्त असल्यामुळे ह्याला गुढमंडपसुद्धा म्हणतात.गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे.
सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. मंडपातील अर्धमंडपातील स्तंभही उल्लेखनीय आहेत. हया दोन प्रकारच्या स्तंभांवर येणारे घटक आणि त्यांचा क्रम सारखाच आहे. हे स्तंभ गुजरातमधील त्याच काळात बांधल्या गेलेल्या सोळंकी मंदिरांमधील स्तंभाशी मिळतेजुळते आहेत. या स्तंभांचे तळखडे चौरस असून त्यावर तीन अष्टकोनी घटक, त्यावर वर्तुळाकार घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्यावर कीचकहस्त आहेत. स्तंभांमधील खांब आणि अष्टकोनी घटकही पुराणाकथांशी संबंधित असलेल्या मूर्तिशिल्पांनी युक्त आहेत. अर्धमंडपातील स्तंभांवर मात्र कीचकहस्तांऐवजी साधे नागशीर्ष हस्त आहेत.
गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात.
हे मंदिर पाहताना किती योजनापूर्वक कोरलेले असेल, हे जाणवते.

गर्भगृह -
गाभाऱ्याच्या गणेश पट्टीत योगी शिव कोरलेला आहे. त्यावर सकाळी १० ते दुपारी ४ उजेड असतो, तेव्हा हे शिल्प लक्षात येते. एरवी अंधारच आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या असुन तळात किर्तीमुख कोरले आहेत. प्रत्यक्ष गाभारा सभामंडपाच्या पातळी खाली जवळजवळ सव्वादोन मीटर आहे. तेथवर जायला डझनभर पायऱ्या आहेत. प्रत्यक्ष गाभाऱ्याचे आता कठडा घालून दोन भाग केले आहेत. गाभाऱ्यात उत्तराभिमुखी दोन शिवलिंगे आहेत. मूळ मंदिरात शिवलिंग नसल्याने अलीकडच्या काळात गाभाऱ्यात दोन शिवलिंग स्थापित करण्यात आली आहेत. गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली जाते. पैकी प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आणि स्वयंभू आहे. दुसरे गारगोटीचे घडीव आहे. गाभाऱ्याच्या भिंती अडीच मीटर जाडीच्या आहेत. तर उंची जवळपास २१ मीटर आहे.गाभाऱ्याच्या वरील शिखर कोसळलेले असल्याने तेथुन वर पाहिले असता शिखराच्या अंतर्गत भागाचे अवशेष दिसतात व विवरातून आकाशदर्शन होते. गाभाऱ्याच्या तळापासून शिखराची उंची साधारण ४० फुट आहे. गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.
हा गाभारा दगडी चिरे लावून बंद करण्याची काही व्यवस्था असावी अशा खुणा कोपऱ्यांवर आढळतात. गुजरात येथील मोढ्याच्या सूर्य मंदिरात आणि काठेवाड्यातील पट्ट्यांच्या सोमनाथ मंदिरात असा गाभार बंद करण्याची सुविधा आढळते या सर्व मंदिराच्या उभारणीच्या काळातच मूर्तीभंजक, आक्रमक, धर्माध मुसलमानांच्या स्वाऱ्या सुरु झाल्या. त्याचा हा परिणाम असावा.खरं तर गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर असणारं, बाहेरच्या बाजूचं शिल्प, मूळ मंदिर कोणाचं असावं? याची कल्पना देते.
काही अगम्य कारणामुळे देवळाच्या आत फोटोग्राफीला बंदी आहे. यामुळे नेमके काय साध्य होते ते कळत नाही.
मंदीराचे मंडोवर अर्थात बाह्यभिंतीवरची शिल्पकला :-
मंदिराच्या बाह्यांगाचे शिल्पकाम गेल्या हजार वर्षात उन-पावसाचे तडाखे खाऊन बरेच झिजून गेले आहे. सध्या तर प्रदुषणामुळे त्यास अधिक वेगाने ठिसूळपणा येऊ लागला आहे. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर तोलून धरलेले आढळते. हा गजथर सर्वात खालच्या बाजूला आहे.
देवळाच्या मागील भाग



हे कोरीव खांब ..
















