पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.त्यांना विभागले आहे ते भैरव खिंडीने, पुरंदरच्या पूर्वेस भैरव खिंड व तिच्या पूर्वेस सुमारे एक मैलावर वज्रगड उभा आहे. या दोन्ही किल्ल्यांना खांद्यावर घेतलेल्या डोंगराचा पठारी घेरा (माची) एकूण चार मैलांचा पडावा. पुरंदरची माची म्हणजेच पठार पायथ्यापणूसन २१०० फूट उंचीवर आहे. या माचीवर पुरंदरचा बालेकिल्ला मान उंचावून उभा आहे. किल्ले पुरंदरच्या अत्युच्च शिखराची उंची आहे समुद्र सपाटीपासून ४५६४ फूट. जमिनीपासून ती भरते सुमारे २५०० फूट. याचा अर्थ बालेकिल्ल्याची उंची पडते सुमारे ४०० फूट. किल्ला १८ अंश १७ कला उत्तर अंशावर, ७४ अंश २ कला पूर्व रेखांशावर आहे.
''आल्याड जेजुरी पल्याड सोनोरी, मध्ये''
''वाहते क-हा, पुरंदर शोभ्तो शिवशाहीचा तुरा''
नावाप्रमाणेच पुरंदर गड स्वराज्याचा तुरा म्हणून शोभतो आहे. दुर्ग ही संकल्पना अंत्यंत प्राचीन आहे. अनेक प्राचीन ग्रंथात दुर्गाचे उल्लेख आलेले आहेत. रामायण महाभारत, शिवतत्वरत्नाकार, समरांगणसुत्रधार, कौटीत्य अर्थशास्त्र अशा उत्तमोत्तम ग्रंथातून दुर्गाची माहिती मिळते.
एकूण् १७ प्रकारचे दुर्ग ग्रंथातून आढळून येतात. मराठी माणसाला इतिहासाचा फार अभिमान आहे. आम्ही गर्वाने म्हणतो इतरांना केवळ भूगोलच आहे. पण महाराष्टाला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. यातला अभिमानाचा भाग जरी सोडला तरी इथल्या भूगोलाने मराठी माणसाच्या जिवनमूल्यावर आणि एकंदरीच इतिहासावर गळद प्रभाव निर्माण केला आहे. हिंदूचे प्राचीन आश्रयस्थान, मुस्मिम राजवटीचा आधारस्तंभ, मराठयांचा तर कलिजाचा, पुढे इंग्रजांनी सुध्दा मुख्य लष्करी ठाणे म्हणूनच निवडलेला असा अमौलिक गुणसामार्थ्याचा दुर्ग म्हणजे पुरंदर गड होय. शिवाजी रांजानी स्वराज्याचा पाया येथेच घातला. गड पुरंदरने अनेक शाहया, घराणे राज्य करतांना पाहिली. शिवाजी राजांची पहिली तात्पुरती राजधानी म्हणून ओळखला जाणारा हाच तो पुरंदर. शूरवीर मुरार बाजी देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा बोलका साक्षीदार असलेला पुरंदर किल्ला.
पुरंदर किल्ल्याच्या नावाविषयी एक वेगळी उत्पत्ती आहे. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव ‘पूर’. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्ल्याला ‘पुरंधर’ आणि कालांतराने अपभ्रंशित होत ‘पुरंदर’ असे नाव पडले असावे.
या पर्वताला पुरंदर नाव पडले त्याचे अर्थ समजावून घेउया.
पुरंदरचे विविध अर्थ :
१) शत्रूचे पूर म्हणजे नगर फोडतो, तो पुरंदर होय.
२) आर्यकाळात शंभर गावांच्या प्रमुखास पुरंदर म्हणत.
३) पुरंदर म्हणजे
अ) इंद्र (इंद्राचे एक नाव)
ब) शंकर/शिव/शंभू (शिवाचे एक नाव)
क) विष्णू (विष्णूचे एक नाव)
ड) अग्नी (अग्नीचे एक नाव)
४) पुरंदरचे अनेक व्यावहारिक अर्थ खालीलप्रमाणे-
अ) राजा (राजन)
ब ) क्षत्रिय
क) इंद्र (पुरंदर, शंभू, शिव)
ड) स्वामी
इ) मालक
ई) चंद्र
उ) श्रेष्ठ
इतके विविध अर्थ आणि छटा कॉ एखाद्या शब्दास लाभल्या असतील. पुरंदरचे लोक श्रेष्ठ, पराक्रमी व पवित्र होते आणि आहेत, हे इतिहासावरून स्पष्ट होते.
५) पहिले तीन छत्रपती व त्यांची जन्मस्थाने यांचा पुरंदरच्या अर्थाशी सुगमसंगम कसा झाला आहे, ते येथे स्पष्ट होते.
अ) शिव : (शिवराज, शिवाजी) यांचे जन्मस्थान शिवनेरी पुरंदर.
ब) शंभू (शंभूराज, संभाजी) यांचे जन्मस्थान पुरंदर = पुरंदर.
क) राजा (राजा, राजन, राजाराम) यांचे जन्मस्थान
६) वरीलप्रमाणे तीनही छत्रपतींच्या नावात पुरंदर हा अर्थ समाविष्ट आहे
अ) शिवराज : शिवराज दोन्हींचा अर्थ पुरंदर होय.
ब) शंभूराज : शंभू राज दोन्ही शब्दांचा अर्थ पुरंदर
क) राजाराम : राजा राम (श्रेष्ठ) दोन्ही शब्दांमध्ये हा अर्थ प्रतीत होतो.
याप्रमाणे पुरंदर माहात्म्य सांगावे तेवढे आणि लिहावे तितके तोकडेच ठरेल.
कात्रज घाट, बोपदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
फत्तेखानाचे स्वराज्यावर आक्रमणः-
पुरंदर किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर होता. सासवडपासून सहा मैल पश्चिमेला डोंगराळ मुलुख, तर पूर्वेला सपाट मैदान, वायव्येला तेरा-चौदा मैलांवर सिंहगड, पश्चिमेला एकोणीस-वीस मैलांवर राजगड, असा पुरंदर होता. या तीन किल्ल्यांच्या मधला प्रदेश डोंगराळ असल्याने शत्रूला आत शिरणे कठीण, किल्ला मोठा आणि मजबूत. त्यामुळे गडावर मोठी शिबंदी राहू शकते. गडाची पश्चिमेकडील बाजू सोडल्यास इतर बाजू दुर्गम. सर्वार्थाने किल्ला योग्य होता; पण अडचण अशी की, तो शत्रूच्या कह्यात होता. तरीसुद्धा जमेची बाजू म्हणजे पुरंदरचे किल्लेदार महादजी नीळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजे यांचा जुना स्नेह होता. त्यातच सरनाईक आता वृद्ध झाले होते आणि त्यांच्या चार पुत्रांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते. या परिस्थितीचा लाभ घेऊन राजांनी पुरंदरात प्रवेश केला; पण कह्यात घेतला नाही. म्हणजे किल्ला अजूनही शत्रूच्याच कह्यात होता. याचा अर्थ शत्रूची भूमी शत्रूशीच लढण्यासाठी राजांनी वापरली. केदारजीच्या पत्रावरून स्पष्ट होते की, खानाला आदिलशहाने कोंढाण्याच्या मोहिमेवर मुक्रर केले होते; पण राजे असे अचानक पुढे आल्यामुळे फतेहखानाला आपला विचार पालटावा लागला. कोंढाण्याकडे जाण्याऐवजी त्याने बेलसरजवळ मुक्काम केला. साधारणपणे ऑक्टोबर १६४८ ला खान तेथे पोचला असे मानले जाते. खान असेच करेल ही अटकळ राजांनी बांधली होती. आता राजांच्या कूटयुद्धाला प्रारंभ झाला.
इ.स. १६४८ चा पावसाळा संपल्यावर फतहखान मातब्बर सरदारांसह व बराच फौजफाटा घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. (ऑक्टोबर अखेर) महाराज यावेळी पुरंदरावर होते. त्यामुळे सरळ कोंडाण्यावर चाल करून जाणे खानाला शक्य नव्हते. त्याला पुरंदराच्या अलिकडेच तळ ठोकणे भाग पडले. त्याप्रमाणे भीमा, नीरा ओलांडून तो कहेच्या किनाऱ्याने पुढे सरकत, सरकत जेजुरीजवळील बेलसराजवळ आला. फत्तेखानाने बेलसर खळद हस्तगत केले आणि तेथेच तळ देऊन मुक्काम ठोकला. खळद-बेलसर हि दोन्ही गावे पुरंदर गडाच्या पुर्व पायथ्याला आहेत. त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू.
इथून पुरंदर पश्चिमेस फक्त १० मैल अंतरावर होता. म्हणजे पुरंदर घेऱ्याच्या बाहेर व पाण्याची सोय पाहून खानाने बेलसरला तळ ठोकण्याचे ठरविले हे उघड आहे. शिवाय इथून विजापूरशी अबाधित संपर्क साधता येणे त्याला सहज शक्य होते. नाइलाज म्हणूनच त्याला उघड्यावर तळ ठोकावा लागला. तरी कुशल सेनापती या नात्याने त्याने आल्या आल्या बाळाजी हैबतरावाच्या नेतृत्वाखाली काही फौज शिरवळला तेथील सुभानमंगळचा भुईकोट ताब्यात घेण्यासाठी पाठविली. बाळाजी हैबतरावाबरोबर फाजलशाह व आशफशाह हे दोन नामांकित सरदारही त्याने दिले होते. बाळाजी हैबतरावाला सुभानमंगळ काबीज करून तेथेच बळकट ठाणे करून राहायला त्याने सांगितले. शिरवळचे ठाणे ताब्यात ठेवण्यात फतहखानाचा तिहेरी उद्देश होता.
पहिला उद्देश म्हणजे, महाराजांचे लष्करी बळ चाचपडून पाहता येऊन महाराजांच्या तेथील लोकांना हुसकावून लावल्याने पहिल्या विजयाचे फायदे फतहखानाला मिळणार होते. पुरंदरावरील लढाऊ फौजेचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता होती.
दुसरा उद्देश म्हणजे, महाराजांना शिरवळमार्गे पुरंदरावर होणारा सैन्य व रसदेचा संभाव्य पुरवठा तोडता आला असता. शिरवळचे ठाणे रोहिडखोरे व वेलवंडखोरे यांच्या सरहद्दीवर होते व याच प्रदेशातून महाराजांनी प्रारंभिक हालचाली सुरू केलेल्या होत्या. तिसरा उद्देश म्हणजे, प्रसंगी विजापूरहून अधिक कुमक मागवून पुरंदरावर सासवडकडून व शिरवळकडून दुहेरी आक्रमण करून महाराजांना कोंडीत पकडता येणे शक्य होते.
हा सर्व विचार करूनच फतहखानाने बाळाजी हैबतरावाची रवानगी शिरवळाबर केली. त्यासाठी त्याने आपल्या सैन्याची सुमारे बाराशे सैनिकांची एक तुकडी बाळाजी हैबतराव या सरदाराच्या हाताखाली पाठवली. खान स्वराजाच्या दिशेने निघाला असताना राजांनी हा छोटा किल्ला घेतला होता. खानाच्या या योजनेमुळे त्याचे सैन्य विभागले गेले. शिवभारतानुसार
पुरं शिरोबलं प्रापशिवसैन्यैरवारित:। (१३.१४)
म्हणजे शिवाजी महाराजांनी किल्ला लढवलाच नाही. कौटिल्याच्या सूत्रानुसार त्यांनी आपले बल किंवा सैन्य दूष्य असल्याचे भासवले आणि त्याच वेळी ‘जितम्’ असा विश्वास खानाच्या मनात निर्माण केला.
महाराजांचे सैन्य येत असलेले पाहून बाळाजी हैबतरावानेही लढाईची सिद्धता केली. त्याने कोटाचा दरवाजा बंद केला व तटाच्या आश्रयाने लढायचे ठरवले, पण आदिलशाहाच्या कारकीर्दीत कोटाकडे लक्ष दिले नसल्याने कोट मजबूत नव्हता.महाराजांच्या सैन्याने अत्यंत आवेशाने कोटास धडक दिली. कोटाला म्हणण्यासारखे मजबूत बुरूज नव्हते. खंदकही नाममात्र होता.
कावजी मोठ्या आवेशपुर्ण स्वरात आपल्या सैन्याला म्हणाला," शिरवळ किल्लयांत कांही दम नाही, खुशाल भिंताड फोडून खंदकावर लोटा, घोडे उडवून तटावर चढा! ही कांही मोठी लंका नाही लागून गेली". युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. किल्ल्याच्या बाहेर डोकावणर्यांची बाणांनी डोकी फोडली. पाहता पाहता मराठी सैन्य सुभानमंगळाला चहू अंगांनी बिलगले, त्यांनी तटाची खणती सुरू केली. काही मराठे शिडीच्या सहाय्याने आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. वरून आदिलशाही सेना चाके, नांगर, कर्णे, मुसळे, उखळे, गोटे, घिरटे, पेटलेली कोलिते, खैराच्या निखाऱ्यांचे ढीग, उकळते तेल व अनेक शस्त्रे यांचा मारा करून मराठ्यांना विरोध करू लागली. पण त्या विरोधाला न जुमानता मराठ्यांनी तटाला खिंडार पाडले. कावजीने तटाची बेस फोडली व त्यातून तो कोटात शिरला.आता कोटाच्या आत हातघाईची लढाई सुरू झाली. तट फोडण्यात यश प्राप्त झाल्याने मराठ्यांना विजयोन्माद चढला तर विजापुरी सैन्य बजावात्मक पवित्रा घेऊ लागले. लवकरात लवकर पुरंदराकडे परत जायच्या इराद्याने मावळ्यांनी आदिलशाही फौजेची जणूकाही लांडगेतोडच सुरू केली. या जबरदस्त रेट्यात काही घटकांतच हैबतरावाची फौज संपुर्णपणे कापली गेली. कावजीसोबतच भिकाजी, भीमाजी, तुकाजी, गोदाजी, सदोजी, संभाजी हे घोडेस्वार त्वेषाने यावनी सैन्यावर प्रहार करू लागले. बाळाजी हैबतरावही हिमतीने तोंड देऊ लागला. पण महाराजांच्या सैन्याचा जोर बिलक्षण होता. या धुमश्चक्रीत पहिल्याच सपाट्यात इंगळ्याने पंचवीस, पोळाने बारा, चोराने चौदा, घाटग्याने तेवीस, वाघाने सोळा तर कावजीने एकोणीस उत्तम योद्धे ठार केले. मराठ्यांचा वाढता जोर पाहून हैबतरावाचे सैन्य घाबरून पळत सुटले. बाळाजीने काही वेळ तग धरला. पण अखेर कावजीने भाल्याचा प्रहार करून त्यास ठार केले. बाळाजी हैबतराव मारला जाताच मात्र आदिलशाही सैन्य शरण आले. हैबतराव याचे सैन्य भीतीने रण सोडून पळून गेले आणि मराठ्यांनी गड ताब्यात घेतला .पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला. शरण आलेल्या शेकडो लोकांना कावजीने सोडून दिले व वस्त्रे, शस्त्रे, पालख्या, घोडे, खजिना असा शत्रूचा जिंकलेला सर्व ऐवज घेऊन कावजी पुरंदरास परतला. जाताना त्याने सुभानमंगळाचा बंदोबस्त अर्थातच केला असला पाहिजे. यावेळी पराभूत झालेल्या यावनी सेनेने शिरवळमधील कोटाजवळची कौलारू घरे जाळून मराठ्यांचे धैर्य खच्ची करण्याचा व सूड उगविण्याचा प्रयत्न केला असे दिसते. पण त्याचा उपयोग झाला नाही.
नंतर सर्व मराठा सरदार शिवाजी महाराजांना भेटण्यास पुरंदरला निघाले.ही बातमी पुरंदराच्या पायथ्याशी असणार्या फत्तेखानाकडे पोहोचायच्या आत संभाजीची फौज थोडेफार नुकसान सोसूनही शिरवळ जिंकून पुरंदरावर परतली.

हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं.
मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली. काही मराठेही युद्धात पडले. मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे व सैन्य परतले. सैन्य गडात आल्यावर गडाचे दरवाजे बंद झाले.अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘ सर्जाराव ‘ असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता. पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती. कोणकोणत्या परिस्थितीत सैन्याने माघार घ्यावी, याची एक मोठी सूचीच कौटिल्याने १०.२.१७ मधे दिली आहे. त्यानुसार सैन्य अनुकूल भूमीवर नसेल किंवा सैन्यावरील संकटाच्या प्रसंगी आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी माघारी येण्याची सूचना कौटिल्याने केली आहे. आपल्यावरील संकटाचा विचार करून बाजी जेधे आणि सैन्य परतले.
‘ सोप्पं काम। स्वस्त काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते.
फतहखानास याच सुमारास शिरवळ येथे महाराजांनी केलेल्या पराभवाची वार्ता समजली. या पराभव-वार्तेमुळे चिडून गेलेला व नुकत्याच बेलसरला मिळालेल्या प्रचंड विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या फतहखानाने आता वेळ न दवडता सरळ पुरंदरावर चढाई करून या युद्धाचा शेवट करण्याचे ठरविले, त्याप्रमाणे त्याच्या आज्ञेनुसार विजापुरी सैन्य पुरंदरकडे दौडत सुटले.
महाराजांचा अंदाज अचूक ठरला. अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता महाराजांनीही गृहित धरलेली होती. पुरंदर गड त्यांनी त्या दृष्टीने सिद्धही ठेवला होता. तोफा ठासून भरलेल्या होत्या. मोठेमोठे शिलाखंड तटांबर रचून ठेवलेले होते. गोफणी, अग्निबाण, बंदुकाही सज्ज करून ठेवलेल्या होत्या.शिवाजी महाराज स्वता पुरंदरवर हजर होते आणि फत्तेखानाच्या प्रचंड सैन्याचा उघड्या मैदानावर सामना करणे अवघड आहे हे शिवाजी महाराजांना ठाऊक होते म्हणून सावध पवित्रा घेत फत्तेखानास पुरंदरपर्यंत येऊ दिले. फत्तेखान पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचला आणि त्याने तिथे तळ ठोकला. फत्तेखानासोबत भरपूर सैन्य, मुबलक युध्द साहित्य व अनुभवी सरदार होते . इकडे गडावर साराच पोरखेळ . राजांचे वय यावेळी होते फक्त अठरा वर्षे व बाजी काका सोडले तर बाकी सर्व साथीदारही याच वयाचे होते .
पुरंदरच्या याच उतारावर शिवाजी राजांनी अत्यल्प सैन्यासह आणि तोकड्या साधन सामुग्रीसह फत्तेखानाचा पराभव केला.
उजाडतीच्या वेळी फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती.
फतहखानाचे सैन्य तळाशी आले व व्यूह-रचना करून पुरंदरची चढण चढू लागले. आघाडीस मुसेखान, पिछाडीस फतहखान, डाव्या अंगास फलटणचे निंबाळकर तर उजव्या अंगास मताजी घाटगे होते. फतहखानाच्या या सरदारांमध्ये अनेक सरदार पालखी, हत्ती, घोडे यासारख्या वाहनातून फिरणारे होते. ते प्रथमच आपल्या पायांनी आज गड चढत होते.

अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम सासवड गावात आश्रयाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं. मावळी फौजेने त्यांचा पाठलाग केला व पुन्हा एकदा सासवड या ठिकाणी मैदानी लढाई झाली. या लढाईत आता दोनदा पराभूत झालेले फत्तेखानाचे सैन्य जीवाच्या कराराने लढले व राजांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली मात्र थकलेल्या व संख्येने कमी असणार्या खानाच्या फौजेने आता विजापुरची वाट धरली.मात्र या विजयाला एक गालबोट लागले शत्रु सैन्याचा पाठलाग करताना वीर बाजी पासलकरांना वीरगती प्राप्त झाली मात्र या व अशा काही अनाम सैनिकांच्या बलिदानामुळेच स्वराज्याची ही पहिली लढाई राजे जिंकले.तिकडे बंगरुळास संभाजीनेही फरहादखान, तानाजीराव डुरे व विठ्ठल गोपाळ यांचा दारुण पराभव केला. पुरंदरचे युद्ध हे महाराजांच्या जीवनातील स्वराज्यार्थ लढवलेले पहिले युद्ध होते.
तुल्यबळ आणि बलवत्तर राजांशी संधी करावा, हीनबल राजाशी विग्रह. राजे हीच खेळी खेळले. तुलनेने कमी शक्तीशाली आदिलशहाशी राजांनी लढाई केली आणि सामर्थ्यशाली दिल्लीशी संधी. त्यांनी गुजराथचा सुभेदार मुरादबक्ष याच्यामार्फत दिल्लीच्या शहाजहान बादशहाला एक विनंतीअर्ज पाठवला. त्यात त्यांनी मोंगलांचा सरदार होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी आदिलशहाने अटकेत टाकलेल्या आपल्या वडिलांची सुटका करावी, अशी विनंती केली. राजांचा हा अर्ज मान्य झाला. शहाजीराजांच्या अटक प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा सरदार मुस्तफाखान त्याच वेळी मेला. त्यामुळे आदिलशहावर दडपण आले. त्याने १६ मे १६४९ ला राजांची काही अटींवर सुटका केली. राजे युद्धभूमीवर आणि राजनीती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे यशस्वी झाले.
कोणताही विजिगीषू राजा सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून वेगवेगळ्या योजना आखत असतो. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी राजांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते. यात राजांसमोर कौटिलीय अर्थशास्त्र होते कि नव्हते हे कळायला मार्ग नसला, तरी कौटिल्याचे कूटयुद्ध, संधी आणि शिवाजी महाराजांची कूटनीती अन् संधी विचार यात साम्यस्थळे मात्र निश्चितपणे दिसतात.
पुरंदरवर मोघलांचे आक्रमण :-
दिलेरखान पुरंदरवर चालून आला त्यावेळी वज्रगडावर सुमारे ३०० शिबंदी असावी. पुरंदरवर एकूण २००० मराठे होते. पुरंदरच्या विशेष बंदोबस्तासाठी महाराजांनी नुकताच एक विख्यात सरदार नामजाद केला होता, मुरारबाजी देशपांडे ! चंद्रराव मोऱ्यांची जावळी लुटली त्यावेळी मुरारबाजी महाराजांना लाभले होते. पुरंदरावरून मराठ्यांनी झुंज मांडली ती मुरारबाजींच्या नेतृत्वाखालीच.

पुरंदरच्या पिछाडीकडून म्हणजे दक्षिणेकडून दाऊदखान, राजा रायसिंह राठोड, मुहम्मद सालीह तर्खान, रामसिंह, सय्यिद शैनुल, आबिदीन बुखारी, हुसेन दाऊदझई, शेरसिंह राठोड, राजसिंह कुंवर हे पादशाही बंद्यांसह केदार दरवाजाजवळ मोर्चे बांधून बसले. त्यांच्या उजव्या अंगाकडे रसूलबेग रोझभानी आपल्या रोझभानी वंशाच्या शिपायांसह ठाण मांडून बसला. चतुर्भुज चव्हाण दिलेरखानाला काही शिपायांसह रुद्रमाळ किल्ल्यासमोर तर मित्रसेन व इंद्रमण बुंदेला यांनी वज्रगडाच्या पिछाडीस पूर्वेकडून मोर्चे बांधले. मिर्झाराजे सासवडच्या अलिकडेच एक मुक्काम थांबलेले होते. ते शनिवार दि. १ एप्रिल रोजी पुरंदरच्या पायथ्याशी आले. त्यांनी आपला तळ पुरंदर व सासवडच्या मधोमध म्हणजे पुरंदराच्या अलिकडे (नारायण पेठ येथे) ३ मैलांवर दिला.
तळाची व्यवस्था लावून मिर्झाराजे तडक दाऊदखान व कीरतसिंह यांच्या मोच्र्ध्यावर गेले. तेथून त्यांनी किल्ल्याची पाहणी केली. पुरंदरची बलदंडता क्षणार्धात त्यांच्या लक्षात आली. महाराजांनी गड भांडता ठेवण्यासाठी केलेली जय्यत तयारीही त्यांनी न्याहाळली. पावसाळा तोंडावर आलेला होता. त्यामुळे त्वरित काय हालचाल करता येईल याचा विचार त्यांनी केला. विचारांती किल्ले पुरंदरच्या नेमक्या दौर्बल्याकडे त्यांचे लक्ष गेले, किल्ले रुद्रमाळ उर्फ वज्रगड ! हर प्रयत्नाने पावसाळ्यापूर्वी ही 'पुरंदराची किल्ली' जिंकून घेणे हेच मिर्झाराजांनी आता आपले मुख्य धोरण ठरविले.

मोर्चेबंदीची पाहणी करून मिर्झाराजे तळावर पोहोचतात न पोहोचतात तोच जासुदांनी बातमी आणली की, 'महाराजांचे सरनौबत नेताजी पालकर परिंड्यावर चालून गेले आहेत. नेताजी वेगाने परिंड्याकडे जाऊन थडकले होते. मोगली फौजेवर त्यांनी अकस्मात हल्ला चढविला. मिर्झाराजांना हे वृत्त कळताच त्यांनी सय्यिद मुनव्वरखान बारहा याला तिकडे रवाना केले. त्याच्या सोबत सुप्याहून शर्झखान, हसनखान, जौहरखान, जगतसिंह यांनाही नेताजींच्या पाठलागावर धाडले. ही फौज परिंड्यापर्यंत गेली आणि हात हलवीत परत आली. कारण नेताजी तत्पूर्वीच जमेल तेवढी लांडगेतोड करून परत गेले होते.
ही फौज परतत नाही तोच, पुण्याचा ठाणेदार इहतशामखान मृत्यू पावल्याची बातमी आली. त्याचे जागी मिर्झाराजांनी ९ एप्रिल रोजी कुबादखानाची नेमणूक केली. मोगलांनी पुरंदर सर्व बाजूंनी वेढल्याचे पाहून मराठे त्यांच्याशी अटीतटीने भांडू लागले. तोफा-बंदुकांचा रात्रंदिवस मारा करून शत्रूला दफे करण्याचा' त्यांनी चंग बांधला. मराठे आग पाखडू लागले तेव्हा बचावासाठी मोगलांना खंदक खोदणे भाग पडले, खंदकाच्या सहाय्याने बचावत बचावत ते गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले.

