
मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात स्थापन झालेली मोठी मानवी वसाहत ही महाजनपद काळात दिसून येते. या काळात वस्ती मोठ्या प्रमाणात नद्यांच्या काठावर दिसून येते.
त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भूस्थर रचना यांचा अचूक अंदाज घेवूनच प्राचिन शास्त्रग्रंथातून भूमी परिक्षा करण्यासाठी उपलब्ध क्षेत्र त्या परिसरातील वृक्ष जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद यांचा आधार घेतला जाई. परिसरातील खडकाची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पती व प्राणीजन्य खुणा यांचा अभ्यास करण्यात येई व अनेक वर्षांच्या अनुभवानंतर काही सूत्र सिध्द करण्यात आलेली होती. उदा. जर जांभळाच्या पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर गोड पाणी लागते. ज्या वृक्षाच्या फळास किंवा पुष्पास विकार (फळ किंवा पुष्प सदृष्य) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हात पुढे चार पुरूष खणले असता पाणी लागते. त्याची खूण म्हणजे खाली दगड व पीतवर्ण (पिवळ्या रंगाची जमीन) असेल.
वड, पळस, उंबर हे एकत्र असतील, तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतात, तेथेही वृक्षांच्या उत्तरेकडे चार हात खणले तर पाणी लागेल.
ज्या भूमीवर मुंज, काश कुश यापैकी एका प्रकारचे गवत उपलब्ध आहे व जमीन निळसर, खडकाळ आहे, किमान काळी अथवा तांबड्या (लाल) रंगाची असेल, तेथे विपुल गोड पाणी असते. अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथात याविषयीच्या नोंदी आहेत.

विठ्ठलाजी शास्त्री धारूरकर यांनी उपयुक्त धर्मशास्त्र संग्रह या ग्रंथात (मुंबई शके १८२६) याविषयी चर्चा केली आहे. तर च.धु. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा भूगोल (दिल्ली १९७६) यामध्ये महाराष्ट्राच्या भूस्तर रचनेची व डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यातून भूपृष्ठ व भूजल यांच्या वापराविषयी नोंद केली आहे. अग्निजन्य खडकाची सच्छिद्रता १ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ग्रॅनाईट किंवा बेसाल्टमधून पाणी झिरपणे कठीण असते. चिकण मातीच्या थरातून सहसा पाणी जिरत नाही. उलट, वालूका स्थर किंवा लाईमस्टोन (चुनखडी) खडकातून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सछिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत असतात. या अंतरभौम जलपातळीत भूजल पृष्ठ म्हणतात. देशपांडे नोंदवतात महाराष्ट्रातील विहीरींचे प्राकृतिक स्वरूप केवळ भूपृष्ठ रचनेमुळे निश्चित झाले नसून भूमीगत पाण्याचाही बराच प्रभाव आहे. राज्याच्या जलसिंचनाच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के गरज विहीरी भागवतात. असे असूनही आतातपर्यंत भूमिगत जलपातळीबाबत राज्यात नगण्य संशोधन व्हावे ही आश्चर्यकारक वस्तूस्थिती आहे. आज या क्षेत्रात जाणीपूर्वक लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाआधारे भूजलाचा शोध घेणे शक्य झाले आहे.
दक्षिणेतील द्रवीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोर्यात आढळणारे भूमीज व वेसर (खेचर) स्थापत्यांचा प्रभाव आपणाला त्या त्या क्षेत्रातील बारव स्थापत्यावर पडल्याचे आढळते. याशिवाय भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी लयन स्थापत्य (गुहाशिल्प) दुर्ग स्थापत्य व मंदीर स्थापत्य या प्रत्येक वास्तूंच्या मधला वेगळेपणा त्या परिसरातील जलव्यवस्थापन मध्येही आढळतो. रामायणासारख्या ग्रंथात दैवमातृक आणि नदीमातृक शेतींचा उल्लेख येतो. पावसाच्या पाण्यावर भिजणारी जमीन ही देवमातृक मानली गेली. तथापि यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मानवाने शेती करून पिक पध्दती विसकित केली. त्यासाठी नदी, विहीरी, जलाशय, कालवे यासारख्या पाणी व्यवस्थापन पध्दतीचा आधार घेतला. त्याला अदेवमातृक किंवा नदीमातृकम्हटले गेले आहे.
खाई कोट अट ध्वजा, वापी कूप तड़ाग, वार नारी असती सती, वरनहु नगर सभाग। पदमावत में जिक्र है कि वारी सुफ़ल आहि, तुम बालापन में ही फ़ल गई, मध्यकाल में वाटिका लगाने के बाद उसका विवाह किया जाता था। तब तक लगाने वाला उसका फ़ल न खाता था। वाटिका लगाने एवं फ़लने के बाद वापी कूप तड़ाग का विवाह करने के बाद ही स्वामी उनका उपभोग करता था। व्यंग्य करते हुए कहा है कि - तुम्हारी वाटिका तो कुंवारी ही फ़ल गई।
पूर्णे कूप वापीनां वृक्षच्छेदन पातने। विक्रीणीत गजं चाश्वं गोवधं तस्य निर्द्दिशेत्।।
याचा अर्थ जी व्यक्ती विहीर किंवा बाव बुजवून टाकतो, झाड कापून पाडतो, जी व्यक्ती हत्ती किंवा घोड्याला विकतो त्याला गोवध केला असे मानून तशी शिक्षा द्यावी.
‘तडाग देवतागार भेदकान् घातयेन्नृपः।।
अग्नीपुराणात राजासाठी स्पष्ट आज्ञा दिली आहे कि जर एखाद्या व्यक्तीने जलाशय किंवा देवाचे मंदीर नष्ट केले तर त्याला मृत्युदंड दिला जावा.
स्कंद पुराणातील माहेश्वर खंडात लिहीले आहे कि जी व्यक्ती कुप विकतो, पाण्यात मैथुन करतो, तलाव, विहीरी नष्ट करतो, तो पातकी आहे. जर अश्या व्यक्तीला पुर्नजन्म मिळाला तरी त्याचा त्रास होइल.
वापीची लांबी ७५ ते १५० फुट असू शकते आणि ज्यामध्ये उतरुन पाणी काढता येईल इतकीच पाण्याची पातळी असते.
पुषकरणी १५० ते ३०० फुट आकाराची असु शकते. तर तलावाचा आकार ३०० ते ४५० फुट असु शकतो.
महाराष्ट्रमध्ये लहान मोठे मिळून किमात १५०० बारव अस्तित्वात असावेत. यांपैकी कित्येक बारव आज अतिशय भग्न अवस्थेत आहेत. बर्याच ठिकाणी हे बारव बुजून गेले आहेत किंवा बांधकामाठी बुजविण्यात आले आहेत. मात्र या बारवांना भग्नावस्थेतून काढून स्वच्छ केल्यास जलव्यवस्थापनासाठी त्यांचा खूप उत्तम प्रकारे वापर केला जाऊ शकतो. काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणार्या काळात सर्वच गावांमध्ये लोकसहभागातून अशी कार्ये हाती घेतल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे ते लोकांना बारवांचे महत्व पटवून देण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची.
वापी कूप तडागानि देवतायतनानि च।
अन्नप्रदानमारामं पूर्तमित्यभिधोयते॥
अपरार्क टिकेमध्ये पूर्तकर्मविषयक आलेला हा श्लोक महाभारतातून घेतला आहे.
यासाठी म्हणून विविध कथानकांची व परंपरांची निर्मिती ही झाली. याची नोंद मध्ययुगीन साहित्यात पाहावयास मिळते. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामी, श्री ज्ञानदेव किंवा संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथात याविषयीचे उल्लेख पाहावयास मिळतात.
बारवेवी रचना :-
जसजसे मानवी वस्ती नदीपासून दुरच्या ठिकाणी वसविली जाऊ लागली, तशी पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. भुगर्भातील पाण्याच्या वापरासाठी विहिरी बांधण्याची पद्धत पुर्वी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. याच विहिरींना नविन स्वरूपात निर्माण केले जाऊ लागले. हे नविन स्वरूप होते बारव अथवा कुंडांचे. बारवांचा आकार विहीरींपेक्षा खूप मोठा आणि पसरट असा होता. हे बारव जमिनीत अगदी १० ते १५ फुट पासून १५० – २०० फुट खोलीपर्यंत बांधले जात होते. कोकण भागात भौगोलिक रचनेमुळे पाणी साठवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कोकण भागात असे बारव कमी प्रमाणात आढळतात. तर विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने त्या भागात नैसर्गिक जलाशये जास्त प्रमाणात आढळतात. मात्र कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बारव जास्त प्रमाणात आहेत. या बारवांचा उपयोग भुगर्भातील पाण्याचा वापर करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवून ठेवणे यासाठी केला जात असे.
बारव हा शब्द बाव या शब्दापासून आला आहे. बाव हे लांबी मोजायचे पारंपारिक माप आहे. एक बाव म्हणजे १.५ मीटर. बारवेच्या मध्यभागी भुजलाच्या खोलीपर्यंत पोहचणारा खड्डा खोदलेला असतो. या खड्डयाच्या चारही बाजुने उतरत्या पायर्या बांधून लोकांना पाणी गोळा करण्याची व्यवस्था केलेली असते. बारवा या चौकोनी, आयताकृती किंवा अष्टकोनी आकाराच्या असतात, त्यांना चारही बाजुने कुंपणाची भिंत बांधलेली असते. पाणी घेण्यासाठी वाट बघण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी एक किंवा अधीक बाजुला मंडप उभारलेला असतो. याचे भरपूर प्रकार आहेत. पायऱ्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आली आहे. इतर विहिरींतून पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करावा लागतो किंवा मुळात या विहिरींचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे, असा असतो.
बारवेच्या बाबतीत मात्र, पाणी मोटेने उपसणे हा मूळ हेतू नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून, त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. पायऱ्या असल्याने तिचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे, असा असतो. मंदिर परिसरांत बांधलेल्या बारवांना कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात.
प्राचीन मंदिरांच्या परिसरांत बारवा आढळतातच. त्यातही नृसिंहासारखे उग्र देवतेचे मंदिर असेल, तर जवळ पाणी, नदीचा काठ किंवा कुंड असते. परभणी जिल्ह्यातच पोखर्णी येथे नृसिंह मंदिर आहे. गावाचे नावच पोखर्णी नृसिंह असे आहे. हे मंदिर आता आधुनिक झाले आहे. प्राचीन मंदिराचे काही अवशेष आता नाहीत; पण मंदिराला लागून उतरत्या पायऱ्यांची जुनी भव्य बारव आहे; ती आजही वापरली जाते. पाण्याचा उपसा नियमित केला जातो. बारवांतील पाण्याचा उपसा नियमित झाला, तर त्या चांगल्या राहतात. सोबतच भोवतालच्या आडांनाही पाणी राहते.

अंबेजोगाई (जि बीड) येथील एक बारव
बारवांची निर्मिती चालुक्य काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यपुर्वीदेखिल बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली आहे. मांढळ (जि नागपूर) येथे ४ थ्या शतकातील म्हणजे वाकाटककालिन बारव सापडली आहे. तर मानसपुरी (जि नांदेड) येथे एक राष्ट्रकुट काळातील बारव सापडली आहे. आज दिसणार्या बहुतांश बारव मात्र चालुक्य, यादव आणि विजयनगर काळातील आहेत.
या बारवांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्यांची निर्मिती केली जात असे. काही ठिकाणी एका बाजुने, काही ठिकाणी दोन बाजुने तर काही ठिकाणी चारही बाजुंनी अश्या पायर्यांची सोय केलेली दिसून येते. बारवांची रचना, पायर्यांची व्यवस्था, आकार यांच्या आधारावर कुंड, विहीर, आड, कल्लोळ आणि बारव असे विभागीकरण करता येऊ शकते. विहीर गोल आकाराची आणि खोल असते. आड देखिल विहिरीप्रमाणेच मात्र कमी खोलीचे असतात. विहीर आणि आडामध्ये आत उतरण्यासाठी पायर्यांची सोय नसते. पाणी बाहेर काढण्यासाठी रहाटाचा वापर करण्यात येतो. कुंड हे पसरट आकाराचे, मात्र कमी खोलीचे असते. कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजुंनी पायर्यांची सोय दिसून येते. कल्लोळ हे देखिल कुंडाप्रमाणेच, मात्र आकारात लहान आणि मंदिराच्या आतमध्ये असते. तुळजापुर किंवा त्र्यंबकेश्वर येथे असे कल्लोळ दिसून येतात. बारव हे विहीर आणि कुंड या दोघांचे मिश्रण. आकाराने पसरट, खोलीला कुंडापेक्षा थोडे जास्त, आणि पाण्यापर्यंत जायला एक किंवा अधिक बाजुने पायर्या अशी बारवेची संरचना असते. हे बारव वर्तुळाकार, चौरस, आयात, षटकोन, आष्टकोन अशा विविध आकारांमध्ये दिसून येतात.

सिद्देश्वर मंदिर, लातूर येथील बारव
बारव आणि कुंडांच्या ठिकाणी विविध देवतांच्या मुर्त्या देखिल दिसून येतात. कित्येक बारव हे मंदिराच्या परीसरात किंवा जवळपास असतात. पुर्वी असलेल्या मंदिराच्या जवळपास बारव बांधले गेले, किंवा बारव बांधल्यावर शेजारी मंदिराची निर्मिती केली गेली हे माहित नाही. मात्र मंदिर आणि बारव यांचा परस्पर संबंध मात्र जाणिवपुर्वक केला गेला असवा. बारवाची स्वच्छता आणि रखरखाव टिकवून ठेवण्यासाठी त्याला पवित्र्याची जोड देणे नक्कीच खूप सोयीचे होते. ज्याठिकाणी बारव मंदिर परीसरात नव्हती तेथे बारवांच्या पायर्यांच्या बाजूने अथवा भिंतींमध्ये देवकोष्ठ बांधून त्यामध्ये देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या गेल्या. आज यामधिल खूप कमी ठिकाणी मुर्त्या अस्तित्वात आहेत. आणि जेथे आहेत तेथे खूप भग्न अवस्थेत आहेत. काही बारवांच्या बाजूने मंडपांची रचनादेखिल आढळून येते. ही रचना कदाचित धार्मिक विधींसाठी असावी. किंवा बारवेमध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची जागा म्हणून या मंडपांचा वापर केला जात असण्याचीदेखिल शक्यता आहे.
अहिल्याबाई यांनी बांधलेल्या विहिरी किंवा बारव :
लढाईवर दौड करणाऱ्या लोकांसाठी तसेच तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी रस्त्यात पाण्याची सोय व्हावी. तेथील लोकवस्तीची पाण्याची सोय व्हावी यासाठी विहिरी खोदल्या होत्या. असे संशोधनातून दिसून येते. राजा अशोक, शेरशहासूर, अहिल्याबाई इत्यादीने अशा लोकपयोगी विहिरी बांधल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण भारतात अहिल्याबाई होळकरांनी अनेक ठिकाणी विहिरी बांधलेल्या आहेत. त्यातील काहीचे उल्लेख सापडतात परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी विहिरी बांधलेल्या आढळून येतात त्यांना लोक अहिल्याबाई काळातील विहिरी किंवा बारव म्हणून उल्लेख करतात. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात विविध प्रकारची स्थापत्य निर्मिती झाली. पानिपतच्या युद्धात सैन्याला पाण्याच्या अभावी भरपूर त्रास झाला हे लक्षात घेऊन अहिल्यादेवींनी विविध ठिकाणी बारव, तलाव, विहीरी यांची निर्मिती केली. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील झाला.अहिल्याबाईंच्या आधीच्या काळातील बारवा चारही बाजूंनी ओवऱ्या असलेल्या, उतरत्या पायऱ्या असलेल्या आहेत. (उदा. पुष्करणी बारव चारठाणा, ता. जिंतूर जि. परभणी; मादळमोही ता. गेवराई, जि बीड) या बारवांमध्ये देवकोष्ठ आढळतात. त्यात अष्ट दिक्पाल, शेषशायी विष्णू, गणेश, सप्तमातृका किंवा आसरा आदी देवता आढळतात. त्यांची पूजा केली जाते. शेषशायी विष्णूच्या अतिशय सुंदर मूर्ती जुन्या बारवांमध्ये दिसतात. यातील अप्रतिम शिल्पसौंदर्य असलेल्या दोन मूर्ती आजही मराठवाड्यात आहेत. एक मूर्ती परभणीच्या टाकळकर राममंदिरात (गांधीपार्क) आहे, तर दुसरी पैठणला जुन्या नाथ मंदिराजवळच्या नृसिंह मंदिरात आहे. या मूर्ती बारवांतील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अष्ट दिक्पाल, म्हणजेच आठ दिशांच्या देवतांच्या मूर्ती. या शेषशायी विष्णू मूर्तीच्या प्रभावळीत दिसतात. यांच्या स्वतंत्र मूर्तीही असायच्या. वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथे वर्तुळाकार, आठ दिशांनी आठ पायऱ्या उतरत गेलेली (हेलिकल) बारव कचरा काढल्यावर समोर आली. तिला आठ देव कोष्ठ आहेत. ६४ योगिनींच्या मूर्ती असलेली खांबपिंपरी (ता. शेवगांव, जि. अहमदनगर) येथील बारव तर अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक ठेवा पोटात बाळगून आहे. संपूर्ण भारतभर ६४ योगिनींच्या मूर्ती या शिवाय फक्त दोनच ठिकाणी आहेत. ही बारव पुरातत्त्व विभागाने अधिगहीत करण्याची कारवाई सुरू केली आहे.बंगाली बारव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली आहे. जेजुरीमध्ये येणाऱ्या खंडोबाच्या भक्तांना पाणी या उद्देशाने याची निर्मिती केली गेली. अनेक वर्षापासून या बारवमध्ये घाण, दगडगोटे साचले आहेत. याशिवाय जेजुरी येथील जानाई बारव, सुपे येथील राखुंडी बारव, तसेच धामारी येथील वाघेश्वर बारव जेजुरीजवळील इजाळा (कडेपठार) आणि सुपे येथील सिद्धेश्वर बारव यांचा समावेश होतो. महाराष्ट्राबाहेरही कर्नाटकातील गुडीबंडे येथे वसलेली बेलागिरी रंगणा बारव याचा ही समावेश यात आहे.
याशिवाय इजाळा (कडेपठार, जेजुरी, पुणे), सिद्धेश्वर बारव (सुपे, पुणे), मुक्ताई बारव (पिचडगाव, अहिल्यानगर), गुरुपन्ना बावी (गुडीबंडे, कर्नाटक), अंधारी बारव (कोंढापुरी, पुणे), ओढा (कोंढापुरी, पुणे), मस्तानी तलाव (पाटस, पुणे), जुना बाजारतळ (पाटस, पुणे), गाव वेस (पाटस, पुणे) येथे बारव आहेत.
नेवरी (सांगली), जयराम स्वामी मठ (वडगाव ज.स्वा, सातारा), शिंदे विहीर (वडगाव ज.स्वा, सातारा), मामलेदार कचेरी (सासवड, पुणे), भापकर आळी (लोणी भापकर, पुणे), नारायणेश्वर (नारायणपूर, पुणे) येथील बारव बघायला मिळतात.
अहिल्याबाईंच्या काळानंतर बारवांची रचना जराशी बदलत गेलेली दिसते. वेरूळची, अहिल्याबाईंच्या काळातील बारव ‘शिवतीर्थ’ नावाने ओळखली जाते. ती अतिशय देखणी आहे. या बारवेत आठ छोटी मंदिरे आहेत. जुन्या बारवांमध्ये देवकोष्ठ असत, त्याऐवजी येथे मोठ्या खोल्या अथवा दालने दिसतात. त्यांचा उपयोग स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी करता यायचा. आजही ही दालने वापरली जातात. अहिल्याबाईंच्या काळातील किंवा त्या नंतरच्या बारवांत मात्र अशी रचना नाही. या बारवा भक्कम दगडी बांधणीच्या असून, त्यांत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या असतात. बाकीच्या बाजू भक्कमपणे दगडी चिऱ्यांत बंदिस्त असतात. चोंडाळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील बारव होळकर संस्थानचे दिवाण चंद्रचूड जहागीरदार (न्या. चंद्रचूड यांचे घराणे) यांनी बांधलेली असून, ती अशा पद्धतीच्या बारब बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. या बारवांत एका बाजूला पाणी उपसण्यासाठी मोट लावण्याची सोय आहे. त्याला ग्रामीण भागात बगाड म्हणतात. ही बगाड कमानींच्या रूपात अतिशय देखणी केलेली असते.
- चांदवड येथील नरोटी बारव – चांदवड गावात ही विहीर “नरोटी बारव” म्हणून प्रसिद्ध आहे. ही विहीर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली आहे. पक्की विहीर सदरहूव जुनी बांधलेली असून गंत्री बागेत आहे. सर्वे ५६ नरोटी बारव आजही चांगल्या स्थितीत आहे. या विहिरीला आजही भरपूर पाणी आहे. गावातील लोक आजही या विहिरीचे पाणी वापरतात. ही बारव काळ्या धडी दगडाची बांधलेली आहे. आतमध्ये एक कुंड असून त्यात पाणी आहे.
- सकरगाव ता. निफाड जि. नाशिक येथील विहिर – निफाड या शहरापासून १५ कि. मी. अंतरावर सकरगाव आहे. या गावाला व भागाला ऊस, कांदे, द्राक्षे यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे गाव पूर्वी खानदेश परगण्यात येत होते. या गावाला अहिल्याबाई होळकरांनी एक मोठी पाय विहिर बांधली आहे. आजही ती अहिल्याबाईची बारव या नावाने प्रसिद्ध आहे. सकरगावची ही विहीर आजही चांगल्या स्थितीत आहे. पूर्वी या गावाची ही एकमेव विहिर पाणीपुरवठ्याचे साधन होते. विहिरीचे बांधकाम दगडांनी व चुन्यात केले आहे.
- भिमाशंकर येथील विहिर – भिमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगातील क्षेत्र आहे. पुण्यापासून ७५ मैला वर आहे. हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील भीमाशंकराचे मंदीर हेमाडपंती दगडी बांधणीचे असून त्यावर दशावताराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अहिल्याबाईनी जनतेच्या कल्याणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. भीमाशंकर येथेही यात्रेकरूंची पाण्याची सोय व्हावी यासाठी हि विहिर बांधली आहे. “ती भीमाशंकर येथे धर्मशाळा इमारत, बावडी वगैरे आहे, असा उल्लेख येतो.

- जेजूरी येथील विहिर –पुणे जिल्ह्यात जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थान आहे. जेजुरीचा मल्हारी मार्तंड हे होळकरांचे कुलदैवत. मल्हारराव होळकरांनी मल्हारी मार्तंडांचा किल्ला बांधला. अहिल्याबाई होळकरांनी येथे सरकारी वाडा, श्री गौतमेश्वर छत्री मंदिर, मल्हार तलाव व विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधले. याशिवाय एक विहिर बांधली. ‘श्री क्षेत्र जेजुरी पुणे जिल्हा श्री मल्हारे गौतमेश्वर, तालिमखाना, सरकारी वाडा, श्री दत्त पादुतश्पेरे आहित व कुवा आहे.” असा संदर्भ येतो.
- उज्जेन येथील विहिर –उज्जैन हे प्राचीन काळापासून एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग महाकालेश्वर या नावाने ओळखले जाते. तेथील यात्रेकरूंची सोय व्हावी यासाठी अहिल्याबाई होळकरांनी चिंतामणी गणेशाचे मंदिर, जनार्दन मंदिर व घाटाची उभारणी केली. या चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या दृष्टीने अहिल्याबाईंनी विहिर बांधली आहे. “उज्जैन अंगणात श्री चिंतामण गणपती ३ जमीनबाघे, २ धर्मशाळा, ३ बावडी अंदाजे किंमत ५००० श्री कै. अहिल्या मा. साहेब यांनी बांधले”, अशाप्रकारे कागदोपत्री उल्लेख आहे.

बारवांचे संवर्धन केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. हे बारव सौंदर्यदृष्ट्या आकर्षक ठिकाणे ठरू शकतात, ज्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते आणि स्थानिक समुदायासाठी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध होते. विविध सण-उत्सव, धार्मिक समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने समाजात एकात्मता वाढू शकते.
यासोबतच, या उपक्रमांमधून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती देखील शक्य आहे. जसे की देखभाल, मार्गदर्शन, पर्यटन व्यवस्थापन, हस्तकला विक्री इत्यादी. त्यामुळे बारवांचे जतन हे केवळ सांस्कृतिक दृष्टीने नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.
या प्रकारांमधून बारवांची उपयोगिता, सौंदर्यदृष्टी आणि स्थापत्यशास्त्रातील विविधता लक्षात येते. महाराष्ट्रात बारव पुनरुज्जीवनाची आवश्यकता –
महाराष्ट्रात बारवांची संख्या अंदाजे २० हजाराच्या जवळपास आढळून येते. महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या पारंपरिक बारवा आजच्या काळात जलसंवर्धनासाठी एक समर्थ आणि शाश्वत पर्याय ठरू शकतात. अनेक भागांमध्ये असे बारव आढळतात की, जिथे ९० ते ९५ टक्के वर्षभर पाणी टिकून राहते. बारव पूर्वीच्या काळी गावांतील प्रमुख जलस्रोत होते. मात्र आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, शहरीकरण आणि जलवायू बदल यांच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पाण्याची गरज आणि सध्याची वाढलेली गरज यामधील तफावत भरून काढण्यासाठी या पारंपरिक बारवांचे भूजल पुनर्भरणासाठी पुनरुज्जीवन करणे आवश्यक ठरते.
या प्रक्रियेतून जर स्थानिक जलस्रोतांचा वापर वाढवला गेला, तर पाणीपुरवठ्याच्या योजना अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि टिकाऊ ठरतील. जलस्रोतांचे स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन हे पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी उत्तर ठरू शकते. त्यामुळे बारवांचे संवर्धन व पुनरुज्जीवन हे महाराष्ट्राच्या जलनीतीचा एक महत्त्वाचा भाग व्हायला हवा.

बारव पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमुळे केवळ पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन होत नाही, तर त्याचे अनेक अतिरिक्त फायदे ही मिळतात. सर्वप्रथम, या उपक्रमामुळे उथळ जलधारांचा (shallow aquifer) वापर वाढतो, ज्यामुळे भूजल पातळी स्थिर राहते आणि नैसर्गिक जलचक्राला चालना मिळते. परिणामी, खोल विंधन विहिरींवर (borewells) अवलंबन कमी होते, जे केवळ खर्चिकच नाही तर भूजलाचे अतिनिकर्षण देखील घडवतात.
या बारवांमध्ये नैसर्गिकरीत्या प्रदूषणविरहीत, स्वच्छ आणि निरोगी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी रासायनिक प्रक्रियांचा वापर कमी होतो, जो अनेक वेळा आरोग्यास अपायकारक ठरतो. याशिवाय, बारवांमधील पाण्याचा वापर केल्याने पाणीपुरवठा योजनांवरील खर्चात लक्षणीय बचत होते, कारण स्थानिक स्रोत वापरल्याने वाहतूक, शुद्धीकरण आणि वितरण यावरचा खर्च कमी होतो.
महत्त्वाचे म्हणजे, बारव पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून जनजागृतीस चालना मिळते. लोकांना आपल्या जलसंपत्तीविषयीची जाणीव होते आणि ते या कार्यात सक्रिय सहभाग घेऊ लागतात. परिणामी, पाण्याच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी समाजाभिमुख प्रयत्न शक्य होतात, जे दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
महाराष्ट्रात नोंद घेतल्या गेलेल्या, नकाशावर स्थान निश्चिती झालेल्या दोन हजार बारवा आहेत. रोहन काळे या तरुणाने राज्यभर फिरून बारवांच्या नकाशीकरणाचे फार मोलाचे काम केले आहे. ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ग्रामीण भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर चालवली जात आहे. या मोहिमेत नोंदवल्या गेलेल्या बारवांपैकी जवळपास १०० बारवा वास्तुशास्त्र, रचना, सौंदर्य उपयुक्तता या सर्वच अर्थाने पर्यटन स्थळ बनू शकतील. या बारवांचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकेल, इतके चांगले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी ही मोठी समस्या असते, या पाण्याचा उपसा झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. यातील ७५ बारवा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत निवडण्यात येणार असून, सर्वच परिसर विकसित करण्याची योजना आहे. प्राचीन बारवा मंदिर परिसरात असतील, तर तो परिसर या निमित्ताने स्वच्छ होऊ शकतो. तेथे बाग फुलवली, तर त्याचा उपयोग लहान-थोरांना होऊ शकतो. याच पाण्याचा वापर करून, परिसरात मोठी झाडेही वाढवता येऊ शकतात.
महाराष्ट्रातील आतापर्यंत शोधलेल्या बारव –
पश्चिम महाराष्ट्र – 398
दक्षिण महाराष्ट्र – 357
कोकण – 360
मराठवाडा – 306
पश्चिम विदर्भ – 228
उत्तर महाराष्ट्र – 155
(ही संख्या 1650 इतकी असून, सद्यस्थितीत ती 1800 पर्यंत पोहोचली आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.)
पर्यटनासाठी महत्त्व –
* धुळ्यातील अहिल्यापूर बारव स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध
* परभणीसाठी वालूर बारवचा आकार आकाशगंगेसारखा असून, जगात अशा आकाराची बारव कुठेही नाही. तर पिंगळी येथील बारव पुष्करणी आकाराची आहे.
* पुणे, आंबेगाव, मंचर येथील बारव कुंडाच्या आकाराची आहे.
* औरंगाबाद, शेकटा येथील बारव सुस्थितीत असून, वास्तू स्थापत्य कलेचा सुंदर नुमना आहे.
* अमरावती येथील बारवच्या पाचमजली पायर्या खाली उतरत जावे लागते.
* अहमदनगर येथील हत्ती बारवच्या पायर्या आकाराने मोठ्या असून, याठिकाणी हत्ती पाणी पिण्यासाठी खाली उतरत असल्याचे बोलले जाते.
बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती
बावखळ
स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -
सध्याची परिस्थिती : -
कोकणातील बारवा :-
इतिहासाच्या शेकडो खाणाखुणा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. बदलापूर शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे नमुने बदलापुरात आढळतात. त्यातील देवळोली गावातील चावीच्या आकारातील प्राचीन विहीर पर्यटकांना आकर्षण आहे . ही विहीर पेशवेकालीन असावी. तिचे पाणी दुष्काळातही आटत नाही, असे येथील गावकरी सांगतात.




