Monday, June 21, 2021

लेण्यांविषयी सर्वकाही

सह्यद्री, महाराष्ट्राचा मानिबदू! या सह्यद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. सह्यद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटांच्या यशोगाथा जगप्रसिद्ध आहेत. याच सह्यद्रीच्या उदरात सुमारे दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील कारागिरांनी केवळ छिन्नी-हातोडय़ाचे घाव घालून अनेक लेणी निर्माण केली. भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी या महाराष्ट्रातच आहेत. बहुतांश ठिकाणी पांडवलेणी म्हणून ओळखली जाणारी आणि काहीशी पडकी भासणारी ही लेणी निरखून पाहिली तर त्यांच्या स्थापत्यातून, तिथे कोरलेल्या मूर्तीतून, दानलेखांतून त्यांच्या निर्मितीची कथा उलगडत जाते. काही अपूर्ण राहिलेल्या लेणीदेखील आपल्याशी उत्तम संवाद साधतात. अजिंठा, कान्हेरी, नाशिक येथील लेणींमध्ये कोरलेल्या दानलेखांतच लयन हा शब्द वापरलेला आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लेणींच्या निर्मितीची ओळख करून देणारी ही लेखमाला.

लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची! याच सह्यद्रीच्या उदरात ही लेणी आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पाश्र्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिक, इत्यादिंनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, िहदू व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. त्यामुळे भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी महाराष्ट्रातच आहेत.

इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात मौर्यवंशीय सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला होता. सम्राट अशोकाचे प्रस्तरलेख आणि स्तंभलेख हे अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेले आहेत. महाराष्ट्रात पौनी येथे उत्खननात सापडलेला स्तूप हा मौर्य काळातील स्तूप असावा असे संशोधकांचे मत आहे. मुंबईजवळ सोपारा येथेही विटांनी बांधलेला स्तूप तसेच अशोकाचे शिलालेखही सापडले आहेत. भगवान बुद्धांच्या सूचनेनुसार वर्षभर धर्मप्रसारासाठी फिरतीवर असणारे बौद्ध भिक्षू पावसाळ्यातील निवासासाठी (वर्षांवासासाठी) तात्पुरता निवारा उभारत. प्राचीन बौद्ध ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ही वर्षांवासाची जागा गावाच्या अथवा शहराच्या सीमेबाहेर परंतु शहरापासून जवळ असे. कारण भिक्षेसाठी एखादं गाव जवळ असणे गरजेचे होते. त्यामुळे अनेक बौद्ध स्तूप आणि विहार हे गावाच्या जवळ उभारले जाऊ लागले.

प्राचीन हिंदुस्थानी धर्मात लोकदेवतांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. बौद्ध, हिंदू आणि जैन या सर्व धर्मियांचे आपापले स्थानिक देव किंवा यक्ष-यक्षी या स्वरूपातल्या रक्षक देवता होत्या. महाराष्ट्रातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृहांच्या प्रवेशद्वारापाशी त्यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पण त्या यक्ष-यक्षी किंवा देवांच्या मूर्ती आहेत असे आपण समजतो. त्यासंबंधीचा कोणताही अभिलेखीय पुरावा तिथे नसतो. पण याला अपवाद म्हणजे नाशिक येथील चैत्यगृह. इथे चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एका व्यक्तीचे शिल्प कोरले आहे. पण त्याच्या मागच्या भिंतीवरील शिलालेखात त्याचा यक्ष असा उल्लेख केला आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा अभिलेखीय पुरावा आहे. इ.स.च्या 7व्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महामायुरी’ नावाच्या बौद्ध ग्रंथात सतत प्रवास करणाऱया बौद्ध भिक्षूंना सर्पदंशापासून वाचण्यासाठी काही रक्षामंत्र किंवा कवचमंत्र दिले आहेत. तसेच ते ज्या प्रदेशात असतील तिथल्या स्थानिक देवता किंवा यक्षांनाही आवाहन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यापारी आणि धार्मिक केंद्रांची यादी तसेच तिथल्या स्थानिक रक्षक देवता आणि यक्ष यांच्या नावांची यादी या ग्रंथात दिली आहे. त्यात नाशिक येथे ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता असा उल्लेख आढळतो. वर उल्लेखिलेला चैत्यागृहाच्या बाहेरचा यक्ष हा तो ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता का हे सांगता येणे अवघड आहे. पण हा नाशिकचा प्राचीन रक्षक यक्ष आता पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे हे नक्की.