वज्रगड काबीज करण्यासाठी मोगलांची आता निर्वाणीची धडपड सुरू झाली. मोगलांनी आपल्या सोबत लांब पल्ल्याच्या अवजड तोफाही आणलेल्या होत्या. एक एक तोफ ८०-८० बैलांच्या सहाय्याने ओढावी लागे. अशा या तोफा वज्रगडासमोरील डोंगरावर चढवायच्या व तेथून त्यांच्या सहाय्याने वज्रगडावर भडिमार करायचे ठरले. अतिशय बिकट असे हे काम होते. पण मिर्झाराजांनी ते जिद्दीने तडीस नेण्याचे ठरविले. दिलेरखानही जबरदस्त धाडसी योद्धा होता. आपल्या शागीर्दपेशाच्या बळावर या दोघांनी अब्दुल्लाखान नावाची पहिली तोफ डोंगरावर चढवायला सुरुवात केली. मुंगीच्या पावलाने ही तोफ वर सरकू लागली. ही तोफ वर चढायला एकूण तीन दिवस लागले. अब्दुल्लाखान तोफेच्या मागोमाग फतहलष्कर तोफ वर चढू लागली. तिला वर न्यायला साडे तीन दिवस लागले. तिच्या पाठोपाठ तिसरी हवेली नावाची तोफ डोंगर चढू लागली. या तोफा डोंगर चढत असताना मराठे वज्रगडावरून आगीचा भडिमार करीत होतेच. पुरंदर शर्थनि झुंजत होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते, त्यांचा माटाही सतत सुरू होता. आता अब्दुल्लाखान आणि फतहलष्कर तोफा मदतीस आल्या. त्यामुळे पुरंदरवरून बज्रगडावर कुठलेच सहाय्य मिळू शकले नाही. दोन्ही गड एकाकी पडून झुंजू लागले, मराठ्यांचे धैर्य मात्र वाखाणण्यासारखे होते. हजारो मोगलांशी वज्रगडावरील फक्त तीनशे मराठे शर्थनि झुंजत होते. रात्रंदिवस आगीचा भडिमार करून मोगलांना पुढे सरकू देत नव्हते. वज्रगड वेढल्याला दहा दिवस उलटून गेले, अब्दुल्लाखान, फतहलष्कर व हवेली या प्रचंड तोफा वज्रगडावर आग ओकीत होत्या. अखेर या जबर माऱ्यामुळे वज्रगडाचा एक बुरूज ढासळू लागला. पाहता पाहता तो शेवटी कोसळलाच. या दिवशी तारीख होती १२ एप्रिल १६६५.
वज्रगडाचा बुरूज कोसळलेला पाहून दिलेरखानाला विजयोन्माद चढला, त्याच धुंदीत त्याने आपल्या पठाणांना वज्रगडावर चढून जाण्याची आज्ञा केली. चढण अतिशय अवघड असून एकावेळी फक्त दोन माणसे तीही कष्टपूर्वक वर जाऊ शकत. पण दिलेरखान जिद्दीने बुरुजाच्या रोखाने वर सरकू लागला, उद्ध्वस्त बुरुजावरूनही मराठे तिखट प्रतिकार करीत होते. त्यामुळे दिलेरखानाचा अपेक्षाभंग झाला असणे स्वाभाविक होते. मराठ्यांनी त्याला लवकर दाद दिली नाही तरीही हिमतीने दिलेरखान बुरुजाच्या माथ्यापर्यंत चढून आलाच. आता त्याची मराठ्यांशी हातघाईची लढाई जुंपली. या हल्ल्यात दिलेरचे चार सैनिक जखमी झाले तर मराठ्यांचे सात ठार व चार जखमी झाले.
सायंकाळ झाली. मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले. त्यामुळे बुरूज सोडून ते आतील कोटात आश्रयार्थ गेले. बुधवार मावळला.
मिर्झाराजांना सर्व हकीकत समजली. त्यांनी दिलेरखानाच्या सहाय्यार्थ आपले काही राजपूत रवाना केले. हे सैनिक बहुधा गुरुवारी दुपारी मध्यान्हापर्यंत वज्रगडाबर पोहोचले असावेत. मराठ्यांचा कोटाच्या आश्रयाने चिवट प्रतिकार सुरूच होता. अखेर मोगलांनी तोफखान्याचा उपयोग करून मराठ्यांना जेरीस आणले. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. अवघे तीनशे मराठे हजारो मोगलांशी एकाकी झुंजत होते. या विषम संघर्षातही मराठ्यांनी दिलेरखानाचे ८० सैनिक ठार मारले व ११० सैनिक जखमी केले. अखेर शक्ती संपली तेव्हा मराठ्यांनी शस्त्र खाली ठेवले. मिर्झा राजांनी त्यांना अभयाचा कौल दिला. महाराजांची ही निष्ठावंत माणसे महाराजांकडेच परत जाऊ इच्छित होती. त्यांची इच्छा मिर्झाराजांनी पूर्ण केली. त्यांची शस्त्रे काढून घेऊन त्यांना जाण्याची परवानगी दिली गेली. वज्रगडावरील मराठ्यांना मिर्झाराजांनी जे अभय दिले ते धूर्तपणामुळे. त्यात उद्देश असा होता की, आपण उदार आहोत हे पुरंदर किल्ल्यावरील मराठ्यांच्या अंतःकरणात उसावे व तेही अशाच प्रकारे शरणागतीस प्रवृत्त व्हावेत.
शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी मराठ्यांनी वज्रगडाचा ताबा मोगलांना दिला व जड अंतःकरणाने ते राजगडी परतले. वज्रगड मोगलांच्या ताब्यात गेला याचाच अर्थ पुरंदरचे प्राण धोक्यात आले होते. महाराजांच्या कानावर वज्रगड पडल्याची वार्ता गेली. ते कासावीस झाले. पुरंदरचा वेढा सैल व्हावा यासाठी जमेल तेवढा प्रयत्न ते करीत होतेच. मोगली ठाण्यांवर अकस्मात हल्ले करून मराठे पसार होत. रात्री बेरात्री छापे घालून शत्रूला सळो की पळो करून सोडीत. रस्ते आणि घाट रोखून बसत. आगीही लावून देत. ११ या प्रकारामुळे मोगलांचे अनेक सैनिक व जनावरे मारली गेली.
पुरंदराकडेही महाराजांचे पूर्ण लक्ष होतेच. तेथील आपल्या शूर सैनिकांचे मनोधैर्य वाढावे यासाठी ते प्रयत्नशील असत. पुरंदराभोवती चहू बाजूंनी मोगली विळखा बसलेला असला तरी मराठ्यांची एक तुकडी महाराजांकडून दारूगोळा घेऊन दक्षिणेकडील केदार दरवाजाकडून पुरंदरावर पोहोचलीच ! या भागात दाऊदखान, राजा जयसिंह व अन्य सरदार ठाण मांडून बसलेले होते. जवळच रसूलबेग रोझभानीही मोर्चे बांधून बसलेला होता. पण या सर्वांची नजर चुकवून, त्यांच्या माऱ्यात न सापडता ही हिंमतबाज मराठ्यांची तुकडी केदार दरवाजापर्यंत सुखरूप येऊन पोहोचली. किल्ल्यातील लोकांनी त्यांना आत घेतले. दारुगोळ्याच्या रूपाने महाराजांनी किल्ल्यातील सैनिकांना जणू नवे स्फुरणच प्राप्त करून दिले. राजांकडून एक तुकडी कुमकेस आल्यामुळे पुरंदरावरील मराठ्यांचे मनोधैर्य बाढले तर दिलेरखान विलक्षण चिडून गेला. मराठ्यांना केदार दरवाजातून आत येऊ दिल्याबद्दल त्याने दाऊदखानाची कडक शब्दात हजेरी घेतली.
तेव्हा मिर्झाराजांनी त्याला वेगळ्याच स्वतंत्र कामगिरीवर पाठविण्याचे ठरविले, मिर्झाराजांची धोरणी वृत्ती यामुळे पुन्हा एकदा प्रत्ययास आली.
मिर्झाराजांनी दाऊदखानाच्या नेतृत्वाखाली सुमारे सात हजार स्वार महाराजांच्या मुलुखात त्यांचा मुलुख ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊदखानाच्या मदतीला राजा रायसिंह, शर्झाखान, अमरसिंह चंद्रावत, मुहम्मद सालीह तर्खान, सय्यिद सैनुल आबीदीन बुखारी, अचलसिंह कछवाह व स्वतःचे ४०० स्वार मिर्झाराजांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजांचा तिहेरी उद्देश होता. पहिला उद्देश म्हणजे, आदिलशाहा व महाराजांना दाखवून द्यायचे होते की, मोगली सैन्य केवळ एकाच वेढ्यात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी ते एकाचवेळी सुसज्ज आहे.
दुसरा उद्देश म्हणजे, आजवर महाराजांची सैन्ये बादशाही मुलुखात घुसून उच्छाद मांडीत असत. आता मोगली सैन्ये त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमवाजमव करू शकणार नाहीत हे उघड होते.
आणि तिसरा उद्देश म्हणजे, या निमित्ताने दाऊदखानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता पुरंदर-वेढ्याबाहेर काढता येत होते. मिर्झाराजांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दि. २५ एप्रिल १६६५ रोजी दाऊदखानाची ही तुकडी पुरंदरावरून निघाली. १३ कुत्बुदीनखान व बलुदीखान (लोदीखान?) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजांच्या आज्ञेनुसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिन्याच्या २१ तारखेस, म्हणजे दि. २७ एप्रिल रोजी दाऊदखानही रोहिडा किल्ल्याजवळ पोहोचला आणि मोगली धुमाकुळाला चहू अंगांनी ऊत आला. रोहिडा ते राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झालीत. दि. २८ एप्रिलला मोगलांनी याच भागात ठाण मांडले. दि. २९ रोजी हे सैन्य राजगडच्या रोखाने निघाले. वाटेतील गावे व मुलुख जाळून टाकीत व उद्ध्वस्त करीत दि. ३० एप्रिलला हे सैन्य राजगडच्या पायथ्याशी पोहोचले.
मात्र यावेळी सिंहगडावर असावेत असे वाटते. (आलमगीरनाम्यानुसार राजांचे कुटुंबही राजगडवरच होते. १५) दाऊदखानाचे सैन्य राजगडच्या पायथ्याशी पोहोचले. पण येथे महाराजांसमोर त्यांची मात्र चालली नाही. राजगडावरून तोफा, बंदुका व बाणांचा जबरदस्त मारा सुरू झाला. राजगडच्या (पद्मावती) माचीवरही मराठे युद्धाच्या पवित्र्यात जय्यत तयार होते. राजगडचा दुर्गम डोंगराळ टापू त्यांच्या मदतीला होता. डोंगरांच्या मदतीने राजगड चांगलाच भांडला. मराठ्यांच्या रेट्यापुढे मोगली सैन्य टिकेनासे झाले. अखेर दाऊदखान दोन कोस माघारा हटला. १६ त्याने आपला तळ गुंजणघेऱ्याजवळ दिला व दुसऱ्या दिवशी (दि. १ मे रोजी) तो शिवापूरला आला. आणि तेथून कोंडाण्याच्या दिशेने नासधूस करीत जाऊ लागला. (दि. २ मे) कुत्बुद्दीनखान आपल्या साथीदारांसह कुंवारीगडाच्या आसपासचा मुलुख उद्ध्वस्त करीत होता. त्याने अगणित गुरे-ढोरे व लोक कैद करून नेले. मोगली उठावाला तोंड देण्यासाठी महाराजांचे लोक प्राण पणास लावून झुंजत होते. आताही मोगलांनी धामधूम मांडलेली पाहून मराठ्यांचे ५०० घोडदळ व १००० पायदळ लोहगडावर एकत्रित होऊन मोगलांवर तुटून पडण्यासाठी सिद्ध झाले. मिर्झाराजांना हे वृत्त कळताच त्यांनी दाऊदखान व कुत्बुद्दीनखान यांना लोहगडाकडे जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दोघेही पुण्यास भेटले व दि. ४ मे रोजी पुण्यानजिक चिंचवड येथे त्यांनी तळ दिला, दि. ५ मे रोजी तेथून दाऊदखान व रायसिंह यांनी पुढे कूच केले. टेहेळणीसाठी मोगली पथके लोहगडाच्या परिसरात घुसली आणि अकस्मात मराठे त्यांच्यावर तुटून पडले. मराठे तिखट हत्यार चालवीत होते. अखेर मोगलांनी दाऊदखानाकडे कुमक मागविली. दाऊदखानाने राजा रायसिंह, अचलसिंह व कुत्बुद्दीनखान यांना पाठविले. मराठ्यांनी त्यांनाही शर्थीने तोंड दिले. परंतु अखेर त्यांची शक्ती कमी पडली. त्यामुळे काही वेळानंतर त्यांनी माघार घेतली. या धुमश्चक्रीत मराठे काही प्रमाणात मारले गेले. १७ मोगलांनी लोहगडलगतची सर्व लागवड जाळून टाकली. गरीब प्रजा व गुरेढोरेही कैद झाली. दुसऱ्या दिवशी या फौजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांच्या डोंगरालगतची खेडी जाळून नष्ट केली. लोहगडावरून मराठे जमेल तेव्हा पुन्हा उठाव करीत होते. कुत्बुद्दीनखानाच्या व मराठ्यांच्या यामुळे अनेक झटापटी झाल्या. एकदा या झटापटीत कुत्बुद्दीनखानाच्या हाती ३०० स्त्री-पुरुष व ३००० गुरे सापडली. चौदा दिवसांनंतर ४ जिल्कादला, म्हणजे दि. १० मे १६६५ रोजी दाऊदखान राजा रायसिंहासह पुन्हा पुरंदरच्या मुख्य तळावर दाखल झाला. कुत्बुद्दीनखानाने पुण्यास तळ ठोकला. दाऊदखान, कुत्बुद्दीनखान व त्यांचे सहकारी स्वराज्याची नासाडी करीत असताना इकडे पुरंदरचा वेढाही सुरूच होता. वज्रगड पडल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच पुरंदर ताब्यात येईल अशी दिलेरखान व मिर्झाराजांची अटकळ होती. परंतु पुरंदरवरील मराठे विलक्षण धैर्याने मोगलांना तोंड देऊ लागले. अकस्मात छापे घालून त्यांनी मोगली तोफा निकामी करण्याचे तसेच मोर्चेबंदी खिळखिळी करण्याचे तंत्र अवलंबिले.

एका रात्री पुरंदरवरून मराठ्यांच्या एका तुकडीने अकस्मात कीरतसिंहाच्या मोर्चावर झडप घातली. पण कीरतसिंह सावध असल्याने मराठ्यांना परतावे लागले. लगेच दुसऱ्या दिवशी अंधाराचा फायदा घेऊन मराठ्यांनी पुन्हा रसूलबेग रोझभानीच्या मोर्चावर हल्ला चढविला. या हल्ल्याने रसूलबेग धास्तावला. मराठ्यांनी त्याच्या तोफखान्यावर धाड घालून एका तोफेस मेख ठोकली व तसेच ते रसूलबेगच्या शिपायांवर तुटून पडले. एक शिपाई ठार व चौदा शिपाई जखमी करून मराठ्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली. पण परतताना झबरदस्तखानाच्या तुकडीशी त्यांचा संघर्ष उडाला. त्यात चार मराठे पडले व काही जखमी झाले. तिसऱ्या दिवशी रात्री मराठ्यांनी या भागावर पुन्हा हल्ला चढविला. कालची प्रेते किल्ल्यावर नेण्याचा त्यांचा विचार होता. १३ पण मोगलांनी अडथळा केला तेव्हा पुन्हा चकमक उडाली. मराठे पुरदिलखान, शुभकर्ण बुंदेला यांच्या तुकडीवर घसरले. एकच कापाकापी सुरू झाली. मोगलांचे आठ सैनिक जखमी झाले. चार मराठेही मारले गेले व काही जखमी झाले. दिलेरखान व मिर्झाराजे पुरंदर लवकरात लवकर ताब्यात यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. पण पुरंदर अजूनही दाद देत नव्हता.
दि. १४ एप्रिल १६६५ रोजी वज्रगडाचा पाडाव झाला. दिलेरखानाने आपला मोर्चा पुरंदराकडे वळविला. वज्रगडावरून पुरंदरची माची माऱ्यात सापडत होती. त्यामुळे पुरंदरच्या माचीवर मोगली तोफांचा मारा सुरू झाला. माचीला मजबूत तटबंदी होती. तसेच सफेद बुरूज, काळा बुरूज आणखी चार पाच बलदंड बुरूज या भागाकडून मोगली मारा सहन करीत उभे होते. विशेषतः सफेद बुरूज व काळा बुरूज उद्ध्वस्त केल्याविना माची पुरंदरावर प्रवेश मिळणे कठीण होते. मोगली तोफांमधून उडालेले गोळे तटावर आदळू लागले. बुरुजांपर्यंत सुरूंगही खोदला जाऊ लागला. परंतु बीस दिवस उलटून गेले तरी एक बुरूज व थोडी तटबंदी किंचित ढासळण्यापलीकडे फारशी प्रगती झाली नाही. २१ मराठ्यांचा जोमदार प्रतिकार मोगलांना एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हता.

दिलेर जीवाचा आटापीटा करीत होता, त्याच्या तोफा प्रचंड आग ओकीत होत्या. असेच आणखी दोन आठवडे उलटले. दि. २५ मे पर्यंत प्रगती एवढीच झाली बोत्याची पुरंदराची बज्रगडाकडील तटबंदी थोडी ढासळून दोन भगदाडे पडली व एक बुरूज उद्ध्वस्त झाला. पुरंदर आता पाच सात दिवसात हाती पडेलच असा विश्वास मोगलांना वाटू लागला. २२ मोगल मोठ्या उमेदीने झगडू लागले. पाच दिवस आणखी लोटले. ३० मे उजाडला, पण पुरंदर हाती येण्याचे कुठलेच चिन्ह दिसेना. मराठे सफेद बुरुजावरून प्रभावी उत्तर देत होते. हा बुरूज नष्ट केल्याविना पाऊल पुढे पडणे अशक्य आहे हे दिलेरच्या लक्षात आले. त्याची मती गुंग झाली. मिर्झाराजेही विचारात पडले. अखेर सफेद बुरूज उद्ध्वस्त करण्यासाठी एक युक्ती त्यांना सापडली. या बुरुजाच्याच उंचीचा लाकडे व फळ्यांचा एक दमदमा उभारून त्यावरून सफेद बुरुजावर तोफा डागायच्या । २३ लगेच असा दमदमा उभारण्यासाठी हुकुम सुटला.
हा दमदमा उभारला जाऊ नये म्हणून मराठे सफेद बुरुजावरून जबरदस्त मारा करीत होते. पण मोगलांनी चिवटपणे व नुकसानीची पर्वा न करता अखेर दि. ३० मे च्या सायंकाळी सफेद बुरुजाच्या उंचीएवढा दमदमा उभा केलाच. तोफखान्याचे काही मोगल सैनिक व मिर्झाराजांचे काही राजपूत सैनिक दमदम्यावर चढून तोफांची मांडणी करू लागले. हे पाहताच मराठ्यांनी तोफा, बंदुका, हुक्के, दगड इत्यादी आयुधांचा एकच वर्षाव सुरू करून या लोकांना दफे करण्याकडे व दमदमा निकामी करण्याकडे लक्ष केंद्रित केले. मिर्झाराजांचे इतर लोक दिलेरच्या शिपायांसह दमदम्यावरील सैनिकांच्या मदतीस धावले, पण मराठ्यांचा मारा जबरदस्त होता. त्यामुळे झबरदस्तखान व तोफखान्याचा दरोगा आतिशखान हेही तेथे येवून पोहोचले. २३ पाहता पाहता लढाईने पेट घेतला. मराठ्यांच्या माऱ्यामुळे मोगलांचे अतोनात नुकसान झाले. मिर्झाराजांचा भूपतसिंह नावाचा ५०० सैनिकांवरील एक सरदार बऱ्याच राजपूत सैनिकांसह ठार झाला. दिलेरखानाच्या हाताखालीलही एक सरदार मराठ्यांनी ठार केला. मोगलांचे मनोधैर्य खचून गेले. त्यामुळे मिर्झाराजांनी शुभकर्ण बुंदेला, तुर्कताझखान यांनाही त्यांच्या तुकडीसह मदतीस पाठविले. तेवढ्यानेही भागेना, तेव्हा खासा दिलेरखान व कीरतसिंह हे दमदम्यावर चढले.
संपूर्ण बळानिशी मराठे मोगली लोंढा अडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. पण मुळातच त्यांचे बळ तुटपुंजे होते. अखेर मोगली माऱ्यामुळे सफेद बुरुजाची बरीच नासधूस झाली. मोगल सफेद बुरुजाच्या रोखाने पुढे सरकले. त्यांनी बुरुजाच्या पायथ्याशी सुरूंग खोदायला सुरुवात केली. सफेद बुरूज व काळा बुरूज यामधील तटात मराठ्यांनी बरीच दारू भरून ठेवली होती. यामागील हेतू असा होता की, समजा मोगलांनी सफेद बुरूज जिंकून काळ्या बुरुजावर हल्ला चढविण्याचे ठरविलेच तर तटावरील दारूला आग लावून द्यायची.
मोगलांनी सफेद बुरुजाचा पाया खणायला सुरुवात केली आणि अकस्मात तटावरील दारुने पेट घेतला. प्रचंड स्फोट होऊन अंदाजे ऐंशी मराठे पार भाजून निघाले, हा अपघात कसा घडला याबद्दल निश्चित तपशील उपलब्ध नाही. आलमगीरनाम्यानुसार मराठ्यांनीच मोगलांना रोखण्यासाठी दारूचा भडका उडवून दिला. पण आपलेच सहकारी तटावर उभे असताना ते असे करतील असे संभवत नाही. हा अपघातच होता असे वाटते. दैवाने मोगलांवर एक प्रकारे खैरच केली होती. जल्लोषातच ते काळ्या बुरुजाच्या रोखाने पुढे सरकू इच्छित होते. पण अंधार दाटत चालला होता व बुरुजाजवळील भाग दारूच्या स्फोटाने जळत होता त्यामुळे मिर्झाराजांनी आपल्या सैनिकांना पुढे जाऊ दिले नाही. सफेद बुरुजाच्या बाजूला मोर्चे बांधून मोगली सैन्य तिथेच थांबले. मराठ्यांनी आपले ठाणे काळ्या बुरुजावर नेले. सफेद बुरूज व त्याजवळील एक बुरूज मोगलांच्या ताब्यात गेला.
सफेद बुरूज पडला व मोगल पुरंदर माचीला येऊन भिडले तरी मराठ्यांचे मनोधैर्य तिळमात्रही खालावले नाही. मराठ्यांनी काळ्या बुरुजावरून दुसऱ्या दिवशी पुन्हा घनघोर युद्ध सुरू केले. मोगली अंदाज पुन्हा चुकला. जणू काहीच घडले नाही अशा धारणेने मराठे झुंजत होते । प्रतिकूल परिस्थितीतही मोगलांना त्यांनी चार-पाच दिवस सफेद बुरुजावरच रोखून धरले. अखेर बुरुजावरून तोफांचा मारा सुरू झाला. त्यानेही जमले नाही तेव्हा मोगलांनी पुन्हा काळ्या बुरुजासमोर दमदमा उभारला व त्यावर दोन तोफा चढवून मारा सुरू केला. या माऱ्यामुळे मात्र काळ्या बुरुजावरील मराठे जखमी होऊ लागले. अखेर तो व त्याच्याजवळील दुसरा बुरुज खाली करून मराठे बालेकिल्ल्यावर निघून गेले.

