भूवर्णन :
अंदमान व निकोबार बेटांतील भूस्तरांचे अनुक्रमे आराकान योमाशी व सुमात्रामधील भूस्तरांशी बरेच साम्य दिसते. इओसीन कालातील वालुकाश्म, त्यांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घुसलेले डाइक, झिजेमुळे धारदार व टोकदार स्वरूप आलेले चुनखडक काही ठिकाणी सर्पेटाइन खडक, निळसर झाक असलेले पंकाश्म, पिंडाश्म, प्रवाली खडक व उत्थानाने तयार झालेल्या पुळणी, असे येथील भूरचनेचे निरनिराळ्या भागांतील सामान्य स्वरुप आहे. समुद्रातही प्रवाली खडकांच्या ओळी आढळतात. या बेटांतील डोंगरकणे क्रेटेशियस कालखंडात तयार झाले असावेत. निकोबार बेटे व बॅरन आणि नारकोंडम बेटे यांना जोडणाऱ्या रेषेवर पृथ्वीचा पृष्ठभाग काहीसा अधू आहे त्यामुळे निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के वारंवार बसतात.
अंदमानातील जलप्रवाह लहान, उन्हाळयात आटणारे, परंतु वेगवान आहेत. त्यातल्या त्यात दक्षिण अंदमानमधील प्रवाह थोडेसे लांब व बारमाही आढळतात. ग्रेट निकोबारमध्ये काही नद्या आहेत.
एकंदर हवामान नेहमी दमट व उष्ण असते, परंतु खाऱ्या वाऱ्यांमुळे ते थोडेसे आल्हाददायक होते. जवळजवळ सर्व ठिकाणी कमाल तपमान २९० ते ३१० से. असून किमान तपमान २४० ते २५० से. असते. नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे या बेटांत पाऊस पडतो. दक्षिण अंदमानमध्ये व निकोबार बेटांत तो जवळजवळ वर्षभर असतो. पर्जन्यमान दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. या बेटांवरील सरासरी पर्जन्यमान ३१२ सेंमी. आहे. वर्षभर येथे सोसाट्याचे वारे असतात व वर्षातून साधारणपणे ४५ दिवस झंझावातांचा त्रास होतो.
इतिहास :
भारत, ब्रह्मदेश आणि अतिपूर्व यांमधील दळणवळणाच्या वाटेवर असल्यामुळे या बेटांची काही माहिती प्रवासी, व्यापारी व चाचेलोकांकडून मिळत असे. तथापि बराच काळापर्यंत ती दुर्लक्षितच राहिली. नेग्रिटो वंशाच्या लोकांना ही बेटे प्रथम ज्ञात झाली असावीत. प्राचीन अरब व भारतीय व्यापाऱ्यांच्या लिखाणांत यांचा निर्देश आढळतो. दुसऱ्या शतकात टॉलेमीने या बेटांचा उल्लेख ‘विविध प्रकारचे शंखशिंपले मिळणारे बेट’ म्हणून केलेला आढळतो. सातव्या शतकातील इत्सिंग, तेराव्या शतकातील मार्कोपोलो, १४ व्या शतकातील फ्रायर ओडोरिक व १५ व्या शतकातील निकोलो काँटी इत्यादिच्या प्रवासवृत्तांतून बेटांचा उल्लेख सापडतो. ‘अंदमान’ हे नाव हनुमान यावरून व निकोबार हे १०५० मधील तंजावर शिलालेखात उल्लेखिलेल्या नेक्कावरम् (विवस्त्र लोकांची भूमी) यावरून आले असावे असे मानतात. 10 व्या शतकातील पर्शियन प्रवासी बुझर्ग इब्न शहरयार याने नरभक्षक वस्ती असलेल्या बेटांच्या साखळीबद्दल लिहिले; नंतर मार्को पोलोने त्यात भर घातली की आदिवासींना कुत्र्यांची डोकी असतात आणि ते तामिलनाडू राज्यात तंजावरमध्ये आढळतात (पूर्वी तंजोर)ज्या द्वीपसमूहाला तिमैतिवू - "घाणेरडे बेटे" असे म्हणतात.अर्थात याला संदर्भ नाहीत. अंदमान या शब्दाचा पहिला उल्लेख चिनी साहित्यात आढळतो. कुठल्यातरी चीनी व्यापाऱ्याचे भारताच्या मुख्य भूमीकडे येणारे जहाज वादळामुळे भरकटले आणि ते या बेटांवर जाऊन पोचले. या बेटाचा उल्लेख त्यांनी येनटोमेन असा केला आहे. पुढे काही वर्षांनी म्हणजेच पंधराव्या शतकात आणखी एका चीनी प्रवाशाने आपल्या डायरीत आंदेमन पर्वत अशी नोंद केली आहे. हेच ते अंदमान.याचाच अर्थ या बेटावर चीनवरून भारताकडे येणारी जहाजे विश्रांतीसाठी थांबत असण्याची शक्यता आहे. भारतात दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र याने सुमात्रा बेटांवर हल्ला करण्यासाठी या बेटांचा वापर केला होता अस सांगितलं जात. हे सोडलं तर अंदमानचा इतिहास तसा अप्रकाशित आहे. ज्याची कोणालाही जास्ती माहिती नाही.
तेराव्या शतकात झाओ रुगुआ यांनी लिहिलेल्या झु फॅन झी या पुस्तकात अंदमानचे नाव मध्य चिनी भाषेत 'ąanh də man( आधुनिक मँडरिन चिनी भाषेत युंटुओमन) या नावाने आले आहे. 'कंट्रीज इन द सी' या पुस्तकाच्या ३८ व्या अध्यायात झाओ रुगुआ यांनी स्पष्ट केले आहे की, लांब्री (सुमात्रा) येथून सेलानकडे जाताना प्रतिकूल वाऱ्यामुळे जहाजे अंदमान बेटांच्या दिशेने वाहतात. १५ व्या शतकात वू बेई झीच्या माओ कुन नकाशात झेंग हे च्या प्रवासादरम्यान अंदमानची नोंद "अँडेमन माउंटन" (आधुनिक मंदारिन चिनी भाषेत आंदेमान शॅन) म्हणून केली गेली. आतापर्यंत नोंदवलेले सर्वात जुने पुरातत्त्वीय पुरावे सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत; तथापि, अनुवांशिक, सांस्कृतिक आणि विलगीकरण अभ्यासातील संकेत असे सूचित करतात की या बेटांवर मध्य पॅलेओलिथिक (सुमारे 60,000 वर्षांपूर्वी) च्या सुरुवातीच्या काळात वस्ती असावी. मूळ अंदमानी लोक त्या काळापासून ते १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या बेटांवर मोठ्या प्रमाणात विलगीकरणात राहत असल्याचे दिसून येते. राजेंद्र चोल दुसरा याने अंदमान निकोबार बेटांचा ताबा घेतला. अंदमान आणि निकोबार बेटांचा वापर त्यांनी श्रीविजय साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी सामरिक नौदल तळ म्हणून केला. इ.स. १०५० च्या तंजावूर शिलालेखात सापडलेल्या या बेटाला चोलांनी मा-नक्कावरम ("महान खुली/नग्न भूमी") असे संबोधले.युरोपियन प्रवासी मार्को पोलो (१२ वे-१३ वे शतक) यांनीही या बेटाचा उल्लेख 'नेक्युवेरान' असा केला आहे आणि नक्कावरम या तमिळ नावाच्या भ्रष्ट स्वरूपामुळे ब्रिटिश वसाहतकाळात निकोबार हे आधुनिक नाव पडले असावे.
१७ व्या शतकात त्यांकडे यूरोपीय लोकांचे लक्ष वेधलेले दिसते. त्यांनी तेथे वसाहती करून तेथील मूळच्या लोकांचे धर्मांतर करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पोर्तुगीज व फ्रेंच धर्मप्रचारकांनंतर १७५६ मध्ये डेन लोकांनी या बेटाचा ताबा घेतला. मोराव्हियन मिशनची मदत घेऊनही यश न आल्यामुळे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ मध्ये येथून काढता पाय घेतला. अंदमान बेटांच्या इतिहासाचे चार कालखंड पडतात : १७८८ पर्यंतचा चाच्यांच्या उपद्रवाचा काल १७८८-१९४१ ब्रिटिश राजवटीचा काल १९४१-४५ जपानी अंमलाचा काल व १९४७ नंतरचा भारतीय काल. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातल्या कैद्यांपासून सावरकरांपर्यंत अनेक देशभक्तांना येथील कुप्रसिद्ध बंदिशाळेत ठेवण्यात आल्यामुळे ब्रिटिशकालात ही बेटे म्हणजे काळ्या पाण्याची सजा भोगण्याचे ठिकाण मानण्यात येऊ लागले. जपान्यांनी १९४२ मध्ये या बेटांचा कब्जा घेतला व या द्वीपांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. १९४७ नंतर ही बेटे स्वतंत्र भारतात समाविष्ट झाली.

अंदमान निकोबार बेटं का महत्त्वाची?
भारताच्या भूभागापासून सर्वात दूर असलेली बेटाचं लष्करी दृष्ट्या अनन्य साधारण असं महत्व आहे. जगात जलमार्गे जी मालवाहतूक केली जाते त्यापैकी २५ टक्के मालवाहतूक ही मलाक्का आखातामधून होते. आपला मुख्य शत्रू असलेल्या चीनची बहुतांश मालवाहतूक ही याच आखातामधून होते. त्यामुळे या भागावर नजर ठेवणे, जरब ठेवणे आणि गरज पडल्यास नियंत्रण ठेवणे हे अंदमान निकोबार बेटांमुळे शक्य होणार आहे. फक्त चीन नाही तर भारतासह जपान, सिंगापूर, व्हिएतनाम, तैवान, दक्षिण कोरिया, थायलंड, मलेशिया आणि अर्थात इंडोनेशिया हे देशही मालवाहतूकीसाठी याच आखातामधील जलमार्गाचा वापर करतात. एका अंदाजानुसार दरवर्षी एक लाखाहून अधिक विविध मालवाहू जहाजे या भागातून प्रवास करतात. मालवाहतुकीमध्ये तेलाची वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होते.
थोडक्यात या भागातील जलवाहतूक नियंत्रित केली तर चीनसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो.
सैन्य दलाचे संयुक्त केंद्र – Andaman and Nicobar Command
दक्षिण-पूर्व आशियाई देशांशी संबंधांसाठी अंदमान व निकोबार द्विपसमुहाचे महत्वाचे स्थान
दक्षिण चीन उपसागर हा जगातील वादग्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. चीनच्या वाढत्या सार्मथ्यामुळे, उपसागराच्या भोवतालच्या देशांना आपल्या देशहितांचे संरक्षण करणे कठीण होत चालले आहे. म्हणून ते इतर देशांच्या पाठींब्याच्या आणि मदतीच्या शोधात आहेत. व्हिएतनामाने भारताची मदत घेणे हे यातले एक उदाहरण. चीन ज्या देशांना आपले प्रभावक्षेत्र मानतो अशा दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील राष्ट्रांशी पारंपरिक मैत्री संबंध मजबूत करून भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे. दक्षिण-पूर्व आशियाई देश चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांमुळे चिंतित आहेत.दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील देशांशी आपल्याला आर्थिक व व्यूहात्मक संबंध वाढवावे लागतील. चीनला उत्तर देण्यासाठी भारताला आपल्या मित्रांची फळी उभी करावी लागेल.
द्वीपप्रदेशांपुढील आव्हाने
अंदमान व निकोबार बेटांचे व्यूहरचनात्मक स्थान
आग्नेय आशियाई देशांशी असलेले त्यांचे सान्निध्य, भारतास त्या देशांसोबत संयुक्त कार्यवाही वाढवून, मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यास समर्थ करते.विस्तारित शेजारातील राजकीय व लष्करी घडामोडीबाबत अवगत राहण्यासही भारतास त्यांचाच उपयोग होत असतो.
अंदमान व निकोबार द्वीपसमूह म्हणजे, भारताची पहिली संरक्षण फळी आणि न बुडणारी विमानवाहक नौकाच आहे. ही द्वीपसाखळी स्वसंरक्षणाव्यतिरिक्त, भारताची पूर्वेतील राष्ट्रीय हित साध्य करण्यात अतिशय मोठी भूमिका बजावू शकतात.
बेटांची भूसंरचना
द ग्रेट निकोबार बेटांची साखळी अतिशय महत्त्वाची आहे. कारण ती इंडोनेशियन द्वीपसमूहातील सर्वात उत्तरेकडील बेटांपासून केवळ ९० नॉटिकल मैलांवरच स्थित आहे. इंडोनेशिया भारताच्या ’पूर्वेकडे बघा’ धोरणातील महत्त्वाचा भागीदार देश आहे.
बेटांची ही साखळी, लाकडाची अफाट मोठी वखार आहे. एकदा या बेटांत, हवाई व सागरी,अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित झाल्या की मग, ती बेटे आकर्षक व्यापारी गुंतवणुकीची आणि पर्यटनाची स्वर्गीय ठिकाणे होऊ शकतील.
पोर्ट ब्लेअरला आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्याची योजनाही आहे. तिथे एक तेल प्रस्थानक आणि ग्रेटर निकोबारातील कँपबेल बे बेटावर मालांतरण स्थानक(ट्रान्स शिपमेंट हब), उभारण्याचीही योजना आहे. मालांतरण स्थानक (ट्रान्स शिपमेंट हब), इंधनभरणसुविधा, किंवा करमुक्त व्यापारी पेठ म्हणूनही त्यांचा वापर करण्याची संधीही देते. जेणे करून या प्रदेशातील महासागरी व्यापारास चालना मिळेल.
मल्लाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये चीनची कोंडी
वर्तमान अनुमानानुसार दरसाल एकूण ६०,००० हून अधिक नौका मल्लाक्काची सामुद्रधुनी ये-जा करण्यासाठी वापरत असतात. ऊर्जा उत्पादनांची, तसेच व्यापारी आणि वाणिज्यिक उपयोगाच्या इतर वस्तूंची ने-आण त्या करत असतात. त्यामुळेच अंदमान व निकोबार बेटसमूह, मल्लाक्काच्या सामुद्रधुनीनजीकचा तळ म्हणून, एक लाभ पुरवतो. आग्नेय आशियातील इतर सामुद्रधुनींच्याही तो सान्निध्यात असल्यानेही, वर्दळीच्या ठिकाणांबाबतची तसेच विरुद्ध वाहतुकीची पूर्वसूचना व माहिती तो आपल्याला पुरवू शकतो. मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतून चिनी वस्तूंची प्रचंड वाहतूक सुरू असते. तिला धक्का पोहोचणे चीनला सोसण्यासारखे नाही. भारत मल्लाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये चीनची कोंडी करू शकतो.
आज आपण व्हिएतनामी लष्करी सैनिकांना प्रशिक्षण देत आहोत. आपण पाणबुडीतील संचालन पथकासही (क्रू लाही) प्रशिक्षण देत आहोत. व्हिएतनामच्या मदतीने, दक्षिण चिनी समुद्रात गुप्तवार्तांकन मोहीमही सुरू करता येईल.
मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतील भारताची भूमिका
मल्लाक्काच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी भारताची कार्यकारी गुंतवणूक, सामुद्रधुनीच्या किनार्यावरील देशांनी विनंती केल्यास संभव आहे.सार्वभौमत्त्वाच्या मुद्द्यावरील त्यांची संवेदनाशीलता सांभाळली जाईल. त्या दिशेने असलेले सर्व पर्याय तपासले जातील. त्यांपैकी एक पर्याय असेल भारतीय नौदल वा भारतीय तटरक्षक दलाच्या नौकांनी सामुद्रधुनीत गस्त घालणे होय.किनार्यावरील देशांचे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी त्या नौकांवर घेतलेले असतील.
अवैध मासेमारी आणि स्थलांतरणे रोखण्यासाठी समन्वयित गस्ती घालण्याकरता म्यानमार (आणि बांगलादेश) सोबत, इंडोनेशिया आणि थायलंड यांच्या धर्तीवर, करार करण्याचा विचार करता येईल. मासेमारी उद्योगाचा विकास करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे ’मानवी गुप्तवार्ता’ म्हणून उपयुक्त ठरेल आणि वरील कार्यवाहीस पुष्टी देईल.
अंदमान व निकोबार तळावर संभाव्य भूमिकेकरता तयार रहा
याकरता त्यादृष्टीने, तांत्रिक आणि पुरवठा साहाय्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. अंदमान व निकोबारमधील इतर भागांत, कायमस्वरूपी ताकद स्थापन करण्यासाठी, बंदरे आणि धावपट्ट्या विकसित करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीकरताचा प्रतिसाद सुधारण्याकरता, समुद्रीउचल आणि हवाईउचल क्षमता वाढवायला हव्या आहेत.
नव्यानेच तैनात केल्या जात असलेल्या, नवीन मोठ्या ’रणगाडा अवतरण नौका’, अंदमान व निकोबार बेटांवर ठेवल्या गेल्या पाहिजेत. अंदमान व निकोबार बेटांकरता तटरक्षकदलाने, विशेष २,००० टन प्रदूषण-नियंत्रण-नौका निश्चित केलेल्या आहेत.
कठीण प्रसंगी पोर्ट ब्लेअर तळावरील भारतीय नौदलाकरवी, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि इतर आशियाई देशांच्या नौदलांच्या सहकार्याने; मल्लाक्का, लोंबॉक वा सुंदाच्या सामुद्रधुनींच्या सुरक्षिततेकरता संयुक्त कार्यवाही करणे शक्य आहे.
अंदमान व निकोबार, तसेच लक्षद्वीप बेटांचा विमानवाहू नौका म्हणून वापर करणे, या हवाई तळांचे, भारतीय मुख्यभूमीपासून ९०० कि.मी. अंतरावर असलेले स्थान, आपल्या विमानांना विस्तारित लढाऊ त्रिज्या (एक्सटेंडेड कोंबॅट रेडियस) देईल.भविष्यकाळात आवश्यकता पडल्यास, या बेटांवर प्रक्षेपणास्त्रे तैनात करून त्या अस्त्रांचा लक्ष्यविस्तार वाढवला जाऊ शकतो.या बेटांवर सर्वव्यापी संरक्षण छत्र पुरवण्याकरता, स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली ’आकाश’ आणि इतर हवाई संरक्षण संपदा या बेटांवर तैनात केली जाऊ शकते.
भारतीय आण्विक त्रिविध शस्त्रसंभार, अंदमान व निकोबार बेटांवर कार्यान्वित करण्यासाठी, अंदमान व निकोबारमध्ये पाणबुडीकेंद्र स्थापन करण्याचा विचार भारताने करावा.इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया इत्यादी देशांच्या नौदलांच्या सहकार्याने, सामुद्रधुनींची संयुक्त गस्त घातली जाऊ शकते.
पूर्वेकडील वाढते हितसंबंध:
दीर्घकालीन ऊर्जा-सुरक्षेच्या स्त्रोतांत वैविध्य निर्माण करण्याच्या वाढत्या प्रयासांमुळे काही प्रमाणात कच्चे तेल आणि वायू पूर्वेकडून, उदाहरणार्थ रशियातील साखलीनमधून, व्हिएतनाममधून आणि इंडोनेशियातून प्राप्त केला जाईल. त्यापैकी बहुतेक माल पूर्वी समुद्रमार्गांतूनच भारतात येईल. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, पूर्वी समुद्रमार्गांचे महत्त्व आणि आग्नेय आशियाई सामुद्रधुनींचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढेल.
पारदर्शिता आणि विश्वासनिर्मितीकरता ’मिलन’
मल्लाक्काच्या सामुद्रधुनीतून पार होणारे संपूर्ण जागतिक नौकानयन, ६ अंश वाहिनीतून पार होतच असते. द्वीपसमूहाचे दक्षिण टोक म्हणूनच भौगोलिकदृष्ट्या, मल्लाक्काच्या सामुद्रधुनीत सुरक्षा पुरवण्याची भूमिका निभावण्याकरताही, ते उत्तम स्थित आहे. याची वैधता २००२ मध्येच पाहिली गेली होती. त्यावेळी पोर्ट ब्लेअर/ कँपबेल-बे पासून कार्यरत होणार्या नौदलाच्या सागरी गस्ती नौकेने, अमेरिकेच्या नौकांना या सामुद्रधुनीतून पार होण्यास यशस्वीरीत्या सोबत केलेली होती.
हिंदी महासागरातील २६ डिसेंबर २००४ रोजीच्या त्सुनामी आपत्तीस, भारताने चांगला प्रतिसाद दिला. या प्रकारच्या संकटात, जेव्हा वेळेचे खूपच महत्त्व असते. हिंदी महासागर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापाराकरता संरक्षित आणि सुरक्षित करण्याचा उद्देश कँपबेल-बे येथील तळ (फॉर्वर्ड ऑपरेटिंग बेस), नौदल वा तटरक्षकदलाकडून, जलमार्गांतील कार्यवाहींकरता उपयोगात आणला जाऊ शकतो.
भारत पोर्ट ब्लेअर स्थित डॉर्निअर विमाने, आसिआन देशांना वापरू देण्याचा विचार करू शकेल. संबंध सौदार्हपूर्ण ठेवण्यास आणि विश्वासवर्धनार्थ याचा उपयोग होऊ शकेल. अंदमान व निकोबारातील निगराणी आणि गुप्तवार्तांकनाच्या पायाभूत सुविधा इत्यादींचा उपयोग; आग्नेय आशियातील घुसखोरी, दहशतवाद, चाचेगिरीबाबतच्या नव्या घडामोडींशी अवगत राहण्याकरता केला जाऊ शकतो.अंदमान व निकोबार बेटांतील निगराणी व गुप्तवार्तांकनाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग; घुसखोरी, दहशतवाद आणि अरबी समुद्रातील, बंगालच्या उपसागरातील व हिंदी महासागरातील चाचेगिरी रोखण्यासाठी विकसित केला पाहिजे.
भारतीय संविधानाप्रमाणे या बेटांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा आहे. पोर्ट ब्लेअर हे कारभाराचे मुख्य ठाणे आहे. एक प्रशासक काही अधिकाऱ्यांच्या साहाय्याने या बेटांचा कारभार पाहतो. निकोबार बेटांसाठी एक साहाय्यक प्रशासक असतो. त्याचे कार्यालय कारनिकोबार येथे असते. १९६७ पासून ह्या बेटांचा राष्ट्रपतीने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी लोकसभेत असतो. प्रशासकाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडतात. अंदमानमध्ये २६ ग्रामपंचायती व ३१ न्यायपंचायती आहेत. निकोबारमध्ये परंपरागत पंचायतपद्धती आहे. येथील न्यायालये कलकत्ता हायकोर्टाच्या अधिकारकक्षेत आहेत.
आर्थिक स्थिती :
पोर्ट ब्लेअर, रंगत, मायाबंदर, दिगलीपूर, नानकवरी वगैरे ठिकाणी मिळून १,५०० किवॅ. वीज-उत्पादन-सामग्री १९५०-६८ या काळात बसविलेली आहे.
येथील मुख्य व्यापार लाकूड व नारळ यांचा आहे. निकोबारमधून काही प्रकारचे मासे, सुपारी, काही पक्ष्यांची खाण्यास योग्य अशी घरटी पूर्वीपासून मुख्यतः चीनकडे जातात. तांदूळ, तंबाखू, कापड, हत्यारे इ. वस्तू आयात होतात.विकासासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू, हत्यारे, यंत्रे, खाद्यपदार्थ वगैरे भारतातून आणाव्या लागतात.
पोर्ट ब्लेअर येथे स्टेट बँकेची शाखा आहे. ती सरकारी तिजोरीचाही कारभार पहाते. १९६६ पासून राज्य सहकारी बँकाही कार्य करीत आहेत. १९६८-६९ च्या अर्थसंकल्याप्रमाणे या बेटांचा मुलकी खर्च ७,१६,२५,००० रु., भांडवली खर्च ३,२८,९७,००० रु. व मुलकी जमा २,४७,२५,००० रु. होती.
या बेटांवर एकूण ३३८ किमी. लांबीचे चांगले रस्ते आहेत. १९६० मध्ये मोटारी, ट्रक, बस वगैरे मिळून २८५ वाहने होती. १९६८ मध्ये पोर्ट ब्लेअरमध्ये २० प्रवासी बसगाड्या होत्या त्या शहरात व ग्रामीण भागातही वाहतूक करतात. बेटाबेटांतील दळणवळणासाठी बोटींचे धक्के बांधले जात आहेत. भारताच्या मुख्य भूमीशी दळणवळण ठेवणाऱ्या तीन आगबोटी आहेत. अंदमानमध्ये पोर्ट कॉर्नवालिस, मायाबंदर ही चांगली बंदरे आहेत. निकोबारमध्ये कामोर्ता, त्रिंकत व नानकवरी या बेटांनी वेढलेले नानकवरी हे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहेत. ते पूर्वेकडील एक उत्तम बंदर समजले जाते. कलकत्ता ते रंगूनमार्गे पोर्ट ब्लेअर अशी आठवड्यातून दोनदा विमानवाहतूक सुरू आहे. डाक घरे, दूरध्वनी या सोयीही उपलब्ध आहेत. आकाशवाणी-केद्र १९६१ मध्ये सुरू झाले.
लोक व समाजजीवन :
निकोबारी लोक अंदमानी लोकांपेक्षा सर्वच बाबतीत भिन्न आहेत. निकोबारी आदिवासी लोक पॉलिनेशियन गटाचे आहेत. ते बसक्या नाकाचे, पिवळसर काळ्या रंगाचे आहेत. निकोबारी लोकांत जातीजमाती अशा नाहीत. निरनिराळ्या बेटांवर राहणारे म्हणून त्यांच्यात फरक असतो, परंतु त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतो. नारळ हे प्रमुख उत्पन्न असून देण्याघेण्याचे व्यवहार नारळांच्या संख्येत होतात. त्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या रूढ समजुतीप्रमाणे होतात. काही बंधने कडकपणे पाळतात. उदा., उत्तरेकडील बेटांवरील लोकांनी नावा बांधावयाच्या नाहीत चौरा व तेरेसा बेटांवर चुना तयार करावयाचा नाही, फक्त चौरा बेटावरच मातीची भांडी तयार करावयाची इत्यादि. केवडीची फळे, नारळ, मासे, पादानाऊची फळे, आयात केलेला तांदूळ हे त्यांचे मुख्य अन्न असते. डुकरे, कोंबड्या व बदके वगैरे खास मेजवानीसाठी असतात. या लोकांना पानतंबाखूचा मोठा शोक आहे. तंबाखू ओढतातही. ताडी व दारू पिणे भरपूर प्रचलित आहे. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. जमिनीत रोवलेल्या खांबांच्या आधारावर उभारलेल्या फळ्यांच्या व पानाफांद्याच्या घुमटाकार झोपड्यात पुष्कळ लोक राहतात. संगीत व नुत्य यांची त्यांस आवड आहे. अलीकडे कारनिकोबारमध्ये फूटबॉल हा खेळ लोकप्रिय होऊ लागला आहे. भांडी बनविणे, टोपल्या विणणे, लोखंडाची हत्यारे बनविणे, चटया बनविणे इ. व्यवसाय येथे चालतात.
मलेरिया-निर्मूलनासाठी गावाजवळच्या दलदली नष्ट करण्यात येत आहेत. लोकांना औषधपाणी व शस्त्रक्रियासुद्धा मोफत मिळते. १९६० मध्ये रुग्णालयांत ४१८ खाटा होत्या व २९ दवाखाने होते. तेथे २० डॉक्टर, ६५ परिचारिका, १६ दाया व २१ कंपाउंडर होते. १९६८ मध्ये खाटा ४६१ व दवाखाने ४२ झाले. जनावरांसाठी एक रुग्णालय व चार दवाखाने आहेत. पोर्ट ब्लेअर येथे एक नवीन रुगणालय व ५० खाटांचे क्षयरोगरुग्णालय झाले आहे. त्याशिवाय कारनिकोबार, नानकवरी, बांबूफ्लॅट, मायाबंदर, लाँग आयलंड, रंगत आणि दिगलीपूर येथे रुग्णालये आहेत.
पोर्ट ब्लेअर व कारनिकोबार येथे माहितीकेंद्र व ग्रंथालये आहेत. विमान-वाहतुकीमुळे कलकत्याहून ताजी वर्तमानपत्रे मिळू शकतात. पोर्ट ब्लेअरला सरकारी विवरणपत्रिका निघते.
पर्यटनाच्या दृष्टीने ही बेटे आकर्षक आहेत. पोर्ट ब्लेअर व कार्बिन्स कोव्ह येथे पर्यटकगृहे स्थापन झालेली आहेत. पोर्ट ब्लेअर शहर व तेथील कुप्रसिद्ध वर्तुळाकार तुरुंग, बेटावरील रम्य वनश्री, धबधबे, नौकाविहार, जलक्रीडा, बॅरन व नारकोंडम ही ज्वालामुखी बेटे, कारनिकोबार बेट व नानकवरी बंदर, आकर्षक पुळणी, प्रवाळ अशा कितीतरी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतील अशा आहेत.
कला व क्रिडा :