बदलापूर पश्चिम शहरी भागापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे. सुमारे ६० घरे असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेले आहे. या ठिकाणी सगळ्यात आकर्षण असणारी वास्तू म्हणजे प्राचीन अशा काळ्या कातळातील चावीच्या आकारातील विहीर. ही विहीर सोळाव्या शतकात उभारलेली असावी, असे येथील जुने जाणकार सांगतात. फक्त काळ्या कातळांचा वापर करून चावीच्या आकाराची ही विहीर बांधण्यात आली आहे. कातळावर कातळ रचून, चुना किंवा इतर कशाचाही वापर न करता ही विहीर बांधण्यात आली आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळाच्या पायऱ्या देखील बांधण्यात आल्या आहेत.


सप्तेश्वर :-
कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की, शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काही तरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. संगमेश्वरजवळचं सप्तेश्वरही अशाच सुंदर ठिकाणांपैकी एक. अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.![]() |
डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्यासमोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडातले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूंना खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे; पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. ३० फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.
रानवडी बारव –
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवडी गावाजवळील ऐतिहासिक बारव (पायऱ्यांची विहीर) हा कोकणातील एक महत्त्वपूर्ण जलसंपत्तीचा वारसा आहे. ही बारव म्हणजेच एक खोल विहीर असून, ती ऐतिहासिक काळात पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी आणि जलसंधारणासाठी वापरली जात होती.हि बारव रानवडी, महाड तालुका, रायगड जिल्हा,इथे असून रानवडी गाव महाडपासून अंतर: सुमारे २५-३० किमी वर आहे.महाड शहरातून रानवडी गावाकडे जाण्यासाठी स्थानिक बस सेवा किंवा खासगी वाहनाचा वापर करता येतो.



एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी या बारवाचे आधुनिक पद्धतीने दस्तऐवजीकरण केले आहे, ज्यात बारवाची लांबी, रुंदी, खोली, बांधकामाची रचना आणि शिलालेख यांचा समावेश आहे.
असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा, सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे शोधणे शक्य झाले आहे. खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२ याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.

याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत (पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य केले.
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३ नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली आहेत .त्याच प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण अभिलेखात येतो.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली. जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)

नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई आदमी मद्यसेवन नही करता.
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये, असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन, थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५, ११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पाँडेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४ ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या (वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते. आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना १३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर, वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ. स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात. पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद, पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड केल्याचे उल्लेख मिळतात.
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात. एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.
दोधेश्वर बारव :-
दोधेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहून १३ किलोमिटर अंतरावर आहे .जाण्यासाठी एस टी बसेस उपलब्ध आहेत .तसेच दोधेश्वर नाक्यावरून टम टम ची सोय आहे . दोधेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरा मागे हि बारव आपण्यास बघायला मिळेल. मंदिराला वळसा घालून गेल्यावर मंदिराच्या मागेच पायवाट असून ती बारव कडेच जाते. थोड गवताचे रान वाढलेले आहे तरी हि सांभाळून जावे आपली भेट सरपटणाऱ्या प्राण्याशी होऊ शकते. अंदाजे १७८० च्या नंतरची बांधलेली असावी असा अंदाज आहे. बारवेत शिलालेख आहे पण पाणी जास्त असल्यास दिसू शकत नाही . बारवमध्ये उतरण्यासाठी दोन ठिकाणाहून पायऱ्या आहेत .प्रत्येकी १८ पायऱ्या आहेत .दोन मार्ग म्हणजे पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून जनावरासाठी व दुसऱ्या ठिकाणाहून गावकऱ्यासाठी असावे .ह्या बारवच्या समोरासमोर दोन मार्ग आहेत .दुसरा मार्ग हा झाडाझुडपा मुळे बंद झालाय . पायऱ्या उतरल्यावर समोरच कमान आहे आहे.त्यावर अजून एक छोटी कमान आहे . बारव ७ फूट व्यासाची असून तिची खोली ३० फूट असावी असा अंदाज आहे. प्रत्येकी चारीहिं दिशांना छोट्या कमानी आहेत . मुबलक अस पाणी तीत उपलब्ध आहे त्याचा वापर सिंचना साठी होत आहे. मध्य युगीन स्थापत्य कलेचा उत्तम असा हा नुमाना तुम्हाला बघायला मिळेल तरी हि एकदा नक्कीच भेट द्या.1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11. गंगा बावडी - 437
12. हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276
![]() |
Amrut Tirth (Stepwell) |
हतनुरची बारव :-
चारठाण्याची बारव :-
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .

.मंदिराचा दर्शनी भाग

.मंदिर व समोरील पुष्करणी

.मंदिर व समोरील पुष्करणी


.पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती

.नरसिंहाची भग्न मूर्ती
रहस्यमय वालूर बारव परभणी
डाक टपाल तिकीट
मुखेडची ऐतिहासिक बारव
पोखरणी बारव : अंबड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७६८ दरम्यान निर्माण केलेली पुष्कर्णी बारव गेल्या अनेक वर्षापासून अंबडकरांची तहान भागविण्याचे काम करीत होती. आजही या बारवेशेजारी असलेले जारच्या प्लँटंला बारवेच्या पाण्याचा पाझर आहे. या पुष्कर्णी बारवे ऐवढी मोठी बारव मराठवाड्यात कुठेच पहायला मिळत नाही. या बारवेला पुर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेला दरवाजे आहेत. दगडी पाय-या नंतर सुंदर असे अंतर्गत घाट असुन त्यावर पुर्वी धार्मिक विधी अर्थात पिंडदान व गंगापुजन केल्या जात असे.

बारवेच्या आतील सभामंडप व मंदिर
तर बारवेत सुंदर असे महादेवाचे मंदिर असुन समोर सभामंडप व त्यावर कोरलेली अनेक हत्तींची गजमाळ आणि विविविध फुले, वेलीची केलेली नक्षीकाम बारवेच्या सौंदर्यात भर घालणारे असुन सभामंडपात नंदी असुन गर्भगृहात शिवलिंग स्थापन केलेले आहे. याच मंदिराच्या भिंतीवर तीस देवकोष्टक व कपडे बदलण्यासाठी तयार केलेली स्वतंत्र खोली पहायला मिळते. देवकोष्टकात पुर्वी मुर्ती असाव्यात मात्र कधीकाळी त्या शिवलिंगासह चोरीला गेलेल्या आहेत याबाबत कुणाकडे ही माहिती नाही. इतके चांगले मंदिर असतांनाही शहरातील अनेक लोक इकडे येत नाहीत त्यामुळे गर्दुल्यांनी मंदिराचा ताबा घेतलेला दिसतो.
उन्हाळ्यात हे मंदिर थंडगार असते दरम्यान पावळ्यातील पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली असते त्यामुळे बारवेत टाकलेला सर्व कचरा त्यात घाण कपडे,सोड्याचे रिकामे पुडे अर्थात पाँलिथीन पिशव्या, रिकाम्या दारुच्या दारुच्या बाटल्या, बिसलरीच्या बाटल्या, घरातील निर्माल्य तसेच शेजारच्या बाजारपेठेतील दुकानातील कचराही नियमित टाकल्या जातो.बारवेत जिकडे तिकडे कचरा, उगलेली झाडे पहायला मिळतात तर पालिकेने केलेले उद्यानही दुरावस्थेत सापडलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बारव निर्माण केल्याने त्यांच्या नावे उद्यान असले तरी ते अर्धे अतिक्रमण झालेले आहे.
जालना बखर नावाच्या पुस्तकात एक मजकूर आहे त्यात लिहले आहे की ही बारव सुवासिनींची मनोकामना पुर्णकामना करणारी बारव असुन यात सात आसरा आहेत. त्याची पूजाअर्चा तसेच जावळ देण्याची परंपरा आहे.इथेच पिंडदान व गंगापुजन केल्यास पितृशांती लाभते तसेच जे लोक बारवेत घाण टाकतील ते नेहमीच संकटात, दुःखात,अपयशी राहतील बारव हे लक्ष्मीचे प्रतिक आहे.त्यामुळे बारव नेहमी स्वच्छ ठेवून तीचे पुजन व्हायला हवे साक्षात ती गोदावरी असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पैठण येथील सिध्देश्वर महादेव मंदिराखालुन भुमिगत वाटेने अंबडला आणलेली आहे, असे सांगितले जाते.
खजाना बावडी बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली खजाना विहीर ही कायम स्वरूपी जलस्रोत म्हणून चार शतकाहून अधिक काळापासून ओळखली जाते. .बीड शहराजवळील शेकडो एकर जमिनींना भिजवणारी ही खजाना बावडी भूगर्भातील जलस्रोत शोधण्याच्या तंत्राचा अनोखा नमुना आहे.बीडचं मूळ नाव चंपावती नगर असं होतं. मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर हा भाग त्याच्या राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर त्याने चंपावती हे नाव बदलून भीर हे पारशी नाव दिलं आणि भीरचा अपभ्रंश बीड असा झाला. भीर याचा अर्थ पाण्याचा प्रदेश असाही होतो. बीड शहराजवळच साधारण १६२५ ते १६३० या काळात बांधली गेलेली ही भव्य जलवास्तू आहे.
शहरापासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर 'खजाना विहीर' आहे. या विहिरीचा व्यास सुमारे ५० फूट आहे, तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासून खोल १७ फुटांवर विहिरीत गोलाकार व्हरांडाही असून त्यावर सहज फिरता येतं. त्या व्हरांड्याखाली सहा फूट विहीर आहे. या विहिरीचं पाणी कायम किमान चार फूट तरी असतंच. गेल्या शतकभरात या विहिरीचं पाणी पावसाळ्यात वाढलं नाही किंवा उन्हाळ्यात आटलं नव्हतं. बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमधून कालवा बांधलेला आहे. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागात पाणी आणण्यात आलं असून, या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलंही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे. या विहिरीचं बांधकाम स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानलं जातं. विहिरीच्या आतील बाजुस उर्दू भाषेतील शिलालेख आहे. या विहिरीला तीन कालवे आहेत. यातील एक नैर्ऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. कधीही न आटणाऱ्या या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चुना आणि दगडाचा वापर केलेला असून, ही विहीर मलिक अंबर यांच्या काळात बांधलेली असावी, असा अंदाज आहे. मध्ययुगीन काळात पैसा किंवा धन जपून ठेवण्यासाठीही विहिरींचा उपयोग केला जात असावा. त्यामुळे या विहिरीस खजाना विहीर नाव पडलं असावं, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला 'खजिना विहीर' म्हणतात.जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मी. आहे. जमीनीपासून ४.७ मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. आणि त्या खाली विहीराचा मूख्य व्यास १२.६० मी. एवढा आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं आणि ते कधीच आटत नाही.बोगदा
या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीतला उत्तर दिशेचा बोगदा हा एक कालवा आहे. त्या काळात शेताला ह्याच कालव्याद्वारे पाण्याचा पुरवठा व्हायचा. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.विहिरीतून जाणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याला हवा पुरवठ्यासाठी या कालव्यावर अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात 'झडपा' बांधलेल्या आहेत. ह्या एखाद्या छोट्या आडासारख्या दिसतात. त्यांची खोली १५ फूट ते १६.५ फूट इतकी तर त्यांचा व्यास २ फूट इतका आहे. यात उतरायचीही व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकं यातून पोहत पलीकडे निघायची. आजही या पाण्याचा प्रवाह कायम आहे. यातून येणारं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अडीच कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर अशा एकूण ५३ झडपा आहेत. हे सगळं पाणी भूमिगत म्हणजे जमिनीच्या खालून जवळपास ३ किमी पर्यंत कालव्याने शेताला पोचवण्याचं तंत्रज्ञान आश्चर्यचकीत करणारं आहे !झडप
पण आज ही वैभवसंपन्न विहीर एका मोठ्या संकटात सापडली आहे. विहीर बघायला येणारे पर्यटक बिलकूलच स्वच्छता बाळगत नाहीत. विहिरीच्या पाण्यात बॉटल्स, कचरा वगैरे साचत आहे. विहिरीपर्यंत जायला पक्का रस्ता नाही. यावरून सरकारचं या जलवास्तूबद्दलचं दूर्लक्ष दिसून येतं. विहिरीला तातडीने संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. शिवाय दुष्काळामुळे विहिरीची सिंचन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाढत्या कन्स्ट्रकशन्समुळे ह्या कालव्याच्या झडपा बुजत आहेत. शहराजवळून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे ह्या कालव्याचं शेवटचं टोक 'फुटका नळ'ही उध्वस्त केला असून पुढे शेताला जाणारं पाणी नदीत वळवलं आहे. याने विहीराचं आणि शेतीचं नुकसानच झालं आहे.माहूर शहरातील ‘बारव’ स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना :-
विदर्भातील बारवा :-
पुतळाबारव साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला तिन बाजूने पाय-या बांधल्या आहेत.( कदाचीत चारही बाजूने असतील पण चौथी बाजू काळाच्या ओघात जमिनदोस्त झाली असावी. किवा कोणती नोंद सापडतेका ते बघाव लागेल. सध्यातरी तीनच मार्ग दिसतात. चार कोपरे आणि बाजूला आधारस्तंभ खांब होते. ज्यावर छत हे टिकून होते तर छताचा काही भाग सूर्यप्रकाश येण्याकरिता मोकळा होता.
ही जया प्रकारची बारव असून या बारवेच्या चारही वरच्या बाजूने विविध प्रकारचे दगडी शिल्प कोरली आहेत. या बारवेत सर्वत्र साजशृंगार करणा-या यक्षिणीं / सुरसुंदरीचे पुतळे कोरले आहेत .या पुतळ्यांमूळेच या बारवेला पुतळा बारव म्हंटले जाते. बारव शिल्पस्थापत्य कलेतील ही बारव पुरातत्व विभागाने संरक्षित बारव म्हणून याची नोंद करावी असे वाटते. आनेक प्रकारच्या यक्षिणी , सुरसुंदरी ,गणपती , किर्तिमूख, कोरीव व घडीव शिल्प अस्ताव्यस्त पडले आहेत. या बारवेच संर्वधन करणे गरजेच आहे.
समुद्रमंथना अवतरली देवांगना l
सुरसुंदरी सज्ज मनोरंजना. ll
कधी काळी या पुतळा (सुरसुंदरी) शिल्पांवरून अोळखली जाणारी पुतळा बारवेच सौंदर्य आज लयास जात आहे. याच सुरसुंदरींनी साज शृंगार करून आपल्या सौंदर्याने या बारवेच सोंर्दय वाढवल होत. आज त्यांच्या नशीबी रस्त्याच्या बांधावरचे दगड म्हणून वापर केला जातो. अशाच सुरसुंदरी अर्ध्या जमिनीत गाडलेल्या व इतरस्त विखुरलेल्या.
परकीय आक्रमणे आणि स्थानिक लोकांच्या हव्यासापोटी भारतातील बहुतेक ऐतिहासिक वास्तू या जीर्ण झाल्यात. राजघराण्यातील स्त्रीयांसाठी स्नानासाठी या पुतळा बारवचा उपयोग होत. जर डोळ्यापुढे संपूर्ण बारवेची वास्तू उभी केली तर असे लक्षात येते की बारवेच्या आतल्या बाजूने वेगवेगळ्या देवींदेवतांच्या मुर्ती असणाऱ्या देवळ्या होत्या त्यातल्या काही देवळ्या अजूनही आहेत परंतु त्यातील सुंदर मूर्ती ह्या पडझडीमुळे तुटल्या तर काही चोरीस सुद्धा गेल्या आहेत. पुतळा बारव ही सौंदर्याने नटलेली असून सुध्दा कायम अपरिचित व दुर्लक्षित राहिली आहे. या दुर्लक्षितपणा मुळे आज ही बारव व त्यावरील शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव आणि दरवाजा आणि तटबंदी

बालाजी मंदिराच्या बाजूला लागून रस्त्यालाच बारव आहे.
रस्त्याचा बाजूला १० ते १२ फुटाची भिंत असल्यामुळे दिसत नाही, पण त्या भिंतीला सीमेंटच्या दोन छोट्या चौकनी खिडकी आहेत, त्या मधून थोडीशी दिसते. त्या भिंतीच्या दोन बाजूला बारव मध्ये जायला पायऱ्या आहेत. पण तिथे लोकांनी कचरा आणि अडगळ ठेवली आहे.
बारव खूप सुंदर आहे. बारवच पाणी थोडं स्वच्छ आहे. त्यात पाईप टाकलेले आहेत, त्यावरुन ते पाणी वापरात आहे. बारवला दोन बाजूने दरवाजा आहेत. तसेच बारवच्या थोडीशी मध्ये अशी, एक मजली दगडी इमारत आहे, त्याचावर बहुतेक नंतर बारीक विटांने अजून एक मजला (बहुतेक नंतर बांधलेला दिसतो) आहे. त्या मजल्यावर जाण्यासाठी भुयार सारख्या पायऱ्या आहेत. तिथून वर गेले असता आपल्याला वरुन बारव दिसते पण पूर्ण दिसत नाही. आणि तेथे वर जुन घर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात आपल्याला जुनी वाड्यासारखी घर दिसतात. ह्या वरुन अंदाज लावता येतो. त्याकाळी ह्या बारवच पाणी प्यायला वापरत असावेत.
बारवच्या पुढे, रस्त्याला समोर दरवाजा आहे. आणि बाजूला थोडी फार तटबंदी दिसते. त्याकाळी एक प्रवेश द्वार असावे.
बाकी नामशेष झालेली दिसते. मंदिराच्या समोरच एका छोट्याशा गल्लीत वाडा आहे. वाडा सध्या आतून पूर्ण ढासळलेला आहे, फक्त बाहेरून भिंती चांगल्या दिसतात.
बाहुली विहिर -
अंदाजे 25 फूट खोल असलेल्या विहीरमध्ये उतरण्यासाठी जवळपास 50 पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. याच विहिरीतून परिसरातील शेतीला मोटीच्या साहाय्याने पाणी दिल्या जात असल्याचे गावकरी सांगायला विसरत नाहीत. काही वर्षांआधीपर्यंत परिसरातील आजूबाजूला असलेल्या कित्येक गावांची तहान हीच विहीर भागवित होती. आता लोकांसह प्रतिनिधींनी व सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक विहिरीला उतरती कळा आलेली आहे.
बाहुली विहिरीला सध्या विकासाची आणि सौंदर्यीकरणाची गरज आहे. प्रशासनाद्वारा वेळीच दखल घेऊन विहीर व परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास या ऐतिहासिक वारशाचे अस्तित्व कायम राहणार आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो. "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या उपराजधानीच्या हाकेच्या अंतरावर लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचे आहे.
इतिहास पुसल्या जाण्याची भीती
ऐतिहासिक बाहुली विहिरीला सध्या अवकळा आलेली आहे. विहिरीवरील दारे, खिडक्या तुटल्या असून, भिंती मोडकळीस आलेल्या आहेत. आज विहिरीच्या परिसरातील प्राचीन दगड आणि कित्येक वस्तू चोरीला जाण्यास सुरुवात झाली आहे. विहीर आज पूर्णपणे गढूळ पाण्याबरोबरच प्लॅस्टिक, आजूबाजूचा कचरा, निर्माल्याने भरलेली असल्याने विहिरीची दुरवस्था झालेली आहे.
"चिअर्स' अन् "लवर्स पॉइंट'
शहरापासून हाकेच्या अंतरावर एकांत मिळत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस जोडप्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे ग्लास आणि दारूच्या बाटल्या आणून सकाळपासूनच इथे काही मद्यपी खास दारू पिण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी जमा होतात. विहीर परिसरात कुठेही नजर टाकल्यास रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बॉटल्स व सिगारेटची पाकिटे हमखास आढळून येतात.
ऐतिहासिक सात मजली पायविहिर, महिमापूर, अमरावती
पुरातन पायविहीर, बार्शीटाकळी, अकोला
दुर्लक्षित वास्तू खजिन्यांपैकी हाही असाच एक खजिना आहे...असो, विहिरीसमोरच एक पिराचा दर्गा आहे, तेथे त्यांनी आम्हाला आवर्जून दर्शनास नेले. दर्गाही सातशे आठशे वर्ष प्राचीन असून संपूर्ण काळ्या पाषाणतीलच आहे. मोठमोठाल्या काळ्या दगडापासून भक्कम चौथरा बांधलेला आहे. येथे चारही बाजूनी दरवाजे असून वर चौकटीवर पारशी उर्दू भाषेत कोरीव काम आहे. जे ते काय लिहिलंय त्यांना माहिती नाही. दर्गा देखील पांढऱ्या रंगाने रंगवून काढलेला आहे..
" पुरातन बारव "तळेगाव दशासर :-
यादव काळातील दगडांच्या भिंती असलेल्या विहिरी , देवालयांचे नक्षीयुक्त दगडी खांब, पुष्कर्णा (संस्कृत मध्ये पायऱ्यांच्या विहिरीला पुष्करीणी म्हणतात) विहीर अशा विविध वास्तुंसाठी विख्यात असलेला तळेगाव दशासर परिसर.तळेगाव दशासर गाव अतिशय पुरातन असून यादव काळातील तीन हेमाडपंथी शिवालये आहेत़ ही मंदिरे दगडांनी बांधली असून काळाच्या ओघात ह्या मंदिरांची पडझड झाली आहे.
येथे छोटे हनुमान मंदिर सुद्धा आहे. त्यावरून या बारव ला "पायऱ्यांचा मारोती" म्हणून ओळखले जाते. मात्र हे मंदिर अलीकडच्या काळात बांधले असून हे मंदिर बांधण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. बारव निर्माण करताना मात्र विटा, सिमेंट, रेती, यांचा वापर करण्यात आलेला नाही हे स्पष्ट दिसते. दगड कोरून आणि ते एकमेकांवर ठेवून या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या विहिरीसाठी वापरण्यात आलेले दगड हे मध्ययुगीन कालखंडातील आहे. त्या काळात ज्या काही विहिरी मशिदी, दर्गे आणि मंदिरांचे बांधकाम झाले त्या सर्व बांधकामांमध्ये ज्या प्रकारचे दगड वापरण्यात आले, तसेच दगड या पाय विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात आले असल्याचे डॉ. संतोष बनसोड यांनी स्पष्ट केले. यामुळेच ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे.
ही पायऱ्यांची विहीर, केशव मंदिर, गावाच्या वेशी बाहेरील तलाव आणी इतर बऱ्याच ऐतिहासिक वास्तू तळेगाव दशासर मध्ये आहेत, ज्या या गावाच्या अभिमानास्पद प्राचीन इतिहासाची साक्ष देतात...हा भाग पूर्वी निजामाच्या ताब्यात होता..इजिप्तच्या वास्तुकलेशी काहीसे साम्य असलेल्या या वास्तुची निर्मिती इ.स ६ मधिल असल्याचं सांगितले जाते. पण नेमका इतिहास नाही. पंरतू या बारव जवळ मारूतीचे देऊळ असल्याने चालुक्याच्या काळात हा बारव तयार केला असावा.
तळेगाव दशासर या गावात असणाऱ्या दोन्ही पाय विहिरींना बाराही महिने पाणी राहते. हनुमान मंदिरा मागे जी मोठी बारव आहे. त्या बारवच्या निर्मिती दरम्यानच या ठिकाणी महादेवाची पिंड आणि काही दगडांच्या मूर्ती मुर्त्या घडवून ठेवण्यात आल्या आहेत. अनेकदा पावसाळ्यात ही विहीर पाण्याने तुडुंब भरते, तेव्हा महादेवाचे मंदिर पाण्यात बुडून जाते. मुघल काळापासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९७० पर्यंत तळेगाव दशासर परिसरातील रहिवासी याच पाय विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरायचे.
तळेगाव दशासर या गावासह लगतच्या परिसरात लहान-मोठी शेकडो मंदिरे आहेत. या परिसरात चक्क पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आढळतात. तळेगाव दशासर येथील ग्रामस्थ पाण्यावर तरंगणाऱ्या विटेला खंगरी वीट असे म्हणतात. भगवान श्रीरामाने समुद्रात तरंगणाऱ्या दगडांद्वारे रस्ता बांधला होता. या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर त्या काळात देखील तळेगाव दशासर परिसरात आढळणाऱ्या विटांप्रमाणेच दगडांची निर्मिती केली असावी तळेगाव दशासर परिसरात ज्या काही पाण्यावर तरंगणाऱ्या विटा बनतात त्यांची निर्मिती विशिष्ट प्रकारे करण्यात आली. मध्ययुगीन कालखंडात समृद्ध असणाऱ्या या परिसरात धान्य ठेवण्यासाठी कणग्या कडक असायच्या. या कणग्यांमध्ये खालच्या स्तरावर असणाऱ्या ज्वारीला खाली मातीचा ओलावा त्याच्यावर असणारा ढीग त्यामुळे या ज्वारीला हवा लागत नसायची. त्यामुळे ही खालची ज्वारी सडायची. ही कुजलेल्या अवस्थेतील ज्वारी मुरूमयुक्त चिखलामध्ये मिसळून त्यांच्या विटा तयार केल्या जात असत. या विटा भाजल्या जायच्या. या सच्छिद्र विटा पाण्यामध्ये सोडल्यावर त्या पाण्यावर तरंगायच्या. आज देखील अशा प्रकारच्या विटा तळेगाव दशासर परिसरात अनेक ठिकाणी मिळतात
तळेगाव दशासर परिसरातील प्राचीन शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या मूर्ती आणि इतर पुरातन वस्तू २०२१ मध्ये पुरातत्व विभागाकडून अधोरेखित करून त्या अमरावतीला नेण्यात आल्या. काळा पाषाणातील मूर्ती तसेच काळया पाषाणात कोरलेले खांब यांचा देखील अभ्यास पुरातत्त्व विभागाकडून केला जातो आहे.
या गावात अनेक पुरातन असे वाडे देखील आहेत. गावातील ही विहीर अतिशय प्राचीन असून या विहिरीतून एक भुयारी मार्ग देखील आहे मात्र हा मार्ग नेमका कुठे जातो याबाबत कुठलीही माहिती नाही. आता काही वर्षांपासून हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे
ही अतिशय सुंदर वेगळ्या बांधणीची बारव आहे. हीचे संवर्धन करण्याची तळमळ गावकर्यांनी बाळगली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बारवा :-
पश्चिम महाराष्ट्रात बारा मोटेची विहीर (जि. सातारा) किंवा करमाळ्याची कमलाभवानी मंदिराजवळची, ‘सैराट’ या चित्रपटामुळे गाजलेली अष्टकोनी विहीर यांसारख्या देखण्या बारवा आहेत. काही इतक्या छोट्या आहेत, की त्या आकारानेच त्यांचे देखणेपण अजून खुलून येते.रतनवाडीची बारव :-
(श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )
ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .
अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .

जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .
वरील प्रकाशचित्रामध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .

अमृतेश्वर मंदिराची बारव
जसा मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples ) सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई ) म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल .
बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना .

बारवेतली गणेश मूर्ती .
मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात .

बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .
श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .

११ रुद्रापैकी एक मूर्ती
गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.

आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न
मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते
खांबपिंपरीचे बारववैभव !
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! ते गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर वसलेले आहे. त्या गावातील शिल्पसमृद्ध बारव, शेतात विहिरी खणू लागल्यावर सापडणाऱ्या अनेक प्राचीन वस्तू व घर बांधणीत चार फुटावर पाया खोदल्यावर सापडणारे माणसांचे सापळे या गावाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण करतात...
वास्तुकलेचा उत्तम नमुना पैठणजवळच्या खांबपिंपरी या निसर्गरम्य गावात उपेक्षित स्थितीत पडलेला आहे. ती आहे एक विहीर– पायऱ्या असलेली विहीर म्हणजे बारव. खांबपिंपरी येथील विहीर, मंदिर आणि सभामंडपाचे अवशेष त्यांचे सौंदर्य टिकवून आहेत. खांबपिंपरी हे गाव नगरपासून शेवगावमार्गे एकोणनव्वद किलोमीटरवर आणि पैठणपासून फक्त सतरा किलोमीटरवर काटकडी नदीच्या काठी वसले आहे. आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती आणि घोटण येथील मल्लिकार्जुनाचे प्राचीन मंदिर हेसुद्धा त्याच परिसरात आहेत. नगर जिल्ह्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! तेथेच ती शिल्पसमृद्ध बारव आहे. ती पुष्करणी म्हणूनदेखील परिचित आहे.

