तातोबा मंदिर, ओढा | Tatoba Temple, Odha | Discover Maharashtra
नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन शहर आहे. या शहरात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील काही वास्तू आज चांगल्या स्थितीत आहेत तर काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकहुन निफाडकडे जाताना साधारण १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा गावातील अशीच एक ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.तातोबा मंदिर, ओढा(Tatoba Temple)
गोदावरीच्या कुशीत पहुडलेलं ओढा तसं लहानसं गाव. नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करणारे रंगराव ओढेकर याच गावातील. गावातील आजमितीला जमीनदोस्त झालेल्या ओढेकरांच्या वाड्याच्या मागील बाजूस असलेले तातोबा मंदिर आज विस्मृतीत गेले आहे. मंदिराची पडझड होत असून काटेरी झुडुपांनी मंदिराला वेढा घातला आहे. पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात समावेश असूनही ही वास्तू पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे.
मंदिराचे बांधकाम साधारण १३-१४ व्या शतकातील असावे असे वाटते. गावातील
तातोबानावाची व्यक्ती इथे कायम दिवे लावीत असे त्यामुळे या मंदिराला तातोबा
मंदिर हे नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. पण खरं तर हे मंदिर नाही कारण आत
कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. प्राचीन काळात हा ऋषीमुनींचा मठ असावा व
अध्ययन-अध्यपनासाठी या वास्तूचा वापर होत असावा असे अभ्यासक सांगतात.
मंदिरा समोर कुण्या अनामिक सत्पुरुषाची समाधी आपल्या नजरेस पडते.
स्थानिकांसोबतच पुरातत्व विभागाने देखील दुर्लक्ष केल्याने आज ही वास्तू
नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन
घडवणाऱ्या या वास्तू आपला वैभवशाली इतिहास सांगत आहेत. केवळ आवश्यकता आहे
तो संवाद साधन्याची.
रोहन गाडेकर
लोणजाई टेकडी
| रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी पायथा |
| लोणजाई टेकडी वरून |
| निफाडच्या शेतीचे दृश्य |
| अन्य रांगा |
| लोणजाई मंदीर |
| लोणजाई देवी |
| लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत |
Few days back there was this news in Times of India newspaper which I came across and which set the ball rolling for my next exploration.
The news was that in the village of Chandori, few temples which has got submerged under the Godavari waters have resurfaced again and that too after 34 years!, The reason behind the resurfacing of these temples were the drought like conditions in the state of Maharashtra which has lead to drying of the Godavari river bed.
| Dry river bed of Godavari river |
| Submerged Legacy |
It is not everyday that you get an opportunity to witness something which is lying submerged for past 34 years under the flowing waters of Godavari river.
| Past glory |
Now the next step was to see how I can reach this place, luckily for me my friend Shashi called me and asked can I join him for the visit to Chandori Temples. Well now this is what I call Law of attraction at its best and without blinking my eyelids I said I was in.
We all left on Saturday night taking a last fast Kasara local train and by the time we reached Kasara Station it was 1.30 am. From Kasara we had booked Jeep to take us to the base Village. Following the google map we reached the Chandori Village.Upon reaching the Chandori Village we took a right turn from the highway to enter the village, as it was 3;45 am so asking for direction was itself a task as not a soul could be seem. Anyways a little drive into the village and we were near this Temple.
| Temple from where the path from right side leads to the Godavari river |
It was quite dark when we reached here luckily for us we found one villager who informed us that we were on right way and the Godavari river is just behind this temple but one has to take a little walk to the right side from the side of this temple.One thing that was very surprising was the coolness in the weather and the breeze flowing in the village.It was decided that we would go down the river side in the morning and check out the temples as it was dark but then wanderers are wanderers so few of us started to walk to have a sneak preview of the temples.
| Sneak preview |
| Exploration under full moon |
I simply cannot describe you the beauty of the place, especially when you are able to see only deserted ruins drenched in the milky moonlight of full moon and with cool breeze humoring you. Well it was a sight to die for. How I wish I could capture that real moment on camera but my camera is not so efficient to do so still here I am.
| Deserted temples drenched in the milky moonlight of full moon |
We again came back to the temple and decided to catch little sleep, hence we slept on the floor of the temple till the day break.Most of us were not able to sleep as the breeze was blowing very furiously and it was too chilly, mind you all this during the times when average climate in Maharashra is 40 degree furnace hot.
| Caught napping |
Oh ! I simply loved this place. As I was not carrying any bed sheet so for me the sleeping proved to be quite challenging.
Sun was yet to come out, and we were all eager now to go and explore the Chandori Temples Legacy, so we all regrouped and started our walk all over. Moving from the right and a little walk of 2 minutes we come across a this bridge.
| River bridge and temples behind it |
Walking little further from the temple we come across this bridge which joins the Chandori to Saykheda village and behind this bridge one can see a series of small temples on the river bed and the on the other side of the river the sun was rising in all its glory, painting the scenery all around in golden sheet.
The golden sunlight lit these temples in such a manner that one could feel the magic of bygone era.These temple are in a row one after the other but at little distance.
| Temples in a row |
| Temples standing as on today |
Few of our friends had visited this place 3 weeks back and they found these temple partially submerged in water hence they had little difficulty to check out from inside. I am sharing the pictures they clicked 3 weeks earlier.
![]() |
| Partially submerged temples clicked 3 weeks earlier ( PC:Vinay Y Jadhav) |
The interesting thing about all these temples was that each of them had a shivling. In a way we can say that each of the temple is Shiva temple.
| Innumerable shivlings |
| Shivling here |
| Shivling there |
| Shivlings everywhere |
Not much information is available about these temples on the internet and neither the locals could give us any useful information. No doubt they have cleaned the temples from inside and offered prayers too.At some places people who had visited had put flowers and garlands on the deities.
| Garlanded Idols |
| Another garlanded Idol |
I could not find much history about this place on the net, matter of fact even the Archaeological Survey of India(ASI) has no record of these temples except for the fact that the villagers last saw these temples in the year 1982. According to one of the reports that I read on net was that during the year 1907 Nandur Madyameshwar dam was built (Reference Nashik Gazetteer) resultant to that the water's course went over these temples and they got submerged under the waters.Since last 100 years only twice these temples could be seen this been the 3 time, otherwise mostly their top domes were visible.
![]() |
| 3 weeks earlier picture (PC: Vinay Y Jadhav) |
It was now time for us to start our exploration. Moving down from the bridge we checked out the temple nearest to the bridge.
| Visit to our first temple |
The front portion of the this temple is under debris perhaps due to this reason one can see only the head of the Nandi idol rest of the body buried under the stones.
| Sunken idol of Nandi |
| Ganpati carved on outer side |
The carving on the temples are quite exquisite
![]() |
| Exquisite carvings on the temple (PC: Vinay Y Jadhav) |
![]() |
| Exquisite carvings on the temple (PC: Vinay Y Jadhav) |
I am sharing pictures of my friend Vinay Jadhav who had visited this place 3 weeks earlier because that will help you understand how different the whole complex looked with water still being there.
![]() |
| Pic taken on 1st may 2016 |
From here we moved on to the next temple. most of the temples were of similar pattern except for the last which is of Indra god.Few temples has this kind of embankment.
| Embankment around the temple |
| Ghats been used for bathing |
We relaxed here for a bit of a time and then moved on to the last temple which is also know as Indra temple.
![]() |
| Indra temple with 2 real snakes ( PC: Vinay y Jadhav) |
Watching all this neglected historical legacy of temples and idols scattered around like some waste garbage. I was not only pained and hurt but felt helpless and frustrated as to why nothing can be done to protect and salvage such beautiful architecture.
| History or garbage |
| Is this the way to treat the national treasures |
| Utter Filth |
Seeing all this I want to make a humble request to, then be it Govt of India or some NGO to come forward and adopt this site. Reconstruction can be done of these temples especially with the modern technology available.The local Sarpanch should make an effort to bring their village on map as a popular tourism spot.
Now that these temples have emerged and can be seen. Every effort must be made to see that this wonderful piece of history don't dissolves away into oblivion and remains only as news that these temples were seen third time during the year 2016.
With heavy heart and lots of questions in my mind I left from Chandori Village to explore a new destination Kugaon Killa aka Inamdarancha wada( Click here to read out our new journey) because I believe the journey of Weekend Wanderer is ever ongoing !!
Links:
Shashikant Dumbre Picture set of Chandori
Chandori Temples Journey video ( Click here for the video Film)
Special Thanks to Shri Vinay Jadhav for allowing few of his pictures for this blog.
Live Photo
Updated on:
नाशिक ः गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी एक आहे. नाशिकच्या १८८८ मधील गॅझेट मध्ये या गावाचा इतिहास आहे.
चांदोरी गावचे जहागीरदार सरदार भाऊसाहेब हिंगणे यांचा हिंगणे वाडा इतिहादाची साक्ष देत आजही सुस्थितीत उभा आहे. 1721 मधील हिंगणे वाडा देशात प्रसिद्ध आहे. या वाडयाला महादेवभट हिंगणे यांचा मोठा इतिहास आहे. ते नाशिकचे अॅडमीनिस्ट्रेटर होते. त्यांना 1718 मध्ये बहादुरकी मिळाली व त्यांना चांदोरीसह पाच गावांची जहागिरी दिली. तसेच दिल्लीची वकिली देखील त्यांनी केली होती. अश्या या हिंगणे वाड्यात त्यांचे वंशज आबासाहेब हिंगणे हा वाडा सांभाळत आहेत. चारशे वर्षापूर्वीचा मतकरी वाड्यामधील दक्षिण मुखी रामाचे मंदिर गावाचे वैभव असून वर्षभरात अनेक उत्सव या गावात साजरे केले जातात. मतकरी वाड्यातील रामजन्मोत्सव व दक्षिणाभिमुख राममंदिर महाराष्ट्रात आगळेवेगळे आहे. राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती कायम चौपाळ्यावर असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चिम पिंडी हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. रामनवमीला येथे मोठी मिरवणूक काढली जाते. या मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची चित्रे पहायला मिळतात. मतकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या आहेत.
या गावात माघ पौर्णिमेला दोन दिवस यात्रा असते. या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. नवमीच्या दिवशी मोठा उत्सव असतो. हिंगणे घराण्याचा पराक्रम, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरे, इंद्राचे दुर्मिळ मंदिर, जुने वाडे, नारायण महाराजांची संजीवन समाधी, नदीपात्रात असलेली आठ हेमांडपंती मंदिरे, टर्ले-जगताप वाडा, हिंगमिरे वाडा आणि बोहाड्याची परंपरा जपणारे हे गाव म्हणून पंचक्रोशित आेळखले जाते. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथेही इंद्राचे मंदिर आहे.
गोदावरी नदीच्या पात्रात मंदिर आहे. ज्यावर्षी नदीपात्र कोरडे होते, त्याच वेळेस या मंदिरातील देवतांचे दर्शन होत असते. अशी आठ हेमांडपंती मंदिरे गावात आहेत चांदोरीची आणखी एक ओळख म्हणजे लोककलावंत माधवराव गायकवाड. लोकनाट्य क्षेत्रात आजही गायकवाडांचे नाव आदराने घेतले जाते. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके हे स्वतः माधवराव गायकवाडांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. मात्र तमाशा हेच माझे जीवन असल्याचे सांगत त्यांनी फाळकेंना चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
गावात अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्यामध्ये पूर्ण गाव सहभागी होताे आमच्या वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मिळ आहेत वाडा बघण्यासाठी पर्यटक नेहमी भेट देत असतात.
- अश्विनी मतकरी (मतकरी वाडा)
॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी, मणी-मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
॥ चंपाषष्ठी करिती जे कुळधर्म, त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
गोदावरी ज्या ठिकाणी चंद्रकोरीप्रमाणे वळण घेऊन प्रवाही होते, महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जागृत आणि परंपरेने मानाच्या स्थानांपैकी चांदोरी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर प्रथम चांदोरी येथे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळेच “आधी चांदोरी, मग जेजुरी” ही श्रद्धापर परंपरा चांदोरीसह पंचक्रोशीत अनेक वर्षांपासून अव्याहत सुरू आहे.
चांदोरी गावचे जहागीरदार सरदार भाऊसाहेब हिंगणे यांचे सातवे वंशज पुष्कर हिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वी उभारण्यात आले. त्यांच्या पणजोबा नानासाहेब हिंगणे यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरात स्वयंभू पिंड असून, बाहेर हेगडी प्रधानाची मूर्ती आणि आवारात दीपमाळ आहे.
वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. माघ पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते आणि या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. दिवंगत भक्त चंद्रकांत गडाख यांनी येथून पायी जेजुरी वारीची परंपरा सुरू केली. गडाख कुटुंबाकडे बारा गाड्या ओढण्याचा मान असून, मंदिरातील पूजाविधीची जबाबदारी गुरव कुटुंबाकडे आहे.
दिंडोरी, निफाड आणि आजूबाजूच्या गावांतील भक्त जेजुरीला जाताना चांदोरी येथे काठीची भेट आणि दर्शन घेतात. ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते.
मंदिराचे पुजारी नीळकंठ शिंदे सांगतात की, देव खंडोबा बानूच्या माहेर असलेल्या चंदनपुरीला जाताना चांदोरी येथे गोदावरीच्या तिरी मुक्कामी थांबले. गावचे जहागीरदार हिंगणे यांना स्वप्नात दृष्टांत देऊन, “माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी मंदिर बांधा,” असे सांगितले. चमत्कार असा की ज्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले, तेथे जेजुरीप्रमाणेच स्वयंभू पिंड प्रकट झाली. या स्थानी खंडोबाचा पदस्पर्श लाभल्याची श्रद्धा असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चंपाषष्ठीच्या दिवशी चांदोरीतील ग्रामस्थ आपल्या घरातील देव्हाऱ्यातील देव भेटीसाठी येथे आणतात. पहाटेपासून सायंकाळपर्यंत भाविकांची मोठी वर्दळ असते. मंदिराचा जीर्णोद्धार १९८० च्या सुमारास करण्यात आला असून, खंडेरावाच्या भंडाऱ्याचा म्हणजेच पिवळा रंग मंदिराला देण्यात आला.
चांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा आता नाही, परंतु ते ठिकाण लोकांच्या मनी पक्के बसले आहे. किंबहुना चांदोरी प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक वाड्यांमुळे. गावाला तसा इतिहासही आहे. गावात नव्या इमारती दिसतात, पण त्या जुन्या घरांसमोर खुज्या वाटतात. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान यांनी महादेव भट हिंगणे यांना 1718 मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणे यांची वकील म्हणून दिल्लीच्या वकिलातीवर नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. त्या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वकिलातीचे महादेव भट यांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारी असेही म्हटले जाते. पेशव्यांनी महादेव भट यांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम म्हणून 1730 मध्ये दिली. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते.
गणेश हिंगणे यांनी छपन्न खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत 1762 मध्ये बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी येथे व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. हिंगणे यांच्याकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी 1953 पर्यंत होती. ब्रिटिशांनी सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी नाशिक जिल्ह्यात मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुल यांची मालकी ही हिंगणे यांच्याकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा तो इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया-ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत.
चांदोरीतील हिंगण्यांचा वाडा, मठकरी वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखे आहेत. त्याखेरीज टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते, की जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (तालुका इगतपुरी) येथे बकऱ्याचा बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन् पुढे झाले चांदोरी म्हणे!
गावातील बुद्धविहार, लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीत येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. मठकरी वाड्यातील दक्षिणाभिमुख राममंदिर व तेथील रामजन्मोत्सव महाराष्ट्रात आगळेवेगळे आहेत. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्चितम पिंडी हा त्या मंदिराचा विशेष आहे. रामाने मृगवेध त्या मंदिरातूनच घेतला; तसेच, रामाचे पाऊल तेथे उमटल्याचा दाखला अशा पुराण कथा मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. रामनवमीला तेथे मोठी मिरवणूक असते. मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची जुनी चित्रे आहेत. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मीळ आहेत.
चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी ओळखले जाते. तसेच, ते महाराष्ट्रात फक्त चांदोरी (व त्र्यंबकेश्वबर) येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळ 1852 मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूत समजले जाते. सरदार हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ती हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत आहेत. शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मीळ मंदिर हेही विशेष होय. ती मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदिपात्रात अनेक मूर्ती बेवारसरीत्या पडलेल्या पाहण्यास मिळतात. त्या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास तो ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जातो अशी प्रथा असल्याने तेथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती, मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवन समाधी नदीकिनारी आहे. चांदोरीत अनेक संत-महात्मे येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे विठ्ठल-रूक्मिणी व राईबाई यांची मूर्ती पाहण्यास मिळते. तेथील भिंतीवर चित्र असून त्या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजवणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. माधवराव गायकवाडांचे नाव आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना त्यांनी चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. माधवरावांनी मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत फाळकेंना नकार दिला होता. त्यांनी लोककलावंत म्हणून केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा 1987 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा ‘तमाशा कलावंत’ म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे. त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत असते हे मात्र नक्की!
– रमेश पडवळ
म्हसरूळचे श्रीक्षेत्र सीता सरोवर-श्रीराम मंदिर : एक प्रेक्षणीय स्थळ

श्रीक्षेत्र आयोध्या नगरातून बाहेर तब्बल चौदा वर्षे वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र यांच्या समवेत लक्ष्मण व सीतामाई यांनी सर्वाधिक काळ नाशिक-पंचवटी तपोवनात काढला असल्याची माहिती अयोध्या दप्तरी आहे. वनवासात नाशिक-पंचवटी-म्हसरूळ भागात दाटपणे वेगवेगळ्या प्रकारे झाडे होती. हवामान व वातावरण अतिशय चांगले होते. म्हणून या भागात सर्वाधिक काळ प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी वास्तव्य करून वनवास भोगला आहे. पंचवटी-तपोवण याठिकाणी श्रीराम-सीता गुफा असून लक्ष्मणाकडून शुर्पनखा हिचे नाक कापले ते स्थान आजही आहे. दरम्यान, प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने-वास्तव्याने पावन असलेल्या श्रीक्षेत्र पंचवटी नगरीतील म्हसरूळ गावात म्हणजे त्याकाळी दाट जंगल भाग असलेल्या भागात प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण हे भर उन्हात पायपीट करीत असताना सीतामाईंना तहान लागली होती. सीतामाईंची तहान भागविण्यासाठी प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांनी इतरत्र पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शोधूनही पाणी मिळाले नाही. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी तेव्हा उभे असलेल्या ठिकाणीच जमिनीवर जोरदार बाण मारला. त्यावेळी जमिनीतून पाण्याची धार वाहू लागली. यावेळी या पाण्याने सीतामाईंची तहान भागवली गेली, अशी कथा आहे. पूर्वीच्या दाट वन अरण्यात म्हणजे आजच्या म्हसरूळ गावातील हे ठिकाण सीता सरोवर म्हणून ओळखले जाते.
म्हसरूळ याठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी तब्बल सव्वा महिना मुक्काम केला. जमिनीवर मारलेल्या बाणाने उपलब्ध झालेले पाणी पुढे पिण्याबरोबरच वापरासाठीही श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी उपयोगात आणले, अशी अख्यायिका आहे. आज श्रीक्षेत्र सीता सरोवर म्हणून ओळखले जात असलेल्या या पवित्र सरोवरात श्रीराम व सीतामाई असे दोन कुंड आहेत. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळात वाहत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी योग्य असल्याने ब्रिटिशांनी दगड बांधकाम करून कुंड सुशोभित केले व गोड, चवदार, स्वच्छ पाणी म्हणून काही वर्षे ब्रिटिशांनी व पुढे म्हसरूळ ग्रामस्थांनी सीता सरोवरातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला असल्याचे ज्येष्ठ तसेच आजही अनेक वडीलधार्यांकडून सांगितले जाते. विशेषतः पूर्वी म्हसरूळ गाव – सीता सरोवर याठिकाणी दरवर्षी पौष महिन्यात दर रविवारी मोठी यात्रा भरते.
म्हसरूळ ग्रामस्थांचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर व ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई यांची कुटी होती, आज तेच ठिकाण पुरातन श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण मंदिर असून हेही एक मुख्य श्रीराम मंदिर म्हणूनच ओळखले जात आहे. दरवर्षी सीता सरोवर- राम मंदिर येथे म्हसरूळ गाव भजनी मंडळ व श्रीराम भक्त परिवार आणि मंदिराचे प्रमुख पप्पूशेठ शर्मा परिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी मुख्य नावाजलेले साधू-महंत यांनी भेट देऊन संत-महंत भोजनाचा लाभ घेतला आहे व आजही घेत आहेत. प्रामुख्याने आज म्हसरूळ ग्रामस्थांकडून सीता सरोवराची तर श्रीराम मंदिराची देखभाल शर्मा परिवाराकडून केली जाते. म्हसरूळचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर सुशेभिकरणासाठी नाशिक महापालिकेचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नुकतेच केंद्र सरकारने रामायण सर्किटमध्ये म्हसरूळ गाव-सीता सरोवरचा प्रेक्षणीय स्थळ म्हणून समावेश केला आहे. तर यापूर्वीच प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या न्यास समितीने आपल्या दप्तरी नोंद केली आहे. त्याचा पुरावा म्हणून अयोध्या येथून संगमरवरीत श्रीराम यांच्या चरणपादूका सात वर्षे पूर्वीच म्हसरूळच्या पुरातन श्रीराम मंदिर येथे पाठविण्यात येऊन विधीवत पुजनाने प्रतिष्ठान करण्यात आले आहेत.
मुल्हेरचा रासोत्सव
एक अनोखी परंपरा - मुल्हेरचा रासोत्सव.....
श्रीकृष्णच्या जीवनात
रासलीलेचे स्थान अढळ आहे. गोपिका व श्रीकृष्ण यांच्या एकमेकांवरच्या
निस्सीम प्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. गोकुळातील गोपींचे कृष्णकन्हैयावर
अपार प्रेम होते. कृष्णाचे सुद्धा सर्व गोपींवर समान प्रेम होते. सर्व
गोपी श्रीकृष्णमय झाल्या होत्या. त्या गोपींना आपले पतीसुद्धा श्रीकृष्णरुप
दिसत असत. श्रीकृष्णाने सर्व गोपींना वचन दिले होते. त्याप्रमाणे शरद
ऋतूतील पौर्णिमेस रात्रीच्या शांत समयी मुरलीधरने मुरली वाजविण्यास सुरूवात
केली. मुरलीचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी ऐकताच त्या सावध झाल्या. त्यांना
कृष्णाच्या भेटीची ओढ लागली. त्यांनी व्यवस्थित शृंगार केला व
श्रीकृष्णाकडे आल्या.
श्रीकृष्णास मुरली वाजवताना पाहून सर्व गोपींना
आनंद झाला. श्रीकृष्णाने गोपींच्या संख्येएवढी रूपे धारण केली. त्यामुळे
प्रत्येक गोपीला श्रीकृष्णाचा सहवास लाभला. एकमेकांचा हात धरून
श्रीकृष्णासह गोल रिंगण करून गाणी म्हणत त्या आनंदाने नृत्य करू लागल्या.
सर्व गोपिकांच्या जीवनातला तो सुवर्णक्षण होता. श्रीकृष्णाबरोबरची
रासक्रीडा पाहून सर्व देवदेवतांना आपणसुद्धा गोपींचे रूप घ्यावे असे वाटू
लागले. रासलीलेतील गोपींचे तालमय नृत्य पाहून रंभा, मेनका, तिलोत्तमा इ.
अप्सरासुद्धा आश्चर्यचकित झाल्या. गंधर्व, यक्ष,किन्नर यांना गोपींचा हेवा
वाटू लागला.
असाच अनोखा रासक्रीडा उत्सव नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर
येथे दरवर्षी साजरा होतो. नाशिकच्या बागलाण प्रांतातील मुल्हेर येथील
रासोत्सव महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी एक आहे. मराठी प्रांत असूनही
येथे उत्तरेतील मथुरा आणि वृंदावनात प्रचलीत असणाऱ्या ब्रज भाषेतील गोपीगीत
गाऊन उत्सव साजरा केला जातो. स्थानिक श्रद्धेनुसार महाभारतातील राजा
मयुरध्वज याने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने रासोत्सव सुरु केला. पुढे
इ.स.१५० च्या सुमारास बागलाण प्रांतावर आभिरांचे आधिपत्य होते. ते स्वतःला
कृष्णाच्या कुळातील समजत असत. त्यांनी ही परंपरा सुरु केली असावी परंतु
त्याचे तेव्हाचे स्वरूप कसे असावे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.
साधारणपणे हजार वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो अशी स्थानिक मान्यता
आहे. प्रचलीत उत्सव इ.स.१६०० दरम्यान श्री.उद्धवमहाराजांचे गुरु
श्री.काशिनाथमहाराज यांच्यापासून साजरा केला जातो.
स्थानिक
आख्यायिकेनुसार हा उत्सव महाभारत कालीन मुल्हेर राजा मयूरध्वज याने
(इ.स.पूर्व ३००० सुमारे )सुरु केला. राजा मयूरध्वजाचे राज्य नर्मदेच्या
दक्षिण भागात होते या राजधानी रत्नपुर (मुल्हेरचे पूर्वीचे नाव )
पांडवांच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी नर्मदा हि त्यांच्या दिग्विजयाची सीमा
निश्चित करण्यात आली.अर्जुन श्रीकृष्णासह नर्मदातीरी अश्व त्यांचा १६
वर्षाचा मुलगा ताम्रध्वज सांभाळत होता. अर्जुनाने नर्मदेच्या दक्षिण
तिरावरील राज्यावर विजय मिळवण्याची इच्छा श्री कृष्णा जवळ प्रगट केली. पण
देवाने सांगितले की, आपली हिच सीमा आहे. तसेच मयूरध्वज राजा महापराक्रमी
आहे.त्याच्यापुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे तरी ही अर्जुनाने कृष्णाला
आग्रह धरला की तुम्ही असतांना काहीही अशक्य नाही.मयूरध्वज हि कृष्ण भक्त
होता. त्याच्यावर कृपा व्हावी व अर्जुनाचाही हट्ट पुरवावा. अशा इच्छेने ते
सैन्यासह नर्मदेच्या तीरावर आले. त्यांचा सामना ताम्रध्वजानें केला तोही
पराक्रमी होता. त्याने आपल्या बाणाच्या वर्षावाने अर्जुनाचा पराभव केला. मग
कृष्णाने दुसरी युक्ती केली. त्या दोघांनी ब्राह्मण वेष धारण केला व
मयूरध्वजाच्या यज्ञ मंडपात दान मागण्यासाठी आले राजाने त्यांचा आदर करून
काय दान देऊ? हि पृच्छा केली तेव्हा ब्राह्मण रुपी कृष्णाने सांगितले की
आमचा मुलगा जंगलात एका सिंहाने पकडला असून त्याला सोडविण्यास आपला अर्धा
देह द्यावा. अशी इच्छा केली. राजाने कृष्णाचे चिंतन केले तेव्हा त्याला
ब्राह्मणाचे खरे स्वरूप कळाले. साक्षात भगवान आपल्याकडे दान मागत आहेत हे
जाणून राजाने पत्नी शुद्धमती व पुत्र ताम्रध्वज ह्याच्या हातून देह कापून
दिला .श्रीकृष्ण राजावर प्रसन्न झाले. राजाचा त्याग पाहून अर्जुन हि खजील
झाला. देवाने राजास वर देऊ केला तेव्हा मयूरध्वज म्हणाला की देवा आपल्या
दर्शनाने मोक्ष प्राप्ती आहेच. पण द्यायचे असेल तर आपल्या ह्या जन्मातील
वैशिष्ट्य असलेली रासक्रीडा मला दाखवावी. श्रीकृष्णाने मयूरध्वज राजास ती
दिव्यचक्षूंनी दाखविली. राजा धन्य झाला व भगवान श्रीकृष्णास विनंती केली की
आपली हि कृपा अश्विनी पौर्णिमेस उत्सव म्हणून साजरी करण्याची परवानगी
द्यावी, तेव्हा पासून रासक्रीडा उत्सव साजरा होतो. एवढेच नाही तर श्री
उद्धव महाराजांनी आपले निर्वाणानंतर चे स्थान ह्या जागे जवळ असावे अशी
इच्छा केली . म्हणून समाधी हि रासस्तंभा समोर आहे.
उत्सवाचे स्वरूप -
अश्विन शुद्ध पौर्णिमेला गोरजमुहूर्तावर श्री.उद्धवमहाराज समाधी
मंदिराच्या प्रांगणातील एका खांबावर चोवीस आरे असणाऱ्या चक्रावर केळीच्या
पानांचे आच्छादन करून त्याचे आरोहण केले जाते त्यानंतर ते झेंडूच्या
फुलांनी सुशोभित केले जाते. श्री.उद्धवमहाराजांचे वंशज असणाऱ्या पंडित
घराण्यातील एका उपनयनसंस्कार झालेल्या बालकाला कृष्ण बनवतात तोच
त्यादिवसाचा साक्षात भगवान असतो त्याची आणि इतर गोपींची पंडितांच्या घरी
आरती केली जाते. त्यानंतर त्यांना उत्सवस्थळी चक्राखाली आसनावर बसवले जाते.
रासक्रीडा उत्सवाची सुरुवात ही रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते.
यासाठी २८ फुट व्यासाचे भव्य चक्र दोरीच्या सहाय्याने विणून तयार केले
जाते. यात १४ आऱ्या असलेल्या ७ फुट व्यासाचे चक्राला २८ बाम्बू बांधून ते
२८फुट व्यासाचे भले मोठे चक्र कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे विनले जातेेचक्राची
सजावट केळीची पाने व झेंडूच्या फुलांनी केली जाते. त्यानंतर सूर्यास्त व्
चंद्रोदय यांच्या संपात काळी हजारो हातानी १४ फूटी रासस्तंभावर चढविले
जाते.
रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना
वाटून दिलेली असून सर्व समाजघटकांना विविध जबाबदार्या सोपवत सामाजिक
एकतेचा संदेशही या उत्सवातून देण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आहे. आजही
हे सर्व समाज आपापली परंपरा व जबाबदारी सांभाळून आहेत. रासमंडलासाठी
लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणण्याचे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे,
रासमंडल विणणे व देव सांभाळण्याची जबाबदारी शिंपी समाजाकडे, रासाच्या
चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळण्याचे काम मराठा समाजाकडे,
दिवाबत्तीची सोय करण्याचे नियोजन तेली समाजाकडे आणि भजन परंपरा व पूजा
साहित्याची जबाबदारी ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी
रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात. मुल्हेर परिसरातील
४२ खेड्यांमधून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांचा सहभाग या
उत्सवात असतो. गुजरातच्या डांग भागातूनही काही आदिवासी या उत्सवासाठी
मुल्हेर गाठतात.
सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्या मध्यकाळी म्हणजेच
संपतकाळी हे चक्र चंद्र सूर्याच्या साक्षीने, श्री उद्धव महाराज की जयच्या
जयघोषात १४ फूट उंचीच्या रासस्तंभावर चढवतात. चक्र म्हणजे मंडल होय.
वृंदावनात अशाच मंडलाखाली भगवान श्रीकृष्ण गोपिकांसमवेत वृंदावनात
रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतिक म्हणजेच हे रासचक्र आहे तर रासक्रीडेला
गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक
आख्यायिकेनुसार इ.स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा। मयुरध्वजास भगवान
श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले.
तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जात
असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते. रासक्रीडा उत्सवाची धुरा
सध्या मुल्हेरच्या श्री उद्धव महाराज समाधी संस्थानकडे आहे. चारशे
वर्षांपूर्वी उद्धव महाराजांनी मुल्हेरला समाधी घेतली. त्यांचे गुरू श्री
काशीनाथ महाराज मुल्हेरलाच राहत. त्यांच्याही आधी मुल्हेरमध्ये रासक्रीडा
उत्सव सुरू होताच.
मात्र, इ. स. १६४०च्या सुमारास काशीनाथ
महाराजांनी रासक्रीडा उत्सवाची पुनर्रचना केल्याचे संदर्भ श्री उद्धवमहाराज
संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले
आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरू
आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा सहवास आणि उत्साहपूर्ण भक्तीमय
वातावरणात हा रासोत्सव आजही उत्तर भारतीय पद्धतीनेच साजरा केला जातो. श्री
उद्धव महाराजांच्या समाधीसमोर संपातकाली रास स्तंभावर चक्र चढल्या नंतर
पूजा, आरती होते. रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्णाचे रूप
दिले जाते. नवसाने झालेल्या मुला, मुलींना राधागोपिका बनवून राधा कृष्ण जय
कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी वा भजनाच्या जयघोषाने देवघरापासून समाधी
मंदिराकडे नेतात, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होतो. सकाळी
सात वाजेपर्यंत रासाच्या चक्राखाली व्रज भाषेतील १०५ भजने म्हटली जातात. या
भाजनांची रचना विस्कळीत झाली. ती पुन्हा सुस्थापित करण्याचे काम श्री
काशीनाथ महाराजांनी केले. या भजनांची गायकी पंजाबी आहे. तर पखवाज उत्तर
भारतीय आहे. सुमारे अर्धा किलो वजनाची दक्षिणी झांज अत्यंत वेगाने या
भजनांमध्ये वाजवली जाते.
या भजनांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही भजने संत
कबीर, नरसिंह स्वामी यांनी रचलेली असून यात श्रीकृष्णाशी असलेली गोपिकांची
एकरूपता, विरहाचि व्याकुळता आणि समर्पण याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे.
केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण,
मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकॉस, रामकली, भैरवी, नायकी
आदी रागदारीत गायली जातात. रासक्रीडेची भजने गाण्यामध्ये तरुण वर्गाचा
उत्साह लक्षणीय असतो, हेही एक या उत्सवाचे वैशिष्ठ्य. भजन सोहळ्याची सांगता
भैरवीने होते. हा परमोच्च क्षण असतो. यावेळी उपस्थित भाविकांचे अश्रूंनी
डोळे भरून येतात. सकाळी ८.३० वा. रासस्तंभावरून रासचक्र हळूवारपणे खाली
उतरविले जाते. त्यानंतर रासचक्र महोत्सवाची सांगता होते. यादिवशी
मुल्हेरमध्ये मोठी यात्रा भरते. या उत्सवाला महाराष्ट्राप्रमाणे गुजरात,
मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक
कोजागिरीच्या रात्री उपस्थित असतात. त्यामुळे मुल्हेरला यात्रेचे स्वरूप
येते.
या उत्सवात नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठीही गर्दी
असते. त्यात अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलणारे अधिक असतात. नवस हा श्रद्धेचा
भाग असला तरी हा रासक्रीडा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आहे यात शंका
नाही.
श्री देवी सप्तश्रुंग स्तोत्र
श्रीगणेशाय नमः || श्री सरस्वत्ये नमः || श्री गुरुभ्यो नमः || श्री दुर्गादेव्ये नमः ||
ॐ नमो श्री सप्तशृंगी निवासिनी | नमो सह्याद्रीशिखर रूपिनी |
नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी | जगजननी तुज नमो ||१||
नमो महिषासुरमर्दिनी | नमो सुरवरबंधमोचनी |
नमो भक्त मनोल्हासिनी दैत्यकुलदाहिनी तुजनमो ||२||
नमो मुळमाया भगवती | तुझीया नामे भक्त गर्जती |
सगुणरूप नटली पर्वती | पहाता तटस्थ सूरनर ||३||
कष्टे लंघुनी गिरीवर | जवळ करिता तुझे द्वार |
शिन भाग उतरे पार |नवल अदभूत हेची पै ||४||
सुंदर ध्यान मृत्युलोकी | भक्तलिन सदविवेकी |
साष्टांग नमोनी नयन झाकी | हृदय मंदिरी रूप तुझे ||५||
सर्व सुरांचे तेज एकवटले | अष्टादश भूजारूप नटले |
दानव अंगी भय सुटले | उर्वीवरी प्रगटता ||६||
सर्व देवांची एकशक्ती | प्रेमभावे करावी भक्ती |
ओळंगती चारी मुक्ती |निश्चय चित्ती असावा ||७||
औट पिठे भारता माझारी | अर्धपिठ सप्तश्रुंगगिरी |
दुर्गा हीच आष्टादशकरी | पावली निर्वाण भक्तासी ||८||
विप्रकुळांची कुलस्वामिनी | रेणुकामाता पुर निवासिनी |
क्षत्रियकुल वरदायिनी | तुळजापूर तुकाई ||९||
तृतीय वर्ण वैश्याची आई | करविर निवासिनी रमाबाई |१०||
ध्यान धावते पर्वत कंदरी | क्रोधावली असुरावरी |
नानापरी आयुधेकारी | रणांगणी उभी जैसी ||११||
कधी सौम्यरूप दिसे | कधी नयना उग्रता भासे |
भक्तजना लाविले पिसे | संचारोनी नाचवी थै थै ||१२||
सन्मुख पार्वती मार्कंडेय मुनी | वाडे सप्तसतीचा मधुर ध्वनी |
परिसे जगदंबा लक्ष लावोनी | हस्त कर्णासी लाविला ||१३||
घोडंब निवासीनि धृवबाला | स्तवनार्थी उभी पूर्वेला |
पाठीशी परशुरामबाला | निसर्ग रचना सुंदर ||१४||
गणेशतीर्थी लंबोदर | यमुनातांबुल तीर्थ मनोहर |
शिवालय तीर्थी सिद्धेश्वर | स्नाने पतिता उद्धरी ||१५||
पिंडश्राद्ध पितृतर्पण | करिता पूर्वजा उद्धरण |
मनिद्विपी स्वानंदे करून | समिपता मुक्ती भोगिती ||१६||
नवदुर्गा पर्वत शिखरी | शस्त्रे सज्ज घेवुनिया करी |
गुप्तउभ्यारण सुंदरी | ध्वजरक्षणी सावध ||१७||
सप्तमातृका विक्राळरूप | करी पाजाळुनी पोत दीप |
स्वेच्छे खेळती समीप | रक्षणी सप्तश्रुंगाचे ||१८||
वेताळादि चंडीका भैरव | शाखिनी डाकिनी बिरुदेव |
सांभाळी ती स्वयमेव | अंबिका राजदरबार ||१९||
अदभूत चमत्कार अनेक | वर्णिता वाटेल कौतुक |
सर्वस्वी नटली रूप एक | भगवती अंबिका समर्थ ||२०||
राम असता बळ ब्रम्हचारी | तीर्थे फिरलासे उर्वीवरी |
तव सप्तश्रुंगासी रावणारी | दर्शनास्तव पातले ||२१||
रघुनाथ वनवासी असता | पंचवटी ये निवास करिता |
सांगे घेउनी जनकदुहिता | मातेच्या दर्शनी येतसे ||२२||
अद्यापि सिंदूर चर्चुनी | जगदंबे सन्मुख बैसोनी |
भक्तजना प्रथम दर्शनी | सगुणरूप नटला असे ||२३||
ऐसी माय माझी अनादी | सदभक्ता उतरावी भवाद्धी |
योगिया ब्रम्हानंदपदी | स्वानंदे बैसवी अक्षय ||२४||
सप्तश्रुंगरूपे सप्तशती | शुद्ध वैखरी उच्चारिती |
तयासीच उत्तमगती | तवकृपे लाभतसे ||२५||
ऐसी जगन्माता श्रीमंतीण | भक्ता का करिसी हैराण |
अन्न उदाक्स्तव दिनदिन | हिंडवीसी दारोदारी ||२६||
भक्ता कसोटी लाविसी | खरे खोटे निवडिसी |
सदभक्ता अपंगीसी | अंती दाविसी ब्रम्हरूप ||२७||
तुझे गाता गुणगान | राधासुत झाला लीन |
जळी स्थळी तुझे ध्यान | अहोरात्र ध्यातसे ||२८||
कधी दाविसी चितस्वरूप | भक्ती करिता जपतप |
अंतरीचा ध्यान दिप | अखंड जळतो तवकृपे ||२९||
आता नको हो अंत पाहू | करपल्लवे किती तुज पाहू |
यातना कुठवरी साहू | विश्वमोहिनी दयाळे ||३०||
जीवसृष्टीची जीवन कळा | चिदानंदरुपी चितकळा |
त्रिभुवन सुंदरी वेल्हाळ | भोळा खुळा भाव माझा ||३१|
माया ब्रंम्हात मानिती भेद | निवडीता तटस्थ झाले वेद |
ज्ञानवंत पी घालिती वाद | खेद बहु वाटतसे ||३२||
अंबे तूच रामकृष्ण हरी | राधा रुक्मिणी जनककुमारी |
माया ब्रंम्हाचा खेळ दशअवतारी | आभेदत्व नसेची ||३३||
देहासवे फिरे छाया | तैसी व्यापली श्रीहरीची माया |
ब्रम्ह स्वरूपी ओळख द्याया | जगदंबिका समर्थ ||३४||
पित्याची ओळखी माताच सांगे | बाप म्हणविता वर पांगे |
दूषण येईल निजांगे | समाधान मायकरी ||३५||
सगुणसृष्टी सगुणदेव | भावे मानिले स्वयमेव ।
भेदाभेद पहाती जीव | सोहं शिवा विसरले ||३६||
माजेल वादाचा पाल्हाळ | दुर्गा भगवती गुण वेल्हाळ |
आमंगळासी करिले मंगळ | कृपामृत दृष्टीने ||३७||
तुझे रूप ध्यानी मनी | शिरी मुकुट पंचफणी |
केस मोकळे सोडोनी | मान झुकविली उत्तरे ||३८||
कुंकुम लाविले स्वस्तीक | हरिंद्रा गुलाल बुक्का टिक |
वक्र भुवया सुरेख | धनुष्या कृती शोभती ||३९||
शंकरे चंद्रमा धरिला जटेत तोची | तुझिया मुकुटात |
दैत्यावरील क्रोध बहुत | शितल होण्या धरीला असे ||४०||
किंचित मुरडीले नाशिक | नथनी सर्जाची सुरेख |
गालावरी लावली टीक | दृष्ट सगुनीला होईल ||४१||
कर्णफुले शोभती छान | तांबुल विडामुखी धरून |
अलंकार गळा भरून | नाभिपर्यंत लोळतसे ||४२||
पुतळ्याची हौस भारी | ताईत पेट्या डोरले शिनगरी |
कंठा बोरमाळ गळसरी | महाराणी शोभतसे ||४३||
रंगारंगाच्या पैठण्या फार | नारळी जरतारी बुट्टेदार |
छातीवरी उभा पदर | गुर्जरनि माय माझी ||४४||
पायघोळ दिसे छान | शिंदेशाही तोडर घालोन |
सच्य चरण उचलोन | वाम पुढे टाकिला ||४५||
कमंडलुरुद्राक्ष माला | वामसव्य दोन्ही कराला |
सव्य हास्ती परशु धरीला | वाम लाविला मुकुटासी ||४६||
आणिक हस्त चतुर्दश | शस्त्रे धरिले बहुवश |
दृष्टदानव दंडनास | वर्णिता विस्तार वाढेल ||४७||
आश्विन शुद्ध कोजागिरी | श्रुंगार पुजा षोडशोपचारी |
महापूजा रात्रभरी | नामगजरी कल्लोळ ||४८||
कोजागिरीचे चंद्रामृत | रम्य वनश्री डोलत |
वैकुंठ कैलास भासत | भाविक भक्ता स्वानंद ||४९||
वनस्पती सिद्ध सोज्वळ | धरूजाता होतसे ज्वाळ |
संधीनी संजीवानी कोमल मृतजीवा उठविती ||५०||
गळसरीची प्रदक्षिणा | सोपी आते बहुजना |
आखतिर्थी प्रदक्षिणा | आष्टतिर्थ दर्शन ||५१||
सूर्यतीर्थ कालिका तिर्थ | गंगा लक्ष्मी सरस्वती तिर्थ |
तांबुल यमुना शितला तिर्थ | स्नाने पापे नासती ||५२||
तिसरी महा प्रदक्षिणा | सुरथराजा वैश्यस्थाना |
वणी मार्कंडेया सहजाना | गणती तिन योजने ||५३||
कृतयुगी ब्रम्हा सांगे नारदा | सिद्धीदायक भक्त वरदा |
कालिका लक्ष्मी शारदा | जगदंबीका हिच पै ||५४||
ममकमंडलु पासून निघाली | गिरीजा तीच गीरणा नाम पावली |
महानदित मुख्य जहाली | पर्वता सन्नीध वहातसे ||५५||
ऐसा या अर्धपीठाचा महिमा | नित्य जपावे बत्तीस नामा |
दुर्गभीमा दुर्गाभामा | दुर्गमात्मस्वरूपिणी ||५६||
दुर्गा दुर्गा र्तीशमनी | दुर्गमा दुर्गपद्वी निवारीनी |
दुर्गमच्छेदिनी | दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी | दुर्गभ्या ||५७||
दुर्गतोध्वारिनी दुर्गनिहंत्री | दुर्गमापहा दुर्गमासुर सहंत्री |
कलीयुगी नाममंत्री | उद्धरतिल मानव ||५८||
दुर्गमज्ञानदा दुर्गमार्ग स्वरुपिनी | दुर्गभा दुर्गमायुधधारिणी |
दुर्गमालोका दुर्गमार्थ स्वरुपिनी | दुर्गदैत्य लोक दवानला ||५९||
दुर्गमार्गप्रदा दुर्गमाश्रीता | दुर्गमविद्या दुर्गमता |
दुर्गमांगी आंबामाता | दुर्गमज्ञान संस्थाना ||६०||
दुर्गभ्या दुर्गमेश्वरी दुर्गभात्रिभुवना माझारी |
नाम पठणे संकटे निवारी | दुर्गदारिणी भगवती ||६१||
नामस्मरणी ठेवुन विश्वास | त्रिकाल जपावे बत्तीस नामास |
निर्विघ्न करील भक्तास | सप्तश्रुंगी निवासिनी ||६२||
भक्तिसाधन नामची श्रेष्ठ | नचसाधती जपतपाचे कष्ट |
नाम महिमा वरिष्ठ | कलीयुगा माझारी ||६३||
तनमन धनेची शरण | धरावे आंबेची चरण |
त्रिविध ताप दारूण | निवारील निश्चये ||६४||
निष्काम करिता भक्ती | आंगीबाने चैतन्य शक्ती |
चौ पुरुषार्थ चारीमुक्ती | वोळंगती सर्वस्वे ||६५||
अमृत मोहिनी निवासी | महालयाच्या पंचक्रोसि |
एक योजने दक्षिणेसी | जन्मभूमी कारेगाव ||६६||
प्रतिष्ठान निवासी एकनाथ | मासिक वारी पिता करीत |
नाथ कृपेने जन्म होत | देहनाम निवृत्ती ||६७||
माता माझी राधाबाई | मुखी नाम आंबाबाई |
बालपणी मंत्र देई | तोची लोलो लागला ||६८||
सप्तश्रुंग दुर्गामाई | तुझी लीला तुची वदवी |
भरून उरली सर्वाठाई | मी तव अज्ञान बालक ||६९||
श्रोतया विनवी भक्तकवी | चुकी भुली पदरात घ्यावी |
बहुश्रुत अनुभवी | नमन माझे साष्टांग ||७०||
इतिश्री पद्म पुराणांतरगत | वर्णिली सह्याद्री खंडात |
मार्कंडेय सप्तशतीत | सविस्तर कथियेले ||७१||
तया आधारे वर्णन केले | भक्ती भावे श्रुंगारीले |
श्रीजगदंबे चरणी वाहिले | भक्ता मुखी वदवावे ||७२||
|| श्रीजगदंबार्पणमस्तु ||
मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर
आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जाणून घेऊया दुर्मिळ व एकमेवाद्वितीय अशी मूर्ती असलेले मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावाचे मुख्य दैवत आहे श्रीकृष्ण. या गावातील श्रीकृष्णाच्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे येथे असलेली गोपालकृष्ण स्वरूपातील अष्टबाहू मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कधी झाली अज्ञात आहे. मात्र पुरातनकाळापासून ही वैशिट्यपूर्ण मूर्ती असलेल्या या मंदिरात येथील ग्रामस्थ गोपाळकृष्णाची मनोभावे आराधना करीत आहेत.
मराठाकालीन शैलीतील दुमजली काष्ठ सभामंडप असलेले हे मंदिर पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे आहे. या मंदिराची तीन मजली इमारत काष्ठवास्तुशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. या सभामंडपातील गाभाऱ्यात ही देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभाऱ्यावर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत.
गाभाऱ्यातली शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती अतिशय देखणी व मंत्रमुग्ध करणारी आहे. कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हातात मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स धेनु आणि गरूड उभे आहेत.
या मूर्तीविषयी एक आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन काळी केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. सोबत त्याने तयार केलेली ही अष्टबाहू गोपाळकृष्णाची मूर्ती होती. पुढे जाण्यासाठी सकाळी जेव्हा तो तयार झाला तेव्हा जमिनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीकारास उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो,
हे
अष्टबाहू कृष्णाचे रूप भारतात इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. त्यामुळे
मोहाडीतील ही या दुर्मिळ कृष्णमूर्तीचे वैभव हे मोहाडीचे वैशिष्ट्य आहे.
साधारण पंचाहत्तर वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा
जीर्णोद्धार केला होता. गावात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उतसाहाने व
भक्तिभावाने साजरा केला जातो. पाहण्यासारखा असतो. या जन्माष्टमी
उत्सवानिमित्ताने अनेक वर्षांपासून होत असलेली मोहाडीची श्रीकृष्ण
व्याख्यानमालाही रसिकांसाठी एक आकर्षण असते.
श्री सप्तशृंगी मातेचे मूळ स्वरूप प्रकट
आदिमाया आदिशक्ती श्री राजराजेश्वरी भगवती सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवर असलेला शेंदूर दूर करण्यात आला व आईसाहेबांचे मूळ स्वरूप जगासमोर आले.
सावरकर जन्म स्थान (सावरकर वाडा), भगूर
भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे.
सावरकर कुटुंबाच्या वडिलोपार्जित वाड्यात २८ मे १८८३ या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांच्या नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला दिले गेले.
सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती. जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात विकून टाकला होता. लिलावात घेणार्याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले होते. केंद्र सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व खात्याकडे दिले. २८ मे १९९८ रोजी सावरकर स्मारकात रुपांतरित केले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तितके मुळ स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते.
बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो!
वाड्यातील तळमजल्यावरील जन्मस्थानाचे जागेवर तशी एक पाटी व सावरकरांचा परिचित फोटो आहे. कंपाऊंडच्या भिंतीच्याआतील वाडा बर्यापैकी मोठा आहे. आत शिरल्यावर समोर अंगण आहे. उजव्याबाजूच्या कंपाऊंडलगत त्यांचा अर्धपुतळा आहे. समोरच्या पडवीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यांकडे जाता येते. आतील खोल्यांमध्ये सावरकर-कुटुंबियांचे आणि सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहेत.
आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!
आतल्या खोलीला लागून लहानसे देवघर आहे. तेथे त्यांच्या घरी एकेकाळी असलेल्या अष्टभुजादेवीचा फोटो ठेवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली.
देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.
सावरकरांनी चौदा/ पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्याची ते अखेरपर्यंत झटले.
तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.
आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.
आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/-4bcYFUbbhY
https://youtu.be/-4bcYFUbbhY
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता
भगूर, ता. जि. नाशिक
‘माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मारीत मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन’, अशी प्रतिज्ञा वयाच्या १४व्या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांनी भगूर येथील अष्टभुजा मातेसमोर केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या देवीला पुढे स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता म्हणून ओळखले जाऊ लागले.
दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावाला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथे महर्षी भृगू ऋषींचे वास्तव्य होते. ते स्थापत्यशास्त्राचे तज्ज्ञ समजले जात. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधल्याचे मानले जाते. त्यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. असे सांगितले जाते की भृगू ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात साधना केली व गुरुकुल उभारले, म्हणून या परिसराला ‘भार्गव’ असे नाव पडले होते. त्याचे पुढे ‘भगूर’ झाले. भृगू ऋषींचे वास्तव्य, शिवकाळ, पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या, असा वारसा भगूरला लाभला आहे. सावरकरांनी भगूरवर लिहिलेली ‘भार्गव’ ही कविता गावाचे महात्म्य वर्णन करते. सशस्त्र चळवळींमुळे इंग्लंडमध्ये ‘डँबिस गाव’ अशी भगूरची नोंद होती.
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य चळवळीचे रणशिंग फुंकण्यापूर्वी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारे प्रथम भारतीय म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ओळख आहे. ‘क्रांतिसूर्य’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. २८ मे १८८३ रोजी भगूर या गावात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तिथे त्यांच्या पूर्वजांचा वाडा होता. वडील
जहागीरदार असल्यामुळे लहानग्या विनायकास लोक ‘छोटे जहागीरदार’ असे म्हणायचे.
सावरकर यांना आईचे छत्र फार काळ लाभले नाही. आईनंतर मोठ्या भावाची पत्नी येसू वहिनीने त्यांना आईची माया दिली. तिच्या मार्गदर्शनाखाली सावरकर शिकू लागले, कविता करू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रामायण, महाभारत या ग्रंथांसह घरात असणारी ऐतिहासिक पुस्तके वाचून काढली होती. नाशिकमधील एका स्पर्धेसाठी शिवजयंतीनिमित्त सावरकरांनी शिवरायांवर गीत लिहिले होते. त्या गीतासाठी लोकमान्य टिळकांच्या हातून त्यांना पारितोषिक मिळाले होते. तेव्हापासून त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. चाफेकर बंधूंकडे पाहून त्यांनी आपणही क्रांतिकारक बनायचे, असे मनोमन ठरवले व पुढे मित्र मंडळ मेळावा स्थापन केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भगूर येथील जुने घर म्हणजे सध्याचा ‘सावरकर
वाडा’ आजही चांगल्या स्थितीत आहे. असे सांगितले जाते की विनायक सावरकर यांचे वडील दामोदर सावकरकरांच्या पणजोबांना लुटारूंना पिटाळून लावताना अष्टभुजा भवानीची मूर्ती मिळाली होती. ही देवी पुढे सावरकर कुटुंबीयांची कुलदैवत झाली. देवीला पूर्वी बोकडाचा बळी दिला जात असे. त्यामुळे देवीची मूर्ती खंडोबाच्या मंदिरात ठेवण्यात आली. मात्र, दामोदरपंतांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार ‘मला घरी घेऊन जा’ असे या देवीने सांगितले. त्यामुळे ही मूर्ती सावरकरवाड्यात आणण्यात आली. १८९८ मध्ये झालेल्या प्लेगच्या उद्रेकानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी घरातील या देवीसमोर आपल्या साथीदारांसह देश स्वतंत्र करण्याची शपथ घेऊन स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून या अष्टभुजा देवीला स्वातंत्र्यलक्ष्मी असे म्हटले जाऊ लागले.
सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतल्यानंतर देवीसाठी बळी द्यायला ही मूर्ती पुन्हा खंडोबा मंदिरात आणण्यात आली. सावरकर वाड्यात देवी जेथे स्थानापन्न होती ते स्थान आजही तेथे पाहता येते. या देवीला स्मरून केलेले ‘जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे…’ आणि ‘ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ ही सावरकर यांची गीते प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची ही मूर्ती सुंदर आहे. सध्या गावातील खंडोबा मंदिरात ती विराजमान आहे. या मंदिराच्या गर्भगृहात खंडोबा, बाणाई व म्हाळसादेवी यांचे स्थान आहे, तर खालच्या बाजूला शिवपिंडी आहे. त्यांच्या मधोमध स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. पहिल्या दिवशी विधिवत पूजा–अर्चा करून येथे घटस्थापना केली जाते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसऱ्याच्या दिवशी अष्टभुजा देवी व खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक येथून जवळच असलेल्या देवळाली कॅम्पमधील रेणुका मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी जाऊन पुन्हा पालखी गावात येते. नवरात्रोत्सवात येथे शेकडो भाविक दर्शनाला येत असतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील जुने घर आता राष्ट्रीय स्मारक झाले आहे. इंग्रजांनी हे घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केला होता. इंग्रजांकडून मारुतीराव चव्हाण यांनी ते खरेदी केले. पुढे ते पांडुबा चव्हाण यांनी घेतले. नंतर त्यांच्याकडून केंद्र सरकारने खरेदी करून २८ मे १९९८ रोजी ते सावरकर स्मारकात रूपांतरित केले. या वाड्यामध्ये सावरकर यांचा जीवनपट दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यात सावरकरांचे जन्मस्थान, जेथे अष्टभुजा मूर्तीची स्थापना केली होती, ते देवघर आहे. याशिवाय त्यांची वंशावळ येथे दाखविली आहे.
उपयुक्त माहिती:
- नाशिक शहरापासून भगूर १७ किमी अंतरावर
- भगूर गावात सावरकर वाडा, तर गावाच्या वेशीवर खंडोबा मंदिर
- नाशिक, इगतपुरीहून एसटीची सुविधा
- वाहने सावरकर वाडा व मंदिराजवळ जाऊ शकतात
- गावात निवास व न्याहरीची सुविधा उपलब्ध नाही
कर्दमाश्रम : 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ', करंजी
'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ' असलेला #कर्दमाश्रम, करंजी ता. दिंडोरी, जि. #नाशिक
#दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र #करंजी म्हणजे कर्दमऋषींच्या तपश्चर्येने व प्रभू #दत्तात्रेयांच्या बाललीलांनी पुनीत झालेला परिसर. #नाशिक - #वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे.
#कर्दम ऋषी व देवहूती या दांपत्याची कन्या महासती #अनुसया हिचा विवाह सप्तर्षींपैकी एक असलेले महान ऋषी #अत्रि यांच्याशी झाला होता. त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या उदरी पुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. म्हणजेच कर्दम ऋषी हे प्रभू दत्तात्रेयांचे आजोबा. सृष्टीची रचना करत असताना ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम ऋषींचा जन्म झाला. त्यांनाच ब्रह्माने सृष्टीचा विस्तार करण्याचा आदेश दिला. कर्दम ऋषींनी आपल्या भार्येसाठी आकाशात उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींचा विवाह लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाला. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. देवहुतीने आपल्याला विष्णूसारखा पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याने स्वतः:भगवान विष्णूंनी तिच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे या पुत्राला म्हणजेच #कपिल ऋषींना विष्णुच्या २४ अवतारांपैकी एक अवतार मानले जाते. हे कपिल मुनी 'सांख्य तत्वज्ञानाचे' प्रवर्तक मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या ऋषींशी लावले.
श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे. यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव इथे पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे असे म्हणतात. मंदिरात असलेल्या देवघरात एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे. या कर्दमाश्रम परिसरात स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे.
कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/MCXEbPPByTY
https://youtu.be/MCXEbPPByTY
हनुमंताची मूर्ती सोन्याची….कि शेणाची?
हनुमंताची मूर्ती सोन्याची….कि शेणाची?
#नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.
समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. … त्यांतील एक जण म्हणाला की, ‘हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.’ तर दुसरा मुलगा म्हणाला की,’मूर्ती शेणाची आहे’. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.
अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले – ‘ तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे’. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.
कर्दमाश्रम : 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ', करंजी
'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ' असलेला #कर्दमाश्रम, करंजी ता. दिंडोरी, जि. #नाशिक
#दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र #करंजी म्हणजे कर्दमऋषींच्या तपश्चर्येने व प्रभू #दत्तात्रेयांच्या बाललीलांनी पुनीत झालेला परिसर. #नाशिक - #वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे.
#कर्दम ऋषी व देवहूती या दांपत्याची कन्या महासती #अनुसया हिचा विवाह सप्तर्षींपैकी एक असलेले महान ऋषी #अत्रि यांच्याशी झाला होता. त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या उदरी पुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. म्हणजेच कर्दम ऋषी हे प्रभू दत्तात्रेयांचे आजोबा. सृष्टीची रचना करत असताना ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम ऋषींचा जन्म झाला. त्यांनाच ब्रह्माने सृष्टीचा विस्तार करण्याचा आदेश दिला. कर्दम ऋषींनी आपल्या भार्येसाठी आकाशात उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींचा विवाह लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाला. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. देवहुतीने आपल्याला विष्णूसारखा पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याने स्वतः:भगवान विष्णूंनी तिच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे या पुत्राला म्हणजेच #कपिल ऋषींना विष्णुच्या २४ अवतारांपैकी एक अवतार मानले जाते. हे कपिल मुनी 'सांख्य तत्वज्ञानाचे' प्रवर्तक मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या ऋषींशी लावले.
श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे. यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव इथे पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे असे म्हणतात. मंदिरात असलेल्या देवघरात एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे. या कर्दमाश्रम परिसरात स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे.
कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/MCXEbPPByTY
https://youtu.be/MCXEbPPByTY
सातवाहनांचं सातपूर
अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन् त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरेकडून आलेले परकीय क्षहरात घराण्यातील भूपक आणि नहपान या क्षत्रपांनी शिवस्वातीवर आक्रमणे करून महाराष्ट्र ताब्यात घेतला अन् महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले परकीय घराणे ठरले. नाशिक-जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. भूपक क्षत्रपानंतर नहपानाच्या हातात सत्ता एकवटली. दरम्यान, क्षत्रपांनी सातवाहनांना नाशिक परिसरातून हुसकावून लावले व सातवाहन पैठणला वसले. सातवाहन घराण्यातील गौतमीमीपुत्र सातकर्णीने अथक प्रयत्नांनंतर नहपान या क्षत्रपावर नाशिक येथे पूर्ण तयारीनिशी युद्ध केले अन् या युद्धात विजय मिळवित महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र केला. हे युद्ध अतिसंहारक असल्याच्या नोंदी पांडवलेणीतील (त्रिरश्मी लेणी) शिलालेखात मिळतात. सातकर्णीने नाशिकमध्ये नहपानाच्या सैन्यावर मात केली. नहपान युद्ध भूमीतून सह्याद्री पर्वतात आश्रयाला गेला. सातकर्णीने त्याचा पाठलाग करून नहपानाचा समूळ उच्छेद केला. पांडवलेणीतील शिलालेखात याचा उल्लेख ‘क्षहरात वंश निर्वंश करस’ म्हणजेच ‘नहपान क्षत्रपाचे क्षहरात घराणे नष्ट करणारा’ असा केला आहे. सातवाहनाने महाराष्ट्र राज्यलक्ष्मी त्यांच्याकडे खेचून आणली. या काळात गौतमीपुत्र सातकर्णी इतका बलाढ्य राजा भारतात अन्य नव्हता म्हणून त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले होते, असे गौरोवोद्गार पांडवलेणीतील शिलालेखात आहेत. तर या युद्धाचे वर्णन भद्रबाहू या जैन साधूच्या ग्रंथातही आढळते. इ. स. ७८ मध्ये झालेले हे युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्यसमरच ठरले. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव सातवाहनांनी गुढ्या उभारून साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे इतिहास अभ्यासक मानतात. हा पराक्रम नाशिकमध्ये घडल्याने हा सण नाशिकनेच जगाला दिला, असे म्हणायलाही हरकत नाही. सातवाहनांनी चार शतकांहून अधिककाळ महाराष्ट्रावर राज्य करीत समृद्धीचा सुवर्णकाळ दाखविला. याच काळात सातवाहन व क्षत्रपांनी पांडवलेणी (त्रिरश्मीलेणी) खोदण्यासाठी दाने दिली. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोवर्धन (गोवर्धन गंगापूर) येथे व्यापाऱ्यांचे संघ स्थापन झाले होते. सातवाहनांच्या या इतिहासाची छाप जशी लेणीतील शिलालेखांतून उमटली आहे तशीच गुढीपाडवा सणामुळे गेल्या दोन हजार वर्षापासून हा अज्ञात इतिहास घराघरात बहरताना दिसतो. त्यातच सातवाहनांची वसाहत असलेल्या सातपूरलाही गुढीपाडव्यांलाच यात्रा भरते. ही परंपरा दोन हजार वर्षांपासून चालत आली असावी, असे सातवाहनांचा पराक्रम सांगून जातो.
औद्योगिक वसाहतीमुळे सातपूर आता नाशिक शहराचे एक महत्त्वाचे उपनगर बनले आहे. पूर्वी ते सातवाहन या भारतातील एका बलाढ्य राजाची वसाहत होते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही अन् ते साहजिकही आहे. पण दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास अन् त्या इतिहासाचा घटनाक्रम आपल्याला सातपूर या नावामागील कथा उलगडून सांगतो. सातपूरमध्ये उत्खननात (खोदकामात) सातवाहनकालीन हत्यारांचे अवशेष मिळाले आहेत. तांबड्या रंगांची हत्यारांची पाती पाहताना त्यावेळी घडलेले युद्ध डोळ्यासमोर उभी राहतात. या हत्यारांचे अवशेष त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाणे संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच या परिसरात सातवाहन राहत असावेत म्हणून गावाला सातपूर नाव पडले असावे, याला बळ मिळते. सातपूरचे पूर्वीचे नाव सतीपूर होते, असे सांगताना ग्रामस्थ एक अख्यायिका सांगतात. श्रीराम या परिसरात अग्नियज्ञ करत होते. यावेळी पार्वती सीतेचे रूप घेत यज्ञस्थळी श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी आली. मात्र श्रीरामाने महादेवाच्या पार्वतीला ओळखले व माता तू येथेच थांब, अशी विनंती केली. तेव्हा पार्वतीने नंदिनी नदीच्या (आताची नासर्डी) रूपात येथेच राहील, असे सांगितले. तेव्हापासून सातपूरला सतीपूर असे नाव पडले व नंदिनी या सतीपूरातून वाहते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीपूर या गावाचे नाव मुगलांच्या काळात सय्यदपूरही झाले अन् पेशवाईत सातपूर असेही ग्रामस्थ सांगतात. सय्यदपूरचे सातपूर होण्यामागेही राजेबहाद्दर नारोशंकरांच्या पराक्रमाची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
त्र्यंबकरस्त्यालगत अन् नंदिनीच्या कुशीत वसलेल्या सातपूरच्या मुख्य बाजार रस्त्याने या उपनगरात प्रवेश करताना डाव्या हाताला समोर हनुमानाचे मंदिर लागते. तीन मजली दिसणारे हे हनुमानाचे मंदिर पूर्वी सातपूर गावच्या वेशीबाहेर होते अन् त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी पडावाचे ठिकाण असे. मंदिरासमोर सातपूर गावची वेस होती. आज ती नाही. मात्र तिच्या आठवणी ज्येष्ठांच्या मनात दिसतात. वेशीतून आत गेल्यावर सातपूर गावात अजूनही दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचे वाडे असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण सोनवणे वाडा, जैन वाडा, भंदूरेंचा वाडा, निगळांचा वाडा, बंदावणे वाडा अशी काही उदाहरणे पहायला मिळतात. हे वैभव अनुभवून पुन्हा हनुमान मंदिराकडे यायचे अन् हनुमान मंदिरासमोरून उजव्या हाताने माळी गल्ली, बंदावणे गल्ली, निगळ गल्लीतील जुनी घरे व काही शिल्लक राहिलेले लहान लहान वाडे पाहत स्वारबाबा नगरमधील अग्निमंदिरापर्यंत जायचे. अग्निमंदिरात अरविंद पतंगे अग्निपूजेबद्दल माहिती देताना दंग होऊन जातात. ‘पूर्वी सातपूर गावात कोण आलं तरी कळायचं, आता हे गाव शहर झालं आहे. कोण येत जातं यावर आता नियंत्रण नाही,’ असे सातपूरच्या बदलेल्या स्वरूपाबद्दल दत्तू पंढरीनाथ मौले तळमळीने सांगतात. ‘आम्ही काशीमाळी मध्य प्रदेशातून सातपूरमध्ये आलो. याला आता दोनशे-तीनशे वर्षे झाली असतील. सातपूर पूर्वी नजरेत भरावं एवढं गावासारखं होतं.’ असेही मौले आवर्जून सांगतात.
सातपूरला निगळांचं सरदार घराणंही लाभलं आहे. निगळांचा बाराशे सालापासूनचा वंशवृक्ष राजस्थानच्या भाटांकडे नोंदविलेला दिसतो. ‘राजस्थानातील प्रतापगडचे निगळ औरंगाबादच्या देवगिरीची लढाई लढले. ही लढाई जिंकल्याने त्यांना नारायणगावची जहागिरीत पाटीलकी मिळाली. तेथून १३३५ मध्ये पुण्यातील ओडेगावी आले. तेथे निगळांनी मोठा गढीवजा वाडाही बांधला. मुगलांच्या त्रासापासून धर्म वाचविण्यासाठी निगळ परिवार १५०५ मध्ये कोकणात स्थिरावले. तेथून पेशवाईत महादुपा या एका भावाला ओझाची तर तुकाराम या दुसऱ्या भावाला सातपूरची पाटीलकी मिळाली. तुकाराम निगळ १७०७ मध्ये सातपूरला आले.’ असे शांताराम निगळ भाटांकडील नोंदीच्या आधारे सांगतात. तर ‘भंदुरे कुटुंब राजस्थानातून काशीला आले व तेथून ते जलालपूर येथे शेती व्यवसायात स्थिरावले. भंदुरेनंतरच्या काळात जलालपूरहून सातपूरला स्थिरावले. भंदूरेंचे दोनशे-तीनशे वर्षापूर्वीचे दोन जुने वाडे या इतिहासाची साक्ष आजही देतात,’ असे डॉ. झुंबर भंदुरे सांगतात. गावातील अनेक कुटुंबांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातपूरची ग्रामदेवता सप्तशृंगी माता आहे. तिला भवानी माताही म्हटले जाते. मातेचे मंदिर औद्योगिक वसाहतीतील एका टेकडावर वसले आहे. हे मंदिर व वणीचे सप्तशृंगी मंदिर समोरासमोर असल्याचे दिसते. अग्नि मंदिर, गणेश मंदिरातील गणपतीची शिळा व बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहून मरीमाता मंदिराकडे जायचे तेथून पुन्हा निगळगल्ली, बंदावणे गल्ली व माळी गल्लीतून हनुमान मंदिर व शेजारचे खंडोबा मंदिर पहायचे. हनुमान मंदिराशेजारी पूर्वी तालीम होती. ती आता नाही. मंदिरातून तालमीत जाणारा दरवाजा मात्र अजूनही तालमीची आठवण करून देतो. मंदिरातील पुजेचा मान असलेल्या यमुनाबाई पोटींदे या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला शुभआशीर्वाद देताना दिसतात. त्यानंतर दुर्गामाता मंदिर, सातपूरचा बाजार, बाजारामागील सप्तशृंगीचे छोटेखानी मंदिर, राममंदिर व पूर्वी घाटावर असलेले महादेव मंदिर दगडी बांधणीचे आहे. नंदिनीला पूर्वी सुंदर घाट होता. याच घाटावर महादेव मंदिर होते. येथे पूर्वी दशक्रियाविधी देखील व्हायचे. मात्र आता नंदिनीचा नासर्डी नाला झाल्याने घाट हरविला आहे. महादेव मंदिर पाहून नंदिनी अनुभवली की पूर्वी नंदिनी किती सुंदर असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. १९५० पर्यंत सातपूरचे ग्रामस्थ नंदिनीचे पाणी पिण्यासाठी वापरायचे, असे शांताराम निगळ सांगतात. जवळच बंद पडलेली शिवटॉकीज आहे. तेथून भवानी मातेच्या मंदिरात जाता येते. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे देवीची चिरा आहे तर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात अनेक वीरगळी पहायला मिळतात. तेथून आई गडदवणी माता मंदिर व पीरबाबांचे ठाणेपाहून सातपूर रस्त्यातील वेताळ मंदिरातील लाकडी मुखवटे सातपूर गावात पूर्वी बोहाड्यांच्या सोंगांचा उत्सव होत असल्याचा इतिहास सांगतात. बोहाडे आता होत नाहीत. मात्र सातवाहनांनी याच गावातून सुरू केलेला गुढीपाडवा उत्सव ग्रामस्थ आजही जल्लोषात साजरा करतात. सातपूरकर दरवर्षी गुढीपाडव्याला भवानी मातेचा उत्सव व बारागाड्या ओढण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात. बारागाड्या ओढणाऱ्याला गणेशा म्हटले जाते. मानपान ठरलेल्या कुटुंबातील पुरूषाला म्हणजेच गणेशाला साडी, चोळी, पीतांबर फेटा हातात तलवार अशी पारंपरीक वेशभूषा केली जाते. त्यानंतर गणेशाला गावातून मिरवले जाते व दारोदारी सुवासिनी गणेशाचे औक्षण करतात. सर्व मंदिरांमध्ये गणेशा दर्शन देवतांचे पूजन करीत सप्तशृंगी माता मंदिरातून गणेशा बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी येतो. गणेशा बारागाड्यांना प्रदक्षिणा घालतो व बारागाड्या ओढतो. गणेशाची मिरवणूक गावातील पीराला नेवैद्य दाखवून संपते. बारागाड्यांचा सोहळा, पोळा, होळी व निवृत्ती महाराजांची पालखी असे सातपूरचे मुख्य सोहळ्यांचा मानपान ग्रामस्थ एकत्रित येऊन ठरवितात. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, मौले आदी कुटुंबांचा व ग्रामस्थांचा गावातील उत्सवांमधील सहभाग सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवितो, असे डॉ. झुंबर भंदुरे व शांताराम निगळ सांगतात.
सातपूरमध्ये १९४६ पर्यंत इंग्रजांची निग्रोंच्या पलटनीचा कॅम्प होता. याच्या खाणाखुणा अजूनही सातपूरमधील पपया नर्सरी चौकात इंग्रजांनी बांधलेल्या बराकीच्या माध्यमातून पहायला मिळतात. या बराकींचा आता कार्यालयासाठी खुबीने वापर केलेला दिसतो. हा कॅम्प त्यानंतर देवळालीत वसला. त्यानंतर १९६१ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत आली अन् सातपूरचे गावपण शहराकडे वळले. मात्र सातपूरने वेगवेगळ्या उत्सव आणि सुप्तगुणांतून दोन हजार वर्षांपासूनचा जपलेला इतिहास थक्क करतो. म्हणूनच सातवाहनांचे सातपूर पाहताना दोन हजार वर्ष मागे गेल्यासारखे वाटायला लागते. असं काही सातपूरमध्ये अनुभवयाला मिळेल, ही कल्पना मात्र नक्कीच कोणी केली नसणार!
लोणजाई टेकडी
| रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी पायथा |
| लोणजाई टेकडी वरून |
| निफाडच्या शेतीचे दृश्य |
| अन्य रांगा |
| लोणजाई मंदीर |
| लोणजाई देवी |
| लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत |
नाशिकचा प्राचीन इतिहास त्याच्या कणाकणात दडलेला आहे. एखाद्या राजाने हजारो वर्षांपूर्वी मंदिरांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना दान म्हणून दिलेली गावे आता कोठे आहेत हे शोधताना नाशिकचा इतिहासही उलगडू लागतो. सामुंडी, चंद्राची मेट अशा गावांतून समोर येतो त्या वेळच्या ऋणानुबंधाचा धागा.
सातवाहनांचे बलाढ्य साम्राज्य नष्ट झाले अन् पाचव्या शतकाच्या मध्यात दक्षिणेत बदामी चालुक्य घराणे शक्तिशाली घराणे म्हणून उदयाला आले. या घराण्याची स्थापना पहिला पुलकेशीने केली. पुलकेशीला कीर्तीवर्मन व मंगलेश अशी दोन मुले होती. पुलकेशीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र कीर्तिवर्मन राजा झाला. कीर्तीवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा पुलकेशी लहान असल्याने त्याचा राज्यपाल म्हणून कीर्तिवर्मनचा भाऊ मंगलेश याच्याकडे राज्यकारभार गेला. मात्र त्याने कीर्तीमानच्या मुलगा दुसरा पुलकेशीचा अधिकार नाकारला. त्यातून झालेल्या युद्धांत मंगलेश मारला गेला. घरातील या भांडणात शत्रूंनी चालुक्यांविरोधात बंडाचे निशाण उभारले. मात्र पुलकेशीने सर्वांवर विजय मिळवित उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस कावेरी या मधील विशाल प्रदेशावर स्वामीत्व मिळविलं. हर्षवर्धनवरची पुलकेशीने विजय मिळविला. या स्वाऱ्यांनंतर दक्षिणापूतनाथ झालेला पुलकेशीने आपल्या राज्याला ९९ हजार गावे जोडली यात अंजनेरीचाही समावेश होता. पुलकेशीच्या मृत्यूनंतर पल्लवांनी बदामीचा ताबा घेतला. त्या चार मुलांपैकी पहिला विक्रमादित्य व चंद्रादित्य यांनी नाशिक-कोकण परिसरात आश्रय घेतला. तर आदित्यवर्मन व अभिनवादित्य यांनी बदामीवर आपले राज्य प्रस्थापित केले. विक्रमादित्याने आपला हक्क मारला गेल्याने आपल्या भावांवर चाल करून पुन्हा बादामी ताब्यात घेऊन स्वत: राजा झाला. विक्रमादित्यानेही नाशिकमध्ये बारावर्ष वनवास भोगला व त्यानंतर राजा झाला. त्यानंतर पल्लवांचा नाश करीत पुलकेशीच्या मृत्यूचा बदला घेतला. या दरम्यान नाशिकच्या अंजनेरीची प्रशासक म्हणून जबाबदारी विक्रमादित्यने गुर्जर उर्फ हरिश्चंद्रवंशीय वंशातील स्वामिचंद्र यांना दिली. वंशपरंपरेने अंजनेरीचा कारभार राजा सिंहराज व त्यानंतर राजा पृश्विचंद्र भोगशक्तीकडे आला अन् येथून सुरू होते नाशिकच्या अंजनेरी ताम्रपटातील भोगशक्तीने दान म्हणून दिलेल्या गावांची सफर. हा प्रवास एक अनोखा अनुभव देतो.
अंजनेरी हे अनेक राजांच्या राजधानीचे शहर राहिले आहे. हे आता अंजनेरीकडे पाहून वाटत नसले तरी तेथील मंदिर व लेणीहा वारसा आपल्याला आजही इतिहास सांगतो. अंजनेरीत चार प्राचीन ताम्रपट मिळाले आहेत. त्यांना अंजनेरी ताम्रपट असे म्हटले जाते. यातील दोन ताम्रपट भोगशक्ति या राजाचे आहेत. या ताम्रपटात देवालयाच्या व्यवस्थेसाठी दान दिलेल्या गावांचा तसेच लोकांना, व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलतींचा उल्लेख केलेला आहे. तसेच ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत. त्यांच्या दंडाचा व शिक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील समगिरीपट्टन, चंद्रपुरी, सवाणेपल्लिका, कंसारिपल्लिका, मौरेयपल्लिका, अंबेयपल्लिका या गावांचा उल्लेख आलेला आहे. ही गावे आता नेमकी कुठे आहेत, कशी आहेत. त्या गावांना माहिती आहे का की, ही गावे आठव्या शतकाच्या आधीपासून आपला इतिहास घेऊन पुढे चालली आहेत. त्यांना माहिती असेल का हा इतिहास असे अनेक प्रश्न घेऊन अंजनेरीतून आमचा प्रवास त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सुरू झाला. पहिनेरोडला लागल्यावर उजव्या हाताला काजोलीकडे जायचं. काजोली (काजुर्ली)च्या आधी डावीकडे असंख्य वीरगळी पावसापासून बचावासाठी एक झुडपाखाली आश्रयाला गेल्याने दिसते. काजोलीपाहून सामुंडीच्या दिशेने निघायचं. सामुंडी म्हणजे भोगशक्तिच्या ताम्रपटातील सवाणेयपल्लिका. हे गाव आता कसे असेल, असा विचार करता करताच सामुंडीत आपण पोहचतो. अकराशे लोकसंख्येच्या गावात कोळी समाज सर्वाधिक आहे. मारूती, मरिआई मंदिरे गावात आहेत. गावातील यात्रेतील बोहाड्यांची परंपरा पंचवीस वर्षांपूर्वी बंद झाली. सामुंडीला पूर्वी सोनेवाडीही म्हटले जायचे असे, संपत खोडे व लिलाबाई ठाकूर सांगतात. भोगशक्तिने आठव्या शतकात हे गाव देवालयाला दान म्हणून दिले होतं. सामुंडीपासून पुढे अस्वलीत हर्ष गाव लागतं. हर्ष म्हणजे हरिहर गड. हे गडाच्या पायथ्याचे गाव असल्याचे रामा बाळू सिद्ध सांगतात. तेथून पुढे हरिहरच्या पायथ्याचे कोटमवाडी, निरगुडे हर्ष ही गावे आहेत, असे समाधान निरगुडे सांगतात. तेथून थोडेपुढे गेल्यावर टाकेहर्षमध्ये भातशेतातील एक झाडाखाली मोठ्या संख्येने आदिवासींचे लाकडी चिरे उभारलेले दिसतात. तेथून पुढे टाके हर्ष हे गाव लागतं. हर्ष किल्ल्याच्या अवतीभवतीच्या सर्व गावांच्या मागे हर्ष असे बिरूद लागलेले आहे. पुढे बसगड म्हणजे भास्करगडाच्या पायथ्याला वसलं वैतरणा धरणामुळे विस्थापित डहाळेवाडी हर्ष हे गाव लागतं. गावाने आपल्या जुन्या परंपरा जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गावात मे महिन्यात सात दिवस बोहाड्यांचा कार्यक्रम होतो, असे शिवराम घोरपडे व मधू खोंडे सांगतात.
आता भोगशक्तिच्या चंद्रपुरीत जाण्याचे वेध लागल्याने आपलाही वेग वाढतो. रस्त्यात उजव्या हाताला मोखाड्याकडे जाणारा घाट रस्त्याचा फाटा लागतो. या रस्त्यावर घाटनदेवीचे मंदिर आहे. चंद्राच्या मेट गावाची ही देवी गावाची रक्षणकर्ती मानली जाते. मंदिरापासून जवळच मुठभर घरांचे आदिवासी पाडे व त्यांचं विश्व अनुभवत आपण चंद्रपुरीत म्हणजेच चंद्राची मेट या गावात पोहचतो. गावाच्या नावातील चंद्र हा चालुक्य घराण्याचे मांडलीक असलेले हरिचंद्र वंशामुळे पडले असावे, असे वाटते. तर मेट म्हणजे गडाच्या उतारावरील सपाट परिसर जेथे गाव वसलेले असते अन् तेथे जकात व्यापार अशा गोष्टी चालतात. ही व्यवस्था ज्यांच्याकडे सोपविलेली असते ते मेटकरी, असे प्रा. रामनाथ रावळ सांगतात. चंद्राच्या मेटमध्ये दाखल झाल्यावर या आदिवासी पाड्यावर एकमेव वाड्यासारखे घर दिसते. हा वाडा ६ बाय १० खणी व दोन-तीन मजली असून, ते चंद्रे कुटुंबीयांचे आहे. अर्थात गावात सर्वाधिक आडनावाचे लोक चंद्रेच आहेत, असे कैलास चंद्रे, रमेश चंद्रे, चंद्रराम व जीवन चंद्रे सांगतात. हा वाडा दीडशे वर्ष जुना आहे. चंद्राची मेट हे जकातीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्याला नाशिकचं गेटही म्हटले जाते. जकातीचा कारभार बहुदा या कुटुंबीयांकडे असल्याने हे त्यावेळी श्रीमंत घर असावं. चंद्राची मेटमधील बाजारपेठही मोठी होती. येथील ग्रामस्थांना प्राचीन नाणीही सापडतात, असे जीवन चंद्रे सांगतात. इंग्रजांच्या काळात चळवळींचे केंद्रही हे गाव राहिलं आहे.
ग्रामस्थांशी गप्पागप्पांमध्ये गावचा इतिहास उलगडायला लागतो. तसे गावकरी गोळा व्हायला लागतात अन् बाराशे वर्षांपूर्वीही आमचे पूर्वज येथे होते. हे समजून घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासारखा झालेला असतो. अगदी पुलकेशी ते विक्रमादित्य अन् भोगशक्तिने जव्हार बुद्रूकच्या मंदिराला ही गावे दान म्हणून दिल्याचे एकताना गावकरी हरखून जातात अन् बाराशे वर्षांपूर्वीच्या या गावांमध्ये आल्याचा एक वेगळा आनंद मिळतो. सामुंडी, चंद्राची मेट याशिवायही कंसारपल्लिका म्हणजे कुरनोली असावे, मौरेयपल्लिका म्हणजे जव्हार रोडवरील मोरवाडी, अंबेयपल्लिका म्हणजे आताचे अंबाली, जयपूर म्हणजे जव्हार असावे असे संदर्भ शांताराम देव यांच्या महाराष्ट्र ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भमध्ये मिळतात. भोगशक्तिच्या ताम्रपटातील समगिरीपत्तन (पट्टन) हे गाव आता कोणते हा संदर्भ काही लागत नाही. मात्र हे गाव नदीच्या किनारी वसलेल गाव असणार. कारण पट्टन म्हणजे बंदराचे गाव. म्हणजेच वैतरणा नदीतून जलमार्गाने वाहतूक केली जायची. त्यावेळच्या लहान लहान नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी किती खुबीने करीत असावेत हेही समगिरीपत्तन दाखविते.
बदामी चालुक्यवंशीय पुलकेशी ते पृश्विचंद्र भोगशक्तिने अंजनेरीचा केलेला कायपालट आजही वारसास्थळ म्हणून आपल्याला पहायला मिळतो. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेली सोळा मंदिरे, सरोवर अन् अंजनेरीत सापडलेली चार ताम्रपट (हे ताम्रपट नाणेसंशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.) बाराशे वर्षांचा प्रवास आपल्याला घडवितो. माणसं मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची.
डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.
अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)
नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा अशी ह्या किल्ल्याची ओळख.रामशेज ला जाण्यासाठी नाशिक पासून साधारण १४ ते १५ किलोमीटर वर असणारे आशेवाडी गाव गाठायचे.गावातून समोरच कातळ टोपी दिसते तोच रामशेजचा किल्ला.किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे किल्ला डाव्या बाजूला ठेवून सुरुवातील बांधीव पायऱ्या चढून त्या नंतर मळलेल्या वाटेने सरळ किल्ला चढत जायचे.चढताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराअलीकडील राम मंदिर स्पष्ट दिसते त्यामुळे वाट चुकण्याचा संभव नाही.