बेटवासी
व्यवसाय :
मूळ रहिवासी शेती, वनीकरण आणि मासेमारीमध्ये गुंतले होते. अंदमान बेटांमधील बहुतांश रहिवाश्यांचा शेती हा व्यवसाय आहे. मुख्य पिकांमध्ये तांदूळ, नारळ, सुपारी, फळे आणि मसाले असतात. रबर, पामतेल आणि काजू यांचे देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
कपडे :
पुरुष आदिवासी झाडाची साल आणि नारळाच्या झावळ्यांनी आपले अंग झाकतात. सर्वसाधारणतः, कमरेखालील भागावर ही वस्त्रे नेसली जातात. स्त्रिया मुख्यतः असे कपडे परिधान करतात ज्यामुळे त्यांची वक्षस्थळे व कमरेखालील भाग झाकला जाईल. याखेरीज, मण्यांनी बनवलेले हार, कानातले बांगड्यासदृश दागिनेही त्या वापरतात.
अन्न :
मासेमारी आणि शिकार, हे आदिवासींचे अन्न मिळवण्याचे मुख्य मार्ग आहेत. त्यांना उपयुक्त वनस्पतींची देखील चांगली माहीती असते. तथापि, सुरवातीस त्यांना अगदी आग कशी करावी आणि अन्न कसे शिजवावे, हे देखील माहीत नव्हते. वन्य डुकरे, गोगलगायी, डुगॉन्ग्स, कासव आणि घोरपडी हे त्यांच्या अन्नाचा प्रमुख घटक. समुद्रातील मासेमारीवर त्यांची जास्त भिस्त असते. स्त्रिया बादलीसारख्या भांड्यांच्या साह्याने मासे पकडतात. मुळात ते भटक्या जमातीतील लोक होते आणि इतरांपासून ते नेहमीच वेगळे रहात आले. एकंदरीत त्यांची खाण्याची सवय सोपी आणि साधी!
संस्कृती :
सर्व स्थानिक जमाती या बेटाच्या समृद्धी, वांशिकता आणि रीतीरिवाजांचे जतन करण्यासाठी आग्रही होते. मूळ लोकांची दोन भिन्न गटांमध्ये विभागणी केली गेली होती जी त्यांची भिन्न संस्कृती होती. एक म्हणजे ओंगे, जारवा, अंदमानी, सेंटिनेलि आणि ऑटोथॉन्स सारख्या निग्रिटो, जो शोम्पन्स, निकोबारी आणि मोनोलोइड होते.
बेटाच्या आधुनिक रहिवाशांची जीवनशैली :
नागरीकरणाच्या वाढत्या प्रसारासह, या बेटांच्या रहिवाशांनी आधुनिकता आणि वैश्विक संस्कृती स्वीकारली आहे. देशाच्या विविध भागांतून वेगवेगळ्या कारणांसाठी पंजाबी, बंगाली, दक्षिण भारतीय आदी लोक इथे स्थायिक झाले आहेत. ते सुशिक्षित आणि साक्षर आहेत. देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असूनही, उंची हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सच्या आगमनाने आधुनिक शहरी जीवन सुधारले आहे. एकेकाळी निर्जन असलेल्या या बेटांवर आता बार आणि पब देखील आढळतात.
सण :
भारतीयांच्या अंगात भिनलेला सणांचा उत्साह येथेही आहे. नेहमीचे दुर्गापूजा, लक्ष्मीपूजा, जन्माष्टमी, द्वीप पर्यटन महोत्सव आणि सुभाष मेळा भव्य प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात.
जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अत्यंत मनोभावे साजरा केला जातो. घरे रंगवून सजविली जातात. रात्रीचे मुख्य आकर्षण रासलीला असते ज्यात स्थानिक लोक नाटिकांद्वारे श्रीकृष्णाच्या जीवनलीलांचे वर्णन करतात. मध्यरात्र होईपर्यंत सर्व भक्तगण उपवास धरतात आणि मध्यरात्रीनंतर श्रीकृष्णाला नेवैद्य दाखविल्यानंतच तो प्रसाद ग्रहण करतात.
सुभाष मेळा हा या बेटाचा आणखी एक लोकप्रिय उत्सव आहे ज्यात देशी व परदेशी कलाकारांच्या हस्तकलेचे प्रदर्शन केले जाते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या उत्सवात देखील मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
येथील जीवन खूप सोपे आणि साधे आहे. लोकही खूप मैत्रीपूर्ण आहेत. भारतातील सर्व राज्यांतील लोक येथे येऊन स्थायिक झाले असल्याने इथली बोली हिंदी आणि अन्य बोलीभाषा यांचे संमिश्र रूप आहे.
आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू कोलकाता, चेन्नई, दिल्लीहून येतात, म्हणून त्या थोड्या महाग असतात. येथे पावसाचा निश्चित असा हंगाम नाही. तो कधीही, कुठेही, केव्हाही पडतो!
इथली शिक्षण व्यवस्था चांगली आहे. येथील शासकीय व अशासकीय अशा दोन्ही शाळांच्या शिक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे. इथली वैद्यकीय महाविद्यालये, पॉलिटेक्निक, आयटी आणि टीटीआय संस्थासुद्धा चांगले योगदान देत आहेत.
अंदमान बीच हा जगातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे. येथील समुद्र जैविक संपत्तीने समृद्ध आहेत. अंदमान निकोबार बेटे खूप स्वच्छ आहेत. इथली झाडे प्रत्येक हंगामात फुलांनी भरलेली असतात.
ओंगे
लिटल अंदमानमधील ओंगे बेटाचा दोन तृतीयांश भाग वनीकरण विभागाच्या अखत्यारीत आणण्यात आला आणि 1977 मध्ये वस्ती करण्यात आली. सुमारे 100 उर्वरित ओंगे 25 चौरस किलोमीटरच्या दोन आरक्षणांपुरते मर्यादित आहेत: डुगॉन्ग क्रीक (डुगॉन्ग क्रीक)आणि दक्षिण खाडी (दक्षिण उपसागर)... मानववंशशास्त्रज्ञांच्या मते, ओंगेच्या संख्येत घट हे प्रदेशांच्या ( त्सुनामी) नुकसानीशी संबंधित आहे.
सेंटिनेलीज
परंतु इथे एका रहस्यमय आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांना सेंटिलनीज म्हणतात. ही पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जमात म्हणून ओळखली जाते. कोणीही या बेटावर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बाणांच्या व भाल्याच्या वर्षावास सामोरे जावे लागते, कोणीही या बेटाजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास हे लोक त्यांची हत्या करतात. अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न झाले परंतु कधीही यश आले नाही. भारत सरकारने १९६७ पासून या बेटावर संशोधन करण्याचा प्रयन्त केला परंतु विशेष काही माहिती हाती आली नाही. १९७४ साली नॅशनल जिओग्राफिक चा एक समूह या विषयावर माहितीपट बनवण्यासाठी गेला असता आदिवासींनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा दिग्दर्शकच दंडात बाण घुसल्यामुळे जखमी झाला व त्यांना प्रयत्न सोडून द्यावे लागले. एकदा तेथील खडकांवर आपटून एक जहाज निकामी झाले, जहाजावरील लोकांना त्यावरील सामान सुद्धा तसेच सोडून द्यावे लागले तेंव्हापासून ते अजूनही तसेच आहे. अगदी अलीकडे २००६ साली दोन मच्छीमार तिथे गेले असता आदिवासींनी त्यांची हत्या केली, जेंव्हा त्यांची मृत शरीरं आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले तेंव्हा या लोकांनी ते उतरू दिले नाही.
मानववंश शास्त्रज्ञ डॉ टी एन पंडित यांनी या बेटावर २० वर्षे संशोधन केले आहे, त्यांना शेती माहीत नाही कारण वरून पाहता शेतीच्या कोणत्याही खुणा या बेटांवर दिसत नाहीत, बेटांजवळ किनाऱ्यावर मिळणारे मासे खाऊन ते जगतात, त्यांना नौकायन माहीत नाही, जंगलातील फळे,कंदमुळे,नारळ व इतर वनस्पती त्याच्या आहारात असतील तसेच ते शिकार करत असतील पण याबद्दल एकही पुरावा नाही कारण या बेटावर जाताच येत नाही.
त्यांची संख्या ५० ते ४०० अशी कितीही असू शकते. संशोधनांमधून हे समोर आले आहे की, हे लोक किमान ६०,००० वर्षांपासून या बेटावर राहत आहेत त्यांचा आफ्रिकेत उगम पावलेल्या पहिल्या मानवाशी थेट संबंध आहे, ही एक अश्मयुगीन जमात आहे. आजच्या या अंतरिक्ष युगात पृथ्वीवर एक अश्मयुगीन जमात राहते याची कोणी कल्पना देखील केली असेल का. अंदमानच्या मुख्य बेटांवर 'जारवा' जमातीचे लोक राहतात या दोन्ही आदिवासींची जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. सेंटिलीनीज जारवांपासून देखील हजारो वर्षांपूर्वीच विभक्त झालेले आहेत.
भारत सरकारने १९९७ साली सेंटिनल द्वीप आणि त्यापासून आजूबाजूचा ३ किमी चा परिसर 'Exlusive Zone' म्हणून घोषित केला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. इतकेच काय नौदलाची एक बोट या बेटाभवती नियमित गस्त घालत असते. भारत सरकारच्या या धोरणाचे कौतुक वाटते हे त्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव मानणाऱ्या या लोकांना माहिती तरी असेल का की भारत सरकार आपले रक्षण करीत आहे.
अंदमान
आता अंदमानीची लोकसंख्या जेमतेम ५० लोकांची आहे आणि ही जमात नामशेष होण्यापासून वाचू शकणार नाही असे दिसते. १९ व्या शतकाच्या मध्यभागी, सुमारे सात हजार अंदमानी होते, परंतु वसाहतवाद्यांशी असलेल्या मैत्रीमुळे या जमातीचा मृत्यू झाला: १९७१ पर्यंत गोवर, सिफिलीस आणि फ्लूच्या साथीमुळे त्यांची लोकसंख्या १९ लोकांवर गेली. अंदमानीला सरळ बेटावर हलवण्यात आले.
जारवा