ही गणेशमूर्ती....

हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

आदिमायेचं रौद्ररुप !!

ब्रम्हदेव सपत्नीक मूर्ती

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प





उत्तरद्वारानंतर जमिनीलगत एक देवळासारखी खोली आहे. त्यात शिवलिंग, पर्वताकार पाषाण व पार्वतीची मूर्ती आहे. मूळ मंदिरानंतर हे बांधकाम केल्याचे जाणवते. यानंतर गाभाऱ्यातील अभिषेक जल वाहून आणून कुंडात सोडले आहे. तेथून वाट काढून ते नदीत नेऊन सोडले आहे.
या मंदिरातील शिल्पामध्ये आठ हात असलेली एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ती अत्यंत सुबकपणे कोरलेली असून, कामदेवाचे शरीरसौष्ठव, अलंकार सुस्पष्टपणे आणि नाजूकपणे कोरलेले आहेत. या मंदिरातील एका मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. तिला तीन तोंडे असल्यामुळे तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात.
काही ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हातात घेतलेला उंच मुकुट परिधान केलेला विष्णू दिसून येतो. उग्र स्वरूपाची शस्त्रधारी दुर्गा म्हणजे आदिमायेचे संहारक रूपाचे शिल्प इथे पाहता येते. गजासुराचा वध सुद्धा इथे शिल्पात कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने मूर्ती कोरुन कलाकार कलेच्या माध्यमातून देवाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवत असतो.
कुंडाच्यावर त्रिमूर्ती शिव कोरलेला आढळतो. शिवाच्या डाव्या अंकावर पार्वती बसलेली आहे. (काही तज्ञांच्या मते हे शिल्प त्रिमुखी ब्रह्मा व पत्नी सावित्रीचं आहे.) तर वरच्या कोनाड्यात नरमुंडधारी अक्राळविक्राळ अन् भितीदायक अशी महाकाली कोरलेली आहे. कृश शरीराच्या या महाकालीची हाडे देखील दिसतात. कृश स्तन लोंबणारी, वाळलेले हातपाय असणारी ही मूर्ती आहे. गळ्यात मानवी शिरांची माळ आहे. तर कमरेला सर्पमेखला आहे. वरच्या उभट पट्टधात चंद्रकोरीत नटराजाची मूर्ती आहे.
नंतरच्या कोनात शिवपार्वती विवाह सोहळा दाखवला आहे. यातील महादेवाच्या हातात त्रिशूळ आहे. यानंतरच्या कोनात एक प्रकाश स्तंभ रूपी शिव आणि हंसारूढ ब्रह्मदेव व वराहरूपी विष्णू दाखविले आहेत.
दक्षिण दरवाज्याजवळील कोनात कानावर हात ठेऊन लगट करणाऱ्या स्त्रीला टाळून पुढे असणाऱ्या तरूणीकडे जाणारा साधू कोरला आहे. दक्षिण दारालगतच शेंदूर चर्चित गणपतीची मूर्ती आहे.
येथील वैशिष्ट्य म्हणजे चार मुखांचा ब्रम्हदेव इथे दिसतो. ब्रम्हदेवाचे चौथे मुख मागे असून पुढून फक्त तीनच मुख दिसतात.
चौरीधारी शालभंजिका, आरसा घेतलेल्या शालभंजिका, लज्जावती, नृत्यांगना, कच्छमुक्ता, वृक्षदेवता, द्वारपाल, मिथुनशिल्पे, आठ हातांचा कामदेव, चार हातांचा विष्णू, महिषासुरमर्दिनी, त्रिमुखी ब्रह्मा, मोहिनी, गणपती, कार्तिकेय अशा इतरही अनेक उल्लेखनीय मूर्ती आहेत. यांचे अविर्भाव, झोक, डौल, वेशभूषा, दागदागिने, शस्त्रे अतिशय सुबकपणे कोरली आहेत. पण गेल्या हजार वर्षात झालेल्या पाऊसपाण्याच्या माऱ्याने त्यांचे तपशील नष्ट होऊ लागले आहेत.
याशिवाय मंदिराच्याच बाह्यांगावर सुमारे पावणेदोन मीटर उंचीवर एक लहानशी पट्टी कोरलेली आहे. त्यामध्ये शृंगारिक कामशिल्पे, संभोग शिल्पे व कामक्रिडा करणाऱ्या अनेक आकृती कोरलेल्या आहेत. पण त्यातील बऱ्याच झिजून गेल्या आहेत.
अपेक्षा :-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसह लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागलेल्या दिसतात. वर्षभरातील इतर सोमवारच्या तुलनेत श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. तसेच इथे महाशिवरात्रीला मोठीजत्रा भरते , हि जत्रा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा असल्याचे बोलले जाते. महाशिवरात्रीला अंदाजे दोन-अडीच लाख लोक येतात.आपल्याकडे एवढा अमूल्य ठेवा आहे मात्र तो आपण जपायला हवा. मंदिराच्या परिसरात काहीच करायला नको. आज अंबरनाथच्या शिवमंदिराच्या अगदी काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. तसंच येथील MIDC च्या प्रदूषणाचाही परिणाम या मंदिरातील दगडावर होतोय.