साधारण ४५ मिनिटे ते १ तासाच्या चढाई नंतर आपण गुहेपाशी पोहोचतो.ह्या गुहेत शिवपिंड ठेवलेली आहे. हि गुहा पाहून सरळ गेल्यावर श्री रामाचे मंदिर लागते मंदिराच्या मागच्या भिंतीवर (जी किल्ला चढताना समोर लागते) एक शिलालेख कोरलेला आहे.ह्या शिलालेखावरचा मजकूर हा पुढील प्रमाणे आहे –
१. ।। श्री गणेशाय नम:।।
२. स्वस्तिश्री म नृपशालिवाहन शक १६८२ विक्रमनाम
३. संवत्छरे: श्रीराजा शाहूचरणि दृढभाव: पंत
४. प्रधान बाळाजि बाजिराव: सुभेदार आपा स ब (स)
५. (दा) शिव: सटवोजि मोहिते हंबिरराव
६ (फ)किर मुहहंमद कारिगर
शिलालेखाचा सारांश-शालिवाहन शकाच्या १६८२व्या वर्षी विक्रमनाम संवत्सरात छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे
बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी सुभेदार (आपाजी सदाशिव?), शेवटची ओळ लागत नाही परंतु त्याचा साधारण अर्थ सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या सहकार्याने किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला. हे बांधकाम फकीर मुहम्मद याने केले असा होतो.
ह्या शिलालेखावरून स्पष्ट होते कि इ.स १७६० (शके १६८२) साली किल्ला मराठ्यांकडे होता व किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला गेला.मंदिरात श्री राम ,लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे.मंदिर छोटेखानी आणि सुंदर आहे.मंदिराच्या डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.हे पाहून सरळ पायरी मार्गाने चालत आपण उध्वस्त प्रवेशद्वाराने किल्ल्यात प्रवेश करतो.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे दोन भाग पडतात डाव्या बाजूला आहे तो पठाराचा भाग आणि उजव्या बाजूला पाण्याची टाकी आणि उध्वस्त अवशेष असलेला किल्ल्याचा डोंगर माथा.प्रथम उजवीकडे जाण्याआधी प्रवेश द्वाराला समांतर उतरत गेल्यावर कमानी असलेला दरवाजा लागतो.मी समांतर ह्या साठी म्हणतोय कारण दरवाजा उतरल्यावर आपल्याला राम मंदिराजवळ असलेले गुहेचे छत दिसते आणि गम्मत म्हणजे ह्या छताला भोक आहे ते आपल्यला आतून स्पष्ट दिसते.दरवाज्याचे प्रयोजन बघून नक्कीच या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे वाटते. दरवाजा अत्यंत रेखीव आहे , दरवाजा पाहून पुन्हा मागे यायचे आणि उजव्याबाजूस सरळ चालत गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात त्या उतरल्यावर आणखी एक छोटा दरवाजा लागतो आणि पुढे छोटेखानी तटबंदी लागते हि बहुदा टेहळणीची जागा असावी .इथून रामशेज खालील परिसर आणि नाशिक कडे जाणारा रास्ता पाहायला मिळतो.हे पाहून वर यायचे आणि सरळ चालत जाऊन डोंगर माथ्यावर जायचे.


गडमाथ्यावर जाताना थोडा अलीकडे चुन्याच्या घाण्याची जागा लागते ती पाहून पुढे गेल्यावर आधी काही कोरडी टाकी आणि देवीचे मंदिर लागते.मंदिर पाहून सरळ चालत राहायचे आणि माथ्याच्या टोकापर्यंत जायचे , वाटेत काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.अवशेष पाहून आपण माथ्याच्या टोकाला पोहोचतो इथे खराब टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. किल्ल्यांवरच्या टाक्यांची संख्या पाहता किल्ला छोटा असून किल्ल्यावर बराच राबता असावा असे वाटते.हे पाहून परत किल्ल्याच्या पठाराच्या मार्गावर निघायचे परंतु पठारावर जाण्याआधी वाटेत टाकी लागतात त्याला समांतर एक छोटी पायवाट खाली कड्या पर्यंत जाते.इथे किल्ल्यातील गुप्त दरवाजा लागतो. काटकोनात उतरून हा चोर दरवाजा आपणास दिसतो फार फार तर २ माणसे उभे राहू शकतात एवढी जागा आहे.दरवाज्याच्या छतावर कमळपुष्प कोरले आहे.किल्ल्यावरील हा छोटेखानी गुप्तदरवाजा किल्ल्याचे मुख्य आकर्षणच म्हणायला हवे.दरवाच्याची रचना पाहून मन थक्क होते.




चोरदरवाजा पाहून सरळ किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस यायचे इथे एक सुंदर मोठा भगवा ध्वज उभारलेला आहे. ध्वजालिकडे दोन मोठी खराब टाकी लागतात.इथे आपली गडफेरी संपते.पाऊस सुरु झाल्या झाल्या अथवा सुरु होताना जे मळभ असणारे वातावरण असते त्या वातावरणात ह्या किल्ल्यावर जरूर जावे.मराठ्यांच्या इतिहासातील एका अलौकिक झुंझीच्या साक्षीदार असणाऱ्या ह्या छोटेखानी किल्ल्याला जरूर भेट द्या.