दि. २ जून १६६५ रोजी याप्रमाणे पुरंदर माची व पाच बुरूज मोगलांच्या ताब्यात गेले. आतापावेतो विजय मोगलांचा झाला असला तरी पराक्रम गाजवला मराठ्यांनीच. सैन्यसंख्या अनेक पटींनी जास्त असूनही मोगलांना एक-एक दिवस एक-एक वर्षांसारखा वाटत होता. २५ शिवाय अजून पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर मराठ्यांचेच निशाण दिमाखात फडकत होते. मुरारबाजी देशपांडे आपल्या शूर साथीदारांसह बालेकिल्ल्याचे रक्षण करीत होते. प्रत्येक पावलासाठी मिर्झाराजांना भरपूर किंमत चुकवावी लागत होती. तरीही पुरंदरचा विजय आता त्यांच्या दृष्टिक्षेपात येऊ लागला. तिकडे राजगडावर महाराज संभाव्य पराभवाच्या कल्पनेने चिंताग्रस्त झाले होते. मिर्झाराजांनी त्यांची खरोखरी विलक्षण कोंडी केलेली होती. मिर्झाराजांच्या मुत्सद्देगिरीला तोड नव्हती. एवढा मुत्सद्दी शत्रू महाराजांना प्रथमच भेटला होता. मिर्झाराजांनी केलेली व्यूहरचना नीट ध्यानी घेतली म्हणजे त्यांची मुत्सद्देगिरी नेमकी नजरेत भरते. औरंगाबादला आल्यापासून मिर्झाराजांच्या हालचालींना वेग आला होता. त्यांनी मनुचीला तेथूनच रामनगर, पेठ व चौथिया या कोळी प्रदेशातील संस्थानिकांकडे पाठवून त्यांनी शिवाजीची बाजू घेऊ नये तसेच त्याला आपल्या प्रदेशातून जाण्यासाठी वाट देऊ नये अन्यथा आपण त्यांचेविरुद्ध युद्ध पुकारू असा निरोप पाठविला. सुरतेवर महाराज याच मागनि चालून गेले होते. या भागाची नाकेबंदी झाल्यावर मिर्झाराजांनी सासवडला तळ ठोकला. पुणे-जुन्नर मार्गावर तसेच लोहगडासमोर त्यांनी मजबूत ठाणी उभारून नाकेबंदी केली. पश्चिम किनाऱ्यावरील गोवेकर पोर्तुगीज, वेंगुर्लेकर डच, सुरतकर इंग्रज व जंजिरेकर सिद्दीला त्यांनी एकाचवेळी शिवाजी विरुद्ध उठावणी करण्यासाठी बोलणे लावले. जावळीकर चंद्रराव मोऱ्यांचे नातलग, अफझलखानाचा वडील पुत्र फाजलखान, बेदनूर, बसवापट्टणचे नायक अशा सर्वांना आपल्या झेंड्याखाली आणून महाराजांचा सूड घेण्यासाठी उद्युक्त केले. गोवळकोंडेकर कुत्बशाह व विजापूरकर आदिलशाहा यांनाही महाराजांचा पक्ष सोडून देण्यास धमकावले, याशिवाय प्रत्यक्ष औरंगजेबालाही गुजराथच्या बंदरातून आपली जहाजे व गुराबा शिवाजीच्या समुद्रकिनाऱ्यावर पाठविण्याचा सल्ला दिला. २६ अशी सर्वदूर नाकेबंदी केल्यानंतर मिर्झाराजांनी स्वराज्य सर्व बाजूंनी भरडून काढायला सुरुवात केली. पुरंदराला वेढा घातला. त्याचवेळी त्यांच्या फौजा स्वराज्याचा मुलुख उद्ध्वस्त करू लागल्या. स्वराज्याचे प्रजानन कैद करून नगर व परिंड्याच्या किल्ल्यात ठेवले जाऊ लागले. महाराजांचे काही सरदारही आमीष दाखवून फोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. २७ जावळीचा खेळोजी भोसला ५०० पायदळासह मिर्झाराजांना फितूर झाला. २७ बहुधा यामुळेच महाराजांना शके १५८७ च्या ज्येष्ठ शु. ६ ला (१०) मे १६६५) तातडीने जावळीस जावे लागले. २८ महाराजांना सैन्यभरती करता येऊ नये म्हणून, तसेच त्यांचे सैन्य एकत्र येऊ नये म्हणून मिर्झाराजांनी यशस्वी प्रयत्न केला. त्याचवेळी राजगड व सिंहगडच्या थेट पायथ्यापर्यंत सैन्य पाठवून त्यांनी काळजी उत्पन्न केली. याच काळात सैन्यासंबंधीचे सर्वाधिकारही मिर्झाराजांनी औरंगजेबाकडून आपल्याकडे मागून घेतले. त्यामुळे मोगली सैन्यावर त्यांचा वचक कायम राहिला. औरंगजेबाची इच्छा चौलचे बंदर व तळकोकण जिंकावे अशी होती. पण व्यूहरचनेच्या दृष्टीने ते गैरसोयीचे असल्याने मिर्झा राजांनी निर्भीडपणे ही सूचना नाकारली. आपल्या सैन्याची विभागणी ठिकठिकाणी उत्कृष्टपणे करून त्यांनी प्रत्येक सरदारावर स्वतंत्र जबाबदारी सोपविली. कर्तृत्ववान सरदारांना इनामे देऊन प्रोत्साहित केले, त्याचप्रमाणे ठरल्यानुसार अल्पावधीत हालचाली करून कमीत कमी वेळात उद्दिष्ट गाठले, विशेषतः दख्खनेतील डोंगराळ भागात मोहिमा रेंगाळल्या म्हणजे मोगली सैन्य सुस्त होऊन जाते हे शाइस्ताखान व जसवंतसिंहाच्या उदाहरणावरून मिर्झाराजांनी हेरले होते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी हालचाली करून मोगलांना सुस्त वा आळशी बनू दिले नाही.
मिर्झाराजांचे हे कर्तृत्व ध्यानात घेऊनच औरंगजेबानेही त्यांचेवर विश्वास व्यक्त करताना, 'तुमच्या मुत्सद्देगिरीवर माझा पूर्ण विश्वास आहे. शिवाजीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुम्हाला जे जे योग्य वाटेल ते ते सर्व करा. '२९ असे लिहिले. मिर्झाराजे म्हणतील ती प्रत्येक गोष्ट औरंगजेबाने मान्य केली. त्यामुळे मिर्झाराजांचाही उत्साह दुणावला. मिर्झाराजांनी दिलेरखानालाही योग्य तऱ्हेने हाताळले, या सर्वांचा परिणाम म्हणूनच महाराजांची परिणामकारक कोंडी झाली. दुर्दैवाने, महाराजांच्या बाजूने काय प्रयत्न झाले याविषयी तपशील पुरविणारी साधने उपलब्ध नाहीत. त्यांच्या हालचाली प्रामुख्याने मोगली पत्रव्यवहारातून तेवढ्या ध्वनित होतात. त्यावरून लक्षात येते की महाराजांनी प्रत्येक किल्ला भांडता राहावा यादृष्टीने सर्व ठिकाणी बंदोबस्त केला होता. अकस्मात छापे घालणे, रसद तोडणे, मोगली मुलुखावर हल्ले चढविणे हेही प्रकार ते करीत होते. पोर्तुगीज व विजापूरकरांशी मैत्री-संबंध प्रस्थापित करण्यात त्यांनी बरेच यश मिळविले होते. पण त्यांचा पवित्रा नाइलाजास्तव संरक्षणात्मक होता. मिर्झाराजांचा पवित्रा आक्रमक होता. स्वाभाविकच प्रभावी आक्रमकाला प्राप्त होणारे लाभ मिर्झाराजांनाच मिळत होते. आपली मर्यादित शक्ती ओळखून महाराजांनी मिर्झाराजे बऱ्हाणपुराहून निघाल्यापासूनच त्यांच्याशी तहाची बोलणी करण्यासाठी वकील पाठवायला सुरुवात केली. त्याप्रमाणे महाराजांचे वकील मिर्झाराजांना प्रथम पाबळ मुक्कामी व नंतर पुण्याजवळ भेटले. या वकिलांनी मिर्झाराजांसाठी महाराजांची पत्रे आणलेली होती. पण मिर्झाराजांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. २० आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून महाराजांना आधी प्रभावित करण्याचा धूर्त बेत मिर्झाराजांनी आखला.
महाराजांनी यानंतरही एक प्रदीर्घ हिंदी पत्र मिर्झाराजांना पाठविले. हे पत्र महाराजांचा विश्वासू अधिकारी कर्माजी घेऊन आला. २० या पत्रात महाराजांनी लिहिले होते की, 'मी बादशाहाचा उपयुक्त चाकर आहे. माझ्याकडून बादशाहा अनेक परींनी चाकरी घेऊ शकतो.' महाराजांनी या पत्राद्वारे असेही सुचविले की, बिकट वाटा व डोंगराळ प्रदेश असलेल्या कोकणात शिरण्यापेक्षा मोगलांनी विजापूर काबीज करण्याचा प्रयत्न करावा.' अर्थात या कामी आपले सहकार्य त्यांनी ध्वनित केले होते.
पण मिर्झाराजांनी उत्तर पाठविले की, 'मोगल साम्राज्याची फौज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे अगणित आहे व ती तुमच्यावरच पाठविण्यात आली आहे. आपल्या डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांनी युक्त दुर्गम प्रदेशाचा तुम्ही भरवसा न बाळगणेच इष्ट होईल, आमच्या वाऱ्यासारख्या फौजा घोड्यांच्या टापांखाली त्या मुलुखाची पार धुळदाण करून टाकतील. तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर निमूटपणे बादशाहाला शरण या. त्यामुळेच तुमची प्रतिष्ठा व वैभव वाढेल. अन्यथा आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार रहा. महाराजांनी हे उत्तर ऐकूनही वाटाघाटी सुरूच ठेवल्या. त्यांनी दुसरी थैली रवाना करून काही खंडणी व १-२ स्थळे देण्याची तयारी दर्शविली. पण मिर्झाराजांचे पहिलेच उत्तर कायम होते. यानंतर वज्रगड पडला. दाऊदखान व रायसिंहाने स्वराज्यात एकच धुमाकूळ मांडला. महाराजांचा प्रतिकार थिटा पडू लागला. आता निर्वाणीचा उपाय शोधणे भाग पडले. राजगडावर आपल्या मुत्सद्यांसमवेत महाराज कुठला पवित्रा घ्यावा याचा गंभीर विचार करू लागले. त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे मिर्झाराजे तयार असतील तर तहाची बोलणी करून संघर्ष संपविणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे मिर्झाराजे असेच अडून बसतील तर विजापूरकरांकडून मिळविलेला तळकोकणातील प्रदेश त्यांना परत करून मोगलांविरुद्ध परिणामकारक आघाडी उघडणे.
मिर्झाराजे तहाच्या बोलण्याला किंमत देत नाहीत हे आता जवळ जवळ स्पष्ट झाले. तेव्हा महाराजांनी अंतःस्थरीत्या विजापूरकरांशी बोलणी सुरू केली. ही बोलणी फलद्रूप होऊन आदिलशाही फौजा तळकोकणात महाराजांच्या मदतीला पाठविण्याचे आदिलशाहाने मान्य केले. ३१ आपल्या विश्वासू गुप्तहेरांकडून मिर्झाराजांना ही वार्ता कळली. ३१ तेव्हा ते अस्वस्थ झाले. पावसाळा तोंडावर आला होता. अशावेळी कोकणासारख्या डोंगराळ मुलुखात विजापूरकर व महाराज एक होऊन आपल्यावर तुटून पडले तर आजवरच्या आपल्या व्यूहरचनेवर व मुत्सद्देगिरीवर पाणी फेरले जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांच्या आता लक्षात आले की, महाराजांच्या तहाच्या बोलण्याची उपेक्षा करणे याचा अर्थ त्यांना एकप्रकारे विजापूरकरांच्या गोटात आपणच ढकलल्यासारखे होईल.
अखेर मिर्झाराजे काहीसे वाकले. त्यांनी आपला जासूद पत्र देऊन महाराजांकडे पाठविला. पत्राचा आशय असा होता की, 'तुम्ही शिसोदे राजपूत, आम्ही तुम्ही एकाचे एकच आहो. तुम्ही भेटीस येणे. तुमचे सर्व प्रकारे बरे करू. मिर्झाराजांचा निरोप पोहोचला तेव्हा पत्राचे उत्तर देऊन कोणास हेजीब म्हणून पाठवावे याबद्दल राजगडी खल सुरु झाला. विचारांती रघुनाथपंतांची रवानगी करावी असे ठरले. पंतांना पंडितराव हा किताब देऊन महाराजांनी त्यांना मिर्झाराजांकडे पाठविले. रघुनाथपंतांना पाठविताना महाराजांनी विचार असा केला की, 'रजपुताजवळ प्रसंग पडला तर हे थोर शास्त्रज्ञ आहेत. राजपूतही शास्त्र आणतो. त्यासी व यासी गाठ बरी पडेल.' पंतांसोबत महाराजांनी वस्त्रालंकारही पाठविले होते.
पंत मिर्झाराजांच्या छावणीत पोहोचले. (दि. २० ते २५ मे च्या दरम्यान) मिर्झाराजांनी पंतांची सन्मानपूर्वक भेट घेतली. पंतांनी वस्त्रालंकार पेश करून एकांतात महाराजांचे म्हणणे मिर्झाराजांना सांगितले. पण मिर्झाराजांनी आपला आब राखण्यासाठी पंतांशी काहीही बोलण्याचे नाकारले. ते म्हणाले, 'बादशाहाने मला सिवाशी बोलणी करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे माझ्या जबाबदारीवर मी काहीच बोलणी करू शकत नाही. मात्र सिवा निःशस्त्र होऊन अपराधी म्हणून क्षमायाचना करण्यासाठी आला तर परमेश्वराचे छायास्वरूप असलेल्या रहमदिल बादशाहाच्या कृपासागराचा ओघ सिवाकडे वळू शकेल,
पंत राजगडी परतले, मिर्झाराजांचे म्हणणे त्यांनी महाराजांच्या कानावर घातले. महाराजांनी पंतांना परत पाठवून मिर्झाराजांना कळविले की, 'माझ्या ऐवजी माझ्या पुत्रास (शंभूराजांना) आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्याकडे पाठविण्यास मी तयार आहे !' पण मिर्झाराजांनी या विनंतीस साफ नकार दिला, नाउमेद होऊन पंत पुन्हा परत फिरले, काय करावे याचा विचार राजगडी सुरू झाला. विजापूरकरांच्या कथित मैत्रीवर फारसे विसंबून राहणे धोक्याचे होते. त्यापेक्षा एकवार संधी मिळालीच आहे तर मिर्झाराजांशी तह करून स्वराज्य टिकविता आले तर पाहावे असा विचार करून महाराजांनी पुन्हा रघुनाथपंतांना मिर्झाराजांकडे अभयाचा कौल मिळविण्यासाठी पाठविले. पंतांनी मिर्झाराजांना महाराजांचा निरोप सांगितला की, 'आपण म्हणता त्याप्रमाणे निःशख होऊन महाराज आपल्या भेटीसाठी येण्यास तयार आहेत. फक्त त्यासाठी त्यांना सुरक्षिततेची हमी पाहिजे आहे. अशी जीविताची हमी आपण उघडपणे देऊ शकत नसाल तर निदान खाजगीत क्रियाशपथ द्या. त्यावर विसंबून ते भेटीस येतील.'
मिर्झाराजांना जिंकल्याचा आनंद झाला. श्रीकर्पूरगौराची पूजा करून त्यांनी त्यावरील बेल-तुळशी पंतांजवळ अभयाचे प्रतीक म्हणून महाराजांसाठी दिल्या. मिर्झाराजांनी वचनही दिले की, 'माझ्या छावणीत आपल्यावर सिवा बादशाही हुकुमाचे पालन करण्यास तयार असेल तर त्याचे अपराध माफ केले जातील व त्याचेवर कृपा केली जाईल. जर हे त्याला मान्य झाले नाही तर इथून सुखरूपपणे तो परत आपल्या घरी जाऊ शकेल,
यावेळी मिर्झाराजांनी पंतांना बखे दिली. महाराजांनाही बखालंकार पाठविले. त्यांना सल्लाही दिला, 'दिल्लीचा पातशाहा बहुत जोराबर, यासी शत्रुत्व लावलियाने शेवट लागणार नाही. राजियांनी आपल्या भेटीस यावे. जैसा रामसिंग आपला पुत्र तैसे तुम्ही आपले आहा. आपण तुमचे बाईट करणार नाही. मिर्झाराजांकडून अभयाची क्रिया-शपथ घेऊन रघुनाथपंत परतले, ही तिथी होती, शके १५८७ ची आषाढ शुद्ध सप्तमी, शुक्रबार दि. ९ जून १६६५.
पुरंदरचा तह :-
महाराज मिर्झाराजांच्या भेटीसाठी त्यांच्या पुरंदरजवळील छावणीत येणार ही वार्ता पसरताच तिथे काळजीचे वातावरण निर्माण झाले. महाराजांबद्दलच्या अद्भुत कथा अगोदरच सर्वदूर पसरलेल्या होत्या. त्यामुळे सामान्य लोक भयमिश्रित उत्सुकतेने त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले होते.मिर्झाराजांची चिंता दुहेरी होती. एकतर भेट निर्विघ्नपणे पार पडावी आणि दुसरे म्हणजे आपल्याला हवे ते नेमके मिळवून घ्यावे. त्यातही भेट निर्विघ्नपणे पार पडण्यापेक्षा बोलण्यातून काय निष्पन्न होते, आपणास हवे ते आपण कसे मिळवू शकतो, याचाच मुत्सद्दी विचार ते करीत होते. पण विचारासही फारसा अवकाश उरला नव्हता. रघुनाथपंत मिर्झाराजांकडून अभयाची क्रियाशपथ घेवून परतले त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १० जून १६६५ रोजी रात्री छावणीस बातमी आली की, 'उद्या म्हणजे दि. ११ जून रोजी सकाळी महाराज मिर्झाराजांच्या छावणीत दाखल होतील. मिर्झाराजांच्या शिरावरील तणाव अधिक वाढला.
वाटाघाटीतून जर काही निष्पन्न व्हावयाचे असेल तर महाराजांवर जेणेकरून विलक्षण मानसिक दडपण येईल असा डावपेच योजणे आवश्यक होते. मिर्झाराजे त्या दृष्टीने विचार करू लागले. आणि त्यांना असा उपाय सापडला. उद्या महाराज छावणीत दाखल होतील त्या मुहूर्तावरच किल्ले पुरंदरावर 'सुलतान ढवा' करून उर्वरित पुरंदरावर कब्जा मिळवायचा. आपल्या मराठ्यांची कत्तल होत असलेली स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली म्हणजे 'सीवा' त्वरित शरणागती पत्करेल व आपण म्हणू तसा तह घडवून आणता येईल. मिर्झाराजांना हा विचार आवडला. आपल्या मर्जीनुसार शिवाजीची सपशेल शरणागती त्यांना पाहिजे होती. त्याविना आजवरचे कर्तृत्व फलद्रूप झाले नसते. म्हणूनच महाराजांच्या आगमनाची बातमी कळताच मिर्झाराजांनी दि. १० जूनच्या रात्रीच दिलेरखान व कीरतसिंहाकडे पुरंदर-माचीवर निरोप पाठविला की, 'उद्या सूर्योदय होताच तुम्ही आपले मोर्चे पुढे सरकवा व इशारा होताच बालेकिल्ल्यावर निर्वाणीचा हल्ला चढवा.
मिर्झाराजांचा निरोप दिलेरखानाला पोहोचला. त्याने एल्गाराची तयारी सुरू केली. दि. ११ जून रोजी महाराज पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजांना भेटण्यासाठी येणार असल्याची बार्ता पुरंदरावर मुरारबाजींना होती की नाही हे सांगणारा पुरावा उपलब्ध नाही. परंतु तशी कुणकूण त्यांच्या कानी पडली असल्याचा संभव नाकारता येण्यासारखा नाही. त्यामुळेच बहुधा दिलेरच्या एल्गाराची तयारी पाहून त्याच्याआधी आपणच त्याच्यावर निवडक लोकांनिशी अकस्मात हल्ला चढवून महऱ्हाटी तरवारीची चमक मोगलांना दाखवावी असा विचार मुरारबाजींनी केला. त्यानुसार आपल्या सैन्यातील ७०० शूर मावळे त्यांनी निवडले.
दिलेरखान आणि मुरारबाजी दोघांनीही एल्गाराची तयारी केली. शके १५८७ ची आषाढ शुद्ध नवमी, रविवारचा सूर्य उगवला. (दि. ११ जून १६६५). दिलेरखानाचे मोर्चे ठरल्यानुसार पुढे सरकू लागले. मिर्झाराजांची इशारत पोहोचताच बालेकिल्ल्याच्या सरदरवाजावर सर्व बळानिशी तो तुटून पडणार होता. दिलेरखान इशारतीची वाट पाहू लागला. मोर्चे हळुहळू पुढे सरकत होते.

आणि अकस्मात सरदरवाजातून ढाल-फिरंग हाती घेतलेले मुरारबाजी ७०० मावळ्यांसह विलक्षण आवेशाने मोगलांवर तुटून पडले. ५००० पठाणांवर ७०० मराठ्यांनी झडप घातली. घोरांदर युद्ध सुरू झाले. मराठ्यांनी एकच कापाकाप सुरू केली होती, हां हां म्हणता ५०० पठाण त्यांनी ठार मारले. दिलेरखानासोबतच कीरतसिंहाचेही अनेक सैनिक जखमी झाले. काही मारले गेले. 'मुरारबाजींचा रणावेश तर अतुलनीय होता. अनेक दिवसाची चीड व क्रोधच जणू त्यांच्या समशेरीद्वारा प्रकट होत होता. मोगलांची दाणादाण उडवीत ते थेट दिलेरखानाच्या देवडीच्या रोखाने पुढे सरकू लागले, त्यांची पाठराखण त्यांचे ६० कडवे साथीदार करीत होते,
मुरारबाजींच्या रेट्यामुळे मोगल मागे सरकू लागले. खासा दिलेरखान देवडी सोडून माघारा फिरला. मुरारबाजी व त्याचे साठ मावळे यांना रोखण्यासाठी दिलेरखानाने तोफखाना व तिरंदाज, बरच्या व आडहत्यारी असे १००० लोक त्यांच्यावर पाठविले. बेभान झालेले मुरारबाजी त्यांच्याशी रुद्र-तांडव करू लागले. पण त्यांचे बळ कमी पडत होते, पाहता पाहता मुरारबाजींचे साठही मावळे मारले गेले. आणि हे पाहून मुरारबाजी जास्तच खवळले. प्राणावर उदार होऊन त्यांनी दिलेरखानाशीच टक्कर घेण्याचा निश्चय केला, ढाल फिरंग सावरीत मुरारबाजी दिलेरच्या रोखाने पुढे सरकले.

हजारो शत्रु-सैन्याच्या गराड्यात एकटा बहादूर ढाल तरवार घेऊन झुंजताना दिलेरखानाने पाहिला व तो आश्चर्याने थक्क झाला. असा वीर आपल्याकडे असावा असे त्याला वाटले असल्यास नवल कोणते? त्यामुळेच मोहात पडून त्याने मुरारबाजीचे 'मर्दाना शिपाई' म्हणून कौतुक केले व 'कौल माग म्हणजे तुला नावाजतो' असे प्रलोभनही दाखविले. बिचारा दिलेरखान ! मुरारबाजींच्या रूपात त्याने 'मर्दाना शिपाई' तेवढाच पाहिला. हा मर्दाना शिपाई पोटभरू शिपाई नसून तो महाराजांनी घडविलेला महाराजांचा शिपाई आहे हे त्याला आकळले नाही. म्हणूनच त्याने कौलाचे प्रलोभन दाखविले. परंतु हे प्रलोभनाचे शब्द मुरारबाजींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरले. ते ताडकन् उत्तरले, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय?"
आणि त्वरेने तरवार उगारून ते दिलेरखानाच्या रोखाने पुढे सरकले, दिलेरखान सावध होता. त्याने आपला तीर-कमठा ताणला आणि मुरारबाजींना 'तीर मारून पुरा केला. मुरारबाजी धारातीर्थी पडले. दिलेरखानाने तोंडात अंगुळी घातली की, असा शिपाई खुदाने पैदा केला !
मुरारबाजींसोबत ३०० मावळेही ठार झाले. खासा सरदार पडला तरी मराठ्यांचे मनोधैर्य तिळमात्रही कमी झाले नाही. उर्वरित ४०० मावळे माघारे गडावर गेले व तेथून त्यांनी दिलेरखानाशी पुन्हा जिद्दीने झुंज मांडली. मराठे म्हणत होते, 'एक मुरारबाजी पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर आहोत. ऐसी हिंमत धरून भांडतो'.

मुरारबाजींच्या पराक्रमाने मोगल हबकून गेले होते तर मराठ्यांचा रणावेश विलक्षण वाढला होता. त्यामुळे आपल्या फौजेला उत्तेजन देण्यासाठी दिलेरखानाने शिरावरली पगडी काढून ठेवली व गड घेईन तेव्हाच पगडी बांधेन' अशी प्रतिज्ञा केली.
दिलेरखान पुन्हा सरदरवाजावर तुटून पडला. पुरंदर घेण्याची त्याला घाई झाली होती. महाराज तळाशी मिर्झाराजांच्या छावणीत येण्यापूर्वी गडावर मोगली निशाण फडकविण्यासाठी तो जीवाचा आटापिटा करू लागला. मराठेही पावलागणिक त्याला कडवा प्रतिकार करू लागले.
अखेर सरदरवाजाही पडला. मराठे आता बिनीचा दरवाजा झुंजवू लागले. यावेळी सकाळचे सुमारे ९ वाजले असावेत. मिर्झाराजे लढाईचे वृत्त वारंवार विचारीत होते. तेवढ्यात बातमीदारांनी बातमी आणली की, 'महाराज शिवापूरला येऊन तेथून मोगली ठाणेदार सर्फराजखानासह मुलाखतीस येत आहेत."
यावेळी सकाळचा पहिला प्रहर उलटून गेला होता. (सकाळी १० चा सुमार) बातमीदारापाठोपाठ महाराजांचे वकील रघुनाथपंतही दाखल झाले. त्यांनी मिर्झाराजांना कळविले की, 'महाराज ठरलेल्या शर्तीनुसार आपल्या भेटीस आले आहेत. सोबत फक्त ६ ब्राह्मण मुत्सद्दी व पालखीचे कहार (भोई) तेवढेच आहेत.
महाराजांची पालखी छावणीपासून काही अंतरावर उभी होती. मिर्झाराजांनी उदयराज मुन्शी व उग्रसेन कछवाह या दोघांना सामोरे पाठविले. त्यांच्यासोबत महाराजांसाठी निरोपही पाठविला की, 'जर सर्व किल्ले आमच्या ताब्यात देण्याची तयारी असेल तरच त्यांनी पुढे यावे अन्यथा ते तेथूनच परत जाऊ शकतात.'
मिर्झाराजांचा निरोप ऐकून महाराज उत्तरले की, 'मी आता मोगलांची चाकरी पत्करली असल्याने माझे अनेक किल्ले मोगली साम्राज्यात देण्यास तयार आहे.'
महाराजांनी किल्ले देण्याची तयारी दर्शविल्यामुळे मिर्झाराजांच्या आज्ञेनुसार उदयराज मुन्शी व उग्रसेन कछवाह महाराजांना मिर्झाराजांकडे आणू लागले. महाराजांनी विश्वासघात करू नये म्हणून काही हत्यारी राजपूत मिर्झाराजांनी त्यांच्यासोबत पाठविले होते. महाराजांची पालखी बादशाही सैन्यामधून मिर्झाराजांच्या डेऱ्याकडे येऊ लागली तशी त्यांना पाहण्यासाठी चहुबाजूंनी माणसांनी गर्दी केली.
महाराज डेऱ्याजवळ आलेले पाहून मिर्झाराजांनी आपला लष्कराचा बक्षी जानी बेग याला महाराजांना आत आणण्यासाठी पाठविले. पालखीतून उतरून जानी बेग सोबत महाराज मिर्झाराजांच्या डेऱ्यात आले. मिर्झाराजे आपल्या बैठकीत जागेवर उभे झाले. दरबारी रिवाजानुसार आलिंगनपूर्वक भेट घेण्यासाठी महाराज पुढे आले. महाराज निःशस्त्र होते ! निःशंक होते ! मिर्झाराजांनीही आलिंगनपूर्वक महाराजांची भेट घेतली व महाराजांना आपल्या जवळच बसविले. तेथून पुरंदरावर चालू असलेले भीषण रणकंदन दिसत होते.
महाराजांना आपल्याजवळ बसविण्यात धूर्त मिर्झाराजांचा असा हेतू होता की, ते भीषण रणकंदन महाराजांना दिसावे आणि त्यांच्या मनावर अपेक्षित तो परिणाम व्हावा. मिर्झाराजांचा हा उद्देश सफल झाला. महाराजांचे लक्ष पुरंदराकडे गेले. तोफा- बंदुकांच्या आगीचे लोळ महाराजांना बसल्या जागेवरूनही दिसत होते. युद्धाची धुमश्चक्री सुरू होती. आपल्या माणसांच्या संभाव्य प्राणहानीच्या कल्पनेने महाराज कळवळले. त्यांनी पुरंदराचा ताबा मिर्झाराजांना ताबडतोब देण्याचे कबूल केले. त्यावर मिर्झाराजे छद्मीपणाने उत्तरले की, 'पुरंदर तर आमच्या शाही बहादूर सैनिकांनी जवळ जवळ जिंकलाच आहे. थोड्याच वेळात गडावरील शत्रूना ते कापून काढतील, तुम्हाला बादशाहाला नजराणा द्यायचाच असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ आणखी बरेच किल्ले आहेत!'
मिर्झाराजांच्या मागणीस अनुकूलता दर्शवून महाराजांनी पुन्हा पुरंदरावरील आपल्या लोकांचे प्राण वाचविण्याची कळकळीची विनंती मिर्झाराजांना केली. मिर्झाराजांनी ती लगेच मान्य केली व गाझीबेगसोबत दिलेरखान व कीरतसिंहाकडे निरोप पाठविला की, 'सीवा सुदैवाने रस्त्यावर आल्याकारणाने गडावरील त्याच्या लोकांना अमान (अभय) दिले आहे. त्यास आता त्रास देऊ नये. म्हणजे ते गडाबाहेर येतील व आपले लोक आत जाऊन किल्ला ताब्यात घेतील.
गाझीबेगसोबत महाराजांनीही आपला माणूस पुरंदरावरील आपल्या गडकऱ्याकडे पाठवून किल्ला मोगलांच्या ताब्यात देण्याची आज्ञा केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी गडकऱ्याने सय्यिद मुहम्मद जवाद याला गडाचा ताबा दिला व महाराजांचे सैन्य जड अंतःकरणाने पुरंदर उतरले.
महाराजांची उतरण्याची व्यवस्था मिर्झाराजांनी आपल्याच दिवाणखान्यात केली होती. भोजनोत्तर तहाची वाटाघाट सुरू झाली, मिर्झाराजांच्या वतीने सुरतसिंह कछवाह व उदयराज मुन्शी महाराजांशी चर्चा करू लागले. मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. मिर्झाराजे एकही गड सोडायला तयार नव्हते. अखेर तडजोड होऊन असे ठरले की, चार लक्ष होन महसूलाचे २३ लहान-मोठे किल्ले महाराजांनी औरंगजेबाला द्यावेत व स्वतःकडे १ लक्ष होन महसूलाचे १२ लहान-मोठे किल्ले-यात महाराजांची राजधानी राजगड होता- ठेवावेत. अर्थात शाही कृपेचा प्रसाद म्हणूनच हा मुलुख महाराजांकडे राहणार असल्याने त्यांनी औरंगजेबाची एकनिष्ठपणे चाकरी करणे तहानुसार आवश्यक होते.
यानंतर महाराजांनी शाही चाकरी करण्यासंबंधी बोलणे सुरू केले. महाराज म्हणाले की, 'माझ्या आजवरच्या अदूरदृष्टीमुळे बादशाहाला तोंड दाखविण्यास मला संकोच वाटतो. म्हणून माझ्या पुत्रास शाही चाकरीसाठी मी पाठवतो. त्याला पंचहजारी मनसब मिळावी. मजसारख्या पाप्यास मनसबदारी व शाही चाकरीतून वगळावे. यापुढे जिवंत असेतोबर मी बादशाही हुकुमांची अवज्ञा करणार नाही. दख्खनेतील स्वाऱ्यांमध्ये माझ्यावर सोपविलेली कोणतीही कामगिरी मी योग्य तन्हेने पार पाडीन.'

महाराजांनी आणखी एक इच्छा व्यक्त केली की, '४ लक्ष होन वसुलीचा विजापुरी तळकोकणचा मुलुख माझ्याकडे आहे. याशिवाय ९ लक्ष होन बसुलाचे आणखी काही बालाघाटी महाल बादशाहाने माझ्या सुपूर्द करावेत व त्यादृष्टीने एक शाही फर्मान मला देण्यात यावे. त्यात असे नमूद केलेले असावे की, जेव्हा केव्हा विजापूरवर शाही आक्रमण होईल तेव्हा उपरोक्त तालुके शिबाला बहाल करण्यात येतील. असे फर्मान मला मिळाल्यास मी बादशाहाला दरसाल तीन लक्ष होन याप्रमाणे एकूण ४० लक्ष होन खंडणी द्यायला तयार आहे.'. तहाची वाटाघाट तीन दिवस सुरू होती.

सोमवार (दि. १२ जून १६६५) उजाडला. आदल्या रात्री कबूल केल्याप्रमाणे महाराजांनी लगेच ठरलेले किल्ले मोगलांच्या ताब्यात द्यावेत असा लकडा मिर्झाराजांनी त्यांच्यामागे लावला. त्यानुसार महाराजांनी आपला एक माणूस रोहिडा किल्ल्यावर पाठविला. किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी मिर्झाराजांनी इंद्रमण बुंदेल्यास रवाना केले.

महाराजांनी दुसरा माणूस लोहगड, विसापूरगड, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांचा ताबा देण्यासाठी रवाना केला. हे किल्ले कुबादखान व हलालखान यांनी ताब्यात घ्यावेत असे मिर्झाराजांनी फर्मावले, कोंडाणा किल्ला खासे महाराज राजगडला परत जाताना कीरतसिंहाच्या हवाली करणार होते. उर्वरित किल्लेही त्यानंतर लवकरच मिर्झाराजांच्या सुपूर्द करायचे ठरले.

