Tuesday, January 3, 2023

हरिश्चंद्रगड ( भाग २ )

हरिश्चंद्रगडावर चढणार्या सर्व वाटांची माहिती घेतल्यावर आता बालेकिल्ल्याचा फेरफटका करुया. हरिश्चंद्रगडाचे प्रमुख अवशेष त्याच्या पश्चिम भागात आहेत.खिरेश्वर गावातून किंवा कोथळे गावातून टोलारखिंडीच्या वाटेने आल्यास बालेकिल्ला परिसरात जाण्यासाठी बरीच वाटचाल करावी लागते, 

वाटेवर हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला

टोलारखिंडीतील पॅच चढून वर आल्यावर हरिश्चंद्र गडाचा बालेकिल्ला दिसतो.समोर एक रुळलेली पाउल वाट दिसते. खूप दूरवर तारामती शिखर देखील दिसते . या डोंगर माळेवरून सात डोंगर चढून उतरून मंदिरापर्यंत जाता येते. 


   
कोकण कड्यावरून दिसणारे हरिश्चंद्र गडाचे संपूर्ण पठार.लांब दिसणारा तो बालेकिल्ला आणि समोर जवळ दिसणारे ते तारामती शिखर  


 वाट कधी दाट निर्बीड अरण्यातून तर कधी ओसाड माळरानावरून जाते आणि त्यात खूपच फसव्या वाटा आहेत.त्या रुळलेल्या पाउल वाटेवरून,त्या अरण्यातून, माळरानातून डोंगरवाटा तुडवीत कधी चढण तर कधी उतरण करीत चालत रहायचे .जवळ जवळ १.५ तासांनी सातवा डोंगर चढल्यावर मंदिर दृष्टीक्षेपात येऊ लागते. एकदा या मंदीर परिसरात पोहचल्यावर खर्या अर्थाने गडावर पोहचलो असे म्हणता येइल.  कारण गडावर जर मुक्काम करायचा झाल्यास तो याच परिसरात करता येतो.तसेच पिण्याचे पाणीही याच परिसरात उपलब्ध आहे. या उलट पाचनई गावातुन गडावर जाणारी वाट फारच सोपी असुन या वाटेने गडावरील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर गाठण्यास २ तास पुरेसे होतात. 
मुख्य म्हणजे या वाटेने आपण थेट गडाच्या मुख्य परिसरात प्रवेश करतो. या वाटेने जाताना आपल्याला दोन ठिकाणी वास्तु अवशेष तर एका ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. यातील एका ठिकाणचे वास्तु अवशेष हे घडीव दगडांचे आहेत. 

हे छोटेसे मंदिर दिसले की समजावे आपण गडावर आलो.
 

 


 
 महाविष्णू मंदिरायच्या बाहेरील सुबक दगड कोरीव गाभरा..
 
 गडावर महादेव पूजनीय होते त्यामुळे बरेच ठिकाणी पिंडिंचे अस्तित्व बगायला मिळते

 भग्न अवस्थेतील पिंड...
  
एकावर एक दगड उभेकरून भक्कम भिंत उभारताना खाचे प्रणालीचा केलेला उपयोग
 
दगडी मंदिर...
 
 कातळ कोरीव पाण्याचे टाके
 
 
सुबक कळस असलेले गणपती बाप्पा 
 

महादेव मंदिराच्या बाजू कडील डोळे विसफारतील असे दगडी कोरीव बांधकाम... 

पाचपिंडी महादेवासमोरील दगडी गाभाऱ्यात असणारे गणपती बाप्पा आणि महादेव...



 

पाचनई व खिरेश्वर येथुन येणाऱ्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक लहानशी घुमटी असुन या घुमटीसमोर पाण्याचे लहान टाके आहे. या घुमटीत एक शिवलिंग असुन तेथेच राजा हरिश्चंद्र कावडीने पाणी भरत असल्याचे शिल्प ठेवलेले आहे. या घुमटीच्या आसपास काही स्मरणशिळा तसेच भग्न शिल्प आहेत. येथुन समोरच काही अंतरावर प्राकाराच्या आत हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर:

 साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे.तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले दगड पहायला मिळतात.हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे येथील एकमेव मंदिर नसुन या मंदीराच्या प्राकाराबाहेर अजुन काही लहानमोठी भग्न मंदीरे आहेत. यात दोन गुहामंदीरे असुन एका गुहामंदीरात विनायकाची तर दुसऱ्या गुहामंदीरात शिवलिंग आहे. एका मंदीरात विश्वामित्र ऋषीची भग्न मुर्ती असुन दुसऱ्या एका मंदीरात गणपती व शिवपार्वतीची मूर्ती आहे. उर्वरीत बहुतांशी मंदीरात शिवलिंगाच्या स्थापना केलेल्या आहेत. हा लहानमोठ्या अनेक मंदिरांचा समूह आहे ज्यात हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे मुख्य आहे. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. या मंदिर परीसरात पुष्करणी वगळुन लहान मोठी पाण्याची एकुण बारा टाकी आहेत. यातील बहुतांशी टाकी हि मंदिरासाठी दगड काढल्याने निर्माण झाली आहेत.
हरिश्चंद्रगडावरील मंदिर
सध्याच्या घडीला गड पठरावर बरीच पडझड झालेली आहे. तरीही दिमाखात उभ्या असलेल्या वास्तू त्याकाळची भव्यता दर्शवतात.

दारु मांस वर्ज्य ठेवा.








हरीश्चंद्रेश्वर

मंदिरात शंकराची पिंड

 

22. 


 मुख्य मंदिर आणि शिखर
मंदिराभोवतालची ओवरी

गणपति
मंदिराच्या आतील एक विष्णुमूर्ति
आवारातील वीरगळ

मंदीर परीसर पाहुन झाल्यावर मुख्य मंदिराच्या दिशेने निघावे. मुख्य मंदीराचे बांधकाम दोन उंचवट्यामधील घळीत केलेले असुन संपुर्ण मंदिराला प्राकाराची भिंत आहे. या प्राकारात प्रवेश करण्यासाठी पुर्व दिशेला एकमेव दरवाजा असुन या दरवाजा समोरच एक दगडी पूल आहे. प्राकाराबाहेरील एका टाक्यात पाण्याचा जिवंत झरा असुन टाक्याचे पाणी या दगडी पुलाखालुन वाहते तसेच पावसाळ्यात तारामती शिखरावरून वाहत येणारे पाणी देखील याच पुलाखालुन वाहते. त्यामुळे या ठिकाणास मंगळगंगेचा उगम म्हणुन ओळखले जाते. या प्रवाहाला चांगदेवांनी ‘मंगळगंगा’ म्हटले आहे.पुढे हा प्रवाह पाचनई गावाच्या दिशेने वाहत जातो. पाचनई गावात जाणाऱ्या वाटेने गेल्यास एक उंच कड्यावरून हे पाणी खाली कोसळताना दिसते. या कड्यावर दगडी भिंत घालुन हे पाणी गडावर वापरण्यासाठी अडवलेले दिसुन येते. या बंधाऱ्याची आता काही प्रमाणात पडझड झाल्याने पाणी अडत नाही. हा बंधारा पहाण्यासाठी पाचनई गावातुन येणारा मार्ग सोयीचा आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या प्राकाराच्या दरवाजासमोर तीन कीर्तीमुखे मांडलेली असुन दरवाजाच्या भिंतीवर दोन्ही बाजुस दोन शिलालेख आहेत. यातील डावीकडील शिलालेखातील चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ।। अशा ओळी वाचता येतात. 


राक्षस आणि किन्नर हे सुध्दा महाकाल यांचे पूजक होते. त्यांची प्रतिकृती शेंदूर लांबवलेल्या दगडावरून दिसून येते.







मंदिराला जोडुन असलेली पाण्याची व्यवस्था, आत उतरण्यासाठी पाय-यासुद्धा आहेत.
777.JPG






खालील फोटोंमध्ये मंदिर आणि त्याभोवतीचा परिसर तसेच बारीकसारीक मुर्त्या टिपल्या आहेत. मंदिराचे नक्षीकाम आणि सध्याची स्थिती याचा अंदाज येऊ शकतो.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
गाभाऱ्यातील शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील एका लहान मंदिर व शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम



हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर

प्राकारच्या दरवाजातुन सहा पायऱ्या उतरल्यावर आपला मंदीराच्या आवारात प्रवेश होतो. हरिश्चंद्रेश्वर मंदीराची पायापासुन शिखरापर्यंत उंची साधारण चाळीस फुट असुन मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुर्व व पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. या दोन्ही दरवाजांच्या दर्शनी भागात द्वारपाल कोरलेले असुन दोन्ही दरवाजासमोर नंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी एका अखंड शिळेवर गोलाकार वर्तुळ कोरलेले असुन या वर्तुळाच्या मध्यावर चौकोनी शिवलिंग कोरलेले आहे. या शिवलिंगाच्या मागील बाजुस अजुन एक शिवलिंग मांडलेले आहे. असेच शिवलिंग आपल्याला अंजनेरी परिसरात पहायला मिळते. जर खरोखरच भोगशक्ती राजवंशाकडून हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधण्यात आले असेल तर या दोन शिवलिंगातली साधर्मे लक्षात घेण्या जोगी आहेत.काळ्या पाषाणात घडवलेल्या या मंदिरातील देवाची पूजा चारही दिशांनी आत जाऊन करता येते. इतक्या अवघड जागी हे सुंदर आणि भव्य मंदिर शेकडो वर्षापूर्वी  या निर्बीड जंगलात  कसे बांधले असेल याचा विचार करू लागतो. 



 



१५. 

१६. 

१७. 

१८. 

१९. 

 




भग्न अवस्थेतील मुर्त्या
खांबावरील आणि ईतर नक्षीकाम
महाविष्णुंचे मंदिर, "महाविष्णु" नावाचा वापर करणारे अत्यंत बुद्धिमान आणि भागवत ज्ञानामध्ये पारंगत असतात. म्हणुन या ठिकाणाच्या पवित्रतेविषयी मी कल्पना करु शकतो. 




मंदिराचे शिखर वगळता भिंती, खांब आणि दरवाजावर आकर्षक कोरीव काम केलेले आढळते. मंदिराच्या कळसात असलेल्या दगडावर गोलाकार खळगे पाडुन त्यावर एक आकर्षक नक्षी निर्माण केलेली आहे. मुख्य मंदीराला लागुन असलेल्या दक्षिणेकडील चौथऱ्यावर गणपतीबाप्पा विराजमान झाले असुन या मुर्तीच्या वरील बाजुस असलेल्या चौकटीवर देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. यातील अक्षरे (श्रिदशी ण नाथ कासिष सकपनाथ ) याप्रमाणे आहेत.शेजारील गुहेत विठ्ठल – रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. 
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम

 मंदिराच्या पश्चिम बाजुस झीज झालेल्या सहा फुट उंचीच्या दोन भैरवमूर्ती असुन दक्षिणेला एक विरगळ पहायला मिळते. ग्याझेटीयरमध्ये या मंदीराची तुलना उत्तरेतील बुध्दगयेच्या मंदिराशी करण्यात आली आहे. मंदिराच्या पुर्व प्राकारच्या भिंतीला लागुन दोन लहान मंदीरे आहेत. मंदिराच्या उत्तरेकडील प्राकाराच्या भिंतीत कोरीवकामाने नटलेले अजुन एक मंदिर आहे. या मंदिरावर महासिद्ध विष्णुमंदिर लिहिले असले तरी मंदीराची एकुण घडण पहाता हे मंदिर शैव परीवारातील असावे. मंदिराच्या पश्चिमेस लहानमोठ्या एकुण सहा गुहा असून त्यांतील दोन गुहा म्हणजे पाण्याची टाकी आहेत. या दोन्ही गुहांमधील पाणी थंड व चवदार आहे. यातील एका गुहेमध्ये पुरातत्व खात्याने बाहेर उघडयावर असलेल्या मूर्ती एकत्रित करून ठेवलेल्या असुन दुसऱ्या गुहेत चौथरा आहे. या चौथर्यााखाली एक प्रशस्त खोली असुन त्यावर चौथर्यापची शिळा ठेवली आहे. गुहेच्या या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा तत्वज्ञान विषयक ग्रंथ लिहिला. या गुहेच्या खांबावर चांगावटेश्वर म्हणजे योगी चांगदेव यांचा उल्लेख असणारे लहानमोठे तीन शिलालेख पहायला मिळतात. या सर्व शिलालेखांचे डॉ.वी.भि.कोलते यांनी वाचन केलेले असुन पाचव्या शिलालेखात संत निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर,नामदेव यांनी त्यांच्या यात्रापर्वात श्रीहरिश्चंद्रपर्वताची यात्रा केल्याचा उल्लेख येतो. मंदिराच्या उत्तरेकडील प्राकाराच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. याशिवाय मंदिराच्या पश्चिम बाजुस असलेल्या उंचवट्यावर मध्यम आकाराची एक दगडी घुमटी पहायला मिळते. हि घुमटी डोंबाची घुमटी म्हणुन ओळखली जाते.याठिकाणी खूप लोकं महादेवाची आराधना आणि पूजा करतात. गावाकऱ्याच्या मते गड ढासळल्यामुळे बराच मातीचा ढिगारा वाहून येतो त्यामुळे गडावर आजही उतखनन केल्यास बर्याच महादेव पिंडीचे सापडतील.



गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत. पहिला आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्राकाराच्या दर्शनी भिंतीच्या बाहेरील प्रवेशद्वाराचे डावीकडे. दुसरा व तिसरा केदारेश्वर लेण्याच्या मधल्या दोन खांबावर मध्यभागी. चौथा आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरातील लेण्याच्या दर्शनी डाव्या खांबावर, तर पाचवा, सहावा, आणि सातवा तेथेच आहेत. आठवा मात्र हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागील चौकटीवर, माथ्याच्या भागात आहे. पहिल्या व चौथ्या लेखांत चांगा वटेश्वराचा म्हणजे योगी चांगदेवांचा उल्लेख आहे.

विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम त्या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम त्यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले आहे. ‘तत्वसार’च्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता पावलेला होता.त्यावरून येथे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व संत नामदेव येऊन गेल्याचे दिसते. तसा स्पष्ट उल्लेख पाच क्रमांकाच्या शिलालेखात आहे. या लेखाचे वाचन डॉ. वि. भ. कोलते यांनी केले असून 'महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख' या आपल्या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवाचे मोठे बंधू पण नाथ परंपरेनुसार निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरू आणि ज्ञानदेव त्यांचे शिष्य आहेत. क्रमांत सात आणि आठव्या शिलालेखात नंदनाथ आणि गयनाथ तथा गहिनीनाथ व दखिणनाथ व त्याचा शिष्य सपकनाथ यांचा उल्लेख असून हे तिन्ही लेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्यांच्या दर्शनी स्तंभावर कोरलेले आहेत. यावरून हरिश्चंद्रगडावर अनेक नाथयोगी राहत होते व येथे ९-१०व्या शतकातील मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथांपासून सुरू झालेली गुरू शिष्यांची परंपरा जोपासणारे नाथ संप्रदायाचे गुरूकुल असल्याचे सिद्ध होते.

हरिश्चंद्रगडावरील लेण्यात व मंदिरात कोरलेल्या शिलालेखावर प्रथम लक्ष गेले ते डब्ल्यू. एफ. सिंक्लेर याचे इ. स. १८७७ मध्ये. त्यानंतर फर्ग्युसन आणि बर्जेस यांच्या 'दि केव्ह टेम्पल ऑफ इंडिया' या पुस्तकात उल्लेख आढळतो. पण इ. स. १९६९मध्ये गो. नी. दांडेकर यांनी 'दुर्गदर्शन' या पुस्तकात 'चक्रपाणी वटेश्वर नंदतु (तु) / तस्य सुतु वीकट देऊ' अशा ओळी लिहिल्या आहेत. यानंतर नागपूर विद्यापीठातील संशोधक प्रा. म. रा. जोशी यांनी हरिश्चंद्रगडावरील सर्व लेख शोधून त्याचे फोटो व ठसे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक वि. गो. खोबरेकर यांच्याकडे पाठविले व तेथून ते डॉ. वि. भि. कोलते यांच्याकडे आले.''हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमधून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक १, शिलालेख क्रमांक ३ आणि शिलालेख क्रमांक ४ या सर्व शिलालेखांच्यामध्ये 'वटेस्वर' या नावाचा उल्लेख आलेला दिसतो. यामध्ये शिलालेख क्रमांक ३ या लेखामध्ये 'श्री वटेस्वर शिवस्य प्रणति:' असे म्हटलेले आहे. वटेश्वर म्हणजेच शिव हे यावरून आपल्याला समजायला मदत होते. 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक २ यामध्ये 'गुहेश्वर भैरव' हे 'हरिश्चंद्रगड' येथील देवतेचे नाव असावे किंवा एखाद्या तेथे राहणाऱ्या 'भैरव' या योग्याचे देखील नाव असावे. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ 'हरी[श्चं]द्र देवो' हा जो उल्लेख आलेला आहे तो 'हरिश्चंद्रगड' येथील गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे या 'हरीश्चंद्रदेव' यावरूनच या पर्वताचे नाव 'हरिश्चंद्रगड' असे पडले आहे. तसेच मागील एका लेखामध्ये आपण 'हरिश्चंद्रगड' याचे नाव कसे पडले याबाबत देखील आढावा घेतला तो देखील संदर्भ नक्की पाहावा. 
शिलालेख क्रमांक ६ मध्ये देखील काही नावे आहेत परंतु ती नावे अस्पष्ट झाली असल्याने  त्यांचा अर्थ लागत नाही.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ७ या शिलालेखात 'नंदनाथ' तसेच 'गयनाथ' ही नावे आलेली आहेत. तसेच शिलालेख क्रमांक ८ मध्ये 'दखिणनाथ' आणि त्यांचा शिष्य 'सकपनाथ' यांची नावे आलेली आहेत. परंतु या व्यक्ती कोण आहेत हे मात्र 'डॉ. वि. भि. कोलते' यांना हे माहिती नाही असे ते सांगतात. तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी एक अनुमान याबाबत असेही काढलेले आहे कि हे कोणी नाथसंप्रदायातील योगी आहेत हे स्पष्ट होते मात्र हे 'गयनाथ' म्हणजे गहिनीनाथ असावेत काय? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरील सर्व शिलालेख पाहता आपल्याला असे मात्र दिसून येते कि 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे खूप महत्वाचे ठिकाण होते.  इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल माकिनटोशच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये गड काबीज केला. त्याने किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी उध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. 