गडाच्या इतिहासाबद्दल – रामशेज हा किल्ला १६३५ साली शहाजहान ने स्वारी केली तेव्हा मोघलांकडे होता हे धोडप , राजदेहेर ह्या किल्ल्यांवर असणाऱ्या शिलालेखांवरून कळते.तेव्हा रामसेज किल्ल्याबरोबरच त्या पट्ट्यातील चांदवड, धोडप , इंद्राई, राजदेहेर इत्यादी किल्ले अलावर्दीखान तुर्कमान ह्याने घेतले असे शिलालेखात कोरले आहे.रामशेजवर औरंगजेबाने शहाबुद्दीनखान ह्याची नियुक्ती केली , तसेच त्याच्याबरोबर राव दलपत आणि इतर बुंदेले सरदार सुद्धा होते.प्रारंभी बुंदेले व त्यांच्या सरदारांचा किल्ल्यावरील ५०० ते ६०० लोकांच्या शिबंदीसमोर काही टिकाव लागला नाही.त्यातच मे १६८२ साली संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना वेढा फोडण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाबुद्दीन खानाच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले आणि मोगलांना माघार घ्यावी लागली.ह्या विजयाने किल्ल्यावरील शिबंदीत जोर चढला.शहाबुद्दीन खानाकडून काही एकट्याने होत नाही म्हंटल्याबर औरंगजेबाने बहादुरखानास शहाबुद्दीन च्या मदतीस कुमक देऊन पाठवले.शहाबुद्दीन ने किल्ल्याला वेढा घालणे , सुरुंग लावणे , मोर्चे बांधणे , दमदमे तयार करून वर चढवणे हे सर्व प्रयत्न केले पण किल्लेदारासमोर त्याचे काही चालेना.शिवाय खानाने केलेल्या दुसऱ्या कडक हल्ल्यात राजा राव दलपतराय ह्याला दगड लागला त्यामुळे मोगलानी पुन्हा माघार घेतली. शेवटी बादशहाने शाबुद्दीनखानाला परत बोलावले व जुन्नर ला पाठवले आणि वेढ्याची जबाबदारी खानजहान बहादूर कोकलताश ह्या एकट्यावर आली.
कोकलताश ने तर आणखी नवीन योजना आखली त्याच्या योजने प्रमाणे किल्ल्याच्या एका बाजूला हल्ला करायचा म्हणून तोफा दारुगोळा त्या बाजूस आणून हशमांनी आणि सैन्याने जमवाजमव करून गर्दी करून आवई उठून द्यायची आणि दुसऱ्या बाजूस किल्ल्याच्या जिथे शिबंदी नाही किंवा कमी आहे तिथे काही निवडक सैनिकांनी जाऊन किल्ल्यावर हल्ला करायचा. परंतु किल्लेदार इतका हुशार होता कि त्याला हि योजना कळली व त्याने सुद्धा आपल्याला जस काय माहित नाही असे दाखवून मुद्दाम दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोगली गटावर हल्ला करण्यासाठी आलेल्या सैनिकांना सडकून काढून मोगलांच्या योजनेवर अक्षरशः पाणी फिरवले. अजून कहर म्हणजे सैन्याने कोण्या एका तांत्रिकाला पकडून आणले आणि तो म्हणाला कि मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप द्या मी तो मंत्रून हातात घेईल मग कुठलीही अडचण न येता तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकाल.एके दिवशी ह्या तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगली सैन्य येताना मराठ्यांना दिसले आणि मराठ्यांनी दगडांचा मारा गोफणीने सुरु केला, ह्या माऱ्यात तांत्रिकाला दगड लागला त्यात तो साप उडाला आणि तांत्रिक जागच्या जागी कोसळला हे पाहून मोगली सैन्याने माघार घेतली.ह्या पराभवाने संतापून औरंगजेबाने कोकलताशला पण पुन्हा बोलवून घेतले आणि वेढा उठला.त्यानंतर संभाजी महाराजांनी किल्लेदाराचे कौतुक करून त्याची बदली एका प्रमुख किल्ल्यावर केली.पुन्हा बादशहाने कासीमखान किरमाणी नावाच्या सरदाराला किल्ला घेण्यासाठी पाठवले पण त्याच्याकडून सुद्धा काही झाले नाही.अशाप्रकारे सण १६८७ पर्यंत किल्ला भांडला आणि शेवटी फितुरीनेच तो मोगलांकडे आला.
मी हि झुंज स्थलाभावी फार थोडक्यात सांगितली ,ह्या लढाईवर सविस्तर लिहिण्यासारखे आहे.थोडक्यात काय माझा एक एक एक एक वर्ष लढू शकतो हे महाराजांचे वाक्य रामशेज आणि मराठ्यांनी सार्थ केले.
संदर्भ- ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे ,तारीखे दिल्कुशा ह्या भीमसेन सक्सेना च्या ग्रंथाचा श्री. सेतुमाधवराव पगडी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद – मोगल आणि मराठे , तसेच ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ मधील अखबार
गरज वारसा सर्वेक्षणाची!
नाशिक एक ऐतिहासिक संस्कृती पुढे घेऊन जाणारं गाव आहे. येथील समृद्ध सांस्कृतिक ऋणानुबंधाला लोकसंस्कृतीचे कोंदण लाभले आहे. येथील प्रत्येक वारसा हा प्रत्येक श्वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. प्रत्येक वारशामध्ये संस्कारसक्षम स्पर्श अनुभवता येतो. हा वारसा जपण्यासाठी तो नेमका कुठे, कसा जगतो आहे, हे शोधायलाच हवे. म्हणून गरज आहे वारसा सर्वेक्षणाची.
मानवी संस्कृतीच्या विकासात वारसा निर्मितीला महत्त्वाचे स्थान आहे. जगण्याच्या सजगतेतून प्रथा, परंपरांचा जन्म झाला. आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे, त्याच्या नोंदी गुफांमध्ये चित्रांच्या माध्यमातून रेखाटला गेला. शिकार, शेती, लग्न, मिरवणुका, लढाईचे प्रसंग हजारो वर्षांपासून जपलले आपण पाहतो. वारसा विकासालाही टप्पे होते, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गुफांमधील ही चित्र पुढे मूर्ती कलेतून दिसू लागली. भाषा, लिपी विकसित होऊ लागली अन् चित्रांच्या जागी रेषांनी आकारलेली लिपीही एक वारसा ठरली. निसर्गाकडून माणूस देव या संकल्पनेकडे वळाला. मूर्तीपूजा जसजशी विकसित झाली तसतशी
लेणी, मंदिरे आकाराला येऊ लागले. भाषाही दरम्यानच्या काळात बोलकी होऊ झाली. वस्ती करून राहू लागलेला माणूस आपल्या पाऊलखुणा सिंधू-सरस्वती संस्कृतीसारख्या स्थळांतून अगदी नाशिक-जोर्वे सारख्या स्थळांपर्यंत पुढच्या पिढ्यांसाठी वारसा म्हणून उभ्या ठाकल्या. उत्खननातून आता या पाऊलखुणा समोर आल्याने मानवी संस्कृती कधी अन् कशी बहरली हे समोर आले आहे. ही स्थळे आपला वारसा ठरू लागली आहेत. पण माणूस येथेच थांबला नव्हता. त्याने प्रगतीची कास कधी सोडली नाही. राहण्यासाठी घरे, जगणे सोपे करण्यासाठी वेगवान हत्यारे, गरजेची भांडी, जगण्यासाठी अन् मेल्यानंतर काय या नीतीमूल्यांची ठेवण सुरू केली. पंथ, धर्म, सत्तेतील जयविजय, आक्रमण, सत्तांतर, व्यापार हे बदल जसजसे मानवाने स्वीकारले तसतशी त्याच्या जगण्यातील बदलही पुढे आले. बदलाचे आव्हानही त्याने स्वीकारले अन् लेणी, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, वाडे, नदी, लोकसंस्कृती, सणउत्सव, प्रथा, परंपरा, चित्रकला, काष्ठशिल्प, देवदेवतांची शिल्पे, लोककला, लोककथा, अख्यायिका, गीते, संस्कार हे सर्वकाही त्याने अन् आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवले. बदलत्या काळानुसार यातील अनेक वारसास्थळे (स्थळ म्हणजे फक्त वास्तू नव्हे; लोकपरंपरा, प्रथा देखील.) लोप वापली, काही नव्याने निर्माण झाली तर अनेक वारसास्थळे लोप वापण्याच्या स्थितीत आहेत. या लोप वापत असलेल्या दृश्य अन् अदृश्य वारसा स्थळांचे जिल्ह्यानुसार सर्वेक्षण होणे व त्यावर चिंतन होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास हा वारसा हातातून निसटेल ही भीती कायम आहे. फक्त पुरातत्त्व विभाग सर्वच वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात सक्षम नाही. त्यामुळे आपला वारसा लोकांनीच जपायला हवा, यासाठी एक मोठी चळवळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने कामाला सुरूवात झाली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन व जिल्ह्यातील वारसास्थळांचे सर्वेक्षणाचा गोवर्धन पर्वत पुरातत्त्व व गॅझेटिअर या दोन विभागांनी उचलायला हवा. या दोन विभागांवर जबाबदारी टाकण्यात अथवा त्यांच्याकडून अपेक्षा करण्याच कारणही तसं आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकपदी असलेले तेजस गर्गे अन् गॅझेटिअर विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिवपदी असलेले डॉ. दिलीप बलसेकर हे दोघेही नाशिककर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही खूप आहेत. वारसा संवर्धन क्षेत्रात चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना नाशिककरांनीही योग्य साथ द्यायला हवी अन् या विभागांना लोकसहभाग आवश्यक असेल तर वारसा सर्वेक्षण, संवर्धन, जतनाची कामे कशी केली जातात याचे प्रशिक्षण त्यांनी नाशिककरांना द्यायला हवे. तरच वारसा जतन अन् संवर्धनाच्या विकासवाट अधिक समृद्ध अन् सोप्या होतील. मात्र, यापूर्वी गरज आहे ती आपल्या जिल्ह्यात नोंदविल्या न गेलेल्या गावागावांतील वारसा स्थळांच्या सर्वेक्षणाची. अशा सर्वेक्षणातूनच एकमेकांतील दूरावा दूर करून संवाद निर्माण करता येईल.
वारसा म्हणजेच हेरिटेजबाबत लोकांमध्ये जनजागृती होत आहे. जुनं ते सोनं याचही महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळे आपण आता जतन, संवर्धन प्रक्रियेकडे वळायला हवं. मात्र वारसा स्थळांचं जतन-संवर्धनापूर्वी गावागावांतील वारसा नेमका काय आहे, कोणत्या स्थितीत आहे यावर मंथन व्हायला हवं. ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वारसा शोधणं, मिळणं ही सर्वेक्षणाच्या पातळीवर पहिली मोहीम. या वारशाची नोंद घेणे ही दुसरी पायरी. तर मिळालेल्या वारशाचे विश्लेषण, त्याची स्थिती अन् त्यासाठी काय करता येर्इल ही वारसा संवर्धन आणि जतनची शेवटची पायरी ठरते. उदाहरणच द्यायचे झाले तर गोदाकाठी पूर्वी चित्रकथी नावाची एक लोककला सादर व्हायची. ही आता फक्त कोकणात दिसते. गोदाकाठी कागदावर, कापडावर काढलेल्या चित्रांच्या मदतीने त्या चित्रांचे वर्णन गीतातून केले जायचे. रामायण, महाभारत, अनेक अख्यायिकांचे हे हक्काचे ठिकाण होते. जनजागृतीचे संदेशही या चित्रकथीतून दिले जायचे मात्र आता ही लोककला नामशेष झाली आहे. अशीच आणखी एक लोककला म्हणजे बोहाडे. गावागावांतील उत्सवांमधून सादर होणारे बोहाडे, आखाडी आता बंद होऊ लागले आहेत. बोहाड्यांना दारूची लागण झाल्याने या कार्यक्रमांमधून होणारा वाद नको म्हणून हा लोककला प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही गावांनी हा वारसा काळजाशी जपला आहे. या महत्त्वाच्या घटनेची नोंद मात्र ना पुरातत्त्व विभागाने घेतली आहे ना गॅझेटिअर विभागाने. कॉर्पोरेट संस्था प्रदर्शनापुरत्याच लोककलांचा आधार घेताना दिसतात. पण ठोस काम त्या करताना दिसत नाहीत. अशाच उपेक्षेतून बोहाडे ही परंपरा बंद होत आहे.
बोहाडे लोककलेचा एक भाग असूनही लोककथा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फक्त लोककलाच नाही तर या लोककलेवर विसंबून असलेले कलाकारही विवंचना सहन करीत जगत आहेत. सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेले उपक्रमही ढेपाळले आहेत. हरसूल येथे मुखवट्यांचे संग्रहालय उभारण्यात आले. पण, दुर्लक्ष अन् इच्छाशक्तीच्या अभावामुळे सर्वकाही कुलपात पडून आहे. उत्साहाच्या भरात लाखो रूपये खर्च करून उपक्रमांचे काय होते हे हरसूलचे उदाहरण ताजे आहे. बोहाडे परंपरा अन् त्यांच्या मुखवट्यांना लोकाश्रय अन् सरकारचा आश्रय मिळाला तर लोककलेचे जतन अन् संवर्धन होर्इल. शिवाय, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही वेग येर्इल. अशीच तऱ्हा आहे आदिवासी लोककला, कलाकार अन् प्रथा, परंपरांची. राष्ट्रीय पातळीवर वाद्य वाजवणारे कलाकार नाशिकमध्ये आहेत. मात्र त्यांना राजाश्रय नसल्याने त्यांची कला नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. सध्या अनेक कलाकार मोलमजुरी करून जीवन कंठत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध तारपा वादक हरी दत्ता चारस्कर. हा कलाकार वारसा नाही का? त्यांना जपण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का? त्यांची कला पुढच्या पिढ्यांकडे जाऊ शकेल, असे वारसा लोककला विद्यापीठ नाशिकमध्ये उभे राहू शकत नाही का? या प्रश्नांची उत्तरं फक्त विचारमंथन करून मिळणार नाहीत. कारण, जागेवरून बसून मंथन करण्यापलीकडे म्हणजे नाशिकचा नेमका वारसा काय आहे अन् तो जपण्यासाठी काय करायला हवे यावर आता फिल्डवर्क या ठोस उपाययोजनेची गरज आहे.
नाशिकमधील प्राचीन मंदिरांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. हा वारसा जपला जावा असे कोणालाही वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फायदा एखादा नेता, अँटिक वस्तूंचा एजंट घेताना दिसतो. गावात नवीन मंदिर बांधून देतो म्हणून गावातील जुन्या मंदिरातील शिल्प ट्रक भरून घेऊन गेल्याची उदाहरणे नाशिकमध्ये कमी नाहीत. यास आपली मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. मंदिर भग्न झालं, शिल्प भंगली म्हणजे अनिष्ट काही होर्इल, या भीतीने अनेक गावकऱ्यांनी ही प्राचीन शिल्प, मूर्ती चक्क ट्रक भरून समुद्रात नाहीतर नदीत सोडून दिल्याची उदाहरणेही नाशिकमध्ये सापडतात. अशा एजंटांना रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. कायदा आहे पण कोणी तक्रार करीत नाही, तोपर्यंत हा कायदा कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. या सगळ्यामुळेच वारसा अज्ञात आहे अन् नष्ट होण्याच्या स्थितीत आला आहे.
वीरगळ, प्राचीन मंदिरे, इतिहास, मंदिरांवरील चित्र, प्राचीन मठ, पेशवेकालीन वाडे, वीरगळी, आदिवासींचे चिरे, बारवा, यादवकालीन विहीरी, ऐतिहासीक जलयोजना, नदीवरील घाट, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या, जुनी कागपत्रे असा अन् खुपसा वारसा जपण्यासाठी जोपर्यंत गावागावातून सर्वेक्षण करून नोंदी होत नाहीत. तोपर्यंत अवतीभवती वारसा आहे, तो जपला पाहिजे अन् त्यातूनही आपल्या गावाचा विकास होऊ शकतो ही भावना ग्रामस्थांमध्ये जोपर्यंत रूजविण्यासाठी प्रयत्न होत नाही, तोपर्यंत सगळे प्रयत्न निरर्थक ठरतील. पुरातत्त्व अन् गॅझेटिअर या दोन विभागांना लोकाभिमुख व्हायचे असेल तर त्यांनी त्याची सुरूवात अशा सर्वेक्षणातून करायला हवी. तरच लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होर्इल. या चळवळीला लोक पाठिंबा, सहभाग मिळेल अन् वारसा जनतसंवर्धनाचा श्रीगणेशाही होर्इल. 
सरसेनापती उमाबाई दाभाड्यांचे अभोणा
पराक्रमाची पराकाष्टा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. पेशवाईतील इतिहासाला पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी पराक्रमाची झालर चढवली अन् नाशिकच्या अभोणा गावाच्या इतिहासाला शौर्याचे अनोखे कोंदणही मिळाले. अभोणा फक्त गाव नाही तर देशातीलच नव्हे, तर बहुधा जगातील पहिली महिला सरसेनापती देणारी ती भूमी ठरली आहे.
भारताचा इतिहास अनेक लढवय्या रणरागिणींनी उजळून निघालेला आहे. यात झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले अशी अनेक नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे पेशवाईतील सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. पेशवाईतील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो. मात्र पेशवाईतील हे एक वास्तव एक नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारर्कीद जाणून घेणे गरजेचे आहे. छत्रपतींच्या गादीची धुरा सांभाळणाऱ्या पेशवाईने इतिहासाला एक वेगळाच आयाम दिला. तसेच पेशवाईला शौर्याचा रंग देण्यात त्यावेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे. छत्रपतींसाठी अन् पेशव्यांच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणा-या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांचा पदरी होते. छत्रपतींनंतर संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली.
संभाजीनंतर ते राजारामांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन् नंतर १७१७ मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर शाहूने त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्यांकडून त्रिंबकराव मारले गेले अन् येथूनच खंडेरावांची पत्नी अन् त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा पेशव्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. शाहूंनी बाजीरावांसह तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन् त्या पेशवाईतील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई या अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत अभोण्यात पोहचलो अन् थक्क करणारे वास्तव डोळ्यापुढे तरळले.
नाशिकहून सप्तश्रृंगीगडाकडे जाणाऱ्या रस्त्याने नांदुरी गाव आले की, तेथून अभोणा गावाकडे जाणारा रस्ता लागतो. या फाट्यावर उजव्या हाताला एका झाडाखाली आदिवासींची चिरे अन् एका भग्न गणेशमूर्तीसह अनेक देवतांचे भग्न अवशेष ठेवलेले दिसतात. ते पाहून पाच किलोमीटवर असलेल्या अभोण्याकडे जाताना मध्येच मोहनदरी फाटा लागतो. फाट्यावर आदिवासींचे लाकडी चिरे पहायला मिळतात. ते पाहून आपण एका ऐतिहासिक मराठा सरदाराच्या गावात जात आहोत याची उजळणी मनात सुरू होते. गिरणा नदीच्या काठावर वसलेले अभोणा ही एक प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने पहिल्यापासूनच हे वर्दळीच ठिकाण. आता एखाद्या विकसित शहरासारखं रुप घेऊ लागलं आहे. पण गिरणापात्रात मधोमध असलेली एक प्राचीन वास्तू या विकासापासून आपल्याला लांब घेऊन जाते अन् अभोण्याच्या इतिहासात हरवून टाकते. ठोके-देशमुख या अभोण्यातील सरदार घराण्याची शान गिरणाच्या पुरामुळे उद्धवस्त झालेल्या वास्तूतून पहायला मिळते. हत्ती, घोडे बांधण्याची व्यवस्था, देवांच्या देवळ्याचा एक चौथरा आज येथे शिल्लक आहे. त्यात विविध देवांच्या मूर्तीही मनमोहक आहेत. पूर्वी निवांत अन् एकांतात पहुडण्यासाठी ही जागा खास बनवली गेली असणार तीही नदीपात्राच्या मधोमध. या वास्तूच्या फक्त शिल्लक असलेल्या चौथऱ्याला न्याहाळताना समोरच्या टेकडीवरील गढीकडे लक्ष जातं. गढी आता जमीनदोस्त झाली आहे पण गढीचा बुलंद दरवाजा मात्र अजूनही इतिहास उभा करतो. नक्षीकाम, विविध शिल्पे अन् हरवलेल्या इतिहासाला कवटाळून बसलेला हा दरवाजा अभोण्याची शान जपताना दिसतो. या वास्तूकडे जाण्यासाठी घाणीच्या साम्राज्यामुळे थोडी कसरत करावी लागते. पण हा दरवाजा पाहताना गढी (महाल) किती मोठी असेल याची प्रचिती येते. गढीच्या भिंतीचा आकार बरेच काही सांगतो.
हा अभोण्याचा ऐतिहासिक वारसा असल्याने ही वास्तू कायमस्वरूपी जपण्याची गरज मनाशी भिडते. पेशवेदप्तरातील ठोके घराण्याच्या कागपत्रांवरून या घराण्याचे पेठ संस्थानचे लक्षधीर राजे, बाजी आटोळे, सिन्नरचे देशमुख, कुंवर बहाद्दर, मुदोनकर भावसिंग ठोके यांच्याशी आप्त संबंध असल्याचे दिसते. अभोण्याचे देवराव व हरिसिंग ठोके हे दोन सरदार तळेगाव दाभाडेच्या खंडेराव दाभाडेंचे विश्वासू होते. यातून साधारण १७०४ मध्ये अभोण्याच्या देवराव ठोकेंची मुलगी उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेली.
उमाबाईंच्या माहेरीही सरदारकीचे वातावरण असल्याने लढवय्या बाणा त्यांच्यात होताच. शस्त्र चालविण्यात आणि घोडस्वारीत त्या अव्वल होत्या. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद शाहूंनी सोपविले. मात्र गुजरातच्या सुभ्यावरून त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंच्या माहेरकडचे दलपतराव ठोके, भावसिंगराव ठोके, बजाजी आटोळे, कवडे व सिन्नरचे देशमुख, कुंवर बहादुर यांच्यासह ठोकेंच्या सर्व जवळच्या मंडळींना फोडून आपल्या पक्षात सामील केले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी भावसिंग ठोके याला बाजीरावांनी सरंजाम व कुंवर बहादुर याला वस्त्रेही दिली. निझामाची चाकरी सोडून बाजीरावांच्या पदरी आलेल्या भावसिंग ठोकेने बागलाण परिसरात धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.वैतागलेल्या निझामाने पेशव्यांना पत्र लिहीत भावसिंग ठोके यांना मराठ्यांच्या चाकरीत ठेवू नये, अशी विनंती केली. त्यावर निझामाची मर्जी राखावी म्हणून शाहूंनी पेशव्यांना भावसिंग ठोके यास चाकरीत ठेवू नये, अशी आज्ञा केली होती. मात्र तसे घडले नाही. डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी गेलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यामुळे त्रिंबकरावांचा मृत्यू झाला, असे संदर्भ सेनापती दाभाडे दफ्तर, डॉ. एस. ए. बाहेकर व पुष्पा दाभाडे यांच्या उमाबाईंवरील पुस्तकात मिळतात. त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी द्यावी म्हणून शाहू स्वत: त्यांना घेऊन तळेगावास गेले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.
गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढेही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. जात उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. मात्र दरम्यान, उमाबाईंनी पेशव्यांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. पेशवाईतील राजकारणाच्या रंगात उमाबाईंची पकडही यादरम्यान पहायला मिळते. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. ‘या ऐतिहासिक घटनांमध्ये सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडेंचे कार्य मोठे आहे.’ असे दाभाडे घराण्याचे वंशज सरदार सत्यशील दाभाडे सांगतात.
अभोण्याच्या ठोके घराण्यातील ३ मुली सरदार दाभाडे घराण्यात दिल्या होत्या. यात सेनापती दाभाडेंचा तीन नंबरचा मुलगा सेनाखासखेल सवाई बाबुराव दाभाडे यांची एक पत्नी ही हरिसिंग ठोके यांची बहीण अभोणकर ठोके घराण्यातील होती. तर सेनापती यशवंतराव (दुसरा दत्तक) याची पत्नी लक्ष्मीबाई ही हरिसिंग ठोकेंची मुलगी होती. हा इतिहास अभोण्याच्या गढीवरून अनुभवताना अन् बालपणी उमाबाई या गढीत तलवारीशी खेळतायेत असा प्रसंग डोळ्यासमोरून तरळताना अंग शहारून जातं. ठोके यांचे वंशज गावातील पेठ गल्लीत राहतात. त्यांच्याकडील सोन्याची मूठ असलेली तलवार हातात घेतल्यावर उमाबाईंनीही ही तलवार हातात घेऊन शौर्य घडविले असेल, असे वाटायला लागतं. ठोकेंच्या घरातील देव्हारा आणि देव्हाऱ्यातील व्यालावर बसलेली महिषासूरमर्दिनीची सप्तशृंगीची मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. उमाबाईंची सप्तश्रृंगीवरील श्रद्धा त्यांच्या दानातून दिसते. त्यांनी सप्तश्रृंगी मंदिराच्या पायऱ्या बांधल्याची नोंद मिळते. ठोकेंचे ऐश्वर्य आता इतिहासापुरते शिल्लक राहिलेले दिसते. मात्र ठोके घराण्यातील व्यक्तिंच्या डोळ्यातील चमक अन् त्यांना मिळाला मान अजूनही कायम आहे. गावात होळीचा कार्यक्रम प्रथम वाड्यातून होलीका पूजनानंतरच सुरू होतो, अशी परंपरा आहे. ठोकेंच्या घरातील देवीच्या मूर्तीची दसऱ्याला दरवर्षी मिरवणूक निघते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो, असे सरदार ठोके घराण्याचे वंशज जलालसिंग ठोके सांगतात.
अभोणा पाहताना जुन्या बांधणीची घरे जशी भुरळ घालतात तसेच गावातील मंदिरेही आपले वेगळेपण दाखविताना दिसतात. आनंदी देवी मंदिर, खंडेरायाची ठेकडी, मारूतीची दोन मंदिरे, महादेव मंदिर, शनीमंदिर, राममंदिर, गणपती या मंदिरांबरोबरच गोपालकृष्ण मंदिर गावाची शोभा वाढविताना दिसतो. याचबरोबर गढी जवळील समाध्याही पाहण्यासारख्या आहेत. गढीच्या मागील बाजूला नदी काठावरील महादेव मंदिर निसर्गसौंदर्याने सजलेलं आहे. हे मंदिर प्राचीन असल्याचे पुजारी गोविंद चवरे सांगतात. तेथून थोडं पुढं गेलं की, गढीलगत गोपालकृष्ण मंदिरही सुंदर आहे. येथील काष्टशिल्प नजरेत भरत तर मंदिरातील शांती तेथून पाय काढू देत नाही. मंदिरात गेल्यावर कृष्णांची काळापाषाणातील सुंदर मूर्ती पाहताना मोहाडीच्या श्रीकृष्णाची आठवण होते. या दोन्ही मूर्ती एकाच कलाकाराने साकारल्याचे प्रकाश देशमुख सांगतात. देव्हाऱ्यातील शिवाचा अर्धनारीनटेश्वराचा तांब्याचा मुखवटा नजरेत भरतो. गावात खंडेरायाची यात्रा भरते. तसेच श्रावणात गोपाळकृष्णाचा सात दिवस सप्ताह भरतो. पूर्वी यात्रेत बोहाडे सादर व्हायचे; मात्र आता ही परंपरा पंधरा वर्षांपासून बंद आहे. सरदार पेठ गल्लीतील जहागिरदार देशमुख मूळचे वायकुळे. ते काशी, राजस्थान, गुजरात करीत हतगडच्या लढाई दरम्यान कनाशीत व तेथून अभोण्यात स्थायिक झाले. त्यांना १८ गावांची वतनदारी मिळाली होती, असे प्रकाश देशमुख व प्रणव देशमुख सांगतात. गावात आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेठ गल्लीत जैनांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराला अनेकांनी सहकार्य केल्याचे कन्हूभाई पुजारी सांगतात. गावात दोन बारवाही आहेत. मात्र त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचा गावाला पाण्यासाठी वापर होऊ शकतो.
सोन्याची मूठ असलेली तलवार, सप्तश्रृंगीची अनोखी मूर्ती, ठोके, देशमुख घराण्याचा इतिहास अन् उमाबाईंनी दाभाडे घराण्यात उज्ज्वल केलेले अभोण्याचे नाव हा खरा अभोण्याचा वारसा आहे. गढीने देह ठेवला असला तरी इतिहास पुन्हा शौर्य गाजवायला सज्ज असल्याचं अभोणा भटकताना वाटतं. त्यामुळेच अभोण्याची सफर एकदा करायलाच हवी.
यादवकालीन शिंदे, चिंचोली
यादवांचा पराक्रमी राजा सेऊणचंद्राच्या वसईच्या ताम्रपटातील दान दिलेल्या गावात नाशिकच्या चार गावांचा उल्लेख आहे. ही गावे आहेत कुठे अन् कशी आहेत हा शोध यादवकालीन तलाव अन् प्राचीन मंदिराचा खजिना समोर आणतात. सिन्नर तालुक्यातील चिंचोली, वडगाव पिंगळा, मोह व नाशिक तालुक्यातील शिंदे ही गावे मनाला मोहिनी घालतात कारण ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.
सातव्या शतकात हर्षवर्धनाच्या विशाल साम्राज्याचा अस्त झाला. त्यानंतर अनेक नवीन राजघराणी उदयास आली. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा या घराण्यांच्या आपसातील संघर्षांनी युद्धांनी भरलेला आहे. स्वपराक्रमाच्या जोरावर भाग्य काढू इच्छिणाऱ्या साहसी वीरांना हा काळ सर्वस्वी अनुकूल होता. त्यात यादववंशाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अगदी राजपुताना, माळवा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र प्रदेशात आपली सत्ता स्थापन करून यादवांनी आपल्या संस्कृतीचा प्रसार करीत मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपले स्थान पक्के केले. मात्र हे यादव घराणे आले कोठून हे पाहणेही गरजेचे ठरते.
जिनप्रभसूरी यांच्या साधारण अकराव्या शतकातील तीर्थकल्प या ग्रंथात ‘नासिक्यकल्प’ या प्रकरणात अंजनेरीच्या श्रीचंद्रप्रभ तीर्थंकराच्या स्थान माहात्म्याबद्दल सांगताना जिनप्रभसुरी लिहितात, ‘दुर्वास ऋषीने द्वारावती (द्वारकानगरी) जाळल्यानंतर वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाची गर्भवती स्त्री जैन तीर्थंकर श्रीचंद्रप्रभ स्वामी यांना शरण आली. त्यांनी तिला आश्रय देऊन तिचे संरक्षण केले. तिला झालेला पुत्र दृढप्रहार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने आपल्या पराक्रमाने तलारपय (तलवार पद म्हणजेत नगररक्षक) पदही मिळविले. अंजनेरीत यादव वंशाचे बीज रोवले गेले. दृढप्रहार पुढे राजा झाला व त्याने चंद्रप्रभस्वामींचे मंदिर बांधले.’ यादवांचा इतिहास हेमाद्रीने महादेवराय यादव यांच्या काळात (शके ११८२-११९३ म्हणजेच इ.स. १२६०-१२७१ ) या काळात लिहिलेल्या राजप्रशस्ती या ग्रंथातूनही समजतो. यात प्रथम राजा दृढप्रहारी (काळ अंदाजे इ.स.८५०) पासूनचा इतिहास दिला आहे. हेमाद्री दृढप्रहाराबद्दल लिहितो की, ‘द्वारकेचा राजा सुबाहू याला चार पुत्र होते आणि त्याने आपल्या राज्याचे चार भाग करून त्यांना वाटून दिले. त्यात दृढप्रहाराला दक्षिणेचे राज्य मिळाले.’ या दृढप्रहाराचा पुत्र सेऊणचंद्र याचे नाव येते. याबद्दल हेमाद्री राजप्रशस्ती ग्रंथातील २२ व्या श्लोकात म्हणतो की,
तत: स राजा निजराधानीमधिष्ठिता श्रीनगरंगगरय:।
लेभे सुतं सेऊणचंद्र नाम यत्संज्ञया सेऊनदेशमाहु:।।
श्रीनगर राजधानीतील सेऊणचंद्र राजाच्या नावावरून प्रदेशाला सेऊणदेश असे नाव पडल्याचे हेमाद्री सांगतो. सेऊणचंद्र प्रथम हा यादववंशातील महत्त्वाचा राजा दिसतो. यादवांचा इतिहास अनुभवायचा असेल तर अपरांत प्रकाशनच्या देवगिरीचे यादव हे ब्रह्मानंद देशपांडे यांचे पुस्तक नक्की वाचायला हवे. राष्ट्रकूट आणि गुर्जरप्रतिहार यांच्या कलहात त्याने राष्ट्रकूटांच्या बाजूने मोठा वाटा उचलला असावा याचे मुख्य कारण म्हणजे सेऊणचंद्राचे बलाढ्य सैन. सेऊणचंद्राकडे मोठे पायदळ असल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. त्यामुळेच दृढप्रहार हा यादववंशाचा संस्थापक मानला जात असला तरी सेऊणचंद्र हा वंशाला पुढे घेऊन जाणारा ठरला. मात्र तो वडील असलेल्या दृढप्रहारांना विसरलेला नाही. वसईच्या ताम्रपटात सेऊणचंद्र दृढप्रहाराच्या पराक्रमांचेही वर्णन करताना दिसतो. मात्र हा ताम्रपट नाशिककरांसाठी जवळचा ठरतो. कारण यात नाशिकच्या चार गावांचा उल्लेख आला आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटातील ती चार गावे नेमकी आहेत, कुठे आहेत याचा शोध पाऊलखुणांच्या माध्यमातून घेतला अन् चक्क एक हजार वर्षांची सफर अनुभवायला मिळाली.