बहुधा सोमवारी रात्रीच महाराजांची व इटालियन तरूण प्रवासी मनुची यांची भेट झाली असावी. मनुची हा मिर्झाराजांसोबत या मोहिमेवर आलेला होता. कधी कधी मिर्झाराजांच्या इच्छेखातर तो त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी वा पत्ते खेळण्यासाठी जाई. मनुचीला हिंदुस्थानी व पर्शियन भाषा चांगल्या बोलता येत. असाच त्या दिवशीही मनुची, मिर्झाराजे व त्यांचा एक ब्राह्मण कारभारी यांच्यासोबत पत्ते खेळत असताना अकस्मात महाराज तिथे आले. महाराजांना पाहताच तिघेही आदराने उठून उभे राहिले. मनुचीला महाराजांनी यापूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. त्यामुळे एक अपरिचित सुदृढ बांध्याचा विदेशी तरूण पाहताच महाराजांनी स्वाभाविकच मिर्झाराजांना विचारले की, 'हे कोणत्या देशाचे राजे आहेत?'
'हे फिरंगी राजे आहेत' असे उत्तर मिर्झाराजांनी दिले तेव्हा महाराजांना आश्चर्य वाटले. ते उद्गारले, 'माझ्या सैन्यात अनेक फिरंगी आहेत पण असा रुबाब माझ्या पाहण्यात नाही.' मिर्झाराजांनीही मनुचीचे कौतुक केले. तेव्हा मनुचीने गुडघ्यावर बसून दोघांनाही आदराने मुजरे केले."
यानंतर मनुची व महाराज या मुक्कामात बरेच वेळा भेटले. महाराजांनाही फार्सी, हिंदुस्थानी भाषा अवगत होत्याच. त्यामुळे दोघांचे संभाषण रंगू लागले. मनुचीकडून महाराजांना युरोपियन राजांविषयी माहिती मिळाली. महाराजांची समजूत अशी की, पोर्तुगालच्या राजाच्या बरोबरीचा राजा युरोपात दुसरा कोणी नसावा । ख्रिश्चन धर्मासंबंधीही मनुचीने महाराजांसोबत चर्चा केली. मात्र या चर्चेचा तपशील त्याने दिलेला नाही. महाराजांच्या आदबशीर वागणुकीमुळे मिर्झाराजांच्या मनात नकळत प्रेमभावना उत्पन्न झाली. महाराजांना ते मनापासून पुत्रवत मानू लागले
सोमवार उलटला. मंगळवार (दि. १३ जून १६६५) उजाडला. आपल्याला वगळून मिर्झाराजांनी तहाची वाटाघाट आरंभिली, विशेषतः पुरंदर-यशाचे श्रेय मिळू दिले नाही हे पाहून दिलेरखान चिडून गेला होता. त्यामुळे महाराजांनाच त्याच्या भेटीस पाठवून त्याला मोठेपणा द्यावा असा धूर्त विचार मिर्झाराजांनी केला व महाराजांना म्हटले की 'दिलेरखान फार्मिदा ( जाणता) आहे. बादशाहाचे मेहेरबानीचा आहे. त्यास मुजरा हाती करून लागतो. तुम्हीच दिलेरखानाच्या भेटीस जावे लागते. आपण राजपूत आप्तविषयी तुम्हाबरोबरी देतो. ते तुमची भेट करून आणतील. फिकीर न करावी.
महाराज लगेच उत्तरले, 'मी शिवाजी आहे. दिलेरखानाचा गुमान धरितो की काय? तुमच्या आज्ञेने जातो, भेटतो'. मिर्झाराजांनी महाराजांसाठी हत्तीची व्यवस्था केली. सोबत राजा रायसिंहालाही दिले. महाराजांचा हत्ती पुरंदर-माची चढू लागला.
महाराज भेटीस येत असल्याची वार्ता दिलेरखानास पोहोचली. त्याचा मुक्काम सरदरवाजाच्या पायथ्याशी माचीवर होता. 'महाराज येत असल्याचे कळोन दिलेरखान मनात जळला, मनगटे चाविली की, पुरंदर किल्ल्याचे यश आपणास आले नाही ! म्हणून श्रमी होऊन पुढे सामोरा येऊन रागे रागे राजियांसी जोराने आवळोन धरोन घडीभर भेटला! आलिंगन-सोहळा संपताच दोघेही लोडाजवळ बसले. औपचारिक गप्पा गोष्टी झाल्या. दिलेरखानाचा क्रोध काहीसा मावळला. तो म्हणाला, 'तुम्ही मिळोन मिरजा राजियांजवळ जाणे. ते वडील आहेत. ते करतील त्यात आपण आहो. यानंतर मात्र दिलेरने महाराजांचे मोकळ्या मनाने स्वागत केले. जाताना त्यांना दोन घोडे, एक समशेर, एक जमदाढ आणि दोन तकूझ भेटीदाखल दिले. एक घोडा अरबी व सोन्याचा साज चढविलेला होता. निरोपाचे विडे देऊन दिलेरखानाने महाराजांची परत मिर्झाराजांकडे पाठवणी केली. दिलेरखानाच्या मनातील किल्मिष निघून गेल्यामुळे त्याच दिवशी म्हणजे मंगळवार दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला. त्यानुसार
(१) महाराजांकडे लहान-मोठे १२ किल्ले, त्यातील १ लाख होन (५ लाख रुपये) बसुलासह, शाही कृपेचे प्रतीक म्हणून ठेवण्यात येतील, यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये.
(२) दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.
(३) शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरास सदैव दख्खनच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.
(४) विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशाहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशाहाला द्यावी.
(५) तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा. २४ हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिद्ध तह !
मात्र शाही फर्मानाशिवाय तहाला अधिकृत मान्यता प्राप्त होऊ शकत नव्हती. पण शाही मंजुरी येण्यास वेळ लागला असता आणि दिलेला शब्द मोडून तेवढा वेळ महाराजांना छावणीत थांबवून घ्यायचे तर मिर्झाराजांना दुहेरी पेच पडला होता. पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे मिर्झाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून जे पाळेगार, नायक त्यांना सामील झाले होते त्यांचा मिर्झाराजांवरील विश्वास उडून गेला असता व ते मिर्झाराजांच्या दृष्टीने सोयीचे नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मिर्झाराजांना आपल्या विश्वासू हेरांकरवी पक्की बातमी कळलेली होती की, राजगड सोडताना महाराजांनी आपल्या किल्ल्यांचा व मुलुखाचा कडेकोट बंदोबस्त करून ठेवलेला होता व आपण मिर्झाराजांकडून लवकर परत न आल्यास मृत्यू पावलो असे समजून आपल्या अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी स्वराज्याचे सर्वतोपरी रक्षण करावे अशी सक्त ताकीद दिलेली होती.
या दुहेरी पेचामुळे व महाराज जाण्याची घाई करीत होते म्हणून मिर्झा राजांनी स्वतःच्या जबाबदारीवर महाराजांशी तह करून त्यांना रजा देण्याचे ठरविले. अधिकृत फर्मान येईपर्यंत तहाचा तपशील महाराजांनी व मिर्झाराजांनी गुप्तच ठेवलेला दिसतो. मिर्झाराजांना औरंगजेबाविषयी दुर्दम्य विश्वास वाटत होता. म्हणूनच त्यांनी औरंगजेबाला लिहिले की, 'तुम्ही शिवाजीला जे फर्मान पाठवाल त्यात स्पष्टपणे नमूद केले जावे की, मिर्झाराजा जयसिंहाने शिवाजीला दिलेल्या वचनास व त्याचेशी केलेल्या करारास बादशाहाची पूर्ण मान्यता आहे आणि शिवाने ठरल्यानुसार किल्ल्यांचा ताबा दिल्यावर व मिर्झाराजांचे तसे पत्र आल्यानंतरच तहाची कलमे नमूद केलेले सविस्तर फर्मान पाठविले जाईल,
मनाजोगता तह घडून आल्याबद्दल मिर्झाराजांनी विजयाचे चौघडे वाजविण्याची आज्ञा केली. महाराजांच्या वतीने मिर्झाराजांनी उदयराज मुन्शीकडून फार्सी भाषेत औरंगजेबाला उद्देशून शरणागतीचे व कृपायाचनेचे एक पत्रही लिहवून घेतले. शाही फर्मान पाठवून बादशाहाने झालेल्या तहास मान्यता द्यावी अशी त्यात विनंती केली होती. २९ पत्रावर महाराजांनी शिक्का उमटविला. मिर्झाराजांनीच ते पत्र मग महाराजांच्या वतीने औरंगजेबाकडे रवाना केले, सर्व उपचार संपले, महाराजांनी छावणी सोडण्यासाठी मिर्झाराजांची अनुज्ञा मागितली. त्याप्रमाणे बुधवार दि. १४ जून रोजी महाराजांना मिर्झाराजांनी निरोप दिला. निरोप देतेसमयी महाराजांना एक हत्ती व दोन घोडे मिर्झाराजांनी नजर केले. शिवाय मानाचा पोषाखही दिला, तेथून महाराज दाऊदखानाच्या डेऱ्यात गेले. तेथे त्यांना निरोपाचे विडे दिल्या गेले. हा समारंभ आटोपताच महाराज कीरतसिंहासह ठरल्यानुसार कोंडाण्याकडे रवाना झाले.
त्याच दिवशी दुपारी महाराज कोंडाण्यास पोहोचले. लगेच त्यांनी गड कीरतसिंहाच्या ताब्यात दिला. सिंहगडाचा नवा किल्लेदार झाला शाहिदखान. सिंहगडावरून महाराज आपल्या लोकांसह त्याच दिवशी राजगडकडे निघाले. उग्रसेन कछवाहही त्यांच्यासोबत राजगडाकडे निघाला. शंभूराजांना मिर्झाराजांकडे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविलेली होती.
दि. १५ जून रोजी महाराज राजगडला पोहोचले. दि. १७ जूनला उग्रसेन शंभूराजांसह सिंहगडाकडे रवाना झाला. सायंकाळी सिंहगडावर पोहोचला व दि. १८ जूनला कीरतसिंह, उग्रसेन व शंभूराजे पुरंदरास मिर्झाराजांच्या छावणीत पोहोचले." यावेळी शंभूराजांचे वय फक्त आठ वर्षांचे होते. शंभूराजांसोबत यावेळी सरनौबत नेताजी पालकरही जयसिंहाकडे आले असावेत. २ शिवाय काही घोडदळ व पायदळही त्यांच्यासोबत आलेले दिसते." शंभूराजांची व्यवस्था महाराज उतरले त्याच ठिकाणी दिवाणखान्याच्या शामियान्यात केली गेली.
लोहगड, शंभूराजे मिर्झाराजांच्या छावणीत पोहोचले, त्याच दिवशी सायंकाळी रोहिडा, विसापूरगड, तुंग तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झाराजांकडे पोहोचली. पुरंदर, वज्रगड व सिंहगडाचाही ताबा मिळाला होताच, लवकरच नळदुर्ग, मार्गगड उर्फ आत्रा, माहुली, भंडार दुर्ग, तुळशीखुल, कोहोज, बसंतगड, मुरंजन, नंगगड, करमाला, खिरदुर्ग, सोनगड व माणगड ह्यांचाही ताबा महाराजांनी मिर्झाराजांना दिला, कोंडाण्याजवळील कंदकडा व रुद्रमाळ या किल्ल्यांच्या किल्ल्याही त्याच सुमारास बादशाहाकडे रवाना करण्यात आल्या.
हे किल्ले ताब्यात येताच मिर्झाराजांनी शंभूराजांची परत पाठवणी केली. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी शंभूराजांना ओलीस म्हणूनच मिर्झाराजांनी छावणीत आणले होते. अखेर मुत्सद्देगिरीत मिर्झाराजे यशस्वी झाले होते. त्यांनी टाकोटाक महाराजांच्या शरणागतीची व पुरंदर-विजयाची बातमी दिल्लीला औरंगजेबाकडे रवाना केली. विशेष म्हणजे मिर्झाराजांनी तहाबर अखेरचा हात फिरविला त्या दिवशी बकरी ईद होती तर औरंगजेबाला ज्या दिवशी 'सिवाच्या शरणागतीची आनंददायक वार्ता' पोहोचली त्या दिवशी म्हणजे दि. २३ जूनला गुलाबी ईद होती । अकरा दिवसात औरंगजेबाला पुरंदरविजयाची व महाराजांच्या शरणागतीची वार्ता पोहोचली. याचाच अर्थ मिर्झाराजांनी ही वार्ता दि. १३ जून रोजी म्हणजे बकरी ईदेच्या एक दिवस आधीच औरंगजेबाकडे रवाना केली. यामागील हेतू उघड होता. तो म्हणजे गुलाबी ईदेच्या शुभ मुहुर्तावर औरंगजेबाला ही बार्ता कळावी !
औरंगजेबाची मर्जी संपादन करण्यासाठी मिर्झाराजांनी या वार्तेसोबतच एक अनोखा नजराणाही बादशाहाला पेश केला. पुरंदर जिंकण्यासाठी शाही खजिन्यातून जो खर्च झाला होता तो सर्व मिर्झाराजांनी आपल्या खाजगी संपत्तीतून बादशहाला नजराणा म्हणून समर्पित केला. पुरंदर विजयासाठी शाही खजिन्यातून तीस हजार रुपये रोख खर्च झाले होते.
महाराजांवरील या महत्वपूर्ण विजयाची वार्ता औरंगजेबाला दिल्लीस कळली तेव्हा त्याने आनंदाने जोरात शहाजणे वाजविण्यास फर्मावले. या विजयाप्रीत्यर्थ बादशाहाने मिर्झाराजांना सप्त हजारी मनसब, मानाचा पोषाख, सुवर्णनक्षीचे काम केलेली एक तरवार व एक हत्ती बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. दिलेरखानास पंचहजारी मिळाली." मिर्झाराजांचा ज्येष्ठ पुत्र कुंवर रामसिंह याचेवरही शाही कृपा झाली. याशिवाय दाऊदखान, राजा रायसिंह, कीरतसिंह, सुजानसिंह बुंदेला, तुर्कताझखान इत्यादी सरदारांचाही औरंगजेबाने यथोचित गौरव केला.
हस्तकांनी लिहिलेली पत्रे (हप्त अंजुमान), शकावल्या व काही प्रमाणात सभासद बखर हीच होत. याशिवाय कॉरम द गार्द्रचे शिवचरित्र, मनुचीचा प्रवासवृत्तांत, इंग्रज, डच व पोर्तुगीजांची थोडी पत्रे यासारखी काही साधनेही सहाय्यभूत ठरतात. या सर्व साधनांचा आधार घेऊनच मिर्झाराजांच्या मोहिमेचा उपरोक्त तपशील आलेला आहे. अर्थातच तपशिलाची संगती जुळविताना जी शंकास्थाने उत्पन्न होतात त्यांची सूत्ररूपाने चर्चा करणे अभ्यासकांसाठी अपरिहार्य कार्य ठरते. पुरंदर-मोहिमेतील पहिले शंकास्थान म्हणजे, दिलेरखान-मिर्झाराजे संबंध कशा प्रकारचे होते?
मराठी बखरकारांच्या मते शिवाजी व जयसिंह दोघेही हिंदू असल्याने काही फितवा करतील या भयाने औरंगजेबाने मुद्दाम दिलेरखानाची रवानगी केली. या पार्श्वभूमीवरच जयसिंह-दिलेरचे प्रारंभापासूनच तणावाचे संबंध बखरकारांनी रंगविलेले आहेत. मनुची, तारिखे दिल्कुशाचा कर्ता भीमसेन सक्सेना, काही परकीय पत्रलेखक यांनीही दोघांच्या मतभेदासंबंधी उल्लेख केले आहेत. या साधनांच्या आधारे मिर्झाराजे हिंदू म्हणून महाराजांना जवळचे होते व दिलेरखान मुसलमान म्हणून शत्रू होता असे गृहित धरून शिवचरित्राचे काही अभ्यासक आपल्या विधानांची बांधणी करताना दिसतात.
परंतु दिलेरखानाची निवड आपला दुय्यम सेनापती म्हणून मिर्झाराजांनीच केलेली होती. दुसरे म्हणजे सभासद लिहितो त्याप्रमाणे, औरंगजेबाने दिलेरखानास मोहिमेवर निघताना अंतःस्थरीत्या तोंडी सल्ला दिला हे विधान चुकीचे ठरते. कारण दिलेरखान त्यावेळी दिल्लीसच नव्हता. तो आपल्या वतनावर गेलेला होता व तेथूनच परस्पर मिर्झाराजांना सामील होणार होता.
वस्तुतः दिलेरखान मिर्झाराजांच्या पूर्ण विश्वासातील होता. यापूर्वीही तो अनेक वेळा मिर्झाराजांचा सहकारी म्हणून कामगिरी करीत असताना दिसतो. अडचणीच्या प्रसंगी मिर्झाराजे परममित्र म्हणून त्याचा सल्ला घेत. याउलट औरंगजेबाचीच त्याच्यावर म्हणावी तेवढी मर्जी नव्हती असे म्हणण्यास भरपूर जागा आहे. कारण खानजहान लोदीच्या बंडामुळे पठाणांवर बादशाही राग झाला होता व पठाणापैकी कुणालाही पंचहजारी मनसब न देण्याचे त्याचे धोरण होते."
प्रत्यक्ष मोहीम सुरू असतानाही दिलेरखानाने जयसिंहाची अवज्ञा केलेली नाही. पुरंदर-स्वारी दोघांच्या मतभेदातून उद्भवली हे सभासदाने ध्वनित केलेले विधानही अनैतिहासिकच म्हणावे लागते. वस्तुस्थिती अशी होती की, मिर्झाराजांनीच सासवडला तळ ठोकण्याचे ठरविले होते. दिलेरखान त्यांची आघाडी सांभाळीत होता. मराठ्यांनी आघाडीवर अकस्मात हल्ला चढविला व त्यातून पुरंदर-वेढा उद्भवला. पुरंदर-वेढ्याला मिर्झाराजांनी हरकत घेतलेली नाही. याचाच अर्थ दोघात बेबनाव नव्हता. मुळात मिर्झाराजे सर्वोच्च अधिकारी होते, तर दिलेरखान दुय्यम होता. मिर्झाराजांनी आपला आब मुळीच गमावला नाही. दिलेरला अवास्तव महत्वही त्यांनी दिलेले नाही. तहाची कलमे त्यांनी स्वतंत्रपणे ठरविली. त्यानंतरच महाराजांना दिलेरला भेटण्यास सांगितले. ही भेट अर्थातच औपचारिक स्वरूपाची होती. या भेटीचे प्रसंगी दिलेरखान नाराज असेलच तर तो केवळ पुरंदर जिंकून घेण्याचे श्रेय आपल्या पदरात पडले नाही याच कारणामुळे, अशी नाराजी सैनिकी वृत्तीच्या दिलेरखानाच्या दृष्टीने स्वाभाविकही होती. शिवाय महाराज दिलेरप्रमाणेच दाऊदखानासही जाऊन भेटले.
सारांश, मिर्झाराजे व दिलेरखान यांच्यामध्ये वैमनस्य होते, दिलेरखान औरंगजेबाच्या विश्वासातील म्हणून मुद्दाम जयसिंहावर नजर ठेवण्यासाठी आलेला होता, त्याला वचकूनच मिर्झाराजे वावरत होते असे म्हणता येत नाही. एखादा मिर्झाराजांना पटणार नाही असा सल्ला दिलेरखानाने दिलाही असेल तरी, तसा सल्ला देण्याइतपत त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते हे विसरून चालणार नाही. पुरंदर-मोहिमेतील दुसरे महत्वपूर्ण शंकास्थान म्हणजे मुरारबाजी देशपांडेंच्या निधनाची तिथी कोणती असावी?
दुर्दैवाने मोगली वृत्तांतात मुरारबाजींचा नामोल्लेखही कुठे आढळत नाही. बखरकारांनी मात्र त्यांच्या तेजस्वी वृत्तीचे, प्रचंड सामर्थ्याचे व महाराजांवरील अलौकिक निष्ठेचे समर्पक वर्णन केलेले आहे. मुरारबाजी ७०० मावळ्यांसह ५००० पठाणांवर तुटून पडले व अखेर दिलेरखानाचा कौल लाथाडून धारातीर्थी पतन पावले या प्रसंगाचे रोचक वर्णन बखरकारांनी दिले असले तरी, हा प्रसंग कधी घडला याबद्दल उल्लेख आढळत नाही. जेधे शकावली, शिवापूर दप्तर यादी व अन्य शकावल्याही याबाबत मौनच पाळताना दिसतात. या तिथीला असलेले ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तिचा शोध घेणे अभ्यासकाचे आवश्यक कार्य आहे. यादृष्टीने श्री. पुरंदरेंनी आपल्या शिवचरित्रात तकनि १६ मे १६६५ ही तिथी नमूद करून या विषयाला मोलाची चालना दिली आहे.
परंतु पुराव्याची छाननी केली असता उपरोक्त तिथीला बळकट आधार कुठे आढळत नाही. कारण किमान २ जूनपर्यंत तरी मोगल पुरंदर माचीवर येऊन थडकलेले नव्हते." स्वाभाविकच तोपर्यंत मुरारबाजींनी निर्वाणीचा हल्ला करण्याची वेळ उद्भवलेली नव्हती. अशी वेळ दि. ११ जून रोजी आली. या दिवशी मुरारबाजींचे धनी प्रत्यक्ष महाराज पुरंदराच्या पायथ्याशी झेंडा फडकविण्याच्या मर्दुमकीला, ईष्येने स्वामीनिष्ठेला येणार होते व त्यांच्या दिलेरखान हे एल्गार करून त्याचे स्वप्न आव्हान धुळीस तरवार होते. परजून त्यामुळे मिळविले असे उपस्थितीतच पुरंदरावर मोगली सिद्ध होता. स्वामीभक्त याच दिवशी त्यांनी म्हणणे तर्कसुसंगत मुरारबाजींच्या दिलेरखानावर होईल. या शिवाय या तिथीला पोषक असा आनुमानिक पुरावा आलमगीरनामा व प्रत्यक्ष मिर्झाराजांच्याच एका पत्राचा देता येईल." मिर्झाराजांचे हे पत्र बारकाईने वाचले तर बखरकारांनी वर्णन केलेल्या मुरारबाजींच्या युद्धाचा तपशील या वर्णनाशी जुळता वाटतो. आलमगीरनाम्यातील साम्यही असेच बोलके आहे. शत्रूचे साठ लोक मारल्याचा त्यात उल्लेख आहे. सभासदानेही 'खासा मुरारबाजी परभु दिलेरखानाच्या देवडीपावेतो साठी माणसांनिशी मारीत शिरले ... साठी लोक पडले' असा उल्लेख केला आहे. १० यावरून आमच्या मते मुरारबाजींचे पतन शके १५८७ च्या आषाढ शुद्ध नवमीला, म्हणजे रविवार दि. ११ जून १६६५ रोजी सकाळी पहिल्या प्रहरी सुमारे ९ वाजता झाले.

मुरारबाजींचे पतन एकाअर्थी आत्मयज्ञच म्हटला पाहिजे. या प्रकरणाचे प्रारंभी वर्णन केल्याप्रमाणे शरणागतीसाठी महाराजांवर जबरदस्त मानसिक दडपण आणून सांगू तसा तह करण्यासाठी त्यांना भाग पाडायचे अशी योजना मिर्झाराजांनी आखली होती. दिलेरखानाने 'सुलतान-ढवा' करून मराठ्यांची वारेमाप कत्तल उडवायची व पुरंदरावरून ओसंडणारे मराठ्यांचे ते रक्त तळावरील छावणीतून महाराजांना दाखवायचे! म्हणजे ते त्वरित शरणागती पत्करतील व स्वराज्यातील म्हणू तेवढे किल्ले आपल्याला तोडून देतील असा मिर्झाराजांचा डाव होता. तो उधळून लावण्यासाठी व महाराजांची मान ताठ राहावी यासाठी मुरारबाजींनी स्वतःच निर्णय घेऊन दिलेरखानाच्या आधी आपणच 'महऱ्हाटी सुलतान-ढवा' करण्याचे ठरविले, मराठ्यांचे रक्त महाराजांनी पाहण्यापूर्वी मोगलांचेच वाहणारे रक्त मिर्झाराजांना दाखवायचे व त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे असा दृढनिर्धार करून मुरारबाजींनी निवडक मराठ्यांसह दिलेरखानावर अकस्मात हल्ला चढवला. मुरारबाजीच्या या आत्मयज्ञामुळेच मिर्झाराजांना जेमतेम २० किल्ल्यांवरच तह करावा लागला !

मुरारबाजींच्या त्या दिवशीच्या निर्वाणामुळे गलबलून गेलेल्या महाराजांनी पुरंदर तडकाफडकी मिर्झाराजांच्या स्वाधीन करणे संभवनीय आहे. त्यादृष्टीने मिर्झाराजांच्या तळावर दाखल झालेले महाराज मिर्झाराजांशी तहाची वाटाघाट करीत असताना अनेक वेळा बाजूला तोंड वळवीत असल्याचा खाफीखानाने केलेला उल्लेख वस्तुस्थितीनिदर्शक व सूचक वाटतो. पुरंदर-पर्वातील तिसरे शंकास्थान म्हणजे महाराजांनी तहात कोणकोणते व एकूण किती किल्ले औरंगजेबाच्या स्वाधीन केलेत? जेधे करिणा व सभासद बखर २७ किल्ले दिल्याचे नमूद करतात. पेशवेकालीन एका नोंदीतही २७ किल्ल्यांचाच उल्लेख आहे. ५२ तारीखे दिल्कुशाचा कर्ता भीमसेन २४ तर आलमगीरनामा, मआसिर-इ-आलमगिरी, मुन्तखबुललुबाब हे ग्रंथ २३ किल्ले दिल्याचे नोंदवतात. स्वतः मिर्झाराजांनी औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रातही २३ किल्ल्यांचीच नोंद आहे.
या उलट औरंगजेबाकडून महाराजांकडे आलेल्या फर्मानात २० किल्ल्यांची नोंद आहे. कॉस्म द गार्द्र हा लेखकही २० किल्ल्यांचाच उल्लेख करतो. ग्रँट डफनेही २० किल्ले दिल्याचे म्हटले आहे. यापैकी विश्वसनीय साधनांचा विचार केला तर त्यात मिर्झाराजांचे पत्र व औरंगजेबाचे फर्मान यांनाच महत्व द्यावे लागेल. पण त्या दोहोंत मेळ नाही. मिर्झाराजांच्या म्हणण्यानुसार २३ तर औरंगजेबाच्या फर्मानानुसार २० किल्ले महाराजांनी दिल्याचे कळते.
मिर्झाराजांनी २३ गडांची नावे दिली असून ते आपल्या ताब्यात आल्याचेही कळविलेले आहे. त्यांनी दिलेली नावे अशी-
(१) पुरंदर (२) रोहिडा (३) तुंग (४) तिकोना (५) विसापूर (६) लोहगड (७) नळदुर्ग (८) रुद्रमाळ (९) खइगड (अंकोला?) (१०) मार्गगड उर्फ अत्रागड (११) माहुली (१२) भंडारदुर्ग (१३) तुळशीखोल (पलाशगड) (१४) कोहज (१५) वसंतगड (१६) मुरंजन (राजमाची) (१७) नंगगड (१) (१८) कर्नाळा (१९) खिरदुर्ग (खेडदुर्ग) (२०) सोनगड (२१) माणगड (२२) सिंहगड आणि (२३) खंदकडा. पत्रात रुद्रमाळचा दोन वेळा उल्लेख आहे तो चुकून असावा. (आलमगीरनाम्यात कोहज, नंगगड, कर्नाळा, खिरदुर्ग यांच्याऐवजी माणिकगड, रूपगड, सरूपगड, साकरगड अशी चार नावे दिलेली आढळतात.)
सारांश, मिर्झाराजांनी २३ किल्ल्यांचा उल्लेख केला असताना औरंगजेबाने मात्र महाराजांनी वीसच गड दिल्याचे म्हटले आहे. औरंगजेबाच्या विधानाला अतिशय महत्व आहे. कारण ते विधान 'हस्त पंजराचा' शिक्का उमटविलेल्या अधिकृत शाही फर्मानात आहे.
उमेर पार्वता निर्णय तइमेल, असेही त्यांनी पारिक संवाद आहे केला
मग मिर्झाराजे व औरंगजेब यांनी नमूद केलेल्या संख्यांचा मेळ कसा बसवायचा? रुद्रमाळ मिर्झाराजांनी जिंकून घेतला असल्याने तो तहात देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, एकापरीने तहातील किल्ल्यांच्या हिशेबात तो घेणे ही मिर्झाराजांची चूकच होती. तीच गोष्ट पुरंदरची. तोही किल्ला शाही फौजांनी जवळ जवळ जिंकलेला असताना - तेही मिर्झाराजांनी कळविल्यावरून तो महाराजांनी तहात ठरलेल्या किल्ल्यांच्या यादीत टाकणे औरंगजेबाला मान्य नसावे. औरंगजेब दक्षिणेचा पूर्ण माहीतगार होता. एवढेच नव्हे तर भूगोलाचे त्याचे ज्ञान विलक्षण सूक्ष्म होते. त्यामुळे खंदकडा हा सिंहगडाचाच पूर्वेकडील एक भाग आहे हे त्याच्या लक्षात आले नसेल असे म्हणता येत नाही. तोही त्याने स्वतंत्र किल्ला गणला नसावा. त्यामुळेच कायदेशीर शाही फर्मानात २० किल्ल्यांचा उल्लेख करून धूर्तपणे त्याने किल्ल्यांची यादी देण्याचे टाळले ! सर्व किल्ल्यांचा ताबा अगोदरच मिळाला असल्याने त्या किल्ल्यांचा नामोल्लेख टाळण्यात त्याचे काहीच बिघडत नव्हते !
शिवाजीराजांचे मिर्झाराजा जयसिंग यांना पत्र
कुमार छत्रसाल याच्यावर तो कशा प्रकारची आपत्ती आणू पहात होता, हे तू जाणतोस. या खेरीज इतर हिंदुलोकांवर या दुष्टाच्या हाताने काय काय अनर्थ झाले आहेत हेही तुला माहिती आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा वा भावांचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब सांगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस त्याचे स्मरण कर. जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मर्दपणाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणाऱ्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही, कारण हिंदूलोकांवर या वेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे, आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेले तर आम्हां हिंदुलोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर रहाणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हा बरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो; चेहऱ्यावर कसे बसे रंग आणतो, आमच्याच पायात आमचीच बेदी अडकवतो वा आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापतो ते लक्षात घ्या. आम्ही लोकांनी या वेळेला हिंदू, हिंदुस्थान वा हिंदुधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तरवारीस पाणी देऊन ( जशास तसे या न्यायाने ) मारवाडचा तुर्काचा जवाब तुर्कीतच दिला पाहिजे. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंग व मेवाडचा राजा राजसिंग यांच्याशी ऐक्य करतील तर फार मोठे काम होईल अशी आशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून काढा म्हणजे काही काळ पर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात त्याचे जाळे पसरता येणार नाही. तेवढ्यात मी वा माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोनहि बादशाहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारींचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिण देशांच्या पटावरून इस्लामाचे नांव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्या नंतर कार्यदक्ष वीर आणि मला चालवणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा वा कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशांतील पहाडांतून बाहेर पडून मैदानात येईन आणि अत्यंत जलद गतीने तुम्हा लोकांच्या सेवेत हजार होईन वा तुम्हांस हिशेब विचारीन. चोहींकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोकं आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्यांच्या जर्जर झालेल्या घरात पोहोचवू, म्हणजे त्यांच्या नावाचे औरंगहि रहाणार नाही व जेबहि रहाणार नाही. तसेच त्यांची तलवार राहणार नाही आणि कपाटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही कठीण नाही. फक्त हृदय व डोळे आणि हात याची आवश्यकता आहे. दोन अंत:करणे एक होतील तर पहाड तोडता येतील वा मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठिकऱ्या उडवता येतील. या विषयासमंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्रां लिहिणे सयुक्तिक नव्हे. तू म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन; माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देशाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही. अफजलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षात आणून तू शंकीत होऊ नको. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता, तर या वेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते. मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्या माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आले,तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन. शाहिस्तेखानाच्या खिशांतून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन. तुझ्या डोळ्यांवर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा खरा फलादेश करून नंतर तुझा जवाब घेईन. जर या पत्राचे उत्तर माझ्या मनाजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे आणि तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकालात लपविल तेव्हा माझा अर्धचंद्र म्यानातून बाहेर पडेल.. बस्स... कल्याण असो...