खांबपिंपरी या नावापासूनच त्या गावाबद्दलचे कुतूहल चाळवले जाते. खांबपिंपरी हे काय प्रकरण आहे ते गावात गेल्यावर समजते. पिंपरी नावाची गावे अनेक आहेत. पण या पिंपरी गावात एक मोठा दगडी खांब उभा आहे ! त्यामुळे ते झाले खांबपिंपरी. पण बोलताना मात्र त्याचा उल्लेख खामपिंपरी असा होतो. हळुहळू, गावाचे ते नाव रूढ होऊन जाईल अशीही शक्यता आहे. गावातील तो खांब प्राचीन मंदिराच्या सभामंडपाचा असावा. तो अंदाजे दहा फूट उंचीचा दगडी झुकलेला असा आहे. त्याला रणखांब असेही म्हटले जाते. महाभारतात अर्जुन व त्याचा मुलगा बभ्रुवाहन यांचे युद्ध झाले होते. त्यावेळी तो रणखांब उभारला अशी दंतकथा सांगत त्या खांबाला महाभारत काळाशीदेखील जोडले जाते. खांबाच्या माथ्यावर हंसांची नक्षी आहे, तो एका चौथऱ्यावर ठेवलेला आहे. ज्या अर्थी तो खांब तेथे आहे, त्याअर्थी तेथे एखादे मोठे मंदिर अस्तित्वात असणार. पण त्याचे बाकी अस्तित्व काही तेथे दिसत नाही. मात्र मूर्तींचे काही अवशेष इतस्तत: विखुरलेले आहेत. गावकरी तसाच आणखी एक खांब जवळच्या लखमापुरी गावात असल्याचे सांगतात. खांबाचा वरील भाग युद्धाच्या वेळी शेजारील लखमापुरी गावात पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. खांबाजवळ शिवमंदिर असून तेथे गाभाऱ्यात शिवपिंड आहे. नंदीची मूर्ती सभागृहात दिसते. मंदिराच्या खांबांवर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. खांबांच्या वर उलटे नाग कोरलेले दिसतात. बारव शिवमंदिराला लागून आहे व ते खांबपिंपरी गावाचे वैभव म्हणता येते !

त्या खांबावर कोरीव काम केलेले असून त्यावर सप्तमातृका कोरल्या आहेत. त्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विशेष बाब म्हणजे सप्तमातृका अन्य ठिकाणी बसलेल्या अवस्थेत आढळतात. मात्र त्या खांबावर त्या उभ्या दर्शवल्या आहेत. तेथे काळभैरवाचे दुर्मीळ शिल्प आहे. तेथील माजी सरपंच लक्ष्मण पावशे म्हणाले, की १९८७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तेथे जाऊन बारव व खांब यांची पाहणी केली होती. त्यावेळी निधी उपलब्ध करून हा ठेवा जतन करू असे सांगितले होते. मात्र निधी मिळाला नाही !

बारव चौरसाकृती आहे. बारवेचा तळ त्याची देखभाल-दुरुस्ती अवघड होत असल्यामुळे मातीने बुजवून बंद केला आहे, मात्र जमिनीपासून पंचवीस फूट खोलीपर्यंत पायऱ्यांच्या माध्यमातून खाली उतरता येते आणि पाहण्यास मिळतात त्या चौसष्ट योगिनी. ते सुंदर कोरीव काम आहे. तो रेखीव मूर्तींचा जणू पटच दिसतो. योगिनी म्हणजे आभाळातून मुक्त संचार करणाऱ्या देवता. योगिनी साधना अवस्थेत बसलेल्या असून प्रत्येक मूर्तीच्या हातात जपमाला आहे. मूर्ती सातवाहन, चालुक्य, वाकाटक अशा विविध काळांशी निगडित आहेत. मूर्ती तिन्ही बाजूंनी कोरलेल्या आहेत. स्त्री व पुरुष देवतांच्या अशा मिळून एकोणपन्नास मूर्ती तेथे आहेत. प्रत्येक मूर्तीच्या हातात पाश, त्रिशूळ, फळ अशी विविध आयुधे दिसतात; तसेच, प्रत्येक मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नर्तिका नाहीतर वादक आहेत. आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्या चौसष्ट योगिनी रक्तबीज दैत्याचा वध करण्यासाठी भूतलावर आल्या होत्या. रक्तबीज दैत्याला वर होता, की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर सांडला तर त्यामधून आणखी दैत्य तयार होतील. त्यामुळे त्या योगिनी आकाशातून आल्या व त्यांनी रक्तबीज दैत्याचा वध आकाशातच केला आणि त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही. योगिनी हे स्त्री शक्तीचे एक रूप आहे.
बारवेत पाणी नाही. दोन लहान दालने बारवेच्या दोन कोपऱ्यांत आहेत. बारवेच्या दोन भिंती आणि बाजूला दोन खांब उभारून अंदाजे सहा फूट उंचीचे चौरसाकृती मंडप दिसतात. मूर्ती मंडपातसुद्धा कोरलेल्या आहेत. तेथे गणपती, भैरव अशा सुंदर मूर्ती पाहण्यास मिळतात. मूर्तींनी इतकी मढलेली बारव; मात्र तिच्याकडे ना मान्यवरांचे, ना इतिहासतज्ज्ञांचे, ना पर्यटकांचे लक्ष वेधले जात ! महाराष्ट्रातील बऱ्याच बारवांमध्ये देवकोष्ठे (देवाची मूर्ती असलेले कोनाडे) केलेली दिसतात. त्या कोष्ठांमध्ये कधी मूर्ती असतात तर बऱ्याचदा ती रिकामी असतात. परंतु खांबपिंपरी येथील बारवेमध्ये मात्र मूर्तिकला भरभरून अनुभवण्यास मिळते.
बारवेचे महत्त्व आणि कौतुक स्थानिकांना फारसे नसावे. बारवेच्या एका बाजूचे दगड वापरून मारुतीचे मंदिर बांधले गेले आहे. जुने मंदिर पडले होते, सोयीचे म्हणून ग्रामस्थांनी बारवेचे दगड वापरून ते मंदिर उभारले म्हणे. बारवेला त्या बाजूला मूर्ती नव्हत्याच असा युक्तिवाद ग्रामस्थांनी केला. तेथील काही मूर्ती कोणा ‘संशोधका’ने मागितल्या म्हणून ग्रामस्थांनी त्यांना देऊन टाकल्या ! गावाने औदार्य एवढे दाखवले, की त्या कोणाला दिल्या हेदेखील त्या मंडळींना माहीत नाही. बारवेच्या काठावर पुरातन महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी या बारवेलासुद्धा काही प्रमाणात सिमेंट लागलेले दिसते. दुसऱ्या कोपऱ्यावर अखंड शिळा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसतात आणि चारही बाजूंनी गोपिका नृत्य करताना कोरलेल्या आहेत. त्याच शिळेच्या बाजूला महालक्ष्मीचे मंदिर आहे
गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर (प्राचीन/पुरातन वस्तीची शक्यता असलेले ठिकाण) वसलेले आहे. शेतात विहीर खणू लागले, की अनेक प्राचीन वस्तू जसे की खापरे, मोठ्या आकाराच्या विटा सापडतात (आणि अर्थातच त्या फेकून दिल्या जातात). गावच्या परिसरात कोठेही नवीन घर बांधणे झाले तर त्यासाठी चार फूटाचा पाया खोदला, की माणसांचे सापळे सापडतात ! सर्वत्र सापडणारे हे सापळे गावकऱ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे त्यांचे भय वाटत नाही. सापळा ‘निघाला की त्याला नदीमध्ये प्रवाहित करायचे किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची आणि काम सुरू ठेवायचे हे ग्रामस्थांना नेहमीचे झाले आहे.
गावात दोन-तीन जुन्या विहिरी आहेत. कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते; तसेच, बोराची झाडेसुद्धा भरपूर आहेत.
कुभेफळ बाराव :-
नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी भक्कम अशा दगडी बारव बांधण्यात आल्या. अतिशय सुंदर कोरीव बांधकाम ह्या वेळी कारागीरांनी केलेले दिसते. या सर्व बारव होळकरांच्या काळातील दगडी बांधकाम असलेल्या या विस्तीर्ण बारवा आजही या परिसरातील नागरिकांची तहान भागविण्याचे काम करतात.त्या काळातील बांधकामाचे तंत्रज्ञान निश्चितच आपल्यापेक्षा प्रगत होते. बारवाची संपूर्ण बांधणी दगडांनी केली जायची. आजही त्यातील एकही दगड पडलेला दिसत नाही. त्या वेळी याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी,वापरासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात करत असत. बारवांच्या बाजूला आजही येथे महादेवांची मंदिरे आढळतात, जेणेकरून पाणी शुद्ध राहणे, तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. त्या काळातील बारव बांधणाऱ्यांना पाण्याचे स्रोत कुठे आहेत याची माहिती होती. तसेच जलपुनर्भरणाचे महत्त्वदेखील त्यांना माहिती होते. या बारवांविषयीचे पुरावे अजूनही इंदौरच्या होळकर दरबारात आपणास बघावयास मिळतात.

अकोले तालुक्यातील वाशरे गावात, कुभेफळ गावात तसेच औरंगपूर फाटा जवळ बाराव आहेत. वाशेरे गावातील बाराव आजही गावकऱ्यांची तहान भागवते. कुभेफळ गावालगत असलेली बाराव मात्र अतिशय सुंदर बांधकाम केलेली दिसते परंतु गावाच्या व मनुष्य वस्तीच्या बाजुला असल्याने जास्त वापर नसल्यानी थोडी दूर्लक्षित आहे. औरंगपूर फाटा जवळ बाराव पूर्णपणे गाडलेली होती परंतु येथील स्थानिकांनी उत्खनन करून जिर्णोद्धार केला व गाडली गेलेली गणेशाची मूर्ती तसेच शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. या गावाचे अकोल्यापासूनचे अंतर : वाशरे ७.५ km , कुभेफळ ७.५ km औरंगपूर फाटा ४.३ km
होळकरकालीन बारव - वीरगाव : ता.अकोले जि.अहिल्यानगर (महाराष्ट्र)



वाफगाव : होळकरकालीन बुरुजातील विहिर(अंधारी विहिर)
वाफगाव : ता.खेड जि.पुणे(महा.)








ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा











हत्ती बारव, अहिल्यानगर :-





मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर –
महाराष्ट्रातील काही गावात आजही ऐतिहासिक पाऊलखुणा पाहण्यास मिळतात असेच ऐतिहासिक गाव म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गाव इथे एक ऐतिहासिक प्याटी बावी विहीर आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणिकलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराच्या अवशेषाचा वापर करुन बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.
मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.अशा ऐतिहासिक मैंदर्गी गावातील प्याटी विहीर बदल सांगणार आहे.

मैंदर्गी येथील पुरातन प्याटी बावी विहीर भव्य आहे.मैंदर्गी गावात विहीर आहे. पाऊस भरपूर झाल्यास विहीर पाण्यानी भरलेली असते.जसे पाण्याचे झरे लागतात तशी विहीरीची रचना केली आहे.विहीरीची भव्यता बघण्या सारखे आहे.वैशिष्ट्यपूर्ण काळ्या दगडी बांधकाम केले आहे.अजूनही बांधकाम भक्कम आहे.विहिरीत खाली जाण्यासाठी पायरी व्यवस्था केलेली आहे.आतापर्यंत एकदा विहीर तळ दिसला नाही.पाणी अटलेला नाही असे जाणकार जुने मंडळी सांगतात.
विहिरीत भिंतीवर शिलालेख बसवले आहे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या शिलालेखात गणपतराव बापूसाहेब पटवर्धन आधिपती कुरुंदवाड संस्थान यांनी शके.१७९८ मध्ये प्याटी विहिरीचे जिर्णोदार करण्यात आले आहे. मैंदर्गीत प्रवेश केल्यानंतर बस स्थानककडे जाताना उजव्या बाजूला ऐतिहासिक विहीर लागते .विहीरचा सुरक्षित विचार करून स्थानिक नगरपरिषदने लोंखडी चाळी बसलेले आहेत.
विहीरत वरच्या बाजूला पाणी काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे रहाट बसविले आहेत.सध्या विहीरीच्या बाजूला बांधकाम सुरू आहे.विहीरी च्या चारही बाजूने घरे असून मध्यभागी विशाल व भव्य विहीर आहे.ऐतिहासिक पुरातन प्याटी विहीर हे मैंदर्गी गावाचे वैभवात भर टाकणारी स्थळ आहे.त्याची जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.
वेळापुर येथील अर्धनारीनटेश्वर मंदीरातील बारव :-
अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर
उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते.
डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला
सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य
मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन
शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही
दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात,
म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा
आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे
बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर
मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते.
मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. करमाळ्याची सात विहीरींची बारव :-
करमाळा हा भाग दुष्काळी, पाऊस हा ५०० मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान ४५ अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे. त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार १५० - २०० फूट व्यासाचा आहे. तिची खोली ७० -८० फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते.करमाळ्याची हत्ती बारव ( सैराट' चित्रपटातील ) :-
कमलादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची बाब, ती म्हणजे "सैराट' चित्रपटानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेली "हत्ती बारव' ९६ पायऱ्यांची विहीर ! मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनविलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. या बारवेवर हत्तीची मोट चालायची असे सांगितले जाते. कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. तत्कालीन कालखंडात कुठलीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना एवढी विहीर खोदताना किती कष्ट उपसावे लागले असतील याचा अंदाज करता येत नाही. मंदिर बांधकामासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च या बारवावर झाल्याचे मौखिक इतिहासातून सांगितले जाते.
पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे स्थापत्य बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठ्याची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.
औंढे खुर्द ( मावळ ) येथील बारव :-
घुमटाची विहीर :-
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.
घुमटाची विहीर
बामणडोह :-
शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात. हि विहीर सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या समाधीजवळ वायव्येकडे जंगलात जेमतेम ५० मीटर अंतरावर आहे.पुणे-मुंबई रेल्वे ट्रॅकच्या दक्षिणेस फक्त १० मीटर अंतरावर हि विहीर आहे. ही विहीर कधी बांधली गेली याबद्दल कोणतेही संकेत नाहीत, जरी मी ती बाणेश्वर मंदिराच्या समकालीन मानली जाते.जुन्नर तालुक्यातील बारवा :-
बारव ही एक पुर्वजांची अशी संकल्पना आहे की या ठिकाणी प्रत्येक प्राणी मात्रांस आपली मनसोक्त पणे कुणाचीही मदत न घेता तहान भागविता येते अशी उत्कृष्ट बांधकाम केलेली जागा. म्हणून बारव संवर्धन ही संकल्पना गेली अनेक वर्षे मी राबवतोय. या बारवेत उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग असल्याने दिवसा मनुष्य व पक्षी पाणी पितात तर रात्री तहानलेल्या वन्यजीवांची तहान या बारवा भागवितात. म्हणूनच या बारवांचे तसेच पुष्करणींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मनुष्याने जरी या बारवांचा वापर केला नाही तरी आपले संवर्धन कार्य वाया न जाता पशुपक्ष्यांच्या कामी येत. जुन्नर तालुक्यात एकुण अद्याप १३ बारवांपर्यत पोहचुन त्यातील काही बारवांना स्वच्छता करून मोकळा श्वास देता आला आहे. तर जुन्नर तालुक्यात एकुण चार पुष्करणी पैकी एका पुष्करणीस प्रकाशझोतात आणता आले आहे.श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी (नारायणगाव) गावचा ऐतिहासिक वारसा –
जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या दक्षिणेस काही अंतरावर वसलेले एक छोटंसं परंतु तेवढेचं ऐतिहासिक व नैसर्गिक सुंदरतेने नटलेले व संतमहंतांच्या पदपर्शाने पावन झालेले खेडेगाव म्हणजे गुंजाळवाडी (नारायणगाव) होय. या गावाच्या शेजारी जवळच पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आर्वी व नारायणगाव ही ऐतिहासिक वारसा लाभलेली गावे आहेत. जुन्नर तालुक्यातील मध्य पट्ट्यातील ही पर्यटनासाठी तितकीच महत्त्वाची गावे असून पर्यटनस्थळांचे जतन करून हे ऐतिहासिक वैभव श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी ग्रामस्थांनी जगासमोर आणून गावांचा विकास साध्य केला जाऊ शकतो.गुंजाळवाडी गावठाण अजुनही जुन्या पध्दतीच्या घरांनी व्यापलेले असुन गावाने अजूनही खेडुतपणा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.या गावातील कुटुंबांची तहान बाराही महिने भागविते ती येथील असलेली ऐतिहासिक श्री राम बारव. गावच्या जुन्या चावडीच्या उत्तरेस तर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या पूर्वेला आपणास ही बारव दक्षिणोत्तर स्वरूपात पहावयास मिळते. ग्रामस्थांनी येथील बारवेचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले असुन रहदारीच्या विळख्यात ही बारव असल्याने संपूर्ण बारवेस लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने झाकून घेत कुणाचीही जीवित हानी होणार याची ग्रामस्थांनी काळजी घेतली आहे.

बारवेस पश्र्चिमेकडुन उतरण्यासाठी पायरी मार्ग असून आठ दहा पाय-या उतरून खाली गेले की डाव्या हाताला वळताच तेथेच पश्र्चिम भिंतीत सुंदर अशा देवळीत साधारण अडीच तीन फुट उंचीचे श्रीगणेश विराजमान असलेले पहावयास मिळतात तर समोरच उत्तर कमानीवर एक मानविआकृतीचे दगडी शिल्प असून ते कशाबाबतचे आहे ते समजू शकलो नाही. बारवेतील पाणी एवढे स्वच्छ आहे की आपणास त्यात डोकावताना अगदी तळापर्यंत सहज पाहता येते. बारवेच्या पुर्वेस लागुनच श्रीराम पंचायतन मंदिर असुन ते 200 वर्षे जुने असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे श्री राम मंदिर ,श्री हनुमान मंदिर संपूर्ण सुंदर लाकडी कलेत साकारलेले असुन जुन्नर तालुक्यातील एकाही मंदिरास किंवा जवळपास असलेल्या तालुक्यातील मंदिरात अशी लाकडावरील कला कुसर पहावयास मिळत नाही. या मंदिराच्या छताला लावलेले लाकडावरची नक्षीकाम पाहतच रहावी अशीच आहे.
श्री राम व श्री हनुमान मंदिर यांना श्री राम पंचायतन म्हणून ओळखले जाते. हे मंदिर ह. भ. प. सहादूबाबा भाऊ वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर , व त्यांचे बंधू श्री गणाजी वायकर यांनी बांधले असून आतमध्ये वापरण्यात आलेले सर्व मार्बल हे त्या काळी जपान वरून आणले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आजही त्या मार्बलचा रंग हा आहे तसाच आहे. ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांची समाधी, नागदेवता शिल्प मंदिरा समोरच पश्र्चिमेस आहे. मंदिराच्या पाठिमागे पुर्वेस ग्रामदैवत आई मुक्तादेवी मंदिर असुन या मंदिरात काळ्या पाषाणात मुक्तादेवीची अखंड सुबक मूर्ती सिंहावर विराजमान असलेली पहावयास मिळते. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यात या स्वरूपाची देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती इतरत्र कुठेही आढळून येत नाही.
मुंबई मधील “भाऊचा धक्का” आपणास फक्त माहीत असेल व तो भाऊचा धक्का आजही खुप प्रसिद्ध असून त्याचे मुळ हे जुन्नर तालुक्यातील असुन त्या धक्का ह. भ. प. सहादूबाबा वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर यांच्या मालकीचा होता. त्यांच्या नावावरूनच त्याला भाऊचा धक्का म्हणून नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. गावची जुनी परंपरा कायम राखली जावी म्हणून आजही ग्रामसभा ही पूर्वीपासून ग्रामचावडीमध्येच होत असते. दर १२ वर्षांनी जो कुंभमेळा नाशिकमध्ये होतो त्यानंतर तेथील काही साधूंची धुंड ही तीन दिवस याच मंदिरात थांबत असते.
मंदिराच्या पाठिमागे असलेल्या वटवृक्षाचे झाड पण खूप मोठे असून फार जुने असुन ग्रामस्थांनी ते जतन करण्यासाठी योगदान दिले आहे. सांगितले जाते की ह. भ. प सहादू बाबा वायकर हे त्या काळी स्वतः कोणताही मोबदला न घेता पायी प्रवास करून महाराष्ट्र भर कीर्तन करत असत . ह भ प श्री सहदूबाबा वायकर हे ह भ प कोंडाजी बाबा डेरे यांचे गुरू होते. जुन्नर तालुक्यातील ओतूर वरून पंढरपूर ला जाणारी चैतन्य महाराजांची पालखी ही ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी त्या काळी प्रथम चालू केली होती. विशेष म्हणजे ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी स्वहस्ते लिहीलेली संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा आजही आपणास येथे पहावयास मिळते.




The intricate plan and section design of the 

लोणी भापकर येथील बारव


Diagram explaining the position of 


जेजुरी मधील अहिल्यादेवी होळकर तलाव(ता.पुरंदर जि.पुणे) : -

शिरवळची प्राचीन पाणपोयी :-
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.
लिंब बारामोटेची विहिर
पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता. बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो. विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी आकाराची आहे.
सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या
संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार
वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत. लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :-
वडूज-कराड मार्गापासून ५ किलोमीटर अंतरावर गुरसाळे हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी. त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे.
या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड. महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. मध्यतंरी बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..
पायर्यांची विहीर( नकट्या रवळ्याची विहीर :-
सातवाहनकालीन प्राचीन वारसा लाभलेल्या कराड शहरातील पंताचा कोट या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४ मी उंचीवर आहे.विहीर म्हणजे जलस्त्रोताचे जिवंत झरे असतात, तसेच जलसंस्कृतीच्या ठिकाणी जलदेवता व इतर दैवतांचे कोरीव कामसाधारणतः सर्व जल उगम व साठा या ठिकाणी हमखास दृष्टीपथास येते, मात्र येथील विहिरीत ना पाण्याचे झरे, ना जलदेवतांच्या कोरीव आकृती. या सर्व गोष्टींचा अभाव असलेल्याने नक्की ही विहीर पाण्याच्या वापरासाठी निर्माण केली होती की इतर उद्देशाने याचा मनात संम्रभ निर्माण होतो. काहींच्या मते शत्रूच्या सैन्यापासून लपून राहण्यासाठी या विहिरीचा वापर होत असावा. कोयनानदीच्या पात्रतातून चुनेगच्ची खापरी जलवाहिकेच्या माध्यमाने येथे पाणी आणले असावे ही शक्यता वाटते, पण इतक्या भल्यामोठ्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी ना रहाटाचे, ना मोटेचे हौदे असल्याचे पुरावे दिसत नाही.
ही विहीर सुमारे ४१.५ मी लांब असून त्यात ३०.५ मी लांबीचा सोपनमार्ग व खाली ११×११ मी चौरासकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे.मात्र उद्देश किंवा उपयोग कशासाठी होत असावा याबाबत अनभिज्ञता आहे. विहीरीच्या आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे. वीस पायऱ्या चढल्यावर किंवा उतरल्यावर विसावा घेण्यासाठी त्या केल्या असू शकतील.पहिल्या वीस पायऱ्या उतरून गेल्यावर विहिरीच्या अंतर्गत तटबंदी बांधकामातून दोन्ही बाजूने एक माणूस विहिरीरच्या हौद्याकडे जाऊ शकेल अशी रचना आहे. जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा.
अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी. विहिरीत खापरी पाटामार्फत (भाजलेल्या मातीचा पाईप किंवा पाट) कोयनेचे पाणी सोडले जात असावे. त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणीपुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत असे सातारा गॅझेटियर म्हणते.
ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येते.
सध्या या विहीर गाळाने भरुन गेली असल्याने पावसाळ्यात थोडे फार पाणी साठते. ईथे भुयार असून ते भुईकोटाबाहेर निघते असा समज आहे. वास्तविक असे भुयार असेल तर त्यात ऑक्सिजनची कमरता, साप, विंचू अश्या विषारी जीवांचा वावर या सर्व गोष्टी विचारात घेता तथ्य नाही.
कराडच्या वैभवशाली संस्कृतीचा वारसा असलेल्या या विहिरीला नकट्या रावळाची विहीर हे नाव व तिचा नक्की वापर याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे मनात उत्सुकता निर्माण होते. काळाच्या उदरात गडप झालेले रहस्य शोधण्याचा इतिहास संशोधक नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा वाटते.
नेवरीतील बारव :-
सांगली जिल्ह्यातील कडेगांव हा तालुका राजकीय दृष्ट्या नेहमी सक्रिय असतो. याच कडेगांव आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर आहे नेवरी गाव. जसा राजकीय क्षेत्रात याचा छाप तसाच ऐतिहासिक बाबीत देखील या गावाचा ठसा दिसतो. नेवरी गावात बरेच जुने वाडे पाहायला मिळतात. या वाड्यांची स्थिती आजही उत्तम असून त्यांची देखभाल येथे राहणारे घेत असतात. येथे सिद्धनाथाची मोठी यात्रा भरते जी कडेगांव तालुक्यातील मोठी यात्रा म्हणून प्रसिध्द असून त्या दरम्यान रथयात्रा देखील काढली जाते. आजही गावच्या दक्षिण बाजूला ऐतिहासिक बारव , आमराई, व बाजूला हत्तीकुंड पाहायला मिळतो. नेवरी गावाच्या बाहेर एक पुरातन बारव आहे. सिद्धनाथ मंदिरा पासून सरळ पुढे गेलं की गावाच्या शेवटी शेतात एक पत्रा असणारे महादेव मंदिर आहे याच्या शेजारी ही बारव आपण बघू शकतो. या बारवेत उतरण्यासाठी दोन बाजूंनी समोरासमोर वाट आहे त्यामुळे हीचा समावेश भद्रा नावच्या बारव प्रकारात होतो. या बारवेला एक मोट देखील आहे जी नंतर बनवलेली दिसते. या मोटेचे दगड आणि त्यांच्या प्रकार बारवेसाठी वापरलेल्या दगडांच्या पेक्षा वेगळा आहे. तसेच मोटेचे आणि बारवेचे बांधकाम यात फरक जाणवतो. बारवेत एकूण १२ देवकोष्टके आहेत. पैकी फक्त एकात भग्न मूर्तीचे शेष भाग आहेत. मोटेतून दगडी पाटाच्या साहाय्याने पाणी जमिनीला आणि शेजारी असणाऱ्या दगडी टाक्यात पाणी सोडले जात. दोन दगडी टाक्या पूर्वी होत्या पैकी एक मोडकळीस आली आहे तर दुसरी सुस्थितीत आहे. यांचा वापर पाणी जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असावा. छत्रपती शिवरायांचे जावई हरजी राजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी राजे महाडिक यांनी हे गाव बसविले असे म्हटले जाते. याच सोबत हि बारव देखील व्यंकोजी राजेंनी बांधली असं सांगितले जाते. नेवरी गावातील आज बहुतांश कुटुंब महाडिक आडनावाची आहेत. या गावाच्या आसपास औरंगजेबाचा मुक्काम पडल्याचा उल्लेख मोगल दरबारच्या अखाबारात येतो. कालांतराने मुलुख वर्चस्वाने या गावात महाडिक व इंगवले यांच्यात सत्ता संघर्ष झाला व इंगवले लोकांना हे गाव सोडून जावे लागले (सध्या हे लोक कराड जवळील रिसवड या गावात राहतात)| बारव |
| हौद/ टाकी |
हैदरखान विहीर,मिरज :-
मिरज शहराला मोठा ऐतिहासक वारसा असून अनेक वास्तू त्याची साक्ष देत असतात. येथेच आदिलशहाच्या काळात सरदार हैदरखान याने एक विहीर बांधली. सन १५८३ मध्ये बांधलेल्या या विहिरीला हैदरखान विहीर म्हणूनच ओळखले जाते. या विहीराचा आकार १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल असा आहे.
या विहिरीतून आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. पुढे संस्थान काळातही या विहिरीच्या पाण्यावर मिरजेत शेती केली जात असल्याचे पुरावे आढळतात.मिरासाहेब दर्ग्यातील कारंजाला पाणी हैदरखान विहिरीतून एक दगडी पाईपलाईन मिरज शहरातील मिरासाहेब दर्ग्यात आणली होती. या ठिकाणी आणलेल्या पाण्याचे कारंजे तयार करण्यात आले होते. त्यासाठी विहिरीवर हत्तींची मोट वापरण्यात येत होती. या विहिरीमध्ये हत्तींना बांधण्यासाठी दगडी अंकुशही तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजही ते सुस्थितीत आहेत. १८८७ मध्ये हैदरखान विहीर रेल्वेच्या ताब्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मिरजेत रेल्वे पोहोचली. तेव्हा १८८७ मध्ये हैदरखान विहिरीचा ताबा रेल्वेकडे आला. रेल्वेचे डबे धुणे, स्टेशनची स्वच्छता करणे यासारख्या कामांसाठी हैदरखान विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता.सन २०१६ मध्ये मराठवाड्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. लातूरला तीव्र पाणी टंचाई होती. तेव्हा मिरजेतील स्थानिक नेते मकरंद देशपांडे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक योजना मांडली. मिरजेतील हैदरखान विहिरीतून लातूरला पाणी नेण्याच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. जलपरी एक्स्प्रेस धावू लागली दुष्काळग्रस्त लातूरला मिरजेतून पाणी पुरवठा करण्याची योजनेला मान्यता मिळाली. त्यासाठी रेल्वेने हैदरखान विहिरीतील पाणी लातूरला नेण्यात येणार होते. रेल्वेनेही त्यासाठी परवानगी दिली. जलपरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून रोज लाखो लिटर पाणी लातूरला पोहोचवले जावू लागले. सलग ४ महिने हैदरखान विहिरीतून लातूरला पाणीपुरवठा होत होता. ५०० वर्षे जुन्या असणाऱ्या हैदरखान विहिरीने लातूरकरांनाची तहान भागविली.शेकडो वर्षांपासून कित्येकांची तहान भागविणारी हैदरखान विहीर आता संकटात आहे. आसपासच्या लोकांनी विहिरीची कचराकुंडी केल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. विहिरीच्या कठड्यावर झुडपे उगवल्याने ते पडण्याच्या स्थितीत आहेत. विहिरीची दुरावस्था झाल्याने ती अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष आहे.
पांढर पाणी येथील विहिर :-
पन्हाळा ते पावनखिंड मोहिमे दरम्यान एक छोटस पांढरपाणी नावाच एक खेड गाव लागत हे गाव जरी छोट असल तरी या गावाचा इतिहास मोठा आहे. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून निसटले आणि विशाळगडाकडे निघाले. त्यासंदर्भात इथे एक कथा या परिसरात सांगितली जाते.किल्ले पन्हाळा गडावरची अष्टकोनी विहीर ( बाव ) / जलस्रोत...
दुर्ग पन्हाळा तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच अनेकांनी या गडाच्या अक्षरशः वाऱ्या केल्या आहेत. तसे पाहायला गेलं तर पन्हाळ्यावरची अनेक ठिकाण, वास्तू आपल्याला तोंड पाठ आहेत तिकडे हमखास सर्वांची पावले ही वळतातच पण याच गडावरच अशी काही ठिकाण देखील आहेत जिकडे सहसा माहिती अभावी म्हणा किंवा वेळे अभावी म्हणा जाणे काहीजणांना होतच नाही. तर असच एक ठिकाण आहे ते म्हणजे किल्ले पन्हाळा गडावरील ही अष्ट कोणी विहीर ( पाण्याचा जलस्रोत )
किल्ले पन्हाळा गडावर छत्रपती संभाजीराजे दुसरे ( करवीर पाहिले ) यांचे मंदिर आहे. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कूट आहे तर सोमेश्वर तलाव पासून जवळच असणाऱ्या हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधी समोरील भागात तर या मंदिराच्या मागील बाजूसच तट बंदिस्त आशा स्वरूपात आहे ही अष्टकोनी विहीर. मंदिराच्या डाव्या बाजूने चालत आपण पुढे गेलो की एका कोपऱ्यात दगडी तटबंदी सारखे छोटे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते थोडेसे वळण घेऊन आपण पुढे गेलो की मग आपल्या नजरेस पडते ती ही सुंदर अशी विहीर ( बाव ) तिन्ही बाजूनी दगडी छावणीच उभारली असल्यामुळे जवळ गेल्याशिवाय या विहिरीचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तिथून खाली विहरित उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या उतरून आपण सरळ पोहोचतो ते या अष्टकोनी विहिरी जवळ (बावीजवळ ). या विहिरीचे मुख दगडात कलाकुसर काम करून अष्ट कोणी स्वरूपात बनवले आहे. यातील पाणी सुद्धा थंडगार , नितळ आणि पिण्यायोग्य असे सुंदर आहे. विहिरीच्या वरच्या भागात आणि बाजूने दगडी बंदिस्त स्वरूपातील बांधकाम असल्यामुळे या ठिकाणी पाण्यात कोणतीही घाण अथवा धूळ पडण्याची शक्यता खूप कमीच. विहिरीच्या बाहेरच्या भागात एक जुने दगडी भांडे देखील आपल्याला पाहायला मिळतेच. आमच्या शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या स्वच्छता मोहीमा , भटकंती या निमित्ताने आजवर अनेक वेळा किल्ले पन्हाळा गडाची सफर ही ठरलेली आहेच मग सोबत असलेले मित्र मंडळींना घ्यायचं आणि ह्या आशा थोडे आड ठिकाणी दडलेल्या ठेव्याकड घेऊन जायचं हे ठरलेलं आहेच. बऱ्याच जणांना ह्या विहिरीविषयी माहिती नसावी कदाचित पण अतिशय सुंदर व थोडा वेगळा असा विहिरीचा हा ठेवा नक्की आवर्जून सर्वांनी पहावा असाच आहे.
सातप्पा स. कडव
चर्होली बु सरदार दाभाडे घराणे वंश
प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या खंबाटकी घाटाची 'खांब टाक्यावरील खामजाई देवी :-