वसई ताम्रपट सेऊणचंद्रने यादव राजघराण्याचा उपाध्याय सोमदेव आचार्यांचा शिष्य सर्वदेववाचार्य याला गुरूवार, श्रावण शुद्ध चतुर्दशी, सौम्य संवत्सर, शके ९९१, इ.स. १०६९ या तिथीस सिंही या १२ खेड्यांच्या छोट्या विभागातील चिंचुली हे खेडे दान दिले हे नमूद करण्याचा होता. हे दानपत्र नृपतीने चंद्रादित्यपूर या गावाहून दिलेले आहे. या ताम्रपटात सेऊणचंद्रांची वंशावळ दिलेली असून, त्याच्या पराक्रमाचा यात उल्लेख आहे. या दानपत्राचा लेखक प्रेकरय हा होता व सेकारेयनायक याने हे दानपत्र कोरले आहे. या ताम्रपटातील सेऊणपूर व सिंदीनेर म्हणजे सिन्नर, चंदादित्यपूर म्हणजे चांदोर म्हणजेच चांदवड, चिंचुली म्हणजे चिंचोली, वदगंभा म्हणजे वडगाव पिंगळा, महूय म्हणजे मोह व मोहदरी, सिंदी म्हणजे शिंदे गाव याचा उल्लेख आलेला आहे. या चारही गावांचा संबंध वृक्षांशी आहे. चिंचोली चिंचाची झाडे, मोह मोहाची झाडे, वडगाव वडाची झाडे, शिंदे सिंदीची झाडे या गावांमध्ये अधिक असल्याने गावांना तशी नावे पडली असावीत. ही गावे चांगल्या उत्पन्नाची गावे असतील म्हणूनच दान दिली असावीत हे स्पष्टच आहे. यामुळे नाशिक व सिन्नर तालुक्यातील या चार गावांना एक हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचेही पुढे येते.
शिंदे गावातील प्राचीन तलाव
नाशिकहून सिन्नरकडे जाताना दारणा ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या हाताला शिंदे (ता. नाशिक) हे गाव लागते. गावात शिरताच हनुमान मंदिर आहे. मंदिराचा गाभारा उतरविण्यात आला असून, त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. मंदिराच्या सभामंडपात ठाण मांडून बसलेले ज्येष्ठ मंडळी गावाबाबत भरभरून सांगू लागतात. ‘पूर्वी गावात सिंदीची झाडे खूप असतील म्हणून अथवा शिंदे नावाचा कोणीतरी गावात होऊन गेला असेल म्हणून गावाला शिंदे नाव पडले असावे.’ असे पांडूरंग सांगळे सांगतात. शिंदे गावात मारूती, महादेव, रेणुका देवी, खंडोबा, कान्होबा अशी अनेक मंदिरे आहेत. पेशवाईत गावात देशपांडेंचे अनेक वाडे होते; मात्र आता ते नाहीत. पूर्वी खंडोबाच्या यात्रेत बोहाडेही व्हायचे मात्र आता ते बंद होऊन पन्नास वर्ष झाली आहेत. गावात ७०-८० वर्षांपूर्वी मंदिरांची माहिती घेण्यासाठी इंग्रज आल्याची तोंडातोंडी आलेली आठवण ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावाच्या परिसरात अनेक समाधीही होत्या. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात त्या नामशेष झाल्या आहेत. मात्र शिंदे गाव चळवळींचे गाव म्हणूनही परिचित आहे. गावातून गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढा व इगतपुरीच्या भात लढ्यासह अनेक लढ्यांमध्ये मंडळींनी नाव कमावले आहे. यात रामचंद्रनाना भांगरे, पांडूरंग सांगळे, सहादू जाधव धोंडेराम जाधव, विठ्ठूबा जाधव व लक्ष्मण जाधव यांचे नाव आवर्जून घेतले जाते, असे निवृत्ती जाधव व दामू सगर सांगतात. आता गावात काहीच नाही, असे सांगताना ‘हा… एक लय भारी गोष्ट हाय.. दगडाचा हौद… नक्की पहा’ असेही पांडूरंग सांगळे सांगतात. दगडाचा हौद म्हणजे इंग्रजांनी पाण्याची व्यवस्थेसाठी केला असावा, असे सहज मनात आले.
शिंदे गाव नाशिक-पुणे महामार्गामुळे विभागले आहे. रस्ता ओलांडून शिंदे गावातील ज्युनिअर कॉलेजच्या रस्त्याने सरळ हौद पाहण्यासाठी निघायचे. पुढे एक मैदान अन् नदीपात्राच्या कडेला नव्याने बांधलेले रेणुका माता मंदिर व शनी मंदिर दिसते. मंदिराबाहेर एक पिंड व त्यासमोर नंदी उघड्यावर ठेवलेले आहे. हौदाकडे कसं जायचं असं विचारल्यावर एकजण म्हणाला, ‘गाडी तेथेच लावा अन् तेथून दोन किलोमीटरवर एका लहानश्या टेकडीवर जावा. तेथेच हौद हाय’ चिखलाने भरलेला कच्चा रस्ता तुडवीत दूरवर जावूनही रस्ता संपेना..! गुडघ्यापर्यंत आलेला चिखल अन् हिरव्यागार रस्त्यावरची एकांतातील भयानता अंगावर शहारा आणत होती. अखेर समोर एक टेकाड दिसले. मनात हायसं वाटलं असलं तरी परतीचा प्रवास असाच असणार आहे हा विचार मनात आल्यावर पुन्हा एकदा अंगावर काटा आला. दुमजली उंचीची टेकडी चढून गेल्यावर समोर दोन-तीन एकरातील दगडाच्या बांधणीतील बंदिस्त केलेला हौद.. हौद कसला प्राचीन तलाव पाहिल्यावर कसलचं भान उरत नाही. तलावाच्या दोन बाजूच्या भिंती कोसळू लागल्या आहेत. हा तलाव नक्कीच यादवकालीन असणार यात शंका नव्हती. नंतरच्या काळात इंग्रजांनी वरच्या थरातील भिंत बांधल्याचेही स्पष्ट दिसत होते. आजूबाजूचे शेतकरी शेतीसाठी येथून पाणीही वापरतात.
पूर्वी या प्राचीन तलावाभवती गाव असावं. या तलावाला एका जुन्या नोंदीनुसार चिंचोली तलाव म्हटले गेले आहे. मात्र ग्रामपंचायत हद्दीनुसार हा तलाव आता शिंदे गावच्या हद्दीत आहे. तलावातून गावात पाणी वितरणाची व्यवस्था असल्याचेही तलावाच्या एका कोपऱ्यात पहायला मिळते. या प्राचीन तलावाची रचना यादवकाळीन कुंडासारखी असून, मध्यभागी गाळ साचला आहे. पुरातत्त्व व पाटबंधारे विभागाने हा तलाव संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. वेगळं काहीतरी हाती लागल्याच्या आनंदात येताना चिखलातून झालेली फरपट जाताना किंचितही जाणवली नाही. तलावाचे चित्र डोळ्यापुढून जात नव्हते तोच वडगाव पिंगळा गावात केव्हा आलो हे लक्षातही आलं नाही. वडगाव पिंगळा हे गाव म्हणजे ताम्रपटातील वदगंभा म्हणजे वडगाव पिंगळा. वडगावला पिंगळा हे उपनाव शिवकाळात लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे खानदेशातील मोहिमांदरम्यान वडगावात गढी बांधून राहिले म्हणून वडगावला पिंगळ्यांचे वडगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. वडगाव पिंगळ्यातही यादवकालीन मंदिर होते. याचे अवशेष आजही हनुमान मंदिराभवती पहायला मिळतात. तेथून ताम्रपटातील महूय म्हणजे मोह व मोहदरी या गावात पोहचलो. दारणेच्या कुशीत विसावलेले मोह गाव दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हनुमान मंदिर एखाद्या वाड्यासारखे आहे. मंदिरामागे भिसेंचा चाळीसारखा वाडा आहे. मात्र आता तेथे कोणी राहत नाही. गावातातील एका टेकडीवर खंडेरायाचे दगडी बांधणीचे लहानसे मंदिर आहे. तसेच कानिफनाथांचे मंदिरही गावात आहेत. गावात पूर्वी खूप मोहाची झाडे असल्याने गावाला मोह असे नाव पडल्याचे अरूण जाधव सांगतात.
चिंचोलीतील प्राचीन मंदिर
वसईच्या ताम्रपटात उल्लेखलेले चौथे गाव म्हणजे मोह गावाच्या समोरील चिंचुली म्हणजे चिंचोली हे गाव. मोह गावातून नाशिक-सिन्नर महामार्गावर यायचे महामार्ग ओलांडून समोरच्या रस्त्याने चिंचोली गावाकडे निघायचे. गावात चिंचाची झाडे पूर्वी खूप होती म्हणून चिंचोली नाव पडले असेल, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात प्रवेश केल्यावर आपण चिंचोलीच्या शाळेच्या पटांगणात पोहचतो. पटांगणात एका चौथाऱ्यावर काही दगडांना शेंदूर लावलेला व त्यावर व्यायामाचे दोन मुदगल ठेवल्याचे दिसते. ग्रामस्थ त्याला वेताळबाबा म्हणतात. गावातील हनुमान मंदिर व इतर लहान लहान मंदिरांची भटकंती झाली. पण चिंचोलीचे वेगळेपण काय की ज्याचा यादवांशी संबंध येतो. याचे उत्तर उलगडत नसतानाच धनाजी सानप हे वयोवृद्ध चिंचोलीकर खांद्यांवर हात ठेऊन म्हणतात,‘तुला जे हवयं ते आहे माझ्याकडे चल माझ्यासोबत.’ त्यांचे हे शब्द मला कधी यादवकाळात घेऊन गेले हे समजलेही नाही. प्रवास चिंचोलीतील सर्वात मोठ्या वडाच्या झाडाच्या दिशेने निघाला. रस्त्यात उजव्या हाताला दोन उभ्या शिळांवर कोरलेले दोन नाग दर्शन देतात. डाव्या हाताला असलेल्या वडाखाली मोठेबाबा विसावलेले आहेत.
वडाच्या झाडानंतर डाव्याहाताला जाणारा रस्त्याने चार किलोमीटर कच्चा रस्ता (दुचाकी जावू शकते) आहे. या रस्त्याने थेट डोंगर भेटेपर्यंत चालत रहायचं. एका भेंडीच्या झाडाच्या मिठीत एक कातळ दडलेला दिसायला लागतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. काळाने केलेले आघात सोसत हे भूमीज शैलीतील मंदिर फक्त गाभारा रूपाने उभं आहे. त्याचा देह आजूबाजूला विखुरलेला दिसतो. गाभाऱ्यात पिंड आणि नंदी आहेत. आजूबाजूला नक्षीकाम असलेले स्तंभ अन् अवशेष मनाला पीळ देतात. पण कौतुक कराव वाटतं ते त्या भेंडीच्या झाडाचं ज्यानं हजार वर्षांचा हा गाभारा अजूनही जपला आहे. ‘हे मंदिर पुन्हा आहे तसं उभं करता येईल का?’ हा प्रश्न समोर येतो तो शेजारच्या शेतातील बांधावर काम करणाऱ्या दिलीप सानप यांच्याकडून. ‘खूप जुनं मंदिर आहे हो.. याला जपता येईल का?’ ही त्यांची साद मनाला अस्वस्थ करते. कारण नाशिक जिल्ह्यात अशी तीनशेहून अधिक मंदिरे आहेत की जी जपण्याची गरज आहे. यासाठी कोण पुढाकार घेणार या प्रतीक्षेत अजूनही ही मंदिरे तग धरून उभी आहेत. त्या भग्न मंदिराशी संवाद साधताना तो पुन्हा यादवांचा पराक्रम सांगू लागतो आपलं दु:ख बाजूला ठेऊन. त्याला मानात साठवत परतीच्या मार्ग केव्हा संपतो हेच लक्षात येत नाही. पण मनाला एक प्रश्न सतावत राहतो.. ताम्रपटातील या प्राचीन गावांतील तलाव अन् मंदिर जपण्यासाठी आपण काही करणार आहोत का?
खडकवीरांचं धारणगाव
अख्यायिकांनी आपल्या अनोख्या शैलीतून इतिहासातील अस्मिता पाऊलखुणांच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. एखाद्या गावातलं मंदिर फक्त त्या अख्यायिकांच्या बळावर आपला प्रवास करीत असल्याचं पहायला मिळतं. तो इतिहास किती अनोखा असेल याची फक्त कल्पनाच मन प्रफुल्लित करते. असाच अनुभव येवला तालुक्यातील धारणगाव खडक व धारणगाव वीर या गावांत येतो.
साधारणपणे महाराष्ट्रात आढळणारी मंदिरांची शैली म्हणजे भूमिज शैली होय. नाशिकमध्ये अशा शैलीतील दिसणाऱ्या मंदिरांना आपण सरसकट हेमाडपंती मंदिरे म्हणतो. मात्र याचा उल्लेख आवर्जून भूमिज मंदिरे असाच करायला हवा. महाराष्ट्रात अगदी चौथ्या-पाचव्या शतकातही मंदिरे असल्याचे पुरावे उत्खननातून मिळाले आहेत. मात्र राष्ट्रकुटानंतर दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात-अकराव्या शतकापासून मंदिर उभारणीला महाराष्ट्रात पुन्हा जोर धरल्याचे दिसते. मंदिराचा काळ ठरवण्यासाठी त्या मंदिराचे स्थापत्य, मूर्ती, नक्षीकाम, मंदिरावरील शिलालेख अंतर्गत व बाह्य रचना उपयोगी पडते. त्र्यंबकेश्वर, वणी, देवरगाव, धोडंबे, अंबेगण, अंजनेरी, सांगवी, पेठ, दारणासांगवी, सिन्नर आदी मंदिरे पाहिली की शैली अन् रचनेतील फरक लक्षात येतो. त्याशिवाय गोदाघाटावरील मंदिरे अन् साधारण हजार वर्षांपूर्वीची मंदिरं पाहिले की त्यांच्या शैलीत पडत गेलेला फरक लक्षात येतो. हा फरक फक्त रचनेत दिसत नाही. तर गाभारा, जोत, मुखमंडप, द्वार ललाटबिंब व त्यावरील उत्तररांग, सभापद्म म्हणजे फुलाच्या आकाराचे छत, गूढमंडप, अंतराळ, सभामंडप व गाभाऱ्यातील देवळी, उंबरठ्याच्या मंडारक व त्यावरील र्कीतीमुख, ते अर्धचंद्रासारखे असल्याने त्याला अर्धचंद्रशिला आपल्याला भूमिज शैलीचे दर्शन द्यायला लागते. सभामंडपाच्या देवळीत अथवा देवळीच्या बाजूला डोक्याखाली एक हात धरून आडव्या स्थितीतील विष्णू मन आकर्षित करतो. सभामंडपातील खांबांवरील उलटा नाग व त्यावरील चौकटीत देवी मूर्तीच्या अनेक प्रतिमा भूमिज शैलीत डोकवायला लावतात. शिखराच्या आधी पर्णवेल व यक्षवेलही मोहक वाटावी, मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सूरसुंदऱ्या व मैथून शिल्प अनेक प्रश्न मनात निर्माण करतात. नंतरच्या काळात शिलाहार, कल्याणीचे चालुक्य आणि यादवांचा प्रभाव असलेली अनेक मंदिरे नाशिक परिरात आहेत. यातील अजूनही अनेक मंदिरे अज्ञातवासात गूढ इतिहास घेऊन दडलेली आहेत. ही मंदिरे शोधणे अन् त्यांना उलगडणे
यापुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे. असे अनेक आयाम असलेले सूरसुंदरी व मैथून शिल्प असलेले एक मंदिर नाशिकपासून अवघ्या साठ किलोमीटरवर असलेल्या धारणगाव खडक येथे पहुडलेले पहायला मिळते. विशेष म्हणजे या मंदिराची दखल आजवर कोणी घेतलेली नाही. हे मंदिर आपल्याला मंदिर शैलीच्या विश्वात रमायला लावते. तर येथील ऐतिहासिक बारव पेशवाईतील इतिहास उलगडते.
नाशिक-येवला रस्त्यावर विंचूरच्या अलीकडे उजव्या हाताला नैताळे हे गाव लागते. नैताळेतून धारणगाव खडककडे रस्ता जातो. शाळेपासून गावात शिरताना डाव्या हाताला छोट्या मातीच्या ढिगाऱ्यावर एक समाधी दिसते. तेथून उजव्या हाताला गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी ‘सीताराम आला रे सीताराम आला’ हे शब्द कानावर न पडले तर नवलचं. हा सूर ऐकायला आला म्हणजे आपण ग्रामसंस्कृतीच्या वैभवशाली जगात आल्याची खात्री होते. सीताराम बैरागी हे गावात जोगवा मागण्याची परंपरा आजही पुढे नेताना दिसतात. या परंपरेचे पुढे काय होणार ही खंत त्यांना अस्वस्थ करते. आपल्याला जमतंय तोपर्यंत करायचं असेही ते सांगतात. जोगव्याने आजही गावातील प्रत्येक घराला दारावर आलेल्याला आदराने कोणतीही काचकूच न करता पीठ वाढण्याचा संस्कार आजही टिकून असल्याचे दिसतो. धारणगाव हे नुसते धारणगाव नाही तर ते खडक आणि वीर या दोन गावांमध्ये विभागले गेले आहे. बोकडदरी गावातून पुढे धारणगावात येणारी बोकडदरी नदीने एका तिरावर धारणगाव खडक वसविले आहे, तर दुसऱ्या तिरावर धारणगाव वीर. धारणगावला खडक जोडले गेले ते बोकडदरीचा तो किनारा खडकाळ आहे म्हणून. पण यामागे एका राजांची अनोखी गोष्ट दडली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून जाणून घेताना ते आपल्याला अनेक पिढ्यांपासून ऐकत आलेल्या अख्यायिकांतून ‘एक होता राजा’ या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात. अशा अख्यायिका इतिहासाचे कण पुढे घेऊन जाणारे असतात. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालत नाहीत. तसचं धारणगाव वीर या गावाचही आहे. पण गावाचे नाव धारणगाव का आहे. अशी कोणती गोष्ट येथे कोणी धारण केली होती का? इथल्या मातीला काही माहात्म्य आहे का? की गोदावरी काठावरील नांदूरमध्यमेश्वर येथे मारीच राक्षसाच्या वध करून पंचवटीकडे परतणाऱ्या श्रीरामाने काही धारण केले होते. मात्र, हा कल्पनाविलास असला तरी ‘धारण’ नावाचे कोडे काही उलगडत नाही. मात्र धारणगावाने अनेक तपस्वींना ज्ञानधारण करण्यास बळ दिलं आहे. तर धारणगावच्या उपनामांमागील अख्यायिका ही खडकसिंग व वीरसिंग यांच्या नावावरून पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजस्थानातील खडकसिंग आणि वीरसिंग हे दोघे भाऊ कुंभमेळ्यासाठी नाशिकला आपल्या कुटुंब व सैनिकांच्या लव्याजम्यासह आले होते. परतीच्या मार्गावर असताना खडकसिंगांच्या गर्भार पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्या. बाळंत होण्यासाठी ते धारणगावात थांबले; मात्र राणीसाठी शयनगृह नव्हते. ते एका दिवसात बांधले गेले तर राणीने येथे थांबावे, असे राजाच्या एक विद्वानाने सांगितले. मात्र एका रात्रीत शयनगृह बांधले गेले नाही अन् ते अर्धवट राहिले. (पांडवांनी रात्रीत मंदिरे व लेणी बांधल्याच्या कथेसारखे) ते अर्धवट बांधकाम म्हणजे दगडी बांधणीतील कृष्णनाथ मंदिर होय, असे मधुकर जाधव व श्रावण डोमसे व इतर ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर बोकडदरी नदीच्या काठावरच आहे. मात्र हे मंदिर कृष्णनाथाचे मंदिर नसून, भूमिज शैलीतील शिवमंदिर आहे. याच्या खाणाखुणा मंदिरभर पसरलेल्या आहेत. बाराव्या शतकातील हे मंदिर बरेचसे ढासळले आहे. तर मंदिराखाली बारा कढई भरून सोने असल्याच्या गैरसमजातून हे मंदिर अनेकदा खोदले गेले आहे. मंदिराचा समोरचा भाग, अंतराळ व गर्भगृह पूर्णपणे कोसळले आहे. शिल्लक आहे तो फक्त देह. सभामंडप, आतील देवळ्या, स्तभांवरील नक्षी व बाहेरील बाजूला असलेल्या सूरसुंदरी व मैथून शिल्पाची मोजक्या अन् पूर्णपणे झिजलेल्या मूर्ती हे शिवमंदिर असल्याची जाणीव करून देतात. मंदिराच्या अवतीभवती मंदिराचे अवशेष पडल्याचे दिसतात. हे सर्व अवशेष संकलित करून ठेवण्याची गरज आहे. मंदिराशेजारी एक बारव तसेच वीरगळी व आजूबाजूला गोसावी समाजाच्या समाधी पहायला मिळतात. हे भूमिज शैलीतील महादेव मंदिर जपण्यासाठी लासलगावच्या राजा शिवछत्रपती ग्रुपच्या तरुणांनी गेली वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. हे मंदिर संरक्षित झाले तरच तेथील वैशिष्ट्य अन् इतिहास जपला जाईल. यासाठी मंदिराला पक्के कंपाऊड तसेच मंदिराची पुरातत्त्व विभागाकडून दुरूस्ती व्हावी, अशी मागणी हसमुखभाई पटेल, संजय बिरार, सुदर्शन हिरे, गौरव भोईटे, मयुर राऊत, अनिरूद्ध बोराडे, ऋषीकेश जोशी, इंद्रनिल खंडारे व्यक्त करतात. या तरुणांकडून मंदिर परिसरातील स्वच्छता व साफसफाईही वेळोवेळी केली जाते. या तरुणांना ग्रामस्थांचा पाठिंबा व प्रशासकीय बळ मिळाले तर एक मोठा इतिहास जपला जाईल. भग्नतेकडे निघालेल्या या भूमिज मंदिराला वाचविण्यासाठी धारणगावकरांनी तळमळीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
भगरीबाबा हे एक अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व गावाला लाभले आहे. भगरीबाबा मूळचे राजस्थानातून आले होते. त्यावेळी तेही याच भूमिज मंदिरालगतच्या बारवेपाशी तपश्चर्येला थांबले. त्यांना येथेच दृष्टांत झाला. त्यांच्या हातून ग्रामसेवा घडली अन् त्यांनी लासलगावात देह ठेवला. लासलगाव रस्त्याला त्यांची समाधी आहे. तर धारणगाव खडकमध्ये त्यांचे मंदिर आहे. गावात नव्याने बांधलेले विठ्ठल मंदिर, कृष्णमंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर आहेत. गावातील कीर्तनकार बाजीरावनाना जाधव यांच्या कीर्तनातूनही खडकसिंगांचा उल्लेख यायचा. त्यामुळे शेकडो वर्षानंतरही ही कथा जीवंत राहिली आहे. मात्र जाधवांचे निधन झाल्याने ते कीर्तन उपलब्ध नाही. हे कीर्तन नेमके काय होते याचा काही संदर्भ हाती लागत नाही. गावातील दादाराम डोह स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रजांविरूद्ध मोठा लढा दिला होता. गावातील जाधव कुटुंबीय मूळचे राजस्थानचे. राजस्थानातून सासवड असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्यातील एक सरदारांना येवल्यातील १८ गावांची जहागिरी मिळाली. तेव्हापासून जाधव कुटूंब या गावांमध्ये स्थिरावले. विशेष म्हणजे जाधवांचे संबंध या अठरा गावांशिवाय इतरत्र केले जात नाहीत. ही प्रथा आजही पाळली जाते. खडकमध्ये जाधवांचे अनेक वाडे होते. ते आता कोसळले आहेत. वाड्यावरील कोरीव दगडी व लाकडी कलाकुसर आजही अनुभवता येते. गावातील उत्सवात दरवर्षी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. याचेही मानपान ठरलेले आहेत. धरणगाव खडक अनुभवून बोकडदरी नदी ओलांडली की लागते धारणगाव वीर हे गाव. बोकडदरी हा एक नाल्यासारखा ओहळ आहे. या गावाचे नाव वीरसिंगांच्या नावावरून पडल्याचे ग्रामस्थ सांगात. गावातील छोट्याशा महादेव मंदिर व मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील शिल्प पाहण्यासारखी आहेत. मंदिरामागे अनेक वीरांच्या वीरगळी आहेत. तर समोर दगडी बांधणीची बारव आहे. तसेच गावात दगडी बांधणीच्या हिंदू व मुस्लिम समाधी आहेत. या समाधी नेमक्या कोणाच्या आहेत हे मात्र उलगडत नाहीत. धरणगाव वीरमध्ये आवर्जून नारा व कृष्णा नावाच्या दरोडेखोरांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. या दोघांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता, असेही वयोवृद्ध एकनाथ सानप सांगतात. गावात खंडेराव, महादेव, मारूती, विठ्ठल आदी मंदिरे आहेत. खंडोबा यात्रेत बोहाडे सोंग नाचविण्याची परंपर २५ वर्षांपासून बंद झाली आहे. गावात फेरफटका मारताना जुन्या पद्धतीची घरे अन् गल्ल्या पाहून पुन्हा धारणगाव खडककडे वळायचं अन् परतीच्या प्रवासासाठी नैताळेकडे निघायचं. मात्र इतिहासाच्या शोधाचा प्रवास कधी संपत नसतो.
धारणगाव खडकमध्ये अजून एक अनोखी वास्तू असल्याचे कळालं अन् मोर्चा त्या वास्तूकडे वळाला. ती वास्तू म्हणजे एक अनोखी बारव आहे. या बारवेला अनोखे म्हणण्यामागे एक विशेष कारण म्हणजे बारवेवरील शिलालेख अन् बारवेत प्रवेश करताना उजव्या हाताला एक देवळीसारख्या मार्गाने बारवेच्या मधल्या भागात जाणारा रस्ता बारव शैलीचे आणखी एक कवाडे उघडताना दिसतो. आत गेल्यावर सातीआसरा सारखे दगड मांडून ठेवण्यात आले आहेत. बारवेला पाणी असून ती वापरात आहे. मात्र स्वच्छता अन् काळजी या अर्थाने दुर्लक्षित आहे. या शिलालेखावर धारणगावचा उल्लेख धारणग्राम खडक असा आला असून, देशमुखीपणाच्या वतनासाठी ही विहिर दिलेली असून, आसपासच्या ३०-३५ गावांना पाण्याची सोय व्हावी हा बारव उभारण्यामागील उद्देश आहे. ही बारव प्रतापी गंगाधर यांनी बांधली आहे. लेखात प्रभव संवत्सर उल्लेख आला आहे. मात्र आकडे नष्ट झाल्याने नेमके वय काढणे अवघड आहे. प्रभव संवत्सर दर साठ वर्षांनी येत असल्याने १८०७-८ अथवा १७५७ दरम्यानची ही वास्तू असावी. लेखाची भाषा मराठी व लिपी देवनागरी आहे. बांधकामातील धाटणी पेशवेकालीन असल्याने लेखाचा काळ हा पेशवाईतील असावा, असे मोडीतज्ज्ञ व इतिहास अभ्यास प्रा. रामनाथ रावळ सांगतात. खडकसिंग आणि वीरसिंगाचे पुढे काय झाले याचे उत्खनन पुढे होईलच पण त्यांच्या आठवणी या गावाच्या रूपाने आपल्यासमोर आहेत. सुख, समाधान धारण केलेल्या या गावातील प्राचीन मंदिर अन् बारवेच्या रूपाने शिल्लक असलेला वारसा जपण्याची गरज आहे.
श्रीरामाने स्थापित केलेला नांदगावचा मोठा महादेव
नांदगाव तालुक्यातील जातेगांवच्या डोंगरावरील पिनाकेश्वर हे देवस्थान मोठा महादेव नावानेही ओळखले जाते. नाशिकसह खान्देश, मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान पिनाकेश्वर महादेव आहे. प्रभू रामचंद्र स्थापित व सदगुरु जनार्दन स्वामी जिर्णोद्धारीत हे देवस्थान आहे. या ऐतिहासिक पिनाकेश्वर महादेवाचा उल्लेख शिवपुराण व काशीखंड या ग्रंथात आढळतो. पुराणानूसार शिवाचे पिनाक व विष्णूचे सारंग हे महाविनाशक दिव्यधनुष्य समजले जातात. पिनाक हे शिवाने धारण केलेले धनुष्य असून शिवाचे पिनाक, पिनाकिन, पिनाकेय, पिनाकहस्ताय अशा विविध स्वरूपाची नावे प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात शिवलिंग स्थापना करुन शिवआराधना केली. भगवान शिवाने प्रभू रामचंद्रांना पिनाक धनुष्य प्रदान केले. त्यामुळेच या तीर्थक्षेत्रास पिनाकेश्वर हे नाव प्राप्त झाले. शिवपार्वती सारीपाट खेळत असताना पार्वतीमातेने डाव जिंकला म्हणून महादेव रागावले आणि याच डोंगरावर येऊन ध्यानस्थ झाले. शिवविरहात दुःखी झालेल्या पार्वतीमातेने त्यांचा शोध घेण्यासाठी भिल्लीनीचा वेश धारण करून महादेवास वश केले.याच पवित्र स्थानी शिवशक्तीचे मिलन झाले तसेच शिवशक्तीचा पुनर्विवाह झाला.
श्रीराम संस्थानातील चांदोरीचे शिवलिंग
चांदोरीमध्ये राम मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिवमंदिर आहे. इंद्र देवाने अहिल्येची छेडखानी केली असता त्यास गौतम ऋषींनी शाप दिला होता की तुला १००० भगे(भोके)पडतील. परंतु, इंद्र देवाने गौतम ॠषींकडे उपःशाप मागितला असता इंद्र देवास सोमेश्वराची प्रार्थना कर, असे सांगितले. इंद्र देवाने ज्या ठिकाणी सोमेश्वराची प्रार्थना केली ते हेच शिवमंदिर. पुढे रावणाचा मामा मारीच सुवर्णमृगाचे रुप घेवुन पंचवटीतून रामाला चांदोरीपर्यंत घेवुन आला. परंतु, रामाला जेव्हा हा मायावी राक्षस आहे हे कळले तेव्हा त्यास शिवमंदिरपासून हरणावर बाण मारला. तो बाण चाटोरी या गावा जवळ चाटून गेला म्हणून या गावास चाटोरी हे नाव पडले. तो राक्षस नांदुर मध्यमेश्वरजवळ मरण पावला. हे मंदिर काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले. राम मंदिर बांधल्यावर पुजार्यांना स्वप्न पडले. रामाच्या पाठीमागे आहे, तरी मला वरती काढावे. त्यावेळेस शिवलिंग मिळाले. श्रावणातील तिसर्या सोमवारी येथे सोमेश्वराचा मुखवटा ठेवला जातो.
इतिहास फुलविणारे अनकाई
एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की, आपणही त्या गावचेचं होऊन जावं असं वाटायला लागतं. यादवांच्या काळात बांधला गेलेला अनकाई-टनकाई किल्ला व जैन लेणींच्या पायथ्याचे अनकाई गाव हे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.
नाशिक जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यांना गडकिल्ल्यांचे कोंदण लाभलेले आहे. सेलबारी, डोलबारी, दुधेश्वर उपरांग, त्र्यंबकरांग, पेठ उपरांग, सातमाळ रांग, नाशिकची नैर्ऋत्य व वायव्य उपरांग, चणकापूर डोंगररांग, गाळणा टेकड्या गडकिल्ल्यांनी गजबजलेल्या आहेत. नुसत्याच गजबजलेल्याही नाहीत तर या प्रत्येक गडकोटांचे वेगळेपण त्यांच्या ठायी दडलेलं आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहे. तो किल्ला कोणी, कधी बांधला अन् कशासाठी बांधला. त्याभोवतीच्या ऐतिहासिक घडामोडी अन् शौर्य नोंदविण्याची गरज आहे. गाळणा रांगेतील येवल्याजवळील अनकाई-टनकाई किल्ल्याचीही ती अवस्था पहायला मिळते. अनकाई डोंगरावरील किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. हा किल्ला यादवकालीन असून, देवगिरीचे यादव सम्राट सिंघणाच्या (इ.स.१२००-१२४७) कारर्कीदीत तो परमारांच्या ताब्यात होता. यादवांनी परमारांचा किल्लेदार श्रीधर याला फितूर करून हा किल्ला जिंकला, असे पुरातत्त्वज्ञ डॉ. ओ. पी. वर्मा यांनी नोंदविले आहे. अनकाईचे लिखित पुरावे फारसे मिळत नाहीत. मात्र मुघल बादशहा शहाजहान याचा सुभेदार खानखनान याने अलका-पलका किल्ला जिंकून घेतला यावेळी अनकाई-टनकाई हा किल्लाही इ. स. १६३५ मध्ये जिंकल्याचा उल्लेख मिळतो. १६९३ मध्ये सुलेमानबेग हा अनकाई-टनकाईचा किल्लेदार असल्याचा उल्लेख मिळतो. पेशव्यांनीही अनकाई-टनकाई आपल्या ताब्यात असावा यासाठी धडपड केलेली दिसते. १७३४ च्या शेवगावच्या तहानुसार किल्ला मराठ्यांना देण्याचे निजामाने कबुल केले; मात्र निजामाचा अधिकारी व किल्लेदार अब्दुल अझिजखान याने हा किल्ला मराठ्यांना देण्यास नकार दिला. यामुळे पेशवा-निजामात संघर्ष वाढला. अखेर १७५२ च्या मराठे-निजाम यांच्यात भालकीचा तह झाला. या तहानुसार अनकाई मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर अनकाई १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. पेशवाईचा अस्त झाल्याने ४ एप्रिल १८१८ रोजी कॅ. मॅकडॉवेल यांनी अनकाईच्या किल्लेदाराशी वाटाघाटी सुरू केल्या; त्यात यश येत नसल्याचे पाहून मॅकडॉवेलने ५ एप्रिलला सहा पौंडी तोफांचा मारा किल्ल्यावर सुरू केला. या हल्ल्याने किल्लेदार शरण आल्याने अनकाई इंग्रजांच्या हाती आला. यावेळी मराठ्यांचे ३०० सैनिक व ४० तोफा किल्ल्यात होत्या. अनकाई-टनकाईची भक्कम तटबंदी हार खाण्यासाठी नव्हतीच हे आजही ती दाखविते. अनकाईचा इतिहास सतराव्या-अठराव्या शतकापुरताच मर्यादित नाही. तर अनकाई-टनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जैन लेणीच्या कुशीत स्थिरावलेले अनकाई गाव व लेणी आपल्याला अगदी दहाव्या शतकाची सफर घडवून आणतात. गावातील अनेक वास्तू अनकाईवर पुरातत्त्वीय अन् इतिहासाच्या अंगाने खूप काम करण्याची गरज असल्याचे व्यक्त करतात.
नाशिकहून येवल्यात आलात की मनमाड मार्गावर दहा-बारा किलोमीटरवर अनकाई हे गाव आहे. अनकाई फाट्यावरून उजव्या हाताने वळालात की समोर अनकाई-टनकाई जोडगोळी डोंगर खांद्यावर किल्ला घेऊन मिरविताना दिसतो. जसजसे आपण जवळ जाल तसे हे दोघे हातीची कडी करून फुगडी खेळता-खेळता आपल्याला पाहून स्तब्ध झाल्यासारखे उभे असल्याचा भास होतो. दोघांचे हात किल्ल्यांचे बुरूज व तटबंदीने गुंफल्यासारखे वाटायला लागते. रेल्वेच्या पुलाखालून जाताना डोक्यावरून धावणारी रेल्वे मलाही किल्ला पहायचाय असं म्हणत पुढे धावत जाते, असे वाटते. अर्थात अनकाई-टनकाई पाहण्याची भुरळ फक्त आपल्यालाच पडली असे नाही तर परदेशी प्रवाशांनाही पडल्याचे दिसते. भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या डच, पोर्तुगीज, ब्रिटिशांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली. यात फ्रान्स शेवटचा (कालखंड इ.स. १६६४ ते १९५४) होता. याच दरम्यान, झां बातीस्त ताव्हेर्न्ये, फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताबद्दल बरीच उत्सुकता निर्माण केली होती. १६६५ मध्ये थेवेनॉट याने सुरत-औरंगाबाद मार्गावरील अनकाई हे एक मुख्य ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे. थेवेनॉटच्या आठवणींसह आपण अनकाई गावात दाखल होतो. आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरे व उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती पहायला मिळतात. पर्यटकांसाठी राहण्याची सोय म्हणून येथे गावाने मोफत गेस्ट हाऊसची व्यवस्थाही केली आहे. खरं तर येथे उघड्यावर पडलेल्या भग्नमूर्ती, शिल्पांचे सुंदर संग्रहालय गेस्ट हाऊसच्या आवारात होऊ शकते. या गेस्ट हाऊससमोरील उघड्यावर ठेवलेली गणेश मूर्ती व वीरगळ पाहून मागील बाजूच्या अनकाईच्या भग्न वेशीकडे वळायचे. दगडी बांधणीची वेस दिसायला सुंदर आहे; मात्र तिचा वरचा भाग ढासळला आहे. वेशीच्या एका भिंतीला जैन तीर्थंकारांची मूर्ती व त्या मूर्तीच्या माथ्यावर गजलक्ष्मी शिल्प कोरलेले दिसते. वेशीतून गावात गेल्यावर समोर दगडी मठ पहायला मिळतो. अशीच एक वास्तू अनकाई-टनकाई किल्ल्याकडे जाताना लेणींच्या आधी डाव्या हाताला लागते.
अनकाई डोंगराच्या पायथ्यापासून शंभर एक पायऱ्या चढल्यावर जैन लेणी लागते. गावातून लेणीपर्यंत व तेथून किल्ल्यापर्यंत पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे फार दमछाक होत नाही. भौगोलिक दृष्ट्या ही लेणी टनकाईच्या पोटात आहे. बर्जेसने पश्चिम भारतातील लेण्यांवर केलेल्या लिखाणात फक्त सात लेण्यांचा समूह असल्याचा उल्लेख आहे. मात्र त्याठिकाणी वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या आढळतात. लेणी परिसरात पाण्याचे चार टाके आहेत. या लेणी दहाव्या अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. येथे लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. मात्र तो पुसट झाल्याने त्याचे वाचन करता येत नाही. लेणी क्रमांक दोन मध्ये अनकाई देवी आहे. इतर लेण्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती, द्वारशिल्पे अन् गूढ वाढविणाऱ्या मूर्ती पहायला मिळतात. तर काही मूर्तींच्या पायथ्याला शिलालेख कोरले आहेत. जैन लेणी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे सुरक्षित वास्तू घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे लेणीची व्यवस्था चांगली ठेवल्याचे दिसते. मात्र लेणी पाहताना वटवाघळांचा त्रास पर्यटकांना व लेणीलाही होत असल्याचे तेथील अवस्थेवरून लक्षात येते. लेणीचा सोहळा अनुभवून तसेच पायऱ्यांनी पुढे निघाल्यास अनकाई-टनकाई ज्या खिंडीत हातातहात घेऊन पहूडली आहे तेथील बुरूज अन् तटबंदी आपल्याला आकर्षित करते.
यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) अनकाई किल्ल्याचा उल्लेख ‘एनकाई दुर्ग’ असा केलेला आहे. किल्ला अनकाई-टनकाई असे म्हटले जात असले तरी गावाचे नाव फक्त अनकाई आहे. लेणीतील अनकाई देवीमुळे गावाला हे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर टनकाई हा अनकाईचाच एक भाग असलेला किल्ला आहे. मात्र टनकाई हे नावही टाकाई-टुकाई देवी मंदिरामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे मंदिर मनमाड मार्गावर किल्ल्यापासून जवळच आहे. रामायणकाळात अनकाई-टनकाईवर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते. सीतेचे हरण झाल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी निघालेल्या रामाची व अगस्तींची येथेच भेट झाली होती. यावेळी अगस्तींनी श्रीरामाला नांदगावच्या नस्तनपूर येथे जाऊन शनीदेवाची आराधना करण्यास सांगितले होते, अशी अख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात. किल्ल्यावर अगस्तींची गुफाही आहे. तेथे अगस्ती ऋषींची मूर्ती व पाण्याचे तळे आहे. या तळ्याला काशी तळे असेही म्हटले जाते. या तळ्याच्या मधोमध अगस्तींची समाधी असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. श्रावणात महिनाभर अगस्तींची यात्रा भरते. श्रावणातील दर सोमवारी मोठ्या संख्येने भाविक अनकाईला येतात. अनकाईवर मच्छिद्रनाथांची समाधी असल्याचेही ग्रामस्थ मानतात. त्यांना मोठा बाबा असेही म्हटले जाते. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हा अनकाई किल्ला व लेणीची मोडतोड केली होती. त्यानंतर अनकाई-टनकाई मोगलांच्या ताब्यात गेला. विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे थोरले पूत्र शिवाजीपंत बापू यांनी निजामाशी युद्ध करून अनकाई मिळविला. अनवती (अनकाई) गावाजवळ हैजरच्या तोफ खाण्यावर विठ्ठल शिवदेव यांनी हल्ला केला. तेव्हा मिळालेल्या तोफातून थोरल्या माधवराव पेशव्यांनी दोन तोफा विठ्ठल शिवदेव यांना १६७४ मध्ये बक्षीस दिल्या. त्या त्यांनी अनकाई किल्ल्यावर आणून ठेवल्या. अनकाई टनकाई पेशवाईत इंग्रजांच्या हाती पडला. किल्ला भग्नावस्थेत असून किल्ल्याची तटबंदी व सात मजबूत दरवाजे, किल्ल्यावरील मंदिरे, गुफा, माथ्याचा परिसर, पाण्याचे टाके, हिंदू लेणी तळे, वाडा व इमारतींचे अनेक अवशेष पाहिले की किल्ल्याचा वापर अन् त्याच्यावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची उकल होते. अनकाईच्या उत्तरेकडे बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ताही आहे. किल्ल्यावरही दोन तीन ब्राह्मण लेणी आहेत. यात काही देवतांच्या मूर्ती आहेत. अनकाई किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोषित केला आहे. टनकाईवर जाताना प्रवेशद्वार, वाड्याचे अवशेष, पाण्याचे तळे व दोन-तीन टाके, थोडीफार तटबंदी पहायला मिळते. टनकाईवर दगडीबांधणीचे शिवमंदिर आहे. किल्ल्यावरही अनेक ठिकाणी मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या पहायला मिळतात. ‘नाशिक जिल्ह्यात गाळणा किल्ला सोडला तर इतकी मजबूत तटबंदी अनकाई-टनकाईवरच आढळते,’ असा उल्लेख नाशिक गॅझेटियरमध्ये आला आहे. अगस्ती ऋषी, जैन तीर्थंकर व मच्छिंद्रनाथांचा सहवासामुळे अनकाई-टनकाई ऋषीमुनींचे आवडते ठिकाण असल्याचे कपिलगीतेवरून स्पष्ट होते. ‘कपिलगीता’ या धार्मिक ग्रंथावर १४६ वर्षांपूर्वी लिहिलेल्या टीकेच्या मूळ प्रती सोमठाणदेश येथील इतिहास अभ्यासक सुधाकर पगारे यांच्याकडे आहेत. शके १७९१ म्हणजे इ.स. १८६९ मध्ये दामोदर माधवराव यांनी ही टीका रचली. त्यांचे पूर्वज सदाशिव यांनी मूळच्या कपीलगीतेची रचना शके १७४१ म्हणजे इ. स.१८१९ मध्ये केल्याचा उल्लेख ‘येवला यथादर्शन’ या पुस्तकात आला आहे.
अनकाई-टनकाई किल्ला पाहून पुन्हा खिंडीत यायचे. पायऱ्यांनी खाली उतरताना जैन लेणी न्याहाळायची अन् पुन्हा वेशीपाशी हजर व्हायचे. गाव बदलत आहे त्याप्रमाणे गावची मोडकळीस आलेली वेसही दुरूस्त करण्याचा मानस ग्रामस्थ व्यक्त करतात. अनकाई माता मंदिराप्रमाणेच गावात खंडोबा, हनुमान, महादेव मंदिरे आहेत. गावात पूर्वी आखाडीचा कार्यक्रम आठ दिवस साजरा केला जाई व यात विविध सोंगे नाचविली जात, अशी माहिती, सुधीर जाधव, अशोक बोराडे व आनंद वैद्य यांनी दिली. अनकाई किल्ला व आसपासच्या परिसरात पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन झाल्यास मोठा इतिहास समोर येऊ शकतो, अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक नारायण क्षीरसागर व्यक्त करतात. अनकाईचा प्रवास येथेच संपला असे म्हणतानाच गावातील पूर्वेला सतीमंदिर व बारव आहे ती नक्की पहा, असे गावातील रविंद्र देवकर यांनी सांगितले अन् आमची पावलं झपाझपा तिकडं वळाली. सुरूवातीला लहानशी विहीर पहायला मिळाली. त्याला ग्रामस्थ सरोवर म्हणतात. त्याच्या आजूबाजूला मंदिराचे अनेक अवशेष विखुरलेले पहायला मिळाले. या परिसरात दगडी बांधणीची अनेक मंदिरे असणार यात शंका नाही. विहिरीजवळ जनावरांसाठी पाणी ठेवण्याचे मोठे दगडी पात्र पहायला मिळते. तेथून उत्तरकडे नजर टाकली की सहा-सात फूट उंच गवतामध्ये काळाशार कळस डोकावताना दिसला. एखाद्या मोठ्या मंदिराची लहानशी प्रतिकृती उभारल्यासारखा भास या वास्तूकडे पाहिल्यावर झाला. लहानसे प्रवेशद्वार, आतमध्ये मंदिराभवतीचा परिसर तोही लहान, मंदिराच्या बाहेरील सीमाभिंतीही लहान अन् मूळ मंदिरही लहानच प्रतिकृतीसारखे. ही वास्तू फासना शैलीची भासते. मंदिराचे शिखर अष्टकोनी असल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कळसावर कोरलेले चार मुख व त्याच्या दोन्ही बाजूला चार सिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही लहानच. समाधीसारखे भासणा-या वास्तूला अनकाईकर सतीमंदिर म्हणतात. गाभाऱ्यात विठ्ठल रूक्माईसारख्या दिसणाऱ्या भग्न मूर्ती आहेत. मात्र त्या नंतरच्या काळात बसविलेल्या असाव्यात. अनकाईवर येणाऱ्यांची पावले याकडे माहितीअभावी वळत नाहीत. ही वास्तू नेमकी काय असेल यावर संशोधनाला वाव आहे. मजबूत बांध्याचे जोडगोळी किल्ले, मठासारख्या दोन वास्तू, गावची वेस, विखुरलेल्या मूर्ती, लेणीचे कोंदण अन् अज्ञात वास्तूंचे वैभव यासह मनात अनेक प्रश्न, नव्याने काही तरी हाती लागल्याचं समाधान परतीचा प्रवास आनंदी करतो. चला, तर अनकाईची अनोखी रूपे अनुभवायला.
हिरेखानाचे सोनांबे
इतिहास नोंदविला गेला नाही अथवा त्याच्या नोंदी पुढे आल्या नाहीत तर काय होते. हे अनुभवायचे असेल तर नाशिकमधील अनेक गावे याची उत्तम उदाहरणं म्हणायला हवीत. पिढ्यांपिढ्या ऐकत आलेल्या गोष्टींवर अनेक गावांचा इतिहास तग धरून उभा आहे. अशीच काहीशी परिस्थिती सिन्नर तालुक्यातील सोनांबे या गावाचीही आहे.
नाशिकच्या नसानसात ऐतिहासिक ऐश्वर्य अन् शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अज्ञातवासात असलेला इतिहासाला झळाळी देण्याची गरज आहे. सातवाहन ते यादव कालखंड, मुस्लिम राजसत्ता, त्यानंतर आलेला शिवकाळ अन् पेशवाईच्या काळात नाशिकमध्ये मोठे बदल झाले.
पेशव्यांच्या अनेक सरदारांना नाशिक परिसरातील गावांच्या जहागिऱ्या मिळाल्यामुळे त्यांचे वास्तव या परिसरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले दिसते. मोरोपंत पिंगळे असोत वा मस्तानी असो की पेशव्यांचा समशेर यांचे नाशिकशी ऋणानुबंध कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जुळले आहेत. त्यांच्या पाऊलखुणा आजही त्यांचे अस्तित्व गावागावांमध्ये दाखवितात. त्याप्रमाणे महादजी शिंदे, मल्हारराव बर्वे, अहिल्याबाई होळकर, राजेबहाद्दर नारोशंकर यांनसह अनेक सरदार, घराणी व संस्थानांचा ठसा परिसरातील गावांवर उमटलेला दिसतो. सिन्नरमधील देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. पानिपतच्या युद्धातून जखमी अवस्थेतेतील महादजी शिंदेंना राणेखानाने वाचविले व पुन्हा आपल्या मुलखात आणलं.
राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते ही गावे जहागिरी मिळाली. राणेखानाने देवनदीच्या किनारी प्रशस्त वाडा बांधला अन् येथेच विसावलाही. देवपूरमधील राणेखानाचा वाडा पाहताना त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. महादजी शिंदे राणेखानाला ‘भाई’ म्हणायचे अन् राणेखान गेल्यावर महादजी अनेक वेळा ‘भाई भाई’ म्हणून हाका मारायचे या संदर्भावरून राणेखानाचे व्यक्तित्त्व उलगडते. पण राणेखानाला हिरेखान नावाचा भाऊ असेल व देवपूरला राणेखान स्थिरस्थावर होत असताना त्याने आपल्या भावाला याच देवनदीच्या किनारी सिन्नरमधील सोनांबे या गावात वसवले असेल. हा इतिहास मात्र मौखिक रूपानेच सोनांबेकरांकडून ऐकायला मिळतो अन् त्या गावातील हिरेखानाच्या वाड्यासारख्या महालाच्या भिंती या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे पहायला मिळतात. हिरेखान राणेखानासारखाच उमदा लढवय्या असणार, असा भास वाड्याच्या भिंतीला हात लावल्यावर होतो. दोघेही याच देवनदीच्या किनारी इतिहासाप्रमाणेच विसावले हेही दोघांमधील एक साम्य सोनांबे पुढे आणते.
सिन्नरहून सिन्नर-घोटी मार्गावर सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला सोनांबे फाटा लागतो. फाट्यावरून दोन किलोमीटर रस्त्याने आत गेल्यावर झाडांच्या पुंजक्यामध्ये सोनांबे देवनदीच्या किनारी वसले आहे. गावात प्रवेश करताना लहान मोठी मंदिरे, समाधी दर्शन देतात. सकाळी सकाळी पारावर जमलेले ज्येष्ठ मंडळींचा पांढऱ्या शुभ्र पेहराव व कोन काढीत पुढे डोकावणाऱ्या त्यांच्या डोक्यावरील पांढऱ्या गांधी टोप्या इतिहासाबद्दल बोलू लागतात. सोनांबे म्हणजे काय? या माझ्या प्रश्नांनं सर्वच अस्वस्त होतात अन् एक आठवणींचा उसासा टाकत हरविलेल्या गोष्टींना उजाळा देताना जी निराशा, आपलेपणातून निर्माण झालेली उत्सुकता त्यांच्या डोळ्यात उभी राहते. ‘काय दिवस होते’ ही त्या वैशिष्ट्यांची आताची किंमत त्यांना आठवणींचे भावविश्व उलगडताना पाहून अंगावर काटा येतो अन् ते पिवळे धमक आंबे आजही चाखता आले असते तर काय मजा आली असती, असं उगाच वाटून जातं. आंब्याचा सिझनातही आता सोनांबेत आंबा मिळत नाही, ही ज्येष्ठांमधील रूखरूख सर्वकाही सांगते. सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.
सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही आहे. मात्र तो आता हरविलेल्या अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेल्या एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता. त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. तेव्हापासून गावातील भैरवनाथाच्या यात्रेत मंदिरासमोर मंडप टाकण्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबियांना आहे, असे हरिषचंद्र सातपुते, एकनाथ पवार, राजू आंबेकर व ज्ञानेश्वर बोडके सांगतात. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.
हवेलीला काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र आजही हवेलीच्या तीन दिशांच्या बलाढ्या भिंती तग धरून उभ्या आहेत. या तीन मजली हवेलीचा दरवाजा अन् आतील लाकडी कोरीव काम अप्रतिम होते, असे तेथेच राहत असलेले हिरेखानाची वंशज पीरमहम्मद गुलाब पठाण व शाकिद पठाण सांगतात. मात्र आगीत सर्वकाही गेलं. हवेलीतील भुयार थेट देवपूरच्या राणेखानाच्या वाड्यात जाते, असेही ते सांगतात. मात्र आता तेथे कोणाला जावू दिले जात नाही. बिबी नावाची हिरेखानाची बहिण सोनांबेशेजारच्याच वडगाव सिन्नर या गावात दिली होती. बहिणीचे लग्न करताना हिरेखानाने भेट म्हणून सालखडी नदी दिली होती. त्यामुळे वडगाव सिन्नरची मंडळी हक्काने सालखडी नदीचे पाणी पाटाने गावात नेतात, असेही ग्रामस्थ सांगतात. हिरेखानाबद्दल इतिहास फार काही सांगत नसला तरी हवेली वजा वाडा त्याची शैली खूप काही सांगून जाते.
सोनांबेतील वतनदारीतील हेरफेरीचा एक संदर्भही इतिहासाच्या पानांमधून उलगडताना दिसतो. १७९६ मधील कारवाईचा एक मोडी कागद उपलब्ध झाला आहे. यानुसार, सिन्नर परगण्यातील मौजे सोनांबे या गावच्या दादो रघुनाथ कुळकर्णी याने मौजे बेलगाव तऱ्हाळे येथील कुळकण्यांचे वतन नसत्या भानगडी करून त्याच्यापासून निम्मे कुळकर्णीपण लिहून घेतले व जबरदत्तीने बेळगांव तऱ्हेळेच्या कुळकर्ण्यांचे घर मोडून टाकत तेथे वाडा बांधला होता. या संबंधिची फिर्याद दौलतराव शिंदे यांच्याकडे गेली होती. या फिर्यादीची दखल घेऊन मल्हारराव भिकाजी गोसावी यास पत्र लिहून याबाबात दादो रघुनाथ कुळकर्णीचा बदअमल मोडून काढण्याची आज्ञा दौलतराव शिंदे यांनी केली. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, सोनांबे या गावातील कुळकर्ण्यांचे घर मोडून सोनांब्याच्या कुळकर्णीने जो वाडा तऱ्हाळेत बांधलेला आहे तो तोडून त्या जागेवरील असेल ती संपत्ती, वतनाचे कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांना लष्करात येण्यास सांगावे. यासाठी सर्व व्यवस्था भिकाजी गोसावी यांनी पहावी तसेच या विषयीचा फिरून बोभाटा येऊ न देण्याची ताकीदही या हुकूमनाम्यात दिली आहे. याचे मूळ पत्र व हा संदर्भ एक अज्ञात व्यक्तींने नोंदविला आहे. हिरेखानाच्या वाड्याकडून भैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना गावातील ब्रिटीशकालीन शाळा पहायला मिळते. ही शाळा लवकरच नवे रूपडे घेणार आहे. उजव्या हाताला एक मंदिर व त्यासमोर एक पेशवेकालीन विहीर आहे. येथे पाण्यासाठी महिलांची गर्दी पहायला मिळते.
सोनांबे गावचे मुख्य दैवत म्हणजे भैरवनाथ महाराज. भैरवनाथांचे मूळ गाभारा मंदिर दगडी बांधणीचे आहे. या मंदिरात छोटे दगडी देवघर आहे ते मूळ भैरवनाथ मंदिर म्हटले जाते. मंदिरावर द्वारपाल, माथ्यावर उभा गणपतीची मूर्ती, कळसाला वेढा घातलेला नाग अन् गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूने वाघांच्या प्रतिमा छोट्याखानी मंदिराला साज चढवितात. या दगडी मंदिराभवती मोठे मंदिर बांधले आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. मंदिराच्या कामासाठी भगूर व घोटीकरांनी मदत केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मंदिरात लोखंडी दोन नगारे आहेत. मंदिराचा समोरचा मंडप सिमेंटचा बांधलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ खूपच सुंदर असून, दीपमाळेवर पायांपाशी उठावदार नागाची प्रतिमा कोरलेली आहे. मंडपात अनेक समाधी आहेत. भैरवनाथाच्या यात्रेची सुरूवात पहिल्यादिवशी पालखी, रथ परंपरेने होते. संध्याकाळी काठ्या मिरविल्या जातात.
दुसऱ्या दिवशी कुस्त्या संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. बोहाडा ही परंपरा १५ वर्षांपासून बंद आहे. मात्र सोंगाचे मुखवटे दैवत म्हणून अनेकांनी जपले आहेत. गावात बाबुराव बाबा पवार यांची समाधीही आहे. त्यांचे वंशज बबन बाबुराव पवार यांच्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरामागे नागोबा काळेंची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावर असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नागोबा काळे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे घोडा असल्याने त्यांना घोडे आडनाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांना छत्रपतींनी सोनांबे गावात जमीन जहागिरी म्हणून जमीन दिली होती. घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. खापराळे गावातील डोंगरावरील भवानी देवीलाही ग्रामस्थ मानतात. गावातील काळे-घोडे मंडळी देवीची पूजा करतात. गावात काशीआई, हनुमान मंदिर, राम मंदिर, महादेव मंदिरासह इतरही अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. नाशिकरोडच्या अनुराधा थिएटरचे रामनाथ कलंत्री व इतर कलंत्री मंडळी या गावची.
भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला देवनदी व त्यावर ब्रिटीशकालीन बंधारा पहायला मिळतो. गावातून बाहेर पडताना हनुमान मंदिरातील वीरगळ अन् मंदिरामागील अहिल्याबाईंची बारव पहायला विसरू नका. आता आतापर्यंत बारवेचे पाणी ग्रामस्थ वापरत होते. मात्र त्यात खूप कचरा साचल्याने ती मृत अवस्थेत आहे. ही बारव स्वच्छ करून जपण्याची गरज आहे. बारवे शेजारीच गोसावींच्या समाधी आहेत. सिन्नर तालुक्यात गोसावी समाज सर्वच गावांमध्ये पहायला मिळतो. गोसावी समाज हा भटक्या जातीत मोडतो; मात्र आता हा समाज गावांमध्ये स्थिरावला आहे. गिरी, पुरी, गोसावी, गोस्वामी, भारती अशी आडनावे त्यांच्याच आढळतात. या समाजाला शंकराचे वरदान असल्याचे म्हटले जाते. सिन्नरमध्ये महाशिवरात्रीला हा समाज एकत्र येत शंकराची पूजा करतो. अनेक गावांमध्ये आजही गोसावी समाजातील प्रथा, परंपरा आजही भक्तीभावाने पाळल्या जातात. यात अगदी घरोघरी जोगवा मागण्याची पद्धत असो वा अंतविधीची प्रक्रिया असो. गोसावी समाजातर्फे सिन्नर परिसरातील काही गावांमध्ये मठाची स्थापनाही केलेली दिसते. यात सोनांबेचा समावेश होतो. गावात गोसावी व भारती आडनावाची मंडळीही आहेत.
सोनांबेतून बाहेर पडताना नजर उगाचच सैरभैर होते. अजूनही कोठे आंब्याचे मोठे झाड दिसतील, त्याला लगडलले पिवळे धमक आंबे पहायला अन् चाखायला मिळेल, असे वाटते. मात्र सोन्यासारखा हा क्षण अनुभवलेल्या ज्येष्ठ मंडळींच्या डोळ्यातील आठवणींमध्ये जे सोनांबे पाहिले ते आज अनुभवायला मिळत नाही. सोनांबे अनेक बाबतीत प्रगतीपथावर आहे. मात्र गावात येणाऱ्या पाहुण्यांना सोन्यांचे आंबे अन् जपून ठेवलेला इतिहास अनुभवायला मिळाला तर अजून काय हवं.. नाही का?
मोरोपंत पिंगळेंचे वडगाव पिंगळा
अनेक गावं दुर्मिळ अशा अनोख्या इतिहासाने ओतप्रोत भरलेली आहेत. ऐतिहासिक पात्रांच्या स्पर्शाने मोहरलेली गावे आता त्यांच्या पुसट आठवणीशिवाय काहीच सांगत नसल्याचे दिसते. असाच अनुभव वडगाव पिंगळा, जामगाव, पास्ते, चंद्रपूर, खापराळे अन् पळसे या गावांत येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सरदार अन् मराठा दौलतीचे पंतप्रधान म्हणून प्रसिद्ध असलेले मोरोपंत पिंगळे एक अनोखे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व. इ. स. १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास निघाले तेव्हा ज्या तीन गृहस्थांच्या हाती छत्रपतींनी आपल्या राज्य कारभाराची सर्व सूत्रे सोपविली त्यात मोरोपंत हे मुख्य होते. पुढे १६७० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत व प्रतापराव गुजर यांना साल्हेरच्या कुमकेकरिता वीस हजार फौज देऊन रवाना केले. यावेळी त्यांनी साल्हेरजवळ मोगलांचा सरदार इखलासखान याच्या सैन्यावर मोठा विजय मिळवून शत्रूवर मात केली. सुरत लूट सुरक्षितरित्या राजगडावर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रावळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले होते आणि खुद्द शिवरायही खानदेश भागात शिरले होते.
१६७९ ला जालना लुटून आल्यावर पट्टा किल्ल्याच्या आसपास मोंगलांचे जे २७ किल्ले होते त्यातील शक्य तेवढे काबीज करून घेण्याकरिता छत्रपतींनी पंतांची रवानगी केली. पंतांनी ते किल्ले घेऊन सर्व खानदेशवर पकड मिळविली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) प्रथम मोरोपंत सोयराबाईंच्या पक्षास मिळाले. म्हणून त्यांना संभाजी महाराजांनी बंदीत ठेवले. परंतु पुढे मोरोपंत छत्रपती संभाजींच्या पक्षास जाऊन मिळाल्याने त्यांना पेशवाईच्या जागी कायम करण्यात आले. मात्र सहा महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते, की शिवाजी महाराजांचे हेतू व धोरणे मोरोपंतांना चांगले माहिती असल्याने त्यांच्या हातून विलक्षण पराक्रम घडला. युद्धशास्त्र व राज्य कारभारात मोरोपंत तरबेज होते, असे काही उल्लेख मराठा रियासतीत व इतिहासांच्या पानांमध्ये मिळतात. यातून मोरोपंत पिंगळ्यांची कारर्कीद समोर येते. त्यांचा नाशिकशी संबंधही या लढाय्यांदरम्यान समोर येतो. याच उलाढालीच्या दरम्यान मोरोपंत पिंगळेंचे वास्तव्य वडगाव पिंगळा असावे ही माहिती समोर आल्याने या गावाकडे पाहण्याचा नूरच पालटून जातो. इतिहासाला आपल्या नावातून पुढे घेऊन जात असलेल्या वडगाव पिंगळामध्ये आज मोरोपंतांच्या इतिहासाच्या खाणाखुणा शोधूनही सापडत नाहीत.
नाशिक-सिन्नर रस्त्यावर दारणा ओलांडून पुढे शिंदे गावातील उड्डाणपुलाच्या बोगद्यातून उजव्या हाताला नाशिक साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्याने आत गेल्यावर साखर कारखान्यापूर्वी डाव्या हाताने वडगाव पिंगळा या गावाकडे जाता येते. गावात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मंदिर लागते. मंदिराचा सभामंडप नव्याने बांधलेला आहे; मात्र मूळ मंदिराच्या प्रवेद्वारावरील लाकडावर कोरलेली सुंदर नक्षी व त्यावरील रंगकाम आपल्याला आकर्षित करते. मंदिरातील सभागृह व तेथील लाकडावरील कोरीव काम, मलखांब खेळणारा मल्ल, श्रीकृष्ण व सेवकांच्या लाकडी मूर्ती व दोन मजली मंदिरातील लाकडी छत्राचे नक्षीकाम मनमोहून टाकते. गावात हनुमानाची यात्रा भरते. यात्रेत पूर्वी बोहाडा व्हायचा. मात्र २५ वर्षांपासून ही परंपराही बंद झाली आहे. हनुमान मंदिरात बसलेले ज्येष्ठ मंडळी गावाच्या नावाबाबत एक वेगळीच माहिती उलगडतात. गावचे नाव वडगाव असे होते. त्याला पिंगळा हे नाव लागण्यामागे गावाला मोरोपंत पिंगळ्यांचा सहवास लाभल्याचे रघुनाथ सानप, रामदास मुठाळ सांगतात. याबाबत इतिहासात नोंदी नसली तरी वडगाव पिंगळातील ग्रामस्थ गावात मोरोपंतांची गढी असल्याने तसेच पिंगळ्यांची अनेक कुटुंब येथे राहत असल्याने गावाला पिंगळ्यांचे वडगाव म्हणता म्हणता वडगाव पिंगळा असे नाव पडल्याचे सांगतात.
पिंगळे आडनावाचे आता गावात कोणी नाही; मात्र मोरोपंतांच्या आठवणी गावाच्या नावातून आजही ताज्या आहेत. म्हणूनच की काय नाशिकच्या नवरत्नांमध्ये मोरोपंत पिंगळे यांचे नाव घेतले जाते. हे गाव मोरोपंत पिंगळ्यांना जहागिरीत मिळाले असावे का? याबाबत मात्र कोणतीही नोंद आता मिळत नाही. गावात पिंगळ्यांची मोठी गढी होती. मात्र आता ती नाममात्रही दिसत नाही. त्या जागेवर आता घरे वसल्याने खाणाखुणाही मिळत नाहीत. फक्त गढीच्या तुटकतुटक आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात. गावात शनी मंदिर, शिवमंदिर, विठ्ठल-रुख्मिणी आदी मंदिरे आहेत. अहिल्याबाईंच्या बारवेचा पायऱ्यांचा विस्तार बुजवून फक्त आता विहीर जाम रस्त्यावर दिसते. गावात पूर्वी पाण्याची काहीच अडचण नव्हती. वडगाव पिंगळाची मुंबईची परसबाग अशी ओळख होती. काही वर्षांपूर्वी मुंबईला ट्रकच्या ट्रक भरून भाजीपाला जायचा. मात्र आता पाण्याअभावी हेही बंद झाले आहे. विहिरी अन् बोअर प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने गावचा जलस्तर घसरला अन् शेती अवघड झाली. पाण्याचे इतर स्त्रोत म्हणजेच बंधारे व भूजलभरणाचे उपाययोजना नियोजनबद्ध न केल्याने नवीन पिढीला शेती व्यवसाय वारसा म्हणून देताना हात थरथरता, अशी विवंचनाही ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. बोलता बोलता पंधरा वीस शेतकरी मंदिरासमोर गप्पांमध्ये सहभागी होतात अन् ज्येष्ठ शेतकरी आपल्या अडचणी तळमळीने सांगू लागतात.
इतिहास पोटासमोर खुजा झालेला वाटायला लागतो. हरविलेल्या इतिहासाचे पैलू गोळा करीत अन् शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन मन सुन्न होऊन जातं.प्रवास मात्र संपलेला नसतो. गाडीची चाक पुढील प्रवासाला निघतात.
दिंडींचा कळस म्हणजे पळस!
‘पळस पळस त्याने केला दिंडीचा कळस’ असे ज्या गावाच्या नावावरून म्हटलं जातं ते गाव म्हणजे नाशिक-पुणे महामार्गावरील दारणानदी कुशीत वसलेले पळसे हे गाव. पळसे अन् नाशिकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल १९०५ मध्ये बांधला गेला अन् पळसेचा विकास झपाट्याने होऊ लागला. त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना पळसे गावात मुक्काम करते. त्यामुळे दिंडीची मोठी परंपरा पळसे पुढे घेऊन जाताना दिसते. गावात पूर्वी पळसाची झाडे खूप असतील म्हणून गावाला पळसे हे नाव पडले असेल, असे धोंडीराम गायधनी, बबनराव थेटे, संजय डहाळे, विष्णू गायखे सांगतात. गावात प्रवेश केला की, डाव्या हाताला वेस अन् वेशीबाहेर नव्याने बांधलेली ग्रामपंचायत इमारत लागते. पूर्वी पळसे गावात साठे नावाचे लोकच सर्वाधिक होते. आताही साठे नावाचे काही कुटुंबं गावात राहतात. पेशवेकालीन वाडेही बरेच होते. यात पद्मिनिचा वाडा, पाटील वाडा पहायला मिळतो. पद्ममिनिचा वाडा सहा खणी आहे, असे भरत गायधनी सांगतात. वाडा पाहून जुन्या शाळेतील संत आईसाहेबांच्या समाधीकडे जायचे. दगडी छत्रीसारखी समाधी व त्या आजूबाजूला लहान मोठ्या समाधी पाहताना पळसे गावाचा संत परंपरेचा उलगडा होतो. पळसेकर महाराजांचे वास्तवही पळसे गावाला लाभल्याचे ग्रामस्थ सांगतात. तशीच गावात डाव्या विचारांची चळवळही रूजली होती.
गावात विठ्ठल मंदिर, मुंजाबा, हनुमान मंदिर, खंडोबा व शितळा माता मंदिर व इतरही लहान मोठी मंदिरे आहेत. हनुमान मंदिरासमोर सहा फूटाची स्तंभ दीपमाळ आहे. आषाढी एकादशीला गावात यात्रा भरते. पालखीचा सोहळा यावेळी पार पडतो, असे देवीदास गायधनी व सुधाकर जाधव सांगतात. तर आदिकमासात ग्रामस्थ महिनाभर नदीवर आंघोळीला जाण्याची प्रथा आहे. महामार्गापलीकडे भैरवनाथाचे मंदिर व गोसाव्याची समाधी आहे. येथेच मरीआई, खोकलाई, साती आसरा आहेत, असे सुदाम जाधव सांगतात. एक गंमत म्हणजे गावातील ‘बाराशे’ नावाचा एक कुत्रा खूप प्रसिद्धीस आला आहे. तो गावातील प्रत्येक अंत्ययात्रेत सहभागी होतो. या कुत्र्याचा अपघात झाला असताना त्याच्यावर बाराशे रूपये खर्च आल्याने त्याला बाराशे असे नाव पडल्याचे संजय डहाळे सांगतात. पळसेकरांनी लग्नातील एक विशेष परंपरा आजही जपली आहे. ती म्हणजे लग्नात जात्यावर दळण पुरूष मंडळी करतात व लोकगीते गातात. हू प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कधीकाळी कुस्ती अन् कबड्डीत हातखंडा आजमावणारे पळसे हे गाव प्रगतीशील शेतीच्या माध्यमातून विकासाकडे झेपावत असल्याचे पहायला मिळते. वेशीतून समोरच्या रस्त्याने गावाबाहेर पडताना रस्त्यात डाव्या हाताला आहिल्याबाईंची बारव वाईट अवस्थेत पहुडल्याचे पहायला मिळते. हा ऐतिहासिक वारसा जपला गेल्यास पळसेवर आणखी एक कळस नक्कीच चढेल, असे वाटायला लागते.
पोलिसांचं जामगाव अन् पास्ते
वडगाव पिंगळातून जामकडे जाणारा रस्ता हा एक आनंद देणारा घाट आहे. घाटातील पवनचक्क्या पाहत सात-आठ किलोमीटर गेल्यावर आपण जाम गावात पोहचतो. लांबूनच हनुमान मंदिराचा कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे शिखर ओढ वाढवतो. वडगाव पिंगळा सारखचं लाकडी बांधणीतील दुमजली हनुमान मंदिर जाम गावातही आहे. कौलारू छत, त्यावरील हनुमानाची चित्रे, लाकडीकाम व हनुमानाची सुंदर मूर्ती पहायला मिळते. गावात काशीआई, भवानी, खंडोबा मंदिरेही आहेत. सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावात दरवर्षी काशीआईचा उत्सव होतो. साठ-सत्तर उंबऱ्यांचं जाम प्रसिद्ध आहे ते पोलिसांसाठी. प्रत्येक घरातील एकजण पोलिस दलात सेवेत आहे. तर गावातील काशीनाथ बोडके यांची नात प्रियंका कीर्तनकार म्हणून जाम गावाला वेगळेपण मिळवून देत आहे, अशी माहिती प्रभाकर सांगळे व नितीन बोडके यांनी दिली. जाम गावातून पुढे तीन-चार किलोमीटरवर पास्ते हे गाव लागतं. पास्ते देवनदीच्या किनारी वसलं आहे. पास्ते नावाबाबत काहीच माहित नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेल्या अनेक पिढ्या गावाला हेच नाव असल्याचे बाळू आव्हाड व चंदू घुगे सांगतात. या गावात प्रवेश करताना शिवमंदिर, हनुमान मंदिर पहायला मिळतं. हनुमान मंदिरात विठ्ठल व गणपती मंदिर आहे. ही सर्व मंदिरे नव्याने बांधलेली आहेत. गावातील बहुतांश घरातील मुले पोलिस दलात आहेत.
पास्ते गावात दुमली जुनी घरे पहायला मिळतात. पास्ते हे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. जाम गावातून खापराळे गावाकडे जाताना चंद्रपूर हे गाव लागतं. गाव म्हणावं असं तीस-चाळीस घरांचा छोटासा पुंजका चंद्रकोरीतून डोकावताना दिसतो. आजूबाजूला मोकळ रानमाळ, सुसाट वारा अन् यात खेळताना दिसणाऱ्या पवनचक्या एवढं या गावाचं वर्णन डोळ्यापुढं उभं राहतं. गावाच्या आधी एक वीरगळ चंद्रपुरात स्वागत करते अन् गाव पाहता पाहता संपतेही. हा छोटासा आदिवासी पाडा ओलांडून आपण खापराळी या गावाकडे झेपावतो. खापराळी गावातील जवळपास सगळ्याच घरांची छपरं खापराची आहेत. हे गाव दूध व दह्यासाठी प्रसिद्ध आहे. खापराळीच्या डोंगरात भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी डोंगरात वरपर्यंत गाडी जाते. नव्याने बांधलेले मंदिरातून समोर घोटी-सिन्नर रस्ता दिसतो. हा नजारा पाहून पुन्हा नाशिककडे निघायचं. खापराळी, चंद्रपूर, जाम, वडगाव पिंगळा अन् दारणा ओलांडण्यापूर्वी पुन्हा नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी पळसे हे गाव लागतं.
गवळ्यांच गौळाणे अन् बहुल्याचे आंबे
प्रत्येक गाव आपला एक ठसा इतिहासावर उमटवूनवाटचाल करीत असतं. तर अनेकदा एखादा किल्ला अथवा लेणी आपल्या अवतीभवतीच्या गावांच्या निर्मित्तीला कारणीभूत ठरल्याने इतिहासाच्या पाऊलखुणा झालेल्या दिसतात. पांडवलेणीच्या पाठीवरील गौळाणे अन् बहुला किल्ल्यांच्या सावलीतील आंबे बहुला आजही तो इतिहास जागवतात.
दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे धडे देणारी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी (बौद्धलेणी) अनेक गूढ आपल्या उदरात घेऊन आहे. पांडवलेणी घडताना पांडवलेणीच्या आजूबाजूच्या गावांचे स्वरूप काय असेल हा विषय संशोधनाचा ठरावा. पांडवलेणीतील शिलालेखांतून अनेक गावे, नद्या, राजे व व्यापाऱ्यांचा उल्लेख आलेला आहे. यातील अनेक गावांच्या नावांचा आता संदर्भ लावता येत नाही. तर अनेक गावांची नाव बदलल्याने ती सापडतही नाहीत. मात्र दोन हजार वर्षांपूर्वी नाशिक व गोवर्धन या गावांचा पांडवलेणीतील शिलालेखांमध्ये स्पष्टपणे झालेला उल्लेख आजही तसाच आहे. गोवर्धन आहारातील पूर्व मार्गावरील शाल्मलीपद्र गाव हे सातपूर असावे. (काही संशोधक हे निफाडजवळचे सावरगाव असावे असा अंदाज लावतात.) तर पांडवलेणीच्या उजव्या हाताला म्हणजे अगदी पायथ्यालाच असेलेले पाथर्डी हे गाव शिलालेखांमधील पिशाच्यपद्र हे गाव असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.
पांडवलेणीचे खोदकाम करण्यासाठीच्या कामगारांची अथवा पाथरटांची पाथर्डी ही वसाहत आजही आपल्या खाणाखुणा सांभाळून असल्याचे दिसते. तेथे सापडणारे अवशेष त्याची साक्ष देतात. पांडवलेणीतील बौद्ध भिक्षुकांना गरजेच्या गोष्टी पुरविण्यासाठी राजांनी व व्यापाऱ्यांनी चिवर (कपडे) व औषधांची सोय केल्याचा उल्लेखही शिलालेखांमध्ये आला आहे. याची सोय पूर्वी कापडासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोवर्धनमधून होत असावी. तर भिक्षुकांच्या उदरनिर्वाहासाठी गायींचे दान दिल्याचा उल्लेखही लेणीमधील शिलालेखांमध्ये आढळतो. याचाच अर्थ लेणीच्या आजूबाजूच्या एखाद्या गोवर्धन सारख्या गावात या गाई सांभाळण्यासाठी दिल्या जात असाव्यात व तेथून भिक्षुकांना दुधाची सोय होत असावी. तसेच पांडवलेणी त्रिरश्मी डोंगरावरच का कोरली असावी, या प्रश्नाचे उत्तर दोन हजार वर्षांनंतरही तर्कविर्तकांवर आधारलेले आहे. लोकवस्तीपासून लांब पण भिक्षुकांना सहज वावरता येईल व त्यांच्या गरजाही पूर्ण होऊ शकतील, असे ठिकाण त्रिरश्मी पर्वत होते. पांडवलेणीसमोर गोदावरी व मागील बाजूस वालदेवी नदी यामुळे या दोन्ही नद्यांच्या मधोमध हा डोंगर असल्याने येथे पांडवलेणी साकारल्या असाव्यात. याचा संबंध पांडवलेणीच्या मागील पूर्वी दुधासाठी प्रसिद्ध असलेले गवळी लोकांचे गौळाणे हे गाव पांडवलेणीच्या प्रवासादरम्यान वसले असावे, असा ऋणानुबंध गौळाणे उलगडताना दिसतो.
पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावातून गौळाणे गावात जाता येते. साधारण तीन किलोमीटरवर एक चौफुली लागते. चौफुलीवर वीर बाबाचे मंदिर आहे. तेथून डाव्या हाताच्या रस्त्याने गौळाणे गावाकडे रस्ता जातो. वालदेवी नदीच्या कुशीत गौळाणे हे गाव वसले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या गावात आदिवासी कुटुंबीयांचीही काही घरे आहेत. गावात एकमुखी दत्त मंदिर, सप्तशृंगी देवी, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर व चाणसनबाबांचा दर्गा आहे. मात्र गावाची एक विशेष ओळख आहे ती पूर्वी हे गाव गवळ्यांचे गाव होते. गावातील गवळी मंडळी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत असल्याने दुधासाठी हे गाव प्रसिद्ध होते. त्रिरश्मी डोंगरामागे असलेल्या या गावात गवळी स्थिरावण्याचे कारण पांडव लेणी असावे, असेही ग्रामस्थ मानतात. मात्र पांडवलेणीत तसा थेट उल्लेख आलेला नाही. मात्र भिक्षुकांच्या उपजिवेकेसाठी दुधाची गरज हे गाव भागवित तर नसेल, याबाबत आता फक्त तर्कविर्तकच लावले जावू शकतात. मात्र आता गवळी मंडळी गावात नसल्याने दुधाचा व्यवसायही केव्हाच बंद झाला, असेही रामदास चुंभळे सांगतात.
गौळाणेचे सध्याचे वैशिष्ट्य आहे गावातील हनुमान. हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती नग्न आहे. सध्या हेच गौळाणेचे मुख्य आकर्षणही आहे. अंजनेरीवर हनुमानाने जन्म घेतल्यानंतर बाल हनुमानाने पहिली उडी गौळाणेत मारली होती. त्यावेळी बाल हनुमान नग्न अवस्थेत होते त्यामुळे गावातील हनुमान मूर्ती नग्न आहे, अशी अख्यायिका चुंभळे सांगतात. गावातील हनुमानाच्या मंदिरातील नग्न हनुमानाची मूर्ती व शेंदूर फासलेल्या एक वीरगळीसारख्या दगडी चिरेवर गणपती व गाईंची प्रतिमा कोरल्यासारखे दिसते. शेंदूरामुळे यावरील चित्रे अस्पष्ट झालेली आहेत. हे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. हनुमान मंदिरापासून डाव्या हाताने वालदेवी नदीकडे रस्ता जातो. नदीच्या लगत महादेव मंदिर नव्याने बांधलेले आहे. त्याच्या पायऱ्या नदीपात्रातील स्वच्छ पाण्याकडे घेऊन जातात. हा परिसरच निसर्गरम्य आहे. निसर्ग अनुभवताना समोर नाकिंद्याचा किल्ला दिसतो. गौळाणेकर पगडीसारखा दिसणाऱ्या डोंगराला नाकिंद्याचा किल्ला म्हणतात, असे वाघू थापेकर, मुकुंद तपासे व विजय चुंभळे सांगतात. नाकिंदा लक्ष वेधून घेतो. गौळाणेकरांचा नाकिंदा म्हणजेच आंबे बहुल्याचा बहुला किल्ला.
बहुल्याचे आंबे बहुला
गौळाणेतूनच आंबे बहुला गावात रस्ता जातो. अगदी तीन किलोमीटरवर हे गाव लागतं. वालदेवीच्या किनारी एखाद्या घरांचा पुंजका वसावा असे हे गाव वसलेलं आहे. असं वाटण्यामागे एक विशेष कारणही आहे. लष्करांने देवळाली कॅम्प वसविले अन् १९४४ दरम्यान फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या. यात आंबे बहुला हे गावही गेले. त्यामुळे नदीपलीकडे बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आंबे बहुला हे गाव नदी ओलांडून आताच्या जागेत वसले आहे. याला आता ६०-७० वर्ष झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे गावात जुनं अस काहीच नाही. जी काही मंदिरे आहेत ती नंतर ग्रामस्थांनी नव्याने उभारलेली आहेत. यात मारूती, सप्तशृंगी, भैरवनाथ, राम, भवानी मंदिराचा समावेश होतो. आंबे बहुलेकरांची ग्रामदैवत म्हणजे भैरोबा.
भैरोबाचे जुन्या मंदिर आधीच्या गावातही आहे. ते तसेच असल्याचे सुरेश शिर्के व शशीकला गवारी सांगतात. नदीपलीकडे जुन्या गावात पूर्वी आंब्याची खुप झाडे होती म्हणून गावाला आंबे अन् बहुला किल्ल्याच्या पायथ्याचे हे गाव असल्याने गावाला आंबे बहुला असे नाव पडले. एस. पी. परमहंस यांच्या महाभारत शब्दकोशात बहुलाचा उल्लेख नदी म्हणून आला आहे. तर बहुला हे गणेशव्रत म्हणूनही ओळखले जाते. यामुळे बहुला या नावाभवतीचे गूढ उलगडत नाही. मात्र बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी वालदेवी नदी वाहत असल्याने या नदीच्या सहवासात किल्ला असल्याने किल्ल्याला बहुला म्हटले गेले हेही उलगडत नाही. गावात आदिवासी लोकवस्ती जास्त आहे.
मूळच्या आंबे बहुल्यातून देशमुख मंडळी मोठ्या प्रमाणात भगूर, आडगाव, वडनेर, सुकेणे, नाशिकरोड भागात स्थलांतरीत झाली आहेत. ही मंडळीही किल्ल्यामुळे पायथ्याच्या या गावात वसली असावी. गावातील ग्रामस्थांच्या जमिनी लष्करासाठी घ्याव्या लागल्याने सर्वच अल्पभूधारक झाले आहेत. अजूनही त्या जमिनींचा मोबदला मिळाला नसल्याने गाव मोबदल्यासाठी लढताना दिसते, असे राजू देशमुख सांगतात. सध्याच्या गावाभवती वन विभागाची जमीन असल्याने गावचा पुरेसा विकासही होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आजही आंबे बहुल्याचे मुख्य आकर्षण आहे ते बहुला किल्ला. बहुला किल्ल्याच्या इतिहासात फारशा नोंदी मिळत नाहीत. मात्र बहुला किल्ल्याचे आकर्षण भल्याभल्यांना सोडवित नाही. अर्थात बहुला किल्ल्यावर जायला बंदी आहे. कारण हा किल्ला लष्कराच्या फायरिंग रेंजचा एक भाग आहे. रविवारी फायरिंग बंद असल्याने गिर्यारोहक किल्ल्यावर जातात; मात्र तोफांचे जिंवत गोळे इतरत्र पसरले असल्याने आंबे बहुल्यातील ग्रामस्थ तेथे जाणे धोक्याचे असल्याचे सांगतात. बहुला किल्ल्याची उंची ९६५ मीटर आहे. हा किल्ला सुरूवातीला मोगलांकडे असावा व मोगलांकडून मराठ्यांच्या ताब्यात आला असावा अशा काही नोंदी मिळतात. १८१८ नंतर पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज कॅप्टन जॉन ब्रिग्जने बहुला किल्ल्याचा ताबा घेतला व त्याचे नुकसान केले, अशी नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते. बहुला किल्ल्याची तटबंदी आता बऱ्यापैकी ढासळली आहे; मात्र तोफांपासून किल्ल्यांचे संरक्षण व्हावे, अशी किल्ल्याची तटबंदी असल्याचा उल्लेख कॅ. ब्रिग्ज करतो. त्यामुळे दररोज तोफांचे वार सोसूनही हा किल्ला आजही उभा आहे, अशी माहिती गिर्यारोहक सुदर्शन कुलथे देतात.
बहुला किल्लाचे उद्धवस्त झालेले प्रवेशद्वार व कातळात कोरलेल्या उभट पायऱ्या, पाण्याचे चार टाके, अश्मवर्तुळासारखी समाधी, काताळातील चौकोनी छिद्रांचे रिंगण हे बुरजाचा पाया असावे, उद्धवस्त झालेल्या दोन वास्तूंचे अवशेष व लहानसा बहुल्याचा माथा पाहिला की नवलं वाटतं. बहुल्याचा वापरही त्रिंगलवाडी सारखा वाटेवर नजर ठेवण्यासाठी झाला असावा. खरेतर हा किल्ला नाशिक शहरात प्रवेशद्वारावरच असल्याने बहुलाचे महत्त्व मोठे आहे. मात्र तो लष्कराच्या ताब्यात असल्याने तो नियमित पाहता येत नाही. अन्यथा तोही रामशेज सारखा ठरला असता, असे मतही कुलथे व्यक्त करतात. बहुल्याच्या माथ्यावरून महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, रायगड डोंगर, डांग्या सुळका, इगतपुरीचा पसारा, उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी, ईशान्येला त्रिरश्मी डोंगर अन् विस्तारत चाललेलं नाशिक पहायला मिळतं. गौळाणेतील वीट भट्ट्या अन् महापालिकेचा खत प्रकल्प आकाशात ढग तयार करतानाही दिसतो.
शिंगवे बहुला, नांदूर बहुला, अस्वली बहुला, राजूर बहुला व आंबे बहुला या गावांवर बहुला किल्ल्याचा ठसा दिसतो तर पांडवलेणीच्या अवतीभवतीची गावे व त्या गावातील व्यवसाय पांडवलेणीच्या उद्देशांशी जोडली गेली असल्याचे पहायला मिळते. ही गावे भटकतांना त्या काळच्या जीवनशैलीचा स्पर्श आपल्याला होताना अनुभवायला मिळतो. म्हणूनच शहराच्या अगदी जवळची अन् इतिहासाच्या पैलूतून निर्माण झालेली ही गावे नक्कीच पहायला हवीत. कारण अजून काही वर्षांनी या गावांतील खाणाखुणांची जागा शहरातील उंच उंच इमारती घेताना दिसली तर नवलं वाटायला नको.
कर्दमऋषींचं आंबेवणी
रखरखत्या उन्हातही गारवा देणाऱ्या गावांची संख्या आता कमी कमी होत चालली आहे. मात्र दिंडोरीतील आंबेवणी कर्दमऋषींच्या आश्रम अन् धरणाच्या सिंचनामुळे हिरवेगार भासते. दत्तात्रेयांचे आजोळ असणारे आंबेवणी आपल्याला आध्यात्मिक प्रवासही घडविते.
एक धार्मिक शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहेच. पण, पौराणिक, धार्मिक अन् ऐतिहासिक माहात्म्य या सुवर्णत्रिकोणामुळे ते अधिक झळाळताना दिसतं. ऋषीमुनी, मानवाची प्राचीन वसतीस्थाने ते अगदी दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहनांचा काळ नाशिकला वेगळेपण मिळवून देताना दिसतो. नाशिकच्या जडणघडणीत प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाने जेवढा हातभार लावलेला दिसतो तेवढाच पौराणिक अख्यायिकांनी लावलेला आहे. रामायण, ऋषीमुनींच्या पौराणिक अख्यायिकांशिवाय नाशिकचा इतिहास परिपूर्ण होत नाही. ऋषीमुनींसाठी तर नाशिक हे आगारच होते. म्हणूनच राक्षसांमुळे त्रस्त झालेल्या ऋषीमुनींना दिलासा देण्यासाठी वनवासात असताना श्रीराम दंडकारण्यात आले असावेत. अगदी अगस्ती, मार्कंडेय ते कृषीतज्ज्ञ पराशर ऋषींपर्यंत सर्वांची कर्मभूमी पुराणांमधील उल्लेखानुसार नाशिकच राहिली आहे. यात दत्तांचे आजोबा व ब्रह्मपुत्र कर्दम ऋषींचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना व त्याच्या विस्तार करण्यासाठी कर्दम ऋषींची निर्मिती केल्याचे अनेक धार्मिक ग्रंथात म्हटले गेले आहे. कर्दम ऋषींनी आपल्या योग्य विद्येच्या मदतीने जल, वायू, भूमी यावर उडणाऱ्या विमानाची रचना केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींच्या जन्माचा उद्देश आणि ब्रह्माकडून त्यांची निर्मिती केली गेल्याचे नारदाच्या तोंडून कौतुक ऐकल्याने मनु ऋषींना कर्दम ऋषींबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले. त्यांनी स्वत: कर्दम ऋषींच्या आश्रमात जावून आपली कन्या देवहूतीशी लग्न करावे, असा प्रस्ताव ठेवला. कर्दम ऋषींनी मनुचा प्रस्ताव स्वीकारला व देवगणांच्या उपस्थितीत कर्दम ऋषींचं लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाले. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. ब्रह्मदेवाने आपण स्वत: तुझ्या मुलाच्या रूपाने देवहूतीच्या गर्भातून जन्म घेऊ असा शब्द कर्दम ऋषींना दिला होता. म्हणून कर्दम ऋषींचा मुलगा कपिल ऋषींना विष्णुचा अवतार मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या देवांशी लावले. कपिल ऋषींनी आपली आई देवहूतीबरोबर कर्दम आश्रमात राहून आईकडून भक्ति-वैराग्याचे धडे गिरविले. देवहूतीनेही आश्रमात राहून गृहस्थाश्रम धर्माचा त्याग करून योगाच्या माध्यमातून अध्यात्म मार्गाची निवड केली. तर कपिल ऋषी कर्दमाश्रमातून ईशानकोण आश्रमात निघून गेले. तर दुसरीकडे अनसूया व अत्री यांना झालेला मुलगा पुढे दत्तात्रेय म्हणून परिचित झाला अन् त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा कर्दम ऋषींच्या आश्रमातच झाले असावे. त्यामुळेच येथे दत्तात्रेयांचा प्रभाव दिसतो, असे करंजी देवस्थानचे ट्रस्टी दत्तात्रेय नेवडे सांगतात. त्यामुळेच नाशिकवर महानुभवपंथाचा प्रभाव घट्ट दिसतो. कर्दम ऋषींचा आश्रम म्हणून प्रसिद्ध असलेले दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी कर्दमऋषी आणि दत्तात्रेय प्रभूंच्या माहात्म्यातून अध्यात्मिक प्रवास घडविताना दिसते. हा प्रवास फक्त अध्यात्मिक नाही तर निसर्गसौंदर्य मनात फुलविणाराही ठरतो.
नाशिक-वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. चटके देणाऱ्या उन्हातील हा प्रवास रुक्ष वाटत असला तरी करंजीकडे जाणारा रस्ता आपल्याला घनदाट झाडीतून आश्रमाकडे घेऊन जातो. जसं काही हा उन्हाळा नाहीच, असा एक वेगळा अनुभव येथील निसर्गसौंदर्य देऊ लागते. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करवंदांचा बहर मनाला गारवा देतो. आंबेवणी हे गाव दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाच्या कुशीत वसल्याने सिंचनामुळे येथे हिरवाई भर उन्हातही दिलासा देते. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे. आंबेवणी गावातील श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात व इतर वेळीही श्री क्षेत्र करंजी येथील कर्दमाश्रमात भाविकांबरोबरच साधू-महंतांनी रेलचेल असते. पुरातन काळापासून दशनाम जुना आखाड्यातील साधू-महंत कुंभमेळ्याला येथे येऊन वास्तव्य करतात. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते.
दत्तात्रेयांचे रूप एकमुखी की त्रिमुखी? हा भक्तांसाठी नेहमी कुतुहलाचा विषय करंजीत मात्र भक्तांचे आणखीनच कुतुहल वाढविताना दिसतो. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांमधून साकारल्याने दत्तात्रेयांना तीन मुखे असल्याचे पुराणांत व्यक्त झालेले मत आहे. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लिनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शुद्रकाने केलेला दिसतो. मात्र निरंजन रघुनाथांचे नातू विश्वनाथबोवा यांनी काशी येथे स्थापन केलेली दत्तमूर्ती एकमुखी आहे. सत्पुरुष श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनीही एकमुखी दत्तमूर्तीचाच प्रचार केला तसेच गुळवणी महाराजांच्या संप्रदायातही एकमुखी दत्ताचीच चित्रे लोकप्रिय आहेत. नाशिक येथील भटजी महाराजांच्या मठामागील मंदिरातील दत्तमूर्ती एकमुखीच आहे. असं असलं तरीही दत्ताची मूर्ती ही त्रिमूर्ती म्हणूनही भक्तांमध्ये अधिक प्रचलित आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम दत्तांच्या त्रिमुखीचाच उल्लेख आपल्या अभंगातून करताना दिसतात. तर सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. कर्दमाश्रम पाहण्यासारखा असून, येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधीपती शिवदयाळ गिरी (इ.स. १७०१ ते १८२७), सदगुरू रामचंद्र ब्रह्मचारी (इ.स. १८२७ ते १९४७), मुकूंद महाराज ब्रह्मचारी (इ.स. १९४७ ते १९५५), हरि गिरी ब्रह्मचारी (इ.स.१९५५ ते १९६९), भास्करानंद ब्रह्मचारी जोशीबाबा (इ.स. १९६८ ते १९९५) आणि आता महंत सुभाषगिरी महाराज आश्रमाची जबाबदारी सांभाळतात. कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भक्तनिवास व गोशाळा चालविली जाते, असेही दत्तात्रेय नेवडे व नरेंद्र जगताप यांनी सांगितले. कर्दमाश्रमातील हा सोहळा पाहून आपली पावले उनंदा नदीच्या काठावर वसलेल्या आंबेवणीत वळतात.
आश्रमापासून अर्ध्या किलोमीटरवर आंबेवणी हे गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या हाताला स्मशानभूमी व एक मंदिर लागते. मंदिरापासून उनंदेच्या कुशीत शंभरहून अधिक वर्षांपासून उभा असलेला दगडी बांधणीचा सुंदर घाट उनंदेचे रूप दाखवितो. घाटावरून गावातील उंच उंच दिसणारी घरे अन् वाड्यांच्या मोडकळीस आलेल्या मोठाल्या भिंती आपल्याला गावात घेऊन जातात. गावाला आंबेवणी असे नाव कसे पडले असेल याबाबत सांगताना सुरेश वडजे म्हणतात,‘पूर्वी गाव आंब्यांच्या झाडांनी मढलेलं होतं. अगदी वडाच्या झाडासारखा विस्तार व उंची असलेली हजारो आंब्याची झाडे गावात व अवतीभवती होती. मात्र आता बोटांवर मोजण्याइतकी आंब्याची झाडेही गावात नाहीत. त्यामुळे पूर्वी आंब्याचे उत्पादन प्रचंड होतं की गावाचे नावच आंबे पडलं.’ आंबे गावाला आंबेवणी ही म्हटले जाते. हे गाव शिंदे घराण्याच्या वणी संस्थानात येत असल्याने गावाला आंबेवणी म्हटले गेले आहे.
घाटाकडून गावाकडे जाताना उजवीकडे चढावर रेणुका मातेचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात रेणुकीचा तांदळा आहे. हा मुखवटा पूर्वी लगद्याचा होता. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला यावेळी दगडी मुखवटा बसविण्यात आला. मंदिराच्या पूजारी रेणुका बैरागी रेणुका मातेच्या मंदिराबाबत एक अख्यायिका सांगतात की, ‘आंबेवणीपासून पुढे वरखेडा हे गाव लागते. या गावातील एक व्यक्ती वणी गावातील रेणूकेच्या दर्शनासाठी नेहमी जात असे. भक्ताच्या या भक्तीवर खूष होऊन एकदा देवी भक्तामागे वडखेडा गावाकडे निघाली. रस्त्यात भक्ताला जावणले की, आपल्यामागे कोणीतरी येत आहे. देवीनं भक्ताला सांगितलं की मी तुझ्यागावी येऊन राहणार आहे. मात्र भक्ताला काही विश्वास बसेना. आंबेवणी येथे भक्ताने अखेर मागेवळून पाहिले अन् देवी तेथेच थांबली.’ रेणुका देवी तेव्हापासून आंबेवणीच्या ग्रामदैवता असून, गुढीपाडव्याला गावात मोठी यात्रा भरते. पूर्वी यात्रेत बोहाड्याची सोंगे व्हायची; मात्र आता सोंगाचा कार्यक्रम होत नाही. गावात रेणुकामंदिरासमोर लाकडी बांधणीचे मारूती मंदिर आहे. याशिवाय गणपती मंदिर, शिवालय व पांडूरंग मंदिर आहे.
गावात वडजेंचे तीन वाडे व गायकवाडांचा एक वाडा आहे. गायकवाडांचा वाडा आता पूर्णपणे पडला असून, त्याची भिंत गावात ये-जा करणाऱ्यांना गावचा इतिहास सांगत असते. गायकवाडांचे कुटुंब गावात राहाते. तसेच वडजेंचे वाडे गावात आहेत. वडजेंचा वाडा नऊ खणी असून, वाडा संस्कृतीच्या सर्व खाणाखुणा या वाड्यात अनुभवायला मिळतात. धान्य साठवणीच्या वाड्याच्या भिंती रांजणांपासून वाड्यातील आड, चौक अन् दोन मजली वाड्यासाठीचे तीन जीने पाहण्यासारखे आहेत. वडजे मूळचे राजस्थानमधील चितोडचे. महाराणा प्रतापांनंतर ते धोडपजवळील वणी संगमनेर येथे आले. तेथून त्यांना आंबेवणीतील पाटीलकी मिळाली. वडजेंचे काही कुटुंब मडकेजांब येथे तर काही म्हसरूळ येथे स्थिरावली आहेत. वडजेंच्या अनेक नोंदी राजस्थानहून येणाऱ्या भाटांकडे मिळतात, असे सुरेश व गणेश वडजे सांगतात. गावात आजही लहान लहान वाडे अन् बाराबलुतेदारी या ग्रामसंस्कृतीच्या पाऊलखुणा पहायला मिळतात.
आंबेवणी पूर्वी प्रसिद्ध होते ते आंबे अन् डांगरांसाठी. आंबेवणीतील डांगर पखवाजाऐवढे मोठे असायचे. तसेच फ्लॉवर व कोबीसाठीही आंबेवणी प्रसिद्ध होते. आंबेवणीची भाजी मुंबईला जायची. मात्र आता ना आंबे मिळत ना डांगर. भाजीपाला शेतीही नावालाच होते. आता आंबेवणीकर द्राक्ष उत्पादक झाले आहेत. आंबेवणीने काळानुसार कात टाकली असली तरी वाड्यांच्या रूपाने व कर्दमाश्रमाच्या रूपाने आजही आंबेवणीचा साज कायम आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले आंबेवणी रखरखत्या उन्हात पाहण्याची मजाच काही औरच आहे.
बडोद्याच्या प्रधानाचे देवरगाव
बडोदा संस्थान म्हटलं की, नाशिकशी असलेल्या बडोद्याच्या ऋणानुबंधाची आठवण होते. त्यापूर्वीही नाशिकभूमीतील अनेक व्यक्तींनी आपले बौद्धिक प्राबल्य अनेक संस्थांनांवर गाजवले. म्हणूनच चांदवडच्या देवरगावचे नारायणभाऊ शिंदे यांची या संस्थानातील प्रधानपदाची कारकीर्द अन् त्यांचं गाव अनुभवणे अनोखे ठरते.
गुजरातमधील बडोदा संस्थान उभं राहण्यामागे अनोखा इतिहास दडला आहे. तो जाणून घेतल्याशिवाय देवरगावात (ता. चांदवड) प्रवेश करण्यात काहीच मजा नाही. गोष्ट आहे १७०५ सालातील. शाहू महाराजांचे तत्कालीन सेनापती खंडेराव दाभाडे यांनी नर्मदा ओलांडून मोगलांच्या दोन छावण्या उद्धवस्त केल्या. यात त्यांना सरदार दमाजीराव गायकवाड यांची मोठी मदत झाली. गायकवाड घराण्याचा मूळ पुरुष नंदाजीराव यांनी वाघाच्या तावडीतील एक गाय सोडवून आपल्या घराच्या कवाडाच्या आड सुरक्षित आणून ठेवली. म्हणून त्यांना गाय+कवाड = गायकवाड म्हटले जाऊ लागले. त्यांचे मूळ नाव मत्रे पुढे ते मंत्री झाले अन् त्यांना मंत्रीगायकवाड असेही म्हटले जाऊ लागले. दमाजीरावांनी १७३४मध्ये बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून स्थापन केले. बडोद्याच्या गादीवर अनेक राजे आले. अनेक कटकारस्थाने घडली यात महत्त्वाची भूमिका निभावली ती त्या-त्या वेळी संस्थानवर आलेल्या दिवाण म्हणजे प्रधानांनी. बडोदा संस्थानचे दिवाणपद रक्तरंजित, कटकारस्थानांनी अन् कुरघोड्यांनी बरबटलले होते.गायकवाड घराण्याचे पहिले दिवाण प्रभू रावजी आप्पाजी होते. रावजीच्या मृत्यूनंतर त्यांचा पुतण्या सीताराम रावजी दिवाण झाला. मात्र त्याचे इंग्रजांशी न पटल्याने इंग्रजांनी त्याला हकलून लावले अन् त्याच्या जागी त्याचा भाऊ बाबाजी रावजी दिवाण झाला. १८१० ला बाबाजीच्या मृत्यूनंतर बाबाजींचा मुलगा विठ्ठलराव भाऊ हा दिवाण झाला. दोन वर्षांनंतर त्यांची काठेवाड येथे बदली करून त्याच्या जागी गायकवाडांचे पुण्यातील वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन दिवाण झाले. मात्र त्यांचाही पुढे खून झाला. हा खून त्र्यंबक डेंगळेंनी केल्याची आवई इंग्रजांनी उठवली अन् पुढे पेशवाईचा अस्त झाला.
गंगाधरशास्त्रीनंतर बडोद्याची दिवाणगिरी त्यांच्या अल्पवयीन मुलाकडे सोपविण्यात आली. पण तो दुर्बळ ठरला. दिवाणगिरीसाठी सीताराम रावजी पुन्हा धडपडू लागला. इंग्रजांनी सीतारामला नजरकैदेत ठेवले. रावजी दिवाण नसले तरी त्यांच्या सल्ल्यानुसारच राज्य कारभार सुरू होता. हे इंग्रजांना खटकत होते. इंग्रजांनी राजे दुसरे सयाजीरावांना (१८१८-१८४७) सीतारामास दूर करून इतर कोणालाही दिवाण नेमण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यावर सयाजीरावांनी विठ्ठलराव देवाजी खासगीवाले यास आपले दिवाण नेमले. मात्र हा दिवाण राजद्रोह करीत असल्याचे सांगत राजांनी त्याला काढून टाकले. त्यानंतर दिवाण कोण असावा यावर बरीच खलबते रंगली. १८५६ मध्ये खंडेराव महाराज (१८५६-१८७०) बडोद्याच्या गादीवर आले. दरम्यानच्या काळात खंडेरावांचे दोन दिवाण सदाशिव ओझे व गोविंद रोडे यांचीही हकालपट्टी झाली होती. त्यामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील देवरगावचे नारायणभाऊ शिंदे बडोदा संस्थानचे प्रधान दिवाण झाले. नारायणभाऊ शिंदे हे चतुर दिवाण म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यानंतर संस्थानचे दिवाण म्हणून आलेल्या दादाभाई नौरोजींना देखील राजीनामा द्यावा लागला होता. बडोदा संस्थानचे नाशिकच्या कौळाणेचे तृतीय राजे सयाजीराव गायकवाड (१८७५-१९३९) गादीवर येईपर्यंत सर्वच दिवाणांची कारकीर्द वादग्रस्त अन् गूढ राहिली. यावरूनच राजे खंडेरावांच्या काळात दिवाण राहिलेले नाशिकच्या नारायणभाऊ शिंदेंची कारकीर्द जाणून घेणे व अन् त्यांच्या देवरगावची सफर अनोखी ठरते.
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडकडे जाताना शिरवाडे वणीपुढे धोतरखेडे व त्यानंतर महामार्गावर उजव्या हाताला खडकजांब गाव लागते. या गावातून देवरगावला जाण्यासाठी दहा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. पुढे खडक ओझर व गुऱ्हाळे गावातून देवरगावात जाता येते. हा रस्ता थोडा थकवणारा असला तरी देवरगावची ओढ कमी करीत नाही. शिवनदीच्या काठावर वसलेले हे गाव देवाने वरदान दिलेले गाव असल्याने त्याला देवरगाव असे म्हटले जाते, असे कचू शिंदे व साहेबराव शिंदे सांगतात. बाराबलुतेदारी पद्धतीच्या या गावाला एक वेस होती. देवरगावात प्रवेश करताना डाव्या हाताला झाडींचा पुंजका पहायला मिळतो. या पुंजक्यात देवरगावचे महादेव मंदिर वसले आहे. हे मंदिर गुजरात मंदिरशैलीतील खास बडोद्याची छाप असलेले आहे. मंदिरासमोर सभामंडपही होता तो कालांतराने पडल्याने ग्रामस्थांनी मंदिराच्या मूळ रचनेला स्पर्श न करता मंदिरापासून दहा फूटांवर नव्याने मंडप बांधला आहे. मंदिरात सहा पायऱ्या चढून वर जाताना अगदी समोर गर्भगृहाचे शिल्पांनी सजलेले प्रवेशद्वार मनमोहून घेते. पगडीफेटा घातलेले दोन पाहारेकरी अन् दगडावरील नाजूक नक्षीकाम, प्रवेशद्वारावरील शेषनागावरील विष्णू, वराह शिल्प व इतर लहान लहान मूर्तींचा सोहळा अनुभवण्यासारखा आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड आहे. मंदिराच्या चारही बाजूंना असलेले नक्षीकाम बडोद्याच्या मंदिरांची आठवण करून देतात. नाशिकमधील अशा शैलीतील एकमेव असे हे मंदिर नारायणभाऊ शिंदे यांनी उभारल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिवनदीत एक डोहही आहे. या डोहाबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. मात्र नदीला पाणी नसल्याने ही अख्यायिकाही आता विस्मरणात गेली आहे. नदीलगतच्या बटाई तिकोजी मळ्यात सातीआसरा आहेत. हा सोहळा अनुभवून समोरच्या पाराच्या मागील बाजूने गावात प्रवेश करताना एका उंच कौलारू इमारतीचे छत दर्शन द्यायला लागते. ते टोक नजरेत ठेऊन चालत गेल्यावर आपल्याला दगड व लोखंडी सळ्यांनी एखाद्या हवेलीभवती असलेले कंपाऊड लागते. नाशिकमधील वाड्यांभवती दगडी बांधणीचे तट असतात; मात्र नक्षीदार लोखंडी कंपाऊंड ही शैली देखील बडोद्याचीच. कंपाऊंडमधून आपले शरीर इतरांच्या नजरेत भरावे यासाठी एखादा साधू मांडी घालून तपश्चर्येला बसला आहे, असा विस्तार भाऊ शिंदेच्या हवेलीचा असल्याचे दिसते. या हवेलीला शिंदेवाडा म्हटले जाते.
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना दिसणारा दोन मजली शिंदेवाडा नऊ खणाचा आहे हे पाहिल्यापाहिल्या लक्षात येते. एखाद्या राजवाड्यासारखी दिसणारी हवेली बडोदा संस्थानचे दिवाण नारायणभाऊ शिंदे यांचे वंशज भाऊसाहेब शिंदे वाडा फिरवून दाखवितात. दोन चौकी वाडा, त्यातील खोल्या, प्रकाशयोजना, आड, सुसज्ज असे दरबार हॉल, ओसरी, गॅलरी तसेच दुर्मिळ वस्तू अन् वरच्या मजल्याच्या दरबार हॉलमधील २०० वर्षे जुन्या पेटिंग मंत्रमुग्ध करतात. चित्रांचा हा सोहळा म्हणजे त्यावेळच्या बडोदा संस्थानच्या लोकजीवनाचे प्रतिबिंबच असल्याचे अनुभवायला मिळते. हा वाडा नारायणभाऊंनी बांधल्याचे भाऊसाहेब शिंदे सांगतात. गावात शिंदेंनी आणखी एक वाडा बांधला होता. तो पसंत न पडल्याने नव्याने वाडा बांधण्यात आला. जुना वाडा आता अस्तत्विात नाही, असेही ते सांगतात. बडोद्यातील शिंदे कॉलनीतही शिंदे यांचा वाडा आहे. नारायणभाऊ शिंदे यांचा जन्म कुठला याचा उल्लेख इतिहासाच्या पानात सापडत नसला तरी ते ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी संबंधित असावेत, असे वंशज भाऊसाहेब शिंदे सांगतात. नारायणभाऊ शिंदेंना देवरगाव, नारायण टेंभी (निफाड) व संगमनेर येथील सायखेडी ही गावे जहागिरी मिळाली होती. तेव्हापासून ते येथे आले. १९१५ मध्ये बडोद्याचे सत्यजीत राजे देवरगावाला भेट देण्यासाठी आल्याचेही ते सांगतात.
बडोद्याच्या इतर प्रधानांप्रमाणेच नारायणभाऊ शिंदेंची दिवाणची कारकीर्दही वादग्रस्त राहिली आहे. १८५७ मध्ये महाराज खंडेराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर आले. त्यापूर्वीपासून असलेले सदाशिव ओझे व गोविंद रोडे यांची हकालपट्टी करीत खंडेरावांनी १८६८ मध्ये नारायणभाऊ शिंदेंची नेमणूक बडोद्याचे दिवाण म्हणून केली. नारायणभाऊ शिंदेच्या कारकीर्दचे उल्लेख दाजी नागेश आपटे यांनी १९३६ मध्ये लिहिलेला ‘श्री महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र खंड १ ला (इ.स. १८६३-१८८७)’ या दुर्मिळ ग्रंथातून अनुभवायला मिळतो. खंडेराव महाराजांना पुत्र नसल्यामुळे ते पुत्रप्राप्तीसाठी मुस्लिम फकीराच्या नादी लागले होते. या घडामोडींमध्ये नारायणभाऊ शिंदेंच्या चतुराईचा उल्लेख येतो. येथे शिंदेबद्दलच्या अनेक अख्यायिकांचे लेखकाने केलेले वर्णन शिंदेच्या चतुराईची उदाहरणे देताे. लेखक म्हणतो,‘चांगल्या वाईटगुणांचे त्यांच्यात विलक्षण मिश्रण होते म्हणून हा पुरूष गाजला. त्यांचा स्वभाव आनंदी व उदार होता. त्यांची दरबारात वागण्याची बोलण्याची पद्धत सर्वांवर प्रभाव टाकत असे. सर्वांचे स्वागत कसे करावे व मानपान कसा राखावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.
भाऊंना उत्तमोत्तम वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांचा डामडोल निराळाच होता. मात्र ते दिवाण झाल्यापासून त्यांची वागण्याची पद्धत बदलली. त्यांचे अनेक मित्र त्यांच्या दिवाणगिरी वागणुकीमुळे दुरावली होती. त्यांनी महाराजा खंडेरावांवर अशी काही मोहिनी टाकली होती की, सकाळी उठल्यावर खंडेराव भाऊंचे तोंड पाहत असत. शिंदे यांचे महाराजांच्यापदरी असलेले हे महत्त्वच त्यांच्या नाशालाही कारण ठरले.’ असे वर्णन या ग्रंथात केले आहे. १८६९मध्ये नारायणभाऊ शिंदे यांच्यावर अनेक आरोप ठेवत इंग्रजांच्या कुरघोडीने त्यांना बडतर्फ केले. त्यानंतरही ते खंडेरावांचे विश्वासू व्यक्ती होते. मात्र नारायणभाऊंना दिवाणगिरी मिळाल्यामुळे दुखावलेले बापूसाहेब निंबाळकरांनी बंडाळी केली होती. नारायणभाऊंना हटविल्याशिवाय गादी मिळणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली होती. दरम्यान, खंडेरावांचा लहान भाऊ मल्हाररावाने खंडेरावाचा हत्येचा कट केला. पण तो उधळला गेला. १८७० मध्ये इंग्लडचे युवराज मुंबईत आले होते. त्यांच्या भेटीसाठी महाराज खंडेराव गायकवाड यांनी दिवाण नसलेल्या माजी प्रधान नारायणभाऊंनाही सोबत घेऊन गेले होते. यावरून शिंदेच्या बडतर्फीनंतरही ते महाराजांच्या किती जवळ होते हे लक्षात येते. यावेळी मुंबईत गायकवाड राजांना पहायला जमलेल्या लोकांनी शिंदेना ‘भाजलेला इमाम’ असे म्हणून हिणवले. यावेळी झालेल्या अनेक वादांतून राजे इंग्लडच्या राजपुत्राला न भेटताच बडोद्याला परतले. या घटनेनंतर पाच सहा महिन्यांनी खंडेराव राजे यांचे निधन झाले. शिंदेंचा राजाश्रय संपुष्टात आला. त्यानंतर निंबाजीदादा ढवळे दिवाण झाले, तर मल्हारराव गायकवाड राजे झाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या गाडीत नारायणभाऊ शिंदे यांना सोबत घेतले अन् आपल्या संस्थानात फिरविले. शिंदेंशी वैर असलेल्या राजांना पाहून संस्थानातील जनता आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर शिंदेंवर खटला चालविण्यात आला अन् त्यांना भरचौकात शिक्षा देण्यात आली. त्यानंतर कैदेत असताना त्यांचा २ मे १८७२ रोजी मृत्यू झाला. बडोद्याच्या प्रधानाच्या कारकीर्दचा एक अध्याय नारायणभाऊ शिंदे यांच्या रूपाने संपला. त्यांच्या पत्नी गंगूबाई नारायण शिंदे व इतर कुटुंबीय तेव्हापासून देवरगावातच राहू लागले. देवरगावच्या या वाड्यात शिंदेंचे वंशज राहतात. नारायणभाऊंची ही कारकीर्द अंगावर काटा आणते. त्यांचा वाडा मात्र मनाला शांतता देतो. त्यांच्या आठवणी या वाड्याच्या रूपाने आजही येथे अनुभवायला मिळतात. नारायणभाऊंची आवडनिवडही या वाड्यातील वस्तू व वाड्याच्या कामावरून अनुभवायला मिळते.
नारायणभाऊंच्या आठवणी मनात साठवत गावाची सफर पुन्हा सुरू होते. गावातील शनी मंदिराजवळ अहिल्याबाईकालीन बारव आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. तिचे पुनरुज्जीवन केले तर तिच्या पाण्याचा वापर गावाला होऊ शकतो. हनुमान मंदिर, विठ्ठलमंदिर तसेच इतरही लहान मोठी मंदिरे आहेत. यात श्रीक्षेत्र देवरगाव हे हरेकृष्ण महाराजांचे समाधिस्थळ व मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कार्तिकी एकादशीला प्रतिपंढरपूर म्हणून तालुक्यातून भक्तांची गर्दी होत असते. यानिमित्त देवरगाव ते चांदवड महारथ यात्रेचे आयोजन केले जाते. रथातून योगीराज हरेकृष्ण बाबांचा मुखवटा व पादुका श्रीक्षेत्र चांदवड येथे अर्धपीठ आदिमाया श्री रेणुकादेवीच्या भेटीस आणल्या जातात. विंचूबाबा, हरिकृष्णबाबानंतर योगीराज पिठाधीश सुजित महाराज गावातील आध्यात्मिक परंपरा पुढे घेऊन जात आहेत. देवरगावचे वेगळेपण नारायणभाऊ शिंदे यांचा वाडा व महादेव मंदिराच्या रूपाने आजही अनुभवता येतो. नाशिकच्या भूमित अनेक माणसं घडली अन् इतिहासाच्या पडद्याआड गेली असली तरी त्यांच्या आठवणी मात्र इतिहास बनून आजही अनुभवता येतात. हे देवरगावचे मुख्य वैशिष्ट्य.
देवठाण : मंदिरांचा आत्मा
प्रत्येक मंदिराच्या निर्मिती मागील उद्देश देव, भक्त आणि भक्तिबरोबरच त्या गावाला एकत्रित ठेवणे हाही असतो. मंदिर ही संकल्पना आकाराला येत असताना देवाचं ठाणं म्हणजेच देवघर! फक्त मंदिर म्हणून नव्हे तर सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असल्याची साक्ष येवल्याचे देवठाण गाव देतं. म्हणूनच शिल्पसौंदर्यानं नटलेलं देवठाणचं हेमाडपंती मंदिर हे मंदिरांचा आत्मा वाटू लागतो.
माणूस निसर्गपूजकाकडून मूर्तीपूजक कधी झाला हा प्रवासही रम्य तितकाच गूढ आहे. त्रिरश्मी डोंगरावरील पांडव (बौद्ध) लेणीचे उदाहरण पाहिले तर पूर्वीचे राजे बौद्ध भिक्षुकांना दान द्यायचे. या दानातून बौद्ध भिक्षुक पूजापाठासाठी तसेच पावसापासून रक्षण होण्यासाठी लेणी खोदून (कोरून) घ्यायचे. दोन हजार वर्षांपूर्वी दिसणारी बौद्ध लेणी खोदण्याची परंपरा सातव्या आठव्या शतकानंतर बंद झाली. त्यानंतर जैन व हिंदू धर्मियांना राजाश्रय मिळाल्याने त्या लेणींची निर्मिती झालेली दिसते. कलचुरींच्या नंतर राष्ट्रकूट राजघराण्याचा अंमल महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशावर सुरू झाला. राजघराण्यात हिंदू धर्माला अधिक उत्तेजन दिले जाऊ लागले. या काळात लेणींबरोबरच पहिल्यांदा बांधीव मंदिरांनाही प्रोत्साहन मिळू लागले अन् लेणी युग मागे पडून मंदिर युगाला सुरूवात झाली. मात्र उद्देश बदलला नाही. लेणी ही जशी आश्रय अन् पूजापाठाची जागा होती तशीच मंदिरंदेखील होती. बहुतेक, माणूस याच काळात मूर्तीपूजक झाला असावा. मात्र ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात मूर्तीचे उल्लेख येतात. देवालय म्हणजे मानवी शरीर, शिखर म्हणजे शिर, त्याखाली बेकी म्हणजे मान, मग स्कंध, गाभारा म्हणजे ह्दय, मग मंडोवर म्हणजे छाती, पोट हा भाग, कटिभाग म्हणजे जंघा इत्यादीचा उल्लेख अग्निपुराणातही येतो. या आधारेच मंदिर या वास्तूची संकल्पना उभी राहिली. एखादे मंदिर कसे पहावे अन् अनुभवावे हे देखील ही मंदिराची रचना आपल्याला शिकवते. मूर्ती नसलेली मंदिरे ही लेणीनंतर साकारलेल्या गेलेल्या मंदिरांची स्थितीही सुरूवातीला मठ या परिभाषेला पुढे घेऊन जाणारी असावी. भाविकांसाठी आश्रयाचे ठिकाण, त्या-त्या गावातील बाजारपेठेचे ठिकाण, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळींचे ठिकाण म्हणूनही मंदिर संकल्पना अधिक उपयोगी ठरली असावी. लग्न, मुंज, कौंटुंबिक कार्यक्रम तसेच कीर्तने, चर्चा, ग्रामसभा भरविण्याचे ठिकाण म्हणूनही भव्यदिव्य मंदिरासारख्या दिसणाऱ्या मात्र मूर्ती नसलेल्या वास्तूंची निर्मिती झाली असावी. नाशिकचे सौभाग्य असे की, नांदूरमध्यमेश्वर येथील खानगाव थडी, चांदोरी रस्त्यावरील ओढा गावातील तातोबा मंदिर व येवल्यातील देवठाण येथील मंदिर नाशिकच्या मठ संस्कृतीची प्रतीके अजूनही पहायला मिळतात. देवठाणचे हेमाडपंती मंदिर पाहतांना धर्मभावना बाजूला ठेऊन मंदिर रचना, स्थापत्य अन् त्याचा हेतू या अंगाने या वास्तूकडे पाहिले तर त्यावेळचे ग्रामजीवन आपल्या डोळ्यासमोर नांदताना दिसते. कारण देवठाणचे मंदिरही मंदिराच्या उत्क्रांतीच्या क्षणाला म्हणजे साधारण इ.स. ८५० ते १०६० या काळात साकारले गेल्याचा दावा केंद्रीय पुरातत्त्व विभाग करतो.
गाव ही संकल्पना अस्तित्वात आली तसे तिचे अनेक पैंलूही निर्माण झाले. मौजे आणि कसबा, बुद्रूक आणि खूर्द. व्यापार, हुन्नर व कसबी मजुरी करणारे लोक मौजेपेक्षा कसब्यात अधिक असतात आणि कसब्याखाली वाड्याही जास्त असतात. कसब्याचे गाव मौजेपेक्षा जास्त विस्तृत, चव्हाट्याचे, रोजगारी व संपन्न असते. तसेच खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हा खेडूंची जी वस्ती ते खेडे. तर ठाण म्हणजे व्यापारी, बाजारपेठेचे ठिकाण, श्रीमतांची वस्ती म्हणजे ठाणं. बुद्रक म्हणजे थोरला, वयस्कर, मोठा तर खूर्द म्हणजे खूर्दा, चिल्लर, किरकोळ अथवा लहान. जमीनदार, मालदार, मोठे लोक कसबे, बुद्रुक व ठाणं मध्ये निवासाला असत. त्यांचे कामगार मजूर अन्य मौजे, खुर्द वा खेड्यात राहत. पूर्वी ही वर्गव्यवस्था होती. दोन्ही वस्त्यांमध्ये थोडे अंतर असे एखादा रस्ता, नाला वा नदी अशी सीमा असे. जसे देवठाण व भायखेडे यांच्यामध्ये नदी आहे. तशीच ठाणं ही संकल्पना आजही वापरात आहे; मात्र आज तिला गाव म्हटले जात नाही. एखाद्या देवतेचं ठाण, पीराचं ठाण म्हणून आपण त्या ठिकाणांचा उल्लेख करतो. तसेच देवनदीच्या कुशीत वसलेलं देवाचं ठिकाण म्हणूनही देवठाण असे या गावाला नाव पडले असावे, असे कैलासराव डुमरे सांगतात. म्हणूनच देवठाणचा प्रवास अनेक अंगांनी पडलेल्या प्रश्नांची कोडी उलगडतो. नाशिकहून येवला अन् येवल्यातून औरंगाबाद महामार्गावर साधारण २० किलोमीटर गेल्यावर औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीवर देवठाण गाव देव नदीच्या किनारी वसले आहे. महामार्गावरून जाताना देवठाणचा फलक लागेल व गाव दिसेल अशी अपेक्षा न केलेलीच बरी. कारण फलक शोधता शोधता आपण वैजापूर हद्दीत कधी दाखल होतो हे लक्षातही येत नाही. त्यामुळे विचारत विचारतच जाणे योग्य. एका मोडकळीस आलेल्या बसस्टॉप व लहानशा चौफुलीवरून डाव्या हाताने दोन किलोमीटर आत जाताना भासणारा ओसाड परिसर खिन्न करतो. दहा मिनिटांच्या सुनसान प्रवासानंतर पन्नासएक घरांचे लहानशे गाव लागते. गावात प्रवेश करताना डाव्या हाताला एक लहानशे मंदिर आपले स्वागत करते. गावात गेल्यावर दगडी बांधणीच्या दोन घरांच्या मधून एक रस्ता देवठाणच्या महादेव मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो. येथेच पूर्वी वेस होती. मात्र आता ती कोसळल्याने तिचे अस्तित्व दिसत नाही. वेशीतून आत गेल्यावर एका लहानशा टेकडावर चौकोनी आकाराचे मंदिर इतर मंदिरापेक्षा वेगळ्यापद्धतीने साकारलेले पहायला मिळते. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाने २५ सप्टेंबर १९१५ रोजी संरक्षित केली. त्यांच्याकडून होत असलेल्या देखभालीमुळे मंदिराभोवती कंपाऊंड अन् परिसर स्वच्छ दिसतो.
वीसएक पायऱ्या चढून गेल्यावर मंदिरात प्रवेश करताना मन जसे शांत होते तसे या मंदिराच्या आवारात आल्यावर होते. मंदिराचा समोरचा सभामंडपाचा शिल्लक भाग सध्या अठरा खांबांवर उभा आहे. येथे जाण्यासाठी पाच पायऱ्या चढाव्या लागतात म्हणजे आपल्यातील अहंकार, मत्सर, लोभ, मोह अन् आपल्यातील आपण या पायऱ्यांवर ठेऊन समामंडपात प्रवेश करायचा. पायऱ्यांना लागून असलेल्या पहिल्याच स्तंभावर आपल्याकडे पाहत असलेली नाजूक कोरीव कामाने नटलेली नर्तिकेची मूर्ती आपल्या एका हाताचे बोट ओठांवर ठेऊन फक्त शांत राहून मंदिराचा अनुभव घ्या, असे सांगताना दिसते. तर तिच्या शेजारी चांगल्या गोष्टींची सुरूवात आपण ज्याने करतो, असा श्रीगणेश खांबावरील मनोहारी रूपाने आपल्या मनात उरलासुरला मळभ गळून पडतो. मंडपातील खांबांवरील शिल्पवैभव समोरासमोर सजलेल्या दोन देवळ्या व त्यावरील नक्षीकाम तसेच नर्तिकी अन् हत्तींचा नक्षीकामातील वापर आपल्याला मोहात पाडतो. अदभूत सुंदर नक्षीकाम व स्त्रीसौंदर्याने सजलेल्या मूर्तींचा सोहळा द्वारशाखेवर बहरलेला दिसतो. ही द्वारशाखा आपल्याला गर्भगृहात खेचून नेते. या हेमाडपंती मंदिरातील हा गर्भगृह म्हणजे खरे तर सभामंडप आहे. हा सभामंडप पंचवीसहून अधिक खांबांनी पेलला आहे. आयताकृती छत सपाट आहे. येथे फक्त दरवाज्याच्या अगदी समोर एक लहानशी देवळी आहे याशिवाय आत काहीच नाही. मात्र शांत उभे राहिल्यावर देवळीसमोर एखादा प्रगाढ बुद्धिवंत खांबांचा आधार बसलेल्या दहा-वीस शिष्यांना धर्म अन् मानवजातीच्या उधारासाठी मार्गदर्शन करतोय, असे वाटायला लागते. आतील खांब गोल, चौकोनी आकाराचे मिश्र आहेत व त्याच्या वरच्या बाजूला उलट्या नागाचा फणा आहे. आतील नीरव शांतता अनुभवून शेजारच्या छोट्या मंदिरात यावे. ही खोली मंदिराचा गाभारा असल्यासारखे वाटते. येथे पूर्वी महादेवाची पिंड होती, असे जगन खिल्लारे सांगतात. सध्या येथे पिंड नाही. मंदिराच्या गर्भग्रहाच्या छतावर कमळाच्या फुलांची नक्षी आहे. मंदिराला ग्रामस्थ शिवमंदिर मानतात. मात्र हा भुयाराचा मार्ग होता. तो आता बंद करण्यात आला आहे. येथून अंकाई किल्ल्यावर तर देवनदीकडे निघता येत होते, असे ग्रामस्थ सांगतात. हे बदल कालांतराने झाले असावेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागही मंदिर शिवमंदिर असल्याचे न म्हणता हिंदू मंदिर अशी नोंद केलेली दिसते. मंदिराला शिखर नाही. शिखरावर गेल्यावर मंदिरातील आतील रचनाही वरून पाहता येते. तसेच पावसाचे पाणी छतावर साठून राहू नये म्हणूनही हेमाद्रीने याचा विचार केल्याचे दिसते. मंदिराच्या तीन बाजू सपाट दगडाच्या आहेत त्यावर हलके नक्षीकाम केलेले दिसते. कालांतराच्या पाऊसपाण्याने ही नक्षीपुसट झाली आहे. या मंदिराभोवती कोट असल्याचे पहायला मिळते. मंदिराच्या कोटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन खांबांचे अवशेष पडलेले दिसतात. यावरून कोटाचा दरवाजाही सुंदर असेल याची कल्पना येते. त्यामुळे अपसूकच त्या अज्ञात कलाकारांचे कौतुक करावेसे वाटते. येथून अजिंठा, वेरूळ जवळच असल्याने मंदिर ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात यायला सुरूवात झाली होती. त्या पहिल्या टप्प्यातील ही वास्तू घडविली गेली असेल, असे वाटते. डोळ्यांचे पारणे फेडणारे शिल्पसौंदर्य अन् वास्तूरचना अनुभवली म्हणजे देवठाणचा प्रवास संपला असे नाही. तर जगन खिल्लारे हे गावातील एक ज्येष्ठ आपल्याला मंदिराबरोबरच गावचीही सफर घडवून आणतात. कधी देवठाण पहायला गेलात, तर एखाद्या गाईडप्रमाणे ते आपलं गाव आपुलकीनं सर्वांना दाखविताना दिसतात.
देवठाणच्या हेमाडपंती मंदिराच्या टेकडावरून गावाकडे पाहिले, की समोर देवनदी व त्याअवतीभवती वसलेले देवठाण आता अगदी लहान वाटतं. पण तेव्हा देवठाण हे बाजारपेठेचे ठिकाण होतं. कारण पूर्वी देवठाणच्या बाजारपेठेत घोड्यांची खरेदीविक्री मोठ्या प्रमाणात चालत असल्याने देवठाणला ‘घोड्यांचं देवठाण’ म्हटले जायचे, अशी नोंदही पुरातत्त्व खात्याकडे असल्याचे कैलासराव डुमरे सांगतात. बाराबलुतेदारांचं हे गाव आजूबाजूच्या गावांसाठी त्यावेळी आर्थिक राजधानी असणार; मात्र कालांतराने सर्वकाही बदललं. या छोट्या गावात हनुमान, खंडोबा, देवीचे मंदिर, बिरोबा व विठ्ठल-रुक्माईचे मंदिर आहे. विठ्ठल मंदिर व्यापारी कुटूंब आट्टल यांनी बांधून दिले आहे, असे गंगूबाई जानराव सांगतात. येथे एका महाराजांची मूर्ती व समाधीही आहे. ही वास्तू वाड्याची आठवण करून देते. गावात जैन समाजही पूर्वी होता. आता त्यांची जुनी घरे पहायला मिळतात. खंडोबा मंदिर हेदेखील गावचे एक वेगळेपण आहे. खंडोबा मंदिराला कोट आहे. कोटाला सुंदर दगडी प्रवेशद्वार, मंदिरात मुख्य खंडोबा मंदिर असून, मंदिरात एका दगडावर खंडोबा व त्याच्या आजूबाजूला दोन मूर्ती आहेत, असे पुजारी नाना बोठे सांगतात. मंदिराच्या आवारात समाधी व समोर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ व पिंड, लहान मोठ्या मूर्ती व वीरगळी आहेत. गोल आकाराच्या दीपमाळेच्या वास्तूत टोकापर्यंत जाता येते. दीपमाळेमागे सहा खांबावर आधारलेली
सहा कमानींची देखणी दगडी लहानशी वास्तू आहे. जवळच गोल आकारातील अवाढव्य चुन्याच्या घाण्याचा मोठा दगड पाहिला की, दगडाच्या वास्तू कशा साकारल्या असतील याची लगबग डोळ्यापुढे दृष्य बनून दिसू लागतात. गावात दगडी बांधणीची बारवही होती; मात्र ती बुजली आहे. ही बारव पुन्हा मोकळी करून गावाला तिच्या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गावात लक्ष्मीची यात्रा होते. पूर्वी यात्रेत सोंगांचा कार्यक्रम व्हायचा. मात्र सोंग नाचविणे आता बंद झाले असून, यात्रेत आता तमाशा होतो. गावात मल्लांची देखील परंपरा होती. मात्र आता तीही नाही. हेमाडपंती मंदिरामुळे सुंदर भासणारं गाव हीच गावची मुख्य ओळख सध्या आहे.
लेणीकडून मंदिराच्या दिशेने आकाराला आलेला काळ, मठ परंपरा, मंदिराचा उद्देश अन् नंतरच्या काळात बदलत गेलेली मंदिरे अन् त्यांचा उद्देश यासर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर देवठाण पहायलाच हवं. शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले देवठाण आपल्याला एका दिवसाच्या या सहलीत हजार वर्षांचा प्रवास घडवितो, हे काही कमी नाही.
कसे जावे?
नाशिकहून औरंगाबाद एसटीने गेल्यास देवठाण चौफुलीवर उतरून दोन किलोमीटर चालत जावे लागते.
काय पहावे?
देवठाण येथील हेमाडपंती मंदिर मुख्य आकर्षण आहे.
खंडोबा मंदिर व तेथील दीपमाठ आकर्षक आहे.
खासगी गाडी असल्यास देवठाण बरोबरच येवला व चिचोंडीची सफरही करता येईल.
सातवाहनांचं सातपूर
अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन् त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरेकडून आलेले परकीय क्षहरात घराण्यातील भूपक आणि नहपान या क्षत्रपांनी शिवस्वातीवर आक्रमणे करून महाराष्ट्र ताब्यात घेतला अन् महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले परकीय घराणे ठरले. नाशिक-जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. भूपक क्षत्रपानंतर नहपानाच्या हातात सत्ता एकवटली. दरम्यान, क्षत्रपांनी सातवाहनांना नाशिक परिसरातून हुसकावून लावले व सातवाहन पैठणला वसले. सातवाहन घराण्यातील गौतमीमीपुत्र सातकर्णीने अथक प्रयत्नांनंतर नहपान या क्षत्रपावर नाशिक येथे पूर्ण तयारीनिशी युद्ध केले अन् या युद्धात विजय मिळवित महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र केला. हे युद्ध अतिसंहारक असल्याच्या नोंदी पांडवलेणीतील (त्रिरश्मी लेणी) शिलालेखात मिळतात. सातकर्णीने नाशिकमध्ये नहपानाच्या सैन्यावर मात केली. नहपान युद्ध भूमीतून सह्याद्री पर्वतात आश्रयाला गेला. सातकर्णीने त्याचा पाठलाग करून नहपानाचा समूळ उच्छेद केला. पांडवलेणीतील शिलालेखात याचा उल्लेख ‘क्षहरात वंश निर्वंश करस’ म्हणजेच ‘नहपान क्षत्रपाचे क्षहरात घराणे नष्ट करणारा’ असा केला आहे. सातवाहनाने महाराष्ट्र राज्यलक्ष्मी त्यांच्याकडे खेचून आणली. या काळात गौतमीपुत्र सातकर्णी इतका बलाढ्य राजा भारतात अन्य नव्हता म्हणून त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले होते, असे गौरोवोद्गार पांडवलेणीतील शिलालेखात आहेत. तर या युद्धाचे वर्णन भद्रबाहू या जैन साधूच्या ग्रंथातही आढळते. इ. स. ७८ मध्ये झालेले हे युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्यसमरच ठरले. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव सातवाहनांनी गुढ्या उभारून साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे इतिहास अभ्यासक मानतात. हा पराक्रम नाशिकमध्ये घडल्याने हा सण नाशिकनेच जगाला दिला, असे म्हणायलाही हरकत नाही. सातवाहनांनी चार शतकांहून अधिककाळ महाराष्ट्रावर राज्य करीत समृद्धीचा सुवर्णकाळ दाखविला. याच काळात सातवाहन व क्षत्रपांनी पांडवलेणी (त्रिरश्मीलेणी) खोदण्यासाठी दाने दिली. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोवर्धन (गोवर्धन गंगापूर) येथे व्यापाऱ्यांचे संघ स्थापन झाले होते. सातवाहनांच्या या इतिहासाची छाप जशी लेणीतील शिलालेखांतून उमटली आहे तशीच गुढीपाडवा सणामुळे गेल्या दोन हजार वर्षापासून हा अज्ञात इतिहास घराघरात बहरताना दिसतो. त्यातच सातवाहनांची वसाहत असलेल्या सातपूरलाही गुढीपाडव्यांलाच यात्रा भरते. ही परंपरा दोन हजार वर्षांपासून चालत आली असावी, असे सातवाहनांचा पराक्रम सांगून जातो.
औद्योगिक वसाहतीमुळे सातपूर आता नाशिक शहराचे एक महत्त्वाचे उपनगर बनले आहे. पूर्वी ते सातवाहन या भारतातील एका बलाढ्य राजाची वसाहत होते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही अन् ते साहजिकही आहे. पण दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास अन् त्या इतिहासाचा घटनाक्रम आपल्याला सातपूर या नावामागील कथा उलगडून सांगतो. सातपूरमध्ये उत्खननात (खोदकामात) सातवाहनकालीन हत्यारांचे अवशेष मिळाले आहेत. तांबड्या रंगांची हत्यारांची पाती पाहताना त्यावेळी घडलेले युद्ध डोळ्यासमोर उभी राहतात. या हत्यारांचे अवशेष त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाणे संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच या परिसरात सातवाहन राहत असावेत म्हणून गावाला सातपूर नाव पडले असावे, याला बळ मिळते. सातपूरचे पूर्वीचे नाव सतीपूर होते, असे सांगताना ग्रामस्थ एक अख्यायिका सांगतात. श्रीराम या परिसरात अग्नियज्ञ करत होते. यावेळी पार्वती सीतेचे रूप घेत यज्ञस्थळी श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी आली. मात्र श्रीरामाने महादेवाच्या पार्वतीला ओळखले व माता तू येथेच थांब, अशी विनंती केली. तेव्हा पार्वतीने नंदिनी नदीच्या (आताची नासर्डी) रूपात येथेच राहील, असे सांगितले. तेव्हापासून सातपूरला सतीपूर असे नाव पडले व नंदिनी या सतीपूरातून वाहते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीपूर या गावाचे नाव मुगलांच्या काळात सय्यदपूरही झाले अन् पेशवाईत सातपूर असेही ग्रामस्थ सांगतात. सय्यदपूरचे सातपूर होण्यामागेही राजेबहाद्दर नारोशंकरांच्या पराक्रमाची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
त्र्यंबकरस्त्यालगत अन् नंदिनीच्या कुशीत वसलेल्या सातपूरच्या मुख्य बाजार रस्त्याने या उपनगरात प्रवेश करताना डाव्या हाताला समोर हनुमानाचे मंदिर लागते. तीन मजली दिसणारे हे हनुमानाचे मंदिर पूर्वी सातपूर गावच्या वेशीबाहेर होते अन् त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी पडावाचे ठिकाण असे. मंदिरासमोर सातपूर गावची वेस होती. आज ती नाही. मात्र तिच्या आठवणी ज्येष्ठांच्या मनात दिसतात. वेशीतून आत गेल्यावर सातपूर गावात अजूनही दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचे वाडे असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण सोनवणे वाडा, जैन वाडा, भंदूरेंचा वाडा, निगळांचा वाडा, बंदावणे वाडा अशी काही उदाहरणे पहायला मिळतात. हे वैभव अनुभवून पुन्हा हनुमान मंदिराकडे यायचे अन् हनुमान मंदिरासमोरून उजव्या हाताने माळी गल्ली, बंदावणे गल्ली, निगळ गल्लीतील जुनी घरे व काही शिल्लक राहिलेले लहान लहान वाडे पाहत स्वारबाबा नगरमधील अग्निमंदिरापर्यंत जायचे. अग्निमंदिरात अरविंद पतंगे अग्निपूजेबद्दल माहिती देताना दंग होऊन जातात. ‘पूर्वी सातपूर गावात कोण आलं तरी कळायचं, आता हे गाव शहर झालं आहे. कोण येत जातं यावर आता नियंत्रण नाही,’ असे सातपूरच्या बदलेल्या स्वरूपाबद्दल दत्तू पंढरीनाथ मौले तळमळीने सांगतात. ‘आम्ही काशीमाळी मध्य प्रदेशातून सातपूरमध्ये आलो. याला आता दोनशे-तीनशे वर्षे झाली असतील. सातपूर पूर्वी नजरेत भरावं एवढं गावासारखं होतं.’ असेही मौले आवर्जून सांगतात.
सातपूरला निगळांचं सरदार घराणंही लाभलं आहे. निगळांचा बाराशे सालापासूनचा वंशवृक्ष राजस्थानच्या भाटांकडे नोंदविलेला दिसतो. ‘राजस्थानातील प्रतापगडचे निगळ औरंगाबादच्या देवगिरीची लढाई लढले. ही लढाई जिंकल्याने त्यांना नारायणगावची जहागिरीत पाटीलकी मिळाली. तेथून १३३५ मध्ये पुण्यातील ओडेगावी आले. तेथे निगळांनी मोठा गढीवजा वाडाही बांधला. मुगलांच्या त्रासापासून धर्म वाचविण्यासाठी निगळ परिवार १५०५ मध्ये कोकणात स्थिरावले. तेथून पेशवाईत महादुपा या एका भावाला ओझाची तर तुकाराम या दुसऱ्या भावाला सातपूरची पाटीलकी मिळाली. तुकाराम निगळ १७०७ मध्ये सातपूरला आले.’ असे शांताराम निगळ भाटांकडील नोंदीच्या आधारे सांगतात. तर ‘भंदुरे कुटुंब राजस्थानातून काशीला आले व तेथून ते जलालपूर येथे शेती व्यवसायात स्थिरावले. भंदुरेनंतरच्या काळात जलालपूरहून सातपूरला स्थिरावले. भंदूरेंचे दोनशे-तीनशे वर्षापूर्वीचे दोन जुने वाडे या इतिहासाची साक्ष आजही देतात,’ असे डॉ. झुंबर भंदुरे सांगतात. गावातील अनेक कुटुंबांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातपूरची ग्रामदेवता सप्तशृंगी माता आहे. तिला भवानी माताही म्हटले जाते. मातेचे मंदिर औद्योगिक वसाहतीतील एका टेकडावर वसले आहे. हे मंदिर व वणीचे सप्तशृंगी मंदिर समोरासमोर असल्याचे दिसते. अग्नि मंदिर, गणेश मंदिरातील गणपतीची शिळा व बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहून मरीमाता मंदिराकडे जायचे तेथून पुन्हा निगळगल्ली, बंदावणे गल्ली व माळी गल्लीतून हनुमान मंदिर व शेजारचे खंडोबा मंदिर पहायचे. हनुमान मंदिराशेजारी पूर्वी तालीम होती. ती आता नाही. मंदिरातून तालमीत जाणारा दरवाजा मात्र अजूनही तालमीची आठवण करून देतो. मंदिरातील पुजेचा मान असलेल्या यमुनाबाई पोटींदे या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला शुभआशीर्वाद देताना दिसतात. त्यानंतर दुर्गामाता मंदिर, सातपूरचा बाजार, बाजारामागील सप्तशृंगीचे छोटेखानी मंदिर, राममंदिर व पूर्वी घाटावर असलेले महादेव मंदिर दगडी बांधणीचे आहे. नंदिनीला पूर्वी सुंदर घाट होता. याच घाटावर महादेव मंदिर होते. येथे पूर्वी दशक्रियाविधी देखील व्हायचे. मात्र आता नंदिनीचा नासर्डी नाला झाल्याने घाट हरविला आहे. महादेव मंदिर पाहून नंदिनी अनुभवली की पूर्वी नंदिनी किती सुंदर असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. १९५० पर्यंत सातपूरचे ग्रामस्थ नंदिनीचे पाणी पिण्यासाठी वापरायचे, असे शांताराम निगळ सांगतात. जवळच बंद पडलेली शिवटॉकीज आहे. तेथून भवानी मातेच्या मंदिरात जाता येते. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे देवीची चिरा आहे तर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात अनेक वीरगळी पहायला मिळतात. तेथून आई गडदवणी माता मंदिर व पीरबाबांचे ठाणेपाहून सातपूर रस्त्यातील वेताळ मंदिरातील लाकडी मुखवटे सातपूर गावात पूर्वी बोहाड्यांच्या सोंगांचा उत्सव होत असल्याचा इतिहास सांगतात. बोहाडे आता होत नाहीत. मात्र सातवाहनांनी याच गावातून सुरू केलेला गुढीपाडवा उत्सव ग्रामस्थ आजही जल्लोषात साजरा करतात. सातपूरकर दरवर्षी गुढीपाडव्याला भवानी मातेचा उत्सव व बारागाड्या ओढण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात. बारागाड्या ओढणाऱ्याला गणेशा म्हटले जाते. मानपान ठरलेल्या कुटुंबातील पुरूषाला म्हणजेच गणेशाला साडी, चोळी, पीतांबर फेटा हातात तलवार अशी पारंपरीक वेशभूषा केली जाते. त्यानंतर गणेशाला गावातून मिरवले जाते व दारोदारी सुवासिनी गणेशाचे औक्षण करतात. सर्व मंदिरांमध्ये गणेशा दर्शन देवतांचे पूजन करीत सप्तशृंगी माता मंदिरातून गणेशा बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी येतो. गणेशा बारागाड्यांना प्रदक्षिणा घालतो व बारागाड्या ओढतो. गणेशाची मिरवणूक गावातील पीराला नेवैद्य दाखवून संपते. बारागाड्यांचा सोहळा, पोळा, होळी व निवृत्ती महाराजांची पालखी असे सातपूरचे मुख्य सोहळ्यांचा मानपान ग्रामस्थ एकत्रित येऊन ठरवितात. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, मौले आदी कुटुंबांचा व ग्रामस्थांचा गावातील उत्सवांमधील सहभाग सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवितो, असे डॉ. झुंबर भंदुरे व शांताराम निगळ सांगतात.
सातपूरमध्ये १९४६ पर्यंत इंग्रजांची निग्रोंच्या पलटनीचा कॅम्प होता. याच्या खाणाखुणा अजूनही सातपूरमधील पपया नर्सरी चौकात इंग्रजांनी बांधलेल्या बराकीच्या माध्यमातून पहायला मिळतात. या बराकींचा आता कार्यालयासाठी खुबीने वापर केलेला दिसतो. हा कॅम्प त्यानंतर देवळालीत वसला. त्यानंतर १९६१ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत आली अन् सातपूरचे गावपण शहराकडे वळले. मात्र सातपूरने वेगवेगळ्या उत्सव आणि सुप्तगुणांतून दोन हजार वर्षांपासूनचा जपलेला इतिहास थक्क करतो. म्हणूनच सातवाहनांचे सातपूर पाहताना दोन हजार वर्ष मागे गेल्यासारखे वाटायला लागते. असं काही सातपूरमध्ये अनुभवयाला मिळेल, ही कल्पना मात्र नक्कीच कोणी केली नसणार!
सरदारांचं कोटमगाव
नाशिकला एक फार मोठे अवलिया होऊन गेले. आपल्याकडे कुणीआल्यास त्याने पहिल्या पायरीवर पाय ठेवला की कोण आले ते त्यांना ज्ञात होत असे. नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले हे त्यांचे नाव. मूळ नाव वेगळे. परंतु, नंतर याच नावाने त्यांनी कार्य केले. अवलियांमध्ये एखादाच असा असतो की समाजाचे भान, व्यवहाराचे ज्ञान आणि आध्यात्मिकता याची सांगड घालून तो पुढे जातो, पिठले महाराज त्यापैकीच एक होते.
अगदी दोन हजार वर्षांपासून भारतावर होत आलेल्या अनेक आक्रमणांनी भूमिपुत्रांच्या पायाखालची पायभूमी हिसकावली. हा भूमिपुत्र स्थलांतरीत झाला अन् मग मिळेल तिथे आपला स्वत:चा इतिहास निर्माण करण्यासाठी धडपडू लागला. ही धडपड साधीसुधी नव्हती, तर अनेक पिढ्यांच्या कष्टानंतर दाखवलेल्या शौर्यातून त्याला एखाद्या परगण्यात जहागिरी अथवा वतनदारी मिळाली अन् तो योद्धा स्थिरावला. नाशिकची अनेक घराणी हीच कथा मांडताना आपल्या शौर्यगाथा व्यक्त करताना दिसतात. काळ मात्र बदलत असतो, तो ना कोणासाठी थांबतो ना, पुन्हा तोच काळ परत देतो. बदलत्या परिस्थितीशी प्रत्येकाचं युद्ध सुरूच असल्यानं स्थिरावलेल्या मनालाही बदलाची ओढ काय असल्याचे दिसते. तो बदल मात्र इतिहासाच्या पाऊलखुणा पुसट करायला लागतो. ऐतिहासिक वास्तू मागे ठेवून माणसाला पुढे घेऊन जातो. मग उरतात त्या फक्त आठवणी अन् कागदावर मांडलेली वंशावळ. मात्र शौर्यगाथा त्याच असतात. या शौर्यगाथाच त्या गावची ओळख असते. अगदी तीन एक हजार लोकवस्तीचे निफाड तालुक्यातील लासलगावजवळच्या कोटमगावची अशीच कथा आहे. कोटमगाव अज्ञात वाटतं पण त्याच्या अज्ञातपैलूंमध्ये अनेक गुपितं दडली आहेत याचा अनुभव गावाची भटकंती करताना येतो अन् गावाने पाहिलेल्या शौर्याचे वैभवही डोळ्यासमोर उभे राहते.
नाशिक-निफाड हे अंतर साधारण ३५ किलोमीटर आहे. निफाडपासून लासलगाव पंधरा किलोमीटर व तेथून कोटमगाव अगदी दोन किलोमीटरवर. लासलगावातून डाव्या हाताला लासलगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याने आत गेल्यावर रेल्वेपूल लागतो. रेल्वेपूल ओलांडला की, कोटमगाव आपले स्वागत करताना दिसते. समोरच देवराम मंदिरासमोरील पारावर बसलेली ज्येष्ठ मंडळी गावगप्पा मारताना दिसतात. कोटमगाव म्हणजे काय हे कोड त्यांनाही उलगडलेलं नाही, असे ते सांगतात. जेव्हापासून आठवतं तेव्हापासून अन् आजोबा, पंजोबाही कोटमगावच म्हणायचे असं ते ठासून सांगतात. मात्र हे सांगताना गावात बरेच लहान मोठे वाडे होते, हे सांगायला ते विसरत नाहीत. गाव वेशीने सजलेले. या गावाला कोट अन् दोन बुरूजही असल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात. वेशीला लाकडी दरवाजाचा आधार हा गावालाही आधार होता, मात्र काळ बदलला अन् वेशींनी देह ठेवला. मात्र स्मृतीपल्याड गेलेल्या या वेशी गावातील श्रीमंतीचा अन् सरदारांच्या शौर्याचा इतिहास सांगतात.
देवराम मंदिरासमोरून डाव्या हाताला गेलं की, एका लहानशा टेकडीवर गढीसारखे वैभव असलेला वाडा नजरेत भरतो. वाडा म्हणून असलेले त्याचे वैभव आता उरलले नाही; मात्र या गढीवर अकरा-अकरा खणाचे दोन वाडे समोरासमोर उभे होते. या वाड्याला सोमवंशींचा वाडा म्हटले जाते. सोमवंशी वाडा ३५० वर्षे जुना आहे. त्याची कलाकुसर ही चांदवडच्या रंगमहालाशी साम्य दाखविते. रंगमहालाचे काष्टशिल्पाचे काम ज्या कारागिरांनी केले त्याच कारागिरांनी सोमवंशी वाड्याचेही काम केल्याचे विलासराव यादवराव सोमवंशी आनंदाने सांगतात. या वाड्याभवती कोट होता. आता त्या कोटाचे फक्त अवशेष राहिले आहेत. कालांतराने होणारे सर्व बदल या वाड्यात झालेले पहायला मिळतात. शिवकाळात सरनौबत सरदार सोमवंशी नाशिक परिसरात आले. त्यांना कोटमगाव व मोहाडी येथील जहागिरी मिळाली होती. सरदार सोमवंशी लढवय्ये होते. ते मूळचे हस्तिनापूरचे. त्यांचा प्रवास दिल्लीतून सुरू झाला. त्यांना पुण्यातील घोडनदीजवळची जहागिरी मिळाली.
त्यानंतर कोटमगाव, मोहाडी जहागिरी मिळाल्याच्या नोंदी भाटांकडील दप्तरातून मिळतात. या टेकडीवरील वाड्याला दगडी प्रवेशद्वार होते. अकरा-अकरा खणी असे दोन वाडे समोरासमोर व मध्ये चौक अशी या वाड्याची रचना होती. मात्र आता यातील एक वाडाच शिल्लक आहे. त्याचेही दोन मजले आता नाहीत. मात्र वाड्यावरील सुंदर काष्टशिल्प व अकरा खण अजूनही वाड्याचे वैभव दाखवितात. कोटमगावातील विलासराव यादवराव सोमवंशी यांचे आजोबा आनंदराव व्यंकटराव सोमवंशी हे मोहाडीतून दत्तक आले होते. त्यावेळी त्यांचे नाव शहाजीराव भगवंतराव सोमवंशी असे होते. याबाबतचे १९२१ चे मोडीतील दस्त त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. सोमवंशींचा नाशिकच्या सरकारवाड्याजवळही सोमवंशी वाडा होता, असे विलासराव सोमवंशी सांगतात. वाड्यातील आड अन् तटबंदीच्या आठवणी घेऊन ही गढी उतरायची अन् उजव्या हाताच्या मार्गाने पुढे गेल्यावर मारूती व रोकडेश्वराच्या मंदिरात आपण पोहचतो. लाकडी बांधणीतील दीडशे वर्षे जुन्या या मंदिराचे वरचे दोन मजले आता शिल्लक नाहीत; मात्र मंदिराचा जुना बाज कायम रहावा म्हणून कोटमगावच्या ग्रामस्थांनी या मंदिरावर पत्र्याचा मोठा डोम उभारून मंदिर जपले आहे. या मंदिराबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
रोकडेश्वर-हनुमान मंदिर थोडे मागे करावे म्हणून हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते न हलल्याने मूळ मंदिर संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोकडेश्वर मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती खाली देवीची मूर्ती असल्याची अख्यायिका सांगितली जाते, असे भागीरथ शिरसाठ सांगतात. मंदिरातील रोकडेश्वर व हनुमानाची मूर्ती पाहण्यासारखी आहे. येथेच विठ्ठल-रूक्मिणी मंदिरही आहे. गावात जुन्या बांधणीची अनेक घरे आहेत. मात्र शेतीमुळे मळ्यात राहायला जाण्याच्या पद्धतीमुळे ही घरे ओस पडली आहेत. ग्रामदैवत असलेल्या रोकडेश्वराचे मंदिर पाहून उजव्या हाताने पुढे गेल्यावर स्वस्त धान्याचे दुकान म्हणून वापरात असलेली सुंदर माडी पहायला मिळते. तेथून पुढे वीराची शिळा अन् त्यावरील वीर पाहून गावचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वेश्वर महादेव मंदिर पहाता येते. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधणीचे होते. मंदिराचा कळस कालांतराने कोसळल्याने नव्याने फक्त कळसाची बांधणी करण्यात आली; मात्र मंदिर तसेच आहे. पांढऱ्या रंगाने न्हावून निघालेले विश्वेश्वर महादेव मंदिरावरील नक्षीकाम व परिसर वेगळा वाटतो. मंदिरासमोरील नंदीच्या खाली तळघर होते ते आता बंद करण्यात आले आहे. ग्रामदैवताची यात्रा अन् सप्ताहाचे कार्यक्रम नित्यनियमाने होतात, असे ग्रामस्थ सांगतात.
महादेव मंदिराचे वैभव अनुभवून मंदिरासमोरच आपले दोन्ही बाहू पसरवून उभा असलेला ब्राह्मणवाडा आपल्याला साद घालतो. ब्राह्मणवाडाही तीनशे-साडेतीनशे वर्षांचा इतिहास बाळगून आहे. या वाड्याची बांधणी व वाड्यावरील काष्टशिल्प काम चांदवडच्या रंगमहालाशी साम्य दाखविते. यामागील कोडे ब्राह्मणवाड्यातील जितेंद्र अशोक कुलकर्णी उलगडतात. ‘कोटमगाव चांदवड संस्थानचाच एक भाग होते. येथील सरदार होळकरांशी संबंधित होते. होळकरांचा निफाड परगण्याचा कारभार कोटमगावातून चाले. यासाठीची जबाबदारी त्यांनी कुलकर्णींकडे सोपविली होती. यासाठी हा वाडाही त्यांनीच बांधला. येथे न्यायनिवाड्याचे काम चालत असे त्यासाठी मोठ्या वाड्याची गरज असेल म्हणून हा बांधला गेला असावा. ब्राह्मणवाड्यात कोर्टाची इमारत व मोठा दिवाणखानाही होता. तीन मजली वाड्यात तळघर अन् भुयारही होते. कालांतराने वाड्याची पडझड झाली, मात्र आठवणी ताज्या आहेत,’ असे कुलकर्णी सांगतात.
कोटमगाव आणखी एका सरदाराचे शौर्य सांगते ते म्हणजे पवार घराणे. पवारांचाही वाडा गावात होता. येवल्यातील सावरगावातील पवारांचे पूर्वज धार येथून आले. मध्य प्रदेशातील देवास येथील थोरल्या पातीचे तुकोजी पवार (१७८९ ते १८२७) यांच्या घराण्याची जहागिरी लासलगावजवळील कोटमगाव ही होती. त्या जहागिरीची व्यवस्था धारचे गोविंदराव पवार पाहत होते. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सावरगावचे ग्रामस्थ येथील मुस्लिम प्रशासकाच्या छळाने हैराण झाले होते. सावरगावकरांनी आपले गाऱ्हाणे कोटमगाव येथील गोविंदराव पवारांपुढे मांडले. गोविंदरावांनी सावरगावातील जुलमी शासकाची हकालपट्टी करीत सावरगावचा कारभार स्वत:च्या हातात घेतला. तेव्हापासून पवार घराणे सावरगाव येथे स्थायिक झाले. त्याच घराण्यातील मारोतराव पवार यांनी १९८५ ते १९९५ पर्यंत दहा वर्षे विधानसभेत येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले, असे इतिहास अभ्यासक नारायण क्षीरसागर सांगतात.
नाशिकच्या अनेक वाड्यांवरील चित्रांचा इतिहासही कोटमगाव उलगडते. नाशिकच्या अनेक वाड्यांवर अनोखी चित्रे पहायला मिळतात. रंगमहालावरील चित्रे नाशिकच्या चित्रकारांनीही काढल्याचे कोटमगाव सांगते. तर नाशिकच्या चित्रकारांनी राज्याबाहेरही आपली ओळख निर्माण केली होती. कोटमगावचे चित्रकार बापू दिंडोरीकर-दंडगव्हाण हे मल्हारराव होळकरांबरोबर इंदूरला गेले होते. त्यांच्या कलेमुळे होळकरांनी त्यांना मानपान दिला होता. त्यामुळे इंदूरमध्येही दिंडोरकराचा सोनारवाडा होता. दिंडोरकरांनी मल्हाररावांचे काढलेले चित्र अजूनही पुण्यातील चित्रकार वाईकरांच्या संग्रहात असल्याचे कोटमगावातील सुनील दिंडोरकर सांगतात. ब्राह्मणवाडा पाहून मांगीरबाबाच्या व अनोख्या मुखवट्यांच्या दर्शनासाठी राजवाड्याचा रस्ता पकडायचा. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दगडी बांधणीच्या दोन-तीन समाधी आपल्याला दिशा दाखवितायेत असे वाटायला लागते.
कोटमगावात चैत्र पोर्णिमेला एक अनोखा जल्लोष गावाला एकत्र करायचा. हा उत्सव म्हणजे बोहाडे. मात्र गेल्या १० वर्षांपासून सोंगाचा हा खेळ बंद झाल्याने कोटमगावची शानच गेल्यासारखी वाटते आहे. अजूनी अनेक सोंग राजवाड्यातील मांगीरबाबाच्या मंदिरात ठेवलेली पहायला मिळतात. अनेक सोंग अजूनही त्या-त्या सोंगाच्या पात्रांनी आपल्या घरात जपली आहेत. कोटमगावचे आणखी एक वेगळेपण म्हणजे बोहाड्यासाठी लागणारी सोंगांचे मुखवटे बनविणारा कलाकार त्र्यंबक खैरनार याच गावचे. त्यांच्या मृत्यूनंतर गावात मुखवटे बनविणे बंद झाल्याचे विष्णू कदम सांगतात. मात्र त्र्यंबक खैरनार यांच्या आठवणींचा वारसा मुखवट्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जपला आहे, एवढाच काय तो ओलावा मनाला सुखावून जातो.
मांगीराबाबांचे मंदिरही अनोखे आहे. मंदिरात मांगीरबाबांची शिळा आहे. साधारण प्रत्येक गावात मांगीरबाबा पहायला मिळतो. मांगीरबाबांना मांग वीर असेही म्हटले जाते. पूर्वी समाजाच्या उत्कर्षासाठी लढलेल्या योद्धांच्या स्मृतीनिमित्त गावात मांग वीराची चीरा उभारली जात असे. त्यालाच मांगीरबाबा असे म्हटले गेले, असे खैरनार व कदम सांगतात.
कोटमगाव हे नाव गावाला कशावरून पडले हे सापडत नसले तरी या मातीत होळकर, सोमवंशी व पवारांचे घराणे रूजले अन् त्यावेळच्या समाजव्यवस्थेला आवश्यक ते योगदान या पिढ्यांनी दिले. त्यांचा वारसा त्यांचा इतिहास म्हणून पुढे नेण्याचे काम कोटमगाव करीत आहे. बोहाडे बनविणारा कलाकार व राजामहाराजांचे चित्र रेखाटणारा चित्रकार आता
नसले तरी कोटमगाव त्यांच्या आठवणींनी संपन्न झाल्याचा अनुभव गावात घेता येतो. म्हणूनच कोटमगावची सफर करायला हवी!
पाताळेश्वराचे अनोखे पाळे
गाव ही संकल्पना कशी आली? बुद्रुक अन् खुर्द म्हणजे काय?, पाटीलकी देशमुखी बदलत्या व्यवस्थेत निर्माण झाल्या अन् व्यवस्थेसह त्याही गेल्या. गावाच्या अन् गावात एकत्रित राहणाऱ्या माणसांच्या संरक्षणासाठी उभे राहिलेली वेसकोट ही संकल्पनाही काळाच्या ओघात जमीनदोस्त झाली. पण या आठवणी अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताज्या आहेत त्या ग्रामदैवत अन् त्यांच्या अख्यायिकांमुळे. कळवण तालुक्यातील पाताळेश्वराचे पाळे हा अनुभव घडवितं.
रमेश पडवळ
तथाशूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला /
क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतिर्ग्रामसंज्ञिता //
पुराणांमध्ये गाव म्हणजे नेमके काय ही संकल्पना या श्लोकात मांडली आहे. म्हणजेच माणसाला पूर्वीपासूनच एकत्र रहायला आवडतं. एकमेकांच्या आयुष्यात रमायला आवडतं. गाव म्हणजे ज्याच्याभोवती कीर्दसार-वहितीला (शेती) योग्य जमीन आहे आणि जिथे मातब्बर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात. गावच्या हद्दीला किंवा सीमेला शीव ही संज्ञा आहे. गावाचे स्वभावत: आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक पांढरी किंवा गावठाण आणि दुसरा काळी किंवा रान, काळी आणि पांढरी या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारात आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून, भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते.
यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला (घरांसाठी) नसते आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सापडतो, तसा कंदमुळांना सापडत नाही, अशी गावाची व्याख्याच गावगाड्यात मांडली आहे. अर्थात आता मातीची घरे बांधण्याची संकल्पनाही मागे पडली आहे. मात्र मातीच्या घरात राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो हे नाशिकच्या कोणत्याही गावात गेलात तर अनुभवायला मिळू शकते. गावठाणात पांढरीवर गाव वसलेले असते अन् काळीवर शेती. गावाच्या ज्या जागेवर माणस घरेदारे करून नांदतो तिला पांढरी, आई-पांढर किंवा गावठाण म्हणतात. ज्या जागेत शेती करतात तिला काळी, आई-काळी, रान किंवा शिवार म्हणतात. शहरातील फ्लॅट संस्कृतीप्रमाणे गावातही शेतातील बंगल्यांमध्ये वेगळं राहण्याची संकल्पना अधिक बळावल्याचे पहायला मिळू लागले आहे. यामुळे ग्रामसंस्कृतीची वाटचाल शहरसंस्कृतीकडे सुरू झाल्याचा भास व्हायला लागतो.
गावातील सिंमेटच्या घराभवती धीर सोडत असलेली घरे पाहताना स्थापत्यशास्त्रातील घरांच्या बांधणीची ही पिढी परत कधीच पाहता येणार नाही याची हुरहुर मात्र कायम मनात राहते. बदलत्या ग्रामीण जीवनावर आजही ग्रामदैवत व गावातील विविध दैवतांचा पगडा घट्ट असल्याने का होईना अनेक गावांचे गावपण अजूनही टिकून आहे. सण, उत्सव, जत्रेनिमित्त का होईना आजही गाव एकत्र येताना दिसतं अन् हरविलेल्या, हरवत चालेल्या गावावर चर्चा होताना दिसते. कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक व खुर्द ही जोडगोळी अशाच बदलाची स्थित्यंतरे उलगडताना दिसते. ग्रामदैवतांनी गावपण टिकविल्याचा अनुभव अन् जुन्या घरांचा ओलावा येथे अनुभवायला मिळतो. तर पौराणिक व ऐतिहासिक आठवणीही गावाने जोपासल्या आहेत.
नाशिक ते सप्तश्रृंगी गड साधारण ६५ किलोमीटर अंतर आहे. उजव्या हाताने गडाकडे न जाता कळवणकडे जाणाऱ्या रस्त्याने पाच-सहा किलोमीटर गेले की, कोल्हापूर फाटा लागतो. या फाट्याला कोल्हापूर फाटा म्हणण्यामागे गंमतीशीर किस्सा दडलेला आहे. अनेकांना कोल्हापूर फाटा म्हटलं की बुचकळ्यात पडल्यासारखे होते. मात्र, पूर्वी या परिसरात कोल्हे फार होते आणि हा रस्ता कच्चा होता. त्यामुळे या ठिकाणाला कोल्हापूर म्हणण्याची पद्धत रूढ झाली. या फाट्यावरून डाव्या हाताने आत शिरले की पाळे गाव लागते. पाळे गिरणा नदीच्या अल्याडपल्याड वसले आहे. अल्याडपल्याड म्हणजे दोन्ही किनाऱ्यावर पाळे हेच गाव आहे. अलीकडच्या गावाचे नाव आहे पाळे बुद्रूक तर नदी पलीकडे आहे पाळे खुर्द. नाशिकमध्ये अनेक गावांना ब्रुद्रुक आणि खुर्द हे शब्द चिकटलेले पहायला मिळतात. बुद्रुक व खुर्द हे शब्द फारसी असल्याने ते मोगल काळात प्रचलित झाले असावेत. ‘
खुर्द’ म्हणजे लहान. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’. ‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून, ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर. म्हणजेच मुख्य किंवा मोठं गाव म्हणजे ‘बुद्रुक’. येथे बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा स्वीकारला तर खुर्द हा शब्द जशाच्यातसा घेतला. फारशीतील अनेक शब्द आपण अपभ्रंश किंवा जसेच्या तसे घेतल्याचे पहायला मिळतात. साधारणत: बुद्रुक आणि खुर्द ही जोडगोळी पहायला मिळते. कोल्हापूर फाट्यावरून गावात प्रवेश करताना पहिल्यांदा आपण पाळे बुद्रुकमध्ये प्रवेश करतो. गावाला पाळे नाव कशावरून पडले याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. सुरत लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराज पाळेगावात थांबले होते तेव्हा त्यांनी गावाचे नाव पाळे ठेवले, असे पाळे खुर्दमधील मनोज पाटील सांगतात तर पाळे बुद्रुकमधील पाताळेश्वर मंदिरामुळे गावाला पाळे नाव पडल्याचे पाळे बुद्रुकचे प्रभाकर खैरनार, काशीनाथ देशमुख सांगतात. महादेवाने पालन पोषण केलेले गाव म्हणून ‘पाळे’ असेही म्हटले जाते.
पाळे गावाला पौराणिक अख्यायिकेचाही संदर्भ आहे. श्रीराम नाशिकमध्ये वनवासाला असताना ते पाळे गावातूनच संतश्रृगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी श्रीरामाने गावात महादेव मंदिराची स्थापना केली होती म्हणून या मंदिराला ते मंदिर महादेवाचे असूनही रामेश्वर मंदिर असे म्हटले जाते, असे अॅड. बाळासाहेब देशमुख, शिवाजी देशमुख, दिलीप डेरले, संतोष देशमुख सांगतात. रामेश्वर मंदिर पूर्वी दगडी बांधणीतील होते. मंदिरातील महादेवाची पिंड दक्षिणमुखी आहे. पिंडीवर महादेवाचा शेषधारी तांब्याचा मुखवटा आकर्षक आहे. दगडी मंदिर पाडून ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. जुन्या मंदिराचे अवशेष या मंदिराच्या आजूबाजूला पहायला मिळतात. मंदिराच्या व्यवस्थेसाठी देशपांडे घराण्याने २६ एकर जमीन मंदिराला दान दिली आहे. या जमिनीचा दर पाच वर्षांनी लिलाव होतो. रामेश्वर मंदिराजवळच पाळे बुद्रुकच्या हनुमानाचे मंदिर आहे. हा हनुमान सप्तश्रृंगी गडाकडे पाहतो आहे. श्रीराम जेव्हा पाळे गावातून गडाकडे निघाले तेव्हा त्यांना हनुमान पाहत आहे, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
हनुमान मंदिरासमोर देशपांडेंची गढी होती. आता ती जमीनदोस्त झाल्याने तिचे विखुरलेले अवशेष पहायला मिळतात. पाळे बुद्रुक देशमुख व देशपांडे तर खुर्द पाटलांचे म्हणून प्रसिद्ध आहे. देशमुखांना अठरा गावांची देशमुखी होती. देशपांडेंकडे महसुलाची जबाबदारी होती. त्यांची गढी आता नाही; मात्र त्यांचे वंशज गावात आजही आहेत. तर मोरे-शिंदेंना गावची वतनदारी होती. त्यांचे वंशजही गावात आहेत, असे मनोहरराव मोरे व विकास देशपांडे सांगतात. बाराबलुतेदारी पद्धत गावातील वेगवेगळ्या गल्ल्यातून आजही पहायला मिळते. आजूबाजूच्या गावांसाठी पाळे बाजारपेठेचेठिकाण होते. देशपांडेंच्या गढीतून एक भुयार गिरणा नदीतील चुहेली डोहात निघायचे. गढी पडल्याने हा बोगदाही बुजला. मात्र चुलीसारखा दिसणारा हा डोह अजूनही गढीच्या आठवणी सांगतो. या डोहात शस्त्र ठेवले जायची तसेच लपण्याची जागाही येथे होती, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
बुद्रुकमध्ये राम मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, खंडेराय मंदिरे आहेत. रामाचे मंदिर पूर्वी लाकडी बांधणीचे होते ते आता सिमेंटचे झाले आहे. राम मंदिराला खाकी आखाड्याच्या साधूंची मोठी परंपरा आहे. नाशिकमधील नागचौकातील खाकी आखाड्याचे महंत खाकीदास, बालकदास, जानकीदास गरीबदास व सध्या खाकी आखाडा सांभाळणारे नरसिंह दास यांनी पाळे गावात तपश्चर्या करून पुढे मठाची जबाबदारी सांभाळली आहे. हे सर्व साधूमहंत याच गावचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राम मंदिरासमोरच एक कुंड आहे. कुंडात महादेवाची पिंड तर शेजारी हनुमानाचे आणखी एक मंदिर व चावडीची जुनी इमारत आहे. पाळे बुद्रूकमध्ये महाशिवरात्रीला महादेवाचा उत्सव तर पाडव्याला बोहाडे होतात. २६ सोंगांच्या बोहाड्याची जबाबदारी २६ घरात दिलेली आहेत.
विशेष म्हणजे देशमुख व देशपांडेंकडेही बोहाड्याच्या सोंगांची जबाबदारी आहे. दर तीन किंवा पाच वर्षांनी सोंगांचा कार्यक्रम केला जातो. बोहाड्यातील संक्रांतीचा म्हणजेच देवीचा अवतार घेणारे सूत्रधार यशवंत देशमुखांनी आता सत्तरी ओलांडली आहे. मात्र बोहाड्यात संक्रांत साकारण्याची त्यांची जिद्द मात्र कमी झालेली नाही. उत्साहाला वय नसतं असं सांगताना ते म्हणतात,‘बोहाडे कोठून आले, का आले माहिती नाही पण गावाला गावपण देण्याचं काम हा उत्सव करतो. प्रत्येकाला एकत्र ठेवण्याचे अन् तीन वर्षातून एकदा का होईना ग्रामदैवतेच्या साक्षीने जगण्याचे भान देतो. वय झालं असलं तरी अजून एकदा तरी बोहाड्यात देवीचा अवतार होऊन नाचायचं आहे.’ यशवंत देशमुखांप्रमाणे, विकास देशपांडे व इतरही अनेकांनी बोहाड्यातील सोंग उत्सवापर्यंत देवघरात जपून ठेवली आहेत. देशमुख स्वत: बोहाड्यांची देखभाल दुरूस्तीचे कामही पाहतात. गावाला कळवण येथील संत बाबांमुळे गावाला भजन परंपरा जपली आहे.
चावडीसमोरच कीर्तनकार प्रभाकर खैरनार महाराजांचे घर आहे. बाहेरून पाहिल्यास हे घर वाटते; मात्र घरात गेल्यावर आठ खणाचा मोठा वाडाच असल्याचा भास होतो. सुरूवातीला चार खोल्या पार करून आत गेल्यावर वाड्यासारखा चौक लागतो. त्यापुढील पुन्हा चार खोल्यापार केल्यावर गावच्या दुसऱ्या रस्त्याला त्यांचे घर संपते. इतक्या मोठ्या घराची रचना अनोखी अन् दुर्मिळ वाटते. खैरनार यांच्याकडे जुन्या हस्तलिखितांचा संग्रह आहे. हतगडचे वंशज मनोहरराव मोरे यांच गावचे. त्यांच्याकडील ताम्रपटाचा अन् मोडीतील कागदपत्रे पाहून गिरणानदीवरील पूल ओलांडून पाळे खुर्दमध्ये जाता येते. केमच्या डोंगरातून गिरणा पुढे वाहत जाते. गिरणामुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. पुलावरूनच पाळे खुर्दमधील अष्टभुजा नारायणी देवीचे मंदिर आपल्याला खुणावत राहते. या मंदिरातील देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे पाळे खुर्दमधील पोपटसोनू पाटील, संदिप पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पाटील सांगतात. गावात हनुमान, दत्त, संतोषी माता आदी मंदिरे आहेत.
दरवर्षी शाकांबरी पोर्णिमेला अष्टभुजा देवीची यात्रा होते. यावेळी तमाशा, कुस्ती हे मुख्य आकर्षण असते. मात्र खुर्दमध्ये बोहाडे होत नाहीत. गिरणा नदीवर ब्रिटीश काळात लिफ्टची योजना उभारण्यात आली होती. त्याची इमारतही या गावात पहायला मिळते. खुर्दमधील हनुमानाला शेंडीचा हनुमान म्हटले जाते. शेंडी असलेला हनुमान इतरत्र नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या हनुमानाला तांब्याच्या कवचाने मढलेले आहे. त्यामुळे शेंडीचा हनुमान आवर्जून पहावा असा आहे.
महादेवाने पालन पोषण केलेले, रामाचा पदस्पर्श, छत्रपतींच्या आशीवार्दाने भारावलेले पाळे पाहताना ग्रामीण जीवनाचा स्पर्श अनुभवायला मिळतो. हा ठेवा कायम राहावा ती मातीचं घर, मंदिरांचा साज जपण्यासाठी त्यांचे पालनपोषण करण्यासाठी पाळे धडपडताना दिसते.
सोंगांचं चाचडगाव
टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला. बदलाच्या लाटेत अनेक उत्सवांचे स्वरुप बदलले अन् होरपळला सोंगांचा मुखवटा अन् ते बनविणारे कलाकार. नाशिक जिल्ह्यात सोंगांचे मुखवटे बनविणारी पिढी अखेरचा श्वास घेत आहे. हा श्वास जपण्यासाठी चाचडगाव धडपडतांना दिसतं.
व्यक्तीवर त्या-त्या सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडतो अन् त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वात रुपांतर होतं. मात्र प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला एक मुखवटा असतो. हा मुखवटा त्यांच्या स्वार्थ, व्यथा, वेदना अन् सुखाशी इतरांना अज्ञात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच मुखवटा अन् चेहरा हे समीकरण सर्वांना कायम स्तिमीत करत आलं आहे. म्हणूनच माणूस आणि मुखवटा यांचा एकमेकांशी वेगळा ऋणानुबंध जडला आहे. पण कोठून आले हे मुखवटे, कधी आले, कसे आले, कोणी आणले आणि आता ते कुठे आहेत? असे अनेक प्रश्न प्रत्येकालाच सतावतो. मुखवट्यांना प्रत्येक धर्मात अन् समाजात परंपरेच्या अर्थाने एक वेगळं महत्त्वही आहे. देवघरातील टाकांपासून घर सजविताना भिंतीवर टांगलेल्या विदुषकाच्या मुखवट्यापर्यंत आपला कुठे ना कुठे या कलेशी संबंध येतो. महाराष्ट्रातील मुखवट्यांची परंपरा केरळमधून कोकणमार्गे अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र फलश्रुत झाली. १७२८ साली श्यामजी नाईक काळे व शिवराम नाईक गोडबोले या दोन कीर्तनकारांनी कर्नाटकातून यक्षगान हा लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याला पुढे दशावतार व नमन-खेळे या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले. नमन-खेळेतील गीतांमध्ये राघोबादादांचा उल्लेख येतो, यावरून हा प्रकार पेशवाई काळापासून होत असावा. हळूहळू ही बोहाड्याची (आखाडी, भवाडा, सोंग) परंपरा कोकणातून ठाणे, नाशिक भागातील आदिवासींमधून रुजली. बोहाडा अथवा आखाडी हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण नाशिकमधील जवळपास प्रत्येक गावात बोहाड्यांचा कार्यक्रम अगदी अलीकडेपर्यंत जल्लोषात साजरा व्हायची. अजूनही काही गावात ते कसेबसे टिकूनही आहेत. बोहाडा हे मुख्यत: मुखवटानाट्य आहे. आदिवासींमध्ये जंगली प्राण्यांचे मुखवटे धारण करून त्यांची सोंगे सादर केली जायची. परंतु, त्यांचा शहरांशी संपर्क वाढत केल्याने शहरी संस्कृतीचा व देव-देवतांचा प्रभाव त्यांच्या बोहाड्यांवरही पडला अन् प्राण्यांची जागा देव-देवतांच्या मुखवट्यांनी घेतली. त्यांची सादर करण्याची पद्धत नाट्यसादरीकरणाकडून मिरवणुकीत नाचण्यापर्यंत बदलेली. गाव उत्सव, होळी व धार्मिक सणांनिमित्त बोहाडे नाचविले जातात. पण बोहाड्यांमध्ये नाचविले जाणारे मुखवटे येतात कोठून अन् ते कोण बनवितो हे उलगडण्यासाठी चाचडगावात जावं लागतं. हा प्रवास आपल्याला एका वेगळ्या कलेशी जोडतो.
नाशिक-पेठ रस्त्यावर नाशिकपासून २५ किलोमीटरवर चाचडगाव (ता. दिंडोरी) लागते. चाचडगाव चौफुलीवर डाव्या हाताला गावच्या ग्रामदेवतेचे म्हणजेच बेंडकाई माता देवीचे स्थान असलेला डोंगर गावाच्या संरक्षणासाठी दोन्ही बाहू पसरवून निवांत पहूडला आहे. या डोंगराच्या पायथ्याला चाचडगाव वसल्याचे दिसतं. पेठ रस्त्यावरील गावच्या चौफुलीवर ज्येष्ठांचा सकाळी सकाळी जमलेला मेळा चाचडगाव उलगडून सांगायला लागतो. चाचडगाव असे गावाचे नाव कसे पडले अथवा चाचड म्हणजे काय हे कोणालाही माहिती नाही. मात्र चाचपडत चाचपडत हे गाव वसले असावे म्हणून चाचडगाव म्हटले गेले असावे, अशी शक्यता ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. मात्र गाव वेगळं आहे. शोधलं तर खूप काही सापडेल अशा आशावाद बाळू पेगमहाले व एकनाथ रहेरे व्यक्त करतात. गावात बेंडकाई मातेचा उत्सव अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. डोंगरावर मातेचे छोटेखानी मंदिर बांधलेलं आहे. याशिवाय गावात खंडोबा अन् म्हसोबाचं मंदिर आहे. म्हसोबाच्या मंदिरात दगडी चिरे आहेत. मंदिराशेजारी वीरगळींचा खच पडलेला दिसतो. चाचडगावात प्रामुख्याने कोळी व कोकणा आदिवासी राहतात. त्यामुळे त्यांच्यातील वीरांच्या चीरा म्हणजेच वीरगळ उभारण्याची पद्धत चाचडगावातही अनुभवता येते. मात्र या दगडी वीरगळींचे महत्त्व उमजले नसल्याने हा वारसा दुर्लक्षित होऊन गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला निपचीत पहूडलेला आहे. वीरगळीवर समोरच्या बाजूला घोड्यावर हातात तलवार घेऊन बसलेला वीर तसेच वीरगळीच्या डाव्या उजव्या बाजूलाही सैनिकांच्या प्र्रतिमा कोरलेल्या आहेत. वीरगळींवरील नक्षीकाम अनोखे तर आहेच; मात्र अजूनही सुस्थितीत आहे. त्यामुळे या वीरगळी एखाद्या ठिकाणी व्यवस्थित मांडायला हव्यात. आता आदिवासींमध्ये चरिे उभे करण्याची पद्धत बंद झाल्याने त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गावातील वीरांच्या कथा या वीरगळींमधून जिवंत ठेवता येऊ शकतील.
उत्सवांमधून गावातील वीरांच्या कथा सांगण्यासाठीच गावात बोहाड्याच्या सोंगांची निर्मिती होऊ लागली असावी, असे या वीरगळींकडे पाहिल्यावर वाटायला लागतं. चाचडगावात आंबेकर व पेगमहाले ही दोन कुटुंब सोंगे बनविण्यासाठी ओळखली जात होती अन् ही ओळख गावापुरतीच नव्हती, तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या दोन कुटुंबीयांकडे सोंगांची मागणी असे. गेल्या तीन-चार पिढ्या ही दोन कुटुंब बोहाड्यांसाठी सोंग बनवित आले आहेत. मात्र गावागावांतील घरांवर डीश टीव्हीच्या छत्र्यांची गर्दी वाढू लागली अन् मनोरंजनाची संकल्पना बदलत गेली. पूर्वी गावातील उत्सव, धार्मिक व सामाजिक सोहळेच मनोरंजनाचे मुख्य स्त्रोत होते अन् ते अधिक बहारदार करण्यासाठी सोंग नाचविणे हा एक विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम समजला जायचा. पण काळ जसा बदलत गेला तसा सोंगांऐवजी गावाच्या चौकात चित्रपट दाखविले जाऊ लागले. घराघरात टीव्ही आले अन् सोंगांचे मनोरंजनाचे मुख्य काम हिरावले गेले. सोंगं आता धार्मिक कार्यक्रमांपुरतेच मर्यादित झाले आहेत. त्यातच अनेक गावांत बोहाड्यांमध्ये दारू अन् गोंधळाचा प्रादुर्भाव झाल्याने बोहाड्यांच्या परंपरेला खीळ बसली. बोहाड्यांचे खेळ करणारी अन् सोंग ठरलेली मानापानाची कुटुंबे नव्या पिढीपर्यंत ही कला पोहचवू शकली नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी गावाबाहेर पडलेली नवी पिढीही यापासून दुरावली. याचा परिणाम सोंगांसाठी मुखवटे बनविणाऱ्या कलाकारांवर झाला अन् पेगमहाले या कलाकाराने व त्यांच्या पुढील पिढीने मुखवटे बनविण्याऐवजी पोटाची खळगी भरू शकेल असा नवा व्यवसाय निवडला. गावातील आंबेकर या कुटुंबातील मुखवटे बनवू शकेल, अशी शेवटची व्यक्तीही या कलेपासून लवकरच दुरावेल अशी स्थिती आहे. ‘मागील तीन-चार पिढ्यांपासून आम्ही मुखवटे बनविण्याच्या व्यवसायात आहोत. हा व्यवसाय करताना जोड धंदा हवाच. पूर्वी जवळपास प्रत्येक गावातून मुखवट्यांची मागणी असायची त्यामुळे तीस-चाळीस मुखवट्यांचा एक संच असे अनेक संच तयार ठेवावे लागत. त्यामुळे वर्षभर काही ना काही काम सुरू असे. माझे आजोबा तुकाराम आंबेकर व वडील रघुनाथ आंबेकर यांची सोंगांसाठी मोठे योगादान दिले आहे. मात्र यावर वाढलेला संसार आता चालू शकणार नाही हे लक्षात आल्याने घरातील इतर मंडळी मुखवट्यापासून दुरावली. मी मुखवटा कलाकार आहे. मात्र आता सोंगांना पूर्वीसारखी मागणी नाही. एक संच भाड्याने दिल्यावर चार-पाच हजार रूपये भाडं मिळतं; मात्र यावर वर्षभराचा संसार चालू शकत नाही. त्यामुळे आता मुखवट्याचे काम कमी करून शहरात भंगार व्यवसाय सुरू केला आहे. माझी मुले शिकत असल्याने तेही या कलेपासून दुरावली आहेत. बहुतेक मुखवटे बनविणारी आंबेकरांमधील माझी शेवटची पिढी ठरेल,’ असे सांगताना मुखवटा कलाकार विजय रघुनाथ आंबेकर व त्यांची आई राधाबाई रघुनाथ आंबेकर यांचे डोळे भरून येतात. मात्र सोंगांचे कलावैभव किती समृद्ध आहे हे सांगताना ते थकत नाहीत.
गणपती, सरस्वती, शेंद-आसूर, वाली-सुग्रीव, वराह, दुःशासन, भीमा, अर्जुन, मच्छ, खापऱ्या चोर, नारद वाल्मिक, राम, लक्ष्मन, श्रृपनखा, खंडेराव, महादेव, काळभैरव, चंद्रसूर्य, नरसिंह, महिषासूर, देवी, वेताळ, म्हशा आदी मुखवटे तर डोक्यात घालायचा टोप तसेच अनेक पात्र असलेल्या मुखवट्यांच्या ताठी म्हणजेच पाच पांडव ताठी, कृष्ण ताठी, बळीराम ताठी, रावण ताठी, रक्तादेवी ताठी, मारूती ताठी हे मुखवटे विजय आंबेकरांच्या मातीच्या घरातील माडीवर पहूडलेले पाहताना मन थक्क होतं. मुखवटे हातात घेऊन त्यावरील धूळ बाजूला करतांना विस्मरणात जाणाऱ्या कलेला आपण शेवटचे भेटतो आहोत हा भास अंगावर काटा उभा करतो. प्रत्येक मुखवटा चेहऱ्यावर लावताना अन् त्या मुखवट्याच्या डोळ्यातून जग पाहताना नक्की कोण आपला चेहरा हरवत आहे? हा प्रश्नही मनाला अस्वस्थ करतो. मुखवटा काढताना तो निघत नसल्याचा भास ‘मला सोडून जाऊ नका’ अडगळीत टाकू नका’, असे सांगतो आहे की काय असं वाटायला लागतं. मुखवट्यांवर साचलेली धूळ मुखवट्यांवर आहे की आपल्याच चेहऱ्यावर मढवलेली आधुनिकतेची ती धूळ आहे असाही विचार मनात काहूर माजवतो.
आंबेकरांच्या घराच्या माडीवर मुखवट्यांचे छोटेखानी संग्रहालय पाहताना एका कोपऱ्यात जमिनीवर मातीत एक चेहरा साकारलेला आहे. हे काय असावं असा प्रश्न पडतो तोच त्याचं कोडही उलगडतं. हा चेहरा मुखवट्यांचा मातीचा साचा आहे. कागदी लगदा, मेथी चार-पाच दिवस भिजत घालून नंतर तो ठेचून घेतला जातो व चपातीसाठी पीठ मळतो तसं तो लगदा मळला जातो अन् तो मातीच्या त्या साच्यावर थापला जातो. साच्यामुळे चेहऱ्याचा एक आकार तयार होतो अन् त्यातून वेगवेगळे मुखवटे आकार घेतात. तो साच्या मला थोडं आश्वस्त करतो की मी अजून आहे! जगतानाच्या वेदना विसरून काही आनंदाचे क्षण बोहाड्याच्या निमित्ताने का होईना पूर्वी ग्रामस्थांना मिळायचे, त्यांना एकत्रित बांधून ठेवायचे; मात्र झपाट्याने बदलत गेलेल्या मनोरंजनाच्या साधनांनी बोहाड्यांना दारिद्रय दाखवलं. बोहाड्यांची परंपरा नाशिकमधून हद्दपार होतेय असेच नाही तर या बोहाड्यांमध्ये रंग भरण्याचे काम करणारे मुखवटे बनविणारे कलाकारही अज्ञात होऊ लागले आहेत. बोहाड्यांच्या निमित्ताने दर्शन देणाऱ्या मुखवट्यांनाही मागणी कमी झाली अन् त्यांनाही घरघर लागली. त्यांचा चेहराही हरवू लागला. एका पिढीची बोहाड्यांची परंपरा पुढच्या पिढीकडे जात नसल्याने हा बोहाड्यांसह मुखवट्यांचा वारसा लुप्त होईल, अशीच अवस्था नाशिक जिल्ह्यातील गावांमधून दिसते. जे काही अस्तित्व शिल्लक आहे ते बोहाडे करणाऱ्या गावांमुळे. त्यामुळे या कलाकारांना कसलं कलेचं आरक्षण अथवा अनुदान नको आहे तर बोहाडे, सोंग बंद केलेल्या गावांनी ते पुन्हा सुरू केले तर एक कला अन् मनोरंजनाचा एक अनोखा आनंद नवीन पिढीतही रूजविला जाईल, एवढीच अपेक्षा ते कलाकार व्यक्त करतात.
बोहाड्यांच्या मुखवट्यामागे मोठा इतिहास, संस्कृती अन् परंपरा आहे. हा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तो वाचविण्यासाठी चाचडगावातील कलाकारांना पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज निर्माण होताना दिसते. नाहीतर मुखवट्यांचा अज्ञातातून अज्ञाताकडील हा प्रवास अज्ञात राहू नये म्हणून या वेशीवरच्या पाऊलखुणांची नोंद आपण सर्वांनीच घ्यायला हवी.
त्र्यंबकजी डेंगळेंची सासूरवाडी आहेरगाव
इतिहासातील अनेक पात्र आपल्या आजूबाजूला वावरत असतात; मात्र त्यांच्या अभूतपूर्व कर्तृत्वाची नोंद इतिहासाच्या पानातून पुसटशी आल्याने ते बेदखल ठरू लागतात. नाशिकसाठी अज्ञात असलेल्या अशाच एका ऐतिहासिक पात्राचे नाशिकच्या आहेर गावाशी गहिरे नाते आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांची सासूरवाडी म्हणजे निफाड तालुक्यातील आहेरगाव. हे गाव अनेक घटनांचे साक्षीदार आहे. तेव्हांच्या घडामोडींचा थरार आजही अनुभवता येतो.
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती सरदार त्र्यंबकजी डेंगळे कोण होते अन् त्यांचा आहेर गावशी नेमका संबंध काय हे गूढ समजून घेण्यासाठी पेशवाईच्या कारर्किदीवर नजर टाकावी लागते. सतराव्या शतकाचा शेवट अन् आठराव्या शतकाची सुरूवात मराठी साम्राजाला अनेक धक्के देणारी ठरली. यात पेशवाईचा शेवट अंगावर काटे उभे करतो. श्रीमंत माधवराव पेशव्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव पेशवे झाले, पण त्यांचा खून झाला अन् त्यांचा मुलगा सवाई माधवराव गादीवर आले. मात्र सर्व सूत्रे नाना फडणीसांच्या हाती होती. त्यानंतर पहिल्या बाजीरावांचा पुत्र अन् आनंदीबाईंचे पती रघुनाथरावांकडे पेशवाईची सूत्रे आली अन् अवघ्या एका वर्षात बारभाईप्रकरणामुळे ते पायउतार झाले. पुन्हा सत्ताकेंद्र नाना फडणीसांच्या हाती आली. त्यांनी इंग्रजांना मराठा साम्राज्यापासून दूर ठेवण्यात यश मिळविले असले तरी पेशवाईचा कारभार पेशव्यांच्या वंशजांकडे सोपविण्याचे राजकारण अनेक घडामोडींना अन् अनेक लढवय्यांना तयार करत होते. रघुनाथराव पेशवे व आनंदीबाईंचा मुलगा दुसरा बाजीराव याला नाना फडणीसांच्या कैदेत होता. बाजीराव कैदेतून पेशवे होण्यासाठी खटपट करीत होते.
पेशव्यांचे वंशजच पेशवाई चालवू शकतात हे मराठी सरदारांना पटवून देत मराठी सरदारांना आपल्याकडे वळवीत होते. पेशवाईवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली. अनेक मराठी सरदार बाजीरावांच्या बाजूने असल्याचे पाहून नाना फडणीसांचा नाईलाज झाला अन् छत्रपतींनी पेशवाईची सूत्रे १७९६ च्या दरम्यान दुसरे बाजीराव पेशव्यांकडे म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांच्या मुलाकडे सोपवली. अनेक वर्षे कैदत असलेल्या दुसऱ्या बाजीरावांना अखेर पेशवाई मिळाली. पतीला पेशवाई मिळावी म्हणून प्रचंड खटपट करणाऱ्या आनंदीबाईच्या मुलाने अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण केली. दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईसाठी नाना फडणीसासारखा मुत्सद्दी अधिकारी हवा होता. मात्र दुसऱ्या बाजीरावांना नाना नको असल्याने त्याने नानांना कैदेत टाकले अन् येथे जन्म झाला एका नव्या मुत्सद्दी अधिकाऱ्याचा. हा मुत्सद्दी अधिकारी होते त्र्यंबकजी डेंगळे. पेशव्यांचे सेनापती झालेले त्र्यंबकजींच्या कर्तृत्वावर अनेक मोहिमा फत्ते झाल्या. अनेक किल्ले ताब्यात आले. मराठी साम्राज्याचा पुन्हा वचक निर्माण झाल्याची स्थिती इंग्रजांच्या डोळ्यात खुपू लागली. त्र्यंबकजी इतके विश्वासातील होते की त्यांच्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तीन किल्ले इंग्रजांना जामीन म्हणून दिले होते. एखाद्या व्यक्तीसाठी किल्ले जामीन दिल्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असावी. त्र्यंबकजींना हटवले नाही तर आपल्यालाही हे त्रासदायक होईल हे इंग्रजांनी ओळखले अन् सुरूवात झाली एका सूड कथेची. ही सूडकथा आपल्या घेऊन जाते आहेर गावापर्यंत अन् आहेर गावही ती कथा उलगडून सांगायला.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकपासून ३० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत हे गाव आहे. येथून पुढे चार किलोमीटरवर वडनेरभैरव-शिरवाडे चौफुलीपूर्वी उजव्या हाताला आहेर गावाकडे घेऊन जाणारा फलक नजरेस पडतो. या रस्त्यावर पुढे गेल्यावर नेत्रावती नदीवर बांधलेला पूल ओलांडला की उजव्या हाताला हात जोडून उभ्या असलेल्या सैनिकाची अन् त्याच्या दोन कुत्र्यांची प्रतिमा असलेली वीरगळ आपले स्वागत करते. नेत्रावती नदी किनारी वसलेल्या आहेरगावात प्रवेश करताना लहान मोठ्या मंदिरांचा समूह आपल्याला खिळवून ठेवतो.
वेशीसमोर महादेव मंदिराच्या डाव्या हाताला मशीद आहे. मशीदीशेजारीच दातावली ऊर्फ दत्तापीर साहेबांची समाधी आहे. दातावली बाबांच्या अनेक चमत्कारांची माहिती गावकरी देतात. गावातील हिंदू-मुस्लिम समुदायाचे हे ग्रामदैवत असून, पीर साहेबांचा व खंडेरायाचा उत्सव गावात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पीर साहेबांच्या उरसाला १८१८ ला ७०० लोक उपस्थित होते, अशी इंग्रजांच्या दप्तरी नोंद मिळते. गावात महादेव मंदिर, राम, हनुमान, खंडोबा व रोकडोमल महाराज आदी मंदिरे आहेत. गावातील रोकडोमल महाराजांची लाकडी रथातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. रोकडोमल महाराजांचे मंदिर पिंपळगाव रस्त्याला नेत्रावती नदीपलीकडे आहे. येथे सातीआसरा देखील आहेत, असे भास्कर मोरे, फकीरा संत व मधुकर निकम सांगतात.