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, त्याच्या मागील टेकडीवरील विश्वामित्र ऋषींचे लहानसे मंदिर, केदारेश्वर गुहा तारामती शिखराच्या पोटातील गणेशलेणे, सप्ततीर्थ तलाव, रोहिदास आणि तारामती शिखराभोवती असणारी घनदाट झाडी, त्यामध्ये वास्तव्यास असणारे भेकर, सांबर, मोर, ससे आणि निरनिराळे पक्षी, अद्भुतरम्य कोकण कडा आणि मंगलगंगा नदीने केलेले लहानमोठे डोह आणि जलप्रपात यामुळे असे वाटते की निसर्गाने त्याच्या ठेवणीतील जे जे काही आहे ते सर्व येथे उधळून टाकले असावे. सरत्या पावसात रंगबिरंगी तेरड्याच्या फुलांनी बहरलेला किंवा अगदी मणिकांचन योग असेल तर कारवी फुललेली असताना गडाचे रूप म्हणजे त्रिभुवनातील सारे सौंदर्य लेवून काश्मीरच्या नंदनवनाशी स्पर्धा करणारे स्वर्गीय सुखाचा परमोच्च आनंद देणाऱ्या मयपुरीत आपण आल्याचा भास होऊ लागतो.

 सप्ततीर्थ पुष्करणी :-

मंदीराच्या प्राकाराबाहेर असलेली पुष्करणी ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखली जाते. या पुष्करणीच्या एका काठावर चौदा देवळ्या असून त्यात विविध आयुधे धारण केलेल्या चौदा विष्णुमूर्ती होत्या. अगदी अलिकडे आठ मूर्ती ह्या जागेवर होत्या, तर तीन गुहेमध्ये आणून ठेवल्या होत्या. पण त्यातील काही मुर्ती चोरीस गेल्याने पुरातत्व खात्याने उर्वरीत मुर्ती हरिश्चंद्रेश्वर मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. आता येथील देवकोनात एकही मूर्ती नाही.तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशितीर्थ नावाने ओळखले जाते. मंदिरासमोर अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.
  याच सप्ततीर्थ पुष्कर्णी संदर्भात एक हकिकत सांगितली जाते. काही वर्षांपूर्वी एक साधू हरिश्चंद्रगडावर मुक्कामाला होता. एकदा त्या साधूने पुष्कर्णीची स्वच्छता केली, त्यात त्याला तीन गोण्या भरतील इतकी पुरातन नाणी मिळाली. गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी ती तो घेऊन गेला अशी वदंता आहे. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही.

 





तीर्थकुंडातील  १४  देवळ्यां

तीर्थकुंडातील  १४  देवळ्यां




हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारातील पुष्करीणी


हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर

मंदिरासमोरील पुष्करिणी आणि मूर्तींसाठी जागा

सप्ततीर्थ पुष्करणीच तीर्थस्थळ पाहिल.

 केदारश्वराची गुहा :

   हरिश्चंद्रेश्वराचे मंदीर पाहुन प्राकाराबाहेर पडल्यावर मंगळगंगेच्या प्रवाहाच्या उताराच्या दिशेने साधारण २०० फुट गेल्यावर आपण केदारेश्वर गुंफेजवळ पोहोचतो.घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी हि भव्य गुंफा  ५० x ५० फुट आकाराची असून दक्षिणेकडील भिंतीवर शिवपुजनाचा प्रसंग कोरलेला असुन त्याशेजारी एक दालन कोरलेले आहे. पाण्याने भरलेल्या या गुहेच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर ३ फुट उंच व ६ फुट लांब असे भव्य शिवलिंग आहे. कधीकाळी या चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देण्यासाठी चार खांब होते पण आज यातील एक खांब पुर्णपणे नष्ट झाला असून दोन खांब अर्धवट तुटलेले आहेत व केवळ एकच खांब शिल्लक आहे. गुहेतील पाण्याची पातळी ३-४ फुट असुन शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास या थंडगार पाण्यातून जावे लागते. अनेक जण ह्या सुन्न करणाऱ्या पाण्यातून महादेवास अर्ध प्रदक्षिणा घालतात . गुहेतील पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून या गुहेतील पाण्यात पोहणे किंवा उतरणे व्यर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे . आपण कोणत्याही गड  किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहू नये ही विनंती खूप रास्त आहे . आपण सर्वांनी हा नियम पाळला तर आपल्या सर्व गडावर पिण्याच्या पाण्याचा साठा स्वच्छ राहील .
गुहेच्या दर्शनी भागात असलेल्या चौकोनी खांबावर दोन शिलालेख कोरलेले आहे. त्याचे वाचन याप्रमाणे १.श्री(वटे)सर सिवस्य प्रण(म)ति: २.(सिद्ध) श्री गुहेश्वरभैरव.
 
गुहेतील शिवलिंग

केदारेश्वर लेणी
केदारेश्वर लेणी


 
केदारेश्वराची गुहा

 
या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते. पाण्याची खोली साधारण छातीपर्यंत येते.


केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग
केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग

 केदारेश्वर महादेवस्थान
 मंदीराच्या थोड खाली असलेली केदारेश्वराची . गुफा पाहिली.
 
 
     

 श्रीमद भागवतम एकुण बारा स्कंधांचे आहे. पहील्या स्कंधाच्या १६ व्या आणि १७ व्या अध्यायात पृथ्वी आणि धर्म यांची कलियुगातील स्थिती वर्णन केलेली आहे. पृथ्वी गाईच्या रूपात तर धर्म बैलाच्या रूपात अवतिर्ण झालेले आहेत. धर्मरूपी बैलाला एकच पाय असुन कलि (कलियुग) त्या पायावरही आसुडाने फटके मारत आहे. म्हणजे कलियुगात उरला सुरला धर्मही नाहीसा होणार यात तिळमात्र शंका नाही. जेव्हा संपुर्ण धर्म नाहीसा होईल तेव्हा भगवंत स्वतः कल्कि अवतार घेऊन सर्व नराधमांचा नाश करतील. सत्ययुगात धर्म चार पायांवर उभा असतो (१००%), त्रेतायुगात तीन पायांवर (७५%), द्वापारयुगात दोन पायांवर (५०%) तर कलियुगात धर्म एकाच पायावर उभा आहे (२५%). धर्माच्या पायावर आघात करणा-या कलिला सम्राट परीक्षित दंड देतात. या घटनेला आता पाच हजार वर्षे होऊन गेलेली आहेत. हे वाचलेलं आठवते ते हरीश्चंद्रगडावरील शिवलींग पाहील्यानंतर. पुर्वी चार खांबाने वेढलेल्या शिवलींगाभोवती आता एकच खांब शिल्लक राहीलेला आहे. शिवलिंगाभोवतीचे हे खांब कलियुगातील धर्मस्थितीचे प्रतिक आहेत यात मला तिळमात्र शंका नाही.
    पाठीमागचा उजवीकडचा पाय (झेंडयाच्या मागचा) सत्ययुगात नाहीसा झालेला आहे (कारण त्याचा लवलेषही दृष्टीस पडत नाहीये). सत्ययुग संपुन आता २१ लाख वर्षे झालेली आहेत (सांख्य योग, श्रीमद भगवदगीता). मागचा डावीकडचा पाय त्रेतायुगात नाहीसा झालेला आहे कारण त्रेतायुग संपुन आता साधारण ९ लाख वर्ष झालेली आहेत. सत्ययुगापेक्षा १२ लाख वर्ष उशिरा पडलेला खांब त्याच्या स्थितीवरुन जाणवत आहे. द्वापारयुग संपुन फक्त ५००० (पाच हजार वर्ष) झालेली आहेत. ५००० वर्षापुर्वी पडलेल्या खांबाचे वरच्या भागातील नक्षीकाम अजुनही उठावदार आहे.

गणेश गुहा : 

तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावीत. या लयनसंकुलात एकुण तीन लेणी समुह आहेत. डोंगराच्या पुर्व टोकाकडील पहिल्या लेण्यासमोर प्रांगण असून प्रांगणाच्या पश्चिमेस छोटी पाण्याची टाकी आहे. ५.०३ मीटर लांबी असलेल्या या चौरसाकृती लेण्यात तीन बाजुंना काहीसे ठेंगणे असे सलग कट्टे आहेत. हे वैशिष्ट्य वज्रयान लेण्यात दिसून येते. या लेण्याचे प्रवेशद्वार केवळ १.२ मीटर उंचीचे असून त्यावर कोणतेही थर नाहीत. या लेण्यापासून ८ ते ९ मीटर अंतरावर दुसरे लेणे आहे.समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. या लेण्यासमोर प्रांगण असून प्रांगण संपल्यावर ७.१६ मीटर रुंदीचा मुखमंडप लागतो. या मुखमंड्पाला पुढे दोन स्तंभ असून मागील भिंतीत एक छोटे द्वार आहे. या द्वारातून आत गेल्यावर मुख्य मंडप लागतो. या मुख्यमंड्पाच्या मागील भिंतीत त्यामागे असलेल्या कक्षात जाणारे द्वार आहे. या मंडपाच्या उजव्या भिंतीत एक आणि मागील भिंतीत दोन अश्या एकुण तीन खोल्या आहेत. या तीनही खोल्यात शयन ओटे आहेत.





जवळच्या लेण्यातील गणपति
 
 दिगंबर अवस्थेतील गणपतीची खुप दुर्मिळ मूर्ती 

 
 
 
 

हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती


 
 कातळातील गणेश लेणी...
 
 पिण्याच्या पाण्याचा स्रोत...
 
कातळ कोरीव गुहा...
 
आधुनिकतेला लाजवणारी त्यावेळची शिल्पकला...

खांब गुहा...

गुहेतील भव्य श्री महागणपती 
 
 गुहेच्या प्रत्येक खिडकीमधून हरिश्चंद्र मंदिराचे दर्शन बगायला मिळते.
चौथारा शिल्प...

  मुखमंडपाच्या डाव्या भिंतीत एक दरवाजा असून आत गेल्यावर एक दालन लागते.मात्र हे दालन कशासाठी, हे स्मजत नाही. या मुखमंडपाच्या उजव्या प्रस्तरात प्रांगणातून प्रवेश असलेली खोली आहे. या खोलीत देखील शयन ओटा आहे. द्वाराच्या किंवा स्तंभाच्या स्वरुपावरुन या कामाचा काळ निश्चित करता येत नाही. या गुंफेचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे. हे गणेशाचे शिल्प आणि कमी उंचीचे दरवाजे यावरुन हे लेणे इ.स. १२ व्या शतकात कोरले गेले असावे असे अंदाज आहे.
  हे लेणे बघून पुढे गेल्यावर सहा लेण्यांचा एक समुह लागतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे मधोमध बांधीव मंदीर आहे. या समुहातील काही लेणी पुर्वाभिमुख तर काही उत्तराभिमुख आहेत. या लेण्यात अनियमित आकाराची आही छोटी तर काही मोठी दालन आहेत. यातील काही दालनांचे क्रमांक २ शी असलेले साम्य लक्षात घेता हि लेणी नाथपंथीय असावीत. इथे असलेले शिलालेखही याला पुष्टी देतात.
या गणेश गुहेच्या आसपास असलेल्या गुहेत तसेच हरिश्चंद्रेश्वर मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या गुहेत राहण्याची सोय होते. गडाचा हा परीसर पाहुन गुहेत मुक्काम करावा. 
गडावर हौशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने राहाण्यासाठी तंबू तसेच चहापाण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे.

तारामती शिखर :-

   तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. शिखराच्या पोटात लेणी आहेत. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. पाचनई व खिरेश्वर येथुन येणाऱ्या वाटा जेथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी तारामती शिखराची एका सोंड उतरली आहे. या सोंडेवरूनच शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. तारामती शिखर हे गडावरील सर्वात उंच शिखर असुन याची समुद्रसपाटीपासुन उंची ४६७१ फुट आहे.
 
तारामती शिखर

सततच्या वावरामुळे वाट चांगली मळलेली असुन सुरवातीची वाट हि दाट जंगलातुन जाते. साधारण पाउण तासाच्या चढाईनंतर आपण तारामती शिखरावरील ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो. 


महाराष्ट्राचे दुस-या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती".. (पहील्या क्रमांकाचे कळसुबाई आहे)
सर्वोच्च शिखरावरील महादेवस्थान


तारामती शिखरावरील शिवलिंग
तारामती शिखर वरील शिवलिंग
तारामती शिखर वरील शिवलिंग
शिखर माथ्यावर कातळात कोरलेले एक शिवलिंग व त्याजवळ असलेले कोरीव दगडी उखळ वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.

तारामती शिखर
तारामती शिखर
 गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी ती कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन, वारा, पाऊस यांसारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला tor असे म्हणतात.दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहण्यास मिळतात.
तारामती शिखराकडे जाताना उंचावरुन दिसणारे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि पुष्करणी. 

तारामती शिखरावरून दिसणारी सह्याद्रिची डोंगररांग
तारामती शिखरावरून दिसणारे रोहिदास शिखर

   येथुन दिसणारा निसर्ग व आसपासचा परीसर पहाण्यासाठी तारामती शिखरावर जायलाच हवे. तारामती शिखरावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, कलाडगड, रतनगड, भैरवगड, (मोरोशी), अलंग, मदन, कुलंग, भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड हे किल्ले तसेच नाणेघाट, कात्राबाई , आजोबा, कळसूबाई इतका दूरवरचा परिसर दिसतो. तारामती शिखराच्या दुसऱ्या बाजूने उतरणारी वाट आपल्याला आपल्याला कोकणकड्यावर घेऊन जाते.
तारामती शिखरावरुन कोकणकडयाकडे जाताना लागणारी पहीली शिडी. 
स्वर्गातून जमिनीकडे...

 या वाटेने उतरताना आपल्याला दोन शिड्या पार कराव्या लागतात. यातील दुसरी शिडी पार केल्यावर कड्याला लागुनच एक वाट डावीकडे जाताना दिसते. हि माकड नाळेची वाट असुन या वाटेने बरेच अंतर खाली उतरल्यावर एक गोमुख पहायला मिळते. या गोमुखातुन वर्षभर पाणी वाहत असते असे स्थानिक लोक सांगतात. पाचनई ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तारामती शिखराच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर ( घळीच्या वर ) रानडुकरे आणि बिबटे आढळतात. संध्याकाळच्या वेळी तिकडे जाणे  टाळावे.
कोकणकडयाची मुंहदिखाई. आजुबाजुला दाट हिरवाई आहे.


   तारामती शिखर पाहून आता आपण पोहचणार आहोत हरिश्चंद्रगडावरच्या मुख्य आकर्षणाकडे, अर्थात कोकणकडा. 















कोकणकडा: 

     दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहण्यास मिळतात.
    हरिश्चंद्रगडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत! सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्रभीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा ! 


कोकणकडयाचा अंतर्वक्र भाग. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे.

कोकणकडयाचा अंतर्वक्र भाग येथुन स्पष्ट दिसत आहे.


या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. हरिश्चंद्रगडावरील हे सर्वात मोठे आकर्षण असुन केवळ हा कडा पहाण्यासाठी अनेक हौशी पर्यटक गडावर येतात. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. अर्धगोल आकाराचा हा कडा साधारण अर्धा कि.मी. लांब असुन मध्यभागी जवळपास ७५ फूट अंतर्वक्र आहे. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण ३००० फुट असुन कड्याची सरळधार १५०० फूट असावी.
महाराष्ट्राचा भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर पश्चिमेला असलेल्या समुद्र किनारपट्टी नंतर समुद्रसपाटीला असलेला कोकण हा भुभाग आहे, त्यानंतर थेट धुळे जिल्ह्यातून सुरु होउन उत्तर- दक्षिण धावणारी सह्याद्री पर्वताची रांग महाराष्ट्रा पुरती कोल्हापुर जिल्ह्यातील एका टोकाशी असलेल्या पारगडाजवळ जाउन थांबते. बहुतेक सह्याद्री रांग उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे प्रवास करत असली तरी पालघर जिल्ह्यात ती थोडी आग्नेयेकडे वळते तर हरिश्चंद्रगडाच्या या कोकणकड्यापासून तीचा प्रवास पुन्हा नैऋत्य दिशेने सुरु होउन ठाणे जिल्ह्यातील गोरखगडापाशी पुन्हा ती दक्षिणेकडे प्रवास सुरु करते. सह्याद्री आणि समुद्र यांच्या मधली चिंचोळी भुभागाची पट्टी म्हणजे अर्थातच 'कोकण'. या कोकणाची रुंदी सरासरी ६० कि.मी असली तरी ती सर्वात कमी विशाळगडाच्या पश्चिमेला फक्त ३५ कि.मी. तर सर्वात जास्त रुंदी या कोकणकड्यासमोर थेट वसईपर्यंत १०० कि.मी. आहे. म्हणजे एखाद्याने थेट कोकणकड्यावरुन झेप घेउन हवाई प्रवास सुरु केला तर तो थेट वसईच्या बलदंड भुइकोट किल्ल्याजवळ उतरेल. 