सध्या, ३५० अस्तित्वात असलेले जारवा ६३९ चौरस मीटरवर राहतात. किमी दक्षिण आणि मध्य अंदमान बेटांवर. १९५३ मध्ये, मुख्य आयुक्तांनी जारवा वस्त्यांवर बॉम्बफेक करण्याचा प्रस्ताव दिला, आणि अंदमान महामार्ग, जंगलतोड आणि आक्रमणकर्ते आणि पर्यटकांच्या आक्रमणामुळे त्यांचे प्रदेश नष्ट झाले. बहुतेक जारवा बाहेरुन आलेल्या लोकांच्या विरोधी असतात.
शॉम्पेन
बोलशोई निकोबारवरील जंगलात एकूण 250 शॉम्पेन राहिले. ही अर्ध-भटकी शिकारी जमात नदीकाठी राहते. त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्काला विरोध केला आणि हे लोक पर्यटकांचा वावर असलेला प्रदेश टाळतात.
निकोबेरियन्स
निकोबेरियन ही एकमेव जमात आहे ज्यांची लोकसंख्या कमी होत नाही आणि 30,000 लोकसंख्या आहे. त्यापैकी बहुतेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आधुनिक भारतीय समाजात जवळजवळ आत्मसात केले. ते गावांमध्ये राहतात जिथे ते डुक्कर पाळतात आणि नारळ, रताळे आणि केळी पिकवतात. बहुधा मलेशिया आणि म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांमधून आलेले निकोबेरियन लोक कार निकोबारच्या केंद्रस्थानी असलेल्या निकोबार समूहाच्या अनेक बेटांवर राहतात. (कार निकोबार), 2004 त्सुनामीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेला हा प्रदेश.
अंदमान बेटांवर कसे जायचे ?
नियोजन कसे कराल :
कोणत्याही टूर कंपनीबरोबर गेलात तरी स्वतःचे नियोजन देखील महत्वाचे ठरते. पॅकिंग पासून वेळेचे, वैद्यकीय अडचणी असतील तर त्याचे असे करावे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने अंदमानसारख्या ठिकाणी जाताना भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आणि मानसिक तयारी करून जावे. विशेषतः सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आपल्या डेली रुटीनवर प्रभाव पडतो. अंदमानमध्ये सकाळी ५-५.१५ ला सूर्योदय होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत सूर्यास्त होतो. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या बोटीपासून क्रूझ पर्यंत सगळ्या प्रकारचे जलप्रवासाची हौस फिटते. त्यामुळे पाण्याचे वावडे असलेल्यांनी एक मानसिक तयारी करावी.
पॅकिंग :
विशेषतः महिला मंडळाने आवश्यक तेवढेच आणि जमल्यास गुडघ्या पर्यंतचे कपडे घेतल्यास सोयीचे जाते. संपूर्ण किनारी आणि बेट असा भौगोलिक भाग असल्याने उकडण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे. मुंबईकरांना किंवा समुद्र किनारी राहणाऱ्याना तसे हे नवीन नाही, पण इतरांना असू शकते. इथे उकाड्यासोबत वारा आणि समुद्राच्या खारटपाण्याचाही सामना करावा लागतो.
फूड :
निवास निश्चित करताना याची चौकशी आधी करावी कारण स्थानिक अन्न मूळ मासे आणि भात असल्याने उगाचच अवाजवी अपेक्षा करू नये. प्राधान्य लोकल फूड मग ते शाकाहार असो किंवा मासे आहार ते स्थानिकांप्रमाणे असावे. कारण ही चव कितीही पैसे मोजले तरी महाराष्ट्रात मिळणार नाही. दुसरे म्हणजे पाणी. बऱ्याच हॉटेलमध्ये एकवागार्डचे पाणी मिळते.
नियमावली :
बेसिक नियमावली एअरपोर्ट पासूनच सुरू होते. ती म्हणजे वजनाची, काहींना हे नवीन असते काहींना नसते. दुसरी म्हणजे बऱ्याच जणांना मोह असतो तेथून प्रवाळ, शिंपले इत्यादी आणण्याचा हा टाळावा. आणखी एक म्हणजे जिथे कॅमेरा बॅन आहे तिथे बॅनच करावा, ग्रुप टूर मध्ये कोणा एकामुळे बाकीच्यांवर संक्रांत नको. सुरक्षेच्या बाबतीत ग्रुप कॅप्टन पासून स्पीड बोट चालक ही आपली काळजी घेतो. त्यामुळे त्याने दिलेल्या सूचना ऐकल्यास त्यांच्याही पोटावर पाय येत नाही. बऱ्याच बेटांवर किती पर्यटक कोणत्या वेळेत सोडायचे हे नियम केले आहेत. त्यामुळे त्या वेळेत गेल्यास हे भान सहज पाळले जाते. शेवटची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विमानतळावर पाय ठेवल्यापासून इतस्ततः थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर टाळावा. वापर केल्यास शक्यतो जिथे कचरापेटी ठेवली असेल तिथे टाकावा. हे जरा अति होतंय असे काहींना वाटेल पण हे गरजेचे आहे.
शॉपिंग :
अंदमान हे शॉपिंग डेस्टिनेशन नाही त्यामुळे तेथील लोकल मेड असे घेण्यासारखे असेल तर फक्त शहाळे आणि शंख, शिपल्यांचे शोभेच्या वस्तू, कीचेन्स इत्यादी. अगदीच हौस म्हणून अंदमानचे टिशर्ट आठवण म्हणून घेण्यास हरकत नाही. पोर्ट ब्लेअरमधील मॉल आणि इतर ठिकाणी विविध प्रकारचे शिंपले, मोत्याचे दागिने आणि कोरलची स्मृतिचिन्हे मिळू शकतात. तुम्ही स्ट्रॉ हॅट्स, विविध हस्तकला, मण्यांचे दागिने, बांबू हस्तकला खरेदी करू शकता. पण यासाठी पुरेशी कॅश जवळ ठेवावी कारण उठसूट पेटीएम, यूपीआय वापरणारे विक्रेते नाहीत. काही ठिकाणी तर दहा रुपयांची नाणी देखील घेत नाहीत. त्यामुळे ज्या वस्तू खरेदी करायच्या त्यासाठी सुट्टे पैशांसाहित कॅश वापरलेली बरी.
तळ टीप :
अंदमानला सगळ फिरून परत जाताना विमानतळावर सुर क्षा तपासणीच्या फक्त दोनच खिडक्या असल्यामुळे भला मोठी रांग असतो. त्यात शंख , शिंपले अशा प्रवाळयुक्त गोष्टींना सक्त मनाई ( बिचवर आपण सहज हातानी उचलतो असे शिंपले ) असल्याने प्रत्येक बॅग बारकाईने चेक केली जाते , त्यामुळे वेळ वाढतो. थोड जास्त वेळ ठेवून विमानतळावर जावे. (कित्येकदा फॅमिली / ग्रुप मधील मेंबर्स पुढे मागे होणयाची शक्यता असते ).
अंदमानच्या प्रत्येक ठिकाणी , बेटावर जाता येताना लिमिटेड पार्किंग असल्यामुळे बोटीतून- टॅक्सीपर्यंत किंवा टॅक्सीपासून - पर्य्टन स्थळापर्यंत ,हॉटेलच्या पार्किंगपासून ते तुमच्या रुम /व्हिलापर्यंत तुम्हाला तुमच सामान घेऊन कधी कधी भरपूर चालावं लागतं. त्यामुळे चाके असलेली बॅग कॅरी करावी ती संपुर्ण प्रवासात सोपी पडते.
अंदमान हे बेट असल्यामुळे वातावरण कधीही बदलते . कुठेही हवामान अंदजामधे दिसत नसताना किंवा कुठलाही अलर्ट नसताना सकाळचं स्वच्छ नितळ हवामान अक्षरशः २५ मिनटात बदलून ईतका धो धो पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे निदान एक छत्री जवळ ठेवावी. फारसा उपयोग होत नाही तरी डोकं शाबूत रहाते.

विमानाने :-
दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला दैनंदिन उड्डाणे आहेत, तरी दिल्ली आणि कोलकाता येथून उड्डाणे अनेकदा चेन्नईमधून जातात, बुकिंगच्या वेळेनुसार, राऊंड ट्रिपचे भाडे US $ 250 ते US $ 500 पर्यंत असते. काही एअरलाईन्स US $80 इतक्या कमी किमतीत एकेरी उड्डाणे ऑफर करतात, परंतु तिकिटे अनेक महिने अगोदर बुक करणे आवश्यक आहे. तुम्ही एअर इंडिया सेवा देखील वापरू शकता (चेन्नई 0044-28554747; कोलकाता 033-22117879; पोर्ट ब्लेअर 03192-233108; www.airindia.com)आणि जेटलाइट (चेन्नई 080-39893333; कोलकाता 033-25110901; पोर्ट ब्लेअर 003192-242707; www.jetlite.com). पोर्ट ब्लेअरहून आग्नेय आशियासाठी कोणतीही थेट उड्डाणे नाहीत,
सहसा विमान प्रवासाची तिकिटे स्व्तः काढणे चांगले कारण आयत्या वेळी काही बदल झाल्यास आपल्याला थेट समजते. एकदा आपला प्लान दिला की आपल्याला २-३ एजंटचे कोट येतात. त्यापैकी जे आवडेल्/परवडेल ते घ्यायचे. ट्रिप कस्टमाईझ करायची असेल (१-२ दिवस कमी जास्त किवा ठिकाणे कमी जास्त करणे) तर तसेही करुन मिळते. विमानतळावर शक्यतो स्थानिक एजंटची गाडी पिक अप करायला येते. तेथुन पुढची जबाबदारी त्यांची. काही समस्या आल्यास लोकल एजंट आणि ट्रॅव्हल ट्रँगल दोन्ही मदत करतात(एस्कलेशन करता येते, पण एकुण अनुभव चांगला आहे). बोलुन काम झाले नाहीच तर गूगल रिव्ह्यु खराब करायची धमकी द्यावी, म्हणजे सुतासारखे सरळ येतात. पोर्ट ब्लेअर हे विमानतळ अगदिच लहान आहे. एक सांगायची गोष्ट म्हणजे पोर्ट ब्लेअरला फिरायाला आटो रिक्षाच वापरा, टॅक्सिच्या फंदात पडु नये कारण विमानतळ ते हॉटेल करीता आटो ५० रू घेतो तर टॅक्सी रू.१५०. पोर्ट ब्लेअर अंदमानची राजधानी असूनसुद्धा एका लहान जिल्ह्याच्या ठिकाणाप्रमाणेच आहे.
जहाज :-
वेगवेगळ्या जहाजांवरील जागांचे वर्गीकरण थोडे वेगळे असते. बंक बर्थवरील सर्वात स्वस्त जागा 1700 - 1960 रुपये, नंतर 2 वर्ग बी केबिन - 3890 रुपये, 2 वर्ग अ केबिन - 5030 रुपये, नंतर 1 वर्ग केबिन - 6320 रुपये, लक्झरी केबिन - 7640 रुपये. वातानुकूलित वसतिगृहे आहेत, जिथे जागेची किंमत 3290 रुपये आहे. अधिक महागड्या जागांच्या तिकिटांची किंमत विमानाच्या तिकिटां इतकीच असते.

परवानगी
सर्व परदेशी लोकांना अंदमान बेटांना भेट देण्यासाठी परमिट घेणे आवश्यक आहे, जे आपल्या बेटावरच्या आगमनानंतर विनामूल्य दिले जाते. परमिट मिळविण्यासाठी, विमानाने येणार्या पर्यटकांनी त्यांचा पासपोर्ट सादर करणे आवश्यक आहे30 दिवसांच्या परमिटमुळे पर्यटकांना पोर्ट ब्लेअर, दक्षिण आणि मध्य अंदमानमध्ये राहण्याची परवानगी मिळते , उत्तर अंदमान मध्ये (दिगलीपूर), लाँग आयलंडवर, उत्तर पॅसेज, लहान अंदमान (मूळ रहिवाशांचे प्रदेश वगळून), हॅवलॉक आणि नील बेटांवर. तुम्ही पोर्ट ब्लेअरमधील इमिग्रेशन ऑफिसमध्ये 15 दिवसांसाठी परमिट वाढवू शकता (03192-239247; 8: 30-13: 00 आणि 14: 00-17: 30 सोमवार ते शुक्रवार, शनिवारी 13:00 पर्यंत)आणि हॅवलॉक पोलिस स्टेशनमध्ये. ही परवानगी जॉली बॉय बेटांना दिवसा भेटी देण्यास देखील चालते.
बोटीने येणारे पर्यटक सहसा इमिग्रेशन अधिकाऱ्याकडून परवाना बंदरावर मिळतो. अन्यथा, तुम्ही अंदमानला पोहोचल्यावर ताबडतोब हड्डो पिअर येथील इमिग्रेशन कार्यालयात जावे. (हड्डो जेट्टी). परमिट संपूर्ण ट्रिपसाठी आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही बेटांवर प्रवेश करू शकणार नाही. पोलिस अधिकारी सहसा परमिट मागतात, विशेषत: बेटावर किनाऱ्यावर जाताना, आणि हॉटेलमध्ये चेक-इनच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्याही सेवेवर सध्याचे समुद्र प्रवास नियम तपासता येतीलः
अंदमान आणि निकोबार पर्यटन (03192-238473)
चेन्नई परदेशी नागरिक नोंदणी सेवा (044-23454970, 044-28278210) ;
कोलकाता (033-22470549, 033-22473300)
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI; www.shipindia.com)
चेन्नई (०४४-५२३१४०१; जवाहर बिल्डिंग, ६ राजाजी सलाई);
कोलकाता (०३३-२४८२३५४; पहिला मजला, १३ स्ट्रँड आरडी)

राहण्याची सोय
पर्यटकांसाठी निर्बंध.
अंदमान बेटे जरी नंदनवन असली तरी इथला निसर्ग अबाधीत रहावा यासाठी येथे काही निर्बंध आणले गेले आहेत.
हे प्रतिबंधित आहे:
- जमिनीवर आणि समुद्रावर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकायचा नाही
- समुद्राच्या आत कोरल आणि जमिनीवर शिंपले गोळा करणे प्रतिबंधीत आहे
- बंदी असलेल्या बेटावर स्वतःहून जाणे अजिबात सुरक्षित नाही
- येथे खाजगी मालमत्ता असल्यामुळे परवानगी न घेता नारळ गोळा करणे
- समुद्रकिनार्यावर किंवा जंगलात रात्र घालवणे, शिकार करणे, कॅम्पफायर करणे या सर्वांना मनाई आहे.
अंदमान बेटांवर फिरण्यासाठी वहातुकीचे पर्याय :-
बेटांदरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवासी फेरी हा एकमेव तुलनेने स्वस्त मार्ग आहे. पण त्याचे आगाऊ बुकींग करणे चांगले. शटल-हेलिकॉप्टर किंवा सीप्लेन भाड्याने घेता येते पण हि सेवा खूप महाग आहे, बेटांवर, ऑटो रिक्षा सहसा फिरण्यासाठी उपलब्ध असतात, टॅक्सी फक्त पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहेत.
विमान
अंदमानातील बेटांदरम्यान हेलिकॉप्टरची सेवा आहे. पोर्ट ब्लेअरहून तो लहान अंदमानला जातो ( 35 मिनिटे, मंगळ, शुक्र आणि शनि), हॅवलॉक बेट ( 20 मिनिटे)आणि मायाबंदर मार्गे दिगलीपूर (मायाबंदर, एक तास)...मात्र हि सेवा स्थानिक नागरिक, सरकारी नोकर आणि 5 किलोपेक्षा कमी सामान असलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे बहुतेक पर्यटकांना ही सेवा वापरता येत नाही. अर्थात हि सेवा पर्यटकांना हवी असेल तर आधी सचिवालयात अर्ज करावा लागतो.
फेरी
हॅवलॉक आणि नील बेटांवर तसेच रंगत, मैयाबंदर, दिगलीपूर आणि लिटल अंदमान येथे नियमित बोटी जातात. काही कारणाने या बोटी उपलब्ध नसतील तरीही काही स्थानिक मच्छिमार आहेत जे तुम्हाला घेऊन जातात, अर्थात त्यात धोका आहेच.पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक बेटांदरम्यान चालणार्या बोटींचे वेळापत्रक www.and.nic.in/spsch/iisailing.htm वर उपलब्ध आहे.
बस
सर्व रस्ते मुख्य बेटांना पुलांनी जोडलेले आहेत. स्वस्त सार्वजनिक आणि खाजगी बसेस पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेपासून बांदूरपर्यंत आहेत (वंदूर)आणि उत्तरेकडे बारटांग, रंगत, मायाबंदर आणि शेवटी दिगलीपूर, पर्यंत जातात. दुपारी 3:00 च्या नंतर जारवा नेचर रिझर्व्हचा बहुतेक भाग प्रवासासाठी बंद केला जातो, त्यामुळे त्यामधून जाणार्या बस सकाळी 4:00 ते 11:00 पर्यंत सुटतात.याशिवाय खाजगी जीप आणि मिनीव्हॅन गाड्या गावोगावी धावतात आणि तुम्ही त्याने फिरु शकता. तसेच जास्त किमतीत कार भाड्याने देखील घेऊन प्रवास करु शकता.
रेल्वे: -
भारतीय रेल्वेकडून येथे पोहोचण्यासाठी एक खास रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे.

अंदमान निकोबारला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास
सध्या या दोन्ही बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जलमार्गाचा किंवा बसचा प्रवास करावा लागतो. बसने या बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 14 तासांचा प्रवास करावा लागतो तर जलमार्गाने 24 तासांचा प्रवास करून येथे पोहोचता येते. परंतु रेल्वे मार्गाने फक्त 10 तासांतच येथे पोहोचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ट्रनच्या प्रवासात येथील निसर्गसौंदर्यही न्याहाळता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या कामाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. अंदमान निकोबारकडे पर्यंटकांचा वाढता कल लक्षात घेऊन आता पुन्हा हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करण्यात येत असून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

या प्रोजेक्टमुळे अंदामान निकोबारमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या या ठिकाणी जाणाऱ्या पर्यंटकांमध्ये भारतीय पर्यंटकांची संख्या फार मोठी आहे. सध्या हा रेल्वेमार्ग तयार होण्यासाठी फार वेळ लागणार आहे. यासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीटाची घोषणा अद्याप IRCTC मार्फत करण्यात आली नाही.
तुम्ही रेल्वे तिकीट कार्यालयात मुख्य भूभागासाठी रेल्वे तिकीट मिळवू शकता (२३३०४२; ८:००-१२:३० आणि १३:००-१४:००)एबरडीन बाजारच्या दक्षिणेस सचिवालय कार्यालयात आहे (एबरडीन बाजार)पोर्ट ब्लेअर मध्ये. हॉटेल मालक त्यांच्या पाहुण्यांना या समस्येवर सर्व आवश्यक माहिती देऊ शकतात.
पोर्ट ब्लेअर
अंदमानमधील पोर्ट ब्लेअर हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्ही चलन किंवा प्रवासी चेक बदलू शकता. संपूर्ण शहरात एटीएम स्थापित आहेत आणि वेस्टर्न युनियन कार्यालय पोस्ट ऑफिसमध्ये आहे. एबरडीन बाजारात अनेक इंटरनेट ऍक्सेस पॉइंट आहेत.
एबरडीन पोलीस स्टेशन (०३१९२-२३२४००; एमजी रोड (एमजी आरडी))
अंदमान आणि निकोबार पर्यटन (1P 232694; www.tourism.andaman.nic.in; कामराज रोड कामराज रोड); ८:३०-१३:०० आणि १४:००-१७:०० सोम-शुक्र, ८:३०-१२:०० शनि)
ई-कॅफे (30 तास इंटरनेट; 8:00-00:00)ऍबरडीन बाजार मध्ये, अगदी क्लॉक टॉवर समोर.
जीबी पंत हॉस्पिटल (०३१९२-२३३४७३, २३२१०२; जीबी पंत आरडी)
मुख्य पोस्ट ऑफिस (एमजी रोड (MG Rd); ९:००-१९:०० सोम-शनि)
स्टेट बँक ऑफ इंडिया (एमए रोड एमए आरडी); 9: 00-12: 00 आणि 13: 00-15: 00 सोम-शुक्र, 10: 00-12: 00 शनि) येथे तुम्ही प्रवासी चेक आणि चलन बदलू शकता.
पोर्ट ब्लेअर :-
इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित बांधलाय .
ही एक सरकारी शाळा आहे. नो युनिफॉर्म!! .
कोर्बिन्स कोव्ह बीच :-
कोर्बिन्स कोव्ह बीच
अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.
कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
चिडिया टापू
हा भाग पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच.चिडीया टापू हे पोर्ट ब्लेअरपासून ३० किमी अंतरावर आहे. पोर्ट ब्लेअरहून इथे जाण्यासाठी दररोज सात बसेस आहेत (सकाळी 10 वाजल्यापासून दर दिड तासाला).तुम्ही सिंक बेटावरून जहाजानेही येथे पोहोचू शकता. या जैविक उद्यानासाठी भारतीय लोकांना २० तर परदेशी प्रवाशांना 50 रुपये तिकीट आहे. हे उद्यान सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठवड्यातील मंगळ ते रविवार खुले असते.
सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे
मंजेरी :-
इथल्या दलदलीत मगरी आहेत
@ मंजेरी फॉरेस्ट चेक पोस्ट.
@मंजेरी जेटी
इथे फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे.
आमचं वाहन



अंदमानमध्ये अनेक म्युझियम्सही बघण्यासारखी आहेत. चाथम सॉ मिल मधील म्युझियम, समुद्रिका म्युझियम (अजिबात चुकवू नका आणि येथिल डॉक्युमेंटरीही नक्की पहा), अँथ्रोपोलीजिकल म्युझियम, अंदमान फिशरीज म्युझियम (हे स्किप केलं तरी चालेल).
मानववंशशास्त्रीय संग्रहालय
हे वस्तुसंग्रहालयाचा एम.जी रोड (MG Rd) वर असून त्याचा संपर्क क्रमांक (०३१९२)-२३२२९१. इथे प्रवेश 10 रुपये असून त्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि १.३० ते ४.३० अशी आहे. हे पोर्ट ब्लेअरचे सर्वोत्कृष्ट संग्रहालय आहे आणि बेटांवर राहणाऱ्या जमातींबद्दल इथे खूप तपशीलवार माहिती आहे. इतिहास आणि संस्कृतीविषयी आस्था असणार्यांनी इथे अवश्य भेट दिली पाहिजे. इथे जारवा जमाती वापरतात ते चिलखत बघायला मिळते, ज्यावर भौमितीक आकृत्या चितारलेल्या असतात. सेंटीनलीची सापडलेली कवटी, निकोबार बेटावरील शमॅनिक शिल्पकला, नारळाच्या पानापासून किंवा पाम ट्रीच्या झावळ्यापासून केलेल्या बास्केट, इथे असलेल्या आदिवासी जमातीचा पोषाख बघीतला कि एक गोष्ट लक्षात येते कि या बेटावरच्या आदिवासीमधील स्त्री आणि पुरुषांचा पोषाख सारखाच आहे, स्त्रीसुलभ लज्जेमुळे नागर संस्कृतीत स्त्रीया जे जास्तीचे कपडे घालतात, ती प्रथा आदिवासीत नसते, म्हणजे एक प्रकारे आदिवासी स्त्री पुरुष समानता पाळतात.