दातावली बाबांची समाधी पाहून बाहेर पडले की, आहेरगावची वेस आपल्याला गावात यायला सांगते. पूर्वीची वेस पाडून ही वेस नव्याने बनविण्यात आली आहे. वेशीवर ग्रामपंचायत कार्यालय आहे. वेशीतून आत गेल्यावर डाव्या हाताला पारावर ज्येष्ठ मंडळींचा गप्पांचा फड रंगलेला असतो. आजूबाजूला जुन्या बांधणीची घरे गावाचा इतिहास उलगडायला लागतात. पूर्वीसारखे वैभव आता राहिले नसले तरी जुन्या-नव्या संस्कृतीचे दर्शन येथील मातीत पहायला मिळते. मात्र पारावर आजही गप्पा रंगतात त्या त्र्यंबकजी डेंगळे यांच्या. त्र्यंबकजींना आहेर गावात पकडण्यात आले होते यापलीकडे ग्रामस्थांना फारशी माहिती नाही. गावातील अवचीत अन् कवचीत या गवळी असलेल्या बंधूंनी त्र्यंबक डेंगळेंना पकडून देण्याचा विडा उचलला होता व त्यांनीच त्र्यंबकजींना पकडून दिल्याचे आहेरगावकर सांगतात. मात्र काही पुसटशा नोंदी एक मोठा इतिहास समोर आणतो. यासाठी त्र्यंबकजींना समजून घेणे गरजेचे ठरते.
सरदार त्र्यंबकजी डेंगळे संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी या गावचे. ना. स. इनामदारांच्या ‘झेप’ या कादंबरीत या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. तसेच कॅप्टन ब्रीज रिपोर्ट, ग्रँट डफ यांच्या ‘मराठास्’ या पुस्तकातून त्र्यंबकजींबद्दल माहिती मिळते. दुसऱ्या बाजीरावांचे निकटर्तीय अशी ओळख निर्माण झाल्यानंतर त्र्यंबकजींचा दबदबा वाढला. नाना फडणीसांनंतर इंग्रज मराठा साम्राज्य ताब्यात घ्यायला आसूसले होते. मात्र आधी नाना फडणीस अन् आता त्र्यंबकजी डेंगळे त्यांच्या हेतूच्या आड येत होते. त्र्यंबकजीला एखाद्या प्रकरणात गोवल्याशिवाय हा काटा दूर करणे शक्य नसल्याचे इंग्रज अधिकारी एल्फिस्टनने ओळखले. दरम्यान, पेशव्यांच्या मेव्हूणीचं लग्न बडोद्यातील गायकवाडांच्या पदरी असलेले इंग्रजांचे वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या मुलांशी जमवून आणण्यात त्र्यंबकजींच्या खेळीला यश आले होते. यानिमित्ताने गंगाधरशास्त्री गायकवाडांना पेशव्यांच्या जवळ घेऊन येतील अन् गंगाधरशास्त्री इंग्रजांचे वकील असल्याने एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते हा या मागील त्र्यंबकजींचा दूरदृष्टीकोन होता. लग्न नाशिकला करायचे ठरले. लग्नासाठी सरकारवाडा सजला. मात्र इंग्रज अधिकारी अस्वस्थ झाले. त्यांनी बडोद्याच्या गायकवाडांवर दबाव वाढविला व गायकवाडांनीही हा विषय प्रतिष्ठेचा करीत लग्नाबाबत गंगाधरशास्त्रींवर नाराजी व्यक्त केली.
इंग्रज व गायकवाडांची नाराजी फायद्याची नसल्याचे लक्षात आल्याने नाशिकमध्ये लग्नासाठी दाखल झालेल्या गंगाधरशास्त्रींनी लग्न मोडले. त्यानंतर काही महिन्यांनी पेशवे व गंगाधरशास्त्री पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले असतांना एका पहाटे गंगाधरशास्त्रींचा खून झाला. हा खून लग्न मोडल्याच्या संतापातून त्र्यंबकजीने करविल्याचा आरोप इंग्रज अधिकारी एल्फिस्टन यांनी केला व त्र्यंबकजींना अटक करण्याची मागणी केली. गंगाधरशास्त्री इंग्रजांचे वकील असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे सांगत इंग्रजांनी त्र्यंबकजींच्या अटकेसाठी पेशव्यांकडे ससेमिरा सुरू केला. अखेर त्र्यंबकजींना अटक झाली.
इ.स.१८१६ साली ठाण्याचा किल्ल्यात (म्हणजे आजचे ठाणे कारागृह) त्र्यंबकजी पहिले राजबंदी होते. मात्र या वादळाला थोपविणे शक्य नव्हते. त्र्यंबकजी मोठ्या शिताफीने इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. पुढे त्यांनी फौज गोळा करून इंग्रजी मुलखात मोठा धुमाकूळ घातला. इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. स्मिथ आणि एल्फिस्टन या इंग्रज अधिकांऱ्यांनी त्र्यंबकजींसाठी पेशव्यांवर दबाव वाढविला. डेंगळेंची अटक टाळण्यासाठी पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. अखेर त्र्यंबकजी हाती येत नसल्याने पेशवाई ताब्यात घेण्याची धमकी देणे सुरू केल्यावर तडजोड म्हणून त्र्यंबकजींच्या जामिनापोटी सिंहगड, पुरंदर, रायगड हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन करण्याची वेळ पेशव्यांवर आली. हा तह १३ जून १८१७ रोजी पार पडला. मात्र इंग्रजांच्या सततच्या पिच्छामुळे अन् पेशव्यांनीही हतबलता दाखविल्याने त्र्यंबकजी गहिवरले. त्यांनी या सर्वांतून निवृत्त होत सांसरीक जीवन जगण्यासाठी निवडले ते म्हणजे नाशिकजवळचे आहेरगाव. आहेरगाव ही त्र्यंबकजींची सासूरवाडी. त्यांची पत्नी येथील देशमुखांच्या घरातील. हाती असलेल्या पैशातून गुरे घेऊन आहेर गावात कुटुंबासह राहू लागले. यादरम्यान गावातील अवचीत अन् कवचीत यांच्याशी वाद झाले असावेत यातून त्र्यंबकजीने त्यांना जखमी केले. या घटनेमुळे गवळी कुटुंबातील महिला दुखावली. या घटनेचा सूड उगविण्यासाठी तिने चांदोर (आताचे चांदवड) येथे जाऊन त्र्यंबकजी आहेरगावात लपल्याची खबर दिली. कॅप्टन ब्रीजच्या रिपोर्टनुसार, त्र्यंबकजीने गावातील एका व्यक्तीला जखमी केले होते. याचा सूड घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीने चांदोरला जाऊन त्र्यंबकजींबद्दल माहिती दिली.
कॅ. ब्रीजने कॅ. स्वान्स्टन याला सैन्यांसह पाठवून गावाला वेढा दिला. त्र्यंबकजी एका घराच्या तळघरातील गवऱ्या ठेवण्याच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या स्थितीत सापडला, असे गावकरी सांगतात. या घटनेनंतर त्र्यंबकजींना अटक करून चांदवडला व नंतर बंगालमधील चुनारगढच्या कारागृहात हलविण्यात आले. यानंतर त्र्यंबकजी डेंगळेंचे काय झाले. त्यांच्या कुटुंबाचे काय झाले हे याची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे ज्ञानेश्वर देशमुख सांगतात. त्र्यंबकजींची पत्नी देशमुखांची मुलगी होती अन् त्यांना आहेरगावात इंग्रजांनी पकडले होते. एवढीच माहिती आतापर्यंत वाडवडिलांकडून ऐकली असल्याचेही ते सांगतात.
गाववेशीतून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला दोन दीपस्तंभ व त्यासमोरील अनोखी वीरगळ नजरेत भरते.
यातील एका दीपस्तंभावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. तर दुसरा स्तंभ ही वीरगळ आहे. तिची उंची अधिक असल्याने ही त्र्यंबकजींची वीरगळ असावी का? असाही कयास बांधता येतो. जवळच नेत्रावती किनारी त्र्यंबक डेंगळेंच्या पत्नीची समाधी आहे. ही सती गेल्याचे म्हटले जाते. सतीमातेच्या या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्र्यंबकजींची पत्नी सती गेली असेल तर त्र्यंबकजींना मृत्यूनंतर त्यांना गावात आणले असावे का? की कारागृहातून सुटल्यानंतर ते पुन्हा आहेरगावात आले असावेत अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला असावा. हा अज्ञात इतिहास अस्वस्थ तर करतोच; पण एक मुत्सद्दी अन् लढवय्या सेनापतीची अखेर नेमकी कशी झाली असेल अशा अनेक प्रश्नांनी मन भांबावून जाते. म्हणूनच आहेरगाव वेगळे ठरते!
विरांचे एकदरे
इतिहासाच्या खाणाखुणांनी गजबजलेलं दमणगंगेच्या तिरावर वसलेले पेठ तालुक्यातील एकदरे फक्त एक सर्वसामान्य गाव नाही, तर हे गाव भावतं ते तेथील वीरगळींच्या समुहामुळे, वारली समाजाच्या वास्तवामुळे अन् कॉफीच्या अनोख्या गंधांमुळे. वारली चित्रकलेचा आनंद अन् वीरगळींवरील वीरांच्या कथा हरपल्याने एकदरेचा अज्ञात प्रवास मात्र अस्वस्थ करतो…
वीरगळ व सतीशीळा नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. सततच्या लढाया, परकीय आक्रमणे यामुळे धारातीर्थी पडणाऱ्या विरांचे स्मृतीमंदिर म्हणून गावागावांमध्ये वीरगळ उभारल्या गेल्या. वीरगळींबरोबरच उभारल्या गेलेल्या सतीशिळा आपल्याला जुन्या प्रथांची आठवण करून देतात. त्या वीरांची पत्नी आपल्या पतीबरोबर सती जात असल्याचे या वीरगळ सांगतात. त्यामुळे त्यावेळच्या समाजमनावरही प्रकाश पडतो. रणभूमीत अथवा एखाद्या धाडसी कामात वीरगती पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे (हिरो स्टोन) वीरगळ. विराचा दगड या अर्थाच्या वीर-कल या कन्नड शब्दावरून वीरगळ हा शब्द आला. वीरगळाला विराचा दगड किंवा केवळ वीर म्हणूनही संबोधले जाते. वीरगळांची उगम कर्नाटकात झाला अन् तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट या कन्नड राजघराण्यांची सत्ता असलेल्या प्रदेशात वीरगळी आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वीरगळींना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रीय महत्त्व आहे. अनेकदा वीरगळींवर वीर धारातीर्थी पडला तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. गावाचे संरक्षण करताना अथवा वाघापासून गावाचे संरक्षण करताना वीरपुरूष मरण पावल्यास त्याच्या स्मृती म्हणूनही वीरगळ उभारली जाते.
प्रत्येक वीरगळ वेगवेगळ्या घटना सांगतात. त्या वीराच्या कथा शेकडो वर्षांपासून आपल्या ह्दयाशी जपून ठेवताना दिसतात. वीरगळीच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा अथवा गोलाकार त्रिकोणी आकार असतो. वीरगळीवर घोड्यावर बसलेला वीर हातात तलवार घेऊन कोरलेला असतो. वरच्या बाजूला अथवा खाली एक किंवा दोन महिलांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. या महिला म्हणजे त्या विराच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या बायका दाखविलेल्या असतात. तसेच वीरगळीवर वरच्या बाजूला दोन्ही बाजूस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर या विराची कीर्ती कायम राहील, हे यातून वीरगळ उभारणाऱ्यांना सांगायचे असेल. आदिवासी भागात सपाट शिळेवरील वीरगळी अधिक दिसतात. त्यांची उंची एक ते अगदी दहा फुटापर्यंतही असते. तर शिव मंदिरांभवती असणाऱ्या वीरगळींचा आकार चौकोनी गोलकडा अन् प्रमाणबद्ध असलेली असते. वीरगळाची रचना, नक्षीकामही त्या-त्या वेळच्या काळाच्या कडा उलगडतात. घोड्यावरील विराच्या वेशभूषेवरून व डोक्यावरील टोपावरून तसेच वीरगळीवरील नक्षीवरून तो वीर किती प्रबळ होता हे दाखविले जाते. तर आदिवासी भागात दगडी वीरगळींबरोबरच गावातील प्रसिद्ध, हुकमी व्यक्तीच्या चिराही उभारण्याची पद्धत पूर्वी होती. त्याचे शिल्लक अवशेष अन् अस्पष्ट व अज्ञात होत असलेल्या वीरगळी एकदरेत पहायला मिळतात. एकदरेतील हा इतिहास अज्ञात असला तरी हे गाव वीरांचे गाव असल्याचे वीरगळींचा हा समूह दाखवितो.
नाशिक-पेठ रस्त्यावर साधारण ४० किलोमीटरवर डाव्या हाताला कोटंबे हे गाव लागतं. गावाच्या कमानीतून आत जाणाऱ्या फलकावर उस्थळे, देवगाव, गोंदे व घनशेतकडे घेऊन जाणारा फलक दाखवितो. फलकावर एकदरे नसले तरी याच रस्त्याने चार किलोमीटर गेल्यावर एक चौफुली लागते. चौफुलीवर कोठेही न वळता दमणगंगेला डाव्याहाताला ठेऊन पाच-सहा किलोमीटर गेल्यावर गंगेच्या काठावर वसलेले एकदरे पहायला मिळते. चौफुलीपासून एकदरेपर्यंतचा प्रवास खडतर रस्ता अन् अवघड घाट हैराण करीत असला तरी दमणगंगेची सोबत मिळाल्याने हा प्रवास अल्हाददायक होतो. सागाची झाडे अन् डोंगरउतारावर आदिवासींची घरे, शेत पाहताना दमछाक करणाऱ्या प्रवासाचा विसर पडतो. एकदरेत प्रवेश करताना डाव्या हाताचे लाकडी बांधणीचे हनुमान मंदिर व उजव्या हाताकडेचा वीरगळींचा समूह आपले स्वागत करतो. हेदपाडा, उसनळा व एकदरा अशा तीन पाड्यांचे सातशे लोकसंख्येचं एकदरे हे वारली आदिवासी समाजाचे गाव आहे. या वीरगळी केव्हापासून येथे आहेत याचे उत्तर गावात कोणाकडेही नाही. मुळात यांना वीरगळ म्हटले जाते हेच त्यांना माहीत नाही. आदिवासींच्या दृष्टीने या चिरा आहेत. त्यांच्या घरातील कोणाच्या तरी असाव्यात, असे ते सांगतात. पंधरा-वीस वीरगळींचा हा समूह एका रांगेत उभा केलेला आहे. आदिवासींसाठी या चिरा त्यांच्या पूर्वजांच्या असल्याने त्या वीरगळींना शेंदूर फासलेला आहे. सण-उत्सवाच्या काळात त्यांना नेवैद्यही दाखविला जातो. या वीरगळी नेमक्या कोणाच्या हे कोणालाही सांगता येणार नाही, असे शंकर सापटे सांगतात.
एका वीरगळीवर काळाराम सापटे असे नाव असून, काळाराम सापटे यांची वीरगळ दोन चौकटींची आहे. वरच्या चौकटीत वीर घोड्यावर बसलेला असून, त्याच्या हातात काठी आहे. तर त्या चौकटीवर चंद्र, सूर्य कोरण्यात आला आहे. खालील चौकटीत कंबरेवर हात ठेवलेली त्या वीराच्या बायकोची प्रतिमा असून, तिच्या दोन्ही बाजूला झाडवेलीची प्रतिमा आहे. शंकर सापटे आमच्या पूर्वजांपैकी एक असल्याचे ते सांगतात. मात्र ते कोण होते अन् ही वीरगळ केव्हा उभारली हे अज्ञात आहे. एकदरेतील या वीरगळींच्या समूहाचे कौतुक तेथील आदिवासींनाही आहे. मात्र मागील पन्नास वर्षांपासून एकही वीरगळ उभारली नसल्याचे पुंडलिक बात्रे सांगतात. गावात लाकडी चिराही उभारल्या जातात. मात्र ही प्रथाही आता बंद झाली आहे. दगडी वीरगळींनंतर लाकडी चिरा उभारण्याची परंपरा आदिवासींमध्ये होती. या चिरा गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारल्या जात असत; मात्र आता त्याही उभारणे बंद झाले आहे. लाकडी चिराही येथे पहायला मिळतात. त्यांच्यावरही ती व्यक्ती कोणत्या कारणाणे मरण पावली ते कोरलेले असते व त्यावरही सूर्यचंद्र कोरलेला असतो. मात्र आता त्या दुर्मिळ होत चालल्या आहेत, असेही ते सांगतात. मात्र या चिरा व वीरगळ वैशिष्टपूर्ण असून, त्यावरील नक्षी, वीराचे हावभाव, त्यांच्या बायकांची लगबग, पेहराव, दागदागिने व वीरगळीचे नक्षीकामावरून त्यावेळच्या जीवनशैलीची कल्पना येते. मात्र आताची आदिवासी बांधवांची परिस्थिती पाहिली तर कोठे गेले ते वैभव असा प्रश्न पडतो.
एकदरेत वारली आदिवासी राहतात. वारली ही जंगल व डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहत आलेली एक प्राचीन आदिवासी जमात आहे. वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ‘ वारली ‘ शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. वारली म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन वारली चित्रकला येते. या आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग असली तरी एकदरेत ही कला नामशेष झालेली दिसते. या कलेला आपल्याकडे व्यासपीठ न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात टिकून असलेली ही कला हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. लग्नसोहळ्यांमध्ये मातीच्या घरांच्या भिंतींवर लग्नाचा चौकाच्या चित्रातून दिसणारी ही कला अखेरचा श्वास घेताना दिसते. एकदरेत आता कोणीही वारली चित्र काढत नाही. काही लोकगीतेच फक्त होळी, दिवाळी आदी सणांना गायली जात असल्याने ती टिकून आहेत, असे जानू भोंडवे व पुनाबाई भोंडवे सांगतात.
वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी कांबडी नाच मात्र एकदरेत पहायला मिळतो. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. मांदल नाच होळीत तर घोर नाच किंवा टिपरी नाच दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. भक्तीभावाने अन् बेभान होऊन काठी नाचविली जाते. अशीच एक सागाची उंच काठी मारूती मंदिरासमोर उभी करण्यात आली आहे. तिला सणांमध्ये सजवलं जातं. मात्र बोहाडे अथवा सोंगे करण्याची परंपरा गेल्या पंधरावर्षांपासून बंद पडली आहे. पाड्यावर वीज आली तसा टीव्हीही आला अन् बोहाड्याची जागा या मनोरंजन करणाऱ्या चौकटीने घेतली. मात्र वारली आदिवासींची प्रथा परंपरेवरील श्रद्धा कमी झालेली नाही. मारूती मंदिरात नियमित सप्ताह होतो. मारूती मंदिरापासून काही अंतरावर दमणगंगा वाहते. दमणगंगेचा करंजी डोह एकदरेच्या ग्रामस्थांसाठी खास आहे. तेथे देवीचे व शंकराचे छोटेखानी मंदिर आहे. या डोहाबद्दल अख्यायिका आहे मात्र ती सांगणारी पिढी आता गावात नसल्याने आता ती कोणाला सांगता येत नाही. नाचणी, उडीद, भात या पारंपरिक पिकांबरोबर अनेक रानभाज्याही हे आदिवासी दररोजच्या गरजा म्हणून पिकवितात. त्यांची एक सवय मात्र अजब आहे. ती म्हणजे चहा ऐवजी कॉफी पिण्याची. कॉफी! हो धक्का बसेल पण, एकदरेतील बहुतांश आदिवासी चहा पित नाहीत तर कॉफी पितात. याला कारणही तसं आहे. टाकळा ही कोवळ्या पानाची पालेभाजी आदिवासी पिकवितात. टाकळा या रानभाजीला शास्त्रीय नाव आहे कॅशिआ टोरा. हे गाव डॉ. देवदत्त देशमुख यांनी लक्षात आणून दिले. आदिवासी गावांमध्ये त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते. मात्र इतर आदिवासी गावांप्रमाणे एकदरेत त्वचारोग नाही. याला ही कॉफी म्हणजे ही टाकळा (कॅशिआ टोरा) अनुकल ठरत असल्याचेही डॉ. देशमुख सांगतात. या रानभाजीला शेंगाही येतात. त्या शेंगांची भाजीही केली जाते. टाकळाच्या बियांना तरोटाही म्हणतात. त्या तव्यावर कडक गरम करून नाचणी दळावी तसे ते टाकळाच्या बिया म्हणजेच तरोटा जात्यावर दळतात अन् तयार होते कॉफी! तरोट्याचे पिठाची ही कॉफी ओठांवर खिळून राहते. एकदरेत गेलात अन् कॉफी पिली नाही तर ही सफर पूर्ण होत नाही. कॉफी केव्हापासून केली जाते हेही त्यांना माहिती नाही मात्र गेली अनेक पिढ्या हेच चालत असेल, असे ते सांगतात.
नदीचा काठ असो वा लेणीच्या परिसरातील गावे आपल्या संस्कृतीच्या खाणाखुणा असलेल्या वीरगळ, सतीशिळा अनेक गावांमध्ये विखुरलेल्या रूपात पहायला मिळतात. यावर पुरेसे संशोधन न झाल्याने हे शिल्प कोणी उभारले अन् केव्हा उभारली तसेच ही शिल्पे नक्की काय आहेत असा अनेकांना प्रश्न पडतो. हा अज्ञात वारसा नोंदविला गेला पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास मोठा वारसा पुढील पिढ्यांना किमान पाहण्यासाठी तरी साठविता येईल, असे एकदरे सांगताना दिसतो.
भैरवमय वडनेर
शेकडो वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर घेऊन मिरविणारे वडनेर भैरव हे गाव आपल्या वेगळेपणाबद्दल अजूनही अज्ञात आहे. मुख्य बाजारपेठ व त्याकाळी जिल्ह्याचे स्थान असलेले ऐतिहासिक वडनेर प्राचीन ताम्रपटातून उलगडते. भैरवनाथाचे मंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते.
नाशिक-चांदवड रस्त्यावर ४१ किलोमीटरवर शिरवाडे फाटा लागतो. तेथून वडनेर भैरव ४ किलोमीटर आहे. फाट्यावरून डाव्या हाताने वडनेर भैरवकडे निघाल्यावर लगेचच पालखेडचा कालवा लागतो. तो ओलांडताना डाव्या हाताच्या वडाच्या झाडाखालील एक अनोखी वीरगळ आपल्या स्वागताला सज्ज असलेली दिसते. वीरगळीला न्याहाळताना आपली पावलं एका ऐतिहासिक गावाकडे झेपावताहेत असं वाटायला लागतं अन् मनात कुतुहल निर्माण होतं ते नेत्रावती नदीच्या कुशीत वसलेल्या गावाचं वडनेर भैरव असं नाव कसं पडलं असेल याचं. पूर्वी वडनेर अन् भैरव ही दोन वेगळी गावं होती. वडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी अन् नेहर म्हणजे नदी. नदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडांचा समूह ते वडनेर. तसेच वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो. म्हणूनही गावाला वडनेर म्हटले गेले असावे, असे ग्रामस्थ सांगतात. भैरव गावाला भैरवनाथाच्या मंदिरामुळे भैरव नाव पडले असावे. वडनेर व भैरव ही दोन्ही गावे केव्हापासून एक झाली हे सांगणारी पिढी अथवा नोंद उपलब्ध नाही. मात्र वडनेर व भैरव ही दोन गावे वेगळी होती हे निश्चित करण्यासाठी दोन्ही गावांच्या दोन वेशी, दोन मारूती मंदिरे, दोन तालमी पुरेशा ठरतात. वडनेर भैरव ही गावे एक होण्याबाबत शिंदे व होळकर घराण्यांमधील एक व्यवहाराची नोंदही महत्त्वाची ठरते. अहिल्याबाई होळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून वडनेर भैरवशी जोडले जावे म्हणून त्यांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांना त्यांच्या वणीच्या महसुलात असलेल्या वडनेर गावच्या बदल्यात चांदवडच्या महसुलातील पाचोरे, शिरवाडे, आहेरगाव ही गावे दिली. त्यामुळे ही गावे आता वणी पाचोरे, वणी शिरवाडे व वणी आहेरगाव अशी ओळखली जातात. तर वडनेरला भैरवचे वैभव लाभल्याने वडनेर हे वडनेर भैरव म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवनाथाच्या संस्थानाला १२५० पासून ४४१ बिगा जमीन मिळाल्याचा उल्लेख गुरवांकडील एक दस्तात मिळतो, अशी माहिती चंद्रकांत भंडारे यांनी दिली. गावात प्रवेश करताना मल्लासारखा दिसणारी आग्या वेताळाची मूर्ती आपले स्वागत करते. हे गाव मल्लांसाठीही प्रसिद्ध असल्याचे जणू वेताळ देव सांगायला लागतो. मंदिरासमोर रस्त्यापलीकडे वर्तुळाकार दगड आहे. हे भैरव मंदिराच्या दीपमाळेचे दगड आपल्याला गावाच्या इतिहासात डोकवायला लावतात.