विहीर :-
विहीर नेहमी गोलच का असते?
Science Behind The Shape Of Well : खेडोपाडी गेलं असता तिथं विहिरी सर्रास पाहायला मिळतात. गोड्या पाण्याची, निळ्याशार पाण्याची, कासव आणि इतर जलचरांना सामावून घेणारी आणि अनेकांचीच तहान भागवणारी ही विहीर. जमिनीत कैक फूटांपर्यंतचा खड्डा खणून, त्याला अजुबाजूनं दगडी तटबंदी बांधून ही विहीर तयार केली जाते.
अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबासाठी विहीर हा मुख्य जलस्त्रोत असतो. डोंगरउतार किंवा भूगर्भात असणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांचा एकसंध साठा या विहिरीत पाहता येतो. अशा या विहिरीचे अनेक प्रकार सहसा पाहायला मिळतात. कुठं कठडा मोठा असणारी, कुठं जमिनीलाच धरून भूगर्भात खोल असणारी अशी अनेक रुपात ही विहीर पाहता येते.
काही भागांमध्ये या विहीरी आयताकृतीही असतात, पण त्या फारच क्वचित. कारण, सहसा विहीर ही वर्तुळाकारातच खणली आणि बांधली जाते. पण, कधी विचार केला आहे का की ही विहीर त्रिकोण, चौकोन, षटकोन किंवा इतर कोणत्याही आकारात का बरं बांधली जात नाही?
विहिरीच्या आकारामागेही आहे विज्ञान...
विहिरीचा आकार वर्तुळाकार असण्यामागे एक महतत्वाचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे विज्ञान. ज्यावेळी एखादा द्रव पदार्थ साठवून ठेवला जातो तेव्हा तो ज्या स्थायूरुपातील वस्तूमध्ये ठेवला जातो त्या वस्तूचाच आकार घेतो. द्रव पदार्थ एखाद्या भांड्यात ठेवला जातो तेव्हा त्यामुळं त्या पदार्थाच्या आजुबाजूच्या भींतींवर दाब तयार होतो.
विहिरीची बांधणी जर चौकोनी आकारात केली, तर त्यामध्ये जमा होणारं पाणी भींतींच्या कोनाड्यांवर सर्वाधिक दाब टाकेल. अशा परिस्थितीमध्ये विहिरीचं आयुर्मान कमी होऊन ती तुटण्याचा धोका अधिक असेल, याच कारणामुळं विहिरी कायम वर्तुळाकारच असतात. ज्यामुळं त्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या पाण्याचा समान दाब विहिरीच्या भींतींवर तयार होऊन त्या तुटण्याचा धोका कमी असतो.
हेसुद्धा वाचा : फणसाच्या बिया कोणी खाऊ नयेत?
विहीरी वर्तुळाकार असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यातील माती जास्त दिवस खचत नाही. पाण्याचा समान दाब तयार झाल्यामुळं हे शक्य होतं. आहे की नाही विहीरीच्या आकारामागचं हे कमाल कारण....
वाव संस्कृती :-
जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर
जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर
– आशुतोष बापट 8605018020 ashutosh.treks@gmail.com
(अधिकची माहिती दिलीप पोहनेरकर 9422219172 (जालना येथील पत्रकार) यांच्या लेखातून)
======================
संदर्भग्रंथ:-
कसे जाल:-
पुणे - नसरापूर - शिरवळ - खंबाटकी घाट.
Baravs found in Pune
Once upon a time, baravs were an inherent part of many settlements and temple precincts in Pune. A barav next to a shade-giving tree is a common sight in some of villages of Pune even today. Elsewhere, although baravs may have been destroyed over a period, their memory remains intact amongst the older generation of people. Interestingly, in the Junnar taluka (a block) a village itself is named as ‘Barav’ after an old barav which once existed there. In short, baravs were an inseparable part of many settlements.