निसर्गाच्या या कॅनव्हासची भव्यता इतकी प्रचंड आहे कि एकेकाळी हा कडा कॅमेर्यात मावायचा नाही. आज मात्र आधुनिक कॅमेर्यांनी या कड्याचा अंतर्गोल आकार पुर्णपणे फ्रेममध्ये बसवता येतो. पुर्ण पाषाणाचा अर्धवर्तुळाकार आणि अंतर्गोल कितीही वेळ पहात राहिले तरी मन भरत नाही. नेमका हा आकार कसा तयार झाला असावा, हा प्रश्न पडतो आणि निसर्ग हाच सर्वश्रेष्ट कलाकार यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होते.  
अगदी कड्याच्या टोकावर जाउन हा उभे राहून कडा पाहणे केवळ अशक्य, त्यासाठी कड्याच्या काठावर झोपून अलगद पुढे सरकायचे आणि हळुच डोकावून त्या पाताळवेरी गेलेल्या दरीत नजर फेकायची. एखाद्या वावड्यासारखा गोल असलेला तो तळ नीट निरखायचा. एखादे खुरटे रोप ही उगवणार नाही असा पाषाणाचा अखंड पडदा, मध्येच त्याचे झालेले दोन भाग, त्यावर गरुडासारख्या धाडशी पक्ष्यांनी बांधलेली घरटी, खाली खोलात असलेली झाडी आणि त्यातून उगम पावणारे ओढे, अगदी आयुष्यभर जपावा असा हा अनुभव !
भव्य हिमालय तुमचा आमचा ...
केवळ माझा सह्यकडा !

या बाजुनेच येते नळीची वाट

भल्या सकाळी गड चढाईला सुरवात केलेले भटके दमले भागलेल्या अवस्थेत इथे या कोकणकड्यापाशी पोहचतात. कोकणकड्याचे भव्य रुप आणि गार, मंद पश्चिम  वार्याने दिवसभराचे श्रम नाहीसे होतात. मन प्रफुल्लित होते आणि सज्ज होते सह्याद्रि भ्रमंतीतील एक अविस्मरणीय क्षणांची अनुभुती घेण्यासाठी. तो क्षण म्हणजे कोकणकड्यावरुन पाहिलेला सुर्यास्त. एकदा इथून पाहिलेला सुर्यास्त पुन्हा आयुष्यभर विसरणे अशक्य आहे. 
 या कड्यावरून संध्याकाळचा सुर्यास्त पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. इ.स.१८३५ साली कर्नल साईक्स याला या ठिकाणी इंद्रवज्र (संपुर्ण गोलाकार इंद्रधनुष्य) दिसल्याची नोंद आहे. कोकणकड्याच्या दुसऱ्या बाजुने दोन वाटा गडावर येतात. यातील पहिली वाट म्हणजे साधले घाटमार्ग तर दुसरी वाट म्हणजे नळीची वाट. स्थानिक लोक या वाटेला कोकण दरवाजा म्हणुन संबोधतात. सामान्य पर्यटकांना या दोन्ही वाटा सहजसाध्य नाहीत. येथुन या पठाराच्या दुसऱ्या टोकावर जाणारी पायवाट असुन हि पायवाट बैलघाट मार्गे पाचनई गावाच्या दिशेने खाली उतरते. या वाटेवर आपल्याला पाण्याची टाकी तसेच दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. बैलघाट मार्गे पाचनई गावात जाण्यासाठी तीन तास लागतात. 
पश्चिमेचा कोकणकडा 

कड्या वरुन दिसणारा माळशेज घाट

सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची (पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा तीव्र उतार तयार झाला आहे. सुमारे दोन हजार फूट खोलीचा तो सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्रभीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मन तृप्त होत नाही. त्या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहळताना अनामिक भीतीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने तेथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहत बसतो; डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. तेथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच! काळजात धडकी भरवणाऱ्या त्या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी नमवले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला त्या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही त्या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. माकिनटोश नामक ब्रिटीश सेनाधिकाऱ्याने कड्यावर चढाई करताना आधारासाठी असलेल्याय खोबणीची पुरती नासधूस केली. येथे शैव-वैष्णव पंथाबरोबरच येथील आदिवासी, गिरीवासींचा देव जागरही वेतोबाच्या रूपात पाहावयास मिळतो. गडाच्या उत्तरेस धावत गेलेल्या ऑक्टोपससारख्या लांबच लांब डोंगरधारा आहेत त्यापैकी मधल्या धारेवर सुमारे तीन मैल अंतरावर दगडाचे तांदळे व एका काठीला दोन-चार फूटके घाट (घंटी) बांधलेले दिसतात हाच तो आदिवासींचा वेतोबा.


 
 
 
गिर्यारोहणप्रेमी लोक इथे वेगवेगळ्या पॅराशूट उडी, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग सारख्या थरारक कसरती करण्यासाठी कोकणकड्यावर येत असतात. व आठवणी घेउन जातात. या कोकणकड्याची महती लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून हरिश्चंद्रगडावर स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी कोकणकडा महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण होणाऱ्या कोकणकडा महोत्सवात गिर्यारोहण क्षेत्राशी संबंधित चित्रपट,लघुपट व माहितीपट दाखविले जातात तसेच गडकिल्ल्यांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सन्मान सुदधा केला जातो. आणि या महोत्सवाला दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने हजर असतात.
   इंद्रवज्राचा देखावा

कड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे. 

"इंद्रव्रज" याचा योग येणे कठीणच...भौगोलिक आणि वातावरणातील परिस्थिती जेव्हा एकरूप होते, त्याच वेळी याचे दर्शन घडते.

ते अद्भुत दृश्य पश्चिमेस धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असला आणि रिमझिम पाऊस सुरू असला तरच दिसू शकेल. अशा विशिष्ट वेळी साईक्स घोड्यावरून रपेट मारत तेथे आला आणि त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह त्याची प्रतिमा समोरच्या गोलाकार इंद्रधनूत पाहण्यास मिळाली. तो अचंबित झाला. कडा पाहण्यासाठी मंदिरापासून पश्चिमेस दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.

 कोकणकडा प्रस्तरारोहण :-

    हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा हे सह्याद्रीत भ्रमंती करणार्या प्रत्येक ट्रेकरचा हळवा कोपरा. मात्र केवळ कडे, सुळके यांना दुरून पहाण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्यावर चढाई करुन त्यांच्या माथ्यावर पाउल रोवून त्या आवाहनाचा सामना करणार्या प्रस्तरारोहकांनी कोकणकड्याचे जवळपास अशक्यप्राय आव्हान स्विकारले आणि मानव जिद्दीच्या जोरावर काय करु शकतो, याचे उदाहरण घालून दिले. डोंबिवलीच्या गिरीविराज संस्थेने कोकणकडा प्रस्तरारोहण मोहीम यशस्वी पार पाडली, त्यातील हि काही छायाचित्रे. 

 

 


 

 

 


 गिर्यारोहकांनी कोकणकडा अवरोहन एकूण चार टप्प्यांत करण्यात आले. अंतर्वक्र असलेला  यातला पहिला ९०० फुटांचा टप्पा हा सर्वात अवघड आणि रोमांचक  मानला जातो. पुढच्या तीन टप्प्यांतील आरोहण पूर्ण केल्यानंतर खालच्या तीव्र उतार असलेल्या भागात पोहोचल्या नंतर ट्रेक करत पायथ्याशी पोहोचावे लागते.   हजारो फूट दरी असल्याने उरात धडकी भरवणारा जो कोकणकडा आता पर्यंत फक्त वरुन पाहिला तो दोराच्या साह्याने चडून जाणे हा अत्यंत थरारक अनुभव असतो. कोकणकड्याचे रौद्रभीषण परंतु सुंदर रुप जवळून पहाता येते. मनातील भीतीवर मात करून  केलेले गिर्यारोहणातील साहस जीवनात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देते. 

हरिश्चंद्रगडावर असलेले खरे प्रश्न आणि गरज :

       मध्यंतरी २०१५ साली ‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ अशी बातमी आली.मुळात एका फोटोमध्ये लाल रेषेने दाखवलेला भाग तडा गेलाय असे दाखवले होते की जो एकूण कडय़ाच्या फार थोडा भाग म्हणता येईल आणि असे भासवण्यात येत आहे की कोकणकडा धोक्यात आहे.मुळात जी भेग दाखवली जात आहे ती कित्येक र्वष जुनी आहे. गेल्या काही वर्षांत कडय़ावरचा एक दगडही हललेला नाही. मात्र भूशास्त्रीय बदल हे अतिशय सावकाश पद्धतीने होत असतात. यामुळे आजच्या या भेगेकडे दुर्लक्ष करणे भविष्यात खूप धोकादायक ठरू शकते. कारण गडावर येणारे बहुसंख्य पर्यटक या कडय़ावरच रेंगाळत असतात. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा आणि ५०० मीटर उंचीचा हा कोकणकडा अंतर्गोल आहे. उभ्या महाराष्ट्रात असा रौद्रभीषण कडा नाही. ती महाराष्ट्राची संपत्तीच आहे. यामुळे त्याला वाचवणे गरजेचे आहे. नैसर्गिक रचनेने बनलेला कोकणकडा आज महाराष्ट्राचे भूषण बनला पाहिजे होता. पण आज तो विद्रूप कसा दिसू शकेल आणि पैसा कसा खाता येईल या दिशेने प्रवास सुरू झाला आहे, असा संशय येतो. आतापर्यंत दोनदा कोकणकडय़ावर रेलिंग लावण्यात आले आणि कडय़ाचे सौंदर्य विद्रूप करण्यात आले. महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांनी ते बाजूला काढून ठेवले असता पुन्हा नवीन खर्च दाखवून ते पुन्हा उभे करण्यात आले. त्यानंतर मात्र ते गिर्यारोहकांनी उखडून दरीत फेकून दिले. यामागचे कारण असे की वादळी पावसात लोखंडाकडे वीज आकर्षित होते आणि त्याचे झटके गिर्यारोहकांना बसलेले आहेत.

 हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर दारू पिणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. कडय़ावरच्या पाटर्य़ामुळे उंदीर वाढले आहेत आणि त्यामुळे सापांची संख्यासुद्धा वाढते आहे. (या पाटर्य़ाविषयी गावकऱ्यांच्या तक्रारीवर स्थानिक आमदाराने दिलेले उत्तर असे की त्याशिवाय पर्यटन वाढणार नाही. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.) गडावरच प्लास्टिक खाऊन आसपासच्या गावामधल्या गुरांच्या संख्येवर मोठा फरक पडलेला आहे. हरिश्चंद्रेश्वर या मंदिरावर सोनकीची फुले उगवली आहेत जे त्या वास्तुरचनेसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि त्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत आहे.

 हरिश्चंद्रगडाचा प्रचंड विस्तार बघता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात शिबंदी म्हणजे सैन्यबल असणार हे नक्की. इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती म्हणजे त्याप्रमाणात पाण्याची व्यवस्था हवीच. याचा अर्थ गडावर तसेच जलव्यवस्थापन हवे. सध्या जरी गडावर पाण्याची टाकी आणि पुष्करणी असली तरी आवश्यक त्याप्रमाणात पाण्याचा साठा नाही असे दिसते. याचा अर्थ अजूनही गडावर पाण्याचा साठा करण्याची व्यवस्था असणार. असाच एक तलाव हरिश्चंद्रगडावर असल्याचा अंदाज दुर्गभ्रमंती करणारे नाशिकचे श्री. प्रशांत परदेशी यांनी शोधला.त्याचा वृत्तांत त्यांच्याच शब्दात !

पुरातन बंधारा हरिश्चंद्रगडावरचा ancient water resiorvior of harishchandra fort

कातळात खोदलेली टाकी गडाच्या चहुबाजूंना असायला हवी होती, ती का नाहीत? हा प्रश्न नेहमी सतावत होता. गडाला चहुअंगांना नैसर्गिक तटबंदी असल्याने मोठ्या संरक्षणाची आणि पर्यायोने गडाच्या सुदूर भागात पाण्याच्या फार मोठ्या नियोजनाची गरज भासली नसावी? या शक्यतेवर विश्वास नव्हता, परंतू कुणाच्या सांगण्यात किंवा वाचनातही अशा व्यवस्था असल्याची माहिती मिळत नव्हती. २५ नोव्हेंबरला कोकणकड्याची उत्तर बाजु व डोंबांच्या डोंगराच्या मधल्या मार्गाने, अर्थातच प्रचलित अशा नळीच्या वाटेने नाशिक-पुणे-मुंबई अशा विविध ठिकाणच्या २० डोंगरभटक्यांनी ट्रेकसोल्सच्या झेंड्खाली एकदिवसाची छान भटकंती केली आणि अचानक एके ठिकाणी एका भल्या मोठ्या तलावाच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक तर या तलावाची अभ्यासकांकडे नोंद आहे की नाही याची मला काहीच माहिती नाही, परंतू ती असेल त या तलावाविषयी फार गांभीर्याने बघितले गेले नसावे, अन्यथा तो असा दुर्लक्षित राहिला नसता. असा प्राचीन तलाव, हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी म्हणजे इतिहासातला मोठा खजिना आहे.

ब्रिटिश संशोधक डब्ल्यू.एफ.सिंक्लेर यांनी दी इंडियन अँटिक्वेरीच्या पाचव्या खंडात हरिश्चंद्रगडाची भव्यता, कोकणकडा, तारामतीचे शिखर, गडावरील विस्तृत पठार, लेणी, मंदिरे, समाध्या व इतर अवशेषांचे धावते पण नेमके वर्णन केल्याचे निरीक्षण ढेरेंनी नोंदविले आहे. हा खंड माझ्या वाचनात आलेला नाही, त्यामुळे कोकणकड्याच्या तलावाचा त्यात उल्लेख आहे की नाही, हे कळायल मार्ग नाही, परंतू या खंडाची सविस्तर माहिती ढेरे देतात त्यात कोकणकड्यावरच्या विशाल बशीच्या आकाराच्या मात्र तलावाबद्दल त्यांनी लिहीले नाही. ढेरेंनी प्रख्यात पुरातत्वज्ज्ञ जेम्स फर्ग्यूसन व प्रख्यात शिल्पज्ज्ञ जेम्स बर्जेस ज्यांनी हरिश्चंद्रगडावरच्या पुरातत्वीय अवशेषांची, मंदिरे, लेणी आदी सर्व माहिती संशोधकीय दृष्टीतून बारीक सारीक वर्णनासह, 'भारतातील गुंफा मंदिरावरच्या बृहदग्रंथात नोंदविली आहे त्याचाही आढावा आपल्या लेखात घेतला आहे, त्यातही त्यांनी कोकणकड्यावरच्या तलावाचा उल्लेख केलेला नाही. तो त्यांच्याकडून राहून गेला की, फर्ग्युसन, बर्जेस यांनी संशोधन केले त्यावेळी तो झाडी झुडपांच्या आड दडून होता हे कळायला मार्ग नाही.
या दोन लिखाणांच्या प्रती हाती आल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. तुर्तास तरी असेच दिसते की, एकतर कोकडकड्यावरचा हा मोठा बशीच्या आकाराचा तलाव अभ्यासकांना, पुरातत्ववेत्त्याना एकतर ठाऊक नाही, किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात माहिती असूनही त्याचे जतन, जिर्णोद्धार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. त्यामुळे इतिहासातला अनमोल ठेवा आज अक्षरश: गाळ बनून दडला गेला आहे. त्यावरची धुळ कोणी झटकेल का?
सप्तीतीर्थ पुष्कर्णी...यातील चौदा विष्णू मुर्ती आता हरिश्चंद्रेश्वराच्या गुहेत अडगळी सारख्या टाकून दिल्या आहेत...
''गडावरचे तलाव फक्त स्वच्छ पाणी मिळावे इतक्या क्षुल्लक हेतूने कधीच साफ करायचे नसतात''. त्यांचे उत्खनन करायचे असते. त्यात इतिहासाचे मुक साक्षीदार, नाणी, बांगड्या, कौल, माठ यांचे तुकडे दडलेले असू शकतात. अशा संशोधनातून इतिहासाचा एक धागा सुद्धा आपल्याला कुठच्या कुठे नेऊन जाऊ शकतो, परंतू या बद्दल कोणतेही गांभीर्य नसल्याने आज महाराष्ट्रात गड स्वच्छतेची जी लाट आली आहे ती फक्त दगड, गाळ उपसण्यात सार्थकी मानण्या इतपत! फार मोजक्या संस्था असतील ज्यांनी काळजीपूर्वक पाण्याचे कुंड, तळी, टाकी स्वच्छ करून पुरातत्वीय अवशेष वेगळे केले, अभ्यासकांना उपलब्ध करून दिले. त्याला हरिश्चंद्रगडही अपवाद नाही. आज ह्या तलावाचा परिसर चक्क मौजमजेचे ठिकाण बनला आहे. तिथे आता कित्येक तंबु लागु लागलेत, ते तंबु लावणार्‍यांच्या, तिथे मुक्काम करणार्‍यांच्या गावी तरी असेल का की, आपण ज्याठिकाणी रात्री डेरा टाकलाय ते ठिकाण नेमके आहे तरी काय?
हरिश्चंद्रगडावर अलिकडेच दिसणारे साधूबाबा
(आता सप्ततीर्थ पुष्कर्णीचेच बघा: काही वर्षांपूर्वी एका साधूने तिची स्वच्छता केली, त्यात त्याला तीन गोण्या भरतील इतकी पुरातन नाणी मिळाली. गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी ती तो घेऊन गेला अशी वदंता आहे. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही.)
रविवारचा दिवस आमच्याकरिता सह्याद्रीतल्या एका अविस्मरणीय भटकंतीचा होता. नळीच्या वाटेच्या चढाईचा प्रत्यक क्षण ह्याद्रीतल्या एका उत्तभ भटकंतीला आल्याचा आनंद पदोपदी मिळवून देत होता. खरे तर नळीच्या वाटेबद्दल जितके ऐकुन होतो, त्यामानाने ही वाट बघण्याचा योग इतका उशिरा का आला याचे माझे मलाच आश्यचर्य वाटत आहे.
 
दहा मिनीटात कोकणकड्याच्या सपाटीला लागलो. येथे एक बुरूजाचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत होते.