सी अॅनिमोन्स
स्टार फिश. किती सुंदर रंग आहेत ना!
सी-अर्चिन्स
अत्यंत सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची प्रवाळेही होती समुद्रिकामध्ये पण त्यांचे फोटो काढण्याची परवानगी नाही.
'समुद्रीका नॅवल मरिन म्युजिअम ' ( सामुद्रिक सागरी संग्रहालय )
हे संग्रहालाय हळदो रोडवर असून प्रौंढांसाठी तिकीट २० रु तर लहान मुलांसाठी १० रु आहे. आणि कॅमेर्याची पास काढावा लागतो.याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत आहे. सोमवारी याल सुट्टी असते. भारतीय नौदलाने या संग्रहालयाची स्थापना केली होती. बेटांवर असलेल्या सागरी परिसंस्था, वनस्पती, प्राणी, सागरी जीवन याबद्दल सांगणारी विविध प्रदर्शने आहेत. संग्रहालयात एक लहान मत्स्यालय आहे. बाहेर कामोर्टाच्या निकोबार बेटावर किनाऱ्यावर सापलेल्या निळ्या व्हेलचा सांगाडा आहे ( बेट).याच्या आकारावरूनच खरोखरचा देवमासा किती मोठा असावा याचा अंदाज येतो.
केवळ अंदमानातच आढळून येणारा पडौक वृक्ष, हा ह्या राज्याचा राज्यवृक्ष आहे. तो सुमारे १२० फूट उंच वाढतो. पानगळीचा पर्णसंभार बाळगतो. अशा वृक्षांचे उंचच-उंच जंगल तर नजरेचे पारणेच फेडते. तो अत्यंत भारदस्त दिसतो आणि उत्तम लाकडी वस्तुंकरताचे दर्जेदार लाकूड पुरवतो. पडौक लाकूड हे सागवानी लाकडापेक्षा जास्त सुदृढ असते. ह्या पडौकवनांतील वृक्षांचा वापर, बांधकामांकरता आणि बैठकीच्या सामानांकरता लागणार्या लाकडाच्या गरजा भागवण्याकरता, करता यावा, म्हणून १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारने इथे एका आरा यंत्राची स्थापना केली होती . दुर्दैवाने दुसर्या महायुद्धात थेट ह्या ठिकाणी स्फोटके पडल्यामुळे यंत्राचे अपरिमित नुकसान झाले. मात्र पूर्व पाकिस्तान, लंका आणि बर्मामधून ब्रिटिशांनी इथे पुनरुत्थानाकरता आणलेल्या लोकांच्या लाकडाबाबतच्या अतिरिक्त गरजा भागविण्याकरता ह्या यंत्राची पुनर्स्थापना करण्यात आली. बिनीच्या अंदमानी पडौक वृक्षाची कटाई केवळ ह्या सरकारी आरा यंत्रावरच केली जाते. हे आरायंत्र चॅथम बेटावर आहे. हे बेट पोर्ट ब्लेअर शहराच्या उत्तरेला आहे. पोर्ट ब्लेअरशी ते केवळ चॅथम पुलानेच जोडलेले आहे. हा आशियातील सर्वात मोठ्या लाकूड प्रक्रिया उद्योगांपैकी एक आहे व अद्याप कार्यरत आहे, पर्यावरणवाद्यांना इथे भेट देणे कदाचित आवडणार नाही परंतु बेटाच्या इतिहास आणि अर्थव्यवस्थेची मनोरंजक माहिती हवी असेल तर इथे जायलाच हवे. सोमवार ते शनिवार सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत या सॉ मिलला आपण भेट देउ शकतो. प्रवेश फि. १० रुपये.
पहिल्या चित्रात प्रवेशद्वार आणि वन-उप-संरक्षकांचे कार्यालय दिसत आहे. खालच्या ओळीत आरायंत्रावर, तसेच मानवी कौशल्याने साधलेल्या लाकडी वस्तू दिसत आहेत.
पहिल्या चित्रात उभ्या दिसणार्या दोन बांबूंपैकी एकाचा काप मधल्या चित्रात दिसत आहे. मग दिसते आहे ती लाकडातून साकारलेली विश्वकर्म्याची मूर्ती.
त्यानंतरच्या चित्रात दिसते आहे आरायंत्राचे प्रारूप.
खालील पहिल्या चित्रात आरा यंत्राकरता, दातेरी आरीचा पट्टा उचलून नेला जात असलेला दिसत आहे. दुसर्या चित्रात कापले जाणारे पडौक वृक्षाचे लांबलचक खोड दिसते आहे.
त्या कामगाराच्या डाव्या हाताकडील खोडाच्या टोकास आरीचे पाते खोडात उभे घुसलेले स्पष्ट दिसत आहे. उजव्या बाजूस रुळांवरून सरकत पुढे जाणार्या खोडातून कापली गेलेली फळीही, त्या कामगाराच्या उजव्या बाजूस सुटी झालेली दिसते आहे.या वखारीत एक संग्रहालय आहे ज्यात त्या वृक्षापासून केलेल्या विविध वस्तू अगदी अंदमानचा नकाशा सुद्धा केलेला दिसतो.
नॉर्थ बे आयलंड :-
पोर्ट ब्लेअर वरून नॉर्थ बेला सी वॉक करू इच्छिणार्या पर्यटकांना सी-लिंक कंपनीच्या सी-वॉकर जहाजावर आणतात. ह्याकरता समुद्र संचाराकरताचे रु.३,२००/- चे तिकीट वेगळ्याने घ्यावे लागते. स्कूबा डायव्हिंगकरता रु.३,५००/- चे तिकीट पडते. मात्र, ह्यात प्रत्येक स्कूबा डायव्हरसोबत एक स्वतंत्र पाणबुडा सोबत दिला जात असतो. स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावे लागते. पोर्ट ब्लेअर वरून येतांना, एका छोट्या स्वयंचलित होडीतून, जहाजालगत उभ्या असलेल्या दुसर्या होडीत आणि तिथून ह्या जहाजात आपण प्रवेश करतो. तिथे मोठी बोट किनार्यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आपल्याला एका छोट्या होडीत बसवण्यांत येते.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवलेल्या असतात. वर ऊन असेल तर सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरतात. प्रवास सुरु झाला कि आपल्याला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी होते. त्यानंतर आपल्याला हवे असल्यास स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत येते. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील! इथेच कपडे बदलवण्याकरता चेंजिंग रूम, आपले व्यक्तिगत सामान ठेवण्याकरता लॉकर इत्यादी पुरवले जाईल असेही तिकीट देतांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इथे चेंजिंग रूमच्या नावाखाली एक झापड असलेला आडोसा, आणि लॉकरच्या नावाखाली झाकणे असलेले अपुरे कप्पे एका रॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याला कडीकुलूप करावे अशी कोणतीही सोय नाही. समुद्र संचाराच्या कल्पनेने भारावलेले पर्यटक ह्याच तुटपुंज्या सेवांचा आनंद सुखाने घेत असतात. प्रशासकीय अधिकारी सुखासिन ठेवले जात असणार, त्यामुळे त्यांचीही फारशी अडचण होत नाही. तरीही, समुद्र-संचार कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार प्रामाणिक, सचोटीचा आणि विश्वास निर्माण करणारा आहे, ह्यात मुळीच संशय नाही.नॉर्थ बे कडे जाताना
जेटी
नॉर्थ बे आयलंड

खळग्यात असलेल्या खडकावर गुलाबी रंगांची सजीव पोवळी लगडलेली दिसतात.हे झुडूपांप्रमाणे डोलताना दिसतात. पाणबुडे एकेकाला सुटे करून आपले हात त्या पोवळ्यास लावू देतात. काही पोवळी तपकिरी रंगाची दिसतात मात्र हात लावताच गर्द निळे, जांभळे दिसू लागतात. अगदी लाजाळूसारखे मिटतात देखील. दरम्यान तिसरा पाणबुडा खडकाच्या दुसर्या बाजूस जाऊन, आपले फोटो काढतो. आजूबाजूला रंगीबेरंगी मासे स्वैर संचार करत असतात. त्यांना हात लाऊन पाहण्याचे आपले प्रयत्न मात्र असफल होतत. एक म्हणजे ते अत्यंत चपळ असत. दुसरे म्हणजे पाण्यात खोल असल्याने आपल्या हालचाली अतिशय मंद होतात आणि तिसरे म्हणजे हेल्मेटच्या काचेतून खोलीचा अदमास योग्यप्रकारे येतच नाही.
साधारण अर्धा तास गेला कि जसे खाली आणले होते, तसेच एकेकाला वर नेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. खरेतर आपण या सी वॉकचा आनंद आता कोठे घेउ लागतो, पण शेवटी बाहेर यावेच लागते. एक पाणबुडा पर्यटकांच्या रांगेचे एक टोक धरून तळाशी थांबतो. दुसरा एकेकास शिडीपर्यंत नेऊन, शिडीवरून वरपर्यंत घेउन जातो. पृष्ठभागाशी पोहोचताच जहाजावरील कर्मचारी हेल्मेट काढून बाजूला करतात, त्याची नळी काढून टाकतात. बाहेर येणारा विजयी वीराच्या आविर्भावात असतो. अद्भूत पाण्याच्या खालच्या दुनीयेचा दर्शनाचा आनंद त्याच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असतो. तर आत उतरण्यास तयार असलेले लोक, आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत असतांना दिसत असत.
Scuba Diving:
Scuba Diving is one of the most popular activities in Andaman, and the North Bay Island comes under the top 5 best places to experience it.
Beyond the shallow waters above the shoreline, lies one of the most richest and diverse underwater world that presents a great world for the divers.
The underwater currents are moderate and more often than not, some of the very rare species of fishes can be spotted there.

The sea is clear and the visibility is moderately high, making your experience wonderful.
One important thing to note is- The waters near the North Bay are easily mixed, therefore, the visibility can be a little effected during bad weather, but if your are going there in summer there is nothing to worry about.
The dive is usually done a bit far from the island. You will be taken there by boat, accompanied with certified divers to complete the journey.
Overall a great experience.
Sea Walk:
Sea Walk in North Bay can easily be a experience that you can't find anywhere else in the islands.
The island has been personally praised by Sea Walk experts for the perfect underwater experience and alluring surroundings.
For those who don't know, Sea Walk is an activity where you will be taken underwater to walk directly on the sea bed with the help of a helmet-type breathing equipment.
.jpg)
Experts have found a coral belt, some 20 meters away from the island that ticks every mark for the perfect underwater adventure.
The current is perfect, fishes are abundant and the visibility is moderately high, which makes sure the experience is something you'll remember for a very long time.
Once you are ready, you will be taken onto a platoon stationed 20 meters away from the jetty, where you will be lowered underwater. Experts will be there with you every step of the way to make sure everything is safe and wonderful.
Parasailing:
Parasailing is one of the most adventurous activity you can do at North Bay. The wind near the shorelines and deep seas are wild and perfect for flying and the sea is clear throughout the year with medium waves.

The complete Parasailing journey starts from the shore of North Bay and takes you around the seas surrounding the Ross Island where you are allowed to soar into the sky for 5 continuous minutes, after which you are taken back. The complete trip takes around 45 minutes and includes a journey of the deep seas surrounding the neighboring islands.
Dolphin Glass Bottom Boat:
For people who don't want to get wet or for families who prefer to adventure together, Glass Bottom Boat Rides from Dolphin is perfect.

The boat makes it's way from the Jetty and explores the sea surrounding the islands.
The trip takes you to explore the seas, flying through the waves and lets you watch the sea through a transparent bottom, making the experience wonderful and enjoyable for everyone.
The activity can also be enjoyed by kids and elders.
Semi Submarine:
Semi Submarine is offered by Coral Safari in Andaman, and is perfect for people who would like to experience the wonderful underwater world of corals and fishes from the comfort of their cabin.

The coat/submarine takes you to the best known spots of coral belts around the North Bay Island and lets you gaze at the treasury of the corals without having to worry about safety or equipment.
Unlike, Scuba or Snorkeling, the semi submarine can be experienced by both kids and elders making it an adventurous yet family friendly activity.
Overall, a great activity to experience if you are looking for something unique.
Snorkeling:
North Bay, with it's shallow shoreline, offers a pretty decent place to snorkel as it is mostly covered by vibrant corals and sea dwellers.
Although, it is not allowed to bring your own equipment to protect the corals as discussed earlier, you can easily enjoy hours of underwater fun by getting in touch with a vendor on the island.

The great thing about that is - Most of the vendors have boat and know some of the best places to snorkel near the North Bay Island, making it worth a try.
The rates for Snorkeling is low and great for people visiting Andaman on a budget.
Overall a decent experience.
Things you need to know before visiting:
- There are a lot of options available to reach North Bay, but make sure to book with a vendor that assures your safety.
- Boat tickets can be booked at the location or can be booked online but only a few vendors have online booking.
- Boat vendors and guides usually speak Hindi, but understand generic English words and sentences.
- Its always advised to pre-book the boat ticket, because the availability is short during tourist season (January to March).
- The island is mediocre in terms of sightseeing but awesome for Water Sports.
- Most of the water sport vendors are booked throughout the season, so make sure you pre-book the Activities before visiting.
- In case of unfavorable weather, the trip will likely be cancelled or postponed to a later date.
- During heavy rain, the underwater visibility is effected, therefore it's better to visit during moderate rain or summertime.
- Moderate rain actually makes the trip great, if there is visibility problem, Andaman Dolphin Ride is the best option.
- 3-4 Hours is enough to have fun at the island.
- Small food stalls are available at the island.
- Small restrooms, bathrooms and appropriate changing rooms are available.
- It's a good thing to remember the boat number or take the phone number of the boat captain to make sure the return is hassle free.
- Always keep a contact in Port Blair, in case you missed your boat and need help during the visit.
- It better to combine a trip to the Ross Island with the trip for a wholesome day.
- There are no stay options or hotels at the island.
- For people who'd like to stay dry or children can avail Coral Safari Semi Submarine or Dolphin Boat Ride to have fun during the visit.
- Its not allowed to bring your own Snorkeling equipment in this island.
- The island comes under forest reserve, so plastics and trash has to be disposed correctly.
- There is no entry fees to get into the beach.
- There is no proper jetty in the island, the boat are boarded in a floating platform, so make sure you keep your balance intact.
How to Reach North Bay Island:

- You can easily reach North Bay with a Boat as there are less number of large ferries available for transportation.
- The trip usually consists a visit to the Ross Island, but private boats can be booked if informed earlier.
- The boat leaves from the Rajiv Gandhi Water Sports Complex and reaches North Bay via Ross Island in under 30 minutes.
- Life Jackets, instructions and other measures are taken to make sure you stay safe during the journey.
- Usually, a travel guide will accompany through the journey to let you know about the history of the islands and the significance of the isle you are about to visit.
- Sometimes, the boat might take off from the Junglighat Jetty. Don't worry, you will be notified about this by your vendor when you book the ticket.
See the table below to the get detailed ferry/boat information:
| Departure | Arrival | Duration | Cost |
|---|---|---|---|
| 09:30 AM | 10:00 AM | 30 Min | ₹ 750/- |
| 10:00 AM | 10:30 AM | 30 Min | ₹ 750/- |
| 10:30 AM | 11:00 AM | 30 Min | ₹ 750/- |
| 11:00 AM | 11:30 AM | 30 Min | ₹ 750/- |
| 11:30 AM | 12:00 Noon | 30 Min | ₹ 750/- |
| 12:00 Noon | 12:30 PM | 30 Min | ₹ 750/- |
सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर :-
अंदमान म्हणले की प्रथम आठवण होते ती महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीची, असीम त्यागाची आणि त्यांनी भोगलेल्या यातनांची. ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर किंवा इतरत्र राज्य केले तेव्हा समुद्राच्या आजूबाजूचे प्रदेश त्यांनी तुरुंग म्हणून वापरले जसे की अंदमान,मंडाले,रत्नागिरी,ब्रिटिश गयाना,फ्रेंच गयाना बेटे वगैरे. पण त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की अजून १०० वर्षांनी ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातील. जसे प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसासाठी मंडाले हे नाव टिळकांशी आणि गीतारहस्य ग्रंथाशी जोडले गेले आहे तसेच अंदमान हे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि कमला या महाकाव्याशी. ब्रायटन हे त्यांच्या "ने मजसी ने" गीताशी जोडले आहे तर मार्सेली हे नाव जहाजाच्या पोर्ट होल मधून मारलेल्या उडीशी, लंडनमधील इंडिया हाऊस हे बॉम्ब बनविण्याशी आणि पुस्तके कोरून पिस्तुले भारतात पाठवण्याशी अशा अनेकानेक जागा.