This story talks about two baravs which are more than 600 years old, built somewhere in the early 14th century. One of them is found at Manchar town in Ambegaon taluka and the other one is found at Loni Bhapkar village in Baramati taluka of Pune district. The barav at Manchar is still used by the people for bathing and swimming. The one at Loni Bhapkar is part of a temple complex and has religious significance. Although its waters have become unfit for domestic use over time, it is an excellent piece of architecture displaying artwork in basalt rock.
The barav at Manchar
The town of Manchar was once a small village during medieval times, located on the trade route connecting the historic towns of Paithan (famous for its sarees) and Junnar. The barav found in Manchar is a beautiful one located next to a small water course called as ‘Khardi Nala’. This barav is fed by a natural spring and contains ample water throughout the year.
The barav at Manchar is nearly a square which tapers from a width of 22 metres on its topmost side to nearly half the length (11 m) at the bottom side. It has two entrances – one from the south and another from the east. After descending down from these two entrances, one reaches to an intermediate landing that has a raised seating platform.
Steps are a striking feature of this barav. Adjacent steps contain protruding stone blocks at regular intervals to counterbalance the thrust of the soil from behind. They also act as intermediate seating platforms, creating a beautiful rhythmic pattern, which highlights the aesthetic side of structural elements.
A stone inscription housed in the western parapet wall, narrates an interesting story about the construction of this barav. According to the Sanskrit inscription, Manichar (previous name of Manchar) was a beautiful village stationed in the hills of Amargiri. In Manichar, there lived an able, just, brave, and handsome person named Ladidev, who was the son of the village head (mentioned as pattelvarya). One night in his dream, Ladidev sees Mother Earth expressing her wish to permanently reside in his village. Waking up the next day, Ladidev recollects his dream and decides to build a barav at a suitable spot in the village where Mother Earth would permanently reside in the form of water. He thinks that the barav would also help in relieving the water stress conditions experienced by the villagers of Manchar due to frequent droughts. With these considerations, Ladidev initiates the construction of the barav on an auspicious day in the Shaka Samvat year 1266 (i.e. 1344 A.D.) (Ref: Mandake, G, 2003).
Today, the barav is popular amongst the people of Manchar as ‘angholichi barav’ (meaning barav used for bathing). Many adults and school-going kids assemble at the barav during early morning hours for bathing.
“We love swimming in this historical barav. It is always full with water, even in summer. We come here as early as 5 am and enjoy swimming until the afternoon sometimes. Applying soap and bathing in the barav is prohibited, so as to keep its water clean”
A small channel carries water from the barav into a kund, which is a small stepped pond located on its eastern side. Women assemble at this kund daily for washing clothes. Thus, while the barav becomes a social interaction space for men, the kund becomes an interactive space for women, who get a break from their daily routine and find a few leisure moments for chatting with each other while washing their clothes.
The barav at Loni Bhapkar
Loni Bhapkar village contains a beautiful barav built way back in the 14th century. The barav is part of a sacred precinct, originally containing temples of Shiva and Vishnu. Today, the original Shiva temple is in a dilapidated condition, while a new Dattatray temple has been built in place of the Vishnu temple. Interestingly, the barav is placed strategically at the focal point of the two temples, highlighting its significance and sacredness in the entire complex. Earlier, as part of religious rituals, people would take a bath in the barav before entering the temple. They believed that such ritualistic bathing washed away their sins and purified them before entering the sacred temple.
This barav is square-shaped with sides measuring 21 m at top and 14 m at the bottom, containing a series of steps carved in basalt rock. The entrance to the barav is from the southern side from where one descends down a few steps to reach the intermediate landing. The barav stands out because of its parapet wall which contains attractive devkoshta (niches) and a mandap (pavillion).
The two-metre high parapet wall of the barav acts as a kind of threshold, separating terrain and water. It contains 24 attractive devkoshtas forming a rhythmic pattern. Once upon a time, they housed idols of Vishnu in different forms. They reminded people about the sacredness of baravs and discouraged them from indulging in any acts that would pollute their water. Such kind of architectural detailing highlights the effective use of religious and spiritual ideas to encourage the water management practices of health and hygiene amongst people.
A square mandap with a roof supported by brackets resting on four circular pillars protrudes into the barav from its western side. Since the mandap was located outside the Vishnu temple, it is believed to once contain the idol of Varaha – one of the incarnations of Vishnu having the head of a wild boar and the body of a man. The remains of this idol can be seen today beneath a tree next to the barav. Apart from housing the idol, the mandap has a seating platform for people to relax and reflect in the presence of water. The external surface of the mandap is divided into panels by columnar motifs. The panels contain figurative motifs depicting the different incarnations of Vishnu and scenes from the Ramayana.
Despite the structural differences between the baravs at Manchar and Loni Bhapkar, both of them share some commonalities. Firstly, apart from minor structural damages, and wear and tear, both the baravs are in reasonably good conditions even after 600 years. They are fed by an ample quantity of safe groundwater even today. These facts demonstrate the engineering skills and hydrogeological knowledge of the people who built these baravs. Secondly, both the baravs are taken care of by their respective local communities. For instance, in 2019, few men from Manchar volunteered for cleaning and desilting the barav, as told by one of the volunteers Mr. Dhanesh Raut. He also said that every year during Diwali they light oil lamps on the steps of the barav.
Conclusion
In addition to the two baravs discussed in this photo-essay, there exist few others in and around Pune. However, most of them are in a ruined condition. Today, the usefulness of baravs as water storage structures may have declined due to relatively easy access to tap water. Despite this fact, we cannot neglect their value and turn them into places for dumping waste. We need to understand that baravs are much more than mere water storage structures. They have heritage value and have once served as community spaces with socio-cultural and socio-technical identity. Most importantly baravs connect people to water by enabling them to see, hear and touch water.
Currently, when water is increasingly seen as a commodity to be exploited to the fullest, protecting baravs becomes essential as they manifest our ancient cultural values of respecting, sharing and using water with utmost care, which is a precious gift from nature to humankind.
१.(Photo - Vijay Mathane)
२.(साभार- Vidarbha Darshan)
३.Indian Village Directory | villageinfo.in
४.Mishra, Jai Prakash (1993). Researches in social sciences. ISBN
माहितीबद्दल धन्यवाद सर. माझा नेहमीचा मार्ग असून मी ही बारव पाहिली नाही. यावेळी नक्की पाहणार.
या पेक्षा एक प्राचीन बारव अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या ठिकाणी आहे. ही बारव अनेक मजली आहे. स्थानिक इतिहासकारांच्या मते ही बारव इसवीसॅन पूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे मौर्य कालीन आहे. कदाचित भारताच्या अतिप्राचीन विहिरींपैकी एक. पण शासनाच्या दुर्लक्षतेमुळे कोणालाही माहिती नाही.
इजिप्तच्या वास्तुकलेशी काहीसे साम्य असलेल्या या वास्तुची निर्मिती इ.स ६ मधिल असल्याचं सांगितले जाते. पण नेमका इतिहास नाही. पंरतू या बारव जवळ मारूतीचे देऊळ असल्याने चालुक्याच्या काळात हा बारव तयार केला असावा.
प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता.
विहीर ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. भारतीय संस्कृती मध्ये अगदी पारंपारिक काळातसुध्दा उपलब्ध नैसर्गिक पर्यावरणाचा आणि भूस्तर रचनेचा अभ्यास करण्यात आला होता. असे वैदिक वाङमयातील नोंदी विशेषत: ऋग्वेद, अथर्ववेद परिशिष्ट यात पाणी व्यवस्थापन व जलप्रवाहाच्या संदर्भात काही नोंदी मिळतात. राहाटगाडगे किंवा अश्मचर्क याविषयीच्या नोंदी आल्या आहेत, वहारमीहीर याच्या बृहत्संहितेमध्ये उदकार्गल नामक अध्यायामध्ये (५८) याविषयाच्या काही नोंदी आहेत. तसेच कौटिल्य अर्थशास्त्रात सुध्दा आपणाला उपलब्ध होणार्या माहितीचा विचार आहे. कुठल्या भूप्रदेशात निश्चित किती पाणी उपलब्ध होईल, त्यात पावसापासून उपलब्ध होणारे पाणी किती असेल, याविषयीचे काही आराखडे नोंदविले आहेत. याशिवाय अगदी महाभारत, रामायण सारखे महाकाव्य, बौद्ध जातक कथा व वाडमय या सर्वांमधून पाणी व्यवस्थापनाविषयी नोंद मिळते. पौराणिक साहित्याचा विचार करता माणसाने करावयाच्या समाज उपयोगी कामामध्ये वापी, कुप, तडाग यासारख्या वास्तूंच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसते.
वापी कूप तडागानि देवतायतनानि च।
अन्नप्रदानमारामं पूर्तमित्यभिधोयते॥
अपरार्क टिकेमध्ये पूर्तकर्मविषयक आलेला हा श्लोक महाभारतातून घेतला आहे.
इष्टकर्म हे माणसाच्या व्यक्तिगत जीवनात महत्वाचे असले तरी पूर्तकर्म हे समाजासाठी अशा प्रकारची बांधकामे करतांना परिसरातील भूस्थर रचनेची चांगली माहिती असावी लागते. भावप्रकाश या ग्रंथात विहीरीचे लक्षणनोंदवतांना म्हटले आहे की, अल्पविस्तार असलेल्या भूमीत खोल व गोलाकार, खणलेली - बांधलेली विहीर होय. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये नोंदवले आहे की, मातीला लोणा लागणार नाही, अशा जागी चौकोनी विहीर खोदावी. तिचा तळ आणि सर्व बाजू बांधून काढाव्यात. तिला भुईसपाट लाकडाची बळकट दारे असावीत, तिच्यात तीन मजले व अनेक कोठड्या असाव्यात. अशा विहीरींच्या संदर्भात अनेक प्रकारच्या साहित्यिक नोंदी उपलब्ध होतात.
प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता. आजही अंगी असलेल्या काही दैवी शक्ती आधारे परिसराची पहाणी करून विहीरींची जागा दाखवणार्या व्यक्ती मिळतात. अशा व्यक्तींना पायाळू असे संबोधतात.
त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भूस्थर रचना यांचा अचूक अंदाज घेवूनच प्राचिन शास्त्रग्रंथातून भूमी परिक्षा करण्यासाठी उपलब्ध क्षेत्र त्या परिसरातील वृक्ष जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद यांचा आधार घेतला जाई. परिसरातील खडकाची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पती व प्राणीजन्य खुणा यांचा अभ्यास करण्यात येई व अनेक वर्षांच्या अनुभवानंतर काही सूत्र सिध्द करण्यात आलेली होती. उदा. जर जांभळाच्या पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर गोड पाणी लागते.
ज्या वृक्षाच्या फळास किंवा पुष्पास विकार (फळ किंवा पुष्प सदृष्य) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हात पुढे चार पुरूष खणले असता पाणी लागते. त्याची खूण म्हणजे खाली दगड व पीतवर्ण (पिवळ्या रंगाची जमीन) असेल.
वड, पळस, उंबर हे एकत्र असतील, तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतात, तेथेही वृक्षांच्या उत्तरेकडे चार हात खणले तर पाणी लागेल.
ज्या भूमीवर मुंज, काश कुश यापैकी एका प्रकारचे गवत उपलब्ध आहे व जमीन निळसर, खडकाळ आहे, किमान काळी अथवा तांबड्या (लाल) रंगाची असेल, तेथे विपुल गोड पाणी असते. अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथात याविषयीच्या नोंदी आहेत.
विठ्ठलाजी शास्त्री धारूरकर यांनी उपयुक्त धर्मशास्त्र संग्रह या ग्रंथात (मुंबई शके १८२६) याविषयी चर्चा केली आहे. तर च.धु. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा भूगोल (दिल्ली १९७६) यामध्ये महाराष्ट्राच्या भूस्तर रचनेची व डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यातून भूपृष्ठ व भूजल यांच्या वापराविषयी नोंद केली आहे. अग्निजन्य खडकाची सच्छिद्रता १ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ग्रॅनाईट किंवा बेसाल्टमधून पाणी झिरपणे कठीण असते. चिकण मातीच्या थरातून सहसा पाणी जिरत नाही. उलट, वालूका स्थर किंवा लाईमस्टोन (चुनखडी) खडकातून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सछिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत असतात. या अंतरभौम जलपातळीत भूजल पृष्ठ म्हणतात. देशपांडे नोंदवतात महाराष्ट्रातील विहीरींचे प्राकृतिक स्वरूप केवळ भूपृष्ठ रचनेमुळे निश्चित झाले नसून भूमीगत पाण्याचाही बराच प्रभाव आहे. राज्याच्या जलसिंचनाच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के गरज विहीरी भागवतात. असे असूनही आतातपर्यंत भूमिगत जलपातळीबाबत राज्यात नगण्य संशोधन व्हावे ही आश्चर्यकारक वस्तूस्थिती आहे. आज या क्षेत्रात जाणीपूर्वक लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाआधारे भूजलाचा शोध घेणे शक्य झाले आहे.
शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून एखाद्या भूभागाची पाहाणी करून पुनर्भरणाचा विचारही केला जावू शकतो. तथापि मध्ययुग व त्याहीआधी जो भाग सदैव भूजलाने ओतप्रोत भरलेला होता त्याचा अचूक शोध घेण्यात आला. यासाठी परंपरेने व सातत्याने केलेल्या परिसराच्या निरीक्षणाचा फायदा त्यांना झाला. पारंपारिक, अनुभवजन्य शहाणपण अशी याची नोंद केली जावू शकते. भारताच्या विविध भागाचे भूस्थर रचना समजावून घेतांना त्या त्या क्षेत्रात असलेले नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेतली गेली, शिवाय सिंधू, सरस्वती नदीचे खोरे, ब्रम्हपुत्रा, गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी या व अशा प्रत्येक नदीखोर्याची स्वत: ची अशी वैशिष्ट्ये होती. महाकाव्यातून व पौराणिक ग्रंथातून त्यांची नोंद केली आहे. अशी नोंद करतांना स्थल महात्म्य, लोकस्मृती, परंपरा यांचाही विचार केला गेला. व त्या त्या क्षेत्रांचे वैशिष्ट्य लक्षात घेवून जागा नागरिकांसाठी किंवा मानवी वसाहतीसाठी उपयुक्त असणार्या भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा शोध घेण्यात आला, यानंतर त्या क्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची प्रदेशनिहाय अशी वेगळी वैशिष्ट्ये पहावयाला मिळतात. बर्याचदा मंदीर स्थापत्यामध्ये जसे वैविध्य आढळते, तसेच वैविध्य जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जाणवते.
दक्षिणेतील द्रवीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोर्यात आढळणारे भूमीज व वेसर (खेचर) स्थापत्यांचा प्रभाव आपणाला त्या त्या क्षेत्रातील बारव स्थापत्यावर पडल्याचे आढळते. याशिवाय भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी लयन स्थापत्य (गुहाशिल्प) दुर्ग स्थापत्य व मंदीर स्थापत्य या प्रत्येक वास्तूंच्या मधला वेगळेपणा त्या परिसरातील जलव्यवस्थापन मध्येही आढळतो. रामायणासारख्या ग्रंथात दैवमातृक आणि नदीमातृक शेतींचा उल्लेख येतो. पावसाच्या पाण्यावर भिजणारी जमीन ही देवमातृक मानली गेली. तथापि यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मानवाने शेती करून पिक पध्दती विसकित केली. त्यासाठी नदी, विहीरी, जलाशय, कालवे यासारख्या पाणी व्यवस्थापन पध्दतीचा आधार घेतला. त्याला अदेवमातृक किंवा नदीमातृकम्हटले गेले आहे.
ज्या ठिकाणी नदीच्या काठावर किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर एका मर्यादित प्रमाणात मानवी वसाहत होती, तेव्हा प्रारंभिक काळात विहीरींची आवश्यकता नव्हती. पण ज्यावेळी निसर्गत: सहज उपलब्ध असणार्या जलप्रवाहाच्या पलीकडील क्षेत्रात वसाहतीकरणाची गरज माणसाला वाटली तेव्हा भूमीअंतर्गत असलेल्या भूगर्भजलाचा शोध घेतला गेला. व त्यातून विहीर, वापी, बारव या जलस्थापत्य प्रकाराचा विकास झाला. त्यामुळे माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात वसाहती करणे शक्य झाले.
वास्तविक पाहाता बारव निर्मितीच्या मागे असलेली प्रेरणा ही मानवी वसाहतीची गरज हीच होती. विहीरींच्या विविध आकार - प्रकारांचे व तिच्या शुशोभिकरणाचे प्रयोग करताना त्या त्या स्थानाचे भौगोलिक वैशिष्ट्य, पाण्याचे पावित्र्य, शुध्दता जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण देवतांच्या मधून अनुभवी शकतो.
यासाठी म्हणून विविध कथानकांची व परंपरांची निर्मिती ही झाली. याची नोंद मध्ययुगीन साहित्यात पाहावयास मिळते. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामी, श्री ज्ञानदेव किंवा संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथात याविषयीचे उल्लेख पाहावयास मिळतात.
प्रत्येक स्थानावर असलेल्या वास्तूची वैशिष्ट्य व त्या त्या काळामध्ये जाणीवपूर्वक, विकसित झालेल्या जल व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून घेणे ज्ञानवर्धक व रंजक ठरते.
श्री. अरूणचंद्र शं. पाठक - मो : ९६१९०४६०६९
बारव (पाय विहीर) ,Vihir
प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे
कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत.
परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत.
11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी, ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती.
परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले. धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला.
हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही.
हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत. परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते?
13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.
रोहन काळे मंुंंबई- 9372496819
(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)
महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.
(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)
(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)
Baravs – Punyache Paani
Introduction
Pune has witnessed the construction of several aqueducts, cisterns, ornamental pools, ponds, and tanks throughout history, similar to many other places in India. Many of these water structures represent the traditional wisdom and efficient water management practices of our ancestors.
This photo essay narrates the story of one such traditional water structure known as barav, which is a stepped pond or a well. A typical barav consists of a shaft penetrating deep inside the earth to tap groundwater. A steep flight of steps surrounds the shaft, providing access to the people for fetching groundwater. Baravs may be square, rectangular, or octagonal in shape with a parapet wall along their perimeter. One or more pavilions known as mandaps are sometimes present along the sides of the baravs. The name ‘barav’ comes from a traditional unit of measurement called ‘bav’, equivalent to 1.5 metres. Additionally, baravs are also known by the names kund, jalmandavi, and pushkarini.
The religious idea of attaining spiritual merit by performing acts of charity motivated many rulers, traders, money lenders, and priests to patronize the construction of baravs for the common good of the society at different places in Maharashtra. They were built with the financial support of the patrons, but were owned and maintained by the entire community, often transcending the social divides, as understood from the ancient stone inscriptions that exist near them. They were not only utilitarian structures, but also meeting places for people, especially women fetching their daily water, as well as sacred structures for holy bathing as part of religious rituals.
सामाजिक, सांस्कृतिक 'बारव'
बारव, म्हणजेच पायऱ्या असलेली विहीर. आपण ‘बारव’ या नावाने ओळखत असलो, तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायऱ्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आली आहे. इतर विहिरींतून पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करावा लागतो किंवा मुळात या विहिरींचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे, असा असतो.
बारवेच्या बाबतीत मात्र, पाणी मोटेने उपसणे हा मूळ हेतू नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून, त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. पायऱ्या असल्याने तिचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे, असा असतो. मंदिर परिसरांत बांधलेल्या बारवांना कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात. कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवऱ्या असलेली आहे. या बारवेतच मंदिर आहे. आळंद (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील बारवेत आसरा मातेचे मंदिर आहे. चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील पुष्करणी बारव चारही बाजूने ओवऱ्यांचे बांधकाम केलेली, विस्तीर्ण आहे. विस्तीर्ण बारवांना पुष्करणी म्हणतात. कंधार येथे अतिशय विस्तीर्ण तलाव आहे. त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिले आहे. अहिल्याबाईंच्या काळात प्राचीन मंदिरांचे, बारवांचे, नदीच्या घाटांचे जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात करण्यात आले. नवीन बांधकामे झाली. यामागे त्यांचे विलक्षण राजकीय, सामाजिक धोरण होते. याला धार्मिक समजण्याची चूक आपण नेहमीच करतो. ज्या मंदिरांत नियमित पूजा होते, धर्मशाळांचा वापर होतो, नदींचे घाट चांगले आहेत, बारवा चांगल्या बांधल्या गेल्या आहेत, त्यांचा वापर होतो, तेथे शांतता प्रस्थापित होते, असा विलक्षण निष्कर्ष अहिल्याबाईंनी काढलेला दिसतो. सोबतच प्राचीन वास्तुकला, तिचे सौंदर्य हाही मोठा विचार या धोरणात आहे. प्रत्यक्ष सैन्यबळावर भर देण्यापेक्षा, या बाबींवर भर देऊन, संपूर्ण भारतभर त्यांनी प्राचीन वास्तूंच्या जिर्णोद्धाराबाबत एक धोरण प्रत्यक्ष राबवून दाखवले.अहिल्याबाईंच्या आधीच्या काळातील बारवा चारही बाजूंनी ओवऱ्या असलेल्या, उतरत्या पायऱ्या असलेल्या आहेत. (उदा. पुष्करणी बारव चारठाणा, ता. जिंतूर जि. परभणी; मादळमोही ता. गेवराई, जि बीड) या बारवांमध्ये देवकोष्ठ आढळतात. त्यात अष्ट दिक्पाल, शेषशायी विष्णू, गणेश, सप्तमातृका किंवा आसरा आदी देवता आढळतात. त्यांची पूजा केली जाते. शेषशायी विष्णूच्या अतिशय सुंदर मूर्ती जुन्या बारवांमध्ये दिसतात. यातील अप्रतिम शिल्पसौंदर्य असलेल्या दोन मूर्ती आजही मराठवाड्यात आहेत. एक मूर्ती परभणीच्या टाकळकर राममंदिरात (गांधीपार्क) आहे, तर दुसरी पैठणला जुन्या नाथ मंदिराजवळच्या नृसिंह मंदिरात आहे. या मूर्ती बारवांतील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अष्ट दिक्पाल, म्हणजेच आठ दिशांच्या देवतांच्या मूर्ती. या शेषशायी विष्णू मूर्तीच्या प्रभावळीत दिसतात. यांच्या स्वतंत्र मूर्तीही असायच्या. वालूर (ता. सेलू, जि. परभणी) येथे वर्तुळाकार, आठ दिशांनी आठ पायऱ्या उतरत गेलेली (हेलिकल) बारव कचरा काढल्यावर समोर आली. तिला आठ देव कोष्ठ आहेत. ६४ योगिनींच्या मूर्ती असलेली खांबपिंपरी (ता. शेवगांव, जि. अहमदनगर) येथील बारव तर अतिशय महत्त्वाचा असा ऐतिहासिक ठेवा पोटात बाळगून आहे. संपूर्ण भारतभर ६४ योगिनींच्या मूर्ती या शिवाय फक्त दोनच ठिकाणी आहेत. ही बारव पुरातत्त्व विभागाने अधिगहीत करण्याची कारवाई सुरू केली आहे.
अहिल्याबाईंच्या काळानंतर बारवांची रचना जराशी बदलत गेलेली दिसते. वेरूळची, अहिल्याबाईंच्या काळातील बारव ‘शिवतीर्थ’ नावाने ओळखली जाते. ती अतिशय देखणी आहे. या बारवेत आठ छोटी मंदिरे आहेत. जुन्या बारवांमध्ये देवकोष्ठ असत, त्याऐवजी येथे मोठ्या खोल्या अथवा दालने दिसतात. त्यांचा उपयोग स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी करता यायचा. आजही ही दालने वापरली जातात. अहिल्याबाईंच्या काळातील किंवा त्या नंतरच्या बारवांत मात्र अशी रचना नाही. या बारवा भक्कम दगडी बांधणीच्या असून, त्यांत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या असतात. बाकीच्या बाजू भक्कमपणे दगडी चिऱ्यांत बंदिस्त असतात. चोंडाळा (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील बारव होळकर संस्थानचे दिवाण चंद्रचूड जहागीरदार (न्या. चंद्रचूड यांचे घराणे) यांनी बांधलेली असून, ती अशा पद्धतीच्या बारब बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना आहे. या बारवांत एका बाजूला पाणी उपसण्यासाठी मोट लावण्याची सोय आहे. त्याला ग्रामीण भागात बगाड म्हणतात. ही बगाड कमानींच्या रूपात अतिशय देखणी केलेली असते.
प्राचीन मंदिरांच्या परिसरांत बारवा आढळतातच. त्यातही नृसिंहासारखे उग्र देवतेचे मंदिर असेल, तर जवळ पाणी, नदीचा काठ किंवा कुंड असते. परभणी जिल्ह्यातच पोखर्णी येथे नृसिंह मंदिर आहे. गावाचे नावच पोखर्णी नृसिंह असे आहे. हे मंदिर आता आधुनिक झाले आहे. प्राचीन मंदिराचे काही अवशेष आता नाहीत; पण मंदिराला लागून उतरत्या पायऱ्यांची जुनी भव्य बारव आहे; ती आजही वापरली जाते. पाण्याचा उपसा नियमित केला जातो. बारवांतील पाण्याचा उपसा नियमित झाला, तर त्या चांगल्या राहतात. सोबतच भोवतालच्या आडांनाही पाणी राहते.
महाराष्ट्रात नोंद घेतल्या गेलेल्या, नकाशावर स्थान निश्चिती झालेल्या दोन हजार बारवा आहेत. रोहन काळे या तरुणाने राज्यभर फिरून बारवांच्या नकाशीकरणाचे फार मोलाचे काम केले आहे. ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ ग्रामीण भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर चालवली जात आहे. या मोहिमेत नोंदवल्या गेलेल्या बारवांपैकी जवळपास १०० बारवा वास्तुशास्त्र, रचना, सौंदर्य उपयुक्तता या सर्वच अर्थाने पर्यटन स्थळ बनू शकतील. या बारवांचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकेल, इतके चांगले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी ही मोठी समस्या असते, या पाण्याचा उपसा झाल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. यातील ७५ बारवा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत निवडण्यात येणार असून, सर्वच परिसर विकसित करण्याची योजना आहे. प्राचीन बारवा मंदिर परिसरात असतील, तर तो परिसर या निमित्ताने स्वच्छ होऊ शकतो. तेथे बाग फुलवली, तर त्याचा उपयोग लहान-थोरांना होऊ शकतो. याच पाण्याचा वापर करून, परिसरात मोठी झाडेही वाढवता येऊ शकतात.
पश्चिम महाराष्ट्रात बारा मोटेची विहीर (जि. सातारा) किंवा करमाळ्याची कमलाभवानी मंदिराजवळची, ‘सैराट’ या चित्रपटामुळे गाजलेली अष्टकोनी विहीर यांसारख्या देखण्या बारवा आहेत. काही इतक्या छोट्या आहेत, की त्या आकारानेच त्यांचे देखणेपण अजून खुलून येते. औरंगाबाद तालुक्यात शेंदूरवादा येथे खाम नदीच्या काठावर सिंधुरवदन गणेशाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या अंगणात अतिशय छोटी; पण देखणी बारव आहे. तिला चारही बाजूने पायऱ्या आहेत. ती नदीच्या काठावर आहे. पूजेसाठी या बारवेतून पाणी घेतले जायचे. नदीला पूर आला, की बारव बुडते; एवढेच काय मंदिरही पाण्याखाली जाते. आजही ही बारव दिमाखात उभी आहे.
बारव हे केवळ दगडी बांधकाम नाही, की धार्मिक ठिकाणही नाही. ते संपन्न संस्कृतीचे प्रतीक आहे. बारवांचे जतन व संवर्धनासाठी विविध उपयांची गरज आहे. शिवरात्र, चैत्री पाडवा या निमित्ताने या बारवांवर दीपपोत्सव करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. ती सर्वत्र होण्याची गरज आहे. लोककला, शास्त्रीय संगीत, नृत्य आदी कार्यक्रम बारवांच्या परिसरात आयोजित करायला हवेत. बारवांचा अभ्यास अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र; तसेच सांस्कृतिक अंगाने झाला पाहिजे. बारवांच्या बांधकामांत सौंदर्य, उपयुक्तता, पाण्याची गरज, धार्मिक भावना असा सर्वांगीण विचार केला गेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही बारवांचा विचार व्हायला हवा.
प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र – मंगल देशा, पवित्र देशा, मंदिरांच्या देशा
मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात स्थापन झालेली मोठी मानवी वसाहत ही महाजनपद काळात दिसून येते. या काळात वस्ती मोठ्या प्रमाणात नद्यांच्या काठावर दिसून येते. महाराष्ट्रात या काळातील मोठ्या वसाहतींचा विचार करता गोदावरी काठावर नाशिक, पैठण आणि बोधन; तेरणा काठी तेर; कुकडी काठी जुन्नर; केलना काठी भोकरदन; वैनगंगा काठावर पौनी; उल्हास नदीकाठी कल्याण या ठिकाणी सातवाहन कालिन वस्ती दिसून येते. पुढील काळात मानवी वस्ती इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्यास सुरूवात झाली. वाढलेल्या मानवी वस्तीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नदीचे काठ अपुरे पडू लागल्यानंतर पर्यायी मार्गांचा शोध सुरू झाला. आणि यातूनच निर्मिती झाली भुगर्भातील पाण्याचा वापर करण्यासाठी विहीरी आणि बारव निर्मितीची. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्राच्या विविध भागांत अशा बारवांची निर्मिती सुरू झाली. आणि पुढील चालुक्य, यादव आणि विजयनगर काळात मोठ्या प्रमाणात बारवांची निर्मिती करण्यात आली.
नद्यांच्या काठावरील घाट
नद्यांच्या काठावर राहणार्या लोकांना पाण्याची व्यवस्था या नद्यांच्या पात्रातून होत असे. मात्र नद्यांचे खोल पात्र आणि पाण्याचा वाहता प्रवाह यामुळे नद्यांचे पाणी वापरणे त्याकाळी नक्कीच धोक्याचे होत असेल. यामुळे ज्या ठिकाणी नदीचा काठ थोडासा उथळ असेल त्याठिकाणी नदीचे पाणी वापरायला घेण्यासाठी दगडी बांधकाम करून घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली. नदीच्या काठावर मोठमोठ्या आणि उंचीला लहान अश्या पायर्या बांधून नदीच्या पाण्यात उतरण्याची व्यवस्था या घाटांद्वारे करण्यात आलेली आहे. घाट शब्दाची निर्मिती ही संस्कृतमधिल घट्ट या शब्दापासून झाली आहे. उताराची जागा असा घट्ट शब्दाचा अर्थ आहे. नदीकिनार्यावर उताराच्या जागी असे घाट बांधले जात असत. डोंगराच्या उताराच्या जागांवर वाहतुकीसाठी निर्माण केलेल्या मार्गांना देखिल घाट हा शब्द याच अर्थाने वापरला जात असावा.
घाट बांधण्याची पद्धत नेमकी कधी सुरू झाली याचा काहीही ठोस असा पुरावा नाही. मात्र सातवाहन काळात नदीकाठी असे घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली असावी असे वाटते. तेलंगानामध्ये नागार्जुनकोंडा येथे कृष्णा नदीच्या काठावर काही घाटांचे अवशेष सापडले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठावर आणि त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि पैठण येथे गोदावरी नदीच्या काठावर घाटांचे अवशेष सापडलेले आहेत. तेर येथील उत्खननांमध्ये नदीकाठी काही बांधकामांच्या पायाचे अवशेष सापडले आहेत. मात्र हे बांधकाम घाटांचे होते अथवा वस्तीच्या संरक्षक भिंतीचे हे लक्षात येत नाही.
आजच्या काळात महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात असे घाट दिसून येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधिल बरेच घाट हे पेशवेकाळात आणि इंदूरच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेले आहेत. कदाचित याठिकाणी पुर्वी असलेल्या घाटांचा जिर्णोद्धार करून त्यांनी नवे घाट बांधले असावे. मात्र असे पुरावे शिलालेखांत अथवा लिखाणात सापडत नाहीत. त्यामुळे खात्रीने सांगता येत नाही. पाण्यासाठी बांधलेल्या या घाटांसोबतच कित्येक ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी वेगळे घाट देखिल बांधण्यात आलेले आहेत. काशीचे मणिकर्णिका घाट हे असेच अंतिम संस्कारासाठी बनलेले घाट आहे. ज्या गावात नदी नाही अशा ठिकाणी अंतिम संस्कारात गावातच एखाद्या ठराविक जागी होतात. मात्र या जागांना “स्मशान घाट” म्हणण्याची पद्धत आजही आहे.
बारव / कुंड
जसजसे मानवी वस्ती नदीपासून दुरच्या ठिकाणी वसविली जाऊ लागली, तशी पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. भुगर्भातील पाण्याच्या वापरासाठी विहिरी बांधण्याची पद्धत पुर्वी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. याच विहिरींना नविन स्वरूपात निर्माण केले जाऊ लागले. हे नविन स्वरूप होते बारव अथवा कुंडांचे. बारवांचा आकार विहीरींपेक्षा खूप मोठा आणि पसरट असा होता. हे बारव जमिनीत अगदी १० ते १५ फुट पासून १५० – २०० फुट खोलीपर्यंत बांधले जात होते. कोकण भागात भौगोलिक रचनेमुळे पाणी साठवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कोकण भागात असे बारव कमी प्रमाणात आढळतात. तर विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने त्या भागात नैसर्गिक जलाशये जास्त प्रमाणात आढळतात. मात्र कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बारव जास्त प्रमाणात आहेत. या बारवांचा उपयोग भुगर्भातील पाण्याचा वापर करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवून ठेवणे यासाठी केला जात असे.
अंबेजोगाई (जि बीड) येथील एक बारव
बारवांची निर्मिती चालुक्य काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यपुर्वीदेखिल बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली आहे. मांढळ (जि नागपूर) येथे ४ थ्या शतकातील म्हणजे वाकाटककालिन बारव सापडली आहे. तर मानसपुरी (जि नांदेड) येथे एक राष्ट्रकुट काळातील बारव सापडली आहे. आज दिसणार्या बहुतांश बारव मात्र चालुक्य, यादव आणि विजयनगर काळातील आहेत.
या बारवांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्यांची निर्मिती केली जात असे. काही ठिकाणी एका बाजुने, काही ठिकाणी दोन बाजुने तर काही ठिकाणी चारही बाजुंनी अश्या पायर्यांची सोय केलेली दिसून येते. बारवांची रचना, पायर्यांची व्यवस्था, आकार यांच्या आधारावर कुंड, विहीर, आड, कल्लोळ आणि बारव असे विभागीकरण करता येऊ शकते. विहीर गोल आकाराची आणि खोल असते. आड देखिल विहिरीप्रमाणेच मात्र कमी खोलीचे असतात. विहीर आणि आडामध्ये आत उतरण्यासाठी पायर्यांची सोय नसते. पाणी बाहेर काढण्यासाठी रहाटाचा वापर करण्यात येतो. कुंड हे पसरट आकाराचे, मात्र कमी खोलीचे असते. कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजुंनी पायर्यांची सोय दिसून येते. कल्लोळ हे देखिल कुंडाप्रमाणेच, मात्र आकारात लहान आणि मंदिराच्या आतमध्ये असते. तुळजापुर किंवा त्र्यंबकेश्वर येथे असे कल्लोळ दिसून येतात. बारव हे विहीर आणि कुंड या दोघांचे मिश्रण. आकाराने पसरट, खोलीला कुंडापेक्षा थोडे जास्त, आणि पाण्यापर्यंत जायला एक किंवा अधिक बाजुने पायर्या अशी बारवेची संरचना असते. हे बारव वर्तुळाकार, चौरस, आयात, षटकोन, आष्टकोन अशा विविध आकारांमध्ये दिसून येतात.
सिद्देश्वर मंदिर, लातूर येथील बारव
बारव आणि कुंडांच्या ठिकाणी विविध देवतांच्या मुर्त्या देखिल दिसून येतात. कित्येक बारव हे मंदिराच्या परीसरात किंवा जवळपास असतात. पुर्वी असलेल्या मंदिराच्या जवळपास बारव बांधले गेले, किंवा बारव बांधल्यावर शेजारी मंदिराची निर्मिती केली गेली हे माहित नाही. मात्र मंदिर आणि बारव यांचा परस्पर संबंध मात्र जाणिवपुर्वक केला गेला असवा. बारवाची स्वच्छता आणि रखरखाव टिकवून ठेवण्यासाठी त्याला पवित्र्याची जोड देणे नक्कीच खूप सोयीचे होते. ज्याठिकाणी बारव मंदिर परीसरात नव्हती तेथे बारवांच्या पायर्यांच्या बाजूने अथवा भिंतींमध्ये देवकोष्ठ बांधून त्यामध्ये देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या गेल्या. आज यामधिल खूप कमी ठिकाणी मुर्त्या अस्तित्वात आहेत. आणि जेथे आहेत तेथे खूप भग्न अवस्थेत आहेत. काही बारवांच्या बाजूने मंडपांची रचनादेखिल आढळून येते. ही रचना कदाचित धार्मिक विधींसाठी असावी. किंवा बारवेमध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची जागा म्हणून या मंडपांचा वापर केला जात असण्याचीदेखिल शक्यता आहे.
लेण्यांच्या आसपास आणि किल्ल्यांवर जलव्यवस्थपनासाठी दगडी टाके देखिल खूप ठिकाणी दिसून येतात. खडकाला फोडून आतमध्ये पोकळ जागा तयार केली जात असे. आणि त्याचा वापर पाण्याचा साठ्यासाठी केला जात असेल. खडकांमध्ये असणारे झरे आणि पावसाचे पाणी अशा दोन स्त्रोतांद्वारे या टाक्यांमध्ये पाणीसाठा होत असे. कन्हेरी लेण्यांमध्ये सर्वात जुने टाके दिसून येतात. पुढील काळात कित्येक किल्ल्यांवर असे टाके बांधले गेले.
महाराष्ट्रमध्ये लहान मोठे मिळून किमात १५०० बारव अस्तित्वात असावेत. यांपैकी कित्येक बारव आज अतिशय भग्न अवस्थेत आहेत. बर्याच ठिकाणी हे बारव बुजून गेले आहेत किंवा बांधकामाठी बुजविण्यात आले आहेत. मात्र या बारवांना भग्नावस्थेतून काढून स्वच्छ केल्यास जलव्यवस्थापनासाठी त्यांचा खूप उत्तम प्रकारे वापर केला जाऊ शकतो. काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणार्या काळात सर्वच गावांमध्ये लोकसहभागातून अशी कार्ये हाती घेतल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे ते लोकांना बारवांचे महत्व पटवून देण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची.
दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र
नाशिक : सतीश डोंगरे
20 हजार बारवांचा शोध – ऐन लॉकडाऊनमध्ये (2020) महाराष्ट्रातील बारव शोधण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत 1800 बारव शोधून त्या पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील 20 हजार बारव शोधण्याचा ध्यास असून, त्या पद्धतीने काम सुरू आहे. – रोहन काळे, महाराष्ट्र बारव मोहीम.
नाशिकमध्ये 500 च्यावर बारव – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कित्येक बारवांचा श्वास मोकळा केला आहे. नाशिक जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक बारवांची संख्या असून, त्या शोधून त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी धडपड सुरू आहे. – राम खुर्दळ, अध्यक्ष, शिवकार्य गडकोट संवर्धन.
खानदेशातील जलसंस्कृती
असिक, ऋषीक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश, दानदेश, डांगदेश, तानदेश अशी
कधीकाळी विविध नावे असलेला आणि ज्याचा विस्तार उत्तरेला सातपुडा, दक्षिणेस
सातमाळा, चांदोर, अजिंठा डोंगररांगांपर्यंत, पूर्वेला हाती टेकड्या तर
पश्चिमेस सह्याद्री डोंगररांगांपर्यंत असलेला हा खानदेश. वाघुर काठच्या
अजिंठ्याच्या रॉबर्ट – पारो व डोंगरी-तित्तूर काठच्या चाळीसगावच्या केकी
मूस यांची अजरामर प्रेम कहाणी देणारा खानदेश.
खानदेश हा १९०६ पूर्वी एकच जिल्हा होता पण प्रशासकीय सोयीसाठी नंतर त्याचे
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे २ भाग करण्यात आले. १९६० साली पूर्व
खानदेश हा जळगाव जिल्हा झाला, १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचा धुळे जिल्हा झाला
आणि पुढे १ जुलै १९९८ ला नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे
तेव्हापासून जळगाव, धुळे व नंदुरबार असे याचे आत्ताचे ३ जिल्ह्यांचे स्वरूप
आले. अशा या खानदेशातील पुरातत्वीय कालखंड ते आधुनिक काळापर्यंतच्या
जलसंस्कृतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.
भारतीय संस्कृती हि पंचमहाभूतांना म्हणजेच जल, वायू, आकाश,पृथ्वी व अग्नी
यांना महत्व देणारी संस्कृती आहे. याच संस्कृतीत आदिम कालखंडात म्हणजेच
सिंधू संस्कृतीत देखील निसर्गदेवतांचीच पूजा व्हायची ज्यात प्रामुख्याने
जलदेवतांची पूजा व्हायची असे अनेक पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत. प्राचीन
भारतीय साहित्यापैकी एक असलेल्या अथर्ववेदात उल्लेख येतो की – ज्याप्रमाणे
गाई मागे वासरू त्याप्रमाणे नदी मागे कालवा आवश्यक आहे. तसेच ऋग्वेदातहि
शेतीसाठी पाण्याचा वापर कसा करावा, पाणी उपसा कसा करावा याचे दाखले दिलेले
आहेत.
खानदेशात उपलब्ध झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुरातत्वीय अवशेषांवरून
तापी व गिरणा हे दोन खानदेशच्या जलसंस्कृतीचे मुख्य प्रवाह असून प्रकाशा,
सावळदा, बहाळ-टेकवाडे, पाटणे-पाटणादेवी, चित्तेगाव-मानेगाव तसेच धुळे
जिल्ह्यातील शेकडो पुरातत्वीय स्थळांवरून या प्रदेशातील जलसंस्कृतीची मुळे
शोधणे शक्य झाले आहे. १९५२-५३ पासून डॉ. शंकर साळी, बी. के. थापर,
बोपर्डीकर, डॉ. वसंत शिंदे या तज्ञ पुरातत्ववेत्त्यानी केलेल्या
संशोधनांतून २०० पेक्षा जास्त अश्मयुगीन, १०० पेक्षा अधिक ताम्रपाषाण व
जवळपास ५० उत्तर हरप्पा कालीन वसाहती खानदेशात होत्या हे उजेडात आले.१
यातून सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती तो म्हणजे प्राचीन काळी मानवी वसाहती
या जलसमृद्ध असलेल्या प्रदेशातच होत असत म्हणजेच खानदेशची भूमी हि खऱ्या
अर्थाने जलसंपन्न होती. माझ्या अल्पमती ज्ञानानुसार जगाच्या पाठीवर
कोणत्याही एका जिल्ह्यात इतकी पुरात्वीय स्थळे नाहीयेत जितकी एकट्या धुळे
जिल्ह्यात आहेत.
खानदेशातील तापी आणि गोमई नदीच्या काठावर प्रकाशा येथे भारतातील पहिली शेती
झाली तसेच डोंगरी नदीच्या काठावर पाटणे जेथे धवलतीर्थ सारखा अप्रतिम सुंदर
असा जलप्रपात आहे (ता. चाळीसगाव) येथे प्रत्यक्ष वस्ती असलेले भारतातील
सर्वात प्राचीन अश्मयुगीन वसाहत स्थळ १९७२ साली संशोधकांना प्राप्त झाले.२
याच पाटणे या ठिकाणी ४० ते ६० हजार वर्षा पूर्वीची शहामृगाच्या अंड्यावर
केलेली कोरीव नक्षी, अंड्याचे मणी प्राप्त झाले जे मणी भारतातील
दागिन्यांपैकी सर्वप्रथम होत.३ तसेच येथेच सापडलेले पाटा-वरवंटा व धान्याचे
कण यावरून प्राचीन मानवाचा धान्य बारीक करून खाण्याचा प्रथम पुरावा म्हणता
येईल. इ.स. पूर्व १८०० ते १६०० पूर्वीच्या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या
समकालीन असलेल्या मानवाने पाटणेच्या महादेव मंदिरा पासून जवळच असलेल्या आड
नामक नाल्याकाठी एक गांव वसविले.
याच परिसरातील गिरणा-बहुळा नदीच्या काठावरील बहाळला सापडलेल्या आहत
(पंचमार्क्ड) नाण्यांवरून या भागावर इ.स. पूर्व चौथे शतक ते दुसरे शतक या
काळात मौर्यांचे राज्य होते. नंतर सातवाहन राजांच्या काळात उत्तरेकडून अंबा
गाव व तेथून पितळखो-याच्या रस्त्यावर हंकारी नावाचे मातीचा कोट असलेले गाव
वसविले होते. अजिंठ्यातील शिलालेखानुसार पुढे येथे वाकाटकानी येथे राज्य
केले. यावरून एक निष्कर्ष काढता येतो तो म्हणजे इ.स. पूर्व दुसर्या शतकात
ज्याची निर्मिती सुरु झाली त्या पितळखो-याच्या लेणी निर्मितीसाठी पाटणे हे
एक मदत केंद्र नक्कीच ठरलेले असणार. पुरातत्ववेत्ते एम. एन. देशपांडे
यांच्या मतानुसार पितळखो-याच्या जगप्रसिद्ध यक्षाचे नाव संकारी असल्यावरूनच
येथील गावाला संकारी हे नाव दिले असावे. पिंपळनेरच्या ताम्रपटानुसार
बदामीच्या चालुक्यांचीहि येथे सत्ता होती. पुढे अभीर, यादव यांनी येथे
राज्य केले. पाटणादेवीच्या मंदिरातील इ.स. ११५३ व इ.स. १२०७ च्या
शिलालेखानुसार हे स्थळ म्हणजे निकुंभ राजांनी आपली राजधानी बनविले होते.
तेर, पैठण (तत्कालीन प्रतिष्ठान) ते सोपारा (कल्याण) या प्राचीन व्यापारी
मार्गावरील पाटणे हे एक महत्वपूर्ण स्थळ होते.४ शासनाच्या एका ग्रंथ
लेखनाच्या कामानिमित्त या सर्व परिसरातील मंदिरांचा जेव्हा आम्ही सर्वे
केला त्या मंदिरांच्या शिल्प स्थापत्यांवरून तसेच उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ५,
शिलालेख – ताम्रपट यांच्या अभ्यासावरून हि नृत्य, संगीत, शिल्प या
कलांचीही भूमी असल्याचे स्पष्ट होते.
याच पाटणादेवीच्या धवलतीर्थाच्या परिसरात १२ व्या शतकात गणित व ज्योतिष
शास्त्राचा महान अभ्यासक भास्कराचार्य यांनी गणित लिलावती, लिलावती भाष्य,
सिद्धांतसारशिरोमणी सारख्या ग्रंथांची रचना केली. आणि जवळच असलेल्या डोंगरी
व तित्तूर च्या काठावर असलेली चाळीसगाव हि फोटोग्राफी व चित्रकलेचा
ध्येयवेडा कलावंत केकी मूस यांची कर्मभूमी आहे. गंगा-यमुनेचे अप्रतिम शिल्प
निर्माण करणाऱ्या या कलावंताचे जीवन म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी
प्रेमकहाणी आहे.
गिरणा नदीच्याच काठावर नुकतेच २०१७-१८ मध्ये प्रस्तुत लेखकाला प्राप्त
झालेल्या अवशेषांवरून डेक्कन कॉलेज, पुणे येथील श्री. निलेश जाधव व इतर ४
संशोधकांच्या टीमने केलेल्या सर्व्हेनुसार हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ३०
लहान-मोठी वसाहत स्थळे प्राप्त झाली आहेत.६
उपरोक्त सर्व माहितीवरून हे सिद्ध होते की पूर्व खानदेशचे
गिरणा-बहुळा-डोंगरी-तित्तूर नद्यांचे खोरे हा एक समृद्ध आर्थिकदृष्ट्या
संपन्न जलसंस्कृतीचा प्रदेश होता.
पूर्व खानदेश व पश्चिम खानदेशला जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे तापी नदी.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या तापी नदीला खानदेशात लहान मोठया १३
नद्या व असंख्य ओढे मिळतात तसेच खानदेशचा बहुतांश भूभाग हा तापीच्या
दक्षिणेला वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या एका टोकावरून नर्मदेचा प्रवाह
खळाळतो तर मध्यातून तापी वाहते. या तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर
प्रकाशा-कवठे-मेथी-शिंदखेडे अशी असंख्य प्राचीन स्थळे वसलेली आहेत. या पैकी
प्रकाशा-सावळदा हे भारतातील अत्यंत महत्वाचे पुर्तात्वीय स्थळ आहे कारण या
ठिकाणी ४ विविध संस्कृतींचे असंख्य अवशेष प्राप्त झालेले आहेत. भारतात
जेथे जेथे अत्यंत समृद्ध जलसंस्कृतीची स्थळे होती तेथेच कुंभमेळ्यांची
परंपरा सुरुवात झाली व ती कायम राहिली. तापी नदीच्या काठावरील प्रकाश
येथेही हि परंपरा कायम राहिलेली दिसते. ज्याप्रमाणे पश्चिम खानदेशात
तापी-बोरी-बुराई नदीच्या काठांवर शेकडो पुरात्वीय स्थळे प्राप्त झालेली
आहेत (विस्तार भयास्तव त्यांची अधिक माहिती येथे वगळलेली आहे) त्याच
प्रमाणे पूर्व खानदेशातहि याच तापी-पूर्णेच्या संगमावर चांगदेव जवळ
चितेगाव, मानेगाव येथे आद्य पुराश्मयुगीन वसाहतीचे दीड ते एक लाख वर्षा
पूर्वीचे अवशेष प्राप्त झालेले आहेत.७
तापीचे मूळ नाव बदरी व पुर्णेचे पयोष्णी असे होते. या दोन्ही नद्यांच्या
संगमाजवळच असलेल्या मेहूण या गावातील अभिलेखातून जळगाव जिल्ह्याचे
वैशिष्ट्य म्हणता येईल अशी एक माहिती मिळते. चालुक्य विक्रमादित्याचा
मांडलिक हैहय वंशीय (कलचुरी) राजा प्रतिकंट व त्याच्या मुलाचा शुभंकंटचा
खानदेशातील एकमेव असे सूर्य मंदिर येथे उभारल्याच्या संदर्भात उल्लेख मेहूण
अभिलेखात येतो. हे घराणेही रत्नपूरच्या कलचुरीप्रमाणेच सूर्यवंशीय होते.
विशेष म्हणजे यातील प्रतिकंट या राजाचे ‘महाराष्ट्र’ हे व्यक्तिनाम.
संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या एकाही राजाचे ‘महाराष्ट्र’ नाव या
व्यतिरिक्त दुसरे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे. इ.स. ८०७ पासून हि सत्ता
या तापीच्या खोऱ्यात नांदत होती. ८ अशा या २ संपन्न जलसंस्कृतीचा वारसा
देणाऱ्या तापी व गिरणा यांचा संगम जळगाव व चोपडा तालुक्याच्या सीमेवर होतो.
आत्तापर्यंतच्या या प्राचीनतम संदर्भा बरोबरच मध्ययुगीन कालखंडातील
खानदेशातील जलसंस्कृतीचे संदर्भ आपणाला प्राप्त होतात. भारतीय इतिहासात
साधारणतः १२ वे शतक ते १८५७ पर्यंतचा काळ हा मध्ययुगीन काळ मानला जातो.
ज्ञानेश्वरीत उल्लेख आल्याप्रमाणे
शके बाराशे बारोत्तरे तै टिका केली ज्ञानेश्वरे | सच्चिदानंदबाबा अत्यादरे लेखकू जाहला ||
या प्रमाणे शके १२१२ मध्ये म्हणजेच इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरीचे लेखन
पूर्ण झाले याच्याच अवघ्या काही वर्षानंतर खानदेशातील तापी नदीच्या या
काठावरच मेहूण येथे हठयोगी वटेश्वर चांगदेवाची गुरु आद्य स्त्री साहित्यक
संत, मुक्ताई समाधीस्थ झाली. नामदेव गाथेतहि येथीलच तापीकाठच्या
सोमेश्वराचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. नाथपंथाच्या तत्वसार या
महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मितीहि इ.स. १३१२ मध्ये येथेच तापी तीरावर झाली.९
महानुभाव साहित्यातील इ.स. १४१८ मध्ये लिहिल्या गेलेल्या ‘ऋद्धिपूरवर्णन’
या महान काव्याचा रचियता नारायण बास – नारोबास हा बहुळा नदीच्या काठावर
राहणारा असल्याने त्यांना बहाळीये हे संबोधन प्राप्त झाले.१० यातील एकूण
६४१ ओव्यांपैकी कांही ओव्यात बहुळा नदीकाठचे जनजीवनाचे सुंदर वर्णन कवीने
केलेले आहे.
यावरून आपणाला असे म्हणता येईल की तापी-पूर्णा काठावरील हि सर्व स्थाने तत्कालीन कालखंडात ज्ञानसाधनेने संपन्न होती.
दुसरा फारुकी सुलतान नसीर खान (इ.स. १३९९-१४३७) याने असिरगडावरून हस्तगत
केलेल्या संपत्तीतून तत्कालीन खानदेशच्या तापीकाठावर इ.स. १४०० मध्ये
आपल्या राजधानीचे नवीन शहर बांधले व त्यास बुऱ्हाणपूर हे नाव दिले. या
शहरात त्यावेळी २ लाख ३५ हजार व्यक्तींना पुरेल अशी १ कोटी लिटर पाणी
मिळण्यासाठीची पाणीपुरवठा योजना पद्धती इ.स. १६१५ मध्ये अमलात आणली गेली.
जी आजही कसलाही एक रुपये लाईट बिल खर्च न येता चालू आहे. (केवळ योग्य
देखभाल न केल्यामुळे व पाण्यात मिठाचा गुणधर्म जास्त असल्यामुळे आता ३० लाख
लिटर पाणी या पद्धतीतून होतो.)११
नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना १३३५
ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से नगर के
लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई वैद्यक
तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का तेल
यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और कोई
आदमी मद्यसेवन नही करता. १२
मध्ययुगाच्या उत्तरार्धात अबुल फझलच्या एन-इ-अकबरी (इ.स. १५७७) मध्ये,
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या तबकात-ए-अकबरी (इ.स. १५९३) या हस्तलिखित
ग्रंथात,१३ तारीख-ए-दख्खन (इ.स. १७२९) या ग्रंथातहि येथील जलसंस्कृतीची
वर्णने आढळतात.१४ समकालीन हिंदुस्थानात अतिपवित्र मानलेल्या २८ नद्यांमध्ये
अबुल फझलने तापी नदीचा समावेश केलेला आहे. तो लिहितो – ‘तापी नदी वऱ्हाड
गोंडवनच्या दरम्यान उगम पावुन खानदेशातून वाहते आणि पूर्णा व गिरणा या
तिच्या उपनद्या आहेत. येथील हवामान सुखद व हिवाळा आल्हाददायक आहे. येथे
ज्वारी हे मुख्य पीक असून कांही ठिकणी ते ३ वेळा काढले जाते. येथे उत्तम
प्रतीचा तांदूळ होतो. फळफळावळ विपुल असून विड्याची पानेही भरपूर आहेत. येथे
चांगल्या प्रतीचा कापड तयार होतो व धरणगावचा ‘सिरी साफ’ व ‘भिरीन’ हा कपडा
प्रसिद्ध आहे. एदलाबाद हे देखील चांगले शहर असून त्या नजीकच्या तलावाचा
जलसिंचनास्तव उपयोग होतो. चोपडा हे मोठे समृद्ध शहर असून डांभूर्णी गाव व
जामोद परगणा सधन आहे.१५ या लिखाणातून देखील तापीकाठच्या संपन्न खानदेशी
लोकवसाहतीचे संदर्भ समोर येतात.
खानदेशच्या जलसंस्कृती व तिच्या परिसरातील जनजीवनाची अशीच वर्णने आदिल खान
फारुकीच्या गुलशन – इ – इब्राहीमी, १६५६ ते १७१७ पर्यंत खानदेशात अनेक
वेळेला फिरलेल्या निकोलाय मनुची, ट्र̆व्हेनियर, टा̆मसरो, मा̆र्टीन,
थेवेनॉट, बर्नियर व डेक्कन कॉलेज, पुणे येथील मराठा वस्तुसंग्रहालयात व
पेशवे दफ्तर, पुणे येथे असलेल्या खानदेश जमाव रुमाल क्र. १२, ५७, ११३, ११५,
११८, १३३, १६८, १६९, १७०, १९९ व २१८ मध्ये येतात.
४ ते ७ ऑगस्ट १६८१ या ३ दिवसात पॉ͘डेचेरी येथील फ्रेंच्यांच्या वखारीचा
प्रमुख प्रासोन्क्षा मार्टिन याने खानदेशातून प्रवास केला ज्याचे त्याने
आपल्या डायरीत फ्रेंच भाषेत वर्णन करून ठेवलेले आहे. त्यात तो म्हणतो – ४
ऑगस्ट रोजी आम्ही फर्दापूर येथे पोहचलो. अजिंठ्याचा मैल – दीड मैल घाट उतरत
असताना पाहणाऱ्याला भोवतालचे दृश्य इतके सुंदर वाटते की, त्याचे वर्णन
शब्दात करणे शक्य नाही. या प्रदेशातील सर्व भाग अतिशय सुपीक आहे आणि जेथे
पहाल तेथे जमीन शेतीखाली आलेली दिसते. डोंगरातून उगम पावलेल्या नद्या
(वाघूर इ.) या प्रदेशातून वाहत जातात. ह्या प्रदेशात जिकडे-तिकडे
आंब्याच्या बागा व चिंचेची झाडे दिसतात. पुढे तो शेंदुर्णी, गिरणा नदी व
तिचा भोवताल, एरंडोल व धरणगावच्या संपन्नतेचे वर्णन करतो.१६ वाघूर
नदीकाठच्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचे हे पहिलेच यथार्थ वर्णन ठरते.
आजही येथील सप्तकुंड धबधब्यातून पडणारा वाघूरचा विलोभनीय प्रपात पाहताना
१३९ वेळा अजिंठ्याला भेट देऊनही रॉबर्ट-पारो च्या प्रेमकथे प्रमाणे माझेही
मन अतृप्त राहिल्या सारखे वाटते. परंतु मनाला हि मोठी खंतहि राहून जाते की
मागच्या ५० वर्षात या परिसरातीलच मानवाने आपल्या कर्माने या जगप्रसिद्ध
जागतिक वारसाचे प्रचंड नुकसान करून ठेवलेले आहे जि हानी आता कधीच भरून येऊ
शकणार नाही.
एकूणच मुघल व मराठा कालीन सर्व दस्ताऐवजांमध्ये तापी व गिरणाकाठची जळगाव व
भुसावळ याचे उल्लेख वगळून अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा,
एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी,
चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहाद्दरपूर, जामनेर,
वाघळी, जामोद, जैनाबाद, नंदुरबार, देवपूर, धुळे, कवठे, साक्री, दोंडाइचा इ.
स्थानाचे उल्लेख तेथील वनस्पती, प्राणी, पिके व सुपीक जमिनी इ. सह येतात.
पुणे पुराभिलेखागारातील पत्रांवरून आपणास खानदेशातील पेशवे काळातील
पाणीपुरवठा केंद्रांची म्हणजेच धरणे वा बंधारा-यांची माहिती मिळते. या
काळात नेर, डोंगरी, जापी, निमखेड, भवाली, कुसुंबे, दहिवेल, पाटणे, बेटावद,
पिंपळनेर, कासारे इ. गावांना पाटाद्वारे पाणी दिले जायचे. व त्यापैकी एका
ठिकाणी या पाण्यावर जवळपास २७ बिघे जमिनीत १७८५-८६ मध्ये उसाची लागवड
केल्याचे उल्लेख मिळतात.१७
आधुनिक काळातील खानदेशच्या जलसंस्कृतीवर वाईट परिणाम झाल्याचे आढळून येतात.
एकेकाळी अतिशय संपन्न म्हणून ज्याचा उल्लेख झाला त्या नंदुरबारला मुंबई
प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुवर्ट एल्फिन्स्टन याने ऑगस्ट १८१८ मध्ये भेट
दिली तेंव्हा तो आपल्या डायरीत लिहतो की, ‘दक्षिण भारतात दयनीय कोणते शहर
मला दिसले असेल तर ते नंदुरबार’.
१९२१ मध्ये खानदेशचा पहिला नकाशा तयार केला तो क̆प्टन जॉन ब्रिग्ज याने –
आर्थर व्हाईट व जेम्स एव्हर्स यांच्या सहाय्याने. यावेळच्या सर्व्हेनुसार
खानदेशात विहिरींची संख्या २७०३१ व बंधारा-यांची संख्या १४० इतकी होती.
तसेच २१६८ चौरस मैल जंगल सरकारच्या ताब्यात होते. एकूण ५३८ शाळा त्यावेळी
होत्या. याचाच अर्थ बदललेल्या पर्जन्यमानामुळे पश्चिम खानदेशचा नंदुरबार
सारखा भाग होरपळलेला होता परंतु पूर्व खानदेशात विशेषतःरावेर, सावदा,
फैजपूर या भागावर त्याचा कोणताच दुष्परिणाम झालेला नव्हता, आजही भारतातील
केळीच्या एकूण उत्पन्नापैकी २०% केळीचे उत्पादन तापीच्या याच पट्ट्यात
होते. तरीदेखील १८ वे ते २० वे शतक या दरम्यान धुळे जिल्ह्यात जाल्संकृतीचे
रक्षण करण्यासाठी फड पद्धतीचा विकास झाला ज्या १९८४ मध्ये धुळ्यास
वास्तव्यास असलेल्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी मैसूर संस्थानातही
मोठया प्रमाणात उपयोग केला.
स्वातंत्र्योत्तर काळखंडात मात्र हरताळे, म्हसवे, वेल्हाळे, मेहरूण या
जळगाव जिल्ह्यातील तलावांबद्दल बोलायचे तर ज्या मेहरुनच्या काठावर
बहिणाबाई सारखी जीवनाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात सांगणारी आधु महान
कवयित्री राबली तो मेहरूण असो व इतरही तलाव या सर्वाकडे, जाणून बुजून
दुर्लक्ष होत राहिले, इतरही धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तलावाचे कित्येक
वर्ष हीच स्थिती आहे.
परंतु आम्ही खानदेशच्या जलसंस्कृतीच्या उपासकाने कधीही हे विसरता कामा नये
की खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी १३% वर गावांची नावे पाण्याशी संबधित
आहेत.१८ उदा :-
पाणी :- अंबापाणी, गेरुपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी, कुंड्यापाणी इ.
विहिरी :- अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाव्याविहीर, धावळीविहीर इ.
कुवा :- अक्कलकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा इ.
तळे :- निमतळे, तामतळे, खडतळे, तळेगाव इ.
कुंड :- बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.
खानदेशच्या आधुनिक जलसंस्कृतीत दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नोंद करणे इथे संयुक्तिक ठरते.
पाण्याचा थेंब थेंब रुजवून अब्जावधी लिटर पाण्याची बचत करावी या
उद्दिष्टाने याच खानदेशच्या मातीतील सुपुत्राने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन
यांनी जैन इरिगेशन ची स्थापना करून खऱ्या अर्थाने जलक्रांती घडवली. एक महान
स्वप्न उराशी बाळगून स्वप्न त्यांनीच उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन,
जळगाव च्या ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या पदयात्रेत मला हे पाहायला
मिळाले की सातपुड्याच्या कुशीत कुंड्यापाणी हे ७०० लोकवस्तीचे छोटेसे गाव
आहे. या गावात डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा केवळ पाण्याचा झरा हे
एकमात्र साधन असतानाही लागेल तेवढेच पाणी वापरून कधीही पाण्यासाठी संघर्ष न
करणारे हे एक आनंदी गाव आहे. तसेच गिरणेच्या काठावर जळगाव तालुक्यात
लमांजन हे एक असे गाव आहे की ज्याच्या शेजारून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठे
मोठे पाषाण आहेत पण ज्या गावाने ४६ वर्षापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित केला
की ‘जो कोणी नदीतच नव्हे तर नदीकडील बाजूला जरी शौचाला गेले तर तो गावातून
हद्दपार करण्यात येईल, संपूर्ण गाव त्याच्यावर बहिष्कार टाकेल. आपल्या
गावाच्या नदीचे पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखण्याची जबाबदारी आपली
आहे.’ आणि आजही सर्व ग्रामस्थ याचे पालन करतात.
खरे म्हणजे आजच्या काळात हि अत्यंत आदर्श अशी उदाहरणे आहेत कारण आपण जर
नदी, तलाव इ. मध्ये शौच व इतर घाण करत असू आणि आपण जर कितीही फिल्टर लावले,
कितीही पाणी शुद्धीकरण यंत्र वापली तरी आपल्याला पाण्यापासून होणाऱ्या
आजारांपासून कोणीही वाचवू शकत नाही.
जलसंस्कृतीचा असा आदर्श निर्माण करून देणाऱ्या खानदेशचे आपण वारस आहोत
त्यामुळे हा घेतला वसा टाकू नका, पाणी वाया घालू नका, वाया कोणाला घालू देऊ
नका, हि जलसंस्कृतीची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.
माहितीपूर्ण आहे खरा, पण खूप विस्कळित आहे आणि प्रदीर्घ आहे. लेख जर दोन
तीन भागांत विभागला असता तर थोडा मुद्देसूद वाटला असता. खूपशी जंत्री आहे.
असो.
१)प्रकाशा येथे कुंभमेळ्याची परंपरा खरेच आहे का? ही माहिती मला नवीन आहे.
२)सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मृत्यु दि. १२/४/१९६२ रोजी झाला. १९८४मध्ये नव्हे.
३)"नंदुरबार जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धी व जीवनमान याचे वर्णन करताना
१३३५ ते १३६५ या कालखंडात खानदेशातून प्रवास करताना लिहितो – ‘इस छोटे से
नगर के लोग कला-कौशल के द्वारा हि अपना निर्वाह करते है. इनमे से कोई कोई
वैद्यक तथा ज्योतिष के भी अपूर्व ज्ञाता है. चावल, हरे शाक-पात और सरसों का
तेल यहां के प्रधान खाद्यपदार्थ है. यहां मदिरापान दूषण समझा जाता है और
कोई आदमी मद्यसेवन नही करता. १२'' हे वर्णन इब्न बतूताचे आहे हे तळटीप
बघितल्यावरच कळते. शिवाय हे सर्व आधुनिक शुद्ध हिंदी रूपांतर आहे ह्याचा
उल्लेख हवा होता.
४)केळ्यांची लागवड खानदेशात पूर्वापार असली तरी तिला खरा बहर कोंकणात ठाणे
जिल्ह्यातली लागवड रोगग्रस्त झाल्यावर म्हणजे १९७० नंतर आला. तोपर्यंत
हिरव्या सालीच्या केळ्यांची ग्रोझ मिशेल व तत्सम उपजाती आणि वेलची,
मुठेळी, राजेळी वगैरे ठाणे जिल्ह्यातल्या जाती मुंबईत लोकप्रिय होत्या.
पाठ्यपुस्तकांतही वसईच्या केळ्यांविषयी माहिती असे.
जलव्यवस्थापनाचा वारसा
अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास अभ्यासताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातली मोठी क्रांती होती. वारंवार पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील भूवैशिष्ट्ये लक्षात घेत, भूमिपरीक्षा व भूगर्भातील जलस्रोताचा शोध घेत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध प्रकारच्या बारव बांधल्या गेल्या. जलव्यवस्थापनाच्या या समृद्ध वारशाची माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेखमानवी जीवनामध्ये एक नैसर्गिक गरज म्हणून पाण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपण जलस्रोताला जीवन असेच म्हणतो. प्रारंभिक माणसाने निसर्गत: उपलब्ध असलेल्या जलप्रवाहाच्या काठावर, नदीच्या काठावर वसाहत केली. सर्व प्रमुख संस्कृतींचा विकास नद्यांच्या खोर्यांतच झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण मानवी वसाहतीसाठी म्हणून जेव्हा यापेक्षा जास्त भूभाग त्याला आवश्यक वाटला, तेव्हा नैसर्गिक भूस्तररचनेचा अभ्यास करून लहानमोठे बंधारे घालून उपलब्ध जलाच्या अनुषंगाने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास पाहत असताना हे लक्षात येते की, जमिनीच्या पोटात असलेले भूगर्भातील जल शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातील एक मोठी क्रांती होती. त्याला लागलेल्या चाकाच्या शोधाइतकेच महत्त्व या बाबीला होते. त्यातून वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये वस्ती करण्यास त्याने प्रारंभ केला. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात ही बाब इसवीसनपूर्व अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी घडली. महाराष्ट्रासारख्या दंडकारण्यप्रवण क्षेत्रात मानवी वसाहतींचा विस्तार मोठ्या प्रमाणात प्रारंभ होण्यासाठी अगदी प्रारंभिक ऐतिहासिक काळाची वाट पाहावी लागली. इसवीसनाच्या प्रारंभीच्या काळात यामध्ये मोठी भर पडली, असे दिसते. नागरीकरणाचा विस्तार सातवाहनकाळात मोठ्या प्रमाणात झाला. यानंतरच्या काळात भूगर्भातील जलस्रोत शोधण्यासाठी निसर्गत: उपलब्ध असणार्‍या पर्यावरणाचा अगत्याने झालेला अभ्यास, तसेच सूक्ष्म निरीक्षण आणि आचार्य कुलांकडून पारंपरिक शहाणपणाच्या आधारे झालेला विकास लक्षात येतो. यामध्ये वास्तुशास्त्रविषयक ग्रंथांतून भूमिपरीक्षा यासारखे लेखन होऊ लागले. वराहमिहिराने वेगवेगळ्या क्षेत्रांत पडणारा पाऊस याविषयीचे अंदाज व्यक्त केले. मानसार या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथात काही प्रयोग दिले गेले. समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा याही ग्रंथांमध्ये काही निरीक्षणे नोंदवल्याचे दिसते. साधारण चौथ्या-पाचव्या शतकापासून बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत यात भर पडत गेली. परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पती, जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद याचबरोबर परिसरातील खडकांची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पतिजन्य व प्राणिजन्य खुणा यांचा अभ्यास करत अनेक शतकांच्या अनुभवातून काही सूत्रे सिद्ध केली गेली. सहदेव भाडळीसारखे काही तोडगे सांगणारे साहित्यही संग्रहित होऊ लागले. उदाहरणार्थ, जांभूळ वृक्षाच्या पूर्वेस वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरुष खोलीवर गोड पाणी लागते. वड, पळस, उंबर एकत्रित असतील तर तेथे निश्चितपणे उदक आहे. वड व पिंपळ वृक्ष एकत्रित असतील तर त्याच्या उत्तरेस चार हातांवर खणले तर पाणी लागते. तसेच ज्या भूमीवर मुंज, काश व कुश या प्रकारचे गवत उपलब्ध असेल, जमीन खोदली असता निळसर, खडकाळ भाग लागला, किमान काळी व त्याखाली तांबड्या रंगाची माती असेल, तर तेथे गोड पाणी लागते. (पाठक, महाराष्ट्रातील बारव स्थापत्य, पृ. 29, 2017.) अग्निपुराण तसेच कृषीपाराशर व अन्य स्मृतिग्रंथांतून याविषयीच्या नोंदी मिळतात. अर्थात जमिनीखालील पाण्याला आपण भूजल म्हणतो, त्याचा अचूक शोध घेणे हे बारव बांधण्यापूर्वी किंवा विहीर खोदण्यापूर्वी आवश्यक ठरते. महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. त्याची सच्छिद्रता एक ते तीन टक्क्यांहून जास्त नाही. यातून तसेच चिकणमातीच्या थरातून सहसा पाणी झिरपत नाही. उलट वालुकास्तर किंवा चुनखडी यासारख्या खडकांतून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सच्छिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत भरलेले आढळतात. (देशपांडे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल, पृ. 25, 1976.) असे असले, तरी पारंपरिक शहाणपण व सूक्ष्म निरीक्षण यांशिवाय बदलते पर्यावरण, लहरी निसर्ग, पडणारे दुष्काळ यांमुळे माणसाला भूमिपरीक्षा व भूमीअंतर्गत जलाचा शोध घेणे यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागले. महाराष्ट्रात दुर्गादेवीचा दुष्काळ हा मोठा दुष्काळ होता. साधारणपणे आठव्या ते तेराव्या शतकामध्ये विविध क्षेत्रांत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध आकारप्रकारांच्या बारवा बांधल्या गेल्या. एकीकडे स्मृतिग्रंथ व पुराणे यांच्यामुळे मानवी वसाहतीबरोबर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व निसर्गत: उपयुक्त ठरणार्‍या स्थानांवर विविध मंदिरांचा विकास होत होता. यापाठीमागे एक विशिष्ट दिशा असलेल्या आचार्यांची मोठी परंपरा होती. सामान्य माणसाबरोबर धनिक व्यापारी, सामंत व राजवंश अशा निर्मितीसाठी सढळ हाताने मदत करत असत. मंदिर व बारव स्थापत्याचा विकास बरोबरच होत होता. जलाशयांचे पावित्र्य राखले जावे व नगराच्या वैभवात भर पडावी, या दृष्टीने अशा वास्तूमधून विविध देवतांची प्रतिष्ठापना केली जाई. दहा द दहा आकाराच्या लहान कुंडापासून एकावर एक विकसित झालेले चार ते सात टप्पे आपणाला बारव स्थापत्यात दिसतात. एका बाजूने प्रवेश असणे, चारही बाजूंनी प्रवेश असणे, तसेच बारवेच्याच वास्तूमध्ये या भव्य जलकुंडात शेवटच्या टप्प्यावर किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांवर माड, मंडप (पोर्च) बांधले जात. पाण्याची गरज तर निश्चितपणे भागवली जाई. शोधलेले जलस्रोत अगदी मोठ्या दुष्काळातही जिवंत राहत. या उपयुक्ततेबरोबरच सांस्कृतिक विकासामध्ये अशा जलाशयांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान होते आणि त्यातून वेगवेगळ्या आकारांचे मंडप, देवकोष्ठ निर्माण होत. यात शेषशायी विष्णू, सप्तमातृका, गणेश, एकादश रुद्र, उमामहेश्वर, महिषासुरमर्दिनी, भैरव तसेच विष्णूचे चोवीस अवतार यांची स्थापना होई. इथपासून नागदेवता व अनेक आचार्य, अप्सरा व मानवी जीवनातील काही प्रसंग खोदलेली शिल्पे तेथे बसवली जात. या परिसरात विविध ज्ञानशाखांचा विकास होत होता, तर चौसष्ट कलांपैकी अनेक कलांची साधना होत होती
निसर्गत: काळाच्या ओघात अशा काही वास्तूंची क्षती झाली. पण तेराव्या शतकापासून झालेल्या इस्लामी आक्रमणांचा परिणाम म्हणून विविध नगरांतील मठ-मंदिरे व बारवा उद्ध्वस्त केल्या गेल्या. बारव ही निसर्गत: उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी सर्वच धर्मांच्या व जातींच्या माणसांची गरज होती, म्हणून त्याचे पावित्र्य खंडित करण्यासाठी प्रत्येक देवकोष्ठातील मूर्ती शोधून त्या नष्ट केल्या गेल्या. परिसरातील मंदिरेही उद्ध्वस्त केली गेली. या वास्तूंचे शिलाखंड किल्ल्यांच्या, इदगाहच्या व मशिदींच्या बांधकामासाठी वापरले गेले. आज उपलब्ध असलेल्या मंदिरांच्या व जलाशयांच्या वास्तू या मूळ वास्तूपैकी काही अवशिष्ट भाग आहे. या संदर्भात विल डुरांट याने लिहिलेल्या द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन; या ग्रंथमालेतील अवर ओरिएंटल हेरिटेज या प्रथम खंडातील एक भाग ;भारतीय संस्कृती या नावाखाली मा.प. शिखरे यांनी अनुवादित केला. विशेषत्वाने ;इंडिया अँड हर नेबरया भागाचा हा अनुवाद आहे. त्यात औरंगजेबाच्या संदर्भात केलेली नोंद अशी - ;हिंदूंची त्याचप्रमाणे ख्रिस्त्यांची सर्व मंदिरे जमीनदोस्त करण्याचा, प्रत्येक कृती फोडून टाकण्याचा आणि हिंदूंची प्रत्येक पाठशाला बंद करण्याचा हुकूम त्याने आपल्या प्रांतिक सुभेदारांना आणि त्यांच्या हाताखालील अधिकार्यांना दिला. एका वर्षात, म्हणजे १६७९-८० फक्त अंबर येथील सहासष्ट, चितोडमधील त्रेसष्ट आणि उदयपूर येथील तेवीस मंदिरांची मोडतोड करण्यात आली. वाराणसी येथील एका मंदिराच्या वास्तूवर मशीद बांधून त्याने हिंदू भावनांचा उपमर्द केला. सार्वजनिक पूजाविधींवर त्याने बंदी घातली व हिंदूंवर जिझिया कर बसवला. या परिच्छेदात शेवटी डुरांट नोंदवतो की,पिसाट धोरणाची परिणती म्हणजे गेल्या हजार वर्षांत हिंदुस्थानातील कलेचे प्रतिनिधित्व करणार्या किंवा तिचे आश्रयस्थान बनलेल्या हजारो मंदिरांचा नाश झाला. हिंदुस्थान हा देश एकेकाळी किती सुंदर आणि वैभवशाली होता, याची कल्पना आज त्याच्याकडे पाहणार्याला कधीच येणार नाही. (विल डुरांट, अनुवाद - मा.प. शिखरे, भारतीय संस्कृती, पृ. ८८.) महाराष्ट्राच्या संदर्भात काही वेगळे घडले नाही. इ. स. १६८० च्या सुमारास नाशिक परिसरातील २५ महत्त्वपूर्ण मंदिरे पाडली गेली, तर जुन्या किल्ल्यातील महालक्ष्मी मंदिर जामा मशिदीत परिवर्तित केले गेले. (ब्रिटिश गॅझेटिअर, नाशिक जिल्हा, खंड दतख, पृ. ५०३.) महानुभाव स्थानपोथीमध्ये अनेक स्थानांचे तपशील मिळतात. ते नंतरच्या काळात दिसत नाहीत. पैठण (जिल्हा औरंगाबाद) येथे यादव काळापर्यंतच निर्माण झालेली ४२ मोठी व १९ लहान देवळे होती. त्यापैकी काहींवर अकबराचा पुत्र दानियाल याच्या विवाहाप्रसंगी मशीद व मोहल्ले इस्लाम उभारण्यात आले. शहाजहानच्या काळात शहाजहानपुरा वसवला. औरंगजेबाच्या काळात चक्रपाणी मंदिराचे रूपांतर मस्जिद-ए-कोट व जुम्मा मस्जिद यांच्यात झाले. सेतुमाधवराव पगडी यांनी सूफी संप्रदायाबद्दल लिहिताना या विषयीच्या नोंदी विस्ताराने केल्या आहेत. एकूण आज पैठणमध्ये दोन-चार मूर्तींव्यतिरिक्त एकही वास्तू मूळ रूपात उभी नाही. मंदिराबरोबरच जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून उभ्या राहिलेल्या वास्तू नंदा, भद्रा, जया, विजया या प्रकारातील मोठाल्या बारवा होत्या. आज या काळातील दोन-अडीचशे गावांपैकी अपवादात्मकरित्या पिंगळी (जिल्हा परभणी), इडोळी (जिल्हा जालना), जागजी (जिल्हा उस्मानाबाद), अंबाजोगाई, मानूर (जिल्हा बीड) या स्थानांवर असलेल्या देवकोष्ठांमध्ये देवतांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अन्य स्थानांबाबत पाण्याची गरज म्हणून बारवा शिल्लक राहिल्या, मात्र देवकोष्ठे रिक्त झाली. उत्तरकाळात, विशेषत: पेशवाईत, पेशवे व त्यांचे सरदार नारो शंकर, ओक, चंद्रचूड, औंढेकर, थोरल्या माधवरावांची आई गोपिकाबाई यांच्या प्रेरणेतून मूळ प्राचीन वास्तुशास्त्राचा वारसा लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, नाशिक, कायगाव टोके या ठिकाणी मंदिरे, घाट यांची पुन्हा निर्मिती झाली. अहल्याबाई होळकर यांचे या बाबतीतील काम अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरास खेटूनच असलेले कुंड जाणीवपूर्वक पाहावे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ मुद्दाम पाहावे असेच आहे. पेशवाईच्या अस्तानंतर एकही उल्लेखनीय वास्तू उभी राहिली नाही.
आज महाराष्ट्रात उभ्या असलेल्या बारवा किमान 800 वर्षापूर्वींचा जलव्यवस्थापनाचा वारसा सांगतात. त्या आपण जाणीवपूर्वक जतन केल्या, तर हे सांस्कृतिक वैभव पुढच्या पिढीकडे मूळ स्वरूपात हस्तांतरित करता येईल. यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे - उपलब्ध बारवा नियमितपणे साफ करणे, अनावश्यक वाढलेली झाडे व्यवस्थितपणे काढून घेणे, निखळलेले चिरे मूळ स्वरूपात बसवणे. बारव जतन करताना प्रामुख्याने सर्वात खालच्या पातळीवरील कुंड असते, तेथील निखळलेले चिरे मूळ जलप्रवाह अखंडितपणे सुरू राहील याची दक्षता घेऊन बसवावे. अनावश्यक रंगरंगोटी न करता त्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून निखळलेला भाग व्यवस्थितपणे जतन केला गेला पाहिजे. बारवेसभोवताली सगळ्या बाजूंनी किमान दीड मीटर रुंदीचा एक दगडी चौथरा करून घ्यावा. त्याच्यामुळे वरील पट्टा ढासळणार नाही. या चौथर्याच्या सभोवताली एक फूटभर रुंद व दोन फूट खोल अशा मापाची नाली व्यवस्थित बांधली, तर बाहेरून खराब पाणी आत जाणार नाही. याशिवाय उपलब्ध होईल तेवढ्या परिसरात उद्यान विकसित करता येईल. वारंवार पाण्याचा उपसा करणे, पाण्यात वाढणार्या वनस्पती व शेवाळ काढून टाकणे, मत्स्योत्पादन करणे, याबरोबरच विहिरीतील पाणी बाहेर एका टाकीत घेऊन ते पाणी तहान भागवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व इतर उपयोगासाठी वापरता येईल. प्रामुख्याने लहान मोठी मुले व तरुण बारवेत पोहत असतात. पाण्यात जाण्यापूर्वी त्यांनी स्वत:चे शरीर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यावी. सर्वसाधारणपणे या बाबी पाळत असताना स्थानिक वारशाविषयी एक लहानशी माहिती पुस्तिका उपलब्ध असावी, तेथील माहिती देणारा फलक तेथे असावा, नव्या पिढीला आपल्या वारशाविषयीची जाणीव होण्यासाठी स्थानिक शाळा व महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देण्यात यावी. परिसरातील एखादी संस्था किंवा गट यांनी या वारशाची जोपासना करावी, दैनंदिन स्वच्छता कायम ठेवावी. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून या स्थानापर्यंत येणारा मार्ग चांगला राहील याची काळजी घेणे आवश्यक ठरते.
याशिवाय जर आपणाला हे वारसा वैभव - मग ते मंदिराचे, प्राचीन जलाशयाचे किंवा विविध आकारप्रकारांच्या बारवांचे असो, त्यांचे जतन, संवर्धन व भावी पिढीकडे हस्तांतरण करायचे असेल, तर अशा बारवेत असलेल्या एकूण देवकोष्ठांची (देवळ्यांची) संख्या लक्षात घ्यायला हवी. प्रशस्त अशी तीन फूट रुंदीचे देवकोष्ठ असेल तर तेथे शेषशायी विष्णू किंवा सप्तमातृकापट असतो. संख्या सात असेल त्यात मातृका देवतेची स्थापना केलेली असते. अकरा किंवा बारा देवकोष्ठे असतील तर एकादश रुद्राची व स्वतंत्र उमामहेश्वरांची प्रतिमा असते. याशिवाय चोवीस देवकोष्ठे असतील तर विष्णूच्या चोवीस विभव (मूर्ती) असतात. याशिवाय ब्रह्मा, भैरव, नागदेवता यांच्याही मूर्ती असतात. आज आपण प्रतीकात्मकरित्या एक ते पाचपर्यंत मूर्ती बसवू शकतो. यात गणेश, शिव, विष्णू, मातृका व सूर्यदेवता असू शकतात. मात्र असे करताना ज्या दगडात ही वास्तू बांधली आहे, त्याच दगडात व वास्तूला साजेशी अशी मूर्ती असावी. बारवांचे उद्यापन व वार्षिकोत्सव प्रतिवर्षी साजरे करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ होती. तसेच होळीच्या सुमारास प्रतिवर्षी हे जलाशय सामुदायिक सहभागाने स्वच्छ करण्याचीही पद्धत होती. याशिवाय परिसरातील पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून परिसरात निसर्गत: असलेला ओढा रुंद करणे, त्याच्या मूळ स्वरूपात प्रवाहित करणे, आवश्यक तेथे वृक्षारोपण करणे यांसारखे विषयही हाताळले जाऊ शकतात. कुठल्याही जलसाठ्याचे सातत्य हे त्याच्या निसर्गदत्त पुनर्भरण व्यवस्थेवर अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी परिश्रम घेऊन निर्माण केलेला हा वारसा आपण जतन करण्याचा सामूहिक वसा स्वीकारायला हवा.
बारव
महाराष्ट्र बारव मोहीम
इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली
ग्वाल्हेरच्या
माणसाला ग्वाल्हेर किल्ल्याचे प्रचंड आकर्षण व तेवढेच अप्रूप..दिसायला
निःसंशय अतिशय देखणा..पर्शियाहून आलेला निळा रंग वापरून ” मान मंदिर ” चे
अनोखे रूप,तो तजेला अजूनही तेवढाच मोहात पाडतो. मी जेव्हा मुंबईला प्रथम
आले आणि पूज्य मामंजी म्हणाले, “मी जरा मुंबईला जाऊन येतो हं,” मी दचकलेच
..”आपण मुंबईतच आहोत ना ?” पण नंतर खसखस पिकली, कळताच की ही जुनी पिढी
अजूनही फक्त दक्षिण मुंबईलाच मुंबई मानते. इतर फक्त उपनगरे..तसेच
ग्वाल्हेरला प्रथम जाणारा माणूस भांबावतो. स्टेशनवर उतरताच त्याच्या कानी
टेम्पो, रिक्षावाल्यांची पृच्छा ऐकू येते, ” साब, ग्वालियर, ग्वालियर ??..”
कारण
तेथेही बिरला नगर, लष्कर, ग्वालियर, मुरार असे भाग पाडले आहेत. किल्ला हा ”
ग्वालियर ” भागात येतो. पूर्वी तो पायथा इतका गजबजलेला नव्हता.. आता भयंकर
दाटी वाटी झाली आहे. सर्वच शहरांची ही वाढीव लोकसंख्या पूर्वीचे निसर्ग
सौंदर्य नष्ट करीत आहे याचा खेद वाटतो.
महाराज मानसिंग एकदा मृगया करण्यास गेले असता त्यांना निन्नी नावाची एक गवळण दिसली. दोन धृष्टपुष्ट वळू त्वेषाने एकमेकांवर चालून जात होते. त्यांचे ते महाभयंकर नाक फुलवित, फुत्कार सोडीत होणारे युद्धच जणू ..या मुलीने लीलया सोडवले. ते बघून राजा आरक्त..!. तिला पट्टराणी करणारच, हे ठरविल्याने इतर मंत्रीगण नाराज झालेत पण राजाची इच्छा! ती स्वाभिमानी मुलगी, गरीब, खालच्या जातीची पण बाणेदार ..तिने तीन अटी घातल्या
१..मी या सांक नदीचेच पाणी पिणार..
२..मी वेगळ्या महालात राहणार ..
३..तुम्ही जर युद्धावर गेलात तर मी देखील येणार ..
तिच्या या तीनही अटी मान्य झाल्या. ते गुजरी महल देखील बघण्यासारखे आहे. तिच्यासाठी मोठमोठाले पाईप्स घालून सांक नदीचे पाणी तिच्या महालापर्यंत आणले. ती पाईपलाईन अजूनही दिसते. ती संगीतज्ञ होती, असेही सांगतात. आख्यायिकाही असू शकतात. राग..गुर्जरी तोडी ..हा तिनेच तयार केला .. म्हणतात. अकबराच्या नवरत्नांपैकी तानसेनने ‘मियाँ की तोडी’ जसा तयार केला. ती देखील दंतकथा आहे असे म्हणतात. तिचे डोळे सुंदर मृगासारखे असल्याने राजाने तिचे नाव ” मृगनयनी ” ठेवले. मध्यप्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वृंदावनलाल वर्मा हे वडिलांचे परिचित..त्यांनी ‘मृगनयनी’ नावाची कादंबरी लिहिली आणि त्यांच्याच हातून ती मला बक्षीस मिळाली, हा अपूर्व योग होता. त्यांच्या तोंडून त्या कथा ऐकणे म्हणजे मेजवानीच होती. आमच्या शाळेचा हा आणखी एक अनोखा उपक्रम.
त्या किल्ल्यावर आम्ही पुढील बाजूने चढूनही जात असू, कधी कधी मागील रस्त्याने कारने जात असू. ते खास किल्ल्यावर असलेल्या शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी. खूप सुंदर रंगमंच होता त्यांचा..खुले रंगमंदिर ..दगडी पायऱ्या वगैरे. श्रीमंत जीवाजीराव शिंदे पण बघायला येत. याच शाळेत हिंदी चित्रपट नट सलमान खान, नितीन मुकेश वगैरे शिकत असत. एकदा गंमतच झाली .. वडिलांना काम असल्याने ते लवकर उठले. खरे तर असा एक अलिखित नियम होता ( अगदी दंडक नव्हे पण ) की राजे निघून गेल्यावरच इतर जातील..पण आमची प्रशस्त कार निघाली ..आणि त्या वळणदार रस्त्यावर, गोल गोल उतरत जाणाऱ्या त्या वाटेवर प्रत्येक वळणावर शिपाई खाडकन उभे राहत होते, आम्हाला सलाम करीत होते. काही वेळानंतर लक्षात आले, ते असे का वागले आणि खूप हसू लागले सर्व. आमचा कारचालक तर अगदी आनंदी..
त्या किल्ल्यासमोरच आमचे एक काका राहत असत. त्यांच्या गच्चीवरून मानमंदिर दिसे..रेखाटने करायला सोपे .