वर उल्लेखिलेल्या पश्चिमी क्षत्रप राजा नहपान याच्याशी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिकजवळच्या गोवर्धन नावाच्या गावाजवळ घनघोर युद्ध केले. त्या युद्धात नहपान याचा दारुण पराभव झाला आणि त्यांचा वंश ‘निरवशेष’ झाला. सातवाहनांचे गेलेले राज्य परत मिळाले. या सर्व घटनांचा उल्लेख त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये आढळतो. एवढेच नव्हे तर या विजयाचे प्रतीक म्हणून नहपानाच्या चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले. नशिकजवळच्या जोगळटेम्बी नावाच्या गावाला 1904मध्ये नहपानाच्या 13230 नाण्यांचा संग्रह अचानक सापडला. त्यामधील 9270 नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले होते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, या ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ (म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी पितात म्हणजे तिथे पोचलेले आहेत) असे विशेषण मिळालेल्या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर जो मोठा विजय मिळवला त्याप्रीत्यर्थ त्याने ‘शालिवाहन शक’ हा संवत्सर सुरू केला. परंतु हा शक सातवाहनांनी कधीही वापरला नाही, याचे खरे कारण त्यांनी तो सुरूच केला नाही. नहपानाचे गुजरातमधले राज्य कार्दमक क्षत्रप या दुसऱया शक घराण्यातला राजा चष्टन याने ताब्यात घेऊन एक संवत्सर इ.स. 78मध्ये सुरू केला. तोच पुढे शक संवत्सर नावाने प्रसिद्ध झाला. शालिवाहन म्हणजे सातवाहन यांनी एका शक राजाला हरवल्यानंतर जो दुसरा शक राजा गादीवर आला त्याने हा सुरू केला, ही वस्तुस्थिती आपण काही प्रमाणात स्मरणात ठेवली आणि काही प्रमाणात विसरलो.


काळाच्या ओघात सातवाहनांच्या साम्राज्याचा ऱहास झाला आणि या परिसरात आभीर राजांचे राज्य आले. त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात त्यांचा शिलालेख आढळतो. याच आभीर राजांचे वंशज म्हणजे आजचे आहेर आणि त्यांची भाषा ती अहिराणी. काही अभ्यासकांच्या मते त्यांच्या कान्हाचा देश खानदेश. पुढे बौद्ध भिक्षूंनी या लेणी सोडल्यावर तिथे इ.स.च्या 11व्या–12व्या शतकात जैन धर्मियांचा प्रभाव वाढलेला दिसतो. म्हसरूळजवळ चामरलेणी तयार झाल्या तर त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात काही लेण्यांमध्ये जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असे दिसते. तसेच अंजनेरी येथे जैन मंदिरांचेही बांधकाम झाले. अंजनेरी पर्वत, अंकाई-टंकाई, मांगी तुंगी या ठिकाणी जैन लेणी कोरली गेली. अशा प्रकारे मुळातच अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या परिसरात सर्व धर्मियांनी आपापल्या धार्मिक स्थापत्याची उभारणी केली. मांगी तुंगी येथे उभ्या केलेल्या 108 फूट उंचीच्या तीर्थंकरांच्या मूर्तीची 2016 साली गिनीस बुकात नोंद झाली आहे. एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले एक प्राचीन काळापासून समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले नगर सर्व प्रकारच्या लोकांना आपला आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी इथे आकर्षित न करेल तरच नवल होते. त्यातून गोदावरी नदीचे माहात्म्य सर्वश्रुत होतेच. सिंहस्थाच्या वेळेस भरणाऱया कुंभमेळ्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात या परिसराची ख्याती पसरली होती. नाशिक आणि त्र्यंबक या अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नगरांमध्ये विविध प्रकारचे धार्मिक, पितरांसाठीचे विधी करण्यासाठी हिंदुस्थानभरातून लोक येऊ लागले. काळाच्या ओघात अनेक राजवटींनी या प्रदेशात राज्य केले, व्यापार उदीम वाढायला मदत केली, अनेक मंदिरे बांधली, किल्ले बांधले आणि येथील भरभराटीस हातभार लावला. जरी मध्ययुगात नाशिकचे नाव गुलशनाबाद झाले तरी या गावाच्या धार्मिक महत्त्वात, नावलौकिकात काहीही फरक पडला नाही. काही काळाने ते परत नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.

इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात महाराष्ट्रात सातवाहन घराणे उदयाला आले होते. याच काळात भारताचा ग्रीस व रोमबरोबर व्यापार समुद्रमार्गाने व्यापार सुरू झाला होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या सुरुवातीला या व्यापाराला नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या शोधाने मोठी चालना मिळाली आणि नर्ऋत्य मोसमी वारे शिडात भरून सागरी मार्गाने दरवर्षांला १२० रोमन जहाजे व्यापारासाठी भारताच्या किनाऱ्यावर येऊ लागली.

सातवाहन काळात महाराष्ट्राच्या भूभागातील व्यापारी मार्ग दक्षिणापथ या नावाने ओळखला जात असे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी’ या १९०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या खलाशांच्या मार्गदर्शक पुस्तिकेतही या दक्षिणापथाचा उल्लेख आढळतो. याच पुस्तिकेत महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठा म्हणून तेर आणि पठण या शहरांचा तसंच कल्याण, चौल, सोपारा या बंदरांचा उल्लेख आढळतो. या बंदरांवर आलेल्या रोमन जहाजांना तेर, पठण व इतर शहरांतून व्यापारी मार्गाने माल पाठवला जात असे. सार्थवाह हे मालाचे तांडे घेऊन जात असत. या विविध व्यापारी मार्गावर असणाऱ्या डोंगररांगांतील काळ्याकभिन्न कातळात व्यापाऱ्यांनी  दिलेल्या दानामधून लयननिर्मितीला सुरुवात झाली. कुठलेही दान देण्यासाठी दानी माणसाकडे मुबलक प्रमाणात पसा असावा लागतो. तो पसा रोमसोबतच्या व्यापारातून व्यापाऱ्यांकडे आणि मालाला उठाव असल्यामुळे सामान्य माणसाकडेही उपलब्ध होता.

लेणींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, लेणी बांधली जात नसत तर एकसंध पाषाणात कोरली जात असत. अजिंठा तसेच जुन्नर येथील काही अर्धवट कोरलेल्या चत्यगृहांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, ही लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे. कारागीर केवळ छिन्नी हातोडय़ाच्या मदतीने ही लेणी कोरत असत. तत्कालीन लाकडी बांधीव स्थापत्याची प्रतिकृती असलेली ही लेणी कोरताना कातळावर स्थपतीने आखलेल्या रेखांकनाप्रमाणे खांब आणि तुळयांच्या जागा सोडून कारागीर इतर भाग कोरत खालच्या भागाकडे येत. त्यानंतर शिल्पकार त्या खांबांना सुबक आकार देऊन त्यावर नक्षी कोरत असत. प्रसिद्ध फ्रेंच मूíतकार रोदां म्हणाला होता की कुठलीही मूर्ती ही दगडात मूळचीच असते; मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. त्याप्रमाणे ही लेणी कोरून काढणाऱ्या भारतीय शिल्पकारांना त्यातील स्थापत्य, मूर्ती, शिलालेखाच्या जागा माहीत असायच्या; इतर नको असलेला भाग ते कोरून काढायचे.




“भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही ‘शैलगृहे’ अर्थात ‘लेणी’ खोदविली.

अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व सितामढी इ. ठिकाणी ही सुरुवातीची लेणी खोदविली. बाराबर येथे सुदामा, विश्वामित्र, कर्णकौपर, व लोमशऋषी ही चार लेणी आहेत. त्यापैकी ‘सुदामा’ हे लेणे सर्वच प्राचीन असून,’न्यग्रोध गुंफा’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. याची रचना साधी असून, समोर आयताकार दालन व त्यानंतर वर्तुळाकार खोली आहे.

या लेणींपासून सुमारे १.५ कि मी. अंतरावर ‘नागार्जुनी’ गुहा आहेत. गोपिका, वाडिहक व वडलिक या तीन लेण्यांचा समावेश त्यात आहे. या लेणींचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगरातील खडकाला समांतर अशी खोदलेली आहेत. ‘बाराबर’ येथील सुप्रिया व ‘नागार्जुनी’ येथील गोपिका ही लेणी प्रशस्त आहेत.या समूहातील ‘सुदामा’ व ‘लोमशऋषी’ ही लेणी सर्वात प्राचीन असून, ती आकाराने लांबट आयताकार असून त्यातील एका टोकाची रचना ही गजपृष्ठाकार असून ती अर्धगोलाकार आहे.

‘लोमशऋषी’ लेण्याचे प्रवेशद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणींहून भिन्न आहे. ते रेखीव असून, अर्धस्तंभांनी युक्त चौरसाकृती द्वार व त्यावर अर्धगोलाकार आकारातील चैत्यकमान कोरलेली असून कमानीच्या वरच्या भागात जाळी कोरलेली असून , त्याखाली स्तूपाला वंदन करणाऱ्या आठ हत्तींचे कलात्मक शिल्पांकन आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प लेणींमधील ‘शैल शिल्पकले’ ची सुरुवात ठरते. ही लेणी अतिशय साधी असून, बौद्ध भिक्खूंच्या समर्पित जीवनाशी या लेणींची जवळीक साधलेली आहे.

मुखदर्शनाचा काही अलंकृत भाग वगळता या लेणीमधील साधेपण नजरेत भरण्यासारखेच आहे. ही लेणी खोदतांना तत्कालीन स्थापत्यविशारदांनी एखाद्या साध्या घरासारख्या ‘आकृतीबंधा’चा उपयोग केला असावा. एखादे घर ज्याप्रमाणे अगोदर लाकडी खांबावर तुळया व छत टाकून उभारण्यात येते, व नंतर भिंतीमध्ये दारे- खिडक्या बसवण्यात येतात, त्याप्रमाणे या ‘लोमशऋषी’ लेणींची प्रारंभीच रचना दिसून येते.

” चारही दिशांकडून आलेल्या भिक्खूंना पावसात राहता यावे, यासाठी ही लेणी खोदविली आहेत…” असे ‘बाराबर’ येथील लेणींच्या भिंतीवर सम्राट अशोक यांचा नातू ‘दशरथ’ याने ‘धम्मलिपी’तील शिलालेखातून लिहून ठेवल्याचे आपणांस आजही स्पष्टपणे दिसून येते….”


सुरूवातीला भिक्खूंना राहण्यासाठी खास सोय नव्हती. सुरूवातीचे भिक्खू रानावनात उघड्यावर किंवा झाडाखाली, डोंगरकपारी, गुहेत वगैरे ठिकाणी राहत असत. मगधच्या बिंबिसार राजाने, “गावापासून फार दूर नाही आणि अगदी जवळही नाही; लोकांना जाण्यायेण्यास सोयिस्कर, पण त्याचबरोबर एकांतवासास योग्य अशा आपल्या राजगृहाजवळील वेळूवन विहाराचे धम्मदान तथागतांना आणि त्यांच्या संघाला केले. संघास मिळालेला हा पहिला विहार.