वडनेर भैरवचा प्रवास येथेच संपत नाही तर हा प्रवास आपल्याला येथून १४०० वर्ष मागे मूळच्या प्राचीन वडनेरपर्यंत घेऊन जातो. वडनेरचा उल्लेख आतापर्यंत तृतीय गोविंद राजाचा शके ७३० मधील वणी ताम्रपटात मिळतो. हा ताम्रपट दिंडोरी येथे सापडला असून, सध्या हा ताम्रपट बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीत आहे. हा ताम्रपट संस्कृत नागरी लिपीत असून, राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय यांच्या आमदानीतील आहे. या ताम्रपटाचा मुख्य उद्देश राजाने मयूरखंडी (म्हणजे वणीचा मार्केंडेय किल्ला) या राजधानीतून वेंगीनिवासी भारद्वाज गोत्री द्विवेदी दामोदर याचा पुत्र चतुर्वेदी दामोदरभट्ट याला नाशिक देशातील वटनगर (आताचे वडनेर भैरव) विषयातील (म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण अथवा प्रमुख केंद्र) अंबकग्राम (अंबकग्राम म्हणजे वणीच्या दक्षिणेस ८ मैलांवरील अंबे हे गाव) दान दिले हे नमूद करण्याचा हेतू आहे. हा ताम्रपट वत्सराजपुत्र अरूणादित्य याने लिहिला व यावेळी याचा दूतक भुविराम होता. असे या ताम्रपटात नमूद करण्यात आले आहे. वडनेर येथील नाना ऊर्फ अहिराजी तिडके यांच्याजवळ १९१२ रोजी ताम्रपट मिळाला. हा ताम्रपट कलचुरी नृपती बुद्धराज यांचा असून तो संस्कृत भाषेत असून लिपी दाक्षिणात्य वळणाची आहे. हा ताम्रपट कलचुरी नृपती शंकरगणाचा पुत्र बुद्धराज यांच्या काळातील असून, बुद्धराजाने वटनगरचा काश्यप गोत्री ब्राह्मण बोधस्वामी याला वटनगर भागातील भट्टऊरिका जवळचे कोणिकांचे गाव दान दिले हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट कोरला. हा आदेश विदिशा (मध्य प्रदेशातील हल्लीचे बेसनगर) येथील लष्करी तळावरून अनंतमाहायी नावाच्या राणीच्या आदेशावरून महासांधिविग्रहिक अनाफित याने लिहिला. महाबलाधिकृत प्रसह्यविग्रह हा या वेळी दूतक होता. या ताम्रपटांमधील वडनेरच्या उल्लेखावरून वडनेर मुख्य बाजारपेठ असल्याचे निर्देश करते. यातील आणखी एक ताम्रपट गावातील एका व्यक्तीकडे आहे. मात्र तो दाखविला जात नसल्याने वडनेर भैरवच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात आहेत. मारूती मंदिरातील दगडावरील शिलालेख ग्रामस्थांनी न जपल्याने त्यावर नोंदविलेला इतिहास गमावला आहे. हा शिलालेख कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. गावाबद्दलच्या अशा पाऊलखुणा समजल्या जाण्याची गरज आहे.
बाराबलुतेदारांचे वडनेर भैरव गाव आजही गावगाड्याची ही रचना पेठांच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखविते. मुख्य बाजारपेठ रस्त्याला बाराही बलुतेदारांची दुकाने असल्याचे आजही पहायला मिळतात. ही पेठ पाहताना व्यापाऱ्यांच्या लाकडी नक्षीकामातील माड्या पाहताना नवल वाटते. त्यामुळे वडनेर भैरवच्या या पेठेला गुलजार पेठ असेही म्हणतात. `गुलजार पेठ वडनेरेची, चल सजने तुला दाखवितो’ असे शिरवाडच्या रघुनाथ माळी या शाहीराने नोंदवून ठेवले आहे. यावरून वडनेरच्या व्यापारी पेठेचे गुलजार (आबादीआबाद) महत्त्व समोर येते. दोन्ही गावच्या वेशी आज नाहीत. मात्र बाजारपेठ गल्लीने गावचे वैभव आजही टिकवून ठेवल्याचे दिसते. प्राचीन वडनेर भैरवची औरंगजेबाच्या काळात हानी झाली. औरंगजेबाने गावातील मंदिरे पाडण्याचे आदेश दिले. तेव्हा चार मुस्लिम सरदारांनी भैरवनाथाचे मंदिराचा कळस पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र कळसावर चढलेले ते सरदार वरून खाली पडून मरण पावले. त्यांच्या चार दगडी शिळा आजही मंदिराभवती आहेत. तेव्हा गावातील भैरव गावातील तिडके पाटील यांनी औरंगजेबाला असे न करण्याची विनंती केली. तेव्हा औरंगजेबाने तिडकेंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले. मंदिर पाडले जाऊ नये म्हणून तिडकेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला व ते तिडकेंचे पटेल झाले. त्यामुळे भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात पटेलांनाही पूजेचा मान आहे. पोळ्याच्या दिवशी वडनेरच्या वेशीतून भालेरावांचे व भैरवच्या वेशीतून तिडके (आताचे पटेल) यांचे मानाचे बैल वाजत गाजत प्रवेश करतात. गावातील बाराही बलुतेदारांना म्हणजेच प्रत्येक समाजाला मानपान दिला जातो, अशी माहिती अरूण तारकुंडे व सोपान वक्ते यांनी दिली.
औरंगजेबाच्या त्रासानंतर गाव पुन्हा स्थिरस्थावर झाले ते आहिल्याबाई होळकरांच्या काळात. अहिल्याबाईंनी भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावात तीन मजली चावडी बांधली, भैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधली. अहिल्याबाईंनी बांधलेल्या गावात एकूण चार बारवा आहेत. त्यातील पाचोरा रस्त्यावरील बारवच आज पहायला मिळते. गावात न्यायनिवाड्यासाठी फकिरांची चावडी होती. गाव इंग्रजांच्या काळातही प्रसिद्ध होते ते दरोडेखोरांसाठी. गावावर सतत दरोडे पडत असल्याने १८०० पासून येथे पोलिस स्टेशन होते. त्यामुळे येथे स्वातंत्र्यचळवळही बळावल्याने स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणूनही वडनेरला ओळखले जाते. स्वातंत्र्य सैनिक फकिरदास भालेराव हे गावचे पहिले सरपंच होते. विशेष म्हणजे १९४५ दरम्यान गावात किसान चित्रमंदिर टॉकिज उभे राहिले होते. मशालींच्या प्रकाशात येथे नाटके सादर होत असतं. टुरिंग टॉकिज हा फिरता नाटकाचा मंच गावात येत असे. नाट्य परंपराही गावात जपली जात होती. १९६० च्या दरम्यान गावात वीज दाखल झाली. याच दरम्यान, गावात सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी ग्रामस्थांनी नाट्य चळवळ सुरू केली. गावकऱ्यांनी नाटक बसवून पैसा उभा केला व वाचनालय उभारले, अशी आठवणही ज्येष्ठ मंडळी सांगतात. आजही अरूण तारकुंडे नाटकांतील त्या पात्रांचे डायलॉग म्हणून दाखविताना किसान चित्रमंदिर टॉकिज मंदिरात बसून त्यांना अभिनय पाहत असल्याचा भास होतो. चित्रमंदिरनंतर जळाले अन् टिव्ही दाखल झाल्यानंतर फिरत्या टुरिंग टॉकिजलाही घरघर लागली. गावातील बोहाडे साजरा करण्याची परंपराही ९० च्या दशकात बंद पडली. सध्या वाचनालय एक छोट्याशा जागेत चालविले जाते. याची स्वतंत्र इमारत होण्याची गरज आहे. भैरवनाथाचे मंदिर सुंदर सभामंडप आवर्जून पाहण्यासारखा आहे. मंदिराचा मूळ मंदिर गाभारा दगडी आहे. त्यात भैरवनाथ, जोगेश्वरीची राळ्याच्या लुकनने बनवलेला मुखवटा आहे. जोगेश्वरी शेजारी तिची पाठराखण पुतळाबाईची मूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या हाताच्या दरवाजातून आत गेल्यावर भैरवनाथाच्या रथाचे अवशेष ठेवलेले आहेत. चैत्रेला उत्सवासाठी हे अवशेष जोडून रथ बनविला जातो. तेथून पुढे माहुरची रेणुका मातेची तांदळा आहे. त्याशेजारी भैरवाची व शंभर पार्वतीची दगडी मूर्ती आहे. भैरवनाथाचा उत्सव हे वडनेर भैरवचे मुख्य आकर्षण असते. या उत्सवात रथयात्रा चौवीस तास अविश्रांत चालते. रथात भैरवनाथाची मूर्ती ठेवण्यापासून प्रत्येक चौकात पूजेच्या मानपानाचे त्या त्या समाजाचे मानपान आधीपासून ठरलेले आहेत. त्यानुसार भैरवनाथाची मिरवणूक गावातून डोंगरकडेच्या कोकणटेंभी वस्तीजवळच्या जानुसघरात (जानोसा) येथे भैरवाच्या लग्नासाठी जाते. तेथे भैरवाचा जोगेश्वरीशी विवाह लावला जातो व पुन्हा मिरवणूक मंदिराच्या दिशेने गावातून काढली जाते. यावेळी महिला मिरवणुकीसमोर दंडवत घालतात तर पुरूष मंडळी मिरवणुकीसमोर लोटांगण घालतात. हा सोहळा अनुभवण्यासारखा असतो. गावात गणपती, मारूती मंदिरे आहेत. ईदगाह व जामा मशीदही आहे. भैरवनाथ मंदिरामागे गोसावी समाजाच्या समाधी असून, त्या पाहण्यासारख्या आहेत. बाबुराव गोसावी यांनी त्याला चांगल्याबद्दतीने सांभाळल्या आहेत. गावात दहा-बारा मठ होते. यात नागासाधूंचे मठ सर्वाधिक होते. मात्र आज फक्त एकच पुरी मठ गावात आहे. संत जिवनेश्वर काळू बाबा हे वडनेरचेच. त्यांची समाधी आणि मंदीर वडनेर-शिरवाडे रस्त्यावर आहे.
सोनार अन् ब्राह्मणांसाठी ओळखले जाणारे वडनेर भैरव हे गाव पूर्वी नागवेलींच्या पाणमळ्यासाठी प्रसिद्ध होते. आता हे गाव द्राक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. काळानुसार गावची ओळख बदलली असली तरी गावचा प्राचीन इतिहास आपली ओळख ठळक व्हावा, यासाठी आसुसलेला पहायला मिळतो. प्राचीन वास्तु, ताम्रपट, वीरगळ व शिलालेखांच्या माध्यमातून गावाभर विखुरलेल्या पाऊलखुणा जपण्याची गरज हे गाव मनापासून व्यक्त करते.
नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरातील शिलालेखांचा अखेर झाला उलगडा; नेमका काय आहे अर्थ?
अप्पाजी गणेश वैद्य थोरल्या माधवराव पेशव्यांचे सख्खे साडू होते. ते पूर्वी अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लाखलगावची जहागिरी दिली. त्यांचा वाडा आजही पाहता येतो. लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक आणि वैद्य यांचे संबंध नेमके काय होते, याचा उलगडा होण्यास हे शिलालेख इतिहास अभ्यासकांना उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षाही दुधाणे व्यक्त करतात.
पहिला शिलालेख
लाखलगावच्या घाटावरील हा शिलालेख रामाच्या लाखलगावातील गोदातीरावरील घाटाच्या भिंतीत एका शिळेवर बसविलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपात सात ओळींचा असून, शुद्ध मराठीत आहे. शिलालेखास रंग मारल्याने, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे पुसट झाली आहेत. शिलालेख असा :
१. शके १६६३ दुर्मती
२. नाम सवत्सरे मार्ग-
३. शीर्ष सुध १ तदि-
४. ने श्री गंगा चरणी ल-
५. क्ष्मण कृष्णा तत्पर शि-
६. वराम कृष्णा फाटक
७. निरंतर श्रुभवतु(न)
शिलालेखाचा अर्थ : शालिवाहन शकाच्या शके १६६३ व्या वर्षी दुर्मती नाम संवत्सरात गंगा (गोदावरी) चरणी तत्पर असलेले श्री लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक यांनी गोदावरी नदीच्या तीरी मार्गेश्वर वद्य १च्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १७४१ शनिवार रोजी घाट बांधला.
सिद्धेश्वर मंदिरावर दुसरा शिलालेख
लाखलगावातील दुसरा शिलालेख घाटावरील सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूच्या भिंतीवर कोरलेला आहे. हा शिलालेख चार ओळींचा असून, देवनागरीत व उठावदार पद्धतीचा आहे. शिलालेख असा :
१. श्री शके १६६३ दुर्मती नाम सवत्स
२. रे शुद्ध १४ तद्दिनी शिधेश्व
३. र चरनी शिवराम कृष्णा तत्पर लक्ष्म
४. ण निरंतर
शिलालेखाचा अर्थ : मंदिराच्या बांधणीसंदर्भातील या शिलालेखात शिवराम कृष्णा व लक्ष्मण कृष्णा फाटक यांनी शके १६६३ मध्ये सिद्धेश्वर मंदिर बांधल्याचे म्हटले आहे.
लासलगावची ऐतिहासिक गोष्ट....
चांदवड येथील रंगमहाल आणि निफाडचा होळकरवाडा या दोन्हींच्या मध्यवर्ती
ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी तळ असावा म्हणून येथे भुईकोट किल्ला
बांधला. त्यानंतर येथे लष्कराची छावणी देखील उभारली गेली. यामुळे आजचे
लासलगाव हे त्याकाळी लष्कराचे गाव या नावाने प्रसिद्ध झाले. मल्हारराव
होळकरांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचा कारभार अहिल्यादेवी होळकर बघू
लागल्या होत्या.
अहिल्याबाई होळकर यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांच्या राज्यात गुंडांनी हैदोस घालत लूटमार सुरू केली होती. त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करण्याकरिता अहिल्याबाई होळकर यांनी जो कोणी या गुंडांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले जाईल, असे फर्मान सोडले. त्यानुसार होळकर यांच्या राज्यातीलच यशवंतराव फणसे यांनी गुंडांचा बंदोबस्त केला. दिलेल्या शब्दाप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी आपली कन्या "मुक्ताबाई' हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी लावून देत त्यांना आंदण म्हणून लष्कर गावचा भुईकोट किल्ला निफाडचा होळकरवाडा असा राज्यातील अनेक भाग जहागिरीच्या स्वरूपात दिला गेला.
भुईकोट किल्ला आजही भक्कम स्थितीत
मल्हारराव होळकर यांनी बांधलेला लासलगाव येथील भुईकोट किल्ला आजही भक्कम
स्थितीत आहे. किल्ल्यास दोन मुख्य दरवाजे असून, पहिला दरवाजा हा आजची
लासलगावची वेश म्हणून डौलाने उभी आहे. दुसरा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ असून, त्याचे लाकडी दरवाजे व त्याला लावलेले "गजखिळे' आजही
तसेच आहेत. किल्ल्याच्या मुख्य दाराने प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या
मधील भागात "राणी महाल' आहे. या राणी महालाचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडावर
हिरे-मोती वापरून सुबक नक्षीकाम केलेले आहे. किल्ल्याच्या आत वीटकामाची व
दगडीकामांची सुंदर सज्जे असलेली भक्कम तटबंदी आहे, ध्वजारोहणाकरिता जागा
असून, आजही ही जागा शाबूत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ
असलेल्या लासलगावात आज हा भुईकोट किल्ला डौलाने उभा असून, ध्वज खांबावर
भगवा फडकताना दिसतो.
------
आब्बड कुटुंबाकडे मालकी
1766 मध्ये मुक्ताबाई यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य या लष्करी
छावणीत होते. 1791 मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे आकस्मात निधन
झाल्यानंतर मुक्ताबाई सती गेल्या. त्यानंतर यशवंतरावांचे पाचवे वंशज
गणपतराव फणसे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार गेला. 19 व्या शतकाच्या
सुरवातीला हा भुईकोट किल्ला राजस्थान येथून आलेले व्यापारी शिवराज आब्बड
यांनी एक हजार 300 रुपये भरणा करत किल्ल्याचे मालकीहक्क विकत घेतले.
त्यानंतर 1969 मध्ये या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाला दिली गेली. आजही
पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाला "किल्लेवाले' या नावाने ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकीर्दीतील अत्यंत सुंदर असा भुईकोट किल्ला आजही चांगल्या स्थितीमध्ये बघावयास मिळतो. कालांतराने या किल्ल्याची खासगी मालकी झाली. यशवंतराव फणसे यांच्याकडे बराच काळ भुईकोट किल्ला होता. अनेक चांगल्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे.
संजय बिरार (इतिहास अभ्यासक, लासलगाव)
-------
लासलगावची शान असलेल्या आमच्या या भुईकोट किल्ल्यात आज आमची पाचवी पिढी
आनंदाने राहत आहे. आजही सायंकाळी सातला मुख्य दरवाजा बंद केला जातो, तर
सकाळी साडेसहाला उघडला जातो. त्या काळातील किल्ल्यातील पीरबाबांचे स्थान
आजही असून, गुरुवारी त्याची विधिवत पूजा केली जाते.
सोनू आब्बड (किल्ल्यात वास्तव्य करणारी पाचवी पिढी, लासलगाव)
लासलगाव
प्रकार : गढी
जिल्हा : नाशिक
उंची : 0
श्रेणी : सोपी
अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं 'लासलगाव' ताठ मानेने उभं आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव.
या गावाला होळकरी इतिहासाची महान परंपरा आहे.
सुभेदार मल्हारराव होळकर हे मुळचे जेजुरीजवळच्या होळ गावचे. पहिल्या बाजीरावाच्या काळात आपल्या पराक्रमाने त्यांनी सुभेदारी मिळवली. उत्तरेत मराठेशाहीचा जरीपटका लहरला या मागे होळकर शिंदे गायकवाड या घराण्याने गाजवलेली तलवार कारणीभूत ठरली.
साधारण १७५० साली मल्हारबाबांना चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली. या जहागिरीच्या रक्षणासाठी त्यांनी एका भुईकोट किल्याची उभारणी केली. कालांतराने या भागात लष्करी तळ उभा राहिला.
हे होळकरी लष्कराच गाव अपभ्रंश होऊन बनलं लासलगाव.
मल्हारबाबांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या सुनेला सती जाण्यापासून परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. त्यांना राज्यकारभारात तयार केलं.
पुढे मल्हारबाबांचा वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समर्थपणे सांभाळला.
होळकरांची राजधानी माळव्यात महेश्वर येथे होती. इतक्या दुरहून निफाड चांदवडमधल्या आपल्या जहागिरीकडे लक्ष देणे त्यांना अवघड जात होते. लासलगावचा भाग पूर्वीपासून सुपीक होता. येथे बाहेरून येणाऱ्या लुटारुंचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले होते. अनेक प्रयत्न केले तरी त्याला अटकाव करता येणे अशक्य झाले होते.
अशी कथा सांगितली जाते की अहिल्यादेवींना ही रयतेची रोज चालेली लुट बघवत नव्हती. अखेर त्यांनी या लुटारूंचा व गुंडांचा कोण बिमोड करेल त्याला मोठ इनाम देण्यात येईल अस जाहीर केलं. यात यशवंतराव फणसे हा धनगर युवक पुढे आला.
त्याने आपल्या पराक्रमामुळे लासलगावमधून सर्व लुटारू पळवून लावले. गावाचा बंदोबस्त केला.
त्यांच्या या पराक्रमामुळे अहिल्यादेवींनी त्यांना मोठे इनाम तर दिलेच पण शिवाय आपल्या लाडक्या मुलीचा म्हणजेच मुक्ताबाईचा त्यांच्याशी विवाह लावून दिला. त्यांना आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती.
सरदार यशवंतराव फणसे व त्यांच्या घराण्याने अनेक वर्ष लासलगावचे रक्षण केले. त्यांना शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले.
नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.
संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते.
लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत.
प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.
शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे” आजही पाहायला मिळतात. याच उत्तरेला तोंड करून असलेल्या दारातून होळकरी सैन्य आपल्या शत्रूंवर चालून जात असेल.
किल्ल्याच्या बाहेर गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. किल्ल्यात राणीचा महाल होता. त्याच्या खांबावर हिरे मोतींचे नक्षीकाम केले होते असे म्हणतात.
पुढे कालांतराने काही तरी संकट आले व फणसे घराण्यातील पुढच्या पिढीने लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्याला पाच हजार रूपयात विकला.
आजही हा किल्ला आब्बड कुटुंबाकडे आहे. लासलगावची शान असणाऱ्या या किल्ल्यावर भगवा जरीपटका लहरतान दिसून येईल.
अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत लासलगावची उभारणी केली. या गावाला संरक्षण दिले. स्थैर्य दिले. गुंडापुंडाचा नायनाट केला. यामुळेच पुढे कालांतराने हे गाव बाजारपेठ म्हणून उदयास आले. आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला उच्च दर्जाचा कांदा विकण्यासाठी हक्काची जागा मिळाली. आजही ही ओळख टिकून आहे याचं श्रेय जाते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीला.
किल्ले लासलगाव (Lasalgaon Fort)
ता.निफाड जि.नाशिक(महाराष्ट्र)