६० वर्षांनंतर, या बेटांवरील बंदरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न आला होता, परंतु पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांना पेरण्यासाठी वास्तविकपणे १८९७ मध्ये बंदिवान वसाहतीची स्थापना केली गेली. अंदमान आणि निकोबार आणि निकोबार बेटांवर १० मार्च १८५८ रोजी २०० स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या आगमनाने कैद केलेल्या वसाहतीची कारावास सुरू झाली. बर्मा आणि भारतातील मृत्यूदंडातून काही कारणास्तव जगलेल्या सर्व दीर्घावधी व आजीवन कारागृहात असलेल्या देशभक्तांना अंदमानच्या बंदिवासात वसाहतीत पाठविण्यात आले.
पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, वहाबी बंडखोरी, मणिपूर विद्रोह इत्यादींशी संबंधित सैन्य व इतर देशभक्तांना ब्रिटीश सरकारविरूद्ध आवाज उठवण्याच्या गुन्ह्याखाली अंदमानच्या बंदिवासात असलेल्या वसाहतींमध्ये पाठवण्यात आले.
या कारागृहाची रचना बघून ब्रिटिशांच्या बुद्धीचे कौतुक वाटते. पण ती बुद्धी आपल्या विरोधात कृत्य करण्यासाठी वापरल्याने जरा चीड ही येतेच. यातील एक गोष्ट म्हणजे तुरुंगातील कोठडीच्या कड्या. जवळपास हात भर लांब असलेल्या कड्या कैद्यांनी सहजा सहजी उघडू नये यासाठी तीन अडथळे यात केले होते. या अनन्वित अत्याचारातही तेथील राजकीय कैद्यांनी बरेच ऐतिहासिक संप केले. याची माहिती लाईट ऍण्ड साउंड शो मधून मिळतेच. सेल्युलर जेलमध्ये फाशीची जागा त्यानंतर जेथे कोलूचे काम होत असे ती जागा ‘शहीद ज्योत’ या गोष्टी दिसतात. यासाठी तेथे गाईड देखील उपलब्ध आहेत.
येथे आलेले बंदीवान, डाकू वा दरोडेखोर नव्हते. तर राजद्रोहाचा आरोप असलेले राजकीय कैदी होते. इंग्रज सरकारची नीती त्यांना एखाद्या खुनी दरोडेखोराप्रमाणे वागविण्याची होती. त्या वागणुकीला विरोध करण्यासाठी , मृत्यूच्या भयापासून मुक्त असलेल्या अंदमानच्या वीरांनी मे १९३३ मध्ये आमरण उपोषणाला प्रारंभ केला. तसेही मरणारच आहोत तर छळाने पिचून मरण्यापेक्षा आमच्या मर्जीने, ताठ मानेने मरू ,हा त्यांचा निर्धार होता. हुतात्मा जतीन दास आणि हुतात्मा महेंद्रनाथ बॅनर्जी यांनी याआधी ते करून दाखविले होते. अंदमानच्या या पर्वात एकाहून एक असे महान क्रांतिकारक उतरले होते. हुतात्मा महावीर सिंह, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, मोहित मित्र, मनकृष्ण नामदास, बटुकेश्वर दत्त, विजय कुमार सिन्हा, शिव वर्मा, गयाप्रसाद, अंबिका चक्रवर्ती, गणेश घोष ,अनंत सिंग, आनंद गुप्त असे धुरंदर त्यात होते. इंग्रज सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र स्वातंत्र्यवीरांचा जबरदस्त प्रतिकार आणि मनोनिग्रह यामुळे अखेर इंग्रज सरकारला हार स्विकारावी लागली. “की तोडीला तरू फुटे आणखी भराने”, या उक्तीला अनुसरून जुलमी सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. अंदमानचे, नरक अथवा छळछावणी, असे स्वरूप त्यामुळे नष्ट झाले.
या अंदमान जेलच्या निर्मितीचा इतिहासही मोठा क्लेशकारक आणि ध्यानात ठेवण्याजोगा..हा जेल सबंध जगात प्रसिद्ध आहे. जेलचा वेगळा इतिहास आहे. १८९६ ते १९०६ या कालखंडामध्ये काळ पाण्याच्या कैदेवर आणलेल्या बंदीवानांनीच तो बांधून पूर्ण केला. एक हिंदी गाणे आहे ना,” जिस का जूता, उसी का सर..” तशीच ही कहाणी. ही जेल इंग्रजांनी बांधली तेव्हा त्याची रचना “ऑक्टोपस” या समुद्र प्राण्यासारखा होती. “Central watch towar” आणि त्याला जोडल्या गेलेल्या सात तीन मजली इमारती ज्यामध्ये कैद्यांना एकांतवास देण्यासाठी बांधलेल्या कोठड्या. आता या कारागृहाचे केवळ १,६,७ ह्याच शाखा शिल्लक आहेत. बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात आली आहेत.७ शाखा आणि मध्ये वॉच टॉवर अशा पद्धतीने बांधण्यात आले असले प्रत्येक शाखेच्या समोर पुढच्या शाखेची पाठ येते जेणेकरून कैदी एकमेकांना पाहू शकणार नाहीत. खुद्द सावरकर बंधूना २ वर्षे माहित नव्हते की ते दोघे अंदमानात आहेत. कैद्यांनी कामे करायचे कारखाने प्रत्येक शाखेच्या समोर आहेत. तेथे ठेवलेली तेल काढण्याची आणि काथ्या वळण्याची यंत्रे बघितली तर आजही अंगावर शहारा येतो.एका आर्याच्या जागी सरकारी इस्पितळ उभं आहे. मधल्या मनोर्याच्या खांबांवर तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांची नावं आहेत. या इमारतींची रचना अशी होती की एका इमारतीतल्या कैद्यांना समोरचे कैदी दिसू नयेत. फोटोत व्हरांड्यासमोर समोरच्या खिडक्या दिसतायेत. त्या खिडक्यांनाही उतरती छपरे. आणि खोलीत त्याही उंचावर. म्हणजे फक्त उजेड आणि हवा थोडीफार येणार !
जपानी बॉम्ब वर्षावात काही नष्ट झाले. प्रत्येक विंगवर एकूण तीन मजले आहेत. सर्व सात विंग करिता, मध्यभागी एकच निरीक्षण टॉवर आहे.एकूण ६९८ एकांत कोठड्या आहेत. कोणत्याही एका कैद्याला दुसऱ्या कैद्याची संपर्क साधता येणार नाही अशी त्यांची जडण आहे. म्हणून त्याला,” सेल्युलर जेल”, हे नाव दिले गेले. “Central towar” वरून तीनही इमारतीवर लक्ष ठेवता येइल तसेच वेळप्रसंगी तीनही बिल्डींग “Central towar” पासून अलग करता येतील अशा पद्धतीने “Central towar’ चे बांधकाम आहे. त्यामुळे कमी रक्षकांनी ज्यास्तीत ज्यास्त कैद्यांवर लक्ष ठेवता येत असे. इंग्रजांनी या जेलवर Devid Bary या क्रूर कर्म्याला जेलर म्हणून नियुक्त केले होते, संपूर्ण जेलवर त्याची अनिर्बंध सत्ता होती.
प्रत्येक कोठडी 13 फूट लांब 7 फूट रुंद आहे.10 फूट उंच आहे. कोठडीचा दरवाजा आतून ऊघडणे किंवा कुलूप तोडणे शक्यच नव्हते. हवेसाठी फक्त एक छोटीशी खिडकी आहे. कोठडी समोर,चार फूट रुंदीचा व्हरांडा आहे. एकंदर वावरायला जागा ७० चौरस फुटाची. कोठडीच्या मागच्या भिंतीला उंचावर छोटा झरोका आहे. पुढच्या बाजूला लोखंडी मजबूत दरवाजा.कडी कुलूपाची सोय बाजूच्या भिंतीतील खास खोलगट भागात त्यामुळे कोणालाही आतून दरवाजा उघडता येणे शक्यच होणार नाही अशी रचना. सर्व कोठडीत जाण्यासाठी मार्ग “Central towar” मधून होता. या जेलमधून सुटका करून घेणे अशक्य होते. एकदा कोठडीचे दार रात्री बंद झाले की सकाळपर्यंत उघडत नसे.कैद्यांना रात्री नैसर्गिक विधीसाठी पण बाहेर जाता येत नसे.कैद्यांना एकमेकांशी बोलायची मुभा नव्हती.आपल्या शेजारच्या कोठडीत कोणता कैदी आहे हे पण समजणे मुश्कील असे. याच कोठड्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटच्या कोठडीत सावरकर कोठडी आहे. काय विशेष आहे या खोलीत? जश्या इतर ६९३ खोल्या तशीच ही पण एक.पण नाही. या खोलीचे नशीब इतके विलक्षण की एक असामान्य कैदी तिथे काही वर्षे वास्तव्यास होता. आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर हजारो लोकांना दिशा दाखवणाऱ्या भयंकर जहाल आणि धोकादायक माणसासाठी एव्हढी तयारी तर हवीच. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला दोन दरवाजे आहेत, तेही मुद्दाम त्यांच्यावर खास पाळत ठेवण्यासाठी ! या कोठडीत सावरकरांना १० वर्षे ठेवले होते.
फोटोपुढे दंडवत घातला आणि थोडा वेळ तिथंच बसलो. माझ्या आयुष्यातील काही अनमोल क्षणांपैकी हा एक.
त्या लोखंडी दारातून हे जे दिसते आहे ते आहे फाशीघर सावरकरांच्या अगदि दारा पुढे खालिल बाजुस व वरिल झरोक्यातून ऐकू येतो तो दूरवर असलेल्या समुद्राच्या गाजांचा आवाज. (अवांतर - स्वातंत्रवीरांना त्यांचे वडिल बंधु गणेश सुद्धा याच कारागारात आहेत हे तब्बल दोन वर्षानी कळलं).
एकावेळी तीन बंदिवानांना येथे फासावर चढवले जात असे. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, हा जयघोष या परिसरात कितीदा निनादला असेल याला गणती नाही. शेकडो-हजारो बंदिवान येथे फाशीचा फंदा गळ्याभोवती अडकवून स्वर्गारोहण करते झाले. त्यांच्या स्मृती ऊरल्या आहेत, त्या आठवून हे लोंबकळणारे फाशीचे दोर आज अगदी केविलवाणे वाटतात!! किती जणांनी तिथे परमेश्वराकडे अखेरची प्रार्थना केली असेल? हा आपला शेवटचा क्षण आहे हे समजून किती जणांना तिथे रडू आले असेल? मृत्यू परवडला पण इथल्या कठोर शिक्षांमधून आता सुटका होणार या भावनेने किती जणांना तिथे आनंद झाला असेल?
जेलर डेव्हिड बेरी आणि त्याचे साथी यांनी स्वातंत्र सेनानींवर अनन्वित अत्याचार केले. काळ्या पाण्यावर आलेल्या बंदीवानात काही खूनी दरोडेखोर होते. मात्र बहुतेक जण तरुण, सुशिक्षित असे देशभक्त होते. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याचे स्वप्न उराशी घेऊन ते येथे आले होते. बाबाराव सावरकर व विनायक सावरकर ही दोनच मंडळी महाराष्ट्रातून त्यावेळी येथे बंदीवान होती. दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे पन्नास वर्षे शिक्षा झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यावेळी बेरी मोठ्या छद्मीपणे विचारतो, “सावरकर तुम्हाला येथे पन्नास वर्षे शिक्षा भोगावयाची आहे हे लक्षात आहे ना?”. तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी दिलेले उत्तर हे त्यांच्या विजिगीषू वृत्तीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यवीर, बेरीला म्हणाले होते, “हो मला ते पूर्ण माहित आहे?” मात्र पुढील पन्नास वर्षे तुझे सरकार आणि तू तरी इथे राहणार आहात का, हे तुला कुठे माहित आहे?” महापुरुषांची वाणी ही भविष्यवाणी असते. स्वातंत्र्यवीर दहा वर्षांनी तेथून बाहेर आले. मात्र बेरी कधीच इंग्लंडला जाऊ शकला नाही. ब्रिटिश साम्राज्यही भारतावरून नष्ट झाले.. हे सर्व ऐकत असतांना पहात असताना अभिमानाने ऊर भरून येतो.,.
जेलर बेरी हा अतिशय क्रूर व दयेचा लवलेशही नसलेला अधिकारी होता. तो कैद्यांना म्हणे, “या जगात दोन देव आहेत. एक या पृथ्वीवर व दुसरा नरकात. त्यामुळे मी पृथ्वीवरील देव जे तुम्हाला सांगेन तेच करावे लागेल. तुम्ही करा अथवा मरा!” जेलच्या आवारात एक पिंपळाच झाड आहे. त्याला बेरीबाबा का पेड म्हणतात. तिथला त्याकाळचा जेलर बेरी ह्याच ते "निवाड्याचं" स्थान होतं. इथुनच तो "गोड शब्दात"कैद्यांचे निवाडे करत असे/ शिक्षा करत असे. सध्याच्या जेलमधे एक प्रदर्शन आहे त्यात इत्थंभूत माहिती फोटोंसकट आहे.
फाशीघर
फाशीघरात
विविध प्रकारच्या बेड्या
आत कैद्याना देण्यात येणार्या अमानुष वर्तणुकीचे दृष्य दाखवणारे काही मॉडेल्स ठेवलेले होते. ही या कारागाराची प्रतिकृती तारामाश्याच्या आकाराची.त्याच्या प्रत्येक
बाजूवर तीन मजले व प्रत्येक मजल्यावर ५ बाय ६ च्या आकारच्या २० ते ३०
बराकी.
कोलू
५. कोलू फिरवताना मॉडेल
बेड्या
बंदिवानाच्या यादीतील पहिली तीन नावे बाबाराव सावरकर तात्याराव सावरकर व वामनराव जोशी उर्फ दाजी, ही तीनही नावे वंदनीय आहेत. वास्तविक दाजी (वामनराव) हे सावरकर बंधूंचे शिष्य; शिष्य कसले ते भक्तच होते. तरीही त्यांना हा मान मिळाला. कारण, त्यांनी केलेले कृत्य हे दशकातील शतकृत्य होते.
त्यावेळी १९०९ साली विल्यम नावाच्या मग्रूर अधिकार्याने, आपल्या घोडागाडीला पुढे जाऊ दिले नाही, या क्षुल्लक कारणासाठी एका गरीब गाडीवानाला लाथाबुक्क्यांनी तुडवून ठार मारले. त्याच्यावर ब्रिटिश सरकारने काहीच कारवाई केली नाही. तो मुजोर तोंड वरकरून शहरात फिरत होता. हे सळसळत्या रक्ताच्या सावरकर भक्तांना कसे सहन होणार?
. नाशिकमध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला. मग ब्रिटिश सरकारने खटला भरल्याचे नाटक केले. तो आरोपी निर्दोष सुटला आणि नाशिकमध्ये हिंडू लागला.
वरील सर्व कारणांमुळे सावरकर शिष्यांचा भडका उडाला. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. तोच या सर्व अत्याचाराला जबाबदार होता. अत्याचारांची हद्द झाली होती. म्हणून ब्रिटिश शासकांना हे दाखवून देणे गरजेचे होते की, आम्ही भारतीय बुळचट नाही. देव, देश आणि धर्माचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून जॅक्सनचा वध करण्याचे निश्चित झाले.
२१ डिसेंबर, १९०९ रोजी विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या कोवळ्या मुलाने (वय १७) जॅक्सनचा वध केला. हा वध म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला मारलेली सणसणीत थप्पड होती.
अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे यांना जागेवरच अटक झाली. कृष्णाजी कर्वे तेथून निसटले, पण पुढे पकडले गेले. त्याचदिवशी वामनराव उर्फ दाजी जोशी यांनाही येवले येथून अटक झाली. त्यांना काढण्या घालून उघड्या अंगाने फटके मारत मारत नाशिकला आणण्यात आले. या पुढची कहाणी अत्यंत दारुण आहे.
या तरुण मुलांनी जे छळ सोसले त्याला तोड नाही. ती वर्णने वाचवत नाहीत. वाचताना भावना वेग असह्य होऊन मी किती तरी वेळा अगदी सुन्न होऊन बसलो. हा खटला वेगाने चालवण्यात आला. आरोप सिद्ध झाले, निकाल लागला. त्यानुसार अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांना फाशी, वामन (दाजी) जोशी यांना काळ्या पाण्याची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
विनायक देशपांडे व दाजी यांनीच कट रचला, त्याची बारीकसारीक तपशीलासह उत्तम तयारी करून घेतली, हे सिद्ध झाले. म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.
बहुतेक सगळ्या इतिहासकारांनी यांचे वर्णन ‘निधड्या छातीचा, बलदंड शरीराचा व युयुत्सु वृत्तीचा’ असेच केलेले आढळते. काही दिवस भायखळ्याच्या तुरुंगात ठेवून नंतर त्यांना काळ्या पाण्याला अंदमानला पाठवण्यात आले. जेलर बेरी आणि त्याची छळछावणी जगप्रसिद्धच आहे. कोलू चालवणे, काथ्या कुटणे, सतत मार खाणे, अपमान, कदान्न भक्षण हे दाजींच्याही नशिबी आले!
दाजींनी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली जेलमध्ये अन्न सत्याग्रह, संप, आंदोलने, सर्व हिरिरीने केली. बेरीला जेरीस आणले. तेथेही त्यांनी देशभक्तांचे जाळे विणले. त्यामुळे एकदा त्यांना काही देशद्रोही, धर्मद्रोही सावरकरांवर विषप्रयोग करणार असल्याची खबर आधीच लागली. त्यांनी तात्यारावांना सावध केले व मोठे अरिष्ट टळले.
दाजी शाळेत मास्तर असल्याने येथेही शाळा उघडली गेली. अनेकांना साक्षर केले. तेथे हिंदू-मुसलमान हा भेद मुळीच ठेवला नाही. सावरकर राजबंद्यांना सोडण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे सतत अर्ज पाठवत असत. त्याचा उपयोग होऊन जे राजबंदी सोडण्यात आले, त्यात वामनरावांचाही नंबर लागला व त्यांना दहा वर्षांनी भारतात पाठवण्यात आले. पण, ते सुटले असे झाले नाही. भारतात त्यांना येरवड्याच्या तुरुंगात आणून ठेवले. तेथे राजबंदी असूनही त्यांना दीड वर्ष खुनी, दरोडेखोर यांच्या बरोबर ठेवले गेले. येथेही अंदमानसारख्याच ‘दंडाबेडी’, ‘आडवीबेडी’ अशा शिक्षा भोगाव्या लागल्या. या अत्याचारांमुळे जेव्हा १९२२ साली त्यांची सुटका झाली, तेव्हा शरीराने ते खूपच दुर्बळ झाले होते, पण मनाने भक्कम होते.
समशेरपूरला परत आले तेव्हा संपूर्ण कुटुंबाची अगदी वाताहत झाली होती. बंधू, भावजयी, आई निर्वतले होते. भावाची लहान मुले रडत होती. चरितार्थाचा मोठाच प्रश्न होता. वामनरावांनी उर्वरित सर्व कुटुंबीयांना खूप प्रेम दिले, त्यांचा अतिशय प्रेमाने, परंतु शिस्तीने सांभाळ केला.
आपल्या सर्व पुतण्यांना/नातवंडांना मुलगा-मुलगी हा भेद न करता चांगले शिकवले. सर्वजण चांगले शिकले. त्यातील शरयू या उत्तम शिकून शिक्षकी पेशातच गेल्या. शरयू मामींनी संग्रामपूर येथील घरातून कष्टाने जुनी कागदपत्रे हुडकली, तेव्हा दाजी काकांच्या हस्तलिखितात लिहिलेले आत्मचरित्र मिळाले. त्यांनी अपार मेहनत करून ते नीट लिहिले व दि. २६ जनेवारी २०१६ रोजी भगूर येथे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. तेव्हा कुठे दाजी काकांचे महात्म्य प्रकाशात आले.
वामनराव स्वतः हुशार होते. व्ह. फा. परीक्षेत ते नाशिक शहरात दुसरे व संबंध नाशिक जिल्ह्यात सातवे आले होते. त्यामुळे मुलामुलींनी खूप शिकावे, यासाठी ते आग्रही असत. ते उत्तम चित्रकार होते. संगीताचे भोक्ते होते. स्वतः संवादिनी उत्तम वाजवत. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला अगदी घरच्या गाईंनादेखील त्यांनी प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिले. ते इतके स्वाभिमानी की, त्यांनी कधीही स्वातंत्र्यसैनिक म्हणून अर्ज करून पेन्शन मागितली नाही.
क्रांतिकारकांवर लिहिणारे देशभक्त वि. श्री. जोशी हे मुद्दाम समशेरपूरला आले, दाजींना भेटले. नंतर त्यांनी पुराव्यानिशी पत्र पाठवले ते थेट स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना – पंडित नेहरूंना. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून एक हजार रुपयांचा चेक आला व पुढे अजून थोडीशी रक्कम आली. बस्स!
स्वा. सावरकरांचा आणि दाजींचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे. पुढे १९५५ मध्ये दाजींचे मेव्हणे लक्ष्मण कुलकर्णी यांनी दाजी व तात्यारावांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. ही श्रीराम-भरत भेट सावरकर सदनात दादर येथे झाली. दोघांनाही अश्रू आवरेनात. त्यांनी एकमेकांना मिठी मारत मनसोक्त रडून घेतले.
सरकारने उपेक्षा केली, पण राष्ट्रभक्तांच्या हृदयात दाजी काकांना कायमचे मानाचे स्थान मिळाले.
१४ जानेवारी, १९६४… संक्रांत होती. दाजींनी सर्वांना तीळगूळ दिला व आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद दिले आणि आपले पुतणे भास्कर ब्रह्मदेव जोशी यांच्या मांडीवर शांतपणे अखेरचा श्वास घेतला….
‘नाही चिरा, नाही पणती’ अशा अनाम वीरांच्या मांदियाळीतील अजून एक तारा निखळून पडला…
अंदमान,सेल्युलर जेलला भेट देणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने, त्या पहिल्या तीन नावांचे वाचन केल्यावर,आपली मान झुकवली पाहिजे. दाजी विषयी माहिती सर्वांना करून दिली पाहिजे.त्यांच्या अफाट त्यागाचे थोडेतरी मोल होईल!!.
सेल्युलर जेलमध्येच आत एक संग्रहालय आहे. जिकडे सेल्युलर जेलचे मॉडेल ठेवले होते आणि काही माहितीदर्शक फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून गाइडबरोबर आत जेलच्या फेरिसाठी निघालो.
गाईड एका कुटुंबाचे २०० रुपये आकारतो पण ते जी माहिती देतात त्यामानाने ही किंमत फार नाही. (एकुणातच अंदमान महागडे नाही, किमती वाजवी आहेत)
संग्रहालयात दाखल झालो. हे संग्रहालय म्हणजे त्या हुतात्म्यांना आदरांजली आहे ज्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी वाहिलं. भींतिंवर चहुबाजुला त्या वीरांच्या तसबिरी आहेत. हजारांवर नक्कीच असतील. ज्यांनी जीव गमावला त्यांची तपशिलवार माहिती इथे बघायला मिळते.
कोलू आणि काथ्याचा ठराविक कोटा पूर्ण झाला नाही तर जेवण देण्यात येत नसे. हात सोलवटून जात, रक्तं येत पण काथ्या कुटलाच पाहिजे. थोड्या जुन्या आणि त्यातल्या त्यात मवाळ कैद्यांना लाकूड्तोडीसाठी नेत. या कैद्यांवर आदिवासी लोकांचे हल्ले होत, तसे ते आताही होतात जर तुम्ही आदिवाश्यांच्या भागात "शिरलात" तर . अंदमानी लाकूड अत्यंत टिकाऊ असतं. खार्या पाण्यानेसुद्धा त्याला अपाय होत नाही. तिथल्या अंगणात जिथे कैद्यांना कोलूवर चढवायचे, काथ्या कुटायला लावायचे, तेल घाण्याला जुंपायचे, लाकूड कामाला लावायचे , छळाचे इतर प्रकार प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटलं.
जेलवरची गच्ची
नॉर्थ बे बेट
अंदमान सरकारी इस्पितळ
जेल संध्याकाळी ५ वाजता बंद होते, सोमवारी सुट्टी असते, रविवारी खुली असते. ५.३० वाजता आणि अजून एक उशीरा असे २ लाईट अँड साऊंड शो होतात.सेल्युलर जेलमधल्या लाईट अँड साऊंड संध्याकाळचा ६.०० चा शो हिंदीत असतो. ह्यानंतरचा ७.३० वाजताचा शो इंग्रजीत असतो. ह्याचे दर माणशी तिकीट ५० रुपये आहे.
आम्ही मराठी माणसे अंदमानच्या सफरीवर जातो ते केवळ पर्यटन म्हणून जातो का? नाही. भारतीय माणसाच्या, विशेषत: मराठी माणसाच्या अंदमान यात्रेला एक वेगळा असा संदर्भ आहे. राष्ट्रभक्तीचे व्रत घेतलेल्या असंख्य क्रांतिवीरांनी, भारतभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामात, हसत-हसत आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. फाशीचे दोर आनंदाने आपल्या गळ्यात अडकवून घेतले. त्यांचे संसार घरेदारे उद्ध्वस्त झाली. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना छळण्यासाठी येथे छळछावणी उघडली होती. जेथे अनेक क्रांतिवीर, यमयातना भोगीत भारत मातेचे स्वातंत्र्य गान गात होते. या सर्वांचे महामेरू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीही याच सेल्युलर जेलमध्ये आपल्या आयुष्याची अकरा वर्षे व्यतीत केलेली आहेत. त्यांच्या देशसेवेला सीमा नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत ते केवळ आणि केवळ या राष्ट्रवीरांच्या आत्मसमर्पणामुळेच होय. या वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करावे व स्वातंत्र्यवीरांनी आमच्यावर केलेल्या उपकाराची , ही कृतज्ञतेची भावना भारतवासी यांच्या मनात येथे येताना असते. त्यामुळेच आम्ही दुसऱ्यांदा हा अंदमान चा प्रवास केला.अंदमान हे आमच्यासाठी एक राष्ट्रीय तीर्थस्थल आहे.
या शक्तीपीठ अंदमानची अधिष्ठात्री देवता म्हणजे ,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! आमच्या सहप्रवासी सौ ज्योती ताई कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वर केलेली ही छोटी कविता आपणा सर्वांच्याच मनांतील भाव -भावना सांगून जाते. ती येथे उद्धृत केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही, असे वाटते.
“हजारो तलवारींचे शौर्य
लाखो सुमनांची कोमलता
कोट्यवधी सूर्यांचे तेज
……….म्हणजे वीर सावरकर.
मातृभूमीप्रती प्रखर निष्ठा
जाज्वल्य हिंदू राष्ट्रवाद
देशाचा ज्वलंत अभिमान
……….म्हणजे वीर सावरकर
एकाच वेळी दोन जन्मठेप
मार्सेलिसची सागरझेप
अंदमानातील काळे पाणी
……….म्हणजे वीर सावरकर
कष्टमय सेल्यूलर जेल
कोलूच्या अपार यातना
कोठी नं. 121 च्या भिंती
……….म्हणजे वीर सावरकर
कोळसा काट्यांची लेखणी
कमला महाकाव्य लेखन
तोंडपाठ दहा हजार ओळी
……….म्हणजे वीर सावरकर
जातीभेद निर्मूलनाचे व्रत
स्त्रियांना समान अधिकार
विज्ञानाचे सच्चा भक्त
……….म्हणजे वीर सावरकर
एक कवी, साहित्यिक एक
एक वकील, क्रांतीकारी एक
एक वक्ता, समाजसुधारक एक
……….म्हणजे वीर सावरकर.”
यानंतर आपण अंदमान परिसरातील बेटांची सफर करणार आहोत. त्या आधी बेटांची नावे कशी पडली याची माहिती घेउया.
प्लॅग पॉईंट :-
पोर्ट ब्लेअरला असलेला प्लॅग पॉईंटपाशी जाण्यासाठी कोस्टल रोडने जाता येते. खुप लांबून आपल्याला तिरंगा दिसतो. दुसर्या महायुध्दाच्या काळात २३ मार्च १९४३ पासून जपानी सैन्य इथे मुक्कामी होते, पण ६ नोव्हेंबर १९४३ ला टोकियोमध्ये तात्कालीन जपानच्या पंतप्रधांनानी घोषणा केली कि अंदमान , निकोबार समुह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या हवाली करण्यात येत आहे आणि ३० डिसेंबर १९४३ साली पहिला तिरंगा येथे फडकला. याच ठिकाणी आता अतिभव्य तिरंगा डौलाने फडकत असतो.
वंडूर आणि महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान
वंडूर बंदरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय समुद्री उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. ह्या बेटावर प्लास्टिकमुक्त वातावरण सांभाळले जाते. म्हणून बाटलीबंद पाणी नेण्यासही मनाई आहे. दर दोन माणसांगणिक, २०० रुपये अनामत भरून दोन लिटरची एक ओतीव प्लास्टिकची वॉटर बॅग दिली जाते. आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात. बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात. इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी कडक असते की, सगळ्यांनाच आपापल्या सामांनांतून असंख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्यास टाकून द्याव्या लागतात. अंदमानात विशेषतः पाण्यात डुंबायचे असल्याने प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेण्याच्या मोह टाळलेला बरा.
राजीव गांधी वॉटर स्पोर्ट क्लॉम्प्लेक्स :-
याला बहुतेक जण फक्त वॉटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेच म्हणतात. पोर्ट ब्लेअरमध्ये मुक्काम असेल तर इथे नक्कीच भेट द्यायला हवी. हे ठिकाण स्थानिकांमध्ये देखील लोकप्रिय आहे. अंदमानी लोक आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेल्या लढाई ज्याला 'बॅटल ऑफ अबेर्दीन' म्हणतात, त्याच्या स्मृती इथे जपल्या आहेत. २ स्क्वेअर कि.मी. मध्ये पसरलेया या बागेत चालण्यासाठी ट्रॅक आहेत आणि विश्रांतीसाठी हि जागा उत्तम आहे. सेल्युलर जेलमधून इथे सहज पोहचता येते. इथून मरिना पार्क आणि बस स्टँडही जवळ असल्यामुळे पोर्ट ब्लेअरच्या भेटीत इथे जाणे अतिशय सोपे आहे.