त्यानंतर अनेक विहार संघास धम्मदान करण्यात आले. तथागतांनी भिक्खुसंघास पाच प्रकारच्या निवासस्थानी राहण्याची सुचना केली होती. ते पाच प्रकार म्हणजे १) विहार २) अध्यायोग (शिखर असलेले मोठे घर) ३) पासाद (मोठे घर) ४) हम्मीय (घराच्या वरच्या माळ्यावरही खोली) आणि ५) गुहा. महाराष्ट्रात हल्ली फक्त ‘लेण्यांच्या स्वरूपात असलेल्या “गुहा” अस्तित्वात आहेत. भिक्खूंच्या निवासस्थानाचे इतर प्रकार महाराष्ट्रातून आता नष्ट झाले आहेत.


बौद्ध शिक्षण पध्दतीत विद्यार्थी शिक्षणासाठी संगारामात जात असे. संगारामात अनेक विद्वान भिक्खू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असे. ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या तत्त्वानुसार अशा संघारामाचे विश्वविद्यालयात रूपांतर होण्यास बौद्ध शिक्षण पध्दतीत भरपूर वाव असे. म्हणूनच बौद्ध शिक्षण पध्दतीतून नालंदासारखी विश्वविद्यालये निर्माण झाली.


बुद्ध धम्म हा ‘शील, समाधी आणि प्रज्ञा’ यावर आधारलेला धम्म आहे. विद्याव्यासंगाबरोबरच सम्यक समाधीसाठी किंवा ध्यानसाधाणा या लेण्यांचा उपयोग केला जाई. व्यापारी मार्गांवर ज्या ज्या ठिकाणी लेणी खोदण्यास योग्य जागा सापडल्या त्या त्या निसर्गरम्य ठिकाणी एक हजारावर बौद्ध लेणी आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे ७० टक्के लेणी इ. स. ३०० च्या अगोदरची आहेत.


भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा झाल्यास बौध्द संस्कृतीचा विचार प्राधान्याने करावा लागतो. तरच प्राचीन इतिहास हा पूर्णत्वास जाईल. प्राचीन बौध्द संस्कृतीच मुळ स्वरूप जे प्रामुख्याने व्यापार, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक या माणवाच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयावर अवलंबून होत. खरतर समाजाचा विकास आणि एकूणच माणवजातीचा विकास या महत्त्वाच्या मूल्यांवर अवलंबून होता. माणसाचा वैयक्तिक आयुष्य आणि तत्कालीन समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाच्या मुल्यांच्या विकासावर अधिक भर हा बौध्द संस्कृतीच्या कार्यप्रणालीचा एक भाग होता. त्यामुळे समृध्द बौध्द संस्कृतीचा प्रभाव संपूर्ण आशियाई देशांमध्ये पडलेला आपणास दिसून येतो. मुख्यत्वेकरून सम्राट अशोक व त्यानंतर उदयास आलेल्या राजांच्या राज्यकारभारामार्फत बौध्द संस्कृतीला विषेश चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे दिसून येते.

बौध्द संस्कृतीची महत्त्वाची देन म्हणजे पाषाणात कोरलेल्या लेण्या आणि शिल्पकला. याची सुरुवात झाली इ. स. पुर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात बाराबर टेकडीवर पहिली लेणी कोरली आणि इथूनच पाषाणात लेण्या कोरण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात जवळपास दोन हजार लेण्या कोरल्या गेल्या परंतु महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये असलेल्या अग्निजण्य खडकामुळे आणि त्या खडकामध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे नंतरच्या काळात सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरल्या गेल्या. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आणि बाजूला असलेल्या विस्तृत अरबी समुद्र किनारा या समुद्र किनार्‍यावर व्यापारी बंदरांचा विकास होत गेला. प्रमुख बाजारपेठा आणि व्यापारी बंदर व्यापारी मार्गाने जोडले गेले याच प्राचीन व्यापारी मार्गावर देखण्या लेण्यांचा साज चढवला गेला. इथूनच समतेचा, बंधुतेचा संदेश जगभर प्रसार झाला. ही आहे बौध्द संस्कृतीची व्यापार आणि आर्थिक स्तर उंचावणारी.