गूजरीने जेथून सांक नदीचे पाणी आणवले तो बांध बघायला आम्ही जात असू. तिगरा डॅम. माझ्या वडिलांना सर्वांना घेऊन सहलीला जायला आवडत असे. स्वतः इतके व्यस्त. वकील, लेखक, कवी, पुढारी, समाजकार्यात झोकून देणारे पण सहलीसाठी ही वेळ काढत. त्यासाठी खूप मोठा लाकडी पेटाराही बनवून घेतला होता. त्यात आजकाल मॉड्युलर किचनमध्ये असतात तसे अनेक कप्पे. ज्यात वाट्या, भांडी हा पसारा व्यवस्थित राहत असे. सहलीच्या जागी मस्त जागा शोधून मुलांचा नाश्ता पाणी होई. ती भांडी नदीवर जाऊन आम्ही मुले धुवतही असू.. बहुधा बहिणीच. भाऊ झाडावर चढून मस्ती करण्यात दंग किंवा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात. तो पेटारा मोठ्या कारमध्ये सहज मावत असे..असाच एक भरपूर मोठा पाच खणी डबा.. त्यात अगदी खाली कडी कोयंडा, जाळीदार डबा..ज्यात निखारे ठेवलेले.. वरील डब्यातील अन्न गरमागरम राहावे म्हणून .. माझ्या बहिणीच्या मैत्रिणी गायिका..त्यासुद्धा येत कधी.. त्यांच्या गायनाने रंगत येई.
असेच
हरसी डॅम, रमौवा डॅम, देवखोह, बुराखोह, बलदेव कुंडी, कुंवर बाबा ही स्थळे.
जेथे पोहणे अनिवार्य. बालपणी पाण्याला प्रचंड घाबरणारी मी. पण सर्व आलेच
पाहिजे हा वडिलांचा दंडक. त्यामुळे कितीही वेळा आईच्या पदराआड लपण्याचा
प्रयत्न केला तरी ते मामाच्या मदतीने खेचणारच मला…त्याचमुळे सर्व मुले छान
पोहू लागली. माझी बहिण वनिता तर सर्वोत्तमच पट्टीची पोहणारी..अजूनही पोहते.
बुराखोला तर मामाला एकदा वाघीण आणि तिची पिल्ले देखील दिसली होती.