या उद्यानाच्या एका बाजुला मरीन पार्क असून दुसर्या बाजुला रॉस आयलंड आणि नॉर्थ बेला जाणार्या बोटी जिथून सुटतात ती जेटी आहे. या दोन्हीला जोडणारे पदपथ या उद्यानात आहेत. हे उद्यान अंदमान बेटावर मुख्यतः येणार्या पर्यटकांच्या कुटूंबासाठी वॉटर स्पोर्टची सोय असावे या हेतून बांधले आहे. या परिसरातून खुप छान निसर्ग दिसतो. इथे बसण्यासाठी भरपुर बाक असल्यामुळे निवांत बसून आपण विश्रांती घेउ शकतो. समुद्रावरुन येणारा वारा आपले मन प्रसन्न करतो. संध्याकाळी चार वाजल्यानंतर इथे येउन आराम करणे हा सुंदर अनुभव आहे. इथे समुद्र असला तरी सी वॉक, स्कुबा डायव्हींग किंवा स्नॉर्केलिंग करता येत नाही . अर्थातच या सर्व गोष्टी आपण नॉर्थ बे आयलंडवर करु शकतो, नॉर्थ बेचे तिकीट आपण इथे काढू शकतो.


इथल्या वॉटर स्पोर्ट्चे दरपत्रक असे आहे.
जेट स्की ५९९/- रुपये , पॅरासेलिंग- ३५००/- रुपये, बनाना राईड- ४९९/-, कयाकिंग - ३५००/-, सोफा राईड- ४९९/-, ग्लास बॉटम बोट- ७५०/- हे सर्व वॉटर स्पोर्ट सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत असतात.
नॉर्थ बेला जाण्यासाठी बोट दर तासाला असून - ५५०/- रुपये प्रति व्यक्ती घेतले जातात.
रॉस, नील, हॅवलॉक बेटांच्या नावांची कथा
रॉस या प्रसिद्ध बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बाँबेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. २९ ऑक्टोबर १८४९ रोजी त्यांचं निधन झालं.नील आणि हॅवलॉक या बेटांची नावे जेम्स नील आणि सर हेन्री हॅवलॉक या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांवरून ठेवण्यात आली. हॅवलॉक यांनी अवध आणि कानपूरमध्ये तर जेम्स नील यांनी १८५७ मध्ये लष्करी उठाव निपटण्यासाठी कंपनी सरकारतर्फे प्रयत्न केले होते. २४ नोव्हेंबर १५८७ रोजी अतिसाराने हॅवलॉक यांचं निधन झालं तर जेम्स नील यांचा २५ सप्टेंबर १८५७ रोजी गोळी लागून मृत्यू झाला.
सप्टेंबर १९३९ मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा निकोबारचे तत्कालीन प्रशासनप्रमुख जॉन रिचर्डसन आणि त्यांच्या परिसरातील स्थानिक लोकांना पुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नव्हती. अजय सैनी यांनी 'इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकली'साठी लिहिलेल्या एका संशोधन निबंधात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
१९३९ मध्ये जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर रिचर्डसन आणि तेथील लोकांना पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. पहिल्या महायुद्धात या परिसरात शांतता होती. दुसऱ्या महायुद्धात मात्र ही परिस्थिती बदलली. जपानने मलाया, सिंगापूर आणि हाँगकाँग इथे हल्ला केल्यानंतर ब्रिटिशांनी १९४१ मध्ये जपानविरुद्ध युद्ध पुकारलं.
तेव्हा हे युद्ध अगदी आपल्या दाराशीच होतंय, अशी भावना तेथील आदिवासींच्या मनात निर्माण झाली. जपानी लोकांनी सिंगापूर, म्यानमार येथे केलेल्या अत्याराबाबत माहिती मिळाली. १९४२ मध्ये जपानने कामोर्टा आणि पोर्ट ब्लेअरवर बाँब हल्ला केला आणि ही भीती आणखीच बळावली. जपानने या बेटांचा ताबा घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांना जपानी लोकांच्या छळवणुकीचा पहिल्यांदाच अनुभव आला.२४ डिसेंबर १९४२ ला निकोबारमधील ५०० लोकांना बांधकामासाठी मजूर नेमण्यात आलं. निकोबारपेक्षा अंदमानचं महत्त्व जपानी लोकांच्या दृष्टीने जास्त होतं. त्यामुळे जपानी नौदलाचा अंदमानवर ताबा होता.हे नौदल सिंगापूरमधील मुख्यालयाला उत्तरदायी होते. त्यांचा प्रभाव इतका जास्त होता की तेव्हाच्या हंगामी भारतीय सरकारलासुद्धा तिथे कोणताही हस्तक्षेप करता येत नव्हता. निकोबारच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे एक प्रशासकसुद्धा नेमण्यात आला होता. स्थानिकांना जपानी भाषा शिकवली गेली. 'जपानचा राजा म्हणजे देवाचाच एक अवतार आहे, हे सांगण्यासाठी व्याख्यानं आयोजित केली गेली,' असं सैनी लिहितात.
जपानी सैनिकांनी तिथल्या स्थानिकांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचंही सैनी यांनी या शोधनिबंधात पुढे म्हटलं आहे. याबद्दल अनेकदा तक्रार केली तरी त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिकांना रोज कामावर येण्याचे आदेश देण्यात आले होते.
कुणी आजारी पडलं तरी त्याला अगदी घरातून उचलून आणलं जायचं. जुलै १९४५ मध्ये निकोबार भागात अनेक सागरी आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर निकोबारमध्ये राहणाऱ्या आणि तिथे न राहणाऱ्या लोकांचीही हत्या करण्यात आली. जपानने ३०० लोकांना अटक करून त्यांची रवानगी छळछावण्यांमध्ये करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात जपानने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर जपानच्या मेजर जनरलने रिचर्डसन यांना पाचारण केलं. "आमचा राजा शांतताप्रिय आहे. लोकांना ज्या वेदना होत आहेत, त्या त्याला बघवल्या जात नाहीत. आमच्याकडे शस्त्र आहेत, ज्यांनी आम्ही अजून १०० वर्षं युद्ध करू शकतो. मात्र आता आम्हाला शांतता हवी आहे," अशा आशयाचा मजकूर त्यांना वाचून दाखवण्यात आला. या संदेशाबरोबर रिचर्डसन यांना एक जुनं ब्लँकेट, ४० पाऊंड तांदूळ आणि दोन यार्ड इतकं कापड देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
आता या रॉस, नील आणि हॅवलॉक या बेटांची नावं अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप, अशी केली जाणार आहेत.
रॉस बेट, पोर्ट ब्लेअर :-
एकेकाळी रॉसला बेटाला पाँडिचेरी, सायगावच्या. सोबत "पूर्वेचे पॅरिस" म्हटले जात असे.

त्या काळात बांधलेल्या इमारती, बाजरपेठ, बेकारी, चर्च, टेनिस कोर्ट, पाणी शुद्धीकरणासाठीचे यंत्र, विद्युत निर्मिती केंद्र, क्लब हाऊस, जपानी बंकर, छापखाना देखील आज भग्नावस्थेत पाहायला मिळतात.रॉस आयलंडवर आता भग्नावशेष उरले आहेत पण ते ही बघायला फार छान वाटते. वरवर झाडांनी गच्च भरलेले बेट इतके काय काय दडवून ठेवत असेल असे अजिबात वाटत नाही. ढासळलेल्या इमारतींमधून प्रचंड मोठी मोठी झाडे वाढली आहेत. इथे अनेक हरणं आणि मोर दिसतात. हे आयलंड आता नेव्हीच्या अखत्यारीत आहे आणि इथे कोणी रहात नाही. मात्र इथे खूप छान निगा राखली जाते. अतिशय स्वच्छता आहे. पण रात्री मात्र एकदम अमानवीय वाटेल हां. रामसे बंधूंनी हे बेट कसं काय मिसलं देव जाणे!
या बेटाला आता नेताजी सुभाष द्विप असे नाव दिले आहे. सध्याच्या सरकारने जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून भारतीय नावे दिलेली आहेत हे पाहून खूप आनंद होतो. या बेटावर सरकारने आता चांगले रस्ते व पाणी, विजेची सोय केल्यामुळे प्रवास खूप सुखकर होतो..







इथे हरीण आणि मोर शोधा :
जुने चर्च :


मूळ चर्चचा फोटो आणि माहिती :
बेटावरील तळे आणि सिट- आऊट्स :
रॉस बेटावर फेरी (75 रुपये, 20 मिनिटे ) पोर्ट ब्लेअर एक्वैरियम पिअर येथून बुधवार वगळता दररोज 8:30, 10:30, 12:30 आणि 14:00 वाजता निघते. कृपया तुमचे तिकीट खरेदी करताना वेळापत्रक तपासा कारण ओहोटी आणि समुद्री प्रवाहामुळे बोट निघण्याची वेळ बदलू शकते.
या बेटावरील वृक्षसंपदा अतिशय समृद्ध आहे. हरणे, मोर, बदके, रंगबिरंगी पक्ष्यांचे कुजन आपल्या मनातील वादळांना सहज शांत करते. हे बेट एकूण ६० एकरांचे आहे. हे सर्व पाहण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास पायी किंवा कात्रज उद्यानासारखी इलेक्ट्रिक व्हेकलने करता येतो. काही स्थानिकांना येथे किरकोळ व्यवसायास परवानगी दिली आहे. त्यामुळे छोटे रेस्टॉरंट, शहाळे विक्रेते दिसतात.
तिथून तुम्हाला पायऱ्या उतरून मागच्या बाजूला असलेले दीपगृह बघून परत यावे लागते आणि मग तीच गाडी तुम्हाला परत आणते. एका गाडीचे भाडे ६०० रुपये.
दुसऱ्या महायुद्धात बांधलेला एक जपानी बंकर
गाडीतून बेटावरच्या मुख्य इमारती बघत बघत बेटावरच्या सर्वोच्च बिंदूवर पोहचतो. आता जवळपास दोनशे पायऱ्या उतरून मागच्या बाजूला खाली जायचे आहे. बेटाचा शेवटचा बिंदू म्हणजे दीपगृह आपल्याला खुणावत असते आणि त्याच्या मागचा उसळता समुद्र भुरळ घालत असतो.