या प्राचीन लेण्यांमध्ये शिलालेख कोरले गेले लेण्या कोरण्यासाठी दानकर्ते हे समाजातील प्रत्येक स्तरांतून भरघोस दान देत होते त्यांची सविस्तर माहिती शिलालेखांमुळेच मिळू लागली. त्यामुळे प्राचीन लीपीमध्ये उपलब्ध असलेला शिलालेखाच्या माध्यमातून प्रथमच लिपीची त्यासोबत लिखाणाची ओळख करून दिली ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी सम्राट अशोकाने भारताला दिली. पाली भाषेतून त्रिपिटकांसारख्या भव्य ग्रथांबरोबरच अनेक बौध्द साहित्याची नंतर निर्मिती झाली हे प्राचीन साहीत्य आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. बौध्द भिक्खू धर्मप्रचारकांनी आपले विचार हे त्यावेळच्या लोकांच्या (पाली) भाषेमध्ये मांडल्यामुळे बौध्द धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला व त्यामुळे पालीभाषेचा मोठ्याप्रमाणात विकास झाला.


विज्ञानाच्या सर्व कसोटीवर खरा ठरलेल्या बौध्दधम्माने शिक्षण प्रसारासाठी खूप मोठ योगदान दिलं. ज्ञानदान तक्षशिला हे विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तान त्या विद्यापीठाचे अवशेष आढळून येतात. त्याच्या उत्खननात आढळून आलेल्या पूराव्यावरून तक्षशिला विद्यापीठाची भव्यता दिसून येते. त्याचबरोबर नालंदा येथे उभारलेल्या विश्वविद्यापिठात त्याकाळात देशविदेशातील जवळजवळ दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते व दोन ते अडीच हजार शिक्षक विद्यादानाच बहुमुल्य काम करत होते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी हजारो वर्षांपासून आपल्याला शिक्षणाच महत्त्व सांगत आहे. मुस्लिम आक्रमकांनी जेव्हा नालंदा विश्वविद्यापिठ जाळल तेंव्हा कित्येक महिने ते जळत होतं कित्येक ग्रंथाची नासधूस केली होती. याच्यावरून नालंदा विश्वविद्यापिठाची भव्यता दिसून येते.


सम्राट अशोकाच्या कालापासून म्हणजे इस पुर्व तीनशे या काळापासून अखंड दगडामध्ये लेण्या कोरण्याच काम सुरू झालं ते इस. एक हजार पर्यंत चालू होतं या कालावधीत अनेक शिल्पकलांचा विकास झाला व त्याचमाध्यमातून प्राचीन बौध्द संस्कृती,कला, सभ्यता, रहाणीमान, व्यापार तत्कालीन स्त्री वर्गाची समाजातील स्थान यांची माहिती मिळत असते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण. ही शिल्पकलेची भव्यता परदेशातील तसेच देशातील अनेकांना भूरळ घालणारी आहे. कारण या शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक आज भारतात येत असतात.


इतर धर्मातील प्रमुख हे स्वतःला देव किंवा प्रेषित समजतात. माणूस संकटात सापडल्यानंतर त्याला देवाकडे प्रार्थना करावी लागते. किंवा मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्तीसाठी धाव घ्यावी लागते पण बुद्धाने हे सर्व नाकारून मी मोक्षदाता नसून मी मार्गदाता आहे हे सांगितले. जे करायचे आहे ते तुम्हालाच करावे लागेल बुद्धाने मानवाच्या मनावर जास्त भर दिला असल्यामुळे स्वर्ग तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकता हे सांगितले कारण जे विचार तुम्ही करता तेव्हा तेच तुम्ही कृतीमध्ये उतरवत असता.


इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते एकदा एक शिल्पकार दगडामध्ये शिल्प घडवत असतो त्याचवेळी तिथे जवळ असलेल्या एका व्यक्तीने त्या शिल्पकाराला विचारले की तु ही कला कशी आत्मसात केली तेव्हा तो शिल्पकार उत्तर देतो की मी एक शिल्पकार आहे आणि जे शिल्प कोरणार आहे ते या दगडामध्येच आहे मी फक्त त्याच्या भोवती असणारा अनावश्यक भाग आहे तो मी काढणार आहे. बुध्द विचार हेच सांगतो की तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारा अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे तरच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल.