देवखोह अतिशय रम्य परिसर आहे. कारने वर चढत जाणे, पुनः खाली उतरणे… नंतर पायऱ्या उतरून त्या खोहमध्ये जाणे. ती जागा चारी बाजूंनी मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द सावलीत विसावलेली. जवळच झुळझुळ वाहणारी नदी. तेथे आम्ही बरेचदा जात असू. इतरही काही समूह येत. अशा जागी मानावयाचे नियम धाब्यावर बसविणारे. एकदा असेच दुसऱ्या लोकांनी धूर केला. त्यामुळे त्या झाडावरच्या पोळातील मधमाश्या चवताळल्या. खाली धुराच्या साम्राज्यात तर जाणे कठीण आमच्याच बाजूला आल्यात. नुसती पळापळ ..आरडाओरडा. सगळे सामान तेथेच टाकून त्या ओबडधोबड पायऱ्या चढून वर जाणे आणि कारमध्ये बसणे केवळ अशक्य. सर्वात जास्त माझ्याच अंगावर. भाऊ घाबरला. त्याने काळजीपोटी माझ्या अंगावर जाड सतरंजी टाकली, त्यामुळे खूप मधमाश्या त्याच्या अंगावर गेल्या आणि मी वाचले. त्या सतरंजीच्या आत डोळ्यात, कानात जाणाऱ्या मधमाश्या मला दिसत होत्या. थोड्या वेळाने माझी शुद्धच हरपली. माझ्या बहिणी सांगतात ..किती तरी वेळ नंतर त्या माझ्या अंगावरील अडकलेले डंख काढीत होत्या. सर्वात मोठ्या भावाने तर अगदी चक्क विदेशी बनावटीचा नवीन सुंदर कॅमेरा फेकून दिला. माणसाला प्राणापेक्षा अधिक काय प्रिय असू शकते हे जाणवले.
त्या
दिवशी आमच्या ड्रायव्हरची कमाल होती. स्वतःला वाचवित, कारमध्ये शिरलेल्या
असंख्य मधमाश्यांना टॉवेल गुंडाळलेल्या एका हाताने सावरीत, एका हाताने
स्टीयरिंग व्हील धरीत, त्या टेकडीवरून हळूहळू कारचा पहिला, दुसरा गियर
बदलत चढणे, उतरणे किती अवघड ..घृ घृ करत कार कशीबशी वर चढत होती .खूप
लांबवर आल्यानंतर त्या मधमाश्या कमी झाल्यात. हळूहळू दिसेनाश्या .. असे
वेगवेगळे अनुभव कधी गमतीशीर तर कधी भयावह.
पण जीवन शिकविणारे. गरजेचे.
[ पुढील अंकी समापन ]
Tale of Three Baolis
Baolis, or baoris, or vavs, or step-wells, are underground water sources that have been popular in India from the ancient times, especially in the dry areas of this subcontinent. These step-wells generally consisted of two parts, a rectangular tank or kund, and a circular well that extended down to reach the water table. The well provided potable water for drinking, while the tank or kund was primarily used for bathing, washing, and watering crops. During summers the baolis with attached rooms also served as cool resting places for the pilgrims, passing caravans, and other travellers. These architectural marvels were generally commissioned by members of the royal families or by wealthy patrons, for the benefit of the common people.
While varying in style, where the baolis could vary from a L-shaped structure, to a rectangular one, to a circular form, they showed some common features too, such as a flight of stairs that led from the ground level to the water below. Many baolis built under Hindu patronage also served as temples that had figures of gods, goddesses, and animals; shaded pavilions with trabeate columns; corbelled domes; and elaborate carvings. Baolis under Islamic patronage had less ornamentation, no human or animal forms, and had the true domes and arches. In the later periods, often both styles were fused. Both types had circular wells for potable water, where a pulley system was sometimes used for drawing water.
The earliest step-wells in India were first seen in the 3rd century CE. These were basic in architecture, and were designed more out of necessity to store monsoon rain waters for use during the arid summer months. It was necessary to have a year-round water supply, especially in the dry north-western parts of India. Over the centuries, the basic baoli forms gave way to complex architectural structures. According to the historians, by early 19th century there were several thousand step-wells, built on various scales, thriving in India. However, by the early 20th century, only few baolis remained in functional condition, as the British viewed these structures as unhygienic. So they were often filled in, or simply destroyed. Besides this, modern technology brought in plumbing lines and the tap water system that made baolis redundant. Currently the government has started with the preservation and conservation of baolis that still remain, marking them as heritage/ancient monuments.

Abhaneri or Chand baoli built in 8th -9 th CE in Rajasthan beside the Harshad Mata temple. The arched upper parts are clearly a later addition, while it is likely that the lower parts which show trabeate form of columns and niches are a part of the orginal structure of the baoli.
Dholpur baoli (Rajasthan)
Hidden behind the Ghazra ka tomb, is this pretty red sandstone 19th centory baoli. The structure, though unknown to most that visit this little town, is unique for its beautiful double pillars and delicate arches that surround its long rectangular tank and a circular well at the back. Hemmed in by buildings on all sides, the structure looks better conserved than the neighbouring Ghazra ka tomb, though in terms of cleanliness much needs to be done. The tank water, as usual, remains dirty, though the well water appeared clean.

the Dholpur baoli- surrounding residences and unclean waters of the tank fail to dim its unique beauty

unique double pillars and delicate arches are the main attractions of the Dholpur baoli

the well at the back, which is double-storied

the circular pattern of the well (the arches show distinct Mughal influence)

the circular well water looks relatively clean
Gwalior fort step-well (Madhya Pradesh)
Inside the Gwalior fort is a step-well, situated on the left side as one enters the palace complex gates. It is a single, circular, deep well, situated beside a many-pillared hall, which earlier held a shiva-lingum that was thrown down the fort walls by Emperor Jahangir, later to be discovered by a peasant tilling his grounds, and is now placed inside a temple outside the fort gates.

entrance gate to the baoli (note the arches) within the Gwalior fort

The circular baoli with its mossy green waters. There is a pillared passage that runs round the well. The entrance to the well is closed, with the steps plastered off to stop people from reaching the waters down below.

Raniji ki baoli at Bundi (Rajasthan)
Raniji ki baoli is a beautiful step-well, situated in Bundi. According to the signboard outside the baoli complex, the story goes that in late 16th century the king of Bundi married Rani Nathavati, as his previous queen failed to produce an heir. Rani Nathavati in due course gave birth to a son, which led to the previous queen turning envious. After placing her son under custody of the elder queen, Rani Nathavati devoted her entire life in caring for her subjects, wherein she built this step-well in 1699. The baoli has beautiful carvings mainly of elephants and is 46 meters deep. It has high-arched gates with niches for various deities. At the entrance is a gate comprising of four tall pillars, joined beautifully at the top by elephant figures on beams and S –shaped (ogee) slender arches (brackets).

The gate as one enters the Raniji ki baoli. Beautiful elephants and S-shaped arches adorn it

the intricately carved arch above the tank water, with two elephants serving as brackets at two corners. The arches are distinctly Mughal influenced

the well wall at the back, with an imposing arch and a small passage in the foreground separating the well from the tank in front

deities carved in niches on the well wall at the back

figures of elephants carved on the passage (balcony) wall that separates tank from well

intricately carved elephant (with a mahout on its back) serving as a bracket in Raniji ki baoli

delicate carvings on the four pillared gate at the entrance
(This article was published on Virasat E Hind)
राजस्थानातल्या जवाई बांध आणि बेरा, बीकानेर, आभानेरीची चांद बावली
https://chinmaye.com/2020/03/05/mabhaneri/

विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय. पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील नाजूक नक्षीकाम आणि शिल्प सौंदर्याने या रचनेला विश्व वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशाच बारवांची मालिका राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यात दिसते. राजस्थानमध्ये माझी फिल्म शूट करत असताना मी पाहिलेली एक सुंदर बारव म्हणजे आभानेरी येथील चांद बावली …

निकुंभ घराण्यातील राजा चांद किंवा चंद्र याने ८-९ व्या शतकात आभानेरी किंवा आभानगरी येथील आपल्या राज्यात ही विहीर बांधली. या विहिरीची खोली सुमारे १९.५ मीटर आहे. या आयताकृती विहिरीच्या तीन बाजूंना पायऱ्यांची सुंदर रचना आहे तर चौथ्या बाजूला जणू महालच बांधावा त्याप्रमाणे छज्जे आणि दरवाजे आहेत. विहिरीच्या चारही बाजूंना संरक्षक भिंत असून उत्तर दिशेला दरवाजा आहे.

या रचनेत सुमारे 3500 पायऱ्या आहेत आणि १३ मजली बांधकाम केले गेलेले दिसते. राजा चांद हा गुर्जर प्रतिहार घराण्यातील शासक असावा आणि या घराण्याच्या उत्कर्ष काळात या बारवेची बांधणी झाली असे इतिहासकार सांगतात.

या परिसरात एक प्राचीन मंदिरही आहे जे हर्षत माता मंदिर म्हणून ओळखले जाते आणि सुमारे १२ वर्षे जुने बांधकाम मानले जाते. स्थानिकांच्या मते गझनीच्या महंमदाच्या हल्ल्यात या मंदिराचे बरेच नुकसान केले गेले.

या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत.
या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत. दिल्ली-आग्रा-जयपूर या पर्यटन त्रिकोणात असलेलं हे ठिकाण जयपूर आणि आग्रा महामार्गाजवळच आहे. आमेर किल्ला, हवामहल, आग्रा किल्ला, ताजमहाल अशी भटकंती करत असताना आभानेरी सारखी अद्भुत ठिकाणे सुद्धा नक्कीच पाहिली गेली पाहिजेत.
सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार करणारे उंट. कला, संस्कृती, अनेकविध रंगांची उधळण करणारे उत्सव यामुळंही राजस्थानची ख्याती जगभर पसरलेली आहे. अशाच सुंदर राजस्थानामधलं एक सुंदर शहर आहे बीकानेर. वायव्य राजस्थानात वसलेलं बीकानेर शहर राजस्थानामधलं एक महत्वाचं पर्यटन केंद्र आहे.
बीकानेरच्या परिसरामध्ये आढळणारा लाल आणि पिवळा वालुकाश्म आणि उंट या गोष्टी या शहराला खास ओळख प्रदान करून देत आहेत. तिथं आशियामधलं सर्वात मोठं उंट संवर्धन केंद्र आहे. जुन्या बीकानेरमधील अनेक घरं लाल वालुकाश्मातच बांधलेली आहेत. त्यावरूनच या शहराला राजस्थानचं लाल शहर असं नाव पडलेलं आहे. बीकानेर शहरामध्ये आणि त्याच्या आसपास अनेक पर्यटक ठिकाणं आहेत.
राव बिका राठोड यांनी 1488 मध्ये बीकानेर राज्याची स्थापना केली होती. जोधपूर शहराचे संस्थापक राव जोधा राठोड यांचे ते सर्वात ज्येष्ठ सुपुत्र. तोपर्यंत या परिसराला जंगलदेश म्हणून ओळखलं जायचं. त्याच्याही पूर्वी प्राचीन काळापासून मध्य आशिया आणि गुजरातदरम्यानच्या व्यापारी मार्गावरचं ते एक महत्वाचं शहर बनलं होतं.
देश्नोकच्या कर्णी मातेच्या आशीर्वादानं राव बिका यांनी या शहराची स्थापना केली होती. कर्णी मातेचं देश्नोकमधलं मंदिर जगातलं असं एकमेव मंदिर आहे, जिथं उंदराला पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे या मंदिरात प्रवेश करताच सगळीकडे उंदरांचा मुक्त संचार दिसतो. हे मंदिर बीकानेरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. बीकानेरचे महाराजा गंगा सिंग यांनी या मंदिराला दान केलेला चंदेरी दरवाजाही इथं पाहायला मिळतो. गंगा सिंग यांनीच बीकानेर राज्यामध्ये सिंचनासाठी गंगा कालवा बांधला होता.
बीकानेरमध्ये असलेला जुनागढ किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याच्या बांधणीत लाल वालुकाश्म आणि संगमरवराचा प्रामुख्यानं वापर करण्यात आलेला आहे. जुन्या शहरापासून काहीच अंतरावर उत्तर दिशेला राजा राज सिंग यांनी हा किल्ला बांधला होता. याच्या भोवतीनं खोल खंदक खोदलेला आहे. सुरज पोल हे या किल्ल्याचं मुख्य द्वार. या किल्ल्यात असलेल्या हर मंदिरामध्ये राजघराण्याचे विवाह सोहळे आणि जन्म सोहळे पार पडत असत.
जुनागढ किल्लात अनुप महाल, करण महाल, बिजाई महाल, डुंगर निवास, गंगा निवास आणि रंग महाल असे महत्वाचे राजवाडे आहेत. पण चंद्र महाल आणि फूल महाल हे या किल्लामधले सर्वात सुंदर आणि आकर्षक राजवाडे आहेत. या महालांमध्ये सजावटीसाठी आरसे, बारीकबारीक कलाकुसर, चित्रकला यांचा वापर केलेला आहे. यामुळं या महालांचं अंतर्गत सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे. त्याचबरोबर उंच स्तंभ, कमानी यांचाही या महालांच्या बांधकामात समावेश करण्यात आलेला आहे. म्हणूनच या किल्ल्याला भेट देणं हा अतिशय सुंदर अनुभव ठरू शकतो.
लालगढ राजवाडा हे बीकानेरमधलं आणखी एक खास आकर्षण आहे. लाल वालुकाश्मात उभारलेला हा राजवाडा महाराजा गंगा सिंग यांनी आपल्या वडिलांच्या – महाराजा लाल सिंग -स्मृतिप्रीत्यर्थ बांधला होता. याचं बांधकाम 1902 ते 1926 दरम्यान करण्यात आलं होतं. या राजवाड्यात लाल वालुकाश्मावर करण्यात आलेली कलाकुसर अप्रतिम आहे. त्याचबरोबर जुनी छायाचित्रं आणि इतर साहित्याचाही मोठा संग्रह या राजवाड्यात पाहायला मिळतो, जो भोजन कक्षात मांडण्यात आलेला आहे. राजवाड्याच्या बाहेरच्या हिरवळीवर नाचणारे बरेच मोर पाहणं हेसुद्धा रोमांचक ठरतं. त्यांच्यामुळं लालगढ राजवाड्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. या राजवाड्याच्या काही भागाचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तरीही त्याचं मूळ रुप बदलण्यात आलेलं नाही.
गंगा सुवर्ण महोत्सव संग्रहालयात हडप्पा-पूर्व संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहायला मिळतात. गुप्त आणि कुशाण काळामधल्या वस्तूही तिथं मांडलेल्या आहेत. याबरोबरच अनेक सुंदर शिल्पकृती तिथं पाहायला मिळतात. टेराकोटा, चिनी मातीच्या वस्तू, चित्रं, जुनी हत्यारं आणि जुन्या नाण्यांचा संग्रहही तिथं आहे. बीकानेरच्या परिसरातील खास कला आणि कलाकुसरीच्या वस्तूंचा खजिना विशेष दालनात मांडलेला आहे.
देवी कुंड ही बीकानेरमधली शाही घराण्याची स्मशानभूमी आहे. बीकानेर शहरापासून हे ठिकाण 8 किलोमीटरवर आहे. बीका घराण्यामधल्या राजांच्या स्मरणार्थ तिथं अनेक छत्र्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्यातील महाराजा सुरत सिंग यांच्या छत्रीच्या छतावर राजपूत पद्धतीची चित्रकला केलेली पाहायला मिळते.
बीकानेरच्या आसपास अनेक उद्याने आणि अभयारण्ये आहेत. गंगा निवास सार्वजनिक उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, रतन बिहारी मंदिर उद्यान, भवन राजवाडा उद्यान आणि गजनेर अभयारण्य ही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. गजनेर अभयारण्यात गच्च झाडी असून तिथं नीलगायी, चिंकारांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यातच गजनेरचा राजवाडा वसलेला आहे. पूर्वी बीकानेरचे महाराजा याचा वापर उन्हाळी निवासस्थान म्हणून करत असत. या अभयारण्यामधल्या एका तळ्याच्या किनाऱ्यावर हा राजवाडा बांधलेला आहे. आता त्याचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.
अशा या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बीकानेर शहराला पुन्हा एकदा भेट देण्याची इच्छा आहेच. दुर्दैवानं त्यावेळच्या ट्रीपमध्ये काढलेले जवळजवळ सगळेच फोटो खराब झाले आहेत. त्यामुळं इथं फारसे फोटो टाकता आले नाहीत. मागच्यावेळी एका सहल कंपनीमार्फत गेल्यामुळं दीड-दोन दिवसांमध्ये बीकानेर पाहताना गडबड झाली होती. आता मात्र गेलो तर स्वतंत्रपणेच जाईन. म्हणजे सगळं शांतपणे बघता येईल आणि नव्यानं फोटोही टिपता येतील.
अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.