तेच ते रु. २० च्या नोटवरील दीपगृह वेगळ्या कोनातून. दिसलं का? :वीस रुपयाच्या नोटीबद्दलचा जो माहितीफलक आहे त्यावर दाखवलेल्या माउंट
हॅरियेट या उंचावरील व्हू पॉइंटवरून अतिशय सुंदर दृश्य दिसते. या बेटावर
जाण्यासाठी आपले वाहन बोटीवर घालून नेता येते. :
<
अनुराधा ताई सांगतात ,”ज्यावेळी त्सुनामी झाली, त्या आधी तीन दिवस ही हरणे काहीच अन्नपाणी घेत नव्हती. लोकांना त्याचा उलगडा झाला नाही. तीन दिवसांनी जेव्हा हाहा:कार माजला , तेव्हांच त्यांच्या अन्नपाणी वर्जचा अर्थ लोकांना कळला. प्राणी, पक्ष्यांना निसर्ग माणसापेक्षा जास्त कळतो .
वायपर बेट
सिंक बेट
येथे आपण दिवसा जाउ शकतो परंतु, जर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सींकडून येत नसाल तर तुम्हाला मुख्य वन्यजीव वॉर्डनकडून इथे भेट देण्याची परवानगी अगोदर घ्यावी लागेल. चिडीया टापू येथून बोटीने या बेटांवर पोहोचता येते (२ तास)किंवा बांडुरा येथून (३.५ तास). तासात पोहचू शकतो. नॅशनल पार्कला भेट देण्याची परवानगी असेल तर तीच येथे वैध मानली जाते. (भारतीय पर्यटाकांना ५० रुपये / परदेशी पर्यटकांना 500 रुपये).
जॉली बॉय बेट :
१) इथे जाण्यासाठी वंदुरवरुन बोटीने जावे लागते.
२) विमानतळावरुन थेट इथे जायचे असेल तर साधारण दीड तास लागतो. वंदूरला जाण्यासाठी अर्धा तास आणि तिथून बोटीने जॉली बॉय बेट.विमानतळावरुन वंदूर बीचला जाण्यासाठी कॅब्मध्ये ८ जणांचे २५००/- घेतात.
३) काहीवेळा इथे जाण्यासाठी खुप गर्दी असते, त्यामुळे जॉली बॉयवर जाणार्या फेरीचे आधीच बुकींग केल्यास त्रास होणार नाही.
४) जॉली बॉय हे बेट जुन ते सप्टेंबर या कालावधीतच पर्यटकांना खुले असते, त्यानंतर रेड स्कीन हे बेट पर्यटकांना जाण्यासाठी उपलब्ध असते.
५) इथे जाण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ अशी आहे. त्यानंतर हे बेट पर्यटकांसाठी बंद केले जाते.
६) जर आपण स्वतंत्रपणे जॉली बॉय बेटावर जाणार असू तर वनखात्याची परवानगी काढावी लागते. याचे शुल्क ७५/- प्रति व्यक्ती आहे.
७) इथे पावसापासून बचाव करण्यासाठी निवारा नाही, त्यामुळे बरोबर छत्री नेलेली ठिक होइल.
८) आपल्याकडे असणार्या प्रत्येक वस्तुची माहीती वनखात्याला द्यावी लागते, त्यामुळे इथे जाताना कमीतकमी वस्तु घेउन जा.
९) इथे खाण्यापिण्याची सोय नाही.म्हणून बरोबर खाण्याचे पदार्थ आणि पिण्याचे पाणी ठेवावे. अर्थात हे पाणी किंवा खाण्याचे पदार्थ प्लॅस्टीकच्या पॅकिंगमध्ये असता कामा नयेत.
१०) काहीवेळा पाण्याची पातळी कमी होउन प्रवाळ असलेला भाग उघडा पडतो. अश्या वेळी पाण्यात उतरणे टाळालेले बरे.
११) वंदूर बीचपासून जॉली बॉयला जाण्यासाठी स्पीड बोट १०५०/- प्रति व्यक्ती घेतात. इथे स्नॉर्केलींग करायचे असल्यास ५००/- प्रति व्यक्ती आणि ग्लास बॉटम बोटीची राईड घ्यायची असल्यास ९९५/- प्रति व्यक्ती असा दर आहे.
बारतांग बेट :
ह्या नव्या (काहिशा वदग्रस्त) ट्रंक रोडने (नॅशनल हायवे) ह्या जारवांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढला आहेच. गेल्या ७-८ वर्षांत त्यातील काहिंनी आपले शब्द शिकायला सुरवात केली आहे. सगळं जग सारखंच एका वासाचं, एका रंगांचं बनवु पहाणार्या तथाकथित 'आधुनिक' माणसांचा परिणाम पशुपक्षांवर दिसु लागला आहे, तर मग ह्या माणसाच्याच जमातीवर परिणाम न दिसेल तरच नवल. आता हे किती योग्य, अपरिहार्य आणि किती क्लेशकारक हे ज्याचे त्याने ठरवावे.
लवणस्तंभांच्या गुंफा :-
जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी भव्य दिव्य बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. पाण्यात मगरी-बिगरी असल्याने प्रवास थोडा काळजीपुर्वक करावा लागतो. स्पीड बोटीतून बॅकवॉटर्समधून तुम्ही अर्धातास जाता आणि मग अचानक एका तिवराच्या जाळीत बोट घुसते. चारी बाजूला तिवराची जाळी आणि बोगद्यात आपली बोट हा अनुभव रोचक वाटतो.



पॅरॉट आयलंड :-
नावाप्रमाणेच दर दिवशी शेकड्याच्या संख्येने संध्याकाळी इथे पोपटांचे थवेच्या थवे येत असतात. विशेष म्हणजे हे पोपट फक्त रात्रीच इथे मुक्कामाला असतात.दुसर्या दिवशी सकाळी हे निघून जातात. त्यांच्या या वर्तणूकीचे कोडे अद्याप उलगडले नाही. त्याच्यावर संशोधन सुरु आहे. मावळणारा सुर्य आणि पंख फडकवत बेटावर उतरणारे पोपट आणि इतर पक्ष्यांचे थवे हा एक अनुभव असतो. एखाद्या पक्षी निरीक्षकासाठी तर सुखद अनुभव ठरतो. अर्थात अंदमानच्या ट्रिपमध्ये या बेटाचा समावेश आवर्जून केलेला नसतो. मात्र पक्षी आणि निसर्गाची आवड असेल तर इथे जरुर भेट द्या. इथे जाण्यासाठी आपल्याला बारतांग बेटावरुन फेरीने जावे लागते.हॅवलॉक बेट
काला पत्थर बीच :-
काला पत्थर सारखा बीच भारतात शोधून सापडणार नाही. प्रत्येक पर्यटकाला इकडे किती फोटो काढू आणि किती नको असे होतेच. तीन शेड्स मधला समुद्र नजर टाकावी तितका लांब. त्सुनामीमध्ये वाहून आलेली काही प्रचंड खोड असलेली झाडे मराठी चित्रपट सैराटमधील त्या झाडाची आठवण करून देतात.राधानागर बीच :-
एलिफंटा बीच :-
एलिफंट बीच हे एक स्नॉर्कलिंसाठी उत्तम ठिकाण आहे. या बीचला एलेफंट बीच हे नाव पडण्याचे कारण म्हणजे एकेकाळी इथे तीन हत्ती होते, त्यांच्या पायाला साखळी बांधून माहुत त्यांना फिरवायचे. पर्यट्कांनाही त्यांच्यावर स्वार होता यायचे, मात्र कालांतराने येथील हत्ती नैसर्गिकरित्या मृत्यु पावले.शेवटचा हत्ती २०१७ साली मेला.आता मात्र येथे हत्ती नाहीत. इथले निसर्गसौंदर्य, स्वच्छ पाणी आणि उपलब्ध असलेले वॉटर स्पोर्ट यामुळे हॅवलॉक बेटावरील हा किनारा पर्यटाकांना अतिशय प्रिय आहे.


हॅवलॉकच्या बरेच तिकीट काउंटर असतात आणि वॉटर स्पोर्ट साठी तिकिटे विकतात होते. प्रत्येक एजंटचा काउंटर ठरलेला दिसत असतो त्याप्रमाणे टेबलाकडे कडे गेलो कि सगळी माहिती दिली जाते. योजना सोयीची आहे. प्रत्येक खेळाचे ६०० रुपये अशी तुम्हाला पाहिजे तेव्हढी कुपन्स घ्यायची. मग बोट तुम्हाला एलिफंटा बीचवर नेणार. तिथे तुम्हाला पाहिजे ते खेळ खेळायचे.जितकी तिकिटे उरतील ती इथे आल्यावर परत करायची आणि ते पैसे परत घ्यायचे. इथे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळतो. कदाचित सगळा माल बाहेरून मागवावा लागत असेल किंवा दाक्षिणात्य लोक तसेही नाश्त्याला पुरी खातात म्हणून असेल. पण तेच तेच बघून कंटाळा येतो.
ही योजना फक्त पॅरासेलिंग या प्रकाराला लागू नव्हती कारण ते सगळ्यात महाग आहे (प्रत्येकी ३५०० रुपये). शिवाय स्नॉर्केलिंग साठी अधिकचे १००० रुपये दिल्यास १५-२० मिनिटे जास्त फिरून प्रवाळ बघायला मिळतात. १० जणांची फायबर बोट. सुझुकी किंवा यामाहाचे इंजिन सर्वांना लाईफ जॅकेट दिली जाते. एकुणातच लोकांच्या सुरक्षेची काळजी (कायद्याच्या धाकाने असेल किंवा कसेही) घेतली जाते.किनार्यावर घनदाट झाडीत चेंजींग रुम्स आहेत. पाण्यातील कपडे विकत आणि भाड्याने देण्याची सोय आहे.
ट्रेकींग हा इथे जाण्याचा दुसरा पर्याय असला तरी सहसा स्थानिक व्यक्तीच या मार्गाचा वापर करतात, कारण एकतर विशीष्ट रस्ता असा नाही, शिवाय ट्रेकिंगचा रुटवर मार्किंग नाही. ट्रेक करत जायचे असेल तर हे अंतर ८.५ कि.मी. भरते. हॅवलॉक बेटाच्या जेटीच्या उजव्या बाजुला 'वे टु एलेफंट बीच' अशी पाटी आहे, त्या रस्त्याने आपण जाउ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे १०/- रुपये तिकीट काढून बसने जाणे किंवा कॅब करुन जाणे. कॅबसाठी साधारण ७००/- घेतले जातात. ट्रेक करायची इच्छा असेलच तर मात्र काळजी घेतली पाहीजे. एकातर रस्ता घनदाट जंगलातून आहे, त्यामुळे बरोबर स्थानिक वाटाड्या पाहीजे, अन्यथा दाट झाडीत चुकण्याची शक्यता आहे. हा स्रता चिखलाने भरलेला आहे, शिवाय झाडीही खुप जास्त आहे आणि मुख्य म्हणजे डास मोठ्या संख्येने आहेत, जे अगदी दिवसाही चावतात, बहुतेकदा या रस्त्याचा वापर बीचवर असलेले दुकानदार त्यांचे साहित्य नेण्यासाठी किंवा ये जा करण्यासाठी करतात. या मार्गाचा वापर करायचा तर मस्कीटो रिपेलंट बरोबर हवे तसेच भक्कम आणि चांगली पकड असणारे बुट आवश्यक आहेत. ट्रेकिंगसाठी गाईड आपल्याला हॅवलॉक जेटीपाशी मिळतात, ते साधारण २००/- फि घेतात.एलेफंट बीचवर हत्तीच्या तोंडाचा नैसर्गिक आकार मिळालेला खडक आहे. मात्र इथे जाण्यासाठी घनदाट जंगलातून ट्रेक करावा लागतो.
पांढर्या स्वच्छ वाळूच्या या किनार्यावर दाट झाडी आहे. इथे बसण्यासाठी लाकडी बाक आहेत आणि दिवसभराच्या दगदगीनंतर निवांत बसून सुर्यास्ताचा आनंद घेत आराम करता येतो. या किनार्यावरची वाळू स्वच्छ आणि समुद्राची पातळी उथळ असल्यामुळे छोट्या मुलांना देखील आनंद घेता येतो. इथे पाण्याची पातळी फक्त एक मीटर आहे आणि कोणतेही खडक किंवा प्रवाल पाण्यात नाही, त्यामुळे इथे अगदी सुरक्षितपणे पोहण्याचा आनंद आपण घेउ शकतो. इथे जीवरक्षक कायम तैनात असतात आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात. मात्र तरीही किनार्यापासून साधारण १० मिटर अंतरापर्यंतच प्रौढ पर्यटकांनी तर किनार्याच्या अगदी जवळ मुलांनी पोहणे अपेक्षित आहे. इथे निरनिराळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट उपलब्ध आहेत. जेट स्कीइंग, कयाकिंग, स्पीड बोट, बनाना आणि सोफा राईड वैगरे. इथे चेजींग रुम, लॉकर आणि बाथरुम उपलब्ध आहेत.
काही महत्वाच्या टीप :-
१) हा बीच सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खुला असतो.
२) इथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
३) बीचच्या जवळ खाण्याचे पदार्थ उपलब्ध आहेत.
४) अर्थातच बीच लांब असल्यामुळे खाण्याचे पदार्थ महाग आहेत.
५) जर बीचवरच वॉटर स्पोर्टचे बुकींग केले तर दरात कोणतीही घासाघीस केली जात नाही.
६) बीचच्या डाव्या बाजुला बाथरुम आणि चेजींग रुम आहेत.
७) लॉकर रुम उपलब्ध आहेत आणि दर दिवसासाठी त्याचा दर १०/- आहे.
८) यालाच एलेफंटा बीच असेही म्हणतात.
९) जवळपास फक्त स्नॅक जसे सामोसे, पकोडे, वडा असेच पदार्थ मिळतात. मात्र पुर्ण जेवण पाहिजे असेल तर राधानगर बीच किंवा स्वराज्य बेटावरच जावे लागते
१०) इथे कयाकिंग, स्कुबा डायव्हींग, सर्फींग, फन डायव्हींग, बर्ड वॉचींग अश्या गोष्टी उपलब्ध नाहीत.
११) इथे भेट देण्याचा उत्कृष्ट काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी
नील बेट
नील आयलंड म्हणजेच शहीद द्विप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानच्या तीन बेटांचे नाव बदलण्याची घोषणा २०१८ मध्ये केली. यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहतांना त्यांनी रॉस आयलँड, हेव्हलोक आयलँड आणि नील आयलॅडचे नामकरण केले होते. यात नील बेटांचे आता शहीद बेट म्हणून ओळखले जाते. तर रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट आणि हव्हेलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप असे नाव देण्यात आले. पोर्ट ब्लेअरमधील फिनिक्स बे पिअर येथून नीलकडे जाणारी फेरी दररोज सकाळी निघते (१९५ रुपये, दोन तास)इथल्या प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे सुभाष मेळा असून हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित केला जातो. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेष परिधान करून स्थानिक लोक पारंपारिक अन्न शिजवतात आणि पर्यटकां सोबत हा साजरा केला जातो. या बेटावर लोकसंख्या कमी आहे, जेमतेम ३०००, रस्तेही खराब आहेत, मात्र रिसॉर्ट उत्तम आणि सर्व सोयींनी युक्त आहेत. इथे चहा मात्र उत्तम मिळतो, कारण दुध पिशवीतून येत नाही. थेट गायीचे दुध उपलब्ध असल्यामुळे दही, ताक, पनीर असे पदार्थ उत्तम मिळतात. छोट्या टपरीवर कोल्ड्रींगच्या किंवा सोड्याच्या बाटल्या न मिळता, टीन मिळतात. इथे एकच पेट्रोल पंप आहे, पेट्रोल किंवा डिझेल पोर्ट ब्लेअरमधून येते. एकच शा़ळा,दवाखाना आणि पोलिस चौकी आहे. दिवसभराचा पालापाचोळा ,हॉटेलचे राहीलेले जेवण आणि इतर कचरा हे लोक एका मोठ्या खड्यात टाकतात आणि सकाळी जाळतात आणि त्याचे खत बनवतात.
कमी पर्यटन असलेल्या हंगामात, बीचवर बंगले भाड्याने घेउन रहाणे खूप फायदेशीर आहेत. सर्वात लोकप्रिय ठिकाणावर म्हणजे नँगो बीच रिसॉर्ट आहे: (03192-282583; बंगले रु. 50-350, कॉटेज रु. 600-1000) आणि पर्ल पार्क रिसॉर्ट (03192-282510; बंगले 100-250 रुपये, कॉटेज आणि खोल्या रुपये 400-1600), दोन्ही बीच क्रमांक एकवर आहे.
ए-डी बीच रिसॉर्ट (214722; बंगला रु 300-700)- बीच क्रमांक 4 वर असलेला आणखी एक उत्तम पर्याय.
बीच क्रमांक एक हा सर्वात सुंदर आणि भेट देण्यासारखा आहे. गावाच्या पश्चिमेला ४० मिनिटे चालत गेल्यावर इथे पोहचतो. दुचाकी भाड्याने (दररोज ५० रुपये पासून)- बेटावर जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे . इथले रस्ते सपाट आहेत आणि अंतर कमी आहेत. ऑटो रिक्षा तुम्हाला ५० रुपयांमध्ये बीच क्रमांक 1 वर घेऊन जाते. भरतीच्या वेळी दूरवर असलेल्या कोरल रीफजवळील बेटावर स्नॉर्कलिंग करता येते.इथे असलेले पर्ल पार्क रिसॉर्ट हे सूर्यास्त पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. संध्याकाळपासून येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक जमतात. सीतापुर समुद्रकिनारा.येथे काही जलक्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, जसे की बंगी जंपिंग साठी सुमारे साडेचार हजार रुपये, स्नोरकेलींग व कोरल दर्शनासाठी चार हजार रुपये, काचेचा तळ असणार-या बोटीतून प्रवासासाठी आठशे रुपये . शंभर दीडशे फूट आत नेऊन, समुद्रतळाचे छोटे दगड व चिटुकले मासे दाखवतात. समुद्रतळाशी बसलेले मोठी मोठी कासवे व कोरल भोवती फिरणारे रंगीबेरंगी माशांचे विविध, प्रचंड थवे पाहून अचंबित व्हायला होते.
समुद्रकिनारा क्रमांक 3 वालुकामय किनारा असून तो निर्जन आहे. ब्लू सी रेस्टॉरंटमधून इथे जाणे सोयीस्कर आहे. बेटाच्या पूर्वेकडील भागाकडे जाणाऱ्या रस्त्याने तुम्ही येथे पोहोचू शकता. हे अंतर गावापासून ५ किमी आहे. कमी भरतीच्या वेळी, तुम्ही चुनखडीच्या छोट्या गुहांना भेट देऊ शकता.