शेवटचे शंकास्थान, महाराजांनी मिर्झाराजांना पाठविलेल्या प्रदीर्घ कथित फार्सी पत्राबद्दलचे आहे.हे पत्र बनावट असावे असे अभ्यासक मानतात. अशी बनावट पत्रे हितशत्रूकडून त्याकाळी मुद्दाम तयार केली जात. राजकारणी डावपेचाचा तो एक भाग असे. उल्लेखित पत्र बनावट असावे असा तर्क करण्याची कारणे-
(१) उल्लेखित पत्रात महाराजांनी जयसिंहाला प्रणामाबरोबरच माझा आशीर्वादही स्वीकार कर असे म्हटले आहे.
(२) अफझलखान मोगलांचा सरदार होता असे पत्रावरून ध्वनित होते. महाराजांनी लिहिलेल्या पत्रात ही चूक संभवणार नाही.
(३) 'अफझलखानाने बाराशे हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते?' असा मजकूर महाराजांनी लिहिल्याचे पत्रावरून लक्षात येते. हा उल्लेख सरळ सरळ बनावट आहे.
(४) 'शाइस्तेखानाच्या खिशातून मी पत्र काढून घेतले आहे' असेही या पत्रात महाराज लिहितात । या विधानालाही काहीच आधार नाही. हाही उल्लेख उघड उघड बनावट आहे.
(५) छत्रसालासंबंधीचा उल्लेख उत्तरकालीन वाटतो.
या कारणांवरून हे पत्र शंकास्पद वाटते व त्यामुळेच शिवचरित्रासाठी अग्राह्य साधन म्हणून आम्ही ते बाजूला ठेवलेले आहे असो.
पुरंदर-तहानुसार महाराजांकडे राहिलेले बारा किल्ले असे-
(१) राजगड (२) तोरणा (३) रायगड (४) लिंगाणा (५) महाडगड (की महानगड?) (६) पाली (सरसगड) (७) घोसाळा (वीरगड) (८) अशेरी (९) पालगड १०) भोरप (सुधागड) (११) कुंवारीगड (१२) उदयदुर्ग (विजयदुर्ग?).
( पुरंदरचा तह म्हणजे एक प्रकारे महाराजांच्या यावेळच्या पराभवाचे प्रतीकच समजले पाहिजे. मिर्झाराजांनी त्यांची सर्व बाजूंनी पूर्णपणे कोंडी केलेली होती. वज्रगड- पुरंदरानंतर मिर्झाराजे व दिलेरखानाचा रोख उघडच राजगड व कोंडाण्यावर होता. पोर्तुगीज व आदिलशाहा जरी वरवर महाराजांना अनुकूल दिसत असले तरी, त्यांचा भरवसा मुळीच मानता येत नव्हता. इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी तसेच झाले होते. सुमारे ३० वर्षांपूर्वी (इ.स. १६३६ साली) शहाजीराजांची मोगलांनी अशीच कोंडी केली होती. त्यावेळी शहाजीराजांनाही विजापूरकर व पोर्तुगीज प्रारंभी अनुकूल होते. पण मोगलांनी शहाजीराजांना कोंडीत पकडताच या त्यांच्या तथाकथित मित्रापैकी एकानेही त्यांना साथ दिली नव्हती. त्यावेळी आपले कुटुंब वाचविण्यासाठी त्यांना एका परीने याचनाच करावी लागली व अखेर पंचहजारी आदिलशाही सरदार म्हणून मानहानी पत्करून महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात हद्दपार व्हावे लागले होते. महाराजांच्या नजरेसमोर हा ताजा इतिहास नव्हता असे कसे म्हणता येईल? त्यामुळेच, मिर्झाराजांच्या धर्म भावनांना आवाहन करून त्यांची जमेल तेवढी सहानुभूती प्राप्त करून घ्यायची व त्यांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त होणारे नुकसान व अपमानास्पद जीवन जगणे टाळायचे असे धोरण महाराजांनी स्वीकारले. मिर्झाराजेही मुत्सद्देगिरीत तिळमात्र कमी नव्हते. महाराजांची अगतिक मनःस्थिती व त्यांचा होत असलेला कोंडमारा त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. त्यामुळे प्रथम जास्तीत जास्त ताणून धरावे व तुटण्याची वेळ येताच जास्तीत जास्त लाभाची आकांक्षा बाळगून तहाची वाटाघाट आरंभावी हे धोरण त्यांनी स्वीकारले. पुरंदर-युद्धाचे विलक्षण मानसिक दडपण मनावर असतानाच महाराजांना त्यांनी वाटाघाट सुरू करायला भाग पाडले. मिर्झाराजांच्या मुत्सद्देगिरीची कमाल म्हणजे एकीकडे महाराजांच्या अगतिकतेचा पुरेपूर फायदा उचलून त्यांनी दुसरीकडे बादशाहाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आपण वचनाचे पक्के असून तुमचे खरेखुरे हितचिंतक आहोत हे महाराजांच्याही मनावर पक्के बिंबवले. मिर्झाराजांनी मिळविलेल्या (ते) बीस किल्ल्यांचे भौगोलिक स्थान लक्षात घेतले तर त्यांनी महाराजांचे स्वराज्य स्वराज्यातील जवळजवळ ३/४ कसे पक्के मुलुखाचा आवळले लचका होते हे सहज त्यांनी तहाद्वारे लक्षात तोडून येईल, घेतला.
विजापुरी तळकोकणातील व बालाघाटपैकी ९ लक्ष होनांचा मुलुख ४० लक्ष होन खंडणीच्या मोबदल्यात महाराजांना देण्याची तयारी दर्शवून मिर्झाराजांनी औरंगजेबाचेच हित साधले. कारण असे केल्याने (१) औरंगजेबाला १३ वर्षात २ कोटी रुपये सहजासहजी मिळणार होते. (२) शिवाजी व विजापूरकर यांची मैत्री पार दुभंगून मोगलांचा धोका नष्ट झाला असता. (३) हा डोंगराळ व अरण्यमय प्रदेश महाराजांनाच परस्पर विजापूरकरांकडून जिंकून घ्यावयाचा असल्याने मोगली कष्ट, पैसा सर्वच वाचणार होते व (४) संभाजीने मोगली पंचहजारी स्वीकारली पाहिजे अशी अट असल्याने किमान १३ वर्षे (म्हणजे पूर्ण खंडणी वसूल होईपर्यंत) महाराजांचा पुत्र एक प्रकारे ओलीस राहणार होता व अप्रत्यक्षपणे या मुलुखावर मोगलांचाच ताबा राहणार होता.
अशा रीतीने औरंगजेबाचा फायदा करून देऊन त्याची मर्जी संपादन करतानाच धूर्त मिर्झाराजांनी महाराजांचेही आपण हितचिंतक आहोत हे दाखविण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला. तह करताना त्यांनी महाराजांकडे राजगड, रायगड व जावळीचा मुलुख कायम राखला, त्यामुळे निदानपक्षी विजापूरकरांपासून आपले संरक्षण महाराज करू शकत होते.
दुसरी महत्वाची गोष्ट मिर्झाराजांनी केली ती म्हणजे, बादशाहाला आवडणार नाही हे माहीत असूनही त्यांनी तह होताच महाराजांना परत जाऊ दिले. शिवाय आपल्याऐवजी शंभूराजांना मोगली मनसबदारी देण्यात यावी ही महाराजांची मागणी मान्य करून महाराजांचे 'स्वतंत्र व्यक्तिमत्व' जोपासण्याचेही एकपरीने त्यांनी मान्य केले. (अर्थात हे करताना प्रति-शिवाजी नेताजी पालकरांना मात्र त्यांनी धूर्तपणे बांधून घेतले.) पुरंदर तहाच्या कलमांची वाटाघाट करताना महाराजांची मुत्सद्देगिरीही नजरेत भरल्याविना राहत नाही. मिर्झाराजे हे प्रारंभी विजयी आक्रमकाच्या भूमिकेतून वावरत होते तर महाराज शरणागती पत्करलेला शत्रू या भूमिकेत होते. आपली सर्वतोपरी कोंडी झालेली आहे ह्याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळेच आपल्या वागणुकीची छाप मिर्झाराजांवर पाडून आपला जास्तीतजास्त आब राखला जाईल एवढेच त्यांना पाहायचे होते. बाटाघाटीत महाराजांची मुत्सद्देगिरी काही ठिकाणी ठळकपणे नजरेत भरते.
नुकत्याच केलेल्या सुरत-लुटीच्या भरपाईबद्दल तहात एकही कलम नाही. महाराजांनी औरंगजेबाला प्रत्यक्ष भेटण्याबद्दल तहात उल्लेख नाही. मिर्झाराजे व महाराज यांनी ठरविलेल्या करारावर औरंगजेबाचे अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याशिवाय या तहाला व्यवहारात अर्थ नव्हता. त्यामुळे अशा 'पंज्याच्या शाही फर्मानाशिवाय' महाराजांनी किल्ले मिर्झाराजांच्या ताब्यात देणे हे, औरंगजेबाची पाताळयंत्री वृत्ती लक्षात घेता, एक प्रकारे धोका पत्करण्यासारखेच होते. पण महाराजांनी तो पत्करून आपल्याकडून तहाची अंमलबजावणी त्वरित करून टाकली. यात तर त्यांच्या मुत्सद्देगिरीची कमाल समजली पाहिजे. तहाची कलमे ठरविताना मिर्झाराजांकडे ते शाही सर्वोच्च अधिकारी या नात्याने पाहत होते, तर तहाची अंमलबजावणी करताना 'वैधानिकता' बाजूस सारून त्यांनी मिर्झाराजांना किल्ले देऊन टाकले आणि या शाही अधिकाऱ्यास नकळत आपला 'मध्यस्थ' करून टाकले ।
'तुम्ही म्हणाल ते ऐकतो. कारण तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, औरंगजेबावर नाही' असे समर्पणाचे धोरण महाराजांनी अवलंबिले. मिर्झाराजे या मोहक मोठेपणास बळी पडले. शत्रू-सेनापतीला आपला मध्यस्थ व पालक करून घेऊन महाराजांनी जणू संकटकाळी आत्मसंरक्षणार्थ 'कवच'च प्राप्त करून घेतले होते !
पहिले म्हणजे जयसिगानी पाठवलेल्या एका महत्त्वाच्या बाबीची बादशहाने नांद घेतली आहे. दक्षिणेमध्ये दहा हजारांची शिबंदी ठेवणे बंधनकारक असताना व त्यासाठी खर्चाची व्यवस्था असताना प्रत्यक्षात पाच हजार पाचशे लोकच उपस्थित मिळाले. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की दहा हजाराचा खर्च बादशहांकडून घेऊन यक्षात पाच हजार पाचशे म्हणजे निम्म्यापेक्षा थोडे अधिक लोक नेमले होते. हा एक भ्रष्टाचारच होता सुरतेच्या पहिल्या लुटीच्या वेळीही असाच प्रकार घडला होता मुघल साम्राज्यातील मुलकी चलाकरी व्यवस्थेत कशा प्रकारे ग्रहाचार मुरलेला होता है यावरून समजते.
दुसरे म्हणजे निर्माराजांनी केलेल्या सर्व शिफारसी व नेमणूका झांना बादशहाने संमती दिली आहे यावरून मिर्झाराजाचे बादशहाकडे किती मोठे वजन होते हे ध्यानात येते. या लढाईत बुदेल राजपूत सरदार चपत बुदेला यांच्या बरोबर व्याचा मुलगा (की भाऊ?] छत्रसाल याचा उल्लेख येतो. नंतरच्या काळात सुविख्यात झालेला छत्रसाल बुदेला या पुरंदरच्या सघषांत मुघलाच्या बाजूने लढताना दिसतो. लढ्यात दाखवलेल्या शीयांबद्दल त्याची मनसब वाढवण्यात आली आहे.
तिसरे म्हणजे बादशहानी विजापूरच्या मोहिमेकरता आवश्यक तोफांची खानगी मिर्झाराजांच्या मागणीनुसार केली आहे. त्याचबरोबर फर्मानात बंदुकधारी घोडेस्वाराचाही उल्लेख आहे बंदुकधारी घोडेस्वार हे मुळात मंगोल सैन्यामध्ये असत. भारतातही मुघल सैन्यात ते होते हे यातून दिसून येते, पानिपतच्या रणसंग्रामात अब्दालीकडील बंदुकधारी घोडेस्वारामुळेच लढाईचा निर्णय मराठ्याच्या विरुद्ध गेला. एकंदरीत मुघल सैन्यात पायदळ बंदुकधारी व घोडेस्वार बंदुकधारी अशी दोन्ही दले होती
पृष्ठ क्र.१४ वर तसेच सोलापूरचा किल्ला आणि निजामुलमुल्कचे अन्य क्षेत्र जसे 'जी होली इत्यादी जे जाफराबादेशी सबंधित आहेत सोपवले जाण्यास सांगितले जाईल,
या मजकुरातील 'जी होली म्हणजे कर्नाटकातील हाल्लीखेडे व जाफराबाद म्हणजे जाहिराबाद (जे तेलंगणात आहे) ही गावे असण्याची शक्यता आहे. सोलापूरहून हाल्लीखेडे सुमारे १५० कि मी वर असून तेथून जाहिराबाद ५० कि. मी. अंतरावर आहे, ही गावे निजामशाही आणि आदिलशाहीच्या सरहद्दीवर असावीत सोलापूरनजिक कोणतेच जाफराबाद नाही मुघल काळात चांदवड (नाशिक जिल्हा) ह्या गावाचे नामकरण जाफराबाद असे झाले होते, पण ते येथे अपेक्षित नाही दुसरे प्रसिद्ध जाफराबाद गुजरातमध्ये आहे
फर्मानातील काही मजकूर विजापूरच्या संबंधात आहे. कारण शिवाजी महाराजांच्या पाडावानंतर मिर्झाराजाचे उद्दिष्ट विजापूर हस्तगत करणे हे होते. अर्थातच ते सोपे काम नव्हते हे पुढील काळातील घटनावरून सर्वज्ञात आहे.
जमानातील शेवटचा परिच्छेद खूप महत्वाचा आहे "हल्ली आपण (राजा जयसिंह) जसा विचार केला आहे त्याच प्रकारे कार्य कराने, मस्तु 'गुकराना' अदा करण्यासाठी (दरबारात येण्याचे) शिवाजीला कष्ट देऊ नये (शुकराना-कृतज्ञता दर्शक नजराणा) यावरून हे स्पष्ट दिसून येते, की शिवाजी महाराजानी दरबारात भेटीला यावे अशी बादशहाची इच्छा, अपेक्षा अगर आज्ञा नाही. ह्या कर्मानाची तारीख ४ सप्टेंबर १६६५ आहे फर्मान दक्षिणेत आल्यावर ३० सप्टेंबरला महाराजांनी ते समारभपूर्वक स्वीकारल्याचा उल्लेख सापडतो म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत महाराजांची आग्रा भेटीला जाण्याची योजना ठरलेली नव्हती.
२५ नोव्हेंबरनंतर जयसिंगांधी विजापूर मोहिम सुरू झाली. त्यात करारानुसार शिवाजी महाराजही ससैन्य दाखल झाले पुढील तीन महिने १५ नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम चालली बात मिर्झाराजा जयसिंग अपयशी ठरले. खुद्द महाराजानाही विजापूरकराकडून पराभव पत्करावा लागला, अशातच दिलेरखान व पठाणी सरदाराचा गट महाराजांच्या विरुद्ध होता. ह्या बातावरणात मिझाराजानी महाराजांना पन्हाला मोहिमेवर पाठवले ती मोहिमही अयशस्वी झाली.
दक्षिणेतील मुस्लीम राजवटी संपवणे हे मुघलांचे अकबरापासूनचे ध्येयधोरण होते. औरंगजेबालाही तेच करावयाचे होते. मात्र सन १६६५ त्यादरम्यान आदिलशाही आपले सामथ्र्य बर्यापैकी टिकवून होती. मुघलांकडून आदिलशाही नष्ट होणे किया अति दुबळी होगी प्राप्त परिस्थितीत महाराजाच्या हिताचे नव्हते. पुढील काळातील (सन १६७७) मालोजीराव घोरपडे ह्याना लिहीलेल्या पत्रातही महाराजानी आपले या बाबतीतील धोरण स्पष्ट केले आहे त्यामुळे विजापुरच्या आदिलशाहीला दुबळे करण्यात आपण सहाय्यभूत व्हावे अशी त्याची इच्छा नसावी. म्हणूनच महाराजानी विजापूरच्या मोहिमेत आपली पूर्ण शक्ती पणास लावली नसादी या सर्व परिस्थितीत मिर्झाराजांना शिवाजी महाराज दक्षिणेत असणे मुघलाच्या दृष्टीने बहुदा धोक्याचे वाटू लागले असावे कारण नेताजी असावा का असा प्रश्न पडतो, याकरताचमागोमाग खुद्द महाराजानीही आदिलशाहीशी हातम्ळवणी केली व या युतीला कुतुबशाहीचाही पाठिंबा मिळाला तर मुघलांचे शिवाजी महाराज बराच काळ आपल्या राज्यापासून दूर राहिले तर दख्खन अमल राहणे अधिक सोपे जाईल असा विचार मिर्झाराजांनी केला असावा का असा प्रश्न पडतो.
पुरंदरचा तहामागे सर्वनाश होण्यापेक्षा काही काळ नमते घेऊन नव्याने सुसज्ज तयारीसाठी वेळ मिळवणं हा महाराजांचा विचार होता मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाण असल्याचे सांगितले जाते जे माझ्या मते चुकीचे आहे वेळ आली तर वाकेन पण संपणार नाही हे तत्व दीर्घकालीन ध्येयपूर्तीसाठी अधिक उपयुक्त असते
मिर्जाराजा जयसिंगाच्या मोहिमेत सुमारे पंचवीस हजाराचे घोडदळ सहभागी होते त्यात सुमारे ६० ते ७०% घोडदल राजपूत सरदारांचे होते, उर्वरित दिलेरखानाचे पठाण सरदार व अन्य आहेत, सुमारे अर्धशतक बघितलेल्या इटालियन निकोलाय मनुचीचे एक निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. मनुची प्रत्यक्ष जर करीत असे. जयसिंगाच्या मोहिमेत तोफखाना दलावर प्रमुख होता. हा हरहुन्नरी माणूस अनेक कारनामे करीत असे. मुघल राजवटीबद्दल वर्णनतो म्हणतो...
"त्यांना (मुघल बादशहाना) हवे असेल तेव्हा राजपुत राजाना पर चढवतात आणि राजपूताच्या विरुद्ध लढायचे असल्यास ते (बादशहा) राजपूतांचाच उपयोग करतात राणा (उदयपूर मेवाड), राठोड (बिकानेर-जोधपुर इत्यादी मारवाड), कछवाह (अबर जयपुर), बुंदेले (ओर्च्छा-दांतिया) इत्यादी राजपूत राजे हे जरी एक झाले तरी ते गोगलाना हिंदुस्थानातून सहजपणे हाकलून लागू शकतील. (असे होते मोगल निकोलाव मनुची पृष्ठ क. ३४९) मनुची सारख्या परकीय व्यक्तीचे है निरीक्षण खूपच मार्मिक आहे. अकबराच्या उमेदीच्या काळापासून, सुमारे १५५० पासून राजपूत लोक मुघल साम्राज्याचा कणा बनले होते. मनुचीच्या म्हणण्यानुसार वर उल्लेखलेली चार महत्वाची घराणी एकत्र आली असती री मुघलांना गाशा गुंडाळावा लागला असता हे अगदी खरे आहे.
या निमित्ताने मनात असा प्रश्न उपस्थित होतो की उत्तर भारतातील ही परंपरागत दीरत्व जपणारी महाशक्ती आणि लेवढ्याच ताकदीची दक्षिणेत नव्याने उदयास आलेली मराठ्याची महाशक्ती ह्या एकत्र आल्या असत्या तर १७व्या शतकातचं भारत परकीय आणि परधर्मीय जुलुमी सरोच्या जोखडातून मुक्त झाला असता, १८व्या शतकात आलेले, इराणी नादिरशहा आणि अफगाण अहमदशहा अब्दाली, याच्यासारख्या लुटारू आक्रमकांची ह्या देशावर आक्रमण करण्याची हिम्मतही झाली नसती, सभाजी महाराजांच्या अल्प पण तेजस्वी कारकिदीत द्वह्या दोन्ही शक्ती एकत्र येण्याचा महायोग आला होता, पण तो पूर्णत्वास गेला नाहीं नियतीच्या मनात हा उत्तर दक्षिण सगम होणे मच्हते हेच खरे महाराजा जयसिंग ह्यांच्या शिवाजी महाराजांच्या मुलुखात स्वारीसंबंधी व्हॉईसरॉय आपल्या राज्यास लिहितो कि –
बारदेशामधे सांप्रत मोठी धामधूम सुरु आहे. कारण बऱ्याच वर्षा नंतर हिंदुस्थान मधला ( शिवाजी ) ह्या नावाचा देशी राजा आदिलशहा विरुद्ध बंड करीत उठला आहे. आदिलशहाच्या सैन्याशी शिवाजी आणि मराठ्यांच्या अनेक झटापटी ने लढाया झाल्या आहेत, पण त्या सर्व लढाया शिवजीनेच जिंकल्या आहेत. त्याचे कारण हे कि प्रदेश डोंगराळ असल्या कारणाने गनिमांच्या घोडदळाला त्या प्रदेशात हालचाली करता येत नाहीत. त्याचा फायदा शिवाजीला मिळाला आहे आणि म्हणून आदिलशहाच्या सैन्याचा त्या शिवाजीने पराभव केला आहे, आणि इतकेच नव्हे तर त्या आदिलशाही सैन्याची मोठी हानी केली आहे . हेच पाहून मोगल बादशहाने शिवाजी वर मोठे सैन्य धाडले पण त्या गनिमांच्या निष्काळजीपणाने म्हणा किंव्हा शिवाजी ने त्यांना पैश्याची लालच चारल्याने म्हणा , शिवाजी आपल्या मुलुखातून निसटला व बरोबर आठ किंव्हा दहा हजार सैन्य घेऊन तो दोन्ही सैन्यामधून तो एका विजेप्रमाणे बाहेर पडला. शिवाजी थेट सुरतेवर चालून गेला व त्याच्या हल्ल्याची कल्पना नसल्याने सुरत चे लोक गाफील होते. त्यामुळे शिवाजीला मुळीच प्रतिकार झाला नाही. त्याने ते शहर खुशाल लुटले व लूट नौकांमध्ये भरून त्याने आपल्या मुलुखात पाठवून दिल्या. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे औरंगजेबला कळताच त्याला भरपूर दुःख झाले आणि महाराजा जयसिंग ह्यांना शिवाजी महाराजांचे पारीपत्य करण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठविले.
पुरंदरच्या इतिहासातील सर्वात महत्बाची घटना सविस्तर पाहिल्यावर आता आपण इतिहासाचा पुढील पट पाहुया. शिवाजी महाराजांनी तह करुन पुरंदर व सिंहगड हे किल्ले मोगलांना दिले. हे किल्ले इ.स. १६७० पर्यंत काहोर मोगलांच्या ताब्यात होते व त्या वर्षी तान्हाजी मालुसरे याचा भाऊ सूर्याजी याने ते दोन्ही किल्ले मोगलांपासून के बोल परत जिंकून घेतले.दि. ८ मार्च १६७० रोजी निळोपंत सोनदेव मुजुमदार आणि आणि सूर्याजी मालुसरे यांनी किल्ल्यावर एकाएकी हल्ला करुन पुरंदर स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६८९ मध्ये किल्ला औरंगजेबाने घेतला व पुरंदरला अझमगड , तर वज्रगडाला 'वजीरगड' असे नाव दिले. इ.स. १७०५ नंतर भोरचे शंकराजी नारायण सचिव यांनी किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १७०५ मध्ये तो औरंगजेबाने परत जिंकून घेतला. नंतर इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबा मरण पावल्यावर ताराबाईंचा सरदार शंकराजी नारायण सचिव याने तो इ.स. १७०८ मध्ये पुन्हा मोगलांपासून जिंकून घेतला. पुढे त्याच वर्षी शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून दक्षिणेत आले व सातारा येथे गादीवर बसले. त्यांनी सचिवास किल्ला खाली करून देण्यास सांगितले; परंतु तो ताराबाईंच्या पक्षाचा असल्यामुळे त्याने किल्ला खाली करून दिला नाही. १७०७ मध्ये शाहूराजे काही काळा गडाच्या पायथ्याशी होते. तेथे नारायणेश्वर मंदिरात त्यांची दोन लग्ने झाली. तेथे बसून त्यांनी काही निवाडेही केले होते. छत्रपती शाहू यांना १८ जानेवारी १७०८ रोजी सातारा येथे राज्याभिषेक होऊन सातारा ही राजधानी होईपर्यंत मराठ्यांच्या राजधान्या प्रसंगोत्यात वेगवेगळ्या किल्ल्यांवर फिरत राहिलेल्या आढळतात. यामध्ये पहिला मान किल्ले पुरंदरला मिळतो. नंतर राजगड, रायगड, जिंजी, पन्हाळा, विशाळगड, अजिंक्यतारा इ. होत. राज्याचा किंवा त्या प्रदेशाचा जेथून कारभार केला जातो, त्यास राजधानी म्हणतात. येथेच त्यांना राजधानी करावयाची होती; पण पाटसच्या दमाजी थोरातांकडून होणाऱ्या आक्रमणामुळे येथे असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी सातारा गाठले व तेथे ८ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक घेतला.
पुरंदरचा किल्ला आणि नरबळीची कहाणी
पुरंदर पुण्यापासून वीस मैल आणि बॉम्बेपासून १४४ मैल दूर आहे. त्यात पुरंदर आणि वजीरगुर या दोन टेकड्यांचा समावेश आहे, ते जमिनीपासून १५०० फूट उंचीवर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ४५०० फूट आहे. टेकडीच्या माथ्यावर ३०० फूट खाली छावणी वसलेली आहे. सुमारे १३० जणांसाठी बॅरेक्स इथे आहेत . बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सर्व भागातून सैनिकांना भरती करण्यासाठी येथे पाठवले जाते. दोन्ही टेकड्यांच्या माथ्यावर मराठ्यांच्या तटबंदीचे अवशेष आहेत, या मराठ्यांच्या इतिहासाला रक्तपात आणि राजकारणाचा मोठा इतिहास आहे. असे म्हटले जाते की, इथे मोठ्या प्रमाणावर खजिना दडला आहे, परंतु तो इथे असेलच याबद्दल खात्री नाही . इतिहास सांगतो की, या किल्ल्याचा बुरुज बांधण्यात अडचण होती. तो तीन ढासळला. म्हणून राजाने काही लोकांची कत्तल केली आणि सोन्याच्या विटांनी पाया घातला त्यानंतर मात्र तो मजबूतपणे उभा राहिला. सदर घटना एका ताम्रपटात किंवा शिलालेखात सांगितली आहे. हे रेखाचित्रे बॉम्बे मेडिकल स्टाफचे सर्जन आर.एच. मूर यांनी घेतली आहेत.
या किल्ल्यामध्ये एकूण चार-पाच बंदिस्त भागांचा समावेश होतो. १) माची पुरंदर, २) कंदकडा, ३) राजगादी, ४) केदारेश्वर आणि ५) पूर्वेस शेजारी असलेला वज्रगड असे एकूण पाच भाग असल्याने यास किल्ले पुरंदर असे अनेकवचनी संबोधतात. आहे. माचीशिवाय कोठेही सपाट भाग नाही. त्यामुळे शत्रू किल्ल्यात घुसला, तरी त्यास सुरक्षित आहोत किंवा जिंकला, असे वाटत नसे. कारण, दुसऱ्या भागांमधून शत्रूवर सहज मारा व हल्ला करता येत असे. त्यातूनही शत्रूने जोर केलाच, तर दक्षिण बाजूने किल्ला सोडून पळून जाता येत असे. म्हणजे येथे संरक्षण, आक्रमण व बचाव या तीनही बाबींचा समन्वय आढळतो. म्हणून या किल्ल्याची गणना एक उत्तम किल्ला म्हणून होत असे. इतर किल्ल्यांवर शत्रूने निकराचा हल्ला करून तटबुरुजांवरून होणारा कडवा प्रतिकार व मारा मोडून काढून किल्ल्यात प्रवेश केला की, त्यास धन्य वाटे. किंवा गडाला माळा किंवा शिड्या लावून तटावर वा बुरुजावर जाऊन तेथील पहारेकऱ्यांचा विरोध मोडून तिथल्या शिबंदीला लोळविले की गड जिंकला जाई. मात्र, हे समीकरण किल्ले पुरंदरला कधीही लागू होत नसे. कात्रज घाट, बोपदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
गडदर्शन :-






गाडी रस्त्याने पुरंदरकडे जाताना














या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी बांधलेल्या दुमजली वाडय़ांचे अवशेष दिसतात. या वाडयातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडयाच्या मागील बाजुस एक विहीर पहायला मिळते. अर्थात आता या परिसरात लष्कराच्या इमारती असल्यामुळे आता हे अवशेष बघायला मिळत नाहीत. वाडा पाहुन झाल्यावर पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे.