हे मंदिर मोठं पर्यटनस्थळ व्हावं, असं वाटत असले, तरी तशा सोयीसुविधा नाही आहेत. आजही मंदिराच्या आवारात तुम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. तसंच मंदिराबद्दलची खूप चुकीची माहिती पसरवली जाते. मंदिर आवारात याबद्दल एखादी माहिती पुस्तिका वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना या मंदिराच्या इतिहासाबद्दलची खरी माहिती कळेल.
या वास्तूला आता हजार पूर्ण होत आहेत. पूर्वी पेक्षा आता मंदिरात खूप बदल झाले आहेत. पूर्वी मंदिराच्या समोरील बाजूस काहीच नव्हतं. पण आता तिथे सुंदर बाग करण्यात आली आहे. तसंच येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसादही दिला जातो. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हे मंदिर दुर्लक्षितच राहिलं. आता मागील ४-५ वर्षांपासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं. जर हे स्थळ पूर्वीच पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं तर आजचं चित्र फार वेगळं असतं. आता रस्ते, मंदिरातील लाद्या ते बसवल्यामुळे भाविकांची सोय झाली आहे."
मागील तीन वर्षांपासून एका स्थानिक पक्षातर्फे महाशिवरात्री दरम्यान इथे आर्ट फेस्टिव्हल भरवला जातो आणि त्याच्या बऱ्याच प्रमाणात जाहिरातीही केल्या जातात. त्यामुळे या मंदिराबद्दल थोडी जनजागृती होऊ लागली आहे. परंतु जशी केवळ महाशिवरात्रीसाठी इथे स्वच्छता केली जाते, तशीच स्वच्छता नेहमी राहावी, अशीही अपेक्षा इथे येणारे पर्यटक आणि स्थानिक व्यक्त करतात.
२०१५ साली अंबरनाथचे खासदार (कल्याण लोकसभा क्षेत्र) डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" चे आयोजन करून अनेक जागतिक कलाकारांना एकाच मंचावर बोलावून एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यात जगात विख्यात पंडित जसराज, पद्मश्री हरिहरन, प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी, इत्यादी अनेक प्रसिद्ध कलाकार माननीय खासदारांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" च्या निमित्ताने अंबरनाथ येथे बोलावून अंबरनाथकरांना एक आगळीवेगळी भेट दिली होती तसेच विविध चित्रांचे प्रदर्शन, पुरातन शस्त्र प्रदर्शन, पुरातन वस्तू, चित्रकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम घेऊन, अंबरनाथकारांची मने जिंकली होती तसेच त्या निमित्ताने काहीसा दुर्लक्षित झालेला शिवमंदिर परिसर पुन्हा नव्याने उजळून निघाला होता.
अंबरनाथचा काडेपेटी उद्योग :-
अंबरनाथ म्हणले कि आणखी एका गोष्टीची आठवण होते, ती म्हणजे काडेपेटी. आता त्याची थोडी माहिती घेउया.७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी ! इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९५ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं....
आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे 'एम', 'आय नो ', 'होम लाईट','शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत.
संदर्भ :-
१) ठाणे जिल्हा गॅझेटीयर२) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
५) http://sagarshivade07.blogspot.com
६) शेखर शिवदास ठाकरे tshekhars@gmail.com + 974 - 555 765 11
७) https://milindjournalist.blogspot.com/
८) https://bijoor.me/2013/11/07/cycling-to-ambernath-shiva-ambreshwar-temple/
९) राहुल रणसुभे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
१०) http://myblogtshekhars-shivmandirambernath.blogspot.com/2016/08/blog-post.html
११) https://zerobeyond.com/ambernath-shiv-temple-india/
१२) www.survesagar.wordpress.com
१३)
मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे. बाहेरील
बाजुस असलेली शिल्पे निवांतपणे पाहण्यासाठी किमान एक/दिड तास तरी अवश्य राखुन ठेवावा. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते. लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी १९९९ रोजी हे "तीर्थक्षेत्र" म्हणुन घोषित केले आहे. त्यामुळेच कि काय पण इतर तीर्थक्षेत्राजवळ आढळणारा गचाळपणा येथीही थोड्याफार प्रमाणात आढळतो.