तारामतीचे शिखर आता डोकावत होते. पुढच्या काही मिनीटात कोकणकडा नावाचा चमत्कार पुन्हा एकदा नजरेत समावणार होता. कोकणकड्याच्या मध्यमार्गाजवळून प्रस्तरावरोहण (रॅपलिंग) म्हणजे कमरेला दोर बांधून दरीत उतरण्याचा उपक्रम सुरू होता. सर्वसामान्यांना कोकणकडा इतका जवळून आणि तोही इतक्या रोमांचक पद्दतीने बघण्याची संधी त्यामुळे मिळते. साधारणपणे एक किलो मिटरचा आणि पायथ्यापासून ३००० फुट उंचीच्या या कड्यावर सुमारे १८०० फुटांचे प्रस्तरावरोहण गेल्या काही वर्षांपासून कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. जे लोक गिर्यारोहण करू शकत नाही, अशांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली उतरविण्याचा हा साहसी क्रीडा प्रकार. यात धोके मात्र भरपूर असतात. कोणत्या वेळी कशा प्रकारची स्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी कृत्रिम गिर्यारोहणाच्या तांत्रिक ज्ञानासोबतच असे उपक्रम आयोजित करण्याचा अनूभव आवश्यक असते. साधारण १००० फुटाच्या टप्प्यावर सहभागींना उतरवले जात होते. तिथून दुसर्‍या टप्प्याचे ८०० फुटाचे प्रस्तरोवरोहण. ते केले की, साधारण तीन तास जंगल आणि मोठमोठ्या शिळा असलेल्या नदीतून प्रवास करून ही मंडळी बेलपाड्याला पोहोचते.
तलावाचे मुख्यस्त्रोत असलेल्या ओढ्यावरची बंधार्‍याची भिंत कोसळली आहे...
पाठ कुठे टेकलीयं?
आमची कन्या गार्गी हिची पहिलीच हरिश्चंद्रगड भेट असल्याने तिला कोकणकड्याचे दिव्य दर्शन घडले. त्यानंतर आम्ही ओढ्या लगतच्या झाडाच्या सावलीत दुपारच्या जेवणाकरिता विसावलेल्या आमच्या चमूत सामिल झालो. बेलपाड्यावरून कमा पोकळा यांच्याकडून पिठलं आणि तांदळाच्या भाकरी बांधन घेतल्या होत्या, परंतू सतत पाणी पिल्यामुळे जेवण काही जात नव्हते. बाकी मंडली मात्र सफरचंद, चिक्की, खजूर, लाडू, असे विविध पदार्थ सादर करत होती. पोटपूजा आटोपून आमच्यात जे प्रथमच या ठिकाणी आले आहेत त्यांना तारामतीच्या शिखराकडे रवाना करून आम्ही आठ दहा जणांनी झाडाच्या सावलीत मस्त ताणून देण्यासाठी जमिनीला पाठ टेकवली.

बशी सारखा आकार
वेस्टर्न ट्रेकर्स संस्थेच्या प्रस्तरावरोहण मोहिमेकरिता बरेच सहभागी आले होते. आसपासच्या झोपड्यात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्याने बोलण्यामुळे झोप काही लागत नव्हती.
पुण्याचे आर्किटेक्ट केळकर हे ईशान्य दिशेकडे गेले, परतल्यावर त्यांनी हा तलाव असावा अशी शक्यता बोलून दाखवली. समोरच्या बाजुला तलावाच्या भिंतीचे दगड बघितल्याचे त्यांनी सांगितले. लागोलाग मी व मोहिम प्रमुख डॉ. हेमंत बोरसे आम्ही चाचपणी केली तेव्हा खरोखरच ओढ्याच्या मोठ्या प्रवाहावर दोन चौकोनात तासलेल्या लंबाकृती शिळा दिसल्या. त्याच्या आजुबाजूला आणखी काही चौकानी तासलेल्या शिळा इस्तत: विखुरलेल्या दिसल्या. 

कोकणकड्याकडे जाताना तारामतीच्या खालच्या पठारी भागातून आग्नेय बाजूने एक ओढ्यचा प्रवाह आहे, या प्रवाहाचे पाणी या तलावाचा मुख्य स्त्रोत आहे. याचा आकार बशी सारखा असून तळाला तो खोलगट आहे. पूर्व बाजूने दगडांची भली मोठी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत सोडल्यास बाकी सगळे काठ हे नैसर्गिक आहेत. त्या भिंतीच्या चिरांना झाडी झुडपांनी वेढल्यामुळे ती लक्षात येत नाही.

पुरातन बंधारा मुक्कामाचे ठिकाण?
वर्तुळाकार अशा नैसर्गिक खोलकट भागाला घातलेला हा पुरातन बांध असून आसपासचे इतरही प्रवाह यात येऊन मिळतात. या भागात पावसाचे खुप जास्त प्रमाण असल्याने तो लवकर भरून त्याचे जास्तीचे पाणी त्या भिंतीवरून वाहून जाण्याची त्या काळी व्यवस्था केली असावी. गडाच्या एकुण विस्ताराच्या मानाने हा बंधारा छोटा असला तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिरा समोर असलेल्या सप्ततीर्थाचा शंभरपट जास्त पाणीसाठविण्याची याची क्षमता असावी. पुरातत्व विभागाने किंवा जिज्ञासूंनी या तलावाचा अभ्यास केला तर त्याच्या पोटात दडलेल्या गाळात न जाणो कुठल्याशा जुन्या इतिहासाचे काही संदर्भ मिळू शकतील. दुर्दैवाने त्याचे महत्व न समजल्याने या ठिकाणी आता पर्यटकांचे तंबु लागतात.

मधल्या काळात वनखात्याने हरिश्चंद्रगडावर भेट देण्यासाठी येणारे लोक प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणेवर इस्तत: फेकून पर्यावरणाची हानी करतात ही सबब सांगून गडावर रात्रीच्या मुक्कामीची बंदी घोषित केली होती. ती बंदी कधी उठविली? नियमीत व सर्व नियमांचे पालन करून ट्रेक करणार्‍या भटक्यांना अजून पर्यंत यांची माहिती कळविण्यात आलेली नाही. पायथ्याला मात्र सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच वेळ गडावर राहता येइल, असे दोन फलक आहेत. त्यामुळेच नळीच्या वाटेसारखी खडतर चढाई केल्यानंतर आम्ही गडावर मुक्कामाचे नियोजन केले नव्हते. आदल्या दिवशी मात्र येथे हजार लोक मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली. ही संख्या किमान पाचशे तरी असावी. या सगळ्यांचे तंबु या प्राचीन बंधार्‍याच्या पात्रातच लागले होते हे विशेष.








कोकणकड्या लगत काही वर्षांपर्यंत या भागात कार्वीची उंच व जाड बुंधा असलेली प्रजाती बघायल मिळायची. हा बुंधा माणसाच्या मनगटा इतका जाड असायचा. यंदा ती कारवी दिसली नाही.  आमची गड सोडण्याची वेळ समीप आली होती. ३-३७ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरात पोहलो. या परिसरातली भग्न मंदिरे व पुरातत्वीय भग्नावशेषातही मन पार रमून जाते. तासभर या परिसरात व्यतित केल्यानंतर आम्ही पाचनईला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता.
हरिश्‍चंद्र गड
















रेड बोलची कपार

पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणाऱ्या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांच्या दोन थरांच्या मध्ये लाल-हिरवी राख सापडते. तिला भौगोलिक भाषेत ‘रेड बोल’ म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले, मोठमोठ्या भेगा पडल्या, भ्रंश झाले. त्यानंतर त्या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्या नैसर्गिक घटना तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. सोसाट्याचा वारा, धो-धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होत राहिले. मूळचे भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी दऱ्या खोल होत गेल्या. तेथील नव्वद टक्के झीज पावसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली!

हरिश्‍चंद्र गड












गड परिसरातील जैवविविधता

भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्या बाबतीत ‘हरिश्चंद्रा’चे जंगल देशातील समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचे तेथे वैपुल्य आहे. गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासून परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.

गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. तेथे सुमारे पाच हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरू झाला की एरवी भकास वाटणारी तेथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रानलसूण, सोनकी, पालेचिराईत, डायसोफिलिया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकावू लागतात. त्यांना फुलेही अवघ्या पंधरवड्यात येऊ लागतात. पठार जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी अशा विविधरंगी रंगछटांनी नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात पठारावर फुलोत्सवच सुरू असतो.

हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जांभूळ, रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद, आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी आदी वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे तेथील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी त्या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगलतोडीचे प्रमाण कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या त्या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हरिश्‍चंद्र गडकारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्रीच्या माथ्यावर हजार-बाराशे मीटर उंचीवर आढळते. तिचे विपुल अस्तित्व हरिश्चंद्रगडाच्या चहुबाजूंनी आहे. ती दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरते. वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. कारवीने डोंगरउतारावरील मातीचे संधारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. गिरिभ्रमण करणाऱ्यांनाही कारवीचा मोठा आधार तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना असतोच. अन्यथा डोंगरउतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. नव्या कारवीचा दरवर्षी जन्म होतो.

तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतिस्थान तेथे आहे. अभ्यासकांनी त्याबाबत अभ्यास व सर्वेक्षण केले आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे ते निर्जन पठार पावसाळ्यात चैतन्याने न्हाऊन निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचा तेथे आढळ आहे.

कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खोकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू त्या परिसरात आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गरुड, ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्यांचाही तेथील परिसरात वावर असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातींचे विषारी साप त्या भागात आढळतात. विषारी- बिनविषारी इतर सापांचेही वास्तव्य असतेच.

संशोधन व सर्वेक्षण

गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ डिसेंबरला तर तेथे जत्रेचे स्वरूप येते.

शिलालेखांचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांचा समावेश आहे. शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते, रा. चिं. ढेरे या देशी संशोधकांनी केले. त्याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकिल आदींनी त्या गडाला भेट देऊन इतिहास, भाषा व आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यासात भर घातली. ज्ञानदेवादी भावंडेदेखील तेथे येऊन गेल्याचा उल्लेख यात्रापर्वात एका लेखात आढळतो. तो लेख सुवर्णाक्षरांनीच मढवण्यात यावा अशी ‘गोनीदां’ची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

गड तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचेही आकर्षणबिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदींवरून दिसून येते. साईक्स नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर तेथे बांधकामही केले होते. त्याचे अवशेष तेथे दिसतात. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरित्रात, ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) गडावर आल्याचा उल्लेख आहे. त्यांना गडावरच थंडी वाजून आल्याने त्यांना डोली करून खाली नेण्यात आल्याचा मजकूर त्यांच्या चरित्रात आहे.

त्याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक तेथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायांचे अवशेषही तेथे सापडतात.

तेथील वनस्पतीसृष्टीचे संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी) वनस्पती शास्रज्ञ डॉ. कुक यांनी तेथील झाड-झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीने तेथील तीनशेतीस जातींच्या वनस्पतींची नोंद केली आहे. त्याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी तेथील वनस्पतीसृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. तेथील वनस्पतीसृष्टीचे ते महत्त्वाचे संशोधन मानले जाते. गुणवैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करताना डॉ. वामन यांनी सहाशेएकोणतीस वनस्पतींची नोंद केली आहे. त्यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ऐंशी औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर सोळा प्रकारच्या ऑर्किड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे, ती शेकरू तेथील तोलारखिंड परिसरात बऱ्यापैकी संख्येने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतिस्थान येथे आहे. तेथील प्राणिसृष्टीवर हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे तेथील भूगर्भशास्त्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. ते लोक महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात.

भाऊसाहेब चासकर

 हरिश्चंद्रगडावरील मुक्काम आणि वाढणारे पर्यटन, काही प्रश्न :-

प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेली पाण्याची टाकी, दारूच्या बाटल्यांचा खच, खरकट्या पत्रावळी या सगळ्याच्या गराड्यात अडकलेला हरिश्‍चंद्रगड हे महाराष्ट्रातल्या गडकिल्लांच्या दुरावस्थेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या कचऱ्यामुळेच हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी ट्रेकर्समध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडकिल्ल्यांवरचा वाढत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी नाही झाले तर बाकीच्या किल्ल्यावरही मुक्कामास बंदी येऊ शकते. एकुणात ट्रेकर्सचे लाडके आणि हक्काचे असलेले हे गडकोट त्यांच्यापासून दुरावणार का ?


अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्‍चंद्रगड हा भटक्‍यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे. गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्‍चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्या आधी कधी गडावर आले तर 'इंद्रवज्रा'चे विस्मयकारक दृश्‍य येथे हमखास दिसते. गडाच्या या वैशिष्ट्यांमुळे हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम न केलेला ट्रेकर सापडणे विरळा. या गडावरचा मुक्काम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातली एक नितांत सुंदर अनुभूती असते. नव्वदच्या दशकापर्यंत, गडावर असणारे मंदिर आणि गुहा येथे ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय होत होती. कालांतराने पर्यटकांची गर्दी वाढू लागली. तशी गडावरच्या या गुहा आणि मंदिरातील जागा अपुरी पडू लागली. तेव्हा गडावरच्या मोकळ्या जागेत तंबू लावून मुक्कामाची सोय होऊ लागली. पर्यटकांची ही गरज ओळखून गावकऱ्यांनी हे तंबू लावून देण्याची व्यवस्था केली तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या चहा, नाश्‍ता, जेवणाची सोय हे गावकरी करू लागले. गडावर मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची सोय आयती उपलब्ध झाल्याने पर्यटकांची गर्दी बेसुमार वाढली. मानवी गर्दी वाढल्यामुळे पर्यायाने प्लास्टिकचा कचरा वाढायला सुरवात झाली. हा कचरा इतकी वाढला की गडावरचे पाण्याचे स्रोत दूषित झाले. गडावरचे वन्यप्राणी हा परिसर सोडून गडाखाली निघून गेले. हरिश्‍चंद्रगडाला लागलेले हे ग्रहण दूर करण्यासाठी राजूर वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी कडक पाऊल उचलली. गडावर होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा, प्लॅस्टिकचे वाढलेले धोकादायक प्रमाण, कचऱ्यामुळे गडावरील वन्यप्राण्यांचे झालेले स्थलांतर यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना मुक्कामास बंदी घालण्यात आली आहे. हरिश्‍चंद्रगडावर गेल्या काही वर्षात टपरीवजा हॉटेले उभी राहिली आहेत. आजमितीला सुमारे पंचवीस ते तीस हॉटेले गडावर उभी आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो पण या हॉटेलात येणारे पर्यटक आणि काही प्रमाणात हॉटेल मालकही गडाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे महत्त्व जाणत नाहीत. 'नाइट आउट'च्या नावाखाली गडावर उशिरापर्यंत चालणारा धुडगूस, 'बोन फायर'च्या नावाखाली जंगलातले मोठे मोठे ओंडके जाळणे, सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक गडावर सोडून जाणे, मद्यपींची वाढती संख्या, दारूच्या फुटक्‍या बाटल्यांचा खच यामुळे आत्तापर्यंत या गडाच्या पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हॉटेल मालकही त्यांच्याकडून होणारा कचरा हा गडावरच जाळून त्याची विल्हेवाट लावतात. यातून पर्यावरणाची अजूनच हानी होते. गडावर इतक्‍या जास्त प्रमाणात कचरा साठला आहे हा कचरा गडावरून खाली नेणेसुद्धा अशक्‍य झाले आहे. जागतिक वारसा असलेल्या पश्‍चिम घाटाच्या पट्ट्यात हा भाग येत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा हा भाग आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी यांची विपुल जैवविविधता या गडाच्या परिसरात आहे. या सर्व प्रकारांचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वनविभागाकडून उशिरा का होईना पण ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गडावरील हॉटेल चालकांना या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली होती. पण हॉटेल चालकांच्या बेफिकीरपणामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे गडावर आता यापुढे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे तसेच गडावर संध्याकाळनंतर मुक्काम करण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता गडावर येणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात गड बघून खाली उतरणे भाग आहे. कचरा पर्यटकांचा, मनस्ताप डोंगरयात्रींना हरिश्‍चंद्रगडावर झालेला कचरा आणि त्यामुळे मुक्काम करण्यास घालण्यात आलेली बंदी हे सह्याद्रीमधल्या गडकोटांची अवस्था दाखवणारे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
 महाराष्ट्रातल्या इतर गडकोटांवर थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. रस्ताचे जाळे सर्वत्र पसरल्याने आणि खासगी वाहनांची सोय, असंख्य ट्रेकिंग संस्था यामुळे पूर्वी अनवट वाटेवर असणारे बहुतांश गड आता वहिवाटेवर आले आहेत. त्यामुळे हौशी, नवशे यांचा वावर सर्वच गडांवर वाढल्याचे बघायला मिळते. सोशल मिडीयामुळे सह्याद्रीमधील या अनवट ठिकाणांचा बाजार केला जातो. पावसाळ्यात शेकडोंच्या ग्रुपने ट्रेकिंग संस्थांकडून ऍक्‍टिव्हिटी आखल्या जातात. या पर्यटकांना गडाचा इतिहास, पर्यावरणाचा वारसा याच्याशी काहीही घेणे देणे नसते त्यामुळे गडकोटांच्या भिंतींवर नावे कोरणे, पाण्याची टाके दूषित करणे, कचरा फेकणे, मद्यपान करणे यासारखे प्रकार गडकोटांवर सर्रास घडतात. याउलट जबाबदारीने ट्रेकिंग करणारा एक वर्ग आहे जो पर्यावरणाला धक्का लागणार नाही अशा रीतीने भटकंती करत असतो. मात्र मुक्काम बंदीच्या निर्णयाचा फटका डोंगरयात्रींनाही बसणार आहे. यासंदर्भात वनखात्याची नेमकी भूमिका काय हे सांगताना, राजूर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी अमोल आडे म्हणाले '' हरिश्‍चंद्रगडावर येणाऱ्या सर्व पर्यटकांना आता गडावर मुक्काम करता येणार नाही. गडावर झालेले प्लास्टिकचा अफाट कचरा आणि त्यामुळे होणारी निसर्गाची हानी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हा नियम अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गाव आणि गडाचा परिसर येथे लागू होणार आहे. गडावर येणाऱ्या इतर प्रमुख वाटा पुणे जिल्हातील खिरेश्‍वर आणि ठाणे जिल्हातील बेलपाडा या गावांमधून येतात. तिथल्या नागरिकांशी बोलून त्यांना हा कचरा प्रश्‍नाचे गांभीर्य समजावून सांगण्यात येईल आणि गडाच्या सुरवातीलाच पर्यटकांकडून गडावर प्लॅस्टिक जाण्यास अटकाव कसा करता येईल याची काळजी घेण्यात येईल. तसेच यापुढे गडावर कचरा करणाऱ्यास 500/- दंड ठोठावण्यात येणार आहे. गडाच्या परिघातील संबंधित गावे ज्या वन परिक्षेत्रात येतात तिथल्या वनधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा चालू आहे आणि लवकरच या गावातही प्लास्टिक बंदीचा नियम लागू करण्यात येणार आहे. ही बंदी सध्या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा गडावरच्या कचराच्या आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे''. हरिश्‍चंद्रगडावर मुक्कामास बंदी करण्यात आल्यामुळे गडावर ज्यांची हॉटेल्स आहेत त्यांचा रोजगार संकटात सापडला आहे. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन राजूरच्या वनअधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा गडावर हॉटेलचालकांना प्लास्टिक नेता येणार नाही या हमीवर त्यांना व्यवसाय करण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. गडावर हॉटेल असणारे भास्कर बादड यांनी वनखात्याच्या या नियमाला पाठिंबा देत या निर्णयाचे स्वागत केले असले तरी स्थानिकांची अडचण सांगताना म्हणाले की,'' भौगोलिक दुर्गमतेमुळे पावसाळ्यातील चार महिने भातशेतीचे सोडले तर या भागातील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत होता. दर पावसाळ्यानंतर या झोपड्यांची डागडुजी करावी लागते. तसेच हे सगळे सामान पाचनईतून वर गडावर चढविणे जिकरीचे काम आहे. इतक्‍या कष्टातून जे काही दोन पैसे मिळतात तेसुद्धा हॉटेलं बंद झाली तर बंद होतील आणि सगळ्यांचेच रोजगार बंद पडतील. तसे होऊ नये आणि गडावरही स्वच्छता राहावी यासाठी आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिकांनी प्लास्टिकचा एकही जिन्नस विकण्यास ठेवणार नाही आणि पर्यटकांनाही गडावर कचरा करू देणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ अशी हमी या हॉटेल व्यावसियाकांनी वनाधिकाऱ्यांना दिली आहे.'' मुक्काम बंदीची अंमलबजावणी होणार का ? वनाधिकाऱ्यांनी केलेला हा नियम स्वागतार्ह जरी असला तरी त्यांची अंमलबजावणी कशी होते हा एक प्रश्‍नच आहे. कारण गडाचा विस्तार हा अफाट आहे. तसेच गडावर येणाऱ्या तीन मुख्य वाटा आहेत आणि चार ते पाच उपवाटा आहेत. या सर्व वाटांवरुन कोण गडावर येते किंवा जाते यांची नोंद ठेवणे अवघड आहे. शिवाय हा गड तीन जिल्ह्यात पसरला असल्यामुळे तीनही जिल्हातील वनाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतल्याशिवाय ही बंदी प्रभावी ठरणार नाही कारण सध्या जी बंदी घालण्यात आलेली आहे ती केवळ पाचनई भागात घालण्यात आली आहे. गडावरचे महादेवाचे मंदिर हे या भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी महाशिवरात्रीला गडावर काही हजार भाविक दर्शनासाठी येतात. तेव्हादेखील गडावर मोठ्या प्रमाणात कचरा होतो. या कचऱ्याचे नियंत्रण कसे केले जाणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वनखात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकरची तपासणी करणे ही अवघड बाब आहे. पुरातत्त्व खाते असो किंवा वनविभाग, या बंदीची अंमलबजावणी होण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता हा एक प्रमुख अडथळा आहे. या सर्व घटकांचा विचार करून ही बंदी प्रभावीपणे कशी अमलात आणता येईल याची विचार करणे गरजेचे आहे. प्रसंगी जबाबदार ट्रेकर्स, दुर्गसंवर्धन संघटना,स्थानिक यांनी एकत्र करून हे कार्य तडीस न्यावे लागेल. 'रानवाटा'ची सफाई मोहीम गेली बारा वर्षे हरिश्‍चंद्रगडावर होणाऱ्या कचऱ्याची साफसफाई मुंबईमधील 'रानवाटा' नावाची संस्था करत आहे. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय हे काम 'रानवाटा'चे स्वयंसेवक करतात. या संस्थेचे प्रमुख स्वप्नील पवार या गडावरील कचरा प्रश्‍नाचे स्वरूप सांगताना अशी माहिती दिली की, दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात आम्ही ही स्वच्छता मोहीम गडावर राबवितो. या वर्षी तब्बल दोन आठवडे 'रानवाटा' संस्थेचे कार्यकर्ते गडावर कचरा गोळा करत होते. आम्ही गोळा केलेल्या कचऱ्यामध्ये तब्बल अडीच हजार दारूच्या बाटल्या निघाल्या तसेच एक छोटा टेंपो भरून कचरा जमा झाला ज्यात प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा समावेश होता. हा सगळा कचरा गडावरून खाली पायथ्याच्या पाचनई गावात आणण्यात आला आणि तिथून वनखात्याच्या गाडीने तो राजूरला नेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी आम्हाला सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च आला. बारा वर्ष सलग ही स्वच्छता मोहीम राबविल्यानंतरसुद्धा दरवर्षी कचऱ्याचे प्रमाण वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर वनखात्याने घेतलेला मुक्काम बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. गडावर जे ट्रेकर्स येतात त्यांना गड, गडाचे महत्त्व याची जाण असते मात्र पर्यटकांची जी कॅटेगरी असते ती नुसती धुडगूस घालण्यासाठीच गडावर येते. त्यात गडावर जेवण,चहा,नाश्‍त्याची सोय आयती झाल्याने त्यांची संख्या वाढली पर्यायाने कचऱ्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आता या वन खात्याने मुक्कामास बंदी घातलेला हरिश्‍चंद्रगड हा काही पहिला किल्ला नाही या आधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातले वासोटा, प्रचितगड, जंगली जयगड, भैरवगड यासारख्या किल्लांवरही वनखात्याकडून मुक्कामास कायमची बंदी घालण्यात आलेली आहे. या पट्ट्यातील वनसंपदा आणि पर्यावरणाचे जतन करण्यासाठी अशी बंदी गरजेची असली तरी खरंच या बंदीचे परिणाम लक्ष्यात येण्यासाठी दोन पावसाळे जावे लागतील. पर्यटकांच्या उपद्रव जरी यामुळे थांबणार असली तरी जबाबदारीने ट्रेकिंग करणाऱ्या डोंगरयात्रींना मात्र याचा फटका निश्‍चितच बसणार आहे. कारण हरिश्‍चंद्रगडावरची मंतरलेली सकाळ असो किंवा मनावर गारूड टाकणारा कोकणकड्यावरचा सूर्यास्त या दोन्ही गोष्टींना आता ट्रेकर्स कायमचे दुरावणार आहेत.
-------------------------------------


हरिश्‍चंद्रगडावर 'अति तिथे माती' असा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही बंदी कधी ना कधी घातली जाणारच होती. किल्ल्यांवर फिरताना पर्यटक आणि ट्रेकर्स या दोघांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आपण जे काही प्लास्टिक गडावर नेतो ते आपणच खाली आणायला हवा. एक ट्रेकर म्हणून या मुक्काम बंदीच्या निर्णयामुळे मी नक्कीच हळहळलो आहे पण कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न लक्ष्यात घेता या निर्णयाशिवाय गत्यंतर नाही. सोशल मिडीयामुळे सह्याद्रीमधल्या अशा ठिकाणांचा जास्त प्रसार होतो आणि पर्यटकांची संख्या वाढते. कधी कधी ट्रेकर्स मंडळींकडूनसुद्धा उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. रांगणा किल्ल्यावर तटाचे दगड काढून चुलीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी ओळखून भटकंती करणे आवश्‍यक आहे. 
भगवान चिले , दुर्ग अभ्यासक

संदर्भ :-

१)  सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
२)  डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३) दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
४)   किल्ले - गो. नी. दांडेकर
५) दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
६)  ट्रेक द सह्याद्रीज- हरिश कपाडीया
७)   सह्याद्री - स. आ. जोगळेकर
८)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
९ )  www.durgbharari.in हि वेबसाईट
१०) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
११) आडवाटेवरचा महाराष्ट्र -  प्र.के.घाणेकर
१२) आव्हान - आनंद पाळंदे
१३) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
१४) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
१५) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
१६) तत्वसार:- (१०२९- ३३) चांगदेव महाराज.
१७) https://www.saptahiksakal.com/sakalsaptahik-trekstory-swapnil-khot-marathiarticle-2820
१८) https://www.prasannawagh.com, https://www.misalpav.com, https://kharadpatti.wordpress.com, https://reflectedmarathi.blogspot.com, http://sahayadriratna.blogspot.com हे ब्लॉग

खरोखर भाविकांनी, दुर्गयात्री आणि निसर्गमित्रांनी या गडाला आवर्जून भेट द्यावी, असे हे नितांत सुंदर आणि संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, निवृत्तीनाथ आणि नवनाथ संप्रदायांच्या पवित्र पदरवाने पुनित झालेल्या गूढरम्य परिसराला भेट द्यावी, असे ठिकाण आहे.










 

 

 


प्रचि २४ गणेशगुहा


https://www.maayboli.com/node/58875

आता पर्यंत कोकणकड्यावर तीन वेळा मुक्काम केला पण मंदिर परिसरात खुद्द मंदिराच्या मागच्या गुहेत, वरच्या भागात असणाऱ्या गणेश गुहेत मुक्कामाची मजाच वेगळी. 

मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाजूच्या टाक्यातील थंडगार पाणी मनसोक्त पिऊन सोबतचा साठा पूर्ण भरून घेतला. बाकी मंदिर, शिलालेख, गणेश गुहा, केदारेश्वर, पुष्करणी, तारामती, डोंबाची घुमटी, विश्वामित्र, चांगदेव इतर अनेक गोष्टी तसेच या गडाबद्दल भरपूर माहिती पुस्तकात तसेच आंतरजालावर उपलब्ध आहे. 
    साडेआठच्या सुमारास मंदिर परिसरातून निघून टोलार खिंडीच्या वाटेला लागलो डावीकडे मोठी वाट पाचनईच्या दिशेने जाते. बरोब्बर पंधरा मिनिटे टोलारच्या वाटेने गेल्यावर एक झोपडी लागते लव्हाळीचा एक माणूस इथे चहा लिंबू सरबत विकायला बसतो. 
सांगायचं मुद्दा हा की या झोपडी जवळून दोन वाटा फुटतात डावीकडची टोलार


प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
मंदिर आणि परीसर
प्रचि ०७




. कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.





मंगळगंगेच्या प्रवाहात उठून दिसणारी सप्तर्षी पुष्करणी... 
















http://sahayadriratna.blogspot.com/




 https://www.misalpav.com/node/35965

 

 https://www.prasannawagh.com/2017/08/harishchandragad-sadhade-ghat-khiresshwar-sahyadri-ghatwat.html































     
      श्रीमद भागवतम एकुण बारा स्कंधांचे आहे. पहील्या स्कंधाच्या १६ व्या आणि १७ व्या अध्यायात पृथ्वी आणि धर्म यांची कलियुगातील स्थिती 
गडावरीक एक फुल...

सुर्य मावळायच्या आत आम्ही पाचनेईमध्ये परत आलो. तिथे थोडा नाष्टा करुन परतीचा प्रवास सुरु केला.. येताना पाचनेईपासुन बोटापर्यंत ड्राईव्हींग केले. जाताना आणि येताना ड्राईव्हींग करण्याचा अतिरीक्त ताण शरीरावर पडला. पण ट्रेक पुर्ण झाल्याच्या आनंदापुढे सर्व वेदना कुठल्या कुठे विरुन गेल्या.. 
जय शिवराय !
(एकुण अंतर ४०० कि.मी. )

 https://reflectedmarathi.blogspot.com/2014/12/blog-post.html



https://kharadpatti.wordpress.com/2012/03/21/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/






















 किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या आहेत. यातील एका गुहेच्या द्वारपट्टीवर शिव आणि गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या असून गुहेत असणाऱ्या शिलालेखावरून या गुहा दहाव्या–अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात, तसेच येथील लेणी हिंदू लेणी असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. या लेणी समूहातील एक अर्धवट कोरलेल्या गुहेत सहा फूट उंचीची गणपतीची महाकाय मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यांच्या थोडे खाली उत्तरेला एक कुंड असून त्याला ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखले जाते. कुंडांत चौदा देवळ्या असून त्यात विष्णुमूर्ती ठेवलेल्या होत्या. यांतील काही विष्णुमूर्ती आज अस्तित्वात नसून उरलेल्या मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. कुंडासमोर ‘काशितीर्थ’ नावाने ओळखले जाणारे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर काही अपूर्ण शिल्प आहेत. कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एका गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. सांप्रत मंदिराच्या प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस ‘केदारेश्वराचे लेणे’ म्हणून ओळखली जाणारी भव्य गुंफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देणारे खांब असून त्यांपैकी तीन खांब तुटलेले आहेत. गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत.











दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'


'हरिश्चंद्रगड' येथील हे सर्व शिलालेख जर आपण नीट बघितले तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे या शिलालेखांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आपल्याला कोरलेली दिसून येतात. ह्या शिलालेखांच्या मध्ये जी व्यक्तींची नावे दिसतात ती नावे म्हणजे 'हरिश्चंद्रगड' येथे राहणारे 'योगी' किंवा 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिरात दर्शनाला आलेले 'भक्त' याबाबत कोणतीही शंका आजिबात नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमध्ये क्रमांक १ आणि ४ हे शिलालेख खूप महत्वाचे आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये 'चक्रपाणी वटेश्वर' हा उल्लेख आढळतो आणि क्रमांक ४ शिलालेखात आपल्याला जे नाव दिसते ते म्हणजे 'चांगा वटेश्वर' हे अत्यंत महत्वाचे नाव दिसून येते. 

प्राचीन महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचे संत होऊन गेले ते म्हणजे 'चांगा वटेश्वर'. हे 'चांगा वटेश्वर' म्हणजेच 'चांगदेव' नावाचे प्रसिद्ध संत. 'चांगदेव महाराज' यांचे गर्वहरण 'ज्ञानेश्वर' महाराजांची बहिण संत 'मुक्ताबाई' यांनी 'कोरा' असे संबोधून केले. या गर्वहरणानंतर 'ज्ञानेश्वर' महाराजांनी 'चांगदेव महाराज' यांना उद्देशून 'चांगदेव पासष्टी' हा ग्रंथ लिहिला. 'चांगदेव महाराज' यांनी लिहिलेल्या अभंगामध्ये ते स्वत:ला 'चांगा वटेश्वर' आणि 'वटेश्वर चांगा' असेच संबोधले आहे. 'चांगदेव पासष्टी' या ग्रंथामध्ये 'ज्ञानेश्वर महाराजांनी' 'चांगदेव महाराज' यांना जी ओवी  लिहिली आहे ते पुढीलप्रमाणे:-

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥ 

चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यामाझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥

या वरील ओवीमध्ये आपण नीट पाहिले तर 'चांगदेव महाराज' यांना 'वटेश्वराचा पुत्र' असे म्हटलेले आहे. तसेच संत 'मुक्ताबाई' यांच्या अभंगात  देखील 'चांगदेव महाराज' यांचा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

संत 'मुक्ताबाई' यांनी 'चांगदेव महाराज' यांचा केलेला हा उल्लेख अत्यंत महत्वाचा ठरतो. 'तत्वसार' हा ग्रंथ स्वतः चांगदेव महाराज यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये ते स्वत:चा उल्लेख जो करतात तो पुढीलप्रमाणे:-

या अभंगावरून हे सिद्ध होते की 'वटेश्वराचा सुतु' आणि 'वटेश्वर सुत' म्हणजेच 'चांगदेव महाराज' हेच आहेत यामध्ये काही शंका उरत नाही. तसेच 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'चांगदेव महाराज' यांना 'चक्रपाणी' असे देखील संबोधलेले आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥

ओवीचा अर्थ:-

अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी(चांगदेव )यांना ज्ञाननिष्ठ (डोळस) केल्यामुळे त्यांचे आरसे(ज्ञानदेव आणि ते स्वतः) परस्परांना पाहताना आपआपसातला भेद विसरून गेले.

या ओविवरून आपल्याला हे समजून येते की 'चांगा वटेश्वर' आणि 'चक्रपाणी वटेश्वर' ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. या व्यक्ती कोणी भिन्न नाहीत हे यामधून आपल्याला समजते. 'हरिश्चंद्रगड' येथील चौथा शिलालेख जो आहे त्यामध्ये 'चांगा वटेस्वर' असा उल्लेख आलेला आहे. 'चांगा वटेस्वर' म्हणजे 'तत्वसार' ग्रंथाचे निर्माता आहेत. या तत्वसार ग्रंथाच्या शेवटी त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

हरिश्चंद्र नाम पर्वतु | तेथ महादेव भक्तु 

सूरसिद्धीगणींं विख्यातु | सेवेजी जो ||

हरिश्चंद्र देवता | मळगंगा सरिता ||

सर्वतीर्थ पुरविता | सप्तस्थान ||

ब्रम्हस्थळे ब्रम्ह न संडीतु | चंचळ वृक्षु अनंतु 

लिंगी जग्गनाथु | महादेओ ||

ऐसा सर्वांचा समाओ | कळी संसारू दु:खाचा प्रवाहो 

तो देओ मोक्षाचा उत्साओ | शनै: शनै: ||

जो तीर्थांंसि तीर्थ | केदारेसिंं तुकिताति

आणि क्षेत्रिं निर्माती | प्रबंधु हा || (तत्वसार:-१०२९- ३३)

या तत्वसार ग्रंथाच्या श्लोकामधून एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे 'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे. याच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच 'केदारेश्वर' हे मोठे शिवलिंग देखील 'हरिश्चंद्रगड' येथे आहे. एकंदरीतच 'हरिश्चंद्रगड' येथे मोठ्या प्रमाणात सिद्ध योगी हे राहात असावेत हे वरील शिलालेखांच्यावरून समजते.