इतिहास :
सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांना सन १७५० च्या दरम्यान चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली त्यांनंतरच्या काळात या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरवात झाली असावी पण या किल्ल्याच्या निर्माण हा होळकरकालीनच.
“लासलगाव” या नावाच्या मागे एक लोककथा आहे ती अशी कि, राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळापासूनचा लासलगावचा प्रदेश सुपीक होता व या सुपीक प्रदेशावर परकीयांचे आक्रमण होण्याचा जास्त शक्यता होती त्यामुळे राणी अहिल्यादेवी यांनी या ठिकाणी लष्करी भुईकोट निर्माण करण्याचे ठरवले व निर्माण केलाही. कालांतराने हे गाव लष्करी नियंत्रणाखालील गाव म्हणून घोषित केले त्यामुळे या गावाला लष्करी गाव म्हटले जाऊ लागले. पुढे लष्करी गावाचा ब्रिटिश काळात अप्रभ होऊन लासलगाव म्हटले जाऊ लागले.
सन १७६६ ला राणी अहिल्यादेवी होळकर यांची कन्या मुक्ताबाईचा विवाह सरदार यशवंतराव फणसे यांच्याशी झाला. त्यानंतर सरदार यशवंत फणसे यांना राणी अहिल्यादेवींनी आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नर मधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती. तराणा प्रांत हा अहिल्यादेवींच्या खाजगी जहागिरीचा होता.

(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)
शिवाय सरदार फणसे घरण्याला शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले. नंतर १८१८ मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुध्दा पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसें कडे तसेच ठेवले.
सन १७९१ ला यशवंतराव फणसे यांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई किल्ले महेश्वर येथे सती गेल्या. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. सन १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांचे तत्कालीन महाराज हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशेच्या सरदाराने बंड केले.

(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)
होळकर महालात फणशांचे गारदी घुसले. परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव(दुसरे) यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले.
आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्याला पाच हजार रूपयात विकला. त्यामुळे आज हा किल्ला खाजगी मालकीची संपत्ती आहे.

सन १८४८ ला ब्रिटिशांनी नगर जिल्हा होळकरांकडून ताब्यात घेतल्यामुळे फणसे घराणे नामधारी राहिले. लासलगाव व निफाडचा पाटिलकी चा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने १९३७ ला दिला होता. नंतर भारत स्वतंत्र झाला. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. १९५२ ला वंशपरांपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंची ही पाटीलकी रद्द झाली.
माहिती :
पूर्वी संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते. त्या वेशी वर श्रीराम मंदिर ट्रस्ट असे लिहिलेले आहे. वेस आजही चांगल्या स्थितीत असून जांग्या व पाकळी कलाकृती वरील बाजूस बघायला मिळते. या वेशीवरून पूर्वीच्या संपूर्ण तटबंदीचा घेरा केवढा असेल याचा अंदाज येतो. तटबंदी मध्ये पाषाण व विटांचा वापर केलेला दिसतो.

लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छरी आहेत. तोफ किवा बंदुका यांचा शत्रूवर मारा करायला यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुजावर आहेत.
मुख्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि गजखिळे अजूनही भक्कम आणि शाबूत आहेत, त्यावरील होळकर कालीन लाकडी व लोखंडी नक्षीकाम हि वाखन्याजोगे आहे. शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे”. उत्तरेकडे तोंड असलेल्या याच दरवाज्यातून कित्येक स्वाऱ्यांसाठी होळकरांची घोडी-लष्कर भरदाव वेगाने बाहेर पडली असतील.



किल्ल्याच्या मधल्या भागात आज तसे काहीच नाही मात्र पूर्वी लाकडी महाल अस्तित्वात होता. त्याचे सर्व काम हे लाकडात असल्यामुळे त्याला लाकडी महाल किंवा राणी महाल म्हटले जात. या महालातील लाकडांवर हिरे मोती वापरून सुबक असे नक्षीकाम केले होते. काळाच्या औघात हिरे मोती गायब झाले व ९० च्या दशकात जेव्हा संपूर्ण महाल खांदून काढला तेव्हा त्यामधील लाकडात काही हिरे मिळाले होते असे सांगितले जाते.


हा किल्ला लष्करी दृष्टिकोन ठेऊन बांधला असल्यामुळे स्वतःच्या संरक्षणाची पण होळकरांनी खबरदारी घेतलेली दिसते. या किल्ल्यात भुयारी मार्ग नजरेस पडतात. या भुयारी मार्गाच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही भुयार हे येथून २० कि.मी अंतरावर असणाऱ्या चांदवडच्या होळकर वाड्यात निघतात व काही निफाडच्या होळकर वाड्यात व काही येथून काही अंतरावर असलेल्या होळकर वस्तीवर. होळकर वस्तीवर असलेल भुयार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिवीतास धोका असल्याचे कारण तेथील स्थानिक लोक देतात. जीवितास धोका आहे म्हणून एखादा ऐतिहासिक वारसा नष्ट करायचा हा एकमेवच पर्याय आपल्याकडे आहे का?

वीटकामाची व दगडी कामाची सुंदर सज्जे असलेली तटबंदी मजबूत आहेत. सध्या किल्ल्यात खाजगी मालकाचे सहा ते सात कुटुंब राहत आहेत. काही तटबंदीवर आतल्या बाजूने अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे दिसून येतात. ध्वजारोहनची जागा हि आजच्या घडीला व्यवस्थित आहे.



सरदार यशवंतराव फणसे व मुक्ताबाई यांचा जीवनातील बहुतेक काळ हा महेश्वरला गेला. महेश्वर दरबारी फणसे घराण्याला मानाचे स्थान होते. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदोर-महेश्वर ते पंढरपूर अशी आषाडी दिंडी सुरु केली होती. त्या दिंडीची सर्व जबाबदारी हि यशवंतराव फणसे यांची असायची.


दाराच्या चोकटीची भव्यता व नक्षीकाम वाखण्याजोगे आहे
यशवंतराव व मुक्ताबाई त्या दिंडीबरोबर पंढरपूर पर्यंत पायी वारी करत असत. पुन्हा ती होळकरांची दिंडी महेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली कि ते दोघे लासलगावच्या किल्ल्याला मुक्कामी येत असत. मात्र या किल्ल्याचा मुख्य वापर हा लष्करीदृष्ट्याच केलेला दिसतो. आजही होळकरांची दिंडी इंदोर ते पंढरपूर अशी वारी करते व शेवटचा मुक्काम हा पंढरपूरच्या होळकर वाड्यात असतो.
होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्यात हि या किल्ल्यावरून अनेक वेळा संघर्ष झालेला कागदोपत्री बघायला मिळतो. यावरून लासलगाव परिसर व किल्ला लष्करीदृष्ट्या किती महत्त्वाचा होता हे समजू शकते.
राणी अहिल्यादेवी यांनी राज्य परराज्यात जलसाठे निर्मिले मग त्याच्या कर्तृत्वातून लासलगावचा परिसर कसा सुटला असेल. या नजरेने आसपासच्या परिसरात अनेक हेमाडपंथी मंदिरे तसेच चिरेबंदी काळ्या पाषाणातल्या बारवा पाहावयास मिळतात. किल्ल्याच्या बाहेर इच्छापूर्ती गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. हे गणेश मंदिर आकाराने लहान असून प्रसिद्ध आहे. बारवेचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात असून दोन मजली आहे. बारवेत दोन कमानी असून दोन्ही बाजूला देवळ्या पाहवयास मिळतात. एकदंरीत बारवेचे बांधकाम उत्कृष्ट व मनाला भावणारे आहे.


राणी अहिल्यादेवींच्या इतिहासात आपल्याला एक कथा अशी ऐकण्यास मिळते कि, मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर काही वर्षांनी निमाड प्रदेशात दरोडेखोरांचा सामान्य जनतेला त्रास होऊ लागला होता त्यामुळे राणी अहिल्यादेवीनी किल्ले महेश्वर दरबारी एक पण ठेवला होता, जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, जबर बसवेल त्याच्याशी मी माझी मुलगी मुक्तबाई हीचा विवाह लावून देईल तेव्हा त्या दरबरातील एक धाडसी भिल्ल किंवा आदिवासी तरुण पुढे आला व त्याने हा पण पूर्ण केला. त्यांनतर अहिल्यादेवीनी आपली मुलगी मुक्तबाई हीचा विवाह यशवंतरावाशी लावून दिला. पण या कथेचा कोठे हि कागदोपत्री उल्लेख मिळत नाही किंवा मला तरी अद्याप मिळाला नाही.