सुदैवाने जागतिक पातळीवर या "शिल्पनक्षत्राची" नोंद घेतली आहे, पण आपण अजुनही याची खरी किंमत ओळखु शकलो नाही. ९५० वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचे आघात सहन करत, आपले सौंदर्य जपत उभे असलेल्या ह्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची शिल्पश्रीमंती अवश्य पहा. नाहीतर वेरूळ-अजिंठाशी नाते सांगणारे आणि मुंवई-पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणारे हे भव्य शिल्प पहायला इतकी वर्षे का उशीर केला याची चुटपुट लागुन राहायची.
==================================================
==================================================
प्रचि १
प्रचि ४
शिवलिंगाचे दर्शन घेण्याअगोदर या गणेशाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे.
I
had to ask for directions to actually find the temple that is clustered
in the middle of the town next to the Waldhuni river, which is a
tributary to the Ulhas river that flows through Kalyan. I parked my
cycle in one of the shops that provide flowers and other materials for
devotees
As
you enter the gates of the protecting wall around the temple complex,
this intricately carved rock structure of the temple stands proudly in
the center of the complex. The top dome of the temple seems to have been
destroyed or disintegrated, but the rest of the temple seems to be
remarkably in tact
This
temple is built in around 1000 AD in the Vesara architecture style that
combines two different styles. The northern style, technically called
Nagara, is distinguished by the curvilinear towers. The southern style,
known as the Dravida, has its towers in the form of truncated pyramids.
The Vesara style combines both these styles and one can see both type of
features
There are exquisite carvings both outside and inside the temple. The sculptures are all of Hindu mythological origin, predominantly in the Shiva theme. On the outside, there is a ring of sculptures at eye level all around the temple, while inside, there are sculptures on pillars, inner walls and the roof
The inner sanctum is located at a lower level inside the temple, and one has to climb down 20 steps to go down in the Garbhagriha – or interior of the sanctum sanatorium
Located
in the center of the Garbhagriha is the “Swayambhu” or self-manifested
Shiva Linga, and this is open to the sky, probably due to the top of the
temple being destroyed or disintegrated. There was a stream of visitors
who were busy praying and placing flowers, coconuts and other offerings
to the Linga
There is also a small altar on the outside of the temple with the image of a six-armed Varahi. With the head of a sow, Varahi is the shakti (feminine energy, or sometimes, consort) of Varaha, the boar Avatar of the god Vishnu. She is depicted holding a danda (staff of punishment), khetaka (shield), khadga (sword), and pasha (noose) in four hands and the two remaining hands being held in Abhaya and Varada Mudra (“blessing gesture”). She also holds a shakti and hala (plough). She is depicted holding a child sitting on her lap
On
the southern end of the temple complex, a small sanctorium holds the
idol of Lord Ganesh, typically covered with vermillion paint. Behind
this little sanatorium is a small ceremonial pond with the typical
square boundaries
Flowing
along the temple to the east is the Waldhuni river, also called Vadavan
river that is one of the seven tributaries of the Ulhas river. Today,
this river is quite narrow and not very clean. But along the banks I
could see a lot of activity with women washing clothes and some kids
having a blast dipping in the water