'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे.

वरील शिलालेखांच्यापैकी आपण जर शिलालेख क्रमांक १ आणि शिलालेख क्रमांक ४ जर नीट पाहिले तर त्यामध्ये क्रमांक १ शिलालेखामध्ये आपल्याला 'वटेश्वरनंदनु चक्रपाणी' हे नाव आढळून येते तसेच क्रमांक ४ शिलालेखामध्ये 'वटेश्वराचा चांगा' हे नाव आढळून येते. यामधील 'चक्रपाणी' हे नाव 'चांगदेव महाराज' यांचे दुसरे नाव आहे. तसेच 'चांगा' हे नाव देखील त्यांचेच आहे असे दिसते. तसेच शिलालेख क्रमांक ३ यामध्ये 'वटेश्वर नंदनु' असे नाव दिसते. या शिलालेखात 'चक्रपाणी' याचा 'सुत' म्हणजे शिष्य असल्याचे म्हटले आहे. या शिष्याचे नाव 'विकटदेव' असे आहे. आता हा 'विकटदेव' कोण हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांचे म्हणणे आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा आहे. हा शिलालेख देखील 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी वाचायचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी या शिलालेखाचे दोन भाग केलेले आपल्याला दिसतात पहिल्या भागाचे वाचन हे '[नि]वृत(ति) पुत्र  ज्ञाना(न)देउ नाम(दे)उ' वारी हे वाक्य आहे. या वाक्यावरून मात्र हे समजते कि महाराष्ट्रातील काही मोठे संत हे देखील 'हरिश्चंद्रगड' येथे त्यांची वारी झाली असावी. यामध्ये एक गोष्ट महत्वाची बघायला पाहिजे म्हणजे आपल्याला वरील शिलालेखातील संदर्भ समजण्यास मदत होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांचे बंधू आणि गुरु हे 'निवृत्तीनाथ महाराज' हे होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'निवृत्तीनाथ महाराज' यांच्याकडूनच 'गुरुपदेश' घेतलेला होता. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरी' मध्ये पुढीलप्रमाणे लिहितात:-

ते माहेशान्वयसंभुतेंं | श्रीनिवृत्तीनाथसुतेंं | केले ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणे ||१८०६|| (अध्याय १८)

ज्ञानेश्वरीमधील या वरील ओवीमध्ये आपल्याला 'निवृत्तीसुत' असा शब्द दिसतो. यामध्ये 'निवृत्तीसुत' म्हणजे 'सुत' म्हणजे 'शिष्य' या अर्थाने उपयोग केला आहे. तसेच याच अर्थाने 'चांगदेव पासष्टी' मध्ये ओवी क्रमांक ३७ मध्ये 'शिष्य' या अर्थानेच पुत्र हा शब्द वापरलेला आहे. 'चांगदेव पासष्टी' मधील ओवी क्रमांक ३७ पुढीलप्रमाणे:-

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

यामध्ये 'तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे. म्हणून वरील 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ अत्यंत महत्वाचा आहे. तसेच वरील शिलालेख क्रमांक ५ यामध्ये 'नामदेउ' हे देखील नाव आलेले आहे. हे 'नामदेउ' म्हणजे  दुसरे तिसरे कोणी नसून 'नामदेव महाराज' हे होत. या वरील शिलालेख क्रमांक ५ यावरून मात्र असे दिसते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सर्वजण 'हरिश्चंद्रगड' येथे नक्की येऊन गेले असावेत. जेव्हा हे मोठे संत 'हरिश्चंद्रगड' येथे आले असतील तेव्हा 'चांगदेव महाराज' हे देखील गडावर असतील. तसे 'हरिश्चंद्रगड' बघायला गेले तर 'हरिश्चंद्रगड' हे  नाथपंथीयांचे एक महत्वाचे ठिकाण असावे. वरील शिलालेखावरून हे मात्र स्पष्ट होते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सगळेजण 'हरिश्चंद्रगड' येथे येऊन गेलेत हे नक्की. म्हणून 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा ठरतो.

तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ मधील उत्तरार्धात जी नावे आलेली आहेत 'श्रीधरदेव' आणि 'हरीश्चंद्रदेव' ही दोन्ही नावे 'हरिश्चंद्रगडावरील' देवतांची नावे आहेत. आज 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला गणपती, शिव-पार्वती, विठ्ठल-रुक्मिणी, देवी ह्या देवता गडावर पाहायला मिळतात. तसेच शिलालेखातील 'श्रीधर' या नावामुळे गडावर एखादे 'विष्णूचे' मंदिर देखील असावे असे वाटते. दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगडावर' एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या वर जे देवकोष्ठ आहेत त्यामध्ये पूर्वी काही विष्णूमूर्ती होत्या याबाबत गो.नि.दांडेकर आपल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात पान क्रमांक १६९ वर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

देऊळ हेंंच गडावरलं एकटंं नवल नव्हे. आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर मग धांंवत चहूंं दिशांना सुटलों. मंदिराचा प्राकार सोडून बाहेर पडलों, तो उजव्या तास हेमाडपंन्ती बांधणीचा एक तलाव दिसला. त्याच्या दक्षिण दिशेला काळ्या पाषाणांत बांधलेले चौदा कोनाडे, अन् अतिशय नवलाची गोष्ट अशी, की त्या चौदा नकशीदार कोनाड्यांंत चतुर्भुज विष्णूच्या चौदा मूर्ती! चारी हातांंतील आयुधांच्या जागा मात्र निरनिराळ्या.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ 'हरी[श्चं]द्र देवो' हा जो उल्लेख आलेला आहे तो 'हरिश्चंद्रगड' येथील गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे या 'हरीश्चंद्रदेव' यावरूनच या पर्वताचे नाव 'हरिश्चंद्रगड' असे पडले आहे. तसेच मागील एका लेखामध्ये आपण 'हरिश्चंद्रगड' याचे नाव कसे पडले याबाबत देखील आढावा घेतला तो देखील संदर्भ नक्की पाहावा. 

गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमधून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक १, शिलालेख क्रमांक ३ आणि शिलालेख क्रमांक ४ या सर्व शिलालेखांच्यामध्ये 'वटेस्वर' या नावाचा उल्लेख आलेला दिसतो. यामध्ये शिलालेख क्रमांक ३ या लेखामध्ये 'श्री वटेस्वर शिवस्य प्रणति:' असे म्हटलेले आहे. वटेश्वर म्हणजेच शिव हे यावरून आपल्याला समजायला मदत होते. 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक २ यामध्ये 'गुहेश्वर भैरव' हे 'हरिश्चंद्रगड' येथील देवतेचे नाव असावे किंवा एखाद्या तेथे राहणाऱ्या 'भैरव' या योग्याचे देखील नाव असावे. शिलालेख क्रमांक ६ मध्ये देखील काही नावे आहेत परंतु ती नावे अस्पष्ट झाली असल्याने  त्यांचा अर्थ लागत नाही.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ७ या शिलालेखात 'नंदनाथ' तसेच 'गयनाथ' ही नावे आलेली आहेत. तसेच शिलालेख क्रमांक ८ मध्ये 'दखिणनाथ' आणि त्यांचा शिष्य 'सकपनाथ' यांची नावे आलेली आहेत. परंतु या व्यक्ती कोण आहेत हे मात्र 'डॉ. वि. भि. कोलते' यांना हे माहिती नाही असे ते सांगतात. तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी एक अनुमान याबाबत असेही काढलेले आहे कि हे कोणी नाथसंप्रदायातील योगी आहेत हे स्पष्ट होते मात्र हे 'गयनाथ' म्हणजे गहिनीनाथ असावेत काय? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरील सर्व शिलालेख पाहता आपल्याला असे मात्र दिसून येते कि 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे खूप महत्वाचे ठिकाण होते.

'हरिश्चंद्रगडावरील' या आठ शिलालेखांच्या बद्दल आपल्याला आणखी उल्लेख मिळतो तो म्हणजे 'साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची' या 'प्र. के. घाणेकर' यांनी लिहिलेल्या ८४ क्रमांकाच्या 'हरिश्चंद्रगड' या प्रकरणात पान क्रमांक ३२५ येथे आठ शिलालेख असा उल्लेख केलेला असून यामध्ये प्र.के.घाणेकर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

याच परिसरात एकंदर आठ शिलालेख आहेत. पहिला आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्राकाराच्या दर्शनी भिंतीच्या बाहेरील प्रवेशद्वाराचे डावीकडे. दुसरा व तिसरा केदारेश्वर लेण्याच्या मधल्या दोन खांबावर मध्यभागी. चौथा आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरातील लेण्याच्या दर्शनी डाव्या खांबावर, तर पाचवा, सहावा, आणि सातवा तेथेच आहेत. आठवा मात्र हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागील चौकटीवर, माथ्याच्या भागात आहे. पहिल्या व चौथ्या लेखांत चांगा वटेश्वराचा म्हणजे योगी चांगदेवांचा उल्लेख आहे.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत.

तसेच शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर या पुस्तकामध्ये प्र.के. घाणेकर यांनी पान क्रमांक १०६ आणि १०७ यामध्ये 'प्र. के. घाणेकर' लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

एका बाजूला सुटी श्रीगणेशमूर्ती. अलीकडेच तिलाही शेंदूर लावलेला दिसतो. या देवळाच्या पूर्व व दक्षिण दिशांना डोंगर खोदुन गुहा खोदलेल्या. पश्चिम व उत्तर (थोडा भाग) प्राकार भिंत पडून गेलेली. उत्तर प्राकार भिंतीवरील बाहेरील बाजूस प्रवेशद्वाराच्या डावीकडे खूप मोठ्या अक्षराचा अतिशय महत्वाचा शिलालेख:-

चक्रपाणी वटेश्वर:नंदतु तस्य सुतु वीकटदेॐ  

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यामते प्राकार भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या हातासही काही अक्षरे आहेत. पुढे प्र. के. घाणेकर लिहितात हरिश्चंद्रगडावरील शिलालेखांचे वाचन करण्याचे २-४ प्रयत्न झाले. बहुदा पहिला श्री. गो. नि. दांडेकरांचा. दुसरा 'डॉ. वि. भि. कोलते' यांचा. तिसरा प्रयत्न 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांचा. 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथात 'सिद्धपीठ हरिश्चंद्र' या लेखात खूप उहापोह केला आहे. श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्याच्या दर्शनी दोन खांबांपैकी डाव्या दगडी खांबावर डावीकडील बाजूस एक लेख आहे:-

"(चां) गा वटेस्वराचा"

असे त्या शिलालेखाचे वाचन आहे. याच खांबावर दर्शनी बाजूस आणखी तीन लेख आहेत ते असे:-

१) (नि) वृत (ति) पुत्र ज्ञाना (न) देउ नाम (दे) उ वारी स्त्रीधर देवदेउ स्त्रीहरी(श्चं)द्र देवो 

२) व्वाल्लर्वाकु सिवा स्त्री मह (हे) षाजचा 

३) .....देवी स्त्रीनंदनाषु (थु)वावि गयनाषु (थु)

हे तिनही लेख खुपच अस्पष्ट झालेले आहेत. त्यांचे पूर्ण वाचन करून अर्थ लावणे फार कठीण झाले आहे. या पाच शिलालेखांशिवाय आणखी एक शिलालेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूच्या ओट्यावर बसविलेल्या श्रीगणेशमूर्तीच्या मागील चौकटीच्या माथ्याकडील भागात आहे. 'श्री दषि (खि) णनाथ का सिष सकपनाथ' तसेच या लेखाच्या वरच्या बाजूस 'म (य) नाथ'  उथळ कोरलेली अक्षरे दिसतात.


दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' आज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे. डोंगरभटके या किल्ल्यावर येतात कोकणकड्याला भेट देतात 'इंद्रवज्र' बघण्यासाठी अनेक तास घालवतात मात्र हे शिलालेख मात्र फार कमी जण बघतात तसेच त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख यांची आज मात्र दुरवस्था झालेली त्यामुळे ते वाचता नाही आले तरी त्यांचे जतन होणे फार महत्वाचे आहे.  

______________________________________________________________________________________________


संदर्भग्रंथ:-

१) Gazetteer of The Bombay Presidency  Ahmadnagar:- पान क्रमांक 718, 719, 720, 1884.
२) Notes on The Ahamadnagar Collectorate Indian Antiquery (Year V):- पान क्रमांक ११, W. F. Sinclaire.
३) Cave Temples of India:- पान क्रमांक ४७८, Fergusson James and Burges James, 1880.
४) दुर्गदर्शन प्रकरण ११ हरिश्चंद्र दुर्ग:- पान क्रमांक १७०, १७१, गो.नि.दांडेकर, मृण्मयी प्रकाशन, २००४.
५) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
६) सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी:- पान क्रमांक १३२,१३६, ओवी ३७, ओवी ६२ ,संत ज्ञानेश्वर महाराज, संपादक ह.भ.प. दत्तराज देशपांडे, सारथी प्रकाशन.
७) तत्वसार:- (१०२९- ३३चांगदेव महाराज.
८) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
९) तीन शोधनिबंध प्रकरण तिसरे चांगदेव राउळ - एक चिंतन:- डॉ. ब्रम्हानंद देशपांडे, परिचय प्रकाशन,

१०) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची प्रकरण ८४. हरिश्चंद्रगड:- पान क्रमांक ३२५, प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०११.

११) शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर:- पान क्रमांक १०६, १०७, प्र. कें. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २००५.

१२) चक्रपाणि:- पान क्रमांक १६५, डॉ. रा.चिं. ढेरे.  


प्रचि ३२


कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य

पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तरेपासून थेट केरळ पर्यंत पसरलेला. त्यात कर्नाटक आणि केरळ मधील भाग हिरवाईने नटलेला, याउलट महाराष्ट्रातला सह्याद्री मात्र खडकाळ रांगडेपणाच काळकभिन्न सौंदर्य मिरवतोय. आपल्या इतिहासाशी जवळीक साधणाऱ्या सह्यकड्याने हजारो वर्ष उन-पावसाच्या अभिषेकात कितीतरी प्रसव वेदना सहन करून अनघड सुळके आणि उंचच उंच कातळ भिंतींची रचना केली आहे.

सह्याद्रीतील अशाच डोंगररांगेपैकी एक माळशेज घाट परिसर आणि दुर्गवेड्यांचा सखा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर सह्याद्रीचा मालक देवाधिदेव शंभूमहादेवाच दर्शन घेतल्यावर पाय आपोआप कोकणकड्याच्या दिशेने वळतात. कोकणकड्यावर लोटांगण घालून याची रौद्रता डोळ्यात साठवण्यासाठी तर झुंबड उडते. त्याची खोल भीषणता पाहून त्यातीलच काही जणांच्या मुठीची घट्ट पकड सोबतच्या संवंगड्यांच्या मनगटावर आवळली जाते.  इथून दरी इतकी खोल आणि भयाण असूनही आपल्या डोळ्यात मात्र त्याच फक्त सौंदर्यच भरत. याची संपूर्ण छबी डोळ्यात साठवण्यासाठी माळशेज घाटाच्या पायथ्याखालील तळ कोकणातलं बेलपाडा गाव गाठायचं आणि रोहिदासच्या शिखरापासून ते नळीच्या वाटेपर्यंत दीड ते दोन  किलोमीटरचा विस्तार असलेल्या संपूर्ण कोकणकड्याला आपल्या डोळ्यात साठवायचं.  




प्रस्तरारोहकांच्या कितीतरी पिढ्या याच्यावर चढाई करण्याच स्वप्न बाळगून असतात, पण यशस्वी झालेल्यांपेक्षा अयशस्वी मोहिमांचीच संख्या जास्त आहे.  अयशस्वी झालात तरी हरकत नाही,  कारण यावर चढाई करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशंसेस प्राप्त आहे.  कोकणकड्यावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हवी कणखर सवंगड्यांची साथ आणि अनुभवी संघ.

महाराष्ट्रात १९८३ साली प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र (खिळे-बोल्ट) गिर्यारोहकांना अवगत झाल आणि ठाणे येथील  चारूहास जोशी यांच्या गिरीविहार संस्थेने प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र वापरून जीवधनची वानरलिंगी सर केली. त्यानंतर असंख्य सुळक्यांच्या वाटा खुल्या होत गेल्या. पण कोकणकडा अजूनही आव्हानच ठरलेला. १९८५  मध्ये आयआयटी- मुंबईच्या गिर्यारोहकांनी वसंत लिमयेच्या नेतृत्वाखाली प्रथमच कोकणकडा सर केला. त्यांनी सुरुवात तर मध्यावरून केली होती पण पुढे डावीकडे सरकत ते मध्यावरून खूप दूरवरून कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचले.  अद्यापही कोकणकड्याची मध्यवर्ती चढाई अभेद्यच होती. पण तत्कालीन मर्यादित उपलब्ध साहित्याच्या सहाय्याने यावर चढाई करण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा कौतुकास पात्र आहे.

पण कोकणकड्यालासुद्धा पाझर फुटला आणि १९८७ मध्ये मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वाखाली 'समिट हायकर्स' आणि 'पुणे व्हेंचर्स' या मुंबई पुण्याच्या दोन संस्थांनी मिळून याच्या मध्यावरून कोकणकड्यावर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने कोकणकडा पादाक्रांत झाला. “किरण, तुमच्यासारखी क्लाईम्बिंग टीम नसल्याने कड्यावरचा २-२ रुफ (दगडी छत) असलेला भाग मला सोडून द्यावा लागला” अशी खंत मिलिंद पाठक यांनी किरण अडफडकरांकडे एका भेटी दरम्यान व्यक्त केली होती. यावरून कोकणकड्याची भव्यता आणि अवघडपणा लक्षात यावा.        