या तलावाच्या पुढे पुरंदर व वज्रगड यांच्या मधील भैरवखिंड आहे.

![]() |
| छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान - किल्ले पुरंदर |




![]() | ||
| मुख्य दरवाजा येथील वळणदार दगडी पायऱ्यांची वाट - किल्ले पुरंदर |











Pencil
drawing of Purandhar Fort by Alexander Nash (fl. 1834-1846) in 1845.
This image is from an album of 19 drawings depicting the monuments of
Bijapur and the hill forts of Dejouri and Purandhar, made during a
Revenue Survey of the Deccan. Nash served with the Bombay Engineers and
from 1836 was mainly employed in the Revenue Survey of the Deccan, first
as an assistant and from 1841 as Superintendent
२६ शक उपलब्ध नाही.
२७
संदर्भ :-
वज्रगड
वज्रगड अथवा रुद्रमाळ हा पुरंदरचा जुळा किल्ला हा समुद्र सपाटी पासून १३४८ मीटर उंचीवर आहे पुरंदर व वज्रगड यांचे मध्ये भैरव खिंड आहे. पुरंदरच्या माचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील रस्त्याने वज्रगडावर पोहचता येते, पायथ्याचे भिवडी गावा जवळील रडतोंडीच्या घाटाने पाउल वाटेने येथे पोहचता येते.

दोन्ही रस्त्याने चढून आल्यावर खडकात खोदलेल्या व बाजुला तट असलेल्या पायरी मार्गाने

वज्रगडाचे महाद्वारात पोहचता येते. महाद्वारा पुढे अजून एक दरवाजा लागतो.

या दरवाज्यातून आत गेल्यावर खडकाचे प्रचंड सुळके दिसतात या उंच कातळांचा उपयोग प्रस्तरारोहण प्रशिक्षणा साठी केला जातो. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्याचे घेर्यास तटबंदी असुन टिळा ५ बुरुज आहेत.

तटबंदी मधील एका भग्न छोट्या दरवाजा तून उतरून किल्ल्याचे माचीवर जाता येते.

या माचीवर एक तीन भागात खोदलेले तळे असुन

याचे काठावर मारुती मंदिर असुन

रुद्रेश्वर शिव मंदिर आहे या रुद्रेश्वरा वरून या किल्ल्या रुद्रमाळ हे नाव मिळाले. हा या किल्ल्याचा अधिपती देव, पुरंदर हे इंद्राचे नाव आहे व इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून पुरंदर शेजारी असलेला किल्ला म्हणून त्याला वज्रगड हे नावही प्राप्त झाले आहे. या मंदिरांचे पुढे काही अंतरावर पडलेले अवशेष आहेत या ठिकाणी काही काळ आद्यक्रांतिवीर उमाजी नाइक यांचे वास्तव्य होते. किल्ल्याचे वायव्ये कडील बुरजास जोडणारी एक डोंगराची उतरणारी डोंगराची सोंड आहे.या सोंडेच्या वरील तिसर्या टप्प्यावर उत्तानदेवाचे स्थान आहे. सोंडेच्या पायथ्याला कपिलेश्वर शिवस्थान आहे या वरून या सोंडेस कपिलधार असे म्हणतात.

वज्रगडाचे बांधकामा विषयी निश्चीत माहिती उपलब्ध नाही. पण शिवपूर्व
काळापासून त्याचे उल्लेख आढळतात ईस १६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा
दिला व पुरंदर मिळविण्यासाठी त्याने प्रथम वज्रगड घेण्याचा प्रयत्न सुरु
केला. वज्रगडाचे कपिलधारे वरून सेन्यासह तीन तोफा चढविण्यास सुरवात केली,
गडा वरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या.
वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु, व बाबाजी बुवाजी प्रभु. यांनी गड
राखण्यासाठी निकराची झुंज दिली ३० मार्च १६६५ ते १४ एप्रिल १६६५ त्यांनी
किल्ला ३०० मावळ्यांचे साह्याने लढविला. तोफांचे मार्याने किल्ल्याचा
वायव्य बुरुंज ढासळला, व वज्रगड मोघ्लांचे ताब्यात गेला.
पुरंदर व वज्रगडा वरील पुष्प वैभव

राम रावण यांच्या लंके मधील युद्धात मुर्चित पडलेल्या लक्ष्मणाला सावध
करण्यासाठी लागणारी संजीवनी वनस्पती साठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून
नेला या पर्वतातील भाग म्हणजे हा इंद्रनील पर्वत, इंद्रनील म्हणजेच पुरंदर
असे वर्णन संत नामदेवांनी केलेले आहे. पुरंदर – वज्रगड येथील ओषधी वनस्पती
व पुष्प वैभवासाठी प्रसिद्ध आहे.
पुरंदरचे भोगोलिक स्थान त्याची उंची, माती ,पावसाचे प्रमाण यामुळे
हवामानाची वेगळी देण या पर्वतास लाभली आहे , पुरंदर वज्रगडाचे डोंगर माथे
पावसाळ्या मध्ये गवताने झाकलेले असतात, या डोंगर माथ्यावर मोठो झाडे झुडपे
वाढू शकत नाहीत त्यामुळे जास्त पावसात मोठ्या उंचीवर वाढणाऱ्या खुरट्या
वनस्पतींची जैवविविधता येथे आढळते. सह्याद्री मधील कळसुबाई, हिमालयातील
काही भाग व अफगाणीस्तान, दक्षिणेतील अण्णामलाई येथील भागात आढळणाऱ्या काही
वनस्पती येथे आढळतात. तर काही दुर्मिळ वनस्पती याच किल्ल्यावर आढळतात

ईस १९४५ मध्ये इंग्रज प्रशिक्षक फादर संतापो यांनी आपल्या पुरंदर येथील
वास्तव्यात येथील वनस्पती व फुलांचा अभ्यास केला त्यांनी आपल्या ‘फ्लोरा ऑफ
पुरंदर’ या पुस्तकात येथील सुमारे ६०० वन्य वनस्पतींची नोंद केली आहे.
पावसाला सुरु झाल्यावर येथील पुष्प वैभव आकारू लागते ऑगष्ट, सप्टेबर,
ऑक्टोबर महिन्यात हा परिसर आपल्या पुष्प वैभवाने नटू लागतो. प्रत्येक
महिन्यात वेगळेच पुष्प वैभव जन्म घेते, अगदी मार्च महिन्यात सुद्धा येथील
काही फुले फुलतात. या पुष्प वैभवाची ही छोटीशी झलक


Rock wall of Ganesh Darwaja 
Sculpture at right side of the wall of Ganesh Darwaja
Bawata Buruj
Bastion on the Ganesh Darwaja called Bawata Buruj on which another flag is hoisted.


प्रचि १३
मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?

प्रचि १४

प्रचि १५
पुरंदरेश्वराचे मंदिर
श्री केदारेश्वर मंदिराकडे जाणार्या पायर्या

प्रचि २५
दाट धुक्यातले श्री केदारेश्वर मंदिर

प्रचि २६

प्रचि २७
किल्ले वज्रगड

प्रचि २८
प्रचि २९
Bor Tank
Stairs

Kedareshwar Mandir
The most important monuments, on the summit of the hill, is the old temple of Kedareshwar which is also the main deity of Purandar.
‘Deepastambha’, a stone pillar for enlightening the lamps can be seen in front of the temple.

Photo of Rajdarbar of Shivaji Maharaj at Kedareshwar Mandir 
Nandi inside the Kedareshwar Mandir
The overall length of the Machi is one mile, and the width is 100 to 150 feet. The northern part of the Machihas several monuments and entrances with bastions to keep watch on surroundings.
Abanded Church and Bungalow
Both are at the start of the fort. It is believed that when British captured this fort, they made a church and Bungalow at the top.
Lord Dutta Mandir
Statue of Veer Murarbaji Deshpande.
This statue of Murarbaji Deshpande, the commander of the fort standing in his fighting stance gives us the feel of his courageous and fight hard nature.

Samadhi of Veer Murarbaji Deshpande.
There is tomb of Veer Murarbaji Deshpande is just behind of his statue. The tomb appears as Temple like structure that having two sculptures inside it.

Binni Darwaja
While trekking to the fort from Narayanpur village, you will directly enter into Machi of the fort through this entrance.
Ancient Bungalow
When you are on the straight road, you see army barracks on the other side and this bungalow on the ramp.
Lord Shiva Mandir

Purandereshwar Mandir
On the way forward, a ‘Hemadic’ style Purandeshwar temple is seen on the right side of the citadel.

Purandareshwar is the fort’s patron god and another Avatar of Lord Shiva. Peshwa Bajirao I had reconstructed this temple.

Purandereshwar Mandir 
Nandi outside Purandereshwar Mandir 
Walls of Purandereshwar Mandir 
Inside Purandereshwar Mandir 
Gods of Maharashtra 
Lord Ganesha at Purandereshwar Mandir 
Outside view from inside 
Lord Purandereshwar
Rameshwar Peshawa Mandir
This was a private temple of Peshwa. It having the small temples of Lord Hanuman and also Lord Shiva as with the warrior sculpture placed outside of it.


Lord Shiva temple in Rameshwar temple 
Lord Hanuman temple in Rameshwar temple
Bhairav Khind
At the end of the Machi on the east, The Khind that connect Purandar fort with Vajragad where the statue of the Chhatrapati Shivaji Maharaj can be seen.

Watertank & Ruin
A dry watertank and ruin of fortified wall are just between Machi and Balekilla region.

Lakshmi Mandir
There is a small temple of Goddess Lakshmi at just ahead of Dilli Darwaja.
Hanuman Sculpture
This is another feature of the fort which sculptured at the fortified wall which is in front of Gaumukhi Dilli Darwaja of the fort.
Dilli Darwaja
This is the north-facing main entrance of the Purandar. This entrance is Gaumukhi type entrance means another the fortified wall is built in front of the entrance so that no invader can see or attack this entrance.


Steps to Dilli Darwaja covered by fortified wall 



Fortified Wall of Dilli Darwaja
Ganesh Darwaja
After coming inside the Dilli Darwaza, there is another huge entrance is seen at the right which is Ganesh Entrance. Connected with the Ganesh entrance, a huge rock wall extending southwards like a cliff.
Shendrya Buruj
It is the highest bastion of the Purandar build in alignment with the fortified wall which is North-west to the citadel on the lower Balekilla region.

Raajgadi
Coming into center of the lower region of the Balekilla of the fort, you can see remnants or ruins of Raajgadi.
From the lower level, a ‘Stairways to Heaven’ leads to the upper level of Balekilla of the fort.

Balekilla
The upper level of the fort is also surrounded by a steep drop on three sides. This area also houses an ancient Kedareshwar Mandir.Kedareshwar Mandir