The
temple complex is kept quite clean, and I saw some men dressed in the
typical holy saffron clothes who seemed to be maintaining the complex
regularly
It
was almost noon and getting quite hot, and I had to cycle all the way
back home. So I took one last look at the magnificent temple, collected
my cycle from the shop, had a nice cool drink and headed off back the
same way I came – enjoying the short off-road section
(ता. अंबरनाथ, जि. ठाणे) या मंदिराचे स्थापत्य वैशिष्टयाव्यतिरिक्तही अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर एक शिलालेख असून त्यात मंदिराचे बांधकाम ठाणे येथील शिलाहार राजा मुम्मुणिराज याच्या कारकिर्दीत शक संवत ९८२ (सन १० जुलै १०६०) रोजी पूर्ण झाले असा उल्लेख आहे. हा शक संवत्सराचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भूमिज प्रकारातील सर्वात प्राचीन मानले जाणारे माळच्यातील उदसयपूर येथील उदयेश्वर मंदिर साधारणपणे यासच सुमारास, म्हणजे इ.स. १०६९ मध्ये बांधले गेले. मात्र त्या देवळातील पूजाअर्चा वगैरे धार्मिक विधींना सुरुवात इ.स..१०८० मध्ये झाली. त्यामुळे या दृष्टिकोनातून अंबरनाथ येथील शिवमंदिर उदयेश्वर मंदिरापेक्षा प्राचीन आहे असे वाटते.
शिलालेखामध्ये मंदिराचा उल्लेख, "श्री अंबरनाथ देवकुल" असा करण्यात आला असून त्या मंदिरावररुनच या गावाला आणि पर्यायाने रेल्वे स्थानकाला "अंबरनाथ" हे नाव पडले. हे मंदिर मुंबई-पुणे लोहमार्गावरील अंबरनाथ स्थानकापासून दोन कि. मी. अंतरावर असून त्या भोवती त्याच काळात बांधलेली सीमाभिंत आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून दोन अर्धमंडप आणि एक मुखमंडप असलेला मंडप, त्याच्या मागे अंतराल आणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याने या जागीच मंदिर उभारण्यात आल्यामुळे गर्भगृहाच्या जमिनीची पातळी मंदिराच्या अन्य भागातील जमिनीच्या पातळीपेक्षा बरीच खाली असून गर्भगृहात काही पायऱ्या उतरूनच प्रवेश करावा लागतो.
शिल्पसंहितांनुसार भूमिज मदिरे पुढीलप्रमाणे तीन प्रकारची असतात चतुरस्त्र, वृत्तसंस्थानक आणि अष्टशाल हे तीन प्रकार होते. अष्टशाल या प्रकारात गर्भगृहाला आठ भद्र असतात. अंबरनाथ मंदिराचा तलविन्यास तारकाकृती आहे. मंडप आणि गर्भगृहाच्या बाहयरेषा एकमेकांना कोपऱ्यात छेदणाऱ्या चौरसासारख्या आहेत.
मंदिर विस्तीर्ण पीठावर उभे आहे. सध्याच्या जमिनीच्या पातळीच्या वर कुंभ, अंतरपत्र, ग्रासपट्टी,गजथर आणि नरथर असे पीठाचे थर आहेत. त्यामुळे हे पीठ साध्या पीठापेक्षा अधिक अलंकृत आहे असे म्हणता येत. पीठाच्या विविध आडव्या थरांवर गुजरातमधील कलेचा प्रभाव दिसून येतो.
पीठाच्या वर मंडोवर असून यात तवंगानी अलंकृत केलेला कुंभ भागाचा मधूनमधून देवमूर्ती असलेला पट्ट, अतरपत्र, कपोताली इत्यादी भाग आहे. त्यावर जंघा, उद्गम, भरणी, शिरावटी, मंचिका, कपोताली आणि छादय आहेत. त्यावर गर्भगृहावरील शिखराला सुरुवात होते.
मंदिराला तलविन्यास आधीच नमूद केल्याप्रमाणे तारकाकृती आहे. त्याची परिणती गर्भगृह आणि मंडपाच्या बाह्यांगावर अंगे आणि सििललांतरे येण्यात झाली आहे. परिणामी पुढे आलेल्या स्तंभाच्या दोन उपलब्ध बाजूंवर मूर्तीची जोडी आहे आणि गर्भगृहाच्या तीन मुख्य भद्रांवर रथिका आहेत. भूमिज मंदिरांमध्ये सर्वच भद्र आणि अंगभागावर मूळ शिखराची प्रतिकृती असलेली लघुशिखरे असतात. त्यामुळे कपोतालीवर अशा लघुशिखरांची एक ओळच निर्माण होते आणि त्यातून प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर आविष्कार तयार होतो. या मंदिरावरही अर्थातच ह्या छायाप्रकाशलीलेचे सुखद दर्शन घडते. हे शिवमंदिर असल्याने ह्या मंदिराच्या स्तंभाच्या बाह्यांगावरील मुख्य देव शिवपरिवारातीलच आहेत. अंतरालाच्या बाह्यांगावर गणेश आणि कार्तिकेय आहेत. गर्भगृहाच्या बाजूच्या दोन मद्रांवर महाकाली आणि गजासुरसंहारमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील बाजूच्या मद्रावर हरि-हर-पितामहार्क आहे.