आशुतोष बापट
कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की, शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काही तरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. संगमेश्वरजवळचं सप्तेश्वरही अशाच सुंदर ठिकाणांपैकी एक. अनेकदा संगमेश्वर फिरलेल्यांनाही हे ठिकाण माहीत नसतं. प्राचीन जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण इथे दिसतं.
मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगला डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढय़ावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर.
डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्यासमोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडातले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूंना खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा
वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहांत विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे; पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षांने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळं बांधकाम देखणंसुद्धा आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशू कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. ३० फूट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्य़ाद्रीची मुख्य रांग आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.
कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर माहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे माहात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तसंच परिसरात कोणकोणती देवळे आहेत याचंही वर्णन ‘संगमेश्वर माहात्म्य’मध्ये शेषाने दिलेलं आहे. या ग्रंथात कविराज या स्थानाचे श्रेष्ठत्व वर्णन करतो. त्या ग्रंथात कर्णेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी नेमून दिलेल्या गावांची नावं येतात. त्यात धर्मपूर (आजचे धामापूर), शिवनी (शिवने), धमणी (धामणी), लवल (लोवले), तुर्वरी (तिवरे) अशी गावे दिसतात. सप्तेश्वरपासून वाहणारी अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर कसबा इथे कर्णेश्वराचे शिल्पसमृद्ध शिवालय उभे आहे. दगडी बांधणीचे हे शिवालय आणि त्यात असलेली शिल्पकला बघण्यासारखी आहे. मंदिराचे खांब आणि मुख्यत्वे मंदिराच्या पोर्चचे छत आणि त्याच्या द्वारशाखा फारच अप्रतिम आहेत. पोर्चवर अष्टदिक्पालांचे केलेले शिल्पांकन अफाट आहे. दरवाजावर शेषशायी विष्णू आणि त्याचे दशावतार बघत राहावेत असे आहेत. कर्णेश्वर मंदिर परिसरसुद्धा रमणीय आहे. परिसरात काही प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. कसबा गावात असलेले काशीविश्वेश्वर आणि काळभैरव मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेले प्रचंड मोठे पाण्याचे तळे आवर्जून पाहावे. संगमेश्वर माहात्म्यात हे क्षेत्र भक्ती आणि मुक्ती देणारे आहे, तसेच याच्याभोवती सर्वत्र शक्तीची स्थळे आहेत. याच्या अष्टदिशांना आठ तीर्थे आहेत असे उल्लेख येतात. सप्तेश्वर मंदिर पाहून खाली कसबा संगमेश्वरी यावे किंवा उलट करावे; पण ही दोन्ही ठिकाणे बघणे अनिवार्य आहे.
Step wells of Maharashtra
- हम बावड़ियों को गुजरात और राजस्थान से जोड़ते हैं। रोहन काले और उनकी टीम द्वारा चलाए गए महाराष्ट्र बावड़ी अभियान की बदौलत अब हम जानते हैं कि राज्य के विभिन्न क्षेत्रों में कम से कम 1,750 बावड़ियाँ हैं। ये पानी की कमी को दूर कर सकती हैं और हमारी राष्ट्रीय विरासत का हिस्सा हैं।
माफ़ कीजिए, क्या आस-पास कोई पुराना कुआँ है..? सीढ़ियों वाला कुआँ। अम्म... असल में कुआँ तो नहीं, लेकिन एक पुराना तालाब है जिसकी कुछ सीढ़ियाँ टूटी हुई होंगी... वो उस बड़े आम के पेड़ के नीचे है... ये रास्ता सीधा पेड़ तक जाता है... रुको, मेरे साथ आओ। रास्ता साफ़ नहीं है और जंगल से होकर जाता है। तुम उसे आसानी से नहीं ढूँढ पाओगे...
वाह, कमाल है। बहुत बड़ा है। चार प्रवेश द्वार और आला भी कमाल का है... आप इसका इस्तेमाल क्यों नहीं करते? गर्मी के मौसम में भी इसमें काफ़ी पानी रहता है... आपको इसका इस्तेमाल करना चाहिए... वरना ये इतिहास बन जाएगा। ये सिर्फ़ एक तालाब नहीं है... ये हमारी विरासत है। इसे संभाल कर रखना हमारा फ़र्ज़ है।
महाराष्ट्र में 1500 से ज़्यादा बावड़ियाँ हैं। अगर हम हर बावड़ी को पुनर्जीवित और संरक्षित करें, तो महाराष्ट्र में पानी की कमी की समस्या हमेशा के लिए हल हो जाएगी । अगर हम अभी से इसकी शुरुआत कर दें, तो हमारी समृद्ध विरासत आने वाली पीढ़ियों के लिए बची रहेगी।
यह बातचीत रोहन काले, मनोज सिंकर और महाराष्ट्र के एक साधारण ग्रामीण के बीच है। उन्होंने कई परित्यक्त बावड़ियों की खोज की और उन्हें गूगल मैप पर सार्वजनिक रूप से प्रदर्शित किया। बावड़ियों को पुनर्जीवित करने के अपने जुनून के लिए रोहन काले ने अपनी कॉर्पोरेट नौकरी छोड़ दी। छह महीने तक उन्होंने पूरे महाराष्ट्र में लगभग 14,000 किलोमीटर की साइकिल यात्रा की। उन्होंने 400 बावड़ियों की खोज की और उनका दौरा किया और गूगल मैप पर उनके सटीक जीपीएस स्थानों को रिकॉर्ड/नोट किया। महत्वपूर्ण बात यह है कि उन्होंने कई लोगों को बावड़ियों के संरक्षण की आवश्यकता के बारे में आश्वस्त किया और इस संरक्षण परियोजना में कई और लोगों को शामिल किया।
इस तरह "महाराष्ट्र बावड़ी अभियान" की शुरुआत हुई। रोहन हमेशा कहते हैं, "यह मेरा निजी अभियान नहीं है, यह महाराष्ट्र की जनता का अभियान है।"
इस अभियान के तहत अब तक 1,750 से ज़्यादा बावड़ियों का मानचित्रण किया जा चुका है । यह अभियान कई उद्देश्यों को लेकर शुरू किया गया था ।
1. अनुसंधान और संरक्षण उद्देश्यों के लिए महाराष्ट्र में बावड़ियों का सबसे बड़ा और सबसे विश्वसनीय डेटाबेस बनाना।
2. हजारों बावड़ियों की पहचान करना (जीपीएस निर्देशांक प्राप्त करना और उन्हें सार्वजनिक दृश्य के लिए कस्टम गूगल मानचित्र पर मैप करना)।
3. बावड़ियों की तस्वीरें/ड्रोन शॉट लेना।
4. बावड़ियों के वास्तुशिल्प डिजाइन के अध्ययन के लिए कॉलेजों के साथ सहयोग करना।
5. स्वच्छता अभियान का आयोजन करना।
6. बावड़ियों के संरक्षण के लिए लोगों और सरकार के साथ सहयोग करना।
7. ग्रामीणों/स्थानीय विरासत अन्वेषकों को अद्वितीय बावड़ियों को पर्यटक आकर्षण के रूप में पहचानने के लिए प्रोत्साहित करना।
8. छात्रों के लिए निःशुल्क अध्ययन भ्रमण का आयोजन।
9. अन्य गांवों/राज्यों को प्रेरित करने के लिए संबंधित गांव के स्थानीय लोगों/प्राधिकारियों द्वारा बावड़ियों के संरक्षण में किए गए अच्छे कार्यों को सोशल और प्रिंट मीडिया के माध्यम से साझा करना।
10. बावड़ियों के लिए पारिस्थितिक जल शोधन प्रणाली विकसित करना।
11. महाराष्ट्र की जल कमी की समस्या का समाधान और विरासत संरक्षण महाराष्ट्र बावड़ी अभियान का प्राथमिक दृष्टिकोण है ।
इन बावड़ियों का पुनरुद्धार और संरक्षण केवल इस अभियान में लगे स्वयंसेवकों का ही नहीं, बल्कि सभी का कर्तव्य है। स्वयंसेवक इसके लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। उनके प्रयासों का ही परिणाम है कि महाराष्ट्र पर्यटन विकास निगम (एमटीडीसी) ने अपनी वेबसाइट पर बावड़ियों के लिए एक अलग पृष्ठ बनाया है। विभिन्न जिलों में कई बावड़ियों का पुनरुद्धार किया गया है और युवा आगे आकर इस कार्य में रुचि दिखा रहे हैं। सोशल और प्रिंट मीडिया इस अभियान की पहुँच बढ़ाने में मदद कर रहे हैं। वे नियमित रूप से प्रकाशित करते हैं कि कैसे लोग और प्रशासन किसी एक बावड़ी के पुनरुद्धार में मदद करते हैं।
पिछली महाशिवरात्रि पर, महाराष्ट्र बाराव दीपोत्सव के तहत, पूरे महाराष्ट्र में लगभग 160 बावड़ियों को दीपों से सजाया गया। यह दीपोत्सव हमेशा चलता रहेगा। रानी अहिल्यादेवी होल्कर की जयंती पर, धुले के शिरपुर गाँव के लोगों ने एक पाँच मंजिला बावड़ी को दीपों से सजाया। उन्होंने एक व्याख्यान और सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया।
महाराष्ट्र बाराव दीपोत्सव.
बावड़ी सिर्फ़ पानी का स्रोत नहीं होती। इसकी वास्तुकला भी अलग होती है। कुछ बावड़ियाँ इतनी छोटी होती हैं कि एक शयनकक्ष में समा सकती हैं, जबकि कुछ में एक पूरी इमारत समा सकती है। कई डिज़ाइन... कुछ बावड़ियाँ कच्ची होती हैं, कुछ पक्की। महाराष्ट्र में हमें 125 साल से लेकर 1200 साल पुरानी बावड़ियाँ मिल जाएँगी। यह वास्तुकला और सिविल इंजीनियरिंग, दोनों के अध्ययन की एक अलग शाखा है, इतिहास के छात्रों और इतिहासकारों के लिए भी। टूरिस्ट गाइड या टूर अरेंजर्स बावड़ी पर्यटन के रूप में अपने व्यवसाय का विस्तार कर सकते हैं। इससे स्थानीय लोगों और विरासत खोजकर्ताओं को मदद मिलेगी। इससे पर्यटन को बढ़ावा मिलेगा और रोज़गार के अवसर पैदा होंगे।
अरे, लेकिन बावड़ी का असली मतलब क्या है ? माफ़ कीजिए, मैं समझाना भूल गया। मुझे बताना ही होगा कि बावड़ी क्या होती है? इसे कैसे पहचाना जाता है? यह कितने प्रकार की होती है?
बावड़ी का अर्थ है एक कुआँ या पानी की टंकी जिसमें पानी तक पहुँचने के लिए सीढ़ियाँ होती हैं। सिंधु घाटी सभ्यता में कुओं के प्रमाण मिलते हैं। बिजली या डीज़ल से चलने वाले पंप के आविष्कार से पहले, लोग रहट (पानी की बाल्टी खींचने के लिए हाथ से चलने वाली लकड़ी की चरखी), पाय रहट (पानी की बाल्टी खींचने के लिए पैर से चलने वाली लकड़ी की चरखी), और बैल रहट (पानी की बाल्टियों की श्रृंखला खींचने के लिए बैल द्वारा चालित पहिए वाली चरखी) का इस्तेमाल करते थे। बावड़ी यात्रियों, ग्रामीणों, व्यापारियों और कृषि के लिए उपयोगी थीं। शायद यही बावड़ियों के जन्म का एक प्रमुख कारण था। कम ऊर्जा की खपत में सीधे पानी तक पहुँचा जा सकता है।
कई शासक राजवंशों ने बावड़ियाँ बनवाईं। सातवाहनों से लेकर चालुक्य, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, पेशवाओं, रानी अहिल्यादेवी होल्कर और कई परोपकारी धनी लोगों ने इन बावड़ियों का निर्माण करवाया। कुछ बावड़ियों पर शिलालेख खुदे हुए हैं ताकि हम उनकी आयु और इतिहास जान सकें।
मराठी में हर शैली के लिए अलग-अलग नाम हैं जैसे बरव, कुंड , पुष्करिणी , पोखरण, घोडेबाव, पांडव कालीन / शिवकालीन विहार, कटलखोद विहार आदि। अंग्रेजी में इन्हें स्टेप वेल और स्टेप टैंक के नाम से जाना जाता है।
बावड़ी की पहचान कैसे करें ? हर क्षेत्र की वास्तुकला की अपनी अलग शैली होती है। आइए हर क्षेत्र पर एक नज़र डालें।
मैं अपने गृह क्षेत्र कोंकण से शुरुआत करना चाहूँगा । कोंकण में आपको तीन प्रकार के डिज़ाइन देखने को मिलेंगे। घोडेबाव का अर्थ है लेटराइट चट्टानी सतह पर खुदा हुआ एक कुआँ जिसके एक तरफ सीढ़ीनुमा प्रवेश द्वार होता है। ये पूरे क्षेत्र में पाए जाते हैं। दूसरे प्रकार के कुंड पुराने मंदिरों के पास पाए जाते हैं। और तीसरा, पोखरण या पुष्करणी सार्वजनिक जल आपूर्ति के लिए बनाया गया एक केंद्रीय जलाशय है।
कोंकण क्षेत्र में सीढ़ीदार कुएँ।
ऊपर बाईं ओर से। पहली बावड़ी गणपतिपुले मंदिर के पास है। इसके तीन प्रवेश द्वार हैं। वर्तमान में केवल मुख्य बड़ा प्रवेश द्वार ही उपयोग में है। इस बावड़ीनुमा तालाब की मंदिर प्रशासन द्वारा नियमित रूप से सफाई की जाती है। मंदिर लगभग 500 वर्ष पुराना है, इसलिए यह बावड़ीनुमा तालाब भी उतना ही पुराना हो सकता है। कोंकण के कई गाँवों में 120 से 500 वर्ष पुराने मंदिर हैं और लगभग हर मंदिर का अपना कुआँ या बावड़ीनुमा तालाब है।
इन तालाबों का मुख्य उद्देश्य धार्मिक अनुष्ठानों और पूजा-अर्चना के लिए जल उपलब्ध कराना है। रत्नागिरी, रायगढ़, ठाणे और सिंधुदुर्ग जिलों में कई कुंड हैं; जिनमें से अधिकांश मंदिरों के हैं और इसलिए वे अभी भी जीवित हैं और संरक्षित हैं या उपयोग में लाए जाते हैं।
चित्र में दूसरा कुआँ समतल लैटेराइट सतह पर खोदा गया है। इस प्रकार के कुओं का स्थानीय नाम घोडेबाव है , जिसका अर्थ है कि घोड़ा पानी में उतर सकता है। इनमें से कुछ कुएँ कच्चे हैं और कुछ पक्के, कुछ बड़े लैटेराइट पत्थरों से बनी दीवारों से सुरक्षित हैं। ये बावड़ियाँ सड़क के किनारे हैं। (नीचे चित्र देखें) पुराने ज़माने में, वाहनों के आविष्कार से पहले, लोग जलमार्गों का इस्तेमाल करते थे, पैदल या समुद्री यात्रा करते थे। और व्यापार मार्ग बंदरगाहों और घरों को जोड़ते थे। यात्राएँ लंबी होती थीं, ज़्यादातर लोग पैदल चलते थे, कुछ लोग गाड़ियों में यात्रा करते थे। इसलिए रास्ते में बावड़ियाँ बनाई जाती थीं जो प्यासे इंसानों और जानवरों को राहत देती थीं।
यह बिल्कुल स्पष्ट है कि उन रास्तों का इस्तेमाल मुख्य सड़कों के रूप में किया जाता था। 'पशुओं के चलने के रास्ते मानव पथों में विकसित हुए और आगे चलकर राजमार्ग बन गए।' ये दिखने में साधारण सी बातें मानव विकास के एक पहलू पर प्रकाश डाल सकती हैं।
तीसरी और चौथी (मध्य पंक्ति के दाईं ओर) तस्वीरों में दिख रहे कुएँ भी छोटे कुंड हैं। तीसरी तस्वीर में दिख रहा कुंड शायद सबसे नया बावड़ी (125-130 साल पुराना) है। मध्य पंक्ति में बाईं ओर की तस्वीर कोंकण में पाए जाने वाले दुर्लभ प्रकार की है। यह एक विशेष रूप से निर्मित केंद्रीय जलाशय है और खेती के लिए उपयोग किया जाता है।
भौगोलिक परिस्थितियों के अनुसार बावड़ियों के निर्माण की शैली भी बदलती रहती है। महाराष्ट्र के हर जिले में हर प्रकार की बावड़ियाँ मिल जाएँगी, लेकिन उनका आकार, प्रयुक्त सामग्री और भंडारण क्षमता अलग-अलग होती है।
रत्नागिरी में आपको ज़्यादातर चट्टानी मैदानों में खोदे गए घोड़ेबाव मिलेंगे। सिंधुदुर्ग में ज़्यादा कुंड हैं। ठाणे में दोनों प्रकार के कुंड हैं, लेकिन इस्तेमाल की गई सामग्री अलग है। पहली तस्वीर में दिख रही बावड़ी बदलापुर में स्थित है, जिसकी तलहटी तक दीवारें बनी हुई हैं। नीचे दी गई दूसरी तस्वीर सप्तेश्वर मंदिर, संगमेश्वर के पास है और प्राचीन काल में इस क्षेत्र के गौरव का प्रतीक है।
बदलापुर बावड़ी.
सप्तेश्वर बावड़ी.
अब पश्चिमी महाराष्ट्र की ओर चलते हैं । इसमें अहमदनगर, पुणे, सांगली, सतारा और कोल्हापुर जैसे आधुनिक ज़िले शामिल हैं। इन ज़िलों का एक लंबा इतिहास रहा है और ये कई राजवंशों के सत्ता केंद्र रहे हैं। इसलिए आपको यहाँ हर तरह की बावड़ियाँ, जैसे L, Z, U, T आकार की बावड़ियाँ, पोखरण, पुष्करिणी, कुंड, देखने में आकर्षक और ज़्यादा परिष्कृत संरचनाएँ देखने को मिलेंगी।
पश्चिमी महाराष्ट्र में बावड़ियाँ
नीचे दी गई पंक्ति में सबसे ऊपर और दाईं ओर की बावड़ी पर एक नज़र डालें। इसके किनारे पर खड़ा एक आदमी बावड़ी की विशालता को दर्शाता है। कोंकण को छोड़कर महाराष्ट्र में हर जगह कुओं की सीढ़ियाँ बहुत गहरी बनाई गई प्रतीत होती हैं (घोड़ेबाव को छोड़कर)।
नीचे की पंक्ति में सबसे दाईं ओर - यह बावड़ी जेजुरी क्षेत्र में, बल्लालेश्वर मंदिर के बगल में स्थित है। देखिए, यह कितनी आकर्षक और परिष्कृत है। जल आपूर्ति के प्रमुख उद्देश्य के बावजूद, इस क्षेत्र के कुओं की विशेषता उनकी भव्यता और सुंदरता है। इन कुओं का आकार संभवतः इतना बड़ा होगा कि ये कई लोगों, सेना, प्राचीन तीर्थस्थलों और यहाँ आने वाले श्रद्धालुओं की पानी की ज़रूरतों को पूरा कर सकें।
निचली पंक्ति में बीच की तस्वीर में सबसे सुंदर प्रकार की बावड़ी है - पुष्करिणी । घंटों इसके किनारे बैठकर इसकी सुंदरता का आनंद लीजिए। पुष्करिणी की दीवारों पर ज्यादातर आले होते हैं। कभी-कभी देवी-देवताओं की सुंदर मूर्तियां होती हैं या ब्राह्मण (पुजारी) द्वारा धार्मिक अनुष्ठान करने के लिए आला खाली छोड़ दिया जाता है। आप पुष्करिणी पर सुंदर कलाकृतियां देख सकते हैं। मंचर की बावड़ी पर एक शिलालेख उत्कीर्ण है जो बताता है कि इसका निर्माण 14वीं शताब्दी में हुआ था। चूंकि ये जिले लंबे समय तक कई राजवंशों के शक्ति केंद्र थे, इसलिए कई कलाकार यहां रहे, इसलिए आपको एल, जेड, यू, टी जैसे विभिन्न आकार की बावड़ियां मिल सकती हैं। सबसे बाएं खंड में चित्र एल आकार की बावड़ी दिखाता है।
कोल्हापुर शहर में एक खूबसूरत Z आकार की बावड़ी है, दुर्भाग्य से मेरे पास इसकी तस्वीर नहीं है। साथ ही 2 या 3 या अधिक प्रवेश द्वार वाली बावड़ियाँ यहाँ आमतौर पर देखी जाती हैं। लिम्ब बारा मोटेची विहिर के पास बावड़ी वास्तुकला का एक सुंदर उदाहरण है। आप पानी में कदम रख सकते हैं, पानी निकालने के लिए 12 मोट (बैलों द्वारा खींची जाने वाली रस्सी वाली बाल्टी) भी देख सकते हैं और अगर आपको बस एक शांत जगह चाहिए, तो कुएं में उतरें। आश्चर्यजनक रूप से, प्राकृतिक एयर कंडीशनिंग के साथ एक छोटी सी हवेली बनी हुई है। इसका निर्माण 1719-1724 (स्रोत विकिपीडिया) में पास के 300 आम के बागानों को पानी की आपूर्ति के लिए किया गया था। एक आम शहर का निवासी होने के नाते मुझे पता है कि 300 आम के पेड़ों को कभी भी इतने बड़े कुएं की जरूरत नहीं होती
इतने बड़े, भव्य कुओं के पीछे एक कारण यह है कि इन्हें किसने बनवाया और उन्होंने कितना पैसा खर्च किया?
मराठवाड़ा में बावड़ियाँ : इसमें औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड़, बीड, लातूर और उस्मानाबाद जिले शामिल हैं। यहाँ कई बावड़ियाँ हैं। शिवलिंग या अश्व कुएँ के आकार की बावड़ियाँ इस क्षेत्र में कुछ ही हैं। चारों ओर कलात्मक रूप से निर्मित सीढ़ियों वाले, जिनमें पैदल चलना सुविधाजनक है, कुएँ बड़ी संख्या में देखे जा सकते हैं।
मराठवाड़ा में बावड़ियाँ
वास्तविक गहराई चाहे जो भी हो, तालाब बहुत छोटा है, जबकि आसपास का काम ज़्यादा जगह घेरता है और बहुत ही परिष्कृत दिखता है। इनके निर्माण में अलग-अलग रंगों के पत्थरों का इस्तेमाल किया गया है। इनके बड़े आकार का श्रेय पड़ोसी राज्यों कर्नाटक और तेलंगाना के प्रभाव को दिया जा सकता है।
मराठवाड़ा क्षेत्र में पानी की कमी के कारण ही इतनी बड़ी सीढ़ियाँ बनाई गई हैं, और ये सभी सार्वजनिक लाभ के लिए हैं। ये आमतौर पर चार या पाँच सीढ़ियों के सेट के साथ बनाई जाती हैं, जिनके बाद विशाल चबूतरे होते हैं। द्वारों की संख्या और शैली अलग-अलग होती है। लेख में दिए गए चित्र इन संरचनाओं की विविधता को बखूबी दर्शाते हैं।
ऊपर बाईं ओर की तस्वीर में दिख रही बावड़ी में कई तरह की सीढ़ियाँ हैं। बगल में दिख रही गोलाकार सीढ़ियों वाली बावड़ी महाराष्ट्र में अपनी तरह की इकलौती बावड़ी है। परभणी जिले के वलूर में स्थित यह बावड़ी कई वर्षों से ज़मीन के नीचे दबी पड़ी थी। स्थानीय लोगों ने इसकी खुदाई की और इस तरह एक सुंदर संरचना सामने आई। सबसे नीचे दाईं ओर की तस्वीर में दिख रही बावड़ी के तल पर आठ छोटे मंदिर हैं। ये तीर्थ हैं , यानी पुजारियों और साधुओं के लिए यज्ञ जैसे अनुष्ठान करने हेतु जगह छोड़ी गई कुएँ। ऐसे कुओं का पानी पवित्र माना जाता है।
पूरे मराठवाड़ा क्षेत्र ने इस अभियान में व्यापक जनभागीदारी दिखाई है। क्षेत्र के युवाओं ने कई बावड़ियों की सफाई की और उन्हें पुनर्जीवित किया, जिनका उपयोग वर्षों से केवल कूड़ा-कचरा डालने के लिए किया जाता रहा था। ये हमारी विरासत के महत्वपूर्ण प्रतीक हैं। हमने इनमें विभिन्न वास्तुकला और संस्कृति का प्रभाव भी देखा।
विदर्भ की बावड़ियाँ : आइए अब चलते हैं बहुमंजिला बावड़ियों की अद्भुत दुनिया की ओर। ये इतनी खूबसूरत हैं कि कोई इन्हें अच्छी तरह से बनी इमारतें समझने की भूल कर सकता है।
विदर्भ में बावड़ियाँ
विदर्भ में बावड़ियाँ.
बावड़ी पर्यटन में अपार संभावनाएँ हैं। महाराष्ट्र में लगभग हर प्रकार की बावड़ी पाई जाती है, और उनका आकार भी अपेक्षाकृत बड़ा होता है। घोड़ों के लिए कुएँ, जो आमतौर पर कोंकण शैली में बनाए जाते हैं, यहाँ तीन मंजिला संरचना के रूप में दिखाई देते हैं। अगर पुराने ज़माने में कोई पहरेदार होता था, तो वह राहगीरों को पानी पीने और ऊपरी मंजिल पर आराम करने के लिए कहता होगा।
ये विशाल बावड़ियाँ ईंटों से बनी हैं, कभी-कभी लाल या काले पत्थरों से। मेहराबों, प्रवेशद्वारों (तीन तरफ़) और दो मंज़िला ताखों पर कमल के चित्र उकेरे गए हैं। हम इनके काल, नक्काशी का वर्ष और रचयिता का नाम, जो कभी-कभी किसी पद्य में भी मिलता है, देख सकते हैं।
मराठवाड़ा और विदर्भ क्षेत्रों में बावड़ियों का इतिहास चालुक्यों या अहिल्यादेवी होल्कर के शासनकाल, 18 वीं शताब्दी से जुड़ा है। इस समय की बावड़ियाँ खानदेश क्षेत्र में भी पाई जाती हैं। नीचे विशाल बावड़ियों के चित्र देखें। ये बावड़ियाँ विदर्भ (अर्थात् बुलढाणा, वाशी, अकोला, अमरावती, यवतमाल, वर्षा, नागपुर, भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर आदि आधुनिक ज़िलों) से हैं।
खानदेश में बावड़ियाँ
इस क्षेत्र में बावड़ियों की स्थिति और भी बेहतर हो सकती थी। लेकिन हमारे अभियान की बदौलत उनकी सफाई और जीर्णोद्धार में तेज़ी आई है। वर्षों से पानी की कमी झेलने के बाद, स्थानीय लोगों को बावड़ियों के महत्व और लाभ का एहसास हो रहा है। आज युवा इस अभियान में और भी बढ़-चढ़कर हिस्सा ले रहे हैं। एक तरह से यह अभियान की सफलता का प्रतीक है।
विदर्भ के अलावा, खानदेश (नासिक, धुले, जलगाँव, नंदुरबार ज़िले) में भी बहुमंजिला बावड़ियाँ हैं। धुले ज़िले में एक पाँच मंजिला बावड़ी की खोज हुई है (ऊपर खानदेश की तस्वीर में, यह तस्वीर के बाईं ओर वाली बावड़ी है)। यह संभवतः महाराष्ट्र की सबसे ऊँची ज्ञात बहुमंजिला बावड़ी है। पिछले मई में अहिल्यादेवी होल्कर की जयंती के अवसर पर, इसे अद्वितीय प्रकाश व्यवस्था से सजाया गया था। एक पालकी यात्रा और एक व्याख्यान का आयोजन किया गया था।
सुझाव : इस अभियान में भाग लेने के लिए किसी को अपनी नौकरी छोड़ने की ज़रूरत नहीं है। ज़रूरत है तो अपने गाँवों और कस्बों के कुओं की सफाई और संरक्षण की। हमें जीर्णोद्धार के दौरान मूल संरचना को नष्ट करने और अनावश्यक सौंदर्यीकरण से बचना चाहिए। पुरातत्व विभाग या प्राचीन संरचनाओं की विधि जानने वाले किसी व्यक्ति से परामर्श करना बेहतर है। प्रशासनिक एजेंसियों की मदद से शिवकालीन जलापूर्ति और कुआँ संरक्षण जैसी योजनाओं के अंतर्गत परियोजनाओं को क्रियान्वित करने का प्रयास करने की सिफ़ारिश की जाती है।
'शून्य अपशिष्ट' के साथ बावड़ी पर्यटन को बढ़ावा देना एक लक्ष्य हो सकता है। इससे बावड़ी संरक्षण अभियान का विचार फैलेगा और राज्य में जल संकट की समस्या का समाधान भी हो सकता है।
लेखक श्रीरंग महाराष्ट्र बावड़ी अभियान का एक प्रमुख हिस्सा हैं। ईसंस्कृति इस लेख को लिखने और तस्वीरें साझा करने के लिए उनका आभारी है। हम श्री रोहन काले का भी आभार व्यक्त करते हैं । महाराष्ट्र की बावड़ियों के बारे में अधिक जानने के लिए उनकी वेबसाइट देखें।
भारत भर के बावड़ियों के एल्बम देखें
2. हम्पी जल प्रणाली , कर्नाटक
3. बूंदी, राजस्थान की बावड़ियाँ
4. रानी-का-वाव पाटन , गुजरात
6. कन्नूर, केरल
8. स्टेप-वेल पेनुकोंडा किला, आंध्र प्रदेश
9. मेलुकोटे, कर्नाटक में पानी की टंकी या कल्याणी
पानी की कमी की समस्या को हल करने के लिए आधुनिक तकनीक को हर संभव तरीके से अपनाएँ। साथ ही, अपने पूर्वजों से सीखने के लिए खुले और तत्पर रहें। जैसा कि टीम रोहन काले ने दिखाया है, हम बहुत कुछ सीख सकते हैं।
यह भी पढ़ें
1. मंदिरों/तालाबों में बावड़ियाँ क्यों होती हैं?
2. भारत में जल संचयन के पारंपरिक रूपों का उत्थान और पतन
3. ओरछा में बावड़ी के पानी का सिंचाई के लिए उपयोग
4. एरिस, कैस्केडिंग टैंकों की एक प्रणाली
5. प्राचीन भारत ने जल संसाधनों की विरासत को कैसे संरक्षित किया - अच्छा लेख।
7. अनुपम मिश्रा द्वारा TED टॉक - जल संचयन की सरलता 18 मिनट वी.जी.
8. नौल और धार - हिमालय की एक सांस्कृतिक विरासत
9. जल संचयन के पारंपरिक रूप और प्रयोज्यता
प्रसिद्ध बावड़ियों/पानी के टैंकों/कुंडों की कुछ तस्वीरें। ये हमेशा मंदिरों के पास पाए जाते हैं।
कुंड वेरीनाग, जम्मू और कश्मीर झेलम नदी का स्रोत है।
रानी-की-वाव, पाटन, गुजरात
मेलुकोटे, कर्नाटक।
जयपुर के निकट चांद बावड़ी।
पेनुकोंडा किला, आंध्र प्रदेश।
अहमदाबाद, गुजरात के पास अदालज-वाव
अडालज की वाव - Adalaj Stepwell
अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या
अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता.
अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे.
ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली.
राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे.
विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे.
विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात
विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.
ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे.



























































































































































































































































































































































































































































No comments:
Post a Comment