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण
पुरंदरचा तह
इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
Introduction
After visiting Fort Purandar, I spent a lot of effort looking for information on the history of the fort. The most reliable reference I found was the book:History of Aurangzib - based on original sources by Sir Jadunath Sarkar, Vol 4 (ref)This book contains a detailed account of the battle of Purandar and the Purandar Treaty. For I could not find any other source of this information in such detail, I thought it would be valuable to reproduce it for reference.
To the best of my knowledge, for this manuscript was published in 1929, it is now in public domain. In case this assumption is not correct, please write a comment below and I will take necessary action.
The text below is largely copied from various sections of the book. The first two sections are highly abridged for providing a background to the battle. The latter sections are largely reproduced with some sections skipped and minor spelling and grammatical changes.
Shivaji takes control of Northern Konkan
Shivaji's portrait (the 1680s) housed in the British Museum (ref)
The Mughals ruled most of the northern India from their headquarters in Delhi. Emperor Shah Jahan presided over the Mughal kingdom and his son Aurangzeb was in charge of the Southern Deccan region where he had to deal with the two threats of the Bijapur kingdom of Adil Shah and the Maratha leader Shivaji. Aurangzeb managed to contain both threats effectively till the year 1657 when Shah Jahan fell ill and his eldest son Dara Shukoh was about to take over the throne. Aurangzeb and his younger brother Murad collaborated to march northwards to overthrow Dara.
It was during this absence of Aurangzeb from the Deccan that Shivaji grabbed the opportunity and captured several forts and expanded his control over the region. At first to the north, he captured Thane, Kalyan, and Bhivandi. He then captured Mahuli Fort. By the year 1659 he had extended his dominions in the plains to the east of the Sayhadris - or Desh - to the southern limit of the Satara district, and in the Konkan from Mahuli to Mahad. On 14th May 1657, Shivaji's first son Sambhaji was born in Purandar Fort.
But Aurangzeb's absence was not ignored by the Bijapur kingdom either. They took that opportunity to send their general Afzal Khan (Abdullah Bhatari) to fight Shivaji with a cavalry of 10,000. Afzal Khan feared that Shivaji had a much larger armed force and hence decided to invite Shivaji to negotiate a truce. Shivaji agreed but chose the venue that was close to Pratapgad. It was during this meeting that the much taller Afzal Khan held the shorter Shivaji in an embrace and attempted to kill Shivaji him with his sword.
However, Shivaji had anticipated this and had worn an iron armor under his outer garments and an iron helmet under his turban. And concealed in Shivaji's left hand was a set of steel claws (vaghnakh) fastened to his fingers by a pair of rings, and up his right sleeve lay hidden a thin sharp dagger called the Scorpion (bichwa). Shivaji passed his left arm around the Khan's waist and tore his bowels open with the steel claws. Then with his right hand, he drove the bichwa into Afzal's side.
Shivaji used steel claws to disembowel the Bijapuri general Afzal Khan after they met for a negotiation (photo)
This led to Shivaji gaining victory over the Bijapuri attack and he amassed a lot of resources from the attacking army. Using this success they drove their campaign southwards and captured the fort of Panhala.
The defeat of Shaista Khan and the attack on Surat
Aurangzeb had meanwhile succeeded in acceding to the throne and he was coronated in July 1659. He immediately posted Shaista Khan, his trusted lieutenant as the viceroy of Deccan to contain and reverse the damage that Shivaji had done.In early 1660, Shaista Khan opened the campaign against Shivaji from the north and arranged for an attack by the Bijapur army from the south. The Marathas at first retreated and Shaista Khan managed to come unopposed till Saswad, the town just to the north of Fort Purandar. When he attempted to attack Fort Purandar, the Marathas fought back but could not repel the advances of the Mughals. Shaista Khan returned to Saswad and took over Pune and marched on to take over Fort Chakan.
After a break for monsoon when armies generally did not engage in warfare, Shaista Khan continued his attacks and managed to keep control over extreme northern Konkan for about two years. Shaista Khan was settled in Pune with his harem.
On Sunday, 5th April 1663 when Shivaji and 400 of his bravest and expert soldiers entered the camp at night. It was the sixth day of Ramzan, the month of fasting. The Maratha party arrived at Khan's quarters around midnight and entered through the kitchen and started chipping away a brick wall that separated the kitchen from the harem. Shivaji and his lieutenant Chimnaji Bapuji entered through a hole they made in the brick wall and were followed by 200 men. Hacking away at the maze of canvas and screen walls they reached the Khan's bedroom and attacked him managing to severe one of his thumbs. But then the lamps in the room were put out by one wise woman, and in the darkness, the Khan escaped with the help of his slave girls.
Abdul Fath, a son of Shaista Khan was one of the first to rush to the rescue of his father but the brave youth was slain after he struck down two or three Marathas. The night attack was a complete success! The Mughal viceroy, covered with shame and guilt, retired to Aurangabad for greater safety. He was later sent away to Bengal as a punitive deportation by Aurangzeb and Prince Muazzam was appointed to Deccan in his place.
It was during this change in the governors that Shivaji did a second even more audacious feat. From the 6th to the 10th of January 1664 he looted the city of Surat, the richest port on the west coast. The fort of Surat stood on the south bank of the Tapti, 12 miles from the coast. But the city was unprotected and its wealth boundless. After plundering the city, the Marathas departed on the 10th with a considerable treasure.
Jai Singh sent against Shivaji
The failure of Shaista Khan and the sack of Surat caused bitter mortification to Aurangzeb and his Court, and he decided to send his ablest Hindu and Muhammadan generals to the Deccan. Among the promotions and transfers on his birthday, 30th September 1664, the Emperor appointed Mirza Rajah Jai Singh to put down Shivaji. Under him were deputed Dilir Khan, Daud Khan Qureshi, Rajah Rai Singh Sisodia, Ihtisham Khan Shaikhzada, Qubad Khan, Rajah Sujan Singh Bundela, Kirat Singh (a son of Jai Singh), Mulla Yahia Nawaiyat (a Bijapuri noble who had come over to the Mughals), and many other officers, with 14,000 troopers.After making the necessary preparations, and collecting his subordinates, Jai Singh left Upper India and crossed the Narmada at Handia on 9th January 1665. He pushed rapidly on, never wasting a day by halting, except when strong necessity compelled him, arrived at Pune on 3rd March and took over charge from Maharajah Jaswant Singh, who immediately afterward (7th) started for Delhi, as commanded by the Emperor.
Jai Singh’s career had been one of undimmed brilliance from the day when he, an orphan of twelve, had received his first appointment in the Mughal army (1617). Since then he had fought under the imperial banner in every part of the empire, from Balkh in Central Asia to Bijapur in the Deccan, from Qandahar in the west to Mungir in the east.
Wherever there was a difficult or delicate work to be done, the Emperor had only to turn to Jai Singh. A man of infinite tact and patience, an adept in the ceremonious courtesy of the Muslims, a master of Turki and Persian, besides Urdu and the Rajput dialect, he was an ideal leader of the composite army of Afghans and Turks, Rajputs and Hindustanis, that followed the crescent banner of the sovereign of Delhi.
Age and experience had cooled the impetuous ardor of his youth, he had once led a forlorn hope, at the storming of Mau, and he now employed stratagem in preference to force, and bribe in preference to war. His foresight and political cunning, his smoothness of tongue and cool calculating policy, were in striking contrast with the impulsive generosity, reckless daring, blunt straightforwardness, and impolitic chivalry which we are apt to associate with the Rajput character.
And now this veteran of a hundred fights donned his armor at the age of sixty to crush a petty chieftain, who in less than ten years had grown great enough to baffle all the resources of Bijapur and to challenge the prestige of the empire of Delhi.
Jai Singh’s Preparations and Plan of Campaign
In view of his two enemies, Jai Singh very wisely decided to take up a position between both, i.e., in the eastern part of Shivaji’s dominion, whence he could also easily threaten Bijapur, instead of pushing the war into the Western Ghats or the Konkan plain further west. He knew that if he could strike fatally at the heart of the Maratha kingdom, the distant limbs Would drop down of themselves.Secondly, he played skillfully upon the hopes and fears of the Sultan of Bijapur, holding forth the chance of reduction of tribute and removal of the Emperor’s displeasure, if Adil Shah aided the Mughals and thus clearly proved his want of connection with Shivaji. Thirdly, he arranged to combine against Shivaji all his enemies and distract his attentions by attacks from all possible quarters. As early as January he had sent two Europeans named Francisco de Mello and Diogo de Mello to the western coast with letters to the chief of the Portuguese settlement
of Goa inviting him to help the imperialists by attacking Shivaji, who had collected a fleet of his own.
In January he had sent his Brahmin emissaries to various Deccani chieftains, to stir them up against Shivaji. Everyone who bore a grudge to Shivaji or envied the sudden rise of the Bhonslés had been approached by the Mughal general’s spies. Money and promises of high rank in the Mughal service were lavishly employed on Shivaji’s officers to corrupt their loyalty, and with some success.
Above all, Jai Singh concentrated all authority in his own hands, as an indispensable condition of success in war. Jai Singh rightly insisted that in war there should be only one head and that the ‘man on the spot’ should be given full authority, or else the work would suffer. The Emperor yielded to the argument and Jai Singh gained absolute civil and military authority alike. The commandants of the Mughal forts at Ahmadnagar and Parenda were also placed under his orders.
The Campaign Opened, 1665.
Going southwards from Junnar (which is 55 miles west of Ahmadnagar) and crossing the old Mughal frontier, we have first the valley of the Indrayani, overlooked by the hill-forts of Lohgarh and Tikona in the west and Chakan in the center. Next, comes the valley of the Bhima, in which Pune stands. Further south, across a long range, lies the valley of the slender brook Karha, with the cities of Saswad and Supa in the plain and the forts of Singhgarh on the western hills and Purandar on its southern rocky barrier. Beyond these hills lies the valley of the Nira, with the town of Shirwal on its bank and the forts of Rajgarh and Torna in the west and Rohira in the southwest.Pune is almost the same distance (about 28 miles) from Lohgarh in the northwest and Singhgarh in the south. Saswad was admirably situated for attacking Purandar (6 miles south of it), Singhgarh and Rajgarh (18 and 24 miles in the west), and Pune (18 miles northwest of it) while the widening plain east of it enabled cavalry to make an easy and rapid dash into Bijapur territory. or bar the path of reinforcements coming from that side. Even now five main roads meet at Saswad.
Jai Singh, therefore, with a true general’s eye for the ground, made Saswad his base. Pune was strongly garrisoned. An outpost was established opposite Lohgarh to observe and blockade it and guard the road leading north to the Mughal frontier near Junnar. A flying column was organized to ravage the Maratha villages embosomed among the hills to the west and southwest of Saswad. On his eastern side, he was quite secure from attack, from the nature of the ground, the position of Saswad close to the boundary line between Shivaji’s dominion and Bijapur, and the existence of a Mughal advanced post at Supa.
After arriving at Pune (3rd March), Jai Singh spent some days in settling the country and establishing outposts, which he regarded as the “first of the pillars supporting the work of this expedition.”
Jai Singh marched out of Pune on 14th March. Arriving on the 29th at a place one day’s march short of Saswad, he sent on Dilir Khan with the vanguard and the artillery to cross the pass lying in the way, advance four miles up the hill, and then halt.
Next day the Rajah crossed the hill and pushed on to Dilir Khan’s camp, leaving Daud Khan below the pass to see to the safe transit of the army up to noon. The rearguard was to bring up the stragglers.
On this very morning (30th March) Dilir Khan went with the Van to select a proper place for an encampment. In this reconnaissance, he approached Fort Purandar. A large body of Maratha Musketeers, who occupied an enclosure in the waist of the hill called vadi in the local language, now came down and attacked the imperialists, who, however, routed them and captured the vadi. The houses there were burnt and the Mughal Van very boldly improved their victory by at once pushing on as near Purandar as they could and entrenching just beyond the fire of the fort guns.
Jai Singh on hearing of it, at once sent up 3,000 of the troops of his command under Rai Singh Rathor, Kirat Singh, Qubad Khan, Mitraesn, Indraman Bundela and other officers at a gallop. He also despatched an urgent order to Band Khan to come to him, take charge of the camp, and enable the Rajah to go to supervise the siege. But Daud Khan, on hearing the news, had hastened to join Dilir Khan, without coming to Jai Singh.
The day was far spent; there was no high officer left to guard the camp, and so Jai Singh had to stay there perforce. He had already sent forward a party of pioneers and water-carriers, shot, powder, gun munitions, and entrenching tools for the use of Dilir Khan.
Next morning (31st March), Jai Singh carefully escorted the baggage to a permanent camp serving as a base, between Saswad and Purandar, only 4 miles from the latter. Then he reconnoitered the fort from the position of Daud Khan and Kirat Singh. It was not a single fort, but a fortified mass of hills; hence to surround and closely blockade it was impossible.
Purandar Besieged
Six miles south of Saswad rises the stupendous mountain mass of Purandar, the highest point of which towers 4,564 feet above sea-level and more than 2,500 feet above the plain at its foot. It is really a double fort, with an independent and very strong sister enclosure, named Vajragarh, on a ridge running out east of it. Purandar consists of an upper fort or citadel with precipitous sides all around and a lower fort or machi, 300 feet or more below it. The latter is a ledge running round the waist of the hill with many a winding, the entire circuit being four miles. On the north side, the ledge widens out into a broad terrace, containing the barracks and offices of the garrison.
This terrace is bounded on the east by the high spur named Bhairav Khind, which starts from the base of the steep overhanging north-eastern tower (called Khad-kala or the Skyscraper) of the upper fort, and runs for about a mile eastwards in a narrow ridge, ending in a small tableland (3,618 feet above sea-level), crowned with the fort of Rudramal (now called Vajragarh).
This Vajargarh commands the machi or lower fort of Purandar on its northern and most important face, as the garrison has to live here. It was by seizing Vajragarh that Jai Singh in 1665 and the English in 1817 made Purandar untenable for the Marathas. Jai Singh, like a true general, decided to attack Vajragarh first.
Dilir Khan with his nephews and Afghan troops, Hari Bhan and Udai Bhan Gaur, entrenched between Purandar and Rudramal. In front of him was the chief of the artillery, Turktaz Khan, and the party sent by Jai Singh. Kirat Singh with the 3,000 troopers of the Rajah and a few other mansabdars made a stockade opposite the north gate of Purandar. On the right were the trenches of Rajah Narsingh Gaur, Karn Rathor, Jagat Singh of Narwar, and Sayyid Maqbul Alam. Behind Purandar and facing its postern gate (Khirki) was the position of Daud Khan, Rajah Rai Singh Rathor, Md. Salih Tarkhan, Ram Singh [Hada ?], Sher Singh Rathor, Raj Singh Gaur and others.
To the right of this position was posted Rasul Beg Rozbhani and his Rozbhani followers. Opposite Rudramal, Chaturbhuj Chauhan with a party of Dilir Khan’s followers entrenched, and behind these Mitrasen, Indraman Bundela and some other officers.
Jai Singh removed his quarters from the camp to the foot of the hill to be nearer the besieged fort, while the soldiers pitched their tents along the hillside. He visited the trenches every day, encouraged his men, and supervised the progress of the siege. At first, all his efforts were directed to dragging guns to the top of the steep and difficult hill. It took three days to raise a gun, named Abdullah Khan, and mount it opposite Rudramal. In 3 and a half days more a second gun, named Fath Lashkar was taken there. A third, named Haheli, was painfully approaching the summit. The incessant bombardment of the Mughals demolished the bases of the tower in front, and pioneers were sent to its foot to dig a hole underneath.
Capture of Vajragarh
At midnight, 13th April, Dilir Khan’s division stormed the tower and drove the enemy into an enclosure behind it, leaving on the field seven slain and four wounded. Jai Singh reinforced Dilir Khan with a party of his own Rajputs. Next day, the victorious Mughals pushed on to the inner enclosure and tried to capture it by escalade. The garrison, oppressed by their fire, capitulated in the evening (14th April), left the fort, and were disarmed. But Jai Singh very wisely allowed them to return home in order to tempt the garrison of Purandar, by this example of leniency, to surrender instead of fighting to the last. The imperialists lost 80 killed and 109 wounded, as the price of this success.
The possession of Vajragarh was the stepping-stone to the capture of Purandar, or in Jai Singh’s own language, “the key that would unlock Purandar.” Dilir Khan now turned to the latter fort, while Jai Singh organized raids into the Maratha country, in order, as he wrote to the Emperor, to convince Shivaji and the Sultan of Bijapur that the Mughal army was large enough to be able to spare troops from the siege, and also to prevent any concentration of forces around Shivaji by creating constant terror and disturbance in various parts of his kingdom.
There was also a secret reason for thus sending away some generals from the siege camp. He had some disloyal officers under him, whose presence was worse than useless. Daud Khan Qureshi was posted to watch the postern gate (Khirki) of the fort; but after a few days, it became known that a party of Marathas had entered the fort by that gate, without being opposed by him. Dilir Khan severely rebuked Daud Khan for his failure, and a bitter quarrel broke out between the two. Jai Singh then transferred Daud Khan to his own division and posted Purdil Khan and Subh-Karn Bundela opposite the postern.
But matters did not improve: “Subh-Karn did not at all give his heart to the work, but preferred above everything else to favor Shiva !” Daud Khan, too, was a source of mischief in his new station. He constantly declared that the capture of Purandar was beyond the range of possibility and that the siege was a waste of men and money. His intention in talking in this way was, as Jai Singh detected, to discourage the commander-in-chief from heartily supporting the siege-operations so that Dilir Khan would be left to bear the burden of the fight unaided and would have to retire with failure and disgrace. Jai Singh removed the mischief-maker from the camp by creating an independent flying column and sending him at its head, to make raids daily, or on alternate days, in different places in the district.
Maratha Efforts to Raise the Siege
Meantime the Maratha captains had not been idle but tried hard to harass the Mughals and raise the siege. Early in April, Netaji Palkar, Shivaji’s kinsman, and cavalry leader made a dash on Parenda, but a Mughal detachment from Supa hastened in pursuit, and the Maratha host melted away at the news and offered no fight. Late in May, Qutb-ud-din Khan had to advance up to Fort Urouda, to break up a gathering of the enemy of which he had got news.But the Marathas did not invariably fail. As Jai Singh admits, “sometimes we have failed to prevent the enemy from accomplishing their hostile designs.” Khafi Khan is more explicit: “The surprises of the enemy, their gallant successes, attacks on dark nights, blocking of roads and difficult passes, and burning of jungles, made it very hard for the imperialists to move about. The Mughals lost many men and beasts.”
After the capture of Vajragarh in the middle of April, Dilir Khan advanced along the connecting ridge and laid siege to the machi or lower fort of Purandar. His trenches approached the tower of Khad-kala at the north-eastern angle of the fort. “At first, the garrison made sorties to drive back the besiegers. One night they attacked Kirat Singh, who was quite prepared and repulsed them with slaughter. Another attack was mags; in a dark night on the trenches of Rasul Beg Rozbhani: he was caught napping, the guns in his trenches were spiked, and 15 of his soldiers wounded. But reinforcements, attracted by the din of battle, poured in from the neighboring trenches, and the enemy was repulsed with loss. Next day there was a sharp skirmish over the removal of the corpses, in which the Mughals lost 8 men.
But Dilir Khan sat down before Purandar like grim Death, his men “doing in a day what could not be achieved elsewhere in a month.”
Outworks of Purandar Stormed
When, in the course of May, the Mughal trenches reached the foot of the two White Towers, which had been dismantled by bombardment, the garrison began to throw down lighted naphtha oil, leather bags full of gunpowder, bombs and heavy stones which effectually stopped the further advance of the Mughals. Jai Singh ordered a high: wooden platform of logs and planks to be made, on which guns were to be mounted and parties of gunners and musketeers placed, to command the enemy’s position. His first two attempts were frustrated: on the first occasion, the upright posts had been just set up, on the second the cross-pieces had been joined, when the enemy burnt them down.
On 30th May, however, the parts of the third tower were joined together in the rear and sent to the appointed place in front of the White Tower, in charge of Rup Singh Rathor and Giridhar Purohit, with orders to set up a defensive wall in front first of all, and then plant the two rows of posts. Next, some Rajput marksmen were to climb to the top and keep the enemy down with their bows and matchlocks while the tower was being completed. This was done two hours before sunset.
Then the general’s hands were forced by the impetuosity of his men. Before artillery was mounted on the wooden tower and the enemy opposite crushed, with only two hours of daylight remaining, some Ruhela soldiers, without informing Dilir Khan, tried to storm the White Tower. The enemy crowded on the wall in large numbers and checked them. But reinforcements rapidly arrived: the men of the trenches on both hands sealed the wall with ladders, and ran towards the enemy. Jai Singh’s officer Bhupat Singh Puar, a commander of 500, was slain on the right side of the smaller White Tower, with several other Rajputs. On the left side, Balkrishna Sakhawat and some Afghans of Dilir Khan carried on the fight. Just then the line of supports, under Achal Singh and Kirat Singh, arrived on the scene of battle from their shelter behind the wooden structure.
After an obstinate struggle at close quarters, the Marathas lost heavily, retreated to behind the Black Tower and began to gall the Mughals by discharging bombs, kettles full of gunpowder, rockets, stones etc. Finding further advance impossible, Jai Singh was contented with the capture of the three bastions made that day and ordered his men to dig trenches exactly where they had reached and to hold the White Tower, without attempting to push on to the Black Tower.
In the course of the next two days, the wooden structure was completed and two small pieces of cannon were mounted on it. The enemy, unable to reply to this fire from a superior height, evacuated the Black Tower and another bastion near it and took refuge in a stockade adjoining the wall of the tower. But they could not show their heads. The stockade was untenable, and they retired to the trenches behind it. Thus five towers and one stockade of the lower fort fell into the hands of the Mughals.
Purandar now seemed doomed. And, as if to complete its destruction, the Emperor had at J ai Singh’s request dispatched a train of very heavy artillery which was now on the way to the fort. The garrison had suffered heavy casualties during two months of incessant fighting. Early in the siege, they had lost their gallant commandant Murar Baji Prabhu.
Taking seven hundred select men with himself, Murar Baji made a sortie on Dilir Khan, who was trying to climb the hill with 5,000 Afghans and some more troops of other races. The Marathas dashed forward, mingled with the enemy on all sides, and there was severe fighting at close quarters. Murar Baji with his Mavles slew 500 Pathans besides many Bahlia infantrymen, and at the head of sixty desperate followers cut his way to Dilir’s camp.
His comrades were slain by the overwhelming body of the Mughals, but Murar Baji rushed straight on towards Dilir. The Khan, in admiration of his matchless courage, called upon him to yield and promised him his life and a high post under him. Murar indignantly refused and was going to strike at Dilir when the latter shot him down with an arrow. Three hundred Mavles fell with him, and the rest retreated to the fort. But the garrison continued the struggle, undismayed by their leader’s fall and saying, “What though one man Murar Baji is dead? We are as brave as he, and we shall fight with the same courage !”
But at last the steady pressure of Jai Singh bore fruit. Purandar was closely invested, the garrison had been woefully thinned by two months of fighting, and now the capture of five bastions of the lower fort made the stronghold untenable. Its fall was only a question of time. Shivaji found it futile to prolong the resistance. The families of the Maratha officers were sheltered in Purandar, and its capture would mean their captivity and dishonor. He had also failed to prevent the Mughal flying columns from ravaging his country. Failure and ruin stared him in the face wherever he looked.
The Mughal victory of 2nd June and the impending fall of the lower fort decided Shivaji. He resolved to interview Jai Singh and offer fresh terms for peace with the imperialists. Shivaji next demanded and secured from Jai Singh an assurance, confirmed with solemn oaths, that he would be allowed to visit Jai Singh and return home in safety, whether his terms were accepted or not.
Shivaji interviews Jai Singh
Raghunath Ballal, the Maratha envoy, returned to his master on 9th June. On the 1oth he sent word that Shivaji would come next day. On the 11th, at 9 o’clock in the morning, while Jai Singh was holding court in his tent at the foot of Purandar, Raghunath came in and reported that Shivaji had arrived at hand in a pallet: accompanied by six Brahmans only. Jai Singh immediately sent his secretary Udairaj and Ugrasen Kachhwa to meet him on the way and tell him that if he agreed to surrender all his forts he might come, otherwise, he should turn back from the place. Shiva agreed to the terms in general and proceeded forward with the two officers. At the door of the tent, he was welcomed by Jai Singh’s Paymaster and ushered in.Raja Jai Singh of Amber receiving Shivaji Maharaj a day before concluding the Treaty of Purandar (ref)
The Rajah advanced a few steps, embraced Shivaji, and seated him by his side, while armed Rajputs stood around to guard against any treacherous movement on the part of the slayer of Afzal Khan!
Jai Singh had got up a little scene to conquer any lingering reluctance that Shivaji might still have had. In anticipation of the Maratha chief’s arrival, he had sent word to Dilir Khan and Kirat Singh, whose trenches were the most advanced, to be ready to deliver an assault on Purandar.
After Shivaji had entered, Jai Singh gave the signal, the Mughals attacked and captured the remaining part of the Khadkala defenses. The garrison made a sortie to check them but was driven back with the: loss of 80 killed and many wounded. The fighting could be distinctly seen from the interior of the Rajah’s tent. Shivaji then offered to surrender the fort in order to prevent the useless slaughter of his men.
Treaty of Purandar, 1665.
Up to midnight, the two sides haggled for the terms of a permanent peace. But Jai Singh knew the strength of his position. Gradually, after much discussion, they came to this agreement:
- That 23 of his forts, the lands of which yielded 4 lakhs of hun as annual revenue, should be annexed to the Empire; and
- that 12 of his forts, including Rajgarh, with an annual revenue of 1 lakh of hun, should be left to Shiva, on condition of service and loyalty to the imperial throne.”
In addition to the above terms, Shivaji made another and a conditional engagement with the Mughals: “If lands yielding 4 lakhs of hum, a year in the lowlands of Konkan and 5 lakhs of hun a year in the uplands (Balaghat Bijapuri), are granted to me by the Emperor and I am assured by an imperial farman that the possession of these lands will be confirmed in me after the expected Mughal conquest of Bijapur, then I agree to pay to the Emperor 40 lakhs of hun in 13 yearly instalments.” He was expected to wrest these lands from the Bijapuri officers by means of his own troops.
Here we detect the shrewdness of Jai Singh’s policy in throwing a bone of perpetual contention between Shivaji and the Sultan of Bijapur. As he wrote to the Emperor, “This policy will result in a threefold gain: first, we get 40 lakhs of hun or 2 crores of Rupees; secondly, Shivaji will be alienated from Bijapur; thirdly, the Imperial army will be relieved from the arduous task of campaigning in these two broken and jungle regions, as Shiva will himself undertake the task of expelling the Bijapuri garrisons from them.” In return for it, Shiva also agreed to assist the Mughals in the invasion of Bijapur with 2,000 cavalries of his son Shambhuji’s mansab and 7,000 expert infantry under his own command.
Next day (12th June), according to the agreement, 7,000 men and women, (of whom 4,000 were combatants), left Purandar, and the Mughals entered into possession of it; all the stores, weapons, artillery, and other property found within were attached by the Government. Mughal officers were sent with Shivaji’s men to take charge of five other forts to be surrendered by the Marathas.
On the 14th Shivaji was presented by Jai Singh with an elephant and two horses, and sent away to Rajgarh with Kirat Singh, after paying a ceremonial visit to Band Khan. Reaching Kondana at noon of the 14th, Shivaji delivered the fort to Kirat Singh and left for Rajgarh, where he arrived on the 15th. On the 17th he sent away Shambhuji from Rajgarh, in charge of Ugrasen Kachhwa and they arrived in Jai Singh’s camp on the 18th.
The Maratha forts surrendered to the Emperor by the Treaty of Purandar were:
- In the Deccan: Rudramala or Vajragarh, Purandar, Kondana, Rohira, Lohgarh, Isagarh, Tanki, Tikona, Khad-kala near Kondana;
- In Konkan: Mahuli, Muranjan, Khirdurg, Bhandardrug, Tulsikhul, Nardurg, Khaigarh or Ankola, Marg-garh or Atra, Kohaj, Basant, Nang, Karnala, Songarh, and Mangarh.
Thus, in less than three months from the date when he opened the campaign, Jai Singh had succeeded in vanquishing Shivaji. Shivaji loyally carried out his promises: in the war with Bijapur he with his contingent rendered distinguished service under the Mughal banner and was mentioned in the dispatches.
Marathas' Re-capture of Purandar
In the period after the Purandar Treaty from 1667 to 1669, Shivaji lived in peace with the Mughal Government. His relations with Bijapur were also passive. He was busy framing a set of very wise regulations, which laid the foundation of his Government that remains as an object of admiration to this day.
But the peace was essentially a hollow truce on both sides. Shivaji's aim was to recover his strength during this respite from war.
On 11th December 1669, Emperor Aurangzeb received a dispatch from the Deccan reporting the desertion of four Maratha captains of Shivaji's clan (biradari) from the imperial services. Aurangzeb responded by sending Dilir Khan from Deogarh and Daud Khan from Khandesh to Deccan to defend it against Shivaji.
Shivaji opened his offensive with great vigor and immediate success. His roving bands looted Mughal territory and he attacked many of the forts that he had lost in the Purandar Treaty. The most conspicuous capture was of Fort Kondana from Udai-bhan, it's Rajput killedar on 4th February 1670. Assisted by some Koli (fishermen) guides who knew the place well, Tanaji Malsure, with 300 Mavle warriors scaled the hillside near the Kalyan gate using rope ladders and advanced into the fort, killing the sentinels.
Despite the loss of the brave Tanaji Malsure, his brother Suryaji Malsure continued the fight and won the Fort. It was later renamed as Singh-garh in honor of Tanaji Malsure, the lion-hearted hero.
On 8th March, Nilo Pant recovered Fort Purandar, capturing its killedar Razi-ud-nin Khan. A few days later they recovered the forts of Kalyan and Bhivandi. On 16th June 1670, Mahuli Fort was also recovered. By the end of April 1670, Shivaji had won back almost all the forts he had lost in the Purandar Treaty.
The second treaty of Purandar - 1776
Rare Books Society of India)
After the power of the Peshwas had superseded that of the descendants of Sivaji at Poona, Purandar was the usual stronghold to which the Peshwas retreated when unable to remain in safety at their capital.
In 1818, Purandhar was invested by a British force under General Pritzler. On the 14th of March a mortar battery opened on it; and on the 15th, Wazirgarh admitted a British garrison. As Wazirgarh commanded Purandhar, the commandant had to accept the terms given to that garrison, and the British colors were hoisted at Purandhar on the 16th March 1818.
The fort commands a passage through the Ghats, called the Purandhar Ghat. Here, in 1776, was concluded a treaty between the British Government and the Maratha States; but its conditions were never fulfilled, being overruled by the subsequent treaty of Salbai in 1782 between the Bombay Government and Raghuba, at the close of the
first Maratha war (ref: Hunter, William (1886), The Imperial Gazetteer of India, London: Trubner and Co.).
During the last war, the British military sanitarium on Lower Purandhar Fort was used for the accommodation of Jewish and anti-Nazi refugees from Germany and Austria detained under comparatively light restrictions (ref: The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland No. 3/4 - October, 1950, pp. 158-162).
Now the area around Purandar Fort has been allocated and built up as an Army Training Area and is restricted for entry between 9 am and 5 pm.
■ #प्रौढप्रतापपुरंदर - (भाग -१)
सूर्य आता बुडत आला होता. तांबड्या-भगव्या संधीप्रकाशाची उधळण संपूर्ण कर्हेपठारावर झाली होती. पण कर्हेपठारावरच्या दऱ्या-खोऱ्यात एरवी सुखात असणाऱ्या खेडोपाडी आज नेहमीचा प्रसन्नपणा नांदत नव्हता. ना माघारी परतणाऱ्या गाई-गुरांच्या गळ्यातल्या घंट्या-घुंगरांचे आवाज होते, ना बाया-बापड्यांची तिन्ही-सांजेची लगबग. मंदिरांमधून घंटा-आरत्या आज ऐकू येत नव्हत्या. कुठल्याश्या गावात पारापसल्या चावडीवर ना कोणत्या बुवांचे कीर्तन ऐकू येत होते ना टाळ गर्जत होते. ना अंगणातल्या तुळशीपाशी दिवे लागले होते, ना गोठ्यातल्या गायी-म्हशींच्या दुधाने चरव्या निथळत होत्या...नाही म्हणायला घरट्यांकडे परतणाऱ्या पाखरांचा कलकलाट तेवढा गुंजत होता.
सुमसाम झालेल्या संपूर्ण मावळात कसलासा सुन्नपणा भरून राहिला होता! जणू एखाद्या अनामिक भीतीपोटी सगळं मावळ खोरं चिडीचिप्प होऊन बसलं होतं! पण ही भीती अनाठायी नव्हती, अनामिक नव्हती...
आज स्वराज्याच्या माजघरातच एक भलामोठा अजगर वेटोळे घालून फुत्कारीत होता!!
राजेवाडीजवळ औरस चौरस पसरलेल्या महाप्रचंड मोंगल छावणीत घाई गडबड चालली होती! शेकडो तंबू-राहुट्या आणि शामियान्यातुन लगीनघाई असल्यासारखे वातावरण होते. उत्साह होता. पागेत हजारो हजार डौलदार घोडे उभे होते, साखळदंडात बांधलेले हत्ती सुस्तपणाने झुलत होते, दावणीला बांधलेले समान वाहणारे बैल आणि खेचरे, शेकडो मोठं मोठाल्या तोफा, शुत्तरनाळा, पिलनाळा..शस्त्रांचे मोठाले कोठार..त्यात रचलेल्या तलवारी-भाले-बंदुकांच्या राशी, गाड्या भरभरून वागवले जाणारे धान्य, दारू गोळ्यांनी भरलेले भलेमोठे पेटारेच्या पेटारे...कापडा-चोपडांचे ढिगारेच्या ढिगारे, अगणित पालख्या, अंबाऱ्या, मेणे, छत्रे वगैरे सगळा जामानिमा डोळ्यात ठरत नव्हता! हजारो मोंगल सैनिक युद्धसज्जतेत गुंतलेले होते. मोठे मोठे सरदार आणि उमराव आपापल्या फौजफाट्याचा जायजा घेण्यात मश्गुल होते. कानावर बोरू अडकवलेले कारकून आणि बगलेत लखोटे बाळगणारे निरोपे इकडून तिकडे घाईने फिरत होते. तात्पुरत्या उभ्या केलेल्या भटारखान्याच्या दिशेने पोत्याने धान्याची भाज्यांची ने-आण अव्याहत सुरू होती. जागोजाग पेटलेल्या मशाली, दिवटे आणि मेहताबा छावणी उजळून काढत होत्या. एकूणच छावणीची अमिरी आणि भव्यता मोंगली सैन्याची सज्जता आणि सकत दाखवत होती!
छावणीच्या एका बाजूला उंच शाही शामियान्यात मिर्झा राजे किरतसिंह, इंद्रामण बुंदेला, कुबाद खान इत्यादी मंडळीसह मसलतीत गुंतले होते. सैन्याचे पुढचे डावपेच, हालचाली राजकारणावर खलबते सुरू होती. आजूबाजूचे करकून कधी हिशोब, कधी नकाशे, कधी आलेली पत्रे अधून मधून मधून बैठकीसमोर सादर करत. मिर्झा राजे एक एक नकाशा बारकाईने न्याहाळत असतानाच -
"खम्मा घणी...राजा जी की जय हो..." एका निरोप्याच्या आवाजाने मिर्झा राजेंची तंद्री भंगली. प्रश्नार्थक चेहरा करून त्यांनी निरोप्याकडे पाहिले.
"हुकूम, सरदार दिलेर खान पुरंदर गढ़ पोहोंच चुके हैं। उनकी ओर से ये संदेस आया है कि वह किसी कारणवश सासवड नहीं रुक सके। सीधे गढ़ के पास पहुंचकर उन्होंने घेराबंदी का काम आरम्भ कर दिया है। आपसे प्रार्थना है के आप स्वयं तुरंत गढ़ की तरफ कूच करें।" राजपुती निरोप्या अत्यंत नम्र आवाजात बोलला.
थेट पुरंदर?! इतकं तडका फडकी? दिलेर तर सासवडला मुक्कामी थांबून दोन दिवसांनी वेढा सुरू करणार होता! मिर्झा राजेंना थोडं आश्चर्यच वाटलं... शिवाय आपण मुखत्यार असता दिलेर परस्पर वेढा सुरू करतो हे पाहून त्यांना किंचित विशाद देखील वाटला असावा!
=======================
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या हिंदुस्थानात तळहातावरल्या तिळाएवढा भाग मात्र स्वातंत्र्याच्या झळाळीने झगमगून निघाला होता! कंदहारपासून ते जिंजीपर्यंतचा संपूर्ण भूभाग एकाच सब्ज हिलाली हुकूमतीच्या अमलाखाली आणण्याची स्वप्ने रंगावणाऱ्या औरंगजेबाच्या नजरेत दक्खनवर उगवलेला हा ठिपका सलत होता. ठिपका मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला होता! पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट अंधारात तळपणारी ही भगवी ठिणगी त्याला स्वस्थ बसू देईना! वेळीच आवर घातला नाही तर ही ठिणगी वणवा भडकावेल अशी त्याला भीती होती. भीती रास्त होती! पण आवर घालावा कसा?
अमीर-उल-उमराव नवाब शाहिस्तेखान, जसवंत सिंह राठोड, कारतलब खान वगैरे बड्या बड्या मोंगल सरदारांना मराठ्यांनी अक्षरशः झोडपून बडवून काढले होते. हिंदुस्थानातल्या सर्वात मोठ्या सल्तनतीचे हे जंगबहाद्दूर बाशिंदें! सिंधू नदी पासून ते ब्राह्मपुत्रेपर्यंत पसरलेल्या मोंगल रियासतीचे शिलेदार!
अश्या ह्या नामवंत सरदारांना पिकात घुसलेल्या रानडुकरांना जसे हुसकावून लावले जाते तसे हाकून लावले कोणी? सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या मराठ्यांच्या पोरा-सोरांनी! बरं ह्यांचे पराभव काय साधेसुधे होते?
कोकण जिंकण्याचा मनसुबा बाळगून दहा हजार पठाणांसह उंबरखिंडीत उतरलेल्या कारतलबला मूठभरच मराठ्यांनी बुकल बुकल बुकलला! एवढा नावाजलेला सरदार कारतलब! अक्षरशः फक्त अंगावरच्या कपड्यानिशी कसा बसा माफीची भीक मागत माघारी चालता झाला! नवाब शाहिस्तेखान! खुद्द जहाँपनाहचे मामा. लाखभर फौजेच्या गराड्यात लाल महालात तीन वर्षे ठिय्या मांडून बसले होते! पाहून पाहून एकेरात्री महाराजांनी मामासाहेबांना असा दणका दिला की पुण्यात तीन वर्षे रमलेले मामा तीन दिवसात गाशा गुंडाळून पळून गेले! तीन वर्षांच्या बदल्यात मामाना तीन बोटे मात्र द्यावी लागली! महाराजांनी कयामतच्या दिनापर्यंतसाठी मामासाहेबांच्या बेइज्जतीची सोय करून टाकली!
असे कित्येक सरदार शेकून निघाले, शाही खजिन्यातले करोडो रुपये खर्चून झाले, तोफांच्या, बंदुकांच्या अगणित फैरी झाडून झाल्या, हजारो शिपाई, लाखो हत्यारे, खंडोगणती दारुगोळा ढगात गेला...तरीही शिवाजी नावाचे वादळ शमता शमेना! लवेना! झुकेना!
एवढेच कशाला? मोंगल रियासतीचे वैभव असणारी, धन-धान्य, पैसा-अडका, जड-जवाहिर, दुधा-तुपाने, सुख-समृद्धीने उतू जाणारी, संपन्नतेची असल मिसाल कायम करणारी, मुग़लिया सल्तनतीची शानोशौकत म्हणून मिरवणारी सुरत ह्या शिवाजीने लुटून धुवून नेली! उरले सुरले जाळून पोळून राख करून टाकले! दात कोरायला काडी शिल्लक ठेवली नाही. जणू मोंगलशाहीच्या कानफटात मारून मुकुटावरचा मणीच ओरबाडून नेला! इतका प्रचंड अपमान आणि फजिती आलमगीर औरंगजेबाला सहनच होईना. दक्खनच्या कोण्या एका पहाडी मराठ्याने स्वतःला 'आलमगीर' म्हणवणाऱ्या हिंदुस्थानच्या शेहेंशाहची दाढी मुठीत नुसती पकडलीच नव्हती तर हिसडे देऊन, अगदी उपटून हातात ठेवली होती. बेशक ह्या सर्व गोष्टी देशविदेशात देखील कळत असणार. मोंगल रियासतीच्या बेअब्रूचे किस्से चघळले जात असणार! हे विचार औरंगजेबाला सतत छळत होते.. पण करायचं काय?!
आणि मग एके दिवशी औरंगजेबाला खयाल आला तो एका बुलंदमियार सरदाराचा! कच्छवाह घराण्याचा वारसा सांगणारे, पिढीजात राजेपद मिरवणारे, प्रभू श्री रामाचे वंशज म्हणवणारे, परमप्रतापी, महापराक्रमी, मुत्सद्दी, हुशार, अनुभवी, तालेवार आणि समशेरबहाद्दूर - मिर्झा राजे जयसिंह!! मिर्झा राजेंच्या पिढ्यान् पिढ्या मोंगल बादशहांच्या सेवेत खर्ची पडल्या होत्या! इमानदारी, शौर्य आणि मुत्सद्देगिरी मिर्झा राजेंच्या ठिकाणी एकवटलेली होती. बस! इतका नायाब सेनापती दुसरा नाहीच! औरंगजेबाने लगोलग मिर्झा राजांना तलब करून दक्खनच्या मोहिमेची जबाबदारी त्यांच्या मजबूत खांद्यांवर टाकली!
"मिर्झा राजा, आपकी कुव्वते बाजू और शमसीर की ताकत से पुरा हिंदोस्तान मुखातिब है। आपकी दानिशमंदी से भी पूरी कायनात वाकिफ है। मुग़लिया सल्तनत पर मंडरानेवाली न जाने कितनी आफतों के खिलाफ आपने अपने बुलंद हौंसलों और ताक़तसे सल्तनत का दिफ़ा किया है। आज माँबदौलत फिर एक बार आपसे खिदमत की उम्मीद रखती है। दख्खन में सिवाजीने जालसाजी और मक्कारी से मुग़लिया किलों और शहरों पर कब्जा करने की जुर्रत की है। इस दगाबाजी और बद् दियानतीपर उसे सजा देने के लिए काफी सारे सिपहसालार रझामंद है। लेकीन माँबदौलत इस खुशकिस्मतीसे आपके मुकद्दर को नवाजना चाहते हैं...हमे आपकी बहादुरी और ईमानदारी पर पूरा ऐतबार हैं।"
औरंगजेबाला वास्तविक मिर्झा राजेंशिवाय दुसरा उपाय सुचत नव्हता. पण तो आव असा आणू पाहत होता जणू काय ही मोहीम चालू करून तो मिर्झा राजेंवर उपकारच करत होता!
बादशाहच्या ऐतबारीचा मान ठेवून मिर्झा राजेही जल्द अज जल्द दक्खनच्या दिशेने निघाले! औरंगजेबाने मिर्झा राजेंच्या दिमतीला अगणित खजिना, तोफा, हत्ती, उंट, दारुगोळा दिला. पन्नास हजार पायदळ आणि वीस हजार घोडदळ दिले. दिल्लीहून दक्खनला पोचता पोचता हा आकडा वाढत जाणार होता. सन 1665च्या जानेवारी महिन्याच्या सुमारास ह्या प्रचंड फौजेचा लोंढा दख्खनच्या दिशेने गडगडत सुटला.
मिर्झा राजे नर्मदा ओलांडून आधी दख्खनच्या दरवाज्यावर, म्हणजे बुऱ्हाणपुरात आले. औरंगजेबाचा मुलगा, शाहजादा मुअज्जम दक्खनचा सुभेदार होता. मुअज्जम साहेब मस्तमौला होते. उत्तमोत्तम पक्वान्ने खावीत, पोटभर दारू प्यावी, मनसोक्त शिकार करावी, दिलखेच जनानखान्याचा आस्वाद घ्यावा आणि निवांत हुक्का फुंकीत मुजरे पाहावेत एवढाच त्यांचा साधा सरळ कार्यक्रम असे. मराठ्यांसोबत, आदिलशाहीसोबत भांडणे करून मुघल राज्याचा विस्तार वगैरे भानगडीत त्याला अजिबात स्वारस्य नव्हते.
बुऱ्हाणपुरात काही दिवस मुक्काम करून मिर्झा राजेंनी फौजांची जुळवाजुळव केली. तिथेच त्यांना दिलेर खान येऊन सामील झाला! दिलेर वतनात असताना त्याला मिर्झा राजेंना सामील होण्याचे फर्मान दिले गेले आले. शाही हुकुमाची तामील बजावण्यासाठी दिलेर पठाणी फौजेसह तडक बुऱ्हाणपुरात दाखल झाला. रुस्तुमेकंदाहार दिलेर खान जातीने पठाण होता. स्वभावाने काबुल-कंदहारच्या वाळवंटाइतकाच रखरखीत, क्रूर, गरममिजाज आणि करडा! धर्मप्रति जितका कडवा, औरंगजेबाप्रति तितकाच इमानी!
बुऱ्हाणपुराहून हा अजस्त्र मोंगली वरवंटा मार्च 1665च्या सुमारास स्वराज्यावर चालून आला! मिर्झा राजेंच्या मते आधी सर्व मैदानी मुलुख मारून डोंगर-किल्ल्यांची रसद तोडणे महत्वाचे होते. त्यानुसार त्यांनी हालचाली सुरू देखील केल्या. पुण्यात पोचून राजांनी कुतुबुद्दीन खान, बीमरदेव सिसोदिया, झाइद खान वगैरे सरदारांना फौजा देऊन जुन्नर, लोहगड वगैरे भागात पाठवले. रणदौलत खान, जानिसार खान वगैरे सरदारांना हजारोंच्या फौजा देऊन कानद खोरे, भोर मावळ, गुंजण मावळ, पौड खोरे इत्यादी भागांची पक्की नाकेबंदी करून ठेवली! अनेक सरदाराना फौजफाटा देऊन स्वराज्याच्या निरनिराळ्या भागात ठाणी काबीज करण्यास सोडले. शिवाजी महाराजांविरुद्ध यश मिळावे म्हणून मिर्झा राजेंनी इथे कोटीचंडी यज्ञ देखील केला! भरपूर दान-धर्म केला! देव देखील गालातल्या गालात हसले असणार! अधर्मी भक्त काय रावण देखील होता...
दिलेर खानाचा मनसुबा मिर्झा राजेंच्या अगदी उलट होता. त्याला आधी डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची घाई लागली होती. एकदा का डोंगरी दुर्गम मुलुख हातात आला की मग शिवाजीला पनाह घेण्यास जागाच उरणार नाही असा त्याचा तर्क होता! पण सह्याद्रीचे किल्ले म्हणजे काय चिकणमातीची ढेकळे होती की काय सहज फुटायला?
पण अखेर मिर्झा राजेंनी दिलेरच्याच मनसुब्याला मान्यता दिली! मसलतीत पहिला गड निवडला गेला. पुण्याच्या आग्नेयेस असणारा स्वराज्याचा एक अभेद्य किल्ला!! किल्लेपुरंदर!!!
त्यानुसार मार्च महिन्याच्या अखेरीस मोंगली सैन्य लोणी-काळभोर मार्गे दिवे घाटाला वळसा घालून राजेवाडीस पोचले! छावणी पडली. सैन्याची आघाडी दिलेर खान स्वतः सांभाळत होता! इथून पुरंदर फक्त सात कोस!
===================
राजेवाडीहून मिर्झा राजेंचा निरोप घेऊन दिलेर खान सासवडच्या रोखाने रवाना झाला. राजेवाडीहून सासवड फार तर एक मजलभराचे अंतर. तो आघाडीची फौज घेऊन पुरंदरला वेढा घालणार आणि सुपे-शिरवळ वगैरे ठाण्यांचा बंदोबस्त करून मिर्झा राजे त्याला येऊन मिळणार असा बेत मुकर्रर झाला होता. त्याच्या निसबतीला सुमारे दहा हजार फौज होती. शिवाय पाच हजार हत्यारबंद आडदांड पठाण होते!
दुपार टळून गेली तसा दिलेर खान खळद, नारायण पेठ वगैरे ओलांडून दौडत सासवडास पोचला! मोंगली फौज येण्याची खबर लागल्याने गाव ओस पडले होते! जमेल तितके आणि जमेल तसे गाठीशी मारून गरीब रयतेचे जथ्थेच्या जथ्थे बायका पोरांसह डोंगर दऱ्यात पळून गेले! हीच परिस्थिती मावळतल्या अनेक गावांची होती. गेली कित्येक दशके-शतके हाच शिरस्ता होता. कुठल्या ना कुठल्या सुलतानाची फौज अचानक दौडत येई. घरे दारे लुटली जात, आया-बहिणी बाटवल्या जात, माणसांना पकडून गुलाम बनवले जाई, गायी-गुरांना फरफटत नेले जाई...शेतीची नासधूस आणि माणसांच्या कत्तली होत त्या वेगळ्याच!
सासवडच्या बाहेर मुक्काम करण्याची फौजेची तयारी सुरू झाली. बुणगे लगबग करून शामियाने-राहुट्या उभारू लागले. हत्ती-घोड्यांसमोर वैरण पडू लागली. सरदार आपापल्या शिलेदारांना ओरडून ओरडून हुकूम सोडू लागले. नोकर चाकर सामान सुमान वागवत धावपळ करू लागले.
थोड्या बाजूला दिलेर खान काही लोकांसह फौजेच्या हालचाली पाहत मोठ्या दिमाखात उभा होता. तो मध्येच एकदा फौजेकडे तर मधेच पुरंदरच्या दिशेला पाही! इथून पुरंदर फक्त अडीच कोस. इथून दिलेरला उंचच उंच डोंगरावर बालेकिल्ल्याच्या तटबंदीचा आकार पुसट दिसत होता...
"क्या कहते हो मुकर्रब? यह किला कितने वक्त में काबिज़ होगा?" - दिलेर कुर्र्यात बोलला.
"ज्यादा से ज्यादा हफ्ताभर हुजूर। हमारी तोपें इसकी दीवारों को देखते ही देखते ढहा देंगी। और फिर किले पर होंगे ही कितने लोग?" मुकर्रबखान किल्ल्याकडे पाहत उत्तरला.
"जितने भी होंगे मुकर्रब..हमारी शमशीर से मुखातिब होंगे तो दोजखही पोहोंच जाएंगे।"
"बहोत आला फर्माया हुजूर..."
हे बोलणे चालू असतानाच अचानक कल्लोळ उसळला! छावणीच्या मागच्या बाजूला भयातिरेकाने किंकाळ्या उठल्या. लोक सैरा-वैरा धावू लागले. दिलेर दचकला! एकदम काय झालं? एखादा हत्ती-बित्ती बिथरला की काय? दिलेर आणि मंडळी छावणीकडे दौडली. बघतात तो बुणगे वाट फुटेल तिकडे धावत होते, जनावरांसाठी रचलेल्या गवताच्या गंजी धडाधड जळत होत्या. धूर उठला होता! 'भागो भागो'च्या हाकाट्या उठल्या होत्या! दिलेर भंडावून गेला...जिकडे गोंधळ सुरू होता तिकडे धावला..आणि समोर पाहतो तर
शे-पाचशे मर्द मराठे गाडी बेलाशक छावणीत घुसले होते!
मराठे आले? मराठे? खरंच आले? कुठून? कधी? कसे?
भगवे झेंडे थुई थुई नाचवत मराठा घोडेस्वार तलवारींनी दिसेल त्याला कापत सुटले होते, भाल्याने भोसकत आणि पट्ट्यांनी छाटत सुटले होते!! होय! पंधरा हजारांच्या पठाणांच्या फौजेवर त्या इवल्याश्या पण बेडर मराठा तुकडीने बिनदिक्कत, बेधडक छापा घातला होता!! नुसती कत्तल कत्तल कत्तल!! दिलेर क्षणभर अवाक् झाला..मग संतापला!
तार आवाजात भराभर हुकूम सोडून त्याने सरदारांना हुशार केले. इतका वेळ नेमकं काय चाललंय हेच न कळल्याने सुन्न झालेले पठाण दिलेरच्या आरडा-ओरड्याने भानावर आले. ताबडतोब हत्यारे आणि पागा पेश केली गेली. मराठ्यांना हुसकून लावण्यासाठी दिलेर आणि मंडळी तीर तलवार घेऊन, बंदुका ठासून सज्ज झाली..पण..
कुठायत मराठे?! गायब झाले! असे कसे गायब झाले? कुठे गेले? माहीत नाही...कुठून आले? पता नही! दिलेर खानाचे पाहिले स्वागत एकूणच जोरदार झाले. मराठ्यांनी बेसावध दिलेरच्या पाठीत जणू जोरखैच गुद्दाच घातला होता. जमेल तितकी कापाकापी आणि जाळपोळ करून मराठे पसार झाले होते!
छावणीची झालेली दुर्दशा पाहून दिलेर भडकला!!
"मिर्झा राजा को पैगाम भेजो। कहना सीधे किलेपर पोहोंचे.." संतापाने दातावर दात चढवून दिलेर कसा बसा पुटपुटला!
आणि मग फौजेला हुकूम सोडून तो स्वतः पुरंदरच्या दिशेने दौडत सुटला. मागोमाग काफीखान, मुकर्रबखान, मुसेखान वगैरे मंडळी देखील दौडत निघाले. दिलेर संतापाने धुमसत होता! एवढ्या मोठ्या सैन्यावर चिमूटभर उंडग्यांनी छापा घालायची हिम्मत केलीच कशी?! कशी? कशी म्हणजे काय? मराठ्यांना सवयच होती अशी मेहमाननवाजी करण्याची!
सासवड ऐवजी आता थेट पुरंदरच्या पायथ्याशीच मुक्काम घालायचा हा निश्चय करून तो फौजेसकट बेहाय दौडत पुरंदरपायथ्या जवळ आला.
आणि एवढ्यात! गनिमाची फौज किल्ल्याच्या जवळ येतेय हे पाहून अकस्मात किल्ल्यावरून तोफांची गडगडाटी सरबत्ती सुरू झाली! हल्ला होण्याआधीच पुरंदरवरून प्रतिहल्ला सुरू झाला! काही समजायच्या आतच तोफांचे गोळे येऊन फौजेवर अचूक आदळू लागले! दिलेर पुन्हा एकदा हैराण झाला...तोबा! हे मराठे म्हणजे माणसे आहेत का सैतान? दिलेर खानाला मराठ्यांशी झुंजायचं म्हणजे कोणत्या परिस्थितीला सामोरं जायचं हे समजून चुकलं! सांभाळून अंतर ठेवत फौज पायथ्याशी स्थिरावली!
घोड्यावरून उतरून अपमानाच्या आगीत होरपळलेल्या, सुडाने पेटलेल्या दिलेरने पुरंदराकडे नाकपुड्या फेंदारून जळजळीत नजर फेकली...
समोर उत्तुंग, बुलंद, बेलाग किल्लेपुरंदर माथ्यावर जरतारी भगवा मिरवत ताठ मानेने उभा होता!!
क्रमशः
===================
टीप : कहाणी रंगवताना काही संदर्भ चुकले, काही चूक भूल झाली तर मोठ्या मनाने माफ करा :) सुरज उदगीरकर.
शिवाजीराजांचा आपद्धर्म!