या मंदिरावर दाखविण्यात आलेली शिवाची उललेखनीय खरुपे म्हणजे मार्कडेयानुग्रह, कल्याणसुंदर आणि लिंगोद्भव शिव. विष्णूचे काही अवतार आणि रुपेही मंदिराच्यास भिंतीवर दाखविण्यात आली आहेत. मंदिराच्या कोणांवर दिक्पाल दाखविले आहेत. ब्रह्मदेवाला या मंदिरात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मंडपाच्या इशान्य कोपऱ्यात ब्रह्मदेवाचे एक लहानसे मंदिर आहे.
मंदिराच्या मंडपात चौरस रंगशिला असून त्यावर चतुष्की आहे. या चार स्तंभांवर घुमटाकार छत पेलले आहे. या छताच्या खालच्या भागापासून उत्तरोत्तर लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. सर्वात वर कमळाचा आकार कोरला आहे. त्यामुळे हे घुमटाकार छत उलटया कमलपुष्पासारखे भासते. मात्र चतुष्कीच्या चार बाजूंच्या चार भागांवर मात्र बाह्य भागाकडे निमुळती होत जाणारी छते आहेत. ही छते रंगशिलेवरील छताच्या तुलनेत कमी अलंकृतआहेत. मंडपातील आणि अर्धमंडपातील स्तंभही उल्लेखनीय आहेत. हया दोन प्रकारच्या स्तंभांवर येणारे घटक आणि त्यांचा क्रम सारखाच आहे. हे स्तंभ गुजरातमधील त्याच काळात बांधल्या गेलेल्या सोळंकी मंदिरांमधील स्तंभाशी मिळतेजुळते आहेत. या स्तंभांचे तळखडे चौरस असून त्यावर तीन अष्टकोनी घटक, त्यावर वर्तुळाकार घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्यावर कीचकहस्त आहेत. स्तंभांमधील खांब आणि अष्टकोनी घटकही पुराणाकथांशी संबंधित असलेल्या
मूर्तिशिल्पांनी युक्त आहेत. अर्धमंडपातील स्तंभांवर मात्र कीचकहस्तांऐवजी साधे नागशीर्ष हस्त आहेत.
अंबरनाथ हे जरी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन भूमिज मदिर असले तरी या मंदिराला त्याची स्वतःची अशी खास वैशिष्टये आहेत. या वैशिष्टयांमुळे ते माळव्यातील उदयेश्वर मंदिरासारख्या सर्वसाधारण भूमिज मंदिरापेक्ष काही अंशी भिन्न आहे. मंदिराचा तलविन्यास सप्तरथ असून त्याचे शिखर सात मजली आहे (सप्तभूम भूमिज प्रासाद). हया भूमी किंवा मजले बहुतेकवेळा मुख्य शिखरावरील उत्सेधात्मक सात शिखरप्रतिकृतींनी म्हणजे एकावर एक अशा सात प्रतिकृतींच्या रांगांनी सूचित केले जातात. या शिखर प्रतिकृतींच्या रांगा मुख्य शिखरावरील चार लतांच्या मधल्या भागात असतात. या चार मुख्य दिशांना असणाऱ्या लता चैतयगवाक्ष-प्रयोजनांनी अलंकृत केल्या जातात. अंबरनाथ मंदिरावर असलेल्या शिखरप्रतिकृती मात्र मुख्य शिखराच्या प्रतिकृती नाहीत. त्या दाक्षिणात्य (द्राविड) पद्धतीची शाला शिखरे आहेत. त्यांना शिल्पशास्त्रांच्या तांत्रिक भाषेत स्तंभकूट संबोधले जाते. मंडपावर चौकोनी, शंक्वाकृती शिखराऐवजी घंटासंवरण प्रकारचे शिखर आहे. शिल्प संहितांमध्ये "द्राविडकर्म" या प्रकारचे वास्तु-अलंकरण सांगितले आहे. कृष्ण देवांच्या मते अशा प्रकारच्या शिखर-रचना करणे म्हणजेच द्राविडकर्म असावे. तसे असल्यास अंबरनाथचे मंदिर या प्रकारचे अलंकरण असलेले महाराष्ट्रातील पहिले मंदिर होय.
© Suresh Nimbalkar
अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)
मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.
मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे.
काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे.
मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.
मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे. हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते. दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात .
मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.
इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते
अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -












इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.
हा देवळाचा गाभारा. गाभार्यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.
नंदी परत एकदा
खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.
हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
वालधुनी नदीच्या काठावरील, हेमाडपंती शैलीतील हे मंदिर सन १०२२ ते १०६० या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झाले. शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा धाकटा भाऊ माम्वाणी राजाच्या काळात सन १०६०मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते.
मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका खंडात इ. स. १०६०च्या शिलालेखाचा उल्लेख आहे. मंदिराचे गर्भागृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. छत व कळस यामध्ये पोकळी ठेवलेली आहे. कोनात जोडलेल्या गाभाऱ्यामुळे ऊन-सावल्यांचे वेधक दृश्य पाहायला मिळते. मंदिरासमोरील नंदीमंडप व संरक्षक भिंत अस्तित्वात नाही.
अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)
मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.
मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे.
काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे.
मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.
मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे. हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते. दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात .
मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.
इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते















इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा

आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.



देवळाच्या मागील भाग


ही गणेशमूर्ती....


हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.


हे कोरीव खांब ..

आदिमायेचं रौद्ररुप !!

ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प

संपूर्ण देऊळ..

खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.
हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
Ambernath Shiva Temple
Not very far from Mumbai there is a marvelous 11th century temple of Lord Shiva. Very few people know about it and navigating to this place without gps can be tricky. But the grand monument is mostly intact with its rock carved sculptures and structural grace .. therefore, a must visit for heritage enthusiasts. Another unconfirmed trivia about this temple is it was visited by the great Guru Nanak in 1415 CE.
This temple was built by Mahamandaleswara Chittaraj in the 11th century. He belonged to the Silahara dynasty … Chittaraj’s younger brother Mummuniraj completed the temple in 1060 CE. The origins of this temple can be traced due to a stone inscription inside.
श्री अंबरनाथ देवकुला समुद्धारित
It is said that there was a swayambhu Shiva-linga situated next to the river stream and the kings decided to build this black stone temple over it. Therefore to enter the garbha-gruha one has to climb down about 9 stairs and the temple is west facing in direction which is quite rare. This is a temple built in a Bhumija structure and since this temple goes a few years before the similar temple in Udaipur MP … it is important as the first documented example of a bhumija temple.
Garbhabruha and mandapa are like to stars coming together separated by free space known as antaral which is in pragriv form here. The wall has beautiful projections and recesses. There are about 73 sculputed statues on the walls with some special improvisations in gods and godesses which unfortunately did not notice thanks to my ignorance in iconography (this demands another visit) and Sur-sundari nymphs too. The vertical decorations on the shikhara are known as latas and this temple is built in the saptarath-saptabhum-bhumij-prasad structure. Since this is built by a king it could be categorized as Asiddhyatan temple. The element I would love to design for my house was figurines on the rectangular faces on the columns
The pillars are ornately carved and have some similarities with the pillars of the Modhera sun temple built by the Solanki kings … I am sharing a photo from my trip to Modhera in 2008 … but that full story in another blog post.
Modhera Sun temple, Gujarat
https://chinmaye.com/2017/06/13/ambernath-shiva-temple/
मुंबईजवळच्या अंबरनाथ मंदिराची गोष्ट जे हजार वर्षांपूर्वी आम्रनाथ होतं
AMBERNATH SHIV TEMPLE, INDIA - zerobeyond