मर्यादित साहित्य आणि प्रवासाची मर्यादित साधनं, यामुळे त्यांना जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ लागला. यानंतर याच मार्गावरून उपलब्ध खिळ्यांच्या सहाय्याने कोकणकडा सर करण्यासाठी प्रस्तारारोह्कांची रीघ लागली. पण त्यात अयशस्वी प्रस्तारारोह्कांचीच संख्या जास्त होती. त्यानंतरही कोकणकड्यावर खूप दुर्दैवी घटना घडत होत्या. एका संस्थेने आयोजित केलेल्या कोकणकडा रॅपलिंग दरम्यान एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती.  २००४ साली चढाईचा प्रयत्न करताना मार्गातील जुने व कमजोर झालेले खिळे तुटल्यामुळे कल्याणमधील एका संस्थेला दोर आणि मौल्यवान सामान कड्यावरच सोडून यशस्वी माघार घेण्यास भाग पडलं होत. एका वर्षी मोठा शिलाखंड कड्यापासून विलग होऊन खाली कोसळून मार्ग आणखी खडतर बनला होता.

एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा अयशस्वी झाल्याने आम्हालाही याचे कुतूहल होतेच.  २००६ साली गिरीविराजच्या मोहिमेच्या पूर्व तयारी दरम्यान जूनमध्ये याचा मागोवा घेण्याच काम आम्ही केल आणि एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा का अयशस्वी झाल्या त्याची कारण सुद्धा कळली.

कोकण कड्याच्या प्रत्यक्ष भिंतीची मध्यवर्ती उंची १८०० फुट आहे. सुरुवातीला ३०० फुटी मध्यम कातळ चढाई करावी लागते. त्यापुढे ५०० फुट तिरकस रेषेतील सोपी चढाई आणि त्यापुढे मात्र भयानक परिस्थिती आहे. कोकणकडा कशाशी खातात त्याची प्रचीती इथून यावयास लागते. ३५० फुटांची चढाई अवघड प्रकारातली. इथपर्यंत म्हणजे ११५० फुट उंचीवर पोहोचल्यावर डावीकडे सरकणारी आडव्या रेषेतली लांबलचक अर्धवर्तुळाकर परंतु अतिशय अरुंद लेज आहे, थोडस दुर्लक्षही जिवावर बेतेल. या लेजवरचा सुमारे ६५० फुट कडा हा या मार्गातला मुख्य अडसर. इथून मात्र याची भयानकता आणखी वाढते. तुमच्या शरीराचे हाल व्हायला इथूनच सुरुवात होते. त्यातही सुरूवातीच ३०० फुट अंतर पट्टीच्या प्रस्तरारोहकाला घाम फोडत. इथपर्यंत तो कसाबसा पोहोचेलही पण इथून वरची ३५० फुटी चढाई महाभयंकर. कारण इथून वरचा कडा ओव्हरहेंगच्या रूपाने सुमारे १४० ते १६० अंशाच्या कोनात असा काही बाहेर पडतो कि फक्त पाहतानाही भल्याभल्यांची तारांबळ उडावी. आजवरच्या बहुतेक मोहिमा इथूनच अयशस्वी झाल्या आहेत. या शेवटच्या टप्प्यातील मध्यभागात एकुलती एक ससाण्याची लेज आहे, पण इथेही स्वतःला दोर बांधून सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे इथे बेसकॅंप स्थापित करता येत नाही आणि सर्व व्यवहार माथ्यावरूनच नियंत्रित करावे लागतात. खाली पहाव तर आपण चढून आलेला रॉकपेंच दिसतच नाही आणि तिरकस ओव्हरहेंगमुळे वरचाही थांगपत्ता लागत नाही.

सुमारे १४-१५ वर्षे सर्व साहसी प्रस्तरारोहक याच मार्गाचा अवलंब करून कोकणकड्यावर झेंडा रोवत होते. आता अखंड कडाच कोसळून खाली पडल्यामुळे, मार्ग आणखी खडतर बनला होता, जवळ जवळ बंदच झाला होता.   कोकणकडा परत गिर्यारोहकांची परीक्षा पाहत होता. एकतर जुन्या खिळ्यांच्या जागी नवीन खिळे ठोकणे अथवा नवीन मार्ग शोधणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या दृष्टीने मुंबई पुण्याच्या विविध संस्थांनी प्रयत्नसुद्धा केले पण सारे विफल झाले.    

नेमक्या अशाच वेळेस गिरीविराज हायकर्सचा (डोंबिवली) पुनर्जन्म झाला होता. किरण सोबतचे सुभाष पंडीयन, संजय लोकरे, सुनील लोकरे, नरेंद्र माळी आदी जुने साथीदार साथीदार निवृत्त झाल्याने जवळपास १० वर्षांचा काळ अज्ञातवासात गेला. २००२ साली संस्थेला परत उर्जितावस्था प्राप्त झाली. किरण अडफडकरांनी आशिष पालांडे, राहुल शिंदे, दिवाकर भाटवडेकर, प्रदीप म्हात्रे, योगेश सदरे आदीं तरुण मंडळींची सक्षम टीम बांधून वजीर, तावली, भैरवगड, बाण, नानाचा अंगठा आदींवर नवीनच मार्गाने चढाई करून भरपूर अनुभव नवीन टीमच्या पाठीशी गोळा केला आणि कोकणकड्याला हात घालण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही कोणताही गाजावाजा न करता.

त्यासाठी दर शनिवार-रविवार तळोजा येथील पांडवकड्याला भेट देऊन १९८८ साली आम्हीच सर केलेल्या मार्गावर रुफ बोल्टिंग, लॅडर शिफ्टिंगचा कसून सराव करून घेतला. कारण कोकणकड्यावर चढाईसाठी आम्ही सर्वात अवघड मार्ग निवडला होता आणि दोन ठिकाणी १८० अंशाच्या कोनातील दोन दगडी छतांचा समावेश होता.

संस्थेची आर्थिक परिस्थिती तोळामासाच असल्याने सर्व प्रथम पैशांची जमवाजमव करावी लागणार होती. त्यावेळी ठाण्याचे चारुहास जोशी मदतीसाठी आले आणि त्यांच्या 'हिल्स अॅगण्ड ट्रेल्स' या कंपनीच्या वतीने छायाचित्रण आणि चलतचित्रणासाठी आर्थिक खर्चाचा काही भार उचलला. उर्वरित खर्चाची जबाबदारी संस्थेच्याच सभासदांनी विभागून घेतली.  
     
२५ ऑक्टोबर, २००६ - हरिश्चंद्रगडाचा पायथा - खिरेश्वर
जवळपास वीस दिवसांचा शिधा, तंबू, स्वतः तयार केलेले २०० एक्स्पान्शन बोल्ट, दोर, इतर चढाई करण्यासाठीचे सामान घेऊन उत्साहाने भरलेली सगळी मंडळी सामानासोबत गडाच्या पायथ्याशी गोळा झाली. सामान खूपच असल्याने गावातील मंडळींकडे मदतीसाठी 'अर्थपूर्ण' विचारणा केली पण ते अवजड सामान पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शेवटी आम्हीच सामान पाठीवरून वाहुन न्यायाचा निश्चय केला. तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारण ४-५ तास लागतात, पण आम्हाला त्या दिवशी मात्र तब्बल ९ तास लागले, यावरून आमच्याकडे असलेल्या सामानाची प्रचीती आली असेल. गडावरील शंभू महादेवच दर्शन घेऊन थेट कोकणकड्याच्या धुंद वातावरणात प्रवेश केला. आता आमच मुख्यालय इथेच असणार होत, अर्थात कॅम्प नं.१. योग्य जागा पाहून साफसफाई करून तंबू ठोकून दिले.





२७ ऑक्टोबर, २००६ (पहिला दिवस):
सकाळी लवकर उठून किरण आणि मंडळी नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचले. आज त्यांना इथे कॅम्प नं. २ ची स्थापना करायची होती. कोकणकड्याच्या पायथ्याला जाणारा शॉर्टकट शोधण्याच्या नादात सुर्य कधी डोगरापल्याड गेला ते कळलंच नाही. रात्रीचे अंधारात धडपडण्यापेक्षा नळीच्या वाटेतच उघड्यावर मुक्काम करावा लागला.

२८ ऑक्टोबर, २००६ (दुसरा दिवस)
आज कसेही करून चढाईचा मुहूर्त साधायचा होता. रात्री उघड्यावरच झोपलेलो असल्याने लवकरच जाग आली. पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे धावतपळत तडक कोकणकड्याचा पायथा गाठला. कॅंप नं. २ ची स्थापना करून चढाईसाठी सज्ज होण्यास तरीही दुपारचे बारा वाजलेच. शेवटी आज एवढ्या वर्षांपासून हृदयाशी जपून ठेवलेला क्षण प्रत्यक्षात साकार होणार होता. अपघातविरहीत यशासाठी सह्याद्रीचा धावा केला आणि सुरुवातीला चढाईचा मार्ग सोपा असल्याने नव-प्रशिक्षित मनीष पिंपळे आणि राहुल शिंदेने या महात्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा केला. आज प्रत्यक्ष चढाईसाठी वेळ कमी मिळाला. तरीही मिळालेल्या वेळात या दोघांनी सुरुवातीची ३०० फुटी साधारण चढाई पूर्ण करून दोर तिथेच बांधला आणि पुन्हा पायथ्याला कॅंप नं.२ वर परत आले.    




 
२९ ऑक्टोबर, २००६ (तिसरा दिवस)
तिसऱ्या दिवशी दिवाकर भाटवडेकर आणि प्रकाश म्हात्रे यांनी काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून जवळपास ८५० फुट चढाई दिवसभरात केली. यातील सुरुवातीची ५०० फुट चढाई तिरकस रेषेत सोपी होती आणि त्याच्यावरील ३५० फुट चढाई थोडीशी अवघड स्वरूपातील होती. आता आम्ही ११५० फुटी रुंद लेजवर पोहोचलो होतो. खरतर आजच इथे कॅंप नं.३ ची स्थापना करायची होती पण संध्याकाळ झाल्याने परत ११५० फुट खाली पायथ्याला जाण्यास भाग पडले. चढाईचा पहिला टप्पा संपला होता पण कोकणकड्याची खरी लढाई यानंतरच सुरु होणार होती. आता पर्यंतच्या बहुतेक मोहिमा अयशस्वी का झाल्यात त्याची प्रचीती इथूनच येणार होती.  








३० ऑक्टोबर, २००६ (चवथा दिवस):
या पुढच्या मोहिमेसाठी पायथ्याला असलेल्या कॅंप नं.२ ची आवश्यकता नसल्याने त्याचा गाशा गुंडाळून प्रकाश आणि मंगेश सदरे नळीच्या वाटेने कोकणकड्यावर परत कॅंप नं.१ वर निघून गेले. तर किरण, दिवाकर, मनीष आणि राहुल काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने ११५० फुटी लेजवर पोहोचले. त्याच वेळेस पुढच्या मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी आशिष पालांडे आणि योगेश सदरे यांनी कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर खाली असलेल्या टीमला येऊन सामील झाले. आता पुढच्या चढाईचे नियोजन याच ११५० फुटी लेज वरून होणार होते. तंबूसाठीची जागा हेरून पुन्हा सगळे जण आशिष आणि योगेशने माथ्यावरून आणलेल्या दोरावर झुमारिंग (सुमारे ६५० फुट) करत कोकण कड्याच्या माथ्यावर म्हणजेच कॅंप नं.१ वर आले.




प्रचि १२



३१ ऑक्टोबर, २००६ (पाचवा दिवस):
अर्धी लढाई जिंकलेली असल्यामुळे उत्साहाच्या भरात पाच जणांची टीम काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर पोहोचली. या ऐसपैस लेजवर तंबू ठोकण्यासाठी आम्ही कालच जागा हेरून ठेवली होती, त्या जागेवर रात्रीच्या निवासाकरिता २ तंबू ठोकून कॅंप ३ ची स्थापना करण्यात आली. आता कृत्रिम चढाई (अर्थात खिळ्यांच्या मदतीने) सुरु होणार होती आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होती. दरम्यान जेवणखाण आणि सामान पुरवठ्यासाठी किरणने एक वेगळा नायलॉनचा दोर (६५० फुट) माथ्यापासून या ११५० फुटी लेजपर्यंत बांधून सप्लाई लाईन फॉर्म केली.


आज प्रदीप म्हात्रेने पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत जवळपास २०० फुटांची उंची गाठली. कॅंप ३ अर्थात ११५० फुटी लेजवरच मुक्काम असल्याने किरणने बांधलेल्या दोरावरूनच कॅंप १ वरून टीमसाठी जेवणपाणी पुरविण्यात आल.





०१ नोव्हेंबर, २००६ (सहावा दिवस)
आशिष आणि योगेशने, काल प्रदीपने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आरंभ केला. आता मात्र कोकणकडा आपले रंग दाखवायला लागला. दुर्दैवाने त्यांच्या मार्गात अत्यंत ठिसूळ खडक लागल्याने मारलेला खिळा (बोल्ट) केवळ हातानेच हलत होता. तरीही त्यांनी थोडा धोका पत्करून या हलणाऱ्या खिळ्यांच्या सहाय्याने चढाई चालू ठेवली पण अचानक आलेल्या संकटाने भांबावून चढाईचा वेग खूपच मंदावला.



०२ नोव्हेंबर, २००६ (सातवा दिवस):
आज प्रदीप आणि अविन्द्र म्हात्रे त्या ठिसूळ कड्याला भिडले पण त्यांचे सुद्धा ठिसूळ खडकामुळे कालच्यासारखेच हाल झाले. परिस्थिती खूपच कठीण होती. आता मात्र आमचीही इतर मोहिमांसारखीच गत होते कि काय याची शंका यायला लागली. नाईलाजाने प्रदीप आणि अविन्द्र ११५० फुटी लेजवर (कॅंप नं.३) परत आले. २ मौल्यवान दिवस वाया गेले होते, अगदीच आणिबाणीचा प्रसंग उभा ठाकला होता. वॉकीटोकीच्या साहाय्याने आलेल्या प्रसंगाची चर्चा करून किरणने कॅंप १ वरून खाली ११५० फुटी लेजवर (कॅंप ३) वर उतरण्याचा निर्णय घेतला.

०३ नोव्हेंबर, २००६ (आठवा दिवस):
आता अनुभवच कामी येणार होता आणि कॅम्पवर किरण एव्हढा प्रस्तरारोहणाचा अनुभव कोणाच्याच गाठीशी नव्हता. किरणने प्रदीपला सोबत घेतलं आणि त्या ठिसूळ कड्याला सामोरा गेला. प्रदीप साहस एकवटून अर्धवट मारलेल्या खिळ्यावर लटकून किरणला बिले देत होता. ठोकलेल्या खिळ्यावर भरोसा ठेवण्यासारखा नव्हताच, कुठल्याही क्षणी ते बाहेर येउन खाली पडण्याचीच भीती अधिक होती. ठोकलेला खिळा भसकन भिंतीच्या आत जात होता. शेवटी किरणने नवीनच युक्ती वापरली. भिंतीमध्ये छिंद्र करण्यासाठी जो पंच वापरतात, तो पंचच त्या ठिसूळ खडकात पूर्ण ठोकायचा आणि प्रदीपला सावध रहायला सांगून त्या हलत असलेल्या पंचच्या आधाराने वर सरकायचा. असे करत करत त्याने एव्हढ्या वर्षांच्या अनुभवातून कमवलेल्या शिदोरीवर दिवसभरात त्या ठिसूळ कड्यावर मात करत पालीची लेज गाठली (पालीच्या आकाराचा खडक). मग तिथेच दोर बांधून तो परत खाली ११५० फुटी लेज वर रात्रीच्या मुक्कामासाठी उतरला. ठिसूळ पॅचवर मात केल्यामुळे रात्री कॅम्पवर उत्साहाचे वातावरण होते. पण त्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली. संपूर्ण कॅंप पाण्याने भिजून गेला, त्यामुळे रात्र लेजवर असलेल्या एका कपारीत काढावी लागली. पुढे आठवडभर वेळी अवेळी पाऊस हजेरी लावून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता, त्यातच पावसामुळे वरून घरंगळत खाली पडण्याऱ्या दगडांमुळे, अपघात टाळण्यासाठी सारखी कपारीकडे धाव घ्यावी लागत होती.




०४ नोव्हेंबर, २००६ (नववा दिवस):
४ दिवसांमध्ये ११५० फुटी लेजच्या वर खिळ्यांच्या साहाय्याने साधारण ३०० फुट चढाई केली होती. आता खरी परीक्षा सुरु होणार होती कारण १४०-१६० अंशाच्या कोनातला मुख्य ओव्हरहेंग सुरु होत होता ज्यात दोन रुफ (दगडी छत) चा समावेश होता. इथूनच खूप मोहिमा अयशस्वी होऊन माघारी गेल्या आहेत. आज योगेश आणि आशिषने १५ बोल्टच्या साहाय्याने ओव्हरहेंगपर्यंत मजल मारली.



०५ नोव्हेंबर, २००६ (दहावा दिवस):
प्रदीप व दिवाकरने १६० अंशाच्या कोनात बाहेर पडलेल्या ओव्हरहेंगवर बोल्टिंगचा श्रीगणेशा केला. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करणे सगळ्यात कठीण काम. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करताना शरीर मागे फेकले जात असल्याने संपूर्ण शरीरावर अतिरिक्त भार पडतो आणि खिळा ठोकण्याचा वेगही मंदावतो.  



०६ नोव्हेंबर, २००६ (अकरावा दिवस):          
आशिषने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात ११ बोल्ट ठोकले.

०७ नोव्हेंबर, २००६ (बारावा दिवस):
योगेशने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात १० बोल्ट ठोकले.      





०८ नोव्हेंबर, २००६ (तेरावा दिवस):
आता मार्गात पहिलं दगडी छत लागल.  दगडी छत हा ओव्हरहेंगपेक्षाहि भयानक प्रकार. इथे डोक्यावर १८० अंशाच्या कोनात खिळा ठोकावा लागतो. वेदनेमुळे आपल्याला मान आहे हेच आपण विसरून जातो. जवळपास झोपूनच खिळे मारावे लागतात.  पण वेदनेने शरीर गलितगात्र होऊन सुद्धा किरणने दिवसभरात छताला लटकून ९ बोल्टच्या सहाय्याने त्या ३५ फुट रुंदी असलेल्या छताचा फडशा पाडला.