मध्य आणि उत्तर अंदमान
अंदमान बेटे हे सर्व सूर्य आणि वाळूचे नाहीत. हे जंगल देखील आहे, अॅमेझॉनच्या जंगलासारखे घनदाट आणि ज्युरासिक उद्यानासारखे प्राचीन, जणू काही मातृ निसर्गाने लहरीपणाने तयार केले आहे. अंदमान हायवेवर बसच्या लांब हादरत असताना बेटांची ही घनदाट जंगली, जंगली बाजू दिसते. (ATR)... दिगलीपूरला जमिनीवरून प्रवास करताना, तुम्हाला पुरातन वृक्षांनी नटलेल्या खडबडीत रस्त्यांवर आणि लाल-टॅनिन-समृद्ध नद्यांच्या पाण्यावर नांगरणाऱ्या फेरीची दृश्ये दिसतील, ज्यात मगरींचे घर आहे.
रंगत हे दुसरे मुख्य शहर आहे, वाहतूक केंद्र आहे, दुसरे काही उल्लेखनीय नाही. तुम्ही इथे अडकल्यास, आम्ही PLS भवर हॉटेलची शिफारस करतो. (1-सीटर / 2-सीटर 150/250 रुपयांपासून), बर्याच वाईट हॉटेल्सपैकी सर्वोत्तम. जवळच एटीएम आहे. पोर्ट ब्लेअर आणि हॅवलॉक बेटासाठी फेरी निघतात (50/195 रुपये, 9 तास)तसेच लाँग आयलंड (७ रुपये), येरतगा घाटापासून, जे रंगतपासून 8 किमी आहे. पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी रोजची शटल बस आहे (९५ रुपये, ९ तास).
डिसेंबर ते मार्च बिसा (mshe कासव)रंगतपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर कथबर्ट खाडीच्या किनाऱ्यावर घरटे. उत्तरेकडे जाणारी बस तुम्हाला इथे घेऊन जाईल. हॉक्सबिल घरटे (03192-279022; 4-बेड बेडरूम रु. 600, दुहेरी रु. 400, वातानुकूलित रु. 800)राहण्यासाठी एकमेव ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअरमधील A&N टुरिझम कार्यालयात खोली बुक करणे आवश्यक आहे. परवानगी (250 रुपये)बेतापूर येथील वनपाल कार्यालयात नोंदणी करता येईल.
लांब बेट
लाँग आयलंडचे मैत्रीपूर्ण रहिवासी आणि जीवनाचा अविचारी वेग यामुळे ते शांतता आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श गंतव्यस्थान बनते. या बेटावर कोणतीही मोटार चालणारी वाहने नाहीत आणि काही वेळा असे दिसते की येथे फक्त तुम्हीच पर्यटक आहात.
दीड तास जंगल वॉक (पावसानंतर शिफारस केलेली नाही)पांढरा वालुकामय समुद्रकिनारा आणि आंघोळीसाठी आरामदायक जागा असलेल्या लालाजींच्या निर्जन खाडीकडे नेईल. डुंगी भाड्याने करून (1500 रुपये जमा करा), तुम्ही खाडीवर सहज पोहोचू शकता, खासकरून जर तुम्हाला लीचेस आवडत नसतील. चमकदार पांढर्या वालुकामय समुद्रकिनारा आणि स्वच्छ पाण्यासह आश्चर्यकारक मर्क बे मधील नॉर्थ पॅसेज बेटावर तुम्ही शेण आणि स्नॉर्केल देखील भाड्याने घेऊ शकता. तसेच येथून तुम्ही साऊथ बॅटगोनला जाऊ शकता (दक्षिण बटण).
निळा ग्रह (9474212180; www.blueplanetanandamans.com; 300/700 रुपयांपासून आंघोळीसह/विना खोली)हे केवळ एक उत्कृष्ट हॉटेल नाही तर धुतलेल्या किनाऱ्यावरील बाटल्या वापरून वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. साध्या खोल्यांच्या आजूबाजूला एक पाडुक आहे, ज्यावर हॅमॉक्स ताणलेले आहेत. ते खूप मंद इंटरनेट पुरवतात आणि पुरवतात. घाटातून येथे येण्यासाठी निळ्या बाणांचे अनुसरण करा. स्वतंत्र कॉटेज आहेत (2000 ते 3000 रुपयांपर्यंत)जवळपास लाँग आयलंड अल्कोहोल विकत नाही, म्हणून तुम्हाला आगाऊ खरेदी करावी लागेल.
हॅवलॉक आणि पोर्ट ब्लेअरला आठवड्यातून तीन वेळा फेरी जाते. (१९५ रुपये)आणि आठवड्यातून एकदा रंगतला (8 रुपये).
मायाबंदर आणि त्याचा परिसर
"वरच्या" मध्य अंदमानवर, ब्रिटनच्या वसाहती काळात येथे पुनर्स्थापित झालेल्या केरन या बर्मीज टेकडी जमातीने वस्ती केलेली अनेक गावे आहेत. मायाबुंदेरे मध्ये, समुद्र "n" वाळू येथे थांबा (03192-273454; thanzin_the_great@yahoo.co.in; 200 रुपयांपासून क्रमांक), हे एक साधे घर, रेस्टॉरंट आणि बार आहे ज्यातून समुद्र दिसतो. शहराच्या केंद्रापासून 1 किमी अंतरावर आहे. करेनाचे हॉटेल टायटस आणि एलिझाबेथ त्यांच्या मोठ्या कुटुंबासह चालवतात. ज्यांना गर्दीपासून दूर राहायचे आहे त्यांच्यासाठी ही सुज्ञ जागा योग्य आहे. येथे दिवसभराच्या बोटीच्या प्रवासाची ऑफर दिली जाते (500-2500 रुपये प्रति सहल)ज्यामध्ये, हंगामानुसार, एकेचाळीस गुहेच्या सहलींचा समावेश असू शकतो, जिथे स्विफ्टलेट्स त्यांचे मौल्यवान खाद्य घरटे बांधतात, एव्हिस बेटाच्या किनाऱ्यावर स्नॉर्कलिंग, विचित्र बेटाची जंगल सहल मुलाखत, जंगली हत्तींच्या लहान लोकसंख्येचे घर लाकूड खरेदी एंटरप्राइझ 1950 -x वर्षांमध्ये बंद झाल्यानंतर मुक्त केले. तुम्हाला खूप असामान्य वाटेल. परवानगी आवश्यक (५०० रुपये)... जे समुद्र "n" वाळू द्वारे सर्वोत्तम प्राप्त केले जाते.
मायाबंदर रंगतपासून ७१ किमी अंतरावर आहे. पोर्ट ब्लेअरहून रोजची बस आहे (l30 रुपये, 10 तास)आणि आठवड्यातून तीन वेळा - फेरी (मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी)... येथे एक अविश्वसनीय एटीएम आहे.
दिगलीपूर आणि त्याचा परिसर
जे लोक या सुदूर उत्तरेकडील प्रदेशात पोहोचतील त्यांना आकर्षक दृष्ये दिली जातील. अंदमान द्वीपसमूहातील सर्वात उत्तरेकडील प्रमुख शहर, एटीएम आणि संथ इंटरनेट असलेले विस्तीर्ण वालुकामय बाजार शहर असलेल्या दिगलीपूरकडून तुम्ही फारशी अपेक्षा करू नये. (40 रुपये प्रति तास)... तुम्ही थेट कॅलिपूरला जावे जेथे तुम्हाला समुद्र आणि दूरवरच्या बेटांचे निवास आणि दृश्ये मिळतील.
फेरी एरियल बे मरिना येथे पोहोचते, जे दिग्लीपूरच्या नैऋत्येस 11 किलोमीटरवर आहे, बस स्थानक आणि प्रशासन इमारत आहे, जिथे फेरी तिकीट बुक केले जाऊ शकते. कालीपूर हे समुद्रकिनाऱ्याच्या 8 किमी आग्नेयेला आहे.
काय पहावे आणि करावे
इबिस, लेदरबॅक, ऑलिव्ह आणि हिरवी कासवे डिसेंबर ते एप्रिल या काळात दिगलीपूरच्या किनाऱ्यावर घरटी करतात. पर्यटक उष्मायनासाठी अंडी गोळा करण्यास मदत करू शकतात; अधिक माहितीसाठी प्रिस्टाइन बीच रिसॉर्टशी संपर्क साधा. या परिसरात अनेक गुहा देखील आहेत.
वालुकामय पट्टीने जोडलेली जुळी बेटे सुंदर उष्णकटिबंधीय तराजूसारखी आहेत. हा भाग सागरी अभयारण्य मानला जात असल्याने, येथे जाण्यासाठी तुम्हाला वनीकरण विभागाची परवानगी घ्यावी लागेल. (भारतीय / परदेशी रु. 50/500; 6:00-14:00 सोम-शनि), जे एरियल बे मरिनाच्या समोर स्थित आहे. ही बेटे अंदमानातील काही सर्वोत्तम आहेत; आणि येथे उत्तम स्नॉर्कलिंग आहे. 1,000 रुपये दिवसाला गावाबाहेर जाण्यासाठी तुम्ही बोट भाड्याने घेऊ शकता.
Craggie हे कालीपूर जवळ एक छोटेसे बेट आहे, जिथे स्नॉर्कलिंग करायला जाणे देखील आनंददायी आहे. मजबूत जलतरणपटू तेथे स्वतः पोहोचू शकतात किंवा तुम्ही डुंगा भाड्याने घेऊ शकता (200 रुपये राउंड ट्रिप).
माउंट सॅडल पीक - अंदमान बेटांचा सर्वोच्च बिंदू (समुद्र सपाटीपासून ७३२ मी.)... उपोष्णकटिबंधीय जंगलातून कालीपूर ते शिखर आणि परत जाण्यासाठी 6 तास लागतील; शीर्षस्थानी द्वीपसमूहाचे भव्य दृश्य दिसते. यासाठी वन विभागाची परवानगीही लागते. (भारतीय 25 रुपये, परदेशी 250 रुपये)आणि स्थानिक मार्गदर्शक तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करेल - अधिक माहितीसाठी प्रिस्टाइन बीच रिसॉर्ट पहा. अन्यथा, झाडांवर पेंट केलेल्या लाल बाणांचे अनुसरण करा.
कसे जायचे आणि आजूबाजूला कसे जायचे
मायाबंदरच्या उत्तरेस 80 किमी अंतरावर असलेल्या दिगलीपूरमध्ये पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी रोजची बस आहे (१७० रुपये, १२ तास)आणि परत, तसेच मायाबंदरला (50 रुपये, 2.5 तास)आणि रंगत (70 रुपये, 4.5 तास)... पोर्ट ब्लेअरहून दिगलीपूरला जाणारी फेरीही आहे जी रात्री दिगलीपूरहून परत येते (आसन/बंक रु 100/295, 10 तास).
दिगलीपूर ते कालीपूर दर अर्ध्या तासाला बस धावतात; एका ऑटो-रिक्षाची किंमत सुमारे 100 रुपये आहे.
लहान अंदमान
गौबोलंबे हे द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लहान अंदमानचे नाव आहे, येथील रहिवासी ओंगे जमातीचे आहेत. येथे तुम्ही स्वतःला जगाच्या शेवटी सापडत आहात (उष्णकटिबंधीय स्वर्गात): येथे जवळजवळ कोणतेही पर्यटक नाहीत, स्थानिक लोक इतके मैत्रीपूर्ण आहेत की आपण त्यांना एक कुटुंब समजता आणि हे बेट स्वतःच एक हिरवेगार खारफुटी आणि जंगल आहे जे जगाच्या निर्मितीपासून येथे अस्तित्वात आहे.
26 डिसेंबर 2004 रोजी आलेल्या त्सुनामीमध्ये छोट्या अंदमानचे खूप नुकसान झाले होते आणि आता ते हळूहळू सावरत आहे. परंतु, येथे अद्याप पर्यटन पायाभूत सुविधा विकसित झाल्या नसतानाही, नवीन हॉटेल्स आधीच सुरू होऊ लागली आहेत. येथील मुख्य वस्ती हॅट बे आहे, हे पोर्ट ब्लेअरच्या दक्षिणेस १२० किमी अंतरावर असलेले एक छोटेसे शहर आहे, जिथे मुख्यतः हसतमुख बंगाली आणि तमिळ लोक राहतात. उत्तरेला तुम्हाला स्वच्छ आणि ताजे समुद्रकिनारे आढळतील.
काय पहावे आणि करावे
नेताजी नगर, हॅट बेच्या 11 किमी उत्तरेस आणि बटलर बे, आणखी 3 किमी उत्तरेस, सुंदर वाळवंट आहेत (जोपर्यंत गाय योगायोगाने भेटत नाही तोपर्यंत)समुद्रकिनारे आणि सर्फर्ससाठी उत्तम लाटा.
किनाऱ्यापासून थोडे पुढे जंगलात व्हाईट सर्फ आणि व्हिस्पर वेव्ह धबधबे आहेत (नंतरच्या मध्ये 4 किमीचा प्रवास समाविष्ट आहे, ज्यासाठी आम्ही मार्गदर्शकाची शिफारस करतो)... तुम्हाला भव्य धबधबे दिसतील आणि तुम्हाला त्यांच्या तलावांमध्ये पोहण्याची इच्छा असेल, परंतु मगरींपासून सावध रहा.
हॅट बे पासून 14 किमी अंतरावर असलेले छोटे अंदमान दीपगृह हे आणखी एक फायदेशीर पर्यटन आहे. 41 मीटर वर, अगदी 200 पायर्या - आणि किनार्याचे आणि जंगलाचे जादुई दृश्य तुमच्या समोर उघडते. येथे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग मोटारसायकलने आहे, परंतु तुम्ही घाम गाळून बाइकने येथे पोहोचू शकता. तुम्ही ऑटो-रिक्षा देखील भाड्याने घेऊ शकता आणि नंतर, जेव्हा रस्ता दुर्गम होईल तेव्हा, निर्मनुष्य, निर्जन समुद्रकिनार्यावर चालत जा. चालायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
हरबिंदर खाडी आणि डुगॉन्ग खाडी हे अनुक्रमे निकोबार आणि ओंगेचे आदिवासी प्रदेश आहेत; त्यांना भेट देण्यास मनाई आहे.
धाडसी पर्यटक सर्फर्समध्ये, लिटल अंदमानच्या अफवा काही वर्षांपूर्वी परदेशी लोकांसाठी उघडल्यापासून पसरत आहेत. खडकांमधील मध्यांतरांमध्ये, फक्त अनुभवी सर्फर्सना सवारी करण्याची शिफारस केली जाते आणि शार्क आणि मगरी येथे असामान्य नाहीत. सर्फिंग फ्रीक मुथशी कनेक्ट व्हा (9775276182) हॅवलॉक कडून, तो तुम्हाला लहान अंदमान आणि आजूबाजूच्या परिसराविषयी आवश्यक माहिती देईल. अनेक राहण्यायोग्य सर्फर नौका येथे जातात, ज्यांना तुम्ही अधिक दुर्गम, दुर्गम कोपऱ्यांवर नेऊ शकता. सर्फ अंदमानशी संपर्क साधा (www.surfandamans.com).
कसे जायचे आणि आजूबाजूला कसे जायचे
फेरी पूर्व किनाऱ्यावर हॅट बे येथे येतात; समुद्रकिनारे इथल्या उत्तरेस आहेत. बस (१० रुपये)त्यांना पाहिजे तेव्हा बटलर बे येथे जा. स्थानिक जीप भाड्याने मिळू शकते (100 रुपये).
पोर्ट ब्लेअरहून लहान अंदमानला दररोज जलवाहतूक चालते. तुम्ही स्लो जहाजावरील 8-तासांची नाईट क्रूझ किंवा 6 तासांची दिवसाची बोट ट्रिप निवडू शकता (बसण्याची जागा / बेड 25/70 रुपये).
जर तुम्ही हेलिकॉप्टरने उड्डाण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अशा प्रकारे, आपण केवळ 7.5-तासांची बोट ट्रिप टाळू शकत नाही, तर वरून अविश्वसनीय दृश्यांचा आनंद देखील घेऊ शकता - जरी सामानाचे वजन 5 किलोपर्यंत मर्यादित ठेवल्याने गोष्टी काहीशी गुंतागुंतीच्या होतात.
तिथे कसे पोहचायचे? ते कोणत्या देशाचे आहेत? नारळ चॉकलेटच्या प्रसिद्ध जाहिरातीतून परिपूर्ण स्वर्ग येतो तेव्हा या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे आहे का? होय, स्वर्ग. ... ... ज्यामध्ये करण्यासारखे काहीच नाही. ... ... :)
अजून दूर... आता आम्ही तुम्हाला अंदमान बेटांना भेट देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहोत असे समजू नका. अगदी उलट.
जमीन, पाणी आणि हवाई मार्गाने जाण्यासाठी, भारतीय व्हिसा मिळविण्यासाठी आणि नंतर एक विशेष परवाना मिळविण्यासाठी बरेच दिवस लागतात, पहिल्या दिवशी प्रखर वैश्विक सूर्यप्रकाशात जळू नये म्हणून व्यवस्थापित करा ... सनब्लॉकने मळलेले, बांबूमधून बाहेर पडणे. सकाळी आणि संध्याकाळी दोन तास झोपडी .. ...
आणि, सर्वात निंदनीय, विसरून जा. साधारणपणे. अगदी हळूवार.
केवळ या प्रकरणात अंतर्दृष्टी येते - या आश्चर्यकारक क्षणाच्या फायद्यासाठी आपण केलेल्या सर्व अडचणी, काहीही न करण्याचा क्षण. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पिठाने वेढलेला, पायाखालचा शांतपणे कुरकुरीत, पारदर्शकतेमुळे पोहताना प्रत्यक्ष दिसणारा समुद्राचा निळसर पृष्ठभाग, रोज हात पुढे करत राहणारा मधुर नारळ आणि उन्मत्त लयीत अत्यंत आवश्यक असलेली शांतता. आपल्या दैनंदिन जीवनातील.
अंदमान बेटांवर - दूरच्या प्रदेशात आपले स्वागत आहे. तसे, तुम्ही बरोबर ऐकले आहे, अंदमान द्वीपसमूह भारताचा आहे.
त्याला म्यानमारमधून फक्त "तुम्ही पाहू शकता". त्यांच्यामध्ये सुमारे 150 किलोमीटर अंतर आहे. बेटे जवळजवळ दीड हजारांनी "मूळ" देशातून काढून टाकली आहेत. सीस्केप, अंतहीन विस्तार आणि जहाज रोलिंगबद्दल उदासीन नसलेल्यांसाठी हे अंतर अगदी क्षुल्लक आहे.
आठवड्यातून एकदा, कोलकाता बंदरातून एक जहाज अनेक दिवस लक्ष्यापर्यंत जात असते. आणि ज्यांना विमानाने प्रवास करायला आवडते त्यांच्यासाठी अर्थातच, विमान फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे.
तुम्ही कोणताही पर्याय निवडा, परमिट मिळवण्यासाठीची रांग टाळता येणार नाही. तथापि, काळजी करू नका - हे जवळजवळ प्रत्येकाला दिले जाते. आणि पासपोर्टवर फुशारकी मारलेल्या शिक्क्यानंतर, सर्व रस्ते उघडतात. द्वीपसमूहातील कोणत्याही बेटांना. जरी नाही, अजिबात नाही. मी अतिशयोक्ती करत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 500 पेक्षा जास्त, 50 पेक्षा कमी लोक राहतात ...
आणि बाकीचे अस्पर्शित कोपरे आहेत, जिथे फक्त ताजे पाणी नाही आणि जिथे, बहुधा, एखाद्या व्यक्तीचा पाय कधीही ठेवला नाही. बहुतेक तथाकथित "जंगली" बेटांवर अजूनही लोक राहतात जे सभ्यतेशी परिचित नाहीत. ते म्हणतात की त्यांच्यामध्ये आदिम लोकांचे थेट वंशज आहेत. हे तपासण्याचा कोणताही मार्ग नसला तरी - आदिवासी वसाहतींना आरक्षण घोषित केले जाते, ज्यांचे अधिकार्यांद्वारे कडक रक्षण केले जाते आणि त्यांना भेट देण्यास मनाई आहे.
विशेष म्हणजे, द्वीपसमूहाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये, अनेक ट्रॅव्हल एजन्सी "जंगली" बेटांवर सहलीची ऑफर देतात. मला म्हणायचे आहे की अनेक राष्ट्रीयत्वांसह जमिनीचे डझन तुकडे (ओंगे, जरावा, सेंटिनेलियन, इ.), ज्यांची संख्या दोनशे लोकांपेक्षा जास्त नाही. हे आदिवासी पिग्मी आहेत, जे अलीकडेच सुसंस्कृत जगाशी परिचित झाले आहेत आणि कपडे म्हणून फक्त कंगोरे आणि चमकदार मणी वापरतात.
बेटांवर येणाऱ्या पर्यटकांना बोटीतून फक्त शंभर मीटर अंतरावर जाण्याची परवानगी आहे. अर्थात, कुंपण नाहीत. नियुक्त क्षेत्राच्या बाहेर, सहलींचे आयोजक आश्वासन देत असल्याने, अडचणीत येण्याचा धोका आहे. प्रवेश क्षेत्रामध्ये अर्थातच, वर वर्णन केलेले "जंगली" एक दुर्मिळ अपवाद आहेत. आणि जर तुम्ही हेतुपुरस्सर परवानगी असलेल्या श्रेणीतून बेटांवर गेलात तर तुम्ही त्यांना घाबरू नये.









































Optimized.png)
Optimized.jpg)






















No comments:
Post a Comment