Ancient architecture in India is very rich in heritage. Structures as ancient as the 11th Century is truly unique! Ambernath Shiv Temple may have been a little dilapidated to withstand historical climatic onslaught in the last 10 Centuries, but the marvel still stands like a true testament of extraordinary architectural endeavour.
The Ambernath Shiv Temple was built during the 1060 AD in classical style by Chittaraja, King of Shi’erahala. Later on, the work was completed his son Mumunni. The temple is truly an out-of-this-world marvel, because it was built by carving a single large boulder.

The architecture of this temple is Hemadpanti style. The carvings of the outer wall are using black rock and are very exquisite.

As per UNESCO records, the first-ever photos of the temple was taken by a British named Henry Cousens. Around 1850, the then director of the ASI – Archaeological Survey of India had also taken photos of the temple. The dilapidated state was visible in these photographs. Needless to say, trees grew on the walls of the temple. The ASI carried out detailed documentation as one of its pilot projects. The temple was rediscovered by the people, having lost for nearly 800 years.
Each year, during Shivratri (Lord Shiva’s marriage to Goddess Parvati) devotees flock to Ambernath in millions. The small suburban town of Ambernath becomes the centre of attention of Indians as well as many foreigners.

History speaks about King Shilahara as a vassal of Rashtrakutas in the Konkan region. Towards the south, the mighty Kingdom of Chalukya was renowned. The temple is only a few miles away from the ancient trade route. The route leads to the Deccan Plateau. The structure’s arrangement is in a cross shape indicating an interesting fusion of architectural styles. The influence and characteristics of the Chalukyan kingdom is very much evident.
Above ground, the temple structure is up to 21 meters high. Nandi, the guardian of the main entrance to every Shiv temple is omnipresent. Interestingly, there are the two Nandis from the west porch. The two other porticoes are on the north side and the east side.
The structure’s outer wall is carved with various sculptures. The most unique sculptures are of Hari-Hara-Pitamaha-Surya. It decorates the east wall as the centre of the temple. They represent together as Shiva, Vishnu, Brahma and Surya.
Surrounded by four pillars, the Sabhagruha has a raised central altar and a carved Trabeate dome surmounted it. In total, 14 columns of decorative Ghatakam and detailed Dhaarvahakas (load-bearing supports) decorate the Sabhagruha. While the ceiling rises to 14 feet, the height of the pillars ranges from 10 to 12 feet.

It is interesting to note that the sanctum sanctorum (Garbhagruha) is an underground room, where two Shiva Lingas have been built. The depth of the underground area can be gauged by the 20 steps down from the top as a little more than 10 feet. From outside, the temple looks solid and is an orderly square, with a roof high above it.
The exterior wall have been sculpted on the stepped and faceted for identification. In total, nearly 250 elephants called ‘Gaj-thar’ cover the temple. The upstairs houses around 70 Shrungara sculpture Muthuna.

Indian mythology believes that the temple was built by the Pandavas during their exile period. Ambernath Shiv Temple is the oldest temple in India. Ambernath suburb is 60 km away from Mumbai city by local train.

The historic 11th Century Ambernath Shiv Temple is now a UNESCO heritage structure. The temple is also known as Ambreshwar Shiva Temple. Locally, it is popular as Puratana Shivalaya. The ruins of the temple still speak about great Indian architecture.

The ASI – Archaeological Survey of India has completely transformed the temple premise with beautiful landscaping and keeping the area restricted as a tourist place to safeguard the ancient beauty.

Apart from spectacular Indian architecture, Ambernath Shiv Temple is also an engineering marvel for being a jointless structural beauty!
Image Courtesy: Johnny D






























































































No comments:
Post a Comment