किरण रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी झोपून बोल्टिंग करताना-

०९ नोव्हेंबर, २००६ (चौदावा दिवस):
प्रदीपने आज एकट्यानेच बोल्टिंग करत तब्बल १२ खिळे ठोकून तो सुद्धा शर्यतीत असल्याच दाखवून दिल.

प्रत्येक जण आता इतका तयार झाला होता कि रोज ११५० फुटी लेज वरून सुमारे ३००-४०० फुट झुमारिंग केल्यानंतर (तेही ओव्हरहेंगमुळे भिंतीपासून दीडेकशे फुट बाहेर हवेत लटकून) इच्छितस्थळी पोहोचल्यावर एकट्यानेच पंचिंग करून १०-१२ खिळे ठोकत होता. ते गरजेचही होत. तिथे वारंवार चढाईपटू बदलून वेळ वाया गेला असता. त्यात झुमारिंगला दीड दोन तास लागत होते. त्यामुळे एकट्यालाच संपूर्ण दिवस निभावून न्यावा लागत होता.



१० नोव्हेंबर, २००६ (पंधरावा दिवस):
आज किरणने चढाईला सुरुवात केली. त्याला मदतनीस म्हणून दिवाकर आणि त्याखाली दूरवर पालीच्या लेजवर प्रकाश होता. दरम्यान एक अजब प्रकार त्यांना अनुभवास आला. ओव्हरहेंगवर शेवटच्या टप्प्यात बोल्टिंग करताना अचानक प्रचंड गडगडाट होऊन धुरळ्याचे लोट जमा झाले. आसपासच काहीच दिसेनास झाल. या प्रकाराने किरण आणि दिवाकर गांगरूनच गेले. धुरळा विरताच, प्रकाश ज्या लेजवर होता त्या ठीकाणी थोड खाली एक मोठा खडक निखळून पडल्याच लक्षात आल. सुदैवाने प्रकाश सहीसलामत होता पण या पडझडीत एक भलामोठा धोंडा नेमका आमच्या अतिरीक्त दोरावर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. झाल्याप्रकारातून सावरत एकंदर नऊ खिळे आणि एक पाचर यांच्या मदतीने किरणने दिवसभरात चढाईचा अर्धा टप्पा म्हणजेच ससाण्याची लेज गाठली. जेमतेम दीड-दोन फुट रुंद असलेल्या लेजवर असंख्य दगड तुटून पडले होते. दगड इकडे तिकडे हलवून किरण आणि दिवाकरने दोन माणसांना झोपता येईल इतकी जागा तयार करून तिथे एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला आणि परत खाली ११५० फुटी लेजवर परतले. दुसऱ्या दिवसापासून ११५० फुटी लेजला राम राम करायचा होता. खरतर आजच हि लेज सोडणार होतो पण वाइंड अप अर्थात आवराआवर करण्यात वेळ गेला आणि अंधार पडल्याने सगळी काम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.



११ नोव्हेंबर, २००६ (सोळावा दिवस):
आज कॅंप ३ चा अर्थात ११५० फुटी लेजवरचा गाशा गुंडाळून आम्ही माथ्यावर असलेल्या कॅंप १ वर दाखल झालो. तसेच ससाण्याच्या लेजवर असलेल्या दोराचे एक टोक माथ्यावर नेऊन तिथे असलेल्या कारवीच्या झुडुपात ते टोक बांधल. यानंतरची मोहीमेच नियोजन माथ्यावरूनच करणार होतो. दुपारी योगेश आणि आशिष टायरोलीन (व्हॅली क्रॉसिंग) पद्धतीने कारवीत बांधलेल्या दोराच्या साहाय्याने ससाण्याच्या लेजवरील कॅंप ४ वर उतरले. आज वेळ खूपच कमी मिळाल्याने फक्त २० फुट चढाई होऊ शकली. आज त्यांचा मुक्काम या दीड फुट रुंद लेजवरच असल्याने संध्याकाळी दोराच्या साहाय्याने त्यांना जेवण व पाणी पुरवण्यात आले.



किरण, खेळकर मूडमध्ये

१२ नोव्हेंबर, २००६ (सतरावा दिवस):
फक्त दीड फुट रुंद लेजवर अंग अवघडून संपूर्ण रात्र काढावी लागल्याने झोप आलीच नाही. योगेशने सकाळीच चढाईला सुरुवात केली आणि दिवसभरात अथक परिश्रमाने तब्बल १८ खिळे ठोकून नवीन विक्रम केला.
दुसऱ्या दिवशी किरण, दिवाकर आणि प्रदीप कॅंप ४ (ससाण्याची लेज) वर जाणार होते, त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी संध्याकाळी प्रथम आशिषला दोराच्या सहाय्याने वरून बिले देऊन माथ्यावर खेचून घेतलं. पण या सर्व उपद्द्व्यापात रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे नाईलाजाने योगेशला सलग दुसरा दिवस एकट्यालाच ससाण्याच्या लेजवर मुक्काम करावा लागणार होता. मानसिकता, सुरक्षितता, संपर्क अशा सर्वच दृष्टीने ते चुकीच होत पण नाईलाज होता. मनावर धोंडा ठेऊन ती रात्र आम्ही सर्वांनी अक्षरशः चिंतेत काढली. उजाडताच वॉकीटोकीवरून योगेशशी संपर्क करून तो सुरक्षित असल्याच कळल्यावर जीव भांड्यात पडला.




१३ नोव्हेंबर, २००६ (अठरावा दिवस):
सकाळी योगेश परत माथ्यावरच्या कॅंप १ वर येताच, प्रदीप, दिवाकर आणि किरण ससाण्याच्या लेज वर (कॅंप ४) पोहोचले. प्रदीपने चढाई सुरु केली, किरण सेकंड मेन आणि दिवाकर लेजवर. दुपारी दोनच्या सुमारास योगेशचा संदेश मिळाला 'आग्यामाशांच भलमोठ मोहोळ खालच्या (दरीच्या) बाजूला गेल आहे, तुम्हाला दिसलं का?' त्यांना काहीच कल्पना नव्हती. साडेतीनच्या सुमारास किरण दिवाकरशी बोलत असताना खाली दरीत काळ्याकभिन्न आग्यामाशांच भलमोठ मोहोळ त्यांच्याच दिशेने येत होत. किरणने, दिवाकर आणि प्रदीपला लागलीच सावध केल आणि कोणतीही हालचाल न करण्याची सूचना केली. माशा डसल्या तर त्यांच्या बचावासाठी कोणतच साधन नव्हत. डोळे मिटून, शिडीवर लटकत त्याची प्रतीक्षा करत असतानाच ते भलमोठ मोहोळ चक्क त्यांच्या शरीरावरून जाताना जाणवत होत. त्या माशांचे स्पर्श शहारून टाकणारे होते. क्षणार्धात ते मोहोळ, काळे काळे ठिपके वर वर जात नाहीसे झाले. त्यांची जवळपास बंद पडलेली हृदय परत धडधडायला लागली. एव्हढा बाका प्रसंग घडून सुद्धा प्रदीपने जबरदस्तपणे १६ खिळे ठोकलेच.

परत संध्याकाळी वर येताना एक अपघात होता होता वाचला. नेहमीप्रमाणे प्रदीपने संध्याकाळी चढाई थांबवली आणि माथ्यावर कॅंप नं. १ वर जाण्यास तयार झाला. माथ्यावरून जो दोर खाली सोडण्यात आला होता तो चढाईच्या रेषेत नव्हता. त्याचा मध्य चढाईपटूच्या डाव्या हाताला १०० फुट दूरवर होता. त्यामुळे चढाईपटूला त्या दोराच्या रेषेत येण्यासाठी एकतर स्विंग घ्यावा लागला असता, अथवा कोणीतरी त्याचा स्विंग नियंत्रीत करण जरुरी होत. सेकंड मेंन नियंत्रकाच काम करायचा. पण दुर्दैवाने किरणच्या हातून त्या दोराचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रदीपला १०० फुटांचा जोरदार स्विंग आला आणि प्रदीप हवेत हेलखावे खाऊ लागला. त्या दोरावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात किरणचा हातसुद्धा चांगलाच भाजून निघाला. सुदैवाने कोणताही अपघात न होता प्रदीप सुखरूपपणे कॅंपवर पोहोचला.
                 
१४ नोव्हेंबर, २००६ (एकोणिसावा दिवस):
चढाई पूर्णपणे आटोक्यात आली होती. आता शेवटच एक दगडी छत उरल होत. प्रस्तरारोहणातील सर्वात कठीण प्रकार. योगेश आणि आशिषने कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. ईथेच गिरीविराज हायकर्सच्या नावाची एक स्मरणिका ठोकण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत योगेशने १५ खिळे ठोकून त्या छताचा निकाल लावला. त्याला आता माथा एकदम आवाक्यात आला होता. आता आणखी थोडासा जोर लावून योगेश माथ्यावर पोहोचू शकत होता. जीवनात एकदाच मिळणारी संधी. कोकणकड्यावर पाय ठेवून इतिहासात आपलं नाव अजरामर करू शकत होता.

रूफवर (दगडी छत) हवेत अधांतरी बोल्टिंग करताना योगेश -



पण गिरीविराजच्या सर्व तरुण मंडळीने हा मान सह्याद्रीचा शिलेदार किरण अडफडकरांना द्यायचा हे आधीच निश्चित केले होते. म्हणून योगेशने चढाई थांबवून पुढची सूत्रे किरणच्या हाती दिली. किरणने सलग चार खिळे ठोकून शेवटची शिडी सोडली, ३५ फुटांची मुक्त चढाई करत मातीची ढेकळ आणि गवत यातून सावधपणे हालचाली करत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोकणकड्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं. आयुष्यभराच स्वप्न साकार झाल होत. कोकणकड्याच्या सर्वात अवघड आणि अभेद्य मार्गावर १७० expansion bolt च्या सहाय्याने गिरीविराज हायकर्सच नाव कोरल गेल होत.    




   
अवांतर:
एव्हढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी तेव्हढीच मजबूत बेसकॅंप टीम हवी. संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष पांडीयन, कै. संजय रेडकर आणि संदीप रहाटवळ यांनी इतरांच्या मदतीने ते आव्हान लीलया पार केले. अथक शारीरिक त्रासामुळे मोहीम अर्धवट राहण्याचीच चिन्हे दिसत होती, अशा वेळेस संजय नेहमीच धाऊन आला आणि चढाईपटूना मानसिक बळ देण्याच काम सुद्धा समर्थपणे पेललं. प्रवीण घुडे, अमृता राजे, योगेश आंब्रे, जेम्स, राजेश, हर्षद यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले.

दुखः एकाच गोष्टीच आहे कि प्रायोजक मिळून सुद्धा या मोहिमेचे योग्य प्रकारे चलतचित्रण करू शकलो नाही. तत्कालीन उपलब्ध व्हिडीओ कॅमेऱ्याने (कॅसेटवाला) याचे चलतचित्रण केले आहे, पण दुर्दैव असे कि ज्याला हे काम सोपवले होते त्याने पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर तो जो घरी गेला तो थेट मोहिमेच्या शेवटच्या दिवशी परत हजर झाला त्यामुळे चलतचित्रणाची जबाबदारी सर्व नवशिक्यानीच पार पाडली.
              
या मोहिमेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे खूपस साहित्य स्वतःच तयार करण्यात आले होते, अगदी बोल्ट आणि कॅराबिनर्ससुद्धा.






आपला नम्र
गिरीविराज हायकर्स - डोंबिवली


दुपारचे साडे बारा वाजले. आम्ही हरिश्चंद्र गडासाठी सिन्नर-अकोले-राजूर-पाचनई मार्गाने निघालो. वाटेत चहा घेतला. रस्ता जरा लहान असला तरी खूप चांगला आहे. रहदारीही विशेष नव्हती. वातावरण थोडेसे ढगाळ असल्याने ऊन अजिबात जाणवत नव्हते. आजूबाजूचे डोगर, दऱ्या , नद्या, धरणाचे अडलेले पाणी यांचे देखावे असा नयनरम्य प्रवास होता.

पाणवठे

शेती

निळेशार आकाश, आणि विखुरलेले ढग

नदी

उत्तुंग डोंगर माथे

वाटेत एक वनखात्याची चौकी लागली. तेथे गाडीचे रु,१००/- व माणशी रु.३०/- भरून गडाकडे निघालो.

पाचनई गावात येऊन पोहचलो.
गावातले हनुमान मंदिर

पर्यटकांसाठी डॉर्मिटरीचीही व्यवस्था दिसली.

आदल्या दिवशीच पाचनईचे 'हॉटेल कोकणकडा' चे मालक श्री भास्करभाऊ यांचेशी संपर्क साधला होता. त्यांनी माहिती पत्रक, पार्किंगचे लोकेशन इ. ची माहिती पाठवली होती.

त्यानुसार त्यांच्या घरापुढील अंगणात येऊन पोहचलो. स्वत: भास्करभाऊ नव्हते पण घरच्यांनी व्यवस्थित स्वागत केले. फोन लागत नव्हता त्यामुळे आम्ही थोड्याच वेळात पोहचतो आहे व जेवणार आहोत हे सांगू शकलो नव्हतो. पण भूक लागली आहे सांगताच चूल पेटवून पटकन चार भाकरी टाकल्या.

कुतूहल म्हणून मी त्यांच्या घरात फिरूनही आले. जुळ्या मुलांसाठी एकसारखे कपडे आपण नेहमी बघतो इथे दिड वर्षाच्या मुलींसाठी दोन एकसारखे झोके बांधलेले दिसले.

पिठले तयारच होते. पिठलं भाकरी खाल्ली. मिळालेल्या वेळात फोन चार्ज करून घेतले . (नवीन फोन गाडीत असलेल्या चार्जरवर चार्ज होत नव्हता). आता पुढील २४ तास वीज नसल्याने फोन चार्ज करता येणार नव्हता तसेच नेटवर्कही असणार नव्हते. पण फोटोंसाठी फोन वापरावाच लागणार होता तो मात्र जपून. मोजकेच सामान बरोबर घेतले. तरी सुद्धा पाठीवरच्या पिशव्यांव्यतिरिक्त सतरंजी, स्वतःचे पांघरून वगैरे अशा दोन तीन पिशव्या घेऊन गड चढणे आम्हाला कठीण होते. पण सकुबाईने सर्व सामान उचलले आणि आमची काळजी मिटली. आमचा वाटाड्याही तीच होती आणि गडावर आमची सर्व व्यवस्थाही तीच पाहणार होती.

चढाईला सुरुवात करता करता चार वाजले.

प्रवेशद्वार

अजून ताज्या दमाचे असल्याने चढाई सोपी वाटत होती.

आता मात्र थोडा दम लागायला लागला

सखुबाई मात्र खांद्यावर, पाठीवर पिशव्या लटकावून, डोक्यावरच्या पिशवीचा तोल सांभाळत झरझर चालत होती आणि काही अंतर पुढे जाऊन परत आमची वाट बघत थांबत होती.

रस्ता कठीण होत चालला.

हा तर अगदीच कठीण पण आता शिड्या लावल्याने थोडा सोपा

काही ठिकाणी कठडे आहेत.

कातळावर सुंदर चित्र काढली आहेत.

संध्याकाळ व्हायला लागली . डोंगरमाथ्यांना सोन्याची झळाळी आली.

नदी पार करण्यासाठीअसलेला पूल. सध्या नदीला पाणी नसल्याने खालूनच जाता येते.

एका सपाट भागात पोहचलो


हरिश्चंद्रेश्वर मंदिर टप्प्यात आले

मंदिरापर्यंत पोहचता पोहचता अंधार पडायला सुरुवात झाली. मंदिर उद्या सकाळी परत येतांना बघा. सकूबाईची सूचना आली. आम्हाला वाटले आम्ही पोहचलो पण नाही. आमचा कॅम्प कोंकण कड्यावर होता. मंदिराच्या बाजूनेच कड्याला जायचा मार्ग आहे.

अजून जवळपास एक तासाची चढाई करायची होती. थोड्याच वेळात काळोख झाला. सोबत टॉर्च होते म्हणून बरे. धडपडत कसेबसे मुक्कामी पोहचलो. सकुबाईने पटकन चहाचे आधण चुलीवर चढवले.

आज आठवड्याचा मधला दिवस असल्याने पर्यटक नव्हते. माळावर फक्त दोन तंबू लागलेले दिसत होते. सकुबाईचे हॉटेल म्हणा, घर म्हणा किंवा झोपडी म्हणा जे काही होते ते प्रशस्त होते. तुम्ही म्हटला तर तंबू लावू पण आज गर्दी नाही त्यामुळे घरातच झोपला तरी चालेल असं सांगितल्याने आम्ही घरातच झोपायचे ठरवले.

रात्रीचं जेवण तयार होईपर्यंत थोडं झोपडीच्या बाहेर येऊन बसलो. मस्त गार वारा सुटला होता. जास्त वेळ मात्र बसवले नाही. परत घरात आलो आणि जेवायला बसलो.

दुपारपासून शहरी जीवनाचा संपर्क तुटला आहे. आज केक नाही, महागडे हॉटेल नाही, चमचमीत जेवण नाही, आरामदायी बिछानाही नाही पण आकाशात डोक्यावर अष्टमीचा चंद्र आणि त्याच्यापासून थोडेसेच अंतर राखून गुरुही ढगांच्या पुंजक्यातून डोकावून पाहत आहेत, चंद्राचा मंद शीतल प्रकाश आहे, चुलीवरचे अस्सल ग्रामीण जेवण आहे, झोपायला सारवलेल्या जमिनीवर चटई अंथरलेली आहे यापेक्षा चांगले वातावरण लग्नाचा वाढदिवस साजरा करायला कायअसू शकते.

चला ,आता झोपायला जातो आम्ही. पुन्हा भेटू लवकरच उर्वरित सहलीच्या निमित्ताने. शुभ रात्री!

क्रमशः

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...