(फोटो: आण्णासाहेब डांगे यांचे सौजन्य)
याच कथेचा फायदा घेऊन काही लोकांकडून अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले असे सांगितले जाते. अहिल्यादेवींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले? का नाही? हा वेगळा विषय होऊ शकतो मात्र हि कथा आंतरजातीय विवाहाचे उदाहरण होऊ शकत नाही. कारण यशवंतराव फणसेंचे सध्याचे वंशज हे जातीने धनगर आहेत. तसेच ज्या इतिहासकारांनी यशवंतराव फणसे यांचा आदिवासी असा उल्लेख केला आहे त्यांनी त्याचे तत्कालीन दाखले दिले नाहीत त्यामुळे सध्याच्या माहितीवरून आपुन असा निष्कर्ष काढू शकतो कि, यशवंतराव फणसे हे जातीने धनगर होते व अहिल्यादेवींनी आपल्या मुलीचा विवाह हा जातीमधील तरूणाशीच लावला होता.
नानासाहेब होळकर हे सध्या फणसे घराण्याचे वंशज आहेत, असे ते सांगतात. सध्या त्यांचे वास्तव्य हे निफाडला असते. नानासाहेब होळकर हे फणसे घराण्याला दत्तक आले आहेत.
माहितीसाठी आभार :
नानासाहेब होळकर, निफाड, जि.नाशिक
फोटोसाठी आभार :
आनंद बोरा, अमर रेड्डी, प्रशांत परदेशी
अधिक फोटो पाहण्यासाठी Click करा
काही शंका किंवा सूचना असल्यास संपर्क करा.
contact@ahilyabaiholkar.in
लासलगाव | हारूण शेख | Lasalgaon
लासलगावच्या उत्तरेला आहिल्याबाई होळकरांची (Ahilyabai Holkar) उपराजधानी चांदवड तर दक्षिणेला सरदार विंचूरकरांचे संस्थान. सरदार विठ्ठल शिवदेव दाणी (विंचूरकर) मल्हारराव होळकर या दोन्ही सरदारांनी थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दित शौर्य गाजविले…
त्यामुळे बक्षिसरुपी मल्हारराव होळकरांना इंदौर, चांदवड व इतर सुभे मिळाले व सरदार विंचूरकरांना विंचूर गाव व इतर सुभा मिळाला. विंचूर-चांदवड हा मार्ग लासलगावातूनच जातो. याच मार्गाने पूर्वी सरदार विंचूरकर, मल्हारराव होळकर हे ये-जा करायचे.
लासलगाव (Lasalgaon) हा मधला पठारी भाग म्हणून या काळात व्यापारी दृष्टीने व लष्कराला हालचाली, कवायती करता याव्या म्हणून या ठिकाणी भुईकोट किल्ला (Bhuikot Fort) बांधण्यात आला. आजही कांद्याच्या आगारात हा किल्ला ताठ मानेने उभा आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या किल्ल्याची जहागिरी आपल्या जावयाला दिली. किल्ला भुईकोट असून त्याचा रुबाब बघून आपण थक्क होतो. लासलगावची जुनी वेस ओलांडून आत तो सापडतो. या किल्ल्याची कहाणी थक्क करणारी आहे. यशवंतराव हे एक साधारण शिपाई होते परंतू अहिल्यादेवींना शूर जावईच हवा होता.
यशवंतरावांची निवड स्वयंवरातून झाली. त्यांनी जावयाला निफाडचा वाडा, लासलगावचा किल्ला, जुन्नर आदी जहागिरी बहाल केली. यशवंतरावांच्या निधनानंतर त्यांचे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे या किल्ल्याचा कारभार आला. 1835 दरम्यान इंदूरच्या गादी सांभाळणार्या हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशांच्या सरदाराने बंड केले. होळकर महालात फणशांचे गारदी घुसले पण नियोजन फसल्याने हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांचे हरीराव महाराजांचे वारसदार तुकोजीराव यांच्याशी झुंज झाली आणि यात ते मृत्यूमुखी पडले.
यामुळे या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे गणपतराव हे सैरभैर झाले. आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेवून आपल्यावर कारवाई करुन जप्ती आणतील या शंकेतून त्यांनी हा किल्ला एक जैन व्यापारी आब्बड यांना विकला. हा किल्ला अहिल्याबाईंनी आपले जावई सरदार यशवंतराव फणसे यांना कन्यादानात मुलखाची जहागिरीसह दिला. लासलगाव व निफाड प्रांताचे पाटीलकीचे दिले होते. सरदार फणसे घराण्याला यात्रेचा मान, कर वसूली, शिक्षा देणे असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात प्रदान करण्यात आले.
नंतर 1818 मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात पाटीलकीचे वतन वंश परंंपरागत फणसेंकडे आले. लासलगावचा व नाशिकचा पाटिलकीचा बिल्ला नाशिक कलेक्टरने 1937 ला दिला. नंतर भारत स्वतंत्र सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 1952 ला वंशपरंपरागत पाटीलकी रद्द करण्यात आली. त्यामध्ये सरदार फणसेंचीही पाटीलकी रद्द झाली. आजही किल्ला खासगी मालकीत राहिला. त्याला भक्कम अशी तटबंदी आहे.
भले मोठे महाद्वार आहे. आतमध्ये आता सिमेंटची काही घरे उभी राहिली आहेत. जुन्या इमारती, आतले काही लाकडी, दगडी व विटांचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. आतमध्ये लाकडाचे सुंदर कोरीव काम केलेला फार मोठा दरवाजा आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा सुद्धा फार भक्कम आहे. आज जरी तो चहुबाजूंनी घरांनी वेढलेला असला तरी तो ऐतिहासिक शान शोभावा इतका सुस्थितीत आहे. व हाच किल्ला लासलगावची नव्हे आपल्या इतिहासाची शान आहे.
लासलगाव ता.निफाड जि.नाशिक येथील राणी अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला भुईकोट किल्ला सध्या खाजगी मालकीमुळे दुर्लक्षित आहे. दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान यांच्या ४० व्या मोहिमे अंतर्गत या किल्ल्याचे संवर्धन करण्यात आले, त्यामुळे त्यांचे प्रथमतः होळकर राजघराण परिवारातर्फे जाहीर आभार. या मोहिमेत बुरुजावरील कचरा स्वच्छ करण्यात आला. मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, भीमराव राजोळे, चंद्रकांत दुसाने, भाऊसाहेब राजोळे, आशिष बनकर, आकाश जाधव, सागर बनकर, धनंजय बागड, सागर घोलप, अजित जगताप, समीर ठाकूर आदी सहभागी होते. लासलगावचा भुईकोट किल्ला "अहिल्यादेवींचा किल्ला" या नावाने ओळखला जातो. राणी अहिल्यादेवी होळकर आणि लासलगावचा भुईकोट किल्ला यांचा इतिहास लवकरच आपल्यासमोर सविस्तर मांडू.
आभार : प्रा.आनंद बोरा
स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]
चला त्यासाठी भगूर्-नाशिकला!
** ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नव्याने टाकलेला आहे**
* ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नंतर लिहिलेला आहे.

' अष्टविनायकदर्शन' या नावाचे एक ई-बुक इंटरनेटवरून फ्री-डाऊनलोड करता
येते हे कळल्यावर मी ते डाऊनलोड करून घेतले. वाटले होते कि ते असेल
गणेशाच्या आठ स्थानांबद्दल ! पण या पुस्तकातील 'विनायक' आहे स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर!
टीनेजर्सना वा त्याहून अधिक वयाच्या लोकांना सावरकरांचे चरित्र आणि
अफाट कार्यकर्तृत्वाची अगदी प्राथमिक ओळख व्हावी या उद्देशाने तासादीडतासात
वाचून होईल असे हे प्रकाशचित्रांसहीत ४० पानी पुस्तक लिहिले असल्याचे
लेखकाने नमूद केले आहे. त्यातील पहिल्या भागाचे इंग्रजी भाषांतरदेखील इ-बुक
स्वरूपात त्याच लेखकाने उपलब्ध केले आहे.त्याचे नाव मात्र 'स्वातंत्र्यवीर
सावरकर' [इंग्रजी अक्षरे]' असे आहे आणी तेही फ्री-डाऊनलोड करून घेता येते.
पुस्तकातील पहिल्या भागात कृतज्ञता भावनेने केलेली भगूर्-नाशिक,
पुणे, लंडन, ब्रायटन, मार्सेलिस, अंदमान, रत्नागिरी आणि दादर अशा आठ
ठिकाणांची [लेखक त्यांना आठ विनायक म्हणतो] यात्रा घडविली आहे. ती घडवित
असतांनाच चरित्र आणि कार्य यांचे दर्शन घडविले आहे.
दुसर्या भागात सावरकरांच्या व्यक्तिमत्वातील आठ पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर मला या आठ विनायकांपैकी ज्या विनायकांचे दर्शन घेणे शक्य आहे तेथे जाण्याची इच्छा निर्माण झाली.
सात डिसेंबर २०१२ या दिवशी एका विवाहानिमित्त नाशिक येथे जायचे होते
त्यावेळी पुस्तकात दिलेल्या भगूर्-नाशिक येथिल ,'पहिल्या विनायकाचे दर्शन'
घ्यायचे ठरविले. तो अनुभव [भगूरचा पहिल्या भागात आणी नाशिकचा दुसर्या
भागात]येथे देणार आहे...
भगूर येथील सावरकर- जन्मस्थान :
नाशिकपासून साधारण १६ किमि. चांगला रस्ता आहे. आम्ही
पुणे-राजगुरुनगर्-सिन्नर-घोटी-पांडुरली- भगूर या मार्गाने जाऊन सहा डिसेंबर
२०१२ ला साधारण १२ वाजता भगूरला पोचलो.
सावरकरांचे पूर्वज बळवंत रामचंद्र सावरकरांनी तलवार गाजविली होती.
दामोदरपंतांच्या आईचे माहेर देखील क्षात्रतेज असणारे घराणे होते.
जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात
विकून टाकला होता. लिलावात घेणार्याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले
होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते सावरकरांना सरकारने परत करावे या लोकांनी
केलेल्या मागणीला काँग्रेसी सरकारांनी प्रतिसाद दिला नाही. पण युती
सरकारच्या काळात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठींब्यामुळे सरकारने
तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व
खात्याकडे दिले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तित्के
मुळचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना
सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते.
याच वाड्यात २८ मे १८८३ या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांच्या
नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला
दिले गेले. त्याची कथाही मोठी मजेशीर आहे. वाड्यातील तळमजल्यावरील
जन्मस्थानाचे जागेवर तशी एक पाटी व सावरकरांचा परिचित फोटो आहे.
कंपाऊंडच्या भिंतीच्याआतील वाडा बर्यापैकी मोठा आहे. आत शिरल्यावर समोर
अंगण आहे. उजव्याबाजूच्या कंपाऊंडलगत त्यांचा अर्धपुतळा आहे. समोरच्या
पडवीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या
अरुंद जिन्यांकडे जाता येते. आतील खोल्यांमध्ये सावरकर-कुटुंबियांचे आणि
सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहेत.
आतल्या खोलीला लागून लहानसे देवघर आहे. तेथे त्यांच्या घरी एकेकाळी
असलेल्या अष्टभुजादेवीचा फोटो ठेवला आहे.
* दामोदरपंतांच्या आईच्या पूर्वजांनी लुटारू टोळ्यांचा पराभव करून त्यांच्याकडून अष्टभुजादेवी भगूरला आणली. आणि तीच सावरकर घराण्याची कुलदेवता झाली. तिला त्याकाळच्या प्रथेनुसार बोकडाचा बळी द्यावा लागत असे म्हणून मूर्ती खंडोबाच्या देवळात ठेवली होती पण सावरकरांच्या बालपणी ती समारंभपूर्वक घरात आणली गेली. पण बळी मात्र खंडोबाच्या देवळात दिला जाई. या कुलदेवतेसमोरच सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी सशस्त्र लढा देण्याची शपथ नाशिकला असतांना घेतली. *
वरच्या मजल्यावरील दालनात सावरकरांचे एक मोठे तैलचित्र आहे. भगूर
सारख्या खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक बालक मोठेपणी एका
महाबलाढ्य जागतिक शक्तिला आव्हान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची
शपथ घेतो आणि त्यासाठी सर्व आयुष्य झोकून देतो ही गावासाठी केवढी तरी
अभिमानाची बाब!
अशी व्यक्ति वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत ज्या घरात वावरली त्या
घरात आपल्याला वावरायला मिळणे ही केवढी भाग्याची आणि चित्तथरारक गोष्ट आहे
याची जाणीव सतत होत होती.
खरे तर सावरकरांचे ५वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या काळाचा
हा वाडा साक्षिदार! त्यांच्या अनेक आठवणी त्या वास्तूशी निगडित. पण
त्याविषयीची माहिती देण्यासाठी थोड्या फलकांशिवाय कोणी नाही ही उणीव
जाणवली.
डिपार्टमेंटचा एक कर्मचारी देखभालीसाठी तिथे असतो. भेट देणार्यांचे
नाव, पत्ता, सही वगैरे तो घेतो. पण शेवटी तो एक बदल्या होणारा सरकारी
कर्मचारीच ! खरे तर अशा वास्तूत काम करण्याचे भाग्य आपल्या वाट्याला आले या
आनंदात त्याने एक राष्ट्रीय कार्य म्हणून आपण होऊन सर्व माहिती मिळवावी
आणि जिज्ञासूंना द्यावी. सावरकरांबद्दल आदर आणी माहिती असणारा एखादा
स्थानिक उपलब्ध झाला तर फार चांगले होईल.
** एकदा भगूर गावालगत सावरकरांचा बालचमू धनुष्यबाण, तलवार घेऊन खेळत
असतांना गोर्या शिपायांचा घोडदौड-सराव चालला होता. उजव्या हातावर भल्या
मोठ्या विंचवाचे चित्र गोंदवलेल्या एका गोर्याने मस्करी करण्यासाठी
बाबारावांच्या (थोरला भाऊ गणेश) हातातली तलवार काढून घेतली आणि तो निघाला.
तेव्हा त्यांनी ती परत मागितली. तेव्हा त्याने बाबाला नाव विचारले त्यावर
बाबाने त्यालाच नाव विचारले. त्याने ते सांगितले, ' जॉन पर्किन्स!'
मग बाबाने आपली आणि भावाची त्याच्याशी ओळख करून दिली.
त्याने विचारले,' ही तलवार कुणाची? आणि कुठून आणली ही?'
त्यावर विनायकानेच पुढे होऊन उत्तर दिले, ' आमच्या शूर घराण्याची तलवार आहे ही.'
यावर पर्किन्स तलवार विनायकाच्या हाती देत म्हणाला, 'मग आता तूही ही तलवार घेऊन पराक्रम कर!'
पुढे योगायोग असा कि
सावरकरांना मार्सेलिसला पकडुन मुंबईस आणले तेव्हा याच पर्किन्सने त्यांना
ताब्यात घेतले. लहानपणी पाहिलेले त्याच्या हातावर गोंदवलेल्या विंचवाच्या
चित्रामुळे सावरकरांनी त्याला ओळखले. सावरकरांनी त्याला त्या जुन्या
प्रसंगाची आठवण करून दिली आणि तो प्रसंग आठवून तोही चकीत झाला. **
शेवटी सोलापूर येथील सावरकर विचारमंचाने पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित केलेली त्याच लेखकाची 'अष्टविनायकदर्शन' पण जरा वेगळे ही पुस्तिका पुतळ्यासमोर अर्पण केली आणी तेथील कर्मचार्याला ती जमेल तितक्या लोकांना वाचायला दे अशी विनंति करून बाहेर आलो. जाता जाता नमूद करणे आवश्यक आहे की ही पुस्तिका सोलापूर येथील श्री विवेक घळसासी यांनी स्थापन केलेल्या सावरकर विचारमंचाने त्यांच्या कार्यालयात येणार्यास विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. ती मला मिळाली तेव्हां तरी विक्रीसाठी उपलब्ध केलेली नव्हती..
दुसरा भाग लवकरच येईल आणि तो नाशिक येथील अनुभवाचा असेल.
छान माहिती, सोबत फोटो देता आले तर अजुनच छान !
मला अशी यात्रा करायला मनापासून आवडेल !
व्वा! माहिती छानच. 
महेश + १ 
@महेश आणी दिनेशदा
धन्यवाद!
पण माझी कांहितरी चूक झालेली दिसते; कारण लेख अजून अपूर्ण आहे आणि
सर्वांसाठी प्रकाशित केलेला नव्हता [ निदान अशी माझी समजूत आहे]. तेव्हां
आता संपादित करून याला भाग पहिला करून दुसरा भाग नंतर टाकतो.] प्रचि आहेत
पण ते अद्याप संगणकावर घ्यायचे आहेत. ते दुसर्या भागात देता आले तर
पाहातो.
वा वा उत्तम माहिती. तिथे फोटो काढायला परवानगी नाहीयेका ?
नाशिकला "तिळभांडेश्वराच्या" गल्लीत अभिनव भारताचे कार्यालय होते ना?
@पुरंदरे शशांक | 12 December, 2012 - 14:50
तिथे फोटो काढायला परवानगी नाहीयेका ?<<
आत परवानगी नाही.
>>नाशिकला "तिळभांडेश्वराच्या" गल्लीत अभिनव भारताचे कार्यालय होते ना? <<
त्याबद्दल पुढील भागात देणार आहे.
धन्यवाद!
लेखात फोटो टाकायला आज जमले.
त्यामुळे आज लेखाच्या सुरुवातिलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानाचा फोटो टाकला आहे.
धन्यवाद भास्कर !
माहिती छानच. पण हे 'चालू घडमोडी' मध्य का दिसतंय?
@chaitrali | 31 December, 2012 - 13:31 नवीन
... पण हे 'चालू घडमोडी' मध्य का दिसतंय? <<
कोठल्या सदरात टाकावे याचा निर्णय होईना म्हणून!
खूप छान माहिती. धन्यवाद भास्कारजी !!
मूळच्या लेखात दिलेली नवी माहिती * खुणेने दाखवली आहे.
वेगळेच अष्टविनायक. ही यात्रा तुमची सुफळ संपूर्ण होवो!!
भारती बिर्जे डि... | 7 January, 2013 - 12:58 नवीन
वेगळेच अष्टविनायक. ही यात्रा तुमची सुफळ संपूर्ण होवो!!
<<
शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद!
सुंदर
ती लिंक कोणती? डावूनलोड करण्याची
@रेव्यु | 8 January, 2013 - 09:23
ती लिंक कोणती? डावूनलोड करण्याची
<<
धन्यवाद. सवड होताच ती लिंक शोधून इथे टाकीन.
छानच माहिती 
मूळच्या लेखातनव्याने टाकलेला मजकूर ( डबल स्टार **) मध्ये टाकलेला आहे.
खालील इ-पुस्तिका कोणालाही फ्री डाऊनलोड करून घेता येतील.
डाऊनलोड करतांना प्रथम बुकगंगाचा ई-बुक रीडर [जो फ्री डाऊनलोड करता येतो]
डऊनलोड करून घेण्याचा मेसेज येईल. त्याप्रमाणे तो रीडर डाऊनलोड करावा. मग
त्या रीडरमधून ही पुस्तके पण डाऊनलोड करता येतात.
मराठी इ-पुस्तिका
अष्टविनायकदर्शन लेखक : शशिकांत गोखले
www.bookganga.com/eBooks/Book/4687083064560258553.htm
इंग्रजी इ-पुस्तिका त्याच लेखकाची.
A Darshan of Swatantryavir Savarkar
http://www.bookganga.com/eBooks/Book/5499099720559123886.htm
फार स्लो आहे
@रेव्यु
माझ्या मते डाऊनलोड होण्यास वेळ लागण्याचे मुख्य कारण त्या ४० पानांमध्ये ४० फोटो आहेत.
अंदमानात साजरी झालेली सावरकर पुण्यतिथी. भारतातून त्यानिमित्त गेलेले ४०० लोक तेथे उपस्थित होते.
दि.म. ४-३-२०१३: बातमी
स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनी दि २६-२-१३ ला अंदमानातील पोर्टब्लेअर मधील महाराष्ट्र मंडळात आयोजित विशेष समारंभात अंदमानातील निवृत्त मुख्याध्यापक एम अहमद मुज्तबा यांनी लिहिलेल्या
Veer Savarkar- A Revolutionary political prisoner या इंग्रजीतील
चरित्राचे प्रकाशन झाले. मुज्तबा यांच्या पूर्वजांनी सेल्युलर जेलमध्ये
शिक्षा भोगली होती. सावरकरांनी तेथे भोगलेल्या यातना आणि तसेच कैद्यांच्या
साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे दर्शनही पुस्तकात घडविले आहे असे
लेखकाने या प्रसंगी सांगितले.
दि.म.:११-३-१३: वृत्तः
स्वा. सावरकरांच्या नाशिक या कर्मभूमीत दि १५ मार्च ते १७ मार्च १३ पर्यंत नाशिकमधील 'चोपडा लॉन्स' मध्ये २५ वे स्वा. सावरकर साहित्य सम्मेलन होणार आहे.
त्यातील मुख्य कार्यक्रम : अध्यक्षः यशवंत पाठक
१५-३-१३: दुपारी ४: अभिनव भारत मंदीर, वीर सावरकर मार्ग ते 'चोपडा लॉन्स' शोभायात्रा
सायंकाळी ६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन
१६-३-१३: सकाळी १०: सावरकरांवरील जीवनपट दाखवला जाईल.
सकाळी ११.३०: श्याम देशपान्डे व शुभा साठे यांचे 'साहित्यिक सावरकर' यावर भाषण
दुपारी १: 'सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता' या विषयावर परिसंवाद
सहभागः कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडियर हेमंत महाजन
१७-३-१३:रविवारः सकाळी १० : सावरकरांचा राष्ट्रवाद- व्याख्याते- रमेश पतंगे व अविनाश कोल्हे
सकाळी ११.३०: सावरकर हिंदुत्ववादी का बनले?
- वक्ते सुप्रसिद्ध सावरकर अभ्यासक श्री शेषराव मोरे
दुपारी १.१५: विज्ञाननिष्ठ सावरकर- वक्ते अरूण करमरकर
दुपारी ३.१५: तरुणांचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर- वक्ते वि ह धूमकर आणि वा ना उत्पात
सं ५ : समारोप
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.. तसेच नाशिकजवळच असलेल्या सावरकरांच्या भगूर येथील जन्मभूमीलाही भेट देता येईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा-नाशिक]

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर]
हा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :-
http://www.maayboli.com/node/39583
आता देतो आहे त्याचा उरलेला दुसरा भाग.
भगूरहून जायचे होते नाशिकला! "अभिनव भारत मंदिरा"च्या दर्शनाला!
या मंदिराविषयीच्या माहितीचा मला मिळालेला एकमेव स्त्रोत होता :-
स्वातंत्र्यवीर
सावरकर दर्शन प्रतिष्ठान प्रकाशित विशेषांक
लेख- नासिकचे अभिनव भारत मंदिर-
लेखक : परिचित
मे १९०४ मध्ये अभिनव भारत ही सावरकरनिर्मित स्वातंत्र्यासाठी सशस्त्र
लढा देण्याच्या उद्देशाने उभी केलेली गुप्त क्रांतिकारी संघटना कि जी
त्यांनी स्वतःच स्वातंत्र्य प्राप्तिनंतर १० मे १९५२ ला विसर्जित केली.
स्वातंत्र्यलढ्यातील तिचे ऐतिहासिक कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज जर या
नावाने एकादी संघटना असेल तर तिचा सावरकरांच्या मूळच्या संघटनेशी कोणताही
संबंध नाही.
अभिनव भारत मंदिराच्या रुपात १८५७ ते १९४७ पर्यंतच्या हुतात्म्यांना
श्रद्धांजली म्हणुन अभिनव भारत मंदिर संस्था स्थापन करण्याची कल्पना
सावरकरांनी १९४१मध्ये मांडली. त्यासाठी द्रव्यसहाय्य द्यावे म्हणून त्यांनी
लोकांना आवाहन तर केलेच पण व्याख्यानांद्वारे त्यांनी त्यासाठी उल्लेखनीय
अर्थसहाय्यदेखील केले. त्यांचे जुने सहकारी चक्रपाणी, तिवारी,महाबळ व
वर्तक यांनी त्यासाठी ज्या वाड्यांमध्ये अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचे
गुप्त कार्य चाले आणि जेथे कवी गिविंद राहात तो तिळभांडेश्वर गल्लीतील
धोंडभट विश्वामित्र यांचा वाडा विकत घेतला. शिवाय त्याशेजारचा गोरे यांचा
वाडादेखील. हे गोरे देखील अभिनव भारतचे कार्यकर्ते. त्या वाड्यातच अभिनव
भारत मंदिर उभे केलेले आहे (१०मे १९५३).
भगूरला सावरकरांच्या जन्मस्थानाचे ६ डिसेंबरला दर्शन घेऊन आम्ही
नाशिकला विवाहसमारंभात सामील झालो. ७ डिसेंबर १२ ला अक्षता टाकल्या; नि
कार्यालयाबाहेरील एका वयस्क रिक्षावाल्याला तिळभांडेश्वर गल्लीतील अभिनव
भारत मंदिर माहीत आहे काय? असे विचारले.
तिळभांडेश्वर गल्लीत नेतो. तेथे कोठेतरी नाव वाचल्यासारखे वाटते असे तो
म्हणाला. त्याला म्हटले चल तेथे जाऊन शोधू. परत कार्यालयात आणून
सोडण्याच्या बोलीवर रिक्षा ठरवून निघालो. जुन्या नाशिक भागातील अतिशय अरुंद
गल्ल्यांमधील फूल मार्केट मधून सराफाबाजारातून त्याने रिक्षा शेवटी एका
अतिशय अरूंद गल्लीतून जराशा रुंद गल्लीत आणून उभी केली आणि म्हणाला, "ही
आहे तिळभांडेश्वर गल्ली. विचारा इथे!"
बाजुने एक तरूण जात होता त्याला विचारले. तो म्हणाला, "ही काय समोरच पाटी दिसतेय!"
त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले. तेथूनच निघणाऱ्या दुसऱ्या अगदी अरुंद गल्लीच्या डेड एन्डला ठळक अक्षरे दिसली : अभिनव भारत मंदीर.
मंदिराशी कसलेही साम्य नसलेली वास्तू! पोचलो तर शेवटी इथे! असे
वाटण्याचे कारण म्हणजे माझ्या आसपास राहाणारे कांही जण अनेकदा नाशीकला
जातात आणि तेथे कित्येक दिवस नातेवाईकांकडे राहातात देखील. त्यांच्याकडून
या अभिनव भारत मंदिराला जाण्याच्या मार्गाविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न
सफल झाला नाही. त्यांना नाशिक मध्ये अशी माहिती असणारा कोणी भेटला नाही
म्हणे. मायबोलीवर नाशिक नामक गप्पाटप्पांचा धागा आहे. त्यावरही मी आवाहन
करून पाहिले होते. पण कोणाही नाशिककराचा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे
समोरच्या घरावरील ती अक्षरे पाहून एका बाजूला सुखावलो पण त्याच वेळी त्या
गल्लीची नि प्रवेशद्वाराची अवस्था पाहून मन खिन्नही झाले.
माझ्या कल्पनेतील मंदिर आणि प्रत्यक्ष वास्तू यामध्ये कमालीचे अंतर
होते. असे असले तरी त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्व आणि पावित्र्य तिळमात्रही
कमी होत नाही. आपली अनास्था मात्र अधोरेखित होते हेच खरे.
हा आहे गोरे यांचा वाडा. १६१६, तिळभांडेश्वर गल्ली, सराफ बाजाराजवळ,
नाशिक - ४२२००१. या वाड्यात अभिनव भारत मंदीर हे स्मारक स्वातंत्र्योत्तर
काळात सावरकरांच्या प्रेरणेने निर्माण झाले. त्याला कारणही तसेच आहे. अभिनव
भारत संघटनेचे सदस्य या गोरे वाड्यात नि शेजारच्या धॊंडभट विश्वामित्र
यांचे वाड्यात जमून सर्व योजना गुप्तपणे आखायचे आणि पार पाडण्य़ासाठीची
तयारी येथुनच करायचे! त्या सर्व घटनांची साक्षीदार अशी ही वास्तू!
समोर अंगण व त्यामागची छोटीशी दुमजली वास्तु या मंदिराचा भाग आहे.
अंगणाच्या उजव्या बाजूस एका कोनाड्यात एक लहान पण अतिशय सुबक अशी शंखचक्रगदाखड्गधारी स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती आहे.
तळमजल्यावरील
एका खोलीवर हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व
हुतात्मा देशपांडे कक्ष असे नाम फलक आहेत. वरच्या मजल्यावर "बाबाराव (गणेश)
सावरकर सभागृह" आहे.
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा कान्हेरे यांनी वध केला. त्या योजनेतील
सहभागाबद्दल कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना फाशी दिली गेली. त्या शिवाय
गणेश व विनायक सावरकरांना अंदमानात जन्मठेप आणि सर्वात धाकटा भाऊ नारायण
सावरकर यास सक्तमजुरी अशा शिक्षा दिल्या गेल्या. त्याशिवाय अनेकांना
लहानमोठ्या शिक्षा दिल्या गेल्या. या वास्तू आणि सभोवतालचा परिसर , "नाशिक
कॉन्स्पिरसी"मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्व त्यागमूर्ती
देशभक्तांच्या वावरण्यामुळे पवित्र झालेला! त्याचे दर्शन समाधान देऊन गेले.
सध्या वाड्याच्या डाव्या भागात श्री संजय माधव गोरे राहातात. आम्ही
पोचलो तेव्हा श्री गोरे बाहेर जाण्याच्या गडबडीत होते. मी आमचे येण्याचे
कारण सांगितल्यावर ते थांबले आणि त्यांनी वेळात वेळ काढून कांही अधिक
माहिती दिली, ती येथे देत आहे. माहिती देणारा दुसरा कोणि उपलब्ध नसल्याने
आणि मला उपलब्ध वेळ थोडा असल्याने आणखी माहिती मिळ्वता आली नाही.
" सावरकर कुटूंबीय आधी तिळभांडेश्वर गल्ली पलिकडच्या गल्लीतील
पेठेवाड्यात राहात. तेथील वास्तव्यात सावरकरांनी घरातील अष्टभुजा देवीसमोर
वयाच्या १५ व्या वर्षी त्यांची ती सुप्रसिद्ध " देशाचे स्वातंत्र्य
मिळविण्यासाठी मी सशस्त्र झुंजेन" ही शपथ घेतली. नंतर ते गोरेवाड्याशेजारील
दातारांच्या वाड्यात राहायला आले. सावरकरांच्या क्रांतिकारी उद्योगांचा
संशय ब्रिटीश सरकारला आलाच होता त्यामुळे त्यांच्यावर गुप्त हेरांची नजर
असेच. दातार वाड्याच्या बाहेरच्या पायरीवर एक म्हातारी तांदूळ निवडित
बसलेली असे. वाड्याबाहेर हेरांच्या संशयित हालचाली दिसल्या कि ती सुनेला
हाक मारून सांगत असे, "तांदूळ निवडून झाले ग!" हा इशारा मिळाला कि अभिनव
भारताचे सदस्य मागच्या भागातून निसटू्न जायचे. हेराच्या हाती काहीच लागायचे
नाही.
"रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले " या गाजलेल्या काव्याचे जनक आणि सावरकरांचे बालमित्र "स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद [दरेकर]" यांच्याबद्दल
गोरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोरे यांच्याच वाड्यात वरच्या
मजल्यावर कवी गोविंद यांना राहाण्यास एक खोली दिलेली होती. आत शिरल्यावर
डाव्या बाजूस त्या खोलीत जायला एक लाकडी जिना आहे . ती खोली गोरे यांनी
दाखवली.
या मंदिरात जतन केलेल्या सर्व वस्तू, ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके, फोटो इ.
सर्व, डागडुजी / रंगरंगोटी साठी तात्पुरती इतरत्र हालवली होती त्यामुळे
आम्हाला पाहता आली नाहीत. त्यासाठी पुन्हा कधितरी नीट सवड काढून जायचे आहे.
पण जी वास्तू आणि परिसर भारतमातेच्या या सुपुत्रांनी स्वकर्तृत्वाने आणि
त्यागाने गाजवला त्याचे दर्शन लाभले हेही समाधान मोठेच होते.
आम्हाला ही गल्ली आणि अभिनव भारत मंदिर तेथेच आसपास असल्याचे माहित
असणारा रिक्षावाला भेटला याचे गोरे यांना आश्चर्य वाटले. "तुम्ही फार
सुदैवी आहात " असे म्हणून त्यांनी ते व्यक्त केले. या मंदिराच्या
व्यवस्थेसाठी एक संस्था आहे असे कळले. पण जनतेची अनास्था, कार्यकर्त्यांचा
आणि पैशांचा अभाव यामुळे या मंदिराची एकंदर परिस्थिती पाहून फार वाईट
वाटले. तरीही आहे त्या परिस्थितीत कांहीजण जमेल तितकी चांगली व्यवस्था
ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत हेही आशादायक!
वा, फारच सुरेख माहिती सांगितलीत. अभिनव भारत मंदिर , नांव ही सार्थक आहे..
रिग्रेट!!!आपल्याकडील अनेक अमूल्य पण उपेक्षित ठेव्यांमधे या मंदिराचा नंबर लागलेला दिसतोय!! 
मी-भास्कर,
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. त्याबद्दल आपल्याला सादर प्रणाम. आपल्यासारखे लोक आहेत तोवर जनतेला स्वातंत्र्यवीरांचं विस्मरण होणार नाही. कधी नाशिकास गेलो तर तिळभांडेश्वर गल्लीला जाईनच.
सध्या तिथे राहणार्या संजय माधव गोरे यांना त्या जागेच्या ऐतिहासिक मूल्याची जाणीव होती असे दिसते. अशी लोकही विरळीच. त्यांनाही सादर व सकौतुक प्रणाम.
आ.न.,
-गा.पै.
@वर्षू नील | 16 February, 2013 - 11:25
आपल्याकडील अनेक अमूल्य पण उपेक्षित ठेव्यांमधे या मंदिराचा नंबर लागलेला दिसतोय!!
>>
खरे आहे. पण हे ठेवे नव्या पिढीला दाखवून देणे हे आपले काम आहे.
धन्यवाद.
गामा_पैलवान | 16 February, 2013 - 11:34
कधी नाशिकास गेलो तर तिळभांडेश्वर गल्लीला जाईनच.
>>
अवश्य जाऊन या. अशा ऐतिहासिक वास्तू उपेक्षित राहू नयेत म्हणून असे करणे अत्त्यावश्यक आहे.
छान माहिती आहे. आवडला लेख.
छान माहिती आहे.लेख आवडला
फार सुरेख.
तूम्ही या शीर्षकात स्वा. सावरकरांचे नाव, नाशिक वगैरे शब्द टाकलेत, तर
कुणाही गुगल वापरणार्याला ते सापडू शकेल. म्हणजे आता तरी ते अज्ञात
राहणार नाही.
स्वा.सावरकरांच्या स्मरणदिवसांतला मौल्यवान अनुभव. अष्टदर्शनांपैकी दोन तर झालीत.
शुभेच्छा मी भास्कर !
@फार एण्ड व बंटी७२
धन्यवाद! नाशिकला गेलात तर आवर्जून भगूरलाही जाऊन या.
@दिनेशदा | 20 February, 2013 - 14:12
तूम्ही या शीर्षकात स्वा. सावरकरांचे नाव, नाशिक वगैरे शब्द टाकलेत, तर
कुणाही गुगल वापरणार्याला ते सापडू शकेल. म्हणजे आता तरी ते अज्ञात राहणार
नाही.
>>
आपल्या या बहुमोल सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! ती अंमलात आणण्याचा जरूर प्रयत्न करीन.
@भारती बिर्जे डि... | 20 February, 2013 - 14:53
अष्टदर्शनांपैकी दोन तर झालीत.
>> थोडी दुरुस्ती.
भगूर्-नाशिक मिळून पहिले विनायक दर्शन [दोन भागात]!
दुसर्यासाठी जायचे आहे पुण्याला. तेही यथावकाश मायबोलीवर टाकणार आहे.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
@दिनेशदा
आपण केलेली सूचना अंमलात आणली आहे.
छान, नाशिकला गेल्यावर नक्की भेट देणार.
@कंसराज | 20 February, 2013 - 23:15 नवीन
नाशिकला गेल्यावर नक्की भेट देणार.
<<
जरूर भेट द्या आणि मला मिळालेल्या माहितीशिवाय अधिक कांही माहिती मिळाली तर ती वाचण्यास मला आवडेल.
आज स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन!
धागा वर काढण्यासाठी नवीन प्रतिसाद! 
@सखी-माउली | 26 February, 2013 - 09:57 नवीन
धन्यवाद!
आज स्वातंत्र्यवीरांची पुण्यतिथी! त्यानिमित्त भारती बिर्जे डि यांनी सावरकरांच्या 'कोठडी' या काव्याचे सुंदर रसग्रह्णण आजच मायबोलीवर लिहिले आहे. ते अवश्य वाचा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली.
|| वंदे मातरम् ||
अंदमानात साजरी झालेली सावरकर पुण्यतिथी. भारतातून त्यानिमित्त गेलेले ४०० लोक तेथे उपस्थित होते.
दि.म. ४-३-२०१३: बातमी
स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनी दि २६-२-१३ ला अंदमानातील पोर्टब्लेअर मधील महाराष्ट्र मंडळात आयोजित विशेष समारंभात अंदमानातील निवृत्त मुख्याध्यापक एम अहमद मुज्तबा यांनी लिहिलेल्या
Veer Savarkar- A Revolutionary political prisoner या इंग्रजीतील
चरित्राचे प्रकाशन झाले. मुज्तबा यांच्या पूर्वजांनी सेल्युलर जेलमध्ये
शिक्षा भोगली होती. सावरकरांनी तेथे भोगलेल्या यातना आणि तसेच कैद्यांच्या
साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे दर्शनही पुस्तकात घडविले आहे असे
लेखकाने या प्रसंगी सांगितले.
दि.म.:११-३-१३: वृत्तः
स्वा. सावरकरांच्या नाशिक या कर्मभूमीत दि १५ मार्च ते १७ मार्च १३ पर्यंत नाशिकमधील 'चोपडा लॉन्स' मध्ये २५ वे स्वा. सावरकर साहित्य सम्मेलन होणार आहे.
त्यातील मुख्य कार्यक्रम : अध्यक्षः यशवंत पाठक
१५-३-१३: दुपारी ४: अभिनव भारत मंदीर, वीर सावरकर मार्ग ते 'चोपडा लॉन्स' शोभायात्रा
सायंकाळी ६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन
१६-३-१३: सकाळी १०: सावरकरांवरील जीवनपट दाखवला जाईल.
सकाळी ११.३०: श्याम देशपान्डे व शुभा साठे यांचे 'साहित्यिक सावरकर' यावर भाषण
दुपारी १: 'सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता' या विषयावर परिसंवाद
सहभागः कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडियर हेमंत महाजन
१७-३-१३:रविवारः सकाळी १० : सावरकरांचा राष्ट्रवाद- व्याख्याते- रमेश पतंगे व अविनाश कोल्हे
सकाळी ११.३०: सावरकर हिंदुत्ववादी का बनले?
- वक्ते सुप्रसिद्ध सावरकर अभ्यासक श्री शेषराव मोरे
दुपारी १.१५: विज्ञाननिष्ठ सावरकर- वक्ते अरूण करमरकर
दुपारी ३.१५: तरुणांचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर- वक्ते वि ह धूमकर आणि वा ना उत्पात
सं ५ : समारोप
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.. तसेच नाशिकजवळच असलेल्या सावरकरांच्या भगूर येथील जन्मभूमीलाही भेट देता येईल.
स्वा. सावरकर साहित्य संमेलन, नाशिक
शुक्रवार, दि १५ मार्च २०१३:
शोभायात्रा :
ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने नाशिक
येथे आयोजित रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनानिमित्त भर
दुपारी अभिनव भारत संस्थेपासून काढण्यात आलेल्या नेत्रदीपक शोभायात्रेने
सर्वाचे लक्ष वेधून घेतले. वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी
यात्रामार्ग दुमदूमून गेला. अभिनव भारतपासून निघालेली ही शोभायात्रा
मेनरोड, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, गंगापूररोडमार्गे शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे साहित्य नगरीत पोहोचली. संमेलनस्थळी यात्रेचा समारोप झाला.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाठक, अभिनेता शरद पोंक्षे, ऊर्जा युवा
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते, सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष
शंकरराव गोखले, अभिनव भारत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, भाजपचे
शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विनायकदादा पाटील यांच्यासह विविध मान्यवर
उपस्थित होते.
सावरकरांच्या कर्मभूमीत स्वतंत्रता स्तोत्राचे विक्रमी समूहगान:
'जयोस्तुते श्री महन्मंगले' या स्वतंत्रता स्तोत्राचे ३४४ शाळांमधील एक
लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगान करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
केवळ शालेय विद्यार्थीच नव्हे तर, शहरातील अनेक जॉगिंग ट्रॅक, लायन्स क्लब
अशा विविध ठिकाणी शुक्रवारची सकाळ या कवितेने पूर्णपणे भारल्याचे पहावयास
मिळाले. लाखो विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था, लायन्स क्लब व शेकडो
नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने समूह गायनात सहभागी होऊन सावरकरांना अनोख्या
पद्धतीने अभिवादन केले. रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून या
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची शाळांनी जय्यत तयारी केली
होती. पाच ते सहा दिवस आधीपासून त्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात १९०३ मध्ये पुणे
येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना 'जयोस्तुते श्री महन्मंगले' हे
'स्वातंत्र्याचे अजरामर स्तोत्र' लिहिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे नाशिक येथे उद्घाटन:-
लातूर संमेलनाचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी
संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाठक
यांच्याकडे सुपूर्द केली.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या गौरवार्थ भगवा डोलाने फडकावत
ठेवेन आणि आपले सरकार येताच, नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सावरकरांचे
स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
आज येथे उद्घाटन करतांना दिली. ते म्हणाले, " सावरकरांचा मोठेपणा
आपल्याला समजलेलाच नाही. सावरकरांचा आदर नसलेल्यांना सावरकरांनी भोगलेले
भोग एक दिवस भोगायला लावले पाहिजेत. सावरकरांनी आपणाला मजबूत हिंदुस्थानचे
स्वप्न दाखविले आहे, ते विसरून चालणार नाही. वयाच्या आठव्या वर्षापासून
प्रशिक्षण घेणाऱ्या अतिरेक्यांशी आपला सोळा वर्षांचा पोरगा कसा लढणार?
एकीकडे हिंदूंना आतंकवादी म्हणायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी हातमिळवणी
करायची, याला आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही."
संमेलनाध्यक्ष प्रा. पाठक म्हणाले, " सावरकरांनी साहित्याला
कार्य साधनेचा भाग मानले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांनी
सीमा पक्क्या करायला सांगितल्या होत्या. प्रत्येक मुलाने सैनिकी शिक्षण
घेत आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी त्यांची शिकवण होती.
"
(आधार : लोकसत्ता, सकाळ वृत्त)
स्वा. सावरकर साहित्य संमेलन रौप्यमहोत्सव, नाशिक
शनिवार १६ मार्च २०१३ [वृत्तपत्रातील वृत्तांत]
परिसंवाद: "सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता"
सावरकरांची युद्धनीती अमलात आणा असाच संदेश सर्वच वक्त्यांनी दिला.
परिसंवादाची सुरवात करताना कमांडर आगाशे म्हणाले,
" राज्य करण्यासाठी शक्ती पाहिजे आणि आक्रमणाला प्रतिआक्रमणानेच उत्तर
दिले पाहिजे, हे सावरकरांचे विचार होते. या धोरणांकडे दुर्लक्ष केल्याने
दहशतवाद, नक्षलवाद आणि काश्मीरसारखे अनेक प्रश्न उभे राहिले. देशाच्या
सीमा निश्चित करा, असे सावरकरांनी सांगितले होते. मात्र आंतरराष्ट्रीय
शांतिदूत होण्याच्या नादात भारताने आपल्या सीमाही असुरक्षित करून घेतल्या.
त्यामुळे आपण अराजकतेच्या दिशेने चाललो आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या युद्धनीतीचा भारताने स्वीकार केला असता तर
देशातील आजची विदारक स्थिती निर्माण झाली नसती, असे परखड मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी
मांडले. देशाला वाचविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आता सैनिक, गुप्तहेर आणि
पोलिसाची भूमिका बजावली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
देशाच्या संरक्षणसिद्धतेवर बोलताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणाले,
" कायम संरक्षणसिद्धता ठेवा, असे सावरकरांचे विचार होते. मात्र आपण नेमके
त्याविरोधातील धोरणे राबवून एक मृदू राष्ट्राचा शिक्का मारून घेतला.
त्यामुळे आपण आज सर्व बाजूंनी घेरले गेलो. पाकिस्तान प्रॉक्सी वॉरवर भर
देत आहे, तर चीन अनेक आघाड्यांवर भारताला घेरत आहे. त्यामुळे नौसेना,
वायुसेना आणि भूसेना अधिक सामर्थ्यवान करणे गरजेचे आहे. अण्वस्त्रांची
प्रतिरोध क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ संरक्षणसिद्धता म्हणजे
राष्ट्रीय सुरक्षितता नसून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि
धार्मिक क्षेत्रातील हिताची जपवणूक म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षितता."
भारतीय संरक्षण धोरणांवर टीका करताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन म्हणाले,
"बांगलादेश भारतासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत चालली आहे. भारताला
चहूबांजूनी रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीनने मोठ्या प्रमाणात
देशात आर्थिक घुसखोरी करून देशाला कमकुवत करण्याचे धोरण अवलंबले आहे. आपली
शस्त्रास्त्रे जुनी झाली आहेत. तरीही आपण महासत्तेची स्वप्ने पाहत आहोत"
स्वा. सावरकर साहित्य रौप्यमहोत्सवी संमेलन, नाशिक, रविवार १७ मार्च २०१३
[समारोपदिन]
राष्ट्रभक्तीच्या प्रबोधनाबद्दल अनिस सय्यदचा सन्मान:
मोबदल्याची अपेक्षा न करता राष्ट्रभक्तीचे प्रबोधन करणाऱ्या या
युवकाचा, ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यवीर सावकर
साहित्य संमेलनात सन्मान करण्यात आला. दुष्काळाच्या झळांमध्ये कुटुंबाच्या
पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिकमध्ये स्थलांतरित झालेला यवतमाळ जिल्ह्यातील
हा युवक तिसरी पास असलेला गवंडी आहे. अनिसच्या कामाची ओळख नंदन रहाणे यांनी
उपस्थितांना करून दिली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे "फटकारे' हे पुस्तक अनिसला भेट
देण्यात आले. त्या वेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अनिसचे
कौतुक केले. अनिसने सन्मानाला उत्तर देत असताना खरे देशभक्त
उपेक्षित राहिल्याची सल आपल्या मनात असल्याचे सांगून सत्याग्रहाला जहाल
क्रांतीची जोड मिळाल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे नमूद केले.
यापूर्वी लातूरमध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनासाठी
आपण उपस्थित होतो. तेथे सावरकरांचे विचार सामान्यांपर्यंत पोचत असल्याची
प्रचिती आपणाला झाली आणि एक प्रेरणा मिळाल्याचेही अनिसने सांगितले.
परिसंवाद: सावरकरांचा राष्ट्रवाद
स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी का झाले -वक्ते प्रा शेषराव मोरे
स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी मूळ इस्लामच्या धोरणांचा अभ्यास केल्यानंतरच हिंदू
राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे जोपर्यंत इस्लाम कळत नाही, तोपर्यंत
सावरकर समजून घेता येणार नाही. सर्वांच्या न्यायहक्काचे रक्षण व्हावे, असे
सावरकरांचे विचार होते. त्यामुळेच आपल्यावरील अन्याय रोखण्यासाठीच
सावरकरांनी हिंदूंना एकजूट करण्याचा प्रयत्न केला.
अंदमानला जाण्यापूर्वी सावरकर हिंदू राष्ट्रवादी मुळीच नव्हते. मात्र,
कारागृहात असताना त्यांनी कुराण आणि मूळ इस्लामच्या धोरणांचा अभ्यास केला.
इस्लाममध्ये केवळ एकाच धर्माला स्थान असून, द्विराष्ट्रवादाची उद्घोषणा
कुराणात आहे. इस्लामच्या धोरणांच्या आधारावरच पाकिस्तानच्या निर्मितीची
मागणी केली जात होती. शरीयतच्या आधारावर मुस्लिम नेते स्वतंत्र इस्लामची
मागणी करीत होते. त्याला सावरकरांचा विरोध होता. या मुद्यावरच त्यांनी
इस्लामचा अभ्यास केला. त्यानंतरच सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार
केला. हिंदू संघटित केला पाहिजे, हे विचार तेव्हाच त्यांच्या मनामध्ये
भरले. भारतीय नेत्यांमध्ये राष्ट्राविषयी अनास्था आहे. मात्र, सावरकर प्रखर
राष्ट्रवादी आणि बुद्धिवादी होते. ज्यांनी सावरकरांच्या जीवनाचा अभ्यास
केला, त्यांचे जीवन प्रकाशमान होते. सावरकरांच्या विचारांची आज भारताला गरज
आहे.
स्वातंत्र्यानंतर सावरकरांच्या विचारांचा आधार घेतला असता तर देशातील आजची
अराजक स्थिती राहिलीच नसती. सर्वांच्या हक्कांचे न्याय संरक्षण झाल पाहिजे,
असेच सावरकरांचे मत होते. मात्र, अशी परिस्थिती दिसत नसल्यानेच त्यांनी
आपल्यावरील अन्याय रोखण्यासाठी हिंदूंना एकजूट करायला सुरवात केली.
वक्ते : सावरकर अभ्यासक अविनाश कोल्हे
सावरकरांचा राष्ट्रवाद भूगोलनिष्ठित नव्हता तर संस्कृतिनिष्ठित होता. त्यात
धर्म, अध्यात्माला स्थान नव्हते तर विश्वची माझे घर याचाच त्याला आधार
होता. संपूर्ण हिंदु समाजाची पुनर्बांधणी त्यांना हवी होती. राष्ट्रहिताला
प्राधान्य हेच सावरकरांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. देशातील मुस्लिमांना
त्यांचा मुळीच विरोध नव्हता पण महात्माजींनी चालवलेल्या मुस्लीम अनुनयाला
मात्र तीव्र विरोध होता. राष्ट्रवादाच्या भक्कम पायावर हिंदू राष्ट्रवादाची
उभारणी त्यांना अपेक्षीत होती. पण धर्माधिष्टित राष्ट्रवादी असा शिक्का
त्यांच्यावर मारला गेला. बलशाली राष्ट्रच जगावर अधिकार गाजवू शकते म्हणून
भारताने शक्तिशाली राष्ट्र व्हावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या
राष्ट्रवादावर देश चालला असता तर आज उभी ठाकलेली आव्हाने कधीच उभी राहू
शकलि नसती.
वक्ते- वि. ह. भूमकर
त्यांचा राष्ट्रवाद
जाज्वल्य होता. देशहित सर्वोच्च होते. ज्या मातीत जन्मलो, दफन झालो,
तिच्याशी इमान राखणे हाच करा राष्ट्र्वाद असे ते सांगत. त्यांची
राष्ट्रवादाची व्याख्या आता सर्वमान्य झाली आहे.
समारोपात सा. बांधकाम मंत्री छगन भुजबळ म्हणाले, " सावरकरांची देशभक्ती
वादातीत होती. त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी नव्या पिढीला
त्यांची थोरवी सांगण्याची आज गरज आहे. त्यांच्या या जन्मभूमीत त्यांचे भव्य
राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासन पुढाकार घेईल."
अध्यक्ष यशवंत पाठक म्हणाले," सावरकरांचे विचार हा जगण्याचा श्वास
झाला पाहिजे. त्यांनी समाजाला विद्न्यान निष्ठेचा अंकूर दिला आहे कि
ज्यामुळे समाजाला एक नवसंजीवनी मिळाली आहे."
दि.म. २० मार्च १३:
प्रियंका डहाळे यांचे नाशिकात झालेल्या सा.सा.संम्मेलनाबद्दलचे मनोगत :
सावरकरांच्या
साहित्यावर प्रेम करणाऱ्यांनी जाणकारांकडून विश्लेषण ऐकण्यासाठी गर्दी
केली हे संम्मेलनाचे यश म्हणावे लागेल. पारंपारिक श्रोत्यांपेक्षा तरूण व
महिला यांची उपस्थिती लक्षणिय होती. ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते व भगूर जन्मभूमी असलेल्या सावरकरांचे नाशिकात स्मारक व्हावे म्हणून झटणाऱ्या सावरकरसाहित्य आणि इतिहासाचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी
घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. अध्यक्ष पाठक यांच्याव्यतिरिक्त साहित्य
केवळ नावाला चाखत या द्रष्ट्या नेत्याच्या हिंदुत्वाचाच जागर उद घाटनात
झाला. त्यांच्या साहित्याचा पूर्णांशाने वेध घेतला गेला नाही व कालसापेक्ष
चर्चा झालीच नाही. जर संयतपणे सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा आणि
त्यांचे साहित्य सजगतेने मांडले गेले असते तर राजकारणाचा स्पर्श होऊनही हे
संम्मेलन सावरकरांच्या साहित्याचा उत्सव ठरला असता.
माझे मत
सावरकरांचा आयुष्यानुभव आणि कार्य अफाट !
इतिहास, राजकारण, समाजकारण वगैरे जीवनाची सर्वच महत्वाची अंगे त्यांच्या
साहित्यात एकजीव झाल्यासारखी असल्याने , संम्मेलन जरी साहित्याबद्दलचे असले
तरी ते निव्वळ 'साहित्या'च्या परिघात बंदिस्त करणे निव्वळ अशक्य आहे असे
मला वाटते.















































































.jpeg)
.jpeg)
.jpeg)






































































No comments:
Post a Comment