 हे स्तूप बरेचदा अशा प्रकारे डोंगरातच का असतात? याचा शोध घेतला असता पर्शियातील राजांच्या कबरी अशा प्रकारे दगडातच आहेत. त्याचप्रमाणे लिशियातही असेच दिसून येते.

लिशिया कबरी

पर्शिया कबरी

महत्त्वाचा प्रश्नः
केवळ बौद्ध स्तूपांबाबतीत असा पगडा आहे का? (यवन म्हणजे नक्की कोण होते?)


पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्रातील स्तूप हे बहुतांशी़ डोंगरात आहेत. त्यांना शैलगृह असेही म्हटले जाते. सांची, सारनाथ, अमरावती(आंध्र) इ. स्तूप हे जमिनीवर आहेत व बांधीव आहेत.
महाराष्ट्रात जमिनीहीवरही स्तूपांचे अवशेष सापडले आहेत. नालासोपारा येथे आजही विटांनी बांधलेल्या स्तूपाचे अवशेष आहेत. पैठण, तेर येथेही बांधीव स्तूप उत्खननात सापडले आहेत.
बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.

यवन म्हणजे ग्रीक. तिथल्या आयोनिया प्रांतातून ते आले. त्यांना आयोनियन म्हणायचे, पुढे त्याचे योनिय, योन, यवन अशी रूपे प्रचलित झाली. इथे स्थायिक झालेल्या यवनांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारल्याचे शिलालेखांमुळे दिसून येते.

पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.

असे मला वाटत नाही, असे मी सांगत आहे! मला (वर दिलेल्या उदाहरणांवरून असे) वाटते की हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते - ते लिशियातही तसेच होते आणि भारतातही तसेच आले. वरील शैलगृहाचे मुखदर्शन आणि लिशियातील त्या दगडी कबरीच्या मुखदर्शन यात खूप साम्य आहे असे मला वाटते. (हेच एका दुव्यातही दिसते आहे).

आपल्याकडे अमूक गोष्ट हे याचे प्रतिक आहे, तमूक त्याचे असे भरपूर सांगितले जाते. (तुम्हाला म्हणत नाही, पुस्तकांतूनही सांगितलेले दिसते). परंतु नीट पाहिल्यास हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते असे वाटते.
यावरून मी जालीय अर्धवट संशोधन केले आहे! त्यातून जे काही मिळाले ते लेखस्वरूपात इथे टाकते.

बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.
हेही तितकेसे खरे नाही. स्तूप हे बौद्ध अवशेषांवर केले आहेत. त्यांच्याबाजूचे विहार यासाठी नक्कीच आहेत (ध्यान, भिक्खूंची राहण्याची व्यवस्था), पण मूळ स्तूप म्हणजे अवशेषांवर तयार केलेले दगडांचे ढीग होते. ह्यांची काळजी घेण्यासाठी भिक्खूंना विहार केले होते, नंतर अर्थात ती तीर्थस्थाने झाली असावीत (जसे कार्ले).

स्तूपाचे अर्थ असे सर्व दिले आहेतः संदर्भः http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/cgi-bin/tamil/recherche

a knot or tuft of hair , the upper part of the head , crest , top , summit any relic-shrine or relic-casket (made of various materials , such as terra cotta , clay , elaborately formed brick or carved stone ; often very small and portable , and enclosing a fragment of bone or a hair of some saint or deceased relative , or inscribed with a sacred formula ; these are carried long distances and deposited in hallowed spots such as Buddha-Gaya1) ; any heap , pile , mound , tope. ; the main beam (of a house)

बाकी यवन म्हणजे आयोनिया प्रांतातील हे बरोबर, सध्याचे तुर्कस्तान, लिशिया आणि आयोनिया हे सर्व सारखेच. त्यावरूनही ही पिंपळपानाची रचना नसून यवनी शवपेटिकांवर आधारित रचना आहे असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...