PURANDAR – FORT OF WARRIORS

“Purandar fort is just like any other fort but still it is a special one. Fort looks like so many huge mountains have been kept on each other with so many rock patches. On the edge of rock patches, the fortified wall has been built. Inside the fort wall, there is a Machi and inside a Machi, there is a Balekilla with a total twenty-four Buruj where Shendrya Buruj is the highest among all as it feels like Shendrya Buruj is touching to the sky. And inside a Balekilla, so many warriors will show their bravery with their sword just like so many kite birds are soaring in sky..!!”
– Chhatrapati Shivaji Maharaj
Purandar fort witnessed the rising of the king Chhatrapati Shivaji Maharaj against the Adil Shahi, Bijapur Sultanate and the Mughals.

But this hill fort not only cater to the needs of history lovers but also to the desires of adventure enthusiasts.
INDEX OF THE BLOG
PURANDAR FORT
INTRODUCTION
The fort stands at 4,472 ft (1,387 m) above the sea level in the Western Ghats, 50 km to the southeast of Pune.
The fort is now used by the National Cadet Corps academy for training purposes. Currently, most part of the fort is in ruins. But the majestic beauty of this architectural masterpiece in the heart of the Western Ghats, continue to pull thousands of tourists every month.
HISTORY
It is well said that – each of soil of Purandar has historical chapter.

BIRTH OF PURANDAR
Its mythological name is ‘Indraneel Parvat’. According to a legend, It is said that Purandar mountain is the broken part of the Dronagiri Parvat, which Lord Hanuman carried in the Ramayana.

Further history of the Purandar is grand and plays an important role during the Maratha Empire. Being located in a strategic place, the fort witnessed several historic battles, besiegement, treaties and shifting of powers.
FIRST INVASION
Purandar dates back to the Yadava Dynasty in the 11th century. Persian invaders first defeated Yadavas who further fortified the fort in 1350 A.D.

DARK DAY OF PURANDAR
Purandar then besieged several times under the rule of Bedar Sultanate. To prevent the Shendurya Bastion of fort from ever falling again, King of Bedar dreamt that, to appease its patron deity, a man should sacrifice his wife and their firstborn son on the spot, unless the foundation would never be sure. So he ordered his minster, Yesaji Naik Chive to bury his wife and his firstborn son into the foundation of the bastion which was promptly done with a further offering of gold and bricks. When the bastion was finished, a minister, was given possession of the fort and the father of the sacrificed boy was rewarded with two villages.
ADILSHAHI SULTANATE
In 1596 A.D, the Bahudar Shah of the Adilshahi Sultanate granted the territory of “Pune” and “Supa” to Maloji Bhosale, the grandfather of Shivaji Maharaj. But even though Purandar was included in the Maratha territory, it is still under Adilshahi Sultanate.

RISE OF SWARAJYA
In 1646 A.D, a young Shivaji Maharaj in one of his first victories for the Maratha Empire, raided and established a supreme control over the Purandar fort by Shiva sutra or Ganimi Kava (guerrilla tactics).

Maharaj son’s Chhatrapati Sambhaji Maharaj was born at Purandar Fort on 16th May 1657, who latterly became second Chhatrapati of Maratha Empire and carried the legacy of Shivaji Maharaj further and earned same respect & greatness just like his father.
Despite of array of challenges, he went on to rule for 9 years which was largely shaped by the ongoing wars between the Maratha kingdom and Mughal Empire as well as other neighbouring powers such as the Siddis, Mysore, and the Portuguese in Goa.

Sambhaji Maharaj in war with Portuguese 
Sambhaji Maharaj planning to make secret tunnel under the sea to reach Murud Janjira Fort
WARRIOR MURARBAJI & MAAVALE
In 1665 A.D, Purandar was besieged by the forces of Aurangzeb, under the command of Mirza Raje Jai Singh and assisted by Diler Khan backed by 5000 strong infantries.
On that time, Murarbaji Deshpande was the Killedar (keeper) of the fort with his 700 Maavale troops, offered strong resistance against the Mughal forces. In spite of crumbling defences, Murarbaji and his troops sustained a dogged defence. Maratha folk history has it that Murarbaji showed incredible skills as a swordsman and was an aggressive and inspiring leader who pushed back and caused a retreat of a larger Mughal force.

Diler Khan, impressed with the bravery of Murarbaji offered him a truce and employment in the Mughal forces. Murarbaji turned down the offer due to his loyalty to the ideals of Hindavi Swarajya. He was extremely enraged at this very suggestion and in an act of extreme daredevilry charged with his commandos right into the heart of the Mughal troops, killing hundreds.

The remaining Marathas inside the inner walls Balekilla, refusing to surrender and willing to fight to the last man but at the end ultimately giving up their lives in a struggle to retain the fort.
TREATY OF PURANDAR
Shivaji Maharaj daunted at the prospect of the fall of his grandfather’s fort, signed a treaty known as the “First Treaty of Purandar” with Aurangzeb in 1665.

According to the treaty, Maharaj handed over following twenty-three forts including Purandar, and a territory with revenue of four lakh Hons (gold coins):
1)Purandar, 2)Vajragad, 3) Kodhana, 4)Rohida, 5)Lohagad, 6)Visapur, 7)Tikona, 8)Tung, 9)Prabalgad, 10)Mahuli, 11)Bhandargad, 12)Manaranjan, 13)Kohoj, 14)Karnala, 15)Songad, 16)Palasgad, 17)Nardurg, 18)Margagad, 19)Vasantgad, 20)Nangagad, 21)Ankola, 22)Sagargad, and 23)Maangad
RECAPTURING PURANDAR
In 1670 A.D, the truce did not last long as Shivaji Maharaj revolted against Aurangzeb and just like Kondhana and other forts, He also recaptured Purandar after just five years and rebuild the Swarajya.

AFTER SHIVAJI MAHARAJ
The fifth Chhatrapati of Maratha and son of Sambhaji Maharaj, Chhatrapati Shahu Maharaj handed over the reigns of the fort to Peshwas under the Shake in 1695. Under the Peshwa rule, the fort acted as a stronghold whenever their capital city of Pune was under attack.
In 1776 A.D, a treaty was signed between the British Raj and the Maratha States are known as the “Second Treaty of Purandar”. Based on the terms of the accord, the British were able to secure Salsette.

Its conditions were never fulfilled and being overruled by the subsequent Treaty of Salbai in 1782 between the Bombay Government and Raghunathrao, under its terms, the Company retained control of Salsette and Broach, at the close of the First Anglo-Maratha War.

BRITISH RULE
On 14 March 1818, a British garrison marched into Vajragad. As Vajragad commanded Purandar, the commandant of the fort had to accept terms, and the British flag was hoisted at Purandar on 16 March 1818. During the British Raj, the fort was used as a prison. During World War II, it was an internment camp for enemy-alien (i.e. German) families. Therefore, it would be interesting that many of the Germans today calls Purandar their birthplace.

INTO SAFE HANDS
After Independence, fort went to under Indian Army and now there also functioned a National Cadet Corps (N.C.C.) Training unit at the top of Purandar.

For more detail history of Purandar Fort
BASE VILLAGE & REGION
Gherapurandar is a medium size village located in Purandar Taluka of Pune district, Maharashtra with total 136 families residing. It is about 10 km south-west of Saswad region of Pune.

Narayanpur stop to Gherapurandar village 
Lifestyle of village 
House in the village 
Natural beauty arround village
The village of Purandar takes its name from the fort. It takes about three hours to complete the trek to Purandar fort from the base village.

CONSTRUCTION
Perched on a gigantic mountain mass, Purandar height above sea-level is 1398 meters and about 700 meters above the plain at its foot.

Fort is situated so peculiarly that on one side it has a high rainfall zone and on another side, it has a low rainfall zone. This has resulted in different micro-climates and ultimately into wide Floral and Faunal Diversity.

Being quite a huge one, it was a good place for defense and had the capacity to house many soldier-troops, foods grains, and ammunition which proved sufficient for long duration wartime.

There are two distinct levels at the fort: the upper level is the Ballekilla and the lower level is the Machi.
MAP

FORTIFICATION
There are many monuments, old and new, on the both Machi and Balekiila of Purandar fort.
Murargate
This first entrance made by Indian Army in the honor of Veer Murarbaji Deshpande. It is use for the checkpoint purposes before entering into the fort.
Koknya Buruj
At the end of the temple, there is a fortified bastion on eastward called as ‘Koknya Bastion’.

On safety purposes, Military has closed routes to several fortifications of the fort like Khandakada, Kedar Darwaja, Bawachi Machi and Fatte Bastions.

Khandakada of Purandar Fort Kedar Darwaja of Purandar Fort
VAJRAGAD
Towards the east of the terrace, beyond a narrow ridge, lies the fort of Vajragad also called Rudramal. The entry for Vajragad has been closed due to a recent landslide. There is one a Lord Hanuman temple with several water tanks remains on the fort.
HOW TO REACH
MUMBAI – PUNE – SASWAD – NARAYANPUR – GHERAPURANDAR – PURANDAR FORT.
The cheapest and convenient way to reach the Pune is via railways as nearest railhead to Purandar is Pune Railway station (approx. 60 kms) which is well connected to other parts of the country.
From Pune, reaching Purandar fort using public transport is a bit challenging as there is no direct transport available to the fort.
From Pune Railway station, first, you have to catch the local bus that will take you to the Pune State Transport ST Bus stand.

Now you have two ways:
- Catch Bhor or Kaparhol ST and get down at Narayanpur Village (Less Frequent)
- Catch Saswad ST and get down at Saswad ST stand and then catch Kaparhol or Bhor ST and get down at Lord Dutta Mandir in Naryanpur Village (More Frequent)


Narayanpur Stop 
Lord Dutta Mandir at stop 
Journey started from right of this monument
After getting down at Narayanpur stop, you will have to walk to the straight muddy path through local’s house and then farming fields of Narayanpur village.

Right path of the monument 
Muddy Path towards Purandar Fort 
Farms of locals 


After half an hour of the walk, the muddy path meets the main tar the road that directly goes to the fort via Murargate.

This journey from Narayanpur stop to Army checkpoint gate is 6.5km – 1 hour)
So If you have any private vehicle, you can skip this walk of 6.5km and directly reach Murargate because of the motorable Purandar road.


View of Left Purandar road from Main road towards Bhor 

Purandar road towards fort 
TREKKING & ADVENTURE
RESTRICTION on trail route
Trekking to Purandar by natural trail from Narayanpur village that goes to Binni Darwaja is now closed by the army for safety purpose and the only way to reach the fort is by the tar road through Murargate.
Therefore, trek to Purandar is an easy level trek and recommended to all age bar.

RULES & REGULATION
After reaching Murargate by any transport mode, you will be asked to show a valid Government ID proof and Driving licence (if you going by your own vehicle) by the army officer. Entry without valid ID is prohibited. So remember to carry a photo ID card. Collect token from the checkpoint and keep it safe throughout the journey and when you return, show it again at the entrance as checkout.
Keep note that entry time for the fort is 9 AM and exit time is 5 PM. So plan your journey accordingly.
The area is under Indian army control so photography is prohibited only of their property and personals.
FORT EXPLORATION
After checkpoint, continue to walk on the cement road towards the Machi that gives you positive vibes in monsoon.
First, you will come across fortification like an Ancient Church and then temples like Purandeshwar Mandir at the end of the Machi. But the main attraction of the fort is Statue and Samadhi of Veer Murarbaji Deshpande. Remembering all his bravery during the war would definitely give us goosebumps feelings.

There is a local Canteen just after the Lord Shiva Mandir where you can do your breakfast of local food.

At the end of Canteen and from the signboard of Purandar fort, you have to take right and start ascending toward Balekila.
After steep ascending on several zigzag natural trails, you will reach the main entrance of the fort Dilli Darwaja from where the first structure of the Balekilla that comes into view.

Towards Fort 

First Restpoint of the trek 
Natural trail towards Balekiila of the fort

Exploring further, there are several ruins of old buildings, water tanks, and rock steps in the lower Balekila region.

Ridge connecting Balekilla and Machi 


Rock steps before stairs of Purandar Fort 
Rock steps before stairs of Purandar Fort
A staircase from the Machi leads to the Balekilla, one of the greatest attractions inside the fort.

The top of the fort having the Kedareshwar Temple. Several devotees of Lord Shiva visit the Kedareshwar Temple every year, especially on the auspicious occasion of Maha Shivratri.


VIEW FROM SUMMIT
Surrounded by a lush green landscape, Purandar Fort offers some of the most beautiful and breathtaking views of the picturesque valley and area below.

MACRO-CLICKS
modern day maavale
The uniqueness of visiting Purandar fort is you also get a chance to interact with our Indian Army people. They can guide you about the right direction in the fort and treat you in a good manner but even on the suspect, they can check your belongings. But we have to follow their rules calmly no matter what as they are doing their duty and as citizens, it is our duty to respond to them in a well manner.

Because of these strict restrictions by Indian Army, Purandar Fort is the cleanest and safest fort among others. And I personally think this should be apply in all other forts of Maharashtra as to conserve the forts in right way, it is necessary to have discipline among visitors while visiting such historical heritage.
ACCOMMODATION
Staying and Camping is not allowed as there are a strict entry and exit time for visiting the fort.
In case if you are traveling from a faraway place, you can either stay at the hotels in Narayanpur or in Saswad.
In emergency cases, shelters on the fort available in military camps/bungalows situated on the fort. Note that prior permission of the officers is needed to get this accommodation.
FOOD & WATER FACILITY
Canteen at Machi, which only serves onion bhaji, vada-pavs, packaged chips, tea and water.
Otherwise, carry your own food and sufficient water for the trek.
CAR PARKING
There is one car parking inside the Murargate (Chargeable) and outside the Murargate (Non-Chargeable) and the other is at the end of the Machi.
BEST TIME TO VISIT
The region in and around Purandar fort experiences a bearable climate throughout the year, and hence it is a year-round destination.
But the rainy season which lasts from July to September is the best time to visit the fort as the surroundings are lush green and the weather is very pleasant. This is the period when the natural beauty in and around the region is at its peak.
For the most part of the day, the surroundings won’t be visible from the fort due to heavy fog and hence October to February will be a perfect time to visit the fort if you looking to have a glimpse of the nearby regions
SURROUNDING
Sahyadri which stretch along the north-south direction, also have ranges that branch off eastward. On one of it is Sinhagad stands and the same range continues for 24 Km before terminating at Bhuleshwar. The Prestigious ‘Purandar’ lies on this range along with Vajragad. From Sinhagad, we have to travel across Katraj Ghat, Bapdeo Ghat and Dive Ghat to reach up to the foothills of the Purandar. If sky is clear then you get a view of Sinhagad, Rajgad and Torna fort.
The thousand-year-old Narayaneshwar temple of the Hemadpanthi architecture built by the Yadavas still exists at Narayanpur stop.

FINAL THOUGHT ON PURANDAR FORT

“It’s not just about the points of interest that will delight you, it’s the overall surrounding, ambiance, aroma, and history which will make you fall in love with the Purandar Fort”

KEEP WANDERING…
-WANDERING MANN
Click here to go to the top of the blog
Let me know about your positive-negative valuable reviews and if you
really like this blog then do LIKE & SHARE and also do not forget to
FOLLOW my website as there are more such blogs are coming soon.
A little Appreciation from you is all I desire…!!!
All content copyright © present Wandering Maharashtra. All rights reserved.
























































































































































































































No comments:
Post a Comment